12-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, आता तुम्ही ईश्वरीय संपन्न बनत आहात, तुमच्यामध्ये कोणतेही आसुरी गुण
असायला नको, आपली प्रगती करायची असेल तर, बेपरवाई करू नका"
प्रश्न:-
तुम्हा
संगमयुगी ब्राह्मण मुलांना कोणता निश्चय आणि नशा आहे?
उत्तर:-
तुम्हा मुलांना निश्चय आणि नशा आहे की, आम्ही आता ईश्वरीय संतान आहोत. आम्ही
स्वर्गवासी विश्वाचे मालक बनत आहोत. संगम युगामध्ये आम्ही परिवर्तित होत आहोत. आसुरी
संतान पासून ईश्वरीय संतान बनून, २१ जन्मासाठी स्वर्गवासी बनत आहोत, त्यापेक्षा भारी
वस्तू कोणती असू शकत नाही.
ओम शांती।
बाबा मुलांना समजवतात, सहसा मनुष्य शांती पसंद करतात. घरा मध्ये जर मुलांमध्ये
खिटपीट आहे, तर अशांती होते. अशांती मुळे दुःख होते. शांती मुळे सुख मिळते. येथे
तुम्ही मुलं बसले आहात, तुम्हाला खरोखर शांती आहे. तुम्हाला म्हटले आहे की, पित्याची
आठवण करा. स्वतःला आत्मा समजा. आत्म्या मध्ये जी अशांती आहे ती, शांतीच्या सागराची
आठवण करुन नष्ट करायची आहे. तुम्हाला शांतीचा वारसा मिळत आहे. हे पण तुम्ही जाणतात,
शांतीची दुनिया आणि अशांतीची दुनिया बिलकुल वेगळी आहे. आसुरी दुनिया, ईश्वरीय दुनिया,
आणि सतयुग-कलियुग कशाला म्हटले जाते, हे कोणीही मनुष्य मात्र जाणत नाहीत. तुम्ही
म्हणाल, आम्ही पण जाणत नव्हतो, जरी कितीही मोठे असले तरीही. ज्यांच्याजवळ पैसे आहेत
त्यांना मोठे म्हटले जाते. गरीब आणि सावकार पण समजू शकतात. तसे तुम्ही पण समजू शकता,
बरोबर ईश्वरीय संतान आणि आसुरी संतान आहेत. आता तुम्ही गोड मुलं समजता आम्ही ईश्वरी
संतान आहोत. हा पक्का निश्चय आहे ना. तुम्ही ब्राह्मण समजता, आम्ही ईश्वरीय
संप्रदाय, स्वर्गवासी विश्वाचे मालक बनत आहोत. तर प्रत्येक क्षणी खुशी राहायला
पाहिजे. खूप थोडे आहेत, जे अर्थ सहित समजतात. सतयुगा मध्ये ईश्वरीय संप्रदाय आहेत.
कलियुगा मध्ये आसुरी संप्रदाय आहेत. पुरुषोत्तम संगम युगामध्ये आसुरी संप्रदाय
परिवर्तन होतात. आता आम्ही ईश्वरीय संतान बनलो आहोत. मध्य युगात विसरलो होतो. आता
परत यावेळेत जाणले आहे की, आम्ही शिवबाबाचे संतान आहोत. सतयुगा मध्ये कोणीही,
स्वतःला ईश्वरीय संतान म्हणत नाही. तेथे दैवी संतान आहेत. आत्ता परत या वेळेत जाणले
आहे, आम्ही शिवबाबाचे संतान आहोत. यापूर्वी आम्ही आसुरी संतान होतो. आत्ता ईश्वरीय
संतान बनलो आहोत. आम्ही ब्राह्मण ब्रह्माकुमार कुमारी आहोत आणि एक पित्याची रचना
आहोत. तुम्ही सर्व भाऊ-बहीण आहात आणि ईश्वर संतान आहात. तुम्ही जाणतात बाबा पासून
राज्य मिळत आहे. भविष्यामध्ये जाऊन आम्ही दैवी स्वराज्य प्राप्त करू आणि सुखी होऊ.
