19-11-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांना, तुम्हाला फक्त एका बाबांचेच ऐकायचे आहे, आणि ऐकून दुसऱ्यांना सांगायचे आहे.”

प्रश्न:-
बाबांनी तुम्हाला कोणती समज दिली आहे, जी दुसऱ्यांना सांगायची आहे?

उत्तर:-
बाबांनी तुम्हाला समज दिली आहे की तुम्ही आत्मा भाऊ-भाऊ आहात. तुम्हाला एका बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे. हीच गोष्ट तुम्ही सर्वांना सांगा. कारण तुम्हाला साऱ्या विश्वातील लोकांचे कल्याण करायचे आहे. तुम्हीच या सेवेच्या निमित्त बनता.

ओम शांती।
ओम शांती नेहमीच का म्हणले जाते? हा आहे परिचय देणे, आत्म्याचा परिचय आत्म्यास देते. संवाद आत्माच शरीराच्या माध्यमाद्वारे करते. आत्म्याशिवाय शरीर काहीच करू शकत नाही. तर आत्म स्वतःची ओळख करून देणे. आम्ही आत्मा, परमपिता परमात्म्याची मुले आहोत. ते तर म्हणतात आपण आत्माच परमात्मा आहोत. तुम्हा मुलांना यासर्व गोष्टी समजावून दिल्या जातात. शिवबाबा सर्वांना मुलच म्हणतील ना. आत्मिक पिता म्हणतात- हे आत्मिक मुलांनो, या कर्मइंद्रियांद्वारे तुम्ही समजता ना. बाबा समजावितात, सुरुवातीला आहे ज्ञान नंतर भक्ती आहे. असे नाही की अगोदर आहे भक्ती नंतर ज्ञान. सुरुवातीला आहे ज्ञान दिवस (सतयुग-त्रेतायुग) भक्ती रात्र आहे. मग दिवस केव्हा येईल? जेव्हा भक्तीचा वैराग येईल. तुमच्या बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे. ज्ञान आणि विज्ञान आहे ना. आता तुम्ही ज्ञानाचा अभ्यास करत आहात. मग सतयुग-त्रेता मध्ये तुम्हाला ज्ञानाचे भाग्य प्राप्त होते. ज्ञान बाबा आता तुम्हाला देत आहेत, ज्याचे भाग्य तुम्हाला सतयुगामध्ये प्राप्त होईल. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत ना. आता बाबा तुम्हाला ज्ञान देत आहेत. तुम्ही जाणता परत आपण ज्ञानापासून दूर विज्ञान आपल्या घरी शांतीधाममध्ये जाऊ. त्याला ना ज्ञान, ना भक्ती म्हणता येईल. त्याला म्हणले जाते विज्ञान. ज्ञानापासून दूर शांतीधाम मध्ये जातात. हे सर्व ज्ञान बुद्धीमध्ये असले पाहिजे. बाबा ज्ञान देतात, कोठे जाण्यासाठी? भविष्य नवीन दुनियेसाठी ज्ञान देतात. नवीन दुनियेत जाण्यापूर्वी आपल्या घरी जरूर गेले पाहिजे. मुक्तीधाम मध्ये जायचे आहे. जेथील सर्व आत्मे रहिवासी आहे तेथे जरूर जायचे आहे. या नवीन गोष्टी तुम्हीच ऐकता आणि दुसरे कोणी समजू शकत नाही. तुम्ही मुलं जाणता आम्ही अध्यात्मिक पित्याची, आध्यात्मिक मुले आहोत. आत्मिक मुलांना समजवण्यासाठी जरूर आत्मिक पिताच पाहिजेत ना. आत्मिक पिता आत्मिक मुले. आत्मिक