26-02-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो , तुम्हाला श्रीमत मिळाली आहे की , आत्म अभिमानी बनून बाबाची आठवण करा ,
कोणत्या पण गोष्टीत तुम्हाला वादविवाद करावयाचा नाही ...!!
प्रश्न:-
बुध्दीयोग
स्वच्छ बणून, बाबामध्ये लागेल, त्यासाठी कोणती युक्ती रचली आहे?
उत्तर:-
7 दिवसाची भट्टी. कोणी पण नविन येतो, तर त्याला 7 दिवसाचे भट्टी मध्ये बसवा,
ज्याद्वारे बुध्दीतील कचरा निघेल आणि गुप्त बाबा, गुप्त शिक्षण, आणि गुप्त वारशाला
ओळखू शकेल. जर असेच बसला तर गोंधळून जाईल, त्याला वाटेल येथे काही नाही.
गीत:-
जागे हो सजनी,
जागे हो.....
ओम शांती।
मुलांना ज्ञानी तू आत्मा बनण्यासाठी असे जे गीत आहेत, ते एकून मग त्याचा अर्थ केला
पाहिजे, तर तोंड उघडेल. माहित पडेल की, कधीपर्यंत सृष्टीच्या आदि मध्य अंताचे ज्ञान
बुध्दीमध्ये आहे. तुमच्या मुलांच्या बुध्दीमध्ये तर वरपासनू, मुळवतन, सुक्ष्मवतन,
स्थुलवतनच्या आदि मध्य-अंताचे सारे रहस्य जसे की चमकत आहे. बाबा जवळ पण ते ज्ञान आहे,
जे तुम्हाला सांगत आहेत. हे आहे बिल्कुल नविन ज्ञान. जरी ग्रंथामध्ये नांव आहे,
परंतू ते नाव घेतल्याने संभ्रमीत होतील, वादविवाद करण्यास सुरु करतील. येथे तर
बिल्कुल साधारण रितीने समजावतात कि, भगवानुवाच माझी आठवण करा, मीच पतित पावन आहे.
कधी ही कृष्णाला वा ब्रह्माला. विष्णू, शंकर, इत्यादींना पतित पावन म्हणत नाहीत.
सुक्ष्मवतन वासीला पण तुम्ही पतित-पावन म्हणत नाहीत, तर स्थुलवतनचे मनुष्य पतित
पावन कसे होऊ शकतील? हे ज्ञान पण तुमच्या बुध्दी मध्येच आहे. शास्त्राच्या
गोष्टीमध्ये जास्त वादविवाद करणे चांगले नाही, फार वादविवाद होतो. एकमेकांस काठीने
मारतात. तुम्हाला तर फारच सहज समजावले जाते. ग्रंथातील गोष्टीत पण जास्त जायचे नाही.
मुळ गोष्ट आहेच आत्म अभिमानी बनण्याची, स्वत:ला आत्मा समजावयाचे आहे, आणि बाबांची
आठवण करावयाची आहे, ही श्रीमत मुख्य आहे. इतर विस्तार आहे. बीज किती सुक्ष्म आहे.
बाकी झाडाचा विस्तार आहे. जसे बीजामध्ये सारे ज्ञान सामावले आहे, तसे हे सारे ज्ञान
पण बीजामध्ये सामावलेले आहे. तुमच्या बुध्दीमध्ये बीज आणि झाड आले आहे. ज्याप्रकारे
तुम्ही जाणता तसे इतर कोणी समजू शकत नाही. झाडाचे आयुष्यच जास्त लिहले आहे. बाबाच
बीज आणि झाड वा नाटकाच्या चक्राचे रहस्य समजावत आहेत. तुम्ही आहात स्वदर्शन चक्रधारी.
