04-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आता तुम्हाला बेहद्दची पवित्रता धारण करायची आहे, पवित्रता म्हणजे एक बाबा शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको"

प्रश्न:-
बाबा पासून वारसा घेण्याच्या अगोदरचा पुरुषार्थ आणि त्याच्या नंतरच्या स्थिती मध्ये कोणते अंतर आहे?

उत्तर:-
जेव्हा तुम्ही वारसा घेता, तर देहाचे सर्व संबंध सोडून, एक बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करतात आणि जेव्हा वारसा मिळतो तर बाबांना च विसरता.आता वारसा घ्यायचा आहे म्हणून कोणाशी ही नवीन संबंध जोडायचे नाहीत, नाहीतर विसरणे कष्ट दायक होईल. सर्व काही विसरून एकाची आठवण करा, तर वारसा मिळून जाईल.

गाणे:-
पुरुषार्थ करण्याची ही वेळ निघून जात आहे.

ओम शांती।
बाबा समजवत आहेत, ज्ञानी आणि अज्ञानी कोणाला म्हटले जाते, हे फक्त तुम्ही ब्राह्मण मुलंच जाणतात.ज्ञान शिक्षण आहे, ज्याद्वारे तुम्ही जाणले आहे, आम्ही आत्मा आहोत आणि ते परमपिता परमात्मा आहेत.तुम्ही जेव्हा मधुबन मध्ये येतात तर प्रथम जरूर स्वतःला आत्मा समजतात.आम्ही जातो आपल्या बाबांच्या कडे.बाबा शिवबाबां ना म्हणतात.शिवबाबा प्रजापिता ब्रह्मा तना मध्ये आहेत.ते पण बाबाच झाले.तुम्ही घरा मधून निघतात, तर समजतात आम्ही बाबा कडे जातो.तुम्ही चिठ्ठीमध्ये पण लिहिता "बाप दादा" शिवबाबा, ब्रह्मा दादा.आम्ही बाबांना भेटण्यासाठी जातो.बाबा आम्हाला कल्प कल्प भेटतात.बाबा आम्हाला बेहद्द पवित्र बनवून, बेहदचा वारसा देतात.पवित्रते मध्ये हद आणि बेहद्द आहे.तुम्ही पुरुषार्थ करतात, बेहद पवित्र सतोप्रधान बनण्यासाठी.क्रमानुसार तर असतातच.बेहद्द पवित्रता म्हणजे शिवाय एका बाबांच्या, दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको, कारण ते बाबा खूपच गोड आहेत. उच्च ते उच्च भगवान आहेत आणि बेहद्दचे पिता आहेत.ते सर्वांचे पिता आहेत.तुम्हा मुलांनी जाणले आहे, बेहद्द चे पिता नेहमी भारतामध्येच अवतरित होऊन, बेहद्द चा संन्यास शिकवतात. संन्यास प्रमुख आहे ना. यालाच वैराग्य म्हटले जाते.बाबा या जुन्या, खराब दुनियेचा वैराग्य देतात. मुलांनो याच्या मधून बुद्धी योग काढून टाका.याचे नाव च दुःखधाम आहे.कोणाचा मृत्यू होतो, तर म्हणतात स्वर्गवासी झाला, याचा अर्थ पूर्वी नरका मध्ये होता ना.आता तुम्ही समजता हे, जे म्हणतात ते चुकीचे आहे.बाबा सत्य गोष्टी स्वर्गवासी बनण्यासाठी सांगतात.ते बनण्यासाठी आत्ताच पुरुषार्थ करायचा असतो.स्वर्गवासी बनण्यासाठी, बाबा शिवाय कोणी पुरुषार्थ करवून घेऊ शकत नाही. तुम्ही आत्ता पुरुषार्थ करत आहात, एकवीस जन्म स्वर्गवासी बनवणारे आहेत शिव पिता.त्यांना स्वर्गीय पिता म्हटले जाते.ते स्वतःहून म्हणतात, मुलांनो मी तुम्हाला प्रथम शांतीधाम मध्ये घेऊन जातो, मालक आहे ना.शांतीधाम मध्ये जाऊन परत सुखधाम मध्ये भूमिका वठवण्यासाठी येतात.आम्ही शांतीधाम मध्ये जाऊ तर, बाकी सर्व धर्माचे शांतीधाम मध्ये जातील. बुद्धीमध्ये सर्व नाटकाचे चक्र ठेवायचे आहे.आम्ही सर्व शांतीधाम मध्ये जाऊ, परत प्रथम आम्हीच येऊन बाबा पासून वारसा घेतो.ज्यांच्या कडून वारसा घ्यायचा असतो, त्यांची आठवण जरूर करायची असते.मुलं जाणतात, वारसा मिळेल परत बाबांची आठवण विसरून जाईल. वारसा खूपच सहज मिळतो.बाबा सन्मुख समजवतात, गोड मुलांनो तुमचे जे पण संबंध आहेत, ते सर्व विसरून जावा.आता कोणताही नवीन संबंध जोडायचा नाही.जर कोणता संबंध जोडला, परत त्यांना विसरावे लागेल.समजा कोणाला मुलगा किंवा मुलगी झाली, तर आणखीनच कठीण होईल, अनेकांची आठवण करावी लागेल.बाबा म्हणतात, सर्वाना विसरुन एकाची आठवण करा.तेच आमचे पिता, शिक्षक, गुरु इत्यादी सर्व काही आहेत. एका शिव पित्याची मुलं आम्ही सर्व भाऊ-बहीण आहोत. काका मामा इत्यादी कोणतेही संबंध नाहीत.