25-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो , तुम्हाला विकर्माच्या शिक्षेपासून मुक्त होण्याचा पुरुषार्थ करावयाचा आहे , या अंतिम जन्मात सर्व हिसाब किताब चुक्तू करुन पावन बनायचे आहे....!!!

प्रश्न:-
धोकेबाज माया कोणती प्रतिज्ञा तोडण्याचा प्रयत्न करत आहे?

उत्तर:-
तुम्ही प्रतिज्ञा केली आहे की, कोणत्या देहधारी बरोबर आम्ही प्रेम करणार नाही. आत्मा म्हणते आम्ही एका बाबांचीच आठवण करु, स्वत:च्या देहाची पण आठवण करणार नाही. बाबा, देहासहित सर्वांचा संन्यास करवत आहेत. परंतू माया हीच प्रतिज्ञा तोडते. देहामध्ये प्रेम निर्माण होते. जे प्रतिज्ञा तोडतात त्यांना रिक्षा पण फार भोगावी लागते.

गीत:-
तुम्हीच माता पिता तुम्ही आहात...

ओम शांती।
उंच ते उंच भगवानाची महिमा पण केली आहे आणि मग ग्लानी पण केली आहे. आता बाबा स्वत: परिचय देत आहेत आणि मग जेव्हा रावण राज्य सुरु होते तर स्वत:ची उंचाई दाखवितात. भक्ती मार्गात भक्तीचे राज्य आहे. त्यामुळे म्हटले जाते रावणराज्य. ते रामराज्य, हे रावणराज्य. राम आणि रावणाची तुलना केली जाते. बाकी ते राम तर त्रेताचे राजा होते, त्यांचेसाठी म्हटले जात नाही. रावण आहे आर्धाकल्पाचा राजा. असे नाही कि राम आर्धाकल्पाचा राजा आहे. नाही, या सविस्तर समजण्याच्या गोष्टी आहेत. बाकी ही तर फारच सोपी गोष्ट आहे समजण्याची. आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत. आम्हा सर्वांचा तो पिता निराकार आहे. बाबाला माहित आहे यावेळी माझी सर्व मुले रावणाचे जेलमध्ये आहेत. काम चितेवर बसून सर्व काळे झाले आहेत. हे बाबा जाणत आहेत. आत्म्यामध्येच सारे ज्ञान आहे ना. यामध्ये पण जास्त महत्त्व दयावयाचे आहे. आत्मा आणि परमात्म्याला ओळखण्यासाठी. अती सुक्ष्म आत्म्यामध्ये किती भुमिका नोंदलेली आहे. जी वठवत आहे. देहअभिमाना मध्ये येऊन भुमिका करतात तर स्वधर्माला विसरुन जातात. आता बाबा येऊन आत्म अभिमानी बनवत आहेत. कारण आत्म्याला वाटते कि, आम्ही पावन बनू. तर बाबा म्हणतात कि, माझी एकट्याची आठवण करा. आत्मा बोलावते कि, हे परमपिता हे पतित पावन, आम्ही आत्मे पतित बनलो आहोत, येऊन आम्हाला पावन बनवा. संस्कार सारे आत्म्यामध्ये आहेत ना. आत्मा स्पष्ट म्हणते कि, आम्ही पतित झालो आहे. पतित त्यांना म्हटले जाते जे विकारात जातात. पतित मनुष्य पावन निर्विकारी देवतांचे समोर मंदीरात त्यांची महिमा करत आहेत. बाबा समजावतात कि, मुलांनो तुम्हीच देवता होता. 