23-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, ज्ञानाचा तिसरा नेत्र नेहमी उघड ठेवा, तर खुशीमध्ये अंगावर शहारे उभे
होतील, खुशीचा पारा चढत राहिल”
प्रश्न:-
यावेळी
मनुष्याची दृष्टी फार कमजोर आहे, त्यामुळे त्यांना समजावण्याची युक्ती काय?
उत्तर:-
बाबा सांगतात,
त्यांचेसाठी तुम्ही मोठे चित्र बनवा, जे लांबूनच पाहुन समजतील. हे गोळ्याचे (सृष्टी
चक्राचे) चित्र फार मोठे बनविले पाहिजे. हे आहे आंधळ्यासमोर आरसा.
प्रश्न:-
साऱ्या जगाला
स्वच्छ बनविण्यासाठी तुमचे मददगार कोण बनत आहे?
उत्तर:-
ही नैसर्गिक
संकटे तुमची मददगार बनतात. या बेहदच्या जगाच्या स्वच्छतेसाठी जरुर कोणी तरी मदतगार
पाहिजे.
ओम शांती।
गायन पण आहे बाबांकडून सेकंदात मुक्ती अर्थात जीवनमुक्ती मिळते. इतर सर्व तर
जीवनबंधात आहेत. हे एकच त्रिमुर्ती आणि गोळ्यांचे जे चित्र आहे, बस हेच मुख्य आहे-हे
फार मोठ मोठे असले पाहिजे. आंधळ्यासाठी तर मोठा आरसा पाहिजे, जे चांगले रितीने पाहू
शकतील, कारण आता सर्वांची दृष्टी कमजोर आहे, बुध्दी कमी आहे. बुध्दी म्हटले जाते
तिसऱ्या डोळ्याला. तुमच्या बुध्दीमध्ये आता खुशी झाली आहे. खुशीमध्ये ज्यांना शहारे
येत नाहीत, म्हणजे शिवबाबांची आठवण करत नाहीत, तर समजावे कि, ज्ञानाचा तिसरा नेत्र
थोडा उघडला आहे, अंधुक आहे. बाबा समजावतात कि, कोणाला पण थोडक्यात समजावयाचे आहे.
मोठ मोठे मेळे इ. करतात, मुले जाणतात कि, सेवेसाठी खरे तर एकच चित्र पुरेसे आहे. जरी
गोळ्याचे चित्र असले तरी पण ठीक आहे. बाबा, विश्व नाटक आणि झाडाचे अथवा कल्पवृक्षाचे
आणि 84 च्या चक्राचे रहस्य समजावत आहेत. ब्रह्माद्वारे बाबाचा हा वारसा मिळत आहे.
हे पण चांगले प्रकारे स्पष्ट आहे. या चित्रामध्ये सर्व येत आहे, आणखीन इतक्या सर्व
चित्रांची आवश्यकता नाही. हे दोन चित्रे मोठ-मोठ्या अक्षरातील पाहिजेत. लिहले पण
पाहिजे, जीवनमुक्ती ईश्वरीय पित्याचा जन्म सिध्द अधिकार आहे, भविष्यात होणाऱ्या
विनाशापुर्वी. विनाश पण जरुर होणारच आहे. विश्व नाटकानुसार आपोआप सर्व जमतील.
तुमच्या समजावण्याची पण आवश्यकता राहणार नाही. बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा
मिळत आहे. हे तर बिल्कुल पक्के आठवणीत राहिले पाहिजे. परंतू माया तुम्हाला विसरवते.
वेळ निघून जात आहे. गायन पण आहे ना-फार गेले-याचा अर्थ पण यावेळेचा आहे. बाकी थोडा
वेळ राहिला आहे. स्थापना तर होतच आहे, विनाशासाठी थोडा वेळ आहे. खुपच कमी दिवस
राहिले आहेत. विचार केला जातो मग काय होईल? आता तर जागत नाहीत. शेवटी जागे होतील.
