09-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, हे अनादि पूर्वनियोजित नाटक आहे, हे खूपच चांगले बनलेले आहे, याच्या
भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्याला तुम्ही मुलं चांगल्या प्रकारे जाणतात.
प्रश्न:-
कोणत्या
आकर्षणाच्या आधारावर सर्व आत्मे तुमच्याकडे आकर्षित होऊन येतील?
उत्तर:-
पवित्रता आणि
योगाच्या आकर्षणाच्या आधारावर. याद्वारे च तुमची वृद्धी होत जाईल. पुढे चालून
बाबांना लगेच ओळखतील.ते पाहतील अनेक मनुष्य वारसा घेत आहेत तर वृध्दी होत
राहील.जेवढा उशीर होईल, तेवढे तुमच्या मध्ये आकर्षण वाढत जाईल.
ओम शांती।
आत्मिक मुलांना हे माहीत आहे की, आम्ही आत्मे परमधाम वरून येतो, हे बुद्धी मध्ये आहे
ना. जेव्हा सर्व आत्मे येतात बाकी थोडेच राहतात, तेव्हाच बाबा येतात. तुम्हा मुलांना
कोणालाही समजून सांगणे खूपच सहज आहे.दूर देशाचे राहणारे,सर्वात शेवटी येतात, बाकी
थोडेच राहतात. आजपर्यंत वृध्दी होत राहते ना. हे पण जाणतात बाबांना कोणी जाणत
नाहीत,तर रचना च्या आधी मध्य अंतला कसे जाणतील. हे बेहदचे नाटक आहे ना.तर नाटकाच्या
कलाकारांना माहिती व्हायला पाहिजे.जसे त्या नाटकांमधील कलाकारांना माहित असते,अमक्या
अमक्यां ना ही भूमिका मिळाली आहे. जी गोष्ट होऊन गेली त्याचेच परत नाटक
बनवतात.भविष्याचे तर बनवू शकत नाहीत. जे झाले त्याच्या गोष्टी बनवून नाटक तयार
करतात, ते सर्वांना दाखवतात.भविष्याला तर जाणत नाहीत.आत्ता तुम्ही समजता, बाबा आले
आहेत स्थापना होत आहे,आम्ही वारसा घेत आहोत.जे जे येतात,त्यांना आम्ही देवी-देवता
बनण्याचा रास्ता दाखवतो. हे देवता कसे बनले हे कुणालाच माहिती नाही. वास्तव
मध्ये,आदी सनातन देवी देवता धर्म आहे.आपल्या धर्माला विसरतात,त्यामुळे म्हणतात
आमच्यासाठी तर सर्व धर्म एकच आहेत.
आता तुम्ही मुलं जाणतात बाबा आम्हाला शिकवत आहेत.बाबाच्या श्रीमता नुसारच चित्र
बनवले जातात. काही जण तर परत आपल्या बुद्धी द्वारे पण बनवतात.मुलांना हे समजवले आहे
की, कलाकार आहेत परंतु निर्माता-दिग्दर्शक इत्यादी ला कोणी जाणत नाहीत. बाबा आता
नवीन धर्माची स्थापना करत आहेत.जुन्या पासून नवीन दुनिया बनवत आहेत. हे पण
बुद्धीमध्ये राहायला पाहिजे.जुन्या दुनिया मध्येच बाबा येऊन तुम्हाला ब्राह्मण
बनवतात. ब्राह्मणच परत देवता बनतात.युक्ती पहा खूपच चांगली आहे. जरी हे अनादी
पूर्वनियोजित नाटक आहे परंतु हे खूपच चांगल्या प्रकारे बनलेले आहे. बाबा म्हणतात मी
तुम्हाला रोज रहस्य युक्त गोष्टी ऐकवत राहतो.जेव्हा विनाश सुरू होईल तेव्हा मुलांना
