23-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो , निराकार बाबा तुम्हाला स्वत:ची मत देऊन आस्तिक बनवत आहेत , आस्तिक बनल्यामुळेच तुम्ही बाबांचा वारसा घेऊ शकता का....!!!

प्रश्न:-
अमर्यादीत राज्य प्राप्त करण्यासाठी कोणत्या दोन गोष्टीवर पुर्ण लक्ष्य दिले पाहिजे?

उत्तर:-
1) अभ्यास आणि 2) सेवा. सेवेसाठी स्वत:मध्ये लक्षणे पण चांगली पाहिजेत. हे शिक्षण फार आश्चर्यकारक आहे, याद्वारे तुम्ही राजाई प्राप्त करत आहात. द्वापरपासून धन दान केल्याने राजाई मिळते. परंतू आता तुम्ही अभ्यास करुन राजकुमार-राजकुमारी बनत आहात.

गीत:-
आपले तीर्थ वेगळे आहेत...

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गीताची एक ओळ ऐकली. तुमचे तीर्थ आहे, घरात शांत बसून मुक्तीधामला जाणे. दुनियेतील तीर्थ तर साधारण आहेत. मनुष्यांचा बुध्दीयोग तर साधू संत इत्यादी कडे फारच भटकत राहतो. तुम्हा मुलांना तर फक्त बाबाची आठवण करण्याचा आदेश मिळाला आहे. ते आहेत निराकार बाबा. असे नाही कि, निराकार ला मानणारे निराकारी मताचे आहेत. जगामध्ये मत मतांतर, तर फारच आहे ना. येथे एक निराकारी मत निराकार बाबा देत आहेत, ज्याद्वारे मनुष्य उच्च ते उच्च पद जीवनमुक्ती वा मुक्ती प्राप्त करतात, या गोष्टीला कोणी ओळखत नाही. फक्त असेच म्हणतात कि, निराकारला मानणारे आहोत. अनेकानेक, मते आहेत. सतयुगामध्ये तर आहे एक मत. कलियुगामध्ये आहे अनेक मत. अनेक धर्म आहेत. लाखो करोडो मत आहेत. घरा घरात प्रत्येकाची आपली मत आहे. येथे तुम्हा मुलांना एकच बाबा उंच ते उंच मत देत आहेत, उंच ते उंच बनण्याची. तुमचे चित्र पाहून अनेक लोक म्हणतात कि, हे काय बनविले आहे? मुख्य गोष्ट कोणती आहे? सांगा, हे रचता आणि रचनेच्या आदि मध्य अंताचे ज्ञान आहे, ज्या ज्ञानामुळे आम्ही आस्तिक बनत आहोत. आस्तिक बनल्याने बाबांकडून वारसा मिळत आहे, नास्तिक बनल्याने वारसा घालविला आहे. आता तुम्हा मुलांचा धंदाच आहे, नास्तिक ला आस्तिक बनविणे. हा परिचय तुम्हाला मिळाला आहे. बाबांकडून त्रिमुर्तीचे चित्र तर फारच स्पष्ट आहे. ब्रह्मा द्वारा ब्राह्मण तर जरुर पाहिजेत ना. ब्राह्मणाद्वारेच यज्ञ चालतो. हा फार मोठा यज्ञ आहे. प्रथम हे समजावले पाहिजे कि, उंच ते उंच बाबा आहेत. सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. सर्व एक बाबाची आठवण करतात. त्यांना पिता म्हणतात, वारसा पण रचता बाबांकडून मिळत आहे. रचनेकडून तर मिळत नाही, त्यामुळे ईश्वराला सर्व आठवण करत आहेत. आता बाबा आहेत, स्वर्गाचे रचयिता आणि भारतामध्येच येत आहेत, येऊन हे कार्य करत आहेत. त्रिमुर्तीचे चित्र तर फार चांगली वस्तू आहे. हे बाबा, हे दादा. ब्रह्माद्वारे बाबा सुर्यवंशी घराण्याची स्थापना करत आहेत. बाबा म्हणतात कि, माझी आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. मुख्य लक्ष्य समोर आहे, त्यासाठी बाबा बैज पण बनवत आहेत. त्यांना सागा, थोडक्यात दोन अक्षरामध्ये तुम्हाला समजावत आहेत. बाबा कडून सेकंदात वारसा मिळाला पाहिजे ना. बाबा आहेतच स्वर्गाचे रचियता. हा बैज तर फारच चांगली वस्तू आहे. परंतू फार देहअभिमानी मुले समजत नाहीत. सारे ज्ञान आहे एका सेकंदाचे. बाबा भारतालाच येऊन स्वर्ग बनवत आहेत. नविन दुनिया बाबाच स्थापन करत आहेत. या पुरुषोत्तम संगमयुगाची पण महिमा आहे. हे सारे ज्ञान बुध्दीमध्ये टपकले पाहिजे. कोणाचा योग आहे तर ज्ञान नाही, धारणा होत नाही. सेवा करणाज्या मुलांना ज्ञानाची धारणा चांगली होऊ शकते. बाबा येऊन मनुष्याला देवता बनविण्याची सेवा करतात, आणि मुले काहीच सेवा करत नाहीत, तर ते काय कामाचे? ते ह्दयात कसे बसू शकतील? बाबा म्हणतात कि, नाटकात माझे