05-01-2020    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   30.03.1985   ओम शान्ति   मधुबन


तीन तीन गोष्टी चा पाठ पक्का करा.


आज बाप दादा आपल्या नेहमीच्या सोबती मुलांना भेटण्यासाठी आले आहेत.मुलंच बाबांचे नेहमीचे सोबती,सहयोगी आहेत कारण अति स्नेही आहेत.जिथे स्नेह असतो त्यांच्यासाठीच नेहमी सहयोगी सोबती बनतात.तल स्नेही मुलं असल्यामुळे बाबा मुलांच्या शिवाय कोणते कार्य करू शकत नाहीत आणि मुलं बाबांच्या शिवाय कोणते कार्य करू शकत नाहीत, म्हणून स्थापना च्या सुरुवातीपासून बाबांनी ब्रह्माच्या सोबत ब्राह्मण रचले,एकटे ब्रह्म नाही.ब्रह्माच्या सोबत ब्राह्मण मुलांना पण रचले कारण मुलं सहयोगी साथी आहेत,म्हणून जेव्हा बाबांची जयंती साजरी करतात तर सोबत काय करतात शिवजयंती म्हणजेच ब्रह्माची जयंती म्हणजेच ब्राह्मणांची जयंती पण साजरी करतात.तर त्यासोबत बापदादा आणि मुलं सर्वांची आदी रचना झाले आणि सुरुवाती पासुनच बाबांचे सहयोगी सोबती बनले.तर बाबा आपल्या सहयोगी सोबती मुलांना भेटत आहेत.सोबती अर्थात प्रत्येक पावला मध्ये,प्रत्येक संकल्प मध्ये बोल मध्ये सोबत निभावणारे.अनुकरण करणे म्हणजे सोबत निभावणे.असेच प्रत्येक पाऊला मध्ये सोबत निभवणारे म्हणजेच अनुकरण करणारेखरे सोबती आहेत,अविनाशी सोबती आहेत.जे खरे सोबती आहेत,त्यांचे प्रत्येक पाऊल स्वत:च बाप समान चालत राहते.इकडे-तिकडे कोठेही पडू शकत नाही.खऱ्या सोबतीला कष्ट करावे लागत नाहीत.हे कर्म असे करायचे की कसे,यामध्ये संशय न घेता, स्वतः बाबांच्या पाऊलावर पाऊल ठेवत,जरा पण इकडे तिकडे कुठेही पाऊल पडू शकत नाहीत.अशा खऱ्या मुलांच्या मनामध्ये,बुद्धीमध्ये काय सामावलेले आहे? मी बाबांचा,बाबा माझे.बुद्धीमध्ये आहे जो बाबांचा बेहदचा खजाना आहे,तो माझा आहे.मनामध्ये दिलाराम आणि दिल दुसरे काही राहू शकत नाही.तर जेव्हा बाबाच आठवणी मध्ये सामावलेले आहेत,तर जशी स्म्रुर्ती तशी स्थिती आणि तसेच कर्म स्वतः होतात.जसे भक्तिमार्ग मध्ये फक्त निश्चय दाखवण्यासाठी हेच म्हणतात की आमच्या मनामध्ये कोण आहेत.तुम्ही म्हणत नाही परंतु स्वतः तुमच्या मनामध्ये दिलारामचा सर्वांना अनुभव होतो अर्थात दिसून येतो. तर खरे सोबती,प्रत्येक पाऊला मध्ये मास्टर सर्वशक्तिमान आहेत.

