20-01-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, पुण्य आत्मा बनायचे असेल तर आपली दिनचर्या पहा, कोणते पाप तर होत नाही,पुण्याचे खाते जमा आहे.

प्रश्न:-
सर्वात मोठे पाप कोणते आहे?

उत्तर:-
कोणावरती वाईट दृष्टी ठेवणे हे सर्वात मोठे पाप आहे.तुम्ही पुण्यात्मा बनणारी मुलं कोणा वरती पण विकारी दृष्टी ठेवू शकत नाही.तपासायचे आहे आम्ही किती योगा मध्ये राहतो?कोणते पाप तर करत नाही?उच्चपद मिळवायचे असेल तर खबरदार रहा,जरा पण खराब दृष्टी जायला नको.बाबा जी श्रेष्ठ मत देतात त्यावर ती पूर्ण रीतीने चालत रहा.

गीत:-
हे आत्मा,तू आपला चेहरा मनाच्या आरशा मध्ये पहा,किती पुण्य आणि किती पाप आहेत…..

ओम शांती।
बाबा आपल्या मुलांना म्हणतात स्वतःला तपासा.हे तर मनुष्यांना माहित राहते की,आपल्या सर्व जीवनामध्ये किती पाप आणि किती पुण्य केले आहेत.रोज आपली दिनचर्या पाहयची आहे.किती पाप किती पुण्य केले.कुणाला दुःख तर नाही दिले,नाराज तर नाही केले?प्रत्येक मनुष्य समजू शकतात,जीवनामध्ये काय-काय केले, किती पुण्य आणि किती पाप केले.मनुष्य यात्रे वरती जातात,तर दान पुण्य करतात ना,पाप व्हायला नको,असा प्रयत्न करतात.तर बाबा मुलांना विचारतात किती पाप आणि किती पुण्य केले आहेत. आता तुम्हा मुलांना पुण्य आत्मा बनायचे आहे.कोणतेही पाप करायचे नाही.पाप पण अनेक प्रकारचे असतात,कोणासाठी वाईट दृष्टी जाते,हे पण पाप आहे. हे सर्वात खराब आहे.कधी पण विकारी दृष्टी जायला नाही पाहिजे.सहसा स्त्री-पुरुषांची विकारी दृष्टी जाते.कुमार कुमारीं ची पण कधीकधी विकारी दृष्टी जाते.बाबा म्हणतात विकाराची दृष्टी जायला नको,नाहीतर तुम्हाला माकड म्हणावे लागेल.याचे उदाहरण आहे ना,नारद म्हणाला मी लक्ष्मी सोबत स्वयंवर करू शकतो का? तुम्ही पण म्हणतात आम्ही तर लक्ष्मीशी स्वयंवर करू.नारी पासून लक्ष्मी,नरापासून नारायण बनू.स्वतःच्या मनाला विचारा,आम्ही किती पुण्यात्मा बनलो आहोत?कोणते पाप तर करत नाही? किती योगामध्ये राहतो?

