18-02-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो , जुन्या नियेतील काट्यांना नव्या दु नियेचे फुल बनवणे हे तुम्हा हुशार
माळ्यांचे काम आहे ... !!
प्रश्न:-
संगमयुगावर
तुम्ही मुले कोणते श्रेष्ठ भाग्य बनवता ?
उत्तर:-
काट्यांपासून सुगंधीत फुल बनणे, हे आहे सर्वांत श्रेष्ठ भाग्य. जर कोणताही एक विकार
आहे तो काटा आहे. जेव्हा काट्यापासून फुल बनाल तेव्हा सतोप्रधान देवी-देवता बनाल.
तुम्ही मुले आता 21 पिढ्यांसाठी आपले सुर्यवंशी भाग्य बनवण्यासाठी आले आहात.
गीत:-
भाग्य घेऊन आलो
आहे…
ओम शांती।
गीत मुलांनी ऐकले. हे तर साधारण गीत आहे. कारण तुम्ही आहात माळी, बाप आहे बागवान.
आता माळ्यांना काट्यांपासून फुल बनवायचे आहे. हे अक्षर खुप स्पष्ट आहे. भक्त आले
आहेत भगवानाच्या जवळ, हे सर्व भक्त आहेत ना. आता ज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी
बाबांच्या जवळ आलो आहोत. या राजयोगाच्या शिक्षणानेच नविन दुनियेचे मालक बनत आहात.
तर भक्त म्हणतात आम्ही भाग्य बनवून आलो आहे, नविन दुनिया मनामध्ये, समजावून आलो आहे.
बाबाही रोज म्हणतात कि गोड घर आणि गोड राजाईची आठवण करा. आत्म्याची आठवण करायची आहे.
प्रत्येक सेंटरवर काट्यापासून फुल बनत आहेत, फुलांमध्ये ही नंबरवार असतात ना.
शिवलिंगावर फुले वाहतात, कुणी कसे फुल वाहतात कुणी कसे. गुलाबाचे फुल आणि
धोतऱ्याच्या फुलांमध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. हा ही बगीचा आहे. कुणी मोत्याचे फुल
आहे, कुणी चंपाचे फुल, कुणी रतन ज्योत आहेत. कुणी धोतऱ्याचे फुल आहेत. मुलं जाणतात
यावेळेस सर्व काटे बनले आहेत. ही दुनिया काट्यांचे जंगल आहे, याला बनवायचे आहे नव्या
दुनियेचे फुल. या जुन्या दुनियेमध्ये आहेत काटे, तर गीतामध्ये पण म्हणतात आम्ही
बाबांच्या जवळ आलो आहोत जुन्या दुनियेच्या काट्यापासून नव्या दुनितेतील फुल
बनण्यासाठी. जी नवी दुनिया बाबा स्थापन करत आहेत. काट्यापासून फुल म्हणजे देवी-देवता
बनायचे आहे. गीताचा अर्थ किती सोपा आहे. आम्ही आलो आहे नव्या दुनियेसाठी आपले भाग्य
बनविण्यासाठी. नवी दुनिया आहे सतयुग. कोणाचे सतोप्रधान भाग्य आहे, कुणाचे रजो, तमो
आहे, कुणी सुर्यवंशी राजा बनते कुणी प्रजा बनते, कुणी प्रजेचेही नौकर-चाकर बनतात.
ही नव्या दुनियेची राजाई स्थापन होत आहे. शाळेमध्ये भाग्य घडवण्यासाठी जातात ना.
