20-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , तुम्ही ईश्वरीय सेवाधारी खरे संकटातून मुक्त करणारे सैनिक आहात , तुम्हा सर्वांना शांतीची सवलत द्यायची आहे "

प्रश्न:-
तुम्हा मुलांना जेव्हा कोणी शांतीची सवलत मागतात,त्यांना काय समजावयाला पाहिजे?

उत्तर:-
त्यांना सांगा बाबा म्हणतात काय येथे तुम्हाला शांती पाहिजे? हे तर शांतीधाम नाही,खरी शांती तर शांतीधाम मध्येच होऊ शकते.ज्याला मुळवतन म्हटले जाते.आत्म्याला जेव्हा शरीर नाही तर शांती आहे.सतयुगा मध्ये पवित्रता सुख शांती सर्व आहे.बाबाच येऊन तुम्हाला हा वारसा देतात.तुम्ही बाबांची आठवण करा.

ओम शांती।
आत्मिक बाबा आत्मिक मुलांना समजवतात.सर्व मनुष्यमात्र हे जाणतात की,माझ्या मध्ये आत्मा आहे.असे म्हणतात प्रथम मी आत्मा आहे नंतर शरीर मिळते.कोणीही स्वतःच्या आत्म्याला पाहिले नाही,फक्त इतके समजतात कि मी आत्मा आहे. जसे की आत्म्याला जाणतात परंतु पाहिले नाही,तसेच परमपित परमात्मा साठी पण म्हणतात.परम आत्मा म्हणजे परमात्मा परंतु त्यांना पाहिले नाही.न स्वतःला पाहू शकतात,न बाबांना.असे म्हणतात आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते परंतु यर्थात रीतीने समजत नाहीत. ८४ लाख योनी पण म्हणतात,वास्तव मध्ये ८४ जन्म आहेत परंतु हे पण जाणत नाहीत की,कोणत्या आत्म्याने किती जन्म घेतले.आत्मा बाबांना पुकारते परंतु न पाहिले आहे,न यर्थात रितीने जाणतात.प्रथम तर आत्म्याला यर्थात रीतीने जाणले पाहिजे,नंतर बाबांना पण जाणू शकते.स्वतःला जाणत नाही तर कोण समजावून सांगेल?त्याला म्हटले जाते स्व अनुभूती करणे.ते पण बाबा शिवाय कोणी करू शकत नाहीत.आत्म काय आहे?कशी आहे?कोठून आत्मा येते,कशी जन्म घेते?कसे इतक्या छोट्या आत्म्यामध्ये ८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे.हे कोणी पण जाणत नाहीत.स्वतःला जाणत नाही तर पित्याला पण जाणत नाहीत.हे लक्ष्मी-नारायण चे पद पण मनुष्याचे आहे ना.यांनी हे श्रेष्ठ पद कसे मिळवले,हे पण कोणी जाणत नाहीत. मनुष्याला सहज जाणायला पाहिजे ना. असे म्हणतात हे स्वर्गाचे मालक होते परंतु त्यांनी हे मालक पद कसे प्राप्त केले?ते परत कुठे गेले?काहीच जाणत नाहीत.आता तुम्ही तर सर्व काही जाणतात.यापूर्वी काहीच जाणत नव्हते.

