05-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, बाबा आले आहेत, तुम्हाला फुलासारखे बनविण्यासाठी, तुम्ही फुलासारखी मुलं
कधीच कोणाला दु:ख देऊ शकत नाहीत, सदा सुख देत राहा..”
प्रश्न:-
कोणत्या एका
गोष्टीमध्ये तुम्हा मुलांना खुप खुप खबरदारी घ्यायची आहे?
उत्तर:-
मन्सा वाचा
कर्माणा, आपल्या मुखावरती मोठी खबरदारी घ्यायची आहे बुध्दीद्वारे सर्व लोकलाज, कुळ
मर्यादा विसरायची आहे. स्वत:ला तपासा की मी किती दिव्यगुण धारण केले आहेत? लक्ष्मी
नारायण सारखे सुसंस्कृत बनले आहोत? किती फुलासारखे बनले आहोत?
ओम शांती।
शिवबाबा जाणतात, ही माझी मुलं आहेत. तुम्हा मुलांना आत्मा समजून, शरीराला विसरुन
शिवबाबांची आठवण करायची आहे. शिवबाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांना शिकवतो. शिवबाबा
पण निराकार आहेत, तुम्ही आत्मा पण निराकार आहात. येथे येऊन अभिनय करतात. बाबा पण
येऊन अभिनय करतात. हे पण तुम्ही जाणतात, अविनाशी नाटकानुसार बाबा आम्हाला फुलासारखे
बनवत आहेत. तर सर्व अवगुण सोडुन गुणवान बनायला पाहिजे. गुणवान कधीच कोणाला दु:ख देत
नाहीत. ऐकुन न ऐकल्यासारखे करत नाहीत. कोणी दु:खी आहेत, तर त्यांचे दु:ख दूर करतात.
बाबा पण येतात तर सर्व दुनियाचे दु:ख जरुर दूर करतात. बाबा तर श्रीमत देतात, जितके
शक्य होईल तेवढा पुरुषार्थ करुन सर्वांचे दु:ख दूर करत राहा. पुरुषार्थाद्वारेच
चांगले पद मिळेल. पुरुषार्थ केला नाही तर पद कमी होईल. तर मग कल्प कल्प नुकसान होईल.
बाबा मुलांना प्रत्येक गोष्ट समजवतात. मुलं स्वत:चेच नुकसान करतील, हे बाबांना आवडत
नाही. दुनियेमधील लोक फायदा आणि नुकसानला जाणत नाहीत, म्हणून मुलांना स्वत:वरती दया
करायची आहे. श्रीमतावरती चालत राहायचे आहे. जरी बुध्दी इकडे तिकडे जाते तरी प्रत्यन
करा, अशा गोड शिवपित्याची आम्ही का आठवण करु शकत नाही, ज्यांच्या आठवणीमुळेच उच्च
पद मिळत्े. कमीत कमी स्वर्गामध्ये तर जातो, परंतू स्वर्गामध्ये उच्च पद मिळवायचे आहे.
मुलांचे मातपिता म्हणतात ना, आमच्या मुलाने शाळेमध्ये शिकुन उच्च पद मिळवावे. येथे
तर कुणालाच माहिती होत नाही. तुमचे संबंधी हे जाणत नाहीत की, तुम्ही कोणता अभ्यास
करत आहात. त्या शिक्षणमध्ये तर मित्र संबंधी सर्व जाणतात, यामध्ये कोणी जाणतात, कोणी
जाणत नाहीत. कोणाचे पिता जाणतात. तर भाऊ-बहिण, मुलं जाणत नाहीत. कोणाची माता जाणते,
तर पिता जाणत नाहीत. कारण हा विचित्र शिक्षण आहे, आणि शिकवणारे पण विचित्र आहेत,
नंबरानुसार समजतात. बाबा समजवतात भक्ती तर तुम्ही खुप केली आहे, ते ही नंबरानुसार,
ज्यांनी खुप भक्ती केली आहे ते ज्ञान पण घेतात. आता भक्तीची रसम रिवाज पुर्ण होत आहे.
मीराने भक्तीसाठी लोकलाज कुळाची मर्यादा सोडली असे समजत होते. येथे तर तुम्हाला
साऱ्या विकारी कुळाची मर्यादा सोडायची आहे. बुध्दीद्वारे सर्वांचा सन्यास करायचा आहे.
या विकारी दुनियेचे काहीच चांगले वाटत नाही. विकर्म करणारे जरा पण चांगले वाटत
नाहीत. ते आपल्याच भाग्याला खराब करतात. असे कोणते पिता थोडेच असतील जे मुलांनी
कोणाला तंग केलेले पसंत पडेल किंवा न शिकणारे पसंत पडतील. तुम्ही मुलं जाणतात,
स्वर्गामध्ये असे मुलं होत नाहीत. नावच देवी देवता आहे. किती पवित्र नाव आहे.
