30-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, बाबा आले आहेत, तुम्हा मुलांना भक्त आत्म्या पासून, ज्ञानी आत्मा
बनवण्यासाठी, पतितापासून पावन बनवण्यासाठी"
प्रश्न:-
ज्ञानवान मुलं
कोणत्या चिंतना मध्ये नेहमीच मग्न राहतात?
उत्तर:-
मी अविनाशी
आत्मा आहे, हे शरीर विनाश आहे. मी ८४ शरीर धारण केले आहेत. आता अंतिम जन्म आहे.
आत्मा कधीच लहान-मोठी होत नाही. शरीर लहान-मोठे होते. हे डोळे शरीरांमध्ये आहेत
परंतु पाहणारी मी आत्मा आहे. बाबा जोपर्यंत शरीर घेत नाहीत तो पर्यंत शिकवू शकत
नाहीत. असे चिंतन ज्ञानवान मुंलच करत राहतात.
ओम शांती।
हे कोणी म्हटले, आत्म्याने. अविनाशी आत्म्याने शरीराद्वारे म्हटले. शरीर आणि आत्म्यां
मध्ये खूपच फरक आहे. शरीर पाच तत्वाचा पुतळा बनतो. जरी लहान असला तरी आत्म्या पेक्षा
तर फारच मोठा आहे. प्रथम तर एकदम लहान पिंड असते नंतर मोठे होते, तेव्हा आत्मा
प्रवेश करते. पिंड वाढत, वाढत परत मोठे होते. आत्मा तर चैतन्य आहे ना. जोपर्यंत
आत्मा प्रवेश करत नाही तोपर्यंत तो पुतळा काहीच काम करू शकत नाही. खूपच फरक
आहे.बोलणारी चालणारी पण आत्मा आहे. ती खुपच छोटा बिंदू आहे.ती कधी लहान मोठी होत
नाही. तीचा कधी विनाश होत नाही.आता हे परमात्मा पित्याने समजावले आहे, की मी अविनाशी
आहे आणि हे शरीर विनाशी आहे, त्या मध्ये प्रवेश करून मी अभिनय करतो. या गोष्टीचे
तुम्ही आता चिंतन करतात.अगोदर तर न आत्म्याला जाणत होते, न परमात्म्याला जाणत होते,
फक्त असेच परमपिता परमात्मा म्हणत होते. आत्मा पण समजत होते परंतु कुणी म्हटले
तुम्ही तर परमात्मा आहात,हे कोणी सांगितले,भक्तिमार्गा मधील गुरु आणि
ग्रंथांनी.सतयुगा मध्ये तर कोणी सांगणार नाही.आता बाबांनी समजले आहे,तुम्ही माझी
मुलं आहात.आत्मा नैसर्गिक आहे तर शरीर अनैसर्गिक मातीचे बनलेले आहे. जेव्हा आत्मा
असते तर बोलते आणि चालते पण. आता तुम्ही मुलं जाणता आम्हा आत्म्यांना बाबा ज्ञान
समजवत आहेत.निराकार शिव बाबा या संगम युगामध्ये येऊन शरीरा द्वारे ज्ञान देतात. हे
चक्षू(डोळे) तर शरीरा मध्ये राहतात. आता बाबा ज्ञान चक्षू देत आहेत. आत्म्यामध्ये
ज्ञान नाहीतर अज्ञानी चक्षू आहेत. बाबा येतात तर आत्म्याला ज्ञानाचक्षू मिळतात.
आत्माच सर्व काही करते. आत्मा शरीराद्वारा कर्म करते. आता तुम्ही समजता बाबांनी हे
शरीर धारण करुन आपले पण रहस्य सांगतात. सृष्टीच्या आदी मध्ये अंतचे रहस्य पण
सांगतात. सर्व नाटकाचे ज्ञान देतात. या पुर्वी काहीच जाणत नव्हते. होय नाटक जरूर आहे.
