26-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, विश्व नाटकाचे श्रेष्ठ ज्ञान तुम्हा मुलांजवळ आहे, तुम्ही जाणता कि हे
नाटक जसेच्या तसे पुनरावृत्त होत आहे."
प्रश्न:-
प्रवृत्तीवाले
बाबांना कोणता प्रश्न विचारतात, बाबा त्यांना कोणती मत देतात?
उत्तर:-
काही मुले
विचारतात, बाबा आम्ही कोणता धंदा करु? बाबा सांगतात, मुलांनो, जरी धंदा केला तरी तो
उत्तम असावा. ब्राह्मण मुले वाईट धंदा, दारु सिगरेट बिडी इ.चा करु शकत नाहीत, कारण
यामुळे आणखीनच विकाराची ओढ लागते.
ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहेत. आता एक आहे आत्मिक पित्याची श्रीमत, दुसरी
आहे रावणाची आसुरी मत. आसुरी मत बाबाची म्हणत नाहीत. रावणाला बाप तर म्हणत नाहीत
ना. ती आहे रावणाची आसुरी मत. आता तुम्हा मुलांना मिळत आहे ईश्वरीय मत,
रात्रं-दिवसाचा फरक आहे. बुध्दीमध्ये आले आहे ईश्वरीय मताने दैवीगुण धारण होत आहेत.
हे फक्त तुम्ही मुलेच बाबांकडून ऐकत आहात. आणखीन कोणाला माहित पडत नाही. बाबा
भेटतातच संपत्तीसाठी, रावणामुळे तर आणखीनच संपत्ती कमी होत जाते. ईश्वरीय मत कोणीकडे
घेऊन जाते, आणि आसुरी मत कुठे घेऊन जाते, हे तुम्हीच जाणत आहात. आसुरी मत
जेव्हापासून मिळते, तुम्ही खालीच उतरत आले आहात. नविन दुनियेमध्ये थोडे थोडे उतरत
आला. उतरणे कसे होते, मग चढणे कसे होते, हे पण तुम्ही मुले समजले आहात. आता तुम्हा
मुलांना श्रीमत मिळत आहे, परत श्रेष्ठ बनण्यासाठी. तुम्ही येथे आलेच आहात श्रेष्ठ
बनण्यासाठी. तुम्ही जाणता कि, आम्ही परत श्रेष्ठ मत कशी मिळवतो. अनेकवेळा तुम्ही
श्रेष्ठ मताने उंच पद प्राप्त केले आहे मग पुर्नजन्म घेत घेत खाली उतरत आले आहात.
मग परत एकाचवेळेत चढत आहात. नंबरवार पुरुषार्थानुसार तर असतातच. बाबा सांगतात, वेळ
लागतो. पुरुषोत्तम संगमयुगाची वेळ पण आहे, पुर्ण तंतोतंत. नाटक फार तंतोतंत चालत आहे,
आणि फार आश्चर्यकारक आहे. मुलांच्या बुध्दीमध्ये फार सहज येते. बाबाची आठवण करावयाची
आहे, आणि वारसा घ्यावयाचा आहे. बस. परंतु पुरुषार्थ करताना काही ना अवघड पण वाटत आहे.
एवढे उंच ते उंच पद प्राप्त करणे सोपे थोडेच असू शकते. फार सोपी बाबाची आठवण आणि
सहज वारसा बाबाचा आहे. सेकंदाची गोष्ट आहे. नंतर पुरुषार्थ करण्याची सुरुवात करतात
तर मायेचे विघ्न पण पडतात. रावणावर विजय मिळवयाचा आहे. साज्या सृष्टीवर या रावणाचे
राज्य आहे. आता तुम्ही समजले आहात कि, आम्ही योगबळाद्वारे रावणावर प्रत्येक
कल्पामध्ये विजय प्राप्त करत आला आहात. आता पण प्राप्त करत आहोत. शिकविणारे आहेत
बेहदचे बाबा. भक्तीमार्गात पण तुम्ही बाबा बाबा म्हणत आले आहात. परंतु अगोदर बाबाला
ओळखत नव्हतो. आत्म्याला जाणत होतो. म्हणत होतो कि, भ्रकुटीमध्ये चमकत आहे एक
विचित्र तारा----आत्म्याला जाणत होतो, परंतु बाबाला जाणत नव्हतो. कसे विचित्र नाटक
आहे. म्हणत पण होता कि, हे परमपिता परमात्मा, आठवण करत होतो, तरी पण ओळखत नव्हतो.
