06-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांनो स्वतःला तपासा की किती वेळ बाबांची आठवण राहते, कारण स्मृति मध्येच
फायदा आहे,विस्मृती मध्ये नुकसान आहे"
प्रश्न:-
या पाप
आत्म्यांच्या दुनिया मध्ये कोणती गोष्ट अगदीच असंभव आहे,आणि का?
उत्तर:-
येथे कोणी म्हणेल,आम्ही पुण्यात्मा आहोत हे अगदीच संभव आहे,कारण दुनियाच कलियुगी
तमोप्रधान आहे. मनुष्या ज्याला पुण्यांचे काम समजतात,तेपण पाप होते,कारण प्रत्येक
कर्म विकाराच्या वश करतात.
ओम शांती।
हे तर मुलं समजत असतील,आम्ही आत्ता ब्रह्मांची मुलं, ब्रह्माकुमार कुमारी आहोत,
नंतर देवी-देवता बनतो. तुम्हीच समजता दुसरे कोणी समजू शकत नाहीत.तुम्ही जाणता,आम्ही
ब्रह्मकुमार-कुमारी ८४ जन्माचे आणि सृष्टीचक्रा चे शिक्षण घेत आहोत.तुम्हाला हे
शिक्षण घेऊन पवित्र बनायचे आहे.तुम्ही मुलं येथे बसल्यानंतर,बाबांची आठवण,पावन
बनण्यासाठी जरूर करतात. स्वतःला विचारायचे आहे, खरोखर आम्ही बाबाच्या आठवणी मध्ये
बसलो होतो, कि रावण बुद्धीला दुसरीकडे घेऊन गेला.बाबा म्हणतात माझी आठवण करा तर,पाप
नष्ट होतील.आता स्वतःला विचारायचे आहे,आम्ही बाबाच्या आठवणीमध्ये राहिलो की, बुद्धी
दुसरीकडे गेली.स्मुर्ती राहायला पाहिजे, कितीवेळ मी बाबा च्या आठवणी मध्ये
राहिलो,कितीवेळ आमची बुद्धी दुसरीकडे गेली. आपली अवस्था पाहायला पाहिजे,जितका वेळ
बाबांची आठवण कराल, त्याद्वारे पावन बनाल. जमा आणि नुकसानचा हिशोब ठेवायचा आहे. सवय
असेल तर आठवण पण राहील, लिहित रहाल.डायरी तर सर्वांच्या पॉकेटमध्ये असतेच.जे पण
व्यापारी असतात त्यांची आहे सीमित डायरी, तुमची आहे बेहद ची डायरी. तर तुम्हाला आपली
दिनचर्या लिहायची आहे. बाबांचा आदेश आहे, धंदा इत्यादी सर्व काही करा, परंतु वेळ
काढून माझी आठवण पण करा. आपली दिनचर्या पाहून फायदा वाढवत जावा, नुकसान करू नका.
तुमचे तर युद्ध आहे ना. सेकंदामध्ये फायदा, सेकंदामध्ये नुकसान होते. लगेच माहिती
होते आम्ही फायद्या केला की नुकसान.तुम्ही व्यापारी आहात ना.काही जणच हा व्यापार करु
शकतील.स्मृति मध्ये फायदा तर विस्मृति मध्ये नुकसान आहे,स्वतःला तपासायचे
आहे,ज्यांना उच्चपद मिळवायचे आहे त्यांची तर इच्छा असते,आम्ही किती वेळ स्मृति मध्ये
राहिलो. हे तर तुम्ही मुलं जाणतात आम्हा सर्व आत्म्यांचे पिता पतित पावन आहेत. आम्ही
वास्तविक आत्मा आहोत.आपल्या घरा मधुन येथे आलो आहोत, हे शरीर घेऊन आम्ही भूमिका
करतो.शरीर विनाशी आहे आत्मा अविनाशी आहे. संस्कार पण आत्म्यातच राहतात.बाबा
विचारतात हे आत्म्यांनो, या जन्मात लहानपणी कोणते उलटे काम तर नाही केले?आठवण करा
तीन-चार वर्षापासून, आठवण तर राहते,की आम्ही लहानपण कसे व्यतीत केले? काय काय केले?
