14-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांनो, देही अभिमानी बणुन सेवा करा तर प्रत्येक पाऊला मध्ये सफलता मिळत
राहील"
प्रश्न:-
कोणत्या
आठवणीमध्ये रहा तर देह- अभिमान येणार नाही?
उत्तर:-
नेहमी आठवण ठेवा की आम्ही ईश्वरीय सेवक आहोत,सेवाधारी ना कधीच देह -अभिमान येऊ शकत
नाही. जितके बाबांच्या आठवणीमध्ये राहाल, तेवढा देहाभिमान नष्ट होऊन जाईल.
प्रश्न:-
देह अभिमानी
ला अविनाशी नाटका नुसार कोणता दंड मिळतो?
उत्तर:-
त्यांच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान बसत नाही. साहुकार लोकांमध्ये धनामुळे अभिमान
यतो,त्यामुळे हे ज्ञान ते समजू शकत नाहीत,हा पण दंड मिळतो.गरीब मुलं सहज ज्ञान
समजतात.
ओम शांती।
आत्मिक पिता ब्रह्मा द्वारे मत देत आहेत.आठवण करा तर तुम्ही लक्ष्मीनारायण सारखे
बनाल,सतोप्रधान बनून आपल्या स्वर्गा मध्ये प्रवेश कराल. हे फक्त तुम्हालाच म्हणत
नाहीत परंतु हा आवाज तर संपूर्ण भारतामध्येच नाहीतर परदेशामध्ये सुद्धा
जाईल.अनेकांना साक्षात्कार होत राहतील.कोणाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे,हे पण
बुद्धी द्वारे काम घ्यायला पाहिजे.बाबा साक्षात्कार करून म्हणतात राजकुमार बनायचे
असेल तर तुम्ही ब्रह्मा किंवा ब्राह्मणांच्या जवळ जावा.युरोपवासी पण या ज्ञानाला
समजू इच्छितात.भारत स्वर्ग होता तर कोणाचे राज्य होते, हे पूर्ण रीतीने कोणी जाणत
नाहीत.भारतच स्वर्ग होता.आता तुम्ही,सर्वांना समजवत आहात,हा सहज राजयोग
आहे,ज्याद्वारे भारत स्वर्ग किंवा हेवन बनतो.परदेशी मुलांची बुद्धी काही प्रमाणात
चांगली आहे,ते लगेच ज्ञान समजतात.तर आत्ता सेवाधारी मुलांना काय करायला
पाहिजे,त्यांनाच बाबा सूचना देतात.मुलांनी प्राचीन राजयोग शिकवयाचा आहे.तुमच्याजवळ
संग्रहालय,प्रदर्शनी इत्यादी मध्ये खूप येतात,आपले मत लिहितात हे चांगले कार्य करत
आहेत,परंतु स्वतः समजत नाहीत.थोडं फार समजल तर परत येतात.तरी गरीब आपले चांगले
भाग्य बनवतात आणि समजण्यासाठी पुरुषार्थ करतात. साहुकारांना तर पुरुषार्थ करायचा
नाही, कारण देहाभिमान खूप आहे.तर अविनाश नाटका नुसार जसे बाबांनी त्यांना दंड दिला
आहे,तरीही त्यांच्याद्वारे आवाज करावा लागतो.परदेशी लोक तर हे ज्ञान समजू
इच्छितात.ज्ञान ऐकुन खूप खुश होतील.सरकारी अधिकाऱ्यांना ज्ञान समजवण्या साठी खूपच
कष्ट करतात परंतु त्यांना वेळ नाही. त्यांना जरी घरी बसून साक्षात्कार झाला तरी
त्यांच्या बुद्धीमध्ये येणार नाही.तर बाबा मुलांना सुचना देतात,सर्वांचे मत
घेऊन,एकत्र करून त्यांचे एक पुस्तक बनवायला पाहिजे.मत देऊ शकतात पहा,सर्वांना हे
ज्ञान किती चांगले वाटते.परदेशी किंवा भारतवासी पण सहज राजयोगा बाबत माहिती करून
