28-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, बाबांच्या श्रीमतावर चालून स्वतःचा शृंगार करा. चिंतन करून आपला शृंगार
बिघडू देऊ नका. वेळ वाया घालवू नका."
प्रश्न:-
तुम्ही मुले
बाबांच्या पेक्षा सुद्धा मोठे जादूगार आहात कसे?
उत्तर:-
इथे बसल्या
बसल्या तुम्ही लक्ष्मी नारायणा सारखा स्वतःचा शृंगार करीत आहात.येथे बसून तुम्ही
स्वतःला परिवर्तन करीत आहात. ही सुद्धा जादुगरी आहे. ईश्वराची आठवण केल्यामुळे तुमचा
शृंगार होतो. हात पाय सुद्धा चालवण्याची आवश्यकता नाही. फक्त विचार करा- योगामुळे
तुम्ही साफ स्वच्छ आणि सुंदर बनतात. तुमची आत्मा आणि शरीर सोन्याप्रमाणे बनते ही
सुद्धा कमाल आहे ना.
ओम शांती।
आत्मिक जादूगर बसून आत्मिक मुलांना म्हणजे जी मुले बाबांपेक्षाही मोठी जादूगार आहेत,
त्यांना समजवतात. तुम्ही येथे काय करीत आहात? येथे बसून कोणतीही हलचल नको. आपल्या
पत्नीं ना युक्ती सांगत आहेत. पती विचारतात इथे बसून तुम्ही काय करता? लक्ष्मी
नारायणा प्रमाणे तुम्ही स्वतःचा शृंगार करीत आहात. कुणाला कळाले का? तुम्ही सर्वजण
इथे बसला आहात, परंतु नंबरवार पुरुषार्थानुसार आहात ना. बाबा म्हणतात- असा शृंगार
करा. तुमचे ध्येय हे भविष्यातील अमरपुरी साठी आहे. येथे बसून तुम्ही काय करत आहात?
स्वर्गातील शृंगार. यासाठी पुरुषार्थ करीत आहात. याला काय म्हणायचे? येथे बसून
तुम्ही स्वतःला परिवर्तन करीत आहात. उठता-बसता, चालता-फिरता, बाबांनी मनमनाभवची चावी
दिली आहे. आता याशिवाय कोणत्याही फालतू गोष्टी ऐकून व सांगून आपला वेळ वाया घालवू
नका. तुम्ही स्वतःच्या शृंगार मध्ये व्यस्त रहा. दुसरे करतात की नाही हे तुम्हाला
काय करायचे आहे? तुम्हीच स्वतःचा पुरुषार्थ करीत रहा. समजून घेतले पाहिजे. नवीन कोणी
ऐकले तर त्याला आश्चर्य वाटेल. तुमच्यामध्ये कोणी स्वतःचा शृंगार करीत आहे तर कुणी
आणखीनच बिघडवत आहेत. परचिंतन करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवितात. बाबा मुलांना
समजवतात की तुम्ही फक्त स्वतःला पहा, आम्ही काय करीत आहोत? खूप छोटीशी युक्ती
सांगतात, एकच शब्द मनमनाभव. तुम्ही येथे बसला आहात, परंतु तुमच्या बुद्धीत सगळ्या
सृष्टीचे चक्र फिरत आहे. आता पुन्हा आम्ही सर्व दुनियेचा शृंगार करीत आहोत. तुम्ही
किती पद्मापदम भाग्यशाली आहात. येथे बसल्यावर तुम्ही किती महान कार्य करीत आहात. इथे
काही हात पाय चालविण्याची गरज नाही. फक्त विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणता की आम्ही
इथे बसून विश्वाचा शृंगार करीत आहोत. मनमनाभव हा मंत्र किती श्रेष्ठ आहे. या
योगानेच तुमची पापे भस्म होती आणि तुम्ही स्वच्छ बुद्धी बनून किती सुंदर बनाल. आत्मा
पतित असल्यामुळे शरीराची हालत सुद्धा बघा किती खराब झाली आहे. आता तुमची आत्म व
शरीर दोन्ही सोन्याप्रमाणे बनत आहे. ही कमाल आहे ना! तर असा स्वतःचा शृंगार करा.