एकच वेळ आहे जेव्हा फक्त भाऊ बहिणीचे संबंध राहतात. ब्रह्माची मुलं, शिव बाबांची मुलं तर आहेतच आणि नातवंडे पण आहेत. हे तर पक्के बुद्धीमध्ये येते ना, तेही क्रमानुसार पुरुषांप्रमाणे येते.तुम्ही मुलंच चालता-फिरता स्वदर्शन चक्रधारी बनतात.तुम्ही मुलं या वेळेत चैतन्य प्रकाश स्तंभ आहात.तुमच्या एका डोळ्यांमध्ये मुक्तिधाम, तर दुसऱ्या डोळ्यांमध्ये जीवन मुक्तिधाम आहे.ते प्रकाश स्तंभ तर जड असतात, तुम्ही तर चैतन्य आहात. तुम्हाला ज्ञानाचा नेत्र मिळाला आहे. तुम्ही ज्ञानवान बनवून सर्वांना रस्ता दाखवतात.बाबा पण तुम्हाला शिकवत आहेत.तुम्ही जाणतात हे दुःख धाम आहे.आम्ही संगम युगामध्ये आहोत बाकी सारी दुनिया कलियुगामध्ये आहे.संगम युगामध्येच, बाबा मुलांच्या सोबत गोष्टी करतात आणि मुलंच मधुबनला येतात.काही जण लिहतात बाबा अमक्या ला घेऊन येऊ, ते चांगले आहेत, कदाचित ज्ञान बाण लागेल.तर बाबांना पण दया येते.कल्याण होईल, असे वाटते. तुम्ही मुलं जाणता, हे पुरुषोत्तम संगम युग आहे, या वेळेतच तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात.कलियुगा मध्ये तर सर्व कनिष्ठ पुरुष आहेत, जे उत्तम पुरुष नारायणला नमन करतात. सतयुगा मध्ये कोणी कुणाला नमस्ते करत नाहीत.येथील सर्व गोष्टी तेथे नसतात. हे पण बाबाच चांगल्या रितीने समजवतात, तुम्हाला साक्षात्कार होत राहतील. तुम्ही कोणाची भक्ती इत्यादी करत नाही.तुम्हाला बाबा फक्त शिकवतात, घरबसल्या साक्षात्कार होत राहतील.अनेकांना ब्रह्माचा साक्षात्कार होतो.त्यांच्या साक्षात्कारा साठी कोणी पुरुषार्थ करत नाही.बाबा त्यांच्याद्वारे साक्षात्कार करवतात, भक्तिमार्गा मध्ये ज्यांच्या मध्ये जशी भावना ठेवतात, तसाच साक्षात्कार होतो.आता तुमची भावना सर्वात उच्च ते उच्च आहे.तर कष्टाशिवाय बाबा साक्षात्कार करवतात.यज्ञाच्या सुरुवातीला अनेक जण ध्यानामध्ये जात होते.कोणी भक्ती थोडीच केली होती.मुलं कधी भक्ति करतात का?एक दोघाला पाहून जात होते. चला वैकुंठाला चला.एक दोघांना पाहून जात होते, जे काही झाले त्याची परत पुनरावृत्ती होईल.तुम्ही जाणतात आम्ही त्या धर्माचे होतो.सतयुगा मध्ये प्रथम हा धर्म आहे.यामध्ये खूप सुख आहे, परत हळूहळू कमी होत जाते.जे सुख नवीन घरांमध्ये असते, ते जुन्या मध्ये नसते, थोड्या दिवसा नंतर तो भपका कमी होतो.स्वर्ग आणि नर्का मध्ये फरक तर खूप आहे ना.कुठे स्वर्ग कुठे नरक.तुम्ही आनंदामध्ये राहता. हे पण जाणतात, बाबांची आठवण चांगल्या प्रकारे राहील.आम्ही आत्मा होतो, हे पण विसरतात परत देहाभिमान मध्ये येतात.येथे म्हणजे मधुबन मध्ये बसले आहात तर प्रयत्न करा, स्वतःला आत्मा समजा, तर बाबांची आठवण राहील.देहा मध्ये आल्यामुळे परत देहाचे सर्व संबंध आठवणीत येतील.हा पण एक नियम आहे. तुम्ही गायन करतात, माझे तर एक दुसरे कोणी नाही.बाबा आम्ही तुमच्यावर कुर्बान जाऊ, ते पण हीच वेळ आहे, एकाची आठवण करायची आहे.तुम्ही डोळ्याद्वारे जरी कुणाला पाहता, फिरत राहतात, फक्त आत्मा समजुन बाबांची आठवण करायची आहे.उदरनिर्वाहा साठी काम पण करायचे आहे परंतु हाताने काम करत बुद्धीने बाबांची आठवण करायची आहे.आत्म्याला आपल्या साजन ची आठवण करायची आहे.कोणाचे कोणत्या सखी बरोबर प्रेम होते, तर त्यांचीच आठवण येते, परत ते आकर्षण नष्ट होणे फार कठीण होते. परत बाबांना विचारतात, काय करायचे, अरे तुम्ही नावा-रुपा मध्ये का फसतात? एक तर तुम्ही देह अभिमानी बनतात, परत दुसरे तुमचे पूर्वजन्माचे कर्मभोग आहेत, ते धोका देत राहतात.बाबा म्हणतात या डोळ्यांनी जे काय पाहता, त्या मध्ये बुद्धी जायला नको.तुमच्या बुद्धीमध्ये राहावे की आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत.असे अनेक मुलं आहेत मधुबन मध्ये असुन पण बाबांची आठवण करत नाहीत.काही तर येथे बसून आठवणी मध्ये राहू शकत नाहीत.तर स्वतःला तपासायला पाहिजे, आम्ही शिवबाबांची किती आठवण करतो?नाहीतर चार्ट मध्ये, दिनचर्या मध्ये गडबड होईल.

