25-03-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, तुम्हाला मनुष्यापासून देवता बनण्यासाठी शिक्षण शिकायचे आहे आणि
शिकवावयाचे आहे, सर्वांना शांतीधाम आणि सुखधामचा रस्ता सांगावयाचा आहे ...!!
प्रश्न:-
जे सतोप्रधान
पुरुषार्थी आहेत, त्यांची निशाणी काय आहे?
उत्तर:-
ते इतरांना पण आपले सारखे बनवतील. ते अनेकांचे कल्याण करत राहतात. ज्ञान धनाने झोळी
भरुन दान करतात. 21 जन्मांसाठी वारसा घेतात आणि दुसऱ्याला पण देतात.
गीत:-
ओम नमो शिवाए...
ओम शांती।
भक्त ज्यांची महिमा करतात तुम्ही त्यांचे समोर बसले आहात, तर किती खुशी झाली पाहिजे.
त्यांना म्हणतात शिवाए नम: तुम्हाला तर नम: करावयाचे नाही. बाबाची मुले आठवण करतात,
नम: कधी म्हणत नाहीत. हे पण बाबा आहेत, त्यांचेकडून तुम्हाला वारसा मिळत आहे. तुम्ही
नम: करत नाही, आठवण करता. जीवाची आत्मा आठवण करत आहे. बाबांनी या तनाचा आधार घेतला
आहे. ते आम्हाला रस्ता दाखवत आहेत. बाबांकडून बेहदचा वारसा कसा घेतला जातो. तुम्ही
पण चांगले प्रकारे जाणत आहात. सतयुग आहे सुखधाम आणि जेथे आत्मे राहतात. त्याला
म्हटले जाते शांतीधाम, तुमच्या बुध्दीमध्ये आहे की, आम्ही शांतीधामचे वासी आहोत. या
कलियुगाला म्हटले जाते दु:खधाम. तुम्ही जाणता कि आम्ही आत्मे आता स्वर्गामध्ये
जाण्यासाठी, मनुष्यापासून देवता बनण्यासाठी शिकत आहोत. हे लक्ष्मी नारायण देवता
आहेत ना. मनुष्यापासून देवता बनायचे आहे नवीन दुनियेसाठी. बाबांकडून तुम्ही शिकत
आहात. जेवढे शिकाल, शिक्षणात कोणाचा पुरुषार्थ तीव्र असतो, कोणाचा ढिला असतो.
सतोप्रधान पुरुषार्थी जे आहेत ते दुसज्याला पण आपल्या सारखे बनविण्याचा नंबरवार
पुरुषार्थ करत आहेत, अनेकांचे कल्याण करत आहेत. जेवढी धनाने झोळी भरुन दान करतात
तेवढा फायदा होतो. मनुष्य दान करतात, त्यांचे दुसज्या जन्मात अल्पकाळासाठी सुख मिळत
आहे. त्यामध्ये थोडे सुख बाकी तर दु:खच दु:ख आहे. तुम्हाला तर 21 जन्मांसाठी
स्वर्गाचे सुख मिळत आहे. कोठे स्वर्गाचे सुख, कोठे हे दु:ख. बेहदच्या बाबांकडून
तुम्हाला स्वर्गामध्ये बेहदचे सुख मिळत आहे. ईश्वर अर्थ दान पुण्य करत आहेत ना. ते
आहे अप्रत्यक्ष: आता तुम्ही तर सन्मुख आहात ना. आता बाबा बसून समजावत आहेत,
भक्तीमार्गामध्ये ईश्वर अर्थ दान, पुण्य करत आहत तर दुसज्या जन्मांमध्ये मिळत आहे.
कोणी चांगले केले तर चांगले मिळते, वाईट पाप इ. केले तर त्याला तसे मिळत आहे. येथे
कलियुगामध्ये तर पापच होत राहते, पुण्य होतच नाही. तसे तर अल्पकाळासाठी सुख मिळत आहे.