कर्तव्यच आहे रावण राज्यातून सर्वांना सोडविणे. रामराज्य आणि रावणराज्य भारतामध्ये म्हटले जाते. आता राम कोण आहेत, हे पण ओळखत नाहीत. गातात पण कि, पतित पावन, भक्ताचा भगवान एक. तर प्रथम जेव्हा कोणी येईल, त्याला बाबाचा परिचय दया. मनुष्य पाहून समजावले पाहिजे. बेहदचे बाबा येतातच, बेहदचे सुखाचा वारसा देण्यासाठी, त्यांना स्वत:चे शरीर नाही, तर वारसा कसा देतील? स्वत: म्हणतात कि, मी या ब्रह्मा तनाद्वारे राजयोग शिकवून हे पद प्राप्त करवितो. या बैजमध्ये सेकंदाचे समजावणे आहे. किती लहान बैज आहे, परंतू समजावणारे फार आत्म अभिमानी पाहिजेत. ते फार कमी आहेत. अशी मेहनत कोणाकडून होत नाही, त्यामुळे बाबा म्हणतता कि, चार्ट ठेवून पहा कि, साज्या दिवसामध्ये आम्ही किती वेळ आठवणीत राहत आहे? सारा दिवस ऑफीस मध्ये काम करताना आठवणीत राहायचे आहे. कर्म तर करायचेच आहे. येथे योगाला बसवून म्हणतात कि, बाबाची आठवण करा. त्यावेळी कर्म तर करत नाही. तुम्हाला तर कर्म करत आठवण करावयाची आहे. नाही तर बसून आठवण करण्याची सवय पडते. कर्म करताना योग कराल तर कर्मयोगी सिध्द व्हाल. कर्तव्य तर जरुर करावयाचे आहे. यामध्येच माया विघ्न घालते. खरेपणाने चार्ट पण कोणी लिहत नाही. कोणी कोणी लिहतात कि, आर्धा तास, पाऊण तास आठवणीत राहिलो. ते पण सकाळीच आठवणीत बसले असतील. भक्तीमार्गात पण सकाळी उठून रामाची माळ जपतात. असे नाही कि, त्यावेळी एकाच्याच धुंदीत राहतात, नाही, आणखीन पण अनेक विचार येत राहतात. तीव्र भक्तांची बुध्दी काही थांबत असेल. हे तर आहे अजपाजाप. नविन गोष्ट आहे ना. गीतेमध्ये पण मनमनाभव अक्षर आहे. परंतू कृष्णाचे नाव टाकल्याने, कृष्णाची आठवण करतात, काही पण समजत नाहीत. बैज बरोबर जरुर ठेवा. सांगा कि बाबा ब्रह्मा तनामध्ये बसून समजावत आहेत, आम्ही त्या बाबावर प्रेम करतो. मनुष्याला तर ना आत्म्याचे, ना परमात्म्याचे ज्ञान आहे. बाबा शिवाय हे ज्ञान कोणी देऊ शकत नाही. हे त्रिमुर्ती शिव सर्वांत मुख्य आहेत. बाबा आणि वारसा. या चक्राला समजणे तर फार सोपे आहे. प्रदर्शनी द्वारे तर प्रजा लाखाने बनते. राजा तर थोडे बनतात, त्यांची प्रजा तर कोटीच्या अंदाजात असते. प्रजा पुष्कळ बनतात, बाकी राजा बनण्यासाठी पुरुषार्थ करावयाचा आहे. जे जास्ती सेवा करतात ते जरुर उंच पद प्राप्त रकतील. काही मुलांना सेवेचा फार छंद आहे. म्हणतात नोकरी सोडून देऊ, खाण्यासाठी तर आहेच. बाबाचे बनलो तर शिवबाबाच पालना करतील. परंतू बाबा म्हणतात, मी वानप्रस्थ मध्ये प्रवेश केला आहे ना. माता पण तरुण आहेत, तर घरामध्ये राहुन दोन्ही सेवा करावयाची आहे. बाबा प्रत्येकाची परिस्थिती पाहुन मत देत आहेत. लग्न इत्यादी साठी जर परवानगी नाही दिली तर गोंधळ घालतील, त्यामुळे प्रत्येकाचा हिसाब किताब पाहून मत देतात. कुमार असेल तर सांगतात, तु सेवा करु शकतो. सेवा करुन बेहदच्या बाबांकडून वारसा घे. त्या पित्याकडून तुला काय मिळेल? थोडे फार, ते पण सर्व मातीत जाणार आहे. दिवसेंदिवस वेळ कमी होत जात आहे. कोणी समजतात कि, माझ्या संपत्तीचा मुलगा वारस बनेल. परंतू बाबा सांगतात, काही पण मिळणार नाही. सारी संपत्ती राख होणार आहे. ते समजतात शेवटचे खातील. धनवानच धन नष्ट होण्यास काही वेळ लागणार नाही. मरण तर समोर उभे आहे. कोणी पण वारसा घेऊ शकणार नाहीत. फार थोडे आहेत, जे पुर्णपणे समजावू शकतात. जास्त सेवा करणारेच उंच पद प्राप्त करतील, तर त्यांचा आदर पण ठेवला पाहिजे, त्यांचेकडून शिकले पाहिजे. 21 जन्मासाठी आदर ठेवला जातो. आपोआपच ते उंच पद प्राप्त करतात, त्यामुळे आदर तर जिथे तिथे होणारच आहे. स्वत: पण समजू शकतात, जे मिळाले ते चांगले आहे, त्यामध्येच खुश होतात.