भगवान म्हणतात, गोड मुलांनो माझी आठवण करा, आपल्या जवळ नोंद करा, जेव्हा पाहिजे आठवणीमध्ये बसा.भोजन करून फिरुन या, परत १०-१५ मिनिट बाबांच्या आठवणी मध्ये बसा, कारण येथे काही कामधंदा तर नाही.तरीही तपासा, कामधंदा सोडून येथे आले आहेत, ते काहींच्या बुद्धीमध्ये येत राहते.खूप जबरदस्त लक्ष आहे, तेव्हा बाबा म्हणतात स्वतःला तपासा.हा तुमचा अमूल्य वेळ आहे.भक्तिमार्ग मध्ये तुम्ही खूप वेळ वाया घालवला.दिवसेंदिवस विकारांमध्ये जात राहिले.कृष्णाचा साक्षात्कार झाला, खूप खुशी झाली परंतु मिळत तर काहीच नाही.बाबांचा वारसा एकाच वेळेत मिळतो, तर बाबा म्हणतात माझ्या आठवणीमध्ये रहा. तर तुमची जन्म जन्मांतर चे पाप नष्ट होतील.स्वर्गाचा पासपोर्ट त्यांनाच मिळतो, जे आठवणीमध्ये राहून आपल्या विकर्माचा विनाश करून कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात, नाहीतर खूप सजा खावी लागेल. बाबा मत देत राहतात, आपला मुकुटधारी फोटो आपल्या खिशामध्ये ठेवा, तर आठवण येत राहील. यांच्या द्वारे आम्ही हे बनत आहोत.जितके पहाल तेवढी आठवण येईल, परत त्या मध्येच मोह जाईल.आम्ही नरापासून नारायण बनत आहोत.हे चित्र पाहून खुशी होईल.शिव बाबांची आठवण येत राहील, या सर्व पुरुषार्थ करण्याच्या युक्त्या आहेत. कोणालाही विचारा सत्यनारायणाची कथा ऐकल्या मुळे काय फायदा झाला?आमचे बाबा आम्हाला सत्यनारायणाची सत्यकथा ऐकवत आहेत, कसे ८४ जन्म घेतले, त्याचा पण हिशेब पाहिजे ना.सर्व तर ८४ जन्म घेणार नाहीत.दुनियेला तर काहीच माहिती नाही.असेच मुखाद्वारे फक्त म्हणत राहतात, याला तात्विक म्हटले जाते.हे तुमचे प्रत्यक्ष आहे, वास्तविक आहे. आत्ता जे होत आहे, त्याचे परत भक्ती मार्गामध्ये ग्रंथ इत्यादी बनवतात. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनून विष्णू पुरी मध्ये येता.या नवीन गोष्टी आहेत.रावण राज्य असत्य खंड आहे परत राम राज्या मध्ये सत्य खंड होईल.चित्रामध्ये पण खूप स्पष्ट आहे. आता या जुन्या दुनिया चा अंत आहे, पाच हजार वर्षा पूर्वी पण विनाश झाला होता.जे वैज्ञानिक आहेत, त्यांना विचार येतो, आम्हाला कोणी प्रेरक आहे, जे आम्ही हे सर्व काही करत आहोत.ते समजतात आम्ही अशाप्रकारे करू, तर या विनाशी सामुग्री द्वारे सर्व नष्ट होतील परंतु परवश आहेत.त्यांना भीती वाटते, समजतात, घरी बसून एक बाँम्ब सोडू तर सर्व नष्ट होईल.विमान पेट्रोल इत्यादीची पण आवश्यकता राहणार नाही.विनाश तर जरूर होईल.नवीन दुनियेत सतयुग होते, येशू ख्रिस्त पुर्व तीन हजार वर्ष भारत स्वर्ग होता, परत आता स्वर्गाची स्थापना होत आहे. पुढे चालून समजतील.तुम्ही जाणतात स्थापना जरूर होणार आहे. यामध्ये तर पै चा पण संशय नाही.

