29-02-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो , माया दुश्मन ( शत्रु ) तुमच्या समोर आहे म्हणून स्वत : ला खुप - खुप
सांभाळायचे आहे . जर चालता - चालता मायेमध्ये फसाल तर आपल्या भाग्याला गमावून बसाल
...
प्रश्न:-
तुम्हां
राजयोगी मुलांचे मुख्य कर्तव्य काय आहे?
उत्तर:-
शिकणे आणि शिकवणे, हेच तुमचे मुख्य कर्तव्य आहे. तुम्ही आहात ईश्वरीय मतावर.
तुम्हाला कुठे जंगलामध्ये जायचे नाही. घर गृहस्थामध्ये राहून शांतीमध्ये बसून
बाबांची आठवण करायची आहे. अल्फ (परमात्मा) आणि बे (राजाई) या दोन शब्दांमध्ये तुमचे
सर्व शिक्षण येते.
ओम शांती।
बाबाही ब्रह्माद्वारे म्हणू शकतात की, मुलांनो गुड मॉर्निंग (सुप्रभात) परंतू नंतर
मुलांनाही उत्तर (प्रतिसाद) दयावा लागेल. येथे आहे पिता आणि मुलांचा संबंध. नविन जे
आहेत जोपर्यंत पक्के होत नाहीत, काही ना काही विचारत राहतात. हे तर शिक्षण आहे,
भगवानुवाच लिहले आहे. भगवान आहे निराकार. हे बाबा चांगल्याप्रकारे पक्के करतात
कोणालाही समजावण्यासाठी, कारण की त्याबाजूला आहे मायेचा जोर. येथे तर ती गोष्ट नाही.
बाबा तर समजावत ज्यांनी कल्पापुर्वी वारसा घेतला आहे. ते आपोआप येतील. असे नाही की
आमका जायला नको, त्याला पकडा. निघून गेला तर गेला, येथे तर जिवंतपणी मरायचे आहे.
बाबा दत्तक घेतात. दत्तक घेतले जाते काहीतरी वारसा देण्यासाठी. मुले आई-वडिलांकडे
वारसा मिळण्याच्या हव्यासानी येतात. साहुकारांचा मुलगा कधी गरीबांकडे दत्तक जाईल
का! एवढे धन-दौलत इ. सोडून कसा जाईल. दत्तक घेतात साहुकार. आता तुम्ही जाणता बाबांनी
आम्हाला दत्तक घेतले आहे, बेहदचा वारसा देण्यासाठी, बाबा आम्हाला स्वर्गाची बादशाही
देतात. मग का नाही त्यांचे बनणार. प्रत्येक गोष्टीचा हव्यास तर असतोच ना. जेवढे
जास्ती शिकाल तेवढा मोठा हव्यास असणार. बाबाही म्हणतात. तुम्हा सर्वांना 5 हजार
वर्षापुर्वी प्रमाणे दत्तक घेतो. तुम्हीही म्हणता बाबा आम्ही तुमचे आहोत. 5 हजार
वर्षापुर्वी ही तुमचे बनलो होतो. तुम्ही प्रत्यक्षात किती ब्रह्मा कुमार-कुमारी
आहात. प्रजापिता पण सुप्रसिध्द आहे. जोपर्यंत शुद्र पासून ब्राह्मण बनत नाही.
तोपर्यंत देवता बनू शकत नाही. तुम्हा मुलांच्या बुध्दीमध्ये आता हे चक्र फिरत राहते.
आम्ही शुद्र होतो, आता ब्राह्मण आहोत नंतर देवता बनणार आहोत. सतयुगात आम्ही राज्य
करु. तर या जुन्या दुनियेचा विनाश जरुर होणार आहे. पुर्ण निश्चय बसला नसेल तर निघून
जातात. काही कच्चे आहेत जे घसरतात, हे ही ड्रामामध्ये नोंद आहे. माया दुश्मन समोर
उभी आहे, तर ती स्वत:कडे आकर्षित करते. बाबा क्षणो-क्षणी पक्के करवतात, मायेमध्ये
फसू नका नाहीतर आपले भाग्य गमावून बसाल. बाबाच विचारु शकतात की अगोदर केव्हा भेटले
होते? दुसऱ्या कोणाला विचारण्याची अक्कल येणार नाही. बाबा म्हणतात मलाही पुन्हा गीता
ऐकवण्यासाठी यावे लागते. येऊन रावणाच्या तुरुंगातून सोडवायला हवे. बेहदचा बाप
बेहदच्या गोष्टी समजावतात. आता रावणाचे राज्य आहे. पतित राज्य आहे. जे अर्ध्या
कल्पापासून सुरु झाले आहे. रावणाला 0 तोंडे दाखवतात विष्णूला 4 हात दाखवतात. असा
कोणी मनुष्य असत नाही. हा तर प्रवृत्ती मार्ग दाखवला आहे. हे आहे जीवनाचे लक्ष्य,
विष्णूद्वारे पालना. विष्णूपुरीला कृष्णपुरी असेही म्हणतात. कृष्णाला तर 2 हात
दाखवतात ना. मनुष्याला तर काहीच समजत नाही. बाबा प्रत्येक गोष्ट समजावतात. तो सर्व
आहे भक्तीमार्ग. आता तुम्हाला ज्ञान आहे. तुमचे लक्ष्य आहे नरापासून नारायण बनण्याचे.
