15-03-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
11.12.1985 ओम शान्ति
मधुबन
खऱ्या सेवाधारी ची
लक्षणे
आज स्नेहाचे सागर बाप
दादा सर्व स्नेही मुलांना पाहत आहेत.प्रत्येक मुलांमध्ये तीन विशेषता पाहत आहेत,की
प्रत्येक मुलगा तिन विशेषता मध्ये किती संपन्न बनला आहे? त्या तीन विशेषता आहेत
स्नेह,सहयोग म्हणजे सहज योग आणि शक्ती स्वरूप म्हणजे चालता-फिरता चैतन्य लाईट हाऊस
आणि शक्ती स्तंभ. प्रत्येक संकल्प बोल किंवा कर्मा द्वारे तिन्हीच्या स्वरूपात
प्रत्यक्ष रूपामध्ये कोणाला अनुभव व्हावा,फक्त स्वतःच्या प्रती नको परंतु
दुसऱ्यांच्या प्रती पण या तिन विशेषता चा अनुभव व्हावा.जसे बाबा स्नेहाचे सागर
आहेत,असेच मास्टर सागर च्या पुढे,जे ज्ञानी किंवा अज्ञानी आत्मे येतील येथील,तर
अनुभव करावेत,स्नेहाच्या मास्टर सागराच्या लाटा स्नेहाची अनुभती करवत आहेत. जसे
लौकिक किंवा प्राकृतिक सागराच्या किनाऱ्या वरती कोणीही जातात तर शीतलते ची,शांतीचा
अनुभव करतात.असेच मास्टर स्नेहाच्या सागरा द्वारे आत्मिक स्नेहाची अनुभती व्हावी
की,खऱ्या स्नेहाच्या प्राप्तीच्या स्थानाजवळ पोहोचले आहोत.आत्मिक स्नेहाची
अनुभूती,आत्मिक सुगंध वातावरणामध्ये अनुभव व्हावा.बाबांचे स्नेही आहेत,असे तर
सर्वजण म्हणतात आणि बाबा पण जाणतात की बाबांशी सर्वाचा स्नेह आहे.परंतु आत्ता
स्नेहाचा सुगंध विश्वामध्ये पसरवायचा आहे. प्रत्येक आत्म्याला या सुगंधाचा अनुभव
करावयाचा आहे.प्रत्येक आत्मा हे वर्णन करेल की,हे श्रेष्ठ आत्मे आहेत,फक्त बाबांचे
स्नेही नाहीत परंतु सर्वांचे स्नेही आहेत.या दोन्ही अनुभूती जेव्हा सर्वांना नेहमी
अनुभव होतील,तेव्हाच म्हणाल मास्टर स्नेहाचे सागर.आजच्या दुनिया मध्ये खऱ्या आत्मिक
स्नेहाचे भुकेले आहेत.स्वार्थी स्नेह पाहून पाहून त्या स्नेहा द्वारे मन उपराम झाले
आहे, म्हणून आत्मिक स्नेहाच्या थोड्याशा काळाच्या अनुभूतीला जीवनाचा आधार समजतात.
बापदादा पाहत होते,स्नेहाच्या विशेषते मध्ये अन्य आत्म्याच्या प्रती कर्मामध्ये
किंवा सेवांमध्ये आनण्यासाठी किती सफलता मिळाली आहे.फक्त आपल्या मनामध्ये स्वतःशीच
खुश राहत नाही ना?मी तर खूप स्नेही आहे.जर स्नेह नसेल तर बाबांचे कसे बनलो असतो?
