17-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आठवणी मध्ये राहीले तर, दूर असून पण सोबत राहाल, आठवणी द्वारे सोबत असल्याचा अनुभव होतो आणि विकर्म पण विनाश होतात"

प्रश्न:-
दुरदेशी बाबा मुलांना पण दूरांदेशी बनवण्यासाठी कोणते ज्ञान देतात?

उत्तर:-
आत्मा कसे चक्रा मध्ये, वेग-वेगळ्या वर्णामध्ये येते, याचे ज्ञान दूरांदेशी बाबाच देतात. तुम्ही जाणतात, आता आम्ही ब्राह्मण आहोत, यापूर्वी जेव्हा ज्ञान नव्हते तर शूद्र वर्णाचे होतो, त्याच्या अगोदर वैश्य वर्णाचे होतो. दूरदेशा मध्ये राहणारे बाबा दूरांदेशी बनवण्याचे सर्व ज्ञान मुलांना देतात.

गीत:-
जे शिव साजनच्या सोबत आहेत, त्यांच्या वरती नेहमीच ज्ञानाची वर्षा आहे. .

ओम शांती।
जे ज्ञानसागरा सोबत आहेत, त्यांच्यासाठी ज्ञानाची वर्षा आहे. तुम्ही बाबाच्या सोबत आहात ना, जरी विदेशामध्ये आहात किंवा कुठे पण आहात? सोबत आहात. आठवण तर ठेवता ना. जे पण मूलं आठवणी मध्ये राहतात, ते नेहमी सोबत आहेत. आठवणीमध्ये राहिल्यामुळे सोबत राहतात आणि विकर्म पण विनाश होतात, परत विकर्माजीत इसवी सन सुरू होते. जेव्हा रावणाचे राज्य सुरू होते, तेव्हा राजा विक्रमाचे इसवी सन सुरु होते. ते विकर्माजीत, हे विकर्मी. आता तुम्ही विकर्माजीत बनत आहात, परत तुम्ही विकर्मी बनाल. या वेळेत सर्व अती विकर्मी आहेत. कोणालाही आपल्या धर्माची माहिती नाही. आज बाबा एक छोटासा प्रश्न विचारतात- सतयुगा मध्ये देवता हे जाणतात की, आम्ही आदी सनातन देवी-देवता धर्माचे आहोत. जसे तुम्ही समजता आम्ही हिंदू धर्माचे आहोत, कोणी म्हणेल, आम्ही ख्रिश्चन धर्माचे आहोत. तसे तेथे स्वतःला देवी-देवता धर्माचे समजतात का? विचार करण्याची गोष्ट आहे ना. तेथे दुसरा कोणताही धर्म नसतो, जे समजतील आम्ही अमक्या धर्माचे आहेत. येथे तर अनेक धर्म आहेत, म्हणून ओळखण्यासाठी वेग वेगळी नावं ठेवली आहेत. तेथे तर एकच धर्म आहे, म्हणून सांगण्याची आवश्यकता नाही की, मी या धर्माचा आहे. त्यांना माहीती नसते की, दुसरा कोणते धर्म असतो, त्यांचीच राजाई असते. आता तुम्ही समजता आम्ही देवी देवता धर्माचे आहोत. देवी देवता दुसऱ्या कोणाला म्हटले जात नाही. पतित झाल्यामुळे स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. पवित्रते लाच देवता म्हटले जाते. तेथे अशी कोणती गोष्ट नसते. कोणाशी तुलना पण केली जात नाही. आता तुम्ही संगम युगामध्ये आहात. तुम्ही जाणतात आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापन होत आहे. तेथे धर्माची गोष्टच नाही, एकच धर्म आहे. हे पण मुलांना समजले आहे, हे जे म्हणतात महाप्रलय होतो, अर्थात काहीच राहत नाही, हे चुकीचे आहे. बाबा समजवतात, सत्य काय आहे. ग्रंथांमध्ये तर सृष्टी जलमई दाखवली आहे. बाबा समजवतात, शिवाय भारताच्या बाकी धरती जलमय होते. इतकी मोठी सृष्टी काय करणार? एका भारतामध्येच अनेक गाव आहेत. प्रथम जंगल होते, परत त्याद्वारे वृद्धी होत जाते. तेथे तर फक्त तुम्ही आदी सनातन देवी-देवता धर्माचेच राहतात. हे तुम्हा ब्राह्मणांच्या बुद्धीमध्ये बाबा धारण करवत आहेत. आता तुम्ही जाणता, उच्च ते उच्च शिवबाबा कोण आहेत, त्यांचीच पूजा केली जाते. रूई इत्यादीचे फुलं का अर्पण करतात?ते तर निर्विकारी आहेत ना. असे म्हणतात ते, नावा रूपापेक्षा वेगळे आहेत परंतु नावा रुपा पेक्षा वेगळी गोष्ट असू शकत नाही. तेव्हा फुलं इत्यादी अर्पण कोणाला करतात. प्रथम पूजा त्यांचीच होते, मंदिर पण त्यांचेच बनवतात, कारण भारताची आणि सार्‍या दुनियेच्या मुलांची सेवा करतात. मनुष्यांची सेवा केली जाते ना. या वेळेत तुम्ही आपल्याला देवी-देवता धर्माचे म्हणू शकत नाहीत. तुम्हाला माहित नाही की, आम्हीच देवी-देवता होतो परत आत्ता बनत आहोत. आता बाबा समजवत आहेत, तर समजायला पाहिजे ना. हे ज्ञान बाबा शिवाय कोणी देऊ शकत नाही, त्यांना ज्ञानाचे सागर, ज्ञानसंपन्न म्हटले जाते. गायन पण आहे रचनाकार आणि रचनेच्या ज्ञानाला ऋषी मुनी इत्यादी कोणी जाणू शकत नाहीत. नेती नेती करतात. जसे लहान मुलांना काय ज्ञान असते?जसे मोठे होतात विशाल बुद्धी बनतात. बुध्दी मध्ये येते की, हा देश कोठे आहे, हा कोठे आहे? तुम्ही मुलं पण प्रथम या बेहद ज्ञानाला, काहीच जाणत नव्हते. हे पण म्हणतात जरी, आम्ही ग्रंथ इत्यादी वाचत होतो परंतु समजत काहीच नव्हतो. मनुष्य या अविनाशी नाटकांमध्ये कलाकार आहेत ना.