तुम्ही मुलं बाबांना ओळखतात तेव्हा तर येथे बसले आहात.दुनियाचे मनुष्य थोडेच बाबांना जाणतील,की हे बाप दादा आहेत.तुम्ही ब्राह्मण मुलं तर जाणतात, परमपिता परमात्मा ब्रह्मा मध्ये प्रवेश होऊन आम्हाला अविनाश ज्ञान रत्नांचा खजाना देत आहेत.मनुष्यांच्या जवळ विनाशी धनाचा खजाना असतो,तेच दान करतात,ते तर दगड माती आहे.हे ज्ञानाचे रत्न आहेत.ज्ञानसागर बाबांच्या जवळच हे रत्न आहेत.हे एक एक रत्न लाखो रुपयाचे आहेत.रत्नागर बाबां कडुन ज्ञान रत्न धारण करून,परत या रत्नांचे दान करायचे आहे.जेवढे हे ज्ञान घेतील आणि देतील तेवढेच उच्चपद मिळेल.तर बाबा समजवतात,स्वतःला पहा आम्ही किती पाप केले आहेत?आता तर कोणते पाप होत नाही ना.जर पण विकारी दृष्टी जायला नको.बाबा जे मत देतात त्यावरती पूर्ण रीतीने चालायचे आहे,खबरदार राहयचे आहे.मायाचे तुफान जरी आले तरी, कर्मेंद्रिया द्वारे कोणतेही पाप कर्म करायचे नाही.कुणाकडे कुदृष्टी जाते,तर त्यांच्यापुढे उभे पण राहयचे नाही,तेथून निघून जायचे आहे.माहिती तर पडते ना,यांची कुदृष्टी आहे.जर उच्चपद मिळवायचे असेल तर खबरदार राहायचे आहे.कुदृष्टी असेल तर लुळे लंगडे बनतात.बाबा जी श्रीमत देतात त्यावरती चालायचे आहे.मुलं बाबांना ओळखतात ना,बाबा कुठे जातात तर मुलं समजतील, बाप दादा आले आहेत.मनुष्य पाहतात तर खूप,परंतु त्यांना थोडेच माहिती होते,कोणी विचारतील की हे कोण आहेत? बोला बाप दादा आहेत.सर्वांच्या जवळ बैज असायला हवा.तुम्ही सांगा शिवबाबा,आम्हाला या दादा द्वारे अविनाशी ज्ञान रत्नांचे दान देत आहेत.हे अध्यात्मिक ज्ञान आहे.अध्यात्मिक पिता,सर्व आत्म्यांना हे ज्ञान देत आहेत.शिव भगवानुवाच, गिते मध्ये कृष्ण भगवानुवाच चुकीचे आहे. ज्ञानसागर पतित-पावन शिवाला म्हणतात. ज्ञानाद्वारे सद्गगती होते. हे अविनाश ज्ञान रत्न आहेत.सद्गगती दाता तर बाबाच आहेत.हे सर्व अक्षर पूर्ण रीतीने आठवणीत ठेवायचे आहेत.आता तुम्ही मुलं समजतात आम्ही बाबाला जाणतो आणि बाबा पण समजतात मी मुलांना जाणतो. पिता तर म्हणतील ना,ही सर्व माझी मुलं आहेत परंतु जाणत नाहीत.भाग्या मध्ये असेल तर पुढे चालून जाणतील.समजा हे बाबा कुठे जातात,कोणी विचारतात हे कोण आहेत? जरूर शुद्ध भावने द्वारेच विचारतील ना. तुम्हीच सांगा हे बाप दादा आहेत.बाबा निराकार आहेत,ते जो पर्यंत साकार मध्ये येणार नाहीत,तोपर्यंत बाबाकडून वारसा कसा मिळेल? तर शिवबाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारे,दत्तक घेऊन वारसा देतात.हे प्रजापिता ब्रह्मा आणि हे ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. शिकवणारे ज्ञानाचे सागर आहेत,त्यांच्या द्वारेच वारसा मिळतो.हे ब्रह्मा पण शिकत आहेत.हे ब्राह्मण पासून परत देवता बनणारे आहेत.हे ज्ञान समजणे खूपच सहज आहे.कोणालाही बैज वरती समजून सांगणे चांगले आहे.तुम्ही सांगा बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील.पावन बणुन पावन दुनिया मध्ये चालले जाल.हे पतित पावन बाबा आहेत ना.आम्ही पुरूषार्थ करत आहोत पवन बनण्यासाठी. जेव्हा विनाशाची वेळ असेल तर,आमचे शिक्षण पूर्ण होईल.किती सहज आहे समजणे. कोणी कुठे जातात,येतात तर बैज लावलेला पाहिजे.या बैज सोबत एक छोटे पत्रक पण पाहिजे,त्यामध्ये लिहायला पाहिजे,भारतामध्ये शिवबाबा येऊन परत देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. बाकी अनेक धर्म या महाभारत लढाई द्वारे कल्पा पूर्वीप्रमाणे,पूर्वनियोजित नाटका नुसार नष्ट होतील.असे पत्रक दोन चार लाख छापले पाहिजेत.जे कोणालाही पत्रक देऊ शकतो.वरती त्रिमूर्ती चे चित्र हवे, दुसऱ्या बाजूला सेवा केंद्राचे पत्ते पाहिजेत. मुलांना सर्व दिवस सेवेचे च विचार चालायला पाहिजेत.

