28-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, शिवबाबा आले आहेत तुमचे सर्व खजाने भरपुर करण्यासाठी, असे म्हणतात कि, भंडारा भरपुर आणि काल कंटक दूर.”

प्रश्न:-
ज्ञानी मुलांच्या बुध्दीत कोणत्या एका गोष्टीबद्दल पक्का निश्चय असेल?

उत्तर:-
त्यांचा दृढ निश्चय असेल की, आमची जी भुमिका आहे ती कधी नष्ट होऊ शकत नाही. आत्म्यामध्ये 84 जन्मांची अविनाशी भुमिका नोंदलेली आहे. हे ज्ञान बुध्दीत असेल तर तो आत्मा ज्ञानवान आहे. नाही तर सर्व ज्ञान बुध्दीतून निघुन जाते.

ओम शांती।
बाबा आत्मिक मुलांच्या बद्दल काय म्हणतात? काय सेवा करतात? यावेळी बाबा ही आत्मिक ज्ञान शिकविण्याची सेवा करतात, हे तुम्ही जाणता. बाबांची पित्याची भूमिका आहे, शिक्षक व गुरुचीही भुमिका आहे. तिन्ही भूमिका बाबा चांगल्या प्रकारे पार पाडतात. तुम्ही जाणता ते पिता आहेत, सद्गती देणारे गुरु सुध्दा आहेत आणि सर्वांसाठी आहेत. लहान, मोठे, वृध्द, तरुण सर्वांसाठी एकच आहेत, परमपिता, परमशिक्षक आहेत. बेहदचे ज्ञान शिकवितात. तुम्ही एखाद्या परिषदेमध्येही सांगू शकता कि, आम्ही सर्वांचे चरित्र जाणतो. परमात्मा शिवबाबांची जीवन कहानी सुध्दा जाणतो. नंबरवार बुध्दीत सर्व लक्षात असले पाहिजे. सर्व विराट रुप जरुर बुध्दीत राहत असेल. आम्ही आता ब्राह्मण बनलो आहोत, पुन्हा आम्ही देवता बनणार, पुन्हा क्षत्रिय, वैश्य, शुद्र बनणार आहोत. हे तर मुलांच्या लक्षात आहे ना. तुम्हा मुलांच्या शिवाय या गोष्टी कुणाच्याही लक्षात नाहीत. चढती व उतरती कला यांचे सर्व रहस्य बुध्दीत असले पाहिजे. आमची प्रगती झाली होती, पुन्हा अधेगती झाली, आता मध्ये आहोत. आता शुद्र पण नाही आणि पुर्ण ब्राह्मण सुध्दा बनलो नाही. जर आता पक्के ब्राह्मण बनलो तर शुद्रांसारखे वागणार नाही. ब्राह्मण सुध्दा कधी कधी शुद्रांसारखे वागतात. हे पण तुम्ही जाणता कि, पापाची सुरुवात कधीपासून झाली? जेव्हा कामचितेवर चढलात तेव्हा. तुमच्या बुध्दीत संपुर्ण चक्र आहे. परमात्मा पिता वर आहे, तुम्ही मुले खाली आहात, या सर्व गोष्टी तुम्हा मुलांच्या बुध्दीत जरुर असल्या पाहिजेत. आता आम्ही ब्राह्मण आहोत, देवता बनणार आहोत, पुन्हा वैश्य आणि शुद्र घराण्यात येणार आहोत, बाबा येऊन आम्हाला शुद्रापासून ब्राह्मण बनवतात व पुन्हा आम्ही ब्राह्मण पासून देवता बनणार आहोत. ब्राह्मण बनून कर्मातीत अवस्था प्राप्त करुन माघारी जाणार आहोत. तुम्ही बाबांनाही जाणता, बाजोली व 84 जन्मांचे चक्रही तुम्ही जाणता. बाजोलीच्या खेळामधून तुम्हाला खुप सोपे करुन समजावतात. तुम्हाला बाबा हलके बनवतात कारण स्वत:ला बिंदू समजून पटकन जाता यावे. विद्यार्थी शाळेत बसलेले असतात तेव्हा त्यांच्या बुध्दीत अभ्यासच असतो. तुम्हाला सुध्दा हे ज्ञान सदैव लक्षात राहिले पाहिजे. आम्ही आता संगमयुगात आहोत, पुन्हा अशाप्रकारे चक्र लावणार आहोत. हे चक्र सदैव बुध्दीत फिरत राहिले पाहिजे. हे चक्राचे वगैरे ज्ञान तुम्हा ब्राह्मणांजवळच आहे, शुद्रांजवळ नाही. देवतांजवळ सुध्दा हे ज्ञान नाही. आता तुम्ही समजता कि, भक्तीमार्गात जी काही चित्रे बनवली आहेत ती सर्व चुकीची आहेत, तुमची चित्रे अगदी बरोबर आहेत कारण तुम्ही आता एकदम संपूर्ण बनत आहात. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे म्हणून भक्ती कशाला म्हणतात हे तुम्हाला कळाले आहे. ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञान देणारा, ज्ञानाचा सागर पिता आता भेटला आहे. शाळेत शिकतो, तर ध्येय लक्षात असते ना! भक्तीमार्गात ध्येय असत नाही. हे थोडेच तुम्हाला माहित होते कि, आम्हीच देवी-देवता होतो. पुन्हा आमची उतरती कला झाली. आता जेव्हा ब्राह्मण बनलो तेव्हा माहित झाले. ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी पुर्वीसुध्दा बनलो होतो. प्रजापिता ब्रह्माचे नाव तर प्रसिध्दच आहे. प्रजापिता तर मनुष्य आहे ना! त्यांची एवढी मुले आहेत तर ती दत्तक मुलेच असतात. किती दत्तक मुले आहेत. आत्मरुपामध्ये तर सर्व भाऊ-भाऊ आहेत. आता तुमची बुध्दी किती दुरचा विचार करते. तुम्ही जाणता कि, वरती ताज्याप्रमाणे आत्मे आहेत, लांबून तारे किती लहान दिसतात. तुम्ही पण किती लहान आत्मा आहात. आत्मा कधी लहान-मोठी असत नाही. हो, तुमचे पद फार उच्च आहे. त्यांना सुध्दा सुर्य देवता, चंद्र देवता म्हणतात. सुर्य पिता किंवा चंद्र आई असे म्हणत नाही. बाकी आत्मे म्हणजे सर्व नक्षत्रांच्या चांदण्या आहेत. तर सर्व आत्मे एकसारखे एकदम लहान आहेत. येथे येऊन कलाकार बनतात. देवता तर तुम्हीच बनता.