बरोबर सतयुग सुखधाम आहे आणि कलियुग दुखधाम आहे. हे फक्त तुम्ही संगमयुगी ब्राह्मणच
जाणतात. आत्माच ईश्वरीय संतान आहे. हे पण जाणतात, बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत,
ते रचनाकार आहेत ना. नरकाचे रचनाकार तर नाहीत ना, त्यांची कोण आठवण करेल?तुम्ही गोड
गोड मुलं जाणतात, बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत, हे आपले खूप गोड पिता आहेत.
आम्हाला २१जन्मासाठी स्वर्गवासी बनवतात, यापेक्षा भारी वस्तू कोणती असत नाही. ही
समज असायला पाहिजे. आम्ही ईश्वरीय संतान आहोत तर, आमच्यामध्ये कोणतेही असुरी अवगुण
आसायला नकोत. आपली प्रगती करायचे आहे, बाकी थोडावेळ आहे, त्यामध्ये बेपर्वा बनायचे
नाही, विसरून जाऊ नका. तुम्ही पाहता बाबा सन्मुख आहेत, ज्यांची आम्ही ईश्वर संतान
आहोत. ईश्वर पित्यापासून शिकत आहोत, दैवी संतान बनण्यासाठी, तर खूप खुशी राहायला
पाहिजे. बाबा फक्त म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. बाबा आले आहेत,
सर्वांना घेऊन जाण्यासाठी. जितकी आठवण कराल, तेवढे विकर्म विनाश होतील. अज्ञाना
मध्ये जसे कन्याचा साखरपुडा होतो, तर आठवण पक्की होते, मुलगा झाला तर आणखी आठवण
पक्की होत जाते. आठवण तर स्वर्गामध्ये पण पक्की होते, नरकामध्ये पण पक्की होते.
मुलगा म्हणेल हे माझे पिता आहेत. आता हे तर बेहद्द चे पिता आहेत, ज्याद्वारे
स्वर्गाचा वारसा मिळतो, तर त्यांची आठवण पक्की राहायला पाहिजे. बाबा पासून आम्ही
भविष्य २१ जन्माचा परत वारसा घेत आहोत, बुद्धीमध्ये आठवण येत आहे. हे पण जाणतात,
सर्वांना मरायचे आहेच, एक पण राहणार नाही. जे पण सर्वात प्रिय आहेत, ते पण चालले
जातील. हे फक्त तुम्ही ब्राह्मण जाणता, हे जुनी दुनिया नष्ट झाली की, झाली, त्या
अगोदर पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. ईश्वरीय संतान आहोत, तर खूप खुशी असायला हवी.
बाबा म्हणतात मुलांना आपले जीवन हिऱ्या सारखे बनवा. ती दैवी दुनिया आहे, ही आसुरी
दुनिया आहे. सतयुगा मध्ये खूप सुख राहते. ते बाबाच देतात. येथे तुम्ही बाबांच्या
जवळ येता. येथे कायम स्वरूपी राहणार तर नाहीत. तसे तर सर्व एकत्र राहू पण शकत नाहीत,
कारण अनेक मुलं आहेत. येथे तुम्ही खूप उत्साहा ने येता. आम्ही जातो बेहद्द
पित्याच्या जवळ. ईश्वरी संतान आहात. ईश्वर पित्याची मुलं आहोत तर, आम्ही
स्वर्गामध्ये राहायला पाहिजे. ईश्वरीय पिता तर स्वर्गाची स्थापना करतात ना. आता
तुमच्या बुद्धीमध्ये साऱ्या विश्वाचा इतिहास भूगोल आहे. तुम्ही जाणता, स्वर्गीय पिता
आम्हाला स्वर्गाच्या लायक बनवत आहेत, कल्पकल्प बनवतात. एक पण मनुष्य नाही, ज्यांना
हे माहित नाही की, आम्ही कलाकार आहोत, अभिनय करत आहोत. ईश्वरीय पित्याची मुलं परत
आम्ही दुःखी का? आपसा मध्ये का भांडतात, आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत. भाऊ भाऊ कसे आपसा
मध्ये लढाई करत राहतात. लढाई करून नष्ट होतील. येथे आम्ही पित्या कडुन वारसा घेत
आहोत. भावा-भावांना कधीच, खाऱ्या पाण्यात सारखे वागायचे नाही. येथे तर पित्या सोबत
पण खाऱ्या पाण्या सारखे राहतात. चांगली चांगली मुलं पण खाऱ्या पाण्या सारखे राहतात.