आज बापदादा मुलांचे अभिनंदन करण्यासाठी आले आहेत.सर्व सहयोगी सोबती मुलं आपापल्या उमंग उत्साहा मध्ये आठवणी मध्ये,सेवे मध्ये पुढे जात आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच द्दृढ संकल्प आहे,विजयाचा झेंडा फडकवायचा आहे. संपूर्ण विश्वामध्ये एका आत्मिक पित्याच्या प्रत्यक्षतेचा झेंडा फडकाणरच आहे.ज्या ऊंच झेंड्याच्या खाली सर्व विश्वातील आत्मे एकच गीत गातिल,की माझे बाबा माझे पिता आले आहेत.जसे आत्ता तुम्ही लोक झेंडा फडकवतात,तर सर्व झेंड्या खाली गीत गातात आणि परत काय होते,झेंडा फडकवल्या मुळे सर्वांच्या वरती फुलांची वर्ष होते.असेच सर्वांच्या मनामधून हे गीत स्वतःच निघेल,सर्वांचे पिता एकच आहेत,एकच सद्गगती दाता आहेत.असे गीत गायल्या नंतर अविनाश सुख शांतीचा वारसा,फुलांचा पाऊस पडल्या समान अनुभव करतील.बाबा म्हटले आणि वारशाचा अनुभव केला.तर सर्वांच्या मनामध्ये हा एकच उमंग उत्साह आहे म्हणून बापदादा मुलांच्या उमंग उत्साहाला पाहुन मुलांचे अभिनंदन करतात.निरोप तर देणार नाहीत.संगम युगाची प्रत्येक वेळ अभिनंदन करण्याची वेळ आहे.तर मनाच्या लगण वरती,सेवाच्या लगन मुळे,बापदादा सर्व मुलांचे अभिनंदन करत आहेत. सेवेमध्ये नेहमी पुढे जाण्याचा सर्वांचा उमंग आहे.असे कोणी नसेल,ज्याला सेवेमध्ये पुढे जाण्यासाठी उमंग नसेल.जर नसेल तर ते,येथे आलेच नसते.ही पण उमंगाची लक्षणे आहेत.उमंग उत्साह आहे आणि नेहमीच राहील.त्या सोबतच उमंग उत्साहा मध्ये पुढे जात,सेवांमध्ये निर्विघ्न आहात?उमंग उत्साह खूपच चांगला आहे परंतु निर्विघ्न सेवा आणि र्विघ्न पार करत,करत सेवा करणे यामध्ये अंतर आहे. निर्विघ्न अर्थात न कोणासाठी विघ्न रुप बनतात न कोणत्या विघ्नाच्या स्वरूपाला घाबरतात. ही विशेषता उमंग उत्साहाच्या सोबत,सोबत अनुभव करता का?की विघ्न येतातच.एक आहे विघ्न शिकवण्या साठी येणे आणि दुसरे आहे घाबरवण्या साठी येणे.जर यापासून धडा शिकले तर,विघ्न लगन मध्ये परिवर्तीत होतात.जर विघ्नाला घाबरतात तर रजिस्टर मध्ये डाग पडतो.तर फर्क झाला ना.

ब्राह्मण बनणे म्हणजे मायेला आव्हान करणे,की विघ्न खुशाल येवोत.आम्ही विजयी आहोत,तुम्ही काहीच करू शकत नाहीत.प्रथम मायेचे मित्र होते.आता आव्हान करता की आम्ही,मायेजीत बनू. आव्हान करता ना.नाहीतर विजय कोणा वरती मिळवणार? स्वतःवरती? विजय रत्न बनतात तर विजय मायेवरतीच मिळवणार ना? विजय माळे मध्ये गुंफले जातात,तर पुजन पण होते.तर मायाजीत बनणे म्हणजेच विजय बनणे आहे.ब्राह्मण बनणे म्हणजेच मायेला आव्हान करणे.आव्हान करणारे खेळ करत राहतात.आले आणि गेले. दूरुनच जाणतात आणि पळवुन लावतात.वेळ वाया घालवत नाहीत.सेवे मध्ये तर,सर्व खूप चांगले आहेत.सेवेच्या सोबतच निर्विघ्न सेवा पण हवी.जसे पवित्रतचे सुरुवातीपासून रेकॉर्ड,नोंद ठेवतात ना.असे कोण आहे जे संकल्पा मध्ये पण सुरुवाती पासून आता पर्यंत,संकल्पा मध्ये पण अपवित्र बनले नाहीत.तर ही विशेषता पाहता ना.फक्त एका पवित्रतेच्या गोष्टीमुळे चांगल्या मार्काने पास होणार नाहीत परंतु सेवेमध्ये,स्वस्थिती मध्ये,संपर्क संबंधांमध्ये,आठवणी मध्ये सर्वां मध्ये,जे सुरुवाती पासून आत्ता पर्यंत अचल आहेत,हालचाल मध्ये येत नाहीत, विघ्नाच्या वशीभूत झाले नाहीत.