07-06-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   20.01.86  ओम शान्ति   मधुबन


पुरुषार्थ आणि परिवर्तन करण्यासाठी, सुवर्ण संधीचे वर्ष.


आज समर्थ बाबा आपल्या समर्थ मुलांना पाहत आहेत. ज्या समर्थ आत्म्यांनी सर्वात मोठ्यात मोठे समर्थ कार्य, विश्वाला नवीन, श्रेष्ठ विश्व बनवण्याचा दृढ संकल्प केला आहे. प्रत्येक आत्म्याला शांत व सुखी बनवण्याचे, समर्थ कार्य करण्याचा संकल्प केला आहे आणि या संकल्पाला घेऊन, दृढ निश्चय बुद्धी बनून कार्याला प्रत्यक्ष रूपामध्ये घेऊन जात आहात. सर्व समर्थ मुलांना, एकच श्रेष्ठ संकल्प आहे की, हे श्रेष्ठ कार्य होणारच आहे. यापेक्षा पण हे जास्त निश्चित आहे की, हे कार्य झालेले आहे, फक्त कर्म आणि फळाचा पुरुषार्थ आणि प्रारब्धाच्या निमित्त आणि निर्माणच्या कर्म तत्वज्ञाना नुसार निमित्त बनून कार्य करत आहात. भावी अटळ आहे, फक्त आपल्या श्रेष्ठ भावने द्वारे, भावनेचे फळ अविनाशी प्राप्त करण्याचे निमित्त बनले आहात. दुनियाचे अज्ञानी आत्मे हाच विचार करतात, की शांती होईल, कशी होईल, काय होईल, काहीच आशा दिसून येत नाही. काय खरोखर होईल? तुम्ही तर म्हणता होईल नाही परंतु झालेलीच आहे, कारण ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक वेळा हे कार्य झालेले आहे आणि आत्ता पण होणारच आहे. निश्चय बुद्धी निश्चिंत भावी ला जाणतात. इतका अटल निश्चय आहे का ? कारण स्व परिवर्तनाचे प्रत्यक्ष प्रमाणा द्वारे जाणतात, प्रत्यक्ष प्रमाणाच्या पुढे दुसर्‍या कोणत्या प्रमाणाची आवश्यकताच नाही. सोबत परमात्म कार्य नेहमीच सफल आहेच. हे कार्य आत्म्यांचे, महान आत्म्यांचे किंवा धर्मात्म्यां चे नाही. परमात्म कार्य सफल झालेलेच आहे, असे निश्चय बुद्धी, निश्चित भविष्याला जाणारे, निश्चित आत्मे आहात. लोक म्हणतात किंवा घाबरतात, विनाश होईल आणि तुम्ही निश्चिंत आहात, कारण नवीन दुनियेची स्थापना होत आहे. असंभव आणि संभव मध्ये खूप अंतर आहे. तुमच्या समोर नेहमीच स्वर्णिम दुनियाचा स्वर्णिम सूर्य उदय झालेलाच आहे आणि त्यांच्या समोर विनाशाचे काळे ढग आहेत. आता तुम्ही सर्व बाबांच्या जवळ असल्यामुळे, नेहमी खुशीमध्ये नाचत आहात, की आज जुनी दुनिया आहे, उद्या स्वर्णीम दुनिया असेल. आज आणि काल इतक्या जवळ पोहोचले आहात. आता हे वर्ष संपूर्णता आणि समानतेचे जवळ अनुभव करायचे आहे. संपूर्णता तुम्हा सर्व फरिश्त्यां चे विजय माळ घेऊन आव्हान करत आहे. विजय माळेचे अधिकारी तर बनायचे आहे ना. संपूर्ण बाबा आणि संपूर्ण अवस्था दोघेही तुम्हा मुलांना बोलवत आहेत की, हे श्रेष्ठ आत्म्यांनो या, समान मुलांनो या, समर्थ मुलांनो या, समान बनून आपल्या गोड घरामध्ये विश्रामी बना. जसे बापदादा विधाता आहेत, वरदाता आहेत, असेच तुम्ही पण या वर्षाला, विशेष ब्राह्मण आत्म्यांच्या प्रती किंवा सर्व आत्म्या प्रती विधाता बनवून बना, वरदाता बना. उद्या देवता बनणारे आहात, आता अंतिम फरिश्ता स्वरूप बना. फरिश्ता काय करतात?