24-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा मुलांना दु:खधाम पासून सन्यास करण्यासाठी, हाच आहे
बेहदचा सन्न्यास.”
प्रश्न:-
त्या
सन्याशांचा सन्यास आणि तुमचा सन्यास यात मुख्य अंतर काय आहे?
उत्तर:-
ते सन्यासी घरदार सोडून जंगलात जातात परंतू तुम्ही घरदार सोडून जंगलात जात नाही.
घरात राहून साऱ्या जगाला, काट्याचे जंगल समजता. तुम्ही बुध्दीने साऱ्या जगाचा
सन्यास करता.
ओम शांती।
आत्मिक पिता बसून आत्मिक मुलांना रोज रोज समजावतात, कारण अर्धाकल्पाचे बेसमज आहेत
ना. तर रोज रोज समजावे लागते. प्रथम तर मनुष्याला शांती पाहिजे. आत्मे मुळ राहणारे
आहेत शांतीधामचे. बाप तर आहेतच सदैव शांतीचे सागर. आता तुम्ही शांतीचा वारसा
प्राप्त करत आहात. म्हणतात ना शांती देवा. म्हणजे आम्हाला या सृष्टीतून आपल्या घरी
शांतीधामला घेऊन जावा, म्हणजे शांतीचा वारसा दया. देवतांच्या समोर, किंवा शिवबाबा
समोर जावून म्हणतात कि, शांती दया, कारण शिवबाबा आहेत शांतीचे सागर. आता तुम्ही
शिवबाबाकडून शांतीचा वारसा घेत आहात. बाबाची आठवण करुन करुन तुम्हाला शांतीधामला
जायचे आहे जरुर. आठवण नाही केली तरी पण जायचे आहे जरुर. आठवण यासाठी करावयाची आहे
कि, पापांचे ओझे जे डोक्यावर आहे, ते नष्ट होऊन जाईल. शांती आणि सुख मिळते एक
बाबांकडून, कारण ते सुख आणि शांतीचे सागर आहेत. गोष्टच मुख्य आहे. शांतीला मुक्ती
पण म्हटले जाते, आणि नंतर जीवनमुक्ती आणि जीवनबंध पण आहे. आता तुम्ही जीवनबंध पासून
जीवनमुक्त बनत आहात. सतयुगामध्ये कोणते बंधन नसते. गायन पण करतात कि सहज जीवनमुक्ती
किंवा सहज गती-सद्गती. आता दोन्हीचा अर्थ तुम्हा मुलांनी जाणला आहे. गती म्हटले जाते
शांतीधामला, सद्गती म्हटले जाते सुखधामला. सुखधाम, शांतीधाम मग हे आहे दु:खधाम.
तुम्ही येथे बसले आहात, बाबा म्हणतात कि, मुलांनो. शांतीधाम घराची आठवण करा.
आत्म्यांनी आपले घर विसरले आहे. बाबा येऊन आठवण देत आहेत. समजावतात कि, आत्मिक
मुलांनो, तुम्ही घरी जावू शकत नाही, जोपर्यंत माझी आठवण करणार नाही. आठवणीने तुमचे
पाप नष्ट होईल. आत्मा पवित्र बनून मग आपले घरी जाईल. तुम्ही मुले जाणता कि, ही
अपवित्र दुनिया आहे. एक पण पवित्र मनुष्य नाही. पवित्र दुनियेला सतयुग, अपवित्र
दुनियेला कलियुग म्हटले जाते. राम राज्य आणि रावणराज्य. रावण राज्यात अपवित्र दुनिया
स्थापन होत आहे. हा पुर्वपार बनलेला खेळ आहे ना. हे बेहदचे पिता समजावत आहेत,
त्यांनाच सत्य म्हटले जाते. सत्य गोष्टी तुम्ही संगमयुगावरच ऐकत आहात, मग तुम्ही
सतयुगामध्ये जाता. द्वापरपासून रावण राज्य सुरु होत आहे. रावण म्हणजे असुर, असुर कधी
सत्य बोलत नाहीत, त्यामुळे याला म्हटले जाते खोटी माया, खोटी काया. आत्मा पण खोटी
तर शरीर पण खोटे. आत्म्यामध्ये संस्कार भरतात ना. 4 धातू आहेत ना. सोने चांदी, तांबे,
लोखंड---सर्व मिसळ निघून जाते. बाकी खरे सोने तुम्ही बनता या योगबळाने. तुम्ही
जेव्हा सतयुगामध्ये असता तर खरे सोनेच असतात. नंतर चांदी पडते तर चंद्रवंशी म्हटले
जाते, नंतर तांबे, लोखंडाची मिसळ होते, द्वापर-कलियुगामध्ये. मग योगाद्वारे
तुमच्यात जी चांदी, तांबे, लोखंडाची मिसळ पडली आहे, ती निघते. प्रथम तर तुम्ही सर्व
आत्मे शांतीधाममध्ये असता, मग सतयुगामध्ये येता, तर त्याला म्हटले जाते सोन्याची
दुनिया. तुम्ही खरे सोने असता. योगबळाने सारी भेळ मिसळ निघाल्याने बाकीखरे सोने
राहते. शांतीधामला सोन्याची दुनिया म्हटले जात नाही. सोन्याची दुनिया, चांदीची
दुनिया, तांब्याची दुनिया येथे म्हटले जाते. शांतीधाम मध्ये तर शांती आहे. आत्मा
जेव्हा शरीर घेते तेव्हा सोनेरी दुनिया म्हटले जाते, मग सृष्टीच सोन्याची दुनिया
बनते. सतोप्रधान 5 तत्त्वापासून शरीर बनते. आत्मा सतोप्रधान आहे तर शरीर पण
सतोप्रधान आहे. मग शेवटी आले नंतर लोखंडासारखे शरीर मिळते कारण आत्म्यामध्ये मिसळ
होते. तर सोन्याची दुनिया, चांदीची दुनिया या सृष्टीला म्हटले जाते.
