25-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा मुलांना घोर नरकातून काढण्यासाठी, तुम्ही मुलांनी
बाबाला निमंत्रण पण त्यासाठी दिले आहे.”
प्रश्न:-
तुम्ही मुले
मोठ्यातील मोठे कारागीर आहात-कसे? तुमची कारागीरी काय आहे?
उत्तर:-
तुम्ही मुले अशी कारागीरी करता कि, जी सारी दुनियाच नविन बनते, त्यासाठी आम्ही काही
वीटा किंवा पाट्या इ. उचलत नाही, परंतू आठवणीच्या यात्रेने नविन दुनिया बनवितो.
आम्हाला खुशी आहे कि, आम्ही नविन दुनियेची कारागीरी करत आहोत. आम्हीच मग अशा
स्वर्गाचे मालक बनू.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांप्रती आत्मिक बाबा सांगत आहेत, तुम्ही जेव्हा आप-आपले गावांतून
निघता, तर बुध्दीमध्ये हे असते कि आम्ही जातो शिवबाबांच्या पाठशाळेमध्ये, असे नाही
की कोण्या साधू संत इ. चे दर्शन करण्यासाठी किंवा ग्रंथ इ. ऐकण्यासाठी येतो. तुम्ही
जाणता कि, आम्ही जातो शिवबाबाजवळ, दुनियेतील मनुष्य तर समजतात कि, शिव वर राहतात.
ते जेव्हा आठवण करतात तेवहा डोळे उघडून बसत नाहीत. ते डोळे बंद करुन ध्यानात बसतात.
शिवलिंग तर पाहिलेले असते. जरी शिवाचे मंदीरात जातात तरी पण शिवाची आठवण करताना
पाहतात, किंवा मंदीर आठवतात. कोणी मग डोळे बंद करुन बसतात. समजतात कि, दृष्टी
कोणाच्या नांवारुपात जर गेली तर आमची साधना नष्ट होईल. आता तुम्ही मुले जाणता कि,
आम्ही पण शिवबाबांची आठवण करत होतो. कोणी कृष्णाची आठवण करत होते, कोणी रामाची आठवण
करत होते. कोणी आपल्या गुरुची आठवण करत होते, गुरुचे पण लहान लॉकेट बनवून घालत होते.
गीतेचे पण एवढे लहान लॉकेट बनवून घालत होते. भक्तीमार्गात तर सर्व असेच आहे. घरी
बसून पण आठवण करतात. आठवणीत यात्रा करण्यासाठी पण जातात. चित्र तर घरामध्ये ठेवून
पुजा करु शकतात, परंतू ही पण भक्तीची प्रथा पडली आहे. जन्म जन्मांतर यात्रेवर जातात.
चारधामची यात्रा करतात. चार धाम का म्हणतात? पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर... चार
दिशेचे चक्र लावतात. भक्ती मार्ग जेव्हा सुरु होतो, तर प्रथम एकाची भक्ती केली जाते,
त्याला म्हटले जाते अव्याभिचारी भक्ती. सतोप्रधान होते, आता तर यावेळी आहेत.
तमोप्रधान, भक्ती पण व्याभिचारी, अनेकांची आठवण करत राहतात. तमोप्रधान 5 तत्त्वाचे
शरीर, त्यांची पण पुजा करतात. म्हणजे तमोप्रधान भुताची पुजा करतात. परंतू या
गोष्टींला, कोणी समजतात थोडेच. जरी येथे बसले आहेत परंतू बुध्दीयोग कोठे भटकत राहतो.
