22-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, रावणचा कायदा आहे आसुरी मत, खोटे बोलणे. बाबांचा कायदा आहे श्रीमत, खरे बोलणे.”

प्रश्न:-
कोणत्या गोष्टीचा विचार करुन, मुलांना आश्चर्य वाटले पाहिजे?

उत्तर:-
1) कसे हे बेहदचे नाटक आश्चर्यकारक आहे, जे चेहरे, जे कर्म, सेकंद, पास झाले, त्याची जसे च्या तशी पुर्नरावृत्ती होईल. किती आश्चर्यकारक आहे, जो एकाचा चेहरा दुसऱ्यांशी मिळत नाही. 2) कसे बेहदचे बाबा येऊन साऱ्या विश्वाची सद्गती करत आहेत, हे पण आश्चर्य आहे.

ओम शांती।
आत्मिक बाबा शिव, आपली आत्मिक मुले शाळीग्रामांना समजावत आहेत, काय समजावत आहेत? सृष्टीच्या आदि मध्य अंताचे रहस्य समजावत आहेत आणि हे समजावणारे एक बाबाच आहेत आणि जे आत्मे शाळीग्राम आहेत, सर्वांच्या शरीराची नांवे आहेत. बाकी एकच परमात्मा आहे, ज्यांना शरीर नाही. त्या परम आत्म्यांचे नांव शिव आहे. त्यांनाच पतित पावन परमात्मा म्हटले जाते. तेच तुम्हा मुलांना, या साऱ्या विश्वाच्या आदि मध्य अंताचे रहस्य समजावत आहेत. अभिनय करण्यासाठी तर सर्व येथे आले आहेत. हे पण समजावले आहे कि, विष्णूची दोन रुपे आहेत. शंकराची तर काही भुमिका नाही. हे सर्व बाबा बसून सांगत आहेत. बाबा कधी येतात? जेवहा नविन सृष्टीची स्थापना, आणि जुन्याचा विनाश होणार आहे. मुले जाणतात कि, नविन दुनियेमध्ये एका आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापन होत आहे. ते तर शिवाय परमपिता परमात्माच्या कोणी करुच शकत नाही. तेच एक परम आत्मा आहेत, ज्यांना परमात्मा म्हटले जाते. त्यांचे नांव शिव आहे. त्यांचे शरीराचे नांव असत नाही. आणखी जे पण आहेत, त्यांचे शरीराचे नांव आहे. हे पण समजले आहे कि, मुख्य मुख्य जे आहेत, ते तर सर्व आले आहेत. विश्व नाटकाचे चक्र फिरत फिरत आता अंतकाळात आले आहे. शेवटाला बाबाच येतात. त्यांची जयंती पण साजरी करतात. शिवजयंती पण यावेळी साजरी करतात, ज्यावेळी जग बदलत आहे. अति आंधारातून अति प्रकाश होणार आहे, म्हणजेच दु:खधामापासून सुखधाम होणार आहे. मुले जाणतात कि, परमपिता परमात्मा शिव एकदाच पुरुषोत्तम संगमयुगावर येतात, जुन्या जगाचा विनश, नविन जगाची स्थापना करण्यासाठी. अगोदर नव्या जगाची स्थापना, नंतर जुन्या जगाचा विनाश होतो. मुले समजतात कि, शिकुन आम्हाला हुशार बनायचे आहे, आणि दैवी गुण पण धारण करायचे आहेत. आसुरी गुण सोडायचे आहेत. दैवी गुण आणि आसुरी गुणाचे वर्णन दिनचर्यात दाखविले पाहिजे. स्वत:ला पाहिले पाहिजे मी कोणाला तंग तर करत नाही? खोटे तर बोलत नाही? श्रीमताचे विरुध्द तर वागत नाही? खोटे बोलणे, कोणाला दु:ख देणे, तंग करणे हे आहेत रावणाचे कायदे, ते आहेत रामाचे कायदे. श्रीमत आणि आसुरी मताची महिमा आहे. अर्धाकल्प चालते आसुरी मत, ज्यात मनुष्य असुर, दु:खी रोगी बनतात. पाच विकार प्रवेश होतात. बाबा येऊन श्रीमत देत आहेत. मुले जाणतात कि, श्रीमतामुळे आमच्यात दैवीगुण येतात. आसुरी गुण सोडायचे आहेत. जर आसुरी गुण राहिले तर पद कमी होईल. जन्मो जन्मीचे पापाचे ओझे डोक्यावर आहे, नंबरवार पुरुषार्थानुसार ते हल्के होईल. हे पण समजता कि, आता हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. बाबा द्वारा आता दैवीगुण धारण करुन, नविन जगाचे मालक बनतो. तर सिध्द होते की, जुनी दुनिया जरुर नष्ट होणार आहे. नविन दुनियेची स्थापना ब्रह्माकुमार, कुमारीद्वारे होणार आहे. हा पण पक्का निश्चय आहे, त्यामुळे सेवा करत आहात. कोणाचे ना कोणाचे कल्याण करण्यासाठी मेहनत करत राहतात.

