23-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही जितकी जास्त प्रमाणात बाबाची प्रेमाने आठवण कराल, तेवढाच आशिर्वाद मिळेल, पाप नष्ट होतील..”

प्रश्न:-
बाबा मुलांना कोणत्या धर्मात टिकून राहण्याची मत देत आहेत?

उत्तर:-
बाबा सांगतात, मुलांनो तुम्ही आपल्या विचित्रतेच्या धर्मामध्ये टिकून राहा, चित्राचे धर्मामध्ये नाही. जसे बाबा विदेही, विचित्र आहेत, तशी मुले पण विचित्र आहेत, नंतर या चित्रात (शरीरात) येतात. आता बाबा मुलांना म्हणतात कि, मुलांनो विचित्र बना, आपल्या स्वधर्मात टिकून राहा, देह अभिमानात येऊ नका.

ओम शांती।
बाबा बसून आत्मिक मुलांना, समजावतात कि, जेव्हा ओमशांती म्हटले जाते, तर आपल्या आत्म्याला स्वधर्माचा परिचय दिला जातो. तर जरुर बाबाची पण आपोआप आठवण येते, कारण आठवण तर प्रत्येक मनुष्य भगवानाची करतात. फक्त भगवानाचा पुर्ण परिचय नाही. भगवान स्वत:चा आणि आत्म्याचा परिचय देण्यासाठी येतात. भगवंतालाच पतित पावन म्हटले जाते. पतितापासून पावन बनविण्यासाठी भगवान पण विश्व नाटकात बांधलेले आहेत. त्यांना पण पुरुषोत्तम संगमयुगावर यायचे आहे. संगमयुगाची माहिती पण देतात. जुनी दुनिया आणि नविन दुनियेच्या मध्ये बाबा येतात. जुन्या दुनियेला मृत्युलोक, नविन दुनियेला अमरलोक म्हटले जाते. हे पण तुम्ही समजता कि, मृत्यु लोकांमध्ये आयुष्य कमी असते. अकाले मृत्यु होतो. ते आहे अमरलोक, जिथे अकाले मृत्यु होत नाही कारण पवित्र आहेत. अपवित्रतेमुळे व्याभिचारी बनतात, आणि आयुष्य पण कमी होते. बळ पण कमी होऊन जाते. सतयुगामध्ये पवित्र असले कारणाने अव्याभिचारी आहेत. बळ पण जास्ती राहते. बळाशिवाय राजाई कशी प्राप्त करतील? जरुर बाबाकडून त्यांनी आशिर्वाद घेतला असेल. बाबा आहेत सर्व शक्तीमान. आशिर्वाद कसा घेतला असेल? बाबा सांगतात माझी आठवण करा. तर ज्यांनी जास्त आठवण केली असेल, त्यांनीच आशिर्वाद घेतला. आशिर्वाद काही मागण्याची वस्तू नाही. ही तर कष्ट घेण्याची गोष्ट आहे. जितकी जास्त आठवण कराल, तेवढा जास्त आशिर्वाद मिळेल, अर्थात उंच पद मिळेल. आठवणच करणार नाहीत तर आशिर्वाद पण मिळणार नाही. लौकिक पिता मुलांना कधी म्हणत नाहीत कि, माझी आठवण करा. ते लहान पणापासून स्वत:च मम्मा-बाबा म्हणत राहतात. कर्मेन्द्रिया लहान आहेत, मोठी मुले कधी असे बाबा-बाबा मम्मा, मम्मा म्हणत नाहीत. त्यांचे बुध्दीत राहते हे आमचे आई-वडील आहेत, ज्यांचेकडून हा वारसा मिळत आहे. म्हणण्याची किंवा आठवण करण्याची गोष्टच राहत नाही. येथे तर बाबा म्हणतात माझी आणि वारशाची आठवण करा. हदचे संबंध सोडून आता बेहदच्या संबंधाची आठवण करा. सर्व मनुष्याची इच्छा आहे की, आमची गती व्हावी. गती म्हटले जाते मुक्तीधामला. सद्गती म्हटले जाते परत सुखधाममध्ये जाण्यासाठी. कोणी पण प्रथम आले तर जरुर सुख प्राप्त करेल. बाबा सुखासाठीच येतात. जरुर कोणती तरी गोष्ट अवघड आहे. त्यामुळे याला उंच शिक्षण म्हटले जाते. जेवढे उंच शिक्षण तेवढे अवघड पण आहे. सर्व तर पास होणार नाहीत. मोठ्यातील मोठी परिक्षा फार थोडे विद्यार्थी पास करतात, कारण मोठी परिक्षा पास झाल्यावर मग सरकारला