10-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, मुख्य दोन गोष्टी सर्वांना समजावयाच्या आहेत,एक तर बाबांची आठवण करा,
दुसरे ८४ च्या चक्राला जाणून घ्या,परत सर्व प्रश्न समाप्त होतील.
प्रश्न:-
बाबांची महिमा
मध्ये कोणते शब्द येतात,ते श्रीकृष्णाच्या महिमा मध्ये येत नाहीत?
उत्तर:-
वृक्षपती एक बाबाच आहेत, श्रीकृष्णाला वृक्ष पती म्हणणार नाहीत. पित्यांचे पिता
किंवा पतींचे-पती,एका निराकारलाच म्हटले जाते, श्रीकृष्णाला नाही. दोघांची महिमा
वेगवेगळी स्पष्ट करा. प्रश्न:-तुम्हा मुलांना गावा गावांमध्ये कोणती दवंडी द्यायची
आहे?
उत्तर:-
गावा
गावांमध्ये दवंडी द्या की, मनुष्य पासून देवता कसे बनू शकतो? येऊन समजून घ्या.
स्थापना विनाश कसा होतो हे समजून घ्या.
गित:-
तुम्हीच माता,
पिता तुम्हीच आहात…...
ओम शांती।
या गीतामध्ये ज्या दोन ओळी आहेत,तुम्हीच नाव, तुम्हीच नावाडी हे चुकीचे आहे.तुम्हीच
पूज्य आणि तुम्हीच पुजारी म्हणतात, हे पण तसेच होते. ज्ञानाची स्पष्टता
ज्यांच्यामध्ये आहे,ते लगेच गित बंद करतील कारण बाबांचा अपमान होतो.आता तुम्हा
मुलांना हे ज्ञान मिळाले आहे, दुसऱ्या मनुष्यांना हे ज्ञान नाही, तुम्हाला पण हे
ज्ञान आत्ताच मिळते,परत कधी मिळू शकत नाही. गीतेच्या भगवंताचे ज्ञान पुरुषोत्तम
बनण्यासाठी मिळते, इतके समजतात परंतु कधी मिळते, कसे मिळते? हे विसरून गेले
आहेत.गिता ग्रंथ, धर्मस्थापने साठी आहे,बाकी दुसरा कोणता ग्रंथ़ होऊ शकत नाही.
त्यांना शिरोमणी म्हणणार नाही.ग्रंथ अक्षर पण भारता मध्येच उपयोगात आणतात. सर्व
शास्त्रमई शिरोमणी गीताच आहे, बाकी सर्व धर्म नंतर येणारे आहेत, त्यांना शिरोमणी
म्हणनार नाही.मुलं जाणतात,वृक्षपती एक बाबाच आहेत.ते आपले पिता आहेत,पती पण आहेत,तर
सर्वांचे पिता पण आहेत.त्यांना पतींचे पती, पित्यांचे पिता म्हटले जाते.ही महिमा एका
निराकारची केली जाते. कृष्ण आणि निराकार बाबांच्या महिमाची तुलना केली
जाते.श्रीकृष्ण तर नवीन दुनिये चे राजकुमार आहेत.ते परत जुन्या दुनियेच्या संगमयुगा
मध्ये राजयोग कसे शिकवतील. आता मुलं समजत आहेत,आम्हाला स्वयं भगवान शिकवत
आहेत.तुम्ही शिकून देवी देवता बनतात.परत हे ज्ञान चालत येत नाही,प्रायलोप होते. बाकी
पिठा मध्ये मीठा ऐवढे सत्य चित्र राहते.वास्तव मध्ये कोणते चित्र यथार्थ नाही.प्रथम
बाबांचा परिचय मिळेल,तर तुम्ही म्हणणार,स्वयंम भगवान समजवत आहेत.ते तर स्वतः
सांगतील,तुम्ही प्रश्न काय विचारणार? प्रथम पित्याला जाणून घ्या. बाबा म्हणतात माझी
आठवण करा, बस दोन गोष्टी आठवणीत ठेवा.बाबा म्हणतात माझी आठवण करा आणि 84 चक्राची
आठवण करा,बस या दोन गोष्टी समजावयच्या आहेत.बाबा म्हणतात,तुम्ही आपल्या जन्माला
जाणत नाहीत.ब्राह्मण मुलांनाच म्हणतात,दुसरे तर कोणी समजू शकत नाहीत.प्रदर्शनी मध्ये
पहा खूप गर्दी होते,इतके मनुष्य जातात जर काही पाहण्याची गोष्ट असेल, असे समजतात आणि
प्रदर्शनी पाहण्यासाठी येतात.एका एकाला समजवण्या साठी थकून जातात, तेव्हा काय करायला