भूतकाळातील सर्व इतिहास माहीत होईल. परत सतयुगा मध्ये जाल तर भुतकाळाचा इतिहास
काहीच आठवणीत राहणार नाही. प्रत्यक्षात कार्य करत राहतात.भुत काळाच्या गोष्टी कोणाला
ऐकवाल ? हे लक्ष्मी नारायण भुतकाळाला बिलकुल जाणत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये
भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सर्व आहे. विनाश कसा होईल, राजाई कशी स्थापन होईल,
महल कसे बनतील?बनतील तर जरूर ना. स्वर्गाचे दृश्य वेगळे आहेत.जशी जशी भूमिका करत
जाल, तसे तसे माहित होत जाईल. याला म्हटले जाते कारण नसताना खुन होणे. नुकसान होत
राहते,भूकंप होतो खूप नुकसान होते.बाँम्बस टाकतात, हे विनाकारणच आहे ना. कोणी काही
करतात थोडेच. विशाल बुद्धी जे आहेत, ते समजतात बरोबर विनाश झाला होता.जरुर मारामारी
झाली होती. असा खेळ पण बनवतात.हे तर समजू शकतात. कोणत्या वेळेत कुणाच्या बुद्धीमध्ये
येत जाते.तुम्ही तर प्रत्यक्षात आहात. तुम्ही त्या राजधानीचे मालक बनतात. तुम्ही
जाणतात त्या नविन दुनिया मध्ये जरूर जायचे आहे. ब्राह्मण जे बनतात, ब्रह्मा द्वारा
किंवा ब्रह्मा कुमार कुमारी द्वारा तर ते ज्ञान घेत राहतात,आणि स्वर्गा मध्ये येतात.
आपल्या ग्रहस्थ व्यवहारा मध्येच राहतात ना.अनेकांना तर ओळखू पण शकणार नाहीत.सेवा
केंद्रावरती अनेक जण येतात. इतके सर्व थोडेच आठवणी मध्ये राहू शकतात. अनेक ब्राह्मण
आहेत, वृध्दी होत होत अगणित होत जातील. बिनचुक हिशेब काढू शकत नाही.राजाला पण
बिनचूक माहिती होत नसते की, आमची प्रजा किती आहे. जरी लोकसंख्या इत्यादी
मोजतात,तरीही फरक तर पडतो ना. आता तुम्ही विद्यार्थी आहात, हा पण विद्यार्थी
आहे.सर्व आत्म्यांना एका बाबांची आठवण करायची आहे. लहान मुलांना पण शिकवले जाते,बाबा
बाबा म्हणा. तुम्ही जाणता पुढे चालून बाबांना लगेच ओळखतील.इतके सर्व वारसा घेत आहेत
तर,अनेक जण येतील. जेवढा उशीर होईल,तेवढे तुमच्या मध्ये आकर्षण वाढत जाईल. पवित्र
बनल्यामुळे आकर्षण होते.जितके योगामध्ये राहाल तेवढे आकर्षण होईल. दुसऱ्यांना पण
आकर्षित कराल. बाबा पण आकर्षित करतात ना. अनेक जण येत राहतील.त्यासाठी युक्ती पण
शोधली जाते.गितेचे भगवान कोण आहेत?कृष्णाची तर आठवण करणे खूपच सहज आहे.ते साकार रूप
आहे ना.निराकार बाबा म्हणतात, माझीच आठवण करा, या गोष्टीवर सर्व अवलंबून आहे,
म्हणून बाबांनी म्हटले होते, या गोष्टीवर सर्वांकडून लिहून घ्या.. मोठी मोठी
अभिप्रायची यादी बनवाल तर मनुष्याला माहिती पडेल.
तुम्ही ब्राह्मण जेव्हा पक्के निश्चय बुध्दी बनाल,तेव्हा झाडाची वृध्दी होत राहिल.
