16-02-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
25.11.1985 ओम शान्ति
मधुबन
निश्चय बुद्धि विजयी
रत्नांची लक्षणे
आज बाप दादा आपल्या
निश्चयप बुद्धी विजयी रत्नांच्या माळेला पाहत होते.सर्व मुलं स्वतःला समजतात की
निश्चया मध्ये पक्का आहे.असे कोणी थोडेच असतील जे स्वतःला निश्चय बुद्धी मानत नसतील.
कोणालाही विचारा निश्चय आहे?तर हेच म्हणतील,निश्चय नसता तर ब्रह्माकुमार
ब्रह्माकुमारी कसे बनले असतो.निश्चयाच्या प्रश्नावर ती सर्व होय असेच म्हणतात.सर्व
निश्चय बुद्धी बसले आहेत,असेच म्हणाल ना.नाही तर जे समजतात निश्चय होत आहे,त्यांनी
हात वरती करा.सर्व निश्चय बुद्धी आहेत.अच्छा,जेव्हा सर्वांना पक्का निश्चय आहे,तर
विजय माळेमध्ये नंबर का आहेत?निश्चया मध्ये सर्वांचे एकच उत्तर मिळते ना?परत नंबर
का? कुठे अष्ट रत्न, कुठे 100 रत्न आणि कुठे 16000 रत्न याचे कारण काय? अष्ट देवाचे
पूजन गायन आणि 16000 माळेतील मण्याचे गायन आणि पूजन मध्ये खूप अंतर आहे.बाबा एकच
आहेत आणि तुम्ही मुलं एकाची आहात,तर हा निश्चय आहे परत अंतर का? निश्चय बुद्धीमध्ये
टक्केवारी असते का? निश्चया मध्ये जर टक्केवारी असेल तर त्याला निश्चिय म्हनणार
का?८ रत्न पण निश्चय बुद्धी,16000 वाले पण निश्चय टबुध्दीच म्हणणार ना. निश्चय
बुद्धीची लक्षणे विजय आहे,म्हणून गायन आहे निश्चय बुद्धी विजयंती.तर निश्चय म्हणजे
विजयी आहातच.कधी विजय,कधी नाही असे होऊ शकत नाही. परिस्थिती कशी असू द्या परंतु
निश्चय बुद्धी मुलं परिस्थितीमध्ये पण स्वतःच्या स्वस्थिती ची शक्ती नेहमी विजय
अनुभव करतील,अर्थात विजय माळेचा मणका बनले,गळ्यातील हार बनले,त्यांची माये पासून
कधीच हार होऊ शकत नाही.जरी दुनिया दुनियेतील लोक किंवा ब्राह्मण परिवारातील संबंध
संपर्का मधील दुसरे, समजतील किंवा म्हणतील यांची तर हार झाली परंतु ती हार नाही,जीत
आहे कारण कुठेकुठे पाहण्यामध्ये किंवा करणाऱ्यां चा गैरसमज होतो.नम्रचित,निर्माण
किंवा होय जी चा पाठ पक्का करणाऱ्या आत्म्याच्या प्रति कधी गैरसमजुती द्वारे त्याची
हार होऊ शकते,दुसऱ्यांना त्यांची हार दिसून येते परंतु वास्तविक विजय आहे.फक्त त्या
वेळेत दुसऱ्यांच्या सांगण्यामुळे किंवा वातावरणामध्ये स्वतःची निश्चय बुद्धी,संशयाचे
रूप बनायला नको.माहित नाही हार आहे की जीत आहे,हा संशय न ठेवता स्वतःच्या निश्चया
मध्ये पक्के राहा. तर ज्याला आज दुसरे लोक हार म्हणतात, ते उद्या वाह वाह चे पुष्प
चढवतील. विजयी आत्म्याला आपल्या मनामध्ये,आपल्या कर्मा प्रती कधीच दुविधा होणार
नाही,मी चुकीचा आहे किंवा बरोर आहे.दुसऱ्यांना सांणणे वेगळी गोष्ट आहे.दुसरे कोणी
बरोबर म्हणतील, कोणी चुकिचे म्हणतील परंतु आपले मन निश्चय बुद्धी हवे की,मी विजयी
आहे. बाबां मध्ये निश्चयाच्या सोबत स्वतःचा पण निश्चय पाहिजे.निश्चय बुद्धी म्हणजेच
विजयी मन अर्थात संकल्प शक्ती नेहमी स्वच्छ असल्यामुळे होय किंवा नाही चे स्वतः
प्रती किंवा दुसऱ्या प्रती निर्णय सहज सत्य आणि स्पष्ट असतील म्हणून,माहित नाही हा
