01-09-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   21.01.1985   ओम शान्ति   मधुबन


“ईश्वरीय जन्म दिवसाचे सुर्वण बक्षिस-दिव्य बुद्धी”
 


आज विश्व रचनाकार बाबा आपल्या दुनियेतील दिपकांना पाहत आहे. तुम्ही श्रेष्ठ आत्मे दुनियेचे तारे आहात अर्थात दुनियेसाठी ज्ञानाचा प्रकाश आहात. जसे डोळ्यातील प्रकाश नाही तर संसार नाही, प्रकाश नाही तर अंधकारामुळे दुनियाच नाही. जर तुम्ही दिपक नाहीत तर दुनियामध्ये प्रकाश नाही. तुम्हा दिपकामुळे संसार आहे. तर बापदादा आपल्या संसारातील दिपकांना मुलांना पाहत आहेत. अशा मुलांची महिमा सदा गायन केली जाते, आणि पुजन पण होते. अशी मुलंच विश्वाच्या राज्य भाग्याचे अधिकारी बनतात. बापदादा प्रत्येक ब्राह्मण मुलांला जन्म घेताच दिव्य जन्म दिवसाची दिव्य दोन बक्षिस देत आहेत. दुनियेमध्ये मनुष्य आत्मे मनुष्य आत्म्यांना बक्षिस देतात परंतू ब्राह्मण मुलांना स्वत: बाबा दिव्य बक्षिस या संगमयुगावरती देतात, काय देतात? एक दिव्य बुध्दी आणि दुसरे दिव्य नेत्र अर्थात आत्मिक दृष्टी. ही दोन बक्षिस प्रत्येक ब्राह्मण मुलांना जन्म दिवसाची भेट वस्तू आहे. या दोन्ही बक्षिसांना नेहमी सोबत ठेवत यांच्याद्वारे सदा सफलता स्वरुप राहतात. दिव्य बुध्दीच प्रत्येक मुलांना दिव्य ज्ञान, दिव्य आठवण, दिव्य धारणा स्वरुप बनवते. दिव्य बुध्दीच धारणा करण्यासाठी विशेष बक्षिस आहे. तर दिव्य बुध्दी नेहमी आहे अर्थात धारणा स्वरुप आहेत. दिव्य बुध्दीमध्ये अर्थात सतोप्रधान सुर्वण बुध्दीमध्ये जरा पण रजो तमोचा प्रभाव पडतो तर धारणा स्वरुपाच्या ऐवजी मायेच्या प्रभावामध्ये येतात, म्हणून प्रत्येक गोष्ट कठीण अनुभव होते. सहज बक्षिसाच्या रुपामध्ये प्राप्त झालेली दिव्य बुध्दी कमजोर झाल्यामुळे कष्टाचा अनुभव होतो. जेव्हा पण कष्टाचा अनुभव करता तर आवश्य दिव्य बुध्दीद्वारे प्रभावित आहे. तेव्हा असा अनुभव होतो. दिव्य बुध्दीद्वारे सेकंदामध्ये बापदादांची श्रीमत धारण करुन, सदा समर्थ, सदा अचल, सदा मास्टर सर्वशक्तीवान स्थितीचा अनुभव होतो. श्रीमत म्हणजे श्रेष्ठ बनवणारी मत, ते कधी कष्टाचा अनुभव करत नाहीत. श्रीमत नेहमी सहज हल्के बनवणारी आहे. परंतू धारण करण्यासाठी दिव्य बुध्दी जरुर पाहिजे. तर तपासून पहा की आपल्या जन्माची भेट वस्तू नेहमी सोबत आहे? कधी माया आपले बनवून दिव्य बुध्दीचे बक्षिस तर हिसकावून घेत नाही. कधी मायेच्या प्रभावाद्वारे भोळे तर बनत नाही, ज्यामुळे परमात्म बक्षिस पण वाया जाईल. मायेला पण ईश्वरीय बक्षिसाला आपले बनवण्याची कला अवगत आहे. तर माया स्वत: चतुर बनते आणि तुम्हाला भोळे बनवते. कारण भोळेनाथ पित्याची भोळी मुल खुशाल बना, परंतू मायेचे भोळे बनू नका. मायेचे भोळे बनणे म्हणजे विसराळू बनणे. ईश्वरीय दिव्य बुध्दीचे बक्षिस सदा छत्रछाया आहे आणि माया आपली सावली घालते. छत्र उडून जाते, छाया राहते म्हणून तपासून पहा की बाबांची भेटवस्तू, बक्षिस नेहमी कायम आहे? दिव्य बुध्दीची लक्षणे बक्षिस, लिफ्ट चे कार्य करते. जे श्रेष्ठ संकल्प रुपी बटन चालू केले. तर त्या स्थितीमध्ये सेकंदामध्ये स्थिर झाले. जर दिव्य बुध्दीच्या मध्ये मायेची सावली आहे, तर हे बक्षिसच कार्य लिफ्ट करत नाही. जसे लिफ्ट खराब होते तर काय हाल होतात. न वरती न खाली मध्येच लटकतात. शानच्या ऐवजी परेशान दु:खी होतात. किती पण बटण दाबले तरी लक्ष्यापर्यंत पोहचू शकत नाही. तर हे बक्षिस रुपी लिफ्ट खराब करतात म्हणून कष्ट रुपी सिढी चढावी लागते. परत काय म्हणतात? हिम्मत रुपी पाय चालू शकत नाहीत, थकतात. तर सहजला कठीण कोणी बनवले आणि कसे बनवले? स्वत:ला आळसी बनवले. मायेच्या सावलीमुळे सेकंदाची सहज गोष्ट कष्टाच्या अनुभव करवते. दिव्य बुध्दीचे बक्षिस अलौकिक विमान आहे. ज्या दिव्य विमानाद्वारे सेकंदामध्ये बटन चालू केल्यामुळे कुठे पण पोहचू शकतात. संकल्प आहे बटन. वैज्ञानिक तर एका लोकांची सहल करु शकतात. तुम्ही तर तिन्ही लोकांची सहल करु शकतात. सेकंदामध्ये विश्व कल्याणकारी स्वरुप बनून प्रकाश आणि शक्ती देऊ शकतात. फक्त दिव्य बुध्दीच्या विमानाद्वारे उच्च स्थितीमध्ये जावा. जसे त्यांनी विमानाद्वारे हिमालयावरती पण राख टाकली, नदीमध्ये टाकली, कशासाठी? चोहोबाजूला पसरविण्यासाठी. त्यांनी तर राख टाकली. तुम्ही दिव्य बुध्दी रुपी विमानाद्वारे सर्वांत उच्च स्थितीमध्ये स्थिर होऊन, विश्वाच्या सर्व आत्म्याप्रती प्रकाश आणि शक्तीची शुभ भावना श्रेष्ठ इच्छाच्या सहयोगाची लाट पसरवा. विमान तर शक्तीशाली आहे ना? फक्त उपयोगात आणायला पाहिजे.

