29-09-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   16.02.1985   ओम शान्ति   मधुबन


प्रत्येक श्वासांमध्ये खुशीचा नाद घुमत राहणेहीच या श्रेष्ठ जन्मातील भेट आहे
 


आज भोलानाथ बाबा भोले भंडारी आपल्या अत्यंतप्रेमळ सहयोगी सहज योगी सर्व खजान्याचे मालक मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. आताही ही मालक आणि भविष्याचे मालक, आता विश्वाचे रचनाकार चे बालक सो मालक आहात, भविष्यातही विश्वाचे मालक आहात. बापदादा आपल्या अशा मालक मुलांना पाहून खुश होतात. हा नशा बालक सो मालक पणाचा एक नशा व अलोकिक खुशी आहे. असेच सदैव भाग्यवान व सदैव संपन्न श्रेष्ठ आत्मा आहात ना? आज सर्व मुले बाबांच्या अवतरणाची जयंती साजरी करण्यासाठी उमंग उत्साहामध्ये खुश होत आहेत. बापदादा म्हणतात की बाबांची जयंती म्हणजेच मुलांची जयंती आहे, म्हणून ही मजेशीर जयंती आहे. तसे तर वडील आणि मुलांची एकच जयंती नसते. असते का? तोच दिवस वडिलांचा व मुलाचा जन्मदिवस असतो का? असे कधी ऐकले का? हीच अलोकिक जयंती आहे,ज्या घडीला शिवबाबा ब्रह्मा बाबा या मुलांमध्ये अवतरीत झाले त्यादिवशी त्याच घडीला ब्रह्मा बाबा चा सुद्धा अलोकिक जन्म झाला, एकत्र जन्म झाला ना आणि आणि ब्रह्मा सोबतच इतर अनन्य ब्राह्मणांचा सुद्धा जन्म झाला म्हणून दिव्य जन्माची तारीख वेळ रेषा ब्रह्मा बाबा आणि शिव बाबांची अवतरणाची एकच असल्यामुळे शिवपिता आणि ब्रह्मा मुलगा, परमात्मा आणि महान आत्मा असूनही ब्रह्मा बाबा, बाप समान बनला. समानते मुळे एकत्रित स्वरूप बनले. बापदादा, बापदादा असेच सदैव एकत्रच बोलतो वेगळे नाही अशाप्रकारे इतर अनन्य ब्राह्मण दादांच्या सोबत ब्रह्मकुमार ब्रम्हकुमारीच्या रूपामध्ये अवतरीत झाले.

तर ब्रह्मा आणि कुमार कुमारी हेसुद्धा एकत्रित पिता आणि मुले यांच्या आठवणीचे नाव आहे, तर बाप दादा मुलांच्या ब्राह्मण जीवनाची अवतरण जयंती साजरी करण्यासाठी आले आहेत तुम्ही सर्वजण अवतार आहात ना. अवतार म्हणजे श्रेष्ठ स्मृती मी दिव्य जीवन असणारी ब्राह्मण आत्मा आहे. तर नवीन जन्म झाला ना, उच्च स्मृती मुळे या साकार शरीरामध्ये अवतरीत होऊन विश्व कल्याणाच्या कार्यासाठी निमित्त आहात तर मग अवतार आहात ना? जसे बाबा अवतरीत झाले आहेत तसे तुम्ही सर्वजण अवतरीत झाला आहात विश्व परिवर्तनाचे कार्य करण्यासाठी, परिवर्तन म्हणजे अवतरीत होणे. ही अवतरित आत्म्याची सभा आहे, बाबांच्या सोबत सर्व ब्राह्मण मुलांचा सुद्धा अलोकिक वाढदिवस आहे तर मुले बाबांची जयंती साजरी करणार की बाबा मुलांची जयंती. ती साजरी करणार की सर्व मिळून एकमेकांची ची जयंती साजरी करणार, भक्त लोक तर आठवण म्हणून जयंती साजरी करतात. आणि तुम्ही बाबांच्या सोबत जयंती साजरी करता असे श्रेष्ठ भाग्य कल्प-कल्पाची श्रेष्ठ भाग्याची अविनाशी रेषा ओढली गेली. सदैव लक्षात ठेवा की ईश्वरासोबत हे आपले महान भाग्य आहे. प्रत्यक्ष भाग्यविधाता सोबत भाग्य प्राप्त करण्याचा पार्ट आहे. असे डबल हिरो… हिरो पार्ट धारी सुद्धा आहात आणि हिऱ्या समान जीवन असलेले सुद्धा आहात. तर डबल हिरो बनलात ना? सर्व दुनिया ची नजर तुम्हा हिरो पार्ट धारी आत्म्यावर आहे तुम्हा भाग्यवान आत्म्यांची आज अगदी शेवटच्या जन्मात सुद्धा कल्पाच्या अंताला ही, आठवण यादगार स्वरूपात बनलेली आहे. बाबांचे आणि ब्राह्मणांचे बोल शास्त्र स्वरूपात बनले आहेत, जे आज सुद्धा दोन शब्द ऐकण्यासाठी आसुसलेले राहतात. दोन शब्द ऐकल्यामुळे ते शांतीचा व सुखाचा अनुभव करू लागतात.

