27-03-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, शिवबाबा आता तुमची पालना करत आहेत, शिकवत आहेत, घर बसल्या श्रेष्ठ मत देत
आहेत. तर पावला-पावलांवर बाबांकडून श्रीमत घेत राहा तर तेव्हाच उंच पदाची प्राप्ती
होईल...!!
प्रश्न:-
सजापासून सुटका
मिळविण्यासाठी कोणता पुरुषार्थ खूप काळापासून पाहिजे?
उत्तर:-
नष्टोमोहा बनण्याचा पुरुषार्थ, कुणात ही मोह ममत्व नको, आपण आपल्या अंत:मनाला
विचारले पाहिजे की-आपला कुणात मोह तर नाही! कोणतेही जुने संबंध अंत वेळेत आठवायला
नको. योगबळाने सर्व हिसाब-किताब चुक्तू करायचे आहेत. तेव्हाच सजा न खाता श्रेष्ठ पद
मिळेल.
ओम शांती।
आता तुम्ही कुणाच्या समोर बसलेले आहात? बापदादांच्या बाप पण म्हणावे लागेल अन दादा
ही. शिवबाबा पण या ब्रह्मा (दादा) च्या द्वारा तुमच्या समोर बसलेले आहेत. तुम्ही
बाहेर राहता तेव्हा तुम्हाला बाबांची आठवण करावी लागते. पत्र लिहावे लागते. येथे
तुम्ही समोर आहात. संभाषण करत आहात. कुणा बरोबर तर बापदादां बरोबर. शिवबाबा आणि
ब्रह्मा बाबा हे दोघेही सर्वोच्च ॲथॉरिटी (सत्ता/अधिकारी) आहेत. ब्रह्मा बाबा साकारी
आणि शिवबाबा निराकारी आहेत. आता तुम्ही हे जाणता की या सर्वोच्च शक्ती म्हणजेच
शिवबाबांना कसे भेटता येते. बेहदचे पिता शिवबाबा ज्यांना आपण पतित पावन म्हणून
बोलावतो, त्यांच्या आपण आता प्रत्यक्ष समोर आहोत. शिवबाबा आपण सर्व मुलांची पालना
करत आहेत. आपणास शिकवत आहेत. घरबसल्या मुलांना मत देतात की घरात राहूनही कसा
पुरुषार्थ करायचा? आता आपण बाबांच्या श्रीमतावर चाललो तर श्रेष्ठ पद मिळवू शकतो.
मुले जाणतात हे की आपण उंच ते उंच शिवबाबांच्या श्रीमतावर चाललो तर उंच ते उंच पद
प्राप्त करतो. मनुष्य सृष्टीमध्ये सर्वांत श्रेष्ठ पद आहे. श्री लक्ष्मी श्री
नारायणाचे ते भुतकाळात होऊन गेले आहेत. मनुष्य मंदीरात जाऊन या श्रेष्ठ देवी
देवतांना नयन करतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे पवित्रता, ते ही मनुष्य आणि हे
ही मनुष्यच, परंतू कुठे ते विश्वाचे मालक लक्ष्मी-नारायण आणि कुठे हे आजचे पतित
मनुष्य बरोबर 5 हजार वर्षापुर्वी भारत स्वर्ग होता. आपण संपूर्ण विश्वाचे मालक होतो,
हे ज्ञान इतर कुणाच्याही बुध्दीत नाही. ब्रह्मा लाही हे ज्ञान नव्हते. बिल्कुल
अज्ञानाच्या अंधकारात होते. आज शिवबाबांनी येऊन सांगितले की ब्रह्माच विष्णू आणि
विष्णूच ब्रह्मा कसे बनतात. हे खुप गुह्य आणि रमणीय ज्ञान आहे जे इतर कुणीही समजू
शकत नाही. शिवबाबा सोडून हे ज्ञान कुणीच सांगू शकत नाही. निराकार परमात्मा येऊन हे
ज्ञान आपणास सांगतात. कृष्ण भगवानुवाच नाहीये. बाबा म्हणतात मी तुम्हाला हे ज्ञान
सांगू सुखी बनवतो. आणि हे माझ्या निर्वाण धामाला निघून जातो. आता तुम्ही मुले
सतोप्रधान बनत आहात. आणि यात काही खर्च पण होत नाही. फक्त स्वत:ला आत्मा समजून
शिवबाबांची आठवण करायची आहे. एक पै न खर्च करता तुम्ही विश्वाचे मालक बनता, तुम्ही
मधुबनला जे थोडे फार धन देता, ते ही तुमचे स्वत:चे भविष्य श्रेष्ठ बनवण्यासाठी,
कल्पापुर्वी या ज्ञान यज्ञात ज्याने आपले जितके धन सफल केले, तितकेच आता ही करतील
न, त्यापेक्षा जास्त ना कमी हे ज्ञान बुध्दीमध्ये असल्याने काळजी व चिंता करण्याची
गरज नाही. एकदम निश्चित आणि चिंता मुक्त होऊन आपण आपल्यासाठी गुप्त रितीने राजधानी
बनवत आहोत. यासर्व गोष्टीचे बुध्दीमध्ये नेहमी स्मरण करत राहा. तुम्ही मुलांनी सदैव
आनंदी राहिले पाहिजे आणि सोबतच नष्टोमोहा पण बनले पाहिजे. येथे आत्मा नष्टोमोहा
बनल्याने तुम्ही भविष्यात मोहजीत राजा-राणी बनाल. तुम्ही जाणता की या पुराण्या
कलियुगी सृष्टीचा आता विनाश होणार आहे. आपणस परत जायचे आहे, मग ममत्व कशासाठी
ठेवायचे? कुणी आजारी असेल आणि डॉक्टरांनी आपणास सांगितले की यांची जगण्याची शाश्वती
नाही तर आपला मोह कमी होऊन आपण मानसिक तयारी करतो. आपणास ज्ञान आहे की ही आत्मा एक
शरीर सोडून दुसरे धारण करते, आत्मा तर अविनाशी आहे ना! आत्मा निघून गेली, शरीर ही
नष्ट झाले मग त्याची आठवण करण्यात कुठला फायदा वा शहाणपण! आता शिवबाबा सांगतात की
तुम्ही नष्टोमोहा बना. आपण आपल्या अंर्त मनाला विचारले पाहिजे की. आपला कुणात मोह
तर नाही ना! नाही तर ज्यांच्यात मोह आहे ते अंत: समयी जरुर आठवतील, नष्टोमोहा बनाल
तर मोठे पद मिळवाल. स्वर्गात तर सर्वच येतील. ही काही फार मोठी गोष्ट नाही.
महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठलीही सजा न खाता श्रेष्ठ पद मिळविणे होय, योगबळाने
हिसाब-किताब चुक्तू कराल तर यमयातना भोगाव्या लागणार नाही. जुने संबंधी ही आठवायला
नको. आता तर आपल्या ब्राह्मणांशी नाते आहे आणि भविष्यात देवतांशी नाते असेल. आताचे
नाते सगळ्यात श्रेष्ठ नाते आहे. आता तुम्ही ज्ञानसागर शिवबाबचे बनले आहात. संपूर्ण
ज्ञान बुध्द मध्ये आहे. या आधी आपण हे थोडेच जाणत होतो की सृष्टी चक्र कसे फिरते
ते. आता शिवबाबंनी आपणास हे सांगितले आहे. शिवबाबांकडून आपणस इतका श्रेष्ठ वारसा
मिळतो, प्राप्ती होते. म्हणून तर आपण बाबांवर इतके प्रेम करतो. बाबांकडून आपणसं
स्वर्गाचे राज्यपद मिळते. बाबांचा हा रथ ठरलेला आहे. भारतातच भागीरथाचे गायन आहे.
