14-02-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांनो , तुम्हा आत्म्याचा स्वधर्म शांती आहे , तुमचा देश शांतीधाम आहे ,
तुम्ही आत्मा शांत स्वरूप आहात , म्हणून तुम्ही शांती मागू शकत नाहीत .
प्रश्न:-
तुमचे योगबळ
कोणती कमाल करते?
उत्तर:-
योग बळाद्वारे तुम्ही साऱ्या दुनियाला पवित्र बनवतात.तुम्ही थोडी मुलंच योगाद्वारे
हा डोंगर उठवून,सोन्याचा डोंगर स्थापन करतात.पाच तत्व पण सतो प्रधान होतात,चांगले
फळं देतात.सतो प्रधान तत्वा द्वारे हे शरीर पण सतोप्रधान होते.तेथील फळं पण खूप
चांगले स्वादिष्ट असतात.
ओम शांती।
जेव्हा ओम शांती म्हणतात तर खूपच आनंद व्हायला पाहिजे,कारण वास्तव मध्ये आत्मा शांत
स्वरूप आहे. त्याचा स्वधर्म शांती आहे.यावरती संन्यासी म्हणतात,शांती तर तुमच्या
गळ्या मधील हार आहे.शांतीला बाहेर कुठे शोधतात, आत्मा स्वतः शांत स्वरूप आहे.या
शरीरा मध्ये अभिनय करण्यासाठी यावे लागते. आत्मा नेहमी शांत राहील,तर कर्म कसे
करेल?कर्मतर करायचेच आहेत.होय, शांतीधाम मध्ये आत्मे शांत राहतात,तेथे शरीर नाही.हे
कोणी पण संन्यासी समजत नाहीत की,आम्ही आत्मा आहोत. शांतीधाम मध्ये राहणारे
आहोत.मुलांना समजावले गेले आहे,शांतीधाम आपला देश आहे,परत आम्ही सुखधाम मध्ये येऊन
भुमिका वठवतो.या नंतर रावण राज्य होते,तर दुःख धाम सुरू होते.ही 84 जन्माची कहाणी
आहे.भगवान अर्जुना प्रती,तुम्ही आपल्या जन्माला जाणत नाहीत.एकाला का म्हणतात,कारण
एकाचीच खात्री आहे.या राधा-कृष्णाची तर खात्री आहे ना,म्हणून त्यांच्यासाठी
म्हणतात.हे बाबा पण जाणतात,मुलं पण जाणतात की हे जी सर्व मुलं आहेत,ते सर्व ८४ जन्म
घेणारे नाहीत,कोणी मध्ये येतील,कोणी शेवटी येतील.यांची तर खात्री आहे ना. यांना
म्हणतात,हे मुलांना तर,हे अर्जुन झाले ना. रथा वरती बसले आहेत ना.मुलं स्वतः पण समजू
शकतात,आम्ही जन्म कसे घेऊ?सेवा करत नाही तर,सतयुगा मध्ये नवीन दुनिया मध्ये
सुरुवातीला कसे येऊ? यांचे भाग्य कुठे आहे.जे शेवटी जन्म घेतील त्यांच्यासाठी तर
जुने घर होईल ना. मी यांच्यासाठी म्हणतो,ज्यांच्यासाठी तुम्हालापण खात्री आहे.तुम्ही
पण समजू शकता,मम्मा बाबा ८४ जन्म घेतात.कुमारका आहे,जनक आहे,असे असे महारथी जे
आहेत,ते ८४ जन्म घेतात.जे सेवा करत नाही तर,जरुर काही जन्मानंतर येतील.ते असे
समजतात,आम्ही तर नापास होऊ,नंतर शेवटी येऊ.शाळेमध्ये पण पळण्याची शर्यत लावतात,कि
खुणाला हात लाऊन परत या.सर्व एक सारखे तर होऊ शकत नाहीत.शर्यती मध्ये थोडा पाव
इंचाचा पण फरक पडतो,तर त्याचा नंबर येतो. ही पण अश्व रेस आहे.अश्व घोड्याला म्हटले
जाते.रथाला पण घोडा म्हटले जाते. बाकी हे दाखवतात,दक्ष प्रजापिता ने यज्ञ
रचला,त्यामध्ये घोड्यांना स्वाह केले,या सर्व गोष्टी खोट्या आहेत.न दक्ष प्रजापिता
