09-02-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
20.11.1985 ओम शान्ति
मधुबन
संगमयुगी ब्राह्मणांचा
वेगळा प्रिय आणि श्रेष्ठ संसार .
आज ब्राह्मणांचे
रचनाकार बाबा आपल्या छोट्याश्या अलौकिक सुंदर संसाराला पाहत आहेत. हा ब्राह्मण
संसार सतयुगी संसारा पेक्षा अती वेगळा आणि अति प्रिय आहे.या अलौकिक संसाराचे
ब्राह्मण आत्मे खूपच श्रेष्ट आहेत,विशेष आहेत.देवता रूपापेक्षा पण हे ब्राह्मण
स्वरूप विशेष आहे,या संसाराची महिमा,वेगळेपणा आहे.या संसाराची प्रत्येक आत्मा विशेष
आहे,स्वराज्य अधिकारी राजा आहे.प्रत्येक आत्मा स्मृतीची तिलकधारी आहे, अविनाशी
तिलकधारी,स्वराज्य तिलकधारी परमात्माच्या हृदयासिन आहेत.तर सर्व आत्मे या सुंदर
संसाराचे ताज सिंहासन आणि टिळक धारी आहेत.असा संसार साऱ्या कल्पा मध्ये कधी ऐकला
किंवा पाहिला?या संसाराची प्रत्येक ब्राह्मण आत्मा, एक बाबा,एक परिवार,एकच भाषा,एकच
ज्ञान,अर्थात एकच जीवनाचे श्रेष्ठ लक्ष,एकच वृत्ती,एकच दृष्टी,एकच धर्म आणि एकच
ईश्वरीय कर्म आहे.असा संसार जितका लहान तेवढाच प्रिय आहे.असे सर्व ब्राह्मण मना
मध्ये गीत गातात ना, आमचा छोटासा संसार अती वेगळा आणि अति प्रिय आहे.हे गीत गातात
ना.हा संगम युगी संसार पाहून आनंदित होतात ना. किती वेगळा संसार आहे.या संसाराची
दिनचर्या च वेगळी आहे.आपले राज्य आपले नियम,आपली रीती-रिवाज परंतु रीती पण
वेगळी,प्रीती पण प्रिय आहे.अशा संसारांमध्ये राहणारे ब्राह्मण आहात ना.या
संस्थांमध्ये राहतात ना, की कधी आपला संसार सोडून जुन्या संसारांमध्ये तर जात नाहीत
ना,म्हणून जुन्या संसाराचे लोक समजू शकत नाहीत,की आखिर हे ब्राह्मण काय आहेत?असे
म्हणतात ना ब्रह्मकुमारींची चाल आपलीच आहे,ज्ञान पण आपलेच आहे,वेगळे आहे.जेव्हा
संसारच वेगळा आहे,तर सर्व काही नवीन आणि वेगळे असेल ना.सर्व स्वता:ला पहा की,नवीन
संसाराचे,नवीन संकल्प,नविन भाषा,नविन कर्म,असे वेगळे बनले आहात? कोणते ही जुने
संस्कार तर राहिले नाहीत ना?जरा पण जुनेपण असेल तर, ते जुन्या दुनिये कडे आकर्षित
करेल आणि उच्च संसारा पेक्षा खालच्या संसारांमध्ये चालले जाल.उच्च चा अर्थ श्रेष्ठ
झाल्यामुळे स्वर्गाला उच्च दाखवतात,आणि नरकाला खाली दाखवतात.संगम युग स्वर्गा पेक्षा
उच्च आहे कारण आता दोन्ही संसाराचे ज्ञान तुम्हा मुलांमध्ये आहे.येथे पाहुन, जाणून
पण वेगळे आणि प्रिय आहात, म्हणून मधुबन ला स्वर्ग अनुभव करतात ना.असे म्हणतात
स्वर्ग पाहायचा असेल तर मधुबन मध्ये पहा.तेथे स्वर्गाचे वर्णन करणार नाही.आता नशे
द्वारे म्हणतात की आम्ही स्वर्ग पाहिला आहे.आव्हान करता की स्वर्ग पाहायचा असेल तर
येथे येऊन पहा,असे वर्णन करतात ना.प्रथम विचार करत होते,ऐकत होते की स्वर्गाच्या
