07-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबा कल्प कल्प येऊन तुम्हा मुलांना स्वत:चा परिचय देतात, तुम्हाला पण सर्वांना बाबांचा यर्थाथ परिचय दयायचा आहे”

प्रश्न:-
मुलांच्या कोणत्या प्रश्नाला ऐकुन बाबा पण आश्चर्य खातात?

उत्तर:-
मुलं म्हणतात, बाबा तुमचा परिचय देणे खुप अवघड आहे. आम्ही तुमचा परिचय कसा दयायचा? हा प्रश्न ऐकुन बाबांना पण आश्चर्य वाटते. जेव्हा तुम्हाला बाबांनी स्वत:चा परिचय दिला आहे तर तुम्ही पण दुसऱ्यांना देऊ शकता. यामध्ये अवघड काहीच नाही. हे तर खुप सहज आहे. आम्ही सर्व आत्मे निराकार आहोत तर जरुर पिता पण निराकारच असतील.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलं समजतात, बेहदच्या पित्याजवळ बसले आहात. हे पण जाणतात बेहदचे पिता या रथामध्येच येतात. जेव्हा बापदादा म्हणतात, हे तर जाणतात की शिवबाबा या रथावरती विराजमान होतात. जेव्हा बापदादा म्हणतात, हे तर जाणतात की शिवबाबा या रथावरती विराजमान आहेत, आपला परिचय देत आहेत. मुलं जाणतात हे बाबा आहेत, बाबा मत देतात की आत्मिक पित्याची आठवण करा तर पाप भस्म होतील, ज्यालाच योग अग्नी म्हणतात. आता तुम्ही बाबांना ओळखतात, तर असे थोडेच म्हणनार की शिवपित्याचा परिचय कसा देऊ? तुम्हाला पण बेहदच्या बाबांचा परिचय आहे, तर जरुर देऊ शकता. परिचय कसा दयायचा हा प्रश्नच उठू शकत नाही. जसे तुम्ही बाबांना ओळखले आहे तसे तुम्ही म्हणू शकता की आम्हा आत्म्याचे पिता तर एकच आहेत, यामध्ये संशयाची गोष्टच नाही. कोणी कोणी म्हणतात बाबा, तुमचा परिचय देणे कठीणच आहे. अरे पित्याचा परिचय देणे यामध्ये काहीच कठीण नाही. जनावर पण इशाऱ्याद्वारे समजतात की मी अमक्याचा मुलगा आहे. तुम्ही पण जाणतात की आम्हा आत्म्याचे ते पिता आहेत. आम्ही आत्मे आता या शरीरामध्ये प्रवेश आहोत. जसे बाबांनी समजवलो आहे की आत्म अकालमुर्त आहे. असे नाही की, त्यांचे कोणते रुप नाही. मुलांनी ओळखले आहे, अगदीच सहज गोष्ट आहे. आत्म्याचा एकच निराकार पिता आहे. आम्ही सर्व आत्मे भाऊ भाऊ आहोत. शिवपित्याची संतान आहोत. बाबाद्वारेच आम्हाला वारसा मिळतो. हे पण जाणतात की असा कोणता मुलगा दुनियेमध्ये नसेल जो पित्याला आणि त्यांच्या रचनेला जाणत नसेल. बाबांच्या जवळ काय संपत्ती आहे, हे सर्व जाणतात. हा आत्मा आणि परमात्माचा कल्याणकारी मेळा आहे. बाबा कल्याण कारी आहेत. खुप कल्याण करतात. बाबांना ओळखले नंतर समजतात, बेहदच्या पित्याद्वारे आम्हाला बेहदचा वारसा मिळतो. जे सन्यासी गुरु असतात, त्यांच्या शिष्यांना गुरुकडून मिळणाऱ्या वारशाची माहती नसते. गुरुकडे कोणता खजाना आहे, हे शिष्य जाणत नाहीत. तुमच्या बुध्दीमध्ये आहे, ते शिवबाबा आहेत, मिळकत पण बाबांच्या जवळ असते. मुलं जाणतात बेहदच्या पित्याजवळ विश्वाच्या बादशाही स्वर्गाची मिळकत आहे. या गोष्टी तुमच्या शिवाय कोणाच्या बुध्दीमध्ये नाहीत. लौकिक पित्याकडून कोणती संपत्ती मिळते, हे मुलंच जाणतात. आम्ही जिवंत पणी पारलौकिक बाबांचे बनलो आहोत. त्यांच्यापासून काय मिळते, ते पण जाणतात. आम्ही प्रथम क्षुद्र कुळाचे होतो, आता ब्राह्मण कुळामध्ये आलो. हे ज्ञान आहे की बाबा या ब्रह्मा तनामध्ये येतात, यांना प्रजापिता ब्रह्मा म्हणले जाते. ते शिव तर सर्व आत्म्याचे पिता आहेत. प्रजापिता ब्रह्मांना आजोबा म्हणले जाते. आता आम्ही त्यांची मुलं आहोत. शिवबाबांसाठी तर म्हणतात ते सर्वत्र आहेत, आंतरयामी आहेत. हे पण तुम्ही समजता का की, ते कसे रचनाच्या आदी मध्य अंतचे ज्ञान देतात. ते सर्व आत्म्याचे पिता आहेत, त्यांना नावरुपापेक्षा वेगळे समजणे खोटे आहे, चुकीचे आहे. त्यांचे नाव रुप पण आहे, शिवरात्री पण साजरी करतात, जयंती तर मनुष्यांची होते, शिवबाबांची रात्री होते. मुलं समजतात रात्री कोणाला म्हणले जाते. रात्रीमध्ये घोर अंधार असतो. अज्ञान अंधार आहे ना. ज्ञान सुर्य प्रगट होतात आणि अज्ञान अंधाराचा विनाश होतो. आता पण गातात परंतू अर्थ काहीच समजत नाहीत. सुर्य कोण आहे, कधी प्रगट झाले, काहीच समजत नाहीत. बाबा समजवतात, ज्ञान सुर्याला ज्ञानसागर पण म्हणले जाते. बेहदचे पिता ज्ञानाचे सागर आहेत. सन्यासी गुरु गोसावी इ. स्वत:ला ग्रंथाचे अधिकारी समजतात, ती सर्व भक्ती आहे. अनेक वेद ग्रंथ इ. वाचुन विद्वान बनतात. तर बाबा आत्मिक मुलांना सन्मुख समजवत आहेत यालाच आत्मा आणि परमात्माचा मेळा म्हणले जाते. तुम्ही समजता बाबा या रथामध्ये बाबा आले आहेत. याला मिलन मेळा म्हणतात. जेव्हा आम्ही घरी, परमधाममध्ये जातो, तो पण मेळा आहे. येथे बाबा स्वत: शिकवत आहेत. ते पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत. हा एकच मुद्दा चांगल्या रितीने धारण करा, विसरु नका. आता बाबा तर निराकार आहेत, त्यांना स्वता:चे शरीर तर नाही, तर जरुर दुसऱ्यांचे घ्यावे लागेल. स्वत: म्हणतात मी प्रकृतीचा आधार घेतो. नाही तर बोलू कसे? शरीराशिवाय बोलता येत नाही. तर बाबा या तनामध्ये येतात, यांचे नाव ठेवले आहे ब्रह्मा, आम्ही पण क्षुद्रापासुन ब्राह्मण बनलो तर नाव बदलायला पाहिजे. नावे तर तुमचे ठेवली होती. त्यापैकी आता पहा काही जण सोडून गेले, म्हणून ब्राह्मणांची माळ बनत नाही. भक्त माळ आणि रुद्र माळ गायन केली आहे. ब्राह्मणांची माळ बनत नाही. विष्णूची माळ तर चालत आली आहे. प्रथम क्रमांकामध्ये माळेचा मणी कोण आहे? लक्ष्मी नारायणला युगल रुपामध्ये दाखवले आहे विष्णूला 4 भुजा दाखविल्या आहेत, दोन भुजा लक्ष्मीच्या, दोन भुजा नारायणच्या.

