10-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुमची यात्रा बुद्धीची आहे, यालाच आत्मिक यात्रा म्हणले जाते, तुम्ही स्वतःला आत्मा समजतात शरीर नाही, शरीर समजणे म्हणजे उलटे लटकणे....”

प्रश्न:-
मायाच्या देखाव्यांमध्ये मनुष्याला कोणती इज्जत मिळते?

उत्तर:-
आसुरी ईज्जत. मनुष्य कोणाला पण आज थोडी इज्जत देतात, उद्या त्याची बेईज्जत करतात, निंदा करतात. मायाने सर्वांची बेइज्जती केली आहे,पतित बनवले आहे. बाबा आले आहेत तुम्हाला दैवी इज्जतदार बनवण्यासाठी.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्म्यांना विचारतात, कुठे बसले आहात ?तुम्ही म्हणणार, विश्वाच्या आत्मिक विद्यापीठांमध्ये. आत्मिक शब्द तर दुसरे लोक जाणत नाहीत.विश्वविद्यालय तर दुनियेमध्ये अनेक आहेत. हे तर सर्व विश्वामध्ये एकच आत्मिक विद्यालय आहे, एकच शिकवणारे आहेत, काय शिकवतात? आत्मिक ज्ञान. तर हे अध्यात्मिक विद्यालय आहे, अर्थात आत्मिक पाठशाळा. अध्यात्मिक म्हणजे आत्मिक ज्ञान शिकवणारे, कोण आहेत, हे पण तुम्ही मुलच जाणतात. आत्मिक पिताच आत्मिक ज्ञान शिकवत आहेत, म्हणून त्यांना शिक्षक पण म्हणतात. अध्यात्मिक पिता शिकवत आहेत. अच्छा परत काय होईल,तुम्ही मुलं जाणतात या आत्मिक ज्ञानामुळे, आम्ही आपल्य देवी-देवता धर्माची स्थापना करत आहोत. एका धर्माची स्थापना, बाकीचे इतके सर्व धर्म आहेत, त्यांचा विनाश होईल. या अध्यात्मिक ज्ञानाचा सर्व धर्माशी संबंध आहे,हे पण तुम्ही मुलच जाणतात. एका धर्माची स्थापना या आत्मिक ज्ञानामुळे होते. हे लक्ष्मीनारायण विश्वाचे मालक होते ना, त्यांना आत्मिक दुनिया म्हटले जाते. या अध्यात्मिक ज्ञानाद्वारे तुम्ही राजयोग शिकत आहात, त्या राजयोग मुळे राज्याची स्थापना होते अच्छा परत दुस-या धर्माशी काय संबंध आहे? आणि बाकी सर्व धर्म विनाश होतील, कारण तुम्ही पावन बनतात, तर तुम्हाला नवीन दुनिया पाहिजे. इतके सर्व, धर्म नष्ट होतील, एक धर्मच राहील. त्याला म्हटले जाते विश्वामध्ये शांतीचे राज्य. आता आहे पतीत अशांतीचे राज्य, परत पावन शांतीचे राज्य होईल. आता तर अनेक धर्म आहेत, किती अशांती आहे. हे सर्व पतितच पतित आहेत, रावणाचे राज्य आहे ना. आता मुलं जाणतात पाच विकाराला जरूर सोडायचे आहे. हे सोबत घेऊन जायचे नाही. आत्माच चांगले किंवा वाईट संस्कार घेऊन जाते ना. आत्ता बाबा तुम्हा मुलांना पवित्र बनवण्याच्या गोष्टी सांगतात, त्या पावन दुनियेमध्ये कोणीच दुःखी नसते. हे अध्यात्मिक ज्ञान शिकवणारे कोण आहेत? अध्यात्मिक पिता. सर्व आत्म्यांचे पिता, अध्यात्मिक पिता काय शिकवतील, अध्यात्मिक ज्ञान. यामध्ये कोणत्याही पुस्तकाची आवश्यकता नाही, फक्त स्वतःला आत्मा समजुन बाबांची आठवण करायची आहे. पावन बनायचे आहे.