10-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, आपले कल्याण करायचे असेल तर, प्रत्येक प्रकारचे पथ्य ठेवा, फुलांसारखे
बनण्यासाठी पवित्र आत्म्याने बनवलेले शुद्ध भोजन ग्रहण करा"
प्रश्न:-
तुम्ही मुलं
आता येथे कोणता सराव करतात, जो २१ जन्मापर्यंत राहिल?
उत्तर:-
नेहमी निरोगी राहण्याचा सराव तुम्ही इथे करतात, तुम्हाला दधिची ऋषी सारखे यज्ञ
सेवेमध्ये हाडे पण द्यायचे आहेत परंतु हठयोगाची गोष्ट नाही. आपले शरीर कमजोर करायचे
नाही. तुम्ही योगाद्वारे २१ जन्मासाठी निरोगी बनतात. त्याचा सराव येथेच करतात.
ओम शांती।
कॉलेज किंवा विद्यापीठ असते तर, शिक्षक विद्यार्थ्यांकडे पाहतात. गुलाबाच्या फुला
सारखी मुलं कुठे आहेत, समोर कोण बसले आहेत?ही बाग आहे परंतु क्रमानुसार तर आहेतच.
येथेच गुलाबाचे फुल पण पाहतो, परत त्याच्या बाजूला रतन ज्योती पण आहेत. कुठे रुईच्या
फुलां सारखे पण पाहतो. बागवान ला तर पहावे लागेल ना. बागवानला बोलवतात, येऊन जंगला
ला नष्ट करून, फुलांची बाग लावा. तुम्ही मुलं प्रत्यक्षा मध्ये पाहता, कसे
काट्यापासून फुलांचे कलम लागत आहे. तुमच्या मध्ये पण खूप थोडे आहेत, जे या गोष्टीचे
चिंतन करतात. हे पण तुम्ही मुलंच जाणतात, ते बागवान पण आहेत, नावाडी पण आहेत,
सर्वांना घेऊन जातात. फुलासारख्या मुलांना पाहून बाबा पण खुश होतात. प्रत्येक जण
समजतात आम्ही काट्या पासून फूल बनत आहोत. ज्ञान श्रेष्ठ आहे, हे समजण्यासाठी विशाल
बुद्धी पाहिजे. हे आहेत च कलियुगी नर्कवासी. तुम्ही स्वर्गवासी बनत आहात. सन्यासी
तर घरदार सोडून पळून जातात, तुम्हाला तर घरदार सोडायचे नाही. कोणत्या कोणत्या
घरांमध्ये एक काट्यासारखा आहे, तर एक फुलासारखा आहे. बाबांना अनेक जण प्रश्न
विचारतात, बाबा मुलांचे लग्न करायचे का? बाबांना विचारले तर म्हणतील खुशाल करा.
घरामध्ये च ठेवा, संभाळ करा. असे विचारतात याचा अर्थ किंवा समजले जाते, त्यांच्या
मध्ये हिम्मत नाही. तर बाबा पण म्हणतात, खुशाल करा. असे म्हणतात, आम्ही आजारी राहतो,
परत सुन येईल, त्यांनी बनवलेले भोजन करावे लागेल. बाबा म्हणतील खुशाल करा, नाही तर
म्हणणार नाहीत. परिस्थिती अशी आहे तर, जे खावेच लागेल, त्यासाठी आपण प्रबंध करायला
पाहिजे. यामध्ये विचारायचे थोडेच असते. बाबा समजवतात, तुम्ही देवता बनतात, तर हे
पत्थ पाहिजेत. जितके जास्त पथ्य ठेवाल तेवढेच, तुमचेच कल्याण होईल. जास्त पथ्य
ठेवण्या मध्ये काहीतरी कष्ट होतील ना. कुठे बाहेर गावी जायचे असेल तर, भोजन सोबत
घेऊन जावा. कधी भोजन घेऊन गेले नाही, लाचारी आहे तर स्टेशन वाल्यांकडून ब्रेड घेऊन
खावा, फक्त बाबांची आठवण करा. यालाच म्हटले जाते योगबळ. यामध्ये हठयोगाची कोणतीच
गोष्ट नाही, या सर्व भक्ती मार्गातील गोष्टी आहेत. शरीराला तर कमजोर बनवायचे नाही.
दधीचि ऋषि मिसळ हाडे पण यज्ञ सेवेमध्ये लावायचे आहेत आणि यामध्ये हठयोगाची पण गोष्ट
नाही. या सर्व भक्तिमार्ग मधील गोष्टी आहेत. शरीराला तर निरोगी ठेवायचे आहे.
