22-09-2019 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
30.01.1985 ओम शान्ति
मधुबन
माया जीत आणि प्रकृती
जीतच स्वराज्य अधिकारी
आज चोहीकडील राज्य
अधिकारी मुलांचा राज्य दरबार पाहत आहे. चोहीकडे फार वर्षानी भेटलेले, स्नेही बेहदचे
सेवाधारी अनन्य मुले आहेत. अशी मुले, आता पण स्वराज्य अधिकारी, राज्य दरबारात
उपस्थित आहेत. बापदादा अशा योग्य मुलांना, नेहमीचे योगी, मुलांना, अति निर्माण, उंच
स्वमान, अशा मुलांना पाहून हर्षित होत आहेत. स्वराज्य दरबार साऱ्या कल्पामध्ये
अलौकिक, साऱ्या दरबारामध्ये वेगळा आणि अति प्रिय आहे. प्रत्येक स्वराज्य अधिकारी,
विश्वाच्या राज्याचे पाया, नविन विश्वाचे निर्माता आहेत. प्रत्येक स्वराज्य अधिकारी,
चमकणारे दिव्य तिलकधारी, सर्व विशेषतेने चमकणारे, अमुल्य मण्यानी सजलेले ताजधारी
आहेत. सर्व दिव्य गुणांची माळा धारण केलेले, संपुर्ण पवित्रतेचा लाईटचा ताज धारण
केलेले, श्रेष्ठ स्थितीच्या स्व सिंहासनावर उपस्थित आहेत. असे नटलेले राज्य अधिकारी
दरबारामध्ये उपस्थित आहेत. अशी राज्य दरबार बापदादाचे समोर आहे. प्रत्येक राज्य
अधिकाऱ्या समोर किती दास दासी आहेत? प्रकृतीच दासी बनली आहे ना. शत्रु सेवाधारी बनले
आहे. असे आत्मिक नशेत राहणारे, विकारांना परिवर्तन करुन, काम विकाराला शुभ भावना,
श्रेष्ठ इच्छेच्या स्वरुपात बदलून, सेवेमध्ये लावणारे, असे शत्रुला सेवाधारी
बनविणारे, प्रकृतीच्या कोणत्या पण तत्त्वावर बदलतात. कलियुगामध्ये हे तत्त्व धोखा
आणि दु:ख देतात. संगमयुगात परिवर्तन होतात, रुप बदलतात. सतयुगामध्ये हे 5 तत्त्व
देवतांच्या सुखाचे साधन बनतात. हा सुर्य तुमचे भोजन तयार करेल, त्यामुळे आचारी बनला
जाईल ना. हे वारे तुमचा नैसर्गिक पंखा बनेल. तुमच्या मनोरंजनाचे साधन बनून जाईल.
वारे वाहतील, झाडे हालतील, आणि या फांद्या अशा डोलतील, जे त्यांच्यामुळे वेगवेगळे
आवाज स्वत:च येत राहतील. तर मनोरंजनाचे साधन बनले ना. हे आकाश तुम्हा सर्वांसाठी
राजपथ बनेल. विमान कोठे चालविणार? हे आकाशच तुमचा रस्ता बनेल. एवढा मोठा महामार्ग
आणखी कोठे आहे? विदेशात आहे? किती पण मैलाचे बनवतील परंतू आकाश मार्गापेक्षा तर
लहानच आहे ना. एवढा मोठा रस्ता कोठे आहे? अमेरिकेत आहे? आणि बिना अपघाताचा रस्ता
असेल. जरी 8 वर्षाच्या मुलांनी चालवले तरी पण पडणार नाही, तर समजले. हे पाणी अत्तर
फवारण्याचे काम करेल. जसे जडी बुट्टी मुळे गंगेचे पाणी आता पण इतर पाण्यापेक्षा
पवित्र आहे. असे सुगंधीत जडी बुटी मिसळल्यामुळे पाण्यात नैसर्गिक सुगंध राहिल. जसे
येथे दूध शक्ती देते, तसे तेथे पाणीच शक्तीशाली असेल, स्वच्छ असेल, त्यामुळे
म्हणतात की, दुधाच्या नद्या वाहतात. सर्व आतापासूनच खुश झाले आहेत ना. असेच ही
पृथ्वी अशी श्रेष्ठ फळे देईल, जो ज्या वेगवेगळ्या चवीचे इच्छितात, त्या चवीचे फळ,
तुमच्या समोर हजर होईल. हे मीठ असणार नाही, साखर पण असणार नाही. जसे आता आंबट
पणासाठी टमाटे आहेत, तर पाहिजे तसे आहेत ना. आंबट पणा येतो ना. तसे जी चव तुम्हाला
पाहिजे, तसे फळ असेल. रस काढा आणि तशी चव होऊन जाईल. तर ही पृथ्वी एक तर श्रेष्ठ फळ,
श्रेष्ठ अन्न देण्याची सेवा करेल. दुसरे नैसर्गिक दृश्य, देखावे ज्याला निसर्ग
म्हणले जाते, तर नैसर्गिक दृष्ये, पहाड पण असतील. असे सरळ पहाड असणार नाहीत.