आता तर तुम्ही भविष्य सतयुगामध्ये 21 जन्मांसाठी सदा सुखी बनत आहात. त्यांचे नावच
आहे. सुखधाम, प्रदर्शनी मध्ये पण तुम्ही लिहू शकता कि, शांतीधाम आणि सुखधामचा हा
मार्ग आहे, शांतीधाम आणि सुखधाम जाण्याचा सहज मार्ग. आता तर कलियुग आहे ना.
कलियुगातून सतयुग, पतित दुनियेतून पावन दुनियेमध्ये जाण्याचा सहज मार्ग-बिगर कौडी
खर्चा. तर मनुष्य समजतील कारण पत्थरबुध्दी आहेत ना. बाबा फारच सोपे करुन समजावत
आहेत. यांचे नांवच आहे सहज राजयोग, सहज ज्ञान.
बाबा तुम्हा मुलांना किती समजदार बनवित आहेत. हे लक्ष्मी नारायण समजदार आहेत ना. जरी
कृष्णासाठी काय काय लिहले आहे, ते आहेत खोटे कलंक. कृष्ण म्हणतात कि, मैया, मी लोणी
खाल्ले नाही----आता याचा पण अर्थ समजत नाहीत. मी लोणी खाल्ले नाही, तर मग कोणी
खाल्ले? मुलांना दूध पाजले जाते, मुले लोणी खातील कि दूध पितील. हे जे दाखवितात मटकी
फोडली इत्यादी अशी कोणती गोष्ट नाहीत. ते तर स्वर्गाचे पहिले राजकुमार आहेत. महिमा
तर एका शिवबाबाची आहे. दुनियेमध्ये आणखीन कोणाची महिमा नाही. यावेळी तर सर्व पतित
आहेत, परंतू भक्तीमार्गाची महिमा आहे, भक्त माळा पण गायली जाते ना. स्त्रीमध्ये
मीराचे नांव आहे, पुरुषामध्ये नारद मुख्य गायले जातात. तुम्ही जाणता कि, एक आहे
भक्त माळ, दुसरी आहे ज्ञानमाळ. भक्त माळेतून रुद्र माळेचे बनले आहात, नंतर रुद्रमाळे
तून विष्णूची माळा बनते. रुद्र माळा आहे संगमयुगाची, हे रहस्य तुम्हा मुलांच्या
बुध्दीमध्ये आहे. या गोष्टी बाबा तुम्हाला समोर बसून समजावत आहेत. समोर जेव्हा बसता
तर तुमचे अंगावर शहारे आले पाहिजेत. अहो सौभाग्य 100 टक्के दुर्भाग्यशाली पासून
आम्ही सौभाग्यशाली बनत आहे. कुमारी तर काम कटारीच्या खाली गेल्या नाहीत. बाबा
म्हणतात, ती आहे काम कटारी. ज्ञानाला पण कटारी म्हणत आहेत. बाबा म्हणतात, ज्ञानाचे
अस्त्र, शस्त्र, तर त्यांनी मग देवींना स्थुल अस्त्र, शस्त्र दिले आहेत. त्या तर
आहेत हिंसक वस्तू. मनुष्यांना हे माहित नाही की, स्वदर्शन चक्र काय आहे?
शास्त्रामध्ये पण कृष्णाला पण स्वदर्शन चक्र देऊन हिंसाच हिंसा दाखली आहे. खरी तर
आहे ज्ञानाची गोष्ट. तुम्ही आता स्वदर्शन चक्रधारी बनले आहात, त्यांनी मग हिंसेच्या
गोष्टी लिहल्या आहेत. तुम्हा मुलांना आता स्वत:चे अर्थात चक्राचे ज्ञान मिळाले आहे.
तुम्हाला बाबा म्हणतात कि, ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभुषण, स्वदर्शन चक्रधारी.
