29-03-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
16.12.1985 ओम शान्ति
मधुबन
राईट हॅन्ड कसे बनाल?
आज बापदादा आपल्या
अनेक भुजांना पाहत आहेत. 1) भुजा (हात) सदैव प्रत्यक्ष कर्म करण्याचा आधार आहेत.
प्रत्येक आत्मा आपल्या भुजांद्वारे (हातांद्वारे) कर्म करते. 2) भुजांना सहयोगाची
निशानी देखील म्हटले जाते. सहयोगी आत्म्यांना राईट हॅन्ड (उजवा हात) देखील म्हटले
जाते. 3) भुजांना शक्तीरुप म्हणूनही दाखवले जाते. म्हणून बाहुबल असे म्हणतात.
भुजांच्या अजूनही विशेषता आहेत. 4) भुजा म्हणजे हात जी स्नेहाची निशाणी आहे. म्हणून
एकमेकांना भेटल्यावर हात मिळवतात. भुजेचं पहिलं स्वरुप-संकल्पांना कर्मात प्रत्यक्ष
करणे. आपण सर्व बाबांचे हात आहोत. तर या चार विशेषता आपल्यात दिसतात का? याद्वारे
हात ओळखून विचारा मी कोणती भुजा आहे? सर्वच बाबाचे हात आहेत परंतू उजवे कि डावे हे
या विशेषताद्वारे तपासा.
पहिली गोष्ट, बाबांच्या प्रत्येक श्रेष्ठ संकल्प, बोल, कर्मातील प्रत्यक्ष जीवनात
आणले आहे का? कर्मांना प्रत्यक्ष पाहू शकतो. कर्मांना सर्व पाहू शकता आणि समजू शकता
किंवा कर्माद्वारे अनुभव करु शकतो. म्हणून म्हणतता की, बोलतात सगळेच, करुन दाखवा.
प्रत्यक्ष कर्मात पाहिल्यावर म्हणता येईल हे जे बोलतात ते करतात. म्हणून कर्म
संकल्पाबरोबरच कथनाला देखील प्रत्यक्ष प्रमाण निश्चित करणारा आहे. असे राईट हॅन्ड
प्रत्येक कर्माद्वारे बाबांना प्रत्यक्ष करत आहेत का? राईट हॅन्डची विशेषता आहे.
त्याने सदा शुभ व श्रेष्ठ कर्म होतात. राईट हॅन्डची गती लेफ्ट हॅन्ड पेक्षा अधिक
असते. तर असे चेक करा. कि शुभ व श्रेष्ठ कर्म तीव्रगतीने होत आहेत का? श्रेष्ठ
कर्मचारी राईट हॅन्ड आहेत का? जर या विशेषता नसतील तर तुम्ही लेफ्ट हॅन्ड आहात.
कारण बाबांना प्रत्यक्ष करणे म्हणजे उंच ते उंच कर्म करणे होय. आपल्या आत्मिक
दृष्टीने किंवा (सर्वोत्तम) आनंदमयी आत्मिक मुखाद्वारे बाबांना प्रत्यक्ष करा. हे
देखील कर्मच आहे. तर असे श्रेष्ठ कर्मधारी बनला आहात का? भुजा म्हणजे सहयोग तर चेक
करा, बाबांच्या कर्तव्यात किती सहयोगी आहात? तन, मन, धनाने सहयोगी आहात का? कि कधी
कधी सहयोगी आहात. जसे लौकिक कार्यात पुर्ण वेळ काम करणारे असतात. कुणी थोडा वेळ काम
करणारे असतात. त्यांच्यात फरक असतोच ना. त्यांच्या प्राप्तीतही फरक असेल. जेव्हा
वेळ मिळाला, उत्साह असेल, किंवा मुड चांगला असेल तर सहयोगी होतात. नाही तर सहयोगी
ऐवजी वियोगी बनतात. तर चेक करा तन-मन-धन या तीन रुपांमध्ये पूर्ण कि अपूर्ण आहात?
