10-11-2019 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
06.03.1985 ओम शान्ति
मधुबन
"
संगमयुगउत्सवाचेयुगआहे,ब्राह्मणजीवनउत्सवाचेजीवनआहे"
आज सर्वश्रेष्ठ
पवित्र,सर्वोच्च बाबा, आपल्या पवित्र आणि आनंदी हंसा सोबत होळी साजरी करण्यासाठी आले
आहेत.त्रिमूर्ती बाबा तीन प्रकारच्या होळीचे दिव्य रहस्य ऐकवण्यासाठी आले आहेत.तसे
तर संगमयुग पवित्र युग आहे,उत्साहाचे युग आहे.तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांचा प्रत्येक
दिवस, प्रत्येक क्षण उत्साहाने संपन्न आहे.अज्ञानी आत्मे स्वतःला उत्साहा मध्ये
आणण्यासाठी उत्सव साजरे करतात परंतु तुम्ही श्रेष्ठ आत्म्या साठी हे ब्राह्मण जीवनच
उत्साहाचे जीवन आहे.उमंग, खुशी द्वारे भरलेले जीवन आहे म्हणून संगम युग उत्साहाचे
युग आहे.ईश्वरीय जीवन नेहमीच उमंग उत्साहाचे जीवन आहे,नेहमीच खुशीमध्ये नाचत
ज्ञानाचे शक्तिशाली अमृत पीत, सुखाचे गीत गात, मनापासून स्नेहाचे गीत गात, आपले
श्रेष्ठ जीवन व्यतीत करत आहात.अज्ञानी एक दिवस सण साजरा करतात,अल्पकाळ उत्साहा मध्ये
येतात परत जसेच्या तसेच बनतात.तुम्ही उत्सव साजरा करत पवित्र बनतात आणि दुसऱ्यांना
पण पवित्र बनवतात.ते फक्त साजरे करतात,तुम्ही साजरे करत करत तसे बनतात.लोक तीन
प्रकारे होळी साजरी करतात,एक जाळण्याची होळी,दुसरी रंग लावण्याची होळी,तिसरी मंगल
मिलन करण्याची होळी.या तिन्ही होळी अध्यात्मिक रहस्याने भरलेल्या आहेत परंतु ते
स्थूल रूपामध्ये होळी साजरी करतात.या संगम युगामध्ये तुम्ही महान आत्मे,जेव्हा
बाबाचे बनतात म्हणजेच पवित्र बनतात,तर प्रथम काय करतात,प्रथम सर्व जुन्या सभाव
संस्काराला योग अग्नी द्वारे भस्म करतात अर्थात जाळतात.त्याच्यानंतर च आठवणी द्वारे
बाबाच्या सोबतचा रंग लागतो.तुम्ही पण प्रथम जाळणारी होळी साजरे करत होते,परत
प्रभूच्या संगती च्या रंगांमध्ये रंगून जातात अर्थात बाप समान बनतात.बाबा ज्ञानाचे
सागर तर,मुलं पण संगतीच्या रंगामध्ये ज्ञान स्वरूप बनतात.जे बाबांचे गुण ते मुलांचे
पण गुण होतात.ज्या बाबांच्या शक्ती आहेत,ते तुमचा खजाना बनतो,तुमची संपत्ती बणुन
जाते.तर संगतीचा रंग असा अविनाशी लागतो, जो जन्म जन्मतंरासाठी अविनाश रंग बणुन जातो.
