19-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, तुम्ही आता शिक्षण घेत आहात, हे शिक्षण आहे पतितापासून पावन बनण्याचे, तुम्हाला हे शिकावयाचे आहे, आणि शिकवावयाचे आहे...!!!

प्रश्न:-
जणामध्ये कोणते ज्ञान असून पण अज्ञानांचा अंधार आहे?

उत्तर:-
मायेचे ज्ञान, ज्याद्वारे विनाश होत आहे. चंद्रावर जात आहेत, हे ज्ञान फार आहे, परंतू नविन जग, आणि जुने जगाचे ज्ञान कोणाजवळ पण नाही. सर्व अज्ञानाचे अंधारात आहेत, सर्व ज्ञान नेत्राने आंधळे आहेत. तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. तुम्ही ज्ञानसंपन्न मुले जाणता कि, त्यांच्या मेंदूमध्ये विनाशाचे विचार आहेत, तुमच्या बुध्दीमध्ये स्थापनेचे विचार आहेत.

ओम शांती।
बाबा या शरीराद्वारे समजावत आहेत, याला जीव म्हटले जाते. यांच्यात आत्मा पण आहे, आणि मी पण यांच्यात येऊन बसत आहे, हे तर प्रथम पक्के झाले पाहिजे. यांना दादा म्हटले जाते. हा निश्चय मुलांना फारच पक्का झाला पाहिजे. या निश्चयामध्येच रमण केले पाहिजे. बरोबर बाबा नी ज्यांच्यात प्रवेश केला आहे, ते बाबा स्वत: म्हणत आहेत, मी यांच्या अनेक जन्मातील अंताला येतो. मुलांना समजावले आहे, हे आहे सर्व शास्त्र शिरोमणी गीतेचे ज्ञान. श्रीमत म्हणजे श्रेष्ठ मत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत आहे. एका भगवानाची. ज्यांच्या श्रेष्ठ मताने तुम्ही देवता बनत आहात. बाबा स्वत: म्हणत आहेत, मी येतोच तेव्हा जेव्हा तुम्ही भ्रष्ट मतावर पतित बनून जाता. मनुष्यांना पतित बनण्याचा अर्थ पण समजावयाचा आहे. विकारी मनुष्यापासून निर्विकारी देवता बनविण्यासाठी बाबा आले आहेत. सतयुगामध्ये मनुष्यच राहतात. परंतू दैवी गुणवाले. आता कलियुगामध्ये आहेत, सर्व आसुरी गुणवाले. आहे सारी मनुष्य सृष्टी. परंतू ही आहे ईश्वरीय बुध्दी आणि ती आहे आसुरी बुध्दी. येथे आहे ज्ञान, तेथे आहे भक्ती. ज्ञान आणि भक्ती वेगळी वेगळी आहे. भक्तीची पुस्तके अनेकानेक आहेत. ज्ञानाचे पुस्तक एक आहे. एका ज्ञानसागराचे पुस्तक एकच असले पाहिजे. जे पण धर्म स्थापन करतात, त्यांचे पुस्तक पण एकच असते. ज्याला धार्मिक पुस्तक म्हटले जाते.

