01-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका. येथे तुम्ही सत्संगामध्ये
बसले आहात, तुम्हाला मायेच्या कुसंगांमध्ये जायचे नाही. कुसंगामुळेच संशय येतो.
प्रश्न:-
यावेळेस
कोणत्या पण मनुष्यांना अध्यात्मिक म्हणू शकत नाही, का?
उत्तर:-
कारण सर्व देह
अभिमानी आहेत. देह अभिमानीला अध्यात्मिक कसे म्हणू शकतो. अध्यात्मिक पिता तर एकच
निराकार पिता आहेत. जे तुम्हाला पण देही अभिमानी बनवण्याची शिक्षा देतात. बाबांच्या
शिवाय परम सर्वोच्च कोणालाच म्हणू शकत नाहीत.
ओम शांती।
ओम शांती मुलं जेव्हा येथे बसतात तर जाणतात बाबा आमचे पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत,
आणि सद्गुरू पण आहेत. तिघांची आवश्यकता असते. प्रथम पिता नंतर शिक्षक नंतर गुरु.
येथे आठवण पण अशीच करायची आहे. कारण नवीन गोष्ट आहे ना. बेहद्दचे पिता पण आहेत,बेहद
म्हणजे सर्वांचे. येथे जे पण येतील ते म्हणतात हे स्मृतीमध्ये आणा. यामध्ये कोणाला
संशय असेल तर हातवर करा. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे ना. जन्म जन्मांतर कधी असे कोणी
मिळाले असेल का ज्याला तुम्ही पिता, शिक्षक, सदगुरू समजले असेल,ते पण सर्वोच्च.
बेहदचे पिता, बेहदचे शिक्षक, बेहदचे सदगुरू. असे कधी कोणी मिळाले? शिवाय या
पुरुषोत्तम संगम युगाच्या कधी भेटू शकणार नाही. यामध्ये कोणाला संशय असेल तर हात
वरती करा. येथे सर्व निश्चिय बुद्धी होऊन बसले आहेत. मुख्य हे तीनच आहेत. बेहदचे
पिता ज्ञान पण बेहद्दचे देतात. बेहद ज्ञान तर हे एकच आहे. हदचे ज्ञान तर शाळा,
महाविद्यालयांमधील तुम्ही शिकत आले आहात.कोणी वकील बनतात, कोणी सर्जन बनतात, कारण
या दुनियेत डॉक्टर, न्यायाधीश, वकील इत्यादी सर्व पाहिजेत. सतयुगी दुनियेत तर
आवश्यकता नाही. तेथे दुःखाची कोणतीच गोष्ट नाही. तर बाबा मुलांना बेहदची शिक्षा
देतात. परत अर्धा कल्प कोणते ज्ञान घेण्याची आवश्यकता नाही. हे ज्ञान एकदाच मिळते.
जे 21 जन्मासाठी फळ स्वरूप बनते अर्थात त्याचे फळ मिळत राहते. स्वर्गात तर डॉक्टर
वकील न्यायाधीश नसतात हा तर निश्चय आहे ना? तेथे दुःख नसते, कर्म भोग नसतात. बाबा
कर्माची गती सन्मुख समजवतात. गीता ऐकवणारे असे सांगतात का? बाबा म्हणतात, मी तुम्हा
मुलांना राजयोग शिकवतो. ग्रंथामध्ये तर लिहिलेले आहे, कृष्ण भगवानुवाच परंतु ते दैवी
गुणधारी मनुष्य आहेत. शिवबाबा तर कोणते नाव धारण करत नाहीत, बदलत नाहीत. बाबा
म्हणतात मी हे शरीर भाड्याने घेतो. हे शरीर रुपी घर माझे नाही ब्रह्माचे आहे.
