28-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, हे शिक्षण जे बाबा शिकवितात, यामध्ये अफाट कमाई आहे, म्हणून चांगल्या रितीने शिकत राहा, तार कधीही तोडू नका....!!!

प्रश्न:-
जे विनाशकाले विपरीत बुध्दी आहेत, त्यांच्याकोणत्या गोष्टीबद्दल हसायला येते?

उत्तर:-
जेव्हा तुम्ही त्यांना सांगता कि, विनाश लवकरच होणार आहे, तर त्यांना हसायला येते. तुम्ही जाणता बाबा येथे कायम तर राहणार नाहीत, बाबांचे कर्तव्य आहे सर्वांना पवित्र बनविणे. जेव्हा सर्व पवित्र बनतील तेव्हा ही जुनी दुनिया विनाश होईल, नवी येईल. हे युध्दच विनाशासाठी आहे.तुम्ही देवता बनल्यानंतर या कलियुगी खराब सुष्टीवर येऊ शकत नाही.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावतात. मुले समजतात कि, आम्ही खुप बेसमज बनलो होतो. मायारुपी रावणाने बेसमज बनविले होते. हेही मुले समजतात कि, बाबा जरुर येणारच, जेव्हा नविन सृष्टी स्थापन होणार आहे. त्रिमुर्तीचे एक चित्र आहे-बह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना व शंकराद्वारे विनाश कारण करवून घेणारा तर बाबा आहे ना. तो एकच आहे जो करतो आणि करवून घेतो. प्रथम कुणाचे नाव येईल. जो करतो त्यांचे नंतर, ज्याद्वारे करवितो त्यांचे. करवून घेणारा असे म्हणतात ना. ब्रह्माद्वारा नविन दुनियेची स्थापना करवितात. हे सुध्दा मुले जाणतात आमची जी नवी दुनिया आहे, जिची आम्ही स्थापना करीत आहोत, यांचे नांवच आहे देवी-देवतांची दुनिया. सतयुगातच देवी-देवता असतात. दुसऱ्या कुणाला देवी-देवता म्हणू शकत नाही. आता तुमच्या लक्षात आले कि, बरोबर आम्हीच देवी-देवता होतो, निशानी ही आहे. इस्लाम, बौध्द, ख्रिश्चन इत्यादी सर्वांची निशानी आहे. आमचे राज्य होते. तेव्हा इतर कुणीही नव्हते. आता इतर सर्व धर्म आहेत, आमचा देवता धर्म मात्र नाही. गीतेमध्ये नुसतीच मोठी-मोठी अक्षरे आहेत पण कुणी समजत नाही. बाबा म्हणतात विनाशकाले विपरीत बुध्दी आणि विनाश काले पीत बुध्दी. विनाश तर याच वेळी होणार आहे. बाबा संगमयुगात येतात, जेव्हा दुनियेचे परिवर्तन होते. बाबा त्याबदल्यात तुम्हा मुलांना सर्वकाही नविन देतात. बाबा सोनार आहेत, परीट आहेत, फार मोठे व्यापारी सुध्दा आहेत. एखादा विरळाच कोणी बाबांसोबत व्यापार करतो. या व्यापारात खुप फायदा आहे. शिक्षण घेण्यात खुप फायदा होतो. महिमासुध्दा करतात कि, शिक्षण म्हणजे कमाई आहे, आणि ती सुध्दा अनेक जन्मांची कमाई आहे. तर असे शिक्षण चांगल्या प्रकरे घेतले पाहिजे ना आणि बाबा शिकवितात पण, खुप सहज रीतीने, फक्त एक आठवडा समजून घ्या नंतर भले कुठेही जा, तुम्हाला हे ज्ञान समजले, म्हणजे मुरली मिळत राहिल मग पुन्हा तुमची तार तुटणार नाही. ही आहे आत्म्याची परमात्म्यासोबत तार. गीतेमध्ये सुध्दा लिहिले आहे कि, विनाशकाळात विपरीत बुध्दी असेल तर विनाशच होतो आणि प्रीतबुध्दी असेल तर विजय होतो. तुम्ही जाणता यावेळी मनुष्य एकमेकांना मारतात व त्रास देतात. यांच्या सारखा राग अथवा विकार इतर कुणामध्येही नाही. हे सुध्दा गायन आहे कि, द्रौपदीने धावा केला. बाबा समजावतात तुम्ही सर्वजण द्रौपदी आहात. भगवानुवाच, बाबा सांगतात-मुलांनो, आता विकारांत जाऊ नका. मी तुम्हाला स्वर्गात नेत आहे, तुम्ही फक्त माझी आठवण करा. आता विनाशकाळ आहे ना, कुणाचेच ऐकत नाहीत. भांडतच राहतात. किती सांगितले शांत राहा, पण शांत राहत नाहीत. आपल्या मुलां-बाळांना सोडून युध्दाच्या मैदानावर जातात. किती मनुष्य मरतात. मनुष्यांची काही किंमत राहिली नाही. जर किंमत आहे, महिमा आहे तर ती आहे या देवी-देवतांची, आता तुम्ही देवता बनण्याचा पुरुषार्थ करीत आहात. खरंतर तुमची महिमा या देवतांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला आता बाबा शिकवित आहेत. किती उच्च शिक्षण आहे. शिकणारे या शेवटच्या जन्मात, एकदम तमोप्रधान बनले आहेत. मी तर सदैव सतोप्रधानच आहे.

