16-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , अपार खुशी किंवा नशेमध्ये राहण्यासाठी देह अभिमानाच्या रोगाला सोडून प्रित बुद्धि बना , आपली चलन सुधारा "

प्रश्न:-
कोणत्या मुलांना ज्ञानाचा अहंकार चढू शकत नाही ?

उत्तर:-
जे बाबांना यथार्थ जाणून आठवणीत राहतात, हृदयापासून बाबांची महिमा करतात, ज्यांचे मुरलीवर पूर्ण लक्ष आहे, त्यांना ज्ञानाचा अहंकार चढू शकत नाही. जी मुलं बाबांना साधारण समजतात ते आठवण करू शकत नाही. जर आठवणीमध्ये राहतील तर बाबांना पूर्ण समाचार देतील. मुलं बाबांना आपल्या समाचार देत नाही, तर बाबांचे विचार चालतात की मुलं कुठे बेशुद्ध तर नाही झाले.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजवतात मुलांनो, जेव्हा कोणी नवीन येतात तर त्यांना पहिल्यांदा हद आणि बेहदच्या दोन्ही पित्याचा परिचय द्या. बेहदचे पिता म्हणजे बेहद आत्म्यांचे पिता. ते हदचे पिता प्रत्येक जीवात्म्याचे पिता आहेत. हे ज्ञान पण सर्वजण एक सारखे आचरणामध्ये आणू शकत नाही. कोणी एक टक्का, तर कोणी 95 टक्के धारण करतात. या तर समजण्याच्या गोष्टी आहेत. सूर्यवंशी, चंद्रवंशी घराना असेल ना, राजा राणी आणि प्रजा. प्रजे मध्ये सर्व प्रकारचे मनुष्य असतात. प्रजा म्हणजे प्रजा. बाबा समजवतात, हे ज्ञान आहे. प्रत्येक जण आपल्या बुद्धीनुसारच शिकतो. प्रत्येकाला आपापली भूमिका मिळालेली आहे. ज्यांनी कल्पा पूर्वी जेवढे ज्ञान धारण केले होते, तेवढेच आता सुद्धा करतील. ज्ञान कधी लपुन राहू शकत नाही. ज्ञानाच्या आधारावरच पद प्राप्त होते. बाबा समजवतात पुढे चालून परीक्षा होईल. परीक्षे शिवाय दुसऱ्या वर्गात जाऊ शकत नाही. तर शेवटी सर्वांना समजेल. परंतु आत्ता सुद्धा समजू शकता की, आपण कोणत्या पदाचे लायक आहोत? जरी इज्जती करिता सर्वजण हात उचलतात, परंतु समजू शकतात की, आम्ही असे लायक कसे बनवू शकतो,तरीसुद्धा हात वरती करतात. हे सुद्धा अज्ञानच म्हणता येईल. बाबा तर लगेच समजतात कि यांच्यापेक्षा लौकिक विद्यार्थ्या मध्ये ज्ञान चांगले आहे. लौकिक विद्यार्थी समजतात, आम्ही शिष्यवृत्ती घेण्याच्या लायक नाहीत, पास होणार नाही. ते समजतात शिक्षक जे शिकवितात त्यामध्ये आम्ही किती गुण घेऊ? असं थोडंच म्हणतील की आम्ही चांगल्या गुणांनी पास होऊ? येथे तर काही मुलांमध्ये एवढी पण बुद्धी नाही, देह अभिमान खूप आहे. जरी देवता बनण्यासाठी आलेले आहेत, पण ते गुण नाहीत. बाबा म्हणतात, विनाश काले विपरीत बुद्धी. कारण कायद्यानुसार बाबांसोबत प्रेम नाही.