23-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, बाबा आले आहेत, तुम्हाला ज्ञाना द्वारे शुद्ध सुगंधित फुल बनवण्यासाठी,
तुम्हाला काट्यासारखे बनायचे नाही, काट्याला म्हणजे विकारींना या सभेमध्ये घेऊन
यायचे नाही"
प्रश्न:-
जी मुलं
आठवणीच्या यात्रेमध्ये कष्ट घेतात, त्यांची लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
आठवणीचे कष्ट घेणारी मुलं खूप खुशी मध्ये राहतील. त्यांच्या बुद्धीमध्ये राहील कि,
आता आम्ही परत जात आहोत, परत आम्हाला सुगंधीत फुलांच्या बागेमध्ये जायचे आहे. तुम्ही
आठवणीच्या यात्रे द्वारे सुगंधीत बनतात आणि दुसर्यांना पण बनवतात.
ओम शांती।
बागवान पण बसले आहेत, माळी पण आहे आणि फुलं पण आहेत, ही नवीन गोष्टी आहे ना. कोणी
नवीन जर हे ऐकतील, तर म्हणतील, हे काय म्हणत आहेत? बागवान, फुल इत्यादी काय आहे? अशा
गोष्टी कधी ग्रंथांमध्ये ऐकल्या नाहीत. तुम्ही मुलं जाणता, आठवण पण बागवान, नावाडी
ची करतात. आता येथे आले आहेत, घेऊन जाण्यासाठी. बाबा म्हणतात आठवणीच्या यात्रेमध्ये
राहायचे आहे. स्वतःला स्वता:च पहा, आम्ही किती दूर जात आहोत?किती सतोप्रधान अवस्था
पर्यंत पोहोचलो आहोत. जितकी सतो प्रधान अवस्था होत जाईल, तर समजतील आम्ही परत जात
आहोत. किती अवस्था चांगली झाली आहे. सर्व आठवणीच्या यात्रे वरती आधारित आहे. खुशी
पण भरपूर राहील. जितके जे कष्ट घेतील, तर त्यांच्यामध्ये खुशी येत जाईल. जसे
परीक्षेचे दिवस जवळ येतात, तर विद्यार्थी समजतात ना, आम्ही किती मार्गाने पास होऊ,
इथे पण असेच आहेत. प्रत्येक मुलगा स्वतःला जाणतो, किती सुगंधित फूल बनलो आहोत?किती
सुगंधित बनून दुसऱ्यांना बनवत आहोत? हे पण गायन केले जाते, काट्याचे जंगल आहे, ती
फुलांचा बाग आहे. मुसलमान लोक पण म्हणतात, अल्लाहचा बगीचा. ते समजतात, तेथे एक बाग
आहे, तेथे जातात त्यांना खुदा फूल देतात. मनामध्ये जी इच्छा असते, ती पूर्ण करतात.
बाकी असे तर नाही, कोणी फुल देतात. जशी ज्याची बुद्धीमध्ये भावना आहे, तसेच
साक्षात्कार होत राहतात. येथे साक्षात्कार वगैरे काहीच नाहीत. भक्ती मार्गामध्ये तर
साक्षात्कारासाठी गळा पण कापून देतात. मीरेला साक्षात्कार झाला तर, तिचा खूप मान आहे,
तो भक्तिमार्ग आहे. भक्ती अर्धा कल्प चालणार आहे. ज्ञान काहीच नाही. वेद इत्यादींचा
पण खूप मान आहे. असे म्हणतात, वेद तर आमचे प्राण आहेत. आता तुम्ही जाणतात, वेद
शास्त्र इत्यादी सर्व भक्तिमार्गा साठी आहेत. भक्तीचा खूप मोठा विस्तार आहे. मोठे
झाड आहे. ज्ञान बीज आहे. आता ज्ञानाद्वारे तुम्ही खूप शुद्ध आणि सुगंधित पण बनतात.
