31-01-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो , योग अग्नी सारखा आहे. ज्यामध्ये तुमची पापं जळून जातात , आत्मा सतोप्रधान
बनत जाते. म्हणून एक पित्याच्या आठवणीत (योगात) रहा ....!!!
प्रश्न:-
पुण्य आत्म
बनत असणाऱ्या मुलांनी कोणती गोष्ट खुप खुप लक्षात ठेवली पाहिजे?
उत्तर:-
पैसा कुणाला दान करायचा, या गोष्टी वर पुर्ण लक्ष ठेवायचे आहे. जर कुणाला पैसे दिले
व त्याने जावून दारु वगैरे पिली, वाईट कर्म केले तर त्याचे पाप तुमच्या माथ्यावर
येईल. तुम्हाला पापी आत्म्यांसोबत कोणतीही देवाण-घेवाण करायची नाही. येथे तुम्हाला
पुण्यात्मा बनायचे आहे.
गीत:-
तो आमच्या
पासून वेगळा होणार नाही ...
ओम शांती।
यालाच आठवणीची अग्नी म्हटले जाते. योग अग्नी म्हणजे आठवणींचा अग्नी. अग्नी अक्षर का
म्हटलं आहे? कारण त्यात पापं जळून जातात. हे फक्त तुम्ही मुलंच जाणतात. कि कसे आपण
तमोप्रधानहून सतोप्रधान बनत जातो. सतोप्रधानाचा अर्थच आहे पुण्यात्मा, तर
तमोप्रधानाचा अर्थच आहे पापात्मा असे म्हटले जाता हा खुप पुण्यात्मा आहे व हा खुप
पापात्मा आहे. यावरुन सिध्द होतं की आत्माच सतोप्रधान बनते व पुर्नजन्म घेत घेत
तमोप्रधान बनते म्हणून त्यांना पापात्मा म्हटले जाते. पतित पावन पित्यालाही
याच्यासाठी आठवतात कि, त्याने येऊन आत्म्याला पावन बनवावे. आत्म्याला पतित कुणी
बनविले? हे कुणालाच माहित नाही. तुम्हाला माहित आहे, जेव्हा आत्म पावन होती तेव्हा
रामराज्य म्हटले जात होते. आता आत्मा पतित असल्याने रावणराज्य म्हटले जाते. भारतच
पावन व पतित बनतो. बाबाच येऊन भारताला पावन बनवतात. सर्वच आत्मे पावन बनून
शांतीधाममध्ये निघून जातात. आता दु:खधाम आहे. इतकी सोपी गोष्ट देखील बुध्दील येत
नाही. जेव्हा मनापासून समजले तेव्हा खरे ब्राह्मण बनाल. ब्राह्मण बनल्याशिवाय वारसा
मिळू शकत नाही.
आता हा संगमयुगाचा यज्ञ आहे. यज्ञासाठी ब्राह्मण हवाच. आता तुम्ही ब्राह्मण आहात.
तुम्ही जानता हा मृत्यू-लोकांचा शेवटचा यज्ञ आहे. मृत्यू लोकांतच यज्ञ असतात.
अमरधामात यज्ञ नसतात. भक्तांच्या बुध्दीत या गोष्टी बसू शकत नाही. भक्ती पूर्ण वेगळी
आहे. तर ज्ञान वेगळे, मनुष्य वेद-शास्त्रांनाच ज्ञान समजतात. त्यात ज्ञान असते तर
सगळे परमधामात गले असते. परंतू विश्वरुपी नाटकानुसार परत जाता येत नाही. बाबा
सांगतात पहिला क्रमांकच सतो, रजो, तमोमध्ये येतात. तेव्हा दुसरे कसे सतोची भुमिका
करुन परत जातील? त्यांना तमोमध्ये येऊन भुमिका करावीच लागणार आहे. प्रत्येक
कलाकारांची स्वत:ची अशी वेगळी ताकत आहे. मोठ मोठे कलाकार किती प्रसिध्द असतात.
सर्वांत प्रमुख निर्माता, संचालक व मुख्य कलाकार कोण आहे? आता तुम्ही जाणता शिवपिता
मुख्य, त्यानंतर जगतअंबा व जगतपिता आहे. ते विश्वाचे मालक बनतात. निश्चितच त्यांची
भुमिका मुख्य आहे. त्यामुळे त्यांचे वेतनही मोठे असेल. वेतन सर्वांत मोठे शिवपिता
देतात. म्हणतात कि तु मला इतकी मदत करतोस, कि तुला वेतन ही जरुर मिळणार. वकील
शिकवतांना म्हणेल कि इतकं मोठं पद मिळवून देतो, तर लक्ष दिलं पाहिजे. गृहस्थीमध्ये
राहून कर्मयोगाचा संन्यास केला पाहिजे. संसारात राहून सर्वकाही करुन बाबांपासून
वारसा मिळवू शकतात. यात कोणतीही समस्या नाही. कर्म करताना बाबांची आठवण करावी.