कोणती गोष्ट,मन खात तर नाही,आठवण करा. सतयुगा मध्ये कोणतेही पापकर्म होत नाहीत,तर
विचारण्याची गोष्टच नाही. येथे तर पाप होत राहतात. मनुष्य ज्याला पुण्यांचे काम
समजतात,ते पण पापच आहे, ही पापाची दूनिया आहे. तुमचे देवाण-घेवाण पण, पापा
आत्म्याशीच होते.येथे पुण्य आत्मे तर नाहीतच.पुण्य आत्म्यांच्या दुनिया मध्ये परत
एक पण पाप आत्म नाही.पापाच्या या दुनिया मध्ये एक पण पुण्यात्मा होऊ शकत नाही. ज्या
गुरूंच्या चरणी माथा टेकतात ते पण काही पुण्य आत्मे नाहीत.हे तर कलियुग आहे, ते पण
तमोप्रधान आहे,यामध्ये कोणीच पुण्यात्मा असणे असंभव आहे. पुण्यात्मा बनवण्यासाठी
बाबांना पुकारतात की, येऊन आम्हाला पावन आत्मा बनवा.असे पण नाही कोणी खूप दान पुण्य
केले,धर्मशाळा इत्यादी बनवल्या,ते काही पुण्यात्मा आहेत,नाही. लग्नासाठी हॉल इत्यादी
बनवतात, हे पुण्य थोडेच आहे. या समजण्याच्या गोष्टी आहेत.हे रावण राज्य
आहे,पापात्म्यां ची आसुरी दुनिया.या गोष्टी तुमच्याशिवाय कोणीच जाणत नाही.रावण जरी
असला परंतु त्याला ओळखत नाहीत. शिवाचे पण चित्र आहे परंतु ओळखत नाहीत. मोठ-मोठे
शिवलिंग इत्यादी बनवतात, परत म्हणतात ते नावारुपा पेक्षा वेगळे आहेत, सर्वव्यापी
आहेत म्हणून बाबा म्हणतात,यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत... भारतामध्येच
बाबांची निंदा होते. जे बाबा तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात, तुम्ही मनुष्य मता वरती
चालून त्यांची खूप निंदा करतात. मनुष्य मत आणि ईश्वरीय मतांचे पुस्तक पण आहे ना.हे
तर तुम्ही जाणतात आणि समजतात,आम्ही श्रीमता द्वारे देवता बनत आहोत. रावण मता वरती
परत मनुष्य बनतो. मनुष्य मताला असुरी मत म्हणले जाते,आसुरी कर्तव्य करत
राहतात.मुख्य गोष्ट ईश्वराला सर्वव्यापी समजतात,कच्छ अवतार मच्छ अवतार इत्यादी….खूपच
आसुरी बनले आहेत ,छी छी बनले आहेत. तुमची आत्मा कच्छ मच्छ अवतार घेत नाही,मनुष्य तना
मध्येच येते.आता तुम्ही समजता आम्ही मासे मगर इत्यादी थोढेच बनतो.८४ लाख योनी मध्ये
थोडेच जन्म घेतो.आत्ता तुम्हाला बाबांचे श्रीमत मिळत आहे,मुलांनो तुम्ही ८४जन्म घेता.८४
आणि ८४ लाखाची टक्केवारी काय होईल?. खोटे तर पुर्णपणे खोटे आहे,खर्याचे नाव
नाही,याचा अर्थ पण समजायला पाहिजे. भारताचे काय हाल झालेत पहा. भारत सत्य खंड होता
ज्यालाच स्वर्ग म्हणले जाते. अर्धाकल्प रामराज्य,अर्धाकल्प रावण राज्य.रावण राज्याला
आसुरी संप्रदाय म्हणनार,अक्षर खूपच खडक आहेत. अर्धा कल्प देवतांचे राज्य चालते.