84 जन्म घेत घेत खाली जरुर उतरावयाचे आहे. हा खेळच आहे. पतितापासून पावन, पावन पासून पतित होण्याचा. सारे ज्ञान बाबा येऊन इशारा करुन समजावत आहेत. आता सर्वांचा शेवटचा जन्म आहे. सर्वांना हिसाब किताब चुक्तू करुन जावयाचे आहे. बाबा साक्षात्कार करतात. पतितांना आपल्या विकर्माचा दंड जरुर भोगावा लागतो. आत्म्याला भासना होते, मी सजा भोगत आहे. जसे काशी कलवट घेते वेळी दंड भोगतात, केलेल्या पापाचा साक्षात्कार होतो. तेव्हा तर म्हणतात क्षमा करा भगवान, आम्ही परत असे करणार नाही. हे सर्व साक्षात्काराचे वेळीच क्षमा मागतात. अनुभव करतात, दु:ख भोगतात. सर्वांत जास्त महत्त्व आहे, आत्मा आणि परमात्म्याचे. आत्माच 84 जन्माची भुमिका बजावत आहे. तर आत्मा सर्वांत शक्तीशाली आहे ना. साज्या विश्वनाटकात महत्त्व आहे, आत्मा आणि परमात्म्याचे. ज्याला दूसरे कोणी पण ओळखत नाही. एक पण मनुष्य ओळखत नाही कि, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे? नाटकानुसार हे पण होणार आहे. तुम्हा मुलांना पण हे ज्ञान आहे कि, या काही नविन गोष्टी नाहीत, कल्पापुर्वी पण असे झाले होते. म्हणतात पण कि, ज्ञान भक्ती वैराग्य. परंतू अर्थ समजत नाहीत. ब्रह्माबाबांनी या साधू इत्यादीची संगत फार केली आहे, फक्त नांव घेत राहतात. आता तुम्ही मुले चांगले प्रकारे जाणता कि, आम्ही जुन्या दुनियेतून नविन दुनियेमध्ये जात आहोत तर जुन्या दुनियेपासून जरुर वैराग्य आले पाहिजे. यांच्यात काय मन लावावे. तुम्ही प्रतिज्ञा केली आहे कि, कोणत्या पण देहधारी बरोबर प्रेम करणार नाही. आत्मा म्हणते कि, आम्ही एका बाबाचीच आठवण करु. स्वत:चे देहाची पण आठवण करणार नाही. बाबा देहासहित सर्वांचा सन्यास करवितात. मग दुसज्यांच्या देहाबरोबर आम्ही लगाव का ठेवावा. कोणाबरोबर लगाव असेल तर त्यांची आठवण येत राहिल. मग ईश्वराची आठवण येणार नाही. माया तर फार धोखेबाज आहे. कोणत्या पण परिस्थितीमध्ये मायेपासून स्वत:ला वाचावयाचे आहे. देह अभिमानाचा फार मोठा रोग आहे. बाबा म्हणतात आता आत्म अभिमानी बना. बाबाची आठवण करा तर देह अभिमानाचा रोग सुटेल. सारा दिवस देह अभिमानात राहतात. बाबाची आठवण फारच मुश्किलीने करतात. बाबांनी सांगितले आहे, हाताने काम करा, मनाने आठवण करा. जसे आशिक माशुक धंदा इत्यादी करताना पण आपले माशुकचीच आठवण करत राहतात. आता तुम्हा आत्म्यांना परमात्म्याची प्रेम ठेवावयाचे आहे तर त्यांचीच आठवण केली पाहिजे ना. तुमचे मुख्य लक्ष्य आहे कि आम्हाला देवी देवता बनायचे आहे, त्यासाठी पुरुषार्थ करावयाचा आहे. माया धोखा तर जरुर देईल, स्वत:ला त्यापासून मुक्त करावयाचे आहे, नाही तर फसून मराल, मग ग्लानी पण होईल, नुकसान पण फार होईल.

