20-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, तुम्हाला येथे प्रवृत्ती मार्गाचे प्रेम मिळते, कारण बाबा हृदयापासून
म्हणतात माझ्या मुलांनो बाबांपासून वारसा मिळतो हे प्रेम देहधारी गुरु देऊ शकत
नाही. "
प्रश्न:-
ज्या मुलांच्या
बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा आहे. स्वच्छ बुद्धी आहे. त्या मुलांची ओळख काय आहे?
उत्तर:-
त्या मुलांना
दुसऱ्यांना ज्ञान सांगण्याचा नशा असेल, त्यांची बुद्धी मित्र संबंधी मध्ये भटकणार
नाही. स्वच्छ बुद्धी ज्यांची असेल ते अभ्यास करताना जांभळी किंवा आळस देणार नाहीत.
शाळेमध्ये कधी डोळे मिटून बसणार नाही. जी मुलं गरम तव्या प्रमाणे बसतात त्यांची
बुद्धी इकडे-तिकडे भटकत असते, ज्ञान समजतच नाहीत. त्यांच्यासाठी बाबांना आठवण करणं
खूप अवघड वाटतं.
ओम शांती।
हा बाप आणि मुलांचा मेळा आहे. गुरु शिष्याचा मेळा नव्हे. लोकांची दृष्टी असते हे
आमचे शिष्य आहेत किंवा जिज्ञासू आहेत. हलकी दृष्टी झालेली आहे, ते त्याच दृष्टीने
पाहणार. आत्म्याला पाहत नाहीत. ते शरीराला पाहतात आणि शिष्य सुद्धा देहाच्या अभिमाना
मध्ये असतात. त्यांची नजर तशी असते, हे आमचे गुरु. गुरूसाठी खूप सन्मान असतो. इथे
खूप फरक आहे इथे बाबा मुलांना सन्मान देतात. बाबांना माहित आहे मला यांना शिकवायचं
आहे सृष्टिचक्र फिरते. इतिहास भूगोल मुलांना समजतात, त्या गुरूंच्या हृदयामध्ये
मुलांसाठी प्रेम नसते. बाबांकडे मुलांसाठी खुप प्रेम आहे आणि मुलांच्या मनामध्ये
बाबांसाठी खूप प्रेम आहे. तुम्हाला माहित आहे बाबा आपल्याला सृष्टी चक्राचे ज्ञान
सांगतात. ते गुरु लोक काय शिकवतात? अर्ध्या कल्पाचे शास्त्र शिकवतात, भक्तिमार्गाचे
कर्मकांड शिकवतात, गायत्री मंत्र संध्या शिकवतात. बाबा आले आहेत आपला परिचय
देण्यासाठी. आपण बाबांना ओळखत नव्हतो. सर्वव्यापी म्हणत होतो, कधीही विचारलं ईश्वर
कुठे आहे, तर लगेच म्हणत होतो सर्वव्यापी आहे. तुमच्याजवळ मनुष्य जेव्हा येतात
तेव्हा विचारता येथे काय शिकवतात ? सांगा, आम्ही राजयोग शिकतो. ज्यामुळे तुम्ही
मनुष्यापासून देवता म्हणजे राजा बनू शकतो. अजून कुठला सत्संग असा असेल जेथे सांगतील
आम्ही मनुष्यापासून देवता बनण्याची शिक्षण घेतो. देवता असतात सतयुगामध्ये,
कलियुगामध्ये मनुष्य आहेत. आता आम्ही तुम्हाला संपूर्ण सृष्टीच्या रहस्याचे ज्ञान
देतो. ज्यामुळे तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल आणि परत तुम्हाला पवित्र बनवण्याची खूप
चांगली युक्ती सांगतो अशी युक्ती कोणी कधी सांगू शकत नाही. हा सहज राजयोग आहे.बाबा
पतित पावन आहेत ते सर्व शक्तिवान पण आहेत तर त्यांना आठवण केल्याने पाप भस्म होतील.
