12-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, बाबांची नजर मिळाल्यामुळे सा-या विश्वाचे मनुष्य मात्र संतुष्ठ होतात, म्हणून म्हटले जाते दृष्टीद्वारे संतुस्ट.

प्रश्न:-
तुम्हा मुलांच्या मनामध्ये खुशीचे नगडे वाजले पाहिजेत, का ?

उत्तर:-
कारण तुम्ही जाणतात बाबा आले आहेत, सर्वांना घेऊन जाण्यासाठी. आता आम्ही आपल्या बाबा सोबत घरी जाऊ. हाहाकार च्या नंतर जय जयकार होणार आहे. बाबांच्या एका नजरेद्वारे साऱ्या विश्वाला मुक्ती जीवनमुक्त्ती मिळणार. हे सर्व विश्व संतुस्ट होऊन जाईल.

ओम शांती।
आत्मिक शिवबाबा बसून आपल्या आत्मिक मुलांना समजतात, हे तर जाणतात की तिसरा नेत्र पण असतो. बाबा जाणतात सा-या दुनियाचे, जे पण आत्मा आहेत, सर्वांना मी वारसा देण्यासाठी आलो आहे. बाबांच्या मनामध्ये वारसा तर आहेच, लौकिक किंवा शारीरिक पित्याच्या मनामध्ये पण वारशाची आठवण राहते, मुलांना वारसा द्यायचा आहे, मुलगा नसेल तर संभ्रम होतो. कोणाला द्यायचा? परत दत्तक घेतात. येथे तर बाबा बसले आहेत. यांची तर साऱ्या दुनिया मध्ये, जे पण आत्मा आहेत, त्या सर्वांवरती नजर जाते, सर्वांना मला वारसा द्यायचा आहे. जरी इथे बसले आहेत परंतु नजर तर संपूर्ण विश्वा वरती आणि विश्वातील मनुष्यमात्रा वरती आहे, कारण सध्या विश्वालाच संतुस्ट करायचे आहे. बाबा समजवतात पुरुषोत्तम संगमयुग आहे. तुम्ही जाणतात बाबा आले आहेत, सर्वांना शांतीधाम सुखधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. सर्व संतुस्ट होणार आहेत, पूर्वनियोजित नाटक अनुसार कल्प कल्प असेच संतुस्ट होतात. बाबा सर्व मुलांची आठवण करतात, नजर जाते ना. सर्वजण ज्ञान घेणार नाहीत. पूर्वनियोजित नाटकानुसार सर्वांना परत घरी जायचे आहे, कारण नाटक पूर्ण होत आहे. पुढे चालून स्वतः समजतील आता विनाश होणार आहे आणि नवीन देण्याची स्थापना होणार आहे. कारण आत्मा तरीही चैतन्य आहे ना. तर बुद्धीमध्ये येईल बाबा आले आहेत, स्वर्गाची स्थापना होईल आणि आम्ही शांतीधाममध्ये चालले जाऊ. सर्वांची गती होईल बाकी तुमची सदगती होईल. आता बाबा आले आहेत आम्ही स्वर्गामध्ये जाऊ जयजयकार होईल, आज तर खूपच हाहाकार आहे, कुठे दुष्काळ, कुठे लढाई चालते, कुठे भूकंप होतात, हजारो मरत राहतात. मरायचे तर आहेच. सतयुगामध्ये अशा गोष्टी नसतात. बाबा म्हणतात मी आलो आहे, परत साऱ्या विश्वामध्ये जयजयकार होईल. मी भारतामध्येच येईल. साऱ्या विश्वामध्ये भारत जसे गाव