08-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, म्हणून आता तुमचे मन कोणामध्ये आकर्षित व्हायला नको"

प्रश्न:-
ज्यांना जुन्या दुनिया पासून बेहद्दचे वैराग्य असेल, त्यांची लक्षणे कोणती आहेत?

उत्तर:-
ते आपले सर्व काही शिव पित्याला अर्पण करतील, माझे काहीच नाही, बाबा माझा देह पण माझा नाही. हा जुना देह आहे, त्यांना पण सोडायचे आहे. त्यांचा मोह सर्व गोष्टींमधून नष्ट होत जाईल आणि नष्ट मोहा बनतील. त्यांच्या बुद्धी मध्ये राहते की या, दुनियेतील काहीच कामाला येणार नाही कारण हे सर्व हद्दचे आहे.

ओम शांती।
बाबा मुलांना ब्रह्मांड आणि सृष्टी चक्राच्या आदी मध्य अंत चे ज्ञान देत आहेत, दुसरे कोणी देऊ शकत नाही. एक गिताच आहे, ज्यामध्ये राजयोगा चे वर्णन आहे. भगवान नरा पासून नारायण बनवतात, हे शिवाय गिता, दूसऱ्या ग्रंथांमध्ये नाही. हे पण बाबांनी सांगितले आहे, असे म्हणतात मीच तुम्हाला राजयोग शिकवला होता. हे समजवले होते की, हे ज्ञान काही परंपरा द्वारे चालत नाही. बाबा येऊन एक धर्माची स्थापना करतात, बाकी इतर सर्व धर्म विनाश होतात. कोणतेही ग्रंथ इत्यादी परंपरा द्वारे चालत नाहीत आणि जे धर्म स्थापन करण्यासाठी येतात, त्यावेळेस काही विनाश होत नाही, जे सर्व नष्ट होतील. भक्ती मार्गातील ग्रंथ वाचतच येतात. यांचा(ब्राह्मण धर्माचा)जरी गीता ग्रंथ असला परंतु तेही भक्तिमार्ग मधेच बनवतात, कारण सत युगामध्ये तर कोणते ग्रंथ इत्यादी राहत नाहीत. दुसर्‍या धर्माच्या वेळेत विनाश तर होतच नाही. जुनी दुनिया नष्ट होत नाही, परत नवीन बनेल, तीच चालत येते. आत्ता तुम्ही मुलं जाणता, ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत. गायन पण गितेचे आहे. गिता जयंती साजरी करतात, वेद जयंती तर नाही. भगवान एकच आहेत, तर एका ची जयंती साजरी करायला पाहिजे. बाकी सर्व त्यांची रचना आहे, त्यांच्या द्वारे काहीच मिळत नाही. वारसा बाबा कडूनच मिळतो, काका मामा इत्यादी कडून काही वारसा मिळत नाही. आता हे तुमचे बेहद्द चे पिता, बेहद्दचे ज्ञान देत आहेत. हे काही ग्रंथ साहित्य ऐकवत नाहीत. ते म्हणतात हे सर्व भक्तिमार्गाचे आहेत, या सर्वांचे रहस्य मी तुम्हा मुलांना ऐकवतो. हे ग्रंथ काही शिक्षण नाही, शिक्षणाद्वारे तर पद प्राप्त होते. हे राजयोगा चे शिक्षण तर बाबाच मुलांना शिकवत आहेत. भगवानुवाच मुलांप्रती परत पाच हजार वर्षानंतर असेच होईल. मुलं जाणतात, आम्ही पित्याकडून रचनाकार आणि रचनेच्या आधी मध्य अंतला जाणले आहे. हे कोणी दुसरे समजाऊ शकत नाहीत, शिवाय शिव पित्याच्या. या मुखकमल द्वारे ज्ञान ऐकवतात. हे भगवंतांनी भाड्याने घेतलेले मुख आहे ना. ज्याला गौमुख पण म्हणतात, मोठी माता आहे ना. यांच्या मुखाद्वारे ज्ञानाचे महावाक्य निघतात, न की जल इत्यादी. भक्तिमार्ग मध्ये परत गौमुख द्वारे जल निघते, असे दाखवले आहे. आता तुम्ही मुलं समजता, भक्तिमार्गा मध्ये काय काय करतात, खूप दूर दूर गोमुख इत्यादी ठिकाणी पाणी पिण्यासाठी जातात. आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनवत आहात. हे तर जाणतात, शिवपिता मनुष्या पासून देवता बनवण्यासाठी शिकवत आहेत. तुम्ही पाहता कसे शिकवत आहेत. तुम्ही सर्वांना हे सांगा, आम्हाला भगवान शिकवत आहेत, ते म्हणतात माझीच आठवण करा, तुमचे विकर्म विनाश होतील. तुम्ही जाणता, सतयुगा मध्ये खूप थोडे मनुष्य असतात. कलियुगामध्ये तर असंख्य मनुष्य आहेत. बाबा येऊन आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. बाबा येऊन मनुष्यांना देवता बनवत आहेत. मनुष्या पासून देवता बनणाऱ्या मुलांमध्ये, दैवी गुण दिसून येतील, त्यांच्यामध्ये क्रोधाचा अंश पण दिसणार नाही. जर कधी क्रोध आला, तर ते लगेच बाबांना सांगतील, आमच्याकडून ही चूक झाली. आम्ही क्रोध केला, विकर्म केले. बाबांशी तुमचा किती संबंध आहे. बाबा क्षमा करा. बाबा म्हणतात, क्षमा होत नाही. बाकी पुढे तुम्ही अशी चूक करू नका, शिक्षक काही क्षमा करत नाहीत. ते रजिस्टर दाखवतात, यांची चलन चांगली नाही. बेहद्दचे बाबा पण म्हणतात, तुम्ही आपली चाल चलन रोज पाहत रहा, रोज आपली दिनचर्या तपासा, कुणाला दुःख तर नाही दिले? कुणाला तंग तर नाही केले?दैवी गुण धारण करण्यामध्ये वेळ तर लागतो ना. देह अभिमान महत्प्रयासाने नष्ट होतो. जेव्हा आपल्याला देही(आत्मा) समजतील, तेव्हा बाबा मध्ये स्नेह येईल, नाहीतर देहाच्या कर्म बंधना मध्येच बुद्धी लागून राहते. बाबा म्हणतात, तुम्हाला शरीर निर्वाह अर्थ काम तर करायचे आहेच, त्यामधून वेळ काढू शकता, भक्तीसाठी पण वेळ काढतात. मीरा कृष्णाच्या आठवणी मध्येच राहत होती ना. पुनर्जन्म तर येथेच घेत गेली.

