01-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत शिकायचे आणि शिकवायचे आहे, खुशी आणि पद
यांचा आधार राजयोगाचे शिक्षण आहे"
प्रश्न:-
सेवेच्या
सफलता साठी कोणता, मुख्य गुण पाहिजे?
उत्तर:-
सहनशीलते चा. प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशील बनून आपसा मध्ये संघटन बनवून सेवा करा.
भाषण इत्यादीचे कार्यक्रम घेऊन या. मनुष्याला अज्ञान निद्रे पासून जागृत करण्यासाठी
अनेक प्रबंध, उपाय निघतील. जे भाग्यवान बनणारी मुलं आहेत, ते हेच शिक्षण आवडीने
घेतील.
गाणे:-
आम्हाला त्या
मार्गावर ती चालायचे आहे…
ओम शांती।
मधुबन मध्ये कोणता विचार करून आले आहात. काय शिक्षण घेण्यासाठी आले आहात? कोणाकडे
आला आहात? (बापदादा कडे ) ही नवीन गोष्ट आहे ना. कधी असे ऐकले की बाप दादांच्या जवळ
शिकण्यासाठी जात आहोत, ते पण बाप आणि दादा दोन्ही एकत्र आहेत. आश्चर्य आहे ना.
तुम्ही अद्भुत पित्याची संतान आहात. तुम्ही मुलं न रचनाकार, न रचनेच्या आधी मध्य
अंत ला जाणत होते. आता त्या रचनाकाराला आणि रचनेला तुम्ही क्रमानुसार पुरुषार्थ
प्रमाणे जाणले आहे. जितके जाणले आहे, जितके दुसऱ्यांना समजवतात तर खुशी आणि भविष्य
पद श्रेष्ठ होईल. मुख्य गोष्ट आहे, आम्ही रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंतला
जाणले आहे. फक्त आम्ही ब्राह्मण-ब्राह्मणी च जाणतो. जोपर्यंत जगायचे आहे, स्वतःला
निश्चय करायचा आहे की, आम्ही ब्रह्मकुमार कुमारी आहोत आणि शिवबाबा द्वारे वारसा घेत
आहोत, तोही सार्या विश्वाचा. पुर्ण रितीने शिकत आहेत किंवा कमी शिकत आहोत, ती गोष्ट
वेगळी आहे. तरीही जाणतात, तरीही जाणत तर आहेत ना. आम्ही त्यांची मुल आहोत, परत
प्रश्न येतो शिकणे किंवा न शिकण्याचा, त्या नुसारच पद मिळते. बाबांच्या गोदी मध्ये
आलो आहोत, तर आम्ही राजाईचे अधिकारी बनू. परत शिक्षणा मध्ये रात्रंदिवसा चा फरक
पडतो. काही तर चांगल्या रीतीने शिकतात आणि शिकवतात, बाकी काही विचार येत नाहीत, बस
शिकायचे आणि शिकवायचे आहे. हे अंत काळापर्यंत चालणार आहे. विद्यार्थी जीवनामध्ये
शेवटपर्यंत शिक्षण घेत नाहीत, त्याचाही कालावधी असतो. तुम्हाला तर जोपर्यंत जगायचे
आहे शिकायचे आणि शिकवायचे आहे. स्वतः ला विचारायचे आहे, बाबा जे रचनाकार आहेत,
त्यांचा परिचय किती जणांना दिला. मनुष्य तर मनुष्यच आहेत. तसे तर दिसण्यामध्ये
काहीच फरक नाही. शरीरामध्ये थोडा फरक दिसून येतो. हे मानस पटला वरती अभ्यास चालत
राहतो. जितके जे शिकतील तेवढीच त्यांना खुशी होईल. मना मध्ये राहते, काय आम्ही नवीन
विश्वाचे मालक बनू?आता आम्ही स्वर्गाच्या द्वारी जात आहोत. आपल्या मनाला नेहमी
विचारत रहा, माझ्या मध्ये किती फरक पडला आहे. बाबांनी आम्हाला आपले बनवले आहे.
