26-01-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
13.11.1985 ओम शान्ति
मधुबन
संकल्प , संस्कार ,
संबंध , बोलणे आणि कर्मामध्ये नविनता आणा
आज नविन दुनियातील
नविन रचनेचे रचयिता बाबा, आपल्या नविन दुनियेतील अधिकारी मुलांना म्हणजेच नवीन
रचनेला पाहत आहेत. नविन रचना नेहमीच प्रिय वाटते. दुनियेच्या हिशोबाने जुन्या युगात
नविन वर्ष साजरे करतात. परंतू तुम्ही नविन रचना, नविन युगाची, नविन जीवनाची अनुभूती
करत आहात. सर्व नविन झाले आहे. जुने समाप्त झाले, नविन जन्म, नविन जीवनाची सुरुवात
झाली. जन्म नविन झाला, तर जन्मामुळे जीवन स्वत:च बदलत आहे. जीवन बदलणे म्हणजे
संकल्प, संस्कार, संबंध, सर्व बदलले म्हणजे नविन झाले. नविन धर्म, नविन कर्म- आता
ते फक्त नविन वर्ष म्हणत आहेत. परंतू तुम्हा सर्वांसाठी सर्व नवीन झाले आहे. आजच्या
दिवशी अमृतवेळे पासून नविन वर्षाची शुभभावना तर दिली, परंतू फक्त तोंडाद्वारे दिली
का मनाने? नविनतेचा संकल्प केला? या विशेष तीन गोष्टीच्या नविनतेचा संकल्प केला?
संकल्प, संस्कार आणि संबंध, संस्कार आणि संकल्प नविन म्हणजे श्रेष्ठ बनले. नविन
जन्म, नविन जीवन झाले पण आता पर्यंत जुना जन्म व जीवनातील संकल्प, संस्कार आणि
संबंध तर राहिले नाहीत ना? जर या तिन्ही पैकी कोणत्या पण गोष्टीत अंश मात्र जुने पण
राहिले असेल तर तो अंश नविन जीवनातील, नविन युगातील, नवीन संबंधातील, नविन
संस्कारातील सुख व सर्व प्राप्ती पासून वंचित करेल. काही मुले बापदादा समोर आपल्या
मनातील गोष्टी, वार्तालाप करुन सांगत आहेत. बाहेरुन म्हणत नाहीत. बाहेरुन कोणी
विचारले कसे आहात? तर सर्व असे म्हणतात कि, फार चांगले, कारण जाणतात कि, बाह्य मुखी
आत्मे आतील काय ओळखतात. परंतू बाबाशी वार्तालाप करताना लपवू शकत नाहीत. आपल्या
मनातील गोष्टीमध्ये असे जरुर वाटते कि, ब्राह्मण तर बनलो, शुद्रपना पासून किनारा
केला, परंतू जे ब्राह्मण जीवनाची महानता, विशेषता सर्व श्रेष्ठ प्राप्तीचा व अति
इंद्रिय सुखाचा, फरिश्ते पणातील डबल लाइट जीवनाचा, असे विशेष अनुभव जेवढा व्हायला
पाहिजे, तेवढा होत नाही. जे वर्णन या श्रेष्ठ युगातील, श्रेष्ठ जीवनाचे आहे, असा
अनुभव, अशी स्थिती फार थोडा वेळ राहते. याचे कारण काय? जेव्हा ब्राह्मण झालो तर
ब्राह्मण जीवनातील अधिकार पणाचा अनुभव होत नाही, का? राजाचा मुलगा आहे, परंतू
संस्कार भिकारी पणाचे तर मग त्यांना काय म्हणावे? राजकुमार म्हणावे? येथे पण नविन
जन्म, नवीन ब्राह्मण जीवन, आणि तरी पण जुने विचार व संस्कार प्रत्यक्ष होऊन, कर्मात
येतात तर, त्यांना ब्रह्माकुमार म्हणावे का? आर्धा शुद्रकुमार आणि आर्धा
ब्रह्माकुमार नाटकामध्ये एक खेळ दाखवतात कि, आर्धा पांढरा, आर्धा काळा. संगमयुग याला
तर समजलात नाही ना. संगमयुग म्हणजे नविन युग. नविन युग तर सर्व नवे.
