22-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो , बाबाचे कर्तव्य बरोबर आहे , ते योग्य वेळी येतात. थोडा पण फरक पडत नाही.
त्यांचे येण्याची आठवण म्हणून शिवरात्री मोठ्या धुम धडाक्यात साजरी करा....!!!
प्रश्न:-
कोणत्या
मुलांचे विकर्म पूर्णपणे विनाश होऊ शकत नाहीत?
उत्तर:-
ज्यांचा योग बरोबर नाही, बाबांची आठवण राहत नाही, तर विकर्म विनाश होत नाहीत.
योगमुक्त न झाल्याने, तेवढी सद्गती होत नाही, पाप राहतात. त्यामुळे पद पण कमी होते.
योग, नसल्याने कोणाचे तरी नाव रुपात फसतात, त्याच गोष्टीची आठवण येते, ते आत्म
अभिमानी राहू शकत नाहीत.
गीत:-
हे कोण आले आज
सकाळी सकाळी...
ओम शांती।
प्रात:काळ किती वाजता होतो? बाबा सकाळी किती वाजता येतात? (कोणी म्हणाले 3 वाजता,
कोणी म्हणाले 4, कोणी म्हणाले संगमयुगावर, कोणी म्हणाले 12 वाजता) बाबा तंतोतंत
विचारत आहेत. 12 वाजता तर तुम्ही सकाळ म्हणू शकत नाही. 12 वाजून एक सेकंद झाला, एक
मिनीट झाला तर ए.एम. म्हणजे सकाळ सुरु झाली. ही बिल्कुल सकाळ आहे. विश्वनाटकात
बाबाचे कर्तव्य बिल्कुल तंतोतंत आहे. सेकंदाचा पण उशीर होत नाही. हे नाटक अनादि
बनलेले आहे. 12 वाजून एक सेकंद जो पर्यंत होत नाही तर ए.एम. म्हणू शकत नाही. ही
बेहदची गोष्ट आहे. बाबा म्हणतात कि मी येतोच सकाळी सकाळी विदेशी लोकांचा ए.एम,
पी.एम. बरोबर चालत आहे. त्यांची बुध्दी तरी पण चांगली आहे. ते एवढे सतोप्रधान पण
बनत नाहीत, तर तेवढे तमोप्रधान पण बनत नाहीत. भारतवासीच 100 टक्के सतोप्रधान मग 100
टक्के तमोप्रधान बनत आहेत. तर बाबा फार तंतोतंत आहेत. सकाळ म्हणजे 12 वाजून एक
मिनिट, सेकंदाचा हिशोब ठेवत नाहीत. सेकंद निघून गेल्याचे माहित पण पडत नाही. आता या
गोष्टी तुम्ही मुलेच समजत आहात. जग तर बिल्कुल घोर अंधारा मध्ये आहे. बाबाला सर्व
भक्त दु:खामध्ये आठवण करत आहेत, पतित पावन या. परंतू ते कोण आहेत? केव्हा येतात? हे
काही पण जाणत नाहीत. मनुष्य असून सुध्दा काहीच जाणत नाहीत, कारण पतित तमोप्रधान झाले
आहेत. काम पण किती तमोप्रधान आहे. आता बेहदचे बाबा आदेश देतात कि, मुलांनो कामजीत,
जगतजीत बना. जर आता पवित्र बनले नाहीत, तर विनाशाला प्राप्त व्हाल. तुम्ही पवित्र
बनल्याने अविनाशी पद प्राप्त कराल. तुम्ही राजयोग शिकत आहात ना. सुविचार पण लिहतात
कि, पवित्र बना, योगी बना. खरे तर लिहले पाहिजे राजयोगी बना. योगी तर साधारण अक्षर
आहे, ब्रह्म बरोबर योग लावतात, ते पण योगी आहेत. मुलगा वडिला बरोबर, पत्नी, पतीची
आठवण करतात, परंतू हा तुमचा आहे राजयोग. बाबा राजयोग शिकवत आहेत. त्यामुळे राजयोग
लिहणे योग्य आहे. पवित्र बना आणि राजयोगी बना. दिवसेंदिवस सुधारणा तर होतच राहते.
