02-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, बाबा आले आहेत, तुम्हा मुलांचा शृंगार करण्यासाठी, पवित्रतेचा सर्वात
चांगला शृंगार आहे.”
प्रश्न:-
पूर्ण 84 जन्म
घेणाऱ्यांची मुख्य लक्षणे कोणती आहेत?
उत्तर:-
(१) ते पित्याच्या सोबतच शिक्षक आणि सद्गुरु तिघांची आठवण करतील. असे नाही पित्याची
आठवण आली तर शिक्षक विसरतील. जेव्हा तिघाची आठवण कराल, तेव्हाच कृष्णपुरी मध्ये जाऊ
शकाल, म्हणजेच सुरुवातीपासून भूमिका करू शकाल.
(२) त्यांना कधीच
मायचे वादळ हरवू शकणार नाही.
ओम शांती।
बाबा मुलांना म्हणतात, हे तुम्ही विसरत तर नाही,आम्ही बाबांच्या पुढे शिक्षकांच्या
पुढे आणि सद्गुरूंच्या पुढे बसलो आहोत.बाबा असे समजत नाहीत की, सर्व काही या
तिघांच्या आठवणीत बसले आहेत. तरीही बाबांचे कर्तव्य आहे समजवणे. हे अर्थ सहित आठवण
करणे आहे. आमचे बाबा, पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि बरोबर आमचे सद्गुरु पण आहेत.
जे मुलांना सोबत घेऊन जातात. बाबा आले आहेत मुलांचा शृंगार करण्यासाठी, पवित्रता
द्वारेच शृंगार करतात. धन पण खूप देतात. नवीन दुनियेत जाण्यासाठी धन देतात, याची
मुलांनी आठवण करायची आहे.मुलं गफलत करतात, जे विसरून जातात .जी पूर्ण खुशी व्हायला
पाहिजे ती होत नाही. असे बाबा तर कधी मिळाले नाहीत. तुम्ही जाणता आम्ही बाबांची मुलं
आहेत जरुर. ते आम्हाला शिकवतात म्हणून शिक्षक पण आहेत.हे शिक्षण नविन दुनिया अमरपुरी
मध्ये जाण्यासाठी आहे.आता आम्ही संगमयुगात बसलो आहोत, ही आठवण तर जरूर मुलांना
व्हायला पाहिजे. चांगल्या रीतीने आठवण करायची आहे. यावेळेत कंसपुरी असुरी दुनिया
मध्ये आहोत. हे पण मुलं जाणतात. समजा कोणाला साक्षात्कार होतो परंतु साक्षात्कार
द्वारे कोणीही कृष्णपुरी किंवा त्यांच्या राजघराण्या मध्ये जाऊ शकत नाहीत. तेव्हाच
जाऊ शकता जेव्हा पिता, शिक्षक आणि गुरु तिघांची आठवण करत राहाल. या गोष्टी आत्म्याशी
केल्या जातात. आत्माच म्हणते, होय बाबा, तुम्ही तर खरे सांगत आहात. तुम्ही पिता पण
आहात,शिकवणारे शिक्षक पण आहात. सर्वोच्च आत्मा शिकवते. शारीरिक शिक्षण पण आत्माच
शरीराच्या सोबत शिकते,परंतु ती आत्मा पण पतित, तर शरीर पण पतित आहे.दुनिये मधील
मनुष्यां माहित नाही की आम्ही नर्कवासी आहोत.