डोळे मोठे होतील. हे डोळे नाहीत, बुध्दी रुपी डोळा. लहान लहान चित्राद्वारे एवढी मजा
येत नाही. मोठ मोठे बनतील. सायन्स पण किती मदत करत आहे. विनाशामध्ये तत्त्व पण मदत
करतात. बिना कौडी खर्च न करता तुम्हाला किती मदत देतात. तुमच्यासाठी फारच सफाई करुन
देतात. ही फारच छी छी दुनिया आहे. अजमेर मध्ये स्वर्गाचे स्मृती स्थळ आहे. येथे
दिलवाला, मंदीरामध्ये स्थापनेचे स्मृती स्थळ आहे, परंतू काही समजू थोडेच शकतात. आता
तुम्ही समजदार झाले आहात. जरी मनुष्य म्हणतात की, आम्ही जाणत नाही की विनाश होईल,
बुध्दीत बसत नाही. एक गोष्ट आहे ना. सिंह आला, सिंह आला, मानत नव्हते एक दिवशी
बकऱ्या खावून गेला. तुम्ही पण म्हणता की, ही जुनी दुनिया गेली की गेली. फार गेले
थोडे राहिले.
हे सारे ज्ञान तुम्हा मुलांच्या बुध्दीमध्ये राहिले पाहिजे. आत्माच धारण करते.
बाबाच्या आत्म्यात पण ज्ञान आहे ना, ते जेव्हा शरीर धारण करतात, तेव्हा ज्ञान देतात.
जरुर त्यांचे मध्ये ज्ञान आहे, त्यामुळे तर ज्ञानाचा सागर ईश्वरीय पिता म्हटले जाते.
ते साऱ्या सृष्टीच्या आदि मध्य अंताला जाणत आहेत. स्वत:ला तर जाणतात ना. आणि
सृष्टीचे चक्र कसे फिरत आहे, त्याचे पण ज्ञान आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये नॉलेजफुल
अक्षर फार चांगले आहे. मनुष्य सृष्टी रुपी झाडाचा बीजरुप आहे, त्यामुळे त्यांना सारे
ज्ञान आहे. तुम्ही हे जाणता नंबरवार पुरुषार्थानुसार. शिवबाबा तर आहेत नॉलेजफुल. हे
चांगल्या रितीने बुध्दीत राहिले पाहिजे. असे नाही कि, सर्वांच्या बुध्दीत एकरस धारणा
होते. जरी लिहले तरी धारणा काहीच नाही. फक्त लिहतात, सांगू कोणाला पण शकत नाहीत.
कागदाला सांगतात. कागद काय करेल. कागदाकडून तर काही समजणार नाहीत. या चित्राद्वारे
फार चांगले समजतील. मोठ्यातील मोठे ज्ञान आहे तर अक्षर पण मोठ मोठी पाहिजेत.
मोठ्यातील मोठे चित्र पाहून मनुष्य समजतील यामध्ये जरुर काहीतरी सार आहे. स्थापना
आणि विनाश पण लिहले आहे. राजधानीची स्थापना ही आहे ईश्वरीय पित्याचा जन्मसिध्द
अधिकार. प्रत्येक मुलांचा हक्क आहे जीवनमुक्ती. तर मुलांची बुध्दी चालली पाहिजे की,
सर्व जीवनबंध मध्ये आहेत. त्यांना जीवन बंधनातून जीवनमुक्तीमध्ये कसे घेऊन जावे?
