20-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुमचा वेळ खूपच किमती आहे, म्हणून फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू
नका"
प्रश्न:-
मनुष्या पासून
देवताबनण्यासाठी, बाबांची कोणती श्रीमत मिळाली आहे?
उत्तर:-
मुलांनो तुम्ही जेव्हा मनुष्यापासून देवता बनतात, तर कोणताही असुरी स्वभाव असायला
नको. २) कोणाला ही रागऊ नका. ३) कोणालाही दुःख देऊ नका. ४) कोणत्याही फालतू गोष्टी
कानाद्वारे ऐकू नका. बाबांचे श्रीमत आहे, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका.
ओम शांती।
मुलांना सहज रीतीने बसायचे आहे, कोठेही बसू शकतात, जंगलामध्ये बसा, डोंगरावरती बसा,
घरामध्ये बसा, झोपडीमध्ये बसा, कुठे ही बसू शकतात. असे बसल्यामुळे तुम्ही मुलं
परिवर्तन व्हाल. तुम्ही मुलं जाणता, आता आम्ही मनुष्य भविष्यासाठी देवता, काट्या
पासून फुल बनत आहोत. बाबा बागवान पण आहेत, माळी पण आहेत. बाबांची आठवण केल्यामुळे
आणि स्वदर्शन चक्र फिरवल्यामुळे आम्ही परिवर्तन होत आहोत. येथे बसा किंवा कुठेही बसा,
तुम्ही परिवर्तन होत होत, मनुष्या पासून देवता बनत आहात. बुद्धीमध्ये मुख्य
उद्दिष्ट आहे की, आम्ही असे लक्ष्मीनारायण सारखे बनत आहोत. कोणतेही कामकाज करा,
भोजन बनवा फक्त बुद्धीद्वारे बाबांची आठवण करा. मुलांनाही श्रीमत मिळाली आहे,
चालता-फिरता सर्व काही करता, फक्त आठवणीत राहावा. बाबा ची आठवणी द्वारे वारसा पण
आठवणीत येतो, तर ८४ च्या चक्राची पण आठवण येते. यामध्ये काहीच कष्ट नाहीत. जेव्हा
आम्ही देवता बनतो, तर आसूरी स्वभाव राहायला नको. कोणाला रागावू नका, कुणाला दुःख
देऊ नका, फालतू गोष्टी ऐकू नका, फक्त बाबांची आठवण करा. बाकी संसाराच्या इकडच्या
तिकडच्या गोष्टी खूप ऐकल्या आहेत. अर्ध्या कल्पा पासून हे ऐकत ऐकत तुम्ही खालीच आले
आहात. आता बाबा म्हणतात या फालतू गोष्टी ऐकू नका. अमका असा आहे, यांच्यामध्ये हे
अवगूण आहेत, कोणत्याही फालतू गोष्टी करायच्या नाहीत. हे जसे की आपला वेळ वाया घालवणे
आहे. तुमचा वेळ खुपच किंमती आहे. शिक्षणाद्वारे आपलेच कल्याण आहे. याद्वारेच असे
श्रेष्ठ पद मिळेल. त्या शिक्षणामध्ये तर खूप कष्ट करावे लागतात. परीक्षा पास
करण्यासाठी परदेशात पण जातात. तुम्हाला तर कोणतेच कष्ट नाहीत. बाबा आत्म्यांना
म्हणतात, मज पित्याची आठवण करा. एक-दोघांना समोर बसवतात, तरीही बाबांच्या आठवणी
मध्ये राहा. आठवणीमध्ये बसत बसत, तुम्ही काट्या पासून फूल बनत आहात. खूपच चांगली
युक्ती आहे, तर बाबांच्या श्रीमता वरती चालायला पाहिजे ना. प्रत्येकाचे वेगवेगळे
आजार असतात. तर प्रत्येक आजारासाठी सर्जन आहे. मोठ्या मोठे मनुष्यांच्या जवळ खास
सर्जन असतात. तुमचे सर्जन कोण बनले आहे? स्वयम् भगवान. ते तर अविनाशी सर्जन आहेत.