योगाद्वारे २१ जन्मासाठी निरोगी बनायचे आहे. सराव येथेच करायचा आहे. बाबा समजवतात,
यामध्ये विचारण्याची गोष्टच राहत नाही. होय कोणती मोठी गोष्ट आहे, त्यामध्ये
संभ्रमित होतात, तर विचारू शकतात. लहान लहान गोष्टी, बाबांना विचारण्यामध्ये मध्ये
खूप वेळ जातो. मोठे मनुष्य खूप कमी बोलतात. शिवबांना म्हटले जाते सद्गती दाता,
रावणाला सद्गती दाता थोडेच म्हणाल. जर ते सदगती दाता असतील तर, त्यांना का
जाळतात?मुलं समजतात रावण तर प्रसिद्ध आहे. जरी रावणा मध्ये खूप शक्ती आहे, परंतु
दुष्मन आहे ना. अर्धा कल्प रावणाचे राज्य चालते परंतु कधी त्यांची महिमा ऐकली नाही.
तुम्ही जाणतात रावण, पाच विकाराला म्हटले जाते. साधुसंत पवित्र बनतात, तर त्यांची
खूप महिमा करतात. या वेळेत सर्व मनुष्य पतित आहेत. कोणीही आले, समजा कोणी मोठे
मनुष्य आहेत, ते म्हणतात बाबांना भेटायचे आहे, बाबा त्यांना काय विचारतील?रामराज्य
कधी ऐकले आहे?मनुष्य आणि देवता कधी ऐकले आहे?या वेळेत मनुष्यांचे राज्य आहे की, या
देवतांचे राज्य आहे? मनुष्य कोण, देवता कोण देवता कोण?देवता कोणत्या राज्यामध्ये
होते? देवता तर सतयुगा मध्ये असतात. यथा राजा राणी तथा प्रजा. तुम्ही विचारू शकता
की ही नवीन सृष्टी आहे की जुनी सृष्टी आहे? सतयुगा मध्ये कोणाचे राज्य होते?आता
कोणाचे राज्य आहे?चित्र तर समोर आहेत. भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे? हे बाबाच
सन्मुख समजवत आहेत?जे मुलं म्हणतात बाबा धारणा होत नाही, त्यांना बाबा म्हणतात, अरे
अल्लाह आणि बादशाही सहज आहे. बाबा म्हणतात तुम्ही माझी आठवण करा तर, वारसा मिळेल.
भारतामध्ये शिवजयंती साजरी करतात परंतु भारतामध्ये येऊन, कधी स्वर्ग बनवला. भारत
स्वर्ग होता, हे जाणत नाहीत, विसरले आहेत. तुम्ही म्हणाल, आम्ही पण काहीच जाणत
नव्हतो की, आम्ही स्वर्गाचे मालक होतो. आता बाबा द्वारे आम्ही परत देवता बनत आहोत.
हे ज्ञान देणारा मीच आहे. सेकंदांमध्ये जीवनमुक्ती चे गायन आहे परंतु याचा अर्थ
थोडेच समजतात. सेकंदामध्ये तुम्ही स्वर्गाची परी बनतात. त्याला इंद्रसभा पण म्हणतात.
ते परत इंद्राला पाऊस पडणारा देवता समजतात. आता पाऊस पाडणार्या ची कोणती सभा लागते
का, इंद्रलठ, इंद्रसभा काय काय ऐकवत राहतात.
आज परत हा पुरुषार्थ करत आहात, शिक्षण आहे ना. कायद्या चा अभ्यास करतात तर, समजतात
उद्या आम्ही वकील बनू. तुम्ही शिकत आहात, उद्या शरीर सोडून, राजाई मध्ये जाऊन जन्म
घेऊ. तुम्ही भविष्यासाठी प्रारब्ध मिळवतात. येथून शिकून परत तुमचा जन्म सतयुगा मध्ये
होईल. राजकुमार राजकुमारी बनण्याचे मुख्य लक्ष आहे, हा राजयोग आहे ना. काही जण तर
म्हणतात, बाबा आमची बुद्धी चालत नाही, हे तर तुमचे भाग्य आहे. अविनाशी नाटकांमध्ये
तुमची भूमिका अशीच आहे, त्याला बाबा कसे बदलू शकतील?स्वर्गाचे मालक बनण्यासाठी सर्व
हक्कदार आहेत परंतु क्रमानुसार तर असतील ना. असे तर नाही, सर्व बादशहा बनतील.
काहीजण म्हणतात ईश्वरीय शक्ती आहे, जे सर्वांना बादशहा बनवेल, परत प्रजा कोठून येईल?
