29-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- भविष्यामध्ये उच्च घराण्यांमध्ये येण्याचा आधार शिक्षण आहे, या शिक्षणामुळेच तुम्ही गरीब पासून राजकुमार बनू शकता."

प्रश्न:-
मुखामध्ये सोन्याचा चमचा दोन प्रकारे प्राप्त होऊ शकतो, कसा?

उत्तर:-
एक भक्तीमध्ये दान पुण्य केल्यामुळे, दुसरे, ज्ञानामध्ये शिक्षणामुळे.भक्तीमध्ये दान पुण्य करतात,तर राजा किंवा सावकाराच्या जवळ जन्म घेतात परंतु ते तर हदचे आहे. तुम्ही ज्ञानामध्ये शिक्षणाने मुखामध्ये सोन्याचा चमचा प्राप्त करता. ही आहे बेहद्द ची गोष्ट. भक्तीमध्ये शिक्षणाने राजाई भेटत नाही. इथे जे जेवढ्या चांगल्याप्रकारे शिकतात, तेवढे उंच पद प्राप्त करतात.

ओम शांती।
गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या आत्मिक मुलांना बाबा बसून समजावत आहेत, याला म्हटले जाते आत्मिक ज्ञान. बाबा येऊन भारत वासी मुलांना समजावून सांगतात, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा, हा बाबांनी खास हुकूम केला आहे, तर तो मानायला पाहिजे ना. उच्च ते उच्च बाबांची श्रीमत प्रसिद्ध आहे. हेही तुम्हा मुलांना ज्ञान आहे की फक्त शिव बाबांनाच श्री श्री म्हणू शकतो. तेच श्री श्री बनवतात, श्री म्हणजे श्रेष्ठ. तुम्हा मुलांना आता माहित पडले आहे की यांना बाबांनी असे बनवले आहे.आता आम्ही नव्या दुनियेसाठी शिकत आहात.नव्या दुनियेचे नावच आहे स्वर्ग, अमर पुरी. महिमा करण्यासाठी नावे अनेक आहेत. म्हणतात ही स्वर्ग आणि नर्क. अमका स्वर्गवासी झाला याचा अर्थ नर्क वासी होता ना. परंतु मनुष्यामध्ये एवढी समज नाही, स्वर्ग- नर्क, नवी दुनिया, जुनी दुनिया कशाला म्हटले जाते, काहीच जाणत नाहीत. बाहेरचा किती दिखावा आहे. तुम्हा मुलांमध्येही खूप थोडे आहेत,जे समजतात बरोबर बाबा आम्हाला शिकवत आहेत. आम्ही हे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी आलो आहोत. आम्ही गरीबा पासुन राजकुमार बनणार आहोत. प्रथम- प्रथम आम्ही जाऊन राजकुमार बनणार. हे शिक्षण आहे, जसे इंजिनियर, वकील इ. शिकतात तर बुद्धी मध्ये राहते की आम्ही घर बांधू नंतर असे करू.... हे प्रत्येकाला आपले कर्तव्य आठवणींमध्ये येत असते. या शिक्षणाद्वारे तुम्हा मुलांना जाऊन मोठ्या उच्च घरामध्ये जन्म घ्यायचा आहे. जो जेवढे जास्ती शिकेल तेवढा खूप उच्च घरांमध्ये जन्म घेईल. राजाच्या घरा मध्ये जन्म घेऊन नंतर राज्य चालवायचे आहे. गायन केले जाते मुखामध्ये सोन्याचा चमचा.एक तर ज्ञानामुळे हा मुखामध्ये सोन्याचा चमचा मिळू शकतो. दुसरे, जर दान - पुण्य चांगल्या प्रकारे केले तरीही राजाच्या जवळ जन्म मिळेल.तो आहे हद्दचा. हा आहे बेहद्दचा. प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या. जर काही समजले नाही तर विचारू शकता. लिहून घ्या ही- ही गोष्ट बाबांना विचारायची आहे. मुख्य आहे बाबांच्या आठवणी ची गोष्ट. बाकी कोणता संशय इ. आहे तर तो ठीक करू शकतो. हे ही मुलं जाणतात जेवढे भक्ती मार्गामध्ये दान पूर्ण करतात, तेवढे सावकारा जवळ जन्म घेतात. जर कोणी वाईट कर्म करतात तर त्यांना तसाच जन्म मिळतो, बाबांच्या जवळ येतात. काही काहींचे तर असे कर्मबंधन आहेत विचारूच नका. हे सर्व आहेत पाठीमागचे कर्मबंधन. काही-काही राजेही असे असतात, खूप कडे कर्मबंधनात असतात. या लक्ष्मीनारायणला तर कोणतेच बंधन नाही. तिथे आहेच योग बळाची रचना. जेंव्हा की योग बळा द्वारे आम्ही विश्वाचे राज्य घेऊ शकतो तर काय मुलं जन्माला घालू शकत नाही! सुरुवातीलाच साक्षात्कार होतो. तिथे तर ही साधारण गोष्ट आहे. खुशी मध्ये वाद्य वाजत राहतात. वृद्ध पासून लहान मुल बनतात. महात्मा पेक्षाही छोट्या मुलांना जास्ती मान दिला जातो कारण की,महात्मा तरीही संपूर्ण जीवन पार करून मोठे झालेले असतात. विकारांना जाणतात. लहान मुलं जाणत नाहीत,म्हणून महात्मा पेक्षाही उच्च म्हटले जाते. तिथे तर सर्व महात्मे आहेत. कृष्णालाही महात्मा म्हणतात. तो आहे खरा महात्मा. सतयुगा मध्येच महान आत्मे असतात. त्यांच्यासारखे इथे कुणी असू शकत नाही.