येथे तर तुम्हा मुलांना डोळे बंद करुन, शिवबाबाची आठवण करावयाची नाही. जाणता कि,
बाबा फार फार दुरदेशातील राहणारे आहेत. ते येऊन मुलांना श्रीमत देत आहेत. श्रीमतावर
चालल्यानेच श्रेष्ठ देवता बनाल. देवतांची सारी राजधानी स्थपन होत आहे. तुम्ही येथे
बसून आपले देवी देवतांचे राज्य स्थापन करत आहात. अगोदर तुम्हाला थोडेच माहित होते
कि ते कसे स्थापन होत आहे. आता जाणता कि, बाबा आमचे पिता आहेत, शिक्षक बनून
शिकवितात आणि मग बरोबर पण घेऊन जातात, सद्गती करण्यासाठी. गुरु लोक कोणाची सद्गती
करत नाहीत. येथे तुम्हाला समजावले जाते. हे एकच पिता, शिक्षक, सतगुरु आहेत.
बाबांकडून वारसा मिळत आहे, सतगुरु जुन्या दुनियेतून नविन दुनियेत घेऊन जातात.
यासर्व गोष्टीला वृध्द माता तर समतू शकत नाहीत. त्यांच्यासाठी मुख्य गोष्ट आहे,
स्वत:ला आत्मा समजून शिवबाबाची आठवण करणे, आम्ही शिवबाबाची मुले आहोत, आम्हाला बाबा
स्वर्गाचा वारसा देतात. वृध्द मातांना मग, सोप्या सरळ भाषेत समजावले पाहिजे. तसे तर
प्रत्येक आत्म्याचा हक्क आहे बाबांकडून वारसा घेण्याचा. मृत्यू तर समोर उभा आहे.
जुनी दुनिया तर मग जरुर नविन बनणार आहे. नविन परत जुनी. घर बनविण्यासाठी किती थोडे
महिने लागतात, मग जुने होण्यासाठी 100 वर्षे लागतात.
आता तुम्ही मुले जाणता कि, ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. ही लढाई आता लागणार
आहे ती परत 5 हजार वर्षांनी लागेल. या सर्व गोष्टी तर वृध्द माता समजू शकत नाहीत.
तर मग ब्राह्मणीचे काम आहे त्यांना समजावणे. त्यांचेसाठी तर एक अक्षरच भरपूर आहे,
स्वत:ला आत्मा समजनू बाबाची आठवण करणे. तुम्ही आत्मे परमधाम मध्ये राहणारे आहात,
परत येथे शरीर घेऊन भुमिका वटवत आहात. आत्मा येथे दु:ख आणि सुखाचा अभिनय करत आहे.
मुळ गोष्ट बाबा सांगत आहेत, माझी आठवण करा आणि सुखधामाची आठवण करा. बाबाची आठवण
केल्याने पाप नष्ट होतील आणि मग स्वर्गामध्ये याल. आता जेवढे जे आठवण करतील तेवढे
पाप नष्ट होतील. वृध्द माता तर विरगळू आहेत, सतसंगात जावून कथा ऐकतात. त्यांना मग
वारंवार बाबाची आठवण करुन द्यावयाची आहे. शाळेमध्ये तर अभ्यास असतो, कथा ऐकली जात
नाही. भक्तीमार्गात तर तुम्ही पुष्कळ कथा ऐकल्या आहेत, परंतू त्यातून काहीच फायदा
होत नाही. छी छी दुनियेतून नविन दुनियेत तर जावू शकत नाही. मनुष्य तर ना रचियता
बाबाला ना रचनेला जाणतात. माहित नाही, माहित नाही म्हणतात. तुम्ही पण पुर्वी जाणत
नव्हता. आता तुम्ही भक्तीमार्गाला चांगल्याप्रकारे ओळखले आहे. घरामध्ये पण अनेकांकडे
मुर्ती असतात, मुर्ती तीच आहे. काही काही पती पण, स्त्रीला म्हणतात कि, तु घरामध्ये
मुर्ती ठेवून पुजा कर. बाहेर धक्के खाण्यासाठी का जाते, परंतू त्यांची भावना असते.
