24-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, तुम्हाला आपल्या दिव्याचा सांभाळ स्वत:च करावयाचा आहे, वादळापासून वाचण्यासाठी ज्ञान आणि योगाचे तुप जरुर पाहिजे....!!!

प्रश्न:-
कोणता पुरुषार्थ गुप्त बाबाकडून गुप्त वारसा देत आहे?

उत्तर:-
अंतमुर्खहोऊन गप्प बसून बाबाची आठवण करा, तर गुप्त वारसा मिळेल. आठवणीत राहून शरीर सोडले तर फार चांगले आहे, यात काही त्रास नाही. आठवणी बरोबरच ज्ञान आणि योगाची सेवा पण करावयाची आहे, ती जर करु शकत नसाल तर कर्मणा करा, अनेकांना सुखी केले तर आशिर्वाद मिळेल, वागणे, बोलणे व चालणे पण फार सात्वीक पाहिजे.

গীতঃ-
निर्बल बरोबर लढाई बलवानची ---

ओम शांती।
बाबांनी समजावले आहे, जेव्हा असे गीत ऐकता, तर प्रत्येकाला, स्वत: बरोबर विचार सागर मंथन करावयाचे आहे. हे तर मुले जाणतात कि, मनुष्य मरतात तर 12 दिवस दिवा जाळतात. तुम्ही तर मरण्यासाठी तयारी करत आहात आणि स्वत:ची ज्योत पुरुषार्थ करुन तुम्हीच जागवत आहात. पुरुषार्थ पण माळेमध्ये येणारेच करत आहेत. प्रजा या माळेत येत नाही. पुरुषार्थ केला पाहिजे आम्ही, विजय माळेत प्रथम येण्याचा. कोठे माया रुपी मांजर वादळ आणून विकर्म ना करावे ज्यामुळे दिवाच विझुन जाईल. आता यात ज्ञान आणि योगाचे दोन्ही बळ पाहिजे. योगा बरोबर ज्ञान पण जरुर पाहिजे. प्रत्येकाला आपल्या दिव्याचा सांभाळ करावयाचा आहे. अंतापर्यंत पुरुषार्थ करावयाचाच आहे. शर्यत चालत राहते, तर फार सांभाळ केला पाहिजे, कोठे ज्योत कमी ना व्हावी, विझून ना जावी. त्यामुळे योग आणि ज्ञानाचे तुप रोज टाकले पाहिजे. योगबळाची ताकद नसेल तर पळू शकणार नाहीत. शेवटी राहतील. शाळेमध्ये विषय असतात, पाहतात कि, अमूक विषयात हुशार नाही, तर त्यामध्ये पुढे जाण्यासाठी जोर लावतता. येथे पण तसे आहे. कर्मणा सेवेचा विषय पण फार चांगला आहे. अनेकांचे आशिर्वाद मिळतात. काही मुले ज्ञान देयाची सेवा करतात. दिवसेंदिवस सेवेत वाढ होत राहाते. एका मालकाचे 6-8 दुकान पण असतात. सर्वच एक सारखे चालत नाहीत. कोणामध्ये कमी गिराईक, कोणामध्ये जास्त असतात. तुमच्यामध्ये पण एक दिवस ती वेळ येईल, ज्यावेळी रात्रीला पण वेळ मिळणार नाही. सर्वांना माहित पडेल कि ज्ञान सागर बाबा आले आहेत, अविनाशी ज्ञान रत्नांनी झोळी भरत आहेत. मग अनेक मुलं येतील. काही विचारुच नका. एक दोघाला सांगतात ना. येथे ही वस्तू फार चांगली आणि स्वस्त मिळत आहे. तुम्ही मुलं पण जाणता कि, हे राजयोगाच शिक्षण फार सोपे आहे. सर्वांना या ज्ञान रत्नांची माहिती झाली तर येत राहतील. तुम्ही ज्ञान आणि योगाची सेवा करत आहात. जे ज्ञान आणि योगाची सेवा करत नाहीत, तर मग कर्मणा सेवेचे पण गुण आहेत. सर्वांचे आशिर्वाद मिळेल. एक दोघांना सुख दयावयाचे असते. ही तर फार फार स्वस्त खाण आहे. ही अविनाशी हिरे जवाहराताची खाण आहे. 8 रत्नांची माळा बनवतात ना. पुजा पण करतात परंतू कोणाला माहित नाही कि ही माळा कशाची बनली आहे.

