20-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, जर शिवबाबांचा तुम्हाला आदर आहे तर त्यांच्या श्रीमता अनुसार चाला. श्री
मतानुसार चालले म्हणजेच पित्याचा आदर करणे.”
प्रश्न:-
मुले बाबां
पेक्षाही जादूगर आहेत कसे?
उत्तर:-
श्रेष्ठ ते श्रेष्ठ पित्याला आपला मुलगा बनवणे मानणे. शरीर मन धनाने पित्याचे वारस
म्हणजेच वारसदार बनवून त्यांच्यावर समर्पित होणे हीच मुलांची जादूगरी आहे. जे आता
परमेश्वराला वारसदार बनवतात तेच 21 जन्मांकरता वारसाहक्काचे अधिकारी बनतात.
प्रश्न:-
धर्मराजाची सभा
कोणत्या मुलांकरता असते?
उत्तर:-
जी मुले दान
केलेली वस्तू पुन्हा परत घेण्याचा संकल्प करतात. मायेच्या प्रभावात येऊन डीससर्विस
करतात त्यांच्याकरिता धर्मराजाची सभा बसते.
ओम शांती।
आत्म्याचे विचित्र पिता येऊन आपल्या विचित्र मुलांना समजावून सांगतात म्हणजेच दूर
देशात राहणारे यांना परमपिता परमात्मा म्हणतात खूप खूप दूर देशातून येऊन या
ब्रह्माच्या शरीराद्वारे आपल्याला शिकवितात. आता जे शिकवतात त्यांच्याबरोबर आठवण तर
स्वाभाविकपणे राहतेच सांगावेच लागत नाही की हे मुलांनो शिक्षकाबरोबर आठवण ठेवा किंवा
त्यांची आठवण करा. नाही येथे पिता सांगतात हे आत्म अभिमाने मुलांनो हा तुमचा पिता
पण आहे शिक्षक पण आहे गुरु पण आहे यांच्याबरोबर आठवण ठेवा. म्हणजेच पित्याची आठवण
ठेवा. हे आहेत विचित्र शिवबाबा. तुम्ही त्यांना क्षणाक्षणाला विसरून जातात म्हणून
सांगावे लागते शिकवण्या बरोबर आठवण ठेवली तरच तुमचे पाप भस्मीभूत होईल. हा कायदा
नाही सांगत की शिक्षक म्हणतील की मला पहा यात तुमचा फायदा आहे. परंतु शिवबाबा फक्त
म्हणतात माझी आठवण करा या आठवणीच्या शक्तीनेच तुमचे पाप नष्ट होईल. यालाच म्हणतात
आठवणी ची यात्रा. आता आत्म्याचे विचित्र पिता मुलांना पाहतात मुले सुद्धा स्वतःला
आत्मा समजून विचित्र पित्याची आठवण करतात. तुम्ही तर क्षणाक्षणाला शरीर धारण करता
मी तर सारे कल्प शरीरात येत नाही फक्त या संगमयुगातच खूप दूरच्या देशातून परमधामतून
येतो तुम्हाला शिकविण्या करता. हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा बाबाच आपले पिता
शिक्षक आणि सद्गुरू आहेत. ते विचित्र आहेत. त्यांना स्वतःचे शरीर नाही मग येतात कसे?
