15-12-2019 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
21.03.1985 ओम शान्ति
मधुबन
सुदर्शन चक्रा द्वारे
विजय चक्राची प्राप्ती.
आज बापदादा आत्मिक
सेनापतीच्या रुपामध्ये आपल्या आत्मिक सेनला पाहत आहेत.या आत्मिक सेने मध्ये
कोणते,कोणते महावीर आहेत,कोणते शक्तिशाली शस्त्र धारण केले आहेत.यासाठी शारीरिक
शस्त्रधारी दिवसें दिवस अतीसूक्ष्म आणि तीव्रगतीचे शक्तीसंपन्न साधन बनवत जातात,असे
आत्मिक सेना अतीसुक्ष्म शक्तीशाली शस्त्रधारी बनले आहात का?जसे विनाशाकारी आत्म्याने
एका स्थाना वरती बसून अनेक मैल दूरवर विनाशकारी किरणा द्वारे विनाश करण्यासाठी साधन
बनविले आहेत,तिथे जाण्याची पण आवश्यकता नाही,दूर बसूनच निशाणा लावू शकतात.असे
आत्मिक सेना स्थापनाकारी सेना आहे.ते विनाशकारी आणि तुम्ही स्थापना कारी आहात.ते
विनाशाचे नियोजन करतात आणि तुम्ही नवीन रचनेच्या विश्व परिवर्तनाचे नियोजन
करतात.स्थापनाकारी सेनाने,असे तीव्र गतीचे आत्मिक साधन धारण केले आहेत.एका स्थाना
वरती बसुन,पाहिजे तिथे आत्मिक किरणा द्वारे,कोणत्या पण आत्म्याला जाणीव करून देऊ
शकता,टच करु शकता. परिवर्तन शक्ती इतक्या तीव्र गतीची सेवा करण्यासाठी तयार
चक्राज्ञान अर्थात शक्ती सर्वांना प्राप्त होत आहे ना.ज्ञानाच्या शक्तीद्वारे असे
शक्तिशाली शस्त्रधारी बनले आहात. महावीर बनले आहात की वीर बनले आहात. विजयाचे चक्र
प्राप्त केले आहे.शारीरिक सेनेला अनेक प्रकारच्या चक्रचे नाम बक्षिसा मध्ये
मिळतात.तुम्हा सर्व सर्वांना सफलता चे बक्षीस विजय चक्र मिळालेल आहे. विजय झालेला च
आहे.असे निश्चय बुद्धी महावीर विजय चक्राचे अधिकारी आहेत. बापदादा पाहत आहेत कुणाला
विजय चक्र प्राप्त आहे.सुदर्शन चक्रा द्वारे विजय चक्राची प्राप्ती करत आहात.सर्व
शस्त्रधारी बनले आहात ना.या आत्मिक शस्त्रांची यादगार स्थुल रूपामध्ये तुमच्या
यादगार चित्रांमध्ये दाखवली आहे.देवींच्या चित्रांमध्ये शस्त्रधारी दाखवतात
ना.पांडवांना पण शस्त्रधारी दाखवतात.हे आत्मिक शस्त्र म्हणजे आत्मिक शक्ती रूपामध्ये
दाखवले आहे.वास्तव मध्ये सर्व मुलांना बापदादा द्वारा एकाच वेळेस एक सारखी ज्ञानाची
शक्ती प्राप्त होते.वेगवेगळे ज्ञान देत नाहीत तरीही नंबरानुसार का बनतात.बापदादांनी
कधी कोणत्या मुलांना वेगळे शिकवले आहे का?एकत्रच शिक्षण देतात ना.सर्वांना एकच
अभ्यास देतात ना, कोणत्या ग्रुप ला वेगळा अभ्यास शिकवतात का? कुणालाच नाही.हे सहा
