19-01-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
02.09.1985 ओम शान्ति
मधुबन
"प्रत्येक कार्यामध्ये
सफलतेचे सहज साधन स्नेह"
आज मुरब्बी मुलांच्या
स्नेहाचे रिटर्न देण्यासाठी आले आहेत. मधुबन निवासींना अथक सेवेचे विशेष फळ
देण्यासाठी फक्त मिलन मनवण्यासाठी आले आहेत. हे स्नेहाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे,
ब्राह्मण परिवाराचा विशेष आधार हे विशेष स्नेह आहे. वर्तमान वेळी स्नेह प्रत्येक
कार्यामध्ये सफलतेचे सहज साधन आहे. योगी जीवनाचा आधार तर निश्चय आहे, परंतु
परिवाराचा आधार स्नेह आहे. जो स्नेह कोणाच्याही मनाला जवळ घेऊन येतो. वर्तमान वेळी
आठवण आणि सेवा यांच्या समानतेचे सोबत स्नेह आणि सेवा यांची समानता सफलतेचे साधन आहे.
मग ती देशातली सेवा असो, विदेशी सेवा असो दोन्हीच्या सफलतेचे साधन आत्मिक स्नेह आहे.
ज्ञान आणि योग, हे शब्द तर खूप जणांकडून ऐकले आहेत परंतु दृढतेने आणि श्रेष्ठ
संकल्पाने आत्म्यांना स्नेहाची अनुभूती होणे ही विशेषता आणि नवीनता आहे. आणि आजच्या
विश्वाला स्नेहाची गरज आहे, कितीही अभिमानी व्यक्तीला स्नेह जवळ अआणू शकतो. स्नेहाचे
भिकारी, शांतीचे भिकारी आहेत, परंतु शांतीचा अनुभव सुद्धा स्नेहाच्या दृष्टीने करू
शकतो. तर स्नेह, शांतीचा अनुभव स्वतः करऊ शकतो. कारण शांतीचा अनुभव सहज होतो.
बाबासुद्धा स्नेहाचाच प्रतिसाद देतात. जरी रथ चालो किंवा न चालो तरीसुद्धा बाबा
स्नेहाचा प्रतिसाद देतात. मुलांमध्ये सुद्धा बाबा याच स्नेहाचे प्रत्यक्ष फळ पाहू
इच्छितात. (गुलजार दादी, जगदीश भाई, निर्वैर भाई) विदेश सेवा करून आले आणि (दादी जी
आणि मोहिनी बेहेन) जात आहेत. हे सुद्धा त्या आत्म्याच्या स्नेहाचे फळ त्यांना मिळत
आहे. नाटकाच्या नोंदणी अनुसार विचार काही वेगळा करतात परंतु होते काही वेगळे.
तरीसुद्धा फळ प्राप्त होते त्यामुळे प्रोग्राम बनतो. सर्वजण स्वतःची चांगली भूमिका
वाटून आले. ही नाटकांमध्ये नोंद झालेली आहे, तर सहज त्याचे फळ प्राप्त होते. विदेश
सुद्धा चांगल्या आवडीने सेवेमध्ये पुढे जात आहे. हिम्मत आणि उमंग यामध्ये सर्वजण
चांगले आहे. सर्वांच्या हृदया मधून धन्यवादाचे विचार बाप दादा पर्यंत पोहोचतात,
कारण ते सुद्धा समजतात, भारतामध्ये किती आवश्यकता आहे तरीसुद्धा भारताचा स्नेह
आम्हाला किती सहयोग देत आहे. याच भारतामध्ये सेवा करणाऱ्या सहयोगी परिवाराला मनातून
धन्यवाद देत आहेत जेवढा देश दूर तेवढेच हृदयातून स्नेहाचे पात्र बनणारे जवळ आहेत.
त्यामुळे बापदादा चहूबाजूच्या मुलांना धन्यवाद आजच्या बदल्यात प्रेमपूर्वक आठवण आणि
धन्यवाद देत आहेत. बाबा पण गीत गातात ना.
भारतामध्ये सुद्धा खूप उमंग उत्साहाने पदयात्रेची खूपच चांगली भूमिका पूर्ण करत आहे.