अगोदर शांतीधामला जातील मग सुखधाममध्ये. सुखधामला जीवनमुक्त म्हणतात. ही चित्रे
विशेष करुन मोठ मोठी बनली पाहिजेत. मुख्य चित्र आहेत ना. फार मोठ मोठे अक्षर असतील
तर मनुष्य म्हणतील ब्रह्माकुमारीने एवढे मोठे चित्र बनविले आहेत, जरुर काही ज्ञान
आहे. तर जिकडे तिकडे तुमची पण मोठ मोठी चित्रे लागतील, तर विचारतील हे काय आहे? बोला,
एवढी मोठी चित्रे तुम्हाला समजावण्यासाठी बनविली आहेत. यात स्पष्ट लिहले आहे, बेहदचा
वारसा यांना होता. कालची गोष्ट आहे, आज ते नाहीत, कारण 84 पुनर्जन्म घेत घेत खाली
आले आहेत. सतोप्रधान पासून तमोप्रधान तर बनायचेच आहे. ज्ञान आणि भक्ती, पुज्य आणि
पुजारीचा खेळ आहे ना. अर्ध्या अर्ध्यामध्ये बिल्कुल पुर्ण खेळ बनलेला आहे. तर असे
मोठ मोठे चित्र बनविण्याची हिम्मत पाहिजे. सेवेची पण हौस पाहिजे. दिल्लीच्या कोणत्या
भागामध्ये सेवा करावयाची आहे. मेळा जत्रेमध्ये तर फार लोक जातात, तेथे तुम्हाला हे
चित्रच कामाला येतील. त्रिमुर्ती, गोळा हे आहेत मुख्य. ही फार चांगली वस्तू आहे,
आंधळ्यासमोर जसा आरसा आहे. आंधळ्याला शिकविले जाते. शिकते तर आत्म आहे ना. परंतू
आत्म्याची कर्मेद्रिये लहान असतील, तर त्यांना शिकविण्यासाठी चित्र इ. दाखविली
जातात. मग थोडे मोठे झाले तर जगाचा नकाशा दाखविला जातो. मग तो सारा नकाशा
बुध्दीमध्ये राहतो. आता तुमच्या बुध्दीमध्ये सारे हे विश्व नाटकाचे चक्र आहे, एवढे
सर्व धर्म आहेत, कसे नंबरवार येतात, मग निघुन जातील. तेथे तर एकच आदि सनातन देवी
देवता धर्म आहे, ज्याला स्वर्ग म्हणतात. बाबा बरोबर योग लावल्याने आत्मा पतितापासून
पावन बनेल. भारताचा प्राचीन योग प्रसिध्द आहे. योग म्हणजे आठवण. बाब पण सांगतात कि,
मज पित्याची, आठवण करा. हे सांगावे लागते. लौकिक पित्याला असे सांगावे लागत नाही
की, माझी आठवण करा. मुले आपो-आप बाबा मम्मा म्हणत राहतात. ते आहेत लौकिक मात पिता,
हे आहेत पारलौकिक, त्यांचे गायन आहे, तुमच्या कृपेने सुख भरपुर ज्यांना दु:ख आहे,
तेच गात आहेत. सुखामध्ये तर म्हण ज्यांची आवश्यकता राहत नाही. दु:खामध्ये आहेत,
तेव्हा हाक मारतात. आता तुम्ही समजले आहात कि, हे मात-पिता आहेत. बाबा सांगत आहेत
ना, दिन प्रतिदिन तुम्हाला गुह्य गोष्टी सांगत आहे. पुर्वी माहित होते काय कि,
मात-पिता कोणाला म्हटले जाते? आता तुम्ही जाणता कि, पिता तर त्यांनाच म्हटले जाते.
पित्याकडून वारसा मिळत आहे, ब्रह्मा माता पण पाहिजे ना. कारण मुलांना दत्तक
घ्यावयाचे आहे. ही गोष्ट कोणाच्या पण लक्षात येत नाही. तर बाबा वारंवार म्हणतात कि,
गोड गोड मुलांनो, बाबाची आठवण करत राहा. लक्ष्य मिळाले नंतर, मग खुशाल, कोठेही जावा.
परदेशात जावा, 7 दिवसाचा कोर्स केला तर फार झाले. बाबा कडून तर वारसा घ्यावयाचाच आहे.
आठवणीद्वारेच आत्मा पावन बनेल. स्वर्गाचे मालक बनाल. हे लक्ष्य तर बुध्दीमध्ये आहे
मग खुशाल कोठे पण जावा. सारे गीतेचे ज्ञान या बैजमध्ये आहे. कोणाला पण विचारण्याची
आवश्यकता नाही, कि काय करावयाचे आहे. बाबा कडून वारसा घ्यावयाचा आहे तर जरुर बाबाची
आठवण करावयाची आहे. तुम्ही हा वारसा बाबंकडून अनेक वेळा घेतला आहे. विश्व नाटकाचे
चक्र पुनरावृत्त होत राहत आहे ना. अनेक वेळा तुम्ही शिक्षकांकडून शिकून कोणते ना
कोणते पद प्राप्त करत आहात. अभ्यासात बुध्दीयोग शिक्षकाबरोबर राहतो ना. परिक्षा जरी
लहान आहे, मोठी आहे, अभ्यास तर आत्मा करते ना. ब्रह्माबाबाची पण आत्मा अभ्यास करते.
