15-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला स्मृती आली आहे की, आम्ही 84 जन्माचे चक्र पूर्ण केले, आता आम्ही आपल्या घरी शांतीधाम जात आहोत, बाकी थोडा वेळ आहे"

प्रश्न:-
ज्या मुलांना घरी जाण्याची स्मृती राहते, त्यांची लक्षणे कोणती असतील?

उत्तर:-
ते जुन्या दुनियेला पाहून पण, पाहणार नाहीत, त्यांना बेहद्यचे वैराग्य असेल. धंदा इत्यादी करत पण हलके राहतील. इकडच्या-तिकडच्या फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवणार नाहीत. आपल्याला या दुनियेतील पाहुणे समजतील.

ओम शांती।
फक्त तुम्ही संगम युगी ब्राह्मण मुलंच जाणतात की, आम्ही थोड्या वेळासाठी, या जुन्या दुनिये चे पाहुणे आहोत. तुमचे खरे घर शांतीधाम आहे, त्याचीच मनुष्य खूप आठवण करतात. मनाला शांती मिळावी, परंतु मनात काय आहे? शांती काय आहे? शांती कशी मिळेल? काहीच समजत नाहीत. तुम्ही जाणतात आपल्या घरी जाण्यासाठी बाकी थोडा वेळ आहे. साऱ्या दुनियाचे मनुष्यमात्र क्रमानुसार तेथे जातील. ते शांतीधाम आहे आणि हे दुःखधाम आहे. हे आठवण करणे तर सहज आहे ना. कोणी पण वृद्ध असेल किंवा जवान असेल, हे तर आठवण करू शकता ना. यामध्ये सर्व सृष्टीचे ज्ञान आहे. हे सर्व सविस्तर बुद्धीमध्ये येते. आता तुम्ही संगमयुगा मध्ये बसले आहात. हे बुद्धीमध्ये राहते, आम्ही शांतीधाम मध्ये जात आहोत. पूर्वनियोजित नाटका नुसार हे बुद्धीमध्ये राहिल्यामुळे, तुम्हाला खुशी होईल. आम्हाला आपल्या ८४ जन्माची स्मृती आली आहे. तो भक्ती मार्ग वेगळा आहे, हा ज्ञान मार्ग वेगळा आहे. गोड मुलांनो, आता आपल्या घराची आठवण येते?किती ऐकत राहतात? अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. एक हे पण आहे की, आता आम्ही शांतीधाम मध्ये जाऊ, परत सुखधाम मध्ये येऊ. बाबा आले आहेत पावन दुनिया मध्ये घेऊन जाण्यासाठी. सुखधांमध्ये सुख आणि शांती मध्ये राहतात. शांतीधाम मध्ये फक्त शांती आहे. येथे तर खूप हंगामा आहे ना. मधुबन मधून तुम्ही आपल्या घरी जाल, तर बुद्धी इकडच्या तिकडच्या गोष्टी मध्ये, कामधंद्या इत्यादी मध्ये जाईल. मधुबन मध्ये तर काहीच झंझट नाही. तुम्ही जाणतात आम्ही शांतीधामचे निवासी आहोत. येथे आम्ही कलाकार बनलो आहोत. कोणालाही ही माहिती नाही की, आम्ही या सृष्टी रुपी रंगमंचावर कलाकार कसे आहोत? तुम्हा मुलांनाच बाबा शिकवतात. करोडो मधून काहीजण शिकतात. सर्व तर शिकू शकणार नाहीत. तुम्ही आता खूप समजदार बनले आहात. अगोदर बे समजत होते. आता तर पहा लढाई, भांडणे काय काय होत राहते, यांना काय म्हणाला?आम्ही आपसामध्ये भाऊ-बहीण आहोत, हे विसरले आहेत. भाऊ भाऊ कधी एकमेकांचा खून करतात का?होय खून करतात, तर फक्त मिळकतीसाठी. आता तुम्ही जाणतात, आम्ही सर्व एक पित्याची मुलं आहोत. तुम्ही प्रत्यक्षामध्ये समजता, आम्हा मुलांना बाबा येऊन शिकवत आहेत, पाच हजार वर्ष प्रमाणे, कारण ते ज्ञानाचा सागर आहेत. या शिक्षणाला कोणी जाणत नाहीत. हे पण तुम्ही मुलं जाणता, बाबा स्वर्गाचे रचनाकर आहेत. सृष्टीला रचणारे म्हणणार नाहीत, सृष्टी तर अनादी काळापासून आहे. स्वर्गाला रचनारे म्हणू शकतो. तेथे दुसरा कोणता खंड नसतो. येथे तर अनेक खंड आहेत. काही काळ असा होता, जेव्हा एकच धर्म होता. एकच खंड होता, नंतर अनेक धर्म आले. आता बुद्धीमध्ये बसते की, अनेक धर्म कसे येतात. प्रथम आदी सनातन देवी-देवता धर्म आहे. सनातन धर्म पण येथेच म्हणतात परंतु अर्थ काही समजत नाहीत. तुम्ही सर्व आदी सनातन देवी-देवता धर्माचे आहात, फक्त