20-10-2019 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
24.02.1985 ओम शान्ति
मधुबन
“ संगम युग सर्व
श्रेष्ठ प्राप्तीचे युग ”
आज बापदादा प्राप्ती
स्वरूप विशेष आत्म्यांना पाहत आहे. एका बाजूला अनेक आत्मे अल्प कालाची प्राप्ती
असणारे, ज्यामध्ये प्राप्ती बरोबर अप्राप्ती पण आहे. आज प्राप्ती आहे, उद्या
अप्राप्ती आहे. एका बाजूला अनेक प्राप्ती असतानाही अप्राप्ती स्वरूप. दुसऱ्या बाजूला
खूप थोडे, सदा काळाची प्राप्ति स्वरूप विशेष आत्मे. दोघांच्यामध्ये महान अंतराला
पाहात होते. बापदादा प्राप्ती स्वरूप मुलांना पाहून हर्षित होते. प्राप्ती स्वरूप
मुले भाग्यवान आहेत. इतकी प्राप्ती केली, जे तुम्हा विशेष आत्म्याच्या प्रत्येक
पावला मध्ये पदम आहेत. लौकिक मध्ये प्राप्ती स्वरूप जीवनाच्या विशेष चार
गोष्टीचीप्राप्ती आवश्यक आहेत. १) सुखमय संबंध २) स्वभाव आणि संस्कार नेहमी शितल आणि
स्नेही ३) खऱ्या कमाईची श्रेष्ठ संपत्ती ४) श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ संपर्क जर या
चारही गोष्टी आहेत. जीवनामध्ये सफलता आणि खुशी आहे, परंतु लौकिक जीवन या प्राप्ती
अल्प कालाच्या प्राप्ति आहेत. आज सुखमय संबंध आहेत, परंतु उद्या तेच संबंध दुःखमय
बनून जातात. आज सफलता आहे, उद्या नाही. याच्या अंतरात तुम्ही प्राप्ती स्वरूप
श्रेष्ठ आत्म्यांना या अलौकिक जीवनामध्ये चारही गोष्टी नेहमी प्राप्त आहेत, कारण
निर्माता सुखदाता सर्व प्राप्तीचे दाता बरोबर अविनाशी संबंध आहेत. अविनाशी संबंध कधी
पण दुःख आणि धोका देत नाहीत. विनाशी संबंध वर्तमान वेळेला दुःख आणि धोका आहे.
अविनाशी संबंधांमध्ये खरं स्नेह आणि सुख आहे.तर सदा स्नेह आणि सुखाचे सर्व संबंध
बाबा कडून प्राप्त आहेत. एकाही संबंधाची कमी नाही. जो पण संबंध पाहिजे त्या
संबंधाच्या प्राप्तीचा अनुभव करा. ज्या आत्म्याला जो संबंध खूप आवडतो, त्या संबंधानी
ईश्वर प्रीतीची रिती निभावतो. ईश्वराला आपला संबंधी बनवा, असे श्रेष्ठ संबंध पूर्ण
कल्पामध्ये प्राप्त होऊ शकत नाहीत. तर संबंध सुद्धा प्राप्त आहे. बरोबर या अलौकिक
दिव्य जन्मांमध्ये नेहमी श्रेष्ठ स्वभाव, ईश्वरीय संस्कार असल्यामुळे स्वभाव,
संस्कार कधीही दुःख देत नाहीत. जे बापदादाचे संस्कार, ते मुलांचे संस्कार. जो बाप
दादाचा स्वभाव, तोच मुलांचा स्वभाव. स्व-भाव म्हणजे नेहमी प्रत्येका बरोबर स्व
म्हणजे आत्म्याचा भाव. स्व- श्रेष्ठला पण म्हणले जाते, स्व चा भाव किंवा श्रेष्ठ
भाव हाच स्वभाव आहे. नेहमी महादानी, रहमदिल, विश्व कल्याणकारी. जे बाबांचे संस्कार
तेच आपले संस्कार आहेत. म्हणून स्वभाव आणि संस्कार आपल्याला खुशीची प्राप्ती करून
देतात. अशीच खरी कमाईच सुखमय संपत्ती आहे. तर अविनाशी खजाने किती मिळाले? प्रत्येक
जण, प्रत्येक खजिन्याच्या, खाणीचे मालक आहेत. फक्त खजिना नाही, अखूट, अगणित खजिने
मिळाले आहेत. जे खर्चा, खा आणि वाढवत राहा. जेवढे खर्च कराल तेवढे वाढत राहते.
