30-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो:- तुम्ही आता पुजारी पासून पूज्य बनत आहात, पूज्य बाबा आले आहेत तुम्हाला अापसमान पूज्य बनवण्यासाठी"

प्रश्न:-
तुम्हा मुलांच्या मनामध्ये कोणता दृढविश्वास आहे?

उत्तर:-
तुम्हाला दृढ विश्वास आहे की आम्ही जिवंतपणी बाबांकडून पूर्ण वारसा घेणारच. बाबांच्या आठवणी मध्ये हे जुने शरीर सोडून बाबांसोबत जाऊ. बाबा आम्हाला घराचा सहज रस्ता सांगत आहेत.

गीत:-
ओम नमः शिवाय......

ओम शांती।
ओम शांती तर मनुष्य खूप म्हणत राहतात. मुलंही म्हणतात, ओम शांती. आत मध्ये जी आत्मा आहे- ती म्हणते ओम शांती. परंतु आत्मे तर यथार्थ रीतीने स्वतःला जाणत नाहीत, न बाबांना जाणतात.खुशाल बोलवत राहतात परंतु मी जो आहे, जसा आहे यथार्थ रीतीने मला कोणीही जाणत नाही. हा (ब्रह्मा) ही म्हणतो की मी स्वतःला जाणत नव्हतो की मी कोण आहे, कुठून आलो आहे! आत्मा तर पुरुष आहे ना. मुलगा आहे ना. पिता आहे परमात्मा. तर सर्व आत्मे आपापसात भाऊ- भाऊ झाले. नंतर शरीरामध्ये आल्यामुळे कोणाला पुरुष, कोणाला स्त्री म्हटले जाते. परंतु यथार्थ आत्मा काय आहे, हे कोणीही मनुष्य जाणत नाही. आता तुम्हा मुलांना हे ज्ञान मिळत आहे जे तुम्ही सोबत घेऊन जाता. तिथे हे ज्ञान असते, आम्ही आत्मा आहोत हे जुने शरीर सोडून दुसरे घेत आहोत. आत्म्याची ओळख सोबत घेऊन जातात. सुरुवातीला तर आत्म्यालाही जाणत नव्हते. आम्ही केव्हापासून भूमिका वठवत आहे, काहीच माहीत नव्हते.अजूनही काही स्वतःला पूर्णपणे ओळखत नाहीत. मोठ्या रूपाने जाणतात आणि मोठ्या लिंग रूपाचीच आठवण करतात. मी आत्मा बिंदू आहे. बाबा ही बिंदू आहे, त्या रूपामध्ये आठवण करतील, असे खूप थोडे आहेत. नंबर वार बुद्धी आहे ना. काहीजण तर चांगल्या रीतीने समजून घेऊन इतरांना समजावायला लागतात. तुम्ही समजता स्वतःला आत्मा समजायचे आहे आणि बाबांची आठवण करायची आहे. तोच पतित-पावन आहे. सुरुवातीला तर मनुष्यांना आत्म्याची ओळखच नाही,ती ही समजावून सांगायला पाहिजे. स्वतःला जेंव्हा आत्मा निश्चय करतील तेव्हा बाबांनाही ओळखू शकतील.आत्म्याला ओळखत नाहीत म्हणून बाबांनाही पूर्णपणे ओळखू शकत नाहीत. आता तुम्ही मुले जाणत आहात आम्ही आत्मा बिंदू आहोत. एवढ्या छोट्याशा आत्म्यामध्ये ८४ जन्मांची भुमिका आहे, हे तुम्ही समजावून सांगा. नाहीतर फक्त म्हणतात ज्ञान खूप चांगले आहे. भगवंताला भेटण्याचा रास्ता खूप चांगला सांगतात परंतु मी कोण आहे, बाबा कोण आहेत, हे जाणत नाहीत, फक्त चांगले-चांगले म्हणतात. काहीजण तर असेही म्हणतात की हे नास्तिक बनवतात. तुम्ही जाणत आहात- ज्ञानाची समज कोणा मध्येही नाही. तुम्ही समजवतात, आता आम्ही पूज्य बनत आहोत. आम्ही कोणाची पूजा करत नाही कारण की जो सर्वांचा पुज्य आहे उंच-उंच भगवान, त्याची आम्ही संतान आहोत. तो तर आहे पूज्य पिताश्री. आता तुम्ही मुले जाणत आहात- पिताश्री आम्हाला आपले बनवून शिकवत आहे. सर्वात उंच ते उंच पूज्य एकच आहेत, त्याच्या शिवाय दुसरे कोणी पूज्य बनवू शकत नाही.