12-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, मनामध्ये दिवस-रात्र बाबा-बाबाच म्हणत रहा तर खुप खुशी राहील, बुद्धीमध्ये
राहील बाबा आपणास कुबेराचा खजाना देण्यासाठी आलेले आहेत.
प्रश्न:-
बाबा कोणत्या
मुलांना इमानदार फुल म्हणतात? त्यांची लक्षणे कोणती ?
उत्तर:-
इमानदार मुले
तीच आहेत, जी कधी मायेच्या आधीन होत नाहीत. मायेच्या आकर्षणामध्ये येत नाहीत. असे
इमानदार फुले अंतकाळात येऊन पण पुढे जाण्याचा तीव्रगतीने पुरुषार्थ करत राहतात. ते
जुन्या पेक्षा पुढे जाण्याचे लक्ष ठेवतात. आपले अवगुण काढण्याचा प्रयत्न करत राहतात.
दुसऱ्यांचे अवगुण पाहत नाहीत.
ओम शांती।
शिवभगवानुवाच, ते आत्मिक पिता आहेत. कारण शिव तर परमात्मा आहेत ना. बाबा तर रोज
नवनवीन गोष्टी समजवत राहतात. गीता ऐकवणारे सन्यासी इत्यादी अनेक आहेत, या पित्याची
आठवण करू शकत नाहीत. बाबा अक्षर त्यांच्या मुखाद्वारे निघू शकत नाही. हे अक्षर
गृहस्थीसाठीच आहे. ते तर निवृत्ती मार्गाचे आहेत. ते ब्रह्म तत्त्वाची आठवण करतात.
मुखाद्वारे कधीच शिवबाबा म्हणत नाहीत. खुशाल तुम्ही तपासून पहा. समजा मोठे-मोठे
विद्वान, संन्यास, चिन्मयानंद, गीता ज्ञान ऐकवत राहतात.असे नाही की ते गीतेचे भगवान
कृष्णाला समजून त्यांच्याशी योग लावू शकतात. नाही. ते तर ब्रह्म सोबत योग लावणारे
ब्रह्मज्ञानी किंवा तत्वज्ञानी आहेत. कृष्णला कधी कोणी बाबा म्हणतील, असं होऊ शकत
नाही. कृष्ण कधी गीता ऐकवणारे बाबा होऊ शकत नाही. शिवाला सर्व बाबा म्हणतात, कारण
ते सर्व आत्मांचे पिता आहेत. सर्व आत्मे त्यांनाच बोलवितात, हे परमपिता परमात्मा.
ते सर्वोच्च, परम आहेत कारण परमधाममध्ये राहणारे आहेत. तुम्ही पण सर्व परमधाममध्ये
राहतात, परंतु शिवबाबांना परमात्मा म्हणतात. ते कधीच पूनर्जन्मामध्ये येत नाहीत.
स्वतः म्हणतात माझा जन्म दिव्य आहे आणि अलौकिक आहे. तुम्हाला कोणी, अशा प्रकारे
ब्रह्मा मध्ये प्रवेश करून विश्वाचे मालक बनवण्याची युक्ती सांगतील, असे होऊ शकत
नाही. तेव्हाच बाबा म्हणतात, “मी जो आहे जसा आहे तसा मला कोणी ओळखत नाही.” मी स्वतः
जेव्हा आपला परिचय देतो तेव्हाच मला ओळखतात. हे ब्रम्हांडला किंवा तत्वांना मानणारे
कृष्णाला आपला पिता कसे म्हणणार. आत्मा तर मुले आहेत. कृष्णाला पिता कसे म्हणणार असं
थोडेच आहे की कृष्ण सगळ्यांचा पिता आहे. आपण सगळे भाऊ-भाऊ आहोत. असे पण नाही
श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे. सगळे कृष्ण थोडीच होतात. सगळेच कृष्ण आहेत तर मग त्यांचा
बाप कोण. मनुष्य खूप चुका करतात. त्यांना माहीत नाही, म्हणूनच बाबा म्हणतात
कोटीमध्ये कोणीतरी मला ओळखते. कृष्णाला तर कोणी पण ओळखतील, विदेशी लोक सुद्धा
त्यांना ओळखतात, म्हणूनच लॉर्ड कृष्णा म्हणतात. चित्र पण आहेत खरे चित्र नाही.