याचा अर्थ पण आता तुम्ही जाणत आहात. तुमच्यामध्ये साज्या 84 जन्मांचे आणि सृष्टीच्या
चक्राचे ज्ञान आहे. प्रथम सतयुगामध्ये एक सुर्यवंशी धर्म आहे मग चंद्रवंशी. दोन्हीला
मिळून स्वर्ग म्हटले जाते. या गोष्टी तुमच्या मध्ये पण नंबरवार सर्वांच्या बुध्दीत
आहेत. जसे तुम्हाला बाबांनी शिकविले आहे, तुम्ही शिकून हुशार झाले आहात. आता
तुम्हाला मग इतरांचे कल्याण करावयाचे आहे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. जो पर्यंत
ब्रह्मा मुखवंशावली बनले नाहीत तर शिवबाबांकडून वारसा कसे घेणार. आता तुम्ही बनले
आहात ब्राह्मण. वारसा शिवबाबांकडून घेत आहात. हे विसरले नाही पाहिजे. मुद्दे लिहले
पाहिजेत. ही शिडी आहे 84 जन्मांची शिडी उतरण्यासाठी तर सोपी आहे. परंतू शिडी चढतात
तर कमरेला हाथ देऊन कसे चढतात. परंतू लिफ्ट पण आहे. आता बाबा आले आहेत तुम्हाला
लिफ्ट देण्यास. सेकंदामध्ये चढती कला होते. आता तुम्हा मुलांना तर खुशी झाली पाहिजे
की आमची चढती कला आहे. अति प्रिय बाबा मिळाले आहेत. त्यांच्यासारखी प्रिय वस्तू
आणखीन कोणती नाही. साधू संत इ. जे पण आहेत ते सर्व त्या एका माशुकाची आठवण करतात,
सर्व त्यांचे आशिक आहेत. परंतू ते कोण आहेत, ते काही पण समजत नाहीत. फक्त सर्वव्यापी
म्हणतात.
तुम्ही आता जाणता कि, शिवबाबा आम्हाला यांचेद्वारे शिकवित आहेत. शिवबाबांना स्वत:चे
शरीर तर नाही. ते आहेत परम आत्मा. परम आत्मा म्हणजे परमात्मा. ज्यांचे नाव शिव आहे.
बाकी सर्व आत्म्यांचे शरीरावर वेगवेगळी नांवे पडतात. एकच परम आत्मा आहे. ज्यांचे
नांव शिव आहे. मग मनुष्यांनी अनेक नावे ठेवली आहेत. अनेकानेक मंदीरे. बनविली आहेत.
आता तुम्ही अर्थ समजत आहात. मुंबईमध्ये बबुलनाथाचे मंदीर आहे. यावेळी तुम्हाला
काट्यापासून फुल बनवत आहेत. विश्वाचे मालक बनता. तर पहिली गोष्ट मुख्य ही आहे की
आम्ही आत्म्याचा पिता एक आहे, त्यांचेकडूनच भारतवासीयांना वारसा मिळत आहे. भारतातील
हे लक्ष्मी नारायण मालक आहेत ना. चीनचे तर नाहीत ना. चीनचे असते तर चेहराचा वेगळा
असता. हे आहेतच भारतासाठी. पहिल्या प्रथम गोरे मग सावळे बनतात. आत्म्यामध्येच घाण
पडते, त्यामुळे सावळा बनते. उदाहरण, सारे आत्म्यावरच आहे. भ्रमरी किड्याला बदलून
आपल्यासारखे बनविते. सन्यासी काय बदल करतात. पांढरे कपडे घालणाज्याला भगवी कपडे
घालून, डोके टक्कल करतात. तुम्ही तर हे ज्ञान घेत आहात. अशा लक्ष्मी नारायणासारखे
शोभनिय बनता. आता तर प्रकृती पण तमोप्रधान आहे, तर ही धरतीच तमोप्रधान आहे. नुकसान
कारक आहे. आकाशात वादळ उठते, किती नुकसान होते, उपद्रव होत राहतात. आता या
दुनियेमध्ये आहे, परम दु:ख, तेथे मग आहे परमसखु. बाबा परम दु:खातून परम सुखामध्ये
घेऊन जात आहेत. याचा विनाश होत आहे, मग सर्व सतोप्रधान बनतात. आता तुम्ही पुरुषार्थ
करुन जेवढा बाबांकडून वारसा घ्यावयाचा आहे. तेवढा घ्या. नाही तर शेवटी पश्चात्ताप
करावा लागेल. बाबा आले परंतू आम्ही काही केले नाही. हे लिहले आहे, जगाला आग लागते
तेव्हा कुंभकरण निद्रेतून जागतात. नंतर हाय हाय करुन मरुन जातात. हाय हाय नंतर मग
जयजयकार होईल. कलियुगामध्ये हाय हाय आहे ना. एक दोघाला मारत राहतात. फार अनेकानेक
मरतील. कलियुगानंतर मग सतयुग जरुर होईल. दोन्हीच्या मध्ये आहे हे संगम. याला
पुरुषोत्तम युग म्हटले जाते. बाबा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनण्याची चांगली युक्ती
सांगत आहेत. फक्त म्हणतात माझी आठवण करा आणि काही पण करायचे नाही. आता तुम्हा
मुलांना डोके पण टेकायचे नाही. बाबाला कोणी हात जोडतात तर बाबा म्हणतात, ना तुम्हा
आत्म्यांना हात आहेत, ना बाबाला मग हात कोणाला जोडता? कलियुगी भक्तीमार्गातील एक पण
चिन्ह असले नाही पाहिजे. हे आत्मा, तुम्ही हात का जोडता? फक्त बाबाची आठवण करा.
