21-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , तुम्हाला बाबाद्वारे जी अद्वैत मत मिळत आहे , त्या मतावर चालून कलियुगी मनुष्याला सतयुगी देवता बनविण्याचे श्रेष्ठ कर्तव्य करावयाचे आहे …

प्रश्न:-
सर्व मनुष्य मात्र दु : खी का बनले आहेत ? त्यांचे मुळ कारण काय ?

उत्तर:-
रावणाने सर्वांना शापीत केले आहे, त्यामुळे सर्व दु:खी बनले आहेत. बाबा वारसा देतात, रावण शाप देतो, हे पण दुनिया ओळखत नाही. बाबाने वारसा दिला, त्यामुळे तर भारतवासी एवढे सुखी स्वर्गाचे मालक बनले, पुज्य बनले. शापीत झाल्याने पुजारी बनतात.

ओम शांती।
मुले येथे मधुबन ला येतात बापदादा जवळ, सभागृहामध्ये जेव्हा येतात, प्रथम पाहतात, भाऊ बहिणी बसलेले असतात, नंतर मग बापदादा येतात, तर बाबाची आठवण येते. तुम्ही आहात प्रजापिता ब्रह्माची मुले, ब्राह्मणि ब्राह्मणी. ते ब्राह्मण तर ब्रह्मा बाबाला ओळखतच नाहीत. तुम्ही मुले जाणता, बाबा जेव्हा येतात तर ब्रह्मा, विष्णू, शंकर पण जरुर पाहिजेत. असे म्हणतात कि, त्रिमुर्ति शिव भगवानुवाच. तीघाद्वारे तर बोलणार नाहीत ना. या गोष्टी चांगल्याप्रकारे बुध्दीत धारण करावयाच्या आहेत. बेहद पित्याकडून जरुर स्वर्गाचा वारसा मिळत आहे, त्यामुळे सर्व भक्त भगवंताकडून काय इच्छितात, जीवनमुक्ती. आता आहे जीवनबंध, सर्व बाबांची आठवण करतात कि, येऊन बंधनापासून मुक्त करा. आता तुम्ही मुलेच जाणता की, बाबा आले आहेत. प्रत्येक कल्पात बाबा येतात. म्हणतात पण, तुम्हीच मातापिता--- परंतू याचा अर्थ तर कोण पण समजत नाही. निराकार पित्यासाठी समजतात, गातात परंतू मिळत काही नाही. आता तुम्ही मुलांना त्यांचेकडून वारसामिळत आहे नंतर पुढच्या कल्पात मिळेल. मुले जाणतात बाबा आर्धाकल्पासाठी वारसा देत आहेत, आणि रावण मग शाप देतात. दुनिया हे पण ओळखत नाही की, आम्ही सर्व शापीत आहोत. रावणाचा शाप मिळाला आहे. त्यामुळे सर्व दु:खी आहेत. भारतवासी सुखी होते. काल या लक्ष्मी नारायणाचे राज्य भारतामध्ये होते. देवतांचे समोर डोके टेकतात, पुजा करतात, परंतू सतयुग केव्हा होते, हे कोणाला माहित नाही. आता पहा लाखो वर्षाच्या हिशोबाने मनुष्य किती होतील. फक्त सतयुगामध्येच मनुष्य अनेक होतील. कोणत्या पण माणसाच्या बुध्दीत बसत नाही. बाबा समजावतात कि, गायन पण आहे कि 33 करोड देवता आहेत. असे थोडेच कि ते काही लाखो वर्षामध्ये होतात. तर हे पण मनुष्यांनी समजले पाहिजे.

