27-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, बाबाची दृष्टी हद आणि बेहदच्या पण पलीकडे जाते, तुम्हाला पण हद (सतयुग)
बेहद (कलियुग) च्या पलीकडे जावयाचे आहे."
प्रश्न:-
उंच ते उंच
ज्ञान रत्नांची धारणा कोणत्या मुलांमध्ये चांगली होत आहे?
उत्तर:-
ज्यांचा बुध्दी
योग एका बाबा बरोबर आहे, पवित्र बनले आहेत. त्यांना या रत्नांची धारणा चांगली होते.
या ज्ञानासाठी शुध्द बुध्दी पाहिजे. उल्टे सुल्टे संकल्प पण बंद झाले पाहिजेत. बाबा
बरोबर योग लावत लावत बुध्दी सोन्यासारखी बनली तरच रत्न धारण होतील.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना आत्मिक बाबा बसून रोज रोज समजावत आहेत. हे तर समजावले आहे
मुलांना कि, ज्ञान, भक्ती वैराग्याचे हे सृष्टी चक्र बनलेले आहे. बुध्दीमध्ये हे
ज्ञान राहिले पाहिजे. तुम्हा मुलांना हद आणि बेहदच्या पलीकडे जायचे आहे. बाबा तर हद
आणि बेहदच्या पलीकडे आहेत. त्याचा पण अर्थ समजला पाहिजे ना. आत्मिक पिता बसून सांगत
आहेत. हा पण विषय समजावयाचा आहे कि, ज्ञान, भक्ती मग आहे वैराग्य. ज्ञानाला म्हटले
जाते दिवस, जेव्हा नविन दुनिया आहे. त्यामध्ये ही भक्ती अज्ञान नाही. ती आहे हदची
दुनिया कारण तेथे फार थोडे असतात, नंतर हळू हळू वृध्दी होत जाते. अध्र्या कल्पानंतर
सृष्टीची वृध्दी होत आहे. वरुन आत्मे येत राहतात. येथे वृध्दी होत राहते. हदपासून
सुरुवात होते, बेहदमध्ये जाते. बाबाची तर हद आणि बेहदच्या पलीकडे दृष्टी जाते.
जाणतात कि, हदमध्ये किती थोडी मुले असतात, मग रावण राज्यात किती वृध्दी होते. आता
तुम्हाला हद आणि बेहदच्या पलीकडे जावयाचे आहे. सतयुगामध्ये किती लहान दुनिया असते.
तिथे सन्यास किंवा वैराग्य इत्यादी होत नाही. नंतर द्वापर पासून मग इतर धर्म सुरु
होतात. सन्यास धर्म पण येतो, जे घरादाराचा सन्यास करतात. सर्वाला जाणले तर पाहिजे
ना. त्याला म्हटले जाते हठयोग आणि हदचा सन्यास. फक्त घरदार सोडून जंगलामध्ये जातात.
द्वापरयुगापासून भक्ती सुरु होते. ज्ञान तर असतच नाही. ज्ञान म्हणजे सतयुग त्रेता
सुख, भक्ती म्हणजे अज्ञान आणि दु:ख हे चांगले प्रकारे समजले पाहिजे, नंतर दु:ख आणि
सुखाचे पलीकडे जायचे आहे. हद बेहदच्या दूर. मनुष्य शोध घेतात ना. कोठपर्यंत समुद्र
आहे, आकाश आहे. फार प्रयत्न करतात परंतू अंत प्राप्त करत नाहीत. विमानातून जातात.
त्यामध्ये पण तेवढे पेट्रोल पाहिजे ना, जे परत पण येऊ शकेल. फार दूरपर्यंत जातात,
परंतू बेहदमध्ये जावू शकत नाहीत, हद पर्यंतच जातात. तुम्ही तर हद, बेहदच्या दूर जात
आहात. आता तुम्ही समजू शकता कि, अगोदर नविन दुनियेत हद आहे. फार थोडे मनुष्य असतात.
