04-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आठवणीची नोंद ठेवा जितके आठवणी मध्ये राहण्याची सवय लागेल,तेवढेच पाप नष्ट होतील कर्मातीत अवस्था जवळ येत जाईल"

प्रश्न:-
आठवणीचा चार्ट(तक्ता) ठीक आहे की नाही,याची पारख कोणत्या चार गोष्टी द्वारे केली जाते?

उत्तर:-
१ आसामी २ चलन ३ सेवा आणि ४ खुशी बापदादा या चार गोष्टींना पाहून सांगतात की त्यांचा चार्ट किंवा तक्ता ठीक आहे की नाही.जी मुलं संग्रहालय किंवा प्रदर्शनीच्या सेवेत उपस्थित राहतात.ज्यांची चलन श्रेष्ठ आहे,अपार खुशी मध्ये राहतात,तर जरूर त्यांचा चार्ट चांगला असेल, दिनचर्या चांगली असेल.

गीत:-
हे प्राणी(आत्मा) तू आपला चेहरा मनाचा आरशा मध्ये पहा.

ओम शांती।
मुलांनी गीत ऐकले याचा अर्थ पण जाणायला पाहिजे,किती पाप शिल्लक राहिले आहेत आणि किती पुण्य जमा केले आहेत,अर्थात आत्म्याला सतोप्रधान बनण्या मध्ये किती वेळ आहे?आत्तापर्यंत किती पावन बनले आहेत.हे समजू तर शकतात ना? आपली दिनचर्या किंवा चार्ट मध्ये कोणी लिहितात,आम्ही दोन-तीन घंटा आठवणी मध्ये राहिलो,कोणी लिहितात आम्ही एक घंटा राहतो,हे तर खूपच कमी झाले ना. जर कमी आठवण कराल,तर पाप पण थोडेसेच नष्ट होते.आता तर खूप पाप आहेत,जे नष्ट झाले नाहीत.आत्म्याला च प्राणी म्हटले जाते.तर आत्ता बाबा म्हणतात,स्वतःला विचार की,या हिशोबाने किती पाप नष्ट झाले आहेत.आपल्या दिनचर्या द्वारे माहिती तर पडते ना,आम्ही किती पुण्यात्मा बनले आहोत.हे तर बाबांनी समजावले आहे,कर्मातीत अवस्था अंत मध्ये होईल.आठवण करत करत सवय लागेल,परत जास्त पाप नष्ट होतील.स्वतःला तपासायचे आहे,किती वेळ बाबांच्या आठवणी मध्ये राहतो.यामध्ये थापा मारण्याची गोष्टच नाही, हे तर स्वतः तपासायचे आहे.बाबांना आपली दिनचर्या लिहून दिली,तर बाबा लगेच सांगतील यांचा चार्ट किंवा दिनचर्या ठीक आहे की नाही. आसामी,चलन,सेवा आणि खुशी ला पाहून बाबा लगेच समजतात,यांची दिनचर्या किंवा चार्ट कसा आहे.सारखी आठवण त्यांनाच राहते,जे नेहमीच संग्रहालय किंवा प्रदर्शनची सेवा करत राहतात. संग्रहालया मध्ये तर दिवसभर येणे जाणे राहते. दिल्लीमध्ये तर खूप येत राहतात,सारखाच बाबांचा परिचय द्यावा लागतो.तुम्ही सांगता विनाश होण्यामध्ये बाकी थोडे वर्ष आहेत,दुसरे लोक म्हणतात हे कसे होऊ शकते. तर लगेच म्हणायला पाहिजे,हे आम्ही थोडेच सांगतो,हे तर भगवानुवाच आहे ना.भगवानुवाच आहे तर जरुर सत्यच असेल ना,म्हणून बाबा समजवतात घडी घडी सांगा ही शिव बाबांची श्रीमत आहे.आम्ही सांगत नाही श्रीमत त्यांची आहे,ते सत्यच आहेत.प्रथम तर बाबांचा परिचय द्यावा लागेल,म्हणून बाबा म्हणतात प्रत्येक चित्रांमध्ये लिहा शिव भगवानुवाच.ते तर सत्यच सांगतील ना,आम्ही थोडंच जाणत होतो. बाबांनी सांगितले आहे,तेव्हाच आम्ही आपणास सांगतो.कधीकधी वर्तमान पत्रांमध्ये पण येते अमक्यानी भविष्यवाणी केली आहे,विनाश लवकरच होईल.