येथे तर आहे नव्या दुनियेची गोष्ट. या जुन्या दुनियेमध्ये काय भाग्य बनवणार? तुम्ही
भविष्य नव्या दुनियेमध्ये देवता बनण्याचे भाग्य बनवत आहात, ज्या देवतांना सर्व नमन
करतात. आम्हीच ते देवता, पुज्य होतो नंतर आम्हीच पुजारी बनलो आहोत. 21 जन्मांचा
वारसा बाबांकडून मिळतो, ज्याला 21 पिढ्या असे म्हटले जाते. पीढी वृध्द अवस्थेपर्यंत
म्हटले जाते. बाबा 21 पिढ्यांचा वारसा देतात. कारण तरुण पणी किंवा लहानपणी, मध्येच
अकाले मृत्यू कधी होत नाही म्हणून याला म्हटले जाते अमरलोक. हे आहे मृत्युलोक
रावणराज्य, येथे प्रत्येकामध्ये विकारांची प्रवेशता आहे, ज्यांच्यामध्ये कोणता एकही
विकार असेल तर काटे झाले ना. बाबा समजतात माळ्याला श्रेष्ठ सुगंधीत फुल बनवणे जमत
नाही. माळी चांगला असेल तर सुंदर-सुंदर फुले तयार करेल. विजयमाळेमध्ये गुंफण्या
योग्य फुल हवे. देवतांना चांगली फुले घेऊन जातात ना. समजा राणी एलिजाबेथ येणार असेल
तर, एकदम गुंफण्या सुंदर फुलांची माळ बनवून घेऊन जातात. येथील लोक आहेत तमोप्रधान.
शिवाच्या मंदीरात ही जातात. समजतात हे भगवान आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकराला तर
देवता म्हणतात, शिवाला भगवान म्हणतात. तर तो उंच ते उंच झाले ना. आता शिवाला
म्हणतात तो धतुरा खात होता, भांग पित होता. किती निंदा करतात, फुल पण धोतऱ्याचे
घेऊन जातात असा परमपिता परमात्मा त्यांच्याजवळ काय घेऊन जातात? तमोप्रधान
काट्यांजवळ तर सुंदर फुलं घेऊन जातात आणि शिवाच्या मंदीरात काय घेऊन जातात? दुधही
कसले वाहतात? 5 टक्के दुध आणि 95 टक्के पाणी. भगवंताच्याजवळ दुध कसे वाहायला हवे,
काहीच जाणत नाहीत. आता तुम्हाला चांगले समजले आहे. तुमच्यामध्ये ही नंबरवार आहेत.
जे चांगले जाणकार आहेत त्यांना सेंटरचे मुख्य बनवले जाते. सर्व तर एकसारखे नसतात.
भले शिक्षण तर नंबरवार आहेत ना. विजय माळेमध्ये येण्याचा मुख्य आधार आहे शिक्षण,
शिक्षण तर एकच असते. त्यामध्ये पास तर नंबरवार होतात ना. सर्व शिक्षणवर अवलंबून आहे.
कुणीतर विजय माळेच्या 8 दान्यांमध्ये येतात, कुणी 108 मध्ये, कुणी 16108 मध्ये.
विस्तार होतो ना. जसा झाडांचाही विस्तार होतो, प्रथम एक पान, दोन पाने नंतर वाढत
जाते. हे ही झाड आहे. घराणे असतात, जसे कृपलानी घराणे इ.ते सर्व आहेत हदचे घराणे हे
आहे बेहदचे घराणे. यांच्या सुरुवातीला कोण आहे? प्रजापिता ब्रह्मा त्यांना म्हणतात
ग्रेट-ग्रेट ग्रॅन्ड फादर (पंजोबा) परंतू हे कोणाला माहित नाही. मनुष्य जराही जाणत
नाहीत की, सृष्टीचा रचनाकार कोण आहे?बिलकुल अहिल्यासारखे दगडाची बुध्दी झाली आहे,
असे जेव्हा बनतात तेव्हाच बाबा येतात.
तुम्ही येथे आले आहात अहिल्या बुध्दी पासून पारसबुध्दी बनण्यासाठी, तर ज्ञान धारण
केले पाहिजे ना. बाबांना ओळखले पाहिजे आणि शिक्षणाचा विचार केला पाहिजे? समजा आज आले
आहत, उद्या अचानक शरीर सुटून जाते नंतर काय पद प्राप्त करणार? ज्ञान तर काहीच घेतले
नाही. काहीच शिकले नाही तर काय पद मिळणर! दिवसेंदिवस जे उशीरा शरीर सोडतात, त्यांना
तरी थोडा वेळ मिळतो कारण वेळ कमी होत जातो, यामध्ये जन्म घेऊन काय करु शकतो. होय,
तुमच्यामध्ये जे कुणी जातील ते चांगल्या घरामध्ये जन्म घेतील. संस्कार घेउन जाते तर
ती आत्मा लगेच जागृत होते, शिवबाबांची आठवण करते. संस्कार पडलेले नसतील, तर काहीच
करणार नाही. यागोष्टी खुप स्पष्ट समजाव्या लागतात. माळी चांगल्या चांगल्या फुलांना
घेऊन येतात, तर त्यांचे कौतुक केले जाते, फुल बनवणे तर माळ्यांचे काम आहे ना. अशी
खुप मुले आहेत. ज्यांना बाबांची आठवण करण जमतच नाही. भाग्यावर अवलंबून आहे ना.