बाबा भारतातच देतात. तुम्हा मुलांच्या बुध्दीत आता 84 जन्मांचे चक्र आपणास पूर्ण
करायचेच आहे. 84 च्या चक्रामधून आपण सुटू शकत नाही. तुम्ही जाणता की शिडी उतरायला
खूप वेळ (5 हजार वर्ष) लागतो. परंतू या एकाच संगमयुगी जन्मात आपण ही शिडी चढले.
म्हणूनच म्हटले जाते. तुम्ही त्रिलोकीनाथ, त्रिकालदर्शी बनता, आपण त्रिलोकीनाथ
बनणार आहोत. हे तुम्हाला आधी माहित नव्हते, आता बाबा भेटले, आणि ज्ञान सांगत आहेत,
तेव्हा कुठे आपण हे जाणले. बाबांना भेटायला कुणी आले तर बाबा त्यांना विचारतात. या
आधी याच वेषामध्ये याचे घरामध्ये कधी भेटलोय? तर उत्तर देतात की, हा बाबा कल्प कल्प
भेटलो आहोत. तर बाबांना समजते की-ब्रह्माकुमारींनी व्यवस्थित समजावून सांगितले आहे.
आता तुम्ही स्वर्गाचे दृश्य समोर पाहत आहात. जवळ आहात ना. मनुष्य ईश्वर विषयी
म्हणतात की, तो नाव रुपापासून वेगळा आहे. असे असेल तर मुले कुठून येतील. मुले ही मग
नाव रुपापासून वेगळे होतील. हे जे म्हटले जाते. ते एकदम चुकीचे आहे. ज्यांनी
कल्पापुर्वी हे ज्ञान घेतले आहे, त्यांच्यात बुध्दीत हे बसेल, प्रदर्शनीमध्ये
भिन्न-भिन्न प्रकारचे लोक येतात. काही जण फक्त ऐकीव माहितीवर म्हणतात वा लिहीतात की
हे ज्ञान सर्व कल्पना आहे. तर मग आपण जाणले पाहिजे की, हा दैवी कुळातील नाहीये.
अनेक प्रकारचे मनुष्य असतात. तुमच्या बुध्दीत आता संपूर्ण कल्पवृक्ष, ड्रामा आणि 84
जन्माचे चक्र आहे. आता तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे. पुरुषार्थ पण ड्रामानुसारच
होतो. ड्रामामध्ये सर्व नोंदलेले आहे. परंतू असे ही नाही की ड्रामामध्ये पुरुषार्थ
करण्याची नोंद असेल, तर पुरुषार्थ करु, असे समजणे पुर्णत: चुकीचे आहे. याचा अर्थ
ड्रामाचे यथार्थ ज्ञान आकलन झालेले नाहीये. त्यांना नास्तीक म्हटले जाते, ते
बाबांवर प्रेम करु शकत नाही. ड्रामाचे रहस्य वा ज्ञान उल्टे समजून घेतल्याने अशा
आत्म्यांचे पतन होते. त्यांच्या भाग्यात नाही हेच त्याचे उत्तर, विघ्न तर अनेक
प्रकारचे येतील. परंतू त्यांना घाबरायचे नाही, बाबा म्हणतात जे तुम्हाला चांगल्या
गोष्टी वा ज्ञान सांगतात त्यांचे ऐका, बाबांची आठवण केली तर खूप आनंदात राहाल,
बुध्दीत सदैव हे ठेवले पाहिजे की, 84 जन्मांचे चक्र पुर्ण झाले आहे. आता परमधामला
परत जायचे आहे. असे स्वत:शीच आत्मिक संवाद करायचा आहे. पतित आत्मा तर परत जाऊ शकत
नाही. प्रथम जरुर शिवसाजन पाहिजे, त्यांच्या मागून मग वरात ग्रंथामधून शिवाच्या
वरातीचे गायन आहे. सर्वांना नंबरवार जायचे आहे. इतक्या आत्म्यांची झुंड कशा प्रकारे
नंबरवार जात असतील? मनुष्याला पृथ्वीवर राहण्यासाठी किती मोठी जागा लागते, किती
फर्निचर संपत्ती इ. पाहिजे. आत्मा तर सुक्ष्म बिंदू रुप आहे, आत्म्याला काय पाहिजे.
