20-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, बाबा आले आहेत, तुम्हाला सर्व खजिन्यांनी मालामाल बनविण्यासाठी, तुम्ही फक्त ईश्वरीय मतावर चालत राहा, चांगल्या पध्दतीने पुरुषार्थ करुन वारसा घ्या, मायेकडून हार खाऊ नका...!!!

प्रश्न:-
ईश्वरीय मत, दैवी मत आणि मनुष्य मत यामध्ये मुख्य कोणते अंतर आहे?

उत्तर:-
ईश्वरीय मतापासून तुम्ही मुलं आपल्या घरी परत जाता आणि पुन्हा नविन दुनियेमध्ये उंच पदाची प्राप्ती करता. दैवी मताद्वारे तुम्ही सदैव सुखी राहाता कारण ती सुध्दा यावेळेस बाबांकडून मिळालेली मत आहे. पण तरीही खालीच उतरता, मनुष्य मत दु:खी बनवते. ईश्वरीय मतावर चालण्यासाठी प्रथम शिकवणाऱ्या बाबांवर संपुर्ण निश्चय पाहिजे.

ओम शांती।
बाबांनी अर्थ समजावला आहे, मी आत्मा शांत स्वरुप आहे. जेव्हा ओम शांती म्हटले जाते, तेव्हा आत्म्याला आपले घर आठवते. मी आत्मा शांत स्वरुप आहे. नंतर जेव्हा कर्मइंद्रिय भेटतात तेव्हा आवाजामध्ये येतात. प्रथम इंद्रिय छोटी असतात नंतर मोठी होतात. परमपिता परमात्मा तर आहे निराकार. त्यांनाही रथ हवा आहे बोलण्यासाठी. जसे तुम्ही आत्मे परमधाममध्ये राहणारे आहात, येथे येऊन बोलू लागता. बाबाही म्हणतात मी तुम्हाला ज्ञान देण्यासाठी बोलतो. बाबा स्वत:चा आणि रचतेच्या आदि-मध्य-अंताचा परिचय देतात. हे आहे आत्मिक ज्ञान आणि ते आहे शारिरीक ज्ञान ते स्वत:ला शरीर समजतात. असे कुणी नाही समजत की मी आत्मा या कानांद्वारे ऐकत आहे. आता तुम्ही मुले समजता की बाबा पतित पावन आहेत, तोच येऊन समजावतो मी कसा येतो. तुमच्या प्रमाणे मी गर्भामध्ये येत नाही. मी यांच्यामध्ये प्रवेश करतो. नंतर काही प्रश्नच राहतनाही. हा रथ आहे. यांना माताही म्हटले जाते. सर्वांत मोठी नदी ब्रह्मपुत्रा आहे. तर ही आहे सर्वांत मोठी नदी. पाण्याचा विषय नाही. ही आहे महानदी अर्थात सर्वांत मोठी ज्ञान नदी. तर बाप आत्म्यांना समजावतात की मी तुमचा पिता आहे. जसे तुम्ही बोलता, मी ही बोलतो. माझी भुमिका सर्वांत शेवटी आहे. जेव्हा तुम्ही एकदम जास्त पतित बनता, तेव्हा तुम्हाला पावन बनविण्यासाठी मला यावे लागते. या लक्ष्मी नारायणाला असे बनवणारा कोण? ईश्वराशिवाय अजून कोणाला म्हणू शकत नाही. बेहदचे पिताच स्वर्गाचे मालक बनवत असेल ना. बाबाच ज्ञानाचा सागर आहे. तोच म्हणतो मी या सृष्टीचा चैतन्य बीज आहे. मी आदि-मध्य-अंताला जाणतो. मी सत्य आहे. मी चैतन्य बीजरुप आहे. या सृष्टीरुपी झाडाचे ज्ञान माझ्यामध्ये आहे. याला सृष्टी चक्र किंवा नाटक असे म्हटले जाते. हे फिरतच राहते. ते हदचे नाटक दोन तास चालते. याची रीळ पाच हजार वर्षांची आहे. जी-जी वेळ निघून जाते, पाच हजार वर्षापेक्षा कमी होत जाते. तुम्ही जाणता प्रथम आम्ही देवी देवता होतो नंतर हळू-हळू आम्ही क्षत्रिय कुळामध्ये आलो. हे सर्व रहस्य बुध्दीमध्ये आहे ना. तर हे स्मरणात राहिले पाहिजे. आम्ही सुरुवातीला भुमिका सादर करण्यासाठी आलो, तेव्हा आम्ही देवी देवता होतो. 1250 वर्ष राज्य केले. वेळ तर बदलत जाते ना. लाखो वर्षांची तर गोष्टच नाही. लाखो वर्षाचे तर कुणी चिंतन करुच शकत नाही.

