02-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, हा आश्चर्य कारक सतसंग आहे, जिथे तुम्हाला जिवंत पणी मरणे शिकवतात, जिवंतपणी मरणारेच हंस बनतात...”

प्रश्न:-
तुम्हा मुलांना आता कोणती एक काळजी आहे?

उत्तर:-
आम्हाला विनाशाच्या पुर्वी संपन्न बनायचे आहे. जी मुलं ज्ञान आणि योगामध्ये मजबूत होतात, त्यांना मनुष्याला देवता बनवण्याचा छंद लागतो. ते सेवेशिवाय राहू शकत नाहीत. जिन्न सारखे राहतील. सेवेच्या सोबत स्वत:ला संपन्न बनवण्याची चिंता राहते.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजवत आहेत, आत्मा आता शरीरामध्ये आहे, परत प्रजापिता ब्रह्माची संतान आहे कारण दत्तक घेतले आहेत. तुमच्या साठी म्हणतात हे भाऊ बहिण बनवतात. मुलांना बाबांनी समजवले आहे, वास्तवमध्ये तुम्ही आत्मा भाऊ भाऊ आहात. आता नविन सृष्टी होते तर प्रथम श्रेष्ठ ब्राह्मण पाहिजेत. तुम्ही क्षुद्र होते, आता परिवर्तन झाले आहात. ब्राह्मण पण जरुर पाहिजेत. प्रजापिता ब्रह्माचे नाव तर प्रसिध्द आहे. यामुळे तुम्ही समजता आम्ही सर्व मुलं भाऊ बहिण झाले. जे पण स्वत:ला ब्रह्माकुमार कुमारी म्हणतात ते जरुर भाऊ बहिण झाले. सर्व प्रजापिता ब्रह्माची संतान आहेत. तर भाऊ बहिण जरुर असायला पाहिजेत. हे बेसमज लोकांना समजून सांगायचे आहे. बेसमज पण आहेत आणि परत अंधश्रध्दा पण आहे. ज्यांची पुजा करतात, विश्वास ठेवतात, हा अमका व्यक्ती आहे, परंतू त्यांना जाणत काहीच नाहीत. लक्ष्मी नारायण ची पुजा करतात परंतू ते कधी आले कसे बनले, परत कोठे गेले? कोणीच जाणत नाहीत. कोणी पण मनुष्य नेहरु इ. ला जाणतात तर त्यांच्या इतिहास भुगोलाची सर्वांना माहिती आहे. जर आत्म चरित्राला जाणत नाहीत तर ते काय कामाचे? पुजा करतात, परंतू त्यांची जीवन कहानी जाणत नाहीत. मनुष्यांची जीवन कहानी ला जाणतात परंतू जे मोठे भुतकाळात होऊन गेले, त्यांच्यापैकी एकाची पण जीवन कहानीला जाणत नाहीत. शिवाचे किती पुजारी