03-03-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, शिक्षण हीच कमाई आहे, शिक्षण हेच कमाईचे साधन आहे. त्याच आध्यात्मिक
शिक्षणानेच तुम्ही 21 जन्मासाठी खजिना जमा करु शकता...!!
प्रश्न:-
ज्या मुलांवर
बृहस्पती गुरुची दशा राहील अशा मुलांचे कोणते चिन्ह दिसू लागतात?
उत्तर:-
त्यांचे श्रीमतावर पूर्णपणे लक्ष असेल, ते शिक्षण चांगले शिकतील कधीही नापास होणार
नाही. श्रीमताचे उल्लंघन करणारेच नापास होतात. त्यांच्यावर राहूची दशा बसते. आता
तुम्हा ममुलांवर वृक्षपती पित्याद्वारे बृहस्पती गुरुची दशा बसलेली आहे.
गीत:-
ह्या पापाच्या
दुनियेपासून दूर घेऊन, चल दूर जेथे सुख शांती असेल.
ओम शांती।
ही दुनिया पापी आत्माची आहे. तुम्हाला हे गीत गायचे नाही, कारण तुम्ही पावन बनत
आहात. ही आचरणात आणण्याची गोष्ट आहे. खुप मोठा खजिना आहे. जसे शाळेचे शिक्षण हे
सुध्दा खजिनांच आहे. शिक्षणाद्वारेच उदरनिर्वाह चालतो. मुलांना माहित आहे, येथे
ईश्वर शिकवितात, हे शिक्षण सर्वांत मोठे आहे. कारण या शिक्षणाचे उद्दीष्टे ही मोठे
आहे. हा खरा सतसंग आहे, बाकी सगळे खोटे आहे. तुम्हाला माहित आहे. पूर्ण कल्पात एकच
खरा खुरा सतसंग होतो, जेव्हा पतित पावनला सगळे बोलवतात. आता ते बोलवितात आणि तो
ईश्वर तुमच्या समोर बसलेले आहेत. आपण नव्या दुनियासाठी पुरुषार्थ करतो. जिथे दु:खाचे
नाव नाही. तुम्हाला स्वर्गात सुखशांती मिळते नरकात नाही, हे तर कलियुग आहे. सर्व
दु:खी आहेत. भ्रष्टाचाराने जन्माला आलेले आहेत, म्हणून ईश्वराला बोलवितात की बाबा
आम्ही पतीत झालो आहोत, पावन बनण्यासाठी गंगास्नान करतो. बरं, स्नान केले तर पावन
बनायला हवे ना? मग पुन्हा धक्के का खातात? धक्का खात, सीडी उतरत उतरत पापी बनले. 84
जन्माचे रहस्य बाप तुम्हाला समजावीत आहेत. ते तर 84 जन्म घेत नाहीत. तुमच्या जवळ 84
जन्माचे सीडीचे चित्र चांगले आहे. कल्प वृक्षाचे चित्र गीतेमध्ये आहे. परंतू
ईश्वराने गीता कधी ऐकवली, काय केले, भारतवासी जाणत नाहीत. बाबा म्हणतात की,
संगमयुगातच स्वर्गाची स्थापना होते. विश्व ड्रामामध्ये बदल होऊ शकत नाही. जे काही
ड्रामामध्ये ठरलेले आहे ते हुबेहुब होणार आहे. असे नाही जे आहे त्यात बदल होईल?