ही तुमची बाग आहे. येथे काटे कोणालाही म्हणणार नाही, कारण येथे विकारांमध्ये कोणी
जात नाहीत. तर असे म्हणतील, या बागेमध्ये एक पण काटा नाही, काटे कलियुगामध्ये आहेत.
आता तुम्ही पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहात, या या वेळेत काटे कोठून आले?जर कोणी
काटे म्हणजे विकारी बसले असतील तर, स्वतःचे च नुकसान करून घेतील. कारण हे
इंद्रप्रस्थ आहे ना. यामध्ये ज्ञान परी बसल्या आहेत, ज्ञानाचा डान्स करणाऱ्या आहेत
ना. मुख्य मुख्य चे नाव पुखराज परी, नीलम परी इत्यादी आहेत. ते परत नवरत्न गायन केले
जातात परंतु हे कोण होते, हे कोणालाच माहिती नाही. बाबा फक्त म्हणतात माझी आठवण करा.
मुलांच्या बुद्धी मध्ये, आता ज्ञान आहे, ८४चे चक्र पण बुद्धी मध्ये आहे.
ग्रंथांमध्ये ८४ लाख म्हटले आहे. गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांना बाबांनी
समजवले आहे, तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत. आता तमोप्रधान पासून, सतोप्रधान बनायचे आहे.
किती सहज आहे. भगवानुवाच तुम्ही माझी आठवण करा. आता तुम्ही मुलं सुगंधित फुल
बनण्यासाठी, स्वतःला आत्मा समजून शिवपित्याची आठवण करा. काटे म्हणजे विकारी बनू नका.
येथे सर्व गोड गोड फुलं आहेत, काटे नाही. होय, मायचे वादळ तर येतील. माया अशी कडी
आहे, जे लगेच फसवते, परत पश्चाताप करतात. आमची तर केलेली कमाई सर्वच नष्ट झाली.
हा बाग आहे, बागेमध्ये चांगली चांगली फुलं पण असतात. या बागेमध्ये पण कोणी चांगले
फुल बनत जातात. जसे मुगल बागेमध्ये चांगले चांगले फुल असतात, सर्व पाहण्यासाठी
जातात. येथे तुमच्या जवळ कोणी पाहण्यासाठी तर येणार नाहीत. तुम्ही काट्यांना काय
तोंड दाखवणार? गायन पण आहे, मुत पलीती कपड धोने( विकारी आत्म्यांना शिवपिता च
स्वच्छ करतात) बाबांना जप साहेब सुखमनी इत्यादी सर्व आठवत होते. अखंड पाठ पण करत
होते. आठ वर्षाचे होते तर, पटका पण बांधत होते. मंदिरांमध्ये पण राहत होते. मंदिराचे
सर्व देखभाल बाबांच्या कडेच होती. आता समजतात मुत पलीती कपड धोने चा अर्थ काय आहे.
संपूर्ण महिमा तर बाबाची आहे. आता तुम्ही मुलांना बाबा सन्मुख समजावत आहेत. मुलांना
म्हणतात चांगले चांगले फुल घेऊन या. जे चांगले चांगले फुल आणतील, ते चांगले फुल
मानले जातील. सर्वजण म्हणतात, आम्ही लक्ष्मी नारायण बनू, म्हणजे गुलाबाचे फुल झाले.
बाबा म्हणतात, अच्छा तुमच्या मुखा मध्ये गुलाब. आत्ता पुरुषार्थ करुन नेहमी गुलाब
बना. अनेक मुलं आहेत. प्रजा तर खूप बनत आहे. तेथे तर आहेत च राजा राणी आणि प्रजा.
