11-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, बेहदची स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर अभ्यास करा एका बाबाशिवाय
दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको”
प्रश्न:-
बाबाचे
बनल्यानंतर पण खुशी राहत नाही, त्याचे कारण कोणते?
उत्तर:-
1) बुध्दी
मध्ये पुर्ण ज्ञान राहत नाही. 2) बाबांची यर्थाथरित्या आठवण करत नाही. आठवण
केल्यामुळे माया धोका देत राहते, म्हणुन खुशी राहत नाही. तुम्हा मुलांच्या बुध्दी
मधे नशा हवा की बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवतात, तर नेहमी उल्लास आणि खुशी राहावी.
बाबांचा जो वारसा आहे, पवित्रता सुख आणि शांती यामधे संपुर्ण बना तर खुशी राहिल.
ओम शांती।
ओम शांतीचा अर्थ तर मुलांना चांगल्या रितीने माहिती आहे, की मी आत्मा आहे, माझे हे
शरीर. हे चांगल्यारितीने आठवण करा. भगवान म्हणजे आत्म्याचे पिता आम्हाला शिकवत आहेत
असे कधी ऐकले, ते तर समजतात कृष्ण शिकवतात, परंतु त्यांचे नाव रुप तर आहे ना. हे तर
शिकवणारे निराकार पिता आहेत. आत्माच ऐकते आणि परमात्मा ऐकवतात ही नविन गोष्ट आहे.
विनाश तर होणारच आहे ना. एक आहे विनाश काळात विपरीत बुध्दी, दुसरे म्हणजे विनाश
काळात प्रित बुध्दी. यापुर्वी तुम्ही पण म्हणत होते, दगडा मातीमध्ये ईश्वर आहे.
यासर्व गोष्टींना चांगल्याप्रकारे समजावयाचे आहे. हे तर समजवले आहे, आत्मा अविनाशी
आहे, शरीर विनाशी आहे. आत्मा कधी कमी जास्त होत नाही. ती इतकी सुक्ष्म आहे इतक्या
छोटया आत्म्यामधे 84 जन्माची नोंद आहे, ती भुमिका करत राहते. आत्माच शरीराला चालवते.
उच्च ते उच्च पिता शिकवतात तर जरुर पद पण उच्च मिळेल ना. आत्माच शिकुन पद घेते.
आत्म्याला पाहिले जात नाही. खुप प्रयत्न करतात की आत्म्याला पाहु, आत्मा कशी येते,
कोठुन येते परंतु माहिती होत नाही. आत्मा वेगळी आहे. जीव वेगळा आहे. आत्मा लहान मोठी
होत नाही. जीव लहान मोठा होतो. आत्माच पतित आणि पावन बनते. आत्माच बाबांना बोलवते,
हे पतित पावन बनवणारे तुम्ही या. हे पण समजवले जाते, सर्व आत्मे वधू, सिता आहेत,
शिवबाबांच राम आहेत, एकच साजन आहेत. दुसरे लोक सर्वाना साजन म्हणतात. आता साजन
सर्वामधे प्रवेश करतील असे होऊ शकत नाही. हे उल्टे ज्ञान बुध्दीमधे असल्यामुळेच खाली
उतरत आले आहेत. कारण खुप निंदा करतात, पाप करतात, दोष देतात. बांबाची खुप भारी निंदा
केली आहे. मुलं कधी पित्याची निंदा करतील का. परंतु आजकाल बिघडले आहेत म्हणुन
पित्याची पण निंदा करतात. हे तर बेहदचे पिता आहेत. आत्माच बेहदच्या पित्याची निंदा
करते, बाबा तुम्ही कच्छ मच्छ अवतार घेतात, असे म्हणतात कृष्णाची पण ग्लानी केली आहे,
राणीला पळविले, लोणी चोरले इ. आता लोणी इ. चोरण्याची त्यांना काय आवश्यता आहे. किती
तमोप्रधान बुध्दी बनले आहेत. बाबा म्हणतात मी येऊन, पावन बानण्याची खुप सहज युक्ती
संगतो. बाबाच पतित पावन सर्वशक्तीमान अधिकारी आहेत. जसे साधु संत इ. जे पण आहेत
त्यांना ग्रथांचे अधिकारी म्हणतात. शकरांचार्याना पण वेद ग्रंथ इ.चे अधिकारी
म्हणतात. त्यांचा खुप देखावा असतो. शिवाचार्यचा तर काहीच भपका दिखावा नाही.