जेव्हा संगतीचा रंग लागतो तर आत्मीक रंगाची होळी साजरी करतात.तर आत्मा आणि
परमात्माचा, पिता आणि मुलांच्या श्रेष्ठ मिलन चा मेळा सदा होत राहतो. अज्ञानी
आत्म्याने पण, तुमच्या या आत्मिक होळीला आठवणीच्या रूपामध्ये साजरे करणे सुरू केले
आहे. तुमच्या प्रत्यक्ष उत्साह भरलेल्या जीवनाच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये आठवण
करून,अल्प काळासाठी खुश होतात.प्रत्येक पाऊला मध्ये,तुमच्या श्रेष्ठ जीवनामध्ये ज्या
विशिष्ट प्राप्ती झाल्या आहेत, त्यांची आठवण करून अल्पकाळासाठी सुद्धा आनंद व्यतीत
करतात.ही आठवण पाहून किंवा ऐकून,तुम्ही पण आनंदित होतात ना, की आमच्या विशेषतांचे
यादगार आहेत.तुम्ही मायेला जाळले आणि ते होळी बनवून जाळतात. इतक्या रमणिक गोष्टी
बनवल्या आहेत, ऐकून तुम्हाला हसू येते की, आमच्या गोष्टीला त्यांनी कोणते रूप दिले
आहे. होळीचा उत्सव आपल्या वेगवेगळ्या प्राप्तीच्या आठवणी मध्ये साजरे करतात.तुम्ही
आत्ता नेहमी खुश राहतात,खुशीच्या प्राप्तीची यादगार म्हणून खुश होऊन होळी
करतात.त्यावेळेस सर्व दुःख विसरतात आणि तुम्ही सदा काळासाठी दुःख विसरले
आहात.तुमच्या खुशीच्या प्राप्तीची आठवण म्हणून होळी साजरी करतात.होळीच्या दिवशी
सर्व लहान मोठे एकत्रित राहून अगदी आनंदात होळी साजरी करतात.त्यादिवशी सर्वांचा मूड
एकदम चांगला असतो, हे तुमच्या डबल लाईट बनण्याची आठवण आहे.जेव्हा प्रभूच्या
संगतीच्या रंगांमध्ये रंगतात, तर डबल लाईट बनतात. तर या विशेषताची आठवण आहे. यादिवशी
लहान-मोठे कोणत्याही संबंधाचे,एक सारख्या स्वभाव मध्ये राहतात. जरी लहान नातू असला
तरी,आजोबाला रंग लावेल.सर्व संबंधाचे,लहान-मोठ्याचे भान विसरतात, एकाच समान
भावामध्ये येतात,हे पण तुमच्या विशेष समान भाव अर्थात भावाभावाचे स्थितीमध्ये आणि
कोणत्याही देहाच्या संबंधाची दृष्टी राहत नाही.हे भावा भावाच्या समान स्थितीची आठवण
आहे. या दिवशी वेगवेगळ्या रंगाची पिचकारी भरून, एक दोघाला रंग लावतात.ही पण या
वेळेतील तुमच्या सेवेची यादगार आहे.कोणत्या पण आत्म्याला तुम्ही दृष्टीच्या पिचकारी
द्वारे, प्रेम स्वरूप बनण्याचा रंग, आनंद स्वरूप बनण्याचा रंग, सुख शांतीचा रंग,
शक्तींचा रंग लावतात. असा रंग लावतात जो नेहमीच लागून राहतो, रंग काढुन टाकावा लागत
नाही, कष्ट घ्यावे लागत नाहीत. प्रत्येकाची इच्छा असते नेहमी या रंगांमध्ये रंगून
जावे.सर्वांच्या जवळ आत्मिक रंगाच्या आत्मिक दृष्टीची पिचकारी आहे ना.होळी खेळतात
ना.ही आत्मिक होळी, तुम्हा सर्वांच्या जीवनाची आठवण आहे. अशाप्रकारे बापदादा शी
मंगल मिलन साजरे केले.ज्यामुळे बाप समान बनतात.असे मंगल मिलन साजरे केले,ज्यामुळे
एकत्र स्वरुप बनले,जे कोणी वेगळे करू शकत नाही.
हा दिवस झालेल्या गोष्टींना विसरण्याचा पण दिवस आहे.६३ जन्माच्या गोष्टींना तुम्ही
विसरतात ना. झालेल्या गोष्टीला बिंदू लावतात म्हणून होळीला झालेल्या गोष्टीला बिंदू
लावण्यासाठी पण साजरी करतात.कोणतीही दुश्मनी असेल,तरीही या दिवशी सर्व विसरून
एकमेकाशी भेटतात. तुम्हीपण आत्म्याचे दुश्मन जे आसुरी संस्कार, आसुरी स्वभाव विसरून
प्रभु मिलन केले ना. संकल्प मात्र पण,जुने संस्कार,स्मृती यायला नको. हे पण तुमच्या
विसरण्याच्या विशेषता चे यादगार साजरे करतात,तर ऐकले तुमच्या किती विशेषता
आहेत.तुमच्या प्रत्येक विशेषताचे कर्माचे, वेगवेगळे यादगार बनवले आहेत.ज्यांच्या
प्रत्येक कर्माचे यादगार आहेत,त्यांची आठवण करून खुशी मध्ये येतात, तर ते स्वत:किती
महान असतील, समजले. तुम्ही कोण आहात? पवित्र तर आहात परंतु खूप विशेष पण आहात.
