19-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, देही अभिमानी बनण्याचा अभ्यास करा, या अभ्यासाद्वारे तुम्ही पुण्यात्मा
बनू शकाल.
प्रश्न:-
कोणत्या एका
ज्ञानामुळे तुम्ही सदा आनंदी राहू शकता ?
उत्तर:-
तुम्हाला ज्ञान मिळाले आहे की, हे नाटक खूपच आश्चर्यकारक बनलेले आहे, यामध्ये
प्रत्येक कलाकाराची अविनाशी भूमिका नोंदलेली आहे, सर्व आपापली भूमिका वठवत आहेत, या
कारणामुळे तुम्ही नेहमी आनंदीत राहू शकतात.
प्रश्न:-
कोणती कला बाबांच्या जवळ आहे, दुसऱ्यांच्या जवळ नाही?
उत्तर:-
देही अभिमानी बनण्याची कला एक बाबा जवळच आहे, कारण ते स्वतः नेहमी देही आहेत,
सर्वोच्च आहेत. ही कला कोणत्याही मनुष्याकडे होऊ शकत नाही .
ओम शांती।
आत्मिक मुलांनो अर्थात आत्मा प्रती बाबा बसून समजवतात, स्वतःला आत्मा समजायचे आहे.
बाबांनी मुलांना समजवले आहे, प्रथम हा अभ्यास करा, आम्ही आत्मा आहोत. जेव्हा स्वतःला
आत्मा समजाल तेव्हाच परमपिता ची आठवण करू शकता. स्वतःला आत्मा समजले नाही तर जरूर
लौकिक सबंधी, धंदा इत्यादी आठवणीत येत राहील म्हणून तुम्ही स्वतःला देह समजू नका.
हे ज्ञान बाबा कल्पामध्ये एकदाच देतात, परत पाच हजार वर्षांनंतर हे ज्ञान मिळेल.
स्वतःला आत्मा समजले तर बाबांची पण आठवण येईल. अर्धा कल्प तुम्ही स्वतःला देह समजले
आहे, आत्ता आत्मा समजायचे आहे.तसेच मी पण आत्मा आहे,परंतु मी सर्वोच्च आहे. मी आत्मा
आहे परंतु मला कोणताही देह नाही.हे तर शरीरधारी आहेत ना, ते बाबा निराकार आहेत,हे
प्रजापिता ब्रह्मा तर साकारी झाले ना. शिव बाबांचे वास्तविक नाव शिव आहे, ते सर्व
आत्म्यांचे पिता आहेत, फक्त ते श्रेष्ठ म्हणजे सर्वोच्च आत्मा आहेत, फक्त याच वेळेत
येऊन शरीरामध्ये प्रवेश करतात, त्यांना कधी देहाचा अभिमान होऊ शकत नाही. देह अभिमानी
साकारी मनुष्य असतात, ते तर निराकार आहेत .त्यांना येऊन अभ्यास करायचा आहे.बाबा
म्हणतात तुम्ही स्वतःला आत्मा समजा, मी आत्मा आहे ,आत्मा आहे, हा धडा बसून पक्का करा.
मी आत्मा शिवबाबांचा मुलगा.आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास पाहिजे ना. बाबा दररोज
नवनवीन गोष्टी समजवतात, तुम्ही जेव्हा स्वतःला चांगल्या रितीने आत्मा समजतात,
तेव्हाच बाबांची पण चांगल्या रीतीने आठवण येईल.देह अभिमान असेल तर बाबांची आठवण करू
शकणार नाही. अर्धा कल्प तुम्हाला देहाचा अहंकार राहतो, आता मी तुम्हाला शिकवतो,
स्वतःला आत्मा समजा.दुसरे कोणी असे शिकवू शकत नाही की,स्वतःला आत्मा समजा. शरीरा
वरतीच नाव पडते ना, नाहीतर एक-दोघांना कसे बोलतील. येथे तुम्ही बाबाकडून वारसा घेत
आहात, त्याचेच प्रारब्ध तुम्ही मिळवता. बाकी नावानेच बोलवणार ना. कृष्णाचे पण शरीरा
वरुन नाव आहे ना. नावा शिवाय तर कारभार चालू शकणार नाही. असे नाही की, स्वर्गामध्ये
म्हणतील स्वतःला आत्मा समजा. तेथे तर आत्मा अभिमानीच राहतात. ही सवय तुम्हाला आता
लावायची आहे,कारण डोक्यावरती पापाचे आझे आहे ,हळूहळू थोडेथोडे पाप करत करत,एकदमच
पाप आत्मा बनले आहेत.
