26-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही आता श्रीमतावर शांतीच्या गुफा मध्ये जात आहात. तुम्हाला बाबांकडून शांतीचा वारसा भेटत आहे,शांती मध्ये सर्वकाही येऊन जाते"

प्रश्न:-
नव्या दुनियेच्या स्थापनेचा मुख्य आधार काय आहे?

उत्तर:-
"पवित्रता".बाबा जेव्हा ब्रह्मा तना मध्ये येऊन नवीन दुनिया स्थापन करतात तेंव्हा तुम्ही आपसा मधे भाऊ - बहिण होऊन जाता. स्त्री-पुरुषाचा भान निघून जातो. या शेवटच्या जन्मांमध्ये पवित्र बनता तर पवित्र दुनियेचे मालक बनून जाता.तुम्ही स्वतःशी प्रतिज्ञा करता की आम्ही भाऊ-बहीण होऊन राहू. विकाराची दृष्टी ठेवणार नाही. एक दुसऱ्याला सावधान करून प्रगती करू.

गीत:-
जाग सजनी जाग....

ओम शांती।
गोड- गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले आणि बुद्धी मध्ये स्वदर्शन चक्र फिरले. बाबांनाही स्वदर्शन चक्रधारी म्हटले जाते कारण सृष्टीच्या आदी- मध्य - अंताला जाणणे- हे आहे स्वदर्शन चक्रधारी बनणे. या गोष्टी बाबां शिवाय कोणी समजावू शकत नाही. तुम्हा ब्राह्मणांचे सर्व काही शांतीवर अवलंबून आहे. सर्व मनुष्य म्हणतात ही शांती देवा, हे शांती देणाऱ्या... कोणालाही माहित नाही शांती कोण देते किंवा शांतीधाम मध्ये कोण घेऊन जाते. हे फक्त तुम्ही मुलंच जाणता, ब्राह्मणच स्वदर्शन चक्रधारी बनतात. देवतांनाही स्वदर्शन चक्रधारी म्हणू शकत नाही. रात्रंदिवसा चा फरक आहे.बाबा तुम्हा मुलांना समजावत आहेत, तुम्ही प्रत्येक जण स्वदर्शन चक्रधारी आहात- क्रमवार पुरूषार्थ अनुसार.बाबांची आठवण करणे,हीच मुख्य गोष्ट आहे. बाबांची आठवण करणे म्हणजेच शांतीचा वारसा घेणे. शांती मध्ये सर्वकाही येऊन जाते. तुमचे आयुष्य ही वाढते, काया ही निरोगी बनते. बाबां शिवाय कोणीही स्व दर्शन चक्रधारी बनवू शकत नाही,आत्माच बनते. पिताही आहे कारण की सृष्टीच्या आदी - मध्य - अंताचे ज्ञान आहे. गीतही ऐकले आता नवीन दुनिया स्थापन होत आहे. गीत तर मनुष्यांनी बनवले आहेत. बाबा बसून अर्थ समजावून सांगतात. तो आहे सर्व आत्म्यांचा पिता, तर सर्व मुलं आपापसात भाऊ- भाऊ बनतात. बाबा जेव्हा नवीन दुनिया रचतात तर प्रजापिता ब्रह्मा द्वारे तुम्ही भाऊ-बहीण आहात, प्रत्येक जण ब्रह्माकुमार-कुमारी आहेत, या गोष्टी बुद्धीमध्ये राहिल्याने स्त्री-पुरुषाचे भान निघून जाते. मनुष्यांना हे समजत नाही की आम्ही ही वास्तवामध्ये भाऊ भाऊ आहोत. नंतर बाबा रचना रचतात तर भाऊ-बहीण होतात. खराब दृष्टी निघून जाते. बाबा आठवण करून देतात, तुम्ही बोलवत आला आहात हे पतित-पावन, आता मी आलो आहे, तुम्हाला सांगत आहे या जन्मांमध्ये पवित्र रहा. तर तुम्ही पवित्र दुनियेचे मालक बनाल. ही प्रदर्शनी तर तुम्हा सर्वांच्या घराघरांमध्ये असायला पाहिजे कारण तुम्ही मुलं ब्राह्मण आहात. तुमच्या घरा मध्ये ही चित्रे नक्कीच असायला हवीत. यांच्यावर समजावून सांगणे खूपच सोपे आहे. ८४ चे चक्र तर बुद्धीमध्ये आहे ना. अच्छा- तुम्हाला एक बहीण (शिक्षिका) देऊ. ती येऊन सेवा करून जाईल. तुम्ही प्रदर्शनी सुरू करा. भक्ती मार्गामध्ये कोणी कृष्णाची पूजा किंवा मंत्रतंत्र जाणत नसतील तर ब्राम्हणाला बोलवतात. तो रोज येऊन पूजा करतो. तुम्हीही मागवु शकता. हे खूपच सोपे आहे. बाबांनी प्रजापिता ब्रह्मा द्वारे सृष्टी रचली असेल तर नक्कीच ब्रह्माकुमार- कुमारी भाऊ-बहिण बनले असतील. प्रतिज्ञा करतात आम्ही दोघेजण भाऊ-बहिण बनून राहू, विकाराची दृष्टी ठेवणार नाही. एक दुसऱ्यांना सावधान करून उन्नती प्राप्त करू.मुख्य आहे आठवणी ची यात्रा. ते लोक विज्ञानाच्या बळाने आकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु वरती काही दुनिया थोडीच आहे. हे आहे विज्ञानाच्या अतिमध्ये जाणे. आता तुम्ही शांतीच्या गुफे मध्ये जाता ,श्रीमतावर. त्यांचे आहे विज्ञान, इथे तर तुमची आहे शांती.मुलं जाणतात आत्मा तर स्वतः शांत स्वरूप आहे. या शरीराद्वारे फक्त भूमिका वठवायची आहे. कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. बाबा म्हणतात स्वतःला शरीरापासून वेगळी आत्मा समजून बाबांची आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील. खूप सहज आहे, सर्वात जास्त जे माझे भक्त अर्थात शिवाचे पुजारी आहेत, त्यांना समजावून सांगा. उंच ते उंच पुजा आहे शिवाची कारण तोच सर्वांचा सदगती दाता आहे.

