28-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो , तुम्ही स्वत:ला संगमयुगी ब्राह्मण समजता , तर सतयुगी झाड दिसतील आणि अपार
खुशीत राहालाच....!!!
प्रश्न:-
जे ज्ञानातील
छंदीष्ट मुले आहेत, त्यांची लक्षणे कोणती?
उत्तर:-
ते आपसात ज्ञानाच्या गोष्टी करतील, परचिंतन करत नाहीत. एकांतात बसून विचार सागर
मंथन करतात.
प्रश्न:-
या सृष्टी
नाटकातील कोणते रहस्य तुम्ही मुलेच समजत आहात?
उत्तर:-
या सृष्टीमध्ये
कोणती पण वस्तू कायम नाही, एका शिवबाबा शिवाय जुन्या दुनियेतील आत्म्यांना नविन
दुनियेत घेऊन जाण्यासाठी कोणीतरी पाहिजे, हे पण नाटकातील रहस्य तुम्ही मुलेच समजत
आहात.
ओम शांती।
आत्मिक मुलांप्रती पुरुषोत्तम संगमयुगावर येणारे बाबा समजावत आहेत. हे तर मुले
समजतात कि, आम्ही ब्राह्मण आहे. स्वत:ला ब्राह्मण समजता का ते पण विसरुन जाता?
ब्राह्मणांना आपले कुळ विसरत नाही. तुम्हाला पण हे जरुर आठवणीत. राहिले पाहिजे की,
आम्ही ब्राह्मण आहोत. ही एक गोष्ट आठवणीत राहिली तरी नाव पार जाईल. संगमवर तुम्ही
नवनवीन गोष्टी ऐकत आहात तर त्यांचे चिंतन चालले पाहिजे, ज्याला विचार सागर मंथन
म्हटले जाते. तुम्ही आहात रुप बसंत. तुमच्या आत्म्यामध्ये सारे ज्ञान भरले जाते,
त्यातून रत्न निघाले पाहिजेत. स्वत:ला समजायचे आहे कि, आम्ही संगमयुगी ब्राह्मण
आहोत. कोणी तर हे पण समजत नाही. जर स्वत:ला संगमयुगी समजले तर सतयुगातील झाड दिसून
येतील, आणि अपार खुशी पण होईल. बाबा जे समजावत आहेत त्याची उजळणी झाले पाहिजे. आम्ही
संगमयुगावर आहोत, हे पण तुमचे शिवाय कोणाला माहित नाही. संगमयुगातील हे शिक्षण वेळ
खात आहे. हे एकच शिक्षण आहे. नरापासून नारायण, नर्कवासी पासून स्वर्गवासी बनण्याचे.
हे आठवणीत राहिले तरी पण खुशी होईल, आम्ही ते देवता स्वर्गवासी बनत आहोत. संगमयुगा
वासी झालात तरच ते स्वर्गवासी बनाल. पूर्वी नर्कवासी होता तर बिल्कुल वाईट अवस्था
होती, वाईट काम करत होतो. आता ते नाहीशे करावयाचे आहे. मनुष्यापासून देवता
स्वर्गवासी बनायचे आहे. कोणाची पत्नी मरते, तुम्ही विचारा तुमची पत्नी कोठे आहे? तर
म्हणतता स्वर्गवासी झाली. स्वर्ग काय गोष्ट आहे, ते जाणत नाहीत. जर स्वर्गवासी झाली
तर मग खुष झाले पाहिजे ना. आता तुम्ही मुले या गोष्टीला जाणत आहात. मनात विचार चालला
पाहिजे, आम्ही आता संगमयुगावर आहोत, पावन बनत आहोत. स्वर्गाचा वारसा बाबांकडून घेत
आहोत. हे वारंवार आठवण केले पाहिजे, विसरले नाही पाहिजे. परंतू माया विसरुन एकदम
कलियुगी बनविते. चलन अशी चालतात, जसे एकदम कलियुगी, तो खुशीचा पारा राहत नाही. तोंड
जसे मुडदयासारखे बाबा पण म्हणतात कि, सर्व काम चितेवर बसून जळून मुडदा झाले आहेत.