पुजारी नक्कीच पुजारी बनवतील. दुनियेमध्ये सर्व आहेत पुजारी. तुम्हाला आता पूज्य भेटला आहे, जो आप समान बनवत आहे. तुमची पूजा सोडवली आहे. आपल्या सोबत घेऊन जातात. ही खराब दुनिया आहे. हे तर आहे मृत्युलोक. भक्ती सुरू तेंव्हाच होते,जेंव्हा रावण राज्य असते. पूज्य पासून पुजारी बनतात. नंतर पुजारी पासून पूज्य बनवण्यासाठी बाबांना यावे लागते. आता तुम्ही पूज्य देवता बनत आहात. आत्मा शरीराद्वारे भूमिका वठवत आहे. आता बाबा आम्हाला पूज्य देवता बनवत आहेत, आत्म्याला पवित्र बनवण्यासाठी. तर तुम्हा मुलांना युक्ती सांगितली आहे- बाबांची आठवण केल्याने तुम्ही पुजारी पासून पूज्य बनाल कारण तो पिता आहे सर्वांचा पूज्य.जे अर्धा कल्प पुजारी बनतात, तेच नंतर अर्धा कल्प पूज्य बनतात. हीसुद्धा नाटकांमध्ये भूमिका आहे. नाटकाच्या आदि - मध्य - अंताला कोणीही जाणत नाही. आता बाबांच्या द्वारे तुम्हा मुलांनी जाणले आहे आणि इतरांनाही समजावून सांगत आहात. सुरुवातीला मुख्य गोष्ट ही समजावून सांगायची आहे - स्वतःला आत्मा बिंदी समजा. आत्म्याचा पिता तो निराकार आहे, तो ज्ञानसंपन्न येऊन शिकवत आहे. सृष्टीच्या आदी- मध्य- अंताचे रहस्य समजावत आहे. बाबा एकदाच येतात. त्यांना एकदाच ओळखायचे असते. येतातही एकदाच संगम युगावरती. जुन्या पतित दुनियेला येऊन पावन बनवतात. आता बाबा नाटकाच्या नियोजनानुसार आले आहेत. कोणतीही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक कल्पा - कल्पा मध्ये असेच येतात. एक सेकंद ही मागे-पुढे होऊ शकत नाही. तुम्हा मुलांच्या मनाला पटते की बरोबर बाबा खरे ज्ञान देत आहेत, परत कल्पा नंतरही बाबांना यावे लागेल. बाबांच्या द्वारे जे यावेळी जाणले आहे ते पुन्हा कल्पा नंतरही जाणून घेऊ. हेही जाणत आहात की आता जुन्या दुनियेचा विनाश होईल. नंतर आम्ही सतयुगामध्ये येऊन आपली भूमिका बजावणार आहोत. सतयुगी स्वर्गवासी बनू. हे तर बुद्धीमध्ये आठवणीत आहे ना. आठवणीमध्ये राहिल्यामुळे खुशी पण राहते.हे विद्यार्थी जीवन आहे ना. आम्ही स्वर्गवासी बनण्यासाठी शिकत आहोत. जोपर्यंत अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत, ही खुशी सदैव राहायला पाहिजे. बाबा समजावत राहतात की अभ्यासपूर्ण तेव्हा होईल जेव्हा विनाशासाठी सर्व सामान तयार होईल. नंतर तुम्ही समजून जाल- नक्की आग लागणार आहे. तयारी होत राहते ना. कोणती ना कोणती अट अशी घालतात त्यामुळे लढाई जरूर लागते. कल्पा पूर्वीप्रमाणे विनाश होणार आहे. तुम्ही मुलं पहाल. अगोदर ही मुलांनी पाहिले होते एका ठिणगी मुळे किती लढाई लागली होती. एक दुसऱ्याला भीती दाखवत राहतात,असे करा नाहीतर आम्हाला बॉम्ब टाकावे लागतील. मृत्यू समोर येतो तेव्हा बॉम्ब बनवल्या शिवाय राहू शकत नाहीत. अगोदरही लढाई लागली होती तेव्हा बॉम्ब टाकले होते. भावी होती ना. आता तर हजारो बॉम्ब आहेत.