म्हणतात की मला प्रकृतीचा मुखाचा आधार घ्यावा लागतो. मी तर आहे विचित्र तुम्हाला
सर्वांना चित्र म्हणजेच शरीर आहे मला शरीर तर जरूर पाहिजे. ना घोड्यांच्या गाडीतून
तर नाही येणार. बाबा म्हणतात मी या शरीरात प्रवेश करतो जे नंबर वन आहेत तेच पुन्हा
शेवटच्या नंबर मध्ये येतात. जे सतोप्रधान होते तेच तमोप्रधान होतात तेव्हा त्यांनाच
पुन्हा सतोप्रधान बनवण्याकरता पिता पुन्हा शिकवतात समजतात की या रावणाच्या राज्यात
पाच विकारांवर विजय मिळवून तुम्हाला जगतजीत बनायचे आहे. मुलांनी ही गोष्ट लक्षात
ठेवली पाहिजे की आम्हाला विचित्र पिता शिकवत आहेत. ती त्याची आठवण नाही केली तर पाप
भस्म कसे होणार? ही गोष्ट तुम्ही फक्त या संगम युग आतच ऐकणार. एकदा जे काही घडते
तेच कल्पा नंतर पुन्हा रिपीट होते म्हणजेच पुनरावृत्ती होते. बाबा किती चांगले
समजतात. हे समजण्यासाठी कुशाग्र बुद्धी पाहिजे. हा कुठल्या साधूसंतांचा सत्संग नाही
त्यांना पिता म्हणतात तर पुत्र पण म्हणतात तुम्ही जाणता की हे आमचे बाबा पिता पण
आहेत व पुत्र पण आहेत. आम्ही सर्व काही या मुलाला वारसाहक्काच्या रूपा देतो व पितान
कडून 21 जन्म करता सुख शांती चा वारसा घेतो. कचरा म्हणजेच पाच विकार देऊन
पित्याकडून विश्वाचे राज्य घेतो. आपण भक्तिमार्गात म्हटले होते बाबा जेव्हा तुम्ही
याल तेव्हा आम्ही तुमच्यावर शरीराने मनाने धना सहित समर्पित होऊन. लौकिक पिता पण
मुलांच्यावर समर्पित होतात तर येथे तुम्हाला हे कसे विचित्र पिता मिळालेले आहेत की
ज्यांची आठवण केल्याने तुमचे पाप नष्ट करून ते आपल्या घरी परत जातील. किती मोठी
यात्रा आहे? बाबा येतात पहा कोठे? जुन्या रावणाच्या राज्यात. म्हणतात की माझ्या
नशिबात पवित्र शरीर मिळण्याचा योग नाही. पती त्यांना पावन बनवण्याकरता कसे येऊ?
आम्हाला तर पतित दुनियेत येऊनच सर्वांना पवित्र बनवावे लागते तर अशा शिक्षकाचा आदर
ठेवला पाहिजे ना? पुष्कळ जण असे आहेत की आदर ठेवत नाहीत. हेसुद्धा सृष्टी रूपी
नाटकात घडणारच आहे. राज्यात सर्वजण पाहिजेत नंबर प्रमाणे तर सर्व प्रकारचे येथे
तयार होतात. कमी दर्जा प्राप्त होणार यांचे हे हाल होतील ना शिकतील ना त्याच्या
आठवणीत राहतील. हे खुपच विचित्र पिता आहेत ना त्यांची वर्तणूक दिव्य आहे. त्यांचा
पार्ट आणखीन कोणाला मिळू शकणार नाही. हे पिता येऊन तुम्हाला किती श्रेष्ठ ज्ञान
देतात तेव्हा त्यांचा आदर केला पाहिजे त्यांच्या श्री मताप्रमाणे चाललेच पाहिजे.
परंतु माया क्षणाक्षणाला विसरायला लावते. माया इतकी खतरनाक आहे की जी चांगल्या
चांगल्या मुलांना पदावरून खाली उतरवते. पिता किती धनवान बनवतात परंतु माया एकदम
तोंड फिरवते. मायेपासून स्वतःला वाचवायचे असेल तर शिव बाबांची आठवण जरूर केली पाहिजे,
खूप चांगली चांगली मुले आहेत की जी बाबांचे बनून पुन्हा मायाचे बनतात विचारूच नका .
पक्के निंदक बनतात तर माया एकदम नाकालाच पकडते. गोष्ट पण आहे ना हत्तीला मगरीने
खाल्ले परंतु याचा अर्थ कोणालाच समजत नाही. बाबा प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने
समजावून सांगतात. काही मुले समजतात सुद्धा परंतु नंबरानुसार पुरुषार्था प्रमाणे
कोणाला तर धारणा बिलकूल होत नाही. फार श्रेष्ठ शिक्षण आहे ना. तर त्याची धारणा करू
शकत नाही. बाबा म्हणतील की त्यांच्या नशिबात राज्य भाग्य नाही. कोणी धोत्र्याचे फुल
आहे तर कोणी सुगंधी फूल आहे. विविध फुलांची बाग आहे ना अशीसुद्धा विविधता असली
पाहिजे. राज्यात तुम्हाला नोकर-चाकर पण मिळतील. नाहीतर नोकर-चाकर कसे मिळतील.
राज्याची स्थापना तर येथेच होते ना नोकर-चाकर चांडाळ इत्यादी सर्व मिळतील. ही
राजधानी स्थापन होत आहे. नवलच आहे पिता तुम्हाला एवढे श्रेष्ठ महान बनवतात तर अशा
पिठाच्या आठवणीने आनंदाश्रू ओघळले पाहिजेत.