घेऊ इच्छितात.स्वर्गाच्या देवी-देवतांना जी राजाई सहजयोगा द्वारे भारताला मिळाली
होती.तर हे संग्रहालय,प्रदर्शनी गव्हर्नमेंट हाऊस मध्ये लावायला पाहिजे.जिथे संमेलन
इत्यादी होत राहतात,असे विचार मुलांमध्ये चालायला पाहिजेत.आत्ता वेळ लागेल,इतक्या
लवकर नरम बुद्धी होत नाही. गोदरेज चे कुलुप बुद्धीला लागलेले आहे.जेव्हा तुम्ही
प्रसिद्ध व्हाल तर क्रांती होईल,होय, जरूर होणार आहे. बोला गव्हर्नमेंट हाऊस मध्ये
संग्रहालय प्रदर्शनी केले तर खूप परदेशी लोक येऊन पाहतील.विजय तर मुलांचा जरूर
होणार आहे.तर विचार चालायला पाहिजेत,देही अभिमानीलाच असे विचार येतील, सेवे साठी
काय करायला पाहिजे,बिचार्यांना माहिती होईल आणि बाबा पासून वारसा घेतील. आम्ही पण
म्हणतो, बिगर काही कवडी खर्च करता तुम्ही देवी देवता बनू शकता...तर जे चांगले चांगले
मुलं येतात ,ते मत देतात. उपपंतप्रधान उद्घाटन करण्यासाठी येतात,परत
पंतप्रधान,राष्ट्रपती पण येतील कारण त्यांनाही जाऊन सांगायचे आहे,हे तर आश्चर्यकारक
ज्ञान आहे.खरी शांती तर अशा प्रकारे स्थापना होत आहे,हे बुद्धीला पटते.हे ज्ञान
बुद्धीला पटण्यासारखे आहे,आज नाही पटले तर उद्या पटेल. बाबा म्हणतात मोठमोठ्या
मनुष्या जवळ जावा,पुढे चालून ते पण,हे ज्ञान समजतील. मनुष्याची बुद्धी तमोप्रधान आहे
म्हणून उलटे काम करत राहतात.दिवसें दिवस आणखी तमोप्रधान बनत जाते.
तुम्ही समजवण्यासाठी प्रयत्न करतात की, हा विकारी धंदा बंद करा आणि आपली प्रगती करा.
बाबा आले आहेत पवित्र देवता बनवण्यासाठी. शेवटी तो दिवस पण येईल गव्हर्नमेंट हाऊस
मध्ये संग्रहालय होईल.तुम्ही म्हणा खर्च तर आम्ही करतो, शासन कधी पैसे देणार
नाही.तुम्ही मुलं म्हणा,आमच्या खर्चा द्वारे प्रत्येक गव्हर्मेंट हाऊसमध्ये हे
संग्रहालय लावू शकतो.एका मोठ्या गव्हर्मेंट हाऊस मध्ये,असे संग्रहालय लावले तर परत
सर्व ठिकाणी होऊन जाईल.समजून सांगण्या साठी पण हुशार मुलं पाहिजेत.तुम्ही त्यांना
म्हणा, वेळ फिक्स करा,जे कोणीही येऊन ज्ञान घेईल. बिगर कवडी खर्च,जीवन बनवण्याचा
रस्ता आम्ही सांगत आहोत.ते पुढे चालून होऊन जाईल.परंतु बाबा मुलां द्वारेच
सांगतात.चांगली चांगली मुलं आहेत,जे स्वतःला महावीर समजतात त्यांनाच माया पकडते,खूप
मोठे लक्ष आहे,खूप खबरदारी ठेवायची आहे.मायची बॉक्सिंग कमी नाही. मोठ्यात मोठी
बॉक्सिंग आहे रावणाला जिंकण्या साठी हे युद्धाचे मैदान आहे.थोडा पण देहाचा अभिमान
यायला नको.सेवा करतो,हे करतो, इ. आम्ही तर ईश्वरीय सेवक आहोत, आम्हाला संदेश द्यायचा
आहे, यामध्ये गुप्त कष्ट आहेत.तुम्ही ज्ञान आणि योगाद्वारे स्वतःला समजावत राहतात.
