24-03-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, आत्मिक सेवा करुन स्वत:चे आणि दुसज्याचे कल्याण करा, बाबाशी खरे मन ठेवा
तर बाबाच्या ह्दयामध्ये बसाल...!!
प्रश्न:-
आत्म् अभिमानी
बनण्याची कष्ट कोण करु शकते? आत्म अभिमानीची लक्षणे सांगा?
उत्तर:-
जेवढे शिक्षण आणि बाबाशी अटूट प्रेम असेल, ते आत्म अभिमानी बनण्याची मेहनत करु
शकतात. ते शीतल असतात, कोणाशी पण जास्त बोलत नाहीत, त्यांचे बाबांवर प्रेम असते,
वागणे फार उत्तम असते, त्यांना नशा असतो की, आम्हाला भगवान शिकवत आहेत, आम्ही
त्यांची मुले आहोत. ते सुखदाई असतात. प्रत्येक पाऊल श्रीमतावर ठेवून चालतील.
ओम शांती।
मुलांनी सेवा समाचार पण ऐकला पाहिजे, नंतर मुख्य मुख्य जे महारथी सेवा करणारे आहेत,
त्यांनी विचार मांडले पाहिजेत. बाबा जाणतात की सेवा करणाऱ्या मुलांचाच विचार सागर
मंथन चालतो. मेळा वा प्रदर्शनीचे उद्घाटन कोणाकडून करावे. कोण कोणते मुद्दे सांगितले
पाहिजेत. शंकराचार्य इ. तुमच्या या गोष्टी समजले तर म्हणतील यांचे ज्ञान तर फार उंच
आहे, यांना शिकविणारा कोणी श्रेष्ठ आहे. भगवान शिकवत आहे, ते तर मानणार नाहीत. मग
प्रदर्शनी इ. चे उद्घाटन करण्यासाठी जे येतात, त्यांना काय काय समजावले, तो समाचार
सर्वांना सांगितला पाहिजे किंवा टेप मध्ये थोडक्यात भरला पाहिजे. जसे गंगेनी
शंकराचार्याला समजावले, अशी सेवा करणारी मुले तर बाबांच्या ह्दयात बसतात. तशी तर
स्थुल सेवा पण आहे, परंतू बाबाचे लक्ष आत्मिक सेवेवर जाते, जे अनेकांचे कल्याण
करतात. कल्याण तर प्रत्येक गोष्टीत आहे. ब्रह्मा भोजन बनविण्यामध्ये पण कल्याण आहे,
जर योगयुक्त होऊन बनविले तर. असे योगयुक्त भोजन बनविणारा असावा, त्यामुळे
भंडाज्यामध्ये फार शांती राहिल. आठवणीच्या यात्रेत राहिल. कोणी पण येइल तर पटकन
त्यांना समजावेल. बाबा समजतात कि सेवा करणारी मुले कोण आहेत, जे दुसऱ्यांना समजावू
शकतात, बहुत करुन त्यांनाच सेवेसाठी बोलावतात पण. तर सेवा करणारेच बाबांच्या
ह्दयामध्ये बसतात. बाबांचे सारे लक्ष सेवा करणाज्या मुलांकडेच जाते. काही तर समोर
मुरली ऐकून पण काही समजत नाहीत. धारणा होत नाही, कारण अर्धाकल्पाचा देह अभिमानाचा
रोग फार मोठा आहे. त्याला नष्ट करणारे फार थोडे आहेत, जे चांगल्या रितीने पुरुषार्थ
करत आहेत. अनेकांकडून आत्मअभिमानी बनण्याची मेहनत पोहचतच नाही. बाबा समजावतात कि,
मुलांनो आत्म अभिमानी बनणे ची मेहनत करा. कोणी चार्ट पण पाठवितात. परंतू पुर्ण नाही.
तरी पण थोडे तरी लक्ष राहते. आत्म अभिमानी बनण्याचे लक्ष अनेकाचे कमी राहते.
