03-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
महावाक्य -
गोड मुलांनो, तुम्ही
मातपित्याच्या समोर आले आहात, अपार सुख मिळवण्यासाठी. बाबा तुम्हाला अपार
दुःखापासून अपार सुखांमध्ये घेऊन जातात"
प्रश्न:-
एक बाबाच राखीव
राहतात, पुनर्जन्म घेत नाहीत, का?
उत्तर:-
कारण तुम्हाला
तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवणारे पण पाहिजेत ना. बाबा पण पुनर्जन्मामध्ये आले तर
तुम्हाला काळ्यापासून गोरे कोण बनवेल, म्हणून बाबा राखीव राहतात.
प्रश्न:-
देवता नेहमी सुखी
असतात, का ?
उत्तर:-
कारण पवित्र आहेत,
पवित्रतेमुळे त्यांची चलन सुधरलेली असते. जिथे पवित्रता आहे तिथे सुख शांती आहे.
मुख्य पवित्रताच आहे.
ओम शांती.
गोड गोड फार
वर्षानंतर भेटलेल्या मुलांना बाबा समजतात, ते पिता पण आहेत, तर माता पिता पण आहेत.
तुम्ही गायन करत होते ना तुम्ही मात पिता,आम्ही बालक. सर्वच पुकारत राहतात,कोणाला
बोलवतात, परमपिता परमात्माला. बाकी त्यांना समजून येत नाही की, त्यांच्या कृपेमुळे
अपार सुख कधी आणि कोणते मिळाले होते, अपार सुख कशाला म्हणतात, ते पण समजत नाहीत .आता
तुम्ही इथे समोर बसले आहात, तुम्ही जाणतात येथे दुःख पुष्कळ आहे. हे दुःख आहे, ते
सुखधाम आहे. कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही की, आम्ही २१ जन्म स्वर्गामध्ये खूप सुखी
होतो. तुम्हाला पण पूर्वी हा अनुभव नव्हता. आता तुम्ही समजता, आम्ही त्या परमपिता
परमात्माच्या समोर बसले आहोत. आम्ही २१ जन्मासाठी स्वर्गाची बादशाही मिळवण्यासाठी
येथे आलो आहोत. आपण जाणले आहे आणि बाबाद्वारे सर्व सृष्टिचक्र पण समजले आहे. आम्ही
प्रथम सुखांमध्ये होतो परत दुःखामध्ये आलो. हे पण नंबरानुसार प्रत्येकाच्या
बुद्धीमध्ये राहते. विद्यार्थ्यांना तर सदैव आठवणीमध्ये राहिले पाहिजे, परंतु बाबा
पाहतात मुलं घडी-घडी विसरतात म्हणूनच कोमेजून जातात. लाजाळूच्या झाडासारखी अवस्था
होते. माया आकर्षित करत राहते, ती खुशी राहत नाही. नंबरानुसार तर आहेत ना,
स्वर्गामध्ये तर जातील परंतु तिथे पण राजापासून प्रजे पर्यंत पद असतात. ही गरीब
प्रजा, सावकार, स्वर्गामध्ये पण असे आहेत, तर नरकामध्ये पण असेच आहेत. उच्च आणि नीच,
आता तुम्ही मुलं जाणतात. आम्ही अपार सुख प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करत
आहोत.लक्ष्मीनारायण सर्वात जास्त सुख मिळवतात. मुख्य पवित्रतेची गोष्ट आहे. पवित्रता
शिवाय शांती आणि संपत्ती मिळू शकत नाही, यामध्ये चलन खूपच चांगली पाहिजे. मनुष्याची
चलन पवित्रते द्वारे सुधारते.पवित्र आहेत, तर त्यांना देवता म्हणले जाते. तुम्ही इथे
आले आहात देवता बनण्यासाठी. देवता सदा सुखी असतात,मनुष्य नेहमी सुखी राहू शकत नाहीत.
सुख देवतानां असते. या देवतांची पूजा करतात कारण ते पवित्र आहेत. सर्व पवित्रता वरती
आधारित आहे. विघ्न पण यामध्येच येतात. दुनिये मध्ये शांती हवी असे म्हणतात, पवित्रते
शिवाय शांती कधीच होऊ शकत नाही.प्रथम मुख्य गोष्ठ पवित्रतेची आहे.पवित्रते द्वारे
चलन सुधारते.पतित झाल्यामुळेच चलन बिघडते.समजायला पाहिजे आता मला परत देवता बनायचे
आहे,तर पवित्र जरूर बनायला पाहिजे. देवता पवित्र आहेत, म्हणून तर अपवित्र मनुष्य
त्यांच्यापुढे डोके टेकवतात .मुख्य गोष्ट पवित्रतेचे आहे. पुकरतात पण असेच की,हे
पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा. बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे, यावरती विजय
मिळवा. यावरती विजय मिळवल्यामुळेच तुम्ही पवित्र बनाल. तुम्ही जेव्हा पवित्र
सतोप्रधान होते तर शांती आणि सुख दोन्ही होते. तुम्हा मुलांना तर ती स्मृति आली आहे,
कालचीच गोष्ट आहे, तुम्ही पवित्र होते तर अपार सुख-शांती, सर्वकाही होते. आता परत
तुम्हाला लक्ष्मीनारायण सारखे बनवायचे आहे. यामध्ये प्रथम मुख्य गोष्ट आहे संपूर्ण
निर्विकारी बनणे. हे तर गायन आहे. हा ज्ञानयज्ञ आहे, यामध्ये जरूर विघ्न पडतील.
