07-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, नेहमी खुशीमध्ये रहा तर आठवणीची यात्रा सहज होईल आठवणी द्वारेच २१
जन्मासाठी पुण्यात्मा बनाल...”
प्रश्न:-
तुमचे सर्वात
चांगले सेवक किंवा गुलाम कोण आहेत?
उत्तर:-
नैसर्गिक
आपत्ती किंवा विज्ञानाचे संशोधन, शोध ज्याद्वारे विश्वाचा कचरा साफ होतो. हे तुमचे
सर्वात चांगले गुलाम आहेत, जे स्वच्छता मध्ये मदतगार बनतात. सर्व प्रकृती तुमच्या
अधिकारामध्ये राहते.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलं काय करत आहेत? युद्धाच्या मैदानामध्ये उभे आहेत, तसे तर उभे
नाहीत, तुम्ही तर बसले आहात ना. तुमची सेना फार छान आहे, याला म्हटले जाते आत्मिक
पित्याची आत्मिक सेना. आत्मिक पित्या सोबतयोग लावून, रावणावर विजय मिळवण्याचा सहज
पुरुषात करतात.तुम्हाला गुप्त महावीर म्हणले जाते. पाच विकारा वरती तुम्ही विजय
मिळवतात, त्यामध्ये पण प्रथम देहाभिमान आहे. बाबा विश्वा वरती विजय मिळवण्यासाठी
किंवा विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी खूपच सहज युक्ती सांगतात. तुम्हा
मुलाशिवाय कोणी जाणत नाही. तुम्ही विश्वामध्ये शांतीचे राज्य स्थापन करत आहात, तेथे
दुःख अशांती रोग इत्यादी चे नाव रूप नसते. हा अभ्यास तुम्हाला नवीन दुनिया चे मालक
बनवते.बाबा म्हणतात गोड गोड मुलांनो काम विकारावर विजय मिळवल्यामुळे तुम्ही २१
जन्मासाठी जगजीत बनतात, हे तर खूपच सहज आहे. तुम्ही शिव बाबांची आत्मिक सेना आहात.
रामाची गोष्ट नाही, कृष्णाची पण गोष्ट नाही. राम म्हणजे परमपिता परमात्मा. बाकीचे
जे रामाची सेना दाखवतात ते सर्व चुकीचे आहे. गायन पण आहे, ज्ञानसूर्य प्रगट झाले
अज्ञान अंधकार विनाश. कलियुगामध्ये खूपच आज्ञान अंधकार आहे, स्वर्गामध्ये भांडण तंटे
मारामारी असे होत नाही. तुम्ही आपले राज्य पहा कसे स्थापन करतात, हात-पाय इत्यादीचा
वापर करत नाही. यामध्ये देहाचे भान तोडायचे आहे घरामध्ये राहून आठवण करा की, मी देह
नाही आत्मा आहे, हेच मुख्य आहे. तुम्ही आत्मे ८४जन्म भोगतात. आता तुमचा अंतिम
जन्मआहे. जुनी विकारी दुनिया नष्ट होत आहे. यालाच पुरुषोत्तम संगमयुग म्हणतात. शेंडी
लहान असते ना, ब्राह्मणांची शेंडी प्रसिद्ध आहे.बाबा खूपच सहज समजावून सांगतात.
