30-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, एक बाबांच्या आठवणीत राहणे म्हणजे अव्यभिचारी आठवण आहे, या आठवणीमुळे
तुमची पापे भस्म होतात...”
प्रश्न:-
बाबा जे
समजावतात ते कुणी सहज मानते तर कुणाला कठीण वाटते-याचे कारण काय आहे?
उत्तर:-
ज्या मुलांनी खुप काळ भक्ती केलेली आहे, अर्ध्याकल्पाचे जुने भक्त आहेत, ती मुले
बाबांची प्रत्येक गोष्ट सहज मान्य करतात कारण त्यांना भक्तीचे फळ मिळते. जे जुने
भक्त नाहीत त्यांना प्रत्येक गोष्ट समजणे अवघड वाटते. दुसऱ्या धर्मातील लोक तर या
ज्ञानाला समजूच शकत नाहीत.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना आत्मिक पिता समजावतात तुम्ही सर्व मुले काय करीत आहात? तुमची
आठवण अव्याभिचारी आहे. एक आहे व्यभिचारी आठवण, दुसरी आहे अव्यभिचारी आठवण. तुम्हा
सर्वांची आहे अव्यभिचारी आठवण. कुणाची आठवण? बाबांची. बाबांची आठवण करत-करत पापे
जळून जातात आणि तुम्ही तिथे पोहोचता. पवित्र बनून पुन्हा नविन दुनियेत जाता. आत्मे
जातात. आत्माच या इंद्रियाद्वारे सर्व कर्म करते ना! तर बाबा सांगतात क, स्वत:ला
आत्मा समजून बाबांची आठवण करा. लोक तर अनेकांची आठवण करतात. भक्तीमार्गात तुम्हाला
एकाची आठवण करायची आहे. भक्ती सुध्दा सुरुवातीला तुम्ही उच्च ते उच्च अशा
शिवबाबांचीच केली होती. त्याला अव्याभिचारी भक्ती म्हणतात. तोच सर्वांना सद्गती
देणारा स्वत: पिता आहे. त्यांच्याकडून मुलांना बेहदचा वारसा मिळतो. भावा-भावाकडून
वारसा मिळत नाही. वारसा नेहमी पित्याकडून मुलांना मिळतो. कन्यांना फार थोडा वारसा
मिळतो. ती तर पुढे जाऊन एखाद्याची अर्धांगनी बनते. येथे तर तुम्ही सर्व आत्मे आहात.
सर्व आत्म्यांचा पिता एक आहे. सर्वांना पित्याकडून वारसा घेण्याचा हक्क आहे. तुम्ही
भाऊ भाऊ आहात. भले शरीर स्त्री-पुरुषांचे आहे. सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. ते फक्त
म्हणतात हिंदू-मुस्लीम भाऊ भाऊ अर्थ जाणत नाहीत. तुम्ही आता अर्थ समजता. भाऊ भाऊ
म्हणजे सर्व आत्मे एका पित्याची मुले आहेत व पुन्हा प्रजापिता ब्रह्माची मुले म्हणजे
भाऊ बहिण आहेत. आता तुम्ही जाणता कि, या दुनियेतून सर्वांना माघारी जायचे आहे. सर्व
मनुष्यांचा पार्ट आता पुर्ण होत आहे. पुन्हा बाबा येऊन या जुन्या दुनियेतून नव्या
दुनियेत घेऊन जातात. गायन करतात-हे नावाडी, आमची नाव पैलतीरावर घेऊन जावा, ने म्हणजे
सुखधामला घेऊन चला. ही जुनी दुनिया बदलून नवी दुनिया जरुर येणार आहे. शंतीधामपासून
अगदी सर्व दुनियेचा नकाशा तुमच्या बुध्दीत आहे. आम्ही सर्व आत्मे गोड घर म्हणजे
शांतीधामचे रहिवासी आहोत. हे तर बुध्दीत आहे ना! आम्ही जेव्हा सतयुगी नव्या दुनियेत
आहोत तेव्हा बाकी इतर सर्व आत्मे शांतीधाममध्ये राहतात. आत्मा कधी विनाश पावत नाही.
आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. तो कधीच विनाश होत नाही. समजा, हा इंजिनियर
आहे तर पुन्हा 5 हजार वर्षांनी हुबेहुब असाच इंजिनियर बनेल. हे नाव, रुप, देश व
ठिकाण असेल. यासर्व गोष्टी बाबा येऊन समजावतात. हा अनादि अविनाशी ड्रामा (नाटक) आहे.
