27-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आता तुम्ही नवीन संबंधांमध्ये जात आहात, त्यामुळे इथल्या सर्व कर्मबंधनयुक्त संबंधांना विसरून, कर्मातीत बनण्याचा पुरुषार्थ करा"

प्रश्न:-
बाबा कोणत्या मूलांची स्तुती करतात? सर्वात जास्त प्रेम कोणाला देतात?

उत्तर:-
बाबा गरीब मुलांची स्तुती करतात. वा गरिबी वा! आरामात दोन भाकरी खायच्या आहेत, हव्यास नाही.गरीब मुलं बाबांची प्रेमानी आठवण करतात. बाबा आडाणी मुलांना पाहून खुश होतात कारण की त्यांना शिकलेले विसरण्याची मेहनत करावी लागत नाही.

ओम शांती।
आता बाबांना, मुलांप्रती रोज- रोज सांगण्याची आवश्यकता राहत नाही की स्वतःला आत्मा समजा.आत्म-अभिमानी भव किंवा देही- अभिमानी भव... अक्षर आहे तर तेच ना. बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा.आत्म्या मध्येच ८४ जन्मांची भुमिका भरलेली आहे. एक शरीर घेतले पार्ट बजावला, नंतर शरीर नष्ट होऊन जाते.आत्मा तर अविनाशी आहे.तुम्हा मुलांना हे ज्ञान आत्ताच मिळत आहे दुसऱ्या कोणाला या गोष्टी माहीत नाहीत.आता बाबा म्हणतात- प्रयत्न करून जेवढी होईल तेवढी बाबांची आठवण करा. कामधंदा करत असताना एवढी आठवण राहू शकत नाही. ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहून कमळाच्या फुलाप्रमाणे पवित्र बनायचे आहे. नंतर जेवढी होईल तेवढी माझी आठवण करा. असे नाही की मला ध्यानामध्ये (नेष्ठा) बसायचे आहे. ध्यान (नेष्ठा) अक्षरही चुकीचे आहे. प्रत्यक्षात आठवण आहे. कुठेही बसले असाल, बाबांची आठवण करा. मायेचे वादळ तर भरपूर येतील. कुणाला काय आठवेल, कुणाला काय.वादळ आल्यानंतर परत येऊ नये म्हणून त्याला संपवावे लागते. इथे बसल्या - बसल्या ही माया खूप त्रास देते.हेच तर युद्ध आहे. जेवढे हलके बनाल तेवढे बंधन कमी होतील. प्रथम आत्मा निर बंधन आहे,जेव्हा जन्म घेते तेव्हा आई-वडिलांमध्ये बुद्धी जाते,नंतर स्त्रीला दत्तक घेतात,जी गोष्ट समोर नव्हती ती गोष्ट समोर येते, नंतर मुलांना जन्म दिल्यावर त्यांची आठवण येते. आता तुम्हाला हे सर्व विसरून जायचे आहे, एक बाबांची आठवण करायची आहे, म्हणूनच बाबांची महिमा आहे. तुम्हीच मात - पिता इ. सर्वकाही तोच आहे, त्याचीच आठवण करा. तो तुम्हाला भविष्यासाठी सर्वकाही नवीन देत आहे. नवीन संबंधांमध्ये घेऊन जात आहे.संबंध तर तिथेही असतील ना. असे तर नाही कि सर्व काही प्रलया मधे नष्ट होऊन जाईल. तुम्ही एक शरीर सोडून नंतर दुसरे घेता. जे खूप चांगले - चांगले आहेत,ते नक्कीच उंच कुळामध्ये जन्म घेतील. तुम्ही शिकतच आहात भविष्य 21 जन्मां साठी. शिक्षण पूर्ण झाले आणि प्रारब्ध सुरू होईल. शाळेमध्ये शिकून पुढच्या वर्गात जातात ना. तुम्हीही जाणार आहात- शांतीधाम नंतर सुखधामामध्ये. या खराब दूनिये पासून सुटका होईल.