22-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, यावेळी निराकार बाबा साकारमध्ये येऊन तुमचा श्रृंगार करत आहेत, एकटे
नाही....
प्रश्न:-
तुम्ही मुले
आठवणीच्या यात्रेमध्ये का बसत आहात?
उत्तर:-
कारण तुम्ही जाणता कि, या आठवणीमुळेच आमचे आयुष्य मोठे होत आहे. 1) आम्ही निरोगी
बनतो. 2) आठवणीमुळे आमचे पाप नष्ट होतात, आम्ही खरे सोने बनतो, आत्म्यातून रजो-तमो
ची घाण निघते, ती कंचन बनते. 3) आठवणी मुळेच तुम्ही पावन दुनियेचे मालक बनता. 4)
तुमचा श्रृंगार होतो. 5) तुम्ही फार धनवान बनता ही आठवणच तुम्हाला पद्मापद्म
भाग्यशाली बनवते.
ओम शांती।
आत्मिक मुलांना, आत्मिक पिता समजावत आहेत. येथे बसून तुम्ही काय करत आहात? असे नाही
फक्त शांतीमध्ये बसले आहात. अर्थासहित ज्ञानस्वरुप अवस्थेमध्ये बसले आहात. तुम्हा
मुलांना ज्ञान आहे, बाबाला आम्ही का आठवण करत आहे. बाबा आम्हाला फार मोठे आयुष्य
देतात. बाबाची आठवण केल्याने आमची पापे नष्ट होतील. आम्ही खरे सोने, सतोप्रधान बनतो.
तुमचा किती श्रृंगार होत आहे. तुमचे आयुष्य वाढेल. आत्मा पतित होऊन जाते. आता
आत्म्यात भेसळ झाली आहे. आठवणीच्या यात्रेने ती सर्व भेसळ जी रजो-तमो ची पडली आहे,
ती सर्व निघून जाईल. एवढा तुमचा फायदा होत आहे. मग आयुष्य मोठे होईल, तुम्ही
स्वर्गाचे निवासी बनाल, आणि फार धनवान बनाल. तुम्ही पद्मा पद्म भाग्यशाली बनाल,
त्यामुळे बाबा म्हणतात, मनमनाभव, माझी एकाची आठवण करा. कोणत्या देहधारीसाठी म्हणत
नाहीत. बाबाला तर शरीरच नाही. तुमची आत्मा पण निराकार आहे. मग पुर्नजन्मामध्ये येत
येत पारसबुध्दी पासून पत्थरबुध्दी झाली आहे. आता परत पवित्र बनायचे आहे. आता तुम्ही
पवित्र बनले आहात. पाण्याने स्नान तर जन्मोजन्मी केले, वाटत होते कि आम्ही पावन बनू,
परंतू पावन बनण्याऐवजी आणखीनच पतित बनून नुकसान झाले, कारण येथे आहे खोटी माया,
सर्वांत खोटे बोलण्याचे संस्कार आहेत. बाबा म्हणतात कि, मी तुम्हाला पावन बनवून जातो,
मग तुम्हाला पतित कोण बनवितो? आता तुम्हाला जाणीव होते ना. किती गंगा स्नान करत आलो,
परंतू पावन तर झालो नाही. पावन बनून तर पावन दुनियेमध्ये गेले पाहिजे. शांतीधाम आणि
सुखधाम आहे, पावनधाम. ही आहेच रावणाची दुनिया, याला दु:खधाम म्हटले जाते. ही तर सहज
समजण्याची गोष्ट आहे ना. यात काही अवघडच नाही. ना कोणाला सांगण्यासाठी अवघड आहे. जर
कोणी भेटले तर फक्त हे सांगा, स्वत:ला आत्मा समजून बेहदच्या बाबाची आठवण करा.
आत्म्यांचा पिता आहे, परमपिता परमात्म शिव. प्रत्येकाचे शरीराचा तर आप-आपला पिता आहे.