यामध्ये गुप्त राहून विचार सागर मंथन कराल, तेव्हाच नशा चढेल.
असे प्रेमाने समजावयाचे आहे, बाबांचा वारसा प्रत्येक भारतवासींना मिळतो.५००० वर्षा
पूर्वी लक्ष्मीनारायणाची राज्य होते,आता तर वेशालय म्हणले जाते,सतयुग शिवालय आहे.ते
शिवबाबांनी स्थापन केले आहे आणि या कलियुगाची स्थापना रावण करतात.रात्रंदिवसा चा
फरक आहे.मुलांना पण जाणीव होते,बाबा आपल्या सारखे बनवतात. देही अभिमानी बनणे हीच
मुख्य गोष्ट आहे.देही अभिमानी बणुन विचार करायला पाहिजे, पंतप्रधानांना जाऊन
समजावयचे आहे,त्यांना दृष्टी दिली तर साक्षात्कार होऊ शकतो.तुम्ही दृष्टी देऊ
शकतात.देही अभिमानी होऊन राहिले,तर तुमच्या बॅटरीमध्ये शक्ती भरत जाईल.देही अभिमानी
होऊन बसला,स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केली,तर बॅटरी मध्ये शक्ती भरेल.गरीब
लगेच आपली बॅटरी भरू शकतात कारण बाबांची खुप आठवण करतात.जरी ज्ञान चांगले आहे,योग
कमी आहे,तर बॅटरी भरू शकत नाही.कारण देहाचा अहंकार खूप राहतो,योग काहीच नाही,
म्हणून ज्ञान बाणा मध्ये शक्ती भरत नाही.तलवारी ला पण धार असते,एकच तलवार दहा रुपये,
तशीच तलवार पन्नास रुपयाला पण असते. गुरुगोविंद सिंगच्या तलवारीचे गायन आहे.यामध्ये
हिंसेची गोष्ट नाही,देवता तर डबल हिंसक आहेत. आज भारत असा आहे,उद्या असा बनेल.तर
मुलांना खूपच खुशी होयला पाहिजे.काल आम्ही रावण राज्यामध्ये होतो, तर नाकामध्ये दम
केला होता.आज आम्ही परमपिता परमात्मा च्या सोबत आहोत.आता तुम्ही ईश्वरीय परिवाराचे
आहात. सतयुगा मध्ये तुम्ही दैवी परिवारचे असणार आहात.स्वयं भगवान आम्हाला शिकवत
आहेत. आम्हाला त्यांच्याकडून खूप स्नेह मिळत आहे. अर्धाकल्प रावणाचा स्नेह
मिळाल्यामुळे माकडासारखे बनलो आहोत.आत्ता बेहद च्या पित्याकडून प्रेम
मिळाल्यामुळे,तुम्ही देवता बनतात.५००० वर्षाची गोष्ट आहे,त्यांनी लाखो वर्षे म्हणले
आहे.हे ब्रह्मा पण तुमच्यासारखे पुजारी होते,सर्वात शेवटी कल्पवृक्षा मध्ये उभे
आहेत. सतयुगा मध्ये तुम्हाला खूप धन दिलं होतं,परत मंदिर इत्यादी बनवले.मंदिरा मध्ये
पण खूप धन होते,ज्यांना येऊन अनेकांनी लुटले.मंदिर तर दुसरे पण असतील,प्रजेचे पण
मंदिर असतील.प्रजा तर आणखीनच साहुकार असते,प्रजेकडून राजे लोक कधी कर्ज पण घेतात.ही
खूपच खराब दुनिया आहे,सर्वात खराब शहर कलकत्ता आहे.याला परिवर्तन करण्यासाठी तुम्हा
मुलांना खूप कष्ट घ्यायचे आहेत.जे करतील त्यांना मिळेल.अभिमान आला आणि हे
विकारांमध्ये गेले.मनामनाभव चा अर्थ पण समजत नाहीत,फक्त श्लोक कंठ करतात. ज्ञान