महिन्याचे ईश्वरी विद्यार्थी आहेत,ते पन्नास वर्षाचे आहेत,तरीही एकाच वर्गामध्ये
बसतात.वेगवेगळे बसतात का?एकाच वेळेस आणि सर्वांना एकत्र शिकवतात,जर कोणी ऊशीरा आले
असतील,तर जो प्रथम शिकवलेला अभ्यास, चुकलेला असेल,तोच अभ्यास बाबा परत सर्वांना
शिकवतात.जो रिवाईज कोर्स चालत आहे, तोच तुम्ही पण शिकत आहात, की जुन्यां साठी वेगळा
कोर्स आहे,तुमचा वेगळा आहे,सर्वांसाठी एकच कोर्स आहे ना.चाळीस वर्षापासुन जे ज्ञान
घेतात,त्यांच्यासाठी मुरली वेगळी आणि सहा महिने मुरली ऐकत आहेत त्यांच्यां साठी पण
एकच मुरली आहे ना. शिकवणारे पण एकच आहेत,शिक्षण पण एकच आहे,तरीही नंबरानुसार का
बनतात? की सर्वच नंबर एक आहेत.नंबर का बनतात? कारण राजयोगाचे शिक्षण सर्वच घेतात
परंतु ज्ञान म्हणजे एकेक गोष्टीला शस्त्र किंवा शक्तीच्या रूपांमध्ये धारण करणे आणि
ज्ञानाच्या गोष्टीला फक्त मुद्द्याच्या रूपामध्ये धारण करणे यामध्ये अंतर होते.काही
ऐकून फक्त मुद्द्याच्या रूपामध्ये मध्ये धारण करतात आणि त्या धारण केलेल्या
मुद्द्यांचे वर्णन पण चांगले करतात.भाषण करणे किंवा कोर्स देण्यामध्ये जास्तीत
जास्त मुलं हुशार आहेत. मुलांचे भाषण किंवा कोर्स करण्यामुळे बापदादा पण खूष खुश
होतात.काही मुलं तर बापदादा पेक्षा चांगले भाषण करतात.ज्ञानाला मुद्द्याच्या रुपा
मध्ये धारण करणे आणि ज्ञानाच्या एका एका मुद्द्याला शक्तीच्या रुपामध्ये धारण
करणे,यामध्ये अंतर पडते.जसे नाटकाच्या मुद्दयाची गोष्ट आहे.हे फार मोठे विजय
प्राप्त करण्याचे शक्तिशाली शस्त्र आहे.ज्याला नाटकाच्या ज्ञानाची शक्ती,प्रत्यक्ष
जीवनामध्ये धारण केली आहे,ते कधीच हलचल मध्ये येऊ शकत नाहीत.सदा एकरस अचल अडोल एकरस
बनवण्यासाठी विशेष शक्ती,हा अविनाश नाटकाचा मुद्दा आहे. शक्तीच्या रूपामध्ये धारण
करणाऱ्यांची कधीच हार होऊ शकत नाही परंतु जे फक्त मुद्द्याच्या रुपयांमध्ये धारण
करतात ते काय करतात?अविनाश नाटकाचा मुद्दा वर्णन करतात आणि हलचल मध्ये पण येतात,
अविनाशी नाटकाचे मुद्दे पण बोलत राहतात. कधी कधी डोळ्यांमध्ये अश्रू येतात,माहित
नाही काय होईल,माहित नाही काय आहे.अविनाश नाट्याचा मुद्दा पण बोलत राहतात,विजयी
बनायचे आहे,विजयी आहातच.अविनाश नाटक पण आठवणीत आहे परंतु माहित नाही काय झाले? तर
याला काय म्हणावे? शक्तीचा रुपामध्ये,शस्त्राच्या रुपामध्ये धारण केले की, फक्त
मुद्द्याच्या रुपामध्ये धारण केले.असेच आत्म्याच्या प्रती पण म्हणतात,शक्तिशाली
