21-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, मुलगा पित्याला प्रसिध्द करतो. मनमत सोडून श्रीमतावर चाला, तरच बाबाला सिध्द कराल....

प्रश्न:-
कोणत्या मुलांचे रक्षण बाबा जरुर करातातच?

उत्तर:-
जी मुले खरी आहेत, त्यांचे रक्षण जरुर होत आहे. जर रक्षण होत नाही तर मनामध्ये जरुर कोणती ना कोणती खोट आहे. अभ्यास न करणे, संशयामध्ये येणे, म्हणजे मनात काही ना काही खोटे आहे. त्यांना माया खाली पाडते.

प्रश्न:-
कोणत्या मुलांसाठी माया चुंबक आहे?

उत्तर:-
जे मायाच्या सुंदरते कडे आकर्षित होत राहतात, त्यांचेसाठी माया चुंबक आहे. श्रीमतावर चालणारी मुले आकर्षित होत नाहीत.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहेत, हा तर मुलांनी निश्चय केला आहे. आत्मिक पिता आम्हा आत्मिक मुलांना शिकवत आहेत. ज्याची महिमा आहे कि, आत्मे परमात्म्या पासून दूर राहिले फार काळ.... मुळवतन मध्ये दूर राहत नाहीत. तेथे तर सर्व एकत्र राहतात. वेगळे होतात तर जरुर आत्मे तेथून दूर होतात. खाली येऊन आपआपली भुमिका वठवितात. सतोप्रधान पासून खाली उतरत-उतरत तमोप्रधान बनत बोलावतात कि, पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा. बाबा पण म्हणतात कि मी प्रत्येक 5हजार वर्षानंतर येतो. हे सृष्टीचक्र 5 हजार वर्षाचे आहे. पुर्वी तुम्ही हे जाणत नव्हता. शिवबाबा समजावतात तर जरुर कोणाचे शरीराद्वारे सांगतील, वरुन काही आवाज तर करत नाहीत. शक्ती किंवा प्रेरणा इ.ची गोष्ट नाही. तुम्ही आत्मा शरीरा मध्ये येऊन बोलत आहात. तसे बाबा पण म्हणतात कि, मी शरीराद्वारे सुचना देतो. त्यावर जो जेवढा चालेल, ते आपलेच कल्याण करताल. श्रीमतावर चालो वा ना चालो, शिक्षकाचे ऐका किंवा न ऐका, स्वत:चे कल्याण किंवा अकल्याण करतात. नाही शिकाल तर जरुर नापास व्हाल. हे पण सांगतात कि, शिवबाबांकडून शिकून इतरांना शिकवावयाचे आहे. बाबा मुलांना प्रसिध्द करतात. शारीरिक पित्याची गोष्ट नाही. हे आहेत आत्मिक पिता. हे पण तुम्ही समजता कि, जेवढे आम्ही श्रीमतावर चालू तेवढा वारसा प्राप्त करु. पुर्ण चालणारे उंच पद प्राप्त करतील. न चालणारे उंच पद प्राप्त करत नाहीत. बाबा तर सांगतात कि, माझी आठवण करा तर तुमचे पाप नष्ट होईल. रावण राज्यात तर तुमच्यावर फार पाप चढले आहे. विकारामध्ये गेल्यानेच पाप आत्मा बनतात. पुण्य आत्मा आणि पाप आत्मा जरुर असतात. पुण्य आत्मासमोर पाप आत्मा डोके टेकवतात. मनुष्याला हे माहित नाही कि, देवता जे पुण्य आत्मा होते, तेच मग पुर्नजन्म घेत-घेत पाप आत्मा बनतात. ते तर समजतात कि, ते नेहमीच पुण्य आत्मा आहेत. बाबा सांगतात कि, पुर्नजन्म घेत-घेत सतोप्रधान पासून तमोप्रधान बनतात, नंतर अगदीच पाप आत्मा बनतात, तेव्हाच बाबाला बोलावतात. जेव्हा पुण्य आत्मा असतात तेव्हा आठवण करण्याची आवश्यकता राहत नाही. तर हे तुम्हा मुलांना इतरांना सांगावयाचे आहे, सेवा करावयाची आहे, बाबा तर इतरांना सांगण्यासाठी नाही जाणार मुले सेवा करण्यालायक आहेत, तर मुलांनाच गेले पाहिजे. मनुष्य तर दिवसेंदिवस असुर बनत आहेत. न ओळखल्यामुळे वाद करण्यास उशीर करत नाहीत. मनुष्य म्हणतात गीतेचा भगवान कृष्ण आहे. तुम्ही समजावता कि, ते तर देहधारी आहेत, त्यांना देवता म्हटले जाते. कृष्णाला पिता म्हणत नाहीत. येथे तर सर्व पित्याची आठवण करतात ना. आत्म्यांचा पिता तर दुसरा कोणी असत नाही. हे प्रजापिता ब्रह्मा पण सांगतात कि, निराकार पित्याची आठवण करा. ते निराकार पिता आहेत. समजावले तर फार जाते, कोणी पुर्ण न समजल्याने उलट्या रस्त्याने जंगलात जाऊन पडतात. बाबा तर स्वर्गात जाण्याचा रस्ता दाखवतात तरी पण जंगलाच्या रस्त्याने जातात. बाबा समजावतात कि, तुम्हाला जंगलाकडे घेऊन जाणारा रावण आहे. तुम्ही मायेकडून पराजीत होता, रस्ता विसरता, नंतर जंगलातील काटे बनतात, तर मग ते स्वर्गात उशीरा येतात. येथे तुम्ही आले आहात, स्वर्गात जाण्याचा पुरुषार्थ करण्यासाठी. त्रेताला पण स्वर्ग म्हणत नाहीत. 25 टक्के कमी आहे ना. त्याची नापासा मध्ये गणना होते. तुम्ही येथे आले आहात, जुन्या जगाला सोडून नवीन जगात जाण्यासाठी. त्रेताला नवीन जग म्हणत नाहीत. जे नापास होतात ते तिथे जातात, कारण वाट नीट चालत नाहीत. खाली वर होतात. तुम्ही पण जाणता कि, जेवढी आठवण असायला पाहिजे तेवढी नाही. स्वर्गवासी जे बनतात, त्यांना म्हणतात चांगले पास. त्रेता वाल्यांना नापास म्हटले जाते. त्या शिक्षणात तर दुसऱ्यादा शिकता येते. येथे तर दुसऱ्या वर्षी शिकण्याची गोष्टच नाही. जन्म-जन्मांतर, कल्प-कल्पांतर तेच परीक्षा पास करतात, ज्यांनी कल्पापुर्वी केले आहे. या नाटकातील रहस्याला चांगले रितीने समजले पाहिजे. काही समजतात आम्ही चालू शकत नाही. वृध्द असेल तर त्याला हाताला धरुन चालवा तर चालेल, नाहीतर पडेल. परंतु नशीबात नसेल तर किती पण जोर दया, फुल बनण्यासाठी परंतू बनत नाहीत. धोतऱ्याचे पण फुल आहे. ते काटे तर टोचतच आहेत.

