04-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, तुम्ही धरतीचे चैतन्य तारे आहात, तुम्हाला साऱ्या विश्वाला प्रकाश दयायचा
आहे”
प्रश्न:-
शिवबाबा तुम्हा
मुलांच्या कायेला कंचन कसे बनवतात?
उत्तर:-
ब्रह्मा
मातेच्या द्वारा तुम्हाला ज्ञान दुध पाजुन तुमची काया कंचन करतात, म्हणून त्यांच्या
महिमा मध्ये गातात, त्वमेय मातश्च पिता... तुम्ही ब्रह्मा मातेद्वारा ज्ञान दुध पित
आहात, ज्यामुळे तुमचे सर्व पाप नष्ट होतात तुम्ही कंचन बनाल.
ओम शांती।
आत्मिक पिता बसून समजवतात, जसे आकाशात तारे आहेत. तसेच तुम्हा मुलांसाठी गायन आहे,
हे धरतीचे तारे आहेत. त्यांना पण नक्षत्र देवता म्हणले जाते. तसे तर ते देवता नाहीत.
तर तुम्ही त्यांच्यापेक्षा महा बलवान आहात कारण तुम्ही तारे विश्वाला प्रकाश देतात.
तुम्हीच देवता बनणारे आहात. तुमचीच प्रगती आणि अधोगती होते. ते तर या धरती रुपी
मंडपला प्रकाश देतात. त्यांना देवता म्हणता येत नाही. तुम्ही देवता बनत आहात. तुम्ही
साऱ्या विश्वाला प्रकश करणारे आहत. आता साऱ्या विश्वावरती घोर अंधार आहे. पतित बनले
आहेत. आता बाबा तुम्हा गोड गोड मुलांना देवता बनवण्यासाठी आले आहेत. मनुष्य लोक तर
सर्वांना देवता समजतात. सुर्यांना पण देवता म्हणतात. कुठे कुठे सुर्याचा झेंडा पण
लावतात. स्वत:ला सुर्यवंशी पण म्हणवतात. वास्तवमध्ये तुम्ही सुर्यवंशी आहात ना. तर
बाबा बसून तुम्हा मुलांना समजवतात. भारतामध्येच घोर अंधकार झाला आहे. आता
भारतामध्येच प्रकाश पाहिजे. बाबा तुम्हा मुलांना ज्ञान काजळ देत आहेत. तुम्ही
अज्ञान निद्रामध्ये झोपले होते, बाबा येऊन जागृत करतात. नाटकाच्या नियोजनानुसार
कल्प कल्प पुरुषोत्तम संगमयुगामध्ये मी परत येतो. हे पुरुषोत्तम संगमयुग कोणत्या
ग्रंथामध्ये नाही. या युगाला तुम्ही मुलंच जाणतात, जेव्हा तुम्ही पुजारी पासुन
पुज्य बनत आहात. हे पण समजुन घ्यायचे आहे. यालाच आत्मिक शिक्षण म्हणले जाते, यामध्ये
कोणासोबत लढाई होत नाही. शिक्षक साधारण रिती शिकवतात आणि मुलं पण साधारण रिती
शिकतात. यामध्ये लढाईची गोष्टच नाही. हे असे थोडेच म्हणतात की, मी भगवान आहे. तुम्ही
मुलं पण जाणतात, शिकवणारे निराकार शिवबाबा आहेत. त्यांना स्वत:चे शरीर नाही. मी हा
रथ भाड्याने घेतो असे म्हणतात. भागिरथ पण का म्हणतात? कारण खुप खुप भाग्यशाली रथ आहे.
हे परत विश्वाचे मालक बनतात, तर भागिरथ झाले ना. तर सर्वांचा अर्थ समजायला पाहिजे
ना. हे सर्वात उच्च शिक्षण आहे. दुनियेमध्ये तर खोटच खोट आहे. खऱ्याची नाव हालते
डोलते परंतू बुडत नाही अशी म्हण आहे. आजकाल तर अनेक प्रकारचे भगवान निघले आहेत.
स्वत:ला तर सोडा परंतू शेणामातीमध्ये पण भगवान म्हणतात. भगवंताला खुप भटकवले आहे.