बाबा पण म्हणतात कि, बाबा आज तुम्हाला रहस्य युक्त गोष्टी सांगत आहे. आता शिवजयंती
पण येणार आहे. शिवजयंती तर तुम्हाला चांगले प्रकारे साजरी करावयाची आहे. शिवजयंतीचे
वेळी तर तुम्हाला चांगली सेवा करावयाची आहे. ज्यांचे जवळ प्रदर्शनी आहे, आपआपले
सेवाकेंद्रावर किंवा घरामध्ये शिवजयंती चांगली साजरी करा आणि लिहा कि, शिवबाबा गीता
ज्ञान दाता, पित्याकडून अमर्यादीत वारसा घेण्याचा रस्ता, येऊन शिका. वाटले तर दिवे
इत्यादी पण लावा. घराघरामध्ये शिवजयंती साजरी केली पाहिजे. तुम्ही ज्ञान गंगा आहात
ना. तर प्रत्येकाकडे गीता पाठशाळा असली पाहिजे. घराघरामध्ये तर गीता वाचत आहत ना.
पुरुषापेक्षा स्त्रिया भक्तीमध्ये पुढे असतात. असे कुटूंब परिवार पण आहेत जेथे गीता
वाचत आहेत. तर घरामध्ये पण चित्र ठेवली पाहिजेत, लिहा कि बेहदच्या पित्याकडून येऊन
परत तो वारसा घ्या.हा शिवजयंतीचा सण खरे तर तुमची खरी दिवाळी आहे. जेव्हा शिवपिता
येतात तर घराघरामध्ये प्रकाश होतो. हा सण तर खुप दिवे इत्यादी लावून प्रकाश करुन
साजरी करा. तुम्ही खरी दिवाळी साजरी करत आहात. शेवटी तर होणार आहे. सतयुगामध्ये.
तेथे तर घराघरामध्ये प्रकाश असतो म्हणजे आत्म्याची ज्योती पेटलेली असते. येथे तर
आंधार आहे. आत्मा आसुरी बुध्दी बनते. तेथे आत्मे पवित्र असल्यामुळे दैवी बुध्दी
राहते. आत्माच पतित, आत्माच पावन बनत आहे. आता तुम्ही कौडी पासून हिरा बनत आहात.
आत्मा पवित्र झाल्यामुळे शरीर पण पवित्र मिळते. येथे आत्मा अपवित्र असल्यामुळे शरीर
आणि जग पण अपवित्र आहे. या गोष्टीला काही थोडे आहेत. जे यथार्थ रितीने समजत आहेत,
आणि त्यांना खुशी होत आहे. नंबरवार पुरुषार्थ तर करत आहेत. ग्रहचारी पण आहे ना. कधी
राहूची ग्रहचारी बसते त्यामुळे आश्चर्यवत पळून जातात. बृहस्पतीची दशा बदलून बरोबर
राहूची दशा बसते. काम विकारात गेला आणि राहूची दशा बसली. कुस्ती होत आहे ना. तुम्ही
मातांनी पाहिले नसेल, कारण माता घरामध्ये राहतात. आता तुम्हाला माहित आहे, भ्रमरीला
घरेत्री म्हणजे घर बनविणारी म्हणतात. घर बनविण्याची चांगली कारागीर आहे, त्यामुळे
घरेत्री नाव आहे. किती कष्ट घेते. ती पण खरी मिस्त्री आहे. दोन तीन खोल्या बनविते.
3-4 किडे घेऊन येते. तशा तुम्ही पण ब्राह्मणी आहात. वाटले तर 1-2 ला बनवा, 10-12
बनवा, 100 बनवा, 500 बनवा. मंडप इत्यादी बनवितात, हे पण घर बनविणे झाले ना.
