16-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, तुम्हाला आपल्या योग बळाने विकर्म विनाश करून पवित्र बणुन पवित्र दुनिया
बनवायची आहे, ही तुमची सेवा आहे.
प्रश्न:-
देवी-देवता
धर्माची कोणत्या विशेषताचे गायन आहे?
उत्तर:-
देवी देवता
धर्म खूप सुख देणारा आहे. तेथे दुःखाचे नाव सुद्धा नसते. तुम्ही मुलं ७५%सुख
प्राप्त करता. जर अर्धे सुख असले असते तर त्यामध्ये काहीही आनंद नाही
ओम शांती।
भगवानुवाच शिवबाबांनी समजाविले आहे की, कोणत्याही मनुष्यांना ईश्वर म्हणू शकत नाही.
देवतांना सुद्धा ईश्वर म्हणता येणार नाही. ईश्वर तर निराकार आहेत. त्यांचे कोणतेही
साकारी किंवा आकारी रूप नाही. सूक्ष्म वतन वासियांचे सुद्धा आकारी रूप आहे. त्यामुळे
त्यांना सूक्ष्म वतनवासी म्हणले जाते. इथे साकारी शरीर आहे, त्यामुळे याला स्थूलवतन
वासी म्हणले जाते. सूक्ष्मवतन मध्ये हे स्थूल ५ तत्वांनी बनलेले शरीर नसते. हे पाच
तत्त्वांचे मनुष्य शरीर बनलेले आहे. याला मातीचा पुतळा म्हणले जाते. सूक्ष्मवतन
वासियांना मातीचा पुतळा म्हणता येणार नाही. देवता धर्माची आत्मा सुद्धा मनुष्यच आहे
परंतु त्यांना दैवी गुण वाले मनुष्य म्हणतात. शिवबाबांकडून दैवी गुण प्राप्त होतात.
दैवी गुणाच्या मनुष्यामध्ये आणि आसुरी गुणाच्या मनुष्य मध्ये किती फरक आहे. मनुष्यच
शिवालया मध्ये आणि वैशालया मध्ये राहण्याच्या लायक बनतात. सतयुगाला शिवालय म्हणले
जाते. सतयुग येथेच असते.ते काही मुळवतन किंवा सूक्ष्म वतन मध्ये नाही. तुम्ही मुलं
जाणता शिवबाबांनी स्थापन केलेले ते सतयुग आहे. केव्हा स्थापन केले? संगमयुगावर. हे
पुरुषोत्तम युग आहे. आता ही दुनिया पतित तमोप्रधान आहे. याला सतोप्रधान नवीन दूनिया
म्हणता येणार नाही.नवीन दुनियेला सतोप्रधान म्हणले जाते.तीच दुनिया जेव्हा जुनी बनते
तेव्हा तिला तमोप्रधान म्हणले जाते,परत ती सतोप्रधान कशी बनेल? तुम्हा मुलांच्या
योगबळाच्या आधारावर बनते. योगबळानेच तुम्हा आत्म्याचे विकर्म विनाश होतात आणि तुम्ही
पवित्र बनता.पवित्र साठी जरूर पवित्र दुनिया पाहिजे.नविन दुनियेला पवित्र आणि जुन्या
दुनियेला अपवित्र म्हंटले जाते. पवित्र दुनिया बाबा स्थापन करतात आणि अपवित्र दुनिया
रावण स्थापन करतो. या गोष्टी मनुष्याना माहित नाहीत. हे ५ विकार नसते तर मनुष्यांनी
दुःखी होऊन बाबांना बोलविले नसते. बाबा म्हणतात मी आहेच दुःख हर्ता, सुख कर्ता.
रावणाचा ५ विकारांचा १० शिशाचा पुतळा बनविलेला आहे. त्या रावणाला शत्रू समजुन
जाळतात. ते पण असे नाही कि द्वापाराच्या सुरवातीपासून जाळायाला सुरुवात करतात,नाही.
जेव्हा तमो प्रधान बनतात, तेव्हा काही मत-मतांतर असणारे, बसून या नविन गोष्टी
काढतात. जेव्हा कोणी खुप दुःखी होतात, तेव्हा त्याचा पुतळा बनवतात. तेव्हा येथे
सुद्धा मनुष्याना जेव्हा खूप दुःख होते त्या वेळेस या रावणाचा पुतळा बनवुन जळतात.