कोणी नविन आले, बाबा महिमा करतील की, स्वदर्शन चक्रधारी मुलांनो, तर कोणी समजू
शकणार नाही. ते तर स्वत:ला बाबाचा मुलगाच समजत नाहीत. हे बाबा पण गुप्त आहेत, तर
ज्ञान पण गुप्त आहे, वारसा पण गुप्त आहे. नविन कोणी पण ऐकून गोंधळून जाईल, त्यासाठी
7 दिवसाचे भट्टीमध्ये बसविले जाते. ते 7 दिवस भागवत वा रामायण इ. ठेवतात, खरे तर,
यावेळी 7 दिवस भट्टीमध्ये ठेवले जाते, त्यामुळे बुध्दीमध्ये जो सारा कचरा आहे तो
निघेल, आणि बाबाशी बुध्दीयोग लागेल. येथे सर्व आहेत राणी. सतयुगामध्ये हे रोग असत
नाहीत. हा अर्धाकल्पाचा रोग आहे, 5 विकाराचा रोग मोठा भारी आहे. तेथे तर आत्म
अभिमानी राहतात, जाणतात कि, आम्ही आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेत आहोत, अगोदर
पासूनच साक्षात्कार होत आहे. अकाले मृत्यू कधी होत नाही. तुम्हाला मृत्युवर विजय
प्राप्त केला जाते. काळ, महाकाळ म्हणतात. महाकाळचे पण मंदीर आहेत. शिख लोकांचे मग
अकालतख्त आहे. खरेतर अकालतख्त ही भृकुटी आहे, जेथे आत्मा विराजमान आहे. सर्व आत्मे
या आकालतख्तावर बसली आहेत. हे बाबा समजावत आहेत. बाबाला स्वत:चे तख्त तर नाही, ते
येऊन ब्रह्माबाबाचे तख्त घेत आहेत. या तख्तावर बसून तुम्हा मुलांना राज्य तख्त नशीन
बनवत आहेत. तुम्ही जाणता की, ते राज्य तख्त कसे आहे. ज्यावर लक्ष्मी नारायण
विराजमान होतात. राजतख्त तर गायले जात आहे ना.
विचार करावयाचा आहे, त्यांना भोलानाथ भगवान का म्हटले जाते? भोलानाथ भगवान
म्हटल्याने बुध्दी वर जाते. साधू संत पण बोटाने इशारा पण वर देतात, कि त्यांची आठवण
करा. यथार्थ रुपात तर कोणी जाणत नाही. आता पतित-पावन बाबा सन्मुख येऊन म्हणतात कि,
माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील. खात्री देतात. गीतेमध्ये पण लिहले आहे,
परंतू तुम्ही गीतेतील एक उदाहरण दयाल तर ते 10 देतील, त्यामुळे त्यांची गरज नाही.
जे शास्त्र इत्यादी वाचतात, ते समजतात आम्ही भांडू? तुम्ही मुले तर या शास्त्राला
जाणतच नाहीत, तुम्ही त्यांचे कधी नांव पण घेऊन नका. फक्त सांगा, भगवान म्हणतात कि,
तुमच्या पित्याची आठवण करा, त्यांनाच पतित पावन म्हटले जाते. गातात पण पतित-पावन
सीताराम---सन्यासी पण जिकडे तिकडे धुन लावून राहतात. असे मत मतांतर तर फार आहेत ना.
हे गीत किती सुंदर आहे. विश्वनाटकानुसार कल्प कल्प असे गीत बनत आहेत. जसे की तुम्हा
मुलांसाठीचे बनले आहेत. असे चांगले गीत आहेत. जसे नयन हीनला वाट दाखवा प्रभू. प्रभू
काही कृष्णाला थोडेच म्हणतात? प्रभू वा ईश्वर निराकारलाच म्हणतात. येथे तुम्ही
म्हणता बाबा, परमपिता परमात्मा आहेत. आहेत तर ते पण आत्मा ना. भक्तीमार्गा मध्ये पण
जास्तच गेले आहेत. येथे तर बिल्कुल साधी गोष्ट आहे. अल्फ आणि बे. अल्प अल्लाह, बे
बादशाही, ही तर साधी गोष्ट आहे. बाबाची आठवण करा तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल.
