08-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, ख-या बाबासोबत खरे बना, खरा चार्ट लिहा ,ज्ञानाचा अहंकार सोडून आठवणीमध्ये राहण्याचा पूर्ण रीतीने पुरुषार्थ करा...”

प्रश्न:-
महावीर मुलांची मुख्य लक्षणे कोणती आहेत?

उत्तर:-
महावीर मुलं तेच, ज्यांच्या बुद्धीमध्ये निरंतर बाबांची आठवण आहे. महावीर म्हणजे शक्तिशाली .महावीर तेच ज्यांना निरंतर खुशी राहते, जे आत्म अभीमानी आहेत, ज्यांना देहाचा जर आपण अहंकार नाही .अशा महावीर मुलांच्या बुद्धीमध्ये राहते की आम्ही आत्मा आहोत, बाबा आम्हाला शिकवत आहेत.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मूलांना विचारत आहेत, स्वतःला आत्मा समजून बसले आहात का ?कारण बाबा जाणतात हे थोडे अवघड आहे, यामध्येच कष्ट आहेत .जे आत्माभिमान होऊन बसले आहेत त्यांनाच महावीर मानले जाते. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे, यालाच महावीर म्हटले जाते. नेहमी स्वतःला विचारत रहा आम्ही आत्मा-भिमानी आहोत? आठवणी द्वारेच महावीर बनतात म्हणजे सर्वश्रेष्ठ बनतात. सर्वश्रेष्ठ अर्थात शक्तिमान, किंवा महावीर तर मनामध्ये खुशी व्हायला पाहिजे, आम्ही आत्मा आहोत. आम्हा सर्व आत्म्यांना बाबा शिकवत आहेत. बाबा पण जाणतात कोणी आपला चार्ट 25% दाखवतात कोणी 100% दाखवतात, कोणी म्हणतात चोवीस तासांमध्ये अर्धातास आठवण राहते तर किती टक्के आठवण झाली? (2%) स्वतःची फार संभाळ करायची आहे. सावकाशपणे महावीर बनायचे आहे, लगेच महावीर बनू शकत नाही, यामध्ये कष्ट आहेत. ते जे ब्रह्मज्ञानी तत्त्वज्ञांनी आहेत, असे समजू नका ते स्वतःला आत्म समजतात? ते तर ब्रह्म घरालाच त्यालाच परमात्मा समजतात आणि स्वतःला अहम ब्रह्मस्मी म्हणतात. आता घराशी थोडाच योग लावायचा असतो? आता तुम्ही मुलं स्वतःला आत्मा समजतात. आपला चार्ट पाहायचा आहे, चोवीस तासांमध्ये आम्ही किती वेळ स्वतःला आत्मा समजतो? आता तुम्ही मुलं जाणता आम्ही ईश्वरी सेवेवर आहोत, फक्त ईश्वरसेवा. हे सर्वांना सांगायचे आहे की, बाबा म्हणतात मनमनाभव म्हणजेच स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. ही तुमचे सेवा आहे .जितकी सेवा तुम्ही कराल, तेवढे फळ मिळेल. या गोष्टी चांगल्या रीतीने समजण्याच्या आहेत. चांगले चांगले महारथी पण या गोष्टीला पूर्ण रीतीने समजत नाहीत, यामध्ये खूप कष्ट आहेत. कष्टाशिवाय फळ थोडेच मिळू शकते. बाबा पाहतात कोणी चार्ट लिहून पाठवतात, कोणाकडून तर चार्ट लिहिणे होत नाही, ज्ञानाचा अहंकार आहे. आठवणी मध्ये राहण्याचे कष्ट घेत नाहीत. बाबा समजतात मुख्य गोस्ट आठवण करण्याची आहे, स्वतःवरती नजर ठेवा की माझा चार्ट कसा आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. काही जण असं म्हणतात की चार्ट लिहिण्यासाठी