22-02-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांनो , तुम्हाला भगवान शिकवित आहेत , तुमच्याजवळ ज्ञान रत्न आहेत , या
रत्नांचाच धंदा तुम्हाला करावयाचा आहे . तुम्ही येथे ज्ञान शिकता , भक्ती नाही …
प्रश्न:-
मनुष्य विश्व
नाटकातील कोणत्या आश्चर्यकारक नोंदीला भगवानाची लीला समजून त्यांची बढाई करतात ?
उत्तर:-
जो कोणी ज्यामध्ये जशी भावना ठेवतो, त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो तर समजतातकि,
भगवानाने साक्षात्कार केला, परंतू होते तर विश्व नाटकानूसार. एकीकडे भगवानाची बढाई
करतात, दुसरीकडे सर्वव्यापी म्हणून ग्लानी .
ओम शांती।
भगवानूवाच-मुलांना हे पण समजावले आहे कि, मनुष्याला किंवा देवतांना भगवान म्हटले
जात नाही. गातात पण कि ब्रह्मा देवताए नम;, विष्णूला देवताए नम:, शंकर देवताए नम:,
नंतर म्हणतात शिव. परमात्माए नम: हे पण तुम्ही जाणता की, शिवाला स्वत:चे शरीर नाही.
मुळवतनमध्ये शिवबाबा आणि शाळीग्राम राहतात. मुले जाणतात कि, आता आम्हा आत्म्यांना
बाबा शिकवित आहेत, दुसरे जे पण सतसंग आहेत, खरं तर ते काही सतचा संग नाही. बाबा
म्हणतात तो तर मायेचा संग आहे. तेथे असे कोणी समजत नाही कि, आम्हाला भगवान शिकवित
आहेत. गीता पण ऐकतात तर कृष्ण भगवानुवाच समजतात. दिवसेंदिवस गीतेचा अभ्यास कमी होत
चालला आहे, कारण आपल्या धर्माला ओळखत नाहीत. कृष्णा बरोबर तर सर्वांचे प्रेम आहे,
कृष्णालाच झोक्यात झोका देतात. आता तुम्ही समजता कि, आम्ही झोका कोणाला द्यावयाचा?
मुलांना झोका दातत, पित्याला तर झोका देत नाहीत. तुम्ही शिवबाबाला झोका देणार? ते
बालक तर बनत नाहीत, पुनर्जन्मात येत नाहीत. ते तर बिंदू आहेत, त्यांना काय झोका
देणार. कृष्णाचा अनेकांना साक्षात्कार होतो. कृष्णाचे मुखामध्ये तर सारे विश्व आहे,
कारण विश्वाचे मालक बनतात. तर विश्व रुपी कोणी आहे. ते जे आपसात भांडतात, ते पण
सृष्टी रुपी लोण्यासाठी भांडतात. समजतातकि, आम्ही विजयी होवू. कृष्णाचे मुखामध्ये
लोण्याचा गोळा दाखवितात. असे पण अनेक प्रकारचे साक्षात्कार होत आहेत. परंतू अर्थ
काही पण समजत नाहीत. येथे तुम्हाला साक्षात्काराचा अर्थ समजावला जातो. मनुष्य
समजतात कि, आम्हाला भगवान साक्षात्कार करवितात. हे पण बाबा समजावतात कि, ज्यांची
आठवण करता, समजा, कोणी कृष्णाची नौधा भक्ती करतात, तर अल्पकाळासाठी त्यांची मनोकामना
पुर्ण होते. हे पण नाटकामध्ये नोंदलेले आहे. असे नाही म्हणायचे कि, भगवानाने
साक्षात्कार केला. जो ज्या भावनेने ज्याची पुजा करतात, त्यांना तो साक्षात्कार होतो.
हे विश्व नाटकात नोंद आहे. ही तर भगवानाची बडाई करतात कि ते साक्षात्कार करतात.
