14-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, सर्वशक्तिमान बाप आले आहेत, तुम्हाला शक्ती देण्यासाठी, जेवढे तुम्ही
आठवणीत राहाल तेवढी तुम्हाला शक्ती मिळत राहील."
प्रश्न:-
या नाटकामध्ये
चांगल्यात चांगला भुमिका तुम्हां मुलांचा आहे- कशी?
उत्तर:-
तुम्ही मुलंच
बेहद बाबांचे बनता. भगवंत शिक्षक बनून तुम्हालाच शिकवतात तर भाग्यवान झालात ना.
विश्वाचा मालक तुमचा पाहुणा बनून आलेला आहे, ते तुमच्या मदतीने विश्वाचे कल्याण
करतात. तुम्ही मुलांनी बाबांना बोलवलं आणि बाबा आले, हीच आहे दोन्ही हातांची टाळी.
आत्ता बाबांकडून तुम्हाला सर्व विश्वावर राज्य करण्याची शक्ती मिळते.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुले, आत्मिक वडिलांच्या समोर बसले आहेत. शिक्षकाच्या समोर देखील
बसलेले आहेत आणि हे पण जाणतात की बाबा गुरूच्या रूपामध्ये आले आहेत, आम्हा मुलांना
येथून घेऊन जाण्यासाठी. ही दुनिया जुनी आणि छी-छी बनली आहे. तुम्ही मुले सुद्धाछी-छी
बनले आहात. स्वतःच स्वतःला सांगता पतित पावन बाबा येऊन आम्हा पतितांना या
दु:खधामातून शांतीधामामध्ये घेऊन चला. आता तुम्ही येथे बसले आहात तर तुमच्या
मनामध्ये यायला पाहिजे. मी तुमच्या बोलण्यावरून, निमंत्रणावरून आलो आहे. बाबा आठवण
करून देतात, बरोबर तुम्हीच बोलवत होता ना, या म्हणून. आत्ता तुम्हाला आठवण आली आहे
की आम्हीच बोलवले आहे. ड्रामा अनुसार बाबा आले आहेत, जसे कल्पापुर्वी आले होते तसे.
ते लोक योजना बनवतात ना. ही पण शिवबाबांची एक योजना आहे. या वेळेला सर्वांची आपली
आपली योजना आहे ना. पाच वर्षांची योजना बनवतात, त्याच्यामध्ये हे-हे करणार, गोष्टी
पहा कशा येऊन मिळतात. पूर्वी हे योजना वगैरे बनवत नव्हते, आत्ता या योजना बनवतात.
तुम्ही मुलं जाणता की आपल्या बाबांची ही योजना आहे. ड्रामाच्या योजनेनुसार पाच हजार
वर्षांपूर्वी, मी ही योजना बनवली होती. तुम्ही गोड-गोड मुलं जे आता खूप दुःखी झाले
आहात, वेश्यालयामध्ये पडलेले आहात, आत्ता मी आलो आहे तुम्हाला शिवालयामध्ये घेऊन
जाण्यासाठी. ते शांतीधाम आहे निराकारी शिवालय आणि सुखधाम आहे साकारी शिवालय. तर
यावेळी बाप तुम्हा मुलांना ताजेतवाने करत आहेत. तुम्ही बाबांच्या समोर बसले आहात
ना. बुद्धीमध्ये निश्चय तर आहे बाबा आला आहेत. 'बाबा' अक्षर खूप गोड आहे. हे पण
जाणता की आम्ही आत्मे त्या वडिलांची मुले आहोत नंतर भूमिका बजावण्यासाठी या बाबांचे
बनता. किती वेळा तुम्हाला लौकिक बाबा मिळाले? सतयुगापासून सुख आणि दुःखाची भूमिका
बजावलेली आहे. आत्ता तुम्ही जाणता आमची दुःखाची भूमिका आता पूर्ण होते, सुखाची
भूमिका देखील 21 जन्म बजावलेली आहे. त्यानंतर अर्धा कल्प दुःखाची भूमिका बजावली.
