28-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, विश्वाचे राज्य बाहुबलाने होऊ शकत नाही, त्यासाठी योगबळच पाहिजे, हा
सुध्दा एक कायदा आहे...”
प्रश्न:-
शिवबाबांना
स्वत:च स्वत:वर कोणत्या गोष्टीचे आश्चर्य वाटते?
उत्तर:-
बाबा म्हणतात-पहा, कसे आश्चर्य आहे-मी तुम्हाला शिकवतो, हे मी कुणाकडून कधी शिकलो
नाही. माझा कुणी पिता नाही, माझा कुणी शिक्षक नाही, गुरु नाही. मी सृष्टीचक्रात
पुनर्जन्म घेत नाही. तरीही तुम्हाला सर्व जन्मांची कहाणी सांगतो. स्वत: 84 च्या
चक्रात येत नाही परंतू चक्राचे ज्ञान एकदम बरोबर देतो.
ओम शांती।
आत्मिक पिता तुम्हा मुलांना स्वदर्शन चक्रधारी बनवतात, म्हणजे तुम्ही 84 चे चक्र
जाणता. पुर्वी जाणत नव्हता, आता बाबांच्याद्वारे जाणतो. 84 जन्मांच्या चक्रात तुम्ही
जरुर येता. तुम्हा मुलांना 84 च्या चक्राचे ज्ञान देतो. मी स्वदर्शन चक्रधारी आहे
पण प्रत्यक्ष 84 जन्मांच्या चक्रात येत नाही. यावरुन समजा की, शिवबाबांकडे संपुर्ण
ज्ञान आहे. तुम्ही जाणता आम्ही ब्राह्मण आता स्वदर्शन चक्रधारी बनतो. बाबा बनत
नाहीत. मग त्यांना अनुभव कुठून आला? आम्हाला तर अनुभव येतो. बाबांना कुठून येतो
अनुभव? जे आम्हाला ज्ञान सांगतात? प्रत्यक्ष अनुभव पाहिजे ना! बाबा म्हणतात मला
ज्ञानाचा सागर म्हणतात परंतू मी 84 जन्मांच्या चक्रात येत नाही. मग माझ्यात हे
ज्ञान कोठून आले? शिक्षक शिकवतात म्हणजे ते जरुर शिकले आहेत ना! हे शिवबाबा कसे
शिकले? यांना 84 च्या चक्राचे ज्ञान कसे माहित झाले, जेव्हा कि ते स्वत: 84 च्या
चक्रात येत नाहीत. बाबा बीजरुप असल्यामुळे जाणतात. स्वत: 84 च्या चक्रात न येता
तुम्हाला सर्व समजावतात, हे सुध्दा किती आश्चर्य आहे! असेही नाही की, बाबांनी
शास्त्रांचा वगैरे अभ्यास केला आहे. म्हणतात नाटकानुसार त्यांच्यात हे ज्ञान
नोंदलेले आहे ते तुम्हाला सांगतात. तर मग हा मजेशीर शिक्षक आहे ना! आश्चर्यच ना
म्हणून तर एवढी मोठ मोठी नावे दिली आहेत. ईश्वर, प्रभु, अन्तर्यामी वगैरे. तुम्हाला
आश्चर्य वाटते की, ईश्वरामध्ये हे सर्व ज्ञान कोठून आले? कोठून आले जे तुम्हाला
समजावतात. त्यांना तर कुणी वडील नाही, ज्यांच्याद्वारे त्यांचा जन्म झाला अथवा
ज्ञान समजून घेतले असावे! तुम्ही सर्व भाऊ 2 आहात. तो एकच तुमचा पिता आहे, बीजरुप
आहे. किती ज्ञान ते मुलांना देतात, म्हणतात 84 जन्म मी घेत नाही, तुम्ही घेता. तर
जरुर प्रश्न पडणार ना-बाबा तुम्हाला ज्ञान कसे माहित झाले? बाबा म्हणतात मुलांनो,
अनादि नाटकानुसार माझ्यात पहिल्यापासूनच हे ज्ञान आहेत. जे मी तुम्हाला शिकवतो
म्हणून मला उच्च ते उच्च भगवान म्हणतात. स्वत: चक्रात येत नाही पण त्यांच्यात
संपुर्ण सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे.तर तुम्हा मुलांना किती खुशी झाली
पाहिजे! त्यांना 84 च्या चक्राचे ज्ञान कोठून मिळाले? तुम्हाला तर बाबांच्याकडून
मिळाले. बाबांमध्ये सत्य ज्ञान आहे. त्यांना ज्ञानाचा सागर असे म्हटले जाते,
कोणाकडून शिकले सुध्दा नाहीत. तरीही त्यांना सत्य ज्ञान माहित आहे, म्हणून त्यांना
ज्ञानाचा सागर असे म्हणतात. हे आश्चर्य आहे, म्हणून हे शिक्षण सर्वश्रेष्ठ आहे.
