26-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही बाबा जवळ आले आहेत, तुमचे चरित्र सुधारण्यासाठी तुम्हाला आता दैवी चरित्र बनवायचे आहे”

प्रश्न:-
तुम्हा मुलांना डोळे बंद करुन, बसण्यास मनाई का केली जाते?

उत्तर:-
कारण दृष्टीद्वारे पुर्ण संतुष्ट करणारे बाबा तुमच्या समोर आहेत. तर डोळे बंद केले तर संतुष्ट कसे व्हाल. शाळेत डोळे बंद करुन बसत नाहीत. डोळे बंद केले तर सुस्ती येईल. तुम्ही मुले तर शाळेत शिक्षण घेत आहात, हे शिक्षण अनंत प्राप्तीचे स्त्रोत आहे. लाखो पद्माची कमाई होत आहे, कमाईमध्ये सुस्ती उदासी येऊ शकत नाही.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांप्रती बाबा समजावत आहेत. हे तर मुले जाणतात कि, आत्मिक पिता परमधामवरुन येऊन आम्हाला शिकवत आहेत. काय शिकवत आहेत? बाबा बरोबर आत्म्याचा योग लावण्यास शिकवत आहेत, ज्याला आठवणीची यात्रा म्हटले जाते. हे पण सांगितले आहे-बाबाची आठवण करुन करुन गोड आत्मिक मुलांनो, तुम्ही पवित्र बनून आपल्या पवित्र शांतीधाम मध्ये जाल. किती सोपे समजवणे आहे. स्वत:ला जे पाप आहेत, जे भस्म होत जातील. यालाच योग अग्नी म्हटले जाते. हा भारताचा प्राचीन राजयोग आहे, जे बाबाच प्रत्येक 5 हजार वर्षानंतर येऊन शिकवत आहेत. बेहदचे बाबाच भारतामध्ये या साधारण तनामध्ये, येऊन तुम्हा मुलांना समजावत आहेत. या आठवणीनेच तुमचे जन्मो जन्मीचे पाप नष्ट होतील, कारण बाबा पतित पावन आहेत, आणि सर्वशक्तीमान आहेत. तुमची आत्म्याची बॅटरी आता तमोप्रधान बनली आहे. जी सतोप्रधान होतील, आता तिला परत सतोप्रधान कसे बनवायचे, जे तुम्ही सतोप्रधान दुनियेमध्ये जावू शकाल, शंतीधाम, घरामध्ये जावू शकाल. मुलांना हे फार चांगल्यारितीने आठवणीत ठेवायचे आहे. बाबा मुलांना हा डोस देत आहेत. ही आठवणीची यात्रा उठता, बसता, चालता-फिरता तुम्ही करु शकता. जेवढे होईल तेवढे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमळ फुलासारखे पवित्र राहायचे आहे. बाबाची पण आठवण करावयाची आहे, आणि त्या बरोबर दैवी गुण पण धारण करावयाचे आहेत, कारण दुनियेतील लोकांचे तर आसुरी चरित्र आहे. तुम्ही मुले येथे आले आहात दैवी चरित्र बनविण्यासाठी. या लक्ष्मी नारायणाचे चरित्र फार गोड होते. भक्तीमार्गात यांचीच महिमा गायली जाते. भक्ती मार्गा कधी सुरु होतो, हे पण कोणाला माहित नाही. आता तुम्ही समजले आहात, आणि रावण राज्य कधी पासून सुरु झाले, हे पण आता समजले आहात. तुम्हा मुलांना हे सारे ज्ञान बुध्दीमध्ये ठेवावयाचे आहे. जेव्हा जाणता कि, आम्ही ज्ञानसागर आत्मिक पित्याची मुले आहोत, आता आत्मिक पिता आम्हाला शिकविण्यास आले आहेत. हे पण जाणता कि, हे काही साधारण पिता नाही. हे आहेत आत्मिक पिता, जे आम्हाला शिकविण्यास आले आहेत. त्यांचे निवासस्थान सदैव ब्रह्मलोक आहे. लौकिक पिता तर सर्वांचे येथे आहेत. भक्तीमार्गात लौकिक पिता असले तरी पण परमपिता परमात्म्याला बोलावत आहेत, त्यांचे एकच नांव खरे शिव आहे. बाबा स्वत: समजावत आहेत, गोड गोड मुलांनो, माझे एकच नाव शिव आहे. जरी अनेक नावानी अनेक मंदीरे बनविली आहेत, परंतू ती सर्व आहे भक्तीमार्गाची सामग्री. खरे माझे नांव एकच शिव आहे. तुम्हा मुलांना आत्माच म्हटले जाते, सालीग्राम म्हटले तरी पण दर्जा नाही. अनेकानेज साळीग्राम आहेत. शिव एकच आहेत. ते आहेत बेहदचे पिता, बाकी सर्व आहेत मुले. यापुर्वी तुम्ही हदची मुले, हदच्या पित्याजवळ राहत होता. ज्ञान तर नव्हते. बाकी अनेक प्रकारची भक्ती करत होतो. अर्धाकल्प भक्ती केली, द्वापरपासून भक्ती सुरु होत आहे. रावण राज्य पण सुरु झाले आहे. ही आहे फार सोपी गोष्ट. परंतू एवढी सोपी गोष्ट पण कोणी सहज समजत नाही. रावण राज्य कधी पासून सुरु होत आहे, हे पण कोणी जाणत नाही. तुम्ही गोड मुले जाणता कि, बाबा ज्ञानाचे सागर आहेत. जे त्यांचे जवळ आहे ते मुलांना देत आहेत. शास्त्र तर आहेत भक्ती मार्गातील.