काहीच नाही. आत्म्याला किती छोटी जागा पाहिजे. हे साकारी झाडे आणि निराकारी झाड या
दोन्हींमध्ये किती फरक आहे. ते आहे केवळ चमकणाऱ्या बिंदीचे झाड, यासर्व गोष्टी बाबा
बुध्दीत ठसवतात. तुमच्या शिवाय या गोष्टी जगात इतर कुणीही ऐकू शकत नाही. बाबा आपणास
आपले घर आणि सतयुगी राजधानीचे स्मरण करुन देतात. तुम्ही मुले आता रचताला जाणल्यामुळे
सृष्टीचे आदि-मध्य-अंताला ही जाणता. तुम्ही आता त्रिकालदर्शी आणि खऱ्या अर्थाने
आस्तिक झाले आहात. संपूर्ण जगात खऱ्या अर्थाने कुणीही आस्तिक नाही. ते शिक्षण हदचे
आहेत. हे आहे बेहद (बेअंत) चे ज्ञान. तिथे शिकविणारे अनेक शिक्षक असतात. येथे एकच
शिक्षक आहे. आणि हा शिक्षक खुप वंडरफुल आहे, तो आपला पिता आहे, शिक्षक ही आहे, अन
गुरु ही आहे हा तर विश्व शिक्षक आहे, परंतू हे ज्ञान सर्वच जण घेणार नाहीत. बाबांना
सर्वांनी ओळखले तर सर्वच जण इकडे पळत येतील. बापदादांना पाहण्या भेटण्यासाठी
ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर ब्रह्मा बाबांमध्ये परमात्म शिव आलेले आहेत. हे समजले तर
सर्वजण येथे येतील. लढाई सुरु झाल्यानंतरच शिवबाबा प्रत्यक्ष होतील. त्यानंतर कुणी
येऊ ही शकणार नाहीत. तुम्ही जाणता की आता सर्व विश्वाचा विनाश होणार आहे. सर्वांत
आधी एक भारतच होता, इतर कोणतेही खंड नव्हते, आता तुमच्या बुध्दीत भक्ती मार्गाचेही
ज्ञान आहे. बुध्दीतील गोष्टी कुणी विसरतो थोडेच परंतू स्मरणात असूनही हे ज्ञान आहे
की आता भक्ती मार्ग पूर्ण झाला आहे. आता परत परमधामला जायचे आहे. आता या दुनियेत
राहायचे नाहीये. घरी परत जाण्याचा आनंद तर असतोच ना. तुम्हा मुलांना बाबांनी
सांगितले आहे की आता तुमची वानप्रस्थ अवस्था आहे, तुम्ही दोन पैसे ही सतयुगी राजधानी
स्थापन करण्याच्या कार्यात लावता, ते ही अगदी कल्पापूर्वी प्रमाणे, तुम्ही हुबेहुब
कल्पापुर्वीचेच आहात, आणि तुम्हीही म्हणता की बाबा तुम्हीही कल्पापुर्वीचेच आहात.
आपण कल्प-कल्प बाबांकडून ज्ञान घेतो, श्रीमतावर चालून श्रेष्ठ बनायचे आहे. या गोष्टी
इतर कुणाच्याही बुध्दीत नाहीत. तुम्हाला हा आनंद आहे की, आपण आपली राजधानी
श्रीमतानुसार स्थापन करत आहात. बाबा फक्त म्हणतात की, पवित्र बना. तुम्ही पवित्र
बनाल तर सगळी दुनिया पवित्र बनेल. सर्वजण परत आपल्या शांतीधामाला परत जातील. बाकी
इतर गोष्टींची आपण का चिंता करायची. कोण कशा सजा भोगतील. कसे होईल यात आपले काय जाते.