तुम्ही जाणता कि, आमचे बहिण भाऊ किती सेवा करतात. सर्वांना बाबाचा परिचय देत राहतात. बाबा आले आहेत, प्रथम जरुर थोड्यांनाच भेटतील. नंतर वृध्दीला प्राप्त करतात. एका ब्रह्माद्वारे किती ब्रह्माकुमार बनतात. ब्राह्मण कुळ तर जरुर पाहिजे ना. तुम्ही जाणता कि, आम्ही सर्व ब्रह्माकुमार-कुमारी आहोत शिवबाबाची मुले, सर्व भाऊ भाऊ आहोत. मुळात भाऊ भाऊ आहोत, नंतर प्रजापिता ब्रह्माचे बनल्यानंतर भाऊ बहिण बनतो. नंतर देवता कुळात गेलो, तर संबंधामध्ये वाढ होत जाते. यावेळी ब्रह्माची मुले आणि मुली आहोत तर एकच कुळ झाले, याला राजधानी म्हणत नाहीत. राजधानींना कौरवाची आहे, ना पांडवाची. राजधानी तेव्हा होते जेव्हा राजा-राणी नंबरानुसार गादीवर बसतात. आता तर आहे प्रजेचे प्रजेवर राज्य. सुरुवातीपासून पवित्र राजधानी आणि अपवित्र राजाई चालत आली आहे. पवित्र राजधानी देवतांची चालली आहे. मुले जाणतात कि, 5 हजार वर्षापुर्वी स्वर्ग होता तर पवित्र राजधानी होती. त्यांची चित्रे पण आहेत, मंदीर खुपच सुंदर बनवले आहेत, आणखीन कोणाची मंदीरे नाहीत. या देवतांचीच फार मंदीरे आहेत.