बेहदच्या राजाईसाठी आणि सेवा यावर लक्ष पाहिजे. हे आहे अमर्यादीत शिक्षण. ही राजधानी स्थापन होत आहे ना. या शिक्षणाद्वारे येथे तुम्ही अभ्यास करुन राजा बनत आहात. कोणी पण मनुष्य धनदान केल्याने राजा वा सावकाराचे घरी जन्म घेतात. परंतू तिथे आहे अल्पकाळाचे सुख. तर या शिक्षणावर फार लक्ष दिले पाहिजे. सेवेची काळजी वाटली पाहिजे. आम्ही आमचे गावी जावून सेवा करु. अनेकांचे कल्याण होईल. बाबा जाणतात कि, सेवेचा छंद अजून कोणामध्ये नाही. लक्षण-पण चांगले पाहिजेत ना. असे नाही की, अपकार करुन आणखीन या यज्ञाचे नाव बदनाम करुन, स्वत:चे पण नुकसान करावे. बाबा तर प्रत्येक गोष्ट चांगल्याप्रकारे समजावत आहेत. बैज इत्यादीसाठी किती प्रयत्न करतात. मग समजतात कि, नाटकानुसार उशीर होत आहे. या लक्ष्मी नारायणाचे ट्रान्सलाईटचे चित्र पण उत्तम आहे. परंतू मुलांवर ब्रह्मस्पतीची दशा आहे तर उद्या राहूची दशा बसते. नाटकामध्ये साक्षी होऊन भूमिका पाहावी लागते. उंच पद प्राप्त करणारे फार कमी आहेत, होऊ शकते कि ग्रहचारी उतरेल. ग्रहचारी उतरल्यावर मग उडी मारतात. पुरुषार्थ करुन आपले जीवन बनविले पाहिजे, नाही तर कल्प कल्पासाठी स्वत:चा सत्यनाश कराल. समजतात कि, कल्पापुर्वी प्रमाणे ग्रहचारी बसली आहे. श्रीमतावर नाही चाललात तर पद पण मिळणार नाही. उंच त्या उंच भगवानाची श्रीमत आहे. या लक्ष्मी नारायणाचे चित्राला तुमच्याशिवाय कोणी समजू शकणार नाही. म्हणतात चित्र तर फार सुंदर बनविले आहे. बस, तुम्हाला हे चित्र पाहून मुलवतन, सुक्ष्मवतन, स्थुलवतन, साज्या सृष्टीचे चक्र बुध्दीमध्ये येईल. तुम्ही ज्ञानसंपन्न बनता, नंबरवार पुरुषार्थानुसार. बाबांना तर हे चित्र पाहून फार खुशी होते. विद्याथ्र्यांना पण खुशी झाली पाहिजे ना कि आम्ही शिकुन असे बनतो. शिक्षणानेच उंच पद मिळत आहे. असे नाही कि जे नशीबात आहे. पुरुषार्थानेच प्रालब्ध मिळत आहे. पुरुषार्थ करविणारे बाबा म्हणतात माझे श्रीमतावर नाही चाललात तर वाईट गती होईल. प्रथम तर कोणाला पण बैजवरच समजावा, मग जे लायक आहेत ते लगेच म्हणतील, आम्हाला हे मिळू शकतील? होय, का नाही. या धर्मातील जो असेल, त्याला बाण लागेल. त्यांचे कल्याण होऊ शकते. बाबा तर सेकंदामध्ये हातावर स्वर्ग देत आहेत, यामध्ये तर फार खुशी असली पाहिजे. तुम्ही शिवाचे भक्ताला ज्ञान द्या. त्यांना सांगा, शिवबाबा म्हणतात, माझी आठवण करा तर राजांचा राजा बनाल. बस, सारा दिवस, हिच सेवा करा. विशेषकरुन बनारसमध्ये