12-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो तुम्हाला आता शिक्षक बनवून सर्वांना मनमनाभव हा वशीकरण मंत्र ऐकायचा आहे, हा तुम्हा मुलांचा धंदा आहे"

प्रश्न:-
बाबा कोणत्या मुलांचे काहीच स्वीकार करत नाहीत?

उत्तर:-
ज्यांना अहंकार आहे मी इतके देतो,मी इतकी मदत करू शकतो,बाबा त्यांचे काहीच स्वीकार करत नाहीत.बाबा म्हणतात माझ्या हातामध्ये चावी आहे,पाहिजे तर मी कुणाला गरीब बनवू शकतो,पाहिजे तर साहूकार,हे पण अविनाश नाटकांमध्ये नोंदलेले आहे.ज्यांना आज आपल्या साहुकारी चा अहंकार आहे,ते उद्या गरीब बनतात आणि गरीब मुलच बाबांच्या कार्यामध्ये आपले थोडे फार पैशे सफल करतात.

ओम शांती।
हे तर आत्मिक मुलं जाणतात की बाबा आम्हाला नवीन दुनियेचा वारसा देण्यासाठी आलेले आहेत.हे तर मुलांना पक्के माहीतआहे की जितकी आम्ही बाबांची आठवण करू तेवढेच पवित्र बनू. जितके आम्ही चांगले शिक्षक बनू तेवढच उच्चपद प्राप्त करू.बाबा तुम्हाला शिक्षकाच्या रूपामध्ये शिकवतात,तुम्ही परत दुसऱ्यांना शिकवायचे आहे. तुम्ही शिकवणारे शिक्षक जरूर बनतात बाकी तुम्ही कोणाचे गुरू बनू शकत नाहीत,फक्त शिक्षक बनू शकतात.सर्वांचे सद्गुरू एकच आहेत,तेच शिक्षक बनून शिकवतात.तुम्ही शिकून सर्वांना मनमनाभव चा रस्ता दाखवत राहतात.बाबांनी तुम्हाला हा धंदा दिला आहे की,माझी आठवण करा आणि परत शिक्षक पण बना.तुम्ही कोणालाही बाबांचा परिचय देतात,तर त्यांचे पण कर्तव्य आहे बाबांची आठवण करणे.शिक्षकाच्या रूपाने सृष्टिचक्र चे ज्ञान द्यावे लागते.बाबांची तर जरूर आठवण करायची आहे.बाबांच्या आठवणी मुळेच पाप नष्ट होतात.मुलं जाणतात आम्ही पाप आत्मा आहोत म्हणून,बाबा सर्व मुलांना म्हणतात,स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा,तर तुमचे पाप नष्ट होतील.बाबाच पतित पावन आहेत ते सांगतात,गोड मुलांनो तुमची आत्मा पतित बनली आहे ज्या मुळे,शरीर पण पतित बनले आहे.तुम्ही अगोदर पवित्र होते,आता तुम्ही अपवित्र बनले आहात.बाबाच पतित पावन आहेत,ते आत्ता पतित पासून पावन होण्याची युक्ती सहज सांगत आहेत.बाबांची आठवण करा तर तुम्ही पवित्र बनाल.चालता-फिरता बाबांची आठवण करा.ते लोक गंगास्नान करतात,तर गंगेची आठवण करत राहतात.समजतात ती पतीत पावनी आहे.गंगेची आठवण केल्यामुळे पावन बनू परंतु बाबा म्हणतात कोणीच अशाप्रकारे पावन बनू शकत नाही.पाणी कसे काय पावन बनवू शकेल? बाबा म्हणतात मीच पतितपावन आहे,मुलांनो देहा सहित देहाचे सर्व धर्म विसरून माझी आठवण करा, तर तुम्ही पावन बणुन परत आपल्या घरी मुक्तिधाम मध्ये पोहोचू शकाल.तुम्ही आपल्या घराला विसरले आहात.बाबांना सर्व कल्प तर कोणीच जाणत नाही.एकाच वेळेस बाबा स्वतःहून आपला परिचय देतात,या मुखाद्वारे.या मुखाची खूप महिमा आहे.गोमुख पण म्हणतात ना.ती तर जनावर आहे, ही मनुष्याची गोष्ट आहे.

