25-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, स्वत:मधील अवगुण काढावयाचे असतील तर खज्या मनाने बाबाला सांगा, बाबा
तुम्हाला अवगुण काढण्याच्या युक्त्या सांगतील...!!!
प्रश्न:-
बाबांची शक्ती
कोणत्या मुलांना मिळत राहते?
उत्तर:-
जी मुले ईमानदारीने आपला आजार सर्जन बाबाला सांगतात, बाबा त्यांना दृष्टी देतात.
बाबांना अशा मुलांवर फार दया येते. आतून वाटते की, या मुलाचे हे भूत निघून जावे.
बाबा त्यांना शक्ती देतात.
ओम शांती।
बाबा मुलांना विचारत राहतात. प्रत्येक मुलांनी स्वत:ला विचारावयाचे आहे कि,
बाबांकडून काय मिळाले? कोण कोणत्या गोष्टीची कमी आहे? प्रत्येकानी स्वत:कडे पाहयचे
आहे. जसे नारदाचे उदाहरण आहे, त्यांना म्हटले तुमचे तोंड आरशात पहा, लक्ष्मीशी
स्वयंवर करण्यासाठी लायक आहे? तर बाबा पण तुम्हा मुलांना विचारतात कि, काय समजता,
लक्ष्मी बरोबर स्वयंवर करण्याचे लायक बनले आहात? जर नाही तर काय काय अवगुण आहेत?
ज्याला घालविण्यासाठी मुलं पुरुषार्थ करत आहेत. नव नविन मुलांना हे समजावले जाते
कि, स्वत:मध्ये पहा कि, कोणते अवगुणा तर नाहीत? कारण तुम्हा सर्वांना संपूर्ण
बनावयाचे आहे. बाबा आलेच आहेत संपूर्ण बनविण्यासाठी, त्यामुळे मुख्य उद्देशाचे
चित्र पण समोर ठेवले आहे. स्वत:ला पहा कि आम्ही यांच्या सारखे संपूर्ण बनलो आहे? ते
देहाची विद्या शिकविणारे शिक्षक इ. यावेळी सर्व विकारी आहेत. हे (लक्ष्मी-नारायण)
संपूर्ण निर्विकारींचे उदाहरण आहे. आर्धाकल्प तुम्ही यांचीच महिमा केली आहे. तर आता
स्वत:चे मनाला विचारा कि माझे मध्ये कोण कोणते अवगुण आहेत, ज्यांना काढून मी माझी
प्रगती करेल? आणि बाबाला सांगेण कि, बाबा हे अवगुण आहेत, जे माझ्याकडून निघत नाहीत,
कोणता उपाय सांगा. आजार सर्जनकडूनच सुटू शकतील. कोण-कोणते नायब सर्जन पण हुशार
असतात. डॉक्टरांकडून कंपाऊंडर शिकतात, तर हुशार डॉटर बनतात. ईमानदारीने स्वत:ची
तपासणी करा, माझ्यामध्ये काय काय अवगुण आहेत? ज्यामुळे मला वाटते कि, हे पद प्राप्त
करु शकणार नाही. बाबा तर म्हणतात ना, तुम्ही यासारखे बनू शकता. अवगुण सांगितले तर
बाबा उपाय सांगतील. आजार तर फार आहेत. अनेकांमध्ये अवगुण आहेत. कोणामध्ये फार क्रोध
आहे, लोभ आहे----त्यांना ज्ञानाची धारणा होऊ शकत नाही. जे कोणामध्ये धारणा करु
शकतील. बाबा दररोज समजावत आहेत. खरे तर एवढे समजावण्याची आवश्यकताच नाही. मंत्राचा
अर्थ बाबा समजावून सांगत आहेत. बाबा तर एकच आहेत. बेहदच्या बाबाची आठवण करावयाची आहे
आणि त्यांचेकडून हा वारसा घेऊन, आम्हाला असे बनायचे आहे. इतर शाळेमध्ये 5 विकारांना
जिंकण्याची गोष्टच नसते. ही गोष्ट आताच राहते, जे बाबा येऊन समजावत आहेत.
