25-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, मायेला वश करण्याचा मंत्र आहे मनमनाभव, या मंत्रामध्ये फार वैशिष्ट्ये सामावली आहेत, हाच मंत्र तुम्हाला पवित्र बनवितो”

प्रश्न:-
आत्म्याच्या सुरक्षिततेचे नंबरएक साधन कोणते आहे आणि कसे?

उत्तर:-
आठवणीची यात्राच सुरक्षिततेचे नंबर एकचे साधन आहे. कारण या आठवणीनेच तुमचे चरित्र सुधारत आहे. तुम्ही मायेवर विजय प्राप्त करता. आठवणीमुळे पतित कर्मेइंद्रिया शांत होतात. आठवणीमुळेच बळ मिळते. ज्ञान तलवारीला योगाची धार पाहिजे. आठवणीमुळेच गोड सतोप्रधान बनाल. कोणाला पण नाराज करणार नाहीत, त्यामुळे आठवणीच्या यात्रेमध्ये कमकुवत बनायचे नाही. स्वत:च स्वत:ला विचारावयाचे आहे, मी कोठपर्यत आठवणीत राहत आहे?

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना दररोज सावधान जरुर केले पाहिजे. कसे? सुरक्षा प्रथम सुरक्षा काय आहे? आठवणीच्या यात्रेने तुम्ही फार फार सुरक्षित राहाल. मुळ गोष्टच मुलांसाठी ही आहे. बाबांनी समजावले आहे, तुम्ही मुले जेवढे आठवणीच्या यात्रेमध्ये तत्पर राहाल, तेवढी खुशी पण राहिल आणि वागणे पण ठिक राहिल कारण पावन पण बनायचे आहे. चारित्र पण सुधारावयाचे आहे. आपली तपासणी करावयाची आहे, माझे वागणे कोणाला दु:ख देण्यासारखे तर नाही ना. मला कोणता देहअभिमान तर येत नाही ना? हे चांगले रितीने स्वत:च तपास करावयाचा आहे. बाबा बसून मुलांना शिकवत आहेत. तुम्ही मुले शिकता पण, आणि मग शिकवतो पण. बेहदचे बाबा फक्त शिकवत आहेत. बाकीचे तर सर्व आहेत देहधारी. यात सारे जग येते. एक बाबाच विदेही आहेत. ते तुम्हा मुलांना म्हणतात की, तुम्हाला तर विदेही बनायचे आहे. मी आलो आहे तुम्हाला विदेही बनविण्यासाठी. पवित्र बनूनच तेथे जाल. छी-छी ला तर बरोबर घेऊन जाणार नाहीत, त्यामुळे प्रथम मंत्रच हा देतात. मायेला वश करण्याचा हा मंत्र आहे. पवित्र होण्याचा हा मंत्र आहे. या मंत्रामध्ये फार वैशिष्ट्ये भरलेली आहेत, याद्वारेच पवित्र बनायचे आहे. मनुष्यापासून देवता बनायचे आहे. जरुर आम्हीच देवता होतो, त्यामुळे बाबा म्हणतात, स्वत:ची सुरक्षा पाहिजे असेल तर, मजबूत महावीर बनण्यासाठी हा पुरुषार्थ करा. बाबा तर शिकवण देत राहतील. जसे विश्व नाटकात आहे अविनाशी नाटकानुसार बिल्कुल ठीकच चालले आहे, भविष्यासाठी समजवत आहेत. आठवणीच्या यात्रेत कमजोर व्हायचे नाही. बाहेर राहणाऱ्या बंधनातील गोपी जेवढ्या आठवण करतात, तेवढे समोर राहणाऱ्या पण आठवण करत नाहीत, कारण त्यांना उत्कंठा राहते शिवबाबांना भेटण्याची. जे भेटतात, त्यांचे जसे की पोट भरलेले आहे. जे फार आठवण करतात, ते उंच पद प्राप्त करतील. पाहण्यात येते की, चांगले चांगले, मोठ मोठे सेंटर सांभाळणारे मुख्य पण, आठवणीच्या यात्रेत कमजोर आहेत. आठवणीची धार फार चांगली पाहिजे. ज्ञान तलवारी मध्ये आठवणीची धार नसल्या कारणाने कोणालाच बाण लागतच नाही, पुर्ण मरत नाहीत. मुले प्रयत्न करतात, ज्ञानाचा बाण मारुन, बाबाचे बनवावे, मरजीवा बनवावे. परंतू मरत नाहीत, तर जरुर ज्ञान तलवारीमध्ये गडबड आहे. बाबा जरी जाणतात कि, नाटक फार तंतोतंत बिनचुक चालले आहे, परंतू भविष्यासाठी तर समजावत राहतात ना. प्रत्येकांनी आपले मनाला विचारावे. मी कोठपर्यंत आठवण करत आहे? आठवणीनेच बळ येईल, त्यामुळे म्हटले जाते, ज्ञान तलवारीला धार पाहिजे. ज्ञान तर फार सोप्या पध्दतीने समजावू शकता.

