16-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आपली बॅटरी चार्ज करण्याचा विचार करा, आपला वेळ परचिंताना मध्ये वाया घालवू नका, स्वतःच्या कष्टाने पुढे जा, नशा चढेल"

प्रश्न:-
ज्ञान एका सेकंड चे असले तरी बाबांना इतक्या विस्तारात आणि एवढ्या सविस्तर पणे का सांगायची आवश्यकता आहे?

उत्तर:-
कारण की ज्ञान दिल्यानंतर मुलांमध्ये सुधारणा झाली की नाही हे पण बाबा पाहतात आणि मग आणखी सुधारण्यासाठी ज्ञान देतात. संपुर्ण बीज आणि झाडाचे ज्ञान देतात, ज्यामुळे त्यांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते. जर एका सेकन्डचे मंत्र देऊन गेले तर त्यांना कोणी ज्ञानाचे सागर म्हनणार नाही.

ओम शांती।
आत्मिक पिता बसुन आत्मिक मुलांना समजवतात. भक्ती मार्गा मध्ये परमपिता परमात्मा शिवला येथेच पुजतात. जरी बुद्धी मध्ये आहे की हे होऊन गेले आहेत. जेथे पण लिंग पाहतात तर त्यांची पुजा करतात. हे तर समजतात शिव परमधाम मध्ये राहतात, होऊन गेले त्यामुळे त्यांचे यादगार बनवून पुजा करतात. ज्या वेळेस आठवण केली जाते त्यावेळेस जरूर बुद्धी मध्ये येते की ते निराकार आहेत. जे परमधाम मध्ये राहतात त्यांना शिव म्हणून पुजतात. मंदिरात जाऊन डोके टेकवतात. त्यांच्यावर दुध, फळ, पाणी इ. वाहतात. परंतु ते तर जड आहेत. जडची भक्ती करतात. आता तुम्ही जाणतात, ते चैतन्य आहेत, त्यांचे राहण्याचे ठिकाण परमधाम आहे. ते लोक जेंव्हा पुजा करतात तेंव्हा बुद्धी मध्ये राहते की परमधाम निवासी आहेत, होऊन गेले आहेत, तेंव्हा हे चित्र बनवले आहेत. त्यांची पुजा केली जाते. ते चित्र काही शिव नाहीत. त्यांची प्रतिमा आहे.तसं तर देवतांना सुद्धा पुजतात. जड चित्र आहे, चैतन्य नाही. परंतु ते चैतन्य होते, ते कोठे गेले, हे समजत नाहीत. जरूर पुनर्जन्म घेऊन खाली आले असतील. आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळत आहे. समजता की जे पण पुज्य देवता होते ते पुनर्जन्म घेत आले आहेत. आत्मा तीच आहे. आत्म्याचे नाव बदलत नाही. बाकी शरिराचे नाव बदलत राहते. ती आत्मा कोणत्या न कोणत्या शरिरात आहे. पुनर्जन्म घ्यायचा तर आहे. तुम्ही पुजता त्यांना, जे पहिले पहिले शरिर वाले होते. (सतयुगी लक्ष्मी नारायण ची पुजा करतात) या वेळी तुमचे विचार चालतात, जे ज्ञान बाबा देतात. तुम्ही समजता ज्या चित्राची पुजा करतात ते पहिल्या नंबरचे आहेत. हे लक्ष्मी नारायण चैतन्य होते. येथेच भारतात होते, आता नाही. मनुष्य हे नाही समजत की ते पुनर्जन्म घेत घेत वेगळे नाव रूप घेत ८४ जन्माचा भुमिका राहतात, हे कोणाच्या विचारात पण येत नाही. सतयुगामध्ये जरूर होते परंतु आता नाहीत. ही पण कोणाला समज येत नाही. आता तुम्ही जाणता, नाटकाच्या नियोजना नुसार परत चैतन्यात जरूर येतील. मनुष्यांच्या बुद्धी मध्ये हे विचार येत नाहीत. बाकी एवढे जरूर समजतात की ते होऊन गेलेत. आता त्यांचे जड चित्र आहेत. परंतु ते चैतन्य कोठे गेले हे कोणाच्या बुद्धीत येत नाही. मनुष्य तर ८४ लाख पुनर्जन्म म्हणतात, हे पण तुम्हा मुलांना समजले आहे की ८४ जन्म घेतात न की ८४ लाख जन्म. आता राम चंद्रांची पुजा करतात, त्यांना हे माहित नाही की राम कोठे गेले. तुम्ही जाणता की श्री राम ची आत्मा जरूर पुनर्जन्म घेत राहते. येथे परिक्षेत नापास झाले, परंतु कोणत्या ना कोणत्या नावा रूपा मध्ये जरूर असेल ना. येथेच पुरुषार्थ करत राहतात. एवढे नाव प्रसिद्ध आहे रामा चे, तर जरूर येतील ना, त्यांना ज्ञान द्यावं लागेल. आता काही माहित पडत नाही तर त्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. या गोष्टीत गेल्याने वेळ वाया जातो, यापेक्षा का नाही वेळेचा सदुपयोग करावा. आपल्या प्रगतीसाठी बॅटरी चार्ज करावी. दुसऱ्या गोष्टीचे चिंतन तर परचिंतन होईल. आतातर स्वचिंतन करायचे आहे. आपण बाबांची आठवण करायची आहे. ते सुद्धा जरूर शिकत असतील. आपली बॅटरी चार्ज करत असतील. परंतु तुम्हाला आपली बॅटरी चार्ज करायची आहे. त्यामुळे म्हण आहे - "अपनी घोट तो नशा चढे".

