16-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुमचा प्रथम पाठ मी आत्मा आहे, शरीर नाही. आत्माभिमानी बनून रहा तर
बाबांची आठवण राहील"
प्रश्न:-
तुम्हा
मुलांच्या जवळ कोणता गुप्त खजाना आहे?जो मनूष्यांच्या जवळ नाही?
उत्तर:-
तुम्हाला भगवान शिवपिता शिकवत आहेत त्या शिक्षणाच्या, खुशीचा गुप्त खजाना तुमच्याकडे
आहे. तुम्ही जाणतात आम्ही जे शिकत आहोत, भविष्य अमरलोक साठी, ना की, या मृत्युलोक
साठी. बाबा म्हणतात, सकाळी उठून फिरायला जावा, फक्त प्रथम पाठ आठवणीत ठेवा, तर
खुशीचा खजाना जमा होत राहील.
ओम शांती।
बाबा मुलांना विचारतात, मुलांनो, आत्माभिमानी बनून बसले आहात?स्वतःला आत्मा समजून
बसले आहात. आम्हा आत्म्याला परमात्मा पिता शिकवत आहेत, मुलांना ही स्मृती आली आहे,
आम्ही देह नाही आत्मा आहोत. मुलं आत्म अभिमानी राहू शकत नाहीत. सारखे देह अभिमाना
मध्ये येतात, म्हणून बाबा विचारतात, आत्म-अभिमानी होऊन राहता का?आत्म अभिमानी बनून
रहाल तर बाबांची आठवण येईल. जर देह अभिमानी बनून रहाल तर, लौकिक संबंधी इ. ची आठवण
येईल. प्रथम तर हा शब्द आठवणीत ठेवा, आम्ही आत्मा आहोत. मज आत्म्यामध्ये ८४ जन्माची
भूमिका भरलेली आहे. हे पक्के करायचे आहे, आम्ही आत्मा आहोत. अर्धा कल्प तुम्ही देह
अभिमानी बनून राहिले. आता फक्त संगम युगामध्येच मुलांना आत्माभिमानी बनवले जाते.
स्वतःला देह समजल्यामुळे बाबांची आठवण येत नाही, म्हणून प्रथम हा पाठ पक्का करा
आम्ही आत्मे बेहद्द पित्याची मुलं आहोत. देहाच्या पित्याची कधी आठवण करणे शिकवले
जात नाही. आता बाबा म्हणतात, मज पारलौकिक पित्याची आठवण करा, आत्माभिमानी बना. देह
अभिमानी बनल्यामुळे देहाचे संबंध आठवणीत येतील. स्वत:ला आत्मा समजून बाबांची आठवण
करा, हेच कष्ट घ्यायचे आहेत. हे कोण समजवत आहे, आम्हा आत्म्यांचे पिता, ज्यांची
सर्व आठवण करतात. बाबा या, येऊन दुःखा पासून मुक्त करा. मुलं जाणतात, या
शिक्षणाद्वारे आम्ही भविष्यासाठी उच्च पद मिळवतो. आता तुम्ही पुरुषोत्तम संगम
युगामध्ये आहात. आत्ता या मृत्युलोका मध्ये आत्ता राहायचे नाही. हे आमचे शिक्षण,
भविष्य २१ जन्मासाठी आहे. आम्ही सतयुग अमर लोकांसाठी शिकत आहोत. अमर बाबा आम्हाला
ज्ञान ऐकवत आहेत, तर जेव्हा येथे बसतात तर, प्रथम स्वतःला आत्मा समजायचे आहे.