तुम्ही माळेतील मनी बनताना म्हणता की बाबा तुम्ही किती विचित्र आहात कसे येऊन आम्हा
पतितांना पवित्र बनवण्या करिता शिकवत आहात. भक्ती मार्गामध्ये शिवाची पूजा करतात
परंतु माहित नाही की हेच पतित-पावन आहेत. तरीपण बोलतात हे पतितपावन येऊन आम्हाला
गुणवान बनवून देवी-देवता बनवा. मुलांची आज्ञा ऐकून बाबा येतात आणि म्हणतात मुलांनो
पवित्र बना. पवित्र ते वरच भांडण होतात. बाबा नवलच करतात !मुलांना म्हणतात माझी
आठवण कराल तर पाप भस्म होईल. बाबां आत्म्या बरोबरच बोलतात. सर्व काही आत्मा करते.
विकर्म सुद्धा आत्माच करते. आणि शरीराद्वारे भोगणा भोगते. त्यांच्या साठेच
धर्मराजाचे सभा बसते विषेश्या मुलांकरता जे सर्विस करण्याच्या योग्यतेचे बनवून
सुद्धा पुन्हा दुश्मन बनतात हे तर बाबा ना माहित आहे माया कशी त्यांना खाऊन टाकते
बाबा आम्ही पराभूत झालो तोंड काळे केले आता क्षमा करा? आता पतित बनला मायेचे बनलात
पुन्हा क्षमा कशाची? त्यांना तर पुन्हा खूप खूप कष्ट करावे लागतील. पुष्कळ आहेत जे
मायेमुळे पतित बनतात. बाबा म्हणतात येथे बाबांना विकारांचे दान देऊन जा पुन्हा परत
घेऊ नका नाहीतर तुम्ही संपून जाल. हरिश्चंद्र राजाची कथा आहे दान दिल्यावर पुन्हा
खूप सावध राहायचे आहे. दान परत घेतल्याने शंभर पटीने शिक्षा होते. पुन्हा एकदम हलके
पद मिळेल. मुलांना माहित आहे राजधानी स्थापन होत आहे. जो धर्म स्थापन करतात त्यांची
प्रथम राजाई चालत नाही राजाई तर तेव्हाच होईल जेव्हा पन्नास-साठ करोड होतील.
तेव्हाच लष्कर बनेल सुरुवातीला तर येतातच फक्त एक-दोन नंतर वृद्धी होते तुम्हाला
माहित आहे की क्राइस्ट पण कोणत्यातरी रुपात येईल पुनर्जन्म तर घ्यावाच लागतो.
तमोप्रधान तर प्रत्येकाला व्हावे लागते. या वेळी सगळी दुनियाच तमोप्रधान जडी भूत
झाली आहे. जुन्या जगाचा विनाश जरूर झाला पाहिजे. ख्रिश्चन लोकसुद्धा म्हणतात की येशू
ख्रिस्ताच्या अगोदर तीन हजार वर्ष पूर्व स्वर्ग होता. पुन्हा जरूर येईल परंतु ही
गोष्ट कोण समजावणार बाबा म्हणतात की आता ती अवस्था मुलांची कोठे राहिली आहे.
क्षणाक्षणाला म्हणतात की आम्ही आठवणीत राहू शकत नाही. मुलांच्या कृती वरून कळून येते.
बाबांना समाचार द्यायला घाबरतात. बाबा तर मुलांवर किती प्रेम करतात. प्रेमाने नमस्ते
करतात. मुलांमध्ये तर गर्व असतो चांगल्या चांगल्या मुलांना माया भुरळ पडते. बाबा
समजू शकतात म्हणतात मी ज्ञानाचाचा सागर आहे. याचा अर्थ असा नाही की मी सगळ्यांचे
अंतकरण जाणतो मी आलो आहे शिकवण्याकरता ना की कोणाचे मन वाचण्याकरता. मी कोणाच्या
मनाला वाचू शकत नाही. साकार ब्रह्मा बाबा सुद्धा कोणाच्या मनाला वाचू शकत नाही.
