01-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, पतीत पासून पावन बनवणाऱ्या बाबा सोबत,तुमचे खूपच प्रेम असायला हवे.पहाटे
उठून प्रथम शिव बाबांना सुप्रभात म्हणा"
प्रश्न:-
बिनचुक आठवण
करण्यासाठी कोणत्या धारणा पाहिजेत?बिनचूक आठवण करणाऱ्यांची लक्षण कोणती आहेत?
उत्तर:-
बिनचुक आठवणी
साठी धैर्यता,गम्भीरता,आणि समज पाहिजे. या धारणाच्या आधारे द्वारे जे आठवण करतात
त्यांची आठवण,शिवबाबांच्या आठवणींशी मिळते,बाबांकडून शक्ती येऊ लागते.त्या
शक्तीद्वारे आयुष्यवान,निरोगी बनतात.मन एकदम शीतल होते.आत्मा सतोप्रधान बनत जाते.
ओम शांती।
बाबा म्हणतात गोड मुलांनो,तत्वम म्हणजे तुम्ही पण शांत स्वरूप आहात.तुम्हा सर्व
आत्म्यांचा स्वर्धम शांती आहे.शांतीधाम वरून परत येथे येऊन बोलायला लागतात.या
कर्मेंद्रिया तुम्हाला अभिनय करण्यासाठी मिळाल्या आहेत.आत्मा लहान-मोठी होत
नाही,शरीर लहान मोठे होते.बाबा म्हणतात मी तर शरीरधारी नाही,मला मुलांना सन्मुख
भेटण्यासाठी यावे लागते.समजा पिता आहेत,त्यांना मुलं होतात,तर तो मुलगा असे म्हणणार
नाही की,मी परमधाम वरून जन्म घेऊन मात पित्याला भेटण्यासाठी आलो आहे.जरी कोणती नवीन
आत्मा येते,कोणत्या शरीरा मध्ये किंवा नविन आत्मा जुन्या शरीरांमध्ये प्रवेश करते
तर ते,असे म्हणनार नाहीत की मात पित्याला भेटण्यासाठी आलो आहे.त्यांना आपोआप मात
पिता भेटतात.येथे ही नवीन गोष्ट आहे.बाबा म्हणतात परमधाम वरून येऊन तुम्हा मुलांच्या
सन्मुख उपस्थित आहे.मुलांना ज्ञान देतात,कारण मी ज्ञानसंपन्न ज्ञानाचा सागर आहे.मी
तुम्हा मुलांना राजयोग शिकवण्यासाठी येतो.राजयोग शिकवणारे एकच भगवान आहेत.कृष्णाच्या
आत्म्याला ही भूमिका मिळाली नाही.प्रत्येकाची भूमिका आप- आपली आहे.ईश्वराची भूमिका
आपली आहे.तर बाबा समजवतात,गोड मुलांनो स्वतःला आत्मा समजा,असे स्वतःला आत्मा समजणे
खूपच गोड आवस्था आहे.आम्ही काय होतो?आणि आता काय बनत आहोत?हे कसे आश्चर्यकारक नाटक
बनलेले आहे,हे पण तुम्ही आत्ताच समजतात.हे पुरुषोत्तम संगम युग आहे,इतके जरी आठवणीत
राहिले तरी पक्के होते,आम्ही सत्ययुगात जाणारे आहोत.आता संगमयुगा मध्ये आहोत,परत
आपल्या घरी जायचे आहे म्हणून पावन जरुर बनायचे आहे.मनामध्ये खूप खुशी व्हायला
पाहिजे.बाबा म्हणतात,गोड मुलांनो तुम्ही माझी आठवण करा,तर सतयुगी विश्वाचे मालक
बनाल.बाबा खूपच मुलां वरती प्रेम करतात,असे नाही फक्त शिक्षकाच्या रूपामध्ये शिकवुन
घरी घेऊन जातात.हे तर पिता आणि शिक्षक पण आहेत.तुम्हाला आठवणीची यात्रा शिकवतात.
