23-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, संगमयुग नशीबवान बनण्याचे युग आहे, यात तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे आपले भाग्याचा तारा चमकावू शकता....!!!

प्रश्न:-
आपल्या पुरुषार्थाला तीव्र करण्याचे सहज साधन काय आहे?

उत्तर:-
बाबाचे अनुकरण करत राहा, तर पुरुषार्थ तीव्र होईल. बाबालाच पहा, माता तर गुप्त आहे. पित्याचे अनुकरण केल्याने बाबासारखे उंच बनाल त्यामुळे तंतोतंत अनुकरण करत राहा.

प्रश्न:-
बाबा कोणत्या मुलांना बुध्दू समजतात?

उत्तर:-
ज्यांना बाबाला भेटल्याची पण खुशी होत नाही-ते बुध्द आहेत ना. असे बाबा जे विश्वाचे मालक बनवितात, त्यांचा मुलगा बणून सुध्दा खुशी न राहणे, तर त्यांना बुध्दूच म्हणावे ना.

ओम शांती।
गोड गोड तुम्ही मुले आहात भाग्यशाली तारे. तुम्ही जाणता कि, आम्ही शांतीधामची पण आठवण करतो. बाबाची पण आठवण करतो. बाबाची आठवण केल्यानेच आम्ही पवित्र बनून परमधाम घरी जावू. येथे बसून असे विचार करत आहात ना. बाबा काही कष्ट देत नाहीत. जीवनमुक्तीला तर कोणी ओळखत नाही. ते सर्व पुरुषार्थ करत आहेत मुक्तीसाठी, परंतू मुक्तीचा अर्थ समजत नाहीत. कोणी म्हणतात आम्ही ब्रह्म मध्ये लीन होऊन जावू, मग येथे यायचेच नाही. त्यांना हे माहितच नाही की, आम्हाला या चक्रात जरुर यायचेच आहे. आता तुम्ही या गोष्टीला समजत आहात. तुम्हा मुलांना हे माहित आहे कि आम्ही स्वदर्शन चक्रधारी भाग्यवान तारे आहोत. लकी म्हटले जाते नशीबवानाला. आता तुम्हा मुलांना नशीबवान बाबाच बनवित आहेत. जसा पिता तशी मुले असतात. काही पिता साहूकार आहेत, काही पिता गरीब पण असतात. तुम्ही मुले जाणता कि, आम्हाला तर बेहदचा पिता मिळाला आहे, तर जे जेवढे भाग्यशाली बनू इच्छितात, तेवढे बनू शकतात, जेवढे सावकार जे बनू इच्छितात, ते बनू शकतात. बाबा सांगतात कि, जे पाहिजे ते पुरुषार्थ करुन घ्या. सारा आधार पुरुषार्थावर आहे. पुरुषार्थ करुन जेवढे उंच पद घेऊ इच्छिता ते घेऊ शकता. उंच ते उंच पद आहे हे लक्ष्मी नारायण, आठवणीचा चार्ट पण जरुर ठेवावयाचा आहे, कारण तमोप्रधान पासून सतोप्रधान जरुर बनायचे आहे. बुध्दू बनून असेच नाही बसायचे. बाबाने समजावले आहे. जुनी दुनिया आता नविन होत आहे. बाबा येतातच नवीन सतोप्रधान दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी. ते आहेत बेहदचे बाबा, बेहदचे सुख देणारे. समजावतात कि सतोप्रधान बनल्यानेच तुम्ही बेहदचे सुख प्राप्त कराल. सतो बनाल तर कमी सुख. रजो बनाल तर त्यापेक्षा कमी सुख. हिशोब सारा बाबा सांगत आहेत. अथाह धन तुम्हाला मिळते, अथाह सुख पण तुम्हाला मिळते. बेहदच्या बाबांकडून वारसा घेण्याचा दुसरा कोणता उपाय नाही, शिवाय आठवणीच्या. जेवढी बाबाची आठवण कराल, आठवणीमुळे