आता तुम्ही मुलं जाणत आहात बाबा आले आहेत, सर्वांना सोबत घेऊन जाणार आहेत. आपल्या वेळेवर आम्हीही नाटका नुसार कर्मातीत अवस्था प्राप्त करू नंतर विनाश होईल.आपली आत्मा सतो प्रधान बनण्यासाठी खूप पुरुषार्थ करायचा आहे. बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे, श्रीमत भगवत गीता असे म्हणतात, महिमा मोठी आहे. देवतांचीही महिमा गातात- सर्वगुणसंपन्न, संपूर्ण निर्विकारी.... बाबाच येऊन संपूर्ण पावन बनवतात. जेव्हा संपूर्ण पतीत दुनिया बनते तेव्हाच बाबा येऊन संपूर्ण पावन दुनिया बनवतात. सर्वजण म्हणतात आम्ही ईश्वराची मुलं आहोत तर नक्कीच स्वर्गाचा वारसा असायला पाहिजे. प्रजापिता ब्रह्मा द्वारे आता आम्ही भाऊ-बहीण बनलो आहोत. कल्पा पूर्वीही बाबा आले होते, शिवजयंती साजरी करतात. नक्कीच प्रजापिता ब्रह्मा ची मुलं बनली असतील. बाबांजवळ प्रतिज्ञा करतात- बाबा आम्ही एक दुसऱ्या सोबत राहून पवित्र राहतो. तुमच्या मार्गदर्शनावर चालत राहतो. कोणती मोठी गोष्ट नाही. आता हा शेवटचा जन्म आहे, हा मृत्युलोक नष्ट होणार आहे. तुम्ही आता समजदार बनले आहात. कोणी स्वतःला भगवान म्हणत असतील, तर म्हणतील भगवान तर सर्वांचा सदगती दाता आहे. हे मग स्वतःला कसे म्हणू शकतात परंतु समजतात नाटकाचा खेळ आहे.

