06-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, या बेहदच्या खेळामध्ये तुम्ही आत्मा रुपी कलाकार अभिनय करत आहात, तुमचे निवासस्थान गोड शांतीधाम आहे, तेथे आत्ता जायचे आहे"

प्रश्न:-
जे अविनाश नाटकाच्या खेळाला अर्थ सहित जाणतात, त्यांच्या मुखाद्वारे कोणते शब्द निघू शकत नाहीत?

उत्तर:-
हे असे झाले नसते, तर असे झाले असते, हे व्हायला नको होते. . असे शब्द अविनाशी नाटकाच्या खेळाला जानणारे म्हणू शकत नाहीत. तुम्ही मुलं जाणता हे नाटक, जूँ सारखे, हळूहळू चालत राहते. जे काही होते, ते सर्व नाटकांमध्ये नोंद आहे. काळजी ची गोष्टच नाही.

ओम शांती।
बाबा जेव्हा आपला परिचय मुलांना देतात, तर मुलांना पण आपला परिचय मिळतो. सर्व मुलं खूप वेळ देह अभिमानी होऊन राहतात. देही अभिमानी झाले, तर बाबांचा अर्थ सहित परिचय मिळेल परंतु अविनाशी नाटकांमध्ये असे नाही. जरी म्हणतात भगवान ईश्वरीय पिता रचनाकार आहेत परंतु जाणत नाहीत. शिवलिंगाचे चित्र पण आहे परंतु इतके मोठे तर ते नाहीत. अर्थ सहित न समजल्या मुळे बाबांना विसरले आहेत. शिवपिता रचनाकार असून, जरूर नवीन दुनियाची स्थापना करतील. तर जरूर मुलांना नवीन दुनियेच्या राजधानीचा वारसा मिळाला पाहिजे. स्वर्गाचे नाव भारतामध्ये प्रसिद्ध आहे परंतु समजत काहीच नाहीत. कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात, स्वर्गवासी झाले. आता असे कधी होते काय?आता तुम्ही समजता, आम्ही सर्व तुच्छ बुद्धी होतो, क्रमानुसार तर म्हणाल ना. याच्या अनेक जन्माच्या, अंतिम शरीरा मध्ये येतो. हे क्रमांक एक आहेत. मुलं समजतात आता आम्ही, त्यांची मुलं, ब्राह्मण बनलो आहोत. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा खूप वर्षापासून समजावत आहेत, नाहीतर बाबांना ओळखणे सेकंदाची गोष्ट आहे. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर, तुमचे विकर्म विनाश होतील. निश्चय झाला, परत कोणत्या गोष्टी मध्ये, प्रश्न इत्यादी उठू शकत नाहीत. बाबाने समजवले आहे, तुम्ही पावन होते जेव्हा शांतीधाम मध्ये होते. या गोष्टी तुम्ही बाबा द्वारेच ऐकतात, दुसरे कोणी ऐकवू शकत नाही. तुम्ही जाणतात आम्ही आत्मे, कुठले रहिवासी आहोत. जसे नाटकाचे कलाकार म्हणतील, येथील रहिवासी आहोत, वस्त्र बदलून रंगमंचा वरती येतो. आता तुम्ही समजता आम्ही येथील रहिवासी नाहीत. ही एक नाटक शाळा आहे. हे आता बुद्धी मध्ये आले आहे की, आम्ही मूळ वतनचे निवासी आहोत, ज्याला गोड शांतीचे घर म्हटले जाते. त्यासाठी सर्वांची इच्छा असते, कारण आत्मा दु:खी आहे. असे म्हणतात, आम्ही कसे परत घरी जायचे, घराचा पत्ता माहीत नसल्या मुळे भटकतात. आता तुम्ही भटकण्या पासून मुक्त झाले आहात. मुलांना माहित झाले आहे, आता तुम्हाला खरोखर घरी जायचे आहे. आत्मा खूप छोटी बिंदू आहे. हे पण आश्चर्य आहे, ज्याला कूदरत म्हटले जाते. इतक्या छोट्या बिंदू मध्ये इतकी मोठी भूमिका भरलेली आहे. परमपिता परमात्मा येऊन भूमिका वठतात, हे पण तुम्ही जाणले आहे. सर्वात मुख्य भूमिका त्यांची आहे, कारण कर्ता करविता आहेत ना. तुम्ही गोड गोड मुलांनी आता समजले आहे की, आम्ही आत्मे शांती धाम मधून येतो. आत्मे काही नवीन थोडेच निघू शकतात. जे शरीरा मध्ये प्रवेश करतील, नाही. आत्मे सर्व गोड घरी शांतीधाम मध्ये राहतात, तेथून भूमिका करण्यासाठी सृष्टीवर येतात. सर्वांना आपापली भूमिका वठवयाची आहे, हा खेळ आहे. हे सूर्य चंद्र तारे काय काय आहेत? हे सर्व बत्ती आहेत. यामध्ये रात्र आणि दिवसाचा खेळ चालतो. काहीजण म्हणतात, सूर्य देवताय नमः, चंद्र देवताय नमः. . परंतु वास्तव मध्ये हे काही देवता नाहीत. या खेळाची कोणालाही माहिती नाही. सूर्य चंद्राला पण देवता म्हणतात, वास्तव मध्ये हे सर्व विश्व नाटकां मध्ये, प्रकाश देणारे बत्ती आहेत. आम्ही त्या गोड शांतीधामचे रहिवासी आहोत. येथे भूमिका वठवण्यासाठी आलो आहोत. हे चक्र जूँ सारखे हळूहळू फिरत राहते. जे काही होते, ते अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे. असे म्हणायला नाही पाहिजे की, असे झाले नसते, तर असे झाले असते. हे तर अविनाश नाटक आहे ना. जसे तुमची मम्मा