पगार पण फार द्यावा लागतो ना. काही विद्यार्थी मोठी परिक्षा पास होऊन पण असेच बसून राहतात. सरकार जवळ एवढा पैसा नाही जो मोठा पगार देतील, येथे तर बाबा म्हणतात कि, जेवढे उंच शिकाल तेवढे उंच पद मिळेल. असे पण नाही सर्व काही राजा वा सावकार बनतील. सारा आधार शिक्षणावर आहे. भक्तीला शिक्षण म्हणत नाहीत. हे तर आहे आत्मिक ज्ञान, जे आत्मिक पिता देत आहेत. किती उंच शिक्षण आहे. मुलांना अवघड वाटत आहे, कारण बाबाची आठवण करत नाही, त्यामुळे चरित्र पण सुधारत नाही. जे चांगली आठवण करतात, त्यांचे चरित्र पण चांगले होत जाते. फार फार गोड सेवाधारी बनत जातात. चरित्र चांगले नसेल तर कोणी पसंद पण करत नाहीत. जे नापास होतात तर जरुर चारित्रामध्ये अडचण आहे. श्री लक्ष्मी नारायणाचे चारित्र्य फार चांगले आहे. रामाच्या दोन कला कमी होतात. भारत रावण राज्यात खोटा खंड झाला आहे. सत्य खंडात तर थोडे पण खोटे असत नाही. रावण राज्यात खोटेच खोटे आहे. खोट्या मनुष्याला दैवी गुण वाला म्हणत नाहीत. ही बेहदची गोष्ट आहे. आता बाबा म्हणतात कि, अशा खोट्या गोष्टी कोणाच्या ऐकू नका, ना सांगू नका. एका ईश्वराच्या मतालाच खरी मत म्हटले जाते. मनुष्य मताला खोटी मत म्हटले जाते. खऱ्या मताने तुम्ही फार उंच बनता. परंतु सर्वचालू शकत नाहीत तर खोटे बनतात. काही बाबाशी प्रतिज्ञा पण करतात कि, बाबा एवढे आयुष्य आम्ही खोटी कामे केली, आता करणार नाही. सर्वांत खोटे काम आहे विकाराचे भुत, देह अभिमानाचे भुत तर सर्वांमध्ये आहे. मायावी पुरुषामध्ये देहअभिमानच असतो. बाबा तर आहेत विदेही विचित्र. तर मुले पण विचित्र आहेत. ही समजण्याची गोष्ट आहे. आम्ही आत्मे विचित्र आहोत मग येथे चित्रामध्ये (शरीरात) येतो. आता बाबा परत म्हणतात कि विचित्र बना. आपले स्वधर्मात राहा. चित्राचे धर्मात राहू नका. विचित्रतेच्या धर्मात राहा. देहअभिमानात येऊ नका. बाबा किती समजावत आहेत. यात आठवणीची फार जरुरत आहे. बाबा सांगतात कि, स्वत:ला आत्मा समजून माझी आठवण कराल, तर तुम्ही सतोप्रधान पवित्र बनाल. अपवित्र बनल्याने फार दंड भोगावा लागतो. बाबाचे बनल्यानंतर जर कोणती चुक झाली, तर मग म्हटले जाते, सतगुरुचा निंदक उंच पद प्राप्त करत नाही. जर तुम्ही माझे मतावर चालुन पवित्र बनले नाही तर सौगुणा दंड भोगावा लागेल. बुध्दी चालवायची आहे. जर आम्ही आठवण करणार नाही. तर एवढे उंच पद पण प्राप्त करणार नाही. पुरुषार्थांसाठी वेळ पण देतात. तुम्हाला म्हणतात काय पुरावा आहे? सांगा, ज्या तनामध्ये येतात ते प्रजापिता ब्रह्मा तर मनुष्य आहेत ना. मनुष्याचे नांव शरीरावर पडते. शिवबाबा तर ना मनुष्य आहेत, ना देवता आहेत. त्यांना सर्वोच्च आत्मा म्हटले जाते, ते तर पतित वा पावन बनत नाहीत. ते समजावतात कि माझी आठवण केल्याने तुमची पापे नष्ट होतील. बाबाच बसून समजावतात कि, तुम्ही सतोप्रधान होता, आता तमोप्रधान झाले आहात. परत सतोप्रधान बनण्यासाठी माझी आठवण करा. या देवतांची विशेषता पाहा कशी आहे, आणि त्यांचेकडून दया मागणाऱ्यांना पण पहा. आश्चर्य वाटते-आम्ही काय होतो. मग 84 जन्मामध्ये विकारात पडून एकदम भुईसपाट झाले आहोत.