मायेचे वादळ अंतकाळा पर्यंत चालतील.विजय प्राप्त केला तर,न पुरुषार्थ राहिल,न माया
राहिल. बाबांची आठवण करण्या मध्ये अनेक जणांची हार होते. जितके तुम्ही योगा मध्ये
मजबूत राहाल तेवढा विजय मिळत जाईल. ही राजधानी स्थापन होत आहे. मुलांना निश्चय आहे
की आमची राजाई होईल परत हिरे जवाहर कुठून आणायचे. खाणी परत कोठून येतील. या सर्व
भरपुर होत्या ना. यामध्ये संभ्रमित होण्याची गोष्टच नाही.जे होणार आहे ते
प्रत्यक्षात पाहू. स्वर्ग तर जरूर बनणार आहे. जे चांगल्या रितीने ज्ञान योग करतात
त्यांना निश्चिय राहील,की आम्ही भविष्यात राजकुमार बनू.हिरे जवाहरां चे महल असतील.
हा निश्चय पण सेवाधारी मुलांना च असेल. जे कमी पद प्राप्त करणारे असतील, त्यांना असे
विचार कधीच येणार नाहीत की, आम्ही असे महल इत्यादी बनवू. जे खूप सेवा करतात,त्यांना
महल मिळतील. दास,दासी पण मिळतील. सेवाधारी मुलांनाच असे विचार येतील.मुलं पण समजतात,
कोण कोण चांगली सेवा करत आहेत.जे कमी शिकतात त्यांना वाटेल,आम्ही तर जे शिकले आहेत,
त्यांच्या कडे नोकरी करू. जसे हे बाबा आहेत,बाबांना विचार तर चालतात ना. वृध्द आणि
बालक समान झाले,म्हणून त्यांचे कार्य पण लहान मुलासारखे होते. बाबांचे एकच कार्य आहे,
मुलांना शिकवणे.विजयी माळेचा मणी बनण्यासाठी,पुरुषार्थ पण खूप पाहिजे. खूपच गोड
बनवायचे आहे. श्री मतावर चालाल तरच उच्चपद मिळेल.ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे
ना. बाबा म्हणतात मी जे ऐकवतोय, त्यावरती विचार करा. पुढे चालून तुम्हाला
साक्षात्कार होत राहतील.जसे जवळ जाल तर आठवण पण राहील. ५000 वर्ष झाले आपल्या
राजधानी मधून आलो होतो. ८४ जन्माचे चक्र लावून आलो. जसे वास्को-द-गामा साठी म्हणतात
विश्वाचे चक्र लावले. तो वास्को-द-गामा एक होता ना.हे पण एकच आहेत, जे तुम्हाला 84
जन्माचे रहस्य समजावून सांगतात.राजाई घराणे चालत येते. तर स्वतःला पाहयचे आहे,
माझ्या मध्ये कोणता देह अभिमान तर नाही ना.नाराज तर होत नाही ना. कुठे बिगडत तर नाही
ना. तुम्ही योग बळा मध्ये असाल, शिव बाबांची आठवण करत रहाल,तर तुम्हाला कोणीही चापट
इत्यादी मारू शकणार नाही.योगबळच ढाल आहे. कोणी काहीच करू शकत नाहीत. जर कोणाला मार
मिळतो तर जरूर देह अभिमान आहे. देही अभिमानी ला कोणी मारू शकत नाही. चूक आपलीच
असते.विवेक असा म्हणतो देही अभिमानीला कोणी काहीच करू शकत नाही, म्हणून प्रयत्न
करायचे आहे देही अभिमानी बनण्यासाठी.सर्वांना संदेश द्यायचा आहे.भगवानुवाच मनमनाभव.
कोणते भगवान हे पण तुम्हा मुलांना समजावयाचे आहे. बस याच एका गोष्टी मध्ये तुमचा
विजय आहे. साऱ्या दुनिया मध्ये मनुष्याच्या बुध्दी मध्ये कृष्ण भगवानुवाच आहे.
