13-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, हुशार विद्यार्थी बनून चांगल्या मार्कानी पास होण्याचा पुरुषार्थ करा, आळशी विद्यार्थी बनू नका, आळशी ते आहेत ज्यांना संपूर्ण दिवसभर मित्र-संबंधीची आठवण येत राहते...!!!

प्रश्न:-
संगमयुगावर सर्वांत भाग्यवान सर्वांत भाग्यशाली कोणाला म्हणायचे?

उत्तर:-
ज्यांनी आपले तन-मन-धन सर्व सफल केले आहे किंवा करत आहेत ते आहेत भाग्यवान. काही जण तर खुप कंजुष असतात, तर समजले जाते भाग्यामध्ये नाही, समजत नाहीत कि विनाश समोर उभा आहे, काहीतरी करावे. भाग्यवान मुले समजतात कि बाबा आता सम्मुख (समोर) आले आहेत. आम्ही आमचे सर्वकाही सफल करु. हिम्मत ठेवून अनेकांचे भाग्य बनविण्यासाठी निमित्त बनू.

गीत:-
भाग्य जागृत होऊन, आलो आहे....

ओम शांती।
तुम्ही मुले भाग्य बनवत आहात. गीतेमध्ये कृष्णाचे नाव लिहले आहे आणि म्हणतात भगवानूवाच मी तुम्हाला राजयोग शिकवतो. आता कृष्ण भगवानूवाच तर नाहीये. श्रीकृष्ण तर तुमचे लक्ष्य आहे. शिव भगवानुवाच, मी तुम्हाला राजांचाही राजा बनवत आहे. तर पहिला राजकुमार कृष्णच बनेल. बाकी कृष्ण भगवानूवाच नाहीये. कृष्ण तर तुम्हा मुलांचे लक्ष्य (ध्येय) आहे, ही पाठशाळा आहे. भगवान शिकवतात, तुम्ही सर्व राजकुमार-राजकुमारी बनता.