पुन्हा मुलांच्या बुध्दीत नाटकाचे ज्ञान पक्के बुध्दीत बसलेले आहे. या 84 च्या
फेऱ्यातून तुमची सुटका नाही. म्हणजे ही दुनिया कधीही नष्ट होत नाही. सृष्टीचा
इतिहास भूगोल पुन्हा घटत आहे. हे 84 चे जन्माची शिडी खुप महत्त्वाची आहे. त्रिमुर्ती
आणि गोळा हे चित्र महत्त्वाचे आहे. गोळ्याच्या चित्रात स्पष्ट दाखविले आहे की,
प्रत्येक युग 1250 वर्षाचे आहे. हे आहे जसे आंधळ्या समोर आरसा. 84 च्या जन्म पत्रीचा
आरसा. बाप पुन्हा मुलांच्या दशेचे वर्णन करतात. बाप तुम्हाला बेहदच्या दशे विषयी
सांगतात की, तुम्हा मुलांवर आता बृहस्पती गुरुची दशा आहे. मग अभ्यासावर सगळे ठरते.
की कोणावर बृहस्पतीची दशा, कोणावर शुक्राची, कोणावर राहूची दशा. नापास झाले तर
राहूची दशा समजावी. येथे ही असेच आहे. श्रीमतावर नाही चालले तर अविनाशी राहूची दशा
बसली आहे. असे समजावे. मुलांना अभ्यासावर पूर्ण लक्ष्य दिले पाहिजे. यामध्ये बहाना
देऊ नये, सेंटर दूर आहे, इ. पायी येण्यास 6 घंटे लागले तरी मुरलीसाठी पोहचले पाहिजे.
मनुष्य तिर्थावर जातात. किती धक्के खातात. पूर्वी पायी यात्रा करीत होते. बैलगाडीत
जात होते. येथे तर एकाच शहरात जायचे असते. ही किती मोठे विद्यापीठ आहे. ज्यात तुम्ही
लक्ष्मी नारायण बनतात. इतक्या मोठ्या शिक्षणासाठी दूर सेंटर आहे किंवा फुर्सत नाही,
असे म्हटले तर बाबा काय म्हणतील हा मुलगा लायक नाही. बाबा श्रेष्ठ बनविण्यासाठी
येतात. हे आपलाच सत्यानाश करुन घेतात.
श्रीमत सांगते-पवित्र बना, दैवी गुण धारण करा. एकत्र राहूनही विकारात न जाणे,
दोघांच्या मध्ये ज्ञान रुपी तलवार असते, आम्हाला पवित्र दुनियाचे मालक बनायचे आहे
आता तर पतीत दुनियाचे मालक आहेत. ते देवता डबल मुकुटधारी होते. मग अर्ध्या
कल्पानंतर पवित्रतेचा मुकूट निघून जातो. आता पवित्रतेचा मुकूट कोणाच्या डोक्यावर
नाही, फक्त जे धर्म स्थापक आहे त्यांच्या डोक्यावर असू शकतो कारण पवित्र आत्मा
शरीरात प्रवेश करतात ह्याच भारतात डबल मुकूट धारी पण होते. सिंगल मुकूटधारी डोके
टेकवतात. कारण ते आहे पवित्र महाराजा-महाराणी, महाराजे, राजापेक्षा मोठे असतात.
त्यांच्याकडे मोठी जहागिरी असते. सभेमध्ये महाराजे पुढे आणि राजे मागे बसतात
कायदेप्रमाणे त्यांचा दरबार भरत असे. हाच ईश्वरीय दरबार आहे. यालाच इंद्र सभा ही
म्हणतात. सुंदर तरुनीला परी म्हणतात ना? राधा कृष्णाची नैसगिक सुंदरता आहे. जेव्हा
ते काम चितेवर बसतात. ते भिन्न भिन्न नाव रुपाचे शाम वर्णीय बनतात. शास्त्रामध्ये
ह्या गोष्टी नाहीत. ज्ञान भक्ती वैराग्य, या तीन गोष्टी आहेत. ज्ञान सर्व श्रेष्ठ
आहे. आता तुम्ही ज्ञान प्राप्त करतात. तुम्हाला भक्तीचा वैराग्य आहे. ही तमोप्रधान
दुनिया आता नष्ट होणार आहे. त्याचा वैराग्य आहे. जेव्हा नवीन घर बणून तयार होते.
