03-06-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्हाला श्रीमता वरती सर्वांना सुख द्यायचे आहे, तुम्हाला श्रेष्ठ मत
मिळत आहे, श्रेष्ठ बनून दुसऱ्यांना पण श्रेष्ठ बनवा"
प्रश्न:-
दयावान
मुलांच्या मध्ये कोणती लहर यायला पाहिजे? त्यांनी काय करायला पाहिजे?
उत्तर:-
जे दयाळू मुलं आहेत, त्यांच्या मनामध्ये येते, आम्ही गावागावां मध्ये जाऊन सेवा करू.
आज-काल बिचारे खूपच दुःखी आहेत, त्यांना जाऊन खुशखबर ऐकवायची आहे की, विश्वामध्ये
पवित्रता सुख आणि शांती चे दैवी स्वराज्य स्थापन होत आहे. ही तीच महाभारत लढाई आहे,
बरोबर त्यावेळेस बाबा पण आले होते. आत्ता पण आले आहेत.
ओम शांती।
गोड गोड मुलं येथे बसले आहेत, ते जरूर समजतात, आम्ही ईश्वरी संतान आहोत. जरुर स्वता:
ला आत्माच समजतील. शरीर आहे तेव्हाच आत्मा ऐकू शकते. बाबांनी हे शरीर भाड्याने घेतले
आहे, त्यामुळेच ऐकवत असतात. आता तुम्ही समजता, आम्ही ईश्वरीय संतान किंवा संप्रदाय
परत दैवी संप्रदाय बनू. स्वर्गाचे मालक देवताच असतात. आम्ही परत पाच हजार
वर्षापूर्वी प्रमाणेच स्वराज्याची स्थापना करत आहोत, परत आम्ही देवता बनू. या वेळेत
सारी दुनिया भारत खास आणि दुनिया सर्व मनुष्य मात्र एक-दोघांना दुःखच देत आहेत.
त्यांना हे माहित नाही की सुखधाम पण असते. परमपिता परमात्माच येऊन सर्वांना सुखी
शांत बनवतात. येथे तर घरा घरांमध्ये एक-दोघांना दुःख देतात. साऱ्या विश्वामध्ये
दुःखच दुःख आहे. आता तुम्ही मुलं जाणता, बाबा आम्हाला २१ जन्मासाठी सदा सुखी बनवत
आहेत. कधीपासून दुःख सुरू झाले परत कधी पूर्ण होईल, हे कोणाच्या बुद्धीमध्ये किंवा
चिंतन मध्ये नसेल. तुम्हाला च बुद्धी मिळाली आहे, आम्ही बरोबर ईश्वरी संप्रदाय आहोत,
तसे तर सारी दुनिया मनुष्य मात्र ईश्वरी संप्रदाय आहेत. प्रत्येकजण त्यांना पिता
म्हणून बोलावतात. आता तुम्ही मुलं जाणता, शिव बाबा आम्हाला श्रीमत देत आहेत. श्रीमत
प्रसिद्ध आहे. उच्च ते उच्च भगवंताची उच्च ते उच्च मत आहे. गायन पण केले जाते,
त्यांची गत मत वेगळी आहे. शिवबाबाची श्रीमत आम्हाला खूपच श्रेष्ठ बनवते, स्वर्गाचे
मालक बनवते. बाकीचे जे पण मनुष्यमात्र आहेत, ते नरकाचे मालक बनतात. आता तुम्ही संगम
युगा मध्ये आहात. हा तर निश्चय आहे ना. निश्चय बुद्धीच येथे येतात आणि समजतात बाबा
आम्हाला परत सुखधाम चे मालक बनवतात. आम्हीच १००% पवित्र ग्रहस्थ मार्गाचे होतो. आता
ही स्मृति आली आहे. ८४ जन्माचा हिशोब आहे ना. कोण किती जन्म घेतात. जे धर्म नंतर
येतात, त्यांचे जन्म पण थोडेच होतात.
