06-10-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   18.02.1985   ओम शान्ति   मधुबन


“संगमयुग तन मन धन आणि वेळ सफल करण्याचे युग”
 


आज विश्व कल्याणकारी बाबा आपल्या सहयोगी मुलांना पाहत आहेत. प्रत्येक मुलांच्या ह्दयामध्ये बाबांना प्रत्यक्ष करण्याची आवड आहे. सर्वांचा एकच श्रेष्ठ संकल्प आहे आणि सर्व याच कार्यामध्ये उमंग उत्साहाद्वारे मगन आहेत. एका बाबांशी आवड असल्यामुळे सेवेमध्ये पण लगन आहे आवड आहे. दिवस रात्र साकार कर्मामध्ये किंवा स्वप्नामध्ये पण बाबा आणि सेवाच दिसुन येते. बाबाचे सेवेविषयी प्रेम आहे. म्हणून स्नेही सहयोगी मुलांचे प्रेम पाहुन बापदादा पण आनंदीत होतात. आपले तन, मन, धन, वेळ खुपच प्रेमाने सफल करत आहेत. पापाच्या ऐवजी पुण्याच्या खात्यामध्ये, वर्तमान पण श्रेष्ठ आणि भविष्यासाठी पण जमा करत आहेत. संगमयुग आहेच एकाचे पदमगुणा जमा करण्याचे युग. तन सेवेमध्ये लावा आणि 21 जन्मासाठी संपूर्ण निरोगी तन प्राप्त करा. कसे पण कमजोर तन असू दे, रोगी असु दे, परंतू वाचा कर्मणा नाही तर मन्सासेवा अंतकाळापर्यंत करु शकतात. आपल्या अतिइंद्रिय सुख, शांती, शक्ती, चेहऱ्याद्वारे डोळ्याद्वारे दाखवू शकतो. जे संपर्कामध्ये येणारे म्हणतील हे तर आश्चर्य कारक पेशंट आहेत. डॉक्टर्स पण पेशंटला पाहुन आनंदीत होतील. तसे तर डॉक्टर्स पेशंटला पाहुन खुशी देतात, परंतू ते देण्याच्या ऐवजी होण्याचा अनुभव करतील. कसे पण आजारी असु देत परंतू जर बुध्दी पवित्र आहे ठिक आहे तर अंतकाळापर्यंत सेवा करु शकतात कारण हे जाणतात कि या वेळेतील तनाद्वारे केलेल्या सेवेचे फळ 21 जन्म खात राहू असे तनाद्वारे मनाद्वारे स्वत: मनाचे शांती स्वरुप बनुन सदा प्रत्येक संकल्पामध्ये शक्तीशाली बनून, शुभ भावना शुभ कामनाद्वारे दाता बनून, सुख शांतीच्या शक्तीची किरणे वातावरणामध्ये पसरवत जावा. जेव्हा तुमची रचना सुर्य चोहो बाजूला प्रकाशाची किरणे पसरवत राहतात. तर तुम्ही मास्टर सर्वशक्तीमान, विधाता वरदाता, भाग्यवान, प्राप्तीची किरणे चोहोबाजूला पसरवू शकत नाही? संकल्प शक्ती अर्थात मनाद्वारे एका स्थानावरती असून पण चोहो बाजूला प्रकंपनाद्वारे वातावरण बनूव शकतात. थोड्याशा वेळेत या जन्मामध्ये, मनाद्वारे सेवा केल्यामुळे, 21 जन्म मन सदा सुख शांतीच्या मौजमध्ये राहाल, परत अर्धाकल्प भक्तीद्वारा, चित्राद्वारे मनाची शांती देण्याच्या निमित्त बनाल. चित्र पण इतके शांतीचे, शक्ती देणारे बनेल तर एका जन्मात मनाची सेवा केल्यामुळे सर्व कल्प चैतन्य स्वरुपाद्वारे किंवा चित्राद्वारे शांतीचे स्वरुप बनाल.

