01-02-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांनो , या शरीररूपी कपड्यांना येथेच सोडायचे आहे , म्हणून यामधून ममत्व
काढून टाका , कोणत्या पण मित्र संबंधीची आठवण करू नका .
प्रश्न:-
ज्या
मुलांमध्ये योगबळ आहे त्यांची लक्षणे काय असतील ?
उत्तर:-
त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये थोडा पण धक्का बसणार नाही, कुठे पण लगाव नसेल. समजा
कुणाचा मृत्यू झाला तर दुःख होणार नाही, कारण मुलं जाणतात या अविनाश नाटकांमध्ये
त्यांची एवढीच भूमिका होती. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते.
ओम शांती।
हे ज्ञान खूपच गुप्त आहे. यामध्ये नमस्ते करावे लागत नाही. दुनियामध्ये नमस्ते किंवा
राम राम इत्यादी म्हणतात. येथे या सर्व गोष्टी चालू शकत नाहीत,कारण हा एक परिवार आहे.
परिवारामध्ये एक दोघाला नमस्ते किंवा सुप्रभात म्हणत नाहीत, असे शोभत पण नाही.
घरांमध्ये तर, जेवण वगैरे केले, कार्यालय मध्ये गेले, परत आले हे चालूच राहते,
नमस्ते करण्याची आवश्यकता राहत नाही. सुप्रभातची फॅशन ही युरोपियन लोकांनी काढली आहे.
अगोदर काहीच म्हणत नव्हते. कोणी सत्संगी आपसा मध्ये मिळतात, तर नमस्ते करतात किंवा
पाया पडतात. येथे पाया पडतात, म्हणजे नम्रता दाखवण्या साठी पाया पडतात. येथे तर
तुम्हा मुलांना देही अभिमानी बनायचे आहे. आत्मा,आत्म्याला काय करेल, तरीही म्हणावे
लागते नमस्ते. जसे बाबाला म्हणतात,नमस्ते. आत्ता बाबा म्हणतात मी साधारण तनाद्वारे
तुम्हाला शिकवत आहे, यांच्याद्वारे स्थापना करतो, कशी? ते पण बाबा सन्मुख समजतात,
नाहीतर कोणी कसे समजतील? येथे बाबा सन्मुख समजवतात, तरच मुलं समजतात. दोघांना नमस्ते
करावे लागेल, बापदादा नमस्ते. जर दूसरे लोक असे ऐकतील, तर संभ्रमीत होतील की,हे
बापदादा काय म्हणतात? डबल नावे अनेक मनुष्याचे असतात ना,जसे लक्ष्मीनारायण किंवा
राधेकृष्ण इत्यादी अनेक नावे आहेत.हे जसे स्त्री पुरुष एकत्रित झाले.आत्ता तर हे
बापदादा आहेत.या गोष्टींना तुम्ही मुलंच समजू शकतात.जरूर बाबाच मोठे झाले.ते नावं
पण डबल आहेत परंतु आहेत तर एक ना.परत दोन नावं का ठेवली आहेत?आता तुम्ही मुलं
जाणता,हे तर चुकीचे झाले ना. बाबांना दुसरे कोणी ओळखू शकत नाहीत. तुम्ही म्हणाल
नमस्ते बापदादा.परत बापदादा म्हणतात शारीरिक,आत्मिक मुलांनो नमस्ते, परंतु इतके
लांबलचक शोभत नाही.हे वाक्य तर बरोबर आहे. तुम्ही आत्ता शारीरिक मुलं आहात आणि
आत्मिक पण आहात.शिवबाबा सर्व आत्म्याचे पिता आहेत आणि परत प्रजापिता पण जरूर
आहेत.प्रजापिता ब्रह्माचे संतान भाऊ बहीण आहेत.तुम्ही आता सर्व ब्रह्माकुमार कुमारी
आहात.ब्रह्मा कुमार कुमारी झाल्यामुळे प्रजापिता पण सिद्ध होतात.यामध्ये अंधश्रद्धा
ची गोष्ट नाही.असे सांगा ब्रह्माकुमार कुमारींना वारसा शिव पित्या द्वारे मिळत
आहे,असे तुम्ही सांगा.ब्रह्मा द्वारे वारसा मिळत नाही. ब्रह्मा पण शिव बाबाचा मुलगा
आहे.सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा विष्णू शंकर ही रचना आहे.यांचे रचनाकार शिव आहेत.
