22-03-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
14.12.1985 ओम शान्ति
मधुबन
“ वर्तमानातील हे
जीवनच भविष्याचा आरसा ”
(मधुबन निवासी बरोबर)…
आज विश्व
रचनाकार बाबा आपल्या मास्टर रचयिता मुलांना पाहत आहेत? मास्टर रचयिता आपल्या
रचतापनच्या स्मृतीमध्ये कोठ पर्यंत स्थित राहत आहेत. तुम्हा सर्व रचनाकारी विशेष
पहली रचना हा देह आहे. या देहरुपी रचनेचे, रचनाकार कोठपर्यंत बनले आहात? देहरुपी
रचना कधी आपल्याकडे रचयिताला आकर्षित करुन रचनापनाला विस्मृत तर करत नाही ना? मालक
बनून या रचनेला सेवेमध्ये लावता? जेव्हा पाहिजे, जसे पाहिजे मालक बनून करु शकता?
पहिल्या प्रथम या देहाचे मालक पणाचा अभ्यासच प्राप्तीचे मालक किंवा विश्वाचे मालक
बनवू शकतो. जर देहाच्या मालक पणामध्ये संपूर्ण सफलता नाही तर विश्वाचे मलाक पणामध्ये
पण संपन्न बनू शकत नाही. वर्तमान काळातील हे जीवन भविष्याचा आरसा आहे. या आरशाद्वारे
स्वत:चे भविष्य स्पष्ट पाहू शकता. प्रथम या देहाचे संबंध आणि संस्काराचे अधिकारी
बनण्याच्या आधारावरच मालकपणाचे संसकार आहेत. संबंधामध्ये न्यारे आणि प्यारे पण
येणेच, मालक पणाची निशाणी आहे. संस्कारामध्ये निर्माण आणि निर्माण या दोन विशेषाता
मालक पणाची निशाणी आहे. त्या बरोबर सर्व आत्म्यांच्या संपर्कामध्ये येणे, स्नेही
बनणे, मनापासून स्नेहाचा आशिर्वाद म्हणजे शुभ भावना सर्वांचे आतून, त्या
आत्म्याप्रती निघावी. जरी ओळखता, ना ओळखता, दूरचा संबंध वा संपर्क आहे, परंतू जे पण
पाहिले ते स्नेहामुळे असा अनुभव करील की हे आमचे आहेत, स्नेहाच्या जाणीवेने आपले पणा
अनुभव करतील. संबंध दूर चा असला तरी पण स्नेह संपन्नतेचा अनुभव करेल. विश्वाचे मालक
वा देहाचे मालक पणाचे, अभ्यासी आत्म्यांची ही पण विशेषता अनुभवामध्ये येईल. ते
ज्यांचे पण संपर्कामध्ये येतील त्यांना, त्या विशेष आत्म्याद्वारे दातापणाची अनुभूती
होईल. हे कोणाच्या संकल्पामध्ये पण येणार नाही की, हे घेणारे आहेत. त्या
आत्म्याद्वारे, सुखाची, दातापणाची, शांती, प्रेम, आनंद, खुशी सहयोग, हिम्मत, उत्साह,
उमंग कोणत्या ना कोणत्या विशेषतेच्या दातापणाची अनुभूती होईल. नेहमी विशाल बुध्दी
आणि विशाल मन ज्याला तुम्ही मोठ्या मनाचे म्हणता, ती अनुभूती होईल. आता या
निशाणीद्वारे स्वत:च स्वत:ला तपासा की आम्ही काय बनणार आहे? आरसा तर सर्वांजवळ आहे?
जेवढे स्वत:च स्वत:ला ओळखू शकाता तेवढे इतर ओळखू शकत नाहीत. तर स्वत:ला ओळखा. अच्छा.
आज तर भेटण्यासाठी आलो आहे. तरी पण सर्व आले आहेत. त्यामुळे बापदादाला पण सर्व
मुलांचा स्नेहा बरोबर, मान पण ठेवावा लागतो, त्यामुळे आत्मिक वार्तालाप केला.
मधूबनवाले आपला अधिकार सोडत नाहीत. तरी पण जवळ बसले आहात. अनेक गोष्टीमध्ये निश्चित
होऊन बसले आहात. जे बाहेर राहतात त्यांना तरी पण मेहनत करावी लागते. कमविणे आणि खाणे
ही काही कमी मेहनत नाही. मधूबनमध्ये कमविण्याची तर चिंता नाही ना. बापदादा जाणतात
कि, प्रवृत्ती मध्ये राहणाज्यांना सहन पण करावे लागते, सामना पण करावा लागतो, हंस
आणि बगळे यांचे मध्ये राहून स्वत:ची उन्नती करत पुढे जात आहेत, परंतू तुम्ही लोक
किती तरी गोष्टीपासून स्वत:च दूर आहात. आरामात राहता, आरामात खाता आणि आराम करता.