तुम्ही मुलं समजता आम्ही देवी देवता होतो, नंतर भुमिका करत करत वर्षामागून वर्ष जात, आता किती वर्ष निघून गेली. हळू-हळू सुख कमी होत जाते. प्रत्येक वस्तू सतोप्रधान, सतो, रजो, तमो होत जाते. जुनी अवश्य बनते. ही तर आहे बेहदची गोष्ट. यासर्व गोष्टी चांगल्या पध्दतीने बुध्दीमध्ये धारण करुन इतरांना समजावयाच्या आहेत. सर्व जण सारखे नसतात. नक्कीच वेगवेगळ्या पध्दतीने समजावत असतील, चक्र समजावणे सर्वांत सोपे आहे. ड्रामा आणि झाड दोन्ही मुख्य चित्र आहेत. कल्पवृक्ष नाव आहे ना. कल्पाचे आयुष्य किती वर्षाचे आहे, हे कोणाला माहित नाही. मनुष्यांची अनेक मते आहेत. कुणी काय म्हणते तर कुणी काय म्हणते. आता तुम्ही अनेक मनुष्यांचे मत समजले आहे आणि एक ईश्वरीय मत ही समजले आहे, किती फरक आहे? ईश्वरीय मताद्वारे तुम्हाला परत नविन दुनियेत जायचे आहे. अजून कोणाच्या मतांनी दैवी मतांनी किंवा मनुष्य मतांनी घरी परत नाही जाऊ शकत. दैवी मतांनी तुम्ही खालीच उतरता, कारण कला कमी होत जातात. आसुरी मतांनीही उतरत जाता. परंतू श्रीमतामध्ये सुख आहे. आसुरी मतामध्ये दु:ख आहे. दैवी मत पण यावेळेस बाबांनी दिलेले आहे, म्हणून तुम्ही सुखी राहता. बेहदचेपिता किती दुरुन येतात. मनुष्य कमविण्यासाठी बाहेर जातो. जेव्हा खूप पैसा एकत्र करतात, तेव्हा माघारी येतात. बाबा पण म्हणतात मी तुम्हा मुलांसाठी खुप खजाना घेऊन येतो कारण मी जाणतो, तुम्हाला खुप माल दिला होता. तो सर्व तुम्ही गमावला आहे. तुमच्याशीच बोलतो ज्यांनी खरोखर गमावले आहे. 5 हजार वर्षाची गोष्ट तुम्हाला आठवते ना. म्हणतात हो बाबा 5 हजार वर्षापुर्वी तुम्हाला भेटलो होतो. तुम्ही वारसा दिला होता. आता तुम्हाला स्मृती आली आहे. बरोबर बेहदच्या पित्याकडून बेहदचा वारसा घेतला होता. बाबा तुमच्याकडून नविन दुनियेच्या राजाईचा वारसा घेतला होता. अच्छा आता परत पुरुषार्थ करा. असे नका म्हणू बाबा मायेच्या भुतांनी आम्हाला हरवले. देह-अभिमान आल्यामुळे तुम्ही मायेकडून हारता. लोभ आला, लाच खाल्ली. लाचारीची गोष्ट वेगळी आहे. बाबांना माहित आहे. लोभाशिवाय पोट भरत नाही. हरकत नाही भले खा परंतू कुठे फसून मरु नका. नंतर तुम्हालाच दु:ख होईल. पैसा मिळाला खुश होऊन खाल. कुठे पोलीसांनी पकडले तर जेलमध्ये जावे लागेल. असे काय नका करु, त्याला मी जबाबदार नाही. पाप करतात तर जेलमध्ये जातात. तिथे तर जेलवगैरे असत नाही. तर ड्रामा प्लॅन अनुसार जो कल्पापूर्वी तुम्हाला वारसा मिळाला होता. 21 जन्मांसाठी तसाच नंतरही मिळेल. सारी राजधानी तयार होत आहे. गरीब प्रजा, साहुकार प्रजा, परंतू तिथे दु:ख कोणाला नाही. याची बाबा गॅरंटी देतात. सर्व एकसारखे तर बनू शकत नाहीत. सुर्यवंशी-चंद्रवंशी राजाई मध्ये सर्व हवेत ना. मुलांना माहित आहे कसे बाबा आम्हाला विश्वाची बादशाही देतात. पुन्हा आम्ही उतरतो. आठवणीत आले ना. शाळेमध्ये शिकवलेले लक्षात राहते ना. येथे पण बाबा आठवण करुन देतात. हे आत्मिक ज्ञान संपूर्ण जगात कोणीच शिकवू शकत नाही. गितेमध्ये पण लिहले आहे. मनमनाभव, याला महामंत्र वंशीकरण मंत्र असे म्हणतात. म्हणजेच मायेवर विजय मिळविण्याचा मंत्र. मायाजीते जगतजीत. माया 5 विकारांना म्हटले जाते. रावणाचे चित्र एकदम बरोबर आहे. 5 विकार स्त्रीचे, 5 विकार पुरुषाचे. यामुळे गाढवाप्रमाणे म्हणजे आधीन होतात, म्हणून रावणाच्या डोक्यावर गाढवाचे डोके दाखवतात. आता तुम्हाला समजले, ज्ञानाशिवाय आम्ही ही असेच होतो. बाबा किती आनंदाने बसून आम्हाला शिकवतात. ते परम शिक्षक आहेत, त्यांच्याकडून आम्ही जे शिकतो ते दुसऱ्यांना शिकवतो.प्रथम तर शिकवणाऱ्यावर निश्चय असायला हवा. बोला-बाबांनी आम्हाला असे समजावले आहे. आता तुम्ही माना किंवा नका मानू. हे बेहदचा पिता तर आहेत ना. श्रीमत श्रेष्ठ बनवते. तर श्रेष्ठ नविन दुनिया असायला हवी ना.