आम्ही आता खुप शक्तीशाली बनत आहोत. बाबांच्या आठवणीने आम्ही सतोप्रधान देवता बनतो. नंबरवार थोडा थोडा फरक पडतो. एखादी आत्मा सतोप्रधान देवता बनते, तर एखादी आत्मा संपुर्ण पवित्र बनत नाही. ज्ञान जरासुध्दा जाणत नाही. बाबा सांगतात कि, बाबांचा परिचय तर सर्वांना मिळाला पाहिजे. शेवटी बाबांना तर ओळखणार ना! विनाशाच्या वेळी तर सर्वांना माहित होणारच आहे की, बाबा आले आहेत, आताही काही जण असे म्हणतात कि, ईश्वर जरुर कुठे तरी आलेला आहे परंतू माहित नाही. समजतात कि, तो कोणत्याही रुपात येऊ शकतो. अनेकांची अनेक मते आहेत, तुमचे सर्वांचे एकच ईश्वरीय मत आहे. तुम्ही ईश्वरीय मतानुसार काय बनत आहात? एक आहे मनुष्यमत, दुसरे आहे ईश्वरीय मत व तिसरे आहे देवता मत, देवतांना सुध्दा कुणी मत दिले? बाबांनी. बाबांचे श्रीमत हे श्रेष्ठ बनविणारे मत आहे. श्री श्री बाबांना म्हणू शकतो, मनुष्याला नाही. श्री श्री येऊन श्री बनवितात. देवतांना बाबा श्रेष्ठ बनवितात म्हणून बाबांना श्री श्री म्हणतात. बाबा म्हणतात कि, मी तुम्हाला लायक बनवतो. त्या लोकांना अर्थात भक्तीमार्गातील मनुष्यांनी श्री श्री ही पदवी स्वत:ला लावून घेतली, परिषदेत तुम्ही हे समजावू शकता. समजाऊन सांगण्यासाठी तुम्हीच निमित्त आहात. श्री श्री तर एक शिवबाबाच आहेत. जे आपणास श्रेष्ठ देवता बनवतात. ही तमोप्रधान भ्रष्टाचारी दुनिया आहे. भ्रष्टाचारातून जन्म होतो. कुठे बाबांची पदवी परंतु हे पतित लोक स्वत:लाच ही पदवी लावून घेतात. खरे खरे महात्मे तर हे देवी देवता आहेत ना! सतोप्रधान दुनियेत कुणीही तमोप्रधान मनुष्य असु शकत नाही. रजोमध्ये मनुष्यही रजोगुणी असतात, तमोगुणी नाही. वर्णांचे सुध्दा गायन आहे ना. आता तुम्हाला सर्व ज्ञान समजले आहे, पुर्वी काहीच माहित नव्हते. आता बाबा किती समजदार बनवतात.