तुम्हा मुलांना७५% सुख मिळते. जर अर्धे दुःख असते तर तो आनंद प्राप्त झाला नसता.
बाबा म्हणतात तुमचा हा देवी-देवता धर्म खूप सुख देणारा आहे. सृष्टी तर अनादि बनलेली
आहे. हे कोणी विचारू शकत नाही, कधी बनली आणि परत पूर्ण केव्हा होणार? हे चक्र फिरतच
राहते. शास्त्रामध्ये तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष सांगितलेले आहे.जरूर संगम युग पण
असेल, ज्यामध्ये सृष्टी परिवर्तन होईल. आत्ताच असं तुम्ही अनुभव करता, असं कोणी समजू
शकत नाही. एवढं पण समजत नाही की, लहानपणी चे नाव राधाकृष्ण आहे, नंतर स्वयंवर
होते,दोन्ही वेगवेगळ्या राजधानीचे असतात मग त्यांची स्वयंवर होते तर लक्ष्मीनारायण
बनतात. ह्या गोष्टी बाबा तुम्हाला समजावितात. बाबाच ज्ञानाचे सागर आहेत. असं नाही
कि ते सर्वांच्या मनातले ओळखतात.आता तुम्ही मुले समजता बाबा तर येऊन ज्ञान देतात.
ज्ञान शाळेमध्ये मिळते. शाळेमध्ये तर मुख्य ध्येय जरूर पाहिजे.आता तुम्ही ज्ञान घेत
आहात.पतित दुनियेमध्ये राज्य करू शकत नाही.राज्य नवीन पवित्र दुनियेमध्ये करणार.
राजयोग सतयुगामध्ये शिकवले जात नाही. संगमयुगा मध्ये बाबा येऊन राजयोग शिकवितात, ही
बेहद्द ची गोष्ट आहे. बाबा केव्हा येतात हे कोणालाच माहीत नाही, घोर अंधकार मध्ये
आहेत. ज्ञानसूर्य नावामुळे जपान मधील लोक स्वतःला सूर्यवंशी समजतात. वास्तवामध्ये
सूर्यवंशी तर देवता आहेत. सूर्यवंशी चे राज्य सतयुगा मध्ये होते, गायन पण आहे,
ज्ञान सूर्य प्रकटला…... तर भक्तीचा अंधकार विनाश होतो. नवीन दुनियाच जुनी बनते,परत
जुनी ती पुन्हा नवीन बनते. हे केवढे मोठे घर आहे,एवढा मोठा मंडप आहे. सूर्य चंद्र
तारे किती काम करतात, रात्रीला खूप काम चालते. अशे सुद्धा काही राजे लोक आहेत, जे
दिवसा झोपतात आणि रात्री आपली सभा घेतात, खरीदारी करतात. हे आत्ता सुद्धा कोठे-कोठे
चालत राहते. कारखाने इत्यादी सुद्धा रात्री चालतात. हे आहे हदचे दिवस आणि रात्र, ती
बेहद्द ची गोष्ट आहे, या गोष्टी तुमच्या शिवाय आणखीन कोणाच्या बुद्धीमध्ये नाहीत.
