21-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, तुम्ही ज्ञानाचा पाऊस पाडून हिरवळ करणारे आहात, तुम्हाला धारणा स्वत:
करुन, इतरांना करवावयाची आहे....!!!
प्रश्न:-
जे ढग पाऊस
पाडत नाहीत, त्यांना कोणते नांव देणार?
उत्तर:-
ते आहेत सुस्त ढग. चुस्त ढग ते, जे पाऊस पाडतात. जर धारणा करतील तर सांगितल्या
शिवाय राहणार नाहीत. जे धारणा करुन दुसज्यांना धारणा करवित नाहीत, त्यांचे पोट
पाठीला लागते, ते गरीब आहेत. प्रजेमध्ये जावून पद प्राप्त करतील.
प्रश्न:-
आठवणीच्या
यात्रेमध्ये मुख्य कष्ट कोणते आहेत?
उत्तर:-
स्वत:ला आत्मा समजून बाबांना बिंदू रुपामध्ये आठवण करणे, बाबा जसे आहेत, त्या
स्वरुपात खरी आठवण करणे, यातच कष्ट आहे.
गीत:-
जे शिव साजन
बरोबर आहेत, त्यांच्यावरती ज्ञान वर्षा आहे...
ओम शांती।
जसे समुद्राच्यावर ढग आहेत, तर ढगाचा पिता समुद्र झाला, जे ढग समुद्राबरोबर आहेत,
तेच पाऊस पाडत आहेत. तेच ढग समुद्राकडून पाणी घेतात, नंतर पाऊस पाडतात. तुम्ही पण
समुद्राजवळ येता, ज्ञान धारण करण्यासाठी. समुद्राची मुले ढग तर आहातच, जे गोड पाणी
धारण करत आहात. आता ढग पण अनेक प्रकारचे आहेत. कोणी खुप पाऊस पाडतात, महापुर येतो,
कोणते कमी पडतात. तुमच्यामध्ये पण असे नंबरानुसार आहेत, जे फार जोरात पाफस पाडतात,
त्यांचे नाव पण घेतले जाते. जसा पाऊस फार पडला तर मनुष्य आनंदी होतात. हे पण तसेच
आहे. जे चांगले ज्ञान सांगतात, त्यांची महिमा होते. जे सांगत नाहीत, ते सुस्त आहेत,
त्यांचे पोट भरत नाही. पुर्ण धारणा न झाल्याने पोट पाठीला लागले आहे. दुष्काळामध्ये
मनुष्याचे पोट पाठीला लागते. येथे पण स्वत: धारणा करुन, इतरांना धारणा करवित
नाहीत,तर त्यांचे पोट पाठीला लागते. पुष्कळांना ज्ञान सांगणारे, राजा राणी बनतील आणि
न सांगणारे गरीब बनतात. गरीबाचे पोट पाठीला लागते. तर मुलांनी धारणा फार चांगली केली
पाहिजे, यात पण आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान किती सोपे आहे. तुम्ही आता समजता कि,
आमचे मध्ये आत्मा आणि परमात्म्याचे दोन्हीचे ज्ञान नव्हते. तर पोट पाठीला लागले होते.
मुख्य आहेच आत्मा आणि परमात्म्याची गोष्ट. मनुष्य आत्म्यालाच ओळखत नाहीत. तर
परमात्म्याला मग कसे ओळखतील? किती मोठे विद्वान, पंडीत इत्यादी आहेत, कोणी पण
आत्म्याला ओळखत नाहीत. आता तुम्हाला माहित झाले आहे कि, आत्मा अविनाशी आहे.
