13-06-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबांचे प्रिय बनण्यासाठी आत्माभिमानी होऊन बसा, बाबांकडून आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत, याच खुशी मध्ये रहा.

प्रश्न:-
संगम युगांमध्ये तुम्ही ब्राह्मण, फरिश्ता म्हणजे देवदूत बनण्यासाठी कोणते गुप्त कष्ट घेतात?

उत्तर:-
पवित्र बनण्याचे गुप्त कष्ट घेतात. तुम्ही ब्रह्माची मुलं संगम युगामध्ये भाऊ-बहीण आहात. भावा बहिणीची खराब दृष्टी जाऊ शकत नाही. स्त्री पुरुष सोबत राहत, दोघे स्वतःला ब्रह्मकुमार कुमारी समजतात, या स्मृती द्वारे जेव्हा पूर्ण पवित्र बनाल, तेव्हाच देवदूत बनू शकाल.

ओम शांती।
गोड गोड मुलांनो स्वतःला आत्मा समजून येथे बसायचे आहे. हे रहस्य तुम्हा मुलांना पण समजावयाचे आहे. आत्म अभिमानी बनून बसले तर बाबां सोबत स्नेह राहील. बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. बाबा कडून आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत. हे सर्व दिवस बुद्धीमध्ये रहाणे, हे कष्ट घ्यायचे आहेत. हे घडी घडी विसरल्या मुळे खुशी राहत नाही. बाबा सावधान करतात, मुलांनो देही अभिमान होऊन बसा, स्वतःला आत्मा समजा. आता आत्मा आणि परमात्माचा मेळा आहे. जर मेळा लागला होता, तर कधी लागला होता. जरूर कलियुग आणि सतयुग आदीच्या संगम युगामध्ये लागला असेल. आज मुलांना या विषयावर समजवतात. तुम्हाला पण एखादा विषय जरूर घ्यायचा आहे. उच्च ते भगवान परत, ब्रह्मा विष्णू शंकर आहेत. शिवपिता आणि देवता आहेत. मनुष्यांना हे माहितीच नाही की, शिव आणि ब्रह्मा विष्णू शंकर चा आपसा मध्ये काय संबंध आहे? कोणालाही त्यांची जीवन कहाणी माहित नाही. त्रिमूर्ती चे चित्र पण प्रसिद्ध आहे. हे तीन देवता आहेत. फक्त तीन धर्म थोडेच असतात. धर्म मोठा असतो, देवी देवता धर्म. हे सूक्ष्म वतनवासी आहेत, वरती शिवबाबा आहेत. मुख्य ब्रह्मा आणि विष्णू आहेत. आता बाबा समजवतात, तुम्हाला विषय देतात, ब्रह्मा च विष्णू आणि विष्णू च ब्रह्मा कसे बनतात. जसे तुम्ही म्हणतात, आम्ही शुद्र पासून ब्राह्मण, परत ब्राह्मण पासून देवता कसे बनतो, तसेच यांचे पण आहे. प्रथम ब्रह्मा पासून विष्णू नंतर विष्णू पासून ब्रह्मा बनतात. ते तर म्हणतात, आत्मा च परमात्मा आणि परमात्माच आत्मा बनतात. हे तर चुकीचे आहे, असे होऊ पण शकत नाही. तरी या विषयावर चांगल्या रीतीने समजावयाचे आहे. काहीजण म्हणतात परमात्मा, कृष्णाच्या तना मध्ये आले आहेत. जर कृष्णा मध्ये आले तर ब्रह्माची भूमिका तर नष्टच होईल. कृष्ण तर सतयुगाचे प्रथम राजकुमार आहेत, ते पतित कसे होऊ शकतात? ज्यांना येऊन पावन बनवावे लागेल. अगदीच चुकीचे आहे. या गोष्टी महारथी सेवाधारी मुलंच समजू शकतात, बाकी तर कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाहीत. हा विषय खूप चांगला आहे. ब्रह्मा च विष्णू आणि विष्णू च ब्रह्मा कसे बनतात, त्यांची जीवन कहाणी आम्ही सांगत आहोत, कारण त्यांचा आपसा मध्ये संबंध आहे. अशा प्रकारे सुरुवात करायची आहे. ब्रह्मा पासून विष्णू सेकंदांमध्ये आणि विष्णू पासून ब्रह्मा बनण्यांमध्ये ८४ जन्म लागतात. या खूप मोठ्या समजण्याच्या गोष्टी आहेत. आता तुम्ही ब्राह्मण कुळाचे आहात. प्रजापिता ब्रह्मा चे ब्राह्मण कुळ कोठे गेले. प्रजापिता ब्रह्माची तर नवीन दुनिया पाहिजे ना. नवीन दुनिया तर सतयुग आहे. तेथे तर प्रजापिता नाहीत. कलियुगा मध्ये प्रजापिता होऊ शकत नाहीत. ते संगमयुगी आहेत. तुम्ही आता संगम युगा मध्ये आहात, शुद्रा पासून तुम्ही ब्राह्मण बनले आहात. शिवपित्या ने ब्रह्माला दत्तक घेतले आहे. बाबांनी यांची कशी रचना केली, हे कोणी जाणत नाहीत. त्रिमूर्ती मध्ये रचनाकार शिवाचे चित्र नाही, तर माहिती कसे होईल, उच्च ते उच्च भगवान आहेत, बाकी सर्व त्यांची रचना आहे. हे ब्राह्मण संप्रदाय आहेत, तर जरूर त्यांचा जरुर प्रजापिता पण पाहिजे. कलियुगामध्ये तर होऊ शकत नाहीत. सतयुगा मध्ये पण नाही. गायन केले जाते, ब्राह्मण देवी देवताय नमःआता ब्राह्मण कोणत्या युगाचे आहेत. प्रजापिता ब्रह्मा कोणत्या युगाचे आहेत?जरूर संगम युगातील म्हणावे लागेल. पुरुषोत्तम संगमयुग आहे. या संगम युगाचे कोणत्याही ग्रंथांमध्ये वर्णन नाही. महाभारत लढाई पण संगम युगा मध्येच लागली होती, न की सतयुग किंवा कलियुगामध्ये. पांडव आणि कौरव, हे संगम मध्ये आहेत. तुम्ही पांडव संगम युगी आहात, तर कौरव कलियुगी आहेत. गिते मध्ये पण भगवानुवाच आहे ना. तुम्ही पांडव दैवी संप्रदाय आहात. तुम्ही आत्मिक पंडे बनत आहात. तुमची आत्मिक यात्रा आहे, जी तुम्ही बुद्धी द्वारे करतात.