वरदाता बनून वरदान देतात. देवता नेहमी देतात, घेत नाहीत. त्यांना घेणारे म्हणत नाहीत. तर वरदाता आणि विधाता, फरिश्ता सो देवता, आता हाच महामंत्र, आम्ही फरिश्ता सो देवता, या मंत्राला विशेष स्मुर्ती स्वरूप बनवा. मनामनाभव तर झालेले आहातच ना. हा सुरुवातीचा मंत्र राहिला. आता या समर्थ मंत्राला अनुभव मध्ये घेऊन या. असे व्हायला पाहिजे, हे मिळायला पाहिजे, या दोन्ही गोष्टी घेणारे बनवतात. घेण्याचे संस्कार देवता बनण्या मध्ये वेळ घेतात, म्हणून या संस्काराला समाप्त करा. प्रथम जन्मामध्ये ब्रह्माच्या घरातून देवता बनून, नवीन जीवन, नवीन युगाचे क्रमांक एक मध्ये या. इसवी सन पण, एक एक एक (१/१/१) हवे. प्रकृती पण सतोप्रधान नंबर एक होईल, राज्य पण नंबर एक होईल. तुमची सुवर्णयुगी अवस्था पण क्रमांक एक असायला हवी. एका दिवसाच्या फरकां मध्ये पण एक एक एक हे बदलून जाते. आता पासून फरिश्ता सो देवता बनण्यासाठी, अनेक वर्षांचे संस्कार प्रत्यक्ष कर्मामध्ये धारण करा, कारण अनेक वर्षाचे गायन आहे, जी अनेक वर्षाची सीमा आहे, ती आत्ता समाप्त होत आहे. त्याची तारीख मोजत बसू नका. विनाशाला अंतकाळ म्हटले जाते, त्या वेळेत अनेक वर्षाची संधी पण समाप्त होईल, परंतु थोड्या वेळेची संधी पण समाप्त होईल, म्हणून बाप दादा अनेक वर्ष आहेत, या बाबीला समाप्ती चा इशारा देत आहेत. परत अनेक वर्ष आहेत, असे समजण्याची संधी समाप्त होऊन, थोडा वेळ पुरुषार्थ, थोडीच प्रारब्ध आहे, हेच म्हणतील. कर्मा च्या खात्यामध्ये आता अनेक वर्ष नष्ट होऊन, थोडावेळ किंवा अल्पकाळ सुरू झाला आहे, म्हणून हे वर्ष परिवर्तन करण्याचे वर्ष आहे. अनेक वर्षाचे थोड्या वेळा मध्ये परिवर्तन होणार आहे, म्हणून या वर्षाच्या पुरुषार्था मध्ये, अनेक वर्षाचा हिशेब, जितके जमा करू इच्छिता, तेवढे करू शकतात. परत गा-हाणे करू नका की, आम्ही चालढकल करत होतो, आज नाहीतर उद्या बदलून जाऊ, म्हणून कर्माच्या गती ला जानणारे बना. ज्ञानसंपन्न बनून तीव्र गतीने पुढे चला. असे व्हायला नको २००० सालाचा हिशेब लावत बसाल. पुरुषार्थाचा हिशोब वेगळा आहे आणि सृष्टी परिवर्तनाचा हिशोब वेगळा आहे. असा विचार करू नका की, आणखी पंधरा वर्षे पडले आहेत, आत्ता अठरा वर्षे आहेत, ९९ मध्ये होईल, असा विचार करत बसू नका. हिशेबाला समजून घ्या. आपला पुरुषार्थ आणि प्रारब्धच्या हिशेबाला जाणून त्या गतीने पुढे जात राहा, नाहीतर अनेक वर्षांचे जुने संस्कार, जर राहिले तर, अनेक वर्षाचे मोजमाप धर्मराज पुरीच्या खात्यामध्ये जमा होईल. काही काही अनेक काळाचे व्यर्थ, अयर्थात कर्म, विकर्माचे खाते, आता पण आहे, बापदादा फक्त घोषणा करत नाहीत. थोडासा पडदा घालतात, परंतु