18-12-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, माया फार जबरदस्त आहे, तिच्यापासून खबरदार राहा, कधी हाविचार न येवो
कि, आम्ही ब्रह्माला मानत नाही, आमचा तर शिवबाबांशी प्रत्यक्ष संबंध आहे.”
प्रश्न:-
कोणत्या
मुलांवर सर्वांचे प्रेम आपोआपच जाते?
उत्तर:-
जे अगोदर
प्रत्येक गोष्टीला स्वत: अनुकरणात आणतात मग इतरांना सांगतात, त्यांचेवर सर्वांचे
प्रेम आपोआपच जाते. ज्ञानाला स्वत:मध्ये धारण करुन मग अनेकांची सेवा करावयाची आहे,
तेव्हा सर्वांचे प्रेम मिळेल. जर स्वत: करत नाहीत फकत इतरांना सांगतात, तर त्यांना
कोण मानेल? ते तर जसे पंडीत आहेत.
ओम शांती।
मुलांना बाबा विचारतात, आत्म्यांना परमात्मा विचारत आहेत, हे तर जाणता कि, आम्ही
परमपिता परमात्म्याचे समोर बसले आहोत. बाबाला स्वत:चा रथ नाही, हा तर निश्चय आहे
ना? या भृकुटी मध्ये बाबांचे निवास स्थान आहे. बाबांनी स्वत: म्हटले आहे कि, मी
यांचे भकुटीच्यामध्ये बसत आहे. यांचे शंरीर भाड्याने घेत आहे. आत्मा भृकुटीच्या
मध्ये बसते, तर बाबा पण येथेच येऊन बसत आहेत. ब्रह्मा बाबा पण आहेत तर शिवबाबा पण
आहेत. जर हे ब्रह्मा नसते तर शिवबाबा पण नसते. जर कोणी म्हणेल कि आम्ही शिवबाबाची
आठवण करतो, ब्रहमाची नाही. परंतू शिवबाबा बोलणार कसे? वरती आकाशात नेहमी शिवबाबाची
आठवण करत आलो. आता तुम्हा मुलांना माहित आहे कि, आम्ही बाबाजवळ बसलो आहोत, असे तर
समजत नाही कि शिवबाबा वर आहेत. जसे भक्तीमार्गात म्हणतात शिवबाबा वर आहेत, त्यांची
प्रतिमा येथे पुजली जाते. या गोष्टी फार समजण्याच्या आहेत, जाणता कि बाबा ज्ञानाचे
सागर ज्ञानसंपन्न आहेत तर ज्ञान कसे सांगतील. ब्रहमाचे तनाद्वारे सांगत आहेत. काही
म्हणतात, आम्ही ब्रह्माला मानत नाही, परंतू शिवबाबा म्हणतात कि, मी या मुखाद्वारे
तुम्हाला सांगत आहे, माझी आठवण करा. ही समजण्याची गोष्ट आहे ना. ब्रह्मा तर स्वत:
म्हणतात कि, शिवबाबाची आठवण करा, ते कुठे म्हणतात माझी आठवण करा? यांचेद्वारे
शिवबाबा म्हणतात कि, माझी आठवण करा. हा मंत्र मी यांचे मुखाद्वारा देत आहे. ब्रहमा
नसतील तर मी मंत्र कसा देईल? ब्रह्मा नसतील तर शिवबाबाशी कसे भेटाल? कसे माझ्याजवळ
बसाल? चांगले चांगले महारथींना पण असे विचार येतात, जे माया, माझेपासून तोंड वळवते.
म्हणतात कि, आम्ही ब्रह्माला मानत नाही. तर त्यांची काय गती होईल? माया किती
जबरदस्त आहे, जे एकदम तोंडच फिरवते. आता तुमचे तोंड शिवबाबांनी समोर केले आहे.