तेवढेच दैवीगुण आपोआप येतील. सतोप्रधान बनायचे आहे तर दैवीगुण पण जरुर पाहिजेत. स्वत:ची तपासणी स्वत:च करावयाची आहे. जेवढे उंच पद घेऊ इच्छितात घेऊ शकता, स्वत:चे पुरुषार्थाने. शिकविणारे शिक्षक तर बसले आहेत. बाबा सांगतात कि, कल्प कल्प तुम्हाला असेच समजावत आहे. अक्षरच दोन आहेत, मनमनाभव, मध्याजी भव. बेहदच्या बाबाला ओळखता, हे बेहदचे बाबाच बेहदचे ज्ञान देणारे आहेत. पतितापासून पावन बनण्याचा रस्ता पण, बेहदचे बाबाच सांगत आहेत. तर बाबा जे समजावत आहेत, ती काही नविन गोष्ट नाही. गीतेमध्ये पण जे लिहले आहे ते पिठातील मिठासारखे आहे. स्वत:ला आत्मा समजा. शरीराचे सर्व धर्म विसरा. सुरुवातीला तुम्ही अशरीरी होता. आता अनेक मित्र संबंधाच्या बंधनात आले आहात. सर्व तमोप्रधान आहेत, आता परत सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही जाणता कि, तमोप्रधान पासून परत आम्ही सतोप्रधान बनतो, तर मित्र संबंधी इ. पण सर्व पवित्र बनतील. जेवढे जे कल्पा पुर्वी सतोप्रधान बनले आहेत, तितकेच ते परत बनतील. त्यांचा पुरुषार्थ तसा होईल. आता अनुकरण कोणाचे केले पाहिजे. गायन करतात कि, पित्याचे अनुकरण करा. जसे हे बाबाची आठवण करतात. पुरुषार्थ करतात, त्यांचे अनुकरण करा. पुरुषार्थ करविणारे तर बाबा आहेत, ते तर पुरुषार्थ करत नाहीत, ते पुरुषार्थ करुन घेतात. नंतर म्हणतात कि, गोड गोड मुलांनो, ब्रह्मा बाबाचे अनुकरण करा. गुप्त मात-पिता आहेत ना. माता तर गुप्त आहे. पिता तर पाहण्यात येतात. हे चांगल्या रितीने समजावयाचे आहे. असे उंच पद प्राप्त करावयाचे आहे तर बाबाची चांगले प्रकारे आठवण करा. जसे ब्रह्मा बाबा आठवण करतात. हे बाबाच सर्वांत उंच पद प्राप्त करतात. हे फार उंच होते, मग यांच्या अनेक जन्मातील अंतच्या जन्मामध्ये मी प्रवेश केला आहे. हे चांगले ध्यानात ठेवा, विसरु नका. माया अनेकांना विसवते. तुम्ही म्हणता कि, आम्ही नरापासून नारायण बनत आहेत. त्याची पण बाबा युक्ती सांगत आहेत. कसे तुम्ही बनू शकता. हे पण जाणता कि, सर्व तर जसेच्या तसे अनुकरण करत नाहीत. मुख्य लक्ष्य बाबा सांगत आहेत. ब्रह्मा बाबाचे अनुकरण करा. आताचेच गायन आहे. बाबा पण आता तुम्हा मुलांना ज्ञान देत आहेत. सन्याशांचे शिष्य स्वत:ला म्हणवतात परंतू ते तर चुकीचे आहे ना, अनुकरण तर करतच नाहीत. ते सर्व आहेत ब्रह्मज्ञानी, तत्त्वज्ञानी, त्यांना ईश्वर ज्ञान देत नाहीत. तत्त्व किंवा ब्रह्मज्ञानी म्हणवितात. परंतु तत्त्व किंवा ब्रह्म त्यांना ज्ञान देत नाहीत. ते सर्व ग्रंथामधील ज्ञान शास्त्रांचे आहे. येथे तुम्हाला बाबा ज्ञान देत आहेत, ज्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. हे चांगले रितीने ध्यानात ठेवा. तुम्ही विसरुन जाता, हे मनात