24-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"तुम्ही आत्मे जेव्हा स्वच्छ बनाल, तेव्हाच हा संसार सुखद बनेल, दुःखाचे कारण ५ विकाराच्या वशीभूत होऊन केलेले कर्म आहेत" मातेश्वरी जी चे अनमोल महावाक्य

गीत:-
जाने न नजर,पहचाने जिगर...

आपल्या बेहद पित्याची महिमा ऐकली.साधारण मनुष्याची अशी महिमा होऊ शकत नाही.ही त्या एकाचीच महिमा आहे,जे या महिमाचे अधिकारी आहेत कारण त्यांची महिमा त्यांच्या कर्तव्या नुसार गायन केली जाते.त्यांचे कर्तव्य सर्व मनुष्या पेक्षा महान आहेत,कारण सर्व मनुष्य आत्म्यासाठी त्यांचे कर्तव्य आहे.तर सर्वात उच्च झाले ना,कारण सर्वांसाठी सर्वांचे गती सद्गती दाता एक आहेत.असे म्हणणार नाही की, काही जणांची गती सद्गती केली.ते तर सर्वांचे गती सद्गती दाता आहेत.ते सर्वोच्च अधिकारी आहेत ना.तसे पण साधारण रीतीने पाहिले,तर महिमा तेव्हाच होते,जेव्हा कोणी कर्तव्य करून जातात,ज्यांनी काही ना काही थोडेफार असे काम केले आहे, त्यांचीच महिमा होते.तर बाबांची पण जी महिमा आहे,ते उच्च ते उच्च आहेत,जरूर त्यांनी येथे येऊन महान कर्तव्य केले असतील आणि ते ही आमच्यासाठी मनुष्य सृष्टीसाठी, महान उच्च कर्तव्य केले आहेत.या सृष्टीचे कर्ता-करविता त्यांना म्हटले जाते,तर त्यांनी येऊन मनुष्य सृष्टीला उच्च बनवले आहे.प्रकृती सहीत सर्वांचे परिवर्तन केले आहे परंतु कोणत्या युक्ती द्वारे परिवर्तन केले,ते सन्मुख समजतात.असे नाही की प्रथम मनुष्य आत्मा,आत्म्या मध्ये परिवर्तन केल्यामुळे,परत आत्म्याच्या शक्तीद्वारे,आपल्या कर्माच्या शक्तीद्वारे, परत प्रकृती, तत्व इत्यादी वरतीपण त्यांची शक्ती काम करते.परिवर्तन करणारे तर तेच झाले ना,परंतु कसे करतात?जोपर्यंत मनुष्य आत्मा उच्च बनत नाही, तोपर्यंत आत्म्याच्या आधारा द्वारे, प्रकृती,तत्व इत्यादी,हे सर्व क्रमानुसर,त्या शक्तीमध्ये येतात, त्याद्वारे परत सारी सृष्टी हिरवीगार सुखद बनते.

तर मनुष्य सृष्टीला सुखद बनवणारे बाबा जाणतात की,मनुष्य सृष्टी सुखद कशी बनेल?जोपर्यंत आत्मे स्वच्छ बनत नाहीत,तोपर्यंत संसार सुखद होऊ शकत नाही,कारण ते येऊन प्रथम आपल्याला स्वच्छ बनवतात.आता आत्माच अपवित्र झाली आहे.प्रथम त्या अपवित्रतेला अस्वच्छतेला काढायचे आहे.परत आत्म्याच्या शक्तीद्वारे,प्रत्येक गोष्टी द्वारे,त्यांची तमोप्रधानता बदलून सतोप्रधानता होईल,त्यालाच