देह वा देहाचे संबंधामध्ये तन-मन-धन लावतात कि, बाबांच्या श्रेष्ठ कार्यात? जेवढी
प्रवृत्ती देहाच्या संबंधितायांची तेवढीच देहाची आहे. काही मुलं संबंधाच्या
प्रवृत्ती पासून दूर आहेत. परंतू वेळ, संकल्प व धन ईश्वरीय कार्यापेक्षा देह
प्रवृततीत जास्त लावतात. देहाची प्रवृत्ती देखील एक माया जालच आहे. माया जालापासून
परे राहणे म्हणजे राईट हॅन्ड होणे. फक्त ब्राह्मण किंवा ब्रह्माकुमारी-कुमार बनलात
म्हणजे सहयोगी बनलात असे नाही. दोन्ही प्रवृत्तीपासून न्यारे व बाबांचे प्यारे
बनायचे आहे. देहाची प्रवृत्ती ही संकल्पना खुपच व्यापक आहे. सहयोगी रिती बनलात हे
चेक करायचे आहे.
तिसरी गोष्ट, भुजा स्नेहाची निशाणी आहे. स्नेह म्हणजे मिलन, देहधारी हातात हात घेऊन
एकमेकांना भेटतात. तसे राईट हॅन्ड संकल्प, बोल व संस्काराचे मिलन करतात. जो बाबांचा
संकल्प तोच राईट हॅन्डचा. बाबा व्यर्थ नाही तर समर्थ संकल्प करतात. बाबांचे शब्द
सुखदाई मधुर व सुविचारी असतात. साधारण नाही. सदा अव्यक्त व आत्मीक भाव असावा.
व्यक्त नसावेत यालाच म्हणतात स्नेह वा मिलन, बाबांचे संस्कार सदा उदारचित्त,
कल्याणकारी, निस्वार्थी इत्यादी आहेत. सारांश जे बाबांचे संस्कार तेच राईट हॅन्डचे,
तर चेक करा असे समान वा स्नेही कुठपर्यंत बनलात? चौथी गोष्ट, भुजा अर्थात शक्ती, तर
हे ही चेक करो कुठपर्यंत शक्तीशाली बनला आहात? संकल्प, दृष्टी वृत्तीने कुठपर्यंत
शक्तीशाली बनलात? त्यांची लक्षणे आहे की, कुणालाही परिवर्तन करु शकाल. संकल्पानेच
श्रेष्ठ सृष्टीची रचना होईल. वृत्तीने वायुमंडळाचे परिवर्तन होईल. दृष्टीने आत्मिक
स्वरुपाचा अनुभव होईल. तर अशी शक्तीशाली भुजा आहात का कमजोर? जर कमजोर असाल तर
लेफ्ट हॅन्ड. भुजा सर्वच आहात परंतू आपण कोणती ते जाणून घ्या. जर कुणी तुम्हाला
राईट हॅन्ड म्हणत नसेल तर सिध्द कराल व जिद्द ही कराल परंतू स्वत: जसे असाल तसे
जाणून घ्या कारण परिवर्तनाचा थोडाच काळ आहे. आळसात असे म्हणू नका की सर्व ठीक आहे.
मन खात राहिल की अभिमान व आळस पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे यापासून मुक्त व्हा.
सर्वार्थाने स्वत:ला जाणून दया यातच स्वकल्याण सामावले आहे. समजलं! अच्छा!
सदैव स्वपरिवर्तनात, स्वचिंतनात राहणारे, सदा स्वत:मधील विशेषता चेक करुन संपन्न
बनणारे, सदैव दोन्ही प्रवृत्तीपासून न्यारे, बाबा व त्यांच्या कार्यात प्यारे
राहणारे, अभिमान व आळस यापासून मुक्त राहणारे तीव्र पुरुषार्थी श्रेष्ठ आत्म्यांना
बापदादांची गोड आठवण व नमस्कार.
पार्टी सोबत
:-
1) सदैव स्वत:ला स्वदर्शन चक्रधारी अनुभव करता? स्वदर्शन चक्र मायेच्या अनेक
चक्रांपासून मुक्ती देणारे आहे. बाबा मायेच्या चक्रांपासून सोडवून विजयी बनवतात.
