10-12-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
" गोड मुलांनो , सर्वशक्तिमान बाबांशी बुध्दीयोग लावल्यामुळे शक्ती मिळेल , आठवणी
मुळेच आत्मा रुपी बॅटरी चार्ज होईल , आत्मा पवित्र सतोप्रधान बनेल .
प्रश्न:-
संगम युगावरती तुम्ही मुलं कोणता पुरुषार्थ करतात , ज्यामुळे देवता पद मिळते ?
उत्तर:-
संगम युगामध्ये
आम्ही शितल बनण्याचा पुरुषात करतो,शितल म्हणजेच पवित्र बनल्यामुळे आम्ही देवता
बनतो.जोपर्यंत शितल बनत नाही तोपर्यंत देवता पण बनू शकत नाही.संगम युगामध्ये शितल
देवी बणुन सर्वांवरती ज्ञानाचे शितल जल टाकायचे आहे,सर्वांची तपत विझवायची आहे.स्वतः
पण शितल बनायचे आहे आणि सर्वांना पण बनवायचे आहे.
ओम शांती।
मुलांना प्रथम एक गोष्ट समजायची आहे,की आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत आणि शिव बाबा सर्व
आत्म्यांचे पिता आहेत,त्यांना सर्वशक्तिमान म्हणले जाते.तुमच्यामध्ये पण सर्व शक्ती
होत्या,तुम्ही साऱ्या विश्वावर राज्य करत होते.भारतामध्येच देवी-देवतांचे राज्य
होते,तुम्हीच पवित्र देवी-देवता होते.तुमच्या घराण्या मध्ये किंवा कुळा मध्ये सर्व
निर्विकारी होते.कोण निर्विकारी होते? आत्मे.आता परत तुम्ही निर्विकारी बनत
आहात.सर्वशक्तिमान बाबांकडून शक्ती घेत आहात.बाबांनी समजवले आहे,आत्माच ८४
जन्मांमध्ये भुमिका करते.आत्म्या मध्येच सतोप्रधानची शक्ती होते,ती परत दिवसेंदिवस
कमी होत गेली.सतोप्रधान पासून तमोप्रधान तर बनवायचे आहेच.जसे बॅटरीची शक्ती कमी होत
जाते,तर मोटर ऊभी राहते.बॅटरी डिस्चार्ज होते.आत्म्याची बॅटरी फुल डिस्चार्ज होत
नाही,काहीना, काही ताकत राहते.जसे कोणी मरतात तर दिवा लावतात, त्यामध्ये तेल घालत
राहतात,कुठे दिव्याची ज्योत विझायला नको.आता तुम्ही मुलं समजतात,तुमच्या मध्ये
पूर्ण शक्ती होती,आत्ता नाही. आता परत तुम्ही सर्वशक्तिवान बाबा सोबत आपला बुद्धी
योग लावत,स्वतःमध्ये शक्ती भरत राहतात कारण शक्ती कमी झाली आहे.शक्ती एकदम नष्ट झाली
तर, शरीर पण राहणार नाही.आत्मा बाबांची आठवण करत करत एकदम पवित्र होते.सतयुगा मध्ये
तुमची बॅटरी पूर्णपणे शक्तिशाली असते,परत हळूहळू कला म्हणजेच बॅटरीची शक्ती कमी होत
जाते.कलियुग अंतकाळा पर्यंत आत्म्याची एकदम थोडीच शक्ती राहते,दिवाळं निघते.बाबांची
आठवण केल्यामुळे आत्मा परत भरपूर होते.तर आत्ता बाबा समजवतात एकाची आठवण करायची
आहे.उच्च ते उच्च एक भगवंतच आहेत,बाकी सर्व रचना आहे. रचनेला रचना द्वारे हदचा वारसा
मिळतो. रचनाकार तर एकच बाबा आहेत बाकी सर्व हदचे आहेत.बेहदच्या बाबांची आठवण
केल्यामुळे बेहदचा वारसा मिळतो.मुलांना मनामध्ये समजायला पाहिजे की,बाबा आमच्यासाठी
स्वर्ग, नवीन दुनिया स्थापन करत आहेत. पूर्वनियोजित नाटकानुसार स्वर्गाची स्थापना
