28-02-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो , बाबा तुमचा पाहुणा ( अतिथी ) बनून आले आहेत तर तुम्ही त्यांचा आदर करा ,
जसे प्रेमानी बोलवले आहे असा आदरही करायचा आहे , निरआदर व्हायला नको ...
प्रश्न:-
कोणता नशा
तुम्हा मुलांना सदैव चढायला पाहिजे?
उत्तर:-
सर्वांत मोठी (उंच ते उंच) आसामी (हस्ती) या पतित दुनियेमध्ये आमचा पाहुणा बनून आला
आहे, हा नशा सदैव चढायला पाहिजे, पण नंबरवार हा नशा चढतो. काहीतर बाबांचे बनून ही
संशयबुध्दी बनून हात सोडून जातात. तर म्हणणार त्यांचे नशीब.
ओम शांती।
दोन वेळा म्हणायला हवे. हे तर मुलं जाणतात कि एक आहे बाबा, दुसरा आहे दादा. दोघे
एकत्र आहेत ना. भगवानाची महिमा पण किती मोठी करतात. पण अक्षर किती सोपे आहे-गॉड
फादर (ईश्वरीय पिता) फक्त फादर (पिता) नाही म्हणत, गॉड फादर उंच ते उंच आहेत,
त्यांची महिमा पण खुप उंच आहे. त्यांना बोलवतात पण तित दुनियेमध्ये स्वत: येऊन
सांगतात कि, मला पतित दुनियेत बोलावतात परंतू तो कसा पतित पावन आहे, केव्हा येतो,
हे कोणालाही माहित नाही. अर्धाकल्प सतयुग-त्रेतामध्ये कोणाचे राज्य होते, कसे झाले
कोणालाही हे माहित नाही. पतित-पावन बाप येतो पण जरुर, त्यांना कुणी पतित-पावन
म्हणतात, कुणी मुक्तीदाता म्हणतात. आवाज देतात कि स्वर्गात घेऊन चल. सर्वांत उंच ते
उंच आहे ना. त्यांना पतित दुनियेमध्ये बोलवतात की येऊन आम्हा भारतवासींना श्रेष्ठ
बनवा. त्यांचे पद किती मोठे आहे. सर्वोच्च सत्ता आहे. त्यांना बोलवतात, जेव्हा
रावणराज्य आहे. नाहीतर या रावणराज्यातून कोण सोडवणार? यासर्व गोष्टी तुम्ही मुलं
ऐकता तर नशा पण चढायला हवा. परंतू एवढा नशा चढत नाही. दारुचा नशा सर्वांना चढतो, हा
नशा चढत नाही. यामध्ये धारणेचा विषय आहे. भाग्याची गोष्ट आहे. तर बाप आहे खुप मोठी
हस्ती (आसामी) तुमच्यामध्ये ही काहींना पुर्ण निश्चय राहतो. निश्चय जर सर्वांना असता
तर संशयामध्ये येऊन का पळाले असते? बाबांना विसरुन जातात. बाबांचे बनले, नंतर
बाबांवर कुणी संशय घेऊ शकत नाही. परंतू हा बाप आहे आश्चर्यकारक, गायन ही आहे
आश्चर्य होऊन बाबांना जाणतात, बाबा म्हणतात, ज्ञान ऐकतात. ऐकवतात, अहो माया तरीही
संशयबुध्दी बनवते. बाबा समजावतात या भक्तीमार्गाच्या शास्त्रांमध्ये काही सार नाही.
बाबा म्हणतात मला कुणीही जाणत नाहीत. तुम्हा मुलांमध्ये ही खुप कमी जण, जाणू शकतात.
तुम्हीही जाणू शकता की ती आठवण सदैव थांबू शकत नाही. मी आत्मा बिंदी आहे, बाबा ही
बिंदी आहे. तो आमचा पिता आहे, त्यांना स्वत:चे शरीर नाही. असे म्हणतात मी या शरीराचा
आधार घेतो. माझे नाव शिव आहे. माझ्या आत्म्याचे नाव कधी बदलत नाही. तुमच्या शरीराचे
नाव बदलते. शरीरावरच नाव पडते. लग्न झाल्यावर नाव बदलतात नंतर ते नाव पक्के करतात.
