28.06.2020 प्रभात:मुरली ओम शांती "अव्यक्त बापदादा” रिवाइज 18.02.1986 मधुबन


"निरंतर सेवाधारी किंवा निरंतर योगी बना"

आज ज्ञान सागर पिता आपल्या ज्ञान गंगाना पाहत आहेत. ज्ञानसागरातून निघणारी ज्ञानगंगा कशी आणि कोठून पावन करून यावेळी सागर आणि गंगाचे मिलन साजरी करत आहे. हा गंगासागराचा मेळा आहे . या मेळ्यात चोहूबाजूने गंगा पोहोचलेल्या आहेत. बाप दादा देखील ज्ञानगंगाना पाहून हर्षित होत आहेत.प्रत्येक गंगेमध्ये हा दृढ निश्चय आणि नशा आहे की या पतीत दुनियेला आणि पतित आत्म्यांना पावन बनवायचे आहे. याच निश्चय आणि नशेमुळे प्रत्येक सेवाक्षेत्रात पुढे जात आहेत. मनामध्ये हाच उमंग आहे की लवकरात लवकर परिवर्तनाचे कार्य संपन्न होवो. सर्व ज्ञान गंगा, ज्ञानसागर बाप समान विश्व कल्याणी वरदानी आणि महादानी दयाळू आत्मे आहेत.यामुळे आत्म्यांचे दुःख व शांतीचा आवाज अनुभव करून आत्म्याचे दुःख व अशांतीला परिवर्तन करण्याची सेवातीव्रगतीने करण्याचा उत्साह वाढत आहे. दुःखी आत्म्याच्या हृदयाचा आवाज ऐकून दया येते ना.वाटते सर्व सुखी व्हावेत सुखाची किरणे,शांतीची किरणे, शक्तीची किरणे,विश्वाला देण्याच्या निमित्त घडावे. आज सुरुवातीपासून आतापर्यंत ज्ञानगंगाची सेवा कुठपर्यंत निमित्त बनलेली आहे,हे पहात होते.आताही कमी वेळेत अनेक आत्म्यांची सेवा करावयाची आहे.पन्नास वर्षात देश-विदेशात सेवेचा पाया चांगला टाकला आहे.चारही दिशेला सेवा स्थान स्थापन केलेली आहेत. सेवेची वेग-वेगळी साधनं वापरलेली आहेत,हे योग्यच केले आहे. देश-विदेशात विखुरलेल्या मुलांचे संघटन बनलेले आहे, बनवत राहाल. आता अजून काय करावयाचे आहे? कारण आता सर्व विधी माहीत झाली आहे.अनेक प्रकारची साधनं एकत्र केली जात आहेत.