होत आहे,ज्यामध्ये तुम्हीच राज्य करतात.मी तर नेहमीच पवित्र आहे,मी कधीच गर्भा
द्वारे जन्म घेत नाही.न देवी देवता प्रमाणे जन्म घेतो.तुम्हा मुलांना स्वर्गाची
बादशहा देण्यासाठी,जेव्हा ब्रह्मा ६०वर्षाच्या वानप्रस्थ अवस्थेमध्ये असतात,
त्यावेळेस मी त्यांच्यामध्ये प्रवेश करतो.हेच परत नंबर एक तमोप्रधान पासून नंबर एक
सतोप्रधान बनतात.उच्च ते उच्च एकच भगवान आहेत परत ब्रह्मा विष्णू शंकर सूक्ष्मवतन
वासी आहेत.ब्रह्मा विष्णू शंकर कुठून आले?हा फक्त साक्षात्कार होतो. सूक्ष्मवतन
मध्येच आहे.जिथे स्थूल शरीर नाही.सूक्ष्म शरीर फक्त दिव्यदृष्टी द्वारे पाहू
शकतो.ब्रह्मा तर सफेद वस्त्रधारी आहेत.ते विष्णू हिरे जवाहर पासून,सजलेले आहेत. परत
शंकराच्या गळ्यामध्ये नाग इत्यादी दाखवतात,असे शंकर इत्यादी कोणीही नसतात.अमरनाथ
वरती शंकराने पार्वतीला अमर कथा ऐकवली असे म्हणतात.आता सूक्ष्मवतन मध्ये तर मनुष्य
सृष्टीच नाही.तर कथा कसे ऐकवतील,बाकी सूक्ष्मवतन मध्ये तर फक्त साक्षात्कार होतो.जे
बिलकुल पवित्र बनतात त्यांचा साक्षात्कार होतो, तेच परत स्वर्गाचे मालक बनतात.तर
बुद्धीमध्ये यायला पाहिजे,यांनी राज्य भाग्य कसे घेतले?लढाई इ.तर होत नाही.देवता कधी
हिंसक असतात का?आता तुम्ही बाबांची आठवण करत,राज्य घेत आहात.कोणी मानतील किंवा न
मानतील.गिता ग्रंथा
मध्ये आहे,देह सहित देहाचे सर्व धर्म विसरून माझीच आठवण करा.बाबांना तर देह
नाही.ज्यामध्ये ममत्व राहिल.बाबा म्हणतात मी थोड्या वेळा करिता,हे शरीर भाड्याने
घेतो,नाहीतर मी हे ज्ञान कसे देईल.मी या झाडाचे चेतन्य बीजरुप आहे.या चैतन्य झाडाचे
ज्ञान माझ्या जवळ आहे.या सृष्टीचे आयुष्य किती आहे,कशी उत्पत्ती,पालना,विनाश
होतो,मनुष्यांना काहीच माहिती नाही.ते हदचा अभ्यास शिकवतात.बाबा तर बेहदचे शिक्षण
देऊन मुलांना विश्वाचे मालक बनवतात.भगवान कधीच देहधारी मनुष्यांना म्हणले जाऊ शकत
नाहीत.ब्रह्मा विष्णू शंकर ला पण आपला सूक्ष्म देह आहे म्हणून त्यांना पण भगवान
म्हणू शकत नाही. हे शरीर तर या दादाच्या आत्म्याचे तख्त आहे.आता हे अकालमुर्त
बाबांचे तख्तआहे.अमृतसरमध्ये पणा अकाल तख्त आहे,जे मोठे मोठे असतात, ते अकाल तख्त
वरती जाऊन बसतात.आता बाबा समजवतात हे सर्व आत्म्याचे अकाल तख्त आहे.आत्म्या मध्येच
चांगले किंवा वाईट संस्कार असतात.तेव्हा तर म्हणतात,हे कर्मांचे फळ आहे.सर्व
आत्म्याचे एकच पिता आहेत. बाबा कोणत्या ग्रंथाचा अभ्यास करून समजवत नाहीत.या गोष्टी
कोणत्याही ग्रंथांमध्ये नाहीत,तेव्हा तर लोक म्हणतात हे लोकं ग्रंथाला मानत
नाहीत.साधुसंत इत्यादी गंगे मध्ये जाऊन स्नान करतात,तर काय पावन बनतात,परत तर कोणी