पतित बनले आहेत. सतोप्रधान पासून सतो रजो तमो मध्ये येत गेले. तुम्ही समजता आदी सनातन देवी-देवता धर्माच्या आहोत, आम्ही खूप पवित्र होतो, आता पतित बनलो आहोत. तुम्ही बाबा पासून वारसा घेतला होता, पवित्र दुनिये चे मालक बनण्यासाठी. तुम्ही समजता आम्ही प्रथम पवित्र ग्रहस्थ धर्माचे होतो. आता अविनाशी पूर्वनियोजित नाटकानुसार रावण राज्यांमध्ये आम्ही पतित प्रवृत्ती मार्गाचे बनलो आहोत. तुम्हीच पुकारतात, हे पतित पावन, आम्हाला सुखधाम मध्ये घेऊन चला. कालचीच गोष्ट आहे, काल तुम्ही पवित्र होते. आज अपवित्र बनून पुकारतात. आत्मा पतित झाली आहे, आत्माच पुकारते, बाबा येऊन आम्हाला परत पावन बनवा. परत तुम्ही २१ जन्मासाठी खूप सुखी बनाल. बाबा तर खूप चांगल्या गोष्टी ऐकवतात, वाईट गोष्टी सोडवतात, तुम्ही देवता होते ना. आता परत बनायचे आहे. पवित्र बना, खूप सहज आहे. खूप भारी कमाई आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, शिवबाबा आले आहेत. प्रत्येक पाच हजार वर्षांनंतरही जुन्या दुनियेपासून नवीन दुनिया जरूर होते. हे कोणी दुसरे सांगू शकत नाहीत. ग्रंथांमध्ये तर कलियुगाचे आयुष्य खूप लांबलचक लिहले आहे. ही सर्व अविनाशी नाटकाची भावी आहे. आता तुम्ही मुलं पापापासून मुक्त होण्याचा पुरुषार्थ करत आहात. लक्षात ठेवा कोणतेही पाप आता व्हायला नको. देहाभिमान मध्ये आल्यामुळेच परत दुसरे विकार येतात, ज्याद्वारे पाप होते म्हणून विकार रुपी भुतांना पळवून लावायचे आहे. या दुनियेच्या कोणत्याही गोष्टींमध्ये मोह नको. या जुन्या दुनिये पासून वैराग्य हवे. जरी पाहता, जुन्या घरांमध्ये राहता परंतु बुद्धी नवीन दुनिये मध्ये लागली पाहिजे. जेव्हा नवीन घरांमध्ये जाल, तर नवीन घरालाच पहाल. जोपर्यंत जुने घर नष्ट होत नाही, तोपर्यंत या डोळ्याने जुन्या ला पाहून पण, न पाहिल्या सारखे करायचे आहे. कोणते पण असे काम करायचे नाही ज्याचा पश्चाताप करावा लागेल. आज अमक्याला दुःख दिले, हे पाप केले, बाबांना विचारू शकता, बाबा हे पाप आहे का? घुटका का खायला पाहिजे? विचारणार नाही तर संभ्रम होईल, विचाराल तर बाबा लगेच हलके करतील. तुम्ही खूप भारी झाले आहात, पापाचे ओझे खूप भारी आहे. २१ जन्मापासून हलके व्हाल. जन्म जन्मांतर चे डोक्यावरती ओझे आहे. जितके आठवणीमध्ये रहाल, तेवढे हलके होत जाल. आत्म्या मधील भेसळ निघून जाईल आणि खुशी वाढेल. सतयुगा मध्ये तुम्ही खूप खुशहोता, परत कमी होत होत तुमची खुशी गायब झाली. सतयुगा पासून कलियुगा पर्यंत, या यात्रेला पाच हजार वर्ष लागले. स्वर्गा मधून नरका मध्ये येण्याच्या यात्रेची आत्ताच माहिती झाली आहे की, आम्ही स्वर्गा मधून नरका मध्ये कसे आलो?आता परत तुम्ही नरका मधून स्वर्गामध्ये जात आहात. एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती, बाबांना ओळखले. बाबा आले आहेत, तर आम्हाला स्वर्गामध्ये जरुर घेऊन जातील. मुलगा झाला आणि मिळकतीचा अधिकारी बनला. बाबाचे बनलो तर, परत नशा चढला पाहिजे ना, उतरायला का पाहिजे. तुम्ही तर मोठे आहात ना. बाबांची मुलं बनले आहात, तर राजधानी वरती तुमचा अधिकार आहे, म्हणून गायन पण आहे, अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोपी वल्लभ च्या वल्लभ ला विचारा. वल्लभ शिव पिता आहेत ना, त्यांना विचारा. क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे, खुशीचा पारा चढेल. काही तर लगेच आपल्या सारखे बनवतात. मुलांचा कामच आहे, सर्वकाही विसरून आपल्या राजधानीची आठवण करायची आहे.