आत्मा आहे,सर्वशक्तिमान ची मुलगी आहे,मुलगा आहे, ही गोष्ट फार मोठी आहे.अशी गोष्ट
कधी आम्ही विचार केली नव्हती.कुठे मास्टर सर्वशक्तिमान आत्मा आणि कुठे हे बोल?चांगले
वाटते का?याला काय म्हणणार?तर एक आत्म्याचा पाठ,परम आत्म्याचा पाठ,नाटकाचा पाठ,८४
जन्माचा पाठ,किती पाठ आहेत? सर्वांना शक्ती म्हणजे शस्त्राच्या रुपामध्ये धारण करणे
म्हणजे विजयी बनणे.फक्त मुद्द्याच्या रुपा मध्ये धारण करणे तरी कधी ज्ञान मुद्दे
कामाला येतात,कधी येत नाहीत.परत ज्ञान मुद्याच्या रूपामध्ये धारण करणारे,सेवेमध्ये
व्यस्त असल्यामुळे आणि ज्ञान मुद्द्याचे सारखे सारखे वर्णन केल्यामुळे,माये पासून
सुरक्षित राहतात.परंतु जेव्हा कोणती परिस्थिती किंवा माया शक्ती रूपांमध्ये समोर
येते,तेव्हा नेहमीच विजयी बनू शकत नाहीत.ते ज्ञान मुद्द्याचे वर्णन करत राहतील परंतु
शक्ती न मिळाल्यामुळे नेहमीच विजयी बनू शकत नाहीत. तर समजले नंबरा नुसार का
बनतात?आता हे तपासून पहा की, प्रत्येक ज्ञानाच्या मुद्द्याला,शक्ती रुपामध्ये
शस्त्राच्या रुपामध्ये धारण केले आहे ?फक्त ज्ञानवान बनले की, शक्तिशाली पण बनले
आहात? ज्ञानासोबत च शक्तिशाली बनले की,फक्त ज्ञानसंपन्न बनले.यर्थात ज्ञान लाईट आणि
शक्ती रुपामध्ये आहे.त्या रुपामध्ये धारण केले?वेळेवरती ज्ञान विजय बनू शकत नाही,तर
ज्ञान शक्तीच्या रुपा मध्ये धारण केले नाही.जर कोणताही योध्दा वेळे वरती शस्त्र
कार्यामध्ये लावू शकत नाहीत तर त्याला काय म्हणणार? महावीर म्हणनार? ही ज्ञानाची
शक्ती कशासाठी मिळाली आहे? माय जीत बनण्यासाठी मिळाली आहे ना,की वेळ निघून
गेल्यानंतर ज्ञानाचे मुद्दे आठवणीत येतील,करायला तर पाहिजे होते,विचार केला होता.
तर हे तपासून पहा आता,शक्तीचा कोर्स कुठपर्यंत केला आहे.कोर्स करण्यासाठी सर्व तयार
आहात ना.असे कोणी आहे जे कोर्स करू शकत नाहीत.सर्वच करू शकतात, आणि खूप प्रेमाने
चांगल्या रुपाने,कोर्स करतात.बापदादा पण पाहतात,खूपच प्रेमाने अथक बणुन करतात,लगन
द्वारे करतात आणि करवतात.खुप चांगले कार्यक्रम करतात,तन-मन-धन पण लावतात.तेव्हा तर
इतकी वृध्दी झाली आहे.हे तर खूपच चांगले करतात परंतु आता वेळेप्रमाणे लहानपण पूर्ण
झाले आता युवा अवस्था मधून वानप्रस्थ अवस्थां मध्ये पोहचले आहात. कुठे पोहोचले
आहात?या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त नवीन आहेत परंतु परदेश सेवेची तर खूप वर्षे झाले
आहेत.
