29-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, राजाई प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे राजयोगाचे शिक्षण घेत आहात, हे तुमचे
नविन शिक्षण आहे."
प्रश्न:-
या
शिक्षणामध्ये काही मुले नापास का होतात?
उत्तर:-
कारण येथे
मायेसोबत युध्द आहे. मायेसोबत असणाज्या या युध्दात, बुध्दीला जबरदस्त मार बसतो. मार
बसल्यामुळे बाबांसोबत सत्यतेने वागत नाहीत. सत्य वागणारी मुले सदैव सुरक्षित राहतात.
ओम शांती।
हा तर सर्व मुलांना निश्चय आहे की, आम्हा आत्मारुपी मुलांना परमात्मा पिता शिकवितात.
पाच हजार वर्षानंतर एकदाच येऊन बेहदचे पिता बेहदच्या मुलांना शिकवितात. एखादा नविन
मनुष्य हे ऐकेल तर त्याला काही समजणार नाही. आत्मिक पिता, आत्मिक मुले म्हणजे काय,
हे सुध्दा कळणार नाही. तुम्ही मुले जाणता कि, आम्ही सर्व भाऊ-भाऊ आहोत. ते आमचे पिता,
शिक्षक व सतगुरु आहेत. तुम्हा मुलांच्या आपोआप हे लक्षात राहिल. येथे बसून समजणार
कि, सर्व आत्म्यांचा एक आत्मिक पिता आहे. सर्व आत्मे त्यांचीच आठवण करतात. मग तो
कोणत्याही धर्मांचा असो. सर्व मनुष्य मात्र जरुर त्याची आठवण करतात. बाबा समजावतात
सर्वांमध्ये आत्मा तर आहे ना. आता बाबा सांगतात-देहाचे सर्वधर्म विसरा आणि माझी
आठवण करा. आता तुम्ही आत्मा येथे अभिनय करत आहात. कसा अभिनय करतात, बजावतात हे
सुध्दा समजावले आहे. मुले सुध्दा नंबरवार पुरुषार्था प्रमाणे समजतात. तुम्ही राजयोग
आहात ना! शिकणारे सर्व योगीच असतात. शिकवणाज्या शिक्षकांसोबत योग ठेवावाच लागतो.
आपले ध्येयसुध्दा लक्षात असते. या शिक्षणाने आम्ही अमूक बनणार आहोत. हे शिक्षण तर
एकच आहे. याला म्हणतात-राजांचेही महाराजा, बनण्याचे शिक्षण, राजयोग आहे ना. राजाई
मिळविण्यासाठी बाबांशी योग. दुसरा कोणी मनुष्य हा राजयोग कधी शिकवू शकत नाही.
तुम्हालाही कुणी मनुष्य शिकवत नाही. तुम्हा आत्म्यांना परमात्मा शिकवतात, तुम्ही
पुन्हा इतरांना शिकवता. तुम्ही सुध्दा स्वत:ला आत्मा समजा. आम्हा आत्म्यांना बाबा
शिकवितात. हे आठवणीत न राहिल्यामुळे वाणीला तेवढी धार येत नाही, म्हणून अनेकांच्या
बुध्दीत ज्ञान बसत नाही. बाबा सतत सांगतात कि, योगयुक्त होऊन, आठवणीच्या यात्रेत
राहून समजवा, आम्ही आत्मा रुपी भाऊला सांगत आहोत. तुम्ही पण आत्मा आहात. हे सर्वांची
पिता, शिक्षक, सद्गुरु आहेत, आत्म्याला पहा. जरी गायन करतात सेकंदात जीवनमुक्ती
परंतु यात खुप कष्ट आहेत. आत्म अभिमानी न बनल्यामुळे तुमच्या वाणीमध्ये शक्ती राहत
नाही. कारण ज्याप्रकारे बाबा समजावतात त्याप्रकारे कुणीही समजावत नाही. काही जण खुप
चांगल्या रितीने समजावतात. कोण काटा आहेत कोण फुल आहे. माहित तर होते. शाळेतही मुले
पाचवी-सहावी शिकून पुढच्या वर्गात जातात. चांगली मुले जेव्हा बदली होतात तेव्हा
दुसज्या वर्गातील शिक्षकांनाही लगेच माहित होते. ही मुले खुप हुशार आहेत.
