02-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुमची नजर शरीरा वरती जायला नको,स्वतःला आत्मा समजा,शरीराला पाहू नका.
प्रश्न:-
प्रत्येक
ब्राह्मण मुलाला कोणत्या विशेष दोन गोष्टी वरती लक्ष द्यायचे आहे?
उत्तर:-
१ अभ्यासावर,२
दैवी गुणांवरती. काही मुलांमध्ये क्रोधाचा वंश पण नाही आणि काही तर क्रोधा मध्ये
येऊन खुप भांडतात.मुलांना विचार करायला पाहिजे,आम्हाला दैवी गुण धारण करून देवता
बनायचे आहे.कधी क्रोधा मध्ये येऊन वार्तालाप करु नका.बाबा म्हणतात,कुणा मुलांमध्ये
क्रोध आहे तर तो भूतनाथ भूतनाथिनी आहे.अशा भूत असणाऱ्या मुलां सोबत तुम्ही गोष्टी
पण करु नका.
गीत:-
भाग्य घेऊन आलो
आहे…..
ओम शांती।
मुलांनी गीत ऐकले,दुसऱ्या कोणत्याच सत्संगामध्ये कधी गीता वरती समजून सांगत नाहीत.ते
ग्रंथ ऐकवतात.जसे गुरुद्वारा मध्ये ग्रंथाचे दोन वचन काढुन परत त्याचा विस्तार
करतात.गीता वरती कोणी समजवत आहेत,असे कधी होत नाही.आता बाबा समजतात,हे सर्व गीत
भक्तिमार्गाचे आहेत.मुलांना समजावले आहे,ज्ञान वेगळी गोष्ट आहे,जे एका निराकार शिवा
द्वारेच मिळू शकते.याला आत्मिक ज्ञान म्हटले जाते.ज्ञान तर अनेक प्रकारचे
असते.कोणाला विचारले हा गालिचा कसा बनतो? तुम्हाला हे ज्ञान आहे का?प्रत्येक
गोष्टीचे ज्ञान असते ना. त्या आहेत शारीरिक गोष्टी.आत्मिक पिता तर एकच आहे,त्यांचे
रूप दिसून येत नाही.त्या निराकार चे चित्र पण शाळीग्राम सारखे आहे.त्यांनाच परमात्मा
म्हणतात.त्यांना निराकारच म्हटले जाते.मनुष्य सारखा आकार नाही.प्रत्येक वस्तूचा
आकार तर जरूर असतो ना.त्या सर्वांमध्ये लहान आकार आत्म्याचा आहे,त्याला कुदरत म्हटले
जाते.आत्मा खूपच सूक्ष्म आहे,जी डोळ्याने दिसून येत नाही.तुम्हा मुलांना दिव्यदृष्टी
मिळाली आहे,ज्याद्वारे सर्व साक्षात्कार होतो.जे भूतकाळात होऊन गेले आहेत,त्यांना
दिव्य दृष्टीने पाहिले जाते.प्रथम नंबर मध्ये लक्ष्मीनारायण होऊन गेले आहेत,आता परत
आले आहेत तर,त्यांचा साक्षात्कार पण होतो. त्या खूपच सूक्ष्म गोष्टी आहेत.याद्वारे
समजू शकता,शिवाय परमपिता परमात्मा, आत्म्याचे ज्ञान कोणीच देऊ शकत
नाही.मनुष्य,आत्मिक ज्ञानाला यर्थात रितीने जाणत नाहीत,तसे तर परमात्म्याला पण
यर्थात रितीने जाणत नाहीत.दुनिया मध्ये मनुष्यांचे अनेक मतं आहेत.काही म्हणतात आत्मा
परमात्मा मध्ये मिसळून जाते,कोणी काय म्हणतात.आता तुम्हा मुलांना जायचे आहे,ते पण
नंबरा नुसार,सर्वांच्या बुद्धीमध्ये तर एक सारखे बसू शकत नाही.सारखं सारखं
बुद्धीमध्ये बसवावे लागते.आम्ही आत्मा आहोत,त्याला ८४ जन्माची भूमिका वठवयाची
आहे.आता बाबा म्हणतात,स्वतःला आत्मा समजुन परमपिता परमात्माला ओळखा आणि आठवण
करा.बाबा म्हणतात मी, यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हा मुलांना ज्ञान देतो.तुम्ही
मुलं आत्मा समजत नाहीत,म्हणून तुमची नजर शरीराकडे जाते.वास्तव मध्ये तुमचे यांच्याशी
काहीच काम नाही.सर्वांचे सद्गगती दाता तर शिव बाबा आहेत,त्यांच्या श्रेष्ठ मतावरती
आम्ही सर्वांना सुख देतो.ब्रह्मांना पण अहंकार येत नाही की,मी सर्वांना सुख देतो.जे
बाबांची पूर्णपणे आठवण करत नाहीत,त्यांचे अवगुण नष्ट होत नाहीत.स्वतःला आत्मा
निश्चय करत नाही.मनुष्य तर न आत्म्याला,न परमात्म्याला जाणतात. सर्वव्यापीचे ज्ञान
पण भारत वासींने पसरवले आहे.तुमच्यामध्ये पण जे सेवाधारी मुल आहेत,ते समजतात, बाकी
सर्व इतके समजू शकत नाहीत. जर बाबांची पूर्ण ओळख मुलांना असेल,तर बाबांची आठवण
करतील आणि दैवी गुणांची धारणा पण करतील.
