21-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, तुमचे हे शिक्षण मिळकतीचे साधन आहे, या शिक्षणामुळे तुमची 21 जन्माच्या
कमाईची व्यवस्था होऊन जाते”
प्रश्न:-
मुक्तीधाम ला
जाणे कमाई आहे कि नुकसान आहे?
उत्तर:-
भक्तासाठी ही
पण कमाई आहे कारण अर्धाकल्पापासून शांती शांती मागत आले आहेत. फार मेहनत घेऊन पण
शांती मिळाली नाही. आता बाबाद्वारे शांती मिळत आहे म्हणजे मुक्तीधाम जात आहेत, तर
ही पण अर्धाकल्पाच्या मेहनतीचे फळ मिळते, त्यामुळे याला पण फायदा म्हणावे, नुकसान
नाही. तुम्ही मुले तर जीवनमुक्तीमध्ये जाण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुमच्या
बुध्दीमध्ये आता साऱ्या जगाच्या इतिहास-भुगोलाचे ज्ञान आले आहे.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना, आत्मिक पिता समजावत आहेत की, आत्माच सर्व काही समजत आहे.
यावेळी तुम्हा मुलांना आत्मिक जगात घेऊन जात आहेत. त्याला म्हटले जाते आत्मिक दैवी
दुनिया, याला म्हटले जाते शरीराची दुनिया, मनुष्याची दुनिया. मुले समजतात की, दैवी
दुनिया होती, ती दैवी मनुष्याची पवित्र दुनिया होती. आता मनुष्य अपवित्र आहेत,
त्यामुळे एकच धर्म होता विराट रुपामध्ये झाडावरच समजावयाचे आहे. या झाडाचे बीजरुपवर
आहे. झाडाचे बीज आहेत बाबा, मग जसे बीज तसे फळ म्हणजे पाने निघतात. हे पण आश्चर्य
आहे ना. किती लहान वस्तू किती फळ देत आहे. किती त्यांचे रुप बदलत जात आहे. या
मनुष्य सृष्टी रुपी झाडाला कोणी जाणत नाही, याला म्हटले जाते कल्पवृक्ष, याचे फक्त
गीते मध्येच वर्णन आहे. सर्व जाणतात की, गीताच नंबरएकचे धर्म शास्त्र आहे. शास्त्र
पण नंबरवार तर आहेत ना. कशी नंबरवार धर्माची स्थापना होत आहे, हे पण फक्त तुम्हीच
समजत आहात, आणखीन कोणामध्ये पण हे ज्ञान असत नाही. तुमच्या बुध्दीमध्ये आहे प्रथम
कोणत्या धर्माचे झाड होते, मग त्यात इतर धर्माची वाढ कशी होत आहे, मुख्य गोष्ट ही
आहे. देवी देवतांचे झाड आता नाही, आणी इतर सर्व फांद्या आहेत. बाकी आदि सनातन देवी
देवता धर्माचा पाया नाही. हे पण गायन आहे-एका आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना
करत आहेत, बाकी इतर सर्व धर्म विनाश होत आहेत. आता तुम्ही जाणता कि, किती लहान दैवी
झाड असेल. मग इतर सर्व एवढे धर्म असतच नाहीत. झाड प्रथम लहान असते मग मोठे होत जाते.