म्हणाल सुवर्ण अवस्थेत येतात.तर हे तत्व इत्यादी,सर्व सुर्वण अवस्थे मध्ये येतात.परंतु प्रथम आत्म्याची अवस्था बदलते.तर आत्म्याला शुद्ध पवित्र बनवनारे,सर्वोच्च अधिकारी झाले ना. तुम्ही पाहता की,आता दुनिया बदलत आहे.प्रथम स्वतःला बदलायचे आहे. जेव्हा आपण स्वतःला बदलू, त्या आधारे दुनियाचे परिवर्तन होईल.जर आज तागायत आमच्या मध्ये बदल झाला नाही,स्वतःला परिवर्तन केले नाही,परत दुनियाचे परिवर्तन कसे होईल? म्हणून स्वतःची दररोज तपासणी करा.जसे जमाखर्च ठेवणारे दररोज रात्री आपले खाते पाहतात, किती जमा झाले?सर्व आपला जमाखर्च ठेवतात.तसेच हा पण जमाखर्च ठेवा की,सार्‍या दिवसांमध्ये किती फायदा आणि किती नुकसान झाले?जर नुकसान जास्त झाले तर, परत दुसर्‍या दिवसासाठी खबरदार राहायचे आहे.या प्रकारे स्वतःवरती लक्ष दिल्यामुळे,परत फायद्या मध्ये जात जात,आपली स्थिती मजबूत बनवाल.तर असे तपासत स्वतःला परिवर्तन झाल्याचे जाणीव व्हायला पाहिजे.असे नाही आम्ही तर देवता बनू,ते तर अंत काळात बनाल,आता जसे आहोत तसे ठीक आहोत,नाही. आता पासून ते दैवी संस्कार धारण करायचे आहेत.आतापर्यंत पाच विकारामुळे ते संस्कार चालत होते, आता पाहायचे आहे, त्या विकाराद्वारे आम्ही मुक्त होत आहोत? माझ्या मध्ये जे क्रोध इत्यादी होता,तो नष्ट होत आहे? लोभ किंवा मोह इत्यादी जे होते,ते सर्व विकारी संस्कार बदलत जात आहेत.जर बदलत जात आहेत,नष्ट होत आहेत,तर समजा आमचे परिवर्तन होत आहे.जर विकार सुटत नाही,तर समजा की, परिवर्तन झाले नाही.तर परिवर्तनाची जाणीव व्हायला पाहिजे,आपल्या मध्ये बदल व्हायला पाहिजे.असे नाही की सर्व दिवस विकारी खात्या मध्येच जात राहील,बाकी समजाल की आम्ही,काही दान पूर्ण केले बस, नाही.आमचे जे कर्माचे खाते चालत आहे,त्यालाच आम्हाला संभाळायचे आहे.आम्ही जे काही करतो,त्यामध्ये कोणत्याही विकार वश आपले विकर्मी खाते तर बनत नाही ना.तर यामध्ये स्वतःची संभाळ करायची आहेत.ही सर्व दिनचर्या ठेवायचे आहे आणि झोपण्याच्या अगोदर दहा-पंधरा मिनिट,स्वतःला तपासायचे आहे की,सर्व दिवस आम्ही कसा व्यतीत केला?काही जण नोंद पण करतात,कारण पाठीमागील जन्माचे पापाचे ओझे डोक्यावरती आहे.त्याला नष्ट करायचे आहे,त्यासाठी बाबांचा आदेश आहे की, माझी आठवण करा.तेही आम्ही किती वेळ आठवणीत राहिलो, कारण अशी दिनचर्या लिहिल्यामुळे दुसऱ्या दिवसासाठी सावधान व्हाल. असे सावधान राहत,राहत परत सावधान बनाल.परत आमचे कर्म चांगले राहतील आणि दुसरे कोणते पाप कर्म होणार नाहीत.तर पापापासून स्वतःची संभाळ करायची आहे.आम्हाला या विकाराने च खराब बनवले आहे,विकारामुळे च आम्ही दुःखी झालो आहोत.आता आम्हाला दुःखापासून सुटायचे आहे,हीच मुख्य गोष्ट आहे.भक्तीमध्ये पण परमात्म्याला बोलवतात,आठवण करतात,जे काही पुरुषार्थ करतात,ते कशासाठी करतात?सुख आणि शांतीसाठी करतात ना.तर त्यासाठी हा प्रत्यक्ष अभ्यास करून घेतला जातो.हे प्रत्यक्षात करण्याचे महाविद्यालय आहे,याचा अभ्यास केल्यामुळे आम्ही स्वच्छ किंवा पवित्र बनत जातो.परत आपला जो आदी सनातन पवित्र प्रवृत्तीचे लक्ष आहे त्याला प्राप्त करू.जसे कोणी डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मध्ये जातात,तर ते वैद्यकीय सराव करत डॉक्टर बनतात.याच प्रकारे आम्ही पण या महाविद्यालयां मध्ये,या शिक्षणाद्वारे किंवा या अभ्यासाद्वारे, या विकारापासून किंवा पापकर्म करण्यापासून मुक्त होऊन,स्वच्छ बनत जाऊ.परत स्वच्छते ची पदवी कोणती आहे? देवता.