बाहेर ऑफीसला जाणारे दिवसा आराम करतात का? येथे तर शरीराला पण आराम तर बुध्दीला पणा
आराम आहे. त्यामुळे मधूबन निवासांची स्थिती सर्वांपासून नंबर एकची झाली आहे ना,
कारण एकच काम आहे. अभ्यास करता, तो पण बाबा करवतात. सेवा करता ती पण यज्ञ सेवा आहे.
बेहदच्या बाबाचे बेहदचे घर आहे. एकच गोष्ट आहे, एकाचीच ओढ आहे, दुसरे काहीच नाही.
माझे सेंटर ते पण नाही. फक्त माझी जबाबदारी (चार्ज) हे पण नसले पाहिजे. मधूबन
निवासींना किती तरी गोष्टीत सहज पुरुषार्थ आणि सहज प्राप्ती आहे. अच्छा सर्व मधुबन
वाल्यांनी सुवर्ण जयंतीचा पण कार्यक्रम बनविला आहे ना. समारंभ नाही. त्यांची तर
पत्रिका इ. छापली आहे. ते झाले विश्व सेनेप्रती. स्वत:साठी काय योजना बनविली आहे?
स्वत:च्या रंगभूमीवर काय अभिनय करणार? त्या रंगभूमीसाठी तर कार्यक्रम पण बनविता.
स्वत:च्या प्रगतीसाठी काय योजना बनविली आहे? प्रत्येक गोष्टीची सुरुवात तर मधूबन
निवासी पासून आहे ना. कोणता पण समारंभ असतो तर काय करता? (दिवे पेटवितो) तर सुवर्ण
जयंतीचा दिपक कोण पेटवेल? प्रत्येक गोष्टीची सुरुवात कोण करेल? मधुबन निवासीमध्ये
हिम्मत आहे, उमंग पण आहे, वायुमंडळ पण आहे, सर्व मदत आहे. जेथे सर्वांचा सहयोग आहे
तेथे सर्व सहज आहे. फक्त एक गोष्ट करावी लागेल. ती कोणती?
बापदादा सर्व मुलांमध्ये ही श्रेष्ठ इच्छा ठेवतात की, प्रत्येक जणा बाबा सारखा बनवा.
संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे हीच विशेषता आहे. पहिली गोष्ट आहे स्वत:शी म्हणजे
स्वत:चा पुरुषार्थ, स्वत:चा स्वभाव संस्कार, बाबाला समोर ठेवून संतुष्ट आहात. हे
तपासायाचे आहे. होय, मी संतुष्ट आहे यथाशक्ती प्रमाणे, ती वेगळी गोष्ट आहे. परंतू
खज्या स्वरुपातील हिशोबाने स्वत: संतुष्ट होणे आणि मग दुसज्याला संतुष्ट करणे, अशी
संतुष्टताच महान आहे. दुसरे पण म्हणतील कि हे खज्या रुपाने संतुष्ट आत्मा आहे.
संतुष्टतेमध्ये सर्व काही येते. ना विघ्नरुप राहायचे, ना विघ्न रुप बनायचे, याला
म्हणतात संतुष्टता. शांतताभंग करणारे अनेक असतील परंतू स्वत: शांती भंग करावयाची
नाही. आगीच्या प्रभावापासून स्वत:च स्वत:ला दूर करुन सुरक्षित राहणे. दुसज्याला पाहू
नका. स्वत:ला पहा मला काय करायचे आहे. मला निमित्त बनून इतरांना शुभभावना आणि
शुभकामना देऊन सहयोग द्यावयाचा आहो. ही आहे. विशेष धारणा, यामध्ये सर्व काही येते.
याची तर सुवर्णजयंती साजरी करु शकता ना. निमित्त मधूबन वाल्यांसाठी सांगत आहे, परंतू
आहे सर्वांसाठी. मोहजीतची गोष्ट ऐकली आहे ना. तशी संतुष्टतेची गोष्ट बनवा. कोणाकडे
पण कोण जाईल, किती पण उलट सुलट परिक्षा घेवो, परंतू सर्वांच्या मुखाद्वारे
सर्वांच्या मनातून संतुष्टतेच्या विशेषतेचा अनुभव व्हावा, हा तर तसाच आहे, नाही. मी
कसा बनेल, आणि बनवेल. बस, ही छोटीशी गोष्ट रंगमंचावर दाखवा. अच्छा.