जेव्हा तुम्ही समजवतात, तर म्हणतात गोष्ट बरोबर आहे. परंतु जेव्हा तुमच्यासारखे
समजतील,तेव्हा म्हणू, बाबा जे शिकवतात ते ठीक आहे. कृष्ण थोडेच असे म्हणतील, मी असा
आहे, मला कोणी जाणू शकत नाही. कृष्णाला तर सर्व जाणतात.असे पण नाही श्रीकृष्णाच्या
तना द्वारे भगवान समजवतात,नाही. कृष्ण तर सतयुगा मध्ये असतात. तेथे भगवान कुठून
येतील. भगवान तर येतातच पुरुषोत्तम संगम युगामध्ये.तुम्ही मुलं अनेकां कडून लिहून
घ्या, तुमचे असे मोठे पुस्तक छापलेले पाहिजे, त्यामध्ये सर्वांचा अभिप्राय लिहायला
पाहिजे. जेव्हा पाहतील अनेकांनी लिहिले आहे, तर स्वतः पण लिहतील. तुमच्याजवळ
अनेकांचा अभिप्राय होईल.भगवान कोण आहे, वरती लिहा. उच्च ते उच्च शिव पिताच आहेत.
कृष्ण तर होऊ शकत नाही. ते म्हणू शकत नाही, तुम्ही माझीच आठवण करा. मुख्य गोष्ट हीच
आहे,ज्यामध्ये सर्वांच्या बुद्धीचे दिवाळे निघाल आहे. बाबा असे म्हणत नाही की इथेच
बसून रहा,नाही. सद्गगुरु ला आपले बनवले परत घरी जाऊन रहा. सुरुवातीला तर तुमची भट्टी
बनवायची होती. ग्रंथांमध्ये पण भट्टी ची गोष्ट आहे परंतु भट्टी कशाला म्हटले जाते,
हे कोणी जाणत नाहीत.भट्टी विटांची असते. त्यामध्ये पण काही पक्क्या निघतात,काही
खंजर निघतात. येथे पण पहा सोने नाही, बाकी दगड-मातीच आहे.जुन्या गोष्टीचे मुल्य
पुष्कळ आहे.शिव बाबांचा,देवतांचा पण मान आहे.सतयुगा मध्ये तर मानाची गोष्टच नाही.
तेथे थोडेच जुन्या गोष्टी शोधत राहतील.तेथे पोट भरलेले असते, शोधण्याची आवश्यकता
नाही. तुम्हाला खोदायची आवश्यकता पडत नाही,द्वापर च्या नंतर खोदकाम सुरू
करतात.इमारत बनवतात तर, त्यामधून काही निघून येते, ते,समजतात खाली काही असेल.सतयुगा
मध्ये तुम्हाला कोणतीच काळजी नसेल.तेथे तर खुप सोने असते. विटा पण सोन्याच्या असतात.
कल्पा पूर्वी जे झाले आहे, जे नोंद आहे त्याचा साक्षात्कार होत राहतो.आत्म्यांना
बोलावले जाते,ही पण अविनाश नाटकामध्ये नोंद आहे,यामध्ये संभ्रमित होण्याची आवश्यकता
नाही.सेकंद बाय सेकंद भूमिका चालत राहते, परत गायब होते. हे शिक्षण आहे,भक्तिमार्ग
मध्ये तर अनेक चित्र आहेत.तुमचे हे सर्व चित्र अर्थसहित आहेत,कोणतेही चित्र बिगर
अर्थाचे नाही. जोपर्यंत तुम्ही कोणाला समजावून सांगत नाहीत, तोपर्यंत कोणीही समजू
शकत नाहीत. समजून सांगणारे, ज्ञानवान, समजदार एक बाबाच आहेत.आता तुम्हाला ईश्वरीय
मत मिळत आहे. ईश्वरीय घराण्याचे किंवा कुळाचे तुम्ही आहात.ईश्वर येऊन घरांना स्थापन
करतात. आता तुम्हाला राजाई नाही.राजधानी होते,आता नाही. देवी-देवतांचा धर्म पण जरूर
आहे. सूर्यवंशी चंद्रवंशी राजाई आहे ना. गीताद्वारे ब्राह्मण कुळ पण बनते आणि
