09-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो तुमची आठवण खूपच आश्चर्यकारक आहे कारण तुम्ही एक पित्याच्या सोबत,शिक्षक
आणि सद्गुरू तिघांची आठवण करतात"
प्रश्न:-
कोणत्या मुलाला
माया मगरूर बनवते, त्यावेळेस ते कोणत्या गोष्टींमध्ये निष्काळजी बनतात?
उत्तर:-
मगरूर मुलं देह अभिमाना मध्ये येऊन मुरली ऐकत नाहित,निष्काळजी बनतात.एक म्हण आहे
ना,उंदराला हळदीची गाठ मिळाली आणि तो समजू लागला,मी फार मोठा हळदीचा व्यापारी
आहे.अनेक मुलं असे आहेत,जे मुरली ऐकत नाहीत,ते म्हणतात आमचा संबंध तर प्रत्यक्ष
शिवबाबां सोबत आहे.बाबा म्हणतात मुलांनो, मुरली मध्ये नव नवीन गोष्टी येतात त्यामुळे
मुरली कधी बुडवू नका,यावरती खूपच लक्ष द्यायचे आहे.
ओम शांती।
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांना आत्मिक पिता विचारतात,तुम्ही इथे बसल्या
नंतर कुणाच्या आठवणी मध्ये बसले आहात? पिता शिक्षक की सद्गुरु. सर्वजण या तिघांच्या
आठवणी मध्ये बसले आहात.प्रत्येक जणांनी स्वताला विचारायचे आहे,फक्त येथे बसल्यानंतर
आठवण येते की,चालत फिरता आठवण राहते,कारण ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. दूसऱ्या
कोणत्याही आत्म्याला कधी असे म्हणले जात नाही.जरी हे लक्ष्मीनारायण विश्वाचे मालक
आहेत,परंतु त्यांच्या आत्म्याला कधी असे नाही म्हणत नाहीत की हे,पिता आहेत शिक्षक
पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत.साऱ्या दुनिया मध्ये जे पण जीवात्मा आहेत,कोणत्याही
आत्म्याला असे म्हणणार नाहीत.तुम्ही मुलंच असे आठवण करतात.मनामध्ये येते हे बाबा
पिता पण आहेत,शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत, तेही सर्वोच्च.तिघांची आठवण करता
की एकाची.जरी ते एक असले परंतु तीन कर्तव्या मुळे आठवण करतात.शिवबाबा आमचे पिता पण
आहेत शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत.हे अगदी महत्त्वाचे आहे.जेव्हा बसता किंवा
चालता-फिरता तेंव्हा हे आठवणीत यायला पाहिजे. बाबा विचारतात,अशाप्रकारे आठवण करता
का की, हे आमचे पिता, शिक्षक आणि सद्गुरु पण आहेत.असा कोणीही देहधारी होऊ शकत
नाही.देहधारी नंबर एक कृष्ण,त्यांना पिता शिक्षक सद्गुरु म्हटले जात नाही.ही अगदीच
आश्चर्यकारक गोष्ट आहे.तर खरे सांगायला पाहिजे, तिन्ही रुपामध्ये आठवण करतो?भोजन
करताना फक्त शिव बाबांची आठवण करता की तिघांची आठवण बुद्धीमध्ये असते.दुसरे कोणी असे
आत्म्याला म्हणू शकत नाहीत.ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.त्याची विचित्र महिमा आहे. तर
बाबांना आठवण पण अशी करायला पाहिजे.तर बुध्दी एकदम तिघांकडे चालली जाईल,जे
आश्चर्यकारक आहेत.बाबा बसून स्वतःचा परिचय देत आहेत. परत सर्व चक्राचे ज्ञान पण
देतात.असे युग आहे आहे, इतके वर्ष चालते,चक्र फिरत राहते.हे ज्ञान पण रचनाकार बाबाच
देतात,त्यांची आठवण केल्यामुळे खूप मदत मिळते.पिता शिक्षक गुरु एकच आहेत.इतकी उच्च
आत्मा दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही,परंतु माया अशा पित्यांची पण आठवण करू देत
नाही,तर शिक्षकांची आणि गुरुंची पण आठवण विसरून जातात.हे प्रत्येकाने स्वतःच्या
मनाला विचारायला पाहिजे.बाबा आम्हाला अशा विश्वाचे मालक बनवत आहेत.
