19-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आता तुम्हाला निंदा-स्तुती, मानापमान, सर्व काही सहन करायचे आहे, तुमचे सुखाचे दिवस आता जवळ येत आहेत"

प्रश्न:-
बाबा आपल्या ब्राह्मण मुलांना कोणता एक इशारा देतात?

उत्तर:-
मुलांनो कधीही बाबांशी रुसू नका, जर बाबांशी रुसले तर सद्गती पासून पण रुसणार. बाबा ईशारा देतात, रुसणाऱ्या मुलांना खूप कडक सजा मिळते. आपसा मध्ये किंवा ब्राह्मणीशी पण रुसले तर, फुल बनत-बनत काटा बनाल, म्हणून खूप खबरदार रहा.

गीत:-
हे आत्म्यांनो धैर्य धरा, सुखाचे दिवस आले की आले. . . .

ओम शांती।
फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांनी गित ऐकले. तुम्हा मुलांचे जे पण जन्म जन्मातंरचे दुःख आहेत, सर्व दुःख दूर व्हायला पाहिजेत. गीताचे वाक्य ऐकले, तुम्ही जाणतात आता आमची दुःखाची भूमिका पूर्ण होत आहे आणि सुखाची भूमिका सुरू होत आहे. जे पूर्ण प्रकारे जाणत नाहीत, त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टी मध्ये दुःख जरूर मिळते. येथे बाबांच्या जवळ आल्या नंतर पण, कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख होते. बाबा जाणतात, अनेक मुलांना कष्ट होत राहते. जेव्हा तीर्थयात्रेला जातात, तर कुठे गर्दी होते, पाऊस पडतो, कधी वादळ येते, जे खरे भक्त असतील, ते म्हणतील काय हरकत नाही. भगवंताच्या जवळ जात आहोत. भगवान समजूनच यात्रेला जातात. मनुष्यांचे तर अनेक भगवान आहेत. जे चांगले मजबूत असतात, ते तर म्हणतात, काय हरकत नाही. चांगल्या कामांमध्ये नेहमी विघ्न पडतात, परत थोडेच जायचे असते. काही तर परत पण येतात. कधी विघ्न पडतात, कधी पडत पण नाहीत. बाबा म्हणतात मुलांनो, ही पण तुमची यात्रा आहे. तुम्ही म्हणाल, आम्ही बाबा कडे जातो, ते सर्वांचे दुःख दूर करणारे आहेत. हा निश्चय आहे. मधुबन मध्ये किती गर्दी होते, बाबांना काळजी वाटते. अनेकांना कष्ट होत असतील, जमिनी वरती झोपावे लागते. बाबांची इच्छा नसते की, मुलांनी जमिनीवर झोपावे परंतु अविनाश नाटक अनुसार गर्दी होत राहते, खाली जमिनीवर झोपावे लागते. कल्पा पूर्वी पण गर्दी झाली असेल, यामध्ये काही दुःख व्हायला नको. हे पण जाणतात, शिकणारे कोणी राजा बनतात, कोणी गरीब बनतात. कोणाचे उच्च पद तर, कोणाचे कनिष्ठ असेल, परंतू सुख जरुर असेल. हे पण बाबा जाणतात, कोणी खूप कच्चे आहेत, जे काहीच सहन करू शकत नाहीत. त्यांना काय कष्ट झाले तर म्हणतील, आम्ही विनाकारण आलो किंवा म्हणतील आम्हाला ब्राह्मणी जबरदस्ती घेऊन आली. असे पण असतील, जे म्हणतील आम्हाला ब्राह्मणींने विनाकारण फसवले. त्यांना पूर्ण ओळख नाही की, विश्वविद्यालया मध्ये आलो आहोत. या वेळेतील शिक्षणाने कोणी श्रीमंत बनतील तर कोणी गरिब पण बनतील. कोणी भविष्य मध्ये गरिब पण बनणार आहेत. येथील गरीब-श्रीमंत आणि स्वर्गातील गरीब-श्रीमतां मध्ये रात्रंदिवसाचा फरक असतो. येथील श्रीमंत पण दुखी आहेत, तर गरीब पण दुखी आहेत, स्वर्गामध्ये तर दोघे सुखी राहतात. येथे तर आहे, पतित विकारी दुनिया. जरी कुणाजवळ खूप धन आहे, बाबा समजवतात, हे धन संपत्ती सर्व मातीमध्ये मिसळून जाईल, हे शरीर पण नष्ट होईल. आत्मा तर माती मध्ये मिसळू शकत नाही. अनेक मोठे मोठे सावकार, बिर्ला सारखे आहेत परंतु त्यांना माहित नाही की, आता ही जुनी दुनिया परिवर्तन होत आहे, माहित झाले तर लगेच येतील. असे म्हणतात येथे भगवान आले आहेत?तरीही जातील कोठे?बाबांच्या शिवाय कोणाला सद्गती मिळू शकत नाही. जर कोणी रुसले तर म्हणतील सद्गती पासून रुसले. असे अनेक जण विकारात जात राहतात, आश्चर्यवंत ऐकतात, निश्चय होतो. . . आणि परत सोडून जातात. काही तर समजतात बरोबर यांच्याशिवाय दुसरा कोणता रस्ता नाही. याद्वारे सुख आणि शांतीचा वारसा मिळेल. याशिवाय सुख-शांती मिळणे अशक्य आहे. जेव्हा धन खूप असेल, तेव्हा तर सुख मिळेल. धनामध्ये सुख असते ना. मुळ वतन मध्ये तर आत्मे शांती मध्ये बसले आहेत. कोणी म्हणतील आमची नाटका मध्ये भूमिकाच नसती तर, आम्ही नेहमीच शांतीधाम मध्येच राहिलो असतो परंतु असे म्हटल्यामुळे थोडेच होईल. मुलांना समजवले आहे, हा पूर्वनियोजित खेळ आहे. अनेक जण आहेत, जे कोणत्या ना कोणत्या संशया मध्ये येऊन ज्ञान सोडतात. ब्राह्मणीशी रुसतात, किंवा किंवा आपसामध्ये रुसून हे ज्ञान सोडून देतात.