आत्ता तुम्ही तर बेहदच्या बाबांची मुलं आहात. प्रजापिता ब्रह्माकुमार कुमारी तर बेहदचे आहेत ना. तुम्ही सांगणार आम्ही बेहदच्या बाबांची मुलं आहोत,जे पतित-पावन ज्ञानाचे सागर आहेत. प्रथम हि गोष्ट समजावून पक्की करायचे आहे, परत पुढच्या चित्रावर माहिती सांगायचे आहे.असे म्हटले आहे यादव कौरव इत्यादी विनाश काळात विपरीत बुद्धी आहेत.शिवबाबांचे नाव घेत राहतील तर यामध्ये मुलांचे पण कल्याण आहे.आठवण करत राहतील.बाबांनी जे तुम्हाला सांगितले आहे, ते परत तुम्ही दुसऱ्यांना सांगत रहा.तर सेवा करणाऱ्या मुलांची दिनचर्या किंवा चार्ट चांगला राहील.संपूर्ण दिवसांमध्ये ८तास सेवेमध्ये व्यस्त राहतात,फक्त एक तास विश्राम करतात.तरीही दिवसातून ७ तास सेवा करत राहतात.तर समजायला पाहिजे त्यांचे विकर्म लवकर विनाश होतील.अनेकांना घडी घडी बाबांचा परिचय देत राहाल तर जरूर,अशी सेवाधारी मुलं बाबांना पण प्रिय वाटतील.बाबा पाहतात हे अनेकांचे कल्याण करत राहतात,रात्रंदिवस यांना हे चिंतन राहते,आम्हाला अनेकांचे कल्याण करायचे आहे.अनेकांचे कल्याण करणे म्हणजेच स्वतःचे पण कल्याण करणे आहे.शिष्यवृत्ती पण त्यांनाच मिळेल,जे अनेकांचे कल्याण करत राहतात.मुलांचा धंदाच हा आहे,शिक्षक बणुन अनेकांना मार्ग दाखवायचा आहे.प्रथम तर ज्ञानाची पूर्णपणे धारणा करावी लागेल.कोणाचे कल्याण करत नाहीत,तर समजले जाते यांच्या भाग्य मध्ये नाही.मुलं म्हणतात,बाबा आम्हाला नोकरीपासून सोडवा,आम्ही ईश्वरीय सेवा करत राहतो.बाबा पण पाहतात,बरोबर हे सेवा करण्याच्या लायक आहेत,बंधन मुक्त आहेत,तेव्हा तर म्हणतात ५००,१०००रु.कमवण्या पेक्षा,ही सेवा करत राहिल्यास अनेकांचे कल्याण होईल.जर बंधनमुक्त आहेत तर,बाबा सेवा पाहूनच श्रीमत देतील.सेवाधारी मुलांना तर जिथे पाहिजे तिथे बोलवत राहतात.शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात ना,हे पण शिक्षण आहे.हे काही साधारण मत नाही.सत्य म्हणजेच सत्य बोलणारे.आम्ही श्रीमतावर आपणास सांगत आहोत,ईश्वराची मत आत्ता तुम्हाला मिळत आहे.बाबा म्हणतात तुम्हाला परत जायचे आहे.आत्ता बेहद सुखाचा वारसा घ्या. तुम्हाला वारसा मिळत आला आहे कारण स्वर्गाची स्थापना तर कल्प कल्प होते ना. हे कोणालाच माहिती नाही की ५००० वर्षाचे हे सृष्टीचे चक्र आहे.मनुष्य तर बिलकुलच अंधारामध्ये आहेत.तुम्ही आता प्रकाशा मध्ये आले आहात.स्वर्गाची स्थापना पण बाबाच करतील,हे तर गायन आहे,भंभोरला आग लागली तरी अनेक जण अज्ञान निद्रे मध्ये झोपलेले राहिले. तुम्ही मुलं जाणता,बाबा ज्ञानाचे सागर आहेत.उच्च ते उच्च बाबांचे,कर्तव्य पण उच्च आहे.असे पण नाही,ईश्वर तर समर्थ आहेत,ते पाहिजे ते करू शकतील,नाही.हे सर्व काही पूर्वनियोजित नाटकं बनलेले आहे.लढाई ई.मध्ये किती मरतात,हे पण नाटका मध्ये नोंद आहे,यामध्ये भगवान काहीच करू शकत नाहीत.भूकंप इत्यादी होतात तर खूप दुःखी होतात,पुकारतात हे भगवान,परंतु भगवान काय करू शकतात. भगवंताला तर तुम्ही बोलावले आहे, विनाश करा,पतित दुनिया मध्ये बोलवले आहे,स्थापना करून सर्वांचा विनाश करा.बाबा महणतात मी विनाश करत नाही,ही तर अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे,कारण नसताना खून होत राहतात, यामध्ये वाचवण्याची गोष्टच नाही.तुम्हीच पुकारले आहे,पावन दुनिया बनवा,तर जरूर पतित आत्मे जातील ना.काही तर बिलकुलच समजत नाहीत,श्रीमता चा अर्थ पण समजत नाहीत.भगवान कोण आहेत काहीच समजत नाहीत.कोणता मुलगा चांगल्यारितीने शिक्षण घेत नाही तर मात पिता म्हणतात तू तर पत्थर बुद्धी आहेस. येथे अशा गोष्टी म्हणत नाहीत,कलियुगा मध्ये पत्थर बुद्धीच आहेत,पारस बुद्धी येथे कोणी होऊ शकत नाहीत.आजकाल तर पहा मनुष्य काय काय करत राहतात.एक ह्रदय काढून दुसरे घालतात.अच्छा,इतके कष्ट केले परंतु यामुळे फायदा काय होईल? थोडे दिवस अजून जिवंत राहील.अनेक जण रिद्धी-सिद्धी शिकून येतात,फायदा तर काहीच होत नाही.भगवंताची आठवण यामुळेच करतात की,येऊन आम्हाला पावन दुनियेचे मालक बनवा.आम्ही पतित दुनिया मध्ये खूप दुःखी झालो आहोत. सतयुगा मध्ये तर कोणता आजार किंवा दुःखाची गोष्टच नसते.आता बाबा द्वारा तुम्ही खूप श्रेष्ठ पद मिळवत आहात.येथे पण मनुष्य शिक्षणाद्वारे उच्च पदवी मिळवतात तर खूप खुश होतात.तुम्ही मुलं समजता येथे तर बाकी थोडे दिवस आहेत, पापाचे ओझं डोक्या वरती खूप आहे,खूप सजन खातील.स्वतःला पतित तर म्हणतात ना.विकारांमध्ये जाणे पाप समजत नाहीत. पापात्मा तर बनतात ना.असे समजतात गृहस्थ आश्रम तर अनादी काळापासून चालत आलेला आहे,समजवले जाते सतयुगा मध्ये तर पवित्र ग्रहस्थ आश्रम होता.पाप आत्मे नव्हते.येथे पाप आत्मे आहेत म्हणून दुःखी आहेत.येथे तर अल्प काळाचे सुख आहे,आजारी पडले आणि मृत्यू झाला.मृत्यू तर तोंड वासून उभा आहे. अचानक हृदय बंद पडते.येथे आहेच काग विष्टा समान सुख,तेथे तर तुम्हाला खूप सुख आहे.तुम्ही सार्‍या विश्वाचे मालक बनतात,कोणत्याही प्रकारचा दुःख रोग नसतो.न गरमी ना थंडी असेल,नेहमीच चांगला मौसम असेल.तत्व पण कायद्या नुसार राहतात. स्वर्ग स्वर्गच आहे,स्वर्गा नरका मध्ये रांत्र दिवसाचा फलक आहे.तुम्ही स्वर्गाची स्थापना करण्यासाठी बाबांना बोलवतात,येऊन पावन दुनियेची स्थापना करा आणिआम्हाला पावन बनवा.