बाबा सांगतात-मी मुलांचा आज्ञाकारी सेवक बनून आलो आहे. विचार करा तुम्ही किती अस्वच्छ बनला आहात. बाबाच आम्हाला वाह-वाह बनवितात. भगवान मनुष्यांना शिकवून किती श्रेष्ठ बनवित आहे. बाबा स्वत: सांगतात-मी खुप जन्मांच्या शेवटी तुम्हा सर्वांना तमोप्रधानपासून सतोप्रधान बनविण्यासाठी आलो आहे. आता तुम्हाला मी शिकवत आहे. बाबा म्हणतात, मी तुम्हाला स्वर्गवासी बनविले होते, तुम्ही पुन्हा नर्कवासी कसे बनलात, कुणी बनविले? गायन सुध्दा आहे विनाशकाळात विपरीत बुध्दी असणाऱ्यांचा विनाश होतो आणि जे प्रीतबुध्दी आहेत त्यांचा विजय होतो. जेवढे तुम्ही प्रीतबुध्दी बनाल म्हणजे जेवढी आठवण कराल, तेवढा तुमचाच फायदा आहे. युध्दाचे मैदान आहे ना. कुणीही हे जाणत नाही की, गीतेमध्ये कोणते युध्द वर्णन केले आहे. त्यांनी तर कौरव आणि पांडवांचे युध्द दाखविले आहे. कौरव संप्रदाय आणि पांडव संप्रदाय तर आहेत पण युध्द नाही. पांडव त्यांना म्हणतात जे बाबांना जाणतात. ज्यांची बाबांशी प्रीत बुध्दी आहे. व ज्यांची बाबांशी विपरीत बुध्दी आहे त्यांना कौरव म्हणतात. शब्द तर खुप चांगले अर्थात समजून घेण्यासारखे आहेत.

आता संगमयुग आहे. तुम्ही मुले जाणता कि, नवी दुनिया स्थापन होत आहे. बुध्दीने समजून घ्या. आता दुनिया किती मोठी आहे. सतयुगात किती थोडे लोक असतील. लहान झाड असते ना. ते झाड हळू हळू मोठे होते. मनुष्य सृष्टीचे हे उल्टे झाड कसे आहे, हे सुध्दा कुणी समजत नाही. याला कल्पवृक्ष म्हणतात. झाडाचे ज्ञानसुध्दा पाहिजे ना. आणि झाडाचे ज्ञान तर खुप सहज आहे, पटकन सांगता येईल. या झाडाचे ज्ञान सुध्दा इतके सोपे आहे पण हे आहे मनुष्यात्म्यांचे झाड, मनुष्याला आपल्या झाडाचे ज्ञान नाही. म्हणतात-ईश्वर रचयिता आहे, तर तो जरुर चैतन्य आहे ना. बाबा सत्य आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचे सागर आहेत, त्यांच्यामध्ये कोणते ज्ञान आहे, हे सुध्दा कुणाला समजत नाही. बाबाच बीजरुप व चैतन्य आहेत. त्यांच्यापासूनच सर्व रचना आहे. तर बाबा समजावतात, मनुष्यांना आपल्या वृक्षाचे ज्ञान नाही, इतर वृक्षांना तर चांगल्याप्रकारे जाणतात. झाडाचे बीज जर चैतन्य असते तर ते बोलू शकले असते पण ते तर निर्जीव आहे. तर आता तुम्ही मुले सुध्दा रचयिता आणि रचना यांचे रहस्य जाणता. बाबा सत्य आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. चैतन्यमध्ये बातचीत करु शकतात ना. मनुष्याचे शरीर सर्वांत उच्च आणि अमूल्य आहे. त्यांचे मुल्य सांगू शकत नाही. बाबा येऊन आत्म्यांना समजावतात.

