23-02-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
27.11.1985 ओम शान्ति
मधुबन
जुना संसार जुने
संस्कार विसरण्याचे उपाय …
बापदादा सर्व
निश्चबुध्दी मुलांचे, निश्चयाचे प्रत्यक्ष जीवनातील स्वरुप पाहत आहेत.निश्चयबुध्दीची
विशेषता सर्वांनी ऐकली, असे विशेषतांची संपन्न,निश्चबुध्दी विजयी रत्न, या ब्राह्मण
जीवन किंवा पुरुषोत्तम संगमयुगी जीवनामध्ये नेहमी निश्चयाचे प्रमाणामध्ये ते नशेत
राहतील. आत्मिक नशा. निश्चयाच्या आरशासारखा आहे.निश्चय फक्त बुध्दीमध्ये
स्मृतीपर्यंत नाही, परंतू प्रत्येक पावलात आत्मिक नशेच्या रुपामध्ये कर्माद्वारे
प्रत्यक्ष स्वरुपात स्वत:ला पण अनुभव होतो आणि इतरांना पण अनुभव होतो, कारण हे
ज्ञानी आणि योगा जीवन आहे. फक्त ऐकणे आणि सांगण्या पुरते नाही, जीवन बनवायचे आहे.
जीवनामध्ये स्मृती म्हणजे संकल्प, बोल, कर्म, संबंध सर्व येते. निश्चय बुध्दी म्हणजे
नशेच जीवन. असे आत्मिक नशेवाली आत्म्यांचा प्रत्येक संकल्प, नेहमी नशेमध्ये संपन्न
असेल. संकल्प बोल. कर्म, तीघातून निश्चयाचा नशा अनुभव होईल. जसा नशा तशी खुशीची झलक,
चेहऱ्याद्वारे वागण्याद्वारे प्रत्यक्ष होईल, निश्चयाचे प्रमाण नशा आणि नशेचे
प्रमाण खुशी अनुभव होईल. नशा किती प्रकारचा आहे, त्याचा विस्तार फार मोठा आहे. परंतू
सार रुपामध्ये एकच नशा आहे, अशरीरी आत्मिक स्वरुपाचा. याचा विस्तार जाणता का? आत्मे
तर सर्व आहेत, परंतू आत्मिक नशा तेव्हा अनुभवाल, जेव्हा हे स्मृतीमध्ये ठेवता की,
मी कोणती आत्मा आहे? याचा आणखीन विस्तार आपसामध्ये शोधा, किंवा स्वत: मनन करा.
दुसरे नशेचे विशेष रुप, संगमयुगतील अलौकिक जीवन आहे. या जीवनामध्ये पण कोणते जीवन
आहे, याचा पण विस्तार काढा. तर एक आहे, आत्मिक स्वरुपाचा विस्तार दुसरे आहे अलौकिक
जीवनाचा नशा. तिसरा आहे फरिश्तेपणाचा नशा. फरिश्ता कोणाला म्हटले जाते. याचा पण
विस्तार आहे. चौथा आहे भविष्याचा नशा. या चारही प्रकारच्या अलौकिक नशे पैकी, कोणता
पण नशा जीवनामध्ये असेल, तर स्वत:च खुशीमध्ये नाचत राहाल. निश्चय पण आहे. परंतू खुशी
नाही याचे कारण काय? नशा नाही. नशा सहजच जुना संसार, आणि जुने संस्कार विसरुन टाकतो.
या पुरुषार्थी जीवनामध्ये विशेष विघ्नरुप या दोन गोष्टी आहेत. एक जुना संसार, दुसरा
जुना संस्कार. संसारामध्ये देहाचे संबंध आणि देहाचे पदार्थ दोन्ही येतात. त्या
बरोबर संसारापेक्षा ही जुने संस्कार जादा विघ्न रुप बनत आहेत. संसार विसरुन जातो.
परंतू संस्कार विसरत नाहीत. मग संस्कार परिवर्तन करण्याचे साधन आहे, या चारीही नशे
पैकी कोणता पण एक नशा साकार स्वरुपामध्ये असावा, फक्त संकल्प रुपात नसावा. साकार
स्वरुपात राहिल्याने कधी पण विघ्न रुप बनणार नाही. आता पर्यंत संस्कार परिवर्तन न
होण्याचे कारणच हे आहे. या नशेला संकल्प रुपात म्हणजे ज्ञानाच्या रुपात बुध्दी
पर्यंत धारण केले आहे, त्यामुळे कधी पण कोणाचा जुना संस्कार बाहेर येतो, मग अशी भाषा
बोलतात, मी सर्व समजत आहे, बदलायचे आहे, हे पण समजते, परंतू वागण्यापर्यंत नाही.
