22-12-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   24.03.1985   ओम शान्ति   मधुबन


“ आता नाही तर कधी नाही ”


आजप्रेमळ आणि कायदेशीर बापदादा सर्व मुलांचे खात्याला पाहत होते. प्रत्येकाचे जमेचे खाते किती आहे. ब्राह्मण बनणे म्हणजे खाते जमा करणे, कारण या एका जन्मात, जमा केलेल्या खात्यानुसार 21 जन्माची प्रालब्ध प्राप्त करत राहतात. 21 जन्माची प्रालब्ध प्राप्त करत नाहीत, परंतू जेवढे पुज्य बनता, म्हणजे राज्य पदाचे अधिकारी बनता, त्याच हिशोबानूसार आर्धाकल्प भक्तीमार्गामध्ये पुजा पण राज्य भाग्याचे अधिकाराच्या हिशोबानेच होत राहते. राज्य पद श्रेष्ठ आहे तर पुज्य स्वरुप पण तेवढेच श्रेष्ठ आहे. तेवढ्याच संख्येने प्रजा पण बनत आहे. प्रजा आपल्या राज्य अधिकारी विश्व महाराजा किंवा राजाला आई-वडीलांचे रुपात प्रेम करते. तेवढेच भक्त आत्मा पण असेच त्या श्रेष्ठ आत्म्याला किंवा राज्य अधिकारी महान आत्म्याला, आपले प्रिय ईष्ट समजून पुजा करतात. जे भ्रष्ट बनतात ते इष्ट पण तेवढेच महान बनत आहेत. या हिशोबानूसार या ब्राह्मण जीवनामध्ये राज्यपद आणि पुज्य पद प्राप्त करता. आर्धाकल्प राज्यपद प्राप्त करणारे बनता, आणि आर्धाक्ल्प पुज्य पद प्राप्त करणारे बनता, तर हा जन्म किंवा जीवन किंवा युग साऱ्या कल्पांचे खाते जमा करण्याचे युग वा जीवन आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांची एक बोधवाक्य बनविले आहे, आठवणीत आहे? आता नाही तर कधीच नाही हे या वेळेसाठी या जीवनासाठीच म्हटले जाते. ब्राह्मणासाठी पण हे बोधवाक्य आहे, तर अज्ञानी आत्म्ये जागे होण्यासाठी पण हेच बोधवाक्य आहे. जर ब्राह्मण आत्मा, प्रत्येक श्रेष्ठ कर्म करण्यापूर्वी, श्रेष्ठ संकल्प करत, हे बोधवाक्य नेहमी आठवणीमध्ये ठेवेल की, आता नाही तर, कधीच नाही, तर काय होईल? नेहमी प्रत्येक कार्यात तीव्र गतीने पुढे जाल. नेहमी त्यासोबतच हा सुविचार उमंग उत्साह देणारा आहे. आत्मिक जागृती आपोआपच होत राहते. बरं, नंतर करु, पाहू करायचे तर आहेच, चालायचे तर आहेच. बनायचे तर आहेच, असे साधारण पुरुषार्थाचे विचार स्वत:च नष्ट होतील, कारण स्मृती आली आहे कि, आता नाही तर कधीच नाही, जे करावयाचे आहे, ते आता करा. याला म्हटले जाते-तीव्र पुरुषार्थ.