यांच्यासोबत कोणती पलटन नाही. बाबा तर सन्मुख सर्व वेद ग्रंथ इ.चे रहस्य ऐकवतात. जर
शिवबाबांनी दिखावा केला तर प्रथम ब्रहमा चा दिखावा पाहिजे, परंतु नाही. बाबा
म्हणतात, मी तर तुम्हा मुलांचा सेवक आहे. बाबा यांच्यामधे प्रवेश करुन मुलांना
समजवतात की, मुलांनो तुम्ही पतित बनले आहात.
तुम्ही पावन होते, परत 84 जन्माच्या नंतर पतित बनले. यांच्याच भुगोलाची पुनवृत्ती
होती.यांनीच 84 जन्म भोगले, परत त्यांनाच सतोप्रधान बनण्याची युक्ती सांगतात. बाबा
सर्वशक्तीमान आहेत.ब्रहमा व्दारे सर्व वेद ग्रंथ इ.चे रहस्य समजवतात. चित्रामधे
ब्रहमाच्या हातामधे ग्रंथ दाखवतात .परंतु वास्तव मधे ग्रंथ इ.ची गोष्ट नाही. न बांबा
जवळ ग्रंथ आहेत, न ब्रहमा जवळ, न तुमच्या जवळ ग्रंथ आहेत. बाबा तर तुम्हाला दररोज
नव-नविन गोष्टी ऐकवतात. हे तर जाणतात की सर्व भक्ती मार्गाचे ग्रंथ आहेत. मी काही
ग्रंथामधील ज्ञान ऐकवत नाही. मी तर तुम्हाला मुखाव्दारे नविन ज्ञान ऐकवतो. तुम्हाला
राजयोग शिकवतो, ज्यांचे परत भक्तीमार्गाचे ग्रंथ बनतात, गिता नाव ठेवतात. माझ्याजवळ
किंवा तुमच्याजवळ गिता आहे काय. हे तर शिक्षण आहे, अभ्यास आहे. अभ्यासामधे अध्याय
श्लोक इ. थोडेच असतात .मी तर तुम्हा मुलांना शिकवतो, हुबहुब कल्प कल्प असेच शिकवत
राहतो. खुपच सहज गोष्ट समजवतो की, स्व:ला आत्मा समजा हे शरीर तर माती मधे जाणार आहे
आत्मा तर अविनाशी आहे, शरीर तर घडी घडी नष्ट होत राहते. आत्माच एक शरीर सोडुन दुसरे
घेते. बाबा म्हणतात मी कल्पामधे एकदाच येतो. शिवरात्री पण साजरी करतात. वास्तवमधे
शिवजयंती म्हणायला पाहिजे. परंतु जयंती म्हणल्यामुळे गर्भाव्दारे जन्म होतो म्हणुन
शिवरात्री म्हणतात. तुझ्यामधे माझ्यामधे आहे तर मग शोधतात का? एकदम देवता पासुन
आसुरी संप्रदायचे बनतात. देवता कधी दारु पितात, का? करतेच आत्मे विकारामधे
गेल्यामुळे दारु इ. पिण्यास सुरु करायला लागले. बाबा म्हणतात या जुन्या दुनियेचा
विनाश जरुर होणार आहे. जुन्या दुनियेमधे अनेक धर्म, नविन दुनियेमधे एक धर्म आहे
एकापासुन अनेक धर्म झाले परत एक जरुर होतील. मनुष्य तर म्हणतात कलियुग आणखी 40 हजार
वर्ष आहे. याला अज्ञानाचा काळोख म्हणले जाते. ज्ञान सुर्य प्रकट झाला. अज्ञान अंधार
विनाश. मुनष्यामधे खुप अज्ञान आहे. बाबा ज्ञान सुर्य ज्ञान सागर येतात, तर भक्ती
मार्गाचे अज्ञान दुर होते. तुम्ही बाबांची आठवण करत करत पवित्र बनतात, भेसळ बनावट
निघुन जाते, हा योग अग्नी आहे. काम अग्नी काळे बनवते. योग अग्नी म्हणजे शिवबाबांची
आठवण गोरा बनवते.