आहेत. पुजा करतात, परत मुखाद्वारे म्हणतात दगड धोंड्यात, कण कणामध्ये आहेत. काय ही जीवन कहानी झाली? ही तर अकलेची गोष्ट झाली नाही. स्वत:ला पतित म्हणतात, हे अक्षर अगदी बरोबर आहे. पतित म्हणजे विकारी. तुम्ही समजाऊ शकतात, आम्हाला ब्रह्माकुमार-कुमारी का म्हणतात? कारण ब्रह्माची संतान आणि दत्तक घेतलेले आहेत. आम्ही कुख वंशावळ नसून मुख वंशावळ आहोत. ब्राह्मण ब्राह्मणी तर भाऊ बहिण झाले. तर त्यांची आप आपसात विकारी दृष्टी होऊ शकत नाही. मुख्यत काम विकाराचेच खराब विचार असतात. पण पक्के आहे. दुनियेला काहीच माहिती नाही. असेच फक्त म्हणतात. तुम्ही समजाऊ शकता की सर्व आत्म्याचे पिता ते एकच आहेत. त्यांना सर्व बोलवतात. तुम्ही चित्र पण दाखवले आहेत. मोठ मोठे धर्माचे पण या निराकार पित्याला मानतात. ते निराकार आत्म्याचे पिता आणि परत साकार मध्ये सर्वांचे पिता प्रजापिता ब्रह्मा आहेत, ज्यांच्यामुळे परत वृध्दी होत राहते, झाड वाढत जाते. वेगवेगळ्या धर्मामध्ये येत राहतात. आत्मा तर या शरीरापासून वेगळी आहे. शरीराला पाहुन म्हणतात ही अमेरिकन आहे, हा अमका आहे. आत्म्याला तर जाणत नाहीत. आत्मे सर्व शांतीधाममध्ये राहतात. तेथून भुमिका करण्यासाठी येतात. तुम्ही कोणत्या पण धर्माच्या आत्म्यांना सांगा, पुनर्जन्म तर सर्व घेतात आणि वरुन पण नविन आत्मे येत राहतात. तर बाबा समजवतात, तुम्ही पण मनुष्य आहात. मनुष्यलाच सृष्टीच्या आदी मध्य अंतची माहिती पाहिजे की, हे सृष्टी चक्र कसे फिरते, यांचा रचनाकार कोण आहे, किती वेळ फिरण्यासाठी लागतो? हे तुम्हीच जाणता, देवता तर जाणत नाहीत. मनुष्यच जाणून परत देवता बनतात. मनुष्याला देवता बनवणारे बाबाच आहेत. बाबा आपला आणि रचनेचा परिचय देतात. तुम्ही जाणतात आम्ही बीजरुप बाबांची बीजरुप मुल आहोत. जसे बाबा या उल्ट्या वृक्षाला जाणतात, तसेच आम्ही पण जाणले आहे. मनुष्य मनुष्याला कधी हे समजाऊ शकत नाही. परंतू तुम्हाला बाबांनी समजवले आहे.