आता तुम्ही इथे फुलां सारखे, गुणवान बनण्यासाठी आले आहात. तुम्हाला जाणीव होते, बरोबर आम्ही काट्यां पासून फूलं बनत आहोत. फुल जरूर बनवायचे आहे. कोणाला कोणता संशय आहे, अमका हे करतो, ते असे आहेत, म्हणून आम्ही येणार नाही, बस रुसुन घरीच बसतात. बाबा म्हणतात बाकी सर्वांशी रुसा परंतू बाबांशी कधीच रुसू नका. बाबा इशारा देतात, सजा खूप खडक आहे. गर्भामध्ये पण जी सजा मिळते, सर्व साक्षात्कार करवतात. साक्षात्कारा शिवाय सजा मिळू शकत नाही. येथील पण साक्षात्कार होईल की, तुम्ही शिकत-शिकत आपसामध्ये भांडून रुसून, ज्ञान सोडले होते. तुम्ही मुलं समजता, आम्हाला पित्या कडून शिकायचे आहे, ज्ञान-योग कधीच सोडायचा नाही. तुम्ही येथे मनुष्यापासून देवता बनवण्याचे शिक्षण घेत आहात. अशा उच्च ते उच्च पित्याला, तुम्ही भेटण्यासाठी आले आहात. कधी जास्त येतात, तर अविनाशी पूर्वनियोजित नाटका नुसार कष्ट होतात. मुलांच्या मनात अनेक वादळं येतात. एखादी गोष्ट मिळाली नाही, हे मिळाले नाही, हे तर काहीच नाही. जेव्हा मृत्यूची वेळ येईल, तेव्हा अज्ञानी मनुष्य म्हणतील, आम्ही काय गुन्हा केला आहे, जे कारण नसताना आम्हाला मारतात. त्या अंत काळातील दृश्याला म्हणतात, कारण नसताना खुन होणे. अचानक बॉम्स पडतील, असंख्य मनुष्य मरतील, हे कारण नसताना खून झाले ना. अज्ञानी मनुष्य खूप ओरडतील, तुम्ही मुलं तर खूप खुश व्हाल, कारण तुम्ही जाणतात या दुनियेचा विनाश होणार आहे. अनेक धर्माचा विनाश झाला नाही, तर एक सत्य धर्माची स्थापना कशी होईल? यामध्ये एकच आदी सनातन देवी देवता धर्म होता. कोणाला काय माहिती सतयुग आदीमध्ये काय होते?हे पुरुषोत्तम युग आहे. बाबा आले आहेत, सर्वांना पुरुषोत्तम बनवण्यासाठी, सर्वांचे पिता आहेत ना. या अविनाश नाटकाला तर तुम्ही जाणले आहे ना. सर्वच तर सतयुगा मध्ये येणार नाहीत. इतके कोटी सतयुगा मध्ये थोडेच येतील. या सविस्तर गोष्टी आहेत. अनेक मुली आहेत, जे काही समजत नाहीत. भक्तिमार्ग मध्ये बुडाले आहेत, ज्ञान बुद्धी मध्ये बसत नाही. भक्ती ची सवय लागली आहे. असे म्हणतात, भगवान काय करू शकत नाहीत. मृत व्यक्तीला पण जिवंत करू शकतात. बाबांच्या जवळ येतात, असे म्हणतात, अमक्याने मृत व्यक्तीला जिवंत केले, तर भगवान काय करू शकत नाहीत. कोणी चांगले काम केले तर, बस त्यांचीच महिमा करतात परत त्यांचे हजारो शिष्य बनतात. तुमच्या जवळ खूप थोडे येतात, भगवान शिकवतात तरी इथे थोडे का?असे अनेक जण म्हणतात. अरे येथे तर जिवंतपणी मरावे लागते ना. तेथे तर कनरस आहे. खुप भपक्याने बसून गिता ऐकवतात आणि भक्त लोक ऐकतात. येथे कनरसाची गोष्ट नाही. तुम्हाला फक्त म्हटले जाते, बाबांची आठवण करा. गिते मध्ये पण हे मनमनाभव अक्षर आहे. बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होतील. बाबा म्हणतात अच्छा, ब्राह्मणी किंवा सेवा केंद्राशी रुसतात अच्छा, हे तर काम करा बाकी सर्व संग सोडून स्वतःला आत्मा समजा. एका बाबांची आठवण करा. बाबांच पतित-पावन आहेत. बस बाबाची आठवण करत रहा, स्वदर्शन चक्र फिरवत रहा, इतकी आठवण केली तरी स्वर्गामध्ये जरूर याल. स्वर्गामध्ये उच्चपद तर पुरुषार्थ अनुसारच मिळेल. प्रजा बनवावी लागेल, नाहीतर राज्य कोणावरती कराल. जे खूप कष्ट करतात, उच्च पद पण तेच मिळवतील. उच्च पद मिळवण्यासाठी खूप माथा मारतात. पुरुषार्थी शिवाय तर कोणी राहू शकत नाही. तुम्ही मुलं जाणता, उच्च ते उच्च पतित-पावन बाबा आहेत. मनुष्य जरी त्यांची महिमा करतात परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. भारत खूप सावकार होता, भारतच स्वर्ग, आश्चर्यकारक दुनिया आहे. ते सात आश्चर्य तर मायेचे आहेत. साऱ्या नाटकांमध्ये उच्च ते उच्च स्वर्ग आहे आणि कनिष्ठ ते कनिष्ठ नर्क आहे. आता तुम्ही बाबांच्या जवळ आले आहात. गोड बाबा आम्हाला खूप उच्च ते उच्च घेऊन जातात, त्यांना कोण विसरेल? जरी कुठेही बाहेर गेले, फक्त एक गोष्ट आठवण ठेवा, बाबांची आठवण करायची आहे. बाबाच श्रीमत देतात, भगवानुवाच, ना की ब्रह्मा भगवानुवाच.