त्याला सतयुग म्हटले जाते. तुम्हा मुलांना रचनेच्या आदि मध्य अंताचे ज्ञान असले
पाहिजे. हे ज्ञान आणखीन कोणामध्ये नाही. तुम्हाला समजावणारे बाबा आहेत, जे बाबा हद
आणि बेहदच्या दूर आहेत, आणखीन कोणी समजावू शकत नाही. रचनेच्या आदि मध्य अंताचे
रहस्य समजावत आहेत, नंतर सांगतात कि, यांचेपासून दूर जावा. तेथे तर काहीच राहत नाही.
किती पण दूर उंच जातात, आकाशच आकाश आहे. याला म्हटले जाते हद आणि बेहदच्या पासून
दूर. कोणी अंत प्राप्त करु शकत नाही. म्हणतात बेअंत. बेअंत म्हणणे तर सोपे आहे,
परंतू अंताचा अर्थ समजला पाहिजे. आता तुम्हाला बाबा समज देत आहेत. बाबा सांगतात कि,
मी हदला पण ओळखतो, बेहदला पण ओळखत आहे, आमूक आमूक धर्म या या वेळी स्थापन झाले आहेत.
दृष्टी जाते सतयुगाच्या हदकडे. नंतर कलियुगाच्या बेहदकडे. नंतर त्यांचे ही दूर आम्ही
जातो. जिथे काहीच नाही. सुर्य चंद्राच्या पण वर आम्ही जातो, जिथे आमचे शांतीधाम,
गोड घर आहे. तसे तर सतयुग पण गोड घर आहे. तिथे शांती पण आहे तर राज्य भाग्य सुख पण
आहे, दोन्ही पण आहे. घरी परमधाम जाल, तिथे तर फक्त शांती आहे. सुखाचे नांव नाही. आता
तुम्ही शांतीची स्थापना करत आहात आणि सुख शांतीची स्थापना पण करत आहात. तिथे तर
शांती पण आहे, सुखाचे राज्य पण आहे. मुलवतनमध्ये तर सुखाची गोष्टच नाही.
आर्धाकल्प तुमचे राज्य चालत आहे, मग आध्र्याकल्पानंतर रावण राज्य येते. अशांती आहे
5 विकारामध्ये 2500 वर्षे तुम्ही राज्य करता नंतर रावणाचे राज्य येते. त्यांनी तर
लाखो वर्ष लिहले आहे. एकदम जसे बुध्दू बनविले आहे. पाच हजार वर्षाचे कल्पाला लाखो
वर्ष म्हणणे बुध्दूपणा म्हणावे ना. जरा पण सभ्यता नाही. देवता मध्ये किती दैवी
सभ्यता होती. ती आता असभ्यता झाली आहे. काही जाणत नाहीत. आसुरी गुण आले आहेत. पुर्वी
तुम्ही पण काही जाणत नव्हता. कामकटारी चालवून आदि मध्य अंत दु:खी बनवितात त्यामुळे
त्यांना म्हटलेच जाते रावण संप्रदाय. दाखवितात कि रामाने वानर सेना घेतली. आता
रामचंद्र त्रेतातील, तेथे मग वानर कोठून आले, आणि मग म्हणतात, रामाची सीता चोरुन
नेहली. अशा गोष्टी तर तेथे असतच नाहीत. जीव जानवर इत्यादी 84 लाख योनी जेवढ्या येथे
आहेत, तेवढ्या सतयुग त्रेतामध्ये थोड्याच असतील. हे सारे बेहदचे नाटक बाबा बसून
समजावत आहेत. मुलांना फार दूरदृष्टीचे बनायचे आहे. पुर्वी तुम्हाला काहीच माहित
नव्हते. मनुष्य असून नाटकाला जाणत नाहीत. आता तुम्ही समजता कि, सर्वांत मोठे कोण आहे?
उंच ते उंच भगवान. श्लोक पण म्हणतता कि, उंच तुझे नांव आता तुमच्या शिवाय आणखीन
कोणाचे बुध्दीमध्ये नाही. तुमच्यामध्ये पण नंबरवार आहेत. बाबा हद आणि बेहद दोन्हीचे
रहस्य समजावत आहेत. त्यांचे पलीकडे काही पण नाही आहे. ते आहे तुमचे राहण्याचे ठिकाण,
ज्याला ब्रह्मांड पण म्हटले जाते. जसे येथे तुम्ही आकाश तत्त्वामध्ये बसले आहात,
यात काही पाहण्यात येत आहे का? रेडिओ मध्ये म्हणतता कि, आकाशवाणी. आता ही आकाशवाणी
तर बेअंत आहे. अंत मिळत नाही. तर आकाशवाणी म्हटल्याने मनुष्य काय समजतील. हे जे मुख
आहे ते आहे पोखळी. मुखातून वाणी (आवाज) निघत आहे. ही तर साधारण गोष्ट आहे. मुखातून
आवाज निघणे ज्याला आकाशवाणी म्हटले जाते. बाबाला पण आकाशद्वारा वाणी चालवावी लागते.