भारतवासी म्हणतात यांची पूजा होते गीतेमध्ये सुद्धा लिहिलेला आहे, श्रीकृष्ण भगवान.
आता ईश्वर याला लॉर्ड का म्हणतात? लॉर्ड कृष्णा म्हणतात. लॉर्ड ही पदवी मोठ्या
व्यक्तींसाठी वापरली जाते. परंतु आज मनुष्य सगळ्यांनाच हि पदवी देतात. यालाच
म्हणतात अंधेर नगरी चौपट राजा…. कोणत्याही पतित मनुष्याला लॉर्ड (स्वामी) म्हणतात.
कुठे हे पतित मनुष्य आणि कुठे शिवबाबा आणि श्री कृष्ण ! बाबा म्हणतात मी तुम्हाला
जे ज्ञान आता देत आहे ते नंतर प्राय:लोप होते. मी नवीन दुनियेची स्थापना करतो.
ज्ञान सुद्धा देतो. जेव्हा मी जेव्हा ज्ञान देईन तेव्हाच मुल ऐकतील ना. माझ्याशिवाय
हे ज्ञान कोणीच देऊ शकत नाही. कुणालाही माहिती नाही .
संन्याशी शिवबाबाना आठवण करतात का? ते म्हणू पण शकत नाही की निराकार शिव बाबांना
आठवण करा. कधी ऐकले आहे का? खूप शिकलेले लोकसुद्धा समजत नाहीत. आता बाबा सांगतात
श्रीकृष्ण ईश्वर नाही. मनुष्य त्यांना पण भगवान समजतात. किती फरक झाला आहे. बाबा
मुलांना शिकवत आहेत. ते बाप, टीचर, आणि सतगुरू आहेत. सगळ्यांना समजवतात परंतु न
समजल्या कारणाने त्रिमूर्ती शिव यांना दाखवतच नाहीत. ब्रम्हाला दाखवतात ज्यांना
प्रजापिता ब्रह्मा म्हणतात. प्रजेची रचना करणारा परंतु ते पण भगवान नाहीत. भगवान
प्रजेची रचना करत नाहीत. कारण सर्व आत्मे त्यांची मुले आहेत. कुणाच्याद्वारे तरी
रचना करणार ना? तुम्हाला कोणी दत्तक घेतले? ब्रम्हाबाबा द्वारे बाबांनी दत्तक घेतले.
तुम्ही ब्राह्मणच देवता बनता. ही गोष्ट तुम्ही कधीच ऐकली नसेल. प्रजापिताची भुमिका
आहे, कर्म ही आहे. इतकी प्रजा येणार कुठून. कुख वंशावली तर असू शकत नाही. कुखवंशावली
ब्राह्मण म्हणतात, आमचे आडनाव आहे ब्राह्मण. आडनाव सगळ्यांचे वेगवेगळे असतात.
प्रजापिता ब्रह्मा तेव्हाच म्हणतात जेव्हा बाबा यांच्या मध्ये प्रवेश करतात. ही
नवीन गोष्ट आहे. बाबा स्वतः म्हणतात मला कोणी ओळखत नाही. सृष्टिचक्राबद्दल सुद्धा
कुणाला माहीत नाही म्हणून तर साधू संन्यासी नेति नेति म्हणतात ना. ईश्वराला,
ईश्वराच्या रचनेला ओळखत नाहीत. बाबा म्हणतात जेव्हा मी स्वतःहून परिचय देतो तेव्हाच
कळते. देवी-देवतांना सुद्धा माहित नाही,आपण राज्य कसे प्राप्त केले? त्यांना हे
ज्ञान नाही. पद प्राप्त केले मग ज्ञानाची आवश्यकता पण नाही. ज्ञान फक्त सदगतीसाठी
आहे. त्यांना तर सदगती मिळाली. ही खूप मोठी गोष्ट आहे. समजदार समजू शकतात. वृद्ध
मातामध्ये त्यांच्यामध्ये इतकी बुद्धी नाही नंबरानुसार प्रत्येकाची भुमिका वेगळी आहे.
