17-10-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   09.03.1985   ओम शान्ति   मधुबन


बाबा आणि सेवेशी स्नेह हेच ब्राह्मण जीवनाचे जीवनदान आहे
 


आज बाप दादा सर्व मुलांचा पुरुषार्थाची आवड पहात होते. प्रत्येक जण आपापल्या हिम्मत आणि उत्साहाने पुढे जात आहे. हिम्मत सुद्धा सर्वांमध्ये आहे उमंग उत्साह पण सर्वांमध्ये आहे. प्रत्येकामध्ये हा एक श्रेष्ठ विचार पण आहे की आम्हाला बाप दादांच्या जवळचा रत्न, नुरे रत्न, हृदय सिंहासन धारी, दिलाराम बाबाचे प्रिय बनायचे आहे. लक्षसुद्धा सर्वांचे संपन्न बनण्याचे आहे. सर्व मुलांच्या मनात आवाज एकच आहे की, स्नेहा च्या बदल्यात आम्हाला बाबांसारखे संपन्न बनायचे आहे आणि याप्रमाणे पुढे जाण्यामध्ये विजय पण होत आहेत. कोणालाही विचारले की काय इच्छा आहे? तर सर्व जणांचा एकच उमंगाचा आवाज आहे की संपूर्ण आणि संपन्न बनायचे आहे. बाप दादा हा सर्वांचा उमंग उत्साह पाहून श्रेष्ठ लक्ष पाहून आनंदित होतात आणि सर्व मुलांना अशा एका उमंग उत्साहाची एका मताची भेट देत आहे. कि कसे आम्ही एका पित्याचे एका मताचे एकाच ध्येयाचे आणि एकाच घरात एकाच राज्यात राहात आहोत आणि आनंदाने उडत आहोत. पिता एकच आणि इतके पात्र आणि योगी मुले. प्रत्येक एक दुसऱ्याच्या विशेषते मुळे विशेष प्रगती करीत आहेत. संपूर्ण कल्पा मध्ये असे पिता होणार नाहीत ना मुले असे होतील. की जे कोणीसुद्धा मुले व उमंग उत्साहात कमी असतील! गुणांनी संपन्न असतील. एकाच धैयात मग्न असतील असे कधी होऊ शकत नाही. बाबदादांना सुद्धा अशा मुलांबद्दल अभिमान असेल आणि मुलांनासुद्धा शिवबाबा बद्दल अभिमान असेल. जेथे पण पहाल एकच विशेष आवाज सर्वांच्या मनात आहे बाबा आणि सेवा. जेवढे बाबांवर प्रेम आहे तेवढेच सेवेवर पण प्रेम आहे. दोन्ही बद्दलचे प्रेम प्रत्येक ब्राह्मणांच्या जीवनातील जीवदान आहे. यातच नेहमी व्यस्त राहण्याचा आधार माये वर विजय मिळवून देत आहे.

