30-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो , बाबा तुम्हाला ज्ञान आणि योगाची खुराक , खाऊ घालून चांगले , जबरदस्त
खात्री करतात , त्यामुळे नेहमी आनंदी मजेत राहा आणि श्रीमतानुसार सर्वांचे
आदरातिथ्य करा...!!!
प्रश्न:-
या संगमयुगावर
तुमच्या जवळ सर्वांत अमुल्य वस्तू कोणती आहे, जी सांभाळावयाची आहे?
उत्तर:-
या सर्वोत्तम ब्राह्मणकुळामध्ये तुमचे हे जीवन फारच अमुल्य आहे, त्यामुळे या शरीराचा
सांभाळ जरुर करावयाचा आहे. असे नाही कि हा तर मातीचा पुतळा आहे, केव्हा हे नाहीसे
होईल. नाही, हे जीवंत ठेवायचे आहे. कोणी आजारी पडले तर शरीरावर तंग व्हावयाचे नाही.
त्यांना सांगा तुम्ही शिवबाबाची आठवण करा, जेवढी आठवण कराल. तेवढे पाप नष्ट होतील.
शरीराची सेवा केली पाहिजे, ते जिवंत राहावे, शिवबाबाची आठवण करत राहावे.
ओम शांती।
ज्ञानाचा तिसरा नेत्र देणारे आत्मिक पिता, आत्मिक मुलांना समजावत आहेत. ज्ञानाचा
तिसरा नेत्र बाबा शिवाय कोणी देत नाही. आता तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र
मिळाला आहे. ज्याद्वारे तुम्ही सृष्टीच्या आदि मध्य अंताला जाणले आहे. हे आहे
ज्ञानाचे सॅक्रीन. सॅक्रीनचा एक थेंब पण किती गोड असतो. ज्ञानाचे एकच अक्षर आहे
मनमनाभव. हे अक्षर किती गोड आहे. स्वत:ला आत्मा समजून बाबाची आठवण करा. बाबा
शांतीधाम आणि सुखधामचा रस्ता सांगत आहेत. बाबा आले आहेत. मुलांना स्वर्गाचा वारसा
देण्यासाठी तर मुलांना किती आनंद वाटला पाहिजे. असे म्हणतात पण कि खुशी सारखी खुराक
नाही. जे नेहमी खुष-मजेत राहतात त्यांचेसाठी ही जशी खुराक आहे. 21 जन्म मजेत
राहण्याची ही जबरदस्त खुराक आहे. ही खुराक नेहमी एक दोघाला खाऊ घाला. हे आहे
एकमेकाचे जबरदस्त आदरातिथ्य. असे आदरातिथ्य आणखीन कोणी मनुष्य, इतर मनुष्याची करु
शकत नाही.
तुम्ही मुले श्रीमतावर सर्वांचे आत्मिक आदरातिथ्य करत आहात. खरी खुशी खिरापत पण ही
आहे कि कोणाला बाबाचा परिचय देणे. गोड मुले हे जाणतात कि आम्हाला जीवनमुक्तीची भेट
मिळत आहे. सतयुगामध्ये भारत जीवनमुक्त होता, पावन होता. बाबा फार मोठी उंच खुराक
देत आहेत. तेव्हा तर गायन आहे अतिइंद्रिय सुख विचारावयाचे असेल तर गोप गोपींना
विचारा. ज्ञान आणि योगाची प्रथम श्रेणीची आश्चर्यकारक खुराक आहे आणि ही खुराक एकाच
आत्मिक डॉक्टर जवळ आहे. आणखी कोणाला या खुराकाची माहितीच नाही. बाबा म्हणतात गोड
मुलांनो तुमच्यासाठी हातावर स्वर्गाची भेट घेऊन आलो आहे. मुक्ती-जीवनमुक्तीची ही
भेट माझे जवळच आहे, प्रत्येक कल्पामध्ये मीच येऊन तुम्हाला ही भेट देत आहे. मग रावण
हिसकावून घेत आहे. तर आता तुम्हा मुलांना किती खुशीचा पारा चढला पाहिजे. तुम्ही
जाणता कि, आमचे एकच पिता, शिक्षक आणि खरे खुरे सदगुरु आहेत. जे आम्हाला बरोबर घेऊन
जातात. अति प्रिय बाबांकडून विश्वाची बादशाही मिळत आहे, ही कमी गोष्ट आहे का?