ते म्हणतात मी तुम्हाला अर्ध्या कल्पा साठी निरोगी बनवतो, फक्त माझी आठवण करा तर
विकर्म विनाश होतील. तुम्ही २१ जन्मासाठी निरोगी बनाल. ही गाठ बांधायला पाहिजे.
आठवणी द्वारेच तुम्ही निरोगी बनाल. परत २१ जन्मासाठी कोणताही रोग होणार नाही. जरी
आत्मा अविनाशी आहे, पण शरीरच रोगी बनते, परंतु त्रास तर आत्म्याला होतो ना.
स्वर्गामध्ये अर्धा कल्प तुम्ही कधीच रोगी बनणार नाही. फक्त आठवणीच्या यात्रेमध्ये
तत्पर रहा. सेवा तर मुलांना करायची आहेच. प्रदर्शनीमध्ये सेवा करत करत मुलांचा घसा
बसतो. काही मुलं समजतात, आम्ही सेवा करत-करत बाबांच्या जवळ जाऊ. ही पण खूप चांगली
सेवेची पद्धत आहे. प्रदर्शनीमध्ये मुलांना समजायचे आहे. प्रदर्शनीमध्ये प्रथम
लक्ष्मीनारायण चे चित्र दाखवायला पाहिजे. हे नंबर एक चित्र आहे. भारतामध्ये आजपासून
पाच हजार वर्षांपूर्वी बरोबर यांचे राज्य होते, खूप छान होते. पवित्रता सुख-शांती
सर्व होती, परंतु भक्तिमार्ग मध्ये सतयुगाला लाखो वर्षे म्हटल्यामुळे कोणतीही गोष्ट
आठवणीत कशी येईल? हे लक्ष्मीनारायण चे चित्र खूपच चांगले आहे. सतयुगा मध्ये बाराशे
पन्नास वर्ष, या घराण्याने राज्य केले होते. अगोदर तुम्ही पण जाणत नव्हते. आत्ता
बाबांनीच मुलांना स्मृती दिली आहे की, तुम्हीच सार्या विश्वावरती राज्य केले होते,
काय तुम्ही विसरले आहा?८४जन्म पण तुम्हीच घेतले होते. तुम्ही सूर्यवंशी होते,
पुनर्जन्म तर घेतात ना. ८४ जन्म तुम्ही कसे घेतले? हे खूप सहज गोष्ट समजण्याची आहे,
खाली उतरत आले, आता परत बाबा प्रगती करवतात. चढती कला तुझ्या मुळे सर्वांचे भले.
परत शंख इत्यादी वाजवतात. असं तुम्ही मला जाणतात हाहाकार होईल. पाकिस्तान मध्ये
पहिले काय काय झाले होते. सर्वांच्या मुखाद्वारे हेच निघत होते, हे भगवान हे राम आता
काय होईल? आता विनाश तर खूप मोठा आहे, परत जयजयकार होईल. बाबा मुलांना समजवतात, या
बेहदच्या दुनिये चा आता विनाश होणार आहे. बेहद्दचे बाबा बेहद्दचे ज्ञान तुम्हाला
देतात. हदच्या गोष्टी, इतिहास-भूगोल तर ऐकत आले आहात. कोणालाच माहीत नव्हते की,
लक्ष्मीनारायण ने राज्य कसे केले, यांचा इतिहास भूगोल कोणी जाणत नाही. तुम्ही
चांगल्या रीतीने जाणतात, इतके जन्म राज्य केले, परत हे धर्म होते. याला म्हटले जाते
अध्यात्मिक ज्ञान, जे अध्यात्मिक पिताच मुलांना सन्मुख देतात. दुसरीकडे मनुष्य
मनुष्याला शिकवतात. येथे आम्हा आत्म्यांना परमात्मा आपल्या सारखे बनवत आहेत. शिक्षक
जरूर आपल्यासारखे बनवतील ना.
