27-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो , तुमचा प्रत्येक बोल फार गोड , उत्तम असायला पाहिजे , जे बाबा दु:खहर्ता ,
सुखकर्ता आहेत , अशा नावासारखे सर्वांना सुख द्या....!!!
प्रश्न:-
लौकिक मित्र
संबंधी यांना ज्ञान देण्याची युक्ती काय आहे?
उत्तर:-
जे पण मित्र संबंधी इत्यादी आहेत. तर त्यांचे बरोबर फार नम्रतेने, प्रेमपुर्वक हसून
बोलले पाहिजे. समजले पाहिजे की, ही तिच महाभारताची लडाई आहे. बाबांनी रुद्रज्ञान
यज्ञ रचला आहे. मी तुम्हाला सांगतो की, भक्ती इत्यादी तर जन्म जनमांतर केली, आता
ज्ञान सुरु झाले आहे. जेव्हा संधी मिळेल तर फार युक्तीने बोला. कुटूंब परिवाराबरोबर
फार प्रेमाने चाला. कधी कोणाला दु:ख देऊ नका.
गीत:-
शेवटी तो दिवस
आला आज ज्या दिवसाची वाट पाहत होतो...
ओम शांती।
जेव्हा कोणते गीत वाजते तर मुलांनी आपले मनात त्याचा अर्थ काढला पाहिजे. सेकंदात
निघू शकतो. ही बेहदच्या नाटकातील फार चांगली वेळ आहे. भक्तीमार्गात मनुष्य बोलावत
पण आहेत. जेव्हा कोर्टामध्ये केस चालू असते तर वाटते की, कधी वाटाघाटीची चर्चा होईल,
कधी बोलावतील ज्यामुळे आमच्या केसचा, निकाल लागेल. तशी मुलांची पण कसे आहे, कोणती
केस? रावणाने तुम्हाला फार दु:खी बनविले आहे. तुमचा दावा दाखल झाला आहे मोठ्या
कोर्टामध्ये मनुष्य बोलावतात कि, बाबा या, येऊन आम्हाला दु:खापासून सोडवा. एक दिवस
दाव्याची सुनावणी जरुर होईल. बाबा ऐकतात पण, विश्वनाटकानुसार येताता पण बिल्कुल
वेळेवर. त्यामध्ये एका सेकंदाचा पण फरक पडत नाही. बेहदचे घड्याळ किती तंतोतंत चालत
आहे. येथे तुमच्याजवळ जी लहान घड्याळे आहेत, ते पण तंतोतंत चालत नाही. यज्ञाचे
प्रत्येक कार्य बिनचुक झाले पाहिजे. घड्याळ पण बिनचुक असायला पाहिजे. बाबा तर फारच
बिनचुक आहेत. सुनावणी फार बिनचुक होते. कल्प, कल्प, कल्पाचे संगमवर बिनचुक वेळेवर
बाबा येतात. तर मुलांची आता सुनावणी होईल, बाबा आले आहेत. आता तुम्हा सर्वांना
समजावत आहेत. पुर्वी तुम्ही पण समजत नव्हता कि, दु:ख कोण देत आहे? आता बाबांनी
समजावले आहे, रावण राज्य सुरु होत आहे. द्वापर पासून तुम्हा मुलांना माहित झाले आहे
कि, बाबा कल्प कल्प संगमयुगावर येत आहेत. ही आहे बेहदची रात. शिवबाबा बेहदच्या
रात्रीमध्ये येतात, कृष्णाची गोष्ट नाही, जेव्हा घोर अंधारात अज्ञानाचे निंद्रेत
झोपलेले असतात, तेव्हा ज्ञानसुर्य बाबा येतात, मुलांना दिवसात घेऊन जाण्यास,
सांगतात कि माझी आठवण करा, कारण पतितापासून पावन बनायचे आहे. बाबाच पतित पावन आहेत.