बाबा सन्मुख समजवतात, लौकिक पिता पण मुलांना समजवतात, परंतू ते असे नसतात की ते पिता
शिक्षक आणि गुरु पण तेच असतात. प्रथम पित्याकडे जन्म घेतात परत थोडे मोठे
झाल्यानंतर शिक्षक पाहिजेत, शिकवण्यासाठी. परत 60 वर्षाच्या नंतर गुरु पाहिजेत. हे
तर एकच पिता शिक्षक आणि सतगुरु आहेत. मी तुम्हा आत्म्याचा पिता आहे. आत्माच शिकते.
आत्म्याला आत्माच म्हणले जाते. बाकी शरीराचे अनेक नावे आहेत. विचार करा, हे बेहदचे
नाटक आहे. हे नाटक पूर्वनियोजित आहे, यामध्ये कोणतीच नविन गोष्ट नाही. हे अनादी
पुर्वनियोजीत नाटक आहे जे फिरत राहते. भुमिका करणारे आत्मे आहेत. आत्मा कुठे राहते?
आम्ही आपल्या परमधाममध्ये राहणारे आहोत परत येथे भुमिका करण्यासाठी आलो आहोत. बाबा
तर नेहमीच तिथे राहतात. ते पुर्नजन्मामध्ये येत नाहीत. आता तुम्हाला रचनाकार पिता
स्वत:चा आणि रचनेचा अर्थ समजवतात. तुम्हाला स्वदर्शक चक्रधारी मुलं म्हणतात. याचा
अर्थ पण कोणी दुसरे समजवू शकत नाहीत. कारण ते समजतात, स्वदर्शन चक्रधारी विष्णू
आहेत, हे परत मनुष्याला का म्हणतात? हे तुम्हीच जाणतात क्षुद्र तर मनुष्यच होते, आता
ब्राह्मण बनले आहेत तरी मनुष्यच आहेत परत देवता बनतील तरीही मनुष्यच राहतात, परंतू
चरित्र बदलत राहतात. रावण येतो तर तुमचे चरित्र बिघडत जाते. सतयुगामध्ये हे विकार
नसतात.
आता बाबा तुम्हा मुलांना अमरकथा ऐकवत आहेत. भक्तीमार्गामध्ये तुम्ही किती कथा ऐकल्या
असतील. अमरनाथ ने पार्वतीला कथा ऐकवली असे म्हणतात. आता त्यांना तर शंकर ऐकवतील ना.
शिव कसे ऐकवतील? अनेक मनुष्य आहेत, ऐकण्यासाठी भक्ती मार्गातील गोष्टी बाबाच बसून
सांगतात. बाबा असे नाहीत सांगत की, भक्ती काही खराब आहे. नाही, हे तर अनादी नाटक आहे,
ते समजवले जाते. आता बाबा म्हणतात एक तर स्वत:ला आत्मा समजा. मुख्य गोष्ट तर एकच आहे.
भगवानुवाच मनमनाभव. याचा अर्थ कोणता आहे? हे बाबा सन्मुख ऐकवतात कारण गोमुख आहे. हे
पण समजवले जाते, त्वमेय माताश्च पिता... त्यांनाच म्हणतात. तर या माते द्वारा तुम्हा
सर्वांना दत्तक घेतले आहे. शिवबाबा म्हणतात, या मुखाद्वारे तुम्हा मुलांना ज्ञान
दुध पाजतो तर तुमचे जे पाप आहेत ते सर्व भस्म होऊन तुमची आत्मा कंचन बनते. तर काया
पण कंचनच मिळते. आत्मा अगदी पवित्र कंचन बनते परत हळु हळू सिढी उतरत जातात. आता
तुम्ही समजले आहात आम्ही आत्मे कंचन होतो, शरीर पण कंचनच होते परत नाटकानुसार आम्ही
84 च्या चक्रामध्ये आला. आता कंचन नाही. आता तर 9 कॅरेट म्हणाल, बाकी थोडी टक्केवारी
राहते. एकदम प्राय:लोप होत नाही. काही न काही शांती राहते. बाबांनी ही लक्षणे
सांगितली आहेत. लक्ष्मी नारायणचे चित्र नंबरएक आहे. आता तुमच्या बुध्दीमध्ये सर्व
चक्र आले आहे. बाबांचा परिचय पण आला आहे. जरी आता तुमची आत्मा पुर्णपणे कंचन बनली
नाही. परंतू बाबांचा परिचय तर बुध्दीमध्ये आहे ना. कंचन होण्यासाठी युक्ती सांगतात.