बाबा म्हणतात, स्वता:ला आत्मा समजा. आठवणीच्या यात्रे मध्ये राहा. शारीरिक यात्रा करुन परत येतात, ती अर्धाकल्प चालते. ही संगमयुगा ची यात्रा एकाच वेळेतील आहे. तुम्ही जाऊन मृत्यू लोका मध्ये परत येणार नाहीत. पवित्र बनून तुम्हाला पवित्र दुनिये मध्ये यायचे आहे, म्हणून तुम्ही आता पवित्र बनत आहात. तुम्ही जाणतात आत्ता तेथे चतुर्भुजची प्रतिमा राहते, ज्याद्वारे माहिती होते की, हे विष्णू संप्रदाय आहेत. येथे रावणाची प्रतिमा आहे, तर रावण संप्रदाय आहेत. तर हा विषय ठेवल्यामुळे मनुष्य आश्चर्य करतील. आता तुम्ही देवता बनण्यासाठी राजयोग शिकत आहात. ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण, तुम्ही शुद्र पासून ब्राह्मण बनले आहात. दत्तक घेतले आहात. ब्राह्मण पण येथे आहेत परत देवता पण येथेच बनतात. राजघराणे,

राजवंश येथेच असते. विणूचे राजघराने आहे. ब्राह्मणांचे राजघराणे म्हणत नाहीत. एकानंतर दुसरे, परत तिसरे, राजे येतात. आता तुम्ही जाणतात, आम्ही ब्राह्मण कुलभूषण आहोत, परत देवता बनतो. ब्राह्मणच विष्णू कुळांमध्ये, परत विष्णू कुळामधून क्षत्रिय चंद्रवंशी कुळामध्ये परत वैश्य कुळांमध्ये, परत शुद्र कुळांमध्ये येतात. परत ब्राह्मणच देवता बनतात अर्थ खूपच स्पष्ट आहे. चित्रांमध्ये काय काय दाखवतात. आम्ही ब्राह्मणच विष्णुपुरी चे मालक बनतो, यामध्ये संशय घ्यायचं नाही. बाबा जे निबंध देतात, त्यावरती विचार सागर मंथन करायला पाहिजे, कोणाला कसे समजावयाचे, ज्यामुळे तर मनुष्य आश्चर्य करतील की, यांचे समजावणे तर खूप चांगले आहे. ज्ञाना ज्ञानसागरा शिवाय दुसरे कोणी समजावू शकत नाहीत. विचार सागर मंथन करून परत लिहायला पाहिजे. परत वाचा तर विचार येतील, हे वाक्य सांगायला पाहिजे होते. बाबा पण प्रथम मुरली लिहून तुमच्या हातामध्ये देत होते, परत ऐकवत होते. येथे तुम्ही घरामध्ये बाबाच्या सोबत राहतात. आता तर तुम्हाला बाहेर जाऊन सांगावे लागते. तर हा विषय खूपच आश्चर्यकारक आहे, ब्रह्माच विष्णू बनतात, यांना कोणी जाणत नाहीत. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा दाखवतात. जसे गांधीच्या नाभीतून नेहरू. परंतू राजघराणे तर पाहिजे ना. ब्राह्मण कुळांमध्ये राजघराणे नसते. ब्राह्मण संप्रदायच दैवी राजाई मध्ये येतात, परत चंद्रवंशी राजाई मध्ये जातील, परत वैश्य राजाई मध्ये जातील. असे सर्वाची राजाई चालते. सत्ययुग निर्विकारी दुनिया आहे आणि कलियुग विकारी दुनिया आहे. हे दोन अक्षर पण कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाहीत. नाहीतर हे जरुर बुद्धीमध्ये यायला पाहिजे, की विकारी पासून निर्विकारी कसे बनतात. मनुष्य न निर्विकारीला जाणतात, ना विकारीला. तुम्हाला समजवले जाते, देवता निर्विकारी