06-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही भारताचे सर्वात श्रेष्ठ सेवक आहात,तुम्हाला आपल्या तन-मना-धना
द्वारे श्रीमता नुसार,या दुनियेला राम राज्य बनवायचे आहे.
प्रश्न:-
खरी अलौकिक
सेवा कोणती आहे,जी आता तुम्ही मुलं करत आहात?
उत्तर:-
तुम्ही मुलं
गुप्त रितीने श्रीमता नुसार पावन भूमी, सुखधाम ची स्थापना करत आहात,हीच भारताची खरी
सेवा आहे.तुम्ही देहाच्या बाबांच्या श्रीमता नुसार सर्वांना रावणा च्या जेल मधुन
सर्वांना सोडवत आहात.यासाठी तुम्ही पावन बणुन दुसऱ्यांना पावन बनवत आहात.
गीत:-
हे
प्रभू,अज्ञान मनुष्यांना रस्ता दाखव…….
ओम शांती।
हे प्रभू,ईश्वर,परमात्मा आणि पिता अक्षरा मध्ये खूपच फरक आहे.हे ईश्वर,हे प्रभू
म्हणल्यामुळे खुप आदर राहतो.परत त्यांना पिता म्हणतात,तर पिता अक्षर खूपच साधारण
आहे.पिता तर अनेक आहेत.प्रार्थने मध्ये पण म्हणतात,हे प्रभू,ईश्वर.बाबा का म्हणत
नाहीत?ते परम पिता आहेत परंतु बाबा अक्षर जसे दबले जाते.परमात्मा अक्षर श्रेष्ठ
होते.हे प्रभू अज्ञानी मनुष्यांना रस्ता दाखवा असे म्हणतात.आत्मा म्हणते बाबा
आम्हाला मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता दाखवा.प्रभू अक्षर खूपच मोठे आहे.पिता अक्षर
साधारण आहे.येथे तुम्ही जाणता बाबा येऊन समजवत आहेत.तसे तर पिता खूप आहेत.असे
बोलवतात,तुम्हीच मात पिता आहात….किती साधारण अक्षर आहे. ईश्वर किंवा प्रभू
म्हटल्यामुळे समजतात,ते काय करू शकत नाहीत.आता तुम्ही मुलं जाणतात बाबा आले
आहेत.बाबा खूपच श्रेष्ठ आणि सहज रस्ता दाखवतात.बाबा म्हणतात, माझ्या मुलांनो, तुम्ही
रावणाच्या मता वरती,काम चिता वरती चढून भस्मीभूत झाले आहात.आता मी तुम्हाला पावन
बनवून घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. बाबांना बोलतातच यासाठी की येऊन आम्हाला पावन
बनवा. बाबा म्हणतात मी आलो आहे तुमच्या सेवे मध्ये. तुम्ही मूलं पण भारताची अलौकिक
सेवा करतात,तुमच्या शिवाय कोणी करू शकत नाही.तुम्ही भारतासाठीच करतात,श्रीमता नुसार
पवित्र बणुन भारताला बनवतात. बापू गांधीची पण इच्छा होती,रामराज्य व्हावे.कोणता ही
मनुष्य रामराज्य ची स्थापना करू शकत नाही,नाहीतर प्रभूला पतित-पावन म्हणून का
बोलतात? आता तुम्हा मुलांना भारता बद्दल खूपच प्रेम आहे, तुम्ही खरी सेवा भारताची
आणि बाकी सर्व दुनियाची करत आहात.