तुम्ही समोर बसले आहात. मग जे असे समजतात कि, ब्रह्मा तर काहीच नाहीत, तर त्यांची
काय गती होईल? दुर्गतीला प्राप्त करतात. मनुष्य तर बोलावतात कि, ओ गॉड फादर मग गॉड
फादर ऐकतात का? म्हणतात कि, ओ मुक्तीदाता या. काय तेथूनच मुक्त करतील? कल्प
कल्पाच्या पुरुषोत्तम संगमयुगावरच बाबा येत आहेत. ज्यांच्यात येतात त्यांनाच मानले
नाही, तर काय म्हणावे? मायेमध्ये एवढे बळ आहे, जी नंबर एकलाच कोडी तुल्य बनविते. असे
पण कोणी, सेंटरवर आहेत, तेव्हा तर बाबा म्हणतात खबरदार राहा. जरी बाबांनी सांगितले
ज्ञान, दुसऱ्याला सांगत पण राहतात. परंतू जसे पंडितासारखे. जसे बाबा पंडिताची गोष्ट
सांगतात. यावेळी तुम्ही बाबाची आठवण करुन विषय सागरातून क्षीरसागरामध्ये जात आहात
ना. भक्तीमार्गात पुष्कळ कथा बनविल्या अहोत. पंडीत दुसऱ्याला सांगत होता, कि राम
नाव घेतल्याने पार होऊन जाल, परंतू स्वत: फारच जास्त घाट्यात होता. स्वत: विकारात
जात राहणे आणि दुसऱ्याला म्हणणे निर्विकारी बना. त्यांचा काय परिणाम होईल? पंडीत
खोटा निघाला, तर त्यांचेवर कोण प्रेम करेल? प्रेम त्यांचेवर जाते जे प्रत्यक्षात
बाबांची आठवण करतात. चांगल्या चांगल्या महारथीला पण माया गिळून टाकते.
बाबा समजावतात कि, आता तर कर्मातीत अवस्था बनली नाही, जोपर्यंत युध्दाची तयारी झाली
नाही. एकीकडे युध्दाची तयारी होईल, दुसरीकडे कर्मातीत अवस्था होईल. पुर्ण संबंध
होईल, मग युध्द पुर्ण होते, बदल होऊन जाईल. अगोदर रुद्रमाळा बनत आहे. या गोष्टी इतर
कोणी जाणत नाही. तुम्ही समजता कि, या दुनियेला बदलायचे आहे. ते समजतात कि, या
दुनियेचे अजून 40 हजार वर्षे राहिलेले आहेत. तुम्ही तर समजता कि, विनाश समोर उभा आहे.
तुम्ही आहात अल्प संख्याक, ते आहेत बहुसंख्य. तर तुमचे कोण मानेल? जेव्हा तुमची
वृध्दी होईल्, मग तुमच्या योगबळाने अनेक जण आकर्षित होऊन येतील, जेवढा तुमच्यातील
गंज निघून जाईल, तेवढे बळ भरत जाईल. असे नाही की बाबा जानी जाननहार आहेत. नाही,
सर्वांच्या अवस्थेला जाणत आहेत. बाबा मुलांच्या अवस्थेला जाणतनाहीत? सर्व काही
माहित राहते. आता तर कर्मातीत अवस्था झाली नाही. मोठ्यातमोठ्या चुका होणे पण शक्य
आहे. महारथी कडून पण होत आहेत. बोलणे चालणे, चाल चलन इ. सर्व प्रसिध्द होत जाईल. आता
तर दैवी चलन बनवायची आहे. देवता सर्व गुण संपन्न आहेत ना. आता तुम्हाला असे बनायचे
आहे. परंतू माया कोणाला पण सोडत नाही. लाजाळूच्या झाडासारखे बनविते. शिडी आहे ना.
देहअभिमान आल्याने वरुन एकदम खाली पडतात, पडला आणि मेला. आजकाल स्वत:ला मारण्यासाठी
कसले कसले उपाय करत आहेत. 20 मजल्यावरुन पडून एकदम नष्ट होऊन जातात. असे पण होऊ नये
कि दवाखान्यात पडून राहतील, दु:ख भोगतील. तर कोणी स्वत:ला पेटवून घेतात. मग कोणी
वाचविले तर किती दु:ख भोगत राहतात. संपूर्ण जळाले तर आत्मा निघून जाईल, जीवघात
करतात. असे समजतात कि जीवघात करुन, दु:खापासून सुटून जाऊ. जोश आला तर बस. काही तर
दवाखान्यात खुप दु:ख भोगत आहेत. डॉक्टर समजतात कि हे दु:खापासून सुटू शकत नाहीत,
यापेक्षा चांगले कि याला गोळी दिली तर हे मरुन जातील. परंतू ते समजतात कि, गोळी
देऊन मारणे महापाप आहे. आत्मा स्वत: समजते कि, असला त्रास भोगण्यापेक्षा चांगले आहे
शरीर सोडून देणे. आता शरीर कोण सोडवेल? ही आहे अपार दु:खाची दुनिया,स्वर्गामध्ये
आहेत अपार सुख.