कृष्णांचे नाव पण ठेवले आहे, श्याम सुदंर. पंरतु अर्थ थोडाच समजतात. बाबा येऊन अर्थ
समजवतात, प्रथम सतयुगामधे खुप सुदंर असतात. आत्मा पवित्र सुदंर आहे तर शरीर पण
पवित्र सुदंर मिळते. स्वर्गामधे धन दौलत सर्व काही नविन असते. नविन धरती परत जुनी
होते. आता या जुन्या दुनियेचा विनाश जरुर होणार आहे. खुप तयारी होत आहे. भारतवासी
इतके समजत नाहीत, जितके परदेशी लोक समजतात. ते आपल्याच कुळाचा विनाश ओढावुन घेत
आहेत. कोणी प्रेरणा देत आहे. विज्ञानाव्दारे आम्ही आपला विनाश ओढावुन घेत आहोत. हे
पण समजतात खिस्त पुर्व तीन हजार वर्ष स्वर्ग होता. या देवी देवतांचे राज्य होते.
भारतच प्राचीन होता. या राजयोगाव्दारे लक्ष्मी नारायण असे बनले होते. तो राजयोग बाबा
परत शिकवत आहेत. सन्याशी शिकवु शकत नाहीत. आजकाल तर खुप ठगी झालो आहे. परदेशामधे
जाऊन म्हणतात, आम्ही भारताचा प्राचीन योग शिकवतो, परत असेही म्हणतात, अंडी खावा.
दारु इ. प्या काही पण करा. आता सन्याशी इ. राजयोग कसा शिकवतात, मनुष्याला देवता कसे
बनवतील? बाबा समजवतात, आत्मा किती उच्च आहे, परत पुनर्जन्म घेत घेत सतोप्रधान पासुन
तमोप्रधान बनली आहे. आता तुम्ही परत स्वर्गाची स्थापना करत आहात तिथे दुसरा धर्म
नसतो.
आता बाबा म्हणतात, नर्काचा विनाश तर जरुर होणार आहे. येथे जे आले आहेत, ते परत
स्वर्गामधे जरुर येतील शिवबाबा कडुन थोडेपण ज्ञान ऐकले तर स्वर्गामधे जरुर येतील.
परत जितका अभ्यास करतील. बाबांची आठवण करतील तेवढे उच्च पद प्राप्त करतील. आता
विनाश काळ तर सर्वासाठीच आहे. विनाश काले जे प्रित बुध्दी आहेत, बाबा शिवाय कोणाची
आठवण करत नाहीत, तेच उच्च पद प्राप्त करतात. याला म्हणले जाते-बेहदची स्कॉलरशिप,
यामधे तर स्पर्धा करायला पाहिजे. ही ईश्वरीय लॉटरी आहे. एक तर बाबांची आठवण दुसरे
म्हणजे दैवी गुणांची धारण करायची आहे.राजाराणी बनायचे आहे तर प्रजा पण बनवायची आहे.
कोणी प्रजा खुप बनवतात, कोणी कमी बनवतात. सवेव्दारे बनते सेवेमुळे संग्राहालय
प्रदर्शनीमध्यसे खुप प्रजा बनते. प्रजा तुम्ही शिकत आहात, परत सुर्यवंशी चंद्रवंशी
घराण्यामधे चालले जाल. हे तुम्हा ब्राहमाणाचे कुळ आहे. बाबा ब्राहमण कुळ दत्तक घेऊन
त्यांना शिकवतात. बाबा म्हणतात एक कुळ आणि दोन घराणे बनवतो. सुर्यवंशी महाराज
महाराणी आणि चद्रंवंशी राजाराणी. यांना डबल सिरताज म्हणतात परत जेव्हा विकारी राजा
बनतात तर त्यांना प्रकाशाचा ताज देत नाहीत. डबल ताजधारी राजांचे मंदिर बनवुन त्यांची
पुजा करतात. पवित्रच्या पुढे माथा टेकवतात. सतयुगामधे पुजा होत नाही. ती तर पावन
दुनियाच आहे, तेथे पतित नसतात. त्यास सुखधाम निर्विकारी दुनिया म्हणले जाते. यास
विकारी दुनिया म्हणतात. एक पण पावन नाही. सन्यांसी घरदार सोडतात, राजा गोपीचंद चे
पण उदाहरण आहे. तुम्ही जाणतात, कोणी पण मनुष्य एक दोघाची गती सदगती करु शकत नाहीत.
