02-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही या विश्वा वरती शांतीचे राज्य स्थापन करणारे, बाबांचे मदतगार आहात,
आता तुमच्या समोर सुख शांती ची दुनिया आहे"
प्रश्न:-
बाबा मुलांना
कशासाठी शिकवतात, या शिक्षणाचा उद्देश कोणता आहे?
उत्तर:-
बाबा आपल्या मुलांना स्वर्गाचे राजकुमार, विश्वाचे मालक बनवण्या साठी शिकवत आहेत.
बाबा म्हणतात, मुलांनो या शिक्षणाचा उद्देश आहे, दुनियाच्या सर्व गोष्टींना विसरा,
म्हणजे सोडुन द्या. असे कधीच समजू नका, आमच्या जवळ लाखो, करोडो रुपये आहेत. काहीच
हातामध्ये येणार नाहीत म्हणून चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून अभ्यासावर लक्ष द्या.
गाणे:-
तो दिवस आला
आज, ज्याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो…
ओम शांती।
मुलांनी गित ऐकले, शेवटी विश्वामध्ये शांतीची वेळ आली. सर्व म्हणतात, विश्वामध्ये
शांती कशी होईल, परत जे चांगले मत देतात त्यांना बक्षीस पण देतात. नेहरू पण मत देत
होते, शांती तर झाली नाही, फक्त मत देऊन गेले. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे
की, कधी काळी संपूर्ण विश्वामध्ये सुख-शांती संपत्ती इ. होती, ती आता नाही, आता परत
होणार आहे. चक्र तर फिरत राहिल ना. हे पण तुम्हा ब्राह्मणांच्या बुद्धीमध्ये आहे.
तुम्ही जाणतात, भारत परत सोन्याचा बनणार आहे. भारतालाच सोन्याची चिमणी म्हटले जाते,
फक्तअशीच महिमा करतात. तुम्ही प्रत्यक्षा मध्ये पुरुषार्थ करत आहात. तुम्ही जाणता
बाकी थोडे दिवस आहेत, तर या नरका मधील दुःखाच्या सर्व गोष्टी विसरतात. तुमच्या
बुद्धीमध्ये आता सुखाची दुनिया समोर आहे. जसे पूर्वी परदेशां मधून येत होते, तर
समजत होते, आता घरी जाण्यास थोडा वेळ आहे, कारण परदेशा मधुन घरी येण्यासाठी खुप वेळ
लागत होता. आता तर विमानाने खूप लवकर पोहोचतात. आता तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये
आहे, आत्ता आमचे सुखाचे दिवस येणार आहेत, ज्याच्या साठी आम्ही पुरुषार्थ करत आहोत.
बाबांनी पुरुषार्थ पण खूप सहज सांगितला आहे, अविनाशी नाटका नुसार कल्पा पूर्वी
प्रमाणे हे निश्चित आहे. तुम्हीच देवता होते, देवतांचे अनेक मंदिर बनवत आहेत. मुलं
जाणतात, इतके मंदिर इत्यादी बनवून काय करतील? बाकी थोडे दिवस आहेत. तुम्ही मुलं
ज्ञानाचे अधिकारी आहात. असे म्हटले जाते परमपिता, परमात्मा सर्वशक्तिमान ज्ञानाचे
अधिकारी आहेत. तुम्ही पण ज्ञानाचे अधिकारी आहात, दूसरे लोक भक्तीचे अधिकारी आहेत.
बाबांना म्हटले जाते सर्वशक्तिमान अधिकारी. तुम्ही मुलं पण क्रमानुसार पुरुषार्था
प्रमाणे बनत आहात. तुम्हाला सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान आहे. तुम्ही जाणता बाबा
पासून वारसा घेण्यासाठी, आम्ही पुरुषार्थ करत आहोत. जे भक्तीचे अधिकारी आहेत, ते
सर्व भक्तीच्या गोष्टीच ऐकवतात. तुम्ही ज्ञानाचे अधिकारी आहात, तर ज्ञानच ऐकवतात.
