14-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, तुमची जेव्हा कर्मातीत अवस्था होईल तेव्हा विष्णूपुरी मध्ये जाल, पास विद्
ऑनर (सन्मानाने पास होणारी) होणारी मुलेच कर्मातीत बनतात...!!!
प्रश्न:-
तुम्हा
मुलांवरती दोन्ही बाप कोणते कष्ट (मेहनत) घेतात?
उत्तर:-
मुले
स्वर्गामध्ये जाण्यासाठी योग्य बनावी. सर्वगुण संपन्न, 16 कला संपुर्ण बनविण्याचे
कष्ट, बापदादा दोघेही घेतात. हे जसे तुम्हाला डबल इंजन मिळाले आहे. असे आश्चर्यकारक
शिक्षण देतात ज्यामुळे तुम्ही 21 जन्मांची राजाई प्राप्त करता.
गीत:-
लहानपणीचे
दिवस विसरु नका....
ओम शांती।
गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांनी गीत ऐकले. नाटकामध्ये ठरल्याप्रमाणे
अशी-अशी गीते निवडली आहेत. मनुष्य चक्रावुन जातात की हे काय नाटकाच्या गितावरती
मुरली चालवतात. हे कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे. शास्त्र, वेद, उपनिषद इ. सर्व सोडून
दिले, आता रेकॉर्डवर चालवतात, हे पण तुम्हा मुलांच्या बुध्दीमध्ये आहे, की आम्ही
बेहदच्या पित्याचे बनलो आहे, ज्यांच्या कडून अतिंद्रिय सुख मिळते, अशा बाबांना कधी
विसरायचे नाही. बाबांच्या आठवणीने जन्म-जन्मांतराचे पाप नष्ट होतात. असे व्हायला नको
आठवण सोडून दिली आणि पाप राहून गेले. नंतरपद ही कमी होईल. अशा बाबांची तर चांगल्या
पध्दतीने आठवण करण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. जसे साखरपुडा झाल्यानंतर
एक-दुसज्यांची आठवण करत राहतात. तुमचाही साखरपुडा झाला आहे. नंतर जेव्हा तुम्ही
कर्मातीत अवस्था प्राप्त करता तेव्हा विष्णूपुरी मध्ये जाता. आता शिवबाबा ही आहेत.
प्रजापिता ब्रह्मा बाबाही आहेत, दोन इंजिन मिळालेली आहेत. एक निराकारी, दुसरी साकारी.
दोघेही मेहनत (कष्ट) घेतात कि, मुलांनी स्वर्गात जाण्या योग्य बनावे. सर्वगुण
संपन्न 16 कला संपुर्ण बनायचे आहे. येथे परिक्षा पास करायची आहे. या गोष्टी
शास्त्रामध्ये नाहीत. हे शिक्षण खुप आश्चर्यकारक आहे. भविष्य 21 जन्मांसाठी दुसरे
शिक्षण असते मृत्युलोकांसाठी, हे शिक्षण आहे अमरलोकांसाठी. त्यासाठी शिकायचे तर
येथेच आहे ना. जोपर्यंत आत्मा पवित्र बनत नाही तोपर्यंत सतयुगामध्ये जाऊ शकत नाही.
म्हणून बाबा संगमयुगामध्ये येतात. यालाच पुरुषोत्तम कल्याणकारी युग म्हटले जाते.
जेव्हा की तुम्ही कौडीपासून हिज्यासारखे बनत आहात, म्हणून श्रीमतावर चालत राहा. श्री
श्री शिवबाबांनाच म्हटले जाते. माळेचा अर्थही मुलांना समजावला आहे. वरती फुल आहे
शिवबाबा नंतर आहे मेरु मणी. प्रवृत्तीमार्ग आहे ना. नंतर आहेत दाणे जे विजय मिळवणारे
आहेत. त्यांचीच रुद्र माळा नंतर विष्णूची माळा बनते. या माळेचा अर्थ कोणालाच माहित
नाही. बाबा समजावून सांगतात तुम्हा मुलांना कौडीपासून हिज्यासारखे बनायचे आहे. 63
जन्म तुम्ही बाबांची आठवण करत आलात. तुम्ही सर्व प्रियेसी आहात एका प्रियकराचे,
सर्व भक्त एका भगवानाचे आहेत. पतिचाही पति, पित्याचा पिता तो एकच आहे. तुम्हा
मुलांना राजांचा ही राजा बनवतात. स्वता: बनत नाहीत. बाबा वारंवार समजावतात.