आता तुम्हा मुलांना जुन्या दुनिये पासून वैराग येतो. तुम्ही जाणता, या जुन्या दुनिया मध्ये परत पुनर्जन्म घ्यायचा नाही. दुनियाच नष्ट होते. या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धी मध्ये आहेत. जसे बाबां मध्ये ज्ञान आहे, तसे मुलांमध्ये पण आहे, हे सृष्टीचे चक्र, इतर कोणाच्या बुद्धीमध्ये नाही, तुमच्यामध्ये पण क्रमानुसार आहे. ज्यांच्या बुद्धीमध्ये हे राहते की, उच्च ते उच्च पतित पावन, शिव पिताच आहेत, ते आम्हाला शिकवत आहेत. हे पण तुम्ही मुलंच जाणतात. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ८४ जन्माचे चक्र आहे. तुम्हाला स्मुर्ती राहते, आता या नरकामध्ये अंतिम जन्म आहे, याला म्हटले जाते रौरव नर्क. खूप खराब वातावरण आहे, म्हणून संन्यासी लोक घरदार सोडून जातात, त्या झाल्या शारीरिक गोष्टी. तुम्ही संन्यास करतात बुद्धी द्वारे, कारण तुम्ही जाणता, आत्ता आम्हाला परत घरी जायचे आहे, सर्वांना विसरावे लागते. जुनी दुनिया, खराब दुनिया, नष्ट झाली की झाली. घर जेव्हा जुने होते, तेव्हा नवीन बनवण्यासाठी सुरू करतात. तर मनामध्ये येते, घर पडले की पडले. आता तुम्ही मुलं शिकत आहात ना, तुम्ही जाणतात नवीन दुनिये ची स्थापना होत आहे. आता थोडेच दिवस आहेत, अनेक मुलं येऊन हे ज्ञान घेतील. नविन इमारती पण आत्ता बनत आहेत, जुन्या इमारती नष्ट होत जातात, बाकी थोडे दिवस आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये या बेहद्दच्या गोष्टी आहेत. आता आमचे जुन्या दुनिया मध्ये मन लागत नाही, हे काहीच कामाला येणार नाही, आम्ही इथून जाऊ इच्छितो. बाबा पण म्हणतात या जुन्या दुनियेशी मन लावायचे नाही. मज पित्याची आणि घराची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील, नाहीतर खूप सजा खावी लागेल, आणि पद पण भ्रष्ट होईल. आत्म्याला इच्छा होते की, आम्ही ८४ जन्म भोगले आहेत. आता बाबांची आठवण करायची आहे, तेव्हाच विकर्म विनाश होतील. बाबांच्या मतावर चालायचे आहे, तेव्हाच श्रेष्ठ जीवन बनेल, हे पण तुम्हीच जाणतात. बाबा चांगल्या रीतीने स्मृती देतात, ते बेहद्दचे पिता ज्ञानाचे सागर आहेत, तेच येऊन शिकवतात. बाबा म्हणतात हे शिक्षण तुम्ही घ्या आणि शरीर निर्वाण अर्थ कामधंदा पण करा परंतु विश्वस्त होऊन करा. ज्या मुलांचे जुन्या दुनियेशी वैराग्य असेल, ते सर्वकाही बाबांना अर्पण करतील. आमचे काहीच नाही बाबा, हा देह पण माझा नाही. हे तर आता जुने आहे, त्यांना पण सोडायचे आहे. सर्वांशी मोह नष्ट होत जाईल,