वेळ गेल्याने कधी शुभ संकल्प पण बदलून जातो. शुभ कार्य ज्या उत्साहाने करण्याचा विचार केला होता, ते पण बदलून जाते, त्यामुळे ब्रह्मा बाबा पहिल्या क्रमांकाला गेले त्यांची विशेषता कोणती होती? कधी नाही, परंतू आता करावयाचे आहे. तुरंत दान महापुण्य म्हटले जाते. जर तुरंत दान नाही केले, विचार केला, वेळ घालविला, नियोजन करुन, मग प्रत्यक्षात आणले तर त्याला तुरंत दान म्हटले जात नाही. दान म्हटले जाते. तुरंत दान आणि दानमध्ये अंतर आहे. तुरंत दान महादान आहे. महादानाचे फळ महान आहे कारण जोपर्यंत विचाराला प्रत्यक्षात करण्याचा विचार करता, करु का, करेल, आता नाही, थोड्या वेळानंतर करतो. आता एवढेच करतो, असा विचार करणे, आणि प्रत्यक्षात करणे, यामध्ये जो वेळ जातो, त्यामध्ये मायेला संधी मिळते. बापदादा मुलांच्या खात्यामध्ये कितीतरी वेळा पाहतात कि, विचार करणे आणि करणे, यामध्ये जो वेळ असतो, त्यावेळीच माया येते आणि मुळ गोष्टच बदलून टाकते. कधी वाटते शरीराद्वारे मनाद्वारे, असे करावे परंतू वेळ गेल्याने जो 100 टक्के विचार केला होता, ते करण्याचे वेळी बदलून जाते. वेळ घालविल्याने, मायेचा प्रभाव पडल्याने, 8 तास लावणारे, 6 तास लावतात. 2 तास कमी लावतात. परिस्थितीच तशी बनते. त्याचप्रमाणे धनाचा विचार करता, 100 लावाावयाचे आहेत, आणि लावता 50, एवढा फरक पडतो. कारण मध्येच मायेला संधी मिळते, मग कितीतरी विचार येतात. बरं 50 आता लावतो, नंतर 50 पुन्हा लावतो. आहे तर बाबाचेच. परंतू तन-मन-धन सर्वांचे, जे तुरंत दान होते ते महापुण्य आहे. पाहिले आहे ना, बळी जो दिला जातो, महाप्रसाद होतो, जो तुरंत दिला जातो. एका झटक्यात जे मरतात त्याला महाप्रसाद म्हटले जाते. जे बळी जाताना ओरडतात, विचार करुनच राहतात त्यांना महाप्रसाद म्हणत नाहीत. जसे ते बोकडाचा बळी देतात, त्यावेळी ते फार ओरडते येथे काय करतात? विचार करतात, असे करु का नको ना करु. हे आहे विचार करणे ओरडणाऱ्याला कधी पण महाप्रसादाचे रुपात स्विकार करत नाहीत. असेच येथे पण तुरंत दान महापुण्य, हे जे गायन आहे ते यावेळेचेच आहे, म्हणजे विचार करणे आणि करणे तुरंत असावे. विचार करुन करुन राहून न जावे. काही वेळा असे अनुभव पण सांगतात. विचार पण मी असा केला होता, परंतू दुसऱ्यानेच केले, मी केले नाही. तर ज्यांनी केले त्यांनी प्राप्त केले. जो विचार करतच राहतो, तो विचार करत करत त्रेतायुगामध्येच पोहचतो. विचार करतच राहतो. हाच व्यर्थ विचार आहे कि जे तुरंत केले नाही. शुभ कार्याचे, शुभ विचाराचीच महिमा आहे कि, तुरंत दान महापुण्य कधी कधी काही मुले फार खेळ दाखवितात. व्यर्थ विचार एवढ्या वेगाने येतात ज्यावर नियंत्रण होत नाही. मग त्यावेळी म्हणतात, काय करावे, झाले ना. नियंत्रण करु शकत नाहीत. जे मनात आले ते केले, परंतू व्यर्थ न करण्यासाठी नियंत्रण शक्ती पाहिजे. एका समर्थ विचाराचे फळ पदमगुणा मिळत राहते. असेच एका व्यर्थ विचाराचा जमा खर्च आहे उदास होणे, नाराज होणे किंवा खुशी नष्ट होणे किंवा समजून येत नाही कि मी काय आहे, स्वत:लाच समजत नाहीत, याचा पण, एकाचा अनेक पटीने अनुभव होत राहतो. मग विचार करतात कि, विशेष काहीच नव्हते. माहित नाही का आनंद नष्ट झाला. गोष्टी तर मोठ्या नव्हत्या, परंतू फार दिवस झाले, आनंद कमी झाला आहे. माहित नाही का एकटेपणा, बरा वाटतो. कोठैतरी जावे, परंतू जावे तरी कुठे? ऐकटा म्हणजे बाबांच्या सोबती शिवाय, एकटे तर जायचे नाही ना. असे जरी एकटे झालात तरी पण बाबांच्या सोबतीत एकटे कधी व्हायचे नाही. जर बाबाचे सोबतीत एकटे झालात, वैरागी, उदासी, मग तो तर दुसरा मठ झाला. ब्राह्मण जीवन नाही. एकत्र आहात ना. संमयुग मिळून राहण्याचे युग आहे. अशी अदभुत जोडी तर साऱ्या कल्पात मिळणार नाही. जरी लक्ष्मी नारायण पण बनले, परंतू अशी जोडी तर बनणार नाही ना, त्यामुळे संगमयुगातील जे एकत्रित रुप आहे, जे एक सेकंद पण वेगळे होऊ शकत नाही. वेगळे झालात आणि गेलात. असा अनुभव आहे ना. मग काय करता? कधी समुद्राचे तटावर जाता, कधी छतावर, कधी थंड हवेच्या ठिकाणी जाता. मनन करण्यासाठी जावा, ती वेगळी गोष्ट आहे. परंतू बाबाशिवाय एकटे जावू नका. कुठेही जावा बाबा बरोबर जावा. हा ब्राह्मण जीवनाचा वायदा आहे. जन्मताच हा बाबा वायदा केला आहे ना. बरोबर राहू, बरोबरीने चालू. असे नाही कि जंगलात किंवा समुद्राकडे जावयाचे आहे. नाही. बरोबर राहायचे आहे. बरोबर जायचे आहे. हा वायदा पक्का आहे ना सर्वांचा. दृढ विचाराचे नेहमी विजय प्राप्त करतात. दृढता विजयाची किल्ली आहे. तर हा वायदा पण दृढ पक्का केला आहे ना. जिथे दृढता नेहमी आहे, तिथे विजय नेहमीच आहे. दृढता कमी तर विजय पण कमी.

