12-01-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
11.04.1985 ओम शान्ति
मधुबन
“ उदारता हीच आधार
स्वरुप संघटनेची विशेषता आहे ”
आज विशेष विश्व
परिवर्तनाचे आधार स्वरुप, विश्वाच्या बेहद सेवेचे आधार स्वरुप, श्रेष्ठ स्मृती,
बेहदची वृत्ती, मधुर आणि अमुल्य वचनांच्या आधारे इतरांना ही असेच उमंग-उत्साह
देण्याचे आधार स्वरुप आणि निर्मााण स्वरुप अशा विशेष आत्म्यांना भेटण्यासाठी आलेले
आहेत. प्रत्येक जण स्वत:ला असे आधार स्वरुप अनुभव करता का? आधार रुप आत्म्यांच्या
या संघटनेवर इतकी बेहदची जबाबदारी आहे. आधार रुप अर्थात सदैव स्वत:ला प्रत्येक क्षणी,
प्रत्येक संकल्पात आणि प्रत्येक कर्मांमध्ये जबाबदार समजून चालणारे, या संघटनेत येणे
म्हणजेच बेहद जबाबदारीचे मुकुटधारी बनणे, हे संघटन ज्याला मीटींग म्हणता, मीटींग
मध्ये येणे अर्थात बाबा, सेवा आणि परिवारांशी स्नेहाच्या श्रेष्ठ संकल्पांच्या
धाग्यात स्वत: आणि इतरांना ही बांधण्याचे आधार रुप बनणे होय, या निमित्त
आत्म्यांच्या संघटनेत येणे म्हणजे स्वत्:ला इतरांसाठी आदर्शमुर्त बनवणे होय, ही
केवळ मीटींग नाहीये, तर सदैव मर्यादा पुरुषोत्तम बनण्याच्या शुभ संकल्पाच्या बंधनात
स्वत्:ला बांधणे आहे. यासर्व गोष्टीचे आधार स्वरुप बनणे यालाच आधार स्वरुप संघटन
म्हटले जाते. चार ही बाजूंचे विशेष निवडक रत्न एकत्र्ति झाले आहेत. निवडक अर्थात
बाबांच्या समान बनलेले, सेवेचे आधार स्वरुप बनणे म्हणजेच स्वत:चा आणि इतरांचा ही
उध्दार कर्ता बनणे होय. या दोन्ही गोष्टींमध्ये सफलता मिळविण्यासाठी तिसरी कुठली
गोष्ट पाहिजे? आधार रुप आहात म्हणून तर निमंत्र्णावरुन आले आहात आणि उध्दार रुप
आहात म्हणूनच नियोजन केले आहे. उध्दार करणे म्हणजे सेवा करणे तिसरी गोष्ट काय पाहिली?
जितके विशेष संघटनेचे आहात. तितकेचे उदारचित्त. उदार अंतकरणाचे बोल आणि भावना कितपत
आहेत? कारण उदारचित्त अर्थात सदैव प्रत्येक कार्यामध्ये विशाल अंत:करण आणि मोठ्या
मनाचे कोणत्या बाबतीत विशाल अंत:करण वा मोठे मन? तर सर्वांप्रती शुभ भावनेच्या
द्वारे प्रोत्साहन देऊन पुढे नेण्यात मोठे मनाचे, तुझे ते माझे, आणि माझे ते तुझे
कारण सर्व एकाच बाबांचे आहेत. या बेहदच्या वृत्तीमध्ये विशाल अंत:करण, मोठे मन.
उदार अंत:करण अर्थात दातृत्वाची भावनेने भरलेले मन असावे. आपणास शिवबाबांकडून
प्राप्त झालेले गुण, शक्ती आणि विशेषता वाटण्यात विशाल अंत:करणाने महादानी बना.
मुखाद्वारे ज्ञान धनाचे दान करणे, ही काही फार मोठी गोष्ट नाही, परंतू गुणांचे दान
करणे वा गुण देण्यामध्ये सहयोगी बनायचे आहे. हा दान शब्द ब्राह्मणांसाठी योग्य नाही.
