14-06-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
22.01.86 ओम शान्ति
मधुबन
बापदादांची
आशा-संपूर्ण आणि संपन्न बना.
आज विशेष दूर देशवासी,
दूरदेश निवासी मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. इतक्या दूरवरून भेटण्यासाठी आले आहेत.
इतक्या दूर वरून कोणत्या आकर्षणाने येतात ? बापदादा मुलांची ओढ जाणतात. एकीकडे
हृदयापासून भेटण्याची आकर्षण आहे, तर दुसरीकडे बाबांशी भेटण्यासाठी धैर्य पण आहे,
म्हणून धीरज चे फळ, विशेष रूपांमध्ये देण्यासाठी आले आहेत. विशेष भेटण्यासाठी आले
आहेत. सर्व दुहेरी परदेशी मुलांच्या स्नेहाचे संकल्प, हृदयापासून भेटण्याचा उमंग,
प्रत्येक वेळेत बापदादा पाहतात आणि ऐकतात. दूर बसून पण स्नेहा मुळे जवळ आहेत.
बापदादा पाहतात की, कसे प्रत्येक वेळेत रात्रंदिवस जागरण करून, मुलं दृष्टी आणि
वातावरण मुळे स्नेह आणि शक्ती ग्रहण करत आहेत. आज विशेष मुरली चालवण्यासाठी आलेले
नाहीत. मुरली तर खूप ऐकल्या आहेत. आता तर बापदादां ना हे वर्ष विशेष प्रत्यक्ष
स्वरूप, बापदादाच्या स्नेहाचे प्रमाण स्वरूप, संपूर्ण आणि संपन्न बनवण्याच्या
जवळीकते चे स्वरूप, श्रेष्ठ संकल्प, श्रेष्ठ बोल, श्रेष्ठ संबंध आणि संपर्क, असे
श्रेष्ठ स्वरूप पाहू इच्छितात. जे ऐकले आणि त्याचे स्वरूप बनले, ही समानता पाहू
इच्छितात. प्रत्यक्षात परिवर्तनाचा श्रेष्ठ समारंभ पाहू इच्छितात. या वर्षांमध्ये
हिरक जयंती, सुवर्ण जयंती साजरी केली आणि कराल परंतु बाप दादा खरे बेदाग, अमूल्य
हिऱ्यांचा हार बनवू इच्छितात. असा एक-एक हिरा अनमोल चमकायला हवा, जी त्याच्या
प्रकाशाची आणि शक्तीची चमक, हद्द पर्यंत नाही परंतु बेहद पर्यंत जावी. बापदादानी
मुलांचे हद्दचे संकल्प, हद्दचे बोल, हद्दीची सेवा, हद्दचे सबंध खूप वेळा पाहिले
आहेत परंतु आता बेहद्दचे पिता आहेत, तर बेहद्दच्या सेवेची आवश्यकता आहे. त्याच्या
पुढे हे हद्दच्या दिपकचा प्रकाश काय आहे?आता प्रकाश स्तंभ, शक्तिस्तंभ बनायचे आहे.
बेहद्द कडे दृष्टी ठेवा. बेहद्द ची दृष्टी बनेल, तेव्हा सृष्टीचे परिवर्तन होईल.
सृष्टी परिवर्तनाचे इतके मोठे कार्य, थोड्यावेळ मध्ये संपन्न करायचे आहे. तर गती आणि
विधी पण बेहद्दची तीव्र पाहिजे. तुमच्या वृत्तीमुळे देश-परदेशा च्या वातावरण मध्ये
एकच आवाज घुमावा की, बेहद्द चे मालक, विश्वाचे मालक, बेहद्दचे राज्याधिकारी, बेहद्द
चे खरे सेवाधारी, आमचे देव आत्मे मिळाले. आता एकच आवाज देश-विदेशा मध्ये घुमेल,
तेव्हा संपूर्णता आणि समाप्तीच्या जवळीकते चा अनुभव होईल, समजले. अच्छा.