.अशा विश्वाचे मालक बनवणाऱ्या, पतीत पासून पावन बनवणाऱ्या बाबां सोबत खूपच प्रेम
पाहिजे.सकाळी सकाळी उठल्यानंतर प्रथम शिव बाबांना सुप्रभात म्हणायला
पाहिजे.सुप्रभात म्हणजेच आठवण कराल तर खूप खुशी होईल. मुलांनी स्वता:ला विचारायला
पाहिजे, आम्ही सकाळी उठून बाबांची आठवण करतो का?मनुष्य भक्ती पण सकाळीच करतात
ना,भक्ती पण खूप प्रेमाने करतात. परंतु बाबा जाणतात काही मुलं खूप प्रेमाने आठवण
करत नाहीत.सकाळी उठून बाबांना सुप्रभात करा आणि ज्ञानाच्या चिंतना मध्ये रहा तर
खुशीचा पार चढेल. बाबांना सुप्रभात म्हणणार नाही तर, पापाचं ओझे कसे उतरेल?मुख्य
आठवणच आहे,याद्वारे भविष्यासाठी खूपच भारी कमाई होत आहे.कल्प कल्पांतर ही कमाई खुप
कामाला येईल.खूप धैर्य गंभीरताआणि समजदार पणा द्वारे आठवण करायची आहे.काही मुलं
असेच म्हणतात,आम्ही बाबांची खुप आठवण करतो,परंतु बिनचूक आठवण करण्यामध्ये कष्ट
आहेत.जे बाबांना जास्त आठवण करतात त्यांना शक्ती पण जास्त मिळते कारण आठवणी द्वारेच
आठवणीची शक्ती मिळते.योग आणि ज्ञान दोन गोष्टी आहेत.योगाचा विषय वेगळा आहे,खूप भारी
विषय आहे.योगाद्वारेच आत्मा सतो प्रधान बनते.आठवणी शिवाय सतोप्रधान बनणे असंभव
आहे.चांगल्या रीतीने,प्रेमाने बाबांची आठवण केली तर,आपोआप शक्ती मिळेल,निरोगी
बनाल.शक्तीद्वारे आयुष्य पण वाढते.मुलं आठवण करतात तर, बाबा पण खूपच शक्ती
देतात.बाबा खुप भारी खजाना मुलांना देत आहेत.
गोड मुलांनो,हे पक्के आठवणीत ठेवा,बाबा आम्हाला शिकवत आहेत.शिव बाबा पतित पावन
आहेत,सद्गगती दाता पण आहेत.सद्गगती म्हणजे स्वर्गाची राजाई देतात.बाबा खूपच गोड
आहेत,खूपच प्रेमाने मुलांना शिकवतात.बाबा,दादा द्वारे आम्हाला शिकवतात.बाबा खूपच
गोड आहेत,खूप प्रेम करतात,कोणतेच कष्ट देत नाहीत,फक्त म्हणतात माझी आठवण करा आणि
चक्राची आठवण करा.बाबांच्या आठवणी द्वारे मन एकदम शितल व्हायला पाहिजे.एका बाबांचीच
आठवण यायला पाहिजे कारण बाबा पासून खूप भारी वारसा मिळतो.स्वतःला पाहायला पाहिजे,
माझे बाबा बरोबर किती प्रेम आहे?किती दैवी गुण धारण केले आहेत?कारण तुम्ही आता
काट्या पासून फूल बनत आहात. जितके योगामध्ये राहाल,काट्या पासून फुल,सतोप्रधान बनत
जाल.फुलासारखे बनले पण परत तेथे राहू शकत नाहीत. फुलांचा बगीचा स्वर्ग आहे.जे
अनेकांना काट्या पासून फूल बनवतात त्यांनाच खरे सुगंधित फुल म्हणू शकतो,ते कधी
कुणाला दुःख देणार नाहीत.क्रोध पण फार मोठा काटा आहे,ज्यामुळे अनेक दुःखी होतात. आता
तुम्ही मुलं काट्याच्या दुनिया पासून निघून संगमयुगा मध्ये आहात.जसे माळी फुलांना
वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवतात,तसेच तुम्हा मुलांना पण आता संगमयुगी भांड्यात
ठेवले आहे.परत तुम्ही फुल बणुन स्वर्गामध्ये जाल.कलयुगी काटे भस्म होतील.