बाबाच्या आठवणीमध्ये राहायचे आहे, तर विकर्म विनाश ह़ोतील. आम्ही आता संगम युगामध्ये
आहोत. बाबा आम्हाला पुरुषोत्तम बनवत आहेत. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तुम्ही
पुरुषोत्तम बनाल. मी तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी आलो आहे. सतयुगा मध्ये
तुम्ही देवता होते, आता जाणता सिढी कसे उतरतात. आमच्या आत्म्यामध्ये ८४ जन्माची
भूमिका नोंदलेली आहे. दुनिया मध्ये कोणी जाणत नाहीत, तो भक्तिमार्ग वेगळा आहे, हा
ज्ञानमार्ग वेगळा आहे. ज्या आत्म्यांना बाबा शिकवतात, ते जाणतात, दुसरे कोणी जाणू
शकत नाहीत. हा गुप्त खजाना भविष्यासाठी आहे. तुम्ही अमरलोक साठी शिकत आहात, ना की,
मृत्यू लोकासाठी. आता बाबा म्हणतात, सकाळी उठा फिरायला जावा, प्रथम हा पाठ पक्का
करायचा आहे, आम्ही आत्मा आहोत, ना कि शरीर. माझे आत्मिक बाबा आम्हाला शिकवत आहेत.
ही दुःखाची दुनिया आता बदलणार आहे. सत्ययुग सुखाची दुनिया आहे, बुद्धीमध्ये सर्व
ज्ञान आहे. हे आत्मिक अध्यात्मिक ज्ञान आहे. शिवपिता ज्ञानाचे सागर, अध्यात्मिक पिता
आहेत. ते आत्म्याचे पिता आहेत, बाकी इतर सर्व देहाचे संबंधी आहेत. गायन पण करतात,
माझे तर एक दुसरे कोणी नाही. आम्ही एक पित्याची च आठवण करतो. देहाची पण आठवण करत
नाही. हे जुने देह तर सोडायचे आहे. हे पण तुम्हाला ज्ञान मिळाले आहे. हे शरीर कसे
सोडायचे आहे. आठवण करत करत शरीर सोडायचे आहे, म्हणून बाबा म्हणतात देही अभिमानी बना.
मनामध्ये घोटत राहा, पिता, बीज आणी झाडाची आठवण करायची आहे. ग्रंथांमध्ये हे
कल्पवृक्षाचा वृत्तांत आहे.
हे पण मुलं जाणतात, आम्हाला ज्ञानसागर पिता शिकवत आहेत. कोणी मनुष्य शिकवत नाहीत.
हे पक्के करायचे आहे. शिक्षण घ्यायचे तर आहे ना. सतयुगा मध्ये देहधारी शिकवतात. हे
बाबा तर देहधारी नाहीत. हे म्हणतात, मी जुन्या देहाचा आधार घेऊन तुम्हाला शिकवतो.
कल्प कल्प तुम्हाला येऊन असे शिकवतो, परत कल्पा नंतर असेच शिकवेल. आता तुम्ही माझी
आठवण करा तर, तुमचे विकर्म विनाश होतील, मीच पतित पावन आहे. मलाच सर्वशक्तिमान
म्हणतात परंतु माया पण कमी नाही, ती पण शक्तिमान आहे, कोणत्या युगापासुन तिने अधोगती
केली आहे. आता आठवण येते ना. ८४ च्या चक्राचे पण गायन आहे, ही मनुष्याची गोष्ट आहे.
अनेक जण विचारतात जनावरांचे काय होईल. अरे जनावरांची गोष्टच नाही. बाबा पण मुलांशी
गोष्टी करतात, दुसरे तर बाबाला जाणत नाहीत, तर ते काय म्हणतील. काहीजण तर म्हणतात,
आम्ही बाबाला भेटू इच्छीतो. आत्ता जाणत तर काहीच नाहीत, उल्टे सुल्टे प्रश्न
विचारत राहतात. सात दिवसा चा कोर्स केल्यानंतर पण पुर्ण पणे समजत नाहीत की, हे आमचे
बेहद्द चे पिता आहेत. जे जुने भक्त आहेत, ज्यांनी खूप भक्ती केली आहे, त्यांच्या
बुद्धीमध्ये तर ज्ञानाच्या सर्व गोष्टी बसतात. भक्ती कमी केली असेल तर बुद्धीमध्ये
पण कमी बसेल. तुम्ही सर्वात जास्त जुने भक्त आहात. गायन पण आहे, भक्तीचे फळ
