14-03-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्ही फार भाग्यशाली आहात कारण तुम्हाला बाबाच्या आठवणी शिवाय कोणतीच
काळजी नाही,या बाबांना तर खूपच विचार चालत राहतात"
प्रश्न:-
बाबांच्या जवळ
सुपात्र मुलं आहेत त्यांची लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
सर्वांचा बुद्धीयोग बाबांशी जोडत राहतील,सेवाधारी असतील.चांगल्या रीतीने शिकून
दुसऱ्यांना पण शिकवतील.बाबाच्या हृदयासिन असतील.असे सुपात्र मुलंच बाबाचे नाव
प्रसिद्ध करतात.जे चांगल्या प्रकारे शिकत नाहीत ते दुसऱ्यांना पण खराब करतात,ही पण
नाटकांमध्ये नोंद आहे.
गीत:-
आशीर्वाद घ्या
मात पित्याचे तर ओझे उतरेल पापाचे…
ओम शांती।
प्रत्येक घरामध्ये मात-पिता आणि दोन चार मुलं असतात,परत आशीर्वाद मागतात.त्या तर
हदच्या गोष्टी आहेत.हे हदच्या गोष्टीसाठी गायन आहे. बेहदचे तर कोणालाच माहिती
नाही.आता तुम्ही मुलं जाणता आम्ही बेहदच्या बाबा ची मुलं आणि मुली आहोत.ते हदचे
माता-पिता असतात,आशीर्वाद घ्या हदच्या मात पित्याकडून असे म्हणतात.हे बेहदचे मात
पिता आहेत.ते हदचे मात पिता तर मुलांची सांभाळ करतात,परत शिक्षक शिकवतात.आता तुम्ही
मुलं जाणतात,हे बेहदचे मातपिता,हे बेहदचे शिक्षक,बेहद चे सद्गुरू,सर्वोच्च
पिता,शिक्षक,सर्वोच्च गुरू आहेत.सत्य बोलणारे,सत्य शिकवणारे आहेत.मुलां मध्ये पण
नंबरा नुसार असतात ना.लौकिक घरांमध्ये दोन-चार मुलं असतात तर त्यांची किती सांभाळ
करावी लागते. येथे तर अनेक मुलं आहेत,अनेक सेवा केंद्राच्या मुलांचे समाचार येतात,
हा मुलगा असा आहे,शैतानी करतो,हा तंग करतो,विघ्न घालतो.या पित्याला तर काळजी राहते
ना.प्रजापिता तर हे आहेत ना.अनेक मुलांची काळजी राहते,म्हणुन तुम्ही बाबांच्या
चांगल्या प्रकारे आठवणी मध्ये राहू शकतात.यांना तर खूप काळजी आहे.एक काळजी तर
आहेच.दूसरे हजारो विचार राहतात.अनेक मुलांची सांभाळ करावी लागते.माया पण मोठी
दुश्मन आहे ना,चांगल्या प्रकारे कोणा कोणाची चमडी उतरवत राहते.कोणाला नाकाला,कोणाला
शेंडीला पकडते.या सर्वांचा विचार करावा लागतो ना.तरीही बेहदच्या पित्याच्या आठवणी
मध्ये राहावे लागेल.तुम्ही बेहदच्या पित्याची मुलं आहात,तर बाबाच्या श्रीमता वरती
चालून का नाही बाबाकडून पूर्ण वारसा घ्यायचा?सर्व एकरस तर चालू शकत नाहीत,कारण हे
राज्य स्थापन होत आहे.दुसर्या कोणाच्या बुद्धीमध्ये येऊ शकत नाही.हा खूपच श्रेष्ठ
अभ्यास आहे.बादशाही मिळाली परत माहिती होत नाही,ही राजाई कशी स्थापन झाली.या
राज्याची स्थापना होणे खूपच आश्चर्यकारक आहे.आता तुम्ही अनुभवी आहात,अगोदर यांना
