26-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, बाबाचे मददगार बनून, या कलियुगी पहाडाला सतयुगी बनवायचे आहे, पुरुषार्थ करुन नविन दुनियेतील उत्तम पद प्राप्त करावयाचे आहे...!!!

प्रश्न:-
बाबाचे कर्तव्य कोणते आहे? कोणते कर्तव्य पुर्ण करण्यासाठी संगमयुगावर बाबाला यावे लागते?

उत्तर:-
रोगी आणि दु:खी मुलांना सुखी बनविणे, मायेच्या पाशातून काढून अपार सुख देणे, हे बाबाचे कर्तव्य आहे, जे संगमयुगावर बाबा पूर्ण करतात, बाबा महणतात कि, मी आलो आहे तुम्हा सर्वांचे दु:ख दूर करण्यासाठी सर्वांवर कृपा करण्यासाठी. आता पुरुषार्थ करुन 21 जन्मासाठी आपले उंच नशीब बनवा.

गीत :
भोलेनाथ पेक्षा शक्तीशाली, दुसरे कोणी नाहीत...

ओम शांती।
भोलेनाथ शिव भगवानुवाच, ब्रह्मा मुख कमळाद्वारे म्हणतात कि, हे वेगवेगळ्या अनेक धर्मचे मनुष्य सृष्टीरुपी झाड आहे ना. या कल्प वृक्ष किंवा सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य मुलांना समजावत आहे. गितामध्ये पण यांची महिमा आहे. शिवबाबाचा जन्म येथे आहे, बाबा सांगतात कि, मी आलो आहे भारतामध्ये. मनुष्य हे जाणत नाहीत कि, शिवबाबा कधी आले होते? कारण गीतेमध्ये कृष्णाचे नांव लिहले आहे. द्वापर युगाची तर गोष्ट नाही. बाबा समजावतात कि, मुलांनो, 5 हजार वर्षापुर्वी पण मी येऊन हे ज्ञान दिले होते. या झाडावरुन सर्वांना माहित पडत आहे. झाड चांगले प्रकारे पाहा. सतयुगामध्ये बरोबर दैवीदेवतांचे राज्य होते, त्रेतामध्ये राम सीतेचे आहे. बाबा आदि मध्य अंताचे रहस्य सांगत आहेत. मुले विचारतात कि, बाबा, आम्ही मायेच्या पाशामध्ये कधी फसलो? बाबा सांगतात कि, द्वापरयुगामध्ये, परत नंबरवार दुसरे धर्म येतात. हिशोब केल्याने समजू शकतो कि या दुनियामध्ये आम्ही परत कधी येऊ? शिवबाबा सांगतात कि, 5 हजार वर्षानंतर येतात. संगमयुगावर माझे कर्तव्ये पार करण्यासाठी. सर्व जे मनुष्य मात्र आहेत, सर्व दु:खी आहेत, त्यामध्ये पण खास भारतवासी. विश्वनाटकानुसार भारतालाच मी सुखी बनवत आहे. बाबाचे कर्तव्य आहे कि, मुले आजारी पडली तर त्यांना औषध पाणी करणे. हा आहे फार मोठा आजार. सर्व रोगाचे मुळ हे 5 विकार आहेत. मुले विचारतात हे कधी पासून सुरु झाले? द्वापर पासून, रावणाची गोष्ट सांगावयाची आहे. रावणाला काही पाहिले जात नाही. बुध्दीद्वारे समजले जाते. बाबाला पण बुध्दीद्वारे जाणले आहे. रावणाला काही पाहिले जात नाही. बुध्दीद्वारे समजले जाते. बाबाला पण बुध्दीद्वारे जाणले जाते. आत्मा आत्मा मन बुध्दी सहित आहे. आत्मा जाणते कि, आमचे पिता परमात्मा आहेत. दु:ख, सुख, लगाव झुकाव मध्ये आत्मा येते. जेव्हा शरीरात आहे, तर आत्म्याला दु:ख होते. असे म्हणत नाहीत, मज परमात्म्याला दु:खी करु नका. बाबापण समजावतात कि, माझी पण भुमिका आहे. कल्प कल्प संगमयुगावर येऊन मी अभिनय करतो. ज्या मुलांना मी सुखात पाठविले होते, ते दु:खी झाले आहेत, त्यामुळे परत नाटकानुसार मला यावे लागते. बाकी कच्छ मच्छ अवतार अशा गोष्टी काही नाहीत. म्हणतता कि, परशुरामाने कुऱ्हाडीने क्षत्रियांना मारले. यासर्वदंतकथा आहेत. तर आता बाबा समजावत आहेत. माझी आठवण करा.

