24-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो , तुम्ही अशरीरी बनून जेव्हा बाबाची आठवण करता तर तुमच्यासाठी ही दुनियाच नष्ट होते , देह आणि दुनिया विसरुन जाते....!!!

प्रश्न:-
बाबाद्वारे सर्व मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र का मिळाल आहे?

उत्तर:-
स्वत:ला आत्मा समजून, बाबा जसे आहेत, त्या रुपात आठवण करण्यासाठी तिसरा नेत्र मिळाला आहे, परंतू हा तिसरा नेत्र काम तेव्हा करेल जेव्हा पूर्ण योगयुक्त रहाल, म्हणजे एका बाबाशी खरी प्रीत राहिल, कोणाच्या नावारुपात लटकू नका. माया प्रीत ठेवण्यात विघ्न घालते. यामध्येच मुले धोका खातात.

गीत:-
मरणे तुझ्या गल्लीमध्येच...

ओम शांती।
तुम्हा ब्राह्मण मुलाशिवाय या गीताचा अर्थ कोणी समजू शकत नाहीत. जसे वेद शास्त्र इत्यादी बनविले आहेत. परंतू जे काही वाचतात, त्याचा अर्थ समजत नाहीत. त्यामुळे बाबा म्हणतात मी ब्रह्मा मुखाद्वारे वेद शास्त्रांचा सार समजावतो, तसेच या गीताचा पण अर्थ कोणी समजत नाही, बाबाच याचा अर्थ सांगतात. आत्मा जेव्हा शरीरापासून अलीप्त होते, तर जगापासून सारा संबंध तुटतो. गीतेमध्ये पण आहे, स्वत:ला आत्मा समजून अशरीर बनून बाबाची आठवण करा, तर हे जग नष्ट होवून जाते. हे शरीर या पृथ्वीवर आहे, आत्मा यातून निघून गेली तर मग त्यावेळी, त्यासाठी मनुष्य सृष्टीच नसते. आत्मा एकटी बनते, उडून दुसज्या शरीरात जाते. येथे या आकाश तत्त्वातच त्याला भुमिका करावयाची आहे. मुलवतनमध्ये जावयाचे नाही. जेव्हा शरीर सोडते, तर ना हे कर्मबंधन, ना ते कर्मबंधन राहते. शरीरापासून वेगळी होऊन जाते ना. मग दुसरे शरीर घेतले तर ते कर्मबंधन सुरु होते. या गोष्टी तुमच्या शिवाय आणखीन कोणी मनुष्य जाणत नाहीत. बाबांनी समजावले आहे सर्व बिल्कुल बेसमज आहेत. परंतू असे कोणी समजतात थोडेच. स्वत:ला किती हुशार समजत आहेत. शांतीचा पुरस्कार देत राहतात. हे पण तुम्ही ब्राह्मण कुलभूषण चांगल्याप्रकारे समजावू शकता. ते तर जाणतच नाहीत कि शांती कशाला म्हटले जाते? कोणी तर महात्मा जवळ जातात कि, मनाला शांती कशी मिळेल? असे म्हणतात कि, जगामध्ये शांती कशी होईल. असे म्हणत नाहीत कि निराकारी दुनियेमध्ये शांती कशी होईल? ते तर आहे शांतीधाम, आम्ही आत्मे शांतीधाममध्ये राहतो, परंतू ते तर मनाची शांती म्हणतात. ते जाणत नाहीत कि, शांती कशी मिळेल? शांतीधाम तर आपले घर आहे. येथे शांती कशी मिळू शकेल? होय, सतयुगामध्ये सुख, शांती, संपत्ती सर्व आहे, ज्याची स्थापना बाबा करत आहेत. येथे तर किती अशांती आहे. हे सर्व आता तुम्ही मुले समजत आहात. सुख शांती संपत्ती भारतामध्येच होती. हा वारसा होता बाबाचा, आणि दु:ख अशांती कंगालपणा, हा वारसा आहे रावणाचा. यासर्व गोष्टी बेहदचे बाबा बसून मुलांना समजावत आहेत. बाबा परमधाममध्ये राहणारे ज्ञानाचे सागर आहेत, जे सुखधामाचा आम्हाला वारसा देत आहेत. ते आम्हा आत्म्यांना समजावत आहेत. हे तर जाणता कि, ज्ञान असते आत्म्यामध्ये. त्यांनाच ज्ञानाचे सागर म्हटले जाते. ते ज्ञानाचे सागर या शरीराद्वारे जगाचा इतिहास भूगोल समजावत आहेत. जगाचे आयुष्य तर असले पाहिजे ना. जग तर आहेच. फक्त नवी दुनिया आणि जुनी दुनिया म्हटले जाते. हे पण मनुष्यांना माहित नाही. नविन जगापासून जुने जग होण्यासाठी किती कालावधी लागत आहे?