ही गीता पाठशाळा, जीवनमुक्ती प्राप्त करण्यासाठी आहे. ब्राह्मण तर जरुर पाहिजेत. हा
आहे रुद्र ज्ञान यज्ञ. शिवाला रुद्र ही म्हणतात. आता बाबा विचारतात ज्ञान यज्ञ
कृष्णाचा आहे का शिवाचा आहे? शिवाला परमात्मा म्हणतात, शंकराला देवता म्हणतात.
त्यांनी शिव आणि शंकराला एकत्र केले आहे. आता बाबा म्हणतात मी यांच्यामध्ये प्रवेश
केला आहे. तुम्ही मुले बापदादा असे म्हणता. ते म्हणतात शिवशंकर ज्ञानसागर तर एकच आहे.
आता तुम्ही जाणता ब्रह्मा पासून विष्णू ज्ञानानी बनतो. चित्र ही बरोबर बनवले आहे.
विष्णूच्या नाभीतून (बेंबीतून) ब्रह्मा निघाला याचा अर्थही कुणी समजू शकत नाही.
ब्रह्माला ग्रंथ हातात दिले आहेत. आता ग्रंथाचे सार बाबा सांगतात का ब्रह्मा? हा ही
मास्टर ज्ञान सागर बनतो. बाकी चित्र एवढे सारे बनवलेत. ते काही यथार्थ (योग्य)
नाहीत. ते आहेत सर्व भक्तीमार्गाचे. मनुष्याला काही 8-10 हात नसतात. हा तर फक्त
प्रवृत्ती मार्ग दाखवला आहे. रावणाचा ही अर्थ सांगितला आहे-अर्धाकल्प आहे रावणराज्य,
रात्रं. आर्धाकल्प आहे रामराज्य दिवस, बाबा प्रत्येक गोष्ट समजावतात. तुम्ही सर्व
एक बाबांची मुले आहात. बाबा ब्रह्मा द्वारा विष्णूपुरीची स्थापना करतात आणि तुम्हाला
राजयोग शिकवतात. जरुर संगमयुगावर राजयोग शिकवतील. द्वापरमध्ये गीता ऐकवली हे तर
चुकीचे आहे. बाबा सत्य सांगतात. अनेकांना ब्रह्मांचा, कृष्णाचा साक्षात्कार होतो.
ब्रह्माला सफेद वस्त्रामध्येच पाहतात. शिवबाबा तर आहे बिंदू, बिंदूचा साक्षात्कार
झाला तर काहीच समजणार नाही. तुम्ही म्हणता मी आत्मा आहे, आता आत्म्याला कुणी
पाहिलेय का, कुणीच नाही. तो तर आहे बिंदू.समजू शकतात ना. जो ज्या भावनेने ज्याची
पुजा करतो, त्याला तोच साक्षात्कार होतो. दुसरे रुप पाहिले तर गोंधळून जाईल. हनुमान
ची पुजा केली तर त्याला तोच दिसेल. गणेशाच्या पुजाऱ्याला तोच दिसेल. बाबा म्हणतात
मी तुला एवढे धनवान बनवले, हिऱ्या जवाहरांचे महल होते. तुम्हांकडे मोजता येणार नाही
एवढे धन होते, तुम्ही आता ते सर्व कुठे गमावले? आता तुम्ही कंगाल (गरीब) बनले आहात,
भीक मागत आहात, बाबा तर म्हणू शकतात ना. आता तुम्ही मुले समजता, बाबा आले आहेत,
आम्ही पुन्हा विश्वाचे मालक बनतो. हा ड्रामा अनादि बनलेला आहे. प्रत्येकजण
ड्रामामध्ये आपली भुमिका सादर करत आहे. कुणी एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेतो, यामध्ये
रडण्यासारखे काय आहे. सतयुगात कधी रडत नाहीत. आता तुम्ही मोहजीत बनत आहात. मोहजीत
राजे हे लक्ष्मी-नारायण इ. आहेत तिथे मोह नसतो. बाबा अनेक प्रकारच्या गोष्टी समजावत
राहतात. बाबा आहे निराकार, मनुष्य तर त्याला नावा-रुपापासून न्यारा असे म्हणतात. पण
नावारुपापासून न्यारी कोणतीही गोष्ट असू शकत नाही. हे भगवान, असे गॉड फादर असे
म्हणतात ना. तर नाव-रुप आहे ना. लिंगाला शिव परमात्मा, शिवबाबा ही म्हणतात. बाबा तर
आहे ना. बरोबर बाबांची मुलेही जरुर असणार. निराकाराला निराकार आत्माच बाबा म्हणते.