थोडेच माहिती होते,आम्ही काय होतो,परत कसे ८४जन्म घेतले.आता समजले आहे,तुम्ही पण
म्हणता,बाबा तुम्ही तेच आहात,या खूप समजण्याच्या गोष्टी आहेत.या वेळेतच बाबा येऊन
सर्व गोष्टी समजवतात.यावेळेस जरी कोणी कितीही लखपती,करोडपती असतील,बाबा म्हणतात हे
पैसे इत्यादी सर्व मातीमध्ये मिळणार आहेत,बाकी थोडा वेळ आहे.दुनियाचे समाचार रेडिओ
किंवा पेपर द्वारे ऐकतात, वाचतात,काय काय होत आहे.दिवसें दिवस खूपच भांडणे वाढत जात
आहेत.सर्व गोंधळून गेले आहेत.सर्व आपसा मध्ये भांडत राहतात,मरत राहतात.तयारी
अशाप्रकारे होत आहे, यामुळे समजले जाते आता लढाई सुरू झाली कि झाली.दुनिया हे जाणत
नाही,हे काय होत आहे,काय होणार आहे.तुमच्यामध्ये पण खूप थोडे आहेत,जे चांगल्या
प्रकारे समजतात आणि आनंदा मध्ये राहतात.या दुनिया मध्ये बाकी थोडे दिवस आहेत.आता
आम्हाला कर्मातीत अवस्थांमध्ये जायचे आहे.प्रत्येकाला स्वतःसाठी पुरुषार्थ करायचा
आहे.तुम्हीपण पुरुषार्थ स्वतःसाठी करतात,जितके जे करतील तेवढे फळ मिळेल.स्वतःचा
पुरुषार्थ करायचा आहे आणि दुसऱ्याकडून पण करून घ्यायचा आहे.हा रस्ता दाखवायचा आहे.ही
जुनी दुनिया खलास होणार आहे.आता बाबा आले आहेत,नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी,तर या
विनाशाच्या अगोदर तुम्ही नवीन दुनिये साठी राजयोगाचा अभ्यास शिकून घ्या.भगवानवुवाच
मी तुम्हाला राजयोग शिकवत व्हेज केलते आहे.लाडक्या मुलांनो तुम्ही खूप भक्ती केली
आहे. अर्धा कल्प तुम्ही रावण राज्यामध्ये होते ना.हे पण कोणालाच माहिती नाही की,राम
कोणाला म्हटले जाते, राम राज्याची कशी स्थापना झाली.हे सर्व तुम्ही ब्राह्मण च
जाणतात. तुमच्या मध्ये पण काही असे आहेत,जे काहीच जाणत नाहीत.
बाबांच्या जवळ सुपात्र मुलं आहेत, ते सर्वांचा बुद्धी योग बाबांशी जोडतात.जे
सेवाधारी आहेत,चांगल्या रीतीने अभ्यास करतात,ते बाबांच्या हृदयासिन आहेत.काही तर
परत लायक पण नाहीत.सेवेच्या ऐवजी विघ्न घालतात,जे सर्वांचा बुद्धीयोग नष्ट करतात.हे
पण नाटकांमध्ये नोंद आहे, नाटका नुसार हे होणारच आहे.जे चांगल्या प्रकारे अभ्यास
करत नाहीत,ते काय करतील,ते दुसऱ्यांना पण खराब करतील,म्हणून मुलांना समजवले
जाते,बाबांचे अनुकरण करा आणि जे पण सेवाधारी मुलं आहेत,जे बाबांच्या ह्रदया वरती
चढलेले आहेत,त्यांचा संग करा.तुम्ही विचारू शकता कोणाच संग करायचा?बाबा लगेच
सांगतील,यांचा संग फार चांगला आहे.अनेक आहेत जे असा संग करतात,त्यांचा रंग पण उलटा
चढतो.गायन पण आहे संग किनार्याला लावतो,कुसंग बुडवतो.कुसंग केला तर एकदम नष्ट
होतात.घरामध्ये दास दासी पण पाहिजेत ना.प्रजाचे नोकर चाकर सर्व पाहिजेत ना.ही सर्व