बाबा म्हणतात, खुप जन्मांच्या अंताच्या ही अंतामध्ये मी तुम्हाला हे ज्ञान ऐकवतो. पुन्हा एकदा श्रीकृष्ण बनण्यासाठी. या पाठशाळेचा शिक्षक शिवबाबा आहे, श्रीकृष्ण नाही. शिवबाबाच दैवी धर्माची स्थापना करतात. तुम्ही मुले म्हणता आम्ही आलो आहे भाग्यवान बनविण्यासाठी. आम्ही परमपिता परमात्म्याकडून भाग्य बनविण्यासाठी आलो आहे. हे आहे राजकुमार-कुमारी बनण्याचे विद्यालय. राजयोग आहे ना. शिवबाबांच्या द्वारे पहिली-पहिली स्वर्गाची दोन पाने राधा-कृष्ण निघतता. हे जे चित्र बनवले आहे, हे ठीक आहे, समजावण्यासाठी चांगले आहे. गीतेच्या ज्ञानांनीच भाग्य बनते. भाग्य (नशीब) खुलले होते परत फुटले (बिघडले). खुप जन्मांच्या शेवटी तुम्ही एकदम तमोप्रधान बेगर (गरीब) बनले आहात. आता परत राजकुमार बनायचे आहे. प्रथम तर जरुर राधा-कृष्णच बनणार, नंतर त्यांचीही राजधानी सुरु होते. फक्त एक तर नसेल ना. स्वयंवरानंतर राधा-कृष्णच लक्ष्मी नारायण बनतात. नरापासून राजकुमार किंवा नारायण बनणे गोष्ट एकच आहे. तुम्ही मुले जाणता हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक होते. नक्कीच संगमयुगावर स्थापना झाली असेल म्हणनूच संगमयुगाला पुरुषोत्तम युग म्हटले जाते. आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना होते. बाकी इतर सर्व धर्म विनाश होऊन जातील. सतयुगामध्ये बरोबर एकच धर्म होता. तो इतिहास-भूगोल जरुर पुर्नरावत्त होणार आहे. पुन्हा स्वर्गाची स्थापना होईल. ज्यामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, परिस्तान होते. आता तर कब्रस्तान (स्मशान) आहे. सर्व काम चितेवर बसून भस्म होऊन जातील. सतयुगामध्ये तुम्ही महल इ. बनवाल. असे नाही कि खालून (जमीनीतून) सोन्याची द्वारका किंवा लंका बाहेर येईल. द्वारका असू शकते, लंका तर असणार नाही. स्वर्णिम युग म्हटले जाते राम राज्याला, खरे सोने जे होते ते सर्व लुटले गेले. तुम्ही समजावता भारत खुप धनवान होता. आता तर कंगाल आहे. कंगाल अक्षर लिहणे, वाईट गोष्ट नाही. तुम्ही समजावू शकता सतयुगामध्ये एकच धर्म होता. तिथे दुसरा कोणता धर्म असू शकत नाही. काही जण म्हणतात हे कसे होऊ शकते. काय फक्त देवताच असणार? अनेक मत-मतांतर आहेत. एक दुसज्याशी मिळू शकत नाही. किती आश्चर्य आहे. किती कलाकार (एक्टर्स) आहेत. आता स्वर्गाची स्थापना होत आहे, आम्ही स्वर्गवासी बनतो हे लक्षात राहिले तर सदैव हसतमुख राहाल. तुम्हा मुलांना खुप खुशी राहिली पाहिजे. तुमचे ध्येय तर उंच आहे ना. आम्ही मनुष्यापासून देवता स्वर्गवासी बनत आहोत. हे ही तुम्ही ब्राह्मणच जाणता कि स्वर्गाची स्थापना होत आहे. हे ही सदैव लक्षात राहिले पाहिजे. परंतू माया क्षणोक्षणी विसरायला लावते. भाग्यात नसेल तर सुधरत नाहीत. खोटे बोलण्याची सवय अध्र्याकल्पापासून लागली आहे, ती जात नाही. खोटेपणालाही खजाना समजतात सोडतच नाहीत तर समजले जाते यांच्या भाग्यात नाही. बाबांची आठवण करत नाहीत. आठवण ही तेव्हा येईल जेव्हा पुर्ण मोह (ममत्त्व) निघून जाईल. साज्या दुनियेचे वैराग्य, मित्र-संबंधी इ. ना पाहून सुध्दा जसे की, पाहतच नाही. जाणतात हे सर्व नर्कवासी, कब्रस्तानी आहेत. हे सर्व नष्ट होऊन जाणार आहेत. आता आम्हाला परत घरी जायचे आहे. म्हणून सुखधाम-शांतीधाम ची आठवण करतात. आम्ही काल स्वर्गवासी होतो, राज्य करत होतो, ते गमावले आहे, पुन्हा आम्ही राज्य घेतो. मुले समजतात भक्तीमार्गामध्ये पाया पडणे, माथा टेकणे, पैसे वाया घालवणे आहे. ओरडत राहतात, मिळत काहीच नाही. आता बोलवतात बाबा या, सुखधाम मध्ये चला. ते ही जेव्हा अंतामध्ये खुप दु:ख होते तेव्हा आठवण करतात. तुम्ही पाहता आता, ही जुनी दुनिया संपणार आहे. आता आमचा हा शेवटचा जन्म आहे. यामध्ये आम्हाला सर्व ज्ञान मिळते. ज्ञान पुर्ण धारण करायचे आहे. भुकंप इ. अचानक होतो. हिंदुस्तान, पाकिस्तानच्या फाळणी (पार्टीशन) मध्ये किती मरण पावले असतील. तुम्हा मुलांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व माहित आहे. बाकी जे राहिले असेल ते ही माहित होत जाईल. फक्त एक सोमनाथचे मंदीर सोन्याचे नसेल. इतरही अनेकांचे महल, मंदीर इ. सोन्याचे असतील. नंतर काय होते, कुठे गायब होऊन जातात? काय भुकंपामध्ये असेच खाली जातात, जे बाहेर निघतच नाहीत? आतच सडून जातात... नेमके काय होते? पुढे जाऊन तुम्हाला माहित पडेल. म्हणतात सोन्याची द्वारका खाली गेली. आता तुम्ही म्हणाल ड्रामानूसार ती खाली गेली आहे नंतर चक्र फिरल्यावर ती वरती येईल. ते ही पुन्हा बनवावी लागेल. हे चर्क बुध्दीमध्ये स्मरण करुन खुप खुश राहिले पाहिजे. हे चित्र तर पाकिटात ठेवले पाहिजे. हा बैज खुप सेवा करण्यायोग्य आहे. पण ऐवढी सेवा कुणी करत नाही. तुम्ही मुले रेल्वे मध्ये ही खुप सेवा करु शकता. परंतू कुणीही कधी समाचार लिहत नाहीत की, रेल्वेमध्ये काय सेवा केली? जनरल डब्यात पण सेवा होऊ शकते. ज्यांनी कल्पापुर्वी समजले असेल, जे मनुष्यापासून देवता बनले असतील. त्यांनाच समजेल. मनुष्यापासून देवता गायीले जाते. असे नाही की मनुष्यापासून ÿिाश्चन किंवा मनुष्यापासून शिख, नाही, मनुष्यापासून देवता बनले म्हणजेच आदि सनातन देवता धर्माची स्थापना झाली. बाकी सर्व आपापल्या धर्मात निघून गेले. झाडामध्ये दाखविले आहे. आमके-आमके धर्म नंतर केव्हा स्थापन होतील? देवता हिंदू बनले. हिंदूपासून नंतर इतर धर्मामध्ये धर्मांतर झाले. असेही खुप येतील जे आपल्या श्रेष्ठ धर्म-कर्माला सोडून, दुसज्या धर्मामध्ये गेले आहेत, ते परत येतील. शेवटी थोडे समजून घेतील, प्रजेमध्ये येतील. देवी-देवता धर्मामध्ये सगळे थोडीच येतील, सर्व आपापल्या भागामध्ये जातील. तुमच्या बुध्दीमध्ये यासर्व गोष्टी आहेत. दुनियेमध्ये काय-काय करत राहतात. अन्न धान्यासाठी किती सुविधा करतात. मोठ्या मोठ्या मशीन वापरतात, होत काहीच नाही. सृष्टीला तमोप्रधान बनायचेच आहे. सीढी खाली उतरायचीच आहे. ड्रामामध्ये जे नोंदलेले आहे तेच होत राहते. नंतर नविन दुनियेची स्थापना होणारच आहे. वैज्ञानिक जे आता शिकत आहेत. थोड्या वर्षामध्ये खुप हुशार होऊन जातील. ज्याद्वारे नंतर तिथे (स्वर्गात) खुप चांगल्या-चांगल्या वस्तू बनतील. हे विज्ञान तिथे सुख देणारे असेल. येथे सुख थोडेच आहे, दु:ख खुप आहे. या विज्ञानाला निघून किती वर्ष झाली? अगोदर तर ही लाइट, गॅस इ. काहीच नव्हते. आता तर पहा काय झाले आहे. तिथे तर शिकलेले, शिकविणारे येतील. लवकर-लवकर काम होत जाईल. येथेही पहा घरे कधी बनतात. सर्व काही तयार असते. किती मजले बनवतात. तिथे असे नसणार. तिथे तर सर्वांनी आपली-आपली शेती असते. कर इ. (टॅक्स) भरावा लागणार नाही. तिथे तर भरपुर धन असेल. भरपुर जमीन असेल. नद्या सर्व असतील, बाकी नाले नसतील जे नंतर खोदले जातात.