आता तुम्ही समजता आम्ही तर आपल्या वतन मध्ये जाऊ. हे तुमचे वतन नाही, हे तर रावणाचे
वतन आहे. तुमच्या वतन मध्ये तर खूप सुख आहेत. काँग्रेसी लोक असे समजत नाहीत की,
आम्ही दुसऱ्यांच्या राज्यांमध्ये आहोत.यापूर्वी मुसलमानाच्या राज्यांमध्ये होते,
परत क्रिश्चनच्या राज्यामध्ये होतो. आता तुम्ही जाणता आम्ही आपल्या राज्यात जात
आहोत. अगोदर रावणाच्या राज्यालाच,आम्ही आपले राज्य समजून बसलो होतो. हे विसरलो की,
आम्ही अगोदर रामराज्या मध्ये होतो, परत 84 जन्माच्या चक्रात आल्यामुळे रावण
राज्यांमध्ये दुःखी झालो. दुसऱ्यांच्या राज्यांमध्ये दुःखच असते. हे सर्व ज्ञान
मंथन करायला पाहिजे. बाबा तर जरूर आठवणीत येतील, परंतु तिघांची आठवण करायची आहे. हे
ज्ञान मनुष्य घेऊ शकतात, जनावरं तर घेऊ शकणार नाहीत. हे पण तुम्ही मुलंच समजता,
स्वर्गा मध्ये वकील इत्यादीचे शिक्षण नसते.बाबा येथेच तुम्हाला मालामाल करत आहेत.
सर्वच राजा तर बनू शकत नाहीत. तेथे व्यापार पण चालत असतो परंतु तेथे तुम्हाला खूप
धन असते. नुकसान होण्याचा कायदाच नाही किंवा लूटमार इत्यादी होत नाही, त्याचे नावच
स्वर्ग आहे. आता तुम्हा मुलांना स्मृति आली आहे आम्ही स्वर्गामध्ये होतो, परत
पुनर्जन्म घेत घेत खाली उतरलो. बाबा गोष्टी पण त्यांनाच सांगतात.ज्यांनी ८४ जन्म
घेतले घेतले नसतील तर, माया त्यांना हरवेल. हे पण बाबच समजावत राहतात. मायाचे खूप
मोठे वादळ आहे. अनेकांना माया हारवण्याचा प्रयत्न करते, पुढे चालून तुम्ही पहाल,
ऐकाल पण. बाबांच्या जवळ सर्वांचे चित्र असते, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमका इतके
दिवस येत होता,बाबाचे बनले,परत मायेने हारवले,म्हणजे त्याचा मृत्यू झाला, मायेला
जाऊन मिळाले. यावेळेत येथे कोणी शरीर सोडले तर याच दुनियेमध्ये जन्म घ्यावा लागतो.
तुम्ही शरीर सोडाल तर बाबांच्या बेहद च्या घरी जाल. तेथे बाबा मम्मा, मुलं सर्व
असतील ना. परिवार असा असतो. मूळवतन मध्ये तर पिता आणि भाऊ भाऊ आहेत, दुसरा कोणता
संबंध नाही. येथे पिता आणि भाऊबहीण आहेत, परत वृद्धी होत जाते. काका-मामा इत्यादी
अनेक संबंध होतात. या संगमयुगा मध्ये तुम्ही प्रजापिता ब्रह्मा चे बनतात तर
भाऊ-बहिण होतात. शिव बाबांची आठवण करतात तर भाऊ भाऊ आहात. या सर्व गोष्टी चांगल्या
रीतीने आठवण करायच्या आहेत, अनेक मुलं विसरून जातात. बाबा तर समजावत राहतात.पित्याचे
कर्तव्य असते मुलांना डोक्यावरती बसवणे, तेव्हा तर नमस्ते करत राहतात, अर्थ पण
समजवतात.भक्ती करणारे साधुसंत इत्यादी कोणी तुम्हाला जीवनमुक्तीचा रस्ता सांगू शकत
नाहीत,ते मुक्तीसाठी पुरुषार्थ करत राहतात. तो निवृत्तीमार्ग आहे,ते राजयोग कसे
शिकवू शकतील? राजयोग प्रवृत्ती मार्गाचा आहे. प्रजापिता ब्रम्हाला चारभुजा दाखवतात,
म्हणजेच प्रवृत्ती मार्ग झाला ना.येथे बाबांनी दत्तक घेतले आहे,म्हणून नाव ठेवले आहे
ब्रह्मा सरस्वती. नाटकांमध्ये तशी नोंद आहे.वानप्रस्थ अवस्थांमध्ये मनुष्य गुरु
करतात,सहसा साठ वर्षाच्या नंतर गुरु करतात.ब्रह्मा तना मध्ये पण साठ वर्षाच्या नंतर
बाबांनी प्रवेश केला, तर पिता, शिक्षक आणि गुरु बनले.आता तर कायदे पण बिघडले आहेत,
लहान मुलांना पण गुरु करतात. हे तर निराकार आहेत.तुम्हा आत्म्याचे हे पिता पण बनतात,
शिक्षक सद्गुरु पण बनतात. निराकारी दुनिया ला आत्म्याची दुनिया म्हटले जाते, असे तर
म्हणू शकत नाही, दुनियाच नाही. शांती धाम म्हटले जाते जिथे आत्मा राहतात. जर असे
म्हणले परमात्म्याचे नाव रूप देश काळ नाही, तर मुले कुठून येतील? तुम्ही मुलं समजता
सृष्टीच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती कशी होते. इतिहास तर चैतन्याचा असतो, भूगोल
तर जड वस्तूंचा असतो. तुमची आत्मा तर जाणते, आम्ही कधी पर्यंत राज्य करत होतो.