तुम्हाला भाग्यवान आत्म्यांचे श्रेष्ठ कर्म चरित्र रूपामध्ये आजही गायले जात आहे.तुम्हा भाग्यवान आत्म्यांची श्रेष्ठ भावना श्रेष्ठ कामना भरलेले श्रेष्ठ संकल्प आशीर्वादाच्या रूपामध्ये आजही गायले जातात. कोणत्याही ही देवी देवता समोर आशीर्वाद मागण्यासाठी जातात. तुम्हा भाग्यवान आत्म्यांची श्रेष्ठ स्मृती आठवणीच्या स्वरूपात अजूनही यादगार चालू आहे, नामस्मरणाची किती महिमा करतात, कोणी नावाचे स्मरण करते तर कुणी माळेच्या स्वरूपात नामस्मरण करत आहेत. हीच वृत्ती ची आठवण नामस्मरणाच्या स्वरूपात चालत आली आहे. तर असे भाग्य कसे बनवायचे? कारण भाग्यविधाता सोबत भाग्यवान बनलो आहोत तर कळत असेल किती भाग्यवान असा दिव्य जन्म आहे अशा दिव्य जन्माची बापदादा भाग्यवान मुलांना शुभेच्छा देत आहेत, सदैव शुभेच्छा आहेत. ही फक्त एक दिवसाच्या शुभेच्छा नाही. हा भाग्यवान जन्म प्रत्येक सेकंद प्रत्येक वेळी शुभेच्छांनी भरपूर आहे. आपल्या या श्रेष्ठ जन्माला जाणता ना. प्रत्येक श्वासां मध्ये आनंदाचा नाद घुमत आहे, श्वास चालत नाही परंतु आनंदाचा नाद घुमतोय, हा नाद ऐकू येतोय ना? नैसर्गिक नाद किती श्रेष्ठ आहे या दिव्य जन्माचा आनंदाचा नाद म्हणजे श्वास, दिव्य जन्माची श्रेष्ठ भेट आहे. ब्राह्मण जन्म होताच हा आनंदाचा नाद भेट म्हणून मिळतो नाद वाजवताना सुद्धा बोट खालीवर करतात, त्याचप्रमाणे श्वास पण खालीवर होतो तर श्वास चालतो म्हणजे नाद घुमतो श्वास बंद होऊ शकत नाही, तसा नादही बंद होऊ शकत नाही. सर्वांचा आनंदाचा नाद चालू आहे ना डबल विदेशी काय समजतात? भोळ्या भंडारी कडून सर्व भंडारे भरपूर राहतील, भरण्याची मेहनत करावी लागणार नाही आरामात फळ मिळेल. आत्ताचा पुरुषार्थ आणि 21 जन्माचे फळ, 21 जन्म सदैव आनंद आणि मजा अनुभव करत राहाल. आता सुद्धा संगम योग मजेचे युग आहे गोंधळून जाण्याचे नाही. मजेचे युग आहे, जर कोणत्याही गोष्टीत गोंधळ असेल, तरसंगम युगावरून पाय थोडा कलियुगात जात आहे, म्हणून थोडे गोंधळतात. संगम युग म्हणजे दोघांचे मिलन साजरे करण्याचे युग आहे, तर पिता आणि मुले यांचे मिलन साजरे करण्याचे युग आहे. जिथे मिलन आहे तिथे मजा आहे, म्हणजेच मजा साजरा करण्याचा जन्म आहे, गोंधळून जायची गरज नाही मजे यावेळी खूप आत्मिक मजा करा. डबल विदेशी तर डबल मजेत राहणारे आहेत. कशामध्ये च्या जन्माच्या शुभेच्छा गोंधळून जाण्यासाठी दुनियेत इतर अनेक आत्मे आहेत, तुम्ही नाही समजले का? आपल्या श्रेष्ठ जयंतीला.. तसे पण आज-काल ज्योतिषी विद्या माहीत असलेले लोक दिवस तारीख आणि वेळ यांच्या आधारे भाग्य सांगतात. तुम्हा सर्वांची वेळ कोणती आहे? बाबांच्या सोबत ब्राह्मणांचा सुद्धा जन्म झाला आहे. जी ईश्वराची तिथी ती तुमची सुद्धा.

