13-10-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   21.02.1985   ओम शान्ति   मधुबन


“ शितलते ची शक्ती ”
 


आज ज्ञानसूर्य ज्ञान चंद्रमा आपल्या भाग्यशाली आणि प्रेमळ ताऱ्यांना पाहत आहेत. हे आत्मिक तारामंडळ साऱ्या कल्प मध्ये कोणी पाहू शकत नाही. तुम्ही आत्मिक तारे आणि ज्ञानसूर्य, ज्ञान चंद्रमा या अनासत्क्त आणि प्रेमळ तारामंडळ ला पाहत आहात. आत्मिक तारामंडळ, वैज्ञानिक पण पाहू शकत नाहीत, शांत स्वरुप आत्मेच या तारामंडळ ला पाहू शकतात, जाणू शकतात. तर आज तारामंडळ ची सहल करत वेगवेगळ्या ताऱ्यांना पाहून, बापदादा आनंदीत होत आहेत. एकेक तारा ज्ञानसूर्य द्वारा शक्ती आणि प्रकाश घेऊन बाबांसारखे सत्यतेच्या शक्तीमध्ये संपन्न, सत्य स्वरूप बनले आहेत आणि ज्ञान चंद्रमा द्वारा शितलते ची शक्ती धारण करून चंद्रमा समान शितल स्वरूप बनले आहेत. या दोन शक्ती सत्यता आणि शीतलता सदा सहज सफलता प्राप्त करवतात. एकीकडे सत्यतेच्या शक्तीचा श्रेष्ठ नशा आणि दुसरीकडे जितका श्रेष्ठ नशा तितकाच शीतलतेच्या, आधारे, कोणत्याही उलट्या नशेच्या किंवा क्रोधित आत्म्याला पण शितल बनवणारे आहात. कोणत्याही अहंकाराच्या नशेमध्ये मी मी करणारा असेल परंतु शीतलतेच्या शक्तीच्या द्वारे मी मी ऐवजी बाबा बाबा म्हणायला लागतील. सत्यताला पण शीतलताच्या शक्तीद्वारे सिद्ध करण्याच्या शक्तीद्वारे सिद्धी प्राप्त होते. नाही तर शीतलते ऐवजी शक्तीची सत्यताला सिद्ध करण्याच्या लक्षा द्वारे सिध्द करतात, परंतु अज्ञानी सिद्धला जिद्द समजून घेतात, म्हणून सत्यता आणि शीतलता दोन्ही शक्ती सोबत पाहिजेत. कारण आजच्या विश्वामध्ये प्रत्येक मानव कोणत्या ना कोणत्या अग्नीमध्ये जळत आहे. अशा अग्नीमध्ये जळणाऱ्या आत्म्यांना प्रथम शितलतेच्या शक्तीद्वारे अग्नीला शितल करा, तेव्हाच शितलतेच्या आधाराद्वारे सत्यतेला जाणू शकाल. शीतलतेची शक्ती म्हणजेच आत्मिक स्नेहाची शक्ती. चंद्रमा स्नेहाच्या शितलतेद्वारे कोणत्या पण बिघडलेल्या मुलांना परिवर्तन करते. तर स्नेह अर्थात शीतलतेचा शक्तीद्वारे कोणत्या पण अग्नीमध्ये जळणाऱ्या आत्म्याला पण शितल बनवून सत्यताला धारण करण्याच्या योग्य बनवते. प्रथम चंद्राच्या शीतलशतेद्वारे योग्य बनतात, परत ज्ञान सूर्याच्या सत्यताच्या शक्तीद्वारे योगी बनतात तर ज्ञान चंद्रमाच्या शीतलतेची शक्ती बाबांच्या पुढे जाण्यासाठी योग्य बनवते, योग्य नाहीत तर योगी पण बनू शकत नाहीत. तर सत्यतेला ओळखण्याच्या अगोदर शीतलता पाहिजे. सत्यतेला धारण करण्याची शक्ती