तुम्ही रुपही आहात आणि बसतही आहात. बाबा ज्ञानाचे सागर आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला रत्न मिळतात. हे ज्ञानरत्न आहेत, या रत्नांच्यामुळे तुम्हाला ती स्थुल रत्नेसुध्दा भरपूर मिळतात, लक्ष्मी नारायण यांच्याजवळ पहा किती रत्न आहेत. हीरे जवाहिऱ्यांच्या महालात राहतात. नावच स्वर्ग आहे, ज्याचे तुम्ही मालक बनणार आहात. एखादया गरीब व्यक्तीला अचानक मोठी लॉटरी लागते तर तो व्यक्ती वेडा होतो ना. बाबा सुध्दा म्हणतात कि, तुम्हाला विश्वाची बादशाही मिळते, तर माया किती, विरोध करते. पुढे जाऊन तुम्हाला हे माहित होईल कि, कितीतरी चांगल्या मुलांना सुध्दा माया खाऊन / गिळून टाकते. एकदम खाऊन टाकते. तुम्ही सर्प पाहिला आहे, बेडकाला कसा पकडतो, जसे हत्तीला मगर पकडते. सर्प बेडकाला एकदम पुर्णच गिळून टाकतो, माया सुध्दा अशीच आहे, मुलांना जिवंत पकडून एकदम नष्ट करते. मुले पुन्हा कधी बाबांचे नाव सुध्दा घेत नाहीत. तुमच्यामध्ये योगबळाची ताकत खुपच कमी आहे. सर्व भिस्त योगबळावरच आहे. ज्याप्रमाणे सर्व बेडूक गिळतो, तुम्ही मुले सुध्दा सर्व बादशही गिळून टाकता. साऱ्या विश्वाची बादशाही तुम्ही एका सेकंदामध्ये घेणार आहात. बाबा किती सहज युक्ती सांगतात. हत्यार वगैरे घ्यायची आवश्यकता नाही. बाबा ज्ञान आणि योगाची अस्त्र-शस्त्रे देतात. त्यांनी मात्र स्थुल हत्यारे दाखवली आहेत.

तुम्ही मुले यावेळी म्हणता कि, आम्ही काय होतो आणि काय बनलो जे पाहिजे ते म्हणा, पण तुम्ही तसे होता जरुर. भले मनुष्यच होता परंतू गुण व अवगुण दोन्ही आहेत ना. देवतांमध्ये दैवीगुण आहेत म्हणून त्यांची महिमा करतात. आपण सर्वगुण संपन्न आहात, मी निर्गुण आहे माझ्यात कोणता गुण नाही. यावेळी सर्व दुनियाच निर्गुण आहे म्हणजे एकही देवतांचा गुण नाही. बाबा जे गुण शिकविणारे आहेत, त्यांनाच जाणत नाहीत म्हणून म्हणतात विनाशकाळात विपरीत बुध्दी. आता संगमयुगात विनाश तर होणारच आहे. जेव्हा जुनी दुनिया विनाश होते आणि नवी दुनिया स्थापन होते. याला म्हणतात विनाशकाळ, हा अंतिम विनाश आहे. यानंतर अडीच हजार वर्षे कोणतेही युध्द वगैरे होत नाही. मनुष्यांना हे काहीच माहित नाही. कारण विनाश काळात, त्यांची विपरीत बुध्दी आहे. तर जरुर जुन्या दुनियेचा विनाश होणार ना. या जुन्या दुनियेत अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत. किती जण मरतात. बाबा यावेळी या दुनियेचे हाल सांगतात. फरक तर खुप आहे ना. आज भारताचे हे हाल आहेत, उद्याचा भारत कसा असेल? आज हे आहे, उद्या तुम्ही कुठे असाल? तुम्ही जाणता कि, प्रथम नवी दुनिया किती लहान होती. तिथे महालात हिरे-जवाहिरे वगैरे असतात. भक्तीमार्गात सुध्दा तुमचे मंदीर काही साधारण नसते. तिथे काय फक्त एक सोमनाथाचे मंदीर नाही. एकाने बांधले तर ते पाहून दुसराही बनवितो. एका सोमनाथाच्या मंदिराला किती लुटले आहे. पुन्हा आपलेच यादगार बनविले आहे. तिथे भिंतीमध्ये दगड वगैरे लावतात. त्या दगडांची किती किंमत काय असेल? एवढ्या लहान हिऱ्याची सुध्दा किती किंमत असते. बाबा जवाहिरे होते. एका रत्तीचा हिरा येत होता, 90 रुपये रत्ती. आता त्यांची किंमत हजार रुपये आहे. ते ही मिळत नाहीत. किंमत खुप वाढली आहे. यावेळी विदेशात खुप धन आहे, पण सतयुगापुढे हे काहीच नाही.