स्वत:ला तपासा की माझ्यामध्ये दैवीगुण आहेत? सहनशील पण बनायचे आहे. बुध्दीयोगाची
गोष्ट आहे. ही माये सोबतची लढाई तर चांगली आहे. बाबांची आठवण करण्यामध्ये लढाईची
गोष्ट नाही. बाकी होय, यामध्येच माया विघ्न आणते, बिल्कुल बिनचुक तोच पुरुषार्थ
चालतो जो कल्प कल्प चालत आला आहे. तुम्ही जाणतात आता आम्ही पद्मापद्म भाग्यशाली बनत
आहोत परत सतयुगामध्ये खुप सुख राहते.
कल्प कल्प बाबा असेच समजवतात. ही नविन गोष्ट नाही. बाबा तर म्हणतात मुलांनी
फुलासारखे बनावे. शारीरिक पित्याची पण अशीच इच्छा असते. पारलौकिक बाबा तर येतात
विकारींना फुलासारखे गुणवान बनविण्यासाठी, तर असे बनायला पाहिजे. मन्सावाचा कर्मणा
मुखावरती खुप खबरदारी पाहिजे. प्रत्येक कर्मइंद्रियावरती दयायचे आहे. माया खुपच धोका
देणारी आहे, मायेपासून सांभाळ करायचा आहे. मोठे लक्ष्य आहे. अर्ध्याकल्पापासून
विकारी दृष्टी राहिली आहे, अशा दृष्टीला एका जन्मात पवित्र बनवायचे आहे. जसे या
लक्ष्मी नारायणची आहे. हे सर्वगुण संपन्न आहेत. स्वर्गात कोणाची ही विकारी दृष्टी
नसते, रावणच नसतो. ही पण नविन गोष्ट नाही. तुम्ही अनेक वेळेस हे पद मिळवले आहे.
दुनिया तर बिल्कुल जाणत नाहीत, हे कोणते शिक्षण घेत आहेत. बाबा तुमच्या सर्व आशा
पुर्ण करतात. अशुभ आशा रावणाच्या असतात. तुमच्या शुभ आशा आहेत. विकारी कोणतीच इच्छा
असायला नको. मुलांना सुखामध्ये राहायचे आहे. तुमच्या, इतक्या सुखाचे वर्णन पण करु
शकत नाहीत, दु:खाचे वर्णन असते. सुखाचे वर्णन थोडेच असते. तुम्हा सर्व मुलांची एकच
आशा आहे की आम्ही पावन बनू. कसे पावन बनू? ते ही तुम्ही जाणतात कि, पावन बनवणारे एक
बाबाच आहेत, त्यांच्या आठवणीद्वारेच पावन बनू. प्रथमत: नविन दुनियेमध्ये पावन हे
देवी देवताच असतात. पावन बनण्यामध्ये पहा किती ताकत आहे. तुम्ही पावन बसुन पावन
दुनियेचे राज्य प्राप्त करतात म्हणून देवता धर्मामध्ये खुप ताकत आहे असे म्हणले जाते.
ही ताकत कोठून मिळते? सर्वशक्तीवान बाबा कडुन. घरा घरामध्ये तुम्ही मुख्य दोन चार
चित्र लावुन खुप सेवा करु शकता. ती पण वेळ येईल, करफ्यु इ. असा लागेल, जेव्हा तुम्ही
कोठेही ये जा करु शकणार नाही.