स्वदर्शन चक्रासमोर माया थांबू शकत नाही. असे अनुभवी बनलात का? बापदादा रोज याच
टायटलने आठवण करतात. याच आठवणीने समर्थ बना. सदैव स्वत:च्या दर्शनात राहा तर
शक्तीशाली बनाल. कल्पा कल्पाचे श्रेष्ठ आत्मा आहोत या स्मृतीने मायाजीत व्हाल. सदैव
ज्ञानाच्या स्मृतीत राहून त्या आनंदात राहा. आनंद अनेक दु:खांना विसरवून टाकते.
सर्व दुनिया दु:खधामात तर तुम्ही संगमयुगात हे भाग्यच आहे.
2) सदैव पवित्रतेच्या शक्तीने स्वत:ला व दुसज्यांना प्रेरणा देणारे बनलात का?
गृहस्थीत राहून पवित्र् आत्मा बनने या विशेषतेला दुनियेसमोर प्रत्यक्ष करायचे आहे.
असे बहादुर बनलात? पावन आत्मा आहोत या स्मृतीने स्वत:च्या परिपक्वते बरोबर जगासमोर
त्याचे प्रत्यक्ष प्रमाण सिध्द करावयाचे आहे. कोणती आत्मा आहात? अशक्यास शक्य करुन
दाखवणारे, पवित्रतेची शक्ती कैलावणारी आत्मा आहे. हे सदैव आठवणीत ठेवा.
3) कुमार नेहमी स्वत:ला मायाजीत कुमार समजतात का? मायेकडून हार खाणारे नाही तर
मायेला हारवणारे असे शक्तीशाली बहादूर आहात का? बहादुराला माया देखील घाबरते. मायेला
छोटीसी कमजोरी ही पुरेसी असते. बहादुर म्हणजे सदैव मायाजीत. माया येऊच शकत नाही. असे
आव्हान करणारे आहात ना. पुढे जाणारे आहात ना. सर्व स्वत:ला सेवेच्या निमित्त अर्थात
सदा विश्व कल्याणकारी समजून जाणारे आहात. विश्वकल्याण कारी बेहद मध्ये राहतात.
हदमध्ये नाही. लौकिक मध्ये येणारे खरे सेवाधारी नाहीत. अलौकिक म्हणजे जसे बाबा तसे
मुलं. बाबांना अनुकरण करणारे श्रेष्ठ कुमार आहेत. नेहमी याच स्मृतीत राहा.
ज्याप्रमाणे बाबा संपन्न अलौकिक आहेत त्याप्रमाणे संपन्न व सर्व खजिन्यांनी
परिपुर्ण आहात. या स्मृतीने व्यर्थ समाप्त होऊन समर्थ बनाल. अच्छा.
अव्यक्त
मुरलीतून निवडलेले प्रश्नोत्तरे
प्रश्न :-
कोणता विशेष
गुण संपूर्ण स्थितीला प्रत्यक्ष करतो? जेव्हा आत्म्याची संपूर्ण स्थिती बनते तेव्हा
त्याचे प्रत्यक्ष कर्मात कोणती महिमा (गायन) होते?
उत्तर :-
समानतेचा!
निंदा स्तृती, जय-पराजय, सुख-दु:खात समानता असेल तर संपूर्णतेची स्थिती असते.
दु:खात चेहरा वा मस्तकावर दु:खाची लहर असण्यापेक्षा आनंदाची लहर दिसावी. निंदा
करणाज्यांप्रती थोडी ही दुष्टी-वृत्तीत अंतर नसावे. सदैव कल्याण कारी दृष्टी,
शुभचिंतक वृत्ती राहावी. हीच समानता होय.
प्रश्न :-
स्वत:ला
आशिर्वाद देणारे वा बापदादांकडून आशिर्वाद घेण्याचे साधन कोणते?