ना आत्म्याच्या कर्तव्याला, ना परमात्म्याचे कर्तव्याला पुर्ण जाणत नव्हतो. बाबाच
स्वत: येऊन समजावत आहेत. बाबाशिवाय कधी कोणी सत्य दर्शन करवून देत नाही. कोणाची
भुमिकाच नाही. म्हटले पण जाते, ईश्वरीय संप्रदाय, आसुरी संप्रदाय, आणि दैवी
संप्रदाय. आहे फार सोपे. परंतु या गोष्टी आठवणीत ठेवणे, यातच माया विघ्न घालत आहे.
विसरवत आहे. बाबा सांगतात कि, नंबरवार पुरुषार्थानुसार आठवण करत करत जेव्हा नाटकाचा
अंत होईल, म्हणजे जुन्या दुनियेचा अंत होईल, तेव्हा नंबरवार पुरुषार्थानुसार राजधानी
स्थापन होऊन जाईल. शास्त्रातून या गोष्टी कोणी समजू शकत नाही. गीता इत्यादी तर
ब्रह्मा बाबांनी पण फार वाचले आहे ना. आता बाबा म्हणतात कि, यांचे काही महत्तव नाही.
परंतु भक्तीमध्ये तर कनरस फार मिळतो त्यामुळे सोडत नाहीत.
तुम्ही जाणता कि, सारा आधार पुरुषार्थावर आहे. धंदा इत्यादी पण काही जणाचा उत्तम
असतो, काही जणांचा वाईट धंदा असतो. दारु, बीडी, सिगरेट इत्यादी विकतात. असला धंदा
तर फार वाईट आहे. दारु सर्व विकाराला ओढून आणते. कोणाला दारुडा बनविणे, हा धंदा
चांगला नाही. बाबा मत देतात कि, युक्तीने असा धंदा बदलून दुसरा करा. नाही तर उंच पद
प्राप्त करु शकणार नाही. बाबा समजावतात कि, यासर्व धंदामध्ये नुकसान आहे, शिवाय
अविनाशी ज्ञान रत्नांच्या धंदाच्या. जरी जवाहराताचा धंदा करत होते, परंतु फायदा तर
झाला नाही ना, लखपती बनले. तुम्ही पण समजता कि, बाबा जे सांगतात बिल्कुल बरोबर आहे.
आम्हीच देवी देवता होतो, चक्रामध्ये येऊन खाली आलो आहेत. सृष्टीच्या आदि मध्य अंताला
पण जाणले आहे. ज्ञान तर बाबाद्वारे मिळाले आहे. परंतु दैवीगुण पण धारण करावयाचे
आहेत. आपली तपासणी करावयाची आहे, माझेमध्ये कोणता आसुरी गुण तर नाही ना? हे बाबा पण
जाणत आहेत, मी हे शरीर रुपी घर भाड्याने दिले आहे. हे घर आहे ना. यात आत्मा राहते.
मला फार आनंद वाटतो कि, भगवानाला मी भाड्याने घर दिले आहे. विश्व नाटकानुसार आणखीन
कोणाचे घर त्यांना घ्यायचेच नाही. कल्प कल्प हेच घर घ्यावे लागते. ब्रह्मा बाबांना
तर खुशी होते, परंतु नंतर हंगामा पण किती झाला. ब्रह्मा बाब कधी हसत खेळत शिवबाबांना
म्हणतात कि, बाबा, तुमचा रथ बनलो तर मला एवढ्या शिव्या खाव्या लागल्या. शिवबाबा
म्हणतात कि, सर्वांत जास्त शिव्या मला मिळाल्या. आता तुमची बारी आहे. ब्रह्माला कधी
शिव्या मिळाल्या नाहीत. आता बारी आली आहे. रथ दिला आहे, हे तर समजत आहेत, तर जरुर
बाबाची मदत पण मिळेल. तरी पण बाबा म्हणतात कि, बाबाची निरंतर आठवण करा, त्यामुळे
तुम्ही मुले ब्रह्मा बाबा पेक्षा पण पुढे जावू शकता, कारण यांचे वर तर फार मामले
आहेत. जरी नाटक म्हणून सोडून देत आहेत, तरी पण काहीतरी काळजी जरुर वाटते. हे बिचारे
फार चांगली सेवा करत होते. हे संगदोषाने खराब झाले आहेत. किती बदनामी होत आहे. अशी
अशी कामे करतात तर कामे करत आहेत, काळजी वाटते ना. त्यावेळी हे समजत नाहीत कि हे पण
नाटक बनलेले आहे, नंतर विचार येतो. हे तर नाटकात नोंदलेले आहे ना. माया अवस्थेला
बिगडून टाकते त्यामुळे फार बदनामी होते. किती अबलांवर अत्याचार होत आहेत. येथे तर
स्वत:ची च किती बदनामी करत आहेत, उल्टे सुल्टे बोलतात.
