13-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , खरी कमाई करण्याचा पुरुषार्थ , प्रथम तुम्ही स्वत : करा , परत आपल्या मित्र संबंधी कडून पण करून घ्या . स्वतःच्या परिवारा पासून सुरुवात करा .

प्रश्न:-
सुख किंवा चैन प्राप्त करण्याची , विधी काय आहे ?

उत्तर:-
पवित्रता,जिथे पवित्रता आहे तिथे सुख चैन आहे. बाबा पवित्र दुनियेची ची स्थापना करतात,तेथे विकार नसतात.जे देवतांचे पुजारी आहेत,ते कधी असा प्रश्न करणार नाहीत,की विकार शिवाय दुनिया कशी चालेल.आता तुम्हला त्या दुनिया मध्ये जायचे आहे,म्हणून या पतीत दुनियेला विसरायचे आहे.शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे.

ओम शांती।
ओम शांती चा अर्थ तर मुलांना समजवला आहे.शिवबाबा पण ओम शांती म्हणतात,तर शाळीग्राम मुलं पण म्हणतात.आत्मच म्हणते ओम शांती.शांतीच्या सागराची मुलं, शांतीसाठी जंगलामध्ये जाऊन कोणता उपाय करत नाहीत.तर हे बाबाच बसून समजतात.त्या पित्यालाच म्हणतात, तिथे घेऊन चल,जिथे सुख आणि चैन आहे.चैन किंवा सुख सर्व मनुष्यांना पाहिजे असते,परंतु सुख आणि शांती च्या अगोदर पवित्रता पाहिजे.पवित्रता ला पावन,अपवित्र ला पतित म्हटले जाते.पतित दुनिया वाले पुकारत राहतात,येऊन आम्हाला पावन दुनिये मध्ये घेऊन चला.बाबाच आहेत,पतीत दुनिया पासून मुक्त करून पावन दुनिये मध्ये घेऊन जाणारे.सत्ययुगा मध्ये पवित्रता आहे,तर कलियुगामध्ये अपवित्रता आहे,ती निर्विकारी दुनिया आणि ही विकारी दुनिया आहे.मुलं जाणतात,दुनियेची वृध्दी होत राहते.सतयुग र्निविकारी दुनिया आहे,तर जरूर थोडेच मनुष्य असतील.थोडेच मनुष्य कोन असतील?बरोबर सतयुगा मध्ये देवी-देवतांचे राज्य आहे.त्यालाच सुख शांती ची दुनिया किंवा सुखधाम म्हटले जाते.हे दुःखधाम आहे.दुःखधामला बदलून सुखधाम बनवणारे एकच परमपिता परमात्मा आहेत.सुखाचा वारसा जरुर शिवपिताच देतील.आता ते पिता म्हणतात दुखधामला विसरा,शांतीधाम आणि सुखधाम ची आठवण करा,यालाच मनमनाभव म्हणले जाते. दुखधामचा विनाश करून शांतीधाम मध्ये घेऊन जातात,या चक्राला पण समजायचे आहे.८४ जन्म घ्यावे लागतात.जे प्रथम सुखधाम मध्ये येतात,तेच८४जन्म घेतात.या सर्व गोष्टी आठवण केल्यामुळे तुम्ही सुखधाम चे मालक बनू शकता.

