06-12-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
" गोड मुलांनो , तुमच्या जवळ मनमनाभव आणि मध्याजीभव चे तीक्ष्ण बाण आहेत . या
बाणाद्वारे तुम्ही माये वरती विजय मिळवू शकता .
प्रश्न:-
मुलांना बाबांची मदत कोणत्या आधारे द्वारे मिळते , बाबांचे धन्यवाद कोणत्या
रूपांमध्ये मानतात ?
उत्तर:-
जेवढे बाबांशी
स्नेह ठेवतात,तेवढीच बाबांची मदत मिळते.स्नेहा द्वारे बाबांशी गोष्टी करा, आपले
संबंध बरोबर ठेवा,श्रीमता वरती चालत राहा,तर बाबा मदत करत राहतील.मुलं बाबांचे
धन्यवाद मानतात,बाबा तुम्ही परमधाम मधुन येऊन आम्हाला पतित पासुन पावन बनवतात.
तुमच्याकडून आम्हाला खूप सुख मिळत आहे. प्रेमामध्ये अश्रू पण येतात.
ओम शांती।
मुलांना सर्वात प्रिय माता आणि पिता आहेत आणि पित्याला परत मुलं सर्वात
प्रियअसतात.आता बाबा ज्यांना तुम्हीच माता आणि पिता म्हणतात,लौकिक मात पित्याला कुणी
असे म्हणणार नाही.ही महिमा जरूर एका परमात्माची आहे परंतु त्यांना कोणी जाणत
नाहीत.जर त्यांना जाणले तर तेथे येतील आणि अनेकांना घेऊन येतील परंतु अविनाशी
नाटकांमध्ये नोंदच अशी आहे.जेव्हा नाटक पूर्ण होईल तेव्हा येतील.पुर्वी मूवी नाटक
होते,जेव्हा नाटक पूर्ण होते तेव्हा सर्व कलाकार स्टेजवर येत होते.हे पण बेहदचे मोठे
नाटक आहे.हे पण सर्व मुलांच्या बुद्धी मध्ये यायला पाहिजे,सतयुग त्रेता द्वापर
कलियुग, हे सृष्टीचे चक्र आहे.असे नाही मुळवतन सूक्ष्मवतन मध्ये चक्र फिरत
राहते.सृष्टीचे चक्र येथेच फिरते.गायन पण आहे,सतनाम,एक ओंकार... ही महिमा कोणाची
आहे.जरी ग्रंथांमध्ये शिख लोक महिमा करतात.गुरुनानक वुवाच... आता एक ओंकार तर त्या
निराकार परमात्माची महिमा आहे परंतु ते लोक परमात्माच्या मोहिमेला विसरून गुरुनानक
ची महिमा करतात.सद्गुरु पण नानक ना समजतात.वास्तव मध्ये सृष्टी वरती जी पण महिमा ती
तर एकाचीच आहे,दुसऱ्या कोणाची महिमा नाही.आता हे पहा ब्रह्मा मध्ये बाबाची प्रवेशता
जर झाली नसती,तर हे पण कवडी तुल्य असते.आता तुम्ही कवडी तुल्य पासून,हिरे तुल्य बनत
आहात,त्या परमपिता परमात्मा द्वारे.आत्ता पतित दुनिया, ब्रह्माची रात्र आहे.पतित
दुनिया मध्ये बाबा येतात आणि त्यांना जे ओळखतात,ते त्यांच्यावरती बळी जातात.आजच्या
दुनिया मध्ये तर मुलं खूपच खराब बनतात.देवता तर खूपच चांगले होते.आता ते पुनर्जन्म
घेत,तमोप्रधान बनले आहेत.संन्याशी पण अगोदर फार चांगले होते,पवित्र होते,भारताला
मदत करत होते.भारतामध्ये पवित्रता नसती तर,भारत काम विकारा वरती जळून नष्ट झाला
असता.सतयुगा मध्ये काम विकार नसतो.कलियुगामध्ये तर सर्व काम चितेच्या काट्या वरती