तुम्ही स्वर्गाचे मालक होते. आता कलियुग जुनी दुनिया आहे, परत नवीन दुनिया होईल. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की, प्रत्येक पाच हजार वर्षांनंतर बाबा भारतामध्ये येतात, त्यांची जयंती पण साजरी करतात. तुम्ही जाणतात बाबा येऊन आम्हाला राजधानी देऊन जातात, परत आठवण करण्याची आवश्यकता राहत नाही, परत जेव्हा भक्ती सुरू होते, तेव्हा आठवण करतात. आत्म्याने माल खाल्ला आहे, म्हणून आठवण करते, आम्हाला शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन चला. आता तुम्ही मुलं समजतात, ते आमचे पिता, शिक्षक आणि गुरु पण आहेत. सृष्टीच्या आदी मध्य अंतचे चक्र, ८४ जन्माचे ज्ञान तुमच्या बुद्धी मध्ये आहे. अगणित वेळेस ८४ जन्म घेतले आहेत आणि घेत राहाल. त्याचा शेवट कधी होत नाही. तुमच्या बुद्धीमध्ये हेच चक्र आहे. स्वदर्शन चक्र सारखे आठवण करायला पाहिजे, हेच मनामनाभव आहे. जितके बाबांची आठवण करू, तेवढे पाप नष्ट होतील. तुम्ही जेव्हा कर्मातीत अवस्थाच्या जवळ पोहोचाल, तर तुमच्याकडून कोणतेही कर्म होणार नाहीत. आता थोडे थोडे विक्रम होतात. संपूर्ण कर्मातीत अवस्था आत्ता थोडीच बनली आहे. हे बाबा पण तुमच्या सोबत विद्यार्थी आहेत, शिकवणारे तर शिवबाबा आहेत. जरी यांच्यामध्ये प्रवेश करतात, हे पण विद्यार्थी आहेत. या नवीन नवीन गोष्टी आहेत. आता फक्त तुम्ही बाबा आणि सृष्टिचक्र ची आठवण करा. ती भक्ती आहे, हा ज्ञानमार्ग आहे. रात्रंदिवसचा फरक आहे. तिथे खूप झांज जे इत्यादी वाजवतात, येथे फक्त आठवणीत राहायचे आहे. आत्मा अमर आहे, अकाल तख्त पण आहे, असे नाही की, अकल तख्त फक्त शिवपिता आहेत. तुम्ही पण अकाल मूर्त आहात. अकाल मूर्त आत्म्याचे भ्रुकुटी सिंहासन आहे. जरूर भ्रुकुटी मध्येच बसतील, पोटामध्ये थोडीच बसतील. आता तुम्ही जाणता, आम्हा अकाल मूर्त आत्म्याचे सिंहासन कुठे आहे. या भ्रुकुटीच्या मध्ये आत्म्याचे तख्त आहे. अमृतसर मध्ये अकालतख्त आहे ना. अर्थ काहीच समजत नाहीत. महिमा पण गायन करतात, अकालतख्त. त्यांच्या अकालतख्तची कोणालाच माहिती नाही. आता तुम्हाला माहिती झाले आहे. तख्त तर हाच आहे ज्याच्यावर बसून ऐकवतात. तर आत्मा अविनाशी आहे आणि शरीर विनाशी आहे. आत्म्याचे हे अकालतख्त आहे, नेहमीचे हे तख्त राहते. हे तुम्हीच समजतात, त्यांनी परत हे तख्त बनवून नाव ठेवले आहे. वास्तव मध्ये अकाल आत्मा तर येथे बसली आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये अर्थ आहे. एकोअंकार याचा अर्थ तुम्ही समजतात. मनुष्य मंदिरामध्ये जाऊन म्हणतात, अचतम् केशवम. . . अर्थ काहीच समजत नाहीत. अशीच स्तुती करत राहतात. अचतम् केशवम रामनारायणम्. . . आत्ता राम कुठे, नारायण कुठे. बाबा म्हणतात तो सर्व भक्तिमार्ग आहे. ज्ञान तर खूप सहज आहे. कोणी दुसऱ्या गोष्टी विचारण्या अगोदर वारशाची आठवण करायची आहे. ते कष्ट कोणा द्वारे होत नाहीत, विसरतात. एक नाटक पण आहे, माया असे करते, भगवान असे करतात. तुम्ही बाबांची आठवण करता, माया तुम्हाला दूसरीकडे घेऊन जाते. मायेचा आदेश आहे, पहिलवानाशी, पहिलवान होऊन लढते. तुम्ही सर्व लढाईच्या मैदानामध्ये आहात. तुम्ही जाणतात, यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे योध्दे आहेत. कोणी तर खूप कमजोर आहेत, कोणी माध्यम, कोणी कमजोर आहेत. कोणीतरी खुप हुषार आहेत. सर्व मायेशी युद्ध करणारे आहेत. गुप्त च गुप्त आहेत. ते पण जमिनीच्या आतमध्ये बाँम्बस ची पण करत राहतात. हे पण तुम्ही मुलंच जाणतात. आपल्या मृत्यूसाठी सर्व काही करत राहतात, त्यांचे विज्ञानाचे बळ आहे. नैसर्गिक आपत्ती पण खूप आहेत. त्यामध्ये तर कोणाचे काहीच चालत नाही. आता कृत्रिम पावसासाठी पण प्रयत्न करतात. कृत्रिम पाऊस पाडला तर पाऊस जास्त होईल, असे समजतात. तुम्ही मुलंच जाणतात, कितीही पाऊस पडला तरीही, नैसर्गिक आपत्ती तर येणारच आहे. मुसळधार पाऊस पडल्यावर काय करू शकतील, याला म्हटले जाते नैसर्गिक आपत्ती. सतयुगा मध्ये या आपत्ती नसतात. येथे असतात, परत विनाशा मध्ये मदत करतात.

