24-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, योगबळाने वाईट संस्कारांना परिवर्तन करुन स्वत:मध्ये चांगले संस्कार भरा. ज्ञान आणि पवित्रतेचे संस्कार, चांगले संस्कार आहेत”

प्रश्न:-
तुम्हा मुलांचा जन्मसिध्द अधिकार कोणता आहे? तुम्हाला आता कोणती भासना येत आहे?

उत्तर:-
तुमचा जन्मसिध्द अधिकार आहे मुक्ती आणि जीवनमुक्ती. तुम्हाला आता भासना येते की, आम्हाला बाबा बरोबर परत घरी जायचे आहे. तुम्ही जाणता कि, बाबा आले आहेत भक्तीचे फळ मुक्ती आणि जीवनमुक्ती देण्यासाठी. आता सर्वांना शांतीधाम मध्ये जायचे आहे. सर्वांना आपल्या घराचा साक्षात्कार करावयाचा आहे.

ओम शांती।
मनुष्य, बाबाला खरे बादशहा म्हणत आहेत. इंग्रजीमध्ये बादशहा म्हणत नाहीत. त्यामध्ये फक्त फादर म्हणतात, गॉड फादर इज ट्र्युथ म्हणतात. भारतामध्ये म्हणतात खरे बादशहा. आता फरक तर फार आहे. ते फक्त खरे सांगत आहेत, खरे शिकवत आहेत, खरे बनवत आहेत. येथे म्हणतात खरे बादशहा. खरे पण बनवत आहेत आणि सत्यखंडाचे बादशहा पण बनवत आहेत. हे तर बरोबर आहे-मुक्ती पण देतात, जीवनमुक्ती पण देतात, ज्याला भक्तीचे फळ म्हटले जाते. मुक्ती आणि जीवनमुक्ती, भक्तीचे फळ देतात, आणि मुक्त पण करतात. मुले जाणतात आम्हाला दोन्ही देत आहेत. मुक्त तर सर्वांना करत आहेत, फळ तुम्हाला देत आहेत. आम्हाला दोन्ही देत आहेत. मुक्त तर सर्वांना करत आहेत, फळ तुम्हाला देत आहेत. मुक्ती आणि जीवनमुक्ती अशी पण भाषा बनविली आहे ना. भाषा तर फार आहेत. शिवबाबाची पण फार नावे ठेवली आहेत. कोणाला म्हणा त्यांचे नांव शिवबाबा आहे तर म्हणतात कि, आम्ही तर त्यांना मालकच म्हणतो. मालक तर ठीक आहे परंतू त्यांचे पण नांव पाहिजे ना. नाव रुपापासून वेगळी कोणती वस्तू असत नाही. मालिक पण कोणत्या गोष्टीचा बनत आहे ना. नाव रुप तर जरुर आहे. आता तुम्ही जाणता कि, बाबा बरोबर मुक्त पण करत आहेत, नंतर शांतीधामला सर्वांना जरुर जायचे आहे. आपले घराचा साक्षात्कार सर्वांना करावयाचा आहे. घरातून आले आहेत, तर प्रथम त्याचा साक्षात्कार कराल, त्याला म्हणतात गती सद्गती, अक्षर म्हणतात परंतू अर्थ रहित. तुम्हा मुलांना तर भासना येते की, आम्ही आमचे घरी पण जावू आणि फळ पण घेऊ. नंबरवार तुम्हाला मिळत आहे, तर इतर धर्मवाल्यांना पण नंतर वेळेनुसार मिळेल. बाबांनी समजावले होते, ही पत्रके आहेत फार चांगली, तुम्ही स्वर्गवासी आहात कि नर्कवासी? तुम्ही मुले पण जाणता कि, ही मुक्ती जीवनमुक्ती दोन्ही ईश्वरीय पित्याचा जन्मसिध्द अधिकार आहे. तुम्ही लिहू पण शकता. बाबांकडून तुम्हा मुलांना हा जन्मसिध्द अधिकार मिळत आहे. बाबाचे बनल्यामुळे दोन्ही गोष्टी प्राप्त होत आहेत. तो आहे रावणाचा जन्मसिध्द अधिकार, हा आहे परमपिता परमात्म्याचा जन्मसिध्द अधिकार. हा आहे भगवानाचा जन्मसिध्द अधिकार, तो आहे शैतानाचा जन्मसिध्द अधिकार. असे लिहले पाहिजे जे काही समजू शकतील. आता तुम्हा मुलांना स्वर्ग स्थान करावयाचा आहे. किती काम करावयाचे आहे. आता तर जसे बाळ आहेत, जसे मनुष्य कलियुगासाठी म्हणत आहेत कि, आता लहान (बाळ) आहे. बाबा सांगतात कि, सतयुगाचे स्थापनेत लहान आहात. आता तुम्हा मुलांना वारसा मिळत आहे. रावणाचा काही वारसा म्हणत नाहीत. गॉड फादर कडून तर वारसा मिळत आहे. तो काही पिता थोडेच आहे, त्याला (रावण 5 विकार) तर शैतान म्हटले जाते. शैतानाचा वारसा काय मिळत आहे? 5 विकार मिळतात. देखावा पण असा करत आहेत, तमोप्रधान बनून जात आहेत. आता दसरा साजरा करतात, उत्सव साजरा करतात. फार खर्च करतात. परदेशींना पण निमंत्रण देवून बोलावतात. सर्वांत प्रसिध्द दसरा साजरा करतात म्हैसूर मध्ये. पैसे वाले पण फार आहेत. रावण राज्यामध्ये पैसा मिळाला तर अक्कलच नष्ट होऊन जाते. बाबा सविस्तर समजावत आहेत. त्याचे नांवच आहे रावणराज्य. याला परत म्हटले जाते ईश्वरीय राज्य. रामराज्य म्हणणे पण चुकीचे होते. गांधीजी रामराज्य पाहिजे म्हणत होत. मनुष्य समजतात की, गांधीजी पण अवतार होते. त्यांना किती पैसे देत होते. त्यांना भारताचा बापूजी म्हणत होते. आता हे तर साऱ्या विश्वाचे बापू आहेत. आता तुम्ही येथे बसले आहात, जाणता किती जीवआत्मे असतील. जीव (शरीर) तर विनाशी आहे, बाकी आत्मा आहे अविनाशी. आत्मे तर पुष्कळ आहेत. जसे आकाशात तारे राहतात ना. तारे जास्त आहेत कि आत्मे जास्त आहेत? कारण तुम्ही आहात जमीनीवरील तारे आणि ते आहेत आकाशातील तारे म्हटले जाते ना.

