18-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, आदेश द्या की,हे भुतांनो तुम्ही आमच्या जवळ येऊ शकत नाही, तुम्ही त्यांना
घाबरून टाका, तर ते पळून जातील.
प्रश्न:-
ईश्वरीय
नशेमध्ये राहणाऱ्या मुलांच्या जीवनाची शोभा कोणती आहे?
उत्तर:-
सेवाच, त्यांच्या जीवनाची शोभा आहे. तेव्हांच नशा राहतो की आम्हाला ईश्वरी लॉटरी
मिळाली आहे. सेवेची आवड पण पाहिजे ना. परंतु ज्ञान बाण तेव्हाच लागेल, जेव्हा
मनामध्ये कोणतेही विकार रुपी भूत नसेल.
प्रश्न:-
मी शिवबांचा मुलगा आहे, असे हक्काने कोण म्हणू शकते?
उत्तर:-
ज्यांना निश्चय आहे की स्वयम् भगवान आमचे पिता आहेत. आम्ही अशा श्रेष्ठ पित्याची
मुलं आहोत. अशा नशेमध्ये राहणारे, लायक मुलेच शिवबाबाचा मुलगा आहे, असे हक्काने
म्हणू शकतात. जर चरित्र ठीक नाही, चलन श्रेष्ठ नाही तर, तो शिवबाबाचा मुलगा होऊ शकत
नाही.
ओम शांती।
शिवबाबा आठवणीत आहेत? स्वर्गाची बादशाही आठवणीत आहे? येथे जेव्हा बसता तर
बुद्धीमध्ये यायला पाहिजे, आम्ही बेहदच्या पित्याची मुल आहोत आणि नेहमी त्या
पित्याची आठवण करतो. आठवणी शिवाय आम्ही वारसा घेऊ शकत नाही.कोणता वारसा पवित्रतेचा.
तर त्यासाठी चांगला पुरुषार्थ पण करायला पाहिजे ना. कधीच कोणत्याही विकाराची गोष्ट
आमच्यासमोर येऊ शकत नाही. फक्त विकाराची ची गोष्ट नाही. एक भूत पण नाही, तर कोणतेही
भूत येऊ शकत नाही. असा शुद्ध अहंकार राहायला पाहिजे. खूपच श्रेष्ठ ते श्रेष्ठ
भगवंताची आम्ही मूल आहोत, तर श्रेष्ठ झालो ना. बोलचाल, चलन पण खूपच चांगली पाहिजे.
बाबा चलनाद्वारे समजतात, हे तर बिलकुलच कवडी तुल्य आहेत. माझा मुलगा म्हणण्याच्या
हकदार पण नाहीत. लौकिक पिता पण लायक नसलेल्या मुलांना पाहून नाराज होतात. तर हे पण
पिता आहेत. मुलं जाणतात बाबा आम्हाला शिक्षा देत आहेत, परंतु कोणी कोणी असे आहेत जे
बिलकुल समजत नाहीत. बाबा आम्हाला समजवत आहेत तो निश्चय तो नशा नाही. तुम्हा मुलांची
बुद्धी खूपच श्रेष्ठ पाहिजे. आम्ही श्रेष्ठ आहोत बाबा खूपच चांगल्या रीतीने
समजावतात. मनामध्ये विचार करा आम्ही श्रेष्ठ ते श्रेष्ठ पित्याची मुल आहोत, तर आमचे
चरित्र खूपच श्रेष्ठ असायला पाहिजे. देवी-देवतांची जी महिमा आहे, तीच आमची पण असायला
पाहिजे. प्रजेची थोडीच महिमा आहे. एका लक्ष्मी नारायणला दाखवले आहे, तर मुलांना
फारच चांगली सेवा करायला पाहिजे. लक्ष्मीनारायण दोघांनीही ही फार चांगली सेवा केली
आहे ना. बुद्धी फार श्रेष्ठ पाहिजे .काही मुलांमध्ये तर काहीच फरक दिसून येत नाही.
मायाद्वारे हार खातात आणि नंतर जास्तच बिघडतात. तर खूपच नशा राहायला पाहिजे, आम्ही
शिवबाबांची मुलं आहोत. बाबा म्हणतात सर्वांना माझा परिचय देत रहा. सेवाद्वारेच शोभा
होईल. तेव्हाच बाबाच्या हृदयावर चढू शकाल. मुलगा तोच जो बाबांच्या हृदयात आहे.