तर आता बाबा म्हणतात तुम्ही हे पक्के करा की मी आत्मा आहे. हा बाबांनी परिचय दिला
आहे की जेव्हा जेव्हा अत्याचार आणि ग्लानी (निंदा) होते तेव्हा मी येतो. काही
अक्षरांनाही पकडायचे नाही. बाबा स्वत: सांगतात मला दगड-धोंड्यात ठोकून किती ग्लानी
करतात. ही सुध्दा नवी गोष्ट नाही. कल्प-कल्प असे पतित बनतात आणि ग्लानी करतात.
तेव्हाच मी येतो. कल्प-कल्पाची माझी भुमिका आहे. यामध्ये अदली-बदली होऊ शकत नाही.
ड्रामामध्ये नोंद आहे ना. तुम्हाला अनेकजण म्हणतात कि, फक्त भारतातच का येतोत? काय
भारतच स्वर्ग बनणार? हो, हा तर अनादी-अविनाशी भुमिका आहे ना. बाबा किती उंच ते उंच
आहेत. पतितांना पावन बनवणारे, बाबा म्हणतात मला बोलवतातच या पतित दुनियेमध्ये. मी
तर सदैव पावन आहे. मला पावन दुनियेमध्ये बोलवायला पाहिजे ना! परंतू नाही, पावन
दुनियेमध्ये बोलवण्याची गरजच नाही. पतित दुनियेमध्येच बोलवतात की येऊन पावन बनवं.
मी किती मोठा पाहुणा आहे. अर्ध्या कल्पापासून माझी आठवण करत आले आहात. येथे कुण्या
मोठ्या व्यक्तीला बोलवतात, जास्तीत जास्त एक-दोन वर्ष बोलवतील. अमका या वर्षी नाही
तर दुसऱ्या वर्षी येईल. यांची तर अर्ध्या कल्पापासून आठवण करत आले आहात. यांच्या
येण्याचा पार्ट तर ठरलेला आहे. हे कोणाला माहित नाही. खुप उच्च ते उच्च बाप आहे.
मनुष्य, बाबांना एका बाजूला प्रेमाने बोलवतात आणि दुसरीकडे महिमेमध्ये डाग लावतात.
खरंतर हा मोठ्याहून मोठा खुप महिमा योग्य पाहुणा आहे, ज्यांच्या महिमेला डाग लावला
आहे. म्हणतात तो दगड-धोंडे सर्वांत आहे. किती सर्वोच्च महान सत्ता आहे, बोलवतात ही
खुप प्रेमाने, परंतू बिल्कुल बुध्दू आहेत. मीच येऊन स्वत:चा परिचय देतो की, मी तुमचा
पिता आहे. मला ईश्वरीय पिता असे म्हणतात. जेव्हा सर्व रावणाच्या जाळ्यात अडकतात
तेव्हा बाबांना यावे लागते. कारण की सर्व आहेत भक्तीयां किंवा सजनी-सीता बाबा आहेत
साजन-राम, एका सीतेची गोष्ट नाही, सर्व सीतांना रावणाच्या तुरुंगातून सोडवतात. ही
आहे बेहदची गोष्ट. ही आहे जुनी पतित दुनिया, याचे जुने होते परत नविन होणे एक्युरेट
आहे. हे शरीर इ. तर काही लवकर जुने होतात, काही जास्त वेळ चालतात. ही ड्रामामध्ये
बरोबर नोंद आहे. पुर्ण 5 हजार वर्षानंतर मला यावे लागते. मीच येऊन स्वत:चा परिचय
देतो आणि सृष्टी चक्राचे रहस्य समजावतो कुणालाही न माझी ओळख आहे, न ब्रहमा, विष्णू,
शंकराची, न लक्ष्मी-नारायणाची, न राम-सीतेंची ओळख आहे. उच्च ते उच्च कलाकार
नाटकामध्ये तर हेच आहेत. आहे तर मनुष्यांची गोष्ट कुणी 8-10 भुजावाले मनुष्य नसतात,
विष्णूला 4 भुजा का दाखवतात? रावणाला 10 तोंडे का आहेत? हे कोणालाही माहित नाही.