आता तुम्ही समजता आम्ही कचऱ्याच्या दुनियेत बसलो आहे. दुसरे कोणी समजू शकतनाही. आम्ही स्वर्गामध्ये सदैव सुखी राहतो. येथे नर्कामध्ये किती दु:खी आहोत. याला नर्क म्हणा किंवा विषय वैतरणी नदी म्हणा, जुनी घाणेरडी दुनिया आहे. आता तुम्हाला जाणवते कुठे सतयुग स्वर्ग, कुठे कलियुग नर्क. स्वर्गाला म्हटले जाते दुनियेतील आश्चर्य, त्रेतालाही नाही म्हणणार. येथे या खराब दुनियेमध्ये राहणाऱ्या मनुष्यांना किती खुशी होते. विष्ठेच्या किड्यांना श्रमरी भूं-भुं करुन आपल्यासारखे बनवते. तुम्ही पण कचऱ्यामध्ये पडले होते. मी येऊन भुं-भुं करुन तुम्हाला किड्यापासून म्हणजे शुद्रापासून ब्राह्मण बनवतो. आता तुम्ही डबल ताजधारी बनत आहात. तर किती खुशी राहायला पाहिजे. पुरुषार्थ पुर्ण करायला हवा. बेहदचे बाबा समजावून तर खुप छान सांगतात. मनालाही वाटते बाबा सर्व खऱ्या गोष्टी सांगतात. यावेळी सर्व मायेच्या जाळ्यात अडकले आहेत. बाहेरचा दिखावा किती आहे? बाबा समजावतात मी तुम्हाला मायेच्या जाळ्यातून वाचवतो, स्वर्गामध्ये घेऊन जातो. स्वर्गाचे नाव तर ऐकले आहे. आता स्वर्ग तर नाही. फक्त या मुर्ती (चित्र) आहेत. हे स्वर्गाचे मालक किती धनवान होते. भक्तीमार्गामध्ये भले रोज मंदिरात जात होतो. परंतू हे ज्ञान काहीच माहित नव्हते. आता तुम्ही समजता भारतामध्ये हा आदि सनातन देवी-देवता धर्माच्या बदल्यात आता हिंदू हिंदू म्हणत राहतात. सुरुवातीला हिंदू महासभेचा मुख्य अध्यक्ष आला होता. बोलला, मी विकारी असूर आहे स्वत:ला देवता कसा म्हणू? आम्ही बोललो अच्छा, ये आम्ही समजावतो, पुन्हा एकदा देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे, तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो. येथे बसून शिका. म्हणाला, दादा जी मला वेळ नाही. वेळ नाही तर मग देवता कसे बनणार! ही शिकवण आहे ना, बिचाऱ्यांच्या भाग्यात नव्हते, मरुन गेला. असेही नाही म्हणू शकत की तो प्रजेमध्ये येईल. नाही असेच ऐकून आला होता, येथे पवित्रतेचे ज्ञान मिळते परंतू सतयुगात येऊ शकत नाही. तरीही हिंदू धर्मात येईल.