तुम्ही किती धनवान बनत आहात. शिवबाबांचा भंडारा भरपुर आहे. शिवबाबांचा भंडारा कोणता आहे? अविनाशी ज्ञान रत्नांचा शिवबाबांचा भंडारा भरपुर व कालकंटक दूर. बाबा तुम्हाला ज्ञानरत्ने देतात. स्वत: सागर आहेत. ज्ञानरत्नांचे सागर आहेत. मुलांनी बुध्दीने बेहदमध्ये राहिले पाहिजे. इतके करोडों आत्मे सर्व स्वत:च्या शरीररुपी सिंहासनावर विराजमान आहेत. हे बेहदेच नाटक आहे. आत्मा या सिंहासनावर विराजमान आहे. शरीर एकासारखे दुसज्याचे नाही. सगळ्यांची गुण वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. हे नैसर्गिक आहे. प्रत्येकाची अविनाशी भुमिका आहे. एवढ्या लहान आत्म्यामध्ये 84 जन्मांची भुमिका भरलेली आहे. एकदम सुक्ष्म आहे. यापेक्षा सुक्ष्म असे आश्चर्य दुसरे कोणते नाही. एवढ्या लहान आत्म्यामध्ये सर्व भुमिका भरलेली आहे, जी आत्मा येथेच आपली भुमिका वठवते. सुक्ष्मवतनमध्ये भुमिका नाही. बाबा किती चांगल्याप्रकारे समजावतात. बाबांकडून तुम्ही सर्वकाही जाणता. हेच ज्ञान आहे. असे नाही कि, सर्वांच्या मनात काय चालले आहे ते जाणतात. हे ज्ञान जाणतात कि, जे ज्ञान तुमच्यामध्येही आता विकसित होत आहे. या ज्ञानानेच तुम्ही एवढे उच्च पद मिळवता. हे पण समजते ना. बाबा बीजरुप आहेत. त्यांच्यामध्ये झाडाच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. मनुष्य म्हणतात, सुष्टीचे आयुष्य लाखों वर्षे आहे. हे काही ज्ञान नाही. आता तुम्हाला संगमयुगावर हे सर्व ज्ञान मिळत आहे. बाबा तुम्हाला आता चक्राचे ज्ञान देत आहेत. याअगोदर तुम्ही काहीच जाणत नव्हता. आता तुम्ही संगमयुगामध्ये आहात. हा तुमचा शेवटचा जन्म आहे. पुरुषार्थ करत करत शेवटी तुम्ही पुर्ण ब्राह्मण बनणार आहात. आता नाही. आता तर चांगली चांगली मुले सुध्दा ब्राह्मण पासून शुद्र बनतात. अर्थात मायेकडून हार खातात. बाबांच्याजवळ असणारे हरतात आणि रावणाकडे निघून जातात. कुठे बाबांची आम्हाला श्रेष्ठ बनवणारी मत तर कुठे रावणाची भ्रष्ट बनवणारी मत. सेकंदामध्ये जीवनमुक्ती. सेकंदामध्ये रावणाकडून पुर्ण दुर्दशा होते. ब्राह्मण मुले चांगल्या प्रकारे जाणतात कि, दुर्दशा कशी होते. आज बाबांचे बनतात तर उदया मायेने पंजा मारला तर रावणाचे बनतात. तुम्ही वाचवायचा प्रयत्न करता तर काहींचा मायेपासून बचाव होतो. एखादा बुडत आहे हे पाहून तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत राहा. किती खिटपिट असते.