तुम्ही आता समजत आहात कि, बाबा आमची स्वच्छ बुध्दी बनवत आहेत. रावण मलेच्छ बुध्दी बनवितो. मुख्य गोष्ट तर ही आहे. सतयुगामध्ये आहे पवित्र, येथे आहे अपवित्र हे पण कोणाला माहित नाही की, रामराज्य कधीपासून असते? रावण राज्य कधीपासून असते? समजतात कि, येथेच रामराज्य पण आहे, रावणराज्य पण आहे. अनेक मतमतांतर आहेत ना. जेवढे मनुष्य आहेत, तेवढी मते आहेत. आता येथे तुम्हा मुलांना अद्वैत मत मिळत आहे, जी बाबा देत आहेत. तुम्ही आता ब्रह्मा द्वारे देवता बनत आहात. देवतांची महिमा आहे, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण--- आहेत तर ते पण मनुष्य, मनुष्याची महिमा गायन का करतात? जरुर फरक असेल ना. आता तुम्ही मुले पण क्रमवारीनुसार मनुष्याला देवता बनविण्याचे कर्तव्य शिकत आहात. कलीयुगी मनुष्याला तुम्ही सतयुगी देवता बनविता, म्हणजे शांतीधाम, ब्रह्मांड आणि विश्वाचे मालक बनवित आहात. हे तर शांतीधाम नाही ना. येथे तर कर्म जरुर करावयाचे आहे. ते आहे गोड शांत घर. आता तुम्ही समजता कि, आम्ही आत्मे, गोड घराचे ब्रह्मांडाचे मालक होता, तेथे दु:ख, सुखा पासून दूर राहतो. मग सतयुगामध्ये विश्वाचे मालक बनतो. आता तुम्ही मुले लायक बनत आहात. मुख्य लक्ष्य अचुक समोर आहे. तुम्ही मुले आहात योगबळाचे, ते आहेत बाहुबळाचे. तुम्ही पण युध्दाचे मैदानावर आहात, परंतू तुम्ही आहात डबल अहिंसक. ते आहेत हिंसक. हिंसा काम कटारीला म्हटले जाते. संन्यासी पण समजतात ही हिंसा आहे, त्यामुळे पवित्र बनतात. परंतू तुमच्या शिवाय बाबा बरोबर प्रित कोणाची ही नाही. आशिक माशूकची प्रीत असते ना. ते आशुक माशुक तर एका जन्मासाठी असतात. तुम्ही सर्व आहात माझे आशिक. भक्तीमार्गामध्ये मला एका माशुकाला आठवण करत आले आहात. आता मी सांगतो कि, या शेवटच्या अंतिम जन्मात पवित्र बना, आणि यथार्थ रितीने आठवण करा, तर मग माझी आठवण करण्यापासून तुमची सुटका होईल. सतयुगामध्ये आठवण करण्याची आवश्यकता नाही. दु:खामध्ये आठवण सर्व करतात. याला स्वर्ग तर म्हणत नाहीत ना. मोठी माणसे जी धनवान आहेत, ते समजतात कि, आमचेसाठी तर येथेच स्वर्ग आहे. विमान इत्यादी सर्व काही वैभव आहे, किती अंधश्रध्दे मध्ये राहत आहेत. गायक पण करतात तुम्ही माता पिता---परंतू समजत काही पण नाहीत. कोणते अपार सुख मिळते, ते काही पण जाणत नाहीत. बोलते तर आत्माच ना. तुम्ही आत्मे समजता कि, आम्हाला अपार सुख मिळत आहे. त्यांचे नावच आहे. स्वर्ग, सुखधाम. स्वर्ग तर सर्वांना महल असतात. भक्तीमार्गामध्ये पण किती, न मोजता येईल एवढे धन होते, ज्याद्वारे सोमनाथाचे मंदीर बनविले. एक एक चित्र लाखोंच्या किंमतीचे होते. ते सर्व कोठे गेले? किती लुटून घेऊन गेले. मुसलमानांनी मस्जिद इत्यादी ठिकाणी लावले, एवढे अथाह, धन होते. आता तुम्हा मुलांचे बुध्दीमध्ये आहे कि, आम्ही बाबाद्वारे परत स्वर्गाचे मालक बनत आहोत. आमचे सोन्याचे महल असतील. दरवाज्यावर पण हिरे जवाहरात लावलेले असतात. जैन धर्माचे मंदीर पण असे बनविले जातात. आता हिरे इत्यादी, तर नाही ना, जे अगोदर होते. आता तुम्ळी जाणता कि, आम्ही बाबाद्वारे स्वर्गाचा वारसा घेत आहोत. शिवबाबा येतात पण भारतामध्येच. भारतालाच शिव भगवानाद्वारे स्वर्गाचा वारसा मिळत आहे. ख्रिश्चन पण म्हणतात कि, क्राइस्टच्या 