17-02-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांनो , बाबा तुम्हाला अविनाशी ज्ञान रत्नाचे दान देतात , तुम्ही परत
दुसऱ्यांना दान देत रहा , ज्ञानाद्वारेच सद्गती होईल "
प्रश्न:-
कोणता नवीन
रस्ता तुम्हा मुलांशिवाय कोणीही जाणत नाहीत?
उत्तर:-
घराचा रस्ता किंवा स्वर्गा मध्ये जाण्याचा रस्ता,आता बाबा द्वारे तुम्हालाच मिळाला
आहे.तुम्ही जाणता शांतीधाम आम्हा आत्म्यांचे घर आहे, स्वर्ग वेगळा आहे,शांतीधाम
वेगळे आहे. हा नवीन रस्ता तुमच्या शिवाय कोणीही जाणत नाही.तुम्ही म्हणता आत्ता
कुंभकर्णाची निद्रा सोडा,डोळे उघडा, पावन बना.पावन बणुनच घरी जाऊ शकाल.
गीत:-
हे सजनिया
तुम्ही जागे व्हा , आता नवीन युग आले की आले…
ओम शांती।
भगवानुवाच.हे तर बाबांनी समजले आहे की,मनुष्यांना देवता किंवा भगवान म्हटले जात
नाही,कारण यांचे साकारी रूप आहे,बाकी परमपिता परमात्माला,न साकारी,न आकारी रुप आहे
म्हणून त्यांना शिव परमात्मा म्हटले जाते.ज्ञानाचे सागर ते एकच आहेत. कोणत्या
मनुष्यामध्ये हे ज्ञान होऊ शकत नाही.कोणाचे ज्ञान?रचनाकार आणि रचना च्या आधी मध्य
अंतचे ज्ञान किंवा आत्मा आणि परमात्मा चे,हे ज्ञान कोणा मध्येच नाही.तर बाबा येऊन
जागे करतात,हे सजनिया,हे भक्तीया जागे व्हा.सर्व पुरुष किंवा स्त्री भक्तीया
आहेत,भगवंताची आठवण करतात. सर्व सजनिया आठवण करतात एकाच शिव साजनची.सर्व
सजनीया,आत्मे परमपिता परमात्मा साजनीची आठवण करतात.सर्व सीता आहेत,एक राम परमपिता
परमात्माच्या.राम अक्षर का म्हणतात, कारण रावण राज्य आहे ना. तर त्याच्या भेटीमध्ये
राम राज्य म्हटले जाते.त्यांना ईश्वर पण म्हणतात,भगवान पण म्हणतात,त्यांचे खरेखुरे
नाव शिव आहे.तर आता म्हणतात जागे व्हा, आता नवयुग येत आहे,जुने समाप्त होत आहे.या
महाभारत लढाईच्या नंतर सतयुगाची स्थापना होत आहे आणि या लक्ष्मीनारायणाच्या राज्य
येईल.जुने नष्ट होत आहे म्हणून बाबा म्हणतात मुलांनो कुंभाकर्णा ची निद्रा सोडा, आता
डोळे उघडा,नवीन दुनिया येत आहे.नवीन दुनियेला स्वर्ग म्हटले जाते,हा नवीन रस्ता
आहे.हे घर किंवा स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता कोणीही जाणत नाहीत. स्वर्ग वेगळा
आहे,शांतीधाम जिथे आत्मे राहतात ते ठिकाण वेगळे आहे.आता बाबा म्हणतात जागे
व्हा.तुम्ही रावण राज्यामध्ये पतित बनले आहात.या वेळेत एक पण पवित्र आत्मा होऊ शकत
नाही.पुण्यात्मा म्हणू शकत नाही. जरी मनुष्य दान पूर्ण करतात परंतु पवित्र आत्मा एक
पण नाही.येथे कलियुगामध्ये पतित आत्मे,सतयुगा मध्ये पावन आत्मे आहेत त्यामुळे
म्हणतात,बाबा येऊन आम्हाला पावन आत्मा बनवा.ही पवित्रतेची गोष्ट आहे. यावेळेत बाबा
येऊन तुम्हा मुलांना अविनाश ज्ञान रत्नांचे दान देतात.असे म्हणतात,हे ज्ञान तुम्ही
दुसऱ्यांना पण देत रहा,तर पाच विकाराचे ग्रहण लागले आहे,ते सुटेल.पाच विकाराचे दान