पाहिजे. तर शितलतेची शक्ती धारण करणारे आत्मा, स्वतः पण विचारांच्या गतीमध्ये, बोलमध्ये, संपर्कमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये शितल असेल. विचारांची गती तिर्व झाल्यामुळे व्यर्थ पण खूप होते आणि नियंत्रण करण्यामध्ये पण वेळ जातो. जेव्हा पाहिजे तेव्हा नियंत्रण किंवा परिवर्तन कले नाही तर या मधे वेळ आणि शक्ती पण जास्त लावावी लागते. ठीक गतीने चालणारे अर्थात शीतलते च्या शक्तीस्वरूप राहणारे व्यर्थपासून मुक्त होतात, अपघातापासून सुरक्षित राहतात. हे का, कसे, असे नाही, तसे पाहिजे, या व्यर्थ गति पासून मुक्त होतात. जसे झाडाची सावली कोणत्या पण वाटसरुला आराम देते, सहयोगी आहे ना. असेच शितलतेची शक्ती असणारे आत्मे पण, दुसऱ्या आत्म्यांना पण, आपल्या शितलतेच्या सावलीद्वारे सहयोगाचा आराम देतील. प्रत्येकाला आकर्षण होइल की या आत्म्याच्या जवळ गेल्यानंतर दोन क्षणासाठी पण शीतलते च्या छाया मध्ये, शितलतेचे सुख आनंद घ्यावा.जसे चहूबाजूला खूप ऊन असेल तर सावलीचे स्थान शोधतात, असेच त्यांची दृष्टी किंवा आकर्षण अशा आत्म्याकडे स्वतः जाईल .आता विश्वा मध्ये आणखीन च विकाराची अग्नी जास्त होईल. जसे आग लागल्या नंतर मनुष्य खुप ओरडतात, शितलता शोधतात. असेच हे मनुष्य शीतलतेचा आधार शोधतिल, तुम्हा शितल आत्म्याकडे आकर्षित होऊन येतील, जरासा आपण शीतलतेचा अनुभव त्यांना करवा. एकीकडे विनाशाची अग्नी, दुसरीकडे विकाराची अग्नी, तिसरीकडे देह आणि देहाचे सबंध, पदार्थांच्या आकर्षणाची अग्नी, चौथी कडे पश्चातापाची अग्नी, चहूबाजूला अग्नीच अग्नी दिसून येईल, खुप ओरडतील. तर अशा वेळेस,तुम्हा शीतलते च्या शक्तिसंपन्न आत्म्याकडे धावत धावत येतील, सेकंदासाठी सुद्धा शितल करा असे म्हणतील.अशा वेळेत शितलताची शक्ती ,स्वतःमध्ये पण खूप जमा पाहिजे, ज्यामुळे चहुबाजूच्या अग्नीचा परिणाम स्वतःवर व्हायला नको. चहू बाजूची अग्नी मिटणारे शितलतेचे वरदान देणारे, शीतला स्वरूप बना. जरा पण चहुबाजूच्या अग्नीचा किंवा विकाराचा वंश राहिला असेल तर बाजूची अंश मात्र पण राहिलेली अग्नी आणखीच प्रज्वलित होईल. जसे अग्नी अग्नीला प्रज्वलित करते, तसेच याची पण तुम्ही चेकिंग करा. विनाशाच्या ज्वाळाच्या अग्नीपासून सुरक्षित राहण्याचे साधन म्हणजे निर्भयता ची शक्ती. निर्भयता विनाशाच्या प्रभावापासून डगमग होऊ देणार नाही, हलचलमध्ये घेऊन येणार नाही .