इतिहासाचे पण गायन होते, ज्याला गोष्टी म्हणल्या जातात. भूगोल देशाचा असतो, चैतन्यने
राज्य केले, जड तर राज्य करणार नाहीत.या वेळेपासून अमक्याचे राज्य होते, क्रिश्चन
लोकांनी भारतावर,कधीपासून कधीपर्यंत राज्य केले .तर या विश्वाचा इतिहास भूगोल ला
कोणी जाणत नाहीत. सतयुगाला लाखो वर्ष मानतात, त्यामध्ये कोण राज्य करून गेले, किती
वेळ राज्य केले, हे कोणी जाणत नाहीत, यालाच इतिहास म्हटले जाते. आत्मा चैतन्य आहे,
तर शरीर जड आहे.सर्व खेळ जड आणि चैतन्याचा आहे. मनुष्य जीवन ऊत्तम गायले जाते.जणगणना
पण मनुष्याची केली जाते, जनावराची तर कोणी गणना करू शकत नाहीत. सर्व खेळ तुमच्या
वरती आधारित आहेत. इतिहास-भूगोल पण तुम्हीच ऐकता. बाबा यांच्यामध्ये प्रवेश करून
तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगतात, यालाच म्हटले जाते इतिहास आणि भूगोल. हे
ज्ञान नसल्यामुळे तुम्ही खूपच बेसमज बनले आहात. मनुष्य असुन दुनियेचा इतिहास भूगोल
जाणला नाही, तर ते मनुष्य काय कामाचे? आता बाबा द्वारे तुम्ही विश्वाचा इतिहास
भूगोल ऐकत आहात. हे ज्ञान खूपच चांगले आहे, कोण शिकवत आहेत, स्वयम् भगवान. बाबाच
उच्च ते उच्च पद देणारे आहेत. लक्ष्मीनारायण आणि त्यांच्या सोबत जे स्वर्गामध्ये
राहतात, त्यांचेच उच्च पद आहे ना. तेथे वकिली इत्यादी करत नाहीत, तेथे तर फक्त
शिकायचे असते.कला शिकली नाही तर घरे इत्यादी कसे बनवतील?एक दोघाला कला शिकवतात,
नाहीतर घरे कोण बनवतील, आपोआप तर बनणार नाहीत. हे सर्व रहस्य आत्ता तुमच्या
बुद्धीमध्ये नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे राहते. तुम्ही जाणता हे चक्र फिरत राहते,
इतका वेळ आम्ही राज्य करत होतो, परत रावण राज्यामध्ये आलो. दुनियेला या गोष्टीची
माहिती नाही की, आम्ही रावण राज्यामध्ये आहोत. आम्हाला रावण राज्या पासून मुक्त करा
असे म्हणतात. काँग्रेसच्या लोकांनी ख्रिश्चन राज्यापासून भारताला मुक्त केले, आता
परत म्हणतात, हे ईशवरीय पिता आम्हाला मुक्त करा. आठवण येते ना, कोणीही जाणत नाही
की, असे का म्हणतात? आता तुम्ही समजले आहे साऱ्या सृष्टी वरती रावणाचे राज्य आहे.