आज बापदादा सर्वांचा आवाज ऐकत होते, नविन वर्षाचे अभिनंदन करत होते. कार्ड पण
पाठवितात पत्र पण लिहतात, परंतू म्हणणे आणि करणे दोन्ही एक आहे? अभिनंदन तर केले,
फार चांगले केले. बापदादा पण अभिनंदन करत आहेत. बापदादा पण म्हणतात सर्वांचे
मुखातील बोलण्यात अविनाशी भवचे वरदान आहे. तुम्ही लोक म्हणताना मुखात गुलाब, बापदादा
म्हणतात मुखातील बोलण्यात अविनाशी वरदान असावे. आजपासून फक्त एक शब्द आठवणीत ठेवा.
नवीन जो पण विचार कराल, बोलाल, कर्म कराल, हे तपासून पहा, लक्षात ठेवा कि, नविन आहे?
हाच पोतामेल, चोपडी, रजिस्टर आजपासून सुरु करा. दिवाळीत चोपडीवर काय करतात?
स्वस्तिका काढतात ना, किंवा गणेश नम: जरुर म्हणतात. ही कोणाची आठवण आहे? स्वस्तिकाला
पण गणेश का म्हणतात? स्वस्तिका स्वस्थितीमध्ये स्थित होण्याचे आणि पुर्ण रचनेच्या
ज्ञानाचे प्रतीक आहे. गणेश म्हणजे ज्ञानसंपन्न, स्वस्तिकाच्या एका चित्रामध्ये सारे
ज्ञान समाविष्ठ आहे. ज्ञानसंपन्न तेच्या स्मृतीची आठवण गणेश किंवा स्वस्तिका
दाखवितात. याचा अर्थ काय होतो? कोणत्या पण कार्याच्या सफलतेचा आधार आहे.
ज्ञानसंपन्न म्हणजे समजदार, ज्ञानस्वरुप बनणे. ज्ञानस्वरुप, समजदार बनलात तर
प्रत्येक कर्म श्रेष्ठ आणि सफल होईल ना. ते तर फक्त कागदावर आठवणीची निशाणी लावतात,
परंतू तुम्ही ब्राह्मण आत्मे स्वत: ज्ञानसंपन्न बनून प्रत्येक संकल्प कराल, तो
संकल्प आणि सफलता दोन्ही बरोबरीने अनुभव कराल. तर आज पासून या दृढ संकल्पाचे
रंगाद्वारे आपल्या जीवनाच्या चोपडी वर प्रत्येक संकल्प, संस्कार नवाच करा. होईल, असे
पण नाही, होणारच आहे. स्वास्थतीमध्ये स्थित होऊन श्रीगणेश म्हणजे आरंभ करा. स्वत:
श्रीगणेश बनून आरंभ करा. असा नका विचार करु की, हे तर होतच राहत आहे. संकल्प फार
वेळो करता, परंतू संकल्प दृढ करा. जसे पायामध्ये सिमेट इत्यादी टाकून मजबूत केले
जाते ना. जर रेतीचा पाया टाकला तर किती वेळ टिकेल? तर ज्यावेळी संकल्प करता.
त्यावेळी म्हणता, करुन पाहू, जेवढे होईल तेवढे करु. दुसरे पण असेच करतात. अशी रेती
मिसळता, त्यामुळे पाया पक्का होत नाही. दुसज्याला पाहणे सोपे वाटते. स्वत:ला
पाहण्यात मेहनत वाटती. जर दुसज्याला पाहू वाटते, सवयीचे गुलाम असाल, तर ब्रह्मा
बाबाला पहा. ते पण दुसरे आहेत ना, त्यामुळे बापदादांनी दिवाळीचा पोतामेल पाहिला.
पोतामेलचे विशेष कारण ब्राह्मण बनून पण ब्राह्मण जीवनाची अनुभूती न होणे. जेवढी
व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. त्यांचे विशेष कारण आहे, परदृष्टी, परचिंतन मध्ये
जाणे. परिस्थितीचे वर्णन, आणि मननामध्ये जास्त राहते, त्यामुळे स्वदर्शन चक्रधारी
बना. स्व मुळे पर नष्ट होईल. जसे नवीन वर्षाचे सर्वांनी मिळून अभिनंदन केले, तसे
प्रत्येक दिवस नवा दिवस, नव जीवन, नवा संकल्प, नवा संस्कार स्वत:च अनुभव कराल. आणि
मनामध्ये प्रत्येक वेळी, बाबा प्रती, ब्राह्मण परिवाराचे प्रती अभिनंदनाचा चांगला
उत्साह स्वत:च उत्पन्न होत राहिल. सर्वांच्या दृष्टी मध्ये अभिनंदन, आनंद, भेट
कार्डाची लहर राहिल. तर असे आजच्या अभिनंदन शब्दाला अविनाशी बनवा, समजले. लोक
पोतातेल ठेवतात. बाबांनी पोतामेल पाहिला. बापदादाला मुलांवर दया येते कि, सारे मिळत
असताना अर्धे का घेतात? नाव नविन ब्रह्माकुमार कुमारी आणि कामात भेसळ का? दाताची
मुले आहात, विधाताची मुले आहात, वरदाताची मुले आहात. तर नवीन वर्षात काय आठवणीत
ठेवाल? सर्व नवे करावयाचे आहे, म्हणजे ब्राह्मण जीवनाच्या मर्यादेत सर्व नवे. नवीनचा
अर्थ आहे. काही मिसळ करावयाची नाही. चतुर पण फार बनले आहात ना, बाबाला पण शिकवितात.