निर्भयता च्या आधाराद्वारे विनाशामध्ये पण ज्वाळा मधील भयभीत आत्म्यांना शितलताची शक्ती देऊ शकाल. आत्मा भयाच्या अग्नीपासून सुरक्षित राहिल्या मुळे खुशी मध्ये नाचतील. विनाश पाहून पण स्थापना चे दृश्य पाहतील. त्यांच्या एका डोळ्यांमध्ये मुक्ती, स्वीट होम, गोड घर, दुसऱ्या डोळ्यांमध्ये जीवनमुक्ती अर्थात स्वर्ग सामावलेला असेल. त्यांना आपले घर आपले राज्यच दिसून येईल. दुसरे लोक ओरडतील, हाय मी मेलो, हे पण गेले आणि तुम्ही म्हणाल आपल्या घरामध्ये, आपल्या राज्यांमध्ये गेले. हे पण काही नवीन नाही, खुशी होईल. आपले घर,आपले राज्य या खुशीमध्ये नाचत-गात सोबत याल. ते ओरडतील आणि तुम्ही सोबत याल. ऐकण्यामध्येच सर्वांना खुशी होत आहे तर, त्यावेळेत किती खुशी मध्ये असाल. तर चारही प्रकारच्या अग्नीद्वारे तुम्ही शितल झाले ना? ऐकले ना, विनाश अग्नीपासून वाचण्याचे साधन आहे निर्भयता. असेच विकाराच्या अग्नीच्या अंशापासून वाचण्याचे साधन आहे. आपल्या आदी अनादी वंशाची आठवण करा.आदी वंश देव आत्मा आहे. देव आत्मा सोळा कलासंपन्न, संपूर्ण निर्विकारी आहे. तर आदी अनादी वंशा ची आठवण करा, तर विकाराचा अंश पण समाप्त होईल. असेच तिसरे म्हणजे देह देहाचे संबंध आणि पदार्थाच्या आकर्षणाची अग्नी, या अग्नीपासून सुरक्षित राहण्याचे साधन म्हणजे एक बाबांनाच आपला संसार बनवा. बाबच संसार आहे तर, बाकी सर्व असार होऊन जाईल, परंतु काय करतात ते पण दुसऱ्या दिवशी ऐकवेल. बाबाच संसार आहे ही आठवण आहे, तर न देह, न संबध, न पदार्थ स्मृतीमध्ये राहतील,सर्व नष्ट होईल. चौथी गोष्ट पश्चाताप अग्नी, यापासून सुरक्षित राहण्याचे सहज साधन म्हणजे सर्व प्राप्ती स्वरूप बनणे. अप्राप्ती पश्चाताप करवते. प्राप्ती पश्चाताप नष्ट करते. आता प्रत्येक प्राप्तिला समोर ठेवून चेक करा कोणत्या पण प्राप्तीचा अनुभव करण्यामध्ये आपण कमी तर नाही पडत? प्राप्तीची यादीत तर आहेना. अप्राप्ती नष्ट म्हणजे पश्चाताप पण नष्ट. आता या गोष्टींना तपासून पहा, तेव्हाच शीतल स्वरूप बनवून जाल. दुसऱ्यांच्या अग्नीला विझवणारे शितल योगी किंवा शितलादेवी बनून जाल. तर समजले शितलतेची शक्ती काय आहे, सत्यतेची शक्ती पण ऐकवले ना, पुढे चालून पण ऐकत राहाल. तर ऐकले तारामंडळ मध्ये काय पाहिले, विस्तार परत ऐकवू. अच्छा. अशा सदा चंद्रमा समान शितल शक्तीस्वरूप मुलांना सत्यताच्या शक्तीद्वारे सतयुग आणणाऱ्या मुलांना, सदा शितलतेच्या सावलीद्वारे सर्वांच्या मनाला आराम देणाऱ्या मुलांना, नेहमी चहुबाजूच्या अग्नीपासून सुरक्षित राहणाऱ्या शीतल योगी शितलादेवी मुलांना ज्ञानसूर्य ज्ञान चंद्रमाची प्रेम पूर्ण आठवण आणि नमस्ते.

