14-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, जेव्हा तुम्ही नंबर अनुसार सतो प्रधान बनाल तेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा विनाशाची ताकत वाढेल आणि ही जुनी दुनिया नष्ट होईल.”

प्रश्न:-
कोणता पुरुषार्थ करणाऱ्याला बाबांचा पूर्ण वारसा मिळेल?

उत्तर:-
पूर्ण वारसा घ्यायचा असेल तर प्रथम बाबांना आपला वारस बनवा. जे पण तुमच्याकडे आहे ते सर्वकाही बाबांना अर्पण करा. बाबांना आपला मुलगा बनवा तर पूर्ण वारशाचे अधिकारी बनाल. २)संपूर्ण पवित्र बना, तेव्हा पूर्ण वारसा मिळेल. संपूर्ण पवित्र नाही तर दंड खाऊन थोडसं पद मिळेल.

ओम शांती।
मुलांना फक्त एकाच आठवणीमध्ये बसायचे नाही, तिघांच्या आठवणीमध्ये बसायचे आहे. जरी एक आहे, तरी तुम्हाला माहित आहे ते पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत. सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. ही नवीन गोष्ट फक्त तुम्हाला माहित आहे. भक्ती शिकवतात, शास्त्र ऐकवतात, यासर्व मनुष्याला ईश्वर म्हणू शकत नाही. ते तर निराकार आहेत .निराकार आत्म्यांना समोर येऊन शिकवतात. आत्मा शरीराद्वारे ऐकते हे बुद्धीमध्ये असायला पाहिजे. आता तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये बसला आहात. बेहदच्या बाबांनी म्हटले आहे, आत्मिक मुलांनो, माझी आठवण करा तर तुमचे पाप नष्ट होईल. येथे ग्रंथ इत्यादीची काही गोष्ट नाही. तुम्हाला माहित आहे, शिवबाबा आपल्याला राजयोग शिकवतात. किती श्रेष्ठ शिक्षक आहेत. उच्च ते उच्च आहेत तर पद उच्च करवतात. जेव्हा तुम्ही सतोप्रधान बनणार नंबरवार पुरुषार्था प्रमाणे, तेव्हा लढाई लागेल. नैसर्गिक आपत्ती पण होतील. आठवण पण जरूर करायची आहे, आणि बुद्धी मध्ये ज्ञान असणं जरुरी आहे. फक्त एकाच वेळेस पुरुषोत्तम संगमयुगावरती बाबा येऊन नवीन दुनियेसाठी समजावतात. छोटी मुलं पण बाबांना आठवण करतात. तुम्ही तर समजदार आहात. तुम्हाला माहित आहे, बाबांची आठवण केल्यामुळे विकर्म विनाश होतात आणि बाबांकडून उच्च पदाची प्राप्ती होते. लक्ष्मी-नारायण यांनी जे नवीन दुनियेत पद प्राप्त केले ते पद शिवबाबा कडूनच मिळालेले आहे. लक्ष्मीनारायण परत 84 जन्माचे चक्र घेऊन आता ब्रम्हा-सरस्वती बनले आहेत. हेच परत लक्ष्मी-नारायण बनतील. आता पुरुषार्थ करत आहेत. सृष्टीच्या आधी-मध्य-अंताचे ज्ञान तुम्हाला आहे. आता तुम्ही अंधश्रद्धेमुळे देवतांच्या पुढे डोकं टेकणार नाही. देवतांच्या पुढे जाऊन मनुष्य स्वतःला पतित सिद्ध करतात, “तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात, आम्ही पापी विकारी आहोत, आमच्यामध्ये कोणतेही गुण नाही.” असे म्हणतात. तुम्ही ज्यांची महिमा गाता, आता तुम्ही तसेच बनत आहात. बाबांना मुलं विचारतात बाबा, “हे ग्रंथ कधीपासून वाचायला सुरुवात केली?” बाबा सांगतात, जेव्हा पासून रावणाचे राज्य सुरू झाले. ही सर्व भक्तीची सामग्री आहे. तुम्ही जेव्हा येथे बसता, तेव्हा सर्व ज्ञान बुद्धीमध्ये असणे आवश्यक आहे. हे संस्कार आत्मा घेऊन जाईल. भक्तीचे संस्कार जाणार नाहीत. भक्तीचे संस्कार असणारे जुन्यादुनियेमधील मनुष्याकडे जन्म घेतील. हे पण आवश्यक आहे. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचे चक्र फिरत राहिले पाहिजे. सोबत बाबांची आठवण करायची आहे. बाबा आपले पिता पण आहेत. बाबांची आठवण केली तरच विकर्म विनाश होतील. बाबा आपले शिक्षक पण आहेत. हे समजले तर शिक्षण सुद्धा बुद्धीमध्ये राहील आणि सृष्टी चक्राचे ज्ञान असेल तर तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल.(आठवणीची यात्रा चालू आहे )

