07-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


'गोड मुलांनो, ज्ञानाच्या धारणे सोबत, सतयुगाच्या राजाई साठी आठवण आणि पवित्रतेचे बळ पण जमा करा.

प्रश्न:-
आता तुम्हा मुलांच्या पुरुषार्थाचे कोणते लक्ष पाहिजे?

उत्तर:-
नेहमी खुशी मध्ये राहणे,खुप गोड बनणे,सर्वा सोबत प्रेमाने चालणे,हेच तुमच्या पुरुषार्थाचे लक्ष पाहिजे.याद्वारे तुम्ही सर्वगुण संपन्न,१६ कला संपूर्ण बनाल.

प्रश्न:-
ज्यांचे कर्म श्रेष्ठ आहेत,त्यांची लक्षणे कोणती?

उत्तर:-
ते कोणालाही दुःख देणार नाहीत. बाबा दुःख हर्ता,सुख कर्ता आहेत,असे श्रेष्ठ कर्म करणारे पण दुखहर्ता सुखकर्ता असतील.

गित:-
सोडून द्या आकाश सिंहासन,तुम्ही धरतीवरती या….

ओम शांती।
गोड गोड मुलांनी हे गीत ऐकले.हे गोड गोड मुलं कोणी म्हटले. दोन्ही पित्याने म्हटले.निराकार आणि साकारी पित्याने म्हटले,म्हणून त्यांना बाप दादा म्हटले जाते.दादा साकारी आहेत. आता हे गीत भक्ति मार्गातील आहेत.मुलं जाणतात,बाबा आले आहेत आणि बाबांनी सर्व सृष्टीचक्राचे ज्ञान बुद्धीमध्ये बसवले आहे.मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही ८४ जन्म पूर्ण केले,आता नाटक पूर्ण होत आहे.आता पावन बनवायचे आहे,योग किंवा आठवणी द्वारे.आठवण आणि ज्ञान तर प्रत्येक गोष्टीमध्ये चालत राहते.वकिल बनण्यासाठी जरूर त्यांचीआठवण करतील आणि त्यांच्याद्वारे ज्ञान घेतील.याला पण योग आणि ज्ञानाचे बळ म्हटले जाते.येथे तर ही नवीन गोष्ट आहे.त्या योग आणि ज्ञाना द्वारे थोडेच बळ मिळते.येथे या योग आणि ज्ञानाच्या द्वारे जास्त बळ मिळते कारण शिकवणारे सर्वशक्तिमान अधिकारी बाबा आहेत.बाबा म्हणतात मी,ज्ञानाचा सागर आहे.तुम्ही मुलांनी आता सृष्टी चक्राला जाणले आहे.मुळ वतन,सूक्ष्म वतन...सर्व आठवणीत आहे.जे ज्ञान बाबा मध्ये आहे,ते पण मिळाले आहे.तर ज्ञानाला धारण करायचे आहे आणि राजाई साठी,बाबा मुलांना योग आणि पवित्रता शिकवतात.तुम्ही पण पवित्र बनतात,आणि बाबा पासून राजाई पण घेतात.बाबा आपल्या पेक्षा पण जास्त दर्जा मुलांना देतात.तुम्ही 84 जन्म घेत घेत,सर्व मान सन्मान गमावून बसले आहात.हे ज्ञान तुम्हा मुलांना आताच मिळते.श्रेष्ठ बनण्याचे ज्ञान,सर्वश्रेष्ठ बाबा द्वारेच मिळते.मुलं जाणतात,जसे की आम्ही,बापदादांच्या घरी बसलो आहोत.हे दादा(ब्रह्मा) माता पण आहे.ते पिता तर वेगळे आहेत.बाकी ही माता पण आहे परंतु हे पुरुषाचे शरीर असल्यामुळे दुसरी माता नियुक्त केली आहे.यांना पण दत्तक घेतले जाते.त्यांच्या द्वारे परत रचना झाली आहे.रचनेला पण दत्तक घेतले आहे.पिता मुलांना दत्तक घेतात,वारसा देण्यासाठी.ब्रह्मांना पण दत्तक घेतले आहे.प्रवेश करणे आणि दत्तक घेणे एकच गोष्ट आहे.मुलं जाणतात आणि समजवतात पण तेही नंबरा नुसार पुरुषार्थ प्रमाणे.सर्वांना हेच समजावयाचे आहे की आम्ही आपल्या परमपिता परमात्माच्या श्रीमता वरती,या भारताला परत श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवत आहोत,तर स्वतःला पण बनवायचे आहे.स्वतःला पाहयचे आहे,की आम्ही श्रेष्ठ बनलो आहोत?कोणते भ्रष्टाचाराचे काम करून कुणाला दुःख तर देत नाही?बाबा म्हणतात,मी आलो आहे तुम्हा मुलांना सुखी बनवण्यासाठी,तर तुम्हा मुलांना पण सर्वांना सुख देयचे आहे.बाबा कधीच कुणाला दुःख देऊ शकत नाहीत. त्यांचे नावच आहे दुखहर्ता सुखकर्ता. मुलांना स्वतःला तपासायचे आहे,मन्सा,वाचा,र्कमाने कोणाला दुःख तर देत नाही ना?शिवबाबा कधी कोणाला दुःख देत नाहीत.बाबा म्हणतात मी कल्प कल्प तुम्हा मुलांना ही बेहदची गोष्ट ऐकवतो.आता तुमच्या बुद्धी मध्ये आहे,आम्ही आपल्या घरी जाऊन,परत नवीन दुनिये मध्ये येऊ,ते आत्ताच्या अभ्यासा नुसार.अंत काळात तुम्ही परिवर्तन व्हाल.वापस घरी जाऊन परत नंबरा नुसार अभिनय करण्यासाठी याल.ही राजधानी स्थापन होत आहे.