आहे, बाबांच्यासाठी तर गावाच झाले, खूप थोडे मनुष्य असतील. सतयुगामध्ये सारे विश्वच जसे लहान गाव असेल, आता तर खूपच वृद्धि झाली आहे. बाबांच्या बुद्धीमध्ये तर सर्व आहे ना. आता या शरीराद्वारे मुलांना समजवत आहेत, तुमचा पुरुषार्थ पण तोच चालतो जो कल्पा पूर्वी चालत आला आहे. बाबा कल्पवृक्षाचे बिज आहेत. हे साकारी झाड आहे. निराकरी झाडावरती आहे. तुम्ही जाणतात हे कसे बनले आहे. हे दुसरे मनुष्य कोणी जाणत नाहीत. बेसमज आणि समजदार मध्ये खूप फरक आहे. कुठे समजदार स्वर्गामध्ये राज्य करतात, त्यांना म्हटले जाते सत्यखंड स्वर्ग. आता तुम्हा मुलांच्या मनामध्ये खूप खुशी व्हायला पाहिजे. बाबा आले आहेत, ही जुनी विकारी दुनिया तर जरूर बदलेल, जितके शिकतील तेवढे श्रेष्ठ पद मिळेल, बाबा तर शिकवत आहेत, ही तुमची शाळा असून त्याची खूप वृद्धि होत राहील, अनेक शाळा होतील. सर्वांची शाळा एकत्र असणार नाही, इतके राहतील कुठे? तुम्हा मुलांना आठवण आहे, आम्ही सुखधाममध्ये जात आहोत. जसे कोणी परदेशात जातात आणि आठ-दहा वर्ष तेथे राहून परत भारतामध्ये येतात. भारत गरीब आहे, परदेशी लोकांना भारतामध्ये सुख वाटणार नाही, तसे तर तुम्हा मुलांना पण येथे सुख नाही. तुम्ही जाणता आम्ही खूप श्रेष्ठ, राजयोगाचे शिक्षण घेत आहोत, ज्याद्वारे आम्ही स्वर्गाचे मालक देवता बनतो. स्वर्गांमध्ये खूप सुख असतील, त्या सुखाची सर्व आठवण करतात. हे गाव म्हणजे कलियुग तर आठवणीत पण येणार नाही. यामध्ये तर खूप दुःख आहेत, या रावण राज्यात पतित दुनियामध्ये, आज अपरम अपार दुःख आहेत, उद्या परत सुख असतील. आम्ही योगाद्वारे सुखाची दुनिया स्थापन करत आहोत. हा राजयोग आहे ना. बाबा स्वत: म्हणतात मी तुम्हाला राजांचा राजा बनवतो, तर असे बनवणाऱ्या शिक्षकांची आठवण करायला पाहिजे ना. शिक्षका शिवाय, वकील अभियंते थोडेच बनू शकतात. ही परत नवीन गोष्ट आहे, आत्म्याला योग लावायचा आहे, परमात्मा सोबत. त्यांच्यापासूनच खूप वर्ष वेगळे राहिले आहात, खूप वर्ष म्हणजे काय ते पण बाबा स्वतः समजत राहतात. मनुष्य कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष म्हणतात, बाबा म्हणतात नाही, हे तर पाच हजार वर्षानंतर, जे तुम्ही प्रथम दुरावले होते, तेच येऊन बाबांशी भेटतात. तुम्हालाच पुरुषार्थ करायचा आहे. गोड गोड मुलांना बाबा कोणतेही कष्ट देत नाहीत, फक्त म्हणतात स्वतःला आत्म समजा, जीवात्मा आहे ना. आत्मा अविनाशी आहे. जीव विनाशी आहे.

आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते, आत्मा कधीच जुनी होत नाही, हे आश्चर्य आहे ना. शिकवणारे पण आश्चर्यकारक आणि शिक्षण पण आश्चर्यकारक आहे. कोणालाच आठवणीत नाही, विसरतात. पूर्वजन्मामध्ये कोणते शिक्षण घेत होते, याची कुणालाच आठवण नाही. या जन्मामध्ये तुम्ही शिकतात त्याचा परिणाम, त्याचा मोबदला नवीन दुनिया मध्ये मिळतो, हे फक्त मुलांनाच माहिती आहे. हे आठवणीत राहिले पाहिजे, आत्ता पुरुषोत्तम संगमयुग आहे. आम्ही नवीन दुनियामध्ये जाणार आहोत, याची आठवण राहिली तर बाबांची पण आठवण राहील. आठवणीसाठी बाबा अनेक उपाय सांगतात. बाबा पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सदगती पण आहेत. तिन्ही स्वरूपामध्ये तुम्ही आठवण करा. बाबा आठवण करण्यासाठी खूप युक्ती देत राहतात, परंतु माया विसरायला लावते. बाबाजी नवीन दुनिया स्थापन करतात, बाबांनी सांगितले आहे, हे पुरुषोत्तम संगम युग आहे, याची आठवण करा, परत आठवण का करू शकत नाहीत? आठवण करण्याच्या युक्ती सांगतात. परत सोबत हेही म्हणतात की माया खूपच बलवान आहे, सारखे सारखे तुम्हाला विसरायला लावते, आणि देह-अभिमानी बनवते म्हणून जितके शक्य होईल, तेवढी माझी आठवण करा. उठता-बसता, चालता-फिरता देहाच्या ऐवजी स्वतःला देही म्हणजेच आत्मा समजा. हेच कष्ट घ्यायचे आहेत, ज्ञान तर खूप सहज आहे. सर्व मुले म्हणतात आठवण कायमस्वरुपी राहत नाही, तुम्ही बाबांची आठवण करता तर माया आपल्याकडे आकर्षित करते. यावरतीच हा खेळ बनलेला आहे. तुम्ही समजता आता आमचा बुद्धी योग जो बाबांच्या सोबत आहे आणि ज्ञानाच्या विषयांमध्ये राहायला पाहिजे, तो तितका नाही, विसरतात, परंतु तुम्हाला विसरायला नाही पाहिजे. वास्तव मध्ये या चित्रांची पण आवश्यकता नाही, परंतु शिकवण्याच्या वेळेस उदाहरण देण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. अनेक चित्र बनत राहतात. पांडव सरकारचे नियोजन कसे आहे, त्या सरकारचे पण नियोजन असते. तुम्ही समजता नवीन दुनिये मध्ये फक्त भारत होता.खूपच लहान होता, भारत सर्व विश्वाचा मालक होता, प्रत्येक गोष्ट नवीन होती.दुनिया तर एकच आहे. कलाकार पण तेच आहेत. चक्र फिरत राहते. तुम्ही मोजू शकता, किती सेकंद, किती तास, दिवस ,वर्ष, पूर्ण झाले, चक्र फिरत राहते. आजकल करत करत पाच हजार वर्ष पूर्ण झाले आहेत. सर्व दृश्य, खेळ होत राहतो. खूपच मोठे बेहदचे झाड आहे. झाडाची पाने तर मोजू शकत नाहीत, हे पण झाड आहे. याचे बीज देवी देवता धर्म आहे परत हे तीन ट्यूब, मुख्य धर्म निघाले आहेत. बाकी झाडाचे पाने तर खूप आहेत, कुणाची शक्ती नाही जे मोजू शकतात. यावेळेत सर्व धर्माच्या झाडाची वृद्धी झाली आहे. हे बेहदचे मोठे झाड आहे. हे सर्व धर्म परत राहणार नाहीत. आता सर्व झाड उभे आहे, बाकी बिज नाही, वडाच्या झाडाचे उदाहरण बिलकुलच बरोबर आहे. हे पण आश्चर्यकारक झाड आहे. बाबांनी नाटकामध्ये हे उदाहरण ठेवले आहे, समजून सांगण्यासाठी, त्याचे बीज नाही, ही तर समजण्याची गोष्ट आहे. बाबांनी तुम्हाला खूपच समजदार बनवले आहे. आता देवी-देवता धर्माचा पाया म्हणजे फाउंडेशन नाही बाकी थोडीच लक्षण आहेत, जसे पिठामध्ये मीठ. थोडीच लक्षणे बाकी राहिले आहेत. तर मुलांच्या बुद्धीमध्ये हे सर्व ज्ञान राहायला पाहिजे, बाबांच्या बुद्धीमध्ये पण हे ज्ञान आहे ना. तुम्हाला पण हे सर्व ज्ञान देऊन आपल्यासारखे बनवत आहेत. बाबा बीजरूप आहेत आणि हे उलटे झाड आहे. हे मोठे बेहदचे नाटक आहे. आता तुमची बुद्धी वरती जात आहे. तुम्ही बाबा आणि रचनेला पण जाणले आहे. जरी ग्रंथांमध्ये आहे, तरी ऋषिमुनी कसे जाणतील. एक पण जाणत असेल तर परंपरागत चालत येईल, आवश्यकताच नाही. जेव्हा सदगतीहोते, मध्येच कोणी परत जाऊ शकत नाही. नाटक पूर्ण होईल तेव्हा सर्व कलाकार इथे येतील, जोपर्यंत बाबा आहेत, जेव्हा तेथे बिल्कुल खाली होतील, तेव्हाच बाबांची वरात जाईल. प्रथम तर जाऊन बसणार नाहीत, बाबा सर्व ज्ञान देतात. या दुनियचे चक्र कसे पुनरावृत्त होते, सतयुग, कलियुग, परत संगम होतो. गायन पण आहे, परंतु संगम कधी होतो, हे कुणालाच माहिती नाही.