हे आहेत जगदंबा आणि जगतपिता. आई आणि वडिलांचा देश म्हणतात ना. भारतवासी आठवण पण करतात कि, तुम्ही मात-पिता---तुमच्या कृपेने सुख अपार, तर बरोबर मिळत आहेत. मग जो जेवढा पुरुषार्थ करेल. जसे सिनेमा पाहण्यासाठी जातात, प्रथम वर्गाचे तिकीटाचे आरक्षण करतात. बाबापण म्हणतात कि, वाटले तर सुर्यवंशी किंवा चंद्रवंशीचे तिकीटाचे आरक्षण करा, जेवढे जे पुरुषार्थ करतात तेवढे पद प्राप्त करतात. तर सर्व दु:ख घालविण्यासाठी बाबा आले आहेत. रावणाने सर्वांना फार दु:ख दिले आहे. कोणते ही मनुष्य, इतर मनुष्याची गती, सद्गती करु शकत नाही. आता आहेच कलियुगाचा अंत. गुरु लोक शरीर सोडतात तर मग येथेच पुर्नजन्म घेतात. तर मग ते इतरांची काय सद्गती करतील. काय एवढे सर्व अनेक गुरु मिळून पतित सृष्टीला पावन बनवतील? गोवर्धन पर्वत म्हणतात ना. या माता, लोहयुगाला सुवर्णयुग बनवितात. गोवर्धनाची पुजा पण करतात, ती आहे तत्त्वपुजा. सन्यासी पण ब्रह्म अथवा तत्त्वाची आठवण करतात, समजतात कि तेच परमात्मा आहेत, ब्रह्म भगवान आहे. बाबा म्हणतात हा तर भ्रम आहे. ब्रह्मांड मध्ये तर आत्मे अंडाकारासारखी राहतात. निराकार झाड पण दाखविले आहे. प्रत्येकाचा आप-आपला विभाग आहे. या झाडाचा मुख्य पाया आहे, भारतातील सुर्यवंशी-चंद्रवंशी घराना. नंतर वृध्दी होत राहते. मुख्य आहेत 4 धर्म, तर हिशोब केला पाहिजे, कोण कोणते धर्म कधी येतात? जसे गुरु नानक 500 वर्षा पुर्वी आले. असे तर नाही शिख लोक काही 84 जन्माची भूमिका वठवितात. बाबा सांगतात कि, 84 जन्म फक्त तुम्ही ब्राह्मणच घेतात. बाबांनी समजावले आहे कि, तुमचीच संपूर्ण भूमिका आहे. ब्राह्मण देवता, क्षत्रिय, वैश्य, शुद्र तुम्ही बनता. जे अगोदर देवी देवता बनतात तेच सारे चक्र लावत आहेत.

बाबा सांगतात कि, तुम्ही वेद शास्त्र तर फार ऐकले आहेत. आता हे ऐका आणि निर्णय करा कि शास्त्र बरोबर आहेत का गुरु लोक बरोबर आहेत कि, जे बाबा सांगत आहेत ते बरोबर आहे? बाबा तर सांगतातच सत्य. मी खरे सांगत आहे, ज्याद्वारे सतयुग बनते आणि द्वापर पासून तुम्ही खोटे ऐकत आलात त्यामुळे नर्क बनला आहे.

बाबा सांगतात कि, मी तुमचा गुलाम आहे, भक्ती मार्गामध्ये तुम्ही गात आलात कि मी गुलाम, मी गुलाम तुमचा--आता मी तुम्हा मुलांच्या सेवेसाठी आलो आहे. बाबाला निराकारी निरहंकारी म्हटले जाते. तर बाबा म्हणतात कि माझे कर्तव्य आहे तुम्हा मुलांना सुखी बनविणे. गाण्यामध्ये पण आहे कि, येणे आणि जाणेतील भेद सांगतात---बाकी डमरु इ. वाजविण्याची काही गरज नाही. हे तर आदि मध्य अंतचा सारा समाचार सांगत आहेत, बाबा सांगतात कि, तुम्ही सर्व मुले पात्रधारी आहात, मी यावेळी, करनकरावनहार आहे. मी यांचेद्वारे (ब्रह्मा) स्थापना करत आहे. बाकी गीतेमध्ये जे काही लिहले आहे, तसे काही नाही. आता तर प्रत्यक्षात चालू आहे ना. मुलांना हे सहज ज्ञान आणि सहज योग शिकवत आहे. योग लावण्यास शिकवत आहे. म्हणतात ना कि योग लावणरे, झोळी भरणारे, दु:ख हरणारे... गीतेचा पण पूर्ण अर्थ समजावत आहेत. योग शिकवितो आणि इतरांना पण शिकविण्यास लावतो. मुले योग शिकून इतरांना पण शिकवत आहेत ना. म्हणतात कि योगाद्वारे आमची ज्योत जागविणारे---असे गीत पण कोणी घरात बसून ऐकले तर सारेच ज्ञान बुध्दीमध्ये फिरेल. बाबांच्या आठवणीने वारसाचा पण नशा चढेल. फक्त परमातम वा भगवान म्हणून तोंड गोड होणार नाही. बाबा म्हणजेच वारसा.

