18-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा तुम्हाला नवीन दुनियेसाठी राजयोग शिकवत आहेत म्हणून या जुन्या दुनियेचा विनाश जरुर होणार आहे"

प्रश्न:-
मनुष्यांना कोणती एक चांगली सवय लागली आहे परंतु त्याद्वारे पण, प्राप्ती होत नाही?

उत्तर:-
मनुष्यांना भगवंताची आठवण करण्याची सवय लागली आहे. जेव्हा कोणती गोष्ट होते, तर म्हणतात हे भगवान! समोर शिवलिंग येते परंतु ओळख अर्थसहित नसल्यामुळे प्राप्ती होत नाही. असे पण म्हणतात सुख-दुःख सर्व तेच देतात. तुम्ही मुलं आता असे म्हणणार नाहीत.

ओम शांती।
बाबांना रचनाकार म्हटले जाते, कोणाचे रचनाकार?नवी दुनिया चे रचनाकार. नवीन दुनियेला स्वर्ग किंवा सुखधाम म्हटले जाते परंतु समजत नाहीत. कृष्णाच्या मंदिराला पण सुखधाम म्हणतात. ते तर छोटे मंदिर झाले. कृष्ण तर विश्वाचे मालक होते. बेहद्दच्या मालकाला जसे की हद्दचे मालक बनवले आहे. कृष्णाच्या छोट्या मंदिराला सुखधाम म्हणतात. बुद्धीमध्ये हे येत नाही की, ते तर विश्वाचे मालक होते. भारतामध्ये राहणारे होते. तुम्हाला पण पूर्वी काहीच माहिती नव्हते. बाबांना तर सर्व काही माहिती आहे, ते सृष्टीच्या आदी मध्य अंतला जाणत होते. आता तुम्ही मुलं जाणतात. या दुनिये मध्ये हे कोणालाच माहित नाही, की ब्रह्मा विष्णू शंकर कोण आहेत?शिव तर उच्च ते उच्च भगवान आहेत. अच्छा, प्रजापिता ब्रह्मा कोठून आले? आहेत तर मनुष्यच. प्रजापिता ब्रह्मा तर जरूर येथेच पाहिजेत ना, ज्याद्वारे ब्राह्मण बनतील. प्रजापिता म्हणजेच मुखाद्वारे दत्तक घेणारे, तुम्ही मुख वंशावळ आहात. आता तुम्ही जाणतात, कसे ब्रह्माला शिवपित्याने आपले बनवून मुख वंशावळ बनवले आहे. यांच्या मध्ये प्रवेश केला, परत म्हटले की हा माझा मुलगा पण आहे. तुम्ही जाणतात ब्रह्मा नाव कसे पडले?कशी उत्पत्ती झाली, हे दुसरे कोणी जाणत नाहीत. अशीच महिमा गायन करतात की, परमपिता परमात्मा उच्च ते उच्च आहेत परंतु हे कोणाचे बुद्धीमध्ये येत नाही की, उच्च ते उच्च पिता आहेत. आम्हा सर्व आत्म्याचे ते पिता पण आहेत. ते पण बिंदू रुप आहेत. त्यांच्यामध्ये सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान आहे. हे ज्ञान पण तुम्हाला आता मिळत आहे, यापूर्वी जरा पण हे ज्ञान नव्हते. मनुष्य फक्त म्हणत राहतात, ब्रह्मा विष्णू शंकर परंतु जाणत काहीच नाहीत. तर त्यांना समजावून सांगायचे आहे, आता तुम्ही समजदार बनले आहात. तुम्ही जाणतात, बाबा ज्ञानाचे सागर आहेत, जे आम्हाला ज्ञान ऐकतात, आणि शिकवतात. हा राजयोग नवीन दुनिये साठी आहे. तर जरूर जुन्या दुनिये चा विनाश व्हायला पाहिजे. त्यासाठी महाभारत लढाई आहे. अर्ध्या कल्पा पासून तुम्ही भक्ती मार्गातील ग्रंथा चा अभ्यास करत आले. आता तर प्रत्यक्ष ऐकत आहात. बाबा कोणते ग्रंथ ऐकवत नाहीत. जप-तप करणे ग्रंथ इत्यादी वाचणे, हे सर्व भक्तिमार्ग आहे. आता भक्तांना भक्तीचे फळ पाहिजे, कारण भगवंताशी भेटण्यासाठी कष्ट करतात परंतु ज्ञानाद्वारे सद्गती होते. ज्ञान आणि भक्ती दोन्ही एकत्र चालू शकत नाहीत. आत्ता भक्तीचे राज्य आहे. सर्व भक्त आहेत. प्रत्येकाच्या मुखाद्वारे हे ईश्वरीय