तुम्ही मुले जाणता कि, कलियुगानंतर सतयुग जरुर येणार आहे, त्यामुळे कलियुग आणि सतयुगाचे संगमावर बाबाला यावे लागत आहे. हे पण तुम्ही जाणता कि, परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे नविन दुनियेची स्थापना, शंकराद्वारे विनाश करतात. त्रिमुर्तीचा अर्थच आहे-स्थापना, विनाश, पालना. ही तर साधारण गोष्ट आहे. परंतू या गोष्टी तुम्ही मुले विसरुन जात आहात. नाही तर तुम्हाला खुशी, फार राहिल. निरंतर आठवण राहिली पाहिजे. बाबा आम्हाला नविन दुनियेच्या लायकीचे बनवत आहेत. तुम्ही भारतवासीच लायक बनत आहेत, आणखीन कोणी नाही. होय, जे इतर धर्मामध्ये गेले आहेत, ते येऊ शकतील. परत या धर्मात येतील, जसे गेले होते. हे सारे ज्ञान तुमच्या बुध्दीमध्ये आहे. मनुष्यांना समजावयाचे आहे ही जुनी दुनिया आता बदलत आहे. महाभारताचे युध्द पण जरुर होणार आहे. यावेळीच येऊन राजयोग शिकवत आहेत, जे राजयोग शिकतात, ते नव्या दुनियेमध्ये जातात. तुम्ही सर्वांना समजावू शकता कि, उंच ते उंच भगवान आहे, मग ब्रह्मा विष्णू, शंकर नंतर येथे या, मुख्य आहे जगदंबा जगतपिता. बाबा येतातच येथे ब्रह्माचे शरीरामध्ये, प्रजापिता ब्रह्मा तर येथे आहेत ना. ब्रह्माद्वारे स्थापना सुक्ष्मवतनमध्ये तर होणार नाही ना. येथेच होत आहे. हे व्यक्त पासून अव्यक्त बनतात. हे राजयोग शिकून मग विष्णूचे दोन रुप बनतात. जगाचा इतिहास भूगोल समजला पाहिजे ना. मनुष्यच समजतील. जगाचे मालकच जगाचा इतिहास भुगोल समजावू शकतात. ते ज्ञानाचे सागर पुर्नजन्म रहित आहेत. हे ज्ञान कोणाच्या बुध्दमध्ये नाही. पारखन्याची पण बुध्दी पाहिजे ना. काही बुध्दीत बसत आहे, का असेच आहेत, नाडी पाहिली पाहिजे. एक अजमल खॉ प्रसिध्द वैद्य होऊन गेले आहेत. ते रोग्याला पाहताच आजाराची माहिती त्यांना होत होती. तसे तुम्हा मुलांना पण समजले पाहिजे की हा लायक आहे कि नाही?

