31-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, तुम्हाला जे ज्ञान मिळाले आहे, त्यावर विचार सागर मंथन करा, ज्ञान मंथनानीच अमृत निघेल....!!!

प्रश्न:-
21 जन्मांसाठी मालामाल बनण्याचे साधन काय आहे?

उत्तर:-
ज्ञान रत्न. जेवढे तुम्ही या पुरुषोत्तम संगमयुगावर ज्ञान रत्न धारण करता तेवढे मालामाल बनता. आताचे ज्ञान रत्न तिथे हिरे जवाहर बनतात. जेव्हा आत्मा ज्ञान रत्न धारण करते. मुखाने ज्ञान रत्न बोलते. रत्न ऐकते आणि ऐकवते तेव्हा त्यांच्या हर्षित चेहऱ्याद्वारे बाबांचे नाव प्रसिध्द होते. आसुरी गुण काढून टाकले तेव्हा मालामाल बनता.

ओम शांती।
बाबा मुलांना ज्ञान आणि भक्तीवर समजावतात. हे तर मुलं समजतात कि सतयुगामध्ये भक्ती नसते. ज्ञानही सतयुगात मिळतनाही. कृष्ण न भक्ती करतो न ज्ञानाची मुरली वाजवतो. मुरली म्हणजे ज्ञान देणे. गायन आहे ना मुरलीमध्ये आहे जादू, तर नक्कीच काहीतरी जादू असेल. फक्त मुरली वाजवणे ही साधारण गोष्ट आहे. फकीर लोक सुध्दा मुरली वाजवतात. यामध्ये तर ज्ञानाची जादू आहे. अज्ञानाला जादू नाही म्हणू शकत. मनुष्य समजतात कृष्ण मुरली वाजवत होता. त्याची खुप महिमा करतात. बाबा सांगतात कृष्ण तर देवता होता तो मनुष्यापासून देवता. देवतापासून मनुष्य बनत राहतो. दैवी सृष्टी पण असते तर मनुष्य सृष्टी पण असते. या ज्ञानाद्वारे मनुष्यापासून देवता बनतात. जेव्हा सतयुग असते तेव्हा या ज्ञानाचा वारसा आहे. सतयुगात भक्ती होत नाही. देवता जेव्हा मनुष्य बनतात तेव्हा भक्ती सुरु होते. मनुष्यांला विकारी व देवतांना निर्विकारी म्हणले जाते. देवतांच्या सृष्टीला पवित्र दुनिया म्हटले जाते. आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. देवतांमध्ये हे ज्ञान असणार नाही. देवता सद्गतीमध्ये आहेत ज्ञान हवे आहे दुर्गती वाल्यांना. या ज्ञानानी दैवीगुण येतात. ज्ञानाची धारणा करणाऱ्याची चलन देवतांसारखी असते कमी धारणा करणाऱ्यांची चलन मिक्स असते. आसुरी चलन तर नाही म्हणणार. जे धारणा करत नाहीत, त्यांना माझी मुलं आहेत, असे कसे म्हणणार? मुलं बापाला ओळखत नाहीत तर बापही मुलांना कसे ओळखणार?भगवानाची निंदा करणे किती खराब आहे. नंतर जेव्हा तेच ब्राह्मण बनल्यानंतर निंदा करणे बंद करतात. तर या ज्ञानाचे मंथन करायला हवे. विद्यार्थी विचार सागर मंथन करुन ज्ञानामध्ये वाढ करतात. तुम्हाला हे ज्ञान मिळते त्यावर स्वत: विचार सागर मंथन करा, म्हणजे अमृत निघेल. विचार सागर मंथन होत नसेल तर काय मंथन होते? आसुरी विचार मंथन, ज्यामध्ये कचरा असतो. आता तुम्ही ईश्वरीय विद्यार्थी आहात. हे जाणता की मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण बाप देत आहेत. देवता तर नाही शिकवणार देवतांना कधीच ज्ञानाचा सागर म्हणत नाहीत. बाबाच ज्ञानाचा सागर आहे. तर स्वत:ला विचारायला हवं आमच्यामध्ये सर्व दैवीगुण आहेत का? जर आसुरी गुण असतील तर ते काढून टाकायला हवे तरच देवता बनाल.

