19-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो , तुम्हाला चालता - फिरता आठवणीत राहण्याचा अभ्यास करायचा आहे . ज्ञान व योग याच दोन मुख्य गोष्टी आहेत . योग म्हणजे आठवण ...

प्रश्न:-
हुशार मुलं मुखातून कोणते शब्द काढणार नाहीत?

उत्तर:-
आम्हाला योग शिकवा, हे शब्द हुशार मुलं बोलणार नाहीत. पित्याची आठवण करण्यास शिकवले थोडेच पाहिजे. ही पाठशाळा आहे शिकणे व शिकवण्याची. असेही नाही की, आठवण करावयास खास बसले पाहिजे. तुम्हाला कर्म करताना बाबांची आठवण करण्याचा अभ्यास केला पाहिजे.

ओम शांती।
आता आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजवतात. मुलं जाणतात आत्मिक पिता या रथाद्वारे आपल्याला समजवतात. आता बाबांचे मुलं आहात तेव्हा कुणा भाऊ किंवा बहिणस बाबांची आठवण करावयास शिकवा असे बोलणे चुकीचे आहे. तुम्ही काही लहान मुलं नाहीत. हे तर जाणता कि मुख्य आत्मा आहे व तो अविनाशी आहे. शरीर विनाशी आहे. आत्माच मोठी आहे. अज्ञानकाळात आपण आत्मा आहोत, याचे ज्ञान नसते व शरीराद्वारे बोलते याचे ही देह अभिमानात येऊन म्हणतात की, हे करत आहे. आता देही बनत आहात. जाणता कि आत्मा शरीराद्वारे बोलते, कर्म करते. आत्मा पुरुष आहे. बाबा समजवतात कि, बऱ्याचदा म्हणतात की आम्हाला योगात बसवा. या विचाराने एकमेकांसमोर बसतात की दोघेही बाबांच्या आठवणीत बसलेत. पाठशाळा यासाठी नसून शिकण्यासाठी आहे. असेही नाही की येथे बसून आठवण करा. बाबा सांगतात चालता-फिरताना, उठता-बसता बाबांची आठवण करा. यासाठी खास बसण्याची गरज नाही. जसे कुणी म्हणतात राम-राम म्हणा. राम-राम म्हणण्या शिवाय आठवण करु शकत नाही का? आठवण चालता-फिरता करता येते. तुम्हाला कर्म करताना आठवण करायची आहे. प्रियकर-प्रेयसी का एकमेकांची बसून आठवण करतात. कामकाज, व्यवसाय सर्व करायचे आहे. सर्व काही करताना आपल्या प्रियकाराला आठवयाचे आहे. कुठे जाण्याची गरज नाही.