चांगले रितीने धारण करण्याची गोष्ट आहे. बाबा रोज रोज सांगतात कि, गोड गोड मुलांनो, स्वत:ला आत्मा समजून, मज पित्याची आठवण करा, आता परत जायचे आहे. पतित तर जावू शकत नाहीत. पवित्र एक तर योगबळाने व्हायचे आहे, नाही तर शिक्षा भोगून व्हायचे आहे. सर्वांचा हिशोब चुक्त जरुर होणार आहे. बाबांनी समजावले आहे कि, तुम्ही आत्मे मुळात परमधाम मध्ये राहणारी आहात, मग येथे सुख आणि दु:खाचा अभिनय करत आहात. सुखाचा अभिनय आहे रामराज्यात आणि दु:खांचा अभिनय आहे रावणराज्यात, रामराज्य स्वर्गाला म्हटले जाते. तेथे संपूर्ण सुख आहे. म्हणतात पण कि, स्वर्गवासी आणि नर्कवासी. तर हे चांगले रितीन धोरण करावयाचे आहे. जेवढे जेवढे तमोप्रधान पासून सतोप्रधान बनत जाल, तेवढी खुशी पण होईल. जेव्हा रजो अवस्थेत द्वापरयुगामध्ये होता, त्यावेळी पण तुम्हाला खुशी होती. तुम्ही एवढे दु:खी विकारी नव्हता. येथे आता खुप विकारी दु:खी झाले आहात. तुम्ही आपल्या मोठ्यांना पहा, किती विकारी, दारुडे आहेत. दारु फार वाईट वस्तु आहे. सतयुगामध्ये तर आहेतच शुध्द आत्मे, नंतर खाली उतरत उतरत एकदम छी-छी झाले आहेत, त्यामुळे याला घोर रौरव नरक म्हटले जाते. दारु अशी वस्तु आहे जी भांडण, मारामारी, नुकसान करण्यासाठी उशीर लावत नाही. यावेळी मनुष्याची बुध्दी जशी भ्रष्ट झाली आहे. माया फार वाईट आहे. बाबा सर्वशक्तीवान सुख देणारे आहेत. तशी माया फार दु:ख देणारी आहे. कलियुगातील मनुष्याची अवस्था काय झाली आहे, एकदम जीर्ण जीर्ण, काही पण समजत नाहीत, जसे कि पत्थरबुध्दी हे पण नाटक आहे ना. कोणाच्या नशीबात नसेल तर मग अशी बुध्दी बनून जाते. बाबा ज्ञान तर फार सापे सांगत आहेत. मुलांनो, मुलांनो म्हणत समजावत आहेत. माता पण म्हणतात आम्हाला 5 लौकिक मुले आहेत, आणि एक आहे पारलौकिक मुलगा. जो आम्हाला सुखधामला घेऊन जाणार आहे. पिता पण समजतात, तर मुलगा पण समजतात. जादूगार आहेत ना. बाबा जादूगार तर मुले पण जादूगार बनतात. म्हणतात कि, बाबा आमचा मुलगा पण आहे. तर बाबाचे अनुकरण करुन असे बनले पाहिजे. स्वर्गामध्ये यांचे राज्य होते ना. शास्त्रामध्ये या गोष्टी नाहीत. या भक्ती मार्गातील शास्त्रांची पण नाटकामध्ये नोंद आहे. नंतर पण होणार. हे पण बाबा समजावत आहेत, शिकविणारा शिक्षक पण पाहिजे ना. पुस्तके थोडेच शिक्षक बनू शकतील. तर मग शिक्षकाची आवश्यकता राहणार नाही. ही पुस्तके इ. सतयुगामध्ये असत नाहीत. बाबा समजावतात कि, तुम्ही आत्मा तर समजत आहात ना. आत्म्याचा पिता पण जरुर आहे. जेव्हा कोण मोठे व्यक्ती येतात, तेव्हा सर्व म्हणतात कि हिंदू-मुस्लीम भाऊ भाऊ आहेत, अर्थ काही समजत नाहीत. भाऊ-भाऊचा अर्थ समजला पाहिजे ना. जरुर त्यांचा पिता पण असेल. एवढी किरकोळ पण समज नाही आहे. भगवानुवाच हा अनेक