त्यामध्ये बसून सर्वांना भू-भू करत आहात. मग त्यातून कोणी समजून कीड्यापासून
ब्राह्मण बनतात, कोणी सडलेल्या अवस्थेत राहतात. म्हणजे आपले धर्माचे नाहीत. तुम्ही
तरी पण मनुष्य आहात ना. तुमची ताकद तिच्यापेक्षा (भ्रमरी) तर जास्त आहे. तुम्ही 2
हजारामध्ये पण भाषण करु शकता. पुढे चालून तुम्ही 4-5 हजारचे समोर जाल. भ्रमरीची
तुमचे बरोबर तुलना होते. आजकाल सन्यासी लोक पण बाहेर विदेशामध्ये जावून म्हणतात कि,
आम्ही भारताचा प्राचीन राजयोग शिकवित आहे. आजकाल माता पण भगवी कफनी घालून जातात,
विदेशींना फसवून येतात. त्यांना म्हणतात कि, भारताचा प्राचीन राजयोग भारतात येऊन
शिका. तुम्ही असे थोडेच म्हणता कि, भारतात येऊन शिका. तुम्ही तर विदेशात जाल, तर
तेथेच बसून शिकवाल, हा राजयोग शिका तर स्वर्गामध्ये तुमचा जन्म होईल. यात कपडे
इत्यादी बदलण्याची गोष्टच नाही. येथे आहे देहाचे सर्व संबंध विसरुन, स्वत:ला आत्मा
समजून बाबाची आठवण करणे. बाबाच मुक्तीदाता, मार्गदर्शक आहेत, सर्वांना दु:खापासून
मुक्त करतात.आता तुम्हाला सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही पुर्वी सुवर्ण युगात होता,
आता लोहयुगात आहात. सारे जग, सर्व धर्माचे लोहयुगात आहेत. कोणत्या पण धर्माचे आहेत,
त्यांना म्हणायचे आहे, बाबा म्हणतात कि, स्वत:ला आत्मा समजून माझी आठवण करा. तर
तुम्ही पावन बनाल, नंतर मी बरोबर घेऊन जाईल. बस, एवढेच बोला, जास्त नाही. हे तर फार
सोपे आहे. तुमच्या ग्रंथामध्ये पण आहे कि, घरो घरी संदेश दिला. कोणी एक राहिला तर
त्याने तक्रार केली कि, मला कोणी सांगितले नाही. बाबा आले आहेत तर सगळीकडे दवंडी
दिली पाहिजे. एक दिवस जरुर सर्वांना माहित पडेल कि बाबा आले आहेत, शांतीधाम सुखधामचा
वारसा देण्यासाठी. जेव्हा देवता धर्म होता तर इतर कोणता धर्म नव्हता. सर्व
शांतीधामला होते. असे विचार चालले पाहिजेत, सुविचार बनविले पाहिजे. बाबा सांगतात
कि, देहासहित सर्व संबंध सोडा. स्वत:ला आत्मा समजून शिवपित्याची आठवण करा तर आत्मा
पवित्र बनून जाईल. आता आत्मे अपवित्र आहेत. आता सर्वांना पवित्र बनवून बाबा
मार्गदर्शक बनून परत घेऊन जातात. सर्व आप-आपल्या विभागात निघून जातील. मग देवता
धर्मातील नंबरवार येतील. किती सोपे आहे. हे तर बुध्दीमध्ये धारण झाले पाहिजे. जे
सेवा करतात, ते लपले जावू शकत नाहीत. बदनामी करणारे पण लपले जावू शकत नाहीत.