तुम्ही जाणता कि, आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत, तर खुशी झाली पाहिजे ना,
त्यामुळे गायन पण आहे, अतिइंद्रीय सुखाची भासना गोप गोपींना विचारा. तुम्ही तुमच्या
मनाला विचारा आम्ही त्या अनुभुतीमध्ये राहतो? तुम्ही ईश्वरीय मिशन आहात ना. ईश्वरीय
मिशन काय काम करत आहे? प्रथम तर शुद्रापासून ब्राह्मण ब्रह्मणापासून देवता बनत आहे.
आम्ही ब्राह्मण आहात, हे विसरले नाही पाहिजे. ते ब्राह्मण तर झटक्यात म्हणतता कि,
आम्ही ब्राह्मण आहे. ते तर आहेत वंशावळ. तुम्ही आहात मुखवंशावळ. तुम्हा ब्राह्मणांना
फार नशा असला पाहिजे. गायन पण केले जाते, ब्रह्मा भोजन, तुम्ही कोणाला ब्रह्मा भोजन
खाऊ घालता तर किती आनंदी होतात. आम्ही पवित्र ब्राह्मणांचे हात चे खातो. मनाने,
वाचेने कर्माने पवित्र असले पाहिजे. कोणते अपवित्र कर्तव्य केले नाही पाहिजे. वेळ
तर लागत आहे. जन्मताच कोणी बनत नाही. जरी म्हटले जाते, सेकंदात जीवनमुक्ती, बाबाचा
मुलगा बनला आणि वारसा मिळाला. एक वेळा म्हटले हे प्रजापिता ब्रह्मा आहेत. निश्चय
झाल्यानेच वारस होतात. नंतर जर कोणते अकर्तव्य केले तर शिक्षा फार खावी लागेल. जसे
काशी कलवटचे समजावले आहे. शिक्षा भोगल्याने हिसाब किताब चुक्तू होऊन जातो.
मुक्तीसाठी विहरीमध्ये उडी मारतात. येथे तर अशी गोष्ट नाही. शिवबाबा मुलांना
म्हणतात, माझी एकट्याची आठवण करा. किती सोपे आहे. तरी पण मायेचे चक्कर येते. हे
तुमचे युध्द सर्वांत जास्त काळ चालत आहे, नविन जे येतात, त्यांचे पण चालते. त्या
युध्दात पण मरतात, दुसरे समाविष्ट होत राहतात. येथे पण मरतात, वाढत पण राहतात. झाड
मोठे तर होणारच आहे. बाबा गोड गोड मुलांना समजावत आहेत, हे आठवणीत राहिले पाहिजे,
ते पिता पण आहेत. सर्वोच्च शिक्षक पण आहेत, सतगुरु पण आहेत. कृष्णाला तर सतगुरु,
पिता, शिक्षक म्हणत नाहीत.
तुम्हाला सर्वांचे कल्याण करण्याचा छंद असला पाहिजे. महारथी मुले सेवा करतात,
त्यांना तर फार खुशी राहते. जेथून निमंत्रण येते, तिकडे जातात. प्रदर्शनी सेवा
समितीवर पण चांगली चांगली मुले निवडतात. त्यांना सुचना दिल्या जातात, सेवा करत राहा.
तर म्हणतात हे ईश्वरीय मिशनची चांगली मुले आहेत. बाबा पण खुश होतात, हे तर फार
चांगली सेवा करत आहेत. स्वत:चे मनाला विचारा कि, मी सेवा करत आहे? म्हणतता पण
ईश्वरीय पित्याचे सेवेवर. ईश्वरीय पित्याची सेवा काय आहे? बस, सर्वांना संदेश दया,
मनमनाभव. आदि-मध्य अंताचे ज्ञान तर बुध्दीमध्ये आहे. तुमचे नावच आहे. स्वदर्शन,
चक्रधारी. तर त्यांचे चिंतन चालले पाहिजे. स्वदर्शन चक्र थांबले नाही पाहिजे. तुम्ही
चैतन्य लाईट हाऊस आहात. तुमची महिमा फार गायली जाते. बेहदच्या बाबांची महिमा पण
तुम्ही समजत आहात. ते ज्ञानाचे सागर पतित पावन आहेत, गीतेच भगवान आहेत. तेच ज्ञान
आणि योगबळाने हे कार्य करत आहेत, यात योगबळाचा प्रभाव फार आहे. भारताचा प्राचीन योग
प्रसिध्द आहे. तो तुम्ही आता शिकत आहात. सन्यासी तर हठयोगी आहेत, ते पतितांना पावन
बनवू शकत नाहीत. ज्ञान तर आहे एका बाबाजवळ. ज्ञानातून तुम्ही जन्म घेत आहात. गीतेला
माय बाप म्हटले जाते, माता पिता आहे ना. तुम्ही शिवबाबाची मुले आहात तर मातपिता
पाहिजेत ना. मनुष्य गायन करतात, परंतू समजतात थोडेच, बाबाच समजावतात कि, याचा अर्थ
किती गुह्य आहे. ईश्वरीय पिता म्हटले जाते, मग मात पिता का म्हटले जाते? बाबांनी
सांगितले आहे, जरी सरस्वती आहे, परंतू वास्तविक खरी खरी माता ब्रह्मपुत्रा आहे.