आत्मअभिमानी फार शीतल असतात. ते एवढी जास्त बातचीत करत नाहीत. त्यांचे बाबांशी एवढे
प्रेम असते कि विचारुच नका. आत्म्याला एवढी खुशी झाली पाहिजे जी कधी कोणत्या
मनुष्याला होणार नाही. या लक्ष्मी नारायणाला तर ज्ञान नसते. ज्ञान तुम्हा मुलांनाच
आहे, ज्यांना भगवान शिकवित आहेत. भगवान आम्हाला शिकवित आहेत, हा नशा पण तुमच्यामध्ये
पण कोणी एक दोघांलाच राहत आहे. तो नशा असेल तर बाबांच्या आठवणीत राहतील, ज्यांना
आत्म अभिमानी म्हटले जाते. परंतू तो नशा राहत नाही. आठवणीमध्ये राहणाराची चलन फार
चांगली उत्तम असते. आम्ही भगवानाची मुले आहोत. त्यामुळे गायले पण जाते की,
अतीइंद्रिय सुख गोप गोपींना विचारा, जे आत्म अभिमानी बनून बाबाची आठवण करतात. आठवण
करत नाहीत ते त्यामुळे शिवबाबांचे ह्दयात बसत नाहीत. शिवबाबाचे ह्दयात नाहीत तर
ब्रह्मा बाबाचे पण ह्दयात बसत नाहीत. त्यांचे ह्दयात असतील तर यांचे पण ह्दयात
असतील. बाबा प्रत्येकाला ओळखत आहेत. मुले स्वत: पण जाणतात कि आम्ही काय सेवा करतो.
सेवेचा छंद मुलांमध्ये फार असला पाहिजे. कोणाला सेंटर वाढविण्याचा पण छंद राहतो.
कोणाला चित्र बनविण्याचा छंद राहतो. बाबा पण म्हणतात की, मला ज्ञानी तू आत्मा मुले
प्रिय वाटतात, जे बाबांच्या आठवणीत राहतात आणि सेवेसाठी पण भागदौड करतात. कोणी तर
बिल्कुलच काही सेवा करत नाहीत, बाबांचे पण ऐकत नाहीत. बाबा तर जाणतात ना की, कोणाला
कोठे सेवा करावयाची आहे. परंतू देह अभिमानामुळे, स्वत:चे मतावर चालतात, ते मग
ह्दयामध्ये बसत नाहीत. अज्ञान काळामध्ये पण कोणी मुलगा वाईट वागणारा असेल तर तो
पित्याच्या ह्दयात बसत नाही. त्याला कपूत म्हटले जाते. संगदोषाने खराब होऊन जातात.
येथे पण जे सेवा करतात तेच बाबाला प्रिय वाटतात. जे सेवा करत नाहीत त्यांना बाबा
थोडेच प्रेम करतील. समजतात कि, नशीबानुसारच शिकतील, तरी पण प्रेम कोणावर राहिल? तो
तर कायदा आहे ना. चांगल्या मुलाला फार प्रेमाने बोलावतात. म्हणतात कि तुम्ही फार
सुखदाई आहात, तुम्ही पिता स्नेही आहात. जे बाबाची आठवणच करत नाहीत, त्यांना पिता
स्नेही थोडेच म्हणतात, दादा (ब्रह्माबाबा) स्नेही बनायचे नाही, शिवबाबा स्नेही
बनायचे आहे. जे बाबाचे स्नेही आहेत त्यांचे बोलणे चालणे फार गोड चांगले असते.
बुध्दीला असे वाटते की, जरी वेळ आहे परंतू शरीराचा काही भरवसा थोडाच आहे. बसल्या
बसल्या अपघात होतो. कोणाला ह्दयघात होतो. कोणाला रोग होतो, मृत्यू तर अचानक होत आहे
ना, त्यामुळे श्वासा तर भरवसा नाही. नैसर्गिक संकटाची पण आता सवय झाली आहे. अवकाळी
पाऊस पडल्याने पण नुकसान होत आहे. ही दुनियाच दु:ख देणारी आहे. बाबा पण अशावेळी
येतात, ज्यावेळी महान दु:ख आहे, रक्ताच्या नद्या वाहतील. प्रत्यन केले पाहिजे आम्ही
आपला पुरुषार्थ करुन 21 जन्माचे कल्याण तर करावे. अनेकांचे तर आपले कल्याण करण्याची,
चिंताच दिसून येत नाही.