या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, आता तर
फक्त नाममात्र महाराज महाराणी आहेत. पदवी पण देतात. लाख, दोन लाख दिल्यामुळे राजा
राणीचा, किताब पदवी मिळते, परत चाल चलन पण तशीच ठेवावी लागेल. आता तुम्ही मुलं जाणता,
श्रीमता वरती आपले राज्य स्थापन करत आहोत. स्वर्गामध्ये तर सर्व सुंदर गोरे(पवित्र)
असतात. लक्ष्मी नारायणाचे राज्य होते ना. ग्रंथांमध्ये तर कल्पाचे आयुष्य लांब लचक
लिहल्या मुळे मनुष्य विसरले आहेत. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात, सावळ्या पासून
सुंदर बनण्यासाठी. आता देवता तर काळे असतात का?कृष्ण सावळा आणि राधेला गोरी दाखवतात.
तसे सुंदर तर दोन्ही असतील ना, परत कामचिते वरती चढून दोन्ही काळे बनतात. तेथे तर
सोनेरी दुनिया चे मालक आहेत, ही काळी दुनिया आहे. तुम्हा मुलांच्या मनामध्ये खुशी
राहायला पाहिजे आणि दैवी गुण धारण करायला पाहिजेत. काहीजण म्हणतात, बाबा बिडी सुटत
नाही, बाबा म्हणतील, अच्छा खूप प्या. तुम्ही विचारतात तर, काय म्हणनार?पथ्य करत नाही
तर, विकारात जाल. स्वतःच आपल्याला समजावयाला पाहिजे ना. आम्ही देवता बनतो तर, आपली
चाल चलन, खानपान कसे राहायला पाहिजे. सर्वजण म्हणतात, आम्ही लक्ष्मीशी, नारायणशी
स्वयंवर करु? अच्छा, आपल्या मध्ये पहा, असे गुण आहेत? आम्ही बिडी पितो तर नारायण कसे
बनू शकतो? नारदाची गोष्ट पण आहे ना. नाराल काही एक नाही, सर्व मनुष्य भक्त नारदच
आहेत.
बाबा म्हणतात देवता बनणाऱ्या मुलांनी, अंतर्मुखी बनून स्वतःशी गोष्टी करायच्या आहेत.
जेव्हा देवता बनतात, तर आपली चलन कशी असायला पाहिजे?आम्ही देवता बनतो तर दारू बिडी
पिऊ शकत नाही, विकारांमध्ये जाऊ शकत नाही. ना पतीत मनुष्यांनी बनवलेले भोजन स्विकार
करू शकतो, नाहीतर त्याचा परिणाम अवस्थेवर होईल. या गोष्टी बाबाच मुलांना समजवतात.
अविनाशी नाटकाच्या रहस्याला पण कोणी जाणत नाही. हे नाटक आहे, सर्व कलाकार आहेत.
आम्ही आत्मे परमधाम वरून अभिनय करण्यासाठी येतो. अभिनय तर साऱ्या दुनियेतील
कलाकारांना करायचा आहे. सर्वांना आपापली भूमिका आहे. अनेक कलाकार आहेत, कसे त्यांची
भूमिका करतात, हे विविध धर्माचे झाड आहे. एका आंब्याच्या झाडाला विवधेतेचे झाड
म्हणनार नाही. त्याला तर फक्त आंबेच येतील. हे मनुष्य सृष्टी चे झाड आहे परंतु
त्याचे नाव आहे विविध धर्माचे झाड. बिज एकच आहे. मनुष्यांची विविधता पहा किती आहे,
कोणी कसे आहेत, कोणी कसे आहेत. हे बाबाच सन्मुख समजवतात. मनुष्य काहीच जाणत नाहीत.
मनुष्याला बाबाच पारस बुध्दी बनवतात. तुम्ही मुलं जाणता या, जुन्या दुनिये मध्ये
थोडे दिवस आहेत. कल्पा पूर्वीप्रमाणे कलम लागत राहते. चांगली प्रजा, साधारण प्रजाचे
कलम लागते. येथेच राजधानी स्थापन होत आहे. मुलांना प्रत्येक गोष्टींमध्ये बुद्धीचा
वापर करायचा आहे. असे नाही कधी मुरली ऐकली, नाही ऐकली. येथे बसून पण बुद्धी बाहेर
जात राहते. असेही काही आहेत, सन्मुख मुरली ऐकून खूप गदगद होतात. मुरली साठी खुप
धावपळ करुन मुरली ऐकतात. भगवान शिकवत आहेत, असे शिक्षण थोडेच सोडायला पाहिजे. टेप
मध्ये मुरली बिनचूक भरली जाते, ऐकली पाहिजे ना. सावकार लोक टेप खरेदी करून देतील तर,
गरीब ऐकतील. अनेकांचे कल्याण होईल. गरीब मुलं पण आपले भाग्य खूप श्रेष्ठ बनवू शकतात.