होती, विचार पण आला नाही की, ती शरीर सोडेल. अच्छा शरीर सोडले हे पण अविनाशी नाटकांमध्ये नोंद होते. आता आपली नवीन भूमिका वठवत आहे. काळजीची कोणतीच गोष्ट नाही. येथे तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आहे, आम्ही सर्व कलाकार आहोत. हा हार आणि जीत चा खेळ आहे. हा खेळ माया वरती आधारित आहे. माया कडून हरल्यानंतर हार होते आणि मायेला जिंकल्या नंतर जीत होते. हे गायन तर सर्व करतात परंतु बुद्धीमध्ये जरा पण ज्ञान नाही. तुम्ही जाणतात, माया काय गोष्ट आहे, हा तर रावण आहे, ज्यालाच माया म्हटले जाते. धनाला संपत्ती म्हटले जाते, माया म्हणत नाहीत. मनुष्य समजता ज्यांच्या जवळ खूप धन आहे, त्यांना मायेचा नशा आहे. असे म्हणतात परंतु मायेचा नशा असतो काय?मायेला आपण जिंकण्याचा प्रयत्न करतो. तरी यामध्ये संशय घेण्याची गोष्टच नाही. कच्ची अवस्था असल्यामुळे संशय येतो. आता भगवानुवाच आहे, कुणाच्या प्रती, आत्म्याच्या प्रती. भगवान तर जरुर पाहिजेत ना, आत्म्याला ज्ञान देतील. कृष्ण देहधारी आहेत, ते आत्म्या प्रती कसे ज्ञान देत देतील. तुम्हाला कोणी देहधारी ज्ञान देत नाहीत. बाबांना तर देहच नाही, बाकी सर्वांना देह आहे, ज्यांची पुजा करतात, त्यांची आठवण करणे तर सहज आहे ना. ब्रह्मा विष्णू शंकरा ला देवता म्हणतात, शिवाला भगवान म्हणतात. उच्च ते उच्च भगवान आहेत, त्यांना देह नाही. हे पण तुम्ही जाणतात, जेव्हा तुम्ही मुळ वतन मध्ये होते त्यावेळेस देह होता का? नाही. तुम्ही आत्मे होते. हे बाबा पण आत्माच आहेत, फक्त ते परमात्मा आहेत. त्यांच्या भूमिकेचे गायन आहे. भूमिका करुन गेले तेव्हा तर पूजा होते. एक पण मनुष्य नाही, ज्यांना माहित आहे की, पाच हजार वर्ष पूर्व पण परमपिता परमात्मा रचनाकार आले होते, तेच स्वर्गीय ईश्वरीय पिता आहेत. प्रत्येक पाच हजार वर्षांनंतर कल्पाच्या संगम मध्ये येतात परंतू कल्पाचे आयुष्य लांबलचक केल्यामुळे सर्व विसरले आहेत. तुम्हा मुलांना बाबा सन्मुख समजावतात, तुम्ही स्वतः म्हणतात, बाबा आम्ही आपल्याला कल्प कल्प भेटतो आणि आपल्या कडून वारसा घेतो, परत वारसा कसा गमावतो, हे पण बुद्धी मध्ये आहे. ज्ञान अनेक प्रकारचे आहे परंतु ज्ञानाचे सागर भगवंतालाच म्हटले जाते. आता हे पण समजत नाहीत, विनाश जरुर होईल, पुर्वी पण विनाश झाला होता. कशाप्रकारे झाला होता, हे कोणालाही माहिती नाही. ग्रंथांमध्ये तर विनाशा बद्दल अनेक कथा लिहिल्या आहेत. पांडव आणि कौरव युद्ध कसे होऊ शकते?आता तुम्ही ब्राह्मण संगम युगामध्ये आहात. ब्राह्मणाची तर कोणतीही लढाई नाही. बाबा म्हणतात तुम्ही माझी मुलं डबल अहिंसक आहात. आता तुम्ही निर्विकार बनत आहात. तुम्हीच बाबा द्वारे वारसा घेतला होता, यामध्ये काहीच कष्टाची गोष्ट नाही. ज्ञान तर खूपच सहज आहे, ८४ जन्माचे चक्र तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आता नाटक पूर्ण होत आहे, बाकी थोडा वेळ आहे. तुम्ही जाणता आता, अशी वेळ येणार आहे, जे सावकारांना पण धान्य मिळणार नाही, पाणी मिळणार नाही. याला म्हटले जाते दुःखाचे डोंगर कोसळणे, कारण नसतानी खून होत राहतील. इतके सर्व नष्ट होतील. कोणी चूक करतात तर त्यांना दंड मिळतो. यांनी काय चूक केली, फक्त एकच चूक केली, जे शिव पित्याला विसरले. तुम्ही तर बाबा पासून राजाई घेत आहात. बाकी मनुष्य समजतात आत्ता मृत्यू आला की आला. महाभारत लढाई थोडी पण सुरू झाली तर मरतील. तुम्ही तर जिवंत राहताल ना. तुम्ही परिवर्तित होऊन राजयोगाच्या शिक्षणाद्वारे अमर लोक मध्ये जाल. शिक्षणाला कमाईचे साधन म्हटले जाते. ग्रंथांमधील पढाई पण आहे, त्याद्वारे पण कमाई होते परंतु ते शिक्षण भक्तीचे आहे. आता बाबा म्हणतात मी तुम्हाला या लक्ष्मीनारायण सारखे बनवतो. तुम्ही आता स्वच्छ बुद्धी बनत आहात. तुम्ही जाणतात, आम्हीच उच्च ते उच्च बनतो, परत पुर्नजन्म घेत घेत खाली उतरत येतो. नवीन पासून जुने होते ना. आत्ता सृष्टीची उतरती कला आहे. चढती कला होती, तेव्हा या, देवतांचे राज्य होते, स्वर्ग होता, आत्ता नर्क आहे. आता तुम्ही परत स्वर्गवासी बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात.