हे नाटक चालूच राहते, कल्प पूर्वी प्रमाणेच.हे नाटक जरूर पुरुषार्थ करवेल.असे पण नाही जे नाटकामध्ये होईल, जे भाग्या मध्ये असेल, नाही. काहीजण विचारतात पुरुषार्थ मोठे की प्रारब्ध मोठे.पुरुषार्थ मोठा आहे, कारण पुरुषार्था द्वारेच प्रारब्ध, भाग्य बनते. पुरुषार्थ शिवाय कधी कोणी राहू शकत नाही.तुम्ही पुरुषार्थ करत आहात ना.कुठून कुठून मुलं येतात, पुरुषात करतात.ते म्हणतात, बाबा आम्ही विसरतो.अरे शिव बाबा तुम्हाला म्हणतात, माझी आठवण करा, कोणाला म्हटले?मज आत्म्याला.बाबा आत्म्याशी च गोष्टी करतात.शिवबाबा च पतित पावन आहेत, यांची आत्मा पण त्यांच्याद्वारे ऐकते.मुलांना हा पक्का निश्चय करायला पाहिजे की, बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवत आहेत.ते उच्च ते उच्च आहेत, प्रिय ते प्रिय आहेत. भक्ती मार्गामध्ये त्यांचीच आठवण करत होतो, गायन पण आहे तुमची गत मत वेगळी आहे.तर जरूर मत दिली असेल ना.आता तुमच्या बुद्धी मध्ये आहे, सर्व मनुष्यमात्र परत घरी जातील.विचार करा किती आत्मे आहेत, सर्वांचा सिजरा आहे. सर्व आत्मे परत क्रमानुसार जाऊन बसतील.तुमचा वर्ग बदलतो तर क्रमानुसार बसतात ना.तुम्हीपण क्रमानुसार जातात.छोटी बिंदू आत्मा क्रमानुसार जाऊन बसेल, परत क्रमानुसार भूमिका करण्यासाठी येईल.ही रुद्र माळ आहे.बाबा म्हणतात इतक्या करोड आत्म्याची माझी माळ आहे, वरती मी फूल आहे. भूमिका करण्यासाठी परत सर्व येथे आले आहेत.हे नाटक अविनाशी बनलेले आहे.असे म्हटले जाते, हे पूर्वनियोजित नाटक आहे.कसे नाटक चालत राहते, तेही तुम्ही जाणतात. सर्वांना सांगा की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा.तर तुमचे विकर्म नष्ट होतील, परत तुम्ही चालले जाल. हे कष्ट आहेत.सर्वांना मार्ग दाखवणे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही कोणत्या देहधारी मध्ये फसवत नाहीत.बाबा म्हणतात माझी आठवण करा, तुमचे पाप नष्ट होतील.बाबा सूचना देतात तर, त्या कराव्या लागतील ना.विचारायची गोष्टच नाही, कसे पण करून, माझी आठवण जरूर करा.यामध्ये बाबा काय कृपा करणार, आठवण तर तुम्हाला करायची आहे.वारसा तुम्हाला घ्यायचा आहे.बाबा स्वर्गाचे रचनाकार आहेत, तर जरूर स्वर्गाचा वारसा मिळेल.आता तुम्ही जाणता, हे झाड जुने झाले आहे, वैराग्य आहे.याला म्हटले जाते बेहद्द चे वैराग्य.ते हठयोगीचे हद्दचे वैराग्य आहे, ते बेहद्द चे वैराग्य शिकवू शकत नाहीत.बेहद्दचे वैराग्य असणारे परत हद्दचे वैराग्य शिकवू शकत नाहीत. आता बाबा म्हणतात, फार वर्षानी भेटलेल्या गोड मुलांनो, तुम्ही पण म्हणता फार वर्षांनी भेटलेले अती गोड बाबा.६३ जन्म बाबाची आठवण केली. बस माझे तर एकच बाबा दुसरे कोणी नाही.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता, बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) स्वर्गा मध्ये जाण्याचा पासपोर्ट घेण्यासाठी बाबाच्या आठवणी द्वारे आपल्या विकर्माचा विनाश करून कर्मातीत अवस्था बनवायची आहे.सजा पासून वाचण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे.

