27-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो , बाबा तुम्हाला दैवी धर्म आणि श्रेष्ठ कर्म शिकवतात म्हणून तुमच्याकडून कोणतेही आसुरी कर्म व्हायला नको . बुध्दी खुप शुध्द पाहिजे ...

प्रश्न:-
देह अभिमान आल्यानंतर पहिले पाप कोणते होते?

उत्तर:-
जर देह-अभिमान असेल तर बाबांच्या बदल्यात देहधारीची आठवण येईल, कुदृष्टी जात राहिल, खराब विचार येतील. हे खुप मोठे पाप आहे. समजायला हवे, माया वार करत आहे. लगेच सावधान झाले पाहिजे.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावतात आहेत. आत्मिक पिता कुठून आले आहेत? आत्म्यांच्या दुनियेमधून ज्याला निर्वाणधाम किंवा शांतीधाम असेही म्हणतात, ही तर गीतेची गोष्ट आहे. तुम्हाला विचारतात-हे ज्ञान कुठून आले? सांगा, हे तर तेच गीतेचे ज्ञान आहे. गीतेचा भाग चालू आहे आणि बाबा शिकवतात. भगवानुवाच आहे ना, भगवान तर एकच आहे. तो आहे शांतीचा सागर. राहतात ही शांतीधाम मध्ये, जिथे आम्हीही राहतो. बाबा समजावतात ही आहे पतित दुनिया, पाप आत्म्यांची तमोप्रधान दुनिया. तुम्ही ही जाणता बरोबर आम्ही आत्मे यावेळेस तमोप्रधान आहोत. 84 चे चक्र पुर्ण करुन सतोप्रधान पासून आता तमोप्रधान बनलो आहोत. ही जुनी दुनिया किंवा कलियुगी दुनिया आहे ना. हे नावं सर्व यावेळेसची आहेत. जुन्या दुनियेनंतर पुन्हा नविन दुनिया होते. भारतवासी हे ही जाणतात कि महाभारत लढाई तेव्हा लागली होती, जेव्हा दुनिया बदलणार होती. तेव्हाच बाबांनी येऊन राजयोग शिकवला होता. फक्त चुक कोणती झाली आहे? एक तर कल्पाचे आयुष्य विसरले आहेत. आणि गीतेच्या भगवानालाही विसरले आहेत. कृष्णाला तर गॉड फादर म्हणू शकत नाही. आत्मा म्हणते गॉड फादर, तर तो निराकार झाला. निराकार बाप आत्म्यांना म्हणतात कि, माझी आठवण करा. मीच पतित पावन आहे, मला बोलावतात, हे पतित पावन कृष्ण तर देहधारी आहे ना. मला तर कोणते शरीर नाही. मी निराकार आहे, मनुष्यांचा बाप नाही, आत्म्यांचा बाप आहे. हे तर पक्के झाले पाहिजे. नेहमीच आम्ही या पित्यांकडून वारसा घेत असतो. आता 84 जन्म पुर्ण झाले आहेत, बाबा आले आहेत. बाबा बाबा करत राहायचे आहे. बाबांची खुप आठवण करायची आहे. संपुर्ण कल्पभर शारीरिक पित्याची आठवण करत आलो. आता बाबा आले आहेत आणि मनुष्य सृष्टीतील सर्व आत्म्यांना परत घेऊन जात आहेत कारण रावण राज्यामध्ये मनुष्यांची दुर्गती झालेली आहे म्हणून आता बाबांची आठवण करायची आहे. हे ही मनुष्याला कळत नाही की आता रावणराज्य आहे. रावणाचा अर्थच समजत नाही. बस एक रुढी पडलेली आहे. दसरा साजरा करण्याचा तुम्हाला ही अर्थ समजत नव्हता. आता समज मिळाली आहे, इतरांना समजावण्यासाठी, जर इतरांना समजावू शकत नसेल तर याचा अर्थ स्वत:ला काही समजलेलं नाही. बाबांमध्ये सृष्टी चक्राचे ज्ञान आहे. आम्ही त्याची मुले आहोत तर मुलांमध्येही हे ज्ञान असायला हवे. तुमची ही आहे गीता पाठशाळा, उद्देश काय आहे? लक्ष्मी-नारायण बनणे. हा राजयोग आहे ना. नरापासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनण्याचे हे ज्ञान आहे. ते लोक बसून कथा ऐकवतात. येथे तर आम्ही शिकतो. आम्हाला बाबा राजयोग कल्पाच्या