बाबा मुलांना समजावतात. येथे तुम्ही शाळेत शिकत आहात ना! हे चक्र आम्ही कसे फिरतो हे तुम्हाला माहित आहे. तुम्हा मुलांना श्रीमत मिळते, असे असे करा. भगवानुवाच तर जरुर आहे. त्याची श्रीमत आहे ना! मी तुम्हा मुलांना आता शुद्रापासून देवता बनवण्यासाठी आलो आहे. आता कलियुगात शुद्र संप्रदाय आहे. कलियुग पुर्ण होत आले आहे, हे तुम्ही जाणता. तुम्ही संगमयुगात आहात. बाबांकडून हे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे. शास्त्रांमध्ये मनुष्य मत आहे. ईश्वर कधीही शास्त्र बनवत नाही. एका गीतेलाच किती नावे दिली आहेत. गांधी गीता, टागोर गीता वगैरे. खुप नावे आहेत. लोक गिता एवढी का वाचतात? समजत तर काहीच नाही. तोच अध्याय घेतात आणि आप-आपला वेगवेगळा अर्थ सांगतात. पण ते सर्व मनुष्याचे बनवलेले आहे ना! तुम्ही म्हणू शकता कि, मनुष्य मतावर बनलेली गीता वाचून आज ही हालत झालेली आहे. गीता हे प्रथम नंबरचा ग्रंथ आहे. ते आहे देवी देवता धर्माचे ग्रंथ हे तुमचे ब्राह्मण कुळ आहे. हा सुध्दा ब्राह्मण धर्म आहे ना! किती धर्म आहेत, ज्यांनी ज्यांनी जो धर्म स्थापन केला, परत त्यांचे नाव रुढ होते. जैनी लोक महावीर म्हणतात, तुम्ही मुले सर्व महावरी महावीरनी आहात. तुमचे मंदिरात यादगार आहे. राजयोग आहे ना! खाली योगतपस्या करीत बसले आहेत व वरती राजाईचे चित्र आहे. राजयोगाचे मंदिर एकदम बरोबर आहे. पण प्रत्येकाने त्याला वेगळे नाव दिले आहे. यादगार मात्र एकदम बरोबर आहे. बुध्दीने चांगले काम करुन यादगार ठीक बनवले आहे पण ज्याला जे वाटते ते त्याने नाव दिले आहे. हे मॉडेल रुपात बनवले आहे, स्वर्ग आणि राजयोग संगमयुगातील बनवले आहेत. तुम्ही आदि-मध्य-अंताला जाणता. सुरुवातही तुम्ही पाहिली आहे. सुरुवात संगमयुगाला म्हणा अथवा सतयुगाला म्हणा. संगमयुगाचे दृश्य खाली दाखवतात आणि राजाई वरती दाखवतात. तर सतयुग सुरुवात आहे आणि द्वापरयुगात सुरु होतो यादगार. एकदम बरोबर आहे. यादगार म्हणून खुप मंदीर बनवली आहेत. येथे सर्व निशाणी आहेत. मंदिरे सुध्दा येथेच बनतात. देवी-देवता अर्थात भारतवासी राज्य करत होते ना. नंतर किती मंदिरे बनवतात. शीख खुप असतील तर ते आपले मंदिर बनवतील. हनुमान, गणेश यांची मंदिरे बनवतील. हे सृष्टीचे चक्र कसे फिरते, स्थापना, पालना, विनाश कसा होतो. हे तुम्हीच जाणता, कलियुगाला अंधाराची रात्र असे म्हणतात. ब्रह्माची रात्र आणि दिवस असे गायन आहे. कारण ब्रह्माच सृष्टीचक्रामध्ये येतो. आता तुम्ही ब्राह्मण आहात पुन्हा देवता बनणार आहात. मुख्य तर ब्रह्मा आहे ना! ब्रह्मा की विष्णू! ब्रह्मा म्हणजे रात्र व विष्णू म्हणजे दिवस. तेच रात्रीतून दिवसामध्ये येतात. दिवसांतून पुन्हा 84 जन्मांनंतर रात्रीमध्ये येतात. किती सोप्यारितीने समजावतात. हे सुध्दा पुर्ण लक्षात राहत नाही. कारण पुर्ण अभ्यास करीत नाहीत त्यामुळे नंबरवार पुरुषार्थाप्रमाणे पद मिळते. जेवढी आठवण कराल तेवढे सतोप्रधान बनाल. सतोप्रधान भारतच पुन्हा तमोप्रधान बनतो. मुलांना किती ज्ञान आहे. या ज्ञानाचे चिंतन करा. हे ज्ञान नविन दुनियेसाठी आहे कि, जे बेहदचे पिताच येऊन देतात. सर्व मनुष्य बेहदच्या पित्याची आठवण करतात. इंग्रज लोकसुध्दा म्हणतात-हे ईश्वरपिता, मुक्तीदाता, मार्गदर्शक याचा अर्थ तर तुमच्या बुध्दीत आहे. बाबा येऊन दु:खाच्या दुनियेतून बाहेर काढतात आणि सुवर्ण युगामध्ये घेऊन जातात. सुवर्णयुग एकेकाळी होऊन गेले आहे म्हणून तर त्याची आठवण करतात ना! तुम्हा मुलांना आतून खुप खुशी झाली पाहिजे आणि दैवी कर्म सुध्दा केले पाहिजे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. बाबांकडून जो अविनाशी ज्ञानरत्नांचा अखूट खजिना मिळत आहे. ते लक्षात घेऊन बुध्दीने बेहदमध्ये जायचे आहे. या बेहदच्या नाटकामध्ये आत्मे कशाप्रकारे आपापल्या सिंहासनावर विराजमान आहेत. हे साक्षी होऊन पाहावयाचे आहे.