सतयुगा मध्ये वजीर नसतात, कारण तेथे राजा मध्ये शक्ती असते. वजीर इत्यादी कडुन मत
घेण्याची आवश्कता नसते. नाही तर मत देणारे मोठे होतील. तेथे भगवान भगवतीला मत
घेण्याची आवश्यकता नसते. वजीर इत्यादी तेव्हाच असतात, जेव्हा पतित बनतात. भारताची
गोष्ट आहे, दूसरे कोणते खंड नसतात, जेथे राजे, राजांना माथा टेकतील. येथेच दाखवले
जातात, ज्ञान मार्गात पुज्य, अज्ञान मार्गात पुजारी. ते दुहेरी ताजधारी, ते एकेरी
ताजधारी. भारतासारखा पवित्र खंड दुसरा असत नाही. स्वर्ग, बहिश्त होता, त्यासाठी हे
ज्ञान घेत आहात. आता तुम्हाला फुला सारखे बनायचे आहे. बागवान आले आहेत, माळी पण
आहेत, माळी पण क्रमानुसार असतात. मुलं पण समजतात, ही बाग आहे, यामध्ये काटे नाहीत,
काटे तर दुःख देतात. बाबा तर कोणाला दुःख देत नाहीत, ते दुखहर्ता सुखकर्ता आहेत.
किती गोड बाबा आहेत.
तुम्हा मुलांचे बाबा वरती प्रेम आहे. बाबा पण मुलां वरती प्रेम करतात. हे शिक्षण आहे.
बाबा म्हणतात मी तुम्हाला प्रत्यक्षात शिकवत आहे. हे म्हणजे ब्रह्मा पण शिकत आहेत,
तुम्ही शिकून दुसर्यांना पण शिकवा आणि काट्या पासून फुलां सारखे बनवा. भारताचे
महादानी म्हणून गायन आहे कारण आता तुम्ही मुलं महादानी बनतात. अविनाश ज्ञान रत्नांचे
तुम्ही दान करतात. बाबांनी समजवले आहे, आत्मा रूप बंसंत आहे. बाबा पण रुप बंसंत
आहेत, त्यांच्यामध्ये सर्व ज्ञान आहे. ते ज्ञानाचे सागर, परमपिता परमात्मा
सर्वशक्तिमान आहेत. ज्ञानाच्या सागराचे गायन आहे, साऱ्या समुद्राची शाई बनवा, तरी
त्यांची महिमा संपणार नाही आणि परत एक सेकंदामध्ये जीवनमुक्ती चे पण गायन आहे.
तुमच्याजवळ कोणते ग्रंथ इत्यादी नाहीत. दुसरीकडे कोणत्या पंडिता कडे गेले तर समजतात,
या पंडितानी खूप ग्रंथ इत्यादीचा अभ्यास केलेला आहे. यांनी एवढे वेळ ग्रंथ कंठ केले
आहेत. तेच संस्कार घेऊन जातात, तर लहानपणापासून परत अध्ययन करायला सुरुवात करतात.
तुम्ही संस्कार घेऊन जात नाहीत. तुम्ही शिक्षणाचा परिणाम घेऊन जातात. तुमचे शिक्षण
पूर्ण झाल्यानंतर, त्याचा परिणाम निघेल आणि ते पद प्राप्त कराल. ज्ञान थोडे घेऊन
जाल, जे कोणाला सांगाल. येथे तर तुमचे शिक्षण चालू आहे, याचे भाग्य नवीन दुनियेत
मिळणार आहे. तुम्हा मुलांना बाबांनी समजावले आहे, माया पण काही कमी शक्तिवान नाही.
दुर्गती मध्ये घेऊन जाण्यासाठी मायेची शक्ती आहे परंतु मायेची महिमा थोडीच कराल.
दुःख देण्यामध्ये शक्तिमान आहे ना. बाबा सुख देण्यामध्ये शक्तिमान आहेत, म्हणून
त्यांचे गायन आहे. हे पण नाटक बनलेले आहे. तुम्हाला सुख मिळते तर दुःख पण मिळते.