राजधानी स्थापन होत आहे,यामध्ये विशाल बुद्धी पाहिजे म्हणून बेहदचे बाबा मिळाले
आहेत,तर त्यांची श्रीमत घेऊन चालायला पाहिजे.नाहीतर मोफत आपले पद भ्रष्ट होईल.हे
शिक्षण आहे,यामध्ये आत्ता नापास झाले तर जन्मानंतर कल्प कल्पांतर नापास होत
राहाल.चांगल्या रीतीने अभ्यास कराल तर कल्प कल्पांतर चांगल्या प्रकारे शिक्षण घेत
राहाल.असे समजले जाते,हे चांगल्या प्रकारे शिकत नाहीत तर,कोणते पद मिळेल?स्वतः पण
समजतात आम्ही सेवा तर काहीच करत नाही,आमच्या पेक्षा हुशार तर खूप आहेत.हुशार भावा
बहिणीला भाषणाला बोलवतात,तर जरूर जे हुशार आहेत त्यांचे पद पण श्रेष्ठ होईल.आम्ही
इतकी सेवा करत नाही,तर उच्च पद मिळू शकत नाही.शिक्षक तर विद्यार्थ्याला समजतात.हे
रोज अभ्यास करतात की नाही,शिक्षका जवळ रजिस्टर तर राहते ना.अभ्यासा सोबत चलन चे पण
रजिस्टर राहते.येथे पण असेच आहे, यामध्ये मुख्य गोष्ट योगाची आहे.योग चांगला आहे तर
चलन पण चांगलीच राहील.कधी कधी शिक्षणाचा पण अहंकार येतो.आठवण करण्यासाठी गुप्त कष्ट
करायचे आहेत म्हणून अनेकांचा समाचार येतो की बाबा आम्ही योगा मध्ये राहू शकत नाही.
बाबांनी समजावले आहे योग अक्षर काढून टाका.बाबा ज्यांच्याद्वारे वारसा मिळतो,त्यांची
तुम्ही आठवण करू शकत नाही.हे तर आश्चर्य आहे.बाबा म्हणतात हे आत्म्यांनो,तुम्ही मज
पित्याची आठवण करत नाही,मी तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी आलो आहे.तुम्ही माझी आठवण
करा तर, या योग अग्नी द्वारे पाप नष्ट होतील.भक्ती मार्गामध्ये मनुष्य खूप धक्का
खातात कुंभमेळ्या मध्ये खूप थंड पाण्याने स्नान करतात,अनेक कष्ट सहन करतात.येथे तर
कोणतेच कष्ट नाहीत.जे हुशार मुलं आहेत,साजनची खरे खरे सजनी बणुन राहतात,फिरण्या साठी
जातात तर एकांत मध्ये बागेमध्ये जाऊन बसतात.इकडच्या तिकडच्या गोष्टी किंवा फालतू
गोष्टी,बोल चाल मध्ये राहिल्या मुळे वातावरण खराब होते, म्हणून जितका वेळ मिळेल
बाबाची आठवण करण्याची सवय लावा. अभ्यास करा,चांगल्या खऱ्या साजन चे सजनी बना.बाबा
म्हणतात देह धारीचा चा फोटो पण ठेवू नका,फक्त बाबाचा फोटो ठेवा,ज्यांची आठवण करायची
आहे.जर समजा सृष्टी चक्राची पण आठवण करत राहिले,तर त्रिमूर्ती आणि गोळ्या चे चित्र
पण चांगले आहे,यामध्ये सर्व ज्ञान आहे.स्वदर्शन चक्रधारी तुमचे नाव अर्थ सहित
आहे.नवीन कोणी ऐकले तर समजू शकणार नाहीत.हे तुम्ही मुलं समजतात,तुमच्यामध्ये पण कोणी
चांगल्या रीतीने आठवण करतात.अनेक जण आहेत जे काहीच आठवण करत नाहीत,आपलं पद खराब
करतात.हे शिक्षण तर खूपच सहज आहे.बाबा म्हणतात शांती द्वारे तुम्ही विज्ञानावर विजय