त्यामध्ये 84 जन्मांची अविनाशी भुमिका भरलेली आहे. जी चालत राहते. आत्म अविनाशी तर
भुमिका पण अविनाशी आहे. आत्मा कशी संपूर्ण भुमिका बजावत आहे. हे कोणाला पण माहित
नाही. ते तर आत्मच परमात्मा आहे असे म्हणतात. तुम्हा मुलांना सुरवातीपासून ते
शेवटापर्यंतचे पुर्ण ज्ञान आहे. ते तर विश्व नाटकाचा कालावधीला लाखो वर्ष आहे असे
म्हणतात. आता तुम्हाला सारे ज्ञान मिळाले आहे. आता तुम्ही जाणता कि, बाबांनी
रचलेल्या या ज्ञान यज्ञामध्ये ही सारी दुनिया स्वाह! होणार आहे. त्यामुळे बाबा
म्हणतात कि, देहा सहित जे काही आहे, ते सर्व विसरुन जावा, आणि स्वत:ला आत समजा
शिवबाबा आणि शांतीधाम, गोड घरांची आठवण करा. हे तर आहेच दु:ख धाम. तुमच्यामध्ये पण
नंबरवार पुरुषार्थानुसार समजावणारे आहेत. आता तुम्ही ज्ञानाने भरपुर होत आहात. बाकी
सारी मेहनत आहे आठवणीची जन्मो-जन्मीचा देह अभिमान नष्ट करुन आत्म अभिमानी बनणे. हीच
मोठी मेहनत आहे, म्हणणे फार सोपे आहे. बाबा म्हणतात कि, मी जसा आहे, जो आहे, त्या
रुपात मुश्कली कोणी आठवण करतात. जसा पिता तशी मुले असतात ना. स्वत:ला ओळखले तर
बाबाला पण ओळखतील ना. तुम्ही जाणता कि, शिकविणारे तर एकच बाबा आहेत, शिकणारे तर
अनेक आहेत. बाबा राजधानी कशी स्थापन करत आहेत, हे तुम्ही मुलेच जाणत आहात. बाकी ते
शास्त्र इत्यादी सर्व भक्ती मार्गाची सामुग्री आहे, समजावण्यासाठी आम्हाला सांगावे
लागते. बाकी यामध्ये घृणा करण्याची गोष्ट नाही. शास्त्रामध्ये पण ब्रह्माचा दिवस आणि
रात्र म्हणतात. परंतू समजत नाहीत. रात्रं आणि दिवस आर्धा आर्धा आहे. शिडीवर किती
सोप्या पध्दतीने समजावले जाते.
मनुष्य तर समजतात कि, भगवान मोठे समर्थ आहेत, ते जे पाहिजे ते करु शकतात. परंतू बाबा
म्हणतात कि, मी विश्व नाटकाचे, बंधनात बांधलो आहे. भारतावर तर किती संकटे येत
राहतात. त्यासाठी मी वारंवार येतो का? माझी भुमिकाच मर्यादीत आहे. जेव्हा संपूर्ण
दु:खी होतात, तेव्हा मी, माझे वेळेनुसार येतो. एका सेकंदाचा पण फरक पडत नाही.
नाटकामध्ये प्रत्येकाची तंतोतंत भुमिका नोंदलेली आहे. हे आहे अति उंच बाबाचे अवतरण,
मग नंतर नंबरवार सर्व कमी ताकतीचे. तुम्हा मुलांना आता बाबाचे ज्ञान मिळाले आहे.
ज्याद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनता. तुमच्यामध्ये सर्व शक्ती येत आहेत.
पुरुषार्थ करुन तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनत आहात. इतरांची तर भुमिकाच नाही.
मुख्य आहे नाटक, ज्याचे ज्ञान आता तुम्हाला मिळत आहे. इतर सर्व आहे साधारण, कारण ते
सर्व या डोळ्याने पाहिले जाते. जगातील आश्चर्य तर बाबाच आहेत, जे मग स्थापन पण
करतात स्वर्ग, ज्याला हेवन, पैराडाइज म्हटले जाते. त्यांची किती महिमा आहे, बाबा आणि
बाबाच्या रचनेची फार महिमा आहे. उंच ते उंच भगवान आहेत. उंच ते उंच स्वर्गाची
स्थापना बाबा कशी करतात, हे कोणी पण काहीच जाणत नाहीत. तुम्ही गोड मुले पण
नंबरानुसार पुरुषार्थानुसार जाणता आणि त्यानुसारच पद पण प्राप्त करता, जे पुरुषाचे
करता तो नाटकानुसारच होतो. पुरुषार्थाशिवाय तर काही मिळत नाही. कर्मा शिवाय तर एक
सेकंद पण राहू शकत नाही. ते हठयोगी प्राणायाम करतात, जसे जड बणुन जातात, आत पडून
राहतात वर माती पडत राहते. माती वर पाणी पडल्याने गवत उगवते. परंतू यात काही फायदा
नाही. किती दिवस असे पडून राहतील? कर्म तर जरुर केलेच पाहिजे. कर्म सन्यासी कोणी
बनत नाही. हो, फक्त स्वयंपाक इ. करत नाहीत, त्यामुळे त्यांना कर्म संन्यासी म्हटले
जाते. ही पण त्यांची नाटकात भुमिका आहे. हे निवृत्ती मार्गवाले, नसते तर भारताची
काय अवस्था झाली असती? भारत नंबर एकचा पावन होता. बाबा प्रथम पवित्रता स्थापन करतात,
जी मग पुढे आर्धाकल्प चालते. बरोबर सतयुगामध्ये एक धर्म, एक राज्य होते, मग दैवी
राज्य स्थापन होते. असे चांगले चांगले सुविचार बनवून मनुष्याला जागृत केले पाहिजे.