डबल परदेशी जरी या आपल्या श्रेष्ठताच्या यादगार ला जाणत नसले परंतु तुमच्या आठवणीचे
महत्व दुनियावाले आठवण करून यादगार साजरे करत आहेत. समजले होळी काय असते,तुम्ही तर
सर्व रंगांमध्ये रंगलेले आहात. असेच प्रेमाच्या रंगांमध्ये रंगलेले आहात,जे
बाबांच्या शिवाय दुसरे कोणी दिसत नाही.स्नेहा मध्येच खातात,पितात, चालतात,गातात,
नाचत राहतात.पक्का रंग लागलेला आहे ना,की कच्चा लागलेला आहे. कोणता रंग लागलेला आहे
कच्चा की पक्का. झालेल्या गोष्टीला विसरले ना.चुकून पण जुन्या गोष्टी आठवणीत यायला
नको,असे म्हणतात ना, काय करायचे, हे चुकीने येतात.नवीन जन्म,नवीन गोष्टी, नवीन
संस्कार, नवीन दुनिया, हा ब्राह्मणांचा संसार पण, नवीन संसार आहे,ब्राह्मणांची भाषा
नवीन आहे,आत्म्याची भाषा नवीन आहे ना. ते काय म्हणतात आणि तुम्ही काय म्हणतात.
परमात्माच्या प्रती पण नवीन गोष्टी आहेत, तर भाषा पण नवीन, सबंध संपर्क नवीन, सर्व
नवीनच झाले ना. जुने समाप्त झाले, नवीन सुरू झाले. नवीन गीत गातात ना, जुने नाही.
का? कसे? हे जुने गित आहेत. आहा, वाह,ओहो नवीन गित आहेत. तर कोणते गीत गातात, हाय
हाय चे गीत तर नाहीत ना गात. हाय हाय करणारे दुनिया मध्ये तर खूप आहेत, तुम्ही
नाहीत. तर अविनाशी होळी साजरी केली, म्हणजेच झालेल्या गोष्टी ना विसरून संपूर्ण
पवित्र बनले. बाबाच्या संगतीच्या रंगामध्ये रंगले तर होळी साजरी केली ना. सदा बाबा
आणि मी सोबत आहोत आणि संगमयुगात नेहमीच सोबत राहू,वेगळे होऊ शकत नाही.तर असा उमंग
ऊत्साह मनामध्ये आहे ना, मी आणि माझे बाबा, कि पडद्याच्या पाठीमागे तिसरे पण कोणी
आहे. कधी उंदीर, कधी मांजर तर येत नाही ना. सर्व समाप्त झाले,जेव्हा बाबा मिळाले तर
सर्व काही मिळाले. बाकी काहीच राहत नाही.न संबंधी राहतात, ना खजाना राहतो,न शक्ती न
गुण राहतात,न आत्मज्ञान राहते. कोणती प्राप्ती राहते.तर बाकी आणखी काय पाहिजे,यालाच
म्हटले जाते होळी साजरी करणे,समजले.
तुम्ही लोक खूप आनंदात राहतात, बेफिक्र बादशहा,विना कवडीचे बादशहा,बेगमपूर चे बादशहा.
अशा नशे मध्ये कोणी राहू शकत नाही. दुनियाचे साहुकार असतील, दुनिया मध्ये प्रसिद्ध
व्यक्ती असतील, अनेक ग्रंथ वादी वेदांचा अभ्यास करणारे असतील,नवविध भक्ती करणारे
असतील, नंबर एक वैज्ञानिक असतील ,कोणत्या पण व्यवसायाचे असतील परंतु असे आनंदाचे
जीवन होऊ शकत नाही.ज्यामध्ये कष्ट नाही,प्रेमच प्रेम आहे, चिंता नाही परंतु
शुभचिंतक आहात, शुभचिंतन आहे. अशा मौजच्या जीवनामध्ये, साऱ्या विश्वामध्ये चक्कर
लावून या, जर कोणी मिळाले तर घेऊन या, म्हणून गीत गाता,मधुबन मध्ये बाबाच्या
संसारामध्ये आनंदच आनंद आहे. खा तरी आनंद, झोपा तरी आनंद, गोळ्या घेऊन झोपण्याची
आवश्यकता नाही. बाबांच्या सोबत बुद्धीने विश्राम करा तर गोळी पण घ्यावी लागणार नाही,
एकटे झोपतात तर म्हणतात, उच्च रक्तदाब आहे,दुःख आहे, तेव्हा गोळी घ्यावी लागते. बाबा
सोबत आहेत, बस बाबांची आठवण आहे, ही आहे गोळी.अशी पण परत वेळ येईल, जसे सुरुवातीला
औषधे चालत नव्हती, आठवण आहे ना, यज्ञाच्या सुरुवातीला औषध पण नव्हते, होय थोडे मलई,
लोणी खाऊ घातले. औषधे खाऊ घातली नाही, तर जसे सुरुवातीला सवय लावली, तसे तर जुने