नष्टोमोहा बनायचे आहे. हे बेहद्दचे वैराग्य आहे ना. ते हद्दचे वैराग्य आहे. आपल्या बुद्धी मध्ये आहे, आम्ही स्वर्गा मध्ये जाऊन आपले महल बनवू. येथील काहीच कामाला येणार नाही, कारण हे सर्व हद्दचे आहे. तुम्ही आता हद्द मधून निघून बेहद्द मध्ये जात आहात. तुमच्या बुद्धीमध्ये हे बेहद्दचे ज्ञान राहायला पाहिजे. आत्ता कोणामध्ये आकर्षण राहायला नको. आता तर आपल्या घरी जायचे आहे. बाबा येऊन आम्हाला सोबत घेऊन जातात. तुमच्यासाठी हे काही नवीन शिक्षण नाही. तुम्ही जाणता आम्ही कल्प कल्प शिकत आलो आहोत, तुमच्यामध्ये पण क्रमानुसार आहेत. सर्व दुनिया मध्ये असंख्य मनुष्य आहेत परंतु तुम्ही थोडेच जाणतात, हळूहळू हे ब्राह्मणांचे झाड वृद्धिंगत होत राहील. पूर्वनियोजित नाटका नुसार स्थापना होणारच आहे. मुलं जाणतात, आमचे आत्मिक शासन आहे. आम्ही दिव्यदृष्टी द्वारे नवीन दुनिया पाहत आहोत. तेथे जायचेच आहे. भगवान पण एकच आहेत, तेच शिकवणारे आहेत. राजयोग शिकवला होता, त्यावेळेस लढाई पण बरोबर लागली होती आणि अनेक धर्माचा विनाश, एक धर्माची स्थापना झाली होती. तुम्ही पण तेच आहात, कल्प कल्प तुम्हीच शिकत आले आहात आणि वारसा घेत आले आहात. प्रत्येकाला आप आपला पुरुषार्थ करायचा आहे. हे बेहद्द चे शिक्षण आहे, हे शिक्षण दुसरे कोणी मनुष्य मात्र देऊ शकत नाहीत. बाबांनी सावळा आणि सुंदर चे रहस्य पण समजले आहे. तुम्ही जाणतात आम्ही सुंदर बनत आहोत, पूर्वी सावळे होतो. कृष्ण काही एकटाच सावळा नव्हता, सारी राजधानी तशीच होती. आता तुम्ही समजता, आम्ही नर्क वासी पासून स्वर्ग वासी बनत आहोत. आता तुम्हाला या नर्का द्वारे नफरत येते. तुम्ही आता पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहात. अनेक लोक ज्ञान घेण्यासाठी येतात, यांच्यापैकी तेच येतील, जे पूर्वी आले असतील. संगमयुगा ची पण चांगल्या रीतीने आठवण करायची आहे. आम्ही पुरुषोत्तम म्हणजेच, मनुष्या पासून देवता बनत आहोत. मनुष्य तर हे पण समजत नाहीत की, नर्क काय आहे आणि स्वर्ग काय आहे. असे म्हणतात सर्व काही इथेच आहे. जे सुखी आहेत, ते स्वर्गामध्ये आहेत आणि जे दुखी आहेत ते नरकामध्ये आहेत. अनेक मते आहेत ना. एका घरामध्ये पण अनेक मत होतात. मुलं इत्यादी मध्ये जो मोह असतो, तो लवकर नष्ट होत नाही. मोह असल्यामुळे काहीच समजत नाहीत. बाबांना विचारतात मुलांचे लग्न करू का, परंतु मुलांना कायद्यानुसार समजवले जाते की, स्वर्गवासी होण्यासाठी, एकीकडे ज्ञान घेत आहात, दुसरीकडे विचारतात त्यांना नरकामध्ये घालू का? बाबांना तुम्ही विचारतात, तर बाबा म्हणतील जाऊन करा. बाबा समजवतात यांच्यामध्ये मोह आहे. आता जर नाही म्हटले, तर अवज्ञा होईल. मुलींचे तर लग्न करायचे आहे, नाहीतर संगदोष मध्ये येऊन खराब होतील. मुलांचे लग्ना तर करायचे नाही परंतु हिम्मत पाहिजे ना. शिव बाबांनी ब्रह्मा द्वारे करून दाखवले ना, त्यांना पाहून दुसरे पण करायला लागले. घरांमध्ये खूप भांडणे होतात, ही भांडणाऱ्यां ची दुनिया आहे. काट्याचे जंगल आहे ना. एक-दोघांना विकारी बनवत राहतात. स्वर्गाला फुलांचा बगीचा म्हटले जाते. ही दुनिया म्हणजे जंगल आहे. बाबा येऊन काट्या पासून फुलां सारखे बनवतात. प्रदर्शनी मधून फार थोडे निघतात. प्रदर्शन मध्ये होय, होय असे करतात परंतु समजत काहीच नाहीत. एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. राजधानी स्थापन करण्यामध्ये वेळ तर लागतो ना. मनुष्य स्वतःला विकारी थोडेच समजतात. यावेळेत चेहरा मनुष्याचा असला तरी, चलन मात्र माकडा सारखीच आहे परंतु स्वतःला असे समजत नाहीत. तरी बाबा म्हणतात आपल्या रचनेला समजावयचे आहे, जर समजत नाही तर त्यांना पळवून लावायला पाहिजे परंतु ती शक्ती पाहिजे ना. मोहाच्या किडा असा लागलेला आहे, जो निघू शकत नाही. येथे तर नष्टमोहा बनायचे आहे. माझे तर एक बाबा, दुसरे कोणीच नाही. आता बाबा आले आहेत, सोबत घेऊन जाण्यासाठी, तर पावन बनायचे आहे, नाहीतर खूप सजा खातील, आणि पद पण भ्रष्ट होईल. आत्ता स्वतःला सतोप्रधान बनण्याची चिंता लागायला पाहिजे. शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही समजावू शकता, भगवंताने भारताला स्वर्गाचे मालक बनवले होते, आता परत बनवत आहेत. ते फक्त म्हणतात, माझी आठवण करा. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या, मुलां प्रती, मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) जुन्या दुनिये पासून बेहद्द चे वैरागी बनून, आपले सर्व काही अर्पण करायचे आहे. माझे काहीच नाही, हा देह पण माझा नाही, यापासून मोह काढून नष्टोमोहा बनायचे आहे.