आम्ही त्यांच्या द्वारे खूप श्रेष्ठ बनत आहोत. सर्व अभ्यासा वरतीच आधारीत आहे.
मनुष्य शिक्षणाद्वारे खूप उच्च बनतात, तरीही ते अल्प काळाचे क्षणभंगुर पद आहे.
त्यामध्ये काही ठेवले नाही. जसे की काहीच कामाचे नाही. लक्षण काहीच नाहीत. आता या
राजयोगाच्या शिक्षणाद्वारे खूप श्रेष्ठ बनत आहात. सर्व लक्ष अभ्यासा वरती द्यायचे
आहे. ज्यांच्या भाग्य मध्ये आहे, त्यांचे मन अभ्यासा मध्ये लागते. दुसऱ्यां च्या
अभ्यासा साठी पण वेगवेगळ्या रीतीने पुरुषार्थ करत राहायचे आहे. आपली इच्छा होते,
दुसऱ्यांना शिकवून त्यांना पण स्वर्गाचे मालक बनवावे. ही प्रदर्शन इत्यादी तर काहीच
नाही, पुढे चालून समजवण्या साठी अनेक प्रंबध, उपाय निघतील. आता बाबा पावन बनवत
आहेत, तर ज्ञान योगावर पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टींमध्ये सहनशील
पाहिजे. आपसामध्ये भेटून संघटन करून भाषण इत्यादी चे कार्यक्रम ठेवायचे आहेत. एका
अल्लाह वरती म्हणजे ईश्वरा वरती समजून सांगणे खूपच चांगले आहे. उच्च ते उच्च भगवान
कोण आहेत?एक आल्लाह वरती, म्हणजे शिवबाबां वरती, तुम्ही दोन तास भाषण करू शकता. हे
पण तुम्ही जाणता, अल्लाह म्हणजे बाबांची आठवण करण्या मुळेच खुशी राहते. जर मुलांचे
आठवणीच्या यात्रांमध्ये लक्ष कमी आहे, बाबांची आठवण करत नाहीत, तर नुकसानच होईल ना.
सर्व आठवणी वरती आधारित आहे. आठवण केल्यामुळेच तुम्ही स्वर्गामध्ये जाल. बाबांची
आठवण विसरल्या मुळेच विकारांमध्ये जातात. या गोष्टीला दुसरे कोणी समजू शकत नाहीत.
शिवबाबां ना तर जाणत नाहीत. जरी कोणी कितीही भपक्या द्वारे पूजा करतात, आठवण करतात
परंतु समजत नाहीत.
तुम्हाला बाबा पासून खूप मोठी जहागीरी मिळत आहे. भक्ती मार्गामध्ये कृष्णाचा
साक्षात्कार करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. अच्छा दर्शन झाले, परत फायदा तर काहीच
झाला नाही. पहा दुनिया कोणत्या गोष्टी वरती चालत आहे. तुम्ही जसे की उसाचा रस पित
आहात बाकी सर्व त्याचा राहिलेला हिस्सा म्हणजे चिपाडं चघळत आहात. तुम्ही आत्ता रस
पिऊन, पोट पूर्ण भरून, अर्धा कल्प सुख प्राप्त कराल. बाकी सर्व भक्ती मार्गातील
उसाचा चोथा चघळत आहेत. आता बाबा खूप प्रेमाने पुरुषार्थ करवत आहेत परंतु भाग्या
मध्ये नाही, तर लक्ष देत नाहीत. न स्वता: लक्ष देतात, न दुसऱ्यांना लक्ष देऊ देतात,
न स्वता: ज्ञान अमृत पितात, न दुसऱ्यांना पिऊ देतात. अनेक जण असे वागत आहेत.