अर्धा कल्पा साठी जे काय केले, ते सर्व नष्ट होईल, हळूहळू पाप कमी होत जाते. सतयुगा
मध्ये तुम्ही सतोप्रधान असतात , त्रेता मध्ये सतो बनतात. वारसा आत्ताच मिळतो.
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर, वारसा मिळेल. देही अमिमानी बनण्याची
शिक्षा, बाबा आत्ताच देतात. सतयुगात हे ज्ञान मिळत नाही.आप आपल्या नावावर च चालतात.
येथे तर एकाच्या, आठवणीच्या शक्तीद्वारे पापत्मा पासून पुण्यात्मा बनायचे आहे.सतयुगा
मध्ये या अभ्यासाची आवश्यकता नाही. तुम्ही हे ज्ञान सतयुगा मध्ये घेऊन जाऊ शकत
नाही.तेथे न हे ज्ञान घेऊन जाता,न योग. तुम्हाला पतित पासुन पावन आत्ताच बनायचे
आहे.परत कला हळूहळू कमी होत जातात. जशी चंद्राची कला कमी होऊन फक्त एक रेषा राहते.
या मध्ये तुम्ही संभ्रमित होऊ नका.
काहीच नाही समजले तर विचारू शकतात. प्रथमतः हा निश्चय पक्का करा मी आत्मा आहे. तुमची
आत्मा तमोप्रधान बनली आहे, प्रथम सतो प्रधान होती,दिवसेंदिवस कला कमी होत जातात. मी
आत्मा आहे, हे चांगल्या रीतीने न समजल्या मुळे तुम्ही बाबांना विसरून जाता. प्रथम
मुख्य गोष्ट ही आहे. आत्माभिमानी बनल्यामुळे बाबांची आठवण येईल आणि वारशाची पण आठवण
येईल. वारसा आठवण आला तर पवित्र राहाल, दैवी गुणांची धारणा पण होईल. मुख्य लक्ष तर
समोर आहे ना. हे ईश्वरीय विद्यापीठ आहे, स्वयम् भगवान तुम्हाला शिकवत आहेत.
देहीअभिमानी पण तेच बनवतील, दुसरे कोणीही ही कला जाणत नाहीत. एक बाबाच शिकवतात, हे
दादा पण पुरषार्थ करतात. बाबा तर कधीच देह धारण करत नाहीत. ज्यामुळे त्यांना देह
अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करावा लागेल. ते फक्त या वेळेत येतात, तुम्हाला देही
अभिमानी बनवण्यासाठी. एक म्हण पण आहे ज्यांच्या डोक्यावरती अनेक कामं आहेत, ते कसे
निवांत झोपू शकतात. जास्त धंदा इत्यादी खूप असेल, तर वेळ मिळत नाही आणि ज्यांना वेळ
आहे ते येतात, बाबांच्या समोर पुरुषार्थ करतात. कोणी पण नवीन येतात, तर समजतात
ज्ञान तर खूपच चांगले आहे. हे भगवदगितेत पण आहे,मज पित्याची आठवण करा, तर तुमचे
विकर्म विनाश होतील. तर बाबा हे समजवत आहेत.बाबा कोणालाच दोष देत नाहीत. हे तर
तुम्ही जाणतात, तुम्हाला पावन पासून पतित बनवायचे आहेच. आणि मला येऊन पतित पासून
पावन बनवायचे आहेच. हे पूर्वनियोजित नाटक आहे,यामध्ये कोणाची निंदेची गोष्ट नाही.
तुम्ही मुलं ज्ञानाला चांगल्या रीतीने समजले आहात, दुसरे कोणी पण ईश्वराला जाणत
नाहीत, म्हणून निधन चे नास्तिक आहेत. आता बाबा तुम्हाला खूपच समजदार बनवत आहेत.
