15-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, शांतीचा दिव्यगुण सर्वात मोठा गुण आहे, म्हणून शांत चित्ताने बोला,अशांती पसरवणे बंद करा...!!!

प्रश्न:-
संगमयुगा मध्ये बाबां कडून मुलांना कोणता वारसा मिळतो? गुणवान मुलांची लक्षणे कोणती आहेत?

उत्तर:-
पहिला वारसा मिळतो,ज्ञानाचा 2) शांतीचा 3) गुणांचा. गुणवान मुले नेहमी आनंदी राहतात. कोणाचे अवगुण पहात नाही. कोणाची तक्रार करणार नाहीत,ज्यांच्या मध्ये अवगुण असतात त्यांच्या सोबत पण राहणार नाहीत. कोणी काही सांगितले तर ऐकून न ऐकल्यासारखे करतील आपल्या नशेमध्ये राहतील.

ओम शांती।
आत्मिक पिता बसून आत्मिक मुलांना समजावितात. एकतर तुम्हाला बाबांकडून ज्ञानाचा वारसा मिळत आहे. पित्याकडून पण गुण घ्यायचे आहेत, आणि परत याचित्रांकडून (लक्ष्मीनारायण) सुद्धा गुण घ्यायचे आहेत. अवगुण काढले काय? बाबांनाचशांतीचे सागर म्हणतात. तेव्हा आपल्याला सुद्धा शांती धारण केली पाहिजे. शांती करता बाबा समजावून सांगतात एक दुसऱ्याबरोबर शांतीने बोला. हा शांतीचा गुण घ्या. गुणांची धारण करावी लागते.ज्ञानाचा गुण घेतच आहात. हे ज्ञान घ्यायचे आहे. हे ज्ञान फक्त आपले विचित्र पिताच शिकवितात. विचित्र आत्मा(मुले) शिकतात. ही आहे या शिक्षणातली नवीन युक्ती, जी युक्ती दुसरे कोणी सांगू शकत नाही.कृष्णा सारखे दैवीगुण धारण करावयाचे आहेत.पित्याने समजाविले आहे, “मी शांतीचा सागर आहे,” तर येथे शांती स्थापन करावयाची आहे. अशांती नष्ट करावयाची आहे. आपल्या वर्तनावरून पहावे की मी कुठपर्यंत शांतीत राहू शकतो. अनेक पुरुष शांती पसंत करतात, समजतात की शांतीत राहणे चांगले आहे. शांतीचा गुण खूप श्रेष्ठ आहे. परंतु शांती कशी निर्माण होईल, शांतीचा अर्थ काय आहे, हे भारतातील मुले जाणत नाहीत. शिवबाबा भारतातील मुलांना सांगतात, मी भारतात आलो आहे. आता तुम्ही समजले की, शांती अंतकरणातून असणे गरजेचे आहे. असे नाही की दुसऱ्याने अशांत केले तर स्वतःपण अशांत व्हायचे नाही. अशांत होणे हा पण अवगुण आहे. अवगुण काढला पाहिजे. प्रत्येका कडूनगुण धारण केला पाहिजे. जरी आवाज ऐकला किंवा कोणी आवाज केला तरी स्वतः शांत राहिले पाहिजे. कारण की बाबा आणि दादा दोघे ही शांत राहतात, कधी अशांत होत नाहीत. कधी स्वतःची महिमा करत नाहीत. ब्रह्मा बाबा पण शिकलेना, जितके शांत राहू तितके चांगले आहे. शांती मुळे आठवण चांगली करू शकतो अशांत होणारे आठवण करू शकत नाही. प्रत्येका कडून गुण शिकला पाहिजे, दत्तात्रेय इत्यादीचे उदाहरण पण हेच सांगते देवतांसारखे गुणवान कोणीच नाहीत. एकच विकार कारणीभूत आहे, त्यावर विजय मिळवत आहात. कर्मेन्द्रिययांवर विजय मिळवायचा आणि अवगुण सोडायचे आहेत. अवगुणांकडे पाहून बोलू नका, ज्यांच्या मध्ये गुण आहेत त्यांच्याकडे जा, नेहमीच गोड व शांत राहा. थोडं मोजकेच बोलल्याने सर्व कार्य करू शकता. सर्वांमधले गुण घेऊन गुणवान बना. समजदार व शहाणे नेहमी शांत राहणे पसंत करतात. काही भक्तलोक ज्ञानी लोकांपेक्षा शहाणे व निर्माणचित्त असतात. ब्रह्मा बाबा तर अनुभवी आहेत, ते ज्या लौकिक पित्याचे मुल होते. त्यांचे पिता शिक्षक होते, खूप निर्माण होते, शांत होते, कधी क्रोध करत नसत. ज्या प्रमाणे साधूलोकांचे श्रेष्ठत्व सांगितले जाते की, परमात्म्याला भेटण्यासाठी ते पुरुषार्थ करतात, काशी, हरिद्वार मध्ये राहतात. मुलांनो खूप शांत व गोड राहिले पाहिजे. येथे कोणी अशांत राहिले तर शांती निर्माण करण्यासाठी निमित्त बनू शकत नाहीत. अशांत राहणाऱ्या बरोबर बोलू नका. दूर राहा. फरक आहे ना. ते बगळे आणि हे हंस. हंस पूर्ण दिवस गुणग्रहण करतात. उठता, बसता, चालता, बाबांच्या ज्ञानाला आठवण करतात. दिवसभर बुद्धीमध्ये असू द्या कि कोणाला कसे समजावून सांगू बाबांचा परिचय कसा देऊ?

