01-03-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
02.12.1985 ओम शान्ति
मधुबन
बंधनापासून मुक्त
होण्याची युक्ती आत्मिक शक्ती.
आज बापदादा आपल्या
आत्मिक मुलांच्या आत्मिक शक्तीला पाहत होते. प्रत्येक आत्मिक मुलांनी,आत्मिक
पित्यापासून आत्मिक शक्तीचा,संपूर्ण अधिकार मुलगा बनल्याच्या नात्याने मिळवला तर
आहेच,परंतु प्राप्ती स्वरूप किती बनले आहेत,हे पाहत होते.सर्व मुलं प्रत्येक
दिवशी,स्वतःला आत्मिक मुलगा म्हणून,आत्मिक पित्याला प्रेम पूर्ण आठवणीच्या
मोबदल्यात,मुखाद्वारे किंवा मनाद्वारे प्रेम पूर्ण आठवण किंवा नमस्ते च्या रूपामध्ये
देतात,मोबदला देतात ना. याचे रहस्य हेच झाले की रोज आत्मिक पिता,आत्मिक मुलांना
आत्मिक शक्तीचे, वास्तविक स्वरूप आठवण करून देतात कारण या ब्राह्मण जीवनाची विशेषता
आत्मिकता च आहे.या आत्मिक शक्तीद्वारे स्वतःला किंवा दुसऱ्यांना परिवर्तन करतात.याचा
मुख्य पायाच आत्मिक शक्ती आहे.या शक्तीद्वारे अनेक प्रकारच्या शारीरिक बंधना पासून
मुक्ती मिळते.बापदादा पाहत होते की आज पर्यंत अनेक सूक्ष्म बंधन,जे स्वता: पण अनुभव
करतात,की या बंधनापासून मुक्त व्हायला पाहिजे परंतु मुक्ती मिळवण्या साठी युक्ती
प्रत्यक्षात वापरत नाहीत कारण आत्मिक शक्ती प्रत्येक कर्मामध्ये वापरयला येत
नाही.एकच संकल्प, बोल आणि कर्म तिघांना सोबत शक्तिशाली बनवावे लागेल, परंतु या
गोष्टीमध्ये कमजोर होतात,ढिल्ले पडतात.एकी कडे संकल्पाला शक्तीशाली बनवतात,तर वाणी
मध्ये कमजोर होतात. कधी वाणीला शक्तीशाली बनवतात तर कर्मामध्ये ठीक राहत नाही परंतु
एकाच वेळेस तीनही आत्मिक शक्तीशाली एकाच वेळेत बनवा,तर ही मुक्तीची युक्ती आहे.जसे
सृष्टीच्या रचनेमध्ये तीन ही कार्य स्थापना पालना आणि विनाश आवश्यक आहेत,असे सर्व
बंधनापासून मुक्त होण्याची युक्ती मनसा वाचा कर्मणा मध्ये आत्मिक शक्ती सोबतच
आवश्यक आहेत.कधी मनसाला सांभाळतात,तर वाचा मध्ये कमी पडतात,परत म्हणतात विचार केला
नव्हता माहिती नाही,हे कसे झाले?तिघांकडे पूर्ण लक्ष पाहिजे,कारण हे तिन्ही साधन
संपन्न स्थितीला आणि बाबांना प्रत्यक्ष करणारे आहेत.मुक्ती मिळवण्यासाठी तिघांमध्ये
आत्मिकते चा अनुभव आवश्यक आहे. जर तीनही मध्ये युक्तीयुक्त आहेत तर जीवनमुक्त
आहेत.तर बापदादा सूक्ष्म बंधनाला पाहत होते.बंधनाची लक्षण आहेत,बंधन असणारा व्यक्ती
