30-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, नेहमी श्रीमतावर चालत राहा, हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे, श्रीमतावर
चालल्यामुळे आत्म्यांचा दीपक जागृत होतो”
प्रश्न:-
पुर्ण
पुरुषार्थ कोण करु शकतात? उच्च पुरुषार्थ म्हणजे काय?
उत्तर:-
पुर्ण
पुरुषार्थ तेच करु शकतात ज्यांचे लक्ष अथवा बुध्दीयोग एका बाबांच्यामध्ये आहे.
सर्वांत उच्च पुरुषार्थ आहे बाबांवरती पुर्णपणे बलिहार जाणे. बलिहार जाणारी मुले
बाबांना फार आवडतात.
प्रश्न:-
खरी-खरी दिवाळी
साजरी करण्यासाठी बेहदचे पिता कोणता सल्ला देतात?
उत्तर:-
मुलांनो,
बेहदची पवित्रता धारण करा. जेव्हा येथे बेहद पवित्र बनाल, असा उच्च पुरुषार्थ कराल
तेव्हा लक्ष्मी-नारायणाच्या राज्यात जाऊ शकाल. म्हणजे खरी-खरी दिवाळी वा
राज्याभिषेक दिवस साजरा करु शकाल.
ओम शांती।
मुलांनो, आता येथे बसून काय करीत आहात? चालता-फिरता अथवा येथे बसून अनेक जन्मांचे
पापांचे ओझे जे डोक्यावर आहे, त्या पापांना आठवणीच्या यात्रेने विनाश करत आहात. हे
तर आत्मा जाणते की, आम्ही जेवढी बाबांची आठवण करु तेवढी पापे भस्म होतील. बाबा तर
खुप चांगल्याप्रकारे समजावतात. जरी येथे बसला आहात तरी सुध्दा जे श्रीमतावर चालतात,
त्यांना बाबांचा सल्ला आवडणारच. बेहदचा पिता सल्ला देत आहे की, बेहद पवित्र बना,
तुम्ही येथे बेहद पवित्र बनण्यासाठी आला आहात. ते तर यादच्या यात्रेने बनणार आहात.
काही जण तर बिल्कुल आठवण करु शकता नाहीत. काही जण समजतात कि, आम्ही आठवणीने आपली
पापे भस्म करीत आहोत म्हणजेच स्वत:चे कल्याण करीत आहोत. बाहेरचे तर या गोष्टी जाणत
नाहीत. तुम्हालाच पिता भेटला आहे, तुम्ही रहातच आहात पित्याजवळ. तुम्ही जाणता कि,
आता आम्ही ईश्वराची मुले बनलो आहोत, यापुर्वी आसुरी संतान होतो. आता आम्ही ईश्वरीय
मुलांच्या संगामध्ये आहोत. गायन सुध्दा केले जाते. संग तारतो आणि कुसंग बुडवतो. मुले
घडी घडी हे विसरतात कि, आम्ही ईश्वराची मुले आहोत, तर आम्हाला ईश्वरीय श्रीमतावर
चालले पाहिजे, मनमतावर नाही. मनुष्य मताला मनमत असे म्हटले जाते. मनुष्याचे मत हे
आसुरी असते. ज्या मुलांना स्वत:चे कल्याण करावयाचे आहे ती मुले बाबांची खुप
चांगल्याप्रकारे आठवण करतात. सतोप्रधान बनण्यासाठी. जे सतोप्रधान असतात त्यांची
महिमा केली जाते. बरोबर जाणता कि, आम्ही सुखाधामचे मालक बनतो पण नंबरवार जेवढे
श्रीमतावर चालतो, तेवढे उच्च पद मिळते आणि जेवढे स्वत:च्या मतावर चालतो तेवढे पद
भ्रष्ट होते. स्वत:चे कल्याण करण्यासाठी बाबांचे श्रीमत तर मिळतच असते. बाबा
समजावतात कि, हा सुध्दा पुरुषार्थ आहे. जे जेवढी आठवण करतात तेवढी त्यांची पापे
भस्म होतात. आठवणीच्या यात्रेशिवाय पवित्र तर बनू शकत नाही. उठता बसता, चालता-फिरता
हीच काळजी ठेवा. तुम्हा मुलांना किती वर्षांपासून ज्ञान मिळाले आहे तरी सुध्दा
समजतात कि, आम्ही खुप दूर आहोत. एवढी बाबांची आठवण करु शकत नाही. सतोप्रधान
बनण्यासाठी तर खुप वेळ लागेल. यामध्ये जर शरीर सुटले तर, कल्पा कल्पासाठी पद हल्के
होईल. ईश्वराचे बनलेलोच आहे तर पुर्ण वारसा घेण्याचा पुरुषार्थ करा. बुध्दी एकाच
बाजूला झुकली पाहिजे. आता तुम्हाला श्रीमत मिळत आहे. तो आहे उच्च ते उच्च भगवान.