शिक्षकाच्या रूपामध्ये शिक्षा देतात, कसे हे सृष्टीचे चक्र चालते .ही शिक्षा
मिळाल्यामुळे तुम्ही पण सुधारतात .भारतामध्ये शिवालय होते आता वेश्यालय झाले आहे
ना. यामध्ये निंदाची गोष्ट नाही. हा खेळ आहे,जे बाबाच समजवतात. तुम्ही देवता पासून
आसुर कसे बनले, असे म्हणू शकत नाही का बनले? बाबा आले आहेत, मुलांना आपला परिचय
देण्यासाठी आणि सृष्टि चक्राचे ज्ञान देण्यासाठी. मनुष्यच जाणतील ना.आता तुम्ही हे
ज्ञान जाणून परत देवता बनतात. मनुष्यापासून देवता बनण्याचे हे शिक्षण आहे,जे बाबच
बसून शिकवतात. येथे तर सर्व मनुष्यच मनुष्य आहेत. देवता तर या सृष्टी वरती येऊ शकत
नाहीत, जे शिक्षक बनवुन शिकवतील. बाबा कसे शिकवण्यासाठी येतात? गायन पण आहे परमपिता
परमात्मा रथाचा आधार घेतात.हे पूर्ण रीतीने लिहीत नाहीत, कोणते शरीर घेतात.
त्रिमूर्ती चे रहस्य पण कोणी जाणत नाहीत. परमपिता अर्थात परमात्मा. ते जसे आहेत,
तसाच आपला परिचय देतील ना. यामध्ये अहंकाराची गोष्ट नाही,हे पण मनुष्य न समजल्यामुळे
म्हणतात, त्यांच्यामध्ये अहंकार आहे. हे ब्रह्मा पण म्हणतात मी परमात्मा नाही.ही तर
समजून घेण्याची गोष्ट.हे तर बाबांचे महावाक्य आहे, सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत.
यांना दादा म्हटले जाते,हा भाग्यशाली रथ आहे ना. नाव पण ब्रह्मा ठेवले आहे,कारण
ब्राह्मण पाहिजेत ना.आदी देव प्रजापिता ब्रह्मा आहेत. प्रजाचे पिता आहेत, आता कोणती
प्रजा?प्रजापिता ब्रह्मा तर शरीरधारी आहेत, तर दत्तक घेतले ना. शिवबाबा मुलांना
समजवतात, मी दत्तक घेत नाही, तुम्ही तर नेहमी माझीच मुलं आहात. मी तुम्हाला बनवत
नाही. मी तर तुम्हा आत्म्याचा पिता आहे. बाबा खूपच चांगल्या रीतीने समजत आहेत, तरीही
म्हणतात स्वताला आत्मा समजा .तुम्ही साऱ्या जुन्या दुनियेचा सन्यास करतात. बुद्धी
द्वारे जाणतात या जुन्या दुनिये पासून परत जाऊ. असे नाही संन्यास करून जंगल मध्ये
जायचे आहे.साऱ्या जुन्या दुनियेचा संन्यास करून आम्ही आपल्या घरी चालले जाऊ म्हणून
कोणत्याही गोष्टीची आठवण यायला नको, शिवाय एक बाबांच्या. साठ वर्षाचे आयुष्य पूर्ण
झाले तर वाणी पासून दूर जाण्यासाठी पुरुषार्थ करायला पाहिजे. ही वानप्रस्थ ची गोष्ट
आहे, ती पण या वेळेतील. भक्तिमार्ग मध्ये तर वानप्रस्थ कशाला म्हणतात,हे पण माहित
नाही. वानप्रस्थचा अर्थ पण सांगू शकत नाहीत.वाणी पासून दूर मुलवतनला च म्हणू
शकतो.तेथे सर्व आत्मे निवास करतात तर सर्वांची अवस्था वानप्रस्थ आहे, सर्वांना घरी
जायचे आहे. ग्रंथांमध्ये पण दाखवतात,आत्मा भ्रकुटी मध्ये चमकणारा तारा आहे. काही
समजतात आत्मा आगंठया सारखी आहे,त्याचीच आठवण करतात. ताऱ्यांची कशी आठवण करतील? कशी
