18-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, तुम्हास कोणत्याही विकारी देहधारी मनुष्याविषयी ममत्व राखायचे नाही कारण
तुम्ही पवित्र जगात जात आहात, एक पित्याशी प्रेम राखायचे आहे.
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
व त्या गोष्टीमुळे त्रास नाही झाला पाहिजे? आणि का?
उत्तर:-
तुम्हाला
तुमच्या जुन्या शरीराचा थोडासुद्धा त्रास वाटला नाही पाहिजे कारण हे शरीर खूप खूप
मूल्यवान आहे. आत्मा या शरीरात विराजमान होऊन, पित्याची आठवण करत खूप मोठा धनलाभ
घेत आहे. पित्याच्या आठवणीत रहाल तर खुशीचा खुराक मिळत राहील.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुले आपण दूरदेशी राहणारे आणि दूरदेशीचे प्रवासी आहोत. आपण आत्मा
आहोत आणि आता खूप दूरदेशी जाण्याचा पुरुषार्थ करत आहोत. हे फक्त तुम्ही मुलेच जाणता
की आपण आत्मे दूरदेशीचे राहणार आहोत आणि आणि दूरदेशी राहणाऱ्या पित्याला पण बोलवतो,
की येऊन आम्हाला पण तिथे दूर देशी घेऊन जा. आता ते दूरदेशी राहणारा पिता तुम्हा
मुलांना तिकडे घेऊन जातो. तुम्ही आत्मिक प्रवासी आहात कारण या शरीरासोबत आहात ना.
आत्माच प्रवास करते. शरीर तर इथेच त्याग होईल बाकी आत्माच प्रवास ( यात्रा) करेल.
आत्मा कुठे जाईल? आपल्या आत्म्याच्या दुनियेत. ही आहे साकार दुनिया, ती आहे
आत्म्यांची दुनिया. मुलांना पित्याने समजावलय आता घरी परतायचे आहे, ज्या ठिकाणाहून
भूमिका बजावायला येथे आले आहात. हा खूप मोठा रंगमंच आहे. रंगमंचावर भूमिका बजावून
नंतर सर्वांना घरी परतायचं आहे. नाटक जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच घरी जाणार ना. आता
तुम्ही इथे बसले आहात तुमची बुद्धी घराकडे आणि राजधानी मध्ये आहे. ही गोष्ट पक्की
आठवणीत ठेवा कारण गायन आहे अंतसमयी जिथे बुद्धी त्याप्रमाणे गती. आता तुम्ही इथे
अभ्यास करत आहात जाणता भगवान शिवबाबा आपल्याला शिक्षण देत आहोत. पुरुषोत्तम संगमयुगा
शिवाय भगवान कधी शिक्षण देणार नाहीत.संपूर्ण 5 हजार वर्षात निराकार भगवान पिता
एकदाच येऊन शिकवतात. हा तुमचा पक्का निश्चय आहे. शिक्षण किती सहज आहे. आता घरी
परतायचं आहे. त्या गृही तर सर्वांचे प्रेम आहे. मुक्तिधाम मध्ये जायचं तर सर्वांना
आहे परंतु त्याचा अर्थ समजत नाही. मनुष्याची बुद्धी या वेळेत कशी आहे आणि तुमची
बुद्धी आता कशी बनली आहे, किती फरक आहे. तुमची आहे स्वच्छ बुद्धी, पुरुषार्थाच्या