बाबांच्या आठवणीनेच तुमचे जन्म-जन्मांतराचे पाप भस्म होतील. साधू संत तर म्हणतात
आत्मा निर्लेप आहे. बाबा समजावतात संस्कार चांगले किंवा वाईट आत्माच घेऊन जाते. ते
तर म्हणतात बस जिकडे पाहिले तिकडे भगवानच भगवान आहे. भगवानाची ही सर्व लीला आहे.
एकदमच वाम मार्गात खराब बनून जातात. अश्चर्याच्या मतावरही लाखों मनुष्य चालले आहेत.
ही पण ड्रामामध्ये नोंद आहे. नेहमी बुध्दीमध्ये तीन धाम आठवणीत ठेवा. शांतीधाम जिथे
आत्मे राहतात, सुखधाम ज्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. दु:ख धाम सुरु होते,
अध्र्याकल्पानंतर, भगवानाला म्हटले जाते स्वर्गाचा रचयिता. तो काही नर्क स्थापन करत
नाही. बाबा म्हणतात मी तर सुखधाम स्थापन करतो. बाकी हारणे-जिंकणे चा खेळ आहे. तुम्ही
मुले श्रीमतावर चालत मायेवर विजय मिळवता. नंतर अध्र्याकल्पानंतर रावण राज्य सुरु
होते. तुम्ही मुले आता युध्दाच्या मैदानावर आहात. हे बुध्दी मध्ये धारण करायचे आहे,
नंतर दुसज्यांना समजावयाचे आहे. आंधळ्यांची काठी बनून घराचा रस्ता दाखवयाचा आहे.
कारण सर्व त्या घराला विसरले आहेत. म्हणतात की, हे एक नाटक आहे, परंतू याचे आयुष्य
लाखो हजारो वर्षाचे आहे असे म्हणतात. बाबा समजावतात रावणाने तुम्हाला किती आंधळे
बनवले आहे. आता बाबा सर्व गोष्टी समजावतात. बाबांनाच ज्ञानसागर असे म्हटले जाते.
याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाच्या मनात काय चालले, ते जाणतात. ते तर रिध्दी,
सिध्दीवाले शिकतात, जे तुमच्या मनात काय आहे ते सांगतात. नॉलेजफुलचा अर्थ हा नाही.
ही तर बाबांची महिमा आहे. तो ज्ञानाचा सागर आनंदाचा सागर आहे. मनुष्य तर म्हणतात की
तो अंतरयामी आहे. आता तुम्ही मुले समजता की तो शिक्षक आहे. आम्हाला शिकवतो. तो
आत्मिक पिता आहे, आत्मिक सतगुरु पण आहे. ते शरीरधारी शिक्षक गुरु असतात, ते पण
वेगवेगळे असतात. तिन्ही एक असू शकत नाही. कदाचित काही जण पिता शिक्षकही असू शकतो.
गुरु होऊ शकत नाही. तो तर मनुष्य आहे. येथे तर ते परमपिता परमात्मा शिकवितात.