मुलं जाणतात,आत्ता जो पुरुषार्थ करू तोच पुरुषार्थ कल्फ कल्प सिद्ध होईल.प्रथम तर सर्वांच्या बुद्धीमध्ये बसवायचे आहे की,रचना आणि रचनेच्या आदी मध्य अंतचे ज्ञान बाबा शिवाय कोणी देऊ शकत नाही.सर्वोच्च बाबाचे नावच गायब केले आहे.त्रिमूर्ती नाव आहे,त्रिमूर्ती रस्ता पण आहे,त्रिमुर्ती हाऊस पण आहे. त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू शंकर ला म्हटले जाते.या तिघांचे जे रचनाकार शिवबाबा आहेत,त्या बीजाचे,मुळाचे नावच गायब केले आहे.तुम्ही मुलं जाणतात,शिव बाबा सर्वोच्च आहेत,परत त्रिमूर्ती आहेत.बाबा पासुन आम्ही वारसा घेत आहोत.बाबाचे ज्ञान आणि वारसा या दोन्ही गोष्टी नेहमी आठवणीत राहिल्या,तर नेहमी हर्षित मुख राहाल.बाबांच्या आठवणीमध्ये राहून तुम्ही कुणालाही ज्ञान द्याल,तर त्याचा परिणाम चांगला होईल,त्यामध्ये शक्ती येत जाईल. आठवणीच्या यात्रे द्वारेच शक्ती मिळते. आता शक्ती गायब झाली आहे कारण आत्मा पतित,तमोप्रधान झाली आहे ना. आता मुख्य हीच काळजी करायची आहे की,आम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान कसे बनू.मनमनाभव चा अर्थ पण हा आहे.जे गिता वाचतात,त्यांना विचारायला पाहिजे,मनमनाभव चा अर्थ काय आहे? हे कोणी म्हटले माझी आठवण करा तर वारसा मिळेल? नवीन दुनिया स्थापन करणारे,कृष्ण तर नाहीत.ते तर राजकुमार आहेत.गायन आहे ब्रह्मा द्वारा स्थापना होते.आता कर्ता-करविता कोण?हे विसरले आहेत.त्यांच्यासाठी सर्वव्यापी म्हणतात, ब्रह्मा, विष्णू, शंकर इत्यादी सर्वा मध्ये आहेत असे म्हणतात.आता याला अज्ञान म्हटले जाते.बाबा म्हणतात तुम्हाला पाच विकार रुपी,रावणा ने खूपच बेसमज बनवले आहे.तुम्ही जाणता बरोबर आम्ही अगोदर असेच होतो.प्रथम उत्तम पासून उत्तम पण आम्ही होतो,परत खाली उतरत, उतरत महान पतित बनलो.ग्रंथांमध्ये दाखवले आहे,राम भगवंतानी,वानराची सेना घेतली,हे पण ठीक आहे.तुम्ही जाणता अगोदर,आम्ही पण वानरा सारखे होतो.आता जाणीव होते की,ही भ्रष्टाचारी दुनिया आहे,एक,दुसऱ्यांना दुःख देत राहतात.हे काट्याचे जंगल आहे.स्वर्ग फुलांची बाग आहे.जंगल फार मोठे असते.सतयुग फुलांची बाग आहे,ती खुपच लहान असते.या गोष्टी पण तुम्ही मुलं नंबरा नुसारचच समजतात.ज्यांच्यामध्ये ज्ञान आणि योग नाही,सेवेमध्ये तत्पर राहत नाहीत,त्यांना खुशी पण राहत नाही.दान केल्यामुळे मनुष्याला खुशी होते.असे समजतात यांनी अगोदरच जन्मा मध्ये दान पुण्य केले आहे,म्हणून तर असा चांगला जन्म मिळाला आहे.कोणी भक्त असतात समजतात,चांगल्या भक्ताच्या घरांमध्ये जाऊन जन्म घेऊ.चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते.बाबा कर्माची गती मुलांना समजवतात.दुनिया या गोष्टीना जाणत नाही.तुम्ही जाणता आत्ता,रावण राज्य असल्यामुळे मनुष्याचे कर्म सर्व विर्कम बनतात.पतीत तर बनायचे आहेच,५ विकाराची सर्वांमध्ये प्रवेशता आहे.जरी दान पुण्य करतात तरी त्याचे अल्पकाळा साठी फळ मिळते.तरीही पाप तर करतच राहतात.रावण राज्यांमध्ये जी पण देवाण-घेवाण होती,त्यामुळे पापच होतात. देवतांना खूपच चांगला प्रसाद अर्पण करतात.स्वच्छ बणुन येतात परंतु जाणत काहीच नाहीत.बेहदच्या बाबाची खूपच निंदा केली आहे.ते समजतात आम्ही महिमा करतो.ईश्वर सर्वव्यापी आहेत,सर्वशक्तिमान आहेत परंतु बाबा म्हणतात ही तर त्यांची उल्टी महिमा आहे.तुम्ही प्रथम बाबांची महिमा ऐकवतात की,उच्च ते उच्च भगवान एकच आहेत,आम्ही त्यांची आठवण करतो.राजयोगाचे मुख्य लक्ष पण समोर आहे.हा राजयोग बाबाच शिकवतात. कृष्णाला पिता तर नाही म्हणणार,तो तर मुलगा आहे.शिवाला बाबा म्हणनार.त्यांना स्वतःचा देह नाही,हा तर मी भाड्याने घेतो, म्हणून यांना बाप दादा म्हणतात.ते उच्च ते उच्च निराकार बाबा आहेत.