चांगल्याप्रकारे शिकलेली आहेत म्हणून तर जास्त मार्क मिळाले आहेत. शिक्षकांना तर
समजते ना, ते आहे लौकिक शिक्षण, येथे ती गोष्ट नाही. हे आहे पारलौकिक शिक्षण. येथे
असे म्हणू शकत नाही की, हे चांगल्याप्रकारे शिकून आलेत म्हणून हुशार आहेत. नाही त्या
परीक्षेत तर पुढच्या वर्गात बदली होते तेव्हा शिक्षक समजतात, यांनी अभ्यासाचे कष्ट
घेतले आहेत, म्हणून चांगले गुण मिळाले आहेत. हे तर नविन शिक्षण आहे. जे कुणी शिकलेले
नाही. शिक्षण नवे व शिकविणाराही नवा आहे. सर्व नवीन आहेत, नविनांना शिकवतात जे
चांगल्याप्रकारे शिकतात त्यांना हुशार म्हणता येईल. हे आहे नव्या दुनियेसाठी नविन
ज्ञान, दुसरे कोणी शिकविणारा नाही. काही तर खुप मधुर आणि आज्ञाकारी आहेत,
पाहिल्यावरच लक्षात येते की, हा शिकवणारा खुपच चांगला आहे, यांच्यामध्ये कोणताही
अवगुण नाही. चालण्या-बोलण्यावरुनच माहित होते. बाबा सर्वांना विचारतात कि, हा कसा
शिकवतो, यांच्यामध्ये कोणती कमजोरी तर नाही ना. असे खुप जण म्हणतात कि, मी विचारल्या
शिवाय कधी समाचार दयाचा नाही. काही चांगले शिकवितात. काही हुशार नसतात. मायेचा वार
होतो. बाबा हे जाणतात कि, माया यांना खुप धोका देते. भले 10 वर्षे शिकवत आहेत पण
माया इतकी जबरदस्त आहे, देह अभिमान आला कि फसला, बाबा सांगतात-जो पण पहिलवान आहे,
त्यांना मायेचा वार होतो. माया सुध्दा जे शक्तीशाली आहेत त्यांच्याशी शक्तीशाली
बनून युध्द करते.
तुम्ही समजत असाल की, बाबांनी ज्यामध्ये प्रवेश केला तो पहिला नंबर आहे, पण नंबरवार
खुप आहेत ना. बाबा उदाहरण म्हणून एक-दोघांचे देतात. नंबरवार अनेक आहेत. जसे
दिध्ल्लीत गीता ही मुलगी खुप हुशार आहे. मुलगी खुप गोड आहे. बाबा नेहमी म्हणतात-गीता
तर खरी गीता आहे. लोक ती गीता वाचतात, पण हे समजत नाहीत की, ईश्वराने कशाप्रकारे
राजयोग शिकवून, राजांचेही राजा बनवले होते. सतयुगात एकच धर्म होता, कालचीच गोष्ट आहे.
