25-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये कधी अलबेले बनू नका, आठवणीनेच आत्मा पावन बनेल, बाबा आले आहेत सर्व आत्म्यांची सेवा करुन, त्यांना शुध्द बनविण्यासाठी....!!!

प्रश्न:-
कोणती स्मृती मनात ठेवली तर खाणे पिणे शुध्द होऊन जाईल?

उत्तर:-
नेहमी स्मृती ठेवाकि, आम्ही बाबाजवळ आले आहोत, सचखंड मध्ये जाण्यासाठी किंवा मनुष्यापासून देवता बनण्यासाठी, तर खाणे-पिणे शुध्द होईल, कारण देवता कधी अशुध्द वस्तू खात नाहीत. आम्ही सत्य बाबाजवळ आलो आहोत, सचखंड पावन दुनियेचा मालक बनण्यासाठी, तर पतित (अशुध्द) बनणार नाही.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना विचारतात कि, मुलांनो, तुम्ही जेव्हा येथे बसले आहात तर कोणाची आठवण करत आहात? आपल्या बेहद पित्याची. ते कोठे आहेत? त्यांना बोलावतात ना कि, हे पतित पावन, आजकाल सन्यासी पण म्हणतात कि, हे पतित पावन सीता-राम म्हणजे पतितांना पावन बनविणारे राम या. हे तर मुलं समजतात कि, पावन दुनिया सतयुगाला, पतित दुनिया कलियुगाला म्हटले जाते. आता तुम्ही कोठे बसले आहात? कलियुगाच्या अंतकाळात, त्यामुळे बोलावतात कि बाबा येऊन आम्हाला पावन बनवा. आम्ही कोण आहोत? आत्मा. आत्म्यालाच पवित्र बनायचे आहे. आत्मा पवित्र बनली तर शरीर पण पवित्र मिळते. आत्मा पतित बनल्याने शरीर पण पतित मिळत आहे. हे शरीर तर मातीचा पुतळा आहे, आत्मा तर अविनाशी आहे. आत्मा या कर्मेद्रियाद्वारे बोलते, आम्ही फार पतित बनलो आहोत, येऊन आम्हाला पावन बनवा. बाबा पावन बनवत आहेत. 5 विकार रुपी रावण पतित बनवित आहेत. बाबांनी आता आठवण दिली आहे कि, आम्ही पावन होतो, मग असे 84 जन्म घेत घेत, आता शेवटच्या जन्मामध्ये आले आहोत. हे जे मनुष्य सृष्टी रुपी झाड आहे, बाबा सांगतात कि, मी याचा बीजरुप आहे, मला बोलावतात कि, हे परमपिता परमात्मा, ओ गॉड फादर, मला मुक्त करा. प्रत्येक जण स्वत:साठी म्हणतात कि, मला सोडवा पण आणि मार्गदर्शक बणून शांतीधाम घरी घेऊन चला. सन्यासी इ. पण म्हणतात कि, कायमची शांती कशी मिळेल? आता शांतीधाम तर घर आहे. जेथून आत्मे अभिनय करण्यासाठी येतात. तेथे फक्त आत्मेच आहेत. शरीर आसत नाही. आत्मेशरीराशिवाय राहतात. अशरीरीचा अर्थ असा नाही कि, कपडे घालण्याशिवाय राहणे. नाही, शरीराशिवाय आत्मे राहतात. बाबा म्हणतात कि, मुलांनो, तुम्ही आत्मे तेथे मुळवतन मध्ये शरीराशिवाय राहता, त्याला निराकारी दुनिया म्हटले जाते.

