03-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबा आले आहेत मुलांची बुद्धी स्वच्छ बनवण्यासाठी,जेव्हा तुम्ही स्वच्छ बनाल तेव्हाच देवता बनू शकाल"

प्रश्न:-
या नाटकाच पूर्व नियोजन कोणते आहे?ज्याच्यापासून बाबा पण सुटू शकत नाहीत?

उत्तर:-
या कल्पामध्ये बाबांना आपल्या मुलांजवळ यायचेच आहे,पतित दुखी मुलांना सुखी बनवायचे आहे.हे नाटकाचे नियोजन बनलेले आहे.या बंधनापासून बाबा पण सुटू शकत नाहीत.

प्रश्न:-
शिकवणार्या बाबांची मुख्य विशेषता काय आहे?

उत्तर:-
ते खूपच निरहंकारी बणुन,या पतित दुनिया,पतित तना मध्ये येतात.शिव पिता यावेळेस तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवतात. तुम्ही परत द्वापर युगा मध्ये त्यांच्यासाठी सोन्याचे मंदिर बनवतात.

गीत:-
पापाच्या दुनिया पासून दूर घेऊन चल….

ओम शांती।
गोड गोड मुलांनी हे गीत ऐकले की,दोन दुनिया आहेत,एक पापाची दुनिया,दुसरी पुण्ण्याची दुनिया.दुःखाची दुनिया आणि सुखाची दुनिया.सुख जरूर नवीन दुनिया मध्ये,नवीन घरांमध्ये होऊ शकते.जुन्या घरामध्ये दुखच होते म्हणून त्याला नष्ट केले जाते.परत नवीन घरांमध्ये सुखामध्ये बसायचे असते.आता मुलं जाणतात,भगवंताला कोणी मनुष्य मात्र जाणत नाहीत.रावण राज्य असल्यामुळे मनुष्य बिलकुलच पत्थर बुद्धी,तमोप्रधान बुद्धी बनले आहेत.बाबा येऊन समजवतात,मला भगवान तर म्हणतात परंतु कोणी पण जाणत नाहीत.भगवंताला जर जाणत नसतील तर ते कोणत्याच कामाचे नाहीत.दुःखा मध्येच हे प्रभू,हे ईश्वर असे पुकारतात.परंतु आश्चर्य आहे एक पण मनुष्य मात्र बेहदच्या पित्याला,रचनाकाराला यर्थात जाणत नाहीत.ईश्वर सर्वव्यापी असुन मगर माशांमध्ये परमात्मा आहे असे समजतात. ही तर परमात्म्याची निंदा करतात.बाबांना खूपच दोष देतात म्हणून भगवानुवाच आहे जेव्हा भारतामध्ये माझी आणि देवी-देवतांची निंदा करत,शिडी उतरत तमोप्रधान बनतात तेव्हा मी येतो. पूर्वनियोजित नाटका नुसार मुलं म्हणतात, या भूमिकेमध्ये यावेच लागेल.बाबा म्हणतात ते नाटक पूर्वनियोजित आहे,मी पण या नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलेला आहे.या नाटकांमधून मी पण सुटू शकत नाही.मला पतितांना पावन बनवण्यासाठी यावेच लागते,नाहीतर नवीन दुनिया कोण स्थापन करेल.मुलांना रावण राज्याच्या दुःख पासून सोडवुन नवीन दुनिया मध्ये कोण घेऊन जाईल?जरी दुनिया मध्ये असे खूप धनवान मनुष्य आहेत,समजतात आता आम्ही तर स्वर्गामध्ये बसलो आहोत, धन आहे महल,विमान आहे परंतु अचानक कोणी आजारी पडतात आणि बसल्या बसल्या मृत्यू होतो,खुपच दुःख होते. त्यांनाही माहीत नाही की सतयुगा मध्ये अचानक मृत्यू होत नाही,दुःखाची कोणतीच गोष्ट नसते.सर्व आयुष्यवान असतात.येथे तर आचानक मरतात,सतयुगा मध्ये अशी गोष्ट होत नाही.तिथे काय होते हे कोणीही जाणत नाहीत,म्हणून बाबा म्हणतात खूपच तूच्छ बुद्धी आहेत.मी येऊन त्यांना स्वच्छ बुद्धी बनवतो.रावण तुच्छ बुद्धी,तमोप्रधान बनवतात.भगवान स्वच्छ बुद्धी बनवत आहेत.बाबा तुम्हाला मनुष्या पासून देवता बनवत आहेत.सर्व मुलं म्हणतात,सूर्यवंशी महाराजा महाराणी बनण्यासाठी आलो आहोत.मुख्य उद्देश समोर आहे.नरा पासून नारायण बनायचे आहे.ही सत्यनारायणाची कथा आहे,परत भक्तीमध्ये ब्राह्मण कथा ऐकवतात,त्याद्वारे खरोखर,कोणी नरा पासून नारायण बनत नाहीत.तुम्ही तर खरोखर नरापासून नारायण बनण्यासाठी आले आहेत.तुमच्या संस्थेच्या उद्देश काय आहे?