ज्ञान खुप सोपं आहे. गातात हे पतित पावन येऊन पावन बनवं. पावन दुनियेत राजधानी
असल्याने, लायक बनवतात.
या ज्ञानात दोन मुख्य विषय आहेत. अल्फ व बे, स्वदर्शन चक्रधारी बनून बाबांची आठवण
केल्यास संपूर्ण आरोग्यदायी व संपत्तीवान बनाल. बाबा म्हणतात माझी तेथे आठवण करा,
घराचीही करा त्याने तुम्ही घरी (परमधाम) यालं. स्वदर्शन चक्रधारी बनल्याने तुम्ही
चक्रवती राजा व्हाल. हे बुध्दीत ठेवायचे आहे. आज सगळे तमोप्रधान आहेत. सुखधामात सुख,
शांती, संपत्ती सगळे मिळेल. तेथे एक धर्म असेल. आज प्रत्येक घरात अशांती आहे.
विद्यार्थी देखील किती गोंधळ करतात. नविन रक्त दाखवतात. ही तमोप्रधान तर सतयुग नवी
दुनिया आहे. बाबा संगमयुगात आला आहे. महाभारत लढाई संगमयुगातीलच आहे. आता ही दुनिया
बदलेलं. बाबा म्हणतात मी नविन दुनियेची स्थापना करण्यासाठी संगमावर येतो.
पुरुषोत्तम महिना वा सवंत देखील साजरे करतात. परंतू संगमयुगाची माहिती कुणाला नाही.
संगमयुगात येऊनच बाबा तुम्हाला हिऱ्याप्रमाणे बनवतात. परंतू त्यातही नंबरवार असतात.
हिऱ्याप्रमाणे राजा तर सोन्याप्रमाणे प्रजा बनते. मुलाने जन्म घेताच वारसदार बनतो.
आता तुम्ही पावन दुनियाचे हक्कतदार बनतात. मोठं पद मिळविण्यासाठी पुरुषार्थ करा.
आताचा पुरुषार्थ हा कल्पा-कल्पाचा असेल. लक्षात येतं की हा कल्प-कल्प असाच
पुरुषार्थ करेल. काहींकडून जास्त पुरुषार्थ होणार नाही. जन्मो-जन्मी, कल्पो-कल्पी
प्रजेतच येतील. हे सावकार प्रजेत दास-दासी बनतील. क्रमाप्रमाणेच असतील ना.
शिक्षणामुळे सगळं माहित होते. बाबा लगेचच सांगू शकतात कि, या स्थितीत शरीर सोडल्यास
काय बनाल? दिवसागणीक वेळ कमी होत आहे. शरीर सोडल्यास ज्ञान घेता येणार नाही.
मात्र्थोडेसे बुध्दीत राहिल. बाबांची आठवण कराल. लहान मुलांकडून बाबांची आठवण करवून
घेतात. तेव्हा ते देखील शिवबाबा, शिवबाबा करत असतात. तेव्हा त्यांना देखील काहीतरी
मिळते. लहान मुले महात्म्याप्रमाणे असतात विकारांचा लवलेशही नसतो. जसा मोठा होईल तसा
विकारांचा परिणाम होईल, क्रोध, मोह असेल. आता तुम्हाला समजवलं जाते की जे या
डोळ्यांनी दिसत आहे. त्यापासून ममत्व काढून टाकायचे आहे. आत्मा जानते हे सर्व मातीत
मिळणार आहे. सर्व तमोप्रधान आहे. मनुष्य मरतात तेव्हा जुन्या वस्तू, करणी घोराला
देातत. बाबा तर मोठा करणी घोर आहे. धोबी देखील. तुमच्याकडून काय घेतात व काय देतात?