असं तर म्हणू शकत नाही, हे ईश्वरा बुद्धी दे. बाबा म्हणतात मी सगळ्यांनाच बुद्धी
दिली तर सगळेच नारायण बनतील. मग काय सगळे एक दुसऱ्यावरती, राजसिंहासनावर बसणार का?
सगळ्यांच्या जीवनाचे लक्ष्य नारायण बनणे आहे, परंतु बनणार तर नंबरानुसार. जर
सगळ्यांनी हात वर उचलला की आम्ही पण नारायण बनणार, तर बाबांना खूप हसू येते. सगळे
एक सारखे कसे बनणार. नंबरवार आहेत ना. नारायण पहिला, नारायण दुसरा नारायण तिसरा. जसे
एडवर्ड पहिला, दुसरा, तिसरा असतात ना. लक्ष जरी एक असेल तरी स्वतः समजू शकतो माझी
वर्तणूक कशी आहे आणि मी काय पद प्राप्त करणार. पुरुषार्थ तर जरूर करायचा आहे. बाबा
नंबरानुसार फुल घेऊन येतात, नंबरानुसार फुल देऊ पण शकतात, परंतु असे करत नाहीत.
कारण मुले नाराज होतील. बाबांना माहित आहे, कोण चांगली सेवा करतात, कोण सुंदर फुल
आहे. नंबरानुसार तर असणार. बाबांची खूप जुनी मुलं पण बसलेले आहेत. परंतु नवीन फुलं
खूप छान आहेत. नंबरवन त्यांना म्हणणार जे इमानदार आहेत. ज्यांची कधी भांडणे होत नाही,
ज्यांच्यामध्ये ईर्षा नाही. काहींमध्ये खूप अवगुण आहेत. संपूर्ण तर म्हणू शकत नाहीत.
१६ कला बनण्यासाठी खूप मेहनत पाहिजे. अजून कोणी संपूर्ण बनले नाही. अजून पर्यंत
चांगल्या-चांगल्या मुलांमध्ये सुद्धा खूप ईर्षा आहे. खूप अवगुण आहेत. बाबांना माहिती
आहे, मुले पुरुषार्थ कसा-कसा करतात. दुनियेला माहित नाही. त्यांना तर काहीच माहित
नाही. खूप थोडी मुलं समजतात. गरीब मुलं पटकन समजतात. बेहद बाबा आलेले आहेत त्यांना
आठवण केल्याने आपले पाप नष्ट होतात. आपण बाबांकडे नवीन दुनियेचा वारसा घेण्यासाठी
आलेलो आहोत. नंबरानुसार असतातच ना. १०० पासून १ नंबर पर्यंत, ज्यांनी बाबांना ओळखला
आहे, थोडे तरी ज्ञान घेतलेले आहे ते स्वर्गामध्ये जरूर येतात. २१ जन्म स्वर्गामध्ये
येणे किती मोठी गोष्ट आहे . मेल्यानंतर स्वर्गात जातात असं थोडीच आहे. स्वर्ग कुठे
आहे, हेच समजत नाहीत. मोठी-मोठी लोकं म्हणतात, मेल्यानंतर स्वर्गात जातात. परंतु
स्वर्ग म्हणजे काय? याचा अर्थ माहीत नाही. हे फक्त तुम्हाला माहित आहे. तुम्ही पण
मनुष्य आहात परंतु ब्राम्हण बनलात. स्वतःला ब्राम्हण म्हणतात. तुम्हा ब्राम्हणांचा
एक बापदादा आहे. तुम्ही संन्यास्याना विचारू शकता, हे जे महावाक्य आहे किंवा
भगवानुवाच आहे की देहा सहित देहाच्या सर्व धर्मांचा त्याग करून मामेकम याद करा, हे
श्रीकृष्ण म्हणतात का? तुम्ही श्रीकृष्णाला आठवण करता का? तर ते होय म्हणणार नाहीत,
तिथेच हे प्रसिद्ध होईल. परंतु अबलानारी जातात त्यांना काय माहिती. संन्यासी आपल्या
शिष्या समोर क्रोधीत होतात. दुर्वासा ऋषिचे नाव आहे ना. त्यांच्यात खूप अहंकार होता.