आत्म्याला परमात्मा म्हटले जात नाही. हे पण कोणाला समजत नाही. असे म्हणतात,
परमात्म्यांनी अर्जुनाला साक्षात्कार केला, तर तो म्हणाला बस करा. बस करा मी एवढे
तेज सहन करु शकत नाही. हे जे ऐकले आहे त्यामुळे समजतात परमात्मा एवढा तेजोमय (प्रकाशमान)
आहे. सुरुवातीला बाबांच्या जवळ यायचे, तर साक्षात्कार व्हायचा. म्हणायचे बस करा,
खुप तेज आहे आम्ही सहन करु शकत नाही. जे ऐकले आहे तीच भावना बुध्दीत असते, बाबा
म्हणतात जो ज्या भावनेने आठवण करतो मी त्याची भावना पुर्ण करतो. कुणी गणेशाचा पुजारी
असेल, तर त्याला गणेशाचा साक्षात्कार करवतो. साक्षात्कार झाल्यानी समजतात बस
मुक्तीधाम मध्ये पोहचलो. परंतू नाही मुक्तीधाम मध्ये, कुणीही जावू शकत नाही. नारदाचे
उदाहरण आहे. तो शिरोमणी भक्त गायलेला आहे. त्यांनी विचारले मी लक्ष्मीला वरु शकतो,
तर म्हणाले आपले तोंड तर बघा. भक्त माळा ही असते. स्त्रियांमध्ये मीरा आणि
पुरुषांमध्ये नारद मुख्य आहेत. येथे ज्ञानामध्ये मुख्य शिरोमणी आहे सरस्वती,
नंबरवार तर असतातच ना. बाबा समजावतात मायेपासून खुप सावधान राहायचे आहे. माया असे
उल्टे काम करवेल. नंतर शेवटी खुप रडावे लागेल. पश्चात्ताप करावा लागेल. भगवान आला
आणि आम्ही वारस होऊ शकलो नाही. नंतर प्रजेमध्ये दास-दासी जाऊन बनाल. शेवटी शिक्षण
तर पुर्ण होऊन जाते, नंतर खुप पश्चात्ताप करावा लागतो म्हणून बाबा अगोदरच समजावून
सांगतात, नंतर पश्चात्ताप व्हायला नको. जेवढी बाबांची आठवण करत राहू, तरच योग
अग्नीने पापे भस्म होतील. आत्मा सतोप्रधान होती नंतर कट चढत-चढत तमोप्रधान बनली आहे.
सोने, चांदी, तांबे, लोखंड नावे ही आहेत आता तुम्हाला लोखंडाच्या दुनियेतून
सोन्याच्या दुनियेत जायचे आहे. पवित्र बनल्याशिवाय आत्मे जावू शकत नाहीत. सतयुगाता
पवित्रता होती, तेव्हा शांती, समृध्दी पण होती. येथे पवित्रता नाही तर शांती,
समृध्दी ही नाही. रात्र-दिवसाचा फरक आहे. तर बाबा समजावतात हे लहानपणीचे दिवस विसरु
नका. बाबांनी दत्तक घेतले आहे ना. ब्रह्माद्वारे दत्तक घेतात ना. हे दत्तक घेणे आहे
ना. स्त्रीला दत्तक घेतले जाते. बाकी मुलांना जन्म दिला जातो. स्त्री (पत्नीला) रचना
म्हणू शकत नाही. हे बाबा ही दत्तक घेतात, तुम्ही आमची तीच मुले आहात. ज्यांना
कल्पापुर्वी दत्तक घेतले होते. दत्तक मुलांनाच बाबांकडून वारसा मिळतो. उंच ते उंच
बाबांकडून उंच ते उंच वारसा मिळतो. तो तर आहेच भगवान नंतर दुसज्या नंबरवर आहेत,
लक्ष्मी-नारायण सतयुगाचे मालक. आता तुम्ही सतयुगाचे मालक बनत आहात. अजून संपूर्ण
बनले नाही, बनत आहात.
पावन बनून पावन बनवणे हीच आत्म्याची खरी सेवा आहे. आता तुम्ही आत्मिक सेवा करता
म्हणून तुम्ही खुप उच्च आहात. शिवबाबा पतितांना पावन बनवतात. तुम्हीही पावन बनता.
रावणाने तुच्छ बुध्दी बनवले आहे. आता बाबा लायक (योग्य) बनवून विश्वाचे मालक बनवतात.
अशा बाबांना दगड-धोंड्यात आहे असे कसे म्हणू शकतो? बाबा म्हणतात हा खेळ बनविला आहे.