ओम शांती, ज्ञान आणि भक्ती. बाबांना म्हटले जाते, ज्ञानाचे सागर त्यांना भक्तीचे सर्व ज्ञान माहित आहे भक्ती कधी सुरू झाली, कधी पूर्ण होईल, मनुष्यांना माहित नाही. बाबा येऊन समजतात. सतीयुगामध्ये देवी-देवता विश्वाचे मालिक होते. तिथे भक्तीचे नाव पण नसते एकही मंदिर नाही. सर्व देवी देवता होते. या सृष्टीवर जेव्हा जुनी दुनिया होती म्हणजे 2500 वर्षे पूर्ण होतात किंवा त्रेता आणि द्वापर युगात संगम होतो, तेव्हा रावण येतो. संगम तर जरूर पाहिजे. त्रेतायुग आणि द्वापरयुगाच्या संगमावर रावण येतो, आणि देवी-देवता वाममार्गाला जातात. हे तुमच्याशिवाय कुणालाच माहीत नाही. बाबा पण कलियुगाचा अंतला आणि सतयुगाच्या आदिच्या संगमावर येतात, आणि रावण द्वापरयुगाच्या संगमावरती येतो. त्या संगमाला कल्याणकारी म्हणू शकत नाही. अकल्याणकारी असेच म्हणणार. बाबांचे नाव कल्याणकारी आहे. द्वापरयुगापासून अकल्याणकारी युग सुरू होते. बाबा चैतन्य बीज स्वरूप आहेत. त्यांना साऱ्या झाडाचे ज्ञान आहे. ते बीज चैतन्य असते तर त्याने सांगितले असते, माझ्यापासून झाड कसे निघते. परंतु ते जड असल्यामुळे सांगत नाही. आता आपल्याला माहित आहे, बीज टाकल्यामुळे छोटसं झाड निघते आणि नंतर मोठे फळ द्यायला सुरुवात करते. परंतु चैतन्य हे सांगू शकतात. दुनियामध्ये आज-काल मनुष्य काय-काय करतात. नवीन संशोधन करतात. चंद्रावरती जाण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही हे सगळं ऐकता. चंद्रावर जातात, हे शोधण्यासाठी की चंद्र काय आहे? समुद्रामध्ये सुद्धा खूप दूरवर जातात, परंतु अंत प्राप्त करू शकत नाहीत. कारण तिथे फक्त पाणीच पाणी आहे. विमानाने वरती जातात तेव्हा इतके पेट्रोल टाकावे लागते, जे ते परत येऊ शकते. आकाश पण बेहद आहे. सागर पण बेहद आहे. त्याच प्रकारे बाबा ज्ञानाचे सागर आहेत. तो पाण्याचा सागर आहे, आकाश पण बेहद आहे. धरती पण बेहद आहे चालत रहा. समुद्राच्या खाली सुद्धा जमीन आहे. डोंगर सुद्धा जमिनीवर उभे आहेत. धरती खोदून पर्वत काढतात, पाणी पण काढतात. समुद्र सुद्धा जमिनीवर आहे. त्याचा अंत भेटत नाही. खूप दूरपर्यंत पाणीच पाणी दिसते. परमपिता परमात्मा जे बाबा आहेत, त्यांच्यासाठी बेअंत म्हणू शकत नाही. मनुष्य जरी ईश्वराला बेअंत म्हणत असतील, मायाला पण बेअंत म्हणत असेल, परंतु तुम्हाला माहित आहे, ईश्वर बेअंत नाही. बाकी आकाश बेअंत आहे. हे पाच तत्व आकाश वायु हे तमोप्रधान बनले आहेत. आता आत्म सुद्धा तमोप्रधान बनली आहे. तेव्हा बाबा येऊन सतोप्रधान बनवतात. किती छोटी आत्मा आहे. 84 जन्म भोगते हे चक्र फिरत राहते. हे नाटक अनादि आहे, याचा अंत होत नाही. हे परंपरा पासून चालत आले आहे. केव्हा सुरू झाले याचाही अंत प्राप्त करू शकत नाही. बाकी ही गोष्ट सर्वांना समजवायची आहे की नवीन दुनिया केव्हा सुरू झाली आणि ती जुनी केव्हा होते . हे पाच हजार वर्षात चक्र फिरतच राहते. बाकी दुनिया मध्ये थाप मारतात, की सतयुग लाखो वर्षांचे आहे. आणि मनुष्य रोज ऐकत ऐकत ते सत्य आहे असेच समजतात. हे कुणालाच माहित पडत नाही की ईश्वर कधी येऊन स्वतःचा परिचय देतात? माहीत नसल्यामुळे कलियुगाला अजून चाळीस हजार वर्ष आहे असं समजतात. जोपर्यंत तुम्ही समजावून सांगणार नाही, तुम्ही समजवण्यासाठी निमित्त आहात. हे कल्प फक्त पाच हजार वर्षाचे आहे, लाखो वर्षाचे नाही.