कर्म म्हणजे जीवनात पाहिजे. जीवनाद्वारे परिवर्तन अनुभवात यावे. याला म्हटले जाते,
साकार स्वरुपात येणे. आता बुध्दीपर्यंत मुद्यांचे रुपात विचार करणे आणि वर्णन
करण्यापर्यंत आहे. परंतू प्रत्येक कर्मात, संपर्कात परिवर्तन दिसावे, याला म्हटले
जाते, साकार रुपामध्ये अलौकिक नशा. आता प्रत्येक नशेला जीवनामध्ये आणा. कोणी पण
तुमच्या मस्तकाकडे पाहिले, तर मस्तकाद्वारे आत्मिक नशेची वृतती. अनुभवतील. जरी कोणी
वर्णन करा अथवा न करो, परंतू वृत्ती, वायुमंडळ आणि प्रकंपन पसरवते. तुमची वृत्ती.
दुसऱ्याला पण खुशीच्या वायु मंडळामध्ये, खुशीचा, प्रकंपणाचा अनुभव करेल, याला म्हटले
जाते, नशेमध्ये स्थित होणे. असेच दृष्टीद्वारे चेहऱ्यावरील हास्याद्वारे, मुखातील
बोलण्याने, आत्मिक नशेचा साकार रुपाचा अनुभव होईल. तेव्हा म्हटले जाईल, नशेमध्ये
राहणारे निश्चयबुध्दी विजयी रत्न, यामध्ये गुप्त राहायचे नाही. कोणी अशी पण चतुराई
करतात कि, आम्ही गुप्त आहोत. जसी म्हण आहे कि, सुर्याला कोणी लपवू शकत नाही. किती
पण घनदाट ढग असतील, तरी पण सुर्य ओपला प्रकाश टाकतच राहतो. सुर्य हटतो कि ढग हटतात?
ढग येतात पण आणि निघून पण जातात, परंतू सुर्य आपल्या प्रकाश स्वरुपात स्थित असतो.
तसेच आत्मिक नशेवाला पण आत्मिक रुपापासून लपू शकत नाही. त्यांची आत्मिक नशेची चमक
प्रत्यक्ष रुपात अनुभव आवश्य होईल. त्यांचे प्रकंपण स्वत:च इतरांना आकर्षित करतील.
आत्मीक नशेमध्ये राहणाराची प्रकंपणे स्वत:साठी आणि इतरांसाठी छत्र छायेचे काम करेल.
तर आता काय करावयाचे आहे? साकार जीवनामध्ये आणल्याने ज्ञानसंपन्नात बरोबर विजय आणि
आशीवार्दाचा अनुभव करतील. अच्छा, नंतर सांगतो कि, विजयी आणि आशिर्वादाचे स्वरुप काय
असते?
आज आत्मिक नशेच्या गोष्टी सांगत आहे. सर्वांना नशेचा अनुभव व्हावा. या चारी ही नशे
पैकी एका नशेचा भिन्न भिन्न रुपामध्ये वापर करा. जेवढा या नशेला जीवनामध्ये अनुभव
कराल, तर नेहमीच सर्व चिंतेपासून मुक्त, बेफिकीर बादशाहा बनाल. सर्व तुम्हाला
बेफिकीर बादशहाचे रुपात पाहतील तर आता याचा विस्तार काढा आणि जीवनात आणा. जेथे खुशी
आहे तेथे मायेची कोणती पण चाल चालत नाही. बेफिकीर बादशहाच्या, बादशाहीमध्ये माया
येऊ शकत नाही. येते आणि पळविता, परत येत परत पळवून लावता. कधी देहाचे रुपात येत, कधी
देहाच्या संबंधाचे रुपात येते. यालाच म्हटले जाते, कधी माया हात्तीच्या रुपात येते,
कधी मांजर बनून येते, कधी उंदीर बनून येते. कधी उदंराला काढता, कधी मांजराला काढता.