या नाटकाचे आयुष्य 5 हजार वर्षे आहे. एकही सेकंद कमी-जास्त होऊ शकत नाही. हे अनादि
बनविलेले नाटक आहे. सर्वांना भुमिका मिळालेली आहे. आत्म-अभिमानी, साक्षी होऊन खेळ
पाहावयाचा आहे. बाबांना तर शरीर नाही. ते ज्ञानाचे सागर, बीजरुप आहेत. बाकी इतर
आत्मे जे वरती निराकारी दुनियेत राहतात ते पुन्हा नंबरप्रमाणे आपली भुमिका
वठविण्यासाठी येतात. पहिल्यांदा देवतांचा नंबर लागतो पहिल्या नंबरने येणाऱ्या
राज्यघराण्याची चित्रे आहेत व पुन्हा चंद्रवंशी राज्यघराण्याची सुध्दा चित्रे आहेत.
सर्वांत उच्च आहेत सुर्यवंशी लक्ष्मी-नारायण यांचे राज्य. त्यांचे राज्य कधी व कसे
स्थापन झाले-कोणीही मनुष्य मात्र जाणत नाही. सतयुगाचे आयुष्य लाखों वर्षे सांगतात.
कुणाचेही जीवनचरित्र जाणत नाहीत. या लक्ष्मी नारायणचे जीवन चरित्र जाणुन घेतले
पाहिजे. न जाणता त्यांच्यापुढे नतमस्तक होणे व त्यांची महिमा करणे हे चुकीचे आहे.
बाबा आपणासं जे-जे मुख्य आहेत त्यांचे जीवन चरित्र सांगतात. तुम्हीही आता जाणता कि,
यांची राजधानी कशी चालते! सतयुगात श्रीकृष्ण होता, आता पुन्हा ती कृष्णपुरी स्थापन
होत आहे. कृष्ण हा स्वर्गातला राजकुमार आहे. लक्ष्मी-नारायणाची राजधानी कशी स्थापन
झाली. हे सर्व तुम्ही जाणता.
नंबरप्रमाणे माळासुध्दा बनते आहे. अमुक-तमुक हे माळेचे मणी बनतील. पण चालता-चालता
पुन्हा काही नापासही होतात. माया धुळ चारते. जोपर्यंत सेनेत आहेत, म्हणतात हा अमुक
आहे, हा कमांडर आहे. पुन्हा मरतात, येथे मृत्यू म्हणजे अवस्था खाली येणे, मायेकडून
हार खाणे, आश्चर्याने हे ज्ञान ऐकतात, दुसऱ्यांना सांगतात व पळून जातात... ही माया
इतकी जबरदस्त आहे...कि ईश्वराला घटस्फोट देतात. मरजीवा बनतात, बाबांचे बनतात आणि
पुन्हा रामराज्यातून रावणराज्यात निघून जातात. यावरच यांच्यामध्येही युध्द दाखविले
आहे. पुन्हा राक्षस आणि देवता यांच्यामध्येही युध्दा दाखविले आहे. एकच युध्द दाखवा
ना! बाबा समजावतात कि, हे भारताचे आहे. युध्द म्हणजे हिंसा आहे, हा तर धर्मच आहे
अहिंसा परमो देवी-देवता धर्म. आता तुम्ही डबल अहिंसक बनत आहात. तुमच्याकडे योगबळ आहे.
हत्यारे वगैरे यांनी तुम्ही कुणाला काही करत नाही. ख्रिश्चनांमध्ये पण ती ताकद खुप
आहे. रशिया आणि अमेरिका दोघे भाऊ आहेत. या दोघांत चढा ओढ आहे. ती बॉम्बस
बनविण्यामध्ये, एकमेकांना दोघेही वरचढ आहेत. इतकी ताकद आहे कि, जर दोघे एकत्र आले
तर संपूर्ण दुनियेवर राज्य करु शकतात. पण हा कायदाच नाही की, बाहुबलाच्या जोरावर
कुणी दुनियेवर राज्य करु शकेल. गोष्टीत सुध्दा दाखवतात-दोन बोक्यांचे भांडण व
मध्येच तिसऱ्या माकडाने लोणी पळवले. यासर्व गोष्टी आता बाबा सांगतात. ब्रह्माला
यातले काहीच माहित नव्हते. ही चित्रे सुध्दा बाबांनीच दिव्य दृष्टी देऊन बनवली आहेत
आणि आता समजावतात, ते आपापसांत भांडतात व संपूर्ण विश्वाची बादशही तुम्हाला मिळते.
