09-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, नेहमी खुशीमध्ये रहा की, आम्हाला कोणी देहधारी शिकवत नाही, अशरीरी बाबा
शरीरामध्ये प्रवेश करून, खास आम्हाला शिकवण्यासाठी आले आहेत"
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
ज्ञानाचा तिसरा नेत्र का मिळाला आहे?
उत्तर:-
आम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र शांतीधाम आणि सुखधामला पाहण्यासाठी मिळाला आहे. या
नेत्रा द्वारे जी जुनी दुनिया, मित्र, नातेवाइक इत्यादी दिसून येतात, त्यांच्या
मधून बुद्धी काढून टाकायची आहे. बाबा कचऱ्या मधून काढून फुलासारखे म्हणजे देवता
सारखे बनवण्यासाठी आले आहेत, म्हणुन अशा पित्याचा आदर करायचा आहे.
ओम शांती।
शिव भगवानुवाच मुलां प्रती. शिव भगवंताला खरे बाबा तर जरूर म्हणणार, कारण रचनाकार
आहेत ना. आता तुम्ही मुलंच आहात, ज्यांना भगवान भगवती बनण्यासाठी शिकवत आहेत. हे तर
प्रत्येक जण चांगल्या रीतीने जाणतात, असे कोणी विद्यार्थी असत नाहीत, जे आपले
शिक्षक, अभ्यास आणि त्याच्या परिणामा ला जाणत नाहीत. ज्यांना भगवान शिकवत आहेत, तर
त्यांना खूप खुशी व्हायला पाहिजे. ही खुशी कायमस्वरूपी का राहत नाही?तुम्ही जाणतात,
आम्हाला कोणते देहधारी मनुष्य शिकवत नाहीत. अशरीरी बाबा शरीरां मध्ये प्रवेश करून
खास तुम्हा मुलांना शिकवण्यासाठी आले आहेत. हे कोणालाही माहीत नाही की, भगवान स्वतः
शिकवत आहेत. तुम्ही जाणतात, आम्ही भगवंताची मुल आहोत, ते आम्हाला शिकवतात, तेच
ज्ञानाचे सागर आहेत. शिवबाबां च्या सन्मुख तुम्ही बसले आहात. आत्मे आणि परमात्मा
आत्ताच भेटतात, हे विसरू नका परंतु माया अशी आहे, जे विसरायला लावते, नाही तर तो नशा
राहायला पाहिजे ना. भगवान आम्हाला शिकवतात, त्यांची आठवण करत राहायला पाहिजे परंतु
इथे तर बिलकुलच विसरतात. काहीच जाणत नाहीत. भगवान स्वतः म्हणतात अनेक मुलं हे
विसरतात, नाहीतर ती खुशी राहायला पाहिजे ना. आम्ही भगवंताची मुलं आहोत, ते आम्हाला
शिकवत आहेत. माया खुप प्रबल आहे, जे बिलकुलच विसरायला लावते. या डोळ्याने जी जुनी
दुनिया, मित्र, नातेवाईक इत्यादी पाहतात, तिकडे बुद्धी चालली जाते. आता तुम्हा
मुलांना, बाबांनी तिसरा नेत्र दिला आहे. तुम्ही शांतीधाम सुखधाम ची आठवण करा. ही
दुनिया दु:खधाम छी छी आहे. हे तुम्ही जाणता, भारत स्वर्ग होता, आता नर्क आहे. बाबा
परत तुम्हाला फुलासारखे बनवतात. स्वर्गामध्ये तुम्हाला २१जन्म सुख मिळते. यासाठी
तुम्ही हे ज्ञान घेत आहात परंतु चांगल्या प्रकारे शिकत नाहीत, कारण येथील धन-दौलत
इत्यादीमध्ये बुद्धी अटकते. त्या मधून बुद्धी निघत नाही. बाबा म्हणतात शांतीधाम
सुखधाम कडे बुद्धी ठेवा परंतु बुद्धी खराब दुनिया कडे एकदम चिटकली आहे, जी निघत नाही.