सागर आणि ब्रह्मपुत्रा आहे, प्रथम संगम यांचा होतो. बाबा यांच्यात प्रवेश करतात. या
किती सुक्ष्म गोष्टी आहेत. अनेकांच्या बुध्दीमध्ये या गोष्टी राहत नाहीत, ज्यांचे
चिंतन चालेल. फारच कमी बुध्दी आहे, कमी पद प्राप्त करणारे आहेत. त्यांचेसाठी बाबा
तरी पण म्हणतात, स्वत:ला आत्मा समजा. हे तर सोपे आहे ना. आम्हा आत्म्याचा पिता आहे
परमात्मा. ते तुम्हा आत्म्यांना म्हणतात कि, माझी एकट्याची आठवण करा तर विकर्म
विनाश होतील. ही आहे मुख्य गोष्ट. कमी बुध्दीचे, मोठ्या गोष्टी समजत नाहीत, त्यामुळे
गीतेमध्ये पण आहे, मनमनाभव. सर्व लिहतात, बाबा, आठवणीची यात्रा अवघड आहे, वारंवार
विसरुन जातो. कोणत्या ना कोणत्या मुद्यावर हार खातात. हे युध्द आहे, माया आणि
ईश्वरीय मुलांचे. यांची कोणाला माहिती नाही. बाबांनी सांगितले आहे, मायेवर विजय
प्राप्त करुन, कर्मातीत अवस्था प्राप्त करावयाची आहे. प्रथम तुम्ही आले आहोत, कर्म
संबंधामध्ये त्यात येत येत, आर्धाकल्पानंतर तुम्ही कर्म बंधनामध्ये येता. प्रथम
तुम्ही पवित्र आत्मा होता. कर्मबंधन ना सुखाचे, ना दु:खाचे होते. नंतर सुखाचे
संबंधात आला. हे पण आता तुम्ही समजता कि, आम्ही संबंधात होतो, आता दु:खात मध्ये
आहोत, नंतर जरुर सुखामध्ये जावू. नविन दुनिया जेव्हा हे ाती तेव्हा मालक होतो,
पवित्र होतो, आता जुनी दुनियेमध्ये पतित बनला आहे. मग आम्ही ते देवता बनत आहोत, हे
आठवणीत ठेवले पाहिजे ना.
बाबा म्हणतात कि, माझी आठवण करा तर तुमचे पाप नष्ट होतील, तुम्ही माझे घरी याल.
शांतीधाम मार्गे सुखधामला जाल. प्रथम जायचे आहे घरी, बाबा म्हणतता माझी आठवण कराल
तर तुम्ही पवित्र बनाल, मी पतित पावन तुम्हाला पवित्र बनवत आहे, घरी जाण्यासाठी. अशा
गोष्टी स्वत:शी केल्या पाहिजेत. बरोबर आताचक्र पुर्ण होत आहे, आम्ही एवढे जन्म घेतले
आहेत. आता बाबा आले आहेत पतितापासून पावन बनविण्यासाठी. योगबळानेच पावन बनाल. हा
योगबळ फार प्रसिध्द आहे, जे बाबाच शिकवित आहेत. यात शरीराद्वारे काही पण करण्याची
गरज नाही. तर सारा दिवस या गोष्टीचे चिंतन चालले पाहिजे. एकांतामध्ये कोठे पण बसा,
अथवा जावा बुध्दीमध्ये हेच चालले पाहिजे. एकांत तर फार आहे, वर छतावर फिरू शकता.