तेव्हा जुन्या घराचे वैराग्य येते. हदची गोष्ट आहे आणि ही बेहदची गोष्ट आहे. आता
तुमची बुध्दी नव्या दुनियाकडे आहे. ही आहे जुनी दुनिया नर्क आहे. सतयुग आणि
त्रेतायुगाला म्हणतात शिवालय, शिवबाबांची स्थापन केलेली आहे ना. आता ह्या
वेश्यालयाचा तुम्हाला तिरस्कार आहे. बऱ्याच जणांना तिरस्कार येत नाही. लग्नाच्या
बेडीत गटारमध्ये पडू इच्छितात. मनुष्य सगळे विषय वैतरणी नदीत आहेत. घाणीत पडलेले
आहेत. एक दुसऱ्यांना दु:ख देतात. म्हणून म्हणतात अमृत सोडून विष का खातात? जे काही
म्हणतात त्यांचा अर्थही जाणत नाहीत. तुम्हा मुलांमध्ये ही नबरवार आहेत. हुशार
शिक्षक समजतात कि कोणाची बुध्दी कुठे भटकते, वर्गामध्ये कोण जांभई देतात. कोणाला
डुलकी लागते, समजून जातात यांची बुध्दी घर किंवा धंदा, रोटीमध्ये भटकत आहे. जांभाई
ही थकलेल्यांची निशाणी आहे. धंदयात कमाई होत असले, रात्री 1-2 वाजेपर्यंत दुकानात
बसतात. कधी जांभई देत नाहीत. येथे तर बाबा किती मोठा खजिना देतात, जांभई देणे
तोट्याची लक्षणे आहेत. दिवाळखोर व्यक्ती जांभई देतात. तुम्हाला तर खजाना मिळतो आहे.
तेव्हा आपले किती लक्ष्य असायला हवे. अभ्यासाच्या वेळेत जांभई दिली तर शिक्षक
समजतात की, मुलांची बुध्दी दुसरीकडे भटकते, येथे बसून घर-दार आठवते, मुलं बाळ
आठवतात. येथे तर तुम्हाला भट्टीत राहायचे आहे. येथे कोणाचीच आठवण येता कामा नये.
समजा कोळी 6 दिवस भट्टीत राहते, शेवटी कोणाची आठवण आली, चिठ्ठी लिहली तर नापास
व्हाल, पुन्हा 7 दिवस सुरु करावे लागतील, 7 दिवस भट्टीत राहिले तर सर्व आजार पण
निघून जाईल. तुम्ही अर्ध्या कल्पाचे महान रोगी आहेत. बसल्या बसल्या अकाले मृत्यू
होतो. सतयुगात असे काहीही होत नाही. येथे तर कोणते कोणते आजार असतात. मरताना,
आजारामुळे लोक ओरडतात. स्वर्गात जरा ही दु:ख होत नाही. तेथे वेळेवर लक्षात येते की,
आता हे शरीर सोडून आपण लहान मुलं बनणार, येथे ही तुम्हाला साक्षात्कार होतो.