बेहदच्या पित्याचा वारसा पण,जरूर बेहदचा आहे. सोबत ही महिमा पण बुद्धी मध्ये यायला
पाहिजे. चालता-फिरता तिघांची आठवण यायला पाहिजे. या एका आत्म्याच्या तिन्ही सेवा
एकत्रित आहेत, म्हणून त्यांना सर्वोच्च म्हटले जाते.आता संमेलन इत्यादी करतात
म्हणतात,विश्वामध्ये शांती कशी होईल? ती शांतीची दूनियेची स्थापना तर आत्ता होत
आहे,येऊन समजून घ्या.कोण करत आहे, तुम्हाला त्याचे कर्तव्य सिद्ध करून सांगायचे आहे.
बाबांचे कर्तव्य आणि कृष्णाचे कर्तव्य मध्ये खूपच फरक आहे,बाकी सर्वांचे नाव
शरीरावरुन पडते, यांच्या आत्म्याच्या नावाचे गायन केले जाते.ते आत्मा पिता पण
आहेत,शिक्षक, सद्गुरु पण आहेत.आत्म्यामध्ये ज्ञान आहे परंतु ते कसे देतील. शरीरा
द्वाराच देतील,जेव्हा देतात म्हणून तर महिमा गायन केली जाते.आत्ता शिवरात्रिला मुलं
संमेलन करतात,तर सर्व धर्माच्या नेत्यांना बोलवतात. तुम्हाला समजून सांगायचे आहे
ईश्वर तर सर्वव्यापी नाहीत.जर सर्वांमध्ये ईश्वर आहेत तर प्रत्येक आत्मा,ईश्वर पिता
पण आहे,शिक्षक पण आहे आणि गुरु पण आहे?तर तुम्ही सांगा,सृष्टीच्या आदी मध्य अंताचे
ज्ञान आहे?हे तर कोणी पण सांगू शकणार नाहीत.
तुम्हा मुलांच्या मनामध्ये यायला पाहिजे,उच्च ते उच्च पित्याची खूप महिमा आहे,ते
साऱ्या विश्वाला पावन बनवणारे आहेत. प्रकृती पण पावन बनते. संमेलनांमध्ये तुम्ही
प्रथम हे विचारा की,गीतेचे भगवान कोण आहेत?सतयुगी देवी देवता धर्माची स्थापना करणारे
कोण आहेत?जर कृष्णासाठी म्हणतील तर,शिव पित्याचे नाव गायब करतील किंवा म्हणतील ते
नाव रूपापेक्षा वेगळे आहेत, जसे कि नाहीतच. तर पित्या शिवाय अनाथ झाले ना. बेहद च्या
पित्याला जाणत नाहीत.एक दोघे काम कटारी चालवुन खुप तंग करतात.एक-दोघांना दुःख
देतात.तर या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये चालायला पाहिजेत.हे लक्ष्मी नारायण
भगवान भगवती आहेत ना,यांचे पण वंशावळ आहे ना.तर जरूर असेच सर्व देवी देवता
पाहिजेत.तर तुम्ही सर्व धर्माच्या लोकांना बोलवतात.जे चांगल्या प्रकारे शिकलेले
आहेत,पित्याचा परिचय देऊ शकतात त्यांनाच बोलवायचे आहे.तुम्ही लिहू शकता, येऊन
रचनाकार आणि रचना च्या आदी मध्यं अंतचा परिचय देतील, त्यांना आम्ही येण्या-जाण्याचा,
राहण्याचा सर्व प्रबंध करु. हे तर जाणतात कोणीही हे ज्ञान देऊ शकत नाही. जरी कोणी
परदेशातून आले, रचनाकार आणि रचनेचा परिचय दिला तर आम्ही त्यांचा येण्या-जाण्याचा
खर्च देऊ,अशी जाहिरात कोणी करू शकत नाही. तुम्ही तर बहादूर आहात ना.महावीर महावीरनी
आहात.तुम्ही जाणतात,लक्ष्मी नारायण नी विश्वाची बादशाही कशी घेतली?कोणती बहादुरी
