16-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, आत्म्यामधून विकारांचा कचरा काढून शुद्ध फूल बना, बाबांच्या आठवणीनेच सर्व कचरा निघून जाईल.

प्रश्न:-
पवित्र बनणाऱ्या मुलांना कोणत्या एका गोष्टी मध्ये बाबांचे अनुकरण करायचे आहे ?

उत्तर:-
जसे बाबा संपूर्ण पवित्र आहेत, ते कधी अपवित्र कचऱ्यावाल्यां सोबत मिसळून जात नाही, खूप खूप पवित्र आहेत. तसे तुम्ही पवित्र बनणाऱ्या मुलांनी बाबांचे अनुकरण करायचे आहे, वाईट गोष्टींना पाहू नका.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत हे दोन्हीं पिताच आहेत ना. एकाला आत्म्याचे, दुसऱ्याला शरीराचे म्हणले जाईल . शरीर तर दोघांचे एकच आहे. दोन्हीं पिता समजावतात. जरी एक समजावतात, दुसरे समजतात तरीही म्हणू, दोघेही समजावतात. ही जी एवढी छोटीशी आत्मा आहे. त्याच्यावर किती मळ चढलेला आहे. मळ चढल्याने किती नुकसान होते. हा फायदा आणि नुकसान तेव्हाच पाहिले जाते, जेव्हा शरीराच्या सोबत आहोत. तुम्ही जाणता आम्ही आत्मा जेव्हा पवित्र बनू, तेव्हा या लक्ष्मी-नारायण सारखे पवित्र शरीर मिळेल. सध्या आत्म्यावर किती मळ चढलेला आहे . जेव्हा मध काढतात तेव्हा तर त्याला गाळून घेतात. तर किती कचरा निघतो, मग शुद्ध मध होतो. आत्मा देखील खूप मळते. आत्माच कांचन होती, एकदम पवित्र होती. शरीर कसे सुंदर होते. या लक्ष्मी नारायणचे शरीर पहा, किती सुंदर आहे. मनुष्य तर शरीरालाच पूजतात ना. आत्माकडे पाहत नाहीत. आत्म्याची तर ओळख सुद्धा नाही. पहिली आत्मा सुंदर होती, शरीर देखील सुंदर मिळते. तुम्हाला सुद्धा असे बनावे वाटते. तर आत्मा किती शुद्ध झाली पाहिजे. आत्म्यालाच तामोप्रधान म्हणले जाते, कारण त्याच्यामध्येपूर्ण कचरा आहे. एक तर आहे, शरीराच्या आभिमानाचा कचरा आणि नंतर काम-क्रोधाचाकचरा. कचरा काढण्यासाठी त्याला गाळले जाते ना. गाळल्यामुळे रंगच बदलून जातो. तुम्ही चांगल्या प्रकारे बसून विचार केल्यास तुम्हाला जाणवेल, खूप कचरा भरलेला आहे. आत्म्यामध्ये रावणाची प्रवेशता आहे. आता बाबांच्या आठवणीत असाल तरच कचरा निघेल. या मध्ये देखील वेळ लागतो. बाबा समजवतात शरीराच्या अहंकारामुळे विकारांचा किती कचरा आहे. कचरा देखील कमी नाही. क्रोधी आत मध्ये जळत असतो. कोणत्या न कोणत्या गोष्टींमध्ये हृदय जसे जळत असते. चेहरा सुद्धा तांब्या सारखा लाल होतो. आता तुम्ही समजता आमची आत्मा जळली आहे. आत्म्यामध्ये किती मळ आहे. आता माहीत झाले आहे. या गोष्टी समजणारे खूप थोडे आहेत, यामध्ये तर प्रथम फुल पाहिजे ना. आता तर खूप त्रुटी आहेत. तुम्हाला तर सर्व त्रुटी काढून एकदम पवित्र बनायचे आहे ना. हे लक्ष्मी-नारायण किती पवित्र आहेत. वास्तवात त्यांना हात लावण्याचा पण आदेश नाही. पतित जाऊन एवढ्या उंच पवित्र देवतांना हात लावू शकत नाहीत. हात लावण्याच्या लायकीचेच नाहीत. शिवला तर हात लावू शकत नाहीत. ते तर आहेत निराकार, त्यांना तर हात लावू शकत नाही. ते तर आहेतच सर्वाधिक पवित्र. जरी त्यांची प्रतिमा मोठी ठेवलेली आहे, कारण एवढा छोटा बिंदू, त्यांना तर कोणी हात लावू शकत नाही. आत्मा शरीरामध्ये प्रवेश करते, तर शरीर मोठे होते. आत्म तर मोठी-छोटी होत नाही. ही तर आहे कचऱ्याची दुनिया. शिवबाबा तर खूप पवित्र आहेत. येथे तर सर्वांना एकसारखे बनवतात. एक दोघांना म्हणतात सुद्धा, तुम्ही तर जनावरासारखे आहात. सतयुगा मध्ये अशी भाषा नाही. आता तुम्हाला वाटते की आमच्या आत्म्यामध्ये खूप सारा मळ चढलेला आहे. आत्मा लायकच नाही, जे बाबांना आठवण करेल. ना-लायक समजून माया सुद्धा एकदम त्यांना काढून टाकते.

