17-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, या जुन्या दुनियेमध्ये कोणतेही सार नाही, त्यामुळे तुम्हाला या मध्ये मन लावायचे नाही. बाबांची आठवण विसरली तर सजा खावी लागेल.

प्रश्न:-
बाबांची मुख्य आज्ञा काय आहे? त्याचे उल्लंघन का होते?

उत्तर:-
बाबांची आज्ञा आहे कोणाकडून ही सेवा घ्यायची नाही कारण तुम्ही स्वतः सेवाधारी आहात. परंतु देह अभिमान मुळे बाबांच्या आज्ञेचे उल्लंघन करतात. बाबा म्हणतात तुम्ही येथे सुख घेतले तर तेथे सुख कमी होईल. काही बोललं तर म्हणतात की आम्ही तर स्वतंत्र राहू. परंतु बाबा म्हणतात तुम्ही सर्व बाबांवर आधारित आहात.

गीत:-
मनाचा आधार तुटू नये….

ओम शांती।
शिवभगवानुवाच आपल्या शालिग्राम प्रती. शिव आणि शालिग्रामला संपूर्ण मनुष्य जाणतात. दोन्ही निराकार आहेत. आता कृष्ण भगवानूवाच म्हणू शकत नाही. भगवान एकच असतात. तर शिवभगवानुवाच कुणा प्रति? आत्मिक मुलां प्रती. बाबांनी आता समजवले आहे मुलांचा संबंध बाबांसोबत आहे, कारण पतित-पावन ज्ञानाचे सागर स्वर्गाचा वारसा देणारे शिवबाबाच आहेत. आठवण पण त्यांचीच करायची आहे. ब्रह्मा त्यांचे भाग्यशाली रथ आहेत. रथा द्वारे बाबा वारसा देतात. ब्रह्मा कडून वारसा मिळत नाही.ते तर घेणारे आहेत. तर मुलांना स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. जर समजा रथाला काही त्रास होते किंवा काही कारणा मुळे मुलांना मुरली मिळत नाही तर मुलांचे पूर्ण लक्ष शिव बाबांकडे जाते. ते तर कधी आजारी पडू शकत नाही. मुलांना एवढे ज्ञान तर मिळालेले आहे,ते सुद्धा समजाऊ शकतात. प्रदर्शनी मध्ये मुले किती समजवतात. ज्ञान तर मुलांमध्ये आहे ना. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये चित्राचे ज्ञान सामावलेले आहे. मुले कुठे अडकू शकत नाही. समजा टपालाचे येणे-जाणे बंद होते, संप झाला तर काय कराल? ज्ञान तर मुलांमध्ये आहे. समजवायचे आहे सतयुग होते, आता कलियुग जुनी दुनिया आहे. गीतामध्ये पण ऐकले जुन्या दुनियेत काही सार नाही, त्यामध्ये मन लावायचे नाही. नाहीतर सजा खावी लागेल. बाबांच्या आठवणीने सजा कमी होत जाईल. असे न होवो कि बाबांची आठवण विसरेल आणि सजा खावी लागेल, आणि जुन्या दुनियेमध्ये जात चालले जाल. असे तर खूप गेले, ज्यांना बाबा आठवणीत पण नाहीत. जुन्या दुनियेमध्ये मन लागले, दुनिया खूप खराब आहे. कुणासोबत मन लागले तर सजा खूप खावी लागेल. मुलांना ज्ञान सांगायचे आहे. भक्तीमार्गाची गीत सुद्धा ऐकायचे नाही. आता तर संगम युग आहे. ज्ञानसागर बाबा द्वारे तुम्हाला संगम युगामध्ये ज्ञान प्राप्त होते. दुनिया मध्ये हे कोणाला माहित नाही कि ज्ञानाचे सागर एकच आहेत. ते जेव्हा ज्ञान देतात त्यावेळेसच मनुष्यांची सद्गती होते. सद्गती दाता तर एकच आहेत मग त्यांच्या मतावर चालायचे आहे. माया कुणालाच सोडत नाही. देह अभिमान नंतरच काही न काही चुका होतात. काही काम वश होतात, कुणी क्रोधाच्या वश होतात. मनामध्ये वादळ तर खूप येतात- प्रेम करू, हे करू... कोणाच्या शरीरामध्ये मन लावायचे नाही. बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा, तर देहाचे भान निघून जाईल. नाहीतर बाबांच्या आज्ञेचे उल्लंघन होते. देह अहंकाराने नुकसान खुप होते, त्यामुळे देहा सहित सर्व काही विसरायचे आहे. फक्त बाबांना आणि घराला आठवण करायची आहे. आत्म्यांना बाबा सजवितात.आत्म्यांना बाबा समजवितात शरीरामध्ये राहून कार्य करताना माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. रस्ता तर खूप सहज सांगितलेला आहे. हे पण समजतात की तुमच्याकडून चुका होतात. परंतु असे होऊ नये कि, चुकांमध्येच अडकून राहाल. एकदा चूक झालेली परत तीच करायची नाही. स्वतःचे कान पकडले पाहिजे, परत ही चूक करणार नाही. पुरुषार्थ केला पाहिजे जर सारख्या सारख्या चुका होत असतील तर समजलं पाहिजे की, आपले खूप नुकसान होत आहे. चुका करता करता तर दुर्गतीला प्राप्त केले ना. किती मोठी शिडी उतरत आता काय बनले? पूर्वी तर हे ज्ञान नव्हते. आतां नंबरा नुसार सर्वजण या ज्ञानामध्ये प्रवीण झाले आहेत. जेवढे होईल तेवढे अंतर्मुखी सुद्धा राहायचे आहे. मुखाद्वारे काही बोलायची नाही. जे ज्ञानामध्ये प्रवीण मुले आहेत, ते कधीच जुन्या दुनियेमध्ये मन लावणार नाही. त्यांच्या बुद्धीमध्ये असेल आम्हाला तर रावण राज्याचा विनाश करायचा आहे. ही शरीर पण जुने, रावण संप्रदायाचे आहे. तर आम्ही रावण संप्रदायाची का आठवण करू? एका रामाची आठवण करायची आहे. खरे पिताव्रता बनायचे आहे.