सृष्टीचे चक्र फिरत राहते, परंतु हे कसे फिरते याला कोणीच जाणत नाही. रचनाकार आणि
रचनाच्या आदी मध्य अंतचे ज्ञान आता तुम्हाला मिळत आहे. बाकी तर सर्व भक्ती
आहे.बाबाच येऊन तुम्हाला ज्ञानी तू आत्मा बनवतात, अगोदर तुम्ही भक्त आत्मा होते,
भक्ती करत होते. आता तुम्ही ज्ञान ऐकत आहात. भक्तीला अज्ञानाचा अंधार म्हणले
जाते.असे नाही भक्ति द्वारे भगवान मिळतात. बाबाने समजवले आहे भक्तीची पण भूमिका आहे,
ज्ञानाची पण भूमिका आहे. तुम्ही जाणता आम्ही भक्ती करत होतो तर कोणते सुख नव्हते.
भक्ती करत बाबांना शोधण्यासाठी भटकत होतो. आता तुम्ही समजता यज्ञ तप, दान-पुण्य करत
शोधत शोधत, धक्का खात-खात तंग होत होतो. तमोप्रधान बनल्यानंतर अधोगतीला सुरुवात होते,
खोटे कार्य करण्यास सुरुवात होते, त्यामुळे पतीत बनले. असे नाही की पावन होण्यासाठी
भक्ती करत होते. भगवंतापासून पावन बनल्या शिवाय आम्ही पावन दुनिया मध्ये जाऊ शकत
नाही. असे नाही पावन बनल्या शिवाय भगवंताशी मिळू शकत नाही. भगवंताला तर बोलवतातच
यासाठी की तुम्ही येऊन पावन बनवा. पतितच भगवंताला भेटण्यासाठी येतात,पावन
बनण्यासाठी.पावन तर भगवंताशी भेटू शकत नाहीत. सतयुगा मध्ये थोडेच लक्ष्मी नारायणशी
भगवान भेटतात?भगवान येऊन तुम्हा पतितांना पावन बनवतात आणि तुम्ही हे शरीर सोडतात.
पावन आत्मे या तमोप्रधान सृष्टीमध्ये राहू शकत नाहीत. बाबा तुम्हाला पावन बनवून
चालले जातात, त्यांची भूमिका पण नाटकामध्ये आश्चर्यकारक आहे. जशी आत्मा दिसून येत
नाही जरी साक्षात्कार होतो तरी समजू शकत नाहीत. बाकी तर सर्व समजू शकता, हा अमका आहे,
असा आहे, आठवण पण करतात. मनुष्याची इच्छा असते अमक्याचा चैतन्य मध्ये साक्षात्कार
व्हावा, बाकी तर काही मतलब नाही. अच्छा चैतन्य मध्ये पाहिले परत काय? साक्षात्कार
झाल्यानंतर तर गायब होतात. अल्पकाळ क्षणभंगुर सुखाची इच्छा पूर्ण होते, त्याला
म्हटले जाते अल्पकाळ क्षणभंगुर सुख.साक्षात्काराची इच्छा होती ती झाला, बस .येथे तर
मुख्य गोष्ट आहे, पतिता पासून पावन बनणे. पावन बनाल तर देवता बणुन स्वर्गामध्ये जाऊ
शकाल. ग्रंथांमध्ये तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष लिहिलेले आहे, समजतात कलियुगा आणखी
चाळीस हजार वर्ष आहे. बाबा सांगतात सर्वकल्पच ५००० वर्षाचा आहे, तर मनुष्य अज्ञान
अंधारामध्ये आहेत, ना. त्याला म्हटले जाते घोर अंधार. ज्ञान कोणा मध्येच नाही, ती
सर्व आहे भक्ती.रावण जेव्हा येतात तर भक्ती सुरू होते आणि जेव्हा बाबा येतात तर
त्यांच्यासोबत ज्ञान पण येते. बाबांकडून एकाच वेळेस ज्ञानाचा वारसा मिळतो, सारखा
सारखा मिळू शकत नाही. स्वर्गामध्ये तर तुम्ही कोणालाही ज्ञान देत नाहीत,आवश्यकताच
नाही. ज्ञान त्यांनाच मिळते जे अज्ञाना मध्ये आहेत. बाबांना कोणीच जाणत नाहीत.
