27-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, तुम्ही आता पुरुषोत्तम संगमयुगावर आहात, तुम्हाला येथे राहून नविन दुनियेची आठवण करावयाची आहे आणि आत्मा पावन बनवायचा आहे...!!!

प्रश्न:-
बाबाने तुम्हाला अशी कोणती समज दिली आहे, ज्यामुळे बुध्दीचे कुलूप उघडले आहे?

उत्तर:-
बाबाने या अमर्यादीत अनादि विश्व नाटकाचा समज दिली आहे, ज्यामुळे बुध्दीला जे गोदरेजचे कुलूप लागले होते ते उघडले आहे. पत्थरबुध्दी पासून पारस बुध्दी बनले आहात. बाबांनी समजावले आहे कि या विश्वनाटकात प्रत्येक कलाकारांची आप-आपली अनादि भूमिका आहे, ज्यांनी कल्पापूर्वी जेवढा अभ्यास केला आहे, ते आता पण तेवढाच करतील, पुरुषार्थ करुन आपला वारसा घेतील.

ओम शांती।
आत्मिक मुलां प्रती आत्मिक बाबा बसून शिकवित आहेत. जेव्हा पासून पिता बनले आहेत, तेव्हा पासूनच शिक्षक पण आहेत, तेव्हा पासूनच मग सतगुरुच्या रुपात मत देत आहेत. हे तर मुलांनी समजले आहे कि, जेव्हा ते पिता, शिक्ष्ज्ञक, गुरु आहेत तरी लहान मुलगा तर नाहीत ना. उंच ते उंच, मोठ्यातील मोठे आहेत. बाबा जाणतात कि, ही सर्व माझी मुले आहेत. विश्वनाटकानुसार बोलावले पण आहे कि, येऊन आम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन चला. परंतू समजत काहीच नाहीत. आता तुम्ही समजता कि, पावन दुनिया सतयुगाला, पतित दुनिया कलियुगाला म्हटले जाते. म्हणतात पण कि, येऊन आम्हाला रावणाच्या तुरुंगातून मुक्त करुन, दु:खा पासून सोडवून, शांतीधाम, सुखधाम मध्ये घेऊन चला. नाव दोन्ही चांगली आहेत. मुक्ती जीवनमुक्ती किंवा शांतीधाम-सुखधाम. तुम्हा मुलां शिवाय दुसऱ्या कोणाच्या बुध्दीत नाही कि, शांतीधाम कोठे. सुखधाम कोठे आहे? फारच बेसमज आहेत. तुमचे मुख्य लक्ष्यच समजदार बनण्याचे आहे. जे समजदार नाहीत त्यांच्यासाठी मुख्य लक्ष्य ठेवले जाते कि, समजदार बनायचे आहे. सर्वांना शिकवायचे आहे कि, मुख्य लक्ष्य, मनुष्यापासून देवता बनायचे आहे. ही आहेच मनुष्याची सृष्टी, ती आहे देवतांची सृष्टी. सतयुगामध्ये देवतांची सृष्टी आहे, तर जरुर मनुष्याची सृष्टी कलियुगामध्ये असेल. आता मनुष्यापासून देवता बनायचे आहे तर जरुर पुरुषोत्तम संगमयुग पण असेल. ते आहेत देवता, हे आहेत मनुष्य. देवता समजदार आहेत. बाबांनीच असे समजदार बनविले आहे. अमर्यादीत सुख असतेच नविन दुनियेमध्ये, आणि अमर्यादीत दु:ख असतेच जुन्या दुनियेमध्ये. देवतांची चित्रे पण तुमच्या समोर आहेत. त्यांची महिमा पण आहे. आजकाल तर 5 तत्वांची पुजा करत आहेत.