मुलांना शिडी वर समजावले जाते कि, कसे आम्ही शिडी खाली उतरत आले आहोत. जास्तीत जास्त पुर्ण 84 जन्म लागतात. मग कोणी एक जन्म पण घेतात. आत्मे वरुन येतच राहतात. आता बाबा म्हणतात कि, मी आलो आहे, पावन बनविण्यासाठी. शिवबाबा ब्रह्माबाबाद्वारे तुम्हाला शिकवत आहेत. शिवबाबा आहेत आत्म्यांचे पिता, आणि ब्रह्माला आदि देव म्हणतात. या दादामध्ये बाबा कसे येत आहेत, हे तुम्ही मुलेच जाणत आहात. मला बोलावतात पण कि, हे पतित पावन या. आत्म्यांनी या शरीराद्वारे बोलावले आहे. मुख्य आत्मा आहे ना. हे आहेच दु:खधाम, येथे कलियुगामध्ये पहा, बसल्या बसल्या अचानक मृत्यु होत आहे, तेथे असा कोणता आजारच होत नाही. नावच आहे स्वर्ग. किती चांगले नांव आहे. नांव घेताच मन खुश होऊन जाते. ख्रिश्चन पण म्हणतात कि, क्राइस्टच्या 3 हजार वर्षापुर्वी स्वर्ग होता. येथे भारतवासी यांना तर काहीच माहित नाही, कारण त्यांनी सुख फार पाहिले आहे तर दु:ख पण फार पाहिले आहे. तमोप्रधान बनले आहोत. 84 जन्म पण त्यांचेच होतात. आर्धाकल्पानंतर मग इतर धर्माचे येतात. आता तुम्ही समजता कि, अर्धाकल्प देवी देवता होते, तर इतर कोणता धर्म नव्हता. मग त्रेतामध्ये जेव्हा राम होते, तरइस्लामी, बौध्दी नव्हते. मनुष्य तर फारच घोर आंधारामध्ये आहेत. म्हणतात कि, जगाचे आयुष्य लाखो वर्ष आहे, त्यामुळे मनुष्य समजतात कि, कलियुग अजून लहान मुल आहे. तुम्ही आता समजता कि, कलियुग पुर्ण झाले आहे, सतयुग येईल. त्यामुळे तुम्ही आले आहात, बाबाकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी. तुम्ही सर्व स्वर्गवासी होता. बाबा येतातच स्वर्गाची स्थापना करण्यासाठी. तुम्हीच स्वर्गामध्ये येता, बाकीचे सर्व शांतीधाम घरी जातात. ते आहे गोड घर, आत्मे तेथे निवास करतात. मग येथे येऊन भुमिका वटवितात. शरीराशिवाय तर आत्मा बोलू पण शकत नाही. तेथे शरीर नसल्या कारणाने आत्मे शांती मध्ये राहातत. मग आर्धाकल्प आहे देवी देवता, सुर्यवंशी-चंद्रवंशी, मग द्वापर कलियुगामध्ये होतात मनुष्य. देवतांचे राज्य होते मग आता ते कोठे गेले? कोणाला माहित नाही. हे ज्ञान, आता तुम्हाला बाबांकडून मिळत आहे. दुसऱ्या कोणत्या मनुष्यामध्ये हे ज्ञान आसत नाही. बाबाच येऊन मनुष्यांना हे ज्ञान देत आहेत, ज्यामुळेच मनुष्यापासून देवता बनतात. तुम्ही तेथे आलेच आहात मनुष्यापासून देवता बनण्यासाठी, देवतांचे खाणे पिणे अशुध्द आसत नाही, ते कधी बीडी इ. ओढत नाहीत. येथील पतित मनुष्याचे काही विचारु नका, काय काय खात आहेत. आता बाबा सांगत आहेत, हा भारत अगोदर खरा खंड होता. जरुर खऱ्या बाबांनी स्थापन केला होता. बाबालाच सत्य म्हटले जाते. बाबाच म्हणतात कि, मीच या भारताला सत्यखंड बनवत आहे. तुम्ही खरे देवता कसे बनू शकता, ते पण तुम्हाला शिकवित आहेत. किती मुले येथे येतात, त्यामुळे इमारती इ. बांधाव्या लागतात. अंतापर्यंत बांधाव्या लागतील, अनेक बनतील. घरे खरेदी पण करु शकता. शिवबाबा ब्रह्माबाबाद्वारे कार्य करत आहेत. ब्रह्मा झाले आहेत सावळे, कारण हा फार जन्मातील शेवटचा जन्म आहे ना. हेच मग गोरे बनतील. कृष्णाचे पण चित्र गोरे आणि सावळे आहे ना. संग्रहालयामध्ये मोठ मोठी चांगली चित्रे आहेत, ज्यावर तुम्ही कोणाला चांगल्याप्रकारे समजावू शकता. येथे बाबा संग्रहालय बनवत नाहीत, याला म्हटले जाते शांतीचा स्तंभ. तुम्ही जाणता कि, आम्ही शांतीधाम आपले घरी जात आहोत. आम्ही तेथील रहिवासी आहोत, मग येथे येऊन शरीर घेऊन अभिनय करत आहोत. मुलांना अगोदर हा निश्चय झाला पाहिजे कि, येथे कोणी साधू संत शिकवत नाहीत. हे (दादा) तर सिंधचे राहणारे होते, परंतू त्यांच्यात जे प्रवेश करुन बोलतात ते आहेत ज्ञानाचे सागर. त्यांना कोणी ओळखत नाहीत, म्हणतात पण गॉड फादर. असे ही म्हणतात त्यांचे नाव रुप काहीच नाही. ते निराकार आहेत, त्यांना कोणता आकार नाही. मग म्हणतात ते सर्वव्यापी आहेत. अरे, परमात्म कोठे आहे? म्हणतात सर्वव्यापी आहे, सर्वांचे मध्ये आहे. अरे, प्रत्येकामध्ये आत्मा बसली आहे, सर्व भाऊ-भाऊ आहेत ना, मग घटा घटामध्ये परमात्मा कोठून आला? असे म्हणत नाहीत कि, परमात्मा पण आहे, आणि आत्मा पण आहे. परमात्मा बाबाला बोलवत आहेत, बाबा येऊन आम्हा पतितांना पावन बनवा. मला तुम्ही बोलावता हा धंदा, ही सेवा करण्यासाठी. आम्हा सर्वांना येऊन शुध्द बनवा, पतित दुनियेमध्ये मला निमंत्रण देता, आणि म्हणता कि, बाबा आम्ही पतित आहोत. बाबा तर पावन दुनिया पाहतच नाहीत. पतित दुनियेमध्ये तुमची सेवा करण्यासाठी आले आहेत. आता हे रावण राज्य विनाश होणार आहे. बाकीजे राजयोग शिकत आहात, ते जावून राजांचा राजा बनतील. तुम्हाला अनेक वेळा शिकविले आहे, नंतर 5 हजार वर्षानंतर तुम्हालाच शिकवितो. सतयुग त्रेताची राजधानी आता स्थापन होत आहे. अगोदर आहे ब्राह्मण कुळ. प्रजापिता ब्रह्मा गायले जाते ना, ज्यांना एडम आदि देव म्हटले जाते. हे कोणाला माहित नाही. पुष्कळ असे आहेत येथे येऊन ऐकतात, मग मायेच्या वश होऊन जातात. पुण्य आत्मा बनता बनता पाप आत्मा बनतात. माया फार जबरदस्त आहे. सर्वांना पाप आत्मा बनविते. येथे कोणी पण पवित्र आत्मा, पुण्य आत्मा नाही. पवित्र आत्मे देवी देवताच होते, जेव्हा सर्व पतित बनतात. तेव्हा बाबाला बोलावतात. आता हे आहे रावण राज्य, पतित दुनिया, याला म्हटले जाते काट्याचे जंगल. सतयुगाला म्हटले जाते, फुलांची बाग. मुगल गार्डनमध्ये किती उत्तम प्रतीची चांगली चांगली फुले आहेत. धोतऱ्याची पण फुले मिळतात, त्यांचा अर्थ कोणी पण समजत नाही, शिवाच्या पिंडीवर धोतऱ्याचे फुल का वाहतात? हे पण बाबा बसून समजावत आहेत. मी जेव्हा शिकवितो, तर त्यामध्ये कोणी फर्स्टक्लास मोतीचे, कोण रतन ज्योत, कोणी मग धोतऱ्याचे फुल पण आहोत. नंबरवार तर आहेत ना. तर याला म्हटले जाते, दु:खधाम, मृत्यूलोक. सतयुग आहे अमरलोक. या गोष्टी कोणत्या शास्त्रामध्ये नाहीत. ग्रंथ तर या दादांनी वाचली आहेत, बाबा तर ग्रंथ शिकवित नाहीत. बाबा तर स्वत:च सद्गती दाता आहेत. फक्त गीतेचा संदर्भ देतात. सर्वशास्त्र मई शिरोमणी गीता भगवानाने सांगितली आहे, परंतू भगवान कोणाला म्हटले जाते ते भारतवासियांना माहित नाही. बाबा म्हणतता कि, मी निष्काम सेवा करत आहे, तुम्हाला विश्वाचा मालक बनवत आहे, मी बनत नाही. स्वर्गामध्ये मला तुम्ही आठवण करत नाही. दु:खामध्ये सर्व आठवण करतात, सुखामध्ये कोणी करत नाही. याला दु:ख आणि सुखाचा खेळ म्हटले जाते. स्वर्गामध्ये दुसरा कोणता धर्म नसतो. ते सर्व येतातच नंतर. तुम्ही जाणता कि, आता या जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे, नैसर्गिक संकटे, वादळ येतील, सर्व नष्ट होऊन जाईल.