ते जेव्हा येतील तेव्हाच सुनावणी होईल. आता तुमची सुनावणी होत आहे. बाबा म्हणतता
कि, मी आलो आहे. पतितांना पावन बनविण्यासाठी. पावन बनण्याचा तुम्हाला किती सोपा
उपाय सांगत आहे. आजकाल पहा विज्ञानाचा किती जोर आहे. आण्विक बॉम्ब इत्यादीचा किती
जोराने आवाज होत आहे. तुम्ही मुले शांतीच्या बळाने या सायन्सवर विजय प्राप्त करत
आहात. विज्ञानाद्वारेच हा सारा विनाश होणार आहे. सायलेन्सद्वारे तुम्ही विजय
प्राप्त करता. बाहुबळवाले कधी पण विश्वावर विजय प्राप्त करु शकत नाहीत. हे मुद्दे
पण तुम्ही प्रदर्शनीमध्ये लिहले पाहिजेत.
दिल्लीमध्ये फार सेवा होऊ शकते कारण दिल्ली आहे सर्वांची राजधानी तुमची पण दिल्लीच
राजधानी असेल. दिल्लीलाच परिस्थिान म्हटले जाते. पांडवाचे किल्ले तर नाहीत. किल्ला
तेव्हा बांधला जातो. जेव्हा शत्रू आक्रमण करतात. तुम्हाला तर किल्ले इत्यादीची
आवश्यकता राहत नाही. तुम्ही जाणता कि, आम्ही शांतीच्या बळावर आपले राज्य स्थापन करत
आहोत. त्यांची आहे कृत्रीम शांती. तुमची आहे खरी शांती. ज्ञानाचे बळ, शांतीचे बळ
म्हटले जाते. ज्ञान आहे, शिक्षण शांतीचे बळ म्हटले जाते. शिक्षणाद्वारे पण बळ मिळते.
पोलीस अधिक्षक बनतात, किती ताकद राहते. त्यासर्व गोष्टी आहेत शरीराच्या, दु:ख
देणाज्या. तुमची प्रत्येक गोष्ट आत्मिक आहे. तुमच्या मुखातून जो पण शब्द निघेल तो
एक एक बोल असा उत्तम गोड असावा, जे ऐकणारा खुश होईल. जसे बाबा दु:खहर्ता, सुखकर्ता
आहेत, असे तुम्हा मुलांना पण सर्वांना सुख द्यावयाचे आहे. कुटूंब परिवाराला पण दु:खी
करायचे नाही. कायदे अनुसार सर्वांबरोबर चालायचे आहे. मोठ्या बरोबर प्रेमाने वागायचे
आहे. मुखाद्वारे बोल असे उत्तम निघावे, जे सर्व खुष होतील. बोला, शिवबाबा म्हणतात
मनमनाभव. उंच ते उंच मी आहे. माझी आठवण केलयाने तुमचे विकर्म विनाश होतील. फार
प्रेमाने बोलायचे आहे. समजा कोणी मोठा भाऊ आहे, त्याला बोला, दादाजी, शिवबाबा
म्हणतात कि, माझी आठवण करा. शिवबाबा ज्यांना रुद्र पण म्हटले जाते, तेच ज्ञानयज्ञ
रचतात. कृष्ण ज्ञान यज्ञ अक्षर म्हणत नाहीत. रुद्र ज्ञान यज्ञ म्हणतात तर रुद्र
शिवबाबांना हा यज्ञ रचला आहे. हा राजाई प्राप्त करण्यासाठी ज्ञान आणि योग शिकवत
आहेत. बाबा म्हणतात कि, भगवानुवाच मामेकम आठवण करा. कारण आता सर्वांची शेवटची घटका
आहे, वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वांना परत जावयाचे आहे. मरणाचे वेळी मनुष्याला
म्हणतात कि, ईश्वराची आठवण करा. येथे ईश्वर स्वत: म्हणतात कि, मरण समोर उभे आहे.
त्यापासून कोणी वाचू शकत नाही. शेवटीला येऊन बाबा सांगत आहेत कि, मुलांनो, माझी
आठवण करा, तर तुमचे पाप भस्म होतील, याला आठवणीची अग्नी म्हटले जाते. बाबा खात्री
देतात कि, यामुळे तुमचे पाप दग्ध होतील. विकर्म विनाश करण्याचा, पावन बनण्याचा
आणखीन कोणता उपाय नाही. पापाचे ओझे डोक्यावर वाढत वाढत भेसळ होत होते सोने 9 कॅरेटचे
झाले आहे. 9 कॅरेट नंतर मुलम्मा म्हटले जाते. आता परत 24 कॅरेट कसे बनेल. आत्मा
शुद्र कशी बनली? आत्मा शुध्द कशी बनेल? शुध्द आत्म्याला शरीर पण शुध्द मिळेल. कोणी
मित्र संबंधी इत्यादी असतील तर त्यांना फार नम्रतेने, प्रेम भावाने, हसतमुखाने बोलले
पाहिजे. समजावले पाहिजे, ही तर तिच महाभारत लढाई आहे. हा रुद्र ज्ञान यज्ञ पण आहे.