सर्व खेळ दोन गोष्टीवर आधारित आहे. भारताची हार आणि भारताची जीत होते. भारतामध्ये सतयुग आदी च्या सुरुवातीला पवित्र धर्म होता. या वेळेत अपवित्र धर्म आहे. अपवित्रते मुळे स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत, तरीही श्री श्री नाव ठेवतात परंतु श्री म्हणजे श्रेष्ठ. पवित्र देवतांनाच श्रेष्ठ म्हटले जाते. श्रीमद् भगवानुवाच म्हटले जाते ना. श्री कोण झाले?जे बाबांच्या सन्मुख ऐकून श्री बनतात, की ज्यांनी स्वतःला श्री श्री म्हटले आहे. बाबांच्या कर्तव्यावर जे नावं ठेवले आहेत, ते आपल्यावरती ठेवली आहेत. या सर्व सविस्तर गोष्टी आहेत, तरीही बाबा म्हणतात, मुलांनो एका बाबांची आठवण करत रहा, हा वशीकरण मंत्र आहे. तुम्ही रावणावर विजय मिळवतात आणि जगजीत बनतात. सारखे सारखे स्वतःला आत्मा समजा. हे शरीर तर पाच तत्वाचे बनलेले आहे, शरीर बनते परत सुटते परत बनते. आत्ता आत्मा तर अविनाशी आहे. अविनाश आत्म्याला अविनाश बाबा संगमयुगा मध्ये शिकवत आहेत. जरी अनेक विघ्नं येतात, मायाचे वादळे येतात, तुम्ही बाबांच्या आठवणी मध्ये राहा. तुम्ही समजतात, आम्हीच सतोप्रधान होतो, परत तमोप्रधान बनलो, तुमच्यामध्ये पण क्रमानुसार जाणतात. तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आहे, आम्हीच प्रथम भक्ती सुरु केली होती, जरूर ज्यांनी प्रथम भक्ती केली त्यांनीच शिवाची मंदिरं बनवले, कारण तेच धनवान पण असतात ना. मोठ्या राजांना पाहून, दुसरे राजा आणि प्रजा पण मंदिरं बनवतात. या सर्व सविस्तर गोष्टी आहेत. एका सेकंदा मध्ये जीवनमुक्ती म्हटले जाते, परत किती वर्ष लागतात समजून घेण्यामध्ये. ज्ञान तर खूप सहज आहे त्यामध्ये इतके वर्ष लागत नाहीत, जितके आठवणीच्या यात्रेसाठी लागतात. पुकारतात पण बाबा या, येऊन आम्हा पतितांना पावन बनवा. असे नाही म्हणत, बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवा. सर्व म्हणतात, पतितांना पावन बनवा. पावन दुनिया म्हटले जाते सतयुगाला, या दुनियेला पतीत दुनिया म्हटले जाते. पतित दुनिया म्हणत असतानाही स्वतःला तसे पतित समजत नाहीत, स्वतः प्रती घ्रुणा करत नाहीत. तुम्ही कोणत्या विकारी मनुष्यांनी बनवलेले भोजन खात नाहीत, तर दूसरे लोक म्हणतात आम्ही काय अछूत आहोत काय?