वेळ नाही. मुख्य गोष्ट बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून मज परमात्माची आठवण करा. येथे जितका वेळ बसता तेवढे स्वतःला, मध्ये मध्येच विचारत रहा, मी बाबांच्या आठवणी मध्ये किती वेळ बसलो. येथे बसता तेव्हा तुम्हाला बाबा च्या आठवणीमध्येच राहायचे आहे, आणि सुदर्शनचक्र फिरवत रहा, यामध्ये काहीच कष्ट नाहीत. आम्हाला बाबांच्या जवळ सतोप्रधान बनूण जायचे आहे. या गोष्टीला चांगल्या रीतीने समजायचे आहे ,काही तर लगेच विसरतात. खराखरा चार्ट सांगत नाहीत, असे अनेक महारथी आहेत, खरे तर कधीच सांगत नाहीत .अर्धाकल्प खोटी दुनिया चालत आली आहे, तर जसे खोटे मनामध्ये ठासून बसले आहे. यामध्ये पण जे साधारण आहेत, ते तर लगेच चार्ट लिहितात. बाबा म्हणतात तुम्ही पापांना भस्म करून आठवणीच्या यात्रा द्वारे पावन बनाल. फक्त ज्ञानाद्वारे पावन बनू शकत नाहीत. बाकी फायदा काय? पुकारतात पण पावन बनण्यासाठी, त्या साठीआठवण करणे मुख्य आहे. प्रत्येकाने आपला चार्ट खरा खुरा सांगायचं आहे. येथे तुम्ही पाऊन तास बसले, तर पाहायचे आहे, पाऊन तासांमध्ये आम्ही किती वेळ स्वतःला आत्मा समजून,बाबाच्या आठवणीमध्ये राहिलो? काहींना तर खरे सांगायची लाज वाटते, बाबांना खरे सांगत नाहीत, ते समाचार देतील ही सेवा केली, इतक्या लोकांना समजवले, हे केले, परंतु आठवणीच्या यात्रेचा चार्ट लिहीत नाहीत. बाबा म्हणतात आठवणीच्या यात्रांमध्ये न राहिल्यामुळेच तुमचा बाण कुणाला लागत नाही, ज्ञान तलवारी मध्ये ती ताकद भरत नाहीत. ज्ञान तर ऐकवतात बाकी योगाचा बाण लागणे मुश्कील आहे. बाबा म्हणतात पाऊन घंट्यामध्ये, पाच मिनिट पण आठवणीच्या यात्रा मध्ये बसत नाहीत. समजत नाहीत, कसे स्वतःला आत्मा समजून बाबाची आठवण करायची? काही जण म्हणतात, आम्ही निरंतर बाबाच्या आठवणी मध्ये राहतो, बाबा म्हणतात, ती अवस्था आता होऊ शकत नाही, जर निरंतर आठवणीत राहिले तर लगेच कर्मातीत अवस्था होईल, ज्ञान संपूर्ण आचरणामध्ये येईल. थोडे पण कुणाला ज्ञान दिले तर त्यांना लगेच ज्ञान बाण लागेल, कष्ट आहेत ना. विश्वाचे मालक थोडेच असे बनू शकतो? माया तुमच्या बुद्धीचा योग कुठे ना कुठे घेऊन जाते, मित्रसंबंधी ई.ची आठवण येत राहते. कोणाला परदेशात जायचे असेल तर मित्र संबंधी जहाज,विमान इत्यादींची आठवण येत राहील.परदेशात जाण्याची प्रत्यक्ष इच्छा आहे, ती आकर्षित करत राहते. बुद्धीचा योग् बिलकुल निघून जातो.दुसर्‍या कुणाकडे, बुद्धी जायला नको,यामध्ये खूप कष्ट घ्यावे लागतात.