05-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्हाला आत्ता ज्ञानाची दृष्टी मिळाली आहे, ज्यामुळे तुमचे भटकणे बंद
झाले, तुम्ही शांतीधाम सुखधामची आठवण करता"
प्रश्न:-
देवतां मध्ये
कोणती शक्ती आहे आणि ती शक्ती कोणत्या विशेषते मुळे आहे?
उत्तर:-
देवतां मध्ये साऱ्या विश्वा वरती राज्य करण्याची शक्ती आहे, ती शक्ती विशेष एकमत या
विशेषते मुळे आहे. तेथे एकमत असल्यामुळे तेथे वजीर इत्यादी ठेवण्याची आवश्यकता नाही.
देवतांनी संगम युगामध्ये बाबांकडून अशी श्रेष्ठ मत घेतली आहे, ज्यामुळे २१ जन्म
राज्य करतात. तेथे एका राजाचा एक दैवी परिवार असतो, दुसरे मत नसते.
गाणे:-
ज्ञान हीन अंध
व्यक्तींना रस्ता दाखव, हे प्रभू….
ओम शांती।
मुलांना नेत्र तर मिळाले आहेत, पूर्वी नेत्र नव्हते. कोणते नेत्र, ज्ञानाचे नेत्र
नव्हते. अज्ञानाचे नेत्र होते. मुलं जाणतात, ज्ञानाचे सागर एक शिव पिताच आहेत.
दुसऱ्या कोणा मध्ये हे आत्मिक ज्ञान नाही. या ज्ञानाद्वारे सद्गती म्हणजे शांतीधाम
सुखधामला जाऊ शकता. आता तुम्हा मुलांना ज्ञानची दृष्टी मिळाली आहे, कसे सुखधाम
बदलून परत मायेचे राज्य किंवा दुःखधाम येते. सर्वजण आळवतात, हे प्रभू आम्हा
नेत्रहीन ला रास्ता दाखव. भक्ती मार्गामध्ये यज्ञ, दान-पुण्य इत्यादी द्वारे
कोणालाही शांतीधाम सुखधाम जाण्याचा रस्ता मिळू शकत नाही. प्रत्येकाला आपली भूमिका
वठवायची आहे. बाबा म्हणतात मला पण भूमिका मिळाली आहे. भक्ती मार्गामध्ये बोलवतात,
हे प्रभू मुक्ती जीवन मुक्ती चा रस्ता दाखव, यासाठी खूप यज्ञ, दान-पुण्य इत्यादी
करत करत खूप भटकले आहात. शांतीधाम सुखांमध्ये भटकत नाहीत. हे पण तुम्ही जाणता, ते
फक्त ग्रंथाचा अभ्यास आणि शारीरिक शिक्षण घेत राहतात. या आध्यात्मिक पित्याला तर
पुरेपूर जाणत नाहीत. आत्मिक पिता तेव्हाच येवून ज्ञान देतात, जेव्हा सर्वांचे सद्गती
होते. जुन्या दुनियाचे परिवर्तन होते, मनुष्या पासून देवता बनतात, परत साऱ्या सृष्टी
वरती एकच देवी-देवतांचे राज्य असते, त्याला स्वर्ग म्हणतात. हे पण भारत वासी जाणतात,
आदी सनातन देवी देवता धर्म भारता मध्येच होता, त्या वेळेत इतर कोणताही धर्म नव्हता.