बाबांची आठवण करत करत अंत मतीसो गती होईल. ही आठवणीची यात्रा आहे, यात्रा अक्षर चांगले आहे, ती शारीरिक यात्रा आहे, ही आत्मिक यात्रा आहे त्यामध्ये पायी जावे लागते, हात-पाय चालवावे लागतात, यामध्ये काहीच नाही, फक्त आठवण करायची आहे. खुशाल कुठेही फिरा, उठा, बसा परंतु स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, यात काहीच अवघड नाही. फक्त आठवण करायची आहे, हे तर वास्तविक आहे ना. यापूर्वी तुम्ही उलटे चालत होते,स्वतःला आत्म्याच्या ऐवजी शरीर समजणे यालाच म्हणले जाते उलटे लटकणे. स्वतःला आत्मा समजणे हे आहे सुलटे समजणे. अल्लाह जेव्हा येतात. तेव्हा येऊन पावन बनवतात, अल्लाहची पावन दुनिया आहे, रावणाची असुरी दुनिया आहे. देहाभिमानामध्ये सर्व उलटे झाले आहेत, आता एकाच वेळेस देही अभिमानी बनायचे आहे ,तर तुम्ही ही अल्लाह चे मुल आहात. अल्लाहू म्हणणार नाहीत .बोटाने हमेशा वरती ईशारा करतात,तर सिद्ध होते अल्लाहा वरती आहेत. तर येथे जरूर दुसरी गोष्ट आहे.आम्ही त्या अल्लाह ची मुलं आहोत, आम्ही भाऊ भाऊ आहोत. अल्लाहू म्हणल्यामुळे उलटे होते की, आम्ही सर्व पिता आहोत,परंतु नाही एकच पिता आहेत, त्यांची आठवण करायची आहे. अल्लाह नेहमीच पवित्र आहेत. अल्लाह स्वतःबसून शिकवत आहेत. थोड्याशा गोष्टीमध्ये मनुष्य खूपच संभ्रमित होतात. शिवजयंती पण साजरी करतात ना. कृष्णाला असे पद कोणी दिले? शिवबाबा ने. बाबा जी नवीन दुनिया स्थापन करतात, त्यामध्ये श्रीकृष्ण नंबर एक राजकुमार आहेत. बाबा मुलांना पावन बनवण्याची युक्ती बसून सांगतात. मुल जाणतात स्वर्ग ज्याला वैकुंठ विष्णुपुरी म्हणतात,तो भूतकाळ होऊन गेला परत भविष्य होईल, चक्र फिरत राहते ना. हे ज्ञान आता तुम्हा मुलांना मिळत आहे, याची धारणा करून परत दुस-यांना पण करावयाची आहे. प्रत्येकाला शिक्षक बनायचे आहे, असे पण नाही की शिक्षक बनल्या मुळेच लक्ष्मीनारायण बनू शकतील, असे नाही. शिक्षक बनल्यामुळे तुम्ही प्रजा बनवू शकाल, जितके अनेकांचे कल्याण कराल तेवढे श्रेष्ठ पद मिळेल, आठवण राहील. बाबा म्हणतात रेल्वेने तुम्ही जाता तर बॅज वरती समजून सांगा. बाबा पतित-पावन, मुक्तिदाता आहेत, पावन बनवणारे आहेत. अनेकांची आठवण करावी लागते ना.जनावर हाती घोडे, मगर मासे ई.ला पण अवतार मानतात. त्यांची पण पूजा करत राहतात.भगवान सर्वव्यापी आहेत, अर्थात सर्वामध्ये आहेत असे समजतात. सर्वांना खाऊ घालू या. अच्छा कना कना मध्ये भगवान आहेत, परत त्यांना खाऊ कसे घालणार? बिलकुलच समजच्या बाहेर गेले आहेत. लक्ष्मीनारायण देवी-देवता इ. थोडेच असे काम करतील. मुंग्यांना अन्न देणे, अमक्याला देणे. बाबा समजवतात तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही जाणतात आम्ही धर्माची स्थापना करत आहोत. राज्य स्थापन करण्यासाठी मिल्ट्री राहते, तुम्ही गुप्त आहात. तुमचे अध्यात्मिक