29-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो , बाबाची श्रीमत तुम्हाला 21 जन्माचे सुख देत आहे , अशी वेगळी मत बाबा शिवाय कोणी देऊ शकत नाही , तुम्ही श्रीमतावर चालत राहा....!!!

प्रश्न:-
स्वत:च स्वत:ला राजतिलक देण्याचा सहज पुरुषार्थ काय आहे?

उत्तर:-
1) स्वत:च स्वत:ला राजतिलक देण्यासाठी, बाबा जे शिक्षण देत आहेत, त्यावर चांगले रितीने चाला, यात आशिर्वाद वा कृपेची गोष्ट नाही. 2) बाबाचे अनुकरण करा, दुसज्याला पाहू नका, मनमनाभव, त्यामुळे स्वत:च स्वत:ला तिलक मिळतो, अभ्यास आणि आठवणीचे यात्रेद्वारेच तुम्ही भिकारी पासून राजा बनाल.

गीत:-
ओम नमो शिवाए.....

ओम शांती।
जेव्हा बाबा आणि दादा ओम शांती म्हणतात तर दोन वेळा पण म्हणू शकतात. कारण दोघे एकांत आहेत. एक आहे. अव्यक्त, दुसरा आहे व्यक्त, दोघे एकत्र आहेत. दोघाचा एकच आवाज येतो. वेगवेगळा पण होऊ शकतो. हे एक आश्चर्य आहे. दुनियेमध्ये हे कोणाला माहित नाही कि, परमपिता परमात्मा यांचे शरीरात बसून ज्ञान देत आहेत. हे कोठे पण लिहले नाही. बाबांनी कल्पापुर्वी पण सांगितले होते, आता पण सांगतात कि, मी या साधारण तनामध्ये त्यांचे फार जन्मातील अंतामध्ये प्रवेश करतो, यांचा आधार घेतो, गीतेमध्ये काही ना काही असे महावाक्य आहेत, जे थोडे खरी आहेत. ते खरे अक्षर आहे. मी अनेक जन्मातील अंतामध्ये प्रवेश करतो, जेव्हा यांची वानप्रस्थ अवस्था असते. यांचेसाठी असे म्हणणे बरोबर आहे. प्रथम सतयुगामध्ये जन्म पण यांचा होतो. मग शेवटी वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहेत, ज्यावेळी बाबा प्रवेश करतात. तर त्यांचेसाठी पण म्हणतात की, हे जाणत नाहीत, यांनी किती पुनर्जन्म घेतले. शास्त्रामध्ये 84 लाख पुनर्जन्म लिहले आहेत, हा सर्व आहे भक्तीमार्ग; ज्ञानमार्ग वेगळा आहे. भक्तीमार्ग वेगळा आहे. भक्ती करत करत उतरच येतात. हे ज्ञान तर एकदाच मिळते. बाबा ऐकवेळाच सर्वांची सद्गती करण्यासाठी येतात. बाबा येऊन सर्वांची एकदाच प्रालब्ध बनवितात, तुम्ही शिकता पण भविष्य नविन दुनियेसाठी. बाबा येतातच, नविन राजधानी स्थापन करण्यासाठी, त्यामुळे याला राजयोग म्हटले जाते. याचे फार महत्त्व आहे. कोणीतरी भारताचा प्राचीन राजयोग शिकवावा अशी इच्छा ठेवतात, परंतू आजकाल हे सन्यासी लोक बाहेर जावून म्हणतात कि, आम्ही प्राचीन राजयोग शिकविण्यासाठी आलो आहे. त्यामुळे हे लोक पण समजतात कि, आम्ही शिकू, कारण त्यांना वाटते या योगाद्वारेच स्वर्गाची स्थापना झाली होती. बाबा सांगतात कि, योगबळाद्वारे तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. स्वर्ग स्थापन केला आहे बाबांनी कसे स्थापन करतात, ते जाणत नाहीत. हा राजयोग आत्मिक पिताच शिकवत आहेत. शरीरधारी कोणी मनुष्य शिकवू शकत नाही. आजकाल मिलावट खोटी, भ्रष्टाचार तर फारच आहे, त्यामुळे बाबा म्हणतात, मी पतितांना पावन बनविण्यासाठी आलो आहे, जरुर मग पतित बनविणारा पण कोणी असेल. आता तुम्ही निर्णय करा, बरोबर असे आहे ना? मी च येऊन सर्व वेदशास्त्राचे सार सांगत आहे. ज्ञानामुळे तुम्हाला 21 जन्मांचे सुख मिळत आहे. भक्तीमार्गात आहे अल्पकाळ क्षणभंगूर सुख हे आहे 21 जन्माचे सुख, जे बाबा देत आहेत, बाबा तुम्हाला सद्गती देण्यासाठी, जी श्रीमत देतात, ती सर्वांत वेगळी आहे. हे बाबा सर्वांचे ह्दय जिंकणारे आहेत. जसे ते स्थुल दिलवाडा मंदीर आहे, तसे हे आहे चैतन्य दिलवाला मंदीर. बरोबर तुमच्या कर्तव्याचीच चित्रे बनविली आहेत. यावेळी तुमचे कर्तव्य चालू आहे. दिलवाला बाबा मिळाला