शिवाचे मंदीर तर फार आहेत, तेथे चांगली सेवा होऊ शकते. कोणी ना कोणी तर निघेल. फार सोपी सेवा आहे. कोणीतरी करुन पहावी, भोजन तर मिळेलच, सेवा करुन पहा. सेंटर तर तेथे आहेच. सकाळी मंदीरात जावा, रात्री परत या, सेंटर बनवा. सर्वांत जास्त तुम्ही शिवाचे मंदीरात सेवा करु शकता. उंच ते उंच आहे शिवाचे मंदीर. मुंबईमध्ये बबुलनाथाचे मंदीर आहे. सारा दिवस तिथे जावून सेवा करुन अनेकांचे कलयाण करु शकता. हा बैजच भरपुर आहे. प्रत्यन करुन पहा. बाबा म्हणतात हे बैज लाख तर काय 10 लाख बनवा. वयोवृध्द लोक तर फार चांगली सेवा करु शकातत. पुष्कळ प्रजा बनेल. बाबा फक्त म्हणतात माझी आठवण करा, मनमनाभव अक्षर विसरुन गेले आहात. भगवानुवाच आहे ना. कृष्ण थोडेच भगवान आहेत, ते तर पुर्ण 84 जन्म घेत आहेत. शिवबाबा तर या कृष्णाला पण हे पद प्राप्त करुन देतात. मग धक्का खाण्याची काय गरज आहे, बाबा तर म्हणतात फक्त माझी आठवण करा. तुम्ही सर्वांत चांगली सेवा, शिवाचे मंदीरामध्ये करु शकता. सेवेच्या सफलतेसाठी आत्मअभिमानी अवस्थेमध्ये स्थित होऊन सेवा करा. मन स्वच्छ असेल तर इच्छा पूर्ण होतात. बनारससाठी तर बाबा विशेष मत देत आहेत, तेथे वनप्रस्थींचे आश्रम पण आहेत. त्यांना सांगा, आम्ही ब्रह्माची मुले ब्राह्मण आहोत. बाबा ब्रह्माद्वारे सांगतात, माझी आठवण कराल तर विकर्म विनाश होतील, आणखीन कोणता उपाय नाही. सकाळ पासून रात्री पर्यंत शिवाचे मंदीरात बसून सेवा करा. प्रयत्न करुन पहा. शिवबाबा स्वत: म्हणतात, माझी मंदीरे तर फार आहेत. तुम्हाला कोणी पण काही म्हणणार नाही, आणखीनच खुश होतील, हे तर शिवबाबाची फार महिमा करत आहेत. सांगा, हे ब्रह्मा, ब्राह्मण आहेत, हे काही देवता नाहीत. हे पण शिवबाबाची आठवण करुन हे पद घेत आहेत. यांचे द्वारा शिवबाबा म्हणतात माझी एकट्याची आठवण करा. किती सोपे आहे. वयोदवृध्दाचा कोणी अपमान करणार नाही. बनारसमध्ये आतापर्यंत एवढी काही सेवा झाली नाही. बैज किंवा चित्रावर समजावणे फार सोपे आहे. कोणी गरीब असेल तर त्याला म्हणा, तुम्हाला फुकट देतो, साहुकार असेल तर त्याला म्हणा, तुम्ही दयाल तर अनेकांचे कल्याणासाठी आणखीन बनवू, त्यामुळे तुमचे पण कल्याण होईल. हा तुमचा धंदा सर्वांत जास्त होईल. कोणी प्रयत्न करुन पाहावा. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. ज्ञानाला जीवनामध्ये धारण करुन मग सेवा करावयाची आहे. जे जास्त सेवा करतात, चांगली लक्षणे आहेत, त्यांचा आदर पण जरुर ठेवला पाहिजे.