बाबांनी तुम्हाला आठवण करून दिली आहे, बाबा विचारतात बरोबर असेच आहे ना. आता परत
तुम्हाला अर्धा कल्प सुखाची भूमिका वठवायची आहे. या ज्ञानाने तुमची आत्मा भरपूर
राहते आणि नंतर खाली होऊन जाते. नंतर बाप भरपूर करतात, तुमच्या गळ्यामध्ये विजयाचा
हार पडलेला आहे. गळ्यामध्ये ज्ञानाचा हार आहे. बरोबर आपण चक्र लावत असतो. सतयुग,
त्रेता, द्वापर, कलियुग आणि नंतर येतो गोड संगम युगावर. याला गोड म्हणणार. शांतीधाम
काही गोड नाही. सर्वात गोड आहे पुरुषोत्तम कल्याणकारी संगमयुग. ड्रामामध्ये तुमची
चांगल्यात चांगली भूमिका आहे. तुम्ही किती भाग्यवान आहात. बेहदच्या बाबांचे तुम्ही
बनता. ते येऊन तुम्हा मुलांना शिकवतात. किती उंच, किती सहज शिक्षण आहे. किती तुम्ही
धनवान बनतात, यामध्ये काही मेहनत नाही करायला लागत. डॉक्टर, इंजिनिअर वगैरे खुप
कष्ट घेतात, तुम्हाला तर वारसा मिळतो, वडिलांच्या कमाईवर मुलांचा हक्क असतो ना.
तुम्ही हे शिकून 21 जन्मांची खरी कमाई करता. तिथे तुम्हाला कोणतेही नुकसान होत नाही,
ज्यामुळे तुम्हाला बाबांना आठवण करावी लागेल, यालाच अजपाजाप असे म्हटले जाते.
तुम्ही जाणता बाबा आले आहेत. बाप पण म्हणतात मी आलो आहे, दोन्ही हातांची टाळी वाजते
ना. बाबा म्हणतात मला आठवण करा तर जन्मजन्मांतर चे पाप भस्म होतील. 5 विकार रुपी
रावणाने तुम्हाला पाप आत्मा बनवले आहे, नंतर पुण्य आत्मा देखील बनायचे आहे, हे
बुद्धी मध्ये आले पाहिजे. आम्ही बाबांच्या आठवणीने पवित्र बनून घरी जाणार, बाबांच्या
सोबत. नंतर या शिक्षणाने आम्हाला शक्ती मिळते. देवी-देवता धर्मासाठी म्हटले जाते
धर्म बलवान आहे. बाबा तर आहेत सर्वशक्तिमान. तर बाबांकडून आम्हाला विश्वामध्ये शांती
स्थापन करण्याची ताकद मिळते. ती बादशाही आमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.
एवढी ताकद मिळते. राज्यांच्या हाता मध्ये पहा किती ताकद येते. एक राजाची किती प्रजा,
लष्कर वगैरे असते परंतु ती आहे काही काळाची ताकद. ही आहे 21 जन्मांची ताकत. आता
तुम्ही जाणता आम्हाला सर्वशक्तिमान बाबाकडून, विश्वावर राज्य करण्याची ताकत मिळते.
प्रेम तर राहतेच ना. वास्तवामध्ये देवता नाहीत तरीसुद्धा प्रेम राहते ना. जेव्हा
देवता समोर असतील तेव्हा प्रजेचे किती प्रेम असेल. आठवणीच्या यात्रेने ही सर्व ताकद
तुम्ही घेत राहता. ह्या गोष्टी विसरू नका. आठवण करत करत तुम्ही खूप ताकतवान बनतात.