भक्तिमार्गाचा किती विस्तार आहे, मनुष्याकडे पैसा आहे म्हणून तो खर्च करतो. बाबा म्हणतात मी तुम्हाला किती पैसे देऊन जातो. बेहदचे बाबा वारसा देतात. त्यामुळे सुख मिळतं, आयुष्य वाढतं. बाबा मुलांना म्हणतात, “माझ्या लाडक्या मुलांनो, “आयुष्यवान भव!” सतयुगात तुमचं आयुष्य दीडशे वर्ष असते. तिथे काळ खाऊ शकत नाही. बाबा तुम्हाला वरदान देतात, “आयुष्यवान भव!” तुम्ही अमर बनतात तिथे अकाली मृत्यू होत नाही. तुम्ही खूप सुखी असतात, म्हणून त्याला सुखधाम म्हणतात. आयुष्य पण मोठं आणि धन पण खूप, सुख पण खूप असते. गरीब पासून सावकार बनतात. आता तुमच्या बुद्धीत आहे, बाबा देवी देवता धर्माची स्थापना करतात. हे खूप छोटे झाड आहे. सतयुगात एक धर्म, एक राज्य आणि एक भाषा आहे. त्यालाच विश्वामध्ये शांती असे म्हणतात. साऱ्या विश्वामध्ये आपण पार्टधारी आहोत. हे कुणाला माहीत नाही, जर माहित असते तर सांगितलं असतं आपण केव्हापासून आपली भुमिका करत आहोत. आता बाबा आपल्याला समजवतात गीत पण आहे ना जे बाबांनी आपल्याला दिलं ते कोणीच देऊ शकत नाही. सारी पृथ्वी, सारा आकाश, साऱ्या विश्वाची राजधानी देतात. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते. नंतर भारतामध्ये अनेक राजा झाले गायन आहे ना, जे बाबा देतात ते कोणीच देऊ शकत नाही. बाबा आपल्याला सर्व प्राप्ती करवतात. हे ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे, तरच आपण दुसऱ्याला समजावून सांगू शकतो. समजावून तोच सांगू शकतो जे बंधन मुक्त आहेत. बाबांकडे कुणी आलं तर बाबा त्याला विचारतात कीती मुल आहेत? ते सांगतात पाच मुल आहेत आणि शिवबाबा सर्वात मोठे. आपण शिवबाबांचे बनलो तर शिवबाबा सुद्धा आपल्याला मुलगा बनवून विश्वाचे मालक बनवतात. मुले वारसदार असतात ना. लक्ष्मी-नारायण शिवबाबांचे पूर्ण वारसदार आहेत. त्यांनी पूर्वजन्मात आपले सर्वस्व बाबांना दिले. वारसा मुलांनाच मिळतो ना. बाबा म्हणतात तुम्ही मला तुमचे वारसदार बनवा. मुलं म्हणतात बाबा हे सगळं तुमचेच आहे आणि तुमच्याकडे जे आहे ते आमचं. तुम्ही आम्हाला सर्व विश्वाची बादशाही देतात. ड्रामामध्ये लिहिलेला आहे अर्जुनाला विनाशाचा आणि चतुर्भुजाचा सुद्धा साक्षात्कार झाला. अर्जुन दुसरं कोणी नाही तर ब्रह्मा बाबांना साक्षात्कार झाला. ब्रम्हाबाबांनी बघितलं राजाई भेटते तर का नाही बाबांना वारस बनवू. बाबासुद्धा मला वारसदार बनवतात हा व्यापार खूप छान आहे. कुणाला काही विचारलं नाही गुपचूप सगळं देऊन टाकलं. याला म्हणतात गुप्तदान कुणालाच माहीत नाही. यांना काय झालं? काहींनी विचार केला, यांना वैराग्य आलेला आहे. बहुतेक संन्याशी बनले आहेत. मुलं म्हणतात पाच मुलं माझी आहेत, बाकी एक मुलगा शिवबाबा आहेत. ब्रह्म बाबांनी सुद्धा बाबांसमोर सर्वस्व अर्पण केले. त्यामुळे खूप लोकांची सेवा झाली. बाबांना बघून अनेकांना विचार आला. त्यांनी सुद्धा घरदार सोडून दिले, नंतर हंगाम सुरू झाला. घरदार सोडण्याची काहींनी हिंमत दाखवली. ग्रंथामध्ये लिहिले आहे भट्टी बनणार