बाबा किती पवित्र- शुद्ध आहेत. आम्ही आत्मा सुद्धा, कसे होतो आणि कसे बनलो. आता बाबा समजवतात तुम्ही मला बोलावले आहे आत्म्याला शुद्ध बनवण्यासाठी. खूप कचरा भरलेला आहे. बागेमध्ये सर्वच फुले चांगली नसतात. नंबरानुसार असतात. बाबा माळी आहेत. आत्मा किती पवित्र बनते, नंतर किती मळते, एकदम काटा बनून जाते. आत्म्यामध्येच शरीराच्या अहंकाराचा, काम, क्रोधाचा कचरा भरलेला आहे. क्रोध देखील मनुष्यामध्ये किती आहे. तुम्ही पवित्र बनल्यावर तुम्हाला कोणाचाही चेहरा पाहण्याची इच्छा होणार नाही. वाईट गोष्टी पाहू नका. अपवित्रला पाहायचेच नाही. आत्मा पवित्र बनून, पवित्र नवीनशरीर धारण करते, मग नंतर कचरा पाहत नाही. कचऱ्याचे जग समाप्त होऊन जाते. बाबा समजावतात, तुम्ही शरीराच्या अहंकारामध्ये येऊन किती कचरा झाला आहात. पतित झाले आहात. मुले म्हणतात सुद्धा, बाबा आमच्यामध्ये क्रोधाचे भूत आहे. बाबा आम्ही तुमच्याजवळ आलो आहोत, पवित्र बनण्यासाठी. जाणता की बाबा तर आहेतच सदैव पवित्र. अशा सर्वोच्च शक्तीला सर्वव्यापी म्हणून किती अपमान करतात. स्वतःवरही खूप द्वेष येतो. आम्ही कसे होतो नंतर कसे बनतो. या गोष्टी तुम्ही मुलंच समजता, आणखी कोणत्या सत्संगामध्ये किंवा महाविद्यालय इत्यादी मध्ये कोठेही असे मुख्य ध्येय समजवू शकत नाही. आता तुम्ही मुलं जाणता आमच्या आत्म्यामध्ये कचरा भरत गेला. दोन कला कमी झाल्या, परत चार कला कमी झाल्या, परत गेला त्यामुळे म्हणले जाते तमोप्रधान. कोणी लोभा मध्ये, कोणी मोहा मध्ये जळून मरतात, या अवस्थेमध्ये जळत मरून जाणार आहेत आता तर तुम्हा मुलांना शिवबाबांच्या आठवणीमध्ये शरीर सोडायचे आहे, बाबा असे बनवतात. या लक्ष्मी-नारायणला शिवबाबांनी असे बनविले आहे. तर आपल्याला किती काळजी घेतली पाहिजे. वादळ तर खूप येतील. वादळ तर मायेचे येते, आणि दुसरे कोणते वादळ नाही.जसे शास्त्रांमध्ये गोष्टी लिहिलेल्या आहेत, हनुमान इत्यादींच्या.म्हणतात ईश्वराने शास्त्र बनविले. ईश्वर तर सर्व वेद शास्त्रांचे रहस्य समजवतात. ईश्वराने तर सद्गती केली, त्यांना शास्त्र बनवण्याची काय गरज आहे. आता बाबा म्हणतात, वाईट ऐकू नका. या शास्त्र इत्यादींनी तुम्ही उंच पद प्राप्त करू शकत नाही. मी तर या सर्वांपासून वेगळा आहे. कोणीही ओळखू शकत नाही. बाबा काय आहेत, कोणाला माहित नाही. बाबा समजतात कोण कोण माझी सेवा करतात म्हणजे कल्याणकारी बनून दुसऱ्यांचे सुद्धा कल्याण करतात, तेच हृदयावर चढतात. कोणी तर असे सुद्धा आहेत, ज्यांना सेवाच माहित नाही.मुलांना ज्ञान तर मिळालेले आहे की, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. जरी आत्म शुद्ध बनत आहे, हे शरीर तर पतित आहे. ज्यांची आत्मा शुद्ध होत जाते, त्यांच्या वर्तणूकीमध्ये रात्रंदिवसाचा फरक पडतो. वर्तणुकीवरूनच समजते. नाव कोणाचे घेतले जात नाही, जर नाव घेतले तर अजूनच खराब बनतील.