तुम्ही मुले समजता माया खुप बलशाली आहे. काही ना काही चुका करायला लावते. कधी काही उल्टे-सुल्टे पाप घडले तर बाबांना खरे सांगायचे आहे. रावणाच्या दुनियेत तर पाप होतच राहतात. म्हणतात आम्ही जन्म-जन्मांतराचे पापी आहोत. असे कोण म्हणाले? आत्मा म्हणत असते, बाबांसमोर किंवा देवी-देवतांसमोर. आता तुम्हाला जाणीव झाली आहे. बरोबर आम्ही जन्म-जन्मांतराचे पापी आहोत. रावण राज्यामध्ये पापे केली आहेत. अनेक जन्मांचे पाप तर वर्णन नाही करु शकत. या जन्मांचे वर्णन करु शकता, ते सांगितले तरी हल्के होईल. डॉक्टर समोर आजार सांगायचा आहे. आमक्याला मारले, चोरी केली - हे सांगायला लाज नाही वाटत, विकाराची गोष्ट सांगायला लाज वाटते. डॉक्टरांसमोर लाज नाही वाटत, विकाराची गोष्ट सांगायला लाज वाटते. डॉक्टरांसमोर लाजलो तर आजार बरा कसा होणार? मग मन खात राहिल, बाबांची आठवण करु शकणार नाही. खरे सांगितले तर आठवण करु शकता. बाबा म्हणतात मी डॉक्टर तुम्हाला औषध देतो. तुमची काया सदैव कंचन राहिल. डॉक्टरांना सांगितल्यांनी हल्के वाटते. काही तर स्वत:च लिहतात, बाबा आम्ही पापात्मा बनलो. आता बाबा म्हणतात मुलांनो, तुम्ही पाप आत्म्यांशी लेन-देन करु नका. खरा सतगुरु, अकालमुर्त आहेत बाबा. तो कधी पुर्नजन्म घेत नाही. त्यांनी अकालतख्त नाव दिले आहे. परंतू अर्थ समजत नाही. बाबांनी समजावले आहे आत्म्याचे हे तख्त आहे, येथेच शोभून दिसते. तिलक पण येथेच (भृकुटी) लावतात. तिलक बिंदी सारखा लावतात. आता तुम्हाला स्वत:च स्वत:ला तिलक दयायचा आहे. बाबांची आठवण करत राहा. जो खुप सेवा करेल तो मोठा महाराजा बनेल. नविन दुनियेमध्ये जुन्या दुनियेचे शिक्षण थोडेच दिले जाते. तर एवढ्या मोठ्या शिक्षणावर खुप लक्ष दयायला हवे. येथे बसल्यानंतर काहींचा बुध्दीयोग चांगला राहतो, काहींचा कुठे-कुठे भटकत राहतो. कुणी 10 मिनीट लिहतात, काही 15 मिनीट लिहतात. ज्यांचा चार्ट चांगला असेल त्याला नशा चढेल. बाबा एवढा वेळ आम्ही तुमची आठवण केली. 15 मिनीटापेक्षा जास्ती तर कुणी लिहू शकत नाही. बुध्दी इकडे-तिकडे पळते. जर सगळे सारखे झाले तर कर्मातीत अवस्था होऊन जाईल. बाबा किती छान-छान प्रेमाने गोष्टी सांगतात. असे कुणी गुरुनी कधी शिकवले नाही. गुरु एकाला थोडेच सांगणार. गुरुकडून तर हजारो शिकतील ना. सतगुरु तुम्हाला किती शिकवतात. हा आहे मायेला वंश करण्याचा मंत्र. माया 5 विकारांना म्हटले जाते. धनाला संपत्ती म्हटले जाते. लक्ष्मी-नारायणाला म्हणतात, यांच्या जवळ खुप संपत्ती होती. लक्ष्मी-नारायणाला कधी माता-पिता नाही म्हणत. आदि देव, आदि देवीला जगतपिता, जगतअंबा म्हणतात. यांना नाही. हे स्वर्गाचे मालक आहेत. अविनाशी ज्ञान धन घेऊन आम्ही एवढे धनवान बनलो आहे. अंबेजवळ तर अनेक आशेनी जातात. लक्ष्मी जवळ तर फक्त धनासाठी जातात आणखी काही नाही. तर मोठी कोण आहे? हे कोणाला माहित नाही, अंबेकडून काय मिळते? लक्ष्मीकडून काय मिळते? लक्ष्मीला फक्त धन मागतात. अंबेकडून तुम्हाला सर्व काही मिळते अंबेचे नाव जास्त घेतात. कारण मातांना दु:ख खुप सहन करावे लागते. तर मातांचे नाव जास्त घेतले जाते. अच्छा तरीही बाबा म्हणतात बाबांची आठवण करा तर पावन बनाल. चक्राची आठवण करा दैवीगुण धारण करा. खुप जणांना आप समान बनवा. ईश्वराचे तुम्ही विद्यार्थी आहात. कल्पापुर्वी ही बनले होते. आताही तेच लक्ष्य आहे-ही आहे सत्य नरापासून नारायण बनण्याची कथा. अच्छा!

