08-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, सकाळी सकाळी उठून बाबांशी गोड गोड आत्मिक संवाद करा,बाबांनी जे ज्ञान दिले आहे,त्याचे मनन चिंतन करत रहा.

प्रश्न:-
सर्व दिवस खुशी मध्ये जाण्यासाठी कोणते युक्ती पाहिजे?

उत्तर:-
रोज अमृतवेळेला उठून ज्ञानाच्या गोष्टींमध्ये रमण करा,स्वतःशी गोष्टी करा. नाटकाच्या आदी मध्य अंतचे स्मरण करुन, बाबांची आठवण करा, तर सर्व दिवस खुशीमध्ये जाईल.विद्यार्थी आपल्या अभ्यासाची उजळणी करत राहतात.तुम्हा मुलांना पण उजळणी करत राहायचे आहे. गीत:- आज अज्ञान अंधारा मध्ये मनुष्य आहेत….

ओम शांती।
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांनी गीत ऐकले.तुम्ही भगवंताची मुल आहात ना.तुम्ही जाणतात, भगवान आम्हाला मार्ग दाखवत आहेत.ते पुकारतात,आम्ही अज्ञान अंधारा मध्ये आहोत,कारण भक्तिमार्ग अज्ञान अंधाराचा मार्ग आहे.भक्त म्हणतात,तुम्हाला भेटण्यासाठी भटकत आहोत.कधी तीर्थावर तर कधी कुठे,दान पुण्य करत,मंत्र जपत राहतात.अनेक प्रकारचे मंत्र देतात तरीही कोणी समजत नाहीत की,आम्ही अज्ञानाच्या अंधारामध्ये आहोत. ज्ञानप्रकाश काय गोष्ट आहे,काहीच समजत नाहीत कारण अज्ञानाचा काळोख आहे. आता तुम्ही अज्ञानाच्या काळोखा मध्ये नाहीत.तुम्ही कल्पवृक्षा मध्ये प्रथम येतात. नवीन दुनिये मध्ये जाऊन राज्य करतात,परत शिडी उतरत जातात.यानंतर इस्लामी,बौद्धी,क्रिश्चन येतात.आता बाबा परत कलम लावत आहेत.सकाळी उठून अशा गोष्टी मध्ये रमण करायचे आहे. खूपच आश्चर्यकारक नाटक आहे.या नाटकाची फिल्म किंवा रीळ पाच हजार वर्ष आहे.सतयुगाचे आयुष्य एवढे,त्रेतायुगाचे आयुष्य एवढे.. बाबा मध्ये हे सर्व ज्ञान आहे.दुनिया मध्ये दुसरे कोणी जाणत नाहीत.तर मुलांना सकाळी उठून एका बाबांची आठवण करायची आहे, आणि ज्ञानाचे स्मरण खुशी मध्ये करायचे आहे.आता आम्ही सर्व नाटकाच्या,आदी मध्यं अंतला जाणले आहे.बाबा म्हणतात कल्पाचे आयुष्य ५००० वर्ष आहे.मनुष्य लाखो वर्ष म्हणतात.खूपच आश्चर्यकारक नाटक आहे.बाबा जे ज्ञान देतात,त्याचे विचार सागर मंथन करायला पाहिजे, उजळणी करायला पाहिजे.विद्यार्थी अभ्यासाची उजळणी करत राहतात.