सतयुगा मध्ये भक्ती नसते. पुजारी एक पण असत नाही, पुज्यच पूज्य आहेत. अर्धाकल्प
पुज्य तर अर्धा कल्प पुजारी असतात. हे भारत वासींनाच म्हणतात, जेव्हा पुज्य होते,
तेव्हा स्वर्ग होता. आता भारत पुजारी नर्क आहे. तुम्ही मुलं आता प्रत्यक्षात आपले
जीवन बनवत आहात. तुम्ही क्रमानुसार पुरुषार्थ प्रमाणे सर्वांना समजवत राहतात आणि
वृद्धीला प्राप्त करत राहतात. या नाटकांमध्ये पहिल्या पासून याची नोंद आहे. हे नाटक
तुम्हाला पुरुषार्थ करवत राहील, तुम्ही करत राहतात. तुम्ही जाणता अविनाशी नाटकामध्ये
आमची अविनाशी भूमिका आहे. दुनिया या गोष्टीला जाणत नाही. आमची च नाटकांमध्ये भूमिका
आहे. जे सांगतील ते तर समजत असतील ना, की आमची अविनाशी नाटकांमध्ये, कशी भूमिका आहे.
हे सृष्टी चक्र फिरत राहते. हा विश्वाचा इतिहास भूगोल तुमच्या शिवाय कोणाला माहित
नाही. उच्च ते उच्च कोण आहेत, दुनिया मध्ये कोणी जाणत नाहीत. ऋषीमुनी इत्यादी पण
म्हणत होते, आम्ही जाणत नाहीत. नेती नेती असे म्हणत होते ना. आता तुम्ही मुलं जाणता,
रचनाकार शिव पिताच आहेत आणि ते आम्हाला शिकवत आहेत. हे पण बाबांनी अनेक वेळेस
सांगितले आहे, जेव्हा येथे बसतात, तेव्हा देही अभिमानी होऊन बसा. एक बाबाच राजयोग
शिकवतात आणि विश्वाचा इतिहास भूगोल समजवतात. बाबा म्हणतात मी काही तुमच्या मनातील
संकल्प जाणत नाही, इतकी मोठी दुनिया आहे, सर्वांच्या मनातील संकल्प जाणत बसतील काय?
बाबा स्वतः म्हणतात, मी अविनाश नाटकातील नोंदीप्रमाणे तुम्हाला पावन बनवण्यासाठी
अवतरीत होतो. अविनाश नाटकामध्ये जी भूमिका आहे, तीच वठवण्यासाठी येतो. बाकी मी काही
तुमच्या मनातील संकल्प जाणत नाही. मी सांगतो माझी कोणती भूमिका आहे आणि तुम्ही कोणती
भूमिका वठवत आहात. तुम्हाला हे ज्ञान शिकून दुसऱ्यांना शिकवायचे आहे. माझी भूमिकाच
आहे, पतितांना पावन बनवणे. हे पण तुम्ही मुलंच जाणतात. तुम्ही तिथी तारीख इत्यादी
सर्व जाणतात, दुनिये मध्ये कोणी जाणत नाहीत. तुम्हाला बाबा शिकवत आहेत, जेव्हा हे
चक्र पूर्ण होईल तेव्हा परत बाबा येतील. त्या वेळेस जे दृश्य चालले, परत कल्पा नंतर
चालेल. एक सेकंद दुसऱ्याशी मिळू शकत नाही. हे नाटक चालत राहते. मुलांना नाटकाची
माहिती आहे, तरी तुम्ही घडी घडी विसरतात. बाबा म्हणतात तुम्ही फक्त माझी आठवण करा.
आपले बाबाच शिक्षक आहेत, गुरु पण आहेत. तुमची बुद्धी नवीन दुनिया कडे जायला पाहिजे.
बाबा ची महिमा ऐकून आत्मा खुश होते. सर्वजण म्हणतात, आमचे बाबा, पिता पण आहेत,
शिक्षक पण आहेत. ते सत्यम शिवम सुंदरम आहेत. ज्ञान पण खरे आणि संपूर्ण आहे. त्या
मनुष्यांचे शिक्षाण तर अर्धेच आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये खूप खुशी व्हायला
पाहिजे. मोठी परीक्षा पास करणार्याच्या बुद्धीमध्ये जास्त खुशी राहते. तुम्ही खूप
श्रेष्ठ शिक्षण घेत आहात, तर कापारी खुशी व्हायला पाहिजे. भगवान बाबा, बेहद्दचे पिता
आम्हाला शिकवत आहेत. तुमच्या अंगावरती आनंदाचे शहारे यायला पाहिजेत. भगवत गितेच्या
त्याच भागाची पुनरावृत्ती होत आहे. तुमच्याशिवाय कोणालाही माहिती नाही. त्यांनी तर
कल्पाचे आयुष्य वाढवले आहे. तुमच्या बुद्धी मध्ये आहे, हे पाच हजार वर्षांचे चक्र
फिरत राहते, ज्याला स्वदर्शन चक्र म्हटले जाते.
