25-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो , बाबा जे आहेत , जसे आहेत , त्यांना यथार्थ ओळखून आठवण करणे , ही मुख्य गोष्ट आहे , मनुष्याला ही गोष्ट फारच युक्तीने समजावयाची आहे .....!!!

प्रश्न:-
साऱ्या जगासाठी कोणते शिक्षण आहे जे येथेच तुम्ही शिकत आहात?

उत्तर:-
साऱ्या जगासाठी हेच शिक्षण आहे की, तुम्ही सर्व आत्मा आहात, आत्मा समजून बाबाची आठवण करा तर पावन बनाल. साऱ्या जगाचे जे पिता आहेत, ते एकदाच येतात सर्वांना पावन बनविण्यासाठी तेच रचता आणि रचनेचे ज्ञान देत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे एकच विद्यापीठ आहे, ही गोष्ट मुलांनी स्पष्ट करुन समजावली पाहिजे.

ओम शांती।
भगवानुवाच-आता हे तर आत्मिक मुले समजतात कि, भगवान कोण आहे. भारतामध्ये कोणी पण खऱ्या अर्थाने ओळखत नाही. म्हणतात पण कि, मी जो आहे, जसा आहे मला यथार्थ रितीने कोणी ओळखत नाही. तुमच्या मध्ये पण नंबरवार आहेत. नंबरवार पुरुषार्थानुसार जाणत आहेत. जरी येथे राहत आहेत, परंतू यथार्थ रितीने ओळखत नाहीत. यथार्थ रितीने ओळखणे आणि बाबाची आठवण करणे, हे फार कठीण आहे. जरी मुले म्हणतात की, फार सोपे आहे, परंतू मी जो आहे, मज पित्याचा निरंतर आठवण करावयाची आहे, बुध्दीमध्ये ही युक्ती ठेवावयाची आहे. मी आत्मा फार सुक्ष्म आहे. आमचे बाबा पण बिंदू सुक्ष्म आहेत. आर्धाकल्प तर कोणी भगवानाचे नांव पण घेत नाहीत. दु:खामध्येच आठवण करतात-हे भगवान. आता भगवान कोण आहे, हे तर कोणी मनुष्य समजत नाहीत. आता मनुष्यांना कसे समजावे, यावर विचार सागर मंथन केले पाहिजे. नाव पण लिहले आहे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, यामध्ये पण समजत नाहीत की, हे आत्मिक बेहदच्या पित्याचे ईश्वरीय विश्व विद्यालय आहे. आता काय नाव ठेवावे, जे मनुष्य झटक्यात समजतील? कसे मनुष्यांना सांगावे, कि हे विद्यापीठ आहे? विश्वापासून विश्वविद्यालय अक्षर निघाले आहे. युनिवर्स म्हणजे सारे जग. त्यांचे नाव ठेवले आहे, विश्वविद्यालय, ऱ्यामध्ये सर्व मनुष्य शिकू शकतात. विश्वासाठी विश्वविद्यालय आहे. आता खरे तर विश्वासाठी ऐकच बाबा येत आहेत, त्यांचे हे एकच विश्व विद्यालय आहे. मुख्य लक्ष्य पण एकच आहे. बाबाच येऊन साऱ्या विश्वाला पावन बनवत आहेत, योग शिकवित आहेत. हे तर सर्व धर्मांसाठी आहे. सांगतात कि, स्वत:ला आत्मा समजा, साऱ्या जगाचा पिता आहे, निराकार ईश्वर पिता, तर त्यांचे नांव आध्यात्मिक विश्वविद्यालय, आध्यात्मिक निराकार ईश्वरय पित्याचे ठेवावे. विचार केला जातो ना. मनुष्य असे आहेत, जे साऱ्या जगातील, एक पण बाबाला ओळखत नाही. रचनाकाराला ओळखले तर रचनेला पण ओळखतील. रचनाकाराद्वारेच रचनेला ओळखले जाते. बाबा मुलांना सर्व काही समजावत आहेत. दुसरे कोणी ही ओळखत नाहीत. ऋषी मुनी पण, आम्ही ओळख नाही, ओळखत नाही, म्हणत गेले. तर बाबा आता सांगतात कि, तुम्हाला अगोदर हे रचनाकार आणि रचनेचे ज्ञान नव्हते. आता रचनाकाराने समजावले आहे. बाबा सांगतात कि, मला सर्व बोलावतात कि, येऊन आम्हाला सुख शांती दया कारण आता दु:ख अशांती आहे. त्यांचे नांवच आहे, दु:खहर्ता सुखकर्ता ते कोण आहेत? भगवान ते कसे दु:ख हरुन सुख देत आहेत, हे कोणी ओळखत नाही. तर हे स्पष्ट करुन लिहावे की, मनुष्य समजतील निराकार ईश्वर पिताच हे ज्ञान देत आहेत. असे असे विचार सांगर मंथन केले पाहिजे. बाबा समजावतात कि, मनुश्य सर्व आहेत. पत्थरबुध्दी. आता तुम्हाला पारस बुध्दी बनवत आहेत. खरेतर पारसबुध्दी त्यांना म्हणावे जे कमीत कमी 50 पेक्षा जास्त गुण घेतील. नापास होणारे पारसबुध्दी नाहीत. रामानी पण कमी गुण घेतले त्यामुळे क्षत्रिय दाखविले आहे. हे पण कोणी समजत नाही की, रामाच्या हातात धनुष्यबाण का दाखविला आहे? श्रीकृष्णाचे हातात स्वदर्शन चक्र दाखवतात, की त्यांनी सर्वांना मारले, आणि रामाला धनुष्यबाण दाखविला आहे. एक खास मासिक निघत आहे, ज्यामध्ये दाखविले आहे-कृष्ण कसे स्वदर्शन चक्राद्वारे अकासुर-बकासुर इ. ना मारतात. दोघांना हिंसक बनविले आहे, आणि परत डबल हिंसक बनविले आहे. म्हणतात कि, त्यांना पण मुले झाली. अरे, ते तर यावेळी रावण संप्रदाय म्हटले जाते.