कल्पानंतर ही असेच होणार. आता ड्रामा प्लॅन अनुसार मी आलो आहे. तुम्हाला समजावण्या
साठी यामध्ये थोडाही फरक पडू शकत नाही. बाबा एका सेकंडाचाही उशीर करु शकत नाहीत. जसे
बाबांचे अवतरण होते, तसेच तुम्हा मुलांचेही अवतरण होते, तुम्ही अवतरीत आहात. आत्मा
येथे येऊन भु-भुमिका साकारमध्ये बजावते, याला म्हटले जाते अवतरण, वरुन खाली आला
भुमिका बजावण्यासाठी. बाबांचा दिव्य अलौकिक जन्म आहे. बाबा स्वत: म्हणतात मला
प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. मी या शरीरामध्ये प्रवेश करतो. हे माझे कायम स्वरुपी
शरीर आहे. हा खुप मोठा आश्चर्य कारक खेळ आहे. या नाटकामध्ये प्रत्येकाची भुमिका
नोंद झालेली आहे. 21 जन्मांची भुमिका परत अशीच सादर करणार. तुम्हाला स्पष्ट ज्ञान
मिळाले आहे, ते ही नंबरवार पुरुषार्थानुसार. महारथींची बाबा महिमा तर करतात ना. हे
जे दाखवतात पांडव आणि कौरवांचे युध्द झाले, यासर्व खोट्या बनवलेल्या गोष्टी आहेत.
आता तुम्ही समजता ते आहेत शरीराची डबल हिंसा करणारे, तुम्ही आहात आत्मिक, डबल
अहिंसक राजाई घेण्यासाठी. तुम्ही कसे बसले आहात. हे जाणता बाबांच्या आठवणीने विकर्म
विनाश होणार आहेत. हिच चिंता सतत लागून आहे. कष्ट सारे आठवण करण्यामध्ये आहेत,
म्हणून भारताच्या प्राचीन योगाचे गायन आहे. परदेशी भारताचा प्राचीन योग शिकण्याची
इच्छा बाळगतात. समजतात कि सन्यासी आम्हाला हा योग शिकवतील. खरतर ते काहीच शिकवत
नाहीत. त्यांचा संन्यास आहे हठयोगाचा. तुम्ही आहात प्रवृत्ती मार्ग वाले. तुमचे
सुरुवातीलाच राज्य होते. आता आहे अंत. आता तर पंचायती राज्य आहे. दुनियेत अंधार खुप
आहे. तुम्हाला माहित आहे. आता तर मारामारी, खून हा खेळ होणार आहे. हा ही एक खेळ
दाखवतात, ही तर बेहदची गोष्ट आहे, किती खुन होतील. नैसर्गिक आपत्ती येईल. सर्वांना
मरण येईल. याला खुने नाहेक खेळ म्हटले जाते. हे पाहण्यासाठी खुप हिम्मत असायला हवी.
भित्रे तर बेशुध्द पडतील, यासाठी निर्भयता खुप असायला हवी. तुम्ही शिव शक्ती आहात
ना. शिवबाबा आहेत सर्व शक्तीमान, आम्ही त्यांच्याकडून शक्ती घेतो, पतितापासून पावन
बनण्याची युक्ती बाबाच सांगतात. बाबा खुप सहज मार्ग सांगतात. मुलांनो तुम्ही
सतोप्रधान होता, आता तमोप्रधान बनले आहात. आता बाबा म्हणतात माझी आठवण करा तर,
तुम्ही पतितापासून पावन सतोप्रधान बनाल. आत्म्याला बाबांशी योग लावायचा आहे. तरच
पापे भस्म होऊन जातील, अधिकारी ही बाबाच आहेत. चित्रांमध्ये दाखवतात विष्णूच्या नाभी
(बेंबी) तून ब्रह्मा निघाला. त्यांच्याद्वारे सर्व वेद शास्त्रांचे रहस्य सांगितले.
आता तुम्ही हे जाणता ब्रह्माच विष्णू, विष्णू हाच ब्रह्मा बनतो. ब्रह्मा द्वारे
स्थापना करतात, नंतर जी स्थापना केली त्याची पालनाही करणार ना. हे सर्व
चांगल्याप्रकारे समजावले जाते, ज्यांना समजले आहे त्यांना असे वाटत राहते की, हे
आत्म ज्ञान कसे सर्वांना मिळेल. आमच्याकडे पैसा आहे तर का नाही सेंटर खोलायचे. बाबा
म्हणतात ठीक आहे. भाड्याने घर घ्या, त्यामध्ये हॉस्पिटल आणि विद्यापीठ खोला.