जरी येथे बसले आहेत, तरी जुन्या विकारी दुनिया पासून बुद्धी निघत नाही. आता बाबा आले
आहेत, मुलांना सुंदर पवित्र बनवण्यासाठी. तुम्ही मुख्य पवित्रते साठी सांगतात, बाबा
आम्हाला पवित्र बनवून पवित्र दुनियेमध्ये घेऊन जावा. तर अशा बाबांचा खूप खूप आदर
करायला पाहिजे. अशा बाबां वरती तर कुर्बान जायला पाहिजे. जे परमधाम वरून येऊन आम्हा
मुलांना शिकवत आहेत. मुलावर खूप कष्ट घेतात, एकदम कचऱ्यातून काढतात आणि तुम्हाला
फुलासारखे बनवतात. तुम्ही जाणता कल्प कल्प आम्ही असे फुलासारखे देवता बनतो. मनुष्या
पासून देवता बनण्यासाठी वेळ लागत नाही. आता आम्हाला बाबा शिकवत आहेत. आम्ही येथे
मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी आलो आहोत. हे आत्ता माहीती पडले आहे, प्रथम हे
माहिती नव्हते की, आम्ही स्वर्गवासी होतो. आता बाबांनी सांगितले आहे, तुम्ही राज्य
करत होते, परत रावणाने राज्य हिरावून घेतले. तुम्हीच खूप सुख पाहिले आहे, परत 84
जन्म घेत शिडी उतरत आले. ही खूपच खराब दुनिया आहे, अनेक मनुष्य दुखी आहेत. अनेक
भुकेने व्याकूळ होऊन मरतात. काही सुख नाही, जरी कितीही धनवान आहेत, तरीही हे
अल्पकाळ चे सुख काग विष्ठा समान आहे, याला म्हटले जाते विषय वैतरणी नदी.
स्वर्गामध्ये तर आम्ही खूप सुखी होतो. आता तुम्ही सावळ्या पासुन गोरे बनत आहोत. आता
तुम्ही समजता, आम्हीच देवता होतो, परत पुनर्जन्म घेत घेत वेश्यालय मध्ये येऊन पडलो
आहोत. आता परत तुम्हाला शिवालय मध्ये घेऊन जातात. शिवबाबा स्वर्गाची स्थापना करत
आहेत. तुम्हाला हे ज्ञान देत आहेत, तर चांगल्या रीतीने शिकायला पाहिजे ना. हे ज्ञान
घेत, चक्र बुद्धीमध्ये ठेवून, दैवी गुणांची धारणा करायला पाहिजे. तुम्ही मुलं रूप
बसंत आहात, तुमच्या मुखाद्वारे नेहमी रत्न निघायाला पाहिजेत, कचरा नाही. बाबा
म्हणतात, मी पण रूप बसंत आहे. . . मी परमात्मा ज्ञानाचा सागर आहे. शिक्षणच कमाईचे
साधन असते. मनुष्य शिकून जेव्हा वकील डॉक्टर इत्यादी बनतात, तर लाख रुपये कमावतात.
एकेक डॉक्टर महिन्यां मध्ये लाख रुपये कमावतात, जेवण करण्या साठी पण वेळ नसतो.
तुम्ही आता हे ज्ञान घेतात, तुम्ही तर विश्वाचे मालक बनतात. तर या ज्ञानाचा खूप नशा
राहायला पाहिजे ना. तुम्हा मुलांमध्ये ज्ञान देण्यासाठी पण खूप श्रेष्ठत्व पाहिजे,
तुम्ही श्रेष्ठ बनतात ना. राजांची चलन पहा कसे असते. बाबा तर अनुभवी आहेत ना.
