24-02-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, तुम्ही फार मोठे जवाहिज्याचे व्यापारी आहात, अविनाशी ज्ञान रत्न रुपी
जवाहरात देवून सर्वांना सावकार बनवायचे आहे.....!!!
प्रश्न:-
आपल्या जवीनाला
हिज्या सारखे बनविण्यासाठी, कोणत्या गोष्टीची फार फार काळजी घेतली पाहिजे?
उत्तर:-
संगतीची मुलांनी संग त्यांचा केला पाहिजे जे चांगले ज्ञान सांगतात. जे सांग नाहीत,
त्यांची संगत केल्याने फायदाच काय? संगतीचा दोष फार लागतो, कोणी कोणाच्या संगतीने
हिज्यासारखे बनतात, कोणी मग कोणाच्या संगतीने खापरासारखे बनतात. जे ज्ञानवान आहेत
ते आपल्यासारखे इतरांना जरुर बनवितात. संगती पासून स्वत:चा सांभाळ करावयाचा आहे.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना साज्या सृष्टीचे, सारे विश्वनाटक चांगल्याप्रकारे बुध्दी
मध्ये आठवणीत आहे. त्यातील फरक पण बुध्दीमध्ये आहे. हे सारे बुध्दीमध्ये पक्के
राहिले पाहिजे की, सतयुगामध्ये सर्व श्रेष्ठाचारी, निर्विकारी पावन धनवान होते. आता
तर दुनिया भ्रष्टाचारी विकारी पतित कंगाल आहे. आता तुम्ही मुले संगमयुगावर आहात.
तुम्ही सर्व त्या किनाऱ्याकडे तिरांकडे जात आहात. जसे नदी आणि सागराचा जेथे मेळ होतो,
त्याला संगम म्हटले जाते. एकीकडे गोड पाणी एकीकडे खारे पाणी असते. आता हा पण संगम
आहे. तुम्ही जाणता कि, बरोबर सतयुगामध्ये लक्ष्मी नारायणाचे राज्य होते, मग असे
चक्र फिरते. आता आहे संगम, अकलियुगाचे अंताला सर्व दु:खी आहे,त याला जंगल म्हटले
जाते. सतयुगाला बाग म्हटले जाते. आता तुम्ही काट्यापासून फुल बनत आहात. ही आठवण
तुम्हा मुलांना राहिली पाहिजे. आम्ही बेहदच्या बाबांकडून वारसा घेत आहे. हे
बुध्दीमध्ये आठवणीत ठेवले पाहिजे. 84 जन्माची गोष्ट तर फार सोपी आहे. समजतात कि, आता
84 जन्म पूर्ण झाले. तुमच्या बुध्दीमध्ये पक्के आहे कि, आम्ही आता सतयुगी बागेमध्ये
जात आहोत. आता आमचा जन्म या मृत्युलोकांमध्ये होणार नाही. आमचा जन्म होईल
अमरलोकांमध्ये. शिवबाबांना अमरनाथ पण म्हणतात, ते आम्हाला अमर कथा सांगत आहेत, तेथे
आम्ही शरीरामध्ये राहून पण अमर राहू. आपल्या खुशीने वेळेवर शरीर सोडू, त्याला
मृत्युलोक म्हणत नाहीत. तुम्ही कोणाला पण सांगाल तर ते समजतील कि, बरोबर
यांच्यामध्ये तर पुर्ण ज्ञान आहे. सृष्टीचा आदि आणि अंत तर आहे ना. लहान मुलगा पण
तरुण आणि वृध्द होत आहे मग अंत होतो, परत मुलगा बनतो. सृष्टी पण नवी बनते, मग
पावभाग जुनी, आर्धाभाग जुनी, मग सारी जुनी होऊन जाते. नंतर नवीन बनते. यासर्व गोष्टी
कोणी एक दोघाला सांगू शकत नाहीत. अशी चर्चा कोणी करु शकत नाही. तुमच्या
ब्राह्मणाशिवाय आणखीन कोणाला हे आत्मिक ज्ञान मिळत नाही. ब्राह्मण वर्गात याल,
तेव्हा ऐकाल. फक्त ब्राह्मणच जाणतात. ब्राह्मणामध्ये पण क्रमानुसार आहेत. कोणी
यथार्थ रितीने सांगतात, कोणी सांगू शकत नाहीत तर त्यांना काही मिळत नाही.