तुम्हा मुलांना स्वत:चे पण रहस्य सारे सांगितले आहे. तुम्हाला निश्चय होत आहे. आहे
फार सोपे. जसे आम्ही आत्मा आहे. तसे बाबा पण परमआत्मा आहे. उंच ते उंच आत्मा आहे
ना. सर्वांना आप-आपली भुमिका मिळालेली आहे. सर्वांत उंच ते उंच भगवान मग प्रवृत्ती
मार्गातील युगल मेरु. नंतर नंबरवार माळा पहा किती थोडी आहे, मग सृष्टी वाढत वाढत
किती मोठी होत आहे. किती करोड दाणे अर्थात आत्म्यांची माळा आहे. हे सर्व शिक्षण आहे.
बाबा जे समजावत आहेत त्याला चांगले प्रकारे बुध्दीमध्ये धारण करा. झाडाचा विस्तार
तर तुम्ही ऐकत राहत आहात. बीज वर आहे. हे वेगळे झाड आहे. याच आयुष्य किती आहे.
झाडाची वृध्दी होत आहे तर सारा दिवस बुध्दीमध्ये हेच ठेवा. या सृष्टी रुपी कल्प
वृक्षाचे आयुष्य बिल्कुल तंतोतंत आहे. 5 हजार वर्षांत एका सेकंदाचा पण फरक पडत नाही.
तुम्हा मुलांच्या बुध्दीमध्ये आता किती ज्ञान आहे, जे चांगले मजबूत आहे. मजबूत
तेव्हा व्हाल, जेव्हा पवित्र बनाल. या ज्ञानाची धारणा करण्यासाठी बुध्दी सोन्यासारखी
पाहिजे. मग इतके सोपे होईल, जसे बाबासाठी सोपे आहे. मग तुम्हाला पण म्हणतील मास्टर
नॉलेजफुल. नंतर नंबरवार पुरुषार्थानुसार माळेचे दाणे बनाल. अशा गोष्टी बाबा शिवाय
कोणी समजावू शकत नाही. ब्रह्माबाबाची आत्मा पण समजावत आहे. शिवबाबा पण या
तनाद्वारेच समजावत आहेत, ना कि देवतांच्या शरीराद्वारे. बाबा एकदाच येऊन गुरु बनत
आहेत, तरी पण बाबालाच भुमिका वठवयाची आहे. 5 हजार वर्षानंतर येऊन भुमिका वठवतात.
बाबा समजावतात उंच ते उंच मी आहे. नंतर आहे मेरु. जे सुरुवातीला महाराजा-महाराणी
आहेत ते मग अंताला जावून आदि देव, आदि देवी बनतात. हे सारे ज्ञान तुमच्या बुध्दीत
आहे. तुम्ही कोठे पण समजावा, तर आश्चर्य करतील. हे तर बरोबर सांगत आहेत. मनुष्य
सृष्टीचा बीजरुपच ज्ञानसंपन्न आहे. त्यांचे शिवाय आणखीन कोणी ज्ञान देवू शकत नाही.
यासर्व गोष्टी धारण करावयाच्या आहेत, परंतू मुलांना धारणा होत नाही. आहे फार सोपे.
काही अवघड नाही एक तर यामध्ये आठवणीची यात्रा पाहिजे, त्यानंतर पवित्र बुध्दीमध्ये
रत्न धारण होतील. हे उंच ते उंच रत्न आहेत. बाबा तर जवाहरी होते. फार चांगला हीरा,
माणिक इत्यादी आले वर, ते चांदीच्या डबीमध्ये कापसात चांगले प्रकारे ठेवत होते. जे
कोणी पण पाहतील. तर म्हणत, ही तर फार फस्र्टक्लास वस्तू आहे. येथे पण असे आहे.