राजांना काही भेट द्यायची असेल तर, ते कधी भेट हातामध्ये घेत नाहीत. जर घ्यायची
असेल तर, त्यांच्या सचिवाला इशारा करतील. ते खूप श्रेष्ठ असतात. त्यांच्या
बुद्धीमध्ये विचार राहतात की, जर यांच्याकडून आपण घेत आहोत तर, त्यांना द्यायचे पण
आहे, नाहीतर घेणार नाहीत. काही राजा तर प्रजा प्रजा कडून काहीच घेत नाहीत. काहीजण
तर खूप लुटत राहतात, राजां मध्ये पण फरक असतो ना. आता तुम्ही सतयुगी डबल मुकुटधारी
राजा बनत आहात. दुहेरी मुकुटासाठी पवित्रता जरूर पाहिजे. या विकारी दुनियेला तर
सोडायचे आहे. मुलांनी विकारांना सोडले आहे, येथे म्हणजे मधुबनला विकारी कोणीही बसू
शकत नाही. जर न सांगता बसले तर, आपलेच नुकसान करतात. काहीजण तर हुशारी करतात. कोणाला
माहिती थोडेच होईल, जरी बाबांनी पाहिले नाही, तरी स्वतःच पाप आत्मा बनतात. तुम्हीपण
पाप आत्मा होते, आता पुरुषार्था द्वारे पुण्यात्मा बनायचे आहे. तुम्हा मुलांना खूप
ज्ञान मिळाले आहे. या ज्ञानाद्वारे तुम्ही कृष्णपुरी चे मालक बनतात. बाबा खूप
चांगल्या रीतीने दिव्य गुणांचा श्रुंगार करत आहेत. स्वयंम भगवान शिकवत आहेत, तर खूप
खूश व्हायला पाहिजे. असे शिक्षण तर कोणी सौभाग्यशाली च घेतात आणि परत प्रमाणपत्र पण
घ्यायचे आहे. बाबा म्हणतील तुम्ही कसे शिकत आहात, बुद्धी भटकत राहते, तर काय बनाल?
लौकिक पिता पण म्हणतात, या हालत मध्ये तुम्ही नापास व्हाल. काही जण तर शिकून लाख
रुपये कमावतात, काही तरी धक्के खात राहतात. तुम्हाला मात-पित्याचे अनुकरण करायचे आहे
आणि जे भाऊ चांगल्या रीतीने शिकतात, हाच धंदा करतात. प्रदर्शनी मध्ये अनेकांना
ज्ञान देतात. पुढे चालून, जितके दुःख होईल, तेवढे मनुष्याला वैराग येईल, परत हे
ज्ञान घ्यायला सुरुवात करतील. दुःखामध्ये भगवंताची खूप आठवण करतात. दुःखा मध्ये,
मृत्यूच्या वेळेत, हे राम, हे भगवान करत राहतात ना. तुम्हाला तर काहीच करायचे नाही.
तुम्ही तर खुशीने तयारी करत राहतात. कधी हे जुने शरीर सुटून, आम्ही आपल्या घरी जाऊ,
परत सतयुगा मध्ये सुंदर शरीर मिळेल. पुरुर्षार्थ करून शिकवणाऱ्या पेक्षा श्रेष्ठ
बनायला पाहिजे. असे पण शिकवणाऱ्या पेक्षा शिकणाऱ्या ची अवस्था खूप चांगली राहते.
बाबा तर प्रत्येकाला जाणतात ना. तुम्ही मुलं पण जाणू शकतात, स्वतःला चांगल्या
प्रकारे तपासले पाहिजे, माझ्या मध्ये कोणती कमी आहे?मायैच्या विघ्नांना दूर करायचे
आहे, त्याच्या मध्ये फसायचे नाही.
जे म्हणतात माया तर खुप जबरदस्त आहे, आम्ही कसे चालू शकतो, जर असा विचार केला तर,
माया एकदम कच्ची खाऊन टाकील. मगरीने हत्तीला खाल्ले हे आत्ताचे उदाहरण आहे. चांगल्या
चांगल्या मुलांना, मायारूपी मगर एकदम हप करते. स्वता:ला सोडवू शकत नाहीत. स्वतः पण
समजतात, आम्ही मायेच्या चापट पासून सुटू इच्छितो, परंतु माया सुटू देत नाही. मुलं
म्हणतात, बाबा मायेला सांगा, तिने आम्हाला पकडू नये. अरे हे तर युद्धाचे मैदान आहे
ना. मैदानामध्ये असे थोडेच म्हणणार की, आम्हाला तुम्ही हात लावू नका. क्रिकेटच्या
खेळा मध्ये असे थोडेच म्हणतात, आम्हाला बॉलिंग करू नका. ते लगेच म्हणतात, युद्धाच्या
मैदान मध्ये आले आहात तर, लढाई करा, तर माया खूप त्रास देईल. तुम्ही खूप श्रेष्ठ पद
मिळू शकता. भगवान शिकवत आहेत कमी गोष्ट आहे काय?आत्ता तुमची, चढती कला क्रमानुसार,
पुरुषार्था प्रमाणे होत आहे. प्रत्येक मुलांना आवड असते की, आपले भविष्य जीवन,
हिऱ्या सारखे बनवावे. विघ्नांना नष्ट करत जायचे आहे. कसेही करून बाबा पासून वारसा