जवाहिज्यामध्ये पण पाहतो कि, कोणाजवळ तर करोडोचा माल असतो, कोणा जवळ तर 10 हजाराचा
पण माल आसत नाही. तुमच्यामध्ये पण असे आहेत. जसे ही पाहा जनक आहे, ही चांगली जवाहिरी
आहे. यांचे जवळ मुल्यवान जवाहिरे आहेत. कोणाला देवून चांगला सावकार बनवू शकते. कोणी
लहान जवाहिरी आहे, जास्ती देवू शकत नाही तर त्यांचे पद पण कमी होते. तुम्ही सर्व
जवाहिरी आहात, हे अविनाशी ज्ञान रत्नांचे जवाहरात आहे. ज्यांचे जवळ चांगली रत्ने
आहेत ते सावकार बनतील, इतरांना पण बनवितील. असे पण नाही कि सर्वच चांगले जवाहिरी
आहेत. चांगले चांगले जवाहिर मोठ मोठ्या दुकानात तरबेज राहतात. बाबाला पण म्हटले जाते,
सौदागर, रत्नागर. रत्नांचा सौदा करण्यासाठी मग जादूगर पण आहेत, कारण त्यांचे जवळच
दिव्य दृष्टीची किल्ली आहे. कोणी नवविध भक्ती करतात तर त्यांना साक्षात्कार होतो.
येथे अशा गोष्टी नाहीत. येथे तर विनासयास घरी बसल्यावर पण अनेकांना साक्षात्कार होत
आहे. दिवसेंदिवस सोपे होत जाईल. कोणाला ब्रह्माचा आणि कृष्णाचा साक्षात्कार होतो.
त्यांना म्हणतात ब्रह्मा जवळ जावा. त्यांचेकडे राजकुमार बनण्याचे शिक्षण घ्या. हे
पवित्र राजकुमार राजकुमारी बनत आहेत ना. राजकुमार ला पवित्र पण म्हणतात.
पवित्रतेद्वारे जन्म होत आहे ना. पतिताला भ्रष्टाचारी म्हणतात. पतितापासून पावन
बनायचे आहे, हे बुध्दीमध्ये ठेवले पाहिजे. जे कोणाला सांगू पण शकतील. मनुष्य समजतात
कि, हे तर फार समजदार आहेत. त्यांना सांगा, आमचे कडे कोणत्या शास्त्राचे ज्ञान नाही.
हे आहे आत्मिक ज्ञान जे आत्मिक बाबा समजावत आहेत. हे आहेत त्रिमुर्ती ब्रह्मा,
विष्णू शंकर. ही पण रचना आहे. रचयिता एक बाबा आहेत, ते आहेत हदचे रचयिता, हे आहत.