तुम्ही जाणतात ही मोठी माता आहे, ज्या माते द्वारे शिवबाबा तुम्हाला दत्तक घेतात.तुम्ही आत्ता बाबा बाबा म्हणू लागले आहात.बाबा म्हणतात आठवणीच्या यात्रे द्वारे तुमचे पाप नष्ट होतील. मुलांना बाबांची आठवण तर येते ना.पित्याचा चेहरा इत्यादी मनामध्ये बसून जातो.तुम्ही मुलं जाणता,जसे आम्ही आत्मा आहोत,तसेच बाबा पण परमात्मा आहेत.शरीराच्या संबंधांमध्ये तर चेहरे वेगवेगळे आहेत,बाकी आत्मा तर एक सारखीच आहे.जसे आम्ही आत्मा तसेच शिव पिता परमात्मा आहेत.तुम्ही मुलं जाणतात बाबा परमधाम मध्ये राहतात आणि आम्ही पण तेथेच राहतो.बाबांच्या आत्म्यामध्ये आणि आमच्या आत्म्या च्या साईज मध्ये काहीच फरक नाही.ते पण बिंदू आहेत,आम्ही पण बिंदू आहोत.हे ज्ञान दुसऱ्या कोणालाही नाही.तुम्हालाच बाबा सांगतात.बाबा साठी पण काय काय म्हणतात,ते सर्वव्यापी आहेत,दगडा मातीमध्ये आहेत.ज्याला जे येईल ते म्हणत राहतात.अविनाशी नाटकाच्या नियोजना नुसार भक्तिमार्ग मध्ये बाबांचे नाव देश काळ सर्वच विसरले आहेत.तुम्ही पण विसरले होते,आत्मा आपल्या पित्याला विसरते.मुलगा पित्याला विसरल्यानंतर तो,बाकी काय जाणू शकेल,म्हणजेच विनाधनी झाले ना.धनीची आठवणच करत नाहीत.धनीच्या कर्तव्याला पण जाणत नाहीत,तसेच स्वतःला पण विसरतात.तुम्ही चांगल्या रीतीने जाणतात,बरोबर आम्ही विसरलो होतो.आम्ही पूर्वी देवी देवता होतो आता तर जनावरां पेक्षा पण खराब झालो आहोत. मुख्य तर स्वतःच्या आत्म्याला विसरलो आहोत,आता याची जाणीव कोण करून देईल कोणत्याही जीवात्म्या ला माहित नाही की आम्ही आत्मा कसे आहोत, कशाप्रकारे आम्ही आमचा अभिनय करतो.आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत,हे ज्ञान दुसऱ्या कोणामध्ये नाही.यावेळेत सर्व सृष्टी तमोप्रधान झाली आहे,ज्ञान काहीच नाही.तुमच्या बुद्धीमध्ये आत्ता ज्ञान आहे.आम्ही आत्मा खूप वर्षापासून बाबांची निंदा करत आलो,निंदा करत करत बाबांपासून दूर गेलो.अविनाशी नाटकाच्या नियोजनानुसार आम्ही शिडी उतरत आलो.मुख्य गोष्ट आहे बाबांची आठवण करणे.बाबा दुसरे कोणतेही कष्ट देत नाहीत.मुलांना फक्त बाबांची आठवण करण्याचेच कष्ट आहेत.पिता कधीच मुलांना कोणते कष्ट देऊ शकत नाहीत.कायदा असा म्हणतो.बाबा म्हणतात मी कोणतेही कष्ट देत नाही.कोणी प्रश्न इत्यादी विचारतात,तर म्हणतात या गोष्टीमध्ये तुम्ही वेळ का वाया घालवता?त्यापेक्षा बाबांची आठवण करा. मी आलो आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी,म्हणून तुम्हा मुलांना आठवणीच्या यात्रे द्वारे पावन बनायचे आहे. मीच पतितपावन आहे.