तसे तर तरुण-तरुणींमध्ये शक्ती पण खुप असते,जे पाहिजे ते करु शकतात.म्हणून आजकाल
शासन पण तरुणांना घाबरतात कारण तरुण ग्रुपमध्ये बुद्धीची शक्ती पण आहे आणि शारीरिक
शक्ती पण आहे.येथे तोडफोड करणारे नाहीत,बनवणारे आहेत.ते जोश मध्ये येणारे आणि तुम्ही
शांत स्वरुपा मध्ये राहणारे आहात.बिगडीला बनवणारे आहात,सर्वांचे कल्याण करणारे
आहात.ते तरुण दुःख देणारे आहेत आणि तुम्ही दुःख दूर करणारे आहात. दूखहर्ता सुखकर्ता
आहात.जसे बाबा तशीच मुलं आहेत.नेहमी प्रत्येक संकल्प,प्रत्येक आत्म्याच्या प्रती
किंवा स्वतःच्या प्रती सुखद संकल्प आहेत कारण दुःखाच्या दुनियेपासून बाहेर आले
आहात.या दुनिया मध्ये नाहीत, दुःखाधाम पासून सुखधाम मध्ये पोहोचले आहात.पुरुषोत्तम
युगा मध्ये बसले आहात.ते कलियुगी तरुण आहेत, तुम्ही संगम युगी तरुण आहात, म्हणून आता
नेहमी ज्ञानाला शक्ती रूपामध्ये धारण करा आणि करवुन घ्या. जितके स्वतः शक्तीच्या
रुपा मध्ये कोर्स केला असेल तेवढाच दुसर्यांना पण करू शकतात, नाही तर फक्त
ज्ञानाच्या मुद्द्याचा कोर्स करतात.आता कोर्सला परत रिवाईज करायचे आहे, एका एका
मुद्द्या मध्ये कोणती शक्य आहे,किती शक्ती आहे,कोणत्या वेळी कोणत्या शक्तीचा वापर
करायचा आहे,प्रशिक्षण स्वतःच,स्व:ताला देऊ शकतात. तर हे चेक करा आत्म्याच्या
मुद्द्याचे शक्तीशाली शास्त्र साऱ्या दिवसांमध्ये प्रत्यक्षात किती कार्यामध्ये
लावले.तुमचे प्रशिक्षण तुम्ही स्वतःच करू शकता कारण ज्ञान तर तुमच्या कडे आहे.
आत्म्याच्या प्रति ज्ञान मुद्दे काढायला सांगितले, तर पुष्कळ काढतील आणि काही
भाषणांमध्ये तर खूप हुशार आहेत परंतु एकेक मुद्द्याला पहा परिस्थितीच्या वेळेत किती
कार्यामध्ये लावले.हा विचार करु नका, ठीक तर राहत आहोत परंतु गोष्ट अशी होती
परिस्थिती आली तेंव्हा असे झाले.शस्त्र कोणासाठी असतात?जेव्हा दुश्मन येतात त्यासाठी
असतात ना,कि दुष्मन आला आणि मी हरलो,परंतू मायेसाठी तर शस्त्र आहेत ना. शक्ती
कोणासाठी धारण केली आहे,वेळेवरती विजय मिळवण्यासाठी शक्तिशाली बनलेत ना. तर समजलं
काय करायचे आहे? आपसात चांगले आत्मिक सुसंवाद करत राहतात. बापदादांना सर्व समाचार
मिळतात.बापदादा तर मुलांचा उमंग उत्साह पाहुन खुश होतात.मुरली शी प्रेम आहे,बाबांशी
प्रेम आहे, सेवेशी पण प्रेम आहे परंतु कधीकधी नाजूक बनतात आणि शस्त्र
सुटतात.त्यावेळेस त्यांची फिल्म काढुन परत त्यांनाच दाखवायला पाहिजे.थोड्याच
वेळासाठी असते,जास्त नाही परंतु नेहमीच निर्विघ्न राहणे आणि कधी विघ्न, कधी
निर्विघ्न चालत राहणे फर्क तर आहे ना. धाग्यामध्ये जितकी गाठ पडेल तेवढा धागा कमजोर
होतो,जोडला तरी,जोडलेली गोष्ट आणि साबूत गोष्टीमध्ये फरक तर पडतो ना. जोड दिलेली
गोष्ट चांगली वाटणार नाही, तर हे विघ्न आले आणि परत निर्विघ्न बनले,तुटले परत
जोडले,तर जोड तर झाला ना,याचा अवस्थे वरती प्रभाव पडतो.