आता तुम्ही समजले आहे, ज्ञान, भक्ती, आणि मग आहे वैराग्य हे तीन मुख्य आहे. सन्यासी पण जाणतात कि, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. परंतू सन्याशांचे आहे आपले हदचे वैराग्य. ते बेहदचे वैराग्य शिकवू शकत नाहीत. दोन प्रकारचे वैराग्य आहे, एक आहे हदचे, दुसरे आहे बेहदचे. ते आहे हठयोगी सन्याशांचे वैराग्य. हे आहे बेहदचे. तुमचा आहे राजयोग, ते घरदार सोडून जंगलात जातात, तर त्यांचे नांवच पडते सन्यासी. हठयोगी घरदार सोडून जातात. पवित्र राहण्यासाठी. ते पण चांगले आहे. बाबा सांगतात कि, भारत तर फार पवित्र होता. एवढा पवित्र खंड आणखीन कोणता असत नाही. भारताची तर फार उंच महिमा आहे, जे भारतवासी स्वत: जाणत नाहीत. बाबाला विसरल्यामुळे सर्व काही विसरले जातात अर्थात नास्तिक निधनके बनतात. सतयुगात किती सुख शांती होती. आता किती दु:ख अशांती आहे. मुलवतन तर आहे शांतीधाम, जेथे आम्ही आत्मे राहतो. आत्मे आपल्या घरुन येथे आली आहेत, बेहदची भुमिका वठविण्यासाठी. आता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग जेव्हा बेहदचे बाबा येतात, नविन दुनियेत घेऊन जाण्यासाठी. बाबा येऊन उत्तम ते उत्तम बनवित आहेत. उंच ते उंच भगवान म्हटले जाते. परंतू ते कोण आहेत, कोणाला म्हटले जाते. हे काही पण समजत नाहीत. एक मोठे लिंग ठेवले आहे. समजतात कि, हे निराकार परमात्मा आहेत. आम्हा आत्म्यांचे ते पिता आहेत, हे पण समजत नाहीत, फक्त पुजा करतात. नेहमी शिवबाबा म्हटले जाते, रुद्र बाबा, किंवा बबुलनाथ बाबा म्हणत नाहीत. तुम्ही लिहता पण कि, शिवबाबाची आठवण आहे? वारसा आठवणीत आहे? ही बोधवाक्य घरो-घरी लावली पाहिजेत, शिवबाबाची आठवण करा तर पाप भस्म होतील कारण पतित पावन एकच बाबा आहेत. या पतित दुनियेमध्ये तर एक पण पावन असत नाही. पावन दुनियेमध्ये मग एक पण पतित असत नाही. शास्त्रामध्ये तर सर्व ठिकाणी पतित लिहले आहेत. त्रेतामध्ये पण म्हणतात रावण होता, सीता पळवून नेली. कृष्णा बरोबर कंस, जरासंघ, हिरण्यकश्यच इ. दाखवतात.कृष्णावर कलंक लावले आहेत. आता सतयुगामध्ये हे सर्व असू शकत नाहीत. किती खोटे कलंक लावले आहेत. बाबावर पण कलंक लावले आहेत, तर देवतांवर पण कलंक लावले आहेत. सर्वांची ग्लानी करत राहत आहेत. तर आता बाबा म्हणतात कि, ही आठवणीची यात्रा आहे. आत्म्याला पवित्र बनविण्यासाठी. पावन बनून मग पावन दुनियेत जावयाचे आहे. बाबा 84 चे चक्र पण समजावत आहेत. आता तुमचा हा अंतिम जन्म आहे. आता घरी जायचे आहे. घरी तर मग शरीर जात नाही. सर्व आत्मे जाणार आहेत, त्यामुळे गोड गोड आत्मिक मुलांनो, स्वत:ला आत्मा समजून बसा, देह समजू नका. इतर सतसंगामध्ये तर तुम्ही देहअभिमानी होऊन बसता, येथे बाब म्हणतात कि, आत्म अभिमानी होऊन बसा. जसे माझ्यात हा संसकार आहे. मी ज्ञानाचा सागर आहे. तुम्हा मुलांना पण असे बनायचे आहे. बेहदचे पिता आणि हदचा पिता यातील भेद सांगत आहेत. बेहदचे बाबा तुम्हाला सारे ज्ञान सांगत आहेत. पुर्वी जाणत नव्हतो. आता सृष्टीचे चक्र कसे फिरत आहे, त्यांचे आदि-मध्य-अंत आणि चक्राचे आयुष्य किती आहे, सर्व सांगत आहेत. भक्तीमार्गामध्ये तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्षे सांगून घोर अंधारात टाकले आहे. खालीच उतरत आले आहेत. म्हणतात पण कि, जेवढी आम्ही भक्ती करतो, तेवढे बाबाला खाली ढकलतात. बाबा येऊन आम्हाला पावन बनवतील. बाबाला ओढतात कारण पतित आहेत, फार दु:खी बनले आहेत. मग म्हणतात कि, आम्ही बाबाला बोलावतो. बाबा पण म्हणतात कि, बिल्कुल दु:खी तमोप्रधान बनले आहेत, 5 हजार वर्षे पुर्ण झाले तर, परत आले आहेत. हे शिक्षण काही या जुन्या दुनियेसाठी नाही. तुमची आत्मा धारण करुन, बरोबर घेऊन जाईल. जसा मी ज्ञानाचा सागर आहे. तुम्ही पण ज्ञान नदी आहात. हे ज्ञान काही या दुनियेसाठी नाही. ही छी छी दुनिया आहे. छी छी शरीरे आहेत. याला तर सोडायचे आहे. शरीर तर येथे पवित्र होणार नाही. मी आत्म्यांचा पिता आहे. आत्म्यांनाच पवित्र बनविण्यास आलो आहे. या गोष्टीला मनुष्य तर काही पण समजत नाहीत, फारच पत्थरबुध्दी, पतित आहेत, त्यामुळे म्हणतात कि, पतित-पावन आत्माच पतित बनली आहे. आत्माच सर्व काही करत आहे. भक्ती पण आत्माच करते, शरीर पण आत्माच घेत आहे.