तुम्ही जाणतात भारताला परत रामराज्य बनवत आहेत,जसे बापूजींची इच्छा होती. ते हद चे
बापुजी झाले,हे आहेत बेहदचे बापूजी.हे बेहदची सेवा करतात.हे तुम्ही मुलं
जाणतात,तुमच्या मुलां मध्ये पण क्रमानुसार नशा राहतो,आम्ही रामराज्य बनवू.शासनाचे
तुम्ही सेवक आहात.तुम्ही दैवी शासन बनवतात,तुम्हाला भारता साठी अभिमान आहे.तुम्ही
जाणतात सतयुगा मध्ये ही पावन भूमी होती,आता तर पतित आहे.तुम्ही जाणतात आम्ही बाबा
द्वारे परत पावन भूमी किंवा सुखधाम बनवत आहोत ते पण गुप्त,श्रीमत पण गुप्त
मिळते.भारताच्या शासनासाठी तुम्ही करत आहात.तुम्ही श्रीमता नुसार भारताची उच्च ते
उच्च सेवा करून आपल्याच तन-मन-धनाने द्वारे करत आहात.काँग्रेसी किती लोक जेलमध्ये
गेले,तुम्हाला तर जेल इत्यादी मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या तर आत्मिक
गोष्टी आहेत.तुमची लढाई पण पाच विकार रुपी रावणा बरोबर आहे.ज्या रावणाचे संपूर्ण
पृथ्वी वरती राज्य आहे.तुमची ही सेना आहे.लंका तर एक छोटे बेट आहे.ही सृष्टी तर
बेहदचे बेट आहे.तुम्ही बेहद बाबांच्या श्रीमता नुसार सर्वांना रावणाच्या जेल मधुन
सोडवतात.हे तुम्ही जाणता,या पतित दुनियेचा विनाश तर होणारच आहे.तुम्ही शिवशक्ती
आहात. शिवशक्ती तर हे गोप पण आहेत.तुम्ही गुप्तरितीने भारताची खूप मोठी सेवा करत
आहात.पुढे चालून सर्वांना माहीत होईल. तुम्ही श्रीमतावर आत्मिक सेवा करत आहात.तुम्ही
गुप्त आहात.शासन हे जाणत नाही,की हे ब्रह्मकुमार कुमारी भारताला आपल्या तन-मन-धनाने
द्वारे श्रेष्ठ सत्य खंड बनवत आहेत.भारत सत्य खंड होता, आता खोटा खंड आहे.सत्य तर
एक बाबाच आहेत.ईश्वर सत्य आहेत असे म्हटले जाते.तुम्हाला नरा पासून नारायण बनवण्याचे
सत्य शिक्षण देत आहेत.बाबा म्हणतात,तुम्हाला कल्पा पूर्वी पण नरा पासून नारायण बनवले
होते.रामायणा मध्ये काय काय कथा लिहिल्या आहेत.रामानी वानराची सेना घेतली असे
म्हणतात.तुम्ही पण प्रथम वानरा सारखे होते.एक सितेची गोष्ट नाही.बाबा समजवतात,कसे
आम्ही रावण राज्याचा विनाश करून राम राज्याची स्थापना करत आहोत,यामध्ये कोणत्या
कष्टाची गोष्ट नाही.ते तर खूप खर्च करत जातात,रावणाचे बूत बणवुन परत रावणाला
जाळतात,समजत काहीच नाहीत.मोठे मोठे लोक ते पाहण्यासाठी जातात,परदेशी लोकांना पण
बोलवतात, समजत काहीच नाहीत.आत्ता बाबा समजवतात,तुम्हा मुलांच्या मनात उमंग उत्साह
आहे की,आम्ही भारताची खरी आत्मिक सेवा करत आहोत,बाकी सारी दुनिया रावणाच्या मता वरती
आहे.तुम्ही रामाच्या श्रीमता नुसार आहात.राम म्हणा, शिव म्हणा, नावे तर अनेक ठेवली
आहेत. तुम्ही मुलं भारताचे सर्वात श्रेष्ठ सेवक आहात.पतित पावन,येऊन पावन बनवा असे
म्हणतात.तुम्ही जाणता सतयुगा मध्ये आम्हाला खूप सुख मिळते.खूप खजाना मिळतो.तेथे
सरासरी आयुष्य पण फार मोठे असते.ते योगी आहेत आणि येथे सर्व भोगी आहेत.ते पावन आणि
हे पतित आहेत.रात्रं दिवसा चा फरक आहे. कृष्णाला योगी पण म्हणतात,महात्मा पण
म्हणतात परंतु तो तर खरा महात्मा आहे. त्यांची महिमा गायन केली जाते,सर्वगुण
संपन्न,संपूर्ण निर्विकारी...आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहेत.सन्याशी तर
ग्रहस्थींच्या जवळ विकाराने जन्म घेऊन परत संन्यासी बनतात.या गोष्टी आत्ताच बाबा
तुम्हाला समजून सांगतात.यावेळेस मनुष्य तर असत्य आणि दुःखी आहेत. सतयुगा मध्ये कसे
होते?धार्मिक आणि सत्यवान होते,१०० टक्के पवित्र होते. नेहमी आनंदी राहत होते.रात्रं
दिवसाचा फरक आहे.या गोष्टी यर्थात रितीने तुम्हीच जाणतात.कुणालाच माहिती नाही,भारत
स्वर्गा पासून नर्क कसा बनला आहे.लक्ष्मी नारायण ची पूजा करतात,मंदिर बनवतात समजत
काहीच नाहीत.बाबा समजवत राहतात,जे मोठ्या पदावर आहेत,बिर्ला इ.ना समजावू
शकता,लक्ष्मी नारायण नी हे पद कसे मिळवले,काय केले ज्यामुळे यांचे मंदिर बनवले आहेत?