बाप दादा जवळ सर्व मुलांचे सेवेचे व उमंग उत्साहाचे आराखडे, योजना पोहोचतात. योजना सर्व चांगल्या आहेत सृष्टी चक्रातील नाटका अनुसार ज्या विधीप्रमाणे वृद्धि प्राप्त होत आहे यश मिळते आहे ते सुरुवातीपासून आतापर्यंत चांगले ते चांगलेच आहे आता सेवेचे आणि ब्राह्मणांचे विजयीरत्न बनण्याचे किंवा विजयी होण्याचे पुष्कळ वर्ष होऊन गेली. आता सुवर्ण जुबली पर्यंत पोहोचले आहात. सुवर्ण जुबली का साजरी होत आहे? काय जगाच्या हिशोबा अनुसार साजरी करीत आहात की वेळेनुसार विश्वाला तीव्र गतीने संदेश देण्याच्या व मंग उत्साहामुळे साजरी करत आहात. चहुकडे बुलंद आवाजामुळे झोपलेल्या आत्म्यांना जागे करण्याचे साधन तयार करीत आहात? जेथे पण ऐकाल जेथे पण पहाल तेथे चहुकडे हाच आवाज गुंजताना ऐकायला मिळेल की वेळे अनुसार आता गोल्डन जुबली मुळे सुवर्णयुग येण्याची सोनेरी वेळ, सुवर्णयुग येण्याचा सोनेरी संदेशामुळे आनंदाची बातमी मिळत आहे. या गोल्डन जुबली मुळे गोल्डन युग येण्याची सूचना किंवा संदेश देण्याची तयारी करत आहात. चहूकडे अशी लहर पसरेल की आता सुवर्णयुग आले की आले चहुकडे असे दृश्य दिसावे की जसे सकाळच्या वेळी अंधकार संपून सूर्योदय होत आहे तेव्हा सूर्योदय होऊन प्रकाशाची आनंदाची बातमी चहूकडे पसरेल. अंधकार विसरून प्रकाशात ये अशीच विश्वातील आत्मा दुःखाचे व अशांतीचे बातमी ऐकून ऐकून विनाशाच्या भीतीने भयभीत होऊन नाराज झाली निराश झाली अशा विश्वातील आत्म्यांना या गोल्डन जुबली द्वारे शुभेच्छांचा सूर्योदय होण्याचा अनुभव करावा. जशी विनाशाची लाट आहे तसेच सत्ययुगी सृष्टीच्या स्थापनेची आनंदाची लाट चहूकडे पसरावे. सर्वांच्या मनात आशेचा किरण चमकावा काय होईल? काय होईल? या ऐवजी समजतील की आता हे होणार आहे अशी लहर पसरवा. गोल्डन जुबली ही गोल्डन युग येण्याच्या आनंदाच्या बातमीचे साधन आहे ज्याप्रमाणे आपण मुलांना दुःख धाम पाहताना सुखधाम नेहमी स्वतः च आठवणीत राहते आणि सुखधाम ची आठवण दुःख धाम विसरायला लावते. आणि सत्य किंवा शांतीधाम आला जाण्याच्या तयारीमध्ये मगन होऊन जातात, व स्वतःला विसरून जातात. जायचे आहे आणि सुखधाम मध्ये यायचे आहे. जायचे आणि यायचे ही आठवण शक्तिशाली बनवते आणि आनंदाने सेवा च्यानिमित्त पण बनवत आहे. आता लोकांना अशा दुःखाच्या बातम्या खूप ऐकल्या आहेत आता या आनंदाच्या बातमी द्वारे दुःखधातून सुखधाम मध्ये जाण्यासाठी आनंदाने तयारी करा. त्याच्यामध्ये ही लाट पसरेल आम्हाला जायचे आहे. निराश झालेल्यांना आशा दाखवा. नाराज झालेल्यांना आनंदाची बातमी ऐकवा. अशी योजना बनवा विशेष बातमी पत्र मधून किंवा जी आवाज पसरवण्याची साधने आहेत त्या साधनांमधून एकाच वेळी एकच आनंदाचा संदेश चहूकडे सर्वांना पोहोचेल जिथून पण कोणी येतील तर एकच आनंदाची बातमी सर्वांना माहीत असेल अशा युक्तीने चहूकडे एकच आवाज असेल नवीनता पण असावी आपल्या संपूर्ण ज्ञानाच्या स्वरूपाला प्रत्यक्ष करायचे आहे आता समजत आहे की आता शांत स्वरूप आहे शांतीचा सहज सोपा रस्ता सांगणारे आहेत हेच स्वरूप प्रत्यक्ष झाले आहे आणि होणार आहे परंतु ज्ञान सागर बाबांचे आहे तर हेच आहे आता हा आवाज होईल असे आता म्हणतात की शांती चे ठिकाण आहे तर हेच आहे असे सगळ्यांच्या मुखातून हाच आवाज निघेल की सत्य ज्ञान आहे तर हेच आहे. ज्याप्रमाणे शांती आणि प्रेमच्या शक्तीचा अनुभव करतात. त्याप्रमाणे सत्यता पण सिद्ध होईल तर आणखीन सगळे काय आहे ते पण सिद्ध होऊन जाईल. सांगण्याची आवश्यकता पडणार नाही आता ती सत्तेची शक्ती कशी प्रत्यक्ष करावी ती विधी कोणती स्वीकारावी सांगावी लागणार नाही. परंतु ते स्वतः म्हणतील की सत्य ज्ञान, परमात्म ज्ञान, शक्तिशाली आहे ते हेच आहे. याकरिता ची विधी पुन्हा सांगू. तुम्ही लोकांनी पण यावर विचार करा. पुन्हा दुसर्या वेळी ऐकू प्रेम आणि शांतीची धरणी तर बनली आहे ना? आता ज्ञानाचे बीज पडले आहे तेव्हाच तर ज्ञानाच्या बीजाचे फळ स्वर्गाच्या वारसा हक्काचे अधिकारी बनून.

