30-12-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड मुलांनो, सर्व भिस्त आठवणीवर आहे, बाबंची आठवण केल्यानेच तुम्ही गोड बनणार
आहात, या आठवणीमध्येच मायेचे युध्द चालते....!!!
प्रश्न:-
या नाटकामध्ये
कोणते रहस्य विचार करण्याजोगे आहे? ज्याला तुम्ही मुलेच जाणता?
उत्तर:-
तुम्ही जाणता
कि, नाटकामध्ये एक भुमिका दोन वेळा बजावू शकत नाही. साऱ्या दुनियेत जी पण भुमिका
बजावली जाते ती एकमेकांपेक्षा वेगळी व नविन आहे. तुम्ही विचार करता कि, सतयुगापासून
आतापर्यंत कशाप्रकारे दिवस बदलत जातात. सर्व कार्यव्यवहार, चालचलन बदलत जाते.
आत्म्यामध्ये पाच हजार वर्षाच्या चाल-चलनची भुमिका भरलेली आहे, ज्यामध्ये कधीच बदल
होऊ शकत नाही.
ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना विचारतात-गोड गोड मुलांनो, तुम्ही आपल्या भविष्याचे
पुरुषोत्तम मुख, पुरुषोत्तम शरीर पाहता का? हे पुरुषोत्तम संगमयुग आहे ना. तुम्ही
आता अनुभव करता कि, आम्ही पुन्हा नविन दुनिया सतयुगामध्ये, दैवी वंशावळीमध्ये जाणार
आहोत, ज्याला सुखधाम असे म्हणतात. तिथे जाण्यासाठीच तुम्ही आता पुरुषोत्तम बनत आहात.
बसल्या-बसल्या हे विचार तुमच्या मनात आले पाहिजेत. विद्यार्थी जेव्हा शिकत असतात
तेव्हा त्यांच्या बुध्दीत हे जरुर असते कि, उदया आम्ही हे बनणार आहोत. त्याप्रमाणे
तुम्हीही जेव्हा येथे बसता तेव्हा तुम्ही हे जाणता कि, आम्ही विष्णूच्या
घराण्यामध्ये जाणार आहोत. तुमची बुध्दी आता अलौकिक बनली आहे. इतर कोणत्या
मनुष्याच्या बुध्दीमध्ये या गोष्टी येणार नाहीत. हा काही साधारण सत्संग नाही. येथे
बसला आहात, समजता सत्य बाबा ज्यांना शिव म्हणतात आम्ही त्यांच्या संगामध्ये बसलो
आहोत. शिवबाबा रचयिता आहेत, तेच या रचनेच्या आदि-मध्य अंताला जाणतात. तेच हे ज्ञान
सांगतात. जसे कि, कालच घडलेली गोष्ट सांगत आहेत. येथे बसलात, हे तर लक्षात आहे ना.
आम्ही येथे परिवर्तन होण्यासाठी म्हणजे हे शरीर बदलून देवतांचे शरीर घेण्यासाठी आलो
आहोत. आत्मा म्हणते-हे आमचे तमोप्रधान जुने शरीर आहे. याला बदलून पुन्हा देवतांचे
शरीर घेणार आहोत. किती सोपे ध्येय आहे. शिकविणारा शिक्षक शिकणाऱ्या
विद्यार्थ्यांपेक्षा जरुर हुशार असणार ना. श्रेष्ठ कर्म करायला शिकवितात. आता तुम्ही
समजता कि, आम्हाला उच्च ते उच्च भगवान शिकवितात तर जरुर देवी देवताच बनविणार ना. हे
शिक्षण नविन दुनियेसाठी आहे. दुसऱ्या कुणाला नविन दुनियेबद्दल काहीच माहित नाही. हे
लक्ष्मी-नारायण नविन दुनियेचे मालक होते. देवी देवता सुध्दा नंबरवार असणार ना. सर्व
एकसारखे असू शकत नाहीत कारण राजधानी आहे ना. तुमच्या मनात हे विचार चालले पाहिजेत.
आम्ही आत्मा पतितापासून पावन बनण्यासाठी बाबांची आठवण करतो. आत्मा आठवण करते आपल्या
गोड पित्याची. बाबा स्वत: म्हणतात माझी आठवण केली तर पवित्र सतोप्रधान बनाल. सारी
भिस्त बाबांच्या आठवणीवर आहे. बाबा तर विचारणारच-मुलांनो, माझी आठवण किती वेळ करता?