पहिले पहिले धार्मिक पुस्तक आहे गीता. पहिला पहिला सनातन देवी देवता धर्म आहे, न कि हिंदू धर्म. मनुष्य समजतात कि, गीतेतून हिंदू धर्म स्थापन झाला. गीतेचे ज्ञान कृष्णानी दिले. कधी दिले? परंपरेतून. कोणत्या शास्त्रावरती शिव भगवानुवाच नाही. तुम्ही आता समजता कि, या गीता ज्ञानाद्वारेच मनुष्यापासून देवता बनले आहेत, जे बाबा आता देत आहेत. यालाच भारताचा प्राचीन राजयोग म्हटले जाते. ज्या गीतेमध्येच काम महाशत्रु लिहले आहे. या शत्रूनेच तुम्हाला पराजित केले आहे. बाबा यावरच विजय प्राप्त करवून जगतजीत विश्वाचे मालक बनवित आहेत. बेहदचे बाबा यांचेद्वारा तुम्हाला शिकवित आहेत. ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता. हे मग आहेत सर्व मनुश्य आत्म्यांचे बेहदचे पिता. नावच आहे प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही कोणाला विचारु शकता कि ब्रह्माच्या पित्याचे नांव काय आहे, तर गोंधळात पडतात. ब्रह्मा विष्णू शंकर या तिघांचा पिता कोणी असेल ना. ब्रह्मा, विष्णू, शंकर सुक्ष्मवतनमध्ये देवता आहेत. त्यांचेवर आहेत शिव. मुले जाणतात कि, शिवबाबाची जी मुले, आत्म्ये आहेत, त्यांनी शरीर धारण केले आहे, ते तर सदैव निराकार परमपिता परमात्मा आहेत. आत्माच शरीराद्वारे म्हणत आहे परमपिता. किती सोपी गोष्ट आहे. याला म्हटले जाते अल्फ आणि बे चे शिक्षण. कोण शिकवत आहेत? गीतेचे ज्ञान कोणी सांगितले? कृष्णाला तर भगवान म्हटले जात नाही. ते तर देहधारी आहेत. मुकुटधारी आहेत. शिव तर आहेत निराकार त्यांचे वर तर कोणता मुकूट इत्यादी नाही. तेच ज्ञानाचे सागर आहेत. बाबाच बीजरुप चैत्न्य आहेत. तुम्ही पण चैतन्य आहात. सर्व झाडाच्या आदि मध्य अंताला तुम्ही जाणत आहात. जरी तुम्ही माळी नाहीत, परंतू समजू शकता कि, बी कसे पेरतात, त्यापासून झाड कसे निघते. ते आहे स्थुल, हे आहे चैतन्य. आत्म्याला चैतन्य म्हटले जाते. तुमच्या आत्म्यामध्येचज्ञान आहे, आणखीन कोणाच्या आत्म्यामध्ये ज्ञान असू शकत नाही. तर बाबा चैतन्य मनुष्य सृष्टीचे बीजरुप आहेत. ही चैतन्य रचना आहे.