या देवतांचे तर गायन आहे ना. त्यांचीच महिमा आहे,सर्वगुणसंपन्न, सोळा कला सम्पन,संपूर्ण निर्विकारी, तर असे श्रेष्ठ कसे बनणार?असे नाही आम्ही तर पूर्वनियोजित बनलो आहोतच,नाही.बनायचे आहे कारण आम्हीच बिघडले होतो,आम्हालाच बनायचे आहे.असे नाही देवतांची कोणती दुसरी दुनिया आहे.आम्ही मनुष्यच देवता बनणार आहोत.ते देवताच विकारांमध्ये गेले,परत निर्विकारी बनायचे आहे परंतु निर्विकारी बनण्याची पद्धत बाबा शिकवत आहेत.आता त्यांच्यासोबत आपला आत्मिक संबंध जोडायचा आहे.आता बाबांनी येऊन ज्ञानाचा प्रकाश दिला आहे.शेवटी तुम्ही माझेच आहात आणि माझेच बनून कसे राहाल.जसे लौकिक मध्ये,पिता मुलांचा आणि मुलं पित्याचे कसे बनून राहतात.असे तुम्ही पण तन-मन-धना द्वारे माझे बनून चाला. कसे चालायचे,त्याचा आदर्श प्रमाण, हे ब्रह्मा बाबा आहेत,ज्याच्या तनामध्ये शिव बाबा येतात.ते आपले तन मन धन,सर्व शिव बाबांच्या हवाली करून,चालत आहेत.असे ब्रह्मा पित्याचे अनुकरण करायचे आहे.यामध्ये काही विचारण्याची किंवा संभ्रमित होण्याची गोष्टच नाही,खूप सरळ गोष्ट आहे.तर आता चालत राहा.असे नाही ऐकले तर खूप आहे आणि धारण कमी केले आहे,नाही.थोडे ऐका आणि धारण खूप करा.जे ऐकता,ते प्रत्यक्षामध्ये कसे आणायचे,त्याचा पूर्ण प्रकारे विचार करा.अभ्यास करुन प्रगती करत रहा.असे नाही ऐकत राहिले,ऐकत राहिले..नाही. आज जे ऐकले आहे,त्याला जर प्रत्यक्षामध्ये आणले,बस.आजपासून त्या अवस्थेमध्ये राहू. विकाराच्या वश होऊन असे काम करणार नाही आणि आपली दिनचर्या चांगली बनवू,आपला चार्ट ठेवू.जर कोणी याला प्रत्यक्ष जीवनामध्ये धारण करतील,तर पहा काय होईल.तर आत्ता जे सांगितले, त्याला प्रत्यक्षात आणायचे आहे.जे सांगतात,जे ऐकतात ते करा,बस. दुसरी कोणतीच गोष्ट नाही,फक्त प्रत्यक्ष धारणे वरती जोर द्या.समजले. तसे शिवपिता आणि दादा दोघांना चांगल्या प्रकारे जाणतात,असेच दोघांचे अनुकरण करा.असे अनुकरण करणारेच सुपात्र मुलं आहेत किंवा गोड मुलं आहेत.अशा मुलांच्या प्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.