अनुभवी आहत ना. स्थूल संपत्ती कशासाठी कमाववितात. डाळ भाकरी सुखाने खावी. परिवार
सुखी राहवा. दुनियेमध्ये नावलौकिक होवो. तुम्ही स्वतःला पाहा किती सुख आणि आनंदाने
डाळ भाकरी मिळत आहे. जे गायन पण आहे डाळ भाकरी खा, आणि ईश्वराचे नाव घ्या. अशी गायन
केलेली डाळ भाकरी खात आहेत, आणि ब्राह्मण मुलांना बापदादांचे वचन आहे ब्राह्मण
मुलांना डाळ भाकरी पासून वंचित होऊ शकत नाही. आसक्तीचे जेवण मिळणार नाही. परंतु डाळ
भाकरी जरूर मिळेल. डाळ भाकरी पण आहे, परिवार पण ठीक आहे, आणि नाव किती मोठे आहे.
इतके तुमचे नाव मोठे आहे, आज तुम्ही शेवटच्या जन्मपर्यंत पोहचले आहात, तरी तुमच्या
जड चित्रांच्या नावाने ही अनेक आत्मे आपली कामें सिध्द करत आहेत. नाव तुम्हा
देवी-देवतांचे घेतात, आणि काम आपले सिध्द करतात, इतके नाव मोठे आहे. एका जन्मासाठी
नाव मोठे नाही होत, तर संपूर्ण कल्पामध्ये तुमचे नाव मोठे होते. तर सुखमय आणि खरे
संपत्तिवान आहात. बाबाच्या संपर्कामध्ये आल्यामुळे तुमचाही श्रेष्ठ संपर्क बनला.
तुमचा असा श्रेष्ठ संपर्क आहे जो तुमच्या एका सेकंदाच्या संपर्कासाठी तहानलेली आहे.
फक्त दर्शनाच्या संपर्कांचे सुद्धा तहानलेले आहेत. संपूर्ण रात्र जागरण करतात. फक्त
एक सेकंदाच्या संपर्कांसाठी बोलवितात. ओरडत राहतात किंवा पाहण्यासाठी कितीही सहन
करतात, असे चित्र घरी सुद्धा असतात तरीही, एका सेकंदाच्या संमुख संपर्कासाठी
तहानलेले आहेत. एका बेहदच्या बाबांचे बनल्या कारणाने संपूर्ण विश्वाच्या
आत्म्यांबरोबर संपर्क झाला. बेहदचा परिवार झाला. विश्वाच्या सर्व आत्म्यांबरोबर
संपर्क झाला. तर चारही गोष्टी अविनाशी प्राप्त आहे, म्हणून सदा सुखी जीवन आहे.
प्राप्ती स्वरूप जीवन आहे. अप्राप्त नाही कोणती वस्तू ब्राम्हणांच्या जीवनामध्ये,
हेच तुमचे गीत आहे ना. असे प्राप्ती स्वरूप आहेत ना, कि बनायचे आहे? सांगितले ना,
आज प्राप्ती स्वरूप मुलांना पाहत आहेत. ज्या श्रेष्ठ जीवनासाठी दुनियेतील लोक किती
कष्ट घेतात. आणि तुम्ही काय केले? कष्ट केले कि प्रेम? प्रेमा-प्रेमामध्येच बाबांना
आपले बनविले. तर दुनियेतील लोक कष्ट करतात आणि तुम्ही प्रेमाने प्राप्त केले. बाबा
म्हणाले आणि खजाण्याची चावी मिळाली. दुनिया वाल्यांना विचारा तर काय म्हणतील. कमवणे
खूप अवघड आहे. या दुनियेमध्ये चालणे खूप अवघड आहे. आणि तुम्ही काय म्हणता?