आता बाबा सांगतात-विनाशकाळात विपरीत बुध्दी आहेत. तुम्ही जाणता विनाश जवळ आहे तर लोक हसतात. बाबा म्हणतात मी येथे किती वेळ बसून राहू, येथे मला काय मजा वाटते? मी तर सुखीही होत नाही व दु:खीही होत नाही. माझे कर्तव्य आहे पवित्र बनविणे. तुम्ही हे होता, आता असे बनला आहात. आता पुन्हा तुम्हाला असे उच्च बनवित आहेत. तुम्हीही जाणता कि, आम्ही पुन्हा देवता बनणार आहोत. आता तुम्ही समजदार बनला आहात, आम्ही या दैवी घराण्याचे सदस्य होतो. राजाई होती. पुन्हा अशी आमची राजाई आम्ही हरवली. नंतर इतर-इतर येऊ लागले. आता हे चक्र पुर्ण होत आहे. आता तुम्ही समजता कि, लाखों वर्षांची ही गोष्टच नाही. हे युध्द तर विनाशासाठी आहे, तिकडे तर तुम्ही खुप आरामात मरणार आहात. कोणताही त्रास होणार नाही. दवाखाने वगैरे तिथे असणार नाहीत. तिथे कोण बसून सेवा करेल आणि रडेल. तिथे तर हा कायदाच नाही. तिथे सर्वांचा मृत्यू खूप सहज होतो. येथे तर दु:खी होऊन मरतात कारण तुम्ही खुप सुख उपभोगले आहे तर तुम्हाला दु:खही पाहावे लागेल. रक्ताच्या नद्या येथेच वाहतील. ते समजतात हे युध्द पुन्हा शांत होईल पण शांत काही होणार नाही. मिरुआ मौत मलूका शिकार. तुम्ही देवता बनता, पुन्हा या कलियुगी अस्वच्छ सृष्टीवर तुम्ही येऊ शकत नाही. गीतेत सुध्दा आहे भगवानुवाच-विनाशपण पहा, स्थापना पण पहा. साक्षात्कार झाले ना. हे साक्षात्कार वगैरे सर्व शेवटी होतील. अमूक-अमूक हे बनतील पण त्यावेळी हल्के पद असेल तर खुप रडतील, खुप पश्चात्ताप करतील, शिक्षा खावी लागेल, नशीबाला दोषही देतील, पण काय करणार? ही तर 21 जन्मांची लॉटरी आहे. लक्षात येत आहे ना. साक्षात्काराशिवाय कुणाला सजा मिळू शकत नाही. सभा भरविली जाते ना. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. स्वत:मध्ये ज्ञान रत्नांची धारणा करुन रुप-बसंत बना. ज्ञान रत्नांच्या आधारे विश्वाच्या बादशाहीची लॉटरी घ्यायची आहे.

2. या विनाशकाळात बाबांशी प्रीत ठेवून एकाच्याच आठवणीत रहा. असे कोणतेही कर्म करु नका कि, जेणेकरुन शेवटी पश्चात्ताप करावा लागेल अथवा स्वत:च्या नशीबाला दोष दयावा लागेल.

वरदान:-
अलबेलेपण अथवा स्वत:वर लक्ष देण्याचा अभिमान सोडून बाबांची मदत मिळविण्याचे पात्र बनणारे सहज पुरुषार्थी भव

काही मुले हिम्मत ठेवण्याऐवजी अलबेलेपणामुळे अभिमानामध्ये येतात आणि समजतात कि, आम्ही तर सदैव पात्रच आहोत. बाबा आम्हाला मदत नाही करणार तर कुणाला करणार. या अभिमानामुळे हिम्मत ठेवण्याच्या विधीला विसरतात. काहींच्यामध्ये तर स्वत:वर लक्ष देण्याचा सुध्दा अभिमान येतो. आणि हा अभिमान बाबांच्या मदतीपासून वंचित करतो. समजतात आम्ही खूप योग केला, ज्ञानी-योगी आत्मा बनलो, सेवेची राजधानी बनवली. या प्रकारचा अभिमान सोडून हिम्मत ठेवून त्याआधारे मदतीचे पात्र बना, तर सहज पुरुषार्थी बनाल.

बोधवाक्य:-
जे व्यर्थ आणि नकारात्मक संकल्प चालतात त्यांचे परिवर्तन करुन विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये लावा.