बाबांनी सांगितले आहे, जेंव्हा तुम्ही सतोप्रधान होते, तेंव्हा तुमचे खुप मोठे पद होते. आता परत पुरुषार्थ करा, मला आठवण करा तर विकर्म विनाश होतील. ध्येय आहे ना, हे चिंतन करत-करत सतोप्रधान बनाल. नारायणाची आठवण केल्याने आम्ही नारायण बनु. अंत काळात जे नारायण सिमरतील (आठवतील)..... तुम्हाला बाबांची आठवण करायची आहे ज्या मुळे पाप नष्ट होतील. नंतर नारायण बनतील. ही नरापासून नारायण बनण्याची सर्वोच्च युक्ती आहे. एकच नारायण तर नाही बनणार ना. ही तर संपुर्ण राजधानी बनते. बाबा सर्वोच्च पुरुषार्थ करवतील. हे आहेच राजयोगाचे ज्ञान, ते पण संपुर्ण विश्वाचे मालक बनायचे आहे. जेवढा पुरुषार्थ कराल, तेवढा जरूर फायदा आहे. एक तर स्वतःला आत्मा निश्चय जरूर करा, कोणी-कोणी लिहितात पण असे, अमुक आत्मा तुम्हाला आठवण करत आहे. आत्मा शरिरा द्वारे लिहिते. आत्म्याचे कनेक्शन (संबंध) आहे शिवबाबा सोबत. मी आत्मा आमुक शरिराच्या नावा रूपात आहे. हे तर जरूर सांगावं लागेल ना. कारण की आत्म्याच्या शरिरावरच वेगवेगळे नावं पडतात. मी आत्मा तुमचा मुलगा आहे, माझ्या आत्म्याच्या शरिराचे नाव अमुक आहे. आत्म्याचे नाव तर कधीच बदलत नाही. मी आत्मा अमुक शरिराची आहे. शरिराचे नाव तर जरूर पाहिजे. नाही तर व्यवहार चालणार नाही. येथे बाबा म्हणतात मी पण या ब्रह्माच्या शरिरात थोड्या वेळेसाठी येतो, यांच्या आत्म्याला सुद्धा समजावतो. मी या शरिरा द्वारे तुम्हाला शिकवण्यासाठी आलो आहे. हे माझं शरिर नाही. मी या मध्ये प्रवेश केला आहे. परत आपल्या घरी निघून जाईन. मी तुम्हां मुलांना हा मंत्र देण्यासाठी आलो आहे. असं नाही की मंत्र देऊन चालले जाऊ नाही, मुलांना पाहावं पण लागत की कुठं पर्यंत सुधारले आहेत. परत सुधरवण्याची शिक्षा देत राहतात. सेकंड चे ज्ञान देऊन गेले तर ज्ञानाचे सागर म्हटले जाऊ शकत नाही. किती काळ झाला तुम्हाला समजवत राहतात. झाडाचे, भक्ती मार्गाच्या सर्व गोष्टी सविस्तर समजवत राहतात. सविस्तर (घाऊक) म्हणजे मनमनाभव. परंतु असं म्हणून निघुन तर जाणार नाही. पालना (सांभाळ) पण करावी लागते. काही मुलं बाबांना आठवण करता करता निघुन जातात. अमुक आत्मा ज्याचे नावं अमुक होतं. खूप चांगला शिकत होता, ही स्मृती (आठवण) तर येईल ना. जुनी जुनी मुलं किती चांगली होती, त्यांना मायेनी गीळून टाकले. सुरुवातीला किती आले. लगेच येऊन बाबांची गोद घेतली भट्टी बनली. या मध्ये सर्वांनी आपलं भाग्य अजमावल. परंतु भाग्य अजमावता-अजमावता मायेनी एकदम उडवून टाकलं. थांबू शकले नाही. परत ५ हजार वर्षांनी असं होईल. किती निघून गेले. अर्ध झाड तर गेलं असेल. जरी झाडाची वाढ झाली आहे परंतु जुने तर निघून गेले, समजू शकतो त्यातील काही परत येऊन जरूर शिकतील. आठवण येईल की आम्ही बाबांकडून शिकत होतो आणि सर्व आजून पर्यंत शिकत आहेत. आम्ही हार खाल्ली. परत मैदानात येतील. बाबा येऊ देतील, परत येऊन पुरुषार्थ करू देत. काही न काही चांगलं पद जरूर मिळेल.