तर बाबा आता येऊन बेसमजदारला समजदार बनवत आहेत. बाबांनी किती धन माल दिला होता, सर्व कोठे गेले? आता किती दिवाळखोर बनले आहात. भारत जो सोन्याची चिमणी होता, तो आता काय बनला आहे? आता परत पतित पावन बाबा आले आहेत, राजयोग शिकवित आहेत. तो आहे हठयोग, हा आहे राजयोग. हा राजयोग दोघांसाठी आहे, तो हठयोग फक्त पुरुषच शिकत आहेत. आता बाबा म्हणतात कि, पुरुषार्थ करा, विश्वाचा मालक बणून दाखवा. आता या जुन्या दुनियेचा विनाश तर होणारच आहे, तर बाकी थोडा वेळ आहे, हे युध्द शेवटचे युध्द आहे. हे युध्द सुरु झाले तर थांबणार नाही. हे युध्द सुरुच तेव्हा होते, जेव्हा तुम्ही कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल, आणि स्वर्गात जाण्याचे लायक बनाल. बाबा तरी पण म्हणतात कि, आठवणीच्या यात्रेमध्ये अलबेले बनू नका, यामध्येच माया विघ्न आणते. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. बाबांकडून चांगले शिकून फर्स्टक्लास फुल बनायचे आहे, काट्याचा या जंगलाला फुलांची बाग बनविण्यासाठी बाबाला पुर्ण मदत करावयाची आहे.