मंदीरात गेल्यावर शिवबाबा म्हणतात, नंतर घरी आल्यावर वडीलांनाही बाबा म्हणतात. अर्थ
तर समजत नाहीत, आम्ही त्यांना शिवबाबा का म्हणतो! बाबा सर्वांत मोठे शिक्षण दोन
अक्षरांमध्ये शिकवतात. अल्फ आणि बे. अल्फ (परमात्मा) ची आठवण करा तर बे (राजाई)
तुमची आहे. ही खुप मोठी परिक्षा आहे. मनुष्य मोठी परिक्षा पास झाल्यानंतर पहिले
शिक्षण लक्षात थोडीच राहते. शिकता-शिकाता शेवटी सार बुध्दीमध्ये येतो. येथेही तसेच
आहे. तुम्ही शिकत आला आहात. शेवटी बाबा म्हणतात मनमनाभव, तर देहाचा अभिमान सुटेल.
ही मनमनाभव ची सवय लागली तर शेवटी बाबा आणि वारसा आठवणीत राहिल. मुख्य हेच आहे, किती
सहज आहे. त्या शिक्षणामध्ये आता तर माहित नाही काय-काय शिकतात. जसा राजा तसा तो आपली
रस्म (रिती-रिवाज) चालवतो पुर्वी मन, शेर, पावशेरचा हिशोब चालत होता. आता तर किलो
इ. काय-काय निघाले आहे. किती वेगळे वेगवळे प्रांत झाले आहेत. दिल्लीमध्ये जी वस्तू
एक रुपया शेर, मुंबई मध्ये मिळेल दोन रुपया शेर, कारण प्रांत वेगळे वेगळे आहेत ना.
प्रत्येक जण समजतात आम्ही आमच्या प्रातांला (भागाला) उपाशी थोडीच मारणार आहे. किती
भांडणे होत राहतात. किती वैताग आहे.
भारत किती धनवान होता परत 84 चे चक्र लावून कंगाल बनलेला आहे. म्हटले जाते
हिऱ्यासारखा अनमोल जन्म कौंडीसाठी वाया घालविला..... बाबा म्हणतात तुम्ही कोंडीच्या
मागे का मरता. आता तर बाबांकडून वारसा घ्या, पावन बना, बोलवताही हे पतित-पावन ये
पावन बनव. तर यावरुन सिध्द होते की, पावन होतो, आता नाहीत. आता आहे कलियुग, बाबा
म्हणतात मी पावन दुनिया बनवत आहे तर पतित दुनियेचा जरुर विनाश होईल म्हणूनच ही
महाभारत लढाई आहे, जी या रुद्र ज्ञान यज्ञामधून प्रज्वलित झाली आहे. ड्रामामध्ये तर
ही विनाश होण्याची ही नोंद आहे. सुरुवातीला तर बाबांना साक्षात्कार झाला. पाहिले
एवढी मोठी राजाई मिळत आहे तर खुप खुशी व्हायला लागली, नंतर विनाशाचा साक्षात्कारही
करवला. मनमनाभव, मध्याजीभव. हे गीतेचे अक्षर आहेत. काही-काही अक्षर गीतेचे ठीक आहेत.
बाबाही म्हणतात तुम्हाला हे ज्ञान ऐकवतो, हे नंतर लोप पावते. कुणालाही माहित नाही
कि लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तर तेव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता. त्यावेळी
लोकसंख्या किती थोडी असेल, आता किती आहे. तर ही बदलायला हवी. जरुर विनाश व्हायला
पाहिजे. महाभारत लढाई पण आहे. जरुर भगवान ही असेल. शिवजयंती साजरी करतात तर
शिवबाबांनी येऊन काय केले? तेही माहित नाही. आता बाबा समजावतात, गीतेमुळे कृष्णाच्या
आत्म्याला राजाई मिळाली. मात-पिता म्हणतात गीतेला, ज्यामुळे तुम्ही देवता बनता.