बाबा आठवण करून देतात - गोड गोड मुलांनो मामेकम आठवण करा तर पाप नष्ट होतील. आता कसं आठवण करता, काय हे समजता की बाबा परमधाम मध्ये आहेत? नाही बाबा या रथा मध्ये बसलेले आहेत. या रथाची सर्वांना माहिती होतं जाईल. हा भाग्यशाली रथ आहे. या मध्ये आलेलो आहे. भक्ती मार्गात होते तर त्यांना परमधाम मध्ये आठवण करत होते, परंतु हे जाणत नव्हते की त्यांना आठवण केल्याने काय होईल. आता तुम्हां मुलांना बाबा स्वतः या रथा मध्ये बसुन श्रीमत देतात, त्यामुळे तुम्ही मुलं समजता की बाबा येथे या मृत्यू लोकांमध्ये पुरुषोत्तम संगमयुगा मध्ये आहेत. तुम्हाला माहित आहे की आपल्याला ब्रह्माची आठवण करायची नाही. बाबा म्हणतात की मामेकम आठवण करा. मी या रथा मध्ये येऊन तुम्हां मुलांना ज्ञान देत आहे. स्वतःची पण ओळख करून देतो, मी येथे आहे. आधी तर तुम्ही समजत होते की परमधाम मध्ये राहणारे आहेत. होऊन गेले आहेत, परंतु कधी हे माहित नव्हते. होऊन तर सर्वजण गेले. ज्यांचे पण चित्रं आहेत. आता ते कोठे आहेत, हे कोणाला माहित नाही. जे जातात, ते आपल्यावेळी परत येतात. वेग-वेगळी भुमिका वठवत राहतात. स्वर्गामध्ये तर कोणी जात नाही, बाबांनी सांगितले आहे स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो आणि जुन्या दुनियेचा अंत आणि नविन दुनियेची सुरुवात पण पाहिजे. ज्याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते, हे ज्ञान आता तुम्हाला आहे. मनुष्य काहीच समजत नाहीत. समजतात पण शरिर जळून जाते, बाकी आत्मा निघून जाते. आता कलयुग आहे तर जन्म जरूर कलयुगामध्येच घेणार. सतयुगामध्ये होतो तर जन्म पण सतयुगामध्ये घेत होतो. हे पण जाणता की आत्म्याचा पुर्ण स्टॉक निराकारी दुनियेत आहे. हे तर बुद्धी मध्ये बसले आहे. परत तेथून येतात, येथे शरिर धारण करून जीव आत्मा बनतात. सर्वांना येथे येऊन जीव आत्मा बनायचे आहे. परत नंबरानुसार जायचे आहे. सर्वांना तर घेऊन नाही जाणार, नाही तर प्रलय होईल. ते दाखवता कि प्रलय झाला, परिणाम काहीच दाखवत नाही. तुम्ही तर जाणता हि दुनिया कधीच रिकामी होऊ शकत नाही. गायन आहे ना राम गेले, रावण गेले ज्यांचा खुप परिवार आहे. संपुर्ण दुनियेत रावण संप्रदाय आहे ना. राम संप्रदाय तर खुप थोडा आहे. रामाचा संप्रदाय सतयुग त्रेता मध्ये आहे. खुप फरक असतो. नंतर अजून फांद्या निघत राहतात. आता तुम्ही बीज आणि झाडाला पण जाणले आहे. बाबा सर्व काही जाणतात. तेंव्हा तर सांगत राहतात त्यामुळे त्यांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते. एकच गोष्ट असती तर मग काही ग्रंथ इ. पण बनले नसते. झाडाचा विस्तार पण सांगतात ना. मुळ गोष्ट नंबरएक विषय आहे बाबांना आठवण करायची आहे. या मध्येच कष्ट आहे. यावरच सर्व काही आधारित आहे. बाकी झाडाला तर तुम्ही समजले आहे. दुनिये मध्ये या गोष्टी कोणी समजत नाहीत. तुम्ही सर्व धर्मांची तिथी-तारीख इ. सर्व सांगता. अर्धाकल्पात हे सर्व काही येतात. बाकी आहे सूर्यवंशी आणि चंद्रवंशी. यांच्यासाठी खुप युग आहे असं तर म्हणणार नाही, आहेतच दोन युग. तेथे मनुष्य थोडे आहेत ८४ लाख जन्म तर होऊच शकत नाहीत. मनुष्य समजच्या बाहेर होऊन जातात त्यामुळे बाबा येऊन समज देतात. बाबा जे रचयिता आहेत, तेच रचता आणि रचनेचे आदि-मध्य-अंत चे ज्ञान बसुन देतात. भारतवासी तर काहीच जाणत नाहीत. सर्वांची पुजा करत राहतात. मुस्लिमांना, पारसींना इ. जे येतील त्यांची पुजा करतात. कारण आपला धर्म आणि धर्म स्थापकाला विसरले आहेत. दुसरे तर आपापल्या धर्माला जाणतात. सर्वांना माहित आहे अमुक धर्म केंव्हा आणि कोणी स्थापन केला. बाकी सतयुग त्रेता चा इतिहास-भुगोल कोणाला माहित नाही. चित्र पण पाहतात शिव बाबांचे हे रूप आहे. तेच उंच ते उंच पिता आहेत. तर आठवण सुद्धा त्यांची करायची आहे. येथे सर्वात जास्त पुजा श्रीकृष्णाची करतात, कारण पहिल्या नंबरचे आहेत. प्रेम पण त्यांना करतात, म्हणून गीतेचे भगवान पण त्यांना समजले आहेत. ऐकवणारे पाहिजे तेंव्हा तर त्यांच्या कडून वारसा मिळेल. बाबाच ऐकवतात. नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश करवणारे आजून दुसरे कोणीच होऊ शकत नाहीत, शिवाय एका बाबांचे. ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश, विष्णू द्वारा पालना - हे पण लिहितात, हे या ठिकाणसाठीच आहे. परंतु समज काहीच नाही.

