21-12-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड मुलांनो, आत्मा रुपी बॅटरीला ज्ञान आणि योगाने, भरपुर करुन सतोप्रधान बनवायचे
आहे, पाण्याच्या स्नानाने नाही....!!!
प्रश्न:-
यावेळी सर्व
मनुष्य आत्म्यांना भटकवणारा कोण आहे? तो भटकवतो कशासाठी?
उत्तर:-
सर्वांना
भटकवणारा रावण आहे, कारण तो स्वत:च भटकत आहे. त्याला आपले स्वत:चे घर नाही. रावणाला
कोणी बाबा म्हणत नाही. बाबा तर परमधामवरुन येतात आपले मुलांना ठिकाणा देण्यासाठी.
आता तुम्हाला घराचा पत्ता मिळाला आहे, त्यामुळे तुम्ही भटकत नाही. तुम्ही म्हणता
कि, आम्ही बाबापासून प्रथम दूर गेलो, आता परत प्रथम घरी जावू.
ओम शांती।
गोड गोड मुलं येथे बसून समजतात कि, ब्रह्माबाबा मध्ये जे शिवबाबा आले आहेत, कसे पण
करुन आम्हाला घरी बरोबर घेऊन जातील. परमधाम आत्म्याचे घर आहे ना. तर मुलांना जरुर
आनंद होत असेल कि, बेहदचे बाबा येऊन आम्हाला फुलासारखे बनवत आहेत. कोणते कपडे इ.
घालत नाहीत. याला म्हटले जाते, योगबळ, आठवणीचे बळ. जेवढे शिक्षकाचे पद आहे, तेवढे
इतर मुलांना पद पण देत आहेत. ज्ञानाद्वारे विद्यार्थी हे जाणतात कि, आम्ही लक्ष्मी
नारायण बनू. तुम्ही पण समजता कि, आमचे बाबा शिक्षक पण आहेत, तर सतगुरु पण आहेत, ही
आहे नविन गोष्ट. आमचे बाबा शिक्षक आहेत, त्यांची आम्ही आठवण करतो. आम्हाला शिकवून
लक्ष्मी-नारायण बनवत आहेत. आमचे बेहदचे पिता आले आहेत, आम्हाला परत घरी घेऊन
जाण्यासाठी. रावणाचे कोठे घर नाही, घर रामाचे आहे. शिवबाबा कोठे राहतात? तुम्ही
झटक्यात सांगता परमधाममध्ये. रावणाला तर बाबा म्हणत नाहीत. रावण कोठे राहतो? माहित
नाही, असे म्हणत नाहीत कि, रावण परमधममध्ये राहतो, नाही त्यांचा जसे कि ठिकाणाच नाही.
भटकत राहतो, आणि तुम्हाला पण भटकवतो. तुम्ही रावणाची आठवण करता का? नाही. किती
तुम्हाला भटकवतो, ग्रंथ वाचा, भक्ती करा, असे करा. बाबा म्हणतात याला भक्तीमार्ग
म्हणले जाते, रावण राज्य. गांधीजी पण म्हणत होते रामराज्य पाहिजे. या रथामध्ये आपले
शिवबाबा आले आहेत. मोठे बाबा आहेत ना. ते आत्म्यांना मुलं मुलं म्हणत बोलवत आहेत.
आता तुमच्या बुध्दीमध्ये आहे, आत्मिक पिता आणि आत्मिक पित्याच्या बुध्दीत आहे तुम्ही
आत्मिक मुलं, कारण आमचा संबंध आहेच मुळवतनाशी. आत्मे आणि परमात्मा दूर राहिले फार
काळ... तिथे तर आत्मे बाबा बरोबर एकत्र राहतात. नंतर, वेगळी होतात, आप-आपला अभियन
करण्यासाठी. फार काळाचा हिशोब पाहिजे ना, ते बाबा बसून सांगतात. तुम्ही आता शिक्षण
घेत आहात. तुमच्यामध्ये पण क्रमवार आहेत, जे चांगल्याप्रकारे शिकतात. तेच प्रथम
माझ्यापासून वेगळे झाले आहेत. तेच माझी जास्त आठवण करतात. त्यामुळे ते प्रथम
माझ्याजवळ येतात.