आता बाबा तुम्हाला समजावत आहेत कि, तुम्ही आहात पुरुषोत्तम संगमयुगावर. तुमच्यामध्ये पण क्रमवार पुरुषार्थानुसार जाणतात कि, आमचा एक पाय स्वर्गात तर दुसरा पणय नर्कामध्ये आहे. राहता तर येथेच परंतू बुध्दी नविन दुनियेत आहे, आणि जे नविन दुनियेमध्ये घेऊन जात आहेत, त्यांची आठवण करावयाची आहे. बाबांच्या आठवणीनेच तुम्ही पवित्र बनत आहात. हे शिवबाबा समजावत आहेत. शिवजयंती तर जरुर साजरी करतात, परंतू शिवबाबा कधी आले, येऊन काय केले, हे माहित नाही. शिवरात्री साजरी करतात, आणि कृष्ण जयंती पण साजरी करतात, जे शब्द कृष्णासाठी म्हणतात ते शिवबाबासाठी तर म्हणणार नाहीत त्यामुळे त्यांची मग शिवरात्री म्हणतात. अर्थ काही समजत नाहीत. तुम्हा मुलांना तर अर्थ समजावला जात आहे. अनेक दु:ख आहेत कलियुगाच्या अंतामध्ये, मग पुष्कळ सुख, असते सतयुगामध्ये. हे ज्ञान आता तुम्हा मुलांना मिळाले आहे. तुम्ही आदी मध्य अंताला जाणत आहात. जे कल्पापुर्वी शिकले आहात, तेच आता शिकतील, ज्यांनी जो पुरुषार्थ केला आहे तेच करत राहतील आणि तसेच पद पण प्राप्त करतील. तुमच्या बुध्दीमध्ये पूर्ण चक्र आहे. तुम्हीच उंच ते उंच पद प्राप्त करता मग तुम्हीच उतरता पण तसेच. बाबांनी समजावले आहे कि, मनुष्य आत्मे आहेत, माळ आहे ना, सर्व क्रमाकमाने येत आहेत. प्रत्येक कलाकाराला आप-आपली भूमिका मिळाली आहे, कोणत्यावेळी कोणाला कोणती भूमिका वठवयाची आहे. हे अनादि बनलेले विश्वनाटक आहे जे बाबा बसून समजावत आहेत. आता तुम्हाला बाबा जे समजावत आहेत, ते तुमच्या बांधवांना सांगायचे आहे, तुमच्या बुध्दी मध्ये आहे कि, प्रत्येक 5 हजार वर्षानंतर बाबा येऊन आम्हाला समजावत आहेत, आम्ही नंतर, इतर बांधवांना समजावतो. भाऊ भाऊ आत्म्याच्या संबंधात आहे. बाबा सांगतात कि, यावेळी तुम्ही स्वत:ला अशरीरी आत्मा समजा. आत्म्यालाच आपले पित्याची आठवण करावयाची आहे, पावन बनण्यासाठी आत्मा पवित्र बनली तर मग शरीर पण पवित्र मिळेल. आत्मा अपवित्र तर शरीर पण अपवित्र. क्रमवारीनूसार तर असतातच. चेहरे, वागणे एकाचे दुसऱ्यांशी मिळत नाही. क्रमाक्रमाने सर्व आप-आपली भूमिका वटवित आहेत, फरक पडू शकत नाही. नाटकामध्ये तेच दृष्य पाहाल जे काल पाहिले होते. तेच पुर्नरावृत्त होते ना. हे मग अमर्यादीत आणि कालचेच नाटक आहे. काल तुम्हाला समजावले होते. तुम्ही राज्य घेतले मग राज्य घालवले. आज परत समजत आहात. राज्य प्राप्त करण्यासाठी. आज भारत जुना नरक आहे, उद्या नविन स्वर्ग होईल. तुमच्या बुध्दीमध्ये आहे कि, आता आम्ही नविन दुनियेमध्ये जात आहोत. श्रीमतावर श्रेष्ठ बनत आहोत. श्रेष्ठ जरुर श्रेष्ठ सृष्टीवर राहतील. हे लक्ष्मी-नारायण श्रेष्ठ आहेत तर श्रेष्ठ स्वर्गात राहत आहेत. जे भ्रष्ट आहेत ते नरकामध्ये राहत आहेत. हे रहस्य तुम्ही आता समजत आहात. या अमर्यादीत विश्वनाटकाला जर कोणी चांगले प्रकारे समजले, तेव्हा बुध्दीत बसेल. शिवरात्री पण साजरी करतात. परंतू जाणत काही पण नाहीत. तर आता तुम्हा मुलांना ताजेतवाने करावे लागते. तुम्ही मग इतरांना ताजेतवाने करत आहात. आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे, मग सद्गती ला प्राप्त कराल. बाबा सांगतात कि, मी स्वर्गात येत नाही, माझी भुमिकाच आहे. पतित जगाला बदलून पावन जग बनविण्याची तेथे तर तुमच्या जवळ असंख्य खजाना असतो, येथे तर कंगाल आहात, त्यामुळे बाबाला बोलावतात कि, येऊन अमर्यादीत वारसा दया. कल्प कल्प अमर्यादीत वारसा मिळत आहे, मग कंगाल पण होतात. चित्रांवर समजावा तेव्हा समजू शकतील. प्रथम नंबरला लक्ष्मी नारायण मग 84 जन्म घेऊन मनुष्य बनले आहात. हे ज्ञान आता तुम्हा मुलांना मिळाले आहे. तुम्ही जाणता कि, आजपासून 5 हजार वर्षा पूर्वी आदि सनातन देवी देवता धर्म होता, ज्याला वैकूंठ, स्वर्ग, देवतांचे जग पण म्हटले जाते. आता तर म्हणत नाहीत. आता तर आहे आसुरी जग. आसुरी जगाचा शेवट, दैवी जगाच्या आरंभातील आता आहे संगम. या गोष्टी आता तुम्ही समजत आहात, दुसऱ्या कोणाचे मुखातून हे ऐकू शकत नाही. बाबाच येऊन यांचे मुख घेतात. मुख कोणाचे घेतात, समजत नाहीत. बाबाची सवारी कोणावर होते? जसे तुमच्या आत्म्याची तुमच्या शरीरावर सवारी आहे ना. शिवबाबंना स्वत:ची सवारी तर नाही, तर त्यांना मुख जरुर पाहिजे. नाही तर राजयोग कसे शिकवतील? प्रेरणेद्वारे तर शिकणार नाहीत. तर यासर्व गोष्टी ह्दयात ठेवायच्या आहेत. परमात्म्याचे बुध्दीमध्ये हे सारे ज्ञान आहे ना. तुमच्या पण बुध्दीमध्ये हे बसले पाहिजे. हे ज्ञान बुध्दी मध्ये धारण करावयाचे आहे. म्हटले पण जाते कि तुमची बुध्दी ठीक आहे ना? बुध्दी आत्म्यामध्ये आहे ना. आत्मच बुध्दीद्वारे समजते. तुमची पत्थरबुध्दी कोणी बनविली? आता समजता कि, रावणाने आमची बुध्दी काय बनविली आहे. काल तुम्ही विश्वनाटकाला जाणत नव्हता, बुध्दीला एकदम गोदरेजचे कुलूप लागले होते. गॉड अक्षर तर येते ना. बाबा जी बुध्दी देतात ती बदलून पत्थरबुध्दी होऊन जाते. मग बाबा येऊन कुलूप उघडतात. सतयुगामध्ये आहे पारसबुध्दी बाबा येऊन सर्वांचे कल्याण करत आहेत. क्रमाक्रमाने सर्वांची बुध्दी उघडत आहे. मग एक दोघांचे मागे येत राहतात. वर तर कोणी राहत नाही. पतित तेथे राहत नाहीत. बाबा पावन बनवून पावन जगात घेऊन जातात. तेथे सर्व पावन आत्मे राहतात. ती आहे निराकारी सृष्टी.