बाबा म्हणतात मला आठवण करत राहा तर तुमचे विकर्म विनाश होतील. पिताव्रता किंवा ईश्वरव्रता बनले पाहिजे ना. भक्त ईश्वराला आठवण करतात, हे ईश्वरा येऊन आम्हाला सुख शांतीचा वारसा द्या. भक्तीमार्गात तर स्वतःला संपूर्ण स्वाहा करतात. येथे तर बळी चढण्याची गोष्ट नाही. येथे तर जिवंतपणी जुन्या दुनियेपासून मरतात म्हणजे बळी चढतात. हे आहेत जिवंतपणी बाबांचे होणे, कारण की त्यांच्याकडून वारसा घ्यायचा आहे. त्यांच्या मतावर चालायचे आहे. जिवंतपणी बळी चढणे, वारी जाने वास्तव मध्ये एकच गोष्ट आहे. भक्तिमार्ग मध्ये भक्त किती जीव घात करतात. येथे जीव घातची गोष्ट नाही. बाबा म्हणतात स्वतःला आत्म समजा,बाबांची आठवण करा. देह अभिमान मध्ये येऊ नका. उठता-बसता बाबांना आठवण करण्याचा पुरुषार्थ करा.१00% पास तर कोणी झाले नाही. वर-खाली तर होत राहतात. चुका होतात, त्यावर सावधानी नाही मिळाली, तर चुका कशा सुधारतील? माया कोणालाच सोडत नाही. असे म्हणतात बाबा आम्ही मायेपासून हरलो. पुरुषार्थ पण करतात मग माहीत नाही काय होते. आमच्याकडून एवढ्या मोठ्या चुका माहित नाही, कशा होतात. समजतात पण ब्राह्मण कुळामध्ये यामुळे आमचे नाव बदनाम होईल. तरीसुद्धा मायेचा असा वार होतो जे समजून येत नाही. देह अभिमान मध्ये आल्यामुळे बेसमज बनतात. बेसमजीचे कार्य होते, त्यामुळे बाबांची निंदा होते, वारसा पण कमी होतो. असे खूप चुका करतात. माया अशी जोरात चापट मारते, जे स्वतः तर हरतात आणि मग रागात येऊन दुसऱ्यांना चापट इत्यादी मारतात. नंतर पश्चाताप करतात. बाबा तर म्हणतात आता तर खूप कष्ट करावे लागतील. स्वतःचे पण नुकसान केले आणि दुसऱ्यांचे पण केले.किती तोटा झाला, राहूचे ग्रहण लागले. बाबा म्हणतात द्या दान तर सुटेल ग्रहण. राहु चे ग्रहण लागते तर उतरायला खूप वेळ लागतो. सिडी चढून परत उतरायला खूप वेळ लागतो. मनुष्यांना दारूची सवय होते तर सोडायला किती कष्ट लागतात. सर्वात मोठी चूक आहे- तोंड काळे करणे. सारखी सारखी देहाची आठवण येते. मुले वगैरे होतात तर त्यांची आठवण येते. ते मग दुसऱ्यांना ज्ञान काय देतील. त्यांचे कोणी ऐकणार पण नाही. आता आपण तर सर्वांना विसरून एका बाबांची आठवण करत आहोत. यामध्ये खूप काळजी घेतली जाते. माया खूप प्रबळ आहे. संपूर्ण दिवस शिव बाबांची आठवण करण्याचा प्रयत्न करायचा. आता नाटक पूर्ण होत आहे, आपल्याला जायचे आहे. हे शरीर पण नष्ट होणार आहे.जेवढी बाबांची आठवण कराल तेवढे देह अभिमान विसरत झाल, दुसऱ्या कोणाची आठवण येणार नाही. किती मोठे लक्ष आहे, एका बाबां शिवाय दुसऱ्या कोणामध्ये मन लावायचे नाही. नाहीतर त्यांची आठवण येईल. खूप मोठे ध्येय आहे. बोलणे खूप सोपे आहे परंतु लाखांमध्ये एक माळेचा मणी निघतो. कुणी शिष्यवृत्ती पण घेतात. जे चांगले कष्ट घेतील, तर जरुर शिष्यवृत्ती मिळेल. साक्षी होऊन पाहिचे आहे मी कशी सेवा करतो? खूप मुलांची इच्छा असते की नोकरी सोडून ही सेवा करावी. परंतु बाबा परिस्थिती पण पाहतात. एकटा आहे, कुणी नातेवाईक नाही तर मग काही हरकत नाही. तरीसुद्धा बाबा म्हणतात नोकरी करा आणि ही सेवा पण करा. नोकरीमध्ये पण खुप जणांसोबत ओळख होईल, तुम्हा मुलांना ज्ञान तर खूप मिळालेले आहे. मुलं द्वारे पण बाबा खुप सेवा करत राहतात. कोणामध्ये प्रवेश करून सेवा करतात. सेवा तर करायची आहे. ज्यांच्यावर जवाबदारी आहे त्यांना झोप कशी येईल. शिवबाबा