बाबा तुम्हा मुलांना स्वदर्शन चक्रधारी बनवत आहेत. बाबा म्हणतात आता सेवेमध्ये तत्पर बना. घराघरांमध्ये प्रदर्शनी सुरू करा. यासारखे महान पुण्य कोणतेच नाही. कोणाला बाबांचा रस्ता दाखवणे, याच्यासारखे दान कोणतेच नाही. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर पाप नष्ट होतील. बाबांना बोलवता यासाठी हे पतित-पावन , मुक्तिदाता, मार्गदर्शक या. तुमचेही नाव पांडव गायले आहे. बाबाही पंडे आहेत. सर्व आत्म्यांना घेऊन जातील. ते आहेत शरीराचे पंडे. हा आहे आत्मिक. ती आहे शरीराची यात्रा, ही आहे आत्म्याची यात्रा. सतयुगामध्ये भक्तीमार्गा मधील यात्रा नसतात. तिथे तुम्ही पूज्य बनता, आता बाबा तुम्हाला किती समजदार बनवत आहेत. तर बाबांच्या मतावर चालायला हवे ना. कोणत्याही प्रकारची शंका असेल तर विचारायला पाहिजे. आता बाबा म्हणतात गोड - गोड मुलांनो देही- अभिमानी बना. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. तुम्ही माझी लाडकी मुलं आहात ना. अर्ध्या कल्पाच्या तुम्ही सजनी आहात. एकाचीच किती नावे ठेवली आहेत, किती नावे, किती मंदिरे बनवतात. मी तर एकच आहे. माझे नाव शिव आहे. मी पाच हजार वर्षापूर्वी भारतामध्येच आलो होतो. मुलांना दत्तक घेतले होते. आताही दत्तक घेत आहे. ब्रह्माची ची मुलं असल्याने तुम्ही नातवंडे आहात. आत्म्याला वारसा इथेच मिळतो. इथे भाऊ-बहिणीचा प्रश्न निर्माण होत नाही. आत्माच शिकत आहे, वारसा घेत आहे. सर्वांना हक्क आहे. तुम्ही मुलं या जुन्या दुनियेमध्ये जे काही पहात आहात, हे सर्व विनाश होणार आहे. बरोबर महाभारत लढाई आहे. बेहद चा पिता बेहद चा वारसा देता आहे. बेहद चे ज्ञान ऐकवत आहे. तर त्यागही बेहद चा असायला हवा. तुम्ही जाणत आहात कल्पा पूर्वीही बाबांनी राज योग शिकवला होता, राजस्व अश्वमेध यज्ञ रचला होता नंतर राज्य करण्यासाठी सतयुगी नवी दुनिया जरूर पाहिजे. जुन्या दुनियेचा विनाशही झाला होता. ५००० वर्षाची गोष्ट आहे ना. ही लढाई लागली होती, ज्यामुळे स्वर्गाचे गेट उघडले होते. बोर्डा वरतीही लिहा- स्वर्गाचे द्वार कसे उघडत आहे- येऊन समजून घ्या. तुम्ही समजावून सांगू शकत नसाल तर दुसऱ्याला बोलवू शकता. नंतर हळूहळू वाढ होत जाईल. तुम्ही किती भरपूर ब्राह्मण ब्राह्मणी आहात प्रजापिता ब्रह्मा ची मुले. वारसा शिव बाबांकडून मिळतो. तोच सर्वांचा पिता आहे. हे तर बुद्धी मध्ये चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायला पाहिजे- आम्ही ब्राह्मण पासून देवता बनत आहोत. आम्हीच देवता होतो नंतर चक्र पूर्ण केले. आम्ही आता ब्राह्मण बनलो आहोत नंतर विष्णुपुरी मध्ये जाणार आहोत. ज्ञान खूपच सोपे आहे परंतु कोट्यामध्ये एखादाच येतो. प्रदर्शनीमध्ये किती भरपूर येतात, चुकून एखादाच येतो, काहीजण फक्त महिमा करतात खूपच छान आहे, आम्ही नक्की येऊ. कुणी एखादाच 7 दिवसाचा कोर्स करतात, 7 दिवसांची काय गोष्ट आहे. गीतेचा पाठ ही 7 दिवस ठेवतात. 7 दिवस तुम्हाला भट्टीमध्ये राहायचे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केल्याने सर्व कचरा निघून जाईल. अर्ध्या कल्पा चा खराब आजार देह - अभिमान आहे तो काढून टाकायचा आहे. देही-अभिमानी बनायचे आहे. 7 दिवसाचा कोर्स मोठा थोडीच आहे. कुणाला सेकंदामध्ये ही बाण लागू शकतो. उशिरा येणारे पुढे जाऊ शकतात. म्हणतात आम्ही काहीही करून बाबांकडून वारसा घेणारच. काहीजण तर जुन्या पेक्षाही पुढे निघून जातात कारण चांगले-चांगले पॉईंट्स तयार माल मिळतो. प्रदर्शनी समजावणे किती सोपे होऊन जाते. स्वतः ला समजावून सांगता येत नसेल तर बहिणीला बोलवा. रोज येऊन कथा सांगून जाईल.५००० वर्षापूर्वी या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते, जे १२५० वर्ष चालले. किती छोटी गोष्ट आहे. आम्हीच देवता होतो नंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनलो. मी आत्मा ब्राम्हण बनलो, हम सो चा अर्थ किती युक्ती युक्त समजावत आहेत. विराट रूप पण आहे, परंतु त्यामध्ये ब्राह्मण आणि शिव बाबांना काढून टाकले आहे. अर्थ काहीच समजत नाही. आता तुम्हा मुलांना आठवणीची मेहनत करायची आहे. दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या संशयामध्ये यायचे नाही. विक्रमाजीत बनून उंच पद प्राप्त करायचे आहे,तर हे चिंतन नष्ट करायचे आहे हे असे का होते, हा असे का करतो. या सर्व गोष्टी सोडून एकाच चिंतन राहू द्या की,मला तमो प्रधान पासून सतो प्रधान बनायचे आहे. जेवढी बाबांची आठवण करू तेवढे विक्रमाजीत बनून उंच पद प्राप्त करू. बाकी फालतू गोष्टी ऐकून स्वतःचा माथा खराब करून घ्यायचा नाही. सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट मुख्य आहे- त्यांना विसरू नका. कोणासोबत वेळ वाया घालवू नका. तुमचा वेळ खूप मूल्यवान आहे. वादळांना घाबरू नका. खूप त्रास होईल, नुकसान होईल. परंतु बाबांची आठवण कधी विसरू नका. आठवणीनेच पावन बनायचे आहे, पुरुषार्थ करून उंच पद प्राप्त करायचा आहे. हे वृद्ध बाबा एवढे उच्चपद प्राप्त करतात, आम्ही का नाही करणार. हेही शिक्षण आहे ना. तुम्हाला इथे कोणतेही पुस्तक इ. उचलण्याची गरज नाही. बुद्धीमध्ये सर्व गोष्ट आहे. किती छोटी गोष्ट आहे. सेकंदाची गोष्ट आहे, जीवन मुक्ती सेकंदामध्ये मिळते. मुख्य गोष्ट आहे बाबांची आठवण करा. बाबा जे तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात त्यांना तुम्ही विसरून जाता! म्हणतात सर्व थोडीच राजा बनणार आहेत. अरे तुम्ही सर्वांचे चिंतन का करता! शाळेमध्ये ही चिंता थोडीच असते की सर्वांना शिष्यवृत्ती मिळेल का? शिकत राहतील ना. प्रत्येकाच्या पुरुषार्था वरून समजले जाते की यांना कोणते पद मिळणार आहे. अच्छा.

गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात - पिता बाप-दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. ही वेळ खूप मूल्यवान आहे, याला फालतू गोष्टींमध्ये वाया घालवू नका. कितीही वादळ आले, नुकसान झाले परंतु बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे.

2. तमो प्रधान पासून सतो प्रधान बनण्याचे चिंतन करायचे आहे, दुसरे कोणते चिंतन चालायला नको. हम सो, सो हम (आम्हीच होतो) ची छोटीशी गोष्ट खूप युक्तीने समजून घ्यायची आणि समजा वयाची आहे.

वरदान:-
दाता पणाच्या भावने द्वारे इच्छा मात्र अविद्याच्या स्थितीचा अनुभव करणारे तृप्त आत्मा भव

सदैव एक लक्ष असायला हवे की मला दाताचा मुलगा बनून सर्व आत्म्यांना द्यायचे आहे, दाता पणाची भावना ठेवल्याने संपन्न आत्मा बनाल आणि जे संपन्न असतील ते सदैव तृप्त असतील. मी देणाऱ्या दाताचा मुलगा आहे- देणे म्हणजेच घेणे आहे, हीच भावना सदैव निर्विघ्न, इच्छा मात्रम अविद्या च्या स्थितीचा अनुभव करविते. सदैव एक लक्षा कडेच आपली नजर असायला हवी, ते लक्ष आहे बिंदू इतर कोणत्याही गोष्टींच्या विस्ताराला पाहूनही पाहू नका, ऐकत असूनही ऐकू नका.

बोधवाक्य:-
बुद्धि किंवा स्थिती जर कमजोर असेल तर त्याचे कारण आहे व्यर्थ संकल्प.