शिवबाबांसाठी तर असे कोणी म्हणू शकत नाहीत की,यांचे रचनाकार कोण? शिवबाबा चे
रचनाकार तर कोणी होऊ शकत नाहीत. ब्रह्मा विष्णू शंकर ही रचना आहे. यांच्यावरती
शिवबाबा,सर्व आत्म्यांचे पिता, रचनाकार आहेत, तर प्रश्न उठतो रचना कधी केली? नाही,
ही तर रचना आहे. इतक्या आत्म्यांची कधी रचना केली? हा प्रश्न असू शकत नाही, हे अनादि
नाटक चालत येते,याचा कधी अंत होत नाही. या गोष्टी तुम्ही मुलं पण नंबरा नुसार समजत
आहात.हे खूपच सहज आहे. एका बाबा शिवाय कोणत्या ही व्यक्तीमध्ये लगाव नको, मग कोणाचा
मृत्यू होवो किंवा जिवंत असो. असे गायन आहे मातेचा मृत्यु झाला तरी, ज्ञानरुपी हलवा
खात रहा, म्हणजे मुरली दररोज ऐकत रहा. कोणाचा मृत्यू होतो, काळजीची गोष्टच नाही
कारण हे अनादी अविनाश नाटक बनलेले आहे,त्यानुसार त्यांना या वेळेत जायचे होते,
यामध्ये कोणी काय करू शकतात.जरा पण दुःखी होण्याची गोष्ट नाही.ही योग बाळाची अवस्था
आहे. असे कायदा म्हणतो,जरा पण धक्का बसायला नको.सर्व कलाकार आहेत. आप-आपली भूमिका
वठवत राहतात. मुलांनाही ज्ञान मिळाले आहे.
बाबांना म्हणतात, हे परमपिता परमत्मा येऊन आम्हाला घेऊन चला.इतक्या सर्व शरीराचा
विनाश करून सर्व आत्म्यांना सोबत घेऊन जायचे आहे.हे तर खूप मोठे कार्य झाले ना.येथे
कोणाचा मृत्यू होतो,तर बारा महिने रडत राहतात.शिव पिता तर सर्व मनुष्य आत्म्यांना
घेऊन जातील. सर्वांचे शरीर नष्ट होतील.मुलं जाणतात महाभारत लढाई लागते,तर मच्छरा
सारखे चालले जातील.नैसर्गिक आपत्ती पण येणार आहे.ही सारी दुनिया परिवर्तन होत
आहे.आता पहा इंग्लंड,रशिया इत्यादी मोठे मोठे देश आहेत.सतयुगा मध्ये हे सर्व होते
का? दुनिया मध्ये हे पण कोणाच्या बुद्धी मध्ये येत नाही की, आमच्या राज्यांमध्ये
दूसरे कोणतेच देश नव्हते.एक धर्म एक राज्य होते.तुमच्यामध्ये पण नंबरा नुसार
आहेत,ज्यांच्या बुध्दी मध्ये चांगल्या प्रकारे बसते.जर धारणा होईल तर तो ज्ञानाचा
नशा,नेहमीच नशा चढलेला राहिल.नशा कोणाला फार मुश्कील ने चढतो.मित्र संबंधी मधुन
आठवण काढली तर,बेहद खुशीमध्ये बुद्धी राहिल,ही फार मोठी कमाल आहे.होय, हे पण अंत
काळामध्ये होईल.अंत काळातच कर्मातीत अवस्था प्राप्त कराल.शारीरिक भान नष्ट होईल. बस
आम्ही आता जातो.हे जसे साधारण होऊन जाईल.जसे नाटकांमधील कलाकार आपली भूमिका करून
परत घरी जातात. हा देहरूपी कपडा तुम्हाला येथेच सोडायचा आहे.हा शरीर रुपी कपडा