काही मुले म्हणतात कि, बाबांनी सांगितले आहे कि, नवीन करावयाचे आहे, तर हे नवीन
आम्ही करत आहोत. परंतू ब्राह्मण जीवनाच्या मर्यादे प्रमाणे नविन असावे. मर्यादेची
रेषा तर ब्राह्मण जीवन, ब्राह्मण जन्मात बापदादांनी दिली आहे. समजले नविन वर्ष कसे
साजरे करावयाचे आहे. सांगितले कि, 18 वा अध्याय सुरु होत आहे.
सुवर्ण जयंती पुर्वी विश्वविद्यालयाची सुवर्णजयंती आहे. असे समजू नका, कि फक्त 50
वर्षे झालेल्यांची सुवर्ण जयंती आहे. परंतू ही ईश्वरीय कार्याची सुवर्ण जयंती आहे.
स्थापनेच्या कार्यात जे पण सहयोगी आहेत, जरी 2 वर्षाचे असावेत, वा 50 वर्षाचे असोत,
परंतू 2 वर्षे वाले पण स्वत:ला ब्रह्मकुमार कुमारी म्हणतात ना, का आणखीन कोणते नांव
आहे. तर ही ब्रह्मद्वारे ब्राह्मणांना रचलेली सुवर्ण जयंती आहे, यामध्ये सर्व
ब्रह्माकुमार कुमारी आहेत. सुवर्ण जयंती पर्यंत स्वत:मध्ये सोन्यासारखे अर्थात
सतोप्रधान संकल्प, संस्कार निर्माण करावयाचे आहेत. अशी सुवर्ण जयंती साजरी करावयाची
आहे. असे तर निमित्त मात्र रुढी परंपरेनुसार साजरी करतात. परंतू खरे तर सुवर्ण जयंती,
सोन्यासारखी बनण्याची जयंती आहे. कार्य सफल झाले म्हणजे कार्य अर्थ निमित्त आत्मे
सफलता स्वरुप बनणे. अजून पण वेळ आहे. या 3 महिन्यात दुनियेच्या रंगमचा वर वेगळी
सुवर्ण जयंती साजरी करुन दाखवा. दुनिया वाले सन्मान करतात, आणि येथे समान बनलेली
अवस्था प्रत्यक्ष करावयाची आहे. सन्मान देण्यासाठी काही पण करता, हे तर निमित्त
मात्र आहे. वास्तविकता जी आहे, ती दुनियेसमोर दाखवावयाची आहे. आम्ही सर्व एक आहोत.
एकाचे आहोत, एकरस स्थितीवाले आहोत. एकाच्या लगनमध्ये मगन राहून एकाचे नाव प्रत्यक्ष
करणारे आहोत, हा न्यारा आणि प्यारा गोल्डन स्थितीचा झेंडा फडकावा. सोनेरी दुनियेची
दृष्ये तुमच्या डोळ्याद्वारे, बोल आणि कर्माद्वारे स्पष्ट दिसले पाहिजेत. अशी
सुवर्ण जयंती साजरी करा. अच्छा.
असे नेहमी अविनाशी अभिनंदनाचे पात्र श्रेष्ठ मुलांना, आपल्या प्रत्येक संकल्प आणि
कर्माद्वारे नविन संसाराचा साक्षात्कार करणारी मुलांना. आपल्या सुवर्ण स्थितीद्वारे
सुवर्ण युग आले कि आले, अशा शुभ आशेचा दिपक विश्वातील आत्म्यांचे मनात जागविणारे,
नेहमी चमकणाज्या ताज्यांना, सफलतेच्या दिपकांना दृढ संकल्पाद्वारे नविन जीवनाचे
दर्शन करणारे, दर्शनीय मुर्त मुलांना बापदादांची प्रेमळ आठवण, अविनाशी अभिनंदन,
अविनाशी वरदानां बरोबर नमस्ते.