परदेशी शिक्षक भाऊ वहिनी सोबत अव्यक्त बापदादा चा वार्तालाप :- हा कोणता ग्रुप आहे, श्रेष्ठ सेवाधारी यांचा ग्रुप आहे. आज बापदादा आपल्या मित्रांना भेटण्यास आले आहेत. मित्राचे नाते फारच आनंदाचे असते. जसे बाबा सदा मुलांच्या स्नेहामध्ये सामावलेले आहेत, तसेच मूलं पण बाबांच्या स्नेहामध्ये सामावले आहेत. तर हा प्रेमळ ग्रुप आहे. खाता-पिता चालता कुठे सामावून जाता? प्रेमामध्येच राहता ना. या प्रेमळ स्थितीमध्ये राहण्याची स्थिती प्रत्येक गोष्टींमध्ये सहजच समान बनवते, कारण बाबांच्या प्रेमामध्ये सामावलेल्या आत्म्यांच्या संगचा रंग लागतो ना. कष्टापासून सुटण्याचे सहज साधन बाबांच्या प्रेमामध्ये तल्लीन राहणे. ही प्रेमळ अवस्था खूपच भाग्यशाली आहे, यामध्ये माया येऊ शकत नाही तेव्हाच बाप समान विश्व कल्याणकारी बनू शकाल. जो बाबांचा विचार आहे तोच मुलांचा, जे बाबांचे बोल आहेत तेच मुलांचे. तर प्रत्येक कर्म तुमचे काय बनवून जातील? आरसा. तर प्रत्येक असे आरशासारखे पाहिजेत, ज्यामध्ये बाबा दिसून येतील. असा ग्रुप आहे ना? जसे अनेक प्रकारचे आरशे असतात, ज्यामध्ये मोठा मनुष्य छोटा दिसतो, छोटा मनुष्य मोठा दिसतो. तर तुमचे प्रत्येक कर्म आरशासारखे स्वच्छ दिसून येईल, डबल दिसून येईल. तुमच्यामध्ये बाबा दिसून येतील. तुम्ही बाबांच्या सोबत दिसून याल. जसे ब्रह्मा बाबा मध्ये डबल दिसून येत होते, असे तुमच्या प्रत्येकामध्ये पण नेहमीच बाबा दिसून येतील, म्हणजेच डबल झाले ना, असे आरसे आहात का? सेवाधारी विशेष कोणत्या सेवेच्या निमित्त आहात, बाबांना प्रत्यक्ष करण्याची विशेष सेवा आहे. हे तर आपल्या प्रत्येक कर्म बोल संकल्पद्वारे बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे. तर आपल्या प्रत्येक कर्माद्वारे, बोल, संकल्पद्वारा बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे. या कार्यामध्ये नेहमी मग्न राहता ना. कधी कोणती पण आत्मा जर आत्म्याला पाहते, हे फार चांगले बोलतात, हे फार चांगली सेवा करतात, हे फार चांगली दृष्टी देतात, तर हे पण बाबांना, नाही पाहिले आत्म्याला पाहिले, हे पण चुकीचे होते. तुम्हाला पाहून सर्वांच्या मुखाद्वारे निघावे बाबा, तेव्हा म्हणाल शक्तिशाली आरसा. एकटी आत्मा न दिसता त्यामध्ये बाबा दिसून यायला पाहिजेत, यालाच यथार्थ सेवाधारी म्हणले जाते, समजले. जितके तुमच्या प्रत्येक विचारांमध्ये बोलामध्ये बाबा, बाबा असेल तेवढेच दुसऱ्यांना पण तुमच्या द्वारे बाबा दिसून येतील. जसे आज कालच्या विज्ञानाच्या साधनाद्वारे अगोदर जी गोष्ट दाखवतात, ती गायब होते आणि दुसरीच गोष्ट दिसून येते. असे तुमच्या शांतीच्या शक्तीद्वारे तुम्हाला पाहून पण तुम्ही दिसणार नाहीत, आणि बाबा दिसून येतील, अशी शक्तिशाली सेवा पाहिजे. बाबाशी संबंध जोडल्यामुळे आत्मे नेहमी शक्तिशाली बनतात,जर आत्म्याशी संबंध जोडतात तर सदा शक्तिशाली बनू शकत नाहीत, समजले. सेवाधारी यांची विशेष सेवा काय आहे, आपल्याद्वारे बाबांना प्रत्यक्ष करणे किंवा तुम्हाला पाहिल्यानंतर त्यांच्या मुखाद्वारे बाबा बाबा चे गीत सुरू व्हावे. अशी सेवा करता ना, अच्छा.