तुम्हा मुलांना आता जरूर समजायला हवे,आता बाबा आले आहेत, सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी. सर्वजण बोलवत आहेत, हे पतित-पावन या. या खराब दुनिये मधून आम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन चला. तुम्ही मुले जाणता पावन दुनिया दोन आहेत- मुक्ती आणि जीवन मुक्ती. सर्वांचे आत्मे पवित्र बनून मुक्तिधाम मध्ये निघून जातील. हे दुःखधाम विनाश होईल, ज्याला मृत्युलोक म्हटले जाते. प्रथम अमर लोक होता, नंतर चक्र पूर्ण करून आता मृत्यू लोकांमध्ये आले आहात. नंतर अमर लोका ची स्थापना होत आहे. तिथे अकाळी मृत्यू होत नाही म्हणून त्याला अमर लोक असे म्हटले जाते. शास्त्रांमध्ये ही अक्षरे आहेत परंतु यथार्थ रीतीने कुणीही समजत नाही. हेही तुम्ही जाणत आहात- आता बाबा आले आहेत. नक्कीच मृत्यू लोकाचा विनाश होणार आहे. हे १०० टक्के खरे आहे. बाबा समजावत आहेत की आपल्या आत्म्याला योग बळा द्वारे पवित्र बनवा. माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. परंतु एवढे ही मुलं आठवण करू शकत नाहीत. बाबांकडून वारसा किंवा राजाई घेण्यासाठी मेहनत तर पाहिजे ना. जेवढे शक्य होईल तेवढी आठवण करायची आहे. स्वतःला पाहायचे आहे- किती वेळ आम्ही आठवणी मध्ये राहतो आणि किती जणांना बाबांची आठवण करून देतो? मनमनाभव, याला मंत्र ही म्हणू शकत नाही, ही आहे बाबांची आठवण. देह - अभिमानाला सोडून द्यायचे आहे. तुम्ही आत्मा आहात, हा तुमचा रथ आहे, याच्या द्वारे तुम्ही किती काम करता. सतयुगामध्ये तुम्ही देवी-देवता बनून कशाप्रकारे राज्यकरता नंतर तुम्ही तोच अनुभव प्राप्त कराल. त्यावेळी तर प्रत्यक्षात आत्म - अभिमानी राहता. आत्मा म्हणते माझे हे शरीर जुने झाले आहे, हे सोडुन नवीन घ्यायचे आहे. दुःखाची गोष्टच नाही. इथे तर शरीर सुटू नये म्हणून किती डॉक्टरांची औषधे इ. घेण्याची मेहनत करतात. तुम्हा मुलांना आजारी असतानाही या जुन्या शरीरापासून त्रस्त व्हायचं नाही कारण की तुम्ही समजता या शरीरामध्ये राहून बाबांकडून वारसा प्राप्त करायचा आहे. शिव बाबांच्या आठवणी मुळेच पवित्र बनून जाऊ. ही मेहनत आहे. परंतु प्रथम आत्म्याला जाणायला पाहिजे. तुमची मुख्य आहे आठवणी ची यात्रा. आठवणी मध्ये राहता - राहाता नंतर आम्ही मुळवतन मधे जाऊ. जिथले आम्ही राहणारे आहोत, तेच आमचे शांतीधाम आहे. शांतीधाम सुखाधामाला तुम्हीच जाणता आणि आठवण करता. दुसरे कोणी जाणत नाही. ज्यांनी कल्पा पूर्वी बाबांकडून वारसा घेतला आहे, तेच घेतील.