फक्त एक बाबाच्या आठवणीमध्ये राहायचे आहे यामध्ये देह पण आठवणीत यायला नको, ही अवस्था तुमची अंत काळामध्ये होईल. दिवसेंदिवस जितके आठवणीच्या यात्रा वाढवत राहाल, यामध्ये च तुमचे कल्याण आहे. जितके जितके आठवणीमध्ये राहाल तेवढी तुमची कमाई जमा होत राहील. जर शरीर सुटले परत कमाई तर करू शकणार नाहीत, जाऊन लहान मुलगा बनले तर कमाई करू शकणार नाहीत. जरी आत्मा हे संस्कार घेऊन गेली परंतु शिक्षक पण पाहिजेत ना, परत आठवण करून देण्यासाठी. बाबा पण आठवण करून देतात ना. बाबांची आठवण करा, हे शिवाय तुमच्या, दुस-या कोणाला माहित नाही की, बाबाच्या आठवणी मुळेच पावन बनू. ते तर गंगास्नान इत्यादीला श्रेष्ठ मानतात, म्हणून गंगास्नानच करत राहतात.बाबांना तर, यासर्व गोष्टीचा अनुभव आहेना. यांनी तर खूप गुरु केले होते, ते पाण्याचे स्नान करण्यासाठी जातात, येथे तुमचे स्नान आहे. आठवणीच्या यात्रेचे. बाबाच्या आठवणीशिवाय तुमची आत्मा पावन बनू शकत नाही.याचे नावच आहे योग, म्हणजे आठवणीची यात्रा. ज्ञानाला स्नान समजू नका, योग म्हणजे स्नान आहे. ज्ञान तर शिक्षण आहे. योगाचे स्नान आहे ज्याद्वारे पाप नष्ट होतात. ज्ञान आणि योग दोन वेगळ्या गोष्टी आहेत, बाबांच्या आठवणी द्वारे जन्म जन्मांतर चे पाप भस्म होतात. बाबा म्हणतात, आठवणीच्या यात्रे द्वारेच तुम्ही पावन बनुण सतोप्रधान बनाल. बाबा तर खूप चांगल्या रीतीने समजावतात, गोड गोड मुलांनो या गोष्टीला विसरू नका. आठवणीच्या यात्रे द्वारे जन्म जन्मांतर चे पाप नष्ट होतील, बाकी ज्ञान तर कमाई आहे. आठवण आणि ज्ञान हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे शिक्षण ,विज्ञान म्हणजे योग किंवा आठवण .कुणाला श्रेष्ठ मानणार ?ज्ञान कि योग? आठवणीची यात्रा खूपच मोठी आहे, यामध्ये कष्ट आहेत. स्वर्गामध्ये तर सर्व जातील.सतयुग आहे स्वर्ग,त्रेता आहे सेमी स्वर्ग .तेथे तर या शिक्षणाद्वारे जाऊन विराजमान होतील,बाकी मुख्य योगाची गोष्ट आहे. प्रदर्शनी किंवा संग्रहालयामध्ये तुम्ही ज्ञान समजवतात .योग थोडेच समजवू शकतात? फक्त इतके सांगू शकता की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, बाकी ज्ञान तर खूप देतात. बाबा म्हणतात प्रथम ही मुख्य गोष्ट समजून सांगा की ,स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. हे ज्ञान देण्यासाठी तुम्ही एवढे चित्र इत्यादी बनवले आहेत, योगासाठी कोणत्या चित्राच्या आवश्यकता नाही.चित्र सर्व ज्ञान समजावण्यासाठी बनवले आहेत. स्वतःला आत्म समजल्या मूळे देहाचा अहंकार बिलकुल नष्ट होतो .ज्ञानामध्ये तर मुख पाहिजे ज्याद्वारे वर्णन करू शकतो. योगाची तर एकच गोष्ट आहे, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. शिक्षणामध्ये तर देहाची आवशकता आहे, शरीराशिवाय कसे शिक्षण घेऊ शकाल किंवा शिकवू शकाल. पतित-पावन बाप आहेत तर त्यांच्यासोबत योग लावावा लागेल ना, परंतु काहीजण जाणत नाहीत.बाबा स्वतः येऊन शिकवतात,मनुष्य मनुष्याला कधी ही शिकवू शकत नाहीत.बाबा म्हणतात माझी आठवण करा यालाच म्हटले जाते परमात्म्याचे ज्ञान.