पिता जरूर निघते. आता तुम्ही मुलं जाणतात की, बाबांनी स्वतःचा परिचय दिला आहे, की मी सूक्ष्म बिंदू रूप आहे, मलाच ज्ञानाचे सागर म्हटले जाते. मज बिंदू मध्ये सर्व ज्ञान आहे. आत्म्यामध्ये च ज्ञान राहते. आता तुम्ही मुलं समजतात की, त्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते. ते सर्वोच्च आत्मा म्हणजेच, सर्वात उच्च ते उच्च, पतित-पावन सर्वोच्च आहेत. मनुष्य हे भगवान म्हणतात, तर शिवलिंगाची आठवण येते, ते पण अर्थ सहित. ती जशी सवय लागली आहे, भगवंताची आठवण करण्याची. असे समजतात भगवानच सुख दुःख देतात. आता तुम्ही मुलं असे म्हणणार नाही. तुम्ही जाणतात, बाबा सुखदाता आहेत. सतयुगा मध्ये सुखधाम होते. तेथे दुःखाचे नाव नव्हते. कलियुगामध्ये तर दुःख च दुःख आहे. तेथे सुखाचे नाव नाही. उच्च ते उच्च भगवान आहेत, ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत, हे कोणालाच माहीत नाही की, ते आत्म्याचे पिता पण आहेत. असे म्हणतात आम्ही सर्व भाऊ आहोत, तर जरूर सर्व एक पित्याची मुलं झाले ना. कोणी परत म्हणतात ते सर्वव्यापी आहेत. तुझ्या मध्ये पण आहेत, माझ्या मध्ये पण आहेत इत्यादी. अरे तुम्ही तर आत्मा आहात, तुमचे शरीर आहे, परत तिसरी गोष्ट कसे होऊ शकते. आत्म्याला परमात्मा थोडच म्हणनार. जीवात्मा म्हटले जाते. जीव परमात्मा म्हटले जात नाही, परत परमात्मा सर्वव्यापी कसे होऊ शकतात. बाबा सर्वव्यापी असते तर, पितृ भाव झाला असता. पित्याला पित्याकडून वारसा कसा मिळेल. पित्या कडुन तर मुलगा वारसा घेतो. सर्व पिता कसे होऊ शकतात?इतकी छोटीशी गोष्ट पण कोणाच्या बुध्दी मध्ये येत नाही. तेव्हा बाबा म्हणतात मुलांनो, मी आज पासून पाच हजार वर्ष पूर्व तुम्हाला खूप समजदार बनवले होते, तुम्ही निरोगी, संपत्तीवान, समजदार होते. यापेक्षा जास्त समजदार कोणी होऊ शकत नाही. तुम्हाला आत्ता जी समज मिळाली आहे, ती परत सतयुगा मध्ये नसेल. ते थोडेच माहिती राहते, की आमची परत अधोगती होईल. तुम्हाला हे माहिती झाले, तर परत सुखाची जाणीव होणार नाही. हे ज्ञान परत नष्ट होते. हे नाटकाचे ज्ञान, आत्ताच तुमच्या बुद्धी मध्ये आहे. ब्राह्मण च अधिकारी राहतात. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आता आम्ही ब्राह्मण वर्णाचे आहोत. ब्राह्मणांनाच बाबा ज्ञान ऐकवतात. ब्राह्मण परत सर्वांना ऐकवतात. असे गायन पण आहे की, भगवंताने येऊन स्वर्गाची स्थापना करण्यासाठी राजयोगाचे ज्ञान दिले होते. कृष्ण जयंती साजरी करतात, ते समजतात, कृष्ण वैकुंठाचे मालक होते परंतु ते विश्वाचे मालक होते, हे बुद्धीमध्ये येत नाही. जेव्हा त्यांचे राज्य होते, तर दुसरा कोणता धर्म नव्हता, त्यांचे सर्व विश्वावरती राज्य होते आणि जमुनाच्या किनाऱ्यावरती होते. आता तुम्हाला कोण समजावत आहे, भगवानुवाच. बाकी जे पण वेदशास्त्र इत्यादी ऐकवतात, ते सर्व भक्ती मार्गाचे आहे. येथे तर स्वतः भगवान तुम्हाला ज्ञान देत आहेत. आता तुम्ही समजता आम्ही पुरुषोत्तम बनत आहोत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही शांतीधाम निवासी आहोत, परत येऊन २१ जन्माचे भाग्य प्राप्त करू.