बाबा बसून मुरली सांगत आहेत तरी पण बुध्दी सेवा करणाज्या मुलांकडे राहते. आता
शंकराचार्यानी प्रदर्शनी मध्ये बोलावले आहे, नाही तर हे लोक असे कोठे जात नाहीत.
फार घमंड मध्ये राहतात, तर त्यांना मान पण दिला पाहिजे. वर सिंहासनावर बसविले पाहिजे.
असे नाही, आपले बरोबर बसवावे नाही, त्यांना मान फार पाहिजे. निर्माण बनतील तर मग
चांदी इ. चे सिंहासन पण सोडतील. बाबा पहा कसे साधारण राहत आहेत. कोणी पण ओळखत नाहीत.
तुम्हा मुलांमध्ये पण कोणी विरळेच जाणतात. किती निरहंकारी बाबा आहेत. येथे तर पिता
आणि मुलांची संबंध आहे ना. जसे लौकिक पिता, मुलांबरोबर राहतात, खातात, खाऊ घालतात,
हे आहेत बेहदचे पिता. सन्यासी इ. ना बाबाचे प्रेम मिळत नाही. तुम्ही मुले जाणता कि,
कल्प कल्प आम्हाला बेहदच्या बाबाचे प्रेम मिळत आहे. बाबा फुलासारखे बनविण्याची फार
मेहनत घेत आहेत. परंतू नाटकानुसार सर्व तर फुल बनत नाहीत. आज फार चांगले चांगले,
उद्या विकारी बनतात. बाबा म्हणतात नशीबात नाही, तर आणखीन काय करतील. अनेकांचे वागणे
वाईट होते. आज्ञेचे उल्लंघन करतात. ईश्वराचे मतावरच चालत नाहीत तर त्यांची काय
अवस्था होईल. उंच ते उंच बाबा आहेत, आणखीन तर कोणी नाही. नंतर देवतांच्या
चित्रामध्ये पाहिले तर हे लक्ष्मी नारायणाचे उंच ते उंच आहेत. परंतू मनुष्य हे पण
जाणत नाहीत की यांना, असे कोणी बनविले. बाबा तुम्हा मुलांना रचता आणि रचनेचे ज्ञान
चांगले रितीने बसून समजावत आहेत. तुम्हाला तर आपले शांतीधाम, सुखधामचे आठवणीत येते.
सेवा करणाज्याचे नांव, आठवणीत येते. जरुर जे बाबाचे आज्ञाकारी मुले आहेत,
त्यांचेकडेच मन जाते. बेहदचे बाबा एकदाच येतात. ते लौकिक पिता तर जन्मोजन्मी मिळतात.
सतयुगामध्ये पण मिळतात. परंतू तेथे हे बाबा मिळत नाहीत. आताच्या शिक्षणाद्वारे
तुम्ही हे पद प्राप्त करता. हे पण तुम्ही मुलेच जाणतात कि बाबाकडून आम्ही नविन
दुनियेसाठी शिकत आहोत. हे बुध्दीमध्ये आठवणीत राहिले पाहिजे. आहे फार सोपे. समजा
बाबा खेळत आहेत, अचानक तेथे कोण आले तर बाबा पटकन तेथेच त्यांना ज्ञान देण्यास
सुरुवात करतात. बेहदच्या पित्याला ओळखता का? बाबा आले आहेतच जुन्या दुनियेला नवीन
बनविण्यासाठी. राजयोग शिकवत आहेत. भारतवासीनाच शिकवित आहेत. भारतच स्वर्ग होता. जिथे
या देवी देवतांचे राज्य होते. आता तर नर्क आहे. नरकापासून नंतर स्वर्ग बाबाच
बनवितात. अशा मुख्य गोष्टी आठवणीत ठेवून कोणी पण आले तर त्यांना बसून समजावा. तर
किती खुश होतील. फक्त सांगा, बाबा आले आहेत. ही तीच महाभारतातील युध्द आहे जे
गीतेमध्ये सांगितले आहे. गीतेचे भगवान आले होते, गीता सांगितली होती. कशासाठी?