बाबा विचारतात मुलांनो, मी तुम्हाला इतके सावकार बनवले होते, परत तुमची दुर्गती कशी झाली?परंतु ऐकतात असे, जसे काहीच समजत नाहीत. तर मुलांना थोडे कष्ट होतात, दुख-सुख, निंदा-स्तुती सर्व सहन करावे लागते. येथील मनुष्य कसे आहेत, पंतप्रधानाला पण दगड मारण्याला कमी करत नाहीत. असे म्हणतात कॉलेजातील मुलांचे नवीन रक्त आहे, त्यांची खूप महिमा करतात. ते समजतात, हे भविष्यातील नवीन रक्त आहे परंतु तेच विद्यार्थी दुःख देणारे निघतात. कॉलेजला आग लावतात, एका दोघांना शिव्या देत राहतात. बाबा समजवतात, दुनियाचे हाल काय झाले आहेत?अविनाश नाटकांमधील अभिनेते असून पण नाटकाच्या आदी मध्यं अंतला आणि मुख्य कलाकाराला जाणत नाहीत, तर त्यांना काय म्हणाल?मोठ्यात मोठे कोण आहेत?त्यांचे जीवन चरित्र तर जाणायला पाहिजे ना, काहीच जाणत नाहीत. ब्रह्मा विष्णू शंकर ची कोणती भूमिका आहे?धर्म स्थापकाची कोणती भूमिका आहे? मनुष्य तर अंधश्रद्धा मध्ये येऊन, सर्वांना गुरु म्हणत राहतात. गुरु तर तेच आहेत, जे सर्वांची सदगती करतात. सर्वांचे सदगती दाता तर परमपिता परमात्मा आहेत, परमगुरु पण आहेत, परत ज्ञान पण देतात. तुम्हा मुलांना शिकवतात, त्यांची भूमिका पण आश्चर्यकारक आहे. एक सत्य धर्माची स्थापना करतात आणि सर्व धर्माला नष्ट करतात. बाकी तर फक्त धर्माची स्थापना करतात. स्थापना आणि विनाश करणाऱ्यांनाच गुरु म्हणनार ना. बाबा म्हणतात मी तर काळांचा काळ आहे. एका धर्माची स्थापना आणि बाकी सर्व धर्माचा विनाश होईल, अर्थात या ज्ञान यज्ञामध्ये स्वाह होतील. परत न कोणती लढाई लागेल, न यज्ञ केला जाईल. तुम्ही साऱ्या विश्वाच्या आदी मध्य अंतला जाणतात, बाकी सर्व माहित नाही- माहित नाही, करत राहतात. तुम्ही असे थोडेच म्हणाल. बाबा शिवाय कोणी समजावू शकत नाहीत. तर तुम्हा मुलांना, खूप खुशी व्हायला पाहिजे परंतु मायेचा सामना असा होतो, जे आठवणच नष्ट करते. तुम्हा मुलांना मान-अपमान सहन करायचे आहे. तसे तर कोणी अपमान करत नाही. जर कोणती गोष्ट असेल, तर बाबांना कळवायला पाहिजे. बाबांना समाचार देत नाहीत, तर खूप मोठे पाप होते. बाबांना ऐकवल्यामुळे लगेच त्यांना सावधानी मिळेल. या सर्जन(मोठे डाँक्टर) पासून काहीच लपवायला नाही पाहिजे. बाबा खूप मोठे सर्जन आहेत. ज्ञान इंजेक्शन, याला ज्ञानाचे काजळ पण म्हणतात. काजळा ला ज्ञानाचा सुरमा पण म्हटले जाते. जादू इत्यादीची तर गोष्टच नाही. बाबा म्हणतात, मी आलो आहे तुम्हाला पावन होण्याची युक्ती सांगण्यासाठी. पवित्र बनणार नाहीत तर धारणा पण होणार नाही. काम विकारामुळे परत दुसरे पाप होत राहतात, यालाच जिंकायचे आहे. स्वतः विकारांमध्ये जात असाल तर, दुसऱ्यांना म्हणू शकणार नाही, ते तर महापाप होईल. बाबा गोष्ट पण सांगतात, पंडिताने म्हटले राम-राम म्हटल्यामुळे सागर पार होईल. मनुष्य पाण्याचा सागर समजतात. जसे आकाशाचा अंत नाही, तसेच सागरचा पण अंत नाही. ब्रह्म महातत्वाचा पण अंत नाही. येथे मनुष्य अंत मिळवण्यासाठी पुरुषार्थ करतात. तेथे तर कोणी तसा पुरुषार्थ करत नाहीत. येथे आकाशात कितीही दूर जातात, परत येतात. पेट्रोल नसल्यामुळे येथील कसे?हा वैज्ञानिकांचा अतीअंहकार आहे, त्याद्वारेच विनाश करतात. विमानाद्वारे सुख आहे आणि त्याद्वारे दुःख पण आहे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कोणत्याही कारणामुळे ज्ञानयोग सोडायचा नाही, परत त्याची सजा खूप खडक आहे, त्यापासून वाचण्यासाठी बाकी सर्व संग सोडून एक बाबांची आठवण करायची आहे. कधीच रुसायचे नाही.