भाग्यात नसेल तर काही समजणार नाही. भाग्यवान मुले तर बाबांना योग्य रितीने ओळखुन
त्यांची चांगल्याप्रकारे आठवण करतील. बाबां बरोबर नव्या दुनियेची देखील आठवण करत
राहतील. गीतामध्ये पण म्हणतात ना, आम्ही नवीन दुनियेसाठी नवीन भाग्य बनवण्यासाठी आलो
आहे. 21 जन्मांसाठी बाबांकडून राज्यभाग्य घ्यायचे आहे. या नशे आणि खुशीमध्ये राहा.
अशा गीतांचा अर्थ इशाऱ्यांनी समजायला हवा. शाळेमध्ये ही कुणाच्या भाग्यात नसेल तर
नापास होतात, ही तर खुप मोठी परीक्षा आहे. भगवान स्वत: बसून शिकवत आहे हे ज्ञान
सर्व धर्मासाठी आहे. बाबा म्हणतात स्वत:ला आत्मा समजून माझी आठवण करा. तुम्ही जाणता
कोणत्याही देहधारी मनुष्याला भगवान म्हणू शकत नाही. ब्रह्मा-विष्णू, शंकरालाही
भगवान नाही म्हणणार. ते ही सुक्ष्म वतनवासी देवता आहेत. येथे आहेत मनुष्य. येथे
देवता नाहीत. हा आहे मनुष्य लोक. हे लक्ष्मी-नारायण मनुष्य. येथे देवता नाहीत. हा
आहे मनुष्यलोक. हे लक्ष्मी-नारायण इ. दैवीगुण धारी मनुष्य आहेत. ज्याला देवता धर्म
म्हटले जाते. सतयुगात सर्व देवी-देवता आहेत. सुक्ष्मवतन मध्ये आहेत
ब्रह्मा-विष्णू-शंकर, गातात ही देवताए नम:, विष्णू देवताए नम:...नंतर म्हणतात शिव
परमात्माए नम:, शिवाला देवता म्हणत नाही. आणि मनुष्याला भगवान म्हणू शकत नाही. तीन
मजले आहेत ना. आम्ही आहोत तिसऱ्या मजल्यावर. सतयुगाचे जे दैवीगुण धारी मनुष्य आहेत
तेच आसुरी गुणधारी बनतात. मायेचे ग्रहण लागल्याने काळे होतात, जसे चांद्रालाही
ग्रहण लागते ना. त्या आहेत हदच्या गोष्टी, या आहेत बेहदच्या गोष्टी. बेहदचा दिवस आणि
बेहदची रात्र आहे. गातात ही ब्रह्माचा दिवस आणि रात्र. तुम्हाला आता एक बाबांकडून
शिकायचे आहे. बाकी सर्व विसरायचे आहे. बाबांच्या द्वारे शिकल्याने तुम्ही नव्या
दुनियेचे मालक बनता. ही खरी-खुरी गीता पाठशाळा आहे. पाठशाळेमध्ये कायमचे राहत नाहीत.
मनुष्य समजतात भक्ती मार्ग ईश्वराला भेटण्याचा मार्ग आहे, जेवढी जास्त भक्ती कराल
तर भगवान प्रसन्न होतील आणि येऊन फळ देईल. यासर्व गोष्टी तुम्हाला आता समजतात.
भगवान एक आहे जो आता फळ देत आहे. जे प्रथम सुर्यवंशी पुज्य होते, त्यांनीच सर्वांत
जास्ती भक्ती केली आहे, तेच येथे येतील. तुम्हीच पहिल्यांदा शिवबाबांची अव्यभिचारी
भक्ती केली आहे जरुर तुम्हीच प्रथम भक्त आहात. नंतर उतरत-उतरत तमोप्रधान बनता.
