04-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


महावाक्य -
गोड मुलांनो, आठवणीच्या यात्रे वरती पूर्ण लक्ष द्या यामुळेच तुम्ही सतोप्रधान बनाल.

प्रश्न:-
आपल्या मुलावर बाबा कोणती कृपा करतात?

उत्तर:-
बाबा मुलांच्या कल्याणाकरता सूचना देतात,या सूचनाच त्यांच्या वरती कृपा आहेत. बाबांची सर्वात प्रथम सूचना आहे, गोड मुलांनो देही अभिमानी बणा. देही अभिमानी खूपच शांत राहतात, त्यांचे विचार कधी उलटे चालत नाहीत.

प्रश्न:-
मुलांना आपापसात कोणती चर्चा करायला पाहिजे?

उत्तर:-
जेव्हा आपण फिरायला जातो त्यावेळेत आठवणी मध्ये राहण्याची स्पर्धा करा आणि बसून चर्चा करा, कोणी किती वेळ बाबांची आठवण केली.येथे आठवणीसाठी एकांत खूपच चांगला आहे.

ओम शांती.
आत्मिक पिता आत्मिक मुलांना विचारतात, तुम्ही काय करत आहात? आत्मिक मुलं म्हणतात बाबा, आम्ही जे सतोप्रधान होतो ते तमोप्रधान बनलो, परत बाबा आपल्या श्री मतानुसार आम्हाला सतोप्रधान जरुर बनायचे आहे. आता तुम्ही मार्ग दाखवला आहे, ही काय नवीन गोष्ट नाही, जुनीच गोष्ट आहे. सर्वात जुनी आठवणी ची यात्रा आहे, यामध्ये दिखावा करण्याची गोष्टच नाही .प्रत्येकांनी स्वतःला विचारायचे आहे की, मी बाबांची किती आठवण करतो. किती सतोप्रधान बनलो आहे. कोणता पुरुषार्थ करत आहे? सतोप्रधान तेव्हाच बनू जेव्हा अंत काळ येईल,त्याचा पण साक्षात्कार होतो. कोणी पण, जे काही करतात, ते आपल्यासाठीच करतात .बाबा कृपा करत नाहीत, बाबा ज्या सूचना देतात, मार्गदर्शन करतात हीच त्यांची कृपा आहे. मुलांचे कल्याण करण्यासाठी बाबा तर कल्याणकारी आहेतच. काही मुले उल्टे ज्ञानामध्ये येतात.बाबा जाणतात देह अभिमानी मग्रूर असतात.देही अभिमानी म्हणजे आत्मा अभिमानी, खूप शांत राहतात, त्यांना कधी उल्टे सुल्टे विचार येत नाहीत. बाबा अनेक प्रकारे पुरुषार्थ करवत राहतात. माया पण खूप जबरदस्त आहे, चांगल्या चांगल्या मुलावर ती आघात करते, म्हणून ब्राह्मणांची माळ बनत नाही. आज चांगल्या प्रकारे आठवण करतात, उद्या देह अहंकारा मध्ये असे येता जसा सांड असतो. सांडला खूप अहंकार असतो.यासाठी एक म्हण पण आहे सूर्य मंडलचा साज देह अभिमानी काय जाणतील? देहाभिमान खूप खोटा आहे. मोठे कष्ट करावे लागतात. शिव बाबा म्हणतात मी तुमचा सर्वात आज्ञाधारक सेवक आहे, असे पण नाही की स्वतःला सेवक म्हणायचे आणि नवाबी चालवत राहायचे. बाबा म्हणतात गोड मुलांनो सतोप्रधान जरूर बनायचे आहे. हे तर खूप सहज आहे, यामध्ये काहीच अवघड नाही,संभ्रम नाही. मुखाद्वारे काहीच बोलायचे नाही. कुठे पण जावा, मना द्वारे माझी आठवण करा.असे पण नाही येथे बसतात तर, बाबा मदत करतात. बाबा तर मदत करण्यासाठीच आले आहेत. पित्याला तर हा विचार असतो, मुलगा कुठे चूक करायला नको. माया येथेच ठोसा मारत राहते.देह अभिमान खूपच खराब आहे. देहाच्या भानामध्ये आल्यामुळेच जमिनीवर येऊन पडले आहेत. बाबा म्हणतात येथे येऊन बसतात,तर सर्वात प्रिय बाबांची आठवण करत रहा. बाबा म्हणतात मीच पतितपावन आहे,माझी आठवण केल्यामुळे तुमचे जन्मानंतरचे पाप भस्म होतील. मुलांची ती अवस्था बनलेली नाही, जे कोणालाही चांगल्या रीतीने समजावू शकतील. ज्ञान तलवारी मध्ये पण योगाची शक्ती पाहिजे, नाहीतर तलवार काहीच कामाची नाही. मुख्य गोष्ट आहे आठवणीच्या यात्रेची. अनेक मुलं उलट्या धंद्यामध्ये लागून जातात. आठवणीची यात्रा किंवा अभ्यास करत नाहीत, म्हणून वेळ मिळत नाही. बाबा म्हणतात इतका जास्त कामधंदा करू नका ज्यामुळे आपले पद गमावून बसाल.