19-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो , तुम्ही आला आहात तुमच्या बेहद पित्याजवळ विकारी पासून निर्विकारी बनण्यासाठी म्हणूनच तुमच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं भूत नसले पाहिजे.”

प्रश्न:-
कोणते शिक्षण आहे जे बाबा तुम्हाला देतात आणि ते शिक्षण साऱ्या कल्पामध्ये दिले जात नाही?

उत्तर:-
नवीन राजधानी स्थापन करण्याचे शिक्षण, मनुष्याला राजा बनवण्याचे शिक्षण. यावेळी सुप्रीम बाबा देत आहेत. हे नवीन शिक्षण साऱ्या कल्पा मध्ये दिले जात नाही. या शिक्षणामुळे सतयुगी राजधानी स्थापन होत आहे.

ओम शांती।
हे मुलांना माहित आहे की आपण आत्मा आहोत, ना की शरीर. यालाच म्हणतात देही- अभिमानी. सर्व मनुष्य आहेत देह अभिमानी. ही आहे पाप आत्म्याची दुनिया अथवा विकारी दुनिया. रावण राज्य आहे. सतयुग हे भूतकाळात होऊन गेल आहे. तिथे सर्वजण निर्विकारी होते. मुलांना माहित आहे आपणच पवित्र देवी-देवता होतो, परत 84 जन्मानंतर पतित बनलो आहोत. सर्वच सर्वच जन 84 जन्म घेत नाहीत. भारतवासी देवी-देवता होते, ज्यांनी 82, 83-84 जन्म घेतले आहेत. आता तेच पतित बनले आहेत. भारताचे गायन अविनाशी खंड म्हणून केलं जाते. जेव्हा भारतामध्ये लक्ष्मीनारायणाचे राज्य होते तेव्हा भारताला नवीन दुनिया, नवीन भारत म्हटलं जात होतं. आता आहे जुनी दुनिया, जुना भारत. ते तर संपूर्ण निर्विकारी होते, कोणताही विकार नव्हता. तेच देवी-देवता 84 जन्म घेऊन आता पतित बनले आहेत. काम विकाराचे भूत, क्रोधाच भूत, लोभाच भूत हेच सर्वात शक्तिशाली भूत आहेत. याच्यात मुख्य आहे देहअभिमानाचे भूत. रावणाचे राज्य आहे ना. हाच रावण भारताचा अर्ध्या कल्पापासूनचा शत्रू आहे ज्याच्यामुळे मनुष्यात 5 विकार प्रवेश करतात. देवतांच्या मध्ये हे भूत नव्हते. पुन्हा पुनर्जन्म घेउन घेऊन आत्मा विकारांमध्ये आली. तुम्हाला माहित आहे, तुम्ही जेव्हा देवी-देवता होतो, तेव्हा कोणत्याही विकाराचं भूत नव्हतं. सतयुग- त्रेताला म्हटलं जातं रामराज्य, द्वापर- कलियुगला म्हटलं जातं रावण राज्य. इथं प्रत्येक स्त्री-पुरुषांमध्ये 5 विकार आहेत. द्वापर युगापासून कलियुगापर्यंत 5 विकार प्रवेश करतात. आता तुम्ही पुरुषोत्तम संगम युगावर आहात. बेहदच्या पित्याकडे आला आहात विकारी पासून निर्विकारी बनण्यासाठी. निर्विकारी बनल्यानंतर जर कोणी विकारी बनत असेल तर बाबा म्हणतात तू तर काळ तोंड केलंस, आता गोरे होणे मुश्कील आहे. हे तर पाचव्या मजल्यावरून पडण्यासारखे आहे. पूर्ण हाडे तुटून जातात. गीतेत लिहिलं आहे भगवानूवाच-काम महाशत्रू आहे. भारताचा वास्तविक धर्मशास्त्र गीता आहे . प्रत्येक