बाबा किती समजावतात. काल तुम्ही ज्या शिवाची पुजा करत होता ते आज तुम्हाला शिकवत आहेत. प्रत्येक गोष्टीत पुरुषार्थीसाठीच जोर दिला जातो. पाहिले जाते कि, माया चांगल्या चांगल्या फुलांना खाली पाडते. हाडे तोडते, ज्याला मग निंदक म्हटले जाते. जे एक राजधानी सोडून दुसरीकडे जातात, त्याला फितूर म्हटले जाते. बाबा पण म्हणतात कि, माझे बनून नंतर मायेचे बनतात तर, त्याला पण फितूर म्हटले जाते. त्यांचे वागणे पण तसेच होते. आता बाबा माये पासून सोडविण्यास आले आहेत. मुले म्हणतात माया फार चतूर आहे, आपल्या कडे ओढत राहते. माया जसे की चुंबक आहे. यावेळी चुंबकाचे रुप धरत आहे. किती सुंदरता जगामध्ये वाढली आहे. पुर्वी हे सिनेमा इ. थोडेच होते. हे सर्व 100 वर्षात निघाले आहेत. बाबा तर अनुभवी आहेत. तर मुलांना या नाटकातील गुह्य रहस्याला चांगल्या रितीने समजले पाहिजे, प्रत्येक गोष्ट तंतोतंत नोंदलेली आहे. 100 वर्षात जसेकी स्वर्ग बनला आहे, विरोधासाठी. तर समजून येते की, आता स्वर्ग आणखीन लवकर येत आहे. विज्ञान पण कामाला येत आहे. ते पण फार सुख देणारे आहे ना. ते सुख कायम मिळावे त्यासाठी या जुन्या जगाचा विनाश पण होणार आहे. सतयुगातील सुख आहेत भारताच्या भाग्यामध्ये. ते तर येतातच द्वापर युगात, जेव्हा भक्तीमार्ग सुरु होतो, तेव्हा भारतवासी वाम मार्गात जातात, तेव्हा दुसरे धर्मवाले क्रमाने येतात. भारत घसरत-घसरत एकदम खाली येतो. नंतर चढायचे आहे. येथे पण चढतात, मग पडतात. किती पडतात, विचारु नका. कोणी तर मानतच नाहीत की, बाबा आम्हाला शिकवत आहेत. चांगले-चांगले सेवाधारी, ज्यांची बाबा महिमा करतात, ते पण मायेच्या जाळ्यात अडकतात. कुस्ती होते ना. माया पण असे लढत आहे. एकदम पुर्ण पाडून टाकते. पुढे चालून तुम्हा मुलांना माहित पडत जाईल. माया एकदम पुर्ण झोपवते. तरी पण बाबा म्हणतात कि, एक वेळ ज्ञान ऐकले आहे, तर स्वर्गात जरुर येतील. बाकी पद मात्र प्राप्त करु शकणार नाहीत. कल्पा पुर्वी ज्यांनी जेवढा पुरुषार्थ केला आहे किंवा पुरुषार्थ करत-करत खाली पडले आहेत, तसे आता पण पडतील, आणि चढतील. विजय आणि पराजय होत राहतो ना. सारा आधार मुलांचा आठवणीवर आहे. मुलांना हा अखूट खजाना मिळत आहे. दुनियेत तर लाखोंचे दिवाळे निघते. कोणी लाखाने धनवान बनतात, ते पण एका जन्मासाठी. दुसरे जन्मात थोडेच एवढे धन राहिल. कर्म भोग पण फार आहे. तेथे स्वर्गात तर कर्म भोगाची गोष्ट असत नाही. यावेळी तुम्ही, 21 जन्मासाठी किती जमा करत आहात. जे पुर्ण पुरुषार्थ करतात, ते पुर्ण स्वर्गाचा वारसा प्राप्त करतात. बुध्दी मध्ये राहिले पाहिजे आम्ही बरोबर स्वर्गाचा वारसा प्राप्त करत आहोत. हा विचार करुन का, कि नंतर खाली उतरणार आहोत. हे सर्वांत जास्त खाली पडले, आता परत चढायचे आहे. आपोआप पुरुषार्थ पण होत राहत आहे. बाबा समजावतात कि, पहा, माया किती प्रबळ आहे. माणसा मध्ये किती अज्ञान भरले आहे. अज्ञाना मुळे बाबाला पण सर्वव्यापी म्हणतात. भारत किती फस्र्ट क्लास होता. तुम्ही समजता कि आम्ही असे होतो, आता परत बनत आहोत. या देवतांची किती महिमा आहे, परंतु कोणी जाणत नाही, तुम्हा मुलांशिवाय. तुम्ही जाणता कि बेहदचे बाबा ज्ञानाचे सागर येऊन आम्हाला शिक्षण देतात, तरी पण माया अनेकांना संशयामध्ये आणते. खोटे, कपट सोडत नाहीत. तेव्हा बाबा सांगतात कि, खराखरा स्वत:चा चार्ट लिहा. परंतु देह-अभिमाना मुळे