मुलांना बाबांचे फार आश्चर्य वाटते. त्यांना ज्ञानाचा सागर असे का म्हणतात? हे
समजून घेतले पाहिजे. दुसरे काय तर हे चित्र जेव्हा तुम्ही दाखवता तर विचारतात कि,
ब्रह्माच्या शरीरात ब्रह्माची आत्मा असणार आणि जो नारायण बनतो त्यांच्या शरीरात
त्यांची आत्मा असेल. दोन आत्मे आहेत ना! एक ब्रह्माची आणि एक नारायणाची, पण विचार
केला तर हे दोन आत्मे नाहीत. एकच आत्मा आहे. हे एक देवता म्हणून उदाहरण दाखवतात.
हेच ब्रह्मापासून विष्णू म्हणजे नारायण बनतात. यासर्व गुप्त गोष्टी आहेत.बाबा खुप
गुह्य ज्ञान देतात. जे ज्ञान इतर कुणीही देवू शकत नाही. तर ब्रह्मा आणि विष्णू
यांच्या दोन आत्मा नाहीत. तसेच सरस्वती आणि लक्ष्मी या दोघींची आत्मा एकच का दोन
आहेत? आत्मा एक व शरीर दोन आहेत. सरस्वतीच पुन्हा लक्ष्मी बनते म्हणून आत्मा एकच आहे.
84 जन्म एकच आत्मा घेते. हे समजून घेतले पाहिजे, ब्राह्मणापासून देवता व देवतापासून
क्षत्रिय बनतात. आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करते. आत्मा एकच आहे, हे
उदाहरण दाखवले जाते कि, ब्राह्मण पासून देवता कसे बनतात. हम सो चा अर्थ किती सुंदर
आहे. यासर्व गुप्त गोष्टी आहेत. यामध्ये पहिल्यांदा ही समज पाहिजे की, आम्ही एकाच
पित्याची मुले आहोत. सर्व आत्मे मुळ परमधामचे आहेत. येथे भुमिका वठवण्यासाठी आलो आहे.
हा एक खेळ आहे. बाबा तुम्हाला या खेळाचा समाचार सांगतात, बाबा तर सत्य जाणतातच.
त्यांना कुणी शिकवले नाही. 84 च्या चक्राला तेच जाणतात. यावेळी तुम्हाला सांगतात.
तुम्ही पुन्हा विसरता पुन्हा त्याचे शास्त्र कसे बनू शकते? बाबांनी कोणत्या
शास्त्रांचा अभ्यास केलेला नाही. तरी सुध्दा बाबा नवनविन गोष्टी सांगतात. अडीच हजार
वर्षे भक्तीमार्ग चालतो. या गोष्टी शास्त्रांमध्ये नाहीत. ही शास्त्रे नाटकानुसार
भक्तीमार्गात बनली आहेत. तुमच्या बुध्दीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाटकाचे संपुर्ण
ज्ञान आहे. त्यांना मनुष्याच्या शरीराचा आधार घ्यावा लागतो. शिवबाबा ब्रह्मा तनात
येऊन सृष्टीचक्राचे ज्ञान सांगतात. मनुष्यांनी तर सृष्टीचे आयुष्य लाखो वर्षे
सांगितले. नविन दुनियेची पुन्हा जुनी दुनिया बनते. नविन दुनियेला स्वर्ग म्हणतात तर
जुन्या दुनियेला नर्क म्हणतात. दुनिया तर एकच आहे. नविन दुनियेत देवी-देवता राहतात.
