18-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुमची वर्तणूक खूप श्रेष्ठ असावी, तुम्ही देवता बनत आहात, तर लक्ष आणि लक्षण, कथनी आणि करनी सारखी बनवा.
 

गीत:-
तुम्हाला प्राप्त करून आम्ही हे जग प्राप्त केले

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले. आता तर थोडी मुल आहेत. नंतर खूप होतील प्रजापिता ब्रम्हाला तर सर्वांना ओळखायचे आहे. सर्व धर्मांच्या आत्म्यांना ओळखायचे आहे. बाबांनी समजवले आहे, श्री लौकिक पिता हद्दचे ब्रह्मा आहेत,त्यांचे आडनावाने कुळ बनते. हे बेहद्द चे कुळ आहे.नाव प्रजापिता ब्रह्मा आहे ना. ते हद्दचे ब्रम्हा, हदची प्रजा रचतात. कोणी दोन, चार रचतात, कोणी रचत नाही. त्यामुळे असे म्हणू शकत नाही की संतान नाही. यांची संतान तर संपूर्ण दुनिया आहे. बेहदचे बापदादांचे गोड-गोड मुलां बद्दल खूप रुहानी प्रेम आहे. मुलांना किती प्रेमाने शिकवितात आणि श्रेष्ठ देवता बनवितात. तर मुलांना किती आनंदाचा पारा चढलेला पाहिजे. आनंदाचा पारा तेव्हा चढेल, जेव्हा निरंतर बाबांना आठवण करत रहाल. बाबा कल्प कल्प खूप प्रेमाने मुलांना पावन बनवण्याची सेवा करतात. पाच तत्व सहित सर्वांना पवित्र बनवितात. कवडी पासून हिरा बनवितात. किती मोठी बेहद्द ची सेवा आहे. बाबा खूप प्रेमाने मुलांना ज्ञान पण देत राहतात कारण मुलांना सुधरविने पित्याचे किंवा शिक्षकांची कर्तव्य आहे. बाबांच्या श्रीमताने श्रेष्ठ बनतात. हे सुद्धा मुलांना चार्ट मध्ये पाहिले पाहिजे की आपण श्रीमतावर चालतो की मनमता वर चालतो? श्रीमतामुळेच तुम्ही संपूर्ण बनाल. जेवढी बाबांवर प्रीत बुद्धी असेल तेवढे गुप्त आनंदामध्ये भरपूर राहाल. स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की आपल्याला एवढी गुप्त कापारी खुशी होते का? अव्यभिचारी आठवण आहे का? कोणती इच्छा तर नाही? एका बाबांची आठवण आहे? सुदर्शन चक्र फिरत राहील तेव्हा तनामधून प्राण निघावेत.एक शिवबाबा दुसरे ना कोणी. हाच अंतिम मंत्र आहे.