काही चांगली,तीव्र पुरुषार्थी मुलं पण आहेत. ज्ञानवान, सेवाधारी पण आहेत.बापदादा
परिवाराच्या नजरे मध्ये पण आहेत परंतु जोडणे,तोडणे अशी आत्मा नेहमी शक्तिशाली
राहणार नाही.छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांना कष्ट घ्यावे लागतील.कधी नेहमी
हलके,आनंदी खुशी मध्ये नाचणारे असतील परंतु असे नेहमी नजर येणार नाहीत.महारथींच्या
लिस्टमध्ये असतील परंतू असे संस्कार असणारे कमजोर जरुर राहतात याचे कारण कोणते?तोडणे
जोडण्याचे संस्कार त्यांना मनामधून कमजोर करतात.असा विचार करू नका की माया आली.चालत
तर आहोत परंतु असे चालणे नाही.कधी तोडणे कधी जोडणे हे काय झाले? बाबांच्या आठवणी
मध्ये राहणे, नेहमी आनंदी,नेहमी छत्रछाया मध्ये राहणे,ते आणि या जीवनामध्ये अंतर आहे
ना, म्हणून बाबा म्हणतात कोणा कोणाची जन्म पत्री खूपच छान आहे.कोणा कोणाच्या मध्येच
डाग आहे,जरी तो डाग मिटवतात परंतु तो दिसून तर येत नाही ना.डागच पडायला नको.स्वच्छ
कागद आणि डाग मिटवलेला कागद कोणता चांगला वाटेल. स्वच्छ कागद ठेवण्याचा आधार खूपच
सहज आहे,घाबरू नका हे तर खूप मुश्कील आहे, नाही. खूपच सहज आहे कारण वेळ पण जवळ येत
आहे,वेळेला पण विशेष वरदान मिळालेले आहे.जे जितके उशिरा येतात त्यांना वेळेनुसार
जास्त लिफ्टची गिफ्ट पण मिळते आणि आता अव्यक्त रूपाची भुमिका वरदानीच आहे.तर वेळेची
पण तुम्हाला मदत आहे.अव्यक्त भूमिकेची,अव्यक्त सहयोगाची पण मदत आहे.तीव्र गतीने वेळ
जात आहे, याची पण मदत आहे.प्रथम तर संशोधन करण्यामध्ये वेळ गेला,आता तर सर्व तयार
आहेत.आता तुम्ही तयार साधना वर पोहचले आहात.हे पण वरदान कमी नाही.जे प्रथम आले
त्यांनी तर लोणी काढले तुम्ही लोक तर लोणी खाण्याच्या वेळेत पोहोचले,तर वरदानी झाले
ना.फक्त थोडेसे लक्ष ठेवा,बाकी कोणती मोठी गोष्ट नाही.सर्व प्रकारची मदत तुमच्या
सोबत आहे. आता तुम्हा लोकांना महारथी निमित्त आत्म्यांची इतकी पालना मिळत आहे, तेवढी
सुरुवातीला आलेल्यांना मिळाली नाही.एका एकाला वेळ काढुन भेटतात.सुरुवातीला तर जनरल
पालन मिळाली,परंतु तुम्ही तर लाडके बणुन पालना घेत आहात.सांभाळ केल्याचा मोबदला पण
देणार आहात ना,मुश्किल नाही,फक्त एक एका गोष्टीला शक्तीच्या रुपामध्ये वापरण्याचे
लक्ष ठेवा.समजले अच्छा.