तुम्ही मुलं समजले आहात चार युग आहेत, हे छोटे युग आहे, याला बुटके योग म्हटले जाते. कृष्णाला पण तसेच लहान दाखवतात. तर हे ज्ञान आहे. ज्ञानाला मोडून तोडून भक्ती मध्ये काय काय बनवले आहे. त्यांचे सर्व सुत एकमेकात अडकले आहे. त्यांना समजवण्यासाठी एकच बाबा आहेत. प्राचीन राजयोग शिकवण्यासाठी परदेशामध्ये जातात, तो तर हाच आहे ना, प्राचीन म्हणजे सुरुवातीपासून आलेला. सहज राजयोग शिकवणारे बाबच आहेत. खूप लक्ष राहते. तुम्ही पण लक्ष ठेवतात की आता स्वर्ग स्थापन होत आहे. आत्म्याला तर आठवण येते ना, बाबा म्हणतात हे ज्ञान जे मी तुम्हाला देतो, परत मीच येऊन कल्पानंतर तुम्हाला हे ज्ञान देईल. हे नविन दुनियासाठी, नवीन ज्ञान आहे. हे ज्ञान बुद्धीमध्ये राहिल्यामुळे खुशी खूप होते. बाकी थोडा वेळ आहे, आत्ता घरी जायचे आहे. एकीकडे खुशी होते आणि दुसरीकडे त्याची जाणीव पण होते, अरे असे गोड बाबा आम्ही कल्पानंतरच पाहू. बाबा पण मुलांना खूप सुख देतात ना. बाबा येतातच शांतीधाम सुखधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. तुम्ही शांतीधाम सुखधामची आठवण करा तर बाबांची पण सहज आठवण येईल. या दुःखाला विसरून जावा. बेहदचे बाबा बेहदच्या गोष्टी ऐकवतात. जुन्या दुनियापासून तुमचे मोह निघत राहिल तेव्हाच खुशी पण होईल. त्या मोबदल्यात तुम्ही सुखधाममध्ये जातात. सतोप्रधान बनत जाल.कल्प कल्प जे बनले आहेत तेच बनतील आणि त्यांनाच खुशी होईल. परत हे जुने शरीर सोडून देऊ, त्यानंतर नवीन शरीर घेऊन सतोप्रधान दुनियामध्ये येऊ. हे ज्ञान नष्ट होईल, गोष्टी तर खूपच सहज आहेत. रात्री पण झोपताना ज्ञानाची स्मरण करा तर खुशी पण राहील, आम्ही लक्ष्मी-नारायण सारखे बनवत आहोत? आजच्या दिवसांमध्ये आम्ही, काही असुरी कार्य तर केले नाही? पाच विकारा पैकी कोणत्या विकारांनी आम्हाला जास्त त्रास तर नाही दिला? आपल्या वरती लक्ष ठेवायचे आहे, स्वतःला दररोज तपासायचे आहे, अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. योगबळा द्वारे खूप सुखाची दुनिया स्थापन करायची आहे. या दुःखाच्या विकारी दुनियेला विसरायचे आहे. खुशी राहवी की आम्ही सत्य खंडाचे मालक बनत आहोत.

2. दररोज स्वतःला तपासायचे आहे की सा-या दिवसांमध्ये कोणत्या विकाराने त्रास तर दिला नाही,कोणते असुरी काम तर केले नाही? लोभाच्या वश तर झालो नाही?

वरदान:-
नेहमी एक बाबांच्या स्नेहा मध्ये सामावलेले सहयोगी सो सहज योगी आत्मा भव :
 

ज्या मुलांचा बाबांशी खूप स्नेह आहे, तेच आत्मे सदा बाबांच्या श्रेष्ठ कार्यामध्ये सहभागी होतील, आणि जे जितके सहयोगी तितकेच सहज योगी बनतात. बाबांच्या स्नेहामध्ये सामावलेले सहयोगी आत्मा कधीच मायेचे सहयोगी बनू शकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक संकल्पामध्ये बाबा आणि सेवा राहते म्हणून झोप पण करतील तर त्यामध्ये खूप आराम मिळेल, शांती आणि शक्ती मिळेल. झोप झोप राहणार नाही, जसे कमाई करून खुशी मध्ये परत आले आहेत. इतके परिवर्तन होइल.

बोधवाक्य:-
प्रेमाचे अश्रु हृदयाच्या डब्या मध्ये मोती बनतात.