जाऊ शकत नाहीत.सर्व अंत काळात जातील,जसे हजारो माशा एकत्र जातात.जसे माशांच्या राणी
पाठीमागे सर्व माशा जातात.बाबा जातील तर त्यांच्या पाठीमागे सर्व आत्मे आपल्या घरी
जातील.मुळवतन मध्ये जसे,सर्व आत्म्याचा समुह आहे.तर येथे सर्व मनुष्यांचा समुह
आहे.एक दिवस सर्वांना जायचे आहे.बाबा येऊन सर्वांना घेऊन जातात,तर शिव बाबांची वरात
झाली ना.मुलं किंवा मुली म्हणा,बाबा येऊन मुलांना आठवणीची यात्रा शिकवतात.पवित्र
बनल्या शिवाय आत्मा परत जाऊ शकत नाही.जेव्हा पवित्र बनेल तर प्रथम शांतीधाम मध्ये
जाईल, परत तेच हळूहळू येत राहतील,वृद्धी होत जाईल.राजधानी बनायची आहे ना.सर्व एकत्र
येत नाहीत,झाड पण हळूहळू वृद्धी होत राहील.प्रथम आधी सनातन धर्म आहे, जे बाबा
स्थापन करतात.ब्राह्मण पण प्रथम तेच बनतात,ज्यांना देवता बनायचे आहे. प्रजापिता
ब्रह्मा तर आहेत ना.प्रजामध्ये पण भाऊ-बहिण होतात.ब्रह्माकुमार कुमारी तर अनेक
बनतात.जरुर निशचय बुध्दी असतील तरच इतके गुण घेतात. तुमच्यामध्ये पण जे पक्के
आहेत,ते प्रथम येतील,कच्चे तर नंतर येतील. मुळ वतन मध्ये तर सर्व आत्मे राहतात,परत
खाली येतात तर वृद्धी होत जाते. शरीरा शिवाय आत्मा कशी भूमिका करेल.ही कलाकारांची
दुनिया आहे,जी चार ही युगामध्ये फिरत राहते. सतयुगा मध्ये आम्हीच देवता होतो परत
क्षत्रिय वैश्य शूद्र बनलो.आता हे पुरुषोत्तम संगम युग आहे. हे युग पण आत्ताच
बनते,जेव्हा बाबा येतात. हे बेहदचे ज्ञान बाबांच देतात. शिवबाबांना तर आपल्या
शरीराचे कोणतेच नाव नाही. हे शरीर तर या दादाचे आहे. बाबांनी थोड्या वेळापुरते हे
भाड्याने घेतले आहे.बाबा म्हणतात,मला तुमच्याबरोबर गोष्टी करण्यासाठी मुख तर पाहिजे
ना.मुख नसेल तर बाबा मुलांसोबत कसे गोष्टी करतील.बेहदचे ज्ञान याच मुखाद्वारे
ऐकवतात म्हणून यांनां गौमुख पण म्हणतात.डोंगरा मधून पाणी कुठून तरी येतेच परत येथे
गोमुख बनवले आहे,त्याद्वारे पाणी येते,त्यांना गंगाजल समजून पितात. त्या पाण्याचे
फारच महत्त्व समजतात.या दुनिया मध्ये सर्व खोटेच आहे.सत्य ज्ञान तर एक बाबांच
देतात,परत ते खोटे मनुष्य या बाबाच्या ज्ञानालाच खोटे समजतात.भारतामध्ये जेव्हा
सतयुग होते,तर त्याला सत्य खंड म्हटले जाते.परत भारतच जुना होतो,प्रत्येक
गोष्ट,प्रत्येक पदार्थ खोटा होतो.खूप फरक होतो.बाबा म्हणतात तुम्ही माझी खूप निंदा
करतात,सर्वव्यापी म्हणून पण खूप अपमान केला आहे.बाबांना बोलवतातच यासाठी की जुन्या
दुनियातून, विकारी दुनियेतून घेऊन चला.बाबा म्हणतात माझी सर्व मुलं काम चितेवरती
चढुन कंगाल बनले आहेत.तुम्ही तर स्वर्गाचे मालक होते ना,स्मृती येते ना.मुलांना च
समजवतात,साऱ्या दुनिया ला तर समजून सांगणार नाहीत.मुंलच बाबांना समजतात, दुनिया या
गोष्टीला काय जाणेल?