मुलांनी सदैव हर्षित राहिले पाहिजे. ईश्वरीय विद्यार्थी जीवन सर्वांत चांगले आहे.
हे आताचेच गायन आहे. मग नविन दुनियेमध्ये तुम्ही नेहमीच खुशीमध्ये राहाल. दुनियेला
हे माहित नाही खरी खुरी खुशी कधी साजरी करतात. मनुष्यांना तर सतयुगाचे ज्ञानच नाही.
त्यामुळे येथेच साजरे करतात. परंतू या जुन्या दुनियेमध्ये खुशी कोठून मिळणार! येथे
तर त्राहि त्राहि करत राहतात. किती दु:खाची दुनिया आहे.
बाबा तुम्हा मुलांना किती सोपा रस्ता सांगत आहेत. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमळाचे
फुलासारखे राहा. धंदा दोरी इत्यादी करुन पण माझी आठवण करत राहा. जे जसे आशिक आणि
माशुक असतात. ते तर एकमेकांची आठवण करतात. तो तिचा माशुक ती त्याची आशिक असते. येथे
तशी गोष्ट नाही, येथे तर तुम्ही सर्व एका माशुकांचे जन्मोजन्मीचे आशिक आहात. बाबा
तुमचे कधी आशिक बनत नाहीत. तुम्ही त्या माशुकला येण्यासाठी आठवण करत आले आहात.
जेव्हा दु:ख जास्ती होते तेव्हा जास्ती आठवण करतात. तेव्हा तर गायन पण केले जाते.
दु:खामध्ये स्मरण सर्व करतात, सुखामध्ये कोणी करत नाही. यावेळी जसे बाबा
सर्वशक्तीवान आहेत. दिवसेनुदिवस माया पण सर्वशक्तीवान, तमोप्रधान होत जात आहे,
त्यामुळे आता बाबा म्हणतात कि, गोड मुलांनो, आत्म अभिमानी बना. स्वत:ला आत्मा समजून
बाबाची आठवण करा, आणि त्याच बरोबर दैवीगुण पण धारण करा, तर तुम्ही असे (लक्ष्मी-नारायण)
बनाल. या शिक्षणात मुख्य गोष्ट आहे आठवणीची. उंच ते उंच बाबाची फार प्रेमाने
स्नेहाने आठवण केली पाहिजे. उंच ते उंच बाबाच नविन दुनिया स्थापन करणारे आहेत. बाबा
म्हणतात मी आलो आहे, तुम्हा मुलांना विश्वाचा मालक बनविण्यासाठी, त्यामुळे आता माझी
आठवण करा, तर तुमचे अनेक जन्माचे पाप कमी होतील. पतित पावन बाबा म्हणतात कि, तुम्ही
पतित बनले आहात, त्यामुळे आता तुम्ही माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनून पावन
दुनियाचे मालक बनाल. पतित पावन बाबालाच बोलवतात ना. आता बाबा आले आहेत, तर जरुर
पावन बनायचे आहे. बाबा दु:खहर्ता, सुखकर्ता आहेत. बरोबर सतयुगामध्ये पावन दुनिया
होती तर सर्व सुखी होते. आता बाबा परत सांगत आहेत. मुलांनो शांतीधाम आणि सुखधामाची
आठवण करा. आता आहे संगमयुग. नावाडी बाबा तुम्हाला या तीरावरुन त्या तीरावर घेऊन जात
आहेत. नाव काही एक नाही, सारी दुनियाच जशी एक मोठे जहाज आहे. त्याला त्या तीरावर
घेऊन जावयाचे आहे.
तुम्हा गोड मुलांना किती आनंद झाला पाहिजे. तुमच्यासाठी तर नेहमीच आनंदच आनंद आहे.
बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत, हे तर कधी ऐकले नाही, ना वाचले आहे. भगवानुवाच मी
तुम्हा आत्मिक मुलांना राजयोग शिकवित आहे. तर पुर्णपणे शिकले पाहिजे, धारण केले
पाहिजे. पुर्णपणे अभ्यास, केला पाहिजे. अभ्यासामध्ये क्रमवारी तर असतेच. स्वत:ला
पाहिले पाहिजे मी उत्तम आहे, मध्यम आहे कि कनिष्ट आहे? बाबा म्हणतात कि, स्वत:ला पहा,
मी उंच पद प्राप्त करण्याचे लायक आहे? आत्म्यांची सेवा करतो? कारण बाबा म्हणतात,
मुलांनो, सेवाधारी बना, बाबाचे अनुकरण करा. मी आलो आहे सेवेसाठी, त्यामुळेच तर हा
रथ घेतला आहे. यांचा रथ आजारी पडला तर मी यांचेमध्ये बसून मुरली लिहतो. मुखाद्वारे
बोलू शकत नाही. तर मग मी लिहून देतो. कारण मुलांसाठी, मुरली चुकू नये, कारण मी
सेवेवर आहे ना. ही आहे आत्म्याची सेवा. तर तुम्ही मुले पण बाबांची सेवा करत राहा.
जे चांगला पुरुषार्थ करतात, चांगली सेवा करतात, त्यांना महावीर म्हटले जाते. पाहिले
जाते कि कोण महावीर आहेत, जे बाबांच्या आदेशावर चालत आहेत? बाबाचा आदेश आहे स्वत:ला
आत्म समजून सर्वांना भावाचे रुपात पहा. या शरीराला विसरुन जावा. बाबा पण शरीराला
पाहात नाहीत. बाबा म्हणतात कि, मी आत्म्याच पाहतो. हे तर ज्ञान आहे कि आत्म
शरीराशिवाय बोलू शकत नाही. मी पण या शरीरात आलो आहे, भाड्याने घेतले आहे.
शरीराद्वारेच आत्मा शिकत आहे. बाबाची बैठक पण येथे (भ्रकुटीमध्ये) आहे. हे आहे
अकालतख्त. आत्मा अकालमुर्त आहे. आत्मा कधी लहान मोठी होत नाही. शरीर लहान मोठे होते.
जे पण आत्मे आहेत, त्या सर्वांचे तख्त ही भ्रकुटी आहे. शरीर तर सर्वांचे वेगवेगळे
आहेत. कोणाचे अकालतख्त पुरुषाचे आहे, कोणाचे अकालतख्त स्त्रीचे आहे, कोणाचे
अकालतख्त मुलाचे आहे. बाबा बसून मुलांना आत्मिक कवायत शिकवत आहेत. जेव्हा कोणाशी
बोलता तर प्रथम स्वत:ला आत्मा समजा. मी आत्मा अमूक भावा बरोबर बोलत आहे. बाबाचा
संदेश देतो कि, शिवबाबाची आठवण करा. आठवणीनेच गंज उतरेल. सोन्यामध्ये जेव्हा भेसळ
होते, तर सोन्याची किंमत कमी होते. तुम्हा आत्म्याला पण गंज लागल्याने तुम्ही कौडी
मौल झाले आहात. आता परत पावन बनायचे आहे. तुम्हा आत्म्यांना आता ज्ञानाचा तिसरा
नेत्र मिळाला आहे. त्या नेत्राने आपल्या भावाना पाहा. भावा-भावाचे रुपात पाहिल्याने
कर्मेइंद्रिया चंचल होणार नाहीत. राज्यभाग्य घ्यावयाचा आहे, विश्वाचे मालक बनायचे
आहे तर ही मेहनत करा. भाऊ भाऊ समजून सर्वांना ज्ञान द्या. तर मग ही सवय पक्की होऊन
जाईल. खरे खुरे भाऊ तुम्ही सर्व आहात. बाबा पण वरुन आले आहेत, तुम्ही पण आले आहात.
बाबा मुलांसोबत सेवा करत आहेत. सेवा करण्याची बाबा हिम्मत देत आहेत. हिम्मत मुलांची
मदत बाबाची तर हा अभ्यास करा. मी आत्मा भावाला शिकवत आहे. आत्माच शिकते ना. याला
आध्यात्मिक ज्ञान म्हटले जाते. जे आत्मिक पित्याद्वारेच मिळत आहे. संगमयुगावरच बाबा
येऊन हे ज्ञान देत आहेत कि स्वत:ला आत्मा समजून, भावा भावाचे दृष्टीने पाहावयाचे आहे.
