06-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्हाला बाबांसारखे ईश्वरीय सेवाधारी बनायचे आहे, संगमयुगावरती शिवपिता येतात, तुम्हा मुलांची सेवा करण्यासाठी”

प्रश्न:-
हे पुरुषोत्तम संगमयुगच सर्वांत सुंदर आणि कल्याणकारी आहे, कसे?

उत्तर:-
यावेळेतच तुम्ही मुलं स्त्री आणि पुरुष दोघे उत्तम बनतात. हे संगमयुग आहेच कलियुगाचा अंत आणि सतयुगाच्या संगमाची वेळ. चा वेळा. यावेळेतच बाबा तुम्हा मुलांसाठी ईश्वरीय विद्यापीठ उघडतात, जिथे तुम्ही मनुष्यापासून देवता बनतात. असे विद्यापीठ साऱ्या कल्पामध्ये कधीच होत नाही. यावेळेतच सर्वांची सद्गती होते.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना सन्मुख समजवत आहेत. येथे बसल्या बसल्या एक तर तुम्ही बाबाची आठवण करतात, कारण ते पतित पावन आहेत, त्यांची आठवण केल्यामुळेच पावन सतोप्रधान बनण्याचा उद्देश आहे. असे नाही सतो पर्यंत उद्देश आहे. सतोप्रधान बनायचे आहे, म्हणून बाबांची आठवण पण जरुर करायची आहे, परत गोड घराची पण आठवण करायची आहे कारण तिथे जायचे आहे, परत मिळकत पण पाहिजे म्हणून आपल्या स्वर्ग धामाची पण आठवण करायची आहे कारण प्राप्ती होत आहे. मुलं जाणतात, आम्ही बाबाची मुलं बनलो आहोत, बरोबर बाबापासून शिक्षण घेऊन आम्ही स्वर्गामध्ये जाऊ, नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे. बाकी जे पण जीव आत्मा आहेत ते शांतीधाममध्ये चालले जातील. घरी तर जरुर जायचे आहे. मुलांना हे पण माहित झाले आहे की, आता रावण राज्य आहे. यांच्या तुलनेत सतयुगाला राम राज्य म्हणले जाते. दोन कला कमी होत जातात. त्यांना सुर्यवंशी त्यांना चंद्रवंशी म्हणले जाते. जसे क्रिश्चनची राजाई एकच चालते, तसेच ही पण एकच राजाई असते. परंतू त्यामध्ये सुर्यवंशी आणि चंद्रवंशी आहेत. या गोष्टी कोणत्या ग्रंथामध्ये नाहीत. बाबा बसून समजवतात ज्यालाच ज्ञान म्हणले जाते. स्वर्ग स्थापन झाला, परत ज्ञानाची आवश्यकता नाही. हे ज्ञान मुलांना पुरुषोत्तम संगमयुगावरतीच शिकवले जाते. तुमच्या सेवाकेंद्रावरती किंवा संग्रहालयामध्ये मोठ मोठ्या अक्षरामध्ये जरुर लिहायला पाहिजे की भावांनो आणि बहिणीनों, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, जे एकाच वेळेत येते. पुरुषोत्तम संगमयुगाचा अर्थ पण समजत नाहीत, तर हे लिहायला पाहिजे, कलियुग अंत आणि सतयुग आदीचा संगम आहे. हे संगमयुग सर्वांत सुंदर कल्याणकारी आहे. बाबा पण म्हणतात, मी पुरुषोत्तम संगमयुगावरतीच येतो. तर संगमयुगाचा अर्थ पण समजवला आहे. वेश्यालयचा अंत, शिवालयाच्या सुरुवातीला पुरुषोत्तम संगमयुग म्हणले जाते. येथे सर्व विकारी आहेत, तेथे सर्व निर्विकारी आहेत. तर जरुर उत्तम तर निर्विकारीला म्हणले जाते ना. पुरुष आणि स्त्री दोघे उत्तम बनतात म्हणून नावच पुरुषोत्तम युग म्हणले जाते. या गोष्टीला बाबा आणि तुम्हा मुलांच्या शिवाय कोणाला माहित नाही की, हे संगमयुग आहे. कोणाच्या विचारामध्ये येत नाही की, पुरुषोत्तम संगमयुग कधी होते. आता बाबा आले आहेत. ते मनुष्य सृष्टीचे बीजरुप आहेत. त्यांची इतकी महिमा आहे, ते