पदयात्री तसेच
सायकल यात्री ब रोबर अव्यक्त बापदादांची मुलाखत
यात्रेद्वारे सेवा तर सर्वांनी केली. जी पण सेवा केली त्या सेवेचा प्रत्यक्ष फळ पण
अनुभवला. सेवेची विशेष खुशी अनुभव केली ना. पदयात्रा तर केली, सर्वांनी तुम्हाला
पदयात्रीचे रूपात पाहिले. आता आत्मिक यात्रीच्या रुपात पाहतील. सेवेच्या रुपात तर
पाहिले, परंतू आता एवढी निराळी यात्रा करणारे अलौकिक यात्री आहेत, हा अनुभव व्हावा.
जसे या सेवेमध्ये लगनद्वारे सफलतेला प्राप्त केले. तसे आता आत्मिक यात्रेमध्ये सफल
व्हावयाचे आहे. मेहनम करतात, फार चांगली सेवा करत आहेत, सांगतात पण चांगले, यांचे
जीवन फार चांगले आहे, हे तर झाले. परंतू आता जीवन बनविण्यासाठी प्रयत्न करतील, असा
अनुभव करतील कि, या जीवनासारखे दुसरे कोणते जीवनच नाही. तर आत्मिक यात्रेचे लक्ष्य
ठेवून, आत्मिक यात्रेचा अनुभव करा. समजले काय करावयाचे आहे. चालता-फिरता असे पाहतील
की हे साधारण नाहीत. हे आत्मिक यात्री आहेत तर काय करावयाचे आहे. स्वत: पण यात्रे
मध्ये राहा, आणि दुसज्याला पण यात्रेचा अनुभव करा. पदयात्रेचा अनुभव केला, आता
फरिश्ते पणाचा अनुभव करावा. ते अनुभव करतील कि हे या धरतीवर राहणारे नाहीत. हे
फरिश्ते आहेत. यांचे पाय या धरतीवर पडत नाहीत. दिवसेनुदिवस उडती कलेद्वारे इतरांना
उडवा. आता उडण्याची वेळ आहे. चालण्याची वेळ नाही. चालण्यासाठी वेळ लागतो आणि
उडण्यासाठी वेळ लागत नाही. स्वत:चे उडती कलेद्वारे इतरांना पण उडवा. समजले. अशा
दृष्टीने स्मृतीने, सर्वांना संपन्न बनवत जावा. त्यांना वाटले पाहिजे की, आम्हाला
काही मिळाले आहे. भरपूर झालो आहे. खाली होतो परंतू आता भरपूर झालो आहे. जिथे
प्राप्ती होत राहते तिथे सेकंदात समाप्ती होऊन जाते. तुम्ही लोकांना प्राप्ती झाली,
त्यामुळे तर सोडले ना. चांगले वाटले, अनुभव केला, तेव्हातर सोडले ना. असेच नाही
सोडले. असा इतरांना प्राप्तीचा अनुभव करवा, समजले. बाकी चांगले आहे. जे पण सेवेमध्ये
दिवस गेले, ते स्वत:साठी आणि इतरांसाठी पण श्रेष्ठ गेले. उमंग उत्साह चांगला राहिला.
अवस्था चांगली राहिली ना. परमात्मा चिंतन नेहमी राहिले, तर सफलता पण नेहमी राहिल.
असे नाही पदयात्रा पुर्ण केली तर सेवा पुर्ण झाली. नंतर जसे होते तसे. नाही. नेहमी
सेवेच्या क्षेत्रामध्ये सेवे शिवाय ब्राह्मण राहू शकत नाहीत. फक्त सेवेची भुमिका
बदलली आहे. सेवा तर अंतापर्यंत करावयाची आहे. असे सेवाधारी आहात ना, का तीन महिने,
दोन महिन्याचे सेवाधारी आहात. नेहमीचे सेवाधारी, नेहमीच उमंग उत्साह राहावा. अच्छा,
नाटकामध्ये जी पण सेवेची भुमिका मिळते त्यामध्ये विशेषता भरलेली आहे. हिम्मतीने
मदतीचा अनुभव केला. अच्छा. स्वत:द्वारे बाबाला प्रत्यक्ष करण्याचा श्रेष्ठ संकल्प
राहिला, कारण जेव्हा बाबाला प्रत्यक्ष कराल. तेव्हा या जुन्या दुनियेची समाप्ती
होईल, आपले राज्य येईल. बाबाला प्रत्यक्ष करणे म्हणजे आपले राज्य आणणे. आपले राज्य
आणायचे आहे, हा उमंग उत्साह नेहमी राहत आहे ना. जसे विशेष कार्यक्रमाचा उमंग उत्साह
राहिला, असे नेहमी या संकल्पाचा उमंग उत्साह राहो, समजले.
