05-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, तुमचे काम आहे, स्वत:शी गोष्टी करुन पावन बनणे, दुसऱ्या आत्म्यांच्या
चिंतनामध्ये आपला वेळ वाया घालवू नका”
प्रश्न:-
कोणत्या
गोष्टीमध्ये बुध्दी गेली तर सर्व जुन्या सवयी सुटतील?
उत्तर:-
आम्ही बेहदच्या
पित्याची संतान आहोत, तर विश्वाचे मालक झालो, आम्हाला देवता बनायचे आहे, ही गोष्ट
बुध्दीमध्ये आली तर सर्व जुन्या सवयी नष्ट होतील. तुम्ही सांगा किंवा नका सांगू,
स्वत:च सोडून देतील. उल्टे सुल्टे खान पान, दारु इ. स्वत:च सोडून देतील. वाह!
आम्हाला तर लक्ष्मी नारायण बनायचे आहे, असे म्हणतील. 21 जन्माचे राज्य भाग्य मिळत
आहे, तर का नाही पवित्र राहायचे?
ओम शांती।
बाबा सारखे सारखे मुलांचे ध्यान आकर्षित करतात की बाबांच्या आठवणीमध्ये बसले आहात?
बुध्दी दुसरी कडे तर नाही जात ना. बाबांना यासाठीच बोलवतात की येऊन आम्हाला पावन
बनवा. पावन तर जरुर बनायचे आहे आणि ज्ञान तर तुम्ही कोणाला पण समजावू शकतात. हे
सृष्टी चक्र कसे फिरते, कोणालाही तुम्ही समजावू शकता, तर ते लगेच समजतील. जरी
पवित्र राहत नाहीत तरी ज्ञान तर समजतील ना. कोणतीच मोठी गोष्ट नाही. 84 चे चक्र आणि
प्रत्येक युगाचे आयुष्य इतके आहे, इतके जन्म होतात. किती सहज आहे. याचा संबंध
आठवणीशी नाही, हे तर शिक्षण, अभ्यास आहे. बाबा तर यर्थाथ गोष्टी समजवतात. बाकी
सतोप्रधान बनण्याची गोष्ट आहे. ते आठवणीद्वारेच होतील. जर आठवण करणार नाहीत तर खुप
छोटे पद प्राप्त होईल. इतके उच्च पद मिळणार नाही, म्हणून लक्ष्य दया असे म्हणतात.
बुध्दीचा योग बाबांच्या सोबत हवा. यालाच प्राचीन योग म्हणले जाते. शिक्षकाबरोबर
प्रत्येकाचा योग असतोच. मुख्य गोष्ट आठवण करण्याची आहे. आठवणीच्या यात्रेद्वारे
सतोप्रधान बनायचे आहे आणि सतोप्रधान बनून वापस घरी जायचे आहे. बाकी ज्ञान तर खुपच
सहज आहे. कोणी मुलगा पण सहज समजू शकतो. मायेचे युध्द आठवण करतानाच चालते. तुम्ही
बाबांची आठवण करतात आणि माया परत आपल्याकडे आकर्षित करते. असे म्हणत नाहीत की
माझ्यामध्ये तर शिवबाबा बसले आहेत, मी शिव आहे. नाही, मी तर आत्मा आहे, शिवबाबांची
आठवण करायची आहे. असे नाही माझ्यामध्ये शिवबाबांची प्रवेशता आहे. असे होऊ शकत नाही.
बाबा म्हणतात मी कोणामध्ये जात नाही. मी तर ब्रह्माच्या रथामध्ये सवार होऊन तुम्हा
मुलांना समजावतो. होय कोणी बुध्दू मुलं आहेत आणि कोणी चांगले जिज्ञासू आले आहेत तर
त्यांच्या सेवा अर्थ, मी प्रवेश करुन दृष्टी देऊ शकतो. सदैव बसत नाही. बहुरुप धारण
करुन कोणाचेही कल्याण करतो. असे कोणी म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये शिवबाबांची
प्रवेशता आहे, मला शिवबाबा असे म्हणतात. नाही, शिवबाबा तर मुलांनाच समजवतात. मुख्य
गोष्ट आहे पावन बनण्याची, ज्यामुळे पावन दुनियेत जाऊ शकतील. 84 चे चक्र पण खुपच सहज
समजवतात. चित्र समोर लावले आहेत. बाबा शिवाय तर हे ज्ञान कोणी देऊ शकत नाहीत.