दुसरी मुरली १९५७.

गीत:-
मेरा छोटासा,देखो ये संसार है..

हे गीत कोणत्या वेळेतील गायन केलेले आहे,कारण या संगम युगा मध्येच,आम्हा ब्राह्मण कुळाचा छोटासा संसार आहे.हा आमचा कोणता परिवार आहे,ते क्रमानुसार सांगतात.आम्ही परमपिता परमात्मा शिवाचे नातवंडे आहोत, ब्रह्मा-सरस्वती चे मुख संतान आहोत आणि विष्णु शंकर आमचे तायाजी(चुलते) आहेत.आम्ही आपसा मध्ये सर्व भाऊ बहिण आहोत. हा आपला छोटासा संसार आहे,याच्यापुढे आणखी सबंध रचले जात नाहीत,या वेळेतील एवढेच संबंध म्हणू.आमचे संबंध किती मोठ्या सर्वोच्च अधिकारी शक्ती बरोबर आहेत,हे पहा.आमचे आजोबा शिव आहेत,त्यांचे नाव खूप भारी आहे,ते साऱ्या मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत.सर्व आत्म्यांचे कल्याणकारी असल्यामुळे त्यांना हर हर भोलेनाथ,शिव महादेव म्हटले जाते.ते सर्व सृष्टीचे,दुखहर्ता सुखकर्ता आहेत,त्यांच्याद्वारे आम्हाला सुख शांती पवित्रतेचा मोठा अधिकार मिळतो.शांती मध्ये परत कोणत्या बंधनाचा कर्मभोग राहत नाही.या दोन्ही वस्तू पवित्रतेच्या आधारावरती आहेत.जोपर्यंत पित्याच्या पालनेचा पूर्ण वारसा घेतील,पित्याद्वारे प्रमाणपत्र मिळाले नाही,तो पर्यंत,तो वारसा मिळू शकत नाही.तुम्ही पहा ब्रह्माच्या वरती किती मोठी जबाबदारी आहे,जे अस्वच्छ पाच विकारानी ग्रस्त अपवित्र आत्म्यांना सुंदर बनवतात.ज्या अलौकिक कार्याचा फायदा,परत सतयुगा मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्णाचे पद मिळते. आता पहा त्यापित्या सोबत तुमचा कसा संबंध आहे?तर बेफिकर आणि खुश व्हायला पाहिजे.आता प्रत्येकाने स्वतःला विचारायचे आहे की,आम्ही पूर्ण रीतीने त्यांचे बनले आहोत? विचार करायला पाहिजे,जेव्हा परमात्मा पिता आले आहेत,तर त्यांच्यापासून आम्ही पुर्ण वारसा कसा घेऊ? विद्यार्थ्यांचे काम आहे संपूर्ण पुरुषार्थ करून,शिष्यवृत्ती घेणे. तर आम्ही प्रथम क्रमांकाची लॉटरी का नाही जिंकायची?ते विजय माळी मध्ये गुंफले जाणे आहे.बाकी कोणी आहेत,जे दोन्ही हातामध्ये लाडू पकडून बसले आहेत.येथे पण हद्दचे सुख घेऊ आणि वैकुंठा मध्ये पण काही ना काही सुख घेऊ,असा विचार करणाऱ्यांना मध्यम आणि कनिष्ठ पुरुषार्थी म्हणाल,ना की सर्वोत्तम पुरुषार्थी.जेव्हा बाबा देण्यासाठी टाळाटाळ करत नाहीत, तर घेणारे का करतात तेव्हा गुरुनानक ने म्हटले,परमात्मा तर दाता आहेत,समर्थ आहेत परंतु आत्म्यामध्ये घेण्याची पण ताकद नाही.असे गायन पण आहे,देणारे देत आहेत परंतु घेणारे थकून जातात. तुमच्या मनामध्ये येते असेल आम्ही का नाही,श्रेष्ठ पद मिळवावे?बाबा खूप मेहनत करतात तरीही माया अनेक प्रकारे विघ्न आणते,कारण आता मायेचे राज्य नष्ट होणार आहे. आता मायने सर्व सार काढून टाकले आहे,तेव्हाच परमात्मा येतात. त्यांच्या मध्ये सर्व रस सामावलेला आहे. त्यांच्याद्वारे सर्व संबंधाची रसना मिळते,तेव्हा तर त्वमेव माताश्च पिता इत्यादी म्हणतात.ही सर्व महिमा परमात्मा चीच गायन केलेली आहे. तर बलिहारी यावेळेची आहे,जे असे संबंध बनले आहेत.तर परमात्म्याच्या सोबत इतकेच संपूर्ण संबंध जोडायचे आहेत,ज्याद्वारे२१ जन्मासाठी सुख प्राप्त होईल,हीच पुरुषार्थांची सिद्धी आहे.२१ जन्माचे नाव ऐकून थंड पडू नका,असा विचार करू नका २१ जन्मासाठी इतकावेळ पुरुषार्थ पण करा, परत २१ जन्मानंतर विकारांमध्ये जायचेच आहे,तर सिद्धी काय झाली? परंतु पूर्वनियोजित नाटकांमध्ये आत्म्याला जितकी सर्वोत्तम सिद्धी आवश्यक आहे,तेवढी मिळेल ना.बाबा येऊन आम्हाला संपूर्ण अवस्थेपर्यंत घेऊन जातात, परंतु आम्ही मुलं बाबांना विसरतो, तर जरुर विकारामध्ये जातील ना. त्यामध्ये बाबांचा काहीच दोष नाही. आता पुरषार्था मध्ये कमी झाली तर, सतयुग त्रेताचे सर्व सुख,या जन्माच्या पुरुषार्थ वरती आधारित आहे.तर का नाही आम्ही संपूर्ण पुरुषार्थ करून आपली सर्वोत्तम भूमिका वठवायची? का नाही पुरुषार्थ करुन हा,हा वारसा घ्यायचा.पुरुषार्थ मनुष्य नेहमी सुखासाठी करतात.सुख दुःखा पेक्षा अनासक्त होण्यासाठी कोणीच पुरूषार्थ करत नाहीत.ते तर अविनाशी नाटकाच्या अंत काळात, परमात्मा येऊन सर्व आत्म्याला सजा देऊन,पवित्र बनवून आपल्या भूमिकेपासून मुक्त करतील.हे तर परमात्माचे कार्य आहे,ते आपल्या वेळेत येऊन,स्वतःच सांगतात.आता जेव्हा आत्म्याला,तरीही भूमिका करायची असेल,तर का नाही सर्वोत्तम भूमिका वठवयाची?