वाढत वाढत आता किती मोठे झाले आहे. आता याचे आयुष्य पुर्ण होत आहे, याद्वारे वडाचे
झाडाचे उदाहरण फार चांगले समजावत आहेत. हे पण गीतेचे ज्ञान आहे जे बाबा समोर बसून
समजावत आहेत, ज्याद्वारे तुम्ही राजांचा राजा बनत आहात. मग भक्तीमार्गात हे गीता
शास्त्र इ. बनतात. हे पुर्वपार बनलेले नाटक आहे. नंतर पण असेच होईल. नंतर जे जे
धर्म स्थापन होतील त्यांचे स्वत:चे शास्त्र होतील. शिख धर्माचे आपले शास्त्र,
ख्रिश्चन आणि बौध्दांचे आप-आपले शास्त्र असेल. आता तुमच्या बुध्दीत साऱ्या जगाचा
इतिहास भुगोल नाचत आहे. बुध्दीज्ञानाचे नृत्य करत आहे. तुम्ही साऱ्या झाडाला ओळखले
आहे. कस कसे धर्म येतात, कसे वाढीला प्राप्त करतात. मग आपला एक धर्म स्थापन होतो,
बाकीचे नष्ट होऊन जातील. गातात पण कि, ज्ञान सुर्य प्रगटाण… आता बिल्कुल अज्ञान
अंधार आहे. किती जास्त माणसे आहेत, मग इतके सर्व असणारच नाहीत. या लक्ष्मी-नारायणाचे
राज्यात हे असत नाहीत. मग एक धर्म स्थापन होणारच आहे. हे ज्ञान बाबाच येऊन देत आहेत.
तुम्ही मुले कमाई साठी किती ज्ञान येऊन शिकत आहात. बाबा शिक्षक बनून आले आहेत,
त्यामुळे अर्धाकल्पांच्या कमाईची व्यवस्था झाली आहे. तुम्ही फार धनवान बनत आहात.
तुम्ही जाणता कि आता आम्ही शिकत आहोत. हे आहे अविनाशी ज्ञान रत्नाचे शिक्षण, भक्तीला
अविनाशी ज्ञान रत्न म्हणत नाहीत. भक्तीमध्ये मनुष्य जे काही शिकतात, त्याद्वारे
नुकसारच होत आहे. रत्न बनत नाहीत. ज्ञान रत्नांचे सागर एका बाबांलाच म्हटले जाते.
बाकी ती आहे भक्ती. त्यामध्ये काही पण मुख्य लक्ष्य नाही. फायदा नाही. कमाईसाठी तर
शाळेत शिकत आहात. नंतर भक्ती करण्यासाठी गुरु जवळ जातात. कोणी तरुणपणी गुरु करतात,
कोणी म्हातारपणी गुरु करतात. कोणी लहानपणीच सन्यास घेतात. कुंभच्या मेळ्यात किती
जास्त येतात. सतयुगामध्ये असे काही असत नाही. तुम्हा मुलांच्या बुध्दीमध्ये सर्व
गोष्टी आल्या आहेत. रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला तुम्ही जाणले आहे. त्यांनी
तर कल्पाचे आयुष्यच मोठे केले आहे. ईश्वराला सर्वव्यापी म्हटले आहे. ज्ञानाचा
पत्ताच नाही. बाबा येऊन अज्ञान निद्रेतून जागवत आहेत. आता तुम्हाला ज्ञानाची धारणा
होत आहे. बॅटरी भरत आहे. ज्ञानामुळे कमाई आहे, भक्तीमध्ये घाटा आहे. वेळेनुसार
जेव्हा घाट्याची वेळ पुर्ण होते, तर मग बाबा कमाई करण्यासाठी येतात. मुक्तीमध्ये
जाणे ही पण कमाई आहे. शांती तर सर्व मागत आहेत. शांती देवा म्हटल्याने बुध्दी
बाबांकडे जाते. म्हणतात, विश्वात शांती असावी, परंतू ती कशी होईल, हे कोणाला माहित
नाही. शांतीधाम, सुखधाम वेगळे आहेत, हे पण जाणत नाहीत. जो प्रथम नंबरमध्ये आहेत,
त्यांना पण काही माहित नव्हते. आता तुम्हाला सारे ज्ञान आहे. तुम्ही जाणता कि, आम्ही
या कर्मक्षेत्र वर कर्माचे नाटक करत आहोत. कोठून आले आहोत? ब्रह्मालाकातून निराकारी
दुनियेतून आले आहेत, या साकारी दुनियेमध्ये भुमिका करण्यासाठी. आम्ही आत्मे दुसऱ्या
ठिकाणी राहणारे आहोत. येथे हे 5 तत्त्वाचे शरीर राहते. शरीर आहे तरच आम्ही बोलू शकतो.