बेहदचे बाबा, बेहदचे रचयिता. बाबा बसून शिकवत आहेत, मेहनत केली पाहिजे. बाबा
फुलासारखे बनवत आहेत. तुम्ही आहात ईश्वरीय कुळातील, तुम्हाला बाबा पवित्र बनवत आहेत,
परत जर अपवित्र बनला तर कुलक लकीत बनाल. बाबा तर जाणतात ना. नंतर धर्मराज द्वारा
फार शिक्षा देतील. बाबा बरोबर धर्मराज पण आहेत. धर्मराजाचे कर्तव्य पण आता पूर्ण
होत आहे. सतयुगामध्ये तर आसत नाही. नंतर सुरु होते द्वापर पासून. बाबा कर्म अकर्म,
विकर्माची गती समजावत आहेत. असे म्हणतात कि, यांनी पूर्वीच्या जन्मामध्ये असे कर्म
केले होते, त्यांचा हा भोग आहे. सतयुगामध्ये असे म्हणत नाहीत. वाईट कर्माचे तेथे
नांव असत नाही. येथे तर वाईट चांगले दोन्ही आहेत. सुख दु:ख दोन्ही आहे. परंतू सुख
फार थोडे आहे. तेथे मग दु:खाचे नाव नाही. सतयुगामध्ये दु:ख कोठून आले. तुम्ही
बाबांकडून नविन दुनियेचा वारसा घेत आहात. बाबा आहेतच दु:ख हर्ता, सुख कर्ता. दु:ख
कधी पासून सुरु होते, हे पण तुम्ही जाणत आहात. शास्त्रामध्ये तर कल्पाचा कालावधी
लांबलचक लिहला आहे. आता तुम्ही जाणता कि, अर्ध्याकल्पासाठी आमचे दु:ख नष्ट होतील,
आणि आम्ही सुख प्राप्त करु. हे सृष्टीचे चक्र कसे फिरत आहे. यावर समजावणे फार सोपे
आहे. यासर्व गोष्टी तुमच्या शिवाय कोणाच्या बुध्दीत बसत नाहीत. लाखो वर्ष म्हटल्याने
यासर्व गोष्टी बुध्दीतून निघून जातात.
आता तुम्ही जाणता कि, हे चक्र 5 हजार वर्षाचे आहे. कालची गोष्ट आहे, जेव्हा या
सुर्यवंशी चंद्रवंशीचे राज्य होते. असे म्हणतात कि ब्राह्मणाचा दिवस, असे नाही
म्हणत कि, शिवबाबाचा दिवस. ब्राह्मणाचा दिवस परत ब्राह्मणाची रात्र. ब्राह्मण मग
भक्तीमार्गात पण येतात. आता आहे संगम, ना दिवस, ना रात्र. तुम्ही ब्राह्मणच जाणता,
या गोष्टीला इतर कोणी जाणत नाही. ते तर म्हणतात शास्त्रामध्ये याचा कालावधी लिहला
आहे, तुम्ही मग हा हिशोब कोठून आणला? हे अनादि नाटक पूर्वपार बनलेले आहे, हे कोणाला
माहित नाही. तुम्हा मुलांच्या बुध्दीमध्ये आहे, आर्धाकल्प आहे सतयुग त्रेता, मग
आर्धानंतर भक्ती सुरु होते. ते आहे त्रेता आणि द्वापरचा संगम. द्वापर पासून ते
शास्त्र हळू हळू बनतात. भक्ती मार्गाची सामुग्री फार लांबलचक आहे. जसे झाड किती
लांबलचक आहे. यांचे बीज आहेत बाबा. हे उल्टे झाड आहे. पहिल्या प्रथम आदि सनातन देवी
देवता धर्म आहे. या गोष्टी जे बाबा सांगत आहेत, या आहेत बिल्कुल नविन. या देवी देवता
धर्माच्या स्थापकास कोणी ओळखत नाही. कृष्ण तर लहान आहे. ज्ञान सांगणारे आहेत. बाबा,
तर बाबाला उडवून मुलांचे नांव टाकले आहे. कृष्णाचेच चरित्र इ. दाखवले आहे. बाबा
सांगतात कि, लीला काही कृष्णाची नाही. गातात पण कि, हे प्रभू, तुमची लीला अपरंपार
आहे. लीला एकाचीच असते. शिवबाबाची महिमा फार वेगळी आहे. ते तर आहेत सदा पावन राहणारे,
परंतू ते पावन शरीरात येत नाहीत. त्यांना बोलावता, तेच पतित दुनियेला येऊन पावन
करण्यासाठी. तर बाबा म्हणतात कि, मला पतित दुनियेमध्ये यावे लागते. यांच्या फार
जन्मातील अंतामध्ये येऊन प्रवेश करतो. तर बाबा मुख्य गोष्ट सांगत आहेत, अल्फची आठवण
करा, बाकी इतर सारे किरकोळ आहे. ते सर्व तर धारण करु शकत नाहीत, जे धारण करु शकतात,
त्यांना समजावत आहे. बाकी तर सांगतो, मनमनाभव. नंबरवार बुध्दी तर असतेच ना. काही ढग
तर फारच पाऊस पाडतात, काही थोडे पडून, निघून जातात. तुम्ही पण ढग आहात ना. काही तर
बिल्कुल पडतच नाहीत. ज्ञानाला ओढण्याची ताकद नाही. मम्मा बाबा चांगले ढग आहेत ना.