उत्तर :-
नेहमी समतोल
ठेवा म्हणजे बापदादांचा आशिर्वाद मिळेल. महिमा ऐकताना त्याची नशा चढू देऊ नका. आणि
निंदा ऐकताना घृणेचा भाव निर्माण होऊ देऊ नका. जेव्हा दोन्हींचा समतोल होईल तेव्हा
कर्मामध्ये संतुष्टतेचा अनुभव येईल.
प्रश्न :-
तुमचा
प्रवृत्तीमार्ग असल्याने कोणत्या दोन दोन गोष्टींमध्ये समतोल ठेवणे आवश्यक आहे?
उत्तर :-
ज्याप्रमाणे
आत्मा व शरीर, बाबा व दादा दोन आहेत. दोघांच्या कर्तव्याने विश्व परिवर्तन होते.
त्याप्रमाणे दोन दोन गोष्टीत समतोल ठेवल्यास श्रेष्ठ प्राप्ती कराल. 1) न्यारा व
प्यारा 2) गायन व निंदा 3) स्नेह व शक्ती 4) धर्म व कर्म 5) एकांतवासी व रमणिक 6)
गंभीर व मिलनसार असे अनेक प्रकारचे समतोल असल्यास संपूर्णतेच्याजवळ जाल. असे नाही
की कृती एक अनुभव वेगळा. यामुळे प्रभाव पडत नाही.
प्रश्न :-
कशात समानता
असावी कशात नाही?
उत्तर :-
श्रेष्ठते
मध्ये समानता असावी. साधारणतेत नाही. जसे कर्म श्रेष्ठ तशी धारणाही श्रेष्ठ असावी.
धारणेने कर्माला मर्ज करु नये. धर्म व कर्मात श्रेष्ठता ठेवणाराच धर्मात्मा होय. तर
स्वत:ला विचारा कि धर्मात्मा बनलात का? कर्मयोगी वा वरदानी बनलात का?
प्रश्न :-
बुध्दमध्ये जर
कोणत्याही प्रकारची अस्वस्थता येत असेल तर त्याचे कारण काय?
उत्तर :-
त्यांचे कारण
आहे संपन्नतेत कमी! कोणतीही गोष्ट जर संपूर्ण असेल तर अस्वस्थता येत नाही. तेव्हा
यापासून सुरक्षित ठेवायचे असल्यास स्वत:ला संपन्न बनवा. वस्तू संपन्न असेल तर आपोआप
आकर्षित करेल. संपूर्णतेमध्ये प्रभावशाली असते. जेवढी संपूर्णता असेल तेवढी अनेक
आत्मे आकर्षित होतील.
प्रश्न :-
देही अभिमानीची
सुक्ष्म स्टेज काय आहे?
उत्तर :-
जे देही
अभिमानी आहेत त्यांना जर कोणत्याही गोष्टीचा इशारा समजून वर्तमान व भविष्य दोन्ही
काळासाठी उन्नतीचे साधन समजून त्या इशाज्याला सामावून व सहन करतात. सुक्ष्मात देखील
दृष्टी वृत्तीत हालचाल होणार नाही. जसे महिमेच्या वेळी स्नेहाची भावना तसे शिक्षा
वा इशारा देतानाही स्नेह व शुभचिंतनाची भावना हवी. अच्छा. ओम शांती.
वरदान:-
सदा खुशी (आनंदात)
व मौजेच्या स्थितीत राहणारे एकत्रति (कंम्बाइन्ड) स्वरुपाचे अनुभवी भव.
बापदादा मुलांना नेहमी
सांगतात बाबांच्या हातात हात देऊन चला. एकटे नाही. एकट्याने चालल्यास कंटाळा येईल.
कुणाची नजर पडेल. बाबा सोबत आहेत. या स्मृतीने मायेची नजर पडणार नाही व एकत्रति
पणाचा अनुभव असल्याने आनंदाने व मौजेत राहाल. धोका व दु:ख देणाऱ्या संबंधापासून ही
वाचाल.
सुविचार:-
योगरुपी कवच धारण करा
तर मायारुपी शत्रुचा वार होणार नाही.