तुम्ही मुलं गीत किंवा कविता इ. ऐकतात, बाबा म्हणतात हा भक्तीमार्ग आहे. असे म्हणतात शांती देवा म्हणजे परमात्माची आठवण करतात कृष्णाची नाही. नाटकानुसार अशांत झाल्याने पित्याला बोलवतात कारण तो सुख-शांती ज्ञानाचा सागर आहे. ज्ञान व योग मुख्य असून योग म्हणजे आठवण त्यांचा हठयोग पूर्ण वेगळा असून तुमचा राजयोग आहे. बाबांची फक्त आठवण करायची आहे. बाबांद्वारे बाबांना जाणून आदी-मध्य-अंतास जाणले आहे. तुम्हाला सर्वांत मोठा आनंद हा आहे, की भगवान आम्हास शिकवतात. परमेश्वराचाही पूर्ण परिचय व्हावयास हवा. असे कधी नाही समजतात कि, आत्मा तारा तसा परमात्मा तारा आहे. परमात्मा ही आत्माच आहे. परंतू त्यांना परमआत्मा, सर्वोच्च आत्मा म्हटले जाते. ते पूर्नजन्म घेत नाहीत. स्वत: सांगतात मी कसा येतो. त्रिमुर्तीचे गायन ही भारतात आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकराचे चित्र दाखवतात. शिव परमात्मा नम: म्हणतात. उंच बाबाला विसरुन त्रिमुर्ती दाखवतात. वरती शिव असायला हवा, ज्यामुळे समजेल की यांचा रचनाकार शिव आहे. रचनेकडून वारसा मिळत नाही, ब्रह्मा कडूनही नाही. विष्णूला तर हिऱ्या मोत्यांचा मुकुट आहे ना. बाबांमुळे दु:खी पासून सुखी बनत आहोत. शिवाचे चित्र नसल्याने सर्व खंडीत झाले आहे. परमात्म्याची ही सर्व रचना आहे. बाबांकडून आता 21 जन्मांचा वारसा मिळत आहे. परंतू तेथे असे समजतात कि सर्व वारसा लौकिक पित्याकडनच मिळतो. कारण तेथे हे माहितच नसते की हे शिवबाबांपासून मिळाले आहे. आता तुम्हाला हे कळाले आहे. आताची कमाई तेथे 21 जन्म चालते. तेथे हे ज्ञान अजिबात नसते. हे ज्ञान न देवतांकडे, न शुद्रांकडे, तुम्हा ब्राह्मणाकडे असते. हे आत्मिक ज्ञान असून दैवी ज्ञानाचा अर्थ समजत नाहीत. तत्त्वज्ञानाचे विशारद असे म्हणतात. परंतू दैवी ज्ञानाचा विशारद एक पिता आहे. बाबांना शल्यविशारद (सर्जन) देखील म्हणतात. साधू-सन्यासी थोडेच सर्जन आहेत. वेद-शास्त्र वाचनाऱ्यांना थोडेच विशारद (डॉक्टर) म्हणतात. भलेही ते शिर्षक (टायटल) देतात. परंतू वास्तवात एक बाप सर्जन असून तो आत्म्याला इंजेक्शन देतात. भक्तीमार्गात असणाऱ्यांना भक्ती विशारद म्हणता येईल. त्यांचा फायदा तर नाहीच परंतू पतनच होते. तर त्यांना डॉक्टर कसे म्हणणार? डॉक्टर तर फायदा देत असतो. हे बाबा तर अविनाशी ज्ञानाचे सर्जन आहेत. योगबळाने तुम्ही आरोग्यदायी बनता. हे तुम्ही मुलेच जाणतात. दुसरे काय जाणणार. बाबा अविनाशी सर्जन आहेत. आत्म्यामध्ये जो विकारांचा मल (खाद) निर्माण झाला आहे, त्याला काढून, पावन बनवून सद्गती देणे. ही बाबांमध्ये शक्ती आहे. सर्वशक्तीवान-पतीत पावन एक पिता आहे. मनुष्याला सर्वशक्तीवान म्हणू शकत नाही. तर बाबा कोणती शक्ती दाखवतात? सर्वांना आपल्या शक्तीने सद्गती देतात. त्यांना ईश्वरीय ज्ञानाचे डॉक्टर म्हणतात. तत्त्वज्ञानी तर खुप मनुष्य आहेत. ईश्वरीय डॉक्टर तर एकच आहे. आता बाबा म्हणतात माझी आठवण करुन पवित्र बना. मी पवित्र बनवण्यासाठी आलो असताना तुम्ही अपवित्र का बनतात? पावन बना पतित नाही. सर्व मुलांप्रती बाबा सांगतात गृहस्थीमध्ये राहून कमळ पुष्पाप्रमाणे पवित्र बना. बाल ब्रह्मचारी बनल्यास पवित्र दुनियाचे मालक बनाल. इतके जन्म पापं केलीत आता ती भस्म करा. परमधामात केवळ पवित्र आत्मेच राहतील अपवित्र नाही. बुध्दीत ठेवा की बाबा आपल्याला शिकवतात. विद्यार्थी कधी म्हणतील का की शिक्षकांची आठवण करायला शिकवा. आठवण करायला शिकवण्याची मुळीच गरज नाही. संदलीवर बसण्याचाही काही गरज नाही. पित्याची आठवण करा. दिवसभर व्यवसायात असल्याने बाबांना विसरतात म्हणून येथे बसवले जाते की 10-15 मिनीटे तरी आठवण करा. तुम्हाला कामकाज करताना आठवण करण्याची सवय लावली पाहिजे. अर्ध्याकल्पानंतर प्रियकर भेटला आहे. बाबा सांगतात आठवणीने आत्म्यातील मळ निघून तुम्ही विश्वाचे मालक बनाल. तर का नाही आठवण करावी? स्त्री बरोबर लग्न केल्यास सांगतात. तुझा पती गुरु, ईश्वर सर्वकाही आहे. परंतू तरी देखील ती सर्व मित्र, नातेवाईकांची आठवण करते. ती देहाची आठवण झाली. बाबा पतीचा पती आहे. त्यांची आठवण करा. कुणी म्हणतात आम्हाला नेष्ठामध्ये बसवा (योगा). परंतू त्याने काय होईल? 10 मिनीटे येथे बसलात म्हणजे एक रुप झालात असे नाही. भक्तीमध्ये आठवण करताना बुध्दी अनेकदा भटकते. नवरुपाची भक्ती करणारे साक्षात्काराची अपेक्षा करतात. आशेने बसून एकरुप होतात. तेव्हा साक्षात्कार होतो. त्यांना नवरुप भक्त म्हटले जाते. ही भक्ती प्रियकर-प्रेयसी प्रमाणे असते. खाता-पिता आठवणीत राहतात. त्यात विकार नसतो परंतू शरीरावर प्रेम असते एकमेकांना पाहिल्याशिवाय राहू शकत नाही.