अरे तुम्ही स्वतः च म्हणतात ना, पतीत तर सर्वच आहेत ना. तुम्ही म्हणतात पण आम्ही पतित आहोत, देवता पावन आहेत. तर पतीतांना काय म्हणणार?गायन आहे ना, अमृत सोडून विष कशासाठी घेता? विष म्हणजे विकार तर खराब आहेत ना, तुम्हाला आदी मध्य अंत दुःख देतात परंतु त्याला विष थोडेच समजतात. जसे अमली, अमल शिवाय राहू शकत नाही, दारूची सवय असणारे दारू शिवाय राहू शकत नाहीत. युध्दाची वेळ असते तर, सैनिकांना दारू पिऊन लढाई वरती पाठवतात, नशा करायला मिळाला बस. समजतात, आम्हाला असे करायचे आहे. त्या लोकांना मृत्यूची भीती वाटत नाही. कुठे पण बाँम्ब सहीत जाऊन पडतात. मुसळा ची(मिसाईल) लढाई लागली, सत्य गोष्टी आता तुम्ही प्रत्यक्षात पाहत आहात. अगोदर फक्त वाचत होते, पोटा द्वारे मुसळ(मिसाईल) निघाले, परत हे, हे झाले. आता तुम्ही समजतात, पांडव कोण आहेत, कौरव कोण आहेत. स्वर्गवासी बनण्यासाठी पांडवांनी जिवंतपणी देह अभिमान नष्ट करण्याचा पुरुषार्थ केला. तुम्ही आत्ता ही जुनी चप्पल( शरीर) सोडण्याचा पुरुषार्थ करतात. तुम्ही म्हणतात ना, जुनी शरीर रुपी चप्पल सोडून नवीन घ्यायची आहे. बाबा मुलांना च समजवतात. बाबा म्हणतात मी कल्प कल्प येतो. माझे नाव शिव आहे, शिवजयंती पण साजरी करतात. भक्तिमार्ग मध्ये अनेक मंदिरं पण बनवली आहेत. नावं पण अनेक ठेवली आहेत. देवींचे पण असेच नावं ठेवतात. यावेळी तुमची पूजा होत आहे. हे पण तुम्ही मुलं जाणता, ज्याची आम्ही पूजा करत होतो, ते आम्हाला शिकवत आहेत. ज्या लक्ष्मी नारायणाचे आम्ही पुजारी होतो, ते आता आम्ही स्वतः बनत आहोत. हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे. तुम्ही स्मरण करत राहा आणि दुसर्यांना पण ऐकवा. अनेक आहेत जे धारणा करु शकत नाहीत. बाबा म्हणतात, जे जास्त धारणा करू शकत नाहीत, तरी हरकत नाही, आठवण तर करू शकतात ना. बाबांची आठवण करत राहा. जे मुरली चालवू शकत नाहीत, तर येथे आठवण करत बसा. येथे म्हणजे मधुबन मध्ये, कोणते बंधन, झंझट इत्यादी तर नाही. घरामध्ये तर लहान मुले, इत्यादी वातावरण पाहून तर नशाच गायब होतो. येथे चित्र पण ठेवले आहेत, कोणालाही समजावून सांगणे खूप सहज आहे. ते लोक तर गीता इत्यादी पूर्णपणे कंठ करतात.