भगवंताची निंंदा केल्याशिवाय गोष्टच करत नाहीत. हे पण तुम्ही आत्ता समजतात. तुम्ही
म्हणतात ईश्वर सर्वव्यापी नाहीत, ते आम्हा आत्म्यांचे पिता आहेत आणि ते म्हणतात की
परमात्मा दगडा मातीमध्ये आहे.तुम्ही मुलांनी चांगल्या रीतीने समजले आहे,भक्ती अगदीच
वेगळी आहे, त्यांच्यामध्ये जरा पण ज्ञान नाही. वेळच सर्व बदलून जाते. भगवंताचे नाव
पण बदलून जाते परत मनुष्याचे नाव पण बदलते. प्रथम देवता म्हटले जाते परत क्षत्रिय
वैश्य शूद्र बनतात. ते दैवी गुण वाले मनुष्य आहेत, हे आसुरी गुण वाले मनुष्य,
बिलकुलच खराब झाले आहेत. गुरुनानक पण म्हणतात चोर इत्यादी, मनुष्याने असे म्हटलं तर
त्यांना लगेच शिव्या देतील, परंतु बाबा म्हणतात हे सर्व आसुरी संप्रदाय आहेत.
तुम्हाला स्पष्ट करून समजावत,राहतात. हा रावण संप्रदाय, तो राम संप्रदाय आहे.
आम्हाला रामराज्य पाहिजे असे गांधीजी म्हणत होते, रामराज्या मध्ये सर्व निर्विकारी
आहेत. रावण राज्यांमध्ये सर्व विकारी आहेत,त्याचे नावच वेश्यालय आहे, रौरव नर्क आहे
ना. यावेळेस मनुष्य विषय वैतरणी नदी मध्ये गोता खात आहेत. मनुष्य ज़नावर इत्यादी
सर्व एक सारखे झाले आहेत. मनुष्याची काहीच महिमा राहिली नाही. पाच विकारावरती तुम्ही
मुलं विजय मिळवता, त्याद्वारे मनुष्यापासून देवता पद मिळवतात,बाकी सर्व नष्ट होतात.
देवता सतयुगा मध्ये राहत होते, आता या कलियुगामध्ये असुर राहतात. असुरांचे काय
लक्षणं आहेत, त्यांच्यामध्ये पाच विकार आहेत. देवतांना तर संपूर्ण निर्विकारी म्हटले
जाते आणि असुरांना संपूर्ण विकारी म्हणले जाते. ते १६ कला संपूर्ण आहेत आणि येथे तर
एक पण कला राहिली नाही. हे बाबच बसून मुलांना समजावून सांगतात. बाबा परिवर्तन
करण्यासाठी येतात.रावण राज्य वेश्यालय ला, शिवालय बनवतात. त्यांनी तर येथेच नाव
ठेवले आहे, त्रिमूर्ती हाऊस, त्रिमूर्ती रस्ता इत्यादी अगोदर असे नावं नव्हते, आता
काय व्हायला पाहिजे. सर्व दुनिया कोणाची आहे? परमात्म्याची आहे ना. परमात्माची
दुनिया आहे, जी दुनिया अर्धा कल्प पवित्र आणि अर्धा कल्प अपवित्र राहते. निर्माता
तर त्यांनाच म्हटले जाते ना, तर त्यांचीच ही दुनिया झाली ना. बाबा समजवतात मी तर
मालक आहे, मी बिजरुप चैतन्य ज्ञानाचा सागर आहे. माझ्यामध्ये सर्व ज्ञान आहे,दुसऱ्या
कोणा मध्ये होऊ शकत नाही. तुम्ही समजू शकता या सृष्टी चक्राच्या आदि मध्य अंतचे
ज्ञान, बाबा मध्येच आहे,बाकी तर सर्व थापा आहेत. मुख्य थाप हीच आहे ज्यासाठी बाबा
उल्हाना देतात. तुम्ही मुलांनी मला दगडा माती, कुत्र्या मांजरा मध्ये समजले आहे. तर
तुमची किती दूर्दशा झाली आहे.