ईश्वराचे अवतरण म्हणजे दिव्य जन्माचीजी वेळ आहे, तीच वेळ तुमच्या जन्माची आहे, किती श्रेष्ठ वेळ आहे, किती श्रेष्ठ रेखा आहे. ज्याला दशा म्हणतात, तर मनामध्ये सदैव उमंग उत्साह ठेवा की बाबांच्या सोबत आमचा हा जन्म आहे. ब्रह्मा ब्राह्मणांशिवाय काहीच करू शकत नाही आणि शिवबाबा ब्रम्हा शिवाय काही करू शकत नाही, म्हणजेच सोबत आहोत ना म्हणून जन्माची तारीख जन्माच्या वेळेचे महत्व सदैव लक्षात ठेवा ज्या तिथीला ईश्वर खाली उतरले त्या तिथीला आपण आत्मे अवतरीत झालो, नावाची रास पहा ब्रह्मा आणि ब्राह्मण. ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी नावाची रास सुद्धा श्रेष्ठ आहे. असा श्रेष्ठ जन्म अथवा जीवन असणाऱ्या मुलांना पाहून बाबा सदैव आनंदित होतात. मुले म्हणतात, वाह बाबा वाह आणि आणि बाबा म्हणतात, वाह मुलांनो, अशी मुले कुणालाही मिळणार नाहीत. आजच्या या दिव्यदिवसाची विशेष भेट बाप दादा सर्व मुलांना दोन सोन्याचे बोल देत आहेत, एक सदैव स्वतःला असे समजा किमी बाबांचे प्रकाश मान रत्न आहे. प्रकाशमान रत्न म्हणजे सदैव डोळ्यात समावलेले, डोळ्यांमध्ये सामवण्यासाठी बिंदू स्वरूप आहे डोळ्यांमध्ये बिंदू ची कमाल आहे, तरप्रकाशमान रत्न म्हणजे बिंदू बाबांच्यामध्ये समावलेले आहेत प्रेमामध्ये समावलेले आहे. तर हा एक सोन्याचा शब्द लक्षात ठेवा कि, मी प्रकाशणारे रत्न आहे आणि दुसरे म्हणजे सदैव बाबांची सोबत आणि बाबांचा हात माझ्या डोक्यावर आहे. सोबत पण आहे आणि सदैव हात हातामध्ये आहे. सदैव आशीर्वादाचा हात डोक्यावर आहे, आणि सहयोगाची सोबत आहे तर सदैव बाबांची सोबत आणि आणि बाबांचा हात हातातच आहे, साथ देतात व हात देतात असे नाही तर साथ सदैव आहेच हे दुसरे सोन्याचे शब्द सदैव सोबत आणि आणि बाबांचा हात हातात हीच आजच्या दिवशी दिव्य जन्माची भेट आहे. अच्छा,

अशाप्रकारेसर्वठिकाणाहूनआलेल्यासदैवश्रेष्ठभाग्यवानमुलांनासदैवप्रत्येकश्वासालाआनंदाचानादअनुभव
करणाऱ्यामुलांनाडबलहिरोमुलांना,सदैवभगवानआणिभाग्यअसेआठवणीठेवणाऱ्यामुलांनासदैवसर्वखजाना भरपूर,भंडारअसलेल्यामुलांनाभोलानाथअमरनाथवरदानीपित्याकडूनखूपखूपदिव्यजन्माच्याशुभेच्छा,
त्यासोबतप्रेमळआठवणआणिनमस्ते.