शिख लोकांना पण ग्रंथ आठवणीत राहतो. तुम्हाला काय कंठ करायचे आहे, शिवपित्याला. तुम्ही म्हणतात, बाबा या बिलकुल नवीन गोष्टी आहेत. एकच वेळ आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. पाच हजार वर्षांपूर्वी पण शिकवले होते, दुसऱ्या कोणाची ताकत नाही. असे समजू शकतात ज्ञानाचे सागर एकच पिता आहेत, दुसरे कोणी होऊ शकत नाहीत. ज्ञानसागर बाबाच तुम्हाला समजवतात. आज-काल असे पण खूप आहेत जे, स्वतः म्हणता मी अवतार घेतला आहे, म्हणून सत्यते च्या स्थापने मध्ये खूप विघ्न पडतात परंतु गायन आहे सत्याची नाव हलेल, डुलेल परंतु बुडणार नाही. आता तुम्ही तुम्ही मुलं बाबांच्या जवळ येतात, तर तुमच्या मनामध्ये खूप खुशी राहायला पाहिजे. यापूर्वी यात्रेला जात होते तर, मनामध्ये काय येत होते. आता घरदार सोडून येथे आले आहात, तर कोणते विचार येतात. आम्ही बापदादाच्या जवळ जातो. बाबांनी हे पण समजले आहे, मला फक्त शिव बाबा म्हणतात, ज्यांच्या मध्ये प्रवेश केला आहे, ते ब्रह्मा आहेत. वंशावळ असते ना. प्रथम ब्राह्मणांची वंशावळ आहे, परत देवतांची वंशावळ सुरू होते. आता दूरदेशी बाबा मुलांना दूरांदेशी बनवतात. तुम्ही जाणतात आत्मा कसे सर्व चक्रा मध्ये वेगवेगळ्या वर्णांमध्ये आली आहे. याचे ज्ञान दूरदेशी बाबा देतात. तुम्ही विचार कराल आता आम्ही ब्राह्मण वर्णाचे आहोत. यापूर्वी हे ज्ञान नव्हते, तर शूद्र वर्णा चे होतो. आमचे सर्वात मोठे पिता आहेत. मोठे शुद्र, मोठे वैश्य, मोठे क्षत्रिय . . यापुर्वी मोठे ब्राह्मण होते. आता या गोष्टी शिवाय बाबाच्या कोणी समजावू शकत नाहीत, यालाच दूरांदेशी ज्ञान म्हटले जाते. दूरदेशा मध्ये राहणारे बाबा, येऊन दूरदेशाचे सर्व ज्ञान मुलांना देतात. तुम्ही जाणतात, आपले बाबा, दूरदेश मधून येथे येतात. हा परक्याचा देश आणि परक्याचे राज्य आहे, त्यांना स्वतःचे शरीर नाही आणि ते ज्ञानाचे सागर आहेत. स्वर्गाचे राज्य पण तेच देतात. कृष्ण थोडेच देतील. शिवबाबाच देतील. कृष्णाला तर बाबा म्हणू शकत नाहीत. बाबा राज्य देतात, बाबा पासूनच वारसा मिळतो. आता हद्दचा सर्व वारसा पूर्ण होतो. सतयुगा मध्ये तुम्हाला हे माहित नाही की, आम्ही या संगमयुगा मध्ये २१ जन्माचा वारसा घेतला होता. हे पण तुम्हीच जाणतात, आम्ही २१ जन्मा चा वारसा अर्ध्या कल्पासाठी वारसा घेत आहोत. २१ पिढी म्हणजे पूर्ण आयुष्य. जेव्हा हे शरीर वृध्द होइल, तेव्हा वेळेवर शरीर सोडू. जसे साप जुने शरीर सोडून नवीन घेतात. आम्ही ही भूमिका वठवत वठवत, शरीर जुने झाले आहे. तुम्ही खरे खरे ब्राह्मण आहात, तुम्हालाच भ्रमरी म्हटले जाते. तुम्ही विकारी किड्यांना आपल्यासारखे पवित्र ब्राह्मण बनवतात. तुम्हाला म्हटले जाते, विकारी किड्यांना घेऊन या आणि बसून त्यांना भू-भू करून ज्ञान द्या. भ्रमरी पण भू-भू करते परत कोणाला तर पंख पण येतात, कोणी मरतात पण. ते सर्व उदाहरण आत्ताचे आहेत. तुम्ही लाडके मुल आहात, मुलांना डोळ्यातील तारे म्हटले जाते. बाबा म्हणतात, तुम्ही माझ्या डोळ्यातील तारे आहात. तुम्हाला आपले बनवले आहे, तर तुम्ही माझे झाले ना. अशा बाबांची जितकी आठवण केली तर पाप नष्ट होतील. दुसऱ्या कोणाची आठवण केल्यामुळे पाप नष्ट होणार नाहीत. अच्छा.