विद्यापीठ आहे. सर्व दुनियाचे जे पण मनुष्य मात्र आहेत, सर्व या धर्मा मधून निघून आपल्या घरी जातील. आत्मे चालले जातील, तेआहे आत्म्याचे राहण्याचे घर. आता तुम्ही संगमयुगा वरती अभ्यास करत आहात, शिक्षण घेत आहात, परत सतयुगा मध्ये जाऊन राज्य कराल,बाकी कोणताच धर्म नसेल. गीतामध्ये पण आहे ना, बाबा तुम्ही जे देतात ते दुसरे कोणी देऊ शकत नाही, सर्व आकाश,धरती तुमचे राहते, सा-या विश्वाचे मालक तुम्ही बनतात. हे पण तुम्ही आत्ताच समजतात, नवीन दुनिया मध्ये या सर्व गोष्टी विसरुन जाल. याला आत्मिक अध्यात्मिक ज्ञान म्हटले जाते. तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आहे की आम्ही प्रत्येक पाच हजार वर्षानंतर राज्य घेतो, परत गमावतो, हे 84 चे चक्र फिरतच राहते. तर अभ्यास करावा लागेल तेव्हाच तुम्ही जाऊ शकणार.शिकणार नाही तर नवीन दुनिये मध्ये जाऊ शकणार नाही.तेथे तर मर्यादित नंबर आहेत, नंबरनुसार पुरुषार्थ प्रमाणे तेथे जाऊन पद मिळेल. इतके सर्व तर शिकणार नाहीत ना, जर सर्व शिकतील तर परत दुसऱ्या जन्मांमध्ये राज्यपद पण मिळेल. शिकणा-याची पण मर्यादा आहे.सतयुग-त्रेता मध्ये येणारेच हे ज्ञान घेतील. तुमची प्रजा खूप बनत राहते.उशिरा येणारे तर पाप भस्म करू शकणार नाहीत. पाप आत्मे असतील तर परत सजा खाऊन थोडेफार पद घेतील,बेइज्जती होईल. जे आत्ता मायेचे खूप इज्जत वाले आहेत,ते बेईज्जत बनतील. ही ईश्वरीय इज्जत आहे. ती असुरी इज्जत आहे. ईश्वरीय अथवा दैवी ईज्जत आणि आसुरी इज्जत मध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. आम्ही असुरी इज्जत वाले होतो, आता परत दैवी इज्जत वाले बनतो. आसुरी इज्जत मुळे बिलकुलच गरीब बनले होतो. ही काट्यांची दुनिया आहे, तर बेइज्जती झाली ना, नंतर इज्जतदार बनतात. जसे राजा तसेच प्रजा बनते. बाबा तुम्हाला इज्जतदार, खूप श्रेष्ठ बनवतात, तर इतका पुरुषार्थ पण करायला पाहिजे. सर्वजण म्हणतात आम्ही इज्जतदार बनावे म्हणजेच नरापासून नारायण नारीपासून लक्ष्मी बनावे. या पेक्षा श्रेष्ठ इज्जत कोणाची नाही. कथा पण नरापासून नारायण बनण्याची ऐकतात.अमर कथा, तिजरी ची कथा या एकच आहेत. ही कथा तुम्ही आत्ताच ऐकू शकतात. तुम्ही मुलं विश्वाचे मालक होते,परत 84 जन्म घेत घेत उतरत आले. परत प्रथम नंबरचा जन्म होईल.प्रथम नंबर जन्मांमध्ये तुम्ही खूप श्रेष्ठ पद मिळवतात. राम इज्जत वाले बनवतात,रावण बेइज्जतवान बनवतात. या ज्ञानामुळेच तुम्ही मुक्ती जीवन मुक्ती प्राप्त करतात.अर्धा कल्प रावणाचे नाव राहत नाही.या गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये येतात, ते पण नंबरनुसार. कल्प कल्प तुम्ही नंबर नुसार पुरुषार्थ नुसार समजदार बनतात. माया गफलत करवत राहते, बाबांची आठवण करण्याचे विसरून जातात. भगवान शिकवत आहेत, ते आमचे शिक्षक बनले आहेत, तरीही अनुपस्थित राहतात. शिकत नाहीत दर दर धक्का खाण्याची सवय पडली आहे.