आहेत. असे कधी ऐकले नाही की, ब्राह्मण निर्विकारी आहेत. नवीन दुनिया निर्विकारी आहे तर जुनी दुनिया विकारी आहे. तर जरुर संगमयुग दाखवावे लागेल, याचे कोणालाही माहिती नाही. पुरुषोत्तम महिना साजरा करतात ना. ते तीन वर्षाच्या नंतर एकदा येतो. तुम्हचे पाच हजार वर्षानंतर एकदाच संगम युग येते. मनुष्य आत्मा आणि परमात्माला जाणत नाहीत, फक्त म्हणतात अजब सितारा चमकतो. बस जसे दाखवतात राम कृष्ण परमहंस चे शिष्य विवेकानंद म्हणत होते, मी गुरूंच्या समोर बसलो होतो, गुरुचे ध्यान करतात ना. आता बाबा म्हणतात, तुम्ही माझीच आठवण करा, साक्षात्काराची गोष्टच नाही. गुरु तर आठवणीत आहेत. खास बसून आठवण केल्यामुळे काय आठवणीत येतील काय?विवेकानंदाची गुरु मध्ये भावना होती, हे भगवान आहेत, तर पाहिले की त्यांची आत्मा निघून, माझ्यामध्ये मिळून गेली. त्यांची आत्मा कुठे जाऊन बसली, परत काय झाले, काहीच वर्णन नाही. बस खुश झाले. आम्हाला भगवंतांनी साक्षात्कार केला, भगवान कोण आहेत, हे पण जाणत नाहीत. बाबा समजवतात, शिडीच्या चित्रावरती तुम्ही समजून सांगा. हा भक्तिमार्ग आहे. तुम्ही जाणतात, एक भक्तीची नाव आहे, दुसरी ज्ञानाची नाव आहे. ज्ञान वेगळे वेगळे, भक्ती वेगळी आहे. बाबा म्हणतात, आम्ही तुम्हाला कल्पा पूर्वी ज्ञान दिले होते, विश्वाचे मालक बनवले होते. आता तुम्ही कोठे आहात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे, कसे कसे झाड वाढते, जसा फुलांचा गुलदस्ता असतो ना. हे सृष्टी रुपी झाड पण, फुलदाणी आहे. या मध्ये तुमचा धर्म, परत या धर्मा द्वारे तीन धर्म निघतात, परत त्यांच्याद्वारे वृद्धी होत जाते. तर या झाडाची पण आठवण करायची आहे. अनेक फांद्या इत्यादी निघत राहतात. अंत काळात येणार्‍यांचा पण मान होतो. जुने वडाचे झाड असते ना, त्याचे खोड नसते, बाकी सर्व झाड पारंब्या वरती उभे असते. देवी देवता धर्म नष्ट झालेला आहे, बिलकुल सडला आहे. भारतवासी आपल्या धर्माला बिलकुल जाणत नाहीत बाकी सर्व आपल्या धर्माला जाणतात. काही तर म्हणतात आम्ही धर्माला मानत नाहीत. मुख्य चार धर्म आहेत बाकी अनेकानेक आहेत. या झाडाला आणि सृष्टिचक्र ला तुम्ही आत्ता जाणतात. देवी-देवता धर्माचे नावच गायब झाले आहे परत बाबा त्याची स्थापना करून बाकी सर्व धर्माचा विनाश करतात. गोळ्याच्या(सुर्ष्टीचक्र) चित्रावरती पण जरूर घेऊन यायला पाहिजेत. हे सत्ययुग हे कलियुग आहे. कलियुगा मध्ये अनेक धर्म आहेत, सतयुगा मध्ये एकच धर्म आहे. एका धर्माची स्थापना अनेक धर्माचा विनाश कोण करतात. भगवान पण कोणाच्या द्वारेच करतील ना. बाबा म्हणतात ब्रह्मा द्वारे आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना मी करवतो. ब्राह्मणच विष्णुपुरी चे देवता बनतात.