(२) ज्ञान इंजेक्शन किंवा ज्ञानाचे काजळ देणारे एक बाबाच आहेत. त्या सर्जन पासून कोणती गोष्ट लपवायची नाही. बाबांना ऐकवल्यामुळे लगेच सावधानी मिळेल.

वरदान:-
प्रत्येकाच्या विशेषतेला स्मृती मध्ये ठेवून विश्वास पात्र बनून, एकमत संघटन बनवणारे, सर्वांचे शुभचिंतक भव.

अविनाश नाटका नुसार प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या विशेषता अवश्य आहेत, त्या विशेषतेला कार्यामध्ये लावा आणि दुसर्‍याची विशेषता पहा. एक दोघांमध्ये विश्वासपात्र रहा, तर त्यांच्या गोष्टीचा भाव बदलून जाईल. जेव्हा प्रत्येकाची विशेषता पहाल, तर अनेक असताना पण, एक दिसून येतील. एकमत संघटन होईल. कोणी कुणाच्या निंदे ची गोष्ट ऐकली, तर त्याला प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी, ऐकवणार्‍यांचा भाव परिवर्तन करा, तेव्हा म्हणनार शुभचिंतक.

बोधवाक्य:-
श्रेष्ठ संकल्पाचा खजानाच श्रेष्ठ भाग्य किंवा ब्राह्मण जीवनाचा आधार आहे.