गोड मुलं जाणतात पारलौकिक बाबा कडून आम्हाला अविनाशी वारसा मिळत आहे.जी खरी खुरी
मुलं आहेत,ज्यांचे बाप दादा वरती पूर्ण प्रेम आहे,त्यांनाच खूप खुशी होते.आम्ही
विश्वाचे मालक बनत आहोत.होय,पुरुषार्था द्वारेच विश्वाचे मालक बनले जाते,फक्त
म्हणल्यामुळे नाही.जे असाधारण मुलं आहेत,त्यांना नेहमीच आठवण राहते की,आम्ही परत
तीच सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी स्थापन करत आहोत.जितके तुम्ही अनेकांचे कल्याण
कराल,तेवढाच तुम्हाला फायदा होईल.जे अनेकांना रस्ता दाखवतात,तर त्यांना अनेकांचे
आशीर्वाद मिळतील.ज्ञानसागर तुम्हाला रत्नांनी झोळी भर भरून देतात,ते परत दान करायचे
आहे.जे दान करतात,ते सर्वांना प्रिय वाटतात.मुलांच्या मनामध्ये खूपच खुश राहायला
पाहिजे.समजदार मुलं जी आहेत,ते म्हणतील आम्ही तर बाबा कडून पूर्णपणे वारसा घेऊ,खूप
बाबांची आठवण करतील.बाबांशी खूप प्रेम असायला हवे कारण जाणतात,प्राणदान देणारे बाबा
मिळाले आहेत.ज्ञानाचं वरदान पण असे देतात ज्याद्वारे आम्ही खूपच श्रेष्ठ
बनतो,अपवित्र पासून पवित्र बनतो,इतका भंडारा भरपूर करतात.जितके बाबांशी स्नेह राहील
तेवढे आकर्षण होईल.सुई स्वच्छ असेल तर चुंबकाकडे आकर्षित होते.बाबांच्या आठवणी मुळे
मनातील अशुद्धता निघून जाईल.एका बाबांच्या शिवाय कोणाचीच आठवण यायला नको.जसे
पत्नीचे,पतिच्या सोबत खूप प्रेम राहते.तुमचा पण साखरपुडा झाला आहे ना.साखरपुड्याची
खुशी कमी होते का?शिव बाबा म्हणतात,गोड मुलांनो तुमचा माझ्या बरोबर साखरपुडा झाला
आहे.ब्रह्माच्या सोबत साखरपुडा झाला नाही.साखरपुडा पक्का असेल तर त्यांची आठवण पण
खूप यायला पाहिजे.
बाबा समजवतात,गोड मुलांनो गफलत करू नका.स्वदर्शन चक्रधारी,लाईट हाऊस बना.स्वदर्शन
चक्रधारी बनल्यामुळे अभ्यास चांगला होईल परत तुम्ही ज्ञानाचे सागर बनले
जाल.विद्यार्थी शिकून परत शिक्षक बनतात, तुमचा पण हाच धंदा आहे. सर्वांना सुदर्शन
चक्रधारी बनवा तेव्हाच चक्रवर्ती राजा राणी बनाल.बाबा नेहमीच मुलांना विचारतात
स्वदर्शन चक्रधारी होऊन बसले आहात का?बाबा पण स्वदर्शन चक्रधारी आहेत ना.बाबा आले
आहेत तुम्हा गोड मुलांना परत घेऊन जाण्यासाठी.तुम्हा मुलांच्या शिवाय मला पण आराम
मिळत नाहीत.जेव्हा भेटण्याची वेळ येते तर बाबांना पण आराम वाटत नाही,बस मी आत्ताच
जाऊ,कारण मुलं खूप पुकारतात,खूप दु:खी आहेत, दया येते.आता तुम्हा मुलांना घरी जायचे
आहे,परत तेथुन तुम्ही आपोआप सुखांमध्ये जाल.तेथे मी तुमचा सोबती बनणार नाही.आपल्या
अवस्थांनुसार तुमची आत्मा,सुखधाम मध्ये चालली जाईल.तुम्हा मुलांना खूप नशा राहायला
पाहिजे,आम्ही आत्मिक विद्यापीठांमध्ये शिकत आहोत,ईश्वरी विद्यार्थी आहोत.आम्ही
मनुष्यापासून देवता किंवा विश्वाचे मालक बनण्यासाठी शिकत आहोत. याद्वारे आम्ही सर्व
परीक्षा पास करतो.आरोग्याचे पण शिक्षण घेतो,चरित्र सुधारण्याचे पण शिक्षण
घेतो.आरोग्य मंत्रालय,अन्न मंत्रालय,महसूल मंत्रालय,गृहनिर्माण मंत्रालय सर्व
यामध्ये येते.