ज्ञानाचे सागर आहेत, आनंदाचे सागर आहेत, पतित पावन आहेत. ज्ञानाद्वारे सद्गती करतात. असे तुम्ही कधी म्हणनार नाही की भक्तीद्वारे सद्गती होते. ज्ञानाद्वारे सद्गती होते आणि सद्गती सतयुगामध्ये आहे. तर जरुर कलियुगाचा अंत आणि सतयुगाच्या सुरुवातीच्या संगमावरती येतील. बाबा खुपच स्पष्ट करुन समजवतात. नविन पण येतात, हुबहू जसे कल्प कल्प येतात, येत राहतील. राजधानी अशीच स्थापन होते. तुम्हा मुलांना माहिती आहे की आम्ही ईश्वरीय सेवाधारी खरोखर आहेत. एकाला थोडेच शिकवतील. एक जण शिकतात परत यांच्याद्वारे शिकुन दुसऱ्यांना शिकवतात, म्हणून येथे मोठे विद्यापीठ उघडावे लागते. साऱ्या दुनियेमध्ये असे विद्यापीठ दुसरे कोणतेच नाही. दुनियेमध्ये कोणीच जाणत नाहीत की ईश्वरीय विद्यापीठ पण असते. आता तुम्ही मुलं जाणतात, गितेचे भगवान शिव येऊन हे विद्यापीठ उघडतात. नविन दुनियेचे मालक देवी देवता बनतात. यावेळेत आत्म जी तमोप्रधान बनली आहे परत त्यालाच सतोप्रधान बनायचे आहे. यावेळेत सर्व तमोप्रधान आहेत ना. जरी कोणी कुमार पण पवित्र राहतात, कुमारी पण पवित्र राहतात, सन्यासी पण पवित्र राहतात, परंतू आजकाल ती पवित्रता नाही. प्रथम जेव्हा आत्मे येतात तर पवित्र राहतात, परत अपवित्र बनतात कारण तुम्ही जाणतात सतोप्रधान सतो रजो तमो द्वारेच सर्वांना पार वहयचे आहे. अंतकाळात सर्व तमोप्रधान बनतात. आता बाबा सन्मुख समजवतात, हे झाड तमोप्रधान जडजडीभुत अवस्थेला प्राप्त झाले आहे, जुने झाले आहे तर जरुर त्याचा विनाश व्हायला पाहिजे. हे विविध धर्माचे झाड आहे म्हणून याला विराट लिला महणतात. किती मोठे बेहदचे झाड आहे. ते तर जड झाड असतात, जे बी लावा तसे ते झाड उगवते. हे पर विविध धर्माचे वेगळे चित्र. मनुष्य तर सर्वच आहेत, परंतू त्यांच्यामध्ये पण विविधता भरपूर आहे म्हणून याला विराट लिला म्हणतात. सर्वधर्म कसे नंबरानुसार येतात, हे पण तुम्हीच जाणतात. सर्वांना जायचे आहे परत येयचे आहे. हे नाटक बनले आहे. ईश्वरीय नाटक बनले आहे. आत्मा किंवा परमात्मा अति सुक्ष्म असुन त्यांच्यामध्ये किती भुमिका भरली आहे, हे खुपच आश्चर्य आहे. परम आत्म्याला मिळून परमात्मा म्हणले जाते. तुम्ही त्यांना बाबा म्हणतात कारण सर्व आत्म्याचे ते सर्वोच्च पिता आहेत ना. मुलं जाणतात, आत्माच सर्व भुमिका करते. मनुष्य हे जाणत नाहीत. ते तर आत्म्याला निर्लेप म्हणतात. वास्तवमध्ये हे अक्षर चुकीचे आहे. हे पण मोठ मोठ्या अक्षरामध्ये लिहायला पाहिजे, आत्मा निर्लेप नाही. आत्माच जसे कर्म करते, चांगले किंवा वाईट तसेच फळ प्राप्त करते. वाईट संस्कारामुळेच पतित बनते, तेव्हा तर देवतांच्या पुढे जाऊन त्यांची महिमा गातात. आता तुम्हाला 84 जन्माची माहिती झाली आहे, दुसरे कोणते मनुष्य जाणत नाहीत. तुम्ही त्यांना 84 जन्म सिध्द करुन सांगतात तर म्हणतात काय हे ग्रंथ सर्व खोटे आहेत? कारण ऐकले आहे, मनुष्य 84 लाख योनीमध्ये जन्म घेतात. आता बाबा बसून समजवतात, वास्तवमध्ये सर्व ग्रंथामध्ये श्रेष्ठ ग्रंथ गिता आहे. बाबा आता, आम्हाला राजयायेग शिकवत आहेत, जे 5 हजार वर्षापुर्वी शिकवला होता.