शिवबाबा तुम्हा मुलांना समजवत आहेत.या नवीन गोष्टी आहेत.ब्राह्मण पण जरूर
पाहिजेत.प्रजापिता ब्रह्माचे संतान कधी असतात,याविषयी दुनियेमध्ये कोणालाच माहिती
नाही. ब्राह्मण तर खूप आहेत परंतु ते कुख वंशावली आहेत.ते काही मुख वंशावली ब्रह्मची
संतान नाहीत.ब्रह्माच्या मुलांना तर ईश्वर पित्याकडून वारसा मिळतो. तुम्हाला तर
आत्ता वारसा मिळत आहे. तुम्ही ब्राह्मण वेगळे आहात,ते वेगळे आहेत.तुम्ही ब्राह्मण
असतातच संगम युगामध्ये,ते द्वापर कलियुगामध्ये आहेत. हे संगम युगी ब्राह्मणच वेगळे
आहेत. प्रजापिता ब्रह्मा ची खूप मुलं आहेत. जरी शारीरिक पित्याला पण ब्रह्मा म्हणत
असले तरी,ती शारीरिक गोष्ट झाली.हे बाबा तर म्हणतात सर्व आत्मेच माझी मुलं
आहेत.तुम्ही गोड गोड आत्मिक मुल आहात.हे कोणालाही समजून सांगणे तर सहज आहे.शिव
बाबांना तर स्वतःचे शरीर नाही. शिवजयंती साजरी करतात परंतु त्यांचे शरीर दिसून येत
नाही.बाकी प्रत्येकाचे शरीर आहे.सर्व आत्म्यांना आप आपले
शरीर आहे.शरीरा वरून नाव पडते, परमात्माला आपले शरीरच नाही, म्हणून त्यांना परमात्मा
म्हटले जाते. त्यांच्या आत्म्याचे नावच शिव आहे,ते कधी बदलत नाही.शरीर बदलते तर नाव
पण बदलून जाते.शिव बाबा म्हणतात,मी तर सदैव निराकार परम आत्माच आहे.पूर्वनियोजित
नाटका नुसार,हे शरीर घेतले आहे.सन्यांशाचे पण नाव बदलते,गुरुचे बनले तर
नाव बदलते.तुमचे पण नाव बदलले होते परंतु किती नावे बदलत राहणार. अनेक जण पळून
गेले.जे त्यावेळेस होते त्यांचे नाव ठेवले गेले.आत्ता नाव ठेवत नाहीत,कोणावरही
विश्वास नाही.माया अनेकांना हरवते तर ते,ज्ञान सोडून जातात,म्हणून बाबा कोणाचेही
नाव ठेवत नाहीत.कोणाचे नाव ठेवावे, कुणाचे नाही,हे पण ठीक नाही.असे सर्व म्हणतात
बाबा,आम्ही तुमचे झालो परंतु यथार्थ रिती होत नाहीत.विजय माळेमध्ये येऊ शकत
नाहीत.अनेक असे आहेत,वारस बनण्याच्या रहस्याला पण जाणत नाहीत.बाबांना भेटण्यासाठी
येतात परंतु वारस नाहीत.वारस बनण्यासाठी भगवंता ला आपले वारस बनवावे लागते.हे रहस्य
पण समजणे कठिण आहे.बाबा समजवतात वारस कोणाला म्हटले जाते.भगवंताला कोणी वारस बनवले
तर,संपत्ती द्यावी लागेल. तर बाबा परत वारस बनवतील.संपत्ती तर गरिबाच्या
शिवाय,कोणीच सावकार देऊ शकत नाहीत.माळ तर फार थोड्या मुलांची बनते.हे पण कोणी
बाबांना, विचारले तर बाबा सांगू शकतात,तुम्ही वारस बनण्याचे अधिकारी आहेत की नाही?हे
बाबा पण सांगू शकतात.ही साधारण गोष्ट आहे.वारस बनण्या मध्ये खूप अक्कल