मुलांना समजावले आहे कि, सर्वांच्या शरीराची नांवे बदलतात. यांचे पण नांव शिव चालत आले आहे. शिव भगवानुवाच, कोणत्या पण देहधारीला भगवान म्हटले जात नाही. बाबा शिवाय कोणी बाबाचा परिचय देऊ शकत नाही, कारण ते तर बाबाला ओळखतच नाहीत. येथे पण पुष्कळ आहेत, ज्यांचे बुध्दीत येत नाही की, बाबाची आठवण कशी करायची. गोंधळून जातात. एवढा लहान बिंदू, त्यांची आठवण कशी करायची. शरीर तर मोठे आहे, त्यांचीच आठवण करत राहतात. असे पण गातात कि, भ्रकुटीच्या मध्ये चमकत आहे तारा, म्हणजे आत्मा ताऱ्या सारखी आहे. आत्म्याला शाळीग्राम म्हटले जाते. शिवलिंगाची पण मोठ्या रुपात पुजा होते. जसे आत्मा पाहु शकत नाही. शिवबाबा पण कोणाला पाहण्यात येत नाहीत. भक्तीमार्गात बिंदूची पुजा कशी करायची, कारण प्रथम शिवबाबाची अव्याभिचारी पुजा सुरु होते ना. तर पुजेसाठी जरुर मोठी वस्तू पाहिजे. शाळीग्राम पण मोठे अंड्या सारखे बनवितात. एकीकडे आंगठ्या सारखे पण म्हणतात आणि ताऱ्यासारखे पण म्हणतात. आता तुम्हाला तर एका गोष्टीवर समजायचे आहे. आर्धाकल्प मोठ्या वस्तूची पुजा केली. आता मग बिंदू समजणे यात कष्ट पण आहे, पाहु शकत नाहीत. हे बुध्दीने जाणायचे आहे. शरीरामध्ये आत्मा प्रवेश करते, जी मग निघुन जाते, कोणी तर पाहु शकत नाही. मोठी वस्तू असेल तर पाहु पण शकाल. बाबा पण असे बिंदू आहेत, परंतू ते ज्ञानाचे सागर आहेत, आणखीन कोणाला ज्ञानाचे सागर म्हणत नाहीत. शास्त्र तर आहेत भक्ती मार्गातील. एवढे सर्व वेद-शास्त्र इ. कोणी बनविले? म्हणतात व्यासानी बनविले. क्राइस्टच्या आत्म्याने कोणते शास्त्र बनविले नाही. हे तर नंतर मनुष्य बसून बनवितात. ज्ञान तर त्यांच्यात नसते. ज्ञानसागर आहेतच एक बाबा. शास्त्रामध्ये ज्ञानाच्या, सद्गतीच्या गोष्टी नाहीत. प्रत्येक धर्मवाला आप-आपल्या धर्मस्थापकाची आठवण करतो. देहधारीची आठवण करतात. क्राइस्टचे पण चित्र आहे ना. सर्वांची चित्र आहेत. शिवबाबा तर आहेत परमआत्मा, आता तुम्ही समजता कि, आत्मे सर्व भाऊ-भाऊ आहोत. भावामध्ये ज्ञान असत नाही, जे कोणाला ज्ञान देऊन सद्गती करतील. सद्गती करणारे आहेत एकच बाबा. श्री श्री 108 जगद्गुरु म्हणा किंवा विश्व गरु म्हणा, गोष्ट एकच आहे. आता तर आहे रावण राज्य, संगमयुगावरच बाबा येऊन या सर्व गोष्टी समजावत आहेत.