तुम्हा मुलांना खुशीने गदगद व्हायला पाहिजे की, बेहद्दचे बाबा, शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत, ते ज्ञानाचे सागर आणि सृष्टीच्या आदी मध्य अंतला जाणतात. असे बाबा आमच्यासाठी आले आहेत, तर खुशी मध्ये गदगद व्हायला पाहिजे. मुलं बाबांना म्हणतात, बाबा आम्ही, आपल्याला वारस बनवले आहे. बाबा मुलांवरती कुर्बान जातात, मुलं परत म्हणतात भगवान तुम्ही जेव्हा याल, तेव्हा आम्ही तुमच्या वरती कुर्बान जाऊ, म्हणजे आपला मुलगा बनवू. हे पण आपल्या मुलांनाच वारस बनवतात. बाबांना वारस कसे बनवनार?या पण खूप रहस्ययुक्त गोष्टी आहेत. आपले सर्वकाही सफल करायचे आहे, यामध्ये बुद्धीचे काम आहे. गरीब तर लगेच यज्ञ सेवेत सफल करतात, सावकार मुश्कील करू शकतात, जोपर्यंत पूर्ण प्रकारे ज्ञान घेत नाहीत. इतकी हिंमत राहत नाही, गरीब तर लगेच म्हणतात बाबा, आम्ही तर तुम्हालाच वारस बनवू, आमच्या जवळ आहेच काय?वारस बनवून परत शरीर निर्वाह पण करायचा आहे. फक्त विश्वस्त समजून राहायचे आहे. युक्त्या पण खूप सांगत राहतात. बाबा तर फक्त पाहतात की, कोणत्या पाप कर्मा मध्ये पैसे तर खराब करत नाहीत. मनुष्याला पुण्यात्मा बनवण्यामध्ये पैसे लागतात. सेवा पण कायदेशीर करतात का? हे पूर्ण प्रकारे तपासतील, परत मत देतील. हे पण धंद्यामध्ये ईश्वरार्थ काढत होते ना. ते तर अप्रत्यक्ष होते, आता तर बाबा प्रत्यक्षामध्ये आले आहेत. मनुष्य समजतात, आम्ही जे काही करतो, त्याचे फळ ईश्वर दुसऱ्या जन्मांमध्ये देतात. कोणी गरीब दुःखी आहेत, तर समजतील चांगले कर्म केले आहेत, म्हणून सुखी आहेत. बाबा तुम्हा मुलांना, कर्माच्या गती बाबत समजावतात, रावण राज्यामध्ये तुमचे सर्व कर्म विकर्म होतात. सत्ययुग त्रेता युगा मध्ये रावणच नाही, त्यामुळे तेथे कोणते कर्म विकर्म होत नाहीत. येथे जे चांगले काम करतात, त्यांना अल्पकाळाचे सुख मिळते. तरीही काही ना, काही रोग खिटपीट होत राहते, कारण अल्पकाळाचे सुख आहे. बाबा म्हणतात, हे रावण राज्य नष्ट होणार आहे. राम राज्याची स्थापना शिवबाबा करत आहेत.