2. कर्मातीत अवस्थेला प्राप्त करणे वा स्वर्गामध्ये उंच पदाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये तत्पर राहावयाचे आहे, अलबेले बनायचे नाही.

वरदान:-
एका ठिकाणी राहून अनेक आत्म्यांची सेवा करणारे प्रकाश आणि शक्ती संपन्न भव :-

जसे लाईट हाऊस एका ठिकाणावर स्थित होऊन, दूर दूरची सेवा करत आहेत, तसे तुम्ही पण एका ठिकाणी राहून, अनेकांची सेवा अर्थ निमित्त बनू शकता, यामध्ये फक्त लाइट माइटने संपन्न बनण्याची आवश्यकता आहे. मन बुध्दी नेहमी व्यर्थ विचार करण्यापासून मुक्त असावी, मनमनाभवच्या मंत्राचे सहज स्वरुप बनून, मन्सा शुभ भावना, श्रेष्ठ कामना. श्रेष्ठ वृत्ती आणि श्रेष्ठ वायुमंडळाने संपन्न व्हा तर, ही सेवा सहज करु शकता. हीच मन्सा सेवा आहे.

बोधवाक्य:-
आता तुम्ही ब्राह्मण आत्मे शक्ती रुप बना, आणि दुसऱ्या आत्म्यांना वक्ते बनवा.