बाबाद्वारे आम्हाला सृष्टीच्या आदि मध्य अंताचे ज्ञान मिळत आहे. आणखीन दुसरीकडे कुठे
पण हे ज्ञान मिळणार नाही. मी तुम्हाला सत्य सांगत आहे, ही भक्ती इत्यादी तर जन्म
जन्मांतर केली आहे, आता ज्ञान सुरु होत आहे. भक्ती आहे रात्र, ज्ञान आहे दिवस
सतयुगामध्ये भक्ती असत नाही. युक्तीने बोलले पाहिज. जेव्हा कधी संधी मिळेल, तेव्हा
बाण मारयचा असतो, तर वेळ आणि संधी पाहिली पाहिजे. ज्ञान देण्याची पण फार युक्ती
पाहिजे. बाबा युक्त्या तर सर्वांना सांगत राहतात. पवित्रता तर फार चांगली आहे, हे
लक्ष्मी नारायण आमचे मोठे पुज्य आहेत ना. पुज्य पावन मग पुजारी पतित बनले. पावन
देवताची पतित पुजा करतात, हे तर शोभत नाही. काही तर पतितापासून दूर पळतात. वल्लभचारी
तर पायाला पण शिवू देत नाहीत. समजतात हा छी छी मनुष्य आहे. मंदीरामध्ये पण नेहमी
ब्राह्मणालाच मुर्तीला हात लावण्याची परवानगी असते. शुद्र मनुष्य आत जावू शकत नाहीत.
तेथे ब्राह्मण लोकच त्यांना स्नान इत्यादी करवितात, दुसज्या कोणाला जावू देत नाहीत.
फरक तर आहे ना. आता ते तर आहेत कुखवंशावली ब्राह्मण, तुम्ही आहात मुख वंशावली खरे
ब्राह्मण. तुम्ही त्या ब्राह्मणांना चांगले समजावू शकता कि, ब्राह्मण दोन प्रकारचे
आहेत, एक तर आहेत प्रजापिता ब्रह्माचे मुखवंशावली, दुसरे आहेत मुखवंशावली. ब्रह्माचे
मुख वंशावली ब्राह्मण आहेत, उंच ते उंच शेंडी. यज्ञ स्थापन करतात तरी पण ब्राह्मणाला
नियुक्त केले जाते. हा आहे ज्ञान यज्ञ. ब्राह्मणाला ज्ञान मिळत आहे. जे देवता बनत
आहेत. वर्ण पण समजावले अहोत. जी सेवाधारी मुले आहेत त्यांना सेवेचा सदैव छंद राहतो.
कोठे प्रदर्शनी असेल तर झटक्यात सेवेसाठी पळतात, आम्ही जावून असे मुद्दे समजावू.
प्रदर्शनी तर प्रजा बनविण्याचा विहंग मार्ग आहे, आपोआपच अनेकानेक येतात. तर
समजावणारे पण चांगले पाहिजेत. जर कोणी पुर्ण समजावले नाही तर म्हणतात ब्रह्मा कुमारी
जवळ एवढेच ज्ञन आहे. बदनामी होते. प्रदर्शनी मध्ये एक असा चुस्त असावा जो
समजावणाज्या, गाईडला पाहत राहिल. कोणी मोठा मनुष्य आला. तर त्यांना समजावणारा पण
तसाच चांगला दिला पाहिजे. कमी समजावणारा असेल त्याला हटविले पाहिजे. देखरेख
करण्यासाठी एक चांगला असला पाहिजे. तुम्हाला तर महात्म्यांना पण बोलवायचे आहे.