एकीकडे त्यांची महिमा पण करतात, तर दुसरीकडे म्हणतात कि, दगड धोंड्यामध्ये भगवान
आहे.किती अंधश्रध्देने भक्ती करतात. तर दुसरीकडे म्हणतात कि, दगड धोंड्यामध्ये
भगवान आहे. किती अंधश्रध्देने भक्ती करतात. समजतात कि, बस कृष्णाचा साक्षात्कार झाला,
कृष्णपुरीमध्ये आम्ही जरुर जावू. परंतू कृष्णपुरी येणार कोठून? हे सर्व रहस्य बाबा
तुम्हा मुलांना आता सांगत आहेत. कृष्णपुरीची स्थापना होत आहे. ही आहे कंसपुरी. कंस,
अकासूर, बकासूर, कुंभकरण, रावण ही सर्व आसुरांची नांवे आहेत. शास्त्रामध्ये काय काय
बसून लिहले आहे.
हे पण समजावयाचे आहे कि, गुरु दोन प्रकारचे आहेत. एक आहेत भक्तीमार्गाचे गुरु ते पण
भक्ती शिकवत आहेत. हे बाबा तर आहेत ज्ञानाचे सागर, यांना सदगुरु म्हटले जाते. हे कधी
भक्ती शिकवत नाहीत, ज्ञानच शिकवितात मनुष्य तर भक्तीमध्ये किती खुश होतात, झांज
वाजवितात, बनारसमध्ये तुम्ही पाहता सर्व देवतांचे मंदीरे बनविली आहेत. ही सर्व आहे
भक्तीमार्गाची दुकानदारी, भक्तीचा धंदा. तुम्हा मुलांचा धंदा आहे. ज्ञान रत्नांचा,
याला पण व्यापार म्हटले जाते. बाबा पण रत्नांचे व्यापारी आहेत. तुम्ही समजता कि, हे
रत्न कोणते आहेत. या गोष्टीला समजतील तेच ज्यांनी कल्पापुर्वी समजले होते, दुसरे
समजणारच नाहीत. जे पण मोठ मोठे आहेत ते शेवटाला येऊन समजतील. दुसरे धर्मात पण गेले
आहेत ना. एका राजा जनकाची कथा सांगत आहेत. जनक मग अनुजनक बनले. जसे कोणाचे नांव
कृष्ण असेल तर तुम्ही अनु दैवी कृष्ण बनाल. कोठे ते सर्वगुण संपन्न कृष्ण, कोठै हे.
कोणाचे नाव लक्ष्मी आणि ती या लक्ष्मी-नारायणासमोर जावून, महिमा गाते. हे थोडेच
समजता कि यांच्यात आणि माझ्यात फरक का पडला आहे? आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले
आहे, हे सृष्टी चक्र कसे फिरत आहे? तुम्हीच 84 जन्म घेता. हे चक्र अनेक वेळा फिरत
आले आहे. कधी बंद होत नाही. तुम्ही या नाटकामध्ये कलाकार आहात. मनुष्य एवढे जरुर.
समजतात कि, आम्ही या नाटकामध्ये भुमिका बजावण्यासाठी आला आहे. बाकी विश्वनाटकाच्या
आदि मध्य अंताला जाणत नाहीत.
तुम्ही मुले समजता कि, आम्हा आत्म्यांचे राहण्याचे ठिकाण उंच ते उंच आहे. तेथे
सुर्य चंद्राला पण प्रकाश पडत नाही. हे सर्व समजणारी मुले पण जादा तर साधारण गरीबच
बनत आहेत. कारण भारतच सर्वांत सावकार होता, आता भारतच सर्वात गरीब बनला आहे. सारा
खेळ भारतावर आहे. भारतासारखा पावन खंड आणखीन कोणता नाही. पावन दुनियेमध्ये पावन खंड
असतो, आणखीन कोणता दुसरा खंड तेथे असत नाहीत. बाबंनी समजावले आहे, ही सारी दुनिया
एक मोठे बेट आहे. जसे लंका एक बेट आहे. दाखवतात कि रावण लंकेमध्ये राहत होता. आता
तुम्ही समजतात कि, रावणाचे राज्य तर साज्या जगावर आहे. ही सारी सृष्टी समुद्रावर आहे.