मुलं म्हणतात बाबा, मायचे वादळ खूप येते, आम्ही आठवण करणे विसरतो. बाबा म्हणतात
तुम्ही कुणाला विसरतात, जे बाबा तुम्हाला दुहेरी मुकुटधारी, विश्वाचे मालक बनवतात,
त्यांना तुम्ही कसे विसरू शकता? दुसऱ्या कोणाला विसरत नाही. पत्नी, मुलं-बाळ, काका,
मामा, मित्र संबंधी इत्यादी सर्व आठवणीत आहेत, बाकी या गोष्टींना तुम्ही का
विसरता?तुमचे युध्द या आठवणी मध्ये आहे, जितके शक्य होईल तेवढी आठवण करायची आहे.
तुम्हा मुलांना आपल्या प्रगतीसाठी पहाटे उठून बाबाच्या आठवणीमध्ये फिरायचे आहे.
तुम्ही छतावरती किंवा बाहेर थंड हवे मध्ये फिरण्या साठी जायला हवे. येथेच येवुन बसणे
आवश्यक नाही, बाहेर पण फिरु शकता. सकाळच्या वेळेत, घाबरण्याची गोष्टच नसते. बाहेर
जाऊन फिरु शकता. आपसा मध्ये याच गोष्टी करा, पहा कोण बाबांची जास्त आठवण करतात, परत
आपला अनुभव सांगायला पाहिजे, इतका वेळ बाबांची आठवण केली. बाकी वेळ आमची बुद्धी कुठे
कुठे गेली, याला म्हटले जाते एक दोघांमध्ये प्रगती करणे. तुम्ही नोंद करा, किती वेळ
बाबांची आठवण केली. बाबाचा जो अभ्यास आहे, तो सांगतात. बाबांच्या आठवणी मध्ये तुम्ही
एक तास फिरा तरीही, थकावट येणार नाही. बाबा ची आठवणी मुळे तुमचे जन्म जन्मांतरा चे
पाप नष्ट होतील. सृष्टीच्या चक्राला तुम्हीच जाणतात, रात्रंदिवस तुम्हाला हेच
बुद्धीमध्ये पाहिजे की आम्ही आता घरी जात आहोत. पुरुषार्थ करत आहात. मनुष्याला
काहीच माहिती नाही. मुक्तीसाठी खूप भक्ती करत राहतात, अनेक मतं आहेत. तुम्हा
ब्राह्मणांचे एकच मत आहे. जे ब्राह्मण बनतात, त्या सर्वांची एकच मत आहे. तुम्ही
बाबाच्या श्रीमता द्वारे देवता बनत आहात. देवतांची कोणती श्रीमत नाही. श्रीमत
आत्ताच तुम्हा ब्राह्मणांना मिळते. भगवान निराकारच आहेत, तुम्हाला राजयोग शिकवतात,
ज्याद्वारे तुम्ही आपले राज्य भाग्य घेऊन, खूप उच्च विश्वाचे मालक बनतात. भक्ती
मार्गाचे वेद ग्रंथ इत्यादी अनेक आहेत परंतु एक गीताच कामाची आहे. भगवान येऊन
राजयोग शिकवतात, त्यालाच गिता म्हटले जाते. आता तुम्ही बाबा द्वारे शिकत आहात,
ज्याद्वारे स्वर्गाचे राज्य प्राप्त करतात. ज्यांनी ज्ञान घेतले त्यांनी मिळवले.