तुमच्यामध्ये जी भुते आहेत, जे दु:ख देत आहेत, ते सांगाल तर त्यांना काढण्याची
युक्ती बाबा सांगतील. बाबा ही ही भुते आम्हाला तंग करत आहेत. भुत काढणाज्या समारे
सांगितले जाते ना. तुमच्यामध्ये ती भुते तर नाहीत. तुम्ही जाणता कि, हे 5 विकार रुपी
भुत जन्मो जन्मीचे आहेत. तपासले पाहिजे की माझ्यामध्ये कोणते भुत आहे? त्याला
काढण्यासाठी मत घेतली पाहिजे. डोळे पण फार धोखा देणारे आहेत, त्यामुळे बाबा सांगतात
कि, स्वत:ला आत्मा समजून, दुसज्याला पण आत्मा समजण्याचा अभ्यास करा. या युक्तीने
तुमचा हा आजार निघून जाईल. आम्ही सर्व आत्मे तर भाऊ भाऊ आहोत. शरीर तर नाही. हे पण
जाणता कि, आम्ही आत्मे सर्व परत घरी जाणार आहोत. तर स्वत:ला पाहावयाचे आहे मी
सर्वगुण संपन्न बनलो आहे? नाही तर माझेमध्ये काय अवगुण आहेत? तर बाबा पण अशा
आत्म्याकडे बसून पाहतात कि, याचे मध्ये हा अवगुण आहे तर त्याला शक्ती देतात. या
मुलाचे हे विघ्न नष्ट व्हावे. जर सर्जन पासूनच लपविले तर ते काय करु शकतील? तुम्ही
तुमचे अवगुण सांगितले तरच बाबा पण उपाय सांगतील. जसे तुम्ही आत्मे बाबाची आठवण करता,
बाबा, तुम्ही किती गोड आहात! आम्हाला कवडी पासून हिरा बनवतात. बाबाची आठवण करत
राहाल, तर भुते निघत राहतील. कोणते ना कोणते भुत जरुर आहे. बाबा सर्जनला सांगा, बाबा
मला याची युक्ती सांगा. नाही तर फार नुकसान होईल, बाबाला सांगितल्यामुळे त्यांना दया
पण वाटते, हे मायेचे भूत यांना तंग करते. भुतांना पळविणारे तर एकच बाबा आहेत,
युक्तीने पळवितात. या 5 भुतांना पिटाळून लावा, ही सर्व भुते लवकर जात नाहीत.
कोणामध्ये विशेष जास्त राहते, कोणामध्ये कमी राहते. परंतु आहेत जरुर. बाबा पाहतात
कि, यांच्यात हे भुत आहे. दृष्टी देते वेळी आत वाटते ना. हा तर फार चांगला मुलगा आहे,
आणखीन यांच्यात चांगले चांगले गुण आहेत, परंतु काही जण सांगत नाहीत, कोणाला सांगू
शकत नाहीत. माया ने जसा गळा बंद करुन टाकला आहे, याचा गळा मोकळा झाला तर इतराची पण
सेवा करु शकतील. दुसज्यांचे सेवेमध्ये, स्वत:ची सेवा शिवबाबाची सेवा करत नाहीत.
शिवबाबा स्वत: सेवा करण्यासाठी आले आहेत, सांगतात कि या जन्मो जन्मीच्या भुतांना
पळवून लावा.
बाबा सन्मुख सांगत आहेत कि, हे पण जाणता कि, झाड हळू हळू वाढते, पाने गळून पडतात.
माया विघ्ने घालते. बसल्या बसल्या विचार बदलत राहतात. जसे सन्याशाला घृणा आली तर
एकदम निघून जातात. ना काही कारण, ना कोणते बोलणे. संबंध तर सर्वांचा बाबा बरोबर आहे.