तुम्हा मुलांना आता हा निश्चय ठेवायचा आहे की, आम्ही ईश्वरीय संतान आहोत. आम्हाला
श्रेष्ठ मत मिळत आहे, सर्वांना श्रेष्ठबनवण्यासाठी. आपले तेच बाबा राजयोग शिकवत
आहेत. मनुष्य समजतात वेद ग्रंथ इत्यादी सर्व भगवंताला भेटण्याचे मार्ग आहेत, आणि
भगवान म्हणतात, यांच्याद्वारे कोणी मला भेटू शकत नाही. मी येतो तेव्हा तर माझी जयंती
म्हणजे शिवरात्री साजरी करतात परंतु कधी आणि कोणाच्या शरीरांमध्ये येतो, हे कोणी
जाणत नाहीत, शिवाय तुम्हा ब्राह्मणांच्या. आता तुम्हा मुलांना सर्वांना सुख द्यायचे
आहे. दुनिया मध्ये तर सर्व एक दुसऱ्याला दुःख देतात. ते लोक, हे समजत नाहीत कि,
विकारांमध्ये जाणे दुःख देणे आहे. आता तुम्ही जाणतात, हे महान दुःख आहे. कुमारी जी
पवित्र होती तिला अपवित्र बनवतात, नर्कवासी बनवण्यासाठी. लग्नासाठी खूप खर्च करत
राहतात. येथे तर अशी अशी गोष्टच नाही. तुम्ही शांती मध्ये बसले आहात, सर्वजण खुश
होतात. साऱ्या विश्वाला सदा सुखी बनवतात. तुमचा मान शिवशक्ती च्या रूपांमध्ये आहे.
तुमच्या पुढे लक्ष्मी नारायणचा काहीच मान नाही. शिव शक्तीचे नाव प्रसिद्ध आहे. कारण
जशी बाबानी सेवा केली आहे, सर्वांना पवित्र बनवून सुखी बनवले, असेच तुम्ही पण बाबाचे
मदतगार बनले आहात, म्हणून तुम्हा शिवशक्ती भारत मातांची महिमा आहे. हे लक्ष्मी
नारायण राजा राणी आणि प्रजा सर्व स्वर्गवासी आहेत. ती मोठी गोष्ट आहे का?जसे ते
स्वर्गवासी आहेत, तसेच येथील राजा राणी सर्व नर्कवासी आहेत. अशा नर्क वासींना तुम्ही
स्वर्गवासी बनवत आहात. मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. अगदीच तुच्छ बुद्धी आहेत, काय
काय करत राहतात. अनेक लढाया इत्यादी होत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये दुःखच दुःख
आहे. सतयुगा मध्ये तर प्रत्येक गोष्टी मध्ये सुखच आहे. आता सर्वांना सुख देण्यासाठी
बाबा श्रेष्ठ मत देत आहेत. गायन पण आहे, श्रीमद् भगवानुवाच. श्रीमतमनुष्यवाच नाही.
सतयुगा मध्ये देवतांना मत देण्याची आवश्यकता नाही. येथे तुम्हाला श्रीमत मिळत आहे.
बाबांच्या सोबत तुम्हा शिव शक्तीचे गायन आहे. आता परत ते प्रत्यक्ष भूमिका वठवत
आहेत. आता बाबा म्हणतात, तुम्हा मुलांना मनसा वाचा कर्मना सर्वांना सुख द्यायचे आहे.
सर्वांना सुखधाम चा मार्ग सांगायचा आहे. तुमचा धंदाच हा आहे. शरीर निर्वाह करण्या
साठी पुरुषांना धंदा पण करायचा असतो. असे म्हणतात संध्याकाळी देवता परिक्रमा
देण्यासाठी निघतात. आता देवता कुठून आले परंतु या वेळेला शुद्ध म्हणतात. या वेळेत
सर्व रिकामे असतात. तुम्हा मुलांना चालता-फिरता, उठता-बसता आठवणीमध्ये राहायचे आहे.