आता तुम्ही आहात पुरुषोत्तम संगमयुगावर पुरुषोत्तम बनत आहात, तर तुमच्या अवती भोवतीचे वातावरण खुप चांगले असले पाहिजे. खराब गोष्टी मुखाद्वारे बोलू नये. नाहीतर म्हटले जाईल हा कमी दर्जाचा आहे. वातावरण पाहून लगेच समजते, मुखानी दु:ख देणारे शब्द निघतात. तुम्हा मुलांना बाबांचे नाव लौकिक करायचे आहे. सदैव चेहरा हर्षित राहायला हवा. मुखानी सदैव रत्न निघाले पाहिजे. हे लक्ष्मी नारायण किती हर्षितमुख आहेत. यांच्या आत्म्यांनी ज्ञान रत्न धारण केले होते. मुखामधून हे रत्न निघाले होते. रत्न ऐकत आणि ऐकवत होते. किती खुशी राहायला हवी. आता तुम्ही जे ज्ञान रत्न घेत आहात, तेच नंतर हिरे-जवाहरात बनतात. 9 रत्नांची माळ काही हिऱ्या जवाहरातांची नाही, या चैतन्य रत्नांची माळ आहे. मनुष्य लोक ते रत्न समजून अंगठी वगैरे घालतात. ज्ञान रत्नांची माळ या पुरुषोत्तम संगमयुगावर बनते. हेच रत्न 21 जन्मांसाठी मालामाल बनवतात. ज्यांना कोणी लुटू शकत नाही. येथे घातले तर लगेच कोणीतरी लुटून नेईल. तर स्वत:ला खुप खुप समजदार बनवायचे आहे. आसुरी गुणांना काढायचे आहे. आसुरी गुणवाल्यांचा चेहरा असा होऊन जातो. क्रोधामध्ये तर लाल तांब्यासारखा होऊन जातो. कामविकार वाले तर एकदम तोंडच काळे करतात. कृष्णालाही काळा दाखवतात ना. विकारांमुळेच गोऱ्यापासून सावळा बनला. तुम्हा मुलांना प्रत्येक गोष्टीचे विचार सागर मंथन करायला हवे, हे शिक्षण आहे. तुम्ही मुलांनी ऐकले आहे राणी विक्टोरियाचा वजीर अगोदर खुप गरीब होता, दिव्यावर अभ्यास करायचा. परंतू ते शिक्षण काही रत्न थोडेच आहे. शिक्षण घेऊन पुर्ण प्रतिष्ठा प्राप्त करतात, तर शिक्षण उपयोगी झाले, न की पैसा. शिक्षण म्हणजेच धन आहे. ते आहे हदचे हे आहे बेहदचे धन. आता तुम्ही समजता, बाबा आम्हाला शिकवून विश्वाचे मालक बनवतात. तिथे तर पैसा मिळविण्यासाठी शिक्षण घेणार नाही. तिथे तर आत्ताच्या पुरुषार्थीनी भरपुर धन प्राप्त होते. धन अविनाशी बनते. देवतांच्या जवळ खुप धन होते नंतर जेव्हा वाममार्ग, रावण राज्यामध्ये येतात, तरीही किती धन होते. किती मंदिर बनवले. नंतर मुसलमानांनी लुटले. किती धनवान होते. आजकालच्या शिक्षणांनी एवढे धनवान नाही बनू शकत, तर या शिक्षणांनी पहा मनुष्य काय बनतो. गरीबांपासून साहुकार, आता भारत पहा किती गरीब आहे. नावांचे साहुकार जे आहेत त्यांना तर वेळच नाही. आपले धन पद प्रतिष्ठेचा किती अहंकार असतो, येथे अहंकार वगैरे सर्व संपले पाहिजे. आम्ही आत्मा आहोत. आत्म्याजवळ धन, दौलत, हिरे, जवाहरात वगैरे काहीच नाही.