आत्म्यांचा पिता आहे. परमपिता परमात्मा शिव. प्रत्येकाचे शरीराचा तर आप-आपला पिता
आहे. आत्म्यांचा तर एकच पिता आहे. किती चांगल्या रितीने समजावत आहेत, आणि
हिंदीमध्येच समजावत आहेत. हिंदी भाषाच मुख्य आहे. तुम्ही पद्मापद्म भाग्यशाली या,
देवी देवतांना म्हणता ना. हे किती भाग्यशली आहेत. हे कोणाला माहित नाही कि हे
स्वर्गाचे मालक कसे बनले. आता तुम्हाला बाबा सांगत आहेत. हा सहज योगाद्वारे या
पुरुषोत्तम संगमयुगी वरच असे बनत आहे. आता जुनी दुनिया आणि नविन दुनियेचा संगम आहे.
परत तुम्ही नविन दुनियेचे मालक बनाल. आता बाबा फक्त सांगतात कि, दोन शब्द अर्थासहित
आठवण करा. गीतेमध्ये आहे मनमनाभव. शब्द तर वाचतात परंतू अर्थ काहीच जाणत नाहीत. बाबा
सांगतात कि, माझी आठवण करा कारण मीच पतित पावन आहे, आणखीन कोण असे म्हणत नाही.
बाबाच सांगतात कि, माझी आठवण केल्याने तुम्ही पावन बनून पावन दुनियेमध्ये जाल.
प्रथम तुम्ही सतोप्रधान होता, पुर्नजन्म घेत घेत तमोप्रधान बनले आहात. आता 84
जन्मांनंतर तुम्ही नविन दुनियेमध्ये देवता बनत आहात. रचयिता आणि रचना दोन्हीला
तुम्ही जाणले आहे. तर आता तुम्ही आस्तिक बनले आहात. पुर्वी जन्म जन्मांतर तुम्ही
नास्तिक होता. या गोष्टी जे बाबा सांगत आहेत, ते आणखीन कोणी जाणत नाही. कोठेही जावा
कोणी पण तुम्हाला या गोष्टी सांगणार नाही. आता दोन्ही बाबा तुमचा श्रृंगार करत आहेत.
अगोदर तर बाबा एकटे होते. शरीराशिवाय होते. परमधाममध्ये बसून तुमचा श्रृंगार करु
शकत नाहीत. म्हणतात ना बत बारा (1 आणि 2 मिळून 12 होतात), बाकी प्रेरणा किंवा शक्ती
इ.ची गोष्ट नाही. वरुन प्रेरणेद्वारे मिळत नाही. निराकार जेव्हा साकार शरीराचा आधार
घेतात तेव्हा तुमचा श्रृंगार करतात. समजता पण कि, बाबा आम्हाला सुखधामला घेऊन जातात.
नाटकातील योजनेनुसार बाबा बांधलेले आहेत, त्यांना काम मिळाले आहे. दर 5 हजार
वर्षांनी तुम्हा मुलांसाठी येतात. या योगबळाने तुम्ही किती सुंदर बनता. आत्मा आणि
शरीर दोन्ही निरोगी सुंदर बनते, नंतर छी छी बनता. आता तुम्ही साक्षात्कार करता कि,
या पुरुषार्थाने आम्ही असे श्रृंगारीत बनू. तेथे विकारी दृष्टी असत नाही. तरी पण
अंग सर्व झाकलेले असते. येथे तर पाहा वाईट वाईट गोष्टी रावण राज्यात शिकत आहेत. या
लक्ष्मी नारायणाला पहा ड्रेस इ. किती चांगला आहे. येथे सर्व आहेत देहअभिमानी.