तुम्ही ब्राह्मण खरी गिता ऐकवणारे आहात. ज्ञान तर खुपच सहज आहे, ज्यांच्या घरातील
सर्व येतात तेथे तर शांती असते, त्यांच्यासाठी तर खुपच सहज आहे. हे त्रिमुर्ती, गोळा,
झाड आणि शिडीचे चित्र पुष्कळ आहेत. त्यांच्यासोबत गितेचे भगवान, कृष्ण नाहीत हे
चित्र पण चांगले आहे. खुप सहज आहे, यामध्ये काही पैसे पण खर्च होत नाहीत. चित्र तर
आहेतच. चित्राला पाहिल्या नंतरच ज्ञान स्मृती मध्ये येत राहिल. एक कोठडी त्यासाठी
बनवा, त्याच खोलीमध्ये तुम्ही झोपले तरी चालेल. जर श्रीमतावरती चालत राहिले तर,
तुम्ही अनेकांचे कल्याण करु शकतात. कल्याण करत पण आहात, तरी बाबा त्यांची परत आठवण
करुन देतात, असे असे तुम्ही करु शकतात. ठाकुरजीची मुर्ती ठेवतात ना. यामध्ये परत
समजण्याच्या गोष्टी आहेत. जन्म जन्मांतर तुम्ही भक्ती मार्गामध्ये, मंदिरामध्ये
भटकत आले, परंतू हे कोण आहेत, यांची माहिती झाली नाही. मंदिरामध्ये देवीची पुजा
करतात, त्यांचेच परत विसर्जन करतात, पाण्यात बुडवतात, किती अज्ञान आहे. जे पुज्य
आहेत, त्यांची पुजा करुन त्यांना समुद्रामध्ये बुडवतात. गणेशाला, देवींना,
सरस्वतींला पण पाण्यामध्ये विसर्जन करतात. बाबा सन्मुख, कल्प कल्प या गोष्टी
समजवतात. जाणीव करुन देतात, तुम्ही काय करत होते, मुलांना तर नफरत आली पाहिजे. बाबा
इतके समजवतात गोड गोड मुलांनो, तुम्ही हे काय करत आले. याला विषय वैतरणी नदी म्हणले
जाते. असे नाही की तिथे कोणता क्षीरसागर आहे. परंतू तिथे प्रत्येक गोष्ट भरपुर असते.
कोणत्याच गोष्टीसाठी पैसे लागत नाहीत. पैसे तर तिथे नसतात. सोन्याचेच शिक्के
पाहण्यात येतात, जेव्हा घरामध्ये पण सोने असते, सोन्याचा विटा असतात. तर सिध्द होते
तेथे सोन्या चांदीचे काहीच मुल्य नसते, येथे तर पहा किती मुल्य आहे. तुम्ही जाणतात
एका एका गोष्टीमध्ये आश्चर्य आहे. मनुष्य तर मनुष्यच आहेत. हे देवता पण मनुष्यच
आहेत, परंतू यांचे नाव देवता आहे. त्यांच्या पुढे जाऊन मनुष्य मनातील खराब गोष्टी
जाहिर करतात, आम्ही पापी आहोत, आमच्यामध्ये काहीच गुण नाहीत. तुम्हा मुलांच्या
बुध्दीमध्ये आहे मुख्य लक्ष्य आहे, आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. देवतामध्ये
दैवीगुण आहेत. मनुष्य मंदिरामध्ये जातात परंतू हे समजत नाहीत की, हे पण मनुष्यच
आहेत. आम्ही पण मनुष्यच आहेत, परंतू हे दैवी गुणधारी आहेत, आम्ही आसुरी गुणवाले
आहोत. आता तुमच्या बुध्दीमध्ये येते की आम्ही खुप नालायक होतो. देवी देवतांच्या पुढे
जाऊन गात होतो, तुम्ही सर्वगुण संपन्न. आता बाबा समजवतात हे तर भुतकाळात होऊन गेले,
यांच्यामध्ये दैवी गुण होते, अपार सुखी होते. आता तेच अपार दु:खी बनले आहेत.
यावेळेत सर्वांमध्ये 5 विकारांची प्रवेशता आहे. आता तुम्ही विचार करता, कसे आम्ही
उतरत उतरत एकदम जमिनीवर पडलो आहोत. भारतवासी खुप साहुकार होते. आता तर पहा कर्ज घेत
राहतात. यासर्व गोष्टी बाबाच बसुन समजवतात, दुसरे कोणी समजाऊ शकत नाही. ऋषी मुनी पण
माहित नाही, जाणत नाही म्हणत होते. आता तुम्ही समजतात, ते तर खरे बोलत होते. न
पित्याला न रचनेच्या आदी मध्य अंतला जाणत होते. आता पण तुम्हा मुलांशिवाय कोणी जाणत
नाही. मोठ मोठे सन्यासी, महात्मे कोणीच जाणत नाहीत. वास्तवमध्ये लक्ष्मी नारायणच
महान आत्मा आहेत, सदा पवित्र आहेत. हे पण जाणत नाहीत तर दुसरे कसे जाणतील? खुपच सरळ,
सहज गोष्टी बाबा समजवत आहेत परंतू अनेक मुलं विसरतात. काही चांगल्याप्रकारे गुण
धारण करतात तर गोड वाटतात. जितका मुलांमध्ये गोडवा, गुण दिसतात तर दिल खुश होते.