आपले भविष्य तर बनवायचे आहे ना परंतु सतोप्रधान बनवायचे आहे. यामध्येच खूप कष्ट आहेत. अनेक मोठ मोठे संग्रहालय इत्यादी संभाळणारे आहेत परंतु आठवणीच्या यात्रा मध्ये राहत नाहीत. बाबांनी समजावले आहे या यात्रांमध्ये गरीब बंधनयुक्त माता जास्त राहतात. घडी घडी बाबांची आठवण करत राहतात,आमचे हे बंधन खलास करा, अत्याचार होतात, याचे पण गायन आहे. तुम्हा मुलांना खूप गोड बनायचे आहे. खरे विद्यार्थी बना. चांगले विद्यार्थी असतात ते बागे मध्ये जाऊन अभ्यास करतात. तुम्हाला पण बाबा म्हणतात खुशाल कुठे पण फिरायला जावा परंतु स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहा .आठवणीची यात्रा करण्याची आवड पाहिजे. ते विनाशी धन कमवण्याच्या तुलनेमध्ये हे अविनाश धन कमावणे खूपच चांगले आहे. अविनाश धन तरी पण नष्टच होणार आहे.बाबा जाणतात मुलं पूर्ण आठवणी मध्ये राहत नाहीत. खरी सेवा जी करायला पाहिजे ती करत नाहीत. बाकी स्थूल सेवेमध्ये ध्यान देतात. जरी पूर्वनियोजित नाटकं नुसार होते, परंतु बाबा तरीही पुरुषोत्तम करवतील ना. बाबा म्हणतात कोणते पण काम करा, कपडे शिलाई करतात,तर बाबांची आठवण करत शिलाई करा. आठवणीमध्ये च माया विघ्न घालते.बाबांनी समजावले आहे पहिलवानाशी माया पण पहिलवान बनवून लढते. बाबा स्वतः सांगतात मी पैलवान आहे जाणतो, भिकाऱ्या पासून राजकुमार बनणार आहे, तरी माया खूप सामना करते. माया कोणालाच सोडत नाही.पहिलनवान आत्म्याशी तर खूपच लढते. काही मुलं आपल्या देहाच्या अहंकारा मध्ये खूप राहतात. बाबा खूपच निरंकारी राहतात, मी तुम्हाला नमस्ते करणारा सेवक आहे, असे म्हणतात. दुसरे लोक तर स्वतःला खूपच श्रेष्ठ समजतात. हा देह अहंकार नष्ट करायचा आहे. अनेकांमध्ये अहंकाराचे भूत बसले आहे, बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करत राहा. मधुबन मध्ये तर खूपच छान संधी आहे, वेळ पण आहे, खुशाल फिरत रहा. परत एक दोघांना विचारा ,किती वेळ आठवणीमध्ये राहिलो? बुद्धी दुसरीकडे गेली तर नाही ना. अशा प्रकारे आपापसात चर्चा करायला पाहिजे.खुशाल स्त्रिया वेगळ्या आणि पुरुष वेगळे बसा, स्त्रियांना पुढे करा, आणि पुरुषांनी मागे रहा, कारण मातांची सांभाळ करायची आहे, मातांना पुढे करायचे आहे. मधुबन मध्ये खूप छान एकांत आहे. संन्याशी पण एकांत मध्ये राहतात.सतोप्रधान सन्यासी जे होते, ते खूप निर्भय राहत होते, जनावर इत्यादींना घाबरत नसत, ते बह्मच्या नशेमध्ये राहत होते. आता तर तमोप्रधान बनले आहेत. प्रत्येक धर्म जो स्थापन होतो ,प्रथम सतोप्रधान असतो परत तमो मध्ये येतात .संन्याशी जे सतोप्रधान होते ते बह्मच्या मस्ती मध्ये मस्त राहत होते, त्यांच्यामध्ये खूप आकर्षण होते.जंगलामध्ये पण त्यांना भोजन मिळत होते. दिवसेंदिवस तमोप्रधान झाल्यामुळे ताकद कमी होत जाते.