बाबा समजवतात माझ्या आठवणीने विकर्म विनाश होतील. 84 जन्म कसे घेतले. बिजाची आठवण केल्यास संपूर्ण झाडाची लक्षात येते. हे विविध धर्माचे झाड आहे. हे तुमच्याच बुध्दीत आहे कि भारतच सुवर्णयुग होते आज लोहयुग आहे. आत्मा खर सोनं असते नंतर त्याला गंज चढतो. ही दुनिया आज पूर्ण खोटी, लोहयुगी आहे. आत्मा लोहमयी झाल्याने दागिने देखील तसेच आहेत. बाबा म्हणतात मी पतित-पावन असून माझी आठवण करा. तुम्ही मला पतित-पावन या, म्हणून बोलवतात. मी प्रत्येक कल्पमध्ये तुम्हाला सांगतो मनमनाभव, मध्याजी भव अर्थात स्वर्गाचे मालक बना. काही म्हणतात आम्हाला ज्ञानापेक्षा योगात मजा येते, तेव्हा योग करुनच जातात. म्हणतात आम्हाल शांती पाहिजे. बाबांची कोठेही आठवण करु शकता. तसेच परमधामात जातात. यात योग शिकवण्याची गरज नाही. बाबांची आठवण करायची आहे. असे बरेच आहेत की केंद्रावर जावन अर्धा-पाऊण तास बसतात. म्हणतात नेष्ठामध्ये (योगा) बसवा, बाबांनी तसा कार्यक्रम दिला आहे. बाबा म्हणतात चालता-फिरता आठवण करा, नाही पेक्षा बसणे चांगले. बाबा म्हणत नाही परंतू असेही नाही की रात्रीच बाबांची आठवण केली पाहिजे. कामकाज करताना आठवणीची सवय लावा. यात मेहनत आहे. बुध्दी क्षणा-क्षणाला इकडे-तिकडे भटकते. भक्तीमार्गात बुध्दी भटकल्यास चिमटा काढतात. खऱ्या भक्तांच्या गोष्टी करतात. येथे ही अशा गोष्टी केल्या पाहिजेत. बाबांची आठवण का केली नाही? आठवण न केल्यास विश्वाचे मालक कसे बनणार? प्रियकर-प्रेयसी तर नावा-रुपात फसलेले असतात. येथे आत्मा समजून पित्याची आठवण करतात. आत्मा शरीराहुन वेगळी असून शरीरात आल्याने कर्म करायची असतात. असे अनेक आहेत जे म्हणतात आम्हाला बाबांचे दर्शन (दिदार) करायचे आहे परंतू बाबा तर बिंदू आहे. कुणी म्हणतात कृष्णाचा साक्षात्कार अथवा दर्शन करायचे आहे. जे जड आहे ते चैतन्य रुपात पाहून काय फायदा होणार? साक्षात्काराने थोडीच फायदा होतो. बाबांच्या आठवणीने आत्मा पवित्र बनते. नारायणाच्या साक्षात्काराने नारायण थोडीच बनणार आहात? तुम्ही जाणतात आपले ध्येय लक्ष्मी-नारायण बनण्याचे, परंतू ज्ञान घेतल्याशिवाय थोडेच बनणार. ज्ञान घेऊन हुशार बना, प्रजाही बनवा तेव्हाच लक्ष्मी-नारायण बनाल. मेहनत आहे. आदरा सहित उत्तीर्ण झाल्याने धर्मराजांकडून सजा मिळणार नाही. ब्रह्मा मुरब्बी मुलगा पण सोबत आहे. तुम्ही वेगाने पुढे जाऊ शकता. बाबांवर किती ओझे आहे. पुर्ण दिवस