तुम्ही प्रत्येक पाच हजार वर्षानंतर बाबा कडून हे राजयोगाचे शिक्षण घेतात ,राज्य
प्राप्त करण्यासाठी .मुख्य लक्ष पण समोर आहे. शिवबाबा कडून आम्हाला लक्ष्मी- नारायण
सारखे बनायचे आहे. बाबा म्हणतात होय मुलांनो, का नाही, फक्त देह अभिमान सोडून
स्वतःला पुण्यात्मा समजून मज पित्याची आठवण करा, तर पाप नष्ट होतिल. तुम्ही जाणतात
या जन्मामध्ये पावन बनल्यामुळे आम्ही 21 जन्म पुण्य आत्मा बनतो,परत उतरण्यास सुरु
होते,पाप आत्मा बनण्यास सुरू होते. हे पण जाणतात आमचे 84 चे चक्र आहे. सर्व दुनिया
तर स्वर्गामध्ये येणार नाही. 84 चक्रा मध्ये येणारे आणि या देवी-देवता धर्माचे च
येतील.सतयुग त्रेता बाबाच स्थापन करतात, ज्यांची स्थापना आता करत आहेत.द्वापार
कलियुग रावणाची स्थापना आहे. रावणाचे चित्र आहे ना, वरती गाढवाचे चित्र आहे. विकारी
टट्टु बनवतात. तुम्ही समजता आम्ही कसे होतो,ही पाप आत्म्याची दुनिया आहे. पाप
आत्म्याच्या दुनिया मध्ये करोडो मनुष्य आहेत.पुण्य आत्म्याच्या दुनिया मध्ये
सुरुवातीला नऊ लाखच असतात. तुम्ही आता सार्या विश्वाचे मालक बनतात. हे
लक्ष्मीनारायण विश्वाचे मालक होते ना. स्वर्गाची बादशाही तर बाबच देतील. बाबा
म्हणतात मी तुम्हाला विश्वाची बादशाही देण्यासाठी आलो आहे, त्यामुळे तुम्हाला पावन
जरूर बनायचे आहे. ते पण या मृत्यू लोकांच्या अंतिम जन्मात पवित्र बना . या विकारी
जुन्या दुनियाचा विनाश समोर आहे. बॉम्बस इत्यादी असे तयार केले आहेत, ज्यामुळे घरी
बसल्या बसल्या सा-या दुनियेला नष्ट करू शकतात. तुम्ही मुलं तर घरी बसल्या बसल्या
योग बळाद्वारे विश्वाचे मालक बनतात. तुम्ही योग बळाद्वारे शांती स्थापन करत आहात.ते
विज्ञानाच्या शक्तीद्वारे सारी दुनिया खलास करतील. ते तुमचे सेवक आहेत. तुमची सेवा
करत आहे आहेत. जुनी दुनिया नष्ट करतात. नैसर्गिक आपत्ती इत्यादी सर्व तुमचे गुलाम
बनतात. सारी प्रकृती तुमची गुलाम बनते. फक्त तुम्ही बाबाची आठवण करा. तुमच्या
मनामध्ये खूपच खूशी व्हायला पाहिजे. हाच भारत पूर्ण शिवालय होता. सतयुगा मध्ये
संपूर्ण निर्विकारी,येथे आहेत विकारी.
आता तुम्हाला स्मृती आली आहे, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका .बाबा
समजवतात तुम्ही खूपच खराब बनले होते. तुमच्याजवळ खूप धन होते, तुम्ही स्वर्गाचे
मालक होते, आता तुम्ही स्वर्गाच्या ऐवजी नरकाचे मालक बनले आहात, ते पण नाटक बनलेले
आहे .प्रत्येक पाच हजार वर्षानंतर तुम्हा मुलांना नरका मधून बाहेर काढून
स्वर्गामध्ये घेऊन जातात. आत्मिक मुलांनो तुम्ही माझी गोष्ट मानणार नाही
काय?परमात्मा म्हणतात तुम्ही पवित्र दुनिया चे मालक बना, तर तुम्ही बनणार नाही काय?
विनाश तर जरूर होईल. या योग बळा द्वारेच तुमचे जन्म जन्मांतराचे पाप नष्ट होतील,
बाकी जन्मानंतरचे पाप नष्ट होण्यासाठी वेळ लागतो. मुलं सुरुवातीपासून आले आहेत, दहा
टक्के पण योग लागत नाही ,म्हणून पाप नष्ट होत नाहीत. नवीन नवीन मुलं लगेच योगी
बनतात, त्यांचे पाप नष्ट होतात, आणि सेवा करायला लागतात. तुम्ही मुलं समजता आता मला
परत जायचे आहे. बाबा घेऊन जाण्यासाठी आले आहेत. पाप आत्मा तर सुखधाम मध्ये जाऊ शकत
नाहीत.ते तर दुःखांमध्ये राहतात. म्हणून आता बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तुमचे
पाप भस्म होतील. अरे मुलांनो तुम्ही फुलासारखे बना, दैवी कुळाला कलंक लावू नका.
तुम्ही विकारी बनल्यामुळे खूप दुःखी बनले आहात. हा पण नाटकाचा खेळ आहे. पवित्र
बनणार नाही तर पवित्र दुनिया स्वर्गात येणार नाहीत.भारत स्वर्ग होता, कृष्णपुरी होता.