अनुक्रमानुसार संपूर्ण विश्वाच्या आदि मध्य अंतचे ज्ञान तुम्हाला खूप चांगल्या
तऱ्हेने माहित आहे. तुमच्या मनाला हे माहीत आहे की आता कष्ट करून नरा पासून नारायण
जरूर बनायचे आहे. येथुन प्रथम तर घरी जाणार ना. तर आनंदाने जायचे आहे. जसे सतयुगात
देवता आनंदाने एक शरीर त्याग करून दुसरे शरीर धारण करतात, तसेच या जुन्या शरीराला
पण आनंदाने सोडायच आहे. या शरीरामुळे वैतागून जायचे नाही, कारण हे खूप मूल्यवान
शरीर आहे. या शरीराद्वारे आत्म्याला पित्याकडून लॉटरी मिळते . आपण जोपर्यंत पवित्र
बनत नाही तोपर्यंत घरी जाऊ शकत नाही. पित्याची आठवण करत राहाल तेव्हाच त्या योग
शक्तीने पापांचे ओझे उतरेल, नाहीतर खूप शिक्षा मिळेल. पवित्र तर नक्की बनायचं आहे
लौकिक जीवनात सुद्धा जेव्हा मुलं कुठले वाईट कर्म करतात तेव्हा वडील रागाने छडी
मारतात कारण दुष्कृत्यांनी अपवित्र बनतात. कोणासोबत अपवित्र प्रेम करतात तर आई
वडिलांना ते रुचत नाही. तर हा बेहदचा पिता म्हणतो तुम्हाला इथे राहायचं नाहीये. आता
तुम्हाला नवीन दुनियेत जायचे आहे तिथे कोणी विकारी अपवित्र असत नाहीत. एकच
पतित-पावन पिता येऊन असे पवित्र तुम्हास बनवतात. परमपिता स्वतः सांगतात माझा जन्म
दिव्य आणि अलौकिक आहे आणि कुठली इतर आत्मा माझ्यासारखा शरीर प्रवेश करू शकत नाही.
भले धर्मस्थापक जे येतात त्यांचा आत्मा सुद्धा प्रवेश करतो परंतु त्यांची गोष्टच
निराळी आहे, मी जो येतो तो सर्वांना घेऊन जाण्यासाठीच. ते तर येतात परमधाम मधून खाली
भूमिका करायला. मी तर सर्वांना घेऊन जातो आणि सांगतो की तुम्ही कसे पहिल्यांदा नवीन
दुनियेत खाली येता. त्या नव्या दुनियेत बगळा कोणी असत नाही. पिता तर येतात
बगळ्यांच्या मध्ये नंतर तुम्हाला हंस बनवतात. तुम्ही आता हंस बनता, मोती निवडणारे.
सतयुगात तुम्हाला ही रत्ने मिळत नाहीत. इथे तुम्ही ज्ञान रत्न निवडून हंस बनता.
बगळ्याचा हंस कसे बनता हे पिता तुम्हास विराजमान होऊन सांगतात. आता तुम्हाला हंस
बनवतात. देवतांना हंस असुरांना बगळा म्हणतात. आता तुम्ही वाईट सोडून मोती निवडता.
तुम्हालाच पद्मापदम भाग्यशाली म्हणतात. तुमच्या एका पाऊल खुणे मध्ये पद्माची कमाई
होते. शिवबाबाला तर पायच नाहीत ज्याचे पद्म होतील. ते तर तुम्हाला पद्मापदम
भाग्यशाली बनवतात. बाबा म्हणतात मी तुम्हाला विश्वास चा मालक बनवण्यासाठी आलो आहे.