आठवणीमध्येच मायेचे युध्द होते. युध्द म्हणजे कोणते हे ही तुम्हाला ठाऊक आहे. ही
यात्रा नाही पण जणू युध्दच आहे, यामध्ये खुप सावध राहा. ज्ञानामध्ये मायेचे तुफान
वगैरे येत नाही. मुले सांगतात कि, बाबा आम्ही तुमची आठवण करतो, पण मायेचे एकच वादळ
असे येते आणि आम्हाला खाली पाडते. एक नंबरचे वादळ आहे देहअभिमान. त्यानंतर काम,
क्रोध, लोभ, मोह मुले म्हणतात-बाबा, आम्ही खुप प्रयत्न करतो तुमच्या आठवणीत
राहण्याचा, कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून पण तरीही मायेची वादळे येतात. आज क्रोधाचे,
कधी लोभाचे वादळ येते. बाबा, आज आमची अवस्था खूप चांगली होती, दिवसभर कोणतेही वादळ
आले नाही. खूप खुशी दिवसभर होती. बाबांची आठवण खुप प्रेमाने केली. स्नेहाचे अश्रू
डोळ्यांतून आले. बाबांच्या आठवणीने तुम्ही खुप गोड बनणार आहात.
हेही मुले समजतात कि, आम्ही मायेकडून हार खात-खात कुठे येऊन पोहोचलो आहे. हे इतर
कुणाला थोडेच समजते? मनुष्य तर लाखो वर्षे म्हणतात किंवा ही रुढी परंपरा आहे, असे
म्हणतात. तुम्ही म्हणणार कि, आम्ही पुन्हा आता मनुष्यापासून देवता बनत आहोत. हे
ज्ञान बाबाच येऊन देतात. विचित्र पिता हे विचित्र ज्ञान देतात. विचित्र हे निराकार
परमात्म्याला म्हटले जाते. निराकार हे ज्ञान कसे देतात. बाबा स्वत: समजावतात कि, मी
कशाप्रकारे या शरीरात प्रवेश करतो. तरीही मनुष्य गोंधळून जातात. काय, परमात्म या
एकाच शरीरात येतो. पण या नाटकामध्ये हेच शरीर निमित्त बनले आहे. जरा सुध्दा बदल होऊ
शकत नाही. यासर्व गोष्टी तुम्ही समजून घेऊन मग इतरांना समजावता. आत्मा शिकत आहे.
आत्माच शिकते व इतरांना शिकविते. आत्मा अत्यंत मुल्यवान आहे. आत्मा अविनाशी आहे.
फक्त शरीर नष्ट होते. आम्ही आत्मे आपल्या परमपिता परमात्म्याकडून रचता आणि रचनेच्या
तिन्ही काळाचे 84 जन्मांचे ज्ञान घेत आहोत. ज्ञान कोण घेत आहे? आम्ही आत्मा. तुम्ही
आत्म्यानेच ज्ञानाचे सागर परमात्म्यांकडून मुलवतन व सुक्ष्मवतन याबद्दल जाणून घेतले
आहे. लोकांना हे माहित नाही की, आम्हाला स्वत:ला आत्मा समजले पाहिजे. मनुष्य तर
स्वत:ला शरीर समजून उल्टा लटकलेला आहे. गायन आहे आत्मा सत् चित् आनंद स्वरुप आहे.
सर्वांत जास्त महिमा परमात्म्याची आहे. एका पित्याची किती महिमा आहे. तो सुखकर्ता
दु:खकर्ता आहे. दुसऱ्या कोणाची एवढी महिमा करणार नाही की, ते दु:खहर्ता, सुखकर्ता,
ज्ञानाचे सागर आहेत. नाही, ही फक्त बाबांची महिमा आहे. तुम्ही मुले सुध्दा मास्टर
दु:खहर्ता सुखकर्ता आहात. तुम्हा मुलांना सुध्दा हे ज्ञान नव्हते, जसे तुमची बुध्दी
लहान मुलांप्रमाणे होती. छोट्या मुलांमध्ये ज्ञानही नसते, आणि कोणता अवगुणही नसतो,
म्हणून त्याला महात्मा म्हणतात. कारण तो पवित्र आहे. जितके लहान मुल तेवढे ते एक
नंबरचे फुल, जणू कर्मातीत अवस्थाच. कर्म अकर्म-विकर्म हे काहीच जाणत नाहीत म्हणून
त्यांना फुल म्हणतात. लहान मुल सर्वांना आकर्षित करते. जसे एक बाबा सर्वांना
आकर्षित करतात. सर्वांना आकर्षित करुन सुगंधी फुल बनविण्यासाठीच तर बाबा आले आहेत.