(२) कधीच अशी चूक करायची नाही, ज्यामुळे रजिस्टर वरती डाग पडेल. सर्व दैवी गुण धारण करायचे आहेत. मनामध्ये जरा पण क्रोधाचा अंश राहायला नको.

वरदान:-
डबल लाईट म्हणजे एकदम हलके बनून, सर्व समस्यांना नष्ट करणारे, तीव्र पुरुषार्थी भव.

नेहमी स्वतः ला अमूल्य रत्न समजून बाप दादांच्या हृदया मधे रहा म्हणजेच नेहमी बाबांच्या आठवणी मध्ये सामावलेले रहा, तर कोणतीच गोष्ट कठीण अनुभव होणार नाही. सर्व ओझे समाप्त होईल. याच सहयोगाने, एकदम हलके बनून पुरुषार्था मध्ये सर्व समस्या नष्ट करणारे, तीव्र पुरुषार्थी बनाल. जेव्हा कोणते कठीण कार्य अनुभव होते, तर बाबांच्या समोर बसा आणि बाप दादांच्या वरदाना चा हात स्वतःवरती अनुभव करा, यामुळे सेकंदामध्ये सर्व समस्या मधून मार्ग निघू शकेल.

बोधवाक्य:-
सहयोगाची शक्ती असंभव गोष्टीला पण संभव बनवते, हाच सुरक्षा चा किल्ला आहे.