. सर्वात मोठा काटा काम विकराचा आहे,नावच पतित दुनियाआहे.सतयुग१००% पवित्र दुनिया
आहे.मनुष्य पवित्र देवतांच्या पुढे जाऊन नमन करतात.अनेक भक्त शाकाहारी असतात परंतु
असे नाही की ते विकारांमध्ये जात नाहीत.तसेच अनेक बाल ब्रह्मचारी पण असतात,लहान पणा
पासून कोणतीही खराब गोष्ट इत्यादी खात नाहीत.संन्यासी पण म्हणतात निर्विकारी
बना.सन्यीसी घरादाराचा सन्यास करुन परत दुसऱ्या जन्मामध्ये कोणत्या ग्रहस्थी जवळ
जन्म घेऊन, परत घरदार सोडून जंगलामध्ये जातात. परंतु पतित पासून पावन बनू शकत
नाहीत.पतित-पावन बाबांच्या, श्रीमता शिवाय कोणीच पावन बणवू शकत नाही.भक्तिमार्ग
आहेच उतरते कलेचा मार्ग,तर परत पावन कसे बनतील? पावन बनले तर घरी जातील,स्वर्गामध्ये
येतील.सतयुगी देवी देवता कधी घरदार सोडतात का? त्यांचा आहे हदचा सन्यास आणि तुमचा
बेहद चा संन्यास आहे. सारी दुनिया, मित्र संबंधी इत्यादी सर्वांचा सन्यास करायचा आहे.
तुमच्यासाठी आत्ता स्वर्गाची दुनिया स्थापन होत आहे.तुमची बुद्धी स्वर्गाकडे
आहे.मनुष्य तर नर्का मध्येच लटकले आहेत.तुम्ही मुलं परत बाबांच्या आठवणी मध्ये लटकले
आहात. तुम्हाला शितल देवी बनवण्या साठी ज्ञान चितेवर बसवले जाते.शितलतेच्या विरोधी
शब्द आहे तपत,अग्नी.तुमचे नावच आहे शितलादेवी,एक तर नसेल ना जरुर अनेक असतील,ज्यांनी
भारताला शीतल बनवले. या वेळेत सर्व काम चिता वरती जळत आहेत.तुमचे नाव येथेच
शितलादेवी आहे.तुम्ही शितल करणारी, ज्ञानाचे थंड पाणी शिडकवणाऱ्या देव्या आहात. हे
ज्ञानाचे जल आहे,जे आत्म्या वरती घातले जाते.आत्मा पवित्र बनल्यामुळे शितल बनते.