बाबा मत देतात मधुबन मध्ये मुलांना प्रगती करण्यासाठी खूप छान संधी आहे. येथे तुम्ही कमाई करण्यासाठी येतात. बाबांशी फक्त भेटल्यामुळे थोडीच कमाई होणार आहे. बाबांची आठवण केली तर कमाई होत राहील.असे समजू नका बाबा आशीर्वाद देतील, नाही. ते साधून लोक इत्यादी आशीर्वाद करतात, परंतु तुम्हाला खाली उतरायचे आहे ,आता बाबा म्हणतात जिन्न बनवून आपला बुद्धि योग नेहमी वरती लावा.एक जिन्नची गोष्ट आहे ना, म्हणाला मला काम द्या नाहीतर तुम्हाला खाऊन टाकेल. बाबा पण म्हणतात तुम्हाला सूचना देतो, आठवणीमध्ये राहिले तर नाव किनार्‍याला लागेल. तुम्हाला सतोप्रधान जरूर बनायचे आहे. माया किती पण माथा मारेल आम्हाला तर श्रेष्ठ शिव पित्याची जरूर आठवण करायची आहे. अशा प्रकारे बाबांची महिमा करत आठवणीमध्ये रहा. कोणत्याही मनुष्याची आठवण करू नका. भक्तिमार्गा ची जी पदध्तआहे तो ज्ञान मार्गामध्ये होऊ शकत नाही. बाबा समज देतात की आठवणीच्या यात्रेमध्ये हुशार बनायचे आहे. मुख्य हीच गोष्ट आहे, सतोप्रधान बनवायचे आहे. बाबांची शिक्षा मिळते, फिरायला जाता तरीही आठवणीमध्ये रहा, तर घराची पण आठवण येत राहील आणि राज्याची पण आठवण येईल. असे नाही आठवण करत करत खाली पडायचे आहे, तो तर मग हठयोग होतो, ही तर सरळ गोष्ट आहे. स्वतःला आत्म समजून बाबांची आठवण करायची आहे. काही मुलं बसल्याबसल्या पडतात म्हणून बाबा म्हणतात चालता-फिरता, खाता-पिता आठवणीमध्ये रहा, असे नाही बसल्या बसल्या बेहोश होऊन जावा.यामुळे तुमचे पाप नष्ट होणार नाहीत,हे पण मायाचे विघ्न पडतात. भोगाचा (प्रसादाचा) पण रितीरिवाज आहे, बाकी यामध्ये काहीच नाही,हें न ज्ञान आहे ,ना योग आहे. साक्षात्काराची काहीच आवश्यकता नाही, अनेकांना साक्षात्कार झाले, ते आज ज्ञानामध्ये नाहीत. माया खूपच प्रबळ आहे, साक्षात्काराची इच्छा कधीच ठेवायची नाही, यामध्ये तर बाबांची आठवण, सतोप्रधान बनण्यासाठी करायची आहे. नाटकाला पण जाणतात, हे आनादि पूर्वनियोजित नाटक आहे, याची पुनरावृत्ती होत राहते. हे पण समजून घ्यायचे आहे आणि बाबा जे मार्गदर्शन करतात, त्यावर ती पण चालायचे आहे. आम्ही परत राजयोग शिकण्यासाठी आलो आहोत, हे मुलं जाणतात.भारताची गोष्ट आहे,हाच तमोप्रधान बनला आहे, परत यालाच सतोप्रधान बनवायचे आहे. बाबा पण भारतामध्ये येऊन सर्वांची सद्गगती करतात ,हा फार मोठा आश्चर्यकारक खेळ आहे. आता बाबा म्हणतात गोड गोड आत्मिक मुलांनो,स्वतःला आत्मा समजा. तुम्हाला 84चे चक्रात येऊन 5000 वर्ष झाले, आता परत जायचे आहे. या गोष्टी दुसरे कोणी सांगू शकत नाही. तुम्हा मुलांमध्ये पण नंबरा नुसार पुरुषार्थ प्रमाणे निश्चिय बुद्धी होतात. ही बहेदची शाळा आहे, बेहद चे बाबा आम्हाला शिकवतात. हे मुलं जाणतात ते उस्ताद आणि शिक्षक आहेत, खूपच मोठे उस्ताद आहेत .खूप प्रेमाने पण समजतात अनेक चांगली चांगली मुलं आरामशीर सहा वाजेपर्यंत झोपुन राहतात, माया एकदम नाकाला पकडते. हुकुम चालवत राहतात. यज्ञाच्या सुरुवातीला, तुम्ही जेव्हा योग भट्टीमध्ये होते, तेव्हा मम्मा बाबा पण सर्व काही सेवा करत होते. जसे कर्मा आम्ही करू, आम्हाला पाहून दुसरे पण करतील. बाबा तर जाणतात महारथी, घोडेस्वार, प्यादे नंबर नुसार आहेत.