व्यर्थ आणि अयर्थात चे खाते, आत्ता पण खूप आहे, म्हणून हे वर्ष सुवर्ण संधीचे वर्ष आहे. पुरुषोत्तम युग आहे. तसेच पुरुषार्थ आणि परिवर्तनाची सुवर्णसंधी चे वर्ष आहे, म्हणून विशेष हिमंत आणि मदत च्या, विशेष वरदाना च्या वर्षाला, साधारण पन्नास वर्षाच्या सारखे, गमावू नका. आजपर्यंत बाबा स्नेहाचे सागर बनून, सर्व संबंधाच्या स्नेहा मध्ये, चालढकलपणा, साधारण पुरुषार्थाला पाहत, ऐकत पण न ऐकल्या सारखे, न पाहिल्या सारखे करून, मुलांना स्नेहाची जास्त मदत देऊन, जास्त गुण देऊन, पुढे घेऊन जात आहेत. मदत करत आहेत परंतु आता वेळ परिवर्तन होत आहे, म्हणून आत्ता कर्माच्या गतीला, चांगल्या प्रकारे जाणून यावेळेचा लाभ घ्या. ऐकवले होते ना, १८वा अध्याय सुरू झाला आहे. १८ व्या अध्याया ची विशेषता, आता स्मृती स्वरुप बना. आता स्मृती-विस्मुर्ती नाही. स्मृती म्हणजे अनेक वर्षाची स्मृती स्वतः आणि सहज राहील. आता युद्धाचे संस्कार, कष्टाचे संस्कार, मनाला गोंधळात टाकणाऱ्या संस्काराला समाप्त करा. नाहीतर हे अनेक वर्षाचे संस्कार, बनून, अंत मती सो, भविष्यामध्ये गती प्राप्त करण्याचे निमित्त बनतील. ऐकवले होते ना, अनेक वर्ष आहेत, पुरुषार्थ करु, असे समजण्याची वेळ समाप्त होत आहे आणि अनेक वर्षाच्या कमजोरीचा कर्मभोग सुरू होत आहे. समजले, म्हणून विशेष परिवर्तनाची ही वेळ आहे. आता वरदाता आहात, परत लेखा-जोखा घेण्याचे निमित्त बनतील. आता फक्त स्नेहाचा हिशोब आहे, तर काय करायचे आहे?स्मृती स्वरूप बना. स्मृति स्वरूप स्वतःच नष्टोमोहा बनवेल. आता तर मोहा ची यादी पण खूप लांबलचक आहे. एक स्वतःची प्रवृत्ती, दुसरी दैवी परिवाराची प्रवृत्ती, तिसरी सेवेची प्रवृत्ती, चौथी हदच्या प्राप्तीची प्रवृत्ती, या सर्वापासून नष्टोमोहा म्हणजे अनासक्त बनून प्रिय बना. मी पणा म्हणजे मोह, या पासुन नष्टोमोहा बना, तेव्हाच अनेक वर्षाच्या पुरुषार्था चे, अनेक वर्षाच्या प्रारब्धाच्या प्राप्तीचे अधिकारी बनाल. अनेक वर्ष म्हणजे सुरुवातीपासून अंत काळापर्यंत प्रारब्धाचे फळ. तसे तर एक एक प्रवृत्ती पासून निवृत्त होण्याचे रहस्य पण चांगल्या प्रकारे जाणतात आणि भाषण पण चांगले करू शकतात परंतु निवृत्त होणे म्हणजे नष्टोमोहा होणे, समजले. ज्ञानाच्या मुद्दे तर तुमच्या जवळ बापदादा पेक्षा जास्त आहेत, म्हणून ज्ञानाचे मुद्दे काय ऐकवायचे? ज्ञानाचे तर अनेक मुद्दे आहेत, आता बिंदू बना. अच्छा. नेहमी श्रेष्ठ कर्माच्या प्राप्तीच्या गतीला जानणारे, नेहमी अनेक वर्षाचे तीव्र पुरुषार्थाचे, श्रेष्ठ पुरुषार्थाचे श्रेष्ठ संस्कार असणारे, नेहमी स्वर्णिम युगाचे आदी रत्न, संगम युगाचे पण आदी रत्न, असे आदी देवता समान मुलांना, आदी पिता, अनादी पित्याचे नेहमी आदी बनणारे, श्रेष्ठ वरदानी, प्रेमपूर्वक आठवण आणि सोबतच सेवाधारी पित्याचे नमस्ते.