बाबांनी समजावले की जे मुले येतात त्यांच्या कडून फॉर्म भरून घ्या. सेंटरवर जे कोणी कोर्स करू इच्छितात तर त्यांचा फॉर्म भरून घ्या. कोर्स करू इच्छित नाहीत, त्यांचा फॉर्म भरून घेण्याची आवश्यकता नाही. फॉर्म यासाठी भरून घ्यायचा आहे त्यांना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. त्यांना कसे समजावे, कारण की या जगात या गोष्टी कोणाला माहित नाही. फॉर्म मुळे या गोष्टी कळतात. बाबांना कोणी भेटायला येतात त्यावेळी सुद्धा फॉर्म भरून घ्यावा. तेव्हा माहीत होईल की कोणत्या कारणाने भेटण्यास येत आहेत. जे कोणी येतील त्यांना हद आणि बेहद्दच्या पित्याचा परिचय द्या, कारण की तुम्हाला बेहदच्या पित्याने येऊन स्वतःचा परिचय दिला आहे. तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना परिचय देता त्यांचे नाव आहे शिवबाबा. शिव परमात्माय नमः म्हणतात ना, ते सर्व कृष्णाला देवता म्हणून नमस्कार करतात. शिवबाबांना परमात्मा म्हणून नमस्कार करतात. बाबा सांगतात माझी आठवण केली तर तुमचे पाप नष्ट होतील. मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा मिळवण्या करता आत्मा पवित्र बनायला हवी. ती आहेच पवित्र सतोप्रधान दुनिया. तिथे जायचे आहे तर शिवबाबा म्हणतात माझी आठवण करा. हे तर खूप सोपे आहे, कोणा कडून ही फॉर्म भरून त्यांचा कोर्स करू शकता. पहिल्या दिवशी फॉर्म भरा पुन्हा समजावून सांगा, पुन्हा फॉर्म भरा तेव्हा माहीत होईल आम्ही जे समजावून सांगितले,ते त्याच्या आठवणीत राहिले की नाही. तुम्ही पहाल, की दोन दिवसांच्या फॉर्म भरून घेण्यात, जरूर फरक दिसेल. तुम्हाला ही कळेल त्यांना काय समजले आहे. आम्ही समजावून सांगितल्यावर त्यांनी त्यावर काही विचार केला आहे की नाही, हे फॉर्म सर्वांच्या जवळ असावेत. बाबा मुरलीमधून जो मार्ग दाखवतात तो मोठ्या-मोठ्या सेंटरने ताबडतोब अमलात आणावा. म्हणून फॉर्म ठेवावे, नाहीतर कसे समजणार ते स्वतः अनुभव करतील की काल काय लिहिले होते, आज काय लिहिले आहे. फॉर्म अगदी आवश्यक आहे. वेग-वेगळ्या पद्धतीने छापला तरी चालेल हरकत नाही किंवा एकाच ठिकाणी छापून सगळीकडे पाठवा, हे आहे दुसऱ्यांचे कल्याण करणे.