काही मुलं खूपच आरामशीर राहतात, उशिरापर्यंत झोपून राहतात. कोणी विचारले तर म्हणतात, येथे नाहीत परंतु रूममध्येच झोपलेले असतात .काय काय होत राहते,बाबा समजवतात संपूर्ण तर कोणीच बनले नाहीत.खुपच सेवे मध्ये विघ्न आणतात. नाहीतर बाबा बद्दल गायन आहे तुम्ही प्रेम करा किंवा मारा आम्ही तुमचा दरवाजा सोडणार नाही. येथे तर थोड्या थोड्या गोष्टीवरून रुसतात,योगाची खूपच कमी आहे. बाबा मुलांना खूप समजावत राहतात, परंतु कोणामध्ये ताकत नाही, जे लिहतील.योग असेल तर लिहण्यामध्ये पण शक्ति भरेल. बाबा म्हणतात गीतेचे भगवान शिव आहेत ना कि कृष्ण, हे चांगल्या प्रकारे सिद्ध करून समजावून सांगा. बाबा तुम्हा मुलांना सर्व गोष्टींचा अर्थ समजावतात. मुलांना येथे नशा चढतो बाहेर गेल्यानंतर नष्ट होतो. वेळ खूप वाया घालवतात. आम्ही कमाई करून यज्ञामध्ये देऊ असे विचार करून आपला वेळ वाया घालवायचा नाही. बाबा म्हणतात तुम्हा मुलांचे कल्याण करण्यासाठी आलो आहे. तुम्ही परत आपलेच नुकसान करत आहात. यज्ञामध्ये ज्यांनी कल्पा पूर्वी मदत केली होती, ते करतील. तुम्ही का डोके खपवता, हे करायचे, असे करायचे, त्यांनी करावे.नाटकांमध्ये सर्वकाही नोंद आहे, ज्यांनी बीज पेरले आहे,ते आत्ता पण जरूर करतील. यज्ञाचे चिंतन तुम्ही करू नका, स्वतःचे कल्याण करत रहा. स्वतःला मदत करा,भगवंताला मदत करू शकता का? भगवंताकडून तर तुम्ही घेता, हा विचार पण यायला नाही पाहिजे. बाबा म्हणतात लाडक्या मुलांनो स्वतःला समजून माझी आठवण करा, तर विर्कम विनाश होतील. आता तुम्ही संगम युगावरती उभे आहात. संगम युगा वरती तुम्ही दोन्हीकडे पाहू शकता. येथे तर खूप मनुष्य आहेत. सतयुगा मध्ये खूप थोडे मनुष्य असतात. संपूर्ण दिवस संगम युगा वरती उभे राहायला पाहिजे. बाबा आम्हाला कशा पासून काय बनवतात. बाबांची भूमिका खूपच आश्चर्यकारक आहे. तुम्ही फिरायला जावा परंतु आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. अनेक मुलं आपला वेळ वाया घालवतात. आठवणीच्या यात्रा द्वारे तुमची नाव किनाऱ्याला लागेल. मुलांना समजले होते नाटकाची पुनरावृत्ती होत राहते. सर्व कल्पवृक्ष बुद्धीमध्ये राहायला पाहिजे अभ्यास आहे. बाकी धंदा इत्यादी खुशाल करत राहा ,अभ्यासासाठी वेळ काढायला पाहिजे.गोड बाबा आणि स्वर्गाची आठवण कराल तेवढी प्रगती होईल तर अंत मती सो गती होईल. बाबा आम्ही आपल्या जवळ आलो की आलो.बाबांच्या आठवणी मध्ये श्वास पण सुखद व्हायला पाहिजेत. ब्रह्मज्ञानी चे श्वास पण सुखद होतात. ब्रह्मच्या आठवणी मध्ये राहतात परंतु ब्रह्मलोक कोणी जाऊ शकत नाहीत. हे होऊ शकते. काही उपवास ठेवून शरीर सोडून मारतात. ते दुःखी होऊन मरतात. बाबा म्हणतात खा प्या परंतु बाबांची आठवण करा. मरायचे तर सर्वांनाच आहे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