तुम्हा मुलांना आता सर्व माहित पडले आहे, त्यामुळे आपले घर पण तसे फारच जवळ दिसून येते. तुमचे घराबरोबर फार प्रेम आहे. तुमच्या सारखे प्रेम तर कोणाचे पण नाही आहे. तुमच्यामध्ये पण क्रमवारीचे आहेत, ज्यांचे बाबा बरोबर प्रेम आहे, त्यांचे घराशीपण प्रेम आहे. मुरब्बी मुलं आहेत ना. तुम्ही समजता कि येथे जे चांगला पुरुषार्थ करुन मुरब्बी मुलगा बनतील तेच उंच पद प्राप्त करतील. लहान अथवा मोठे शरीरावर अवलंबून नाही. ज्ञान आणि योगात जे मस्त आहेत, ते मोठे आहेत. काही लहान लहान मुले पण ज्ञान योगामध्ये तीव्र आहेत तर मोठ्यांना शिकवितात. नाही तर नियम आहे मोठे लहानाला शिकवितात. आजकाल तर बुटके पण आहेत. तसे तर सर्व आत्में बुटके आहेत. आत्मा बिंदू आहे. त्यांचे काय वजन करावे, तारा आहे. मनुष्य लोक तारा नाव ऐकून वर पाहतात. तुम्ही तारा नाव ऐकून स्वत:ला पाहता. जमीनीवरील तारे तुम्ही आहात. ते आहेत आकाशातील स्थुल तारे, तुम्ही चैतन्य आहात. त्यांच्यामध्ये तर आदला बदली काही होत नाही, तुम्ही तर 84 जन्म घेत आहात, किती मोठा अभिनय करत आहात. भूमिका वठवत वठवत चमक मंद होऊन जाते. बॅटरी उतरली आहे.नंतर बाबा येऊन निरनिराळ्या प्रकाराने समजावत आहेत, कारण तुमची आत्मा शक्तीहीन झाली आहे. ताकद जी भरलेली होती ती नष्ट झाली आहे. आता परत बाबाद्वारे ताकद भरत आहात. तुम्ही तुमची बॅटरी भरत आहात. यामध्ये माया पण फार विघ्न घालते. बॅटरी भरु देत नाही. तुम्ही चैतन्य बॅटरी आहात. जाणता कि बाबा बरोबर योग लावल्याने आम्ही सतोप्रधान बनू. आता तमोप्रधान बनलो आहोत. ते मर्यादीत शिक्षण आणि या अमर्यादीत शिक्षणामध्ये फार फरक आहे. कसे क्रमाक्रमाने सर्व आत्मे वर जातात, नंतर आपल्या वेळी परत भुमिका करण्यासाठी येतात. सर्वांना आपली अविनाशी भुमिका मिळाली आहे. तुम्ही ही 84 जन्माची भुमिका अनेक वेळा केली आहे. तुमची बॅटरी किती वेळा, उतरली आणि भरली आहे. जेव्हा आता जाणले आहे कि आमची बॅटरी उतरली आहे, तर मग भरण्यासाठी उशीर का केला पाहिजे? परंतू माया बॅटरी भरु देत नाही. माया बॅटरी भरण्यासाठी तुम्हाला विसरवते. वारंवार बॅटरी उतरवते. प्रयत्न करता बाबाची आठवण करण्याची परंतू करु शकत नाही. तुमच्यामध्ये बॅटरी भरुन कोणी सतोप्रधान पर्यत जातात, त्यांचेकडून पण कधी कधी माया चुका करुन, बॅटरी उतरवून टाकते. असे शेवटापर्यंत होत राहते. नंतर जेव्हा युध्दाचा शेवट होईल, तर सर्व नष्ट होऊन जाईल, मग ज्यांची जेवढी बॅटरी भरलेली आहे, त्यानूसार पद प्राप्त कराल. सर्व आत्मे बाबची मुलं आहेत, बाबच येऊन सर्वांची बॅटरी भरत आहेत. खेळ कसा आश्चर्यजनक बनलेला आहे. बाबा बरोबर योग लावणे वारंवार हरतात, त्यामुळे किती नुकसान होते. योग लागत राहावा यासाठी पुरुषार्थ केला जात आहे. पुरुषार्थ करुन करुन लावून परत समाप्त होतो, तर मग क्रमाने पुरुषार्थानुसार तुमची भूमिका पुर्ण होते. जसे कल्प कल्प होत आली आहे. आत्म्याची माळ बनत राहते. तुम्ही मुले जाणता कि, रुद्राची माळ आहे, विष्णूची पण माळ आहे. प्रथम क्रमांकाला तर रुद्राची माळ ठेवतात ना. बाबा देवी दुनिया निर्माण करत आहेत. जशी रुद्रमाळा आहे, तशीच रुण्ड माळा आहे. ब्राह्मणंची माळा आता बनू शकत नाही, आदला बदली होत आहे. शेवटी बनेल जेव्हा रुद्र माळा बनते. ही ब्राह्मणाची पण माळ आहे, परंतू यावेळी बनत नाही. वास्तवात प्रजापिता ब्रह्माची सर्व संतान आहेत. शिवबाबाच्या मुलांची पण माळ आहे, विष्णूची पण माळ आहे. तुम्ही ब्राह्मण बनता, तर ब्रह्मा आणि शिवाची पण माळ पाहिजे. हे सारे ज्ञान तुमच्या बुध्दीत नंबरवार आहे. ऐकतात तर सर्वच, परंतू कोणाचे त्याचवेळीच कानातून निघून जाते. ऐकतच नाहीत. कोणी तर अभ्यासच करत नाहीत, त्यांना तर माहित नाही कि, भगवान शिकविण्यासाठी आले आहेत. शिकतच नाहीत, हे शिक्षण तर किती आनंदाने शिकले पाहिजे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आठवणीच्या यात्रेद्वारे आत्मा रुपी बॅटरी भरुन, सतोप्रधान पर्यंत पोहचायचे आहे. अशी कोणती चुक करायची नाही, ज्यामुळे बॅटरी एकदम उतरुन जाईल.