असेच धनाद्वारे सेवेच्या निमित्त बनणारे 21 जन्म अनगणित धनाचे मालक बनतात. त्याचसोबत द्वापरयुगापासून आज पर्यंत पण अशी आत्मा कधी धनाची भिखारी बनणार नाही. 21 जन्म राज्य भाग्य मिळेल. जे धन माती समान असेल अर्थात इतके सहज आणि अपार धन असेल. तुमच्या प्रजेची प्रजा अर्थात प्रजाचे सेवाधारी पण अगणित धनाचे मालक असतील. परंतू 63 जन्मामध्ये कोणत्याच जन्मामध्ये धनाचे भिखारी बनणार नाहीत. आनंदाने दाळ भाकरी खात राहाल. कधी भाकरीचे भिकारी होणार नाहीत. तर एक जन्म दाताकडे धन लावल्यामुळे, दाता पण काय करेल? सेवामध्ये लावतील. तुम्ही तर बाबांच्या भंडारीमध्ये घालतात ना. आणि बाबा सेवेमध्ये लावतात. तर सेवार्थ किंवा दाताच्या अर्थ धन लावणे अर्थात पुर्ण कल्प भिकारी पणापासून वाचणे. जितके लावाल तेवढे द्वापर पासुन कलियुग पर्यंत आरामशीर खात राहाल. तर तन मन धन आणि वेळ सफल करायचे आहे. वेळ लावणारे एक तर सृष्टी चक्राच्या सर्वांत श्रेष्ठ वेळेत सतयुगामध्ये येतात. सतोप्रधान युगाचे भक्त लोक आजपर्यंत गायन करत राहतात. स्वर्गाचे गायन करतात ना. तर सतोप्रधान युगात 1-1-1 अशा वेळेत अर्थात सतयुगाच्या प्रथम जन्मामध्ये, असा श्रेष्ठ वेळेचा अधिकार प्राप्त करणारे, प्रथम क्रमांकामध्ये येणाऱ्या आत्म्यासोबत जीवनाचा वेळ व्यतीत करणारे बनतील. त्यांच्या सोबत शिक्षण घेणारे, खेळणारे, फिरणारे बनतील. तर जे संगम युगावरती आपला वेळ सफल करतात, त्यांचे श्रेष्ठ फळ संपुर्ण श्रेष्ठ वेळेचा अधिकार प्राप्त होतो. जर वेळ सफल करण्यात आळशी आलबेले बनले तर प्रथम नंबरमध्ये येणारी अर्थात श्रीकृष्ण स्वरुपामध्ये स्वर्गामध्ये प्रथम वर्षामध्ये न येता, थोड्या वर्षाने नंबरानुसार येतील. हे आहे वेळ देण्याचे महत्त्व. तुम्ही देता काय आणि घेता किती? म्हणून चार ही गोष्टीला तपासा, तन-मन-धन वेळ चारही जितके लावू शकतो. तेवढे लावत आहे, सफल करत आहे? असे तर नाही जितके लावू शकतो, तेवढे सफल करत नाही. यथाशक्ती लावल्यामुळे तेवढेच प्राप्त होईल, संपुर्ण प्राप्ती होणार नाही. तुम्ही ब्राह्मण आत्मे संदेशामध्ये काय म्हणतात? संपुर्ण सुख शांती आपला जन्म सिध्द