ते दोघेही खुप शक्तीशाली आहेत, प्रत्येक ठिकाणी आपापसांत भांडणे लावून देतात. आणि
पुन्हा एकमेकांना मदत करतात कारण त्यांचा व्यापार जबरदस्त होतो. जेव्हा हे दोन देश
आपापसांत युध्द करतील तेव्हाच दारु गोळा वगैरे यांचा वापर होईल. जिथे-तिथे
दोघांमध्ये युध्द पेटवून देतात. हा हिंदुस्तान पाकिस्तान पहिले वेगळे होते का? दोघे
एकत्र होते. ही सर्व नाटकामध्ये नोंद आहे. आता तुम्ही पुरुषार्थ करीत आहात, योगबळाने
विश्वाचे मालक बनण्याचा. ते आपापसांत भांडतात, तुम्हाला त्यामध्ये लोणी मिळते. लोणी
म्हणजे विश्वाची बादशाही, तुम्हाला मिळते आणि तीही अगदी सहज मिळते बाबा म्हणतात-गोड
गोड मुलांनो, पवित्र जरुर बना. पवित्र बनून पवित्र दुनियेत चला. त्याला निर्विकारी
दुनिया म्हणतात, संपूर्ण निर्विकारी दुनिया. प्रत्येक वस्तु सतोप्रधान सतो, रजो,
तमोमध्ये जरुर येते. बाबा सांगतात-तुम्हाला एवढी बुध्दी नव्हती कारण शास्त्रांत लाखों
वर्षे सांगितले आहे. भक्ती म्हणजे अज्ञानाचा अंधार हे सुध्दा तुम्हाला माहित नव्हते.
आता कळते कि, ते म्हणतात. कलियुग अजून 40 हजार वर्षे चालेल. 40 हजार वर्षे पुर्ण
झाल्यावर पुन्हा काय होणार? कुणालाच हे माहित नाही म्हणून म्हणतात कि, सारे
अज्ञानाच्या गाढ निद्रेत झोपी गेलेत. भक्ती म्हणजे अज्ञान आहे. ज्ञान देणारा एकच
पिता ज्ञानाचा सागर आहे. तुम्ही ज्ञानाच्या नद्या आहात, बाबा तुम्हाला मुलांना
म्हणजे आत्म्यांना शिकवतात. तो पिता, शिक्षक व सतगुरु सुध्दा आहे. दुसरे कुणी असे
म्हणणार नाही की, तो आमचा पिता, शिक्षक, गुरु आहे. ही तर बेहदची गोष्ट आहे. बेहदचा
पिता, शिक्षक व सतगुरु आहे. बाबा स्वत: समजावतात मी तुमचा परमपिता आहे, तुम्ही सर्व
माझी मुले आहात. तुम्ही सुध्दा म्हणता... हो... बाबा, तुम्ही तेच आहात. बाबा सुध्दा
म्हणतात तुम्ही कल्पा-कल्पाला भेटता. तर बाबा आहेत परमात्मा, ते येऊन मुलांना सर्व
गोष्टी समजावतात. कलियुगाचे आयुष्य 40 हजार वर्षे मानणे म्हणजे पुर्णपणे चुकीचे आहे.
5 हजार वर्षांमध्ये सर्वकाही आहे. बाबा जे समजावतात ते तुम्ही मान्य करता व समजून
घेता. असे नाही की, तुम्ही मान्य करीत नाही. जर मान्य करीत नसता तर येथे आला नसता.
या धर्मांचे नसतील तर ते मान्य करत नाहीत. बाबा समजावतात कि, सर्व भिस्त ही भक्तीवर
आहे. ज्यांनी खुप भक्ती केली आहे तर, त्यांनाच भक्तीचे फळ मिळाले पाहिजे. त्यांनाच
बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो. तुम्ही जाणता कि, आम्हीच देवता विश्वाचे मालक बनतो.
बाकी थोडे दिवस आहेत. या जुन्या दुनियेचा विनाश तर दाखविला आहे, आणखी कोणत्या
दुसऱ्या शास्त्रात असे काही दाखविले नाही. भारताचे धर्मशास्त्र म्हणजे एक गीता आहे.