आहे कारण त्यांना एकांत पाहिजे. बाबांशिवाय कुणाचीही आठवण करायची नाही. मित्रसंबंधी कुणाला आठवण करू नका. कारण आत्मा जी पतित बनलेली आहे तिला पावन बनवायचे आहे. बाबा म्हणतात व्यवहारांमध्ये पवित्र राहा. यावरच मारामारी आहे. म्हणतात स्त्री-पुरुषांमध्ये ज्ञान भांडण लावते कारण एक पवित्र बनतो आणि दुसरा नाही, तर भांडण होते. या सर्वांनी मार खाल्लेला आहे. कारण अचानक ही नवीन गोष्ट झाली. सगळे आश्चर्य करतात हे काय झालं? जे सर्व पळाले. मनुष्य समजू शकत नाही. फक्त एवढं म्हणतात कोणती तरी शक्ती आहे असे कधीच झाले नाही. जे सगळे घरदार सोडून पळाले. ड्रामामध्ये हे शिवबाबाचे चरित्र आहे. कुणी रिकाम्या हाताने पळाले. हा सुद्धा खेळ आहे. घरदार सोडून पळाले, काहीच आठवण नाही. हे फक्त शरीर आहे यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे आणि आत्म्याला बाबांच्या आठवणीने पवित्र बनवायचे आहे. तेव्हाच आपण परत जाऊ शकतो. स्वर्गामध्ये अपवित्र आत्मा जाऊ शकत नाही. कायदाच नाही मुक्तिधाम मध्ये पवित्र पाहिजे आणि पवित्र बनण्यासाठी विघ्न पडतात. कोणत्या सत्संगामध्ये जाण्यासाठी विघ्न पडत नाही. कुठेपण जा, परंतु इथे पवित्रता मुळे विघ्न पडतात. हे तर सर्वांना माहीत आहे. पवित्र बनल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही. नाहीतर धर्मराज शिक्षा करतील, थोडीशी भाकरी मिळेल. शिक्षा नाही भोगली तर पद सुद्धा चांगले मिळेल ही समजण्याची गोष्ट आहे. बाबा म्हणतात गोड मुलांनो, तुम्हाला माझ्याकडे यायचे आहे ना! हे जुनं शरीर सोडून पवित्र आत्मा बनून या. मग 5 तत्व सुद्धा सतोप्रधान नवीन होऊन जातात आणि तुम्हाला शरीर सुद्धा नवीन मिळेल. सगळं वरखाली होऊन नवीन बनेल ज्याप्रकारे शिवबाबा ब्रह्मा बाबाच्या शरीरात येऊन बसतात त्याच प्रकारे आत्मा गर्भ महालामध्ये जाऊन बसेल. जन्मवेळ होईल तेव्हा जन्म घेतात तेव्हा विजेप्रमाणे आत्मा चमकेल कारण ती पवित्र आहे. हे नाटकामध्ये लिहिलेले आहे.अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आत्मा पवित्र बनण्यासाठी एकांताच्या भट्टीमध्ये रहायचे आहे. एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणाचीही आठवण यायला नको.

2. बुद्धीमध्ये सर्व ज्ञान ठेवून बंधन मुक्त बनुन दुसर्यांची सेवा करायची आहे. बाबांसोबत खरा व्यापार करायचा आहे. बाबांनी सर्व काही गुप्त केले असे गुप्तदान करायचे आहे.

वरदान:-
निमित्त आणि निर्माण भावा द्वारे सेवा करणारे श्रेष्ठ सफलता मूर्त भव.
 

सेवाधारी म्हणजे सदा बाबां समान निमित्त बनणारे आणि निर्माण राहणारे. निर्माणता श्रेष्ठ सफलतेचे साधना आहे. कोणत्या पण सेवेमध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी नम्रता भाव आणि निमित्त भाव धारण करा. यामुळे सेवेमध्ये नेहमी आनंदाचा अनुभव कराल. सेवेमध्ये कधी थकणार नाही. कोणतीही सेवा मिळाली तरी या दोन विशेषता द्वारे सफलता स्वरूप बनाल.

बोधवाक्य:-
सेकंदांमध्ये विदेही बनण्याचा अभ्यास असेल तर सूर्यवंशी मध्ये येऊ शकाल.