ब्रह्मा बाबाची विशेषता काय होती, हिच होती ना तुरंत दान. कधी विचार केला काय होईल? अगोदर विचार, मग केले, नाही. तुरंत दान आणि महा पुण्यामुळे, नंबरएक महान आत्मा बनले, त्यामुळे पहा नंबर एकचे महान आत्मा बनल्यामुळे, कृष्णाचे रुपात नंबर एकची पुजा होत आहे. एकच महान आत्मा आहे ज्यांची बाल रुपात पण पुजा होते. बाळ रुप पण पाहिले आहे ना. आणि युवा रुपात राधे कृष्णाचे रुपात पण पुजा होते, आणि तिसरे गोप गोपीकेच्या रुपात पण गायन पुजन आहे. चौथे लक्ष्मी नारायणाचे रुपामध्ये ही एकच आत्मा आहे ज्यांची वेगवेगळ्या आयुष्याचे रुपात, वेगवेगळ्या चरित्राचे रुपात, गायन आणि पुजन होते. राधेचं गायन आहे. परंतू राधेला बाल रुपामध्ये झोक्यात झुलवत नाहीत. कृष्णाला झुलवतात-प्रेम कृष्णावर करतात. राधेचे बरोबर असल्याने नाव जरुर आहे. तरी पण नंबर एक आणि दोन मध्ये फरक तर आहे ना. तर नंबर एक बनण्याचे कारण काय झाले? महा पुण्य, महान पुण्य आत्माच महान पुज्य आत्मा बनली. अगोदर पण सांगितले आहे, तुम्हा लोकांच्या पुजेमध्ये पण अंतर असेल. कोणत्या देवी देवतांची पुजा विधीपुर्वक होते आणि कोणाची अशीच काम चलाऊ होत राहते. याचा तर मग फार विस्तार आहे. पुजेचा पण फार विस्तार आहे. परंतू आज तर सर्वांचे जमेचे खाते पाहत होतो. ज्ञानाचा खजाना, शक्तीचा खजाना, श्रेष्ठ विचाराचा खजाना, किती जमा केला आहे, आणि वेळेचा खजाना किती जमा केला आहे. हे चारी पण खजाने किती जमा केले आहेत. हे खाते पाहत होतो. तर आता या चारही खाती स्वत:च तपासून पहा. नंतर बापदादा पण सांगतील कि, निष्कर्ष काय निघाला, प्रत्येक खजाना जमा करणे आणि प्राप्तीचा काय संबंध आहे, आणि कसा जमा करावयाचा आहे, यासर्व गोष्टीवर नंतर सांगेण. समजले.