बाबा सांगतात कि, गोड गोड मुलांनो, तुम्ही दैवी घराण्यातील होता. आता स्वत:ची चलन पहा हे (देवी देवता) बनू शकता? असे नाही, सर्व लक्ष्मी नारायण बनतील. मग तर सारी फुलांची बाग बनेल. शिवबाबांना तर फक्त गुलाबाचे फुल चढवावे, परंतू नाही धोतऱ्यांचे फुल पण वाहतात. बाबाची मुले कोणी फुल पण बनतात, कोणी धोतऱ्याचे पण बनतात. पास नापास तर होतातच. स्वत: पण समजतात कि, आम्ही राजा तर बनू शकणार नाही. आपले सारखेच बनवत नाहीत, सावकार कसे कोण बनेल ते तर बाबा जाणतात. पुढे चालुन, तुम्ही मुले पण ओळखाल कि, हा अमुक बाबांचा कसा मददगार आहे. कल्प कल्प ज्यांनी जे काही केले आहे तेच करतील. यात फरक पडत नाही. बाबा मुद्दे तर देत राहत आहेत. अशी अशी बाबाची आठवण करावयाची आहे, आणि सर्व बाबांकडे लावायचे आहे. भक्ती मार्गामध्ये तुम्ही ईश्वर अर्थ करत होता. परंतु ईश्वराला ओळखत नाही. एवढे समजता कि उंच ते उंच भगवान आहेत. असे नाही कि उंच ते उंच नाव रुपवाला आहे. ते आहेतच निराकार. मग उंच ते उंच साकार येथे येतात. ब्रह्मा-विष्णू-शंकरला देवता म्हटले जाते. ब्रह्मा देवताए नम:, विष्णू देवताए नम:, मग म्हणतात शिव परमात्माए नम:, तर परमात्मा आहेत ना. ब्रह्मा, विष्णू, शंकरला परमात्मा म्हणत नाहीत. मुखाद्वारे महणतात पण कि शिव परमात्मा नम: तर जरुर परमात्मा एक आहे ना. देवतांना नमन करतात. मनुष्य लोकांमध्ये मनुष्याला मनुष्य म्हणतात. त्यांना पण परमात्माए नम: म्हणणे, हे तर पुर्ण अज्ञान आहे. सर्वांच्या बुध्दीमध्ये हे आहे कि ईश्वर सर्वव्यापी आहे. आता तुम्ही मुले समजता कि, भगवान तर एक आहेत, त्यांनाच पतित पावन म्हटले जाते. सर्वांना पावन बनविणे हे भगवंताचे काम आहे. जगाचा गुरु कोणी मनुष्य होऊ शकत नाही. गुरु पवित्र असतात ना. येथे तर सर्व विकाराने जन्म घेणारे आहेत. ज्ञानाला अमृत म्हटले जाते. भक्तीला अमृत म्हणत नाहीत. भक्ती मार्गात भक्तीच चालते. सर्व मनुष्य भक्तीत आहेत. ज्ञानसागर जगतचा गुरु एकाला म्हटले जाते. आता तुम्ही जाणता कि, बाबा येऊन काय करत आहेत. तत्त्वाला पण पवित्र बनवित आहेत. नाटकामध्ये त्यांची भुमिका आहे. बाबा निमित्त बनतात, सर्वांचा सद्गती दाता आहे. आत हे समजावयाचे कसे. येतात तर पुष्कळ, उद्घाटन करण्यासाठी येतात. तर त्यांना तार पाठवा कि, भविष्यात होणाऱ्या विनाशाच्या अगोदर बेहदच्या पित्याला ओळखून त्यांचेकडून वारसा घ्या. ते आहेत आत्म्याचे पिता. जे पण मनुष्य मात्र आहेत सर्व पिता म्हणतात. रचता आहेत तर जरुर रचनेला वारसा मिळेल. बेहदच्या बाबाला कोणी ओळखत नाही. बाबाला विसरले हे पण नाटकात नोंद आहे. बेहदचे बाबा उंच ते उंच आहेत, ते काही हदचा वारसा देत नाहीत. लौकिक पिता असून पण बेहदच्या पित्याची सर्व आठवण करतात. सतयुगामध्ये त्यांची कोण आठवण करत नाही. कारण बेहदच्या सुखाचा वारसा मिळाला आहे. आता तुम्ही बाबाची आठवण करतात. आत्माच आठवण करते. मग आत्मेच स्वत:ला आणि आपले पित्याला, नाटकाला विसरुन जातात. मायेची सावली पडते. सतोप्रधान बुध्दीला मग तमोप्रधान जरुर व्हायचे आहे. स्मृतीमध्ये येत आहे, नविन दुनियेमध्ये देवी देवता सतोप्रधान होते, हे कोणी पण जाणत नाही. दुनियाच सतोप्रधान सोन्याची बनत आहे. त्याला म्हटले जाते नविन जग. हे आहे लोखांडाचे जग. यासर्व गोष्टी बाबाच येऊन मुलांना समजावत आहेत. कल्प कल्प जो वारसा तुम्ही घेता, पुरुषार्थानुसार तोच मिळणार आहे. तुम्हाला पण आता माहित पडले आहे आम्ही हे होतो, नंतर आम्ही खाली आलो. बाबाच सांगतात कि, असे असे होईल. कोणी म्हणतात कि, प्रयत्न फार करतो परंतु आठवण राहत नाही. यात बाबा किंवा शिक्षक काय करेल, कोणी शिकणारच नसेल तर शिक्षक काय करेल. शिक्षक आशिर्वाद करतील तर सर्व पास होतील. शिक्षणाचा फरक तर फार राहतो. हे आहे बिल्कुल नविन शिक्षण, येथे तुमचे जवळ सहसा गरीब दु:खीच येतील, सावकार येणार नाहीत. दु:खी आहेत तेव्हा येतात. सावकार समजतात, आम्ही तर स्वर्गात बसले आहोत. नशिबात नाही, ज्यांचे नशीबात आहे, त्यांना झटक्यात निश्चय बसतो. निश्चय आणि संशयामध्ये उशीर लागत नाही. माया झटक्यात विसरविते. वेळ तर लागतो ना. यात गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. स्वत:वर उपकार करावयाचा आहे. श्रीमत तर मिळत राहते. किती सोपे करुन बाबा सांगत आहेत, फक्त स्वत:ला आत्मा समजून माझी आठवण करा.