चहूबाजूला सेवेची धूमधामाचे वातावरण खूप चांगले आहे. उमंग उत्साह, थकलेल्या अवस्थेला
विसरून सफलता प्राप्त करून देत आहे. चहूबाजूच्या च्या सेवेची सफलता चांगली आहे. बाप
दादा पण सर्व मुलांच्या सेवेचा उमंग उत्साहाचे स्वरूप पाहून हर्षित होतात. (नैरोबी
मध्ये जगदीश भाई पोपला भेटून आले) पोपला पण दृष्टी दिली ना. हे पण तुमच्यासाठी
विशेष व्ही आय पी सेवेमध्ये सफलता सहज प्राप्त होण्याचे साधन आहे. जसे भारतामध्ये
विशेष राष्ट्रपती आले. तर आता म्हणू शकतात की भारतामध्ये सुद्धा आले. असेच विशेष
विदेशामध्ये, विदेशच्या मुख्य धर्माच्या प्रभावाच्या नात्याने समिप संपर्कामध्ये आले,
तर कोणाला सहज हिम्मत येऊ शकते आम्हीपण संपर्कामध्ये येऊ. तर देशामध्ये पण चांगलं
सेवेचे साधन बनले आणि विदेशामध्ये पण सेवेचे सहज साधन बनले. तर वेळेप्रमाणे जे पण
सेवेमध्ये समिती येणे मध्ये अडथळा येतो, ते पण सहज समाप्त होऊन जाईल. राष्ट्रपतीचे
भेटले तर झाले ना. तर दुनियेसाठी हे उदाहरण देण्यासाठी मदत करेल. सर्वांनी प्रश्न
केला अजून कोणी आले? हे प्रश्न समाप्त होतात. तर हे सुद्धा नाटका नुसार याच वर्षी
सेवेमध्ये सहज प्रत्यक्षता होण्याचे साधन बनले. आता जवळ येत आहेत. यांचे तर फक्त
नावच काम करेल. आता पहा कोण निमित्त बनतात. मनोभूमी तयार करण्यासाठी चहूबाजूला सर्व
गेले. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मनू भूमी तर तयार केली आहे. आता प्रत्यक्ष फळ कोणत्या
रूपाद्वारे होते, त्याची तयारी आता होत आहे. सर्वांचा परिणाम तर चांगली आहे.पदयात्री
पण एक बल एक भरोसा ठेवून पुढे चालले आहेत. सुरुवातीला अवघड वाटते. परंतु
प्रत्यक्षात आले तर सोपे होते,तर सर्व देश-विदेश आणि जे पण सेवेच्या निमित्त बनलेले
सेवेद्वारे अनेकांना बाप दादांचे स्नेही सहयोगी बनवून आले आहेत, त्या सर्वांना
विशेष प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. प्रत्येक मुलाचे वरदान आपापले आहेत. विशेष
भारतामध्ये सर्व पदयात्रेत चालणाऱ्या मुलांना आणि विदेश सेवा अर्थ चहूबाजूला
निमित्त बनलेल्या मुलांना आणि मधुबन निवासींना श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बनलेल्या
मुलांना त्यासोबत, जे सर्व भारतवासी मुले, यात्रा वाल्यांना उमंग उत्साह देण्याच्या
निमित्त बनलेले, त्या सर्व चहूबाजूच्या मुलांना विशेष प्रेमपूर्वक आठवण आणि सेवेच्या
सफलतेचे अभिनंदन देत आहेत. प्रत्येक स्थानावर कष्ट तर केले आहेत परंतु हे विशेष
कार्य अर्थ निमित्त बनले आहेत त्यामुळे विशेष जमा झाले आहेत. प्रत्येक देश मोरीशिस,
नैरोबी अमेरिका हे सर्व उदाहरण तयार होत आहेत. आणि हे उदाहरण पुढे चालून
प्रत्यक्षामध्ये सहयोगी बनतील. अमेरिका वाल्यांनी पण कमी केले नाही. एक-एक छोट्या
स्थानाने सुद्धा जेवढे उमंग उत्साहाने आपल्या शक्ती अनुसार खूप जास्त केले आहे.
विदेशामध्ये क्रिश्चनचे राज्य आहे. आता जरी ती शक्ती जरा कमी झाली आहे, परंतु धर्म
तर सोडला नाही. चर्च सोडून दिले आहेत परंतु धर्म सोडला नाही त्यामुळे पोप सुद्धा
तिथे राजा प्रमाणे आहे. राजा पर्यंत पोहोचले तर प्रजे मध्ये स्वतः आदर येतो. कट्टर
क्रिश्चन आहेत, त्यांच्यासाठी पण उदाहरण चांगले आहे. उदाहरण क्रिश्चनांनसाठी
निमित्त बनेल. कृष्ण आणि क्रिश्चनाचा संबंध आहे. भारताचे वातावरण तरी सुद्धा वेगळे
आहे. सुरक्षितता इत्यादीचे खूप असते. परंतु हे प्रेमाने भेटले ते चांगले आहे.