हे ईश्वरीय पिता म्हणून बोलावतात परंतु ते थोडेच समजतात कि, ते आत्म्याचे उच्च ते उच्च पिता आहेत. आम्ही त्यांची मुलं दुःखी का?आता तुम्ही समजतात, दुःख पण होणारच आहे. हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे ना. जिंकण्या मध्ये सुख आहे आणि हारण्या मध्ये दुःख आहे. बाबांनी राज्य दिले होते, रावणाने हिरावून घेतले. आता तर मुलांच्या बुद्धी मध्ये आहे, बाबा द्वारे आम्हाला स्वर्गाचा वारसा मिळत राहतो. बाबा आले आहेत. आता फक्त त्याची आठवण करायची आहे, तरच पाप नष्ट होतील. जन्म जन्मातंराचे डोक्यावरती ओझे आहे ना. हे पण तुम्ही जाणतात, तुम्ही खूप दुखी नव्हते. काही सुख पण आहे, पिठामध्ये मिठा एवढे, ज्याला कागविष्टा समान सुख म्हटले जाते. तुम्ही जाणतात सर्वांचे सदगती दाता एकच आहेत. जगतगुरु पण एकच झाले. वानप्रस्थ मध्ये गुरु केले जातात. आता तर लहान मुलांना पण गुरु करतात, कारण मेले तर सद्गती व्हावी. बाबा म्हणतात वास्तव मध्ये कोणालाही गुरु करू शकत नाही. गुरु तेच आहेत, जे सद्गती देतील. सदगती दाता एकच आहेत. बाकी खिस्त, बुद्ध इत्यादी कोणीही गुरू नाहीत, ते येतात तर, सर्वांना सदगती मिळते का?येशू ख्रिस्त आले त्यांच्या नंतर, त्या धर्माचे येतात, परत त्यांना गुरु कसे म्हणणार, जेव्हा घेऊन येण्यासाठी निमित्त बनतात. पतित-पावन तर एक बाबांना च म्हणतात, ते सर्वांना परत घेऊन जातात, स्थापना पण करतात, फक्त घेऊन जातील तर प्रलय होईल. प्रलय तर होत नाही. सर्व शास्त्रमयी शिरोमणी श्रीमद्भगवद्गीते चे गायन आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. . भारतामध्येच बाबा येतात. स्वर्गाची बादशाही देणारे शिव पिताच आहेत. त्यांना पण सर्वव्यापी म्हणतात. आता तुम्हा मुलांना खुशी आहे की, नवीन दुनियेमध्ये सार्‍या विश्‍वा वरती आमचेच राज्य होईल. त्या राज्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही. येथे तर जमिनीच्या तुकड्या तुकड्या साठी खूप लढत राहतात. तुम्हाला तर खुशी होते. कल्प कल्प आम्ही