सर्वशक्तिमान दुस-या कोणाला म्हणू शकत नाही. सर्वांना शक्ती मिळते, यावेळी
कोणामध्येही शक्ती नाही, सर्व तमोप्रधान आहेत. परत सर्व आत्म्यांना एका कडूनच शक्ती
प्राप्त होते. परत आपल्या राजधानी मध्ये जाऊन आप आपला पार्ट वठवतील. आपला हिशोब
चुकतं करून परत असेच नंबर अनुसार शक्तिवान बनतात. प्रथम नंबरमध्ये तर या देवतांमध्ये
शक्ती आहे. लक्ष्मीनारायण बरोबर सा-या विश्वाचे मालक होते ना. तुमच्या बुद्धीमध्ये
संपूर्ण सृष्टीचे चक्र आहे. जसे तुमच्या आत्म्यामध्ये हे ज्ञान आहे, तसेच बाबांच्या
आत्म्यामध्ये पण संपूर्ण ज्ञान आहे. आता तुम्हाला ज्ञान देत आहेत.नाटकामध्ये भूमिका
भरलेली आहे जी पुनरावृत्त होत राहते. परत ही भूमिका पाच हजार वर्षानंतर पुनरावृत्त
होते. हे सुद्धा तुम्ही मुलं जाणतात. तुम्ही सतयुगामध्ये राज्यकर्ता, आणि बाबा
निवृत्त अवस्थेमध्ये असतात, परत केव्हा रंगमंचावर येतात? जेव्हा तुम्ही दुःखी होतात.
तुम्ही जाणतात त्यांच्यामध्ये संपूर्ण भूमिका भरलेली आहे. किती छोटी आत्मा आहे,
तिच्यामध्ये किती समज राहते. बाबा येऊन किती समज देतात. परत सतयुगामध्ये हे सर्व
विसरून जातात. सतयुगामध्ये हे ज्ञान तुमच्या मध्ये राहत नाही.तेथे तुम्ही सुख
भोगतात. हे सुद्धा आता तुम्ही समजतात, सतयुगामध्ये आम्हीच सो देवता बनून सुख भोगतो.
आता तुम्ही सो ब्राह्मण आहात. परत देवता बनत आहात. हे ज्ञान बुद्धीमध्ये चांगल्या
रीतीने धारण करायचे आहे. कोणालाही समजवण्यामध्ये आनंद होतो ना. तुम्हीच प्राण दान
देतात. म्हणतात ना काळ येऊन सर्वांना घेऊन जाईल. काळ इत्यादी काहीच नाही. हे तर
अनादी बनवलेले नाटक आहे. आत्मा म्हणते मी एक शरीर सोडून परत जाऊन दुसरे शरीर घेते.
मला कोणता काळ खात नाही. आत्म्याला अनुभूती होते. आत्मा जेव्हा गर्भामध्ये असते
तेव्हा साक्षात्कार करून, दुःख भोगत असते. आत मध्ये दंड भोगते,त्यामुळे म्हणले जाते
गर्भजेल. खुपच आश्चर्यकारक नाटक बनलेले आहे. गर्भ जेलमध्ये दंड भोगत आपला
साक्षात्कार करत राहतात. दंड का मिळतो? साक्षात्कार तर करवतील ना. हे-हे बेकायदेशीर
काम केलेले आहे, यांना दुःख दिलेले आहे. तेथे सर्व साक्षात्कार होतो, तरी सुद्धा
बाहेर येऊन पाप आत्म बनतात.सर्व पाप भस्म कसे होतील. ते तर मुलांना समजलेले आहे. या
आठवणीच्या यात्रेमुळे आणि सुदर्शन चक्र फिरवल्याने तुमचे पाप नष्ट होतील. बाबा
म्हणतात गोड गोड स्वदर्शन चक्रधारी मुलं, तुम्ही 84 चे हे चक्र फिरवले, तर तुमचे
जन्म जन्मांतर चे पाप नष्ट होतील. चक्राला सुद्धा आठवण करायची आहे, कोणी हे ज्ञान
दिलं त्यांची सुद्धा आठवण करायची आहे.बाबा आम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनवत आहेत.