तर आता मुलांना काय करायचे आहे? प्रथम शांतीधाम जायचे आहे, त्यासाठी बाबाची आठवण
करावयाची आहे, तेव्हाच तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल. यात वेळ तेवढी लागते, जेवढी
वेळ बाबा येथे राहतात. ते सोन्याचे दुनियेत भुमिका करतच नाहीत. तर आत्म्याला जेव्हा
शरीर मिळते तेव्हा म्हटले जाते कि हे सोन्याचे दुनियेतील जीव आत्मा आहे. असे म्हणत
नाहीत कि, सोन्यासारखी आत्मा. नाही, सोन्यासारखी जीवात्मा मग चांदीसारखी जीवआत्मा
होते. तर येथे तुम्ही बसले आहात, तुम्हाला शांती पण आहे तर सुख पण मिळत आहे. तर काय
केले पाहिजे? दु:खधाम पासून सन्यास. याला म्हटले जाते बेहदचा सन्यास. त्या सन्याशाचा
आहे हदचा सन्यास, घरदार सोडून जंगलात जातात. त्यांना हे माहित नाही कि सारी सृष्टीच
जंगल आहे. हे काट्याचे जंगल आहे. ही आहे काट्याची दुनिया, ती आहे फुलाची दुनिया. ते
जरी सन्यास घेतात परंतू तरी पण काट्याचे दुनियेत, जंगलात शहरापासून दूर दूर जावून
राहतात. त्यांचा आहे निवृत्ती मार्ग, तुमचा आहे प्रवृत्ती मार्ग तुम्ही पवित्र जोडी
होता, आता अपवित्र बनले आहात. त्याला गृहस्थ आश्रम पण म्हटले जाते. सन्यासी तर
येतात नंतर. इस्लामी, बौध्दी पण नंतर येतात. ख्रिश्चनांच्या थोडे अगोदर येतात. तर
या झाडाची पण आठवण करावयाची आहे, चक्र पण आठवण करायचे आहे. बाबा कल्प कल्प येऊन
कल्प वृक्षाचे सारे ज्ञान देत आहेत, कारण स्वत: बीजरुप आहेत, सत्य आहेत, चैतन्य
आहेत, त्यामुळे कल्प कल्प येऊन कल्प वृक्षाचे सारे रहस्य सांगत आहेत. तुम्ही आत्मा
आहात, परंतू तुम्हाला ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, शांतीचा सागर म्हटले जात नाही.
ही महिमा एकाच बाबाची आहे जे तुम्हाला असे बनवित आहेत. बाबाची ही महिमा नेहमीसाठी
आहे. सदैव ते पवित्र आहेत आणि निराकार आहेत. फक्त थोड्या काळासाठी येतात पावन
बनविण्यासाठी, सर्वव्यापीची तर गोष्टच नाही. तुम्ही जाणता कि, बाबा सदैव तेथेच
राहतात. भक्तीमार्गात नेहमी त्यांची आठवण करतात. सतयुगामध्ये तर आठवण करण्याची
आवयकताच नसते. रावणराज्यात तुमचे ओरडणे सुरु होते, तेच येऊन सुख शांती देतात. तर मग
जरुर अशांतीमध्ये त्यांची आठवण येते. बाबा सांगतात कि, दर 5 हजार वर्षानंतर मी येतो.
आर्धाकल्प आहे सुख, अर्धाकल्प आहे दु:ख. अर्धा कल्पानंतरच रावण राज्य सुरु होते.