बसले आहेत. आजकाल मनुष्यांना दहा-बारा मुलं होतात,कोणता कायदाच राहिला नाही.सतयुगा
मध्ये जेव्हा मुलगा होतो तर त्यांना,साक्षात्कार होतो.शरीर सोडण्याच्या अगोदर पण
साक्षात्कार होतो,की आम्ही परत जाऊन मुलगा बनू.एकच मुलगा होतो जास्त नाही.सर्व काही
कायद्या नुसार चालते.वृध्दी तर जरुर होते परंतु तेथे विकार नसतात.मुलं कशी होतात असे
विचारतात?बोलायला पाहिजे,तेथे योग बळाद्वारेच सर्व काम होते.सृष्टीची राजाई पण,आम्ही
योग बळाने घेतो. बाहुबळा द्वारे सुर्ष्टीची राजाई मिळु शकत नाही.बाबांनी समजवले
आहे,जर क्रिश्चन आपापसात मिळतील तर,विश्वा वरती राज्य करू शकतील परंतु ते आपापसात
मिळू शकत नाहीत.असा कायदाच नाही.एक गोष्ट आहे ना,दोन मांजर आपसात लढतात आणि लोणी
तुम्हा मुलांना मिळते.कृष्णाच्या मुखामध्ये नेहमी लोणी दाखवतात.हे सृष्टी रुपी लोणी
आहे.बेहदचे बाबा म्हणतात,या योग बळाच्या लढाईचे ग्रंथांमध्ये गायन केलेले
आहे,बाहुबळाचे नाही.त्यांनी परत हिंसक लढाई ग्रंथांमध्ये दाखवली आहे.त्याच्याशी आपला
कोणताच संबंध नाही.पांडव आणि कौरव ची लढाई झाली नाही.हे अनेक धर्म,पाच हजार
वर्षापूर्वी पण होते,जे आपसात लढाई करून विनाश झाले होते.पांडवांनी देवी-देवता
धर्माची स्थापना केली आहे,ज्याद्वारे सृष्टीचे राज्य मिळते.मायाजीत जगतजीत
बनतात.सतयुगा मध्ये माया, रावण नसतो.तेथे थोडेच रावणाचा पुतळा बणवुन
जाळतील,नाही.येथे अनेक प्रकारचे चित्र बनवत राहतात,असा कोणता आसुर नसतो.हे पण समजत
नाहीत,स्त्रियांमधील पाच विकार आणि पुरुषांमधील पाच विकार आहेत,त्यांना मिळून दहा
तोंडाचा रावण बनवतात.विष्णूला चार भुजा देतात. मनुष्य साधारण गोष्ट पण समजत
नाहीत.मोठा रावणाचा पुतळा बनवून जाळतात.अती प्रिय मुलांना बाबा समजवतात.पित्याला
मुलं हमेशा नंबरा नुसार प्रिय असतात.काहीजण तर खूपच प्रिय असतात,काही कमी
असतात.जितके गोड असतील तेवढे जास्त प्रेम मिळते.येथे सेवा करतात ते,प्रिय
वाटतात.भक्तिमार्ग मध्ये तर दया मागतात. हे भगवान माझ्यावरती दया करा परंतु अविनाश
नाटकाला कोणी जाणत नाहीत.जेव्हा खूपच तमोप्रधान बनतात,तेव्हाच बाबा येतात.असे नाही,
ईश्वर पाहिजे ते करू शकतात किंवा पाहिजे तेव्हा येऊ शकतात.जर अशी शक्ती असेल तर,परत
इतकी निंदा झाली असती का? वनवास का मिळेल? या फारच गुप्त गोष्टी आहेत.कृष्णाची तर
निंदा होऊ शकत नाही.भगवान हे करू शकत नाहीत असे म्हणतात,परंतु विनाश तर होणारच
आहे,परत वाचण्याची गोष्टच नाही.सर्वांना परत घेऊन जायचे आहे.स्थापना,विनाश