दैवी गुण सुद्धा धारण करा. बाबा सर्वांना एकच रस्ता सांगतात. शिवबाबा आणि सतयुगाची
बादशाही. फक्त ईश्वराची आठवण करा तर तुमचा सर्व श्रुंगार बदलून जाईल.
तुम्ही बाबां पेक्षा मोठे जादूगर आहात. तुम्हाला युक्ती सांगतात की असे केल्यामुळे
तुमचा शृंगार होईल. स्वतःचा शृंगार न केल्यामुळे तुम्ही फुकट स्वतःचे नुकसान करून
घेतात. एवढे तरी समजते की आम्ही भक्तिमार्गात काय काय करीत होतो. सारा शृंगार
बिघडवून आता काय बनलो आहोत. आता एकाच अक्षरामुळे. बाबांच्या आठवणीने तुमचा शृंगार
होत आहे. मुलांना किती चांगल्या प्रकारे समजावून बाबा ताजेतवाने करतात. येथे बसून
तुम्ही काय करता? आठवणीच्या यात्रेमध्ये बसतात जर कुणाचे व्यर्थ विचार चालत असतील
तर शृंगार थोडाच होणार आहे! तुमचा शृंगार झाला तर दुसऱ्यांनाही रस्ता दाखवा असा
शृंगार करवण्यासाठी. शिवबाबा, तुमची कमाल आहे, तुम्ही आमचा किती शृंगार करतात! उठत-
बसता, चालता-फिरता आपला शृंगार करा. काहीजण स्वतःचा शृंगार करून पुन्हा दुसऱ्यांचाही
शृंगार करतात. व काही जण आपलाही शृंगार करीत नाहीत, व दुसऱ्यांचा ही शृंगार
बिघडवितात .व्यर्थ गोष्टी सांगून त्यांची ही अवस्था बिघडवितात. स्वतःचाही शृंगार
करीत नाही व दुसऱ्यांचा ही नाही. तर चांगल्या प्रकारे विचार विमर्श करा - बाबा कशी
युक्ती सांगतात. भक्ती मार्गातील शास्त्र वाचून ही युक्ती कळत नाही. शास्त्र वाचतात
तर कोण मानणार नाही? रात्र आणि दिवस असतात तर दोन्ही पण मानणार ना! हे आहे बेहदचे
दिवस आणि रात्र.
बाबा सांगतात- गोड मुलांनो, तुम्ही स्वताचा शृंगार करा. वेळ वाया घालू नका. वेळ खूप
थोडा आहे. तुमची खूप मोठी विशाल बुद्धी बनवा. आपापसात खूप प्रेमाने राहा. वेळ वाया
घालू नका कारण तुमचा वेळ फार महत्त्वाचा आहे.कवडी पासून हिर्याप्रमाणे तुम्ही बनतात.
एवढे ज्ञान फुकट थोडच ऐकता? ही कहाणी आहे का? बाबा एकच अक्षर सांगतात मोठ्या मोठ्या
लोकांना जास्त बोलून चालत नाही. बाबा एक सेकंदात जीवनमुक्तीचा रस्ता दाखवितात. ते
तर आहेत सर्वश्रेष्ठ शृंगार करणारे, म्हणून तर त्यांच्या चित्रांची पूजा केली जाते
जेवढा मोठा मनुष्य असेल तेवढे मोठे मंदिर बनेल. त्यांचा शृंगार करतील. पूर्वी
देवतांच्या चित्रांना हिऱ्यांचा हार घालत होते. बाबांना अनुभव आहे ना!
बाबांनी स्वतः हिऱ्यांचा हार बनवला होता, लक्ष्मी-नारायणासाठी. खरेतर त्यांच्यासारखा
पोशाख येथे कुणी बनवू शकणार नाही. आता तुम्ही नंबरवार पुरुषार्थ अनुसार बनत आहात.