देण्यासाठी भगवान येतात परंतु कोणाला थोडेच माहिती आहे, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग
बिलकुल वेगळा आहे. सारी दुनिया भक्तिमार्ग मध्ये आहे, करोडो मधून काहीच हे ज्ञान
घेतात. ज्ञान तर खूप गोड आहे. ८४ जन्माचे चक्र पण मनुष्यच जाणतात. अगोदर काहीच जाणत
नव्हते. तुम्ही पण अगोदर काहीच जाणत नव्हते. शिवाला पण जाणत नव्हते. शिवाचे मंदिर
तर अनेक आहेत. शिवाची पूजा करतात, जल अर्पण करतात, शिवाय नम: करतात, का पूजा
करतात?काहीच माहित नाही. लक्ष्मी नारायण ची पूजा का करतात ते कोठे गेले काहीच माहिती
नाही. भारत वासीच आहेत जे स्वतःच्या पूज्य देवतांना बिलकुल जाणत नाहीत. ख्रिश्चन
जाणतात येशू ख्रिस्त अमक्या इ. सना मध्ये आले, येऊन स्थापन केली. मला तर कोणी जाणत
नाहीत. पतित-पावन पण शिवाला च म्हणतात. तेच उच्च ते उच्च आहेत ना. त्यांची सर्वात
जास्त सेवा करतात. सर्वांचे सद्गती दाता आहेत. तुम्हाला कसे शिकवत आहेत. बाबांना
बोलतातच येऊन आम्हाला पावन बनवा. मंदिरामध्ये खूप पूजा करतात, किती धूमधाम, किती
खर्च करत राहतात. श्रीनाथ च्या मंदिरामध्ये आणी जग्गनाथ च्या मंदिरा मध्ये खूप फरक
आहे. तसे तर एकच आहेत. जगन्नाथमंदिरा मध्ये प्रसादासाठी तांदळाचा हंडा चढवतात.
श्रीनाथ मंदिरामध्ये तर चांगल्या प्रकारचे मिष्टान्न बनवतात. फरक का होतो? कारण तर
पाहिजे ना. श्रीनाथ ला काळे, तर जगन्नाथ ला पण काळे बनवले आहे. कारण तर काहीच समजत
नाहीत. जगत नाथ लक्ष्मीनारायण ला म्हणतात, की राधा कृष्णाला म्हणणार. राधे-कृष्ण,
लक्ष्मीनारायणचा सबंध काय आहे? हे पण कोणी जाणत नाहीत. आता तुम्हा मुलांना माहिती
पडले आहे की, आम्ही पूज्य देवता होतो, परत पुजारी बनलो, चक्र लावले आता परत देवता
बनण्यासाठी आम्ही शिकत आहोत. हे कोणी मनुष्य शिकवत नाहीत. भगवानुवाच आहे ना,
ज्ञानसागर पण भगवंतालाच म्हणतात. येथे तर भक्तीचे सागर अनेक आहेत, जे पतित-पावन
ज्ञानाचे सागर बाबांची आठवण करतात. तुम्हीच पतित बनले तर पावन जरूर बनायचे आहे. ही
पतीत दुनिया आहे. हा स्वर्ग नाही. वैकुंठ कुठे आहे, हे कोणालाच माहिती नाही. हे
स्वर्गवासी झाले असे म्हणतात, परत नरकाचे भोजन इत्यादीत का खाऊ घालतात? सतयुगा मध्ये
तर खूप फळं फुले इत्यादी असतात. येथे काय आहे, हा तर नर्क आहे. आता तुम्ही जाणतात,
बाबा द्वारे आम्ही स्वर्गवासी बनण्याचा पुरुषार्थ करत आहोत. पतीता पासून पावन बनायचे
आहे. बाबानी युक्ती सांगितली आहे, कल्प कल्प बाबाच युक्ती सांगतात. माझी आठवण करा
तर विकर्म विनाश होतील. आता तुम्ही जानता आम्ही पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहोत.
तुम्हीच म्हणतात, बाबा आम्ही पाच हजार वर्षांपूर्वी असे श्रेष्ठ बनले होतो. तुम्ही
जाणतात कल्प कल्प ही अमर कथा, बाबा कडूनच ऐकतो. शिवबाबाच अमरनाथ आहेत. बाकी असे नाही
की, पार्वतीला बसून कथा ऐकवतात. ती भक्ती आहे. ज्ञान आणि भक्तीला तुम्हीच समजले आहे.