किती लक्ष ठेवावे लागते. आपण एवढे आठवणीत ठेवू शकत नाही. भोजन समयी थोडी आठवण ठेवून विसरुन जातात. बाबा आणि ब्रह्मा दोघे प्रवास करतात. प्रवासादरम्यान बाबांना विसरुन जातो. विसरणारी गोष्ट आहे. क्षणा क्षणाला विसरुन जातात. यात खुप मेहनत आहे. आठवणीनेच आत्मा पवित्र बनेल. अनेकांना शिकवाल तर मोठं पद मिळाले. जे चांगले समजतात ते मोठं पद मिळवतील. प्रदर्शनी वेळी किती प्रजा बनते. तुम्ही एक-एक लाखोंची सेवा कराल, परंतू तशी अवस्था हवी. कर्मातीत अवस्था झाल्यावर शरीर सुटून जाईल. पुढे युध्द सुरु होईल. तेव्हा अनेक तुमच्याकडे येतील. महिमा वाढत जाईल. शेवटी सन्यासीही येऊन बाबांची आठवण करतील. त्यांची ही भुमिका मुक्तीधामात जाण्याची आहे. ज्ञान घेणार नाहीत. तुमचा संदेश सर्व आत्म्यांपर्यंत पोहचणार आहे. वर्तमानपत्राद्वारे खुप ऐकतील. किती गावे आहेत, सर्वांना संदेश द्यायचा आहे. संदेशी पैगंबर तुम्हीच आहात. पित्याशिवाय कुणी पावन बनवू शकत नाही. धर्मस्थापक कुणाला पावन बनवू शकत नाही. त्यांचा धर्म त्यांना वाढवायचा असल्याने ते परतीचा मार्ग कसे सांगतील? सर्वांचा एकच सद्गती दाता आहे. तुम्हाला आता पवित्र बनायचेच आहे. खुप आहेत जे पवित्र राहत नाही. कारण काम महाशत्रू आहे. चांगली-चांगली मुले काम विकारात पडतात. वाईटदृष्टी हा कामविकाराचाच अंश आहे. हा मोठा राक्षस आहे. बाबा म्हणतात यावर विजय मिळवा म्हणजे जगतजीत बनाल. अच्छा,

गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. काम-काज करता करता आठवणीत राहण्याची सवय लावायची आहे. बाबांबरोबर जाण्यासाठी वा पावन दुनियेचा मालक बनण्यासाठी पवित्र जरुर बनायचे आहे.

2. उच्च्पद मिळवण्यासाठी अनेकांची सेवा करायची आहे. अनेकांना शिकवायचे आहे. संदेशी बनून हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवायचा आहे.


वरदान:-
मी पणाच्या सुक्ष्म स्वरुपाचाही त्याग करणारे सदा निर्भय , निष्काळजी बादशहा भव :-
 

आजच्या दुनियेत धन व भय दोन्ही आहेत. जितके धन तेवढेच भयात खातात-पितात. जेथे मी पणा आहे तेथे भय आहे. जरी कांचनमृग असेल तरी भय आहे. परंतू माझा एक बाबा असेल तर निर्भयी बनाल. तर सुक्ष्म रुपात मी पणाला तपासून त्याचा त्याग करा. तर निर्भयी, निष्काळजी बादशहा राहण्याचे वरदान मिळेल.

बोधवाक्य:-
दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करा तर तुम्हाला स्वत : हून आदर मिळेल .