द्या,तर दुःखाचे ग्रहण नष्ट होईल.पवित्र बणुन सुखधाम मध्ये चालले जाल.पाच विकारां
मध्ये नंबर एक काम विकार आहे,त्याला सोडुन पवित्र बना.स्वता: पण म्हणतात, हे
पतितपावन आम्हाला पावन बनवा.पतित विकारी ला म्हटले जाते.हा सुख आणि दुःखाचा खेळ
भारतासाठी आहे,परत बाबा भारतामध्येच येऊन,साधारण तनामध्ये प्रवेश करतात,परत यांचे
चरित्र बसून ऐकवतात.येथे सर्व ब्राह्मण ब्राह्मण या प्रजापिता ब्रह्माची संतान
आहेत.तुम्ही सर्वांना पवित्र बनण्याची युक्ती सांगतात. तुम्ही ब्रह्माकुमार आणि
कुमारी, विकारांमध्ये जाऊ शकत नाहीत.तुम्हा ब्राह्मणांचा हा एकच जन्म आहे.देवता
वर्णांमध्ये तुम्ही २० जन्म घेतात,वैश्य शूद्र वर्णां मध्ये ६३ जन्म.ब्राह्मण वर्णा
मध्ये हा एकच जन्म आहे.यामध्ये पवित्र बनायचे आहे.बाबांच्या आठवणी द्वारे किंवा
योगबळा द्वारे विकर्म भस्म होतील.हा एकच जन्म पवित्र बनायचे आहे.सतयुगा मध्ये कोणी
पतीत नसते.आता एक अंतिम जन्म जर पवित्र बनाल तर,२१ जन्म पावन रहाल.पावन होते,आत्ता
पतित बनले आहात. पतित आहात तेव्हा तर बोलवतात. पतित कोणी बनवले, रावणाच्या मताने.
तुम्हा मुलांना माझ्याशिवाय, रावण राज्या पासून,दुःखापासून कोणीही मुक्त करू शकत
नाही.सर्व काम विकाराच्या अग्नी वरती बसून,पतित झाले आहेत.मला येऊन ज्ञान चितेवर
बसवावे लागते.ज्ञानाचे जल द्यावे लागते.सर्वांची सद्गती करावी लागते. चांगल्या
रीतीने अभ्यास करतात त्यांची सद्गती होते बाकी सर्व शांतीधाम मध्ये जातात.सतयुगा
मध्ये फक्त देवी देवता आहेत,त्यांची सद्गती झालेली आहे बाकी सर्वांना गती किंवा
मुक्ती मिळते.पाच हजार वर्षापूर्वी या देवतांचे राज्य होते,लाखो वर्षाची गोष्ट
नाही.आता बाबा म्हणतात, गोड गोड मुलांनो, माझी आठवण करा. मनमना भव,हे अक्षर तर
प्रसिद्ध आहेत. भगवानुवाच कोणत्याही देहधारी ला भगवान म्हटले जात नाही.आत्मे एक
शरीर सोडून दुसरे घेतात.कधी स्त्री,कधी पुरुष बनतात.भगवान कधी जन्म-मृत्यूच्या
खेळामध्ये येत नाहीत.हे अविनाशी नाटका मध्ये नोंद आहे.एक जन्म दुसऱ्या जन्माशी मिळू
शकत नाही,परत तुमच्या या जन्माची पुनरावृत्ती होईल,परत हे कार्य,हाच चेहरा परत
घ्याल.हे अविनाश नाटक पूर्वनियोजित आहे.हे बदलू शकत नाही. श्रीकृष्णाला जे शरीर
सतयुगा मध्ये होते परत तसेच मिळेल.ती आत्मा तर येथे आहे. तुम्ही आत्ता जाणता आम्ही
पण असेच बनू.लक्ष्मी-नारायण ची चेहरे तंतोतंत बरोबर नाहीत.परत तसेच बनतील.या गोष्टी
नवीन कोणी समजू शकत नाहीत.चांगल्यारीतीने जेव्हा कुणाला समजून सांगा तेव्हा ८४ चे
चक्र जाणतील आणि समजतील,बरोबर प्रत्येक जन्मांमध्ये नाव रूप चेहरा इत्यादी वेगवेगळे
होते. आत्ता यांच्या अंतिम ८३व्या जन्माचा चेहरा हा आहे,म्हणून नारायणाचा चेहरा
जवळ-जवळ असा दिसून येतो.नाही तर मनुष्य समजू शकणार नाहीत.