हे बेट आहे. यावर रावणाचे राज्य आहे. यासर्व सीता रावणाच्या कैदेमध्ये आहेत. त्यांनी
तर मर्यादेत कथा बनविल्या आहेत. आहे ही सारी बेहदची गोष्ट. बेहदचे नाटक आहे.
त्यामध्येच असे लहान लहान नाटक बनविले आहेत. हे सिनेमा इ. पण आताच बनले आहेत,
त्यामुळे बाबाला पण समजावून सांगणे सोपे होत आहे. बेहदचे सारे नाटक तुम्हा मुलांच्या
बुध्दीमध्ये आहे. मुळवतन सुक्ष्मवतन आणखीन कोणाचे बुध्दीत येणार नाही. तुम्ही जाणता
कि, आम्ही आत्मे मुलवतनचे रहिवासी आहात. देवता आहेत सुक्ष्मतवन वासी, त्यांना
फरिश्ता पण म्हटले जाते. तेथे हाडा मासाचा पिंजरा असत नाही. ही सुक्ष्मवतनची
निर्मिती पण थोड्या काळासाठी आहे. आता तुम्ही तेथे आत येत आहात, नंतर कधी जाणार नाही.
तुम्ही आत्मे जेव्हा मुळवतनवरुन खाली येता तर सुक्ष्मवतन मार्ग येत नाही, सरळ खाली
येता. आता सुक्ष्तवतन मार्गे वर जाता. आता सुक्ष्तवतनची भुमिका आहे. हे सर्व रहस्य
मुलांना समजावत आहे. बाबा जाणतात कि, मी आत्म्यांना समजावत आहे. साधू संत इत्यादी
कोणी या गोष्टीला समजत नाहीत. ते कधी या गोष्टी सांगणार नाहीत. बाबाच मुलांशी
बोलतात. इंद्रिया शिवाय तर बोलू शकत नाही. म्हणतात कि मी या शरीराचा आधार घेऊन
तुम्ही मुलांना शिकवत आहे. तुम्हा आत्म्यांची दृष्टी पण बाबाकडेच जात. ह्य या आहेत
सर्व नविन गोष्टी. निराकार बाबा, त्यांचे नांव आहे शिवबाबा. तुम्हा आत्म्यांचे नांव
तर आत्मच आहे. तुमच्या शरीराचे नाव बदलत राहते. मनुष्य म्हणतात परमात्मा नांव
रुपापासून वगळा आहे,परंतू नांव तर शिव म्हणतात ना. शिवाची पुजा पण करतात. समजतात एक
आणि करतात दुसरे. आता तुम्ही बाबाचे नांव, रुप, देश, काळाला पण समजले आहात. तुम्ही
जाणता कि, कोणती पण वस्तू नांव रुपाशिवाय असत नाही. या पण फार सुक्ष्म समजण्याच्या
गोष्टी आहेत. बाबा समजावतात कि, गायन पण करतात सेकंदात जीवनमुक्ती, म्हणजे मनुष्य
नरापासून नारायण बनू शकतो. बाबा स्वर्गाचे ईश्वरीय पिता आहेत, आम्ही त्यांची मुले
बनलो आहोत, त्यामुळे स्वर्गाचे मालक आहोत. परंतू हे पण समजत नाहीत. बाबा सांगतात
कि, मुलांनो, तुमचे मुख्य लक्ष्यच आहे, नरापासून नारायण बनणे. राजयोग आहे ना.