तुम्ही मुले जाणता कि, आम्ही आत्मा बिंदू आहोत, आमचे बाबा पण बीजरुप ज्ञानाचे सागर आहेत. ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. आत्मा काय आहे, त्यामध्ये कशी अविनाशी भुमिका भरलेली आहे. या गुह्य गोष्टीला चांगली चांगली मुले, पण पुर्णपणे समजत नाहीत. स्वत:ला यथार्थ पणे आत्मा समजणे आणि बाबाला पण बिंदू समजून आठवण करणे, ते ज्ञानाचे सागर आहेत, बीजरुप आहेत---असे समजून फार मुश्कीलीने आठवण करतात, मोठ्या विचाराने नाही. यात सुक्ष्म बुध्दीने काम घ्यावे लागते, मी आत्मा आहे, आमचे बाबा आले आहेत. ते बीजरुप ज्ञानसंपन्न आहेत. आम्हाला ज्ञान सांगत आहेत. धारणा पण सुक्ष्म आत्म्यामध्ये होत आहे. असे फार आहेत, जे मोठ्या रितीने फक्त म्हणतात कि, आत्मा आणि परमात्मा---परंतू यथार्थ रितीने बुध्दीत येत नाही. नसल्यापेक्षा मोठ्या रितीने आठवण करणे पण ठीक आहे. परंतू ही यथार्थ आठवण जास्त फायदेशीर आहे. ते एवढे उंच पद प्राप्त करु शकत नाहीत, यामध्ये फार मेहनत आहे. मी आत्मा सुक्ष्म बिंदू आहे, बाबा पण सुक्ष्म बिंदू आहेत, त्यांचेत सारे ज्ञान आहे. हे पण येथे तुम्ही बसले आहात, त्यामुळे काहीतरी बुध्दीत येते, परंतू चालता-फिरता तसे चिंतन राहिले पाहिजे ते नाही. विसरुन जातात. सारा दिवस असे चिंतन राहावे, ही आहे खरी खरी आठवण कोणी खरे सांगत नाही कि आम्ही कशी आठवण करत आहे. जरी चार्ट पाठवितात, परंतू हे लिहत नाहीत कि, असे स्वत:ला बिंदू समजून आणि बाबाला पण बिंदू समजून आठवण करत आहे. खरेपणाने पुर्ण लिहत नाहीत. जरी फार चांगली मुरली वाचतात, परंतू योग फार कमी आहे. देह अभिमान फार आहे, या गुप्त गोष्टीला पुर्ण समजत नाहीत, स्मरण करत नाहीत. आठवणीनेच पावन बनायचे आहे. अगोदर तर कर्मातीत अवस्था पाहिजे ना. तेच उंच पद प्राप्त करतील. बाकी मुरली वाचणारे तर पुष्कळ आहेत. परंतू बाबा जाणतात कि, योगात राहू शकत नाहीत. विश्वाचे मालक बनणे काही एवढे सोपे थोडचे आहे. ते अल्पकाळाचे पद प्राप्त करणारे पण किती अभ्यास करतात. प्राप्तीचे साधन आता झाले आहे. पुर्वी थोडेच बॅरिस्टर इत्यादी एवढे कमवत होते. आता किती कमाई होत आहे.

मुलांना स्वत:चे कल्याणासाठी एक तर स्वत:ला आत्मा समजून यथार्थ रितीने बाबाची आठवण करावयाची आहे, आणि त्रिमुर्ती शिवाचा परिचय इतरांना पण द्यावयाचा आहे. फक्त शिव म्हटल्याने समजणार नाहीत. त्रिमुर्ती तर जरुर पाहिजे. मुख्य आहेतच दोन चित्रे, त्रिमुर्ती आणि झाड. शिडी पेक्षा पण झाडामध्ये जास्त ज्ञान आहे. हे चित्र तर सर्वांजवळ असली पाहिजेत. एकीकडे त्रिमुर्ती, गोळा, दुसरीकडे झाड. हा पांडव सेनेचा झेंडा असला पाहिजे. नाटकाचे आणि झाडाचे ज्ञान पण बाबा देत आहेत. लक्ष्मी नारायण, विष्णू इत्यादी कोण आहेत? 4 भुजावाले, 8 भुजावाले, किती चित्र बनिविले आहेत. काही पण समजत नाहीत. 8-10 हाताचा तर कोणी मनुष्य असत नाही. ज्याला जे वाटते तसे बनवितात, मग तसेच पुढे चालते. कोणी मत दिले कि हनुमानाची पुजा करा, तर तसे करतात. दाखवितात कि संजीवनी बुटी घेऊन आला----त्याचा पण अर्थ तुम्ही मुले समजत आहात. संजीवनी बुटी तर आहे मनमनाभव. विचार केला जातो, जो पर्यंत ब्राह्मण बनले नाही, बाबाचा परिचय मिळाला नाही तो पर्यंत कौंडी सारखे आहेत. पदाचा मनुष्यांना कती अभिमान आहे. त्यांना समजावणे फार अवघड आहे. राजाई स्थापन करण्यासाठी किती मेहनत लागत आहे. तो आहे बाहुबल, हा आहे योगबल. या गोष्टी शास्त्रात तर नाहीत. खरे तर तुम्ही कोणते शास्त्र इत्यादीचा आधार घेत नाही. जर तुम्हाला म्हणले-तुम्ही शास्त्राला मानता? बोला होय, हे तर सर्व भक्तीमार्गाचे आहेत. आता आम्ही ज्ञानमार्गावर चालत आहोत. ज्ञान देणारे ज्ञानाचे सागर एकच बाबा आहेत, याला आत्मिक ज्ञान म्हटले जाते. परमात्मा बसून आत्म्यांना ज्ञान देत आहेत. ते मनुष्य, मनुष्याला देतात. मनुष्य कधी आध्यात्मिक ज्ञन देवू शकत नाहीत. ज्ञानाचे सागर पतित पावन, मुक्तीदाता, सद्गती दाता एकच बाबा आहेत.