शिवबाबांना तर जाणतच नाही. बाबा प्रत्येक गोष्ट समजावीत राहतात. ब्रम्हा साठी सुद्धा
समजविलेले आहे, हे प्रजापिता आहेत. बाबा सृष्टी रचतात तर जरूर कोणामध्ये तरी प्रवेश
करतील ना. पवित्र मनुष्य तर सतयुगांमध्ये असतात कलियुगामध्ये तर सर्वजण विकाराने
जन्म घेतात म्हणून पतित म्हणले जाते. मनुष्य म्हणतात विकारा शिवाय सृष्टी कशी चालू
शकेल? अरे तुम्ही देवतांना तर संपूर्ण निर्विकारी म्हणता,किती शुद्धतेने त्यांची
मंदिर बनविले जातात. ब्राह्मणांशिवाय दुसऱ्या कोणाला आत प्रवेश नसतो वास्तवामध्ये
या देवतांना विकारी कोणी स्पर्श करू शकत नाही परंतु आज काल तर पैशाने सर्व काही
चालते. घरामध्ये मंदिर इत्यादी बनवितात तरीसुद्धा ब्राम्हणाला बोलविले जाते. आता
विकारी तर ते ब्राम्हण सुद्धा आहेत, फक्त नाव ब्राह्मण आहे. ही तर दुनियाच विकारी
आहे, तर पूजा सुद्धा विकारीं कडूनच होते. निर्विकारी कुठून येणार? निर्विकारी तर
सतयुगामध्ये असतात. असे नाही की विकारांमध्ये जातात तर त्यांना, निर्विकारी म्हणले
जाते. शरीराचा तर विकाराने जन्म होतो. बाबांनी तर एकच गोष्ट सांगितले आहे की, ही
विकारी दुनिया रावण राज्य आहे. राम राज्य संपूर्ण निर्विकारी आहे. रावण राज्यामध्ये
विकारी आहे. सतयुगामध्ये पवित्रता होती तर सुख शांती पण होती. तुम्ही दाखवू शकता या
युगामध्ये लक्ष्मीनारायण याचे राज्य होते. तेथे पाच विकार नसतात. ते आहेच पवित्र
राज्य, जे ईश्वर स्थापन करतात. ईश्वर पतित राज्य स्थापन करत नाही. सतयुगामध्ये जर
पतित असते तर बाबांना बोलविले असते ना. तेथे तर कोणी बोलवित नाही. सुखामध्ये कोणी
आठवण करीत नाही. ईश्वराची महिमा करतात ना, सुखाचे सागर, पवित्रतेचे सागर…. म्हणतात.
दुनियेत शांती व्हावी. आता मनुष्य संपूर्ण दुनियेमध्ये शांती स्थापन कसे करतील?
शांतीचे राज्य तर एका स्वर्गामध्येच होते. जेव्हा कोणी एकमेकांसोबत भांडतात तेव्हा
त्यांना शांत करावे लागते. तेथे तर असतेच एक राज्य.
बाबा म्हणतात की जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. या महाभारत लढाईमध्ये सर्व काही
नष्ट होते. विनाशकाले विपरीत बुद्धि - हे अक्षर सुद्धा लिहिलेले आहे ना. बरोबर
पांडव पण तुम्हीच आहात ना. तुम्ही आहात रुहानी पंडे. सर्वांना मुक्तिधामचा रस्ता
दाखवितात. ते आत्म्याचे घर शांतीधाम आहे.हे दुःखधाम आहे.आता बाबा म्हणतात या
दुखधामाला विसरून जावा. बस, आता तर आपल्याला शांतीधाम मध्ये जायचे आहे. हे आत्मा
म्हणते, आत्मा अनुभव करते. आत्म्याला स्मृती आली आहे कि मी आत्मा आहे. बाबा म्हणतात
मी जो आहे जसा आहे…. दुसरे तर कोणी मला ओळखू शकत नाही. तुम्हाला समजवले आहे मी बिंदी
आहे. तुम्हालाही सारखे सारखे बुद्धीमध्ये राहिले पाहिजेत आम्ही 84 चक्र कसे पूर्ण
केले आहे. यामध्ये बाबांची पण आठवण येईल, घर सुद्धा आठवणीत येईल आणि चक्र सुद्धा
आठवणीत येईल. या दुनियेच्या इतिहास भूगोल आला तुम्ही मुलं जाणता किती खंड आहे. किती
वेळा युद्ध झाले. सतयुगामध्ये युद्धाची तर गोष्टच नाही. कुठे राम राज्य आणि कोठे
रावण राज्य. बाबा म्हणतात आता तर तुम्ही जसे की ईश्वरी राज्यांमध्ये आहात, कारण
ईश्वर येथे आले आहेत राज्य स्थापन करण्यासाठी. ईश्वर स्वतः तर राज्य करीत
नाहीत.निष्काम सेवा करतात. श्रेष्ठ ते श्रेष्ठ ईश्वर, सर्व आत्म्यांचे पिता आहेत.