बाबा म्हणतात मी तुम्हाला आपल्यापेक्षा उच्च दुहेरी मुकुटधारी बनवतो. प्रकाशाचा ताज
आठवणी द्वारे मिळतो आणि ८४ च्या चक्राला जाणल्यामुळे तुम्ही चक्रवर्ती बनतात. आता
तुम्हा मुलांना कर्म अकर्म विकर्माची गती बाबांनी समजावली आहे. सतयुगा मध्ये कर्म
अकर्म होतात. रावण राज्यांमध्ये कर्म विकर्म होतात. शिडी उतरतात, कला कमी होत होत
उतरायचे आहे. खूप छी-छी बनतात, परत बाबा येऊन भक्तांना फळ देतात. दुनियेमध्ये भक्त
तर सर्व आहेत. सतयुगा मध्ये भक्त कोणी नसतात. भक्ती पर्व येथे आहे. तेथे तर ज्ञानाचे
प्रारब्ध असते. आता तुम्ही जाणता, आम्ही बाबा पासून बेहद्दचे प्रारब्ध घेत आहोत.
कोणालाही प्रथम या लक्ष्मीनारायणाच्या चित्रा वरती समजून सांगा, आज पासून पाच हजार
वर्ष पूर्व यांचे राज्य होते. विश्वामध्ये सुख-शांती पवित्रता सर्व होते. दुसरा
कोणता धर्म नव्हता. यावेळेत तर अनेक धर्म आहेत. प्रथम धर्म नाही, परत तो धर्म जरूर
येइल. आता बाबा खूप प्रेमाने शिकवतात. लढाईची कोणती गोष्ट नाही, गरिब जीवन आहे,
परक्याचे राज्य आहे, आपले सर्व काही गुप्त आहे. बाबा पण गुप्त आले आहेत. आत्म्याला
सन्मुख समजवतात. आत्मा च सर्वकाही करते, शरीराद्वारे अभिनय करत राहते. आत्मा आत्ता
देह अभिमानामध्ये आले आहेत. बाबा म्हणतात देही अभिमान बना. दुसरे कोणते कष्ट देत
नाहीत. बाबा जेव्हा गुप्त रुपा मध्ये येतात, तर तुम्हा मुलांना गुप्तदान मध्ये
विश्वाची बादशाही देतात. तुमचे सर्व गुप्त आहे म्हणून रिती रिवाजा नुसार कन्याला
जेव्हा हुंडा देतात तर गुप्त रूपाने देतात. वास्तव मध्ये गुप्तदान महापुण्य चे गायन
आहे. दोघा चोघांना माहित झाले तर, त्याची ताकत कमी होते. बाबा म्हणतात मुलांनो,
तुम्ही प्रदर्शनीमध्ये प्रथम या लक्ष्मी नारायणांच्या चित्रावरती सर्वांना समजावून
सांगा. तुमची इच्छा आहे ना विश्वामध्ये शांती व्हावी परंतु ती कधी होती, हे कोणाच्या
बुद्धीमध्ये येत नाही. आता तुम्ही जाणतात सतयुगा मध्ये पवित्रता सुख-शांती सर्व होते.