अच्छा, यावर पण आपसात चर्चा करा. बाबा आता ही गोष्ट घेत नाहीत. हे तर समजावले आहे कि सर्व आत्म्यांचा एक पिता आहे, यांचे बुध्दीत तर सर्व आहेत, जे पण मनुष्य मात्र आहेत, सर्वांचा तो पिता आहे. हे तर सर्व जाणतात कि सारी सृष्टी समुद्रावर उभी आहे. हे पण काही सर्वांना माहित नाही. बाबांनी समजावले आहे हे रावण राज्य साऱ्या सृष्टीवर आहे. असे नाही, रावण राज्य काही समुद्राचे पलिकडे आहे. सागर तर सर्वत्र आहेच. म्हणतात की, खाली बैल आहे, त्यांचे शिंगावर सृष्टी उभी आहे. मग जेव्हा थकतो तेव्हा शिंग बदली करतो. आता जुनी दुनिया खलास होऊन नविन दुनिया स्थापन होत आहे. शास्त्रामध्ये तर अनेक प्रकारच्या गोष्टी दंतकथा, लिहल्या आहेत. हे तर मुले जाणतात कि, येथे सर्व आत्मे शरीराबरोबर आहेत, यांना म्हटले जाते निराकारी, आत्म्यांची दुनिया. याला सृष्टी म्हणतात, त्याला म्हटले जाते निराकारी दुनिया. आत्मा जेव्हा शरीरामध्ये येते. तेव्हा हालचाल होते. नाही तर शरीर काही कामाचे राहत नाही. तर त्याला म्हटले जाते निराकारी दुनिया. जेवढे पण आत्मे आहेत, ती सर्व अंतकाळात आले पाहिजेत, त्यामुळे याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते. सर्व आत्मे जेव्हा येथे येतात तर तेथे एक पण राहत नाही. जेव्हा तेथे एकदम खाली होऊन जाते, तेव्हा मग सर्व परत जातात. तुम्ही हे संस्कार घेऊन जाता, नंबरवार पुरुषार्थानुसार. कोणी ज्ञानाचे संस्कार घेऊन जातात, कोणी पवित्रतेचे संस्कार घेऊन जातात, यायचे तर येथेच आहे. परंतू अगोदर तर घरी जावयाचे आहे. तेथे आहेत चांगले संस्कार. येथे आहेत वाईट संस्कार. वाईट संस्कार बदलून चांगले संस्कार बनत आहेत. मग वाईट संस्कार योग बळाने चांगले होत आहेत. चांगले संस्कार तेथे घेऊन जातील. बाबा मध्ये पण शिकविण्याचे संस्कार आहेत ना. जे येऊन समजावत आहेत. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावत आहेत. बीजाची पण माहिती देत आहेत, तर साऱ्या झाडाची पण माहिती देत आहेत. बीजाची माहिती आहे ज्ञान, आणि झाडाची माहिती आहे भक्ती. भक्ती तर फार विस्ताराने होत आहे ना. बीजाची आठवण करणे तर सोपे आहे. तेथेच निघून जावयाचे आहे. तमोप्रधान पासून सतोप्रधान बनण्यासाठी थोडाच वेळ लागत आहे, नंतर सतोप्रधान पासून तमोप्रधान बनण्यासाठी 5 हजार वर्षे बरोबर लागतात. हे चक्र फार तंतोतंत बरोबर बनलेले आहे, जे पुनरावृत्त होत राहते. दुसरे कोणी या गोष्टी सांगत नाही, तुम्ही सांगू शकता. अर्धे अर्धे केले जाते. आर्धा स्वर्ग, आर्धा नरक, मग सविस्तर पणे सांगत आहेत. स्वर्गामध्ये जन्म कमी, आयुष्य मोठे असते. नरकामध्ये जन्म जास्ती, आयुष्य कमी असते. तेथे आहेत योगी, येथे आहेत भोगी, त्यामुळे येथे फार जन्म होत आहेत. या गोष्टीला दुसरे कोणी जाणत नाही. मनुष्याला काही पण माहिती नाही. देवता कधी होते, ते कसे बनले, किती समजदार बनले, हे पण तुम्ही जाणता. बाबा यावेळी मुलांना शिकवून 21 जन्मासाठी वारसा देत आहेत. नंतर तुमचे हे संस्कार राहत नाहीत. मग दु:खाचे संस्कार होऊन जातात. जसे राजाईचे संस्कार असतात, तर ज्ञानाच्या अभ्यासाचे संस्कार पुर्ण होऊन जातात. हे संस्कार पुर्ण झाले, तर नंबरवार पुरुषार्थानुसार रुद्र माळेमध्ये ओवले जाल, मग नंबरवार येतील, भुमिका करण्यासाठी. ज्यांनी पुर्ण 84 जन्म घेतले आहेत, ते अगोदर येतात. त्यांची नांवे पण सांगत आहेत. तर आहे पहिला राजकुमार स्वर्गाचा. तुम्ही जाणता कि, फक्त एक थोडेच असतील, सारी राजधानी असेल ना. राजा बरोबर तर मग प्रजा पण पाहिजे. होऊ शकते-एकापासून दुसरे जन्म घेत जातील. जरी म्हटले 8 एकत्र येतात, परंतू श्रीकृष्ण तर नंबर एकला येईल ना. 8 एकत्र येतात तर मग कृष्णाची एवढी महिमा का? यासर्व गोष्टी पुढे चालून समजतील म्हणतात ना, आज तुम्हाला फार रहस्य युक्त गोष्टी सांगत आहे. काही तर राहिले आहे ना. ही युक्ती चांगली आहे, ज्या गोष्टी मध्ये पाहा सांगत आहे. काही तर राहिले आहे ना. ही युक्ती चांगली आहे, ज्या गोष्टी मध्ये पाहा समजत नाही, तर सांगा, आमची मोठी बहिण उत्तर देवू शकते, नाही तर म्हणा, आतापर्यंत बाबांनी सांगितले नाही. दिवसेनुदिवस रहस्य सांगत आहेत, असे म्हणतात. लाजण्याची गोष्ट नाही. रहस्य युक्त मुद्दे जेव्हा सांगत आहे, तर तुम्हाला ऐकून फार खुशी होते. शेवटी मग सांगतात कि, मनमनाभव, मध्याजी भव. अक्षरे पण शास्त्र बनविणऱ्याने लिहली आहेत. संभ्रमित होण्याची जरुरत नाही. मुलगा बापाचा झाला, आणि बेहदचे सुख मिळाले. यामध्ये मन्सा, वाचा, कर्मणा पवित्रतेची आवश्यकता आहे. लक्ष्मी-नारायणाला बाबाचा वारसा मिळाला आहे ना. हे पहिल्या नंबरमध्ये आहेत, ज्यांनाच पुजले जात आहे. स्वत:ला पण पाहा-आमच्यात असले गुण आहेत. आता तर अवगुणी आहात ना. आपल्या अवगुणाची पण कोणाला माहिती नाही.