तुम्ही गोड गोड मुलांनी नाटकाच्या रहस्याला जाणले आहे.बाबांनी खूप समजावून सांगितले आहे,हा अनादी अविनाशी ड्रामा आहे,यामध्ये जिंकतात आणि हारतात.आता हे चक्र पूर्ण झाले आहे,आम्हाला घरी जायचे आहे.बाबांचा आदेश मिळाला आहे,मज पित्याची आठवण करा.हे नाटकाचे ज्ञान बाबाच देतात.नाटक कधी लाखो वर्षाचे असते का?कोणीही त्याची आठवण करु शकणार नाही.पाच हजार वर्षांचे चक्र आहे,जे सर्व तुमच्या बुद्धी मध्ये आहे.खूपच चांगले हार आणि जितचा खेळ बनलेला आहे.सकाळी उठून अशा गोष्टीचे विचार करायला पाहिजेत.आम्हाला बाबा कडुन विजय मिळवण्या साठी शक्ती मिळत राहते.अशा गोष्टी सकाळी उठून स्वतःसोबत करायला पाहिजेत,तर सवय लागेल.या बेहदच्या नाटकाला कोणी जाणत नाहीत.कलाकार होऊन,आदी मध्य अंतला जाणत नाहीत. आता मी बाबा द्वारे लायक लायक बनत आहोत.

बाबा आपल्या मुलांना आपल्यासारखे बनवतात.आपल्या सारखेच काय,पिता तर मुलांना आपल्या खांद्यावरती बसवतात.बाबांचे मुलांशी खूपच प्रेम आहे. खूपच चांगल्या रितीने समजवतात,गोड गोड मुलांनो,मी तुम्हाला विश्वाचे मालक बनवतो,मी बनत नाही,तुम्हा मुलांना सुंदर बणवुन परत शिक्षक बणवून शिकवतो. परत सद्गगती साठी ज्ञान देऊन तुम्हाला शांतीधाम सुखधामचे मालक बनवतो.मी निर्वाण धाम मध्ये बसतो.लौकिक पिता पण कष्ट करून,कमावून सर्व काही मुलांना देऊन,स्वतः वानप्रस्थ मध्ये जाऊन भजन इत्यादी करत राहतात.परंतु इथे तर बाबा म्हणतात जर तुमची वानप्रस्थ अवस्था असेल तर मुलांना समजावून,तुम्ही या सेवेमध्ये लागायला पाहिजे.परत गृहस्थ व्यवहारांमध्ये फसायचे नाही.तुम्ही स्वतःचे आणि दुसऱ्याचे कल्याण करत रहा.आता तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. बाबा म्हणतात मी आलो आहे तुम्हाला वाणी पासून दूर घेऊन जाण्यासाठी,अपवित्र आत्मा तर जाऊ शकत नाहीत.हे बाबा सन्मुख समजावत आहेत.मजा पण सन्मुख ऐकण्यात आहे.सेवाकेंद्रा वर तर मुलं-मुरली वाचतात.येथे तर बाबा सन्मुख आहेत, म्हणून मधुबन ची पण महिमा आहे.तर बाबा म्हणतात सकाळी उठण्याची सवय लावा.भक्ती पण मनुष्य सकाळी ऊठुन करतात,परंतु त्यांच्यापासून वारसा तर मिळू शकत नाही.वारसा तर मिळतोच रचनाकार पित्या कडून.कधी रचने द्वारे वारसा मिळू शकत नाही,म्हणुन म्हणतात आम्ही रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्यं अंतला जाणत नाहीत.जर हे ज्ञान जाणत असते तर परंपरा पासून चालत आले असते.मुलांना हे पण समजायचे आहे की,आम्ही खूप श्रेष्ठ धर्माचे होतो,परत कसे धर्मभ्रष्ट,कर्मभ्रष्ट बनलो आहोत.माया गोदरेजचे कुलुप बुद्धीला लावते म्हणून भगवानाला म्हणतात तुम्ही बुद्धी वानांचे बुद्धी आहात,यांच्या बुद्धीचे कुलूप उघडा. आता तर बाबा सन्मुख समजावत आहेत. मी ज्ञानाचा सागर आहे,तुम्हाला यांच्याद्वारे समजवतो,कोणते ज्ञान? या सृष्टी चक्राच्या आदी मध्य अंताचे ज्ञान,कोणी मनुष्य देऊ शकत नाही.