रचनेला कधी रचने कडून वारसा मिळू शकत नाही. लौकिक संबंधां मध्ये पण मुलाला पित्या कडून वारसा मिळतो.मुलीला मिळू शकत नाही.आता बाबांनी समजवले आहे,तुम्ही आत्मे माझी मुल आहात.प्रजापिता ब्रह्मा चे मुलं आणि मुली आहात.ब्रह्मा द्वारे वारसा मिळू शकत नाही.शिवबाबा चे बनल्या नंतरच वारसा मिळू शकतो.हे बाबा तुम्हा मुलांना सन्मुख समजत आहेत.याचे कोणते ग्रंथ तर बनवू शकत नाही.जरी तुम्ही लिहितात,साहित्य पण छापतात,तरीही शिक्षका शिवाय तर कोणी समजू शकत नाही.शिक्षका शिवाय पुस्तकाद्वारे कोणीही समजू शकत नाहीत.आता तुम्ही आत्मिक शिक्षक आहात.बाबा बीजरूप आहेत, त्यांच्या जवळ सर्व झाडाचे आदी मध्य अंतचे ज्ञान आहे.शिक्षकाच्या रूपामध्ये तुम्हाला समजावतात.तुम्हा मुलांना नेहमी खुशी राहायला पाहिजे की,परमपित्याने आम्हाला आपला मुलगा बनवला आहे.तेच आम्हाला शिक्षक बणुन शिकवत आहेत,तेच खरे सद्गुरू पण आहेत आणि सोबत घेऊन पण जातात.सर्वांचे सद्गगती दाता एकच आहेत.उच्च ते उच्च बाबाच आहेत,जे भारताला प्रत्येक पाच हजार वर्षानंतर वारसा देतात.फक्त शिवजयंती साजरी केल्यामुळे कोणती गोष्ट सिद्ध होत नाही.बाबा येतात आणि ब्रह्माचा जन्म होतो.मुलगा बनले,ब्राह्मण बनले आणि मुख्य लक्ष समोर आहे.बाबा स्वतः येऊन स्थापना करतात.मुख्य लक्ष तर खूपच स्पष्ट आहे.फक्त कृष्णाचे नाव गिता दाता लिहिल्या मुळे गीतेचे महत्व कमी झाले आहे.याची पण अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे.ही चूक परत होईल.ज्ञान आणि भक्तीचा हा खेळ आहे.बाबा म्हणतात लाडक्या मुलांनो,सुखधाम आणि शांतीधाम ची आठवण करा.अल्लाह आणि बादशाही, खूपच सहज आहे.तुम्ही कुणालाही विचारु शकता,मनमनामव चा अर्थ काय आहे? पहा ते काय सांगतात.तुम्ही विचारा भगवान कोणाला म्हटले जाते.उच्च ते उच्च तर भगवान आहेत,त्यांना सर्वव्यापी थोडेच म्हणनार.ते तर सर्वांचे पिता आहेत.आता त्रिमूर्ती शिवजयंती येते,तुम्हाला त्रिमूर्ती शिवा चे चित्र बनवायला पाहिजे.उच्च ते उच्च शिव आहेत,परत सूक्ष्मवतन वासी ब्रह्मा विष्णू आणि शंकर.उच्च ते उच्च शिवबाबा आहेत,तेच भारताला स्वर्ग बनवतात,त्यांची जयंती तुम्ही साजरी का करत नाही.जरूर भारताला वारसा दिला होता,त्यांचे राज्य होते.यामध्ये तुम्हाला आर्य समाजी पण मदत करतील,कारण ते शिवाला मानतात.तुम्ही आपला झेंडा लावा.एकीकडे त्रिमूर्ती गोळा,दुसरीकडे झाड.तुमचा झेंडा वास्तव मध्ये असा व्हायला पाहिजे,बनू शकतो ना.सर्वांना माहित होईल,आपला धर्म परत कधी येईल.स्वतः आपला हिशेब काढू शकतात. सर्वांना चक्र आणि झाडावरती समजून सांगायचे आहे.येशू ख्रिस्त कधी आले इतका वेळ,ती आत्मा कोठे राहत होती. जरूर निराकारी दुनिया मध्येच राहत होती. आम्ही आत्मा रूप बदलून येथे येऊन साकारी बनतो.बाबांना पण म्हणतात तुम्ही रूप बदलून साकारी सृष्टीमध्ये या.येथेच येतील ना.सूक्ष्म वतन मध्ये तर येणार नाहीत.जसे मी रूप बदलून अभिनय करतो,तुम्ही पण या आणि येऊन आम्हाला राजयोग शिकवा.राज योग आहेच भारताला स्वर्ग बनवण्या साठी. ही तर खूपच सोपी गोष्ट आहे.मुलांना आवड पाहिजे,धारणा करून दुसऱ्यांना पण करवायची आहे.त्यासाठी लिखापडी पण करायला पाहिजे.बाबाच भारताला येउन स्वर्ग बनवतात.ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षापूर्वी भारत स्वर्ग होता,असे म्हणतात. त्रीमुर्ती, शिवाचे चित्र सर्वांना पाठवयाला पाहिजे.त्रिमूर्ती शिवाचा स्टॅम्प,तिकीट बनवायला पाहिजे. हे पोस्टाचे तिकीट बनवणारा पण एक विभाग असतो. दिल्लीमध्ये खूपच शिकलेले आहेत,हे काम ते करू शकतात.तुमची राजधानी पण दिल्लीत असेल.पूर्वी दिल्लीला परीस्थान म्हणत होते,आता तर कब्रिस्तान झाली आहे.तर या सर्व गोष्टी तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये यायला पाहिजेत.