2. काम करताना आठवण करण्याची सवय लावली पाहिजे. सेवेमध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी स्वत:ची अवस्था आत्मअभिमानी बनवा. मन स्वच्छ ठेवले पाहिजे.

वरदान:-
शांतीच्या शक्तीद्वारे सेकंदात मुक्ती आणि जीवनमुक्तीच ा अनुभव करणारे विशेष आत्मा भव

विशेष आत्माची शेवटची विशेषत आहे, सेकंदात कोणत्या पण आत्म्याला मुक्ती आणि जीवनमुक्तीचे अनुभवी बनविणे. फक्त रस्ता दाखविणार नाहीत तर सेकंदात शांतीचा, अतिइंद्रीय सुखाचा अनुभव करतील. जीवनमुक्तीचा अनुभव आहे सुख आणि मुक्तीचा अनुभव आहे शांती. तर जे पण समोर येतील ते सेकंदात याचा अनुभव करतील, जेव्हा अशी गती होईल तेव्हा विज्ञानावर शांतीचा विजय पाहून सर्वांचे मुखातून वाह वाहचा आवाज निघेल आणि प्रत्यक्षतेचे दृश्य समोर येईल.

बोधवाक्य:-
बाबांच्या प्रत्येक आदेशावर स्वत:ला समर्पण करणारे खरे परवाने बना...!!!


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
तपासून पहा कि जो पण विचार येत आहे तो स्वत: किंवा सर्वांसाठी कल्याणाचा आहे? सेकंदात किती विचार आले, त्यापैकी किती सफल आणि किती असफल झाले? विचार आणि कर्मामध्ये अंतर नसावे. संकल्प जीवनाचा अमुल्य खजाना आहे. जसे स्थुल खजाना व्यर्थ घालवत नाहीत, तसा एक विचार पण व्यर्थ जावू नये.