आता बाबा म्हणतात कि, मी तुम्हा आत्म्यांना घेऊन जाण्यास आलो आहे. मी बेहदचा पिता तुम्हा आत्म्यांच्या बोलावण्यावर आलो आहे. तुम्ही किती ओरडले आहात. आतापर्यंत बोलावत राहत आहेत, हे पतित पावन, ओ गॉड फादर, या, जुन्या दुनियेतील दु:खापासून, शैतानापासून मुक्त करा, तर आम्ही सर्व घरी निघून जावू. आणखीन कोणाला माहिती पण नाही की, घरामध्ये कसे, केव्हा जावू? मुक्तीला जाण्यासाठी किती माथा मारत आहेत, किती गुरु करतात. जन्मोजन्मी माथा मारत चालत आले आहेत. ते गुरु लोक तर जीवनमुक्तीच्या सुखाला तर जाणतच नाहीत. ते इच्छितात मुक्ती. म्हणतात कि, विश्वात शांती कशी होईल? सन्यासी पण मुक्तीलाच जाणत आहेत. जीवनमुक्तीला तर जाणतच नाहीत. परंतू मुक्ती आणि जीवनमुक्ती दोन्ही वारसा बाबाच देत आहेत. तुम्ही जेव्हा जीवनमुक्ती मध्ये राहता, तेव्हा बाकीचे सर्व मुक्तीमध्ये राहतात. आता तुम्ही मुले हे ज्ञान घेत आहात. लक्ष्मी नारायण बनण्यासाठी. तुम्हीच सर्वांत जास्त सुख पाहिले आहे, मग सर्वांत जास्त दु:ख पण तुम्हीच पाहता. आदि सनातन देवी देवता धर्मवाले तुम्हीच मग धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट झाले आहात. तुम्ही पवित्र प्रवृत्ती मार्गवाले होता, हे लक्ष्मी नारायण पवित्र प्रवृत्ती मार्गवाले आहेत. घरदार सोडणे हा सन्याशांचा धर्म आहे. सन्यासी पण प्रथम चांगले होते. तुम्ही पण अगोदर चांगले होता, आता तमोप्रधान झाले आहात. बाबा सांगतात हा विश्व नाटकातील खेळ आहे. बाबा समजावतात कि हे शिक्षण आहेच नविन दुनियेसाठी. पतित शरीर, पतित दुनियेमध्ये, विश्व नाटकानुसार आम्हाला परत 5 हजार वर्षानंतर यावे लागते. ना कल्प लाखो वर्षाचा आहे, ना मी सर्वव्यापी आहे. ही तर तुम्ही माझी निंदा करत आले आहात. मी तरी पण तुमच्यावर किती उपकार करत आहे. जेवढी शिवबाबांची निंदा केली आहे, तेवढी आणखीन कोणाची केली नसेल. जे बाबा तुम्हाला विश्वाचे मालक बनवितात, त्यांचेसाठी तुम्ही म्हणता कि, सर्वव्यापी आहे. जेव्हा निंदा करण्याची पण मर्यादा संपून जाते, तेव्हा परत मी येऊन उपकार करत आहे. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग, कल्याणकारी युग, तेव्हा तुम्हाला पवित्र बनविण्यासाठी येत आहे. किती सोपी युक्ती पावन बनविण्यासाठी. तुम्ही भक्तीमार्गात फार धक्के खाल्ले आहेत, तलावामध्ये पण स्नान करत आले आहात, समजतात यामुळे पावन बनू. आता कोठे ते पाणी आणि कोठे पतित पावन बाबा तो सर्व आहे भक्तीमार्ग, हा आहे ज्ञानमार्ग. मनुष्य किती घोर आंधारात आहेत. कुंभकरणाच्या निद्रेत झोपले आहेत. हे पण तुम्ही जाणता, गायले पण जाते कि, विनाशकाले विपरीत बुध्दी विनशंती, आता तुमची नंबरवार पुरुषार्थानुसार प्रीत बुध्दी आहे. पुर्ण नाही, कारण माया वारंवार विसरवून टाकत आहे. ही आहे 5 विकारांची लढाई पाच विकाराला रावण म्हटले जाते. रावणाचे डोक्यावर गाढवाचे तोंड दाखवितात.