केली?बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी यायला पाहिजेत.तुम्ही खूपच श्रेष्ठ कार्य करत
आहात,साऱ्या विश्वाला पावन बनवत आहात,तर बाबांची आठवण करायची आहे आणि वारशाची पण
आठवण करायची आहे, फक्त असे नाही की शिव बाबांची आठवण आहे परंतु त्यांची महिमा पण
सांगायची आहे.ही महिमा निराकारची आहे,परंतु आपला परिचय कसे देतील?जरूर रचना च्या आदी
मध्यं अंतचे ज्ञान देण्यासाठी मुख पाहिजे ना.मुखाची पण खूप महिमा आहे,मनुष्य गोमुख
वरती जातात,खूप धक्के खातात,काय काय गोष्टी बनवल्या आहेत.बाण मारला आणि गंगा
निघाली,गंगेला पतित पावन समजतात.आता पाणी कसे पतिता पासुन पावन बनवू शकते,पतित पावन
तर एकच पिता आहेत.ते पिता तुम्हा मुलांना शिकवत आहेत.बाबा म्हणतात असे असे करा, कोणी
येऊन पिता रचनाकार आणि रचनेचा परिचय देतील.साधू-संन्यासी इत्यादी हे पण जाणतात
की,ऋषी मुनी सर्व म्हणत होते,नेती नेती आम्ही ईश्वराचा परिचय जाणत नाही,म्हणजेच
नास्तिक झाले ना.आता पहा कोणी अस्तिक निघतात का?आता तुम्ही मुलं नास्तिक पासून
आस्तिक बनत आहात.तुम्ही बेहदच्या बाबांना जाणतात,जे तुम्हाला इतके श्रेष्ठ बनवत
आहेत. त्यांना पुकारतात पण,हे ईश्वरीय पिता, मुक्त करा. बाबा समजवतात यावेळी,रावणाचे
राज्य संपूर्ण विश्वा वरती आहे.सर्व भ्रष्टाचारी आहेत,परत श्रेष्ठचारी होतील.
मुलांच्या बुद्धी मध्ये आहे प्रथम पवित्र दुनिया होती.बाबा अपवित्र दुनिया थोडीच
बनवतील,बाबा तर येऊन पावन दुनियाची स्थापना करतात ज्याला शिवालय म्हटले जाते.शिवबाबा
शिवालय बनवतील ना.ते कसे बनवतात हे पण तुम्ही जाणतात.महाप्रलय,जलमय असे काही होत
नाही.ग्रंथांमध्ये तर अनेक कथा लिहिल्या आहेत. पाच पांडव राहिले आणि तेही हिमालयात
गेले परत त्याच्यापुढे कोणालाही माहिती नाही.या सर्व गोष्टीं बाबाच सन्मुख समजतात.हे
पण तुम्ही जाणतात ते पिता,शिक्षक आणि सद्गुरु पण आहेत.स्वर्गामध्ये हे मंदिर इत्यादी
नसतात,हे देवता होऊन गेले आहेत,ज्यांचे यादगार मंदिर आहेत.हे सर्व अविनाश नाटकामध्ये
नोंद आहे.सेकंड बाय सेकंड नवीन गोष्टी होत राहतात,चक्र फिरत राहते. आता बाबा मुलांना
सूचना तर चांगल्या प्रकारे देतात.अनेक देह अभिमानी मुलं आहेत,ते समजतात आम्ही तर
सर्व जाणले आहे,मुरली पण ऐकत नाहीत,त्यांना मुरलीची कदर नाही.बाबा समज
देतात,काहीवेळेस मुरली खूपच चांगली चालते,मुरली कधीच बुडवायची नाही.१०-१५ दिवसाची
मुरली जी बुडाली आहे,ती बसून वाचायला पाहिजे.हे पण बाबा समजतात अशा प्रकारे आव्हान
द्या,रचनाकार आणि रचनेच्या आधी मध्य अंतचे ज्ञान कोणी येऊन दिले,तर त्यांचा सर्व
खर्च करू. असे आव्हान तर तेच देतील,जे जाणत असतील.शिक्षक स्वतः जाणतात,तेव्हा विचारू
शकतात.जाणल्या शिवाय कसे विचारतील.