बाबा सांगतात- मुलांनो, वेळ वाया घालवू नका. इतरांचाही वेळ वाया घालवू नका. बाबा
फार सोपी युक्ती सांगतात. माझी आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील. आठवणी शिवाय एवढा
शृंगार होणार नाही. तुम्ही देवता बनणार आहात ना! दैवी स्वभाव धारण करा, यामध्ये हे
सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पण पत्थर बुद्धी बनल्यामुळे सर्व समजावून सांगावे
लागते. एका सेकंदाची गोष्ट आहे. बाबा सांगतात- गोड गोड मुलांनो, तुम्ही आपल्या
पित्याला विसरल्यामुळे शृंगार बिघडला. बाबा म्हणतात चालता-फिरता शृंगार करीत राहा.
परंतु माया सुद्धा काही कमी नाही. काही जण लिहितात- बाबा, तुमची माया खूप त्रास देते.
बाबा म्हणतात- अरे, माझी माया कुठे आहे, हा तर खेळ आहे ना! मी तर तुम्हाला
मायेपासून सोडविण्यासाठी आलो आहे. माझी माया कुठून आली?यावेळी सर्वत्र मायेचे राज्य
आहे. जसे रात्र आणि दिवस यांच्यामध्ये फरक नाही. तसा हा बेहदचा दिवस व रात्र यांचा
खेळ आहे. यामध्ये एक सेकंदचाही फरक पडत नाही. आता तुम्ही मुले नंबरवार पुरुषार्थ
नुसार असा शृंगार करीत आहात. बाबा सांगतात- चक्रवर्ती राजा बनायचे आहे तर चक्र
फिरवत रहा. भले गृहस्थ व्यवहारांमध्ये राहा, या ठिकाणी संपूर्ण बुद्धीचे काम आहे.
आत्म्यामध्ये मन बुद्धी आहे. येथे तुम्हाला बाहेरचा गोरख धंदा काही सुद्धा नाही.
येथे तुम्ही येताच स्वतःचा शृंगार करण्यासाठी, ताजेतवाने होण्यासाठी. बाबा सर्वांना
एक सारखेच शिकवितात. येथे बाबांच्या समोर नवे नवे मुद्दे ऐकण्यासाठी येतात व पुन्हा
घरी गेल्यानंतर जे काही ऐकले आहे ते विसरतात. इथून बाहेर गेल्यानंतर लगेच बुद्धीची
झोळी खाली होते. जे काही ऐकले त्यावर मनन चिंतन करीत नाहीत. तुमच्यासाठी येथे
एकांताची जागा खूप आहे. बाहेर तर ढेकणंसारखे मनुष्य फिरत राहतात, जे एकमेकांचा खून
करून रक्त पितात.
बाबा मुलांना समजवतात की, हा तुमचा वेळ खूप महत्वपूर्ण आहे, त्याला तुम्ही वाया
घालवू नका. स्वतःचा शृंगार करण्याच्या खूप युक्त्या बाबांनी सांगितल्या आहेत. मी
सर्वांचा उद्धार करण्यासाठी येतो. मी तुम्हाला विश्वा बादशाही देण्यासाठी आलो आहे.