बाबा समजवतात मी धोबी आहे. मी योगबळाद्वारे तुम्हा आत्म्यांना शुध्द बनवतो परत तुम्ही विकारामध्ये जाऊन आपलाच श्रृंगार बिघडवतात. बाबा सर्वांना शुध्द बनवण्यासाठी येतात. आत्म्यांना येऊन शिकवतात तर जरुर येथे येऊन शिकवायला पाहिजे ना. तुम्ही येऊन पावन बनवा असे पुकारतात. कपडे घाण असतील तर त्याला स्वच्छ करुन शुध्द बनवले जाते. तुम्ही पण पुकारतात हे पतित पावन बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा. आत्मा पावन बनली तर शरीर पण पावन मिळेल. तर प्रथम मुख्य गोष्ट आहे बाबांचा परिचय देणे. बाबांचा परिचय कसा दयायचा हा तर प्रश्नच विचारु शकत नाहीत. तुम्हाला पण बाबांनी परिचय दिला तेव्हा तर तुम्ही आले आहात. बाबांच्याजवळ येतात, तर बाबा कुठे आहेत? या रथामध्ये, हे अकाल तख्त आहे. तुम्ही आत्मा पण अकालमुर्त आहात. हे शरीर तुम्हा आत्म्याचे सिंहासन आहे, ज्यांच्यावरती तुम्ही आत्मा विराजमान आहात. ते अकाल तख्त तर जड झाले ना. तुम्ही जाणतात मी अकालमुर्त अर्थात निराकार, ज्यांचे साकार रुप नाही. मी आत्मा अविनाशी आहे, कधीच विनाश होत नाही. एक शरीर सोडुन दुसरे घेते. मज आत्म्याला अविनाशी भुमिका मिळाली आहे. आज पासून 5 हजार वर्षापुर्वी पण अशीच भुमिका अभिनय होता. 1-1 इसवी सनापासून आम्ही येथे भुमिका करण्यासाठी येतो. हे 5 हजार वर्षाचे चक्र आहे. ते तर लाखो वर्ष म्हणतात. म्हणून थोड्या वर्षाचा विचार येत नाही. तर मुलं असे कधी म्हणू शकत नाहीत. की आम्ही, शिवपित्याचा परिचय कसा देऊ? असे प्रश्न विचारल्यानंतर बाबांना आश्चर्य वाटते. अरे तुम्ही शिवपित्याचे बनले आहोत, तरीही बाबांचा परिचय देऊ शकत नाहीत. आम्ही सर्व आत्मे आहोत, ते आमचे बाबा आहेत. सर्वांची सद्गती करतात. सद्गती कधी करतील हे पण तुम्हाला आताच माहिती झाले आहे. कल्प कल्प, कल्पाच्या संगमयुगावरती येऊन सर्वांची सद्गती करतील. ते तर समजतात, आणखी 40 हजार वर्ष शिल्लक आहेत आणि ईश्वराला नावारुपापेक्षा वेगळे आहेत असे समजतात. नाव रुप नसलेली कोणती गोष्ट नसते. दगडामातीचे पण नाव असते. तर बाबा म्हणतात, गोड गोड मुलांनो, तुम्ही आले आहात बेहदच्या पित्याजवळ. बाबा पण जाणतात, अनेक मुलं आहेत. मुलांना आता हद आणि बेहदपासून दूर जायचे आहे. बाबा सर्व मुलांना