मुलांनी गीत ऐकले रोज आपली दिनचर्या तपासायची आहे,की आज माझी अवस्था कशी राहिली.बाबाने असे अनेक मनुष्य पाहिले आहेत,ते रोज रात्री आपला जमाखर्च, दिनचर्या लिहितात.ते तपासतात कोणते खराब काम तर नाही झाले,सर्व लिहतात.ते समजतात चांगली जीवन कहाणी लिहिली तर,पुढची पिढी वाचून, ते चांगले कर्म करतील.अशी दिनचर्या लिहिणारे चांगल्या मनुष्य असतात.विकार तर सर्वा मध्ये असतातच.येथे तर ती गोष्ट नाही.तुम्ही आपली दिनचर्या पहा,परत बाबांच्या जवळ पाठवायला पाहिजे,तर प्रगती होईल आणि भीती पण राहील.सर्व स्पष्ट करून लिहायला पाहिजे,आज माझी विकारी दृष्टी गेली,असे झाले.जे एक दोघांना दुःख देतात,बाबा त्यांना गाजी म्हणतात.जन्मानंतरचे पाप तुमच्या डोक्या वरती आहेत.आता तुम्हाला आठवणीच्या बळा द्वारे पापाचे ओझे उतरायचे आहे. रोज पाहिचे आहे,आम्ही सर्व दिवसात किती गाजी बनलो.कुणाला दुःख देणे म्हणजे गाजी बनणे आहे,पाप बनते.बाबा म्हणतात,गाजी बणुन कुणाला दुःख देऊ नका.स्वतःची पूर्णपणे तपासणी करा, आम्ही किती पाप,किती पुण्य केले.जे पण भेटतील त्यांना ज्ञान सांगा,रस्ता दाखवा. सर्वांशी खुप प्रेमाने बोला, बाबांची आठवण करायची आहे आणि पवित्र बनायचे आहे. घरामध्ये राहत कमलपुष्प समान पवित्र बनायचे आहे.जरी तुम्ही संगम युगात आहात परंतु हे तर रावण राज्य आहे ना. या मायावी विषयी वैतरणी नदी मध्ये राहत कमल फुलासारखे पवित्र बनायचे आहे. कमळाचे फूल खूप चिखलामध्ये फसलेले असते, परत पाण्याचे वरती येते,ते ग्रहस्थी आहे,खूप गोष्टी निर्माण करते.हे उदाहरण पण तुमच्यासाठी आहे.विकारापासून अलिप्त होऊन राहा.हा एक जन्म पवित्र राहा, तर परत हे अविनाशी होऊन जाईल. तुम्हाला बाबा अविनाशी ज्ञान रत्न देतात, बाकी तर सर्व दगड-माती आहे.ते लोक तर भक्तीच्या च गोष्टी ऐकवत राहतात. ज्ञानसागर पतित-पावन तर एक बाबाच आहेत,तर अशा बाबांशी खूपच प्रेम असायला पाहिजे. पित्यांचे मुलांशी आणि मुलांचे पित्याशी प्रेम राहते ना,बाकी दुसरा कोणता संबंध नाही.सावत्र तेच आहेत, जे बाबांच्या पूर्ण मतावर चालत नाहीत, रावणाच्या मतावर चालतात,रामाच्या मतावर थोडेच चालतात.अर्धा कल्प रावण संप्रदाय आहेत म्हणून या दुनियेला भ्रष्टाचारी म्हटले जाते.आता तुम्हाला बाकी सर्वांना सोडून एका बाबांच्या मतावर चालायचे आहे. ब्रह्माकुमार कुमार यांची मदत मिळते,ते पण तपासायला पाहिजे की हे मत बरोबर आहे,की चुकीचे. तुम्हा मुलांना आता सत्य-असत्य ची समज मिळाली आहे. जेव्हा सत्यवान येतील त्यावेळेस चूक आणि बरोबर सांगतील. बाबा म्हणतात तुम्ही अर्धा कल्प भक्ती मार्गाचे ग्रंथ ऐकले,आता मी जे ऐकवतो हे बरोबर आहे, की ते बरोबर आहे. ते मनुष्य म्हणतात ईश्वर सर्वव्यापी आहे,मी म्हणतो तुमचा पिता आहे.आता निर्णय करा, बरोबर कोण आहे.हे पण मुलांना समजले जाते ना,जेव्हा ब्राह्मण बनतील तेव्हा समजतील.रावण संप्रदाय तर खूप आहेत. तुम्ही तर खूप थोडे आहात,तुमच्यामध्ये पण नंबर नुसार आहेत.जर कोणाची खूप कुदृष्टी आहे तर,त्यांना रावण संप्रदाय म्हटले जाईल.राम संप्रदाय तेव्हाच समजले जाईल,जेव्हा सारी सृष्टी बदलून जाईल. आपल्या अवस्था द्वारे प्रत्येक जण समजू शकतात. प्रथम तर ज्ञान नव्हते,आता बाबांनी रस्ता दाखवला आहे.तर पाहयचे आहे अविनाश ज्ञान रत्नांचे दान करत राहतो का.भक्त लोक दान करतात विनाशी धनाचे,आता तुम्हाला दान करायचे आहे अविनाश धनाचे.विनाशी धन आहे तर अलौकिक सेवेमध्ये सफल करा.पतीतांना दान केल्यामुळे पतीतच बनतात.आता तुम्ही आपले धन दान करतात तर,त्याचा मोबादला प्रत्येक जन्मासाठी नवीन दुनियेमध्ये मिळतो. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.बाबा पण सांगत राहतात,सर्वा वरती दया करा,हे गायन पण आहे.परमपिता परमात्मा ब्रह्म द्वारे स्थापना करतात परंतु अर्थ समजत नाहीत.