ऐकवले होते ना,विघ्नाच्या वश व्हायचे नाही,न स्वतः कुणाच्या पुढे विघ्नरुप बनायचे.याचे पण गुण जमा होतात.एक पवित्रता दुसरी अव्यभिचारी आठवण.आठवणीमध्ये जर पण विज्ञान नको या रीतीने सेवे मध्ये नेहमी निर्विघ्न,आणि गुणांमध्ये पण नेहमी संतोष आणि संतोष करणारे आहात.संतुष्टतेचा गुण सर्व गुणांच्या धारणेचा आरसा आहे, तर गुणांमध्ये संतुष्टता स्वतःप्रती आणि दुसऱ्याकडून ते प्रमाणपत्र घ्यायचे आहे.हे लक्षणं चांगल्या मार्काने पास होणाऱ्यांचे लक्षणे,अष्ट रत्नांची लक्षणे आहेत.सर्वां मध्ये नंबर घेणारे आहात ना,की फक्त एकामध्ये ठीक आहेत.सेवांमध्ये चांगला आहे,बाप दादा तर अभिनंदन देतच आहेत. अष्ट रत्न बनायचे आहे की ईष्ट बनायचे आहे.अष्ट बनले तर ईष्ट पण इतकेच महान बनतील.त्याच्यासाठी तीन गोष्टी संपूर्ण वर्षभर आठवणीत ठेवा आणि तपासून पहा.या तीन गोष्टींमध्ये,जर आपण संकल्प मात्र राहिलो,तरी त्याला निरोप द्या.आज निरोप देण्याचा दिवस आहे,जेव्हा सुट्टी देतात,तर निरोप देताना काय करतात,खडीसाखर, बदाम,इलायची देतात ना.त्यामध्ये तीन गोष्टी असतात,तर बाप दादा पण तीन गोष्टी भेट देतील ना.निरोप नाही देत तर अभिनंदन करतात,तेव्हा तर मुख गोड करतात ना.तर जसे येथे तीन गोष्टी कशासाठी देतात?परत लवकर येण्याची आठवण राहावी म्हणून देतात. बापदादा पण आज तीनगोष्टी सांगत आहेत,जे सेवे मध्ये कधी कधी विज्ञान रूप पण बनतात.तर तीन गोष्टीवरती विशेष लक्ष बापदादा देत आहेत,ज्या लक्ष दिल्यामुळे स्वतः पण चांगल्या मार्काने पास बनालच.

एक गोष्ट:-कोणत्याही प्रकारचा हदचा लगाव,आकर्षण नको.बाबांचे आकर्षण वेगळी गोष्ट आहे परंतु हदचा लगाव नको. दुसरे:-कोणत्याही प्रकारचा स्वतःचा,स्वताःशी किंवा दुसऱ्यांशी तनाव म्हणजेच ओढातान नको.लगाव नको. मायेशी युद्धाच्या ऐवजी आपसा मध्ये आओढातान नको.तिसरा:-कोणत्याही प्रकारचा कमजोर स्वभाव असायला नको. लगाव, तनाव आणि कमजोर स्वभाव. वास्तव मध्ये स्वभाव शब्द फारच चांगला आहे.स्व ला श्रेष्ठ म्हटले जाते.श्रेष्ठ भाव आहे,स्व चा भाव आहे,आत्माभिमान आहे. परंतु भाव स्वभाव,भाव स्वभाव हा शब्द खूप बोलत राहतात ना.तर हा कमजोर स्वभाव आहे. जो वेळे प्रमाण,उडती कलेमध्ये विघ्नरुप बनतो,ज्याला तुम्ही लोक रॉयल रूपांमध्ये म्हणतात,माझा स्वभाव असा आहे.स्वभाव श्रेष्ठ आहे तर बाप समान आहात.विघ्न रूप बनतात,तर कमजोर स्वभाव आहे.तर तीन शब्दांचा अर्थ जाणतात ना.अनेक प्रकारचे तणाव आहेत आणि तनावाचे कारण आहे मी पणा.मी हे केले,मी हे करू शकतो,मीच करेल.हे जो मी पणा आहे,हा तणाव उत्पन्न करतो.मी हा देहअभिमानाचा आहे.एक आहे, मी श्रेष्ठ आत्मा आहे.एक आहे,मी अमका आहे,मी समजदार आहे,मी योग्य आहे, मी ज्ञानी आहे.माझा सेवेमध्ये नंबर पुढे आहे.याच गोष्टी मुळे तणाव उत्पन्न होतो,या कारणामुळे सेवेमध्ये कुठेकुठे जी तीव्र गती पाहिजे, तशी प्रगती होण्याच्या ऐवजी गती कमी होते.चालत राहतात परंतु प्रगती होऊ शकत नाही.तीव्र करण्याचा आधार आहे,दुसऱ्यांना पुढे जाताना पाहून त्यांना पुढे करणे म्हणजे, स्वतःला पण पुढे करणे आहे.समजतात ना, सेवेमध्ये मी पणा कोणता,कोणता येतो?हा मी पणाच तिव्र गतीला समाप्त करतो.समजले.