पित्याचे मुलावर खूपच प्रेम असते, मुलांना डोक्यावरती बसवतात. इतका मोह असतो, परंतु
हा आहे हदचा आहे. असा कोणताही पिता नसेल, जो मुलांना पाहून खूश होणार नाही.
मातापित्याला तर खूप खुशी होते. येथे जेव्हा बसता तर समजायला पाहिजे, बाबा आम्हाला
शिकवत आहेत. बाबा आमचे आज्ञाधारक शिक्षक आहेत. त्यांनी जरूर खूप छान सेवा केली असेल,
तेव्हा तर त्यांचे गायन करतात. खूपच आश्चर्यकारक गोष्टी आहेत. त्यांची महिमा खूप
केली जाते. येथे बसले आहात तर बुद्धीमध्ये नशा राहायला पाहिजे. सन्यासी तर आहेतच
निवृत्ती मार्गाचे, त्यांचा धर्मच वेगळा आहे. हे पण आत्ताच बाबा तुम्हाला समजवत
आहेत. तुम्ही अगोदर हे थोडेच जाणत होते? संन्यास मार्गाला तुम्ही अगोदर थोडेच जाणत
होते. तुम्ही तर गृहस्थाश्रम मध्ये राहात, भक्ती इत्यादी करत होते. तुम्हाला परत
ज्ञान मिळणार नाही, तुम्ही खूपच चांगले शिक्षण घेत आहात आणि साधारण पणे बसले आहात.
दिलवाडा मंदिरामध्ये पण तुम्ही खाली तपश्चर्या करत बसले आहात, वरती छतावर स्वर्ग आहे.
छतावर स्वर्ग पाहून मनुष्य समजतात, की स्वर्ग वरती असतो.
तर तुम्हा मुलांच्या मनामध्ये यासर्व गोष्टी यायला पाहिजेत. आम्ही हे शिक्षण घेत
आहोत. कुठे फिरायला जाता तेव्हा बुद्धीमध्ये असे विचार चालतील, तर खूपच मजा येईल.
त्याला पण दुनियेमध्ये कोणी जाणत नाही. बाबांचे मुलं बणुन आणि पित्याचे आत्मचरित्र
चरित्र जाणले नाही तर त्यांना बुध्दूच म्हणावे लागेल. असा बुध्दू कधी पाहिला नसेल.
भगवंताला न जाणल्यामुळे ते सर्वव्यापी म्हणतात. भगवंताला स्वतःच पुज्य स्वताच पुजारी
असे म्हणतात. तुम्हा मुलांच्या मनामध्ये खूपच खुशी व्हायला पाहिजे की, आम्ही खूपच
श्रेष्ठ पूज्य होतो, परत आम्हीच पुजारी बनलो. शिवबाबा तुम्हाला इतके श्रेष्ठ बनवतात
म्हणुन नाटकानुसार तुम्ही त्यांची पूजा सुरू करतात. या गोष्टींना दूनिया थोडेच जाणते
की, भक्ती कधी सुरू झाली. बाबा तुम्हा मुलांना रोज समजवत राहतात. मधुबनमध्ये बसले
आहात तर मनामध्ये खूपच खूशी व्हायला पाहिजे ना. आम्हाला कोण शिकवत आहेत? भगवान
स्वतःहून शिकवतात, हे तर कधी तुम्ही ऐकले नसेल. ते तर समजतात गीतेचा भगवान कृष्ण आहे.
कृष्ण शिकवत असतील अच्छा, कृष्णाला जरी समजले तरी खूपच उच्च अवस्था पाहिजे. एक
पुस्तक पण आहे मनुष्य मत आणि ईश्वरी मताचे. देवतांना तर कोणाचे मत घेण्याची आवश्यकता
नाही. मनुष्याला वाटते ईश्वराने मत द्यावी. देवतान तर अगोदरच जन्मांमध्ये श्रेष्ठ
मिळाली होती, ज्यामुळे त्यांनी उच्च पद मिळवले. आता तुम्हा मुलांना श्रेष्ठ
बनण्यासाठी श्रीमत मिळत आहे. ईश्वरीय मत आणि मनुष्य मता मध्ये खूप फरक आहे. मनुष्य
मत काय म्हणते आणि ईश्वरी मत काय म्हणते? तर जरूर ईश्वरी मतावर चालावं लागेल. कोणाशी
भेटण्यासाठी जातात तर, काहीच घेऊन जात नाहीत. आठवत नाही कोणाला कोणती भेट द्यायला
पाहिजे. हे मनुष्य मत आणि ईश्वरीय मताचे पुस्तक फारच चांगले आहे. तुम्ही पण मनुष्य
होते, परंतु असुरी मताचे होते आणि आत्ता ईश्वरीय मत मिळत आहे, त्यामध्ये खूप फरक आहे.