आता तुम्ही फरक पाहू शकता-तुम्ही काय होता, काय बनायचे आहे, तर श्रीमतावर चालायला पाहिजे ना. मनामध्ये जो कचरा भरलेला आहे त्याला काढून टाकायचे आहे. लौकिक संबंधांमध्ये सुद्धा काही काही खूप खराब मुले असतात, तर त्यांचे पिता सुद्धा वैतागतात, असा मुलगा नसता तर बरे झाले असते, असे म्हणतात. फुलांच्या बागेचा सुगंध असतो. परंतु नाटकानुसार कचरा पण आहे. धोत्र्याच्या फुलालाबिलकुल पाहू वाटत नाही. परंतु बागेत गेल्यानंतर नजर तर सगळीकडे जाते. आत्मा म्हणते हे आमके फुल आहे. सुगंध पण चांगल्याच फुलाचा घेणार ना. बाबा पण पाहतात,यांची आत्मा किती आठवणीच्या यात्रेमध्ये राहते, किती पवित्र बनली आहे आणि दुस-यांना पण स्वतःसारखे बनवतात, ज्ञान सांगतात. मुळ गोष्ट आहे, मनमनाभव. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर पवित्र फुल बनाल. लक्ष्मीनारायण किती पवित्र फुल होते.यांच्या पेक्षा सुद्धा शिवबाबाखूप पवित्र आहेत. मनुष्यांना थोडंच माहित आहे की, या लक्ष्मीनारायणला पण शिवबाबांनी बनविले. तुम्ही जाणता पुरुषार्था ने हे बनले. रामाने कमी पुरुषार्थ केला तर चंद्रवंशी बनले. बाबा तर खूप समजवितात. एकतर आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे, ज्यामुळे कचरा निघेल, आत्मा पवित्र बनेल. तुमच्या जवळ संग्रहालय इत्यादीमध्ये खूप येतात. मुलांना सेवेची आवड असली पाहिजे. सेवेला सोडून कधी झोप घ्यायची नाही. सेवेमध्ये खूप नियमित रहायचे आहे. संग्रहालयामध्ये सुद्धा तुम्ही आरामाची वेळ सोडता. घसा बसतो, जेवण इत्यादी पण करायचे आहे. परंतु मनामधे रात्रंदिवस सेवेचा उमंग असला पाहिजे. कोणी आले तर त्यांना रस्ता दाखवा. जेवणाच्या वेळी कोणी आले तर प्रथम त्यांना वेळ देऊन नंतर जेवण केले पाहिजे, असा सेवाधारी असावा. कोणा-कोणाला खूप देह अभिमान येतो, आराम करणारे,नवाब बनतात. बाबांना तर समजवावे लागते. ही नवाबी सोडा. नंतर बाबा साक्षात्कार पण करवतील-आपले पद पहा! देह अभिमानाची कुऱ्हाडी आपल्याच पायावर मारून घेतली. खूप मुलं बाबांसोबत सुद्धा इर्षा करतात. अरे, हे तर शिवबाबांचा रथ आहे, यांची संभाळ करावी लागते. येथे तर असे आहेत जे खूप औषधे घेत राहतात, डॉक्टरांचे औषध घेतात. बाबा म्हणतात शरीराला तंदुरुस्त ठेवा,परंतु आपल्या अवस्थेला पण पहा. तुम्ही बाबांच्या आठवणी मध्ये राहून जेवण करा तर कोणतीच वस्तू नुकसान करणार नाही. आठवणीद्वारे शक्ती भरली जाईल. जेवण खूप शुद्ध होईल. परंतु अशी अवस्था नाही. बाबा तर म्हणतात, ब्राह्मणांनी बनविलेले जेवण उत्तम ते उत्तम आहे, परंतु हे तेव्हा होईल, जेव्हा आठवणीमध्ये राहून बनवाल. आठवणीमध्ये राहून बनविल्याने त्यांना सुद्धा फायदा होईल, आणि खाणाऱ्यांना सुद्धा फायदा होईल.