पाहिजे.लक्ष्मीनारायण विश्वाचे मालक होते परंतु त्यांनी ते पद कसे घेतले,कोणीही
जाणत नाहीत. आता तुमचे मुख्य लक्ष्य समोर आहे. तुम्हाला असे बनायचे आहे.मुलं पण
म्हणतात आम्हीच सूर्यवंशी लक्ष्मी नारायण बनू,ना की चंद्रवंशी राम सीता. राम सीताची
पण ग्रंथांमध्ये निंदा केलेली आहे.लक्ष्मी नारायणाची कधी निंदा ऐकली
नसेल.शिवबाबांची,कृष्णाची पण निंदा केलेली आहे.बाबा म्हणतात,मी तुम्हाला श्रेष्ठ ते
श्रेष्ठ बनवतो.मुलं माझ्या पेक्षा हुशार बनतात.लक्ष्मी नारायणाची तर कोणी निंदा करू
शकत नाही.जरी कृष्णाची आत्मा तीच आहे परंतु न जाणल्यामुळे निंदा केली आहे.लक्ष्मी
नारायणचे मंदीर पण खुप खुशीने बनवतात.वास्तव मध्ये राधे कृष्णाचे मंदिर बनवायला
पाहिजे,कारण ते सतोप्रधान आहेत.ही त्यांची युवा अवस्था आहे,त्यामुळे त्यांना सतो
म्हणतात.ते लहान आहेत म्हणून त्यांना सतोप्रधान म्हणतात.लहान मुलगा महात्मा समान
असतो.जसे छोट्या मुलांमध्ये विकार नसतात,तसेच स्वर्गा मध्ये,मोठ्यांना पण माहित नसते
विकार काय गोष्ट आहे?तिथे पाच भूत नसतात.विकारांची जशी माहितीच नसते.या वेळेत
अज्ञान रुपी रात्र आहे.काम विकाराची चेष्ठा पण रात्री मध्येच होते.देवता ज्ञान
दिवसांमध्ये आहेत तर काम विकारांची चेष्ठा होत नाही.विकार कोणतेच नसतात,सर्व
निर्विकारी आहेत.तुम्ही जाणता दिवस सुरु होताच आमचे सर्व विकार चालले जातील.माहित
पण राहत नाही विकार काय गोष्ट आहे.हे रावणाचे विकारी गुण आहेत.ही विकारी
दुनियाआहे.निर्विकारी दुनिया मध्ये विकाराची कोणतीच गोष्ट नसते.त्यांना ईश्वरी
राज्य म्हणले जाते.आता आसुरी राज्य आहे.हे कोणी जाणत नाही.तुम्ही सर्व काही
जाणता,नंबरा नुसार पुरुषार्थ प्रमाणे. अनेक मुलं आहेत.कोणतेही मनुष्य समजू शकत
नाहीत की,हे सर्व ब्रह्माकुमार कुमारी कोणाची मुल आहेत. सर्व शिव बाबांची आठवण
करतात,ब्रह्मा बाबांची नाही.हे सुद्धा म्हणतात शिव बाबांची आठवण करा, ज्याद्वारे
विर्कम विनाश होतील.दुसऱ्या कोणाची आठवण केल्यामुळे विर्कम विनाश होणार नाहीत.भगवत
गीते मध्ये पण म्हणतात,फक्त माझीच आठवण करा.कृष्ण तर असे म्हणू शकत नाहीत. वारसा तर
निराकार पित्यापासूनच मिळतो.स्वतःला जेव्हा आत्मा समजाल तेव्हाच निराकार पित्याची
आठवण करु शकाल.मी आत्मा आहे,प्रथम हा पक्का निश्चय करावा लागेल.माझे पिता परमपिता
परमात्मा आहेत,ते म्हणतात माझी आठवण करा तर,तुम्हाला वारसा देईल.मी सर्वांना सुख