नेहमीच परवश असतो.बंधन युक्त मनुष्य स्वतःला आंतरिक खुषी किंवा सुखाचा नेहमी अनुभव
करत नाही.जसे लौकिक दुनियेमध्ये अल्प काळाचे साधन अल्प काळाची खुशी किंवा सुखाची
अनुभुती करवतात परंतु आंतरिक किंवा अविनाशी अनुभूती होत नाही.असेच सूक्ष्म
बंधनांमध्ये बांधलेली आत्मा,या ब्राह्मण जीवनामध्ये थोड्या वेळापुरते सेवेचे
साधनं,संघटनेच्या शक्तीचे साधन,कोणत्या ना कोणत्या प्राप्तीचे साधन,श्रेष्ठ संगतीचे
साधन,या साधनाच्या आधारे द्वारे चालतात,जोपर्यंत साधन आहेत तोपर्यंत खुशी आणि सुखाची
अनुभूती करतात.ज्यावेळेस साधनं समाप्त होतात तर खुशी पण गायब होते.नेहमी एकरस राहत
नाहीत.कधी आनंदामध्ये नाचत राहतात,त्या वेळेत जसे की त्यांच्या सारखे दुसरे कोणीच
नाहीत परंतु परत असे थांबतील छोटेसे दगड,पण डोंगरा सारखा अनुभव करतील,कारण स्वतःची
शक्ती नसल्यामुळे साधनांच्या आधारावर खुशीमध्ये नाचतात. साधनं नष्ट झाली तर कसे
नाचतील?यासाठी आंतरिक आत्मिक शक्ती तिनी रूपांमध्ये नेहमी सोबतच आवश्यक आहे.मनसा
संकल्पाला नियंत्रण करण्याची शक्ती नाही,हे मुख्य बंधन आहे.स्वत:च्या संकल्पाच्या
वश झाल्यामुळे परवशचा अनुभव करतात.जे
स्वतःच संकल्पाच्या बंधनांमध्ये आहेत,ते अनेक दिवस यामध्येच व्यस्त राहतात. जसे
तुम्ही लोक म्हणतात ना,हवेमध्ये किल्ला बनवतात.किल्ला बनवतात आणि बिघडवतात.खूप मोठी
भिंत उभी करतात म्हणून हवेमध्ये किल्ला म्हटले जाते.जसे भक्तीमध्ये पूजा,शृंगार इ.
करून परत त्याचे विसर्जन करतात.असे संकल्पा मध्ये पण बांधलेली आत्मा खूप काही बनवते
आणि परत बिघडवते.स्वतःच या व्यर्थ कार्यामुळे थकून जातात आणि कमजोर बनतात. कधी
अभिमाना मध्ये येऊन स्वतःची चूक दुसर्यावर ढकलतात,दुसर्याला दोषी बनवतात परत वेळ
गेल्यानंतर समजतात, विचार करतात,हे तर ठीक केले नाही.परंतू अभिमानाच्या वश
झाल्यामुळे,स्वतःला वाचवण्या साठी दुसऱ्याचे दोष विचार करत राहतात.तर सर्वात मोठे
बंधन मनसाचे बंधन आहे.ज्यामुळे बुद्धीला कुलूप लागते म्हणून कितीही समजवण्याचा
प्रयत्न केला,तरीही त्यांना समजून येत नाही.मनसा बंधनाची विशेष लक्षण आहेत जाणीव
करण्याची शक्ती नष्ट होते म्हणून या सूक्ष्म बंधनाला समाप्त केल्या शिवाय आंतरिक
खुशी,नेहमीसाठी अतींद्रिय सुखाचा अनुभव करू शकत नाहीत.