पुर्वी तुम्ही सकाळी मुरली ऐकल्यानंतर पहाडावर जात होता, जे ऐकले त्यांचे चिंतन
करण्यासाठी पहाडावर जावून बसत होता. जे ज्ञानातील छंदीष्ट आहेत, ते तर आपसात
ज्ञानाच्याच गोष्टीकरतील. ज्ञान नाही तर मग परचिंतन करत राहतात. प्रदर्शनीमध्ये
तुम्ही किती लोकांना हा रस्ता सांगतात. समजवता कि, आमचा धर्म फार सुख देणारा आहे.
दुसरे धर्मातील लोकांना फक्त एवढे समजावयाचे आहे कि, बाबांची आठवण करा. असे समजायचे
नाही कि हा मुसलमान आहे, मी अमूक आहे, नाही, आत्म्याला पाहावयाचे आहे. आत्म्याला
समजावयाचे आहोत. प्रदर्शनीमध्ये समजावताना हा अभ्यास करा, आम्ही आत्मा भावाला
समजावत आहे. आता आम्हाला बाबांकडून वारसा मिळत आहे. स्वत:ला आत्मा समजून भावाला
ज्ञान देत आहे, आता चला बाबा जवळ, फार काळ बाबांपासून दूर राहिलो आहे. ते आहे
शांतीधाम, येथे तर किती अशांती दु:ख इत्यादी आहे. आता बाबा म्हणतात कि, स्वत:ला
आत्मा समजण्याचा अभ्यास करा तर नाव, रुप, शरीर सर्व विसरुन जाईल. अमूक मुसलमान आहे
असे का समजता? आत्मा समजून समजावा, समजू शकता कि, ही आत्मा चांगली आहे कि वाईट.
आत्मासाठीच म्हटले जाते कि, वाईटापासून दूर पळाले पाहिजे. आता तुम्ही बेहदच्या
बाबाची मुले आहात. येथे भुमिका बजावली आता परत घरी जायचे आहे, पावन बनायचे आहे.
बाबाची जरुर आठवण केली पाहिजे. पावन बनाल तर पावन दुनियेचे मालक बनाल. मुखाद्वारे
प्रतिज्ञा करावयाची आहे. बाबा पण म्हणतता कि, प्रतिज्ञा करा. बाबा युक्ती पण
सांगतात कि, तुम्ही आत्मे भाऊ भाऊ आहात, मग शरीरात आल्यावर भाऊ-बहिण बनता. भाऊ-बहिण
कधी विकारात जावू शकत नाहीत. पवित्र बनून आणि बाबाची आठवण केलयाने तुम्ही विश्वाचे
मालक बनाल. समजावले जाते कि, मायेकडून हरलात मग उठून उभे राहा. जेवढे उभे राहाल,
तेवढी प्राप्ती होईल. घाटा आणि जमा तर होत आहे ना. आर्धाकल्प जमा मग रावण राज्यात
घाटा होत जातो. हिशोब आहे ना. विजयाने जमा, पराजयाने घाटा तर स्वत:ची पूर्ण तपासणी
केली पाहिजे. बाबाची आठवण केल्याने तुम्हा मुलांना खुशी होईल. ते तर फक्त महिमा करत
आहेत, समजत काही पण नाहीत. बेसमज मध्ये सर्व काही करत आहेत. तुम्ही तर पुजा इत्यादी
करत नाहीत. बाकी महिमा तर करतात ना. त्या एका बाबाची महिमा आहे अव्याभिचारी. बाबा
येऊन तुम्हा मुलांना स्वत:च शिकवत आहेत. तुम्हाला काही प्रश्न विचारण्याची आवश्यकता
नाही. चक्र स्मृतीमध्ये ठेवायचे आहे. समजले पाहिजे, कसे आम्ही मायेवर विजय प्राप्त
करतो, आणि मग हार खात आहे. बाबा सांगतात कि, हार खाल्याने 100 टक्के दंड पडतो. बाबा
म्हणतात कि, सदगुरुची निंदा करु नका, नाही तर पद प्राप्त होणार नाही. ही सत्य
नारायणाची कथा आहे, याला कोणी जाणत नाही. गीता वेगळी, सत्य नारायणाची कथा वेगळी केली
आहे. नरापासून नारायण बनण्यासाठी ही गीता आहे.