जो पर्यंत तुम्ही ब्रह्माची मुलं बनले नाही तो पर्यंत येथे येऊ शकत नाही. जो पर्यंत पुर्ण कोर्स घेऊन समजत नाहीत तो पर्यंत तुम्हा ब्राह्मणांच्या सभामध्ये कसे बसू शकतात? याला इंद्र सभा पण म्हणतात. इंद्र काही पाऊस पाडत नाहीत. इंद्र सभा म्हणतात. परी पण तुम्हालाच बनायचे आहे. अनेक प्रकारच्या पऱ्या असतात. काही मुलं शोभवान असतात तर म्हणतात, परी सारखे आहेत. पाऊडर इ. लावून सुंदर बनतात. सतयुगामध्ये तुम्ही परी राजुकार बनतात. आता तुम्ही ज्ञान सागरामध्ये ज्ञान स्नान केल्यामुळे परी, देवी देवता बनतात. तुम्ही जाणतात, आम्ही किती श्रेष्ठ बनत आहोत. जे नेहमी पवित्र पिता आहेत ते नेहमी सुंदर आहेत, ते प्रवासी तुम्हाला सुंदर पवित्र बनवण्यासाठी पवित्र तनामध्ये प्रवेश करतात. आता गोरे म्हणजे पवित्र कोण बनवेल? बाबांनाच बनवावे लागेल सृष्टी चक्राला तर फिरावे लागेल. आता तुम्हाला गोरा बनायचे आहे. शिकवणारे ज्ञान सागर एकच पिता आहेत. ज्ञानाचे सागर प्रेमाचे सागर एकच पिता आहेत. त्या पित्याची जी महिमा गायन केली जाते, ती महिमा शारीरिक पित्याची थोडीच केली जाऊ शकते. बेहदच्या पित्याचीच महिमा आहे. त्यांनाच सर्वजण बोलवतात की, आम्हाला गुणवान बनवण्यासाठी या. आता तुम्ही बनत आहात ना, नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे. अभ्यासामध्ये सर्व एकरस नसतात. रात्रंदिवसाचा फरक आहे. तुमच्याकडे ज्ञान घेण्यासाठी खुप येतील. ब्राह्मण जरुर बनायचे आहे. परत कोणी चांगल्या रितीने शिकतात, कोणी कमी. जे अभ्यासामध्ये सर्वांत हुशार असतील, ते दुसऱ्यांना पण शिकवू शकतील. तुम्ही समजाऊ शकता, इतके कॉलेज सुरु होत राहतात. बाबा पण म्हणतात, कॉलेज असे बनवा, ज्यामध्ये रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंतचे ज्ञान सहज समजतील. बाबा भारतातच येतात आणि हे अध्यात्मिक महाविद्यालय उघडत राहतात. पुढे चालून विदेशात पण असे कॉलेज, महाविद्यालय उघडतील. अनेक महाविद्यालय, विद्यापीठ पाहिजेत. जेथे अनेक जन येऊन शिकतील परत जेव्हा शिक्षण पुर्ण होईल तेव्हा देवी देवता धर्मामध्ये सर्व परिवर्तीत होतील अर्थात मनुष्यापासून देवता बनतील. तुम्ही मनुष्यापासून देवता बनतात ना. गायन पण आहे मनुष्यापासूनच देवता बनतात, येथे मनुष्यांची दुनिया आहे, ती देवतांची दुनिया आहे. देवता आणि मनुष्यामध्ये रात्रंदिवसांचा फरक आहे. दिवसा देवता तर रात्री मध्ये मनुष्य असतात. सर्व भक्तच भक्त आहेत, पुजारी आहेत. आता तुम्ही पुजारी पासून पुज्य बनतात. सतयुगामध्ये ग्रंथ भक्तीचे नाव नसते. तेथे सर्व देवता असतात. मनुष्य भक्त आहेत. मनुष्यच परत देवता बनतात. ती दैवी दुनिया आहे, या दुनियेला आसुरी दुनिया म्हणले जाते. राम राज्य आणि रावण राज्य म्हणले जाते. यापुर्वी तुमच्या बुध्दीमध्ये थोडेच होते की रावण राज्य कशाला म्हणले जाते? रावण राज्य कधी आले? काहीच माहिती नाही. समुद्रामध्ये लंका बुडाली असे म्हणतात, परत द्वारका समुद्रामधून वरती आली असे पण म्हणतात. आता तुम्ही जाणत आहत ही लंका, दुनिया सर्व बुडणार आहे. सारी दुनिया बेहदची लंका आहे. ही सर्व बुडणार आहे, पाणी येईल. बाकी सर्व काही बुडणार नाही. खुप धन होते. बाबांनी समजवले आहे, एकाच सोमनाथ मंदिरला मुसलमानांनी अनेक वेळेस लुटले. आता पहा, काहीच राहिले नाही. भारतामध्ये खुप धन होते. भारतालाच स्वर्ग म्हणले जाते. आता स्वर्ग कुठे आहे? आता तर नर्क आहे, परत स्वर्ग बनेल. स्वर्ग कोण, रावण कोण बनवते? हे पण तुम्ही जाणले आहे. रावण राज्य किती वेळ चालते, ते पण स्पष्ट केले आहे. रावण राज्यामध्ये अनेक धर्म आहेत. रामराज्यामध्ये तर फक्त सुर्यवंशी चंद्रवंशी राहतात. आता तुम्ही शिकत आहात. हा अभ्यास, शिक्षण दुसऱ्या कोणाच्या बुध्दीमध्ये नाही. ते तर रावण राज्यच आहे. रामराज्य सतयुगामध्ये असते. बाबा म्हणतात? कारण पतित बनतात. देवतांच्या लायकीची महिमा आणि स्वत:च्या न लायकीची महिमा गातात.