असे अनेक लोक विचारतात,तुम्ही सांगा आमचा मुख्य उद्देश नरा पासुन नारायण बनणे आहे. परंतु ही काही संस्था नाही,हा तर एक परिवार आहे,माता-पिता आणि मुलं बसले आहेत.भक्तिमार्गा मध्ये तुम्हीच गायन करत होते,तुम्हीच माता पिता...हे मात पिता जेव्हा तुम्ही येतात,तेव्हा आपल्या कडून खूप सुख मिळते आणि आम्ही विश्वाचे मालक बनतो.आता तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात ना,ते पण स्वर्गाचे.आत्ता बाबांना पाहून खूपच खुश व्हायला पाहिजे. ज्यांची अर्धाकल्प आठवण केली,हे भगवान या तुम्ही या,तर आम्ही तुमच्या द्वारे खूप सुख प्राप्त करु.हे बेहद चे,बाबा बेहदचा वारसा देतात,तेही २१ जन्मासाठी. बाबा म्हणतात मी तुम्हाला दैवी संप्रदाय बनवतो आणि रावण आसुरी संप्रदाय बनवतात.मी आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतो,तेथे पवित्रते मुळे आयुष्य पण जास्त असते.येथे भोगी आहेत,अचानक मरतात.तेथे योगा द्वारे वारसा मिळालेला असतो,आयुष्य पण १५० वर्षे राहते.आपल्या वेळेनुसार एक शरीर सोडून दुसरे घेतात.तर हे ज्ञान बाबाच बसुन देतात.भक्त भगवंताला शोधतात, समजतात ग्रंथ वाचणे,तीर्थ इत्यादी करणे हे सर्व भगवंताशी भेटण्याचे रस्ते आहेत. बाबा म्हणतात हे रस्तेच नाहीत,रस्ता तर मी तुम्हाला सांगतो.तुम्हीच म्हणत होते हे अंधांची लाठी प्रभू,तुम्ही या आम्हाला शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन चला.बाबाच सुखधाम चा रस्ता दाखवतात, कधी दुःख देत नाहीत.हे तर बाबा वरती खोटे आरोप लावले आहेत,कोणाचा मृत्यू होतो तर भगवंताची निंदा करायला लागतात.बाबा म्हणतात मी थोडेच कुणाला मारतो किंवा दुःख देतो.प्रत्येकाची आप आपली भूमिका आहे.मी जे राज्य स्थापन करतो तेथे अकाली मृत्यु,दुःख इत्यादी नसते.मी तुम्हाला सुखधाम मध्ये घेऊन जातो.मुलांना खूपच खुशी व्हायला पाहिजे, ओहो,बाबा आम्हाला पुरुषोत्तम बनवत आहेत.मनुष्याला हे माहीत नाही की संगम युगालाच पुरुषोत्तम म्हटले जाते.भक्ती मार्गा मध्ये भक्तांनी परत पुरुषोत्तम महिना इत्यादी बनवले आहे.आता तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात.सर्वात उच्च पुरुषोत्तम लक्ष्मी नारायण आहेत.मनुष्य तर काहीच समजत नाहीत.प्रगती करणारे एकच बाबा आहेत. शिडी वरती कुणालाही समजून सांगणे खूपच सहज आहे.बाबा म्हणतात आता खेळ पूर्ण झाला,आता घरी चला.आत्ता हे जुने खराब वस्त्र सोडायचे आहे.तुम्ही प्रथम,नवीन दुनिया मध्ये सतोप्रधान होते,परत८४ जन्म भोगुन तमोप्रधान शूद्र बनले.आता परत क्षुद्रा पासून ब्राह्मण बनले आहात.आता बाबा भक्तीचे फळ देण्यासाठी आले आहेत.बाबा सुखदाताच आहेत.पतित पावन बाबा साऱ्या दुनियातील मनुष्यमात्र आणि प्रकृतीला पण सतोप्रधान बनवतात.आता तर प्रकृती पण तमोप्रधान आहे.अन्न धान्य मिळत नाही, शासन समजते आम्ही असे करू,पुढच्या वर्षी खुप धनधान्य होईल परंतु काहीच होत नाही.नैसर्गिक आपत्ती मध्ये कोणी काहीच करू शकत नाही.दुष्काळ पडेल भूकंप होईल,अनेक आजार होतील,रक्ताच्या नद्या वाहतील,तीच महाभारत लढाई आहे.आता बाबा म्हणतात तुम्ही आपला वारसा घ्या. मी तुम्हा मुलांना स्वर्गाचा वारसा देण्यासाठी आलो आहे.माया रावण श्राप देते,नरकाचा वारसा देते.हा पण खेळ बनलेला आहे. बाबा म्हणतात पूर्वनियोजित नाटका नुसार मी शिवालय ची स्थापना करतो.हा भारत शिवालय होता,आत्ता वेशालय आहे.विषय सागरामध्ये बुडत राहतात.