काही तर नाव बदनाम करतात. येथे तर पिता शिक्षक आणि सतगुरु तिघांची निंदा करतात. सत
पिता, सत शिक्षक, सतगुरुची निंदा केल्यामुळे तीन पटीने दंड पडतो. परंतू काही
मुलांमध्ये काहीच समज नाही. बाबा समजवतात तर, मुलं अशी पण जरुर असतील. माया पण काही
कमी नाही. अर्धाकल्प पापात्मा बनवते. बाबा परत अर्ध्या कल्पासाठी पुण्य आत्मा
बनवतात. ते पण नंबरानुसार बनतात. बनवणारे पण दोघे आहेत, राम आणि रावण. रामाला
परमात्मा म्हणतात. राम राम म्हणून परत शेवटी शिवाला नमस्ते करतात, तेच परमात्म आहेत.
परमात्माच्या नावाचा जप करतात, मोजतात. तुम्हाला तर असे करायची आवश्यकता नाही. हे
लक्ष्मी नारायण पवित्र होते ना. यांची दुनिया होती, ज्याचा भुतकाळ झाला. त्याला
स्वर्ग नविन दुनिया म्हणले जाते. परत जसे जुने घर होते तर तोडफोड होते, ही दुनिया
पण अशीच आहे. आता कलियुगाचा अंत आहे. खुपच सहज गोष्टी समजण्याच्या आहेत, धारणा
करायच्या आहेत आणि करुन घ्यायच्या आहेत. बाबा तर सर्वांना समजुन सांगण्यासाठी गावा
गावात जाऊ शकत नाहीत. तुम्ही मुलं ईश्वरीय सेवेत उपस्थित आहात. बाबा जी सेवा
शिकवतात, तिच सेवा करायची आहे. तुमची फक्त ईश्वरीय सेवा आहे. तुमचे नाव श्रेष्ठ
करण्यासाठी बाबांनी ज्ञान कलष तुम्हा मातांना दिला आहे. असे पण नाही की पुरुषांना
मिळत नाही, सर्वांना मिळतो. आता तुम्ही मुलं जाणतात आम्ही खुप सुखी स्वर्गवासी होतो.
तेथे कोणतेच दु:ख नव्हते. आता संगमयुग आहे, परत त्या नविन दुनियेचे मालक बनत आहोत.
आता कलियुगी जुनी पतित दुनिया आहे. बिल्कुलच मनुष्य म्हशी सारख्या बुध्दीचे झाले
आहेत. आता तर या सर्व गोष्टींना विसरावे लागते. देहासहित देहाच्या सर्व संबंधाना
विसरुन स्वत:ला आत्मा समजायचे आहे. शरीरामध्ये आत्मा नाही तर शरीर काहीच करु शकत
नाही. त्या शरीरावरती खुप मोह ठेवतात, शरीर जळुन जाते, आत्म्याने जाऊन दुसरे शरीर
घेतले तरी 12 महिने रडत राहतात. आता तुमची आत्मा शरीर सोडेल, तर जरुर श्रेष्ठ
घराण्यात जन्म घेईल, तेही नंबरानुसार थोडे ज्ञान धारण करणारे जरुर साधारण कुळामध्ये
जन्म घेतील, जास्त ज्ञान धारण करणारे जरुर श्रेष्ठ कुळामध्ये जन्म घेतील, तेथे सुख
पण खुप असते. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. बाबा जे
ऐकवतात ते ऐकुन न ऐकल्यासारखे करायचे नाही. गुणवान बनुन सर्वांना सुख दयायचे आहे.
पुरुषार्थ करुन सर्वांचे दु:ख दूर करायचे आहे.
2. विकाराच्या वश होऊन कोणतेच विकर्म करायचे नाही. सहनशील बनायचे आहे. कोणतीही
विकारी इच्छा ठेवायची नाही.
वरदान:-
मी पणाला
बाबामध्ये सामावणारे निरंतर योगी, सहजयोगी भव
ज्या मुलांचे बाबांशी
प्रत्येक श्वासामध्ये प्रेम आहे, प्रत्येक श्वासात बाबा बाबा आहे, त्यांना योगाचे
कष्ट घ्यावे लागत नाही. आठवणींचा पुरावा आहे, कधी मुखाद्वारे मी शब्द निघू शकत नाही.
बाबा, बाबाच निघेल. मी पण बाबामध्ये सामावून जाईल. बाबा बँकबोन, माकडहाड आहेत.
बाबांनी केले, बाबा सोबत आहेत, तुमच्यासोबत खाऊ, पिऊ, चालू, फिरु हे कायमस्वरुपी
स्मृतीमध्ये राहिल, तेव्हा सहजयोगी म्हणाल.
बोधवाक्य:-
मी मी करणे
म्हणजे माया रुपी मांजरीचे आव्हान करणे..!