ते सर्व जड बीज आहेत. असे नाही कि जड बीजामध्ये काही ज्ञान आहे. हे तर आहे चैतन्य बीजरुप, यामध्ये साऱ्या सृष्टीचे ज्ञान आहे. झाडाची उत्पत्ती, पालना, विनाशाचे संपूर्ण ज्ञान त्यामध्ये आहे. मग नविन झाड कसे उभे होत आहे, ते आहे गुप्त. तुम्हाला ज्ञान पण गुप्त मिळत आहे. बाबा पण गुप्त आले आहेत. तुम्ही जाणता कि हे कलम लावले आहे. आता तर सर्व पतित बनले आहेत. बरे, बीजापासून पहिले पहिले पान निघाले, ते कोण होते? सतयुगाचे पहिले पान तर कृष्णालाच म्हणतात. लक्ष्मी-नारायणला म्हणत नाहीत. नविन पान लहान असते. नंतर मोठे होत आहे. तर या बीजाची किती महिमा आहे. हे तर चैत्न्य आहे ना. जरी दुसरे पण निघत आहेत, हळू हळू त्यांची महिमा कमी होत जाते. आता तुम्ही देवता बनत आहात. तर मुळ गोष्ट आहे. आम्हाला देवी गुण धारण करावयाचे आहेत. यांचे सारखे बनायचे आहे. चित्र पण आहेत. हे चित्र नसते तर बुध्दीमध्ये ज्ञान कसे येईल. हे चित्र फार उपयोगी पडतात. भक्तीमार्गामध्ये या चित्राची पुजा होत आहे आणि ज्ञानमार्गात तुम्हाला याद्वारे ज्ञान मिळत आहे, या सारखे बनायचे आहे. भक्तीमार्गात असे नाही समजत कि आम्हाला असे बनायचे आहे. भक्तीमार्गात मंदीर इत्यादी किती बांधत आहेत. सर्वांत जास्त मंदीर कोणाची आहेत? जरुर शिवबाबाचीच आहेत. मग त्यांचे नंतर रचनेची आहेत. पहिली रचना हे लक्ष्मी नारायण आहेत, तर शिवानंतर त्यांची पुजा जास्त होते. माता ज्या ज्ञान देतात त्यांची पुजा होते नाही. त्या तर शिकत आहेत. तुमची पुजा आता होत नाही कारण तुम्ही आता शिकत आहात. जेव्हा तुम्ही शिकून, अशिक्षित बनाल, मग पुजा होईल. आता तुम्ही देवी देवता बनत आहात. सतयुगामध्ये बाबा थोडेच शिकविण्यासाठी येतील. तेथे असे शिक्षण थोडेच असते. हे शिक्षण पतितांना पावन बनण्याचे आहे. तुम्ही जाणता कि, आम्हाला जे असे बनविता. त्यांची पुजा होते, मग आमची पण पुजा क्रमाक्रमाने होईल. नंतर खाल पडल्यानंतर 5 तत्त्वांची पुजा करण्यास सुरु करतात. 5 तत्त्वाची पुजा म्हणजे पतित शरीराची पुजा. हे बुध्दीमध्ये ज्ञान आहे कि, या लक्ष्मी नारायणाचे साऱ्या सृष्टीवर राज्य होते. या देवी देवतांनी राज्य कसे आणि केव्हा प्राप्त केले? हे कोणाला माहित नाही. लाखो वर्ष म्हणत आहेत. लाखो वर्षाची गोष्ट तर कोणाचे बुध्दीमध्ये बसणार नाही, त्यामुळे म्हणतात कि, परंपरेपासून चालत आले आहे. आता तुम्ही जाणता कि, देवी देवता धर्मवाले इतर धर्मात गेले आहेत. जे भारतात आहेत ते स्वत:ला हिंदू म्हणत आहेत, कारण पतित झाल्यामुळे देवी देवता म्हणणे शोभत नाही. परंतू मनुष्यामध्ये ज्ञान कोठे आहे. देवी देवता पेक्षा पण उंच महिमा स्वत:ची करत आहेत. पावन देवी देवतांची पुजा करुन, डोके टेकवतात, परंतू स्वत:ला पतित थोडेच समजत आहेत.