चोहू बाजूच्या श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ इच्छा पूर्ण करणारे, फरिश्ता सो देवता
आत्म्यांना, नेहमी उच्च स्थितीमध्ये राहणारे, प्रकाश स्तंभ, शक्ती स्तंभ विशेष
आत्म्यांना, बाप दादाच्या सूक्ष्म इशाऱ्याला समजणारे, विशाल बुद्धी मुलांना, बाप
दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
देश विदेशाच्या
सर्व मुलां प्रति, बापदादांनी, संदेशाच्या रूपामध्ये प्रेमपूर्वक आठवण दिली.
चोहो बाजूच्या स्नेही सहयोगी आणि शक्तिशाली मुलांच्या वेग वेगळ्या उत्साहाचे पत्र
पाहून बाप दादा स्नेहाच्या सागरामध्ये सामावले. सर्वच वेगवेगळ्या लहरी द्वारे,
आपापल्या उमंग उत्साहा नुसार श्रेष्ठ आहेत आणि बाप दादा ती लहर पाहून हर्षित होत
आहेत. आनंदाची लहर पण खूप चांगली आहे, आणि नियोजन पण खूप चांगले आहे. आता
प्रत्यक्षात बापदादां कडून गुण घ्यायचे आहेत आणि भविष्याच्या खात्यात जमा करायचे
आहेत. या वेळेत बापदादा प्रत्यक्ष अभ्यासक्रमा चे गुण प्रत्येक मुलांचे नोंद करत
आहेत आणि हे वर्ष विशेष प्रत्यक्ष अभ्यासक्रमा आणि प्रत्यक्ष शक्तीचे जास्त गुण
घ्यायचे आहेत, म्हणून जे इशारे वेळेप्रमाणे मिळाले आहेत, त्या इशाऱ्याला प्रत्येक
जणांनी स्वतः प्रति समजून, प्रत्यक्षामध्ये आणायचे आहेत, तर क्रमांक एक मिळू शकेल.
परदेशाचे किंवा देशातील मुलं, ज्यांना दूर बसून पण जवळच्या स्नेहाचा नेहमी अनुभव
होतो आणि नेहमी आनंद राहतो की, काहीतरी करून दाखवायचे आहे. असे करावे की, हे करावे,
असा आनंद आहे तर, आता सेवेचा पुरावा बनून आनंदाला प्रत्यक्षात आनण्याची विशेष संधी
आहे, म्हणून उडती कलाची स्पर्धा करा. आठवणीमध्ये, सेवेमध्ये, दिव्य गुण मूर्त
बनण्यांमध्ये आणि सोबतच ज्ञानस्वरूप बनून ज्ञान चर्चा करण्यामध्ये, चारी विषयांमध्ये,
उडत्या कलेच्या स्पर्धेमध्ये, क्रमांक घेण्यासाठी यावर्षी खूप छान संधी आहे. ही
विशेष संधी घ्या. नवीनतेचा अनुभव करा. नवीन तर पसंत करतात ना. तर हि नवीनता करून
क्रमांक पुढे घेऊन जाऊ शकता. आता यावर्षी जास्त स्पर्धा करून, जास्त गुण घ्यायचे
आहेत. वेळ जास्त मिळाला आहे. पुरुषार्था नुसार भाग्य तर नेहमीच आहे परंतु हे वर्ष
विशेष जास्त गुण घेण्याचे आहे, म्हणून खूप उडत्या कलाचे अनुभवी बनून, पुढे जाणे पण
सहज होईल. जिथे मन आहे तिथे धन पण येऊ शकते. मन धनाला कुठे ना, कुठून ना कुठून घेऊन
येते, म्हणून मन आहे आणि धन नाही, हे बापदादा मानत नाहीत. मनापासून सेवा करणाऱ्यांना,
कोणत्या ना कोणत्या प्रकारची मदत बाप दादा कडून होते. कष्टाचा पैसा हवा, कष्टाचे धना
द्वारे अनेक पटीने फायदा होतो. आठवण करत करत कमावतात ना. तर आठवणीच्या खात्यामध्ये
जमा होते आणि पोहोचतात पण. अच्छा, सर्व आपले नाव आणि विशेषता द्वारे भुजांच्या माळे
सहीत प्रेमपूर्वक आठवण स्वीकार करा.
हीरक जयंती
मध्ये आलेल्या शिक्षक बहिणी प्रति अव्यक्त महावाक्य.