या तीन गोष्टी कष्ट कराल तर बाबा सोबत घेऊन जातील,यालाच म्हटले जाते त्यागा द्वारे मिळालेले भाग्य.नेहमी प्रसाद वाटून खा आणि पुढे जात रहा.हे त्यागाचे भाग्य मिळाले आहे.परंतू या भाग्याला सिमीत ठेवाल तर पुढे जाऊ शकत नाही.नेहमी त्यागाच्या भाग्याचे फळ दुसऱ्यांना पण सहयोगी बनवून पुढे जात रहा,फक्त मी मी करू नका,दुसऱ्यांना पण प्रसाद द्या.कोणतेही कार्य वाटून एक-दोघांनी सहयोग करून पुढे जात राहा. आता सेवेमध्ये हे वातवरण पण दिसून यायला पाहिजे.तर यामध्ये उदार मनाचे बना. याला म्हटले जाते जे करतील ते अर्जुन.एक दोघांना पाहू नका,हे पण असेच करतात ना.हे तर होतेच परंतु मी विशेषता दाखवण्याच्या निमित्त बणुन जाऊ.ब्रह्मा बाबांची विशेषता काय राहिली,नेहमी मुलांना पुढे केले.माझी मुलं हुशार आहेत, मुलं करतील,त्यागाच्या भाग्याचा पण त्याग केला.जर कोणी प्रेमामुळे,प्राप्ती मुळे ब्रह्माची महिमा करत होते,तरीपण त्यांना शिव बाबांची आठवण देत होते.ब्रह्मापासून वारसा मिळणार नाही,ब्रह्माचा फोटो पण ठेवायचा नाही.ब्रह्माला सर्वकाही समजायचे नाही.तर याला म्हटले जाते त्यागाच्या भाग्याचा त्याग करून सेवेमध्ये लागून जाणे.यामध्ये डबल महादानी होतात.दुसरे बोलवतील,स्वतः आपल्याकडे आकर्षित करू नका.जर स्वतः स्वतःची महिमा करतात,आपल्याकडे आकर्षित करतात तर त्यांना कोणते शब्द म्हणतात.मुरली मध्ये ऐकले आहेत ना,असे बनवायचे नाही. कोणतीही गोष्ट स्वता कडे आकर्षित करण्याची ओढाताण करू नका.सहज मिळाले तर ते श्रेष्ठ भाग्य आहे,ओढवून घेणाऱ्याला श्रेष्ठ भाग्य म्हणत नाहीत. त्यामध्ये सफलता मिळत नाही.कष्ट ज्यादा सफलता कमी कारण सर्वांचे आशीर्वाद मिळत नाहीत.सहज मिळते त्यामध्ये सर्वांचे आशीर्वाद आहेत. समजले. तनाव काय आहे,लगाव काय आहे,त्या दिवशी स्पष्ट केले होते.कोणताही कमजोर स्वभाव नको.असे पण समजू नका,मी या देशाचा राहणारा आहे,म्हणून माझा स्वभाव माझी चलन,माझे राहणीमान असे आहे. नाही.देशा मुळे,धर्मा मुळे,संगतीमुळे माझा स्वभाव असा आहे,असे पण नाही.तुम्ही कोणत्या देशाचे राहणारे आहात,हे तर सेवा करण्यासाठी निमित्त स्थान मिळाले आहे. न कोणी परदेशी आहे,असा पण नशा नको की आम्ही भारतवाशी आहोत.सर्व एकाच पित्याचे आहात.भारतवासी पण ब्राह्मणच आहेत,परदेशामध्ये राहणारे पण ब्राह्मणच आहेत,आंतर नाही.असे नाही भारतवासी असे आहेत,परदेशी असे आहेत.असे शब्द पण कधीच बोलू नका,सर्व ब्राह्मण आत्मेच आहेत.हे तर सेवा करण्यासाठी स्थान मिळाले आहे,तुम्ही विदेशामध्ये का पोहोचले आहात, ऐकवले होते ना.