बाबांनी समजावले आहे लक्ष्मीनारायण प्रथम परत दुसरे, तिसरे असे म्हटले जाते. जसे
एडवर्ड प्रथम, दुसरा पण असतोना. पहिली पिढी, दुसरी पिढी असे चालत राहते.तुमचे पण
प्रथम सूर्यवंशी राज्य परत चंद्रवंशी राज्य होते. बाबांनी येऊन अविनाश नाटकाचे
रहस्य पण चांगल्या रीतीने समजले आहे. तुमच्या ग्रंथामध्ये या गोष्टी नाहीत.काही
ग्रंथांमध्ये थोड्या गोष्टी खऱ्या आहेत परंतु ज्यावेळेस त्यांनी जेव्हा ग्रंथ बनवले,
त्यांना काहीच समजले नाही.
बाबा जेव्हा बनारस मध्ये होते त्यावेळेस पण ही दुनिया चांगले वाटत नव्हती.सर्व
भिंतीवरती चित्र काढत होते परंतु त्या वेळेत पूर्ण ज्ञान नव्हते, पूर्ण समज
नव्हती.आमच्या द्वारे कोणीतरी करवत आहे, विनाश पाहिला तर मनामध्ये खूपच आनंद
झाला.रात्री झोपत होते तर जसे उडत होते परंतु काहीच समजत नव्हते. असेच भिंतीवरती
चित्र काढत होते, रेषा मारत होते. कोणती तरी शक्ती आहे, ज्यांनी प्रवेश केला आहे.
मी आश्चर्य करत होतो, पूर्वी तर धंदा इत्यादी करत होतो, परत काय झाले,कुणाला पाहिले
की ते लगेच ध्यानामध्ये जात होतो.हे काय होत आहे, ज्याला पाहतो, त्यांचे डोळे बंद
होत होतात,त्यांना साक्षात्कार होत होता. त्यांना विचारले काय पाहिले तर म्हणत होते
वैकुंठ पाहिले,कृष्णाला पाहिले.यापण सर्व समजण्याच्या गोष्टी झाल्या ना,म्हणून सर्व
काही सोडून बनारस मध्ये गेले. सारा दिवस बसून राहत होते,पेन्सिल आणि भिंत,दुसरा
काहीच धंदा तर नव्हता. लहान मुलासारखे बनले होते.अशा प्रकारे जे काय
पाहिले,समजले,आता हा धंदा करायचा नाही. धंदा इत्यादी सोडावा लागेल, खूप आनंद झाला
होता. आता ही गदाई,धंदा काय कामाचा नाही. रावण राज्य आहे ना. रावण राज्यांमध्ये
रावणाच्या डोक्यावरती गाढवाचे तोंड दाखवतात ना. तर हा विचार आला,ही राजाई नाही.
गाढव नेहमीच मातीमध्ये लोळून धोब्याचे सर्व कपडे खराब करतो. बाबा पण म्हणतात तुम्ही
कसे होते, आता तुमच्या अवस्था किती श्रेष्ठ बनली आहे. हे पण बाबाच समजवतात आणि दादा
पण समजवतात, दोघांचे चालत राहते. ज्ञानामध्ये जे चांगले आहेत त्यांना हुशार म्हणणार
ना, नंबरा नुसार तर आहेतच. तुम्ही मुलं समजता राजधानी स्थापन होत आहे, जरूर नंबरा
नुसार पद मिळतील. आत्माच आपली भूमिका कल्प कल्प वठवते.सर्व एकसारखे ज्ञान तर घेणार
नाहीत.ही स्थापना खूपच आश्चर्यकारक आहे. दुसरे कोणीही स्थापनेचे ज्ञान देऊ शकत नाही.
शीख धर्माची स्थापना झाली, शुद्ध आत्म्याने प्रवेश केला त्यानंतर शीख धर्माची
स्थापना झाली. त्यांचे मुख्य गुरुनानक आहेत, त्यांनी येऊन जप साहेब हा ग्रंथ बनवला.
प्रथम तर नवीन आत्मेच आले असतील कारण पवित्र आत्मा असते. सर्वोच्च तर एक पित्यालाच
म्हणनार, ते पण धर्म स्थापन करतात. तर महान झाले ना,परंतु नंबरा नुसार येत राहतात.