आत्म्यालाच हे ज्ञान मिळते. त्यालाच ज्ञानाचा तिसरा नेत्र म्हणले जाते. आत्म्यालाच
सुख दु:ख होते, त्यांचे हे शरीर आहे ना. आत्माच देवता बनते. कोणी वकिल, कोणी
व्यापारी आत्माच बनते. तर बाबा आत्म्याशी गोष्टी करतात, आपली ओळख देतात. तुम्ही
जेव्हा देवता होते, तर मनुष्यच होते, परंतू पवित्र आत्मे होते. आता तुम्ही पवित्र
नाहीत म्हणून तुम्हाला देवता म्हणू शकत नाहीत. देवता बनण्यासाठी पवित्र जरुर बनायचे
आहे. त्यासाठी बाबांची आठवण करायची आहे. सहसा असे म्हणतात, बाबा देहअभिमान आल्यामुळे
माझ्याकडून ही चुक झाली. बाबा सन्मुख समजवतात, मुलांनो पावन जरुर बनायचे आहे.
कोणतेच विकर्म करु नका. तुम्हाला सर्वगुण संपन्न येथेच बनायचे आहे. पावन बनल्यामुळे
मुक्तीधाममध्ये चालले जाल. दुसरे कोणतेच प्रश्न विचारायची आवश्यकता नाही. तुम्ही
स्वत:शी गोष्टी करा, दुसऱ्या आत्म्याचे चिंतन करु नका. लढाईमध्ये दोन कोटी मनुष्य
मारले गेले, असे म्हणतात. इतके आत्मे कोठे गेले? अरे ते कुठेही गेले असतील, तुमचे
काय जाते. तुम्ही आपला वेळ का वाया घालवता? दुसरी कोणतीच गोष्ट विचारायची आवश्यकता
नाही. तुमचे काम आहे, पावन बनुन पावन दुनियेचे मालक बनणे. दुसऱ्या गोष्टीमध्ये
गेल्यामुळे संभ्रम निर्माण होईल. कोणाला समर्पक उत्तर दिले नाही तर संशयीत होतात.
बाबा म्हणतात मनमनाभव देहसहित देहाचे सर्व संबंध सोडा, माझ्याजवळच तुम्हाला यायचे
आहे. मनुष्य मरतात, जेव्हा स्मशानात घेऊन जातात तर गावाकडे तोंड आणि पाय स्मशानाकडे
ठेवतात आणि परत स्मशानाजवळ पोहचतात तर पाय गावाकडे आणि तोंड स्मशानाकडे करतात. तुमचे
पण घरावरती आहे ना. वरती पतित कोणी जाऊ शकत नाहीत. पावन बनण्यासाठी बुध्दीचा योग
बाबांसोबत लावायचा आहे. बाबांच्यजवळ मुक्तीधाममध्ये जायचे आहे. पतित आहेत म्हणून
बोलवतात की आम्हा पतितांना येऊन पावन बनवा, मुक्त करा. तर बाबा म्हणतात आता पवित्र
बना. बाबा ज्या भाषामध्ये समजवतात, त्याच भाषेमध्ये कल्प कल्प समजवतात. जी भाषा
यांची असेल त्याच मध्ये समजावतील ना. आजकाल हिंदी खुप चालते, असे नाही की भाषा बदलू
शकते. नाही, संस्कृत भाषा इ. देवतांची नसते. हिंदू धर्माची संस्कृत नाही, हिंदीच
पाहिजे. परत संस्कृत का उठवतात? तर बाबा समजवतात. येथे जेव्हा बसतात तर बाबांच्या
आठवणीमध्ये बसायचे आहे आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ नका. इतके मच्छर
मरतात, कुठे जातात? भुकंपामध्ये खुप मरतात, आत्मे कुठे जातात? यामुळे तुमचे काय जाते?