जेवढी जेवढी आठवण करत राहाल, तेवढे फार गोड बनत जाल. तुम्ही सतोप्रधान होता तर फार गोड होता. आता परत सतोप्रधान बनायचे आहे. तुमचा स्वभाव फार गोड पाहिजे. कधी नाराज व्हायचे नाही. असे, वातावरण नसावे, जे कोणी नाराज होतील. असा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे ईश्वरीय कॉलेज स्थापन करण्याची सेवा फार उंच आहे. विश्व विद्यालय तर भारतात फार आहेत, खरेतर ते नाहीत. विश्व विद्यालय तर एकच असते. बाबा येऊन सर्वांना मुक्ती जीवनमुक्ती देत आहेत. बाबा जाणतात की, साऱ्या सृष्टीवर जे पण मनुष्य मात्र आहेत, सर्व नष्ट होणार आहेत. बाबाला बोलावलेच यासाठी कि, छी छी दुनियेचा खात्मा आणि नविन दुनियेची स्थापना करण्यासाठी. मुले पण समजतात बरोबर बाबा आले आहेत. आता मायेचा भपका किती आहे. या भपक्याच्या पतनाचा खेळ पण दाखवत आहेत. मोठ मोठी घरे इ. बनवत आहेत. हा आहे भपका, सतयुगामध्ये अनेक मजली घरे बनत नाहीत. येथे बनवितात, कारण राहण्यासाठी जमीन कमी आहे. विनाश जेव्हा होतो तेव्हा सर्व मोठ मोठी घरे पण नष्ट होतात. पुर्वी एवढी मोठ मोठ्या इमारती बनवत नव्हते. बॉम्ब जेव्हा सोडतील तर अशा प्रकारे पडतील जसे डावातील पाने पडतात. याचा अर्थ असा नाही की, तेच मरतील. बाकीचे दुसरे राहतील. नाही, जो जेथे आहे. जरी समुद्रावर असेल, पृथ्वी वर असेल, आकाशात असेल, डोंगरावर असेल, उडत असेल---सर्व नष्ट होऊन जातील, ही जुनी दुनिया आहे ना. ज्या पण 84 लाख योनी आहेत, त्यासर्व नष्ट होणार आहेत. तेथे नविन दुनियेत हे काहीच राहणार नाही. ना एवढे मनुष्य असतील, ना डास, ना जीव जंतू इ. राहतील. येथे तर खुप आहेत. आता तुम्ही मुले देवता बनता, तर तेथे प्रत्येक वस्तू सतोप्रधान असते. येथे पण मोठ्या माणसाचे घरी जाल, तर चांगली स्वच्छता असते. तुम्ही तर सर्वांत जास्त मोठे देवता बनत आहात. मोठा मनुष्य पण म्हणत नाहीत. तुम्ही फार उंच देवता बनत आहात, ही काही नविन गोष्ट नाही. 5 हजार वर्षापुर्वी पण तुम्ही असे बनले होता नंबरवार. हा एवढा कचरा इ. तेथे काहीच नसते. मुलांना फार खुशी होते, आम्ही फार उंच देवता बनत आहे. एकच बाबा आम्हाला शिकविणारे आहेत, जे आमहाला फार उंच बनवत आहेत. शिक्षणामध्ये नेहमी नंबरवार पदाचे असतात. कोणी कमी शिकले, कोणी जास्त शिकते. आता मुले पुरुषार्थ करत आहेत, मोठ मोठे सेंटर उघडत आहेत, यासाठी कि मोठ्यांना माहित व्हावे. भारताच्या प्राचीन राजयोगाची पण महिमा आहे. विशेष करुन विलायत वाल्यांना जास्ती उत्सुकता होते, राजयोग शिकण्याची. भारतवासी तर तमोप्रधान बुध्दी आहेत. ते तरी पण तमोबुध्दी आहेत, त्यामुळे त्यांना छंद राहतो, भारताचा प्राचीन राजयोग शिकण्याचा. भारताचा प्राचीन राजयोग प्रसिध्द आहे, ज्याद्वारेच भारत स्वर्ग बनत आहे. फारच कमी येतात, जे पुर्ण रितीने समजत आहेत. स्वर्ग हेविन होऊन गेला आहे, जो परत येईल जरुर. हेविन अथवा स्वर्ग आहे सर्वांत आश्चर्यकारक जग. स्वर्गाचे किती नांव प्रसिध्द आहे, स्वर्ग आणि नरक, शिवालय आणि वेश्यालय. मुलांना आता नंबरवार आठवणीत आहे की, आम्हाला आता शिवालयामध्ये जावयाचे आहे. तेथे जाण्यासाठी शिवबाबाची आठवण केली पाहिजे. तेच वाटाड्या आहेत, सर्वांना घेऊन जाणारे. भक्तीला म्हटले जाते रात्र. ज्ञानाला म्हटले जाते दिवस. ही बेहदची गोष्ट आहे. नविन वस्तू आणि जुनी वस्तूमध्ये फार फरक राहतो. आता मुलांची इच्छा होते कि, एवढी उंच ते उंच शिकवण, उंच ते उंच घरामध्ये आम्ही शिकवू, तर मोठ मोठे लोक येतील. एक एकाला समजावले जाते. खरे तर अभ्यासाठी किंवा शिकण्यासाठी एकांताचे ठिकाण असावे. ब्रह्मज्ञानीचे पण आश्रम शहरापासून दूर दूर असतात आणि खालीच असतात. एवढ्या वरच्या ठिकाणी असत नाहीत. आता तर तमोप्रधान झाल्यामुळे शहरामध्ये आले आहेत. ती ताकत संपली आहे. यावेळी सर्वांची बॅटरी संपली आहे. आता बॅटरीला कसे भरायचे आहे, हे बाबा शिवाय कोणी चार्ज करु शकत नाही. मुलांना बॅटरी चार्ज केल्यानेच ताकद येणार आहे. त्यासाठी मुख्य आहे आठवण. त्यामध्येच मायेचे विघ्न पडते. कोणी तर सर्जनच्या समोर खरे बोलतात, कोणी लपवतात. आत जे दु:खणे आहे, ते तर बाबाला सांगितले पाहिजे. या जन्मात जे पाप केले आहे, ते अविनाशी सर्जन समोर वर्णन केले पाहिजे, नाही तर मन खात राहते. सांगितल्याने नंतर खाणार नाही. मनात ठेवणे, हे पण नुकसान कारक आहे. जी खरी खरी मुले आहेत, ते सर्व बाबाला सांगतात, या जन्मात हे हे पाप केले आहे. दिवसेंदिवस बाबा जोर देत आहेत, हा तुमचा शेवटचा जन्म आहे. तमोप्रधानाकडून पाप तर जरुर होतील ना.