जन्मातील अंताचा जन्म आहे. अर्थ किती स्पष्ट आहे. कोणाची निंदा करत नाहीत. बाबा तर रस्ता सांगत आहेत. नंबर एक ते शेवट, गोरेच सावळे बनत आहेत. तुम्ही पण समजता कि, आम्ही गोरे होतो, मग असे बनलो. बाबाची आठवण केल्यानेच असे बनाल. हे आहे रावणराज्य. रामराज्याला म्हटले जाते शिवालय जे सीतेचे राम आहेत, त्यांनी तर त्रेतायुगामध्ये राज्य केले आहे. ही पण समजण्याची गोष्ट आहे. दोन कला कमी होतात ना. सतयुग आहे उंच, त्यांची आठवण करतात, त्रेता आणि द्वापरची एवढी आठवण करत नाहीत. सतयुग आहे नवीन दुनिया आणि कलियुग आहे जुनी दुनिया. 100 टक्के सुख आणि कलियुग गायले जाते. बाबा सतयुग स्थापन करत आहेत. आता तुमचे काम आहे पुरुषार्थ करणे. सतयुग निवासी बनता कि त्रेता निवासी बनता? द्वापर पासून मग खाली उतरता. तरी पण आहात देवी देवता धर्माचे. परंतू पतित झाल्या कारणाने आपल्याला देवी देवता म्हणू शकत नाहीत. तर बाबा गोड गोड मुलांना रोज रोज सांगत आहेत, मुख्य गोष्ट आहे, मनमनाभवची. तुम्हीच नंबरएकचे बनता. 84 चे चक्र लावून शेवटी आले आहात, परत नंबर एकला जाता. आता बेहदच्या बाबाची आठवण करावयाची आहे. हे आहेत बेहदचे बाबा, पुरुषोत्तम संगमयुगावरच बेहदचे बाबा येऊन 21 जन्माचे स्वर्गाचे सुख तुम्हाला देत आहेत. जन्म जेव्हा पुर्ण होतो, तेव्हा तुम्ही आप-आपले शरीर सोडता. योगबळ आहे ना. कायदाच तसा बनलेला आहे. याला म्हटले जाते योगबळ. तेथे ज्ञानाची गोष्ट राहत नाही. आपो-आप तुम्ही वृध्द होत राहता. तेथे कोणता आजार इ. असत नाही. लंगडे किंवा वाकडे तिकडे असत नाहीत. सदैव निरोगी राहता. तेथे दु:खाचे नामनिशाण राहत नाही. मग थोडी थोडी कला कमी होत राहते. आता मुलांना पुरुषार्थ करावयाचा आहे, बेहदच्या बाबांकडून उंच वारसा प्राप्त करण्यासाठी. आदराने पास झाले पाहिजे ना. सर्व तर उच्च पद प्राप्त करु शकत नाहीत. जे सेवाच करत नाहीत ते काय पद प्राप्त करतील. संग्रहालयामध्ये मुले किती सेवा करतात, ना बोलवता लोक येतात. याला विहंग मार्गाची सेवा म्हटले जाते. माहित नाही, यापेक्षा पण आणखीन काही विहंग मार्गाची सेवा निघू शकेल. दोन चार मुख्य चित्र जरुर बरोबर पाहिजेत. मोठ मोठे त्रिमुर्ती, झाड, गोळा, शिडी हे तर प्रत्येक जागी फार मोठ मोठे पाहिजेत. जेव्हा मुले हुशार होतील तेव्हा तर सेवा होईल ना. सेवा तर होणारच आहे. गावामध्ये पण सेवा करावयाची आहे. माता जरी शिकलेल्या नसल्या तरी पण बाबाचा परिचय देणे तर फार सोपे आहे. पुर्वी स्त्रीया शिकत नव्हत्या. मुसलमानाच्या राज्यामध्ये एक डोळा उघडून बाहेर निघत होते. हे बाबा फार अनुभवी आहेत. शिवबाबा म्हणतात मी हे सर्व काही जाणत नाही. मी तर परमधाममध्ये राहतो. यासर्व गोष्टी हे ब्रह्मा तुम्हाला सांगत आहेत. हे अनुभवी आहेत, मी तर मनमनाभवच्या गोष्टी सांगत आहे आणि सृष्टी चक्राचे रहस्य समजावत आहे, जे हे जाणत नाहीत. हे स्वत:चा अनुभव वेगळे समजावत आहेत, मी या गोष्टीत जात नाही. माझी भुमिका आहे, फक्त तुम्हाला रस्ता सांगणे. मी पिता, शिक्षक गुरु आहे. शिक्षक बनून तुम्हाला शिकवित आहे, बाकी यात कृपा इ.