सर्वजण अमृतवेळेला दिल खुश मिठाई खाता ना? सेवाधारी आत्मे रोज दिलखुश मिठाई खातील आणि दुसर्यांना पण खाऊ घालतील. परत तुमच्या जवळ दिल शिकस्त करण्याच्या गोष्टी येणार नाहीत. जिज्ञासू अशा गोष्टी घेऊन येणार नाहीत. नाहीतर यामध्ये पण वेळ द्यावा लागतो ना. परत वेळ पण वाचेल आणि या वेळेमध्ये अनेकांना तुम्ही दिलखुश मिठाई खाऊ घालू शकाल. अच्छा. तुम्ही सर्व, नेहमी दिल खुश राहता ना, कधी कोणते सेवाधारी रडत तर नाहीत ना? काही मनामध्ये रडतात, फक्त डोळ्याद्वारे नाही. रडणारे तर नाहीत ना.अच्छा तक्रार करणारेआहात का? असे माझ्या बाबतीतच का होते, माझीच अशी भूमिका का आहे? माझेच असे संस्कार का आहेत? मलाच असे जिज्ञासु का मिळतात किंवा मलाच असा देश का मिळाला,असे तक्रार करणारे तर नाहीत ना. तक्रार म्हणजेच भक्तीचा जिज्ञासू, कसे पण असतील परंतु परिवर्तन करणे हे सेवाधारीचे विशेष कर्तव्य आहे. देश असेल किंवा जिज्ञासू असेल, आपले संस्कार असतील किंवा दुसऱ्याचे असतील, तर तक्रार करण्याच्या ऐवजी परिवर्तन करण्याच्या कार्यामध्ये लागून जावा. सेवाधारी कधीच दुसऱ्याची कमजोरी पाहत नाहीत, जर दुसऱ्याची कमजोरी पाहिली तर स्वतः पण कमजोर होऊन जाल. म्हणून प्रत्येक आत्म्यांची विशेषता पहा विशेषता धारण करा, विशेषते चे वर्णन करा, हेच सेवाधारी चे विशेष उडती कलाचे साधन आहे, समजले. आणखी सेवाधारी काय काय करतात, सेवेचे नियोजन तर खूप चांगले बनवतात, उमंग उत्साह पण आहे, बाबांशी स्नेह पण चांगला आहे, आणखी पुढे चालून काय करायचे आहे. आत्ता विश्वामध्ये विशेष दोन सत्ता आहेत, एक राज्य सत्ता दुसरी धर्मसत्ता. धर्म नेता आणि राज्य नेता आणि व्यवसायवाले पण वेगवेगळे आहेत, परंतु सत्ता या दोघांकडे आहे. तर आत्ता या दोन सत्तेला स्पष्ट होईल की धर्मसत्ता पण आत्ता सत्ताहीन झाली आहे. आणि राज्यसत्ताचे पण अनुभव करतील, आमची राज्यसत्ता आहे, परंतु खरी सत्ता नाही. त्यांना कशा प्रकारे अनुभव करवाता येईल, त्याचे साधन काय आहे. तर जे पण राजनेता किंवा धर्मनेता आहेत, त्यांना पवित्रता आणि एकता याचा अनुभव करा. या दोन्ही कमी-कमजोरी मुळेच दोन्ही सत्ता कमजोर आहेत, तर पवित्रता काय आहे, एकता काय आहे, या गोष्टीवर त्यांना स्पष्ट समजून सांगितल्यानंतर ते सतः समजतील आम्ही कमजोर आहोत आणि हे शक्तिशाली आहेत. यासाठी तुम्ही विशेष मनन करा. धर्मसत्तेला धर्मसत्ताहिन बनवण्यासाठी पवित्रतेला सिद्ध करा.