मुलांचे एकच आत्मिक पिता आहेत. ते येऊन ज्ञान देतात. बाबा कसे येतात हे पण समजाविले आहे. बाबा म्हणतात मला सुद्धा प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. आता तुम्हाला फक्त बाबांकडून ऐकायचे आहे. बाबां शिवाय दुसरे कुणाचेच ऐकायचे नाही. मुले ऐकून परत आत्मिक भावांना ऐकवितात. काही न काही ऐकवितात जरूर. स्वतःला आत्मा समजा आणि बाबांना आठवण करा, कारण तेच पतित-पावन आहेत. बुद्धी बाबांकडे जाते. मुलांना समजून दिल्यावर समजतात कारण पूर्वी बेसमज होते. भक्ती मार्गामध्ये बेसमज मुळे रावणाच्या तावडीत येऊन काय करत होते, कसे पतित बनले आहेत. दारू पिल्यामुळे काय बनतात? दारू अजून पतित बनविते. आता तुमच्या बुद्धी मध्ये आहे की बेहदच्या बाबांकडून आम्हाला वारसा घ्यायचा आहे. कल्प कल्प घेत आलो आहोत,त्यामुळे दैवी गुण पण धारण करायचे आहे. कृष्णाच्या दैवी गुणांची किती महिमा आहे. वैकुंठाचे मालक किती गोड आहे. आता कृष्णाची राजधानी नाही म्हणता येणार. राजधानी विष्णूची किंवा लक्ष्मी-नारायणाची म्हणता येईल. आता तुम्हा मुलांना समजले आहे की बाबाच येऊन सतयुगाची राजधानी स्थापन करतात. हे चित्र नसले तरी समजाविता येऊ शकते. मंदिर तर खूप बनवितात, ज्यांच्यामध्ये ज्ञान आहे ते दुसऱ्यांचे कल्याण करतात, स्वतः सारखे बनविण्यासाठी सेवेच्या मागे पळत राहतात. स्वतःला पहायचे आहे की आम्ही किती जणांना ज्ञान दिले आहे! कोणा कोणाला लगेच ज्ञान समजते. भीष्मपितामह इत्यादींनी सांगितले आहे ना की आम्हाला कुमारीनी ज्ञानाचा बाण मारला. हे सर्व पवित्र कुमार कुमारी आहेत, म्हणजे मुल आहेत. तुम्ही सर्व मुल आहात त्यामुळे म्हणता आम्ही ब्रह्माचे मुल कुमार कुमारी भाऊ-बहीण आहोत. हे पवित्र नाते आहे. ते सुद्धा दत्तक मुले आहेत. बाबांनी दत्तक घेतले आहे. शिवबाबांनी प्रजापिता ब्रम्हा द्वारे दत्तक घेतले आहे. वास्तवामध्ये दत्तक अक्षर पण म्हणता येणार नाही. शिवबाबांची मुले तर आहोतच. सर्व मला बोलवीत आले शिवबाबा या. परंतु समजत काहीच नाही. सर्व आत्मा शरीर धारण करून पार्ट वाजवीत असते. शिवबाबा सुद्धा शरीर धारण करून पार्ट वाजवितात ना. शिवबाबांनी पार्ट नाही वठवला तर काहीच कामाचे नाहीत. किंमतच राहणार नाही. त्यांची किंमत तेव्हा राहते, जेव्हा संपूर्ण दुनियेला सदगती देतात, तेव्हा त्यांची महिमा भक्ती मार्गामध्ये गातात. सद्गती होते मग बाबांना आठवण करण्याची गरजच राहत नाही. ते फक्त पिता म्हणतात, मग शिक्षक, हे पद गुप्त होते, म्हणण्या पुरतेच राहते, परमपिता परमात्मा पवित्र बनवणारे आहेत. ते सद्गती करणारे