परत तेच दैवी राज्य भाग्य प्राप्त करा. आता तुम्ही किती चांगले प्रकारे समजत आहात.
कृष्णाला श्याम सुंदर का म्हणतात, हे पण आता तुम्ही समजत आहात. आजकाल तर फारच असे
नाव ठेवते आहेत. कृष्णा बरोबर स्पर्धा करत आहेत. तुम्ही मुले जाणता कि कसे पतित राजे,
पावन राजा समोर जावून डोके टेकतात, परंतू ओळखत नाहीत. तुम्ही मुले जाणता कि, जे
पुज्य होते ते परत पुजारी बनले आहेत. आता तुमच्या बुध्दमध्ये सारे चक्र आहे. हे पण
आठवणीत राहिले तरी पण अवस्था चांगली बनेल. परंतू माया आठवण करु देत नाही, विसरुन
टाकते. सदैव हर्षित मुख अवस्था राहिली तर तुम्हाला देवता म्हटले जाईल.
लक्ष्मी-नारायणाचे चित्र पाहून किती खुष होतात. राधे-कृष्ण अथवा राम इत्यादींना
पाहून एवढे आनंदी होत नाहीत, कारण कृष्णासाठी शास्त्रामध्ये अनेक गोष्टी लिहल्या
आहेत. हे ब्रह्मा बाबांचे नारायण बनत आहेत ना. बाबा पण या लक्ष्मी नारायणाचे
चित्राला पाहून खुष होतात. मुलांनी पण असे समजले पाहिजे, आता किती वेळ या जुन्या
शरीरात राहू, नंतर जावून राजकुमार बनू. हे मुख्य लक्ष्य आहे ना. हे पण फक्त तुम्हीच
जाणत आहात. खुशीमध्ये किती गदगद झाले पाहिजे. जेवढे शिकाल तेवढे मोठे पद मिळेल,
शिकला नाही तर काय पद मिळेल? कोठे विश्वाचे महाराजा, महाराणी, कोठे सावकार, प्रजेचे
नोकर चाकर. विषय तर एकच आहे. फक्त मनमनाभव, मध्याजी भव, अल्फ आणि बे, आठवण आणि
ज्ञान. ब्रह्मा बाबाला किती आनंद झाला, अल्फला अल्लाह मिळाला, बाकी सर्व देवून टाकले.
किती मोठी लॉटरी मिळाली. बाकी काय पाहिजे. तर मग मुलांचे मनामध्ये खुशी राहिली
पाहिजे. त्यामुळे बाबा म्हणतात कि, असे ट्रांस-लाईटचे चित्र सर्वांसाठी बनवावे, जे
मुले पाहून खुश होतील. शिवबाबा ब्रह्मा बाबाद्वारे आम्हाला हा वारसा देत आहेत.
मनुष्य तर काहीचे जाणत नाहीत. फारच तुच्छ बुध्दी आहेत. आता तुम्ही तुच्छ
बुध्दीपासून स्वच्छ बुध्दी बनत आहात. सर्वकाही जाणले आहे, आणखीन काही शिकण्याची गरज
नाही. या शिक्षणाद्वारे तुम्हाला विश्वाची बादशाही मिळत आहे, त्यामुळे बाबाला
ज्ञानाचा सागर म्हटले जाते. मनुष्य मग समजतात कि, प्रत्येकाचे मनातील ओळखतात, परंतू
बाबा तर ज्ञान देतात. शिक्षक समजू शकतात कि, हे शिकत आहेत, बाकी सारा दिवस हे थोडेच
पाहतील कि, यांचे बुध्दीत काय आहे चालले आहे. हे तर आश्चर्यकारक ज्ञान आहे. बाबांना
ज्ञानाचे सागर, सुख शांतीचा सागर म्हटले जाते. तुम्ही पण आता मास्टर ज्ञानसागर बनत
आहात. नंतर हे नांव उडून जाईल. मग सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण बनाल. हे आहे
मनुष्याचे उंच पद. यावेळी हे आहे ईश्वरीय पद. समजणे आणि समजावण्याच्या गोष्टी आहेत.