बाबा युक्ती सांगतात कुठे पण जावा,बाबांची जरूर आठवण करा. ८४च्या जन्माचे रहस्य पण बाबांनी समजावले आहे.आता स्वतःला तपासायचे आहे की,आम्ही बाबांची किती आठवण करतो,बस दुसरे कोणतेच विचार करायचे नाहीत.हे तर खूपच सहज आहे.बाबांची आठवण करायची आहे.मुलगा थोडा मोठा होतो तर तो आपोआप वडिलांची आठवण करायला लागतो.तुम्ही पण समजता आम्ही शिव पित्याची मुलं आहोत.आठवण का करावी लागते,कारण आमच्यावरती खूप पाप चढलेले आहे,ते आठवणी द्वारेच नष्ट होतील.एका सेकंदामध्ये जीवन मुक्ती,असे गायन आहे. जीवनमुक्तीचा आधार शिक्षणा वर आहे आणि मुक्तीसाठी आठवणीची यात्रा आहे.जितकी बाबांची आठवण कराल आणि शिक्षणावर ध्यान द्याल तेवढेच उच्चपद मिळेल. धंदा इत्यादी खुशाल करत रहा,बाबा काही मनाई करत नाहीत.धंदा इत्यादी तुम्ही जो पण करता,तो तर दिवस-रात्र आठवणीत राहतो ना.आता बाबा हा आत्मिक धंदा शिकवतात,की मुलांनो स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा आणि ८४ च्या चक्राची आठवण करा.माझी आठवण केल्यामुळेच तुम्ही सर्व सतोप्रधान बनाल. हे पण तुम्ही समजता आत्ता हे जुने शरीर झाले आहे,परत नवीन सतोप्रधान शरीर मिळेल.आपल्या बुद्धीमध्ये ज्ञानाचे रहस्य ठेवायचे आहे,ज्यामुळे खूप फायदा होईल.जसे शाळेमध्ये अनेक विषय असतात.इंग्रजांचे पूर्वी राज्य होते म्हणून इग्रंजी भाषा जास्त चालत आली.आत्ता तर भारतवासी कर्जदार आहेत.जरी कितीही धनवान असले परंतु बुद्धीमध्ये हेच आहे ना की,आमच्या राज्याचे मुख्य आहेत ते कर्जदार झाले आहेत,म्हणजेच आम्ही भारतवासी कर्जदार आहोत.आपण ही जरुर म्हणू आम्ही कर्जदार आहोत. ही पण समज पाहिजे ना.जेव्हा तुम्ही राज्य स्थापन करतात,तुम्ही जाणतात आत्ता आम्ही या सर्व कर्जापासून सुटून पवित्र बनत आहोत,परत अर्धाकल्प आम्ही कोणाकडूनही कर्ज घेणार नाहीत.पतित दुनियाचे मालक कर्जदार आहेत. आता आम्ही पण कर्जदार आहात,पतित दुनियाचे मालक पण आहात.माझा भारत असा आहे गायन करतात ना. तुम्ही मुलं जाणता आम्ही खूप साहुकार होतो राजकुमार राजकुमारी होतो,हे तर आठवणीत राहते ना.आम्ही अशा विश्वाचे मालक होतो,आत्ता खूपच कर्जदार आणि पतित बनले आहोत. हा खेळाचा परिणाम पण बाबत सांगतात,परिणाम काय झाला.तुम्हा मुलांना आठवण आली आहे सतयुगा मध्ये आम्ही खूप साहुकार होतो,तुम्हाला साहुकार कोणी बनवले?बाबा आम्हाला तुम्ही खूप सावकार बनवले होते,एक बाबाच साहुकार बनवणारे आहेत.दुनिया या गोष्टीला जाणत नाही. कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष म्हणल्यामुळे सर्व विसरले आहेत,काहीच जाणत नाहीत.आता तुम्ही सर्व काही जाणले आहे.