आता तुम्ही मुले जाणतात कि, बाबा काय सांगत आहेत? कोणते शास्त्र इ. सांगत नाहीत. आता
आम्ही श्रीमत वर किती श्रेष्ठ बनत आहोत. आसुरी मताने तर किती भ्रष्ट बनलो. वेळ लागते
ना. माये बरोबर युध्द चालत राहते. आता तुमचा विजय तर जरुर होणार आहे. हे तुम्ही
समजता कि, शांतीधाम, सुखधामवर आमचा विजय तर आहेच. कल्प कल्प आम्ही विजय प्राप्त करत
आलो आहे. या पुरुषोत्तम संगमयुगावरच स्थापना आणि विनाश होत आहे. हा सारा विस्तार
तुमच्या मुलांच्या बुध्दीत आहे. बरोबर बाबा आमचेद्वारे स्थापना करत आहेत. नंतर
आम्हीच राज्य करु. बाबाचे आभार पण मानणार नाहीत. बाबा म्हणतता हे पण नाटकात नोंदलेले
आहे. मी पण या नाटकामध्ये भुमिका करत आहे. नाटकामध्ये सर्वांची भुमिका नोंदलेली आहे.
शिवबाबंची पण भुमिका आहे. आमची पण भुमिका आहे, आभार मानण्याची गोष्टच नाही. शिवबाबा
म्हणतात कि, मी तुम्हाला श्रीमत देऊन रस्ता सांगत आहे, आणखीन कोणी सांगू शकत नाही.
जे पण येतील त्यांना सांगा, सतोप्रधान नविन दुनिया स्वर्ग होता ना. या जुन्या
दुनियेला तमोप्रधान म्हटले जाते. नंतर सतोप्रधान बनण्यासाठी दैवीगुण धारण करावयाचे
आहेत. बाबाची आठवण करावयाची आहे. मंत्र पण हा आहे मनमनाभव, मध्याजी भव. बस, हे पण
सांगत आहेत कि, मी सर्वोच्च गुरु आहे.
तुम्ही मुले आता आठवणीच्या यात्रेने साज्या सृष्टीची सद्गती करत आहात. जगदगुरु एक
शिवबाबा आहेत जे तुम्हाला श्रीमत देत आहेत. तुम्ही जाणता कि प्रत्येक 5 हजार
वर्षानंतर आम्हाला ही श्रीमत मिळत आहे. चक्र फिरत राहत आहे. आज जुनी दुनिया आहे,
उद्या नविन दुनिया असेल. या चक्राला समजणे पण फार सोपे आहे. परंतु हे पण आठवणीत
ठेवले पाहिजे, जे कोणाला समजावू शकाल, हे पण विसरुन जातात. कोणी विकारात जातात, तर
मग ज्ञान इ. सर्व नष्ट होऊन जाते. कला काया माया नष्ट करते. आणि कलाहीन करुन टाकते,
विकारामध्ये असे फसतात, काही विचारुच नको. आता तुम्हाला सारे चक्र आठवले आहे. तुम्ही
जन्म जन्मांतर वेश्यालयामध्ये राहिले आहात, हजारो पापे करत आले आहात. सर्वां समोर
म्हणत आलात कि, जन्मो जन्मीचे आम्ही पापी आहोत. आम्हीच पुर्वी पुण्य आत्मा होतो,
नंतर पाप आत्मा बनलो. आता परत पुण्य आत्मा बनत आहोत. आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळत
आहे. नंतर तुम्ही इतरांना सांगून आपले सारखे बनवत आहात. गृहस्थ व्यवहारामध्ये
राहिल्याने फरक तर राहतो ना. ते एवढे सांगू शकत नाहीत जेवढे तुम्ही. परंतू सर्व तर
सोडू शकत नाहीत. बाबा स्वत: सांगतात कि, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमळाचे
फुलासारखे बनायचे आहे. सर्व सोडून आले तर एवढे सर्व बसणार कोठे. बाबा ज्ञान संपन्न
आहेत. ते कोणतेही शास्त्र इत्यादी वाचत नाहीत. ब्रह्मा बाबांनी शास्त्र इत्यादी
वाचली होती. माझ्यासाठी म्हणतात कि, ईश्वर ज्ञानाचे सागर आहेत. तुम्ही जाणता कि, हे
भक्ती मार्गातील शास्त्र पण अनादि आहेत. भक्तीमार्गात हे शास्त्र पण जरुर निघत आहेत,
असे म्हणतात कि डोंगर नष्ट झाला, मग बनेल कसा! परंतु हे तर नाटक आहे ना. शास्त्र
इत्यादी हे सर्व नष्ट होऊन जातात, नंतर त्या त्या वेळी परत तसेच बनतात. आम्ही प्रथम
शिवाची पुजा करत होतो. हे पण ग्रंथामध्ये आहे ना. शिवाची भक्ती कशी केली जाते. किती
श्लोक इत्यादी गात राहतात. तुम्ही फक्त आठवण करत आहात, शिवबाब ज्ञानाचे सागर आहेत.