माया खूपच जबरदस्त आहे. जी चांगली चांगली मुलं आहेत, त्यांची आठवणी तर बाबांना
येतेच. बाबांचे मुलावर खूप प्रेम आहे. बाबांना तर मुलांच्या शिवाय दुसरे कोणीच नाही,
ज्यांची आठवण करतील. तुमच्यासाठी तर खूप आहेत. तुमची बुद्धी इकडे तिकडे जाते. धंद्या
इ. मध्ये बुद्धी जाते. माझ्यासाठी तर कोणताच धंदा नाही. तुम्हा अनेक मुलांचे अनेक
धंदे आहेत. मी आलो आहे, मुलांना स्वर्गाचे वारस बनवण्यासाठी. बेहद्दची संपत्ती फक्त
तुम्हा मुलांची आहे. ईश्वरीय पिता आहेत ना. सर्व आत्मे त्यांची संपत्ती आहे. मायेने
खूप छी छी बनवले आहे. आता बाबा सुंदर बनवत आहेत. बाबा म्हणतात, माझे तर तुम्हीच
आहात. तुमच्याशी माझा मोह पण आहे. मुलं चिठ्ठी लिहित नाही तर, काळजी वाटते. चांगल्या
चांगल्या मुलांची चिठ्ठी येत नाही. चांगल्या चांगल्या मुलांना पण माया एकदम नष्ट
करते. तर जरूर देह अभिमाना मध्ये आहेत. बाबा म्हणतात, आपला समाचार पाठवा. बाबा
विचारतात, मुलांनो तुम्हाला माया त्रास तर देत नाही ना. बहादूर बनून, मायेला जिंकत
आहात ना. तुम्ही युद्धाच्या मैदानामध्ये आहात ना. अशा प्रकारे कर्मेन्द्रियांना वश
करायला पाहिजे, ज्यामुळे चंचलता करणार नाहीत. सतयुगा मध्ये सर्व कर्मेंद्रिया वश
मध्ये राहतात. कर्म इद्रिंयाची चंचलता राहत नाही, न मुखाची, न हाताची, न कानाची,
कोणत्याच प्रकारची चंचलता ची गोष्ट नसते. तेथे कोणती खराब गोष्ट नसते. येथे योग बळा
द्वारे कर्म इद्रिंया वरती विजय मिळवतात. बाबा म्हणतात, कोणतीही वाईट गोष्ट करू नका.
कर्म इद्रिंयाना वश करायचे आहे. चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करायचा आहे, कारण वेळ
खूप कमी आहे. असे गायन पण आहे, फार वेळ गेला, आता थोडाच राहिला आहे. नवीन घर बनते
तर, बुद्धी मध्ये राहते ना, बाकी थोडा वेळ आहे. आता नवीन घर तयार होईल, बाकी आहेत
थोडेच काम राहिले आहे. त्या हद्दच्या गोष्टी आहेत. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे
पण मुलांना समजले आहे की, त्यांचे विज्ञानाचे बळ आहे, तुमचे शांतीचे बळ आहे. त्यांचे
पण बुद्धिबळ आहे, तुमचे पण बुद्धिबळ आहे. विज्ञाना द्वारे खूप संशोधन करत राहतात.