बाप दादा सर्व पाहतात ऐकत राहतात काय काय आत्म्यांचा संवाद होतो. तो चांगले प्रेमाने बसतात. विचार करतात, विचार सागर मंथन चांगले चालले आहे. लोणी खाण्याकरिता मंथन तर करत आहेत. आता सुवर्णमहोत्सवाचे मंथन करीत आहेत यातून शक्तिशाली लोणच निघेल. सर्वांच्या मनात उमंगो उत्साह चांगला आहे हीच मनाच्या उत्साहाची लहर वातावरण बनवते. वातावरण तयार होऊन आत्म्यांना जवळ आणण्याचे आकर्षण वाढत जाते. आता गेले पाहिजे, पाहिले पाहिजे, ही लहर पसरत जाते. पहिले विचार असे होते की माहित नाही काय आहे, आता विचार आहे चांगले आहे गेले पाहिजे, पाहिले पाहिजे, शेवटी म्हणतील हेच बरोबर आहे. आता तुमच्या मनातील उमंग उत्साह त्यांच्या मनात उत्साह निर्माण करतो. आता तुमचे मन आनंदाने नाचत आहे. त्यांच्या पावलांना चालण्याची गती येते. ज्याप्रमाणे येथे कोणी खूप चांगले नृत्य करत असेल, तर दूर बसणार याची पावले ताल धरतात. याप्रमाणे उत्साहाचे वातावरण अनेकांच्या पावलांना चालण्याची गती देत आहेत.

नेहमी स्वतःला सुवर्ण दुनियेचे अधिकारी म्हणून अनुभव करणारे, नेहमी आपली सतोप्रधान स्थिती बनविणारे, उमंग उत्साहत राहणारे, नेहमी दयाळू बनून सर्व आत्म्यांना सतोप्रधान बनण्याचा रास्ता सांगण्याच्या उमंगा मध्ये राहणारे, नेहमी पित्याच्या प्रत्येक सुवर्ण अक्षरांना जीवनात धारण करणारे, असे नेहमी बाप दादांच्या रुदय सिंहासनावर आरूढ झालेले, नेहमी प्रेमात समावलेले,विजय रत्नांना बाप दादांची प्रेमळ आठवण आणि नमस्ते.