शिक्षकाला आणि मुख्य लक्ष्याला आठवण करावयाची आहे. सृष्टीचे चक्र पण बुध्दीत
ठेवावयाचे आहे. बाबा आणि वारशाची आठवण करावयाची आहे. दैवीगुण पण धारण करावयाचे आहेत.
जेवढी धारणा कराल तेवढे उंच पद मिळेल. चांगल्याप्रकारे आठवण करत आहात तर मग येथे
येण्याची पण काय गरज आहे. परंतु तरी पण येतात. असे उंच बाब ज्यांचेकडून एवढा बेहदचा
वारसा मिळत आहे, त्यांना भेटून तर येऊ. मंत्र घेऊन सर्व येतात. तुम्हाला तर फार भारी
मंत्र मिळाला आहे. ज्ञान तर सारे चांगल्याप्रकारे बुध्दीत आले आहे.
आता तुम्ही मुले समजत आहात कि, विनाशी कमाईच्या मागे जास्त वेळ वाया घालवायचा नाही.
हे तर सर्व मातीत मिळणार आहे. बाबाला काय पाहिजे? काही पण नाही. जो पण खर्च इ. करत
आहात, तो तर तुमच्यासाठी करत आहात. यात तर दमडीचा पण खर्च नाही. काही दारु गोळा,
किंवा टँक इ. तर खरीदी करायचे नाही युध्दासाठी. काहीच नाही. तुम्ही युध्द करुन पण
साऱ्या जगापासून गुप्त आहात. तुमचे युध्द पहा कसे आहे. याला म्हटले जाते योगबळ, सारी
गुप्त गोष्ट आहे. यात कोणाला मारण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त बाबाची आठवण
करावयाची आहे. या सर्वांचा मृत्यू विश्व नाटकात नोंदलेला आहे. प्रत्येक 5 हजार
वर्षानंतर तुम्ही योगबळ जमा करण्यासाठी अभ्यास करत आहात. अभ्यास पुर्ण झाला मग
प्रालब्ध पाहिजे नवीन दुनियेमध्ये. जुन्या दुनियसाठी ही नैसर्गिक संकटे आहेत. गायन
पण आहे ना. आपल्या कुळाचा विनाश कसा करत आहेत. किती मोठे कुळ आहे. सारा युरोप यात
येत आहे. हा भारत तर वेगळा एका कोपऱ्यात आहे. बाकी सर्व नष्ट होणार आहे. योगबळाने
तुम्ही साऱ्या विश्वावर विजय प्राप्त करता, पवित्र पण बनायचे आहे या
लक्ष्मी-नारायणासारखे. तेथे विकारी दृष्टीच नाही. पुढे चालुन तुम्हालाफार
साक्षत्कार होतील. आपल्या देशाचे जवळ आले नंतर मग झाडे दिसून येतात ना. तर खुशी होते
आता आलो आहे आपले घराजवळ. तुम्ही पण घराकडे चालले आहात, नंतर आपल्या सुखधामा जाल.
बाकी थोडा वेळ आहे, स्वर्गातून निरोप घेऊन किती वेळ झाला आहे. आता परत स्वर्गजवळ आला
आहे. तुमची बुध्दी जाते वर, ती आहे निराकारी दुनिया, ज्याला ब्रह्मांड पण म्हटले
जाते. आम्ही तेथील रहिवासी आहोत. येथे 84 जन्माची भुमिका केली. आता आम्ही परत जातो.