या पळवून लावण्याच्या कामामध्ये वेळ निघून जातो, त्यामुळे नेहमी आत्मिक नशेमध्ये
राहा. अगोदर स्वत:ला प्रत्यक्ष करा तेव्हा बाबाची प्रत्यक्ष कराल, कारण
तुमच्याद्वारे बाबा प्रत्यक्ष होणार आहे. अच्छा.
नेहमी स्वत:द्वारे सर्व शकतीवानाला प्रत्यक्ष करणारे, नेहमी आपल्या साकार जीवनातील
आरशाद्वारे आत्मिक नशेची विशेषता प्रत्यक्ष करणारे, नेहमी बेफिकीर बादशहा बनून,
मायेला निरोप देणारे, नेहमी ज्ञानाला स्वरुपात आणणारे, असे निश्चय बुध्दी नशेत
राहणारे, नेमी खुशीमध्ये, झोका घेणारे, अशा श्रेष्ठ आत्म्यांना विशेष आत्म्यांना
बापदादांची प्रेमळ आठवण आणि नमस्ते.
सेवाधारी (
शिक्षक ) बहिणीसाठी :-
सेवाधारी म्हणजे आपल्या शक्तीद्वारे इतरांना पण शक्तीशाली बनविणारे. सेवाधारीची खरी
विशेषता ही आहे. निर्बलामध्ये बळ भरण्यासाठी निमित्त बनणे, हीच खरी सेवा आहे. अशा
सेवेची भुमिका मिळणे पण श्रेष्ठ भुमिका आहे. तर हिरो भुमिका करणारे किती नशेमध्ये
राहता? सेवेच्या कृतीमध्ये जेवढा स्वत:चा नंबर पुढे वाढवू शकता, तेवढा वाढवा, कारण
सेवा पुढे जाण्याचे साधन आहे. सेवेमध्ये व्यस्त राहिल्याने स्वत:च सर्व गोष्टी
पासून दुर होऊन जाल. प्रत्येक सेवास्थान रंगमंच आहे, ज्या रंगमंचावर प्रत्येक आत्मा
स्वत:ची भुमिका बजावत आहे. साधन तर फार आहेत, परंतू नेहमी साधनामध्ये शक्ती असली
पाहिजे. जर बिना शक्तीचे साधन वापराल, तर जी सेवेची प्राप्ती व्हायला पाहिजे, ती
होत नाही. जुन्या काळामध्ये जे वीर, पुरुष होते, ते सदैव आपल्या शास्त्राला देवता
समोर अर्पण करुन, त्यामध्ये शक्ती भरुन मग वापरत होते. तर तुम्ही सर्व जण पण कोणते
पण साधन जेव्हा वापरता तर त्यांना वापर करण्यापुर्वी, त्या विधीद्वारेच कार्यात
लावता का? आता जे पण साधन कार्यामध्ये लावता, त्यामुळे थोड्या काळासाठी लोक आकर्षित
होतात. नेहमीसाठी प्रभावीत होत नाहीत, कारण एवढी शक्तीशाली आत्मे, जे शक्तीद्वारे
परिवर्तन करुन दाखवतील, ते क्रमवारीचे आहेत. सेवा तर सर्व करत आहेत, सर्वांचे नाव
शिक्षक आहे. सेवाधारी आहात की शिक्षक आहात परंतू सेवेमध्ये अंतर काय आहे? कार्यक्रम
पण एकच करता, नियोजन पण एकसारखे करता रिती रिवाज पण पण एक सारखा राहतो, तरी पण
सफलतेमध्ये अंतर पडते, त्यांचे कारण काय? कार्यक्रम पण एकच करता, नियोजन पण एकसारखे
करता. रिती रिवाज पण एक सारखा राहतो, तरी पण सफलते मध्ये अंतर पडते, त्यांचे कारण
काय? शक्तीची कमी तर साधनामध्ये शक्ती भरा. जसे तलवारी मध्ये जर धार नसेल तर तलवार,
तलवारीचे काम करत नाही. तसे साधन आहे तलवार परंतू त्यामध्ये शक्तीची धार पाहिजे. ते
जेवढे स्वत: मध्ये भरत जाल, तेवढी सेवेमध्ये स्वत:च सफलता मिळेल. तर शक्तीशाली
सेवाधरी बना. नेहमी विधीद्वारे वृध्दीला प्राप्त करणे. ही पण काही मोठी गोष्ट नाही.