बाबा म्हणतात मुलांनो शांतीधाम ची आठवण करा आणि परत वारसा म्हणजे सुखधामची आठवण करा. प्रथम तुम्ही शांतीधाम मध्ये जातात,तर स्वतःला शांतीधाम आणि ब्रह्मांडचे मालक समजा.चालता-फिरता स्वता:ला शांतीधाम चे रहिवासी समजा,तर ही विकारी दुनिया विसरून जाईल. सतयुग आहे सुखधाम परंतु सर्व तर सतयुगा मध्ये येऊ शकत नाहीत.या गोष्टीत तेच समजतील,जे देवतांचे पुजारी आहेत.ही खरी कमाई आहे,जे खरे बाबाच शिकवतात,बाकी सर्व खोटी कमाई आहे.अविनाश ज्ञान रत्नांच्या कमाईलाच खरी कमाई म्हटले जाते,बाकी विनाशी धन दौलत तर खोटी कमाई आहे.तुम्ही द्वापर युगा पासून खोटी कमाई करत आले.या अविनाशी खऱ्या कमाईचे प्रारब्ध सतयुगा पासुन सुरू होऊन त्रेतायुगा मध्ये पूर्ण होते,म्हणजेच अर्धाकल्प सुख मिळते.परत खोटी कमाई सुरू होते,ज्याद्वारे क्षणभंगुर सुख मिळते.हे अविनाश ज्ञानरत्न,ज्ञानसागर बाबाच देतात.खरे बाबा खरे कमाई करवतात.भारत सत्य खंड होता,आत्ता तर खोटा खंड बनला आहे.दुसऱ्या खंडाला सत्य खंड आणि खोटा खंड म्हटले जात नाही.सत्य खंड बनवणारे बादशाह,सत्य आहेत.एकच ईश्वर सत्य आहे,बाकी सगळे खोटे आहेत.सत्य एकच ईश्वरीय पिता आहेत,बाकी खोटे पिता आहेत.सतयुगा मध्ये खरे पिता मिळतात,कारण तेथे खोटे पाप इत्यादी होत नाही.ही पाप आत्म्यांची दुनिया आहे,ती पुण्यत्म्यांची आहे.आता या खऱ्या कमाईसाठी खूपच पुरुषार्थ करायला पाहिजे.ज्यांनी कल्पापूर्वी कमाई केली आहे,तेच करतील.प्रथम स्वत: कमाई करायची,परत माहेर आणि सासर दोन्ही कडील कमाई करून घ्यायची आहे.स्वतःच्या परिवारा पासून सुरुवात करायची आहे.

सर्वव्यापी चे ज्ञान असणारे भक्ती करू शकत नाहीत.जेव्हा सर्व भगवंताची रुपं आहेत तर भक्ती कोणाची करतात?तर या दलदली मधून काढण्यासाठी कष्ट करावे लागतात. संन्याशांना आपल्या परिवाराचे कल्याण करणे जमणार नाही.प्रथम तर,ते घरदाराचा समाचार ऐकवत नाहीत. तुम्ही विचारा,तुम्ही घरदाराचा,समाचार का देत नाहीत?माहिती तर पडायला पाहिजे ना.सांगण्या मध्ये काय आहे, अमक्या घरचे होते,परत संन्यास घेतला. तुम्हाला विचारलं तर तुम्ही लगेच सांगू शकाल.सन्याशांचे शिष्य तर अनेक जण असतात.त्यांनी जर स्पष्ट केले की भगवान एक आहेत,तर त्यांना विचारतील,तुम्हाला हे ज्ञान कोणी ऐकले?ते म्हणतील की ब्रह्मकुमार कुमारीने,तर त्यांचा सर्व धंदा नष्ट होऊन जाईल.असे कोणी आपली ईज्जत गमावणार नाहीत.परत त्यांना कोणी भोजण पण देणार नाही,म्हणून संन्याशा साठी हे ज्ञान घेणे खूपच मुश्कील आहे. प्रथम तर आपल्या मित्र संबंधिताना ज्ञान देऊन,खरी कमाई करून घ्या ज्याद्वारे २१जन्माचे सुख मिळेल.गोष्टी तर खूपच सहज आहेत,परंतु नाटकांमध्ये इतके ग्रंथ,मंदिर इत्यादी बनवण्याची पण नोंद आहे. पतित दुनिया मध्ये राहणारे म्हणतात,आत्ता पावन दुनिये मध्ये घेऊन चला.सतयुगाला ५०००वर्ष झाले.त्यांनी तर कलियुगाचे आयुष्यच लाखो वर्ष म्हटले आहे,परत मनुष्य कसे समजतील,सुखधाम कोठे आहे,कधी होईल.ते तर म्हणतात,महाप्रलय होतो नंतर कृष्ण अंगठा चोकत,समुद्रामध्ये पिंपळाच्या पानावर येतो.आता कुठल्या गोष्टी,कुठे घेऊन गेले आहेत.आत्ता बाबा म्हणतात,मी ब्रह्मा द्वारे,सर्व वेद ग्रंथाचे रहस्य सांगतो म्हणुन विष्णूच्या नाभी कमल द्वारे ब्रह्मा दाखवतात आणि हातामध्ये ग्रंथ.सूक्ष्मवतन मध्ये ग्रंथ इत्यादी नसतात.आत्ता ब्रह्मा तर जरुर येथेच,असले पाहिजेत.विष्णू लक्ष्मीनारायण चे रूपामध्ये पण येथेच असतात.ब्रह्मच विष्णू बनतात,परत विष्णूच ब्रह्मा बनतात.आत्ता ब्रह्मा पासुन विष्णू निघतात की विष्णू पासून ब्रह्मा निघतात,या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत,परंतु या गोष्टी तेच समजतील जे चांगल्या रीतीने शिकत असतील.बाबा म्हणतात, जोपर्यंत तुमचे शरीर सुटत नाही,तोपर्यंत तुम्ही ज्ञान घेत राहा.तुम्ही बिल्कुलच,१००%बेसमज,कंगाल बनले आहात.तुम्हीच समजदार देवी-देवता होते,आता परत तुम्हीच देवी देवता बनत आहात.मनुष्य तर बनवू शकत नाहीत.तुम्ही देवता होते,परत ८४ जन्म घेत घेत एकदम कलाहिन बनले आहात.तुम्ही सुखांमध्ये होते तर खूप सुख शांती मध्ये होते,आत्ता तर अशांती आहे.तुम्ही ८४जन्माचा हिशोब पण सांगू शकता.इस्लामी,बौध्दी,शिख,ईसाई, मठ,पंत सर्व किती जन्म घेतील.हा हिशोब काढणे तर सहज आहे.स्वर्गाचे मालक तर भारतवासीच बनतात. कलम लागत आहे ना.हे ज्ञान आहे.जर स्वतः समजले आहे,तर परत आपल्या मात पिता,भावा बहिणींना,ज्ञान द्यावे लागेल,गृहस्थ व्यवहारा मध्ये राहत,कमलफुला सारखे राहायचे आहे,परत आपल्या परीवारा पासुन सुरुवात करा.माहेर-सासरच्या लोकांना पण हे ज्ञान द्यावे लागेल.धंद्यामध्ये पण सुरुवातीला आपल्या भावांनाच भागीदार बनवतात.येथे पण असेच आहे.गायन पण आहे, कन्या तिच,जी माहेर आणि सासरचा उद्धार करेल. अपवित्र उद्धार करु शकत नाहीत.तेव्हा कोणती कन्या?या ब्रह्माच्या कन्या, ब्रह्मकुमारी आहेत ना.येथेच अधर कन्या,कुवारी कन्याचे मंदिर पण बनलेले आहे.येथे तुमचे यादगार बनलेले आहेत. आम्ही परत आलो आहोत,भारताला स्वर्ग बनवण्यासाठी.हे दिलवाडा मंदिर अगदी बरोबर बनलेले आहे,त्यामध्ये वरती स्वर्ग दाखवला आहे.स्वर्ग तर येथेच असतो.राजयोगाची तपस्या पण येथेच होते.ज्यांचे मंदिर आहे,त्यांनी हे जाणायला पाहिजे ना.मंदिरा मध्ये जगतपिता,जगदांबा,आदीदेव आदी देव बसले आहेत.अच्छा,आदीदेव कोणाचा मुलगा आहे,शिवबाबांचा.अधरकुमारी, कुमारी,सर्व राजयोगा मध्ये बसले आहेत.बाबा म्हणतात मनमनाभव,तर तुम्ही वैकुंठाचे मालक बनाल.मुक्ती,