पवित्रते वरतीच खूप तंग करतात. आसुरी संप्रदाय आणि दैवी संप्रदायाचे गायन आहे.
तुमच्या बुद्धीमध्ये आहे, सतयुगामध्ये देवी-देवता होते, जरी चेहरा मनुष्याचा असला
तरी त्यांना देवता म्हटले जाते. ते संपूर्ण सतोप्रधान होते. कोणतेच अवगुण तेथे
नसतात, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असते. बाबा परिपूर्ण आहेत तर मुलांना पण परिपूर्ण
बनवतात. योगबळाद्वारे तुम्ही खूप पवित्र, सुंदर बनतात. हा प्रवासी तर नेहमीच गोरा
आहे, जे तुम्हाला पण सावळ्या पासून गोरा बनवतात. तेथे नैसर्गिक सुंदरता असते. सुंदर
बनण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. सतोप्रधान सुंदर असतात. तेच तमोप्रधान
झाल्यामुळे काळे बनतात. नावच आहे शाम सुंदर. कृष्णाला शाम आणि सुंदर का म्हणतात,
याचा अर्थ पण कोणी सांगू शकत नाहीत, शिवाय बाबांच्या. भगवान पिता ज्या गोष्टी
ऐकवतात, कोणी मनुष्य ऐकवू शकत नाहीत. चित्रांमध्ये सुदर्शन चक्र देवतांना दाखवले आहे.
बाबा समजवतात गोड मुलांनो, सुदर्शन चक्रची तर देवतांना आवश्यकता नसते. ते शंख, गदा
इत्यादीचे काय करतील? सुदर्शन चक्रधारी तर तुम्ही ब्राह्मण मुलं आहात. शंखध्वनी पण
तुम्हाला करायचा आहे. तुम्ही जाणतात आत्ता विश्वामध्ये शांती स्थापन कशी होत
आहे.चलन पण चांगली पाहिजे. भक्तिमार्ग मध्ये तुम्ही देवतांच्या पुढे जाऊन आपल्या
चलनाचे वर्णन करतात ना, परंतु त्यामुळे तर तुमची चलन सुधारत नाही. सुधारणारे तर
दुसऱेच आहेत, ते शिवबाबा निराकार आहेत.
त्यांच्यापुढे असे म्हणणार नाहीत की, तुम्ही सर्वगुणसंपन्न, त्यांची महिमाच वेगळे
आहे. देवतांची महिमा गातात परंतु देवता कसे बनायचे. आत्मच पवित्र आणि अपवित्र बनते.
आता तुमची आत्मा पवित्र बनत आहे. जेव्हा आत्मा संपूर्ण बनेल तेव्हा, हे शरीर पतित
बनणार नाही. परत जाऊन पावन शरीर मिळेल.येथे पावन शरीर होऊ शकत नाही. पावन शरीर
तेव्हाचा असेल जेव्हा प्रकृती पण सतोप्रधान असेल. नवीन दुनिये मध्ये प्रत्येक गोष्ट
नविन असते. आत्ता पाच तत्व पण तमोप्रधान आहेत, म्हणून खूप उपद्रव होत राहतात. कसे
मनुष्य मरत राहतात, तीर्थ यात्रेला जातात, तरीही अपघात होतात, मृत्यू होत राहतात.