त्यांचे कर्तव्य न जाणता पूजा करणे,म्हणजेच पत्थर पूजा किंवा बाहुल्यांची पूजा
होती.इतर धर्माचे लोक तर जाणंतात,ख्रिस्त या वेळेत आले परत येतील.
तुम्हा मुलांना खूप आत्मिक नशा राहयला पाहिजे.आत्म्याला खुशी व्हायला पाहिजे. अर्ध
कल्प देह अभिमानी बनले आहात.बाबा म्हणतात अशरीरी बना, स्वतःला आत्मा समजा.आत्माच
बाबा कडून ऐकत आहे.बाकी सत्संगामध्ये कधी असे समजत नाहीत.हे आत्मिक पिता,आत्म्यांना
समजावत आहेत.आत्माच सर्व काही ऐकत आहे.आत्मा म्हणते मी पंतप्रधान आहे,अमका
आहे.आत्म्याने शरीरा द्वारे म्हटले की,मी पंतप्रधान आहे. आता तुम्हाला म्हणतात,आम्ही
आत्मा पुरुषार्थ करून स्वर्गाचे देवी-देवता बनत आहोत.मी आत्मा आणि माझे शरीर
आहे.देही अभिमानी बनण्या मध्ये खूप कष्ट आहेत.सारखे सारखे स्वताला आत्मा समजत रहा
तर,विकर्म विनाश होतील. तुम्ही खूपच आज्ञाधारक सेवक आहात. कर्तव्य पण गुप्त रितीने
करत आहात.नशा पण गुप्त रीतीने पाहिजे.आम्ही शासनाचे आत्मिक सेवक आहोत.भारताला
स्वर्ग बनवत आहोत.बापूजीं ची पण इच्छा होते, नवीन दुनिये मध्ये नवीन भारत हवा.नवीन
दिल्ली पाहिजे.आता नवीन दुनिया तर नाही.ही जुनी दिल्ली कब्रस्थान बनते,परत परिस्तान
बनणार आहे.आता याला परिस्तान थोडेच म्हणणार.नवीन दुनिया मध्ये परिस्तान नवीन दिल्ली
तुम्ही बनवत आहात.खूपच समजण्याच्या गोष्टी आहेत. या गोष्टी कधी विसरायचं
नाहित.भारताला परत सुखधाम बनवणे,खूपच श्रेष्ठ कार्य आहे.अविनाश नाटका नुसार
सुर्ष्ठी,जुनी होणारच आहे. दुखधाम आहे ना.दुखहर्ता सुखकर्ता,एका पित्यालाच म्हटले
जाते. तुम्ही जाणतात,बाबा पाच हजार वर्षानंतर येऊन,दुःखी भारताला सुखी बनवतात. सुख
पण देतात,शांती पण देतात.मनुष्य म्हणतात,मनाला शांती कशी मिळेल? त्याला शांतीधाम
म्हटले जाते,जेथे आवाज नाही,दु:ख नाही.सूर्य-चंद्र इ.पण नाहीत.आता तुम्हा मुलांना
सर्व ज्ञान आहे. बाबा पण येऊन आज्ञाधारक सेवक बनले आहेत परंतु बाबांना बिलकुल जाणत
नाहीत.सर्वांना महान आत्मा म्हणतात. आता महान आत्मा तर स्वर्गा शिवाय कधी होऊ शकत
नाहीत,तेथे तर आत्मे पवित्र आहेत.पवित्रता होती तर शांती,संपत्ती पण होती.आता