त्यांच्या श्रीमतावर चाललो नाही तर धोका मिळेल. श्रीमतावर चालतो कि नाही, हे
तुम्हाला माहिती आणि त्या शिवबाबांना माहिती. तुमच्याकडून पुरुषार्थ करवून घेणारा
शिवबाबा आहे. देहधारी सर्वजण पुरुषार्थ करतात. हा सुध्दा देहधारी आहे. ब्रह्माला
पुरुषार्थ करायला शिकविणारा सुध्दा शिवबाबा आहे. पुरुषार्थ हा मुलांनाच करायचा आहे.
पतितांना पावन बनविणे ही मुळ गोष्ट आहे. तसे दुनियेत खुप जण पवित्र राहतात.
सन्यासीसुध्दा पवित्र राहतात. ते तर एका जन्मासाठी पवित्र बनतात. असे खुप जण आहेत
जे या जन्मात बाल ब्रह्मचारी राहतात. ते काही दुनियेला आपल्या पवित्रतेची मदत करु
शकत नाहीत. ते जेव्हा श्रीमतानुसार पवित्र बनतील व दुनियेला पवित्र बनवतील तरच
त्यांची मदत होईल.
आता तुम्हाला श्रीमत मिळत आहे. अनेक जन्मांत तर तुम्ही आसुरी मतावर चालत आलात. आता
तुम्ही हे जाणता कि, सुखधामाची स्थापना होत आहे. जेवढे आम्ही श्रीमतावर चालून
पुरुषार्थ करु तेवढे उच्च पद मिळेल. हे ब्रह्माचे मत नाही. ब्रह्मा सुध्दा
पुरुषार्थी आहे. यांचा पुरुषार्थ खुप उच्च आहे म्हणून लक्ष्मी-नारायण बनले. तर
मुलांनी ब्रह्माला अनुकरण केले पाहिजे. श्रीमतावर चालत राहा, मनमतावर नाही. आपल्या
आत्मज्योतीला जागृत करा. आता दिवाळी येत आहे, सतयुगात दिवाळी नसते. फक्त
राज्याभिषेक असतो. बाकी आत्मे सतोप्रधान बनतात. आता जी दिवाळी साजरी करतात, ती खोटी
आहे. स्थुल दिपक पेटवतात, सतयुगात तर प्रत्येक घरा-घरात दिपक पेटविलेला असतो म्हणजे
सर्व आत्मे सतोप्रधान असतात. 21 जन्मांसाठी ज्ञानाचे तेलतुप घातले जाते. पुन्हा
हळूहळू कमी होत होत यावेळी सर्वांची आत्मज्योत विझत जाते. यामध्ये पण खास भारतवासी
व बाकी संपूर्ण दुनिया आता सर्व पापात्मा आहेत. सर्वांच्या विनाशांची वेळ आहे,
सर्वांना हिसाब-किताब चुक्तू करावयाचा आहे. आता तुम्हा मुलांना उच्च पद प्राप्त
करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. श्रीमतावर चालला तरच मिळेल. या रावण राज्यात राहून
शिवबाबांची खूप अवज्ञा केली आहे. अजूनही जर त्यांच्या आज्ञेनूसार वागलो नाही तर खुप
धोका मिळेल. बाबांनाच पावन बनविण्यासाठी बोलावले आहे. म्हणून आता आपले कल्याण
करण्यासाठी शिवबाबांच्या श्रीमतावर चालावे लागेल. नाही तर खुप अकल्याण होईल.
गोड-गोड मुले हे सुध्दा जाणतात कि, आम्ही शिवबाबांच्या आठवणीशिवाय संपूर्ण पवित्र
बनू शकत नाही. तुम्हाला एवढी वर्षे झाली तरी सुध्दा ज्ञानाची धारणा का होत नाही?
सोन्याच्या भांड्यामध्येच (पवित्र बुध्दीत) धारणा होईल. नवी-नवी मुले किती सेवाधारी
आहेत. फरक पहा किती आहे! जुनी मुले एवढी बाबांची आठवण करीत नाहीत, जेवढी नवी मुले
करतात. काही शिवबाबांची खुप लाडकी चांगली मुले आहेत. किती सेवा करतात. जसे कि
शिवबाबांसाठी आत्मा बलिहार झालेली आहे. बलिहार झाल्यामुळे सेवासुध्दा खुप करतात.