आता तुम्ही समजता कि, तीर्थ यात्रा करणे म्हणजे भक्तीमार्गातील धक्के खाणे. अनेकवेळा
तुम्ही 84 चे चक्र पार केले आहे. सतयुग त्रेतामध्ये कोणती यात्रा असत नाही. तेथे
कोणते मंदीर इ. असत नाही. या यात्रा इ. सर्व भक्तीमार्गातच असते. ज्ञानमार्गात असले
काही नसते. त्याला म्हटले जाते भक्ती. ज्ञान देणारा तर एका शिवाय दुसरा कोणी नाही.
ज्ञानानेच सद्गती होते. सद्गती दाता एकच बाबा आहेत. शिवबाबांना कोणी श्री श्री
म्हणत नाही, त्यांना नावाची गरज नाही. हे तर मोठे पण आहे, त्यांना म्हणतातच “शिवबाबा”.
तुम्ही बोलावता, शिवबाबा आम्ही पतित बनले आहोत, आम्हाला येऊन पावन बनवा.
भक्तीमार्गाच्या दलदलीमध्ये गळ्यांपर्यंत फसले आहोत. फसून मग ओरडत आहेत. विषय
वासनेच्या दलदलीमध्ये एकदम अडकले आहेत. शिडी उतरत उतरत खाली येऊन फसले आहेत. कोणाला
पण माहित पडत नाही, तेव्हा म्हणतात बाबा आम्हाला बाहेर काढा. बाबाला पण नाटकानुसार
यावेच लागते. बाबा सांगतात मी बांधलेलो आहे, या सर्वांना दलदलीमधून काढण्यासाठी.
याला म्हटले जाते कुंभी पाक नर्क. रौरव नर्क पण म्हणतात. हे बाबा समजावत आहेत,
त्यांना माहित थोडेच आहे.
तुम्ही बाबाला पहा कसे निमंत्रण देत आहात. नियंत्रण तर कोणाचे लग्न इ. चे दिले जाते.
तुम्ही म्हणता कि, हे पतित पावन बाबा, या पतित दुनियेत रावणाच्या जुन्या दुनियेमध्ये
या. आम्ही गळ्यापर्यंत यात फसलो आहे. बाबा शिवाय तर कोणी बाहेर काढू शकणार नाही.
म्हणतात पण कि, दुरदेशातील राहणारे शिवबाब, हा रावणाचा देश आहे. सर्वांची आत्मा
तमोप्रधान झाली आहे. त्यामुळे बोलावतात पण कि, येऊन पावन बनवा. पतित पावन सीताराम,
असे गात ओरडत आहेत. असे नाही कि ते पवित्र राहतात. ही दुनियाच पतित आहे. रावण राज्य
आहे. यात तुम्ही फसले आहात. मग आता हे निमंत्रण दिले आहे, बाबा येऊन आम्हाला कुम्भी
पाक नरकातून बाहेर काढा. तर बाबा आले आहेत. तुमचे आज्ञाधारी सेवक आहेत ना. नाटकातील
अपार दु:ख तुम्ही पाहिले आहेत. वेळ निघून जात आहे. एक सेकंद दुसऱ्या सेकंदाशी मिळत
नाही. आता बाबा तुम्हाला लक्ष्मी नारायणासारखे बनवत आहेत, मग तुम्ही आर्धाकल्प
राज्य कराल. आता वेळ फार थोडी आहे. मृत्यु सुरु झाला तर मनुष्य गोंधळून जातील.
थोड्या वेळात काय होऊन जाईल. कोणी तर विनाश पाहूनच मरतील, काही विचारु नका, अनेक
वृध्द माता आहेत, बिचाऱ्या काही पण समजत नाहीत. जसे तीर्थावर जातात ना, तर एक दोघीला
पाहून तयार होऊन निघतात, आम्ही पण येतो.