खिडक्या इत्यादी सर्व आहेत. तर बाबा समजवतात मी तुमचा बेहदचा पिता म्हणजे सर्व
आत्म्यांचा पिता आहे, आत्म्यानाच शिकवतो. यांना अध्यात्मिक पिता म्हणजे आत्मिक पिता
म्हणतात. दुसऱ्या कोणाला आत्मिक पिता म्हणून शकत नाही. येथे तुम्ही जाणतात हे बेहदचे
पिता आहेत. आता अध्यात्मिक संमेलन होत आहे. वास्तवामध्ये अध्यात्मिक संमेलन तर
नाहीत. ते खरे अध्यात्मिक नाहीत, कारण देह अभिमानी आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो देही
अभिमानी भव! देहाचे भान सोडा. असे थोडे कोणाला म्हणणार. अध्यात्मिक पिता म्हणजे
निराकार पिता. तुम्ही आत्मे अध्यात्मिक मुले आहात. अध्यात्मिक पिता येऊन तुम्हाला
शिकवतात. ही समज दुसऱ्या कोणा मध्ये होऊ शकत नाही. बाबा स्वतः सांगतात की मी कोण आहे
. गीतेमध्ये हे नाही. मी तुम्हाला बेहदची शिक्षा देतो यामध्ये वकील, न्यायाधीश,
डॉक्टर इत्यादीची आवश्यकता नाही. कारण तेथे खूप सुखच सुख आहे, दुःखाचे नाव रूप नसते.
या दुनियेत सुखाचे नाव रूपच नाही. ते प्राय:लोप झाले आहे. काग विष्ठा समान आहे.
थोडेसे सुख आहे. तर बेहदच्या सुखाचे ज्ञान कसे देऊ शकतात? प्रथम जेव्हा
देवी-देवतांचे राज्य होते तर सत्यता १०० टक्के होती आता तर ख-याचे नाव नाही. हे
बेहदचे ज्ञान आहे, तुम्ही जाणतात. हे मनुष्य सृष्टी रुपी झाड आहे. ज्याचे बीज रूप
मी आहे. त्यांच्यामध्ये झाडाचे सर्व ज्ञान आहे. मनुष्यामध्ये हे ज्ञान नाही. चैतन्य
बीज रूप आहे. मला ज्ञानाचे सागर म्हणतात. ज्ञानाद्वारे सेकंदामध्ये गती सदगती होते.
मी सर्वांचा पिता आहे. मला जाणल्यामुळे तुम्हा मुलांना वारसा मिळतो. परंतु राजधानी
आहे ना, स्वर्गामध्ये पद नंबरनुसार खूप आहेत. बाबा एकच अभ्यासक्रम शिकवतात. शिकणारी
तर नंबरानुसारचे असतात. यामध्ये परत दुसऱ्या अभ्यासाची आवश्यकता राहत नाही.
स्वर्गामध्ये कोणी आजारी पडत नाही. पैसे कमवण्याची कोणी शिक्षण घेत नाही. तुम्ही
येथे बेहदचा वारसा घेतात. तेथे हे माहीत नसते की हे पद आम्हाला कोणी दिले आहे. हे
तर तुम्ही आता समजतात. हे सीमित ज्ञान, या दुनियेतील, तुम्ही शिकत आले आहात. आता
बेहदचे ज्ञान शिकवणाऱ्या बाबांना जाणले आहे, पाहिले आहे. तुम्ही जाणतात बाबा पिता
पण आहेत, शिक्षक पण आहेत, ते येऊन आम्हाला शिकवतात. परम शिक्षक आहेत राजयोग शिकवतात.
