18-03-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, या बेहदच्या नाटकाला नेहमी स्मृतीमध्ये ठेवा तर खूप खुश रहाल. या
नाटकामध्ये जे चांगले पुरुषार्थी आहेत आणि अनन्य आहेत, ज्यांची पूजा सुध्दा केली
जाते"
प्रश्न:-
कोणती स्मृती
दुनियाच्या सर्व दुःखांपासून मुक्त करते, खुश करण्याची युक्ती काय आहे?
उत्तर:-
नेहमी स्मृती राहावी की आता आपण नवीन दुनियेमध्ये जात आहोत. भविष्याच्या आनंदात
राहा,तर दुःख विसरून जाईल. विघ्नाच्या दुनियेमध्ये विघ्न तर येतील परंतु स्मृती
असावी की या दुनियेमध्ये आपण बाकी थोडे दिवस आहोत,तर आनंदी राहाल.
गीत:-
सजनिया तुम्ही
जागृत व्हा…
ओम शांती।
हे गीत खूप चांगले आहे. गीत ऐकल्याने सुरुवातीपासून ८४ जन्माचे रहस्य बुध्दी मध्ये
येते. हे सुद्धा मुलांना समजविले आहे, तुम्ही मुलं वरून येता तर सूक्ष्मवतन मधून
येत नाही. आता सूक्ष्मवतन मधून जायचे आहे. सूक्ष्मवतन, बाबा आत्ताच दाखवितात. सतयुग-
त्रेता मध्ये या ज्ञानाच्या गोष्टीच राहत नाहीत. न कोणते चित्र इत्यादी असतात.
भक्तिमार्गात तर अनेक चित्र आहेत. देवी इत्यादींची पूजा तर खूप होते. दुर्गा, काली,
सरस्वती हे सर्व एकच आहेत परंतु नावं किती दिली आहेत. जे चांगला पुरुषार्थ करतात,
अनन्य आहेत त्यांची पूजा जास्त होते. तुम्ही जाणता आपणच पूज्य पासून पुजारी बणुन
बाबांची आणि आपली पूजा करतो. हे बाबा पण नारायणाची पूजा करत होते ना. आश्चर्य कारक
खेळ आहे. नाटक पाहिल्याने आनंद होतो ना, तसेच हे बेहदचे नाटक आहे, याला कोणी ओळखू
शकत नाही.तुमच्या बुद्धीमध्ये आता संपूर्ण नाटकाचे रहस्य आहे. या दुनियेमध्ये अनेक
दुःख आहेत. तुम्ही जाणता आता बाकी थोडे दिवस आहेत,आपण नवीन दुनियेमध्ये चाललो आहोत.
भविष्याची खुशी राहिल तर, या दुःखाला नष्ट करेल.असे लिहितात बाबा खूप विघ्न येतात,
नुकसान होते. बाबा म्हणतात हे काहीच विघ्न नाहीत, आज लखपती आहात, उद्या कखपती बनता.
तुम्हाला तर भविष्याच्या आनंदामध्ये राहायचे आहे. ही रावणाची आसुरी दुनिया आहे,चालता
चालता कोणते न कोणते विघ्न येते. या दुनियेमध्ये बाकी थोडे दिवस आहेत, नंतर आपण खूप
सुखांमध्ये जाऊ. बाबा म्हणतात ना, काल श्याम होता, गावातला मुलगा होता, आता बाबा
तुम्हाला ज्ञान देऊन गोरा बनवत आहेत. तुम्ही जाणता बाबा बीजरूप आहेत, सत्य आहेत,
चैतन्य आहेत. त्यांना परम आत्मा म्हणले जाते. ते उंच ते उंच ठिकाणी राहणारे आहेत,
पुनर्जन्म मध्ये येत नाहीत. आपण सर्वजण जन्म मरणा मध्ये येतो, ते राखीव राहतात.