बापदादाच्या अती शुध्द, श्रेष्ठ मताचे साधन पाहिजे. जसे आजकाल शुध्द नाही तर अति शुध्द पाहिजे. तर बापदादाचे हे डबल शुध्द साधन आहे. जरा पण मनमत परमताचा कचरा असेल तर काय होईल? तर हे तपासून पहा दिव्य बुध्दी रुपी विमानामध्ये नेहमी डबल शुध्द पेट्रोल साधन आहे? मध्येच कचरा तर येत नाही ना. नाही तर हे विमान नेहमी सुखदाई आहे. जसे सतयुगामध्ये कधी कसलाही अपघात होत नाही. कारण तुमच्या श्रेष्ठ कर्माचे श्रेष्ठ प्रारब्ध आहे. असे कोणते कर्म होत नाही जे कर्म भोगाच्या हिशेबामुळे दु:ख भोगावे लागेल. असे संगमयुगी ईश्वरीय बक्षिस दिव्य बुध्दी, सर्व प्रकारच्या दु:ख आणि धोक्यापासून मुक्त आहे. दिव्य बुध्दीमुळे कधी धोक्यामध्ये येऊ शकत नाहीत, दु:खाची अनुभूती करु शकत नाहीत. नेहमीच सुरक्षित आहेत. संकटापासून मुक्त आहात म्हणून या ईश्वरीय भेट वस्तूचे महत्व ओळखून, बक्षिसाला नेहमी सोबत ठेवा, समजले. या बक्षिसाचे महत्त्व? बक्षिस सर्वांना मिळाले आहे की कोणाला राहिले आहे? सर्वांना मिळाले आहे ना. फक्त सांभाळायला येते की नाही हे प्रत्येकाच्यावरती आहे. नेहमी अमृतवेळेला चेक करा, कोणतीही कमी असेल तर अमृतवेळेला ठिक करा तर सर्व दिवस शक्तीशाली राहिल. जर स्वत: ठीक करत नाही तर दुसऱ्याकडून समजून घ्या. परंतू अमृतवेळेला ठीक करा. अच्छा दिव्य दृष्टीची गोष्ट परत सांगेन. दिव्य दृष्टी म्हणा, दिव्य नेत्र म्हणा, आत्मिक प्रकाश म्हणा, एकच गोष्ट आहे. यावेळेत तर दिव्य बुध्दीचे बक्षिस सर्वांच्याकडे आहे ना. सोन्याचे भांडे आहात ना. हीच दिव्य बुध्दी आहे. मधुबनमध्ये दिव्य बुध्दी रुपी संपुर्ण सोन्याचे पात्र घेऊन आले आहात ना. खऱ्या सोन्यामध्ये चांदी किंवा तांबे तर मिक्स नाही ना. सतोप्रधान अर्थात खरे सोने, यालाच दिव्य बुध्दी म्हणले जाते. अच्छा, कोठून ही आले आहात, सर्व बाजूने ज्ञान नद्या ज्ञान सागरात मिसळण्यासाठी आल्या आहात. नदी आणि सागराचा मेळा आहे. महान मेळा साजरा करण्यासाठी आले आहात ना. मिलन मेला साजरा करण्यासाठी आले आहात. बापदादा पण सर्व ज्ञान नद्यांना पाहुन हर्षित होतात की, कसे उमंग उत्साहाने, कोठून कोठून मिलन करण्यासाठी पोहचले आहात. नेहमी दिव्य बुध्दीचे सुर्वण बक्षिस कामकाजामध्ये वापरणारे, सदा बाप समान, चतुर सुजान बनून मायेची चतुराई ओळखणारे, सदा बाबांच्या छत्रछायेमध्ये राहणारे, सदा ज्ञान सागरासोबत मेळा साजरा करणारे, कठीण परिस्थितीला सहज बनवणारे, विश्व कल्याणकारी, श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित राहणारे, श्रेष्ठ आत्म्यांना बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि नमस्ते.