किती गोड वाटतात, अशी मुले बाबांना फार आवडतात. आठवण करुन बाबांना एक प्रकारची मदतच
करतात. बाबा म्हणतात-माझी आठवण करा तर तुम्ही पवित्र बनाल. आम्हाला येऊन पवित्र बनवा
यासाठीच तर बाबांना बोलावले आहे. म्हणून आता बाबा म्हणतात-माझी आठवण करीत राहा.
देहाच्या सर्व संबंधाचा त्याग करावा लागेल. एका बाबांशिवाय कोणत्याही मित्र-संबंधीची
आठवण राहायला नको तरच उच्च पद मिळेल. आठवण केली नाही तर उच्च पद मिळणार नाही. हे
बापदादा पण समजतात व तुम्ही मुलेही जाणता. नव नविन मुले येतात, दिवसेंदिवस सुधारत
जातात. श्रीमतानुसार चालल्यामुळे त्यांच्यात सुधारण होते. क्रोधावरती सुध्दा
पुरुषार्थ करुन विजय मिळवतात. म्हणून बाबा सुध्दा समजावतात कि, अवगुण काढून टाका.
क्रोध हा सुध्दा खराब आहे, त्यामुळे मनुष्य स्वत:ही जळतो व इतरांनाही जाळतो. तोही
निघाला पाहिजे. मुले बाबांच्या श्रीमतानुसार चालत नाहीत त्यामुळे त्यांचे पद हल्के
होते. अनेक जन्मांचे, कल्पा कल्पांचे नुकसान होते.
तुम्ही मुले जाणता ते आहे शारीरिक शिक्षण आणि हे आहे आत्म्याचे शिक्षण जे आत्म्याचे
पिता शिकवितात. प्रत्येक गोष्टींपासून बाबा आपला सांभाळ पण करतात. कोणी विकारी येथे
मधुबनमध्ये येऊ शकत नाही. आजारपणात सुध्दा विकारी मित्र-संबंधी येतात, पण हे ठीक
नाही. हे बाबांना आवडत नाही. नाही तर अंतिम वेळेत मित्र-संबंधीच आठवतील. मग त्यांना
उच्च पद मिळणार नाही. कुणाचीही आठवण येऊ नये यासाठी बाबा पुरुषार्थ करवून घेतात. असे
नाही की, आम्ही आजारी असल्यावर मित्र-संबंधी आम्हाला पाहायला यावेत. नाही, त्यांना
बोलावणे हा कायदा नाही. कायदेशीर चाललो तरच सद्गती होईल. नाहीतर फुकट स्वत:चे
नुकसान करुन घ्याल. पण तमोप्रधान बुध्दीवाले समजत नाही. भगवान सल्ला देत आहेत, तरीही
सुधारत नाहीत. खुप सावधान रीतीने चालले पाहिजे. हे आहे अत्यंत पवित्र असे स्थान.
येथे पतित कुणी थांबू शकत नाही. मित्र-संबंधी जर आठवत असतील तर मृत्यूच्या वेळी
जरुर त्यांची आठवण होईल. देह-अभिमानात आल्यामुळे स्वत:चेच नुकसान होते. शिक्षाही
खावी लागते. श्रीमतावर न चालल्यामुळे खुप मोठी दुर्गती होते. सेवेच्या लायक बनू शकत
नाही. कितीही डोके फोड केली तरीही सेवेच्या लायक बनू शकत नाही. अवज्ञा केली तर
दगडाची बुध्दी बनेल. वर चढण्याऐवजी खालीच उतरावे लागेल. बाबा तर म्हणतात मुलांनी
आज्ञाकारी बनले पाहिजे. नाहीतर पद भ्रष्ट होईल. लौकिक पित्याला जर 4-5 मुले असतील,
पण त्यामध्ये ही जे आज्ञाकारी असतात तेच पित्याला आवडतात. जे आज्ञाकारी नाहीत ते तर
दु:खच देणार. आता तुम्हा मुलांना खुप मोठे असे दोन पिता मिळाले आहेत. तर त्यांच्या
आज्ञेचे पालन केले पाहिजे. आज्ञ पाळली नाही तर अनेक जन्मांत, कल्पा-कल्पात खुप हल्के
पद मिळेल. पुरुषार्थ असा करा कि, शेवटी एका शिवबाबांची आठवण यावी. बाबा म्हणतात-मी
जाणतो प्रत्येक जण काय पुरुषार्थ करत आहे? काही जण तर खुप थोडी आठवण करतात, बाकी तर
आपल्या मित्र संबंधींचीच आठवण करत राहतात. ते इतके खुश राहू शकत नाही. त्यांना उच्च
पद मिळत नाही.