तुम्ही मुले जाणता कि, कसे आम्हीच पुज्य पासून पुजारी बनले आहोत. हे फार आश्चर्य कारक ज्ञान आहे जे दुनियेमध्ये कोणी जाणत नाही. आता तुम्ही भाग्यवान ताऱ्यांनाच निश्चय आहे कि, आम्ही स्वर्गाचे मालक होतो, आता नरकाचे मालक बनले आहोत, स्वर्गाचे मालक होतो तर पुर्नजन्म पण तेथेच घेतो. आता परत आम्ही स्वर्गाचे मालक बनत आहोत. तुम्हा ब्राह्मण मुलांनाच या संगमयुगाची माहिती आहे. दुसरीकडे सारी दुनिया आहे. कलियुगामध्ये. युग तर वेगवेगळे आहेत ना. सतयुगामध्ये होतो तर पुर्नजन्म सतयुगात घेतो. आता तुम्ही संगमयुगात आहात. तुमच्यामध्ये जर कोणी शरीर सोडले तर संस्कारानुसार, येथेच येऊन जन्म घेतात. तुम्ही ब्राह्मण आहात संगमयुगातील, ते शुद्र आहेत कलियुगातील. हे ज्ञान पण तुम्हाला या संगमयुगात मिळत आहे. तुम्ही बी.के. ज्ञान गंगा, प्रत्यक्षात आता संगमयुगात आहात. आता तुम्हाला शर्यत करावयाची आहे. दुकान सांभाळावयाचे आहे. ज्ञान आणि योगाची धारणा नसेल तर दुकान सांभाळू शकणार नाहीत. सेवा केल्यामुळे त्या बदल्यात मोबदला बाबाच देणारे आहेत. यज्ञ रचल्यावर अनेक प्रकारचे ब्राह्मण लोक येत राहतात. मग कोणाला दक्षिणा जास्त, कोणाला कमी मिळते. आता हा परमपिता परमात्म्याने रुद्र ज्ञान यज्ञ रचला आहे. आम्ही आहोत ब्राह्मण. आमचा धंदाच आहे मनुष्याला देवता बनविण्याचा. असा यज्ञ आणखीन कोठे असत नाही, जे कोणी म्हणेल कि आम्ही या यज्ञाद्वारे मनुष्याला देवता बनवत आहोत. आता याला रुद्र ज्ञान यज्ञ अथवा पाठशाळा पण म्हटले जाते. ज्ञान आणि योगाने प्रत्येक मुलगा देवी देवता पद प्राप्त करु शकतात. बाबा सांगतात कि, तुम्ही परमधामातून बरोबर आले आहात. तुम्ही म्हणता कि, आम्ही परमधाम निवासी आहोत. यावेळी बाबांच्या मतानूसार आम्ही स्वर्गाची स्थापना करत आहोत. जे स्थापना करतील तेच जरुर मालक बनतील. तुम्ही जाणता कि, आम्ही या दुनियेमध्ये अती भाग्यवान ज्ञान सुर्य, ज्ञान चंद्रमा आणि ज्ञान तारे आहोत. बनविणारे आहेत ज्ञानसागर बाबा. हे सुर्य, चंद्र, तारे सर्व स्थुल मध्ये आहेत ना, त्यांचेशी आमची बरोबरी आहे. तर आम्ही पण ज्ञान सुर्य, ज्ञान चंद्र, ज्ञान तारे बनू. आम्हाला असे बनविणारे आहेत ज्ञानाचे सागर. नाव तर पडतेच ना. ज्ञान सुर्य अथवा ज्ञान सागराची आम्ही मुलं आहोत. शिवबाबा तर येथील रहिवाशी नाहीत. बाबा सांगतात कि, मी येतोच तुम्हाला माझ्यासारखे बनविण्यासाठी, ज्ञानसुर्य, ज्ञानतारे तुम्हाला येथे बनायचे आहे. तुम्ही जाणता कि, बरोबर आम्ही भविष्यात येथेच स्वर्गाचे मालक बनू. सारा आधार पुरुषार्थांवर आहे. आम्ही मायेवर. विजय प्राप्त करणारे सैनिक आहोत. ते लोक तर मनाला वश करण्यासाठी किती दृढ इत्यादी करतात. तुम्ही तर हठयोग इ. करत नाहीत. बाबा म्हणतात कि, तुम्हाला कोणती त्रासदायक गोष्ट करावयाची नाही, फक्त सांगतो कि, तुम्हाला माझे जवळ यायचे आहे. त्यामुळे माझी आठवण करा. मी तुम्हा मुलांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. असे आणखीन कोणी मनुष्य म्हणू शकणार नाही. जरी स्वत:ला ईश्वर म्हणतील, परंतू स्वत:ला मार्गदर्शक म्हणणारे नाहीत. बाबा म्हणतात कि, मी मुख्य मार्गदर्शक मृत्यूचा काळ आहे. एक सत्यवान सावित्री गोष्ट आहे ना. त्यांचे शारिरीक प्रेम असल्यामुळे दु:खी होती. तुम्ही तर खुशीत आहात. मी तुम्हा आत्म्यांना घेऊन जातो, तुम्ही कधी दु:खी राहणार नाही. तुम्ही जाणता कि आमचे बाबा आले आहेत, आम्हाला गोड घरी घेऊन जाण्यासाठी. ज्याला मुक्तीधाम, निर्वाणधाम म्हटले जाते. म्हणतात कि मी सर्व काळांचा काळ आहे. ते तर एक आत्म्याला घेऊन जातात, मी तर किती मोठा काळ आहे. 5 हजार वर्षापुर्वी पण मी मार्गदर्शक बनून सर्वांना घेऊन गेलो होतो. साजन सर्व सजनींना परत घरी घेऊन जातात, तर त्यांची आठवण केली पाहिजे.