आठवण पण करतात अमका स्वर्गवासी झाले, समजत काहीच नाहीत. ज्याला जे वाटले ते म्हणत
राहतात, अर्थ काहीच नाही. हे अविनाशी नाटक आहे. गोडगोड मुलांच्या बुद्धीमध्ये ज्ञान
आहे की, आम्ही ८४चे चक्र कसे लावले. आता बाबा आले आहेत, पतीत दुनियेपासून पावन
दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी. बाबाच्या आठवणींमध्ये राहत परिवर्तन होत जातात, काट्या
पासून फुल बनतात, परत आम्ही चक्रवर्ती राजा बनू. बाबाच बनवणारे आहेत. ते परमात्मा
सदैव पवित्रच आहेत, तेच पवित्र बनवण्यासाठी येतात. सतयुगा मध्ये तुम्ही खूप सुंदर
बनाल, तेथे नैसर्गिक सुंदरता राहते. आजकाल तर कृत्रिम श्रूंगार करतात ना. काय काय
काय फॅशन निघाल्या आहेत. कशा प्रकारे वस्त्र घालतात. अगोदर स्त्रिया पडद्यामध्ये
राहत होत्या, कोणाची नजर पडायला नको. आता तर आणखीच कसेही कपडे घालत राहतात. जेथे
तेथे खराब वातावरण झाले आहे. बाबा म्हणतात वाईट गोष्टी ऐकू नका.
राजांमध्ये शक्ती राहते, ईश्वर अर्थ दान करतात, तर त्यांच्यामध्ये शक्ती राहते. येथे
तर कोणामध्ये शक्ती नाही. ज्याला जे वाटले ते करत राहतात. अनेक खराब मनुष्य आहेत,
तुम्ही खूप सौभाग्यशाली आहात, जे नावाड्याने तुमचा हात पकडला आहे. तुम्हीच कल्प
कल्प निमित्त बनतात. तुम्ही जाणतात प्रथम मुख्य देहाभिमान आहे, त्याच्यानंतर सर्व
विकार येतात. स्वतःला आत्मा समजून बाबा ची आठवण करण्याचे, कष्ट घ्यायचे आहेत, हे
काही कडू औषध नाही. बाबा फक्त म्हणतात, स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा.
बाबाच्या आठवणीमध्ये कितीही फिरत राहीले, रीहीत कधी थकणार नाहीत. हलके बनाल, खूप
मदत मिळत राहील. तुम्ही मास्टर सर्वशक्तिमान बनतात. तुम्ही जाणतात, आम्ही विश्वाचे
मालक बनत आहोत. बाबांच्या जवळ आलो आहोत, बाकी काही कष्ट नाहीत, फक्त मुलांना
म्हणतात, वाईट ऐकू नका. जे सेवाधारी मुलं आहेत, त्यांच्या मुखाद्वारे तर नेहमी
ज्ञान रत्नच निघतील. ज्ञानाच्या गोष्टी शिवाय, दुसऱ्या कोणत्या गोष्टी मुखाद्वारे
निघणार नाहीत. तुम्हाला फालतू गोष्टी कधी ऐकायच्या नाहीत. सेवा करणाऱ्या मुलांच्या
मुखाद्वारे नेहमीच रत्न निघतात. ज्ञानाच्या गोष्टी शिवाय बाकी दगड मारल्यासारखे आहे.
दगड मारत नाही तर जरूर ज्ञान रत्न देत राहतील. एक तर कटू वचन निघतील किंवा अविनाशी
ज्ञान रत्न निघतील, ज्याची किंमत सांगू शकत नाही. बाबा तुम्हाला ज्ञान रत्न देतात.
ती भक्ती आहे, दगड मारत राहतात.