अच्छा,गोड गोड मुलांप्रति मम्माची प्रेमपूर्वक आठवण.ओम शांती.

वरदान:-
बाबा शब्दाच्या स्मृती द्वारे कारण ला निवारण मध्ये परिवर्तन करणारे नेहमी अचल अडोल भव. कोणतीही परिस्थिती जरी गोंधाळाची असेल परंतु बाबा म्हटल्याने अचल अडोल बनाल.जेव्हा परिस्थितीच्या चितंना मध्ये जातात,तेव्हा कठीनते चा अनुभव होतो.जर कारणाच्या ऐवजी निवारण केले तर,कारणच निवारण बनेल.कारण मास्टर सर्वशक्तिमान ब्राह्मणाच्या पुढे परिस्थिती मुंगी सारखी पण नाही.फक्त काय झाले आहे,का झाले,असा विचार करण्याच्या ऐवजी,जे झाले त्यामध्ये कल्याण सामावलेले आहे,सेवा सामावली आहे.जरी परिस्थिती विपरीत असेल, तरी त्यामध्ये सेवा सामावलेली आहे. या प्रकारे पहा,तर नेहमीच अचल अडोल राहाल.

बोधवाक्य:-
एका बाबाच्या प्रभाव मध्ये राहणारेच कोणत्याही आत्म्याच्या प्रभाव मध्ये येऊ शकत नाहीत.