त्यांच्यामध्ये होऊ शकत नाही,शिवाय तुम्हा ब्राह्मणांच्या,कोणते मठ पंत वाले देवता
बनू शकत नाहीत. प्रजापिता ब्रह्माकुमार कुमारी,ब्राह्मण बनल्याशिवाय,देवता कसे बनवू
शकतील.जे कल्पा पूर्वी बनले होते,तेच बनतील,वेळ लागतो.झाड मोठे झाले तर परत वृद्धी
होत जाते.मुंग्याच्या गती पासून विमाना सारखी गती होईल.बाबा समजतात गोड मुलांनो
बाबांची आठवण करा आणि स्वदर्शन चक्र फिरवा.तुमच्या बुद्धीमध्ये 84 जन्माचे चक्र आहे,
तुम्ही ब्राह्मणच परत देवता आणि क्षत्रिय घराण्याचे बनतात.सूर्यवंशी चंद्रवंशी चा
पण अर्थ कोणी समजत नाहीत.कष्ट घेऊन समजावले जाते,तरी समजत नाहीत.तर समजले जाते आणखी
वेळ आलेली नाही.तरीही येत राहतात,ब्रह्माकुमारींचे नाव प्रसिद्ध आहे असे समजुन,सेवा
केंद्रावरती येतात आणि म्हणतात,चांगली सेवा करत आहात. हे तर मनुष्यमात्राचे चरित्र
सुधारत आहेत.देवतांचे चरित्र पहा कसे आहे,संपूर्ण निर्विकारी,सोळा कला
संपूर्ण,संपूर्ण निर्विकारी.बाबा म्हणतात कामविकार शत्रू आहे.या ५ भूता मुळे तुमचे
चरित्र बिघडलेले आहे.ज्या वेळेस तुम्ही समजवतात,त्यावेळेस चांगले म्हणतात, बाहेर
गेल्यानंतर सर्व काही विसरतात.तेव्हा म्हणतात कितीही शृंगार केला..
इत्यादी. हे काय बाबा निंदा करत नाहीत,समजवत राहतात. दैवी चलन ठेवा,क्रोधा मध्ये
येऊन का भुंकतात. स्वर्गामध्ये तर क्रोध नसतो.बाबा समजवत होते तर कधीच रागवत नव्हते.
बाबा सर्व सहज करून समजवत राहतात.हे अविनाशी नाटक, कायद्यानुसार चालत राहते,या
नाटकांमध्ये कोणती चूक नाही,अनादी अविनाश नाटक बनलेले आहे,जे चालतच राहते.जे कार्य
आता चालते, ते परत पाच हजार वर्षानंतर पण चालेल.काहीजण म्हणतात हे डोंगर वगैरे नष्ट
झाले,तर परत कसे बनतील. तुम्ही नाटक पाहता इमारती, इत्यादी नष्ट झाल्या परत नाटकाची
पुनरावृत्ती होते, तर त्या इमारती पण पाहतात ना. या नाटकाची पण हुबेहुब पुनरावृत्ती
होत राहते.समजून घेण्यासाठी पण बुद्धी पाहिजे,कोणाच्या बुद्धीमध्ये बसणे खूपच कठीण
आहे. विश्वाचा इतिहास भूगोल आहे ना.रामराज्या मध्ये या देवी-देवतांचे राज्य
होते.बाबानी समजले आहे, तुम्हीच पूज्य आणि तुम्हीच पुजारी बनतात,याचा अर्थ पण
मुलांना समजावला आहे .आम्हीच देवता परत क्षत्रिय इत्यादी ही बाजोली आहे ना,त्याला
चांगल्या रीतीने समजायचे आहे, आणि त्यासाठी प्रयत्न पण करायचे आहेत.बाबा असे म्हणत
नाहीत की, तुम्ही धंदा इत्यादी करू नका, नाही,फक्त सतोप्रधान बनवायचे आहे. इतिहास
भूगोलाचे रहस्य समजून,तुम्ही दुसऱ्यांना पण सांगा.मुख्य गोष्ट आहे स्वतःला आत्मा
समजून बाबांची आठवण करा तर सतोप्रधान बनाल.