2. हुशार मुलगा बनण्यासाठी बाबा बरोबर घराशी पण प्रेम ठेवा. ज्ञान आणि योगात मस्त बनायचे आहे. बाबा जे सांगत आहेत ते आपल्या बांधवांना पण सांगायचे आहे.

वरदान:-
सेवेमध्ये राहून संपूर्णतेच्या जवळची अनुभूती करणारे ब्रह्मा बाबसारखे उदाहरण बना

जसे ब्रह्मा बाबा सेवेमध्ये राहून, समाचार ऐकतांना, एकांतवासी बनत होते. एका तासाचा समाचार पाच मिनिटात सार समजून मुलांना खुश करुन, आपल्या अंर्तमुख, एकांतवासी स्थितीचा अनुभव करुन देत होते. तसे बाबाचे अनुकरण करा. ब्रह्मा बाबा ने कधी म्हटले नाही कि, मी फार व्यस्त आहे, मुलांचे समोर उदाहरण बनले. आता वेळेनूसार या अभ्यासाची आवश्यकता आहे. मनातून लगन असेल तर वेळ मिळेल आणि अनेकांसाठी उदाहरण बनाल.

बोधवाक्य:-
प्रत्येक कर्मामध्ये-कर्म आणि योगाचा अनुभव होणेच कर्मयोग आहे.