पार्टी बरोबर
:- ऐकले तर
फार आहे. आता त्या ऐकलेल्या गोष्टींना स्वत: मध्ये समाविष्ट करावयाचे आहे, कारण
जेवढे समाविष्ट कराल तेवढे बाबा सारखे शक्तीशाली बनाल. मास्टर आहात ना. जसे बाबा
सर्वशक्तीवान आहेत, असे तुम्ही सर्व पण मास्टर सर्वशक्तीवान म्हणजे सर्व शक्तींना
धारण करणारे, बाबासारखे बनणारे आहात ना. बाबा आणि मुलामध्ये जीवनाच्या आधारावर,
अंतर दिसले नाही पाहिजे. जसे ब्रह्मा बाबाचे जीवन पाहिले तर ब्रह्मा बाबा आणि मुलं
एकसारखे दिसले पाहिजेत. साकार मध्ये तर ब्रह्मा बाबा कर्म करुन दाखविण्यासाठी
निमित्त बनले ना. असे समान बनणे म्हणजे मास्टर सर्वशक्तीवान बनणे. तर सर्वशक्ती
आहेत? धारण तर केल्या आहेत, परंतू टक्केवारी मध्ये. जेवढे असायला पाहिजे तेवढे नाही.
संपन्न नाही. बनायचे तर समान आहे ना. तर टक्केवारी वाढवा. शक्तींना वेळेवर कार्यात
लावणे, यावरच नंबर मिळत आहेत. जर वेळेवर कामाला येत नाही तर काय म्हणावे? असून पण
नसल्या सारखीच म्हणावे, कारण वेळेवर कामाला आली नाही, तर तपासून पाहा कि वेळेनुसार
ज्या शक्तीची आवश्यकता आहे ती कार्यामध्ये लावू शकता? तर बाबा सारखे मास्टर
सर्वशक्तीवान प्रत्यक्ष रुपात विश्वाला दाखवायचे आहे. तेव्हा तर विश्व मानेल ना,
कि, होय, सर्वशक्तीमान प्रत्यक्ष आले आहेत, हेच लक्ष्य आहे ना. आता पाहावे कि
सुवर्ण जयंती पर्यंत नंबर कोण घेत आहेत. अच्छा.
वरदान:-
विश्व
कल्याणाचे भावनेद्वारा प्रत्येक आत्म्याचा सुरक्षतेची योजना बनविणारे खरे दयावान भव
वर्तमान काळी काही
आत्मे स्वत:च स्वत:च्या अकल्याणासाठी निमित्त बनत आहेत, त्यासाठी दयावान बनून योजना
बनवा. कोणत्या पण आत्म्याचे कर्तव्य पाहून तुम्ही हलचालीमध्ये येऊ नका. परंतू
त्यांच्या सुरक्षितेचे साधन शोधा, असे नाही कि हे तर होतच राहते, झाडे तर झडणारच
आहे,असे नाही. आलेल्या विघ्नाला नष्ट करा. विश्व कल्याणकारी व विघ्नाविनाशक जे नाव
आहे, त्याप्रमाणे संकल्प, वाणी आणि कर्मामध्ये रहमदिल बनून, वायुमंडळाला बदलण्यात
सहयोगी बना.
सुविचार:-
कर्मयोगी ते
बनू शकतात, जे बुध्दीवर सतर्कतेचा पहारा देतात....!!!
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
जरी कोणत्या पण
प्रकारचा भार किंवा ओझे आहे तर आत्मिक व्यायाम करा. आता आता कर्मयोगी म्हणजे साकारी
स्वरुपधारी बनून, साकार सृष्टीमध्ये कर्तव्य करा, आता आता आकारी फरिश्ता बणुन आकारी
वतनवासी अव्यक्त रुपाचा अनुभव करा, आता आता निराकारी बनून मुलवतन वासी स्थितीचा
अनुभव करा, अशा व्यायामाने हल्के बनाल, भारी पण नष्ट होईल.