जल ,पृथ्वी ई.तत्व खूप नुकसान करतात. हे सर्व तत्व तुम्हाला मदत करतील. अचानक पूर
येतो, वादळ येतात, या नैसर्गिक आपत्ती आहेत. ते बॉम्ब इत्यादी बनवतात,हे पण
नाटकांमध्ये नोंदलेले आहे.त्यांना ईश्वरीय आपत्ती म्हणू शकत नाही, ते तर मनुष्यांनी
बनवले आहेत. भूकंप इत्यादी मनुष्याने बनवले नाहीत .या आपत्ती सर्व आपापसात मिळतात ,
पृथ्वी एकदम हलकी होते. तुम्ही जाणतात कसे बाबा आम्हाला एकदम हलके बनवून, सोबत नवीन
दुनियेत घेऊन जातात. माथा हलका झाल्यामुळे शक्तिशाली बनतात. तुम्हाला बाबा बिलकुल
हलका करतात. सर्व दुःख दूर होतात.आता तुम्हा सर्वांचे मन खूप भारी आहे, परत सर्व
हलके, शांत सुखी होतात.जे पण ज्या धर्माचे आहेत त्या सर्वांना खुशी व्हायला पाहिजे,
बाबा आले आहेत सर्वांची सद्गगती करण्यासाठी. जेव्हा पूर्ण स्थापना होते,तेव्हा सर्व
विनाश होईल.यापूर्वी तुमच्या बुद्धीमध्ये हे विचार नव्हते,आता समजतात.गायन पण आहे
ब्रह्मा द्वारे स्थापना, बाकी अनेक धर्म विनाश होतील. हे एक कर्तव्य शिव पिताच
करतात दुसरे कोणी नाही.असा अलौकिक जन्म आणि कर्तव्य, दुसऱ्या कोणाचे होऊ शकत नाही.
बाबा तर श्रेष्ठ आहेत, त्यांचे कर्तव्य पण खूप श्रेष्ठ आहे. हे तर गायन आहे ना, बाबा
येतात एका धर्माची स्थापना आणि अनेक धर्माचा विनाश करण्यासाठी. तुम्हाला आता खूप
श्रेष्ठ महात्मा बनवत आहेत. महात्मा देवता शिवाय कोणी बनू शकत नाही. येथे अनेकांना
महात्मा म्हणत राहतात, परंतु महात्मा महान आत्म्याला म्हटले जाते. स्वर्गाला
रामराज्य म्हणले जाते, तेथे रावण राज्यच नसते, तर विकाराचा प्रश्नच नाही, म्हणून
त्या दुनिये ला संपूर्ण निर्विकारी म्हणले जाते. जितके संपूर्ण बनाल तेवढा वेळ सुख
मिळेल, अपूर्ण तर इतका वेळ सुख प्राप्त करू शकणार नाहीत. शाळेमध्ये पण कोणी संपूर्ण,
तर कोणी अपूर्ण असतात, फरक दिसून येतो. डॉक्टर म्हणजे डॉक्टर,परंतु कोणत्या डॉक्टरची
पगार जास्त, तर कोणाची खूप कमी असते. तसेच देवता, देवता असतात, परंतु पदांमध्ये खूप
फरक पडतो.बाबा येऊन तुम्हाला श्रेष्ठ अभ्यास शिकवतात. कृष्णाला कधी भगवान म्हणू शकत
नाही. कृष्णाला शामसुंदर म्हणतात, सावळा कृष्ण पण दाखवतात, कृष्ण सावळा थोडाच असतो.
नाव रूप तर बदलते ना, तेही आत्मा सावळा बनते, वेगळे नाव रुप देश काळ होते.तुम्ही
समजता बरोबर आम्ही सुरुवातीपासून कसे अभिनय करत आलो. प्रथम देवता होतो, परत देवता
पासुन आसुर बनलो. बाबानी ८४ जन्माचे रहस्य पण समजवले आहे,ज्याची दुसऱ्या कोणाला
माहिती नाही. बाबा म्हणतात लाडक्या मुलांनो तुम्ही माझ्यासोबत घरी राहत होते
ना.तुम्ही भाऊ भाऊ होते ना. सर्व आत्मेच होते, शरीर नव्हते. बाबा होते आणि तुम्ही
भाऊ होते ,दुसरा कोणता संबंध नव्हता. बाबा तर पुनर्जन्मात येत नाहीत, ते तर नाटकां
नुसार राखीव राहतात,त्यांची भूमिका आहे. तुम्ही खूप काळ पुकारले आहे. असे नाही
द्वापर युगापासून बोलणे सुरु झाले,नाही. खूप काळापासून पुकारणे सुरू केले
आहे.तुम्हाला तर बाबा सुखी बनवतात, अर्थात सुखाचा वारसा देतात.तुम्ही पण म्हणता बाबा
आम्ही तुमच्याजवळ कल्प कल्प अनेक वेळा आलो आहोत.हे चक्र चालत राहते, प्रत्येक पाच
हजार वर्षाच्या नंतर तुमच्याशी भेटतो आणि हा वारसा मिळतो.जे पण सर्व देहधारी आहेत,
ते सर्व विद्यार्थी आहेत, शिकवणारे एकच विदेही आहेत. हे त्यांचे शरीर नाही. स्वतः
विदेही आहेत, येथे येऊन देह धारण करतात,त्या शिवाय मुलांना कसे शिकवतील. सर्व
आत्म्यांचे पिता तेच आहेत. भक्तिमार्गा मध्ये सर्व त्यांना बोलतात. बरोबर रुद्र माळ
स्मरण करतात. त्यामध्ये परत फुल आणि युगल मेरु आहेत.ते तर एक सारखेच आहेत.फुलाला का
नमस्ते करतात, ते आता तुम्हाला माहिती झाले आहे. माळ कोणाची जपतात, देवतांची माळ
जपतात, का तुमची जपतात ?माळ देवतांची आहे की तुमची आहे.देवतांची म्हणणार नाही. हे
ब्राह्मणच आहेत, ज्यांना बसून बाबा शिकवतात. ब्राह्मण पासून परत देवता तुम्हीच
बनतात. आता तुम्हीच शिकतात,परत तेथे जाऊन देवता पद मिळवता. तुम्ही बाबा द्वारे
शिकून कष्ट घेऊन देवता बनतात.