रॉयलटीने वेळ देण, विधीपूर्वक भेटणे त्याचा प्रभाव पडतो. हे दिसते की आता वेळ जवळ
आलेली आहे.
लंडनमध्ये पण विदेशाच्या तुलनेत चांगली संख्या आहे आणि विशेष मुरली बद्दल प्रेम आहे,
ज्ञानाबद्दल प्रेम आहे, हा पाया आहे. यामध्ये लंडनचे नंबर एक आहेत. काहीही झाले तरी
मुरली चुकवीत नाही. चार वाजताचा योग आणि क्लासचे महत्व सर्वात जास्त लंडनमध्ये आहे.
याचे पण कारण स्नेह आहे. स्नेहा मुळे येतात. वातावरण शक्तिशाली बनवण्यावर लक्ष
चांगले आहे. तसे पण दुर देश जे आहेत तेथे वातावरणालाच आधार समजतात. त्यामध्ये
सेंटरचे किंवा स्वतःचे. थोडीसुद्धा काही गोष्ट येते ,तर लगेच स्वतःला तपासून
वातावरण शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न चांगला करतात. तेथे वातावरण शक्तिशाली
बनवण्याचे लक्ष चांगले आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वातावरण खराब करत नाहीत.
समजतात जर वातावरण शक्तिशाली नसेल तर सेवेमध्ये सफलता होणार नाही, त्यामुळे हे लक्ष
चांगले ठेवतात. आपल्या पुरुषार्थाचे पण आणि सेंटर च्या वातावरणाचे पण. हिम्मत आणि
उमंगामध्ये कोणी कमी नाही.
जेथे पण पाऊल ठेवतात, तेथे अवश्य विशेष प्राप्ती ब्राह्मणांना पण होते आणि इतर
देशांना पण होते. संदेश पण प्राप्त होतो आणि ब्राह्मणांमध्ये पण विशेष शक्ती वाढते
आणि पालना पण मिळते. साकार रुपामध्ये विशेष पालना प्राप्त करून सर्व खुश होतात, आणि
त्याचा आनंदामध्ये सेवेमध्ये पुढे जातात आणि सफलता प्राप्त करतात. दूर देशांमध्ये
राहणाऱ्यांना पालना तर जरुरी आहे. पालना प्राप्त करून उडत राहतात. जे मधुबन मध्ये
येऊ शकत नाही ते तेथे बसून मधुबनचा अनुभव करतात. जसे येथे स्वर्गाचा आणि संगम युगाचा
आनंद दोन्ही अनुभव करतात, त्यामुळे नाटका अनुसार विदेशामध्ये जाण्याची पण भूमिका
करीत आहेत ते आवश्यक आहे आणि सफलता पण आहे. प्रत्येक विदेशी मुले आपापल्या नावाने
विशेष सेवेचे अभिनंदन आणि विशेष सेवेचा सफलतेचे रिटर्न प्रेमपूर्वक आठवण स्वीकार करा.
बाबांच्या समोर एक एक मुल आहे प्रत्येक देशाचा प्रत्येक मुल डोळ्याच्या समोर येत आहे.
एका एकाला बापदादा प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. जी तडपणारी मुले आहेत त्यांची पण
कमाल पाहून बापदादा नेहमी मुलांवर स्नेहाच्या फुलांची वर्षा करतात. बुद्धिबळ त्यांचे
किती शक्तिशाली आहे. दुसरे विमान नाही तर बुद्धीचे विमान शक्तिशाली आहे त्यांच्या
बुद्धिबळावर बाप दादा पण हर्षित होतात. प्रत्येक जागेची आपापली विशेषता आहे. सिंधी
लोक पण आता जवळ येत आहेत. जे आदि मध्य झाले ते अंत मध्ये तर होईलच. हा पण जो भ्रम
बसलेला आहे की हे सामाजिक सेवा करीत नाहीत, ते ह्या पदयात्रेला पाहून हा भ्रम पण
निघून जाईल. आता क्रांतीची तयारी खूप जोरात होत आहे. दिल्लीवाले सुद्धा पदयात्रीचे
आव्हान करीत आहेत. एवढे ब्राह्मण घरी येतील. असे ब्राह्मण पाहुणे तर नशीब वानांच्या
च्या घरी येतात. दिल्लीमध्ये सर्वांना अधिकार आहे. अधिकार्यांना सत्कार तर द्यायला
पाहिजे. दिल्ली मधूनच विश्वामध्ये नाव होईल. आपल्या आपले एरियामध्ये तर करीत आहेत.