आता तर असे, बाँम्बस बनवत राहतात, म्हणतात की बसल्या बसल्या येथूनच बाँम्बस सोडून
सर्व शहर नष्ट करू, परत सेना, विमाने इत्यादी काहीच कामामध्ये येणार नाहीत. तर ते
विज्ञानाचे बळ आहे, तुमची शांतीची बुद्धी आहे. ते विनाशासाठी निमित्त बनले आहेत.
तुम्ही अविनाशी पद मिळवण्यासाठी निमित्त बनले आहात. हे पण समजण्यासाठी बुद्धी पाहिजे
ना. तुम्ही मुलं समजू शकतात, बाबा खूपच सहज रस्ता दाखवत आहेत. जरी किती पण आहिल्या
कुब्जा आहेत, फक्त दोन अक्षर आठवणीत ठेवा, बाबा आणि वारसा, बाकी सर्व विसरून एक
बाबांची आठवण करायची आहे. बाबा म्हणतात, मी जेव्हा आपल्या घरी परमधाम मध्ये होतो,
तेव्हा तुम्ही भक्तिमार्ग मध्ये पुकारत होते, बाबा तुम्ही या, आम्ही सर्व काही
कुर्बान करू. हे जसे करनीघोर आहेत, करनीघोरला जुने सामान दिले जाते. तुम्ही बाबांना
काय देणार?यांना(ब्रह्मा)तर देत नाहीत ना. यांनीच सर्व काही दिले, हे थोडेच बसून
महल बनवतील. हे सर्व शिवबाबां चे आहे, त्यांच्या मतानुसार करत आहेत, तेच कर्ताकरविता
आहेत, श्रीमत देत राहतात. मुलं म्हणतात, बाबा तुम्ही आमच्यासाठी एकच आहात. तुम्हाला
तर अनेक मुलं आहेत, परत बाबा म्हणतात माझ्यासाठी तुम्ही मुलंच आहेत, तुमच्यासाठी तर
अनेक मित्र संबंधी आहेत. अनेक देहाच्या संबंधाची आठवण राहते. गोड गोड मुलांना बाबा
म्हणतात, जितके शक्य होईल, माझी आठवण करा आणि सर्वांना विसरून जावा, तर स्वर्गाचे
लोणी तुम्हाला मिळेल. जरा विचार करा कसे या खेळाची रचना केली आहे. तुम्ही फक्त
बाबांची आठवण करतात आणि स्वदर्शन चक्रधारी बनल्यामुळे चक्रवर्ती राजा बनतात. आता
तुम्ही मुलं प्रत्यक्षा मध्ये अनुभवी आहात. मनुष्य तर समजतात भक्ती, परंपरा द्वारे
चालत येते. विकार पण परंपरा द्वारे चालत येते. लक्ष्मीनारायण राधे कृष्णा ला पण मुलं
होती ना. अरे होय, मुलं होते परंतु त्यांना संपूर्ण निर्विकारी म्हटले जाते. येथे
संपूर्ण विकारी आहेत, एक दोघांची निंदा करत राहतात. आता तुम्हा मुलांना शिवपिता श्री
श्री कडून श्रीमत मिळत आहे. तुम्हाला श्रेष्ठ बनवतात. जर बाबांचे मानले नाही तर
थोडेच असे श्रेष्ठ बनाल. आता तुम्ही माना किंवा मानू नका. सुपात्र मुलं तर लगेच
मानतील, धारण करतील. पूर्ण मदत करत नाही तर, स्वतःचेच नुकसान करतात. बाबा म्हणतात,
मी कल्प कल्प येतो. किती पुरुषार्थ करुन घेतो, खुशी मध्ये घेऊन येतो. बाबा पासून
पूर्ण वारसा घेण्या मध्येच माया बेपर्वाई करते, परंतु तुम्ही तिच्यामध्ये फसू नका.