आपण आपली चिंता करावी इतर धर्मांच्या भानगडीत आपण का जायचे. आपण आदि सनातन देवी
देवता धर्माचे आहेत. वास्तविक याचे देशाचे नाव भारत आहे, नंतर हिंदुस्तान नाव ठेवले
गेले. हिंदु काही धर्म नाहीये. आम्ही असे लिहिले की आम्ही देवता धर्मांचे आहोत तरीही
ते हिंदु म्हणनूच लिहितात कारण ते हे जाणतच नाहीत की देवी देवता धर्म कधी होता.
कुणालाही हे माहित नाही. आता इतके बी.के. आहेत तर हे एक कुटूंब झाले ना. घर झाले
ना, ब्रह्मा तर प्रजापिता आहेत, सर्वांचे ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर, प्रथमत: तुम्ही
ब्राह्मण बनता आणि नंतर वर्णामध्ये येता. तुमचे हे कॉलेज वा युनिर्वसिटी पण आहे. आणि
हॉस्पीटल पण आहे. शास्त्रांमधून गायन आहे-ज्ञान अंजन सदगुरु दिया, अज्ञान अंधेर
विनाश—अर्थात सदगुरुनी ज्ञानरुपी अंजन डोळ्यात घातले आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला.
योगबळाने तुम्ही सदैव धनवान आणि सदैव निरोगी बनतो. निसर्गोप्चार करतात ना आता तुमची
आत्मा निरोगी अर्थात विकाररहित बनल्याने शरीर पण निरोगी बनेल. हा आहे आध्यात्मिक वा
आत्मिक निसर्गोपचार, आरोग्य, धन संपक्ष आणि आनंदी जीवन 21 जन्मांसाठी मिळते.
सेंटरच्या बाहेर नांव लिहा. अध्यात्मिक निसर्गोपचार केंद्र. मनुष्य आत्म्यांना
पवित्र बनविण्यासाठी, वेगवेगळ्या युक्ती लिहिण्यास काहीच हरकत नाही. आत्माच पतित
बनली आहे, म्हणून तर सर्वजण ईश्वराला पुकारतात ना. आत्मा सुरुवातीला सतोप्रधान
पवित्र होती नंतर अपवित्र बनली, आता ती पुन्हा पवित्र कशी बनेल? भगवानुवाच-मनमनाभव
अर्थात मनबुध्दीने माझी आठवण करा तर मी खात्रीने सांगतो की तुम्ही पवित्र बनाल, बाबा
आपणांस किती युक्ती सांगतात की, असे असे बोर्ड लावा. परंतू अद्याप कुणीही असे बोर्ड
लावले नाहीत. मुख्य चित्र सदैव जवळ पाहिजे. सेंटरमध्ये कुणीही आले तर तुम्ही त्यांना
सांगा की-तुम्ही आत्मा परमधामचे राहणारे आहात. येथे आत्म्याला पार्ट बजावण्यासाठी
कर्मेंद्रीय मिळाली आहेत, हे शरीर तर विनाशी आहे बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश
होतील. आता तुमची आत्मा अपवित्र आहे, पवित्र बनले तर घरी निघून जाल. समजावणे तर फार
सोपे आहे. जो कल्पपुर्ती कला असेल तोच येऊन फुल बनेल. यामध्ये शिष्टचे काही कारण
नाही. तुम्ही तर चांगली गोष्ट लिहत आहोत. ते गुरु लोक पण मंत्र देत आहात ना. बाबा
पण मनमनाभवचा मंत्र देत आहेत ना. बाबा पण मनमनाभवचा मंत्र देऊन मग रचयिता आणि रचनेचे
रहस्य समजावत आहेत. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून फक्त बाबाची आठवण करा. दुसऱ्यांना
पण परिचय दया, दिपस्तंभ पण बना. तुम्हा मुलांना आत्मअभिमानी बनण्याची फार गुप्त
मेहनत करावयाची आहे. जसे बाबा जाणतात की मी आत्म्यांना शिकवित आहे, तशी तुम्ही मुले
पण आत्मअभिमानी बनण्याची मेहनत करा. मुखाद्वारे शिव शिव पण म्हणायचे नाही. स्वत:ला
आत्मा समजून बाबाची आठवण करावयाची आहे, कारण डोक्यावर पापांचे ओझे फार आहे.