तुम्ही जाणता कि, हे आहे मृत्युलोक, ते आहे अमरलोक. तेथे अकाले मृत्यु होत नाही. वर्गात विद्यार्थी नंबरवार बसतात ना. ही पण शाळा आहे ना. ब्राह्मणींला विचारले जाते तुमचे जवळ नंबरवार हुशार मुले कोणती आहेत? जे चांगला अभ्यास करतात ते उजव्या बाजूला असले पाहिजेत. उजव्या हाताचे महत्त्व आहे ना. पुजा इ. पण उजव्या हाताने केली जाते. मुले विचार करतात सतयुगात काय असेल. सतयुगाची आठवण आली तर सत बाबाची पण आठवण येईल. बाबा आम्हाला सतयुगाचे मालक बनवित आहेत. तिथे हे माहित नसते कि, आम्हाला ही राजाई कशी मिळाली. त्यामुळे बाबा म्हणतात कि, या लक्ष्मी नारायणामध्ये पण हे ज्ञान नसते. बाबा प्रत्येक गोष्ट चांगले प्रकारे समजावत आहेत, जे कल्पापुर्वीचे समजले आहेत, ते जरुर समजतील. तरी पण पुरुषार्थ करावा लागतो ना. बाबा येतातच शिकविण्यासाठी. हे शिक्षण आहे, यात फार समजदारी पाहिजे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. हे आत्मिक ज्ञान, फार उंच आणि अवघड आहे, यात पास होण्यासाठी बाबाची आठवण करुन आशिर्वाद घ्यावयाचा आहे. स्वत:चे चारित्र्य सुधारावयाचे आहे.

2. आता कोणते पण बेकायदेशीर काम करावयाचे नाही. विचित्र बनून आपल्या स्वधर्मामध्ये राहावयाचे आहे, आणि विचित्र बाबाचे कायदेशीर मतावर चालायचे आहे.

वरदान:-
परमात्मा प्रेमात लीन होऊन किंवा मिलनात मग्न होणारे खरे स्नेही भव
 

स्नेहाची लक्षणे गायली जाते कि, दोन असून पण दोन न राहता, एक राहतात, यालाच सामावणे म्हटले जाते. भक्तांनी पण या स्नेहाच्या स्थितीला समावून जाणे किंवा लीन होणे म्हटले आहे. प्रेमात लीन होणे, ही स्थिती आहे परंतू स्थिती ऐवजी त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाला नेहमीसाठी समाप्त होणे समजले आहे. तुम्ही मुले जेव्हा बाबाचे किंवा आत्मिक साजनच्या मिलना मध्ये मग्न होऊन जाता, तर समान बनून जाता.

बोधवाक्य:-
अंर्तमुखी ते आहेत, जे व्यर्थ संकल्पापासून मनाचे मौन ठेवतात..!