नेहमीच तुम्हाला खुशी मध्ये राहायचे आहे.खूप खूप गोड बनायचे आहे. सर्वांशी प्रेमाने वागायचे आहे.सर्वगुणसंपन्न, 16 कलासंपन्न,बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.तुमच्या पुरुषार्थाचे हेच लक्ष पाहिजे परंतु आजपर्यंत कोणी असे बनले नाहीत. आता तुमची चढती कला होत जाते. सावकाश प्रगती होत जाते.तर बाबा प्रत्येक प्रकारा ने, शिवजयंती वरती सेवा करण्याचा इशारा देतात.बरोबर मनुष्य समजतील,यांचे ज्ञान तर श्रेष्ठ आहे. मनुष्याला समजून सांगण्या मध्ये खूप कष्ट घ्यावे लागतात.कष्टा शिवाय राजधानी थोडीच स्थापन होईल.प्रगती होते परत अधोगती होते,परत प्रगती होते.मुलांना कोणती ना कोणती परिस्थिती,वादळ येते. मुख्य गोष्ट आठवण करण्याची आहे.आठवणी द्वारेच सतोप्रधान बनायचे आहे.ज्ञान तर खूपच सहज आहे.मुलांना खूप गोड बनायचे आहे.मुख्य लक्ष समोर आहे.हे लक्ष्मीनारायण खुपच गोड आहेत, यांना पाहून खूप खुशी होते.आम्हा विद्यार्थ्यांचे हे मुख्य लक्ष्य आहे.शिकवणारे स्वता: भगवान आहेत.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या आत्मिक मुलां प्रति,मात पिता बाप दादाची प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाबा द्वारे जे ज्ञान आणि वारसा मिळाला आहे त्यांना आठवणीत ठेवुण आनंदीत राहायचे आहे.ज्ञान योग आहे,तर सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे.