यांना सगळे विसरायचे आहे तर वाचणार काय? तुम्ही येथे येता शिकण्याकरता भक्तिमार्ग
ही वेगळा आहे. खाली उतरण्याचा सुद्धा उपाय पाहिजे ना? या गोष्टीमुळे तुम्ही खाली
उतरता. हा पण सृष्टी नाटकातील एक खेळत आहे. भक्ती मार्गातील शास्त्र वाचत वाचत
तुम्ही पायरी उतरत आलात तमोप्रधान बनत आलात. आता तुम्हाला याची दुनियेमध्ये अजिबात
राहायचे नाही. कलियुग संपून आता सत्ययुग येणार आहे. आता संगम युग आहे. या सर्व
गोष्टीची धारणा तुम्हाला करायची आहे. बाबा समजावून सांगतात बाकी तर सर्व दुनियाच्या
बुद्धीला गोदरेज चे कुलूप लागलेले आहे. तुम्ही समजता हे देवी गुण वाले होते, आता
राक्षसी गुण वाले बनलेले आहेत. बाबा समजतात आता भक्तिमार्गाच्या गोष्टी विसरून जा
आता मी सांगतो ते ऐका वाईट ऐकू नका…... आता माझ्या एकट्याचेच ऐका आता मी तुम्हाला
तारणारा आलो आहे.
तुम्ही आहात ईश्वरीय संप्रदायाचे प्रजापिता ब्रह्माच्या मुखकमलतून ज्ञान घेऊन तुमचा
जन्म झाला आहे. तुम्ही सर्व दत्तक मुले आहात. ब्रह्मा बाबांना आदीदेव म्हणतात.
महावीर पण म्हणतात. तुम्ही मुले पण महावीर आहात ना जे योग्य शक्तीने मायेवर विजय
प्राप्त करता. बाबांना म्हणतात ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर शिव पिता तुम्हाला
अविनाशी ज्ञान रत्नांनी भरलेल्या थाळ्या भरून भरून देतात. तुम्हाला ज्ञानाने समृद्ध
आणि संपन्न बनवतात. जे गेम धारण करतात ते उच्चपद प्राप्त करतात जे धारणा करत नाही
ते तर जरूर कमी पद मिळवतात बाबांकडून तुम्हाला कुबेराचा खजाना मिळतो. अल्लाह अवल
दिन ची पण कथा आहे ना. तुम्ही जाणता सत्ययुगात आम्हाला कोणती अप्राप्त वस्तू राहात
नाही. 21 जन्माचा वारसा बाबा देतात. विश्वाचे पिता विश्वाचा वारसा देतात. हद चा
लौकीक पित्याचा वारसा मिळाला तरी विश्वाच्या पित्याची आठवण जरूर करतात. हे परमात्मा
दया कर कृपा कर कोणाला थोडेच माहिती आहे की ते काय देणार आहेत. ते आता तुम्हाला
कळाले बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवतात. चित्रातून सुद्धा कळते ब्रह्मा द्वारे
स्थापना. ब्रह्मा समोर बसलेले आहेत साधारणपणे. स्थापना करणार तर जरूर त्यांना
निमित्त बनवणार ना बाबा किती चांगल्या पद्धतीने समजावतात. तुम्ही पूर्ण समजावू शकत
नाही. भक्तिमार्गात शंकरा समोर जाऊन म्हणतात झोळी भरा आत्मा म्हणते आम्ही भिकारी
झालो आहोत. आमची झोळी गुणांनी भरा आम्हाला देवता बनवा. आता तुम्ही झोळी भरायला आलात.
म्हणतात ना आम्ही तर मनुष्यापासून नारायण बनणार हा अभ्यासच आहे नराचा नारायण
बनवण्याचा जुन्या दुनियेत येण्याचे कोणाचे मन होईल का? परंतु नवीन दुनियेत सगळे
येणार नाहीत. 25 टक्के जुन्या दुनियेत येणार काही कमी तर पडेल ना थोडा जरी कोणाला
बाबा चा परिचय दिला तर तुम्ही स्वर्गाचे मालक जरुर बनाल. आता नरकाचे मालक आहात.
राजाराणी प्रजा सर्वच नरकाचे मालक आहात. तेथे होते डबल मुकुटधारी आता नाही. आज काल
धर्म वगैरे कोणी मानत नाही. देवी-देवता धर्म नष्ट झाला आहे. गायले जाते की
धर्मामध्ये टाकत आहे धर्माला मानत नाही म्हणून ताकद पण राहिली नाही बाबा समजावतात
गोडगोड मुलांनो तुम्ही पुजनिया पासून पुजारी बनलेले आहात. 84 जन्म घेता. तुम्हीच
ब्राह्मण पासून देवता, देवता पासून क्षत्रिय, क्षत्रिय पासून वैश्य, वैश्य पासून
शूद्र आणि शुद्रा पासून पुन्हा ब्राह्मण बनलेले आहात. बुद्धीमध्ये हे सगळे चक्र
फिरते. 84 जन्माचे चक्र आपण लावतो आता पुन्हा घरी चाललो. पतित घरी जाऊ शकत नाही.