किंवा ब्राह्मण जीवनामध्ये कसे पुढे गेलो असतो.आपल्या मनामध्ये संतुष्टता आहे,हे
बाप दादा पण जाणतात आणि आपल्या पर्यंत ठीक पण आहे परंतु तुम्ही सर्व मुलं बाबांच्या
सोबतच सेवाधारी आहात.सेवे साठीच तन-मन-धन तुम्हा सर्वांना बाबांनी विश्वस्त बनवून
दिले आहे.सेवाधारी चे कर्तव्य कोणते आहे?प्रत्येक विशेषतेला सेवा मध्ये लावणे.जर
तुमची विशेषता सेवांमध्ये लागली नाही तर,कधीच ती विशेषता वृद्धी होत नाही.त्या सीमे
पर्यंतच राहिल म्हणून काही मुलं असा अनुभव करतात की बाबाचे बनले रोज सेवा
केंद्रामध्ये येत आहोत,पुरुषार्थ पण करत आहोत,नियमाचे पालन पण करत आहोत परंतु
पुरुषार्था मध्ये जी वृध्दी व्हायला पाहिजे,तो अनुभव होत नाही. चालत आहोत परंतु वृदी
होत नाही याचे कारण काय आहे?विशेषता सेवांमध्ये लावत नाहीत,फक्त ज्ञान देणे किंवा
साप्ताहिक कोर्स करणे ही सेवा नाही. ऐकवणे तर द्वापर पासून परंपरा चालत आहे परंतु
या ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे ऐकवणे,म्हणजेच काही देणे.भक्तिमार्ग मध्ये ऐकवणे
म्हणजेच घेणे होते आणि आत्ता ऐकवणे म्हणजेच काही देणे आहे.दाताची मुलं आहात, सागराचे
मुल आहात.जे पण संपर्क मध्ये येतील ते अनुभव करतील की काही घेऊन जायचे आहे फक्त
ऐकून जायचे नाही.ज्ञाना द्वारे,स्नेहा द्वारे,धना द्वारे किंवा आठवणीच्या शक्तीच्या
धना द्वारे,शक्तीच्या धना द्वारे, सहयोगा च्या धना द्वारे हात म्हणजेच बुद्धी भरून
जात आहोत.याला म्हटले जाते खरी सेवा.सेकंदाच्या दृष्टी द्वारे किंवा दोन वचना
द्वारे,आपल्या शक्तिशाली प्रकंपना द्वारे,संपर्का द्वारे दाता बणुन द्यायचे आहे.असे
सेवाधारीच खरे सेवाधारी आहेत.असे देणारे नेहमी अनुभव करतील,प्रत्येक वेळेस वृध्दीला
किंवा प्रगतीला प्राप्त करत आहोत, नाही तर समजतात पाठीमागे जात आहोत,किंवा जसे पुढे
जायला पाहिजे तसे पुढे जात नाहीत,म्हणून दाता बना, अनुभव करवा.असे सहयोगी किंवा सहज
योगी फक्त स्वतःच्या प्रती आहेत की,दुसऱ्यांना पण आपला उमंग उत्साहाची लाट सहयोगी
बनवते.आपल्या सहयोगाची विशेषता, सर्व आत्म्यांना जाणीव व्हावी की,हे आमचे सहयोगी
आहेत.कोणत्याही कमजोर स्थिती किंवा परिस्थितीच्या वेळेत,हे सहयोगा द्वारे पुढे
जाण्याचे साधन देणारे आहेत.सहयोगाची विशेषता सर्व आत्म्यांना,आपल्या प्रती अनुभव
व्हावी.याला म्हटले जाते,विशेषतेला सेवेमध्ये लावणे.बाबांचे सहयोगी तर आहातच परंतू
विश्वाचे सहयोगी आहात.मुलांच्या प्रती,प्रत्येक आत्म्या कडुन,हे अनुभवाचे बोल
निघावेत,की,हे पण बाप समान सर्वांचे सहयोगी आहेत.वैयक्तिक एक दोघांचे सहयोगी बनू
नका.ते स्वार्थाचे सहयोगी होतील. हदचे सहयोगी होतील.खरे सहयोगी बेहदचे सहयोगी आहेत.