धर्माचे एक शास्त्र आहे. भारताचे तर खूप शास्त्र आहेत. यालाच म्हणतात भक्ती. नवीन दुनिया सतोप्रधान सुवर्णयुग आहे. तिथे भांडणे होत नाहीत. खूप आयुष्य होते, स्वास्थ्य आणि संपन्न होते. आता तुम्हाला आठवले आहे, की आपण देवी देवता खूप सुखी होतो. तिथे अचानक मृत्यू होत नाही. काळाची भीती नाही. तिथे आरोग्य, संपत्ती, आनंद आहे. नरकात आनंद नाही. काही ना काही शारीरिक रोग असतो. ही अपार दुःखांची दुनिया आहे. ती अपार सुखांची दुनिया आहे. बेहदचे पिता दुःखाची दुनिया थोडीच रचतात. बाबांनी तर सुखाची दुनिया बनवली आहे. पुन्हा रावणाचे राज्य आले, तर दुःख अशांती आली. सतयुग आहे सुखधाम तर कलियुग आहे दुःखधाम. विकारात जाणं म्हणजे एक दुसऱ्यावर काम कटारी चालवणं. मनुष्य म्हणतात ही तर ईश्वराची निर्मिती आहे, परंतु नाही, ईश्वराची निर्मिती नाही. रावणाची निर्मिती आहे. ईश्वराने स्वर्गाची रचना केली. तिथे काम कटारी नाही. असे नाही की ईश्वरच दुःख सुख देतो. अरे ईश्वर सर्व जगाचा पिता आहे, ते आपल्या मुलांना दुःख कसे देतील. ते म्हणतात मी तर सुखाची प्रॉपर्टी देतो. पुन्हा अर्ध्या कल्पानंतर रावण श्रापित करतो. सतयुगामध्ये खूप सुख होते, मालामाल होते. एका सोमनाथ मंदिरामध्ये किती हिरे जवाहरात होते. भारत किती निर्विकारी होता. आता तर विकारी आहे. सतयुगात 100% निर्विकारी, कलियुगात 100% विकारी, हा खेळ बनला आहे. लोहयुगात बिलकुल तमोप्रधान बनले आहेत. किती दुःख आहे. हे विमान इत्यादी 100 वर्षात बनले आहेत. यालाच म्हणतात मायेचा दिखावा. मनुष्याला वाटतं विज्ञानानी या जगाला स्वर्ग बनवले आहे. परंतु हा रावणाचा स्वर्ग आहे. कलयुगातील मायेचा पॉम्प पाहून तुमच्याकडे येणारी लोकं मुश्किलीने येतात. समजतात कि आमच्याकडे तर बंगला मोटारगाडी इत्यादी आहे. बाबा म्हणतात, स्वर्ग तर सतयुगाला म्हटलं जाते. जेंव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य होतं. आता या लक्ष्मी-नारायणाचं राज्य नाही. आता कलयुगनानंतर पुन्हा यांचं राज्य येईल. आधी भारत खूप छोटा होता. नवीन दुनियेत फक्त ९ लाख देवी-देवता असतात. नंतर वाढत जातात. सारी सृष्टी वाढत जाते. सुरुवातीला फक्त देव-देवता असतात. बेहदचे बाबा संपुर्ण जगाचा इतिहास भूगोल सांगतात. बाबां शिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. त्यांना म्हटलं जात ज्ञानाचा सागर. सर्व आत्म्याचे पिता. आत्मा-आत्मा भाऊ-भाऊ आहे. नंतर भाऊ-बहीण बनतात. तुम्ही सर्वजण आहात प्रजापिता ब्रह्माची दत्तक मुलं. सर्व आत्मे त्यांची मुले आहेत. त्यांना म्हटलं जातं परमपिता, नाव आहे शिवबाबा .