तुम्हाला बाबांनी श्रीमत दिली आहे की, आपल्या प्रगती साठी पुरुषार्थ करा.
दुसऱ्याच्या चिंतनमध्ये जाऊ नका. तसे तर अनेक गोष्टीचे चिंतन होईल. बस तुम्ही माझी
आठवण करा, ज्यासाठी बोलवले आहे, त्या युक्तीमध्ये चाला. तुम्हाला बाबांकडून वारसा
घ्यायचा आहे, दुसऱ्या गोष्टीमध्ये जायचे नाही म्हणून बाबा घडी घडी म्हणतात लक्ष्य
दया. कुठे बुध्दी तर जात नाही. भगवंताची श्रीमत तर मानायला पाहिजे ना. दुसऱ्या
कोणत्या गोष्टीमध्ये फायदा नाही. मुख्य गोष्ट आहे पावन बनण्याची. हे पक्के
आठवणीमध्ये ठेवा, आमचे बाबा, बाबा पण आहेत, शिक्षक पण आहेत, धर्मस्थापक पण आहेत. हे
जरुर मनामध्ये ठेवा की बाबा पिता पण आहेत, आम्हाला ज्ञान देतात. आणि योग पण शिकवतात.
शिक्षक शिकवतात तर बुध्दीचा योग शिक्षकामध्ये आणि अभ्यासामध्ये जातो. बाबा पण
म्हणतात, तुम्ही पित्याचे तर बनले आहात. मुलं तर आहातच, तेव्हा तर येथे बसले आहत.
शिक्षकांकडून शिकत आहात. कुठे पण राहता, बाबांचे तर आहातच परत अभ्यासामध्ये लक्ष
दयायचे आहे. शिवबाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही सतोप्रधान बनाल.
हे ज्ञान दुसरे कोणी देऊ शकत नाही. मनुष्य तर अज्ञान अंधारामध्ये आहेत ना.
ज्ञानामध्ये पहा किती ताकत आहे. ताकत कोठून मिळते, बाबांकडून ताकत मिळते ज्याद्वारे
तुम्ही पावन बनतात. परत ज्ञान पण सहज आहे. त्या शिक्षणामध्ये तर खुप वर्ष लागतात.
येथे तर सात दिवसाचा कोर्स आहे. याद्वारे तुम्ही सर्व काही समजता, तरी पण बुध्दीवरती
आधारीत आहे. कोणी जास्त वेळ घेतात, कोणी कमी. कोणी तर 2-3 दिवसातच चांगल्या रितीने
समजतात. मुख्य गोष्ट आहे बाबांची आठवण करणे, पवित्र बनणे. त्यामध्येच कष्ट आहेत.
बाकी ज्ञान तर खुपच सहज आहे. स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. एक दिवसाच्या कोर्स,
शिबारामध्ये पण सर्व काही समजू शकते. आम्ही आत्मा आहोत, बेहद पित्याची संतान आहोत
तर जरुर आम्ही विश्वाचे मालक झालो. हे बुध्दीमध्ये येते ना. देवता बनायचे आहे तर
दैवीगुण पण धारण करायचे आहे, ज्यांच्या बुध्दीमध्ये आले ते लगेच जुन्या सवयी सोडतील.
तुम्ही सांगा नाहीतर नका सांगू, स्वत:हुनच सोडतील. उल्टे सुल्टे खान पान दारु इ.