कारण की योग अग्नि आहे ना. तर येथे नवीन गोष्ट शिकवली जाते, हा आहे ज्ञानमार्ग
ज्ञानाचे सागर एकच पिता आहेत, ज्ञान आणि भक्ती वेगवेगळे आहे. ज्ञान शिकवण्यासाठी
बाबांना यावे लागते, कारण ते ज्ञानाचे सागर आहेत, ते स्वतः येऊन स्वतःचा परिचय
देतात की, मी सर्वांचा पिता आहे. ब्रम्हाद्वारे सर्व सृष्टीला पावन बनवितो, पावन
दुनिया सतयुग आहे. पतित दुनिया कलियुग आहे. तर सतयुगाची सुरुवात आणि कलियुगाचा अंत
यांचा हा संगम युग आहे. याला लीप युग म्हणतात, यामध्ये आपण झेप घेतो, कोठे? जुन्या
दुनिया मधून नवीन दुनियेत झेप घेतो. ते तर सीडी वरून हळूहळू खाली उतरतात. येथे आपण
या वाईट दुनिये मधून नवीन दुनियेमध्ये एकदम झेप घेतो सरळ वर निघून जातो. जुन्या
दुनियेला सोडून आपण नवीन दुनियेत जातो, ही आहे बेहद्दची गोष्ट. बेहद जुन्या दुनियेत
आहेत खूप मनुष्य, नवीन दुनियेत असतील थोडे मनुष्य. त्याला स्वर्ग म्हणतात, तेथेच
सर्व पवित्र जातात कलियुगात सर्व आहेत अपवित्र. अपवित्र रावण बनवतो हे तर सर्वांना
समजवतात. आता तुम्ही रावण राज्यात अथवा पतित दुनियेत आहात खरेतर राम राज्यांमध्ये
होतात. जलस वर्ग म्हणतात परत कसे 84 चे फिरत खाली उतरता ,ते तर आम्ही सांगू शकतो
ज्यांची समज चांगली आहे ते लगेच समजतात. ज्यांच्या बुद्धीमध्ये येणार नाही ते तर
असतील तरीही इकडे तिकडे बघत बसतील, लक्षपूर्वक ऐकणार नाहीत. म्हणतात ना तू तर चंचल
आहेस, संन्यासी लोक सुद्धा जेव्हा कथा ऐकवतात तर कोणी आळस देतात किंवा लक्ष दुसरीकडे
असते, तर अचानक त्यांना विचारले जाते काय सांगितले? बाबा सुद्धा सर्वांना बघत असतात,
कुणी असतील पण येथे बसले नाहीत ना? चांगली बुद्धिवान जी मुले आहेत ते शिक्षणामध्ये
कधी आळस देणार नाहीत. पाठशाळेत कधी कोणी डोळे मिटून बसायचे, अशी तर पद्धत नाही.
थोडेसुद्धा ज्ञान समजत नाहीत पित्याची आठवण करणे त्यांच्यासाठी मोठी अवघड गोष्ट आहे,
मग पाप भस्म कसे होणार? बुद्धिमान मुले तर चांगल्या रीतीने धारण करून इतरांना
ऐकण्याचा उत्साह ठेवतात. ज्ञान नसेल तर बुद्धी मित्र संबंधी मध्ये आकर्षित होत राहते,
येथे तर बाबा सांगतात इतर सर्व काही विसरून जायचे आहे. अंतसमय काही आठवलं नाही
पाहिजे. बाबांनी सन्यासी इत्यादींना बघितले आहे, जे पक्के ब्रह्मज्ञानी असतात, पहाटे
असे बसल्या बसल्या ब्रह्म तत्वाची आठवण करत करत शरीर त्याग करतात. त्यांच्या शांतीचा
प्रवाह खूप असतो, आता ते तर ब्रह्मांडामध्ये लोक पाहू शकत नाहीत. नंतर सुद्धा
मातीच्या गर्भातून जन्म घ्यावा लागतो. बाबांनी समजवले आहे वास्तवात महात्मा तर
कृष्णाला म्हणले जाते. मनुष्य तर अर्थ न समजता असेच सांगत असतात. बाबा समजवतात
श्रीकृष्ण आहे संपूर्ण निर्विकारी, परंतु त्यात संन्यासी ना पण देवता म्हणले जाते.