बस कोणत्या देहधारीची चाकरी करायची नाही. बाबांचे तर गायन आहे, द्रोपदीचे पाय चोपले,
याचा अर्थ पण समजत नाहीत. प्रत्यक्षात पाय चोपण्याची गोष्टच नाही. बाबांना
भेटणयासाठी वृद्ध माता इत्यादी खूप येतात, जाणतात भक्ति करत करत थकले आहेत. अर्धा
कल्प खूप धक्के खाल्ले आहेत, तर हे पाय चोपण्याचे अक्षर तसेच घेतले आहे. आता कृष्ण
कसे पाय चोपतील?शोभेल का? तुम्ही कृष्णाला पाय चोपू देणार का? कृष्णाला पाहताच
आकर्षित होतात, त्यांच्यामध्ये तर खूप चमत्कार असतो. कृष्णाच्या शिवाय दुसरी कोणती
गोष्ट बुद्धीमध्ये बसत नाही. ते सर्वात तेजोमय आहेत. कृष्ण मुलांनी ज्ञान मुरली
चालवली, ही गोष्ट शोभत नाही. येथे तुम्ही शिवबाबाना कसे भेटणार? तुम्हा मुलांना तर
बोलावे लागते? शिव बाबांची आठवण करून परत यांच्याकडे या. मुलांच्या मनामध्ये खूप
खुशी राहायला पाहिजे. आम्हाला शिवबाबा सुखी बनवतात तेही एकवीस जन्मासाठी, अशा
बाबांच्या वरती तर कुर्बान जायला पाहिजे. काही सुपात्र मुलं असतात तर पित्या वरती
कुर्बान जातात, ते वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. काही तर असे असतात, जे
वडिलांचा खून पण करतात. येथे तर तुम्हाला खूपच प्रिय बनायचे आहे, कोणालाही दुःख
द्यायचे नाही. जे दयाळू मुलं आहेत, त्यांची इच्छा होते, आम्ही गावा गावांमध्ये जाऊन
सेवा करावी. आज-काल बिचारे खूप दु:खी आहेत, त्यांना जाऊन खुशखबर सांगावी की,
विश्वामध्ये पवित्रता सुख शांती चे दैवी स्वराज्य स्थापन होत आहे. ही तीच महाभारताची
लढाई आहे. बरोबर त्यावेळेस शिवपिता पण होते. आत्ता पण बाबा आले आहेत, तुम्ही जाणतात,
बाबा आम्हाला पुरुषोत्तम बनवत आहेत. हेच पुरुषोत्तम संगम युग आहे. तुम्ही मुलं जाणता,
आम्ही पुरुषोत्तम कसे बनतो. तुम्हाला विचारतात तुमचा उद्देश काय आहे?तुम्ही सांगा
मनुष्यापासून देवता बनवणे. देवता तर प्रसिद्ध आहेत ना. बाबा म्हणतात, जे देवतांचे
भक्त आहेत त्यांना समजून सांगा. भक्ती पण प्रथम तुम्ही सुरु केली, अगोदर शिवाची,
नंतर देवतांची भक्ती केली. तर प्रथम शिव बाबांच्या भक्तांना समजावून सांगायचे आहे,
तुम्ही सांगा शिवबाबा म्हणतात, माझी आठवण करा. शिवाची पूजा करतात परंतु थोडेच
बुद्धीमध्ये येते की, पतित-पावन शिव पिता आहेत. भक्तिमार्गा मध्ये खूप धक्के खात
राहतात. शिवलिंग तर घरांमध्ये पण ठेवू शकतात, त्यांची पूजा करू शकतात, परत अमरनाथ
बद्रीनाथ इत्यादी ठिकाणी जाण्याची काय आवश्यकता आहे? परंतु भक्ती मार्गा मध्ये
मनुष्य अनेक ठिकाणी धक्के जरूर खातात. तुम्हाला त्या पासून सोडवतात. तुम्ही शिवशक्ती,
शिवाची मुलं आहात. तुम्ही शिव पित्या कडून शक्ती घेत आहात, तेही आठवणी द्वारेच
मिळेल, त्या द्वारे विर्कम विनाश होतील. पतित पावन तर बाबाच आहेत ना. आठवणी द्वारे
आम्ही विकर्माजीत पावन बनतो. सर्वांना हा रस्ता सांगा, तुम्ही आत्ता रामाचे बनले
आहात. रामराज्या मध्ये सुख आहे, तर रावण राज्यांमध्ये दुःख आहे. भारता मध्येच
सर्वांचे चित्र आहेत, ज्यांची इतकी पूजा होते. अनेक मंदिरं आहेत, कोणी हनुमानचे
पुजारी, कोणी कुणाचे, याला अंधश्रद्धा म्हटले जाते. आता तुम्ही जाणता, आम्ही पण
अंधच होतो. यांना म्हणजे ब्रह्मांना पण माहित नव्हते, ब्रह्मा, विष्णू, शंकर कोण
आहेत?काय करतात?जे पूज्य होते तेच पुजारी बनले. सतयुगा मध्ये पुज्य आहेत, तर येथे
पुजारी आहेत. बाबा खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात. तुम्ही जाणतात सत्ययुगा
मध्येच पूज्य असतात, येथे पुजारी आहेत म्हणून पुजाच करत राहतात. तुम्ही शिवशक्ती
आहात, आता तुम्ही न पुजारी आहात, न पुज्य आहात. बाबांना विसरू नका. हे साधारण तन आहे,
यामध्ये उच्च ते उच्च भगवान येतात. तुम्ही शिव पित्याला निमंत्रण देतात, बाबा तुम्ही
या, आम्ही खूप पतित बनलो आहोत. जुन्या पतीत दुनिये मध्ये, पतित शरीरां मध्ये या आणि
आम्हाला पावन बनवा. मुलं निमंत्रण देतात. येथे तर कोणीच पावन नाही, जरूर सर्व
पतितांना पावन बनवून घेऊन जातील ना. तर सर्वांना शरीर सोडावे लागेल. कोणत्या
मनुष्याचा मृत्यू होतो, तर खूप रडत राहतात. तुम्ही तर खुशीने जाल. आता तुमची आत्मा
स्पर्धा करते, की कोण शिव बाबांची जास्त आठवण करेल. शिवबाबांच्या आठवणी मध्ये रहात,
शरीर सुटले तर आहो सौभाग्य, नाव भव सागरातून पार होईल. सर्वांना बाबा म्हणतात अशा
प्रकारे पुरषार्थ करा. संन्यासी पण काही असतात, ब्रह्म मध्ये विलीन होण्याचा अभ्यास
करत राहतात, परत अंत काळात, बसल्या-बसल्या शरीर सोडून देतात, तर एकदम शांती होते.