अविनाश ज्ञान ऐकवणारे, ज्ञानाचे सागर एकच शिव पिता आहेत. ते अविनाश नाटका नुसार
कलियुगाचा शेवटी आणि सुरुवातीच्या काळात म्हणजेच संगम युगा मध्ये येतात. कोणत्याही
गोष्टींमध्ये संभ्रमित होऊ नका. बाबा यांच्या तना मध्ये येऊन शिकवतात, दुसरे कोणी
शिकवू शकत नाहीत. हे दादा पण कोणा द्वारे शिकलेले असते, तर दुसरे पण त्यांच्या
सारखेच शिकले असते ना. बाबा म्हणतात त्या गुरु इत्यादी सर्वांचा उद्धार करण्यासाठी
मी येतो. आता तुम्हा मुलांचे मुख्य लक्ष्य समोर आहे. आम्ही असे श्रेष्ठ बनतो. ही नरा
पासून नारायण बनण्याची सत्यकथा आहे. याची महिमा परत भक्ती मार्गामध्ये चालते.
भक्तीमार्गाचे रिती रिवाज चालत येतात. आता हे रावण राज्य पूर्ण होत आहे. तुम्ही आता
दसरा साजरा करण्या साठी थोडेच जातात. तुम्ही तर समजावून सांगता, हे काय करत आहात.
हे तर लहान मुलांचे काम आहे. मोठे मोठे मनुष्य रावणाला कसे जाळतात, हे पाहण्यासाठी
जातात. रावण कोण आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. हे रावण राज्य आहे ना. दसरा सणा
मध्ये खूप खुश होतात, ज्यामध्ये रावणाला जाळतात. दुःख पण चालत येते, काहीच समजत
नाहीत. आता तुम्ही समजता, आम्ही खूप बेसमज होतो, रावण बेसमज बनवतो. आता तुम्ही
म्हणता बाबा आम्ही लक्ष्मी-नारायण जरूर बनू. आम्ही काही कमी पुरुषार्थ थोडंच करणार
आहोत? ही एकच शाळा आहे, ज्ञान तर खूप सहज आहे. वृद्ध माता बाकी काही करू शकत नाहीत,
तर फक्त बाबांची आठवण करा. मुखाद्वारे राम राम तर म्हणतात ना. बाबा ही सहज सोपी
गोष्ट सांगतात, तुम्ही आत्मा आहात, परमात्माची आठवण करा, तर तुमची नाव भव सागरा
मधुन किनाऱ्याला लागेल आणि शांतीधाम सुखधाम मध्ये जाल. बाकी सर्व काही विसरा. जे
काही ऐकले आहे, वाचले आहे, हे सर्व विसरून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा,
तर पित्याकडून वारसा जरूर मिळेल. बाबाच्या आठवणी द्वारेच पाप नष्ट होतील. खूप सहज
आहे. असे म्हणतात, भ्रकुटी मध्ये एक तारा चमकतो. तर जरुर इतकी छोटी आत्मा असेल ना.
डॉक्टर लोक आत्म्याला पाहण्यासाठी खूप प्रयत्न करतात परंतु ती खूपच सूक्ष्म आहे, या
उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. बाबा पण असे सूक्ष्म बिंदू आहेत. बाबा म्हणतात जसे
तुम्ही साधारण आहात, मी पण साधारण बनवून तुम्हाला शिकवतो. कोणालाही माहिती नाही कि
यांना भगवान कसे शिकवत असतील? कृष्ण जर शिकवतील तर अमेरिका जपान इत्यादी सर्व
देशातून येथे येतील. त्यांच्यामध्ये खूप आकर्षण आहे. कृष्णा मध्ये तर सर्वांचे
प्रेम आहे ना. आता तुम्ही मुलं जाणता आम्ही कृष्णासारखे बनत आहोत. कृष्ण राजकुमार
आहे, कृष्णाला गोदीमध्ये घेण्याची इच्छा ठेवतात, तर पुरुषार्थ पण करावा लागेल ना.
कोणती मोठी गोष्ट नाही, बाबा आपल्या मुलांना स्वर्गाचे राजकुमार, विश्वाचे मालक
बनवण्यासाठी शिकवत आहेत.
बाबा म्हणतात मुलांना शिक्षणाचा उद्देश आहे, या दुनियेच्या सर्व गोष्टींना विसरा.