नेहमी महावीर बणुन विजयी छत्रधारी आत्मे,नेहमी ज्ञानाच्या शक्तीला वेळे प्रमाण
कार्यामध्ये लावणारे,नेहमी अटल अचल अखंड स्थिती धारण करणारे,नेहमी स्वतःला मास्टर
सर्वशक्तिमान अनुभव करणारे,अशा श्रेष्ठ नेहमी मायाजीत विजयी मुलांना,बाप दादाची
प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
दादी सोबत
वार्तालाप:-अनन्य
रत्नांच्या प्रत्येक पाउला मध्ये स्वतःला तर करोडोंची कमाई आहे परंतु दुसऱ्यांना
सुध्दा करोडोची कमाई आहे.अनन्य रत्न नेहमीच प्रत्येक पाऊला मध्ये पुढे जात
राहतात.अनादी चावी मिळाली आहे,ऑटोमॅटिक चावी आहे.निमित्त बनणे म्हणजेच ऑटोमॅटिक चावी
लावणे होय. अनन्य रत्नांना अनादि चावी द्वारे पुढे जायचे च आहे. तुम्हा सर्वांच्या
प्रत्येक संकल्प मध्ये सेवा भरलेली आहे.एक निमित्त बनतो,अनेक आत्म्यांना उमंग
उत्साहा मध्ये घेऊन येण्यासाठी.कष्ट करावे लागत नाहीत परंतु निमित्त ला
पाहिल्यानंतर ती लहर पसरते.जसे एक दोघांना पाहून रंग लागतो,तर ही आपोआप उमंग
उत्साहाची लाट दुसऱ्यांच्या पण उमंग उत्साहा मध्ये वृद्धी करते. तसे पण कोणी चांगला
डान्स करत असेल तर, पाहणाऱ्यांचे पण पाऊले नाचायला लागतात, त्याची लहर पसरते.तर
इच्छा नसताना पण हात पाय चालायला लागतात,अच्छा.
मधुबनचा सर्व कारभार तर ठीक आहे ना.मधुबन निवासी मुळे,मधुबन सजलेले आहे. बापदादा तर
निमित्त मुलांना पाहून सदा निश्चित आहेत,कारण मुलं खूपच हुशार आहेत. मुलं पण कमी
नाहीत.बाबांचा मुलांमध्ये पूर्ण विश्वास आहे आणि मुलं पण बाबांच्या पुढे
आहेत.निमित्त बनलेले नेहमीच बाबांना पण निश्चित करतात, तसे चिंता तर नाहीच, तरीही
बाबांना पण खुशखबरी ऐकणारे आहेत.अशी मुलं कोठे पण नसतील,जो एक एक मुलगा, एक
दोघांच्या पुढे आहे. प्रत्येक मुलगा विशेष आहे.कोणाची इतकी मुलं,असे होऊ शकत
नाहीत.कोणी लढणारे असतील,कोणी शिकणारे असतील.येथे तर प्रत्येक मुलगा विशेष मणी
आहे,प्रत्येकाची विशेषता आहे.
वरदान:-
पवित्रताच्या
शक्तिशाली दृष्टी वृत्ती द्वारे,सर्व प्राप्ती करणारे दुःखहर्ता सुखकर्ता भव.
विज्ञानाच्या
औषधा मध्ये अल्पकाळाची शक्ती आहे,जी दुःख दर्दला समाप्त करते परंतु पवित्रताची शक्ती
म्हणजे शांतीची शक्ती मध्ये तर, आशीर्वादाची शक्ती पण आहे.ही पवित्रता ची शक्तिशाली
दृष्टी किंवा वृत्ती नेहमीच प्राप्ती करणारी आहे म्हणून तुमच्या जड चित्राच्या समोर,
हे दयाळू दया करा म्हणून दया किंवा आशीर्वाद मागतात.चैतन्य मध्ये असे मास्टर
दूखहर्ता सुखकर्ता बणुन दया केली आहे,तेव्हा तर तुमची पूजा होते.
सुविचार:-
वेळेच्या
जवळीकते प्रमाण खरी तपस्या किंवा साधना,बेहद वैराग्य वृत्ती आहे.
सूचना:-
आज महिन्याचा तिसरा
रविवार आहे, सर्वांनी संघटित रूपांमध्ये संध्याकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत
आंतरराष्ट्रीय योगा मध्ये संमेल्लीत होऊन स्वतःला अवतरीत आत्मा समजून या स्म्रुती
द्वारे शरीरामध्ये प्रवेश करा आणि शरीरा पासून अनासक्त बना.आपल्या बिज रुप स्थिती
मध्ये बसून परमात्म शक्तीला वातावरणा मध्ये पसरण्याची सेवा करा.