जसे लहान मुलगा वकील काय असतो? हे जाणत नाही,परत ते शिकत शिकत वकील बनतात.तर हे लक्ष्मीनारायण पण या राजयोगा च्या शिक्षणा मुळे बनले आहेत.वकिल डॉक्टर इत्यादि सर्वांचे पुस्तकं असतात.याचे पुस्तक परत गिता आहे.गीता ज्ञान कोणी सांगितले?राजयोग कोणी शिकवला? हे कोणीच जाणत नाहीत.त्यांनी त्या ग्रंथामध्ये नाव बदलले आहे.शिवरात्री पण साजरी करतात.तेच तुम्हाला कृष्णपुरी चे मालक बनवतात.कृष्ण स्वर्गाचे मालक होते ना,परंतू स्वर्गाला जाणत नाही.नाहीतर असे का म्हणतात,कृष्णाने द्वापार मध्ये गिता सांगितली.कृष्णाला द्वापार मध्ये घेऊन गेले आहेत.लक्ष्मी नारायणाला सतयुगा मध्ये,रामाला त्रेता मध्ये घेऊन गेले आहेत.लक्ष्मी नारायण च्या राज्यांमध्ये उपद्रव दाखवत नाहीत.कृष्णाच्या राज्यांमध्ये कंस,रामाच्या राज्यांमध्ये रावण दाखवले आहे.हे कोणालाच माहीती नाही.राधा-कृष्णच लक्ष्मी-नारायण बनतात,हे कोणालाच माहिती नाही.खूपच अज्ञानाचा काळोख आहे.अज्ञाला काळोख,अंधार म्हटले जाते.ज्ञानाला प्रकाश म्हटले जाते.आता प्रकाश करणारे कोण आहेत?ते आहेत शिव पिता.ज्ञानाला दिवस तर भक्तीला रात्र म्हटले जाते.आता तुम्ही समजता हा भक्तिमार्ग पण जन्म जन्मांतर चालत आला आहे.कला शक्ती कमी होत जातात.घर नवीन बनते,परत दिवसें दिवस त्याचे आयुष्य कमी होत जाते.जर ७५% जुने झाले तर त्यांना जुनेच म्हणाल.मुलांना प्रथम हा निश्चय पाहिजे की,हे सर्वांचे पिता आहेत,जे सर्वांची सद्गती करत आहेत,सर्वांसाठी राजयोग शिकवत आहेत.सर्वांना मुक्तिधाम मध्ये घेऊन जातात.तुमच्या जवळ मुख्य उद्देश आहे.तुम्ही हे शिक्षण घेऊन जाऊन आपल्या राजगादी वरती बसाल,बाकी सर्वांना मुक्तिधाम मध्ये घेऊन जातो.चक्रा वरती जेव्हा समजावतात,तर त्यामध्ये दाखवतात सतयुगा मध्ये अशा प्रकारचे अनेक धर्म नसतात.त्यावेळेस ते आत्मे निराकारी दुनिया मध्ये राहतात.हे तर तुम्ही जाणतात,आकाश पोलार आहे.वायूला वायू,आकाशा ला आकाश म्हणाल.असे नाही की सर्व परमात्मा आहेत.मनुष्य समजतात वायूमध्ये पण भगवान आहे, आकाशामध्ये पण भगवान आहे. आता बाबा बसून सर्व गोष्टी समजवतात. बाबांच्या जवळ जन्म घेतला परत कोण शिकवतात कोण?बाबाच आत्मिक शिक्षक बनून शिकवत आहेत.अच्छा. शिक्षण पूर्ण झाले परत सोबत घेऊन जातात,परत तुम्ही नवीन दुनियेत भूमिका करण्यासाठी याल.सतयुगा मध्ये प्रथम तुम्हीच आले होते.आता परत सर्व जन्माच्या शेवटी येऊन पोहोचला आहात,परत सुरुवातीला याल.आता बाबा शर्यत लावतात,चांगल्या रीतीने बाबांची आठवण करा आणि दुसर्यांना पण शिकवायचे आहे,नाहीतर इतक्या सर्वांना कोण शिकवेल? बाबांचे मदतगार बनवायचे आहे ना.ईश्वरीय सेवाधारी नाव आहे ना.इंग्रजीमध्ये संकटातून मुक्त करणारे सैनिक म्हणतात.कोणती सवलत पाहिजे? सर्व म्हणतात शांतीची सवलत पाहिजे. बाबा काही शांतीची सवलत थोडेच देतात. शांतीची सवलत जे मागतात त्यांना सांगा, बाबा म्हणतात आता येथेच तुम्हाला शांती पाहिजे का? हे काय शांतीधाम थोडेच आहे,शांती तर शांतीधाम मध्येच होऊ शकते.त्याला मूळवतन म्हटले जाते.आत्म्याला शरीर नाही तर शांती मध्ये आहे.बाबाच येऊन हा वारसा देतात.तुमच्यामध्ये समजावण्याची खूप युक्ती पाहिजे. प्रदर्शनीमध्ये जर आम्ही उभे राहून सर्वांचे ऐकू तर अनेक चुका निघतील कारण समजावून सागणाऱ्या मध्ये पण क्रमानुसार आहेत ना.सर्व एकरस असते तर ब्राह्मणी असे का लिहते की, अमक्याने येऊन भाषण करावे.अरे तुम्ही पण ब्राह्मण आहात.बाबा आमच्या पेक्षा ते हुशार आहेत.हुशारीमुळे मनुष्य पद मिळवतात.क्रमानुसार तर असतात ना.जेव्हा परीक्षेचा परिणाम निघतो त्यावेळेस तुम्हाला आपोआप साक्षात्कार होईल,आम्ही तर श्रीमता नुसार चाललो नाही.बाबा म्हणतात कोणतेही विकर्म करू नका.देहधारी सोबत लगाव ठेवू नका.हे तर पाच तत्वाचे बनलेले शरीर आहे ना.पाच तत्त्वाची थोडीच पूजा करायची असते, की आठवण करायची असते? जरी या डोळ्याद्वारे पाहता परंतु आठवण बाबांची करायची आहे.आत्म्याला आता ज्ञान मिळाले आहे.आता आम्हाला घरी जायचे आहे परत वैकुंठा मध्ये यायचे आहे.आत्म्याला समजू शकतात,पाहू शकत नाही.तसेच हे पण समजू शकतो. होय,दिव्यदृष्टी द्वारे आपले घर किंवा स्वर्गाला पाहू शकता.बाबा म्हणतात मुलांनो,मनामनाभव मध्याजी भव, म्हणजे बाबा आणि विष्णुपुरी ची आठवण करा.तुमचे मुख्य लक्ष हे आहे.मुलं जाणतात आत्ता आम्हाला स्वर्गामध्ये जायचे आहे बाकी सर्वांना मुक्ती मध्ये जायचे आहे.सर्व तर सतयुगा मध्ये येऊ शकत नाहीत.तुमचे हे दैवी घराने आहे.हा झाला मनुष्याचा धर्म. मूळवतन मध्ये तर मनुष्य नाहीत ना. येथे मनुष्य सृष्टी आहे.मनुष्यच तमोप्रधान आणि सतोप्रधान बनतात. तुम्ही प्रथम शूद्र वर्णाचे होते आता ब्राह्मणां मध्ये आहात.हे वर्ण भारत वासीसाठी आहेत,दुसऱ्या कोणत्या धर्माला असे म्हणणार नाही.ब्राह्मण वंशी,सूर्यवंशी.या वेळेत सर्व शूद्र वर्णाचे आहेत.जडजडीभुत अवस्थेला प्राप्त केले आहे.तुम्ही जुने बनले तर परत सर्व झाड तमोप्रधान बनले,परत सर्व झाड सतोप्रधान बनेल.सतोप्रधान नवीन झाडांमध्ये फक्त देवी-देवता धर्माचे असतात परत तुम्ही सूर्यवंशी पासून चंद्रवंशी बनतात. पुनर्जन्म तर घेतात ना,परत वैश्य व शुद्र वंशी या सर्व नवीन गोष्टी आहेत.