तुम्ही जाणता की ती निराकारी सृष्टी आहे. ही साकारी सृष्टी आहे. सृष्टी तर हीच आहे, येथेच रामराज्य आणि रावणराज्य होते. महिमा सर्व येथील आहे. बाकी सुक्ष्मवतनचा फक्त साक्षात्कार होतो. मूल वतन मध्ये आत्मा राहतात. परत येथे येतात भूमिका वटवण्यासाठी. बाकी सुक्ष्मवतन मध्ये काय आहे, हे चित्र बनवले आहे, ज्या वर बाबा समजवतात. तुम्हां मुलांना असे सुक्ष्मवतनवासी फरिश्ता बनायचे आहे. फरिश्त्याना हाड-मास नसतात. म्हणतात दधिची ऋषींनीं हाडं सुद्धा दिली. बाकी शंकराचे तर कोठे गायन नाही. ब्रह्मा-विष्णूचे मंदिर आहे. शंकराचे काही नाही. म्हणून त्यांना विनाशासाठी निमित्त मानले गेले. बाकी काही असे डोळे उघडल्यानंतर विनाश वगैरे होत नाही. देवता हिंसेचे कार्य कसे करतील, न ते काही करतात, न शिवबाबा अशी आज्ञा देतात. आज्ञा देणाऱ्यावर पण येते ना, म्हणणारेच फसतात. ते तर शिव शंकर एकच आहे असे मानतात. आता बाबा म्हणतात माझी आठवण करा. असं तर नाही म्हणत शिव शंकरला आठवण करा. पतितपावन एकालाच म्हटले जाते. ईश्वर अर्थ सहित बसुन सांगतात. हे कोणीच जाणत नाही. तर हे चित्र पाहून गोंधळून जातात. अर्थ तर जरूर सांगावा लागेल. समजण्यासाठी तर वेळ लागतो. करोडो मधून काही निघतात. मी जो आहे, जसा आहे, करोडो मधून कोणीच मला ओळखू शकतात. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. कोणत्याच गोष्टीच्या चिंतनामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. आपल्या मस्ती मध्ये राहायचे आहे. स्वतःप्रती चिंतन करून आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे.