तेथे का जन्म घेतला,भारतामध्ये का घेतला नाही? तेथे गेले आहात,सेवा केंद्र उघडण्या साठी. नाही तर,भारत वासीयांना व्हीसा घेण्यासाठी खूप प्रश्न येतात.तुम्ही सर्व तर सहजच राहिलेले आहात.अनेक देशांमध्ये सेवा होत आहे.तर सेवा करण्यासाठी परदेशात गेलेले आहात बाकी तुम्ही सर्व ब्राह्मण आत्मा आहात म्हणून कोणत्याही आधाराला स्वभाव बनवायचा नाही.जो बाबांचा स्वभाव तोच मुलांचा स्वभाव. बाबांचा स्वभाव कोणता आहे?नेहमी प्रत्येक आत्म्या बद्दल कल्याणाची भावना,दयेच्या भावनेचा स्वभाव. प्रत्येकाला श्रेष्ठ बनवण्याचा स्वभाव,मधुरतेचा स्वभाव,निर्माणता चा स्वभाव.माझा स्वभाव असा आहे,असे कधीच बोलू नका,माझा आला कोठून? माझा जोरात बोलण्याचा स्वभाव आहे, माझा रागावून बोलण्याचा स्वभाव आहे. स्वभावामुळे असे होते,हीच माया आहे. अनेकांचा अभिमानचा स्वभाव असतो.ईर्षा चा स्वभाव असतो,रागवण्याचा स्वभाव पण असतो,दिलशिकस्त होण्याचा स्वभाव असतो.चांगले असतानी पण स्वतःला चांगले समजत नाहीत,नेहमी स्वतःला कमजोर समजतील, शमी पुढे जाऊ शकत नाही,करू शकत नाही.असा दिलशिकस्त स्वभाव पण चुकीचा आहे.अभिमान मध्ये येऊ नका परंतु समान मध्ये रहा,तर याच प्रकारच्या स्वभावाला म्हटले जाते कमजोर स्वभाव.तर तीन गोष्टीचे लक्ष संपूर्ण वर्ष ठेवा.या तीन गोष्टींमध्ये सुरक्षित राहयचे आहे,काहीच अवघड नाही.सोबती तर सुरुवाती पासून अंत काळापर्यंत सहयोगी आहात.सोबती तर समान पाहिजेत ना.जर सोबत्या मध्ये समानता नसेल,तर प्रेमाची रिती नीभावू शकत नाहीत.आजच्या या तीन गोष्टींना लक्षात ठेवा.परंतु या तीन गोष्टींना,नेहमी किनाऱ्या करण्यासाठी आणखी तीन गोष्टी आठवणीत ठेवायच्या आहेत.आज तीन गोष्टीचा पाठ शिकवत आहे.नेहमी आपल्या जीवनामध्ये संतुलन ठेवायचे आहे.सर्व गोष्टींमध्ये संतुलन हवे. आठवण आणि सेवेमध्ये संतुलन.स्वमान अभिमान ला समाप्त करतो.स्वमान मध्ये स्थिर राहायचे आहे.या सर्व गोष्टी स्मृतीमध्ये राहायला हव्यात.जास्त रमणीक पण नाही आणि जास्त गंभीर पण नाही,संतुलन हवे. वेळे नुसार रमणीक,वेळेनुसार गंभीर.तर एक आहे संतुलन,दुसरे नेहमी अमृतवेळेला बाबांकडून आशिर्वाद घ्यायचे आहेत.रोज अमृतवेळेला बाबांकडुन आशिर्वाद घ्यायचे आहेत.रोज अमृतवेळेला मुलांसाठी आशीर्वादाची झोळी उघडून ठेवतात. त्याद्वारे पाहिजे तेवढा आशीर्वाद घेऊ शकतात.तर,आशीर्वाद,संतुलन आणि आशिर्वाद युक्त जीवन.तीन्ही गोष्टी लक्षात राहिल्या मुळे,ज्या तीन गोष्टी मध्ये लक्ष द्यायच्या आहेत,त्या स्वतः समाप्त होतील, समजले.अच्छा आणखी तीन गोष्टी ऐका.