ज्ञानाने ही समजतात की, आम्ही गरीबा पासून राजकुमार बनतो. आमचे लक्ष्य आहे की राधा
कृष्ण बनणे, लक्ष्मी नारायण नाही. पुर्ण 5 हजार वर्ष तर राधा कृष्णाचेच आहे. लक्ष्मी
नारायणाचे तर 20-15 वर्ष कमी आहेत, म्हणून कृष्णाची महिमा अधिक आहे. हे ही कोणाला
माहित नाही की, राधा कृष्णच पुढे लक्ष्मी नारायण बनतात. आता तुम्ही मुले समजत आहात
की हा अभ्यास आहे. प्रत्येक गावागावात सेंटर उघडतात. तुमचे विद्यापीठ तसेच दवाखाना
आहे. यासाठी 3 पाय पृथ्वी पाहिजे, ज्याच्या नशीबात आहे ते आपल्या घरातील एक खोलीत
ही सत संग उघडतात. येथे जे पैशावाले मनुष्य आहेत, त्याचे पैसे तर मातीतच मिसळणार
आहेत. तुम्ही बापाकडून वारसा घेत आहात. 21 जन्मांचा, बाबा स्वत: म्हणतात की, जुनी
दुनिया बघत असताना ही बुध्दी तेथे लावा. कर्म करताना प्रॅक्टीस करा, तुमची आता
प्रॅक्टीस होत आहे. बाप म्हणतात शुध्द कर्म करा, अशुध्द काही काम नका करु, काही
आजार असेल तर डॉक्टर आहे, त्यांचा सल्ला घ्या. प्रत्येकाचा आजार आपला आहे.
डॉक्टराकडून चांगला सल्ला मिळेल. विचारु शकता की, अशा परिस्थितीत काय करावे? फक्त
लक्षात ठेवा की काही विकर्म होणार नाही. जसे अन्न तसे मन, हे गायन आहे. मांस खरेदी
करणाऱ्यावर, विकणाऱ्यावर खाऊ घालणाऱ्यावर पण पाप लागते. पतीत पावन पित्यापासून काही
लपवू नये. डॉक्टरांपासून आजार पण लपविले तर आजार दूर होत नाही. हा आहे वृध्द अविनाशी
सर्जन, या गोष्टी दुनिया तर जाणत नाहीत. तुम्हाला आता ज्ञान मिळते आहे, तरी ही योग
या विषयात अजून खुप कमी आहे. आठवण बिलकुल करीत नाही. हे बाबा पण ओळखतात की अशी आठवण
पक्की राहू शकणार नाही. नंबरवार तर राहणारच जेव्हा आठवणीची यात्रा पूर्ण होईल.
तेव्हा कर्मातीत अवस्था होईल. तेव्हा लढाई पण सुरु होईल. तोपर्यंत लढाई लागते पुन्हा
बंद होते. लढाई तर केव्हा ही सुरु होऊ शकते. परंतू विवेक सांगतो जेव्हा पर्यंत
राजाई स्थापन होत नाही. तोपर्यंत मोठी लढाई सुरु होऊ शकत नाही. थोडी 2 लागते पुन्हा
बंद होते. राजाई स्थापन होत आहे हे कोणीच जाणत नाही. सत्वप्रधान सत्व, रजो,
तमोबुध्दी तर आहेच ना. तुमच्या मधील ही सतोप्रधान बुध्दीवाले चांगली आठवण करतात.
ब्राह्मण तर आता लाखोच्या घरात आहेत, परंतू त्यांच्यातही सख्ये आणि सावत्र तर आहे
ना. सख्ये चांगली सेवा करतात. आई-वडीलांच्या मतावर चालतात. सावत्र रावणाच्या मतावर
चालतात, काही रामाच्या मतावर, काही रावणाच्या मतावर चालतात. मुलांनी गीत ऐकले,
म्हणतात ना बाबा-अशा जागी घेऊन चला जेथे सुख चैन असेल. स्वर्गात सुख चैन असते.