स्वत:च सोडतील, आम्हाला लक्ष्मी नारायण सारखे बनायचे आहे, 21 जन्मासाठी राज्य भाग्य
मिळत आहे, तर का नाही पवित्र राहायचे? आठवणीमध्येच राहायला पाहिजे. मुख्य गोष्ट आहे
आठवणीची यात्रा. बाकी 84 च्या चक्राचे ज्ञान तर एका सेकंदामध्ये मिळते. पाहताच समजते,
नविन झाड तर जरुर लहान असेल. आता तर मोठे झाड तमोप्रधान बनले आहे. वुद्या परत नविन
बनेल. तुम्ही जाणतात, हे ज्ञान कधी, कोठे पण मिळू शकत नाही. हे शिक्षण आहे, प्रथम
धडा मिळतो की शिवपित्याची आठवण करा. बाबा शिकवतात, हा निश्चय करा. भगवानुवाच, मी
तुम्हाला राजयोग शिकवतो. दुसरे कोणी मनुष्य असे म्हणू शकत नाही. शिक्षक शिकवतात, तर
जरुर शिक्षकाची आठवण कराल ना. बेहदचे पिता पण आहेत, बाबा आम्हाला स्वर्गाचे मालक
बनवतात. परंतू आत्मा पवित्र कशी बनेल, हे कोणी सांगू शकत नाही. जरी स्वत:ला भगवान
म्हणा किंवा काहीही म्हणा, परंतू पावन बनवू शकत नाही. आजकाल तर स्वत:ला भगवान
म्हणून घेणारे तर खुप आहेत. मनुष्य संभ्रमित झाले आहेत. अनेक धर्म निघाले आहेत,
माहिती होत नाही की बरोबर काय आहे. जरी तुमच्या प्रदर्शनीमध्ये किंवा संग्रहालयाचे
उद्घाटन करतात परंतू समजत काहीच नाहीत. वास्तवमध्ये उद्घाटन तर झालेच आहे. प्रथम
पाया तयार होतो, परत जेव्हा इमारत बनते तेव्हा उद्घाटन होते. पाया भरणी करण्यासाठी
बोलवले जाते. ते पण बाबांनी स्थापन केली आहे, बाकी नविन दुनियेचे उद्घाटन तर झालेच
आहे, त्यामध्ये कोणी उद्घाटन करण्याची आवश्यकता नाही. उद्घाटन तर स्वत:च होऊन जाईल.
येथे अभ्यास करुन परत आम्ही नविन दुनियेत चालले जाऊ.
तुम्ही समजतात आता आम्ही स्थापना करत आहोत, ज्यासाठी एवढी मेहनत करायची असते. विनाश
होईल परत ही दुनियाच बदलून जाईल. परत तुम्ही नविन दुनियेत राज्य करण्यासाठी याल.
सतयुगाची स्थापना बाबांनी केली परत तुम्हाला स्वर्गाची राजधानी मिळेल. बाकी उद्घाटन
कोण करेल? बाबा तर स्वर्गामध्ये येत नाहीत. पुढे चालुन पहाल, स्वर्गामध्ये काय काय
असते? पुढे चालुन समजतजाईल.तुम्हीमुलंजाणता,
पवित्रताशिवायचांगल्यागुणांनीपासहोऊनआम्हीस्वर्गामध्येजाऊशकतनाही.श्रेष्ठपदपणमिळवूशकतनाही,
म्हणूनबाबाम्हणतात.तुम्हीखुपपुरुषार्थकरा.धंदाइ.पणकरापरंतूजास्तीपैसेकाय करणर? खाऊ
तर शकणार नाही. तुमचे मुलं नातू इ. तर खाऊ शकणार नाहीत, सर्व मातीमध्ये मध्ये
मिसळून जाईल, म्हणून थोडेच जमा करा, युक्तीने. बाकी तर नविन दुनियेच्या स्थापनेसाठी
सर्व काही परिवर्तन करा, सफल करा. सर्व जण तर असे करु शकत नाहीत. गरीब लवकर सफल
करतात. भक्तीमार्गामध्ये पण ईश्वरार्थ सफल करतात, दुसऱ्या जन्मासाठी, परंतू ते
अप्रत्यक्ष आहे. हे प्रत्यक्ष आहे. पतित मनुष्यांचे पतितसोबतच देवाण घेवाण होते. आता
शिवपिता आले आहेत, तुमचे तर पतितासोबत देवाण घेवाण नाही. तुम्ही ब्राह्मण आहात,
ब्राह्मणांनाच तुम्हाला मदत करायची आहे. जे स्वत: सेवा करतात, त्यांना तर मदत
करण्याची आवश्यकता नाही. येथे गरीब साहुकार इ.सर्व येतात. बाकी करोडपती तर खुप कमी
येतात. बाबा म्हणतात, मी तर गरीब निवाज आहे. भारत खुप गरीब खंड आहे. बाबा म्हणतात,
मी येतोच भारतामध्ये, त्यामध्ये पण आबू सर्वात मोठे तिर्थ आहे, जिथे बाबा येऊन
साऱ्या विश्वाची सद्गती करतात. हा नर्क आहे. तुम्ही जाणतात नर्कापासून स्वर्ग कसा
होतो. आता तुमच्या बुध्दीमध्ये सर्व ज्ञान आहे. बाबा युक्ती अशी सांगतात, पावन
बनण्यासाठी, जे सर्वांचे कल्याण करतात. सतयुगामध्ये कोणत्या अकल्याणाची गोष्ट, रडणे,
मारणे इ. काहीच नसते. आता बाबांची जी महिमा आहे, ज्ञानाचे सागर सुखांचे सागर आहेत.