मुलांनी त्यांची सांगत केली पाहिजे जे चांगले ज्ञान सांगतात. जे ज्ञानच सांगत नाहीत,
त्यांची संगत ठेवल्याने काय होईल? संगतीचा दोष पण फार लागतो. कोणी तर चांगल्याच्या
संगतीने हिज्यासारखे बनतात, कोणी मग वाईटाच्या संगतीने खापरासारखे बनतात. पाठ धरली
पाहिजे चांगल्याची. जे ज्ञानवान आहेत ते आपले सारखे इतरांना फुल बनवितात. सत्य
बाबांकडून जे ज्ञानवान आणि योगी बनले आहेत, त्यांची संगत केली पाहिजे. असे समजले
नाही पाहिजे की, आम्ही अमक्याचे शेपूट धरुन पार जावू. असे पुष्कळ म्हणतात. परंतू
येथे तर ती गोष्ट नाही. विद्यार्थी कोणाचे शेपूट धरल्याने पास होतील काय? अभ्यास
केला पाहिजे ना. बाबा पण येऊन ज्ञान देत आहेत. यावेळी ते जाणतात कि, मला ज्ञान
द्यावयाचे आहे. भक्तीमर्गामध्ये त्यांचे बुध्दीत या गोष्टी नसतात कि, मला जावून
ज्ञान द्यावयाचे आहे. हे सर्व नाटकात नोंदलेले आहे. बाबा काही करत नाहीत.
विश्वनाटकामध्ये दिव्य दृष्टी मिळण्याची गोष्ट असेल तर साक्षात्कार होतो. बाबा
म्हणतात असे नाही कि मी साक्षात्कार करतो. हे नाटकात नोंदलेले आहे. जर कोणी देवीचा
साक्षात्कार करु इच्छितो, तर देवी तर करत नाही. असे म्हणतात कि, हे भगवान, मला
साक्षात्कार करवा. बाबा म्हणतात नाटकात नोंदलेले असेल तर होईल. मी पण नाटकामध्ये
बांधलेला आहे.
बाबा सांगतात कि, मी या सृष्टीवर आलो आहे. यांच्या मुखाद्वारे मी बोलत आहे, यांच्या
डोळ्याद्वारे तुम्हाला पाहत आहे. जर हे शरीर नसते तर पाहू कसे? पतित दुनियेमध्येच
मला यावे लागते. स्वर्गामध्ये तर मला बोलावत नाहीत. मला बोलावता तर संगमवर. जेव्हा
संगमयुगामध्ये येऊन शरीर घेतो, तेव्हाच पाहतो. निराकार रुपात तर काही पाहू शकत नाही.
कर्मेद्रिया मिळतील तेव्हा पाहतील ना. बाबा म्हणतात कि, चांगले किंवा वाईट काम
नाटकानुसार प्रत्येक जण करत आहे. नोंदलेले आहे, मी थोडाच एवढ्या करोडो लोकांचा
हिशोब ठेवेल, मला शरीर मिळते, तेव्हा सर्व काही करतो. करनकारावनहार पण तेव्हाच
म्हणतात. नाही तर म्हणू शकणार नाहीत. मी जेव्हा यांच्यात येतो, तेव्हा पावन बनवितो.
वर आत्मा काय करणार? शरीराद्वारेच अभिनय करेल ना. मी पण येथे येऊन अभिनय करत आहे.