अनेकांना चतुर्भुजचा साक्षात्कार होतो, त्यामुळे सिध्द होते की, विष्णू पुरीचे आम्ही
मालक बनत आहोत. तुम्हाला माहित आहे स्वर्गामध्ये पण लक्ष्मी-नारायणाचे सिंहासनाचे
मागे विष्णूचे चित्र ठेवतात, म्हणजे विष्णूपुरीमध्ये त्यांचे राज्य आहे. हे
लक्ष्मी-नारायण विष्णू पुरीचे मालक आहेत. ती आहे कृष्णपुरी ही आहे कंसपुरी.
विश्वनाटकानुसार अशी नांवे ठेवली आहेत. बाबा समजावतात माझे रुप फार सुक्ष्म आहे.
कोणी पण समजू शकत नाही. म्हणतात पण कि, आत्मा एक चांदणी सारखी आहे, तरी पण लिंग
बनवितात. नाही तर पुजा कशी करावयाची. रुद्र यज्ञ रचतात तर अंगठ्यासारखे शालीग्राम
बनवितात. दुसरीकडे त्याला विचित्र तारा म्हणतात. आत्माला पाहण्यासाठी फार प्रयत्न
करतात, परंतू कोणी पण पाहू शकत नाही. रामकृष्ण, विवेकानंदासाठी पण सांगतात कि,
त्यांनी पहिले आत्मा त्यांचेतून निघून माझ्यामध्ये समाविष्ठ झाली. आता त्यांना
कोणाचा साक्षात्कार झाला असेल? आत्मा आणि परमात्म्याचे रुप तर एकच आहे. बिंदू पाहिला,
समजत काहीच नाहीत. आत्म्याचा साक्षात्कार व्हावा अशी कोणाची इच्छा नसते. इच्छा
ठेवतात कि, परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा. ते बसले होते कि गुरुकडून,
परमात्म्याचा साक्षात्कार होईल. बस, म्हणतात ज्योती होती, ती माझ्यामध्ये सामावली.
यामध्येच विवेकानंद फार खुश झाले. त्यांना वाटले कि हेच परमात्म्याचे रुप आहे.
गुरुमध्ये भावना ठेवतात कि, त्यांचेद्वारे भगवानाचा साक्षात्कार होईल. समजत तर
काहीच नाहीत. बरे, भक्तीमार्गामध्ये समजावणार तरी कोण? आता येथे बाबा समजावत आहेत,
ज्या ज्या रुपामध्ये जशी भावना ठेवतात, जी मुर्ती पाहतात, तो साक्षात्कार होतो. जसे
गणेशाची पुजा करतात तर त्यांचा चैत्न्य रुपामध्ये साक्षात्कार होतो. नाहीतर त्यांना
निश्चय कसा होईल? तेजोमय रुप पाहून समजतात कि, आम्ही भगवानाचा साक्षात्कार केला.
त्यामध्येच खुश होऊन जातात. हा सर्व आहे भक्तीमार्ग, उतरती कला. पहिला जन्म चांगला
होतो, मग कमी होत होत अंताला पोहचतात. मुलेच या गोष्टीला समजत आहेत, ज्यांना
कल्पापुर्वी ज्ञान समजावले होते, त्यांनाच आता समजावत आहे. कल्पापुर्वीचेच येतील,
बाकी इतरांचा तर धर्मच वेगळा आहे. बाबा समजावतात कि, एक एका चित्रामध्ये भगवानुवाच
लिहा. फार युक्तीने समजावले पाहिजे. भगवानुवाच आहे ना-यादव, कौरव आणि पांडव काय करत
होते, त्यांचे हे चित्र आहे. त्यांना विचारा, तुम्ही तुमच्या पित्याला ओळखता का?
ओळखत नसाल तर बाबाशी प्रित नाही ना, मग विपरीत बुध्दी आहात. बाबाशी प्रित नसेल तर
विनाश होऊन जाल. प्रित बुध्दी विजयंती, सत्यमेव जयते, याचा अर्थ पण बरोबर आहे.
बाबाची आठवणच नसेल तर विजय प्राप्त करु शकणार नाही.