आहेत, हे पण समजत नाहीत. जरी म्हणत असतील की सर्वांचे सद्गती दाता एक आहेत. परंतु अर्थ रहित बोलत राहतात. आता तुम्ही जे काही बोलता ते अर्थ सहित आहे. जाणता भक्तीची रात्र वेगळी आहे, ज्ञानचा दिवस वेगळा आहे. दिवसाची सुद्धा वेळ असते. भक्तीची पण वेळ आहे. ही बेहद ची गोष्ट आहे. तुम्हा मुलांना बेहदचे ज्ञान मिळत आहे. अर्धाकल्प दिवस आहे, अर्धाकल्प रात्र आहे. हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे, असे म्हणले जाते. सुख म्हणजे राम, दुःख म्हणजे रावण. रावणावर विजय प्राप्त केला तर राम राज्य येते, परत अर्ध्या कल्पा नंतर रावण, राम राज्यावर विजय प्राप्त करून राज्य करता. तुम्ही आता मायावर विजय प्राप्त करत आहात. एक-एक अक्षर तुम्ही अर्थ सहित म्हणतात. ही तुमची ईश्वरीय भाषा आहे. हे कोणी समजू शकत नाही. शिवबाबा येऊन कसे बोलतात. तुम्ही जानता ही ईश्वराची भाषा आहे, कारण ईश्वर ज्ञानाचे सागर आहेत, असे म्हणले जाते कि ते ज्ञानाचे सागर आहेत, तर जरूर कोणालातरी ज्ञान देतील ना. आता तुम्ही समजता बाबा कसे ज्ञान देतात. स्वतःचा पण परिचय देतात आणि सृष्टीचक्राचे पण ज्ञान देतात. जे ज्ञान घेतल्यामुळे आपण चक्रवर्ती राजा बनतो. स्वदर्शन चक्र आहे ना. आठवण केल्यानेच आपले पाप भस्म होतील. हे आहे तुमचे अहिंसक चक्र आठवणीचे. ते चक्र आहे हिंसक,भक्तिमार्ग मध्ये डोके उडविणारे चक्र दाखवलेले आहे. ते अज्ञानी मुलं एक दुसऱ्यांचा खून करत राहतात. तुम्ही या स्वदर्शन चक्राला जाणल्यामुळे विश्वाचे मालक बनता. काम महाशत्रू आहे ज्यामुळे आदि मध्य अंत दुःखच मिळते. ते आहे दुःखाचे चक्र. तुम्हाला बाबा या सृष्टी चक्राचे ज्ञान देतात. सुदर्शन चक्रधारी बनवितात. शास्त्रांमध्ये तर किती गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्हाला आता ते सर्व विसरायचे आहे. फक्त एका बाबांची आठवण करायची आहे, कारण बाबांकडूनच स्वर्गाचा वारसा घ्यायचा आहे. बाबांची आठवण करायचे आहे, आणि वारसा घ्यायचा आहे. किती सोपे आहे. बेहद्दचे बाबा नवीन दुनिया स्थापन करतात, तर वारसा घेण्यासाठी त्यांची आठवण करायचे आहे. हे आहे मनमनाभव, मध्याजी भव. बाबा आणि वारसाला आठवण केल्याने मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. आम्ही बेहद्च्या बाबांची मुल आहोत. बाबा स्वर्गाची स्थापना करतात, आम्ही मालक होतो परत जरूर बनू. परत तुम्हीच नर्कवासी बनले. सतोप्रधान होते आता परत तमोप्रधान बनले आहात. भक्तिमार्ग मध्ये आम्हीच आलो. संपूर्ण चक्र भूमिका केली. आम्हीच भारतवासी सूर्यवंशी होतो परत, चंद्रवंशी