बाबांनी मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे, ज्याद्वारे तुम्ही स्वत:ला आत्मा समजून, बाबा जे आहेत, जसे आहेत, त्यांना त्या रुपात आठवण करता. परंतू अशी बुध्दी त्यांची असेल जे पूर्ण योगयुक्त असतील, ज्यांची बाबा बरोबर प्रीत बुध्दी असेल. सर्व तर असणार नाहीत ना. एक दोघांचे नावारुपात अडकून पडतात. बाबा म्हणतात प्रीत तर माझे बरोबर करा ना. माया अशी आहे जी प्रीत ठेवू देत नाही. माया पण पाहते कि, माझा ग्राहक जात आहे तर एकदम नाक-कान धरुन ठेवते. नंतर जेव्हा धोका खातात, तेव्हा समजतात, मायेकडून धोका बसला, मायाजीत, जगतजीत बनू शकत नाहीत, उच्च पद प्राप्त करु शकत नाहीत, यामध्ये कष्ट आहेत. श्रीमत सांगते की, माझी एकट्याची आठवण करा, तर तुमची जी पतित बुध्दी आहे ती पावन बनून जाईल. परंतू कित्येकाना फार अवघड वाटत आहे. यामध्ये विषय एकच आहे अल्फ आणि बे, बस, दोन अक्षर पण आठवण करु शकत नाहीत. बाबा म्हणतात, अल्फ ची आठवण करा मग स्वत:चा देह दुसज्याचे शरीराची आठवण करत राहतात. बाबा म्हणतात, शरीराला पाहून पण तुम्ही माझी आठवण करा. आत्म्याला आता तिसरा नेत्र मिळाला आहे, बाबांना समजण्यासाठी, त्यापासून काम करुन घ्या. तुम्ही मुले आता त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनले आहात. परंतू त्रिकालदर्शी पण नंबरवार आहेत. ज्ञान धारण करणे फार अवघड नाही. फारच चांगले प्रकारे समजवतात, परंतू योगबळ कमी आहे, आत्म अभिमानी पणा फार कमी आहे. थोड्या गोष्टीत राग येतो, विकारात जातात. उठतात, मग पडतात. आज उठतात उद्या परत पडतात. देहअभिमान मुख्य आहे, नंतर इतर विकार लोभ, मोह इत्यादी मध्ये फसतात. शरीरामध्ये पण मोह राहतो ना. मातामध्ये मोह जास्त असतो. आता बाबा त्यापासून सोडवत आहेत. तुम्हाला बेहदचे बाबा मिळाले आहेत. मग मोह का ठेवता? त्यावेळी चेहरा बोलणे चालणे माकडासारखे होऊन जाते. बाबा म्हणतात नष्टोमोहा बना, निरंतर माझी आठवण करा. पापाचे ओझे डोक्यावर फार आहे, ते कसे उतरेल? परंतू माया अशी आहे, आठवण करु देत नाही. जरी कितीही डोके चालविले तरी पण बुध्दीला भटकवते. किती प्रयत्न करतात कि, आम्ही अति प्रिय बाबाचीच महिमा करु. बाबा, बस, तुमचे जवळ आलो कि आलो,परंतू नंतर विसरुन जातात. बुध्दी दुसरीकडे जाते. ब्रह्माबाबा नंबर एकला जाणारे पण पुरुषार्थ करतात ना.