परंतू शक्तीशाली आत्मे, वाढावेत यांचे विशेष लक्ष्य असावे. गुणवान असावेत. संख्या
तर आणखीन जादा होईल. गुणात्मकते वर लक्ष द्या. नंबर गुणात्मकते वर मिळेल, संख्येवर
नाही. एक गुणवान 100 संख्येच्या बरोबर आहे.
कुमारा प्रती
:- कुमार काय
कमाल करणार? धमाल करणारे तर नाहीत ना? कमाल करण्यासाठी शक्तीशाली बना. आणि बनवा.
शक्तीशाली बनण्यासाठी नेहमी आपले सर्व शक्तीवानचे शिर्षक आठवणीत ठेवा. जिथे शक्ती
असेल, तिथे मायेपासून मुक्ती मिळेल. जेवढे स्वत: वर लक्ष असेल तेवढे सेवेमध्ये पण
लक्ष जाईल. जर स्वत:वरती लक्ष नाही, तर सेवेमध्ये शक्ती भरत नाही, त्यामुळे नेहमी
स्वत:ला सफलता स्वरुप बनविण्यासाठी शक्तीशाली अभ्यासाची साधने बनविली पाहिजेत. कोणते
असे विशेष कार्यक्रम बनवा, त्यामुळे नेहमी प्रगती होत राहिल. अगोदर स्वउन्नतीचा
कार्यक्रम मग सेवा, सहज आणि सफल होईल, कुमार जीवन भाग्यवान जीवन आहे. कारण कितीतरी
बंधनापासून वाचलात. नाहीतर गृहस्थी जीवनामध्ये किती बंधने आहेत. तर असे भाग्यवान
बनणारी आत्मे, कधी आपल्या भाग्याला तर विसरत नाहीत. नेहमी स्वत:ला श्रेष्ठ भाग्यवान
आत्मा समजून इतरांचे पण भाग्याची रेषा काढणारे आहात. जे निर्बंधन असतात, ते स्वत:च
उडती कलेद्वारे पुढे जात राहतात, त्यामुळे कुमार आणि कुमारी जीवन बापदादाला नेहमी
प्रिय वाटते. गृहस्थी जवीन आहे बंधनवाली आणि कुमारी जीवन आहे बंधनमुक्त, तर
निर्बंधन आत्मा बनून, इतरांना पण निर्बंधन बनवा. कुमार म्हणजे नेहमी सेवा आणि
आठवणीचा समतोल ठेवणारे. समतोल असेल तर नेहमी उडती कला आहे, जे समतोल ठेवणे जाणतात
ते कधी पण कोणत्या परिस्थितीमध्ये खाली वर होऊ शकत नाहीत.
अधर कुमारीसाठी
:-
सर्व आपल्या जीवनाच्या प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे सेवा करणारे आहात ना. सर्वांत
मोठ्यातील मोठे प्रत्यक्ष प्रमाण आहे-आपल्या सर्वांचे जीवनातील परिवर्तन. ऐकणारे आणि
सांगणारे तर फार पाहिलेत. आता सर्व पाहू इच्छितात, एैकू इच्छित नाहीत. तर नेहमी जे
पण कोणते कर्म करता, तर हे लक्ष्य ठेवा कि, जे कर्म आम्ही करत आहे, त्यामध्ये असे
परिवर्तन असावे, जे दुसरे पाहून, परिवर्तीत होतील. यामध्ये स्वत: पण संतुष्ट आणि
खुश राहाल, आणि दुसऱ्याचे पण कल्याण कराल. तर प्रत्येक कर्म सेवार्थ करा. जर ही
स्मृती राहील कि, माझे प्रत्येक कर्म सेवा अर्थ आहे तर स्वत:च श्रेष्ठ कर्म कराल.
लक्षात ठेवा, स्व: परिवर्तनाने इतरांचे परिवर्तन करावयाचे आहे. ही सेवा सहज पण आहे,
आणि श्रेष्ठ पण आहे. मुखाचे पण भाषण आणि जीवनाचे पण भाषण, याला म्हणतात सेवाधारी,
नेहमी आपल्या दृष्टीद्वारे इतरांची दृष्टी बदलणारे सेवाधारी. जेवढी दृष्टी शक्तीशाली
होईल, तेवढे अनेकांचे परिवर्तन करु शकाल. नेहमी दृष्टी आणि श्रेष्ठ कर्माद्वारे
इतरांची सेवा करण्यासाठी निमित्त बना.