सुखाचे दिवस परत येतील, यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. बाबा आम्ही आपल्या जवळ
येऊ, तुमचीच आठवण करत करत, जेव्हा आत्मा पवित्र होईल तेव्हा तुम्ही आम्हाला घेऊन
जाल. अगोदर जेव्हा काशी कलवट खात होते, तर खूप प्रेमाने मृत्यूला स्वीकारत होते. बस
आम्ही मुक्त होऊन जाऊ, असे समजत होते. आता तुम्ही बाबांची आठवण करत करत, शांतीधाम
मध्ये जात आहात. तुम्ही बाबांची आठवण करतात, तर या आठवणीच्या शक्तीद्वारे पाप नष्ट
होतात. मनुष्य समजतात नदीमध्ये आंघोळ केल्याने पाप नष्ट होतात, मुक्ती मिळते. आता
बाबा म्हणतात, ते काही योगबळ नाही. पापाची सजा खाऊन, परत जन्म घेतील, परत पाप करत
राहतात. कर्म, अकर्म, विकर्मा ची गती बाबाच सन्मुख समजावत आहेत. रामराज्या मध्ये
कर्म अकर्म होतात, रावण राज्यामध्ये कर्म विकर्म होतात. तेथे कोणते विकार इत्यादी
नसतात.
गोड गोड फुला सारखे मुलं जाणतात, बाबा आम्हाला सर्व युक्ती सर्व रहस्य समजवतात.
मुख्य गोष्ट आहे, बाबांची आठवण करणे. पतित-पावन बाबा तुमच्या सन्मुख आहेत, खूपच
निर्मान आहेत, कोणता अहंकार नाही. अगदी साधारण राहून चालतात. बाप दादा दोघेही
मुलांचे सेवक आहेत. उच्च ते उच्च शिवबाबा, परत प्रजापिता ब्रह्मा. ते लोक त्रिमूर्ती
ब्रह्मा म्हणतात, अर्थ काहीच जाणत नाहीत. त्रिमूर्ती ब्रह्मा काय करतात, काहीच
माहिती नाही.
अच्छा
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) नेहमी हा
निश्चय राहावा की आम्ही ईश्वरीय संतान आहोत. आम्हाला श्रेष्ठ मता वरती चालायचे आहे.
कोणालाही दुःख द्यायचे नाही, सर्वांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे.
(२) सुपात्र मुलगा
बनून त्यांच्या वरती कुर्बान जायचे आहे. बाबांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे.
जसे बाबा निर्मान निरंकारी आहेत, असेच बाप समान बनायचे आहे.
वरदान:-
कल्याणकारी
बाबा आणि वेळेचा प्रत्येक सेकंद लाभ घेणारे निश्चय बुद्धी निश्चिंत भव.
जे पण दृश्य चालत आहे
त्याला त्रिकालदर्शी बनून पहा. हिम्मत उल्हास मध्ये राहून, आपण ही समर्थ आणि
विश्वाला पण समर्थ बनवा. स्वतःच्या विचारांच्या वादळा मुळे, हलचल मध्ये येऊ नका. जो
वेळ मिळाला आहे, सोबत मिळाली आहे, अनेक प्रकारचे खजाने मिळत आहे, त्याद्वारे
संपत्तीवान आणि समर्थ बना. साऱ्या कल्पामध्ये असे दिवस परत येणार नाहीत म्हणून
आपल्या सर्व चिंता बाबांना देऊन निश्चय बुद्धी बनून नेहमी निश्चिंत रहा. कल्याणकारी
बाबा आणि वेळेच्या प्रत्येक सेकंदाचा लाभ घ्या.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-
बाबाच्या संगतीचा रंग लावा, तर अवगुण स्वतः समाप्त होतील.