धोत्र्याचे फुलं पण खूप आहेत. हे बिचारे काय पद प्राप्त करतील. बाबांना तर दया येते. परंतु दास-दासी बनण्याची सुद्धा नोंद आहे, यामध्ये खुश व्हायचे नाही. विचार सुद्धा करायचा नाही, की आम्हाला असे बनवायचे आहे.दास-दासी बनण्यापेक्षा साहुकार बनले तर चांगले आहे, दासदासी ठेवू शकाल. बाबा तर म्हणतात निरंतर मज एकाची आठवण करा, आठवण करत करत सुख प्राप्त करा. भक्तांनी परत आठवणीची माळा बनविली आहे. ते भक्तांचे काम आहे. फक्त म्हणतात स्वतःला आत्मा समजा, बाबांना आठवण करा. बस. बाकी कोणता जप करू नका. न माळा फिरवा. बाबांना ओळखायचे आहे, त्यांना आठवण करायची आहे. मुखाने बाबा-बाबा थोडंच करायचं आहे. तुम्ही जाणता ते आम्हा आत्म्यांचे बेहदचे पिता आहेत, त्यांना आठवण केल्याने, आम्ही सतोप्रधान बनू, म्हणजे आत्मा कंचन बनेल. किती सोपे आहे. परंतु युद्धाचे मैदान आहे ना. तुमचे आहे माया सोबत युद्ध. ती सारखी तुमचा बुद्धीचा योग तोडत असते. जेवढे जेवढे विनाशी काळात प्रित बुद्धी आहेत, तेवढे पद असतात. बाबां शिवाय कोणाचीच आठवण येऊ नये. कल्पा पूर्वी सुद्धा असे निघाले, जे विजय माळेचे दाणे बदले. तुम्ही जे ब्राह्मण कुळाचे आहात, ब्राह्मणांची रूंड माळा बनते, ज्यांनी खूप कष्ट केले आहेत. ज्ञान सुद्धा गुप्त आहे. बाबा तर चांगल्या रीतीने जाणतात, चांगले-चांगले नंबर एक, ज्यांना महारथी समजत होते, ते आज नाहीत. देह अभिमान खूप आहे, बाबांची आठवण राहू शकत नाही. माया खुप जोराने चापट मारते. खूप थोडे आहेत, ज्यांची माळा बनू शकेल. तरीही बाबा मुलांना समजाविता, स्वतःला पहात रहा, आम्ही किती पवित्र देवता होतो, परत आपण काय बनलो, कचरा बनलो. आता शिवबाबा भेटले आहे, तर त्यांच्या मतावर चालले पाहिजेत ना. कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. कोणाची सुद्धा आठवण येऊ नये. चित्रसुद्धा कोणाचे ठेवायचे नाही. एक शिवबाबांची आठवण राहिली पाहिजे. शिवबाबांना तर शरीर नाही. हे तर थोड्या वेळासाठी घेतले आहे. तुम्हाला असे देवी-देवता, लक्ष्मीनारायण बनविण्यासाठी किती कष्ट करतात. बाबा म्हणतात तुम्ही मला पतित दुनियेमध्ये बोलवता. तुम्हाला पवित्र बनवितो, परत तुम्ही पवित्र दुनियेमध्ये मला बोलवत नाही. तेथे येऊन काय करणार! त्यांची सेवा आहे, पवित्र बनविण्याची. बाबा जाणतात, की एकदम जळून काळे कोळसे झाले आहेत. बाबा आले आहेत, तुम्हाला गोरे बनविण्यासाठी. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. सेवेमध्ये खूप नियमित राहायचे आहे. दिवस-रात्र सेवेचा उमंग येत रहावा. सेवा सोडून कधीही आराम करायचा नाही. बाबांसारखे कल्याणकारी बनायचे आहे.

2. एकाच्या आठवणीने प्रीत बुद्धी बनून आतला कचरा काढून टाकायचा आहे.सुगंधित फुल बनायचे आहे. या कचऱ्याच्या दुनियेमध्ये मन लावायचे नाही.

वरदान:-
‘प्रथम आपण’ या मंत्राद्वारे सर्वांचा सन्मान प्राप्त करणारे निर्माण ते महान भव
 

हा महामंत्र नेहमी लक्षात ठेवा, की निर्माणच सर्व महान आहे. ‘प्रथम आपण करणेच सर्वांचा सन्मान’ प्राप्त करण्याचा आधार आहे. महान बनण्याचे हे एक मंत्र वरदानाच्या रूपामध्ये नेहमी सोबत ठेवा. वरदाना मध्येच राहत, उडत, ध्येयापर्यंत पोहोचायचे आहे. कष्ट तेव्हा करता, जेव्हा वरदानाला कार्यामध्ये लावत नाही. जर वरदान मध्ये राहत, कार्यामध्ये लावत रहा,तर कष्ट संपून जातील. नेहमी सफलता आणि संतुष्टतेचा अनुभव करत रहाल.

बोधवाक्य:-
चेहऱ्याद्वारे सेवा कारण्यासाठी आपला हसणारा, आनंदी आणि गंभीर स्वरुप प्रत्यक्ष करा.