संगम युगामध्ये तुम्हा ब्राह्मण आत्म्याला पवित्र बनण्यासाठी गुप्त कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही ब्रह्माची मुलं संगम युगामध्ये भाऊ-बहीण आहात. भाऊ-बहिणीची खराब दृष्टी राहू शकत नाही. पती पत्नी दोघेही स्वतःला ब्रह्मकुमार कुमारी समजतात, यामध्ये खूप कष्ट आहेत. स्त्री-पुरुषाचे आकर्षण असे आहे, जे हात लावल्या शिवाय राहू शकत नाहीत. येथे भाऊ बहिणीला हात लावायचा नाही, म्हणजे स्पर्श करायचा नाही. स्पर्श केल्यामुळे पापाची जाणीव होते. आम्ही ब्रह्मकुमार कुमारी आहोत, हे विसरतात परत नष्ट होतात. यामध्ये खूप कष्ट घ्यायचे आहेत. युगल पती पत्नी म्हणून राहतात, कुणाला काय माहिती? ते स्वतः जाणतात, आम्ही ब्रह्माकुमार कुमारी आहोत, फरिश्ते देवदूत आहोत, स्पर्श करायचा नाही. असे करत करत सूक्ष्म वतनवासी फरिशता देवदूत बनाल, नाहीतर फरिश्ता म्हणजे देवदूत बनू शकणार नाहीत. देवदूत बनायचे आहे तर पवित्र राहवे लागेल. अशी जोडी निघावी, जी नंबर एक बनेल. असे म्हणतात, दादांनी तर सर्व अनुभव केला आहे, अंत काळामध्ये संन्यास केला आहे. खूप कष्ट तर त्यांनाच आहेत जे पती-पत्नी आहेत, परत त्यामध्ये ज्ञानयोग पण पाहिजे. अनेकांना आपल्या सारखे बनवले तेव्हाच मोठे राजा बनू शकाल. फक्त एका ची गोष्ट नाही. बाबा म्हणतात, तुम्ही शिव बाबांची आठवण करा. हे प्रजापिता आहेत. अनेक असे आहेत, जे म्हणतात आमचे कामच शिवबाबांशी आहे, आम्ही ब्रह्माची का आठवण करायची? त्यांना पत्र का लिहायचे?असे पण आहेत. तुम्हाला आठवण तर शिव बाबांची करायची आहे, म्हणून बाबांचा फोटो इत्यादी पण देत नाहीत. यांच्यामध्ये शिवबाबा येतात, हे तर देहधारी आहेत ना. आता तर तुम्हा मुलांना शिवबांबा कडून वारसा मिळत आहे. काही सन्यासी स्वतःलाच ईश्वर म्हणतात, परत त्यांच्याकडून काय मिळते?भारतवासींचे खूप नुकसान झाले आहे. भारताचे दिवाळं निघाले आहे. प्रजा कडून भीक मागत राहतात. दहा वीस वर्षासाठी कर्ज घेतात, परत द्यायचे थोडेच आहे. घेणारे, देणारे दोघे पण नष्ट होतील. हा खेळच नष्ट होऊन जाईल. अनेक संकट डोक्यावरती आहेत. कोणी सावकारा कडे ठेव ठेवतात, आणि त्यांचे दिवाळं निघते तर गरिबाला खूप दुःख होते. पावलो पावली दुःखच दुःख आहे. अचानक बसल्या बसल्या मरतात. हा मृत्युलोकच आहे. तुम्ही आत्ता अमर लोक मध्ये जात आहात. अमर पुरीचे बादशाह बनत आहात. अमरनाथ तुम्हा पार्वतीं ला अमरकथा सांगत आहेत. तुम्ही जाणतात अमर बाबा आहेत, त्यांच्याकडून आम्ही अमरकथा ऐकत आहोत. आता अमर लोक जायचे आहे. या वेळेत तुम्ही संगम युगा मध्ये आहात. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) विचार सागर मंथन करून ब्रह्माच विष्णू कसे बनतात, या विषया वरती भाषण करायचे आहे. बुद्धीला ज्ञान मंथना मध्ये व्यस्त ठेवायचे आहे.