बाबांनी हे पण समजावले आहे-शाळेमध्ये कधी डोळे बंद करुन, बसले जात नाही. तेथे तर भक्तीमार्गात भगवानाची आठवण करण्याची शिकवण देतात, तर डोळे बंद करुन बसवितात. येथे तर बाबा म्हणतात कि, ही शाळा आहे. ऐकले पण आहे दृष्टीद्वारे संतुष्टताण… म्हणतात कि, ते जादूगार आहेत. अरे ही तर महिमा पण आहे. देवता पण दृष्टीद्वारे संपन्न होत आहेत. दृष्टीद्वारे मनुष्यांना देवता बनविणारे हे जादूगर झाले ना. बाबा बसून बॅटरी चार्ज करतात आणि मुले डोळे बंद करुन बसले तर काय म्हणावे. शाळेत डोळे बंद करुन बसत नाहीत. नाहीतर सुस्ती येईल. शिक्षण तर आहे प्राप्तीचे स्त्रोत्र, लाखो पद्मांची कमाई आहे. कमाईमध्ये कधी जांभळी देणार नाहीत. येथे आत्म्यांना सुधारायचे आहे. येथे मुख्य लक्ष्य ठेवले आहे. त्यांची राजधानी पाहावयाची असेल तर जावून दिलवाडा मंदीर पाहा, हे आहे जड. हे आहे चैतन्य दिलवाडा मंदीर. देवता पण आहेत, स्वर्ग पण आहे. सर्वांचे सद्गतीदाता आबूमध्येच येत आहेत. त्यामुळे मोठ्यातील मोठे तीर्थ आबू आहे. जे पण धर्म स्थापक, अथवा गुरु आहेत, सर्वांची सद्गती बाबाच येवून करत आहेत. हे सर्वांत मोठे तीर्थ आहे, परंतू गुप्त आहे. याला कोणी जाणत नाही. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. जे संस्कार बाबामध्ये आहेत, तेच संस्कार धारण करायचे आहेत. बाबासारखे ज्ञानाचा सागर बनायचे आहे. आत्मअभिमानी होऊन राहण्याचा अभ्यास करावयाचा आहे.