ब्राह्मणाचा दिवस आणि ब्राह्मणाची रात्र आहे. बाबा समजवतात, तुम्ही ब्राह्मण आहात
ना. आदी देव पण ब्राह्मण होते, देवता नाही म्हणणार. आदी देवाकडे पण जातात, देवींचे
तर अनेक नाव आहेत. तुम्ही सेवा केली आहे, म्हणून तुमचे गायन आहे. भारत जो निर्विकारी
होता, तो परत विकारी बनला आहे. आता रावणाचे राज्य आहे ना.
संगमयुगा मध्ये तुम्ही मुलं आत्ता पुरुषोत्तम बनतात, तुमच्या वरती ब्रहस्पतीची दशा
अविनाशी बसते, तेव्हाच तुम्ही आमर पुरी चे मालक बनतात. बाबा तुम्हाला शिकवत आहेत,
मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी. स्वर्गाचे मालक बनण्याला बृहस्पतीची दशा म्हटले
जाते. तुम्ही स्वर्ग अमरपुरी मध्ये जरूर जाल, बाकी अभ्यासामध्ये दशा, खाली वरती होत
राहते. आठवणच विसरते. बाबांनी म्हटले माझी आठवण करा. गीतेमध्ये पण आहे, भगवानुवाच,
काम महाशत्रू आहे. ज्ञान घेतात परंतु विकाराला काही जिंकत नाहीत. भगवंताने कधी
म्हटले ५००० वर्ष झाले. आता परत भगवान म्हणतात, काम महाशत्रू आहे, याला जिंकायचे आहे.
हा विकारच आदी मध्य अंत दुःख देणारा आहे. मुख्य काम विकाराची च गोष्ट आहे, यालाच
पतित म्हटले जाते. आता माहीत झाले आहे चक्र फिरत राहते. आम्ही पतित बनतो, परत बाबा
येऊन पावन बनवतात, अविनाशी नाटका नुसार. बाबा नेहमी म्हणतात, प्रथम आत्म्याची गोष्ट
पक्की करा. श्रीमता वरती चालल्यामुळेच तुम्ही श्रेष्ठ बनाल. हे पण तुम्हीच समजतात,
आम्ही प्रथम श्रेष्ठ होतो, परत भ्रष्ठ बनलो. आत्ता परत श्रेष्ठ बनण्याचा पुरुषार्थ
करत आहोत. दैवी गुणांची धारणा करायची आहे. कोणाला ही दु:खी द्यायचे नाही. सर्वाना
दाखवा. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर पाप नष्ट होतील. पतित पावन तर मलाच म्हणतात
ना. हे कोणालाच माहीत नाही की, पतित पावन कसे येऊन पावन बनवतात. कल्पा पुर्वी पण
बाबांनी म्हणले होते, माझीच आठवण करा. ही योग अग्नी आहे, ज्या द्वारे पाप नष्ट
होतात. भेसळ निघाल्याने आत्मा पवित्र बनते. भेसळ सोन्या मध्येच घालतात, परत दागिने
पण तसेच बनतात. आता तुम्हा मुलांना बाबांनी समजवले आहे, आत्म्यामध्ये कशी भेसळ झाली
आहे, त्याला काढून टाकायचे आहे. बाबांची पण अविनाशी नाटकांमध्ये भूमिका आहे, तुम्हा
मुलांना देही अभिमानी बनवतात. पवित्र पण बनायचे आहे. तुम्ही जाणतात सतयुगा मध्ये,
आम्ही वैष्णव होतो. पवित्र गृहस्थाश्रम होता. आता आम्ही पवित्र बनून विष्णुपुरी चे
मालक बनत आहोत. तुम्ही दुहेरी वैष्णव बनतात. खरेखुरे वैष्णव तुम्ही आहात. ते तर
विकारी वैष्णव धर्माचे आहेत. तुम्ही निर्विकारी वैष्णव धर्माचे आहात. आत्ता एक तर
बाबांची आठवण करतात आणि ज्ञान जे बाबा मध्ये आहे, तुम्ही धारण करतात. तुम्ही राजांचे
राजा बनतात. ते राजे बनतात अल्प काळासाठी, एका जन्मासाठी. तुमची राजाई २१ पिढी तेही
पूर्ण आयुष्य पास करतात. तेथे कधी अकाली मृत्यू होत नाही. तुम्ही काळा वरती विजय
मिळवतात. वेळ जेव्हा येते, तेव्हा समजतात, हे जुने शरीर सोडून नवीन घ्यायचे आहे.