गोड गोड मुलांना, सर्व गोष्टी बाबा समजवतात,जेव्हा कोणी सभांमध्ये भाषण करतात किंवा
कुणाला समजतात तर नेहमी बोला,स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्माची आठवण करा. या
आठवणी द्वारेच तुमचे विर्कम विनाश होतील,तुम्ही पावन बनाल.नेहमीच ही आठवण करवुन
द्यायची आहे परंतु हे पण तेव्हाच म्हणू शकाल,जेव्हा स्वतः आठवणीमध्ये राहाल.या
गोष्टीमध्ये मुलं खूपच कमजोर आहेत,मनातून तुम्हा मुलांना खुशी होईल,जेव्हा आठवणी
मध्ये राहून दुसऱ्यांना समजून सांगाल,तर त्याचा परिणाम पण चांगला होईल.तुम्हाला
जास्त बोलायचे नाही,थोडं पण कुणाला समजून सांगाल,तर त्याचा ज्ञानबाण लागेल.बाबा
म्हणतात,जे झाले ते विसरा.आता स्वतःला सुधारा,जर स्वतः आठवण करणार नाहीत, फक्त
दुसऱ्यांना सांगत राहाल,तर असे चालू शकणार नाही,मन खात राहील. बाबांच्या सोबत
पूर्णपणे प्रेम नाही तर श्रीमता वरती चालू शकत नाहीत.बेहदच्या बाबा सारखे शिक्षण
दुसरे कोणी देऊ शकत नाही.बाबा म्हणतात गोड मुलांनो,आत्ता या जुन्या दुनियेला
विसरा.अंत काळात तर,हे सर्व विसरायचे आहेच.बुद्धी आपल्या शांतीधाम आणि सुखधाम कडे
लागते.बाबांची आठवण करत करत,बाबांच्या जवळ जायचे आहे.पतित आत्मा तर जाऊ शकत नाही.
ते पावन आत्म्याचे घर आहे.हे शरीर पाच तत्त्वांनी बनलेले आहे,तर पाच तत्व येथे
राहण्यासाठी आकर्षित करतात कारण आत्म्याला ही संपत्ती मिळाली आहे, त्यामुळे
शरीरांमध्ये ममत्व झाले आहे. आता ममत्व काढून टाकून आपल्या घरी जायचे आहे.तेथे तर
असे पाच तत्व नाहीत.सतयुगा मध्ये शरीर योगबळा द्वारे बनते.प्रकृती सतोप्रधान असते
म्हणून आकर्षित करत नाही.तेथे दुःख नसते.या खूपच सूक्ष्म समजण्याच्या गोष्टी आहेत.
येथे पाच तत्वाचे बळ आत्म्याला आकर्षित करते म्हणून शरीर सोडण्याचा मन होत
नाही,नाहीतर यामध्ये जास्तच खुशी व्हायला पाहिजे.पावन बणुन शरीर असे सोडायचे,जसे
लोण्या मधून केस बाहेर निघतो.तर शरीरा मधुन आणि सर्व गोष्टी पासून ममत्व एकदम काढून
टाकायचे आहे,याच्यांशी आमचा कोणताच संबंध नाही. बस आम्ही आत्ता बाबा जवळ जात आहोत.या
दुनिया मध्ये आपले सर्व सामान तयार करून अगोदरच पाठवले आहे. सोबत जाऊ शकणार
नाही,बाकी आत्म्यांना जायचे आहे.शरीराला तर येथेच सोडायचे आहे.बाबांनी नवीन शरीराचा
साक्षात्कार करवला आहे.हिरे जवाहराचे महल मिळतील.अशा सुखधाम मध्ये जाण्यासाठी खूपच
कष्ट घ्यायला पाहिजेत, थकायचे नाही. दिवस-रात्र खूप कमाई करायची आहे,म्हणून बाबा
म्हणतात निद्रेला जिंकणाऱ्या मुलांनो माझीच आठवण करा आणि विचार सागर मंथन
करा.नाटकाचे रहस्य बुध्दी मध्ये ठेवल्या मुळे बुद्धी एकदम शीतल होऊन जाईल.जे महारथी
मुलं असतील ते कधीच परिस्थितीमुळे विचलित होणार नाहीत. शिव बाबांची आठवण कराल, तर
ते सांभाळ पण करतील.