बाबा म्हणतात सत्संग इत्यादी मध्ये जाण्या पेक्षा,शाळेमधील शिक्षण चांगले आहे. शिक्षण कमाईचे साधन आहे.सत्संगा मध्ये तर काहीच मिळत नाही.दान पुण्य करा,हे करा,भेट ठेवा,खर्चच खर्च आहे.पैसे पण ठेवा आणि डोके पण ठेवा,माथा च घासला जातो.आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळत आहे त्याचे स्मरण करण्याची सवय लावा आणि दुसऱ्याला पण समजून सांगा.आता तुमच्या आत्म्या वरती बृहस्पती ची दशा आहे.वृक्षपती भगवान तुम्हाला शिकवत आहेत म्हणून तुम्हाला खूप खुशी व्हायला पाहिजे.भगवान शिकवुन आम्हाला भगवान भगवती बनवत आहेत.ओहो अशा बाबांची जितकी आठवण करू तेवढे विर्कम विनाश होतील.अशा प्रकारचे विचार सागर मंथन करण्याची सवय लावायला पाहिजे.दादा आम्हाला या पित्या द्वारे वारसा देत आहेत. शिव बाबा म्हणतात,मी या रथाचा आधार घेतो.तुम्हाला हे ज्ञान मिळत आहे ना.ज्ञान गंगा,ज्ञान ऐकवुन पवित्र बनवतात की, गंगेचे पाणी पवित्र बनवते.आता बाबा म्हणतात, मुलांनो तुम्ही भारताची खरी सेवा करत आहात.ते समाजसेवक तर हदची सेवा करतात,ही आत्मिक सेवा आहे.भगवानुवाच,बाबा समजवतात भगवान पुनर्जन्म रहित आहेत.श्रीकृष्ण तर पूर्ण 84 जन्म घेतात,त्यांचे गीतेमध्ये नाव लिहिले आहे,नारायणचे का नाही लिहिले? हे पण कुणालाच माहित नाही,कृष्णच नारायण बनतात.श्रीकृष्ण राजकुमार होता परत राधेशी स्वयंवर झाले.आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे,तुम्ही समजता शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत.ते बाबा पण आहेत,शिक्षक पण आहेत, सद्गुरू पण आहेत, सद्गगती देतात.उच्च ते उच्च भगवान शिवच आहेत.ते म्हणतात माझी निंदा करणारे उच्चपद प्राप्त करू शकत नाहीत.जर मुलं शिक्षण घेत नाहीत, अभ्यास करत नाहीत,तर शिक्षकाची इज्जत जाते.बाबा म्हणतात तुम्ही माझी इज्जत घालवू नका,अभ्यास करत रहा. मुख्य उद्दिष्ट समोर आहे,.ते गुरु लोक परत स्वतःसाठी म्हणतात,यामुळे मनुष्य घाबरतात.मनुष्य समजतात कोणता श्राप मिळायला नको.गुरुद्वारे मंत्र मिळाला,नंतर ऐकवत राहतात.संन्याशांना विचारलं तुम्ही घर कसे सोडले,ते म्हणतात अशा गोष्टी तुम्ही विचारू नका.अरे का नाही सांगत, आम्हाला काय माहिती,तुम्ही कोण आहात? समजदार बुद्धीच अशा गोष्टी विचारु शकतात. अज्ञान काळा मध्ये कोणा कोणाला नशा राहतो.स्वामी रामतीर्थचा अनन्य शिष्य स्वामी नारायण होते.त्यांचे पुस्तक इत्यादी ब्रह्मा बाबांनी वाचलेले आहे.बाबांना हे सर्व वाचण्याचा छंद होता. लहान होते,परत सिनेमा पाहिला आणि वृत्ती खराब झाली.साधुपणा बदलला. आता बाबा समजवतात,ते सर्व गुरु इत्यादी भक्ती मार्गाचे आहेत. सर्वांचे सद्गगती दाता तर,हे एकच आहेत.ज्यांची सर्व आठवण करतात.गायण पण करतात,माझे गिरीधर गोपाल,दुसरे कोणीच नाहीत.गिरीधर कृष्णाला म्हणतात.वास्तव मध्ये ब्रह्माची निंदा होते.कृष्णाची आत्मा जेव्हा अंत काळात गावातील मुलगा तमोप्रधान होती तेव्हाच निंदा होते.वास्तव मध्ये ही कृष्णाची आत्मा आहे ना.गावांमध्ये पालन-पोषण झालेले आहे.रस्त्याने चालत चालत ब्राह्मण फसला,म्हणजे बाबांनी प्रवेश केला,खुप निंदा झाली.अमेरिकेपर्यंत निंदा झाली.हे आश्चर्यकारक नाटक आहे.आता तुम्ही जाणता तर खुशी होते,आता बाबा समजवतात,चक्र कसे फिरते? आम्ही ब्राह्मण होतो,परत देवता,क्षत्रिय,शूद्र बनलो.हे ८४ जन्माचे चक्र आहे.हे सर्व स्मृती मध्ये ठेवायचे आहे.रचनाकार आणि रचने च्या आधी मध्य अंतला जाणायचे आहे,जे दुसरे कोणी जाणत नाहीत.तुम्ही मुलं समजतात,आम्ही विश्वाचे मालक बनतो,यामध्ये कोणतेच कष्ट नाहीत.असे थोडेच म्हणतो,आसन इत्यादी करा.हठयोग असे शिकवतात की, गोष्ट विचारू नका.कोणा कोणाची बुद्धीच खराब होते.बाबा खूपच सहज कमाई करवतात.ही कमाई २१ जन्मासाठी आहे. तुमच्या हातामध्ये स्वर्ग आहे,बाबा मुलांसाठी स्वर्गाची भेट घेऊन येतात,असे दुसरे कोणी मनुष्य म्हणू शकत नाहीत. बाबाच म्हणतात,यांची आत्मा पण ऐकते. तर मुलांना,सकाळी सकाळी उठुन असे विचार करायला पाहिजेत.भक्त लोक पण सकाळी गुप्त पणे माळ फिरवत राहतात, त्यांना गौमुख म्हणतात,त्यामध्ये हात घालून माळ फिरवत राहतात.राम राम म्हणत राहतात,जसे एखादा बाजा वाजत राहतो. वास्तव मध्ये,गुप्त तर हे आहेत,बाबांची आठवण करायची आहे.यालाच अजपाजाप म्हटले जाते.खुशी राहते,खूपच आश्चर्यकारक नाटक बनलेले आहे. तुमच्या शिवाय कोणाच्या बुद्धीमध्ये नाही.तुमच्या मध्ये पण नंबरा नुसार आहेत.खूपच सहज आहे.आम्हाला स्वतः भगवान शिकवत आहेत.बस त्यांचीच आठवण करायची आहे. वारसा त्यांच्या कडुन मिळतो.या बाबांनी तर लगेच सर्व काही सोडले कारण बाबांचे अवतरण झाले होते.सर्व काही या मातांना अर्पण केले.बाबा म्हणाले इतकी मोठी संस्था स्थापन करायची आहे,सर्व काही सेवां मध्ये लावा.एक पैसा पण कोणाला द्यायचा नाही.इतके नष्टमोहा पाहिजे.खूपच मोठे लक्ष आहे.मीराने लोकलाज विकारी कुळाची मर्यादा सोडली,तर तिचे नाव खूप प्रसिद्ध झाले.या मुली पण म्हणतात मी लग्न करणार नाही, लखोपती असू द्या नाही तर करोडपती. आम्ही तर बेहदच्या बाबांकडून वारसा घेऊ,असा नशा चढायला पाहिजे. यामध्ये पैशाची आवश्यकता नाही.लग्नाच्या दिवसां मध्ये वनवाह मध्ये बसतात,जुने कपडे घालतात.लग्नाच्या नंतर नवीन कपडे,दागिने इत्यादी घालतात. हे बाबा म्हणतात,मी तुमचा ज्ञान रत्ना द्वारे श्रुगांर करतो,त्यामुळे तुम्ही लक्ष्मी नारायण सारखे बनाल.असे दुसरे कोणी म्हणू शकत नाही.