बाबा बसून मुलांना साऱ्या सृष्टी चक्राचे गुह्य रहस्य समजावत आहेत, जे दुसरे कोणी
ही जाणत नाही. रहस्य युक्त पण म्हटले जाते, अति रहस्य युक्त पण म्हटले जाते. हे पण
तुम्ही जाणता कि, बाबा काही वर बसुन समजावत नाहीत. येथे येऊन समजावतात कि, मी या
कल्पवृक्षाचा बीजरुप आहे. या मनुष्य सृष्टी रुपी झाडाला कल्प वृक्ष म्हटले जाते.
जगातील मनुष्य तर बिल्कुल काही जाणत नाहीत. कुंभकर्णाचे निद्रेत झोपले आहेत, नंतर
बाबा येऊन उठवत आहेत. आता तुम्हा मुलांना उठविले आहे, इतर सर्व झोपलेले आहेत. तुम्ही
पण कुंभकर्णाच्या आसुरी निद्रेत झोपलेले होता. बाबांनी येऊन उठविले आहे, मुलांनो उठा,
तुम्ही निष्काळजी होऊन झोपले आहात, याला म्हटले जाते, अज्ञान निंद्रा. ती झोप तर
सर्व जण करतात. सतयुगामध्ये पण करतात. आता सर्व आहेत अज्ञान निद्रेत. बाबा येऊन
ज्ञान देतात, सर्वांना उठवत आहेत. आता तुम्ही मुले उठले आहात, जाणले आहे कि, बाबा
आले आहेत, आम्हाला घेऊन जाण्यासाठी. आता तर ना हे शरीर, ना आत्मा, दोन्ही काही
कामाचे नाहीत, दोन्ही पतित झाले आहेत. एकदम कलई केलेले झाले आहेत, 9 कॅरेटचे म्हणावे,
म्हणजे फार थोडे सोने, खरे सोने 24 कॅरेटचे असते. आता बाबा तुम्हा मुलांना 24 कॅरेट
पर्यंत घेऊन जावू इच्छितात. तुमच्या आत्म्याला खरे खुरे सोन्यासारखे बनवत आहेत.
भारताला सोन्याची चिमणी म्हणत होते. आता तर आहे लोखंडाची रावणाची चिमणी म्हटले
चालेल. आहे तर चैतन्य ना. या समजण्याच्या गोष्टी आहेत. जसे आत्म्याला समजू शकता, तसे
बाबाला पण समजू शकतात, म्हणतात पण कि चमकत आहे तारा, फार छोटा तारा आहे. डॉक्टर इ.
नी फार प्रयत्न केले पाहण्याचे, परंतू दिव्य दृष्टी शिवाय पाहू शकत नाही. फार
सुक्ष्म आहे. कोणी म्हणतात डोळ्यामधून आत्मा निघून गेली, कोणी म्हणतात तोंडावाटे
निघूल गेली. आत्मा निघून कोठे जाते? दुसऱ्या तनामध्ये जावून प्रवेश करते. आता तुमची
आत्मावर निघून जाईल, शांतीधामला. हे पक्के माहित झाले आहे, बाबा येऊन आम्हाला घरी
घेऊन जातील. एकीकडे आहे कलियुग. दुसरीकडे आहे सतयुग. आता आम्ही संगमयुगावर उभे आहोत.
आश्चर्य आहे, येथे करोडो मनुष्य आहेत, आणि सतयुगामध्ये फक्त 9 लाख, बाकी सर्वांचे
काय झाले. विनाश होऊन जातात. बाबा येतातच नविन दुनियेची स्थापना करण्यासाठी.
ब्रह्माद्वारे स्थापना होत आहे. नंतर पालना पण होत राहते, दोन रुपामध्ये. असे पण
नाही 4 हाताचे कोणी मनुष्य असतात, मग तर शोभाच राहणार नाही. मुलांना पण समजावतात
कि, चतुर्भुज श्री लक्ष्मी नारायणाचे एकत्रित रुप आहे. श्री म्हणजे श्रेष्ठ.