सर्वांनी हीरक जयंती साजरी केली, तसे तर सुवर्ण युगी बनायचे आहे, चांदी सारखे नाही.
सुवर्ण युगी बनण्यासाठी या वर्षी कोणते नियोजन केले आहे? सेवेचे नियोजन तर करतात
ना, परंतु स्व परिवर्तन आणि बेहद्द चे परिवर्तना साठी कोणते नियोजन केले आहे. हे तर
आपल्या स्थानासाठी नियोजन करत राहतात, परंतु आदी पासून निमित्त आहात, तर बेहद्द चे
नियोजन करणारे आहात. असे बुद्धीमध्ये राहते की, आम्हाला तर सर्व विश्वाचे कल्याण
करायचे आहे. हे बुद्धीमध्ये राहते ना, की समजतात, हे तर ज्यांचे काम आहे, तेच
जाणतील. कधी बेहद्द चा विचार येतो, की आपल्या स्थानाच्या विचारां मध्ये राहता. नाव
तर आहे विश्व कल्याणकारी, अमक्या स्थानाचे कल्याणकारी तर म्हणत नाहीत ना. बेहद्द
सेवेचे कोणते संकल्प चालतात? बेहद्द चे मालक आहात ना. एका राज्या चे मालक तर बनायचे
नाही. सेवाधारी निमित्त आत्म्यामध्ये जेव्हा ही लहर उत्पन्न होईल, तेव्हाच दुसऱ्या
मध्ये पण ती लहर येईल. जर तुम्हा लोकां मध्येही ही लहर येणार नाही, तर दुसऱ्यामध्ये
पण येऊ शकत नाही. तर नेहमी बेहद्दचे अधिकारी समजून, बेहद्दचे नियोजन करा. प्रथम
मुख्य गोष्ट हीच आहे की, कोणत्याही प्रकारच्या हद्दच्या बंधनां मध्ये, तर बांधलेले
तर नाहीत ना. बंधन मुक्तच बेहद्द च्या सेवेमध्ये सफल होतील. येथेच हे प्रत्यक्ष होत
आहे आणि होत राहील. या वर्षांमध्ये कोणती विशेषता दाखवाल?दृढ संकल्प तर प्रत्येक
वर्षी करतात ना. जेव्हा पण कोणती अशी संधी मिळते, त्यामध्ये दृढ संकल्प तर करतात आणि
करवतात पण. तर दृढ संकल्प घेणे पण साधारण झाले आहे. तसे म्हणता तर दृढ संकल्प परंतु
असतो संकल्प. जर दृढ असेल तर, दुसऱ्यांदा घ्यायची आवश्यकता नाही. दृढ संकल्प हा
शब्द साधारण झाला आहे. जर कोणतेही काम करता आणि म्हणतात की होय दृढ संकल्प करतो
परंतु असे कोणते नवीन साधन काढा ज्याद्वारे विचार आणि प्रत्यक्ष करण्यामध्ये समानता
राहील. नियोजन आणि प्रत्यक्षता दोन्ही सोबत असेल. नियोजन तर खूप करतात परंतु
प्रत्यक्षा मध्ये समस्या येतात, कष्ट होतात, सामना पण करावा लागतो, हे तर होईल आणि
होत राहील. परंतु जेव्हा लक्ष असेल, तर प्रत्यक्षात मध्ये नेहमी पुढे जात रहाल. आता
असे नियोजन करा ज्या मध्ये काही नवीनता दिसून येईल, नाहीतर प्रत्येक वर्षी एकत्र
होता, असे म्हणतात तसेच आहेत, काही बदल नाही. एक एक-दोघांना तसेच पाहतात, मन
प्रसन्न होत नाही. जितकी इच्छा असते तेवढे होत नाही, ते कसे होईल? यासाठी जे करतील
ते अर्जुन. एक पण निमित्त बनला तर दुसऱ्यां मध्ये पण आनदाची लहर येते. तर इतके सर्व
एकत्रित झाले आहात, तर असे कोणते नियोजन प्रत्यक्षता येईल असे बनवा. काही तात्विक
विचाराचे पेपर असतात, तर काही ही प्रात्यक्षिक चे पण पेपर असतात ना. हे तर यज्ञाच्या
सुरुवाती पासून निमित्त बनले आहेत, त्यांचे भाग्य तर श्रेष्ठ आहेच. आता नवीन काय
कराल?