बाबा आत्मिक मुलांना विचारतात, "गोड मुलांनो, जेव्हा बाप दादांना समोर पाहता त्या वेळेस बुद्धीमध्ये येते का आमचे बाबा, बाबा पण आहेत शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत. बाबा आम्हाला या जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये घेऊन जातात. ही जुनी दुनिया आता नष्ट झाली की झाली. ही तर आता कोणत्या कामाची नाही. बाबा कल्प कल्प नवीन दुनिया बनवितात. आपण कल्प कल्प नरापासून नारायण बनतो. मुलांना हे आठवण करून किती खुशी मध्ये राहिले पाहिजे. "मुलांनो, वेळ खूप कमी आहे. आज काय आहे आणि उद्या काय होईल. आज आणि उद्याचा खेळ आहे त्यामुळे मुलांना चुका करायच्या नाहीत. तुम्हा मुलांची वर्तणूक खूप श्रेष्ठ पाहिजे. स्वतःला पाहिचे आहे देवतांसारखी आमची वर्तणूक आहे का? देवताई बुद्धी राहते का? जे लक्ष आहे ते बनत पण आहोत, की फक्त म्हणतोच? जे ज्ञान मिळालेले आहे, त्यामध्ये मस्त राहायचे आहे. जेवढे अंतर्मुखी होऊन या गोष्टींवर विचार करत राहाल तर खूप आनंदी राहाल. हे सुद्धा तुम्ही मुलं जाणता ह्या दुनियेमधून त्या दुनियेमध्ये जाण्यासाठी बाकी थोडा वेळ आहे. जर त्या दुनियेला सोडले तर पाठीमागे का पाहिचे. बुद्धीयोग त्या दुनियेकडे का जातो? हे सुद्धा बुद्धीने समजले पाहिजे. जर तिथून निघून आलो तर बुद्धी का जाते? झालेल्या गोष्टींची चिंतन करू नका. त्या जुन्या दुनियेत कोणतीही इच्छा राहिली नाही पाहिजे. आता फक्त एकच इच्छा राहिली पाहिजे आम्हाला सुखधाम मध्ये जायचे आहे. कुठेही थांबायचे नाही पहायचे नाही पुढे जायचे आहे. एक इकडेच पहात रहा तेव्हा अचल अडोल अवस्था होईल. वेळ नाजूक होत जाईल, या जुन्या दुनियेची स्थिती बिघडत जाईल. तुमचा या सोबत काही संबंध नाही. तुमचा संबंध नवीन दुनियेशी आहे, जो आता स्थापन होत आहे. बाबांनी समजलेले आहे,आता ८४ चे चक्र पूर्ण होत आहे. आता ही दुनिया नष्ट होणार आहे. याची खूप खराब अवस्था आहे. यावेळेस सगळ्यात जास्त क्रोध प्रकृतीला येत आहे, त्यामुळे सर्व काही नष्ट करते. आता तुम्ही मुलं जाणता कि ही प्रकृती सर्वात आधीक क्रोधीत होईल. संपूर्ण जुन्या दुनियेला समाप्त करेल.पूर येईल, आग लागेल. मनुष्य उपाशी मरतील. भूकंपामध्ये घरे इत्यादी सर्व पडतील. या सर्व गोष्टी संपूर्ण दुनियेसाठी येणार आहेत. अनेक प्रकाराने मृत्यू होईल. विषारी गॅसचे असे बॉम्ब सोडतील,ज्याच्या वासनेच मनुष्य मरतील. हे सर्व नाटकामध्ये नोंदलेले आहे. यामध्ये दोष कोणाचाच नाही.विनाश तर होणारच आहे त्यामुळे तुम्हाला या जुन्या दुनियेतून बुद्धीला काढून टाकायचे आहे. आता तुम्ही मुलं म्हणताल वाह सद्गुगरु…. ज्यांनी आम्हाला हा रस्ता दाखविला. आमचे खरे खरे सद्गुगरु एक बाबाच आहेत. ज्यांचे नाव भक्तीमध्ये पण चालत येते. ज्यांची महिमा गायली जाते. तुम्ही मुलं म्हणाल वाह सद्गुरु वाह! वाह नशीब वाह! वाह नाटक वाह! बाबांच्या ज्ञानाने आम्हाला सद्गगती मिळत आहे.

तुम्ही मुलं या विश्वामध्ये शांती स्थापन करण्याच्या निमित्त बनले आहात. तर सर्वांना ही आनंदाची गोष्ट ऐकवा की आता नवीन भारत, नवीन दुनियेत ज्यामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ते पुन्हा स्थापन होत आहे. हे दुःखधाम बदलून सुखधाम बनत आहे.. मनामध्ये आनंद झाला पाहिजे की आपण सुखधामचे मालक बनत आहोत. तेथे असं कोणी विचारणार नाही की तुम्ही आनंदी-सुखांमध्ये आहात का? तब्येत कशी आहे? हे या दुनियेमध्ये विचारले जाते. कारण ही आहेच दुःखाची दुनिया. तुम्हा मुलांनासुद्धा हे कोणी विचारू शकत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही ईश्वराची मुलं आहोत, तुम्ही आम्हाला काय खुशाली विचारता. आम्ही तर सदैव आनंदी आहोत. परवाह होती पार ब्रह्म मध्ये राहणाऱ्या बाबांची, ते भेटले आता कोणाची परवाह करायची? हा सदैव नशा राहिला पाहिजे. तुम्हाला खूप श्रेष्ठ आणि गोड बनायचे आहे. स्वतःच्या नशिबाला श्रेष्ठ बनवायची ही वेळ आहे. पद्मापदमपती बनण्याचे मुख्य साधन आहे, पाऊला पावलांत खबरदारीने चालणे. अंतर्मुखी बनायचे आहे. हे नेहमी लक्षात ठेवा जसे कर्म मी करेल तसे दुसरे करतील. देह अभिमान इत्यादीचे बीज तर अर्ध्या कल्प पासून पेरलेले आहे. संपूर्ण दुनियामध्ये हे बीज आहे.आता त्याला विसरायचे आहे. देह अभिमाना मध्ये यायचे नाही. आता आत्म अभिमानी बनायचे आहे. तुमची आता वयोवृद्ध अवस्था आहे. अतिप्रिय बाबा भेटले आहेत, त्यांचीच आठवण करायची आहे. बाबांच्या ऐवजी देह आणि देहधारींना आठवण करणे ही चूक आहे. तुम्हाला आत्म अभिमानी बनण्याचे आणि शांत बनण्याचे खूप कष्ट घ्यायचे आहेत.