मिळवायचा आहे.सायलेन्स (शांती) आणि सायन्स (विज्ञान )एकच राशी आहे.मिलिटरी मध्ये पण
तीन मिनिट सायलेन्स करतात.मनुष्याची पण इच्छा असते,आम्हाला शांती मिळावी.आता तुम्ही
जाणता शांतीचे जे स्थान आहे ते ब्राह्मण्ड च आहे.ज्या ब्रह्म महतत्वा मध्ये आम्ही
आत्मा छोटी बिंदी राहतो.ते सर्व आत्म्याचे झाड तर आश्चर्यकारक असेल ना.मनुष्य
म्हणतात भ्रुकुटी मध्ये अजब सितारा चमकतो.खूप छोटा सोन्याचा तिलक बनवून येथे
लावतात.आत्मा पण बिंदी आहे,बाबा त्यांच्या बाजू मध्ये येऊन बसतात.साधुसंत इत्यादी
कोणीपण आत्म्याला जाणत नाहीत.जर आत्म्याला च जाणत नाही तर परमात्मया ला कसे
जाणतील,फक्त तुम्ही ब्राह्मणच आत्मा आणि परमात्मा ला जाणतात.कोणता ही धर्माचा जाणू
शकत नाही.आता तुम्ही जाणतात,कसे इतकी छोटी आत्म्या मध्ये सर्व भूमिका नोंदलेली
आहे.सत्संग तर अनेक करतात,समजत काहीच नाहीत.यांनी पण खूप गुरु केले होते.आता बाबा
म्हणतात हे सर्व भक्ती मार्गाचे गुरु आहेत.ज्ञान मार्गाचा गुरु एकच आहे.डबल
मुकुटधारी राज्यांच्या पुढे एक मुकुट असणारे राजा डोके टेकवतात,नमस्ते करतात,कारण
ते पवित्र आहेत.त्या पवित्र राजांचे मंदिरं बनलेली आहेत.पतीत जाऊन त्यांच्यापुढे
डोके टेकवतात,परंतु त्यांना काही माहिती नाही की हे कोण आहेत?आम्ही डोके का
टेकवतो?सोमनाथ मंदिर बनवले आहे,आता पुजा तर करतात परंतु बिंदी ची पूजा कसे
करतील?बिंदी चे मंदिर कसे बनवतील?या खूपच सूक्ष्म गोष्टी आहेत.गीता इत्यादींमध्ये
या ज्ञानाच्या गोष्टी नाहीत.जे स्वतः मालक आहेत,तेच समजतात.तुम्ही आता जाणतात,कसे
इतक्या छोट्या आत्म्या मध्ये भूमिका नोंदलेले आहे.आत्मा पण अविनाशी आहे,तर भूमिका
पण अविनाशी आहे.आश्चर्य आहे ना.हा सर्व पूर्व नियोजित खेळ आहे,असे म्हणतात.हे सर्व
पुर्व नियोजीत आहे.ये आता काहीच पण येत नाही नाटकांमध्ये नोंद आहे ते जरूर
होईल.काळजीची गोष्टच नाही. तुम्हा मुलांना आता स्वतःशी प्रतिज्ञा करायची आहे,काही
झाले तरी रडायचे नाही?तर का मृत्यु झाला आत्म्याने जाऊन दुसरे शरीर घेतले,परत
रडण्याची काय आवश्यकता आहे.परत तर येऊ शकत नाहीत.आश्रू आले तर नापास झाले.म्हणून
बाबा म्हणतात प्रतिज्ञा करा,आम्ही कधीच रडणार नाही.परमधाम मध्ये राहणारे ब्रह्मा
मिळाले तर चिंता कशाची?बाबा म्हणतात तुम्ही मज पित्याची आठवण करा,मी एकाच वेळेस येतो,
ही राजधानी स्थापन करण्यासाठी.यामध्ये लढाई इत्यादीची कोणतीच गोष्ट नाही.गीतेमध्ये
लढाई दाखवली आहे,फक्त पांडव शिल्लक राहिले,कुत्रा सोबत घेऊन डोंगरावरती गेले आणि ते
पण नष्ट झाले.जिंकले आणि मृत्यू झाला.ही गोष्टच पटत नाही.या सर्व दंतकथा आहेत.याला
भक्तिमार्ग म्हटले जाते.