संगमाची विशेषता हीच आहे अतिंद्रिय सुखामध्ये झोके घेणे,नेहमी खुशीमध्ये नाचणे.तर
संगम युगी बणुन या विशेषते चा अनुभव केला नाही तर काय म्हणणार? म्हणून स्वतःला चेक
करा की कोणत्याच प्रकारच्या संकल्पाच्या बंधनांमध्ये बांधले तर नाही?ते व्यर्थ
संकल्पाचे बंधन असेल,ईर्ष्या द्वेषाचे विचार असतील,आलबेलापना चे संकल्प,आळसा चे
संकल्प,कोणत्याही प्रकारचे संकल्प मनसाच्या बंधनाची लक्षणे आहेत.तर आज बापदादा
बंधनाला पाहत होते.मुक्त आत्मे किती आहेत?मोठ मोठे दोर तर नष्ट झाले आहेत.आता हे
सूक्ष्म धागे आहेत.हे छोटे धागे आहेत परंतु बंधनांमध्ये बांधण्यामध्ये हुशार
आहेत,माहिती पण होत नाही,की आम्ही बंधनांमध्ये बांधून घेत आहोत, कारण हे बंधन अल्प
काळाचा नशा चढवतात.जसे ते विनाशी नशा करणारे कधी स्वता:ला खालच्या दर्जाचे समजत
नाहीत.गटर मध्ये मध्ये पडलेले असतील परंतु समजतील मी तर महलां मध्ये आहे.त्यांचे
खाली हात असतील परंतु स्वता:ला राजा समजतील.असेच हा नशा असणारे कधीच स्वतःला चुकीचे
समजणार नाहीत,नेहमी स्वतःला बरोबर सिद्ध करतील किंवा अलबेला पण दाखवतील.हे तर
होतेच,असे तर चालत राहते,म्हणून आज फक्त बंधना बाबत सविस्तर सांगितले,परत वाचा
बद्दल ऐकवू. समजले. आत्मिक शक्ती द्वारा मुक्ती प्राप्त करत चला.संगम युगा मध्ये
जीवनमुक्तीचा अनुभव करणेच,भविष्य जीवनमुक्त भाग्य मिळवणे होय.सुवर्ण जयंतीच्या वर्षा
मध्ये जीवनमुक्त बनायचे आहे ना,की फक्त सुवर्ण जयंती साजरी करायची आहे.बनणे म्हणजेच
साजरी करणे होय.दुनियेतील लोक फक्त साजरी करतात,येथे तसे बनतात.आता लवकर लवकर तयार
व्हा, तेव्हा तर सर्व तुमच्या मुक्ती पासून मुक्त बनतील.वैज्ञानिक पण आपल्याच
बनवलेल्या साधना द्वारे बंधना मध्ये बांधले आहेत.नेत्याना पहा,वाचण्याची इच्छा आहे
परंतु खूप बांधलेले आहेत.विचार करून पण करू शकत नाहीत,तर बंधन झाले ना. सर्व
आत्म्यांना वेगवेगळ्या बंधनापासून मुक्त करणारे,स्वतः मुक्त बणुन सर्वांना मुक्त
बनवा.सर्व मुक्ती मुक्ती म्हणून ओरडत आहेत.कोणाला गरीबी पासून मुक्त होण्याची
इच्छा,कोणाला ग्रहस्थी पासून मुक्त राहण्याची इच्छा आहे,परंतु सर्वांचा आवाज एकच
मुक्तीचा आहे.तर आता मुक्तिदाता बणुन मुक्ती चा रस्ता दाखवा,किंवा मुक्ती चा वारसा
द्या.आवाज तर पोहोचतो ना,की समजतात हे तर बाबांचे काम आहे,आमचे काय आहे?भाग्य तर
तुम्हाला मिळवायचे आहे,बाबांना नाही. प्रजा किंवा भक्त पण पण तुम्हाला
पाहिजेत,बाबांना नाही पाहिजेत.तुमचे भक्त असतील तर,बाबांचे
स्वतः बनतील कारण द्वापर युगात तुम्ही लोकच प्रथम भक्ती करतात.प्रथम तुम्हीच बाबांची
पूजा करण्यास सुरुवात करतात.तर तुम्हा लोकांना सर्व अनुकरण करतील म्हणून आता काय
करायचे आहे? भक्तांचा आवाज ऐका,मुक्तिदाता बना.अच्छा.