बरोबर हे लक्ष्मी नारायण स्वर्गाचे मालक, संपूर्ण निर्विकारी होते. तर बाबाची आठवण
केल्यानेच तुम्ही असे संपूर्ण बनाल. जेवढी जे आठवण करतात आणि सेवा करतात तेवढे ते
उंच पद प्राप्त करतात. ते समजून पण येते. शाळेमध्ये विद्यार्थी समजतात कि, आम्ही
थोडेच शिकलो. जे पूरे लक्ष देत नाहीत ते शेवटी जावून बसतात, तर जरुर नापास होतील.
स्वता:च स्वता:ला उत्साहात ठेवण्यासाठी ज्ञानातील जे चांगली चांगली गाणी बनलेली
आहेत, ती एैकली पाहिजेत, अशी गाणी आपल्या घरात ठेवली पाहिजेत. कोणाला यावर सांगितले
पण पाहिजे. कशी मायेची छाया पडत आहे. ग्रंथामध्ये तर या गोष्टी नाहीतच कि, कल्पाचा
कालावधी 5 हजार वर्षाचा आहे. ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र आर्धा आर्धा आहे.
ही गोणी पण कोणीतरी बनविली आहेत. बाबा बुध्दीवानाची बुध्दी आहेत, तर कोणाच्या
बुध्दीमध्ये आले असेल, ते त्यांनी बनविले. अशा गाण्यावर पण, तुमच्या जवळ कितीतरी
ध्यानात जात होते. एक दिवस येईल जे या ज्ञानाचे गीत गाणारे पण तुमचेजवळ येतील.
संगीताचा आधार राहतो. गायन विद्येचे पण फार नांव आहे. आता तर असा कोणी नाही. फक्त
एक गीत बनविले होते, किती गोड, किती प्रिय---बाबा तर फारच गोड, फारच प्रिय आहेत,
तेव्हा तर सर्वच त्यांची आठवण करत आहेत. असे नाही कि देवता त्यांची आठवण करतात.
चित्रामध्ये तर रामाच्या समोर शिव दाखविले आहेत, राम पूजा करत आहेत. हे चुक आहे.
देवता थोडेच कोणाची आठवण करतात? आठवण मनुष्य करतात. तुम्ही पण आता मनुष्य आहात, मग
देवता बनाल. देवता आणि मनुष्यामध्ये रात्र आणि दिवसाचा फरक आहे. तेच देवता मग
मनुष्य बनत आहेत. कसे चक्र फिरते? कोणाला पण माहित नाही. तुम्हाला आता माहित झाले
आहे की, आम्ही खरे खुरे देवता बनत आहोत. आता आम्ही ब्राह्मण आहोत, नविन दुनियेमध्ये
देवता म्हटले जाईल. आता तुम्हाला आश्चर्य वाटते. हे ब्रह्मा स्वत:च या जन्मामध्ये
अगोदर पुजारी होते, श्री नारायणाची महिमा करत होते, नारायणा प्रती फार प्रेम होते.
आता आश्चर्य वाटते कि, मी तो बनत आहे. तर किती खुशीचा पारा चढला पाहिजे. तुम्ही
आहात अनोळखी सैनिक, अहिंसक, खरे खरे तुम्ही डबल अहिंसक आहात. ना कामकटारी, ना ती
लढाई. काम विकार वेगळा आहे, क्रोध वेगळा आहे. तर तुम्ही आहात डबल अहिंसक. अहिंसक
सेना. सेना अक्षरामुळे त्यांनी मग सेना उभी केली आहे. महाभारत युध्दामध्ये पुरुषाची
नांवे दाखविली आहेत. स्त्रीयांची नाहीत. खरे तर तुम्ही आहात शिव शक्ती. बहुसंख्य
लोक तुम्ही असल्यामुळे शिवशक्ती सेना म्हटले जाते. या गोष्टी बाबांच बसून समजावत
आहेत.
आता तुम्ही मुले नवयुगाची आठवण करत आहात. दुनियेमध्ये कोणालाच नवयुगाची माहिती नाही.