3 हजार वर्षापुर्वी भारत स्वर्ग होता. राज्य कोण करत होते? हे कोणाला माहित नाही. बाकी हे मात्र समजतात कि भारत फार प्राचीन आहे. तर येथेच स्वर्ग होता ना. बाबाला म्हणतता पण स्वर्गाचा ईश्वरीय पिता, म्हणजे स्वर्ग स्थापन करणारा पिता. जरुर पिता आला असेल, तेव्हा तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनले होता. प्रत्येक 5 हजार वर्षानंतर स्वर्गाचे मालक बनता, मग अर्ध्याकल्पानंतर रावण राज्य सुरु होते. चित्रामध्ये असे स्पष्ट करुन दाखवा. ज्यामुळे लाखो वर्षाची गोष्ट बुध्दी मधून निघून जाईल. लक्ष्मी-नारायण कोणी एक नाहीत, त्यांची राजधानी असते ना, मग त्यांची मुले राजा बनतात. राजे तर फार बनतात. सारी माळ बनलेली आहे. माळच स्मरण करतात ना. जे बाबाचे मददगार बनून बाबाची सेवा करतात, त्यांचीच माळा बनते. जे पुर्ण चक्रामध्ये येतात, पुज्य व पुजारी बनतात, त्यांची माळ आठवण आहे. तुम्ही पुज्य पासून पुजारी बनता मग आपलीच माळ पुजता. अगोदर माळेला हात लावून, मग डोके टेकतात. नंतर माळा फिरवणे सुरु करतात. तुम्ही पण सारे चक्र लावता, नंतर शिवबाबांकडून वारसा प्राप्त करता. हे, रहस्य तुम्हीच ओळखता. मनुष्य तर कोणी कोणाचे नांव घेऊन, कोणी कोणाचे माळ जपतात. जाणत तर काहीच नाहीत. आता तुम्हाला माळेचे सर्व ज्ञान आहे, आणखीन कोणाला हे ज्ञान नाही. ख्रिश्चन थोडेच समजतात कि, हे कोणाची माळा जपत आहेत. ही माळा आहेच, त्यांची जे बाबाचे मददगार बनून सेवा करतात. यावेळी सर्व पतीत आहेत, जे पावन होते ते सर्व जन्म घेत पतित बनले आहेत. नंतर क्रमाक्रमाने सर्व जातील. क्रमाक्रमाने येतात, क्रमाक्रमाने जातात. किती समजण्याच्या गोष्टी आहेत. हे झाड आहे. किती फांद्या मठ पंथ आहेत. आता हे सारे झाड खलास होणार आहे, मग तुमची कलम लागेल. तुम्ही आहात या झाडाचा पाया. यामध्ये सुर्यवंशी, चंद्रवंशी दोन्ही आहेत. सतयुग, त्रेतामध्ये जे राज्य करणारे होते, त्यांचा आता धर्मच नाही, फक्त चित्र आहेत. ज्यांचे चित्र आहेत. त्यांच्या आत्मकथेला तर जाणले पाहिजे ना. म्हणतात कि अमूक वस्तू लाखो वर्षाची जुनी आहे. आता खरेतर जुने ते जुने आहे, आदि सनातन देवी देवता धर्म. त्यांचे पुर्वीची कोणती वस्तू असत नाही. बाकी सर्व 2500 वर्षाच्या जुन्या वस्तू आहेत, जमीनीतून खोदून काढतात. भक्तीमार्गामध्ये जी पुजा करतात, ते जुने चित्र काढतात, कारण भुकंपामध्ये सर्व मंदीरे पडतात, नंतर नविन बनवितात. सोने, हिऱ्याच्या खाणी, ज्या आता संपल्या आहेत, त्या मग सतयुगात भरल्या जातील. यासर्व गोष्टी आता तुमच्या बुध्दीत आहेत. बाबांनी जगाचा इतिहास भुगोल समजावला आहे. सतयुगामध्ये किती थोडे मनुष्य असतात, नंतर वृध्दी होत राहते. आत्मे सर्व परमधाम वरुन येत राहतात. येत येत झाड वाढत राहते. नंतर जेव्हा झाडाची जडजडीभूत अवस्था होते, तर म्हटले जाते, राम गेले, रावण गेला, त्यांचा मोठा परिवार आहे. अनेक धर्म आहेत ना. आमचा परिवार किती छोटा आहे. हा फक्त ब्राह्मणांचाच परिवार आहे. ते किती अनेक धर्म आहेत, जन संख्या सांगतात ना. ते सर्व आहेत रावण संप्रदाय, ते सर्व जातील. बाकी थोडेच राहतील रावण संप्रदाय मग स्वर्गात येणार नाहीत, सर्व मुक्तीधाम मध्ये राहतील. बाकी तुम्ही जे शिकत आहात, ते क्रमाक्रमाने स्वर्गामध्ये येतील.