आम्हाला शिकवणारे ज्ञानाचे सागर आहेत,तेच पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता आहेत.बाबा म्हणतात मी तुम्हाला ज्ञान देतो,तुम्ही देवी-देवता बनतात परत ज्ञान राहत नाही.ज्ञान अज्ञानी ला दिले जाते.सर्व मनुष्य अज्ञान अंधकारां मध्ये आहेत.तुम्ही प्रकाशामध्ये आहात.यांच्या ८४ जन्माची गोष्ट पण तुम्ही जाणता.तुम्हा मुलांना सर्व ज्ञान आहे म्हणून तर म्हणतात भगवंतांनी ही सृष्टी का स्थापन केली? काय मोक्ष मिळू शकत नाही.अरे हा तर पूर्वनियोजित खेळ आहे,अनादि नाटक बनले आहे ना.तुम्ही जाणतातच आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते.यामध्ये चिंता करण्याची गोष्टच नाही.आत्म्याने जाऊन आपली दुसरी भूमिका केली.तेव्हाच रडायला पाहिजे जेव्हा वापस ती गोष्ट मिळणार आहे,परत तर येणार नाही मग रडल्या मुळे काय फायदा?आता तुम्हा सर्वांना मोजीत बनवायचे आहे.कब्रस्थान मध्ये काय मोह ठेवायचा आहे.यामध्ये दुःखच दुःख आहे.आज मुलगा आहे,उद्या मुलगा पण असा बनतो,जो वडिलांची टोपी उतरण्या मध्ये पण उशीर करत नाही. वडिलांशी पण भांडत राहतात,याला म्हटले जाते विना धनीची दुनिया.कोणी धनी धोनी नाही,जे शिक्षण देतील,समज देतील?बाबा जेव्हा अशी हालत पाहतात,तेव्हा तर धनीची दुनिया बनवण्या साठी येतात.बाबांच सर्वांना धनीचे बनवतात.सर्वांचे भांडणे मिटवतात. सतयुगा मध्ये कोणते भांडण नसते.साऱ्या दुनिया चे भांडण मिटवतात,परत जयजयकार होते.येथे बहुमत मातांचे आहेत.दासी पण यांनाच समजतात. साखरपुडा करते वेळेस म्हणतात तुमचा पतीच, ईश्वर गुरु इत्यादी सर्व काही आहे. प्रथम श्री नंतर श्रीमती.आता बाबा येऊन मातांना पुढे ठेवतात.तुमच्यावरती कोणी विजय प्राप्त करू शकत नाहीत.तुम्हाला बाबा सर्व कायदे शिकवत आहेत.मोहजीत राजाची पण एक कथा आहे.या सर्व गोष्टी बनवल्या आहेत.सतयुगा मध्ये कधी अकाली मृत्यु होत नाही,वेळे वरती एक शरीर सोडून दुसरे घेतात.साक्षात्कार होतो की आता हे तन वृद्ध झाले आहेत,परत नवीन घ्यायचे आहे,लहान मुलगा बनायचे आहे.आनंदाने शरीरात सोडतात.येथे जरी कितीही वृध्द असले,रोगी होतील,आणि समजतील की शरीर सुटले तर बरं म्हणतील,तरीही रडतील.बाबा म्हणतात आता तुम्ही अशा जागी जातात,तिथे रडण्याचे नाव नाही.तेथे आनंदच आनंद असतो.तुम्हाला खूप बेहदचा आनंद राहायला पाहिजे.अरे आम्ही तर अशा विश्वाचे मालक बनत आहोत.भारत साऱ्या विश्व चा मालक होता ना.आता तर अनेकानेक प्रदेश झाले आहेत.तुम्हीच पूज्य देवता होते परत पुजारी बनले.भगवान थोडेच आपणच पुज्य आणि आपणच पुजारी बनतात.जर ते पण पुजारी बनले,तर पुज्य कोण बनवेल.नाटकामध्ये बाबांची भूमिका वेगळी आहे.ज्ञानाचे सागर एकच आहेत,एकाचीच महिमा आहे.जेव्हा ज्ञानाचे सागर आहेत तर,कधी येऊन ज्ञान देतील,ज्यामुळे सद्गती होईल.जरूर येथे यावे लागेल.प्रथम तर बुद्धीमध्ये बसवायचे आहे,आम्हाला शिकवणारे कोण आहेत?