त्यांना तर अंत च्या वेळेस येऊन सर्वांची सद्गती करायची आहे. तुम्ही भक्तिमार्ग
मध्ये जन्मोजन्मी गायन करत आलात, बाबा तुम्ही आलात तर आम्ही तुमचे बनू. माझे तर एक
शिवबाबा दुसरे कोणी नाही. आपण बाबां सोबतच जाणार आहोत. ही दुःखाची दुनिया आहे. भारत
किती गरीब आहे. बाबा म्हणतात मी भारतालाच सावकार बनवले होते, मग रावणाने नर्क बनवला.
आता तुम्ही मुलं बाबांच्या समोर बसले आहात. गृहस्थ व्यवहारां मध्ये पण खूप जण
राहतात. सर्वांना तर येथे राहायचे नाही. गृहस्थ व्यवहारांमध्ये राहा, खुशाल रंगीत
कपडे घाला, कोण म्हणते पांढरी कपडे घाला. येथे जरी तुम्ही पांढरे वस्त्र घालून राहता,
परंतु रंगीत कपडे घालणारे, त्या कपड्यांमध्ये सुद्धा खूप जणांचे कल्याण करू शकतात.
माता आपल्या पतींना सुद्धा समजवतात, भगवानुवाच पवित्र बनायचे आहे. देवता पवित्र
आहेत तेव्हा तर त्यांना नमस्कार करतात ना. पवित्र बनणे तर चांगले आहे. आता तुम्ही
जाणता सृष्टीचा अंत आहे. जास्त पैसे काय करायचे आहेत. आजकाल तर किती चोऱ्या होतात,
भ्रष्टाचार किती झाला आहे. हे या वेळेचे गायन आहे- कोणाचे दबून राहील
जमिनीमध्ये,कोणाचे चोर लुटतील इ.… सफल त्यांचे होईल जे धनीच्या (ईश्वरीय)
कार्यामध्ये लावतील. धनी (ईश्वर) आता समोर आहे ना. समजदार मुले आपले सर्वकाही
धनीच्या कार्यामध्ये लावून सफल करतील. मनुष्य तर सर्व पतित, पतितांना दान करतात.
येथे तर पुण्य आत्म्यांचे दान घ्यायचे आहे. ब्राह्मणां शिवाय दुसऱ्या कोणा सोबत
संबंध नाही. तुम्ही पुण्य आत्मे आहात. तुम्ही पुण्यांच काम करता. ही घरे इ. बनवतात,
ते पण तुमच्यासाठीच आहेत. पापाची तर कोणती गोष्टच नाही. जे काही पैसे आहेत, भारताला
स्वर्ग बनवण्यासाठी खर्च करत राहता. स्वतःच्या पोटाला पट्टी बांधून सुध्दा म्हणतात-
बाबा, आमची एक वीट या कार्यामध्ये लावा तर तेथे आम्हाला महल मिळतील. किती समजदार
मुले आहेत. दगडांच्या बदल्यात सोने प्राप्त होते. वेळ बाकी थोडा आहे. तुम्ही किती
सेवा करता. प्रदर्शनी,मेळे करत जातात. फक्त मुली हुशार बनल्या पाहिजेत. बेहद्दच्या
पित्याचे बनत नाही, मोह सोडत नाहीत. बाबा म्हणतात मी तुम्हाला स्वर्गामध्ये पाठविले
होते, आता परत तुम्हाला स्वर्गा साठी तयार करत आहे. जर श्रीमतावर चालले तर उच्च पद
प्राप्त होईल. या गोष्टी दुसरे कोणी समजाऊ शकत नाही. संपूर्ण सृष्टी चक्र तुमच्या
बुद्धीमध्ये आहे, मूळवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन. बाबा मुलांना म्हणतात स्वदर्शन
चक्रधारी बना, दुसऱ्यांना पण समजावत रहा. हा धंदा पाहा कसा आहे. स्वतः पण धनवान,
स्वर्गाचे मालक बनायचे आहे, आणि दुसऱ्यांना पण बनवायचे आहे. बुद्धीमध्ये हेच राहिले
पाहिजे, कोणाला कसा रस्ता दाखवायचा आहे? नाटका अनुसार जे काही झाले ते नाटकांमध्ये
नोंद आहे. प्रत्येक सेकंदाला जे काही होतं त्याला आपण साक्षी होऊन पाहतो. मुलांना
बाबा दिव्यदृष्टीचा आधारे साक्षात्कार पण करवितात. पुढे चालून तुम्हाला खूप
साक्षात्कार होतील. मनुष्य दुःखामध्ये त्राही त्राही करत राहतील, तुम्ही आनंदामध्ये
टाळ्या वाजवत राहाल. आपण मनुष्यापासून देवता बनत आहोत, तर जरूर नवीन दुनिया पाहिजे.