तुम्हा मुलांना मनामध्ये खूप खुशी व्हायला पाहिजे. आता आम्ही नव्या दुनियेमध्ये जन्म घेणार आहोत. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. जुने घर झाल्यानंतर नवीन घरांमध्ये जाण्याची खुशी असते ना. किती छान छान मार्बल इ. ची घरं बनवतात. जैनी लोकांकडे खूप पैसे असतात, ते स्वतःला उंच कुळाचे समजतात. खरे पाहता इथे कोणतेही उच्च कुळ नाही. लग्नासाठी उच्च कुळ शोधत असतात. तिथे उच्च कूळ इ. ची गोष्ट नसते. तिथे तर एकच देवतांचे उंच कुळ असते, दुसरे कोणतेही नाही. म्हणून तुम्ही संगम युगावर अभ्यास करत आहात की आम्ही एका बाबांची मुलं सर्व आत्मा आहोत. आत्मा आहे प्रथम, नंतर आहे शरीर. दुनियेमध्ये सर्व देह- अभिमानी राहतात. तुम्हाला आता देही- अभिमानी बनायचे आहे. ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहून आपली अवस्था बनवायची आहे. बाबांना किती मुलं आहेत, किती मोठा ग्रहस्थ आहे, किती विचार येत असतील. यांनाही मेहनत करावी लागते. मी काही संन्याशी नाही. बाबांनी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. ब्रह्मा - विष्णू- शंकराचे चित्रही आहे ना. ब्रह्मा सर्वात उच्च आहेत. तर त्यांना सोडून बाबा कोणा मध्ये येणार. ब्रह्मा कोणी नवीन जन्माला येत नाही. तूम्ही पहाता ना यांना-कसे दत्तक घेतो. तुम्ही कसे ब्राह्मण बनता. या गोष्टींना तुम्हीच जाणता दुसरे कोणी काय जाणणार. असे म्हणतात हा तर जवाहरी होता, यांना तुम्ही ब्रह्मा म्हणता! त्यांना काय माहित एवढे ब्राह्मण - ब्राह्मणी कसे जन्माला येतील. एका- एका गोष्टी मध्ये किती समजवावे लागते. या खूप रहस्य युक्त गोष्टी आहेत ना. हा ब्रह्मा व्यक्त, तो अव्यक्त. हे पवित्र बनुन नंतर अव्यक्त बनतात. हे म्हणतात- यावेळी मी पवित्र नाही. असे पवित्र बनत आहेत. प्रजापिता तर इथे असायला पाहिजे ना. नाहीतर कुठून येणार. बाबा स्वतः समजावतात मी पतित शरीरामध्ये येतो, नक्की यांनाच प्रजापिता म्हणू शकतो. सूक्ष्म वतन मध्ये नाही म्हणणार.तिथे प्रजा काय करणार. हे स्वतंत्र पवित्र बनतात.जसे हे पुरुषार्थ करतात तसे तुम्हीही पुरुषार्थ करून स्वतंत्र पवित्र बनता.विश्वाचे मालक बनता.स्वर्ग वेगळा, नर्क वेगळा आहे. आता तर किती तुकडे - तुकडे झाले आहेत.५००० वर्षापूर्वीची गोष्ट आहे,जेंव्हा कि यांचे राज्य होते. ते लोक नंतर लाखो वर्ष असे म्हणतात. या गोष्टींना तेच समजतील ज्यांनी कल्पा पूर्वी समजले असेल. तुम्ही पाहता इथे मुसलमान, पारसी इ. सर्व येतात. स्वतः मुसलमान हिंदुंना ज्ञान देत आहेत. आश्चर्य आहे ना. समजा कोणी शीख धर्माचे आहे, तेही बसून राजयोग शिकवतात. जे इतर धर्मामध्ये गेले आहेत ते परत देवता कुळामध्ये येतात. कलम लागत आहे. तुमच्याजवळ ख्रिश्चन, पारशी ही येतात बौद्ध पण येतील. तुम्ही मुलं जाणता जेव्हां वेळ जवळ येईल, तेंव्हा चोहू बाजूंनी आपले नाव निघेल. एकच भाषण तुम्ही केले तर खूप जण तुमच्याकडे येतील. सर्वांना स्मृती येईल आमचा खरा धर्म हा आहे. जे आपल्या धर्माचे असतील ते सर्वजण येणार तर आहेतच ना. लाखो वर्षांची गोष्ट नाही. बाबा बसून समजावत आहेत तुम्ही काल देवता होते, आता परत देवता बनण्यासाठी बाबांकडून वारसा घेत आहात.