सूर्यवंशी चंद्रवंशी कुळ पण बनते. बाकी दुसरे कोणी होऊ शकत नाही. तुम्हा मुलांनी
सृष्टीच्या आदी मध्य अंतला जाणले आहे.यापूर्वी तर समजत होते, मोठा प्रलय होतो.नंतर
दाखवतात सागरा मध्ये पिंपळाच्या पानावर कृष्ण येतात. प्रथम नंबर मध्ये तर
श्रीकृष्णच येतात. बाकी सागराची गोष्ट नाही. आता तुम्हा मुलांना चांगली समज आली
आहे.खुशी पण त्यांनाच होईल,जे आत्मिक शिक्षण चांगल्या रीतीने शिकत आहेत.जे चांगल्या
रीतीने शिक्षण घेतात तेच चांगल्या मार्काने पास होतात. जर कोणाशी मन लागले असेल तर,
अभ्यासाच्या वेळी त्यांची आठवण येत राहील, तेथे चालले जातील. बुद्धी तेथे चालले
जाईल, म्हणून शिक्षण, ब्रह्मचार्य मध्येच घेतात. येथे तुम्हा मुलांना समजवले जाते,
एका बाबा शिवाय दुसरीकडे कुठे बुद्धी जायला नकोय.बाबा जाणतात अनेकांना जुन्या
दुनियची आठवण येते. येथे बसून पण ऐकत नाहीत. भक्ती मार्गामध्ये पण असे
होते.सत्संगामध्ये बसल्या नंतर बुद्धी कुठे कुठे जात राहते. ही तर खूप मोठी परीक्षा
आहे. काही तर जसे बसून पण ऐकत नाहीत. काही मुलांना तर खूप खुशी होते. मुरली मध्ये
आनंदात डोलतात. बुद्धी बाबांच्या सोबत असेल तर, परत अंत मती सो गती होईल, यासाठी
खूप चांगला पुरुषार्थ करायचा आहे. येथे तर तुम्हाला खूप धन मिळत आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती,मात पिताव बाप दादांची प्रेम पूर्ण
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) विजय
माळेचा मणी बनण्यासाठी खूप चांगला पुरुषार्थ करायचा आहे. खूप गोड बनायचे आहे.
श्रीमता वरती चालायचे आहे.
(२) योगच सुरक्षेसाठी ढाल आहे, यामुळे योगबळ जमा करायचे आहे. देही अभिमानी बनण्या
साठी पूर्ण प्रयत्न करायचे आहेत.
वरदान:-
प्रत्यक्ष
संकल्प बोल आणि कर्माला फळदायक बनवणारे आत्मिक प्रभावशाली भव :-
जेव्हा कोणाच्या
संपर्कामध्ये येतात, तर त्यांच्या प्रती मनाची भावना स्नेह,सहयोग कल्याणाची भावना,
प्रभावशाली हवी.प्रत्येक बोल हिम्मत उल्हास देणारे प्रभावशाली हवेत. साधारण
गोष्टींमध्ये वेळ जायला नको. तसेच प्रत्येक कर्म फलदायक व्हावे. पाहिजे तर
स्वता:च्या प्रती किंवा दुसऱ्यांच्या प्रति. आपसा मध्ये पण प्रत्येक रुपामध्ये
प्रभावशाली बना. सेवांमध्ये आत्मिक प्रभावशाली बना. तर बाबांना प्रत्यक्ष करण्याच्या
निमित्त बनू शकाल.
बोधवाक्य:-
असे शुभचिंतक
मणी बना,ज्यामुळे तुमची किरणे विश्वाला प्रकाशित करतील.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
मनाची
एकाग्रताच एकरस स्थितीचा अनुभव करवेल. एकाग्रता च्या शक्तीद्वारे अव्यक्त फरिश्ता
स्थितीचा सहज अनुभव करू शकाल.एकाग्रता म्हणजे,मनाला,जिथे पाहिजे,जसे पाहिजे, जेवढा
वेळ पाहिजे,तेवढा वेळ एकाग्र करु शकाल.मन वश मध्ये राहावे.