मुले तर नंबरवार आहेत. त्यांनी पण बाबाला खरे सांगितले तर ते अवगुण निघू शकतील, आणि
उच्च पद प्राप्त करु शकतील. बाबा जाणतात कि, काही जण न सांगितल्यामुळे स्वत:चे फार
नुकसान करत आहेत. कितीही सांगितले तरी तेच ते काम करत राहतात, पकडते. माया रुपी
अजगर सर्वांना पोटात घालून बसला आहे. दलदलीमध्ये गळ्यांपर्यंत फसले आहेत. बाबा खुप
समजावत राहतात. दुसज्या कोणत्या गोष्टी नाहीत, फक्त सांगा दोन पिता आहेत. एक लौकिक
पिता तर नेहमीच मिळतच आहेत. सतयुगामध्ये भेटतो, तर कलियुगामध्ये पण भेटतो. असे नाही
की, सतयुगामध्ये मग पारलौकिक बाबा भेटतात. पारलौकिक बाबा तर एकवेळीच भेटतात.
पारलौकिक बाबा येऊन नर्काला स्वर्ग बनवत आहेत, त्यांची भक्तीमार्गात किती पुजा
करतात, आठवण करतात. शिवाची मंदीरे तर पुष्कळ आहेत. मुले म्हणतात कि, सेवा काही नाही.
शिवाचे मंदीर तर जिथे तिथे आहेत, तेथे जाऊन तुम्ही विचारु शकता कि, यांची पुजा का
करता? हे शरीरधारी तर नाहीत. हे आहेत कोण? म्हणतात परमात्मा. यांचे शिवाय दुसज्या
कोणाला म्हणत नाहीत. त्यांना बोला, हे परमात्मा पिता आहेत ना. त्याला खुदा पण
म्हणतात, अल्लाह पण म्हणतात. सहसा परमपिता परमात्मा म्हटले जाते, त्यांचेकडून काय
मिळणार आहे, याची काही माहिती आहे? भारतामध्ये शिवाचे नांव तर फार घेतात. शिवजयंतीचा
सण पण साजरा करतात. कोणाला पण समजावणे सोपे आहे. बाबा वेगवेगळ्या रितीने समजावत
राहतात. तुम्ही कोणाकडे पण जाऊ शकता. परंतू फार शांतीने, नम्रतेने बोलायचे आहे.
तुमचे नांव तर भारतामध्ये फार पसरले आहे. थोडे जरी बोलतात, तर झटक्यात समजतात कि,
हे बी.के. आहेत. गाव इ. ठिकाणी तर फारच निष्पाप आहेत. तर मंदीरामध्ये जाऊन सेवा करणे
फारच सोपे आहे. या, तर आम्ही तुम्हाला शिवबाबाची जीवन कहानी सांगतो. तुम्ही शिवाची
पुजा करता, त्यांना काय मागता? आम्ही तर तुम्हाला यांची संपूर्ण जीवन कहाणी सांगू
शकतो. दुसज्या दिवशी मग लक्ष्मी-नारायणाचे मंदीरामध्ये जावा. तुमच्या मनात खुशी
राहते. मुलांना वाटते, गावामध्ये सेवा करावी. सर्वांचे आप-आपले मत आहे ना. बाबा
सांगतात कि, प्रथम जावा शिवबाबाचे मंदीरामध्ये. नंतर लक्ष्मी नारायणाचे मंदीरामध्ये
जाऊन विचारा की, यांना हा वारसा कसा मिळाला आहे? या तर आम्ही तुम्हाला या देवी
देवतांची 84 जन्मांची गोष्ट सांगतो. गावातील लोकांना पण उठवावयाचे आहे. तुम्ही
जावून प्रेमाने सांगा. तुम्ही आत्मा आहात, आत्माच बोलत आहे, हे शरीर तर नष्ट होणार
आहे. आता आम्हा आत्म्यांना पावन बणून बाबा बरोबर जायचे आहे. बाबा सांगतात माझी आठवण
करा, तर ऐकल्यानेच त्यांना ओढ लागेल. जेवढे तुम्ही आत्मअभिमानी बनाल तेवढे तुमचे
आकर्षण वाढेल. आता या शरीरापासून, जुन्या दुनियेपासून पुर्ण वैराग्य आले नाही. हे
तरी जाणता कि, हे जुने शरीर सोडावयाचे आहे, यात ममत्व ठेवावयाचे नाही. शरीरात पण
राहून शरीरात ममत्व नसले पाहिजे. हीच धून राहिली पाहिजे की, आता आम्ही आत्मे पावन
बणून आपल्या घरी जावू. नंतर असे पण मनात येते कि, असे विचार अशा केल्याने बाबाची
आठवण पण येईल, घराची पण आठवण येईल. आता आम्ही घरी जात आहोत. 84 जन्म पुर्ण झाले.