विश्वविद्यालय किंवा युनिवर्सिटी, एकच तर झाली. ही मनुष्यापासून देवता बनण्याची किती
मोठे विद्यापीठ आहे. विचारतात, तुमचा खर्च कसा चालतो? अरे, ब्रह्माकुमार-कुमारीच्या
बाबांना एवढी सर्व मुले आहेत. तुम्ही विचारायला आलात होय! फलकावरती पहा काय लिहले
आहे? खुप आश्चर्यकारक ज्ञान आहे. बाप ही आश्चर्यकारक आहे ना. विश्वाचे मालक तुम्ही
कसे बनता? शिवबाबांना म्हणतात श्री श्री, कारण उच्च ते उच्च आहेत ना.
लक्ष्मी-नारायणाला म्हणतात श्री लक्ष्मी, श्री नारायण. यासर्व चांगल्या प्रकारे
आत्मसात करण्याच्या गोष्टी आहेत. बाबा म्हणतात मी तुम्हाला राजयोग शिकवतो, ही आहे
खरी-खरी अमरकथा, फक्त एका पार्वतीला थोडीच ऐकवली असेल. खुप सारे मनुष्य अमरनाथला
जातात. तुम्ही मुले बाबांजवळ आले आहात. ताजेतवाने होण्यासाठी, नंतर सर्वांना
समजावयाचे आहे, जाऊन रिफरेश करायचे आहे, सेंटर खोलायचे आहे. बाबा म्हणतात फक्त 3
पाऊले जमीन घेऊन हॉस्पिटल कम युनिवर्सिटी खोला, तर खुप जणांचे कल्याण होईल. यामध्ये
खर्च तर काहीच नाही. आरोगय, धन, आणि आनंद एका सेकंदामध्ये मिळतो. मुलगा जन्मला आणि
वारस झाला. तुम्हाला ही निश्चय झाला आणि विश्वाचे मालक बनले. नंतर सर्व
पुरुषार्थावर अवलंबून आहे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती, मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. अंत
काळातील शेवटचा खुन मारामारी चे दृश्य पाहण्यासाठी खुप-खुप निर्भय, शिव शक्ती बनायचे
आहे. सर्वशक्तीमान बाबांच्या आठवणीने शक्ती घ्यायची आहे.
2. पावन बणुन पावन बनविण्यासाठी, आत्मिक खरी सेवा करायची आहे. डबल अहिंसक बनायचे आहे.
आंधळ्याची काठी बनून सर्वांना घराचा रस्ता दाखवयाचा आहे
वरदान:-
जुन्या
संस्कारांचा अग्नी संस्कार करणारे खरे मरजीवा भव
ज्याप्रमाणे
मेल्यानंतर शरीराचा संस्कार करतात तेव्हा नाव रुप नष्ट होऊन जाते. अशाप्रकारे तुम्ही
मुले जेव्हा मरजीवा बनता, तेव्हा शरीर भले तेच आहे परंतू जुन्या संस्काराचा,
स्मृतींचा, स्वभावाचा संस्कार करुन टाकता. संस्कार केलेला मनुष्य परत समोर आला तर
त्याला भुत म्हटले जाते. अशाप्रकारे येथेही जर कोणतेही संस्कार केलेले संस्कार जागे
(जागृत) होतात तर हे सुध्दा मायेचे भुत आहेत. या भुतांना पळवून लावा. यांचे वर्णनही
करु नका.
बोधवाक्य:-
कर्मभोगाचे
वर्णन करण्यापेक्षा, कर्मयोगाच्या स्थितीचे वर्णन करत रहा...!!!
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
संपुर्ण
दिवसभर सर्वांप्रती कल्याणाची भावना, सदैव, स्नेह आणि सहयोग देण्याची भावना, हिम्मत,
उल्लास वाढविण्याची भावना, आपले पणाची भावना आणि आत्मिक स्वरुपाची भावना ठेवायची आहे.
हीच भावना अव्यक्त स्थिती बनविण्याचा आधार आहे.