बाबा म्हणतात काल तुम्हाला इतके साहुकार बनवले होते. तुम्ही पद्मापद्म भाग्यशाली
होता, आता तुम्ही काय बनला आहात. तुम्हाला अनुभव होतो ना, ती गीता सांगणाज्यांकडून
तुम्हाला काही अनुभव होतात का? जरा सुध्दा समजत नाहीत. सर्वश्रेष्ठ म्हणून
श्रीमतभगवत गीतेचे गायन केले जाते. ते तर गीतेचे पुस्तक वाचतात व सांगतात. बाबा तर
पुस्तक वाचत नाहीत. फरक आहे ना. ते आठवणीची यात्रा तर करीत नाहीत. त्यांची उतरती
कलाच होत राहते. सर्वव्यापीच्या ज्ञानाने सर्वजण कसे बनलेत ते पहा. तुम्ही जाणता
कल्प-कल्प असेच होणार. बाबा सांगतात-तुम्हाला शिकवून विषय सागरातून पार करतो. किती
फरक आहे. शास्त्र वाचणे हा भक्तीमार्ग आहे. बाबा म्हणतात ग्रंथ वाचून मला कुणी भेटू
शकत नाही. ते समजतात कि, कुठेही गेलात तरी सर्वांना एकाच ठिकाणी पाहोचायचे आहे. कधी
म्हणतात-ईश्वर कोणत्या न कोणत्या रुपांत येऊन शिकविणार. जर बाबांना येऊन शिकवायचे
आहे तर तुम्ही काय शिकविता? बाबा समजावतात कि, गीतेमध्ये पीठामध्ये जेवढे मीठ घालतो
तेवढीच अक्षरे बरोबर आहेत. यामध्ये तुम्ही पकडू शकता. सतयुगात तर कोणतेही शास्त्र
वगैरे काही नाही. ही शास्त्रे भक्तीमार्गातील आहेत. ही शास्त्रे अनादि आहेत असे
म्हणू शकत नाही. सुरुवातीपासून नाहीत. अनादि याचा अर्थ समजला नाही. बाबा समजावतात
हे नाटक अनादि बरोबर आहे. तुम्हाला बाबा राजयोग शिकवतात. बाबा म्हणतात आता तुम्हाला
शिकवतो आणि पुन्हा गायब होतो. तुम्ही म्हणाल आमचे राज्य अनादि होते. राज्य तेच आहे
फक्त पवित्र पासून बदलून पतित झाल्यामुळे नाव बदलले. देवताऐवजी हिंदू म्हणतात. आदि
सनातन देवी देवता धर्माचे आहेत ना. जसे दुसरे सतोप्रधान होते नंतर सतो, रजो, तमो
बनले तशी तुमचीही उतरती कला होते. रजोमध्ये आल्यानंतर अपवित्र बनल्यामुळे देवताऐवजी
हिंदू म्हणवून घेतो. नाहीतर हिंदू हे हिंदुस्थानचे नांव आहे. तुम्ही खरेतर देवी
देवता होता ना. देवता सदैव पवित्र असतात. आता तर मनुष्य पतित बनले आहेत. तेव्हा
नावही हिंदू असे ठेवले आहे. विचारा कि, हिंदू धर्म कधी, कुणी रचला? तर सांगू शकत
नाहीत. आदि सनातन देवी देवता धर्म होता. ज्याला नंदनवन वगैरे खुप सुंदर नावे देतात.
जो भुतकाळ होऊन गेला आहे त्याची पुनरावृत्ती होईल. यावेळी तुम्ही सुरुवातीपासून
अंतकाळापर्यंत सर्व काही जाणता. लक्षात ठेवाल तर जीवंत राहाल. काहींचा तर मृत्यू
होतो. बाबांचे बनतात तर मायेसोबत युध्द सुरु होते. युध्द झाल्यामुळे निंदक बनतात.