लक्ष्मी-नारायणाचे चित्र पाहून फार खुशी झाली पाहिजे. आम्ही आता विश्वाचे मालक बनू.
ज्ञानानेच सर्व गुण येतात. आपले मुख्य लक्ष्य पाहूनच आनंद वाटतो, त्यामुळे बाबा
म्हणतात कि, हे लक्ष्मी नारायणाचे चित्र तर प्रत्येकाजवळ असले पाहिजे. हे चित्र
प्रेम वाढविते. मनात येते की, होय, हा मृत्यू लोकांतील शेवटचा जन्म आहे. मग आम्ही
अमरलोक मध्ये जावून हे बनू. ततत्त्वम. असे नाही कि आत्मा, परमात्मा आहे. नाही, हे
सारे ज्ञान बुध्दीमध्ये बसले आहे. जेव्हा पण कोणाला समजावता तर बोला कि, आम्ही कधी
पण कोणाला भीक मागत नाही. प्रजापिता ब्रह्माची मुले तर फार आहेत. आम्ही आमच्याच तन
मन धनाने सेवा करत आहे. ब्राह्मण आपल्याच कमाई मधून यज्ञ चालवत आहेत. शुद्राचे पैसे
लावू शकत नाही. अनेक मुले आहेत, ते जाणतात कि, जेवढे आम्ही तन मन धनाने सेवा करु,
समर्पित होऊ, तेवढे पद मिळेल. तुम्ही जाणतात कि, ब्रह्म बाबांनी समर्पण केले तर हे,
लक्ष्मी नारायण बनतात. पैसे येथे कामाला तर येणार नाहीत, मग का या कामात लावू नये.
समर्पित झालेले मग काय उपाशी मरतील? फार चांगली पालना होत राहते. बाबांची किती पालना
होत आहे. हा तर शिवबाबाचे रथ आहे, साज्या जगाला स्वर्ग बनविणारे आहेत. ते सुंदर
प्रवासी आहेत.
परमपिता परमात्मा, येऊन सर्वांना सुंदर बनवित आहेत, तुम्ही काळ्या पासून गोरे सुंदर
बनत आहात. किती सुंदर साजन आहे, येऊन सर्वांना गोरा बनवितात. त्यांचेवर तर समर्पित
झाले पाहिजे. आठवण केली पाहिजे. जसे आत्मा पाहू शकत नाही. ओळखले जाते, तसे
परमात्माला पण ओळखू शकता. पाहण्यात तर आत्मा परमात्मा दोन्ही एकसारखे बिंदू आहेत.
बाकी तर सारे ज्ञान आहे. या फार समजण्याच्या गोष्टी आहेत. मुलांच्या बुध्दीमध्ये हे
राहिले पाहिजे. बुध्दीमध्ये नंबरवार पुरुषार्थानुसार धारणा होते. डॉक्टरांना पण औषधे
लक्षात राहतात ना. असे नाही कि त्यावेळी पुस्तकात पाहतील. डॉक्टरांचे पण मुद्दे
असतात, बॅरिस्टरचे पण मुद्दे असतात. तुमच्याजवळ पण मुद्दे आहेत, विषय आहेत, ज्यावर
समजावत आहात. कोणता मुद्दा कोणाला फायदेशीर वाटतो, कोणाला कोणत्या मुद्याने बाण
लागतो. मुद्दे तर अनेकानेक आहेत. जे चांगले प्रकारे धारण करतात, ते चांगली सेवा करु
शकातत. आर्धाकल्पापासून महारोगी आजारी आहेत. आत्मा पतित आहे, त्यांना एक अविनाशी
सर्जन औषध देत आहेत. ते नेहमीच सर्जन आहेत, कधी आजारी पडत नाहीत. अविनाशी सर्जन
एकदाच येऊन मनमनाभवचे इंजेक्शन देत आहेत. किती सोपे आहे, चित्र खिशामध्ये नेहमीसाठी
ठेवा. बाबा नारायणाचे पुजारी होते तर लक्ष्मीचे चित्र काढून, एकट्या नारायणाचे
चित्र ठेवले होते. आता माहित झाले कि, ज्यांची मी पुजा करत होतो, ते आता बनत आहे.