मुलांच्या बुध्दीमध्ये हे राहिले पाहिजे कि, आम्ही ईश्वरीय पित्याचे विद्यार्थी आहे. गीतेमध्ये पण आहे, भगवानुवाच, मी तुम्हाला राजांचा राजा बनवितो. फक्त शिवा ऐवजी कृष्णाचे नाव लिहले आहे. खरंतर शिवबाबाची जयंती साज्या जगाने साजरी केली पाहिजे. शिवबाबा सर्वांना दु:खापासून मुक्त करुन, मार्गदर्शक बनून घेऊन जातात. हे तर सर्व मानतात कि, ते मुक्तीदाता, मार्गदर्शक आहेत. सर्वांचा पतित पावन पिता आहे, सर्वांना शांतीधाम, सुखधामला घेऊन जाणारे आहेत, मग त्यांची जयंती का साजरी करत नाही? भारतवासीच साजरी करत नाहीत, त्यामुळेच भारताची अशी वाईट अवस्था झाली आहे. मरण पण फार वाईट अवस्थेत होते. ते तर बॉम्ब असे बनवतात कि, गॅस निघाला आणि खलास, जसे क्लोरोफॉर्म दिल्यावर होते. ते पण त्यांना बनवायचेच आहेत. बंद होणे अशक्य आहे. जे कल्पापूर्वी झाले आहे, त्याची पुर्नरावृत्ती होत आहे. या अण्वस्त्राद्वारे आणि नैसर्गिक आपत्ती द्वारे जुन्या दुनियेचा विनाश झाला होता, तो आता पण होईल. विनाशाची वेळ जेव्हा येईल तर नाटकातील योजनेनूसार कर्तव्य तर करतीलच. नाटकात विनाश जरुर होईल. रक्ताच्या नद्या येथे वाहतील. गृहयुधमध्ये एक दोघांना मारुन टाकतात ना. तुमच्यामध्ये पण थोडे जाणतात कि, ते जग बदलत आहे. आता आम्ही जातो सुखधाम. तर नेहमीच ज्ञानाच्या अतिइंद्रीय सुखामध्ये राहिले पाहिजे. जेवढे आठवणीत राहाल तेवढे सुख वाढत राहिल. छी छी शरीरापासून नष्टोमोहा बनत जाल. बाबा फक्त म्हणतात कि, अल्फची आठवण करा तर बे बादशाही तुमची आहे. सेकंदामध्ये बादशाही, बादशाहाला मुलगा झाला तर मुलगा बादशहा बनतो ना. तर बाबा म्हणतात कि माझी आठवण करत राहा आणि चक्राची पण करा, तर चक्रवर्ती महाराजा बनाल, त्यामुळे गायन करतात कि, सेकंदात जवीनमुक्ती, सेकंदामध्ये गरीबापासून राजा. किती चांगले आहे. तर श्रीमतावर चांगले प्रकारे चालले पाहिजे. पावलोपावली मत घ्यवी लागते.

बाबा समजावतात कि, गोड मुलांनो विश्वस्त होऊन राहा, तर मतत्त्व नष्ट होईल. परंतू विश्वस्त होणे सोपे नाही. ब्रह्माबाबा स्वत: विश्वस्त बनले, मुलांना पण विश्वस्त बनवत आहेत. बाबा काही तरी घेतात का? म्हणतात तुम्ही विश्वस्त होऊन सांभाळा. विश्वस्त बनलात तर मग ममत्त्व नष्ट होईल. म्हणतता पण कि, ईश्वराने सर्व काही दिले आहे. मग काही नुकसान झाले किंवा कोणी मरण पावले तर आजारी पडतात. मिळाले तर खुशी होते. जेव्हा म्हणतात कि, ईश्वराने दिलेले आहे तर मग मेल्यावर रडण्याची काय आवश्यकता आहे? परंतू माया कमी नाही, एवढे सोपे थोडेच आहे. यावेळी बाबा म्हणतात, तुम्ही मला बोलावले आहे कि, या पतित दुनियेमध्ये आम्ही राहू इच्छित नाही, आम्हाला पावन दुनियेत घेऊन चला, बरोबर घेऊन चला, परंतू याचा अर्थ पण समजत नाहीत. पतित पावन आले तर जरुर शरीर नष्ट होतील ना, तेव्हा तर आत्म्यांना घेऊन जातील. तर अशा बाबा बरोबर प्रीत बुध्दी झाली पाहिजे. एका बरोबरच प्रेम करावयाचे आहे. त्याचीच आठवण करावयाची आहे. मायेचे तुफान तर येतील. कर्मेइंद्रिया कडून कोणते विकर्म करायचे नाही. ते बेकायदा होते. बाबा म्हणतात कि, मी येऊन या शरीराचा आधार घेत आहे. हे यांचे शरीर आहे ना. तुम्हाला आठवण शिवबाबांची करावयाची आहे. तुम्ही जाणता कि, ब्रह्मा पण बाबा आणि शिव पण बाबा आहेत. विष्णू आणि शंकराला बाबा म्हणत नाहीत. शिव आहेत निराकार पिता. प्रजापिता ब्रह्मा आहेत साकारी पिता. आता तुम्ही साकारद्वारे निराकार पित्याकडून वारसा घेत आहात. दादा यांच्यात प्रवेश करतात मग म्हणतात दादाचा वारसा पित्याद्वारे आम्ही घेतो. दादा (आजोबा) निराकार आहे. पिता आहे साकार. या आश्चर्यकारक नवीन गोष्टी आहेत. त्रिमुर्ती दाखवतात परंतू समजत नाहीत. शिवाला दाखवित नाहीत. बाबा किती चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत आहेत, तर खुशी राहिली पाहिजे. आम्ही विद्यार्थी आहोत. बाबा आमचे पिता शिक्षक, सतगुरु आहेत. आता तुम्ही जगाचा इतिहास भूगोल बेहदच्या बाबांकडून ऐकत आहात, मग इतरांना पण सांगत आहात. हे 5 हजार वर्षांचे चक्र आहे, कॉलेज मधील मुलांना जगाचा इतिहास, भूगोल समजावला पाहिजे. 84 जन्माची शिडी काय आहे, भारताची चढती कला आणि उतरी कला कशी होते, हे सांगावायचे आहे. सेकंदामध्ये भारत स्वर्ग बनत आहे, परत 84 जन्मामध्ये, भारत नरक बनत आहे. या तर फारच सहज समजण्याच्या गोष्टी आहेत. भारत सुवर्णयुगातून लोहयुगात कसा आला आहे, हे तर भारतवासीयांना सांगितले पाहिजे. शिक्षकांनी पण समजावले पाहिजे. ते आहे शरीराचे ज्ञान, हे आहे आत्म्याचे ज्ञान. ते मनुष्य देतात, हे ईश्वरीय पिता देतात. ते आहेत मनुष्य सृष्टीचे बीजरुप, तर त्यांचे जवळ मनुष्य सृष्टीचेच ज्ञान आहे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. या छी छी शरीरापासून नष्टोमोहा बनून ज्ञानाचे अतिइंद्रिय सुखामध्ये राहायचे आहे. बुध्दीमध्ये ठेवावे कि ही दुनिया बदलत आहे, आम्ही आता आमचे सुखधामला जात आहे.