आपल्या गुणांद्वारे इतरांना गुणवान बनवणे, इतरांमध्ये विशेषता भरण्यामध्ये सहयोगी
बनणे, याला महादानी आणि विशाल अंत: करणाचे म्हटले जाते, अशाप्रकारे उदाराचित्त,
उदारमनाचे बनणे. हे आहे ब्रह्मा बाबांचे अनुकरण करणे, अशा उदारचित्त आत्म्यांची
लक्ष्णे काय असतील?
तीन निशाणी विशेष असतील, अशी आत्मा ईर्ष्या, घृणा आणि टिका करणे, दोष काढणे या तीन
बाबीपासून सदैव मुक्त असेल. याला म्हटले जाते उदारचित्त, इतरांप्रती असलेली ईर्ष्या,
स्वत:ला हैराण, अस्वस्थ करते आणि इतरांनाही हैराण करते. जसे क्रोधाला अग्नी म्हटले
जाते. तसेच ईर्ष्या ही अग्नी सारखेच काम करते. क्रोध महा अग्नी आहे. ईर्ष्या छोटी
अग्नी आहे. घृणाभाव कधीच शुभचिंतक, शुभचिंतन स्थितीचा अनुभव करु देणार नाही. घृणा
करणे म्हणजे स्वत:चे आणि दुसऱ्यांचे ही पतन करण्यासारखे आहे. असेच कुणावर ही हसता
हसता किंवा गंभीर पणाने टिका करणे, त्यांचे दोष काढणे म्हणजे अशी दु:ख दायक गोष्ट
आहे, जसे कुणीतरी चालत. आहे आणि आपण धक्का देवून पाडतोय किंवा त्याला जाणीवपूर्वक
ठेच लागेल असे करणे होय, जर कुणी चालता-चालता पाडले तर लहान वा मोठी जखम झाली तर ती
व्यक्ती काही काळा करिता का होईना हिम्मत हारते. त्या वेदनेचाच विचार करत राहिल, जो
पर्यंत ती वेदना वा जखम असेल तो पर्यंत त्यासाठी निमित्त वा कारण ठरलेली व्यक्ती
त्याला सतत आठवत राहते आणि ही साधारण गोष्ट नाही. कुणावर ही टिका करणे किंवा काहीतरी
त्याला म्हणणे ही खुप सोपी गोष्ट आहे. परंतू हसता-हसता कुणाला दुखावणे हे दु:खदायी
बनत असते, हे पण दु:ख देण्याच्या लिस्टमध्ये येते. तर समजले! जितके आधार स्वरुप
आहात तितकेच उध्दारकर्ता, उदार अंत:करण आणि उदारचित्त बनण्याचे निमित्त स्वरुप आहात,
लक्षणे समजून घेतली ना! जो उदारचित्त असतो त्यांचे अंत:करण विशाल असते. संघटन तर
खूप चांगले आहे. सर्व नामवंत आलेले आहेत, नियोजन पण खुप छान-छान बनवले आहेत. नियोजन
प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी निमित्त बनलेले आहात. जितके नियोजन चांगले बनवले आहेत,
तितकेच तुम्ही स्वत:ही चांगले आहात. बाबांना पण आवडतात. सेवेप्रतिची लगन वा भावना
खूप चांगली आहे. सेवेमध्ये सदैव सफलता प्राप्त करण्यासाठी उदारता ही खूप महत्तवाची
आहे, सर्वांचे ध्येय, शुभसंकल्प खूप चांगले आणि एकच आहेत. फक्त एका शब्दांची भर
घालायची आहे. एका बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे. सर्वांनी एक बनून एकालाच प्रत्यक्ष
करायचे आहे. फक्त एवढीच भर घालायची आहे. एका ईश्वराचा परिचय देण्यासाठी अज्ञानी लोक
ही एकाच बोटाने अंगुली निर्देश करतील, दोन बोटे नाही दाखवत सहयोगी बनण्याची निशाणी
ही एक बोट दाखवतात. तुम्ही विशेष आत्म्यांची ही विशेषतेची निशाणी परंपरेने चालत
आलेली आहे. तर ही सुवर्णजयंती साजरी करणेसाठी वा नियोजन बनवणेसाठी नेहमी दोन गोष्टी
लक्षात ठेवा. एकता आणि एकाग्रता या गोष्टी कोणत्याही कार्याच्या सफलतेसाठीच्या दोन
श्रेष्ठ भुजा आहेत. एकाग्रता म्हणजे नेहमी निस्वार्थ संकल्प, निर्विकल्प स्थिती.