घेऊन जाण्यासाठी आले आहेत. सतयुगामध्ये खुपच कमी असतात. किती स्पष्ट आहे, म्हणून चित्रावरती समजवले जाते. ज्ञान तर खुपच सहज आहे. बाकी आठवणीच्या यात्रामध्ये वेळ लागतो. अशा पित्याला तर कधीच विसरायचे नाही. बाबा म्हणतात, माझीच आठवण करा तर पावन बनाल. मी येतोच पतितापासून पावन बनवण्यासाठी. तुम्ही अकालमुर्त आत्मे सर्व आप आपल्या सिंहासनावरती विराजमान आहात. बाबांनी पण या शरीराचे लोन म्हणजे भाड्याने घेतले आहे. या भाग्यशाली रथामध्ये बाबा प्रवेश करतात. कोणी म्हणतात, परमात्माचे नाव रुप नाही. हे तर होऊ शकत नाही. त्यांना पुकारतात, महिमा गातात तर जरुर कोणती तरी गोष्ट आहे. तमोप्रधान असल्यामुळे काहीच समजत नाहीत. बाबा समजवतात, गोड गोड मुलांनो, 84 लाख योनी नसतात. 84 च जन्म आहेत. पुनर्जन्म पण सर्वांचा होतो. असे थोडेच ब्रह्ममध्ये जाऊन मिसळतील किंवा मोक्ष प्राप्त करतील. हे तर पुर्वनियोजीत नाटक आहे. एक पण कमी जास्त होऊ शकत नाही. या अनादी अविनाशी नाटकाद्वारेच लहान लहान नाटक बनतात. ते विनाशी आहेत. आता तुम्ही मुल बेहदमध्ये उभे आहात. तुम्हा मुलांना हे ज्ञान मिळाले आहे. आम्ही कसे 84 जन्म घेतले. आता बाबांनी सांगितले आहे. यापुर्वी कोणाला माहिती नव्हते. ऋषी मुनी पण म्हणत होते, आम्ही जाणत नाही. बाबा संगमयुगावरतीच येतात, या जुन्या दुनियेला बदलण्यासाठी. ब्रह्मा द्वारा नविन दुनियेची स्थापना परत करतात. ते तर लाखो वर्ष म्हणतात. कोणती गोष्ट आठवणीमध्ये पण येऊ शकत नाही. महाप्रलय पण होत नाही. बाबा राजयोग शिकवतात परत तुम्ही राजाई प्राप्त करतात. यामध्ये कोणत्या संशयाची गोष्टच नाही. तुम्ही मुलं जाणतात सर्वांत प्रिय शिवपिता आहेत, त्यांच्यानंतर प्रिय श्रीकृष्ण आहेत. तुम्ही जाणतात श्रीकृष्ण स्वर्गाचे प्रथम राजकुमार आहेत, नंबर एक तेच 84 जन्म घेतात. त्यांच्या ही अंतिम जन्मामध्ये मी प्रवेश करतो. आता तुम्हाला पतित पासून पावन बनायचे आहे. पतित पावन बाबाच आहेत. पाण्याच्या नद्याद्वारे पावन बनू शकत नाही. या नद्या तर सतयुगामध्ये पण असतात. तिथे तर पाणी खुपच स्वच्छ असते. कचरा इ. काहीच नसते. येथे तर खुपच कचरा पडत राहतो. बाबांनी पाहिले आहे, त्यावेळेत तर ज्ञान नव्हते. आता आश्चर्य वाटते की पाणी कसे पावन बनवू शकते?