यात पहिला नंबर मुळ आहे देहअभिमान. त्यानंतरच मग इतर विकार येतात. आता बाबा
समजावतात कि स्वत:ला आत्मा समजा, आत्म अभिमानी बना. आत्म्याचीच ओळख पाहिजे. मनुष्य
तर फक्त म्हणतात कि, भृकुटीच्या मध्ये चमकत आहे. आता तुम्ही समजता कि, ती अकालमुर्त
आहे. त्या अकालमुर्त आत्म्याचे हे तख्त, शरीर आहे. आत्मा बसते पण भृकुटीमध्ये.
अकालमुर्तचे हे तख्त आहे. सर्व चैतन्य अकाल तख्त आहेत. ते अकाल तख्त नाही जे
अमृतसरमध्ये लाकडाचे बनविले आहे. बाबाने समजावले आहे जे पण मनुष्य मात्र आहेत,
सर्वांचे आप-आपले अकाल तख्त आहे. आत्मा येऊन येथे विराजमान होते. सतयुग असो, किंवा
कलियुग असो, आत्म्याचे हे तख्त आहे, हे मनुष्य शरीर. तर किती अकालतख्त आहेत. जे पण
मनुष्य मात्र आहेत अकाल आत्म्यांचे तख्त आहेत. आत्मा एक तख्त सोडुन झटक्यात दुसरे
घेते. अगोदर लहान तख्त असते मग मोठे होते. हे शरीररुपी तख्त लहान मोठे होते, ते
लाकडाचे तख्त ज्याला शिख लोक अकालतख्त म्हणतात, ते तर लहान मोठे होत नाही. हे कोणाला
पण माहित नाही कि सर्व मनुष्य मात्राचे अकाल तख्त हे भृकुटी आहे. आत्मा अकाल आहे,
कधी विनाश होत नाही. आत्म्याला वेगवेगळे तख्त मिळतात. सतयुगामध्ये तुम्हाला फार
फर्स्टक्लास तख्त मिळते, त्याला म्हटले जाते सोनेरी तख्त, नंतर आत्म्याला चांदीचे,
तांब्याचे, लोखंडासारखे तख्त मिळते. नंतर सोनेरी तख्त पाहिजे असेल तर जरुर पवित्र
राहिले पाहिजे, त्यासाठी बाबा म्हणतात कि, माझी आठवण कराल, तर तुमच्यातील मिसळ
निघून जाईल. मग तुम्हाला हे दैवी तख्त मिळेल. या गोष्टी दुनियेतील मनुष्य जाणत
नाहीत. देहअभिमानात आले, नंतर एक दोघाला दु:ख देत राहतात, त्यामुळे याला दु:खधाम
म्हटले जाते. आता बाबा मुलांना सांगतात कि, शांतीधामची आठवण करा. जे तुमचे मुळ
निवास स्थान आहे. सुखधामची आठवण करा, याला विसरत जावा. यापासून वैराग्य. असे पण नाही
कि संन्याशासारखे घरदार सोडावयाचे आहे. बाबा सांगतात कि ते एका गोष्टीने चांगले आहे,
दुसरे गोष्टीने वाईट आहे. तुमचे तर चांगलेच आहे. त्यांचा हठयोग चांगला पण आहे, वाईट
पण आहे कारण देवता जेव्हा वाममार्गात जातात, तर भारताला प्रगती करण्यासाठी पवित्रता
जरुर पाहिजे. तर त्यात मदत करतात. भारतच अविनाशी खंड आहे. बाबाचे पण येणे येथे होते.
तर जेथे बेहद बाबाच येतात, ते सर्वांत मोठे तीर्थ आहे. सर्वांची सद्गती बाबाच येऊन
करतात, त्यामुळे भारतच उंच तो उंच देश आहे.
मुळ गोष्ट बाबा सजावतात कि, मुलांनो, आठवणीच्या यात्रेत राहा. गीतेमध्ये पण मनमनाभव
अक्षर आहे, परंतु बाबा काही संस्कृत मध्ये सांगत नाहीत. बाबा मनमनाभवचा अर्थ
सांगतात. देहाचे सर्व धर्म सोडून स्वत:ला आत्मा निश्चय करा. आत्मा अविनाशी आहे ती
कधी लहान मोठी होत नाही. अनादी-अविनाशी भुमिका भरलेली आहे. नाटक बनलेले आहे.