तुम्ही हे पण जाणतात. हे पिता, शिक्षक आणि सदगुरू आहेत. जे कल्प कल्प येऊन हेच
शिक्षण देतात. सतयुग, त्रेतायुगा साठी शिकवतात. परत हे प्राय:लोप होते. सुखाचे
प्रारब्ध पूर्ण होते. अविनाशी नाटका नुसार हे बेहदचे बाबा समोर समजवतात. त्यांनाच
पतित पावन म्हणले जाते. कृष्णाला तुम्ही माता पिता तुम्ही... किंवा पतित पावन
म्हणणार का? शिवबाबांच्या आणि कृष्णाच्या मध्ये रात्रं दिवसाचा फरक आहे. आता बाबा
म्हणतात, मला ओळखल्यामुळे तुम्ही सेकंदांमध्ये जीवनमुक्ती प्राप्त करू शकतात. आता
कृष्ण ईश्वर असेल तर, लगेच ओळखू शकले असते. कृष्णाचा जन्म काही दिव्य अलौकिक नाही.
फक्त पवित्र ते द्वारे होतो. बाबा तर कोणाच्या गर्भाद्वारे जन्म घेत नाहीत. गोड गोड
आत्मिक मुलांनो आत्माच शिकते. चांगले-वाईट संस्कार आत्म्यामध्येच राहतात. जस जसे
कर्म करते त्यानुसार त्यांना शरीर मिळते. कोणी खूप दुःख भोगतात, कोणी काने, बहिरे
असतात. पाठीमागील जन्मात जसे कर्म केले तसे फळ मिळतात. आत्म्याच्या कर्मानुसार रोगी
किंवा चांगले शरीर मिळते.आता तुम्ही मुलं जाणतात आम्हाला शिकवणारे ईश्वरीय पिता
आहेत. ईश्वर शिक्षक आणि धर्मस्थापक पण आहेत. त्यांना ईश्वर परमात्मा म्हणतात.त्यांना
एकत्रितपणे परमात्मा किंवा सर्वोच्च म्हणतात. ब्रह्मंना परम म्हणता येत नाही. परम
म्हणजे उंच ते उंच, पवित्र ते पवित्र. पद प्रत्येकाचे वेगवेगळे आहे.कृष्णाचे जे पद
आहे ते दुसऱ्यांना मिळू शकत नाही. पंतप्रधानाचे पद दुसऱ्यांना थोडेच देता येईल.
पित्याचे पद वेगळे आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकराचे पण वेगळे पद आहे. शिव तर परमात्म
आहेत. दोघांना मिळून शिवशंकर कसे म्हणणार? दोघे वेगवेगळे आहेत, न समजल्या मुळेच
शिवशंकर एकच म्हणतात. नावे पण असेच ठेवतात, यासर्व गोष्टीबाबाच समजवतात. तुम्ही
जाणतात बाबा पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत, सदगुरू पण आहेत. प्रत्येक मनुष्याला पिता
पण असतात, शिक्षक पण असतात, गुरु पण असतात. जेव्हा जेव्हा वानप्रस्थ अवस्थेमध्ये
येतात, तेव्हा गुरु करतात. आजकाल तर लहानपणीच गुरु करून देतात. समजतात जर गुरु नाही
केला तर अवज्ञा होईल. पूर्वी साठ वर्षानंतर गुरु करत होते. ती असते वानप्रस्थ अवस्था.
निर्वाण म्हणजे आवाजापासून दूर, गोड शांतीचे घर ज्यामध्ये जाण्यासाठी अर्ध्याकल्पा
पासून तुम्ही कष्ट घेत होते, परंतु माहित नाही म्हणून जाऊ शकत नव्हते, कोणाला रस्ता
कसा सांगू शकता? एका शिवाय तर कोणी रस्ता सांगू शकत नाही. सर्वांची बुद्धी तर एक
सारखी होऊ शकत नाही. काहीतर जसे कथा ऐकतात, फायदा काहीच नाही. प्रगती काहीच होत नाही.