पूजा करतील. तर बाबा समजतात तुम्ही देह अभिमान मध्ये जेव्हा आले तर पुजारी
बनले.भक्तीची वेळ सुरू झाली, त्याला भक्ती पर्व म्हटले जाते. ज्ञान पर्व वेगळे
आहे.ज्ञान आणि भक्ती एकत्र होऊ शकत नाहीत. दिवस आणि रात्र एकत्र नसतात. दिवसाला सुख
आणि रात्रीला भक्ती म्हटले जाते. प्रजापिता ब्रह्मा चा दिवस आणि परत रात्र ,तर प्रजा
आणि ब्रह्मा दोन्ही एकत्र असतील ना. तुम्ही समजता आम्ही ब्राह्मणच अर्धाकल्प सुख
भोगतो आणि अर्धाकल्प दु:ख.हे पण बुद्धी द्वारे समजण्याची गोष्ट आहे.हे पण जाणतात
सर्व तर बाबांची आठवण करू शकत नाहीत,तरीही बाबा समजवत राहतात,स्वताला आत्मा समजुन
माझी आठवण करा, तर तुम्ही पावन बनाल. हा संदेश सर्वाना पोहोचवयाचा आहे. सेवा करायची
आहे. जे सेवा करत नाहीत, ते तर फुलासारखे बनू शकत नाहीत. बागवान बागेमध्ये आले आहेत,
त्यांना त्यांच्या समोर फुलं पाहिजेत. जे सेवाधारी आहेत सेवा योग्य आहेत, ते
अनेकांचे कल्याण करत राहतात .ज्यांना देह अभिमान आहे, ते स्वत: पण समजतात आम्ही
फुलासारखे तर नाही. बाबा च्या समोर तर चांगल्या चांगल्या फुलांनी बसायला पाहिजे, तर
बाबांची नजर पण त्यांच्यावरती जाईल. ज्ञानाचा डान्स पण चांगला चालेल.( डान्स
करण्याच्या करणाऱ्या मुलीचे उदाहरण) शाळेमध्ये पण शिक्षक जाणतात, कोण नंबर एक,कोण
नंबर दोन मध्ये आहेत.बाबांचे लक्ष पण सेवा करणाऱ्या मुलांकडे जाते,तेच हृदयासिन बनू
शकतात. सेवा करणारे किंवा विघ्ने घालणारे तर, थोडेच ह्रदयासिन बनू शकतात. बाबा
प्रथम मुख्य गोष्ट समजावतात की, स्वतःला आत्मा निश्चय करा, तेव्हाच बाबाची आठवण येऊ
शकेल.देह अभिमान असेल तर बाबांची आठवण येणार नाही. लौकिक सबंध, काम धंदा ई.कडे
बुद्धी चालली जाईल.देही अभिमानी बनल्यामुळे पारलौकिक बाबांची आठवण येईल. बाबांची
खूपच प्रेमाने आठवण करायला पाहिजे. स्वतःला आत्मा समजणे, यामध्ये कष्ट आहेत, यासाठी
एकांत स्थान पाहिजे. योगाची भट्टी आवश्यक आहे. कोणाचीच आठवण यायला नको .कोणाला पत्र
पण लिहू शकत नाही. अशी भट्टी तुमची,यज्ञाच्या सुरुवातीला झाली होती. येथे तर
सर्वांना राहता येऊ शकत नाही, म्हणून म्हटले जाते घरांमध्ये राहून याचा अभ्यास करा.
भक्त लोक पण भक्तीसाठी वेगळी खोली बनवतात. एखाद्या खोलीमध्ये बसून माळ जपतात ,तर या
आठवणीसाठी पण वेगळी खोली आवश्यक आहे.एका बाबांची आठवण करायची आहे, यामध्ये
मुखाद्वारे काहीच बोलण्याची आवश्यकता नाही. या आठवणीसाठी वेळ काढायला पाहिजे. तुम्ही
जाणता लौकिक पिता हदचे रचनाकार आहेत आणि बाबा आहेत बेहद चे रचनाकार. प्रजापिता
ब्रह्मा तर बेहद चे झाले ना. मुलांना दत्तक घेतात.शिवबाबा तर दत्तक घेत नाहीत,
त्यांची मुलं आहेतच. तुम्ही म्हणाल, शिवबाबांचे आम्ही मुलं तर अनादी आहोतच.