वैश्य वंशी... बनत पतित झालो. आपण भारतवासी देवी-देवता होतो, मग आपणच पतीत बनतो. तुम्हाला आता संपूर्ण ज्ञान मिळाले आहे. वाममार्गामध्ये जातात तर किती पतित बनतात. मंदिरात सुद्धा देवतांचे वाममार्गात गेलेले चित्र दाखविले आहे. पूर्वी घड्याळ सुद्धा अशा चित्रांचे बनवीत होते. आता तुम्ही समजता आपण किती पवित्र होतो परत, आपण पुनर्जन्म घेत घेत पतित बनलो. हे सतयुगाचे मालकदैवी गुणवाले मनुष्य होते. आता असुरी गुणवाले बनले आहेत, आणखीन दुसरा काही फरक नाही. शेपटी असणारे किंवा सोंड असणारे मनुष्य नसतात. देवतांचे फक्त ही लक्षणे आहेत. बाकी तर स्वर्ग प्राय:लोप झालेला आहे, फक्त हे चित्र निशाणी आहेत. चंद्रवंशीची पण निशाणी आहे. आता तुम्ही मायावर विजय प्राप्त करण्याचे युद्ध करत आहात. युद्ध करता करता हरतात तर त्याची आठवण धनुष्यबान दिलेला आहे. भारतवसी वास्तवात देवी-देवता घराण्यातले आहेत. नाहीतर कोणत्या घराण्यातले म्हणता येईल. परंतु भारत वासियांना आपल्या घराण्याचे माहीती नसल्यामुळे हिंदू म्हणतात. नाहीतर वास्तवामध्ये तुमचा एकच घराना आहे. भारतामध्ये आहे सर्व देवता घराण्यातले, जे बेहदचे पिता येऊन स्थापन करतात. शास्त्र सुद्धा भारताचे एकच आहे. दैवी राजधानी ची स्थापना होते, परत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा निर्माण होतात. बाबा देवी देवता धर्म स्थापन करतात. मुख्य आहे चार धर्म. मुळ देवी देवता धर्माचेच आहे. येथे राहणारे सर्व मुक्तीधाम मधले आहेत. तुम्ही परत आपल्या देवता धर्माच्या शाखेमध्ये जाल. भारताची हद्द एकच आहे अजून कोणत्या धर्माची नाही. हे वास्तवामध्ये देवता धर्माचे आहेत. परत त्यातून दुसरे धर्म नाटकाच्या नियमानुसार येतात. भारताचा वास्तविक दैवी धर्म आहे, जो बाबा स्थापन करतात. धर्माची वृद्धी होते, हे संपूर्ण ईश्वरीय झाड आहे. बाबा म्हणतात मी या झाडाचा बीजरूप आहे. हे खोड आहे आणि यातून शाखा निघतात. मुख्य गोष्ट आपण आपापसात भाऊ भाऊ आहोत. सर्व आत्म्यांचे एकच पिता आहेत, सर्व त्यांची आठवण करतात. आता बाबा म्हणतात तुम्ही या डोळ्यांनी जे काही पाहता त्या सर्वांना विसरा. हा आहे बेहद्दचे वैराग्य, त्यांचा आहे हदचा वैराग्य. फक्त घर सोडून जातात. तुम्हाला तरी या संपूर्ण दुनियेपासून वैराग्य आहे. भक्ती नंतर जुन्या दुनियेचा वैराग्य आहे. परत आपण नवीन दुनियेमध्ये त्याआधी शांतीधाम मध्ये जाऊ. बाबा म्हणतात की जुनी दुनिया नष्ट होणार आहे या दुनियेत आता मन लावू नका. राहायचे तर येथेच आहे, जोपर्यंत योग्य बनत नाही, कर्मभोग येथेच पूर्ण करायचा आहे.