नेहमी आत्मिक शक्ती च्या द्वारे मुक्ती प्राप्त करणारे,नेहमी स्वतःला सूक्ष्म
बंधनापासून मुक्त करून मुक्तिदाता बनणारे,नेहमी स्वतःला आंतरीक खुशी, अतींद्रिय
सुखाची अनुभती मध्ये पुढे घेऊन जाणारे,नेहमी सर्वां प्रती मुक्त बनण्याची शुभ भावना
ठेवणाऱ्या,अशा शक्तिशाली मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
पार्टीसोबत
वार्तालाप:-
ऐकण्याच्या
सोबतच स्वरूप बनण्यामध्ये पण शक्तिशाली आत्मे आहात ना.नेहमी आपल्या संकल्पा मध्ये
प्रत्येक दिवशी काही ना काही,स्वतःच्या प्रती आणि दुसऱ्यांच्या प्रति उमंग उत्साहाचे
संकल्प करा.जसे या वेळेत वर्तमान पत्रांमध्ये पण अनेक स्थाना वरती 'आजचा विचार'
विशेष लिहितात.असे रोज मनात कोणता ना कोणता उमंग उत्साहाचा विचार बुद्धीमध्ये
स्पष्ट रुपा मध्ये आणा आणि त्याच संकल्पने द्वारे स्वतःचे स्वरुप बनवा आणि
दुसऱ्यांच्या सेवेमध्ये पण त्याचा वापर करा,तर काय होईल.तर नेहमीच नवीन उमंग उत्साह
राहिल.आज हे करायचे,आज हे करू.जसे काही विशेष कार्यक्रम असतात,तर मग उमंग उत्साह का
येतो ? नियोजन करता ना, हे करू परत हे करायचे आहे,याद्वारे विशेष उमंग उत्साह
येतो.असे दररोज अमृत वेळेला विशेष उमंग उत्साहचा संकल्प करा आणि परत स्वतःला
तपासा,तर स्वता:चे पण नेहमीसाठी उमंग उत्साह असणारे जीवन बनेल.समजले,जसे मनोरंजनाचे
कार्यक्रम असतात,तसेच रोज मनाच्या मनोरंजनाचे कार्यक्रम करा.अच्छा.
( 2) नेहमीच शक्तिशाली आठवणीमध्ये पुढे जाणारे आहात ना.शक्तिशाली आठवणी शिवाय
कोणताही अनुभव होऊ शकत नाही.तर नेहमीच शक्तिशाली बणुन पुढे जात रहा.नेहमी आपल्या
शक्तीनुसार ईश्वरी सेवेमध्ये लागून रहा आणि सेवेचे फळ प्राप्त करत राहा.जितके शक्य
आहे तेवढी सेवा करत रहा.तनाद्वारे किंवा मना द्वारे सेवा करत रहा.एकाचे अनेक पटीने
मिळणारच आहे.जेवढे शक्य आहे तेवढी सेवा करत चला,स्वतःसाठी जमा करत रहा.अनेक
जन्मासाठी जमा करायचे आहे. एका जन्मा मध्ये जमा केल्यामुळे २१ जन्म कष्ट करावे
लागणार नाहीत.या रहस्याला जाणतात ना.तर नेहमी आपल्या भविष्याला श्रेष्ठ बनवत
चला.आनंदाने स्वतःला सेवेमध्ये पुढे करत चला.नेहमी आठवणी द्वारे एकरस स्थिती मध्ये
पुढे जात रहा.
(3) आठवणीच्या आनंदा द्वारे अनेक आत्म्यांना खुशी देणारे सेवाधारी आहात ना.खरे
सेवाधारी म्हणजे स्वतःपण सेवेच्या आकर्षणा मध्ये मगन राहणणरे आणि दुसर्यांना पण
सेवेमध्ये पुढे करणारे.प्रत्येक स्थानाची सेवा आप आपली आहे.तरीही जर लक्ष ठेवून पुढे
जात आहात,तर हे पुढे जाणे म्हणजेच आनंदाची गोष्ट आहे.वास्तव मध्ये हे लौकिक शिक्षण
इत्यादी सर्व विनाशी आहे.अविनाश ज्ञानच अविनाश प्राप्तीचे साधन आहे,हाच अनुभव करत
आहात ना.तुम्हा सेवाधारीला अविनाशी नाटकांमध्ये सुवर्णसंधी मिळाली आहे.या
सुवर्णसंधीचा फायदा घ्यायचा आपल्या हातामध्ये आहे.अशी सुवर्ण संधी सर्वांना मिळत
नाही.करोडो आत्म्या मधून काही आत्म्यास मिळते.तुम्हाला तर मिळाली आहे ना,इतका आनंद
राहतो. दुनिया मध्ये कुणाच्या जवळ नाही,ते तुमच्या जवळ आहे,अशा आनंदामध्ये नेहमी
स्वतः आणि दुसर्यांना पण आनंदित करा.जितके स्वतः पुढे जाल,तेवढे दुसऱ्यांना पण पुढे
कराल.नेहमी पुढे
जाणारे,इकडे तिकडे पाहुन थांबणारे नाही. नेहमी बाबा आणि सेवा समोर राहावी,बस, तर
नेहमी प्रगती होत राहील.स्वतःला नेहमी बाबांचे लाडके समजून चालत रहा.