व्यक्तीगत वार्तालाप :-
1. दृष्टी परिवर्तन केल्यामुळे सृष्टी परिवर्तीत झाली ना. दृष्टी श्रेष्ठ झाली तर सृष्टी पण श्रेष्ठ झाली. आता सृष्टीच बाबा आहे, बाबामध्येच सृष्टी सामावलेली आहे. असाच अनुभव होतो ना. जिथे पण पहा ऐका तर बाबांच्या सोबत अनुभव होतो ना. असे स्नेही साऱ्या विश्वामध्ये कोणी होऊ शकत नाही, जे प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पामध्ये सोबत देईल. लौकिक मध्ये कोणी किती ही स्नेही असेल परंतू नेहमीच सोबत देऊ शकणार नाही. हे तर स्वप्नामध्ये पण सोबत देतो. असा साथ देणारा सोबती मिळाला आहे, म्हणून सृष्टी परिवर्तन झाली. आता लौकिकला अलौकिक मध्ये अनुभव करता ना. लौकिकमध्ये जे पण संबंध पाहतात. तर खरा संबंध स्वत: स्मृतीमध्ये येतो, यामुळे त्या आत्म्यांना पण शक्ती मिळते. जेव्हा बाबा नेहमी सोबत आहेत तर बेफिक्र बादशहा आहत. ठीक होईल की नाही, हा पण विचार करण्याची गरज नाही. जेव्हा बाबा सोबत आहेत तर सर्व ठीकच ठीक आहे. तर सोबतचा अनुभव करत प्रगती करत राहा. विचार करणे पण बाबांचे काम आहे. आपले काम आहे. त्यांच्या आठवणीमध्ये मगन राहणे, परत कमजोर विचार पण समाप्त होतात. सदा बेफिक्र बादशहा राहा, आता पण बादशहा आणि नेहमी साठी पण बादशहा.

2. नेहमी स्वत:ला सफलताचे तारे समजा आणि दुसऱ्या आत्म्याला पण सफलताची चावी देत राहा. या सेवेमुळे सर्व आत्मे खुश होऊन, तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील. बाबा आणि सर्वांचे आशीर्वादच पुढे घेऊन जातात.

विशेष निवडक अव्यक्त महावाक्य :-
सहयोगी बना आणि सहयोगी बनवा. जसे प्रजा राजाची सहयोगी स्नेही असते, असेच प्रथम तुमच्या या सर्व कर्मइंद्रिया, विशेष शक्ती सदा स्नेही, सहयोगी राहतील तेव्हाच त्याचा प्रभाव सेवा साथी किंवा लौकिक संबंधी, सोबत्यावरती पडेल. जेव्हा स्वत: आपल्या सर्व कर्मइंद्रियांना आदेशामध्ये ठेवाल तर तुमचे सर्व सोबती तुमच्या कार्यामध्ये सहयोगी बनतील. ज्यांच्याशी स्नेह असतो, त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये सहयोगी जरुर बनतात. अती स्नेही आत्म्याची लक्षणे सदा बाबांच्या श्रेष्ठ कार्यामध्ये सहयोगी बनतील. जितके सहयोगी, तितके सहजयोगी. तर दिवस रात्र हीच लगन राहावी, बाबा आणि सेवा, याशिवाय काहीच नाही. ते मायेचे सहयोगी होऊ शकत नाही, मायेशी किनारा सहज होतो.