तुम्ही फक्त सांगता कि, बाबा असे म्हणतात, ते उंच ते उंच भगवान आहेत, तेच रचनाकार
पिता आहेत. बाकी सर्व आहेत त्यांची रचना. वारसा पित्याकडून मिळतो, भाऊ, भावाला वारसा
काय देईल. कोणी पण सुखधामचा वारसा देवू शकत नाहीत. वारसा देतातच बाबा सर्वांची
सद्गती करणारे एकच बाबा आहेत, त्यांची आठवण केली पाहिजे. बाबा स्वत: येऊन सुवर्णयुग
बनवित आहेत. ब्रह्मातनाद्वारे स्वर्ग स्थापन करत आहेत. शिवजयंती साजरी करत आहेत,
परंतू ते काय करत आहेत, हे सर्व मनुष्य विसरुन गेले आहेत. शिवबाबाच येऊन राजयोग
शिकवून वारसा देत आहेत. 5000 वर्षापूर्वी भारत स्वर्ग होता, लाखो वर्षांची तर
गोष्टच नाही. तिथी तारीख सर्व आहे, त्याला कोणी नष्ट करु शकत नाही. नविन दुनिया आणि
जुनी दुनिया अर्धे अर्धे पाहिजे. ते सतयुगाचा कालावधी लाखो वर्षाचा आहे असे म्हणतात.
तर कोणता हिशोबच होऊ शकत नाही. स्वस्तिका मध्ये पूर्ण 4 भाग आहेत. 1250 वर्षे
प्रतयेक युगामध्ये वाटलेले आहेत. हिशोब केला जातो ना. ते लोक हिशोब तर काहीच जाणत
नाहीत, त्यामुळे कौडी तुल्य म्हटले जाते. आता बाबा हिरेतुल्य बनवत आहेत. सर्व पतित
आहेत, भगवानाची आठवण करत आहेत. त्यांना भगवान येऊन ज्ञानाने फुलासारखे बनवित आहेत.
तुम्हा मुलांना ज्ञान रत्नांनी सजवत आहेत. मग पहा तुम्ही काय बनत आहात, तुमचे मुख्य
लक्ष्य काय आहे? भारत किती अग्रनी होता, सर्व विसरुन गेले आहेत. मुसलमान इत्यादीनी
पण अनेक वेळेस सोमनाथाचे मंदीर लुटून नेले, मस्जिद इत्यादी ठिकाणी हीरे इत्यादी
लावले आहेत. आता त्याची तर कोणी किंमतच करु शकत नाही. एवऐ मोठ मोठे मणी राजांच्या
मुकूटात राहत होत. कोणाचे करोडोचे, कोणाचे 5 करोडचे. आजकाल तर सर्व नकली निघाले
आहेत. या दुनियेमध्ये सर्व आहे कृत्रिम पेशाएवढे सुख बाकी आहे दु:ख, त्यामुळे
सन्यासी पण म्हणतता कि, निकृष्ट प्रतीचे सुख आहे, त्यामुळे ते घरदार सोडतात, परंतू
आता तर ते पण तमोप्रधान बनले आहेत. शहरात आले आहेत. परंतू आता कोणाला सांगावे, राजा
राणी तर कोणी नाही, कोणी पण ऐकत नाही. म्हणतात, सर्वांचे आप-आपली मत आहेत, जे वाटले
ते करा. संकल्पाची सृष्टी आहे. आता तुम्हा मुलांना बाबा गुप्त पध्दतीने पुरुषार्थ
करवित राहत आहेत. तुम्ही किती सुख भोगता. दुसरे धर्म पण शेवटी जेव्हा वृध्दी होतात,
मग लढाई इत्यादी खिटपीट होत राहते. पाऊण भाग तर सुखामध्ये राहता, त्यामुळे बाबा
म्हणतात कि, तुमचा दैवी देवता धर्म फार सुख देणारा आहे. मी तुम्हाला विश्वाचा मालक
बनवित आहे. आणखीन कोणता धर्मस्थापक राजाई स्थापन करत नाही. ते सद्गती करत नाहीत.