या सर्व गोष्टी व्यवस्थित जाणून घ्यावयाच्या आहेत. मनुष्य एवढे तर समजतात ना की
स्वर्ग होता. परंतु कधी होता परत कसा होणार, हे माहित नाही. तुम्ही मुले आता
उजेडामध्ये ( प्रकाशामध्ये) आला आहात. ते सर्व अंधकारामध्ये आहेत.हे लक्ष्मीनारायण
विश्वाचे मालक कधी कसे बनले हे माहीतच नाही. 5 हजार वर्षांची गोष्ट आहे. बाबा
स्थानापन्न होऊन सांगतात जसे, तुम्ही भूमिका करायला येता तसाच मी पण येतो. तुम्ही
आमंत्रण देऊन बोलावता हे पिता आम्हा पतितांना पावन बनवा येथे येऊन. दुसऱ्या कोणास
असे म्हणणार नाही, आपल्या धर्म स्थापकाला सुद्धा असे म्हणणार नाही कि येऊन सर्वांचा
उद्धार करा. क्राइस्ट अथवा बुद्धाला थोडेच म्हणणार पतित-पावन. जो सद्गती करतो तोच
गुरु. ते तर येतात, त्यांच्यानंतर सर्वांना खाली उतरायचे आहे. येथुन परतायचा मार्ग
दर्शवणारा, सर्वांची सद्गती करणारा अकालमूर्त एकच पिता आहे. वास्तविकपणे सद्गुरु
शब्द योग्य आहे. तुमच्या नंतर शीख लोक बरोबर शब्द उच्चारतात. मोठ्यामोठ्याने
उच्चारतात सद्गुरु अकाल. चांगले मोठ्याने गीत गातात सद्गुरु अकालमूर्त म्हणतात. जर
शरीर नाही तर सद्गती कशी देतात, सद्गुरु कसे बनतात, तो सद्गुरु स्वतः येऊन स्वतःचा
परिचय देतात. मी तुमच्या सारखा जन्म घेत नाही. बाकी तर सर्व शरीरधारी सांगत असतात.
तुम्हाला अशरीरी पिता समजावतात. दिवस रात्रीचा फरक आहे. या समयी मनुष्य जे काही
करतात ते सर्व चुकीचे आहे. कारण रावण मत चालवतात ना. सर्वांमध्ये 5 विकार आहेत. आता
रावण राज्य आहे., या गोष्टी बाबा सविस्तरपणे विराजमान होऊन सांगतात. नाहीतर सर्व
सृष्टीचे चक्र कसे माहित होणार. हे चक्र कसे फिरते माहीत पाहिजे ना. तुम्ही हे पण
म्हणत नाही बाबा समजवा. स्वतःहून बाबा समजावतो. तुमच्या मनात एक पण प्रश्न राहत नाही.
भगवान तर पिता आहे. वडिलांचे काम आहे स्वतःहून सांगायचे स्वतःहून करायचे. मुलांना
पिता स्वतःहून शाळेत घालतो. नोकरीच लावतो आणि सांगतो 60 वर्षानंतर हे सर्व सोडून
परमेश्वराची आराधना करा. वेद शास्त्रांचा अभ्यास, पूजा करायची. तुम्ही अर्धा कल्प
पुजारी बनतात आणि अर्धा कल्प पूज्य बनता. पवित्र कसे बनायचे त्यासाठी सहज समजावले
जाते. परत भक्तिमार्ग सहज सुटून जातो. ते सर्व भक्ती करत आहेत, तुम्ही ज्ञान घेत
आहात. ते अंधकारात आहेत तुम्ही प्रकाशात जाता, अर्थात स्वर्गामध्ये. गीतेमध्ये
लिहिले आहे ‘ माझी आठवण करा ’ हे अक्षर तर प्रसिद्ध आहे. गीता वाचन करणाऱ्यांना समजू
शकेल खूप सरळ लिहिले आहे. संपूर्ण आयुष्य गीता वाचत आले आहेत परंतु समजत काहीच नाही.
आता तोच गीतेचा भगवान विराजमान होऊन शिकवतात तर पतितांपासुन पावन बनतात. आता आपण
परमेश्वराकडून गीता श्रवण करतो आणि नंतर इतरांना ऐकवतो, पवित्र बनतो.
बाबांचे महावाक्य आहे ना- हा तोच सहज राजयोग आहे. मनुष्य किती अंधश्रद्धे मध्ये
बुडले आहेत तुमचे सांगणेच ऐकत नाहीत. ड्रामा अनुसार त्यांचे भाग्य जेव्हा खुलेल
तेव्हाच तुमच्याकडे येतील. तुमच्यासारखे भाग्य इतर धार्मिक लोकांचे पण असत नाही.