असे कधीही समजू नका आमच्या जवळ तर लाखो-करोडो रुपये आहेत. काहीच हातामध्ये येणार
नाही, म्हणून चांगल्या रीतीने पुरुषार्थ करा. बाबांच्या जवळ येतात तर बाबा गोड गा-हाणे
करतात. आठ-दहा महिन्यांमध्ये पासून येतात आणि ज्या बाबां कडून स्वर्गाची बादशाही
मिळते, त्यांना आणखी भेटले पण नाहीत. असे म्हणतात बाबा आमचे काम होते, अरे तुमचा
मृत्यू झाला तर परत कसे याल?हे कारण थोडे चालू शकते. बाबा राजयोग शिकवत आहेत आणि
तुम्ही शिकत नाहीत. ज्यांनी खूप भक्ती केली असेल, त्यांना तर सात दिवस काय, एका
सेकंदामध्ये पण ज्ञानाचा बाण लागेल, सेकंदा मध्ये विश्वाचे मालक बनू शकता. हे
ब्रह्म स्वतः अनुभवी बसले आहेत, त्यांनी विनाशाचा साक्षात्कार केला, चतुर्भुज रूप
पाहिले, बस समजू लागले, आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. साक्षात्कार झाला उमंग
उत्साह आला आणि सर्वकाही सोडून दिले. येथे तुम्हा मुलांना सर्व माहिती झाले आहे,
बाबा विश्वाची बादशाही देण्यासाठी आले आहेत. बाबा विचारतात निश्चय कधी झाला, तर
म्हणतात आठ महिने झाले. बाबानी समजवले आहे, मुख्य गोष्ट आहे बाबाची आठवण आणि ज्ञान.
बाकी साक्षात्कार इत्यादी होणे, काहीच कामाचे नाही. बाबांना जाणले तर, दररोज ज्ञान
घ्यायला पाहिजे ना. तुम्ही पण असे श्रेष्ठ बनू शकता. ज्ञानाच्या अनेक गोष्टी मिळतात,
जे तुम्ही दुसऱ्यांना समजावू शकतात. खूप प्रेमाने समजून सांगायचे आहे. शिव बाबाच
पतित-पावन आहेत, ते म्हणतात माझी आठवण करा, तर तुम्ही पावन दुनियाचे मालक बनाल.
युक्तीने ज्ञान सांगायचे आहे. तुमची इच्छा असते ना, हे पिता आम्हाला मुक्त करून,
गोड घरी घेऊन चला. अच्छा, आता तुमच्या वरती पापाचा गंज चढलेला आहे, त्यासाठी बाबा
म्हणतात माझी आठवण करा. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) उठून
फिरयाला जावा आणि बाबांची आठवण करा. आपसा मध्ये गोड गोष्टी करा की, कोण किती वेळ,
बाबांची आठवण करतात, परत आपला अनुभव ऐकवा.
(२) बाबांना ओळखले
परत कोणी कारण सांगायचे नाही, ज्ञान योगाचा अभ्यास करायचा आहे. मुरली कधी चुकवायची
नाही.
वरदान:-
सत्यता द्वारा
प्रत्येक कर्म किंवा बोलमध्ये श्रेष्ठत्व दाखवणारे प्रथम वर्गाचे अधिकारी भव.
सत्यता अर्थात आपल्या
सत्य स्वरूपाची नेहमी स्मृती, ज्यामुळे स्थूल चेहऱ्यामध्ये पण दिव्यत्व दिसून येईल.
सत्यता म्हणजे एक बाबा दुसरे कोणी नाही. या स्मृती द्वारे प्रत्येक कर्मा मध्ये
किंवा बोलमध्ये हे श्रेष्ठत्व दिसून येईल. जे पण संपर्का मध्ये येतील, त्यांना
प्रत्येक कर्मा मध्ये बाप समान चरित्र अनुभव होईल. प्रत्येक वचना मध्ये बाबां सारखे
अधिकारी आणि प्राप्तीची अनुभूती होईल. त्यांचा संग सत्य असल्यामुळे पारस चे काम
करेल. असे दिव्यत्व असणारे श्रेष्ठ आत्मेच प्रथम वर्गाचे अधिकारी बनतात.
बोधवाक्य:-
श्रेष्ठ
कर्माचे खाते वृध्दीगंत करा, तर विकर्माचे खाते नष्ट होईल.