मुख्य आहे आठवणी ची यात्रा. भक्तिमार्गाच्या यात्रा आता संपणार आहेत. भक्तिमार्ग संपणार आहे. भक्तिमार्ग काय आहे? जेंव्हा ज्ञान मिळते तेंव्हा समजतात. समजतात भक्ती केल्याने भगवान मिळेल.भक्तीचे फळ काय देतील? काहीही माहीत नाही. तुम्ही मुले आता समजत आहात बाबा मुलांना नक्कीच स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा देतील. सर्वांना वारसा दिला होता, ज्याप्रमाणे राजा-रानी त्याप्रमाणे प्रजा सर्व स्वर्गवासी होते. बाबा म्हणतात, ५००० वर्षापूर्वी ही तुम्हाला स्वर्गवासी बनवले होते. आता परत तुम्हाला बनवत आहे,नंतर तुम्ही अशा प्रकारे ८४ जन्म घ्याल. हे बुद्धीमध्ये आठवायला पाहिजे, विसरायचे नाही. जे ज्ञान सृष्टीच्या आदी- मध्य- अंताचे बाबांजवळ आहे ते मुलांच्या बुद्धीमध्ये टपकत राहते. आम्ही कसे ८४ जन्म घेतो, आता परत बाबांकडून वारसा घेत आहोत, अनेक वेळा बाबांकडून वारसा घेतला होता, बाबा म्हणतात जसा घेतला होता पुन्हा घ्या. बाबा तर सर्वांना शिकवत राहतात. दैवी गुण धारण करण्यासाठीही सावधानी मिळत राहते. स्वतःला तपासून पाहण्यासाठी साक्षी होऊन बघायचे आहे की आम्ही कुठपर्यंत पुरुषार्थ करत आहोत, काहीजण समजतात आम्ही खूप चांगला पुरुषार्थ करत आहोत. प्रदर्शनी इ. चा प्रबंध करत राहतो कारण की सर्वांना माहित होईल भगवान बाबा आले आहेत. मनुष्य बिचारे सर्व गाढ झोपेमध्ये आहेत. ज्ञान कोणालाही माहित नाही तर नक्कीच, भक्तीला उंच समजतात. अगोदर तुमच्या मध्येही कोणाला ज्ञान माहीत होते का? आता तुम्हाला माहित झाले आहे, ज्ञानाचा सागर बाबाच आहेत, तेच भक्तीचे फळ देतात, ज्याने जास्त भक्ती केली आहे, त्याला जास्त फळ मिळेल. ते उंच पद प्राप्त करण्यासाठी चांगल्याप्रकारे शिकतात. या किती गोड- गोड गोष्टी आहेत. वृद्ध महिला इत्यादींसाठी खूप सहज करून समजावले जाते. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. उंच ते उंच आहे भगवान शिव. शिव परमात्माए नमः असे म्हटले जाते, ते म्हणतात माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील. बस. अजून कोणताही त्रास देत नाहीत. पुढे चालून शिव बाबांची ही आठवण करू लागतील. वारसा तर घ्यायचा आहे, जिवंतपणी बाबांकडून वारसा घेऊनच सोडू. शिव बाबांच्या आठवणी मध्ये शरीर सोडून देतात, नंतर ते संस्कार घेऊन जातात. नक्कीच स्वर्गामध्ये येतील, जेवढा योग तेवढे फळ मिळेल. मुख्य गोष्ट आहे- चालता-फिरता जेवढी होईल तेवढी आठवण करायची आहे. आपल्या डोक्यावरचे ओझे उतरवायचे आहे, फक्त आठवण पाहिजे अजून दुसरा कोणता त्रास बाबा देत नाहीत. जाणतात अर्ध्या कल्पा पासून मुलांनी खूप त्रास भोगला आहे यासाठीच आलो आहे, वारसा घेण्याचा तुम्हाला सहज रस्ता सांगण्यासाठी. फक्त बाबांची आठवण करा. भले अगोदर ही आठवण करत होते परंतु ज्ञान नव्हते, आता बाबांनी ज्ञान दिले आहे की अशा प्रकारे माझी आठवण केल्याने तुमचे विकर्म विनाश होतील. भले शिवाची भक्ती तर दुनियेमध्ये खूप जण करतात, खूप आठवण करतात परंतु ओळख नाही. यावेळी बाबा स्वतः येऊन ओळख करून देतात की माझी आठवण करा. आता तुम्ही समजता आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. तुम्ही म्हणाल आम्ही बाप दादांच्या जवळ जात आहे. बाबांनी हा भागीरथ घेतला आहे, भागीरथ प्रसिद्ध आहे, यांच्याद्वारे बसून ज्ञान सांगत आहेत. हीसुद्धा नाटकांमध्ये भूमिका आहे. कल्प- कल्प या भाग्यशाली रथामध्ये येतात. तुम्ही जाणत आहात की हा तोच आहे ज्याला शाम सुंदर असे म्हणतात. हेसुद्धा तुम्ही समजता. नंतर मनुष्यांनी अर्जुन नाव ठेवले आहे. आता बाबा यथार्थ रीतीने समजावून सांगत आहेत- ब्रह्मा पासून विष्णू, विष्णू पासून ब्रह्मा कसे बनतात. मुलांमध्ये आता समज आहे की आम्ही ब्रह्मापुरी चे आहोत नंतर विष्णुपुरी चे बनणार. विष्णुपुरी मधून ब्रह्मापुरी मध्ये येण्यासाठी ८४ जन्म लागतात. हेही अनेक वेळा समजावले आहे जे तुम्ही परत एकदा ऐकत आहात. आत्म्याला आता बाबा सांगत आहेत की फक्त माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील यासाठी तुम्हाला खुशी होत आहे. हा एक शेवटचा जन्म, पवित्र बनल्यामुळे आम्ही पवित्र दुनियेचे मालक बनू. तर का नाही पवित्र बनायचे? आम्ही एका बाबांची मुलं ब्रह्माकुमार- कुमारी आहोत, तरीही ती शारीरिक वृत्ती बदलण्यासाठी वेळ लागतो. हळूहळू शेवटी कर्मातीत अवस्था होणार आहे. यावेळी कोणाची कर्मातीत अवस्था होणे अशक्य आहे. कर्मातीत अवस्था झाल्यानंतर हे शरीरही राहणार नाही, याला सोडावे लागेल. लढाई सुरू होईल, एक बाबांची आठवण राहील, यामध्ये मेहनत आहे. अच्छा.