तुमचा तर रोजच सतगुरुवार आहे. बृहस्पतीच्या दिवशी महाविद्यालय मध्ये बसता, ती आहे
शरीराची विद्या व ही आहे आत्म्याची विद्या, तुम्ही जाणता कि, शिवबाबा आमचा पिता,
शिक्षक, सद्गुरु आहेत, तर त्यांच्या श्रीमतावर चालले पाहिजे, तरच उच्च पद मिळेल. जे
पुरुषार्थी आहेत, त्यांना आतून खुप खुशी होते. विचारु नका. खुशी आहे तर इतरांनाही
खुश करण्याचा पुरुषार्थ करतात. मुली पहा किती रात्रंदिवस मेहनत करतात, कारण हे
ज्ञान फार मजेशीर आहे. बापदादांना दया येते की, किती मुले बेसमजदार बनून स्वत:चे
नुकसान करुन घेतात. देह अभिमानात येऊन त्यांचा आतून खुप जळतो. क्रोधामध्ये मनुष्य
तांब्याच्या धातूसारखा लाल होतो. क्रोध मनुष्याला जाळतो, तर काम मनुष्याला काळे
बनवितो. मोह व लोभ विकारात मनुष्य इतके जळत नाहीत. क्रोधात मात्र त्यांचा खुप जळतो.
क्रोधाचे भुत खुप जणांत आहे. किती भांडतात, भांडून स्वत:चेच नुकसान करुन घेतात.
निराकार व साकार दोघांचीही आज्ञा पाळत नाहीत. बाबा समजावतात ही तर कपूत मुले आहेत.
मेहनत केली तर उच्च पद मिळेल. तर आपले कल्याण करण्यासाठी सर्व संबंध विसरा. एका
बाबांशिवाय कुणाचीही आठवण करु नका, घरात मित्र-संबंधी यांच्यात राहून सुध्दा फक्त
शिवबाबांची आठवण करा. आता तुम्ही संगमयुगात आहात, तर आपले नवीन घर, शांतीधामची आठवण
करा.
ही तर बेहदची पढाई आहे ना! बाबा शिकवितात तर यांत मुलांचाच फायदा आहे. काही मुले
आपल्या चुकीच्या चाल-चलनमुळे फुकट स्वत:चे नुकसान करुन घेतात. पुरुषार्थ करतात
विश्वाची बादशाही घेण्यासाठी पण माया रुपी मांजर त्यांचे कानच कापते. जन्म घेतला व
म्हणतात आम्ही हे पद मिळवू पण मायारुपी मांजरा पद मिळू देत नाही, आणि मग पद भ्रष्ट
होते. माया खुप जोराने आघात करते. तुम्ही येथे राज्य प्राप्त करण्यासाठी येतात.
परंतू माया मात्र हैरान करते. बाबांना दया येते की, बिचाऱ्यांना उच्च पद मिळाले तर
बरे होईल. पण माझी निंदा करवणारे बनू नका. सतगुरुची निंदा करणाऱ्याला ठिकाणा मिळत
नाही. कुणाची निंदा? शिवबाबांची? बाबांची निंदा होईल अशी चलन ठेवू नका. यामध्ये
अहंकार सुध्दा यायला नको. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. स्वत:चे
कल्याण करण्यासाठी देहाचे सर्व संबंध विसरा, त्यांच्यावर प्रेम करु नका. ईश्वराच्या
मतावर, स्वत:च्या मतावर नाही. वाईट संगापासून बचाव करा व ईश्वरीय संगामध्ये रहा.
2. क्रोध हा खुप वाईट
आहे. हा स्वत:ला जाळतो म्हणून क्रोध या विकाराच्या वशीभूत होऊन अवज्ञा करु नका. खुश
रहा आणि सर्वांना खुश करण्याचा पुरुषार्थ करा.
वरदान:-
मनाच्या जाणीव
शक्तीच्या आधारे दिलाराम बाबांचा आशीर्वाद प्राप्त करणारे स्व-परिवर्तक भव
स्वत:ला परिवर्तन
करण्यासाठी दोन गोष्टींची जाणीव खऱ्या मनापासून झाली पाहिजे (1) आपल्या कमजोरींची
जाणीव (2) जी परिस्थिती किंवा व्यक्ती निमित्त बनते तिची इच्छा आणि तिच्या मनाच्या
भावनेची जाणीव. परिस्थितीच्या पेपरचे कारण जाणून स्वत:ला पास होण्यासाठी श्रेष्ठ
स्वरुपाची जाणीव झाली पाहिजे की, स्वस्थिती श्रेष्ठ आहे व परिस्थिती पेपर आहे-ही
जाणीव सहज परिवर्तन करवते आणि खऱ्या मनापासून जाणीव झाली तर दिलाराम बाबांचे
आशीर्वाद प्राप्त होतात.
बोधवाक्य:-
वारस तोच आहे
जो नेहमी तयार राहून प्रत्येक कार्यामध्ये जी हजूर, असे म्हणत असतो...!