तिथे अपार सुख आहे. सर्व सृष्टीच नविन बनते. आता या दुनियेला जुनी दुनिया म्हणतात.
नावच आहे, लोखंडाची दुनिया. जसे जुनी दिल्ली व नवी दिल्ली असे म्हणतात.
बाबा सांगतात. गोड मुलांनो, नविन दुनियेत नवी दिल्ली असणार आहे. येथे तर जुन्या
दुनियेतच म्हणतात नवी दिल्ली, याला नवी दिल्ली कसे म्हणता येईल? बाबा सांगतात नविन
दुनियेत नवी दिल्ली असेल. तिथे हे लक्ष्मी-नारायण राज्य करतात. त्याला सतयुग
म्हणतात. तुम्ही या संपूर्ण भारतात राज्य करता. तुमची राजगादी यमुना नदीच्या काठावर
असेल. शेवटी रावणराज्याची गादी पण येथेच आहे. रामराज्याची गादी पण येथेच असते.
दिल्ली हे नाव नसेल. त्याला परिस्तान असे म्हणतात. नंतर जो जसा राजा असतो तो तसे
नाव आपल्या राज्यगादीचे ठेवतो. यावेळी तुम्ही सर्वजण जुन्या दुनियेत आहात. नविन
दुनियेत जाण्यासाठी तुम्ही शिकत आहात. तुम्ही पुन्हा मनुष्यापासून देवता बनत आहात.
शिकवणारा पिता आहे.
तुम्ही जाणता उच्च ते उच्च बाबांनी या सृष्टीवर येऊन राजयोग शिकवला. आता तुम्ही
संगमयुगावर आहात. कलियुगी जुनी दुनिया संपणार आहे. बाबांनी याचा हिशोब पण सांगितला
आहे. मी या ब्रह्माच्या शरीराचा आधार घेतो. लोकांना तर ब्रह्मा कोण हे माहितच नाही.
फक्त ऐकले आहे प्रजापिता ब्रह्मा तुम्ही ब्रह्माची प्रजा आहात ना. म्हणून स्वत:ला
बी.के. म्हणवून घेता. खरे तर शिवबाबांची मुले तुम्ही शिववंशी आहात जेव्हा निराकार
आत्मे आहात व नंतर साकारमध्ये प्रजापिता ब्रह्माची मुले भाऊ बहिण आहात, दुसरा कोणता
संबंध नाही. यावेळी तुम्ही कलियुगाचे संबंध विसरता कारण त्यामध्ये बंधन आहे. तुम्ही
नविन दुनियेत जात आहात. ब्राह्मणांना शेंडी दाखवतात. शेंडी ब्राह्मणांची निशाणी आहे.
तुम्हा ब्राह्मणांचे हे कुळ आहे. ते कलियुगी ब्राह्मण आहेत. विशेष करुन ब्राह्मण
मार्गदर्शक असतात. एक धामा खातात तर दुसरे ब्राह्मण गीता सांगतात. आता तुम्ही
ब्राह्मण ही गीता सांगता. ते सुध्दा गीता सांगतात व तुम्ही सुध्दा गीता सांगता. पण
फरक किती मोठा आहे. तुम्ही सांगता कि, कृष्णला भगवान म्हणू शकत नाही. कृष्णाला देवता
म्हणतात. त्यांच्यामध्ये दैवीगुण आहेत. त्याला या डोळ्यांनी पाहू शकतो. शिवाच्या
मंदीरात पहा, त्याला स्वत:चे शरीर नाही. तो आहे परम आत्मा म्हणजे परमात्मा ईश्वर,
प्रभु, भगवान या शब्दांचा काही अर्थ निघत नाही. परमात्मा म्हणजे परम आत्मा, आत्मा
आणि ती परम आत्मा यामध्ये तुम्ही आत्मे आता परमात्माकडून शिकत आहात. तो कुणाकडुन
शिकलेला नाही. तो तर पिता आहे ना. त्या परमपिता परमात्म्याला तुम्ही पिता सुध्दा
म्हणता, शिक्षक पण म्हणता व गुरु सुध्दा म्हणता पण तो एकच आहे. दुसरी कोणतीच आत्मा
पिता, शिक्षक, सद्गुरु बनू शकत नाही. एकच परम आत्मा आहे त्याला म्हणतात परम,
प्रत्येकाला प्रथम पिता पाहिजे, पुन्हा शिक्षक पाहिजे व शेवटी गुरु पाहिजे. बाबा
सुध्दा म्हणतात-मी तुमचा पिता सुध्दा बनतो पुन्हा शिक्षक बनतो आणि पुन्हा मीच तुमचा
सद्गती दाता सत्गुरुही बनतो. सद्गती देणारा गुरु एकच आहे. बाकी गुरु अनेक आहेत. बाबा
म्हणतात. मी तुम्हा सर्वांना सद्गती देतो. तुम्ही सर्वजण सतयुगात जाणार आणि बाकी
सर्व शांतीधामला जाणार, ज्याला परमधाम असे म्हणतात. सतयुगात आदि सनातन देवी देवता
धर्म होता. बाकी दुसरा कोणता धर्म तिथे नाही आणि इतर सर्व आत्मे मुक्तीधामला जातात.