बाबा तुम्हा मुलांना समजवतात, विनाश काळे विपरीत बुद्धीचा,योग्य अर्थ काय आहे. मुलं स्वतः पूर्ण समजत नाहीत, मग ते दुसऱ्यांना काय समजवतील. बाबांना आठवण करणे ही तर गुप्त गोष्ट आहे. शिक्षणामध्ये नंबर अनुसार असतात ना. एकसारखे थोडीच शिकतील. बाबा समजावतात अजून खूप लहान आहेत. अशा बेहदच्या पित्याला तीन-तीन, चार-चार महिने आठवण पण करत नाहीत. समजून कसे येईल की आठवण करतात? बाबांना पत्र सुद्धा लिहीत नाही, की बाबा मी कसा चालत आहे? काय काय सेवा करीत आहे? बाबांना मुलांची किती काळजी वाटते, की मुले कुठे मायाच्या वश तर झाले नाहीत? मुलांनी बाबांचा हात तर सोडला नाही ना? काही मुलं तर बाबांना सेवेच्या किती चांगल्या-चांगल्या बातम्या लिहून पाठवितात. बाबा असं समजतात, मुलांनी बाबांचा हात पकडलेला आहे. सेवा करणारी मुले कधी लपून राहू शकत नाही. बाबा तर प्रत्येक मुलाला जाणतात की, कोणता मुलगा कसा आहे? देह अभिमानाचा खूप मोठा आजार लागलेला आहे. बाबा मुरली मध्ये समजवतात. काहींना तर ज्ञानाचा अहंकार येतो, मग आठवण पण करत नाहीत. पत्र सुद्धा लिहित नाही. तर मग बाबा सुद्धा आठवण कसे करतील? आठवण केल्याने आठवण येते. आता तुम्ही मुलं बाबांना पूर्ण समजतात आणि हृदयातुन बाबांची आठवण पण करता. काही मुलं बाबांना साधारण समजतात, म्हणून आठवण करत नाहीत,ओळखले नाही. बाबा काही चमत्कार थोडंच दाखवितात. भगवानुवाच, मी तुम्हाला विश्वाची राजाई देण्यासाठी राजयोग शिकवितो. तुम्ही असं थोडेच समजतात की विश्वाची बादशाही घेण्यासाठी आम्ही बेहद्दच्या पित्याकडून ज्ञान घेत आहोत. हा नशा असेल तर,अपार आनंदाचा पारा नेहमीच चढलेला राहिला असता. गीता वाचणारे जरी म्हणत असतील, श्रीकृष्ण भगवानुवाच, मी राजयोग शिकवतो. बस. त्यांना राज्य प्राप्त करण्याचा आनंद मिळणार नाही. गीता वाचून पूर्ण केली आणि आपल्या आपल्या काम-धंद्यामध्ये लागले. तुमच्या बुद्धीमध्ये तर आहे, आम्हाला बेहदचे पिता सजवितात. त्यांच्या बुद्धी मध्ये असे विचार येणार नाही. तर जेव्हा पण पहिल्यादा कोणी येतील, त्यांना दोन पित्याचा परिचय द्यायचा आहे. समजवा भारत स्वर्ग होता, आता नर्क आहे. हे कलियुग आहे. याला स्वर्ग म्हणता येणार नाही. असं तर नाही म्हणणार कि सतयुगामध्ये पण आहोत आणि कलियुगामध्ये सुद्धा आहोत. कोणाला दुःख मिळाले तर नर्क आहे आणि कुणाला सुख मिळत असेल तर स्वर्गामध्ये आहे. असे खूप जण म्हणतात, दुःखी मनुष्य नरकामध्ये आहेत, आम्ही तर खूप सुखामध्ये आहोत. गाडी, बंगला, मोटर इत्यादी आहेत तर समजतात आम्ही स्वर्गामध्ये आहोत. स्वर्ग आणि नर्क एकच गोष्ट आहे.