नोकरी करणाऱ्या
कुमारी सोबत वार्तालाप:-
(१) सर्वांचे लक्ष श्रेष्ठ आहे ना.असे तर समजत नाही,दोन्हीकडे चालत राहावे कारण
जेव्हा काही बंधन असतात तर दोन्हीकडे चालावे लागते,ती दुसरी गोष्ट आहे.परंतु
निर्बंधन आत्म्यांनी दोन्हीकडे राहणे म्हणजेच लटकने आहे.काही जणांची परिस्थिती
असते,तर बाबा पण सुट्टी देतात परंतु मनाचे बंधन असतील तर हे लटकने झाले ना.एक पाय
येथे आणि दुसरा पाय तिकडे,तर काय होईल? जर एका नावांमध्ये एक पाय ठेवला आणि दुसरा
पाय दुसऱ्या नावांमध्ये ठेवाल,तर काय हाल होईल? त्रास होईल ना म्हणून दोन्ही पाय एका
नावांमध्ये ठेवा.नेहमी आपली हिम्मत ठेवा.हिम्मत ठेवल्याने जीवन रुपी नाव सहजच किनार्याला
लागेल.आठवणीमध्ये ठेवा,बाबा माझ्या सोबत आहेत,एकटे नाहीत.तर जे पण कार्य करू
इच्छितात,ते करू शकाल.
(२) कुमारींची संगम युगामध्ये विशेष भूमिका आहे.अशी विशेष भूमिका करणारे स्वतःला
बनवले आहे ना,की आज पर्यंत साधारण आहात?तुमची विशेषता काय आहे? विशेषता सेवाधारी
बनण्याची आहे. जे सेवाधारी आहेत ते विशेष आहेत. सेवाधारी नाहीत,तर साधारण झाले
ना.तर काय लक्ष ठेवले आहे? संगम युगा वरतीच ही संधी मिळते.जर आता ही संधी घेतली
नाही,तर साऱ्या कल्पा मध्ये मिळू शकत नाही.संगम युगालाच विशेष वरदान आहे.लौकिक
शिक्षण घेत पण,या ज्ञान योगाच्या आकर्षण मध्ये रहा,तर ते शिक्षण पण विघ्न रुप बनणार
नाही.तर सर्व आपले भाग्य बनवत पुढे जात रहा.जितका आपल्या भाग्याचा नशा असेल तेवढे
सहज मायाजीत बणुन जाल.हा आत्मिक नशा आहे.नेहमी आपल्या भाग्याचे गीत गात राहा तर,गीत
गात आपल्या राज्यामध्ये पोहोचून जाल.
वरदान:-
स्वतःच्या
सर्व कमजोरींना, दानाच्या विधी द्वारे समाप्त करणारे दाता विधाता भव.
भक्तीमध्ये हा नियम
असतो की जेव्हा कोणत्या वस्तूंची कमी असते, तर ते म्हणतात त्याचं दान करा.दान
केल्यामुळे देणे-घेणे होऊन जाते.तर कोणत्याही कमजोरी ला समाप्त करण्यासाठी दाता
विधाता बना.जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बाबा चा खजाना देण्याच्या निमित्त,आधार बनाल
तर कमजोरीचा किनारा स्वतः होऊन जाईल.स्वतःच्या दाता विधाता पनाच्या शक्तिशाली
संस्काराला स्पष्ट करा तर, कमजोरी चे संस्कार स्वतः नष्ट होऊन जातील.
सुविचार:-
आपल्या श्रेष्ठ
भाग्याचे गुण गात रहा, कमजोरी चे नाही.