करवतात,तर जरूर भगवानच असतील ना.परमपिता परमात्मा स्थापना करतात,कशाची? मुख्य गोष्ट
हेच विचारा कि,गितेचे भगवान कोण आहेत.सारी दुनिया संभ्रमित झाली आहे. त्यांनी तर
मनुष्याचे नाव दिले आहे.आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना तर भगवाना शिवाय कोणी
करू शकत नाही. परत तुम्ही कसे म्हणता कृष्ण गीतेचे भगवान आहेत.विनाश आणि स्थापना
करणे कोणाचे काम आहे?गितेच्या भगवंताला विसरुन गितेचे खंडन केले आहे.ही फारच मोठी
चूक आहे.दुसरीकडे जगन्नाथपुरी मध्ये देवतांचे खूपच खराब चित्र बनवले आहेत. शासनाची
मना आहे खराब चित्र
ठेवण्याचे. तर यावरती समजून सांगायला पाहिजे. या मंदिरा वरती कोणाच्या बुद्धी मध्ये
या गोष्टी येत नाहीत.या गोष्टी बाबाच बसून समजवतात.
पहा मुली प्रतिज्ञापत्र,रक्ताने पण लिहून देतात.एक कथा पण आहे ना,कृष्णाच्या हाताचे
रक्त निघाले तर,आपले वस्त्र फाडून बांधले,हे पण प्रेम आहे ना.तुमचे प्रेम एक शिव
बाबा च्या सोबत आहे.ब्रह्माच्या हाताला लागुन रक्त येऊ शकते,यांना दुःख होऊ शकते
परंतु शिवबाबांना तर कधीच दुःख मिळू शकत नाही,कारण त्यांना स्वतःचे शरीर नाही. नाही
कृष्णाला जर काही लागले तर दुःख होईल,परत त्यांना परमात्मा कसे म्हणू शकता.बाबा
म्हणतात मी तर सुखदुःखा पासून वेगळा आहे.होय,मी येऊन मुलांना नेहमी सुखी
बनवतो.सदाशिवअसे गायन आहे.सदाशिव,नेहमीच सुख देणारे म्हणतात,माझी गोड गोड फार
वर्षानंतर भेटलेलेली श्रेष्ठ मुलं,ज्ञान धारण करून पवित्र राहतात,खरे योगी आणि
ज्ञानी राहतात,ते मला खूपच प्रिय आहेत.लौकिक पित्यांना पण काही चांगले असतात,तर काही
वाईट पण मुलं असतात.कोणी तर कुळाला कलंक लावणारे निघतात.खूप खराब बणतात.येथे पण असे
आहेत.बाबाचा मुलगा बणतात,ज्ञान ऐकतात, ज्ञान सांगतात, तरीही बाबांना सोडून देतात
म्हणून बाबा शपथपत्र लिहून घेतात.ते पत्र परत समोर दाखवता येईल.रक्ताने पण लिहून
देतात.रक्ताने लिहुन प्रतिज्ञा करतात.आज-काल शपथ पण घेतात परंतु ती सर्व खोटी शपथ
घेतात.ईश्वराला (हाजर नाजर) सर्वव्यापक जाणुन म्हणजेच हे पण ईश्वर,मी पण ईश्वर शपथ
घेतो.बाबा म्हणतात तुम्ही आता वास्तव मध्ये,हजर नाजर आहात.बाबा या डोळ्या रुपी
खिडकीमधून पाहतात,हे दुसऱ्याचे शरीर,मी भाड्याने घेतले आहे.बाबा भाडेकरू आहेत ना.घर
म्हणजे शरीर कामांमध्ये आणले जाते.तर बाबा म्हणतात मी हे शरीर कामांमध्ये आणतो.बाबा
या खिडकी द्वारे पाहतात.हाजर नाजर आहेत.आत्मा जरुर कर्मेंद्रिया द्वारे काम करुन
घेईल ना.मी आलो आहे तर,ज्ञान जरुर देईल ना.कर्मेंईंद्राया चा वापर करतात, तर जरूर
भाडे पण द्यावे लागेल ना.