(२) सुखधाम आणि शांतीधाम ची आठवण करायची आहे.या देवता सारखे गोड बनायचे आहे. खुशी मध्ये राहायचे आहे. आत्मिक शिक्षक बणुन दान करायचे आहे.अपार खुशीमध्ये राहयचे आहे.

वरदान:-
आंतरमुखतेच्या अभ्यासाद्वारे अलौकिक भाषेला समजणारे सदा सफलता संपन्न भव.

जितके जितके,तुम्ही मुलं आंतरमुखी गोड शांतीच्या स्वरूपामध्ये स्थित राहाल,तेवढी डोळ्याची भाषा,भावनाची भाषा आणि संकल्पाच्या भाषेला सहज समजत जाल. या तीन प्रकारच्या भाषा,योगी जीवनाच्या भाषा आहेत.या अलौकिक भाषा खूप शक्तिशाली आहेत.वेळेनुसार या तीन भाषे द्वारे सफलता प्राप्त होईल,म्हणून आत्मिक भाषेचे अभ्यासी बना.

बोधवाक्य:-
तुम्ही इतके हलके बना,जे बाबा तुम्हाला आपल्या डोळ्यावर बसवून घेऊन जातील.


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी देह,संबध किंवा पदार्थ मध्ये कोणताही लगाव नको,जो वायदा आहे,हे तन,मन,धन तुझे,तर लगाव कसा होऊ शकतो.फरिश्ता बनण्यासाठी हा अभ्यास प्रत्यक्षात करा, की सर्व सेवार्थ आहे, अमानत आहे आणि विश्वस्त आहे.