तुम्ही आता जाणता कि, बरोबर आता नविन जगाची स्थापन होत आहे. आणि जुन्या दुनियेचा विनाश होत आहे. हे पण समजावणे आहे पतित पावन एकच निराकार बाबा आहेत. कोणी देहधारी पतित पावन असत नाही. पतित पावन परमात्माच आहेत. जरी पतित पावन सीताराम पण म्हटले तरी पण बाबांनी समजावले आहे, भक्तीचे फळ देण्यासाठी भगवान येतात. तर सर्व सीता आहेत सजनी, आणि साजन एक राम, जो सर्वांना सद्गती देणारा आहे. यासर्व गोष्टी बाबाच समजावतात. नाटकानुसार तुम्ही परत 5 हजार वर्षानंतर यागोष्टी ऐकाल. आता तुम्ही सर्व शिकत आहात. शाळेमध्ये किती पुष्कळ शिकतात. हे सर्व नाटक बनलेले आहे. ज्यावेळी जे शिकतात, जी कृती होते, तिच कृती कल्पानंतर हुबेहुब होते, हुबेहुब 5 हजार वर्षानंतर परत शिकाल. हे अनादी नाटक बनलेले आहे. जे पण पाहाल, सेकंदा, सेकंदाला नविन वस्तू दिसेल. चक्र फिरत राहते. नवनविन गोष्टी तुम्ही पाहत राहाल. आता तुम्ही जाणता कि, 5 हजार वर्षाचे नाटक आहे, जे चालत राहते. याचा विस्तार तर फार आहे. मुख्य मुख्य गोष्टी समजावल्या जातात. जसे म्हणतात कि, परमात्मा सर्वव्यापी आहे, बाबा म्हणतात कि, मी सर्वव्यापी नाही. बाबा येऊन स्वत:चा व रचनेच्या आदि-मध्य-अंताचा परिचय देत आहेत. तुम्ही आता समजता कि, बाबा कल्प कल्प येतात. आम्हाला वारसा देण्यासाठी. हे पण गायन आहे ब्रह्माद्वारे स्थापना. यात समजावणे फार चांगले आहे. विराट रुपामध्ये पण जरुर अर्थ आहे ना. परंतू बाबा शिवाय कधी कोणी समजावू शकत नाही. चित्र तर फार आहेत, परंतू एकाची पण माहिती कोणाजवळ नाही. उंच ते उंच शिवबाबा आहेत, त्यांचे पण चित्र आहे परंतू जाणत कोणी नाहीत. बरं, मग सुक्ष्मवतन आहे. त्याला सोडुन दया त्यांची आवश्यकता नाही. इतिहास भुगोल येथील आहे, ते तर आहे साक्षत्काराची गोष्ट. जसे येथे ब्रह्मामध्ये बाबा बसले आहेत, तसे सुक्ष्मवतन मध्ये कर्मातीत शरीरामध्ये बसून यांना भेटतात, किंवा बोलतात. बाकी तिथे तर जगाचा इतिहास भुगोल नाही. इतिहास भुगोल येथील आहे. मुलांचे बुध्दीमध्ये बसले आहे, सतयुगामध्ये देवी देवता होते, ज्यांना 5 हजार वर्षे झाली. या आदि सनातन देवता धर्माची स्थापना कशी झाली, हे पण कोणी जाणत नाही. इतर धर्माच्या स्थापनेचे तर सर्व जाणतात. पुस्तके इ. पण आहे. लाखो वर्षाची तर गोष्टच असत नाही. हे तर बिल्कुल चुकीचे आहे परंतू मनुष्याची बुध्दी काही काम करत नाही. प्रत्येक गोष्ट बाबा समजतात कि, गोड गोड मुलांनो, चांगले प्रकारे धारण करा. मुख्य गोष्ट आहे बाबाची आठवण. ही आठवणीचीच शर्यत आहे. शर्यत असते ना. कोणी एक एकटे पळतात. कोणी दोघांना एकत्र बांधून मग पळतात. येथे जे जोडी आहेत तर एकत्र पळण्याचा सराव करतात. विचार करतात सतयुगामध्ये पण असे एकत्र जोडी बनावी. जरी नांव रुप बदलते, तेच शरीर थोडेच मिळते. शरीर तर बदलत राहते. समजतात कि आत्मा एक शरीर सोडुन दुसरे घेते. चेहरा तर दुसरा असेल. परंतू मुलांना तर आश्चर्य वाटले पाहिजे जो चेहरा, जे कृत्य सेकंदा सेकंदाला होवून गेले, ते परत हुबेहुब 5000 वर्षानंतर पुनरावृत्त होईल. किती आश्चर्य-कारक हे नाटक आहे, आणखी कोणी समजावू शकत नाही. तुम्ही जाणता कि, आम्ही सर्व पुरुषार्थ करत आहोत. नंबरवार तर बनणार आहेत. सर्व तर कृष्ण बनणार नाहीत. चेहरे सर्वांचे वेगळे असतील. किती मोठे आश्चर्य कारक नाटक आहे. एकाचा चेहरा, दुसऱ्याशी मिळत नाही. तोच हुबेहुब खेळ पुनरावृत्ती होत आहे. असे सर्व विचार करुन आश्चर्य वाटते. कसे बेहदचे पिता येऊन शिकवत आहेत. जन्म जन्मांतर भक्तीमार्गातील शास्त्र इ. वाचत आलो, साधू महाराजांच्या कथा इ. पण ऐकल्या. आता बाबा म्हणतात भक्तीची वेळ पुर्ण झाली. आता भक्तांना भगवानाद्वारे फळ मिळत आहे. हे जाणत नाहीत, भगवान कधी, कोणत्या रुपात येतात? कधी म्हणतात शास्त्र वाचल्याने भगवान भेटेल? कधी म्हणतात येथे येतील, शास्त्रांद्वारे जर काम झाले असते, तर मग बाबाला का यावे लागेल? शास्त्र वाचून जर भगवान मिळाले असते तर मग भगवान येऊन काय करतील? आर्धाकल्प तुम्ही हे शास्त्र वाचून वाचून तमोप्रधानच बनत आले आहात. तर मुलांना सृष्टीचे चक्र पण समजावतात आणि दैवी चलन पण पाहिजे. एक तर कोणाला दु:ख दयावयाचे नाही. असे नाही कि कोणाला विकार पाहिजे, तो दिला नाही, तर हे काही दु:ख देणे नाही. असे तर बाबा म्हणत नाहीत. असे पण कोणी बुध्दू आहेत, जे म्हणतात, बाबा म्हणतात ना-कोणाला दु:ख द्यायचे नाही. आता हे विकार मागतात तर त्यांना दिले पाहिजे, नाही तर हे पण कोणाला दु:ख देणे झाले ना. असे समजणारे मुर्ख बुध्दीचे पण आहेत. बाबा तर म्हणतात कि, पवित्र जरुर बनायचे आहे. आसुरी चलन आणि दैवी चलनची पण माहिती पाहिजे. मनुष्य तर हे पण समजत नाही. ते तर म्हणतात आत्मा निर्लेप आहे. काही पण करा, काही पण खा, प्या. विकारात जावा, काही होत नाही. असे पण शिकवितात. किती जणांना पकडून घेऊन येतात. बाहेर पण शाकाहारी फार आहेत. जरुर चांगला आहे तेव्हा तरी शाकाहारी बनतात. सर्व जातीत वैष्णव आहेत. छी-छी वस्तू खात नाहीत, ते थोडेच आहेत. तुम्ही पण थोडेच आहात. यावेळी तुम्ही किती थोडे आहात. हळू हळू वाढ होत राहिल. मुलांना हेच शिक्षण दिले जाते. दैवीगुण धारण करा. छी-छी वस्तू असे कोणाद्वारे बनविलेले खाऊ नये. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आपल्या चार्टमध्ये पाहायचे आहे - 1) आम्ही श्रीमताचे विरुध्द तर वागत नाही. 2) खोटे तर बोलत नाही. 3) कोणाला तंग तर करत नाही? दैवी गुण धारण केले आहेत?