हे ग्रंथ इत्यादी सर्व मनुष्यांनी बनवलेले आहेत बाबा येऊन कोणते ग्रंथ शिकवत नाहीत.
बाबा म्हणतात मी कुणाचा मुलगा नाही, मी कोणत्या गुरूंचा शिष्य आहे काय? ज्याद्वारे
मी शिकलो असेल. तर यासर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. जर हे जाणत असले की बंदर
बुद्धी आहेत परंतु मंदिर लायक बनायचे पण आहे ना. असे अनेक, मनुष्य मतावरती चालतात
परत तुम्ही ऐकवतात की आम्ही ईश्वरीय मतावरती किती श्रेष्ठ बनत आहोत. स्वयम् ईश्वर
आम्हाला शिकवत आहेत. भगवानुवाच आम्ही त्यांच्याकडून शिकण्यासाठी दररोज एक तास, पाऊण
तास जातो. मुरली वर्गांमध्ये जास्त वेळ घ्यायला नाही पाहिजे. आठवणीची यात्रा तर
चालता-फिरता पण होऊ शकते. ज्ञान आणि योग दोन्ही खूपच सहज आहे. अल्फचे एकच अक्षर आहे,
भक्तिमार्ग मध्ये तर खूप ग्रंथ आहेत, ते सर्व एकत्र केले तर सर्व घर, ग्रंथाने भरून
जाईल. यावर ते खूपच खर्च करतात. आता बाबा तर खूपच सहज सांगतात फक्त बाबांची आठवण करा.
बाबा आणि वारसा, स्वर्गाची बादशाही घेण्यासाठी आहे. तुम्हीच विश्वाचे मालक होते ना.
भारत स्वर्ग होता, तुम्ही काय विसरले आहात का? याला पण नाटकाची भावी म्हटले जाते.
आता बाबा आले आहेत. प्रत्येक पाच हजार वर्षानंतर शिकवण्यासाठी येतात, तर जरूर नवीन
दुनिया, स्वर्गाच देतील ना. ही तर खूपच सहज गोष्ट आहे. लाखो वर्ष मानल्यामुळे
बुद्धीला जसे कुलूप लागले आहे, कुलूप उघडतच नाही. असे कुलूप लागले आहे, जी इतकी सहज
गोष्ट पण समजत नाहीत. बाबा एकच गोष्ट समजवतात, जास्त काही शिकण्याची आवश्यकता नाही.
येथे तुम्ही एका सेकंदामध्ये कोणालाही स्वर्गाचा वारसा देऊ शकता.परंतु ही शाळा आहे,
यामुळे तुमचा अभ्यास पण चालत राहतो. ज्ञानसागर बाबा तुम्हाला इतके ज्ञान देतात, जे
समुद्राची शाई बनवा, सार्या जंगलच्या लाकडाचा पेन बनवा, तरीही त्याचा अंत मिळू शकत
नाही. ज्ञानाला धारण करून किती वर्ष झाले आणि भक्ती तर अर्धाकल्प चालते. बाबा
तुम्हाला नवीन दुनिये साठी शिकवत आहेत. त्या शारीरिक शाळेमध्ये तर तुम्ही किती वर्ष
शिक्षण घेतात. पाच वर्षापासून वीस-बावीस वर्षापर्यंत शिक्षण घेत राहतात, कमाई थोडी
आणि खर्च खूप कराल तर नुकसानच होईल ना.
बाबा खुप सतोप्रधान बनवतात,तरीही परत तमोप्रधान बनतात. आता भारताची परिस्थिती पहा
काय झाली आहे. खूपच आनंदात समजवायचे आहे. मातांनी पण समजवण्या साठी तयार राहायला
पाहिजे. तुमचेच गायन आहे वंदे मातरम, धरतीला वंदे-मातरम म्हणले जात नाही.