मुलांना आतून किती खुशी राहिली पाहिजे, आम्हाला डबल इंजन मिळाले आहे. डोंगरावर रेल्वेला डबल इंजन मिळते. तुम्ही मुले ही सहयोग देताना. तुम्ही आहात किती थोडे. तुमची महिमाही गायलेली आहे. तुम्ही जाणता आम्ही ईश्वराचे मददगार आहोत. श्रीमतावर मदत (सेवा) करत आहोत. बाबाही सेवा करण्यासाठी आले आहेत. एक धर्माची स्थापना अनेक धर्मांचा विनाश करवतात, थोडे पुढे चालून पहाल, खुप दंगे होतील. आताही घाबरतात, कुठे भांडण करुन बॉम्ब फेकतील, वणवा (चिंगारी) तर खुप पेटत राहतो. क्षणो-क्षणी आपापसात भांडत राहतात. मुले जाणतात जुनी दुनिया नष्ट होणार आहे. नंतर आम्ही आपल्या घरी निघून जाऊ. आता 84 चे चक्र पुर्ण झाले आहे. सगळे एकत्र निघून जातील. तुमच्यामध्येही खुप थोडे आहेत. ज्यांना क्षणो-क्षणी आठवण राहते. ड्रामानुसार हुशार आणि आळशी दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. हुशार विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास होतात. आळशी जो असेल त्याचा तर पुर्ण दिवस भांडण करण्यातच निघून जातो. बाबांची आठवण करत नाहीत. संपुर्ण दिवस मित्र-संबंधीची आठवण येत राहते. येथे तर सर्वकाही विसरायचे आहे. मी आला आहे, हे शरीर रुपी शेपूट लटकले े आहे. आम्ही जेव्हा कर्मातीत अवस्था प्राप्त करु तेव्हा हे शेपूट सोडून जाईल. हिच काळजी आहे, कर्मातीत अवस्था व्हावी तर हे शरीर नष्ट होऊन जाईल. आम्ही शाम पासून सुंदर बणुन जाऊ. मेहनत तर करायची आहे ना. प्रदर्शनी मध्येही पहा किती मेहनत करतात. भोपाळच्या महेंद्र भार्इंनी किती हिम्मत दाखवली आहे. एकटा खुप कष्टाने प्रदर्शनी इ. करत आहे. कष्टाचे फळ ही मिळेलच ना. एकानी किती कमाल केली आहे. कित्येकांचे कल्याण केले आहे. मित्र-संबंधींच्या मदतीने किती काम केले आहे. कमाल आहे! मित्र-संबंधींना समजावतात, हा पैसा इ. सर्व या कार्यामध्ये लावा, ठेऊन काय करणार? सेंटर ही खोलले आहेत. हिम्मतीने कित्येकांचे भाग्य बनवले आहे. असे पाच-सात निघाले तर किती सेवा होईल काही जण तर खुप कंजूष असतात, तर समजले जाते यांच्या भाग्यात नाही, समजत नाहीत विनाश समोर उभा आहे, काहीतरी करावे. आता मनुष्य जे दान करतील ईश्वर अर्थ, त्यांना काहीच मिळणार नाही. संगमयुगावर ज्यांनी आपले तन-मन-धन सफल केले आहे किंवा करत आहेत, ते भाग्यवान आहेत. परंतू भाग्यात नसेल तर समजतच नाही. तुम्ही जाणता ते ही ब्राह्मण आहेत, आम्हींही ब्राह्मण आहेत. आम्ही आहोत प्रजापिता ब्रहृमाकुमार-कुमारी, एवढे सारे ब्राह्मण, ते आहेत कुख वंशावली. तुम्ही आहात मुख वंशावली. शिवजयंती संगमयुगावर होते. आता स्वर्ग बनवण्यासाठी बाबा मंत्र देतात-मनमनाभव, माझी आठवण करा तर तुम्ही पवित्र बणुन पवित्र दुनियेचे मालक बनाल. असे युक्तीने पर्चे (पत्रिका) छापायला पाहिजे. दुनियेमध्ये खुप जण मरतात. जिथे पण कुणी मरेल तिथे जाऊन पर्चे वाटले पाहिजे. बाबा जेव्हा येतात तेव्हाच जुन्या दुनियेचा विनाश होतो. आणि त्यानंतर स्वर्गाचे द्वार उघडले जाते. जर कुणाला सुख धाममध्ये जायचे असेल तर हा मंत्र आहे-मनमनाभव असा सुंदर रितीने छापलेला पर्चा (पत्रिका) सर्वांच्या जवळ असायला हवा. स्मशानामध्ये ही वाटू शकतो. मुलांना सेवा करण्याची आवड असायला पाहिजे. सेवेच्या युक्ती तर खुप सांगितल्या आहेत. हे तर चांगल्याप्रकारे लिहायला पाहिजे. उद्दिष्ट (लक्ष्य, ध्येय) तर लिहलेलेच आहे. समजुन सांगण्याची मोठी चांगली युक्ती पाहिजे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी या शरीर रुपी शेपटीला विसरुन जायचे आहे. एक बाबांच्या शिवाय कोणी मित्र-संबंधी इ. आठवायला नको, हे कष्ट करायचे आहेत.