तुम्ही मुलं जानतात,मम्मा-बाबा पण हे लक्ष्मीनारायण बनतात.येथे तर पाच तत्व पवित्र
नाहीत.हे शरीर सर्व पतित आहेत.सतयुगा मध्ये शरीर पण पवित्र असतात.कृष्णाला खूपच
सुंदर म्हणतात. नैसर्गिक सुंदरता असते.येथे परदेशात जरी गोरे मनुष्य आहेत परंतु
त्यांना देवता थोडेच म्हणणार,दैवी गुण तर नाहीत ना.तर बाबा खूपच चांगल्या रीतीने
समजून सांगतात.हे उच्च शिक्षण आहे,ज्यामुळे तुमची खूप श्रेष्ठ कमाई होते.अगणित हिरे
जवाहर असतात.स्वर्गा मध्ये तर हिरे जवाहराचे महल असतात.आता ते सर्व गायब झाले
आहेत.तर तुम्ही खूप धनवान बनतात.२१ जन्मा साठी अपरम-अपार कमाई आहे,त्यामुळे खूप
कष्ट घ्यायचे आहेत.देही अभिमानी बनायचे आहे,आम्ही आत्मा आहोत.हे जुने शहर सोडून
आत्ता परत आपल्या घरी जायचे आहे.बाबा घेऊन जाण्यासाठी आले आहेत.आम्ही आत्म्याने ८४
जन्म पूर्ण केले,आता परत पावन बनायचे आहे.बाबांची आठवण करायची आहे,नाहीतर कायामत
ची,विनाशाची वेळ आहे.सर्व सजा खाऊन परत आपल्या घरी जातील,कर्मभोग तर सर्वांना चुक्तू
करायचा आहे.भक्तिमार्ग मध्ये काशी कलवट खातात,तरीही कोणीही मुक्तीला प्राप्त करत
नाहीत.तो भक्तिमार्ग आहे,हा ज्ञानमार्ग आहे.यामध्ये जीव घात करण्याची आवश्यकता राहत
नाही.तो जीव घात आहे.तरीही भावना राहते,मुक्ती ला प्राप्त करावे,म्हणून पापाचा कर्म
भोग चुकतो होऊन परत चालू होतो.आत्ता तर काशीकलवट वर घेण्यासाठी,मुश्किल कोणी साहस
ठेवतात,बाकी मुक्ती किंवा जीवन मुक्ती मिळू शकत नाही.बाबां शिवाय जीवन मुक्ती कोणी
देऊ शकत नाही.आत्मा येत राहतात परत कसे जातील?बाबाच येऊन सर्वांची सद्गती करून वापस
घेऊन जातात.सतयुगा मध्ये खूप थोडे मनुष्य राहतात.आत्मा तर कधी विनाश होत नाही.आत्मा
अविनाशी असून शरीर आहे.सतयुगा मध्ये आयुष्यमान असतात.दुःखाची गोष्ट नाही.एक शरीर
सोडून दुसरे घेतात,जसे सापाचे उदाहरण आहे,त्याला मृत्यू म्हटले जात नाही. दुःखाची
कोणतीच गोष्ट नाही.असे समजतात आता वेळ पूर्ण झाला,या शरीराला सोडून दुसरे घेऊ.आता
तुम्हा मुलांना या शरीराद्वारे वेगळा होण्याचा अभ्यास येथेच करायचा आहे.आम्ही आत्मा
आहोत,आता मला घरी जायचे आहे,परत नवीन दुनियेमध्ये यायचे आहे. नवीन शरीर घेऊ,या
अभ्यासाची सवय लावा.तुम्ही जाणतात आत्मा ८४ शरीर घेते.मनुष्यांनी परत८४ लाख म्हटले
आहे. बाबासाठी तर असंख्य,दगड-मातीत म्हणले आहे.यालाच धर्माची निंदा म्हटले जाते.