दादीजीबरोबर:- बेहद वडिलांचे प्रेमाचे हात खूप मोठे आहेत त्या प्रेमळ हातांच्या मिठीत सर्व समावलेले आहात. सदैव सर्व मुले बाबांच्या हाताच्या माळेत गुंफलेले आहेत म्हणून सर्व माया जीत आहेत. ब्रह्मच्या सोबत जन्म घेणारे श्रेष्ठ आत्मे आहात ना. तिथीमध्ये जरासुद्धा अंतर नाही म्हणून ब्रह्माला अनेक तोंडे दाखवली आहेत ब्रह्माला 5 किंवा तीन तोंड दाखवतात कारण ब्रह्मा सोबत ब्राह्मण आहेत तर मग तीन तोंडे आहेत त्यामध्ये तुम्ही आहात का? पाच तोंडे आहेत त्यामध्ये तुम्ही आहात का? तोंड सुद्धा सहयोगी बनते ना, बाबांना सुद्धा नशा आहे, कोणता?संपूर्ण दुनियेत कोणत्याही पित्याला अशी मुले शोधून तरी सापडतील का? नाही. बाबा म्हणतात अशी मुले मिळणार नाहीत. मुले म्हणतात असे पिता मिळणार नाहीत, चांगलेच आहे मुले म्हणजे घराची शोभा असते. एकट्या वडिलांमुळे घराची शोभा वाढत नाही. म्हणून मुले म्हणजे या दुनिया रुपी घराची शोभा आहे. एवढ्या सर्व ब्राह्मणांची शोभा वाढवण्यासाठी निमित्त कोण बनले? मुलेच ना. बाबासुद्धा मुलांची शोभा पाहून आनंदी होतात. बाबांना तुम्हा मुलांपेक्षा जास्त माळा आठवण कराव्या लागतात. तुम्हाला तर एकाच वडिलांची आठवण करावी लागते आणि बाबांना किती माळांची आठवण करावी लागते? जेवढ्या भक्तिमार्गात माळा गळ्यामध्ये घातल्या, तेवढ्या महाराजांची आठवण आज बाबांना करावी लागते. एका मुलाची माळा सुद्धा बाबा एक दिवस विसरतात, असे होऊच शकत नाही. बाबासुद्धा अनन्य भक्त झाले ना ?एक एक मुलांच्या विशेषता ची गुणांची माळा बाबा आठवण करतात आणि जेवढ्या वेळा आठवण करतात तेवढे ते गुण आणि विशेषता ताज्यातवान्या होत जातात. माळा तर बाबा आठवण करतात परंतु त्या माळेचे फळ बाबा मुलांना देतात स्वतः घेत नाहीत. अच्छा,

बापदादा तर सदैव मुलांच्या सोबतच राहतात एक सेकंदही मुलांपासून वेगळे राहू शकत नाही राहायची इच्छा झाली तरीसुद्धा राहू शकत नाही का? जेवढी मुले बाबांची आठवण करतात त्याचा प्रतिसाद तर बाबा देणार ना आठवण केल्याची परत फेड द्यावीच लागते. एक सेकंद सुद्धा बाबा मुलांच्या शिवाय राहू शकत नाही. असेही आश्चर्य कधी पाहिले नसेल जे सदैव सोबतच राहतात. बाबा मुलांपासून वेगळे होऊच शकत नाही. पिता आणि मुलांची जोडी कधीच पाहिली नसेल. खूप चांगली बाग तयार झाली आहे, तुम्हा सर्वांना सुद्धा बाग खूप आवडते ना. प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा आहे म्हणून ईश्वराच्या बागेचे गायन केले जाते. सर्व आदिरत्न आहात, एका एका रत्नाची किंमत किती आहे आणि प्रत्येक रत्नांची, प्रत्येक वेळी, प्रत्येक कार्यामध्ये आवश्यकता आहे. तर तुम्ही सर्वश्रेष्ठ रत्न आहात. ज्यांचे आत्तासुद्धा रत्नांच्या रुपामध्ये पूजा केली जाते. आता अनेक आत्म्यांनी विघ्नविनाशक बनावे म्हणून सेवा करता म्हणून आठवण रूपामध्ये एका एका रत्नांची खूप किंमत आहे. एका एका रत्नाची विशेषता असते. कोणते रत्न विघ्नांचा विनाश करणारे रत्न आहे तर दुसरे आणखीन काही विशेषता भरलेले आहेत. म्हणून आता शेवटी सुद्धा यादगार रूप सेवा करत आहे. तर असे सेवाधारी बनला आहात? समजले का?