दु:खाचे नाम-निशाण ही नसेल. स्वर्ग म्हणतात सतयुगाला, आता तर हे कलियुग आहे. येथे
मग स्वर्ग कुठून येणार? तुमची बुध्दी आता स्वच्छ होत आहे. स्वच्छ बुध्दीच्या लोकांना
मलीन बुध्दीवाले नमन करतात. पवित्र राहणाऱ्यांना मान असतो. सन्याशी पवित्र असतात
तेव्हा सगळे त्यांच्या पाया पडतात. सन्यासी तर विकारातून जन्म घेतात आणि सन्यासी
बनतात. देवतांना म्हणतात संपूर्ण निर्विकारी, सन्यासी केव्हाच संपूर्ण निर्विकारी
नसतात. म्हणून तुमचा खुशीचा पारा उंच हवा, म्हणून म्हणतात अतीइंद्रीय सुख विचारावे
तर गोप गोपीकांना, जे बापाकडून वारसा घेत आहेत. येथे समोर ऐकताना नशा चढतो. कोणाचा
कायम राहतो, कोणाचा पटकन उडून जातो. संगदोषामुळे नशा स्थाई राहत नाही. तुमच्या
सेंटरवर असे बरेच आहे की, थोडा नशा चढतो परंतू कुठे पार्टीमध्ये गेलेतर बीडी
सिगारेट, दारु पितात, नशा उतरतो. संगदोष दोन खुप खराब आहे. हंस आणि बगळे एकत्र राहू
शकत नाही. पती हंस बनतो तर पत्नी बगळा बनते. कुठे मग पत्नी हंसनी बनते तर पती बगळा
बनतो. पवित्रते साठी मार खतात. काही काही घरात सगळे हंस असतात पण चालता चालता बगळा
बनतात. बाप तर म्हणतात, आपल्या नातेवाईकांना, मुलांना सुखी बनविले पाहिजे. हे तर
दु:ख धाम आहे ना. आता तर खुप संकटे येणार आहेत. मग बघा कसे त्राही त्राही करतात. अरे,
बाप आले आणि आम्ही त्याचा वारसा प्राप्त नाही झाला तर टूलेट होईल. बाप स्वर्गाची
बादशाही देण्यासाठी आले आहेत. म्हणून बाबा म्हणतात, माझ्याकडे मजबूत मुलांना घेऊन
या. जे स्वत: समजून घेऊन दुसऱ्यांना समजावतील बाकी बाबा काही फक्त बघण्याची गोष्ट
नाही. शिवबाबा कुठे दिसत नाही. आपल्या आत्म्याला कोणी पाहिले आहे का? फक्त
जाणतात-तसे परमात्मालाही जाना. दिव्य दृष्टी विना त्यांना कोणी पाहू शकत नाही.
दिव्य दृष्टीने तु सतयुग पाहता, आता तुम्हाला तेथे जायचे आहे. कलियुगाचा विनाश
तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही मुलं कर्मातीत अवस्था प्राप्त कराल. अच्छा.
गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक
आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. या जुन्या
दुनियेला पाहताना बुध्दी बाबा व नवी दुनियेकडे लागली पाहिजे. लक्षात ठेवा
कर्मेद्रियाद्वारे कोणतेही विकर्म करु नका. सदैव शुध्द कर्म करा. जर कोणता आजार
असेल तर सर्जनाला सांगावे.
2. संगदोष खुप खराब आहे, म्हणून स्वत:चा सांभळा करा. स्वत:ला व परिवाराला सुखदायी
बणवा अभ्यासात कधीही कारण सांगू नका.
वरदान:-
आपले सर्व काही
सेवेत, अर्पण करणारे गुप्त दानी पुण्य आत्मा भव :-
जी सेवा करतात, ती
विश्वाच्या कल्याणासाठी अर्पण करा. जैसे भक्तीमध्ये जे दानी पुण्य आत्मा असतात, ते
हाच संकल्प करतात की सर्वांचे भले होवो. असेच तुमचा प्रत्येक संकल्प, सेवेच्या प्रती
असला पाहिजे. केव्हाही आपले पणासाठी कामना नको, सर्वांची सेवा प्रती करा. जी सेवा
विघ्न रुप असते त्याला सेवा म्हणत नाही, म्हणून स्वार्थीपणा सोडून गुप्त व खरे
सेवाधारी बनून विश्वाचे कल्याण करत चला.
बोधवाक्य:-
प्रत्येक
गोष्ट प्रभूला अर्पण करा तर येणारी सर्व संकटे सहज निघून जातील.