बाबा म्हणतात कि, मी तुम्हाला नरापासून नारायण बनण्याची कथा सांगत आहे, याला गीता
पण म्हणतात, अमरनाथाची कथा पण म्हणतात. तिसरा नेत्र बाबाच देतात. हे पण जाणता कि,
आम्ही देवता बनत आहे तर गुण पण जरुर असले पाहिजेत. या सृष्टीमध्ये कोणती पण वस्तू
नेहमी कायम नाही. नेहमी कायम तर एक शिवबाबाच आहेत, बाकी तर सर्वांना खाली यायचेच आहे.
परंतू बाबा पण संगम वर येतात, सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी. जुन्या दुनियेतील
आत्म्यांना नविन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना. तर विश्वनाटकामध्ये
ही सर्व रहस्ये आहेत. बाबा येऊन पवित्र बनवित आहेत. कोणत्या पण देहधारीला भगवान
म्हटले जात नाही. यावेळी बाबा समजावत आहेत, आत्म्याचे पंख तुटले आहेत, त्यामुळे उडू
शकत नाही. बाबा येऊन ज्ञान आणि योगाचे पंख देत आहेत. योगबळांनी तुमचे पाप भस्म होईल,
मग तुम्ही पुण्य आत्मा बनाल. प्रथम तर मेहनत पण केली पाहिजे, त्यामुळे बाबा म्हणतात,
माझी एकट्याची आठवण करा, चार्ट करा. ज्यांचा चार्ट चांगला असेल, ते लिहतील आणि
त्यांना खुशी होईल. आता सर्व मेहनम करत आहेत, चार्ट लिहत नाहीत तर योगाची ताकद वाढत
नाही. दिनचर्या लिहल्याने फायदा फार होतो. दिनचर्या बरोबर मुद्दे पण पाहिजेत.
दिनचर्या तर दोन्ही लिहतात, सेवा किती केली आणि आठवण किती केली? पुरुषार्थ असा करावा
ज्यामुळे शेवटी कोणती पण वस्तू आठवणीत येऊ नये. स्वत:ला आत्मा समजून पुण्य आत्मा बनू
अशी मेहनत करावयाची आहे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1.
एकांतामध्ये ज्ञानाचे मनन चिंतन करावयाचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये राहून, मायेवर
विजय प्राप्त करुन, कर्मातीत अवस्था प्राप्त करावयाची आहे.
2. कोणाला पण ज्ञान सांगते वेळी बुध्दीमध्ये ठेवावे कि, आम्ही आत्मा रुपी भावाला
ज्ञान देत आहे. नांव, रुप, देह सर्व विसरुन जावे. पावन बनण्याची प्रतिज्ञा करुन,
पावन बणुन, पावन दुनियाचे मालक बनायचे आहे.
वरदान:-
अखंड योगाचे
विधिद्वारे अखंड पुज्य बनणारे श्रेष्ठ महान आत्मा भव
आजकाल जे महान आत्मे
स्वत:ला म्हणून घेतात, त्यांचे नाव अखंडानंद इ. ठेवतात, परंतू सर्वांत अखंड स्वरुप
तर तुम्ही आहात, आनंदामध्ये पण अखंड, सुखामध्ये पण अखंड, फक्त संगदोषात येऊ नका,
दुसज्याचे अवगुण पाहून, ऐकून त्याकडे दुर्लक्ष करा, तर या विशेषतेमुळे अखंड योगी
बनाल, ज अखंड योगी आहेत, तेच अखंड पुज्य बनतात. तर तुम्ही असे महान आत्मा आहात, जे
आर्धाकल्प स्वत: पुज्य रुपात राहता, आणि आर्धाकल्प जड चित्रामध्ये पुजा होते.
बोधवाक्य:-
दिव्य बुध्दीच
शांतीच्या शक्तीचा आधार आहे...!!!
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
अव्यक्त
स्थितीचा अनुभव करण्यासाठी नेहमी आठवणीत ठेवा कि, विघ्नांना दूर करावयाचे आहे आणि
संपूर्णतेला जवळ आणावयाचे आहे. यासाठी कोणत्या पण ईश्वरीय मर्यादेमध्ये बेपर्वाह
बनायचे नाही, आसुरी मर्यादा व मायेशी बेपर्वाह बना. विघ्नांशी सामना करा तर समस्या
समाप्त होईल.