हारणे आणि जिकंणे कोणासाठी आहे, हे पण माहिती व्हायला पाहिजे ना. बाबा पण भारतात
येताच, जयंती पण भारतात साजरी केली जाते. हे कुणालाच माहीत नाही की, शिवबाबा कधी
येतात, येऊन काय केले होते. नाव लक्षणच गायब केले आहे. कृष्ण मुलाचे नाव, ईश्वराला
समजले आहे. वास्तव मध्ये सर्वात प्रिय शिव पित्याची महिमा वेगळी, कृष्णाची महिमा
वेगळी आहे. ते निराकार आहेत, ते साकार आहेत. कृष्णाची महिमा सर्वगुणसंपन्न, संपूर्ण
निर्विकारी इत्यादी आहे. बाबाची महिमा अशी करणार नाहीत. ज्यांच्यामध्ये गुण आहेत तर,
अवगुण पण होतील म्हणून बाबाची महिमा वेगळी आहे. बाबांना अकालमुर्त म्हणतात ना. आम्ही
पण अकालमुर्त आहोत. आत्म्याला काल खाऊ शकत नाही. आत्मा अकालमुर्ताचे हे आसन आहे.
आमचे बाबा पण अकालमुर्त आहेत. काल शरीराला नष्ट करतो. येथे अकाल मुर्तला बोलवतात.
सत्ययुगा मध्ये बोलवत नाहीत, कारण तेथे सुखच सुख आहे म्हणून गायन करतात, दुःखामध्ये
स्मरण सर्व करतात, सुखामध्ये कोणी करत नाहीत. आता रावण राज्यांमध्ये खूप दुःख आहे.
बाबा तर स्वर्गाचे मालक बनतात परत तेथे अर्धा कल्प कोणी बोलवत नाहीत. जसे लौकिक पिता
मुलांचा शृंगार करून, वारसा देऊन स्वतः वानप्रस्थ घेतात. सर्व काही मुलांना देऊन
म्हणतात, आता मी सत्संगामध्ये जातो, काही खाण्या पिण्यासाठी पाठवत रहा. हे बाबा तर
असे म्हणणार नाहीत ना. हे तर म्हणतात गोड गोड मुलांनो, मी तुम्हाला विश्वाची बादशाही
देऊन स्वतः वानप्रस्थ मध्ये जातो. मी थोडच म्हणेल मला खाण्यासाठी पाठवा ? लौकिक
मुलांचे तर कर्तव्य आहे की, त्याची संभाळ करणे, नाहीतर काय खातील. हे बाबा तर
म्हणतात, मी तर निष्काम सेवाधारी आहे. मनुष्य कोणी निष्काम होऊ शकत नाहीत, भूक
मरतील, मी थोडीच भूक मरणार आहे. मी तर अभोक्ता आहे. तुम्हा मुलांना विश्वाची बादशाह
देऊन, मी विश्राम करतो, परत माझी भूमिका बंद होते, भक्तिमार्ग सुरू होतो. हे अविनाशी
नाटक बनलेले आहे. ज्याचे रहस्य बाबाच सन्मुख समजवतात. वास्तव मध्ये तुमची भूमिका
सर्वात जास्त आहे, तर फायदा पण तुम्हाला च मिळायला पाहिजे. मी आराम करतो, परत तुम्ही
ब्रह्मांडचे मालक, विश्वाचे मालक बनतात. तुमचे नाव मोठे होते. हे अविनाश नाटकाचे
रहस्य तुम्हीच जाणतात. तुम्ही ज्ञानाचे फुल आहात, दुनिये मध्ये एक पण नाही.
रात्रं-दिवसाचा फरक आहे. ते रात्री मध्ये आहेत, तुम्ही दिवसांमध्ये आहात. आज-काल वन
उत्सव करत राहतात. आता भगवान मनुष्यांचा वन उत्सव करत आहेत.