बाबा सांगतात कि, मी, फार जन्माचे अंतामध्ये जो नंबर एक पतित बनले आहेत, त्यांचे मध्येच प्रवेश करतो, कारण त्यांनाच परत नंबरएक मध्ये जायचे आहे. फार मेहनत करावी लागते. या जन्मात पाप झालेले तर आहेत ना. काही ना तर माहितच पडत नाही की आम्ही हे काय करत आहे. खरे सांगत नाहीत. कोणी कोणी खरे सांगतात. बाबंनी समजावले आहे, मुलांनो, तुमची कर्मेइंद्रिया शांत तेव्हा होतील, जेव्हा कर्मातीत अवस्था बनेल. जसे मनुष्य म्हातारे झाले तर कर्मेइंद्रिया आपोआप शांत होऊन जातात. यामध्ये तर लहानपणीच सर्व शांत झाले पाहिजे. योगबळामध्ये चांगले राहिले तर यासर्व गोष्टींचा अंत होईल. तेथे कोणता असा वाईट आजार, कचरापट्टी इ. काही असत नाही. मनुष्य फार स्वच्छ शुध्द राहतात. तेथे आहेच रामराज्य. येथे आहे रावणराज्य, तर अनेक प्रकारचे वाईट आजार इ. आहेत. सतयुगामध्ये असे काही असत नाही. काही विचारु नका. नावच किती फर्स्टक्लास आहे-स्वर्ग, नविन दुनिया. फार स्वच्छता असते. बाबा समजावतात कि, या पुरुषोत्तम संगमयुगावरच तुम्ही यासर्व गोष्टी ऐकत आहात. काल परवा ऐकत नव्हतो. काल मृत्युलोकांचे मालक होतो, आज अमरलोकांचे मालक बनत आहात. निश्चय होतो कि, काल मृत्युलोकांत होतो, आता संगमयुगात अमरलोक मध्ये जाण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. शिकविणारे पण आता भेटले आहेत. जे चांगल्या रितीने शिकतात तर पैसा इ. पण चांगले कमवत आहेत. उपकार शिक्षणाचाच म्हणावा. येथे पण तसेच आहे. या शिक्षणामुळे तुम्ही मोठे उंच पद प्राप्त करतात. आता तुम्ही प्रकाशात आहात. हे पण तुम्हा मुलांशिवाय कोणाला माहित नाही. तुम्ही पण मग वारंवार विसरता. जुन्या दुनियेत जाता. विसरणे म्हणजे जुन्या दुनियेमध्ये जाणे होय.