संन्यासी म्हणणे अथवा देवता म्हणणे त्याचा पण अर्थ आहे. हे देवता कसे बनले, सन्यासी
पासून देवता बनले, बेहद संन्यास केला आणि नंतर नवीन दुनियेत गेले. ते तर हदचा
संन्यास करतात. बेहद मध्ये जाऊ शकत नाहीत. विकारामुळे हदमध्येच पुनर्जन्म घ्यावा
लागतो. बेहद मालक बनू शकत नाहीत. राजाराणी कधी बनू शकत नाहीत कारण त्यांचा धर्म
वेगळा आहे. संन्यास धर्म देवी देवता धर्म नाही, बाबा म्हणतात मी अधर्माचा नाश करून
देवी देवता धर्माची स्थापना करतो, विकार सुद्धा अधर्म आहे. त्यामुळे बाबा म्हणतात
या सर्वांचा विनाश करून आणि आणि एका आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना
करण्यासाठी मला यावे लागते. भारतात जेव्हा सत्युग होते तेव्हा एकच धर्म होता तोच
धर्म आता अधर्म बनला. आता तुम्ही परत आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापनाची करत
आहात. जेवढा पुरुषार्थ करेल तेवढे उंच पद प्राप्त करतील. स्वतःला आत्म निश्चय करायचा
आहे. बरं ग्रहस्थ व्यवहारांमध्ये रहा. त्यामध्ये सुद्धा जेवढे होईल तेवढे, उठता बसता
हे पक्क करा, जसं भक्त लोक सकाळी लवकर उठून एकांतामध्ये माळा जपतात. तुम्ही तर
संपूर्ण दिवसाचा हिशोब काढतात, अमुक वेळेस एवढी आठवण राहिली, संपूर्ण दिवसात एवढी
आठवण राहिली, संपूर्ण हिशोब काढता. ते तर सकाळी उठून माळा जपतात, जरी कोणी खरे भक्त
नाहीत. कितीतरी जणांची बुद्धी बाहेर इकडे तिकडे भटकत राहते. आता तुम्ही समजता भक्ती
मधून फायदा काहीच मिळणार नाही, हे तर ज्ञान आहे ज्यामुळे खूप फायदा होतो. आता तुमची
चढती कला आहे बाबा सारखे सारखे म्हणतात मनमनाभव. गीतेमध्ये पण अक्षर आहे परंतु
त्याचा अर्थ कोणीच सांगू शकत नाही, उत्तर देताच येणार नाही वास्तवामध्ये त्याचा
अर्थ पण लिहिलेला आहे. स्वतःला आत्मा समजून देहाच्या सर्व धर्मांना सोडून मामेकम
आठवण करा भगवानुवाच आहे ना. परंतु त्यांच्या बुद्धीमध्ये श्रीकृष्ण भगवान आहे, ते
तर देहधारी पुनर्जन्म मध्ये येणारे आहेत, त्यांना भगवान कसं म्हणू शकतो तर संन्यासी
इत्यादी कोणाचीच दृष्टी पिता आणि मुलांची होऊ शकत नाही ही जरी गांधीजींना बापू
म्हणत होते परंतु पिता आणि पुत्रचा संबंध नाही म्हणता येणार. ते तर साकार झाले
तुम्हाला तर समजवले आहे स्वतःला आत्मा समजा यांच्यामध्ये जे बाबा बसले आहेत ते तर
बेहदचे बापुजी आहेत. लौकिक आणि पारलौकिक दोन्ही पित्यांकडून वारसा मिळतो. बापूजींनी
पासून तर काहीच मिळाले नाही. बरं भारताची राजधानी परत मिळाली परंतु याला वारसा तर
म्हणता येणार नाही. सुख मिळायला पाहिजे ना. वारसा तर असतोच दोन, एक हदच्या पित्याचा
दुसरा बेहदच्या पित्याचा. ब्रम्हा बाबांकडून कोणताच वारसा मिळत नाही. जरी सर्व
प्रजेचे पिता आहेत, त्यांना म्हटले जाते आजोबांचे आजोबा. स्वतः सांगतात, माझ्याकडून
तुम्हाला काहीच मिळणार नाही, तर मग त्या बापू कडून काय वारसा मिळेल? काहीच नाही.