तुम्ही 2500 वर्षासाठी सुख जमा करता. त्याचे नावच आहे शांतीधाम सुखधाम. आगोदर सुख नंतर दु:ख. बाबांनी समजाविले आहे की, जे पण नवीन आत्मा परमधाम वरून येतात, जसे क्राइस्ट ची आत्मा आली, ती दुःख भोगत नाहीत. खेळच बनला आहे, आधी सुख नंतर दुःख. परमधाम वरून जे येतात ते सतोप्रधान आहेत. जसे तुम्हाला सुख जास्त आहे, तसेच सर्वांना दुःख जास्त आहे. यासर्व, बुद्धीने समजण्याच्या गोष्टी आहेत. बाबा आत्म्यांना बसून समजावितात. जे समजतात ते दुसऱ्यांना समजावितात. बाबा म्हणतात मी हे शरीर धारण केले आहे. अनेक जन्माच्या शेवटी म्हणजे तमोप्रधान शरीरामध्ये प्रवेश केला आहे. परत यांनाच प्रथम यायचे आहे. प्रथम नंबरची आत्मा शेवटी येते, शेवटची परत प्रथम जाते. हे पण समजावून सांगावे लागते. पहिल्या नंबरची आत्मा आल्यानंतर कोण येते? मम्मा. त्यांची भूमिका पण पाहिजे. मम्मानी खूप जणांना ज्ञान दिले आहे. मग तुम्हा मुलांमध्ये नंबरानुसार आहेत, जे खूप जणांना शिकवितात, ज्ञान देतात. मग ते शिकणारे पण प्रयत्न करतात आणि शिकवणाऱ्या पेक्षा उंच पद प्राप्त करतात. खूप सेंटर मध्ये असे पण आहेत जे शिकविणाऱ्या शिक्षिके पेक्षा पुढे जातात. प्रत्येकाला पाहिले जाते. सर्वांच्या वर्तणुकीतून समजते ना, कोणा-कोणाला तर माया अशी नाकाला पकडते कि, जी एकदम हरवून टाकते. विकारात जातात. पुढे जाऊन तुम्ही आशा बातम्या खूप ऐकाल. आश्चर्य वाटेल, हे तर आम्हाला ज्ञान देत होते, मग यांनी बाबाचा हात कसा सोडला. आम्हाला म्हणत होते पवित्र बना आणि स्वतः पतित बनले. समजतील तर जरूर ना. खूपच पतित बनतात. बाबांनी सांगितले आहे कि मोठे मोठे चांगले महारथींना सुद्धा माया पूर्ण हरवते. जसे तुम्ही मायाला हरवून विजय प्राप्त करता,माया सुद्धा युद्ध करते. बाबांनी किती चांगली चांगली श्रेष्ठ, मजेशीर नावे ठेवली होती, परंतु अहो माया, आश्चर्यवत ऐकतात, दुस-यांना ज्ञान देतात, परत ज्ञान सोडून जातात. माया किती जबरदस्त आहे, त्यामुळे खूप खबरदार राहायला पाहिजे. युद्धाचे मैदान आहे ना. माया सोबत तुमची किती मोठे युद्ध आहे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) येथेच कर्माचा हिशोब पूर्ण करून २५०० वर्षासाठी सुख जमा करायचे आहे. या जुन्या दुनियेशी बुद्धी लावायची नाही.या डोळ्यांनी जे काही पाहता ते सर्व विसरायचे आहे.

२) माया खूप जबरदस्त आहे तिच्या पासून खबरदार राहायचे आहे. अभ्यासामध्ये जास्त गतीने पुढे जायचे आहे. एका बाबांचेच ऐकायचे आहे, आणि ऐकून दुसऱ्यांना सांगायचे आहे.

वरदान:-
नेहमी एकरस मूड द्वारे सर्व आत्म्यांना सुख शांती प्रेमची ओजंळ देणारे महादानी भव.

तुम्हा मुलांची आवस्था नेहमी आनंदाची एकरस असावी, कधी मूड ऑफ, कधी मूड खूप आनंदी... असे नाही. नेहमी महादानी बनणाऱ्याचा मूड कधी बदलत नाही देवता बनणारे म्हणजे देणारे तुम्हाला कोणी काहीही दिले, परंतु तुम्ही महादानी मुले सर्वाना सुखाची ओजंळ, शांतीची ओजंळ, प्रेमाची ओजंळ द्या. शरीराच्या सेवे सोबत मानाने अशा सेवेमध्ये व्यस्त रहा तर दुहेरी पुण्य जमा होईल.

बोधवाक्य:-
आपली विशेषता प्रभू प्रसाद आहे, याला फक्त स्वतःसाठीच वापरू नका, वाटा आणि वाढावा.