मायेशी च लढाई होते. अनेक मोठे मोठे वादळ येतात, त्यामध्ये पण वारस मुलांना माया
जास्त त्रास देते. पैलवान मुलांशी पैलवान होऊन लढते. जसे वैद्य औषध देतात, तर सर्व
रोग बाहेर येतात. येथे पण माझे बनला तर, सर्वांची आठवण यायला लागते. वादळ येतील,
यामध्ये बुद्धीची लाईन स्पष्ट पाहिजे. आम्ही अगोदर पवित्र होतो, परत अर्धा कल्प
अपवित्र बनलो, आता परत पवित्र बनून घरी जायचे आहे. माझी आठवण करा तर, या योगा द्वारे
तुमचे विकर्म विनाश होतील. आठवण कराल तेवढे श्रेष्ठ पद मिळेल. आठवण करत करत तुम्ही
घरी चालले जाल. यामध्ये खूपच आंतरमुखता पाहिजे. ज्ञान पण आत्म्या मध्ये धारणा होते
ना. आत्माच शिकते, आत्म्याचे ज्ञान परमात्मा पिताच येऊन देतात. इतके भारी ज्ञान,
तुम्ही विश्वाचे मालक बनण्यासाठी घेतात. तुम्ही म्हणतात, हे पतित पावन, ज्ञानाचे
सागर शांतीचे सागर, जे माझ्या जवळ आहे, ते सर्व तुम्हाला देतो, बाकी फक्त
दिव्यदृष्टीची चावी देत नाही. त्याच्याऐवजी मी तुम्हाला विश्वाचे मालक बनवतो.
साक्षात्कार मध्ये काहीच नाही, मुख्य योगाचे शिक्षण आहे. या ज्ञान योगामुळे तुम्हाला
२१जन्माचे सुख मिळते. मीराच्या तुलनेमध्ये तुम्ही आपल्या सुखाची तुलना करा. ती तर
कलियुगा मध्ये होती, साक्षात्कार इत्यादी केला, परत काय भक्तीची माळ वेगळी आहे,
ज्ञान मार्गाची माळ वेगळी आहे. रावणाचे राज्य वेगळे, तुमचे राज्य वेगळे आहे. राम
राज्याला दिवस, रावण राज्याला रात्र म्हटले जाते. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आठवणीच्या
बळा द्वारे आपल्या कर्मेंद्रियाला असे वश करायचे आहे, जेणे करून चंचलता करणार नाहीत.
वेळ खूप कमी आहे म्हणून चांगल्या रीतीने पुरुषार्थ करुन मायाजीत बनायचे आहे.
(२)बाबा जे ज्ञान देतात, ते अंतर्मुखी बनून धारण करायचे आहे. कधीच आपसामध्ये खाऱ्या
पाण्या सारखे वागायचे नाही. बाबाला आपला समाचार जरूर द्यायचा आहे.
वरदान:-
प्रत्येक
आत्म्याला भटकण्यापासून किंवा भिकारी पणा पासून वाचवणारे निष्काम दयावान भव.
जे मु्लं दयाळू आहेत,
निष्काम, दयावान आहेत, त्यांच्या दयेच्या संकल्प द्वारे, अन्य आत्म्याला आपल्या
आत्मिक रूपाचे लक्ष सेकंदा मध्ये स्मृती येईल. त्यांच्या दयेच्या संकल्प द्वारे,
भिकाऱ्याला पण सर्व खजान्या ची झलक दिसून येईल. भटकणाऱ्या आत्म्याला मुक्ती किंवा
जीवनमुक्तीचा किनारा किंवा लक्ष समोर दिसून येईल. ते सर्वांचे दुखहर्ता सुखकर्ता ची
भूमिका वठवतील. दुखी ला सुखी करण्याची युक्ती आणि साधन नेहमी त्यांच्याजवळ जादूच्या
चावी सारखे असेल.
बोधवाक्य:-
सेवाधारी बनून
निस्वार्थ सेवा करा , तर सेवेचा मेवा मिळेलच.