यासाठी विशेष लक्ष द्या, प्रत्येक काम करण्यापूर्वी हे लक्ष ठेवा की, मला स्वतःला
संपन्न बनवून, उदाहरण मूर्ती बनायचे आहे. काय होते, संघटन चा फायदा पण होतो आणि
नुकसान पण होते. संघटन मध्ये एक दोघांना पाहून आळशी पण बनतात आणि संघटन मध्ये
एक-दोघांना पाहून पुरुषार्थाची लहर पण येते, दोन्ही होते. तर संघटनाला अलबेला रूपाने
पाहू नका. आता ही एक रिती झाली आहे, हे पण करतात, असे पण करतात, आम्ही केले तर काय
झाले?असे तर चालत राहते. तर संघटना मध्ये अलबेला पणामुळे नुकसान होते. संघटनेद्वारे
श्रेष्ठ बनण्याचा सहयोग घेणे ही वेगळी गोष्ट आहे. जर हे लक्ष ठेवले की मलाच करायचे
आहे. मला करून दाखवयाचे आहे आणि दुसऱ्यां कडून करुन घ्यायचे आहे, परत करण्याचा आनंद
राहिल आणि दुसरे पण करतील. नेहमीच हे लक्ष स्पष्ट बुद्धीमध्ये ठेवा. जर फक्त लक्ष
ठेवले तरी ते बुध्दीत राहत नाही, म्हणून प्रत्यक्षा मध्ये होत नाही. तर लक्ष्याला
वेळेनुसार बुध्दी मध्ये सारखे आणत राहा. लक्ष आणि लक्षण नेहमी मिळवत चला, तर
शक्तीशाली बनाल, नाही तर साधारण बनाल. आता या वर्षामध्ये प्रत्येक जणांनी हेच
समजायचे आहे की, आम्हाला साधे आणि उदाहरण मुर्ती बनायचे आहे. ही सेवेची प्रवृत्ती,
वृद्धी करण्यासाठी निमित्त बनते परंतु ही प्रवृत्ती प्रगतीमध्ये विघ्ने रूप बनायला
नको. जर प्रगतीमध्ये विघ्न रुप बनते, तर त्याला सेवा म्हणणार नाही. अच्छा, आहे तर
खूप मोठे संघटन. जेव्हा एक छोटासा ॲटम बॉम्ब कमाल करून दाखवतो, तर इतके आत्मिक
बाँम्बस काय करू शकत नाहीत. स्टेजवर येणारे तर तुम्ही लोकच आहात ना. सुवर्णजयंती
असणारे तर आधार झाले परंतु प्रत्यक्षामध्ये स्टेजवर असणारे तर तुम्ही आहात ना. आता
असे काही करून दाखवा, जसे सुवर्ण जयंतीच्या निमित्त आत्म्याच्या स्नेहाचे संघटन
दिसून येते आणि त्या स्नेहाच्या संघटनेद्वारे प्रत्यक्ष फळ दाखवले-सेवेची वृध्दी
सेवेमध्ये सफलता. असेच संघटन बनवा, जे किल्ल्या सारखे राहील. जसे स्वर्णजयंती वाले
निमित्त दादी, दिदी, जे पण आहेत, त्यांनी जेव्हा स्नेह आणि संघटन शक्तीचे प्रत्यक्ष
फळ दाखवले, तर तुम्ही पण प्रत्यक्ष फळ दाखवा. तर एक दोघांच्या जवळ येण्यासाठी समान
बनावे लागेल. संस्कार तर वेगवेगळे आहेत आणि राहतील पण. आत्ता जगदंबा ला पहा आणि
ब्रह्माला पहा, संस्कार तर वेगळेच राहिले. आता ज्या पण निमित्त दादी दीदी आहेत,
संस्कार एकसारखे तर नाहीत परंतु संस्कार मिळवणे, हा स्नेहाचा पुरावा आहे. हा विचार
करू नका संस्कार मिळवले तर, संघटन बनेल, असे नाही. संस्कार मिळवल्या मुळे संघटन
मजबूत बनेल. अच्छा, हे पण होऊन जाईल. सेवा एक आहे परंतु निमित्त बनणे आणि निमित्त
भाव मध्ये चालणे, ही पण विशेषता आहे. ही च हद्द काढून टाकायची आहे ना. यासाठी विचार
केला ना-सर्वाची बदली करायची. एका सेवा केंद्राचे, दुसऱ्या सेवा केंद्र मध्ये जायला
पाहिजेत. सर्व तयार आहात ना. आदेश निघतील. तुम्ही तर नेहमी मी तयार आहेत ना. बदली
करण्यामध्ये पण फायदा पण आहे. यावर्षी ही नवीन गोष्ट करायची ना. नष्टोमोहा तर
बनावेच लागेल. जेव्हा त्यागी, तपस्वी बनले तर हे काय आहे. त्यागातच भाग्य आहे. तर
भाग्याच्या पुढे त्याग काय आहे?जे स्वता: होऊन पुढे येतात, त्यांना शक्ती तर मिळतेच.