दादीं सोबत वार्तालाप:- घराचे गेट कोण उघडेल? सुवर्ण जयंती वाले की हीरक जयंती वाले, ब्रह्माच्या सोबत उघडणार, की नंतर यायचे आहे. सोबत जायचे तर सजनी बनवून जायचे आणि नंतर जायचे आहे, तर वराती बनून जावे लागेल. नातेवाईकांना पण वराती म्हटले जाते. परिवाराच्या जवळ आहेत परंतु वराती आले, असे म्हटले जाते. तर कोण गेट उघडेल? स्वर्णजयंती साजरी करणारे की, हीरक जयंती साजरी करणारे. जे घराचे गेट उघडतील, तेच स्वर्गाचे पण गेट उघडू शकतील. आता वतन मध्ये येण्यासाठी कुणाला मना नाही. साकार मध्ये तरीपण बंधन होते, वेळेचे आणि परिस्थितीचे बंधन होते. वतन मध्ये येण्यासाठी तर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कोणी अडथळा आनणार नाही, येथे तुमचा क्रम लावण्याची पण आवश्यकता नाही. अभ्यासाद्वारे असा अनुभव कराल, जसे बाबा येथे शरीरा मध्ये असताना पण, एका सेकंदा मध्ये चक्कर लावून परत येत होते. जे अंत वाहक शरीराद्वारे चक्र लावण्याचे गायन आहे. हे आंतर आत्मा वाहन बनते. बिलकुल बटन दाबले, विमान उडाले, चक्र लावून आले आणि दुसरे पण अनुभव करतील की, होय येथे असून पण येथे नाहीत. जसे साकार मध्ये पाहिले होते ना, गोष्टी करत करत सेकंदामध्ये आहेत आणि आत्ता आत्ता नाहीत. आत्ता आहेत आत्ता नाहीत. हा अनुभव केला ना. यामध्ये फक्त स्थुल विस्ताराला समेटण्याची आवश्यकता आहे. जसे साकार मध्ये पाहिले ना, इतका विस्तार असताना पण, अंतिम अवस्था कशी राहिली. विस्ताराला समेटण्याची, उपराम राहण्याची. आता सूचना देत आहेत आणि आता तर अशरीरी पणाचा अनुभव करत आहेत. तर या समेटण्या च्या शक्तीची प्रत्यक्षता पाहिली ना. तुम्ही लोक पण म्हणत होते की, बाबा येथे आहेत की नाहीत, ऐकत आहेत की, नाहीत. परंतु तीव्र गती अशी होते, जे कार्य पण चुकणार नाही. तुम्ही गोष्टी ऐकवत आहात, तरी बाबा ऐकतील परंतु गती इतकी, तीव्र आहे जे, दोन्ही काम एका मिनिटात करू शकतात.