पाहिजे? प्रदर्शनी महिना भर चालत राहिली पाहिजे,तर तुम्ही म्हणू शकता उद्या किंवा
परवा या. ते पण ज्यांची इच्छा आहे,मनुष्या पासून देवता बनायची त्यांनाच समजावयाचे
आहे. एकच लक्ष्मी नारायणाचे चित्र किंवा बैज दाखवायला पाहिजे.बाकी असेच म्हणले,हा
स्वर्ग आहे,हा नर्क आहे,या द्वारे मनुष्य काय समजतील.वेळ वाया जातो.ओळखू पण शकत
नाहीत,हे मोठे मनुष्य आहेत,की सावकार आहेत किंवा गरीब आहेत? आज काल कपडे असे
घालतात,जे कोणी समजू पण शकत नाहीत. प्रथम तर बाबांचा परीचय द्यायचा आहे.बाबा
स्वर्गाची स्थापन करणारे आहेत.आता देवी देवता बनायचे आहे. मुख्य लक्ष्य समोर
आहे.बाबा म्हणतात,मी उच्च ते उच्च आहे,माझी आठवण करा,हा वशीकरण मंत्र आहे.बाबांची
आठवण करा,तर तुमचे विर्कम विनाश होतील आणि विष्णू पुरी मध्ये याल,इतके तर जरुर
समजावयाचे आहे. आठ-दहा दिवस रोज प्रदर्शनी ठेवायला पाहिजे.तुम्ही गावांमध्ये दवंडी
देऊ शकता की मनुष्या पासुन देवता कसे बनू शकता? येऊन समजून घ्या.स्थापणा,
विनाश,पालना कशी होते,हे समजून घ्या.युक्ती तर खूप आहेत.
तुम्ही मुलं जाणता, सतयुग आणि कलियुगा मध्ये रात्रंदिवसा चा फरक आहे. ब्रह्माचा
दिवस, ब्रह्माची रात्र म्हटले जाते. ब्रह्माचा दिवस म्हणजेच विष्णूचा आणि विष्णूचा
म्हणजेच ब्रह्माचा. गोष्ट एकच आहे. ब्रह्माचे ८४ जन्म, विष्णूचे पण ८४ जन्म.फक्त या
संगम युगाच्या जन्माचा फरक पडतो.या गोष्टी बुद्धीमध्ये धारण करायला पाहिजेत. धारणा
होणार नाही तर कोणालाही समजू शकणार नाही.हे समजुन सांगणे तर खूपच सहज आहे.फक्त
लक्ष्मी नारायणच्या चित्राच्या पुढे या गोष्टी समजून सांगा. बाबा द्वारे हे पद
मिळवायचे आहे आणि नरकाचा विनाश पण समोर उभा आहे.ते लोक तर आपलेच मनुष्य मत ऐकवतील.
येथे ईश्वरी मत आहे.जे आम्हाला ईश्वराकडून मिळत आहे.निराकार आत्म्याला,निराकार
परमात्माची मत मिळत आहे.बाकी सर्व मानव मत आहे. रात्रं दिवसाचा फरक आहे.सन्याशी,
उदासी इत्यादी कोणी पण हे मत देऊ शकत नाहीत.ईश्वरीय मत एकाच वेळेत मिळते.जेव्हा
ईश्वर येतात,तर त्यांच्या मता मुळे आम्ही देवी-देवता बनतो.ते येतातच देवी देवता
धर्माची स्थापना करण्यासाठी. ज्ञानाच्या गोष्टी धारण करायला पाहिजेत,ज्या वेळेवर
कामांमध्ये येतील.मुख्य गोष्टी थोड्या मध्ये समजा वयाच्या आहेत. लक्ष्मी नारायणच्या
चित्र वरती समजवणे पण पुष्कळ आहे.हेच मुख्य लक्षाचे चित्र आहे. भगवंतानी या नवीन
दुनियेची स्थापना केली आहे.भगवंतानीच पुरुषोत्तम संगम युगावरती यांना शिकवले होते.या
पुरुषोत्तम संगम युगाची कुणालाच माहिती नाही.तर या सर्व गोष्टी ऐकून मुलांना खूप
खुशी व्हायला पाहिजे.ऐकून परत ऐकवण्या मध्ये जास्त खुशी होते. सेवा करणाऱ्यांनाच
ब्राह्मण म्हणू शकतो.तुमच्या बगल मध्ये खरी गिता आहे. ब्राह्मणा मध्ये पण नंबरा
नुसार आहेत ना.काही ब्राह्मण खूप प्रसिद्ध असतात, खूप कमाई करतात. काहींना तर
खाण्यासाठी पण मुश्कील मिळते. कोणी ब्राह्मण लखोपती असतात, खूप खुशीने नशेने
म्हणतात,आम्ही ब्राह्मण कुळाचे आहोत. खऱ्या खुऱ्या ब्राह्मण कुळाची तर माहितीच नाही.