आता नर्कवासी आहे तर, तुम्हा मुलांनी खुशी खुशी विकार सोडायला पाहिजेत. विष पिणे
लगेच सोडायला पाहिजे. विष पीत पीत वैकुंठा मध्ये थोडे च जाऊ शकतो. आता
लक्ष्मीनारायण सारखे बनण्यासाठी तुम्हाला पवित्र बनायचे आहे. हे तुम्ही समजू शकता
यांनी कशी प्राप्त केली. राज योगाचे शिक्षण आहे, अभ्यास आहे. जसे वकील योग सर्जन
योग असतो सर्जन सोबत योग असेल तर सर्जन बनतील. हे परत भगवानुवाच आहे.रथा मध्ये कसे
प्रवेश करतात? अनेक जन्माच्या अंत मध्ये ब्रह्मामध्ये प्रवेश करून, तुम्हाला ज्ञान
देतो, जाणतो हे विश्वाचे मालक पवित्र होते, आता पवित्र कंगाल बनले आहेत.परत प्रथम
नंबर मध्ये जातील, यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हा मुलांना ज्ञान देतात. बेहदचे
बाबा म्हणतात मुलांनो पवित्र बना तर, तुम्ही नेहमी सुखी बनाल. सतयुग अमर लोक आहे.
कलियुग मृत्युलोक आहे. बाबा खूपच चांगल्या रीतीने समजावून सांगतात, येथे देही
अभिमानी बनतात, परत देह अभिमानी बनतात तर माया द्वारे हार खातात. मायेची एकच तोफ अशी
लागते, जे एकदम गटर मध्ये पडतात .बाबा म्हणतात हे काम विकार गटर आहे, हे सुख थोडेच
आहे. स्वर्ग तर खूपच छान आहे. या देवी-देवतांचे राहणीमान फार चांगले आहे. नावच आहे
स्वर्ग. तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवतात, तरीही काही मुलं म्हणतात, आम्ही तर काम
विकार रुपी वीष जरूर पिणार, तर स्वर्गामध्ये येऊ शकत नाहीत. सजा पण खूप खातील.
तुम्हा मुलांचे मायेशी युद्ध आहे. देह अभिमानामध्ये येऊन खूपच खराब काम करतात.
आम्हाला कोण पाहताय असे समजतात. क्रोध लोभ तर एकांत मध्ये व्यक्त करू शकत नाहीत,
कामविकार एकांतामध्ये करतात, काळे तोंड करतात, काळे तोंड करत करत तुम्ही एकदम सावरे
बनले तर, सा-या दुनियाने तुमचे अनुकरण केले. अशा पतीत दुनियाला जरूर बदलायचे आहे.
तुम्हाला लाज नाही वाटत, एका जन्मासाठी पवित्र बनू शकत नाही.
भगवानुवाच काम महाशत्रू आहे.वास्तव मध्ये तुम्ही स्वर्गवासी होते तर, खुप धनवान होते,
गोष्ट विचारु नका. मुलं म्हणतात बाबा आमच्या शहरांमध्ये चला.बाबा म्हणतात काय
काट्याच्या जंगलामध्ये माकडांना पाहायला येऊ. तुम्हा मुलांनाच पूर्वनियोजित नाटका
नुसार सेवा करायची आहे ,गायन पण आहे मुलं पित्याला प्रत्यक्ष करतात .मुलांनाच जाऊन
सर्वांचे कल्याण करायचे आहे .बाबा मुलांना समजावतात हे विसरू नका आम्ही युद्धाच्या
मैदानामध्ये आहोत. तुमचे युद्ध पाच ५ विकाराशी आहे ,ज्ञानमार्ग बिलकुल वेगळा आहे .बाबा
म्हणतात मी तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवतो तेही २१ जन्मासाठी, परत तुम्हाला नरकवासी
कोण बनवतो, रावण. फरक तर पाहता ना .जन्म जन्मांतर साठी तुम्ही भक्तिमार्ग मध्ये गुरु
केले ,मिळाले काहीच नाही.यांना सद्गुरु म्हणले जाते .बाबा म्हणतात ,मी तुम्हा सर्व
मुलांना काळाच्या पंजा पासून सोडवण्यासाठी आलो आहे. सतयुगामध्ये काळ नाही.त्यास अमर
लोक म्हटले जाते. आता तुम्ही श्रीमतावरती सातयुगी अमर लोकांचे मालक बनतात. तुमची
लढाई पहा कशी आहे? सर्व दुनिया आपापसात भांडत आहे. तुमचे पाच विकार रुपी रावणाशी