बाबा मुलांसाठी इमारती बनवतात, गरीब पण दोन रुपये मनीआँर्डर करतात. बाबा यांची एक
विट इमारती मध्ये लावा. एक रुपये यज्ञांमध्ये लावा, परत काहीजण भंडारी भरणारे पण
आहेत ना. मनुष्य दवाखाना इ. बनवतात, खूप खर्च करतात. सावकार लोक सरकारला खूप मदत
करतात, त्यांना काय मिळते, अल्प काळाचे सुख. येथे तर तुम्ही जे करतात, ते २१
जन्मासाठी. तुम्ही पाहता, बाबांनी(ब्रह्मा) सर्वकाही दिले, त्यामुळे विश्वाचे प्रथम
क्रमांका चे मालक बनले. एकवीस जन्मासाठी असा सौदा कोण करणार नाही. भोलेनाथ तेव्हाच
म्हणतात ना. ती आत्ताची गोष्ट आहे, किती भोळे आहेत. ते म्हणतात, जे काही करायचं आहे
ते करा. अनेक गरीब मुली आहेत, शिलाई करून उदरनिर्वाह करतात. बाबा जाणतात हे खूप
श्रेष्ठ पद मिळवणारे आहेत. सुदाम्याचे उदाहरण आहे ना, तांदळाच्या मुठ्ठी च्या ऐवजी,
२१ जन्मासाठी महल मिळाला. तुम्ही या गोष्टी क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणेच जाणतात.
बाबा म्हणतात, मी भोलेनाथच आहे ना. हे दादा तर भोलेनाथ नाहीत. हे पण म्हणतात, शिव
बाबा भोलेनाथ आहेत, म्हणून त्यांना सौदागर, रत्नागर, जादूगर म्हटले जाते. तुम्ही
विश्वाचे मालक बनतात. येथेच भारत कंगाल आहे, प्रजा सावकार आहे, शासन गरीब आहे. आता
तुम्ही समजता, भारत खूप उच्च होता, स्वर्ग होता, त्याची लक्षणं पण आहेत. सोमनाथ चे
मंदिर, खूप हिरे मोत्यांनी सजवलेले होते. जे उंट भर भरून हिरे-मोती घेऊन गेले.
तुम्ही मुलं जाणतात ही दुनिया जरुर बदलणार आहे, त्यासाठी तुम्ही तयारी करत आहात. जे
करतील त्यांनाच मिळेल. मायेचा पण खूप विरोध होतो. तुम्ही ईश्वराचे मुरिद आहात, बाकी
सर्व रावणाचे मुरिद आहेत. तुम्ही शिव बाबांचे आहात. बाबा तुम्हाला वारसा देतात.
बाबांच्या शिवाय, दुसऱ्या कोणत्या गोष्ठी बुद्धीमध्ये यायला नकोत. अच्छा
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांसाठी मातपिता बापदाची प्रेमपुर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) अंतर्मुखी
बनून, स्वतःशी गोष्टी करायच्या आहेत. जेव्हा आम्ही देवता बनतो, तर माझी चलन कशी
असायला पाहिजे, कोणते अशुद्ध खानपाण नकोय.
(२) आपले भविष्य २१
जन्मासाठी श्रेष्ठ बनवायचे आहे. सुदामा सारखे जे काही आहे, भोलेनाथ बाबांच्या हवाली
करायचे आहे. मुरली ऐकण्यासाठी कोणतेही कारण द्यायचे नाही.
वरदान:-
सत्यता,
स्वच्छता आणि निर्भयता च्या आधारा द्वारे प्रत्यक्षता करणारे रमता योगी, सहज योगी
भव.
परमात्मा
प्रत्यक्षतेचा आधार सत्यता आहे आणि सत्यतेचा आधार स्वच्छता किंवा निर्भयता आहे.
कोणत्याही प्रकारची अस्वच्छता म्हणजे अर्थात सत्यता सफाईची कमी आहे किंवा आपल्याच
तमोगुणी संस्कारा वरती विजयी बनण्यामध्ये, संस्कार मिळवण्यामध्ये किंवा विश्व
सेवेच्या क्षेत्रामध्ये, आपल्या सिद्धांताला सिद्ध करण्यामध्ये भय आहे, तर
प्रत्यक्षता होवू शकत नाही. यामुळे सत्यता आणि निर्भयेतेला धारण करून, एकाच धून
मध्ये मस्त राहणारे, रमता योगी, सहज राज योगी बना, तर सहज अंतिम प्रत्यक्षता होईल.
बोधवाक्य:-
बेहद्द ची
दृष्टी एकतेचा आधार आहे, म्हणून हद्द मध्ये येऊ नका.