11-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, हे रुद्र ज्ञान यज्ञ स्वतः रुद्र भगवंतानी रचले आहे, यामध्ये तुम्ही आपले सर्वकाही स्वाह करा, कारण आत्ता घरी जायचे आहे"

प्रश्न:-
संगमयुगा मध्ये कोणता आश्चर्यकारक खेळ चालतो?

उत्तर:-
भगवंताने रचलेल्या यज्ञामध्ये असुराचे विघ्न पडतात. हा पण संगम युगा मध्येच आश्चर्यकारक खेळ चालतो. असा यज्ञ परत साऱ्या कल्पा मध्ये केला जात नाही. राजस्व अश्वमेध यज्ञ, स्वराज्य मिळवण्यासाठी. या मध्येच विघ्न पडतात.

ओम शांती।
तुम्ही कुठे बसले आहात? याला शाळा किंवा विद्यापीठ पण म्हणू शकता. विश्वविद्यालय पण आहे, ज्याच्या अनेक ईश्वरीय शाखा आहेत. बाबांनी मोठ्यात मोठे विद्यापीठ उघडले आहे. ग्रंथांमध्ये रुद्र यज्ञ नाव लिहिले आहे. या वेळेत तुम्ही मुलं जाणतात, बाबांनी पाठशाला किंवा विद्यापीठ उघडले आहे. उच्च ते उच्च बाबा शिकवत आहेत. तर मुलांच्या बुद्धीमध्ये राहिले पाहिजे कि, भगवान आम्हाला शिकवत आहेत, त्यांनी स्थापन केलेले हे यज्ञ आहे, याचे नाव पण प्रसिद्ध आहे. राजस्व अश्‍वमेध रुद्र ज्ञान यज्ञ. राजस्व म्हणजे स्वराज्य मिळवण्यासाठी. अश्वमेध, हे जे काही दिसून येते, त्या सर्वांना स्वाहा करत आहे, शरीर पण स्वाहा होते. आत्मा तर स्वाह होऊ शकत नाही. सर्व शरीर स्वाह होतील, बाकी आत्मे परत जातील. हे संगम युग आहे, अनेक आत्मे परत जातील, बाकी शरीर तर नष्ट होतील. हे सर्व नाटक आहे, तुम्ही नाटकाच्या वश होऊन चालत आहात. बाबा म्हणतात, मी राजस्व यज्ञाची स्थापना केली आहे. हे पण पूर्वनियोजित नाटकानुसार स्थापन केले आहे. असे नाही की मी यज्ञ स्थापन केला आहे. पूर्वनियोजित नाटका नुसार तुम्हा मुलांना शिकवण्यासाठी कल्पा पूर्वीप्रमाणेच ज्ञान यज्ञ स्थापन केला आहे. मी स्थापन केला, याचा अर्थ पण निघू शकत नाही. पूर्वनियोजित नाटका नुसार स्थापन केला आहे. कल्प कल्प स्थापन केला जातो. हे नाटक पूर्वनियोजित आहे ना. पूर्वनियोजित नाटका नुसार एकाच वेळेत, यज्ञाची स्थापना केली जाते. ही कोणती नवीन गोष्ट नाही. आता बुद्धी मध्ये बसले आहे, बरोबर ५००० वर्षांपूर्वी सतयुग होते, आता चक्राची पुनरावृत्ती होत आहे, परत नवीन दुनियेची ची स्थापना होईल. तुम्ही नवीन दुनिया मध्ये स्वराज्य मिळवण्यासाठी हे ज्ञान घेत आहात. पवित्र पण जरूर बनायचे आहे. तेच बनतात, जे अविनाश नाटकानुसार कल्पा पूर्वी बनले होते, आता पण बनतील. त्रयस्थ होऊन अविनाश नाटकाला पाहयचे आहे आणि परत पुरषार्थ पण करायचा आहे. मुलांना मार्ग दाखवायचा आहे, मुख्य गोष्ट पवित्रतेची आहे. बाबांना बोलवतात च येऊन पवित्र बनवून, आम्हाला या छी छी दुनिया मधुन घेऊन चला. बाबा मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आले आहेत. मुलांना ज्ञानाचे मुद्दे दिले जातात. तरीही मुख्य गोष्ट