त्रेतामध्ये दोन, कला कमी होऊन जातात. तर मुलांना हे जे ज्ञान आता मिळत आहे, त्याच
आठवणीत राहावयाचे आहे. मुख्य आहेतच दोन अक्षर, बाबाची आठवण करा. दुसऱ्या कोणाच्या
लक्षात येणार नाही. बाबाच पतित पावन सर्व शक्तीमान आहेत. गायन पण करतात कि, बाबा,
तुम्ही आम्हाला सर्व आकाश जमीन सर्व काही दिले आहे. अशी कोणती वस्तू नाही, जी ना
दिली आहे. साऱ्या विश्वाचे राज्य दिले आहे.
तुम्ही जाणता कि, हे लक्ष्मी नारायण विश्वाचे मालक होते. मग विश्वनाटकाचे चक्र फिरत
आहे. संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. क्रमवारीने पुरुषार्थ्यांनुसार. हे पण जाणले
आहे कि, विकारीपासून निर्विकारी आणि निर्विकारीपासून विकारी, अशी 84 जन्मांची भुमिका
न मोजता येईल, एवढ्या वेळा केली आहे. ज्यांची मोजणी करु शकत नाही. लोकसंख्येची जरी
मोजणी करु शकतात. बाकी हे जे तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान आणि सतोप्रधान पासून
तमोप्रधान बनता, याचा हिशोब काढू शकत नाही, की किती वेळा बनलो. बाबा सांगतात कि, 5
हजार वर्षांचे हे चक्र आहे. हे तर ठीक आहे. लाखो वर्षांची गोष्ट तर आठवणच करु शकणार
नाही. आता तुमच्या मध्ये दैवी गुणांची धारणा होत आहे. ज्ञानाचा तिसरा डोळा मिळाला
आहे. या डोळ्यांनी तुम्ही जुन्या दुनियेला पाहत आहात. तिसरा डोळा जो मिळाला आहे.
त्याने नविन दुनियेला पाहावयाचे आहे. ही दुनिया तर काही कामाची नाही. जुनी दुनिया
आहे. नवी आणि जुनी दुनियेमध्ये फरक पहा किती आहे. तुम्ही जाणता कि, आम्हीच नविन
दुनियेचे मालक होतो, नंतर 84 जन्म घेऊन असे बनले आहोत? हे चांगल्याप्रकारे आठवणीत
ठेवलले पाहिजे, आणि मग इतरांना पण समजावले पाहिजे, कसे आम्ही हे बनत आहे? ब्रह्मा
पासून विष्णू, मग विष्णू पासून ब्रह्मा बनत आहे. ब्रह्मा आणि विष्णू मध्ये फरक पाहता
ना. विष्णू कसे नटून थटून बसले आहेत, हे ब्रह्मा कसे साधारण बसले आहेत. तुम्ही जाणता
कि, हे ब्रह्माच विष्णू बनणार आहेत. हे कोणाला समजावणे पण फार सोपे आहे. ब्रह्मा
विष्णू शंकरचा ऐकमेकांशी काय संबंध आहे? तुम्ही जाणता कि, हे विष्णूचे दोन रुप
लक्ष्मी नारायण आहेत. हेच विष्णू देवता, नंतर मग हे मनुष्य ब्रह्मा बनतात. हे विष्णू
सतयुगाचे आहेत, ब्रह्मा येथील आहेत. बाबांनी समजावले आहे. ब्रह्मा पासून विष्णू
बनण्यास सेकंद लागतो, मग विष्णू पासून ब्रह्मा बनण्यासाठी 5 हजार वर्षे लागतात.
तसेच तुम्हाला पण, फक्त एकटे ब्रह्माच बनत नाहीत ना. या गोष्टी बाबा शिवाय कोणी
समजावू शकत नाही. येथे कोण्या मनुष्य गुरुची गोष्टच नाही. यांचा पण गुरु शिवबाबा,
तुम्हा ब्राह्मणांचा पण गुरु शिवबाबा आहेत. यांना सतगुरु म्हटले जाते. तर मुलांना
शिवबाबाचीच आठवण करावयाची आहे. कोणाला पण हे समजावणे फारच सोपे आहे कि, शिवबाबाची
आठवण करा. शिवबाबा स्वर्ग नविन दुनिया स्थापन करत आहेत. उंच ते उंच भगवान शिव आहेत.