दादी बरोबर
बापदादा जवळ तुम्हा सर्वांचे मनातील संकल्प पोहचतच आहेत. एवढ्या सर्व श्रेष्ठ
आत्म्यांचे श्रेष्ठ संकल्प आहेत तर साकार रुपात होणारच आहेत. योजना तर फार चांगल्या
बनविल्या आहेत. आणि या यो जनाच सर्वांना पूर्ण बनवतील. साज्या विश्वामध्ये, विशेष
आत्म्यांची शक्ती तर एकच आहे. आणि कोठे पण असे विशेष आत्म्यांचे संगठन नाही. येथे
संगठनाची शक्ती विशेष आहे, त्यामुळे या संगठना वर सर्वांची विशेष नजर आहे, आणि इतर
सर्व डगमगू लागले आहेत. गादी हालू लागल्या आहेत. आणि येथे राज्य गादी बनत आहे. येथे
गुरुची गादी नाही, त्यामुळे हालत नाही. स्व-राज्याची किंवा विश्वाच्या राज्याची गादी
आहे. सर्व हालविण्याचा प्रयतन पण करतील, परंतू संगठनाची शक्ती याला विशेष वाचवित आहे.
तेथे एक एकाला वेगळे करुन संगठनाला असंघटीत करुन मग हालवित आहेत. येथे संगठनाची
शक्तीमुळे हालवू शकत नाही. त्यामुळे या संगठनाच्या शक्तीच्या विशेषतेला नेहमी आणखीन
पुढे वाढवित चला. हा संगठनच किल्ला आहे, त्यामुळे वार करु शकत नाहीत. विजय तर
होणारच आहे, फक्त पुनरावृत्ती करावयाची आहे. जे पुनरावृत्ती करण्यामध्ये हुशार आहेत,
तेच विजयी बनून रंगमंचावर प्रसिध्द होतील. संगठनाची शक्तीच विजयाचा विशेष आधार
स्वरुप आहे. या संगठनानेच सेवेमध्ये वृध्दी करुन सफलतेला प्राप्त केले आहे. सर्व
दादींनी पालनेचा परतावा चांगला दिला आहे. संगठनच्या शक्तीचा आधार काय आहे? फक्त हा
पाठ पक्का व्हावा की, सन्मान देणेच सन्मान घेणे आहे. देणे घेणे आहे, घेणे घेणे नाही.
घेणे म्हणजे घालविणे. देणे म्हणजे घेणे. कोणी दिले तर देणे, हा काही व्यापार नाही.
येथे तर दाता बनण्याची गोष्ट आहे. दाता घेऊन मग देत नाही. तो तर देतच जातो, त्यामुळे
या संगठनाची सफलता आहे. परंतू आता कंगन तयार झाले आहे. माळ तयार झाली नाही. वाढ झाली
नाही तर राज्य कोणावर कराल. आता तर बुध्दीची संख्या कमी आहे. 5 लाख पण तयार झाले
नाहीत. कोणत्या पण विधीद्वारे वाढ तर होत आहे ना. विधीमध्ये बदल होते आहे. अगोदर
साकारमध्ये भेटला, आणि आता अव्यक्त मध्ये भेटत आहात. विधीमध्ये बदल झाला ना. पुढे
पण विधीमध्ये बदल होत राहिल. वृध्दीप्रमाणे भेटण्याची विधी पण बदलत जाईल. अच्छा.
पार्टी बरोबर
1) नेहमी स्वत:च्या गुणमुर्तद्वारे गुणदान करत राहा. निर्बलाला शक्तीचा, गुणांचा
ज्ञानाचे दान दया तर नेहमी महादानी आत्मा बनाल. दाताची मुले देणारे आहात घेणारे
नाहीत. जर विचार करता, हा असा करेल तर मी करेल, हे घेणारे आहेत. मी करेल, हे देणारे
आहेत. तर लेवता नाही देवता बना. जे पण मिळाले आहे ते देत जावा. जेवढे देत जाल, तेवढे
वाढत जाते. सदा देवी म्हणजे देणारी. अच्छा.
2) ऐकले तर फार आहे. शेवटी हिशोब तर करा, ऐकण्याचा फायदा काय आहे. ऐकणे आणि करणे
दोन्ही मिळून आहे? का ऐकणे आणि करण्यामध्ये अंतर पडत आहे, ऐकता कशासाठी? करण्यासाठी
ना. ऐकणे आणि करणे, जेव्हा समान होईल तर काय होईल? संपन्न बनाल ना. तर पहिल्या
प्रथम संपूर्ण स्थितीचा नमुना कोण बनेल? प्रत्येक जण असे का म्हणत नाही की मी बनेल.