संगमयुगावर शिकवतात. बाबा म्हणतात मी जुन्या दुनियेला बदलून नवी दुनिया बनवण्यासाठी आलो आहे. नव्या दुनियेमध्ये यांचे राज्य होते. जुन्या मध्ये नाही. नंतर जरुर व्हायला पाहिजे. चक्र तर जाणता. मुख्य धर्म चार आहेत. आता देवता धर्म नाही. दैवी धर्म भ्रष्ट आणि दैवी कर्म भ्रष्ट बनले आहेत. आता नंतर तुम्हाला दैवी धर्म श्रेष्ठ आणि कर्म श्रेष्ठ शिकवत आहोत. तर स्वत:कडे लक्ष्य ठेवले पाहिजे, माझ्याकडून कोणते आसुरी कर्म तर होत नाही? मायेमुळे बुध्दीमध्ये कोणते खराब विचार तर येत नाहीत? कुदृष्टी तर नाही राहात? पहा, यांची कुदृष्टी जात आहे किंवा खराब विचार येत आहेत तर त्याला लगेच सावध करायला हवे. त्यांना भेटू देखील नये. त्यांना सावध केले पाहिजे तुमच्यामध्ये मायेची प्रवेशता झाल्यामुळे असे खराब विचार येतात. योगामध्ये बसल्यानंतर बाबांच्या आठवणीच्या बदल्यात कोणाच्या शरीराकडे विचार जात असेल तर समजायला हवे हा मायेचा वार होऊ लागला आहे, मी पाप करत आहे. येथे तर बुध्दी खुप शुध्द असायला हवी. हसी-मजाक मध्ये ही खुप नुकसान होते म्हणून तुमच्या मुखामधून सदैव शुध्द वचन निघायला हवे. कुवचन नाही. हसी-मजाक पण नको. असे नाही की मी तर हसले... ते ही नुकसानकारक होते. हसणे सुध्दा असे नको ज्यामध्ये विकारांची हवा असेल. खुप खबरदार राहायला हवे. तुम्हाला माहित आहे नागे लोक असतात त्यांचे विचार विकारी नसतात. वेगळे राहतात. पण कर्मइंद्रियांची चंचलता योगाशिवाय निघू शकत नाही. काम असा शत्रु आहे जो कोणालाही पाहत राहतो, पुर्ण योगी नसतील तर चंचलता जरुर होईल. स्वत:ची परिक्षा घ्यायला हवी. बाबांची आठवण केली तर कोणताही आजार राहणार नाही. योगामध्ये राहिल्याने असे होत नाही. सतयुगामध्ये तर कोणत्याही प्रकारची घाण नसते. तिथे रावण नाही जो चंचलता होईल. तिथे तर योगी जीवन असते. येथेही अवस्थ खुप पक्की असली पाहिजे. योगबळानी हे सर्व आजार निघून जातील. यामध्ये खुप मेहनत आहे. राज्य घेणे काही मावशीचे घर नाही. पुरुषार्थ तर करायला पाहिजे ना. असे नाही बस जे असेल भाग्यात ते मिळेल. धारणा करत नसतील तर पाई-पैशाचे (खुप कमी) पद प्राप्त करण्यायोग्य आहेत. विषय तर खुप असतात ना. कुणी चित्रकलेत, कुणी खेळामध्ये मार्क घेतात. ते आहेत साधारण विषय, तसेच येथेही विषय आहेत, काही ना काही मिळेल. बाकी बादशाही नाही मिळू शकत. ते तर सर्विस (सेवा) कराल तर बादशाही (राजाई) मिळेल. त्यासाठी खुप मेहनत करायला हवी. अनेकांच्या बुध्दीमध्ये बसत नाही. जसे की जेवण पचतच नाही. उच्च पद मिळवण्याची हिम्मत नाही. यालाही आजार म्हणणार ना. तुम्ही कोणतीही गोष्ट पाहून ही पाहू नका. आत्मिक पित्याची आठवण करुन इतरांना रास्ता दाखवायचा आहे. अंधाची काठी बनायचे आहे. तुम्हाला तर रस्ता माहित आहे. रचयिता आणि रचनेचे ज्ञान मुक्ती आणि जीवनमुक्ती तुमच्या बुध्दीमध्ये फिरत असते. जे-जे महारथी आहेत. मुलांच्या अवस्थेमध्ये रात्रं-दिवसाचा फर्क असतो. कुठे खुप धनवान बनतात, कुठे बिल्कुल गरीब. राजाई पदामध्ये फर आहे ना. बाकी ऐवढे आहे, तिथे रावण नसल्यामुळे दु:ख नसते. बाकी संपत्ती मध्ये फरक आहे. संपत्तीमुळे सुख असते.