आम्ही चैतन्य अभिनेते आहोत. आता तुम्ही असे म्हणणार नाही कि, या नाटकाच्या
आदि-मध्य-अंताला आम्ही जाणत नाही. पुर्वी जाणत नव्हतो. आपल्या पित्याला, आपल्या
घराला, यथार्थ रुपाला जाणत नव्हतो. आता जाणतो कि, आत्मा कशी भुमिका करत आहे, स्मृती
येते, पुर्वी स्मृती नव्हती.
तुम्ही जाणता कि, सत्य पिताच सत्य सांगत आहेत. ज्याद्वारे आम्ही सत्यखंडाचे मालक
बनतो. सत्यावर पण सुखमनी मध्ये आहे. सत्य म्हटले जाते सचखंडाला. देवता सर्व खरे
बोलणारे असतात. सत्य शिकविणारे आहेत बाबा. त्यांची महिमा पाहा किती आहे. गायन केलेली
महिमा तुमच्या कामी येते. शिवबाबांची महिमा करत आहेत. तेच झाडाच्या आदि मध्य अंताला
जाणत आहेत. सत्य बाबा सांगत आहेत, त्यामुळे तुम्ही मुले सत्यवादी बनत आहेत. सत्य
खंड पण बनत आहे. भारत सत्यखंड होता. नंबर एकचे उंच ते उंच तीर्थ पण हवा आहे, कारण
सर्वांची सद्गती करणारे बाबा भारतामध्येच येत आहेत. एका धर्माची स्थापना होत आहे,
बाकी सर्वांचा विनाश होत आहे. बाबांनी समजावले आहे, सुक्ष्मवतनमध्ये काही नाही. हे
सर्व साक्षात्कार होत आहेत. भक्तीमार्गामध्ये पण साक्षात्कार होतात. साक्षात्कार
झाले नसते तर एवढी मंदीरे कशी बनली असते, पुजा का होते. साक्षात्कार करतात, भासना
होते हे चैतन्य होते. बाबा समजावतात कि, भक्तीमार्गात जी काही मंदीरे इ. बनतात जे
तुम्ही एवढे पाहिले आहे, ते सर्व पुर्नावृत्त होईल. चक्र फिरतच राहते. ज्ञान आणि
भक्तीचा खेळ बनला आहे. नेहमी म्हणतात ज्ञान भक्ती वैराग्य. परंतू पवित्र तर काही
बनत नाहीत, बाबा बसून सांगत आहेत, ज्ञान आहे दिवस. भक्ती आहे रात्र. वैराग्य आहे
रात्रीचे, मग दिवस होत आहे. भक्तीमध्ये आहे दु:ख, त्यामुळे त्यांचे वैराग्य. सुखाचे
तर वैराग्य म्हणत नाहीत. सन्यास इ. पण दु:खाच्या कारणामुळे घेतात. समझतात कि
पवित्रेमध्ये सुख आहे. त्यामुळे स्त्रीचा त्याग करुन निघुन जातात. आजकाल तर धनवान
पण बनले आहेत, कारण संपत्ती शिवाय तर सुख मिळत नाही. माया वार करुन जंगलातून मग
शहरात घेऊन येते. विवेकानंद आणि रामकृष्ण पण दोन मोठे सन्यासी होऊन गेले आहेत.
सन्यासाची ताकद रामकृष्णामध्ये होती. बाकी भक्तीचे समजावणे, करणे, ते विवेकानंदाचे
होते. दोघांची पुस्तके आहेत. पुस्तक जेव्हा लिहतात तर एकाग्रचित होऊन बसुन लिहतात.
रामकृष्ण जेव्हा आपले आत्मचरित्र लिहत होते, तर शिष्याला पण सांगितले, तु दूर जावून
बस. फार तीव्र कठोर सन्यासी होते, नाव पण मोठे आहे. बाबा असे म्हणत नाहीत की,
स्त्रीला आई म्हणा-आईची महिमा केली आहे. हा ज्ञानाचा रस्ता आहे, वैराग्याची गोष्ट
दुसरी आहे. वैराग्यामध्ये येऊन बायकोला आई समजले. रस्ता आहे, वैराग्याची गोष्ट दुसरी
आहे. वैराग्यामध्ये येऊन बायकोला आई समजले. माता अक्षरामुळे विकारी दृष्टी होत नाही.