ब्राह्मण उत्तम मानले जातात,तेव्हा तर ब्राह्मणांना खाऊ घालतात.
क्षत्रिय, वैश्य, शूद्र धर्माच्या लोकांना कधी खाऊ घालणार नाहीत. ब्राह्मणांना च
खाऊ घालतात म्हणून बाबा म्हणतात,ब्राह्मणांना चांगल्या प्रकारे समजून सांगा.
ब्राह्मणांचे संघटन पण असते, तिथे जाऊन समजून सांगायचे आहे.ब्राह्मण प्रजापिता
ब्रह्माची संतान असायला पाहिजेत. आम्ही त्यांची मुल आहोत. ब्रह्मा कोणाचा मुलगा
आहे,हे पण समजून सांगायचे आहे.तपासायचे आहे की, कुठे कुठे त्यांचे संघटन असतात.
तुम्ही अनेकांचे कल्याण करू शकतात. वानप्रस्थ स्त्रियांच्या पण सभा असतात.बाबांना
कोणी समाचार थोडेच देतात,कुठे कुठे जाऊन सेवा केली. सर्व जंगल बनलेले आहे.तुम्ही
कुठेही जाऊन शिकार करून येऊ शकतात.प्रजा बणवुन यायचे आहे.राजा पण बनवू शकतात.सेवा
तर खूप आहे. संध्याकाळी पाच वाजता सुट्टी होते, यादीमध्ये नोंद करायला पाहिजे,आज
कुठे कुठे जायचे आहे.बाबा युक्ती तर खुप सांगतात.बाबा मुलांशी च गोष्टी करतात.हा
पक्का निश्चय पाहिजे ,मी आत्मा आहे.बाबा आम्हाला ऐकवतात,धारणा पण करायची आहे.जसे
ग्रंथाचा अभ्यास करतात,तर परत संस्कार घेऊन जातात,तर दुसऱ्या जन्मा मध्ये पण तसेच
संस्कार चालत येतात.असे म्हटले जाते, संस्कार घेऊन आले आहेत.जे खूप ग्रंथ वाचतात
त्यांना अधिकारी म्हटले जाते. ते स्वतःला सर्वशक्तिमान अधिकारी समजत नाहीत. हा खेळ
आहे, जो बाबाच समजवतात,नवीन कोणतीच गोष्ट नाही.हे अविनाशी नाटक बनलेले आहे,जे समजून
घ्यायचे आहे. मनुष्य तर, हे समजत नाहीत की,ही जुनी दुनिया आहे.बाबा म्हणतात मी आलो
आहे,महाभारत लढाई समोर उभी आहे. मनुष्य अज्ञान अंधारा मध्ये झोपले आहेत.भक्तीला
अज्ञान म्हटले जाते. ज्ञानाचे सागर तर फक्त बाबाचं आहेत. जे खूप भक्ती करतात ते
भक्तीचे सागर आहेत. भक्त माळ पण आहे ना. भक्त माळेतील नावे एकत्र करायला
पाहिजेत.भक्त माळ द्वापार पासून कलियुगा पर्यंतच असेल. मुलांना खूप खुश राहायला
पाहिजे. खुशी त्यांनाच होईल जे सर्व दिवस सेवा करत राहतात.