खुशाल, दिवसा आपला धंदा इ. करा, गृहस्थ व्यवहारामध्ये तर राहावयाचे आहे. त्यात
राहून पण बुध्दीमध्ये हे ठेवा कि, हे तर सर्व नष्ट होणार आहे. आता आम्हाला परत घरी
जायचे आहे. बाबांनी सांगितले आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये तर जरुर राहायचे आहे. नाही
तर कोठे जाणार? धंदा इ. करा, बुध्दीमध्ये याची आठवण ठेवा. हे तर सर्व विनाश होणार
आहे. अगोदर आम्ही घरी जावू, नंतर सुखधामला जावू. बाकी 8 तास अशा बाबा बरोबर
वार्तालाप करुन, मग जावून आत्म्याची सेवा करावयाची आहे. जेवढा पण वेळ मिळेल,
शिवबाबाचे मंदीरामध्ये, लक्ष्मी-नारायणाचे मंदीरामध्ये जावून सेवा करा. मंदीर तर
तुम्हाला पुष्कळ मिळतील. तुम्ही कोठेही जावा, शिवाचे मंदीर तर जरुर असतेच. तुम्हा
मुलांसाठी मुख्य आहे आठवणीची यात्रा. आठवणीमध्ये चांगल्याप्रकारे राहिलात तर तुम्ही
जे पण मागाल ते मिळेल. प्रकृतीदासी बनून जाते. त्यांचा चेहराच असा आकर्षण करणारा
बनतो, काही पण मागण्याची गरज नाही. सन्याशामध्ये पण कोण कोणी पक्के असतात. बस, असे
निश्चयाने बसतात. आम्ही ब्रह्ममध्ये जाऊन विलीन होऊ. या निश्चयाने फार पक्के राहतात.
त्यांचा अभ्यास असतो. आम्ही या शरीराला सोडून जातो. परंतु ते तर आहेत चुकीच्या
सत्याने. फार मेहनत करतात, ब्रह्ममध्ये लीन होण्यासाठी. भक्तीमध्ये साक्षात्कारासाठी
किती मेहनत करतात. जीव पण देतात. आत्मघात होत नाही, जीवघात होतो. आत्मा तर असतेच,
ती जावून दुसरे जीवन म्हणजे शरीर घेते.
तर तुम्ही सेवेचा चांगला छंद ठेवा, तर बाबाची पण आठवण येईल. येथे पण मंदीर इ. फार
आहेत. तुम्ही योगामध्ये पुर्ण राहून कोणाला काही पण सांगा, कोणता विचार येणार नाही.