राज्यसत्तेच्या पुढे एकतेला सिद्ध करा. या विषयावर मनन करा, त्याचे नियोजन करा आणि त्यांच्याजवळ पोहचा. त्यांना हे ज्ञान द्या, या दोन्ही शक्तीला सिद्ध केले तर ईश्वरी सत्तेचा झेंडा फडकेल. आता या दोन्ही कडे विशेष लक्ष पाहिजे. ते मनामध्ये समजतात परंतु बाहेरून अभिमान आहे. जसे जसे पवित्रता आणि एकताच्या शक्तीद्वारे सबंध संपर्कामध्ये येत राहाल तसे स्वतःच तुमचे वर्णन करतील, समजले. जेव्हा दोन्ही सत्तेला कमजोर सिद्ध करा तेव्हाच प्रत्यक्षता होईल. अच्छा. बाकी तर सेवाधारी ग्रुप आहेतच सदा संतुष्ट. आपल्याशी सोबत्याशी , सेवाद्वारे सर्व प्रकारात संतुष्ट योगी आहात. हे संतुष्ठेचे प्रमाणपत्र घेतले आहे ना? बापदादा, निमित्त दादादीदी सर्व तुम्हाला प्रमाणपत्र देतील की, हे संतुष्ट योगी आहेत. चालता-फिरता पण प्रमाणपत्र मिळेल. अच्छा. कधी मुड तर जात नाही ना. कधी सेवाद्वारे थकून मुड तर जात नाही ना. काय करायचे आहे, इतके कशाला करायचे? असे तर नाही. आत्ता या सर्व गोष्टी स्वतःमध्ये चेक करा. जर कोणती गोष्ट असेल तर परिवर्तन करा, कारण सेवाधारी म्हणजे नेहमीच रंगमंचावर कर्म करणारे. रंगमंचावर नेहमी श्रेष्ठ आणि युक्तीयुक्त प्रत्येक पाऊल टाकावे लागते. असे कधीच समजू नका मी आमच्या देशामध्ये, आमच्या सेंटर वरती बसलो आहे, परंतु विश्वाच्या रंगमंचावर तुम्ही आहात. या स्मृतीमध्ये राहिल्यामुळे प्रत्येक कर्म स्वतः श्रेष्ठ होईल, तुमचे अनुकरण करणारे पण खुप आहेत, म्हणून सदा तुम्ही बाबांचे अनुकरण करा, तर तुम्हाला पण अनुकरण करतील आणि तुम्हाला अनुकरण करणारे पण खुप आहेत, म्हणुन तुम्ही बाबांना अनुकरण करा तर तुमचे अनुकरण करणारे पण बाबांचे अनुकरण करतील. तर अप्रत्यक्ष पणे बाबांचे अनुकरण होईल, कारण तुमचे प्रत्येक कर्म बाबांसारखे आहे म्हणून ही स्मृति नेहमी ठेवा, अच्छा. प्रेमामुळे कष्टापासून दूर आहात. अच्छा. ओमशांती

वरदान:-
एक बाबांनाच सोबती बनवा व त्यांच्यासोबत राहाणारे संपुर्ण पवित्र आत्मा भव

संपूर्ण पवित्र आत्मा तेच आहेत ज्यांच्या संकल्प मध्ये आणि स्वप्नामध्ये ब्रह्माचा-यांची धारणा असेल. जे प्रत्येक पावला मध्ये ब्रह्मा बाबांचे अनुकरण करणारे आहेत. पवित्रचा अर्थ असा आहे की नेहमी बाबांना सोबत बनवणे आणि बाबांच्या आठवणीमध्ये राहणे. संघटनेची सोबत परिवाराच्या स्नेहाची मर्यादा वेगळी गोष्ट आहे, परंतु बाबांच्या मुळेच हे संघटन आणि स्नेहाची सोबत आहे. बाबाच नसतील तर परिवार पण कुठून येईल. बाबा बिज आहेत, त्यांना कधी विसरू नका.

सुविचार:-
कोणाच्या प्रभावामध्ये प्रभावित होणारे नाहीत परंतू ज्ञानाचा प्रभाव घालणारे बना....!