पऱ्या खूप सुंदर असतात,परंतु कोणी पाहिलेत? स्वर्गामध्ये तर हे सर्व असतात,ऐकले खूप
आहे.आता स्वतः स्वर्गाच्या संसारांमध्ये पोहोचले आहात.स्वतः स्वर्गाचे परी बनले
आहात.शाम पासून सुंदर बनले आहात ना. पंख मिळाले आहेत,इतके वेगळे पंख ज्ञान आणि
योगाचे मिळाले आहेत,ज्याद्वारे तिन्ही लोकांचे चक्र लावू शकतात. वैज्ञानिक पण असे
तीव्र गतीचे साधन बणवू शकत नाहीत.सर्वांना पंख मिळाले आहेत?कोणी राहिले तर नाही
ना.या संसाराचे गायन च आहे,कोणती अप्राप्त वस्तू ब्राह्मणांच्या संसारा मध्ये
नाही,म्हणून गायन आहे,एक बाबा मिळाले तर,सर्व काही मिळाले.एक दुनियाचे नाही परंतु
तीन लोकांचे मालिक बनतात.या संसाराचे गायन आहे,सदा सर्व झोक्या मध्ये आनंदात डोलत
राहतात.झोक्यामध्ये झोके घेणे भाग्याची लक्षणे म्हटले जाते.या संसाराची विशेषता काय
आहे,कधी अतिंद्रीय सुखाच्या झोक्यामध्ये झोके घेतात,कधी खुशीच्या झोक्यामध्ये झोके
घेतात,कधी शांतीच्या झोक्यामध्ये झोके घेतात, कधी ज्ञानाच्या झोक्यामध्ये झोके
घेतात,परमात्म्याच्या मांडी वरती झोके घेत राहतात.परमात्मा आठवणीची प्रेमळ अवस्था
आहे,जसे गोदीमध्ये सामावतात.असे परमात्मा च्या आठवणी मध्ये सामावतात,प्रेममय होतात.
ही अलौकिक गोद सेकंदांमध्ये अनेक जन्माचे दुःख दर्द विसरवते,असे सर्व झोक्यामध्ये
झोके घेत राहतात. कधी स्वप्नामध्ये पण विचार केला होता की अशा संसाराचे अधिकारी
बनू.आज बापदादा आपल्या प्रिय संसाराला पाहत आहेत.हा संसार पसंद आहे? प्रिय वाटतो?
कधी एक पाय त्या संसारा मध्ये ठेवत तर नाहीत ना? त्या संसाराला पाहिले,अनुभव केले,
काय मिळाले ?काय मिळाले की गमावले? मनाची सुख शांती गमावली आणि धन पण गमावले,संबध
पण गमावला.बाबांनी सुंदर तन दिले होते ते कोठे गमावले?जरी धन पण एकत्र करतात,ते पण
काळे धन.स्वच्छ धन कुठे गेले?जरी धन आहे परंतु ते काही कामाचे नाही.असे म्हणतात
करोडपती आहेत, परंतू दाखवू शकतात?तर सर्व काही गमावलं तरी पण, जर बुद्धी गेली तर
काय म्हणणार, समजदार? म्हणून आपल्या श्रेष्ठ संसाराला नेहमी स्मृतीमध्ये ठेवा.या
संसाराच्या,या जीवनाच्या विशेषतेला स्मृती मध्ये ठेवून,समर्थ बना.स्मृती स्वरुप
बनाल तर नष्टमोहा स्वताच बनत जाल.जुनी कोणती पण गोष्ट बुद्धी द्वारे स्वीकार करू
नका.स्वीकार केली म्हणजे धोका खाल्ला.धोका खाल्ला म्हणजे दु:ख घेणे. तर कुठे राहायचे
आहे?श्रेष्ठ संसारांमध्ये किंवा जुन्या संसारांमध्ये?स्पष्ट लक्षात ठेवा की, तो
संसार कसा आहे,आणि हा संसार कसा आहे?अच्छा.
अशा छोट्याशा प्रिय संसारा मध्ये राहणाऱ्या विशेष ब्राह्मण आत्म्यांना,नेहमी
ह्रदयासिन राहणाऱ्या आत्म्यांना,नेहमी झोक्या मध्ये आनंदात झोके घेणाऱ्या
आत्म्यांना,नेहमी वेगळे आणि परमात्मा प्रिय मुलांना,परमात्मा आठवण,परमात्मा स्नेह
आणि नमस्ते.