2. आत्मा रुपी बॅटरीला सतोप्रधान बनविण्यासाठी चालता-फिरता आठवणीच्या यात्रेत राहायचे आहे. दैवी चारित्र्य धारण करायचे आहे. फार फार गोड बनायचे आहे.

वरदान:-
ज्ञान धनाद्वारे प्रकृतीची सर्व साधने प्राप्त करणारे, पद्मा पदमपती भव
 

ज्ञान धन स्थुल धनाची प्राप्ती स्वत: करत आहेत. जिथे ज्ञान धन आहे, तिथे प्रकृती स्वत: दासी बनत आहे. ज्ञान धनाने प्रकृतीची सर्व साधने स्वत:च प्राप्त होऊन जातात, त्यामुळे ज्ञान धन सर्व धनाचा राजा आहे. जिथे राजा आहे तिथे सर्व पदार्थ स्वत:च प्राप्त होतात. हे ज्ञान धनच, पद्मा पद्मपती बनविणारे आहे, परमार्थ आणि व्यवहाराला स्वत:च सिध्द करत आहे. ज्ञान धनामध्ये एवढी शक्ती आहे जे अनेक जन्मासाठी राजांचा राजा बनवित आहे.

बोधवाक्य:-
“कल्पा कल्पाचा विजयी आहे” हा आत्मिक नशा जागृत करा, तर मायाजीत बनून जाल...!