तुम्ही जाणता हे चक्र कसे फिरत राहते. भारतच परत गरीब होतो. भारता मध्येच आजपासून पाच हजार वर्ष पूर्व स्वर्ग होता, लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. प्रथम यांची गादी चालत होती. कृष्ण राजकुमारच परत स्वयंवर केल्या वर राजा बनले आणि नारायण नाव ठेवले. हे पण तुम्हीच समजतात, तर आश्चर्य वाटते. बाबा तुम्ही सर्व रचनाकार आणि रचनेचे ज्ञान ऐकवतात, तुम्ही आम्हाला खूप श्रेष्ठ ज्ञान देतात. कुर्बान जाऊ, आम्हाला तर शिवाय एक बाबांच्या दुसऱ्या कोणाची आठवण करायची नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिकायचे आहे, तर जरूर शिक्षकांची आठवण करायला पाहिजे. शाळेमध्ये शिक्षकांची आठवण करतात ना. त्या शाळेमध्ये तर अनेक शिक्षक असतात, प्रत्येक विषयाचे शिक्षक वेगळे असतात. येथे तर एकच शिक्षक आहेत आणि खुपच प्रेमळ आहेत. शिवपिता प्रेमळ, शिक्षक प्रेमळ. . अगोदर भक्तिमार्ग मध्ये तर अंधश्रद्धा मध्ये आठवण करत होते. आता तर प्रत्यक्षात बाबा शिकवत आहेत, तर खूप खुशी व्हायला पाहिजे. तरीही मुलं म्हणतात बाबा, आम्ही विसरतो. माहित नाही, आमची बुद्धी तुमची का आठवण करत नाही. गायन पण आहे ईश्वराची गत मत वेगळी आहे. बाबा तुमची गती आणि सद्गतीची मत खूपच आश्चर्यकारक आहे. अशा बाबांची आठवण करायला पाहिजे. स्त्री आपल्या पतीचे गुण गान करते ना. खूप चांगले आहेत. ही त्यांची संपत्ती आहे. मनामध्ये खुशी राहते ना. हे तर पतींचे पती आणि पित्यांचे पिता आहेत, यांच्याद्वारे आम्हाला खूप सुख मिळते. बाकी इतर सर्वा पासून दुःखच मिळत राहते. होय शिक्षका द्वारे सुख मिळते कारण शिक्षणाद्वारे कमाई होते. हमेशा गुरु वानप्रस्थ अवस्थेमध्ये केला जातो, बाबा पण म्हणतात मी वानप्रस्थ मध्ये आलो आहे. हे पण वानप्रस्थी आणि मी पण वानप्रस्थी आहे. ही सर्व माझी मुलं पण वानप्रस्थी आहेत. बाप, शिक्षक गुरु तिघेही एकत्र आहेत. शिवपिता शिक्षक पण बनतात, परत गुरु बनून सोबत घेऊन जातात. त्या एका पित्याचीच महिमा आहे. या गोष्टी कोणत्या ग्रंथांमध्ये नाहीत. बाबा प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजावतात. या पेक्षा श्रेष्ठ ज्ञान कोणते असत नाही, न जानण्याची आवश्यकता आहे. आम्ही सर्व काही जाणून विश्वाचे मालक बनतो, बाकी काय करणार जास्ती जाणून. मुलांच्या बुद्धीमध्ये हे असेल, तेव्हाच खुशीमध्ये आणि बाबांच्या आठवणी मध्ये राहल. पुण्यात्मा बनण्यासाठी आठवणीमध्ये जरूर राहायला पाहिजे. मायेचा धर्म आहे, तुमचा योग नष्ट करणे. योगा मध्येच मायेचे विघ्न येतात आणि विसरतात. मायेचे विघ्न तर खूप येतात. हे पण अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे. सर्वांच्या पुढे तर हे ब्रह्मा आहेत, तर यांना सर्व अनुभव येतात. माझ्याजवळ अशी परिस्थिती आली तर, मी सर्वांना समजावून सांगेल. हे सर्व मायचे वादळ येतील. बाबांच्या जवळ पण येतात. तुम्हाला पण येतील. मायचे तुफान आलेच नाहीत आणि योग पूर्ण रितीने लागेल, तर कर्मातीत अवस्था बनेल परत आम्ही इथे राहू शकणार नाहीत. कर्मातीत अवस्था झाल्यानंतर परत सर्व चालले जातील. शिवाच्या वरातीचे गायन आहे ना. शिवबाबा येतील तेव्हा तर, आम्ही सर्व आत्मे जाऊ. शिवबाबा येतातच सर्वांना घेऊन जाण्यासाठी. सतयुगामध्ये इतके आत्मे थोडेच असतात. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाबाला आपले वारस बनवून सर्वकाही सेवेत सफल करायचे आहे. वारस बनवून शरीर निर्वाह पण करायचा आहे, विश्वस्त समजून सांभाळ करायचा आहे. पैसे कोणत्याही पाप कार्यामध्ये लावायचे नाहीत.

(२) मनामध्ये गदगद व्हायला पाहिजे की, स्वतः ज्ञानाचे सागर बाबा आम्हाला शिकवत आहेत. पुण्यात्मा बनण्यासाठी आठवणीमध्ये राहायचे आहे. मायेच्या वादळापासून घाबरायचे नाही.

वरदान:-
आत्मिक स्थिती द्वारे व्यर्थ गोष्टीला नष्ट करणारे खुशीच्या खजिन्या द्वारे संपन्न भव. आत्मिक स्थिती द्वारे व्यर्थ गोष्टींच्या साठ्याला समाप्त करा, नाहीतर एक दोघाच्या अवगुणांचे वर्णन करत, रोगा चे किटाणू वातावरणामध्ये पसरत राहाल, याद्वारे वातावरण शक्तिशाली बनत नाही. तुमच्याजवळ अनेक भाव असणारे येतील परंतु तुमच्या कडून शुभ भावनांच्या गोष्टीच घेऊन जावेत. हे तेव्हाच होईल जेव्हा स्वतःच्या जवळ खुशीच्या गोष्टीचा साठा जमा असेल. जर मनामध्ये कोणाच्या प्रती कोणत्या व्यर्थ गोष्टी असतील, तर जिथे व्यर्थ गोष्टी आहेत, तेथे बाबा नाहीत, पाप आहे.

बोधवाक्य:-
स्मृतीचे बटन चालू करा, तर नाराज राहू शकत नाहीत.