प्रत्येकाला आपले धर्मशास्त्र वाचले पाहिजे. आणि ज्यांनी तो धर्म स्थापन केला
त्यांना जाणले पाहिजे. जसे ख्रिश्चन, येशु ख्रिस्ताला जाणतात, त्यालाच मानतात,
त्याची पुजा करतात. तुम्ही आदि सनातन देवी देवता धर्मांचे आहात तर देवतांचीच पुजा
करता. पण आजकाल स्वत:ला हिंदू धर्मांचे म्हणवतात.
तुम्ही मुले आता राजयोग शिकत आहात. तुम्ही राजऋषी आहात. ते हठयोगी आहेत.
रात्रंदिवसाचा फरक आहे. त्यांचा कच्चा म्हणजे हदचा सन्यास आहे, फक्त घरदार सोडण्याचा.
तुमचा सन्यास किंवा वैराग्य आहे ते संपूर्ण जुनी दुनिया सोडण्यासाठी. प्रथम आपल्या
घरी अर्थात शांतीधामला जाऊन पुन्हा नवी दुनिया सतयुगात येणार आहोत.
ब्रह्माच्याद्वारे आदि सनातन देवी देवता धर्मांची स्थापना होते. आता ही तर पतित जुनी
दुनिया आहे, हे समजुन घेतले पाहिजे. बाबांच्याद्वारे शिकवतात. हे तर जरुर सत्य आहे
ना! यामध्ये निश्चय तर आहेच. हे ज्ञान बाबाच आम्हास शिकवतात. बाबा आपले शिक्षक आहेत,
खरे सतगुरु आहेत, आपणास सोबत घेऊन जातात. ते गुरु तर अर्ध्यावरच सोडुन जातात. एक
गुरु गेले तर दुसरे गुरु करतात. त्यांच्या शिष्याला गादीवर बसवतात. येथे आहे पिता
आणि मुलांचे नाते, तर तिथे आहे गुरु आणि शिष्याच्या वारसाचा हक्क. वारसा तर
पित्याकडूनच मिळतो ना. शिवबाबा भारतात येतात. शिवरात्री आणि कृष्णाची रात्री साजरी
करतात. शिवाची जन्मपत्रिका तर नाही. मग सांगणार कसे? त्यांची तिथी-तारीख काहीच नाही.
पहिल्या नंबरचा जो श्रीकृष्ण आहे, त्याची तिथी-तारीख दाखवतात. दिवाळी साजरी करणे हे
तर दुनियावी. मनुष्यांचे काम आहे. दिवाळी काही तुम्हा मुलांसाठी नाही. आमचे नविन
वर्ष, नवी दुनिया सतयुगाला म्हटले जाते. आता तुम्ही नव्या दुनियेत जाण्यासाठी शिकत
आहत. तुम्ही आता पुरुषोत्तम संगमयुगावर आहात. त्या कुंभमेळ्यात कितीतरी लोक जातात.
तो मेळा पाण्याच्या नद्यांकिनारी भरतो. किती मेळे साजरे केले जातात, त्यांची
सर्वांची अगोदर पंचायत भरते. कधी कधी तर त्यांची आपापसांत फार भांडणे होतात कारण
देह अभिमान आहे ना! येथे भांडण तंटा होण्याचा प्रश्चन नाही. बाबा फक्त म्हणतात-गोड
गोड लाडक्या मुलांनो, माझी आठवण करा. तुमची आत्मा जी सतोप्रधान होती ती तमोप्रधान
बनली आहे. त्यामध्ये खाद पडली आहे. ती योगाच्या अग्निने बाहेर पडेल. सोनार लोकांना
माहित आहे. पतित-पावन असे बाबांनाच म्हटले जाते. बाबा हे परम सोनार आहेत. सर्वांच्या
आत्म्यामधील विकारांची बनावट काढून सर्वांना खऱ्या सोन्याप्रमाणे बनवतात. सोने
अग्नीमध्ये टाकतात. येथे आहे योग म्हणजे आठवणीची अग्नी, कारण आठवणीनेच पापे भस्म
होतात. तमोप्रधानपासून सतोप्रधान बनण्यासाठी, आठवणीची यात्रा आवश्यक आहे. सर्वजण तर
काही सतोप्रधान बनणार नाहीत. कल्पापुर्वी प्रमाणे सर्वजण पुरुषार्थ करतील.