जेवढे योगात राहाल तेवढे आरोग्य चांगले राहिल. मेहनत करायची आहे. काहींचे तर वागणे असे असते जसे अज्ञानी मनुष्यांचे असते. ते कोणाचे कल्याण करु शकत नाहीत. जेव्हा परीक्षा होते तेव्हा माहित पडते की कोण किती मार्कांनी पास होणार आहे. मग त्या वेळेस पश्चात्ताप करावा लागेल. बापदादा दोघेही किती समजवत राहतात. बाबा आले आहेत कल्याण करण्यासाठी, आपले ही कल्याण करायचे आहे. तर दुसऱ्यांचे ही कल्याण करायचे आहे. बाबांना बोलवले आहे की येऊन आम्हां पतितांना पावन बनण्याचा रास्ता सांगा. तर बाबा श्रीमत देतात-तुम्ही स्वत:ला आत्मा समजून देह-अभिमान सोडून माझी आठवण करा. किती सोपे औषध आहे. बोला, आम्ही फक्त एका ईश्वरालाच मानतो. ते सांगतात की, मला बोलवतात येऊन पतितांना पावन बनवा तर मला यावे लागते. ब्रह्मा कडून तुम्हाला काही मिळणार नाही. वारसा शिवबाबांकडून भेटतो. यांच्याद्वारे देणारा एक आहे. त्यांचीच महिमा आहे. तोच सर्वांचा सद्गती दाता आहे. हे तर पुज्य पासून नंतर पुजारी बनतात. सतयुगात होते, नंतर 84 जन्म भोगून आता पतित बनले आहेत. पुन्हा पुज्य, पावन बनत आहेत. आम्ही बाबांच्याद्वारे ऐकत आहोत. कोणत्या मनुष्याकडून ऐकत नाही. मनुष्यांचा आहे भक्तीमार्ग, हा आहे आत्मिक ज्ञानमार्ग. ज्ञान फक्त एका ज्ञान सागराकडे आहे, बाकी हे ग्रंथ इ. सर्व भक्तीचे आहेत. ग्रंथ इ. वाचणे-हा सर्व भक्तीमार्ग आहे. ज्ञानसागर तर एकच बाप आहे, आम्ही ज्ञान नद्या ज्ञानसागर मधून निघालो आहे. बाकी तो आहे पाण्याचा सागर आणि नद्या. मुलांच्या या गोष्टी लक्षात राहायला हव्या. अंतर्मुख होऊन बुध्दी चालली पाहिजे. स्वत:ला सुधारण्यासाठी अंतर्मुख होऊन स्वत:ची तपासणी करा. जर मुखानी कोणतेही कुवचन निघाले किंवा कुदृष्टी गेली तर स्वत:ला शिक्षा दयायला पाहिजे-माझ्या मुखातून कुवचन का निघाले, माझी कुदृष्टी का गेली? स्वत:च्या गालावर चापट मारली पाहिजे, पावलो-पाऊली सावध करायला पाहिजे तेव्हाच उंच पद प्राप्त करु शकता. तोंडातून वाईट शब्द निघायला नको. बाबांना तर सर्व प्रकारांनी शिकवावे लागते. कुणाला वेडा म्हणणे हे सुध्दा कुवचन (अपशब्द) आहे.