लक्ष रूपामध्ये किंवा धारणेच्या रूपांमध्ये विशेष तीन गोष्टी ध्याना मध्ये ठेवायचे आहेत.त्या सोडायचे आहेत आणि या धारण करायचे आहेत.सोडणार्‍या गोष्टींना तर नेहमीसाठी सोडुन द्या,त्यांना आठवण करण्याची जरूरत नाही परंतु या तीन गोष्टी ऐकल्या या आठवणीत ठेवायच्या आणि धारणा स्वरूपामध्ये विशेष आठवण ठेवा.एक- सर्व गोष्टींमध्ये सत्यता हवी,भेसळ नको.याला म्हटले जाते सत्यता. संकल्पा मध्ये,बोल मध्ये,सर्व गोष्टींमध्ये सत्यता.खऱ्या ह्रदया वरती साहेब राजी होतात.सत्यतेची लक्षणे काय असतील?सत्य असेल तर तुम्ही आनंदी राहू शकता.जे खरे असतील ते नेहमी खुशी मध्ये नाचत राहतात.तर एक सत्यता,दुसरे श्रेष्ठत्व.छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कधीच बुद्धी जायला नको.जसे चांगली मुलं आहेत,त्यांची छोट्या छोट्या गोष्टीवरती नजर,दृष्टी जात नाही,जर गेली तर त्यांना श्रेष्ठ म्हणणार नाहीत.कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बुद्धी जात असेल,तर त्याला श्रेष्ठ म्हटले जात नाही.जे श्रेष्ठ असतात ते नेहमीसाठी प्राप्ती स्वरूप असतात.त्यांचे डोळे किंवा बुध्दी कोणत्या गोष्टी मध्ये जात नाही.तर ही आत्मिक श्रेष्ठत्व आहे.कपडे चांगले असावेत,तसे नाही.तर सत्यता श्रेष्ठत्व आणि एकमत. प्रत्येक गोष्टीमध्ये, संकल्प मध्ये, बोलमध्ये, कर्मामध्ये,नेहमी एकमत दिसून यायला हवे. ब्राह्मण म्हणजे एक,लाख नाही एक,याला म्हटले जाते एकमत.तेथे अनेक स्थितीमुळे एक पण अनेक होतात आणि येथे अनेक असून पण एक होतात,त्याला म्हटले जाते एकमत.दुसऱ्यांना पाहिचे नाही,आमची इच्छा आहे,एक मत करायचे परंतु ते करत नाहीत.जर तुम्ही करत रहाल तर त्यांना अनेक मतं विभिन्नता,करण्यास संधीच मिळणार नाही.कोणी हात असे करतात, दुसऱ्यांनी केला नाही,तर आवाज होणार नाही.जर कोणी मतभिन्नतेचे कार्य करत ही असेल तरी,तुम्ही एक मतांमध्ये रहा,तर मतभिन्नता असणारे कधीच अनेक मतभिन्नतेचे कार्य करू शकणार नाहीत. एकता मध्ये यावेच लागेल,म्हणून तीन गोष्टी सत्यता श्रेष्ठता आणि एकमत.या तिन्ही गोष्टी नेहमी बाप समान बनण्यामध्ये सहयोगी बनतील.समजले,आज तीन चा पाठ शिकवला आहे ना.बाबांना तर तुला प्रती अभिमान आहे.इतकी योग्य मुलं आणि योगी मुलं कोणाचे ही होऊ शकत नाहीत.योग्य पण आहात,योगी पण आहात आणि एकेक पद्मापदम भाग्यवान आहात. साऱ्या कल्पा मध्ये इतकी आणि अशी मुलं कोणाची होऊ शकत नाहीत,म्हणून विशेष अमृतवेळ बापदादांनी ब्राह्मण मुलांसाठी का ठेवली आहे?कारण बापदादा प्रत्येक मुलांच्या विशेषतेला, सेवेला,गुणांना, नेहमी समोर ठेवतात.प्रत्येक मुलांची जी विशेषता आहे,गुण आहेत, सेवा आहे,त्याला विशेष वरदान द्वारे अविनाशी बनवतात म्हणून खास ही वेळ मुलांकरता ठेवली आहे. अमृतवेळेची विशेष पालना आहे. प्रत्येकाला बाप दादा स्नेहाच्या सहयोगा ची,प्रयोगाचे वरदानाची पालना देतात. समजले,बाबा काय करतात आणि तुम्ही लोक काय करतात?