तुम्ही मुल या वेळेत नरकाला,स्वर्ग बनवणारे आहात. तुम्ही प्रकाश देणारे,जागृत करणारे
पण आहात. बाकी तर सर्व कुंभकर्णाच्या निद्रे
मध्ये झोपलेले आहेत.तुम्ही माता त्यांना जागृत करत आहातआणि स्वर्गाचे मालक बनवत
आहात. यामध्ये जास्तीत जास्त संख्या मातांची आहे म्हणून वंदेमातरम म्हणले
जाते.भीष्मपितामह इत्यादी ला तुम्हीच बाण मारले आहेत.मनमनाभव, मध्याजीभव चे बाण
खूपच सहज आहेत.तुम्ही या बाणा द्वारे माये वरती विजय मिळवता.तुम्ही एका बाबांच्या
आठवणीत राहून त्यांच्या श्रीमता वरती चालायचे आहे.बाबा तुम्हाला असे श्रेष्ठ कर्म
शिकतात,ज्याचा २१ जन्म पश्चात्ताप करावा लागणार नाही. तुम्ही सदा निरोगी सदा
संपत्तीवान बणतात.अनेक वेळेस निसर्गाचे मालक बनले, राज्य घेतले आणि परत
गमावले.तुम्ही ब्राह्मण कुलभूषण हिरो-हिरॉईन ची मुख्य भूमिका वठवतात.या अविनाशी
नाटकांमध्ये सर्वात श्रेष्ठ भूमिका तुमची आहे.तर असे श्रेष्ठ बनवणाऱ्या बाबांच्या
सोबत खूपच प्रेम पाहिजे.बाबा तुमची तर कमाल आहे,मन बुद्धीमध्ये नव्हते,आम्हीच
नारायण होतो.बाबा म्हणतात तुम्हीच नारायण किंवा लक्ष्मी देवी-देवता होते,परत
पुर्नजन्म घेत असुर बनलो.आता परत पुरुषार्थ करून वारसा प्राप्त करा.जितका जे
पुरुषार्थ करतील,तसाच साक्षात्कार होत राहील.राजयोग एक बाबांनींच शिकवला होता.खरा
खरा सहज राजयोग तर तुम्ही आता शिकत आहात.तुमचे कर्तव्य आहे बाबांचा परिचय सर्वांना
देणे.सर्व विनाधनीचे बनले आहेत.या गोष्टी कल्पा पूर्वीचेच करोडो मधून काही आत्मेच
समजतील.बाबांनी समजावले आहे,साऱ्या दुनिये मध्ये महान मूर्ख पाहायचाअसेल तर,येथे
पहा,ज्यांच्याद्वारे वारसा मिळतो त्यांनाच सोडचिट्टी देतात.हे पण अविनाश नाटकांमध्ये
नोंद आहे.आत्ता तुम्ही ईश्वराची संतान आहात परत देवता,क्षत्रिय,वैश्य क्षुद्राची
संतान बनाल.आता आसुरी संतान पासून ईश्वरी संतान बनला आहात.बाबा परमधाम वरून येऊन
पतित पासुन पावन बनवतात,तर त्यांचे खूप धन्यवाद मानायला पाहिजेत.भक्तिमार्ग मध्ये
पण खूप आभार मानत राहतात. दुःखामध्ये थोडेच धन्यवाद मानतात.आता तर तुम्हाला खूप सुख
मिळत आहे,तर खूप स्नेह पाहिजे.आम्ही बाबा सोबत प्रेमाने गोष्टी करतो तर,त्या का नाही
ऐकणार?संबंध आहे ना. पहाटे उठून बाबांशी गोष्टी करायला पाहिजेत.बाबा आपला अनुभव
सांगतात,मी खुप आठवण करतो,बाबाच्या आठवणीमध्ये प्रेमाचे आश्रू येतात.आम्ही काय
होतो,बाबांनी काय बनवले आहे,तुम्ही पण असेच बनतात.योगा मध्ये राहणाऱ्या मुलांना,बाबा