याचे नावच आहे नर्क.सतयुगाला म्हटले जाते स्वर्ग.इथे मनुष्य किती घोर अंधारामध्ये आहेत.जे धनवान आहेत ते समजतात आमच्या साठी इथेच स्वर्ग आहे. स्वर्ग तर नवीन दुनियेमध्ये असतो. ही जुनी दुनिया तर विनाश होऊन जाणार आहे.ज्यांची अवस्था कर्मातीत झाली आहे ते धर्मराज पुरी मध्ये सजा थोडीच भोगणार आहेत. स्वर्गामध्ये तर सजा असणारच नाही.तिथे गर्भ ही महल असतो. दुःखाची कोणतीही गोष्ट नसते. इथे तर गर्भ जेल आहे त्यामुळे सजा खात राहतात. तुम्ही किती वेळा स्वर्गवासी बनता- हे आठवले तरी सर्व चक्र आठवणी मध्ये राहील. एकच गोष्ट लाखो रुपयांची आहे. हे विसरल्यामुळे, देह - अभिमाना मध्ये आल्यामुळे माया खूप नुकसान करते.हीच मेहनत आहे. मेहनत केल्याशिवाय उच्च पद प्राप्त करू शकत नाही. बाबांना म्हणतात- आम्ही अडाणी आहोत, काहीच माहित नाही. बाबांना तर खूप खुशी होते कारण की इथे जे शिकलेले आहे ते सर्वकाही विसरायचं आहे. हे तर थोड्या काळासाठी शरीर निर्वाहासाठी शिकायचे आहे. तुम्ही जाणता ना - हे सर्व नष्ट होणार आहे. जेवढी होईल तेवढी बाबांची आठवण करायची आहे आणि भाकरी तुकडा आनंदाने खायचा आहे. वा यावेळी ची गरीबी. आरामात भाकरी तुकडा खायचा आहे. हव्यास नाही. आज-काल अन्न कुठे भेटते.साखर इ. हळूहळू मिळणार नाही.असे नाही, तुम्ही ईश्वरीय सेवा करता तर तुम्हाला शासन देईल. त्यांना तर काहीच माहित नाही. होय,मुलांना सांगितले जाते- शासनाला समजावून सांगा की,आम्ही सर्व मिळून मात - पित्याजवळ जात आहोत,त्यांना मुलांसाठी टोली पाठवावी लागते. इथे तर स्पष्ट नाही म्हणून सांगितले जाते. लाचारी मध्ये थोडीच देतात. ज्याप्रमाणे एखाद्या फकिराला कुणी सावकार असेल तर मुठ भरून देतो. गरीब असेल तर थोडेफार देईल. साखर इ. येऊ शकते परंतु मुलांचा योग कमी होऊन जातो. आठवणीमध्ये न राहिल्यामुळे, देह - अभिमाना मध्ये आल्यामुळे काम होऊ शकत नाही. हे काम शिक्षणानी जेवढे होऊ शकत नाही तेवढे योगाद्वारे होईल.योग खूप कमी आहे.माया आठवण उडवून लावते. पहिलवानाला अजूनच चांगल्या प्रकारे पकडून ठेवते. चांगल्या- चांगल्या प्रथम क्रमांकाच्या मुलांवरही ग्रह चारी बसते. ग्रहचारी बसण्याचे मुख्य कारण आहे योगाची कमी. ग्रहचारी मुळेच नावा रूपामध्ये फसून मरतात.खूप मोठे लक्ष आहे.जर खरे लक्ष प्राप्त करायचे असेल तर आठवणीमध्ये राहायला पाहिजे.