बाबा द्वारे वारसा घेतो, तर खूप खुशी व्हायला पाहिजे. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तरी विसरतात. मुलं म्हणतात, आमचा योग खंडित होतो. बाबाने म्हटले आहे, योग अक्षर काढून टाका. हे तर ग्रंथा मधील अक्षर आहे. बाबा म्हणतात, माझी आठवण करा. योग भक्तिमार्गाचे अक्षर आहे. बाबा द्वारे स्वर्गाची बादशाही मिळते, त्यांची तुम्ही आठवण करू शकत नाही, तर विकर्म विनाश कसे होतील? राजाई कशी मिळेल? आठवण करणार नाहीतर पद पण कमी होईल, सजा पण खाल. ही पण अक्कल नाही, इतके बेसमज बनले आहात. मी कल्प कल्प, तुम्हाला म्हणतो, माझी आठवण करा, जिवंतपणी या दुनियातून मोह काढून टाका. बाबाच्या आठवणीत तुमचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही विजय माळेचे मणी बनाल. खूप सहज आहे. उच्च ते उच्च शिवबाबा आणि ब्रह्मा दोन्ही सर्वोच्च आहेत. ते पारलौकिक, आणि हे अलौकिक. बिलकुल साधारण शिक्षक आहेत. ते शिक्षक परत सजा पण देतात. हे तर उमंग उत्साह देत राहतात. बाबा म्हणतात, गोड मुलांनो माझी आठवण करा, सतो प्रधान बनवायचे आहे. पतित पावन बाबाच आहेत, गुरु पण तेच आहेत. बाकी कोणी गुरू होऊ शकत नाहीत. असे म्हणतात बुद्ध पार निर्वाण गेले, या सर्व थापा आहेत, एक पण परत जाऊ शकत नाहीत. सर्वांना अविनाशी नाटकामध्ये भूमिका वठवायची आहे. खूप विशाल बुद्धी आणि खुशी राहायला पाहिजे. सर्व ज्ञान तुमच्या बुद्धी मध्ये आहे. ब्राह्मण च ज्ञान घेतात. न शुद्रा मध्ये न देवता मध्ये हे ज्ञान आहे. आता समजून घेणारेच समजतील. जे समजणार नाहीत, त्यांचा मृत्यू आहेच. पद पण कमी मिळेल. शाळेमध्ये शिक्षण घेत नाहीत, तर पद कमी होते. अल्लाह म्हणजे शिवबाबा, बे म्हणजे बादशाही. आम्ही परत आपल्या राजधानी मध्ये जात आहोत, ही जुनी दुनिया नष्ट होईल. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाबा आम्हाला अशा नवीन विश्वाची राजाई देतात, जे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. याच खुशी मध्ये राहायचे आहे.

(२) विजय माळेचा मणी बनण्यासाठी, जिवंतपणी जुन्या दुनियेला विसरायचे आहे. बाबाच्या आठवणी द्वारे विकर्म नष्ट करायचे आहेत.

वरदान:-
एका सोबत सर्व संबंध निभावणारे सर्व किनार्यापासून मुक्त संपूर्ण फरिश्ता भव.

जशी कोणती गोष्ट बनवतात तर, ती जेव्हा तयार होते तर, किनारा सोडते. असे जितके संपन्न स्थितीच्या जवळ येत जाल, तेवढाच, सर्व गोष्टींमधून आपोआपच किनारा होत जाईल. जेव्हा सर्व बंधना द्वारे किनारा होईल म्हणजे कोणा मध्येही लगाव राहणार नाही, तेव्हा संपूर्ण फरिश्ता बनाल. एकाच्या सोबत सर्व नाते निभावणे, हाच ठिकाणा आहे, याद्वारेच फरीश्ता जीवनाचे लक्ष्य जवळ अनुभव होईल. बुद्धीचे भटकणे बंद होईल.

बोधवाक्य:-
स्नेह असे चुंबक आहे, जे निंदा करणाऱ्यांना पण जवळ घेऊन येते.