बाबांनी समजावले आहे हा देवी देवता धर्म खूप सुख देणारा आहे. तुम्हाला पण समजते बाबा
बरोबर सांगतात. शास्त्रात तर तिथे पण कंस-रावण दाखवले आहेत. तिथल्या सुखाची तर
कोणाला कल्पनाच नाही. जरी देवतांची पूजा करतात परंतु बुद्धीत काही समजत नाही. आता
बाबा सांगतात मुलांनो माझी आठवण करता? असे कधी ऐकलंय कि पिता मुलांना म्हणतो की
तुम्ही मला आठवण करा. लौकिक वडील सुद्धा अशा प्रकारची आठवण करायची मेहनत करवतात का?
हे बेहदचा पिताच सांगतो. तुम्ही विश्वाच्या आदि मध्य अंत ला समजून घेऊन चक्रवर्ती
राजे बनाल. प्रथम तुम्ही स्वगृही परतता. नंतर यायचं आहे भूमिका निभावायला. आता
कोणास माहीत होणार नाही. नवीन आत्मा कोणती आणि जुनी कोणती. नवीन आत्म्याचे नाव जरूर
होते. आता सुद्धा बघा काही काही जणांचे किती नाव होते. मनुष्य खूप येतात, सहजपणे
येतात. तर त्यांचा प्रभाव पडतो. बाबासुद्धा याच्यामध्ये सहज प्रवेश करतात तर त्यांचा
प्रभाव पडतो. ती सुद्धा नवीन आत्मा जेव्हा येते तर जुन्या आत्म्यावर त्यांचा प्रभाव
पडतो. शाखा-उपशाखा निघतात तर त्यांची महिमा होते. कोणाला माहित पडत नाही यांचे इतके
नाव कसे होते? नवीन आत्मा असल्याने त्यांच्यात आकर्षण असते. आता तर पहा खोटे
परमेश्वर बनले आहेत, यामुळेच गायन आहे सत्याची नाव हलते डुलते परंतु बुडत नाही.
प्रतिकूल परिस्थिती येतात भगवान तारणारा आहे ना. मुले पण हलतात, नावेला धक्का जरूर
बसतो. इतर सत्संगात तर खूप जण जातात परंतु तेथे कधी वादळ इ. ची गोष्ट येत नाही. इथे
अबलांवर किती अत्याचार होतात परंतु तरीसुद्धा स्थापना तर होणार आहे. बाबा विराजमान
होऊन समजावतात, हे आत्म्यांनो तुम्ही किती जंगली काटे बनले आहात, दुसऱ्यांना काटे
टोचतात तर तुम्हालाही काटा टोचतो. प्रत्येक गोष्टीचा प्रतिसाद तर मिळत असतो. तिथे
दुःखाचे लक्षण कोणती असत नाही म्हणूनच त्याला स्वर्ग म्हणतात. मनुष्य स्वर्ग आणि
नर्क म्हणतात परंतु समजतात काही नाही. म्हणतात आमका स्वर्गात गेला, असे म्हणणे खरे
तर चूक आहे. निराकारी दुनियेला स्वर्ग म्हणत नाहीत. ते आहे मुक्तिधाम. हे मग
म्हणतात स्वर्गा मध्ये गेला. आता तुम्हाला माहित आहे हे मुक्तिधाम आत्म्याचे
निवासस्थान आहे जशी इथे घरे असतात. भक्तिमार्गात जे धनवान असतात ते खूप भव्य मंदिरे
बांधतात. शिवाचे मंदिर बघा कसे बनवले आहे. लक्ष्मीनारायणाचे पण मंदिर बांधतात तर खरे
दागिने इ. किती असतात. खूप धन असते. आता खोटे झाले आहे. तुम्ही सुद्धा सुरुवातीला
खरे दागिने परिधान करत होतात. आता तर घाबरून खरे लपवून खोटे परिधान करता. तिथे तर
सर्वच खरे असते, असत्य काहीच असत नाही. इथे खरे असुनही लपवून ठेवले जाते.
दिवसेंदिवस सोने महाग होत जाते. तिथे तर स्वर्गच आहे. तुम्हाला सर्व नवीन मिळते.