बाबा म्हणतात- ध्याना पेक्षा ज्ञान चांगले. ज्ञानापेक्षा आठवण चांगली. ध्यानामध्ये जास्त गेल्यामुळे मायेच्या भुतांची प्रवेशता होते. असे खूप जण आहेत जे विनाकारण ध्यानामध्ये जात असतात.काय- काय बोलत असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. ज्ञान तर बाबांच्या मुरली मध्ये मिळत राहते.बाबा सावधान करत राहतात. ध्यान काही कामाचे नाही.मायेची खूप प्रवेशता होते.अहंकार येतो. ज्ञान तर सर्वांना मिळत राहते. ज्ञान देणारा शिवबाबा आहे. मम्माला ही इथूनच ज्ञान मिळत होते ना. त्यांनाही म्हणतात मनमनाभव. बाबांची आठवण करा, दैवी गुण धारण करा. स्वतःला पाहायचे आहे आम्ही दैवी गुण धारण करत आहोत? दैवी गुण इथेच धारण करायचे आहेत. कुणाला पहा आत्ता खूप छान अवस्था आहे, खुशीने काम करतात,काहीवेळाने क्रोधाचे भुत आले,नष्ट होते,नंतर लक्षात येते,मी तर चूक केली.पुन्हा सुधारतात. क्षणा- क्षणाला बदलणारे- बाबांजवळ खूप आहेत, आता पाहिले तर खूप गोड, बाबा म्हणतात अशा मुलांवर तर कुर्बान जाऊ. एक तासानंतर कोणत्या ना कोणत्या गोष्टी मध्ये बिघडतात. क्रोध आला, सारी केलेली कमाई नष्ट करून टाकतात. आत्ता-आत्ता कमाई, आत्ता-आत्ता नुकसान होऊन जाते. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. ज्ञान तर खूप सोपे आहे. लहान मुलगा ही सांगू शकतो. परंतु मी जो आहे, जसा आहे, यथार्थ रीतीने जाणायला हवे. स्वतःला आत्मा समजा,अशा प्रकारे छोटी मुलं थोडीच आठवण करू शकतात. मृत्युसमयी मनुष्याला सांगितले जाते भगवंताची आठवण करा परंतु कुणीही करू शकत नाही कारण यथार्थ रीतीने जाणत नाहीत. कुणीही परत जाऊ शकत नाही. न विकर्म विनाश होतात. परंपरेपासून ऋषीमुनी इ. सर्व म्हणत आले आहेत की रचता आणि रचनेला आम्ही जाणत नाही. ते तर तरीही सतोगुणी होते. आजचे तमोप्रधान बुद्धि कसे जाणू शकतात. बाबा म्हणतात हे लक्ष्मीनारायण पण जाणत नाहीत.राजा-राणीच जाणत नव्हते तर मग प्रजा कशी जाणणार. कुणीच जाणत नाही. आता फक्त तुम्ही मुलंच जाणता. तुमच्या मध्येही काही जणच यथार्थ रीतीने जाणतात, म्हणतात बाबा सतत विसरून जातो. बाबा म्हणतात, कुठेही जा फक्त बाबांची आठवण करा. खूप मोठी कमाई आहे. तुम्ही २१ जन्मासाठी निरोगी बनत आहात. अशा बाबांची अंतर्मुख होऊन आठवण करायला पाहिजे. परंतु माया विसरायला लावून वादळामध्ये आणते, यामध्ये अंतर्मुख होऊन विचार सागर मंथन करायला पाहिजे. विचार सागर मंथन करण्याची गोष्ट ही आत्ताची आहे. हे आहे पुरुषोत्तम बनण्याचे संगम युग. हे ही आश्चर्य आहे, तुम्हा मुलांनी पाहिले आहे- एकाच घरामध्ये तुम्ही म्हणता आम्ही संगम युगी आहोत आणि पत्नी, मुलगा किंवा मुलगी इ. कलियुगी आहेत. किती फरक आहे. खूप रहस्ययुक्त गोष्टी बाबा समजावत आहेत. घरामध्ये राहत असतानाही बुद्धीमध्ये आहे की आम्ही फुला सारखे बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. या अनुभवाच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात मेहनत करायची आहे.आठवणीची मेहनत आहे. एकाच घरामध्ये एक हंस आहे, तर दुसरा बगळा आहे. काहीजण खूप छान असतात. कधी विकाराचा विचारही येत नाही. सोबत राहूनही पवित्र राहतात, हिम्मत दाखवतात तर त्यांना खूप उंच पद मिळेल.अशी ही मुलं आहेत ना. काहीजण तर विकारासाठी किती मारतात भांडण करत राहतात. अवस्था अशी बनवयाला पाहिजे जे संकल्पा मध्येही कधी अपवित्र बनण्याचा विचार यायला नको. बाबा सर्वप्रकारे मत देत राहतात. तुम्ही जाणत आहात श्री श्री च्या मता द्वारे आम्ही श्री लक्ष्मी, श्री नारायण बनत आहे. श्री म्हणजेच श्रेष्ठ. सतयुगामध्ये आहेत नंबर वन श्रेष्ठ. त्रेतायुगामध्ये दोन डिग्री कमी होऊन जातात. हे ज्ञान तुम्हा मुलांना आता मिळत आहे.

