11-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, एक बाबांच्या श्रीमता नुसार चालत राहा,तर बाबा तुमचे जिम्मेदार आहेत,बाबांच्या मार्गदर्शनानुसार चालता-फिरता माझी आठवण करा.

प्रश्न:-
जे चांगले गुणवान मुल आहेत,त्यांची मुख्य लक्षणे काय असतील?

उत्तर:-
ते अपवित्र ला पवित्र बनवण्याची चांगली सेवा करतील.कोणालाही अपवित्र बनवणार नाहीत.कधीच आपसा मध्ये लढणार नाहीत.कोणालाच दुःख देणार नाहीत.दु:ख देणे पण त्रास देणेच आहे.

गीत:-
पुरुषार्थ करण्याची वेळ जात आहे...

ओम शांती।
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या आत्मिक मुलांनी नंबरा नुसार या गीताचा अर्थ समजला.नंबरा नुसार यामुळे म्हणतात कारण कोणी तर चांगले समजतात,कोणी मध्यम,तर कोणी खुपच कमी समजतात.समजून घेणे पण प्रत्येकाचे वेगवेगळे आहे.निश्चय बुद्धी पण प्रत्येक जणांची वेगवेगळी आहे.बाबा तर समजवत राहतात,असेच नेहमी समजा की शिवबाबा,ब्रह्मा द्वारे मार्गदर्शन देतात.तुम्ही अर्धा कल्प आसुरी मार्गदर्शन नुसार चालत आला आहात.आता असा निश्चय करा की आम्ही ईश्वरीय श्रीमता नुसार चाललो,तर जीवन रूपी नाव विषय सागरा मधुन क्षिरसागरा कडे जाईल.जर ईश्वरीय श्रीमत न समजता,मनुष्यांचे मत समजले तर संभ्रमित व्हाल.बाबा म्हणतात माझ्या सूचने नुसार चालले तर,मी जिम्मेवार आहे ना.ब्रह्मा द्वारे जे काही कार्य व्यवहार होतो, त्याचा जिम्मेदार मीच आहे,त्यामध्ये मी सुधारणे करेल,फक्त माझ्या सूचनेनुसार,श्री मतानुसार चालला तर.ईश्वरीय मत समजून चाला तर नुकसान होणार नाही. जे चांगल्या रितीने आठवण करतात तेच श्रीमतानुसार चालतील.पाऊलो पाऊली ईश्वरीय श्री मतानुसार चालाल तर कधीच नुकसान होणार नाही.निश्चया मध्येच विजय आहे.अनेक मुले या गोष्टीला समजत नाहीत.थोडे ज्ञान आल्यामुळे देहाभिमान येतो.योग खूपच कमी आहे.ज्ञान तर इतिहास भूगोलाला जाणने आहे,हे तर खूपच सहज आहे.येथे तर मनुष्य खूप विज्ञान इत्यादीचा अभ्यास करतात.हे शिक्षण, अभ्यास तर खूपच सहज आहे. बाकी आठवण करण्यामध्ये कष्ट आहेत.

काहीजण म्हणतात बाबा आम्ही योगा मध्ये खूप मस्त राहतो,बाबा मानत नाहीत.बाबा प्रत्येक मुलांचे कार्य व्यवहार पाहतात.बाबांची आठवण करणारा खूपच प्रेमळ असेल.आठवण करत नाहीत म्हणून उलटे सुलटे कार्य करत राहतात.रात्रंदिवसा चा फरक आहे.आता तुम्ही या शिडीच्या चित्रावरती पण चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता.यावेळेस काट्याचे जंगल आहे.ही बाग तर नाही.स्पष्टपणे समजून सांगायचे आहे,भारत फुलांची बाग होता. बागेमध्ये कधी जंगली जनावर राहतात काय?स्वर्गा मध्ये तर देवी देवता राहत होते.बाबा तर सर्वोच्च अधिकारी आहेत, परत ब्रह्मा पण सर्वोच्च अधिकारी आहेत.हे दादा सर्वोच्च अधिकारी आहेत.शिव आणि प्रजापिता ब्रह्मा.सर्व आत्मे शिवबाबा ची मुलं आहेत,परत साकार मध्ये आम्ही सर्व भाऊ बहीण,प्रजापिता ब्रह्मा ची मुलं आहोत. हे सर्व मनुष्यांचे आजोबा आहेत. अशा सर्व शक्तिवान अधिकाऱ्या साठी आम्हाला घर पाहिजे.असे तुम्ही लिहा परत पहा बुद्धीमध्ये काही बसते का?