आता तुम्ही बाबाचे बनले आहात तर जरुर बदल झाला पाहिजे. बाबांनी बुध्दीचे कुलूप उघडले आहे. ब्रह्मा आणि विष्णूचे पण रहस्य समजावले आहे. हे आहेत, पतित, ते आहेत पावन, दत्तक घेणे या पुरुषोत्तम संगमयुगावरच होत आहे. प्रजापिता ब्रह्मा जेव्हा आहेत, तेव्हाच दत्तक घेणे होत आहे. सतयुगामध्ये तर होत नाही. येथे पण कोणाला मुलगा झाला नसेल, तर मग दत्तक घेतात. प्रजापिताला पण जरुर ब्राह्मण मुले पाहिजेत. हे आहेत मुख वंशावली. ते आहेत कुखवंशावली. ब्रह्मा तर प्रसिध्द आहेत. यांचे नांवच बेहदचे आहे. सर्व समजतात प्रजापिता ब्रह्मा आदि देव आहे, त्यांना इंग्रजीमध्ये ग्रेट ग्रेट फादर (आजोबा) म्हणतात. हे आहे बेहदचे नांव. ती सर्व आहेत हदची नांवे, त्यामुळे बाबा समजावतात-हे जरुर सर्वांना माहित झाले पाहिजे कि, भारत सर्वांत मोठे तीर्थ आहे. जेथे बेहदचे बाबा येतात. असे नाही साऱ्या भारतात उपस्थित आहेत. शास्त्रामध्ये मगध देश लिहले आहे, परंतू ज्ञान कोठे शिकविले? आबूमध्ये कसे आले? दिलवाडा मंदीर पण येथे पूर्ण स्मृतीस्थळ आहे. ज्यांनी पण बनविले, त्यांचे बुध्दीत आले, आणि बसून बनविले. तंतोतंत बिनचुक नमुना तर बनवू शकत नाहीत. बाबा येथेच येऊन सर्वांची सद्गती करत आहेत, मगध देशात नाही. तो तर पाकिस्तान झाला आहे, हे आहे पाक स्थान. खरे तर पाक स्थान तर स्वर्गाला म्हटले जाते. पाक आणि नापाकचा हा सारा खेळ आहे. तर गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांनो, तुम्ही हे समजता कि, आत्मा आणि परमात्मा वेगळे राहिले फार काळ---किती काळानंतर भेटले आहेत? नंतर कधी भेटणार? सुंदर मेळा केला आहे, जेव्हा सदगुरु मिळतो दलालाचे रुपामध्ये. गुरु तर फार आहेत ना, त्यामुळे सद्गुरु म्हटले जाते. स्त्रीचे जेव्हा लग्न होते, तर म्हणतात कि, हा पती तुझा गुरु ईश्वर आहे. पती तर प्रथम अपवित्र बनवितो. आजकाल तर जगामध्ये फार अस्वच्छता वाढली आहे. आता तुम्हा मुलांना तर फुलासारखे बनावयाचे आहे. तुम्हा मुलांना तर पक्या पक्या बंधनात बाबा बांधत आहेत.