तुम्ही जाणतात आम्ही पवित्र होतो, पवित्र गृहस्थ धर्म होता. आता याला धर्म म्हणता येत नाही. अधर्मी बनले आहेत, अर्थात विकारी बनले आहेत. या खेळाला तुम्ही मुलंच समजले आहात. हे बेहदचे नाटक आहे, ज्याची 5 हजार वर्षानंतर पुर्नावृत्ती होत राहते. लाखो वर्षाची तर गोष्ट कोणी समजू शकणार नाही. ही तर काल परवाची गोष्ट आहे. तुम्ही शिवालय मध्ये होते. आज वेश्यालयामध्ये आहात परत वुदया शिवालयामध्ये असाल. सतयुगाला शिवालय, त्रेताला सेमी म्हणले जाते. इतके वर्ष तिथे राहाल. पुर्नजन्मामध्ये तर यायचेच आहे. याला रावण राज्य म्हणले जाते. तुम्ही अर्धाकल्प पतित बनले, आता बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये राहात, कमल फुल समान पवित्र बना, कुमार कुमारी तर पवित्रच आहेत. त्यांना समजुन सांगावे लागेल. भगवानुवाच पावन बना, तर बेहदच्या पित्याचे मानावे लागेल ना. तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहत, कमल फुलासारखे पवित्र राहू शकता. परत मुलांना पतित बनण्याची सवय का लावता? जेव्हा बाबा 21 जन्मासाठी पतित होण्यापासून वाचवतात. यामध्ये लोक लाज कुळाची मर्यादा पण सोडावी लागेल. ही बेहदची गोष्ट आहे. कुमार तर सर्व धर्मामध्ये राहतात, परंतू सुरक्षित पवित्र राहणे जरा कठीण होते, तरीही रावण राज्यामध्ये राहतात ना. परदेशामध्ये पण खुप मनुष्य लग्न करत नाहीत तर अंतिम वृध्द अवस्थेमध्ये सोबती राहावा, म्हणून लग्न करतात. विकारी दृष्टीने करत नाहीत. असे पण दुनियेमध्ये खुप आहेत. पुर्ण रितीने सांभाळ करतात, परत जेव्हा मरतात तर त्यांना काही तरी देऊन जातात. काही लोक धमार्थ लावतात. ट्रस्ट बनवून जातात. परदेशामध्ये मोठ मोठे ट्रस्ट असतात, परत भारताला पण मदत करत राहतात. येथे असा ट्रस्ट नाही जो परदेशामध्ये पण मदत करेल. येथे तर गरीब लोक आहेत, ते कशी मदत करतील? परदेशामध्ये तर त्यांच्याजवळ खुप पैसे आहेत. भारत तर गरीब देश आहे. भारत वासींची परिस्थिती खुपच बिकट झाली आहे. हाच भारत मुकुटधारी होता, कालचीच गोष्ट आहे. स्वत: पण म्हणतात, तीन हजार वर्षापुर्वी भारत स्वर्ग होता, बाबाच बनवतात. तुम्ही जाणतात, बाबा कसे परमधाम वरुन खाली येतात, पतितांना पावन बनविण्यासाठी. ते ज्ञानाचे सागर आहेत, पतित पावन, सर्वांचे सद्गती दाता म्हणजे सर्वांना पावन बनवणारे आहेत. तुम्ही मुलं जाणतात, माझी महिमा तर सर्व गायन करतात. मी पतित दुनियेमध्ये, तुम्हाला पावन दुनिया बनविण्यासाठी येतो. तुम्ही पावन बनता तर प्रथम पावन दुनियेत तुम्हीच येतात. खुप सुख भोगतात परत रावण राज्यामध्ये येतात. जरी गायन करतात, परमपिता परमात्मा ज्ञानाचे सागर, शंतीचे सागर, पतित पावन आहेत. परंतू पावन बनविण्यासाठी कधी येतील हे कोणीच जाणत नाहीत. बाबा म्हणतात, तुम्ही माझी महिमा करतात ना. आता मी आलो आहे. तुम्हाला आपला परिचय देत आहे. मी प्रत्येक पाच हजार वर्षाच्यानंतर या पुरुषोत्तम संगमयुगावरती येतो, कसे येतो ते पण समजवतो. चित्र पण आहेत. ब्रह्मा काही सुक्ष्मवतनमध्ये नसतो. ब्रह्मा येथे आहे आणि ब्राह्मण पण येथेच आहेत, ज्यालाच आजोबा म्हणले जाते, ज्यांची परत वंशावळ बनते. मनुष्य सृष्टीची वंशावळ तर प्रजापिता ब्रह्मा पासुनच चालेल ना. प्रजापिता आहेत तर जरुर, त्यांची प्रजा असेल. कुख वंशावळ तर नसेल, जरुर दत्तक घेतलेले असतील. आजोबा आहेत तर जरुर दत्तक घेतले असतील. तुम्ही सर्व दत्तक मुलं आहात. आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात, परत तुम्हालाच देवता बनायचे आहे. क्षुद्रापासून ब्राह्मण, परत ब्राह्मण पासून देवता, हा खेळ चालत राहतो. विराट रुपाचे पण चित्र आहे ना. तेथुन परत येथे यायचे आहे जरुर. जेव्हा सर्व येतात परत रचनाकार पण येतात. तुम्ही सर्व आत्मे माझी मुलं आहात ना. प्रथम तुम्ही सतयुगामध्ये शरीर धारण करुन खुप सुख भोगले, परत 84 जन्म घेऊन तुम्ही दु:खामध्ये आले आहात. नाटकाचे निर्माता, दिग्दर्शक, असतात ना. हे पण बेहदचे नाटक आहे. बेहदच्या नाटकाला तर कोणी जाणत नाहीत. भक्तीमार्गामध्ये अशा गोष्टी सांगतात, जे मनुष्यांच्या बुध्दीमध्ये तशाच बसल्या आहेत.