परमात्म्याला सर्वव्यापी म्हटले आहे.तर मुलांना सेवेची खुपआवड पाहिजे.दुसऱ्याचे कल्याण केले तर स्वतःचे पण कल्याण होईल.दिवसेंदिवस बाबा खूपच सहज करून सांगतात.त्रिमूर्ती चे चित्र पण खूपच चांगले आहे. यामध्ये शिवबाबा पण आहेत परत प्रजापिता ब्रह्मा पण आहेत. प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी द्वारा परत, भारत १००% पवित्रता सुखशांती दैवी स्वराज्य स्थापन करत आहे.बाकी अनेक धर्म महाभारत लढाई द्वारे कल्पा पूर्वी सारखे विनाश होतील.असे पत्रके छपून वाटायला पाहिजेत.बाबा खूपच सहज सांगतात, प्रदर्शनी मध्ये पण तुम्ही अशी पत्रक द्या.जुन्या दुनियेचा विनाश तर होणारच आहे.नवीन दुनिये ची स्थापना होत आहे.एका आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होत आहे,बाकी सर्व विनाश होतील कल्पा पूर्वीसारखेच.कुठे पण जावा खिशामध्ये नेहमी पत्रक आणि बैज पाहिजे.सेकंदांमध्ये जीवन मुक्ती गायन केलेले आहे. तुम्ही सांगा हे बाप,हे दादा,त्या बाबांची आठवण केल्यामुळे तुम्ही सतयुगी देवता पद प्राप्त कराल.जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना होत आहे.विष्णुपुरी नवीन दुनिया मध्ये परत यांचे राज्य होईल,खूपच सहज आहे.तीर्था वरती मनुष्य जातात,तर खूप धक्के खातात.आर्यसमाज इत्यादी,पूर्ण रेल्वे भरून तिर्था वरती जात होते,याला म्हटले जाते धर्माचे धक्के.वास्तव मध्ये अधर्माचे धक्के आहेत.धर्मामध्ये धक्के खाण्याची आवश्यकता नाही.तुम्ही तर हे शिक्षण घेत आहात.भक्तिमार्ग मध्ये मनुष्य तर काय काय करत राहतात.मुलांनी गीत पण ऐकले की,मनाच्या आरशा मध्ये चेहरा पहा.असा चेहरा तुमच्याशिवाय कोणी पाहू शकत नाही.भगवंताला पण तुम्ही दाखवू शकता.या ज्ञानाच्या गोष्टी आहेत.तुम्ही मनुष्यापासून देवता,पाप आत्म्या पासून पुण्यात्मा बनत आहात. दुनिया या गोष्टीला बिलकुल जाणत नाही.हे लक्ष्मी नारायण स्वर्गाचे मालक कसे बनले हे कोणालाच माहिती नाही.तुम्ही मुलं तर सर्व जाणतात. कुणाला बुद्धी मध्ये हे ज्ञान आवडेल तर, त्याची जीवन रूपी नाव विषय सागरातून क्षिरसागर कडे जाईल,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती,मात पिता बाप दादाची प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) जर विनाशी धन आहे तर,त्याला सफल करण्या साठी अलौकिक सेवेमध्ये लावायचे आहे. अविनाश धनाचे दान जरूर करायचे आहे.