सतयुगाला सद्गती म्हणतात, भुमिका वठवत वठवत पुन्हा दुर्गती होते. तुम्हीच सद्गती
मधून दुर्गतीमध्ये येता. तुम्ही पुर्ण 84 जन्म घेता. तिथे जसा राजा असतो तशी प्रजा
असते, 9 लाख तर प्रथम येतात. 84 जन्म 9 लाख घेणार. पुन्हा दुसरे येत राहणार हा
हिशोब आहे. जो बाबाच समजावतात. सर्वच 84 जन्म घेत नाहीत. पहिल्यांदा येणारेच 84
जन्म घेतात व पुन्हा येतात त्यांचे कमी कमी जन्म होतात. जास्तीत जास्त 84 जन्म.
यासर्व गोष्टी इतर कुणाला माहित नाहीत. बाबा समजावतात. गीतेत सांगितले आहे.
भगवानुवाच. आता तुम्ही समजून घेतले आहे-आदि सनातन देवी देवता धर्म काही श्रीकृष्णाने
रचलेला नाही. तो धर्म तर बाबा स्थापन करतात, कृष्णाच्या आत्म्याने 84 जन्मांच्या
शेवटी हे ज्ञान ऐकले आहे व त्यामुळे तो पहिल्या नंबरमध्ये आला, हे समजून घेणे
आवश्यक आहे. रोज शिकले पाहिजे कारण तुम्ही ईश्वराचे विद्यार्थी आहात. भगवानुवाच आहे
ना! मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. ही जुनी दुनिया आहे. नवी दुनिया म्हणजे
सतयुग. आता आहे कलियुग. बाबा कलियुगी पतित मनुष्यांना सतयुगी पावन देवता बनवतात.
म्हणून कलियुगी मनुष्य बोलावतात कि, बाबा आम्हाला पवित्र बनवा. कलियुगी पतितांना
सतयुगी पावन बनवा. किती मोठा फरक आहे. कलियुगात अपार दु:ख आहे. मुल जन्मले तर सुख
होते आणि उद्या ते मेले तर दु:ख होते. जीवनभर किती दु:ख होते. कारण ही आहे दु:खाची
दुनिया, आता बाबा सुखाची दुनिया स्थापन करीत आहेत. तुम्हाला स्वर्गवासी देवता
बनवतात. आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगात आहात. उत्तम पुरुष व उत्तम स्त्री बनत
आहात. तुम्ही येथे लक्ष्मी नारायण बनण्यासाठी येता. विद्यार्थी शिक्षकांची आठवण
करतात कारण त्यांना माहित आहे कि, हे शिक्षक आम्हाला शिकवून सर्वश्रेष्ठ बनवतात.