म्हणूनच चित्रामध्ये दाखवले आहे, कृष्णांनी गीता सांगितली नाही. कृष्ण गीतचे ज्ञान
आणि राजयोग शिकुन हे बनला. उदया परत कृष्ण असेल. त्यांनी शिवबाबांच्या बदल्यात
कृष्णाचे नाव लिहले आहे. तर बाबां सांगतात हा तर स्वत:मध्ये पक्का निश्चय करा, कुणी
उल्ट्या-सुलट्या गोष्टी सांगून तुम्हाला दुर करतील. खुप गोष्टी
विचारतात-विकाराशिवाय सृष्टी कशी चालेल? हे कसे होईल? अरे, तुम्ही स्वत: म्हणता
निर्विकारी दुनिया होती. संपूर्ण निर्विकारी म्हणता ना मग विकार कसे असू शकतात? आता
तुम्ही जाणता बेहदच्या बाबांकडून बेहदची बादशाही मिळते, तर अशा बाबांची का नाही
आठवण करणार? ही आहे पतित दुनिया. कुंभ मेळ्यामध्ये किती लाखों लोकं जातात. आता
म्हणतात तिथे एक नदी गुप्त आहे. आता गुप्त नदी असू शकते का? येथे ही गऊमुख बनवले आहे.
म्हणतात गंगा येथे येते. अरे, गंगा आल्या रस्त्यानी समुद्रामध्ये जाईल, येथे
तुमच्याजवळ डोंगरावर कशी येईल. भक्तीमार्गात किती धक्के आहेत, ज्ञान, भक्ती, नंतर
आहे वैराग्य. एक आहे हदचे वैराग्य, दुसरे आहे बेहदचे वैराग्य. सन्यासी घरदार सोडून
जंगलामध्ये राहतात, येथे तर ती गोष्ट नाही, तुम्ही बुध्दीने साऱ्या जुन्या दुनियेचा
सन्यास करता. तुम्हा राजयोगी मुलांचे मुख्य कर्तव्य आहे शिकणे आणि शिकवणे. आता
राजयोग काही जंगलात थोडीच शिकवला जातो. हे विद्यालय आहे. शाखा निघत जातात. तुम्ही
मुले राजयोग शिकत आहात. शिवबाबांकडून शिकलेले ब्राह्मण-ब्राह्मणी शिकतात. एक शिवबाबा
थोडीच सर्वांना बसून शिकवेल, तर हे आहे पांडव सरकार, तुम्ही आहात ईश्वरीय मतावर,
येथे तुम्ही किती शांत बसले आहात. बाहेर तर खुप दंगा आहे, बाबा म्हणतात 5 विकारांचे
दान दया तर ग्रहण सुटेल. माझे बना तर मी तुमच्या सर्व कामना पूर्ण करेल. तुम्ही मुले
जाणता आता आम्ही सुखधाम मध्ये जातो, दु:खधामला आग लागणार आहे. मुलांनी विनाशाचा
साक्षात्कार ही केला आहे. आता वेळ खुप कमी आहे. म्हणून आठवणीची यात्रा करा, तरच
विकर्म विनाश होतील आणि उंच पद प्राप्त कराल. अच्छा,
गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक
आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. बाबा
वारशाचा पुर्ण अधिकार घेण्यासाठी जिवंतपणी मरायचे आहे. दत्तक होऊन जायचे आहे. कधीही
आपल्या श्रेष्ठ भाग्याला गमवायचे नाही.
2. कोणतीही उल्टी-सुल्टी गोष्ट ऐकून संशय घ्यायचा नाही. जराही निश्चय ढळायला नको.
या दु:खधामाला आग लागणार आहे म्हणून यांच्यातून आपला बुध्दीयोग काढून टाकायचा आहे.
वरदान:-
समस्यांना
समाधान रुपामध्ये , परिवर्तन करणारे विश्वकल्याणी भव :-
मी विश्व कल्याणी आहे
ही श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ कामनेचे संस्कार धारण करा. या श्रेष्ठ संस्कारांच्या
समोर हदचे संस्कार स्वत: समाप्त होतील. समस्या समाधानाच्या रुपामध्ये परिवर्तन होईल.
आता युध्दामध्ये वेळ घालवू नका. परंतू विजयी पणाचे संस्कार धारण करा. आता सर्व काही
सेवेमध्ये लावा तर कष्टापासून सुटून जाल. समस्यामध्ये जाण्यापेक्षा दान दया. वददान
दया तर स्व:चे ग्रहण स्वत: समाप्त होईल.
बोधवाक्य:-
कुणाच्या कमी
, कमजोरींचे वर्णन करण्यापेक्षा गुण स्वरुप बना , गुणांचेच वर्णन करा .