17-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, जसा तुम्हाला निश्चय (विश्वास) आहे की ईश्वर सर्वव्यापी नाही ते आमचे पिता आहेत असं दुसऱ्याना पण समजावून निश्चय करावा आणि मगत्यांचे मत द्या..."

प्रश्न:-
बाबा आपल्या मुलांना कोणती गोष्ट विचारतात जे दुसरे कोणी विचारू शकत नाही?

उत्तर:-
बाबा मुलांना भेटतात तेव्हा विचारतात-मुलांनो पूर्वी तुम्ही कधी भेटला होता? ज्या मुलांना समजले आहे ते लगेच म्हणतात, हो बाबा आम्ही पाच हजार वर्षांपूर्वी तुम्हाला भेटलो होतो. ज्यांनी नाही समजले, ते गोंधळून जातात. असा प्रश्न विचारण्याची अक्कल दुसऱ्या कोणाला येणार पण नाही. बाबाच तुम्हाला संपूर्ण कल्पाचे रहस्य समजावतात.

ओम शांती।
आत्मिक मुला प्रति आत्मिक बेहदचे पिता समजावतात- येथे तुम्ही बाबांच्या समोर बसले आहात. घरातून निघाल्या बरोबर हा विचार येतो की आम्ही शिव बाबांच्या जवळ, जे ब्रह्मा बाबांच्या रथामध्ये येऊन आम्हाला स्वर्गाचा वारसा देत आहेत. आम्ही स्वर्गामध्ये होतो, परत 84 जन्माचे चक्र लावून नरकामध्ये आलो आहोत. अजून दुसऱ्या कोणत्या सत्संगामध्ये या गोष्टी नसतील.तुम्ही जाणता आम्ही शिवबाबा जवळ जातो जे या रथामध्ये येऊन शिकवत आहेत. ते आम्हा आत्म्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी आले आहेत. बेहदच्या पित्याकडून जरूर बेहदचा वारसा मिळेल. हे तर बाबांनी समजावले आहे की मी सर्वव्यापी नाही. सर्वव्यापक तर 5 विकार आहेत. तुमच्यामध्ये पण 5 विकार आहेत, त्यामुळे तुम्ही महान दुःखी झाले आहात. आता ईश्वर सर्वव्यापी नाही, हे मत जरूर लिहून घ्यायचे आहे. तुम्हा मुलांना तर पक्का विश्वास आहे की ईश्वर सर्वव्यापी नाही. बाबा सर्वोच्च पिता आहे , सर्वोच्च शिक्षक, गुरु पण आहेत. बेहदचे सदगती दाता आहेत. तेच शांती देणारे आहेत. अजून कोणत्या जागी हे विचार कोणीच करत नाही की काय मिळणार आहे,फक्त कनरस - रामायण, गीता इत्यादी जाऊन ऐकतात. बुद्धीमध्ये अर्थ काहीच नाही. पूर्वी आम्ही परमात्मा सर्वव्यापी म्हणत होतो. आता बाबा समजावतात हे खोटे आहे. मोठी अपमानाची गोष्ट आहे. तर हे मत पण खूप गरजेचे आहे. आज काल तुम्ही ज्यांच्याकडून उदघाटन वगैरे करून घेता, ते लिहितात ब्रह्माकुमारी चांगले काम करतात. खूप चांगले समजावतात, ईश्वराला प्राप्त करण्याचा रस्ता दाखवतात, त्यामुळे लोकांच्या मनावर चांगलीच छाप पडते. बाकी हे मत कोणी लिहून देत नाही, दुनियेत जे पण मनुष्य म्हणतात की ईश्वर सर्वव्यापी आहेत, ही खूप मोठी चूक आहे. ईश्वर तर पिता, शिक्षक, गुरु आहेत. एक तर मुख्य गोष्ट ही आहे, दुसरं मग असं मत पाहिजे, की हे जे समजावतात, ते आम्ही समजतो गीतेचे भगवान श्रीकृष्ण नाहीत. भगवान कोणत्या मनुष्यांना किंवा देवताला म्हटले जात नाही. ईश्वर एक आहेत, ते पिता आहेत, त्या पित्याकडून शांती आणि सुखाचा वारसा मिळतो. असे असे मत द्यायचे आहे. आता तुम्ही जी मत घेता, ती कोणत्याच कामाची नाही, हा एवढे लिहितात की ज्ञान खूप चांगले देतात. बाकी मुख्य गोष्ट ज्यामध्ये तुमचा विजय होणार आहे ते लिहून द्या की ब्रह्माकुमारी सत्य म्हणतात की ईश्वर सर्वव्यापी नाही. ते पिता आहेत, तेच गीतेचे भगवान आहेत. बाबा येऊन भक्ती मार्गापासून सोडवून ज्ञान देतात. हे पण मत घेणे जरुरी आहे, की पतित-पावनी पाण्याची गंगा नाही, परंतु पतित पावन शिव बाबा आहेत. अशी मत घेतली तरच तुमची विजय आहे, अजून वेळ आहे. आता तुमची जी सेवा चालते, एवढा खर्च होतो, हे तर