ते तर समजतात कि, नवयुग 40 हजार वर्षानंतर येईल. सतयुग नवयुग आहे, ते तर फार स्पष्ट
आहे. तर बाबा मत देतात कि, असे चांगले गीत पण ऐकून उत्साही व्हाल आणि कोणाला सांगाल
पण. यासर्व युक्ती आहेत. याचा अर्थ पण फक्त तुम्हीच समजू शकता. फार चांगले चांगले
गीत आहेत, स्वत:ला आनंदी करण्यासाठी, ही गाणी फार मदत करत आहेत. अर्थ काढला पाहिजे
तर तोंड पण उघडेल, खुशी पण होईल. बाकी जे जास्त धारणा करत नाहीत, त्यांच्यासाठी बाबा
म्हणतता कि, घरी बसून बाबाची आठवण करत राहा. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून फक्त हा
मंत्र आठवणीत ठेवा, बाबाची आठवण करा आणि पवित्र बना. पूर्वी पुरुष लोक पत्नीला
म्हणत होते, भगवानाची तर घरी बसून पण आठवण करु शकता, मग मंदीरात जावून भटकण्याची
काय आवश्यकता आहे? आम्ही तुम्हाला घरांमध्ये मुर्ती देतो, येथे बसून आठवण करा, धक्का
खाणेसाठी का जाता? असे अनेक पुरुष लोक स्त्रियाला जावू देत नाहीत. वस्तू तर एकच आहे,
पुजा करावयाची आहे, आणि आठवण करावयाची आहे. केव्हा एकदा पाहिले तर आहे, मग तर अशी
आठवण करु शकता. कृष्णाचे चित्र तर सर्वत्र आहे. मोरमुकुटधारी तुम्ही मुलांनी
साक्षात्कार केला आहे, कसे तेथे जन्म होतो, तो पण साक्षात्कार केला आहे, परंतू
तुम्ही काय त्यांचा फोटो काढू शकता? अचुक पणे कोणी काढू शकत नाही. दिव्य दृष्टीने
फक्त पाहू शकता. बनवू शकत नाही, होय पहिल्यामुळे वर्णन करु शकता, बाकी ते पेंट इ.
करु शकत नाहीत. जरी हुशार पेंटर असला, साक्षात्कार पण केला, तरी पण अचुक चेहरा काढू
शकणार नाही. तर बाबांनी समजावले आहे, कोणाबरोबर जास्त वादविवाद करावयाचा नाही. सांगा,
तुमचे पावन बनण्याशी काम आहे आणि शांती पाहिजे असेल तर बाबांची आठवण करा, आणि
पवित्र बना. पवित्र आत्मा येथे राहू शकत नाही. ती परत निघून जाईल. आत्म्यांना पावन
बनण्याची शक्ती एका बाबांमध्ये आहे. आणखीन कोणी पावन बनवू शकत नाही. तुम्ही मुले
जाणता कि, हे सारे रंगमंच आहे, यावर नाटक होत आहे. यावेळी साऱ्या रंगमंचावर रावणाचे
राज्य आहे. साऱ्या समुद्रावर, सृष्टी आहे. हे अमर्यादित बेट आहे. ते आहेत मर्यादेत
ही आहे बेहदची गोष्ट. ज्यावर आर्धाकल्प दैवी राज्य, आर्धा कल्प आसुरी राज्य होते.
तसे तर खंड सारे वेगवेगळे आहेत, परंतू ही आहे सारी बेहदची गोष्ट. तुम्ही जाणता कि,
आम्ही गंगा यमुना नदीच्या गोड पाण्याच्या काठावरच राहतो. समुद्र इत्यादी ठिकाणी
जाण्याची आवश्यकता राहत नाही. ही जी द्वारका म्हणतात, ती काही समुद्राचे मध्यात असत
नाही. द्वारका काही दुसरी वस्तू, नाही. तुम्ही मुलांनी सर्व साक्षात्कार केले आहेत.