काही मुले तर काटेच बनून राहतात. 5 विकारांच्या आधीन जे होतात त्यांना काटे म्हणतात.
एक नंबरचा काय आहे-देहअभिमान, ज्यांमधून इतर अनेक काट्यांचा जन्म होतो. काट्यांच्या
जंगलात खुप दु:ख मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे काटे जंगलात असतात ना, म्हणून दु:खधाम
असे म्हणतात. नविन दुनियेत काटे नाहीत म्हणून त्याला सुखधाम म्हणतात. शिवबाबा
फुलांची बाग बनवितात, रावण काट्यांचे जंगल बनवितो. म्हणून रावणाला काट्यांच्या झाडा
झुडपांनी जाळतात आणि बाबांच्यावर फुले वाहतात. या गोष्टी बाबा व मुले जाणतात, इतर
कुणी जाणत नाही.
तुम्ही मुले जाणता कि, नाटकात एक भुमिका 2 वेळा करु शकत नाही. बुध्दीमध्ये आहे कि,
दुनियेत जी-जी भुमिका केली जाते ती एकमेकांपेक्षा वेगळी आहे. तुम्ही विचार करा
सतयुगापासून आतापर्यंत कसे दिवस बदलत जातात. सर्व व्यवहारच बदलत जातो. 5 हजार
वर्षामध्ये केलेली भुमिका आत्म्यामध्ये भरलेली आहे. ती कधी बदलू शकत नाही. प्रत्येक
आत्म्यामध्ये आपली आपली भुमिका भरलेली आहे. ही साधी गोष्ट ही कुणाच्या बुध्दीत येत
नाही. या नाटकाचा भुतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तुम्ही जाणता. ही एक शाळा आहे
ना. पवित्र बनून बाबांची आठवण कशी करावी हे शिक्षण बाबा शिकवितात. यावर कधी विचार
केला होता कि, बाबा येऊन आम्हाला पतितापासून पावन बनविण्याचे शिक्षण देतील. या
शिक्षणानेच आम्ही विश्वाचे मालक बनू. भक्तीमार्गातील पुस्तके वेगळी आहेत, त्याला कधी
शिक्षण म्हणू शकत नाही. ज्ञानाशिवाय सद्गती कशी होणार? बाबांशिवाय ज्ञान कुठून
मिळणार ज्यामुळे सद्गती होईल. तुम्ही जेव्हा सद्गतीमध्ये असाल तेव्हा भक्ती कराल
काय? नाही तिथे अपार सुख आहे, मग भक्ती कशाला करायची? हे ज्ञान तुम्हाला आताच मिळते.
सर्व ज्ञान आत्म्यामध्ये राहते. आत्म्याचा कोणता धर्म असत नाही. आत्मा जेव्हा शरीर
धारण करते तेव्हा म्हणतात कि, हा या धर्माचा आहे. आत्म्याचा धर्म कोणता? एकतर आत्मा
बिंदीप्रमाणे आहे आणि शांतस्वरुप आहे. शांतीधाममध्ये राहते.
आता बाबा समजावतात कि, बाबांवर सर्व मुलांचा हक्क आहे. अशी खुप मुले आहेत ज्यांनी
धर्मांतर केले आहे. तिथून निघून ते पुन्हा आपल्या खऱ्या धर्मामध्ये येतील.
देवी-देवता धर्म सोडून जे दुसऱ्या धर्मात गेले आहेत ती सर्व पाने (मुले) पुन्हा
आपल्या जागेवर येतील. तुम्हा सर्वांना पहिल्यांदा बाबांचा परिचय दयायचा आहे.