ते आम्हा आत्म्यांचे बाबा आहेत. तर भगवान मुलांना म्हणतात कि, मज पित्याची आठवण करा.
आठवण करणे किती सोपे आहे. मुलगा जन्मतो आणि लगेचआई-आई त्यांच्या तोंडातून स्वत:च
निघते. आई-वडीलांशिवाय इतर कोणाकडे जात नाही. आई मरते तर ती वेगळी गोष्ट आहे. प्रथम
आहेत आई आणि वडील, नंतर इतर मित्र संबंधी इ. असतात. त्यामध्ये पण जोडी जोडी असते.
काका-काकी, दोन आहेत ना. कुमारी असेल, नंतर मोठी झाल्यावर कोणी काकी म्हणेल, कोणी
मामी म्हणेल.
आता तुम्हाला बाबा समजावत आहेत, तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात. बस, इतर सर्व संबंध रद्द
करावयाचे आहेत. भाऊ-भाऊ समजल्याने एका बाबाची आठवण कराल. बाबा पण म्हणतात कि,
मुलांनो माझी एका पित्याचीच आठवण करा. किती मोठे बेहदचे पिता आहेत. ते मोठे बाबा.
तुम्हाला अमर्यादीत वारसा देण्यासाठी आले आहेत. वारंवार सांगतात कि, मनमनाभव.
स्वत:ला आत्मा समजून बाबाची आठवण करा, ही गोष्ट विसरु नका. देहअभिमानात आल्यानेच
विसरुन जाता. प्रथम स्वत:ला आत्मा समजायचे आहे, मी आत्मा सतोप्रधान आहे. आणि एका
बाबाची आठवण करावयाची आहे. बाबांनी समजावले आहे कि, मी पतित पावन आहे, माझी आठवण
केल्याने तुमची आत्मा रुपी बॅटरी जी खाली झाली आहे, ती भरपूर होऊन जाईल, तुम्ही
सतोप्रधान बनून जाल. पाण्याच्या गंगेमध्ये तर जन्मोजमन्मी स्नान केले, परंतू पावन
बनू शकला नाही. पाणी कसे पतित पावन असू शकेल? ज्ञानानेच सद्गती होते. यावेळी आहेच
पाप आत्म्यांची खोटी दुनिया. देवाण-घेवाण पण पाप आत्म्याशी होत आहे. मन्सा वाचा
कर्माने पाप आत्माच बनत आहेत. आता तुम्हा मुलांना समज मिळाली आहे. तुम्ही म्हणता
कि, आम्ही हे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत, आता तुमची भक्ती करणे
बंद झाले आहे. ज्ञानानेच सद्गती होते. हे (देवता) सद्गती मध्ये आहेत ना. बाबांनी
समजावले आहे, हे अनेक जन्मांचे अंतामध्ये आहेत. बाबा किती सोपे करुन समजावत आहेत.
तुम्ही मुले किती कष्ट घेत आहात. कल्प कल्प घेत आहात. जुनी दुनिया बदलून नविन दुनिया
बनवावयाची आहे. असे म्हणतात कि, भगवान जादूगार आहे, रत्नागर आहे, सौदागर आहे.
जादूगार तर आहेत ना. जुन्या दुनियेला नर्कापासून स्वर्ग बनवतात. किती जादू आहे, आता
तुम्ही स्वर्गाचे रहिवाशी बनत आहात, जाणतात कि आता आम्ही नर्काचे रहिवाशी आहोत.
नर्क आणि स्वर्ग वेगवेगळे आहेत. 5 हजार वर्षांचे चक्र आहे. लाखो वर्षांची तर गोष्टच
नाही. या गोष्टी विसरता कामा नये. भगवानुवाच आहे ना, कोणी जरुर आहे, जो पुनर्जन्म
रहित आहे. कृष्णाला तर शरीर आहे, शिवाला नाही. त्यांना मुख तर जरुर पाहिजे. तुम्हाला
सांगण्यासाठी येऊन शिकवत आहेत ना. विश्वनाटकानुसार सारे ज्ञानच त्यांचे जवळ आहे. ते
साऱ्या कल्पात एक वेळेसच येतात दु:खधामला, सुखधाम बनविण्यासाठी सुख शांतीचा वारसा
जरुर बाबांकडून मिळत आहे, तेव्हा तर मनुष्यांना ते आवडतात, बाबांची आठवण करत आहेत.