तुम्ही आता बागेतील फुले बनत आहात. फुलापासून काटे बनले, आता परत काट्या पासून फुल,
बाबाच बनवतात. तुम्हीच पूज्य परत पुजारी बनले, 84 जन्म घेत घेत सतो प्रधान पासून
तमोप्रधान पतित बनले. बाबांनी सर्व शिडी समजावली आहे. आता परत पतित पासून पावन कसे
बनतात हे कोणालाच माहीत नाही. गायन पण करतात हे पतित पावन या, येऊन आम्हाला पावन
बनवा. बाकी पाण्याच्या नद्या, समुद्र इत्यादीला पतित पावन समजून का स्नान करण्यासाठी
जातात? गंगेला पतित-पावन समजतात, परंतु पाण्याच्या नद्यांचा उगम कोठून झाला?
समुद्रापासून निघतात ना. हे सर्व समुद्राची मुले आहेत. तर प्रत्येक गोष्ट चांगल्या
रीतीने समजून घ्यायची असते.येथे तर तुम्ही मुलं सत्संगामध्ये बसला आहात. बाहेर
कुसंग मध्ये जातात, तर तुम्हाला खूप उलट्या गोष्टी ऐकवतात. परत इतक्या सर्व गोष्टी
विसरतात कुसंगामध्ये गेल्यामुळे संभ्रम होतो,संशय येतो परंतु या गोष्टी विसरायचा
नाहीत. बाबा आमचे बेहदचे बाबा पण आहेत, शिक्षक पण आहेत, किना-याला जीवन नौका घेऊन
जातात, या निश्चयामुळेचतुम्ही आले आहात. ते सर्व लौकिक शिक्षक आहेत लौकिक भाषा. हे
सर्व अलौकिक आहे. बाबा म्हणतात माझा जन्म पण अलौकिक आहे. मी हे शरीर भाड्याने घेतो.
ते पण सर्वात जुने, सर्वात जुनी चप्पल ब्रह्मा आहेत. यांना मोठा बूट पण म्हणतात. या
सर्व सहज गोष्टी आहेत. या तर विसरण्याच्या गोष्टी नाहीत परंतु माया इतक्या सहज
गोष्टी पण विसरायला लावते. बाबा पिता पण आहेत, बेहदचे शिक्षण देणारे पण आहेत. जे
कोणी देऊ शकत नाही. बाबा म्हणतात, खुशाल दुसरी कडे जाऊन पहा, कोठेही ज्ञान मिळते का
ते पाहा? सर्व मनुष्य आहेत. ते असे ज्ञान देऊ शकत नाहीत. ईश्वर एकच रथ घेतात, ज्याला
भाग्यशाली रथ म्हणले जाते. ज्यामध्ये बाबांची प्रवेशता होते. पद्मा पदम भाग्यशाली
बनण्यासाठी खूपच जवळचे मणी आहेत, ब्रह्माच विष्णू बनतात. शिवबाबा यांना पण श्रेष्ठ
बनवतात, तुम्हालापण यांच्याद्वारे विश्वाचे मालक बनवतात. विष्णूची पुरी स्थापन होते.
यालाच राजयोग म्हणले जाते राजाई स्थापन करण्यासाठी. आता येथे ऐकतात तर सर्व आहात,
परंतु बाबा जाणतात, अनेकांच्या कानाद्वारे निघून जाते, जे धारणा करून ऐकवू शकतात,
त्यांना महारथी म्हणले जाते. एकूण परत धारणा करतात. दुसर्यांना पण आवडीने समजतात.
महारथी समजून सांगणारा असेल तर लगेच समजतील. घोडेस्वारा कडून कमी, प्यादे कडून आणखी
कमी. हे तर बाबा जाणतात, कोण महारथी आहेत, कोण घोडेस्वार आहेत. आता या ज्ञानात
संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही. परंतु बाबा पाहतात, काही मुलं संभ्रमित होतात.
परत संशय येतो. डोळे बंद करून बसतात. कमाई मध्ये कधी जांभळ्या, आळस येतो का? आळस
देत राहतील तर धारणा कसे करतील. जांभळ्या देत असतील तर बाबा समजतात हे थकलेले आहेत.