आत्म्यामध्ये जी बनावट झाली आहे, ती निघेल कशी? त्यासाठी आठवणीची यात्रा पाहिजे.
यालाच युध्दाचे मैदान म्हणले जाते. तुम्ही प्रत्येक जण युध्दाच्या मैदानामध्ये
शिपाई आहात. आता प्रत्येक जण जितका पाहिजे तेवढा पुरुषार्थ करा. पुरुषार्थ करणे
विद्यार्थ्यांचे काम आहे. कुठे पण जावा, एक दोघाला सावधान करत राहा, मनमनाभव
शिवबाबांची आठवण आहे? एक दोघाला हाच ईशारा दयायचा आहे. बाबांच ज्ञानच ईशारा आहे
तेव्हा तर एका सकेंदामध्ये काया कंचन बनते. विश्वाच मालक बनवतो. शिवपित्याची मुलं
बनले तर विश्वाचे मालक बनले. परत विश्वामध्ये बादशाही आहे. त्यामध्ये उच्च पद मिळवणे,
हाच पुरुषार्थ करणे हे प्रत्येकाच्या वरती आहे. तुम्ही बाबांची आठवण करत राहा तर
आत्मा एकदम पवित्र होईल. सतोप्रधान बनुन सतोप्रधान दुनियाचे मालक बनाल. किती वेळेस
तुम्ही तमोप्रधान पासुन परत सतोप्रधान बनले आहात. हे चक्र फिरत राहते. याचा कधी अंत
होत नाही. बाबा खुप चांगल्यारितीने समजवतात. मी कल्प कल्प येतो. तुम्ही मुलं मला छी
छी दुनियामध्ये निमंत्रण देतात. कोणते निमंत्रण देतात? आम्ही जे पतित बनलो आहोत,
येऊन पावन बनवा. वाह! तुमचे निमंत्रण. आम्हाला शांतीधाम सुखधाममध्ये घेऊन चला, तर
मी तुमचा आज्ञाधारक सेवक आहे. हा पण नाटकाचा खेळ आहे. तुम्ही समजता, आम्ही कल्प
कल्प तेच शिकत आलो, अभिनय करत आलो. आत्माच अभिनय करते. येथे बसून पण बाबा आत्म्यांना
पाहतात. ताऱ्यांना पाहतात खुपच छोटी आत्मा आहे. जसे ताऱ्यांची झिलमिल राहते. कोणता
तारा खुप प्रकाश देतो, कोणता कमी. कोणी चंद्राजवळ असतात. तुम्ही पण योगबळाद्वारे
चांगल्या रितीने पवित्र बनतात तर चमकतात. बाबा पण म्हणतात, मुलांमध्ये जे खुपच
चांगले नक्षत्र आहे, त्यांना फुल दया. मुल पण एक दोघाला जाणतात ना. काही जण फार
हुशार असतात, तर काही ढ पण असतात. त्या ताऱ्यांना देवता म्हणत नाहीत. तुम्ही पण
मनुष्यच आहात, परंतू तुमच्या आत्म्याला पवित्र बनवून विश्वाचे मालक बनवतात. खुप
शक्ती बाबांकडून वारशाच्या रुपामध्ये मिळत राहते. सर्वशक्तीवान पिता आहेत ना. बाबा
म्हणतात, मी तुम्हा मुलांना खुप शक्ती देतो. शिवबाबा तुम्ही तर आम्हाला ज्ञान देऊन
मनुष्यापासून देवता बनवतात. वाह! असे तर कोणी बनवू शकत नाही. शिक्षण कमाईचे साधन आहे
ना. सर्व आकाश, धरती इ. सर्व आपले असतात. कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. त्याला म्हणले
जाते अडोल राज्य. कोणीही खंडन करु शकत नाही. कोणी जाळू शकत नाही. तर अशा बाबांच्या
श्रीमतावरती चालायला पाहिजे ना. प्रत्येकाला स्वत:चा पुरुषार्थ करायचा आहे.