आम्ही पद्मापदम साहुकार होतो,खूप पवित्र होतो,खूप सुखी होतो.तेथे खोटे, पाप इत्यादी काहीच नव्हते.साऱ्या विश्वा वरती तुम्ही विजय मिळवला होता.बाबा,तुम्ही जे देता ते दुसरे कोणीही देऊ शकत नाही,असे पण गायन आहे.कुणाची ताकत नाही,जेअर्धा कल्प सुख देऊ शकतील.बाबा म्हणतात भक्तिमार्ग मध्ये तुम्हाला खूप सुख,धन दिले होते.किती हिरे जवाहर होते,परत अंतकाळात ते तुमच्या हातामध्ये येतील.आता तर त्या गोष्टी दिसून पण येत नाहीत. तुम्ही फर्क पाहता ना,तुम्हीच पूज्य देवी-देवता होते परत तुम्हीच पुजारी बनले आहात.आम्हीच पुज्य,आम्हीच पुजारी.बाबा काही पुजारी बनत नाहीत परंतु पुजारी दुनिया मध्ये येतात.तर बाबा नेहमीच पूज्य आहेत,ते कधीच पुजारी बनत नाहीत,त्यांचा धंदाच आहे,तुम्हाला पुजारी पासून पूज्य बनवणे.हे रावणाचे काम आहे,तुम्हाला पुजारी बनवणे,हे दुनिया मध्ये कोणालाच माहिती नाही.तुम्ही पण विसरून जातात.रोज रोज बाबा समजवत राहतात.बाबांच्या हातामध्ये आहे,पाहिजे तर ते कोणाला साहुकार बनवतील, पाहिजे तर गरीब बनवतील.बाबा म्हणतात जे साहुकार आहेत त्यांना पण गरीब जरूर बनायचे आहे,त्यांची भूमिका तशीच आहे.असे साहुकार ज्ञानात राहू शकत नाहीत.धनवान व्यक्तीला अहंकार पण खूप असतो ना.अहंकार नष्ट होण्यासाठी,साहुकार जेव्हा देण्यासाठी येतात, तेव्हा बाबा म्हणतात आता आवश्यकता नाही,हे धन तुमच्याजवळ ठेवा,जेव्हा आवश्यकता होईल परत घेऊ. कारण पाहतात,हे काही कामाचे नाहीत.यांना आपला अहंकार खूप आहे.तर हे सर्व बाबांच्या हातामध्ये आहे ना,घेणे किंवा न घेणे. बाबा पैसे घेऊन काय करतील,आवश्यकता नाही. हे तर तुमच्यासाठीच इमारतीत इत्यादी बनवत राहतात,येऊन बाबांना भेटूनच जायचे आहे,नेहमी तर राहयचे नाही ना. पैशाची काय आवश्यकता आहे, काही लष्कर किंवा तोफा इ.तर खरेदी करायच्या नाहीत. तुम्ही विश्वाचे मालक बनतात.आत्ता युद्धाच्या मैदानामध्ये आहात.तुम्ही बाबांच्या आठवणीशिवाय काहीच करत नाहीत.बाबांनी आदेश दिला आहे माझी आठवण करा,तर तुम्हाला खूप शक्ती मिळेल. तुमचा हा धर्म खूपच सुख देणारा आहे.बाबा सर्वशक्तिमान आहेत.तुम्ही त्यांचे बनतात,सर्व आठवणीच्या यात्रे वरती अवलंबून आहे.मधुबन मध्ये किंवा सेवा केंद्रावरती तुम्ही ज्ञान ऐकता तर त्यावर ती विचार सागर मंथन चालायला पाहिजे. जसे गाय चारा खाऊन परत रवंथ करत राहते, मुख चालतच राहते. तुम्हा मुलांना पण,बाबा म्हणतात ज्ञानाच्या गोष्टीवरती खूप विचार सागर मंथन करा. बाबांना आम्ही काय विचारावे बाबा म्हणतात मनामनाभव.ज्याद्वारे तुम्ही सतोप्रधान बनाल,हेच मुख्य लक्ष समोर आहे.