स्वस्थिति व स्वप्रगती बाबत लक्ष देत आहात.आता बाकी काय आहे? ज्याप्रमाणे सुरुवातीला आदीरत्नांनी उमंग उत्साहाने तन-मन-धन, समय, संबंध, दिवस-रात्र बाबांना समर्पण करून ज्याप्रमाणे फलस्वरूप शक्तिशाली स्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जेव्हा सेवा आरंभ केली तेव्हा स्थापनेचा आरंभ केला.या दोन्ही वेळी ही विशेषता पाहिली गेली. सुरुवातीला ब्रह्मा बाबांना चालता-फिरता साधारणपणे पाहिले गेले किंवा कृष्ण रूपात पाहिले गेले? साधारण रूपात पाहूनही साधारण दिसत नसेल हा अनुभव आहे . ब्रह्मा बाबा हा विचार करत होते चालता-फिरताना कृष्णाचा अनुभव करत होते .असे केले ना ? सुरुवातीला ब्रह्मा बाबांमध्ये या विशेषता पाहिल्या गेल्या. सेवेच्या वेळी जेथे गेले तेथे देव - देवींचा अनुभव झाला. देवी आल्या आहेत असेच सर्व म्हणत होते असाच अनुभव केला ना ? हीच भावना सेवेच्या वृद्धीसाठी निमित्त बनली. तर सुरुवातीलाही अनासक्त पणाची विशेषता राहिली आहे. दैवीपणाची विशेषता राहिली आहे . आता अंतिम समयी देखील हीच झलक आणि फलक प्रत्यक्ष रूपात अनुभव कराल तेव्हाच प्रत्यक्षतेचे नगारे वाजतील.आता राहिलेला थोडा वेळ निरंतर योगी, निरंतर सेवाधारी,निरंतर साक्षात्कार स्वरूप निरंतर योगी,बाप समान,याच विधीने सिद्धी प्राप्त कराल. सुवर्णमहोत्सव साजरा केला अर्थात सुवर्णमयी दुनियेच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचलेले आहात.जसे सुवर्णमहोत्सव साजरा करताना साक्षात देवींचा अनुभव केला. चालता-फिरता हाच अनुभव सर्वांनी केला .तुम्हा सर्वांची सुर्वण जयंती झाली आहे ना ? कि कुणाची हिरक झाली आहे? की कुणाची ताम्र जयंती झाली आहे ? सर्वांचीच सुर्वण जयंती साजरी झाली आहे.ती साजरी करणे म्हणजे सुर्वण स्थिती वाले बनने आहे.आता चालता-फिरता याचा अनुभव करा की, मी फरिशता पासुन देवता बनणार आहे. दुसऱ्यांना देखील या समर्थ स्मृति पासून देवता रूप दिसले पाहिजे. आता वेळेला, संकल्पा ला, सेवेमध्ये अर्पण करा .आता हा समर्पण सोहळा साजरा करा स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे, शरीराच्या मागे, मनाच्या मागे, साधनांच्या मागे संबंधाच्या मागे संकल्प चालवू नका. सेवेत लावणे अर्थात स्वतःच्याच प्रगतीचीे भेट स्वतःच प्राप्त करणे.आता आपल्या प्रति वेळ लावण्याचा समय परिवर्तन करा . जसे भक्त श्वासाश्वासात रामनाम जपतात,तसेच श्वास श्वास सेवेत लावा. सेवेत मग्न व्हा, विधाते बनून वरदाता बना. निरंतर महादानी बना चार किंवा सहा तासाची सेवा न करता विश्व कल्याणाच्या स्टेजवर स्वार व्हा . प्रत्येक क्षण विश्व कल्याणाच्या प्रति अर्पित करा विश्वकल्याणातच स्व कल्याण सामावलेले आहे . जेव्हा संकल्प आणि सेकंद सेवेमध्ये बिझी राहाल. वेळ नसेल. तेव्हा मायेला देखील तुमच्या जवळ येण्यासाठी वेळ नसेल. समस्या समाधानाच्या रूपात परिवर्तित होतील. समाधान स्वरूप श्रेष्ठ आत्म्यांजवळ समस्या येण्याची हिंमत ठेवणार नाही. सुरुवातीला सेवा करताना देवी रूप, शक्तिरूप असल्यामुळे पतित दृष्टी वाल्यांना देखील परिवर्तन करून पावन बनवले. त्याचप्रमाणे समस्या समाधानाच्या रुपात पुढे येतील. आता आपला वेळ संस्कार परिवर्तनात घालवू नका विश्व कल्याणाचा श्रेष्ठ भावनेने श्रेष्ठ कामनेचे संस्कार अनुभव करा. या श्रेष्ठ संस्कारा समोर लौकिक संस्कार स्वतःच समाप्त होतील .आता युद्धात वेळ घालवू नका . विजयीपणाचे संस्कार अनुभव करा. शत्रु विजयी संस्कारांसमोर भस्म होऊन जाईल म्हणून बाबा म्हणतात, तन-मन-धन निरंतर सेवेत समर्पित करा. खुशाल मनाने,कर्माने करा परंतु सेवेशिवाय इतर कोणत्याही समस्यांमध्ये जाऊ नका. दान द्या वरदान द्या तर स्वतःचे ग्रहण स्वतः समाप्त होईल. अविनाशी नांगर टाका कारण वेळ कमी आहे आणि आत्म्यांची, वातावरणाची, प्रकृतीची सेवा करायची आहे. त्या भटकणार्या आत्म्यांना देखील योग्य ती जागा द्यायची आहे. मुक्तिधामात त्यांच्या घरात त्यांना पाठवायचे आहे तर अजून कितीतरी सेवा करावयाची आहे. आत्म्यांची संख्या किती प्रचंड आहे. प्रत्येक आत्म्याला मुक्ती आणि जीवन मुक्ती द्यायची आहे.सर्वकाही सेवेमध्ये लावून खूप मेवा खा. मेहनतीचा मेवा खाऊ नका सेवेचा मेवा, सेवेचा मेवा मेहनती पासून तुम्हाला वाचवील.