अधिकार आहे. हे तर नाही म्हणत यथाशक्ती आपला अधिकार आहे. संपुर्ण म्हणतात ना. जेव्हा संपुर्ण अधिकार आहे तर संपुर्ण प्राप्ती करणेच ब्राह्मण जीवन आहे. अर्धे अहो तर क्षत्रिय आहे. चंद्रवंशी अर्ध्यामध्ये येतात. तर यथाशक्ती अर्थात अर्धे आणि ब्राह्मण जीवन अर्थात प्रत्येक गोष्टीमध्ये संपुर्ण. तर बापदादा मुलांचा सहयोग देण्याचा चार्ट, तक्ता पाहत होते. तसे तर सहयोगी सर्वच आहेत. जेव्हा सहयोगी बनले आहेत तेव्हा सहज योगी पण बनले आहेत. सर्व सहयोगी सहजयोगी श्रेष्ठ आत्मे आहात. बापदादा प्रत्येक मुलाला संपुर्ण अधिकारी आत्मा बनवतात. परत यथाशक्ती का बनतात? का, हा विचार करता की कोणी तर बनेल. असे विचार करणारे खुप आहेत, तुम्ही नाहीत. आता पण संपुर्ण अधिकार प्राप्त करण्याची वेळ आहे. आता फार उशीर झाला आहे, असा बोर्ड लागला नाही. उशीरा अर्थात अंतकाळात येऊन पुढे जाऊ शकता म्हणून आत पण सुर्वण संधी आहे. जेव्हा फार उशीर झाला, असा बोर्ड लागेल, परत सुर्वण संधीच्या ऐवजी चांदीची संधी घेणारे बनाल. तर काय करायला पाहिजे? सुर्वण संधी घेणारे आहात ना. सुर्वण युगात आले नाही तर ब्राह्मण बनुन काय केले? म्हणून बापदादा स्नेही मुलांना स्मृती देत आहेत की आता बाबाच्या स्नेहामुळे एकाचे लाखो करोडो मिळण्याची संधी आहे. आता जितक्याला तितके असे नाही. एकाचे लाखो करोडो पटीने मिळण्याची संधी आहे. परत हिशेब जितक्याला तितके राहिल. परंतू आता भोलेनाथचे भंडार उघडले आहे, पाहिजे तेवढे घेऊ शकतात. परत म्हणाल आता सतयुगाची नंबर एकची सीट खाली नाही, म्हणून या वेळेत बाप समान संपुर्ण बना. यावेळेच्या महत्त्वाला जाणुन महान बना. डबल विदेशी सुर्वण संधी घेणारे आहात ना. जेव्हा इतक्या लगनद्वारे वृध्दी करत आहात, स्नेही आहात, सहयोगी आहात, तर प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष्य द्वारा संपुर्णताचे लक्षण धारण करा. लगन नसते तर येथे कसे पोहचले, असते. जसे उडत उडत पोहचले, असेच उडती कलामध्ये उडत राहा, प्रगती करत राहा. शरीराद्वारे पण उडण्याचे अभ्यासी आहात. आत्मा पण नेहमी उडत राहावी, हेच बापदादाचे स्नेह आहे. अच्छा.