चांगल्या रीतीने शिकत नाहीत, दयाळू बनत नाहीत, कुणाचे कल्याण करत नाहीत, तर ते काय
पद मिळवतील. शिकणे आणि शिकवणाऱ्यां चे खूप श्रेष्ठ पद होते. शिकत नाहीत तर काय पद
मिळेल? ते पण पुढे चालून माहिती होईल, परत समजतील बरोबर बाबा आम्हाला, खूप इशारा
देत होते. येथे बसले आहात तर बुद्धीमध्ये राहायला पाहिजे, आम्ही बेहद्दच्या बाबा
जवळ बसलो आहोत. आम्हाला परमधाम वरुन येऊन, या शरीरा द्वारे शिकवत आहेत, तेही कल्पा
पूर्वीसारखेच. आता आम्ही परत बाबा च्या समोर बसलो आहोत. त्यांच्या सोबतच आम्हाला
चालायचे आहे, सोडून जायचे नाही. बाबा आम्हाला सोबत घेऊन जातात. ही जुनी दुनिया
विनाश होऊन जाईल. या गोष्टी दुसऱ्या कोणी जाणत नाहीत, पुढे चालून जाणतील, बरोबर ही
जुनी दुनिया नष्ट होत आहे. मिळणार तर काहीच नाही. या गोष्टी दुसऱ्या कोणी जाणत
नाहीत, परत खूप उशीर होईल. आपला कर्मभोग चुक्त करुन म्हणजे, नष्ट करून सर्वांना परत
जायचे आहे. हे पण जे समजदार मुलं आहेत, तेच जाणतात. मुलं तेच आहेत, जे सेवे वरती
उपस्थित आहेत, मात पित्याचे अनुकरण करतात. जसे बाबा आत्मिक सेवा करतात, तशीच
तुम्हाला करायची आहे. काही मुलांना खूप आवड राहते, ज्यांची बाबा महिमा करतात,
त्यांच्या सारखे बनायचे आहे. शिक्षक तर सर्वांना मिळतात. मधुबन मध्ये पण सर्व
येतात, येथे तर मोठे शिक्षक बसले आहेत. बाबांची आठवण करत नाहीत, तर सुधारणार
कसे?ज्ञान तर खूप सहज आहे. ८४ जन्माचे चक्र, खूपच सहज आहे परंतु समजवण्या साठी खूप
प्रयत्न करावे लागतात. बाबा खूप सहज, सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. बाबांची आणि
८४च्या चक्राची आठवण करा तर नाव किनार्याला लागेल. हा संदेश सर्वांना द्यायचा आहे,
आपल्या मनाला विचारा, मी किती लोकांना संदेश देतो? जितके अनेकांना जागृत कराल तेवढे
इनाम मिळेल. जर जागृत नाही करत, तर जरूर झोपलेले आहेत, परत इतके उच्च पद मिळणार
नाही. बाबा रोज म्हणतात, संध्याकाळी सर्व दिवसभराची दिनचर्या लिहा. सेवा पण करत
राहायचे आहे. बाबांचा परिचय देणे हीच मुख्य गोष्ट आहे. बाबांनीच भारताला स्वर्ग
बनवला होता, आता नर्क आहे परत स्वर्ग होईल. चक्र तर फिरत राहते. तमोप्रधान पासून
सतोप्रधान बनायचे आहे. बाबांची आठवण करा तर विकार निघून जातील. सतयुगा मध्ये खूप
थोडे असतात परत रावण राज्यामध्ये खूप वृद्धी होते. सतयुगा मध्ये नऊ लाख परत हळूहळू
वृध्दी होत जाते. जे प्रथम पावन होते, तेच परत पतित बनतात. सतयुगा मध्ये देवतांचा
पवित्र प्रवृत्ति मार्ग होता. तेच परत अपवित्र प्रवृत्तीचे बनतात. अविनाश नाटका
नुसार, परत तुम्ही पवित्र प्रवृत्ती मार्गाचे बनत आहात. बाबाच येऊन पवित्र बनवतात.