बाबा म्हणल्याने आनंदाचा पारा चढला पाहिजे. अतिंद्रिय सुख तुमच्या अंतिम अवस्थेचे
गायन आहे. जेव्हा परीक्षेचे दिवस येतील, त्या वेळेस सर्वांना साक्षात्कार
होईल.अतिंद्रिय सुख सुद्धा मुलांना नंबरानुसार आहे. कोणी तर बाबांच्या आठवणीमध्ये
खूप आनंदामध्ये राहतात.
तुम्हा मुलांना संपूर्ण दिवस हाच अनुभव झाला पाहिजे ओहो, बाबा तुम्ही आम्हाला किती
श्रेष्ठ बनविले. तुमच्याकडून किती आम्हाला सुख मिळात आहे… बाबांना आठवण करताना
प्रेमाचे अश्रू येतात. कमाल आहे, तुम्ही येऊन आम्हाला दुःखापासून सोडविता. विषय
सागरा पासून क्षीरसागराकडे घेऊन जातात, संपूर्ण दिवस हाच अनुभव झाला पाहिजे.संपूर्ण
बाबा च्या वेळेस आठवण करून देतात त्यावेळी तुम्हाला किती आनंद होतो. शिव बाबा
आम्हाला राजयोग शिकवीत आहेत. बरोबर शिवरात्री पण साजरी केली जाते. परंतु मनुष्यानी
शिवबाबांच्या बदल्यात श्रीकृष्णाचे नाव गीतेमध्ये दिले आहे. ही सर्वात मोठी एकच चूक
आहे. नंबरवन गीते मध्येच चूक केली आहे, नाटकच कसे बनले आहे. बाबा येऊन ही चूक
सांगतात पतित-पावन मी आहे की श्रीकृष्ण? तुम्हाला मी राजयोग शिकून मनुष्य पासून
देवता बनविले. गायन सुद्धा माझे आहे ना. अकालमूर्त, अजोनि…. श्रीकृष्णाची हि महिमा
थोडीच असू शकते. श्रीकृष्ण तर पुनर्जन्म मध्ये येतात. त्यांच्या बुद्धी मध्ये ह्या
गोष्टी नंबरा नुसार राहतात. ज्ञानासोबत वर्तणूक सुद्धा चांगली पाहिजे. पायात सुद्धा
काही कमी नाही. जे सुरुवातीला आले त्यांच्या मध्ये जरूर एवढी ताकत असेल. भूमिका
वटविणारे वेगवेगळे असतात. हीरो हीरोइन चा पार्ट भारत वासियांना मिळालेला आहे. तुम्ही
सर्वांना रावण राज्यापासून सोडविता. श्री मतामुळे तुम्हाला किती शक्ती मिळते माया
सुद्धा खूप जबरदस्त आहे जी चालता-चालता धोका देते. बाबा प्रेमाचे सागर आहेत, जे
तुम्हा मुलांना स्वतः सारखे, प्रेमाची सागर बनवितात. कधी कटु वचन बोलू नका. कुणाला
दुःख दिले तर दुःखी होऊन मराल. या सवयी सर्व सोडल्या पाहिजे. सर्वात वाईट गोष्ट आहे
विषय सागरामध्ये गोते खाणे. बाबासुद्धा म्हणतात काम महा शत्रू आहे, किती मुली मार
खातात. कोणी कोणी तर मुलींना म्हणतात जरूर पवित्र बना. अरे पहिल्यांदा तुम्ही तर बना.
मुलींना समर्पित केले तर खर्च इत्यादींपासून मुक्ती मिळाली कारण समजतात-माहित नाही
दुसऱ्या घरी दिल्या नंतर सुख इत्यादी मिळेल कि नाही? आज काल लग्ना मध्ये पण खर्च
खूप लागतो. गरीब लोक तर लगेच आपल्या मुलींना समर्पित करतात. काहींना तर मोह असतो.
सुरवातीला एक भिल जमातीतील होती, तिला येऊ देत नव्हते कारण समजत होते कि येथे जादू
करतात. ईशवराला जादूगार पण म्हणतात ना. दयावान पण ईशवराला म्हणतात. कृष्णाला थोडंच
म्हणणार. दयावान त्याला म्हणतात जो त्रासा पासून सोडवितात. रावण बेरहम आहे.