बाबा म्हणतात, गोड मुलांनो, देह सहित देहाचे सर्व संबंध सोडा. आत्मा शरीर सोडून जाते तेव्हा साहुकारी वगैरे सर्व नष्ट होऊन जाते.नंतर पुन्हा नव्याने शिकावे लागते. धन कमवावे लागते, तेव्हा धनवान बनतात. नाहीतर दान पुण्य चांगले केले असेल तर साहुकाराच्या घरी जन्म घेतात. म्हणतात हे पाठीमागच्या कर्माचे फळ आहे. ज्ञानाचे दान दिले असेल किंवा कॉलेज धर्मशाळा वगैरे बनवली असेल तर त्यांचे फळ मिळते, परंतू अल्पकाळासाठी. हे दान-पुण्य वगैरे पण येथे केले जाते, सतयुगात केले जातनाही. सतयुगात कर्म चांगलीच होतात, कारण आत्ताचा वारसा मिळाला आहे. तिथे कोणतेही कर्म विकर्म नाही बनणार, कारण तिथे रावणच नाही. विकारामध्ये जाण्यानी विकारी कर्म बनून जातात. विकारांमुळे विकर्म बनते. स्वर्गामध्ये विकर्म कोणतेच होत नाही. सर्वकाही कर्मावर अवलंबून आहे. ही माया रावण अवगुणी बनवते. बाबा येऊन सर्वगुण संपन्न बनवतात. रामवंशी आणि रावणवंशीचे युध्द चालते. तुम्ही रामाची मुले आहात, किती चांगली-चांगली मुले मायेपासून हारतात. बाबा नावे नाही सांगत, तरीही अपेक्षा ठेवतात. अधमपेक्षा अधमचा उध्दार करावा लागतो. बाबांना साऱ्या विश्वाचा उध्दार करायचा आहे. रावणाच्या राज्यामध्ये सर्वच अधम गतीला प्राप्त झाले आहेत. बाबा सुरक्षित राहण्यासाठी अनेक युक्त्या रोज-रोज समजावत राहतात. तरीही अधम पासून अधम बनतात. ते नंतर एवढे चढू नाही शकत. तो अधमपना आतल्या आत खात राहतो. जसे म्हणतात ना-अंतकाळी जो स्त्रीची आठवण करतो, त्यांची बुध्दीत तोच अधमपणा आठवत राहते.

तर बाबा मुलांना समजावतात. कल्प-कल्प तुम्हीच ऐकता. सृष्टीचे चक्र कसे फिरते, जनावरांना तर नाही ना समजवणार. तुम्हीच ऐकता आणि समजता. मनुष्य तर मनुष्यच आहेत. या लक्ष्मी नारायणालाही कान-नाक वगैरे सर्व आहे,तरीही मनुष्यच आहेत ना, परंतू त्यांच्यामध्ये दैवीगुण आहेत म्हणून त्यांना देवता म्हटले जाते. हे असे देवता कसे बनतात आणि नंतर कसे उतरतात, या चक्राबद्दल तुम्हालाच माहित आहे. जे विचार सांगर मंथन करतील तेच धारणा करतील. जे विचार सागर मंथन नाही करत, त्यांना बुध्दू समजायचे. मुरली चालवणारा विचार सागर मंथन करत राहिल. या विषयावर हे-हेसमजावयाचे आहे. अपेक्षा ठेवली जाते, आता नाही समजले तर पुढे जाऊन जरुर समजेल. अपेक्षा ठेवणे म्हणजे सेवा करण्याची आवड असणे. थकायचे नाही. भले कुणी चढता-चढता अधोगती झाली आणि जर येत असेल तर प्रेमानी बसवणार, ना असे म्हणणार नाही की निघून जा. हालचाल विचारावी लागेल, एवढे दिवस कुठे होता, का नाही आले? मग म्हणतात मायेनी आम्हाला हरवले, समजतात पण ज्ञान खुप चांगले आहे. आठवण तर राहतेच ना भक्तीमध्ये तर हारणे-जिंकणे हा विषयच नाही. हे ज्ञान आहे याला धारण करायचे आहे. तुम्ही जो पर्यंत ब्राह्मण बनत नाही. तो पर्यंत देवता बनू नाही शकत. ख्रिश्चन, बौध्द, पारसी यांच्यामध्ये ब्राह्मण थोडेच असतात. ब्राह्मणांची मुले ब्राह्मण असतात. या गोष्टी आता तुम्ही समजतात. तुम्ही जाणता अल्फ (परमात्मा) ची आठवण करायची आहे. अल्फ ची आठवण केल्याने बे बादशाही मिळते. जेव्हा कुणी भेटते तेव्हा त्यांना सांगा अल्फ अल्लाहची आठवण करा. अल्फलाच उंच, श्रेष्ठ मानले जाते. बोटांनी ईश्वराकडे इशारा करतात, सरळ सरळ वरती ईश्वर आहे. अल्फ ला एक म्हटले जाते. एकच भगवान आहे बाकी सर्व मुलं आहेत. बाबांना अल्फ म्हटले जाते. बाप ज्ञान देतात. आपला मुलगा बनवतात. तर तुम्हा मुलांना किती खुशी व्हायला हवी, बाबा आमची किती सेवा करतात. विश्वाचे मालक बनवतात. नंतर स्वत: त्या पवित्र दुनियेत येत ही नाहीत, पावन दुनियेत त्यांना कुणी बोलवत ही नाही. पतित दुनियेत बोलवतात. पावन दुनियेत येऊन काय करणार. त्यांचे नावच आहे पतित-पावन तर जुन्या दुनियेला पावन दुनिया बनवणे, ही त्यांची ड्युटी आहे. बाबांचे नावच आहे शिव, मुलांना शाळीग्राम म्हटले जाते. दोन्हीची पुजा होते. परंतू पुजा करणाऱ्यांना काहीच माहित नाही, बस एक रस्म-रिवाज बनवली आहे. पुजेची देवीचे पण अतिशय सुंदर हिऱ्या मोत्यांचे महल वगैरे बनवतात. पुजा करतात ते तर मातीचे लिंग बनवतात आणि तोडतात. शिवबाबांच्या पुजेला मेहनत नाही लागत, दगड पाण्यामध्ये घासून घासून गोल बनतो पुर्ण अंडाकार बनतो. म्हणतात पण आत्मा अंडाकृती आहे, जी ब्रह्मतत्त्वामध्ये राहते, म्हणून त्याला ब्रह्माण्ड असे म्हणतात. तुम्ही ब्रह्माण्ड आणि विश्वाचे मालक बनता.