आता तुम्ही मुले बाबांकडून आदि मध्य अंताचे ज्ञान ऐकून मग इतरांना सांगत आहात, यालाच शंख ध्वनी म्हटले जाते. तुमच्या हातात पुस्तक असे काही नाही. मुलांना फक्त धारणा करावयची आहे. तुम्ही आहात खरे आत्मिक ब्राह्मण, आत्मिक पित्याची मुले. खऱ्या गीतेद्वारे भारत स्वर्ग बनतो. तेथे तर फक्त कथा बसून बनविल्या आहेत. तुम्ही सर्व पार्वती आहात, तुम्हाला अमरकथा सांगत आहे. तुम्ही सर्व द्रौपदी पण आहात. तेथे कोणी विकारी बनत नाहीत. मग म्हणतात कि, मुले कशी जन्म घेतील? अरे, आहेतच निर्विकारी तर विकाराची गोष्ट कशी असेल. तुम्ही समजू शकत नाही कि योगबळाने मुले कशी जन्म घेतील. तुम्ही वादविवाद कराल. परंतू या तर शास्त्रातील गोष्टी आहेत ना. ती आहेच संपूर्ण निर्विकारी दुनिया. ही आहे विकारी दुनिया. मी जाणतो कि विश्वनाटकानुसार माया तुम्हाला परत दु:खी करते. मी कल्प कल्प माझे कर्तव्य पालन करण्यासाठी येतो. मी जाणतो कि, कल्पा पुर्वीचेच फार वर्षांनी भेटलेली मुलेच येऊन आपला वारसा घेतील. त्यांची भासना पण येते, कि हीच महाभारतातील लढाई आहे. तुम्ही परत देवी देवता अथवा स्वर्गाचे मालक बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. यात स्थूल लढाईची कोणती गोष्ट नाही. ना आसूर ना देवतांचे युध्द झाले आहे. तेथे तर मायाच नाही, ज्यामुळे लढाई होईल. आर्धाकल्प ना कोणती लढाई, ना कोणता पण रोग, ना दु:ख अशांती. अरे तेथे तर सदैव सुख, वसंत ऋतू नेहमीच असतो. हॉस्पीटल असत नाहीत, बाकी पाठशाळेत तर शिकावेच लागते. आता तुम्ही प्रत्येक जण येथून वारसा घेऊन जात आहात. मनुष्य शिक्षणाद्वारे आपले पायावर उभे राहतात. यावर एक गोष्ट पण आहे, कोणीतरी विचारले कि तु कोणाचे खात आहे? तर म्हणाली कि मी माझे नशीबाचे खात आहे. ते आहे मर्यादीत नशीब. आता तुम्ही तुमचे अमर्यादीत नशीब बनवित आहात. तुम्ही असे नशीब बनवता जे, 21 जन्म मग आपलेच राज्य भाग्य उपभोगत राहता. येथे आहे अमर्यादीत सुखाचा वारसा, आता तुम्ही मुले दोन्हीमधील फरकाला चांगले प्रकारे जाणतात.भारत किती सुखी होता, आता काय हाल झाले आहेत? ज्यांनी कल्पापुर्वी राज्य भाग्य घेतले असेल तेच आता घेतील. असे नाही कि, जे नशीबात असेल ते मिळेल, मग तर उपाशी मरावे लागेल. हे नाटकाचे रहस्य पुर्ण समजावयाचे आहे.अनेकानेक मत मतांतर आहेत. कोणी मग म्हणतात कि, आम्ही तर सदा सुखीच आहोत. अरे, तुम्ही कधी आजारी पडत नाही का? ते तर म्हणतात कि, रोग इ. तर शरीराला होतात, आत्मा निर्लेप आहे. अरे, ठेच इ. लागते तर दु:ख आत्म्याला होते ना, या फार समजण्याच्या गोष्टी आहेत. ही पाठशाळा आहे, एकच शिक्षक शिकवत आहेत. ज्ञान एकच आहे. मुख्य लक्ष्य पण एकच आहे, नरापासून नारायण बनण्याचे. जे नापास होतात, ते चंद्रवंशी मध्ये जातात. जेव्हा देवता होते, तेव्हा क्षत्रिय नव्हते, जेव्हा क्षत्रिय होते तेव्हा वैश्य नव्हते, जेव्हा वैश् होते तेव्हा शुद्र नव्हते. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत. मातासाठी तर अति सोपे आहे. एकच परीक्षा आहे. असे पण समजू नका की उशीरा येणारे कसे शिकतील. परंतू आता तर नविन तीव्र पुरुषार्थ करत आहेत, प्रत्यक्षात आहेत. बाकी माया रावणाचे कोणते रुप नाही, म्हणतात यांच्यात कामाचे भूत आहे, परंतू रावणाचे कोणते भूत किंवा शरीर तर नाही.