आठवणीचा अर्थ काही हात जोडणे नाही. मनुष्य तर सुर्याला पण हात जोडतात, कोणत्या
महात्म्याला पण हात जोडतात. तुम्हाला हात जोडावयाचे नाहीत, हे तर मी तात्पुरते
घेतलेले शरीर आहे. परंतू कोणी हात जोडला तर मान देण्यासाठी जोडावा लागतो. तुम्हा
ाला तर हे समजावयाचे आहे कि आम्ही आत्मा आहोत, आम्हाला या बंधनातून सुटून आता परत
घरी जावयाचे आहे. यामध्ये तर तिरस्कार वाटत आहे. या जुन्या शरीराला सोडून दयायचे आहे.
जसे सापाचे उदाहरण आहे. भ्रमरी मध्ये पण किती अक्कल आहे जी किड्याला भ्रमरी बनविते.
तुम्ही मुले आहात, जे विषय सागर मध्ये गटांगळ्या खात आहात, त्यांना त्यामधून काढून
क्षीरसागरमध्ये घेऊन जातो. आता बाबा म्हणतात, चला, शांतीधाम. मनुष्य शांतीसाठी किती
माथा मारते आहेत. सन्याशांना तर स्वर्गाची जीवनमुक्ती मिळत नाही, होय. मुक्ती मिळते,
दु:खापासून सुटून शांतीधाममध्ये येते. शेवटी मग जीवनबंध मध्ये येते. आत्म सतोप्रधान
असते मग शिडी उतरत आहे. अगोदर सुख भोगून मग उतरत उतरत तमोप्रधान बनते. आता परत
सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी बाबा आले आहेत. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुम्ही
पावन बनाल.
बाबांनी समजावले आहे ज्यावेळी मनुष्य शरीर सोडतात तर त्यावेळी फार त्रास भोगतात
कारण सजा भोगावी लागते. जसे काशी कळवट खातात कारण ऐकले आहे की, शिवावर बळी गेल्याने
मुक्ती मिळते. तुम्ही आता बळी चढत आहात ना, तर भक्तीमार्गामध्ये पण त्या गोष्टी
चालतात. तर शिवावर जावून बळी चढतात. आता बाबा समजावतात कि परत तर कोणी जावू शकात
नाही. होय, एवढे बलिहार जात आहेत तर पाप नष्ट होतात मग कर्म भोगानुसार, नवीन सुरु
होतो. तुम्ही या सृष्टी चक्राला जाणले आहे. यावेळी सर्वांची उतरती कला आहे. बाबा
म्हणतात कि मी येऊन सर्वांची सद्गती करत आहे. सर्वांना घरी घेऊन जातो. पतितांना तर
बरोबर घेऊन जाणार नाही त्यामुळे आता पवित्र बना तर तुमची ज्योत जागेल. लग्नाचे वेळी
पत्नीच्या डोक्यावर मटक्यामध्ये ज्योत ठेवतात. हा रिवाज पण येथे भारतामध्येच आहे.