सेवाधारीला तर बोलावले जाते. जे काही पण ज्ञान सांगू शकत नाहीत. त्यांना थोडेच
बोलावतात. ते तर आणखीन च नांव बदनाम करतात. म्हणतात कि बी.के. असे असतात का? पुर्ण
प्रतिसाद देत नाहीत. तर नांव बदनाम झाले ना. शिवबाबाचे नाव बदनाम करणरे उच्च पद
प्राप्त करु शकत नाहीत. जसे येथे पण कोणी तर करोड पती आहेत, पद्मपती पण आहेत, कोणी
तर पहा उपाशी मरत आहेत. असे भिकारी पण येऊन राजकुमार बनतील. आता तुम्ही मुलेच जाणता
कि, ते श्रीकृष्ण जे स्वर्गातील राजकुमार होते तेच गरीब बनतात. नंतर गरीबापासून
राजकुमार बनतील. ब्रह्माबाबा साधारण होते ना, थोडे फार कमविले, ते पण तुम्हा
मुलांसाठी. नाही तर तुमचा सांभाळ, कसा होईल? यासर्व गोष्टी ग्रंथामध्ये थोड्याच
आहेत. शिवबाबाच येऊन सांगत आहेत. बरोबर हे गावातील मुलगा होते, नाव काही श्रीकृय्ण
नव्हते. ही आत्म्याची गोष्ट आहे. त्यामुळे मनुष्य गोंधळून गेले आहेत. तर बाबांनी
समजावले आहे. शिवजयंती वर प्रत्येक घराघरामध्ये चित्राद्वारे सेवा करा. लिहा कि
बेहदच्या बाबांकडून 21 जन्मासाठी, स्वर्गाची बादशाही सेकंदामध्ये कशी मिळते, ते
येऊन समजून घ्या. जसे दिवाळीला मनुष्य फार दुकाने उघडून बसतात, तुम्हाला मग अविनाशी
ज्ञान रत्नांचे दुकान उघडून बसायचे आहे. तुमचे किती चांगले सजलेले दुकान असेल.
मनुष्य दिवाळीला करतात, तुम्ही मग शिवजयंती वर करा. जे शिवबाबा सर्वांचे दिवे जागवत
आहेत, तुम्हाला विश्वाचे मालक बनवित आहेत. ते तर लक्ष्मीला अविनाशी धन मागत आहेत,
आणि येथे जगदंबा कडून तुम्हाला विश्वाची बादशाही मिळत आहे. हे रहस्य बाबा सांगत
आहेत. बाबा कोणते शास्त्राचा आधार घेत नाहीत. बाबा सांगतात मी ज्ञानाचा सागर आहे
ना. होय, ब्रह्मा बाबा जाणतात कि, अमूक अमूकू मुलगा सेवा फार चांगली करतो, त्यामुळे
त्याची आठवण येते. बाकी असे नाही कि, प्रत्येकाच्या मनात आत काय चालले आहे. ते ओळखतो.
हो, कोणत्या वेळी माहित पडले कि, हे पतित आहेत, शंका वाटते. त्यांचा चेहराच उदास
होऊन जातो, तर वरुन बाबा पण सांगावा देतात कि, त्यांना विचारा. हे पण नाटकात नोंद
आहे. जे कोणा कोणासाठी सांगतात, बाकी असे नाही सर्वांसाठी सांगतील. असे तर पुष्कळ
आहेत, काळे तोंड करतात. जे करतात ते आपलेच नुकसान करतात. खरे सांगितल्याने काही
फायदा होईल, न सांगितल्याने आणखीनच नुकसान करतात. समजले पाहिजे की, बाबा आम्हाला
गोरा बनविण्यासाठी आले आहेत आणि आम्ही मग काळे तोंड करत आहोत. ही आहेच काट्याची
दुनिया. मनुष्य काटे आहेत. सतयुगाला म्हटले जाते अल्लाहाचा बगीचा आणि हे आहे जंगल,
त्यामुळे बाबा म्हणतात कि, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होत आहे, तेव्हा मी येतो.