पावलांमध्ये पदम कामवायचे आहेत. आणि चालणे तर किती सोपे आहे. उडणारी कला आहे, तर
चालण्यापासून सुद्धा वाचले. तुम्ही म्हणाल चालायचं तर काय उडायचे आहे. किती अंतर
झाले. बापदादा आज विश्वातल्या सर्व मुलांना पहात होते. सर्वजण आप-आपल्या
प्राप्तीच्या लगनमध्ये मग्न होते, परंतु परिणाम काय आहे? सर्वजण शोधामध्ये लागलेले
आहेत. वैज्ञानिक पहा आपल्या शोधामध्ये इतके व्यस्त आहे, जे दुसरे काहीच सुचत नाही.
महात्मे पहा ईश्वराला शोधण्याच्या मागे लागलेले आहेत. छोट्याशा भ्रांती मुळे
प्राप्ती पासून वंचित आहेत. आत्माच परमात्मा आहे किंवा सर्वव्यापी परमात्मा आहेत,
या भ्रांतीच्यामुळे शोधामध्ये लागले आहेत. वैज्ञानिकवाले सुद्धा शोध लावत लावत
म्हणता चंद्रामध्ये, ताऱ्यांमध्ये दुनिया बनवू, असे शोधता शोधता त्यामध्येच हरवून
गेले. शास्त्रवादी पहा शास्त्रार्थाच्या चक्राच्या विस्तारामध्ये हरवून गेले.
शास्त्रार्थाचे लक्ष ठेवून अर्थापासून वंचित झाले. राजनेते पाहा खुर्चीच्या मागे
हरवून गेले आणि दुनियेतील भोळी आत्मे पहा, विनाशी प्राप्तीच्या थोड्याशा आधाराला खरा
आधार समजून बसली आहेत आणि तुम्ही काय केले? ते हरवलेले आहेत आणि तुम्ही प्राप्त केले,
संशयाला समाप्त केले. तर प्राप्ति स्वरूप झाले त्यामुळे नेहमी प्राप्ती स्वरूप
श्रेष्ठ आत्मे आहात.
बापदादा विशेष डबल विदेशी मुलांचे अभिनंदन करत आहेत की, विश्वातील अनेक आत्म्यामध्ये
तुम्ही श्रेष्ठ आत्म्यांची ओळखण्याची नजर शक्तिशाली राहिली, ओळखले आणि प्राप्त केले.
तर बापदादा विशेष डबल विदेशी मुलांची ओळखण्याची नजर पाहून मुलांचे गुणगान गात आहेत.
वाह मुलांनो वाह, जे दूरदेशी असूनही, विभिन्न धर्मामध्ये असूनही, विभिन्न
रीतीरिवाजामध्ये असूनही आपल्या खऱ्या पित्याला, दूर असूनही बरोबर ओळखले.
जवळच्यासंबंधांमध्ये आले. ब्राम्हण जीवनाच्या रितीरिवाजाला आपले मूळ रितीरिवाज
समजून सहज आपल्या जीवनामध्ये आणले. याला म्हणले जाते विशेष प्रेमळ आणि भाग्यवान मुलं.
जसे मुलांना विशेष आनंद आहे, तसाच बापदादांना सुद्धा विशेष आनंद आहे. ब्राह्मण
परिवाराचे आत्मे विश्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पोहोचले होते, परंतु कोपऱ्या
कोपऱ्या मधून हरवलेली आत्मे परत आपल्या परिवारामध्ये आली आहेत. बाबांनी शोधले आणि
तुम्ही ओळखले. त्यामुळे प्राप्तीचे अधिकारी बनले. अच्छा
युगलांसोबत-अव्यक्त बाप दादांची मुलाकात :
प्रवृत्तीमध्ये
राहून सर्व संबंधांनी वेगळे आणि आणि बाबांचे स्नेही बनले आहात? फसलेले तर नाही ना?
पिंजऱ्यातले पक्षी तर नाही, उडणारे पक्षी आहात ना! थोडेसुद्धा बंधन फसवते.