शरीर होते.अंत काळामध्ये पण,सुरुवातीच्या दिवसाची पुनरावृत्ती होईल, साक्षात्कार पण
अनेकांना खूपच होत राहतील.अनेकांची इच्छा आहे ना, साक्षात्कार व्हावेत.अंत
काळापर्यंत जे पक्के असतील,त्यांना साक्षात्कार होतील परत तीच संघटनाची भट्टी
होईल.सेवा पूर्ण होऊन जाईल,आता सेवांमुळे इकडे तिकडे गेलेले आहात परत सर्व नद्या
सागरामध्ये सामावून जातील, परंतु वेळ नाजूक असेल. साधन असताना पण कामामध्ये येणार
नाहीत, म्हणून बुद्धीची लाईन खूपच स्पष्ट पाहिजे. जाणीव होईल आता काय करायचे आहे,
एक सेकंद पण उशीर केला, तर गेले. जसे तिथे पण बटन दाबण्यात एक सेकंद जरी उशीर केला
तर, परिणाम काय होईल? तसेच इथे पण एक सेकंद जाणीव होण्यामध्ये उशीर केला तर मधुबन
ला पोहोचणे मुश्कील होईल.ते लोक खूपच लक्ष देऊन बसतात, हे तर बुद्धीची टचींग संकेत
आहे. जसे सुरुवातीला घरबसल्या आवाज आला, बोलावणे आले की, या,पोहोचा.आत्ताच निघा,तर
लगेच निघाले ना.असेच अंत काळात पण बाबांचा आवाज पोहचेल.जसे साकार मध्ये सर्व मुलांना
बोलवले,तसेच आकार रूपामध्ये पण सर्व मुलांना तुम्ही निघा लवकर, या, असे आव्हान
करतील. बस यायचे आणि सोबत जायचे आहे, अशी आपली बुद्धी स्पष्ट व्हावी आणि दुसरीकडे
कुठे लक्ष नको. जर दुसरीकडे लक्ष गेले तर बाबांचा आवाज, बाबांचे आव्हान ऐकू शकणार
नाहीत. हे सर्व होणारच आहे.
शिक्षक विचार करत आहात,आम्ही तर पोहचुन जाऊ. हे पण होऊ शकते, तुम्हाला तिथेच
बाबांच्या सूचना मिळतील.तेथे काही विशेष कार्य पण असेल. तेथे दुसऱ्यांना पण शक्ती
द्यायची असेल, सोबत घेऊन जायचे असेल.हे पण होईल परंतु बाबांच्या सूचनेप्रमाणे
राहिल.ममता द्वारे नाही, लगावा द्वारे नाही, हाय माझे सेवा केंद्र, हे पण आठवणीत
यायला नको. आमच्या जिज्ञासू ला पण सोबत घेऊन जाऊ,हा अन्याय आहे,मदतगार आहे, असे पण
नाही. कोणासाठी जर थांबले तर तुम्ही पण येऊ शकणार नाहीत.असे तयार आहात, ना यालाच
म्हटलं जातं,नेहमी तयार. नेहमीच सर्वकाही समेटुन घेतलेले पाहिजे.त्या वेळेत समेटनेचा
संकल्प पण येणार नाही,हे करायला पाहिजे, हे करू.साकार मध्ये आठवणीत आहे ना, जी
सेवाधारी मुलं होती, त्यांच्या बॅग नेहमीच तयार होत्या. रेल्वे पोहोचण्यासाठी पाच
मिनिट आहेत आणि सूचना मिळत होत्या की आता इकडे या.सामान तयार राहत होते ना.स्टेशन
वर पोहोचले रल्वे ऊभीच होती आणि जात आहेत, असा पण अनुभव केला ना. ही पण मनाची स्थिती
आहे,या मध्ये सामान तयार ठेवा. बाबांनी बोलवलं आणि मुलं हजर झाले,याला म्हणतात सदा
तयार,अच्छा. अशा संगतीच्या रंगामधे नेहमी रंगलेले, झालेल्या गोष्टींना विसरून
वर्तमान आणि भविष्य श्रेष्ठ बनवणारे, परमात्मा मिलन करणारे, प्रत्येक कर्म
आठवणीमध्ये राहून करणारे, अर्थात कर्म यादगार बनवणारे, सदा खुशी मध्ये नाचत-गात
संगमयुगाचा आनंद घेणारे, असे बाप समान, बाबांच्या प्रत्येक संकल्पाला कार्या मध्ये
आणनारे नेहमी बुद्धी श्रेष्ठ आणि स्पष्ट ठेवणारे, अशा पवित्र आनंदी हंसाना, बाप
दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
बापदादांनीसर्वमुलांच्यापत्रांनाउत्तरदेतहोळीच्याशुभेच्छादिल्या.