बाबा समजावतात कि, हे हे करा. आता पाहतो कि, शिवजयंती वर किती धुमधडाका करत आहेत. ट्रांसलाईटचे चित्र लहान पण असावे, जे सर्वांना मिळतील. तुमची तर आहे बिल्कुल नवीन गोष्ट. कोणी समजत नाही. वर्तमानपत्रात आवाज झाला पाहिजे. सेंटर उघडणारे पण असे पाहिजेत. आता तुम्हा मुलांना पण एवढा नशा चढलेला नाही. नंबरवार पुरुषार्थानुसार समजावतात. एवढे ब्रह्माकुमार कुमारी आहेत. बरं, ब्रह्माचे नाव काढून कोणाचे पण नाव टाका, राधे कृष्णाचे नांव टाका. बरं, मग ब्रह्माकुमार-कुमारी कोठून येणारे? कोणी तर ब्रह्मा पाहिजे ना, जे मुखवंशावली बी.के. आहेत. मुले पुढे चालून समजतील. खर्च तर करावाच लागत आहे. चित्र तर फार स्पष्ट आहेत. लक्ष्मी नारायणाचे चित्र फार चांगले आहे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या सेवाधारी, फरमान वरदान नंबरवार पुरुषार्थानुसार मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. कर्मातीत बनण्यासाठी बाबाला सुक्ष्म बुध्दीने ओळखून यथार्थ आठवण करावयाची आहे. शिक्षणाबरोबर, आठवणीवर पुर्ण लक्ष द्यावयाचे आहे.

2. स्वत:ला मायेच्या धोक्यापासून वाचवायचे आहे. कोणाचे पण शरीरात ममत्त्व ठेवायचे नाही. खरे प्रेम एका बाबावर करावयाचे आहे. देह अभिमानात यायचे नाही.

वरदान:-
वेळेचे महत्त्व जाणून , स्वत:ला संपन्न बनविणारे विश्वाचे आधार मुर्त भव

साज्या कल्पाच्या प्राप्तीचे, श्रेष्ठ कर्म रुपी बीज पेरण्याचे, 5 हजार वर्षाचे संस्काराचे ध्वनीमुद्रण करण्याचे, विश्व कल्याण व विश्व परिवर्तनाची ही वेळ चालू आहे. जर वेळेचे ज्ञान असणारे पण वर्तमान वेळ घालवत आहेत किंवा येणाज्या वेळेवर सोडून देतात, तर वेळेच्या आधारावर स्वत:चा पुरुषार्थ झाला. परंतू विश्वाची आधारमुर्त आत्मे कोणत्या पण प्रकारच्या आधारावर चालत नाहीत. ते एका अविनाशी सहाज्याचे आधारावर कलियुगी पतित दुनियेचा किनारा करुन, स्वत:ला संपन्न बनविण्याचा पुरुषार्थ करतात.

बोधवाक्य:-
स्वत:ला संपन्न बनवा, तर विशाल कार्यामध्ये स्वत: सहयोगी बनाल...!!!


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :-
संपूर्ण फरिश्ता किंवा अव्यक्त फरिश्ता पदवी घेण्यासाठी सर्व गुणांनी संपन्न बना. ज्ञानसंपन्नते बरोबर विश्वासू, शक्तीवान, विजयी बना. आता नाजूक वेळी, नखज्याने चालणे सोडा, विकर्म आणि व्यर्थ कर्माला आपल्या शक्ती रुपाने नष्ट करा.