शिवबाबा सुखदाता आहेत,शांती दाता आहेत,असे म्हणतात ना,आणि बाबा पालना देतात.जसे आई वडिल मुलांना सकाळी तयार करून, स्वच्छ करून,परत म्हणतात सर्व दिवस खा प्या आणि शिका.बापदादा पण अमृत वेळेला ही पालना देतात,म्हणजे संपूर्ण दिवसा साठी शक्ती भारतात.विशेष पालनेची ही वेळ आहे.हे जास्त वरदान मिळण्या साठी आणि पालनाची वेळ आहे. अमृतवेळेला वरदानाने झोळी भरते. जितके जे वरदान घेऊ शकतात,खऱ्या मना द्वारे,स्वार्था द्वारे नाही.जेव्हा स्वार्थअसेल तेव्हा म्हणतात,आम्हाला हे द्या,स्वार्थामुळे मागतात,तर बाप दादा काय करतात? त्यांचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी तेवढी शक्ती देतात,स्वार्थ संपला आणि समाप्त. तरी मुलंच आहेत,ना तर म्हणणार नाहीत. परंतु नेहमीच वरदाना द्वारे पालना होत राहणे,चालत राहणे,प्रगती करत राहणे त्यासाठी जितका अमृतवेळेला शक्तीशाली बनवाल,तेवढा सर्व दिवस सहज जाईल, समजले.

नेहमी स्वतःला चांगल्या मार्काने पास होण्याचे लक्ष आणि लक्षणांमध्ये चालणारे,नेहमी स्वतःला ब्रह्मा बाप समान त्यागाचे भाग्य वाटणारे,नंबर वन त्यागी श्रेष्ठ भाग्य बनवणारे,नेहमी सहज प्राप्तीचे अधिकारी बणुन स्वतःची प्रगती आणि सेवेची प्रगती करणारे,नेहमी प्रत्येक पाऊला मध्ये सहयोगी, सोबती बणुन पुढे जाणारे,स्मृति, स्थिती शक्तिशाली बणवुन नेहमी बाबांचे अनुकरण करणारे,असे सदा सहयोगी सोबती,आदेशाचे पालन करणारे, आज्ञाकारी, संतुष्ठ राहणारे,सर्वांना खूष करण्याच्या रहस्याला जाणनारे,अशा श्रेष्ठ आत्म्यांना,महान पुण्य आत्म्यांना,डबल महादानी मुलांना,बाप दादाची प्रेमपुर्ण आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
मनसा बंधनापासून मुक्त, अतिईद्रींय सुखाची अनुभुती करणारे मुक्तिदाता भव :-

अतिईद्रींय सुखामध्ये राहणे हेच संगमयुगी ब्राह्मणांची विशेषत आहे,परंतु मनाच्या संकल्पाचे बंधन,खुशी किंवा अतिइद्रींय सुखाचा अनुभव करू देत नाहीत. व्यर्थ संकल्प,ईर्षा,अलबेलापण किंवा आळसा च्या विचाराच्या बंधनां मध्ये बांधले जाणे हे मन्साचे बंधन आहेत.अशी आत्मा अभिमानाच्या वश दुसऱ्यांचे दोषा बद्दल विचार करत राहते.त्यांची जाणीव करण्याची शक्ती नष्ट होते, म्हणून या सूक्ष्म बंधनापासून मुक्त बना,तेव्हाच मुक्तिदाता बनू शकाल.

सुविचार:-
अशा खुशीच्या खाणी द्वारे संपन्न राहा,जे तुमच्याजवळ दुःखाची लहर पण येऊ शकणार नाही.
 


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
तुमच्यासमोर कोणी कितीही व्यर्थ बोलले परंतु तुम्ही व्यर्थ समर्थ मध्ये परिवर्तन करा.व्यर्थ ला आपल्या बुद्धीमध्ये स्वीकार करू नका. जर एक पण बोल स्वीकार केला, तर तो एक व्यर्थ अनेक व्यर्थला जन्म देईल.आपल्या मुखा वरती पुर्णपणे लक्ष द्या, "कमीत कमी बोला, हळू बोला आणि गोड बोला"तर अव्यक्त स्थिती सहज बनून जाईल.