तुम्ही मुले समजता कि, आम्ही आता परत माघारी जात आहोत, दु:ख धाम कडून सुखधामकडे जात
आहोत, तर बाबाची आठवण करायची आहे. बाबा पण संगमयुगावर येत आहेत, जेव्हा दुनिया बदलत
आहे. बाबा म्हणतात कि, मी आलो आहे, तुम्हा मुलांना सर्व दु:खापासून सोडवून नविन
पावन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी. पावन दुनियेमध्ये थोडे राहतात. येथे तर फार आहेत,
पतित बनले आहेत, त्यामुळे बोलावतात कि, पतित पावन... हे थोडेच समजतात कि, आम्ही
महाकाळाला बोलावत आहे. आम्हाला या छी-छी दुनियेतून घरी घेऊन जावा. जरुर बाबा येतात,
सर्व मरतील तेव्हा तर शांती होईल ना. शांती शांती म्हणत राहतात. शांती तर
शांतीधाममध्ये असते. परंतू या दुनियेत शांती कशी असेल? जेव्हा कि इतके अनेक मनुष्य
आहेत. सतयुगामध्ये तर सुख शांती होती. आता तर कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत. ते
जेव्हा नष्ट होतील, एका धर्माची स्थापना होईल, तेव्हा तर सुख शांती होईल. हाहाकारा
नंतर जयजयकार होत आहे. पुढे चालून पहा कसा मृत्यूचा बाजार तीव्र होत आहे. कसे मरत
आहेत. बॉम्ब पासून पण आग लागत आहे. पुढे चालून पाहतील आणि म्हणतील कि, बरोबर विनाश
तर जरुर होईलच.
तुम्ही मुले जाणता कि, हे सृष्टीचे चक्र कसे फिरत आहे? विनाश तर होणारच आहे. एका
धर्माची स्थापना बाबा करत आहेत, राजयोग पण शिकवत आहेत. बाकी सर्व अनेक धर्म नष्ट
होऊन जातील. गीतेमध्ये काही दाखविले नाही. मग गीता वाचून निष्कर्ष काय? दाखवितात कि
प्रलय झाला. बरं जलमई होत आहे, परंतू सारी दुनिया जलमई होत नाही. भारत तर अविनाशी
खंड आहे. त्यामध्ये पण आबू सर्वांत पवित्र तीर्थस्थान आहे, जेथे बाबा येऊन सर्वांची
सद्गती करत आहेत. दिलवाडा मंदीर खुप चांगले स्मृतीस्थळ आहे. किती अर्थ सहित आहे.
परंतू ज्यांनी बनविले, ते हे जाणत नाहीत. तरी पण चांगले समजदार तर होते ना.
द्वापरमध्ये जरुर चांगले समजदार होते. कलियुगामध्ये तर आहेत सर्व तमोप्रधान. सर्व
मंदीरामध्ये हे उंच आहे, जेथे तुम्ही बसले आहात. तुम्ही जाणता कि, आम्ही आहोत
चैतन्य, ते आमचेच स्थूल स्मृतीस्थळ आहे. बाकी काही काळ हे मंदीर इत्यादी आणखीन बनत
राहतील.नंतर मग नष्ट होण्याची वेळ येईल. सर्व मंदीर इत्यादी तुटून फुटून जातील.
होलसेल मृत्यू होईल. महाभारी महाभारत लडाई गायली जाते ना, ज्यामध्ये सर्व नष्ट होऊन
जात आहेत. हे पण तुम्ही समजत आहात, बाबा संगम युगावरच येत आहेत. बाबाला रथ तर पाहिजे
ना. आत्मा जेव्हा शरीरामध्ये येते तेव्हाच हालचाल होते. आत्मा शरीरातून निघून गेली,
तर शरीर जड होऊन जाते. तर बाबा समजावतात कि, आता तुम्ही घरी जात आहात. तुम्हाला
लक्ष्मी-नारायण सारखे बनायचे आहे. तर असे गुण पण पाहिजेत ना. तुम्ही मुले या खेळाला
पण जाणता ना. हा खेळ किती आश्चर्य कारक बनलेला आहे. या खेळाचे रहस्य बाबा बसून
समजावत आहेत. बाबा ज्ञानसंपन्न, बीजरुप आहेत ना. बाबाच येऊन साऱ्या झाडाचे ज्ञान
देत आहेत, यामध्ये काय काय होत आहे, तुम्ही यामध्ये किती चांगली चांगली मुले आहेत.