बाप दादा ने रिझल्ट मध्ये पाहिले की खूप करून जे पुरुषार्था मध्ये संस्कार परिवर्तनासाठी वेळ देतात भलेही पन्नास वर्षाचे असो की एका महिन्याचे परंतु सुरुवातीपासून आत्तापर्यंत परिवर्तन करण्याचा संस्कार एकाच रूपांमध्ये आहे. त्यामुळे मूळ संस्कार समया नुसार वेग-वेगळ्या रूपात समस्या बनून समोर येतात.उदाहरणार्थ कुणाला बुद्धीचा अभिमानाचा संस्कार, कुणाला घ्रुणेचा संस्कार तर कुणाला उदास होण्याचा संस्कार आहे . हेच संस्कार आदी पासून अंतापर्यंत वेगवेगळ्या वेळी अनुभवयास मिळतात, त्यात वेळ आणि शक्ती खूप खर्च केली. त्यामुळेच आता शक्तिशाली संस्कार दाताचे, विधाता आणि वरदाताचे अनुभव करा. हे महासंस्कार कमजोर संस्कारांना समाप्त करतील. आता संस्कारांना मारण्यासाठी वेळ घालवू नका. सेवेच्या फळ रूपानेच ते स्वतः समाप्त होतील. असा अनुभव आहे की, सेवेच्या चांगल्या स्थितीमध्ये राहिल्याने,आनंदात राहिल्याने समस्या स्वतःच दबल्या जातात कारण विचार करण्यासाठी वेळच नसतो. प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प सेवेमध्ये दिल्यास समस्यांचा नांगर उचलला जाईल आणि किनारा सोडाल .तुम्ही इतरांना रस्ता दाखविणारे . बाबांचा खजाना देणारे . आधारमूर्त बना,तर कमजोरी स्वतः दूर जाईल. समजले का? आता काय करावयाचे आहे ? आता बेहद्दचा विचार करा व बेहद्द कार्याचा विचार करा. दृष्टीने, वृत्तीने, वाणीने, संगाने वातावरण बनवत जावा. जसे भक्तिमार्गात काही कमी असल्यास दान देण्याची प्रथा आहे. सेवेची पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आता नवीन वळण घ्या, लहान-मोठा एक दिवसाचा व पन्नास वर्षाचा सगळेच समाधान स्वरूपात बना. समजले काय करावयाचे आहे? तसेही पन्नास वर्षानंतर जीवनाचे परिवर्तन होतेच गोल्डन जुबली म्हणजे परिवर्तन जुबली, संपन्न बनण्याची जुबली. अच्छा.

सदा विश्व कल्याणकारी समर्थ राहणारे, सदा वरदानी महादानी स्थितीमध्ये स्थित राहणारे, सदा स्वतःच्या समस्यांना इतरांसाठी समाधान स्वरूप बनणारे, समस्या सहज समाप्त करणारे, प्रत्येक क्षण व संकल्प सेवेमध्ये समर्पण करणारे,खऱ्या सोन्या सारख्या विशेष आत्म्यांना, बापसमान श्रेष्ठ आत्म्यांना,बाप दादांची गोड आठवण व नमस्कार.