ज्ञान भक्ती मग वैराग,असे नाही कि भक्ती, ज्ञान मग वैराग म्हणता येईल. ज्ञानाचा
वैराग थोडंच म्हणता येईल.भक्तीपासून वैराग करायचा असतो, त्यामुळे ज्ञान भक्ती वैराग
हे अक्षर बरोबर आहे. बाबा तुम्हला बेहदचा म्हणजे जुन्या दुनियेचा वैराग करवितात.
सन्यासी तर फक्त घराचा वैराग करवितात. हे सुद्धा नाटका मध्ये नोंदलेले आहे.
मनुष्यांच्या बुद्धी मध्ये बसतच नाही. भारत १०० % भरपूर, निर्विकारी, निरोगी होता.
कधी अचानक मृत्यू होत नव्हती. या सर्व गोष्टीची धारणा खूप थोड्या मुलांनाच होते. जे
चांगली सेवा करतात, ते खूप मोठे साहुकार बनतील. मुलांना संपूर्ण दिवस बाबाच्या
आठवणीत राहिले पाहिजे. परंतु माया आठवण करू देत नाही.बाबा म्हणतात जर सतोप्रधान
बनायचे असेल तर चालता-फिरता जेवण करताना माझी आठवण करा. मी तुम्हाला विश्वात मालक
बनवतो, तर तुम्ही माझी आठवण नाही करणार का! खूप जणांना मायेचे वादळ येतात. बाबा
समजवितात, हे तर होणार आहे. नाटकांमध्ये नोंद आहे. स्वर्गाची स्थापना होत आहे.
नेहमीच नवीन दूनिया राहील, असे नाही. चक्र फिरत राहील तर जरूर खाली उतरत राहतील.
प्रत्येक गोष्ट नवीन पासून जुनी जरूर होते. यावेळी मायेने सर्वांना एप्रिल
फूल(मूर्ख) बनविले आहे. बाबा येऊन गुल-गुल बनवितात. अच्छा!
गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात, आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(1) बाबांसारखे
प्रेमाची सागर बनायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही. कटु वचन बोलायचे नाही. वाईट
सवयी काढून टाकायच्या आहेत.
(2) बाबांसोबत गोड
गोड गोष्टी करत याच अनुभूती मध्ये राहायचे आहे की, ओहो बाबा, तुम्ही आम्हाला किती
श्रेष्ठ बनविले! तुम्ही आम्हाला किती सुख दिले! बाबा तुम्ही आम्हाला क्षीरसागर मध्ये
घेऊन जातात... संपूर्ण दिवस बाबा बाबा आठवणीत राहिले पाहिजे.
वरदान:-
आपल्या
प्रत्येक कर्म आणि विशेषतांद्वारे दाता कडे इशारा करणारे खरे सेवाधारी भव.
खरी सेवा करणारे,
कोणत्याही आत्म्याला सहयोग देऊन स्वतःमध्ये अडकवीत नाहीत. ते सर्वांचं कनेक्शन
बाबांसोबत करवतील. त्यांचे प्रत्येक शब्द बाबांची स्मृती देणारे असतील. त्यांच्या
प्रत्येक कर्मातुन बाबा दिसून येतील. त्यांना हा विचार सुद्धा येणार नाही कि माझ्या
विशेषत्यामुळे हे माझे सहयोग आहेत. जर तुम्हाला पाहिले, बाबांनाही पाहिले, तर ती
सेवा नाही. बाबांना विसरविले. खरे सेवाधारी सत्याकडे सर्वांचे संबंध जोडतील
स्वता:कडे नाही.
बोधवाक्य:-
कोणत्याही
प्रकारची अर्जी टाकण्यापेक्षा नेहमी राजी रहा.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष अभ्यास
अभ्यास करा किया
स्थूल देहामध्ये प्रवेश करून जेव्हा पाहिजे कार्य करा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा
वेगळे व्हा. एका सेकंदा मध्ये धारण करा आणि एका सेकंदामध्ये देहभान सोडून देही बना,
हाच अभ्यास अव्यक्त स्थितीचा आधार आहे.