गोड मुलांनो तुम्हाला या जीवनामध्ये कधीही दुःखी राहायचे नाही. हे जीवनमूल्य आहे, याला सांभाळणे पण पाहिजे. यासोबत कमाई पण करायचे आहे. येथे जेवढे दिवस राहाल, तेवढी बाबांची आठवण आणि कमाई जमा करायची आहे. हिशोब तर पूर्ण होतच राहील त्यामध्ये दुःखी व्हायचे नाही. मुलं म्हणतात बाबा सतयुग केव्हा येईल? बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही पहिल्यांदा संपूर्ण अवस्था तर बनवा. जेवढा वेळ मिळाला आहे त्यामध्ये संपूर्ण बनण्याचा पुरुषार्थ करा. आपल्या अवस्थेला खूप श्रेष्ठ बनवायचे आहे. मुलांमध्ये नष्टमोहा बनण्याची पण हिम्मत पाहिजे. आपल्या वस्तीला खूप श्रेष्ठ बनवायचे आहे. बाबांचे बनला आहात तर बाबांचीच अलौकिक सेवा करायची आहे. स्वभाव खूप गोड पाहिजे. मनुष्यांचा स्वभावच खूप त्रास देतो. ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे त्यांनी स्वतःला तपासायचे आहे. जी पण कमी आहे ती काढून पवित्र हिरा बघायचा आहे. थोडी सुद्धा कमी असेल तर किंमत कमी होईल त्यामुळे कष्ट करून स्वतःला मूल्यवान हिरा बनवायचा आहे.

तुम्हा मुलांकडून बाबा आता नवीन दुनियेच्या संबधाचा पुरुषार्थ करवित आहेत, गोड मुलांनो आता बेहद्दच्या बाबांशी आणि आणि बेहद्द च्या सुखाच्या वारसा सोबत संबंध ठेवा. एकच बेहदचे बाबा आहेत, तरी सर्व बंधनापासून सोडवून तुम्हाला अलौकिक संबंधांमध्ये घेऊन जातात. नेहमी आठवणी मध्ये ठेवले पाहिजेत की आम्ही ईश्वरीय संबंधाचे आहोत. हा ईश्वरीय संबंध सुखदायी आहे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात, आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

अव्यक्त बापदादाचे मधुर महावाक्य( रिवाईज)
सफलता मूर्त बनण्यासाठी मुख्य दोनच गुण पाहिजे एक पवित्रता(प्युरीटी) दुसरी एकता (युनिटी ) .जर पवित्रताते मध्ये कमी आहे तर एकता मध्ये सुद्धा कमी आहे. पवित्रता फक्त ब्रह्मचर्य व्रतलाच म्हणले जात नाही, संकल्प स्वभाव आणि संस्कारांमध्ये सुद्धा पवित्रता पाहिजे. समजा एक दुसऱ्यांच्या प्रति ईर्षा किंवा घृणाचा संकल्प आहे,तर ती पवित्रता नाही अपवित्रता आहे. पवित्रतेचा परिभाषा मध्ये सर्व विकारांचे अंश मात्र सुद्धा नको. विचारांमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची अपवित्रता नसावी. तुम्ही मुलं खूप मोठ्या कार्याला संपन्न करण्यासाठी निमित्त बनले आहात. निमित्त तर महारथीच्या रूपाने बनले आहात ना? जर यादी काढली तर यादीमध्ये पण सेवाधारी आणि देवीच्या निमित्त बनलेले ब्रह्म वत्स महारथीच्या यादीमध्ये नोंदले जातात. महारथीची विशेषता किती आलेली आहे? ते तर प्रत्येक जण स्वतःला जाणतील. महारथी जो यादीमध्ये नोंदला जातो, तो पुढे चालुन महारथी असेल किंवा वर्तमानाच्या यादीमध्ये महारथी आहे. तर या दोन्ही गोष्टींवर लक्ष पाहिजे