बाबा तुम्हा मुलांना दु:खा पासून सोडवून शांतीचे दान देतात.तुम्हालापण शांतीचे दान
द्यायचे आहे.तुमची ही बेहदची शांती अर्थात योगबळ दुसऱ्यांना पण एकदम शांत करेल.लगेच
माहिती होते, हे आपल्या दैवी घराण्याचे आहेत की नाही? आत्म्याला लगेच आकर्षण होते,
हे आमचे बाबा आहेत.नाडी पण पाहायची आहे. बाबाच्या आठवणी मध्ये राहुन,पहा ही आत्मा
आमच्या कुळाची आहे?जर असेल तर एकदम शांत होऊन जाईल.जे या कुळाचे असतील त्यांनाच, या
ज्ञानाच्या गोष्टीमध्ये रस वाटेल.मुलं आठवण करतात तर बाबा पण प्रेम करतात.आत्म्याला
प्रेम केले जाते.हे पण जाणतात,ज्यांनी खूप भक्ती केले आहे,ते जास्ती ज्ञान घेतील.
त्यांच्या चेहरा द्वारे माहीत होते की बाबांशी किती प्रेम आहे.आत्मा बाबांना पाहते.
बाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत. बाबा पण समजतात इतकी लहान बिंदी आत्म्यांना
शिकवत आहे.पुढे चालून तुमची अशी अवस्था होऊन जाईल,असे समजाल आम्ही भाऊ-भावांना
शिकवत आहोत. जरी चेहरा बहिणीचा असेल तरी दृष्टी आत्म्या कडे जायला पाहिजे.शरीरा वरती
बिल्कुलच दृष्टी जायला नको,यामध्ये खूप कष्ट आहेत.या खूपच सूक्ष्म गोष्टी आहेत.
खूपच श्रेष्ठ शिक्षण आहे.याचे वजन करा तर ज्ञानाचा तराजू खूपच भारी होईल. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती,मात पिता बापदादांची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) आपली झोळी
ज्ञान रत्नाने भरून,परत दान करायचे आहे.जे दान करतात ते सर्वांना प्रिय
वाटतात.त्यांनाच खूप खुशी राहते.
(२) प्राण देणाऱ्या
बाबांची खूपच प्रेमाने आठवण करत,सर्वांना शांतीचे दान द्यायचे आहे. स्वदर्शन चक्र
फिरवत,ज्ञाना चे सागर बनायचे आहे.
वरदान:-
उच्च ते उच्च
बाबांना प्रत्यक्ष करणारे शुभ आणि श्रेष्ठ कर्मधारी भव.
जसे उजव्या हाता
द्वारे नेहमी शुभ आणि श्रेष्ठ काम करतात.तसेच तुम्ही बाबांचे सहयोगी मुलं, शुभ किंवा
श्रेष्ठ कर्मधारी बना.तुमचे प्रत्येक कर्म उच्च ते उच्च बाबांना प्रत्यक्ष करणारे
हवे,कारण कर्मच संकल्प किंवा वाचेला प्रत्यक्ष प्रमाणच्या रूपांमध्ये स्पष्ट करणारे
असतात.कर्माला सर्व पाहू शकतात,कर्मा द्वारे अनुभव करू शकतात म्हणून आत्मिक दृष्टी
द्वारे किंवा आपल्या खुशीच्या,आत्मिक चेहऱ्याद्वारे,बाबांना प्रत्यक्ष करा हे पण
श्रेष्ठ कर्मच आहे.
बोधवाक्य:-
आत्मिकते चा
अर्थ आहे, डोळ्यांमध्ये पवित्रते ची चमक आणि मुखा वरती पवित्रतेचे हास्य हवे.
सूचना:-
सर्व ब्रह्मा वत्स १ जानेवारी पासून ३१ जानेवारी २०२० पर्यंत विशेष अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी काही ज्ञानाच्या मुद्दे नोंद करायचे आहेत किंवा पूर्ण दिवस याच
चिंतना मध्ये राहत अनुभवी मूर्ती बना आणि अंतर्मुखी राहून अव्यक्त वतनची सहल करत
राहा.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
जसे साकार मध्ये ब्रह्मा बाबांना अनेक जिम्मेवारी असताना सुद्धा आकारी आणि निराकारी
स्थितीचा अनुभव करत राहिले,तसेच तुम्ही मुलं पण साकार रुपा मध्ये राहत फरिश्ता पणाचा
अनुभव करा आणि करवुन घ्या.जे पण संपर्का मध्ये येतात त्यांना ईश्वरी स्नेह,श्रेष्ठ
ज्ञान आणि श्रेष्ठ चरित्राचा साक्षात्कार तर होतोच परंतु आता अव्यक्त स्थितीचा
साक्षात्कार करवा.