बाबा समजवतात, तुम्ही जेव्हा पुज्य होते तर नविन दुनिया होती. खुप थोडे मनुष्य होते. साऱ्या विश्वाचे तुम्ही मालक होते. आता तुम्हाला खुप खुशी व्हायला पाहिजे. भाऊ बहिण तर बनतात ना. ते म्हणतात हे घरदार सोडवतात. तेच परत जेव्हा राजयोगाचे शिक्षण घेतात तर म्हणतात, हे ज्ञान तर खुपच चांगले आहे. अर्थ समजतात ना. भाऊ बहिण पवित्रतेशिवाय कसे शक्य आहे. संपूर्ण आधार पवित्रतेवरती आहे. बाबा मगघ देशामध्येच येतात, जो खुप पतित झाला आहे, खान पान पण खराब आहे. बाबा म्हणतात मी अनेक जन्मांच्या अंतिम शरीरामध्ये प्रवेश करतो. हेच 84 जन्म घेतात. शेवटून प्रथम येतात, परत प्रथम पासून शेवटी येतात. (लास्ट सो फर्स्ट, परत फर्स्ट सो लास्ट) उदाहरण तर एकाचे सांगतील ना. तुमचे घराणे बनत आहे. जितके चांगल्यारितीने समजत जातील, परत तुमच्याकडे खुप येतील. आता हे लहान झाड आहे. वादळ पण खुप येतात. सतयुगामध्ये वादळ परिस्थितीची गोष्टच नाही. परमधाम मधून नवनविन आत्मे येत राहतात. येथे वादळ लागतात परत खाली पडतात, अधोगती होत राहते. स्वर्गात तर मायेचे वादळच नसते. येथे तर बसल्या बसल्या मरतात आणि परत तुमचे मायेच्या सोबत युध्द आहे, ती पण त्रास देत राहते. सतयुगामध्ये असे होत नाही. दुसऱ्या कोणत्या धर्मामध्ये अशा गोष्टी होत नाहीत. रावण राज्य आणि राम राज्याला कोणी समजत नाहीत. जरी सतसंगामध्ये जात राहतात, तेथे मरणे जगणेची गोष्टच नसते. येथे तर मुलं दत्तक घेतली जातात. आम्ही शिवबाबांची मुलं आहोत, त्यांच्यापासून वारसा घेतो. वारसा घेत घेत खाली पडतात तर वारसा पण नष्ट होतो. हंस बनता बनता बगळा बनतात. तरीही बाबा दयाळू आहेत, तर समजवत राहातात. काही परत सुधारतात. जे स्थिर राहतात, पक्के होतात त्यांना महावीर हनुमान म्हणतात. तुम्ही महावीर महावीरणी आहात. नंबरवार तर आहेत ना. सर्वांत मोठ्या पहिलवानाला महावीर म्हणतात. आदी देवाला पण महावीर म्हणतात, ज्या द्वारेच हे महावीर तयार होतात, जे विश्वावरती राज्य करतात. नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे रावणावरती विजय मिळवण्यासाठी पुरुषार्थ करत राहतात. रावणमध्ये 5 विकार आहेत. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. आता तुमच्या बुध्दीचे कुलुप बाबा उघडतात, परत कुलुप एकदम बंद होते. येथे पण असेच आहे, ज्यांचे बुध्दी रुपी कुलूप उघडते ते सेवा करत राहतात. बाबा म्हणतात जाऊन सेवा करा. जे विकार रुपी गटरमध्ये पडले आहेत त्यांना, बाहेर काढा. असे ही नाही की, तुम्ही पण विकार रुपी गटरमध्ये पडा. तुम्ही पण बाहेर या आणि दुसऱ्यांना पण विकारापासून सोडवा. विषय वैतरणी नदीमध्ये अपरमअपार दु:ख आहे. आता अपरम अपार सुखामध्ये जायचे आहे. जे अपरम अपार सुख देतात, त्यांची महिमा केली जाते. रावण जे दु:ख देतात, त्यांची महिमा काय कराल? रावणाला असुर म्हणले जाते. बाबा म्हणतात, तुम्ही रावण राज्यामध्ये होते. आता अपार सुख मिळवण्यासाठी तुम्ही येथे आले आहात. तुम्हाला खुप सुख मिळते. खुप खुशी राहायला पाहिजे आणि खबरदार पण राहायला पाहिजे. पद तर नंबरानुसारच असतात. प्रत्येक कलाकाराचे पद वेगवेगळे असते, सर्वांमध्ये ईश्वर होऊ शकत नाही. बाबा प्रत्येक गोष्ट समजवतात. तुम्ही बाबांना आणि रचनेच्या आदी मध्य-अंतला नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे जाणतात. नंबरानुसार अभ्यासानुसार मार्क्स, गुण असतात. हे बेहदेच शिक्षण आहे, यामध्ये मुलांचे खुप लक्ष्य पाहिजे. हा राजयोग अभ्यास, मुरली तर एक दिवस पण चुकवू नका. आम्ही विद्यार्थी आहोत, ईश्वरीय पिता शिकवतात, तर तो नशा मुलांना चढायला पाहिजे. भगवानुवाच फक्त त्यांचे नाव बदलून कृष्णाचे नाव लिहले आहे. चुकीने कृष्ण भगवानुवाच समजले आहे. नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे आपले कल्याण करतात, आणि दुसऱ्यांचे पण कल्याण करत राहतात, त्यांना सेवेशिवाय सुख मिळणार नाही.