तुम्ही मुले येथे देवी-देवता बनण्या करता आला आहात. देवता अक्षर खूप श्रेष्ठ आहे दैवी गुणांची धारणा ज्यांनी केली त्यांना देवता म्हणतात. आता तुम्ही दैवी गुण धारण करत आहात. जेथे प्रदर्शनी किंवा म्युझियम असतात तेथे हे फॉर्म खूप पाहिजेत. तर समजेल याची अवस्था कशी आहे, हे कळल्यावर पुन्हा त्यांना समजावून सांगता येईल. मुलांनी तर सतत गुणांचे वर्णन करावे, अवगुणांचे नाही. तुम्ही गुणवान बनत आहात. ज्यांच्या मध्ये खूप गुण आहेत ते दुसऱ्यांना सुद्धा गुणवान बनवतील. अवगुनवाले कधी दुसऱ्यांना गुणवान बनवू शकत नाहीत. मुलांना माहित आहे, वेळ जास्त नाही, पुरुषार्थ खूप करायचा आहे. बाबांनी समजावले आहे तुम्ही रोज प्रवास व यात्रा करता हे जे गायन आहे, अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप-गोपिकांना विचारा हे संगमयुगातीलगोष्ट आहे. आता तर नंबरानुसार सुख आहे. कोणी तर मनातल्या मनात आनंदाचे गीत गातात, ओहो आम्हाला परमपिता परमात्मा भेटले, त्यांच्याकडून आम्ही वारसा घेत आहोत. त्यांच्याकडे काही तक्रार करता येणार नाही जर कोणी काही म्हटले तर ऐकून न ऐकल्या सारखे करून आपल्या नारायणी नशेत मस्त राहायचे आहे. काही आजार किंवा दुःख असेल तरीही तुम्ही आठवणीत राहा. हा हिशोब इथेच पूर्ण करायचा आहे, नंतर तुम्ही 21 जन्म संपूर्ण बनता, तेथे दुःखाची गोष्टच नाही. गायन आहे खुशी सारखा खुराक नाही नंतर आळस निघून जातो. यातच खरा आनंद आहे. तो खोटा आनंद आहे. धन मिळाले, दागिने मिळाले,तर आनंद होतो. ही आहे बेहदची गोष्ट, तुम्हाला तर सदैव आनंदातच राहायचे आहे, माहित आहे ना की आम्ही 21 जन्म नेहमी सुखी राहणार आहोत. याच आठवणीत राहा की आम्ही कोण आहोत? बाबा म्हणतात दुःख दूर झाले पाहिजे. ही तर 21 जन्माची खुशी आहे. आता थोडे दिवस राहिले आहेत, आम्ही जातो सुखधामा मध्ये नंतर आम्हाला काही आठवणार नाही. हे बाबा स्वतः अनुभवाने सांगतात की बातम्या येतात, खिटपिटचालते बाबांना यागोष्टीचे दुःख थोडेच होते. ऐकले. असे घडणारच आहे. हे तर काहीच नाही. आम्ही तर कुबेराच्या खजानाचे मालक बनतो स्वतःशी बोलल्याने आनंद होतो. खूप शांती मिळते. त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसेल शिष्यवृत्ती मिळाल्याने चेहरा किती आनंदित होतो. तुम्ही सुद्धा पुरुषार्थ करत आहात. या लक्ष्मी-नारायणा सारखे आनंदी राहण्यासाठी. सतयुगा मध्ये ज्ञान तर नाही, तुम्हाला ज्ञान पण आहे तर खुशी पण झाली पाहिजे, हर्षितमुख राहिले पाहिजे. या देवतांपेक्षा तुम्ही ब्राह्मण किती श्रेष्ठ आहात. ज्ञानाचे सागर शिव पिता आम्हाला किती श्रेष्ठ ज्ञान देत आहेत. अविनाश ज्ञान रत्नांची लॉटरी मिळाली आहे. तर आम्हाला किती खुशी झाली पाहिजे. हा तुमचा जन्म हिऱ्यासारखा गायन केला जातो. ज्ञानाचे सागर तर बाबांनाच म्हटले जाते. या देवतांना नाही म्हणता येणार. तुम्ही ब्राह्मणच ज्ञानाचे सागर आहात, म्हणून तर तुम्हाला ज्ञानाचा आनंद राहतो, भक्तीमार्गा मध्ये आहे कृत्रिम क्षणभंगुर सुख. सतयुगाला स्वर्ग, सुखधाम, हेविन म्हणतात. तेथे अपरंपार सुख तर येथे अपरंपार दुःख आहे. आता मुलांना समजले आहे की रावण राज्यामध्ये आता आम्ही किती पतित बनलो. हळूहळू पायरी उतरत आलो आहोत. हा आहे विकारांचा सागर. आता बाबा तुम्हाला विषय सागरातून शिरसागर मध्ये घेऊन जात आहेत. मुलांना येथे फार गोड वाटते परंतु बाबांना विसरल्याने काय स्थिती होते बाबा किती अपरंपार आनंद देतात. या ज्ञानामृताचाचे गायन आहे, ज्ञान