पवित्रता नाही तर काहीच नाही.पवित्रतेला च मान आहे.देवता पवित्र आहेत,तर त्यांच्या
पुढे सर्व माथा टेकवतात.पवित्रतेला पावन आणि,अपवित्रतेला पतित म्हटले जाते.हे साऱ्या
विश्वाचे बापुजी आहेत,तसे तर शहराच्या महापौर ला पण बापुजी म्हणतात.स्वर्गामध्ये
थोड्याच अशा गोष्टी असतात.तेथे तर कायदेशीर राज्य चालते. पतित-पावन या असे
बोलतात.आत्ता बाबा म्हणतात,पवित्र बना,तर म्हणतात हे कसे शक्य आहे? परत मुलं कशी
होतील. सृष्टीची वृद्धी कशी होईल? त्यांना हे माहित नाही की,लक्ष्मी नारायण संपूर्ण
निर्विकार होते.तुम्हा मुलांना खूपच विरोध सहन करावा लागतो.
अविनाश नाटकामध्ये जे कल्पा पूर्वी झाले होते,त्याचीच पुनरावृत्ती होते. असे नाही
की ड्रामा म्हणुन थांबायचे आहे, ड्रामामध्ये असेल तर मिळेल. शाळेमध्ये असेच बसून
राहिल्याने कोणी पास होईल का?प्रत्येक गोष्टीसाठी मनुष्याला पुरुषाला तर करावा लागतो.
पुरुषार्था शिवाय तर पाणी पण मिळू शकत नाही. सेकंड बाय सेकंड जो पुरुषार्थ चालतो तो
प्रारब्ध मिळवण्या साठीच.आत्ता बेहदचा पुरुषार्थ करायचा आहे,बेहदच्या सुखासाठी.आत्ता
ब्रह्माची रात्र च ब्राह्मणा ची रात्र परत ब्राह्मणाचा दिवस होईल.ग्रंथांमध्ये पण
वाचत होते परंतु समजत काहीच नव्हते. हे बाबा स्वता:च रामायण भागवत ऐकत होते.पंडित
बणुन बसत होते.आत्ता समजतात तो तर भक्तिमार्ग आहे.भक्ती मार्ग वेगळा आहे,ःज्ञान
वेगळी गोष्ट आहे. बाबा म्हणतात तुम्ही कामचिते बसून स्र काळे बदल्यात कृष्णाला
श्यामसुंदर पण म्हणतात.पुजारी लोक अंधश्रद्धाळू आहेत. किती भूत पूजा आहे.शरीराची
पूजा म्हणजे ५ तत्वाची पुजा झाली.याला म्हटले जाते व्यभीचारी पूजा.भक्ती पण आगोदर
अव्यभिचारी होती.एका शिवाची भक्ती करत होते.आता तर पहा कोणा कोणाची पूजा करत
राहतात.बाबा आश्चर्य पण दाखवतात,ज्ञान पण समजावून सांगतात. काट्या पासून फूल बनवत
आहेत,त्यांना म्हणतात फुलांचा बगीचा.कराची मध्ये एक चौकीदार पठाण होता,तो पण
ध्यानामध्ये जात होता,तो म्हणत होता,मी बहिश्त(स्वर्ग) पाहिला,अल्हा ने मला फुल
दिले,त्याला खूप मजा येत होती.आश्चर्य आहे ना.ते तर सात आश्चर्य म्हणतात. वास्तव
मध्ये आश्चर्यकारक दुनिया स्वर्गच आहे,हे कुणालाच माहिती नाही.