बहिणीमध्ये पण विकारी दृष्टी जावू शकते, मातामध्ये कधी वाईट विचार जात नाही.
पित्याची मुलीमध्ये पण विकारी दृष्टी जावू शकते, मातेमध्ये कधी जाणार नाही. सन्यासी
स्त्रीला माता समजू लागला. त्यांचे साठी असे नाही म्हणतात की, दुनिया कशी चालेल,
जन्म कसे होतील? ते तर एकाला वैराग्य आले, माता म्हटले. त्यांची महिमा पाहा किती आहे.
येथे बहिण भाऊ म्हणून सुध्दा अनेकांची दृष्टी जाते, त्यामुळे बाबा म्हणतात की, भाऊ
भाऊ समजा. ही आहे ज्ञानाची गोष्ट. ती आहे एकाची गोष्ट, येथे तर प्रजापिता ब्रह्माची
मुले अनेक भाऊ बहिण आहेत ना. बाबा सर्व गोष्टी समजावत आहेत. हे ब्रह्माबाबा पण
शास्त्र इ. वाचलेले आहेत. तो धर्मच वेगळा आहे, निवृत्ती मार्गाचा, फक्त पुरुषासाठी
आहे. तो आहे हदचा वैराग्य, तुम्हाला तर साऱ्या बेहदच्या दुनियेपासून वैराग्य आहे.
संगमयुगावरच बाबा येऊन तुम्हाला बेहदच्या गोष्टी समजावत आहेत. आता या जुन्या
दुनियेपासून वैराग्य आले पाहिजे. ही फार पतित छी-छी दुनिया आहे. येथे शरीर पावन असत
नाही. आत्म्याला नविन शरीर सतयुगामध्येच मिळू शकते. जरी येथे आत्मा पवित्र बनते,
परंतू शरीर तरी पण अपवित्रच राहते, जो पर्यंत कर्मातीत अवस्था होईल. सोन्यामध्ये
भेसळ होते, तर अलंकार पण भेसळीचाच बनतो. भेसळ निघुन जाईल, तर अलंकार पण खरा बनेल.
या लक्ष्मी नारायणाची आत्मा आणि शरीर दोन्ही सतोप्रधान आहेत. तुमची आत्मा आणि शरीर
दोन्ही तमोप्रधान काळे आहेत. आत्मा काम चितेवर बसून काळी झाली आहे. बाबा म्हणतात
कि, मग आम्ही येऊन सावळ्यापासून गोरा बनतो. ही ज्ञानाची सारी गोष्ट आहे. बाकी
पाण्याची गोष्ट नाही. सर्व काम चितेवर बसून पतित बनले आहेत, त्यामुळे राखी बांधली
जाते, पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करावी.
बाबा म्हणतात कि, मी आत्म्याबरोबर बोलतो. मी आत्म्यांचा पिता आहे, ज्यांची तुम्ही
आठवण करत आले आहात-बाबा या, आम्हाला सुखधामला घेऊन जावा. दु:ख हरा, कलियुगामध्ये
आहेत, अपार दु:ख बाबा समजावतात, तुम्ही काम चितेवर बसून काळे तमोप्रधान झाले आहात.