रहस्य पण समजून घेतील आणि चक्र पण लावून येतील. असेच अशरीरी होणार नाहीत, जे कोणी गोष्टी करत आहेत आणि तुम्ही म्हणाल की बाबांनी ऐकले नाही. गती खूपच तीव्र होते. बुद्धीत इतकी विशाल होते, जे एकावेळेस दोन्ही कार्य करतात. हे तेव्हाच होते, जेव्हा समेटण्याची शक्ती चा प्रयोग होतो. आता प्रवृत्तीचा विस्तार झाला आहे, त्यामध्ये राहत पण, हाच अभ्यास फरिश्ते पणाचा साक्षात्कार करवेल. आता एकेक लहान-लहान गोष्टीच्या पाठीमागे हे जे कष्ट घ्यावे लागतात, ते स्वतः उच्च स्थितीमध्ये गेल्यामुळे छोट्या गोष्टी व्यक्त भाव अनुभव होतील. उच्च स्थितीमध्ये गेल्यामुळे लहान लहान गोष्टी पासून आपोआप मुक्त व्हाल. कष्टापासून वाचाल, वेळ पण वाचेल आणि सेवा पण तीव्र गतीची होईल, नाहीतर खूप वेळ द्यावा लागतो.

हीरक जयंती मध्ये आलेल्या भाऊ-बहिणी प्रति अव्यक्त बापदादांचा मधुर संदेश- रजत जयंतीच्या शुभ वेळेत आत्मिक मुलांच्या प्रती स्नेहाचे सोनेरी पुष्प.

साऱ्या विश्वामध्ये उच्च ते उच्च महान युगाचे, महान भूमिका करणारे, युगपरिवर्तन मुलांना, श्रेष्ठ जीवनाच्या शुभेच्छा आहेत. सेवांमध्ये वृध्दी करण्याच्या निमित्त बनल्यामुळे विशेष भाग्याच्या शुभेच्छा आहेत. सुरुवातीपासून परमात्म स्नेही आणि सहयोगी बनल्यामुळे, उदाहरण मूर्त बनण्याचे शुभेच्छा. वेळेच्या समस्यांच्या वादळाला भेट समजून नेहमी विघ्नविनाशक बनण्याच्या शुभेच्छा आहेत, अभिनंदन आहे.

बाप दादा नेहमी आपल्या अशा अनुभवाच्या खजाने द्वारे संपन्न, सेवेच्या आधार मूर्त मुलांना पाहून आनंदित होतात आणि मुलांच्या साहसाच्या गुणांची माळ स्मरण करतात. असे भाग्यशाली आणि प्रेमळ वेळेच्या विशेष सोनेरी वरदान देत, नेहमी एकाचे बनून एकाला प्रत्यक्ष करण्याच्या कार्यामध्ये सफल भवचे वरदान देत आहेत. आत्मिक जीवनामध्ये अमर भव. प्रत्यक्ष फळ आणि अमर फळ खाणारे पद्मा पदम भाग्यवान भव.

वरदान:-
वाह अविनाशी नाटक वाह च्या स्मृती द्वारे, अनेकांची सेवा करणारे, नेहमी खुषनुमा भव.

या नाटकातील कोणतेही दृश्य पहाताना, वाह अविनाशी नाटक वाह, ही स्मृती राहिली तर, कधी घाबरणार नाहीत, कारण या अविनाशी नाटकाचे ज्ञान मिळाले आहे की, वर्तमान वेळ कल्याणकारी युग आहे. यामध्ये जे पण दृश्य समोर येतात, त्यामध्ये कल्याण भरलेले आहे. जरी वर्तमान मध्ये कल्याण दिसून येणार नाही परंतु भविष्यामध्ये सामावलेले कल्याण प्रत्यक्ष होईल, तर वाह अविनाशी नाटक वाह, च्या स्मृती द्वारे नेहमी खुश राहाल. पुरुषार्था मध्ये कधी पण उदासी येणार नाही. स्वतः आपल्या द्वारे अनेकांचे सेवा होत राहील.

सुविचार:-
शांतीची शक्ती मन्सा सेवेचे सहज साधन आहे, जिथे शांतीची शक्ती आहे, तेथे संतुष्टता आहे.