तुम्ही मुलंच एक दुसऱ्यांना मदत करता. दुसऱ्याना तर काहीच माहित नाही. तुम्हीच आपले तन मन धन खर्च करून स्वतःसाठी राजधानी स्थापन करत आहात. जे करतील त्यांना प्राप्त होईल. जे नाही करणार त्यांना मिळणार पण नाही. कल्प-कल्प तुम्हीच करता. तुम्हीच निश्चय बुद्धी बनता. तुम्ही समजता की बाबा, बाबा पण आहेत, शिक्षक पण आहेत, गीतेचे ज्ञान योग्य रीतीने समजावतात. भक्ती मार्गामध्ये जरी गीता ऐकत आला आहात परंतु राज्य थोडेच प्राप्त केलं आहे. ईश्वरीय मत बदलून असुरी मत झाली आहे. चरित्र बदलत पतित बनले आहात. कुंभमेळ्यामध्ये करोडो मनुष्य जातात. जेथे जेथे पाणी पाहतात तेथे जातात, समजतात पाण्यानेच पवित्र होऊ. आता तर पाणी जिकडे तिकडे नद्यांमधून येत राहते. यामुळे कोणी पवित्र बनू शकते का! काय पाण्यामध्ये स्नान केल्याने आम्ही पतीता पासून पवित्र देवता बनू का? आता तुम्ही समजता कोणीच पवित्र बनू शकत नाही. ही चूक आहे. तर या तीन गोष्टींमध्ये मते घेतली पाहिजे. आता फक्त म्हणतात संस्था चांगली आहे,तर खूप जणांमध्ये जे गैरसमज झाले आहेत की ब्रह्माकुमारी मध्ये जादू आहे, पळवते, ते विचार दूर होऊन जातात. कारण आवाज तर खूप पसरलेला आहे. परदेशा पर्यंत हा आवाज गेला होता की ब्राह्मना यांना 16108 राण्या पाहिजेत, त्यामधले 400 भेटले आहेत, कारण त्यावेळी सत्संगामध्ये चारशे येत होते. खूप जणांनी विरोध केला. परंतु शिव बाबांच्या पुढे तर काहीच चालू शकले नाही. ते सर्व म्हणत होते की की हे जादूगर कोठून आले. परत आश्चर्य पहा, बाबा तर कराचीमध्ये होते. स्वतःहून सगळा समूह आपसात मिळून निघून गेले. कोणालाच माहित पडले नाही, आमच्या घरातून कसे निघून गेले. आपण विचार केला नाही की की एवढे सर्वजण जाऊन कोठे राहतील. मग लगेच बंगला घेतला. तर जादूची गोष्ट झाली ना. आता सुद्धा म्हणतात जादूगरनी आहेत. ब्रह्माकुमारी जवळ गेले तर परत येणार नाही. हे स्त्री-पुरुष ला भाऊ-बहीण बनवतात. मग अनेक जण येत नाहीत. आता तुमची प्रदर्शनी इ. पाहून ज्या गोष्टी बुद्धीमध्ये बसल्या आहेत, त्या दूर होतात. बाकी बाबा जो अभिप्राय पाहिजे, ते कोणी देत नाहीत. बाबांना तो अभिप्राय पाहिजे. हे लिहा की गीतेचे भगवान कृष्ण नाहीत. संपूर्ण दुनिया समजते कृष्ण भगवान वाच परंतु कृष्ण तर पूर्ण 84 जन्म घेतात. शिवबाबा पुनर्जन्म रहित आहेत. तर यामध्ये खूपच जणांचा अभिप्राय पाहिजे. गीता ऐकवणारे तर खूप आहेत. हे तर वर्तमानपत्रात पण आले आहे की गीतेचे भगवान परमपिता परमात्मा शिव आहेत. तेच पिता, शिक्षक आणि सर्वांचे सदगती दाता आहेत. शांती आणि सुखाचा वारसा फक्त त्यांच्याकडूनच मिळतो. बाकी आता तुम्ही कष्ट, घेता उद्घाटन करता, फक्त मनुष्यांचे गैरसमज दूर होतात. समजवले चांगले जाते. बाकी बाबा जसे म्हणतात तो अभिप्रायलिहून घ्या. हा मुख्य अभिप्राय आहे. बाकी फक्त सल्ले देतात. संस्था खूप चांगली आहे, यामुळे काय होईल. होय, पुढे चालून जेव्हा विनाश आणि स्थापना जवळ येतील तेव्हा तुम्हाला हा अभिप्राय पण मिळेल, समजून लिहितील. आता तुमच्या जवळ येऊ लागले आहेत. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे -एका बाबांची मुलं आपण सर्व भाऊ भाऊ आहोत. हे कोणाला पण समजावणे सोपे आहे. सर्व आत्म्यांचे एक सर्वोच्च पिता आहेत. त्यांच्याकडून जरूर सर्वोच्च बेहदचे पद मिळाले पाहिजे. ते तुम्हाला 5 हजार वर्षांपूर्वी मिळाले होते. ते लोक कलयुगाचे वय लाखो वर्षे म्हणतात, तुम्ही 5 हजार वर्ष म्हणता. किती फरक आहे.