खरे सांगत नाहीत. तर ते पण विकर्म बनते, खरे सांगितले पाहिजे ना. नाही तर फार शिक्षा भोगावी लागेल. गर्भा मध्ये पण जास्त शिक्षा मिळते. तिथे म्हणतात तोबा-तोबा आम्ही परत असे काम करणार नाही. जसे कोणाला मार मिळतो तरी पण अशी माफी मागतात. शिक्षा मिळाले वर पण असे करतात. आता तुम्ही मुले समजले आहात कि, मायेचे राज्य कधीपासून सुरु झाले आहे. पाप करत राहतात. बाबा पाहतात हे एवढे गोड-गोड नम्र बनले नाहीत. बाबा किती नम्र मुलांसारखे 22होऊनचालतआहेत, कारणनाटकानुसारचालतराहतआहेत. म्हणतात जे झाले ते नाटकानुसार समजावतात पण कि पुढे चालून असे होऊ नये. हे बापदादा दोघे एकत्र आहेत ना. दादाची मत आपली, ईश्वराची मत आपली आहे. समजले पाहिजे किही मत कोण देत आहे? हे पण पिता आहेत ना. बाबाचे तर ऐकले पाहिजे. शिवबाबा तर मोठे बाबा आहेत ना, त्यामुळे बाबा सांगतात कि, असेच समजा कि, शिवबाबा समजावत आहेत. नाही समजले तर पद पण प्राप्त होणार नाही. नाटकातील योजने नुसार बाबा पण आहेत, दादा पण आहेत. बाबाची श्रीमत मिळत आहे. माया अशी आहे, जे महावीर, पैलवाना कडून पण कोणते ना कोणते उल्टे काम करवते. समजले जाते, हे बाबाच्या मतावर नाहीत. स्वत:ला पण वाटते कि, मी आसुरी मतावर आहे. श्रीमत देणारे येऊन उपस्थित झाले आहेत, त्यांची आहे ईश्वरीय मत. बाबा स्वत: सांगतात कि, ब्रह्मा बाबांकडून जरी अशी कोणती मत मिळाली, तरी पण त्याला मी ठीक करण्यासाठी बसलो आहे. तरी पण मी रथ घेतला आहेना. मी रथ घेतला तेव्हापासून यांनी शिव्या खाल्ल्या आहेत. नाही तर कधी शिवी नाही खाल्ली. माझ्यामुळे किती शिव्या खातात, तर त्यांचा पण सांभाळ करावा लागतो. बाबा रक्षण जरुर करतात. जसे मुलांचे रक्षण पिता करतातना. जेवढे खरे वागता तेवढे, रक्षण होत आहे. खोट्याचे रक्षण होत नाही. त्यांची तर मग शिक्षा कायम होते. त्यामुळे बाबा समजावतात कि, माया एकदम नाकाला पकडून नष्ट करुन टाकते. मुले स्वत: जाणतात कि, माया खाऊन टाकते तर मग शिक्षण सोडून देतात. बाबा सांगतात अभ्यास जरुर करा. बरे, कोठे कोणाचा दोष आहे. यात जसे जो करेल. तसे भविष्यात प्राप्त करेल, कारण आता जग बदलत आहे. माया असा डाव मारते. ज्यामुळे ती खुशी राहत नाही. मग ओरडतात बाबा. माहित नाही काय होत आहे. युध्दाचे मैदानात फार खबरदार राहतात कि, कुठे कोणी धक्का न मारावा. तरी पण जास्त ताकदवाला असेल तर अंता पर्यंत चालत राहतात, खाली वर होत राहतात. काही मुले खरे बोलत नाहीत. इज्जतीची फार भिती वाटते, माहित नाही बाबा काय म्हणतील. जो पर्यंत सत्य सांगितले नाही, तो पर्यंत पुढे जाणार नाहीत. मनात खटकत राहते, मग त्यात वाढ होत राहते. स्वत:च खरे कधी सांगत नाहीत. कोठे दोघे असतील तर समजतात कि, हा बाबाला सांगेल, तर मीच बाबाला सांगतो. माया फार प्रबळ आहे. समजले जाते कि, यांच्या नशीबात, एवढे उंच पद नसल्याने सर्जन पासून लपवत आहे. लपविल्यामुळे आजारा पासून सुटत नाहीत. जेवढे लपवाल, तेवढे खाली पडत राहतील. भुत तर सर्वांत आहेत ना. जो पर्यंत कर्मातीत अवस्था बनली नाही, तो पर्यंत विकारी दृष्टी पण सुटत नाही. सर्वांत मोठा शत्रु आहे काम. किती तरी खाली पडत आहेत. बाबा तर वारंवार समजावतात कि, शिवबाबा शिवाय कोणत्या देहधारीची आठवण करावयाची नाही. काहीतर असे पक्के आहेत, जी कधी कोणाची आठवण पण करत नाही. पतिव्रता स्त्री असते ना, तिची कुबुध्दी असत नाही. अच्छा.