बाबा म्हणतात माझी आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. तुम्ही अर्धा कल्प पवित्र होते
परत रावण राज्यांमध्ये पतित बनले आहात. हे पण तुम्हीच समजतात, आम्हीच कवडी तुल्य
बनलो होतो, आत्ता खूप ज्ञान मिळत आहे, ज्याद्वारे आम्ही श्रेष्ठ बनत आहोत. बाकीचे
इतके धर्म आहेत, ते सर्व नष्ट होतील. जसे जनावरं मरतात, तसे मनुष्य पण मरतील. जसे
बर्फ पडतो, तर जनावरं पक्षी इ. मरून जातात. नैसर्गिक आपत्ती पण येत राहतील, हे सर्व
नष्ट होणार आहे. हे सर्व मेलेले आहेत, या डोळ्याने तुम्ही जे काही पाहता, ते परत
राहणार नाही. नवीन दुनिये मध्ये खूपच कमी लोक असतात. हे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये
आहे. ज्ञानाचे सागर बाबा आम्हाला ज्ञानाचा वारसा देत आहेत. तुम्ही जाणता साऱ्या
दुनिया मध्ये कचरा च कचरा आहे. आम्ही पण कचऱ्या मध्ये पडलो होतो. आत्ता बाबा कचऱ्या
मधून काढून, खूप सुंदर बनवत आहेत. आम्ही हे शरीर सोडू, तर आत्मा पवित्र बनेल.
बाबा सर्वांना एकत्र शिकतात परंतु ज्यांची बुद्धी डल आहे, ते काहीच समजत नाहीत. हे
पण अविनाशी नाटकां मध्ये नोंदलेले आहे. बाबा म्हणतात त्यांच्या भाग्य मध्ये नाही
तर, मी काय करू शकतो?मी तर सर्वांना एक सारखेच शिकवतो, मुलंच क्रमानुसार शिक्षण
घेतात. काही तर चांगल्या रीतीने समजून दुसऱ्यांना समजवतात. दुसऱ्याचे जीवन पण
हिऱ्या सारखे बनवतात. काही तर बनतच नाहीत. आपलाच अहंकार आहे. जसे वैज्ञानिकाला खूप
अहंकार असतो, जे दूर आकाशा मध्ये, समुद्रामध्ये जात राहतात परंतु याद्वारे काहीच
फायदा होत नाही. मोफत वैज्ञानिक अहंकारा मध्ये येऊन आपली बुद्धी खराब करतात.
त्यांना पगार पण खूप मिळतो, सर्व वाया घालवत राहतात. असे पण नाही सोन्याची द्वारका
खालून येईल. हे तर अविनाशी नाटकाचे चक्र फिरत राहते. परत आम्ही वेळेवर आपल्या नवीन
दुनिये मध्ये जाऊन, महल बनवू. काही आश्चर्य करतात की, काय असेच महल परत बनवतील,
जरूर. बाबा दाखवतात, तुम्ही परत असे सोन्याचे महल बनवाल. तेथे सोने खूप राहते.
आत्ता पण कुठे-कुठे, सोन्याचे डोंगर आहेत परंतु सोने काढू शकत नाहीत. नवीन दुनिया
मध्ये तर सोन्याच्या खाणी भरपूर असतात, त्या आत्ता गायब झाल्या आहेत. आता हिऱ्याचे
मूल्य पहा किती आहे, आज एवढी किंमत आहे, उद्या सतयुगा मध्ये दगडासारखे मिळतील. बाबा
तुम्हा मुलांना आश्चर्य कारक गोष्टी ऐकवतात आणि साक्षात्कार पण करवतात. तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये हेच राहिले पाहिजे, आम्हा आत्म्याला घर सोडून पाच हजार वर्षे
झाले, ज्याला मुक्तिधाम म्हणतात. भक्ती मार्गा मध्ये मुक्तीसाठी खूप प्रयत्न करत
राहतात परंतु आता तुम्ही समजतात, बाबा शिवाय कोणी मुक्ती देऊ शकत नाही. सोबत घेऊन
जाऊ शकत नाहीत. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये नवीन दुनिया आहे. तुम्ही जाणता
चक्र फिरत राहते. तुम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टी मध्ये जायचे नाही, फक्त बाबांची
आठवण करायची आहे. सर्वांना हेच सांगत रहा, बाबाची आठवण करा, तर तुमचे विकर्म नष्ट
होतील. तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवले आहे ना. तुम्ही माझी जयंती पण साजरी करतात.