आहे, सर्वांची सद्गती करणारा, सर्वांचे दु:ख नाहीसे करुन सुख देणारा. किती उंच ते उंच गायन आहे. उंच ते उंच आहे भगवान शिवाची महिमा. जरी चित्रामध्ये शंकराचे समोर शिवाचे चित्र् दाखवितात, खरे तर देवता समोर शिवाचे चित्र ठेवणे तर निशिध्द आहे. ते तर भक्ती करत नाहीत. भक्ती तर ना देवता करतात, ना सन्यासी करतात. ते आहेत ब्रह्म ज्ञानी, तत्त्वज्ञानी. जसे हे आकाश तत्त्व आहे, तसे ते ब्रह्मतत्त्व आहे. ते बाबाची तर आठवण करत नाहीत, ना. त्यांना हा महामंत्र मिळाला आहे. हा महामंत्र बाबाच संगमयुगावर देत आहेत सर्वांचा सद्गती दाता बाबा एकवेळेस येऊन मनमनाभवचा मंत्र देत आहेत. बाबा सांगतात कि, मुलांनो देहा सहित देहाचे सर्व धर्म सोडून, स्वत:ला अशरीरी आत्मा समजून, माझी आठवण करा. किती सोपे सांगत आहेत. रावण राज्यामुळे तुम्ही सर्व देहअभिमानी बनले आहात. आता बाबा तुम्हाला आत्मअभिमानी बनवित आहेत. स्वत:ला आत्मा समजनू बाबाची आठवण करा तर आत्म्यामध्ये जी भेसळ झाली आहे, ती निघून जाईल. सतोप्रधान पासून सतोमध्ये आल्याने कला कमी झाल्या आहेत. सोन्याचे पण कॅरेट असते ना. आता तर कलियुगाचे अंतामध्ये तर सोने पाहण्यात पण येत नाही. सतयुगामध्ये तर सोन्याचे महल असतात. किती रात्र दिवसाचा फरक आहे. त्यांचे नावच आहे, सुवर्णयुग जग. तेथे वीटा दगडाचे काही काम नाही. महल बनतात तर त्यामध्ये पण सोने चांदी शिवाय इतर काही कचरापट्टी असत नाही. तेथे सायन्सद्वारे फार सुख आह. ह्य हे पण नाटक बनलेले आहे. यावेळी सायन्स घमंडी आहेत, सतयुगामध्ये घमंडी असत नाहीत. तेथे तर सायन्समुळे तुम्हाला सुख मिळत आहे. येथे आहे अल्पकाळाचे सुख, मग याद्वारेच फार मोठे दु:ख मिळते. बॉम्ब इ. हे सर्व तर विनाशासाठी. बनवतच आहेत. बॉम्ब बनविण्यासाठी दुसज्याला मनाई करतात, आणि स्वत: बनवितात. ते समजतात पण कि, या बॉम्बद्वारेच मृत्यू होणार आहे, परंतू तरी पण बनवित राहतात, बुध्दी मारली गेली आहे ना. हे सर्व नाटकात नोंद आहे. बनविल्याशिवाय राहू शकत नाहीत. मनुष्य समजतात कि, या बॉम्बद्वारेच आमचा मृत्यू होईल, परंतू माहिती नाही की, कोण प्रेरित करत आहे, आम्ही बनविण्याशिवाय राहू शकत नाही. जरुर बनविलेच पाहिजेत. विनाशाची पण विश्व नाटकात नोंद आहे. किती ही कोणी शांती साठी बक्षीस देवो, परंतू शांती स्थापन करणारे एकच बाबा आहेत. शांतीचे सागर बाबा, शांती, सुख, पवित्रतेचा, वारसा देत आहेत. सतयुगामध्ये आहे बेहदची संपत्ती, तेथे तर दुधाच्या नद्या वाहतात. विष्णूला क्षीरसागर मध्ये दाखवतात. अशी तुलना करतात. कोठे तो क्षीरसागर, कोठे हा विषयसागर. भक्तीमार्गामध्ये मग तलाव इत्यादी बनवून त्यामध्ये दगडावर विष्णूला झोपलेले दाखवतात. भक्तीमध्ये किती खर्च करतात. किती वेळ वाया घालवितात. पैशाचा अपव्यय करतात. देवीच्या किती मुर्ती खर्च करुन बनवितात, मग समुद्रामध्ये बुडवितात. तर पैसे वाया गेले ना. ही आहे बाहुल्यांची पुजा. कोणाच्या पण कर्तव्याची कोणाला माहिती नाही. आता तुम्ही कोणाच्या पण मंदीरात जावा तर तुम्ही प्रत्येकाच्या कर्तव्याला जाणत आहत. मुलांना मनाई नाही, कोठे पण जाण्याची. पुर्वी तर बेसमज बनून जात होते, आता समजदार बनून जातो. तुम्ही म्हणता आम्ही यांच्या 84 जन्माला जाणतो. भारतवासींना तर कृष्णाचे जन्माची पण माहिती नाही. तुमच्या बुध्दीमध्ये हे सारे ज्ञान आहे. ज्ञान हे प्राप्तीचे साधन आहे. वेदशास्त्र इत्यादीमध्ये काही मुख्य लक्ष्य नाही. शाळेमध्ये नेहमीच मुख्य लक्ष्य असते. या शिक्षणाद्वारे तुम्ही किती सावकार बनत आहात.