येथेच घेतला,येथेच सोडायचा आहे.या सर्व नवीन गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये
आहेत,दुसऱ्या कोणाच्या बुद्धीमध्ये नाहीत.अल्लाह आणि बादशाही.अल्लाह सर्वात वरती
राहतात.ब्रह्मा द्वारे स्थापना,शंकरा द्वारे विनाश,विष्णू द्वारे पालना.अच्छा बाकी
शिवाचे काय काम आहे?उच्च ते उच्च शिव बाबांना कोणीही जाणत नाहीत.ते तर म्हणतात
ईश्वर सर्वव्यापी आहेत.हे सर्व त्यांचीच रूपे आहेत.साऱ्या दुनिया च्या बुद्धीमध्ये
पक्के झाले आहे,म्हणून सर्व तमोप्रधान बनले आहेत.बाबा म्हणतात साऱ्या दुनियेची
दुर्गती झाली आहे,परत मी येऊन सर्वांचे सद्गगती करतो.जर सर्वव्यापी आहेत तर,सर्व
भगवानच भगवान आहेत का? एकीकडे म्हणतात आम्ही सर्व भाऊ भाऊ परत म्हणतात सर्व पिता
आहेत,काहीच समजत नाहीत.आता तुम्हा मुलांना बाबा म्हणतात,मुलांनो माझी आठवण करा,तर
तुमचे विर्कम विनाश होतील.तुम्हाला या दादाची किंवा मम्माची आठवण करायची नाही. बाबा
म्हणतात या ब्रह्माची, न मम्माची, कोणाची महिमा काहीच नाही. बाबा नसते तर ब्रह्मानी
काय केले असते? यांची आठवण केल्यामुळे काय होईल होय? तुम्ही जाणता यांच्याद्वारे,
शिव पित्याकडुन वारसा घेत आहोत, ब्रह्मा कडुन नाहीत. ब्रह्मा पण शिवबाबा कडून वारसा
घेत आहेत, तर त्यांची आठवण करायची आहे. हे तर मध्येच दलाल आहेत. मुलांचा साखरपुडा
होतो, तेव्हा ते एक दुसर्याची आठवण करतात ना, लग्न लावणारा तर मध्येच दलाल
झाला.यांच्याद्वारे बाबा तुमचा साखरपुडा आपल्या सोबत करतात, म्हणून गायन आहे सदगुरु
दलाल रूपामध्ये मिळाले. सदगुरु कोणते दलाल तर नाहीत, सदगुरु तर निराकार आहेत.जरी
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु म्हणतात परंतु ते काही गुरु नाहीत. सदगुरु तर एक बाबाच
आहेत.सर्वांची सदगती करतात. बाबांनी मुलांना शिकवले आहे,तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना
रस्ता दाखवतात आणि सर्वांना सांगतात,पाहून पण न पाहिल्यासारखे करा.बुद्धी बाबा सोबत
लागून राहावी. डोळ्यांनी जे काही पाहता ते सर्व कब्रदाखिल होणार आहे.आठवण तर एक
बाबांची करायची आहे,ना की ब्रह्मांची. बुद्धीद्वारे समजते, ब्रह्मा कडुन थोडाच वारसा
मिळतो. वारसा तर शिव बाबाद्वारे मिळणार आहे. बाबां जवळ जायचे आहे. विद्यार्थी,
विद्यार्थ्यां ची थोडीच आठवण करतील.विद्यार्थी तर शिक्षकाची आठवण करतील ना.शाळे