2. विश्वस्त बनून सर्व काही सांभाळून, कशातच ममत्त्व ठेवायचे नाही. एका बाबा बरोबर खरी प्रीत ठेवायची आहे. कमेंद्रियाद्वारे कोणते पण विकर्म करावयाचे नाही.

वरदान:-
सर्व कर्मेइंद्रियाचे आकर्षणापासून दूर , कमळासारखे राहणारे दिव्यबुध्द ी आणि दिव्यनेत्राचे वरदानी भव

बापदादाकडून प्रत्येक ब्राह्मण मुलाला जन्मताच दिव्य समर्थ बुध्दी आणि दिव्य नेत्राचे वरदान मिळाले आहे. जी मुले आपल्या जन्मदिवसाची ही भेट नेहमी यथार्थ रितीने वापर करतात, ते कमळ फुलासारखे श्रेष्ठ स्थितीच्या आसनावर स्थित राहतात. कोणत्याही प्रकारचे आकर्षण, देहाचे संबंध, देहाचे पदार्थ वा कोणती पण कर्मेइंद्रिय त्यांना आकर्षित करु शकत नाही. ते सर्व आकर्षणापासून दूर राहून नेहमी हर्षित राहतात. ते स्वत:ला कलियुगी पतित विकारी आकर्षणापासून किनारा केलेले अनुभव करतात.

बोधवाक्य:-
जेव्हा कोणती पण आसक्ती राहत नाही , तेव्हा शक्ती स्वरुप अवस्था प्रत्यक्ष होईल...!!!


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
लगावाचे दोरखंड तपासा. बुध्दी कोठे कच्चा धाग्यामध्ये तर अटकली नाही ना? कोणते सुक्ष्म बंधन पण नसावे, स्वत:चे शरीरामध्ये पण लगाव नसावा. असे स्वतंत्र म्हणजे स्पष्ट बनण्यासाठी बेहदचे वैरागी बना, तेव्हा अव्यक्त स्थितीत राहू शकाल.