मनमनाभव आहे. पावन बनण्यासाठी बाबांची आठवण करायची आहे, हे विसरायचं नाही. जेवढी आठवण कराल तेवढा फायदा होईल, दिनचर्या म्हणजे चार्ट लिहायचा आहे, नाही तर अंत काळात नापास व्हाल. मुलं समजतात, आम्हीच सतोप्रधान होतो, क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे जे उच्च बनतात, त्यांना कष्ट पण जास्त करावे लागतील. आठवणी मध्ये राहावे लागेल. हे तर समजतात, बाकी थोडा वेळ आहे, परत सुखाचे दिवस येणार आहेत. बरोबर आपले खूप सुखाचे दिवस येणार आहेत. बाबा एकाच वेळेस येतात, दुःखधामला नष्ट करून आपल्या सुखधाम मध्ये घेऊन जातात. तुम्ही मुलं जाणता, आत्ता आम्ही ईश्वरीय परिवारा मध्ये आहोत परत दैवी परिवार मध्ये जाऊ. या वेळेतच गायन आहे, हा संगम च पुरुषोत्तम श्रेष्ठ बनण्याचे युग आहे. तुम्ही मुलं जाणता, आम्हाला बेहद्दचे बाबा शिकवत आहेत. पुढे चालून संन्यासी लोक पण येतील, ती पण वेळ येईल. आता तुमचा एवढा प्रभाव निघत नाही. आता राजधानी ची स्थापन होत आहे, थोडा वेळ आहे. अंत काळामध्ये हे संन्यासी इत्यादी येऊन, हे ज्ञान घेतील. सृष्टिचक्र कसे फिरते, हे ज्ञान कोणामध्ये नाही. हे पण मुलं जाणतात, पवित्र राहण्यासाठीच विघ्न येतात. अबला कुब्जा इत्यादी वरती अत्याचार होतात. द्रोपदीने पुकारले आहे ना. वास्तव मध्ये तुम्ही सर्व द्रौपदी, सीता, पार्वती आहात. आठवणी मध्ये राहिल्याने अबला, कुब्जा पण बाबा पासून वारसा घेतात. आठवणीत तर राहू शकतात ना. भगवंताने येऊन यज्ञ स्थापन केला आहे, त्यामध्ये च खूप विघ्न पडतात. आत्ता पण विघ्न पडत राहतात. कन्याचे जबरदस्ती लग्न करतात, नाहीतर मारतात म्हणून पुकारतात, हे पतित पावन या, तर जरूर त्यांना रथ पाहिजे, ज्यामध्ये येऊन पावन बनवतात. गंगाच्या पाण्याद्वारे पावन बनू शकत नाहीत. बाबाच येऊन पावन बनवून, पावन दुनियेचे मालक बनवतात. स्वाहा कसे होणार?यज्ञ सेवेत सफल कसे करायचे?बाबा म्हणतात मुलांनो, तुम्ही या साकार बाबांना पाहतात, त्यांनी स्वतः करून शिकवले. जसे कर्म आम्ही करू, आम्हाला पाहून दुसरे पण करतील. शिवबाबांनी यांच्या द्वारे कर्म केले ना. सर्वकाही यज्ञामध्ये स्वाहा केले. स्वाहा होण्यामध्ये काही कष्ट थोडेच आहेत. हे न मोठे सावकार होते, न गरीब होते. साधारण होते. यज्ञाची स्थापना केली जाते, तर त्यामध्ये खानपान इत्यादी सर्व सामग्री पाहिजे ना. हा ईश्वरीय यज्ञ आहे. ईश्वराने येऊन, या ज्ञानयज्ञा ची स्थापना केली आहे. तुम्हाला शिकवतात, या यज्ञाची महिमा खूप मोठी आहे. ईश्वरीय यज्ञाद्वारे तुमचे शरीर निर्वाह होते. जे स्वतःला अर्पण समजतात, आम्ही तर विश्वस्त आहोत, हे सर्व काही ईश्वराचे आहे. आम्ही शिवबाबाच्या यज्ञाद्वारे भोजन खातो, ही समजून घेण्याची गोष्ट आहे ना. येथे तर सर्वांना येऊन बसायचे नाही. यांचे (ब्रह्माचे)उदाहरण तर पहा, कसे