अच्छा, सर्व गोष्टीतील गोडी आहे मनमनाभव, म्हणतात माझी आठवण करा तर योग अग्नीने सर्व विकर्म विनाश होतील. बाबा मार्गदर्शक बनून आले आहेत. बाबा म्हणतात कि, मुलांनो, मी तर सन्मुख तुम्हा मुलांना शिकवत आहे. कल्प-कल्प माझे कर्तव्य पालन करत आहे. पारलौकिक बाबा म्हणतात कि, मी माझे कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहे, तुम्हा मुलांच्या मदतीने तुम्ही मदत कराल तर श्रेष्ठ पद प्राप्त कराल. मी किती मोठा पिता आहे, किती मोठा यज्ञ रचला आहे. ब्रह्माचे मुखवंशावली तुम्ही सर्व ब्राह्मण-ब्राह्मणी भाऊ-बहिण आहात. जेव्हा भाऊ-बहिण बनता तर स्त्री-पुरुषाची दृष्टी बदलून जाते. बाबा म्हणतात कि या ब्राह्मण कुळाला कलंकीत करु नका, पवित्र राहण्याच्या युक्त्या आहेत. मनुष्य म्हणतात कि, हे कसे होईल? असे होऊ शकत नाही, एकत्र राहायचे आणि आग पण लागायला नको. बाबा म्हणतात कि, ज्ञान तलवार मध्ये ठेवल्याने कधी आग लागणार नाही, परंतू जेव्हा दोघे पण मनमनाभव होऊन राहतील, शिवबाबाची आठवण करत राहतील, स्वत:ला ब्राह्मण समजतील. मनुष्य तर या गोष्टीला न समजल्यामुळे गोंधळ घालतात, मग शिव्या पण खाव्या लागतात. कृष्णाला थोडेच कोणी शिव्या देऊ शकतात. कृष्ण त्या रुपात आले तर परदेशामधून एकदम सर्व विमानाने पळत येतील, गर्दी होईल. भारतामध्ये माहित नाही काय होईल.

अच्छा, आज भोग आहे, हे आहे माहेरघर, आणि ते आहे सासरघर. संगमयुगावर भेट होते. कोणी कोणी याला जादू समजतात. बाबांनी समजावले आहे कि, हे साक्षत्कार काय आहे? भक्ती मार्गात कसे साक्षात्कार होत आहेत, यामध्ये संशयबुध्दी व्हावयाचे नाही. ही रसम रिवाज आहे. शिवबाबाचा भंडारा आहे, तर त्यांची आठवण करुन नेवैध दाखविला पाहिजे. आठवणीत राहणे तर चांगलेच आहे. बाबांची आठवण राहिल. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. स्वत:ला ब्रह्मा मुखवंशावली समजून पक्के ब्राह्मण बनायचे आहे. कधी आपल्या या ब्राह्मण कुळाला कलंकीत करायचे नाही.

2. बाबासारखे निराकारी, निरहंकारी बनून आपले कर्तव्यपालन पुर्ण करावयाचे आहे. आत्म्यांच्या सेवेवर तत्पर राहावयाचे आहे.

वरदान:-
सेवेच्या प्रवृत्तीमध्ये राहत, एकांतवासी बनणारे अंतर्मुखी भव

शांतीच्या शक्तीचा प्रयोग करण्यासाठी अंतर्मुखी आणि एकांतवासी बनण्याची आवश्यकता आहे. काही मले म्हणतात कि, अंतर्मुखी स्थितीचा अनुभव करणे किंवा एकांतवासी बनण्यासाठी वेळेच मिळत नाही, कारण सेवेची प्रवृत्ती फार वाढली आहे. परंतू त्यासाठी एकदाच आर्धातास, किंवा एक तास काढण्यापेक्षा कधी मधी थोडा वेळ काढा, तर शक्तीशाली स्थिती बनून जाईल.

बोधवाक्य:-
ब्राह्मण जीवनामध्ये युध्द करण्यापेक्षा मजेत राहा, तर अवघड पण सोपे होईल.