सर्वांची पदवी,टायटल काय आहे? विश्व कल्याणकारी आहात की फक्त सेवा केंद्राचे
कल्याणकारी आहात?देशाचे कल्याणकारी आहात की फक्त वर्गातील विद्यार्थ्यांचे
कल्याणकारी आहात.अशी पदवी तर नाही ना? विश्व कल्याणकारी विश्वाचे मालक बनणारे
आहात,की फक्त आपल्या महला चे मालक बनणारे आहात.जे फक्त सेवाकेद्राचे हद मध्ये
राहतील ते आपल्या महला चे मालक बनतील परंतु बेहद बाबा द्वारे बेहदचा वारसा घेत
आहात,हदचा नाही.तर सर्वांच्या प्रती सहयोगाच्या विशेषतेला कार्यामध्ये लावणे,याला
सहयोगी आत्मा म्हणनार.या विधीप्रमाणे शक्तिशाली आत्मा,सर्व शक्तींना फक्त स्वतःच्या
प्रती नाही परंतु सर्वांच्या प्रती सेवा मध्ये लावतील.कोणामध्ये सहनशक्ती नाही
तुमच्याजवळ आहे,दुसऱ्यांना ही शक्ती देणे,हे आहे शक्तीला सेवेमध्ये लावणे. फक्त हा
विचार करू नका मी तर सहनशील राहतो परंतु तुमच्या सहनशीलतेच्या गुणांची प्रकाश आणि
शक्ती दुसऱ्या पर्यंत पोहोचली पाहिजेत.प्रकाश स्तंभाची लाईट फक्त स्वतःपुरती होत
नाही.दुसऱ्यांना प्रकाश देणे किंवा रस्ता दाखवण्या साठी होते. असे शक्तिरूप म्हणजे
प्रकाश स्तंभ,शक्ती स्तंभ बणुन दुसऱ्यांना त्याच्या लाभाचा अनुभव अनुभव करवा.ते
अनुभव करतील की,निर्बलता च्या अंधकारा मधुन शक्तीच्या प्रकाशा मध्ये आलो आहोत किंवा
समजावे की,ही आत्मा आपल्या शक्तीद्वारे मलापण शक्तिशाली बनवण्यामध्ये मदतगार
आहे.बाबांशी संबंध जोडतील,परंतू निमित्त बणुन.असे नाही की सहयोग देऊन आपल्या मध्येच
अटकवतील.बाबाची देण देत आहोत,या स्मृती आणि समर्थी द्वारे विशेषतेला सेवेमध्ये
लावतील.खऱ्या सेवाधारी ची लक्षणे हीच आहेत.प्रत्येक कर्मा द्वारे,त्यांच्या पासुन
बाबा दिसून यायला पाहिजेत.त्यांचा प्रत्येक बोल बाबांची स्मृती देतील.प्रत्येक
विशेषता दाता कडे इशारा करतील.नेहमी बाबाच दिसून येतील.ते तुम्हाला न पाहता नेहमी
बाबांना पाहतील.माझे सहयोगी आहेत, हे खऱ्या सेवाधारी ची लक्षणे नाहीत. हे कधीच
संकल्प मात्र पण विचार करु नका,की माझ्या विशेषते मुळे,हे माझे खुप सहयोगी
आहेत.सहयोगीला सहयोग देणे माझे काम आहे.जर तुम्हाला पाहिले,बाबांना पाहिले नाही, तर
ही सेवा झाली नाही.हे द्वापर युगी गुरुंच्या सारखे बेमुख केले.बाबांना विसरायला
लावले ना की सेवा केली.हे खाली पडणे आहेत नि की चढणे आहे. हे पुण्य नाही पाप
आहे,कारण बाबा नाही तर जरूर पाप आहे.तर खरे सेवाधारी सत्या कडेच संबंध
जोडतील.बापदादांना कधी कधी मुलां वरती,हसायला येते की,लक्ष काय आहे आणि लक्षणं कोणती
आहेत! बाबांकडे पोहचायचे आहे आणि दुसरीकडे जात आहेत.दुसऱ्या धार्मिक पित्या साठी
म्हणतात,ते वरुन खाली घेऊन जात आहेत.असे धार्मिक पिता बनू नका.बापदादा पाहत होते
की,कुठे कुठे मुलं सहज रस्त्याच्या ऐवजी,गल्लीमध्ये फसतात.रस्ता बदलतो म्हणून चालत
राहतात परंतु लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.तर समजले,खरे सेवाधारी कोणाला
म्हणतात?या तीन्ही शक्ती किंवा विशेषेते ला किंवा बेहदच्या दृष्टी द्वारे,बेहदच्या
वृत्तीद्वारे सेवेमध्ये लावा. अच्छा.
नेहमी दाताची मुलं दाता बणुन,प्रत्येक आपल्याला भरपूर करणारे,प्रत्येक खजान्या ला
सेवांमध्ये लावणारे,प्रत्येक वेळी वृद्धी करणारे, नेहमी बाबा द्वारा प्रभू देन
समजून,दुसऱ्यांना पण प्रसाद देणारे,नेहमी एकाकडे इशारा देऊन एकरस बनवणारे,असे नेहमी
आणि सर्वांचे खऱ्या सेवाधारी मुलांना, बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
कुमारीं सोबत
अव्यक्त बापदादाचा वार्तालाप :-
हे लष्कर काय करेल? लष्कर किंवा सेना नेहमी विजय मिळवतात.सेना विजया साठी
असते.दुश्मना सोबत लढण्यासाठी सेना ठेवतात.तर माया दुश्मन वरती विजय मिळवणे,हे सर्व
तुमचे कर्तव्य आहे.नेहमी या कर्तव्याला जाणून लवकरात लवकर पुढे चला,कारण वेळ खूप
तीव्र वेगाने जात आहे.वेळेची गती तेज आहे आणि तुमची गती सावकाश आहे,तर वेळे वरती
पोहोचू शकणार नाहीत,म्हणून तुमच्या पुरुषार्थाच्या गतीला तीव्र करा.जे कमजोर असतात
ते स्वतःच शिकार होतात,शक्तिशाली नेहमी विजयी होतात. तर तुम्ही सर्व विजयी आहात.