अमृत पित राहा. येथे तुम्हाला खूप चांगला नशा चढतो. नंतर बाहेर गेल्याने नशा कमी होतो. बाबा स्वतः अनुभव करतात येथे मुलांना चांगला अनुभव येतो. आम्ही आता घरी जात आहोत आम्ही बाबांच्या श्रीमत प्रमाणे राजधानी स्थापन करत आहोत. आम्ही श्रेष्ठ वारसदार आहोत. हे सर्व ज्ञान बुद्धीत आहे त्यामुळे हे श्रेष्ठ पद मिळत आहे. शिकवणारे कोण आहेत? विश्वाचे पिता शिवबाबा एकदम बदलून टाकतात. तर मुलांना मनामध्ये किती खुशी झाली पाहिजे. हे पण मनामध्ये यायला पाहिजे आम्ही दुसऱ्यांना पण खुशी देऊ. रावण शाप देतो व बाबांकडून वारसा हक्क मिळतो. रावणाच्या शापामुळे तुम्ही किती दुखी अशांत होता. पुष्कळ गोप असे आहेत की ज्यांना मनापासून सेवा करावी असे वाटते, परंतु ज्ञानाचा कलश मातांच्या डोक्यावर दिला आहेत. शक्तीसेना आहे ना. म्हणूनच गायन आहे “वंदेमातरम”, याच बरोबर “वंदेपित्तरंम” पण आहे. परंतु नाव मातांचे आहे. पहिले लक्ष्मीचे नंतर नारायणाचे. पहिले सीतेचे नंतर रामाचे. कलियुगात अगोदर पुरुषाचे नंतर स्त्रीचे नाव येते. हा सुद्धा एक खेळत आहे. शिवबाबा तर सर्व समजावून सांगतात भक्तिमार्गाचे रहस्य पण समजावतात. भक्तीमार्गा मध्ये काय-काय होते जोपर्यंत ज्ञान नाही तो पर्यंत काहीच कळत नाही. आता तुमचे सर्वांचे चरित्र घडत आहे तुमचे दैवी चरित्र घडत आहे. पाच विकारांमुळे तुम्ही असुर बनता. तेवढा बदल घडतो तर परिवर्तन झालेच पाहिजे. शरीर सुटल्यावर थोडेच बदलणार. बाबामध्ये किती ताकत आहे, अनेकांना परिवर्तन करतात, काही मुले स्वतःचा अनुभव सांगतात, आमच्या मध्ये कामविकार होता आम्ही दारू पित होतो. आमच्या मध्ये खूप बदल झाला आहे, आम्ही खूप प्रेमाने राहतो. प्रेमाचे अश्रू येतात. बाबा खूप समजावून सांगतात. परंतु आम्ही सर्व विसरतो. नाही तर आनंदाचा पारा किती चढेल? आम्ही दुसऱ्याचे कल्याण करू. मनुष्य खूप दुखी आहेत त्यांना मार्ग दाखवू. समजावून सांगताना सुद्धा किती मेहनत करावी लागते, शिवी पण खावी लागते, सुरूवाती पासूनच चर्चा आहे की हे सर्वांना भाऊ-बहिण बनवतात. अरे भाऊ-बहीण यांचा संबंध चांगला आहे तुम्ही आता भाऊ-भाऊ आहात. परंतु जन्म-जन्मांतर जी दृष्टी पक्की बनली आहे ती विसरू शकत नाही. बाबांच्या जवळ तर खूप बातम्या येतात. बाबा समजावतात या पतित दुनिये मधुन तुमचे मन परावृत्त झाले पाहिजे. गुलाबाचे फुल बनले पाहिजे. किती ज्ञान ऐकून विसरतात. संपूर्ण ज्ञान नष्ट होते. काम विकार मोठा शत्रु आहे. बाबा तर खूप अनुभवी आहेत. या विकारांमुळे राजा लोकांनी आपले राज्य गमावले. काम विकार मोठा वाईट आहे. सगळेच म्हणतात, हा मोठा शत्रू आहे. बाबा म्हणतात, काम विकाराला जिंकले तर तुम्ही विश्वाचे मालिक बनाल. परंतु काम विकार इतका मोठा शत्रू आहे की प्रतिज्ञा केल्यावरही पतित बनतात. खूप प्रयत्नांनी काही सुधारतात. यावेळी संपूर्ण दुनियाचे चरित्र बिघडले आहे. पवित्र दुनिया केव्हा होती? कशी तयार झाली? त्यांनी राज्य कसे मिळवले? कधी कोणी सांगणार नाही. नंतर वेळ येईल तेव्हा तुम्ही लोक परदेशात जाल आणि ते पण ऐकतील. स्वर्ग कसा स्थापन होतो? तुमच्या बुद्धीमध्ये त्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने बसल्या आहेत. आता तुम्हाला तेच ध्येय ठेवले पाहिजे बाकी सर्व विसरून जा. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. उठता, बसता, चालताना, ज्ञानाची आठवण करून मोती रुपी गुण घेणारे हंस बना. सर्वांकडून गुण घ्या सर्वांना गुण घेण्याचीच शिकवण द्या.