सतयुगामध्ये माझी भुमिका नाही. भुमिके शिवाय कोणी काही करु शकत नाही. हे आहे
विस्तारातील समजावणे. मुख्य गोष्ट तर आहे बाबा आणि वारशाची आठवण करणे. बेहदचे बाबा
एवढे मोठे आहेत, त्यांचेकडून वारसा केव्हा मिळत असेल, हे कोणी जाणत नाही. म्हणतात
येऊन दु:ख नाहीसे करा, सुख दया, परंतू कधी, हे कोणाला माहित नाही. तुम्ही मुले आता
नविन गोष्टी ऐकत आहात. तुम्ही जाणता कि, आम्ही अमर बनत आहोत, अमरलोकला जात आहोत.
तुम्ही अमरलोकला किती वेळा गेले आहात? अनेक वेळा यांचा कधी अंत होत नाही. अनेक जण
म्हणतात, काय मोक्ष मिळत नाही? सांगा नाही, अनादि अविनाशी नाटक आहे. हे कधी विनाश
होऊ शकत नाही. हे तर अनादी चक्र फिरतच राहते. तुम्ही मुले यावेळी खज्या साहेबाला
ओळखत आहात. तुम्ही सन्यासी आहात ना. तसले फकीर नाही. सन्याशांना पण फकीर म्हटले जाते.
तुम्ही राजऋषी आहात, ऋषीला सन्यासी म्हटले जाते. आता तुम्ही परत धनवान बनत आहात.
भारत किती धनाढय होता, आता कसा गरीब बनला आहे. बेहदचे बाबा येऊन बेहदचा वारसा देत
आहेत. गीत पण आहे, बाबा तुम्ही जे देता, ते कोणी देवू शकत नाही. तुम्ही आम्हाला
विश्वाचे मालक बनवित आहात. ज्याला कोणी लुटू शकत नाही. असे गीत बनविणारे त्याचा
अर्थ काढत नाहीत. तुम्ही जाणता कि, तेथे फाळणी इ. काही होत नाही. येथे तर किती
विभाजन होते. तेथे आकाश जमीन सर्व तुमची असते. तर एवढी खुशी मुलांना राहिली पाहिजे
ना. नेहमी समजा शिवबाबा सांगत आहेत, कारण ते कधी सुट्टी घेत नाहीत, कधी आजारी पडत
नाहीत. आठवण शिवबाबाचीच राहिली पाहिजे. याला म्हटले जाते निरहंकारी. मी हे करतो, मी
हे करतो, हा अहंकार आला नाही पाहिजे. सेवा करणे तर कर्तव्य आहे, यात अहंकार आला नाही
पाहिजे. अहंकार आला आणि मेला. सेवा करत राहा, ही आहे आत्मिक सेवा. बाकी सर्व आहेत
शरीराची सेवा. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1) बाबा जे
शिकवत आहेत, त्याचा मोबदला फुल बनून दयायचा आहे. कधी पण ईश्वरीय कुळाचे नांव बदनाम
करायचे नाही. जे ज्ञानवान आणि योगी आहेत त्यांचा संग करा.
2) मी पणाचा त्याग
करुन निरहंकारी बनून आत्मिक सेवा करावयाची आहे, याला आपले कर्तव्य समजले पाहिजे.
अहंकारामध्ये यावयाचे नाही.
वरदान:-
आपल्या फरिश्ता
स्वरुपाद्वारे, सर्वांना वारशाचा अधिकार देणारे आकर्षण मुक्त भव :-
फरिश्ते स्वरुपाची अशी
चमकणारी वस्त्रे धारण करा, जे लांबुनच आत्म्यांना आपलेकडे आकर्षित करेल, आणि
सर्वांना भिकारी पणापासून मुक्त करुन, वारशाचे अधिकारी बनवेल. त्यासाठी ज्ञानमुर्त,
याद मुर्त. आणि सर्व दिव्य गुणमुर्त बनून उडती कलेमध्ये स्थित राहण्याचा अभ्यास
वाढवत राहा. तुमची उडती कलाच सर्वांना चालता फिरता फरिश्ता सो देवता स्वरुपाचा
साक्षात्कार करेल. हीच विधाता, आणि वरदाता पणाची अवस्था आहे.
बोधवाक्य:-
इतरांच्या
मनातील भावनेला ओळखण्यासाठी नेहमी मनमनाभवच्या स्थितीमध्ये स्थित राहा...!!!