या ईश्वरी सभेचा नियम आहे- ज्यांना ज्ञान रत्नांची कदर आहे, कधी आळस इ. नाही घेत त्यांनी पुढे बसायला पाहिजे. काही काही मुलं बाबांसमोर बसल्यानंतर ही आळस देत राहतात. त्यांनी पाठीमागे जाऊन बसायला पाहिजे. ही मुलांची ईश्वरीय सभा आहे. परंतु काही ब्राह्मणी अशा- अशांना घेऊन येतात, बाबांकडून तर धन मिळत आहे, एक एक महावाक्य लाख रुपयांचे आहे. तुम्ही जाणता ज्ञान संगम युगा वरच भेटते. तुम्ही म्हणता बाबा आम्ही पुन्हा आलो आहोत,बेहद चा वारसा घेण्यासाठी. गोड- गोड मुलांना बाबा अनेकदा समजावून सांगतात ही खराब दुनिया आहे, तुमचे बेहद चे वैराग्य आहे. बाबा म्हणतात या दुनियेमध्ये तुम्ही जे पहात आहात ते उद्या नसणार आहे. मंदिर इ. चे नाव निशाण राहणार नाही. तिथे स्वर्गामध्ये त्यांना जुन्या वस्तू पाहण्याची गरज राहणार नाही. इथे तर जुन्या वस्तु चे किती मूल्य आहे. खरे पाहता एक बाबांच्या शिवाय कोणत्याच वस्तूचे मूल्य नाही. बाबा म्हणतात मी आलो नाही तर तुम्ही राजाई कशी घेणार. ज्यांना माहित आहे तेच येऊन बाबांकडून वारसा घेतात, म्हणूनच लाखामधून कुणीतरी असे म्हटले जाते. कोणत्याही गोष्टीमध्ये संशय यायला नको. भोग इत्यादीची रीति रिवाज आहे. याच्याशी ज्ञान आणि आठवणीचा कोणताही संबंध नाही. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी तुमचा संबंध नाही. फक्त दोन गोष्टी आहेत अल्फ आणी बे, बादशाही. अल्फ भगवानाला म्हटले जाते. बोटानी ही वरती इशारा करतात ना. आत्मा इशारा करते ना.बाबा म्हणतात भक्ती मार्गामध्ये तुम्ही माझी आठवण करता.तुम्ही सर्व माझ्या सजनी आहात. हेही जाणता बाबा कल्प - कल्प येऊन सर्व मनुष्यमात्राला दुःखापासून सोडवून सुख आणि शांती देतात, तेव्हा बाबांनी सांगितले होते की फक्त असा बोर्ड लिहा की विश्वामध्ये शांती बेहद चा पिता कशी स्थापन करत आहेत, येऊन समजून घ्या. एका सेकंदामध्ये विश्वाचे मालक २१ जन्मां साठी बनायचे असेल तर येऊन समजून घ्या. घरामध्ये बोर्ड लावा,तीन पायाच्या जमिनीवर तुम्ही मोठ्यात मोठे हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी खोलू शकता. आठवणीमुळे २१ जन्मांसाठी निरोगी आणि शिक्षणामुळे स्वर्गाची बादशाही मिळून जाते. प्रजाही म्हणते की आम्ही स्वर्गाचे मालक आहोत. आज मनुष्याला लाज वाटते,कारण की