आता बाबा म्हणतात, गोड गोड मुलांनो, हे सर्व भक्तीमार्गातील ग्रंथ आहेत. भक्ती मार्गाची ढेर सामग्री आहे, जसे बीजाचा विस्तार सामग्री, झाड आहे. इतक्या छोट्या बीजापासून झाडाचा खुप विस्तार होतो. भक्तीचा पण इतका विस्तार आहे. ज्ञान तर बीज आहे, त्यासाठी विस्ताराची आवश्यकता राहत नाही. बाबा म्हणतात स्वत:ला आत्मा समजून बाबांची आठवण करा. दुसरे कोणते व्रत उपवास ची आवश्यकता नाही. हे सर्व बंद होते. तुम्हाला सद्गतीमिळते परत कोणत्या विधीची आवश्यकता राहत नाही. तुम्हीच खुप भक्ती केली आहे. त्याचे फळ तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. देवता शिवालयामध्ये असतात ना, तेव्हा तर मंदिरामध्ये जाऊन त्यांची महिमा गायन करतात. आता बाबा समजवतात, गोड गोड मुलांनो, मी 5 हजार वर्षापुर्वी पण तुम्हाला समजवले होते की स्वत:ला आत्मा समजा. देहाचे सर्व संबंध सोडुन मज पित्याची आठवण करा तर या योग अग्नीद्वारे तुमचे पाप भस्म होतील. बाबा जे पण आता समजवत आहेत, कल्प कल्प समजवत आले आहेत. गितेमध्ये पण काही काही अक्षर चांगले आहेत. मनमनाभव अर्थात माझी आठवण करा, शिवबाबा म्हणतात, येथे आलो आहे. मी कोणाच्या तनामध्ये येतो ते पण सांगतो. ब्रह्मा द्वारा सर्व वेद ग्रंथ इत्यादी चे सारांश तुम्हाला सांगतो. चित्र पण दाखवतात परंतू अर्थ काहीच समजत नाहीत. आता तुम्ही समजतात, शिवबाबा कसे ब्रह्मा तनाद्वारे सर्व ग्रंथ इ.चे सारांश ऐकवतात. 84 जन्माच्या नाटकाचे रहस्य पण तुम्हाला समजवतात. यांच्याच अनेक जन्माच्या अंतमध्ये येतात. हेच परत प्रथम क्रमांकाचे राजकुमार बनतात परत 84 जन्मामध्ये येतात. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. या रावण राज्यामध्ये राहत पतित लोकलाज कुळाची मर्यादा सोडुन बेहदच्या बाबांची गोष्ट मानायची आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत कमल फुलासारखे राहायचे आहे.

2. या विविध विराट लिलाला चांगल्या रितीने समजावयाचे आहे, यामध्ये भुमिका करणारी आत्मा निर्लेप नाही. चांगले वाईट कर्म आत्माच करते आणि त्यांचे फळ प्राप्त करते. या रहस्याला समजून श्रेष्ठ कर्म करायचे आहेत.

वरदान:-
आत्मिक अधिकारासोबत निरहंकारी बनून सत्य ज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरुप दाखवणारे खरे सेवाधारी भव

जसे वृक्षामध्ये जितकी जास्त फळे येतात तर तो वृक्ष झुकतो अर्थात निर्माण बनण्याची सेवा करतात. असेच आत्मिक अधिकार असणारी मुलं जितके अधिकारी तितकेच निर्माण आणि सर्वांचे स्नेही असतात. अल्प काळाचे अधिकारी अहंकारी असतात. परंतू सत्यतेचे अधिकारी निरहंकारी असतात. हेच सत्य ज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरुप आहे.

बोधवाक्य:-
खऱ्या सेवाधारीच्या वृत्तीमध्ये जितका अधिकार असेल तितकेच वाणीमध्ये स्नेह आणि नम्रता असेल..!