मनुष्याला देवता बनविण्यासाठी. बाबा फक्त सांगतात कि, माझी आणि वरशाची आठवण करा. हे
दु:खधाम आहे. एवढे बुध्दीमध्ये आठवणीत राहिले तरी पण खुशी होईल. आम्ही आत्मे बाबा
बरोबर जाणार आहोत शांतीधाम. मग तेथून अभिनय करण्यासाठी येऊ पाहिल्या प्रथम
सुखधाममध्ये. जसे कॉलेजमध्ये शिकतात तर समजतात कि आम्ही हे शिकतो नंतर हे बनू.
बॅरिस्टर बनू किंवा पोलीस अधिक्षक बनू. एवढे पैसे कमवू. खुशीचा पारा चढत राहितो.
तुम्हा मुलांना पण ती खुशी राहिली पाहिजे. आम्ही बेहदच्या बाबांकडून हा वारसा घेत
आहात, नंतर आम्ही स्वर्गामध्ये आपले महल बनवू. सारा दिवस बुध्दीमध्ये असे चिंतन
राहिले तर खुशी पण होईल. स्वत:चे आणि दुसज्याचे पण कल्याण करतील. ज्या मुलांजवळ
ज्ञान धन आहे. त्यांचे कर्तव्य आहे दान करणे. जर धन आहे, दान करत नाहीत तर त्यांना
कंजुष म्हटले जाते. त्यांचेजवळ धन असून पण जसे की नाहीच. धन आहे तर दान जरुर करा.
चांगली चांगली महारथी मुले जी आहेत ती नेहमी बाबाच्या ह्दयामध्ये बसतात. कोणा
कोणासाठी विचार येतो की, कदाचित हे टिकणार नाहीत. परिस्थिती तशी आहे. देहाचा अहंकार
फार चढलेला असतो. कोणत्या पण वेळी हात सोडून देतील आणि जावून आपले घरामध्ये राहतील.
जरी मुरली फार चांगली वाचतात परंतू देहअभिमान फार आहे, थोड जरी बाबा सावधानी देतात
तर झटक्यात सोडून जातात. नाही तर गायन आहे, प्रेम करा, नाही तर ठोकर मारा----येथे
बाबांनी खरी गोष्ट सांगितली तरी पण रागात येतात, अशी मुले पण आहेत, कोणी तर आतून
फार आभार मानतात, कोणी तर आतले आत जळून मरतात. मायेचा देहअभिमान फार आहे. काही असे
पण आहेत जे मुरली ऐकतच नाहीत, आणि काही तर मुरली शिवाय राहू शकत नाहीत. मुरली वाचत
नाहीत तर आपलाच हठ करतात, आमचे मध्ये ज्ञान तर फार आहे.
तर येथे शंकराचार्य इ. प्रदर्शनी मध्ये येतात, सेवा चांगली होती तर त्याचा समाचार
सर्वांना पाठविला पाहिजे तर सर्वांना माहित पडेल की, कशी सेवा झाली, तर ते पण
शिकतील. अशा सेवेसाठी ज्यांचे विचार चालतात त्यांनाच बाबा सेवा करणारे समजतात.
सेवेमध्ये कधी थकले नाही पाहिजे. येथे तर अनेकांचे कल्याण करावयाचे आहे ना. बाबांना
तर हिच ओढ राहते की, सर्वांना हे ज्ञान मिळावे. मुलांची पण प्रगती व्हावी. रोज
मुरलीमध्ये समजावत आहेत, ही आत्मिक सेवा आहे मुख्य. ऐकणे आणि सांगावयाचे आहे. छंद
असला पाहिजे. बैज घेऊन रोज मंदीरामध्ये जावून सांगा, हे लक्ष्मी नारायण कसे बनले?
नंतर कोठे गेले, कसे राज्य भाग्य प्राप्त केले? मंदीराचे दरवाजात जावून बसा. कोणी
पण आले तर विचारा, हे लक्ष्मी नारायण कोण आहेत? यांचे राज्य भारतामध्ये कधी होते?
हनुमान पण चप्पल चे ठिकाणी जावून बसत होता ना. त्यांचे पण रहस्य आहे. दया येते.