ची काही गोष्ट नाही. शिकवतो, नंतर मग बरोबर घेऊन जाणार आहे. या शिक्षणाद्वारेच सद्गती होत आहे. मी आलो आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. शिवाची वरात गायली जाते. शंकराची वरात म्हणत नाहीत. शिवाची वरात आहे, सर्व आत्मे नवर देवाच्या मागे जात आहेत ना. यासर्व आहेत भक्तीन, मी आहे भगवान. तुम्ही मला बोलावले आहेच, पावन बनवून बरोबर घेऊन जाण्यासाठी. तर मी तुम्हा मुलांना घेऊनच जाईल. लेखा जोखा पुर्ण करुन घेऊन जायचे आहे. बाबा वारंवार म्हणतात कि, मनमनाभव. बाबाची आठवण करा तर वारसा पण जरुर आठवणीत येईल. विश्वाची बादशाही मिळते ना. त्यासाठी पुरुषार्थ पण असा करावयाचा आहे. तुम्हा मुलांना काही त्रास देत नाही. मी जाणतो कि तुम्ही फार दु:ख पाहिले आहे. आता तुम्हाला काही त्रास देत नाही. भक्ती मार्गामध्ये आयुष्य पण थोडे राहते. अकाले मृत्यु होत राहते, किती आदळ आपट करतात. किती दु:ख सहन करतात. बुध्दीच खराब होऊन जाते. आता बाबा म्हणतात कि, फक्त माझी आठवण करत राहा. स्वर्गाचे मालक बनावयाचे आहे. तर दैवी गुण पण धारण करावयाचे आहेत. पुरुषार्थ नेहमी उंच बनण्याचा केला जातो. आम्ही लक्ष्मी नारायण बनू. बाबा सांगतात कि, मी सुर्यवंशी-च्रदंवशी दोन्ही धर्माची स्थापना करत आहे. ते नापास होतात, त्यामुळे क्षत्रिय म्हटले जात आहे. युध्दाचे मैदान आहे ना. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. सुखधामातील वारशाचा पुर्ण अधिकार घेण्यासाठी संगमयुगावर आत्मिक जादूगार बनून, बाबाला आपला मुलगा बनवावयाचे आहे. पुर्णपणे समर्पित व्हायचे आहे.

2. स्वदर्शन चक्रधारी बणून स्वत:ला भाग्यवान तारा बनवायचे आहे. विहंग मार्गाची सेवेसाठी निमित्त बनून उंच पद घ्यायचे आहे. गावोगावी सेवा करायची आहे. त्याबरोबर आठवणीचा चार्ट पण जरुर ठेवा.

वरदान:-
शरीर आणि शरीराच्या जगाची आठवणीपासून दूर राहणारे, सर्व संबंधापासून मुक्त फरिश्ता भव :

ज्यांचे कोणात्याही शरीर आणि शरीरधारी बरोबर नाते म्हणजे मनाचा लगाव नाही तेच फरिश्ता आहेत. देवदूताचे पाय नेहमी जमिनीपासून वर असतात. जमिनीचे वर म्हणजे देह भानाच्या आठवणीपासून दूर. जे देह आणि देहाच्या दुनियेच्या आठवणीपासून दूर राहतात, तेच सर्व बंधनापासून मुक्त देवदूत बनतात. असे देवदूतच हलक्या स्थितीचा अनुभव करतात.

बोधवाक्य:-
बोलण्या बरोबर वागणे आणि चेहज्याद्वारे बाबासारखे गुण दिसले तरच प्रत्यक्षता होईल...!!!