तर प्रत्येक चित्रा वरती शिव भगवानुवाच लिहायला हवे,यामुळे घडीघडी आठवण येत राहील.ज्ञान पण देत राहतील. संग्रहालय किंवा प्रदर्शनीच्या सेवे मध्ये, ज्ञान आणि योग दोन्ही एकत्र चालतात. आठवणी मध्ये राहिल्या मुळे नशा चढेल. तुम्ही पावन बणुन साऱ्या विश्वाला पावन बनवतात.जेव्हा तुम्ही पावन बनता तर जरुर सुर्ष्टी पण पावन पाहिजे.अंत काळ कयामत ची वेळ असल्यामुळे सर्वांचा कर्मभोग चुक्तू होतो.तुमच्यासाठी नवीन सृष्टीचे उद्घाटन करावे लागते.परत अनेक शाखा निघत राहतात.पवित्र बनण्यासाठी नवीन दुनियेचा पाया,तर बाबा शिवाय कोणी घालू शकत नाहीत,तर अशा बाबांची आठवण पण करायला पाहिजे ना.तुम्ही संग्रहालय इत्यादी चे उद्घाटन मोठ्या मनुष्य द्वारे करतात,ज्यामुळे प्रसिद्धी मिळते. मनुष्य समजतात, येथे हे पण येतात. काहीजण म्हणतात तुम्ही लिहून द्या,आम्ही तसेच बोलू,हे पण चुकीचे झाले,चांगल्या रीतीने समजून परत बोलायला पाहिजे,तर चांगले होईल.काहीतरी लिहलेले वाचून दाखवतात,ज्यामुळे चूक होत नाहीत. मुलांना न पाहता भाषण करायचे आहे, तुमच्या आत्म्या मध्ये सर्व ज्ञान आहे ना, परत तुम्ही दुसऱ्यांना देत राहतात,प्रजेची वृद्धी होत राहते,लोकसंख्या पण खूप वाढत राहते.सर्व गोष्टीची वृद्धी होत राहते.सर्व झाड जडजडीभुत झाले आहे.जे आपल्या धर्माचा असेल,ते येत राहतील.नंबरा नुसार तर आहेत ना.सर्व एकरस तर शिकू शकत नाहीत, काही तर शंभर पैकी एक मार्क पण घेतात.थोडे पण ज्ञान ऐकले एक मार्क मिळाला तरी स्वर्गामध्ये येतील.हे बेहद चे शिक्षण आहे,जे बेहदचे बाबाच शिकवतात.जे या धर्माचे असतील ते निघतील.प्रथम तर सर्वांना मुक्तिधाम आपल्या घरी जायचे आहे,परत नंबरा नुसार येत राहतील. काही तरी त्रेता च्या अंत काळापर्यंत येत राहतील.जरी ब्राह्मण बनतात परंतु सर्व ब्राह्मण काही सतयुगात तर येणार नाहीत.या समजण्याच्या गोष्टी आहेत.बाबा जाणतात,राजधानी स्थापन होत आहे,सर्व एकरस तर शिकू शकत नाहीत.राज्यांमध्ये तर सर्व प्रकारचे पाहिजेत.प्रजेला राजाई घराच्या बाहेरचे समजले जाते.स्वर्गामध्ये वजीर किंवा प्रधानाची आवश्यकता नसते. त्यांना श्रीमत मिळाले आहे,ज्याद्वारे ते श्रेष्ठ बनले आहेत.परत ते थोडेच कोणाकडून मत घेतील.वजीर इत्यादीची आवश्यकताच नसते.जेव्हा पतित होतात,तेव्हा एक वजीरव एक राजाराणी असतात.आता तर अनेक वजीर आहेत.येथे पंचायत राज्य आहे ना.एकाची मत दुसऱ्यांशी मिळू शकत नाही.एकाशी मित्रता ठेवा,त्यांना समजून सांगा,परत दुसरे येतील काम करतील, परत त्यांच्या विचारांमध्ये बसले नाही तर, आणखीनच काम बिघडुन टाकतील. एकाची बुद्धी दुसऱ्याशी मिळू शकत नाही. स्वर्गामध्ये तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.