तुम्ही खरे- खरे पांडव आहात, पांडव अर्थात पंडे. ते आहेत शारीरिक पंडे. तुम्ही ब्राह्मण आहात आत्मिक पंडे. तुम्ही आता बेहद्दच्या बाबांकडून शिकत आहात. हा नशा तुम्हाला खूप असायला पाहिजे. आम्ही बाबांच्या जवळ जात आहे, ज्यांच्या द्वारे बेहद्दचा वारसा मिळत आहे. तो आमचा पिता शिक्षकही आहे,यामध्ये शिकण्यासाठी टेबल-खुर्ची इत्यादी ची गरज नाही. हे तुम्ही लिहिता तेही आपल्या पुरुषार्था साठी. खरे पाहता ही समजण्याची गोष्ट आहे. शिव बाबा तुम्हाला पत्र लिहिण्यासाठी पेन्सिल इ. उचलतात, मुलं समजतात शिव बाबांचे लाल अक्षर आले आहे. बाबा लिहितात आत्मिक मुलांनो.मुलंही समजतात आत्मिक बाबा. ते खूप उच्च ते उच्च आहेत, त्याच्या मतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे. हा आदि- मध्य - अंत दुःख देणारा आहे. त्या भुताच्या अधीन होऊ नका.पवित्र बना. बोलवतातही हे पतित-पावन. तुम्हा मुलांना आता राज्य करण्याची, खूप ताकद मिळते. ज्यावर कोणीही विजय मिळवू शकत नाही. तुम्ही किती सुखी बनता. तर या शिक्षणावर किती लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला बादशाही मिळत आहे. तुम्ही जाणत आहात आम्ही कशा पासून काय बनत आहोत. भगवानुवाच आहे ना. मी तुम्हाला राजयोग शिकवत आहे, राजांचाही राजा बनवत आहे. भगवान कोणाला म्हटले जाते, हेही कुणाला माहीत नाही. आत्मा बोलवते- ओ बाबा! तर माहित असायला पाहिजे ना- ते केव्हा आणि कसे येतील? मनुष्य तर नाटकाच्या आदि- मध्य - अंत कालावधी इ. ला जाणतील ना. जाणल्या मुळे तुम्ही देवता बनता. ज्ञान आहे सदगती साठी. यावेळी कलियुगाचा अंत आहे. सर्व दुर्गती मध्ये आहेत. सतयुगामध्ये असते सदगती.आता तुम्ही जाणता बाबा आले आहेत, सर्वांची सदगती करण्यासाठी. सर्वांना जागे करण्यासाठी आले आहेत. कोणती कब्र थोडीच आहे. परंतु घोर अंधारात पडले आहेत, त्यांना जागे करण्यासाठी येतात. जी मुले गाढ झोपेतून जागी होतात त्यांच्या मनामध्ये खूप खुशी होते, आम्ही शिव बाबांची मुलं आहोत, कोणत्याही प्रकारचा फरक नाही. बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवत आहे.रडण्याचे नावही नाही. ही आहे रडण्याची दुनिया. ती आहे हर्षित राहण्याची दुनिया.त्यांची चित्रे पहा किती सुंदर हसतमुख बनवतात. ते चेहरे तर इथे काढू शकत नाहीत. बुद्धी ने समजतात यांच्यासारखे चेहरे दिसतात. तुम्हा गोड-गोड मुलांना आता स्मुर्ती आली आहे कि भविष्यामध्ये अमरपुरी मध्ये आम्ही राजकुमार बनणार आहोत. या मृत्यू लोकाला, या दुनियेला आग लागणार आहे. युद्धामध्ये एक दुसऱ्याला कसे मारतात, आम्ही कोणाला मारतो हे ही समजत नाही. हाहाकारा नंतर जय-जयकार होणार आहे. तुमचा विजय, बाकी सर्वांचा विनाश होईल. रुद्र माळेमध्ये गुफंले जाल नंतर विष्णूच्या माळेमध्ये गुफंले जाल. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात आपल्या घरी जाण्यासाठी. भक्ती किती पसरली आहे. ज्याप्रमाणे झाडाची अनेक पाने असतात त्याप्रमाणे भक्ती ही पसरली आहे. बीज आहे ज्ञान.बीज किती छोटे आहे. बीज आहे बाबा, या झाडाची स्थापना, पालना आणि विनाश कसा होतो, हे तुम्ही जाणता. हे वेगवेगळ्या धर्माचे उलटे झाड आहे. दुनियेमध्ये एकालाही माहित नाही. आता मुलांना खूप मेहनत करायची आहे बाबांची आठवण करण्याची, तरच विकर्म विनाश होतील. ते गीता ऐकवणारे ही म्हणतात मनमनाभव. सर्व देहाचे धर्म सोडून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. मनुष्य याचा अर्थ थोडीच समजतात. तो आहे भक्तिमार्ग. हा आहे ज्ञान मार्ग. ही राजधानी स्थापन होत आहे. चिंतेचा कोणताही विषय नाही. ज्याने थोडेही ज्ञान ऐकले तर तो प्रजे मध्ये येईल. ज्ञानाचा विनाश होत नाही. बाकीचे यथार्थ रीतीने जाणून पुरुषार्थ करतात तेच उंच पद प्राप्त करतात. ही बुद्धीमध्ये समज आहे ना. आम्ही नव्या दुनियेमध्ये राजकुमार बनणार आहोत. विद्यार्थी परीक्षा पास करतात तेंव्हा त्यांना किती खुशी होते. तुम्हाला तर हजार पटीने जास्त अतिंद्रिय सुख व्हायला पाहिजे. आम्ही सार्या विश्वाचे मालक बनतो. कोणत्याही गोष्टी मध्ये कधी रुसायचे नाही. ब्राह्मणी शी पटत नाही, बाबांवर रुसतात, अरे तुम्ही बाबांशी बुद्धीचा योग लावा ना. त्यांची तर प्रेमानी आठवण करा. बाबा बस तुमचीच आठवण करत- करत आम्ही घरी येऊ. अच्छा.