ज्ञानाने सद्गती होते. या ज्ञानाने तुम्ही संपत्तीवान बनता. तुम्ही कोणत्या पण मंदीरात जाल, तर झटक्यात समजता, हे कोणाचे स्मृतीस्थळ आहे. जसे दिलवाडा मंदीर आहे, ते आहे स्थुल, हे आहे चैतन्य. हुबेहुब जसे या झाडामध्ये दाखविले आहे, जसे मंदीर बनविले आहे. खाली तपस्येमध्ये बसले आहेत, वर छतावर सारा स्वर्ग आहे. फार खर्च करुन बनविले आहे. येथे तर काही पण नाही. भारत 100 टक्के धनवान होता. पावन होता. आता भारत 100 टक्के दिवाळखोर पतित बनला आहे, कारण येथे सर्व विकारा द्वारेच जन्म घेतात. तिथे घाणेरडी कोणती गोष्ट नसते. गुरुड पुराणामध्ये मजेशीर गोष्टी लिहल्या आहेत, कि मनुष्य काही सुधारतील. परंतू नाटकामध्ये मनुष्याचे सुधारणे नाहीच. आता ईश्वरीय स्थापना होत आहे. ईश्वरच स्वर्ग स्थापन करतात ना. त्यांनाचा स्वर्गाचा ईश्वरीय पिता म्हटले जाते. बाबांनी समजावले आहे, ते लष्कर जे युध्द करतात, ते सर्व काही राजा-राणी साठी करतात. येथे तुम्ही मायेवर विजय प्राप्त करता, स्वत:साठी जेवढे कराल, तेवढेच मिळेल. तुम्हा प्रत्येकाला आपले तन-मन-धन भारताला स्वर्ग बनविण्यासाठी खर्च करावयाचे आहे. जेवढे कराल तेवढे उंच पद प्राप्त होईल. येथे राहणार तर काहीच नाही. यावेळेच गायन आहे, कोणाचे जमीनीत दबेल---आता बाबा आले आहेत, तुम्हाला राज्यभाग्य देण्यासाठी. सांगतात कि, आता तन-मन-धन सर्व यामध्ये लावा. यांनी (ब्रह्मा) सर्व काही अर्पण केले ना. याला म्हटले जाते महादानी. विनाशी धनाचे दान करतात. तर अविनाशी धनाचे पण दान करावयाचे आहे. जेवढे जो दान करेल. प्रसिध्द दानी असतात तर म्हणतात कि, अमूक मोठा परोपकारी होता. नाव तर घेतात ना. ते अप्रत्यक्षपणे ईश्वर अर्थ करतात. राजाई स्थापन होत नाही. आता तर राजाई स्थापन होत आहे, त्यामुळै संपूर्ण मानवतावादी बनायचे आहे. भक्तीमार्गामध्ये गायन करतात कि, आम्ही समर्पण होऊ. यामध्ये खर्च काही नाही. सरकारचा किती खर्च होत आहे. येथे तुम्ही जे काही करता ते स्वत:साठी, मग भले 8 च्या माळेमध्ये या, 108 च्या या, नाहीतर 16108 मध्ये या. सन्मानाने उत्तीर्ण व्हावयाचे आहे. अशी योगाची कमाई करा ज्यामुळे कर्मातीत अवस्था प्राप्त होईल, मग कोणती शिक्षा मिळणार नाही.