येथे तुम्ही परमपिता शिव परमात्म्याची आठवण करता, ते तुम्हाला देवता बनवतात. बाबा
सांगतात-मी तुमचा पिता आहे. तुम्ही माझी आठवण करा, ज्याची तुम्ही शाळीग्राम आत्मा
मुले आहात. स्वत:ला आत्मा समजून माझी आठवण करा तो ज्ञानाचा सागर आहे. बाबा तुम्हाला
खरी खुरी गीता सांगतात परंतु स्वत: मात्र कुठे शिकलेले नाहीत. बाबा सांगतात कि, मी
कुणाचा मुलगा नाही, मी कुणाकडून शिकलेलो नाही. माझा कुणी गुरु नाही. मी तुम्हा
मुलांचा पिता, शिक्षक, गुरु आहे. त्यांना परम आत्मा म्हणतात. या संपूर्ण सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताला जाणतात, जोपर्यंत ते ज्ञान सांगत नाहीत, तो पर्यंत तुम्हाला
आदि-मध्य-अंताचे ज्ञान समजू शकत नाही. हे चक्र जाणून घेऊन तुम्ही चक्रवर्ती राजा
बनता. तुम्हाला हे ब्रह्माबाबा शिकवत नाहीत. यांच्या शरीरात शिवबाबा प्रवेश करुन
आत्म्यांना शिकवतात. नविन गोष्ट आहे ना! बाबा संगमयुगातच येतात. ही जुनी दुनिया
विनाश होणार आहे. कुणाचे धन जमिनीत गाडले जाईल, तर कुणाचे धन राजा खातो. बाबा
मुलांना सांगतात कि, सर्वांचे कल्याण करण्यासाठी, परत सर्वांना देवता बनविण्यासाठी
पाठशाळा किंवा संग्रहालय खोला. जिथे अनेक जण येऊन सुखाचा वारसा प्राप्त करतील. आता
रावणराज्य आहे ना! रामराज्यात सुख होते, रावण राज्यात दु:ख आहे. कारण येथे सर्वजण
विकारी बनले आहेत, ती निर्विकारी दुनिया आहे. या लक्ष्मी नारायणाला सुध्दा मुले
आहेत ना. पण तिथे योगबळ आहे. बाबा तुम्हाला योगबळ शिकवतात. योगबळाने तुम्ही विश्वाचे
मालक बनता. बाहुबलाने कुणी विश्वाचे मालक बनू शकत नाही. हा कायदा नाही. तुम्ही मुले
योगबळाने संपूर्ण विश्वाची बादशाही घेत आहात. किती उच्च शिक्षण आहे. बाबा
म्हणतात-सर्वांत प्रथम पवित्र बनण्याची प्रतिज्ञ करा. पवित्र बनल्यामुळेच तुम्ही
पवित्र दुनियेचे मालक बनू शकता. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. कलियुगातील
संबंध जे यावेळी बंधन आहेत, त्यांना विसरुन स्वत:ला संगमयुगी ब्राह्मण समजा. खरी
खुरी गीता ऐका व इतरांना सांगा.
2. जुनी दुनिया
संपणार आहे म्हणून त्याअगोदर आपले सर्वकाही सफल करा. अनेकांचे कल्याण करण्यासाठी,
मनुष्यांना देवता बनविण्यासाठी पाठशाळा व म्युजियम खोला.
वरदान:-
दृढ
संकल्पाच्या गुल काडीने आत्मिक बाँबचे फटाके उडवणारे सदैव विजयी भव
आजकाल फटाक्यामध्ये
बाँब बनवतात, परंतू तुम्ही दृढ संकल्पांच्या गुलकाडीने आत्मिक बाँबचे फटाके उडवा
कि, ज्यामुळे जुने सर्व समाप्त होईल. ते लोक फटाक्यांमध्ये पैसे खर्च करतात आणि
तुम्ही मात्र कमाई जमा करता. ते फटाके उडवितात आणि येथे तुमची उडती कला बनते.
यामध्ये तुम्ही विजय मिळवता. तर येथे दुहेरी फायदा करुन घ्या. फटाके उडवा पण आणि
कमाई पण करा. ही विधी धारणे करा.
बोधवाक्य:-
एखाद्या विशेष
कार्यामध्ये मदतगार बनणे म्हणजे आशिर्वादांचा खजिना जमा केल्याप्रमाणे आहे..!