सर्व काही यज्ञामध्ये सफल केले. बाबा म्हणतात, जसे कर्म हे करतात, यांना पाहून दुसऱ्यांनी पण केले. अनेक जणांनी आपले सर्वकाही स्वाह केले. जे जे स्वाह झाले, ते आपला वारसा घेत आहेत. बुद्धी द्वारे समजले जाते, आत्मा तर चालली जाईल. बाकी शरीर तर सर्व नष्ट होतील. हा बेहदचा यज्ञ आहे, यामध्ये सर्व स्वाह होतील. तुम्हा मुलांना समजवले जाते, कसे बुद्धी द्वारे स्वाह होऊन, नष्टमोहा बनायचे. हे पण मुलं जाणतात, ही सर्व सामग्री नष्ट होणार आहे. खूप मोठा यज्ञ आहे, तेथे परत कोणता यज्ञ स्थापन केला जात नाही, न कोणता उपद्रव असतो. हे सर्व भक्तिमार्गाचे अनेक यज्ञ आहेत, ते सर्व नष्ट होतील. ज्ञानसागर एकच भगवान आहेत, तेच मनुष्य सृष्टीचे बिजरुप आहेत, चैतन्य आहेत. शरीर तर जड आहे, आत्मा चैतन्य आहे. ते ज्ञानसागर आहेत, तुम्हा मुलांना ज्ञान सागर बसून शिकवत आहेत. ते फक्त गायन करत राहतात आणि तुम्हाला बाबा सर्व ज्ञान ऐकवत आहेत. ज्ञान काही खूप नाही. दुनियेचे चक्र कसे फिरते, हे फक्त समजायचे आहे. येथे बाबा तुम्हाला शिकवत आहेत, ते म्हणतात मी साधारण तना मध्ये प्रवेश करतो. भागीरथ आहे जरूर. मनुष्यच असतील, ज्यामध्ये बाबा प्रवेश करतील, त्यांचे एकच नाव, शिव चालत येते, बाकी सर्वांचे नावं बदलत राहतात, त्यांचे नाव बदलत नाही. बाकी भक्ती मध्ये अनेक नावं ठेवले आहेत. येथे तर शिवबाबा च आहेत. शिव कल्याणकारी म्हटले जाते. भगवान येऊन नवीन दुनिया स्वर्गाची स्थापना करतात. तुम्ही जाणतात, भारत स्वर्ग होता, आता नर्क आहे परत स्वर्ग जरूर होईल. याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते, जेव्हा बाबा नावाडी बनवून तुम्हाला, या कलयुगी किनाऱ्या मधून सतयुगी किनाऱ्या कडे घेऊन जातात. ही जुनी दुःखाची दुनिया, परत जरूर नवीन दुनिया असेल, पूर्व नियोजित नाटका नुसार. यासाठी तुम्ही आत्ता पुरुषार्थ करत आहात. बाबाची आठवण घडी घडी विसरते, यामध्ये कष्ट आहेत, बाकी तुमच्या कडून, जे विकर्म झाले आहेत, त्याची सजा कर्म भोगाच्या रूपामध्ये भोगावेच लागते, कर्मभोग अंतकाळा पर्यंत भोगायचे आहेत. त्यापासून माफी मिळू शकत नाही. असे नाही बाबा क्षमा करा, क्षमा मिळू शकत नाही. पूर्व नियोजित नाटका नुसार सर्व होते, क्षमा इत्यादी होत नाही. कर्मभोगभोगावेच लागतात. तमो प्रधान पासून, सतोप्रधान बनायचे आहे, त्यासाठी श्रीमत पण मिळते. श्रेष्ठ ते श्रेष्ठ शिवबाबाच्या, श्रीमता द्वारे तुम्ही श्री बनतात. उच्च ते उच्च बाबा तुम्हाला उच्च बनवत आहेत. तुम्ही आत्ता बनत आहात. आता तुम्हाला स्मृती आली आहे. बाबा कल्प कल्प येऊन आम्हाला शिकवत आहेत. अर्धाकल्प ज्यांची प्रारब्ध मिळते. सृष्टी चक्र कसे फिरते, त्या ज्ञानाची आवश्यकता राहत नाही. कल्प कल्प एकाच वेळेस बाबा येऊन ज्ञान देतात की, हे सृष्टीचे चक्र कसे होते?