बाबांची कमाल आहे, मुलांची खूप सेवा करतात. स्वर्गात तर बाबांची कोणी आठवण करत नाही.
भक्तिमार्गात तुम्ही माळ जपत होते, आता ते फुल येऊन तुम्हाला पण फुलासारखे छान
बनवतात अर्थात आपल्या माळेचा मणी बनवतात.तुम्ही सुंदर बनतात ना. आत्म्याचे ज्ञान पण
आत्ताच तुम्हाला मिळते. साऱ्या सृष्टीचे आधी मध्यं अंतचे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये
आहे. तुमचीच महिमा आहे, तुम्ही ब्राह्मण बनुन आपल्यासारखे ब्राह्मण बनवुन परत
स्वर्गवासी देवी-देवता बनतात. देवता स्वर्गामध्ये राहतात. तुम्ही जेव्हा देवता
बनतात तर, तेथे तुम्हाला भूत वर्तमान भविष्याचे ज्ञान नसेल. आता तुम्ही ब्राह्मण
मुलांनाच भूत वर्तमान भविष्याचे ज्ञान मिळत आहे, दुसऱ्या कोणालाच हे ज्ञान मिळत
नाही.तुम्ही खूप भाग्यशाली आहात परंतु माया विसरायला लावते. तुम्हाला ब्रह्मा बाबा
शिकवत नाहीत, हे तर मनुष्य आहेत, हे पण शिकत आहेत. हे तर सर्वात शेवटी होते, सर्वात
नंबर एक पतीत परत तेच नंबर एक पावन बनतात.खूप सुखी होते, मुख्य लक्ष्य समोर आहे.बाबा
तुम्हाला खूपच श्रेष्ठ बनवत आहेत.आयुष्यमान भव, पुत्रवान भव, ही पण नाटकांमध्ये
नोंद आहे. बाबा म्हणतात मी पण जर आशीर्वाद दिले तर सर्वांना देत राहील. मी तर तुम्हा
मुलांना शिकवण्यासाठी आलो आहे.शिक्षणामुळेच तुम्हाला सर्व आशीर्वाद मिळून जातात.
अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. जसे बाबा परिपूर्ण
आहेत, तसेच स्वतःला परिपूर्ण बनवायचे आहे.पवित्रतेला धारण करून आपली चाल चलन
सुधारायची आहे. खऱ्या सुख शांती चा अनुभव करायचा आहे.
2. सृष्टीच्या आधी मध्य अंतचे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून ब्राह्मण पासून देवता
बनवण्याची सेवा करायची आहे. आपल्या उच्च, श्रेष्ठ भाग्याला कधी विसरायचे नाही.
वरदान:-
साधनांच्या
प्रवृत्तीमध्ये राहात कमल फुल समान अनासक्त आणि प्रिय राहणारे वैरागी भव.
साधन मिळाले आहेत तर त्यांना मोठ्या मनाने उपयोगात आणा. हे साधन तुमच्यासाठीच आहेत
परंतु साधनेला विसरू नका. पूर्ण समतोल पाहिजे,साधन वाईट नाहीत, साधन तर आपल्या
कर्माचे फळे आहेत, योगाची फळे आहेत परंतु साधनांच्या प्रवृत्ती मध्ये राहत कमलपुष्प
समान अनासक्त आणि प्रिय बना. साधन वापरत असताना त्यांच्या प्रभाव मध्ये येऊ नका.
साधन वापरत असताना वैराग्य वृत्तीला विसरू नका.प्रथम स्वतःमध्ये धारण करा,नंतर
विश्वाच्या वातावरणामध्ये वैराग्य वृत्ती पसरवा.
बोधवाक्य:-
दुःखी आत्म्यांना
आपल्या शान मध्ये स्थिर करणेच, सर्वात चांगली सेवा आहे.