ही मेहनत करावयाची आहे. स्वत: मेहनत करावयाची आहे, स्वत: पासून सुरुवात करा, म्हणजे
प्रथम स्वत:ला आत्मा समजून मग इइतर भावांना समजावा. तर चांगले प्रकारे बाण लागेल.
ही धार लावावयाची आहे. मेहनत कराल तरच उंच पद प्राप्त कराल. यामध्ये थोडे सहन पण
केले पाहिजे. जर कोणी उल्टे सुल्टे बोलले तर गप्प बसा. तुम्ही गप्प बसलात तर मग
दुसरा काय करेल? टाळी दोन हाताची वजते. एकाने मुखाची टाळी वाजविली, दुसरा शांत
राहिला, तर तो आपोआप शांत होईल. टाळीला टाळी वाजल्याने, आवाज होतो. मुलांना
ऐकमेकांचे कल्याण करावयाचे आहे. बाबा सांगतात कि मुलांनो नेहमी आनंदी राहू इच्छिता
तर मनमनाभव मध्ये राहा. स्वत:ला आत्मा समजून बाबाची आठवण करा. भावा (आत्मा) कडे पाहा.
तर मुलांना आत्मिक यात्रेवर राहण्याची सवय करावयाची आहे. तुमच्याच फायद्याची गोष्ट
आहे. बाबाचे शिक्षण भावांना द्यावयाचे आहे. बाबा म्हणतात मी तुम्हा आत्म्यांना
ज्ञान देत आहे. आत्म्यालाच पाहत आहे. मनुष्य मनुष्याशी बोलता तर त्यांचे तोंडाकडे
पाहतात ना. तुम्ही आत्म्याशी बोलता तर आत्मच पाहता. जरी शरीराद्वारे ज्ञान देता,
परंतू यात शरीराचे भान सोडावयाचे आहे. तुमची आत्मा समजते, परमात्मा पिता आम्हाला
ज्ञान देत आहेत. बाबा पण म्हणतात. आत्म्यांना पाहता आहे, आत्मा पण म्हणते मी
परमात्मा पित्याला पाहत आहे. त्यांचेकडून ज्ञान घेत आहे, याला म्हटले जाते
आध्यात्मिक ज्ञानाचे देणे व घेणे, आत्म्याची आत्मा बरोबर. आत्म्यामध्येच ज्ञान आहे.
आत्म्यालाच ज्ञान द्यावयाचे आहे. ही जसे तीव्र धार आहे. तुमच्या ज्ञानामध्ये ही धार
येईल, त्यामुळे कोणाला पण समजावले तर झटक्यात बाण लागेल. बाबा म्हणतात अभ्यास करुन
पाहा, बाण लागत आहे का? अशी नविन सवय पाडावयाची आहे तर मग शरीराचे भान निघून जाईल.
मायेचे तुफान कमी येतील. वाईट विचार येणार नाहीत. विकारी दृष्टी पण जाणार नाही.
आम्ही आत्म्याने 84 चे चक्र लावले आहे. आता नाटक संपत आहे. आता बाबांच्या आठवणीत
राहावयाचे आहे. आठवणीनेच तमोप्रधान पासून सतोप्रधान बनून, सतोप्रधान दुनियेचे मालक
बनावयाचे आहे. किती सोपे आहे. बाबा जाणतात कि, मुलांना शिकविणे पण माझे कर्तव्यच आहे.
कोणती नवी गोष्ट नाही. प्रत्येक 5000 वर्षानंतर मला यावे लागते. मी बांधलेला आहे.
मुलांना समजावतो, गोड मुलांनो, आत्मिक मुलांनो, आठवणीच्या यात्रेत राहा, तर अंताला
जशी बुध्दी राहिल तशी गती मिळेल. हा अंतकाळ आहे ना. माझी एकट्याची आठवण करा तर तुमची
सद्गती होईल. आठवणीच्या यात्रेने पाया मजबूत होईल. असे आत्म अभिमानी बनण्याचे
शिक्षण एक वेळेसच तुम्हा मुलांना मिळत आहे. किती आश्चर्य कारक ज्ञान आहे. बाबा
आश्चर्यकारक आहेत, तर बाबाचे ज्ञान पण आश्चर्य कारक आहे. कधी कोणी सांगू शकत नाही.