बंधनमुक्त आहात तर नेहमी उडत राहाल. तर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. ना देहाचे,
ना संबंधाचे, ना प्रवृत्तीचे, ना पदार्थांचे. कोणतेच बंधन नको, याला म्हटले जाते
वेगळे आणि प्रेमळ. स्वतंत्र असणारे नेहमी उडत्या कलेमध्ये असतील आणि परतंत्र थोडे
उडतील, पण परत बंधने त्यांना खेचून खाली घेऊन येतील. तर कधी खाली, कधी वर, वेळ वाया
जाईल. नेहमी उडत्या कलेची अवस्था आणि कधी खाली, कधी वर, ही अवस्था, दोघांमध्ये
रात्रं दिवसाचा फरक आहे. तुम्ही कोणत्या अवस्थे मधले आहात. नेहमीनिर्बंधन, नेहमी
स्वतंत्र पक्षी? नेहमी बाबांसोबत राहणारे? कोणत्याच आकर्षण मध्ये आकर्षित होणारे
नाही. तेच जीवन चांगले आहे. जे बाबांचे स्नेही बनतात त्यांची जीवन नेहमी प्रेमळ बनते.
कटकट वाले जीवन नाही. आज हे झाले, काल हे झाले, नाही. परंतु बापदादांचे सोबत राहणारे,
एकरस स्थितीमध्ये राहणारे, मौजेचे जीवन आहे. मौजेमध्ये नाही राहणार तर संभ्रम होईल.
आज ही समस्या आली, काल दुसरी आली होती, या दुःखधमाच्या गोष्टी दुःखधमा मध्येच येतील,
परंतु संगमयुगी ब्राह्मण आहात तर दुःख खाली राहील. दुःखधामापासून किनारा केला, तर
दुःख पाहत असूनही तुम्हाला स्पर्श नाही करणार. कलियुगाला सोडले, किनारा सोडला, आता
संगमयुगावर पोहोचलात. तर संगम नेहमी उंच दाखवितात. संगमयुगी आत्मे नेहमी उंच,
श्रेष्ठ आहेत. जेव्हा बाबा उडविण्यासाठी आले आहेत, तर उडत्या कलेपासून खाली का आले?
खाली येणे म्हणजे फसणे. आता पंख मिळाले आहेत तर उडत राहा, खाली येऊच नका. अच्छा?
अधरकुमारां
सोबत :-
सर्वच एका लगन
मध्ये मग्न राहणारे आहात ना? एक बाबा दुसरा मी, तिसरा कोणी नाही. याला म्हणले जाते
लगन मध्ये मग्न राहणारे. मी आणि माझे बाबा. याच्याशिवाय माझं अजून दुसरं कोणी नाही.
माझी मुलं, माझे नातू... असं तर नाही. ‘माझ्या’मध्ये ममत्व असते. माझे पण समाप्त
होणे, म्हणजे ममत्व समाप्त होणे. तर संपूर्ण ममत्व म्हणजे मोह बाबांमध्ये झाला. तर
बदलले, शुद्ध मोह झाला. बाबा नेहमीच शुद्ध आहेत तर मोह बदलून प्रेम झाले. एक माझे
बाबा ह्या एका माझ्याने सर्व समाप्त होते आणि एकाची आठवण सहज होते, त्यामुळे नेहमी
सहजयोगी. मी श्रेष्ठ आत्मा आणि माझे बाबा बस! श्रेष्ठ आत्मा समजल्याने श्रेष्ठ कर्म
आपो-आप होतील, श्रेष्ठ आत्म्याच्या पुढे माया येऊ शकत नाही.
मातांसोबत :-माता
नेहमी बाबांच्या सोबत आनंदाच्या झोक्या मध्ये झोके घेत राहणारे आहात ना. गोप-गोपिका
नेहमी आनंदामध्ये नाचतात किंवा झोक्यामध्ये झोके घेत राहतात. तर नेहमी बाबांसोबत
राहणारे आनंदामध्ये नाचतात. बाबासोबत आहात, तर सर्वशक्तीसुद्धा सोबत राहतात. बाबांची
सोबत शक्तिशाली बनवते. बाबांच्या सोबत राहणारे नेहमीच निर्मोही असतात, त्यांना
कोणाचा मोह त्रास देणार नाही. तर नष्टमोहा आहात? कशी पण परिस्थिती आली, परंतु
प्रत्येक परिस्थितीमध्ये ‘नष्टमोहा’. जेवढे नष्टमोहाअसाल तेवढी आठवण आणि सेवेमध्ये
पुढे जात राहाल.