सेवाधारी
शिक्षक बहीण सोबत वार्तालाप :-
सेवाधारी अर्थात त्यागी तपस्वी आत्मे.सेवेचे फळ तर नेहमीच मिळते परंतु त्याग आणि
तपस्या द्वारे नेहमीच पुढे जात राहतात.नेहमी स्वतःला विशेष आत्मे समजून विशेष सेवेचे
सबूत द्यायचे आहे.हेच लक्ष ठेवा,जितके लक्ष मजबूत असेल तेवढी इमारत पण चांगली
बनेल.तर नेहमी सेवाधारी समजून पुढे जात रहा.जसे बाबांनी आपल्याला निवडले तसेच तुम्ही
पण,प्रजेला निवडा.स्वतः नेहमी निर्विघ्न बणुन सेवा निर्विघ्न करत चला.सेवा तर सर्व
करतात परंतु निर्विघ्न सेवा करा,याद्वारे च नंबर मिळतात.जिथे पण राहतात तेथे
प्रत्येक विद्यार्थी निर्विघ्न हवा,विघ्नांची लहर राहायला नको. शक्तीशाली वातावरण
हवे,याला म्हणतात निर्विघ्न आत्मा.हेच लक्षात ठेवा,असे आठवणीचे वातावरण हवे,जे
विघ्नच येऊ शकणार नाही.किल्ला मजबूत असेल तर दुश्मन येऊ शकत नाही.तर निर्विघ्न बणुन
निर्विघ्न सेवाधारी बना,अच्छा.
वेग वेगळ्या
ग्रुप सोबत वार्तालाप :-
सेवा करा आणि
संतुष्ट बना,फक्त सेवा करू नका परंतु अशी सेवा करा,ज्यामध्ये संतुष्टता
असेल,सर्वांचे आशीर्वाद मिळतील. आशीर्वाद घेणारी सेवा सहज सफलता देते. सेवा तर
नियोजना नुसार करायची आहेच आणि खूप करा,खुशी उमंग उत्साहा द्वारे करा,परंतु हे
ध्यान जरूर ठेवा जी सेवा करतो त्यामध्ये आशीर्वाद मिळाले आहेत? की फक्त कष्ट
केलेत?जेथे आशीर्वाद असतील तेथे कष्ट होणार नाहीत? तर आता हेच लक्ष ठेवा,जे पण सबंध
संपर्कामध्ये येतील त्यांचे आशीर्वाद घेत चला.जेव्हा सर्वांचे आशीर्वाद घेताल,तर
अर्धा कल्प तुमचे चित्र आशीर्वाद देत राहतील.तुमच्या जड चित्राद्वारे मंदिरामध्ये
आशीर्वाद घेण्यासाठी येतात ना.देवी किंवा देवां जवळ आशीर्वाद घेण्यासाठी जातात
ना.तर आत्ता सर्वांचे आशीर्वाद जमा करत रहा,तेव्हा चित्राद्वारे पण आशीर्वाद देत
रहाल.कार्यक्रम करा,प्रभात फेरी काढा,अती महत्त्वाच्या व्यक्तींची सेवा करा,
सर्वकाही करा परंतु आशीर्वाद देणारी सेवा करा.आशीर्वाद घेण्याचे साधन काय आहे? 'होय'
हा पाठ पक्का करा.कधी कोणाला 'ना' करुन त्याला असे हिंमतहिन बनवू नका.जर कोणी चुकीचे
केले असेल तरी पण त्याला प्रत्यक्षात सरळ चुकीचे म्हणू नका.प्रथम त्याला आधार
द्या,हिम्मत द्या आणि नंतर त्याला समजून सांगा.तर तो समजून घेईल,प्रथमच ना म्हणू नका,
ज्यामुळे त्याची थोडी हिंमत असेल ती पण नष्ट होईल.चुकीचे असू शकतात परंतु चुकीच्या
ला चुकीचे म्हणणे म्हणजेच ते स्वतःला कधीच चुकीचे समजणार नाही, म्हणून प्रथम त्याला
होय म्हणा,हिंमत वाढवा आणि स्वतः निर्णय करू द्या. सन्मान द्या.ही विधी उपयोगात आणा.
कोणी चुकीचा असेल तर त्याला प्रथम चांगलं म्हणा त्याद्वारे त्याला हिम्मत येईल. कोणी
पडलेला असेल तर त्याला काय करणार? धक्का देणार का त्याला उठवणार? त्याला आधार देऊन
प्रथम उभा करा,याला म्हणतात उदारता.सहयोगी बनणाऱ्याला सहयोगी बनवत चला.तुम्ही पण
पुढे,मी पण पुढे चालत राहू.सोबत घेऊन चला,हात हातामध्ये घेऊन चला,तर सफलता होईल आणि
संतुष्टते चे आशीर्वाद मिळतील.असे आशीर्वाद घेण्यामध्ये महान बना,तर सेवांमध्ये
स्वताच महान बनाल.