मनुष्य स्वच्छ बुद्धी पासून बिलकुलच तुच्छ बुद्धी बनतात.आता बाबा तुम्हाला स्वच्छ
बुद्धी बनवतात.बाबांच्या आठवणी द्वारेच स्वच्छ बुद्धी बनतात.बाबा म्हणतात आता नवयुग
येत आहेत,त्याची लक्षणे ही महाभारत लढाई आहे,ही तीच मुसळे, मिसाईल ची लढाई
आहे,ज्यामध्ये अनेक धर्माचा विनाश एका धर्माची स्थापना झाली होती.तर जरुर भगवान आले
असतील ना. कृष्ण येथे कसे येऊ शकतात.ज्ञानाचे सागर निराकार की कृष्ण आहेत.कृष्णाला
हे ज्ञान नसेल,हे ज्ञानच गायब होते.तुमचे पण भक्तिमार्ग मध्ये परत चित्र
बनतील.तुम्ही पूज्यच परत पुजारी बनतात,कला कमी होत जातात,आयुष्य पण कमी होते कारण
भोगी बनतात.तेथे योगी आहेत.असे नाही कोणाच्या आठवणींमध्ये योग लावत असतील.तेथे तर
आहेतच पवित्र.कृष्णाला पण योगेश्वर म्हणतात.यावेळेस कृष्णाची आत्मा पण बाबांच्या
सोबत योग लावत आहे.कृष्णाची आत्मा यावेळी योगेश्वर आहे.सतयुगा मध्ये योगेश्वर
म्हणणार नाही. तेथे तर राजकुमार बनते.तर तुमची अंतिम अवस्था अशी राहायला पाहिजे,जे
शिवाय बाबांच्या कोणत्या शरीराची आठवण यायला नको.शरीराची आणि जुन्या दुनिये पासून
ममत्व नष्ट व्हावे.जुन्या दुनिये मध्ये तर संन्यासी राहतात परंतु घरात दारापासून
ममत्व नष्ट करतात.ब्रह्मला ईश्वर समजून त्यांच्याशी योग लावतात.स्वतःला ब्रह्मज्ञानी
तत्त्वज्ञानी म्हणतात.आम्ही ब्रह्मामध्ये लीन होऊ,म्हणजे मिसळुन जाऊ असे समजतात.बाबा
म्हणतात हे सर्व चुकीचे आहे.मीच सत्य आहे,मलाच सत्य म्हटले जाते.
तर बाबा समजवतात आठवणी ची यात्रा खूप पक्की पाहिजे.ज्ञान तर खूप सहज आहे.देही
अभिमानी बननण्या मध्येच कष्ट आहेत.बाबा म्हणतात कोणत्याही देहाची आठवण यायला नको.
ही भुतांची आठवण झाली,भुत पूजा झाली.मी तर अशरीरी आहे.तुम्हाला माझी आठवण करायची
आहे.या डोळ्याने पाहून सुध्दा बुद्धी द्वारे बाबांची आठवण करा. श्रीमता नुसार चाला
तर धर्मराजाच्या सजा पासून मुक्त व्हाल.पावन बनाल सजा पासुन मुक्त व्हाल. हे खूप
मोठे लक्ष आहे, प्रजा बनणे तर खूपच सहज आहे.त्यामध्ये पण साहूकार प्रजा,गरीब प्रजा
कोण,कोण बनू शकतात,सर्व समजवतात.अंत काळात तुमच्या बुद्धीचा योग बाबा आणि घराशी
राहायला पाहिजे.जसे नाटक पूर्ण होते,तर कलाकारांची बुद्धी घराकडे जाते.ही बेहद ची
गोष्ट आहे.ती हदची कमाई आहे,ही ही बेहद ची कमाई आहे.चांगल्या कलाकारांची कमाई पण
पुष्कळ असते. तर बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत बुद्धी परमधाम कडे लावायचु
आहे.ते साजन सजनी असतात एक दोघांचे,येथे तर सर्व सजनी आहेत एका शिव साजनच्या.त्यांची
सर्व आठवण करतात. आश्चर्यकारक प्रवासी आहेत ना.यावेळेत सर्वांना दुःखापासून सोडून
सद्गती मध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत,त्यांना म्हटले जाते खराखुरा साजन.ते तर एक
दोघांच्या शरीरावरती आकर्षित होतात, विकाराची गोष्ट नसते,त्याला देह अभिमानाचा योग
म्हणतात.मनुष्यांची आठवण करणे म्हणजे पाच भूतांची, प्रकृतीची आठवण करणे.प्रकृतीला
विसरून माझी आठवण करा,यामध्ये कष्ट आहेत,परत दैवी गुण पण पाहिजेत. कोणाशीही बदला
घेणे,हा पण आसुरी गुण आहे.सतयुगा मध्ये एकच धर्म असतो,तेथे बदला घेण्याची गोष्टच
नसते.तो अद्वैत देवता धर्म आहे,जो शिवबाबा शिवाय कोणीही स्थापन करू शकत नाही.