आठवणीनेच तुम्ही पावन बनाल. कल्पापुर्वी प्रमाणे जसा जसा ज्यांनी वारसा घेतला होता,
तेच आप आपल्या वेळेवर घेतील. आदला बदल काही पण होत नाही. मुख्य गोष्ट आहे.
आत्मअभिमानी बनून बाबांची आठवण करणे तर मग मायेची चापट खाणार नाही. देह अभिमानात
आल्याने काही ना काही विकर्म होत, मग शंभर गुणा बनते. शिडी उतरण्यासाठी 84 जन्म
लागले आहेत. आता मग चढती कला एकाच जन्मात होत आहे. बाबा आले आहेत तर लिफ्टचा पण शोध
लागला आहे. पुर्वी तर कमरेवर हाथ देऊन शिडी चढत होता. आता सोपी लिफ्ट निघाली आहे.
ही पण लिफ्ट आहे जी मुक्ती आणि जीवन मुक्ती मध्ये एका सेकंदात जात आहात. जीवन
बंधामध्ये येण्यासाठी 5 हजार वर्ष, 84 जनम लागत आहेत. जीवनमुक्तीमध्ये जाण्यासाठी
एक जन्म लागत आहे. किती सोपे आहे. तुमच्यामध्ये पण जे शेवटी येतील ते पण झटक्यात
चढतील. समजतात की हरवलेली वस्तू बाबा देण्यासाठी आले आहेत. त्यांच्या मतावर जरुर
चालू. अच्छा, गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची
प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. विना चिंता
आपली गुप्त राजधानी श्रीमतांवर स्थापन करावयाची आहे. विघ्नांची काळजी करावयाची नाही,
बुध्दीमध्ये ठेवा की, कल्पापुर्वी प्रमाणे ज्यांनी मदत केली होती, ते आता पण आवश्य
करतील, चिंता करण्याची गोष्ट नाही.
2. नेहमी खुशी ठेवा
की, आता आमची वानप्रस्थ अवस्था आहे, आम्ही परत घरी जात आहे. आत्मअभिमानी बनण्याची
फार गुप्त मेहनत करावयाची आहे. कोणते पण विकर्म करु नका.
वरदान:-
स्नेह आणि
सहयोगाच्या विधीद्वारे यज्ञ सहयोगी बनणारे सहज योगी भव
बापदादाला मुलांचा
स्नेहच पसंद आहे, जे यज्ञ स्नेही आणि सहयोगी बनत आहात, ते सहजयोगी स्वत:च बनतात.
सहयोग सहजयोग आहे. दिलवाले बाबांना ह्दयापासूनचा प्रेम स्नेह आणि ह्दयापासूनचा
सहयोगच प्रिय आहे. लहान मनाचे लहान सौदी करुन खुश होतात आणि मोठ्या मनाचे पोहचयाची
महिमा आहे. तसे जरी कोणी कितीही दिले, परंतू स्नेह नसेल तर जमा होत नाही. स्नेहानी
थोडे पण जमा केले तर ते पद्म होऊन जाते.
बोधवाक्य:-
वेळ आणि शक्ती
व्यर्थ जावू नये, त्यासाठी अगोदर विचार करा मग करा.