सेवाधारी सोबत
वार्तालाप :-
सेवा करत नेहमी आपल्या कर्मयोगी स्थितीमध्ये स्थित राहण्याचा अनुभव करत कर्म करता
की, आठवण कमी होते आणि कर्मामध्ये बुद्धी जास्त राहते.कारण आठवणी मध्ये राहून कर्म
केल्यामुळे कर्मामध्ये कधीच थकावट येणार नाही.आठवणी मध्ये राहून कर्म करणारे करत
नाहीत,तर खुशीचा अनुभव कसा करणार?कर्मयोगी बनवून कर्म म्हणजे सेवा करता ना.कर्मयोगी
चा अभ्यास नेहमीच प्रत्येक पावला मध्ये वर्तमान आणि भविष्य श्रेष्ठ बनवतात.भविष्य
खात्यात नेहमी भरपूर आणि वर्तमान पण सदा श्रेष्ठ असे कर्मयोगी बनवून सेवेची भूमिका
करत चला.विसरत तर नाही ना. मधुबन मध्ये सेवाधारी आहेत तर मधुबन स्वतः बाबांची आठवण
देते.सर्व शक्तींचा खजाना जमा केला आहे ना.इतका जमा केला आहे जो नेहमी भरपूर
रहाल.संगमयुगा वरती बॅटरी चार्ज आहे ना.द्वापर पासून बॅटरी उतरायला सुरुवात
होते.संगम युगा मध्ये नेहमी भरपूर चार्ज राहते. तर मधुबन मध्ये बॅटरी चार्ज
करण्यासाठी आनंद घेण्यासाठी येतात ना. बाबा आणि मुलांचा स्नेह आहे म्हणून भेटणे,ऐकणे
हेच संगम विभागातील सुख आणि आनंद आहे.अच्छा.
युवक रॅलीच्या
सफलता प्रती बापदादाचे वरदानी महावाक्य :-
युवक विभाग खुशाल बनवा,जे पण करा त्यामध्ये संतुष्टता हवी,सफलता हवी. बाकी सेवे
साठीच जीवन आहेच.आपल्या उमंग उत्साहा आधारे जर कोणते कार्य करतात,तर त्यामध्ये
काहीच हरकत नाही. कार्यक्रम आहे,करायचा आहे ते दुसरे रूप होते,परंतु आपल्या उमंग
उत्साहा द्वारे करू इच्छितात,तर काहीच हरकत नाही.जिथे पण पण जाल,जे पण भेटतील,जे पण
पाहाल,तर सेवाच आहे.फक्त बोलण्यात सेवा नाही होत परंतु आपला चेहरा नेहमी
हर्षित,आनंदीत ठेवा.आत्मिक चेहरा पण सेवा करतो.लक्ष ठेवा उमंग उत्साहा द्वारे,खुशी
खुशी ने,आत्मिक खुशीची चमक दाखवत पुढे जात राहायचे आहे.जबरदस्ती कोणाला करायची
नाही.कार्यक्रम बनवायचा आहे,तर करायचा च आहे,अशी कोणती गोष्ट नाही.आपला उमंग उत्साह
आहे,तर करा,हे चांगले आहे. जर कोणामध्ये उमंग उत्साह नाही तर बांधलेले तर
नाहीत.हरकत नाही.तसे जे लक्ष ठेवले होते,या सुवर्णजयंती पर्यंत सर्व प्रदेशा मध्ये
संदेश देण्याचा.जसे ते पदयात्री आपल्या ग्रुप मध्ये येतील,तसे बस द्वारे येणारा
ग्रुप पण पाहिजे.प्रत्येक झोन किंवा प्रदेश बस द्वारे सेवा करत दिल्लीला पोहोचू
शकतात.दोन प्रकारचे ग्रुप बनवा. एक बस द्वारा सेवा करता येतील आणि एक पदयात्रा
करत,सेवा करत येतील. दोन्ही प्रकार होतील.करू शकतात,युवक आहेत ना.यांना कुठे न कुठे
शक्ती तर लावायची आहे.सेवे मध्ये शक्ती लावली तर चांगलेच आहे.यामध्ये दोन्ही भाव
सिद्ध होतात,सेवा पण सिद्ध होतेआणि नाव पण ठेवले आहे पदयात्रा,तर ते पण सिद्ध होऊन
जाईल.प्रत्येक राज्यातील पदयात्रींच्या मुलाखती घेण्यासाठी अगोदरच प्रबंध करतील,तर
आपोआप आवाज पसरेल परंतु फक्त हे जरूर व्हायला पाहिजे की,आत्मिक यात्री दिसून यायला
हवेत.पदयात्री नाहीत परंतु आत्मिक आणि आनंदाची चमक दिसायला हवी.तर नवीनता दिसून
येईल.जसे दुसरे साधारण यात्रा काढतात,असे नाही परंतु असे वाटायला पाहिजे,हे डबल
यात्री आहेत,फक्त यात्रा करत नाहीत,तर आठवणी ची यात्रा पण करणारे आहेत. आणि पदयात्रा
पण करणार आहेत.डबल यात्रेचा प्रभाव दिसून येईल,तर चांगलेच आहे.