तुम्ही खूप दुःख सहन केले आहे, याचे नावच आहे दुःखधाम.भक्तिमार्ग मध्ये अनेक धक्के खाल्ले आहेत.हे पण पूर्वनियोजित नाटक आहे.जेव्हा खूप दुःखी होतात,तेव्हा बाबा येऊन सुखाचा वारसा देतात.बाबाने तुमच्या बुद्धीची कुलूप उघडले आहे.मनुष्य तर म्हणतात सावकारा साठी स्वर्ग आहे,गरीब तर नरका मध्येच आहेत.तुम्ही यर्थात रितीने जाणतात,स्वर्ग कशाला म्हटले जाते.सतयुगा मध्ये थोडेच कोणी दयावान म्हणून बोलवतील.येथे बोलवतात,दया करा,मुक्त करा.बाबाच सर्वांना शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन जातात.अज्ञान काळामध्ये तुम्ही पण काहीच जाणत नव्हते.जे नंबर एक तमोप्रधान,तेच परत नंबर एक सतोप्रधान बनतात.हे ब्रह्मा स्वता:ची बढाई करत नाहीत.मोठेपणा तर एकाचाच आहे. लक्ष्मी नारायणला पण,असे श्रेष्ठ बनवणारे तेच आहेत.उच्च ते उच्च भगवानच आहेत. ते बनवतात पण उच्च.बाबा जाणतात सर्व तर एकसारखे उच्च बनणार नाहीत.तरीही पुरुषार्थ करावा लागतो.येथे तुम्ही येतात, नरा पासून नारायण बनण्यासाठी.आम्ही तर स्वर्गाची बादशाही घेऊ,असे मुलं बाबांना म्हणतात.आम्ही सत्यनारायण ची खरी कथा ऐकण्यासाठी आलो आहोत. बाबा म्हणतात,अच्छा तुमच्या मुखामध्ये गुलाब,परत यासाठी कष्ट करा.सर्व तर लक्ष्मीनारायण बनणार नाहीत,ही राजधानी स्थापन होत आहे.राजाई घराण्या मध्ये आणि प्रजा घराण्या मध्ये पण खूप पाहिजेत ना. काहीजण आश्चर्यवत ऐकतात दुसऱ्यांना सांगतात आणि परत बाबांना सोडचिठ्ठी देतात.अशी मुलं सुद्धा परत वापस येतीत.जे मुलं आपली काही ना काही प्रगती करतात,तेच बाबांना आवडतात.गरीबच समर्पित होऊ शकतात. देह सहित कुणाची आठवण यायला नको, हे फार मोठे लक्ष आहे.जर नातेवाईक मित्रा सोबत संबंध जोडला तर, त्यांची आठवण जरूर त्रास देईल.बाबा काय आठवण येते राहते?सर्व दिवस बुद्धी बेहद मध्ये राहते. खूप कष्ट घ्यावे लागतात.बाबा म्हणतात माझ्या मुलांमध्ये पण उत्तम, मध्यम, कनिष्ठ आहेत.दुसरे कोणी येतात तर समजतात, हे पतित दुनियाचे आहेत,परत यज्ञ सेवा करतात,तर त्यांना सन्मान द्यावा लागतो. बाबा युक्तीबाज आहेत,नाहीतर हे शांतीचे सर्वोच्च शिखर आहेत, पवित्रतेचे पण सर्वोच्च शिखर आहेत.जेथे पवित्रतेचे सागर बाबा,साऱ्या विश्वाला सन्मुख पवित्र बनवतात.येथे कोणी पतित येऊ शकत नाहीत.परंतु बाबा म्हणतात मी आलो आहे सर्व पतितांना पावन बनवण्यासाठी.या खेळांमध्ये माझी पण भूमिका आहे.अच्छा. गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती, बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) स्वतःचा चार्ट पाहत तपासायचे आहे की किती पुण्य जमा केले आहेत?आत्मा किती सतो प्रधान बनली आहे? आठवणी मध्ये राहून सर्व कर्मभोग नष्ट करायचे आहेत.