1. नेहमी आठवणीत ठेवा जे कर्म आम्ही करू, आम्हाला पाहून दुसरे पण करतील. आराम पसंद बनायचे नाही, ज्यामुळे सेवेमध्ये विघ्ने येतील.खूपच निरंकारी राहायचे आहे. स्वतःला स्वतःच मदत करून स्वतःचे कल्याण करायचे आहे.

2. कामधंद्यामध्ये इतके व्यस्त राहायचे नाही ज्यामुळे आठवणीच्या यात्रेला वेळच मिळणार नाही.अभिमान खूपच खोटा आणि खराब आहे त्याला सोडून देऊन देही अभिमानी राहण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.

वरदान:-
इच्छाशक्ती द्वारे सेकंदामध्ये व्यर्थला पूर्णविराम लावणारे अशरीरी भव.

सेकंदामध्ये अशरीरी बनण्याचा पाया आहे ही वैराग्य व्रत्ती अशी योग्य धरणी आहे. त्यामध्ये जे पण पेराल ते लगेच उगवते. तर इच्छाशक्तीद्वारे जे पण संकल्प कराल, व्यर्थ समाप्त होईल. एक सेकंदांमध्ये समाप्त होऊन जाईल. जेव्हा पाहिजे जिथे पाहिजे ज्या पण स्थितीमध्ये पाहिजे सेकंदांमध्ये स्थिर व्हा. सेवा आकर्षित करणार नाही, सेकंदांमध्ये पूर्णविराम लागेल, तर सहजच अशरीरी बनुन जाल.

बोधवाक्य:-
समान बनायचे आहे तर बिगडी ला सुधारणारे बना.