2. शिक्षणाबरोबर दैवी चलन धारण करावयाची आहे. “पवित्र जरुर बनायचे आहे” कोणती पण छी-छी वस्तु खायची नाही. पुर्ण वैष्णव बनायचे आहे. शर्यत करावयाची आहे.

वरदान:-
सेवेद्वारे खुशी, शक्ती आणि सर्वांचे आशिर्वाद प्राप्त करणारे पुण्य आत्मा भव
 

सेवेचे प्रत्यक्ष फळ खुशी आणि शक्ती मिळते. सेवा करुन आत्म्यांना, बाबांच्या वारशाचे अधिकारी बनविणे-हे पुण्याचे काम आहे, जो पुण्य करतो त्याला आशिर्वाद जरुर मिळतात. सर्व आत्म्यांच्या मनात जो आनंदाचा विचार निर्माण होतो. तो शुभ संकल्प आशिर्वाद बनून जातो, आणि भविष्यासाठी पण जमा होऊन जातो, त्यासाठी नेहमी स्वत:ला सेवाधारी समजून सेवेचे अविनाशी फळ खुशी आणि शक्ती नेहमी घेत राहा.

बोधवाक्य:-
मन्सा, वाचेच्या शक्तीद्वारे विघ्नांचा पडदा हटवा, तर कल्याणाचे दृष्य दिसू लागतील..!