अर्धाकल्प तुम्ही भक्ती केली आहे. म्हणून तुम्हाला प्रथम ज्ञान देतात. तुमच्या
मध्येही नंबरवार आहेत.
तुमच्या या शिक्षणामध्ये ही चाल ढकलपणा चालू शकत नाही की, आम्ही दुर राहतो म्हणून
रोज शिकू शकत नाही. काही म्हणतात आम्ही 10 मैल दूर राहतो. अरे, बाबांच्या आठवणीत
तुम्ही 10 मैल चाललो, तरी थकवा येणार नाही. किती मोठा खजाना घेण्यासाठी जाता.
तीर्थांवर मनुष्य दर्शनासाठी चालत जातात, किती धक्के खातात. ही तर एका शहराची गोष्ट
आहे. बाबा म्हणतात मी एवढ्या लांबून आलो आहे. तुम्ही म्हणता घर 5 मैल दूर आहे…. वाह!
खजाना घेण्यासाठी तर पळत यायला पाहिजे. अमरनाथला फक्त दर्शन करण्यासाठी कुठे-कुठे
जातात. येथे तर अमरनाथ बाबा स्वत: शिकवण्या साठी आले आहेत. तुम्हाला विश्वाचे मालक
बनवण्यासाठी आलो आहे. तुम्ही चाल ढकलपणा करत राहता, सकाळी अमृतवेळेला तर कुणीही येऊ
शकते. त्यावेळी कसली भीती नाही. कुणी तुम्हाला लुटणारही नाही. जर दागिने किंवा काही
वस्तू असतील तर हिसकावून घेतील. चोरांना तर धन-वस्तू हव्या आहेत. परंतू कोणाच्या
भाग्यात नसेल, तर मग खुप कारण सांगतात. शिकत नाहीत तर आपले पद गमावतात. बाबा येतातही
भारतामध्ये, भारतालाच स्वर्ग बनवतात. सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा रस्ता सांगतात. परंतू
कुणी पुरुषार्थ केला पाहिजे ना. पाऊल जर उचलले नाही तर पोहचणार कसे. तुम्ही मुले
समजता कि हा आत्मा आणि परमात्म्याचा मेळा आहे. बाबांच्याजवळ आलो आहोत स्वर्गाचा
वारसा घेण्यासाठी, नवीन दुनियेची स्थापना होत आहे. स्थापना पुर्ण झाली आणि विनाश
सुरु होणार. हे तेच महाभारत युध्द आहे ना. अच्छा,
गोड गोड, फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक
आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. बाबा जो
ज्ञानाचा खजाना देत आहेत, ते घेण्यासाठी पळत-पळत यायला पाहिजे, यामध्ये कोणत्याही
प्रकारचे कारण दयायचे नाही. बाबांच्या आठवणीमध्ये 10 मैल चालले तरी थकवा येणार नाही.
2. विजय माळेत येण्याचा आधार मुरली आहे. शिक्षणावर पुर्ण ध्यान दयायचे आहे.
काट्यांना फुल बनवण्याची सेवा करायची आहे. गोड घर आणि गोड राजाईची आठवण करायची आहे.
वरदान:-
निश्चयबुध्दी
पायाला अचल ठेवणारे सदैव निश्चयबुध्दी , निश्चीत भव :-
सर्वांत मोठा आजर आहे
चिंता, यांचे औषध डॉक्टरजवळ ही नाही. चिंतावाले जेवढे प्राप्तीच्या मागे धावतात,
तेवढी प्राप्ती पुढे धावत राहते. म्हणून निश्चयाचे पाय सदैव अचल ठेवा. सदैव एक बळ,
एक भरोसा-हा पाय अचल आहे. तर विजय निश्चीत आहे. निश्चीत विजयी, सदैव निश्चीत आहेत.
माया निश्चय रुपी पाय हलवण्यासाठी वेग-वेगळ्या रुपांनी येते, पण माया हल्ली
पाहिजे-तुमचा निश्चय रुपी पाय नाही, तर निश्चित राहण्याचे वरदान मिळेल.
बोधवाक्य:-
प्रत्येकाची
विशेषता पाहत राहा , तर विशेष आत्मा बणून जाल .