2. स्वतःचा चेहरा नेहमी आनंदी ठेवण्यासाठी स्वतःची बोला. आम्ही तर कुबेराच्या खाजण्याचे मालक बनत आहोत. ज्ञान सागर पिता कडून आम्हाला ज्ञान रत्नांची लॉटरी मिळाली आहे.

वरदान:-
हमी संतुष्ट राहून आपली दृष्टी,वृत्ती, कृती, द्वारे संतुष्टतेची अनुभूती करवणारे संतुष्टमणी भव

ह्मण कुळामध्ये श्रेष्ठ आत्मातेच आहेत, जे नेहमी संतुष्टतेच्या विशेषते मुळे स्वतः समाधानी राहतात आणि आपल्या दृष्टी-वृत्ती आणि कृती मुळे दुसऱ्यांना पण संतुष्टतेची अनुभुती करवितात, तेच संतुष्टमणी आहेत. जे नेहमी संकल्प,बोल, संघटनातील संबंध-संपर्क किंवा कर्मामुळे बापदादां कडून स्वतः वर संतुष्टतेच्या स्वर्ण पुष्पांच्या वर्षावाचा अनुभव करतील. असे संतुष्टमणीच बापदादांच्या गळ्यातील हार बनतील, राज्य अधिकारी बनतील आणि भक्तांची माळ बनतील.

बोधवाक्य:-
कारात्मक आणि व्यर्थला नष्ट करून मेहनत मुक्त बना...!!!