येतातच फक्त आपला धर्म स्थापन करण्यासाठी. ते पण जेव्हा शेवटाला तमोप्रधान बनतात,
तेव्हा मग बाबाला यावे लागते, सतोप्रधान बनविण्यासाठी. तुमचे कडे शेकडो मनुष्य
येतात, परंतू काही पण समजत नाहीत, बाबाला लिहतात अमका फार चांगले समजावत आहे, फार
चांगला आहे. बाबा म्हणतात काही पण समजला नाही. जर समजले, कि बाबा आले आहेत, विश्वाचे
मालक बनवत आहेत, बस. त्यावेळेस नशा चढला पाहिजे. लगेच तिकीट काढून तो पळेल. परंतू
ब्राह्मणीचे पत्र तर जरुर आणले पाहिजे, बाबाला भेटण्यासाठी. बाबाला ओळखले असेल तर
भेटल्याशिवाय राहणार नाही, एकदम नशा चढेल. ज्यांना नशा चढला असेल. त्यांना मनातून
फार खुशी राहते. त्यांची बुध्दी मित्र संबंधी मध्ये भटकणार नाही. परंतू अनेकांची
बुध्दी भटकत आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमळ फुलासारखे पवित्र बनायचे आहे, आणि
बाबाची आठवण करावयाची आहे. आहे फार सोपे जेवढे होईल तेवढी बाबाची आठवण करा. जसे
ऑफीस मधून सुट्टी घेता, तसे धंद्यातून सुट्टी घेऊन एक दोन दिवस आठवणीच्या यात्रेत
बसा. थोडे थोडे आठवण करण्यापेक्षा चांगले आहे पूर्ण दिवस व्रत करावे, बाबाची आठवण
करण्याचे. किती जमा होईल. विकर्म पण विनाश होतील. बाबांच्या आठवणीनेच सतोप्रधान
बनायचे आहे. सारा दिवस पूर्ण योग तर कोणाचा लागणारच नाही. माया विघ्न जरुर घालते,
तरी पण पुरुषार्थ करत करत विजय प्राप्त कराल. बस, आजचा सारा दिवस बागेत बसून बाबाची
आठवण करतो. जेवताना पण बस आठवणीत बसतो. ही आहे मेहनत मला पावन बनायचे जरुर आहे.
मेहनत केली पाहिजे, इतरांना पण रस्ता दाखविला पाहिजे. बैज तर अनेक चांगली वस्तू आहे.
वाटेत पण एकमेकांशी ज्ञान सांगत राहाल, तर फार येऊन ऐकतील. बाबा म्हणतात कि, माझी
आठवण करा, बस, संदेश दिला तर आम्ही जबाबदारी तून सुटलो. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. धंद्या
पासून सुट्टी घेऊन आठवणीत राहण्याचे व्रत घ्या. मायेवर विजय प्राप्त करण्यासाठी
बाबाची आठवण करण्याची मेहनत करा.
2. फार नम्रता आणि प्रेम भावाने, हसत राहून मित्र संबंधीची सेवा करा. त्यांचे मध्ये
बुध्दी भटकावयाची नाही. प्रेमाने बाबाचा परिचय द्यावयाचा आहे.
वरदान:-
लौकिकला
अलौकिकमध्ये परिवर्तन करुन सर्व कमजोरी पासून मुक्त होणारे मा.सर्वशक्तीमान भव :-
जी मास्टर
सर्वशक्तीमान ज्ञानसंपन्न आत्मे आहेत ते कधी कोणाच्या पण कमजोरी किंवा समस्येच्या
वशीभूत होत नाहीत, कारण ते अमृतवेळेपासून जे पण पाहतात, ऐकतात, विचार करतात, किंवा
कर्म करतात, त्याला लौकिक पासून अलौकिक मध्ये परिवर्तन करतात. कोणता पण लौकिक
व्यवहार निमित्त मात्र करुन, अलौकिक कार्य नेहमी स्मृतीत ठेवून, कोणत्या पण
प्रकारच्या मायावी विकारांच्या वशीभूत व्यक्तीच्या संपर्कात, स्वत: वशीभूत होत
नाहीत. तमोगुणी वातावरणामध्ये पण नेहमी कमळासारखे राहतात. लौकिक चिखलात राहून
त्यापासून वेगळे राहतात.
बोधवाक्य:-
अशुध्दी विकार
रुपी भुतांचे आवाहन करते त्यामुळे विचारामध्ये पण शुध्द बना...!!!
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
अमृतवेळेला
उठल्यापासून प्रत्येक कर्म, प्रत्येक संकल्प, आणि प्रत्येक बोलणे यात वक्तशीर बना.
एक पण बोलणे असे नसावे जे व्यर्थ होईल. जसे मोठ्या माणसाचे बोलण्यातील शब्द ठरलेले
असतात, तसे तुमचे बोलणे ठरलेले असावे. जादा बोलायचे नाही.