त्यांना देह अभिमानी म्हणत नाहीत. त्यांची नैसर्गिक सुंदरता आहे. बाबा तुम्हाला असे
नैसर्गिक सुंदर बनवत आहेत. आजकाल तर खरे अलंकार कोणी घालू शकत नाही. कोणी घातले तर
त्यांनाच लुटतील. तिथे तर अशी कोणती गोष्ट नाही. असे बाबा तुम्हाला मिळाले आहेत,
यांचे शिवाय तर तुम्ही बनू शकत नाही. अनेक जण म्हणतात आम्ही तर प्रत्यक्ष शिवबाबा
कडून घेतो. परंतू ते देणार कसे. बरे, प्रयत्न करुन बघा, प्रत्यक्ष मागा. पहा मिळते
का. असे अनेक जण म्हणतात, आम्ही तर शिवबाबा कडून वारसा घेऊ. ब्रह्मा बाबाला
विचारण्याची काय गरज आहे. शिवबाबा प्रेरणेद्वारे काही देतील? चांगल्या चांगल्या
जुन्या मुलांना माया अशाप्रकारे चकवते. एकाला मानतात परंतु एक काय करेल, बाबा
म्हणतात कि, मी एकटा कसा येऊ. मुखाशिवाय बोलू कसे शकतो. मुखाची तर महिमा आहे ना.
गोमुखातून अमृत घेण्यासाठी किती धक्के खात आहेत. श्रीनाथद्वारे जाऊन दर्शन करतात.
परंतू त्यांचे दर्शन करुन काय होईल. त्याला म्हटले जाते भुतपुजा. त्यांत आत्मा तर
नाही. बाकी 5 तत्त्वाचा पुतळा बनविला आहे, ते तर मायेची आठवण करणे झाले. 5 तत्त्व
प्रकृती आहे ना. त्यांची आठवण करुन काय होईल? प्रकृतीचा आधार तर सर्वांना आहे, परंतू
तेथे आहे सतोप्रधान प्रकृती, येथे आहे तमोप्रधान प्रकृती. बाबाला सतोप्रधान
प्रकृतीचा आधार कधी घ्यावा लागत नाही. येथे तर सतोप्रधान प्रकृती मिळू शकत नाही. हे
जे पण साधू संत आहेत. बाबा म्हणतात कि, या सर्वांचा उध्दार मला करावयाचे आहे. मी
निवृत्ती मार्गामध्ये येतच नाही, हा आहेच प्रवृत्ती मार्ग. सर्वांना सांगता कि,
पवित्र बना. येथे तर नांव रुप इ. सर्व बदलत जात आहे. तर बाबा समजावतात कि, पहा, हे
नाटक कसे बनले आहे. एकाचा चेहरा दुसज्याशी मिळत नाही. एवढे करोडो आहेत, सर्वांचे
चेहरे वेगळे आहेत. कितीही कोणी काही केले तरी पण एकाचा चेहरा दुसज्यांशी मिळत नाही.
याला म्हटले जाते निसर्ग आश्चर्य. स्वर्गाला आश्चर्य म्हटले जाते ना. किती शोभनिक
आहे. मायेचे 7 आश्चर्य बाबाचे एक आश्चर्य. ते 7 आश्चर्य तराजूच्या एका पारड्यात ठेवा,
हे एक आश्चर्य दुसज्या पारड्यात ठेवा, तरी पण हे भारी होईल. एकीकडे ज्ञान, दुसरीकडे
भक्ती ठेवा, तरी पण ज्ञानाची बाजू फार भारी होईल. आता तुम्ही समजता कि, भक्ती
शिकविणारे तर पुष्कळ आहेत. ज्ञान देणारे एकच बाबा आहेत. तर बाबा बसून मुलांना
शिकवित आहेत, श्रृंगार करत आहेत. बाबा सांगतात कि, पवित्र बना तर म्हणतात, नाही,
आम्ही तर छी छी च बनू. गरुड पुराणामध्ये पण विषय वैतरणी नदी दाखविली आहे ना. विंचू,
साप इ. सर्व एक दोघाला चावत राहतात. बाबा सांगतात कि, तुम्ही किती निर्धन बनले आहात.
तुम्हा मुलांनाच बाबा समजावत आहेत. दुसज्या कोणाला असे स्पष्ट म्हणाल तर बिघडतील.