शिवबाबा प्रजापिता ब्रह्मा,सर्व आत्म्यांचे पिता आणि मनुष्य मात्राचे पिता. हे ज्ञानाचे मुद्दे खूपच चांगले आहेत समजावून सांगण्या साठी, परंतु मुलं पूर्ण रीतीने समजत नाहीत. विसरतात, ज्ञानाचा अहंकार येतो.जसे की बाप दादांना पण जिंकतात.हे दादा म्हणतात खुशाल माझे मत ऐकू नका.हमेशा समजा शिवबाबा समजवत आहेत,त्यांच्या मता वरती चाला. स्वतः ईश्वर मत देत आहेत,असे असे करा, तर सर्व जिम्मेवारी माझी आहे.ईश्वरी मता वरती चालत रहा.हे ब्रह्मा ईश्वर नाहीत.तुम्हाला ईश्वराकडून शिकायचे आहे.नेहमी समजा ईश्वर मत देत आहेत.हे लक्ष्मीनारायण पण भारता मधील मनुष्यच होते.हे सर्व मनुष्य आहेत परंतु हे शिवालय मध्ये राहणारे आहेत,म्हणून सर्व नमन करतात परंतु समजत नाहीत.स्वतःचा नशा चढतो.अनेका मध्ये दोष आहेत.जेव्हा पुर्ण योग असेल,तेव्हा विर्कम नष्ट होतील. विश्वाचे मालक बनणे काही मावशीचे घर नाही.बाबा पाहतात,माया नाकाला पकडून गटर मध्ये पाडते.बाबाच्या आठवणीत खूप आनंदामध्ये राहायचे आहे.मुख्य लक्ष्य समोर आहे.आम्हाला असे लक्ष्मीनारायण बनायचे आहे.हे विसरल्याने खुशीचा पारा चढत नाही.काही जण असे म्हणतात योगामध्ये बसवा,आम्ही आठवण करू शकत नाही.बाहेर आम्ही आठवणी मध्ये राहू शकत नाही,म्हणून कधी कधी बाबा कार्यक्रम पण पाठवतात परंतु आठवणी मध्ये थोडेच बसतात.बुध्दी इकडे तिकडे भटकत राहते.ब्रह्मा बाबा आपले उदाहरण देतात,मी नारायण चा पक्का भक्त होतो,जिथे तिथे नारायण चे चित्र सोबत ठेवत होतो.तरीही पूजा करतेवेळी बुद्धी इकडे तिकडे जात होती.यामध्ये असेच होते.बाबा म्हणतात चालता-फिरता माझी आठवण करा परंतु काहीजण म्हणतात बहिणीने योग करवुन घ्यावा,नेष्टा चा अर्थ तर कोणी जाणत नाहीत.बाबा नेहमी म्हणतात आठवणीमध्ये राहा.काही मुलं नेष्टा(समोर बसुन योग करवुन घेणे) मध्ये बसल्यानंतर ध्यानामध्ये चालले जातात, न ज्ञान राहते,ना योग राहतो किंवा डुलक्या खातात,अनेकांना सवय लागली आहे.ही तर अल्पकाळाची शांती आहे, बाकी सर्व दिवस अशांती राहते.चालता-फिरता आठवण नाही केली,तर जे पापाचे ओझे आहे,ते कसे उतरेल.अर्ध्या कल्पाचे ओझे आहे.यामध्ये खूप कष्ट आहेत.स्वता:ला आत्मा समजा आणि बाबांची आठवण पण करा.जरी बाबांना अनेक जण लिहून पाठवतात,इतका वेळ आठवणी मध्ये राहीलो परंतु आठवण टिकत नाही.चार्ट ला समजतच नाहीत.बाबा बेहद चे आहेत,पतित पावन आहेत तर, खुषी मध्ये राहायला पाहिजे.असे पण नाही,आम्ही तर शिव बाबांचे आहोतच.असे पण अनेक आहेत,समजतात आम्ही तर बाबांचे आहोतच परंतु आठवण करत नाहीत. जर आठवण करत असते तर प्रथम नंबर मध्ये आले असते.कुणालाही समजून सांगण्यासाठी चांगली बुद्धी पाहिजे.आम्ही तर भारताची महिमा करत आहोत.नवीन दुनिये मध्ये आदी सनातन देवी-देवतांचे राज्य होते,आता ही जुनी दुनिया,लोहयुगी दुनिया आहे.ते सुखधाम आणि हे दुःखधाम आहे.भारत सुवर्णयुग होता तेव्हा देवी-देवतांचे राज्य होते.काही जण तर म्हणतात,आम्ही कसे समजायचे कि देवी-देवतांची राज्य होते.हे ज्ञान खूपच आश्चर्यकारक आहे.ज्यांच्या भाग्य मध्ये आहे,जितका पुरुषार्थ करतात,ते दिसून येते.तुम्ही कार्य व्यवहारा वरून जाणतात.हे कलयुगी पण मनुष्य आहेत, तर सतयुगी पण मनुष्य आहेत.परत त्यांच्यापुढे जाऊन का माथा टेकवतात?त्यांना स्वर्गाचे मालक म्हणतात ना.कोणाचा मृत्यू होतो तर म्हणतात स्वर्गवासी झाला.हे पण समजत नाहीत यावेळेस तर सर्व नर्कवासी आहेत. तर जरूर पुर्नजन्म पण येथेच घेतील.बाबा प्रत्येकाची चलन पाहतात.बाबांना खूप साधारण पद्धतीने अनेकांशी गोष्टी कराव्या लागतात.सांभाळ करावा लागतो.बाबा खूपच स्पष्ट करून समजवत राहतात. अनेक मुलं समजतात,गोष्टी तर ठिक आहेत.तरीही का विकारी बनतात.एक दोघांना दुःख दिल्यामुळे अपवित्र बनतात. विकारी सवय सोडत नाहीत.आता बागवान बाबा फुलांची बाग तयार करत आहेत. फुलासारखे बनवत राहतात,त्यांचा धंदाच हा आहे.जे स्वतः अपवित्र असतील तर ते दुसऱ्यांना पवित्र कसे बनवतील.प्रदर्शनी मध्ये पण खूपच खबरदारी ने कुणाला पाठवायचे असते.