संभ्रम दुविधा नसेल.निश्चय बुद्धि विजयी रत्नांची ची लक्षणे,सत्य निर्णय असल्यामुळे
मनामध्ये थोडा पण संभ्रम नसेल,नेहमी आनंदात असेल.आनंदाची लाट असेल. जरी परिस्थिती
अग्नी सारखी असेल परंतु अग्नी परिक्षा विजयाच्या आनंदाचा अनुभव करवेल कारण
परीक्षेमध्ये विजय होतील ना.आत्ता लौकिक मध्ये कोणत्या ही गोष्टींमध्ये विजय
होतो,तर आनंद साजरा करण्यासाठी,हासत नाचत टाळ्या वाजवतात,ही लक्षणे आनंदाची लक्षणे
आहेत.निश्चय बुद्धी कधी कोणत्याही कार्यामध्ये स्वतःला एकटे अनुभव करणार नाहीत.सर्व
एकीकडे आहेत,मी एकटा दुसरीकडे आहे,जरी अनेकानेक आत्मे दुसरीकडे आहेत परंतु विजय
रत्न फक्त एक असले तरी,ते स्वतःला एकटे नाही परंतु बाबा माझ्यासोबत आहेत म्हणून
बाबांच्या मागे पुढे अक्षोणी सेना काहीच नाही.जेथे बाबा आहेत तेथे सर्व संसार
बाबामध्येच आहे.बीज आहे तर त्यामध्ये झाड आहेच.विजयी निश्चय बुद्धी आत्मा, नेहमी
स्वतःला बाबांच्या छत्रछाये खाली समजतील.आधार देणारे दाता माझ्या सोबत आहेत,हे सहज
अनुभव करवतो. असे नाही जेव्हा समस्या येईल त्या वेळेत म्हणतील बाबा तुम्ही तर
माझ्यासोबत आहात ना.तुम्हीच मदतगार आहात ना. बस आता तुम्हीच आहात.असा स्वार्थाचा
आधार घेणार नाहीत.तुम्ही आहात ना,असे आहेत ना, याचा अर्थ काय झाला? निश्चय झाला?
बाबांना पण आठवण करुन देतात की तुम्ही आधार आहात.निश्यय बुद्धी कधी असे संकल्प पण
करू शकत नाहीत. त्याच्या मनामध्ये जर पण आधार नसल्याचा किंवा एकटेपणाचा संकल्प
मात्र पण अनुभव होणार नाही.निश्चय बुद्धि विजयी असल्यामुळे नेहमी आनंदामध्ये नाचत
राहतील,कधी उदास किंवा अल्प काळाचे हदचे वैराग्याच्या लाटेमध्ये पण येणार
नाहीत.अनेक वेळेस जेव्हा मायेचा जोरात आघात होतो, तेव्हा अल्प काळाचे वैराग्य पण
येते परंतु ते हदचे अल्प काळाचे वैराग असते.बेहदचे नेहमीसाठी चे नसते. मजबूरी द्वारे
वैराग्य उत्पन्न होते म्हणून त्यावेळेस म्हणतात यापेक्षा तर याला सोडलेले चांगल.मला
वैराग्य आला आहे.सेवा पण सोडून देऊ,हे पण सोडून देऊ.वैराग येते परंतु ते बेहदचे असत
नाही विजय रत्न नेहमी हार मध्ये जीत आणि जीत मध्ये पण जीत चा अनुभव करतील. हदचे
वैराग ला किनारा करणे म्हणतात.नाव वैराग्य असते परंतु किनारा होतो,तर विजय रत्न
कोणत्याही कार्याशी समस्याशी,व्यक्तिशी किनारा करणार नाहीत परंतु सर्व कर्म करत
असताना सामना करताने पण सहयोगी बनत,बेहदच्या वैराग वृत्तीमध्ये राहतील.जे नेहमी साठी
आहे.निश्चय बुद्धी कधीच, आपल्या विजयाचे वर्णन करणार नाहीत. दुसऱ्या ची तक्रार
करणार नाहीत,पहा मी तर बरोबर होतो ना.ही गोड तक्रार करणार नाहीत.हे तक्रार करणे
किंवा वर्णन करणे, हे खाली पणाची लक्षणं आहेत.खाली वस्तू एकदम उसळते,जितके भरपूर
असेल तेवढे उसळणार नाहीत.विजय नेहमी दुसऱ्याची हिम्मत वाढवतील,हिम्मत कमी करण्यासाठी
प्रयत्न करणार नाहीत,कारण विजय रत्न बाप सामान,मास्टर आधार दाता आहेत.खालच्या
व्यक्तींना उठवणारे आहेत.निश्चय बुद्धी व्यर्थ पासून नेहमी दूर राहतील.जर ते व्यर्थ