यामध्येच सर्वजण गोंधळून गेले आहेत. तुम्ही मुले समजता कि, आता आम्हाला कोण शिकवित
आहे? बेहदचे पिता, कृष्ण तर देहधारी आहे. यांना (ब्रह्माबाबांना) सुध्दा दादा म्हटले
पाहिजे. तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात ना. त्यानंतर आहे पद, भाऊचे शरीर कसे आहे. बहिणीचे
शरीर कसे आहे. आत्मा तर एक छोटी चांदणी आहे. एवढे सारे ज्ञान एका छोट्या ताऱ्यामध्ये
आहे. तारा शरीराशिवाय बोलू शकत नाही. या ताऱ्याला भुमिका बजाविण्यासाठी इतके सारे
अवयव मिळाले आहेत. तुमची ताऱ्यांची दुनियाच वेगळी आहे. आत्मा येथे येऊन मग शरीर
धारण करते. शरीर हे लहान मोठे असते. आत्माच आपल्या वडिलांची आठवण करते, ती पण
जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत. शांतीधाम घरात आत्मा आपल्या पित्याची आठवण करणार का?
नाही. तिथे काहीच माहित पडत नाही-आम्ही कुठे आहोत? आत्मा आणि परमात्मा जेव्हा दोन्ही
शरीरात आहेत तेव्हा आत्मा आणि परमात्मा यांचा मेळा असे म्हणतात. गायन सुध्दा आहे
आत्मा आणि परमात्म खुप काळ एकमेकांपासून दूर आहेत. किती काळ झाला दूर आहेत? लक्षात
आहे का, किती काळ वेगळे आहोत? सेकंद-सेकंद निघून जात 5 हजार वर्षे झाली. पुन्हा एक
नंबरपासून सुरु करायचे आहे, बरोबर हिशोब आहे. आता तुम्हाला कुणी विचारले यांनी कधी
जन्म घेतला होता? तर तुम्ही बरोबर सांगू शकता. प्रथम नंबरला श्रीकृष्णच जन्म घेतो.
शिवबाबांच्याबद्दल तर काहीच मिनिटे किंवा सेकंद सांगू शकत नाही. कृष्णाबद्दल
तिथी-तारीख, मिनीटे, सेकंद सांगू शकतो. मनुष्यांच्या घड्याळ्यात फरक पडू शकतो.
शिवबाबांच्या अवतरणामध्ये बिल्कुल फरक पडू शकत नाही. बाबा कधी येतात हे कळतच नाही.
असेही नाही, साक्षात्कार होतो तेव्हा येतात. नाही अंदाज करु शकतो, मिनीटे-सेकंदाचा
हिसाब सांगू शकत नाही. त्यांचे अवतरण सुध्दा अलौकिक आहे, बेहदच्या रात्रीच्या वेळीच
येतात. बाकी इतर जी अवतरणे वगैरे होतात, त्यांचे माहित होते. आत्मा शरीरात प्रवेश
करते. सुरुवातीला लहान शरीर धारण करते पुन्हा ते शरीर हळूहळू मोठे होते. शरीरासोबत
आत्मा बाहेर येते. यासर्व गोष्टींचे विचार सागर मंथन करुन पुन्हा इतरांना समजावले
पाहिजे. किती मनुष्य आहेत पण एक दुसऱ्यांसारखा नाही. किती मोठा मंडप आहे. जसे मोठा
हॉल आहे, ज्यामध्ये बेहदचे नाटक सुरु आहे.
तुम्ही मुले येथे येता नरापासून नारायण बनण्यासाठी बाबा नविन सृष्टीची रचना करतात
त्यामध्ये उच्च पद मिळविण्यासाठी. बाकी ही जी जुनी दुनिया आहे, ती विनाश होणार आहे.
बाबांच्याद्वारे नव्या दुनियेची स्थापना होत आहे. बाबांना पुन्हा पालना सुध्दा
करावयाची आहे. हे शरीर सोडल्यानंतर पुन्हा सतयुगात नविन शरीर धारण करुन पालना करतील.