2. सदैव लक्षात ठेवा की, आम्ही संगमयुगी ब्राह्मण आहोत-आम्ही बाबांच्या श्रेष्ठ छत् मतावर कधीही जाणार नाही. आमचे कर्तव्य आहे-बुडवणाज्यांनाही वाचवणे.

वरदान:-
सेवाभावना ठेवून, सेवा करत पुढे जाणारे, व इतरांनाही पुढे घेऊन जाणारे निर्विघ्न सेवाधारी भव

सेवाभावना सफलता मिळवून देते, सेवेमध्ये जर अहंकार आला तर त्याला सेवा भावना म्हणता येणार नाही. कोणत्याही सेवेमध्ये जर अहंकार असेल तर मेहनत जास्त, वेळ सुध्दा जास्त लागतो आणि स्वत: ही संतुष्ट राहत नाही. सेवाभावना असलेली मुले स्वत:ही प्रगती करतात आणि दुसज्यांचीही प्रगती करवितात. ते सदैव उडत्या कलेचा अनुभव करतात. त्याचा उमंग-उत्साह स्वत:लाही निर्विघ्न बनवतो आणि दुसज्यांचेही कल्याण होते.

बोधवाक्य:-
ज्ञानी आत्मा तो आहे, जो सुक्ष्म आणि आकर्षण करणाज्या धाग्यांच्या पासूनही मुक्त आहे...!!!