तर बाबा समजवतात, गोड मुलांनो कधी संभ्रमित होऊ नका, की बाबांची आठवण कशी करायची? अरे तुम्ही बाबांची आठवण करु शकत नाही. ते कुख संतान आहेत तुम्ही दत्तक घेतलेली मुलं आहेत. दत्तक मुलांना ज्या पित्याकडून मिळकत मिळते, त्याला विसरु शकता का? बेहदच्या पित्याकडून बेहदची मिळकत मिळते तर त्यास थोडेच विसरायला पाहिजे. लौकिक मुलं बाबांना विसरतात का? परंतू येथे मायेचा विरोध होतो. मायेबरोबर युध्द चालते, सारी दुनिया कर्मक्षेत्र आहे. आत्मा या शरीरामध्ये प्रवेश करुन येथे कर्म करते. बाबा कर्म अकर्म विकर्माचे रहस्य समजवतात. येथे रावण राज्यामध्ये कर्म विकर्म बनतात. स्वर्गामध्ये रावण राज्यच नाही तर कर्म अकर्म होतात, विकर्म कोणतेच होत नाही. ही तर खुपच सहज गोष्ट आहे. येथे रावण राज्यामध्ये कर्म विकर्म बनतात म्हणून विकर्माचा दंड भोगावा लागतो. असे थोडेच म्हणाल रावण अनादी आहे. नाही, अर्धाकल्प रावण राज्य, अर्धाकल्प राम राज्य आहे. तुम्ही जेव्हा देवता होते तर तुमचे कर्म अकर्म होत होते. आता हे ज्ञान मिळत आहे. मुलं बनले आहात तर अभ्यास पण करायचा आहे. बस परत दुसरा धंदा इ. चे विचार करायचे नाहीत, परंतू गृहस्थ व्यवहारामध्ये राहत धंदा इ. करत कमल फुल समान राहायचे आहे. असे देवता तुम्ही बनत आहात, ती लक्षणे विष्णूला दिली आहेत, कारण तुम्हाला शोभणार नाहीत त्यांनाच शोभतात. विष्णूचे दोन रुप लक्ष्मी नारायण आहेत. ते आहेत अहिंसा परमो देवी देवता धर्म. न कोणते विकार, न काम कट्यार चालवतात, न कोणते लढाई भांडण इ. होते. तुम्ही डबल अहिंसक बनतात. सतयुगाचे मालक होते. नावच आहे सुर्वण युग, कंचन दुनिया. आत्मा आणि काया दोन्ही कंचन बनतात. कंचन काया कोण बनवतात? बाबा आता तर लोहयुग आहे ना. आता तुम्ही म्हणता सतयुग पास झाले. काल सतयुग होते ना. तुम्ही राज्य करत होते. तुम्ही ज्ञान संपन्न बनत जातात. सर्व तर एक सारखे बनत नाहीत. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. मी आत्मा अकाल तख्त नशिन आहे, या स्मृतीमध्ये राहायचे आहे. हद आणि बेहदच्या पार जायचे आहे. म्हणून हदमध्ये बुध्दी फसवायची नाही.

2. बेहद बाबापासून बेहदची मिळकत प्राप्त करायची आहे, याच नशेमध्ये राहायचे आहे. कर्म अकर्म विकर्माच्या गतीला जाणून विकर्मापासून वाचायचे आहे. अभ्यासाच्या वेळेत धंदा इ. मधुन बुध्दी काढायची आहे.

वरदान:-
सेवेमध्ये स्नेह आणि सत्यताच्या अधिकाराच्या संतुलन द्वारे सफलतामुर्त भव

जसे या खोट्या खंडामध्ये ब्रह्मा पित्याला सतयतेच्या अधिकाराचे प्रत्यक्ष स्वरुप पाहिले. त्यांच्या अधिकाराचे बोल कधीच अहंकाराची भासना देत नसत. अधिकाराच्या बोलमध्ये स्नेह सामावलेले होते. अधिकाराचे बोल फक्त प्रियच नाही तर प्रभावशाली होते. तर पित्याचे अनुकरण करा, स्नेह आणि अधिकार, निर्माणता आणि महानता, दोघे सोबत दिसून यावेत. वर्तमान वेळेत सेवेमध्ये या संतुलनाला अधोरेखित करा तर सफलता मुर्त बनाल.

बोधवाक्य:-
माझ्याला तुझ्यामध्ये परिवर्तन करणे अर्थात भाग्याचा अधिकार घेणे..!