बाबाच येउन पवित्र धर्माची स्थापना करतात,म्हणून विष्णूला चतुर्भुज दाखवतात.शंकराच्या सोबत पार्वती, ब्रह्माच्या सोबत सरस्वती दाखवली आहे. आता ब्रह्माला कोणती पत्नी तर नाही.हे तर बाबांचे बनले.खूपच आश्चर्यकारक गोष्टी आहेत.मात पिता तर हे आहेत ना. प्रजापिता पण आहेत,परत त्यांच्याद्वारे बाबा स्थापना करतात,तर माता पण झाली ना.सरस्वती ब्रह्म ची मुलगी आहे,या सर्व गोष्टीं बाबच बसून समजवतात.जसे सकाळी उठून बाबा विचार सागर मंथन करतात,मुलांना पण त्यांचे अनुकरण करायचे आहे.तुम्ही मुलं जाणता हे हार जीत चा आश्चर्यकारक खेळ बनलेला आहे,याला पाहुन खुशी होते.घ्रुणा येत नाही.आम्ही असे समजतो,आम्ही सार्‍या नाटकाच्या आधी मध्य अंतला जाणले आहे,म्हणून तुम्हा मुलांना घ्रुणा येत नाही. तुम्हा मुलांना कष्ट पण घ्यायचे आहेत.गृहस्थ व्यवहारा मध्ये पण राहायचे आहे.पावन बनण्यासाठी प्रतिज्ञा करायची आहे.आम्ही पती-पत्नी एकत्र राहून पवित्र दुनियाचे मालक बनू,परत कोणी नापास पण होतात.बाबाच्या हातामध्ये कोणते ग्रंथ इत्यादी नाहीत.हे तर शिव बाबा म्हणतात, मी ब्रह्मा द्वारे तुम्हाला सर्व वेद ग्रंथ इत्यादी चे रहस्य ऐकवतो.कृष्ण ऐकवत नाहीत. खूपच फरक आहे.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती बाप दादाची प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(1) विचार सागर मंथन करण्याची सवय लावायची आहे.बाबांकडून ज्ञान मिळाले आहे,त्याचे स्मरण करून अपार खुशी मध्ये राहायचे आहे.कुणाशी घ्रुणा करायची नाही.