आता मी आलो आहे, काम चितेवरुन उतरवून ज्ञान चितेवर बसविण्यासाठी. आता पवित्र बनून
स्वर्गात जावयाचे आहे. बाबाची ओठवण करावयाची आहे. बाबा आकर्षित करतात. बाबा जवळ
जोडपे येतात, एकाला आकर्षण होते, दुसऱ्याला होत नाही. पुरुषाने झटक्यात म्हटले,
आम्ही या अंतिम जन्मामध्ये पवित्र राहू, काम चितेवर चढणार नाही. असे नाही कि,
निश्चय झाला होतो. जर निश्चय झाला असता तर बेहदच्या बाबाला पत्र लिहले असते,
संबंधात राहिले असते. ऐकले आहे पवित्र राहतात, आपल्या धंद्यात मस्त राहतात. बाबाची
आठवणच कोठे आहे. अशा बाबांची तर फार आठवण केली पाहिजे. स्त्री-पुरुषाचे आपसात किती
प्रेम असते, पतिची किती आठवण करते. बेहदच्या बाबाची तर सर्वांत जास्त आठवण केली
पाहिजे. गायन पण आहे ना. प्रेम करा वा ठोकर मारा, आम्ही कधी हात सोडणार नाही. असे
नाही येथे येवून राहायचे आहे, तो तर मग सन्यास झाला. घरदार सोडून येथे येऊन राहिले.
तुम्हाला तर म्हटले जाते, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र बना. येथे प्रथम तर
भट्टी बनली होती, ज्यामुळे ऐवढे तयार होऊन निघाले, त्याचा पण फार चांगला वृत्तांत
आहे. जे बाबाचे बनून यज्ञात राहून ईश्वरीय सेवा करत नाहीत ते जावून दास दासी बनतात,
मग शेवटी नंबरवार पुरुषार्थानुसार मुकुट मिळतो. त्यांचे पण घराणे आहे. प्रजेमध्ये
येत नाहीत. कोणी बाहेरचा येऊन आतला बनत नाही. वल्लभचारी बाहेरच्यांना कधी आत येऊन
देत नाहीत. यासर्व समजण्याच्या गोष्टी आहेत. ज्ञान आहे सेकंदाचे, मग बाबाला ज्ञानाचे
सागर का म्हटले जात आहे? समजावत राहतात, शेवटापर्यंत समजावतच राहतील. जेव्हा राजधानी
स्थापन होईल, तुम्ही कर्मातीत अवस्थेत याल, मग ज्ञान पुर्ण होईल. आहे सेकंदाची
गोष्ट. परंतू तरी पण समजावले जाते. हदच्या पित्याकडून हदचा वारसा, बेहदचे पिता
विश्वाचे मालक बनवितात. तुम्ही सुखधामला जाल, तर बाकीचे सर्व शांतीधामला जातील. तेथे
आहेच सुखच सुख. ही तर खात्री आहे-बाबा आले आहेत. आम्ही नविन दुनियाचे मालक बनत
आहोत-राजयोगाचे अभ्यासाने. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. या पतित छी
छी दुनियेपासून बेहदचे वैराग्य घेऊन, आत्म्याला पावन बनविण्याचा पुर्णपणे पुरुषार्थ
करावयाचा आहे. एका बाबाचे आकर्षणात राहायचे आहे.
2. ज्ञानाच्या धारणेने
आपली बॅटरी भरावयाची आहे. ज्ञान रत्नांनी स्वत:ला धनवान बनवायचे आहे. आता कमाईची
वेळ आहे त्यामुळे नुकसानीपासून वाचायचे आहे.
वरदान:-
बाबा आणि
वरदाता या डबल संबंधातून डबल प्राप्ती करणारे नेहमी शक्तीशाली आत्मा भव
सर्व शक्ती बाबांचा
वारसा आणि वरदाताचे वरदान आहे. बाबा आणि वरदाता या डबल संबंधाने प्रत्येक मुलांना
ही श्रेष्ठ प्राप्ती जन्मापासूनच होत आहे. जन्मापासूनच बाबा बालक ते सर्व शक्तीचे
मालक बनवितात. त्या बरोबर वरदाताचे नात्याने जन्मताच मास्टर सर्वशक्तीवान बनवून
“सर्वशक्ती भव” चे वरदान देत आहेत. तर एकाद्वारे हे डबल अधिकार मिळाल्याने नेहमी
शक्तीशाली बनून जात आहात.
बोधवाक्य:-
शरीर आणि
शरीराबरोबर जुने स्वभाव, संस्कार आणि कमजोरी पासून वेगळे होणेच अशरीरी बनणे होय..!