देणारा आहे.मी सर्वांना शांतीधाम मध्ये घेऊन जातो. ज्यांनी कल्पा पूर्वी बाबा पासून
वारसा घेतला होता,तेच परत येऊन ब्राह्मण बनतील,वारसा घेतील.ब्राह्मणा मध्ये पण काही
मुलं पक्के आहेत.सख्खे मुलं पण बनतील आणि सावत्र पण बनतील.आम्ही निराकारी बाबाची
वंशावळ आहोत.तुम्ही जाणताच वंशावळ कशी वाढत जाते.आता ब्राह्मण बनल्या नंतर आम्हाला
परत जायचे आहे.सर्व आत्म्यांना शरीर सोडून परत जायचे आहे.पांडव आणि कौरव दोघांनाही
शरीर सोडायचे आहे.तुम्ही जाणता हे ज्ञानाचे संस्कार घेऊन जातात परत त्यानुसार
प्रारब्ध मिळते.हे पण अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे परत ज्ञानाची भूमिका नष्ट
होते.तुम्हाला ८४ जन्मां नंतर ज्ञान मिळाले आहे.परत हे ज्ञान प्रायलोप होते.तुम्ही
प्रारब्ध भोगतात.तिथे दुसर्या कोणत्या धर्माचे चित्र इत्यादी नसतात.तुमचे
भक्तिमार्ग मध्ये पण चित्र बनतात.सतयुगा मध्ये चित्र कुणाचेच नसतात.तुमचे चित्र
भक्तिमार्ग मध्ये राहतात.तुमच्या राज्यांमध्ये दुसऱ्या कोणाचे चित्रं नसतात,फक्त
देवी देवताच राहतात. याद्वारे समजतात,आदी सनातन देवी देवता धर्मच आहे.नंतर सृष्टी
वृद्धी होत जाते.तुम्हाला हे ज्ञान,विचार सागर मंथन करून अतिइंद्रिय सुखामध्ये
राहायचे आहे.अनेक ज्ञानाच्या गोष्टी आहेत परंतु बाबा समजवतात माया सारखी सारखी
विसरायला लावते.तर हे आठवणीत राहायला पाहिजे,शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत.ते श्रेष्ठ
ते श्रेष्ठ आहेत.आम्हाला परत घरी जायचे आहे. खूपच सहज गोष्टी आहेत.सर्व आठवणी वरती
अवलंबून आहे.आम्हाला देवता बनायचे आहे,दैवी गुण पण धारण करायचे आहेत.पाच विकार भुता
सारखे आहेत.काम विकाराचे भूत, क्रोधाचे भूत,देह अभिमानाचे भुत पण असते.होय,कोणामध्ये
जास्त भूत असतात,तर कोणामध्ये कमी.तुम्हा ब्राह्मणांना माहिती आहे,हे पाच मोठे भूत
आहेत.नंबर एक काम विकाराचे भूत,त्यानंतर क्रोध विकाराचे.कोणी रफडफ बोलतात तर,बाबा
म्हणतात,हे क्रोधी आहेत,हे भूत निघायला पाहिजे. परंतु भूत निघणे खूपच कठीण आहे.
क्रोधामुळे एक दुसऱ्याला दुःख होते.मोहा मुळे इतके दुःख होत नाही. ज्यांच्या मध्ये
मोह आहे,त्यांनाच दुःख होईल म्हणून बाबा समजवतात,या भुतांना पळवुन लावा.प्रत्येक
मुलाला विशेष राजयोग अभ्यास आणि दैवी गुणां वरती लक्ष द्यायचे आहे.काही मुलांमध्ये
तर क्रोधाचा अंश पण नाही,तर काही मुलं क्रोधा मध्ये येऊन आप आपसात भांडण
करतात.मुलांना विचार करायला पाहिजे,आम्हाला दैवी गुण धारण करून देवता बनायचे आहे.