नेहमी हेच लक्ष ठेवा की सेवाधारी बणुन सेवे मध्ये नेहमी पुढे जात राहायचे आहे, कारण
कुमारींना कोणतेच बंधन नाहीत. जितकी सेवा करू इच्छिता तेवढी करू शकतात.नेहमी स्वतःला
बाबांची आणि बाबांसाठी आहे,असे समजून पुढे जात चला.जे सेवेच्या निमित्त बनतात
त्यांना खुशी आणि शक्तींची प्राप्ती स्वतः होते. सेवा चे भाग्य करोडो मधून काहीनां
च मिळते.कुमारी नेहमी पूज्य आत्मा आहेत. स्वतःच्या पुज्य स्वरूपाला स्मृतीमध्ये
ठेवून प्रत्येक कर्म करा आणि प्रत्येक कर्माच्या पूर्वी चेक करा की हे कार्य पूज्य
आत्म्या सारखे आहेत? जर नाहीत तर परिवर्तन करा.पुज्य आत्मे कधीच साधारण होत
नाहीत,महान असतात.100 ब्राह्मणा पेक्षा उत्तम कुमारी आहात.तर शंभर ब्राह्मण एकेक
कुमारींना तयार करायचे आहेत.त्यांची सेवा करायची आहे. कुमारीं नी कोणत्या सेवेचे
नियोजन केले आहे?कोणत्याही आत्म्याचे कल्याण व्हावे यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कोणती
आहे?आपल्या मस्ती मध्ये राहणारे आहात ना? कधी ज्ञानाच्या मस्ती मध्ये कधी आठवणीच्या
मस्ती मध्ये,कधी प्रेमाच्या मस्ती मध्ये,आनंदच आनंद आहे.संगम युग आहे आनंदाचे युग.
अच्छा कुमारी वरती बापदादां ची नेहमीच नजर असते.कुमारी स्वतःला काय बनवतात,हे
त्यांच्यावरती आहे,परंतु बापदादा तर सर्वांना विश्वाचे मालक बनवण्या साठी आले आहेत.
सदा विश्वाच्या मालक पणाची खुशी आणि नशा हवा.नेहमी अथक बणुन सेवा करत रहा.अच्छा.
वरदान:-
करनहार आणि
करावनहार च्या स्मृती द्वारे लाईटचे मुकुटधारी भव .
मी निमित्त
कर्मयोगी,करनहार आहे,बाबा करावनहार आहेत,तर ही स्रुती स्वतः राहते.तर नेहमी लाईटचे
मुकुट धारी किंवा बेफिक्र बादशहा बनतात.बस बाबा आणि मी,दुसरे कोणीच नाही.ही अनुभूती
सहज बादशाह बनवते,इंद्रजीत आणि प्रकृती जीत बनते परंतु जर कोणी चुकून पण कोणत्याही
व्यर्थ भावाचे ओझे आपल्यावरती घेतात,तर मुकुट च्या ऐवजी काळजी करणारे अनेक टोपल्या
डोक्यावर येतात.
सुविचार:-
सर्व बंधनापासून
मुक्त होण्यासाठी दैहीक नात्यापासून नष्ट मोहा बना .
सूचना :-
आज आंतरराष्ट्रीय योग
दिवस रविवार आहे,सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत सर्व भाऊ बहिणी संगटित रुपा
मध्ये एकत्र होऊन,योगा अभ्यासा मध्ये सर्वा प्रती हीच शुभ भावना ठेवा कि,सर्वांचे
कल्याण व्हावे. सर्व आत्मे सत्याच्या मार्गावर चालून परमात्मा वारशाचे अधिकारी
कबनप्राप्त करा मी बाप समान सर्व आत्म्यांना मुक्ती जीवन मुक्तीचे वरदान आहे