तुम्ही मुलं योग आणि ज्ञानामध्ये मजबूत व्हाल तर जिन्न सारखे त्वरीत कामे कराल. मनुष्याला देवता बनवण्याची सवय लागायला पाहिजे. मृत्यूच्या पुर्वी पास व्हायचे आहे. खुप सेवा करायची आहे. अंतकाळात तर लढाई लागेल. नैसर्गिक आपत्ती पण येतील. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. अंतकाळात येऊन म्हणजे उशीरा येऊन सुध्दा प्रथम येण्यासाठी महावीर बनून पुरुषार्थ करायचा आहे. मायेच्या वादळामध्ये घाबरायचे नाही. बाप समान दयाळू बनून मनुष्यांच्य बुध्दीचे कुलुप उघडण्याची सेवा करायची आहे.

2. ज्ञान सागरामध्ये रोज ज्ञान स्नान करुन राजकुमार बनायचे आहे. एक दिवस पण मुरली योग चुकवायचा नाही. ईश्वराचे आम्ही विद्यार्थी आहोत, या नशेमध्ये राहायचे आहे.

वरदान:-
ह्दयापासून, माझे बाबा म्हणून खरा सौदा करणारे समर्पित किंवा मरजीवा भव

ब्रह्माकुमार कुमारी बनणे म्हणजे समर्पित होणे. जेव्हा ह्दयापासून माझे बाबा म्हणतात तर बाबा पण म्हणतात, मुलांनो सर्व काही तुझे. खुशाल प्रवृत्तीमध्ये असाल, नाही तर सेवाकेंद्रामध्ये असाल परंतू ज्यांनी मनापासून माझे बाबा म्हणले, तेव्हाच बाबांनी आपले बनवले, हा मनापासूनचा सौदा आहे, फक्त मुखाचा नाही. समर्पित म्हणजे श्रीमतावरती चालणारे असे समर्पित होणारेच मरजीवा ब्राह्मण आहेत.

बोधवाक्य:-
जर माझ्या शब्दाशी खुप प्रेम आहे तर अनेक माझ्यांना एक माझे बाबा मध्ये सामावून घ्या..!