चोहोबाजूच्या देश-विदेशातील सर्व मुलांचे स्नेहपूर्ण आणि कुठेकुठे आपल्या पुरुषाच्या
प्रतिज्ञा केलेले पत्र आणि संदेश बाप दादांना मिळाले.बपदादा सर्व पवित्र हंसाना
नेहमीच, "जसे बाबा तसा मी" या स्मृतीचा विशेष सुविचार रूपामध्ये आठवण करून देत आहेत.
कोणते पण कार्य करत,संकल्प करत, प्रथम तपासा बाबांचा संकल्प आहे, तोच माझा संकल्प
आहे, जे बाबांचे कर्म तेच माझे कर्म आहे?सेकंदांमध्ये चेक करा आणि प्रत्यक्षामध्ये
आणा तर सदा बाप समान शक्तिशाली आत्मा बनवून सफलतेचा अनुभव कराल. सफलता जन्मसिद्ध
अधिकार आहेच, सफलते ची सफलता नेहमीच गळ्यामध्ये आहे, अर्थात प्रत्येक जन्मामध्ये
अनुभव करत रहाल. बाप दादा आज,या होळीच्या संघटनांमध्ये तुम्हा सर्व आत्म्याला
सन्मुख पाहत आहेत आणि मिलन करत आहेत.स्नेहा द्वारे सर्वांना पाहत आहेत. सर्वांच्या
विशेषता चे वेगवेगळे सुगंध घेत आहेत. खूपच गोड सुगंध प्रत्येकाच्या विशेषते च्या
आहेत. बाबा प्रत्येक विशेष आत्म्यांना विशेषतेला पाहून हेच गीत गातात, हा माझा मुलगा
पद्मापदम भाग्यशाली मुलगा आहे. तर सर्व आपापल्या विशेषता आणि नावासहित सन्मुख
स्वतःला अनुभव करत प्रेमपूर्वक आठवण स्वीकार करा आणि नेहमी बाबांच्या छत्रछाया मध्ये
रहा, घाबरू नका. लहान गोष्ट आहे, मोठी गोष्ट नाही. लहान गोष्टींना मोठी करू नका.
मोठ्या गोष्टीला लहान करा. श्रेष्ठ रहाल तर मोठी गोष्ट छोटी होईल, खाली रहाल तर छोटी
पण मोठी होईल म्हणून बापदादा नेहमी सोबत आहेत त्यांचा हात माझ्या हातात आहे तर घाबरू
नका उडते कला द्वारे सेकंदांमध्ये सर्व पार्क बाबांचे सोबत आहे तर सुरक्षा हेच अच्छा
सर्व फार फार वर्षानंतर भेटलेल्या लाडक्या मुलांना बाप दादा होळीच्या शुभेच्छा देत
आहेत परत सर्व मुलासोबत होळी साजरी केली तसेच पिकनिक केली.
वरदान:-
श्रेष्ठपिताआणिश्रेष्ठकार्ययास्मृतीद्वारेशक्तिशालीभव.
जसे आजकालच्या
दुनिया मध्ये कोणी महत्वाच्या व्यक्तीचा मुलगा असेल तर तो पण स्वतःला महत्वाचा
व्यक्ती समजतो,परंतु बाबा पेक्षा महत्त्वाचा कोणीही नाही. आम्ही अशा श्रेष्ठ ते
श्रेष्ठ पित्याची मुल आहोत. श्रेष्ठ मुला आहोत ही स्मृती शक्तिशाली बनवते श्रेष्ठ
पिता आणि श्रेष्ठ कार्य या स्मृतीमध्ये राहणारे नेहमी बाप समान बनतात. विश्वाच्या
पुढे श्रेष्ठ आणि उच्च तुमच्या शिवाय कोणी होऊ शकत नाही, म्हणून तुमचे गायन आणि
पूजन होते.
सुविचार:-
संपूर्णता
चारच्या मध्ये सूक्ष्म लगावला तपासून पहा आणि त्यापासून मुक्त बना शांती