तर सर्वप्रथम दोन पित्याची गोष्ट बुद्धी मध्ये बसवायची आहे. बाबा स्वतः आपला परिचय देतात. तर मग ते सर्वव्यापी कसे होऊ शकतात? लौकिक पित्याला सर्वव्यापी म्हणणार का? आता तुम्ही चित्रात पाहता आत्मा आणि परमात्म्याचे एकच रूप आहे. त्यामध्ये फरक नाही. आत्मा आणि परमात्मा काही लहान-मोठी नाही, सर्व आत्मे आहेत आणि परमात्मा सुद्धा आत्माच आहे. ते नेहमी परमधाम मध्ये राहतात. त्यामुळे त्यांना परमात्मा म्हणले जाते. फक्त तुम्ही आत्मा जसे जन्म घेतात, तसा मी घेत नाही. मी अंतकाळात या शरीरात येऊन प्रवेश करतो. या गोष्टी बाहेरचे कोणी समजू शकत नाही. या गोष्टी खूप सोप्या आहेत. फर्क फक्त इतका आहे की बाबांच्या ऐवजी वैकुंठवासी श्रीकृष्णाचे नाव दिले आहे. श्रीकृष्णाने वैकुंठातून येऊन नरकामध्ये राजयोग शिकवला का? कृष्ण कसा म्हणू शकतो कि देह सहित….. मामेकम आठवण करा. देहधारीच्या आठवणीने पाप कसे नष्ट होतील? कृष्ण तर लहान मुलगा आहे आणि मी साधारण मनुष्याच्या वृद्ध शरीरामध्ये येतो. किती फरक आहे, या चुकीमुळे सर्व मनुष्य पतित कंगाल झाले आहेत ना. मी सर्वव्यापी आहे, ना श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे. मला तर स्वतःचे शरीर सुद्धा नाही. प्रत्येक आत्म्याला स्वतःचे शरीर आहे. नाव प्रत्येक शरीराचे वेगवेगळे आहेत. मला शरीर नाही, माझ्या शरीराचे नाव नाही. मी तर वानप्रस्थ शरीराचा आधार घेतो. मग यांच्या शरीराचे नाव बदलून ब्रह्मा ठेवतो. माझे तर ब्रह्मा नाव नाही. मला नेहमी सदाशिव म्हणले जाते. मी सर्वांचा सदगती दाता आहे. आत्म्याला सर्वांचा सदगती दाता म्हणता येणार नाही. परमात्म्याची कधी दुर्गति होते का? आत्म्याची दुर्गती आणि आत्म्याची सद्गती होते. या सर्व गोष्टी विचार सागर मंथन करण्याच्या आहेत. नाहीतर दुसऱ्यांना कसे समजवणार? परंतु माया इतकी बलवान आहे जी मुलांची बुद्धी पुढे चालू देत नाही. दिवसभर इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवितात. बाबांपासून दूर घेऊन जाण्यासाठी माया किती प्रयत्न करते. मग काही मुलं तर हात सोडून जातात. बाबांना आठवण न केल्यामुळे अवस्था अचल-अडोल बनू शकत नाही. बाबा सतत मुलांना उठवितात. आणि माया खाली पाडते. बाबा म्हणतात कधीच पराजित व्हायचे नाही. कल्प कल्प असे होते. काही नवीन गोष्ट नाही. मायाजीत अंतला बनणार. रावण राज्य समाप्त तर होणारच आहे. मग आपण नवीन दुनियेत राज्य करू. कल्प कल्प माया जीत बनलेलो आहोत. असंख्य वेळा नवीन दुनियेत राज्य केलेले आहे. बाबा म्हणतात, बुद्धीला नेहमी व्यस्त ठेवा तर नेहमी सुरक्षित राहाल. यालाच सुदर्शन चक्रधारी म्हणले जाते. यामध्ये हिंसेची कोणती गोष्ट नाही. देवतांना सुदर्शन चक्रधारी म्हणता येणार नाही. पतित दुनियेच्या रिती रिवाजा मध्ये आणि देवी-देवतांच्या रिती रिवाजा मध्ये खूप अंतर आहे. मृत्युलोक वासी पतित-पावन बाबांना बोलवितात, आम्हा पतिताना येऊन पवित्र बनवा. पवित्र दुनियेत घेऊन चला. तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आज पासून पाच हजार वर्षांपूर्वी नवीन पवित्र दुनिया होती, ज्याला सतयुगाला म्हणले जाते. त्रेताला नवीन युग म्हणले जात नाही. बाबांनी समजवले आहे ते प्रथम श्रेणीचे आहेत आणि त्रेता द्वितीय श्रेणीतले म्हटले जाते. एक एक गोष्ट चांगल्या रीतीने धारण केली पाहिजे. जे कोणी ऐकेल, तर आश्चर्य वाटेल. कोणा-कोणाला आश्चर्य सुद्धा वाटते. परंतु वेळ नसल्यामुळे पुरुषार्थ करू शकत नाही. परत ऐकतात, पवित्र जरूर बनायचे आहे. हा काम विकारच मनुष्यांना पतित बनवितो. त्यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. परंतु काम विकार जसे की त्यांची मालमत्ता आहे. त्यामुळे ते शब्द बोलत नाहीत. फक्त म्हणतात मनाला वश करा. परंतु मन अमन तेव्हाच होईल, जेव्हा शरीर नसेल. बाकी तर मन कधीच अमन होऊ शकणार नाही. देह प्राप्त झाला आहे कर्म करण्यासाठी, तर मग कर्मातीत अवस्थेत कसे रहाल. कर्मातीत अवस्था मृत व्यक्तीची असते. जिवंतपणी मृत्यू किंवा शरीरापासून वेगळी अवस्था असते. बाबा तुम्हाला शरीरापासून मुक्त बनवण्याचे शिक्षण देत आहेत. शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहेत. आत्मा परमधाम मध्ये राहणारी आहे. आत्मा शरीरामध्ये येते, त्यावेळेस तिला मनुष्य म्हणले जाते. शरीर कर्म करण्यासाठी प्राप्त होते. आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीराचा आधार कर्म करण्यासाठी घेते. शांती तर तेव्हा प्राप्त होईल ज्यावेळेस शरीर नसेल. मूळवतन मध्ये कर्म नाही. सूक्ष्म वतनाची तर गोष्टच नाही. सृष्टीचे चक्र तर येथे फिरते. बाबा आणि सृष्टी चक्राला जाणणे यालाच ज्ञान म्हटले जाते. सूक्ष्मवतन मध्ये न पांढरे वस्त्रधारी आहेत, न अलंकार धारी, न कोणी गळ्यात साप असणारे शंकर देवता असतात. बाकी ब्रह्मा आणि विष्णू चे रहस्य तर बाबा समजावत राहतात. ब्रह्मा येथे आहेत. विष्णूची दोन रूप सुद्धा येथेच आहेत. तो फक्त साक्षात्काराचा पार्ट नाटकांमध्ये आहे. जे दिव्या दृष्टीने पाहिला जातो. अपवित्र दृष्टीने पवित्र गोष्ट पाहू शकत नाही. अच्छा,