बाबा येऊन संपूर्ण विश्वाच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात. असे म्हणतात मी आहे
सर्वांत मोठा पाहूणा परंतू गुप्त. हे ही फक्त तुम्हीच जाणता. परंतू जाणत असतानाही
तुम्ही विसरुन जाता. त्यांचा किती सन्मान ठेवायला पाहिजे, त्यांची आठवण करायला
पाहिजे. आत्मा ही निराकार, परमात्मा ही निराकार, यामध्ये फोटोंचा विषय नाही.
तुम्हाला तर आत्मा निश्चय करुन बाबांची आठवण करायची आहे, देह अभिमान सोडायचा आहे.
तुम्ही सदैव अविनाशी वस्तुला पाहिले पाहिजे. तुम्ही विनाशी देहाकडे का पाहता! देही
अभिमानी बना, यामध्ये मेहनत आहे. जेवढी आठवण कराल तेवढी कर्मातीत अवस्था प्राप्त
करुन उंच पद प्राप्त कराल. बाबा खुपच सहज योग म्हणजे आठवण शिकवतात. योग तर अनेक
प्रकारचे आहेत. याद अक्षर योग्य आहे. परमात्मा पित्याची आठवण करण्यामध्ये मेहनत आहे.
कुणी एखादाच खरे सांगतो. की मी एवढा वेळ आठवण केली. आठवण करतच नाहीत तर सांगायला
लाज वाटते. काही मुले लिहतात सारा दिवस 1 तास आठवण केली , तर लाज वाटली पाहिजे ना .
असा बाप ज्यांची रात्रं - दिवस आठवण करायला पाहिजे आणि आम्ही फक्त एकच तास आठवण करतो
! यामध्ये खुप गुप्त मेहनत करायला हवी. बाबांना बोलवतात तर लांबून येणारा पाहूणा आहे
ना. बाबा म्हणतात मी नविन दुनियेत पाहुणा बनत नाही. जुन्या दुनियेत येतो. नविन
दुनियेची स्थापना येऊन करतो. ही जुनी दुनिया आहे, हे ही कुणी योग्य रितीने जाणत
नाहीत. नविन दुनियेचे आयुष्य जाणत नाहीत. बाबा म्हणतात हे ज्ञान मीच येऊन देतो.
नंतर ड्रामानुसार हे ज्ञान लोप पावते. नंतर कल्पानंतर ही भुमिका पुर्नावृत्त होईल.
मला बोलवतात, प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी करतात. जे होऊन जातात तर त्यांचे
प्रत्येक वर्षी पुण्य स्मरण करतात. शिवबाबांची ही 12 महिन्यांनी जयंती साजरी करतात.
परंतू केव्हापासून साजरी करत आलो, हे कुणाला माहित नाही. असे म्हणतात कि लाखो वर्ष
झाली. कलियुगाचे आयुष्य लाखो वर्ष लिहले आहे. बाबा म्हणतात ही आहे 5 हजार वर्षांची
गोष्ट बरोबर या देवतांचे भारतामध्ये राज्य होते. तर बाबा म्हणतात-मी भारताचा खुप
मोठा पाहुणा आहे, मला अर्ध्या कल्पापासून खुप निमंत्रण देत आले आहात. जेव्हा खुप
दु:खी होता. तेव्हा असे म्हणता की हे पतित-पावन ये. मी आलो आहे पतित दुनियेमध्ये रथ,
(शरीर) तर मला पाहिजे ना. आत्मा अकालमुर्त आहे त्यांचे हे तख्त (सिंहासन) आहे. बाप
ही अकालमुर्त (ज्याला काळ कधीही खात नाही असा) आहे, या तख्तावर येऊन विराजमान होतो.
या खुप रमणीक गोष्टी आहेत. दुसऱ्या कुणी ऐकले तर चक्रावून जातील. आता बाबा म्हणतात
मुलांनो माझ्या मतावर चाला. असे समजा शिवबाबा मत देत आहेत, शिवबाबा मुरली चालवत
आहेत. हे सुध्दा म्हणतात. मी ही त्यांची मुरली ऐकून सांगतो. ऐकवणारा तर तोच आहे ना.