त्यासाठी हा विनाश समोर उभा आहे. हे तर चांगले आहे ना. मनुष्य तर विचार करतात
आपापसात भांडण नको, शांती रहावी. बस. परंतु हे तर नाटकांमध्ये नोंद आहे. दोन माकडे
आपापसात भांडले आणि लोणी तिसऱ्याला मिळाले. तर आता बाबा सांगतात मज पित्याला आठवण
करा आणि दुसऱ्यांना सुद्धा रस्ता दाखवा. राहायचे पण साधारण आहे, जेवण सुद्धा साधारण
असावे. कधी कधी गोड-धोड पण केले जाते. ज्या भंडाऱ्या मधून खाल्ले, म्हणतात,बाबा हे
सर्व तुमचे आहे. बाबा म्हणतात विश्वस्त होऊन सांभाळा. आता मी तुमच्या समोर आहे. मी
पण विश्वस्त बणुन तुम्हाला पण विश्वस्त बनवतो. जे काही करायचे ते विचारून करा. बाबा
प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ला देतात. बाबा घर बांधू, हे करू, बाबा म्हणतील खुशाल करा.
बाकी पाप आत्म्यांना द्यायचे नाही. कन्या ज्ञानामध्ये चालत नसेल, लग्न करू इच्छित
असेल, तर मग काय करू शकता ?. बाबा तर समजवतात तु अपवित्र का बनते? परंतु कोणाच्या
नशिबात नसेल तर पतित बनतात.अनेक प्रकारच्या केस होत राहतात.पवित्र असूनही मायाची
चापट लागते, खराब होतात.माया खूप प्रबळ आहे.मुलं सुद्धा काम विकाराच्या वश होतात,
मग म्हणले जाते ही नाटकाची भावी आहे. या वेळेत पर्यंत जे काही झाले ते कल्पा पूर्वी
सुध्दा झाले होते. नवीन काहीच नाही. चांगले काम करण्यामध्ये विघ्न टाकतात, नवीन
गोष्ट नाही. आपल्याला तर तन-मन-धनाने भारताला स्वर्ग बनवायचे आहे. सर्वकाही बाबांवर
अर्पित करतील. तुम्ही मुले जाणता,आम्ही श्रीमतावर या भारताची आत्मिक सेवा करत आहोत.
तुमच्या बुद्धी मध्ये आहे, आपण आपले राज्य पुन्हा स्थापन करत आहोत. बाबा म्हणतात हा
आत्मिक दवाखाना आणि महाविद्यालय, तीन पाउल जागे मध्ये उघडा, ज्यामुळे मनुष्य सदा
निरोगी आणि धनवान बनतील. 3 पाऊल पृथ्वीचे पण, कोणी देत नाही. असे म्हणतात
ब्रह्माकुमारी जादू करतात, भाऊ-बहीण बनवितात. तुमच्यासाठी नाटकांमध्ये युक्ती खूप
चांगली रचलेली आहे. भाऊ-बहीण कुदृष्टी ठेवू शकत नाहीत. आजकाल तर दुनिये मध्ये इतकी
घाण आहे की विचारू नका. तर जसे की बाबांना दया येते, असे तुम्हा मुलांना पण यायला
पाहिजे. जसे बाबा नरकाला स्वर्ग बनवीत आहे, असे तुम्हा दयावान मुलांना सुद्धा
बाबांचे मदतगार बनले पाहिजे. पैसे आहेत तर आत्मिक दवाखाना आणि आत्मिक महाविद्यालय
उघडत राहा. यामध्ये जास्त पैसे खर्च करायची काहीच गोष्ट नाही. फक्त चित्र ठेवा.