मुलं संग्रहालय इ. बनवतात, या चित्राद्वारे आपल्या समवयस्कांना समजून सांगा. बाबा
सुचना देत राहतात, जे चित्र पाहिजेत ते बनवा. बुध्दी तर सर्वांची काम करते.
मनुष्यांच्या कल्याणासाठीच हे बनवले जाते. तुम्ही जाणतात सेवाकेंद्रावरती कधी कोणी
येतात, आता अशी कोणती युक्ती रचली पाहिजे जे स्वत:हुन लोक ज्ञानाची मिठाई घेण्यासाठी
येतील. कोणाच्या दुकानामध्ये चांगली मिठाई मिळते तर त्याची जाहिरात होते. एक दोघे
म्हणतील अमक्याच्या दुकानावरती जावा. ही ज्ञान मिठाई तर सर्वांत चांगली नंबर एक
मिठाई आहे. अशी मिठाई कोणी देऊ शकत नाही. एकानी अनुभव घेतला तर दुसऱ्यांना ऐकवतात.
सर्व भारतामध्ये सुर्वण युग कसे येईल असा विचार चालतो, त्यासाठी खुप समजवतात, परंतू
पत्थरबुध्दी आहेत, कष्ट तर लागतात ना. शिकार करणे पण शिकावे लागते. प्रथम छोटी
शिकार शिकावी लागते. मोठ्या शिकारी साठी ताकत पाहिजे ना. खुप मोठ मोठे विद्वान
पंडित आहेत, वेद ग्रंथ इ.चा अभ्यास केलेला असतो. स्वत:ला अधिकारी समजतात. हरिद्वार
मध्ये त्यांना मोठ मोठ्या पदव्या मिळतात. तेव्हा बाबांनी समजवले होते, प्रथम तर
हरिद्वार मध्ये सेवेचा घेराव घाला. मोठ्या द्वारा आवाज होऊ दया, मग काही जण ऐकतील.
लहानांच्या गोष्टी तर कोणी ऐकत नाहीत. प्रमुख लोकांना, विद्वान लोकांना समजून सांगा
जे स्वत:ला ग्रंथाचे अधिकारी समजतात. खुप मोठ मोठ्या पदवी देतात. शिवबाबांचे पण इतके
टायटल पदवी नाहीत. भक्ती मार्गाचे राज्य आहे ना, परत ज्ञानमार्गाचे राज्य होईल.
ज्ञानमार्गात भक्ती नसते. भक्तीमध्ये परत ज्ञान बिल्कुल नसते. तर बाबा समजवतात, हे
सर्व तारे बसले आहेत. देहाचे भान सोडायला पाहिजे. जसे आकाशात ताऱ्यांचा झगमगाट असतो
तसे येथे पण चैतन्य ताऱ्यांची झगमगाट आहे. काही तर खुप चमकदार आहेत. हे धरतीचे तारे
आहेत ज्यांनाच देवता म्हणले जाते. हा खुप मोठा मांडवा, मंडप आहे. बाबा समजवतात ते
हदचे रात्र आणि दिवस आहे. हे आहे अर्ध्या कल्पाची रात्र, अर्धाकल्प दिवस बेहदचा.
दिवसामध्ये सुखच सुख आहे. कुठे पण धक्का खाण्याची आवश्यकता नाही. ज्ञानामध्ये सुख
आहे, भक्तीमध्ये दु:ख आहे. सतयुगामध्ये दु:खाचे नाव नाही. तिथे काल नसतो. तुम्ही
काळावरती विजय प्राप्त करता. स्वर्गामध्ये मृत्यूचे नाव नसते. ते अमरलोक आहे. तुम्ही
जाणतात बाबा आम्हाला अमरलोक साठी अमरकथा ऐकवत आहेत. आता तुम्हा गोड गोड मुलांना
सर्व चक्र बुध्दीमध्ये आहे. आम्हा आत्म्याचे घर ब्रह्मलोक आहे. तेथून येथे येतात
नंबरानुसार भुमिका करण्यासाठी. ढेर आत्मा आहेत, एका एकाचे थोडेच बसुन सांगतील.