तर पहिल्यांदा बाबांचा परिचय दयायचा आहे. शिवबाबा म्हणून सर्व आठवण करतात. दुसरीकडे ब्रह्मालाही बाबा महणतात. प्रजापिता आहे तर साऱ्या प्रजेचा पिता आहे ना. ग्रेट-ग्रेट ग्रॅण्ड फादर (आजोबांचे आजोबा) हे सर्वज्ञान आता तुम्हा मुलांमध्ये आहे. प्रजापिता ब्रह्मा असे बरेच जण म्हणतात. परंतू यथार्थ रितीने कुणी जाणत नाहीत. ब्रह्मा कुणाचा मुलगा आहे? तुम्ही म्हणाल परमपिता परमात्म्याचा. शिवबाबांनी यांना दत्तक घेतले आहे. तर हा शरीरधारी आहे ना. ईश्वराची सर्व मुले आहेत. नंतर जेव्हा शरीर मिळाल्यानंतर प्रजापिता ब्रह्मांची दत्तक पुत्र असे म्हणतात. शिवबाबा आत्म्यांना दत्तक घेत नाही. तुम्हाला दत्तक घेतले आहे, आता तुम्ही आहात ब्रह्माकुमार-कुमारी, शिवबाबा दत्तक नाही घेत. सर्व आत्में अनादी अविनाशी आहेत. सर्व आत्म्यांना आपापले शरीर, आप-आपला पार्ट मिळालेला आहे, जो बजवावा लागतो. हा पार्ट अनादि अविनाशी परंपरेनी चालत आला आहे. ज्याचा आदि-अंत सांगू शकतनाही. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. साहुकारी, पद प्रतिष्ठेचा अहंकार सोडून दयायचा आहे. अविनाशी ज्ञान धनांनी स्वत:ला मालामाल बनवायचे आहे. सेवेमध्ये कधीच थकायचे नाही.

2. वातावरण चांगले ठेवण्यासाठी मुखाद्वारे सदैव रत्न बोलायचे आहेत, दु:ख देणारे बोल बोलायचे नाही. यावर लक्ष ठेवून हर्षितमुख राहायचे आहे.

वरदान:-
सदैव श्रेष्ठ वेळेप्रमाणे श्रेष्ठ कर्म करत, वाह-वाहचे गीत गाणारे भाग्यवान आत्मा भव :-

या श्रेष्ठ वेळेला सदैव श्रेष्ठ कर्म करत, “वाह-वाह” चे गीत मनानी गात राहा. “वाह माझे श्रेष्ठ कर्म, किंवा वाह श्रेष्ठ कर्म शिकवणारे बाबा” तर सदैव वाह-वाह! चे गीत गात राहा. कधी चुकुनही दु:खाचे दृश्य पाहून सुध्दा हाय शब्द नाही निघाला पाहिजे. वाह ड्रामा वाह! आणि वाह बाबा वाह! जे स्वप्नातही नव्हते, ते भाग्य घरबसल्या मिळाले. याच भाग्याच्या नशेत रहा.

बोधवाक्य:-
मन-बुध्दीला शक्तीशाली बनवा तर कोणत्याही हलचलमध्ये अचल अडोल राहाल.