सदा सफलता स्वरुप बन, संकल्प वेळ सफल करणारे, प्रत्येक कर्मामध्ये सेवेचा उमंग उत्साह ठेवणारे, सदा स्वत:ला संपन्न बनवून संपुर्ण अधिकार प्राप्त करणारे, मिळणाऱ्या सुर्वण संधीला घेणारे, असे पित्याचे अनुकरण करणाऱ्या सुपात्र मुलांना, नंबर एक मुलांना, बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि नमस्ते.

काठमांडू आणि विदेशी भाऊ बहिणीच्या गटा सोबत बापदादाचे व्यक्तीगत वार्तालाप :- नेहमी स्वत:ला विशेष आत्मा अनुभव करतात का? साऱ्या विश्वामध्ये असे विशेष आत्मा किती असतील? ज्यांचे करोडो मधुन काही, असे गायन आहे. ते कोण आहेत? तुम्हीच आहात ना? तर नेहमी स्वत:ला करोडो मधुन कोणी आणि त्यामधून पण खास, असे श्रेष्ठ आत्मे समजतात? कधी स्वप्नामध्ये पण असा विचार केला नसेल की, एवढे श्रेष्ठ आत्मे बनू, परंतू प्रत्यक्षामध्ये अनुभव करत आहात. तर सदा आपले हे श्रेष्ठ भाग्य स्मृतीमध्ये राहते? वाह! माझे श्रेष्ठ भाग्य. जे ईश्वरानी स्वत: माझे भाग्य बनवेल प्रत्यक्ष भगवंतानी भाग्याची रेषा ओढली, असे श्रेष्ठ भाग्य आहे. जेव्हा या श्रेष्ठ भाग्याची स्मृती राहते तर खुशीमध्ये बुध्दी रुपी पाय जमिनीवर राहत नाही, सदावरती राहतात. तर तुमचे बुध्दी रुपी पाय कुठे राहतात? खाली धरती वरती नाही. देह अभिमान पण धरती आहे. देहअभिमानच्या धरतीपासून वरती राहणारे, यालाच फरिश्ता म्हणले जाते. तर किती पदव्या, स्वमान आहेत. भाग्यवान आहात, फरिश्ते आहात, फार वर्षांनी भेटलेले गोड मुले आहात, जे पण श्रेष्ठ स्वमान आहेत, ते सर्व तुमचे आहेत. तर याच खुशीमध्ये नाचत राहा. गोड मुलं धरतीवरती पाय ठेवत नाहीत, सदा प्रेमाच्या झोक्यामध्ये राहतात. कारण धरतीवरती तर 63 जन्म राहिले, त्याचा अनुभव पण केला. धरतीवरती, मातीमध्ये राहुन खराब झाले आणि लाडके बनले तर नेहमी धरतीच्या वरती राहिले. खराब नाही तर सदा स्वच्छ. खरे मन, स्वच्छ ह्दय असणारी मुलं नेहमी बाबांच्या प्रेमात राहतात, कारण बाबा पण सदा स्वच्छ आहेत ना. तर बाबांच्या सोबत राहणारे पण सदा स्वच्छ आहेत. फार चांगले झाले मिलन मेळ्यामध्ये पोहचले. लगनद्वारे भेटण्यासाठी पोहचले. बापदादा मुलांना पाहुन खुशी होते कारण मुलंच नाहीत तर बाबा पण एकटे काय करतील? खुशाल आपल्याच घरी येत राहा. भक्त लोक यात्रेला जातात तर खुप कठीण मार्ग प्रवास करुन पोहचतात. तुम्ही तर काठमांडू वरुन बसमध्ये आले आहात, मौज करत पोहचले आहात. अच्छा.

लंडन ग्रुप सोबत : सर्व स्नेहाच्या सुत्रामध्ये बांधलेले बाबांच्या माळेचे मणी आहात ना. माळेचे इतके महत्व का बनले आहे? कारण स्नेहाचे सुत्र सर्वांत श्रेष्ठ सुत्र आहे. तर स्नेहाच्या सुत्रामध्ये सर्व एक बाबांचे बनले आहात याची आठवण माळ आहे. ज्याचे एक बाबा दुसरे कोणी नाही तेच एका स्नेहाच्या सुत्रामध्ये माळेचे मणी बनुन गुंफले जातात. सुत्र एकच आहे आणि दाणे अनेक आहेत. तर हे एका बाबांच्या स्नेहाची लक्षणे आहेत. तर असे स्वत:ला माळेचे मणी समजतात ना. असे समजतात, 108 मध्ये तर थोडेच येतील? काय समजतात? हे तर 108 चे नंबर निमित्त मात्र आहेत. जे पण बाबांच्या स्नेहामध्ये सामावलेले आहेत ते गळ्याच्या माळेमधील मोती आहेत. तर जसे एकाच लगनमध्ये मगन राहणारे आहात, तर मगन अवस्था निर्विघ्न बनवते आणि निर्विघ्न आत्म्याचेच गायन आणि पुजन होते. सर्वांत जास्त गायन कोण करते? जर एका मुलांचे पण गायन केले नाही तर मुलगा रुसुन जाईल म्हणून बाबा प्रत्येक मुलांचे गायन करतात कारण प्रत्येक मुलगा आपला अधिकार समजतो. अधिकारामुळे प्रत्येक जण आपला हक्क समजतो. बाबांची गती इतकी गती तीव्र आहे की, कोणाची गती इतकी तीव्र नाही. एका सेकंदामध्ये अनेकांना राजी करु शकतात. तर बाबा मुलांसोबत व्यस्त राहतात आणि मुलं बाबांच्या आठवणीमध्ये व्यस्त राहतात. बाबांचा धंदाच, मुलांचा धंदा आहे.