नवीन दुनियेच्या मनुष्यामध्ये आणि जुन्या विकारी दुनिया च्या मनुष्यामध्ये
रात्रंदिवसा चा फरक आहे. अर्ध्या कल्पापासून अपवित्र मनुष्य, पवित्र देवतांच्या पुढे
डोके टेकतात. हे पण तुम्हा मुलांना समजावले आहे, प्रथम शिव बाबांची पूजा होते. जे
शिवबाबा तुम्हाला पुजारी पासून पूज्य बनवतात. रावण तुम्हाला पुज्य पासून पुजारी
बनवतात परत बाबा अविनाशी नाटका नुसार तुम्हाला पूज्य बनवतात. रावण इत्यादी हे सर्व
नावं तर आहेत ना. दसरा जेव्हा साजरा करतात, त्यावेळेस अनेक परदेशी लोकांना पण
पाहण्यासाठी बोलवतात परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. देवतांची खूप निंदा करतात,परंतू
अशा गोष्टीच नसतात. जसे मनुष्य म्हणतात ईश्वर नावा रूपापेक्षा वेगळे आहेत अर्थात
नाहीतच. तसेच हे खेळ इत्यादी बनवतात ते काहीच नाहीत. ही सर्व मनुष्याची बुद्धी आहे.
मनुष्य मताला आसुरी मत म्हटले जाते. यथा राजा राणी तथा प्रजा,सर्व असेच बनतात,याला
असुरी राज्य म्हटले जाते. सर्व एक दुसऱ्या ची निंदा करत राहतात. तर बाबा समजावतात
मुलांनो जेव्हा तुम्ही योग करण्यासाठी बसतात तर स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण
करा. तुम्ही अज्ञानी होते तर परमात्माला वरती समजत होते, आता तर तुम्ही जाणता बाबा
येथे आलेले आहेत, तर तुम्ही वरती समजत नाहीत. तुम्ही बाबांना या सृष्टी वरतीच, या
तना मध्ये बोलवले आहे.तुम्ही जेव्हा आपल्या सेवा केंद्रावरती बसतात, तर समजता
शिवबाबा मधुबन मध्ये या तना मध्ये आहेत. भक्तिमार्गा मध्ये तर परमात्म्याला वरती
मानत होते. हे भगवान ई..आता तुम्ही बाबांची कुठे आठवण करतात? बसून काय करतात. तुम्ही
जाणतात ब्रह्माच्या तनामध्ये येथे आहेत, तर जरूर येथेच आठवण करावी लागेल ना. वरती
तर नाहीत. येथे पुरुषोत्तम संगमयुगा मध्ये आले आहेत. बाबा म्हणतात मी तुम्हाला
श्रेष्ठ बनवण्यासाठी येथे आलो आहे. तुम्ही मुलं इथेच आठवण करतात. भक्त लोक वरती
आठवण करतात. तुम्ही जरी परदेशात असाल, तरी म्हणाल शिवबाबा ब्रह्मा तना मध्ये आहेत.
तन तर जरूर पाहिजे ना. तुम्ही कुठेही बसले असाल तरी जरूर येथे आठवण कराल.
ब्रह्माच्या तनांमध्ये आठवण करावी लागेल. काही बुद्धिहीन मुलं ब्रह्माला मानत नाहीत.
बाबा असे म्हणत नाहीत ब्रह्माची आठवण करू नका. ब्रह्मा बाबां शिवाय शिवबाबांची आठवण
कशी येईल? बाबा म्हणतात मी या तना मध्ये आहे, या तनांमध्ये माझी आठवण करा, म्हणून
तुम्ही बाप आणि दादा दोघांची आठवण करतात. बुद्धीमध्ये हे ज्ञान आहे. यांची आपली
आत्मा आहे.शिवबाबांना तर आपले शरीर नाही.बाबा म्हणतात मी प्रकृतीचा आधार घेतो.बाबा
बसून सर्व ब्रह्मांड आणि सृष्टीच्या आदी मध्य अंतचे रहस्य समजवतात, दुसरे कोणी
ब्रह्मांडला जाणत नाहीत. ब्रह्म तत्व ज्यामध्ये आम्ही आणि तुम्ही राहतो.परम पिता,
सर्व आत्मे त्या ब्रह्म लोक शांतीधाम मध्ये राहतात. शांतीधाम खूपच गोड नाव आहे, या