वंदे-मातरम मनुष्याला म्हटले जाते. बंधन मुक्त आहेत, तीच सेवा करू शकतात. ते पण जे
कल्पा पूर्वी बंधनमुक्त बनले होते, तेच करत राहतात. अबलावरती खूपच अत्याचार होतात.
आम्हाला बाबा मिळाले आहेत, तर समजतात, बस बाबांची सेवा करायची आहे, बंधन आहे असे
म्हणणारे जसे बकरी सारखे आहेत. सरकार पण म्हणू शकत नाही की तुम्ही ईश्वरीय सेवा करू
नका. गोष्टी करण्यासाठी हिम्मत पाहिजे ना. ज्यांच्यामध्ये ज्ञान आहे तर, ते सहजच
बंधनमुक्त होऊ शकतात. तुम्ही न्यायाधीशाला पण समजू शकतात, की आम्ही आत्मिक सेवा करू
इच्छितो, आत्मिक पिता आम्हाला शिकवत आहेत. ख्रिश्चन लोकं म्हणतात आम्हाला मुक्त करा
मार्गदर्शक बना. भारतवासी पेक्षा त्यांची समज चांगली आहे. तुम्हा मुलांमध्ये पण जे
चांगले समजदार आहेत, त्यांना सेवेची खूप आवड राहते. ईश्वरीय सेवेद्वारे लॉटरी मिळत
आहे, हे तुम्ही समजता. काही तर लाँटरीला पण समजत नाहीत तर, स्वर्गात जाऊन दास-दासी
बनतात. मनामध्ये समजतात ठीक आहे, दासदासी किंवा चांडल तर बनू, स्वर्गामध्ये तर जाऊ.
त्यांची चलन अशीच दिसून येते. तुम्ही समजता बेहदचे बाबा आम्हाला समजवत आहेत. हे दादा
पण समजवतात, बाबा यांच्याद्वारे आम्हाला शिकवत आहेत. काही तर इतके पण समजत नाहीत,
येथुन बाहेर गेले सर्वच विसरतात. येथे बसले आहेत तरीही काहीच समजत नाहीत, बुद्धी
बाहेर भटकत राहते, धक्का खात राहते. एक पण विकार रुपी भूत निघत नाही, शिकवणारे कोण
आहेत आणि काय बनवतात? आत्ता पण सावकारांच्या कडे खुप दास दासी असतात. सेवेसाठी तर
नेहमीच तयार राहायला पाहिजे. तुम्ही विश्वामध्ये सुख-शांती स्थापन करत आहात. तुम्ही
जानता,आम्ही श्रीमतावर प्रत्यक्षात सुख शांतीची स्थापना करत आहोत, यामध्ये अशांती
राहायला नको. बाबांनी येथे पण काही असेच चांगले चांगले परिवार पाहिले आहेत,
त्यामध्ये सहा-सात सुना पण एकत्र प्रेमाने राहत होते, तेथे खूपच शांती होती. ते
असेही म्हणतात आमच्या जवळ तर स्वर्गच आहे, कोणती ही खिटपिट ची गोष्ट नाही, सर्व
आज्ञाधारक आहेत. त्यावेळेत बाबांना पण संन्याशी विचार येत होते. दुनियापासून
वैराग्य होता, आता तर हा बेहदचा वैराग्य आहे. काहीच आठवणीत राहिला नको, बाबांना तर
सर्वनाव रुप विसरून गेले आहेत. मुलं म्हणतात, बाबा आमचीच आठवण येते का? बाबा
म्हणतात, मला तर सर्वांना विसरायचे आहे, न विसरा न आठवण करा .हा बेहदचा वैराग्य आहे
ना. सर्वांना विसरायचे आहे. आम्ही येथील रहिवासी नाहीत. बाबा आले आहेत आपल्याला
स्वर्गाचा वारसा देण्यासाठी. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुम्ही विश्वाचे मालक
बनून जाल. हा बैज पण खूपच चांगला आहे ज्ञान समजावून सांगण्यासाठी, कोणी मागितला तर
त्यांना सांगा हे ज्ञान तुम्ही समजून घ्या.ज्ञान समजल्यामुळे तुम्हाला विश्वाची
बादशाही मिळू शकते. शिवबाबा या ब्रह्माद्वारे मार्गदर्शन करतात, सूचना देतात की,
माझी आठवण करा तर तुम्ही लक्ष्मीनारायण सारखे बनाल. गीतेचा अभ्यास करणारे चांगल्या
रीतीने हे ज्ञान समजून घेतील, जे देवी-देवता धर्माचे असतील. काहीजण प्रश्न विचारतात
देवतांची उतरती कला का झाली? अरे हे चक्र फिरत राहते ना, पुनर्जन्म घेत घेत खाली
उतरायचे चाहे. चक्राला तर फिरायचे आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये हे जरुर येते, आम्ही
सेवा का करू शकत नाही, जरूर माझ्यामध्ये काही अवगुण आहेत. मायेच्या भुताने नाकाला
पकडले आहे.