तुम्ही थोडे धन देतात कि जे संपून जाणार आहे. तरी देखील बाबा सांगतात हे धन
तुमच्याकडे ठेवा फक्त मोह ठेवू नका. बाबाला हिशोब देत रहा. म्हणजे मार्गदर्शन मिळत
राहिल. तुमच्याकडील हे शुद्रधन (करवपन) बाबा आत्मिक विद्यापीठात व आत्मिक
दवाखान्यात आरोग्य व संपत्तीसाठी लावतात. दवाखाना आजाऱ्यांसाठी तर विद्यापीठ
शिकणाऱ्यांसाठी असते. येथे विद्यालय व दवाखाना एकत्र्आहे. ब्राह्मणासाठी केवळ तीन
पावले जमीन हवी. ज्यांच्याजवळ काही नाही, त्यांनी तीन पावले जमीन दयावी. त्यात मुरली
घ्यावी. तीन पावले केवळ बसण्याची जागा असते. आसन देखील तीन पायांचे असते. तीन
पावलांच्या जागेवर येऊन कुणीही येऊन ज्ञान समजून घेईल. कुणी आले, आसनावर बसवले व
बाबांचा परिचय दिला. सेवेसाठी बिल्ले (बॅचेस) देखील बनवले जात आहेत. चित्र्देखील
चांगले आहेत. माहिती देखील चांगले आहे. त्याने सेवा चांगली होईल. दिवसागणीक जशी
संकटे येतील तसे वैराग्य येईल व बाबांची आठवण कराल. आपण आत्मे अविनाशी आहोत. आपल्या
अविनाशी पित्याची आठवण करा. बाबा स्वत: सांगतात कि, माझी आठवण कराल, तर पापे नष्ट
होतील. आत्मा समजून बाबांवर प्रेम करा. देह अभिमानात येऊ नका. मुलांवर ही प्रेम करा.
परंतू आत्म्याचे खरे प्रेम आत्मिक पित्यावर असावे. त्यांच्या आठवणीनेच विकर्म विनाश
होतील. मित्र्, नातलग, मुलांकडे पाहतानाही बुध्दी बाबांकडे असावी. तुम्ही मुले
आवठणींच्या फासीवर चढलेले आहात. आत्म्यांना पिता परमात्म्याच्या आठवणीत राहायचे आहे.
बुध्दी वरती अडकलेली असावी. बाबांचे घर वरतीच आहे. हे मुळधाम, सुक्ष्मधाम आणि हे
स्थुलधाम असून आता घरी जावयाचे आहे.
आता तुमचा प्रवास पुर्ण झाला आहे. परतीचा प्रवास आहे. आपलं घर किती गोड आहे. बेहद
आहे. परत जावयाचे आहे. मनुष्य भक्ती करतात मुक्तीसाठी परंतू ज्ञान नसल्याने मुक्ती
मिळत नाही. किती मेहनत तिर्थ आदी करतात. संन्यासी फक्त शांतीचा मार्ग दाखवतात.
सुखधामाला जाणत नाही. तो फक्त बाबाच दाखवतात. पहिल्यांदा निर्वाणधाम, वानप्रस्थ
अवस्थेत जावं लागेल त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. ते त्यालाच ईश्वर समजतात. आपलं
स्थानही तेच आहे. आत्मा बिंदू आहे आपण ब्रह्मांडवासी आहोत. तुमची देखील पुजा होते.
बिंदूची काय पुजा करणार? पुजा करताना शाळीग्राम बनवून एक-एक आत्म्यांची पुजा करतात.
बिंदूची पुजा कशी करणार म्हणून मोठं लिंग बनवतात. बाबांना तर शरीरच नाही हे तुम्ही
जाणतातच. चित्रातही मोठे रुप दाखवा अन्यथा समजावणार कसे. तारा दाखवा. माता टिळा
लावतात. तयार स्वरुपातही सफेद टिळा मिळतो. आत्म्याही सफेद तारा आहे. भृकुटीत राहते.
अर्थ लोकांना माहित नाही. बाबा सांगता या छोट्या आत्म्यात किती ज्ञान भरलेले आहे.
किती बॉम्बस इ. बनवतात. विशेष आहे की, आत्म्यामध्ये इतक्या भुमिका आहेत. या सर्वच
गुह्य गोष्टी आहेत. छोटी आत्मा शरीराद्वारे कार्ये करवून घेते. आत्मा अविनाशी
असल्याने त्याची भुमिका कधी नष्ट होत नाही. आज झाड मोठं आहे. सतयुगात किती छोटं असतं.