सर्व तर बहादूर आहातच. बदली म्हणजे बदली. कोणाला पण करू शकतात. हिम्मत असेल तर काही
मोठी गोष्ट नाही. अच्छा, तर या वर्षामध्ये नवीनता करु. पसंद आहे ना. ज्यांनी नेहमी
तयार आहोत, हा पाठ सुरुवाती पासून शिकले आहेत, त्यांच्या मनामध्ये शक्ती भरलेली
राहते. कोणत्याही आज्ञेचे पालन करण्याचे बळ मिळते. अच्छा. नेहमी श्रेष्ठ भाग्यशाली
आहात आणि भाग्यामुळे नेहमीच सहयोग प्राप्त होत राहील. समजले.
(२) सेवा वर्तमान आणि भविष्य दोघांनाही श्रेष्ठ बनवते. सेवेचे बळ कमी नाही. आठवण आणि
सेवा दोघांचे संतुलन पाहिजे, तर सेवे मध्ये प्रगतीचा अनुभव करेल. आठवणीमध्ये सेवा
करणे नैसर्गिक व्हायला पाहिजे. ब्राह्मण जीवनाचा स्वभाव काय आहे?आठवणीत राहणे.
ब्राह्मण जन्म घेणे म्हणजे आठवणीच्या बंधनामध्ये बांधणे. जसे ते ब्राह्मण,
जीवनामध्ये काही ना काही खुण ठेवतात, तर या ब्राह्मण जीवनाचे लक्षण आठवण करणे आहे.
आठवणी मध्ये राहणे नैसर्गिक राहावे म्हणून आठवण वेगळे केली, सेवा वेगळी केली, असे
नाही. दोन्ही एकत्रित हवे. इतका वेळ कुठे आहे, आठवण वेगळी करा, आणि सेवा वेगळी करा,
म्हणून आठवण आणि सेवा सोबतच हवी. यामध्ये अनुभवी बनाल, तर सफलता पण प्राप्त कराल.
अच्छा.
वरदान:-
कर्माच्या
गतीला जाणून गती सदगती चा निर्णय करणारे, मास्टर दुखहर्ता सुखकर्ता भव.
आज पर्यंत आपल्या
जीवनाची कहाणी ऐकणे आणि पाहण्या मध्ये व्यस्त राहू नका परंतू प्रत्येकाच्या
कर्माच्या गतीला जाणून, गती-सद्गती देण्याचा निर्णय करा. मास्टर दुखहर्ता सुखकर्ता
ची भूमिका वठवा. आपल्या रचना च्या दुःख अशांतीच्या समस्याला समाप्त करा. त्यांना
महादान आणि वरदान द्या. स्वतः सुविधा घेऊ नका, आता तर दाता बनवून द्या. जर सुविधा
च्या आधारा वरती स्वतःची प्रगती किंवा सेवेमध्ये अल्पकाळा साठी सफलता प्राप्त झाली,
तरी आज महान व्हाल, उद्या महानताचे इच्छूक आत्मा बनाल.
सुविचार:-
अनुभूती न होने
युद्धाची स्थिती आहे, योगी बना योध्दे नाही.