चांगली वस्तू चांगल्या बुध्दीमध्ये शोभते. तुमचे कान ऐकत आहेत. त्यात धारण होत आहे,
पवित्र असाल, बुध्दीयोग बाबा बरोबर असेल तर धारणा चांगली होईल. नाही तर सर्व निघून
जाईल. आत्मा पण आहे किती लहान त्यामध्ये किती ज्ञान भरलेले आहे. किती चांगले शुध्द
भांडे पाहिजे. कोणता विचार पण येऊ नये. उल्टे सुल्टे सर्व विचार बंद झाले पाहिजेत.
सगळीकडून बुध्दीयोग निघाला पाहिजे. माझे बरोबर योग लावत लावत भांडे सोन्याचे बनवा,
तर रत्न धारण होतील. मग दुसज्याला दान करत राहाल. भारताला महादानी मानले जाते, ते
धनदान तर फार करत आहेत. परंतू हे आहे अविनाशी ज्ञान रत्नाचे दान. देहासहित जे काही
आहे ते सोडून एका बरोबर बुध्दीचा योग लावयाचा आहे. आम्ही तर बाबांचे आहोत, यामध्ये
पण मेहनत लागत आहे. मुख्य लक्ष्य तर बाबा सांगत आहेत. पुरुषार्थ करणे मुलांचे काम
आहे. तरच एवढे उंच पद प्राप्त करु शकाल. कोणता पण उल्टा सुल्टा विचार किंवा विकल्प
येऊ नये. बाबाच ज्ञानाचा सागर, हद आणि बेहदच्या पलीकडचे आहेत. सर्व बसून समजावत
आहेत. तुम्ही समजता कि, बाबा आम्हाला पाहत आहेत परंतू मी तर हद आणि बेहद पासून दूर
वर निघून जात आहे. मी राहणाराच तेथील आहे. तुम्ही पण हद बेहदच्या पलीकडे निघून जावा.
संकल्प विकल्प काही पण न येवो. यामध्ये मेहनत आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून
कमळाचे फुलासारखे बनायचे आहे. हाताने काम करा, मनाने. बाबाची आठवण करा. गृहस्थी तर
फार आहेत. गृहस्थी जेवढे ज्ञान घेतात, तेवढे सेंटर वर राहणारी मुले घेत नाहीत.
सेंटर चालविणारे, मुरली वाचणारे पण नापास होत आहेत, आणि शिकणारे उंच पद प्राप्त
करतात. पुढे चालून तुम्हाला सर्व काही माहित पडेल. बाबा बिल्कुल बरोबर सांगत आहेत.
आम्हाला जे शिकवत होते त्यांना मायेने खाल्ले, महारथीला मायेने एकदम जिंकून टाकले,
आज नाहीत. मायेला फितूर झाले, विलायत मध्ये पण फितूर बनतात ना. कोठे कोठे जावून शरण
घेतात. जेथे शक्तीमान असतात, त्यांचेकडे निघून जातात. यावेळी तर मृत्यू समोरच आहे,
त्यामुळे फार ताकदवाल्याकडे जातात. आता तुम्ही समजता बाबाच ताकदवान आहेत. बाबा आहेत
सर्वशक्ती वान. आम्हाला शिकवून साज्या विश्वाचे मालक बनवितात. तेथे सर्व काही मिळून
जात आहे. कोणतीच अप्राप्त वस्तू असत नाही, ज्यांच्या प्राप्तीसाठी आम्हाला
पुरुषार्थ करावा लागतो. तेथे अशी कोणती वस्तू असतच नाही, जी तुमच्या जवळ नसते. तरी
पण नंबरवार पुरुषार्थानुसार पद प्राप्त करत आहेत. बाबा शिवाय अशा गोष्टी कोणी जाणत
नाही. सर्व आहेत पुजारी. जरी मोठ मोठे शंकराचार्य इत्यादी आहेत. बाबा त्यांची महिमा
पण ऐकवतात. प्रथम पवित्रतेच्या ताकदीने भारताला फार चांगली मदत करण्यासाठी निमित्त