सुरुवातीपासून ही संदेशी आणि गुलजार फार साक्षात्कार करत होते. यांनी फार मोठी
भुमिका बजावली आहे, कारण भट्टीमध्ये मुलांना आनंदीत ठेवायचे होते. तेव्हा
साक्षात्काराने फार आनंदीत राहिले. बाबा म्हणतात अंतकाळात फार आनंदीत राहतील अशी
भुमिका परत, पण आहे. गीत पण आहे ना. आम्ही जे पाहिले ते तुम्ही पाहणार नाही. तुम्ही
लवकर लवकर साक्षात्कार करत राहाल. जसे परीक्षेचे दिवस जवळ आले कि माहित पडते कि
आम्ही किती गुणांनी उत्तीर्ण होऊ. तुमचे पण हे शिक्षण आहे. आता तुम्ही जसे
ज्ञानसंपन्न होऊन बसले आहात. सर्व संपन्न तर असत नाहीत. शाळेमध्ये नेहमीच क्रमवारीने
असतात. हे पण ज्ञान आहे, मुळवतन, सुक्ष्मवतन तिन्ही लोकांचे तुम्हाला ज्ञान आहे. या
सृष्टीच्या चक्राला तुम्ही जाणत आहात, हे फिरत राहते. बाबा म्हणतात कि, तुम्हाला जे
ज्ञान दिले आहे, ते दुसरे कोणी समजावू शकत नाही. तुमच्यावर आहे बेहदची दशा. कोणावर
बृहस्पतीची दशा, कोणावर राहूची दशा असते, जे जावून चंडाळ इत्यादी बनतात. ही आहे
बेहदची दशा, ती आहे हदची दशा. बेहदचे बाबा बेहदच्या गोष्टी सांगत आहेत, बेहदचा वारसा
देत आहेत. तुम्हा मुलांना किती खुशी झाली पाहिजे. तुम्ही अनेक वेळा बादशाही घेतली
आहे आणि घालविली आहे, ही तर बिल्कुल पक्की गोष्ट आहे. नविन काही नाही, तेव्हा तुम्ही
सदैव हर्षित राहू शकाल. नाही तर माया घुटका खाऊ घालते.
तर तुम्ही सारे आशिक आहात, माशुकचे. सर्व आशिक त्या एका माशुकाला आठवण करत आहेत. ते
येऊन सर्वांना सुख देत आहेत. आर्धाकल्प त्यांची आठवण केली आहे. आता ते भेटले आहेत
तर किती खुशी झाली पाहिजे. अच्छा,
गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक
आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. नेहमी
हर्षित राहण्यासाठी नविन काही नाही हा पाठ पक्का करावयाचा आहे. बेहदचे बाबा आम्हाला
बेहदची बादशाही देत आहेत, या खुशीत राहावयाचे आहे.
2. ज्ञानातील चांगली चांगली गाणी ऐकून स्वत:ला आनंदीत ठेवायचे आहे. त्याचा अर्थ
काढून दुसऱ्याला सांगावयाचा आहे.
वरदान:-
अनेक
प्रकारच्या प्रवृत्तीपासून निवृत्त होणारे नष्टोमोहा स्मृती स्वरुप भव :-
स्वत:ची प्रवृत्ती,
दैवी परिवाराची प्रवृत्ती, सेवेची प्रवृत्ती, हदच्या प्राप्तीची प्रवृत्ती, या
सर्वांपासून नष्टोमोहा अर्थात वेगळे बनण्यासाठी बापदादांच्या स्नेह रुपाला समोर
ठेवून स्मृती स्वरुप बना. स्मृती स्वरुप बनल्याने नष्टोमोहा स्वत:च बनाल.
प्रवृत्तीपासून निवृत्ती होणे म्हणजे मी पणा नष्ट करुन नष्टोमोहा बनणे. असे
नष्टोमोहा बनणारी मुले, फार काळाच्या पुरुषार्थाद्वारे फार काळाचे प्रालब्ध प्राप्त
करणारे अधिकारी बनतात.
बोधवाक्य:-
कमळ फुलासारखे
वेगळे राहा , तर प्रभूचे प्रेम मिळत राहील .