ज्यांनी कल्पा पूर्वी ज्ञान घेतले होते, त्यांच्या बुध्दीचे कुलूप उघडत राहील,येत
राहतील.अनेक मुलं दूर-दूर वरून शिकण्यासाठी येतात. बाबांनी असे पण पाहिले आहे,
रात्री एका गावा वरून येतात, सकाळी सेंटर वर येऊन झोळी भरून जातात. जोडी अशी पण
नसावी जे मधून निघून जातील. मग काय पद प्राप्त करतील ? मुलांना खूप आनंद झाला पाहिजे.
बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहे, बेहदचा वारसा देण्यासाठी. किती सोपे ज्ञान आहे.
मम्मा-बाबा हे लक्ष्मी-नारायण बनतात, मग आपण कमी पद का घ्यावे? आम्ही सुध्दा सेवा
करू. तर हा नशा राहायला पाहिजे. आम्ही आमची राजधानी योगबळाच्या आधारे स्थापन करत
आहोत .आता आपण स्वर्गाचे मालक बनत आहोत. तेथे मग हे ज्ञान नसेल. हे ज्ञान आत्ता साठी
आहे. अच्छा,
गोड-गोड फार-फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची प्रेम
पूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचे आत्मिक मुलांना नमस्कार.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. समजदार
बणुन आपले सर्व काही धनीच्या नावे सफल करायचे आहे.पतितांना दान करायचे नाही.
ब्राह्मणांशिवाय दुसऱ्या कोणा सोबत संबंध ठेवायचा नाही.
2. बुद्धी मध्ये
कोणतेही असे छिद्र नसावे जे ज्ञान वाहून जाईल. बेहदचे पिता बेहदचा वारसा देण्यासाठी
शिकवत आहेत, या गुप्त आनंदामध्ये राहायचे आहे. बाबांसारखे दयावान बनायचे आहे.
वरदान:-
सर्वांना
उमंग-उत्साहाचा सहयोग देऊन शक्तिशाली बनविणारे खरे सेवाधारी भाव.
सेवाधारी म्हणजे
सर्वांना उमंग उत्साहाचा सहयोग देऊन शक्तिशाली बनविणारे. आता वेळ थोडी आहे आणि रचना
जास्तीत जास्त येणार आहे. फक्त एवढ्या संख्येमध्ये खुश होऊ नका की खूप आले आहेत. आता
तर अजून संख्या वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही जी पालना घेतली आहे,त्याचा मोबदला द्या.
येणाऱ्या निर्बल आत्म्यांचे सहयोगी बनून त्यांना समर्थ, अचल, अडोल बनवा, तेव्हा खरे
सेवाधारी म्हणता येईल.
बोधवाक्य:-
आत्म्याला
जेव्हा, जेथे आणि जसे वाटेल स्थित करून घ्या- हा आत्मिक व्यायाम आहे.
मातेश्वरीचे अनमोल
महावाक्य
1) परमात्मा
गुरु, शिक्षक, पित्याच्या रूपामध्ये वेग-वेगळ्या संबंधांचा वारसा घ्या.