वरदान:-
बालक सो मालक च्या पाठा द्वारे निरंहकारी आणि निराकारी भव.

बालक बनणे म्हणजे हदचे जीवन परिवर्तन करणे.कोणी कोणत्याही मोठ्या देशाचा मालक असेल,श्रीमंत किंवा मोठ्या परिवाराचे असतील परंतु बाबांच्या पुढे सर्व बालक आहेत.तुम्ही ब्राह्मण मुल पण बालक बनतात,तर बेफिक्र बादशहा आणि भविष्यामध्ये विश्वाचे मालक बनतात बालक सो मालक आहोत,ही स्रुती सदा निरंहकारी निराकारी स्थितीचा अनुभव करवते. बालक बणने म्हणजे मुलगा बनणे, म्हणजेच माया पासून सुरक्षित राहणे.

बोधवाक्य:-
प्रसन्नताच ब्राह्मण जीवनाचे व्यक्तिमत्व आहे,तर नेहमी प्रसन्न रहा.


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
बाबांना अव्यक्त रूपामध्ये नेहमी सोबत्याचा अनुभव करणे आणि नेहमी उमंग-उत्साह, खुशी मध्ये रहा.कोणतीही गोष्ट खाली वरती होते तर नाटकातील खेळ समजून खूप चांगले,खूप चांगले, करत चांगले बनवायचे आणि चांगले बनवण्याच्या प्रकंपना द्वारे नकारत्मकते ला सकारात्मक मध्ये परिवर्तन करायचे आहे.