आता तुमची पण ही महिमा आहे, जी बाबांची महिमा आहे. तुम्ही पण आनंदाचे सागर बनतात,
अनेकांना सुख देतात, परत जेव्हा तुमची आत्मा संस्कार घेऊन नविन दुनियेत जाईल परत
तुमची महिमा बदलुन जाईल. परत तुम्हाला सर्वगुण संपन्न म्हणतील. आता तुम्ही
नर्कामध्ये बसले आहात. याला काट्याचे जंगल म्हणतात. बाबांना बागवान, नावाडी पण
म्हणले जाते. गायन पण आहे, आमची नाव पैल तिरावर घेऊन जावा कारण दु:खी आहोत म्हणून
तर आत्मा पुकारते. महिमा जरी गातात, परंतू समजत काहीच नाही. जे आले ते म्हणतत. उच्च
ते उच्च भगवंताची निंदा करतात. तुम्ही म्हणनार आम्ही तर आस्तिक आहोत. सर्वांचे
सद्गती दाता, जे बाबा आहेत, त्यांना आम्ही जाणले आहे. बाबांनी स्वत: परिचय दिला आहे.
तुम्ही भक्ती करत नाहीत तर किती तंग करतात. त्यांची संख्या जास्त आहे, तुमची कमी.
जेव्हा तुमची संख्या जास्त होईल तेव्हा ते पण आकर्षित होतील. बुध्दीचे कुलुप उघडेल.
अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. स्वत:च्या
प्रगतीचे चिंतन करायचे आहे, दुसऱ्या कोणत्याच गोष्टी मध्ये जायचे नाही. अभ्यास आणि
आठवणीवरती लक्ष्य दयायचे आहे. बुध्दीला भटकायचे नाही.
2. आता बाबा
प्रत्यक्षात आले आहेत म्हणून आपले सर्वकाही युक्तीने सफल करायचे आहे. पतित आत्म्याशी
देवाण घेवाण करायची नाही. चांगल्या मार्काने पास होण्यासाठी पवित्र जरुर बनायचे आहे.
वरदान:-
योगाद्वारे
उच्च स्थितीचा अनुभव करणारे डबल लाईट फरिश्ता भव
तुम्ही राजयोगी मुलं,
योगामध्ये उच्च स्थितीचा अनुभव करतात, हठयोगी परत शरीराला वरती उचलतात. तुम्ही कोठे
पण राहुन उच्च स्थितीमध्ये राहतात म्हणून योगी उच्च ठिकाणी राहतात. तुमच्या तर
स्थितीचे स्थान उच्च आहे, कारण डबल लाइट बनले. फरिश्ता म्हणजे ज्यांचे बुध्दी रुपी
पाय जमिनीवर राहत नाहीत, देहभानामध्ये नाहीत. जुन्या दुनियेशी कोणते आकर्षण नाही.
बोधवाक्य:-
आता आशीर्वाद
घेऊन संपन्न बना तर तुमच्या चित्राद्वारे सर्वांना अनेक जन्म आशीर्वाद मिळत राहिल..!