रावणाचे होते ते रामाचे बनतात. पुन्हा रावण रामाच्या मुलांवर विजय मिळवतो आणि
आपल्याकडे घेऊन जातो. काही रोगी बनतात. पुन्हा इकडचेही राहत नाहीत व तिकडचेही राहत
नाहीत. खुशीही नाही व नाराजही नाही. मध्येच अडकुन पडतात. अशी मध्येच अडकुन पडलेली
मुले तुमच्याकडेही खुप आहेत. बाबांचेही पुर्णपणे बनत नाहीत व पुर्णपणे रावणाचेही
बनत नाहीत. आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगात आहात. उत्तम पुरुष बनण्यासाठी
पुरुषार्थ करीत आहात. या फार समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा विचारतात तेव्हा
अनेक मुले हात वर करतात. पण बाबा समजतात एवढी बुध्दी नाही. भले बाबा म्हणतात की,
शुभ बोला म्हणतात तर सगळेच आम्ही नरापासून नारायण बनणार. ही कथाच नरापासून नारायण
बनण्याची आहे. अज्ञान काळात सुध्दा सत्यनारायणाची कथा ऐकतात. तिथे तर कुणी असे
विचारत नाही. येथे बाबा विचारतात, तुम्हाला काय वाटते-एवढी हिम्मत आहे? तुमहाला
पवित्रही जरुर बनायचे आहे. कोणी नविन आले तर त्यांना विचारले जाते, या जन्मांत काही
पापकर्म तर केले नाही ना? जन्म-जन्मांचे पापी तर आहातच. या जन्मातील केलेले पाप
सांगा, तर हल्के व्हाल. नाहीतर ते मनाला खात राहिल. खरे सांगितल्यास हलके वाटेल.
काही मुले खरे सांगत नाहीत, तर माया एकदम जोरात चापट मारते. तुमचे खुप मोठे युध्द
आहे. त्या युध्दात तर शरीराला जखम होते. येथे बुध्दीवर फार मोठा आघात होतो, हे
बाबांनाही माहित आहे. हे ब्रह्मा सांगतात मी खुप जन्म घेतले, हा माझा शेवटचा जन्म
आहे. सर्वांत पवित्र होतो, आता सर्वांत पतित बनलो आहे. पुन्हा पवित्र बनत आहे. असे
तर म्हणत नाही की, मी महात्मा आहे. बाबा सुध्दा खात्रीने सांगतात कि, हा सर्वांत
जास्त पतित आहे. बाबा म्हणतात मी परक्या देशात, परक्या शरीरात येतो. यांच्या अनेक
जन्मांच्या शेवटी, मी यांच्यात प्रवेश करतो, ज्याने पुर्ण 84 जन्म घेतले आहेत. आता
ब्रह्मासुध्दा पवित्र बनण्याचा पुरुषार्थ करीत आहेत. खबरदार सुध्दा खुप राहावे लागते.
बाबा तर जाणतात ना, हा बाबांचा मुलगा बाबांच्या जवळ आहे. हे तर बाबा च्या पासून
वेगळे कधी होऊच शकत नाहीत. विचार सुध्दा येत नाही की, बाबांना सोडुन जावे. एकदम
बाबांच्या बाजूला बसले आहेत. बाबा तर माझे आहेत ना. माझ्या घरात बसले आहेत. बाबा
जाणतात-मनोरंजन सुध्दा करतात. बाबा आज मला आंघोळ घाला. भोजन खाऊ घाला. मी तर लहान
मुलगा आहे. खुप वेगवेगळ्या प्रकारे बाबांची आठवण करतात. तुम्हां मुलांना समजावतो
कि, अशाप्रकारे बाबांची आठवण करा. बाबा, तुम्ही फार मधुर आहात. एकदम आम्हाला
विश्वाचे मालक बनवत आहात. ही गोष्ट इतर कुणाच्या बुध्दीत येणार नाही. बाबा सर्वांना
ताजेतवाने बनवितात. सर्वजण पुरुषार्थ तर करतात, पण चलनसुध्दा तशी हवी ना. चुक झाली
तर पटकन लिहुन सांगितले पाहिजे-बाबा, माझ्याकडून ही चुक होते. काहीजण लिहितात सुध्दा.
बाबा, माझ्याकडून ही चुक झाली, मला माफ करा. माझा मुलगा बनून जर चुक केली तर त्यात
100 पटीने वाढ होते. मायेकडून हरल्यानंतर पुन्हा आहे तसेच बनतात. खुप जण हरतात. हे
फार मोठे युध्द आहे. राम आणि रावणाचे युध्द आहे. वानरांची सेना दाखवतात. हा सर्व
खेळ मुलांवरतीच बनलेला आहे. जसे छोटी मुले बेसमज असतात ना. बाबाही म्हणतात की, ही
तर मुलांची पाई पैशाची बुध्दी आहे, असे म्हणतात-प्रत्येक जण ईश्वराचे रुप आहे,
म्हणजे प्रत्येक जण ईश्वर बनून रचनाही करतो, पालनाही करतो आणि पुन्हा विनाशही करतो.