योग असणाज्यांचा बाण पुर्ण लागेल. तुम्ही फार सेवा करु शकता. प्रयत्न करुन पहा,
परंतु प्रथम आपल्या मनात पहा कि, माझ्यामध्ये कोणते मायेचे भुत तर नाही ना? मायेचे
भुत असणारे थोडेच विजयी होऊ शकतील? सेवा तर फार आहे. ब्रह्माबाबा तर जाऊ शकत नाहीत
ना, कारण शिवबाबा बरोबर आहेत. बाबाला कोठे आम्ही चिखलात घेऊन जावू. कोणा बरोबर
बोलावे, बाबा तर मुलांबरोबरच बोलू इच्छितात. तर मुलांना सेवा करावयाची आहे. गायन पण
केले जाते कि, मुले पित्याला प्रसिध्द करतात. बाबांनी तर मुलांना हुशार बनविले आहे
ना. चांगली चांगली मुले आहेत, ज्यांना सेवेचा खुप छंद आहे. म्हणतात कि, आम्ही
गावाकडे जाऊन सेवा करतो. बाबा म्हणतात जरुर करा. फक्त गुंडाळणारी चित्र बरोबर ठेवा.
चित्रा शिवाय कोणाला समजावणे अवघड वाटते. रात्रंदिवस हाच विचार राहतो कि, इतरांचे
जीवन कसे बनवावे? आमच्यामध्ये जे आवगुण आहेत, ते कसे काढावेत, कशी प्रगती होईल.
तुम्हाला खुशी पण होत आहे. बाबा हा 8-9 महिन्याचा मुलगा आहे. असे फार निघतात. लवकरच
सेवेलायक बनतात. प्रत्येकाला असे वाटते कि, आम्ही आमचे गावात ज्ञान देऊ. आमच्या
सारख्या भावांची सेवा करु. सुरुवात स्वत:चे घरापासून करावी. सेवेचा खुप छंद पाहिजे.
एका जागी बसू नये. चक्कर मारली पाहिजे. वेळ तर फार थोडी आहे. किती मोठ मोठे आखाडे
त्यांचे बनलेले आहेत. अशी आत्मा येऊन प्रवेश करते, जी काही ना शिक्षण बसून देत आहे,
तर त्यांचे नांव प्रसिध्द होते. येथे तर बेहदचे बाबा बसून शिकवत आहेत, कल्पापुर्वी
प्रमाणे. हा आत्मिक कल्पवृक्ष वाढेल. निराकारी झाडातून क्रमाक्रमाने आत्मे येत
राहतात. शिवबाबाची मोठी लांब माळ, किंवा झाड बनलेले आहे. यासर्व गोष्टीची आठवण
केल्यानेच बाबाची आठवण येईल. प्रगती लवकर होईल. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1) कमीत-कमी 8
तास बाबा बरोबर वार्तालाप करुन, मोठ्या शांतीने किंवा नम्रतेने आत्म्याची सेवा
करावयाची आहे. सेवेमध्ये विजयी बनण्यासाठी आत कोणते पण मायेचे भुत नसावे.
2) स्वत:च स्वत:
बरोबर बोलायचे आहे कि, हे जे काही पाहत आहात, ते सर्व विनाश होणार आहे. आम्ही आमचे
घरी जाऊन मग सुखधामला जावू.
वरदान:-
विश्वामध्ये
ईश्वरीय परिवाराचे स्नेहाच्या बीज पेरणारे विश्व सेवाधारी भव :-
तुम्ही विश्व सेवाधारी
मुले, विश्वामध्ये ईश्वरीय परिवाराचे स्नेहाचे बी पेरणारे आहात. खुशाल कोणी नास्तिक
असो कि आस्तीक----सर्वांना अलौकिक किंवा ईश्वरीय स्नेहाची, नि:स्वार्थ स्नेहाचा
अनुभव करविणेच बी पेरणे आहे. हे बीज सहयोगी बनण्याचा वृक्ष स्वत:च निर्माण करतो, आणि
वेळेवर सहजयोगी बनण्याचे फळ देतो. फक्त कोणते फळ लवकर मिळते आणि कोणते फळ उशीरा
मिळते.
बोधवाक्य:-
भाग्यविधाता
बाबाला जाणणे, ओळखणे, आणि त्यांची प्रत्यक्ष मुले बनणे, हे सर्वांत मोठे भाग्य आहे...!!!