पाचशे वर्षांपूर्वी एकाने येऊन शीख धर्माची स्थापना केली, त्यावेळेस जब साहेब हा
ग्रंथ नव्हता. जरूर सुखमणि जप साहेब ,इत्यादी नंतर बनवले असतील,काय शिक्षा देत होते,
उमंग येत होता त्यांची महिमा करण्यासाठी. बाकी ग्रंथ इत्यादी तर नंतर बनवतात,जेव्हा
अनेक होतात,वाचणारे पण पाहिजेत ना.सर्वांचे ग्रंथ, त्यांच्या नंतरच बनतात,जेव्हा
भक्ती मार्ग सुरु होतो, तेव्हा ग्रंथ वाचतात,ज्ञान पाहिजे ना.प्रथम सतोप्रधान असतील
परत सतो, रजो तमो मध्ये येतात. जेव्हा खूप वृद्धी होते,तेव्हा महिमा होते आणि ग्रंथ
बनवण्यास सुरू करतात, नाहीतर वृद्धी कोण करेल, शिष्य बनतील ना. शीख धर्माचे आत्मे
यायला पाहिजेत,जे येऊन त्यांचे अनुकरण करतील,त्यामध्ये खूप वेळ पण पाहिजे. नवीन
आत्मा येते, तर त्यांना दुःख होऊ शकत नाही,असा कायदा पण नाही. आत्मा सतोप्रधान
पासुन सतो रजो तमो मध्ये आल्यानंतर दुःख होते हाच कायदा आहे. येथे रावण संप्रदाय पण
आहेत आणि राम संप्रदाय पण आहेत. सर्व मिक्स झाले आहेत. आता संपूर्ण बनले नाहीत,
संपूर्ण बनतील तेव्हा हे शरीर सोडून देतील. कर्मातीत अवस्था झाल्यानंतर कोणते दुःख
मिळू शकत नाहीत,या दुनिया मध्ये राहू शकत नाहीत.ते चालले जातील बाकीचे राहतील ते
कर्मातीत बनले नसणार. सर्वच एका वेळेत कर्मातीत होऊ शकत नाहीत. जरी विनाश होतो तरी,
काही शिल्लक राहतात. प्रलय तर होत नाही. गायन पण आहे, राम गेले रावण गेले..रावणाचा
खूप मोठा परिवार आहे.आपला परिवार तर खूपच लहान असेल.येथे अनेक धर्म आहेत.वास्तव
मध्ये सर्वात मोठा आपला परिवार पाहिजे, कारण देवी देवता धर्म सर्वात अगोदर आलेला आहे.
आता तर सर्व मिक्स झाले आहेत आणि ख्रिश्चन पण खूप बनले आहेत. जेथे मनुष्य सुख,पद
पाहतात, तर त्या धर्माचे बनतात. जेव्हा जेव्हा पोप येतात तर अनेक ख्रिश्चन बनतात.
परत वृध्दी पण खूप होत राहते. सतयुगा मध्ये तर प्रत्येकाला एक मुलगा एक मुलगीच असते.
दुसऱ्या कोणत्या धर्माचे अशी वृद्धी होत नाही.आता तर पह, ख्रिश्चन सर्वात हुशार झाले
आहेत.परदेशात ज्यांना खूप मुलं होतात,त्यांना बक्षीस मिळते, कारण त्यांना तर मनुष्य
पाहिजेत ना.जे मिलिटरीच्या लष्करा मध्ये कामाला येतील.तसे तर सर्व ख्रिश्चन आहेत.