फार युक्तीने समजावले पाहिजे. काही मुलांमध्ये बोलण्याची पण अक्कल नाही. लहान मुले
एकदम निष्पाप असतात. त्यामुळे त्यांना महात्मा म्हटले जाते. कोठे कृष्ण महात्मा, जसे
हे सन्यासी निवृत्ती मार्गवाले महात्मा म्हणून घेतात. तो आहे प्रवृत्ती मार्ग. ते
कधी भ्रष्टाचारापासून जन्म घेत नाहीत, त्यांना म्हणतातच श्रेष्ठाचारी. आता तुम्ही
श्रेष्ठाचारी बनत आहात. मुले जाणतात कि, येथे बापदादा दोघे एकत्र आहेत. ते जरुर
चांगलाच श्रृंगार करतात. सर्वांना वाटते ना, ज्यांनी या मुलांचा असा श्रृंगार केला
आहे, तर आम्ही त्यांचे जवळ का जाऊ नये, त्यामुळे तुम्ही येथे येता, ताजेतवाने
होण्यासाठी. मन ओढते बाबाकडे जाण्यासाठी. ज्यांना पुर्ण निश्चय होतो, ते तर म्हणतात
कि, वाटेल तर मारा, वाटले तर काही पण करा. आम्ही कधी साथ सोडणर नाही. काही जण तर
विना कारणच साथ सोडून देतात. हा पण नाटकातील खेळ बनलेला आहे. वेगळे राहतात किंवा
घटस्फोट देतात. बाबा जाणतात कि, हे रावणाचे वंशाचे आहेत. कल्प कल्प असे होत आहे.
कोणी परत माघारी येतात. बाबा समजावतात कि हाथ सोडल्याने पद कमी होते. समोर येतात,
प्रतिज्ञा करतात, आम्ही अशा बाबांना कधी सोडणार नाही. परंतु माया रावण पण कमी नाही.
झटक्यात आपल्याकडे ओढत राहते. नंतर समोर आले तर त्यांना समजावले जाते. बाबा काठीने
थोडेच मारतील. बाबा तरी पण प्रेमानेच समजावतात. तुम्हाला माया मगर खावून टाकेल, बरे
झाले जे वाचून परत आला. घायाळ झाला तर पद कमी होऊन जाईल. जे सदैव एकरस राहतात, ते
कधी हटणार नाहीत. कधी हाथ सोडणार नाहीत. येथून बाबाला सोडून, मरुन माया रावणाचे बनले
तर त्यांना माया आणखीन जोरात खाते. बाबा म्हणतात कि, तुमचा किती श्रृंगार करत आहे.
समजावून सांगितले जाते, चांगले बनून राहा. कोणाला दु:ख देऊ नका. रक्ताने लिहून
देतात, तरी पण जसेच्या तसेच बनून राहतात. माया फार जबरदस्त आहे. कान नाकाला पकडून
फार तडपवते. आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा डोळा देतात, त्यामुळे विकारी दृष्टी कधी
गेली नाही पाहिजे. विश्वाचे मालक बनायचे आहे तर काही कष्ट पण घेतले पाहिजे ना. आता
तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही तमोप्रधान आहेत. त्यात भेसळ झाली आहे. या भेसळीला नष्ट
करण्यासाठी बाबा सांगतात कि, माझी आठवण करा. तुम्ही बाबांची आठवण करत नाही, लाज नाही
वाटत. आठवण केली नाही तर मायेचं भुत तुम्हाला गिळून टाकतील. तुम्ही किती छी छी बनले
आहात. रावण राज्यामध्ये एक पण असा नाही, जो विकाराद्वारे जन्मला नाही. स्वर्गामध्ये
विकाराचे नांव नाही, रावणच नाही. रावण राज्य सुरु होते द्वापर युगापासून, पावन
बनविणारे एकच बाबा आहेत. बाबा सांगतात कि, मुलांनो हा एक जन्मच पवित्र बनावयाचे आहे,
नंतर तर विकाराची गोष्टच असत नाही. ती आहेच निर्विकारी दुनिया. तुम्ही जाणता कि, हे
पवित्र देवी देवता होते, मग 84 जन्म घेत घेत खाली आले आहेत. आता झालेत पतित,
त्यामुळे ओरडतात कि, शिवबाबा आम्हाला या पतित दुनियेपासून मुक्त करा. आता जेव्हा
बाबा आले आहेत, तेव्हा तुम्हाला माहित पडले कि हे पतित काम आहे. पुर्वी असे समजत
नव्हता, कारण तुम्ही रावण राज्यामध्ये होता. आता बाबा सांगतात कि, सुखधामला जायचे
असेल तर असे छी छी बनणे सोडा. अर्धाकल्प तुम्ही छी छी बनले आहात. डोक्यावर पापांचे
ओझे आहे आणि तुम्ही शिव्या पण फार दिल्या आहेत. बाबाला शिव्या दिल्याने फार पाप चढले
आहे, हे पण नाटकात नोंदलेले आहे. तुमच्या आत्म्याला पण 84 जन्मांची भुमिका मिळाली
आहे, ती वटवावयाचीच आहे. प्रत्येकाला आपली भुमिका वटवावयाची आहे. मग तुम्ही का रडता,
सतयुगामध्ये कोणी रडत नाही, नंतर ज्ञानाची दशा संपल्याने, मग रडणे आपटणे सुरु होते.