आता तुम्ही मुलं समजता आम्हाला घरी जायचे आहे परत नवीन दुनिये मध्ये येऊन राज्य करू.
तुम्ही प्रवासी आहात ना, दूर देशावरून येथे आपला अभिनय करण्यासाठी आलेले आहात. आता
तुमच्या बुद्धिमध्ये आहे आम्हाला अमरलोक जायचे आहे, हे मृत्युलोक खलास होणार आहे.
बाबा खूपच चांगल्या रीतीने समजावत राहतात, तर चांगल्या रीतीने धारणा पण करायचे आहे.
ज्ञानाचे मनन चिंतन करत राहायचे आहे. कर्मभोगामुळे आजार पण येत राहते, हे पण बाबा
समजवत राहतात. माया तुम्हाला त्रास देईल परंतु तुम्ही संभ्रमित होऊ नका. काही मुलं
थोडे काही झाले तर लगेच हैराण होतात. आजारपणामध्ये मनुष्य आणखीनच भगवंताची जास्त
आठवण करतात. बंगालमध्ये जेव्हा कोणी आजारी असतात, तेव्हा त्यांना म्हणतात राम राम
म्हणा, काहींचा मृत्यू जवळ आला तर त्यांना गंगा किनारी नेहुन हरी बोल हरी बोल
म्हणवतात, परत त्यांना घरी नेहुन त्यांचा अंत्यविधी करण्याची काय आवश्यकता,
गंगेमध्येच तुम्ही त्यांना बुडवा, जेणेकरुन मगर मासे इत्यादीची शिकार होतील,
त्यांच्या कामाला तरी येतील. पारशी लोक मृत्यू झाल्यानंतर, त्या मृत शरीराला झाडाला
लटकवतात, समजतात त्यांची हाडे मांस कामांमध्ये येतील. बाबा म्हणतात, तुम्ही बाकी
सर्व गोष्टी विसरून, माझी आठवण करा. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. बंधनमुक्त
बनुन भारताची खरी सेवा करायची आहे.आम्हाला आत्मिक पिता शिकवत आहेत. आम्ही आत्मिक
सेवा करत आहोत, हे आनंदात समजावयाचे आहे.ईश्वरी सेवा करण्याची आवड पाहिजे.
२. कर्म भोगा द्वारे आलेले आजारपण किंवा मायेच्या वादळा द्वारे संभ्रमित किंवा
हैराण व्हायचे नाही. बाबांनी चे ज्ञान दिले आहे, त्याचे मनन चिंतन करत बाबाच्या
आठवणीमध्ये आनंदित राहायचे आहे.
वरदान:-
सर्व
संबंधाच्या अनुभवा सोबत प्राप्तीच्या खुशीचा अनुभव करणारे तृप्त आत्मा भव
ज्या खऱ्या सजनी आहेत,
त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक कर्मामध्ये प्राप्तीच्या खुशीमध्ये राहतात.
काही मुलं अनुभव करतात ते माझे पिता आहेत, साजन आहेत, मुलगा आहे इत्यादी... परंतु
प्राप्ती जेवढी पाहिजे तेवढी होत नाही, तर अनुभूतीच्या सोबतच सर्व संबंधाद्वारे
प्राप्तीची जाणीव व्हावी. अशी प्राप्ती आणि अनुभूती करणारेच सदा तृप्त राहतात,
त्यांना कोणत्या पण गोष्टीची अप्राप्ती वाटत नाही. जिथे प्राप्ती आहे, तिथे तृप्ती
पण जरूर असेल.
बोधवाक्य:-
निमित्त बना
तर सेवेच्या सफलतेचा हिस्सा मिळेल.