तुमच्या बुद्धीमध्ये आहे, आम्ही जेव्हा सतयुगा मध्ये असू तेव्हा तर जमुनाच्या किनाऱ्यावर सोन्याचे महल असतील. आम्ही खूप थोडे तेथे राहणारे आसू. कल्प-कल्प असे होत राहते. प्रथम छोटे झाड असते, परत वाढत जाते. तेथे कोणतेही खराब गोष्ट नसते. येथे तर पहा चिमण्या खुप घाण करत राहतात. तेथे कोणत्याही घाणीची गोष्टच नसते, त्याला स्वर्ग म्हटले जाते. आता तुम्ही समजता, आम्ही देवता बनतो, तर मनामध्ये खुप खुशी व्हायला पाहिजे. माया रुपी जीन पासून वाचण्यासाठी तुम्ही मुलांनी या आत्मिक धंद्यामध्ये लागायला पाहिजे. मनमनाभव. यामध्ये जिन सारखे बना. जिन चे उदाहरण देतात ना, त्याने म्हटले काम द्या. . . तर बाबा पण काम देतात. नाहीतर माया खाऊन टाकेल. बाबा चे पूर्ण मदतगार तर बनायचे आहे. एकटे बाबा तर करणार नाहीत. बाबा तर राज्य पण करनार नाहीत. तुम्ही सेवा करतात, तर राजाई पण तुमच्यासाठीच आहे. बाबा म्हणतात मी मगध देशा मध्ये येतो. माया पण मगरमच्छ आहे ना. अनेक महारथीला हप करून खाऊन टाकते. हे सर्व दुश्मन आहेत, जसा बेडकाचा दुश्मन साप असतो, तुम्हाला माहित आहे, असाच तुमचा दुश्मन माया आहे. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) स्वतःला पापापासून मुक्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. देहअभिमान मध्ये कधी यायचे नाही. या दुनिये मधील कोणत्याही गोष्टी मध्ये मोह ठेवायचा नाही.

(२) मायारूपी जीन्स पासून वाचण्यासाठी बुद्धीला आत्मिक धंद्यामध्ये व्यस्त ठेवायचे आहे. बाबाचे पूर्णपणे मदतगार बनायचे आहे.

वरदान:-
मी आणि माझ्या पणाला समाप्त करून समानता व संपूर्ण चा अनुभव करणारे खरे त्यागी भव. प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पा मध्ये बाबाची आठवण राहावी. मीपणा समाप्त होऊन जावा, जेव्हा मी नाही तर माझे पण नाही. माझा स्वभाव, माझा संस्कार, माझी वृत्ती, माझे काम किंवा नोकरी, माझे नाव, माझी शान जेव्हा हे मी आणि माझे पण समाप्त होते, म्हणजे समानता आणि संपूर्णता आहे. मी आणि माझ्या पणाचा त्यागच मोठ्यात मोठ्या सूक्ष्म त्याग आहे. मी पणाच्या घोड्याला अश्वमेध यज्ञा मध्ये स्वाहा करा तेव्हाचा अंतिम आहूती पडेल आणि विजयाचे नगारे वाजतील.

बोधवाक्य:-
होय जी करून सहयोगाचा हात पुढे करणे, म्हणजेच आशीर्वादाची माळ घालणे.