आता तुम्ही समजता कि, आम्ही योगबळाने विश्वाची बादशाही घेत आहोत, तर काय योगबळानी मुले होणार नाहीत. ती आहेच निर्विकारी दुनिया. आता तुम्ही शुद्रापासून ब्राह्मण बनले आहात. असे चांगल्या रितीने समजावले पाहिजे, जे मनुष्य समजतील यांचे जवळ पुर्ण ज्ञान आहे. थोडे पण या गोष्टीला समजले तर कळेल कि हा ब्राह्मण कुळातील आहे. कोणासाठी तर झटक्यात वाटते की, हा ब्राह्मण कुळातील नाही. येतात तर अनेक प्रकारचे ना. तर आध्यात्मिक निराकार ईश्वर पित्याचे हे आध्यात्मिक विश्वविद्यालय आहे, असे लिहून पहा, काय होते? विचार सागर मंथन करुन अक्षर जुळविली पाहिजेत, यामध्ये फार युक्तीने लिहायला पाहिजे. तर मनुष्य समजतील येथे हे ज्ञान ईश्वर पिता समजावत आहेत, किंवा राजयोग शिकवत आहेत. हे अक्षर पण साधारण आहे. जीवनमुक्ती दैवी राज्य एका सेकंदामध्ये अशी अक्षर असावीत, जी मनुष्याच्या बुध्दीत बसतील. ब्रह्माद्वारे विष्णू पुरीची स्थापना होत आहे. मनमनाभवचा अर्थ आहे, बाबा आणि वारशाची आठवण करा. तुम्ही आहात, ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभुषण, स्वदर्शन चक्रधारी. आता ते तर स्वदर्शन चक्र विष्णूला दाखवतात. कृष्णाला पण, 4 हात दाखवितात. आता त्यांना 4 हात कसे असू शकतील? बाबा किती चांगले प्रकारे समजावत आहेत. मुलांना फार विशालबुध्दी, पारसबुध्दी बनायचे आहे. सतयुगामध्ये यथा राजा राणी तथा प्रजा पारसबुध्दी असतात. ती आहे पारस दुनिया ही आहे दगडाची दुनिया. तुम्हाला हे ज्ञान मिळत आहे. मनुष्याला देवता बनण्याचे तुम्ही, तुमचे राज्य श्रीमतावर परत स्थापन करत आहात. बाबा आम्हाला, युक्ती सांगत आहेत कि, राजा महाराजा कसे बनू शकता? तुमच्या बुध्दीमध्ये हे ज्ञान भरत आहे, इतरांना समजावण्यासाठी. सृष्टी चक्राच्या गोळ्यावरती समजावणे पण फार सोपे आहे. यावेळेस लोकसंख्या पहा किती आहे. सतयुगामध्ये किती थोडे असतात. संगम तर आहे ना. ब्राह्मण तर थोडे असतात ना. ब्राह्मणांचे युग पण लहान आहे. ब्राह्मणानंतर आहेत देवता. त्यांची वाढ होत राहते. पाळणा असतो ना. तर शिडीच्या चित्रा बरोबर विराट रुप पण असेल तर समजावणे स्पष्ट होईल. तर तुमच्या कुळातील जे असतील त्यांच्या बुध्दीमध्ये रचनाकार आणि रचनेचे ज्ञान सहजच बसेल. त्यांच्या चेहऱ्याद्वारेच माहित पडते कि, हा आमच्या कुळाचा आहे कि नाही? जर नसेल तर वेड्यासारखे एैकेल. जो समजणारा असेल, तो ध्यान देवून एैकेल. एकावेळेस कोणाला पूर्ण बाण लागला तर मग येत राहिल. कोणी प्रश्न विचारतील, आणि कोणी चांगले फुल असेल तर रोज स्वत:हून येईल, आणि पूर्ण समजून घेईल. चित्राद्वारे तर कोणी पण समजू शकते. ही तर बरोबर देवी देवता धर्माची स्थापना बाबा करत आहेत. कोणी तर न विचारता स्वत:च समजतात. कोणी तर फारच विचारतात, समजत काहीच नाही, मग समजावले जाते, गोंधळ तर घालायचा नाही, नंतर असे म्हणतात ईश्वर तुमचे रक्षण पण करत नाहीत. आता ते रक्षण काय करत आहेत, ते तर तुम्ही ओळखत आहात. कर्माचा जमा खर्च तर प्रत्येकाला आप-आपला चुक्तू करावयाचा आहे. असे फार आहेत, तब्येत ठीक नसेल तर म्हणतात रक्षण करा. बाबा तर सांगतात कि, मी तर येतो पतितांना पावन बनविण्यासाठी. हा धंदा तुम्ही पण शिका. बाबा 5 विकारावर विजय प्राप्त करवितात तर, आणखीनच जोरात विकार सामना करतात. विकाराचे तुफान फारच जोरात येते. बाबा तर म्हणतात कि, बाबाचे बनल्यानंतर हे सर्व आजार उसळी खातील, वादळ जोरात येईल. पूर्ण मल्लयुध्द आहे. चांगल्या चांगल्या पैलवानाला पराभूत करते. म्हणतात पण कि, ना इच्छिता पण वाईट दृष्टी जाते, रजिस्टर खराब होऊन जाते. कुदृष्टी वाल्यांबरोबर बोलले पण नाही पाहिजे. बाबा सर्व सेंटर वरील मुलांसाठी समजावत आहेत की, कुदृष्टी वाले फार आहेत, नांव घेतल्याने आणखीन फितूर बनतात. स्वत:चा सत्यानाश करणारे उल्टे काम करतात. काम विकार नाकाला धरतो. माया सोडत नाही, कुकर्म, कुदृष्टी, कुवचन मुखातून निघतात. कुचलन वागतात. त्यामुळे फार फार सावधान राहायचे आहे.