कमाई मध्ये कधी,आळस थकावट होत नाही. जांभळ्या देणे हे उदासी पणाचे लक्षण आहे.
कोणत्या न कोणत्या गोष्टीमध्ये संशय येत असेल तर जांभळ्या खूप येतात. आता बाबांच्या
म्हणजे शिव पित्याच्या घरामध्ये बसले आहात, हा परिवार पण आहे, शिक्षक पण बनतात, गुरु
पण बनतात. रस्ता दाखविण्यासाठी मास्टर, गुरु म्हणले जाते, तर आता बाबांचा उजवा हात
बनायला पाहिजे, ज्यामुळे अनेकांचे कल्याण होईल. बाकी सर्व धंद्यामध्ये नुकसान आहे,
शिवाय नरापासून नारायण बनण्याचे. तर मग कोणते शिक्षण घ्यायला पाहिजे? ज्यांच्याजवळ
खूप धन असते ते तर समजतात स्वर्ग तर येथेच आहे. बापू गांधींनी राम राज्य स्थापन केले?
अरे दुनिया तर तीच जुनी तमोप्रधान आहे ना. दुःख वाढत जाते, याला रामराज्य कसे
म्हणणार? मनुष्य खूपच बेसमज बनले आहेत. बे समजला तमोप्रधान म्हणले जाते. समजदारच
सतोप्रधान असतात हे चक्र फिरत राहते. यामध्ये बाबांना कधी विचारायची आवश्यकताच नाही.
बाबांचे कर्तव्य आहे रचनाकार आणि रचनेचे ज्ञान देणे. ते तर भेटत राहतो, मुरली मध्ये
सर्व समजवत राहतात. सर्व गोष्टीचे उत्तर मिळत जाते, बाकी काय विचारणार? बाबां शिवाय
कोणी समजावू शकत नाही. हे पण तुम्ही बोर्डवर लिहू शकता, “21 जन्मासाठी सदा निरोगी,
सदा संपत्तीवान बनायचे असेल तर येऊन हे ज्ञान समजून घ्या.” अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. बाबा जे
ऐकवतात ते चांगल्या रीतीने धारण करायचे आहे. दुसर्यांना पण आवडीने सांगायचे आहे. एका
कानाने ऐकून,दुसर्या कानाने सोडायचे नाही. कमाई करते वेळी, म्हणजे योग करताना,
जांभळ्या द्यायच्या नाहीत.
2. बाबांचा उजवा हात बनून अनेकांचे कल्याण करायचे आहे. नरापासून नारायण बनवण्याचा
धंदा करायचा आहे.
वरदान:-
वर्तणूक आणि
चेहर्या द्वारे पवित्रतेच्या शृंगाराची झलक दाखवणारे शृंगारी मूर्त भव
पवित्रता ब्राह्मण
जीवनाचा शृंगार आहे. प्रत्येक वेळेत पवित्रतेच्या शृंगाराची अनुभूती चेहर्या किंवा
वागणुकीद्वारे दुसऱ्यांना होऊ द्या. दृष्टीमध्ये, मुखाद्वारे, हाताद्वारे,
पायाद्वारे, पवित्रतेचा शृंगार प्रत्यक्ष व्हावा. प्रत्येक जण वर्णन करतील यांच्यात
वागणुकीद्वारे पवित्रता दिसून येते. डोळ्यांमध्ये पवित्रतेची समक आहे. मुखामध्ये
पवित्रतेचे हस्य आहे. दुसरी कोणती गोष्ट त्यांना दिसणार नाही. यालाच पवित्रतेच्या
शृंगाराद्वारे शृंगारिक मूर्ती म्हणतात.
बोधवाक्य:-
व्यर्थ संबंध,
संपर्क पण जमेचे खाते रिकामे करते, म्हणून व्यर्थला नष्ट करा.