संकल्प असतील, बोल किंवा कर्म असतील.व्यर्थ पासून किनारा म्हणजे विजयी आहेत.व्यर्थ
च्या कारण कधी हार,कधी जीत होते.व्यर्थ समाप्त होते,तर हार समाप्त होते.व्यर्थ
समाप्त होणे हे,विजयी रत्नची लक्षणं आहेत.आता हे तपासून पहा,निश्चय बुद्धी विजयी
रत्नांची लक्षणे अनुभव होतात का? असे ऐकवले होते ना,निश्चित बुद्धी तर आहेत,खरे
बोलतात परंतु निश्चिय बुद्धी एक आहेत जानण्या पर्यंत, मानण्या पर्यंत आणि एक आहे
चालण्या पर्यंत.मानतात सर्व कि भगवान मिळाले आहेत,भगवंताचे बनलो.मानणे व जाणणे एकच
गोष्ट आहे परंतु चालण्या मध्ये क्रमानुसार आहेत.तर जाणतात पण मानतात पण,यामध्ये ठीक
आहेत परंतु तिसरी गोष्ट माणुन,जाणून त्याच्या वरती चालणे.प्रत्येक पावला मध्ये
निश्चयाचा विजय किंवा प्रत्यक्षात लक्षणे दिसून दिसतात,यामध्ये अंतर आहे म्हणून
क्रमानुसार बनले आहेत.समजले नंबर किंवा क्रमांक का बनले आहेत?
याला म्हटले जाते नष्टोमोहा.नष्टोमोहाची परिभाषा खूपच रहस्य युक्त आहे,ते परत कधी
ऐकवू.निश्चय बुद्धी नष्टमोहाची शिडी आहे.अच्छा आज दुसरा ग्रुप आलेला आहे. घरातील
बालकच मालक आहेत,तर घराचे मालक आपल्या घरी आले आहेत,असे म्हणणार ना.घरामध्ये आला
आहात की, घरांतुन आले आहात.जर त्याला घर समजाल तर ममत्व जाईल,परंतु ते तात्पुरते
सेवा स्थान आहे.घर तर सर्वांचे मधुबनच आहे ना.आत्म्याच्या नात्याने परमधाम
आहे.ब्राह्मणाच्या नात्याने मधुबन आहे. जेव्हा म्हणतात की मुख्य कार्यालय माउंट आबू
आहे.तर जिथे राहतात ते काय झाले? कार्यालय झाले ना.तेव्हा तर मुख्य कार्यालय
म्हणतात ना.तर घरांमधून आलो नाहीत परंतु घरामध्ये आले आहात. कार्यालय तर कोणाचे बदली
पण होऊ शकते.घरांमधून काढू शकत नाहीत. कार्यालय तर बदली होऊ शकते घर समजाल तर माझे
पण राहील.सेवा केंद्राला पण घर बनवतात,तेव्हा माझे पण येते. सेवाकेंद्र समजतील तर
माझे पण जाणार नाही.घर बनते,आरामाचे स्थान बनते,तेव्हा माझे पण राहते.तर आपल्या घरी
आले आहात.ही जी म्हण आहे,आपले घर दाताचे दर. हे कोण कोणत्या स्थानासाठी गायन
आहे.वास्तविक दाताचा दर तर आपले घर मधुबन आहे ना.आपल्या घरांमध्ये म्हणजेच दाताच्या
घरी आले आहात.घर किंवा दर एकच गोष्ट आहे ना. आपल्या घरी आल्यानंतर आराम मिळतो
ना.मनाचा आराम,तनाचा आराम,धनाचा आराम.धन कमवण्यासाठी थोडेच जावे लागते.भोजन
बनवा,नंतर खावा,याद्वारे पण आराम मिळतो.थाळीमध्ये बनवलेले भोजन मिळते.येथे तर ठाकूर
बनतात.जसे ठाकूरांना मंदिरांमध्ये घंटी वाजवतात, ठाकूरला उठवायचे असेल,झोपवायचे
असेल,तर घंटी वाजवतात.प्रसाद अर्पण करतात तरी घंटी वाजवतात.तुमची पण घंटी वाजते
ना.आजकाल तर फॅशन आहे, गीत वाजल्यानंतर झोपतात,परत गीत वाजल्यानंतर उठतात,तर ठाकूर
झाले ना. येथील पध्दत परत भक्ती मार्गामध्ये कॉपी करतात.येथे पण तीन-चार वेळेस भोग
लागतो.तर चैतन्य ठाकूरांना चार वाजल्या पासून भोग लावण्यास सुरू होते.अमृत
वेळेपासून भाग सुरु होतो.चैतन्य स्वरूपा मध्ये भगवान मुलांची सेवा करत आहेत.