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) जिवंतपणी देह अभिमान नष्ट करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. या जुन्या चप्पल मध्ये, म्हणजे शरीरांमध्ये जरा पण ममत्व राहायला नको.

(२) खरे ब्राह्मण बनून, कीड्यांना ज्ञानाची भू-भू करून त्यांना पण आपल्यासारखे ब्राह्मण बनवायचे आहे.

वरदान:-
निराशवादी मध्ये पण आशा उत्पन्न करणारे खरे परोपकारी संतुष्ट मणी भव.

त्रिकालदर्शी बनून प्रत्येक आत्म्याची कमजोरीला पाहत, त्यांच्या कमजोरी ला स्वतःमध्ये धारण करण्याच्या ऐवजी किंवा वर्णन करण्याच्या ऐवजी, कमजोरी रूपी काट्यांना कल्याणकारी स्वरूपा द्वारे नष्ट करणे, काट्याला फुल बनवणे, स्वतः पण संतुष्ट मनी सारखे संतुष्ट राहणे आणि सर्वांना संतुष्ट करणे, ज्याच्यासाठी सर्व निराशा दाखवतील, अशा व्यक्ती किंवा स्थितीमध्ये नेहमीसाठी आशाचे दीपक जागृत करणे, म्हणजेदिलशिकस्त शक्तिवान बनवणे. असे श्रेष्ठ कर्तव्य चालत राहिले तर, परोपकारी संतुष्टमणी चे वरदान प्राप्त होईल.

बोधवाक्य:-
परीक्षेच्या वेळेस प्रतिज्ञे ची आठवण यावी, तेव्हा प्रत्यक्षता होईल.