अभ्यासावर ज्यांचे लक्ष राहत नाही,त्यांना परत नोकरी करावी लागते. धोबी इत्यादीचे काम करतात, त्यामध्ये शिक्षणाची आवश्यकता नसते. व्यापारा मध्ये तर मनुष्य करोडपती बनतात, नोकरी मध्ये असे बनू शकत नाहीत,त्यामध्ये तर फिक्स पगार मिळतो. आता तुमचे शिक्षण विश्वाची बादशाही घेण्यासाठी आहे. येथे म्हणतात आम्ही भारतवासी आहोत, नंतर तुम्ही विश्वाचे मालक बनता. तेथे देवी देवता धर्माच्या शिवाय दुसरा कोणता धर्म नसतो. बाबा तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात, तर त्यांच्या मतावर चालायला पाहिजे ना. कोणताही विकार किंवा विकाराचे भूत असायला नको, हे भूत खुपच खराब आहेत. काम विकारी मनुष्याचे आरोग्य बिघडत राहते, शक्ती कमी होत जाते. या काम विकारामुळे तुमची ताकत बिलकुल नष्ट झाली आहे.त्याचा परिणाम आयुष्य कमी कमी होत गेले,भोगी बनले, भोगी रोगी सर्व बनले जातात .स्वर्गामध्ये विकार नसतात ते योगी होते, तेथे सदैव निरोगी आणि आयुष्य पण दीडशे वर्षे राहते.तेथे काळ खात नाही यावर ते गोष्ट पण सांगतात, काहींना विचारले प्रथम सुख पाहिजे की दुःख पाहिजे, तर त्यांनी इशारा केला प्रथम सुख पाहिजे, कारण तेथे कोणताही काळ येणार नाही, आतमध्ये घुसू शकत नाही. ही एक गोष्ट बनवली आहे. बाबा समजतात तुम्ही सुखधाम मध्ये राहत होते, तेथे कोणताही काळ नसतो, रावणराज्य नाही. परत जेव्हा विकारी बनतात तर काळ येतो. अनेक गोष्टी बनवले आहेत,काळ घेऊन गेला परत हे झाले. न काळ दिसण्यामध्ये येतो न आत्मा दिसून येते,यालाच दंतकथा म्हणले जाते. कनरसाच्या अनेक गोष्टी आहेत. आत्ता बाबा समजतात तेथे अकाली मृत्यू कधी होत नाही. आयुष्यवान असतात आणि पवित्र राहतात. 16 कला परत कला कमी होत होत एकदम शून्य कला होतात. मी निर्गुण मध्ये कोणतेच गुण नाहीत एक निर्गुण संस्था पण मुलांची आहे, कोणतेच गुण नाहीत असे म्हणतात .आम्हाला तर गुणवान बनवा, सर्व गुण संपन्न बनवा. आता बाबा म्हणतात पवित्र बनायचे आहे,मरायचे तर सर्वांनाच आहे. इतके असंख्य मनुष्य सतयुगा मध्ये नसतात, आता तर खूप आहेत. तेथे मुलंपण योग बाळा द्वारेच होतात, येथे तर पहा एका-एकाला अनेक मुलं असतात. बाबा म्हणतात माझी आठवण करा.ते बाबाच शिकवतात, शिकवणारे आठवणीत राहतात. तुम्ही जाणतात शिव बाबा आम्हाला शिकवत आहेत, काय शिकवतात? ते पण तुम्हाला माहिती आहे. तर शिवबाबा किंवा शिक्षकाशी योग लावायचा आहे. ज्ञान खूपच श्रेष्ठ आहे .आता तुम्हा सर्वांचे विद्यार्थी जीवन आहे. असे विद्यापीठ कधी पाहिले? जिथे लहान मुलं वृद्ध जवान सर्व एकत्र शिकतील. ही एकच शाळा आहे, एकच शिकवणारे शिक्षक आहेत ज्यामध्ये स्वतः ब्रह्म पण शिकतात, आश्चर्य आहे ना.