तर आता माझी आठवण करा. वेळ वाया घालवू नका. कार्य-व्यवहार करताना सुद्धा बाबांची
आठवण करा. इतके सर्व आत्मे एक माशुक बाबांचे आशिक आहेत. त्या सर्व कथा-कहाण्या
तुम्ही खूप ऐकल्या आहेत. आता बाबा सांगतात ते सर्व विसरा. भक्तिमार्गात तुम्ही माझी
आठवण केली आणि प्रतिज्ञा सुद्धा केली की, आम्ही तुमचे बनू. खूप आशिक आहेत, मुलांचा
माशुक एक आहे. भक्तीमार्गात सांगतात- आम्ही ब्रह्ममध्ये लीन होऊ. या सर्व व्यर्थ
गप्पा आहेत. एकाही मनुष्याला मोक्ष मिळत नाही. हे तर अनादी नाटक आहे, इतकी सर्व
कलाकार आहेत यामध्ये जरासुद्धा फरक पडू शकत नाही. बाबा म्हणतात फक्त एका ईश्वराची
आठवण करा, तर तुमचा शृंगार होईल. आता तुम्ही हे बनत आहात. आता आठवते की, अनेक वेळा
आम्ही हा शृंगार केला आहे. कल्प-कल्प बाबा तुम्ही येणार व आम्ही तुमच्याकडून हे
ज्ञान ऐकणार. किती गुप्त मुद्दे आहेत. बाबांनी युक्ती खूप चांगली दिलेली आहे. अशा
पित्यावर बलिहार जाऊ. आशिक माशुक सुद्धा सर्वच एकसारखे नसतात. हा तर सर्व आत्म्यांचा
एकच माशुक आहे. येथे शारीरिक काही नाही. पण तुम्हाला संगमयुगातच बाबांकडून ही युक्ती
मिळते. तुम्ही कोठेही जा, खा, प्या, फिरा, नोकरी करा, परंतु स्वतःचा शृंगार करीत रहा.
आत सर्व एका माशुकचे आशिक आहेत. फक्त त्यांचीच आठवण करीत राहा. काही मुले म्हणतात-
आम्ही तर 24 तास आठवण करतो. पण सदैव कोणीच आठवण करू शकत नाही. जास्तीत जास्त
दोन-अडीच तास. जास्त कोणी लिहिले तर बाबा मान्य करीत नाहीत. दुसऱ्यांना आठवण करून
देत नाहीत तर आठवण करतात हे कसे समजावे? का, कठीण आहे का? यामध्ये खर्च आहे का? काही
सुद्धा नाही. फक्त बाबांची आठवण करीत राहा, तर तुमची पापे भस्म होतील. दैवी गुण
सुद्धा धारण करा. अपवित्र कुणी शांतीधाम व सुखधाम मध्ये जाऊ शकत नाही. बाबा मुलांना
सांगतात की, स्वतःला आत्मा भाऊ-भाऊ समजा 84 जन्माची भूमिका आता पूर्ण होत आहे. हे
जुने शरीर सोडायचे आहे नाटक पहा कसे बनलेले आहे. तुम्ही नंबरवार पुरुषार्थ अनुसार
समजता. दुनियेत कुणाला काहीच माहीत नाही. प्रत्येकाने स्वतःला विचारा कि, असे
शृंगारधारी कसे बनावे? बाकी सर्व ठीक आहे. फक्त पोटासाठी भाकरी तर आरामात मिळते. खरे
तर पोट काही जास्त खात नाही. जरी तुम्ही संन्यासी आहात परंतु राजयोगी आहात. खूप
उच्च नाही, खूप नीच नाही. खा परंतु जास्त सवय लागायला नको. हेच सर्वांना आठवण करून
सांगा की, शिव बाबांची आठवण आहे का? वारसा लक्षात आहे का? विश्वाच्या बादशाहीचा
शृंगार लक्षात आहे का? विचार करा- येथे बसून तुमची किती कमाई होत आहे. या कमाईमुळे
अपार सुख मिळणार आहे. फक्त आठवण करायची आहे, बाकी काही त्रास नाही. भक्तिमार्गात
मनुष्य किती धक्के खातात. आता बाबा शृंगार करण्यासाठी आले आहेत. तर स्वतःला चांगल्या
प्रकारे शृंगार करा. विसरू नका, माया विसरायला लावते. त्यामुळे खूप वेळ वाया जातो.