आता तुम्ही मुलं जाणतात बाबा आम्हाला शिवालय मध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत.तर ही खुशी राहायला पाहिजे.आम्हाला बेहद चे भगवान शिकवत आहेत.बाबा म्हणतात मी तुम्हाला विश्वाचे मालक बनवतो.भारत वासी आपल्या धर्माला जाणत नाहीत,आपली वंशावळ मोठ्यात मोठी आहे,याद्वारे अनेक वंश निघतात.आदी सनातन कोणता धर्म कोणती वंशावळ,होती हे समजत नाहीत. आदी सनातन देवी देवता धर्माची वंशावळ परत दुसऱ्या नंबर मध्ये चंद्रवंशी वंशावळ, परत इस्लामी वंशावळ सुरू होते.हे झाडाचे सर्व रहस्य कोणीही समजावू शकत नाहीत. आता तर पहा अनेक वंशावळी आहेत.आत्ता तर अनेक धर्माच्या फांद्या भरपूर आहेत.हे विविध धर्माचे झाड आहे. या सर्व गोष्टी बाबाच येऊन स्पष्ट करतात. हे शिक्षण आहे,तर रोज शिकायला पाहिजे. भगवानुवाच मी तुम्हाला राजांचे राजा बनवतो.पतित राजा तर विनाशी धन दान केल्यामुळे बनू शकतता.मी तुम्हाला असे पावन बनवतो,तुम्ही २१ जन्मासाठी विश्वाचे मालक बनवतो तेथे कधी अचानक मृत्यू होत नाही,आपल्या वेळेवर शरीर सोडतात.तुम्हा मुलांना नाटकाचे रहस्य पण समजवले आहे.ते सिनेमा,नाटक इत्यादी निघाले आहेत,तर ज्ञानाचे रहस्य पण समजावणे सहज होते.आज काल तर अनेक नाटक बनवत राहतात.मनुष्याला अनेक छंद लागले आहेत. ते सर्व आहेत सिमित,हे बेहद चे नाटक आहे.यावेळेत मायेचा दिखावा खूप आहे,मनुष्य समजतात आता तर स्वर्ग बनला आहे.पूर्वी एवढ्या मोठ्या इमारती इत्यादी नव्हते.तर मायेचा खूपच विरोध आहे.भगवान स्वर्गाची स्थापना करतात,तर माया पण आपला स्वर्ग दाखवते.हा सर्व मायेचा दिखावा आहे.खुपच जबरदस्त माया आहे.आता माया नष्ट होणार आहे.तुम्हाला मायेशी युद्ध करायचे आहे.बाबा गरीब निवाज आहेत. असे काही लोक म्हणतात,सावकारा साठी तर हा स्वर्ग आहे,गरिब बिचारे नरकामध्ये आहेत.तर आत्ता नरकवासींना स्वर्गवासी बनवायचे आहे.गरीबच वारसा घेतील. साहुकार तर समजतात,आम्ही तर स्वर्गा मध्ये बसलो आहोत.स्वर्ग-नरक येथेच आहे.या सर्व गोष्टींना आता तुम्ही समजतात.भारत खूपच भिकारी बनला आहे,भारतच खूप सावकार होता.एकच आदी सनातन धर्म होता.आता तर अनेक जुन्या गोष्टी शोधुन काढल्या आहेत.असे म्हणतात ही गोष्ट इतक्या वर्षाची जुनी आहे.मनुष्य आणि जनावरांची हाडे पण शोधुन काढतात,म्हणतात याला इतके वर्ष झाले आहेत.आता लाखो वर्षाची हाडे कशी काय निघू शकतात?त्यांची किंमत पण पुष्कळ ठेवतात.बाबा समजवतात मी येऊन सर्वांची सद्गगती करतो,ब्रह्मा तना मध्ये प्रवेश करतो.हे ब्रह्मा साकारी आहेत, हेच परत सूक्ष्मवतन वासी फरिश्ता बनतात,ते अव्यक्त, हे व्यक्त.बाबा म्हणतात मी अनेक जन्माच्या अंत काळात येतो. नंबर एक पावन,परत नंबर एक पतित बनतात.मी यांच्यामध्ये येतो कारण यांनाच परत नंबर एक पावन बनायचेआहे.ब्रह्मा स्वतःला भगवान किंवा अमके म्हणत नाहीत.बाबा समजावतात,मी यांच्या मध्ये प्रवेश करून,त्यांच्याद्वारे सर्वांना सतोप्रधान बनवतो.आता बाबा समजवतात तुम्ही अशरीरी आले होते,परत८४ जन्म घेऊन अभिनय केला,आता परत जायचे आहे,तर स्वतःला आत्मा समजा,देह अभिमानाला नष्ट करा.फक्त आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे बाकी दुसरे कोणतेच कष्ट नाहीत.जे पवित्र बनतील ज्ञान ऐकतील तेच विश्वाचे मालक बनतील.फार मोठी शाळा आहे,शिकवणारे बाबा पण खूपच निरहंकारी बणुन पतित दुनिया,पतित तना मध्ये येतात.भक्ती मार्गामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी खूपच छान सोन्याचे मंदिर बनवतात.या वेळेत मी तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवतो,तर पतित शरीरा मध्ये येऊन अवतरीत होतो.परत भक्ती मार्गामध्ये तुम्ही मला सोमनाथ मंदिरामध्ये स्थापना करतात,सोन्या हिऱ्याचे मंदिर बनवतात कारण तुम्ही जाणतात,बाबांनी आम्हाला स्वर्गाचे मालक बनवले होते म्हणून त्यांची खात्री करतात.हे सर्व रहस्य समजवले आहे.भक्ती पण अगोदर अव्यभिचारी होती, परत व्यभिचारी होते.आजकाल तर पहा मनुष्यांची पण पूजा करत राहतात. गंगाकिनारी जाऊन पहा शिवोहम् म्हणून स्वत:ची पूजा करत राहतात.माता जाऊन त्यांची पूजा करतात,दूध इत्यादी अर्पण करतात.या दादाने पण स्वतः केले आहे,हे पुजारी पण नंबर एक होते,हे पण आश्चर्य आहे ना.बाबा म्हणतात ही,आश्चर्यकारक दुनिया आहे.कसा स्वर्ग बनतो परत नर्क कसा बनतो,हे सर्व रहस्य मुलांना समजवत राहतात.हे ज्ञान कोणत्याही ग्रंथांमध्ये नाही. ते तर तत्त्वज्ञानाचे ग्रंथआहेत,हे अध्यात्मिक ज्ञान तर आत्मिक पिता किंवा तुम्हा ब्राह्मणा शिवाय कोणी देऊ शकत नाही. तुम्हा ब्राह्मणा शिवाय आत्मिक ज्ञान कोणाला मिळू शकत नाही.जोपर्यंत ब्राह्मण बनले नाहीत,तोपर्यंत देवता बनू शकत नाहीत.तुम्हा मुलांना खूपच खुशी राहायला पाहिजे.भगवान आम्हाला शिकवत आहेत श्रीकृष्ण नाही,अच्छा.