ऐकता म्हणजे संस्कार स्वभावाच्या मिलनाची एकता. कोणाचे संस्कार आणि स्वभाव मिळाले नाही तरीही प्रयत्न करून मिळवा ही एकता आहे. फक्त संघटनेला एकता म्हणता येणार नाही. सेवेसाठी निमित्त बनलेली आत्मा या दोन गोष्टी शिवाय बेहदच्या सेवेच्या निमित्त बनू शकत नाही. हदचे होऊ शकतात बेहदच्या सेवेसाठी या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. सांगितले होते ना रास मध्ये ताल मिळाले तरच वाह-वाह होते. तर येथे सुद्धा ताल मिळवणे म्हणजे रास मिळवणे. इतके आत्मे जे ज्ञान वर्णन करतात तर सर्वांच्या मुखातून हेच निघते की हे सर्व एकच गोष्टी बोलतात या सर्वांचा एकच विषय आहे, एकच शब्द आहे, हे सर्व म्हणतात ना. याच प्रमाणे सर्वांचा स्वभाव आणि संस्कार एकमेकांत सोबत मिळाले,तेव्हा म्हणले जाईल की रास मिळाली. याची योजना बनवा.

कोणत्याही कमजोरीला मिटवण्यासाठी विशेष महाकाली स्वरूप शक्तींचे संघटन पाहिजे,जे आपल्या योगा च्या प्रभावाने कमजोर वातावरणाला परिवर्तन करतील. आता तर नाटका नुसार प्रत्येक चलन रुपी दर्पणा मध्ये अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे. पुढे चालून महारथी मुले आपल्या ज्ञानाच्या शक्तीद्वारे प्रत्येकाच्या चेहर्ऱ्यातून त्यांचे कर्म कहानीला स्पष्ट पाहू शकतील. जसे खराब झालेल्या जेवणाचा वास समजून येतो. तसे खराब संकल्प रुपी आहार स्वीकार करणाऱ्या आत्म्यांच्या वातावरणाने बुद्धीमध्ये स्पष्ट अनुभव होईल, याचे यंत्र आहे बुद्धीची लाईन स्पष्ट. ज्याचे हे यंत्र शक्तिशाली असेल तो सहज जाणू शकेल.

शक्तींच्या आणि देवतांच्या मूर्तीमध्ये सुद्धा ही विशेषता आहे. जर कोणीही पाप आत्मा आपले, पाप त्यांच्यासमोर लपवु शकत नाही. स्वतः वर्णन करत राहतात की आम्ही असे पाप आत्मा आहोत. तर मूर्तीमध्ये सुद्धा अंत काळात ही विशेषता दिसून येते. चैतन्य रूपामध्ये शक्तींची ही विशेषता प्रसिद्ध आहे,तेव्हा तर हे यादगार आहे. ही आहे मास्टर जानी जाणनहारची अवस्था म्हणजे ज्ञानाने संपन्न अवस्था. ही अवस्था सुद्धा प्रत्यक्षात अनुभव होईल. होत आहे आणि होईल. असे संघटन बनविले आहे का? बनवायचे तर आहेच. असे क्षमा स्वरूप संघटन पाहिजे, ज्यांच्या प्रत्येक पावला मध्ये बाबांची प्रत्यक्षता होईल. अच्छा

वरदान:-
सेवा करत असताना आठवणीच्या अनुभवाची शर्यत करणारे नेहमी स्नेहमयी आत्मा भव.

आठवणीमध्ये राहता परंतु आठवणी द्वारे ज्या प्राप्ती होतात त्या प्राप्तीच्या अनुभूतीला वाढवत चला. यासाठी आता विशेष वेळ आणि सावधानी ठेवा. ज्यामुळे माहित पडेल की हे अनुभवाच्या सागरामध्ये सामावलेली स्नेहमयी आत्मा आहे.जशी पवित्रता, शांतीच्या वातावरणाची अनुभूती होते तसे श्रेष्ठ योगी लगान मध्ये मगन राहणारे आहे, हा अनुभव व्हावा. ज्ञानाचा प्रभाव आहे परंतु योगाच्या सिद्धी स्वरूपाचा व्हावा. सेवा करत असताना आठवणींच्या अनुभवा मध्ये सामावलेले रहा, आठवणींच्या यात्रेच्या अनुभवाची शर्यत करा.

बोधवाक्य:-
सिद्धीला स्वीकार करणे म्हणजे भविष्य प्राप्तीला येथेच समाप्त करणे.


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष अभ्यास:-
जसे ब्रम्हा बाबांनी निश्चयाचा आधारावर आत्मिक नशेच्या आधारावर निश्चित भावीचे ज्ञाता बनून सेकंदामध्ये सर्व काही सफल केले. स्वतःसाठी काहीच ठेवले नाही. तर स्नेहाची निशाणी आहे सर्वकाही सफल करणे. सफल करण्याचा अर्थ आहे श्रेष्ठ कार्या मध्ये लावणे.