संमेलनात आलेल्या प्रतिनिधींशी अव्यक्त बाप दादांची भेट :-सर्वजण कोठे पोहोचलात?पित्याच्या घरात आला आहात, असा अनुभव करता का? पित्याच्या घरी पाहुणे येतात का मुले येतात? मुले आहात, अधिकारी आहात की पाहुणे आहात? पित्याच्या घरी आलात पित्याच्या घरी सदैव अधिकारी मुले येतात. आत्तापासून स्वतःला पाहुणे नाही परंतु पित्याची मुले महान आत्म समजून पुढे जात राहा. भाग्यवान आहात म्हणून या ठिकाणी पोहोचलात. आता काय करायचे आहे? येथे पोहोचला हे भाग्य तर आहे, परंतु पुढे काय करायचे आहे? आता सदैव सोबत राहायचे. आठवणीत राहणे म्हणजे सदैव सोबत राहणे. एकटे जायचे नाही. बाबांचे सोबत जेथे पण जाणार, जे कर्म करणार ते एकत्र समजून केल्यामुळे सदैव सहज आणि सफलतेचा अनुभव करू शकतात. सदैव सोबत राहू हा संकल्प जरूर करून जा. पुरुषार्थ करू, पाहू, असे नाही परंतु करायचेच आहे, कारण दृढता ही सफलतेची चावी आहे. तर ही चावी सदैव स्वतःच्या सोबत ठेवा, ही एक अशी चावी आहे की तुम्हाला जो खजिना पाहिजे तो खजिना मिळण्यासाठी संकल्प करा तर लगेच तो खजिना मिळेल. ही चावी सदैव सोबत ठेवा म्हणजे सदैव सफलता प्राप्त कराल. आता पाहुणे नाही अधिकारी आत्मा. बाप दादा सुद्धा अशा अधिकारी मुलांना पाहून हर्षित होतात. अनुभव केला तो अनुभवाचा खजिना सदैव वाटत रहा. जेवढा वाटत रहाल तेवढा वाढत जाईल. तर महादानी बना फक्त आपल्या जवळ ठेवू नका.

निरोपघेताना 3:30 वाजता:- सर्व मुलांना शुभेच्छांसोबत सुप्रभात. आजची रात्र शुभ मिलनाच्या मजेत घालवली, त्या प्रकारे सदैव दिवस रात्र बाबांच्या मिलनाच्या मजेत साजरे करत राहा. संपूर्ण संगमयुगच सदैव बाबांच्या शुभेच्छा प्राप्त करून त्यामध्ये वाढ करत पुढे जात राहा व सर्वांना पुढे घेऊन चला. सदैव दयावान सदैव सर्वांबद्दल शुभ भावना ठेवणाऱ्या मुलांना प्रेमळ आठवण आणि सुप्रभात.

वरदान:-
जाणून घेण्याच्या शक्तीद्वारे स्व परिवर्तन करणारे तीव्र पुरुषार्थी भव.

कोणत्याही परिवर्तनाचा सहज आधार म्हणजे जाणून घेण्याची शक्ती आहे जोपर्यंत जाणून घेण्याची शक्ती येत नाही तोपर्यंत अनुभव होत नाही आणि जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत ब्राम्हण जीवनाची विशेषता अर्थात म्हणजे पाया मजबूत नाही, उमंग उत्साहाचीचाल-चलन नाही. जेव्हा जाणून घेण्याची शक्ती प्रत्येक गोष्टीत अनुभवी बनवते तेव्हा तुम्ही तीव्र पुरुषार्थी बनता. जाणून घेण्याची शक्ती नेहमीसाठी सहज परिवर्तन करायला शिकविते.

सुविचार:-
स्नेहाच्या स्वरूपाला प्रत्यक्षात वापरले तर ब्रह्मा बाप समान बनाल...!