आत्माच पतित किंवा पवित्र बनते. सोन्या तच भटूर मिसळतात दागिन्यात नाही. हा आहे
ज्ञानाचा अग्नी ज्यामुळे सगळी मिलावट निघून जाईल व तुम्ही पक्के सोने बनाल. म्हणजेच
पवित्र बनाल व 16 कला बनल्यानंतर दागिने पण तुम्हाला चांगले मिळतील. आता आत्मा पतित
आहे तर पवित्र देवस्थान समोर नमस्कार करतात सर्वकाही करणारी तर आत्मच आहे ना. बाबा
आता समजावून सांगतात मुलांना फक्त माझी आठवण कराल तर तुमची जीवन नाव कलियुगतून
सत्ययुगात पार होईल पवित्र बनवून पवित्र दुनियेमध्ये जाल. तुम्ही जेवढा आता
पुरुषार्थ कराल त्यानुसार बेडापार होणार. सर्वांना हाच परिचय द्या की ते आहेत लौकिक
पिता हे आहेत विश्वाचे पिता संगमयुगातच बाबा येतात व स्वर्गाचा वारसा देतात. तर अशा
पित्याची तर आठवण केलीच पाहिजे. शिक्षकांना कधी विद्यार्थी विसरतात का? परंतु येथे
माया विसरायला लावते खूप सावध राहिले पाहिजे. युद्धाचे मैदान आहे ना! बाबा म्हणतात
आता विकारात जाऊ नका पतित बनवू नका आता तर स्वर्गात जायचे पवित्र बनले तर पवित्र
नव्या दुनिया चे मालक बनणार. तुम्हाला विश्वाची राजाई देतो लहान-सहान गोष्टी आहे
का? फक्त एक जन्म पवित्र बना आता पवित्र नाही बनले तर पुन्हा पती बनाल. आकर्षण खूप
आहे. काम विकारावर विजय मिळवल्यावर तुम्ही जगाचे मालक बनाल. तुम्ही स्पष्ट सांगू
शकता की परमपिता परमात्मा जगाचे गुरु आहेत जे सर्व जगाची सद्गती करतात. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. अविनाश
ज्ञान रत्नांनी बुद्धी रुपी झोळी भरून समृद्ध व्हायचे आहे कोणत्याही प्रकारचा गर्व
असायला नको.
2. सेवा करायच्या योग्य बनवून पुन्हा कधी दुश्मन बनवून डिसर्विस नाही करायचे. दान
दिल्यानंतर खूप खूप सावध राहायचे आहे. दान कधी परत घेण्याचा विचार सुद्धा करायचा
नाही.
वरदान:-
ब्राह्मण
जीवनात एकव्रता बनून या धड्या द्वारे आत्म्याच्या श्रेष्ठत्वात राहणारे संपूर्ण
पवित्र भव.
या ब्राह्मण जीवनात
एकव्रता हा धडा पक्का करून पवित्रतेच्या श्रेष्ठता मध्ये राहून धारणा करावी. तर
संपूर्ण कल्प भर ही आत्मिक श्रेष्ठता चालत राहील. आपली आत्म्याची महानता आणि
पवित्रतेची चमक परमधाम मधील सर्व आत्म्यामध्ये श्रेष्ठ आहे. सुरुवातीच्या काळात
देवता स्वरूपातील हे व्यक्तिमत्व विशेष राहिले नंतर मध्यकाळात आपल्या जड मूर्तींची
विधीपूर्वक पूजा होते या संगम युगात ब्राह्मण जीवनाचा आधार पवित्रतेची महानता आहे
म्हणून जोपर्यंत ब्राम्हण जीवनामध्ये जगायचे आहे तोपर्यंत पवित्र राहिलेच पाहिजे.
बोधवाक्य:-
स्लोगन:- आपण
सहनशिलतेचे देव आणि देवी बनाल तर निंदा करणारे शिवी देणारे पण प्रेमाने मिठीत
मारतील.