काही काही मुलं,मुरली ची काळजी करत नाहीत. बस आमचा तर संबंध शिवबाबा शी आहे परंतु
शिवबाबा जे ऐकवतात,त्याला पण ऐकले पाहिजे, न की फक्त त्यांची आठवण करायची.बाबा खूपच
चांगल्या चांगल्या,गोड गोड गोष्टी ऐकतात परंतु माया बिलकुलच मगरूर बनवते. एक म्हण
पण आहे ना,उंदराला हळदीची गाठ मिळाली आणि तो समजू लागला मी खूप मोठा व्यापारी
आहे.अनेक मुलं आहेत,जे मुरली वाचत नाहीत.मुरली मध्ये नव नवीन गोष्टी मिळतात,तर
यासर्व गोष्टी समजण्याच्या आहेत.जेव्हा बाबाच्या आठवणीमध्ये बसता,तर हे पण आठवण
करायची आहे की,ते पिता, शिक्षक आणि सद्गुरू पण आहेत, नाहीतर कसे शिकाल कसे?बाबांनी
मुलांना सर्व ज्ञान दिले आहे.मुलंच पित्याला प्रत्यक्ष करतील,परत मुलांना पिता
प्रत्यक्ष करतात.आत्म्याला प्रत्यक्ष करतात, परत मुलांचे काम आहे पित्याला
प्रत्यक्ष करणे. बाबा पण मुलांना सोडत नाहीत,म्हणतात आज अमक्या ठिकाणी जावा,आज येथे
जावा,याला काही आदेश म्हणत नाहीत. तर हे निमंत्रण पेपर मध्ये पण द्यायला पाहिजे,या
वेळेत सर्व दुनिया नास्तिक आहे.बाबाच येऊन आस्तिक बनवतात, यावेळी सर्व दुनिया कवडी
तुल्य आहे.अमेरिके जवळ जरी खूप धनदौलत आहे परंतु कवडी तुल्यच आहेत.हे सर्व नष्ट
होणार आहे.साऱ्या दुनिया मध्ये तुम्हीच अमुल्य,हिरेतुल्य बनत आहात. स्वर्गामध्ये
कोणी गरीब असत नाही.तुम्हा मुलांना सदैव ज्ञानाचे स्मरण करत आनंदित राहायचे आहे,
त्याच्यासाठीच गायन आहे अतींद्रिय सुख गोपींना विचारा.या संगम युगाच्या गोष्टी
आहेत.संगम युगाला कोणीही जाणत नाही,विहंग मार्गाच्या सेवेसाठी कदाचीत महिमा होऊ
शकते.गायन पण आहे,हे प्रभू तुझी लीला अपरंपार आहे.हे कोणी पण जाणत नाहीत,भगवान पिता
शिक्षक आणि सद्गुरू पण आहेत.आता पिता तर मुलांना शिकवत राहतात. मुलांना हा
कायमस्वरूपी नशा राहायला पाहिजे.अंत काळापर्यंत नशा राहायला पाहिजेत.आत्ता तर नशा
लगेच सोडावॉटर होतो.सोडा पण असाच होतो ना थोडावेळ ठेवल्यानंतर, जसे खारे पाणी
होते.असे तर व्हायला नाही पाहिजे.कुणालाही अशाप्रकारे समजून सांगा, जे आश्चर्य
करतील.अच्छा अच्छा म्हणतात परंतु वेळ काढून समजून पण घ्यायला पाहिजे,जीवन बनवायला
पाहिजे,हे थोडे मुश्कीलच आहे.बाबा धंदा इत्यादी करण्यासाठी,मनाई करत नाहीत. पवित्र
बना आणि जे शिकवतो त्याची आठवण करा. हे तर शिक्षक आहेत ना,आणि हे शिक्षण अद्वितीय
आहे, कोणताही मनुष्य शिकू शकत नाही. बाबाच भाग्यशाली रथामध्ये घेऊन शिकवतात. बाबांनी
समजावले आहे, हे तुमचे अकालतख्त आहे,ज्यावर अकालमुर्त आत्मा येऊन बसते. आत्म्याला
ही भूमिका मिळाले आहे. आता तुम्ही समजता या तर खऱ्या गोष्टी आहेत, बाकी तर सर्व नकली