मुलं जाणतात, बाबा खूप खूप गोड आहेत, अर्धाकल्प गीत गायन करत आले, तुम्हीच मातापिता
परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. पोपटासारखे फक्त बोलत राहतात. तुम्हा मुलांना खूप खुशी
व्हायला पाहिजे. बाबा आम्हाला बेहदचा वारसा विश्वाची बादशाही देतात. पाच हजार वर्ष
पूर्व आम्ही विश्वाचे मालक होतो. आत्ता नाहीत, परत बनू. शिवबाबा ब्रह्मा द्वारे
वारसा देतात, ब्राह्मण कुल पाहिजे. भागीरथ म्हटल्यामुळे समजू शकत नाहीत म्हणून
ब्रह्मा आणि त्यांचे ब्राह्मण कूळ आहे. ब्रह्मा कूळामध्ये मध्ये प्रवेश करतात,
म्हणून त्यांना भागीरथ म्हटले जाते. ब्रह्माची मुलं ब्राह्मण आहेत, ब्राह्मण शेंडी
आहेत. विराटरूप पण असेच होते, वरती बाबा, परत संगम युगी ब्राह्मण जे ईश्वरीय संतान
बनतात. तुम्ही जाणतात, आता आमही ईश्वरीय संतान आहोत, परत दैवी संतान बनू, तर कला कमी
होत जातील. या लक्ष्मी नारायणाच्या पण कला कमी आहेत, कारण यांच्यामध्ये ज्ञान नाही.
ज्ञान ब्राह्मणां मध्ये आहे परंतु लक्ष्मीनारायण ला अज्ञानी तर म्हणणार नाही. यांनी
या ज्ञानाद्वारे श्रेष्ठ पद मिळवले आहे. तुम्ही ब्राह्मण खूप उच्च आहात, परत देवता
बनतात, तर हे ज्ञान काहीच राहत नाही. त्यांच्यामध्ये ज्ञान असते तर, दैवी वंश परंपरा
द्वारे चालत आले असते. गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांना, सर्व रहस्य, सर्व
युक्ती सांगत राहतात. रेल्वेमध्ये पण तुम्ही सेवा करू शकतात, एका चित्रावरती आपसा
मध्ये बसून गोष्टी कराल, तर अनेक लोक गोळा होतील. तर जे या कुळाचे असतील, ते
चांगल्या रीतीने धारण करून, प्रजा बनतील. चित्र तर सेवेसाठी खूप चांगले चांगले आहेत.
आम्ही भारत वासीच प्रथम देवी-देवता होतो, आत्ता तर काहीच नाहीत, परत इतिहासा ची
पुनरावृत्ती होईल, मध्येच हे संगमयुग आहे. ज्यामध्ये तुम्ही पुरुषोत्तम बनतात. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) ज्ञानाच्या
गोष्टी शिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टी मुखाद्वारे बोलायच्या नाहीत. फालतू गोष्टीं कधी
ऐकायच्या नाहीत. मुखाद्वारे नेहमी रत्न बोलायचे आहेत, कटु वचन नाही.
(२) सेवेच्या सोबत
आठवणीच्या यात्रेमध्ये राहून स्वतःला निरोगी बनवायचे आहे. अविनाश सर्जन स्वतः भगवान
आम्हाला मिळाले आहेत, एकवीस जन्मासाठी निरोगी बनवण्यासाठी, याच नशा किंवा खुशी मध्ये
राहायचे आहे.
वरदान:-
आठवणीच्या जादुच्या
मंत्राद्वारे सर्व सिद्धी प्राप्त करणारे सिद्धी स्वरुप भव.
आठवण जादूचा मंत्र आहे,
या जादूच्या मंत्राद्वारे जे सिद्धी प्राप्त करू इच्छितात, ती प्राप्त होऊ शकते.
तसेच येथे पण कोणत्या कार्यामध्ये सफलता पाहिजे, तर त्यासाठी आठवणीचा महामंत्रच विधी
स्वरुप आहे. हा जादूचा मंत्रच सेकंदामध्ये परिवर्तन करेल. याला नेहमी आठवणीत ठेवा,
तर नेहमी सिध्दी स्वरुप बनाल, कारण आठवणीमध्ये राहणे मोठी गोष्ट नाही, नेहमीच
आठवणीमध्ये राहणे ही मोठी गोष्ट आहे, याद्वारे सर्वसिद्धी प्राप्त होतील.
बोधवाक्य:-
सेकंदामध्ये
विस्तारला सार रूपामध्ये सामावणे म्हणजेच अंतिम प्रमाणपत्र घेणे.