गोड - गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात - पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. साक्षी होऊन स्वतःला पाहायचे आहे की आम्ही किती पुरुषार्थ करत आहोत? चालता-फिरता, कर्म करत असताना किती वेळ बाबांच्या आठवणी मध्ये राहतो?

2. या शरीरापासून कधी त्रस्त व्हायचे नाही. या शरीरामध्ये राहूनच जीवन जगत असताना बाबांकडून वारसा प्राप्त करायचा आहे. स्वर्गवासी बनण्यासाठी या जीवनामध्ये पूर्ण अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
मास्टर रचनाकार च्या अवस्थेद्वारे संकटामध्ये ही मनोरंजनाचा अनुभव करणारे संपूर्ण योगी भव

मास्टर रचनाकाराच्या अवस्थेमध्ये स्थित राहिल्यामुळे मोठ्यात मोठे संकट ही एक मनोरंजनाचे दृष्य अनुभव होईल. ज्याप्रमाणे महा विनाशाच्या संकटाला ही स्वर्गाच्या दरवाजाचे उघडण्याचे साधन सांगता, अशाप्रकारे कोणत्याही प्रकारची लहान-मोठी समस्या किंवा संकट मनोरंजनाचे रूप दिसायला हवे, हाय- हाय च्या बदल्यात ओहो शब्द निघायला हवा- दुःखही सुखाच्या रूपामध्ये अनुभव व्हायला हवे. सुख-दुःखाचे ज्ञान असतानाही त्याच्या प्रभावामधे मध्ये येऊ नये, दुःखामुळेच सुखाचे दिवस येणार आहेत असे समजा- तेंव्हाच म्हणू संपूर्ण योगी.

बोधवाक्य:-
हृदय सिंहासन सोडून साधारण संकल्प करणे म्हणजेच जमिनीवर पाय ठेवणे.