अविनाशी रत्न बनले आहात, याचे अभिनंदन आहे. 10 वर्ष किंवा 15 वर्षापासुन ज्ञानामध्ये आहात, त्यांचे अभिनंदन संगमयुग असे पर्यंत ज्ञानामध्ये चालत राहा. सर्व जण पक्के आहात म्हणून बापदादा अशा पक्क्या अचल मुलांना पाहुन आनंदीत होतात, असा कोणताच मुलगा नाही ज्यांच्यामध्ये एक पण विशेषता नाहीत, म्हणून बापदादा प्रत्येक मुलांची विशेषता पाहुन सदा खुश होतात. नाही तर करोडो मधुन कोणी आणि कधी मधून खास तुम्हीच आहात. जरुर काही विशेषता आहेत. कोणी कोणता रत्न आहे, कोणी कोणता? वेगवेगळ्या विशेषताचे वरदान गायन केलेले आहे. प्रत्येक रत्न विशेष विघ्न विनाशक असतात. तर तुम्ही पण सर्व विघ्न विनाशक आहात.

विदेशी भाऊ बहिणींची प्रेमळ आठवण आणि पत्राचे उत्तर देताना :- सर्व स्नेही मुलांचा स्नेह मिळाला. सर्वांच्या मनातील उमंग आणि उत्साह बाबांच्या जवळ पोहचतात आणि त्या उमंग उत्साहाद्वारे खुश होत आहेत, त्यांना पाहुन बापदादा आणि परिवाराची विशेष आशिर्वाद मिळते. याच आशिर्वाद मुळे पुढे जात आहेत आणि दुसऱ्यांना पण पुढे करत चला. चांगल्या प्रकारे सेवा करत आहात, अशीच प्रगती करत राहा, तर चांगल्या प्रकारचे पद मिळेल. सर्व आपल्या नावासहित विशेषताद्वारे आठवण स्विकार करा. आता पण सर्व मुलं आप आपल्या विशेषताद्वारे बापदादांच्या सन्मुख आहेत म्हणून पदमगुणा यादप्यार स्विकार करा.

दादी चंद्रमणी ने पंजाबला जाण्यासाठी सुट्टी घेतली :- सर्व मुलांना प्रेमळ आठवण दया आणि विशेष संदेश दया की उडती कला साठी पुरुषार्थ करा. दुसऱ्यांची पण प्रगती करण्यासाठी समर्थ धारण करा. कोणत्याही वातावरणामध्ये उडत्या कलेद्वारा अनेक आत्म्यांना उडती कलेचा अनुभव करवू शकता. म्हणून सर्वांना आठवण आणि सेवा सोबत चालत राहावी हीच विशेष स्मृती दया. बाकी तर सर्व मुलं लाडकी आहेत. चांगल्या विशेषता असणारे आत्मे आहेत. सर्वांना आप आपल्या विशेषतामुळे प्रेमळ आठवण स्विकार व्हावी. अच्छा, डबल भुमिका वठवत आहात. बेहदच्या आत्म्याची हीच लक्षणे आहेत, ज्यावेळेत जिथे आवश्यकता आहे तिथे सेवा करण्यासाठी जायचे आहे. अच्छा. अच्छा. ओमशांती.

वरदान:-
सेवेमध्ये विघ्नांना प्रगतीची शिडी समजून पुढे जाणारे निर्विघ्न खरे सेवाधारी भव

सेवा ब्राह्मण जीवनाला, नेहमीच निर्विघ्न बनवण्याचे साधन पण आहे आणि सेवेमध्येच विघ्न पण जास्त येतात. निर्विघ्न सेवाधारीलाच खरे सेवाधारी म्हणले जाते. विघ्न येणे पण नाटकामध्ये नोंद आहे. येतच राहतील आणि येणार आहेत कारण विघ्न पण अनुभवी बनवतात. याला विघ्न न समजता, अनुभवाची प्रगती होत आहे. असे पहा तर प्रगतीची शिडी चढत जाल आणि पुढे जात राहाल.

सुविचार:-
विघ्न रुप नाही, विघ्न विनाशक बना...!