नैसर्गिक सौदर्य वेगवेगळ्या रुपातील डोंगर असतील. काही पक्षाच्या रुपाचे, काही
फुलाच्या रुपाचे. अशी नैसर्गिक बनावट असेल. फक्त निमित्त मात्र थोडासा हात लावावा
लागेल. अशी ही 5 तत्त्वे सेवाधारी बनून जातील. परंतू कोणाची बनतील? स्वराज्य अधिकारी
आत्म्यांचे सेवाधारी बनतील. तर आता स्वत:ला पहा, 5 पण विकार शत्रु पासून सेवाधारी
झाले आहेत? तरच स्वराज्य अधिकारी म्हणावे. क्रोध अग्नी, योग अग्नीमध्ये बदलेल. तसेच
लोभ विकार, लोभ म्हणजे इच्छा. हदची इच्छा बदलून शुभ इच्छा होईल कि, मी नेहमी
प्रत्येक विचारामध्ये, बोलण्यात, कर्मामध्ये निस्वार्थ बेहदचा सेवाधारी बनेल. मी
बाबा सारखा बनेल, जशी शुभ इच्छा अर्थात लोभाचे परिवर्तन स्वरुप शत्रु ऐवजी सेवेच्या
कार्यात लावा. मोह तर सर्वांना फार आहे ना. बापदादामध्ये तरी मोह आहे ना. एक सेकंद
पण दूर राहू नये. हा मोह झाला ना. परंतू हा मोह सेवा करत आहे. जो पण तुमच्या
डोळ्यात पाहिल, तर डोळ्यात सामावलेल्या बाबाला पाहिले. जे पण तोंडाद्वारे बोलाल,
बाबाचे अमुल्य बोल बोलेल. तर मोह विकार पण सेवेमध्ये लागला ना, बदलला ना. तसाच
अहंकार देह अभिमानी पासून आत्मअभिमानी बनता. शुभ अहंकार अर्थात मी आत्मा विशेष आत्मा
बनलो आहे. पद्मा पद्म भाग्यशाली बनलो. बेफिकीर बादशहा बनलो. हा शुभ अहंकार अर्थात
ईश्वरीय नशा, सेवेसाठी निमित्त बनून जातो. तर असे 5 विकार बदलून सेवेचे साधन बनले,
तर शत्रु सेवाधारी झले ना. तर असे तपासा, मायाजीत, प्रकृतीजीत कोठपर्यंत बनलो आहे?
राजा तेव्हा बनाल, जेव्हा प्रथम दास दासी तयार असतील. जो स्वत:च दासाचे अधीन असेल,
तो राज्य अधिकारी कसा बनेल?
आज भारतातील मुलांचा, मेळ्याच्या कार्यक्रमाप्रमाणे, शेवटचा दिवस आहे. तर मेळ्यातील
शेवटची डुबकी आहे. याचे महत्त्व आहे. या महत्त्वाचे दिवशी जसे त्या मेळ्यात जातात,
तर समजतात की, जे पण पाप आहे, ते भस्म करुन, नष्ट करुन जातात, तर सर्वांनी 5
विकारांना, नेहमीसाठी समाप्त करण्याचा संकल्प करावयाचा आहे, हेच शेवटच्या डुबकीचे
महत्त्व आहे. तर सर्वांनी परिवर्तन करण्याचा दृढ संकल्प केला? सोडायचे नाही परंतू
बदलायचे आहे, जर शत्रु तुमचा सेवाधारी झाला तर शत्रु पसंद आहे कि सेवाधारी पसंद आहे?
तर आजचे दिवशी चेक करा, आणि चेंज करा तेव्हा मिलन मेळ्याचे महत्त्व आहे. समजले काय
करावयाचे आहे? असा विचार करावयाचा नाही, चार तर ठीक आहे, बाकी एक राहिला तर चालेल.
परंतू एक चारींना परत घेऊन येईल. त्यांची पण ऐकमेकांत सोबत आहे, त्यामुळे रावणाची
तोंडे सोबत दाखवितात. तर दसरा साजरा करन जावा. 5 प्रकृतीचे तत्त्व जीत, आणि 5 विकार
जीत, 10 झाले ना. तर विजयादशमी साजरी करुन जावा. नष्ट करुन, जाळून राख बरोबर घेऊन
जावू नका. राख जरी घेऊन गेला, तर परत येतील. भुत बनून येतील, त्यामुळे ती पण
ज्ञानसागरामध्ये समाप्त करुन जावा. अच्छा.