चांगले गुणवान मुलं तेच आहेत,जे काट्यांना फुल म्हणजे अपवित्र ला पवित्र बनवण्याची चांगली सेवा करतात.कोणाला दु:ख देणार नाहीत,कधीच आपसामध्ये भांडणार नाहीत. तुम्ही मुलं खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात.यामध्ये कुणाच्या अपमानाची गोष्ट नाही.आता महाशिवरात्रि म्हणजे शिवजयंती येत आहे. तुम्ही प्रदर्शनी पण जास्त करत राहा. छोट्या-छोट्या प्रर्दशनी वरती पण समजावू शकतत.एका सेकंदामध्ये स्वर्गवासी बना किंवा भ्रष्टाचारी पासून पावन श्रेष्ठाचारी बना.एका सेकंदामध्ये जीवन मुक्ती प्राप्त करा.जीवन मुक्तीचा अर्थ पण कोणी समजत नाहीत.तुम्ही आता समजतात, बाबा द्वारे सर्वांना मुक्ती,जीवनमुक्ती मिळत आहे.अविनाशी नाटकाला पण जाणायचे आहे.सर्वधर्मा चे तर स्वर्गामध्ये येणार नाहीत.ते परत आपल्या विभागामध्ये चालले जातील,परत आपल्या वेळेनुसार येऊन धर्माची स्थापना करतील.कल्पवृक्षा मध्ये खूपच स्पष्ट ज्ञान आहे.एका सद्गुरु शिवाय सद्गगती दाता दुसरे कोणी होऊ शकत नाही.बाकी भक्ती शिकवणारे गुरु तर अनेक आहेत.सदगती साठी मनुष्य गुरु होऊ शकत नाहीत,परंतु समजून सांगण्या साठी पण अक्कल पाहिजे.यामध्ये बुद्धीने काम घ्यायचे आहे.हे नाटक खूपच आश्चर्यकारक खेळ आहे.तुमच्यामध्ये पण खूप थोडे आहेत,जे नशेमध्ये राहतात. अच्छा गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्री क्लास १८/३/१९६८ तुम्हाला ग्रंथावर वाद-विवाद करण्याची आवश्यकता नाही. मुख्य गोष्ट आहे आठवण करण्याची आणि सृष्टीच्या आधी मध्य अंतला समजायचे आहे.चक्रवर्ती राजा बनवायचे आहे.या चक्राला फक्त समजायचे आहे,याचेच गायन आहे सेकंदामध्ये जीवनमुक्ती.तुम्हा मुलांना पण आश्चर्य वाटत असेल,अर्धाकल्प भक्ती चालत येते.ज्ञान काहीच नाही.ज्ञान बाबां जवळच आहे. बाबा द्वारे जाणायचे आहे.हे बाबा खूपच असाधारण आहेत म्हणून करोडो मधून काही जणच ज्ञान घेतात.ते शिक्षक असे थोडेच म्हणू शकतील.हे तर म्हणतात मीच पिता शिक्षक आणि गुरु आहे.तर मनुष्य हे ऐकून आश्चर्य खातात.भारताला मातृभूमी म्हणतात कारण आंबा चे नाव खूप प्रसिद्ध आहे.अंबा ची खूप ठिकाणी यात्रा भरते. अंबा अक्षर खूपच गोड आहे.छोटी मुलं पण आईला प्रेम करतात ना,कारण आई खाऊ घालते,पालन पोषण करते.आंबेचा पण बाबा पाहिजे.ही तर दत्तक घेतलेली मुलगी आहे,पती तर नाही.नवीन गोष्ट आहे ना.प्रजापिता ब्रह्मा तर जरुर दत्तक घेत असतील.या सर्व गोष्टी बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगतात.अंबाची खूप यात्रा भरते,पूजा होते कारण मुलीने खुप सेवा केली आहे.मम्मा नी जेवढ्यांना शिकवले असेल,तेवढे दुसरे कोणी शिकवू शकणार नाही.मम्माचे नाव खूप प्रसिद्ध आहे.यात्रा पण अनेक ठिकाणी भरतात.आता तुम्ही मुलं जाणता,बाबांनीच येऊन,रचनेच्या आदी मध्य अंतचे सर्व रहस्य तुम्हा मुलांना समजले आहे.तुम्हाला बाबांच्या घराचे,म्हणजे परमधामची पण माहिती झाली आहे.बाबांशी प्रेम आहे तर घराचे पण प्रेम आहे.हे ज्ञान तुम्हाला आता मिळत आहे.या शिक्षणाद्वारे तुमची खूप कमाई होत आहे,तर खुशी व्हायला पाहिजे ना. आम्ही तुम्हाला मुक्ती,जीवनमुक्ती चा वारसा देण्यासाठी आलो आहे.बाबा तर सर्वांना मुलं च म्हणतील ना.तरी का विसरतात.मी तुमचा बेहदचा पिता आहे. राजयोग शिकवण्या साठी आलो आहे,तर तुम्ही श्रीमता वर चालणार नाही का? परत खूप नुकसान होईल.हे बेहद चे नुकसान आहे.बाबांचा हात सोडला तर कमाई मध्ये नुकसान होईल.अच्छा शुभ रात्री.ओम शांती.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(1) एका बाबाच्या आठवणी द्वारे खूप गोड बनायचे आहे. चालता-फिरता कर्म करत असताना आठवणी मध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे.बाबांच्या आठवणी मध्ये आनंदीत राहायचे आहे.