तुम्हा मुलांसाठी आता हे संगम युग आहे, बाकी सर्व कलियुगा मध्ये आहेत. तुम्ही
पुरुषोत्तम संगम युगा मध्ये बसले आहात. जे जे बाबांची आठवण करतात, त्यांच्या श्रीमता
वर चालतात, ते संगम युगामध्ये आहेत. बाकी सर्व कलियुगा मध्ये आहेत. आता सार्वभौमत्व,
राज्य तर नाही. अनेक मता द्वारे राज्य चालते, सतयुगा मध्ये तर एकाच महाराजांचे मत
चालते. तेथे वजीर नसतात, इतकी शक्ती राहते. जेव्हा पतित बनतात, तेव्हा वजीर इत्यादी
ठेवतात, कारण ती शक्ती राहत नाही. आता तर प्रजेचे प्रजेवर राज्य आहे. सतयुगा मध्ये
एकमत असल्यामुळे ती शक्ती राहते. आता तुम्ही अशी शक्ती घेत आहात, परत २१ जन्म तुम्ही
स्वतंत्र राजाई कराल. आपलाच दैवी परिवार आहे. आता तुमचा ईश्वरी परिवार आहे. बाबा
म्हणतात स्वतःला आत्मा समजून, बाबांच्या आठवणी मध्ये राहता, तुम्ही ईश्वरीय
परिवाराचे आहात. जर देह अभिमानां मध्ये येऊन विसरतात, तर आसुरी परिवाराचे आहात. एका
सेकंदामध्ये ईश्वरीय संप्रदायाचे आणि एका सेकंदा मध्ये आसुरी संप्रदायाचे बनतात.
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे, तर खूपच सहज आहे, परंतु मुलांना कठीण वाटते.
बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतात. देहा
द्वारे कर्म तर करायचेच आहेत. देहा शिवाय तुम्ही कर्म तर करू शकत नाही. प्रयत्न
करायचे आहेत, कामकाज करत आम्ही बाबांची आठवण करू. मधुबन मध्ये तर कामधंदा नसताना ही
आठवण करू शकत नाहीत, विसरून जातात. आठवण करण्याचे कष्ट घ्यायचे आहेत. भक्तीमध्ये
असेच असे थोड़च म्हटले जाते की, सर्व दिवस भक्ती करा, त्यासाठी सकाळची वेळ किंवा
संध्याकाळची वेळ असते. परत मंत्र जे मिळतात, ते बुद्धीमध्ये राहतात. अनेकानेक ग्रंथ
आहेत, ते भक्ती मार्गामध्ये असतात. तुम्हाला तर कोणते पुस्तक इत्यादी वाचायचे नाही,
बनवायचे आहे. ही मुरली तुम्ही छापतात, तेही ताजे तवाने होण्यासाठी, बाकी कोणत्या
पुस्तकाची आवश्यकता नाही. हे सर्व नष्ट होणार आहे. ज्ञान तर एका बाबा मध्येच आहे.
ज्ञान-विज्ञान भवन नाव ठेवले आहे, जसे की तेथे योग आणि ज्ञान शिकवले जाते. अशा
प्रकारचे नावं ठेवतात, त्या बाबत काहीच माहिती नाही की, ज्ञान काय आहे? विज्ञान काय
आहे?आता तुम्ही ज्ञान आणि विज्ञानाला जाणतात. योगाद्वारे आरोग्य ज्याला विज्ञान
म्हटले जाते, आणि हे ज्ञान ज्यामध्ये विश्वाचा इतिहास भूगोल समजवला जातो. विश्वाच्या
इतिहास भूगोला ची कशी पुनरावृत्ती होते ते जाणायचे आहे. परंतु ते शिक्षण हद्द चे आहे,
येथे तर इतिहास-भूगोल बुद्धीमध्ये आहे. आम्ही कसे राज्य घेतो, किती वेळ आणि कधी
राज्य करत होतो, कशी राजधानी मिळाली, या गोष्टी दुसऱ्या कोणाच्या बुद्धीमध्ये नाहीत.
बाबा ज्ञानाचे सागर आहेत. हे सृष्टीचे चक्र कसे फिरते, बाबाच समजवतात. हे या
पूर्वनियोजित नाटकाला न जाणल्या मुळे मनुष्य म्हणतात, अमका निर्वाण गेला किंवा
ज्योती ज्योती मध्ये सामावला.