सुर्वण जयंतीच्या आदीरत्नां सोबत बाप दादांची भेटः-

याचा आनंद होतो की सुरुवातीपासून आपल्या आत्म्यांचा बरोबर राहण्याचा साथी बनण्याचा विशेष पार्ट राहिलेला आहे.बरोबर देखील राहिले आणि जोपर्यंत जगावयाचे आहे तेथपर्यंत बापसमान साथी बनून राहिले. हे दोन्ही वरदान सुरुवातीपासून अंतापर्यंत मिळालेले आहेत.स्नेहा पासून सुरुवात झाली कारण अगोदर ज्ञान नव्हते. स्नेहा मुळेच निर्माण झाल्याने स्नेह देण्याच्या निमित्त बनलेले आहात. कुणीही समोर येऊ देत, विशेषतः तुम्ही बाबांच्या स्नेहाचा अनुभव करा. तुमच्यात बाबांचे चित्र आणि तुमच्या चलनांमध्ये बाबांचे चरित्र दिसावयास हवे. कुणी विचारले बाबांचे चरित्र कसे आहे,तर ते तुमच्या चलनातून दिसावयास हवे कारण बाबांच्या चरित्र अनुसार चालणारी तुम्ही आत्मा आहात चरित्र केवळ बाबांचे नाही तर गोपी वल्लभ आणि गोपींचे देखील आहे. बाबांनी मुलांसोबत प्रत्येक कर्म केले आहे परंतु सदैव मुलांना समोर ठेवले आहे तेव्हा समोर ठेवणे हे चरित्र झाले . असे चरित्र तुम्हा विशेष आत्म्यांद्वारे दिसले पाहिजे.कधीही 'मी पुढे असेल ' असा संकल्प बाबांनी केला नाही. बाबांनी सदैव त्याग करून तुम्हा मुलांना पुढे ठेवले आहे,त्यामुळेच ब्रह्मा बाबा सदैव नंबर एक राहिले आहेत. संबंध आणि वैभवाचा त्याग करणे सोपी गोष्ट नाही परंतु प्रत्येक कार्यात, संकल्पात इतरांना पुढे ठेवण्याची भावना हा श्रेष्ठ त्याग राहिलेला आहे, यालाच म्हणतात स्वतःचे भान विसरून जाणे, मी पणाला मिटवून टाकणे, प्रत्यक्ष पालनेची शक्ती ही कधीच कमी नसते.हीच पालना इतरांच्या पालनेत प्रत्यक्ष करत चला. सुरुवातीपासून बाबां बरोबर राहणे ही गोष्ट कमी विशेष नाही . विशेषता खूप आहेत परंतु आता विशेषता दान करावयाच्या आहेत . बाबांची विशेषता ही तुमची विशेषता. तेव्हा त्या विशेषतांचे दान करा. ज्ञानाचे दान तर सगळेच करतात परंतु तुम्हाला विशेषतांचे दान करावयाचे आहे. विशेषतांचे दान करणारे सदैव महान राहतील. ज्या प्रमाणे ब्रह्मा बाबा देखील अंत-समया पर्यंत महान होते .अच्छा, तुम्हाला पाहून सर्व आनंदी झाले,तेव्हा आनंद वाटला ना, खूप चांगला साजरा केला, सर्वांना आनंदी केले आणि आनंदी झाले .बाप दादा विशेष आत्म्यांच्या विशेष कार्यावर हर्षित आहेत. स्नेहाची माला तयार आहे. पुरुषार्थाची माळ, संपूर्ण होणार्यांची माळ समया नुसार प्रत्यक्ष होत आहे.

ज्याला पूर्ण फरिस्ता रूपाचा अनुभव येईल, समजा तो माळेचा दाणा बनेल. त्यावेळी, त्यानुसार प्रत्यक्ष होत राहतील परंतु स्नेहाची माळ पक्की तर आहे ना ? स्नेह माळेचे मोती सदा अमर असतात, अविनाश असतात . स्नेहा मध्ये सगळेच पास मार्क्स होणारे आहेत,मात्र समाधान स्वरूपाची माळ तयार होणार आहे . संपूर्ण अर्थात समाधान स्वरूप. जसे ब्रह्मा बाबांना पाहिले, समस्या घेऊन जाणाराही समस्या विसरून जात होता. काय घेऊन आला आणि काय घेऊन गेला, हे अनुभव केलेत ना, समस्या सांगण्याची हिंमत राहिली नाही कारण बाबांच्या संपूर्ण स्थिती समोर समस्या म्हणजे बालका समान आहे. यालाच म्हणतात समाधान स्वरूप. प्रत्येकाने समाधान स्वरूप झाल्यास समस्या समाप्त होऊन जातील. अर्ध्या कल्पा साठी निरोप समारंभ होऊन जाईल. आता तर विश्वाच्या समस्यांचे समाधान हेच परिवर्तन आहे.सुर्वण जयंती साजरी करण्याबरोबरच नम्र होण्याची जयंती देखील साजरी करा. जो नम्र होतो तो कोणत्याही रूपांमध्ये स्वतःला बदलू शकतो. नम्र होणे म्हणजे सर्वांचा प्रिय होणे . सर्वांची नजर शेवटी निमित्त होणाऱ्यांवरच राहते.अच्छा

वरदान:-

श्रेष्ठतेच्या आधारावर समीपतेच्या द्वारे कल्पातील श्रेष्ठ प्रारब्ध बनविणारे विशेष भुमिका धारी भव.

या मरजीवा जीवनामध्ये श्रेष्ठतेचा आधार दोन गोष्टींवर आहे. १.सदैव परोपकारी राहणे २.बाल ब्रह्मचारी राहणे.जे मुलं या दोन गोष्टींमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत अखंड राहतील कोणत्याही प्रकारची पवित्रता अर्थात स्वच्छता वारंवार खंडित करणार नाहीत,तसेच विश्वाप्रति आणि ब्राह्मण परिवारा प्रति जे सदा उपकारी असतील,असे विशेष पार्टधारी बाप दादांच्या जवळ राहतील .त्यांचे प्रालब्ध साऱ्या कल्पासाठी श्रेष्ठ बनले जाईल.

सुविचार:-

जर संकल्प व्यर्थ असतील तर दुसरे सर्व खजाने देखील व्यर्थ होतील.

||| ओम शांती |||

ओम शांती.