आता तुम्ही जाणता कि, भक्तीमार्गातील तीर्थयात्रेचा अर्थ आहे खाली उतरवणे तमोप्रधान
बनणे. मोठ्यातील मोठी यात्रा तुमची ही आहे. जे तुम्ही पतित दुनियेतून पावन दुनियेत
जाता. तर या मुलींना काहीतरी शिवबाबाची आठवण देत राहा. शिवबाबाचे नांव आठवणीत आहे?
थोडे फार ऐकले तरी स्वर्गामध्ये येतील. हे फळ जरुर मिळते. बाकी पद तर आहे शिक्षणावर.
यात फार फरक पडतो. उंच ते उंच, मग कमीत कमी, रात्र आणि दिवसाचा फरक पडतो. कोठे
पंतप्रधान कोठे नोकर चाकर. राजधानीत नंबरवार असतात. स्वर्गामध्येच राजधानी असते.
परंतू तेथे पाप आत्मे,विकारी असत नाहीत. ती आहेच निर्विकारी दुनिया. तुम्ही म्हणता
कि, आम्ही हे लक्ष्मी-नारायण जरुर बनू. तुम्ही हात उभे केलेले पाहून, या वृध्द माता
पण सर्व हात उभे करतात. समजत काही नाहीत. तरी पण बाबा जवळ आले आहेत, तर स्वर्गात पण
जातील, परंतू सर्व लक्ष्मी नारायण थोडेच बनतील, प्रजा तर बनतील. बाबा म्हणतात कि,
मी गरीब निवाज आहे, तर बाबा गरीबांना पाहून खुश होतात. जरी किती पण मोठ्यातील मोठे
सावकार पद्मपती आहेत, त्यांचेपेक्षा या उंच पद प्राप्त करतील-21 जन्मासाठी हे पण
चांगले आहे. म्हाताऱ्या जेव्हा येतात, तर बाबाला खुशी होते, तरी पण कृष्णपुरीमध्ये
तर जातील ना. ही आहे रावणपुरी, ज्या चांगले शिकतील, त्या कृष्णाचा सांभाळ करतील.
प्रजा थोडेच आत येईल. ती तर कधी तर दर्शन घेईल. जसे पोप दर्शन देतात खिडकीतून, लाखो
एकत्र येतात, दर्शन करण्यासाठी. परंतू त्यांचे आम्ही दर्शन घेऊन काय करावे. सदा
पावन तर एकच बाबा आहेत, जे येऊन पावन बनवत आहेत. साऱ्या विश्वाला सतोप्रधान बनवत
आहेत. तिथे हे 5 भूत राहत नाहीत. 5 तत्त्व पण सतोप्रधान बनून जातात. तुमचे गुलाम
बनतात. कधी पण अशी गर्मी नसते जे नुकसान होईल. 5 तत्त्व पण कायदेशीर चालतात. अकाले
मृत्यु होत नाही. आता तुम्ही स्वर्गाकडे जात आहात तर नर्कातून बुध्दीयोग काढला
पाहिजे. जसे नविन घर बनवितात तर जुन्या घरातून बुध्दीयोग निघून जातो. बुध्दी
नव्यामध्ये जाते. मग आहे बेहदची गोष्ट. नविन दुनियेची स्थापना होत आहे, जुन्याचा
विनाश होणारआहे. तुम्ही आहात नविन दुनिया, स्वर्ग बनविणारे. तुम्ही फार चांगले
कारागीर आहात. आपलेसाठी स्वर्ग बनवित आहात. किती मोठे चांगले कारागीर आहात,
आठवणीच्या यात्रेद्वारे नविन दुनिया स्वर्ग बनवित आहात. थोडी पण आठवण केली तर
स्वर्गात याल. तुम्ही गुप्त वेषात आपला स्वर्ग बनवित आहात. जाणता कि, आम्ही या
शरीराला सोडून, मग जावून स्वर्गात निवास करु, तर अशा बेहदच्या बाबाला विसरले नाही
पाहिजे. आता तुम्ही स्वर्गात जाण्यासाठी शिकत आहात. आपली राजधानी स्थापन करण्यासाठी
पुरुषार्थ करत आहात. ही रावणाची राजधानी नष्ट होणार आहे. तर मनात खुपच खुशी झाली
पाहिजे. आम्ही हा स्वर्ग तर अनेकवेळा बनविला आहे, राजाई मिळविली परत घालविली आहे.