श्रीकृष्णाचा पहिला जन्म मग 84 जन्मानंतर कसे बनले आहेत. आता सर्व आहेत तमोप्रधान
आप-आपसात भांडत आहेत. हे सर्व विश्वनाटकात आहे. मग स्वर्गामध्ये हे काहीच असणार नाही.
मुद्दे तर अनेकानेक आहेत, लिहले पाहिजे. जसे बॅरिस्टर लोक पण मुद्यांचे पुस्तक
ठेवतात ना. डॉक्टर लोक पण पुस्तक ठेवतात, त्यात पाहून औषध देतात. तर मुलांनी किती
चांगले प्रकारे शिकले पाहिजे, सेवा केली पाहिजे. बाबाने नंबर एकचा मंत्र दिला आहे.
मनमनाभव. बाबा आणि वारसाची आठवण करा तर स्वर्गाचे मालक बनाल. शिवजयंती साजरी करतात.
परंतू शिवबाबांनी काय केले? जरुर स्वर्गाचा वारसा दिला असेल. त्याला 5 हजार वर्षे
झाली. स्वर्गापासून नरक, नरकापासून स्वर्ग बनतो.
बाबा समजावतात कि, मुलांनो, योग युक्त बना, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगल्या
रितीने समजून येईल. परंतू योग ठिक नाही. बाबांची आठवण राहत नाही तर काही पण समजू
शकणार नाहीत. विकर्म पण विनाश होणार नाहीत. योगमुक्त न झाल्याने एवढी सद्गती पण होत
नाही, पाप राहतात. त्यामुळे पद पण कमी होते. फार आहेत त्यांचा योग काही पण नाही,
नावांरुपात फसून राहतात, त्यांचीच आठवण येत राहिल्याने विकर्म विनाश कसे होतील? बाबा
म्हणतता कि, आत्मा अभिमानी बना. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. शिवजयंती
वर अविनाशी ज्ञान रत्नांचे दुकान उघडून सेवा करावयाची आहे. घराघरामध्ये ज्ञान देऊन
सर्वांना बाबाचा परिचय द्यावयाचा आहे.
2. खज्या बाबा बरोबर खरे होऊन राहायचे आहे, कोणते पण विकर्म करुन लपवायचे नाही. असे
योगमुक्त बनायचे आहे, जे कोणते पण पाप राहणार नाही. कोणाचे पण नांवारुपात फसायचे
नाही.
वरदान:-
सागराचे तळाला
जावून अनुभव रुपी रत्न प्राप्त करणारे सदा समर्थ आत्मा भव : -
समर्थ बनण्यासाठी
योगाच्या प्रत्येक विशेषतेचा, प्रत्येक शक्तीचा आणि प्रत्येक ज्ञानाच्या मुख्य
बिंदूचा अभ्यास करा. अभ्यासी, लगनमध्ये मगन राहणाज्या आत्मा समोर कोणत्या पण
प्रकारचे विघ्न थांबत नाही. त्यामुळे अभ्यासाचे प्रयोगशाळेत बसा. आतापर्यंत
ज्ञानसागर, गुणांचे सागर, शक्तीचे सागरामध्ये वरवरच्या लाटामध्ये तरंगत आहात, परंतू
आता सागराच्या तळाला जावा, तर अनेक प्रकारचे विचित्र अनुभवाचे रत्न प्राप्त करुन
समर्थ आत्मा बनाल.
बोधवाक्य:-
अशुध्दीचे
विकार रुपी भुतांचे आवाहन करते त्यामुळे विचारामध्ये पण शुध्द बना...!!!
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
बुध्दीरुपी
पाय पृथ्वीवर ठेवून नका. जशी म्हण आहे कि, देवदूताचे पाय जमीनीवर राहत नाहीत. तशी
बुध्दी या देहरुपी जमीन म्हणजे प्रकृतीच्या आकर्षणा पासून दूर ठेवा. प्रकृतीला अधिन
करणारे बना, ना कि अधीन होणारे.