आता ईश्वर थोडेच विनाश करतील. हे तर किती मोठे अज्ञान आहे, म्हणून म्हणतात बाहुलींची
पुजा करतात. आश्चर्य आहे. मनुष्यांची बुध्दी कशी झालेली आहे. किती खर्च करतात. बाबा
टोमणे मारतात की, मी तुम्हाला एवढे मोठे बनवले, पण तुम्ही काय केले? तुम्ही सुध्दा
जाणता की, आम्हीच देवता होतो पुन्हा चक्रात आलो आणि आता आम्ही ब्राह्मण बनलो आहे.
पुन्हा आम्हीच देवता बनणार आहोत, हे तर बुध्दीत आहे ना. येथे बसल्यानंतर, हे ज्ञान
बुध्दीत असले पाहिजे. राहते ना! बाबा सुध्दा ज्ञानाचे सागर आहेत ना. शांतीधाममध्ये
राहतात पण तरीही त्यांना ज्ञानाचा सागर असे म्हणतात, तुमच्याही आत्म्यात संपूर्ण
ज्ञान आहे ना. असे म्हणतात कि, या ज्ञानाने आमचे डोळे उघडले. बाबा तुम्हाला ज्ञानाचे
नेत्र देतात. आत्म्याला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान प्राप्त झाले आहे. हे
चक्र फिरतच राहते. स्वदर्शनचक्र ब्राह्मणांना मिळते. देवतांना शिकविणारा कुणी नाही.
त्यांना शिकण्याची गरज नाही. शिकायचे तर तुम्हाला आहे कारण पुन्हा तुम्हीच देवता
बनणार आहात. आता बाबा नव-नविन ज्ञान सांगतात. हे नविन ज्ञान ऐकुन तुम्ही उच्च देवता
बनणार आहात. जे पहिल्यांदा आले ते शेवटी येणार व जे शेवटी येतात ते पहिल्यांदा
येणार. हे शिक्षण आहे ना. आता तुम्ही समजता बाबा प्रत्येक कल्पांत येऊन पतितापासून
पावन बनवितात. पुन्हा हे ज्ञान नष्ट होते. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. खुप-खुप
आज्ञाकारी, गोड बना. देह-अहंकारात येऊ नका. बाबांचा मुलगा बनून पुन्हा कोणती चुक करु
नका. मायेसोबतच्या युध्दात खुप खबरदार राहा.
2. आपल्या वाणीत शक्ती येण्यासाठी आत्म-अभिमानी बनण्याचा अभ्यास करा. लक्षात
ठेवा-बाबांना जे शिकवले तेच आम्ही इतरांना सांगतो तर त्यामध्ये ताकत येईल.
वरदान:-
अपवित्रतेचा
अंश, आळस आणि अलबेला पण यांचा त्याग करणारे संपूर्ण निर्विकारी भव
दिवसभरात कोणतेही
कर्म खाली वर होणे, आळस येणे किंवा अलबेलापण हा विकाराचा अंश आहे, ज्याचा प्रभाव
पुज्यनीय बनण्यावर पडतो. जर तुम्ही अमृतवेलेला स्वत:ला जागृत स्थितीत असल्याचा
अनुभव करीत नसाल, मजबुरीने अथवा सुस्तीने बसत असाल तर पुजारी सुध्दा मजबुरीने अथवा
सुस्तीने पुजा करतील. तर आळस आणि अलबेला पणाचा त्याग करा, तेव्हाच संपूर्ण
निर्विकारी बनाल.
बोधवाक्य:-
सेवा खुशाल करा
पण व्यर्थ खर्च करु नका...!!!