भगवंताची सेवा तर सर्व करतात परंतु येथे भगवान स्वतः सेवा करतात,कोणाची चैतन्य
ठाकूरांची.हा निश्चय नेहमी आनंदामध्ये झुलवत राहील.समजले,सर्व झोन,विभागा,मधील लाडके
आहात.जेव्हा जो झोन येतो,तो लाडकाच आहे.लाडके तर आहात परंतु फक्त बाबा चे लाडके
बना.खूपच लाड करतात जे पण आले आहेत भाग्यवान आले आहात, भगवंताजवळ आले आहात.अच्छा.
नेहमी प्रत्येक संकल्पा मध्ये निश्चय बुद्धी विजय रत्न,नेहमी भगवान आणि भाग्याच्या
स्मृती स्वरूप आत्म्याना,नेहमी हार आणि जीत दोघांमध्ये विजय अनुभव करणाऱ्या
आत्म्याना,नेहमी आधार अर्थात सहयोग देणारे मास्टर आधार दाता आत्म्यांना,नेहमी
स्वतःला बाबांच्या सोबत अनुभव करणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, बाप दादांची
प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
पार्टीसोबत
यांची अव्यक्त बापदादा चा वार्तालाप :-
(१) सर्व एका
लगन मध्ये मगन राहणारे श्रेष्ठ आत्मे आहात? साधारण तर नाही. सदा श्रेष्ठ आत्मे जे
पण कर्म करतील ते श्रेष्ठच होईल.जेव्हा जन्मच श्रेष्ठ आहेत तर कर्म साधारण कसे
होतील.जेव्हा जन्म बदलतो तर कर्म पण बदलते.नाव, रूप, देश, कर्म सर्व बदलते.तर नेहमी
नवा जन्म,नव्या जन्माच्या नवीनतेचा च्या उमंग उत्साहा मध्ये राहतात.जे कधीकधी
राहणारे आहेत,त्यांना राज्य पण कधी कधी मिळेल.जे निमित्त बनलेले आत्मा आहेत, त्यांना
निमित्त बनण्याचे फळ मिळत राहते, आणि फळे खाणारे शक्तिशाली होतात.हे प्रत्यक्ष फळ
आहे,श्रेष्ठ युगाचे फळ आहे. याचे फळ खाणारे नेहमीच शक्तिशाली असतील.असे शक्तिशाली
परिस्थितीच्या वरती सहज विजय प्राप्त करतात. परिस्थिती खाली आणि ते वरती राहतात.
श्रीकृष्ण साठी दाखवतात त्यांनी सापावरती पण विजय मिळवला.सापाच्या डोक्यावर ठेवून
नाचला.तर हे चित्र तुमचे आहे.किती पण विषारी साप असतील, तुम्ही त्याच्यावर विजय
प्राप्त करुन नाचणारे आहात. ही श्रेष्ठ शक्तिशाली स्मृती सर्वांना समर्थ बनवेल आणि
जिथे समर्थता आहे तिथे व्यर्थ समाप्त होते.समर्थ बाबा सोबत आहेत,या स्मृती च्या
वरदाना द्वारे नेहमी पुढे चला.