आठवणी ची यात्रा नंबर एक आहे.बाबा म्हणतात मी सर्व मुलांना सोबत घेऊन जाईल.सतयुगा
मध्ये खूप थोडे मनुष्य आहेत,कलियुगामध्ये तर खुप मनुष्य आहेत.कोण सर्वांना परत घेऊन
जाईल, इतक्या सर्व जंगलाची स्वच्छता कोणी करेल? बागवान,नावाडी तर बाबांनाच
म्हणतात.तेच दुःखापासून सोडवुन सुखाच्या किनार्याला घेऊन जातात.हा अभ्यास फारच गोड
वाटतो,कारण ज्ञानच कमाईचे साधन आहे.तुम्हाला तर कुबेरचा खजाना मिळाला आहे.भक्ती
मध्ये काहीच मिळत नाही.येथे पाया पडण्याची पण गोष्ट नाही.ते तर गुरुं च्या पुढे
साष्टांग दंडवत घालतात,त्याच्या पासून पण बाबा सोडवतात.तर आशा पित्याची आठवण करायला
पाहिजे.ते आमचे पिता आहेत,हे तर समजले आहे ना.बाबा पासून वारसा जरूर घ्यायचा आहे,ती
खुशी राहते.काही जण लिहितात,आम्ही साहुकाराला ज्ञान देण्यासाठी गेलो,तर आम्हाला लाज
वाटत होती,की आम्ही गरीब आहोत.बाबा म्हणतात गरीब आहात ते चांगलेच आहे,साहुकार असते
तर तुम्ही हे ज्ञान घेतले नसते.अच्छा गोड गोड,फार फार वर्षानंतर भेटलेल्या
मुलांप्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा
आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) नेहमी याच
खुशी किंवा नशेमध्ये रहा की,आता आम्ही ईश्वराच्या परिवाराचे आहोत,स्वयम् भगवान
आम्हाला शिकवत आहेत.त्यांच्याकडून आम्हाला खूप प्रेम मिळत आहे.ज्या प्रेमा द्वारेच
आम्ही देवता बनतो.
(२) या पूर्वनियोजित नाटकाला बरोबर समजून समजावयचे आहे, यामध्ये काही चूक होऊ शकत
नाही.जे कार्य झाले आहे त्याची पुनरावृत्ती होईल. या गोष्टीला चांगल्या प्रकारे
समजले तर कधीच क्रोध येणार नाही.
वरदान:-
ज्ञानाच्या
श्रेष्ठ खजाण्याला महादानी बणुन दान करणारे मास्टर ज्ञानसागर भव.
जसे बाबा
ज्ञानाचे सागर आहेत,असेच मास्टर ज्ञानसागर बनवून नेहमी दुसऱ्यांना ज्ञान देत रहा.
ज्ञानाचा श्रेष्ठ खजाना तुम्हा मुलांजवळ आहे,त्या खजाने द्वारे भरपूर बणुन आठवणीच्या
अनुभवाद्वारे दुसऱ्याची पण सेवा करा.जे पण खजाने मिळाले आहेत,महादानी बणुन त्यांचे
दान करत रहा,कारण हा ज्ञान खजाना जितके दान कराल तेवढा वाढत जाईल.महादानी बनणे
म्हणजेच देणे नाही,परंतु आणखीनच जमा करणे आहे.
बोधवाक्य:-
जीवन
मुक्तीच्या सोबतच देहापासून अनासक्त,विदेही बनणे हीच पुरुषार्थाची अंतिम अवस्था आहे.