“ गोड गोड , फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते”

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(1) स्वतःला नेहमी सुरक्षित ठेवण्यासाठी बुद्धीला विचार सागर मंथना मध्ये व्यस्त ठेवायचे आहे. सुदर्शन चक्रधारी बनून राहायचे आहे इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायचा नाही

(2) शरीरापासून वेगळे राहण्याचे जे ज्ञान बाबा देत आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. मायेपासून वाचण्यासाठी आपली अवस्था अचल अडोल बनवायची आहे.

वरदान:-
नेहमी उमंग उत्साहा मध्ये राहून मनातून आनंदाचे गीत गाणारे अविनाशी नशीबवानभव :-

तुम्ही नशीबवान मुलं अविनाशी विधीने अविनाशी सिद्धी प्राप्त करता. तुमच्या मनातून नेहमी वाह- वाहचे आनंदाचे गीत गात असता. वाह बाबा! वाह नशीब! वाह गोड परिवार! वाह श्रेष्ठ संगमयुगाची सुवर्ण वेळ! प्रत्येक कर्म वाह! वाह!! आहेत. त्यामुळे तुम्ही अविनाशी नशीबवान आहात. तुमच्या मनामध्ये कधी, का? कसे?मी येऊ शकत नाही. का च्या ऐवजी वाह!वाह!! आणि मी च्या ऐवजी बाबा-बाबा शब्दच येतील.

बोधवाक्य:-
जे संकल्प करता त्याला अविनाशी सरकारचा शिक्का लावा तर अटल राहाल .