(२) पाऊलो पाऊली, ईश्वरीय श्रीमता नुसार प्रत्येक कार्य करायचे आहे.आपला अहंकार दाखवायचं नाही.कोणते उलटे सुलटे काम करायचे नाही.संभ्रमित व्हायचे नाही.

वरदान:-
विश्वकल्याणाची जिम्मेदारी समजून वेळ आणि शक्तीची बचत करणारे मास्टर रचनाकार भव.

विश्वा मधील सर्व आत्मे तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांचा परिवार आहे.जितका मोठा परिवार असतो तेवढी बचत केली जाते.तर सर्व आत्म्यांना समोर ठेवून,स्वतःला बेहद सेवार्थ निमित्त समजून आपला वेळ आणि शक्तीला कार्यामध्ये लावा.आपल्या च प्रती कमावले, खाल्ले आणि गमावले असे अलबेले बनू नका.सर्व खरजान्याचे बजेट बनवा.मास्टर रचनाकार भवच्या वरदानाला स्मृती मध्ये ठेवून वेळ आणि शक्तीचा खजाना सेवेसाठी जमा करा.

बोधवाक्य:-
महादानी तेच आहेत,ज्यांच्या संकल्प आणि बोल द्वारे सर्वांना वरदानाची प्राप्ती होईल.


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
फरिश्ता किंवा अव्यक्त जीवनाची विशेषता आहे,इच्छा मात्र अविद्या.देवताई जीवनामध्ये ईच्छेची गोष्टच नाही.जेव्हा ब्राह्मण जीवन सो फरीश्ता जीवन बनते अर्थात कर्मातीत स्थितीला प्राप्त करतात,तेव्हा कोणते पण शुद्ध कर्म, व्यर्थ कर्म, विकर्म किंवा पाठीमागचे कर्म कोणत्याही कर्माच्या बंधनांमध्ये बांधू शकत नाहीत.