पहा, परमात्मा तीन रूप धारण करून वारसा देतात. ते आपले पिता पण आहेत, शिक्षक पण
आहेत, गुरु पण आहेत. आता पित्याच्या सोबत पित्याचा संबंध, शिक्षकासोबत शिक्षकाचा
संबंध, गुरु सोबत गुरुचा संबंध आहे. जर पित्याला सोडले तर वारसा कसा मिळेल? जेव्हा
पास होऊन शिक्षका द्वारे प्रशस्तीपत्र घेतले तेव्हा शिक्षकांची साथ मिळेल. जर
बाबांचा इमानदार, आज्ञाकारी मुलगा होऊन मार्गदर्शना प्रमाणे नाही चालले तर
भविष्यामध्ये प्राप्ती होणार नाही. मग संपूर्ण सदगतीला प्राप्त करू शकत नाहीत.
बाबांकडून पवित्रतेचा वारसा घेऊ शकत नाहीत. परमात्म्याची प्रतिज्ञा आहे जर तुम्ही
तीव्र पुरुषार्थ कराल तर तुम्हाला 100 पटीने फायदा देईन. फक्त म्हणण्या पुरते नाही,
त्यांच्यासोबत संबंध पण चांगला पाहिजे. अर्जुनाला सुध्दा आज्ञा दिली होती की
सर्वांना मारुन(विसरुन) सतत माझी आठवण कर. परमात्मा तर समर्थ आहेत, सर्वशक्तिमान
आहेत ते आपल्या वचनाला अवश्य पूर्ण करतील परंतु मुलं सुध्दा जेव्हा बाबांसोबत संबंध
निभावतील, जेव्हा सर्वांपासून बुद्धी योग तोडून एका परमात्म्या मध्ये लावतील तेव्हा
संपूर्ण वारसा मिळेल.
2) सर्व
मनुष्य आत्मा पुनर्जन्मा मध्ये येतात.
पहा,जे पण धर्म स्थापन करण्यासाठी येतात ते पुनर्जन्म घेऊन आपल्या धर्माची सांभाळ
करण्यासाठी येतात. ते न स्वतः मुक्त होतात, न दुसऱ्यांना मुक्त करू शकतात, जर असे
मुक्त होत राहाल तर बाकी, मुक्त न झालेलेच सृष्टीवर राहतील. परंतु असे होऊ शकत नाही
की पाप आत्म राहतील आणि पुण्य आत्मा निघून जातील. जसे हे संन्यासी आहेत ते
निर्विकारी आहेत, जर ते मुक्त होत राहतील, तर पाप आत्माच राहतील, मग सन्यासीची
वृध्दी होणार नाही आणि अशी सृष्टी चालू शकणार नाही. पुण्य आत्मे सृष्टीला निर्विकारी
तेच्या बळाच्या आधारावर वाचवतात, तेव्हा सृष्टी चालते. नाहीतर काम अग्नीने सृष्टी
जळून गेली असते. तर हा कायदा नाही, की मधूनच कोणी आत्मा मुक्ती पदाला प्राप्त करेल.
जसे वृक्षाचे एक पान सुद्धा बिजा मध्ये समाऊ शकत नाही, झाड मोठे होऊन, वृध्दी होऊन
जडजडीभूत झाले पाहिजे,नंतर नवीन झाड येते, त्यामुळे जे पण धर्म स्थापन करण्यासाठी
येतात ते परत येऊन सांभाळ जरूर करतात, परंतु ज्यांचा आपण आधार घेतला आहे, ते तर
अनेक अधर्माचा विनाश करतील तेव्हा एक धर्म स्थापन होईल. हे स्थापना विनाश आणि पालना
तिन्ही कार्य करतात, आणि दुसरे धर्म पिता फक्त स्थापनेचे कार्य करतात, विनाशाचे
कार्य करत नाहीत. विनाशाचे कार्य करणे, ते तर परमात्म्याच्या हातामध्ये आहे म्हणून
त्यांना त्रिमूर्ती म्हणले जाते.अच्छा.