सर्वजण म्हणतात रामराज्य पाहिजे परंतु मुक्त कोण करेल? ईश्वरीय पिता मुक्त करून,
मार्गदर्शक बनून घेऊन जातील, असे समजतात. भारतवासींना इतकी अक्कल नाही, बिलकुलच
प्रधान झाले आहेत. परदेशी लोकांना न इतके दुःख मिळते,न इतके सुख मिळते. भारतवासी
सर्वात जास्त सुखी बनतात तर दुखी पण बनतात, याचा पण हिशेब आहे.आत्ता तर खुपच दुःखी
आहेत. जे धार्मिक मनुष्य आहेत, ते आठवण करतात, हे ईश्वर, मुक्तिदाता. तुम्ही पण
मनामध्ये असे म्हणता, बाबा येऊन आमचे दुःख दूर करा आणि आम्हाला सुखाधाम मध्ये घेऊन
चला. ते म्हणतात आम्हाला शांतीधाम मध्ये घेऊन चला, तुम्ही म्हणणार शांतीधाम आणि
सुखधाम मध्ये घेऊन चला. आता बाबा आले आहेत तर खूपच खुशी व्हायला पाहिजे. भक्तिमार्ग
मध्ये कनरस खुप आहे, त्यामध्ये खऱ्या गोष्टी काहीच नाहीत. अगदीच पिठामध्ये मिठा
एवढेच सत्य आहे. चंडिका देवीचा पण मेळा लागतो. आत्ता चंडिका चा मेळा का लागतो? चंडी
कोणाला म्हटले जाते? बाबांनी स्पष्ट केले आहे, चंडाल चा जन्म पण येथे येणारेच घेतात,
येथे राहून पण असे काही खाल्ले पिले, धन देऊन परत मागितले, आम्ही मानत नाही असे
म्हणले , संशय आला तर त्यांना कोणते पद मिळेल?अशा चंडिका चा पण मेळा भरतो,तरीही
सतयुगात तर येतात ना.काही वेळ जरी मदतगार बनले तरी स्वर्गामध्ये तर येतील ना. ते
भक्त लोक तर जाणत नाहीत, ज्ञान तर त्यांच्याजवळ नाही. चित्र असणारी गीता आहे, खूप
पैसे कमवतात, चित्रावरती खूपच आकर्षित होतात. त्याला कला समजतात, मनुष्याला काहीच
माहिती नाही, देवतांचे चित्र कसे असतात. वास्तव मध्ये तुम्ही खूपच चांगले होते,
आत्ता कसे बनले आहात? तेथे कोणी आंधळे, बहिरे इत्यादी नसतात, देवतांची तर नैसर्गिक
सुंदरता असते. तेथे नैसर्गिक सौंदर्य असते. बाबा समजवतात मुलांनो तुम्ही माझी आठवण
करा. बाबा पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत. तिघांची आठवण करा, तर
तिघा द्वारे वारसा मिळेल. अंत काळातील तिघांच्या रूपांमध्ये आठवण करू शकणार
नाहीत,परत मुक्तीधाम मध्ये चालले जातील. बाबांनी समजावले आहे सूक्ष्मवतन मध्ये जे
काही पाहता, या सर्व साक्षात्काराच्या गोष्टी आहेत, बाकी इतिहास भूगोल सर्व या
दुनियेचा आहे. याच्या कालावधीची कोणाला माहिती नाही. आत्ता तुम्हा मुलांना बाबांनी
समजावले आहे, तुम्ही परत कोणालाही समजावू शकता. प्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे
.ते बेहदचे पिता सर्वोच्च आहेत. लौकिक पित्याला परमात्मा किंवा सर्वोच्च आत्मा कधीच
म्हणू शकणार नाही. सर्वोच्च तर एकच आहेत, ज्यानांच भगवान म्हटले जाते. ते ज्ञानाचे
सागर आहेत, तर तुम्हाला ज्ञान शिकवतात.हे ईश्ववरीय ज्ञान कमाईचे साधन आहे. ज्ञान पण
उत्तम मध्यम कनिष्ठ असते ना. बाबा उच्च आहेत, तर शिक्षण पण उच्च आहे, त्यामुळेच पद
पण उच्च मिळते. इतिहास-भूगोल तर लगेच जाणतात, बाकी आठवणीच्या यात्रामध्ये युद्ध
चालते, यामध्ये तुमची हार होते, त्यामुळे ज्ञानामध्ये पण तुमची हार होते,हार होऊन
भागंती होतात.ज्ञान पण सोडून देतात, परत जसे होते तसेच बनतात किंवा त्याच्यापेक्षा
ही खराब बनतात. बाबांच्या पुढे चलनाद्वारे अभिमान लगेच प्रसिद्ध होतो. ब्राह्मणांची
माळा पण आहे परंतु अनेकांना माहीत नाही, आम्ही कसे नबंरानुसार येथे बसायचे,देह
अभिमान आहे ना. निश्चय असणाऱ्यांना जरूर अपार खुशी राहील. कोणाला निश्चय आहे? आम्ही
हे शरीर सोडून राजकुमार बनू ?सर्वांनी हात वरती केला. मुलांना इतकी खुशी राहते .