जरूर घ्यायचा आहे, नाहीतर आम्ही कल्प कल्प नापास होऊ. समजा कोणी सावकाराचा मुलगा आहे,
लौकिक पिता त्यांना ज्ञान घेण्यात अडथळा करतात, तर म्हणतील आम्ही हे लाख रुपये पण
काय करणार?आम्हाला तर बेहदच्या पित्या पासून विश्वाची बादशाही घ्यायची आहे. हे लाख
करोड तर सर्व नष्ट होणार आहेत. कोणाची जमिनी मध्ये पडून राहील, कोणाची आग जाळून
टाकील, साऱ्या सृष्टी रुपी भंबोरला आग लागणार आहे. रावणाची लंका आहे. तुम्ही सर्व
सीता आहात. राम आले आहेत. सारी धरती एक बेट आहे. या वेळेत रावण राज्य आहे. बाबा
येऊन रावण राज्याला खलास करून, तुम्हाला राम राज्याचे मालक बनवतात. तुम्हाला तर
मनामध्ये खूप खुशी व्हायला पाहिजे, गायन पण आहे, अतिइंद्रिय सुख विचारायचे असेल, तर
मुलांना विचारा. तुम्ही प्रदर्शनीमध्ये आपल्या सुखाचे वर्णन करतात ना. आम्ही भारताला
स्वर्ग बनवत आहोत. श्रीमतावरती भारताची सेवा करत आहोत. जितके श्रीमतावर चालाल,
तेवढेच तुम्ही श्रेष्ठ बनाल. तुम्हाला मत देणारे अनेक भेटतील म्हणून त्यांच्या
पासुन स्वतःला सांभाळायचे आहे. कुठे कुठे माया पण गुप्त रितीने प्रवेश करते. तुम्ही
विश्वाचे मालक बनतात, तर मनामध्ये खूप खुशी राहायला पाहिजे. तुम्ही म्हणतात बाबा,
आम्ही आपल्या द्वारे स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत. सत्यनारायणाची कथा ऐकून
आम्ही नरापासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनू. तुम्ही सर्व हात उठवतात की, बाबा
आम्ही आपल्याकडून पूर्ण वारसा घेऊनच सोडू, नाहीतर आम्ही कल्फ-कल्प वारसा गमावू.
कोणतेही विघ्न असेल, त्याला दूर करायचे आहे. इतकी बहादुरी पाहिजे. तुम्ही एवढी
बहादुरी केली आहे ना. ज्यांच्या कडून वारसा मिळतो, त्यांना थोडेच सोडायचे असते. कोणी
तर चांगल्या रीतीने ज्ञान घेतात, काही जण तर भागंती झाले आहेत. चांगल्या चांगल्या
मुलांना मायेनी खाल्ले आहे. माया रूपी अजगरानी खाऊन हप केले आहे.
आता बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, खूप प्रेमाने समजावत राहतात. मी पतित दुनिये मध्ये
येऊन पावन बनवतो. आता पतित दुनियेचा मृत्यू समोर आहे. आता मी तुम्हाला राजांचे राजा
बनवतो. पतित राजांचा पण राजा. एकेरी ताज वाले राजा, दुहेरी ताज असणाऱ्या राजांपुढे
माथा टेकवतात. अर्ध्या कल्पा नंतर जेव्हा, यांची पवित्रता नष्ट होते, तेव्हा रावण
राज्यां मध्ये सर्व विकारी आणि पुजारी बनतात. तर आत्ता बाबा मुलांना समजवतात,
कोणतीच गफलत करू नका, विसरू नका. चांगल्या रीतीने ज्ञान घेत रहा. रोज मुरलीच्या
वर्गा मध्ये उपस्थित राहू शकत नाहीत, तरीही बाबा सर्व प्रबंध करू शकतात. सात रोजचा
पाठ्यक्रम करा, ज्याद्वारे मुरलीला सहज समजू शकाल. कुठे पण जावा फक्त दोन अक्षराची
आठवण करा. हा महामंत्र आहे, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. कोणतेही विकर्म
किंवा पाप कर्म, देहाभिमान आल्यामुळेच होतात. विकर्मा पासून वाचण्यासाठी बुद्धीची
प्रित एक बाबांशी लावायची आहे. कोणत्या देहधारी शी नाही. एका बरोबर बुद्धीचा योग
लावायचा आहे. अंत काळापर्यंत आठवण करायची आहे, परत कोणतेच विकर्म होणार नाहीत. हे
तर सडलेले शरीर आहे याचा अभिमान सोडायचा आहे. नाटक पूर्ण होत आहे. आता आमचे ८४ जन्म
पूर्ण झाले. ही जुनी आत्मा, जुने शरीर आहे. आता तमोप्रधान पासून
सतोप्रधान बनवायचे आहे, परत शरीर पण सतोप्रधान मिळेल. आत्म्याला सतोप्रधान बनायचे
आहे, हीच धून लागून राहावी. बाबा फक्त म्हणतात माझीच आठवण करा. बस हीच काळजी करा.