तुम्हाला साक्षात्कार होईल, खुशीचे बाजे वाजत राहतात. तमोप्रधान शरीराला सोडून,
सतोप्रधान शरीर घ्यायचे आहे, ही तर खुशी ची गोष्ट आहे ना. तेथे दीडशे वर्षे सरासरी
आयुष्यमान राहते. येथे मृत्यू होत राहतात कारण भोगी आहेत. ज्या मुलांचे योगसामर्थ्य
आहे, त्यांची सर्व कर्मेन्द्रिय योगाद्वारे शितल होतात. योगामध्ये पूर्ण
राहिल्यामुळे कर्म इंद्रिय शितल होतात. सतयुगा मध्ये तुम्हाला कोणत्याही
कर्मेंद्रिया धोका देणार नाहीत. कधी असे म्हणणार नाहीत की, कर्मेंद्रिया वश मध्ये
नाहीत. तुम्ही खूप श्रेष्ठ पद मिळवतात, याला म्हटले जाते बृहस्पतीची अविनाश दशा.
वृक्षपती मनुष्य सृष्टीचे बीज शिवपिता आहेत. बीज वरती आहे, त्यांची आठवण पण वरती
करतात. आत्मा पित्याची आठवण करते. तुम्ही मुलं जाणतात, बेहद्दचे पिता आम्हाला शिकवत
आहेत. ते एकाच वेळेस अमर कथा ऐकण्यासाठी येतात. अमर कथा म्हणा किंवा सत्यनारायणाची
कथा म्हणा, त्या कथेचा अर्थ पण समजत नाहीत. सत्यनारायणाच्या कथे द्वारे नरापासून
नारायण बनतात. अमर कथे मुळे तुम्ही अमर बनतात. बाबा प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून
समजवतात, अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांसाठी, मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) योगबळा
द्वारे आपल्या सर्व कर्मेंद्रिया ला वश मध्ये करायचे आहे. एका वृक्षपती पित्याच्या
आठवणीमध्ये राहायचे आहे. खरे वैष्णव म्हणजे पवित्र बनायचे आहे.
(२) सकाळी उठून प्रथम
पाठ पक्का करायचा आहे, मी आत्मा आहे, शरीर नाही. माझे आत्मिक बाबा आम्हाला शिकवत
आहेत. ही दुःखाची दुनिया आता परिवर्तन होणार आहे, असे बुद्धीमध्ये सर्व दिवस
ज्ञानाचे स्मरण करत राहायचे आहे.
वरदान:-
स्वतःच्या प्रती इच्छा
मात्र अविद्या बनून बाप समान अखंडदानी, परोपकारी भव.
जसे ब्रह्मा बाबा नी
स्वतःचा वेळ पण सेवेसाठी दिला, स्वतः निर्मान बनून मुलांना मान दिला. कामाच्या
नावाच्या प्राप्तीचा पण त्याग केला, नाव मान शान सर्वांमध्ये परोपकारी बनले. आपण
त्याग करून दुसऱ्याचे नाव केले, स्वतःला नेहमी सेवाधारी ठेवले आणि मुलांना मालक
बनवले. स्वतःचे सुख मुलांचे सुख समजले. असे बाप समान इच्छा मात्रम अविद्या म्हणजेच
मस्त फकिर बनून अखंडदानी आणि परोपकारी बना, तर विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये तीव्र
गती येईल. तक्रारी आणि कथा समाप्त होतील.
बोधवाक्य:-
ज्ञान गुण आणि
धरणांमध्ये सिंधू बना, स्मृतीमध्ये बिंदू बना.