असे सदा स्वराज्य अधिकारी, अलौकिक टिळाधारी, मुकुटधारी प्रकृतीला दासी बनविणारे, 5
शत्रुला सेवाधारी बनविणारे, नेहमीसाठी बेफिकीर बादशहा, आत्मिक नशेत राहणारे बादशहा,
असे बाबा सारखे सदाचे विजयी मुलांना बापदादांची प्रेमळ आठवण आणि नमस्ते.
कुमारी बरोबर
अव्यक्त बापदादाची भेट :-
सर्व स्वत:ला श्रेष्ठ कुमारी अनुभव करता का? साधारण कुमारी एक तर नोकरीची टोकरी
डोक्यावर घेते, नाहीतर दासी बनते. परंतू श्रेष्ठ कुमारी विश्व कल्याणकारी बनते. अशा
श्रेष्ठ कुमारी आहात ना. जीवनाचे श्रेष्ठ लक्ष्य काय आहे? संगदोष किंवा संबंधाच्या
बंधनापासून मुक्त होणे, हेच लक्ष्य आहे ना? बंधनात अडकणारी नाही. काय करु बंधन आहे,
काय करु, नोकरी करायची आहे, याला म्हटले जाते बंधनात अडकलेली. तर ना संबंध ना बंधन,
ना नोकरीच्या टोकरीचे बंधन. दोन्ही बंधनापासून मुक्त तीच बाबाची प्रिय बनते. अशी
निर्बंधन आहात? दोन्ही जीवन समोर आहे. साधारण कुमारीचे भविष्य आणि विशेष कुमारींचे
भविष्य दोन्ही समोर आहे. तर दोन्ही पासून स्वत:च निर्णय करु शकता. जसे म्हणतील तशी
करेल, असे नाही. स्वत:च्या निर्णय स्वत:च जज होऊन करा. श्रीमत तर आहे विश्वकल्याणी
बना. श्रीमताबरोबर स्वत:च्या मनाच्या उत्साहाने जे पुढे चालतात, त्या नेहमी सहज पुढे
चालतात. जरी कोणाच्या सांगण्यावरुन, किंवा थोडे लज्जे मुळे दुसरे काय म्हणतील, नाही
बनली तर सर्व मला अशा दृष्टीने पाहतील कि, ही कमजोर आहे. अशा जरी कोणाच्या
सांगण्याने बनली तरी पण परिक्षेमध्ये पास होण्यासाठी मेहनत करावी लागते. आणि स्वत:
मधील उत्साह असेल तर किती ही मोठी परिस्थिती आली तर ती सोपी वाटते, कारण मनाचा
उत्साह असतो ना. स्वत:चा उमंग उत्साह पंख बनतात. किती पण डोंगर असला, तरी उडणारा
पक्षी सहजच पार करेल, आणि चालणारा किंवा चढणारा किती मुश्कलीने किती वेळेत पार करेल.
तर हा मनाचा उमंग उत्साह पंख आहेत, या पंखाद्वारे उडणारे त्यांना नेहमी सोपे वाटते.
समजले, तर श्रेष्ठ मत आहे विश्व कल्याणकारी बना, तरी पण स्वत:च स्वत:चा जज बनून आपले
जीवनाचा निर्णय करा. बाबांनी तर निर्णय दिला आहे, ही नविन गोष्ट नाही. आता स्वत:चा
निर्णय घ्या तर सदा सफल राहाल. समजदार ती जी विचारपुर्वक पाऊल टाकेल. विचारच करत बसू
नका. परंतू विचार केला, समजले आणि केले, याला म्हटले जाते समजदार. संगमयुगावर कुमारी
बनने हे पहिले भाग्य आहे. हे भाग्य तर विश्वनाटकानुसार मिळाले आहे. आता भाग्यातून
भाग्य बनवत जावा. याच भाग्याला कार्यात लावले तर भाग्य वाढत जाईल. आणि या पहिल्या
भाग्याला सोडले तर नेहमीच्या सर्व भाग्याला गमावणे होय, त्यामुळे भाग्यवान बना.
भाग्यवान बनून आता, आणि सेवाधारी बनण्याचे भाग्य बनवा. समजले.