आता तुम्ही मुलांनी समजले आहे कि, कसे हे निराकारी झाड आहे, हे मनुष्य सृष्टीचे झाड आहे. हे तुमच्या बुध्दीमध्ये आहे. अभ्यासा मध्ये लक्ष दिले नाही तर परिक्षेमध्ये नापास व्हाल. शिकत आणि शिकवित राहाल तर खुशी पण राहिल. जर विकारामध्ये गेला तर हे सर्व विसरुन जाईल. आत्मा जर पवित्र सोने झाली तर त्यामध्ये धारणा पण चांगली होईल. सोन्याचे भांडे असते पवित्र. जर कोण पतीत बनले तर ज्ञान सांगू शकणार नाही. आता तुम्ही समोर बसले आहात, जाणता कि, ईश्वर पिता शिवबाबा आम्हा आत्म्यांना शिकवित आहेत. आम्ही आत्मे या इंद्रियाद्वारे ऐकत आहोत. शिकविणारे बाबा आहेत, अशी पाठशाळा साऱ्या जगात कोठे असेल? ते ईश्वर पिता आहेत, शिक्षक पण आहेत, सतगुरु पण आहेत, सर्वांना परत घरी घेऊन जातील. आता तुम्ही बाबांच्या समोर बसले आहात. समोर मुरली ऐकण्यात किती फरक आहे. जशी ही टेप मशीन निघाली आहे, सर्वांकडे एक दिवस येईल. मुलांच्या सुखासाठी बाबा अशा वस्तू बनवित आहेत. कोणती मोठा गोष्ट नाही ना. हे सावल शाह आहेत ना. अगोदर गोरे होते, आता सावळे बनले आहेत, त्यामुळे तर श्यामसुंदर म्हणतात. तुम्ही जाणता कि आम्ही सुंदर होतो, आता श्याम बनले आहोत, मग सुंदर बनू. फक्त एकटाच का बनेल? एकालाच सापाने चावले का? साप तर मायेला म्हटले जाते ना. विकारामध्ये गेल्याने सावळे बनतात. किती समजण्याच्या गोष्टी आहेत. बेहदचे बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये राहून या शेवटच्या जन्मामध्ये केवळ माझ्यासाठी पवित्र बना. मी मुलांकडूनही भीक मागत आहे. कमळ फुलासारखे पवित्र बना, आणि माझी आठवण करा, तर या जन्मात. पवित्र बनाल आणि आठवणीत राहिल्याने गत जन्मातील विकर्म पण विनाश होतील. ही आहे योग अग्नी, ज्याद्वारे जन्मों जन्मीचे पाप दग्ध होतील. सतोप्रधान पासून सतो रजो, तमोमध्ये येतात त्यामुळे कला कमी होतात, भेसळ होत जाते. आता बाबा म्हणतात फक्त माझी एकट्याची आठवण करा. बाकी पाण्याचे नदीमध्ये स्नान केल्याने थोडेच पावन बनाल. पाणी पण तत्त्व आहे ना. 5 तत्त्व म्हटले जातो. या नद्या कशा पतित पावनी असू शकतील. नद्या तर सागरापासून निघतात. अगोदर तर समुद्रच पतित पावन असला पाहिजे. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मापिता बापदादाची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
मी पणाचे भानाला नष्ट करुन ब्रह्मा बाबासारखे श्रेष्ठ त्यागी भव :-
 

संबंधाचा त्याग, वैभवाचा त्याग, काही मोठी गोष्ट नाही, परंतू प्रत्येक कर्मामध्ये, विचारामध्ये पण इतरांना पुढे करण्याची भावना ठेवणे, म्हणजे मी पणा नष्ट करणे, अगोदर तुम्ही करणे. हा आहे त्याग. यालाच म्हटले जाते स्वत:चे भानाला नष्ट करणे. जसे ब्रह्मा बाबांनी नेहमी मुलांना पुढे केले. मी पुढे राहावे यात पण नेहमी त्यागी राहिले, त्या त्यागामुळे सर्वांत पुढे म्हणजे एक नंबरमध्ये जाण्याचे फळ मिळाले. तर बाबाचे अनुकरण करा.

बोधवाक्य:-
कोणाची कमजोरी शोधणे हे पण दु : ख देणे आहे .