(२) सर्व अमर बाबांचे अमर आत्मे आहात ना.अमर झाले ना.शरीर सोडतात तर अमर झाले कारण
भाग्य बणवून जात आहात.खाली हात जात नाहीत,यामुळे मरणे नाही.भरपूर होऊन जायचे
आहे,मृत्यू होणे म्हणजे खाली हात जाणे.भरपूर होऊन जाणे म्हणजे शरीर बदली करणे. तर
अमर झाले ना.अमर भवचे वरदान मिळाले, यामुळे मृत्यूच्या वशीभूत होत नाहीत.तुम्ही
जानता जायचे पण आहे आणि परत यायचे पण आहे,म्हणून अमर आहात,अमर कथा ऐकत ऐकत अमर बनले.
रोज रोज प्रेमाने कथा एऐकतात ना. बाबा अमर कथा ऐकवून अमर भव चे वरदान देत आहेत.बस
नेहमी याच आनंदा मधे रहा की,अमर बनलो,मालामाल बनलो. खाली हात आलो होतो,भरपूर
झालो.असे भरपूर झालो,जे अनेक जन्म खाली होऊ शकत नाहीत.
(३) सर्व आठवणीच्या यात्रेमध्ये पुढे जात आहात ना.ही आत्मिक यात्रा नेहमीच सुखदाई
अनुभव करवेल.या यात्रे द्वारे नेहमी साठी सर्व यात्रा पूर्ण होतात.आत्मिक यात्रा
केली तर,सर्व यात्रा झाल्या आणि दुसऱ्या दुसऱ्या कोणत्या यात्रा करण्याची आवश्यकताच
राहत नाही. कारण ही महान यात्रा आहे ना.महान यात्रेमध्ये सर्व यात्रा सामावलेल्या
आहेत. पूर्वी यात्रा मध्ये भटकत होते,आता या आत्मिक यात्रे द्वारे ठिकाण्या वरती
पोहोचले आहात.आता मनाला ठिकाणा मिळाला,तर तनाला पण ठिकाणा मिळाला.या यात्रे द्वारे
अनेक प्रकारचे भटकणे बंद झाले.तर नेहमी आत्मिक यात्रेच्या स्मृतीमध्ये रहा.याद्वारे
नेहमी उपराम रहाल,अनासक्त रहाल,निर्मोही राहाल.कोणामध्ये पण मोह जाणार नाही.
यात्रीचा कोणा मध्ये मोह जात नाही. अशी स्थिती नेहमी राहावी.
निरोप घेते
वेळेत :-
बाप दादा सर्व
देश विदेशाच्या मुलांना पाहून खुश होतात,कारण सर्व सहयोगी मुल आहात.सहयोगी मुलांना
बाप दादा नेहमी हृदयासिन समजून आठवण करत आहेत.सर्व निश्चय बुद्धी बाबांचे प्रिय
आहात,कारण सर्व गळ्यातील हार बनले आहात.अच्छा.सर्व मुलं सेवे मध्ये चांगल्या प्रकारे
वृद्धि करत आहेत,अच्छा.
वरदान:-
खऱ्या
सेवेद्वारे अविनाशी आनंदाच्या सागरामध्ये राहणारे खुशनसीब आत्मा भव .
जी मुलं सेवेमध्ये
बाप दादा आणि निमित्त मोठ्यांच्या स्नेहाचे आशीर्वाद प्राप्त करतात त्यांना मनामधून
अलौकिक आत्मिक खुशीचा अनुभव होतो.ते सेवेद्वारे आंतरिक आनंद,आत्मिक मौज प्राप्तीचा
अनुभव करत,नेहमी आनंदाच्या सागरामध्ये राहतात.खरी सेवा,सर्वांच्या स्नेहा द्वारे
अविनाश सन्मान आणि आनंदाचे आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे खूष नशिबाच्या श्रेष्ठ
भाग्याचा अनुभव करतात. जे नेहमी खुश आहेत तेच खुशनसीब आहेत.
सुविचार:-
नेहमी हर्षित
व आकर्षक मुर्त बनवण्यासाठी संतुष्ट मनी बना .
सूचना :-आज
आंतरराष्ट्रीय योग दिवस तिसरा रविवार आहे.सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत,सर्व
भाऊ-बहिणी संघटित रूपामध्ये एकत्रित योगाच्या अभ्यासामध्ये, हाच शुभ संकल्प करा
की,मज आत्म्या द्वारे पवित्रतेची किरणे निघून साऱ्या विश्वाला पावन बनवत आहेत.मी
मास्टर पतित पावन आत्मा आहे.