सर्वाची सदगती दाता मीच आहे. मीच येऊन सर्वाना पावन बनवतो. एक तर पवित्र बनवुन
शांतिधाम मधे चालले जातील आणि दुसरे म्हणजे पवित्र बनवुन सुखधाममधे जातील. हे
अपवित्र दुखधाम आहे. सतयुगामधे रोग इ. काहीच नसतात. तुम्ही त्या सुखधामाचे मालक होते,
परत रावण राज्यामधे दु:खधामाचे मालक बनले. बाबा म्हणतात कल्प कल्प तुम्ही माझ्या
श्रीमतावरती स्वर्ग स्थपन करतात. नविन दुनियेचे राज्य घेतात परत पतित नर्कवासी
बनतात. देवताच परत विकारी बनतात. वाममार्गात जातात.
गोड गोड मुलांना बाबा परिचय देतात की, मी एकदाच पुरुषोत्तम संगमयुगावरती येतो. मी
युगे युगे येत नाही.कल्पाच्या संगमयुगात येतो. न की युगे युगे.कल्पाच्या संगमा वरती
का येतो, कारण नर्काला स्वर्ग बनवतो. प्रत्येक 5 हजार वर्षा नंतर येतो, काही मुलं
लिहतात, बाबा आम्हाला खुशी, उल्लास राहत नाही, अरे-बाबा तुम्हाला विश्वाचे मालक
बनवतात, अशा बाबांची आठवण करुन तुम्हाला खुशी राहत नाही. तुम्ही पुर्ण पणे आठवण करत
नाहीत पतीची पत्नीची आठवण करुन खुशी होते, जे पतित बनवतात आणि बाबा जे डबल सिरताज
बनवतात, त्यांची आठवण करुन खुशी होत नाही. बाबांचे मुलं बनतात तरीही खुशी राहत नाही.
पुर्ण ज्ञान बुध्दीमधे नाही, आठवण करत नाही म्हणुन माया धोखा देते. मुलांना खुप
चांगल्यारितीने समजवले जाते.कल्प कल्प समजवले जाते. कल्प कल्प समजवतात. आत्मा पत्थर
बुध्दी बनली आहे, त्याला पारस बुध्दी बनवतात. ज्ञानसागर बाबाच येऊन ज्ञान देतात. ते
प्रत्येक बाबतीत संपन्न आहेत. ज्ञानाचे सागर आहेत, सुखाचे सागर आहेत, प्रेमाचे सागर
आहेत. अशा पित्याकडुन तुम्हाला वारसा मिळतो. असे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी तुम्ही
येतात. बाकी तो सतसंग इ.तर सर्व भक्ती मार्गाचे आहेत. त्यामधे मुख्य उददेश काहीच
नाही. याला गिता पाठशाळा म्हणले जाते. वेद पाठशाळा नसते. गिता व्दारेच नरापासुन
नारायण बनतात. जरुर बाबाच बनवतील ना. मनुष्य मनुष्याला देवता बनवू शकत नाही. बाबा
सारखे सारखे समजवतात मुलांनो, स्वत:ला आत्मा समजा. तुम्ही देह थोडेच आहात. आत्मा
म्हणते, मी एक देह सोडुन दुसरा घेते. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. जसे
शिवबाबाचा कोणता भपका, दिखावा करत नाहीत, सेवक बनवुन मुलांना शिकविण्यासाठी आले
आहेत. असे बाप समान अधिकारी असताना पण निरंहकारी राहायचे आहे. पावन बनुन पावन
बनवण्याची सेवा करायची आहे.
2. विनाश काळात
ईश्वरीय लॉटरी घेण्यासाठी प्रित बुध्दी बनुन आठवणीमधे राहण्यासाठी देवी गुणांना
धारण करण्याची स्पर्धा करायची आहे.
वरदान:-
ईश्वरीय
सेवेव्दारे विविध प्रकारचा मेवा प्राप्त करणारे अधिकारी आत्मा भव
सेवा करा तर मेवा
मिळेल असे म्हणले जाते. ईश्वरीय ज्ञान देणेच ईश्वरीय सेवा आहे. जी ही सेवा करतात
त्यंाना अतिइंद्रिय सुखाचा, शक्तीचा खुशीचा विविध प्रकारचा मेवा मिळतो. तुम्ही
ब्राहमणच याचे अधिकारी आहात कारण तुमचे काम आहे ईश्वरीय शिक्षण घेणे आणि शिकवणे,
ज्यामुळे ईश्वराचे बनतील. अशी सेवा करण्यामुळे ईश्वरीय फळाचे अधिकारी बनले, याच
नशेमधे रहा.
बोधवाक्य:-
बाबांच्या
सोबत राहुन कर्म करा तर डबल लाईट बनाल...!