तुमचे काम आहे शिकणे आणि पवित्र बनने. योगा मध्ये राहणे. बाबाचे बनून पवित्र बनले नाही तर, शंभर पटीने दंड मिळेल, नाव पण खराब होईल. गायन पण आहे, सद्गुरु चे निंदक उच्चपद मिळवू शकत नाहीत. मनुष्याला माहित नाही, कोण आहेत सत् पिताच, सद्गुरू, शिक्षक, असतील ना. तुम्हाला ते शिकवतात, खरे सद्गुरु पण आहेत. जसे पिता ज्ञानाचे सागर आहेत, तुम्ही पण ज्ञानाचे सागर आहात ना. बाबानी तर सर्व ज्ञान दिले आहे ना. ज्यांनी जितके कल्पा पूर्वी धारण केले आहे, तेवढेच करतील. पुरुषार्थ करायचा आहे. कर्मा शिवाय तर कोणी राहू शकत नाही. किती हठयोग इ. पण करतात. हे पण कर्म आहे ना. हा पण एक धंदा, अजिविका करण्यासाठी आहे, नाव पण होते, खूप पैसे मिळतात. पाण्यावर चालतात, अग्नी वरती पण चालतात, फक्त उडू शकत नाहीत, त्यासाठी तर पेट्रोल इत्यादी पाहिजे ना, परंतु याद्वारे फायदा काहीच नाही. पावन तर बनत नाहीत. वैज्ञानिकांची पण स्पर्धा आहे ना. त्यांची विज्ञानाची स्पर्धा आणि तुमची शांतीची स्पर्धा आहे. सर्व शांतीच मागतात. बाबा म्हणतात, शांती तर तुमच्या स्वर्धम आहे. स्वतःला आत्मा समजा. आता घरी शांतीधामला जायचे आहे. हे दुःख धाम आहे. आम्ही शांतीधाम मधून परत सुखधाम मध्ये येऊ. हे दुःखधाम नष्ट होणार आहे. हे ज्ञान चांगल्या रीतीने धारण करून परत दुसऱ्यांना धारण करवायचे आहे, बाकी थोडे दिवस आहेत. ते शिक्षण घेऊन, तर परत शरीर स्वास्थ्यासाठी खूप माथा मारावा लागतो. भाग्यवान मुलं लगेच निर्णय घेतात, त्यांनी कोणते शिक्षण घ्यायचे आहे. त्या शिक्षणा द्वारे काय मिळते आणि या शिक्षणाद्वारे काय मिळते. या शिक्षणाद्वारे २१ जन्माचे भाग्य बनते. तर विचार करायला पाहिजे, आम्हाला कोणते शिक्षण घ्यायचे आहे? ज्याला बेहदच्या च्या पित्या कडून वारसा घ्यायचा आहे, ते या बेहद्यच्या शिक्षणा मध्ये तत्पर राहतील, परंतु पूर्वनियोजित नाटका नुसार कोणाच्या भाग्या मध्ये नाहीतर ते, तेच शिक्षण घेत राहतात. हे शिक्षण घेण्यासाठी वेळ काढत नाहीत. हे शिक्षण घेत नाहीत. असे म्हणतात वेळ नाही. बाबा विचारतात कोणते ज्ञान चांगले आहे?