(२) स्वत:च्या दिनचर्या मध्ये पाहायचे आहे की माझी अवस्था कशी राहिली? संपुर्ण दिवसां मध्ये कोणते खराब काम तर केले नाही ना? एक दोघांना दुःख तर दिले नाही? कोणावर ती कुदृष्टी तर जात नाही ना?

वरदान:-
प्रत्येक खजान्याला बाबांच्या श्रीमता नुसार कार्यामध्ये लावणारे प्रमाणिक किंवा इमानदार भव:

प्रामाणिक किंवा इमानदार त्यालाच म्हटले जाते,जे बाबांच्या मिळालेल्या खजान्याला बाबांच्या श्रीमता नुसार कोणत्याही कार्यामध्ये लावत नाहीत.जर वेळ, वाणी, कर्म, श्वास किंवा संकल्प,परमत किंवा संग दोष मध्ये व्यर्थ मध्ये गमावतात,स्वचिंतना ऐवजी पर चिंतन करतात.स्वमानच्या ऐवजी कोणत्याही प्रकारच्या अभिमाना मध्ये येतात,श्रीमतच्या ऐवजी मन मता वरती चालतात,त्याला प्रामाणिक म्हणणार नाही.हे सर्व खजाने विश्व कल्याणासाठी मिळालेले आहेत,तर त्या मध्येच लावणे म्हणजेच प्रामाणिक बनणे होय.

बोधवाक्य:-
विरोध मायेशी करायचा आहे, दैवी परिवाराशी नाही.


अव्यक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ:-
प्रत्येक वेळेत,नवीनतेचा अनुभव करत, दुसऱ्यांना पण नवीन उमंग उत्साहा मध्ये आणायचे आहे.खुशी मध्ये नाचायचे आणि बाबांच्या गुणांचे गीत गायन करायचे आहेत.मधुरतेच्या मिठाई द्वारे स्वतःचे मुख गोड करत,दुसऱ्यांना पण गोड बोल,मधुर संस्कार,मधुर स्वभाव द्वारे तोंड गोड करायचे आहे.