बाबा पहा कमाल करतात, जे मनुष्याला देवता, गरिबाला राजा बनवतात. आता बेहदच्या
बाबाकडून तुम्ही सौदा करण्यासाठी आले आहात, तुम्ही म्हणता, बाबा आम्हाला गरीब पासून
राजा बनवा. हे तर खूपच चांगले ग्राहक आहेत. त्यांना तुम्ही दुःखहर्ता सुखकर्ता
म्हणतात. यांच्यासारखे दान दुसरे नसते. ते सुख देणारे आहेत. बाबा म्हणतात भक्ती
मार्गामध्ये पण मी तुम्हाला देत आलो आहे. साक्षात्कार इत्यादीची या अविनाशी
नाटकांमध्ये नोंद आहे. आता बाबा सन्मुख समजवतात, मी काय काय करतो, पुढे चालून तुम्ही
समजत जाल. शेवटी तुम्ही क्रमानुसार कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल. हे सर्व अविनाशी
नाटका मध्ये नोंद आहे, तरीही पुरुषार्थ करवला जातो. बाबांची आठवण करा, बरोबर ही
महाभारत लढाई पण आहे. सर्व नष्ट होतील, बाकी भारतवासीच राहतील, परत तुम्ही
विश्वावरती राज्य कराल. आता बाबा तुम्हाला शिकवण्यासाठी आले आहेत. तेच ज्ञानाचे
सागर आहेत. हा पण खेळ आहे. यामध्ये संशय घेण्याची गोष्ट नाही. माया वादळ घेऊन येईल.
बाबा समजवतात, तुम्ही घाबरू नका खूप विकारी संकल्प येतील. ते पण जेव्हा बाबाची गोद
घ्याल तेव्हा. जोपर्यंत बाबाची गोद घेतली नाही, म्हणजे बाबांचे बनले नाही, तोपर्यंत
माया इतकी लढणार नाही. बाबाचे ज्ञान घेतल्यानंतर आणखीनच वादळ येतील, म्हणून बाबा
म्हणतात, तुम्ही सांभाळ करा. कमजोर राहाल तर प्रजा मध्ये जाल. राज्यपद घेणे तर
चांगले आहे ना, नाहीतर दास दासी बनावे लागेल. ही सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी
स्थापन होत आहे. अच्छा. गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता
बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) रूप बसंत
बनून अविनाश ज्ञान रत्नाचे दान करून, महादानी बनायचे आहे. जे शिक्षण घेतात, ते
दुसऱ्यांना पण शिकवायचे आहे.
(२) कोणत्या
गोष्टींमध्ये संभ्रमित व्हायचे नाही किंवा घाबरायचे नाही. आपला संभाळ करायचा आहे.
स्वता:ला विचारायचे आहे मी कोणत्या प्रकारचे फूल आहे? माझ्यामध्ये कोणती दुर्गंधी
तर नाही?
वरदान:-
नीराशवादीच्या
चिता वर बसलेल्या आत्म्यांना, नवीन जीवनाचे दान देणारे, त्रिमूर्ती प्राप्ती द्वारे
संपन्न भव.
संगम युगामध्ये बाबा
द्वारा सर्व मुलांना, नेहमी निरोगी, संपत्तीवान आणि आनंदी राहण्याचे त्रिमूर्ती
वरदान प्राप्त होते. जी मुलं या तीन प्राप्ती द्वारे नेहमी संपन्न राहतात, त्यांचा
खुषनसीब, हर्षित चेहरा पाहून मनुष्य जीवन जगण्याचा उमंग उत्साह येतो, कारण आत्ता
मनुष्य जिवंत असून पण निराशवादीच्या चितेवर बसलेले आहेत. आता अशा आत्म्यांना मरजीवा
बनवा. नवीन जीवनाचे दान द्या. नेहमी स्मृती राहावी की, या तीन प्राप्ती, आमचा
जन्मसिद्ध अधिकार आहे. तीन धारणेसाठी (डबल अंडरलाईन खरा) खास लक्ष द्या.
बोधवाक्य:-
अनासक्त आणि
अधिकारी होऊन, कर्मा मध्ये येणेच बंधनमुक्त स्थिती आहे.