तुम्ही जाणता कि, आता आम्ही, शिकत आहोत, नंतर परमधामला जावू. अगोदर गोड घरी जावू, नंतर खाली येऊ. तुम्ही मुले स्वर्गाचे तारे आहात. पुर्वी नरकाचे होतो. तारे मुलांना म्हटले जाते. भाग्यवान तारे नंबरवार पुरुषार्थानुसार आहोत. तुम्हाला आजोबाची संपत्ती मिळत आहे. खाण फार जबरदस्त आहे आणि खाण एकदाच, एकच खाण मिळत आहे. अविनाशी ज्ञानरत्नांची ती पुस्तके तर फार आहेत. परंतू त्यांना रत्न म्हणत नाहीत. बाबाला तर ज्ञानसागर म्हटले जाते. अविनाशी ज्ञान रत्नांची निराकारी खाण आहे. या रत्नाद्वारे तुम्ही झोळ्या भरत आहात. तुम्हा मुलांना खुशी झाली पाहिजे. प्रत्येकाला नशा पण राहत आहे. दुकानावर धंदा जास्त होत असेल तर नाव पण प्रसिध्द होते. येथे प्रजा पण बनवत आहत तर वारिस पण बनवत आहात. येथून रत्नांची झोळी भरुन मग जावून दान दयावयाचे आहे. परमपिता परमात्माच ज्ञानाचे सागर आहेत, जे ज्ञान रत्नांनी, झोळी भरत आहेत. बाकी तर समुद्र नाही जे दाखवितात कि, रत्नांची थाळी भरुन देवतांना देत आहेत. त्या समुद्रातून रत्न मिळत नाहीत. ही ज्ञान रत्नांची गोष्ट आहे. विश्व नाटकानुसार तुम्हाला मग रत्नांच्या खाणी, पण मिळत राहतात. तेथे तर पुष्कळ हीरे-जवाहरात असतात, ज्याद्वारे मग भक्तीमार्गात मंदीर इत्यादी बनवितात. भूकंप इ. झाल्याने सर्व जमिनीत गेले आहेत. तेथे महल इ. तर अनेक बनतात, एक नाही. येथे पण राजामध्ये स्पर्धा फार होते. तुम्ही मुले जाणता कि, हुबेहुब कल्पा पुर्वी प्रामणे जशी घरे बनवली होती तसेच बनवतील. तेथे तर फारच सहज रितीने घरे इ. बनतात. विज्ञान फार काम करते. परंतू तेथे विज्ञान शब्द असत नाही. सायन्सला हिंदीमध्ये विज्ञान म्हणतात. आजकाल तर विज्ञान भवन पण नाव ठेवले जाते. विज्ञान शब्द ज्ञाना बरोबर लावतात. ज्ञान आणि योगाला विज्ञान म्हणतात. ज्ञानातून रत्न मिळतात, योगाद्वारे आम्ही सदा निरोगी बनतो. या ज्ञान आणि योगाचे ज्ञानाद्वारे नंतर वैकुंठामध्ये मोठ मोठे भवन बनतात. आम्ही आता या साऱ्या ज्ञानाला जाणले आहे. तुम्ही जाणता कि, आम्ही भारताला स्वर्ग बनवत आहोत. तुमचे या शरीरामध्ये काही ममत्व नाही. आम्ही आत्मा हे शरीर सोडून स्वर्गामध्ये जावून नविन शरीर घेतो. तेथे पण समजतात कि, एक म्हातारे शरीर सोडून दुसरे नविन घेतो. तेथे कोणते दु:ख वा छंद नसतात. नविन शरीर घेणे तर चांगलेच आहे. आम्हाला बाबा असे बनवत आहेत, जसे कल्पापुर्वी पण बनलो होतो. आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत. बरोबर कल्पापुर्वी पण अनेक धर्म होते. गीतेमध्ये काही