यामध्ये जो उठेल तो अर्जून, जसे ब्रह्मा बाबानी स्वत:ला निमित्त बनविले तसे जे
निमित्त बनतात ते अर्जुन बनतात, म्हणजे प्रथम नंबरमध्ये येतो. अच्छा, पाहू कोण बनत
आहे. बापदादा तर मुलांना पाहू इच्छितात. वर्ष संपत जातात. जसे वर्ष संपते तसे जे पण
जुने वागणे आहे ते संपले पाहिजे. आणि नविन उमंग, नवा संकल्प नेहमी राहावा, तर हिच
संपूर्णतेची निशाणी आहे. आता जुने सर्व नष्ट होईल, आता सर्व नव असावे.
प्रश्न :-
बाबाजवळ
जाण्याचे साधन कोणते आहे?
उत्तर :-
विशेषता,
कोणत्या ना कोणत्या तरी विशेषतेमुळेच बाबाच्या जवळ आले आहात. या विशेषता
सेवेद्वारेच वाढत जातात. ज्या विशेषता बाबांनी भरल्या आहेत, त्या सर्वांना सेवेमध्ये
लावा. विशेषतांना प्रत्यक्षात लावल्यानेच सेवेच्या विषयामध्ये पण गुण घेऊ शकता.
स्वत:चे अनुभव दुसज्यांना सांगा, तर त्यांचा पण उमंग उत्साह वाढेल.
प्रश्न :-
आत्मिक ते
मध्ये कमी येण्याचे कारण काय आहे?
उत्तर :-
स्वत:ला किंवा
ज्यांची सेवा करता त्यांना अनामत समजत नाहीत. अनामत (ठेव) समजल्याने अनासक्त राहाल
आणि अनासक्त बनल्यानेच आत्मियता येईल. अच्छा.
प्रश्न :-
वर्तमान वेळी
विश्वामध्ये जास्त आत्म्यामध्ये कोणत्या दोन गोष्टीची प्रवेशता आहे?
उत्तर :-
(1) भय (2) आणि
चिंता या दोन्हींचा विशेष सर्वांमध्ये प्रवेश आहेत. परंतू जेवढे ते चिंतेमध्ये आहेत,
तेवढे तुम्ही शुभचिंतक आहात. चिंता बदलणे शुभ चिंतक, भावना स्वरुप बनलात. भयभीत ऐवजी
सुखाचे गीत गात आहात. बापदादा अशा बेफिकीर बादशहांना पाहत आहेत.
प्रश्न :-
वर्तमान वेळी
कोणता मोसम चालू आहे? अशा वेळी तुम्हा मुलांचे कर्तव्य काय आहे?
उत्तर :-
वर्तमान वेळी
मोसम आहे. अकार्ले मृत्युचा. जसे वायुचे, समुद्रामध्ये वादळ अचानक येते, तसे हे
अकालमृत्युचे वादळ अचानक आणि तीव्रतेने एकाचवेळी अनेकांना घेऊन जात आहे. अशावेळी
अचानक मृत्यू वाल्या आत्म्यांसाठी, अकालमुर्त बनून शांती आणि शक्तीचा सहयोग देणे,
हे तुम्हा मुलांचे कर्तव्य आहे. तर नेहमी शुभचिंतक बनून, शुभभावना, शभकामनाची
मानसिक सेवेद्वारे सर्वांना सुख शांती द्या. अच्छा.
वरदान:-
दृढतेद्वारे
नापीक जमीनीमध्ये पण फळ निर्माण करणारे सफलता स्वरुप भव :-
कोणत्या पण
गोष्टीमध्ये सफलता स्वरुप बनण्यासाठी दृढता आणि स्नेहाचे संगठन पाहिजे. अशी दृढता
नापीक जमीनीमध्ये पण फळ उत्पादीत करेल. जसे आजकाल सायन्सवाले रेतीमध्ये पण फळ
उत्पन्न करण्याचे प्रयत्न करतात, तसे तुम्ही शांतीच्या शक्तीद्वारे स्नेहाचे पाणी
देऊन फळीभूत बना. निराशावादीमध्ये पण आशावादीचा दीपक जगवू शकता. कारण हिम्मत
ठेवल्याने बाबांची मदत मिळत राहते.
सुविचार:-
स्वत:ला नेहमी प्रभूची
ठेव समजून चाला, तर कर्मामध्ये आत्मिकता येईल.