किती वर्षे झाले आहेत, पाच हजार वर्षाची गोष्ट आहे. तुम्ही स्वर्गवासी बनले होते,
परत ८४ चे चक्र लावले. हे पण नाटक बनले आहे. तुम्हाला हे सृष्टिचक्र समजावतो. आता
तुम्हा मुलांना चांगल्या प्रकारे स्मृति आली आहे, आम्ही सर्व श्रेष्ठ भूमिका करणारे
आहोत. आमची भूमिका बाबांच्या सोबत आहे. आम्ही बाबांच्या श्रीमता वरती, बाबांच्या
आठवणी मध्ये राहून, दुसर्यांना पण आपल्या सारखे बनवतो. कल्पा पूर्वी होते तेच
बनतील. त्रयस्थ होऊन पाहत राहतो आणि पुरुषार्थ पण करवून घेतो. नेहमी उमंग उत्साहा
मध्ये राहण्या साठी रोज एकांत मध्ये बसून स्वतःची गोष्टी करा. बाकी थोडा वेळ या
अशांत दुनिया मध्ये आहे, परत अशांतीचे नाव राहणार नाही. कोणी मुखाद्वारे बोलू शकत
नाहीत, मनाला शांती कशी मिळेल?शांतीसाठी जातात परंतु शांतीचे सागर तर एक बाबांच
आहेत. दुसऱ्या कोणाच्या कडे ही वस्तू नाही. तसे तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये पण
यायला पाहिजे, रचनाकार आणि रचनेला जानणे, हेच ज्ञान आहे. ते शांतीसाठी, हे सुखासाठी
आहे. सुख धना द्वारे मिळते, नाही तर मनुष्य काहीच कामाचे नाहीत. धना साठी माणसं खूप
पाप करत राहतात. बाबांनी तर खूप धन दिले आहे. स्वर्ग सोन्याचा तर नर्क दगडांचा
बनलेला आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) वेळ काढून
एकांत मध्ये बसून स्वतःशी गोष्टी करत स्वतःलाच उमंग उत्साहा मध्ये आणायचे आहे.
आपल्या सारखे बनवण्याची सेवा करत त्रयस्थ होऊन प्रत्येकाची भूमिका पाहण्याचा अभ्यास
करायचा आहे.
२) बाबांची आठवण करून
स्वतःला सुधारायचे आहे. आपल्या मनाला विचारायचे आहे, बाबांचा संदेश किती लोकांना
देतो?किती लोकांना आपल्या सारखे बनवतो?
वरदान:-
शांतीच्या
शक्तीद्वारे विश्वा मध्ये प्रत्यक्षतेचा नगारा वाजवणारे शांत स्वरुप भव.
गायन पण आहे,
विज्ञानाच्या वरती शांतीचा विजय, ना की वाणीचा. जितकी वेळ आणि संपूर्णता जवळ येईल,
तेवढे आपोआप जास्त आवाजा मध्ये येण्या पासुन वैराग्य येईल. जसे आत्ता इच्छा नसताना,
सवय आवाजात घेऊन येते, तसेच इच्छा असुन पण आवाजा पासुन दूर जाल. कार्यक्रम बनवून
आवाजा मध्ये येतील. जेव्हा हे परिवर्तन दिसून येईल, तेव्हा समजा आता विजयाचा नगरा
वाजणार आहे. यासाठी जितका वेळ मिळेल, स्वरूपामध्ये स्थित राहण्याचे अभ्यासी बना.
बोधवाक्य:-
झिरो
बाबांच्या सोबत राहणारे च हिरो कलाकार आहेत.