परमआत्मा ज्ञानाचे सागर आहेत .या फार मोठ्या समजण्याच्या गोष्टी आहेत. सर्वांना सांगा बेहद च्या बाबांची आठवण करा,ते बाबा नवीन दुनिया स्थापन करत आहेत.ते समजत नाहीत की नवीन दुनिया स्थापन होत आहे त्यामुळे ईश्‍वराची आठवण करावी लागेल.त्यांच्या लक्षा मध्ये नाही तर विचार करायचे का?हे पण तुम्ही जाणतात.परमपिता परमात्मा शिव भगवान एकच आहेत.ब्रह्मा देवताय नमः असे म्हणतात परत शेवटी शिव देवताय नमः असे म्हणतात.ते बाबा श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहेत. परंतु ते कोण आहेत हे पण समजत नाहीत .जर दगडा धोंड्या मध्ये आहेत तर नमः कुणाला करतात, अर्थ रहित बोलत राहतात. येथे तर तुम्हाला आवाजापेक्षा दूर जायचे आहे, अर्थात निर्वाणधाम, शांतीधाम मध्ये जायचे आहे .शांतीधाम सुखधाम म्हणले जाते ना ,ते आहे स्वर्ग धाम.नरकाला कधी धाम म्हटले जात नाही .अक्षर खूपच सहज आहेत. ख्रिश्चन धर्म कधीपर्यंत चालेल, हे पण त्या लोकांना माहीत नाही .ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्ष स्वर्ग होता असे म्हणतात,अर्थात देवी-देवतांचे राज्य होते,परत दोन हजार वर्ष ख्रिस्ता ला झाले,आता परत देवता धर्म व्हायला पाहिजे ना.मनुष्याची बुद्धी काहीच काम करत नाही.नाटकाच्या रहस्याला न जाणल्यामुळे अनेक नियोजन करत राहतात.या गोष्टी वृध्द माता समजू शकत नाहीत.बाबा समजवतात आता तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे वाणी पासून दूर जायचे आहे.जरी म्हणतात निर्वाण धाम गेले परंतु कोणीही जात नाही,तरीही पुनर्जन्म घेत राहतात,परत कोणीच जात नाही. वानप्रस्थ मध्ये जाण्यासाठी गुरु ई चा संग करतात. अनेक वानप्रस्थ आश्रम आहेत.माता पण अनेक आहेत .तेथे पण जाऊन तुम्ही सेवा करू शकतात. वानप्रस्थ चा काय अर्थ हे पण तुम्हाला बाबा सन्मुख समजवतात .आता तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे,सारी दुनिया वानप्रस्थी आहे. जे पण माणूस मात्र पाहतात ते सर्व वानप्रस्थीआहेत,सर्वांचे सद्गगती दाता एकच सद्गुरु आहेत,सर्वांना जायचेच आहे. जे चांगल्या रीतीने पुरुषात करतात ते आपले श्रेष्ठ पद मिळवतात, यालाच अंतिम काळ म्हणले जाते.अंतिम काळाचा अर्थ किंवा कयामत चा अर्थ पण ते लोक समजत नाहीत.तुम्ही मुलं पण नंबरा नुसार समजतात. फार मोठे लक्ष्य आहे,सर्वांना समजून सांगा आता घरी जायचे आहे.जरूर आत्म्यांना वाणी पासून दूर जायचे आहे, परत तुमच्या भूमिकेची पुनरावृत्ती होईल.परंतु बाबांची आठवण करत करत श्रेष्ठ पद मिळवाल.दैवी गुणांची धारणा पण करायची आहे.कोणी खराब काम चोरी इत्यादी करायची नाही, तर योगा मुळे पुण्यात्मा बनाल,ज्ञानामुळे नाही. आत्मा पवित्र पाहिजे,शांतीधाम मध्ये पवित्र आत्माच जाऊ शकतात .