तर आहेच जागती ज्योत. बाबत तर म्हणतात मी दिवस-रात्र सेवा करतो, कधी थकत नाही., शरीर साथ देत नाही मग आत्म तर काय करेल? बाबा तर जागती ज्योत आहेत, संपूर्ण दुनियेला जागृत करतात. त्यांची भूमिका पण आश्चर्यकारक आहे. ज्यांना तुम्हा मुलांमध्ये सुद्धा खूप थोडे ओळखतात. बाबा महाकाळ आहेत. त्यांची आज्ञा जर ऐकणार नाही तर धर्मराज द्वारे दंड मिळेल. बाबांची प्रथम अज्ञान आहे की कोणाकडून सेवा घ्यायची नाही. परंतु देह अभिमाना मध्ये येऊन बाबांच्या आज्ञेचे उल्लंघन करतात. बाबा म्हणतात तुम्ही स्वतः सेवक आहात. येथे सुख घेतले तर तिथे कमी होईल. सवय लागते तर नोकरां शिवाय राहू शकत नाही. कोणी तर म्हणतात आम्ही स्वतंत्र राहू, परंतु बाबा म्हणतात बाबांचे सोबत राहणे चांगले. स्वतंत्र राहिल्याने मायाच्या अधीन होतील. तुम्हा सर्वांची जबाबदारी शिव बाबां वर आहे. संपूर्ण दुनिया परतंत्र होते त्यावेळेस म्हणतात हे पतित-पावन या. त्यांच्याकडूनच सुख शांती मिळते परंतु कोणी समजत नाही. ही भक्तिमार्गाची भूमिका सुद्धा पूर्ण करायचे आहे. जेव्हा रात्र पूर्ण होते तेव्हा शिव बाबा येतात. एका मिनिटाचा सुद्धा फरक पडू शकत नाही. बाबा म्हणतात ह्या नाटकाचे संपूर्ण ज्ञान माझ्यामध्ये आहे. नाटकाच्या आदी मध्य अंतला कोणी जाणत नाही. सतयुगापासुन हे ज्ञान प्रायःलोप होते. आता तुम्ही रचयिता आणि रचनाच्या आदि मध्य अंतला जाणता. याला ज्ञान म्हणले जाते,बाकी सर्व भक्ती आहे. बाबांना ज्ञानाचे सागर म्हणतात. आम्हाला ते ज्ञान मिळत आहे. मुलांना नशा पण खूप चांगला पाहिजे. परंतु हे समजतात राजधानी स्थापन होत आहे. कोणी तर प्रजा मध्ये पण साधारण नोकर-चाकर बनतात. थोडे सुद्धा ज्ञान समजत नाही. आश्चर्य आहे ना. ज्ञान तर खूप सोपे आहे. ८४ जन्माचे चक्र आता पूर्ण झाले आहे. आता घरी जायचे आहे. आपण नाटकाचे मुख्य अभिनेते आहोत. पूर्ण नाटकामध्ये मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री आपण आहोत. किती सोपे आहे. परंतु नशिबात नाही तर पुरुषार्थ काय करतील. शिक्षणामध्ये असे होते. कोणी नापास पण होतात, किती मोठे विद्यालय आहे. राजधानी स्थापन होत आहे. आता जेवढे जे शिकतील. मुले जाणू शकतात आम्ही कोणते पद प्राप्त करू? खूप आहेत, सर्वजण तर वारस नाही बनणार. पवित्र बनणे खूप अवघड आहे. बाबा किती सहज शिकवतात, आता नाटक पूर्ण होत आहे. बाबांच्या आठवणीने सतोप्रधान बनून सतो प्रधान दुनियेचे मालक बनायचे आहे. जितके शक्य असेल तितके आठवणीमध्ये राहायचे आहे. परंतु नशिबात नसेल तर दुसऱ्यांची आठवण करत राहतील. दुसऱ्या मध्ये मन लागल्याने खूप दुःखी पण होतात. बाबा म्हणतात या जुन्या दुनियेमध्ये मन लावायचे नाही. ही नष्ट होणार आहे. हे कोणाला माहित नाही. ते समजतात कलियुग अजून खूप वर्ष आहे. घोर अंधकाराच्या निद्रे मध्ये झोपलेले आहेत. तुमची ही प्रदर्शनी विहंग मार्गाच्या सेवेचे साधन आहे. कोणी राजाराणी पण येतील. खूप आहेत ज्यांना सेवेची आवड आहे. कोणी गरीब, कोणी सावकार आहे. दुसऱ्यांना स्वतः सारखे बनवतात तर त्यांचा पण फायदा आहे. सर्वांना ज्ञान सांगायचे आहे. फक्त हे सांगायचे आहे बाबा आणि सतयुगाला आठवण करा. विनाश समोर उभा आहे. जेव्हा विनाशाची वेळ पाहतील त्यावेळेस तुमच्या गोष्टी ऐकतील. तुमची सेवा पण वाढत जाईल. समजतील बरोबर आहे. तुम्ही तर सांगत राहता विनाश होणार आहे.