परंतु देश विदेशामध्ये तर दिल्लीचे टीव्ही रेडिओ निमित्त बनतील.
निर्मलशांता
दादाजी सोबत बापदादा यांची मुलाखत :-
ही आधी रत्नांची निशाणी आहे. हां जी, ची भूमिका नेहमी आठवणीत ठेवून शरीराला पण शक्ती
देऊन पोहोचल्या. आदि रत्नांमध्ये हे संस्कार आहे. कधी 'नाही' म्हणत नाही. नेहमी हां
जी करतात. आणि हां जी मुळेच मोठे बनले, त्यामुळे बाप दादा खुश आहेत. हिम्मते मुलीला
मदतदे बाबांनी स्नेहमिलनाचे फळ दिले.
(दादी जी सोबत)
:-
सर्वांना
सेवेच्या उमंग उत्साहाचे अभिनंदन द्यायचे आहे. आणि नेहमी आनंदाच्या झुल्यामध्ये
झुलत राहतात, आनंदामध्ये सेवेच्या प्रत्यक्षताच्या लगन द्वारे पुढे जात राहतात.
त्यामुळे शुद्ध, श्रेष्ठ, संकल्पाची सर्वांना मुबारक आहे. चार्ली, केन, इत्यादी जे
पहिले फळ निघाले, हाss ग्रुप चांगले रिटर्न देत आहेत. निर्माणता निर्माणचे कार्य
सहज करीत आहे. जोपर्यंत निर्मान नाही बनणार तोपर्यंत निर्माण करू शकत नाही. हे
परिवर्तन खूप चांगले आहे. सर्वांचे ऐकणे आणि सामावणे आणि सर्वांना स्नेह देणे हे
सफलतेचा आधार आहे. चांगली उन्नती केली आहे. नवीन नवीन पांडवांनी सुद्धा चांगले कष्ट
केले आहेत. चांगले स्वतःमध्ये परिवर्तन आणले आहे. अआणखी नवीन परिवर्तन करण्याची
योजना बनवा. इथपर्यंत तर सर्वांना कष्ट करण्याचे फळ मिळते. जे पूर्वी ऐकतच नव्हते,
ते जवळ येऊन ब्राह्मण आत्मे बनत आहेत. आता अजून प्रत्यक्ष करण्याचे नवीन सेवेचे
साधन बनेल. ब्राह्मणांत संघटन पण चांगले आहे. आता सेवेत वृद्धी होत आहे. एकदा वृद्धी
होते, तर ती अनुभूती सर्व ठिकाणी पसरते. अच्छा
वरदान:-
संघटन रूपी
किल्ल्याला मजबूत बनवणारे सर्वांचे स्नेही, संतुष्ट आत्मा भव.
संघटनेची शक्ती विशेष शक्ती आहे. एकमत संघटनेच्या किल्ल्याला कोणी हलवू शकत नाही.
परंतु ह्याचा आधार आहे एकमेकांचे स्नेही बणून सर्वांना सन्मान देणे आणि स्वतः
संतुष्ट राहून सर्वांना संतुष्ट करणे. कोणीही अशांत होऊ नये आणि अशांत करू नये.
सर्व जण एकमेकांना शुभ भावना आणि शुभकामना सहयोग देत राहा तर हा संघटनेचा किल्ला
मजबूत होईल. संघटनांची शक्तीच विजयाचा विशेष आधार आहे.
सुविचार:-
जेव्हा
प्रत्येक कर्म यथार्थ आणि युक्ती युक्त होईल तेव्हा पवित्र आत्मा म्हणता येईल.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष अभ्यास
जसे ब्रम्ह
बाबांनी निश्चयाच्या आधारावर आत्मिक नशेच्या आधारावर, निश्चित भावीचे ज्ञाता बनून
सर्व काही सफल केले. स्वतःसाठी काही ठेवले नाही. स्नेहाची निशाणी आहे सर्व काही सफल
करणे. सफल करण्याचा अर्थ आहे श्रेष्ठते कडे लावणे.