मनुष्य तर ज्याला जे येते ते म्हणत राहतात. जाणत नाहीत की आम्ही कोणाची महिमा गात आहोत. महिमा तर करायला हवी एक पतित पावन बाबांची. दुसरे तर कुणी नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकरालाही पतित-पावन नाही म्हटले जात. हे तर कोणाला पावन बनवत नाहीत. पतितांना पावन बनवणारा एकच बाप आहे. पावन सृष्टी आहे नवी दुनिया ती तर आता नाही. शुध्दता आहे स्वर्गामध्ये. पवित्रतेचा सागरही आहे. हे तर आहे रावणराज्य. मुलांना आता आत्म-अभिमानी बनण्याची खुप मेहनत करायची आहे. मुखातून कोणतीही वाईट गोष्ट कुवचन निघायला नको. खुप प्रेमानी चालले पाहिजे, कुदृष्टी पण खुप नुकसान करते. खुप मेहनत पाहिजे. आत्म-अभिमान आहे अविनाशी अभिमान. देह तर विनाशी आहे. आत्म्याला कुणी ही जाणत नाही. आत्म्याचा बाप जरुर कुणी असेल ना. असे म्हणतात सर्व भाऊ-भाऊ आहेत. मग सर्वांमध्ये परमात्मा बाप, विराजमान कसा होऊ शकतो? सर्व बाप कसे होऊ शकतात? एवढी ही अक्कल नाही! सर्वांचा पिता तर एकच आहे. त्यांच्या कडूनच वारसा मिळतो. त्यांचे नाव शिव आहे. शिवरात्री साजरी करतात. रुद्र रात्री किंवा कृष्ण रात्री असे म्हणत नाहीत. मनुष्य तर काहीच समजत नाहीत, म्हणतात ही सर्व त्यांचीच रुपे आहेत, त्यांचीच लीला आहे.

तुम्ही आता समजता बेहदच्या पित्याकडून बेहदचा वारसा मिळत आहे. तर त्या पित्याच्या श्रीमतावर चालले पाहिजे. बाबा म्हणतात माझी आठवण करा. कामगारांना ही हे शिक्षण दयायला हवे, त्यांचे ही काही कल्याण होईल. पण स्वत: आठवण करत नसतील तर इतरांना काय आठवण करुन देणार. रावण एकदम पतित बनवतो. नंतर बाबा येऊन परिस्थिती बनवतात. आश्चर्य आहे ना. कोणाच्याही बुध्दीमध्ये या गोष्टी नाहीत. हे लक्ष्मी-नारायण किती उंच परिस्थितीपासून नंतर किती पतित बनतात. म्हणून ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र गायलेली आहे. शिवाच्या मंदीरात तुम्ही खुप सेवा करु शकता. बाबा म्हणतात तुम्ही माझी आठवण करा. दारो-दारी भटकणे सोडून दया. हे ज्ञान शांतीचे आहे. बाबांच्या आठवणीने तुम्ही सतोप्रधान बनाल. बस हाच मंत्र देत राहा. कोणाकडून पैसे घेऊ नका. जोपर्यंत पक्का होत नाही. बोला प्रतिज्ञा करा की आम्ही पवित्र राहू, तेव्हाच आम्ही तुमच्या हातांनी बनवलेलं खाऊ शकतो. काहीही घेऊ शकतो. भारतामध्ये मंदीर तर खुप आहेत विदेशी इ. जे पण येतील त्यांना हा संदेश तुम्ही देवू शकता, की बाबांची आठवण करा. अच्छा, गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
मान न मागता सर्वांना मान देणारे , सदा निष्काम योगी भव :-
 

तुम्हाला कुणी मान दिला, मानले किंवा नाही मानले पण तुम्ही त्याला गोड भाऊ, गोड बहिण मानून सदैव स्वमानात राहून, स्नेही दृष्टीने, स्नेहाच्या वृत्तीने आत्मिक मान देत चला. त्यांनी मान दिला तर मी मान देणार-हे पण रॉयल भिकारी पण आहे. यामध्ये निष्काम योगी बना. आत्मिक स्नेहाच्या वर्षावांनी शत्रुलाही दोस्त बनवा. तुम्हाला कुणी दगड फेकून मारले तरीही तुम्ही त्याला रत्न दया कारण तुम्ही रत्नगार पित्याची मुले आहात.

बोधवाक्य:-
विश्वाची नवनिर्मिती करण्यासाठी दोन शब्द लक्षात ठेवा - निमित्त आणि निर्माण .