नवीन दुनियेत सर्व नवीन, अमर्याद धन असते. आता तर पहा प्रत्येक गोष्ट किती महाग झाली
आहे. आता तुम्हा मुलांना मूळवतन पासून सर्व रहस्य समजावले आहे. मूळवतनचे रहस्य बाबा
शिवाय कोण समजवू शकेल. तुम्हाला नंतर शिक्षक बनायचे आहे. व्यवहारांमध्ये भले रहा.
कमलपुष्प समान पवित्र बना. इतरांना सुद्धा स्वतः सारखे बनवाल तर खूप उच्च पद
प्राप्त कराल. इथे राहणाऱ्या पेक्षाही ते लोक उंच पद प्राप्त करू शकतात.
अनुक्रमानुसार तर असणारच आहे, बाहेर राहात असून सुद्धा विजयमाळे मध्ये गुंफले जाऊ
शकता. आठवड्याचा कोर्स करून भले परदेशी जावा नाहीतर आणि आणखी कुठे. सर्व दुनियेला
निरोप मिळणार आहे. पिता आला आहे.त्याचे फक्त सांगणे आहे माझी आठवण करा. तो पिताच
मुक्तिदाता आहे वाट दाखवणारा आहे. तिकडे तुम्ही जाल तेव्हा वर्तमानपत्रात सुद्धा
खूप नाव होईल. दुसऱ्यांना सुद्धा ही खूप सहज गोष्ट वाटेल- आत्मा आणि शरीर भिन्न आहे.
आत्म्यामध्ये मन बुद्धी आहे. शरीर तर जड आहे. भूमिका निभावणारी आत्मा असते. विशेषता
पूर्ण आत्मा आहे तर पित्याची आठवण केली पाहिजे. येथे राहणारे एवढी आठवण करत नाहीत
जेवढी बाहेरचे करतात. जे खुप आठवण करतात आणि बापसमान बनत राहतात, काट्यांपासुन फुले
बनवतात ते उच्चपद प्राप्त करतात. तुम्ही समजता पहिल्यांदा आम्ही सुद्धा काटे होतो.
आता पित्यानी आदेश दिला काम महाशत्रू आहे. यावरती विजय प्राप्त करून तुम्ही जगतजीत
बनता. परंतु लिहून थोडेच समजते. आता बाबांनी समजावलय. अच्छा!
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांना मात-पिता बापदादांची खुप आठवण, प्रेम
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
१) सदा
ज्ञानाचे मोती निवडणारे बनायचे आहे, मोतीच निवडायचे आहेत, विकारांना सोडून द्यायचे
आहे. प्रत्येक पावला मध्ये पद्मापदम भाग्यशाली बनायचे आहे.
२) उंच पद प्राप्त
करण्यासाठी शिक्षक बनून सर्वांची सेवा करायची आहे. कमलपुष्प समान पवित्र बनून
आपल्यासारखे बनवायचे आहे. काट्यांना फुल बनवायचे आहे.
वरदान:-
सहज योगाच्या
साधने द्वारे साधनांवर विजय प्राप्त करणारे प्रयोगी आत्मा भव.
साधनांची उपलब्धता
असताना, साधनांना उपयोगा मध्ये आणताना योगाची स्थिती डगमग नाही झाली पाहिजे. योगी
बनून प्रयोग करणे याला म्हणतात वेगळे राहणे. असताना निमित्तमात्र उपयोग करून
अनासक्ती ने प्रयोग करा. थोडीपण इच्छा असली, तर इच्छा चांगले बनू देत नाही. कष्ट
करण्यातच वेळ निघून जाईल .त्यावेळी तुम्ही साधनेत राहण्याचा प्रयत्न कराल परंतु
साधन स्वतःकडे आकर्षित करतील त्यामुळे प्रयोगी आत्मा बनून सहज योगाच्या साधने द्वारा
साधनांवर म्हणजे प्रकृतीवर विजय प्राप्त करा.
बोधवाक्य:-
माझ्या
माझ्याच्या अनेक संबंधांना समाप्त करणेच फरिश्ता / देवदूत बनणे आहे.