तसे तर शिवजयंती बरोबरच रक्षाबंधन होत आहे. गीता जयंती पण झाली पाहिजे. कृष्णाची जयंती थोडी उशीरा नविन दुनियेत होत आहे. बाकी सण सर्व यावेळेचे आहेत. रामनवमी कधी झाली-हे पण कोणाला माहित आहे का? तुम्ही म्हणता की, नविन दुनियेमध्ये 1250 वर्षानंतर रामनवमी होत आहे. शिवजयंती, कृष्णजयंती राम जयंती कधी झाली---? हे कोणी पण सांगू शकत नाहीत. तुम्ही मुलांनी पण आता बाबाद्वारे जाणले आहे. तंतोतंत सांगू शकता. म्हणजे साऱ्या जगाची जीवन कहानी तुम्ही सांगू शकता. बाबा किती चांगली बेहदची शिकवण शिकवत आहेत. एकाच वेळी तुम्ही 21 जन्मासाठी नग्न होण्यापासून वाचत आहात. आता तुम्ही 5 विकार रुपी रावणाच्या परक्या राज्यामध्ये आहात. आता सारे 84 चे चक्र तुमच्या बुध्दीमध्ये आले आहे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. बेहद सुखाचा वारसा प्राप्त करण्यासाठी मन-वचन-कर्माने पवित्र जरुर बना. चांगले संस्कार योगबळाने धारण करा. स्वत:ला गुणवान बनवा.