ब्रिजेंद्रा दाजी सोबत अव्यक्त बापदादा ची मुलाखत
चालवणारे चालत आहेत, प्रत्येक सेकंदाला करताकरविता निमित्त बनवून करून घेत आहे. करताकरविताच्या हातात चावी आहे. त्या चावीने चालत आहोत. आपोआप चालणारी किल्ली मिळते आणि चालता-फिरता किती वेगळेपणाचा आणि प्रेमाचा अनुभव होता हे जरी कामाचा हिशोब पूर्ण करत आहे, तरीसुद्धा कर्माचा हिशोबा पुढे साक्षी होऊन पहात असताना साथीच्या सोबत मजेत राहात आहे असे आहे ना? तुम्ही तर साथी सोबत मजेत आहात. बाकी हिशोब साक्षी होऊन पूर्ण कसा होत आहे हे पाहत असताना सुद्धा मजेत राहिल्यामुळे काहीच वाटत नाही. कारण की सुरुवातीपासून स्थापनेच्या कार्याकरिता निमित्त बनलेले आहात तेव्हा जोपर्यंत आहोत तोपर्यंत कार्य करत आहोत. चालत आहोत किंवा बसलेल्या आहोत, स्टेजवर आहोत की घरात आहोत, परंतु महावीर मुले नेहमी आपल्या श्रेष्ठ स्थितीमुळे सेवेच्या स्टेजवरच आहेत. दुहेरी स्टेजवर आहात एक स्वतःच्या श्रेष्ठ स्थितीच्या स्टेजवर आहात आणि दुसरे सेवेच्या स्टेजवर आहात. तर संपूर्ण दिवस कोठे राहता? घरामध्ये की स्टेजवर? बेडवर आहे, कोच वर आहे, की स्टेज वर आहे? कोठे जरी असेल तरी सेवेच्या स्टेजवर आहे दुहेरी स्टेजवर आहे. असाच अनुभव होतो ना? स्वतःच्या भूमिकेला साक्षी होऊन पहा या शरीराद्वारे जे पूर्वी केलेल्या कर्माची परतफेड होत आहे हे साक्षी होऊन पाहता याला कर्मभोग नाही म्हणता येणार. कर्मभोगा मध्ये दुःख होते, तर भोग शब्द नका म्हणू कारण दुःख त्रासाची अनुभूती नाही होत, तुम्हा मुलांसाठी कर्मभोग नाही कर्मयोगाच्या शक्तीने सेवेचे साधन बनले आहे.. हे कर्मभोग नाही सेवेची योजना आहे. भोग सुद्धा सेवेच्या योजनेत बदलेल असेच आहे ना? म्हणून नेहमी साथी बरोबर मजेत राहणारी आहात ना? जन्मापासूनच बरोबर राहण्याची इच्छा होती ही इच्छा भक्तीचा रूपाने पूर्ण झाली, ज्ञानामध्ये पण पूर्ण झाली, आणि आता साकार रूपामध्ये सुद्धा पूर्ण झाले आणि आता अव्यक्त रूपामध्ये ही इच्छा पूर्ण होत आहे. तर ही दैवी जन्माची इच्छा वरदानाचा रूपामध्ये पूर्ण झाले. जेवढा साकार बाबांसोबत राहण्याचा अनुभव यांचा आहे तितका कोणाचाच नाही बरोबर राहण्याचा विशेष पाठ मिळाला ही गोष्ट साधारण थोडीच आहे. प्रत्येकाचे भाग्य आपापले आहे. तुम्हीपण म्हणा "वाह रे मी" आदि रत्न नेहमी बाबांना प्रत्यक्ष करण्याचे निमित्त आहेत. प्रत्येक कर्मातून पित्याच्या चरित्राला प्रत्यक्ष करणारे दिव्य आरसा आहेत. आरसा किती आवश्यक असतो स्वतःला पाहण्यासाठी की दुसऱ्यांना पाहण्यासाठी तर तुम्ही सर्व आरसा आहात बाबांचा साक्षात्कार करण्यासाठी जी विशेष आत्मा निमित्त आहे त्यांना पाहिल्यानंतर सर्वांना काय आठवण येते? बाबा काय करत होते कसे तर चालत होते याची आठवण येते? बाबांना प्रत्यक्ष करणारे दर्पण आहात. बाप दादा अशा विशेष मुलांना नेहमी स्वतः पेक्षाही पुढे घेऊन जातात डोक्यावरचा मुकुट बनवतात. डोक्यावरच्या मुकुटातील चमकणारी मनी किंवा रत्न आहे. अच्छा

जगदीश भाई सोबत अव्यक्त बापदादा ची मुलाखत
शुभ बाबांकडून वरदान आतून जी विशेषता मिळाली त्या विशेषता कार्यात उपयोगी आणल्याने नेहमी वृद्धी प्राप्त करत आहात. चांगले आहे. संजयने काय केले होते? सर्वांना दृष्टी दिली होती ना? तर तुम्ही पण ज्ञानाचा तिसरा नेत्र देत आहात हीच दिव्यदृष्टी आहे. ज्ञानाच दिव्य आहे ना? ज्ञानाची दृष्टी सर्वात शक्तिशाली आहे हेसुद्धा वरदानच आहे नाही तर इतक्या मोठ्या विश्वविद्यालया मध्ये ज्ञान कोणते दिले जाते याची समज कशी येणार? एकतात तर खूप कमी ना. साहित्यातून ज्ञान स्पष्ट होत जाते हे पण एक वरदान मिळाले आहे. ही पण एक विशेष आत्माची विशेषताच आहे. प्रत्येक संस्थेची सर्व साधनांच्या माध्यमातून विशेषता प्रसिद्ध होते. ज्याप्रमाणे भाषणातून, संमेलनातून, अनेक साहित्यातून, चित्र, आणखीन जी पण साधना आहेत ही पण संस्था किंवा विश्वविद्यालयाची एक विशेषता प्रसिद्ध करणारे साधनच आहे. हा पण एक निशाण आहे ज्याप्रमाणे बाण पक्षाला घेऊन येतो. तसेच हा एक तीर आहे की जो आत्म्यांना जवळ घेऊन येतो. हा सुद्धा नाटकातील एक पार्ट मिळाला आहे. लोकांचे प्रश्न तर खूप असतात त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण करण्याचे साधन पण आवश्यक आहे.ज्याप्रमाणे समोर पण ऐकतात परंतु हे साहित्य एक उत्तम साधन आहे. ते पण आवश्यक आहे सुरुवातीला पहा ब्रह्मा बाबा ने किती आवडीने ही साधन बनवली. रात्रंदिवस स्वतः बसून लिहीत होते ना? वरदान बनवून तुम्हा लोकांना देत होते ना? तुम्ही त्यांना रत्नजडित करत होता तर हे पण करून दाखविले तर ही पण साधन चांगली आहेत. सभा झाल्यानंतर पाठांतर करण्याकरता हा जो चार्ट बनवता तो पण आवश्यक आहे. पाठांतर करण्याचे साधन आवश्यक आहे. पहिल्या सभेचा हा अनुभव आहे, दुसऱ्याचा हा आहे, तिसऱ्या चा हा आहे. यामुळे लोक पण समजतील की खूप नियमानुसार हे विश्वविद्यालय चालले आहे. ती साधन चांगली आहेत. मेहनत करतात तर त्या कार्य मध्ये शक्ती भरते आता सुवर्णमहोत्सवाचे नियोजन करतील नंतर साजरी करतील जितके नियोजन करतील तेवढी ताकद भरेल. सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उमंग उत्साहाने केलेल्या संकल्पात विजय निश्चितच आहे. फक्त पुनरावृत्ती करायची आहे. आता तर सुवर्णमहोत्सवाच्या नियोजना चे विचार चालू आहेत ना? सुरुवातीला कठीण वाटते पण नंतर खूप सोपे होत जाते तो सहज होण्यातच विजय आहे. यश प्रत्येकाच्या मस्तकावर लिहिलेले आहे.