ते आता आम्हाला ज्ञान देत आहेत. बाबाने तुम्हाल समजावले आहे कि, हे सृष्टीचे चक्र
कसे फिरते. ग्रंथामध्ये तर लांबलचक थापा मारल्या आहेत, जे कधी आठवणीत पण राहणार
नाहीत. तर मुलांना आतुन किती खुशी झाली पाहिजे, बेहदचे बाबा आम्हाला शिकवित आहेत.
गायले पण जाते कि, विद्यार्थी जीवन सर्वांत चांगले आहे. भगवानुवाच-मी तुम्हाला
राजांचा राजा बनवितो. आणखीन कोणत्या शास्त्रामध्ये या गोष्टी नाहीत. उंच ते उंच
प्राप्ती हीच आहे. खरे तर गुरु एकच आहेत, जे सर्वांची सद्गती करत आहेत. जरी स्थापना
करणाज्याला पण गुरु म्हणू शकता, परंतू गुरु तो, जो सद्गती देतो. ते तर आपले नंतर
सर्वांना भुमिका वठविण्यासाठी घेऊन येतात. परत जाण्याचा रस्ता तर सांगत नाहीत. वरात
तर शिवाचीच गायली जाते, दुसज्या कोणत्या गुरुची नाही. मनुष्यांनी शिव आणि शंकराला
एकत्र केले आहे. कोठे शंकर सुक्ष्मवतनवासी, आणि कोठे शिव मुलवतनवासी. दोघे एक कसे
असू शकतील. हे भक्तीमार्गात लिहले आहे, ब्रह्मा, विष्णू, शंकर तीन मुले आहेत.
ब्रह्मा वर पण तुम्ही समजावू शकता. यांना दत्तक घेतले आहे, तर हा पण शिवबाबांचा
मुलगा झाला ना. उंच ते उंच बाबा आहेत. बाकी सर्व त्यांची रचना आहे. किती समजण्याच्या
गोष्टी आहेत. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1) अविनाशी
ज्ञान रत्नांचा धंदा करुन, 29 जन्मासाठी पद्मापद्म भाग्यशाली बनायचे आहे. स्वत:ची
तपासणी करावयाची आहे. माझ्यामध्ये कोणता आसुरी गुण तर नाही ना? आम्ही असा कोणता धंदा
तर नाही करत, ज्यामुळे विकारांची उत्पत्ती होईल?
2) आठवणीच्या यात्रेमध्ये राहून साज्या सृष्टीला सद्गतीमध्ये घेऊन जायचे आहे. एका
सद्गुरु बाबांच्या श्रीमतांवर चालून आपल्यासारखे बनविण्याची सेवा करावयाची आहे.
ध्यान ठेवा कि माया कधी कलाहीन बनवयाला नको.
वरदान:-
शुभ भावना,
शुभ कामना च्या सहयोगाद्वारे आत्म्यांचे परिवर्तन करणारे सफलता संपन्न भव
जेव्हा कोणत्या पण
कार्यामध्ये सर्व ब्राह्मण मुले, संगठीत रुपामध्ये, आपल्या मनाने शुभ भावना आणि शुभ
कामनेचा सहयोग देतात, तर या सहयोगाने वायुमंडळाचा किल्ला बनतो, जे आत्म्याचे
परिवर्तन करतो. जसे पाच बोटांच्या सहयोगामुळे कितीही मोठे कार्य सहजच पार होऊन जाते,
तसे प्रत्येक ब्राह्मण मुलांचा सहयोग, सेवेमध्ये सफलता संपन्न बनवतो. सहयोगाचा
निकाल सफलता आहे.
बोधवाक्य:-
पाऊलो पावली
पदमाची कमाई जमा करणारेच सर्वांत मोठे धनवान आहेत...!!!