गोडगोड फारफार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1) आम्हाला शिकविणारे स्वत: ज्ञानाचा सागर, बेहदचे बाबा आहेत, यात कधी संशय आणावयाचा नाही, खोटे,कपट सोडून स्वत:चा खराखरा चार्ट ठेवावयाचा आहे. देह-अभिमानात येऊन कधी फितूर बनायचे नाही.

2) नाटकाला बुध्दीत ठेवून बाबा सारखे फार-फार गोड नम्र बनून राहावयाचे आहे. आपला अहंकार दाखवयाचा नाही. आपली मत सोडुन एका बाबांच्या श्रेष्ठ मता वर चालावयाचे आहे.

वरदान:-
साथीला नेहमी साथ ठेवून, सहयोगाचा अनुभव करणारे एकत्र रुपधारी भव :

नेहमी तुम्ही आणि बाबा असे एकत्र राहा, जे कोणी वेगळे करणार नाही. कधी स्वत:ला एकटा समजू नका. बापदादा अविनाशी साथ देणारे तुम्हा सर्वांचे साथी आहेत. बाबा म्हटले आणि बाबा हजर होतात. मी बाबांचा बाबा माझे. बाबा तुमच्या प्रत्येक सेवेत सहकार्य करणारे आहेत, फक्त आपल्या एकत्र स्वरुपांच्या आत्मिक नशे मध्ये राहा.

बोधवाक्य:-
सेवा आणि स्वप्रगती, दोन्हीचा समतोल ठेवा, तर विजय मिळत राहिल....!!