समजावतात कि माझं नाव एकाच आहे शिव. भक्ती मार्गात मनुष्यानी खुप सुंदर मंदिर बनवली आहेत, त्यामुळे खुप नावं दिली आहेत. भक्तीचं साहित्य खुप आहे. त्याला शिक्षण म्हटलं जात नाही. भक्तीमध्ये मुख्य उद्देश नाही. भक्ती खाली उतरवणारी आहे. खाली उतरत उतरत तामोप्रधान बनतात. पुन्हा सर्वांना सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही सर्वजण सतोप्रधान बनून स्वर्गामध्ये याल, बाकी सर्वजण सतोप्रधान बनून शान्तिधाम मध्ये राहतील. हे चांगल्या रीतीने आठवणीत ठेवा. बाबा म्हणतात तुम्ही मला बोलावले आहे - बाबा, आम्हां पतितांना पावन बनवा. आणि आता मी सर्व दुनियेला पावन बनविण्यासाठी आलो आहे. मनुष्य समजतात गंगेलाच पतित-पावनी समजतात. विहिरीतुन पाणी काढून त्यालाच गंगेचे पाणी समजून स्नान करतात. कोणी तीर्थ यात्रेवर जाईल, डोंगरावर जाईल तर त्यालाही गुप्त गंगा समाजतील. यालाच म्हणतात असत्य. ईश्वर सत्य आहे असं म्हणतात. बाकी रावण राज्यात सर्वजणच खोटं बोलणारे आहेत. ईश्वर पिताच सत्यखंडाची स्थापना करतात. तिथे असत्य नसते. देवतांना शुद्ध नैवेद्य दाखवला जातो. आता आहे असुरी राज्य, सतयुग-त्रेता मध्ये आहे ईश्वरीय राज्य, जे आता स्थापन होत आहे. ईश्वरच सर्वाना पावन बनवतो. देवतामध्ये कोणताच विकार नसतो. यथा राजा-राणी तथा प्रजा सर्वजण पवित्र असतात. इथे सर्वजण आहेत पापी, कामी, क्रोधी. नवीन दुनिया स्वर्गाला आणि याला नर्क म्हटलं जाते. नर्काला स्वर्ग बनवणारे फक्त बाबाच आहेत, दुसरे कुणीच असू शकत नाही. इथे सर्वजण आहेत नर्कवासी पतित. सतयुगात आहेत पावन. तिथे असं कधीच म्हणणार नाही की आम्ही पतिता पासून पावन होण्यासाठी स्नान करत आहोत.

हे आहे वेग-वेगळ्या मनुष्य सृष्टीचे झाड. बीज आहे ईश्वर. तेच रचना करतात. पहिल्यांदा रचतात देवी-देवतांना. पुन्हा वाढ होऊन होऊन एवढे धर्म होतात. आधी एक धर्म, एक राज्य होते. सुखच सुख होते. मनुष्यांना वाटतं की या जगात शांती नांदावी. ती तुम्ही स्थापन करत आहात. बाकी सर्वजण संपून जातील. बाकी थोडे राहतील. चक्र फिरतच राहतं. आता आहेत कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा आदि पुरुषोत्तम संगमयुग. यालाच म्हणतात कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग. कलियुगानंतर सतयुग स्थापन होत आहे. तुम्ही संगमयुगावर शिकता. त्याचे फळ तुम्हाला सतयुगात मिळते. इथे जेवढे पवित्र बनाल आणि शिक्षण घ्याल तेवढं उंच पद मिळेल. असं शिक्षण कुठेही नाही. तुम्हाला या शिक्षणाच सुख नवीन दुनियेत मिळेल. जर कोणतेही भूत तुमच्यात असेल तर, सजा खावी लागेल आणि दुसरं म्हणजे पद कमी मिळेल. जे स्वतः संपूर्ण बनून दुसऱ्यांना शिकवतील