तुम्हाला खूप चांगले ज्ञान मिळाले आहे,म्हणून तुम्हाला खूप खुशी व्हायला पाहिजे.खुप
सर्वोच्च बापदादा आहेत आणि खूपच साधे राहतात. बाबांची महिमा केली जाते,ते निराकार
निरहंकारी आहेत. बाबांना तर येऊन सेवा करायची आहे.पिता हमेशा मुलांची सेवा करून
त्यांना धनदौलत देऊन,स्वता:वानप्रस्थ अवस्था घेतात. मुलांना डोक्यावरती
बसवतात.तुम्ही मुलं विश्वाचे मालक बनतात.स्वीट होम मध्ये जाऊन,परत स्वीट बादशाही
घेता.बाबा म्हणतात मी तर बादशाह घेत नाही. खरे निष्काम सेवाधारी तर एकच बाबा आहेत.
तर मुलांना खूपच खुश व्हायला पाहिजे परंतु माया विसरवते.इतक्या मोठ्या बापदादांना
थोडच विसरायला पाहिजे. दादाच्या मिळकती वरती किती नशा राहतो.तुम्हाला तर शिवबाबा
मिळाले आहेत.त्यांची संपत्ती आहे.बाबा म्हणतात माझी आठवण करा,आणि दैवी गुण धारण
करा.आसुरी गुणांना काढून टाकले पाहिजे. गायन पण करतात,मज निर्गुण मध्ये कोणते गुण
नाहीत.निर्गुण संस्था पण आहे. आता अर्थ तर कोणी समजत नाहीत. निर्गुण म्हणजे कोणतेच
गुण नाहीत.परंतु ते समस्ज नाहीत.तुम्हा मुलांना बाबा एकच गोष्ट समजवतात,बोला आम्ही
भारताची सेवा करत आहोत.जे सर्वांचे बापुजी आहेत,आम्ही त्यांच्या मतावर चालत
आहोत.श्रीमद्भगवद्गीतेचे गायन आहे ना. अच्छा.
गोड गोड,फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेम पूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) जसे
सर्वोच्च बाप दादा,साधे राहतात तसेच खूप साधे, निराकारी आणि निरहंकारी बणुन राहयचे
आहे.बाबा द्वारे जे चांगले ज्ञान मिळाले आहे,त्याचे चिंतन करायचे आहे.
(२) नाटक जे हुबेहूब पुनरावृत्ती होत आहे यामध्ये बेहद पुरुषार्थ करून,बेहद सुखाची
प्राप्ती करायची आहे.कधीच ड्रामा म्हणून थांबायचे नाही.भाग्यासाठी पुरुषार्थ जरूर
करायचा आहे.
वरदान:-
ऐकण्या सोबत
स्वरूप बणुन मनाच्या मनोरंजन द्वारे नेहमीच शक्तिशाली आत्मा भव.
रोज मनामध्ये
स्वतःच्या प्रती किंवा दुसऱ्याच्या प्रति उमंग उत्साहाचे संकल्प करा.स्वत आपण त्या
संकल्पाचे स्वरूप आणि दुसऱ्यांच्या सेवेमध्ये पण लावा तर आपले जीवन पण नेहमी साठी
आनंदाचे बनेल आणि दुसर्यांना पण उत्साह देणारे बणुन जाल.जसे मनोरंजनाचा कार्यक्रम
असतो,तसेच रोज मनाच्या मनोरंजनाचा कार्यक्रम बनवा,तर शक्तिशाली बणुन जाल.
बोधवाक्य:-
दुसऱ्याला
बदलण्याच्या अगोदर स्वतःला परिवर्तन करा हीच समजदारी आहे.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
चालता-फिरता
स्वतःला निराकारी आत्मा आणि कर्म करत अव्यक्त फरिश्ता समजा तर साक्षी दृष्टा बणुन
जाल. या देहाच्या दुनिया मध्ये काही होत राहील परंतु फरिश्ता वरुन साक्षी होऊन सर्व
भूमिका पाहतात.प्रकाश म्हणजे सहयोग देतात.सकाश देणे म्हणजेच निभावणे होय.