आता परत घरी जावयाचे आहे. त्यामुळे बाबा म्हणतात, गोड मुलांनो असा अभ्यास करा.
स्वत:ला आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्या. तिसज्या डोळ्याने भावा भावाला पाहा. हीच
मोठी मेहनत आहे.
हे आहे तुम्हा ब्राह्मणाचे सर्वोत्तम उंच ते उंच कुळ. यावेळी तुमचे जीवन अमुल्य आहे,
त्यामुळे या शरीराचा पण सांभाळ करावयाचा आहे. तमोप्रधान झाल्यामुळे शरीराचे
आयुष्यमान पण कमी झाले आहे. आता तुम्ही जेवढे योगात राहाल, तेवढे आयुष्य वाढेल.
तुमचे आयुष्य वाढत वाढत 150 वर्षे होईल. सतयुगामध्ये, त्यामुळे शरीराचा पण सांभाळ
करावयाची आहे, असे म्हणू नका की, हा तर मातीचा, पुतळा आहे, कधी मरण येईल, नाही.
शरीराला जीवंत ठेवावयाचे आहे. हे अमुल्य जीवन आहे. कोणता आजार झाला तर त्यामुळे तंग
व्हावयाचे नाही. त्यांना पण सांगा शिवबाबाची आठवण करा. जेवढी आठवण कराल, तेवढे पाप
नष्ट होतील. शरीराची सेवा केली पाहिजे, शिवबाबाची आठवण करत राहावे. ही समज तर
राहतेच ना कि, आम्ही बाबांची आठवण करत आहे. आत्मा आठवण करते, बाबांकडून वारसा
घेण्यासाठी. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. स्वत:ला पहा
मी पुरुषार्थमध्ये उत्तम आहे, मध्यम आहे कि कनिष्ट आहे? मी उंच पद प्राप्त करण्याचे
लायकीचा आहे? मी आत्म्याची सेवा करतो का?
2. तिसज्या नेत्राने आत्मा भावाला पहा, भाऊ-भाऊ समजून सर्वांना ज्ञान दया, आत्मिक
स्थितीत राहण्याची सवय लावा, तर कर्मेइंद्रिये चंचल होणार नाहीत.
वरदान:-
परिस्थितीमध्ये
घाबरण्यापेक्षा बिंदू लावून संपूर्ण पास होणारे सफलता मुर्त भव
जेव्हा कोणत्या पण
प्रकारचा परिस्थिती आला तर घाबरु नका, प्रश्नात जावू नका, हा का आला? या विचारात
वेळ वाया घालवू नका. प्रश्नचिन्ह नाही, बिंदू लावा, तरच वर्ण बदलेल म्हणजे पेपरमध्ये
पास व्हाल. बिंदू लावणारा संपूर्ण पास होईल. कारण बिंदू लावणेच बिंदूरुप अवस्था आहे.
पाहून, न पाहणे, ऐकून न ऐकणे. बाबा जे सांगतात ते ऐका, बाबाने जे दिले ते पहा तर
संपूर्ण पणे पास व्हाल, आणि पास होण्याची निशाणी आहे, नेहमी चढती कलेचा अनुभव करुन,
सफलतेचा तारा बनणे.
बोधवाक्य:-
स्व-प्रगती
करावयाची आहे तर प्रश्न करणे, चुका काढणे आणि निंदा करणेचा त्याग करुन आपला संबंध
ठीक ठेवा.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :
कोणत्या पण
प्रकारचे विघ्न बुध्दीला त्रास देत असेल तर योगाचे प्रयोगाने अगोदर ते विघ्न नष्ट
करा. मन बुध्दीमध्ये थोडी पण गडबड नसावी. अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होण्याचा असा
अभ्यास असावा, ज्यामुळे आत्मा, आत्म्याच्या गोष्टीला व कोणाच्या मनातील भावनेला
सहजच ओळखेल.