तुम्ही जाणतात सर्वगुणसंपन्न सोळा कला संपूर्ण बनायचे आहे.हे आपोआप मनामध्ये यायला पाहिजे.कोणाची निंदा किंवा पापकर्म इत्यादी व्हायला नको.कोणते ही उलटे कर्म करायचे नाही. देवी-देवता नंबर एक आहेत.पुरुषार्था द्वारे त्यांनी हे पद मिळवले आहे ना,त्यांच्यासाठीच गायन आहे अहिंसा परमो देवी-देवता धर्म.कोणाला मारणे ही पण हिंसक झाली ना.बाबा समजवतात मुलांनो, अंतर्मुखी होऊन स्वतःला पहा आम्ही कसे बनलो आहोत?बाबांची आम्ही किती वेळ आठवण करतो?बाबांशी एवढे मन लागायला पाहिजे जी कधीच त्यांची आठवण विसरायला नको.आता बेहदचे बाबा समजवत आहेत,तुम्ही माझी मुल आहात,तेही अनादी मुलं आहात.ते जे साजन सजनी असतात त्यांची शारीरिक आठवण आहे. जसा साक्षात्कार होतो,परत ते चित्र गायब होते तसेच त्यांची पण आठवण येते.त्यांच्या खुशीमध्ये खात-पीत आठवण करत राहतात.तुमच्या आठवणीच्या यात्रेमध्ये खूपच शक्ती आहे.एक बाबांनाच आठवण करत राहायचे आहे आणि परत आपल्या भविष्याची पण आठवण करायची आहे. विनाशाचा साक्षात्कार पण होईल,पुढे चालून लवकर लवकर विनाशाचे साक्षात्कार होतील,परत तुम्ही म्हणाल आता विनाश होणार आहे,बाबांची आठवण करा.ब्रह्मा बाबांनी सर्व काही सोडून दिले ना.अंत काळात कोणाची आठवण यायला नको. आत्ता तर आम्ही आपल्या राजधानीमध्ये चालले जाऊ.नवीन दुनियेमध्ये जरूर यायचे आहे. योगाद्वारे सर्व पाप भस्म करायचे आहेत.यामध्ये खूप कष्ट आहेत, घडीघडी बाबांची आठवण विसरते कारण ही खूपच सूक्ष्म गोष्ट आहे. सापाचे उदाहरण देतात,भ्रमरीचे पण उदाहरण देतात, ते सर्व या वेळेतील आहेत.भ्रमरी पण कमाल करते ना, तिच्या पेक्षा तुमची कमाल जास्त आहे.बाबा लिहितात ना,ज्ञानाची भू-भू करत रहा.अंतकाळात जागृत होतीलच,जातील कुठे?तुमच्या जवळच येतील,तुमचे नाव प्रसिद्ध होत जाईल.आता तर तुम्ही थोडे आहात ना. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांसाठी बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) ज्ञानाचे खूप विचार सागर मंथन करायचे आहे,जे ऐकले आहे त्याची उजळणी करायची आहे.अंतर्मुखी होऊन पाहयचे आहे,बाबांशी माझे मन इतके लागलेले आहे, जे कधीच विसरू शकत नाही.

(२) कोणताही प्रश्न इत्यादी विचारण्या मध्ये आपला वेळ वाया ना घालवता,बाबांच्या आठवणी द्वारे स्वतःला पावन बनवायचे आहे. अंत काळात बाबांच्या आठवणीशिवाय दूसरा कोणताच विचार यायला नको. हा अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
ज्ञान सूर्य,ज्ञानचंद्रा च्या सोबत,साथी बणुन रात्रीला दिवस बनवणारे आमिक ज्ञानाचे तारे भव.

जसे ते तारे रात्री मध्ये प्रगट होतात,तसेच तुम्ही आत्मिक ज्ञानाचे तारे चमकणारे तारे पण ब्रह्माच्या रात्रीमध्ये प्रगट होतात.ते तारे रात्रीला दिवस बनवू शकत नाहीत.परंतु तुम्ही ज्ञानसूर्य ज्ञान च्ंद्रा सोबत रात्रीला दिवस बनवतात.ते आकाशातील तारे आहेत, तुम्ही धरतीवरील तारे आहात.ते प्रकृतीची सत्ता आहेत,तुम्ही परमात्म तारे आहात.प्रकृतीच्या तारामंडळ मध्ये अनेक प्रकारचे तारे चमकताना दिसतात,असे तुम्ही परमात्म तारामंडळ मध्ये चमकणारे आत्मिक तारे आहात.

बोधवाक्य:-
सेवेची संधी मिळणे अर्थात आशीर्वादाने झोळी भरणे.