सर्व गोष्टी तुमच्या बुद्धी मध्ये आहेत.वास्तविक मध्ये आम्ही ब्रह्म महतत्वाचे
रहिवासी आहोत, ज्याला निर्वाणधाम वानप्रस्थ म्हणले जाते. जेव्हा भक्ती आहे, तर
ज्ञानाचे अक्षर पण नाही. याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते,ज्यावेळेस परिवर्तन
होते. जुन्या दुनिया मध्ये असुर राहतात, नवीन दुनिया मध्ये देवता राहतात, तर त्यांना
परिवर्तन करण्यासाठी शिवबाबा ना यावे लागते. सतयुगा मध्ये तुम्हाला काहीच माहिती
होणार नाही. आता तुम्ही कलियुगा मध्ये आहात तरीही काहीच माहिती नाही. ज्यावेळेस
नवीन दुनिया मध्ये असाल त्यावेळेस या जुन्या दुनियाचे काहीच माहिती नसेल.आत्ता
जुन्या दुनिया मध्ये आहात तर नवीन दुनियेची काहीच माहिती नाही. नवीन दूनिया कधी होती,
हे माहिती नाही, ते तर लाखो वर्ष म्हणतात. तुम्ही मुलं जाणतात, बाबा या संगमयुगा
वरती कल्प कल्प येऊन या मनुष्य सृष्टी रुपी झाडाचे रहस्य समजतात आणि हे चक्र कसे
फिरते, ते पण तुम्हा मुलांना समजवतात. तुमचा धंदाच हे ज्ञान समजून घेण्याचा आहे. आता
हे ज्ञान एका एकाला समजवण्या साठी खूप वेळ लागतो म्हणून तुम्ही अनेकांना समजवत
राहतात. अनेक लोक समजून घेतात.या गोड गोड गोष्टी अनेकांना समजावयाच्या आहेत. तुम्ही
प्रदर्शनी मध्येच समजवतात ना. आता शिवजयंती ला पण चांगल्या रीतीने बाबांचा परिचय
द्या. या खेळाचा कालावधी किती आहे. तुम्ही तर बरोबर सांगाल. हा एक भाषणाचा विषय झाला.
तुम्हाला बाबा समजवतात ना, ज्यामुळे तुम्ही देवता बनतात.जसे तुम्ही समजून देवता
बनतात, तसेच दुसर्यांना पण बनवा. एक सद्गुरूच आपली जीवन नौका किनाऱ्याला लावणारे
आहेत. अशा मुख्य मुख्य गोष्टी तुम्ही समजावयाच्या आहेत. हे सर्व ज्ञान बाबा शिवाय
कोणी देऊ शकत नाही. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) पुजारी
पासून पुज्य बनण्यासाठी तुम्हाला संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. ज्ञानवान बनून
स्वतःला स्वता:च परिवर्तन करायचे आहे. अल्पकाळ सुखाच्या पाठीमागे जायचे नाही.
(२) बाप आणि दादा दोघांची आठवण करायची आहे. ब्रह्मा शिवाय शिवबाबांची आठवण येऊ शकत
नाही. आज पर्यंत भक्तीमध्ये वरती आठवण केली आत्ता शिवबाबा ब्रह्मा तना मध्ये आले
आहेत तर दोघांची आठवण यायला पाहिजे.
वरदान:-
हदच्या इच्छा
पासून मुक्त राहुन, सर्व प्रश्नां पासून दूर राहणारे, सदा प्रसन्नचित्त भव.
जी मुलं हदच्या इच्छे
पासून मुक्त राहतात, त्यांच्या चेहऱ्या वरती प्रसन्नते ची झलक दिसून येते.
प्रसन्नचित्त आत्मा कोणत्याही गोष्टींमध्ये प्रश्न चित्त राहत नाहीत. ते नेहमी
निस्वार्थ आणि नेहमी सर्वांना निर्दोष अनुभव करतात. दुसऱ्या कोणा वरही दोष ठेवत
नाहीत. जरी कोणतेही परिस्थिती आली, जरी कोणती ही आत्मा कर्मभोग चुक्त करणारी समोर
आली, जरी शरीराचा कर्मभोग समोर आला परंतु संतुष्टते मुळे, ते सदा प्रसन्नचित्त
राहतात.
बोधवाक्य:-
व्यर्थ
गोष्टीची तपासणी लक्ष देऊन करा, अलबेला रूपामध्ये नाही.