काय होतो आणि काय बनलो आहे. हे नेहमी आठवणीत ठेवता का? आठवणीत राहिल्याने कधी पण
जुने संस्कार बाहेर येणार नाहीत. त्या बरोबर भविष्यात पण काय बनणार आहोत, हे पण
आठवणीत ठेवा तर वर्तमान आणि भविष्य श्रेष्ठ झाल्यामुळे खुशी राहिल, आणि खुशीमध्ये
राहिल्याने नेहमी पुढे चालत राहाल, वर्तमान आणि भविष्यातील दुनिया श्रेष्ठ आहे, तर
श्रेष्ठच्या पुढे जी दु:खदाई दुनिया आहे, ती आठवणीत येणार नाही. नेहमी आपल्या या
अमर्यादीत परिवाराला पाहून खुश होत राहा. कधी स्वप्नामध्ये पण हा विचार केलता का,
असा भाग्यवान परिवार मिळेल. परंतू आता साकारमध्ये पाहात आहात, अनुभव करत आहात. असा
परिवार जो एकमत परिवार असावा, एवढा मोठा परिवार, हा सारे कल्पामध्ये आताच आहे.
सतयुगामध्ये पण छोटा परिवार असेल. तर बापदादा आणि परिवाराला पाहून खुशी होत आहे ना.
हा परिवार प्रिय वाटतो? कारण येथे स्वार्थ भाव नाही. जे अशा परिवाराचे बनतात ते
भविष्यात पण एक दोघांचे जवळ येतात. नेहमी या ईश्वरीय परिवाराची विशेषता पाहून पुढे
चालत चला.
कुमारी बरोबर
:-
सर्व कुमारी
स्वत:ला विश्व कल्याणकारी समजून पुढे वाटचाल करत आहात? ही स्मृती नेहमी समर्थ बनवत
आहे. कुमारी जीवन समर्थ जीवन आहे. कुमारी स्वत: समर्थ बनून इतरांना समर्थ बनविणारी
आहे. व्यर्थला नेहमीसाठी निरोप देणारी. कुमारी जीवनाच्या भाग्याला स्मृतीमध्ये
ठेवून पुढे चालत राहा. हे पण संगम मध्ये मोठे भाग्य आहे, जी कुमारी बनली, कुमारी
आपल्या जीवनाद्वारे इतरांना पण शक्तीशाली बनविणारी आहे. नेहमी एक बाबा दुसरा कोणी
नाही. अशा नशेद्वारे प्रत्येक पाऊल पुढे टाकणारी. तर अशा कुमारी आहात ना.
प्रश्न :
कोणत्या
विशेषते वा गुणाद्वारे नेहमीसाठी प्रिय बनू शकता ?
उत्तर :-
अलीप्त आणि
प्रिय राहण्याचा गुण आणि र्निसंकल्प राहण्याची जी विशेषता आहे. या विशेषतेद्वारे
सर्वांचे प्रिय बनू शकता. प्रिय पणामुळे सर्वांचे हदयापासून प्रेम स्वत:च प्राप्त
होते. या विशेषतेद्वारे सफलता प्राप्त करु शकता.
वरदान:-
सर्व समस्यांचा
निरोप समारंभ करणारे समाधान स्वरुप भव :-
समाधान स्वरुप
आत्म्यांची माळा तेव्हाच तयार होईल, जेव्हा तुम्ही स्वत:च्या संपूर्ण स्थितीमध्ये
स्थित व्हाल. संपूर्ण स्थितीमध्ये समस्या लहानपणीचा खेळ अनुभव होतो. म्हणजे संपून
जातात. जसे ब्रह्मा बाबा समारे जर कोणी मुलगा समस्या घेऊन जात होता, तर समस्येच्या
गोष्टी सांगण्याची हिम्मत पण होत नव्हती. ते बोलणे विसरुन जात होते. तसे तुम्ही मुले
पण समाधान स्वरुप बना, तर आर्धा कल्पासाठी समस्यांचा निरोप समारंभ होईल. विश्वातील
समस्यांचे समाधानच परिवर्तन आहे.
सुविचार:-
जे नेहमी
ज्ञानाचे स्मरण करतात , ते मायेच्या आकर्षणापासून दूर राहतात .