शिव बाबा तुम्हाला शिकवतात, हे ब्रह्मा पण ऐकतात, मुलं किंवा वृद्ध कोणी पण हे ज्ञान घेऊ शकतात. तुम्ही पण शिकत आहात ना. आत्ताच ज्ञान घेणे सुरू केले आहे, दिवस वेळ कमी होत जातो. आता तुम्ही बेहद मध्ये गेले आहात, जाणतात हे पाच हजार वर्षांचे चक्र कसे फिरते. प्रथम एकच धर्म होता, आता तर अनेक धर्म आहेत .आत्ता सार्वभौमत्व म्हणणार नाहीत, याला म्हटले जाते प्रजचे प्रजा वरती राज्य. प्रथम खूपच शक्तिशाली धर्म होता, सा-या विश्वाचे मालक होते.आत्ता अधरमी बनले आहेत, कोणताच धर्म नाही .सर्वा मध्ये पाच विकार आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो धैर्य धरा, बाकी थोडा वेळ तुम्ही या रावण राज्यांमध्ये आहात. चांगल्या रीतीने शिकाल तर परत सुखधाममध्ये जाऊ शकाल. हे दुःखधाम आहे. तुम्ही आपल्या शांतीधाम आणि सुखधाम ची आठवण करा, या दुःखामला विसरत जावा. आत्म्यांना बाबा सूचना देतात, हे आत्मिक मुलांनो, आत्मिक मुलांनी या कर्म इंद्रिय द्वारे ऐकले. तुम्ही आत्मे जेव्हा सतयुगा मध्ये सतोप्रधान प्रधान होते, तर तुमचे शरीर पण खूपच चांगले सतोप्रधान होते.तुम्ही खूप धनवान होते, परत पुनर्जन्म घेत घेत काय बनले आहात, रात्रंदिवसाचा फरक आहे. दिवसा मध्ये आम्ही स्वर्गामध्ये होतो रात्री मध्ये आम्ही नरकामध्ये आहोत. याला ब्रह्माचा दिवस सो ब्राह्मणांचा दिवस आणि रात्र म्हणले जाते. धक्के खात राहतात ,अंधारी रात्र आहे ना ,भटकत राहतात. भगवान काही मिळत नाहीत. यालाच भुल-भुलयै चा खेळ म्हणतात. तर बाबा तुम्हा मुलांना सा-या सृष्टीचे आदी मध्य अंत चा समाचार ऐकवतात. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मात पिता बादादांची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. धक्के खाण्याची सवय सोडून भगवंताच्या ज्ञानावर ध्यान द्यायचे आहे, कधीच अनुपस्थित राहायचे नाही. बाबा सारखे शिक्षक जरूर बनायचे आहे. शिकून परत शिकवायचे पण आहे.

2. सत्यनारायणाची कथा ऐकूण नरापासून नारायण बनायचे आहे. असे इज्जतवान स्वतःला स्वतःच बनवायचे आहे. कधी भुतांच्या वश होऊन आपली इज्जत घालवायची नाही.

वरदान:-
झालेल्या गोष्टींना किंवा वृत्तीला नष्ट करून संपूर्ण सफलता प्राप्त करणारे स्वच्छ आत्मा भव
 

सेवांमध्ये स्वच्छ बुद्धी स्वच्छ वृत्ती आणि स्वच्छ कर्म च सफलतेचा सहज आधार आहे . कोणती ही सेवा, जेव्हा सुरू करता तर प्रथम हे तपासा की, बुद्धीमध्ये कोणत्या आत्म्याच्या झालेल्या गोष्टीची स्मृती तर नाही ना. त्याच वृत्ती, दृष्टी द्वारे त्यांना पाहणे, त्यांच्याशी बोलणे, यामुळे संपूर्ण सफलता होऊ शकत नाही, म्हणून झालेल्या गोष्टींना किंवा वृत्तीला समाप्त करून, स्वच्छ आत्मा बना तेव्हा संपूर्ण सफलता प्राप्त होईल.

बोधवाक्य:-
जे स्वतः परिवर्तन करतात विजय माळा त्यांच्या गळ्यामध्ये पडते.