जिथे एकता आणि एकाग्रता आहे, तिथे यश तुमच्या गळ्यात वरमाला घालीन. सुवर्णजयंती चे
कार्याविशेष या दोन भुजांनी करा, दोन भुजा तर सर्वांना आहेतच. या दोन भुजा आणखी लावा
तर चतुर्भुज व्हाल, सत्यनारायण आणि महालक्ष्मीला चार भुजा दाखवल्या आहेत. तुम्ही
सर्व सत्यनारायण, महालक्ष्मी आहात. साक्षात्कार स्वरुप बनण्यासाठी चतुर्भुजधारी
बनून प्रत्येक कार्य करा. फक्त दोन भुजानीन काम करु नका. चार भुजांनी करा. आता
सुवर्ण जयंती महोत्सवाचा श्री गणेशा केला आहे ना! गणेशालाही 4 भुजा दाखवतात. बापदादा
रोज मीटींगमध्ये येतात. एका फेरीमध्येच सर्व समाचार माहित होतो, बापदादा सर्वांचे
चित्र् पाहून जातात, कोण कसे-कसे बसलेले आहेत. बाबा शरीराची स्थिती पाहात नाहीत तर
मनाच्या स्थितीच्या आसनांचा फोटो काढतात. मुखाने कुणी काहीही बोलत असला तरी मनाने
काय बोलत आहेत ते बोलणे टेप करतात. बापदादा कडेही सर्वांच्या टेप केलेल्या कॅसेट्स
आणि चित्र् दोन्हीही आहेत. विडीओ, टी.व्ही. जे पाहिजे ते आहे. तुमच्याजवळ तुमच्या
कॅसेट आहेत ना! परंतू काही काही जणांना आपल्याच मनाचा आवाज, संकलपाचा आवाज पोहोचत
नाही, अच्छा!
युवकांचे नियोजन सर्वांना आवडले आहे. ही पण उमंग उत्साहाची बाब आहे. आग्रह नाही.
मनापासून आलेला उमंग हा आपोआप इतरांच्या ही मनात उमंग उत्साहाचे वातावरण निर्माण
करतो. ही केवळ पदयात्रा नाही, तर उमंग यात्रा आहे. ही तर निमित्त मात्र् आहे. जे
काही कार्य करता त्यात उमंग उत्साह असायला पाहिजे. सर्वांना प्लॅन पसंत आहे. यापुढे
ही चार भुजाधारी बनून करुन प्लॅन प्रॅक्टीकल मध्ये आणत राहाल तर आणखी वृध्दी होत
राहिल. सुवर्ण जयंती महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा सर्वांचा उमंग-उत्साह
बापदादांना खूप-खंपू आवडला. सर्वांचा उमंग उत्साहाच्या संकल्पाचा पाया हा एकच आहे.
हा एक शब्द आधोरेखीत करुन पुढे जात राहा. एक आहे, एकाचेच कार्य आहे. कोणत्याही
काना-कोपऱ्यात असू द्या, देशात वा परदेशात असु द्या, किंवा पूर्व वा पश्चिम झोन
मध्ये असू द्या, परंतू एकच आहात, आणि एकाचेच कार्य आहे, असाच सर्वांचा संकल्प आहे
ना! जसे कुठलेही शुभ कार्य करताना प्रतिज्ञा करण्यासाठी सर्वजण प्रथम मनोमन दृढ
संकल्प करण्याची निशाणी म्हणून कंगन बांधतात, कार्य करणाऱ्यांना धागारुपी किंवा
कुठलेही कंगन बांधतात, ते श्रेष्ठ संकल्पाचे कंगन असते. आणि आज जसे सर्वांनी
भंडारीमध्ये खुप उमंग-उत्साहाने श्री गणेशा केला. तसेच आता अशी भंडारी ठेवा. जिच्या
मध्ये आपण अटल प्रतिज्ञेची चिठ्ठी टाकू शकतो. दोन्ही भंडारी सोबत असतील तेव्हा सफलता
मिळेल आणि हे मनापासून हवे, फक्त दिखावा म्हणून नको. हाच मुळ पाया आहे. स्वत:
सुवर्ण तुल्य बनून सुवर्णजयंती साजरी करण्याचा हा आधार आहे, आणि यासाठी एक सुवाक्य
नेहमी लक्षात ठेवा की, मी कुणासाठी ही समस्या बनणार नाही, ना समस्येला घाबरेन मी
स्वत: ही नेहमी समाधानी राहिल, अन् इतरांना ही समाधान, आनंद देणारा बनेल. ही स्मृती
सुवर्णजयंती महोत्सवाला आपोआप सिध्दतेकडे घेऊन जाईल. जेव्हा अंतिम सुवर्ण जयंती
होईल, तेव्हा सर्वांना तुमच्या स्वर्णीम दैवी स्वरुपाची अनुभव होईल. तुमच्याद्वारे
ते भविष्य स्वर्णीम जग पाहतील. तुम्ही फक्त नविन सतयुगी जग येणार आहे. असं मुखाने
म्हणणार नाहीत तर प्रत्यक्षात त्यांना दाखवल. जसे जादूगर मुखाने बोलत-बोलत हाताने
करामती दाखवतात तर तुमचा हा सुवर्णकांतीने झळकणारा चेहरा, चमकणारे मस्तक, चमकणारे
डोळे आणि चमकणारे ओठ आहेत. या सर्व इंद्रियाद्वारे स्वर्णीम जगाचा साक्षात्कार
इतरांना झाला पाहिजे, जसे चित्र् बनवता ना-की एकाच चित्रात आता-आता ब्रह्मा बाबा
दिसतील, तर आता-आता कृष्ण दिसेल, विष्णू दिसेल. असा तुमचाही साक्षात्कार व्हायला
पाहिजे. आता-आता फरिश्ता, आता-आता विश्वम महाराजन, विश्व महाराणीचे रुप दिसले पाहिजे.
आता-आता साधारण सफेद वस्त्रधारी, असे वेगवेगळे स्वरुप तुमच्या या सुवर्णमुर्ती
रुपाद्वारे दिसले पाहिजे. समजले! आज इतक्या निवडक आत्मिक गुलाबांचा सुंदर
पुष्पगुच्छ येथे एकत्रित झाला आहे. एकाच आत्मिक गुलाबांचा सुगंध किती असतो, तर इतका
मोठा पुष्पगुच्छ किती कमाल करेल! एका-एका आत्मिक ताऱ्यामध्ये एक दुनिया पण आहे. एकटे
नाहीत. त्या आकाशातील ताऱ्यांमध्ये तर दुनिया नाहीये. तुम्हा चैतन्य ताऱ्यांमध्ये
दुनिया आहे. कमाल तर झालीच पाहिजे, नव्हे कमाल झालेलीच आहे. फक्त मला अर्जुन बनायचे
आहे. बाकी विजय तर निश्चित आहे. परंतू आपणास अर्जुन बनायचे आहे. अर्जुन म्हणजे,
सुवर्ण जयंती च्या संपूर्ण वर्षभरात जो समस्या बनणार नाही. जो समस्या पाहणार नाही.
निर्विघ्न, निर्विकल्प आणि निर्विकारी बनणे या तिन्ही विशेषता जो धारण करील. अशी
सुर्वण स्थितीत जो स्थित राहिल. त्याला पुरस्कार द्या. बापदादांना ही खुशी आहे.
विशाल बुध्दीचे मुले पाहून पित्याला आनंद तर होणारच ना! जसे विशाल बुध्दी आहात,
तसेच मनाने ही मोठे आहात. सर्व विशाल बुध्दीचे आहात म्हणून तर प्लॅन बनवायला आले
आहात, अच्छा! नेहमी स्वत:ला आधार स्वरुप, उध्दारकर्ता स्वरुप, सदैव उदारता असणारे
उदारमनाचे, सदैव-एक आहे आणि एकाचेच कार्य आहे, अशा एकरस स्थितीत स्थित राहणारे.
सदैव एकतेत आणि एकाग्र स्थितीत राहणारे, असे विशाल बुध्दी-विशाल अंतकरणाच्या आत्मिक
मुलांना बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि नमस्ते.