रशिया-अमेरिका सर्व ख्रिश्चन आहेत, परंतु एक गोष्ट आहे ना, दोन माकड आपसामध्ये
भांडले आणि लोणी बोका खाऊन गेला. हे पण नाटक बनलेले आहे.यापूर्वी हिंदु-मुस्लिम
एकत्र राहत होते,तेव्हा पाकिस्तान वेगळे झाले नव्हते. नवीन राज्य झाले, हे पण नाटक
बनले आहे.दोघेजण भांडतील तर दारूगोळा इत्यादी लागेल,त्यांचा धंदा होत राहतो. सर्वात
श्रेष्ठ धंदा त्यांचा हाच आहे परंतु नाटकांमध्ये विजय तुमचाच होईल.शंभर टक्के खात्री
आहे,तुम्हाला कोणीही जिंकू शकत नाही. बाकी सर्व नष्ट होतील, तुम्ही नवीन दुनिया
मध्ये जाल.तेथे आमचे राज्य असेल, ज्यासाठी तुम्ही अभ्यास करत आहात, लायक बनत आहात.
तुम्ही लायक होते आत्ता नालायक बनले आहात, परत लायक बनायचे आहे. गायन पण आहे
पतित-पावन या, परंतु अर्थ थोडेच समजतात. हे सर्व जंगलच आहे. आता बाबा आले आहेत
जंगलातील काट्यांना बागेमधील फुलं बनवण्यासाठी. ती दैवी दुनिया आहे,ही आसुरी दुनिया
आहे. साऱ्या मनुष्य सृष्टीचे रहस्य समजवले आहे.तुम्ही पण आत्ताच समजतात आम्ही आपल्या
धर्माला विसरून, धर्मभ्रष्ट झालेले आहोत म्हणुन सर्व कर्म विर्कमच होत राहतात.
कर्म,विकर्म,अकर्माची गती बाबाच तुम्हाला समजावून गेले होते, तुम्हीपण समजता बरोबर
आम्ही पूर्वी असे होतो, परत आज आम्ही असे बनलो आहोत. जवळ आहात ना. बाबा म्हणतात काल
तुम्हाला देवता बनवले होते, राज्य भाग्य दिले होते,परत सर्व कुठे गेले ?तुम्हाला
स्मृती आली आहे, भक्तिमार्ग मध्ये आम्ही खूप धन गमावले, कालचीच गोष्ट आहे ना. बाबा
हातामध्ये स्वर्ग घेऊन आले आहेत,हे ज्ञान बुद्धीमध्ये राहायला पाहिजे. बाबांनी हे
पण समजले आहे, डोळे खूप धोका देतात, विकारी दृष्टीला ज्ञानाद्वारे पवित्र बनवायचे
आहे, अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बाप दादांचे प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) आपल्या
बेहदच्या डायरीमध्ये दिनचर्या लिहा, आम्ही आठवणी मध्ये राहून किती फायदा केला,
नुकसान तर नाही झाले? आठवणीच्या वेळेत बुद्धी कुठे कुठे गेली?
(२) या जन्मांमध्ये लहानपणापासून आम्ही कोणते, कोणते उलटे कर्म केले किंवा पाप
केले,ते सर्व लिहायचे आहेत.ज्या गोष्टींमध्ये मन खाते त्या गोष्टी बाबांना ऐकून हलके
व्हायचे आहे.आता कोणतेही पापकर्म करायचे नाही.
वरदान:-
चांगल्या
गोष्टी वरती प्रभावित होण्याच्या ऐवजी त्यांना स्वतःमध्ये धारण करणारे परमात्म
स्नेही भव.
जर परमात्म
स्नेही बनायचे असेल तर देहअभिमान तपासून पहा. काही मुलं म्हणतात हे फार चांगले आहेत
किंवा चांगली आहे,म्हणून थोडी दया येते. कोणाचा कोणत्या शरीरात आकर्षण असेल किंवा
कोणत्या गुणांमुळे किंवा विशेषता मुळे आकर्षण आहे परंतु या विषेशता किंवा गुण देणारे
कोण? कोणी चांगले आहेत तर, तर चांगुलपणाला धारण करा, परंतु त्या व्यक्तीकडे आकर्षित
होऊ नका. अनासक्त आणि बाबांचे प्रिय बना. असे अनासक्त म्हणजेच परमात्म स्नेही मुलं
नेहमीच सुरक्षित राहतात.
बोधवाक्य:-
शांतीच्या
शक्तीला धारण करा तर सेवेची गती तीव्र होईल