त्यांना उंच पद मिळेल. किती सेंटर्स आहेत, लाखो सेंटर्स होतील. संपूर्ण विश्वात सेंटर्स उघडले जातील. पाप आत्मा पासून पुण्य आत्मा बनायचे आहे. तुमचे मुख्यधेय सुद्धा आहे. शिकवणारे एक शिवबाबा आहेत. ते आहेत ज्ञानाचे सागर- सुखाचे सागर. बाबाच येऊन शिकवतात. हे शिकवत नाहीत, यांच्याद्वारे शिकवतात. याचं गायन आहे ईश्वराचा रथ, भाग्यशाली रथ. तुम्ही किती पद्मापदम भाग्यशाली आहात. तुम्ही मोठे साहुकार बनता. कधीच आजारी पडत नाही. आरोग्य धन संपदा मिळते. इथे पैसा आहे परंतु रोगही आहेत. तो आनंद इथे मिळू शकत नाही. काही न काही दुःख जरूर असते. त्याचं तर नावच आहे सुखधाम, स्वर्ग, पॅराडाईज. या लक्ष्मी-नारायणाला हे राज्य कोणी दिलं? हे कोणालाही माहित नाही. हे भारतात रहात होते. विश्वाचे मालक होते. कोणतेही विभाजन नव्हते. आता तर किती विभाजन आहे. रावण राज्य आहे. किती तुकडे-तुकडे झाले आहेत. भांडत राहतात, तेव्हा तर साऱ्या भारतामध्ये देवी-देवतांचे राज्य होते. तिथे वजीर नसतात. इथे तर खूप वजीर आहेत कारण की बेअक्कल आहेत. हे वजीर सुद्धा तमोप्रधान पतित आहेत. पतिताला पतित मिळाला असं होऊन होऊन पुढे पतितच बनत जातात. कंगाल बनतात, कर्ज काढतात. सतयुगात तर धान्य, फळ खूप स्वादिष्ट असतात. तुम्ही तिकडे जाऊन सर्व अनुभव करता. सूक्ष्म वतन मध्ये सुद्धा जाता तर स्वर्गामध्ये सुद्धा जाता. बाबा म्हणतात सृष्टिचक्र कसे फिरते? सर्व प्रथम भारतामध्ये एक देवी-देवता धर्म होता. दुसरा कोणताच धर्म नव्हता. पुन्हा द्वापरयुगात रावण राज्य सुरू होते. आता आहे विकारी दुनिया आणि तुम्हाला पवित्र बनून निर्विकारी देवता बनायचे आहे. ही शाळा आहे. भगवानूवाच मी तुम्हा मुलांना राजयोग शिकवतो. तुम्ही भविष्यात हे बनता. राजा बनण्याचे शिक्षण दुसरे कुठेही मिळत नाही. बाबाच शिकवून नवीन दुनियेची राजधानी देतात. परमपिता, शिक्षक, सतगुरू एकच शिवबाबा आहेत. बाबा म्हटल्यानंतर जरूर वारसा मिळाला पाहिजे. ईश्वर जरूर स्वर्गाचा वारसा देईल. रावण ज्याला दरवर्षी जाळलं जातं, हा भारताचा नंबरवन दुश्मन आहे. रावणाने असुर बनवले आहे. याचे राज्य 2500 वर्ष चालते. बाबा तुम्हाला म्हणतात मी तुम्हाला सुखधामाचा मालक बनवतो. रावण तर तुम्हाला दुःखधामा मध्ये घेऊन जातो. अचानक मृत्यू होतो अनेक रोग होत राहतात. तिथे असं काही नाही. नावच आहे स्वर्ग. आता स्वतःला हिंदू म्हणवतात, कारण पतित आहेत. देवता म्हणविण्याच्या लायक नाहीत. बाबा या रथाद्वारे समजावतात. यांच्या बाजूला येऊन बसतात तुम्हाला शिकवण्यासाठी. मग हे ही शिकतात. आपण सर्व विद्यार्थी आहोत, आता बाबा शिकवतात. पुन्हा 5000 वर्षानंतर शिकवतील. हे ज्ञान, हे शिक्षण पुन्हा गुप्त होऊन जाईल. शिकून तुम्ही देवी-देवता बनता. 