तुम्ही पण म्हणता ना, बाबा आम्ही पास होऊन दाखवू. सर्वांना स्कॉलरशिप तर मिळत नाही,
हे पण तुम्ही जाणता, तरीही पुरुषार्थ खूप करतात ना. तुम्ही पण समजता, आम्हाला
नरापासून नारायण बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. कमी का करायचा?कोणत्या
गोष्टीची काळजी नाही. योध्दे कधी काळजी करत नाहीत. काही जण म्हणतात, बाबा खूप मायेचे
वादळ येतात, विकारी स्वप्नही येतात, हे तर सर्व होईल. तुम्ही एक बाबांची आठवण करत
रहा. या दुष्मनाला जिंकायचे आहे. कधीकधी असे स्वप्न येतात, जे मनामध्ये नव्हते, न
चित मध्ये होते, असे संभ्रमित करतील. ही सर्व माया आहे. आम्ही मायेला आता जिंकत
आहोत, अर्ध्या कल्पासाठी दुश्मना कडून राज्य घेतो. आम्हाला कोणतीच काळजी नाही.
बहादूर कधीच चू-चा करत नाहीत. लढाईमध्ये खुशीने जातात. तुम्ही तरी येथे खूप आरामशीर
बसून बाबा कडून वारसा घेतात. हे छी-छी शरीर सोडायचे आहे. आता तुम्ही शांतीधाम मध्ये
गोड घरी जात आहात. बाबा म्हणतात, मी तुम्हाला घेण्यासाठी आलो आहे, माझी आठवण करा तर,
पावन बनाल. अपवित्र आत्मा जाऊ शकत नाही. या सर्व नवीन गोष्टी आहेत. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) विकर्मा
पासून वाचण्यासाठी, बुद्धीचे प्रेम एक बाबांशी लावायचे आहे. या सडलेल्या देहाचा
अभिमान सोडायचा आहे.
(२) आम्ही योध्दे
आहोत, या स्मुर्ती द्वारे मायारूपी दुष्मना वरती विजय मिळवायचा आहे. तीची काळजी
करायची नाही. माया गुप्त रूपामध्ये प्रवेश करते, म्हणून तिला पारखायचे आणि स्वतःची
संभाळ करायची आहे.
वरदान:-
ज्ञान कलश
धारण करून तहानलेल्या ची तहान दूर करणारे अमृत कलशधारी भव.
जास्तीत जास्त म्हणजे
अधिकांश आत्मे प्रकृतीच्या अल्प काळाच्या साधनाद्वारे आत्मिक शक्ती प्राप्त
करण्यासाठी बनलेल्या अल्पज्ञ स्थाना द्वारे परमात्मा मिलन साजरे करणाऱ्या ठेकेदारा
कडून थकले आहेत, निराश झाले आहेत, असे समजतात सत्य दुसरेच आहे, प्राप्तीचे तहानलेले
आहेत. अशा तहानलेल्या आत्म्यांना, आत्मिक परिचय, परमात्म परीचयाचा यथार्त ज्ञानाचे
थेंब देऊन तृप्त आत्मा बनवा, ज्ञान कलष धारण करून तहानलेल्या आत्म्याची तहान भागवा.
अमृतकलश नेहमी सोबत असावा. अमर बना आणि अमर बनवा.
बोधवाक्य:-
सांभाळून
घेण्याच्या कलेला लक्ष बनवा, तर सहज संपूर्ण बनाल.