जीवनमुक्ति धामची आठवण करा. तुमचा हा सन्यास आहे,जैन लोकांचा संन्यास तर खूप अवघड आहे.केस ई.काढण्याची खूपच खडक पद्धत आहे. येथे तर सहज राजयोग आहे.हा प्रवृत्ती मार्गाचा आहे,हे पण अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे.कोणी जैन मुनीने बसून आपला नवीन धर्म स्थापन केला,परंतु त्यास आदी सनातन देवी देवता धर्म तर म्हणनार नाही. तो तर आत्ता प्रायलोप आहे.कोणी जैन धर्म चालवला आणि त्यापाठीमागे चालत आले.ही पण नाटकांमध्ये नोंद आहे. आदिदेव ला पिता आणि जगदंबेला माता म्हणाल.हे तर सर्व जाणता आदीदेव ब्रह्मा आहेत.आदम बिबी,एडम ईव पण म्हणतात.क्रिश्चन लोकांना थोडंच माहिती आहे की,एडम ईव आत्ता तपस्या करत आहेत.मनुष्य सुर्ष्टीच्या सिजऱ्याचे हे मुख्य आहेत.हे रहस्य पण बाबाच सन्मुख समजवतात.शिवाचे किंवा लक्ष्मीनारायणाचे बनले आहेत तर,त्यांचे आत्मचरित्र जाणायला पाहिजे ना.हे ज्ञानसागर बाबाच बसून समजवतात.परमपिता परमात्म्याला च ज्ञानसंपन्न,ज्ञानाचे सागर,आनंदाचे सागर म्हणतात.ही परमात्म्याची महिमा आहे. कोणते,साधू संत,जाणत नाहीत,ते तर म्हणतात परमात्मा सर्वव्यापी आहेत, परत महिमा कोणाची करणार. परमात्माला न जाणल्यामुळेच स्वतःला शिवोहम् म्हणतात,नाहीतर परमात्म्याची खूपच महिमा आहे.ते तर मनुष्य सुर्ष्टीचे बीजरूप आहेत.मुसलमान म्हणतात आम्हाला खुदाने तयार केले आहे,रचना झाले ना.नाही तर रचना,रचनेला वारसा देऊ शकत नाही.रचनेला रचनाकारा कडुन वारसा मिळतो,या गोष्टीला पण कोणी समजत नाहीत.ते बिजरुप आहेत,चैतन्य आहेत,सृष्टीच्या आदी मध्य अंतचे,त्यांना ज्ञान आहे.शिवाय बीजाचे आदी मध्य अंतचे ज्ञान कोणी मनुष्य मात्र देऊ शकत नाहीत.बीज चैतन्य आहे,तर जरूर ज्ञान त्यांच्या मध्येच असेल.तेच येऊन तुम्हाला, साऱ्या सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान देतात.हा बोर्ड लावायला पाहिजे,या सृष्टी चक्राला जाणल्यामुळे तुम्ही सतयुगाचे चक्रवर्ती राजा किंवा स्वर्गाचे राजा बनू शकाल.किती सहज गोष्टी आहेत.बाबा म्हणतात जोपर्यंत जगायचे आहे,माझी आठवण करा.मी स्वतः तुम्हाला हा वशीकरण मंत्र देत आहे. आत्ता तुम्ही माझी आठवण करा तर, आठवणी द्वारे विकर्म विनाश होतील.हे स्वदर्शन चक्र फिरत राहील,तर मायचे डोके कापले जाईल.मी तुमच्या आत्म्याला पवित्र बनवून घेऊन जाईल, परत तुम्ही सतोप्रधान शरीर घ्याल. तेथे विकार नसतात.काहीजण असे म्हणतात विकारा शिवाय सृष्टी कशी चालेल,तुम्ही सांगा तुम्ही कदाचित देवतांचे पुजारी नाहीत.लक्ष्मीनारायण च्या महिमाचे गायन करतात,ते संपूर्ण निर्विकारी आहेत.जगदंबा,जगतपिता,निर्विकारी आहेत.राजयोगाची तपस्या करून पतीत पासून पावन,स्वर्गाचे मालक बनतात. तपस्या करतातच पुण्यात्मा बनण्यासाठी, अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात . आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते .

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)या जुन्या दुनियेला बुद्धी द्वारे विसरून, चालता-फिरता स्वतःला शांतीधाम चे रहिवासी समजायचे आहे.शांतीधाम आणि सुखधामची आठवण करून खरी कमाई करायचे आहे आणि दुसऱ्यांना पण करायची आहे.

(२) राजयोगाची तपस्या करून स्वतःला पुण्यात्मा बनवायचे आहे.मायेच्या डोके कापण्यासाठी नेहमी सुदर्शनचक्र फिरवत राहायचे आहे.

वरदान:-
शांतीच्या शक्तीच्या , प्रयोगाद्वारे प्रत्येक कार्यामध्ये सफलता प्राप्त करणारे प्रयोगी आत्मा भव .

आत्ता वेळेच्या परिवर्तना प्रमाणे, शांतीच्या शक्तीच्या साधनांना प्रयोगा मध्ये आणुन,प्रयोगी आत्मा बना.जसे वाणी द्वारे आत्म्या मध्ये,स्नेहाच्या सहयोगाची भावना,ऊत्पन्न करतात. असे शुभ भावना,स्नेहाच्या भावनेच्या स्थिती मध्ये स्थिर रहा,त्यांच्यामध्ये पण श्रेष्ठ भावना उत्पन्न करा.जसे एक दीपक दुसऱ्या दीपक ला प्रज्वलित करतात,तसेच तुमची शक्तिशाली भावना,दुसऱ्या मध्ये पण सर्वश्रेष्ठ भावना उत्पन्न करेल.या शक्तीद्वारे स्थुल कार्यामध्ये पण,खूप सहज सफलता प्राप्त करू शकाल,फक्त प्रयोग करून पहा.

बोधवाक्य:-
सर्वांचे प्रिय बनायचे आहे , तर उमललेले आत्मिक गुलाब बना , कोमेजलेले नाही .