2500 वर्षे सुखाचा अनुभव केला आहे पुन्हा आहे, दुःख, रावणाचा शाप. आता भारत खूप दुःखी आहे. हे आहे दुःखधाम. म्हणूनच हाक मारतात, हे पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा. आता तर तुमच्यात कोणताही विकार नसायला पाहिजे. परंतु अर्ध्या कल्पाचा हा रोग लवकर थोडेच सुटणार आहे. जे चांगल्या रीतीने अभ्यास करत नाहीत ते नापास होतात. जे चांगल्या मार्काने पास होतात, ते शिष्यवृत्ती घेतात. तुमच्या मधून जे पवित्र बनून दुसऱ्यांनाही पवित्र बनवतात ते बक्षीस घेतात. माळ असते 8 ची. जे चांगल्या मार्काने पास झालेले आहेत. 108 ची पण माळ असते. त्यामाळेचे सुद्धा स्मरण केले जाते. मनुष्य याचे रहस्य थोडेच समजतात. माळेमध्ये वरती फुल आहे नंतर दोन मणी मेरू. स्त्री आणि पुरुष दोन्ही पवित्र बनतात. हे पवित्र होते यांना स्वर्गवासी म्हणत होते. हेच आत्मे पुनर्जन्म घेत-घेत पतित बनले आहेत. इथे पवित्र बनून पावन दुनियेत जातील. विश्वाच्या इतिहास-भूगोलाची पुनरावृत्ती होते. विकारी राजा निर्विकारी राजांची मंदिर बनवून त्यांचे पूजन करतात. पुन्हा तेच पुज्यपासून पुजारी बनतात. विकारी बनल्यामुळे लाईटचा (प्रकाशमय) ताज राहत नाही. हा बनलेला खेळ आहे, हे बेहदचे आश्चर्यकारक नाटक आहे. आधी एकच धर्म होता ज्याला राम राज्य म्हटलं जाते. नंतर इतर धर्म येतात. हे सृष्टिचक्र कसं फिरते हे फक्त एक बाबाच समजावू शकतात. ईश्वर एकच आहेत. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. स्वयं ईश्वर शिक्षक बनून शिकवतो म्हणून चांगल्या प्रकारे शिकायचे आहे. स्कॉलरशिप घेण्यासाठी पवित्र बनून दुसऱ्यांना पवित्र बनवण्याची सेवा करायची आहे.

2. मनामध्ये जे काम, क्रोध आदींचे जे भूत प्रवेश आहेत त्यांना काढून टाकायचे आहे. मुख्य लक्ष्य समोर ठेवून पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
अनुभवाच्या शक्तीद्वारे जुने स्वभाव, संस्कारापासून वेगळे होणारे मायाजीत भव.
 

या जुन्या शरीराचे स्वभाव, संस्कार खूप कडक आहेत. जे मायाजीत बनण्यामध्ये विघ्नरूप बनतात. स्वभाव संस्कार रुपी साप नष्ट होऊन जातो पण त्यांच्या खुणा मात्र मागे राहतात, जे वेळ आल्यावर वारंवार धोका देतात. बऱ्याच वेळा मायेच्या वशीभूत झाल्यामुळे चुकीचे जे आहे त्याला चुकीचे समजत नाहीत. मजबूर होऊन जातात यासाठी चेक करा आणि अनुभवाच्या शक्तीद्वारे जुन्या लपलेल्या स्वभाव संस्कारांपासून वेगळे व्हा तेव्हा मायाजीत बनाल.

बोधवाक्य:-
विदेही पणाचा अभ्यास करा-हाच अभ्यास अचानक आलेल्या परिक्षेत पास करेल.