हे जरी आठवण केले तरी फार चांगले आहे. आम्ही स्वर्गाचे मालक होतो, बाबांनी आम्हाला
असे बनविले आहे. बाबाची आठवण करा तर तुचमी पापे नष्ट होतील. किती सरळ सहज रितीने
तुम्ही स्वर्गाची स्थापना करत आहात. जुन्या दुनियेच्या विनाशासाठी किती वस्तू बनत
राहतात. नैसर्गिक संकटे, अग्नीबाण इ. द्वारा सारी जुनी दुनिया नष्ट होईल. आता बाबा
आले आहेत, तुम्हाला श्रेष्ठ मत देण्यासाठी, श्रेष्ठ स्वर्गाची स्थापना करण्यासाठी.
अनेकवेळा तुम्ही ही स्थापना केली आहे तर बुध्दीमध्ये आठवण ठेवली पाहिजे. अनेक वेळा
राज्य घेतले मग गमावले आहे. हे बुध्दीत चालले पाहिजे. आणि एक दोघाला पण या गोष्टी
सांगा. दुनियेतील गोष्टीमध्ये वेळ घालविला नाही पाहिजे. बाबाची आठवण करा, स्वदर्शन
चक्रधारी बना. येथे मुलांनी चांगले रितीने ऐकून, मग फार उजळणी करावयाची आहे, स्मरण
करावयाचे आहे, बाबांनी काय सांगितले. शिवबाबा आणि वारशाला तर जरुर आठवण केली पाहिजे.
बाबा हातावर स्वर्ग घेऊन आले आहेत, पवित्र पण बनायचे आहे. पवित्र नाही बनाल तर सजा
खावी लागेल. पद पण फार लहान मिळेल. स्वर्गामध्ये उंच पद प्राप्त करावयाचे असेल तर
चांगल्या रितीने धारणा करा. बाबा रस्ता तर फार सोपा सांगतात. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. बाबा जे
सांगत आहेत ते चांगले रितीने ऐकून मग उजळणी करावयाची आहे. दुनियेतील गोष्टीमध्ये
आपला वेळ वाया घालवावयाचा नाही.
2. बाबाचे आठवणीत डोळे बंद करुन बसायचे नाही. श्रीकृष्णाचे राजधानीत, जाण्यासाठी
शिक्षण चांगले रितीने घेतले पाहिजे.
वरदान:-
मनमनाभव होऊन
अलौकिक विधीद्वारे मनोरंजन करणारे बाबासारखे बना (भव)
संगमयुगावर स्मृती
जागृत करणे म्हणजे बाबा सारखे बनणे. हे संगमयुगातील चांगले दिवस आहेत. खुप साजरे करा,
परंतू बाबाची आठवण करत साजरे करा. फक्त मनोरंजनाचे रुपात नाही परंतू मनमनाभव होऊन
साजरे करा. अलौकिक विधीद्वारे अलौकिकतेचे मनोरंजन अविनाशीच होऊन जाते. संगमयुगी
दीपमाळेची विधी-जुने खाते नष्ट करणे, प्रत्येक संकल्प, प्रत्येक तास नवा म्हणजे
अलौकिक असावा. जुने संकल्प, संस्कार, स्वभाव, चाल चलन हे रावणाचे कर्ज आहे, याला एक
दृढ संकल्पाने समाप्त करा.
बोधवाक्य:-
इतर गोष्टी
पाहण्यापेक्षा स्वत:ला आणि बाबाला पहा..!