तुम्ही मुले जेव्हा प्रदर्शनी इ. करतात तर अशी युक्ती करा की, कोणी पण सहजच समजेल. हे गीतेचे ज्ञान स्वत:. बाबा शिकवत आहेत, यात कोणत्या ग्रंथ इत्यादीची गोष्ट नाही. हे तर शिक्षण आहे. पुस्तक गीता तर येथे नाही. बाबा शिकवत आहेत. पुस्तक थोडेच हातात घेत आहेत. मग हे गीता नाव कोठून आले? ही सर्व धर्मशास्त्रे बनतातच नंतर. किती अनेक मठ पंथ आहेत. सर्वांची आप-आपली शास्त्रे आहेत. लहान फांद्या ज्या पण आहेत, लहान लहान मठ मथ आहेत, त्यांचे पण शास्त्र इत्यादी आप-आपले आहेत. तर ते आहेत सर्व बाल बच्चे. त्यांचेतून तर, मुक्ती मिळत नाही. सर्वशास्त्र शिरोमणी गीतेची महिमा आहे. गीतेचे ज्ञान सांगणारे पण आहेत ना. तर हे ज्ञान बाबाच येऊन देत आहेत. कोणते पण शास्त्र इ. हातात थोडेच घेतात. मी पण शास्त्र वाचलेले नाही, तुम्हाला पण शिकवत नाही. ते शिकतात आणि शिकवितात. येथे शास्त्राची गोष्ट नाही. बाबा आहेतच ज्ञानाचे सागर, ते तुम्हाला साऱ्या वेद शास्त्राचे सार सांगत आहेत. मुख्य आहेतच 4 धर्माचे, 4 धर्मशास्त्र. ब्राह्मण धर्माचे कोणते पुस्तक आहे काय? किती समजण्याच्या गोष्टी आहेत. हे सर्व बाबा बसून सविस्तर समजावत आहेत. मनुष्य सर्व पत्थरबुध्दीचे आहेत, तेव्हा तर एवढे कंगाल बनले आहेत. देवता आहेत सुवर्ण युगात, तेथे सोन्याचे महल बनतात, सोन्याच्या खाणी होत्या. आता तर खरे सोनेच नाही. सारी गोष्ट भारतावरच आहे. तुम्ही देवी देवता पारसबुध्दी होता, विश्वावर राज्य करत होता. आता स्मृती आली आहे आम्ही स्वर्गाचे मालक होतो, आता नरकाचे मालक बनलो आहे. आता परत पारसबुध्दी बनत आहोत. हे ज्ञान तुहा मुलांच्या बुध्दीमध्ये आहे, ते मग इतरांना सांगावयाचे आहे. विश्वनाटकानुसार अभिनय चालत आहे. जी वेळ जात आहे, ती जशाच्या तशा पुरुषार्थ करविते ना. ज्या मुलांना नशा आहे, कि स्वत: भगवान आम्हाला स्वर्गाचे मालक बनविण्यासाठी पुरुषार्थ करवित आहेत, त्यांचा चेहरा फार सुंदर खुश राहतो. बाबा येतात मुलांकडून पुरुषार्थ करुन घेण्यासाठी आणि प्रालब्ध देण्यासाठी. हे पण तुम्ही जाणता, दुनियेमध्ये हे कोणीच जाणत नाहीत. स्वर्गाचे मालक बनविण्यासाठी भगवान पुरुषार्थ करवित आहेत. तर खुशी झली पाहिजे. चेहरा फार सुंदर खुशनम: असला पाहिजे. बाबाच्या आठवणीने तुम्ही सदैव हर्षित राहाल. बाबाला विसरल्यानेच उदासी येते. बाबा आणि वारशाची आठवणीमुळे खुशनुम: होऊन जाता. प्रत्येकाला सेवेद्वारे समजले जाते. बाबाला मुलांचा सुगंध तर येतो ना. सपूत मुलांचा सुगंध येतो, कपूतची दुर्गंध येतो. बागेमध्ये सुगंध देणारे कुळच घेण्याची इच्छा होते. धोतऱ्याचे कोण घेणार? बाबाची यथार्थरितीने आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. मायेच्या मल्ल युध्दामध्ये पराजित व्हावयाचे नाही. ध्यानात ठेवा, कधी मुखाद्वारे कुवचन न निघो, कुदृष्टी, कुचलन, कुकर्म होऊ नयेत.