तुमची प्रदर्शनी, मेळे सेवा वृद्धीला प्राप्त होतील, प्रयत्न करायचा आहे कोणते चांगले कार्यालय मिळेल, पैसे खर्च करण्यासाठी तर आम्ही तयार आहोत. बोला तुम्ही घर दिले तर तुमचे नाव होईल. असे खूप कार्यालय रिकामे आहेत. प्रयत्न केल्याने तीन पाऊल पृथ्वीचे मिळतील. तोपर्यंत तुम्ही लहान-लहान प्रदर्शनी ठेवा. शिवरात्री पण तुम्ही साजरी कराल तर सर्वांना कळेल. तुम्ही लिहिता की शिवजयंतीच्या सुट्टीचा दिवस ठरवा, वास्तवामध्ये जन्मदिवस तर एकाचाच साजरा केला पाहिजे. तेच पतित पावन आहेत.खरा स्टॅम्प सुद्धा वास्तवामध्ये या त्रिमूर्तीचा आहे. सत्यमेव जयते... ही वेळ विजय प्राप्त करण्याची आहे. समजवणारे पण पाहिजेत. सर्व सेवा केंद्राचे मुख्य आहेत, त्यांनी लक्ष दिले पाहिजे. आपला स्टॅम्प काढू शकता. ही त्रिमूर्ती शिवजयंती आहे. फक्त शिवजयंती म्हणल्याने समजणार नाहीत. आता सेवा तर मुलांनाच करायची आहे. खूप जणांचे कल्याण केल्याने फायदा होतो, सेवेमुळे खूप फायदा होतो. प्रदर्शनीने खुप सेवा होऊ शकते. प्रजा तर बनेल. बाबा पाहतात सेवेवर कोणत्या मुलांचे लक्ष आहे. तेच बाबांचे मन जिंकतील. अच्छा