इंग्रज तर गेले आता काय आहे? उपोषण वाद-विवाद संप इत्यादी होत राहतात. किती मारामारी
होत राहते. कोणाचीच भिती नाही, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा मारून टाकतात.
सुखा ऐवजी अजूनच दुःख आहे. तर बेहदची गोष्ट इथेच आहे. बाबा म्हणतात सर्वप्रथम हे
पक्का निश्चय करा की, मी आत्मा आहे, शरीर नाही बाबांनी आम्हाला दत्तक घेतले आहे.
आम्ही दत्तक मुले आहोत. तुम्हाला समजवले जाते की बाबा ज्ञानाचे सागर आले आहेत आणि
सृष्टी चक्राचे रहस्य समजवतात. दुसरे कोणी समजू शकत नाही. बाबा म्हणतात, देहाच्या
सर्व धर्मांना विसरून मामेकम आठवण करा. सतोप्रधान जरूर बनावे लागेल. हे पण जाणता की
ह्या जुन्या दुनियेचा विनाश तर जरूर होणार आहे. नवीन दुनियेत खूप थोडे असतात. कुठे
एवढे करोडो आत्मे आणि कोठे नऊ लाख? एवढे सगळे कुठे जातील? आता तुमच्या बुद्धीमध्ये
आहे आपण सर्व आत्मे परमधाम मध्ये होतो, परत येथे भूमिका वठवण्यासाठी आलो.
आत्म्यालाच कलाकार म्हंटले जाते. आत्म भूमिका वटवते या शरीरासोबत, आत्म्याला
कर्मेंद्रिया तर पाहिजेत ना. आत्म किती छोटी आहे, 84 लाख जन्म तर नाहीत प्रत्येक जण
जर 84 लाख जन्म घेतील तर मग भूमिका पुनरावृत्त कशी होईल. आठवण नाही करू शकत,
स्मृतीच्या बाहेर निघून जाईल. 84 जन्म पण तुम्हाला आठवणीत राहत नाहीत, विसरून जाता.
आता तुम्हा मुलांना बाबांना आठवण करून पवित्र जरूर बनायचे आहे. योग अग्निनेच विनाश
होते हा पण निश्चय आहे, बेहद्दच्या पित्याकडून बेहदचा वारसा कल्प कल्प घेतो. आता
पुन्हा हा स्वर्गवासी बनण्यासाठी बाबांनी सांगितले आहे, माझी आठवण करा कारण मी
पतित-पावन आहे, तुम्ही बाबांना बोलविले आहे. तर बाबा आले आहेत पवित्र बनवण्यासाठी,
पवित्र देवता असतात, पतित मनुष्य असतात. पवित्र बनून परत शांतीधाम मध्ये जायच आहे.
तुम्ही शांतीधाम मध्ये जाऊ इच्छिता की सुखधामा मध्ये येऊ इच्छिता? सन्यासी तर
म्हणतात सुखा काग विष्ठा प्रमाणे आहे. आम्हाला शांती पाहिजे तर मग ते सुखधामा मध्ये
कधीच येऊ शकत नाही सत युगामध्ये होता प्रवृत्ती मार्गचा धर्म. देवता निर्विकारी होते
ते पुनर्जन्म घेत घेत पतीत बनले आहेत. आता बाबा म्हणतात निर्विकारी बना स्वर्गा
मध्ये जायचे आहे तर माझी आठवण करा तर तुमचे पाप नष्ट होतील. पुण्या आत्मा बनून जाल,
परत शांतीधाम सुखधाम मध्ये जातील. तेथे शांती पण होती तर सुख सुद्धा होते आता आहे
दुःखधाम परत बाबा येऊन सुखधामाची स्थापना करत आहेत .दुःख धामाचा विनाशचित्र पण समोर
आहे, बोला आता तुम्ही कोठे उभे आहात? आता आहे कलियुगाचा अंत. विनाश समोर उभा आहे,
बाकी आता थोडा वेळ राहिलेला आहे. एवढे खंड तर तेथे नसतात. हा सर्व विश्वाचा इतिहास
भूगोल बाबा समजतात, ही पाठशाला आहे भगवान उवाच प्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे.