(२) राजाई पद प्राप्त करण्यासाठी ज्ञान आणि योगाच्या सोबत आपल्यासारखे बनवण्याची सेवा पण करायची आहे. आपली दृष्टी खूप शुद्ध बनवायची आहे.

वरदान:-
नाव आणि मान च्या त्यागा द्वारे सर्वांचे स्नेह मिळवणारे विश्वाचे भाग्यविधाता भव.

जसे बाबांना नावा रुपा पेक्षा वेगळे म्हणतात, परंतू सर्वात अधिक नावाचे गायन शिवबाबांचे आहे. तसेच तुम्ही पण अल्पकाळा चे नाव आणि मान पासून अनासक्त बना, तर सदा काळासाठी सर्वांचे प्रिय स्वतः बनाल. जे नाव मान च्या भिकारी पणाचा त्याग करतात, तेच विश्वाचे भाग्यविधाता बनतात. कर्माचे फळ स्वतः त्यांच्यासमोर संपन्न स्वरूपामध्ये येईल म्हणून अल्पकाळाचे इच्छा मात्र अविद्या बना. कच्चे फळ खाऊ नका, त्याचा त्याग करा, तर तुमचे भाग्य सावली सारखे तुमच्याकडे येईल.

बोधवाक्य:-
परमात्मा पित्याचे मुलं आहात, तर बुद्धी रुपी पाय नेहमी सिंहासनधारी हवा.