आहेत,न कोणता यज्ञ स्थापन केला आहे.ग्रंथांमध्ये भक्ती मार्गातील अनेक दंतकथा
आहेत.त्यांचे नावच गोष्टी आहेत.अनेक कथा ऐकवतात.तुम्ही तर हे ज्ञान शिक्षण
घेतात,शिक्षणाला कथा थोडेच म्हणाल? शाळेमध्ये शिकता तर,लक्ष असते.आम्हाला या
शिक्षणाद्वारे ही नौकरी मिळेल,काहीना काही मिळते.आता तुम्हा मुलांना देही अभिमानी
बनायचे आहे,हेच कष्ट आहेत.बाबांची आठवण केल्यामुळे विकर्म विना्श होतील.खास आठवण
करायची असते,असे नाही मी तर शिवबाबांचा मुलगा आहे,परत आठवण का करायची,असे नाही.आठवण
करायची आहे.स्वतःला विद्यार्थी समजायचे आहे, बाबा शिकवत आहेत,हे पण विसरतात. शिवबाबा
एकच शिक्षक आहेत,जे सृष्टीच्या आदी मध्य अंतचे रहस्य ऐकवतात. हे पण आठवणीत
राहते.प्रत्येक मुलाने स्वतःच्या मनाला विचारायचे आहे,किती वेळ बाबांच्या आठवण
येते.जास्ती वेळ तर बाह्यमुखता मध्ये जातो.आठवण मुख्य आहे.भारताच्या योगाची खूप
महिमा आहे परंतु योग कोण शिकवतात,हे कोणालाच माहिती नाही.गिते मध्ये कृष्णा चे नाव
लिहिले आहे.आत्ता कृष्णाची आठवण केल्यामुळे एक पण पाप नष्ट होणार नाही, कारण ते
शरीरधारी आहेत.पाच तत्वाचे बनले आहे.त्यांची आठवण केली तर मातीची आठवण केली. पाच
तत्त्वांची आठवण केली.शिवबाबा तर अशरीरी आहेत म्हणून,असे म्हणतात अशरीरी समजून मज
पित्याची आठवण करा.असे म्हणतात,हे पतित-पावन,तर ते एकच झाले ना.युक्तीने विचारायला
पाहिजे, गीते चे भगवान कोण आहेत?भगवान रचनाकार एकच असतात.जर मनुष्य स्वता:ला भगवान
म्हणतात,तर असे कधी म्हणणार नाहीत, की तुम्ही सर्व माझी मुलं आहात.एक तर ततत्त्वम
म्हणतील किंवा ईश्वर सर्वव्यापी आहे,असे म्हणतील.आम्ही पण भगवान,तुम्ही पण भगवान,
जिकडे पाहतो तूच आहे,दगडांमध्ये पण तू आहे,असे म्हणतात.तुम्ही माझी मुलं आहात,हे
बाबां शिवाय कोणी म्हणू शकत नाहीत. हे तर एक बाबाच म्हणतात,हे माझ्या लाडक्या
आत्मिक मुलांनो.असे दुसरे कोणी म्हणू शकत नाही.कोणत्या मुसलमानाला म्हटले माझ्या
लाडक्या मुलांनो,तर ते चापट मारतील.हे एकच पारलौकिक पिता आहेत,तेच म्हणू शकतात.दुसरे
कोणी सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान देऊ शकत नाही.निराकार बाबां शिवाय ८४
जन्माच्या शिडीचे रहस्य पण कोणी समजू शकत नाहीत.त्यांचे वास्तविक नाव शिव
आहे.मनुष्यांनी तर अनेक नावं ठेवली आहेत.अनेक भाषा आहेत.आपापल्या भाषांमध्ये अनेक
नावं ठेवली आहेत.जसे मुंबई मध्ये बबुलनाथ म्हणतात परंतु त्याचा अर्थ थोडेच
समजतात.तुम्ही समजता ते तर काट्यांना फुलासारखे बनवणारे आहेत.भारतामध्ये शिव बाबांचे
हजारो नावं असतील परंतु अर्थ काहीच जाणत नाहीत.बाबा मुलांनाच समजवतात त्यामध्ये पण
बाबा मातांना पुढे करतात.आज-काल स्त्रियांचा मान खूप आहे कारण शिव पिता आले