मुलांमध्ये तर पूर्णपणे दैवी गुण असायला पाहिजेत, कारण तुम्हाला निश्चय आहे.निश्चय
बुद्धी म्हणजे विजय माळे मध्ये येणारे राजकुमार.एक दिवस असाही जरूर येईल,सर्वात
जास्त परदेशी मधुबन मध्ये येतील,बाकी सर्व तीर्थयात्रा सोडून देतील. त्यांची इच्छा
आहे, भारताचा राजयोग शिकावा. कोण आहे ज्यांनी स्वर्गाची स्थापना केली? पुरुषार्थ
केला जातो, कल्पा पूर्वी पण हेच झाले असेल, तर जरुर संग्रहालय पण बनेल. अशा प्रकारची
प्रदर्शनी आम्ही नेहमीसाठी लावू शकतो, असे समजावयाचे आहे. चार पाच वर्षासाठी पण
इमारत भाड्याने घेऊन, तुम्ही प्रदर्शनी लावू शकता. आम्ही भारताची सेवा,सुखधाम
बनवण्यासाठी करत आहोत.यामुळे अनेकांचे कल्याण होईल, अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादा ची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) अपार
खुशीमध्ये राहण्यासाठी नेहमी हीच स्मृति ठेवा, स्वतः बाबा आमचा शृंगार करत आहेत, ते
आम्हाला खूप ज्ञान धन देत आहेत. आम्ही नवीन दुनिया अमरपुरी साठी हे शिक्षण घेत आहोत.
(२) विजय माळेमध्ये
येण्यासाठी, निश्चय बुद्धी बणुन दैवी गुण धारण करायचे आहेत, जे धन यज्ञामध्ये दिले
ते परत घेण्याचा विचार सुद्धा यायला नको. संशयी बुद्धी बनून आपले पद गमवायचे नाही.
वरदान:-
विज्ञानाला
मनोरंजन चा खेळ समजून पुढे जाणारे निर्विघ्न विजयी भव.
विघ्न येणे ही चांगली
गोष्ट आहे परंतु विघ्ना द्वारे हार व्हायला नको. मजबूत बनण्यासाठी विघ्न येतात
म्हणून विघ्नांना घाबरण्याच्या ऐवजी त्यांना मनोरंजन चा खेळ समजून पुढे चला,
तेव्हाच निर्विघ्न विजयी बनाल.जर सर्वशक्तिमान पिता सोबत आहेत, तर घाबरण्याची
कोणतीच गोष्ट नाही, फक्त बाबांची आठवण आणि सेवे मध्ये व्यस्त रहा तर निर्विघ्न बनाल.
जेव्हा बुद्धी फ्री असते, तेव्हाच विघ्न किंवा माया येते, व्यस्त रहा तर माया किंवा
विघ्न किनारा करतील.
बोधवाक्य:-
सुखाचे खाते
जमा करायचे असेल तर मर्यादा पूर्वक,मनापासुन सर्वांना सुख द्या.