मात्र्जुनं होत नाही. गोड छोट्या झाडाचं कलम आता लावलं जात आहे. तुम्ही पतित होता
आता पावन बनत आहात. छोट्या आत्म्यात किती मोठी भुमिका आहे. नैसर्गिकपणे नाटक चालू
राहते. अविनाशी आहे. अविनाशी नाटक (पार्ट) आहे. विशेष आहे ना. बाबा सांगतात मुलांनो
देही-अभिमानी बना. स्वत:हाला आत्मा समजून बाबांची आठवण करा. यात मेहनत असून तुमची
मेहनत मोठी आहे. बाबांपेक्षा तुचमी भुमिका मोठी आहे. बाबा सांगतात तुम्ही स्वर्गात
गेल्यास मी परमधामात विश्रम घेतो. कोणतीही भुमिका नाही. आता सेवा करतो. हे ज्ञान
एवढे विशेष आहे की, तुमच्या शिवाय कुणी जाणत नाही. बाबांच्या आठवणीशिवाय धारणा
होणार नाही. खाण्या-पिण्यामुळे देखील धारणेवर परिणाम होतो. यात पावित्र्य हवं.
बाबांची आठवण करुन वारसा मिळविण्यासाठी चित्र्जवळ ठेवा. योग व वारशाचे चित्र्जवळ
असल्याने नशा राहिल. आपण ब्राह्मणापासून देवता, देवतापासून क्षत्रिय बनतो. आपण
संगमावरचे ब्राह्मण आहोत. ज्ञान बुध्दीत ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. दिवसागणीक
ज्ञान समजल्याने आनंदी होतात.
तुम्ही मुलं जाणता बाबा आपलं कल्याण करतात कल्पागणीक कला वाढते. येथे
उदरनिर्वाहासाठी सर्व काही करावे लागते. बुध्दीत ठेवा आपण बाबांच्या भंडाऱ्यांतून
खातो. आठवणीने काळ कंटक दूर होतील, मग हे शरीर सोडावे लागेल. बाबा दाता असल्याने
काही घेत नाहीत. बाबा म्हणतात माझ्या श्रेष्ठ मतावर चला. पैसे कुणाला दान करायचे हे
लक्षात ठेवा. जर कुणाला पैसे दिले व त्याने दारु इ. पिली, वाईट कर्म केले तर पाप
तुमच्या माथ्यावर येईल. पापी आत्म्यांसोबत देवाण-घेवाण केल्याने पापात्मा बनतात. आता
तुम्हाला पुण्यात्मा बनायचे आहे. बाबा सांगतात-कुणाला दु:ख देऊन का तसेच कशात मोह
ठेवायचा नाही. बाबा अतिगोड (सैक्रीन) बनून येतात. विनाशी धन घेऊन किती व्याज देतात.
बाबा किती भोळा आहे. दोन मुलींच्या बदल्यात महाल देतो. अच्छा.
फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात
आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्कार.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. आता प्रवास
पूर्ण झाल्याने घरी जावयाचे आहे. म्हणून जुन्या दुनियेचा वैराग्य करुन बुध्दी
बाबांच्या आठवणीत ठेवायची आहे.
2. संगमयुगावर पित्याने जो यज्ञ स्थापन केला आहे त्याचा सांभाळ करण्यासाठी खरा
ब्राह्मण बनायचे आहे. कामकाज करताना बाबांच्या आठवणीत राहायचे आहे.
वरदान:-
आपल्या सर्व
खजान्यांना इतरांच्या सेवेप्रती सफल करुन सहयोगी बनणारे सहज योगी भव :
सहजयोगी बनण्याचे
साधन आहे. नेहमी आपल्या संकल्पाद्वारे, वाणीद्वारे व प्रत्येक कार्याद्वारे
विश्वातील सर्व आत्म्यांप्रती सेवाधारी समजून सेवेत सर्वकाही लावायचे आहे. जो
ब्राह्मण जीवनात शक्तींचा, गुणांचा, ज्ञानाचा किंवा श्रेष्ठ कमाईच्या वेळेचे खजानाने
बाबांच्याद्वारे प्राप्त झाला आहे. सेवेत लावल्यास अर्थात सहयोगी बनल्यास सहजयोगी
बनाल. परंतू सहयोगी तेच बनतील जे संपन्न आहेत. सहयोगी बनणे म्हणजे महादानी बनणे होय.
बोधवाक्य:-
बेहदचे वैरागी
बना तर आकर्षणाचे सर्व संस्कार सहजच संपून जातील.
अव्यक्त स्थितीचा
अनुभव करण्यासाठी विशेष गृहपाठ :
ब्राहमणांची
भाषा आप आपसामध्ये अव्यक्त भावाची व्हायला पाहिजे. कोणाची ऐकलेले अवगुण संकल्पामध्ये
पण स्विकार करु नका. संगठनमध्ये विशेष अव्यक्त अनुभवाची आपसामध्ये देवाण-घेवाण करा.