तरी शिष्य खूप होते कारण भक्तीचे राज्य आहे ना. त्यांना विचारण्याची कुणातही ताकत
नाही. नाहीतर तुम्ही विचारू शकता तुम्ही शिवबाबाची पूजा करता का? भगवान कोणाला
म्हणतात? ईश्वर दगडात, मातीत, भिंतीत आहे का? पुढे चालून ह्या गोष्टी त्यांना
समजतील. आता किती नशा आहे. सर्व पुजारी आहेत. पूज्य म्हणणार नाही.
बाबा म्हणतात, मला कोणी विरळाच जाणतात. मी जो आहे, जसा आहे, तुम्हा मुलांमध्ये पण
कोणी बरोबर जाणतात. त्यांना आंतरिक खुशी प्राप्त होते. हे तर तुम्हाला माहित आहे की
बाबा आपल्याला स्वर्गाची बादशाही देतात . कुबेराचा खजाना देतात. अल्लाह अवलदिनचा
खेळ दाखवतात ना? टाळी वाजवल्यामुळे खजाना बाहेर आला. खूप खेळ दाखवतात. खुदा दोस्त
काय करतात, याच्यावर एक गोष्ट आहे. पुला वरती प्रथम जो येत होता, त्यांना एक दिवसाची
राजाई देऊन रवाना करत होते. या सर्व गोष्टी आहेत. आता बाबा आपल्याला सांगत आहेत की
खुदा तुमचा दोस्त झालेला आहे. ब्रम्हा यांच्यामध्ये प्रवेश करून तुमच्या सोबत खातात,
पितात, खेळतात पण. शिवबाबा आणि बह्मा बाबा यांचा रथ एकच आहे, तर जरूर शिवबाबा पण
खेळू शकतात ना. बाबांची आठवण करून खेळतात. तर यांच्यामध्ये दोघे आहेत बाबा आणि दादा.
परंतु कुणाला माहीत नाही. रथामध्ये आले म्हणून घोड्या गाडीचा रथ दाखवतात. असे पण
नाही शिवबाबा कृष्णाच्या रथामध्ये बसून ज्ञान देतात. ते म्हणतात श्रीकृष्ण
भगवानुवाच. ब्रह्मा भगवाननुवाच म्हणत नाही. ब्रह्मा बाबांचा रथ आहे. “शिव
भगवाननुवाच.” बाबा मुलांना स्वतःचा आणि रचनेच्या आदि मध्य अंताचा परिचय आणि कालावधी
सांगतात. जी गोष्ट कुणालाच माहीत नाही. जे समजदार असतात ते बुद्धी वापरतात.
संन्याशांना तर सन्यास करायचा आहे. तुम्ही पण शरीरासहित सगळ्याचा सन्यास करता.
तुम्हाला माहित आहे हे शरीर जुने वस्त्र आहे आणि आता आपल्याला नवीन दुनियेमध्ये
जायचे आहे. आपल्याला या दुनियेमध्ये राहायचे नाही. आपण याठिकाणी फक्त आपला पार्ट
वाजवण्यासाठी आलो आहोत. आपण परमधामाचे रहिवासी आहोत. तुम्हाला माहित आहे निराकारी
झाड कसे आहे. त्याठिकाणी सर्व आत्मे राहतात. आणि हा ड्रामा अनादि आहे. किती करोड
जीव आत्मा आहेत, इतके सगळे कुठे राहतात? निराकारी दुनियेमध्ये. हे सगळे तारे म्हणजे
आत्मा नाही. मनुष्याने या ताऱ्यांना सुद्धा देवता मानले आहे. परंतु ते काही देवता
नाहीत. ज्ञानसूर्य तर आपण शिवबाबांना म्हणणार.तर त्यांना देवता थोडीच म्हणणार.