2. नेहमी खुशीमध्ये राहण्यासाठी बाबा ज्या गुह्य गुह्य गोष्टी रोज सांगत आहेत, त्या ऐकून दुसऱ्याला सांगावयाच्या आहेत. कोणत्या पण गोष्टीत गोंधळून जायचे नाही. युक्तीने उत्तरे दया. लाज वाटून घ्यावयाची नाही.

वरदान:-
स्वमानाचे आसनावर स्थित होऊन शक्तींना आदेशाप्रमाणे, चालविणारे विशालबुध्दी भव
 

आपल्या विशाल बुध्दीद्वारे सर्व शक्ती रुपी सेवाधारीला वेळेवर कामाला लावा. जे पण स्वमान प्रत्यक्ष बाबाद्वारे मिळाले आहेत, त्या नशेमध्ये राहा. स्वमानाच्या स्थितीरुपी आसनावर बसा, तर सर्व शक्ती, सेवेसाठी, नेहमी हजर असल्याचा अनुभव होईल. तुमच्या आदेशाची वाट पाहतील. तर वरदान आणि वारशाला कार्यात लावा. मालक बनून, योगयुक्त बनून युक्तीयुक्त सेवा सेवाधारी कडून घ्या, तर नेहमी राजी राहाल. वारंवार तक्रार करणारे नाही.

बोधवाक्य:-
कोणते पण काम सुरु करण्या अगोदर आठवण करा की, विजय माझा, श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्याचा, जन्म सिध्द अधिकार आहे...!