बनतात. ते पण जेव्हा सतोप्रधान असतात. आता तर तमोप्रधान आहेत. त्यांचेमध्ये काय
ताकद राहिली आहे. आता तुम्ही जे पुजारी होता, तेच मग पुज्य बनण्याचा पुरुषार्थ करत
आहेत. आता तुमच्या बुध्दीत सारे ज्ञान आहे. बुध्दीमध्ये धारणा व्हावी, आणि तुम्ही
समजावत राहावे. बाबाची पण आठवण करा. बाबाच साज्या झाडाचे रहस्य समजावत आहेत. मुलांना
गोड पण असे बनायचे आहे. युध्द आहे ना. मायेचे तुफान पण फार येत आहेत. ते सर्व सहन
करावे लागतात. बाबांच्या आठवणीत राहिल्याने सर्व तुफान निघून जातील. हातमताईचा खेळ
दाखवत आहेत ना. तोंडात मुहलरा ठेवत होते, तर माया निघून जात होती, मुहलरा तोंडातून
काढली तर माया येत होती. लाजाळूचे झाड आहे ना. हात लावला तर आकुंचन होते. माया फार
तिव्र आहे, एवढ्या उंच शिक्षणाचा अभ्यास करता करता, बसल्या बसल्या खाली पाडते,
त्यामुळे बाबा समजावत आहेत. स्वत:ला भाऊ भाऊ समजा तर मग हद बेहदच्या पार जाल. शरीरच
नाही तर दृष्टी कोठे जाईल. ऐवढी मेहनत करावयाची आहे. ऐकून पळून जायचे नाही. कल्प
कल्प तुमचा पुरुषार्थ चालत आहे, आणि तुम्ही आपले भाग्य प्राप्त करता. बाबा सांगतात
कि, जे वाचले आहे ते सर्व विसरुन जावा. जटा मोकळ्या ठेवा, आणि मुरली वाचा. साधू संत
इत्यादी जे ऐकवत आहेत, ते सर्व आहे मनुष्यांची मुरली. ही आहे बेहदच्या बाबांची मुरली.
सतयुग-त्रेतामध्ये तर ज्ञानाच्या मुरलीची आवश्यकता नाही. तेथे तर ना ज्ञानाची, ना
भक्तीची गरज आहे. हे ज्ञान तुम्हाला मिळत आहे या संगमयुग वर आणि बाबाच देणारे आहेत.
अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1.
बुध्दीमध्ये ज्ञान रत्नांना धारण करुन, दान करावयाचे आहे. हद बेहदच्या दूर अशा
स्थितीत राहायचे आहे. जो कधी उल्टा सुल्टा संकल्प किंवा विकल्प ना येवो. आम्ही आत्मे
भाऊ भाऊ आहोत याची आठवण ठेवा.
2) मायेच्या तुफानापासून वाचण्यासाठी मुखामध्ये बाबाच्या आठवणीची मुहलरा ठेवा, सर्व
काही सहन करावयाचे आहे. लाजाळू बनायचे नाही. मायेकडून हार खायची नाही.
वरदान:-
सर्व सत्तेला
सहयोगी बनवून प्रत्यक्षतेचा पडदा उघडणारे खरे सेवाधारी भव
प्रत्यक्षतेचा पडदा
तेव्हा उघडेल, जेव्हा सर्व सत्तावाले मिळून म्हणतील कि, श्रेष्ठ सत्ता, ईश्वरीय
सत्ता, आध्यात्मिक सत्ता आहे, तर ही एकच परमात्मा सत्ता आहे. सर्व एका मंचावर एकत्र
येऊन असा स्नेह मिलन करा. यासाठी सर्वांना स्नेहाचे धाग्यामध्ये बांधून जवळ आणा,
सहयोगी बनवा. हा स्नेहच चुंबक बनेल, जे सर्व एक साथ संगठन रुपामध्ये बाबाच्या
मंचावर येतील. तर आता शेवटी प्रत्यक्षतेचे अभिनेत्याची भुमिका करण्यासाठी निमित्त
बनण्याची सेवा करा, त्याला म्हणावे खरे सेवाधारी.
बोधवाक्य:-
सेवेद्वारे
सर्वांची, आशिर्वाद प्राप्त करणे, ही पुढे जाण्याची शिडी आहे...!!!