आहेत.बाबा माता ची महिमा खूप करतात,तुम्ही शिवशक्ती सेना आहात.तुम्हीच शिवबाबांना
जाणतात.सत्य तर एकच आहेत.गायन पण आहे,सत्याची नाव हालेल डुलेल परंतु बुडणार नाही.तर
तुम्ही खरे आहात.नवीन दुनिया ची स्थापना करत आहात बाकी खोटी नाव सर्व नष्ट
होतील.तुम्ही पण येथे काही राज्य करणारे नाहीत.तुम्ही परत दुसऱ्या जन्मामध्ये जाऊन
राज्य कराल.या खूप गुप्त गोष्टी आहेत,जे तुम्ही मूलंच जाणतात.हे बाबा भेटले नसते,तर
काहीच जाणले नसते.आत्ता जाणले आहे. हे युध्दीष्ठर आहेत, युद्धाच्या मैदानामध्ये
मुलांना उभे करणारे आहेत.हे अहिंसक आहेत.मनुष्य हाणा मारीला हिंसा समजतात.बाबा
म्हणतात प्रथम मुख्य, काम कट्यारी ची हिंसा आहे,म्हणून काम विकाराला महाशत्रू म्हटले
आहे.या वरतीच विजय मिळवायचा आहे.मुख्य गोष्ट काम विकाराची आहे,पतीत म्हणजे विकारी.
पतित बनवणाऱ्याला च विकारी म्हटले जाते.क्रोध करणाऱ्याला विकारी म्हणले जात नाही,की
हे विकारी आहेत.क्रोधीला क्रोधी,तर लोभीला लोभी म्हणतात. देवतांना निर्विकारी म्हटले
जाते.देवता तर निर्लोभी निर्मोही निर्विकारी आहेत.ते कधी विकारांमध्ये जात
नाहीत.तुम्हाला दुसरे मनुष्य म्हणतात,विकारा शिवाय मुलं कशी होतील.देवतांना तर
निर्विकारी मानतात ना.ती निर्विकारी दुनिया असते ना.द्वापर कलियुग विकारी दुनिया
आहे.स्वतःला विकारी,तर देवतांना निर्विकार म्हणतात. तुम्ही जाणतात आम्हीपण विकारी
होतो. आत्ता यांच्या सारखे निर्विकार बनत आहोत.लक्ष्मी नारायण नी आठवणीच्या
शक्तीद्वारे श्रेष्ठ पद मिळवले आहे आणि परत मिळवत आहेत.आम्हीच देवी-देवता
होतो.आम्हीच कल्प कल्प राज्य प्राप्त केले होते,परत गमावले.आता परत आम्ही ते राज्य
प्राप्त करत आहोत.हे चिंतन बुद्धीमध्ये राहिले तर आनंद पण राहील परंतु माया ती
विसरवते.बाबा जाणतात मुलं कायमस्वरूपी आठवणीत राहू शकत नाहीत.तुम्ही मुलं अडोल बणुन
आठवण कराल तर लवकरच कर्मातीत अवस्था होऊन जाईल आणि आत्मा परत जाईल, परंतु
नाही.प्रथम क्रमांका मध्ये तर हे ब्रह्मा जाणार आहेत,परत शिवबाबांची वरात
आहे.लग्नामध्ये माता मातीच्या मटक्या मध्ये दिवा,ज्योत घेऊन जातात,ही खूण
आहे.शिवबाबा साजन तर नेहमीच जागती जोत आहेत.बाकी आमची ज्योत जागृत केली आहे.येथील
गोष्ट परत भक्तिमार्ग मध्ये घेऊन गेले आहेत.तुम्ही योग बळा द्वारे आपली ज्योती
जागृत करतात. योगाद्वारे तुम्ही पवित्र बनतात.ज्ञानाद्वारे धन मिळते,शिक्षणाला
कमाईचे साधन म्हटले जाते ना.योग बळा द्वारे तुम्ही खास भारत आणि बाकी साऱ्या
विश्वाला पवित्र बनवतात.यामध्ये कन्या खूप चांगल्या तऱ्हेने मदतगार बनू शकतात.सेवा
करून उच्च पद मिळवायचे आहे.जीवन हिऱ्या सारखे बनवायचे आहे,कमी नाही.गायन पण केले
जाते माता-पित्याचे अनुकरण करा.माता पिता आणि अनन्य भावा बहिणीचे अनुकरण करा.