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आपला आजार डॉक्टर पासून कधीही लपवायचा नाही. मायेच्या भुतांपासून स्वत:ला वाचवायचे आहे. स्वत:ला राजतिलक देण्यासाठी सर्विस जरुर करायची आहे.

2. स्वत:ला अविनाशी ज्ञान धनानी धनवान बनवायचे आहे. आता पाप आत्म्यांशी देवाण-घेवाण करायची नाही. शिक्षणवर पुर्णपणे लक्ष्य दयायचे आहे.

वरदान:-
गितेचा पाठ शिकणारे आणि शिकवणारे नष्टोमोहा स्मृती स्वरुप भव :-

गिता ज्ञानाचा प्रथम पाठ आहे-अशरीरी आत्मा बना आणि अंतिम पाठ आहे नष्टोमोहा स्मृतिस्वरुप बना. प्रथम पाठ आहे विधी आणि अंतिम पाठ आहे विधीपासून सिध्दी. तर प्रत्येकवेळी स्वत: हा पाठ शिका आणि दुसऱ्यांना शिकवा. असे श्रेष्ठ कर्म करुन दाखवा जेणेकरुन तुमच्या श्रेष्ठ कर्मांना पाहून अनेक आत्मे श्रेष्ठ कर्म करुन आपल्या भाग्याची रेषा श्रेष्ठ बनवू शकतील.

बोधवाक्य:-
परमात्म्याच्या स्नेहामध्ये सामावलेले रहा तर,कष्टापासून मुक्त होऊन जाल.