हा प्रथम क्रमांकामध्ये पुज्य पासून प्रथम क्रमांकाने पुजारी बनला. आता हा
पुरुषार्थी आहे. मुलांनी नेहमी समजायला हवे, आम्हाला शिवबाबांची श्रीमत मिळाली आहे.
जर एखादी गोष्ट चुकीची झाली तर तो बरोबर करेल. हा अतुट निश्चय असेल तर जबाबदार
शिवबाबा आहे. ही ड्रामामध्ये नोंद आहे. विघ्न तर येणारच आहेत, खुप मोठे-मोठे विघ्न
येतात. बाबांच्या मुलांवरही विघ्न येतात. तर नेहमी समजा की शिवबाबा समजावत आहेत तर
आठवण राहिल. काही मुलांना वाटते हे ब्रह्मा बाबा मत देतात, परंतू नाही. शिवबाबाच
जबाबदार आहे. परंतू देह-अभिमान आहे तर सदैव यांनाच पाहात राहतात. शिवबाबा किती मोठा
पाहुणा आहे. तरीही रेल्वे इ. वाल्यांना थोडीच माहित आहे, निराकाराला कसे ओळखणार
किंवा समजणार. तो तर आजारी पडू शकत नाही. तर आजाराचे कारण यांचे (ब्रह्माचे)
सांगतात. त्यांना काय माहित यांच्यामध्ये कोण आहे? तुम्ही मुले ही नंबरवार जाणत
आहात. तो सर्व आत्म्यांचा बाप आणि हा प्रजापिता, मनुष्यांचा बाप आहे. तर हे दोघे (बापदादा)
किती मोठे पाहुणे आहेत.
बाबा म्हणतात जे काही घडत आहे ते ड्रामामध्ये नोंद आहे. मी सुध्दा ड्रामाच्या
बंधनामध्ये बांधलो आहे. नोंद असल्याशिवाय काही करु शकत नाही. माया पण खुप बलशाही आहे.
राम आणि रावण दोघांचा भुमिका आहे. ड्रामामध्ये रावण चैतन्य असता तर म्हणाला असता-मी
सुध्दा ड्रामाअनुसार येतो. हा दु:ख आणि सुखाचा खेळ आहे. सुख आहे नव्या दुनियेमध्ये,
दु:ख आहे जुन्या दुनियेमध्ये, नविन दुनियेत थोडी माणसे. जुन्या दुनियेत किती भरपुर
मनुष्य आहेत. पतित-पावन बाबांना बोलवतात की येऊन पावन दुनिया बनवा कारण पावन
दुनियेमध्ये खुप सुख होते. म्हणूनच कल्प-कल्प बोलवतात. बाबा सर्वांना सुख देऊन
जातात. आता परत पार्ट रिपीट होतो. दुनिया कधी नष्ट होत नाही. नष्ट होणे अशक्य आहे.
समुद्र सुध्दा दुनियेमध्ये आहे ना. हे तीन मजले तर आहेत ना. असे म्हणतात सर्वत्र
पाणी-पाणी होते तरीही पृथ्वीचा मजला तर आहे ना. पाणी पण आहेच ना. पृथ्वीचा मजला कधी
विनाश होऊ शकत नाही. पाणी पण या मजल्यावर असते. दुसरा आणि पहिला मजला, सुक्ष्मवतन
आणि मुलवतनमध्ये पाणी नसते. हे बेहद सृष्टीचे तीन मजले आहेत, ज्याला तुम्हा मुलं
शिवाय कुणी जाणत नाही. ही आनंदाची गोष्ट सर्वांना खुशीनी सांगायची आहे. जे पुर्ण
पास होतात त्यांचेच अतिइंद्रिय सुख गायलेले आहे. जे रात्रं-दिवस सेवेमध्ये तत्पर
आहेत. सेवाच करत राहतात. त्यांना खुप खुशी राहते. कधी कधी असा दिवसही येतो. मनुष्य
रात्रीही जागा राहतो. परंतू आत्मा थकुन जाते तर झोपावे लागते. आत्मा झोपल्यानंतर
शरीर ही झोपते. आत्मा नाही झोपली तर शरीरही नाही झोपणार, आत्मा थकते. आज मी थकलो
आहे-कोण म्हणाले? आत्मा म्हणाली. तुम्हा मुलांना आत्म-अभिमानी बनायचे आहे. यामध्ये
मेहनत आहे. बाबांची आठवण करत नाहीत. देही अभिमानी राहत नाहीत, तर देहाचे संबंधी इ.