नर्कवासी आहेत. स्वतः म्हणतात आमचे वडील स्वर्गवासी झाले,तर नर्क वासी आहात ना.जेव्हा मराल तेव्हा स्वर्गामध्ये जाल.किती सहज गोष्ट आहे.चांगले काम करणाऱ्यांसाठी खास म्हणतात की हा खूप महादानी होता.हा स्वर्गामध्ये गेला परंतु जात कोणीही नाही.नाटक जेव्हा पूर्ण होते तेव्हा सर्व जण स्टेजवर येऊन उभे राहतात. ही लढाई पण तेंव्हा लागणार आहे जेंव्हा सर्व कलाकार इथे येतील नंतर परत जातील. शिवाची वरात म्हणतात ना. शिव बाबांसोबत सर्व आत्मे जातील.मुख्य गोष्ट आता ८४ जन्म पूर्ण झाले.आता ही चप्पल( जुने शरीर) सोडायची आहे. ज्याप्रमाणे सर्प जुनी कात सोडून नवीन घेतो.तुम्ही नवीन शरीर सतयुगामध्ये घेणार. श्रीकृष्ण किती सुंदर आहे,त्याच्यामध्ये किती आकर्षण आहे. खूप सुंदर शरीर आहे असे आम्ही ही घेऊ. म्हणतात ना- आम्ही तर नारायण बनणार.हे तर सडलेले खराब शरीर आहे. हे सोडून आम्ही नवीन दुनियेमध्ये जाणार आहे. हे आठवल्या नंतर खुशी का होत नाही, जेंव्हा कि म्हणता आम्ही नरापासून नारायण बनत आहोत.या सत्यनारायणाच्या कथेला चांगल्या प्रकारे समजून घ्या. जे बोलता ते करून दाखवा,म्हणणे आणि करणे एक असायला पाहिजे. धंदा इ. जरुर करा. बाबा म्हणतात हातानी काम करा, मनाने बाबांची आठवण राहू द्या. जेवढी - जेवढी धारणा कराल तेवढी तुमच्याकडे ज्ञानाची किंमत वाढत जाईल, ज्ञानाच्या धारणेमुळे तुम्ही किती धनवान बनता. हे आहे आत्मिक ज्ञान. तुम्ही आत्मा आहात, आत्माच शरीराद्वारे बोलते. आत्माच ज्ञान देते, आत्माच धारण करते. अच्छा.

गोड - गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात- पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. या जुन्या दुनियेच्या जुन्या वस्तूंना पाहूनही पाहायचे नाही. नरापासून नारायण बनण्यासाठी बोलणे आणि करणे एकसमान बनवायचे आहे.

2. अविनाशी ज्ञान रत्नांची कदर ठेवायची आहे. ही खूप मोठी कमाई आहे,यामध्ये आळस किंवा डुलकी यायला नको. नावा- रूपाच्या गृहचारी पासून वाचण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
साथी आणि साक्षी पणाच्या अनुभवाद्वारे सदैव सफलता मुर्त भव.

जी मुलं सदैव बाबांच्या सोबत राहतात ते स्वतः साक्षी बनतात कारण की बाबा स्वतः साक्षी होऊन भूमिका वठवतात तर त्यांच्यासोबत राहणारे ही साक्षी होऊन भूमिका वठवतील आणि ज्यांचा साथी स्वयंम सर्वशक्तिमान पिता आहे ते सफलता मुरत ही स्वतः बनतात. भक्ती मार्गामध्ये तर बोलवतात की थोड्यावेळासाठी सोबतचा अनुभव करवून द्या,तुमची झलक दाखवा परंतु तुम्ही सर्व संबंधांनी साथी बनले- तर.या खुशी आणि नशे मध्ये राहा की जे मिळवायचं होतं ते मिळालं.

बोधवाक्य:-
व्यर्थ संकल्पांची खूण आहे- मन उदास आणि खुशी गायब.