(२)शिष्यवृत्ती घेण्यासाठी सेवा योग्य बनवून अनेकांचे कल्याण करायचे आहे. बाबांचे प्रिय बनायचे आहे.शिक्षक बणुन अनेकांना रस्ता दाखवायचा आहे.

वरदान:-
मधुरते च्या वरदाना द्वारे नेहमी पुढे जाणारे श्रेष्ठ आत्मा भव.

मधुरता अशी विशेष धरणी आहे,जी कडव्या धरणीला पण मधुर बनवते. कोणालाही दोन क्षण गोड दृष्टी द्या,गोड बोल बोला,तर कोणत्याही आत्म्याला नेहमीसाठी भरपूर करू शकता. दोन क्षणांची गोड दृष्टी व बोल त्याची सृष्टी बदलून टाकतात.तुमचे दोन मधुर बोल त्यांच्यासाठी नेहमी परिवर्तन करण्यासाठी निमित्त बनतात म्हणूनमधुलतेचे वरदान नेहमी बरोबर ठेवा.नेहमी गोड राहणे आणि सर्वांना गोड बनवायचे आहे.

बोधवाक्य:-
प्रत्येक परिस्थितीमध्ये खुश रहा तर,राज़युक्त बणुन जाल.


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
तुम्ही आत्मिक श्रेष्ठ आत्मे आहात म्हणून मुखाद्वारे कधी व्यर्थ किंवा साधारण बोल काढू नका.प्रत्येक बोल यूक्तीयुक्त हवा,व्यर्थ भावा पासून दुर,अव्यक्त भाव असणाराच अव्यक्त स्थितीचा अनुभव करू शकेल.