बाबांनी समजवले आहे,माळ तर खूपच मोठी असते, हजारोच्या संख्यामध्ये आहे. ज्याला कोणी
कुठून, कोणी कोठून ओढत राहतात. काही तरी असेल ना एवढी मोठी माळ बनवली आहे.मुखाद्वारे
राम राम म्हणतात,विचारावा लागेल कुणाला राम राम म्हणून आठवण करतात. तुम्ही कुठे पण
सत्संग मध्ये जाऊन मिक्स होऊन बसू शकतात.हनुमान चे उदाहरण आहे,जेथे सत्संग होत होता,
तेथे बुटा मध्ये जाऊन बसत होते. तुम्हाला पण संधी घ्यायला पाहिजे. तुम्ही खूप सेवा
करू शकता.सेवेमध्ये सफलता तेव्हाच होईल, जेव्हा ज्ञानाचे मुद्दे बुध्दी मध्ये
असतील,ज्ञाना मध्ये मस्त असतील. सेवेच्या अनेक युक्त्या आहेत. रामायण भागवत इत्यादी
अनेक गोष्टी आहेत,ज्याच्यावर तुम्ही दृष्टी देऊन समजावू शकता. फक्त अंधश्रद्धा मध्ये
थोडेच सतसंग करायचा आहे. आम्ही आपले कल्याण करू इच्छितो.ती भक्ती तर खूपच वेगळी आहे,
हे ज्ञान वेगळे आहे. ज्ञान एक ज्ञानेश्वर पिताच देतात. सेवा तर खूप आहे, फक्त हे
सांगण्याची आवश्कता आहे की उच्च ते उच्च कोण आहेत?उच्च ते उच्च भगवानच आहेत.वारसा
तर त्यांच्या कडुनच मिळतो. बाकी सर्व रचना आहे.मुलांना सेवेची आवड पाहिजे. तुम्हाला
राजाई करायची आहे,तर प्रजा पण बनवायची आहे.हा महामंत्र कमी थोडाच आहे. बाबांची आठवण
करा तर अंत मती सो गती होऊन जाईल. अच्छा.
गोड गोड, फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादां ची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१)बाबांनी
वशीकरण मंत्र दिला आहे, तो सर्वांना आठवण करून घ्यायचा आहे. सेवेच्या वेगवेगळ्या
युक्ती शोधायच्या आहेत.गर्दीमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही.
(२) ज्ञानाचे मुद्दे बुध्दी मध्ये ठेऊन ज्ञानामध्ये मस्त राहायचे आहे. हनुमाना सारखे
सत्संगामध्ये जाऊन बसायचे आहे आणि परत त्यांची सेवा करायची आहे. खुशी मध्ये
राहण्यासाठी सर्व दिवस भर सेवा करायची आहे.
वरदान:-
श्रेष्ठ
संकल्पाच्या सहयोगा द्वारे, सर्वांमध्ये शक्ती भरणारे शक्तिशाली आत्मा भव.
नेहमीच शक्तिशाली भवचे
वरदान प्राप्त करून,सर्व आत्म्या मध्ये श्रेष्ठ संकल्पाचे बळ भरण्याची सेवा करा. जसे
आज-काल सूर्याची शक्ती जमा करून अनेक अनेक कार्य सफल करतात,असेच तुम्ही श्रेष्ठ
संकल्पाची शक्ती इतकी जमा करा,ज्यामुळे दुसऱ्यांच्या विचारांमध्ये बळ येईल. हे
संकल्प इंजेक्शनचे काम करेल. यामुळे वृत्ती मध्ये शक्ती येईल.तर आत्ता श्रेष्ठ भावना
किंवा संकल्प द्वारे परिवर्तन करणे या सेवेची आवश्यकता आहे.
बोधवाक्य:-
मास्टर
दुखहर्ता बणुन दुख:ला पण आत्मिक सुखामध्ये परिवर्तन करणे,हेच आपले श्रेष्ठ कर्तव्य
आहे.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
आम्ही
ब्राह्मण सो फरिशता आहोत,ही एकत्रित रुपाची अनुभती विश्वाच्या पुढे
साक्षात्कारमुर्त बनेल.ब्राह्मण सो फरिश्ता या स्म्रुती द्वारे चालता फिरता,स्वतःला
व्यक्त शरीर, व्यक्त देशामध्ये,अभिनय करत ब्रह्मा बाबांचे सोबती,अव्यक्त वतनचे
फरिश्ते, अव्यक्त रूप धारी अनुभव कराल.