त्या शिक्षणाद्वारे काय मिळते आणि या शिक्षणाद्वारे काय मिळते? काही मुलं म्हणतात, बाबा शारीरिक शिक्षणा द्वारे काय मिळेल? थोडीफार कमाई करू शकू, येथे तर भगवान शिकवत आहेत. आम्हाला तर शिकून राजाई पद घ्यायचे आहे. तर जास्त लक्ष कोणत्या शिक्षणाकडे द्यायला पाहिजे. काही तर परत म्हणतात, बाबा हा कोर्स पूर्ण करून परत येऊ. बाबा समजतात, त्यांच्या भाग्या मध्ये नाही. काय होणार आहे, हे तर तुम्ही पुढे चालून पाहू शकाल. काही असे पण समजतात, शरीरा वरती कोणता भरोसा नाही, तर परत खरी कमाई करायला पाहिजे. ज्यांच्या भाग्य मध्ये आहे, ते आपले भाग्य बनवतील, पूर्ण जोर लावतील. आम्ही तर बाबा पासून वारसा घेऊन सोडू. बेहदचे बाबा आम्हाला राजाई देत आहेत, परत का नाही अंतिम जन्म पवित्र बनायचे ? अनेक मुलं आहेत पवित्र राहतात, खोटे थोडेच बोलतात. सर्व पुरुषार्थ करत आहेत, हे ज्ञान घेत आहेत. तरी विश्वास करत नाही. बेहद्दचे बाबा येतात च तेव्हा, जेव्हा जुन्या दुनिये ला नवीन बनवायचे असते. जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे. ते खूप स्पष्ट आहे. वेळ पण बरोबर तीच आहे. अनेक धर्म पण आहेत. सतयुगा मध्ये एकच धर्म असतो. हे पण तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुमच्या मध्ये पण कोणी, आणखी पण निश्चय करत आहेत. अरे निश्चय करण्या मध्ये थोडाच वेळ लागतो. शरीरा वर काहीच भरोसा नाही. थोडी पण संधी गमवायला नाही पाहिजे. कुणाच्या भाग्या मध्ये नाही, तर काहीच बुद्धीमध्ये येत नाही. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता, बापदादाची प्रेम पुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) खरी कमाई करून २१ जन्मासाठी आपले भाग्य बनवायचे आहे. शरीरा वरती काहीच भरोसा नाही, म्हणून जरा पण संधी गमवायची नाही.

(२) नष्टोमोहा बनून आपले सर्व काही रुद्र यज्ञामध्ये स्वाह करायचे आहे. स्वतःला अर्पण करून विश्वस्त बनून सांभाळायचे आहे. साकार पित्याचे अनुकरण करायचे आहे.

वरदान:-
निंदा करणाऱ्यांना पण गुण माळ घालणारे इष्ट देव महान आत्मा भव.

जसे आजकाल विशेष आत्म्याचे स्वागत करते वेळी, गळ्यामध्ये फुलांची माळ घालतात, तर तुम्ही घालणाऱ्यां च्या गळ्यामध्ये परत ती माळ घालतात. असेच निंदा करणाऱ्यांना पण तुम्ही गुण माळा घाला. तर ते स्वतः तुम्हाला गुण माळा परत करतील, कारण निंदा करणाऱ्यांना गुण माळा घालणे म्हणजे जन्म जन्मांतर साठी भक्त निश्चित करणे होय. हे देणे म्हणजे अनेक वेळेस घेणे होते. हीच विशेषता इष्ट देव, महान बनवते.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:- आपली मन्सा वृत्ती द्वारा चांगले शक्तिशाली वातावरण बनवा, तर खराब पण चांगले होईल.