आता तुम्हा संगमयुगी ब्राह्मणांना माहित आहे की, आम्ही कलियुगामध्ये नाहीत. हे नेहमी आठवणीत ठेवा कि आम्ही नविन विश्वाचे मालक बनत आहोत. बाबा आम्हाला शिकवतच आहेत, नविन दुनियेमध्ये जाण्यासाठी. हा आहे शुध्द अहंकार. तो आहे अशुध्द अहंकार. तुम्हा मुलांना तर कधी अशुध्द विचार पण आले नाही पाहिजेत. पुरुषार्थ करत करत शेवटाला अंतिम निकाल लागेल. बाब समजावतात कि, यावेळे पर्यंत सर्व पुरुषार्थी आहेत. परीक्षा जेव्हा होते, मग नंबरवार उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात जातील. तुमची आहे बेहदची शिकवण ज्याला तुम्हीच जाणत आहात. तुम्ही किती समजावता. नवनविन येत राहतात, बेहदच्या बाबांकडून वारसा घेण्यासाठी. जरी दूर राहतात, तरी पण ऐकून ऐकून निश्चय बुध्दी होत जातात-अशा बाबा समोर पण गेले पाहिजे. ज्या बाबांनी मुलांना शिकविले, अशा बाबाला सन्मुख तर जरुर भेटले पाहिजे. समजदारच येथे येतात. कोणी समजत नसले तरी पण येथे आले तर समजतात. बाबा म्हणतात कि, मनामध्ये कोणती पण गोष्ट असो, समजत नसेल तर विचारा. बाबा तर चुंबक आहेत ना. ज्यांचे नशीबात आहे, ते चांगल्या रितीने धारण करतात. नशीबात नसेल तर मग खलास. ऐकून न ऐकल्यासारखे करतात. येथे कोण बसून शिकवत आहे? भगवान. त्यांचे नांव शिव आहे. शिवबाबाच आम्हाला स्वर्गाची बादशाही देत आहेत. मग कोणते शिक्षण चांगले आहे? तुम्ही म्हणता आम्हाला शिवबाबा शिकवतात, ज्याद्वारे 21 जन्माची बादशाही मिळत आहे. असे असे समजावून समजावून घेऊन जातात. कोणी तर पुर्ण न समजल्यामुळे एवढी सेवा करु शकत नाहीत. बंधनाच्या साखळीमध्ये जकडून राहतात. सुरुवातीला तर तुम्ही कसे स्वत:ला साखळीतून सोडवून आलात. जसे कोणी नशेत चूर असतात. ही पण विश्वनाटकात भुमिका होती ज्याने आकर्षित झालात. नाटकात भट्टी बनायची होती. जीवंत पणी मेले, मग मायेच्या बाजूला कोण कोणी निघून गेले. युध्द तर चालत राहते ना. माया पाहते-यानी तर फार हिम्मत दाखविली आहे. आता मी पण ठोकून पाहते कि, पक्के आहेत कि नाहीत? मुलांचा किती सांभाळ होत होती. सर्व काही शिकवत होते. तुम्ही मुले फोटोंचा संग्रह पाहता, परंतू फक्त चित्र पाहून पण समजू शकत नाहीत. कोणी समोर सांगावे कि काय काय होत होते. कसे भट्टीत बसले होते, मग कोणी कसे निघाले, कोणी कसे. जसे रुपये छापतात तरी पण काही काही खराब निघतात. ही पण ईश्वरीय मिशनरी आहे. ईश्वर स्वत: धर्माची स्थापना करत आहेत. ही गोष्ट कोणाला पण माहित नाही. बाबाला बोलावतात, पण जसे नासमज, समजतच नाहीत. म्हणतात कि, असे कसे होऊ शकते. माया रावण एकदम असे तवाई बनवते. शिवबाबाची पुजा पण करतात, नंतर म्हणतात सर्वव्यापी आहेत. शिवबाबा म्हणता मग सर्वव्यपी कसे असतील. पुजा करतात, लिंगाला शिव म्हणतात. असे थोडेच म्हणतात कि, यात शिव बसले आहेत. आता दगडा धोंड्यात भगवानाला म्हणणे--तर काय सर्व भगवंतच भगवान आहेत. भगवान तर अनगिनत नाहीत ना. तर बाबा मुलांना समजावत आहेत, कल्पापुर्वी पण असे समजावले होते. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. असे गोड वातावरण बनवायचे आहे, ज्यात कोणी पण नाराज न होवो. बाबासारखे विदेही बनण्याचा पुरुषार्थ करावयाचा आहे. आठवणीच्या बळाने आपला स्वभाव गोड आणि कर्मेइंद्रिया शांत करावयाच्या आहेत.