सूक्ष्मवतन वासी देवतांना फरिश्ता म्हणाल. यावेळे तुम्हीच ब्राह्मणच परत फरिश्ता
बनतात,परत घरी जाऊन नवीन दुनियेमध्ये येऊन दैवी गुण असणारे मनुष्य म्हणजे देवता.आता
शुद्रा पासून ब्राह्मण बनतात. प्रजापिता ब्रह्माचा मुलगा बनले नाहीतर वारसा कसा
घ्याल.हे प्रजापिता ब्रह्मा आणि मम्मा च परत लक्ष्मी-नारायण बनतात.आता पहा तुम्हाला
जैन लोक म्हणतात,आमचा जैन धर्म सर्वात जुना आहे.आता वास्तव मध्ये महावीर किंवा
आदीदेव ब्रह्मालाच म्हणतात.ब्रह्माच आहेत परंतु कोणी जैनमुनी आले आणि त्यांनी
महावीर नाव ठेवले.आता तुम्ही सर्व महावीर आहात ना.माये वरती विजय प्राप्त
करतात.तुम्ही सर्व बहादुर बनतात.खरे खुरे महावीर,महावीरनी तुम्ही आहात.तुमचे नाव
शिवशक्ती आहे कारण सिंहावर सवारी आहे आणि महामरथींची हाती वरती आहे. तरीही बाबा
म्हणतात लक्ष खूप श्रेष्ठ आहे, एका बाबांची आठवण करायची आहे.तरच विर्कम विनाश होतील,
दुसरा कोणता रस्ता नाही.योगबळा द्वारे तुम्ही विश्वावर राज्य करतात. आत्मा म्हणते
आता मला घरी जायचे आहे.ही जुने दुनिया आहे.हा बेहदचा सन्यास आहे.गृहस्थ
व्यवहारांमध्ये राहत पवित्र बनायचे आहे आणि चक्राला समजल्यामुळे चक्रवर्ती राजा
बनाल.अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
वरदान:-
लक्ष्य आणि
ध्येयाची नेहमी स्मृती ठेवून , तीव्र पुरुषार्थ करणारे नेहमी पवित्र आणि आनंदी भव .
ब्राह्मण जीवनाचे
लक्ष्य आहे, कोणत्याही आधारा शिवाय नेहमी आंतरिक आनंदामध्ये राहणे, जेव्हा हे लक्ष
बदलून हदच्या प्राप्ती मध्ये छोट्या-छोट्या गल्लीमध्ये फसतात.तेव्हा लक्षा पासून
दूर होतात म्हणून काहीही झाले तरी हदच्या प्राप्तीचा त्याग करावा लागला तरी,त्यांना
सोडून द्या परंतु अविनाशी आनंदाला कधीच सोडू नका.पवित्र आणि आनंदी भवच्या वरदानाला
स्मृतीमध्ये ठेवून तीव्र पुरुषार्थ द्वारे अविनाशी प्राप्ती करत रहा.
बोधवाक्य:-
गुण मूर्त
बणुन गुणांचे दान देत चला हीच सर्वात मोठी सेवा आहे.