मुख्य भाऊ-बहिणींसोबत : सर्वांनी मीटिंग घेतली/केली, श्रेष्ठ संकल्पांना सिध्दी
मिळतच असते. नेहमी उमंग-उत्साहात राहून पुढे जाणे हीच विशेषता आहे. मन्सा सेवेचा
विशेष प्रयत्न करा. मन्सा सेवा एखाद्या चुंबकाप्रमाणे आहे. जसे चुंबक कितीही दुरुन
सुईला खेचून घेतो. असे मन्सा सेवेने आत्मे घर बसल्याजवळ खेचले जातील. आता तुम्ही
सेवेसाठी बाहेर जास्त वेळ द्यावा लागतो. परंतू आता सेवेसाठी मन्सा सेवेचा प्रयोग करा.
स्थापनेच्या कार्यात जे-जे मोठे कार्य सिध्द झाले. त्यांची सिध्दी मन्सा सेवेने झाली
आहे. जसे रामलीला करताना वा इतर कार्य करताना करणारे उपवास, व्रत करतात. तसेच
तुम्हीही मन्सा सेवेचे व्रत घ्या. व्रत धारण न केल्यामुळे स्थिती डगमग होते आणि
परिणाम वा सफलता, कधी कशी तर कधी कशी मिळते, मन्सा सेवेचा अभ्यास जास्त पाहिजे.
मन्सा सेवा करण्यासाठी स्थिती लाइट हाऊस आणि माईट हाऊस पाहिजे. लाइट आणि माइट दोन्ही
एकाच वेळी हवी. माइक समोर बोलताना माइट (शक्तीशाली स्थितीत) होऊन बोला, माइक सोबत
सोबत माइट (शक्तीशाली स्थिती) पण हवी आपले मुख पण माइक आहे. तर माइट (शक्तीशाली)
होऊन माइक द्वारे बोला. असे वाटले पाहिजे-की अति शक्तीशाली स्थितीमध्ये वरुन अवतरलो
आहे. अवतार बनून सर्वांप्रती हा संदेश देत आहे. मी अवतरीत आत्मा आहे. अवतार बोलत आहे.
अवतरीत आत्म्याची स्टेज शक्तीशाली असणारच ना! कारण ती आत्मा प्रथमच: परमधामहून येते
तेव्हा त्याची सतोप्रधान स्थिती असते. तुम्ही ही जेव्हा स्वत:ला अवतार समजाल तर ती
शक्तीशाली स्थिती आहे, अच्छा.
वरदान:-
साक्षी बनून
श्रेष्ठ स्थिती द्वारा सर्व आत्म्यांना सकाश देणारे बाबांसमान अव्यक्त फरिश्ता भव :
चालता-फिरता नेहमी स्वत:ला निराकारी आत्मा आणि कर्म करताना अव्यक्त फरिश्ता समजले
तर सतत आनंदात उडत राहाल. फरिश्ता म्हणजे सदैव उंच आणि श्रेष्ठ स्थितीत राहणारा या
साकार दैहीक दुनियेत काहीही होवो. परंतू साक्षी बनून सर्वांना पहा आणि सकाश/प्रकंपने
देत राहा आपल्या श्रेष्ठ आसनाच्या खाली उतरुन सकाश देता नाही येत. आपल्या श्रेष्ठ
स्टेज वर स्थित होऊन वृत्ती, दृष्टीने सहयोग कल्याणाचे सकारण द्या. त्यात इतर
कोणतीही भावना मिसळायला नको. तेव्हाच कसल्याही प्रकारच्या वातावरणात सुरक्षित राहाल
आणि बाप समान अव्यक्त फरिश्ता भवचे वरदानी बनाल.
सुविचार:-
योगबळाने
दु:खाला सुखामध्ये आणि अशांतीला शांतीमध्ये परिवर्तन करा.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष अभ्यास
ब्रह्मा
बाबांशी आपला स्नेह आहे तर स्नेहाची लक्षणे आपल्या आचरणाद्वारे / कर्माद्वारे दिसली
पाहिजेत. जसे ब्रह्माबाबांचे सर्वांत पहिले प्रेम मुरली वर राहिले आणि त्यामुळेच ते
मुरलीधर बनले. तर ज्या मुरली वर ब्रह्मा बाबांचे प्रेम राहिले आणि अजून ही आहे. त्या
मुरलीवर आपले ही प्रेम दिसले पाहिजे, प्रत्येक मुरली खूप प्रेमाने वाचून त्यांचे
स्वरुप बनायचे आहे.