नाही. गायन करतात कि, आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना ब्रह्माद्वारे होते. अनेक धर्माचा विनाश कसा होत आहे, ते तुम्ही समजावू शकता. आता स्थापना होत आहे. बाबा येतातच जेव्हा, देवी देवता धर्म लोप होऊन जातो. मग परंपरेने कसा चालतो. ही फार सोपी गोष्ट आहे. विनाश कोणाचा झाला? अनेक धर्माचा तर, आता अनेक धर्म आहेत ना. यावेळी आता अंत आहे, सारे ज्ञान बुध्दीमध्ये राहिले पाहिजे. असे पण नाही कि, शिवबाबाच समजावत आहेत. काय हे ब्रह्मा बाबा काही सांगत नाहीत. यांची पण भुमिका आहे. श्रीमत ब्रह्माची पण गायली जाते. कृष्णासाठी तर श्रीमत म्हणत नाहीत. तेथे तर सर्व श्रेष्ठ आहेत, त्यांना कोणाच्या मताची गरजच नाही. येथे ब्रह्माची पण मत मिळत आहे. तेथे तर यथा राजा राणी तथा प्रजा सर्वांना श्रेष्ठ मत आहे, जरुर कोणी दिली असेल. देवता आहेत श्रीमतवाले. श्रीमताद्वारेच स्वर्ग बनत आहे, आसुरी मताने नरक बनला आहे. श्रीमत आहे शिवाची. यासर्व गोष्टी सहज समजण्याच्या आहेत. शिवबाबाची ही सर्व दुकाने आहेत. आम्ही मुले चालवणारे आहोत. जे चांगले दुकान चालवितात, त्यांचे नांव होते. हुबेहुब जसे दुकानदारी मध्ये होत आहे. परंतू हा व्यापार कोणी विरळाच करतो. व्यापार तर सर्वांनाच करावयाचा आहे. लहान मुले पण ज्ञान आणि योगाचा व्यापार करु शकतात. शांतीधाम आणि सुखधाम बस, बुध्दीमध्ये त्यांची आठवण करावयाची आहे. ते लोक राम-राम म्हणतात. येथे गप्प बसून आठवण करावयाची आहे, बोलायचे काहीच नाही. शिवपुरी, विष्णूपुरी फार सोपी गोष्ट आहे. गोड घर, गोड राजधानी आठवणीत आहे. ते देतात स्थुल मंत्र, येथे आहे सुक्ष्म मंत्र. अति सुक्ष्म आठवण आहे. फक्त या आठवणीद्वारे आम्ही स्वर्गाचे मालक होतो. काही पण जपायचे नाही, फक्त आठवण करावयाची आहे. आवाज काही पण करावयाचा नाही. गुप्त बाबाकडून, गुप्त वारसा, गप्प राहून, अंतमुर्ख होऊन, आम्ही प्राप्त करत आहे. याच आठवणीत राहून शरीर सुटले तर फार चांगले आहे. कोणते कष्ट नाही, ज्यांना आठवण राहत नाही, त्यांनी स्वत:चा अभ्यास करावा, सर्वांना सांगा कि, बाबांनी सांगितले आहे, माझी आठवण करा तर अंतमती तशी गती होईल. आठवणीने विकर्म विनाश होतात आणि मी स्वर्गामध्ये पाठवतो. बुध्दीयोग शिवबाबाशी लावणे फार सोपे आहे. पथ्ये येथेच पाळावयाची आहेत. सतोप्रधान बनतो तर सर्व सात्वीक असले पाहिजे, चलन सात्वीक, बोलणे सात्वीक. स्वत: बरोबर बोलत राहायचे आहे. जोडीदारा बरोबर प्रेमाने बोलावयाचे आहे. गीतामध्ये पण आहे ना, पियू पियू बोल सदा अनमोल----