भारतामध्ये खास कुमारींची किती पुजा करतात, कुमारांची इतकी करत नाहीत. पुरुषापेक्षा जास्त मातांना नमन करतात, कारण यावेळी ज्ञान अमृत या मातांना मिळत आहे. बाबा यांचेमध्ये प्रवेश करतात. हे पण समजता कि हे ब्रह्मा बाबा, ज्ञानाची मोठी नदी आहे. ज्ञान नदी पण आहे, मग पुरुष पण आहे. ब्रह्मपुत्रा नदी सर्वांत मोठी आहे, जी कलकत्याकडे सागराला जावून मिळत आहे. मेळा पण तेथेच लागत आहे, परंतू त्यांना हे माहित नाही कि हा आत्मे आणि परमात्म्याचा मेळा आहे, ती तर पाण्याची नदी आहे, ज्यांचे नांव ब्रह्मपुत्रा ठेवले आहे. ते तर ब्रह्माला ईश्वर म्हणतात, त्यामुळे ब्रह्मपुत्रेला पावन समजतात. पतित पावन खरे तर गंगा नदीला म्हणू शकत नाहीत. येथे सागर आणि ब्रह्मा नदीचा मेळा आहे. बाबा म्हणतात कि, हे स्त्री तर नाहीत, ज्याद्वारे दत्तक घेतले जातात, हे फार गुह्य समजण्याच्या गोष्टी आहेत, ज्या मग प्राय:लोप होत आहेत. मग नंतर मनुष्य या आधारावर शास्त्र इत्यादी बनवत आहेत.अगोदर हातानी लिहलेली शास्त्र होती, नंतर मोठ मोठी पुस्तके छापली आहेत. संस्कृत मध्ये श्लोक इत्यादी नव्हते. ही तर बिल्कुल सोपी गोष्ट आहे. मी यांचेद्वारे राजयोग शिकवित आहे, मग ही दुनियाच नष्ट होऊन जाईल. शास्त्र इत्यादी काही पण राहणार नाहीत. नंतर भक्तीमार्गात हे शास्त्र इत्यादी बनेल. मनुष्य समजतात कि हे शास्त्र इत्यादी परंपरेने चालत आले आहेत, याला म्हटले जाते अज्ञानाचा अंधार. आता तुम्हा मुलांना बाबा शिकवित आहेत, ज्यामुळे तुम्ही प्रकाशत आले आहात. सतयुगामध्ये आहे पवित्र प्रवृत्ती मार्ग. कलियुगामध्ये सर्व अपवित्र प्रवृत्तीवाले आहेत. हे पण नाटक आहे, संन्यासी राहतात तर या जुन्या दुनियेतच. आता तुम्ही नविन दुनियेमध्ये जाता. तुम्हाला तर बाबांकडून ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, तर तुम्ही किती ज्ञानसंपन्न बनत आहात. यापेक्षा जास्त ज्ञान नसते. ते तर आहे मायेचे ज्ञान, ज्यामुळे विनाश होतो. ते लोक चंद्रावर जावून शोध करत आहेत. तुमच्यासाठी काही नविन गोष्ट नाही आहे. हा सर्व मायेचा भपका आहे. फार दिखावा करत आहेत. अति खोलात जात आहेत कि, काहीतरी कमाल करुन दाखवावी. फार कमाल केल्याने मग नुकसान होऊन जात आहे. त्यांच्या मेंदूत विनाशाचेच विचार येत आहेत. काय काय बनवत राहतात. बनविणारे जाणतात कि याद्वारेच विनाश होईल. प्रयोग पण करत राहतात. म्हणतात पण कि दोन मांजरे भांडली, लोणी तिसऱ्याने खाल्ले. गोष्ट तर लहान आहे, परंतू खेळ किती मोठा आहे. नाव यांचेच मोठे आहे. यांचेमुळेच विनाशाची नोंद आहे. कोणी तर निमित्त बनत आहे ना. ख्रिश्चन लोक समजतात कि, स्वर्ग होता, परंतू आम्ही नव्हतो. इस्लामी, बौध्दी पण नव्हते, तरी पण ख्रिश्चन लोकांची समज चांगली आहे. भारतवासी म्हणतात कि, देवी देवता धर्म लाखो वर्षा पुर्वी होता, तर बुध्द आहेत ना. बाबा भारतामध्येच येत आहेत, जे महान बेसमज होते, त्यांनाच महान ते महान समजदार बनवत आहेत. परंतू तरी पण आठवणीत राहिले तर बाबा तुम्हा मुलांना किती सोपे करुन समजावत आहेत, माझी आठवण करा, तर तुम्ही सोन्याचे भांडे बनाल आणि धारण पण चांगली होईल. आठवणीच्या यात्रेनेच पाप नष्ट होतील. मुरली ऐकली नाही तर ज्ञान नष्ट होऊन जाते. बाबा तर दयावान असल्यामुळे प्रगतीची युक्ती सांगत आहेत. अंतापर्यंत शिकवतच राहतील. बरे, आज नैवध आहे, नैवेध दाखवून लवकर परत जायचे आहे. बाकी वैकुंठात जावून देवी देवता इत्यादींचा साक्षात्कार करणे यासर्व फालतू गोष्टी आहेत. यामध्ये फार सुक्ष्म बुध्दी पाहिजे. बाबा या रथाद्वारे म्हणतात कि, माझी आठवण करा, मीच पतित पावन तुमचा पिता आहे. तुमचे बरोबर खाऊ---तुमचे बरोबर बसू. हे येथील आहे, वर कसे असेल. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. बाबा या दादामध्ये प्रवेश होऊन, आम्हाला मनुष्यापासून देवता म्हणजेच विकारी पासून निर्विकारी बनविण्यासाठी गीतेचे ज्ञान सांगत आहेत, या निश्चयात रमण करावयाचे आहे. श्रीमतावर चालून श्रेष्ठ गुणवान बनायचे आहे.

2. आठवणीच्या यात्रेद्वारे बुध्दीला सोन्याचे भांडे बनवायचे आहे. ज्ञान बुध्दत नेहमी राहिल त्यासाठी मुरली जरुर वाचायची आणि ऐकवयाची आहे.

वरदान:-
शरीराच्या व्याधीच्या चिंतनापासून मुक्त, ज्ञान चिंतन व स्वचिंतन करणारे शुभचिंतक भव

एक आहे शरीराला व्याधि होणे, एक आहे व्याधिमध्ये घाबरणे. व्याधि होणे ही तर भावी आहे, परंतू श्रेष्ठ स्थितीत राहणे, हे बंधनमुक्तची अवस्था आहे. जे शरीराच्या व्याधिच्या चिंतनापासून मुक्त राहून, स्वचिंतन, ज्ञान चिंतन करतात तेच शुभचिंतक आहेत. प्रकृतीचे चिंतन जादा केल्याने चिंतेचे रुप बनते. या बंधनापासून मुक्त होणे यालाच कर्मातीत स्थिती म्हटले जाते.

बोधवाक्य:-
स्नेहाची शक्ती समस्ये रुपी पहाडाला, पाण्यासारखे हल्के बनविते.