मध्ये जी हुशार मुले असतात,ते परत दुसर्यांना पण शिकवतात.बाबा पण म्हणतात एक दोघांना
श्रेष्ठ बनण्यासाठी प्रयत्न करा परंतु भाग्या मध्ये नसेल तर पुरुषार्थ पण करत
नाहीत.थोड्या मध्ये खुश होतात.असे समजायला पाहिजे, प्रदर्शनीमध्ये तर खूप
येतात,अनेकांना समजून सांगितल्यामुळे प्रगती होत जाते.निमंत्रण देतात,तर मोठे मोठे
समजदार मनुष्य येतात.निमंत्रणा शिवाय तर अनेक प्रकारचे लोक येतात, काय काय उलटे
सुलटे बोलत राहतात.श्रेष्ठ मनुष्यांची चाल चलन पण चांगली असते.श्रेष्ठ माणसे आत
मध्ये पण कायदेशीर येतील.चलन मध्ये खूपच फरक राहतो.त्यांच्या मध्ये चालण्याचे
बोलण्याचे काही नियम असतात.मेळ्या मध्ये तर अनेक प्रकारचे येतात,कोणाला मनाई केली
जात नाही, म्हणून कुठेपण प्रदर्शनी मध्ये निमंत्रण कार्डा वरती मनुष्यांना बोलवाल
तर चांगले चांगले लोक येतील,परत जाऊन ते,अनेकांना ज्ञान ऐकवतील.कधी स्त्रियांचा
कार्यक्रम ठेवा,तर फक्त स्त्रिया येऊन पाहतील,कारण कुठे कुठे स्त्रिया खूप पडद्या
मध्ये असतात,बंधनात असतात, तर फक्त स्त्रियांचा कार्यक्रम ठेवा.कोणीही पुरुष यायला
नको.बाबांनी समजवले आहे प्रथम तुम्हाला हे समजायचे आहे की, शिवबाबा निराकार
आहेत.शिवबाबा आणि प्रजापिता ब्रह्मा दोन्ही बाबा आहेत,दोन्ही एक तर होऊ शकत नाहीत,जे
दोन्ही बाबा कडून वारसा मिळेल.वारसा आजोबाचा किंवा वडिलांचा मिळतो.आजोबाच्या मिळकती
वर सर्व मुलांचा अधिकार असतो,जरी कसा पण खराब मुलगा असेल तरीही आजोबाचा वारसा मिळतो.
हा पण कायदा आहे.ते समजतात यांना पैसे मिळाल्यास एका वर्षात सर्व नष्ट करून टाकतील
परंतु सरकारचा कायदाच असा आहे,जे द्यावे लागते.सरकार काहीच करू शकत नाही.बाबा तर
अनुभवी आहेत ना. एक राजाचा मुलगा होता एक कोटी रुपये बारा महिन्यात संपवून टाकले,असे
पण होते.शिवबाबा तर म्हणनार नाहीत, मी पाहिले आहे.हे दादा म्हणजे ब्रह्मा म्हणतात
आम्ही अशी खूप उदाहरणं पाहिली आहेत. ही दुनिया खूपच खराब आहे.ही जुनी दुनिया,जुने
घर आहे.जुन्या घराला नेहमी सोडावे लागते.लक्ष्मी नारायण राजाचा महल खुपच चांगला
असतो.आत्ता तुम्ही बाबाद्वारे समजत आहात आणि तुम्ही नरा पासून नारायण बनतात.ही
सत्यनारायणा ची सत्यकथा आहे.हे पण तुम्ही मुलं समजतात,तुमच्यामध्ये पण पूर्ण पणे
फुलासारखे बनले नाहीत. या ज्ञानामध्ये खूपच चांगुलपणा पाहिजे.तुम्ही दिवसेंदिवस
प्रगती करत राहतात,फुला सारखे बनत जातात.