त्रिमूर्ती सृष्टीचक्र आणि झाड हे तीन मुख्य चित्र आहेत.झाड म्हणजे कल्पवृक्षा ला पाहिल्या नंतर लगेच समजते आम्ही तर अमक्या धर्माचे आहोत.आम्ही सतयुगा मध्ये येऊ शकत नाही.हे चक्र खूप मोठे बनवायला पाहिजे,त्याची स्पष्टता पण पूर्णपणे लिहायला पाहिजे.शिवबाबा ब्रह्मा द्वारे देवता धर्म म्हणजे नवीन दुनिये ची स्थापना करत आहेत.शंकरा द्वारे जुन्या दुनियेचा विनाश परत विष्णू द्वारे नवीन दुनियेची पालन करतात,हे सिद्ध होईल. ब्रह्मा च विष्णू आणि परत विष्णू च ब्रह्मा बनतात,दोघांचा आपसामध्ये संबंध आहे. ब्रह्मा-सरस्वती च लक्ष्मी नारायण बनतात. चढती कला एका जन्मांमध्ये होते परंतु उतरत्या कलेला ८४ जन्म लागतात.आता बाबा म्हणतात ते ग्रंथ इत्यादी सत्य आहेत की मी सत्य आहे.मी तर तुम्हाला खरी सत्य नारायणाची कथा ऐकवतो.आता तुम्हाला निश्चय आहे की सत्य बाबा द्वारे आम्ही नरापासून नारायण बनत आहोत. प्रथम मुख्य गोष्ट ही एकच आहे की मनुष्याला कधी पिता शिक्षक गुरु म्हणले जात नाही.गुरूंना कधी पिता शिक्षक म्हणाल का?येथे तर शिव बाबांच्या जवळ जन्म घेतात,परत शिवबाबा तुम्हाला शिकवतात, परत सोबत घेऊन जातील. मनुष्य तर असा कोणी होत नाही,ज्यांना पिता शिक्षक गुरु म्हटले जाईल.हे तर एकच किती आहेत,त्यांना म्हटले जाते सर्वोच्च पिता.लौकिक पित्याला कधी सर्वोच्च पिता म्हणू शकणार नाही. आठवण पण त्यांचीच करतात.ते पिता तर आहेत.दुःखामध्ये सर्व त्यांची आठवण करतात,सुखांमध्ये कोणी करत नाहीत.तर शिव पिताच येऊन स्वर्गाचे मालक बनवतात.अच्छा.

गोड, गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात पिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
बाह्यमुखतेच्या चतुराई पासुन मुक्त राहणारे बाप पसंत खरे सौदागर भव .
 

बापदादांना बाह्यमुखी दुनिया पसंत नाही. असे म्हटले जाते भोळ्यांचा भगवान.चतुर सुजान ला भोळे मुलंच पसंत आहेत. परमात्म्याच्या डिक्शनरी मध्ये भोळे मूलंच विशेष महत्त्वाचे आहेत.ज्यांच्यामध्ये दुनियाचे आकर्षण जात नाही,तेच बाबांशी सौदा करून परमात्म्याच्या डोळ्याचे तारे बनले.भोळी मुलंच मनापासुन म्हणतात 'माझे बाबा' याच एका सेकंदाच्या बोला मुळे अगणित खजाण्याचे सौदा करणारे, खरे सौदागर बनले.

बोधवाक्य:-
सर्वांचे स्नेह प्राप्त करण्यासाठी मुखाद्वारे नेहमी गोड गोड बोला .