बाबा ज्ञान पहा कसे सोपे करुन देत आहेत. येथे बसून बाबाची आठवण करा, चक्राची आठवण
करा ते पण मनमनाभवच आहे. बाबाच हे सारे ज्ञान देणारे आहेत. तुम्ही म्हणता कि, आम्ही
बेहद पित्याजवळ जात आहोत. बाबा आम्हाला शांतीधाम सुखधाममध्ये जाण्याचा रस्ता सांगत
आहेत. येथे बसून घराची आठवण करावयाची आहे. स्वत:ला आत्मा समजून बाबाची आठवण करावयाची
आहे, घराची आठवण करावयाची आहे, आणि नविन दुनियेची पण आठवण करावयाची आहे. ही जुनी
दुनिया तर नष्ट होणारच आहे. पुढे चालून तुम्ही स्वर्गाची पण फार आठवण कराल. वारंवार
स्वर्गात जात राहाल. सुरुवातीला मुली वारंवार स्वर्गात ध्यानाने जात होत्या. हे
पाहून मोठ मोठ्या घरातील लोक आपले मुलांना सतसंगाला पाठवत होते. नाव पण ठेवले होते,
ओम निवास. अनेक मुलं आली, नंतर गोंधळ झाला. मुलांना बंद केले. येथेच कब्रिस्थान बनत
होते, सर्वांना झोपवत होते, आणि म्हणत होते, आता शिवबाबांची आठवण करा, ध्यानात जात
होते. आता तुम्ही मुले पण जादूगार आहात. ज्याला पाहत होते आणि ते झटक्यात ध्यानात
जात होते. हा जादू किती चांगला आहे. नौधा भक्तीमध्ये तर जेव्हा एकदम शेवटी प्राण
देण्यास तैयार होत होते, तेव्हा त्यांना साक्षात्कार करत होतो, येथे तर बाबा स्वत:
आले आहेत, तुम्हा मुलांना शिकवून उंच पद देण्यासाठी. पुढे जावून तुम्ही मुलं खुप
साक्षात्कार करत राहाल, बाबांना आता जरी कोणी विचारले, तर सांगू शकतात कि, कोण
गुलाबाचे फुल आहे, कोण चंपाचे फुल आहे, कोण धोतऱ्याचे फुलं आहेत.अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. देहाचे
सर्व संबंध सोडून आत्मा भाऊ-भाऊ आहे, हा निश्चय करुन, बाबाची आठवण करुन पुर्ण
वारशाचे अधिकारी बनवायचे आहे.
2. आता पाप आत्माशी देवाण-घेवाण करावयाची नाही. अज्ञान निद्रेतून सर्वांना उठवावयाचे
आहे, शांतीधाम सुखधाम जाण्याचा रस्ता सांगावयाचा आहे.
वरदान:-
कमळ पुष्पाचे
प्रतिक बुध्दीत ठेवून, स्वत:ला आदर्श नमुना समजणारे अलिप्त आणि प्रिय भव
प्रवृत्तीमध्ये
राहणाऱ्यांचा आदर्श आहे कमळाचे फुल, तर कमळ बनून अमल करा, जर अमळ नाही केला, तर
कमाल करणार नाहीत. तर कमळ फुलाचे प्रतिक बुध्दीत ठेवून स्वत:ला आदर्श समजून चला.
सेवा करत अनासक्त आणि प्रिय बना. फक्त प्रिय बनू नका. परंतू अलिप्त बनून, प्रिय बना
कारण प्रेम लगावाच्या रुपात बदलते, त्यामुळे कोणती पण सेवा करतांना अनासक्त आणि
प्रिय बना.
बोधवाक्य:-
स्नेहाच्या
छत्रछायेमध्ये माया येऊ शकत नाही.