पार्टीसोबत बाप दादा ची मुलाखत
नेहमी डबल प्रकाशात आहात ना? कोणत्या गोष्टी स्वतःला कधी ओझे वाले बनवू नका. नेहमी दुहेरी प्रकाशात राहिल्याने संगम युगातील सुखाचे दिवस, आत्मिक मजेचे दिवस, यशस्वी होतील जर थोडासुद्धा ओझे धारण केला तर काय होईल? नाराज व्हाल की मौज वाटेल? कठीण वाटले तर नाराज व्हाल, हलकेपणा असेल तर मजा वाटते. संगम युगातील एक एक दिवस किती किमतीचा आहे, किती श्रेष्ठ आहे, किती प्राप्ति करण्याची वेळ आहे अशा प्राप्ति करण्याच्या वेळेला सत्कारणी लावत चला. सफल करा. रहस्य समजणारी आत्मा आणि युक्तीने चालणारी आत्मा नेहमीच प्रगतीचा अनुभव करते. तर खूप आठवनीत राहा. अभ्यासात राहा. सेवेत पुढे पुढे जात राहा. थांबणारे नाही. अभ्यास व शिकविणारा शिक्षक नेहमी बरोबर राहील. जी पण निमित्त आत्मा आहे विशेष आहे त्यांची विशेषता धारणा अमलात आणा. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून चला पुढे प्रगती करा जेवढे बाबांच्या जवळ तेवढे परिवाराच्या ही जवळ असाल. जर परिवाराच्या जवळ येणार नाही तर 108 मण्यांच्या माळेत पण येणार नाहीत.

वरदान:-
या अंतिम जन्मांमध्ये मिळालेल्या सर्व शक्तींना वापरणारे शक्तिसंपन्न भव

हे गोड नाटक खूप छान बनलेले आहे याला कोणी बदलू शकत नाही परंतु ड्रामामध्ये तुम्हा श्रेष्ठ ब्राह्मण जन्म वाल्यांना खूप शक्ती मिळाली आहे. बाबांनी बिल केले आहे म्हणून बिल पावर मिळाली आहे. या शक्तीला वापरा. जेव्हा पाहिजे तेव्हा या शरिराच्या बंधनापासून वेगळे कर्मातीत अवस्थे मध्ये स्थित होऊन जा. मी वेगळा आहे मालिक आहे. बाबांनी मला निमित्त बनवले आहे. या आठवणी मध्ये मन आणि बुद्धीला एकाग्र करा. तेव्हाच विल पावर मिळेल.

सुविचार:-
मनापासून सेवा करा तर आशीर्वादाचा दरवाजा उघडेल.