बाबा म्हणतात तुम्हा मुलांना या दुनियेपासून वैराग्य पाहिजे.जुन्या गोष्टी पासून
नफरत येते ना.नफरत द्वैष अक्षर खराब आहे.वैराग्य अक्षर गोड आहे. जेव्हा ज्ञान मिळते
तर भक्ती पासून वैराग्य येते.सतयुग त्रेता मध्ये परत ज्ञानाचे प्रारब्ध एकवीस
जन्मासाठी मिळते.तेथे ज्ञानाची आवश्यकता राहत नाही.परत जेव्हा तुम्ही वाम मार्गा
मध्ये जातात,तर शिडी उतरतात.आत्ता अंत आहे. बाबा म्हणतात,आत्ता या जुन्या दुनिया
पासून मुलांना वैराग्य यायला पाहिजे.तुम्ही आत्ता शूद्र पासून ब्राह्मण बनले
आहात,परत देवता बनाल.दुसरे मनुष्य या गोष्टीला काय जाणनार?जरी विराट रूपाचे चित्र
बनवतात परंतु त्यामध्ये न शेंडी आहे,ना शिव आहेत.असे म्हणतात देवता,क्षत्रिय,
वैश्य,शूद्र.बस शूद्रा पासून देवता कसे बनतात,कोण बनवते,हे कोणीच जाणत नाहीत.बाबा
म्हणतात तुम्ही देवी-देवता खूप सावकार होते,परत ते सर्व पैसे कुठे गेले?माथा
टेकवत,पूजा करत सर्व पैसे गमावले.कालचीच गोष्ट आहे ना. तुम्हाला असे श्रेष्ठ बणवून
गेलो,परत तुम्ही असे कसे बनले.अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) फालतू
गोष्टी बोलून वातावरण खराब करायचे नाही.एकांत मध्ये बसून खरी सजनी बणुन एकाच साजन
ची आठवण करायची आहे.
(२) स्वतःच स्वता:शी
प्रतिज्ञा करायची आहे की,कधीच रडणार नाही.डोळ्याद्वारे अश्रू काढणार नाही. जे
सेवाधारी बाबांच्या ह्रदयासिन आहेत त्यांचा संग करायचा आहे.आपले रजिस्टर फार चांगले
ठेवायचे आहे.
वरदान:-
निर्विघ्न्य
स्थिति द्वारा स्वतःच्या पायाला मजबूत करणारे चांगल्या मार्काने पास होणारे भव.
जी मुलं अनेक
वर्षापासून निर्विघ्न स्थितीचे अनुभवी आहेत,त्यांचा पाया पक्का झाल्यामुळे स्वतः पण
शक्तिशाली राहतात आणि दुसऱ्याला पण शक्तिशाली बनवतात.अनेक वर्षाचे शक्तिशाली
निर्विघ्न आत्माच अंत काळात निर्विघ्न बणुन चांगल्या मार्काने पास होतात किंवा
प्रथम वर्गा मध्ये येतात.तर नेहमी हेच लक्ष ठेवा की अनेक वर्षांच्या निर्विघ्न
स्थितीचा अनुभव करायचा आहे.
बोधवाक्य:-
प्रत्येक
आत्म्याच्या प्रती नेहमी उपकार म्हणजे शुभ इच्छा ठेवा तर स्वतः आशीर्वाद मिळत राहील.