युद्ध आहे. त्यावरती विजय मिळवत आहात. हा अंतिम जन्म आहे. बाबा म्हणतात मी गरीब
निवाज आहे. येथे गरीबच येतात, सावकाराच्या तर भाग्य मध्येच नाही, धनाच्या नशेमध्येच
राहतात. हे सर्व नष्ट होणार आहे, बाकी थोडा वेळ आहे. पूर्वनियोजित नाटक आहे ना.हे
इतके बॉम्बस बनवले आहेत, ते जरूर कामांमध्ये आणतील. यापूर्वी तर बाणाद्वारे,
तलवारीद्वारे, बंदुकाद्वारे लढाई करत होते. आता तर बॉम्ब असे निघाले आहेत जे घरी
बसल्या बसल्या खलास करतील. यागोष्टी ठेवण्यासाठी थोड्याच बनवले आहेत, किती वेळ
ठेवतील? बाबा आले आहेत तर विनाश पण जरूर होणार आहे. नाटकाचे चक्र फिरत राहते. तुमचे
राज्य जरूर स्थापन होईल. हे लक्ष्मीनारायण कधीच लढाई करत नव्हते. जरी ग्रंथामध्ये
दाखवले आहे, असुर आणि देवतांची लढाई लागली, परंतु ते सतयुगा चे आणि असुर कलियुगा
चे, दोन्ही कसे भेटतील. आता तुम्ही समजता आम्ही पाच विकारा बरोबर युद्ध करत आहोत,
या विकारावरती विजय प्राप्त करून संपूर्ण निर्विकारी बनू निर्विकारी दुनिया चे मालक
बनू जाऊ. उठता-बसता बाबांची आठवण करायची आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. हे
पूर्वनियोजित नाटक आहे .काही काही काहींच्या नशिबामध्ये नाही. योग बल असेल तरच
विकर्म विनाश होतील. संपूर्ण बनले तेव्हा संपूर्ण दुनिया मध्ये येऊ शकाल. बाबा पण
शंखध्वनी करत राहतात. त्यांनी परत भक्ती मार्गामध्ये शंख किंवा तुतारी इत्यादी बनवले
आहे.बाबा तर या ब्रह्मा मुखाद्वारे समजवतात, हे शिक्षण राजयोगाच्या आहे आहे, आणि
खूपच सहज आहे.बाबा ची आठवण करा आणि राजाई ची आठवण करा. बेहद बाबांना ओळखा आणि राज्य
प्राप्त करा. या विकारी दुनियाला विसरा. तुम्ही बेहद चे संन्याशी आहात. तुम्ही
जाणताच जुनी दुनिया नष्ट होणार आहे. हे या लक्ष्मीनारायणचे राज्य फक्त भारतातच होते.
अच्छा
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादांची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात .आत्मिक मुलांना आत्मिक पित्याचा नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. आपल्या दैवी
कुळाला कलंक लावायचा नाही. फुलासारखे बनायचे आहे.अनेक आत्म्याच्या कल्याणाची सेवा
करून बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे.
2. संपूर्ण निर्विकारी बनण्यासाठी वाईट गोष्टी ऐकायच्या नाहित, ना मुखाद्वारे
बोलायचे आहेत.वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका. अभिमानाच्या वश होऊन
कोणतेच काम करायचे नाही.
वरदान:-
वैराग्य वृत्ती
द्वारे या असार संसाराच्या लगावा पासून मुक्त राहणारे खरे राजऋषी भव
राजऋषी अर्थात राज्य
असताना पण बेहद चे वैरागी, देह आणि देहाच्या जुन्या दुनिया मध्ये जरा पण लगाव नाही,
कारण जाणतात ही जुनी दुनिया आहे असा संसार, यामध्ये कोणतेच सार नाही. अशा संसारमध्ये
ब्राह्मणांचा श्रेष्ठ संसार मिळाला म्हणून त्या संसारापासून बेहदचे वैराग्य अर्थात
कोणताच लगाव नाही, जेव्हा कुणामध्ये लगाव किंवा झुकाव राहणार नाही तेव्हाच राज ऋषी
किंवा तपस्वी म्हणू शकतो.
बोधवाक्य:-
युक्तियुक्त
बोल तेच आहेत जे मधुर आणि शुभ भावना संपन्न आहेत...!