2. उत्तम खुशबुदार फुल बनायचे आहे. नशा ठेवा की स्वत: भगवान आम्हाला शिकवित आहेत. बाबाच्या आठवणीने नेहमी हर्षित राहावयाचे आहे, कधी उदास व्हायचे नाही.

वरदान:-
पुरुषार्थ आणि प्रालब्ध च्या हिशोबाला ओळखून तीव्रगतीने पुढे जाणारे ज्ञान संपन्न भव :-
 

पुरुषार्था द्वारे जास्त काळासाठी प्रालब्ध बनविण्याची हीच वेळ आहे, त्यामुळे ज्ञानसंपन्न बनून, तीव्रगतीने पुढे चला. यामध्ये हा विचार करु नका की, आज नाही तर उद्या बदलेन. यालाच अलबेलापण म्हटले जाते. आतापर्यंत बापदादा स्नेहाचे सागर बनून सर्व संबंधाचा स्नेह देवून मुलांचा अलबेलापण, साधारण पुरुषार्थ पाहून, एैकून पण विशेष मदतीद्वारे जादा गुण देवून पुढे घेऊन जात आहेत. तर ज्ञानसंपन्न बनून हिम्मत आणि मदतच्या विशेष वरदानाचा लाभ घ्या.

बोधवाक्य:-
प्रकृतीचे दास बनणारेच उदास होतात , त्यामुळे प्रकृतीजीत बना ...!!!