रोज नवीन नवीन येत असतात तर, त्यांना उत्साहामध्ये आणावे लागते. तुम्हाला संपूर्ण
ज्ञान आहे, आता तुम्ही जाणतात, आम्ही येथे भूमिका वठवण्यासाठी आलेलो आहोत. 84 चे
चक्र पूर्ण केले आता परत घरी जायचे आहे. असे चक्र फिरवत राहता का? बाबा जाणतात मुलं
खूप विसरतात. चक्र फिरवण्यासाठी कोणताच त्रास नाही, वेळ तर खूप आहे शेवटी तर, तुमची
ही स्वदर्शन चक्रधारीची अवस्था राहील. तुम्हाला असे बनायचे आहे. संन्यासी लोक तर हे
ज्ञान देऊ शकत नाहीत. स्वदर्शन चक्राला तर स्वतः गुरुच जाणत नाही. ते तर फक्त
म्हणतील गंगाकिनारी चला. तेथे किती जण अंघोळ करतात. खूप जणांनी स्नान केल्यानंतर
गुरूंची कमाई होते. सारखे सारखे यात्रेमध्ये जातात. आता त्यायात्रेमध्ये आणि या
यात्रेमध्ये फरक पहा किती आहे? ही यात्रा खुपच सहज आहे. चक्र सुद्धा फिरवा. गातात
सुद्धा ना चहू बाजूला फिरलो, तरी सुद्धा बेहदच्या पित्यापासून दूर राहिलो. ही
तुम्हाला अनुभूती होते. ते लोक तर याचा अर्थ समजत नाहीत. आता तुम्ही जाणतात खूप
फिरलो. आता तुम्ही या फेऱ्यापासून सुटतात. कितीही फिरले तरी कोणी बाबांच्याजवळ आले
नाही खुपच दूर राहिले.
आता नाटकानुसार बाबांना यावेच लागते, सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी. बाबा म्हणतात
माझ्या मतावर तुम्हाला चालावं लागेल, पवित्र बनायचे आहे. या दुनियेला पाहून न
पाहिल्यासारखं करायचे आहे. जोपर्यंत नवीन घर बनवून तयार होईल, तोपर्यंत या जुन्या
घरी राहायचे आहे. बाबा संगमयुगावरती वारसा देण्यासाठी येतात. बेहदच्या पित्याचा
वारसा पण बेहदचा आहे. मुलं जाणतात बाबांचा वारसा आमचा आहे. त्या आनंदामध्ये राहतात.
स्वतःची कमाई करतात आणि बाबांचा वारसा सुद्धा मिळतो. तुम्हाला तर वारसाच मिळतो. तेथे
तुम्हाला माहीत पडणार नाही, की स्वर्गाचा वारसा आम्हाला कसा मिळाला. तेथे तर तुमचे
जीवन खूप सुखी राहते कारण तुम्ही बाबांना आठवण करून शक्ती प्राप्त करतात. पाप नष्ट
करणारे पतित पावन एकच बाबा आहेत. बाबांना आठवण केल्याने आणि स्वदर्शन चक्र
फिरवल्याने तुमचे पाप नष्ट होतात. हे चांगल्या प्रकारे नोंद करून घ्या. एवढेच समजणे
खूप आहे. पुढे तुम्हाला खूप समजावे लागणार नाही. एक इशाराच खूप आहे. बेहदच्या
पित्याची आठवण करा, तर तुमचे पाप नष्ट होतील. तुम्ही नरापासून नारायण, नारीपासून
लक्ष्मी बनण्यासाठी येतात. हे तर आठवणी मध्ये आहे ना. अजून कोणाच्या यागोष्टी
बुद्धीमध्ये येत नाहीत. येथे तुम्ही येता, बुद्धीमध्ये आहे आम्ही बाबांकडून नवीन
दुनिया स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी जातो.