2. श्रीमतावर ईश्वरीय मदतगार बनायचे आहे. तन-मन-धन सर्व सफल करुन आपले उच्च भाग्य बनवायचे आहे.

वरदान:-
ईमानदार बनून स्वत:ला बाबां समोर, स्पष्ट करणारे चढत्या कलेचे अनुभवी भव :-

स्वत:ला जे आहात, जसे आहात-तसेच बाबांच्या समोर प्रत्यक्ष करणे. हेच सर्वांत मोठ्याहून मोठे चढत्या कलेचे साधन आहे. बुध्दीवर जे अनेक प्रकारचे ओझे आहे, त्यांना समाप्त करण्याची हीच सहज युक्ती आहे. ईमानदार बणुन स्वत:ला बाबांच्या समोर स्पष्ट करणे, म्हणजेच पुरुषार्थांचा मार्ग स्पष्ट बनवणे. कधीही हुशारीने मनमत आणि परमताचे प्लॅन बनवून बाबा किंवा निमितत बनलेल्या आत्म्यांच्या समोर कोणतीही गोष्ट ठेवता-तर ही ईमानदारी नाही. ईमानदारी म्हणजे जसे बाबा जो आहे जसा आहे, मुलांसमोर प्रत्यक्ष आहे. तसेच मुलांनीही बाबांसमोर प्रत्यक्ष असायला हवे.

बोधवाक्य:-
खरा तपस्वी तो आहे, जो सदैव सर्वस्व त्यागी अवस्थेमध्ये राहतो...!!!


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
संपुर्ण दिवसभर प्रत्येक आत्म्याप्रती शुभभावना आणि श्रेष्ठ भाव धारण करण्याचे विशेष लक्ष्य ठेवून अशुभ भावला शुभ भावमध्ये, अशुभ भावनेला शुभ भावनेमध्ये परिवर्तन करुन आनंदी स्थितीमध्ये राहा. तर अव्यक्त स्थितीचा अनुभव सहज होत राहिल.