मधुबनमध्ये
आलेल्या सेवाधारी सोबत :
सेवेचे खाते
जमा झाले ना. आता सुद्धा मधुबनच्या वातावरणामध्ये शक्तिशाली स्थिती बनवण्याची संधी
मिळाली,आणि भविष्यासाठी पण जमा झाले. तर दुहेरी प्राप्ती झाली. यज्ञ सेवा म्हणजे
श्रेष्ठ सेवा, श्रेष्ठ स्थितीमध्ये राहून केल्याने पदमगुणा फळ प्राप्त होते. कोणती
पण सेवा करा, प्रथम हे तर पहा की शक्तिशाली स्थितीमध्ये स्थिर होऊन, सेवाधारी बनून
सेवा करत आहोत का? सामान्य सेवाधारी नाही, रुहानी सेवाधारी. आत्मिक सेवाधारी रूहानी
चमक, रूहानी प्रभाव, नेहमी प्रत्यक्ष रूपामध्ये दिसली पाहिजे. चपाती लाटताना पण
‘सुदर्शन’ चक्र चालले पाहिजे. लौकिक निमित्त, स्थुल सूक्ष्म दोन्ही सोबत, हातांनी
स्थुल काम करा, आणि बुद्धीने मंसा सेवा करा, तर दुहेरी सेवा होईल. हातांनी कर्म
करतानाही आठवणीच्या शक्तीने एका स्थानावर असूनही खूप सेवा करू शकता. मधुबन तर असेही
लाईट हाऊस आहे, लाईट हाऊस एका स्थानावर असूनही चहू बाजूची सेवा करतो. असे सेवाधारी
स्वतःची आणि दुसऱ्यांची खूप श्रेष्ठ प्रारब्ध घडवू शकतात. अच्छा! ओम शांती.
आज बापदादांनी संपूर्ण रात्र सर्व मुलांच्यासोबत मिलन केले आणि सकाळी ७ वाजता आठवण
देऊन निरोप घेतला, सकाळचा क्लासबापदादांनी करवला.
रोज बापदादा द्वारे महावाक्य ऐकत-ऐकत महान आत्मा बनले. तर आजच्या दिवसाचा हा सारांश
संपूर्ण दिवस मनाच्या साजच्या सोबत ऐका की, ‘महावाक्य ऐकल्याने महानबनू’. महान ते
महान कर्तव्य करण्याच्या निमित्त आहोत, प्रत्येक आत्म्याच्या प्रति मनसा, वाचा,
संपर्काने, महादानी आत्मा आहोत आणि नेहमी महान युगाचे आव्हान करणारी अधिकारी आत्मा
आहात, हेच आठवणीमध्ये ठेवा. नेहमी अशा महान स्मृतीमध्येराहणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना,
फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांना, बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात,
होवनहार आणि वर्तमान बादशाहांना बाबांचा नमस्कार. अच्छा. ओमशांती.
वरदान:-
शुद्ध आणि
समर्थ संकल्पाच्या शक्तीने व्यर्थ वातावरणाला समाप्त करणारे खरे सेवाधारी भव
म्हणले जाते
संकल्प सुद्धा सृष्टी रचतात. जेव्हा कमजोर आणि व्यर्थ संकल्प करता तर व्यर्थ
वातावरणाची सृष्टी रचली जाते. खरे सेवाधारी ते आहेत, जे आपल्या शुद्ध शक्तिशाली
संकल्पांनी जुन्या वातावरणाला समाप्त करतील. जसे वैज्ञानिक शस्त्रांनी शस्त्रांना
समाप्त करतात,एका विमानाने दुसऱ्या विमानाला खाली पडतात, असेच तुम्हाला शुद्ध,
समर्थ संकल्पांचे वातावरण, व्यर्थ वातावरणाला समाप्त करतील, आता असे सेवाधारी बना.
सुविचार:-
विघ्न रुपी
सोन्याच्या लहान धाग्यांपासून मुक्त बना, आणि मुक्ती वर्ष साजरे करा.....!
सूचना : आज तिसरा
रविवार आहे, सर्व संघटित रूपामध्ये सायंकाळी ६:३० ते ७:३० वाजेपर्यंत अंतरराष्ट्रीय
योगामध्येसंमिलीत व्हा, एकत्रित स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहुन आपल्या
सूक्ष्मवृत्तीद्वारे शक्तिशाली वातावरण बनवण्याची सेवा करा.