तुम्ही मुलं प्रदर्शनीमध्ये समजावू शकता, तुम्हाला दोन पिता आहेत,एक लौकिक दुसरे
पारलौकिक.यामध्ये मोठे कोण? मोठे तर जरूर बेहदचे पिताच झाले ना.वारसा
त्यांच्याद्वारे मिळाला पाहिजे.आता वारसा देत आहेत,विश्वाचे मालक बनवत आहेत.
भगवानुवच तुम्हाला मी राजयोग शिकवतो परत तुम्ही दुसऱ्या जन्मामध्ये विश्वाचे मालक
बनाल.त्या शिक्षणाद्वारे काय मिळेल,येथे तर तुम्ही हिऱ्या सारखे बनतात तेही २१
जन्मासाठी.त्या शिक्षणामध्ये आणि या शिक्षणामध्ये रात्रंदिवसा चा फरक आहे.हे तर पिता
शिक्षक आणि गुरु एकच आहेत,तर पित्याचा वारसा शिक्षकाचा वारसा आणि गुरुचा वारसा सर्व
देतात.आता बाबा म्हणतात देह सहित सर्वांना विसरायचे आहे,तुम्ही मेले तर सर्व दुनिया
मेल्या सारखीच आहे.बाबांची दत्तक मुलं बनले,बाकी कुणाची आठवण करणार? दुसऱ्यांना
पाहत पण जसे पाहयचे नाही.भूमिका करण्या साठी येतो परंतु बुद्धीमध्ये आहे आता आम्हाला
परत घरी जायचे आहे,परत तेथे येऊन अभिनय करायचा आहे.हे बुद्धीमध्ये राहिले तरी पण
खुप आनंद राहील.मुलांना देहाचे भान सोडून द्यायला पाहिजे.या जुन्या गोष्टी येथेच
सोडायचे आहेत,आता परत जायचे आहे.नाटक पूर्ण होत आहे.जुन्या सृष्टीला आग लागत
आहे.अंधाची संतान अंध, अज्ञान निद्रा मध्ये झोपलेले आहेत.मनुष्य तर समजतात,झोपलेले
मनुष्य दाखवले आहेत परंतु ही अज्ञान निद्रेची गोष्ट आहे, ज्याद्वारे तुम्ही जागृत
करतात.ज्ञान अर्थात दिवस,अज्ञान अर्थात रात्र कलियुग.या खूप समजण्याच्या गोष्टी
आहेत.कन्या जेव्हा लग्न करते तर माता-पिता सासू-सासरे इत्यादीची पण आठवण
येते,त्यांना विसरावा लागेल.असे पण युगुल आहेत,जे सन्यांशाना दाखवतात आम्ही युगल
बणुन कधीच विकारांमध्ये जात नाहीत.ज्ञान तलवार मध्ये आहे.बाबांचा आदेश आहे,पवित्र
बनायचे आहे.रमेश उषांना पहा,हे कधीच पतित बनले नाहीत.हे भय आहे,जर आम्ही पतित
बनलो,तर २१ जन्माच राज्य भाग्य नष्ट होईल,दिवाळं निघेल.असे कोणी कोणी नापास होतात.