बाबा म्हणतात स्वदर्शन चक्रधारी बनल्याने तुमचे विकर्म विनाश होतील.आता जे तुमचे
जीवन हिऱ्या यासारखे बनवतात त्यांना पहा. हे सुद्धा तुम्ही समजता यांच्यामध्ये
पाहण्यासारखी काही गोष्ट नाही. हे तुम्ही दिव्यदृष्टी द्वारे जाणतात. आत्माच या
शरीराच्या आधारे शिकते. हे ज्ञान आता मिळालेले आहे. आपण जे कर्म करतो, आत्मच शरीर
धारण करून कर्म करते. बाबांना सुद्धा शिकवायचे आहे त्यांचे नावच आहे सदाशिव. शरीराचे
नाव बदलत राहते. हे शरीर तर माझे नाही. ही यांची मिळकत आहे.शरीर आत्म्याची मिळकत
असते, ज्याद्वारे भूमिका वठवते. ही तर खूप सहज समजण्याची गोष्ट आहे. आत्मा तर
सर्वांमध्ये आहे, सर्वांच्या शरीराचे नाव वेगवेगळे असते. हे तर परम आत्मा, सुप्रीम
(सर्वोच्च) आत्मा आहेत. उंच ते उंच आहेत. आत्ता तुम्ही समजता ईश्वर तर एकच रचनाकार
आहेत. बाकी सर्व रचना भूमिका आहे. हे पण तुम्ही जाणले आहे, आत्मे येत राहतात. प्रथम
आदी सनातन देवी देवता धर्माची आत्मा थोडेच असतात. शेवटी योग्य बनतात पुन्हा प्रथम
येण्यासाठी. हे सृष्टिचक्र पण जशी माळ आहे जी फिरत राहते. माळ जपतात तर सर्व
मण्यांचे चक्र फिरते ना. सतयुगामध्ये भक्ती थोडीसुद्धा राहात नाही. बाबांनी समजवले
आहे. हे माझीच आठवण करा. तुम्हाला घरी जरूर जायचे आहे, विनाश समोर उभा आहे.
आठवणीद्वारेच पाप नष्ट होतील आणि परत शिक्षा भोगन्यापासून सुद्धा सुटले जाल, पद
सुद्धा चांगले प्राप्त कराल, नाही तर शिक्षा खूप भोगावी लागेल. मी तुम्हा मुलांजवळ
किती चांगला पाहुणा आहे. मी संपूर्ण विश्वाला परिवर्तन करतो जुन्या विश्वाला नवीन
बनवितो. तुम्ही सुद्धा जाणतात बाबा कल्प कल्प येऊन विश्वाला परिवर्तन करून जुन्या
विश्वाला नवीन बनवितात. हे विश्व नवीन पासून जुने आणि जुन्या पासून नवीन बनते.
तुम्ही यावेळेत चक्र फिरवत राहतात. बाबांचा बुद्धीमध्ये ज्ञान आहे, वर्णन करीत
राहतात. तुमच्या बुद्धीमध्ये पण चक्र कसे फिरत राहते. तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत,
त्यांच्या श्रीमंताच्या द्वारे आपण पावन बनू. आठवणीने पवित्र बनतील आणि उंच पद
प्राप्त करतील. पुरुषार्थ पण करणे आवश्यक आहे. पुरुषार्थ करण्यासाठी किती चित्र
इत्यादी बनवीत राहतात. जे येतात त्यांना तुम्ही 84 चक्रावर समजावता. बाबांना आठवण
केल्याने तुम्ही पतितापासून पावन बनाल.अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. ज्ञानाला
बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने धारण करून अनेक आत्म्यांना प्राणदान द्यायचे आहे,
सुदर्शन चक्रधारी बनायचे आहे.
2. या गोड संगमयुगावरती आपल्या कमाईच्या सोबत बाबांच्या श्रीमतावर चालून संपूर्ण
वारसा घ्यायचा आहे. स्वतःचे जीवन सुखी बनवायचे आहे.
वरदान:-
संघटनेमध्ये
राहून, सर्वांचे स्नेही बनुन, बुद्धीचा आधार एका बाबांना बनविनारे कर्मयोगी भव
काही काही मुलं
संघटनेमध्ये स्नेही बनण्याच्या ऐवजी अलिप्त राहतात. घाबरतात कि कोठे फसू नये.
त्यामुळे दूर राहणेच बरोबर आहे. परंतु असे नाही, 21 जन्म कुटुंबामध्ये राहायचे आहे.
जर घाबरून अलिप्त रहाल तर हे सुद्धा कर्म संन्याशाचे संस्कार आहेत. कर्मयोगी बनायचे
आहे, कर्म संन्यासी नाही. संघटनांमध्ये राहा, सर्वांचे स्नेही बना परंतु बुद्धीचा
आधार एक बाबा, दुसरे कोणी नाही. बुद्धीला कोणत्या आत्म्यांची सोबत, गुण किंवा कोणती
विशेषता आकर्षित न करो, तेव्हाच कर्मयोगी पवित्र आत्मा म्हणू.
बोधवाक्य:-
बापदादाचा उजवा
हात बना, डावा हात नको.