तुम्ही जाणतात सर्व मनुष्य मात्र या सृष्टीचक्र मध्ये येतात, या मधून कोणीही सुटू
शकत नाही. बाबा समजवतात, मनुष्याची आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. खूप मोठे
अविनाश नाटक आहे, सर्वांमध्ये आत्मा आहे. त्या आत्म्या मध्ये अविनाशी भूमिका भरलेली
आहे, याला म्हटले जाते पूर्वनियोजित नाटक. आत्ता नाटक म्हणतात तर जरूर कालावधी पण
पाहिजे ना. बाबा समजवतात, हे अविनाश नाटक पाच हजार वर्षाचे आहे, भक्ती मार्गातील
ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की, हे नाटक लाखो वर्षाचे आहे. यावेळेत च जेव्हा बाबा
येऊन सहज योग शिकवला होता. त्या वेळेचे गायन आहे, कौरव घोर अंधारामध्ये होते आणि
पांडव प्रकाशामध्ये होते. ते लोक समजतात कलियुग आणखी चाळीस हजार वर्ष आहे. त्यांना
हे माहित होत नाही की, भगवान आले आहेत. या विकारी जुन्या दुनियेतील सर्वांचा मृत्यू
समोर ऊभा आहे. सर्व अज्ञाना मध्ये झोपले आहेत. जेव्हा लढाई पाहतात तर म्हणतात, ही
तर महाभारता च्या लढाई ची लक्षणं आहेत. रंगीत तालीम होत राहते. परत ही लढाई बंद
होईल. तुम्ही जाणतात आमची पूर्ण स्थापना झाली नाही. गीतेमध्ये असे थोडेच आहे की,
बाबांनी सहज राजयोग शिकवून दैवी राजाई ची स्थापना केली. गीतेमध्ये तर प्रलय दाखवला
आहे. असे दाखवतात, सर्वांचा मृत्यू झाला, बाकी पाच पांडव राहिले, त्यांचा ही डोंगरा
वरती जाऊन मृत्यू झाला. राज योगाद्वारे काय झाले, काहीच माहिती नाही. बाबा प्रत्येक
गोष्ट समजावत राहतात. त्यांच्या हद्दच्या गोष्टी आहेत. हद्द ची रचना ब्रह्मा रचतात,
पालना पण करतात, बाकी प्रलय करत नाहीत. पत्नीला दत्तक घेतात. बाबा पण येऊन मुलांना
दत्तक घेतात. ते म्हणतात, मी यांच्यामध्ये प्रवेश करून, मुलांना ज्ञान ऐकवतो,
यांच्या द्वारे मुलांची रचना करतो. पिता पण आहे, परिवार पण आहे, या मोठ्या रहस्य
युक्त गोष्टी आहेत. खूप गंभीर गोष्टी आहेत. सहसा कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाहीत.
आता बाबा म्हणतात, प्रथम स्वतःला आत्मा समजा. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते.
शरीरावरच वेगवेगळे नावं पडतात. नाव रूप चेहरे इत्यादी वेगवेगळे आहेत, एका चा चेहरा
दुसऱ्या शी मिळू शकत नाही. प्रत्येक आत्म्याचे जन्म जन्मानंतर मध्ये आपले चेहरे
आहेत. आपले कार्य व्यवहारा ची अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे म्हणून याला
पूर्वनियोजित नाटक म्हटले जाते. आता बेहद्दचे बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर
विकर्म विनाश होतील. तर आम्ही का नाही बाबांची आठवण करायची? यासाठी कष्ट घ्यायचे
आहेत. तुम्ही मुलं जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये बसतात, तर संकल्प विकल्पाचे युद्ध
चालते परंतु त्याला घाबरायचे नाही. माया घडी-घडी आठवण विसरण्याचा प्रयत्न करवते.
संकल्प विकल्प असे येतील, जे माथा च खराब करतील. तुम्ही कष्ट करा. बाबाने समजवले आहे,
या लक्ष्मी नारायणाच्या कर्मेंद्रिया कशा वश झाल्या. हे संपूर्ण निर्विकारी होते,
हे शिक्षा त्यांना कसे मिळाले?आता तुम्हा मुलांना असे श्रेष्ठ बनण्याचे ज्ञान मिळत
आहे. यामध्ये कोणत्या विकाराची गोष्ट राहत नाही. याच्या मध्ये कोणते विकार नसतात.
नंतर रावण राज्य सुरू होते. रावण कोण आहे, हे पण कोणीच जाणत नाहीत.