विश्वामधील
प्रत्येक राजनेत्या प्रती अव्यक्त बापदादांचा मधुर संदेश :-
विश्वातील
प्रत्येक राजनेता,आपल्या देशाला किंवा देशवासींना प्रगतीकडे घेऊन जाण्याची शुभ
भावना,शुभकामना द्वारे आपापल्या कार्यामध्ये लागले आहेत. भावना खूप श्रेष्ठ
आहे,परंतू त्याचा प्रत्यक्ष परिणाम,जितका पाहिजे तेवढा मिळत नाही,कारण काय?आजचे जनता
किंवा किंवा अनेक नेता मनाची भावना,सेवाभाव, प्रेम भावाच्या ऐवजी स्वार्थ
भाव,ईर्ष्या भावा मध्ये बदलली आहे.यासाठी या पायाला समाप्त करण्यासाठी,प्राकृतिक
शक्ती,वैज्ञानिक शक्ती,वैश्विक ज्ञानाची शक्ती,राज्यांची अधिकाराची शक्ती द्वारे तर
आपले प्रयत्न केले आहेत,परंतु वास्तविक साधन अध्यात्मिक शक्ती आहे.ज्याद्वारे मनाची
भावना सहज बदलू शकते.तिकडे लक्ष कमी आहे,त्यामुळे बदललेल्या भावनांचे बिज समाप्त
होत नाही.थोड्या वेळा करिता पूर्ण पणे दबली जाते परंतु वेळे प्रमाण आणखी उग्र रूप
होते.यासाठी अध्यात्मिक पित्याचा,अध्यात्मिक मुलांना, आत्म्या प्रती संदेश आहे,की
नेहमी स्वतःला आत्मा समजून आत्मिक पित्याशी संबंध जोडून,आत्मिक शक्ती घेऊन,आपल्या
मनाचे नेता बना,तेव्हा राज्य नेता बणून दुसऱ्यांच्या मनाच्या भावनेला बदलू
शकतात.आपल्या मनाचे संकल्प आणि जनताचे प्रत्यक्ष कर्म एक होऊन जातील. दोघांच्या
सहयोगा द्वारे सफलतेचे प्रत्यक्ष प्रमाण अनुभव होईल.आठवणीत राहावे की,स्वतः वर
अधिकार ठेवणारेच,नेहमी योग्य राजनेता, अधिकारी बनू शकतात आणि स्वराज्य तुमचा
अध्यात्मिक पित्याद्वारे जन्मसिद्ध हक्क आहे. या जन्मसिद्ध हक्काच्या शक्तीद्वारे
नेहमी सत्याच्या शक्तीचा अनुभव कराल आणि सफल रहाल.
वरदान:-
संघट ना मध्ये
राहत लक्ष आणि लक्षणाला समान बनवणारे नेहमी शक्तिशाली आत्मा भव
संघटन मध्ये एक
दोघांना पाहून उमंग उत्साह पण येतो आणि अलबेला पण येतो. असे विचार करतात की,हे पण
करतात, आम्ही केले तर काय झाले?म्हणून संघटना पासुन श्रेष्ठ बनण्याचा सहयोग
घ्या.प्रत्येक कर्म करण्याच्या अगोदर,हे विशेष लक्ष ठेवा की,मला स्वतःला संपन्न
बणुन,एक आदर्श बनायचे आहे.मला स्वतः करून दुसऱ्यां कडुन पण करून घ्यायचे आहे.फक्त
नेहमी त्या लक्ष्याला स्मृतीमध्ये ठेवा. लक्ष आणि लक्षण मिळवत चला,तर शक्तिशाली
होऊन जाल.
सुविचार:-
अंत काळामध्ये
येऊन जर पुढे जायचे असेल,तर साधारण आणि व्यर्थ संकल्पा मध्ये वेळ वाया घालवू नका.