त्याअगोदर या जुन्या दुनियेचा विनाशही होणार आहे. सर्व बाजूला आग लागेल. शेवटी फक्त
भारत राहिल बाकी सर्व समाप्त होईल. भारतात सुध्दा थोडेच राहतील. तुम्ही आता मेहनत
करीत आहात कि, विनाशानंतर सजा खायला लागू नये, म्हणून जर विकर्म विनाश नाही झाले तर
सजा पण खावी लागेल आणि पदही मिळणार नाही. तुम्हाला जेव्हा कुणी विचारते की, तुम्ही
कुणाजवळ जाता? तर सांगा, शिवबाबांजवळ, जे ब्रह्माच्या शरीरात आले आहेत. हे ब्रह्मा
म्हणजे शिव नाही. जेवढे बाबांना जाणून घ्याल तेवढे बाबांसोबत प्रेमही राहिल. बाबा
सांगतात कि, मुलांनो तुम्ही इतर कुणावर प्रेम करु नका. आणि इतरांशी असलेले प्रेम
तोडून एकाशीच प्रेम जोडा. जसे आशिक माशूक प्रेमी असतात ना. येथे पण असे आहे. 108 खरे
आशिक बनतात, त्यामध्येही फक्त खरे-खरे 8 बनतात. 8 ची सुध्दा माळ बनते ना. 9 रत्नांचे
गायन आहे ना. 8 मणी, 9 वे बाबा. मुख्य आहेत 8 देवता, पुन्हा 16108
राजकुमार-कुमारींचे कुटूंब बनते, त्रेतायुगाच्या शेवटपर्यंत, बाबा तर तळहातावर
स्वर्ग दाखवितात. तुम्हा मुलांना नशा आहे कि, आम्ही तर सृष्टीचे मालक बनतो. बाबांशी
हा सौदा करायचा आहे. म्हणतात-एखादा विरळा व्यापारीच हा सौदा करु शकतो. असे व्यापारी
थोडेच आहेत. तर मुलांनो या उमंग-उत्साहात रहा कि, आम्ही बाबांजवळ जात आहोत. वरचे
बाबा. दुनियेला माहित नाही, ते म्हणतात कि, ते तर शेवटी येतात. आता तोच कलियुगाचा
शेवट आहे. तीच गीता, महाभारताची वेळ आहे, तेच यादव जे मुसळाचा शोध लावत आहेत. तेच
कौरवांचे राज्य आहे आणि तुम्ही सुध्दा तेच पांडव आहात. तुम्ही मुले आता घरबसल्या
आपली कमाई करीत आहात. भगवान घरबसल्या आला आहे म्हणून बाबा म्हणतात कि, आपली कमाई करा.
हाच जन्म हिऱ्यासारखा अमूल्य आहे. आता हा जन्म कौडीसाठी हरवू नका. आता तुम्ही
यासर्व दुनियेला रामराज्य बनवित आहात. तुम्हाला शिवाकडून शक्ती मिळत आहे. बाकी
आजकाल काहींचा अचानक मृत्यूसुध्दा होतो. बाबा बुध्दीचे कुलूप काढतात आणि माया
बुध्दीला कुलूप लावून बंद करते. आता तुम्हा मातांनाच हा ज्ञानाचा कलश मिळत आहे.
अबलांना बल देणारा तो आहे. हेच ज्ञान अमृत आहे. शास्त्रांमधील ज्ञानाला अमृत म्हणू
शकत नाही. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. एका
बाबांच्या आकर्षणामध्ये राहून सुगंधी फुल बना. आपल्या गोड पित्याची आठवण करुन
देहअभिमान रुपी काटा जाळून थका.
2. या हिरेतुल्य जन्मामध्ये अविनाशी कमाई जमा करा, कौड्यांसाठी हा जन्म वाया घालवू
नका. एका बाबांशी खरे प्रेम करा, एकाच्या संगात रहा.
वरदान:-
जुन्या
स्वभाव-संस्काराचे ओझे समाप्त करुन डबल लाईट राहणारे फरिश्ता भव
जेव्हा बाबांचे
बनले आहात, तर सर्व ओझे बाबांना दया. जुन्या स्वभाव-संस्काराचे थोडे जरी ओझे राहिले
असेल तर ते ओझे वरुन खाली घेऊन येईल. उडत्या कलेचा अनुभव करु देणार नाही म्हणून
बापदादा म्हणतात सर्व ओझे मला देवून टाका. ही रावणाची प्रॉपर्टी स्वत:जवळ ठेवून
घ्याल तर दु:खच मिळेल. फरिश्ता म्हणजे जरा सुध्दा रावणाची प्रॉपर्टी बाळगू नका.
सर्व जुनी खाती जाळून टाका तर डबल लाईट फरिश्ता म्हणता येईल.
बोधवाक्य:-
निर्भय आणि
हर्षितमुख होऊन बेहदचा खेळ पहा तर हलचलमध्ये येणार नाही.