ब्रह्माने तुम्हाला दत्तक घेतले आहे.प्रत्येक गोष्ट चांगल्या रितीने समजायची आहे.
बाबा रोज रोज मुलांना समजावत राहतात. काही जण म्हणतात बाबांची आठवण नेहमीच राहू शकत
नाही. बाबा म्हणतात त्यासाठी थोडा वेळ काढायला पाहिजे. काय काय असे असतात,जे
बिलकुलच वेळ देत नाहीत, बुद्धीमध्ये काम धंदाच राहतो,परत आठवणीची यात्रा कशी होईल.
बाबा समजवतात मुख्य गोष्टी हीच आहे, स्वतःला समजून माझीच आठवण करा तर तुम्ही पावन
बनाल.मी आत्मा आहे,शिव बाबांचा मुलगा आहे, हे मनमनाभव झाले. यामध्ये कष्ट पाहिजेत,
आशीर्वाद ची गोष्ट नाही. हे शिक्षण आहे यामध्ये कृपा किंवा आशीर्वादाची गोष्ट नाही.
मी कधी तुमच्या डोक्यावर हात ठेवतो का? तुम्ही बेहदच्या बाबा कडुन शिक्षण घेत आहात.
अमर भव आयुष्यमान भव यामध्ये सर्व येते.तेथे कधी अकाली मृत्यू होत नाही,तेथे कधी
काळ येऊ शकत नाही.तुम्ही आयुष्यवान बनतात.हा वारसा कोणी साधू संत इ.देऊ शकत नाहीत.
ते म्हणतात पुत्रवान भव.. तर मनुष्य समजतात त्यांच्या कृपेमुळे मुलगा झाला. ज्यांना
मुलगा नसेल ते जाऊन त्यांचे शिष्य बनतात. ज्ञान तर एकाच वेळेस मिळते .हे अव्यिभाचारी
ज्ञान आहे, ज्याचे प्रारब्ध अर्धाकल्प चालते, परत आहे अज्ञान.भक्तीला अज्ञान म्हणले
जाते. प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजवली जाते. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1.आत्ता
वानप्रस्थ अवस्था आहे, म्हणून बुद्धी द्वारे सर्व काही संन्यास करायचा आहे. एकांत
मध्ये बसुन अभ्यास करायचा आहे, आम्ही आत्मा आहोत ,आत्मा आहोत .
2. सेवाधारी बनायचे आहे. देह-अभिमान वश कोणतेच असे कर्म करायचे नाही, ज्याद्वारे
सेवेमध्ये विघ्ने येतील. अनेकांचे कल्याण करण्यासाठी निमित्त बनायचे आहे. आठवणीसाठी
थोडा वेळ अवश्य काढायचा आहे.
वरदान:-
पवित्रता च्या
वरदानाला संस्कार बनवून पवित्र जीवन बनवणारे कष्टा पासून मुक्त भव
काही मुलांना पवित्रते
मध्ये कष्ट वाटतात याद्वारे सिद्ध होते वरदाता बाबा कडून जन्माचे वरदान घेतले नाही,
वरदान घेण्यामध्ये कोणतेच कष्ट नसतात.तर प्रत्येक आत्म्याला जन्माचे प्रथम वरदान आहे
पवित्र भव, योगी भव.जसे जन्माचे संस्कार खूपच पक्के असतात, तर पवित्रता ब्राह्मण
जन्माचा आदी संस्कार,निजी संस्कार आहे. या स्मूर्तीद्वारे पवित्र जीवन बनवा आणि
कष्टा पासून मुक्त बना.
बोधवाक्य:-
विश्वस्थ तेच
आहेत ज्यांच्यामध्ये सेवेची शुद्ध भावना आहे.