मोहजीत राजाची कथा पण तुम्ही ऐकली आहे. हे तर एक खोटे उदाहरण बनविले आहे.
सतयुगामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. मोहजीत बनविणारे तर एकच बाबा आहेत.
परमपिता परमात्म्याचे तुम्ही वारस बनता, जे तुम्हाला विश्वाचे मालक बनवितात. स्वत:ला
विचारा आम्ही आत्मे त्यांचे वारस आहे? बाकी लौकिक शिक्षणामध्ये काय राहिले आहे.
आजकाल तर पतित मनुष्यांचे तोंड पण पाहू नये, ना मुलांना दाखविले पाहिजे. बुध्दीमध्ये
नेहमी ठेवा आम्ही संगमयुगावर आहोत. एका बाबांचीच आठवण करत आहोत, आणि सर्वांना पाहून
न पाहतो. आम्ही नविन जगालाच पाहतो. आम्ही देवता बनत आहे, त्या नविन संबंधालाच पाहतो.
जुन्या संबंधाला पाहून पण पाहत नाही. हे सर्व नष्ट होणारे आहेत. आम्ही एकटे आलो होतो,
नंतर एकटेच जायचे आहे. बाबा एकदाच येतात बरोबर घेऊन जाण्यासाठी. याला शिवबाबाची
वरात म्हटले जाते. शिवबाबांची मुले सर्व आहेत. बाबा विश्वाची बादशाही देत आहेत,
मनुष्याला देवता बनवत आहेत. पुर्वी विष पित होतो. आता अमृत प्यायचे आहे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. स्वत:ला
संगमयुगी निवासी समजून चालावयाचे आहे. जुन्या संबंधान पाहून न पाहायचे आहे.
बुध्दीमध्ये ठेवा आम्ही एकटे आले होतो, एकटेच जायचे आहे.
2. आत्मा आणि शरीर दोन्हीला पवित्र बनविण्यासाठी ज्ञानाच्या तिसज्या डोळ्याने
पाहण्याचा अभ्यास करावयाचा आहे. विकारी दृष्टी नाहीशी करावयाची आहे. ज्ञान आणि
योगाने स्वत:चा श्रृंगार करावयाचा आहे.
वरदान:-
बाबांच्या
छत्रछायेत नेहमी मजेचा अनुभव करणारे आणि करविणारे विशेष आत्मा भव
जिथे बाबांची छत्रछाया
आहे तिथे नेहमी मायापासून सुरक्षित आहात. छत्रछायेच्या आत माया येऊ शकत नाही.
कष्टापासून स्वत:च दूर व्हाल, मजेत राहाल, कारण कष्ट मजेचा अनुभव करु देत नाही.
छत्रछायेमध्ये राहणारे, असे विशेष आत्म्ये, उंच शिक्षण शिकुन पण मजेमध्ये राहतात,
कारण त्यांना निश्चय आहे कि, आम्ही कल्पा-कल्पाचे विजयी आहोत, पास होणारच आहेत, तर
नेहमी मजेत राहा आणि दुसज्याला मजेत राहण्याचा संदेश देत राहा. हीच सेवा आहे.
बोधवाक्य:-
जे नाटकातील
रहस्याला ओळखत नाही, तो नाराज होतो.