सेवेच्या युक्त्या बाबा फार सांगत आहेत, परंतू अमलात कोणी फार मुश्कीलीने आणत आहेत,
सेवा फार आहे. आंधळ्याची काठी बनायचे आहे. जे सेवा करत नाहीत, बुध्दी स्वच्छ नाही.
तर मग धारणा होत नाही. नाही तर सेवा फार सोपी आहे. तुम्ही या ज्ञानरत्नाचे दान करत
राहा. कोणी साहुकार आले तर सांगा, आम्ही तुम्हाला ही भेट देत आहोत. याचा अर्थ पण
तुम्हाला समजावत आहे. या बैज ची बाबाला फार किंमत आहे. आणखी कोणाला एवढी किंमत नाही.
यामध्ये फार चांगले ज्ञान भरलेले आहे. परंतू कोणाच्या नशीबात नसेल तर बाबा पण काय
करु शकतील. बाबाला आणि शिक्षणाला सोडणे, हा तर फार मोठा अपघात आहे. बाबाचे बनून आणि
मग सोडून देणे, या सारखे महान पाप कोणते असत नाही. या सारख दुर्भागी कोणी असत नाही.
मुलांनी श्रीमतावर चालले पाहिजे ना. तुमच्या बुध्दीमध्ये आहे आम्ही विश्वाचे मालक
बनणार आहे, ही कमी गोष्ट थोडीच आहे. आठवण कराल तर खुशी पण होईल. आठवण न केल्याने
पाप भस्म होणार नाहीत. दत्तक बनले आहात तर खुशीचा पारा चढला पाहिजे. परंतू माया फार
विघ्न घालते. कच्या ना खाली पाडते. जे बाबांची श्रीमततच घेत नाहीत ते काय पद
प्राप्त करतील. थोडी मत घेतली तर मग तेवढेच हलके पद प्राप्त करतील. चांगल्या रितीने
मत घेतली तर उंच पद प्राप्त करतील. ही बेहदची राजधानी स्थापन होत आहे. यामध्ये खर्च
इ. ची कोणती गोष्टच नाही. कुमारी येतात, शिकून अनेकांना आपल्यासारखे बनवितात,
यामध्ये फी इ. ची गोष्टच नाही. बाबा म्हणतात तुम्हाला स्वर्गाची बादशाही देत आहे.
मी स्वर्गामध्ये येत नाही. शिवबाबा तर दाता आहेत ना. त्यांना खर्ची काय देणार. यांनी
सर्व काही त्यांना दिले, वारस बनविला. त्या बदल्यात पहा राजाई मिळत आहे ना. हे पहिले
उदाहरण आहे. साऱ्या विश्वावर स्वर्गाची स्थापना होत आहे. खर्च एक पैसा पण नाही.
अच्छा,
गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक
आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. पिता स्नेही
बनण्यासाठी फार फार सुखदाई बनायचे आहे. आपले बोलणे चालणे फार गोड उत्तम ठेवायचे आहे.
सेवा करणारे बनायचे आहे. निरहंकारी बनून सेवा करावयाची आहे.
2. शिक्षण आणि बाबाला
सोडून कधी आपघाती, महापापी बनायचे नाही. मुख्य आहे आत्मिक सेवा, या सेवेमध्ये कधी
थकायचे नाही. ज्ञान रत्नाचे दान करावयाचे आहे. कंजूष बनायचे नाही.
वरदान:-
मी आणि माझे
पण यांचा बळी देऊन संपूर्ण महाबळी भव :-
हदमध्ये कोणती पण
व्यक्ती आणि वैभवामध्ये लगाव, हेच माझे पण आहे. या माझे पणाला आणि मी करतो, मी केले,
या मी पणाला संपूर्ण, समर्पण करणारे म्हणजे बळी देणारेच महाबळी आहेत. जेव्हा हदचा
मी मी पणा सर्मपण कराल तेव्हा संपूर्ण बापसमान बनाल. मी करत आहे, नाही. बाबा करत
आहेत, बाबा चालत आहेत. कोणत्या पण गोष्टीत मी शिवाय नेहमी नैसर्गिक बोलण्यात पण बाबा
शब्दच यावा, मी शब्द नाही.
बोधवाक्य:-
संकल्पामध्ये
अशी दृढता धारण करा ज्यामध्ये विचार आणि करणे समान असेल.