सेवाधारी (शिक्षक)
बहिणींना
सेवाधारी म्हणजे नेहमी सेवेच्या मौजमध्ये राहणारी. नेहमी स्वत:ला मौजमधील जीवनाचा
अनुभव करणारी. सेवाधारी जीवन म्हणजे आनंदी जीवन. तर अशा नेहमी आठवण आणि सेवेच्या
मजेत राहणारी आहात ना. आठवणीची पण मजा आहे, आणि सेवेची पण मजा आहे. जीवन पण मजेचे
आणि युग पण मजेचे. जे नेहमी आनंदात राहणारे आहेत, त्यांना पाहून आणखीन आपल्या
जीवनात मजेचा अनुभव करतात. किती पण कोणी संभ्रमित झालेले येवोत, परंतू जे स्वत:
मजेमध्ये राहतात ते दुसऱ्याला पण अडचणीतून बाहेर काढून, आनंदामध्ये घेऊन जातात. असे
सेवाधारी, जे मजेमध्ये राहतात ते नेहमी तन-मन-धनाने तंदुरुस्त राहतात. मजेत राहणारे
नेहमी उडत राहतात कारण खुशीत राहतात. तसे पण म्हटले जाते हा तर खुशीमध्ये नाचत राहत
आहे. चालत आहे, नाही. नाचत आहे. नाचणे म्हणजे उंच उडणे. उंच पावले उचलली तर नाचतील
ना. तर मजेत राहणारे अर्थात खुशीत राहणारे. सेवाधारी बनणे म्हणजे वरदाता कडून विशेष
वरदान घेणारे. सेवाधारीला विशेष वरदान आहे, एक स्वत:चे स्वत:वर लक्ष, दुसरे वरदान,
डबल फायदा आहे. सेवाधारी बनणे म्हणजे सदा मुक्त आत्मा बनणे, जीवनमुक्त अनुभव करणे.
सेवाधारी नेहमी सफलता स्वरुप आहेत? विजय जन्मसिध्द अधिकार आहे. अधिकार नेहमी सहज
मिळत आहे. मेहनत वाटत नाही. तर अधिकाराचे रुपात सफलता अनुभव करणारे आहात. विजय
होणारच आहे हा निश्चय आणि नशा ठेवा. विजयी होऊ कि नाही असा विचार तर करत नाही ना?
जेव्हा अधिकार आहे, तर अधिकारीला अधिकार ना मिळो, असे होऊ शकत नाही. निश्चय असेल तर
विजय होणारच आहे. सेवाधारीची ही व्याख्या आहे. जी व्याख्या आहे तेच प्रत्यक्षात आहे.
सेवाधारी म्हणजे सहज सफलतेचा अनुभव करणारे.
(सर्वांनी गीत म्हटले…आता जावू नका सोडून…. निरोपाचे) बापदादा जेवढे प्रेमाचे सागर
आहेत, तेवढे दुरचे पण आहेत. स्नेहाने बोल बोललो, ही तर संगमयुगाची मजा आहे. मजा तर
जरुर करा, खावा, प्या नाचा परंतू निरंतर. जसे आता स्नेहामध्ये सामावले आहात, असेच
सामावून राहा. बापदादा प्रत्येक मुलांचे ह्दयातील गीत तर ऐकतच राहतात. आज मुखातील
गीत ऐकले. बापदादा प्रत्येक मुलांचे ह्दयातील गाणे तर ऐकतच राहतात. आज मुखातील गीत
ऐकले. बापदादा शब्द पाहत नाहीत, आवाज पाहात नाहीत, ह्दयाचा आवाज ऐकतात. आता तर सदा
साथ आहोत, जसे साकार रुप तसे अव्यक्त रुपामध्ये, सदा साथ आहेत. आता वियोगाचे दिवस
समाप्त झाले आहेत. आता संगमयुग पुर्ण मिलन मेळा आहे. फक्त मेळ्यामध्ये वेगवेगळी
दृष्ये बदलत आहेत. कधी व्यक्त, कधी अव्यक्त. अच्छा. ओमशांती.
वरदान:-
आत्मिक शक्तीचा
आधारावर, तनाचे शक्तीचा अनुभव करणारे सदा निरोगी भव
या अलौकिक
जीवनात आत्मा आणि प्रकृती दोन्हा निरोगी आवश्य पाहिजे. जेव्हा आत्मा स्वस्थ असेल तर
तनाचा हिसाब किताब, किंवा तनाचे रोग गंभीर पासून किरकोळ झाल्यामुळे, स्वस्थितीच्या
कारणाने स्वस्थ अनुभव होतात. त्यांच्या चेहऱ्यावर, मुखावर आजाराची चिन्हे, कष्ट,
राहत नाहीत. कर्मभोगाच्या वर्णाना ऐवजी कर्मयोगाच्या स्थितीचे वर्णन करतात. ते
परिवर्तनाच्या शक्तीद्वारे, त्रासाला, संतुष्ट ते मध्ये परिवर्तन करुन, संतुष्ट
राहतात, आणि संतुष्टतेचे वातावरण पसरवितात.
सुविचार:-
मनापासून,
तनापासून, आपसातील प्रेमाने सेवा करा, तर विजय निश्चित मिळेल...!