तुम्ही सर्व आहात योध्दे. तुमची लढाई आहे रावणाबरोबर, कोणत्या माणसाशी नाही. नापास झाल्यामुळे दोन कला कमी झाल्या आहेत. त्रेताला दोन कला कमीचा स्वर्ग म्हणतात. पुरुषार्थ तर केला पाहिजे ना. बाबाला पूर्ण अनुकरण करण्याचा. यामध्ये मन बुध्दीने समर्पित व्हावयाचे आहे. बाबा हे सर्व तुमचे आहे. बाबा म्हणतात हे सेवेमध्ये लावा. मी जी मत देत आहे, तसे कार्य करा, विद्यापीठ उघडा, सेंटर उघडा. अनेकांचे कल्याण होईल. फक्त हा संदेश द्यावयाचा आहे की, बाबाची आठवण करा आणि वारसा घ्या. माहिती देणारे, संदेश देणारे तुम्हा मुलांना म्हटले जाते. सर्वांना ही माहिती द्या की, बाबा ब्रह्माद्वारे म्हणतात कि, माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील, जीवनमुक्ती मिळेल. आता आहे जीवनबंध नंतर जीवनमुक्त व्हाल. बाबा म्हणतात मी भारतामध्येच येतो. हे नाटक अनादि बनलेले आहे. कधी बनले, कधी पूर्ण होईल? असे प्रश्न निर्माण होत नाहीत. हे नाटक तर अनादि चालतच रात आहे. आत्मा किती सुक्ष्म बिंदू आहे. त्यामध्ये ही अविनाशी भूमिका नोंदलेली आहे. किती गुह्य गोष्टी आहेत. ताज्यासारखी छोटी आत्मा आहे. माता पण येथे मस्तकावर बिंदी लावतात. आता तुम्ही मुले, पुरुषार्थीने स्वत:च स्वत:ला राजतिलक देत आहात. तुम्ही बाबाच्या शिक्षणावर चांगले रितीने चालाल, तर जसे की तुम्ही स्वत:लाच राजतिलक देता. असे नाही की यामध्ये आशिर्वाद किंवा कृपा होईल. तुम्हीच स्वत:ला राजतिलक देत आहात. खरे तर हाच राजतिलक आहे. बाबाचे अनुकरण करण्याचा पुरुषार्थ करावयाचा आहे, दुसज्याला पाहायचे नाही. हे आहे मनमनाभव, ज्याद्वारे स्वत:च स्वत:ला तिलक मिळत आहे, बाबा देत नाहीत. हा आहेच राजयोग. तुम्ही भिकारी पासून राजा बनत आहात. तर किती चांगला पुरुषार्थ केला पाहिजे. मग ब्रह्मा बाबाला पण अनुकरण करावयाचे आहे. ही तर समजण्याची गोष्ट आहे ना. अभ्यासाने कमाई होत आहे. जेवढा योग तेवढी धारणा होईल. योगामध्येच मेहनत आहे, त्यामुळे भारताचा राजयोग प्रसिध्द आहे. बाकी गंगा स्नान करुन करुन आयुष्य संपूण जाते, तरी पण पावन बनत नाहीत. भक्तीमार्गामध्ये ईश्वर अर्थ गरीबांना देतात तेथे तर ईश्वर येऊन गरीबांना विश्वाची बादशाही देत आहेत. गरीब निवाज आहेत ना. भारत जो 100 टक्के धनवान होता, तो यावेळी 100 टक्के दिवाळखोर आहे. दान नेहमी गरीबांना दिले जाते. बाबा किती उंच बनवित आहेत. अशा बाबाला शिव्या देतात. बाबा म्हणतात, अशी जेव्हा निंदा करतात, तेव्हा मला यावे लागते. हे पण नाटक बनलेले आहे. ते पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत. शिख लोक म्हणतात, सतगुरु अकाल. बाकी भक्तीमार्गातील गुरु तर पुष्कळ आहेत. अकाल ला फक्त हे तख्त मिळत आहे. तुम्हा मुलांचे तख्त पण उपयोग करतो. म्हणतात कि मी यांच्यात प्रवेश करुन सर्वांचे कल्याण करत आहे. यावेळी यांची ही भुमिका आहे. या मोठ्या समजण्याच्या गोष्टी आहेत. नविन कोणी समजणार नाही. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. अविनाशी ज्ञान धनाचे दान करुन, महादानी बनायचे आहे. जसे ब्रह्मा बाबानी आपले सर्व काही यामध्ये लावले, असे बाबाचे अनुकरण करुन राजाईमध्ये उंच पद प्राप्त करायचे आहे.