थोडक्यामध्ये सांगतात, किती धर्म रुपी फांद्या आहेत. झाडाची वाढ होत राहते. अनेक
आहेत ज्यांना आपल्या धर्माची माहिती पण नाही. बाबा येऊन समजवतात तुम्ही वास्तवमध्ये
देवी देवता धर्माचे आहात परंतू आता धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट बनले आहात.
आता तुम्हा मुलांच्या बुध्दीमध्ये आहे की आम्ही वास्तवमध्ये शांतीधामचे राहणारे
आहोत येथे अभिनय करण्यास आलो आहोत. या लक्ष्मी नारायणचे राज्य होते, यांची राजाई
होते. आता संगमयुगावरती उभे आहेत. बाबांनी सांगितले आहे, तुम्ही सुर्यवंशी होते,
परत चंद्रवंशी बनले. बाकी मध्येच त्यांच्या शाखा आहेत. हा बेहदचा खेळ आहे. हे खुपच
छोटे झाड आहे. ब्राह्मणाचे कुळ आहे. परत खुप मोठे झाड होईल, सर्वांना भेटू पण शकणार
नाहीत. जिथे जिथे घेराव घालत राहा. बाबा म्हणतात, दिल्लीला, हरिद्वार ला घेराव घाला.
साऱ्या दुनियेला घेराव घालणारे आहात. तुम्ही योगबळाद्वारे साऱ्या दुनियेवरती एका
राज्याची स्थापना करतात, खुप खुशी होते. कोणी कुठे कोणी कुठे जात राहतात. आता तुमचे
कोणी ऐकत नाहीत. जेव्हा मोठ मोठे लोक येतील, पेपरमध्ये येईल तेव्हा समजतील. आता तर
लहान लहान शिकार करतात. मोठ मोठे साहुकार लोक समजतात, स्वर्ग तर आमच्यासाठी येथेच
आहेत. गरीबच येऊन वारसा घेतात. बाबा माझे तर तुम्हीच आहात दुसरे कोणी नाही, परंतू
जेव्हा मोह ममत्व पुर्णपणे नष्ट होईल, अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. आत्म्याला
कंचन बनविण्यासाठी एक दोघाला सावधान करायचे आहे. मनमनाभवचा ईशारा दयायचा आहे.
योगबळाद्वारे पवित्र बनून चमकदार तारा बनायचे आहे.
2. या बेहदच्या
पुर्वनियोजित नाटकाला चांगल्याप्रकारे समजून स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. ज्ञान
अंजन देऊन मनुष्याला अज्ञानाच्या घोर अंधारापासून काढायचे आहे.
वरदान:-
आपल्या
प्रत्यक्ष जीवनाद्वारे शांतीच्या शक्तीचा आवाज पसरवणारे विशेष सेवाधारी भव
प्रत्येकाला शांतीच्या
शक्तीचा अनुभव करवणे ही विशेष सेवा आहे. जसे विज्ञानाची शक्ती प्रसिध्द आहे, तसेच
शांतीची शक्ती प्रसिध्द व्हावी. सर्वांच्या मुखाद्वारे आवाज निघावा की शांतीची शक्ती
विज्ञाना पेक्षा श्रेष्ठ आहे. तो दिवस पण यायचा आहे. शांतीच्या शक्तीची प्रत्यक्षता
अर्थात बाबांची प्रत्यक्षता. शांतीच्या शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण आहे, तुम्हा
सर्वांचे जीवन. प्रत्येक जण चालता फिरता शांतीचे मॉडेल दिसुन यावे, मग वैज्ञानिकांची
नजर पण शांतीच्या शक्तीकडे जाईल. अशी सेवा करा, तेव्हाच म्हणाल विशेष सेवाधारी
बोधवाक्य:-
सेवा आणि
स्थितीचे संतुलन ठेवा तर सर्वांचे आशीर्वाद मिळत राहतील..!