आता कलियुग आहे, परत सतयुगामध्ये जायचे आहे. तेथे तर सुखच सुख असते, एकाला आठवण
करायचे आहे, ती आहे अव्यभिचारी आठवण. शरीराला विसरायचे आहे शांतीधाम मधून आलो परत
शांतीधाम मध्ये जायचे आहे. तेथे पतित कोणी जाऊ शकत नाही. बाबांना आठवण करत करत
पवित्र बनवून तुम्ही मुक्तिधाम मध्ये चालले जाल. हे चांगल्या रीतीने बसून समजवावे
लागते. पूर्वी एवढी चित्र थोडीच होते चित्राशिवाय, सुद्धा सारांश आत समजवले जात होते.
या पाठशाळेत मनुष्य पासून देवता बनायचे आहे. हे नवीन दुनियेसाठी ज्ञान आहे. ते बाबच
देऊ शकतात. तर बाबांची नजर मुलांवर असते. आम्हा आत्म्यांना शिकवतात. तुम्ही सुद्धा
समजवता बेहद पिता आम्हाला समजवतात त्यांचे नाव शिवबाबा आहे. फक्त बेहदचे बाबा
म्हणल्याने गोंधळून जातील. कारण बाबासुद्धा खूप झाले आहेत. महानगरपालिकेच्या
महापौरांना सुद्धा बाबा म्हणतात. बाबा म्हणतात मी यांच्या मध्ये येतो, तरी सुद्धा
माझं नाव शिवच आहे. मी ह्या रथाद्वारे तुम्हाला ज्ञान देतो, यांना दत्तक घेतले आहे,
यांचे नाव प्रजापिता ब्रम्हा ठेवले आहे. यांनासुद्धा माझ्याकडून वारसा घ्यायचा आहे.
अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. आता जुन्या
दुनियेतून नवीन दुनियेसाठी झेप घेण्याची वेळ आहे, म्हणून या जुन्या दुनियेपासून
बेहदचा संन्यास करायचा आहे.या ला बुद्धीतून विसरायचं आहे.
2. शिक्षणावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे, शाळेत डोळे बंद करून बसणे हा कायदा नाही.
लक्षात ठेवा मुरलीच्या वेळेत बुद्धी इकडे तिकडे जाता कामा नये. जांभळी येता कामा नये.
वरदान:-
वेळेनुसार
स्वतःला तपासून, परिवर्तन करणारे नेहमी विजयी श्रेष्ठ आत्मा भव.
जे खरे राजयोगी आहेत
ते कधी कोणत्या परिस्थितीत विचलित होऊ शकत नाही तर स्वतःला वेळे अनुसार या पद्धतीने
तपासा आणि तपासून परिवर्तन करा. फक्त तपासाल तर मनाने हरले जाल, विचार
करालआमच्यामध्ये ही कमी आहे, माहित नाही ठीक होईल की नाही? त्यामुळे तपासा आणि
परिवर्तन करा. कारण वेळेप्रमाणे कर्तव्य करणाऱ्यांचा नेहमी विजय होते, त्यामुळे
नेहमी विजयी श्रेष्ठ आत्मा बनून तीव्र पुरुषार्थ द्वारे नंबर एक मध्ये या.
बोधवाक्य:-
मन बुद्धीला
नियंत्रण करण्याचा अभ्यास असेल तर सेकंदांमध्ये विदेही बनू शकाल.