अंतकाळात जे पण आत्मे येतात त्यांची थोडी भुमिका आहे. उर्वरीत वेळेत शांतीधाममध्ये
राहतात. स्वर्गात तर येऊ शकत नाहीत. शेवटी येणारे येथेच थोडे सुख, येथेच थोडे दु:ख
प्राप्त करतात. जसे दिवाळीमध्ये डास, पुष्कळ निघतात, सकाळी उठल्यावर पाहतो तर सर्व
डास मेलेले तर मनुष्यांचे पण शेवटी येणाऱ्याची काय किंमत राहते. जसे जनावरासारखे
आहेत. तर बाबा सांगतात कि, हे सृष्टी चक्र कसे फिरत आहे. मनुष्य सृष्टी रुपी झाड
लहानापासून मोठे, मोठ्या पासून लहान कसे बनते. सतयुगात किती थोडे मनुष्य, कलियुगात
किती वाढ होऊन झाड मोठे बनते. मुख्य गोष्टीत बाबांनी इशारा दिला आहे, गृहस्थ
व्यवहारामध्ये राहून माझी एकाची आठवण करा. 8 तास आठवणीत राहण्याचा अभ्यास करा. आठवण
करुन करुन शेवटी पवित्र बनून बाबाजवळ जाल, तर स्कॉलरशीप पण मिळेल. पाप जर राहले तर
मग दुसरा जन्म घ्यावा लागेल. सजा भोगून मग पद पण कमी होऊन जाईल. कर्मभोग तर सर्वांना
चुक्तू करावयाचा आहे. जे पण मनुष्य मात्र आहेत, आता पर्यंत जन्म घेत राहतात. यावेळी
पाहतो, भारतवासी पेक्षा ख्रिश्चनांची संख्या जादा आहे. ते तर समजदार आहेत. भारतवासी
जे 100 टक्के समजदार होते, ते आता परत बेसमज बनले आहेत, कारण तेच 100 टक्के सुख
प्राप्त करतात, मग 100 टक्के दु:ख पण प्राप्त करतात. ते तर येतातच शेवटी.
बाबांनी सांगितले आहे, क्रिश्चनाची राजधानी आणि कृष्णाची राजधानीचा संबंध आहे,
क्रिश्चनांनी राज्य घेतले, मग क्रिश्चनाच्या राजधानी कडून राज्य मिळणार आहे. यावेळी
ख्रिश्चनाचा जोर आहे. त्यांना भारताकडूनच मदत मिळते. आता भारत भुख मरत आहे, परत तेच
सेवा करतात. येथून फार धन, हिरे जवाहरात इ. तेथे घेऊन गेले. फारच धनवान बनले, तर आता
परत धन देत आहेत. त्यांना मिळणार तर नाही. तर आता तुम्हा मुलांना कोण ओळखत नाही. जर
ओळखले असते तर येऊन मत घेतले असते. तुम्ही आहात ईश्वरीय संप्रदाय जे ईश्वरी मतावर
चालतात. तेच मग ईश्वरीय संप्रदायापासून दैवी संप्रदाय बनतील. मग क्षत्रिय, वैश्य,
शुद्र संप्रदाय बनतील. आता आम्ही ब्राह्मण आहोत, मग आम्ही ते देवता, आम्हीच ते
क्षत्रिय---आम्ही तेच चा अर्थ पहा किती चांगला आहे. हा बाजोलीचा खेळ आहे ज्याला
समजणे फार सोपे आहे. परंतू माया विसरवते, दैवी गुणातून आसुरी गुणात घेऊन जाते.
अपवित्र बनणे आसुरी गुण आहे ना. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. स्कॉलरशीप
घेण्यासाठी गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमीत कमी 8 तास बाबाची आठवण करण्याचा अभ्यास
करावयाचा आहे. आठवणीच्या अभ्यासानेच पाप नष्ट होतील आणि कंचन शरीर मिळेल.
2. या दु:खधाम पासून बेहदचे वैराग्य घेऊन, आपले मुळ निवासस्थान शांतीधाम आणि
सुखधामाची आठवण करावयाची आहे. देहअभिमानात येऊन कोणाला दु:ख दयायचे नाही.
वरदान:-
आत्मिक
साजनच्या आकर्षणामध्ये आकर्षित होऊन कष्टापासून मुक्त होणारे सजनी भव
साजन आपल्या
विसरलेल्या सजनीला पाहुन खुश होत आहेत. आत्मिक आकर्षणात आकर्षित होऊन आपल्या खऱ्या
साजनला ओळखले आहे, प्राप्त केले आहे, खऱ्या ठिकाणावर पोहचले आहात. जेव्हा अशा साजनी
आत्म्ये या प्रेमाच्या रेषेच्या आत पोहचतात, त्यामुळे अनेक प्रकारच्या कष्टापासून
मुक्त होतात, कारण येथे ज्ञान सागराच्या स्नेहाच्या लाटा, शक्तीच्या
लाटा---नेहमीसाठी ताजेतवाने करतात. हे मनोरंजनाचे विशेष स्थान, भेटण्याचे स्थान
तुम्हा सजनीला साजन ने बनविले आहे.
बोधवाक्य:-
एकांतवासी
बनण्याबरोबर एकनामी आणि एकानामी वाले बना..!