शास्त्रांमध्ये खूप खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत. ती सर्व भक्तिमार्गाची सामग्री आहे.
त्यामुळे तुम्ही सर्व पतित बनले आहेत. ८४ जन्म भोगुन पतित बनले.आता ही दुनिया लोह
युग आहे. सत्ययुगाला सुवर्णयुग म्हटले जाते. त्याठिकाणी देवी-देवता राहतात. ते कुठे
गेले? हे कुणालाच माहीत नाही. देवी देवतांचा पुनर्जन्म होतो ही पण मान्यता आहे. बाबा
आपल्याला समजतात की देवी देवता पुनर्जन्म घेता घेता हिंदू बनले, पतित बनले. कुणाचाही
धर्म बदली होत नाही, परंतु देवी-देवतांच्या धर्म बदली होतो. का? हे माहीत नाही. बाबा
म्हणतात कारण ते धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट झाले. देवी-देवता पवित्र होते. परंतु
रावणाचा राज्यांमध्ये अपवित्र बनले. स्वतःला देवी देवता म्हणू शकत नाही, म्हणून
हिंदू नाव पडले. देवी-देवता धर्म बाबांनी स्थापन केला आहे. शिवरात्री साजरी केली
जाते परंतु बाबांनी येऊन काय केले? हे कोणालाच माहीत नाही. शिवपुराण पण आहे. खरं तर
शिवाची गीता आहे.जे बाबांनी सांगितले दुसरं कोणतं शास्त्र नाही. तुम्ही कोणतीही
हिंसा करत नाहीत. तुमचे कोणतेही शास्त्र बनत नाही. तुम्ही नवीन दुनियेमध्ये जाता.
सतीयुगामध्ये कोणतंही शास्त्र किंवा गीता नाही. तिथे कोण वाचणार! मनुष्य समजतात
वेदशास्त्र परंपरागत आले आहेत. त्यांना माहीत नाही कि, सतयुगामध्ये कोणतेही शास्त्र
नाही. बाबांनी देवता बनवले तेव्हा सगळ्यांची सदगती झाली. मग शास्त्र वाचण्याची काय
आवश्यकता म्हणून तिथे कोणतेही शास्त्र नाही. संगमयुगामध्ये बाबांनी ज्ञानाची चावी
दिली आहे. बाबा ज्ञानाच्या चावीने आपल्या बुद्धीचे कुलूप उघडतात. पहिले तुमचे
बुद्धीचे कुलूप बंद होते, काहीच समजत नव्हते. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. कोणा
बरोबरही ईर्षा करू नका. अवगुनांला काढून टाकून संपूर्ण बनण्याचा पुरुषार्थ करायचा
आहे.शिक्षणाने उंच पदाची प्राप्ती होते.
2. शरीरा सहित सर्व
गोष्टीचा संन्यास करा. कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका अहंकार ठेवूनका.
वरदान:-
माझ्या
माझ्याला तुझ्या मध्ये परिवर्तन करून बेफिक्र बादशाह बनणारे खुशीच्या खजान्याद्वारे
भरपूर भव.
ज्या मुलाने सर्वकाही
तुझं केले, तेचबेफिक्र आहेत. माझं काहीच नाही सर्व तुझं आहे….जेव्हा असे परिवर्तन
करता, तेव्हा बेफिक्र बनतात. जीवनामध्ये प्रत्येकजण बेफिक्र राहू इच्छितो, जेथे
चिंता आहे तेथे नेहमी आनंदी होऊ शकत नाही. तर तुझे म्हणल्याने, बेफिक्र बनल्याने
आनंदाच्या खजान्यानें भरपूर होऊन जातात. तुम्हा बेफिक्र बादशहाजवळ अगणित, अखुट,
अविनाशी खजाने आहेत. जे सतयुगामध्ये नसतील.
बोधवाक्य:-
खजान्याला
सेवेमध्ये लावणे म्हणजे जमाचे खाते वाढवणे.