सर्व आत्मे तेथे राहतात आत्तापर्यंत येत राहतात बाकी जे पण शिल्लक असतील ते पण येथे येत राहतील. तुम्हा मुलांना आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. येथे तुम्हाला चांगली मदत मिळते, एक दोघांपासून बळ मिळत राहते ना .तुम्हा थोड्या मुलांची ताकत काम करत राहते.गोवर्धन डोंगर दाखवतात ना, करंगळी वरती डोंगर उचलला. तुम्हीच गोप- गोपी आहात ना. सातयुगीदेवी-देवतांना गोप-गोपी म्हणले जात नाही. करंगळी तुम्हीच देतात, लोह युगाला सुवर्णयुग किंवा नरकाला स्वर्ग बनवण्यासाठी तुम्हीच एक बाबाच्या सोबत बुद्धी योग लावतात.योगाद्वारे च पवित्र बनू शकाल. या गोष्टींना विसरायचे नाही. ही ताकद तुम्हाला येथेच मिळते, बाहेर तर असुरी मनुष्याचा संग राहतो. तेथे आठवणीमध्ये राहणे कठीण आहे. इतके अचल आडोल तुम्ही तेथे राहू शकत नाही,संघटन पाहिजे ना. येथे सर्व एकत्र बसतात तर मदत मिळते.येथे धंदा इत्यादी काहीच राहत नाही,मग बुद्धी योग कुठे जाईल ,बाहेर तर धंदा, घर इत्यादी आकर्षित करत राहतात. तसे येथे काहीच नाही, येथील वातावरण पण चांगले शुद्ध राहते.नाटका नुसार तुम्ही डोंगरावरती येऊन बसले आहात. तुमचे यादगार पण समोर बरोबर आहे.वरती स्वर्ग दाखवला आहे, नाहीतर कुठे दाखवतील. तर बाबा म्हणतात येथे येऊन बसतात तर तुम्ही स्वतःला तपासा आम्ही बाबांच्या आठवणी मध्ये बसलो आहोत? सुदर्शनचक्र पण फिरत राहते? अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादाची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचे आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आपल्या आठवणीच्या चार्ट वरती पूर्णपणे नजर ठेवायची आहे, पाहायचे आहे आम्ही बाबांची कितीवेळ आठवण करतो. आठवणीच्या वेळेत बुद्धी कुठे कुठे भटकते.

2. या कयामत च्या वेळेत वाणी पासून दूर जाण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.बाबाच्या आठवणीसोबत दैवी गुणांची धारणा पण जरूर करायची आहे. कोणतेच वाईट काम, चोरी इत्यादी करायची नाही.

वरदान:-
नेहमी सर्व प्राप्ती पासून, भरपूर राहणारे हर्षित मुख हर्षित चित्त भव
 

जेव्हा कोणत्या देवी किंवा देवता ची मूर्ती बनवतात तर त्यामध्ये नेहमी आनंदी चेहरा दाखवतात, ते आपल्या या वेळेच्या आनंदी चेह-याची आठवण चित्रा मध्ये दाखवतात. आनंदी चेहरा अर्थात सदा सर्व प्राप्ती पासून भरपूर. जे भरपूर असतात तेच आनंदी राहू शकतात. जर कोणत्ती अप्राती असेल तर हर्षित राहू शकत नाही, कोणी किती पण हर्षित राहण्याचा प्रयत्न करेल, बाहेरून हासतील परंतु मनापासून हसू शकणार नाही. तुम्ही तर मनापासून हसत राहतात कारण सर्व प्राप्तीने भरपूर हर्षित चित्त आहात.

बोधवाक्य:-
चांगल्या मार्काने पास व्हायचे, असेल तर प्रत्येक खजाण्याचे खाते भरपूर असायला हवे.