आता तुम्ही सिध्द करुन सांगता कि, गीता शिव भगवानाने सांगितली आहे. त्यांनीच राजयोग
शिकविला, ब्रह्माद्वारे. ते तर कृष्ण भगवानाची गीता समजून शपथ घेतात. त्यांना
विचारले पाहिजे, कृष्णाला समोर हाजर मानले पाहिजे की भगवानाला? म्हणतात कि, ईश्वराला
समोर हजर मानून खरे बोला. अडचण आहे ना. मग शपथ पण खोटी होते. सेवा करणाज्या मुलांनो
गुप्त नशा राहिला पाहिजे. नशेमध्ये सांगितल्याने सफलता मिळते. तुमचे हे शिक्षण पण
गुप्त आहे, शिकविणारे पण गुप्त आहेत. तुम्ही जाणता कि आम्ही नविन दुनियेमध्ये जावून
हे बनू. नविन दुनिया स्थापन होत आहे, महाभारताच्या युध्दानंतर. मुलांना आता ज्ञान
मिळाले आहे, ते पण क्रमवारीने धारण करतात, योगामध्ये पण क्रमवारीने आहेत. याची पण
तपासणी केली पाहिजे, कि आम्ही किती आठवणीत राहत आहे? बाबा सांगतात कि, हा आताचा
तुमचा पुरुषार्थ भविष्य 21 जन्मासाठी आहे. आता नापास झालात तर कल्प कल्पावर नापास
होत राहाल. उंच पद मिळणार नाही. पुरुषार्थ केला पाहिजे उंच पद प्राप्त करण्याचा. असे
पण काही सेंटर वर येत आहेत जे विकारामध्ये जात राहतात, आणि तरी सेंटरवर येत राहतात.
समजतात कि, ईश्वर तर सर्व पाहत आहेत, जाणत आहेत. आता बाबाला हे काय पडले आहे जे हे
सर्व पाहणे. तुम्ही खोटे बोलाल, विकर्म कराल, तर आपलेच नुकसान कराल. हे तर तुम्ही
पण समजता कि, काळे तोंड केले तर उंच पद प्राप्त करु शकणार नाही. तरी पण बाबाने ओळखले
तर गोष्ट एकच झाली. त्यांना काय गरज आहे. स्वत:चे मनाला वाटले पाहिजे, मी असे कर्म
केल्याने दुर्गतीला प्राप्त होईल. बाबांनी का सांगावे? हो, नाटकात असेल तर सांगतात
पण. बाबापासून लपविणे, म्हणजे आपला. सत्यनाश करणे. यातून बनण्यासाठी बाबाची आठवण
करावयाची आहे. तुम्हाला चिंता राहिला पाहिजे की आम्ही चांगल्या रितीने किशुन उंच पद
प्राप्त करु. कोणी मेला किंवा जगला, त्यांची चिंता नको. काळजी वाटली पाहिजे की,
बाबांकडून वारसा कसा घेऊ? तर कोणाला पण थोडक्यात समजावयाचे आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
वरदान:-
विशेषतांचे
दान करुन , महान बनणारे महादानी भव :-
ज्ञान दान तर सर्व
करतात, परंतू तुम्ही विशेष आत्मे आपल्या विशेषंताचे दान करा. जो पण तुमचे समोर येइल,
त्याला तुमचे कडून बाबांच्या स्नेहाचा अनुभव व्हावा, तुमच्या मुखाद्वारे बाबाचे
चित्र आणि वागण्याद्वारे बाबचे चरित्र दिसावे, तुमची विशेषता पाहून ते विशेष आत्मा
बनण्याची प्रेरणा घेतील, असे महादानी बना, तर आदि पासून अंतापर्यंत, पुज्य पणामध्ये
पण आणि पुजारी पणामध्ये पण महान राहाल.
बोधवाक्य:-
नेहमी आत्म
अभिमानी राहणाराच सर्वांत मोठा ज्ञानी आहे .