स्त्रीच्या डोक्यावर मडक्यामध्ये ज्योत ठेवतात, पतीच्या डोक्यावर ठेवत नाहीत, कारण
पतीला तर ईश्वर म्हणत आहेत. ईश्वरावर मग ज्योत कशी ठेवतील. तर बाबा समजावतात कि,
माझी तर ज्योत जागेलीच राहते. मी तुमची ज्योत जागवतो. बाबाला शमा पण म्हणतात.
ब्रह्मा समाजी तर ज्योतीला मानतात, नेहमी ज्योत तेवत ठेवतात. त्याचीच आठवण करतात,
त्यालाच भगवान समजतात. दुसरे मग समजतात कि छोटी ज्योत (आत्मा) मोठ्या ज्योती (परमात्मा)
मध्ये समाविष्ठ होते. अनेक मते आहेत. बाबा म्हणतात कि तुमचा धर्म तर अथाह सुख देणारा
आहे. तुम्ही स्वर्गामध्ये फार सुख पाहता. नवीन दुनियेमध्ये तुम्ही देवता बनता. तुमचे
शिक्षण आहेच भविष्य नवीन दुनियेसाठी, इतर सर्व शिक्षण या दुनियेसाठी आहे. येथे
तुम्ही शिकून भविष्यामध्ये पद प्राप्त करता. गीतेमध्ये पण बरोबर राजयोग शिकविला आहे.
मग शेवटी लढाई लागली, काही पण राहिले नाही. पांडवा बरोबर कुत्रे दाखवितात. आता बाबा
म्हणतात मी तुम्हाला देवी देवता बनवित आहे. येथे तर अनेक प्रकारचे दु:ख देणारे
मनुष्य आहेत. काम कटारी चालवून किती दु:खी बनवित आहेत. तर आता तुम्हा मुलांना ही
खुशी राहिली पाहिजे की बेहदचे बाबा ज्ञानाचे सागर आम्हाला शिकवित आहेत. अति प्रिय
माशुक आहे. आम्ही आशिक आर्धाकल्प त्यांची आठवण करत आहे. तुम्ही आठवण करत आले आहात,
आता बाबा म्हणतात मी आलो आहे, तुम्ही माझ्या मतावर चला. स्वत:ला आत्मा समजून मज
पित्याची आठवण करा. दुसरी कोणाची नाही. माझ्या आठवणी शिवाय तुमचे पाप भस्म होणार
नाही. प्रत्येक गोष्टीत सर्जनकडून मत विचारत जावा. बाबा मत देतात, अशी तोंड निभावा.
जर मतावर चाललात तर पावलो पावली पद्म मिळतील. मत घ्या, तर जबाबदारी सुटली. अच्छा,
गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक
आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. बेहदच्या
बाबांकडून बेहदच्या सुखाचा वारसा घेण्यासाठी प्रत्यक्ष ईश्वर अर्थ दान पुण्य
करावयाचे आहे. ज्ञान धनाने झोळी भरुन सर्वांना दयावयाचे आहे.
2. या पुरुषोत्तम
युगामध्ये स्वत:ला सर्व बंधनापासून मुक्त करुन जीवनमुक्त बनायचे आहे. भ्रमरी सारखे
भू-भू करुन आपल्यासारखे बनविण्याची सेवा करावयाची आहे.
वरदान:-
साधारण कर्म
करुन पण उंच स्थितीमध्ये स्थित राहणारे नेहमी डबल लाईट भव :-
जसे बाबा साधारण तन
घेतात, जसे तुम्ही बोलता तसेच बोलतात, तसेच चालतात, कर्म जरी साधारण आहे, परंतू
स्थिती उंच राहते. तसेच तुम्हा मुलांची पणा स्थिती नेहमी उंच असावी. डबल लाइट बनून
उंच स्थितीमध्ये स्थित होऊन कोणते पण साधारण कर्म करा. नेहमी हे आठवणीत ठेवा की,
अवतरीत होऊन अवतार बनून श्रेष्ठ कर्म करण्यासाठी आले आहेत. तर साधारण कर्म अलौकिक
कर्मामध्ये बदलून जाईल.
बोधवाक्य:-
आत्मिक दृष्टी,
वृत्तीचा अभ्यास करणारेच पवित्रतेला सहज धारण करु शकतात.