आठवत राहतात. बाबा म्हणतात तुम्ही अशरीरी विना कपड्याचे आले होते, नंतर निवस्त्र
जायचे आहे. हे देहाचे संबंध इ. सर्व विसरुन जा. या शरीरामध्ये राहताना माझी आठवण करा
तर सतोप्रधान बनाल. बाबा किती मोठी सत्ता आहे. मुलांशिवाय कुणीही जाणत नाही. बाबा
म्हणतात, मी आहे गरीब निवाज, सर्व साधारण आहेत. पतित-पावन बाबा आले आहेत, हे माहित
झाले तर माहित नाही किती गर्दी होईल. मोठ-मोठे लोक आल्यानंतर किती गर्दी होते. तर
ड्रामामध्ये यांची भुमिका गुप्त राहण्याची आहे. पुढे चालून हळू-हळू प्रभाव निघेल आणि
विनाश होईल. सर्व थोडेच भेटू शकतात. आठवण करतात ना, तर त्यांना बाबांचा परिचय मिळेल.
बाकी पोहचू शकणार नाहीत. जसे बंधनामध्ये राहणाज्या मुली भेटू शकत नाहीत. किती
अत्याचार सहन करतात. विकार सोडू शकत नाहीत. म्हणतात सृष्टी कशी चालणार? अरे सृष्टीचे
ओझे बाबांवर का तुमच्यावर? बाबांना ओळखले तर असे प्रश्न विचारणार नाहीत, बोला प्रथम
बाबांना तर जाणा, नंतर तुम्हाला सर्वकाही समजेल. समजावण्याची पण युक्ती आली पाहिजे.
अच्छा,
गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक
आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. सदैव
सर्वोच्च सत्ताधारी बाबांची आठवण करायची आहे. विनाशी देहाला न पाहून देही-अभिमानी
बनण्याची मेहनत करायची आहे. आठवणीचा खरा-खरा चार्ट लिहायचा आहे.
2. दिवस रात्रं सेवेमध्ये तत्पर राहून अपार खुशीमध्ये राहायचे आहे. तीन लोकांचे
रहस्य सर्वांना आनंदाने समजावयाचे आहे. शिवबाबा जे श्रीमत देतात त्यामध्ये अतुट
निश्चय ठेवून चालायचे आहे. कोणतेही विघ्न आले तर घाबरायचे नाही. जबाबदार शिवबाबा आहे.
म्हणून संशयामध्ये येऊ नका.
वरदान:-
वेळ आणि
संकल्पांना सेवेमध्ये अर्पण करणारे मास्टर विधाता , वरदाता भव :-
आता स्वत:च्या
छोट्या-छोट्या गोष्टीच्या मागे, शरीराच्या मागे, मनाच्या मागे, साधनांच्या मागे,
संबंध निभावण्याच्या मागे वेळ आणि संकल्प लावण्यापेक्षा याला सेवेमध्ये अर्पण करा,
हा समर्पण समारोह साजरा करा. श्वासों-श्वास सेवेची लगन हवी, सेवेमध्ये मग्न राहा.
तर सेवेमध्ये लागल्याने स्व-उन्नतीची भेट स्वत: प्राप्त होऊन जाईल. विश्व
कल्याणामध्ये स्व-कल्याण सामावले आहे. म्हणून निरंतर महादानी, मास्टर विधाता आणि
वरदाता बना.
बोधवाक्य:-
आपल्या इच्छा
कमी करा , तर आपो - आप समस्या कमी होऊन जातील .