(२) ज्ञानवान बनून सर्वांना रस्ता दाखवायचा आहे.चैतन्य प्रकाश स्तंभ बनायचे आहे.एका डोळ्यांमध्ये शांतीधाम तर दुसऱ्या डोळ्यांमध्ये सुखधाम राहावे.या दुखधाम ला विसरायचे आहे.

वरदान:-
आपल्या डबल लाईट स्वरूपा द्वारे येणाऱ्या विघ्नांना दूर करणारे तीव्र पुरुषार्थी भव.

येणाऱ्या विघ्ना मध्ये थकणे किंवा कमजोर होण्याच्या ऐवजी सेकंदांमध्ये स्वतःला आत्मिक ज्योती स्वरूप आणि निमित्त भावच्या डबल लाईट स्वरुपा द्वारे सेकंदामध्ये दूर करा.विघ्न रुपी दगड तोडण्यामध्ये वेळ वाया घालू नका.त्याला सेकंदांमध्ये दूर करा.थोड्याश्या विस्मृती मुळे सहज मार्गाला कठीण बनवू नका.आपल्या जीवनाचे भविष्य, श्रेष्ठ लक्ष्याला स्पष्ट पहात, तीव्र पुरुषार्थी बना.ज्या नजर द्वारे बाप दादा किंवा विश्व तुम्हाला पाहत आहे, त्याच स्वरूपामध्ये नेहमी स्थिर रहा.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:- नेहमी खुश राहणे आणि खुशी देणे, हीच खरी शान आहे.