तुम्ही मुलं प्रेमाने म्हणतात बापदादा,ही पण तुमची नवीन भाषा आहे.मनुष्याच्या बुध्दी
मध्ये येऊ शकत नाहीत.समजा बाबा कुठे जातील तर मुलं म्हणतील,बापदादा नमस्ते.बाबा
म्हणतील आत्मिक शारीरिक मुलांनो नमस्ते.असे म्हणावे लागेल.कोणी ऐकतील तर म्हणतील,ही
तर नवीन गोष्ट आहे.बापदादा एकत्र कसे म्हणतात. बाप आणि दादा दोन्ही कधी,एक असतात
का? दोघांची नावे वेगवेगळी आहेत.शिवबाबा, ब्रह्मा दादा,तुम्ही या दोघांच्या मध्ये
आहात. तुम्ही जाणतात ब्राह्मांच्या तना मध्ये शिवबाबा बसले आहेत.आम्ही बापदादांची
मुलं आहोत,हे पण बुद्धीमध्ये राहिले तर खुशी चा पाला चढलेला राहील आणि नाटका वरती
पण निश्चिंत राहायचे आहे. समजा कोणी शरीर सोडले,जाऊन दुसरी भूमिका करतील.प्रत्येक
आत्म्याला अविनाशी भूमिका मिळाले आहे,यामध्ये काहीच विचार करण्याची आवश्यकता
नाही.त्यांना दुसरी भूमिका करायचे आहे, परत बोलावू शकत नाहीत.हे अविनाश नाटक आहे
ना.यामध्ये रडण्याची गोष्टच नाही.अशी अवस्था वाले निर्मोही राजा बनतात.सतयुगा मध्ये
सर्व निर्मोही असतात.बाबांना प्राप्त केले तर रडण्याची आवश्यकताच नाही.बाबा खूपच
चांगला रस्ता दाखवतात.येथे तर कोणाचा मृत्यू होतो,तर खूप रडतात.कन्यां साठी तर खूपच
चांगले आहे.पिता लग्ना साठी फालतू पैसे खर्च करतात आणि त्यामुळे तुम्ही नरका मध्ये
जाऊन पडाल.यापेक्षा तर बोला,आम्ही या पैशा द्वारे आत्मिक विद्यापीठ आणि दवाखाना
सुरु करतो.तर अनेकांचे कल्याण करु,तर तुमचे पण पुण्य आणि आमचे पण पुण्य जमा
होईल.मुलं स्वतःपण उत्साहा मध्ये राहणारे हवेत, की आम्ही भारताला स्वर्ग बनवण्या
साठी तन-मन-धन सर्व खर्च करत आहोत. इतका नशा राहायला पाहिजे.धन द्यायचे असेल तर द्या,
नसेल द्यायचे तर देऊ नका.तुम्ही आपले कल्याण आणि अनेकांचे कल्याण करू इच्छित नाही
काय? इतकी मस्ती असायला पाहिजे.खास कुमारींनी तर मैदानात उभा राहिले पाहिजे.
अच्छा गोड गोड फार वर्षा नंतर भेटलेल्या मुलां प्रती प्रेम पूर्ण आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.
वरदान:-
विशेषता रुपी
संजीवनी बुटी द्वारे मुर्छित ला सुरजीत करणारे विशेष आत्मा भव .
प्रत्येक आत्म्याला
श्रेष्ठ स्मृतीच्या विशेषतेची स्मृती रुपी संजीवनी बुटी खाऊ घाला,तर ते मुर्छित
पासून सुरजीत जागृत होतील.विशेषतांच्या स्वरूपाचा आरसा त्यांच्यासमोर
ठेवा.दुसऱ्यांना स्मृती दिल्यामुळे तुम्ही विशेष आत्मा बनाल.जर तुम्ही कोणाला कमजोरी
ऐकवाल तर ते लपवतील,तुम्ही त्यांची विशेषता ऐकवा तर स्वतः आपली कमजोरी स्पष्ट
करतील.या संजीवनी बुटी द्वारे मुर्छितला सुरजीत, जागृत करून, प्रगती करत चला आणि
दुसऱ्यांची पण प्रगती करवत चला.
बोधवाक्य:-
नाम मान शान
किंवा साधनांचा संकल्पा मध्ये पण त्यागच महान त्याग आहे.