तुमचा हा वेळ तर फार महत्त्वाचा आहे. शिकण्याची मेहनत केल्यामुळे मनुष्य कुठल्या
कुठे पोहोचतो. बाबा तुम्हाला दुसरा काही त्रास देत नाहीत. फक्त सांगतात माझी आठवण
करा. कोणते पुस्तक वाचायची आवश्यकता नाही. बाबा कोणते पुस्तक वाचतात का? बाबा
म्हणतात मी येतो व प्रजापिता ब्रम्हाच्या द्वारे दत्तक घेतो.म्हणून त्यांना मात पिता
म्हटले जाते. हे सुद्धा तुम्ही जाणता, बाबा बरोबर वेळेत येतात. अचूक वेळी येतात व
अचूक वेळी जातील. दुनिया परिवर्तन तर होणारच आहे. आता बाबा तुम्हा मुलांना किती
हुशार, अक्कलवान बनवितात. बाबांच्या श्रीमतावर चालत राहा. विद्यार्थी जे शिकतात तेच
बुद्धी मध्ये राहते. तुम्हीसुद्धा हे संस्कार सोबत घेऊन जाणार आहात. जसे बाबांच्या
मध्ये संस्कार आहे तसेच संस्कार तुमच्या आत्म्यामध्ये भरले जातात. पुन्हा जेव्हा
येथे याल तेव्हा पुन्हा तुम्ही हीच भूमिका वठवणार आहात. नंबरवार पुरुषार्थ अनुसार
याल. स्वतःच्या मनाला विचारा- किती पुरुषार्थ केला आहे स्वतःचा शृंगार करण्याचा?
वेळ कोठे वाया तर घालविला नाही? बाबा सावधान करतात- व्यर्थ गोष्टीमध्ये कोठेही वेळ
वाया घालवू नका. बाबांची श्रीमत लक्षात ठेवा. मनुष्य मतावर चालू नका. तुम्हालाही
थोडेच माहीत होते की, आम्ही जुन्या दुनियेत आहोत. तुम्ही काय होते हे बाबांनी
सांगितले. या जुन्या दुनियेत किती अपार दुःख आहे. ही सुद्धा नाटका अनुसार भूमिका
मिळालेली आहे, नाटका अनुसार खूप संकटे सुद्धा येतात. बाबा समजवतात-मुलांनो, हा
ज्ञान व भक्तीचा खेळ आहे. मजेशीर नाटक आहे. इतक्या छोट्या आत्म्यामध्ये सर्व पार्ट
अविनाशी भरलेला आहे. जो आत्म्याला वटवावा लागतो. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. दुसऱ्या
सर्व गोष्टी विसरून याच धून मध्ये राहा की, आम्ही लक्ष्मी-नारायणासारखे कसे बनू शकतो?
2. स्वतःला विचारा कि :-
अ) आम्ही श्रीमतावर चालून मनमनाभाव या चावीने आपल्या शृंगार ठीक करीत आहोत का?
ब) उलट सुलट गोष्टी ऐकून किंवा सांगून शृंगार खराब तर करीत नाही ना?
स) आपापसात प्रेमाने राहतो का? आपला महत्त्वाचा वेळ कुठे वायाला तर घालवत नाही ना ?
द) दैवी स्वभाव धारण केला आहे का?
वरदान:-
स्व
परिवर्तनातून विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये मनासारखे यश प्राप्त करणारे सिद्धी
स्वरूप भव.
प्रत्येक जण स्व
परिवर्तनातून, विश्व परिवर्तन करण्याच्या सेवेमध्ये मगन आहे. सर्वांच्या मनामध्ये
हाच उमंग-उत्साह आहे की, हे विश्व परिवर्तनाचे कार्य करायचेच आहे. आणि निश्चय सुद्धा
आहे की परिवर्तन होणारच आहे. जेथे हिम्मत आहे तिथे उमंग-उत्साह आहे. स्व
परिवर्तनातून विश्व परिवर्तन या कार्यामध्ये मनासारखी सफलता मिळते परंतु ही सफलता
तेव्हाच मिळते जेव्हा एकाच वेळी आपली वृत्ती वातावरण व वाणी (वाचा) तिन्ही शक्तिशाली
असेल.
बोधवाक्य:-
जेव्हा
बोलण्यामध्ये स्नेह आणि संयम असेल तर वाणीची शक्ती जमा होईल.