2. शिक्षापासून वाचण्यासाठी असा योग कमवा ज्यामुळे कर्मातीत अवस्था प्राप्त होईल. सन्मानाने उत्तीर्ण होण्यासाठी पुरेपुर पुरुषार्थ करा. दुसज्याला पाहू नका.

वरदान:-
आपल्या पुर्वज स्वरुपाची स्मृतीद्वारे सर्व आत्म्यांना शक्तीशाली बनविणारे आधार , उध्दार मुर्त भव

या सृष्टी वृक्षाचे मुळ तना, सर्वांचे पूर्वज तुम्ही ब्राह्मण ते देवता आहात. प्रत्येक कर्माचा आधार कुळ मर्यादांचा आधार, रीती रिवाजाचा आधार, तुम्ही पूर्वज, सर्व आत्म्यांचे आधार आणि उध्दारमुर्त आहात. तुम्हा आत्म्याद्वारेच, सर्व आत्म्यांना, श्रेष्ठ विचाराची शक्ती व सर्व शक्तीची प्राप्ती होते. तुमचे सर्व अनुकरण करत आहेत. त्यामुळे एवढी मोठी जबाबदारी समजून प्रत्येक संकल्प आणि कर्म करा, कारण तुम्हा पूर्वज आत्म्यांचे आधावरच सृष्टीची वेळ आणि स्थितीचा आधार आहे.

बोधवाक्य:-
जे सर्वशक्ती रुपी किरणे चौहीकडे पसरवितात, तेच मास्टर ज्ञानसूर्य आहेत...!!!


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ
कधी मधी विचारांच्या गर्दीला, थांबविण्याचा अभ्यास करा. एका मिनीटासाठी विचारांना किंवा शरीराद्वारे चाललेल्या कर्मांना थांबवून बिंदू रुपाचा अभ्यास करा. हा एका सेकंदाचा अनुभव पण सारा दिवस अव्यक्त स्थिती बनविण्यासाठी मदत करेल.