त्यांच्या बुध्दी मध्ये हे सारे ज्ञान राहते. बाबा आपले सारखे शिक्षक बनवत आहेत.
शिक्षक पण क्रमवार तर आहेत ना. काही तर शिक्षक होऊन मग बिघडून जातात. अनेकांना
शिकवून स्वत: नष्ट होऊन जातात. लहान लहान मुलामध्ये पण वेगवेगळे संस्कार असतात. बाबा
समजावतात कि, येथे पण जे ज्ञान नीट घेत नाहीत, चलन सुधारत नाहीत, ते अनेकांना दु:ख
देण्यास निमित्त बनून जातात. हे पण शास्त्रामध्ये दाखविले आहे, लपून बसत होते, मग
बाहेर जावून फितूर बनून तंग करत होते. हे तर सर्व होत राहते. उंच ते उंच बाबा जी
स्वर्गाची स्थापना करत आहेत, तर किती जण विघ्न रुप बनतात.
बाबा समजावत आहेत, तुम्ही मुलं सुख शांतीचे स्तंभ आहात. तुम्ही फार उत्तम आहात.
तुमच्या पेक्षा उत्तम यावेळी कोणी असत नाही. अमर्यादीत बाबाची मुले आहात, तर किती
गोड राहून वागले पाहिजे. कोणाला दु:ख दयायचे नाही. नाही तर ते अंताला आठवणीत येईल.
मग शिक्षा भोगावी लागेल. बाबा म्हणतात कि, आता घरी जायचे आहे. सुक्ष्मवतनमध्ये
मुलांना ब्रह्माबाबाचा साक्षात्कार होतो. त्यामुळे तुम्ही पण असे सुक्ष्मवतनवासी बना.
शांतीमध्ये राहत अभ्यास करावयाचा आहे. फार कमी बोलायचे आहे. गोड बोलायचे आहे. असा
पुरुषार्थ करत करत तुम्ही शांतीचा स्तंभ बणून जाल. तुम्हाला शिकविणारे बाबा आहेत.
नंतर तुम्ही इतरांना शिकविता. भक्ती मार्ग बोलण्याचा मार्ग आहे. आता तुम्हाला शांत
बनायचे आहे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. फार उत्तम
गोड बनायचे आहे. शांती आणि सुखाचा स्तंभ बनण्यासाठी फार कमी आणि गोड बोलायचे आहे.
शांतीमध्ये राहण्याचा अभ्यास करावयाचा आहे. बोलायचे नाही.
2. स्वत:ची दैवी चलन बनवायची आहे. लाजाळू सारखे बनायचे नाही. युध्दा पुर्वी
कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहाचायचे आहे. निर्विकारी बणून, निर्विकारी बनविण्याची सेवा
करावयाची आहे.
वरदान:-
कर्म आणि
संबंध दोन्हीमध्ये स्वार्थी भावापासून मुक्त राहणारे बाबासारखे कर्मातीत भव :-
तुम्हा मुलांची
सेवा आहे, सर्वांना मुक्त बनविण्याची. तर इतरांना मुक्त करतांना स्वत:ला बंधनात
बांधायचे नाही. जेव्हा मर्यादीत माझे माझे पासून मुक्त व्हाल तरच अव्यक्त स्थितीचा
अनुभव कराल. जी मुले लौकिक आणि अलौकिक, कर्म आणि संबंध दोन्ही स्वार्थ भावापासून
मुक्त आहेत, तेच बाबासारखे कर्मातीत स्थितीचा अनुभव करु शकतील. तर तपासणी करा
कोठपर्यंत कर्माच्या बंधनापासून न्यारे बनले आहात? व्यर्थ स्वभाव संस्कारामध्ये वंश
होण्यापासून मुक्त बनले आहात? कधी कोणता मागील संस्कार वशीभूत तर नाही बनवित.
बोधवाक्य:-
समान आणि
संपूर्ण बनायचे आहे तर स्नेहाचे रुपामध्ये समाविष्ट व्हा.