ड्रामा(नाटक)नुसार याची पण नोंद आहे. अविनाशी नाटकाच्या आदी मध्यं अंत ला कोणी जाणत
नाहीत, म्हणून नेती नेती म्हणजे माहित नाही, माहित नाही असे करत आले. आता तुम्ही
स्वर्गवासी बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. लक्ष्मीनारायण स्वर्गाचे मालक होते ना.
यांच्यापुढे माथा टेकणारे तमोप्रधान कनिष्ठ पुरुष आहेत. बाबा म्हणतात, प्रथम एक
गोष्ट पक्की करा, स्वतःला आत्मा समजून माझीच आठवण करा, यामध्येच कष्ट आहेत. आठ तास
सरकारी नोकरी करतात. आता तुम्ही बेहद्दच्या सरकारचे मदतगार आहात. तुम्हाला कमीत कमी
आठ तास पुरुषार्थ करून आठवणीमध्ये राहायचे आहे. ही अवस्था तुमची अशी पक्की होईल परत
कोणाची आठवण येणार नाही. बाबांच्या आठवणीमध्ये शरीर सोडाल परत तेच विजय माळेचे मणके
बनतील. एका राजाची खूप प्रजा असते. येथे पण प्रजा बनवायची आहे. तुम्ही विजय माळचे
मणके पुजनीय बनतात. १६१०८ ची पण माळ असते, एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवलेली असते.
८ची पण माळ आहे, १०८ मण्यांची पण माळ आहे ना. अंत काळा मध्ये परत १६१०८ची पण बनते.
तुम्हा मुलांनीच बाबा पासून राजयोग शिकून सर्व विश्वाला स्वर्ग बनवला आहे म्हणून
तुमची पूजा होते. तुम्हीच पूज्य होते परत पुजारी बनले. हे दादा पण म्हणतात, आम्ही
स्वतः माळ जपली आहे. लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये तर रुद्र माळ असायला पाहिजे. तुम्ही
प्रथम रुद्र माळे मध्ये परत रुंड माळेचे बनतात. प्रथम नंबर मध्ये रुद्रमाळ आहे,
त्यामध्ये शिव पण आहेत. रुंड माळे मध्ये शिव कसे येतील. ती तर विष्णुची माळ आहे. या
गोष्टीना दुसरे थोडेच समजतात. आता तुम्ही म्हणतात, आम्ही शिवबाबांच्या गळ्याचे हार
बनतो. ब्राह्मणांची माळ बनू शकत नाही. तुम्ही जितके बाबांच्या आठवणी मध्ये राहता,
तेवढे जवळच्या संबधा मध्ये येऊन राज्य कराल. हे शिक्षण दुसऱ्या ठिकाणी मिळू शकत नाही.
तुम्ही जाणता, आत्ता आम्ही या शरीराला सोडून स्वर्गवासी बनत आहोत. सर्व भारत
स्वर्गवासी बनेल. खास भारत स्वर्ग होता, ५००० वर्षाची गोष्ट आहे. लाखो वर्षाची
गोष्ट होऊ शकत नाही. देवतांनाच पाच हजार वर्ष झाले, स्वर्गाला मनुष्य विसरले आहेत,
बाकी काहीच नाही. इतके जुने इसवी सन इत्यादी थोडेच आहेत. सूर्यवंशी चंद्रवंशी परत
दुसऱ्या धर्माचे येतात. जुन्या गोष्टी काय कामाला येतील. अनेक वस्तूंची खरेदी करतात.
जुन्या गोष्टीची खूप किंमत करतात. सर्वात किमती तर शिवबाबा आहेत. अनेक शिवलिंग
बनवतात, आत्मा खूप छोटी बिंदू आहे, हे कोणाला पण समजत नाही. अतिसूक्ष्म रुप आहे.