तुम्ही मुले आले आहात सुरुवातीपासून, सुरुवातीपासून 84 जन्म घेणारे आहात. उशीरा
येणाऱ्याची संपुर्ण भुमिका असत नाही. बाबंनी समजावले आहे, जास्तीत जास्त आणि कमीत
कमी किती जन्म घेत आहात? एका जन्मापुरते पण आहेत. शेवटी सर्व निघून जातील परत. नाटक
पुर्ण झाले, खेळ खलास. आता बाबा समजावत आहेत, माझी आठवण करा, अंतकाळात जशी मती तशी
गती होऊन जाईल. बाबा जवळ परमधामला निघून जाल. त्यांना म्हणतात मुक्तीधाम, शांतीधाम
आणि नंतर सुखधाम. हे आहे दु:ख धाम. परमधाममधून प्रत्येक जण सतोप्रधान येतात, मग सतो,
रजो, तमोमध्ये येत राहतात. एक जन्म झाला त्यामध्ये पण या 4 आवस्थेला प्राप्त कराल.
किती चांगले मुलांना समजावत आहे, तरी पण आठवण करत नाहीत. बाबाला विसरतात नंबरवार तर
आहेत ना. मुले जाणतात कि, नंबरवार पुरुषार्थनुसार रुद्रमाळा बनते. किती करोडोची
रुद्रमाळा आहे. बेहदच्या विश्वाची ही माळा आहे. ब्रह्मा पासून विष्णू, विष्णू पासून
ब्रह्मा, दोघाची नांवे पहा, हे प्रजापिता ब्रह्माचे नांव आहे. अर्धाकल्पानंतर मग
रावण येतो. देवताधर्म, इस्लामधर्म..। आदम-बीबीची पण आठवण करतात, स्वर्गाची पण आठवण
करतात. भारत स्वर्ग होता, मुलांना खुशी तर फार झाली पाहिजे. बेहदचे बाबा, उंच ते
उंच भगवान, उंच ते उंच शिकवत आहेत. उंच ते उंच पद मिळत आहे. सर्वांत उंच ते उंच
शिक्षक आहेत बाबा. ते शिक्षक पण आहेत, नंतर बरोबर घेऊन जातात, तर सद्गुरु पण आहेत.
अशा बाबाची का आठवण राहणार नाही. खुशीचा पारा चढत राहिला पाहिजे. परंतू युध्दाचे
मैदान आहे, माया उभे राहून देत नाही. वारंवार आपटते. बाबा तर म्हणतात, मुलांनो
आठवणीनेच तुम्ही मायाजीत बनाल. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. बाबा जे
शिकवितात ते अंमलात आणावयाचे आहे, फक्त कागदावर लिहून ठेवायचे नाही. विनाशाचे अगोदर
जीवनबंधनातून जीवनमुक्त पद प्राप्त करावयाचे आहे.
2. आपला वेळ विनाशी
कमाईच्या मागे जादा वाया घालवावयाचा नाही, कारण हे सर्व मातीत मिसळणार आहे. त्यामुळे
बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घ्यावयाचे आहे, आणि दैवी गुण पण धारण करवयाचे आहेत.
वरदान:-
अधिकारी बनून
वेळेवर सर्वशक्तीला कामात लावणारे मास्टर सर्वशक्तीवान भव
सर्वशक्तीवान
बाबाद्वारे ज्या सर्व शक्ती प्राप्त आहेत, त्या जशी परिस्थिती, जशी वेळ, आणि ज्या
विधीद्वारे तुम्ही कामात लावू इच्छिता, त्या रुपामध्ये ती शक्ती तुमची सहयोगी बनू
शकते. या शक्तींना, किंवा प्रभू-वरदानाला ज्या रुपामध्ये इच्छिता, ते रुप धारण करु
शकते. आता आता शितलतेच्या रुपामध्ये, आता अग्नी रुपामध्ये. फक्त वेळेवर कार्यात
लावणारे अधिकारी बना. या सर्वशक्ती तर तुम्हा मास्टर सर्वशक्तीवानाच्या सेवाधारी
आहेत.
बोधवाक्य:-
स्व पुरुषार्थ
किंवा विश्व कल्याणाचे कार्य, जेथे हिम्मत आहे तेथे विजय होणारच आहे...!