लक्ष्मीला काढून टाकले तर हे पक्के आहे कि, मी लक्ष्मी बनणार नाही. लक्ष्मी बसून
पाय दाबते, हे चांगले वाटत नव्हते. ते पाहून पुरुष लोक स्त्री कडून पाय दाबून घेतात.
तेथे थोडेच लक्ष्मी असे पाय दाबेल. अशी रुढ परंपरा तेथे असत नाही. ही परंपरा रावण
राज्याची आहे. या चित्रामध्ये सारे ज्ञान आहे. वरती त्रिमुर्ती पण आहे, या ज्ञानाचे
सारा दिवस स्मरण केल्याने फार खुशी होईल. भारत आता स्वर्ग बनत आहे. किती चांगले
ज्ञान आहे, माहित नाही, मनुष्यांच्या बुध्दीमध्ये का बसत नाही. आग फार मोठ्याने
लागेल, भंभोरला लाग लागणार आहे. रावण राज्य तर जरुर नष्ट झाले पाहिजे. यज्ञामध्ये
पण पवित्र ब्राह्मण पाहिजेत. हा फार मोठा यज्ञ आहे, साज्या विश्वात पवित्रता स्थापन
करण्यासाठी. ते ब्राह्मण जरी स्वत:ला ब्रह्माची संतान म्हणतात, परंतू ते आहेत कुख
वंशावली. ब्रह्माची संतान तर पवित्र मुख वंशावली होते ना. तर त्यांना हे समजावले
पाहिजे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. स्वच्छ
बुध्दी बनून आश्चर्य कारक ज्ञानाची धारणा करुन मास्टर ज्ञानसागर बनवयाचे आहे.
ज्ञानाद्वारे सर्व गुण स्वत:मध्ये धारण करावयाचे आहेत.
2. जसे बाबांनी तन मन धन सेवेमध्ये लावले, समर्पित झाले, तसे बाबा सारखे आपले सर्व
काही ईश्वरीय सेवेत सफल करावयाचे आहे. नेहमी आनंदी राहण्यासाठी लक्ष्मी नारायणाचे
चित्र स्वत:जवळ ठेवा.
वरदान:-
सन्मानाने पास
होण्यासाठी, पुरुषार्थाची गती तीव्र आणि ब्रेक शक्तीशाली ठेवणारे यथार्थ योगी भव
वर्तमान वेळेनुसार
पुरुषार्थाची गती तीव्र आणि ब्रेक शक्तीशाली पाहिजे, तेव्हा अंत काळात सन्मानाने
पास व्हाल, कारण त्यावेळची परिस्थिती बुध्दीमध्ये अनेक विचार आणणारी असेल, त्यावेळी
सर्व विचारापासून दूर होऊन एका विचारात स्थित होण्याचा अभ्यास पाहिजे. ज्यावेळी
विस्तारात पसरलेली बुध्दी असेल, त्यावेळी थांबण्याचा अभ्यास पाहिजे. थांबविणे आणि
थांबणे. जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ बुध्दीला एका विचारात स्थिर करणे-तोच आहे
यथार्थ योग.
बोधवाक्य:-
तुम्ही
आज्ञाधारक सेवक आहात त्यामुळे बेफिकीर राहू नका. सेवक म्हणजे सदा सेवेवर हजर...!!!
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
अव्यक्त
स्थितीमध्ये राहण्यासाठी बाबाची श्रीमत आहे, मुलांनो, विचार कमी, कर्तव्य अधिक करा.
सर्व समस्या समाप्त करुन उज्वल बना. जुन्या गोष्टी अथवा जुने संस्कार रुपी अस्थींना,
संपूर्ण स्थितीच्या सागरामध्ये समाविष्ट करा. जुन्या गोष्टी अशा विसरुन जावा, जशा
गेल्या जन्मातील गोष्टी विसरुन जातात.