गोड - गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप-दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही, सदैव हर्षित राहायचे आहे. स्मृतीमध्ये ठेवा आम्ही शिव बाबांची मुलं आहोत, बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवण्यासाठी आले आहेत.

2. आपल्या अवस्थेला एकरस बनवण्यासाठी देही - अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. या जुन्या घरातून ममत्व काढून टाकायचे आहे.

वरदान:-
बंधनांच्या पिंजऱ्याला तोडून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करणारे खरे विश्वस्त भव

शरीराचे किंवा संबंधांचे बंधनच पिंजरा आहे. कर्तव्यपालनही निमित्तमात्र निभवायचे आहे,लगावामूळे नाही तेव्हा निर्बंधन म्हटले जाऊ शकाल.जे विश्वस्त (ट्रस्टी) बनून चालतात ते निर्बंधन आहेत. जर कोणतेही माझेपण असेल तर पिंजऱ्यामध्ये बंद आहात.आता पिंजर्यातल्या मैने पासून फरिश्ता बनले त्यामुळे जराही कुठे बंधन नको. मनाचेही बंधन नाही. काय करू, कसे करू, खूप वाटत होत, नाही- हेसुद्धा मनाचे बंधन आहे. जेव्हा मरजीवा बनले आहात तर सर्व प्रकारचे बंधन समाप्त, सदैव जीवन मुक्त स्थितीचा अनुभव होत राहो.

बोधवाक्य:-
संकल्पा ना वाचवा तर वेळ, बोल स्वतः वाचतील.