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात, आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. जर एखादी कोणती चूक झाली तर कान पकडायचा आहे, परत ती चूक होऊ नये. कधीही देह अहंकार मध्ये यायचे नाही. ज्ञानामध्ये प्रवीण बणुन अंतर्मुखी राहायचे आहे.

2. खरा पिताव्रता बनायचे आहे, बळी चढायचे आहे. कोणाशीही मन लावायचे नाही. बेसमझचे कोणतेही कार्य करायचे नाही.

वरदान:-
विशाल बुद्धी, विशाल हृदयाने आपल्या पणाची अनुभूती करविणारे मास्टर रचयिता भव.

मास्टर रचयिताची पहिली रचना हा देह आहे. चे या देहाच्या मालिक पणा मध्ये संपूर्ण विजय मिळवितात, ते आपल्या स्नेह आणि संपर्कद्वारे सर्वांना आपलेपणाचा अनुभव करवितात. त्या आत्म्याच्या संपर्काने सुखाची, दातापणाची, शांती प्रेम, आनंद, सहयोग हिम्मत उत्साह उमंग कोणत्या न कोणत्या विशेषताची अनुभूती होते. त्यांनाच विशाल बुद्धी विशाल हृदयाचे म्हणले जाते.

बोधवाक्य:-
उमंग उत्साहाच्या पंखा द्वारे नेहमी उडत्या कलेचा अनुभव करत रहा.


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष अभ्यास
कोणतेही कार्य करा, बोल बोला, किंवा संकल्प करा, त्यापूर्वी तपासा की हे ब्रम्हा बाबांसारखे आहे का! ब्रह्मा बाबांची विशेषता,हीच राहिली जो विचार केला तो प्रत्यक्षात कार्यामध्ये आणला. जे बोलले ते केले. असे अनुकरण करा. आपल्या स्वमानाच्या स्मृतीने, बाबांच्या सोबतीच्या शक्तीने, दृढता आणि निश्चयाच्या शक्तीने, श्रेष्ठ पदावर राहून विरोधाला समाप्त करा. तर अव्यक्त स्थिती सहज बनेल.