तुम्ही आहात रुप बसत, आत्मा रुप बनते. ज्ञानाचे सागर बाबा आहेत, तर जरुर येऊन ज्ञानच सांगतील. सांगतात कि, मी एक वेळेच येऊन शरीर धारण करत आहे. ही जादूगरी कमी नाही. बाबा रुप बसत आहेत. परंतू निराकार तर बोलू शकत नाही, त्यामुळे शरीर घेतले आहे. परंतू ते पुनर्जन्म घेत नाहीत. आत्मे तर पुर्न जन्मात येत राहतात.

तुम्ही मुले बाबा वर समर्पित होता, तर बाबा म्हणतात, ममत्व ठेवू नका. आपले काही समजू नका. ममत्व नष्ट करण्यासाठी बाबा युक्ती रचत आहेत. पावलो पावली बाबाला विचारावे लागते, माया अशी आहे जी चापट मारत आहे. पुर्ण बॉक्सींग आहे, अनेक जण तर हार खाऊन, मग उभे होतात, लिहतात बाबा मायेने चापट मारली, काळे तोंड झाले, जसे कि 4 थ्या माळ्यावरुन खाली पडले. क्रोध केला तर 3 ऱ्या मजल्यावरुन खाली पडले. या फार समजण्याच्या गोष्टी आहेत. आता पहा, मुले टेप साठी पण मागणी करत आहेत. बाबा टेप भरुन पाठवा. आम्ही हुबेहुब मुरली ऐकू. याची पण प्रबंध होत आहे, अनेक जण ऐकतील, तर अनेकांची बुध्दी खुलेल. अनेकांचे कल्याण होईल. मनुष्य महाविद्यालय सुरु करतात, तर त्यांना दुसऱ्या जन्मामध्ये विद्या जास्त मिळते. बाबा पण सांगतात कि, टेप मशीन खरेदी करा तर अनेकांचे कल्याण होईल. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. सतोप्रधान बनण्यासाठी फार फार पथ्ये पाळावयाची आहेत. आपले खाणे पिणे, बोलणे चालणे, सर्व सात्वीक ठेवायचे आहे. बाबासारखे रुप बसत बनायचे आहे.

2. अविनाशी ज्ञान रत्नांनी निराकारी खाणीद्वारे आपली झोळी भरुन, अपार खुशीमध्ये राहावयाचे आहे, आणि दुसऱ्याला पण या रत्नांचे दान द्यावयाचे आहे.

वरदान:-
मन बुध्दीला आदेशा प्रमाणे विधिपुर्वक कार्यामध्ये लावणारे निरंतर योगी भव :-

निरंतर योगी म्हणजे स्वराज्य अधिकारी बनण्याचे विशेष साधन, मन आणि बुध्दी आहे. मत्रच मनमनाभवचा आहे. योगाला बुध्दीयोग म्हणतात. तर हा विशेष आधारस्तंभ आपले अधिकारात आहे म्हणजे आदेशानूसार विधिपूर्वक कार्य करत आहे. जो विचार जेव्हा करावयाचा आहे, तसा विचार करु शकाल. जिथे बुध्दी लावू इच्छिता तिथे लावू शकता, बुध्दी तुम्हा राजाला भटकवणार नाही. विधीपुर्वक कार्य करेल तेव्हा म्हणावे निरंतर योगी.

बोधवाक्य:-
मास्टर विश्व शिक्षक बना, वेळेला शिक्षक बनवू नका.