यावेळेस सर्व दुनिया काम चितावर चढून काळी झाली आहे.आता तुम्हा मुलांना कलश मिळतो,या
द्वारे तुम्ही स्वतः शितल बनवून दुसर्यांना पण शितल बनवतात.हे ब्रह्मा पण शितल बनले
आहेत ना.दोघं एकत्र आहेत,घरदार सोडण्याची तर गोष्टच नाही परंतु गौशाळा बनायचे असेल
म्हणून कोणी घरदार सोडले.कोणा साठी?ज्ञान चितेवर बसून शितल बनण्यासाठी.जेव्हा तुम्ही
शितल बनाल तेव्हाच तुम्ही देवता बनू शकता. आता तुम्हा मुलांची बुद्धी जुन्या घराकडे
लागायला नाही पाहिजे.बाबांच्या सोबत नेहमी बुद्धी योग राहावा, कारण तुम्हा सर्वांना
वापस घरी जायचे आहे.बाबा म्हणतात मी पंडा बणुन,तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आलो
आहे.ही शिवशक्ती पांडव सेना आहे. तुम्ही शिवा पासून शक्ती घेणारे आहात,ते
सर्वशक्तिवान आहेत. मनुष्य तर काही पण समजतात,असे पण म्हणतात परमात्मा मेलेल्या
मनुष्याला जिवंत करू शकतात परंतु बाबा म्हणतात लाडक्या मुलांनो या अविनाशी
नाटकांमध्ये प्रत्येकाला अनादि भूमिका मिळाली आहे. मी पण रचनाकार, निर्माता, मुख्य
कलाकार आहे. या अविनाश नाटकांमधील कोणत्याही भूमिकेला मी बदलू शकत नाही.मनुष्य
समजतात झाडाची पानं पण परमात्म्याच्या हुकमा शिवाय हलत नाहीत परंतु परमात्मा स्वतः
म्हणतात मी पण अविनाशी नाटकाच्या अधीन आहे.या अविनाश नाटकाच्या बंधना मध्ये बांधलेला
आहे.असे नाही की माझ्या हुकमा शिवाय पाने हालत नाहीत.सर्वव्यापी च्या ज्ञानाद्वारे
भारतवासी खूपच गरीब बनले आहेत. बाबांच्या ज्ञानाद्वारे भारत परत मुकुटधारी
बनतो,अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादा ची प्रेम पूर्ण आठवण आणि
सुप्रभात . आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते .
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१)सूर्यवंशी
मध्ये प्रथम घराण्या मध्ये येण्यासाठी निश्चय बुद्धी बणुन पूर्ण गुण घ्यायचे
आहेत.पक्का ब्राह्मण बनायचे आहे.बेहदचे ज्ञान स्मृती मध्ये ठेवायचे आहे.
(२)ज्ञान चितेवरती बसुन शीतल म्हणजे पवित्र बनायचे आहे. ज्ञाना आणि योगाद्वारे काम
विकाराच्या अग्नी ला नष्ट करायचे आहे.बुद्धी नेहमी एका बाबाकडे हवी.
वरदान:-
चमत्कार दाखवण्याच्या ऐवजी अविनाश भाग्या चा चमकणारा तारा बनवणारे सिद्धी स्वरुप भव
.
आज काल जे
अल्पकाळाची सिद्धी दाखवणारे आहेत,ते शेवटी परमधाम मधून आल्यामुळे सतोप्रधान
अवस्थेमुळे, पवित्रते च्या फलस्वरूप अल्पकाळाचे चमत्कार दाखवतात. परंतु ती स्थिती
नेहमीसाठी राहत नाही,कारण थोड्या वेळातच ते सतो, रजो,तमो तिन्ही अवस्थां मधून पास
होतात. तुम्ही पवित्र आत्मे नेहमी सिद्धी स्वरूप आहात.चमत्कार दाखवण्याच्या ऐवजी
चमकणारे ज्योती स्वरूप बनवणारे आहात.अविनाशी भाग्याचा चमकणारा तारा बनवणारे
आहात,म्हणून तुमच्याजवळ सर्व थोडे तरी ज्ञान घेण्यासाठी येतील.
बोधवाक्य:-
बेहदच्या वैराग वृत्तीचे वातावरण असेल तर सहयोगी , सहज योगी बनाल .