गंधर्व विवाहाचे नाव तर आहे ना.तुम्ही जाणता पवित्र राहिल्यामुळे खूप श्रेष्ठ पद
मिळेल.एका जन्मासाठी पवित्र बनायचे आहे.योगबळा द्वारे कर्मेंद्रिया वरती पण
नियंत्रण येते.तुम्ही साऱ्या दुनिया ला पवित्र बनवतात.तुम्ही खूप थोडी मुलं योगबळा
द्वारे कलियुगी डोंगराला उठवून सोन्याचा डोंगर स्थापन करतात.मनुष्य थोडेच समजतात,ते
तर गोवर्धन पर्वताला परिक्रमा देत राहतात.हे तर बाबाच येऊन साऱ्या दुनियेला सुवर्ण
युगी बनवतात.असे पण नाही हिमालय सोन्याचा होईल.स्वर्गामध्ये तर सर्व सोन्याच्या खाणी
भरपूर असतात. पाच तत्व सतोप्रधान आहेत,त्यामुळे फळं पण चांगलेच येतात.सतोप्रधान
तत्वा द्वारे हे शरीर पण सतोप्रधान बनते.तेथील फळं पण खूपच चविष्ट असतात.नावच
स्वर्ग आहे.तर स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केल्यामुळे,विकार नष्ट होतील.देह
अभिमाना मध्ये आल्यामुळेच विकाराची चेष्टा होते.योगी कधीच विकारांमध्ये जात
नाहीत.ज्ञान आहे परंतु योग बळ नसेल तर विकारात जातील.असे विचारले जाते पुरुषार्थ
मोठे की प्रारब्ध?तर म्हणतात प्रारब्ध मोठे आहे.तसेच यामध्ये योग मोठा
आहे.योगाद्वारेच पतित पासून पावन बनतात.आता तुम्ही मुलं म्हणणार आम्ही बेहदच्या बाबा
पासून शिकत आहोत. मनुष्यां द्वारे शिकून काय मिळेल? एका महिन्या मध्ये किती कमाई
होईल.येथे तर तुम्ही एक एक रत्न धारण करतात,हे लाखो रुपयांचे आहेत.स्वर्गा मध्ये तर
पैशाची मोजमाप करत नाहीत.खूप धन असते. सर्वांना आपापली शेती इ.असते.आता बाबा
म्हणतात मी तुम्हाला राजयोग शिकवतो. हे मुख्य लक्ष्य आहे,पुरुषार्थ करून उच्च बनायचे
आहे.राजधानी स्थापन होत आहे.लक्ष्मीनारायण नी कसे प्रारब्ध मिळवले, यांच्या
प्रारब्धला जाणले तर बाकी काय पाहिजे?आता तुम्ही जाणतात,कल्प पाच हजार वर्षांनंतर
बाबा येऊन भारताला स्वर्ग बनवतात.तर मुलांना सेवा करण्याचा उमंग यायला पाहिजे.
जोपर्यंत कोणाला रस्ता दाखवला नाही तर भोजन पण करायला नाही पाहिजे.इतका उमंग उत्साह
असेल तेव्हाच उच्च पद मिळू शकेल. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात पिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
वरदान:-
सर्वगुण
संपन्न बनण्याच्या सोबतच कोणत्याही एका विशेषते मध्ये विशेष प्रभावशाली भव .
जसे डॉक्टर साधारण
आजारांचे ज्ञान तर ठेवतात परंतु त्याच सोबत कोणत्या एका विशेष गोष्टीच्या ज्ञानामुळे
प्रसिद्ध होतात. तसेच तुम्ही मुलं पण सर्वगुण संपन्न तर बनायचे आहे,तरीही एका
विशेषतेला विशेष रूपात अनुभवा मध्ये आणत,सेवे मध्ये लावत,पुढे जात रहा.जसे सरस्वतीला
विद्येची देवी,लक्ष्मीला धनाची देवी म्हणून पूजा करतात.असे स्वतः मध्ये सर्वशक्ती
असताना सुद्धा एका विशेषते मध्ये विशेष संशोधन करून स्वतःला प्रभावशाली बनवा.
बोधवाक्य:-
विकार रुपी
सापाला सहज योगाची शैया बनवा तर सदा निश्चिंत रहाल.