2. नरा पासून नारायण बनण्यासाठी अंत काळामध्ये एका बाबांच्याच आठवणीत रहायचे आहे. या सर्वोच्च युक्तीला समोर ठेऊन पुरुषार्थ करायचा आहे. मी आत्मा आहे. या शरिराला विसरायचे आहे.

वरदान:-
देहभानापासून वेगळे राहून परमात्म प्रेमाचा अनुभव करणारे कमळ आसनधारी भव.
 

कमळ आसन ब्राह्मण आत्म्यांच्या श्रेष्ठ स्थितीचे प्रतीक आहे. अशी कमळ आसनधारी आत्मे देहभानापासून स्वतः वेगळे राहतात. त्यांना शरिराचे भान आपल्याकडे आकर्षित करत नाही. जसं ब्रह्मा बाबांना चालता-फिरता फरिश्ता रूप आणि देवता रूप नेहमी स्मृती मध्ये राहिले. असं स्वतः देही अभिमानी स्थिती मध्ये सतत राहतील याला देहभानापासून वेगळे म्हणतात. असे देहभानापासून वेगळे राहणारेच परमात्म्याचे स्नेही बनतात.

बोधवाक्य:-
तुमची विशेषता व गुण प्रभु प्रसाद आहे, त्याला माझं मानणेच देह अभिमान आहे...!