बाबा समजवतात इतक्या छोट्या बिंदू मध्ये इतकी भूमिका भरलेली आहे. हे ज्ञान तुम्हाला
स्वर्गा मध्ये नसेल. हे प्रायलोप होते, तर परत कोणी सहज राजयोग कसे शिकवू शकतील? हे
सर्व भक्ति मार्गा साठी बनवले आहे. आता तुम्ही मुलं जाणता, बाबा द्वारे ब्राह्मण,
देवता क्षत्रिय, तीन धर्माची स्थापना होत आहे, तेही भविष्य नवीन दुनिये मध्ये
जाण्यासाठी. ते शिक्षण तर एक जन्मासाठी घेता, या ज्ञानाचे प्रारब्ध तर तुम्हाला
नवीन दुनिये मध्ये मिळेल. हे ज्ञान फक्त संगम युगामध्ये दिले जाते. हे पुरुषोत्तम
संगमयुग आहे. मनुष्या पासून देवता तर जरूर संगम युगा मध्येच बनतील. बाबा तुम्हा
मुलांना सर्व रहस्य समजवतात. बाबा पण जाणतात, तुम्ही सर्व दिवस आठवणी मध्ये राहू
शकत नाही, अवघड आहे. यासाठी दिनचर्या लिहा, आम्ही शिवबाबांच्या आठवणीमध्ये किती
राहिलो?देहाचा अभिमान असेल तर आठवण कशी राहू शकेल? पापाचे डोक्यावरती खूप ओझे आहे
म्हणून बाबा म्हणतात, आठवणीमध्ये रहा, त्रिमूर्ती चे चित्र खिशामध्ये ठेवा, तरीही
तुम्ही घडीघडी विसरतात. अल्फ म्हणजे शिव बाबांची आठवण केल्या मुळे तुम्हाला बादशहाची
पण आठवण येईल. बैज नेहमी लागलेला असावा. तुमच्या जवळ साहित्य पण हवे, कोणी चांगली
धार्मिक व्यक्ती भेटले तर त्यांना द्यायला पाहिजे. चांगले मनुष्य कधी मोफत घेणार
नाहीत. तुम्ही त्यांना सांगा, याचे काय पैसे घेणार?बोला गरिबांना तर मोफत दिले जाते,
बाकी जे जितके देतील. उच्च प्रतीचे असायला पाहिजे. तुमचे रिती रिवाज दुनिये पेक्षा
अगदीच वेगळे पाहिजेत. चांगले मनुष्य स्वतः काही ना काही देतील. हे तर आम्हा
सर्वांच्या कल्याणासाठी देत आहोत. कोणी वाचून तुम्हाला पैसे पण पाठवून देतील. तुम्ही
खर्च तर करता ना. तुम्ही सांगा, आम्ही आपले तन-मन-धन भारताच्या सेवांमध्ये खर्च करत
आहोत. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) या
बेहद्दच्या सरकारला मदत करण्यासाठी, कमीत कमी आठ तास आठवणीमध्ये राहण्याचा
पुरुषार्थ करायचा आहे. आठवणींमध्ये जे मायेचे विघ्न येतात, त्यांना घाबरायचे नाही.
(२) या पुरुषोत्तम
संगम युगामध्ये ईश्वरीय संप्रदायाचे बनून ईश्वरा च्या मतावर चालायचे आहे. कर्म करत
पण एक बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे.
वरदान:-
गरीबा पासून
राजकुमार ची भूमिका प्रत्यक्षात वठवणारे त्यागी किंवा श्रेष्ठ भाग्यशाली आत्मा भव.
जसे भविष्यामध्ये विश्व महाराज दाता असतील, असे आता पासून दाता पणाचे संस्कार धारण
करा. कोणाकडून कोणतेही सवलत घेऊन परत त्यांना मदत करू असे संकल्प यायला नको, त्याला
म्हटले जाते गरीब पासून राजकुमार बनणे. स्वतः घेण्याची इच्छा ठेवणारे नाही. या अल्प
काळाच्या इच्छे पासून मुक्त बना. असे गरीबच संपन्न मूर्त आहेत. जे आता गरीबा पासून
राजकुमार ची भूमिका प्रत्यक्षात वठवत आहेत, त्यांना म्हटले जाते नेहमी त्यागी किंवा
श्रेष्ठ भाग्यशाली. त्यागा द्वारे नेहमी साठी भाग्य स्वतः बनते.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-
नेहमी आनंदी राहण्यासाठी, त्रयस्त(साक्षी) पणाच्या आसनावरती, अनासक्त बनून प्रत्येक
खेळ पहा.