गोड गोड,फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
 
धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) मायेचा खूप मोठा दिखावा आहे,यापासून आपले तोंड फिरवायचे आहे. नेहमी याच खुशीमध्ये रोमांच उभे राहायला पाहिजे की,आम्ही पुरुषोत्तम बनत आहोत.भगवान आम्हाला शिकवत आहे.

(२) विश्वाचे राज्य भाग्य घेण्यासाठी फक्त पवित्र बनायचे आहे.जसे बाबा निरहंकारी बणुन, पतित दुनिया, पतित तना मध्ये येतात,तसे बाप समान निरहंकारी बणुन सेवा करायची आहे.

वरदान:-
हदच्या सर्व इच्छा वरती विजय प्राप्त करणारे,कामजीत जगजीत भव.

काम विकाराचा अंश सर्व हदच्या इच्छा आहेत.इच्छा एक वसतूची,दुसरी व्यक्ती द्वारा हदच्या प्राप्तीची,तिसरी संबंध निभवण्या मध्ये,चौथी सेवा भावनांमध्ये हदच्या इच्छाचा भाव असतो.कोणत्या पण व्यक्ती किंवा वस्तू विशेष आकर्षण होणे इच्छा नाही परंतु हे चांगले वाटतात,हा पण काम विकाराचा अंश आहे.जेव्हा सूक्ष्म अंश नष्ट होईल,तेव्हाच कामजीत जगतजीत म्हणू शकाल.

बोधवाक्य:-
मनाच्या जाणिवे द्वारा दिलाराम बाबांचे आशीर्वाद घेणारे अधिकारी बना.


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
कोणते पण कर्म करत,नेहमी हीच इच्छा राहावी की,प्रत्येक कर्मामध्ये बापदादा माझ्या सोबत आहेत आणि आमच्या अलौकीक जीवनाचा हात त्यांच्या हातामध्ये आहे अर्थात त्यांच्या हवाली आहे.परत जिम्मेवारी त्यांची होते.सर्व ओझे त्यांचेच होते.सर्व ओझे बाबांच्या वरती ठेवून स्वतःला हलके करा तर कर्मयोगी फरिष्ता बनाल.