गोष्टी आहेत.हे चांगल्या रीतीने धारण करून गाठ बांधा, तर हात लावल्यामुळे आठवण येईल
परंतु गाठ का बांधली हे पण विसरतात. तुम्हाला तर हे चांगल्या प्रकारे आठवण करायचे
आहे. बाबांच्या आठवणी सोबत ज्ञान पण पाहिजे. मुक्ती पण आहे आणि जीवनमुक्ती पण
आहे.मुलांनो खूपच गोड बना. बाबा समजवतात,कल्प कल्प मुलं शिकत राहतात, नंबरानुसार
पुरुषाप्रमाणे वारसा ही घेतील.तरीही ही शिक्षकाचे काम आहे शिकवणे,पुरुषार्थ तर
करवतील ना. तुम्ही सारखे सारखे विसरता म्हणून आठवण करून दिली जाते.शिव बाबांची आठवण
करा,ते पिता शिक्षक आणि सद्गुरु पण आहेत. लहान मुलं अशाप्रकारे आठवण करू शकणार
नाहीत.कृष्णासाठी असे थोडेच म्हणनार,ते पिता शिक्षक आणि सद्गुरू आहेत.सतयुगाचे
राजकुमार श्रीकृष्ण, ते गुरु कसे बनतील.दुर्गती झाल्यानंतर गुरु पाहिजेत ना.गायन पण
आहे बाबा येऊन सर्वांची सद्गगती करतात.कृष्णाला तर सावळे असे बनवतात, जसे काळा कोळसा.
बाबा म्हणतात या वेळेत सर्व काम चितावरते चढून काळा कोळश्या सारखे बनले आहेत,म्हणून
सावळे म्हटले जाते. अनेक रहस्ये युक्त गोष्टी समजण्याच्या आहेत. गीता तर सर्व
वाचतात. भारतवासी सर्व ग्रंथाला मानतात, सर्वांचे चित्र ठेवतात, तर त्यांना काय
म्हणाल, व्यभिचारी भक्ती झाली ना.अव्यभिचारी भक्ती एका शिवाची च आहे.ज्ञान पण एकाच
शिव बाबांकडून मिळते. हे ज्ञान अगदीच वेगळे आहे, याला अध्यात्मिक ज्ञान म्हटले
जाते.अच्छा,
गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या, मुलां प्रति मात पिता, बाप दादांची
प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) विनाशी
नशेला सोडून अलौकिक नशेमध्ये रहा की,आम्ही आत्ता कवडी तुल्य पासून,हिरेतुल्य बनत
आहोत,स्वयम् भगवान आम्हाला शिकवत आहेत. आमचे हे शिक्षण अद्वितीय आहे.
(२) आस्तिक बणुन बाबांना प्रत्यक्ष करण्याची, सेवा करायचे आहे. कधीच मग्रूर बनवून
मुरली चुकवायची नाही.
वरदान:-
प्रत्येक पाऊला
मध्ये वरदाता द्वारे वरदान प्राप्त करून,कष्टापासून मुक्त राहणारे अधिकारी आत्म भव.
जे आहेतच
वरदाता ची मुलं,त्यांच्या प्रत्येक पाऊला मध्ये वरदाता पासून वरदान स्वतःच मिळते.
वरदानच त्यांची पालन आहे. वरदानाच्या पालना द्वारे सांभाळ होतो. कष्टाशिवाय इतकी
श्रेष्ठ प्राप्ती होणे, यालाच वरदान म्हणले जाते, तर जन्म जन्म प्राप्तीचे अधिकारी
बनले.प्रत्येक पाऊला मध्ये वरदानाचे वरदान मिळत आहे आणि नेहमीच मिळत राहील.अधिकारी
आत्म्यासाठी दृष्टी द्वारे बोल द्वारे,सबंध द्वारे वरदानच वरदान आहे.
बोधवाक्य:-
वेळेच्या
गतीप्रमाणे पुरुषाची गतीपण तीव्र करा.