स्वत:ला कोणी किती पण वेगळ्या रस्त्याचे मानतील परंतू ईश्वरीय स्नेह, सहयोगी बनवून “आप आपसात एक आहात” पुढे जाण्यासाठीच्या सुत्रामध्ये बांधतात. स्नेह प्रथम सहयोगी बनवतो, सहयोगी बनवत बनवत स्वत:च वेळेवरती सहयोगी बनवतो. ईश्वरीय स्नेह, परिवर्तनाचा पाया आहे किंवा जीवन परिवर्तनाचे बीज स्वरुप आहे. ज्या आत्म्यामध्ये ईश्वरीय स्नेहाच्या अनुभूतीचे बीज पडते, तर हे बीज सहयोगी बनण्याचा वृक्ष स्वत:च तयार करत राहतो आणि वेळेवर सहजयोगी बनण्याचे फळ दिसून येईल कारण परिवर्तनाचे बीज फळ जरुर दाखवते. सर्वांच्या मनातील शुभ भावना आणि शुभ कामनाची सहयोग कोणत्या पण कार्यामध्ये सफलता प्राप्त करुन देतो, कारण ही शुभ भावना, शुभ कामनाचा किल्ला आत्म्याला परिवर्तन करवतो. वातावरणाचा किल्ला सर्वांच्या सहयोगाद्वारेच बनतो. ईश्वरीय स्नेहाचे सुत्र जर एक असेल तर अनेकताचे विचार असताना पण सहयोगी बनण्याचा विचार उत्पन्न होतो. आता सर्व सत्तेला सहयोगी बनवा. बनवत पण आहात परंतू आणखी जवळ, सहयोगी बनवत चला कारण आता प्रत्यक्षतेची वेळ जवळ येत आहे. प्रथम तुम्ही त्यांना सहयोगी बनवण्याचे कष्ट घेत होते परंतू आता तेच स्वत: सहयोगी बनवण्याचे निमंत्रण देत आहेत आणि पुढे चालून पण करत राहतील.

वेळेनूसार, दिवसेंदिवस सेवेची रुपरेखा बदलत आहे आणि बदलत राहिल. आता तुम्हा लोकांना जास्त बोलण्याची आवश्यकता पडणार नाही. परंतू ते स्वत:च म्हणतील की, हे कार्य श्रेष्ठ आहे म्हणून आम्हाला पण सहयोगी बनायलाच पाहिजे. जे खऱ्या मनापासून स्नेहाने सहयोग देतात, ते पदम गुणा बाबापासून सहयोग घेण्याचे अधिकारी बनतात. बाबा सहयोगाचा पुर्णपणे मोबदला देतात. मोठ्या कार्याला पण सहज करण्याचे चित्र पर्वताला पण करंगळी देत असताना दाखवले आहे, ही सहयोगाची लक्षणे आहेत. तर प्रत्येक जण सहयोगी बनून समोर यावेत, वेळेवर सहयोगी बनावे, आता त्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शक्तीशाली बाण लावावा लागेल. शक्तीशाली बाण तोच असतो, ज्यामध्ये सर्व आत्म्याच्या सहयोगाची भावना असते, खुशीच भावना, सद्भावना असते. अच्छा. ओमशांती.

वरदान:-
स्नेह आणि नविनतेच्या अधिकाराद्वारे समर्पित करवणारे महान आत्मा भव

जे पण संपर्कामध्ये आले आहेत, त्यांना अशा संबंधामध्ये आणा, जे संबंधामध्ये येत येत समर्पण बुध्दी होतील आणि म्हणतील, जे शिव पित्याने सांगितले तेच सत्य आहे, त्यालाच समर्पण बुध्दी म्हणतात. परत त्यांचे प्रश्न समाप्त होतील. फक्त हे नाही म्हणनार यांचे ज्ञान चांगले आहे, परंतू हे नविन ज्ञान आहे, जी नविन दुनिया आणेल, हा आवाज जेव्हा होईल तेव्हा कुंभकर्ण जागृत होतील. तर नविनतेच्या महानते द्वारा स्नेह आणि अधिकाराच्या संतुलनामुळे असे समर्पित करवा तेव्हाच म्हणतील माइक तयार झाले.

सुविचार:-
एक परमात्माचे प्रिय बना तर विश्वाचे प्रिय बनाल...!