पण मदत करतात.बाबा अनेकांना जागे होण्यास मदत करतात,त्यांची खाट हलते.बाबा अनेकांना
ऊठवतात. बेहदचे बाबा खुप दया करतात.तुम्ही येथे का आले आहात.मुलं म्हणतात,बाबा
भविष्यामध्ये श्रीनारायण किंवा लक्ष्मीला वरण्यासाठी,ही परिक्षा पास करत आहोत.ज्ञान
घेण्यासाठी आलो आहोत.खूपच आश्चर्यकारक शाळा आहे.अनेक आश्चर्यकारक गोष्टी
आहेत.मोठ्यात मोठे विश्वविद्यालय किंवा विद्यापीठ हे आहे,परंतु ईश्वरीय विद्यापीठ
नाव ठेवू देत नाहीत.एक दिवस जरूर येईल,अनेक लोक येत राहतील.ते समजतील हे खूपच मोठे
विद्यापीठ आहे.बाबा तर तुम्हाला डोळ्या वरती बसून शिकतात, ते म्हणतात मी तुम्हाला
स्वर्गामध्ये घेऊन जाईल.तर अशा बाबा बरोबर खूपच प्रेमाने गोष्टी करायला पाहिजेत.तर
बाबा पण खूप मदत करतील.ज्यांचा गळा बंद आहे,त्यांना पण ज्ञान देण्यासाठी बाबा मदत
करतात.पहाटे ऊठुन आठवण केल्या नंतर खूपच आनंद होईल.बाबा आपला अनुभव सांगतात,मी
अमृतवेळेला कशा गोष्टी करतो.मुलांना खबरदार करत राहतात.कुळाला कलंकित करायचे
नाही.पाच विकार दान देऊन परत घ्यायचे नाहीत,अच्छा.
गोड गोड , फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती , प्रेमपुर्वक आठवण आणि
सुप्रभात . आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते . .
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१)बाबाचे
प्रिय बनण्यासाठी दयाशील बणुन सेवे मध्ये तत्पर राहायचे आहे. सुपात्र,आज्ञाधारक
बणुन खरे योगी किंवा ज्ञानी बनवायचे आहे.
(२)अमृतवेळेला ऊठुन बाबांशी गोड गोड गोष्टी करायच्या आहेत. बाबांचे आभार मानायचे
आहेत.बाबाच्या मदतीचा अनुभव करण्यासाठी,सर्वात प्रिय बाबांची खुप प्रेमाने आठवण
करायची आहे.
वरदान:-
जुना देह किंवा जुन्या दुनियेच्या सर्व आकर्षाणा पासून सहज आणि नेहमीच दूर राहणारे
राजऋषी भव .
राजऋषी म्हणजे
एकीकडे सर्व अधिकार चा नशा आणि दुसरीकडे बेहद वैराग्याचा अलौकिक नशा. वर्तमान
वेळेत,या दोघांचा अभ्यास करत चला. वैराग्य म्हणजे किनारा नाही परंतु सर्व प्राप्त
असतानी पण हदचे आकर्षण,मन बुद्धीला आकर्षित करायला नको.संकल्प मात्र पण आधीनता
नको,यालाच म्हणतात राजऋषी,म्हणजे बेहदचे वैरागी.हा जुना देह किंवा देहाची जुनी
दुनिया,व्यक्त भाव,वैभव,या सर्व आकर्षणा पासुन नेहमी आणि सहज दूर राहणारे.
बोधवाक्य:-
विज्ञानाच्या साधनांचा वापर करा परंतु आपल्या जीवनाचा आधार बनवू नका .