2. नेहमी या नशेत राहा कि आम्ही संगमयुगी आहोत, कलियुगी नाही. बाबा आम्हाला नविन विश्वाचे मालक बनविण्यासाठी शिकवत आहेत. अशुध्द विचार नष्ट करायचे आहेत.

वरदान:-
श्रेष्ठ विचारांच्या शक्तीद्वारे सिध्दी प्राप्त करणारे सिध्दी स्वरुप भव
 

तुम्हा मास्टर सर्वशक्तीवान मुलांच्या विचारात एवढी शक्ती आहे, जे ज्यावेळी इच्छिता ते करु शकता आणि करवू पण शकता. कारण तुमचा विचार नेहमी शुभ, श्रेष्ठ आणि कल्याणकारी आहे. जो श्रेष्ठ आणि कल्याणाचा विचार आहे, तो सिध्द जरुर होतो. मन नेहमी एकाग्र म्हणजे एका ठिकाणावर स्थित राहते, भटकत नाही. जिथे पाहिजे, जेव्हा पाहिजे मनाला तिथे स्थित करु शकता. त्यामुळे सिध्दी स्वरुप स्वत: बनून जाता.

बोधवाक्य:-
परिस्थितींच्या हलचालीच्या प्रभावापासून वाचायचे आहे तर, विदेही स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा...!