कधी रागवून बोलायचे नाही.कोणी रागवतात तर समजले जाते,यांच्यामध्ये क्रोधाचे भूत
आहे.ते जसे भूतनाथ भूतनाथिनी बनतात.असे भूत असणार्या व्यक्तीशी गोष्ट पण करायला
नको.एकाने क्रोधा मध्ये येऊन गोष्टी केल्या तर,दुसरे पण भूत येतात.तर हे भूत
आपापसात भांडण करतात. भूतनाथिनी अक्षर खूपच खराब आहे. भुताचा प्रवेश होऊ नये म्हणून
मनुष्य किनारा करतात,त्यांच्यासमोर उभे पण राहायला नको,नाहीतर प्रवेशता होते. बाबा
आसुरी गुण काढून दैवीगुण धारण करवतात.बाबा म्हणतात मी आलो आहे दैवी गुण धारण करवुन
देवता बनवण्यासाठी.मुलं जाणतात आम्ही दैवी गुण धारण करत आहोत. देवतांचे चित्र पण
समोर आहेत.बाबांनी समजवले आहे क्रोधी व्यक्तीशी एकदम किनारा करा,स्वतःला वाचवण्याची
युक्ती शोधायला पाहिजे.आमच्यामध्ये क्रोध यायला नको,नाहीतर शंभर पटीने त्याचा दंड
पडेल.बाबा खूपच चांगल्या रीतीने समजून सांगतात,मुलं पण समजतात,बाबा हुबहू कल्पा
पूर्वी सारखेच समजवत आहेत.नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे समजत राहतील.स्वतः वरती पण
दया करायला पाहिजे,आणि दुसऱ्यावर पण दया करायला पाहिजे. काहीजण स्वतःवरती करत नाहीत
आणि दुसऱ्या वरती करतात,दुसरेच श्रेष्ठ बनतात,स्वतः तसेच राहतात. स्वतः विकारांना
जिंकले नाही,फक्त दुसऱ्यांना समजून सांगितले तर, ते विकारांना जिंकतात.हे पण
आश्चर्य आहे.अच्छा.गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादांची
प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) ज्ञानाचे
स्मरण करून अतिइंद्रिय सुखामध्ये राहायचे आहे.कोणाशी पण रफढफ गोष्टी करायच्या
नाहीत.कोणी रागावून बोलत असेल तर,त्यांच्याशी किनारा करायचा आहे.
(२) भगवंताचे वारस बनण्यासाठी प्रथम त्यांना आपले वारस बनवायचे आहे.समजदार बणुन आपले
सर्व बाबांच्या हवाली करून ममत्व काढून टाकायचे आहे.स्वतःवरती स्वतः च दया करायची
आहे.
वरदान:-
एकरस व्स्थिती
द्वारे नेहमी एक बाबांचे अनुकरण करणारे प्रसन्नचित्त भव.
तुम्हा मुलांसाठी
ब्रह्मा बाबांचे जीवन एक संगणक आहे.जसे आजकाल संगणकाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
विचारतात,असेच मनामध्ये जेव्हा कोणताही प्रश्न येतो,काय करू?कसे करू?या ऐवजी ब्रह्मा
बाबाचा जीवनरूपी संगणक पहा.का,कसे असे अनेक प्रश्न,उत्तरामध्ये बदलून जातील. प्रश्न
चित्त राहण्याऐवजी प्रसन्न चित्त बनाल.प्रसन्न चित्त म्हणजे एकरस स्थितीमध्ये एक
बाबांचे अनुकरण करणारे.
बोधवाक्य:-
आत्मिक शक्ती
च्या आधारा वरती सदा निरोगी राहण्याचा अनुभव करा.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
कर्म कितीही
साधारण करत आहात,तरी मध्ये मध्ये अव्यक्त स्थिती बनवण्या साठी लक्ष द्या.कोणते पण
कार्य करा,तर नेहमी बाप दादांना आपले साथी समजून दुहेरी शक्तीद्वारे कार्य करा,तर
आठवण खूपच सहज होईल.स्थूल कामकाजाचा कार्यक्रम बनवताना,बुद्धीचा पण कार्यक्रम सेट
करा,तर वेळेची बचत होईल.