बाबा समजावतात 5 हजार वर्षापूर्वी विश्वामध्ये शांती होती. हे मुख्य ध्येय समोर उभे आहे. यांच्या राज्यांमध्ये विश्वात शांती होती. ही राजधानी आम्ही स्थापन करत आहोत. संपूर्ण विश्वामध्ये सुख शांती होती. कोणत्याच दुःखा चे नाव नव्हते. आता तर खूप दुःख आहे. आम्ही हे सुख शांती चे राज्य स्थापन करत आहोत. बाबा पण गुप्त आहेत. ज्ञान पण गुप्त आहे. तुमचा पुरुषार्थ पण गुप्त आहे. त्यामुळे बाबांना गीत कविता आवडत नाही. ते भक्ती मार्ग आहे. येथे तर शांत बसायचे आहे. शांतीने चालता-फिरता बाबांना आठवण करायची आहे आणि सृष्टी चक्राला बुद्धीमध्ये फिरवायचे आहे.आता आमचा हा शेवटचा जन्म या जुन्या दुनियेत आहे. परत आम्ही नवीन दुनियेत पहिला जन्म घेऊ. आत्मा पवित्र जरूर पाहिजे. आता तर सर्व आत्मे पतित आहेत. तुम्ही आत्मा पवित्र बनण्यासाठी बाबांना आठवण करता. बाबा स्वतः म्हणतात मुलांनो देहा सहित देहाचे सर्व संबंध सोडा. बाबा नवीन दुनिया स्थापन करतात, त्यांना आठवण करा.तर सर्व पाप नष्ट होतील. अरे बाबा जे तुम्हाला विश्वाची बादशाही देतात, अशा बाबांना तुम्ही विसरून कसे जाता! ते म्हणतात-मुलांनो, या शेवटच्या जन्मामध्येच पवित्र बना. आता या मृत्यूलोकाचा विनाश होणार आहे.हा विनाश पण बरोबर 5 हजार वर्षांपूर्वी झाला होता. हे तर आठवते ना. आपले राज्य होते तेव्हा दुसरे कोणते धर्म नव्हते. बाबांजवळ कोणी पण येतात तर त्यांना विचारतात- पूर्वी केव्हा भेटला होता. कोणी समजलेले असतील तर ते लगेच सांगतात, 5हजार वर्षापूर्वी भेटलो होतो. कोणी नवीन येतात तर गोंधळून जातात. बाबा समजतात ब्राह्मणी ने समजवले नाही. परत म्हणतो विचार करा, तर स्मृती येते. ही गोष्ट तर दुसरे कोणी विचारू शकत नाहीत. विचारायची अक्कलच येणार नाही, ते काय या गोष्टी काय समजतील. पुढे चालून तुमच्याकडे अनेक जण येतील, जे या कुळाचे असतील. दुनिया बदलणार तर जरूर आहे. चक्राचे रहस्य तर समजवले आहे. आता नवीन दुनिया मध्ये जायचे आहे. ह्या जुन्या दुनियेला विसरून जावा. बाबा नवीन घर बनवितात तर बुद्धी त्यामध्ये जाते ना. जुन्या घरात मोह राहत नाही. या बेहदच्या गोष्टी आहेत. बाबा नवीन दुनिया स्वर्ग स्थापन करत आहेत, त्यामुळे या जुन्या दुनियेला पाहून न पाहिल्या सारखे करायचे आहे. मोह ममत्व नवीन दुनियेत असावा. या जुन्या दुनियेपासून वैराग्य. ते तर हटयोगाने हद चा संन्यास करून जंगलामध्ये जातात. तुमचा तर संपूर्ण जुन्या दुनियेचा वैराग्य आहे,यामध्ये तर खूप दुःख आहे. नवीन दुनिया सतयुगामध्ये तर अपार सुख आहे तर जरूर त्यांना आठवण करणार ना. येथे सर्व दुःख देणारे आहेत. आई-वडील सर्वजण विकारांमध्ये फसवून देतील बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे, त्याला जिंकल्यानेच तुम्ही जगतजीत बनाल. हा राजयोग बाबा शिकवतात, ज्यामुळे आम्ही हे पद प्राप्त करतो. बोला,आम्हाला स्वप्नांमध्ये भगवान म्हणतात पवित्र बना तर स्वर्गाची राजाई मिळेल. तर आता मी एक जन्म अपवित्र बनून स्वतःची राजाई गमावणार थोडेच. या पवित्रतेवर भांडणे चालतात. द्रौपदीने बोलावले होते या दुःशासना पासून वाचवा. हा पण खेळ दाखवतात कि कृष्णाने २१ साड्या दिल्या .आता बाबा सांगतात किती दुर्गती झाली आहे. खूप दुःख आहे ना. सतयुगात अपार सुख आहे. आता मी आलो आहे अनेक धर्माचा विनाश आणि एका सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी. तुम्हाला राज्यभाग्य देऊन वानप्रस्थ मध्ये जाईल. आर्धा कल्प माझी आवश्यकता जरुरी पडणार नाही. तुम्ही मला कधी आठवण पण काढणार नाही. बाबा समजावतात-तुमच्यासाठी सगळ्यांच्या मनात जे चुकीचे विचार आहेत, ते ठीक होतील. परंतु मुख्य हि गोष्ट आहे कि सर्वांकडून लिहून घ्या कि, ईशवर सर्वव्यापी नाही. त्यांनी येऊन तेर राजयोग शिकवला आहे. बाबा पतित पावन आहेत नदी पावन थोडच बनवते. पाणी तर सगळी कडे असते. आता बेहदचे बाबा सांगतात स्वतःला आत्मा समजा. देहा सहित देहाचे सर्व संबंध विसरा. आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करते, मनुष्य समजतात आत्मा निर्लेप आहे. आत्मा च परमात्मा आहे भक्ती मार्गाच्या गोष्टी आहेत. मुलं म्हणतात बाबा आठवण कशी करू? अरे स्वतःला आत्मा समजता ना आत्मा एवढी छोटी बिंदू आहे, तर तिचे पिता पण एवढे छोटे बिंदू असणार ना. ते पुनर्जन्मात येत नाही. हे बुद्धी मध्ये ज्ञान आहे . बाबाची आठवण का नाही येणार. चालता फिरता बाबांची आठवण करायची आहे. बरं बाबांचे मोठे रूप समजा. परंतु आठवण एका बाबांचीच करायची आहे, तर तुमचे पाप नष्ट होतील. आजून कोणता उपाय नाही. जे समजतात ते म्हणतात, बाबा तुमच्या आठवणीने आम्ही पवित्र बनून पवित्र दुनिया, विश्वाचे मालक बनतो तर आम्ही का नाही तुम्हाला आठवण करणार, एक दुसर्यांना एकमेकांना सुद्धा आठवण करून द्यायची आहे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.


धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. जसे बाबा आणि ज्ञान गुप्त आहे, तसा पुरुषार्थ पण गुप्त करायचा आहे . गीत- कविता इत्यादी पेक्षा शांत बसणे चांगले आहे. शांतीमध्ये चालता फिरता बाबांची आठवण करायची आहे.

2. जुनी दुनिया बदलत आहे, त्यामुळे त्याच्यातून बुद्धी काढून टाकायची आहे. पाहून न पहिल्या सारखे करायचे आहे.

वरदान:-
सर्व पदार्थाच्या आसक्ती पासून वेगळे अनासक्त, प्रकृतिजीत भव.
 

जर कोणता पदार्थ कर्मेंद्रियांना विचलित करत असेल म्हणजे आसक्तीचा भाव उत्पन्न होत असेल, तरी सुद्धा अलिप्त नाही बानू शकत, इच्छाच आसक्तीचे रूप आहे. काही म्हणतात इच्छा नाही परंतु चांगले वाटते. तर ही पण सूक्ष्म आसक्ती आहे- याची सूक्ष्म रूपाने तपासणी करा की हे पदार्थ म्हणजे थोड्यावेळेचे सुखाचे साधन आकर्षित तर नाही ना करत? हे पदार्थ प्रकुर्तीचे साधन आहे, जेव्हा या पासून अनासक्त म्हणजे अलिप्त बनाल तेव्हा प्रकुर्तीजीत बनाल.

बोधवाक्य:-
माझ्या माझ्याच्या मतभेदाला सोडून बेहद मध्ये रहा तेव्हा म्हणणार विश्व कल्याणकरी...!