परमात्म्याची भुमिका सुध्दा नाटकात नोंदलेली आहे, जी नोंद आहे त्याप्रमाणे घडत आहे.
बदल होऊ शकत नाही. रीळ फिरतच राहते. बाबा म्हणतात-पुढे जाऊन तुम्हाला अनेक गुप्त
रहस्ये सांगेन. प्रथम तर हा निश्चय ठेवा की, तो सर्व आत्म्यांचा पिता आहे. त्यांची
आठवण केली पाहिजे. मनमनाभव याचा अर्थच हा आहे. बाकी कृष्ण भगवानुवाच नाहीच. जर
कृष्ण असेल तर सगळे त्यांच्याजवळ जातील. सर्व जण त्याला ओळखतील. मग असे का म्हटले
आहे की, करोडोंमध्ये एखादाच मला ओळखतो/जाणतो? हे तर बाबा समजावतात म्हणून लोकांना
समजून घेण्यामध्ये त्रास वाटतो. पुर्वीही असेच झाले होते. मीच येऊन देवी-देवता
धर्माची स्थापना केली होती. पुन्हा ही शास्त्रे वगैरे सर्व गायब होते आणि पुन्हा
द्वापरयुगाच्या सुरुवातीला भक्तीमार्गातील शास्त्रे वगैरे सर्व तयार होतील. सतयुगात
एकही शास्त्र नाही. भक्तीचे नावरुप नाही, आणि आता भक्तीचेच राज्य आहे. आता सर्वांत
मोठे आहेत ते म्हणजे स्वत:ला श्री श्री 108 जगतगुरु म्हणवून घेणारे. आजकाल तर 1008
असेही म्हणतात. खरे तर ही येथील माळ आहे. जेव्हा माळेचा जप करतात तेव्हा जाणतात कि,
फुल म्हणजे निराकार आहे व नंतर आहे मेरुमणी. ब्रह्मा-सरस्वती जोडमणी दाखवतात कारण
प्रवृत्ती मार्ग आहे ना! प्रवृत्ती मार्गातील लोक निवृत्ती मार्गवाल्यांना गुरु
करतील तर ते काय शिकवतील? हठयोग शिकावा लागेल. तिथे तर अनेक प्रकारचे हठयोग आहेत आणि
राजयोग एकच प्रकारचा आहे. आठवणीची यात्रा ही एकच आहे, ज्याला राजयोग म्हणले जाते.
बाकी इतर सर्व हठयोग आहेत, ते शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी. हा राजयोग बाबाच शिकवतात.
आत्मा प्रथम आणि नंतर शरीर. तुम्ही स्वत:ला आत्म्याऐवजी शरीर समजून उल्टे लटकला
आहात. आता स्वत:ला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर अंत मती सो गती होईल. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. या अनादी
अविनाशी बनविलेल्या नाटकामध्ये प्रत्येकाची भुमिका ही आत्मअभिमानी व साक्षी बनून पहा.
आपले गोड घर व गोड राजधानी यांची आठवण करा, या जुन्या दुनियेला बुध्दीने विसरा.
2. मायेकडून हार खाऊ नका, आठवणीच्या अग्नीने पापांचा विनाश करुन आत्म्याला पावन
बनविण्याचा पुरुषार्थ करा.
वरदान:-
हदच्या
नाज-नखऱ्यांतून (नशेतुन) बाहेर पडून आत्मिक नशेमध्ये राहणारे प्रीत बुध्दी भव
काही मुले हदचा
स्वभाव, हदचे संस्कार यांचे खुप नाज-नखरे करतात. जिथे माझा स्वभाव, माझे संस्कार हे
शब्द येतात तिथे असे नाज-नखरे सुरु होतात. माझे हा शब्दच फेऱ्यांत अडकवतो. परंतु जे
बाबांच्यापासून वेगळे आहे ते माझे नाहीच. माझा स्वभाव हा बाबांच्या स्वभावापेक्षा
वेगळा असूच शकत नाही. म्हणून हदच्या नाज-नखऱ्यांमधून बाहेर पडून आत्मिक नशेमध्ये
राहा. प्रीतबुध्दी बनून प्रेमाचे नखरे खुशाल करा.
बोधवाक्य:-
बाबा, सेवा आणि
परिवार यांच्यावर प्रेम आहे तर कष्टापासुन मुक्त व्हाल...!