वेळ तर मर्यादीत आहे ना. येतात पण मर्यादेत ठिकाणी, स्वत:चे शरीर तर नाही. भाड्याने घेतलेले शरीर आणि आहे, ते पण तात्पुरत्या भुमिकेसाठी शरीर. त्यामुळे वेळेला पण पाहावे लागते. बापदादांना पण प्रत्येक मुलाला भेटण्यामध्ये, प्रत्येक मुलाची गोड गोड आत्मिक सुगंध घेण्यात मजा वाटते. बापदादा तर प्रत्येक मुलांचे तिन काळ जाणतात ना. परंतू मुले स्वत:चे वर्तमानाला जास्त जाणतात, त्यामुळे कधी कसे, कधी तसे होऊन जातात. परंतू बापदादा तीन्ही काळाला ओळखत असल्यामुळे त्याच दृष्टीने पाहतात कि, हे कल्पापुर्वीचे हक्कदार आहेत. अधिकारी आहेत. आता फक्त थोड्याशा, हलचलीमध्ये आहात परंतू आता हलचल असली तर नंतर अचल व्हावयाचे आहे. श्रेष्ठ भविष्य पाहत आहेत त्यामुळे वर्तमानाला पाहून पण पाहत नाहीत. तर प्रत्येक मुलांची विशेषता पाहत आहेत. असा कोण आहे ज्यात कोणती पण विशेषता नाही आहे. पहिली विशेषता तर ही आहे कि जे येथे पोहचलात. आणखीन काही पण नसले तरी समोरासमोर भेटणे, हे भाग्य पण कमी नाही. ही पण विशेषता आहे ना. ही विशेष आत्म्यांची सभा आहे. त्यामुळे विशेष आत्म्यांच्या, विशेषतेला बापदादा पाहून आनंदीत होत आहेत. अच्छा.

नेहमीच तुरंत दान महापुण्यच्या श्रेष्ठ विचारातील, नेहमी कधी ला, आता मध्ये परिवर्तन करणारे, नेहमी वेळेच्या वरदानाला ओळखून वरदानांनी झोळी भरणारे, नेहमी ब्रह्मा बाबाचे अनुकरण करणारे, ब्रह्मा बाबा बरोबर श्रेष्ठ राज्य अधिकारी आणि श्रेष्ठ पदाचे अधिकारी बनणारे, नेहमी बाबा बरोबर एकत्र राहणारे, असे नेहमीचे सोबती मुलांना, नेहमीच बरोबर राहणाऱ्या मुलांना बापदादाची प्रेमळ आठवण आणि नमस्ते.

सर्व मुलांना निरोपाचे वेळी प्रेमळ आठवण देताना
बापदादा चोहीकडच्या सर्व, मुलांना प्रेमळ आठवण पाठवत आहेत. प्रत्येक ठिकाणाची स्नेही मुले, स्नेहाने सेवेमध्ये पुढे जात आहेत, आणि स्नेह नेहमी पुढे नेत आहे. स्नेहाने सेवा करता. त्यामुळे ज्यांची सेवा करता, ते पण बाबाचे स्नेही बनत आहेत. सर्व मुलांना सेवेचे धन्यवाद, कारण कष्ट नसून प्रेमाचे धन्यवाद आहेत कारण नाव कष्ट आहे परंतू आहे प्रेम, त्यामुळे जे आठवणीत राहून सेवा करतात ते स्वत:चे वर्तमान आणि भविष्य जमा करत आहेत, त्यामुळे आता पण सेवेचा आनंद मिळतो आणि भविष्यासाठी पण जमा होत आहे. सेवानाही केली परंतू अविनाशी बँकेत आपले खाते जमा केले. थोडीशी सेवा आणि नेहमीसाठी खात्यात जमा होते. तर ती सेवा काय झाली? जमा झाले ना. त्यामुळे सर्व मुलांना बापदादा प्रेमळ आठवण देत आहेत. प्रत्येक स्वत:ला समर्थ आत्मा समजून पुढे चला, त्यामुळे समर्थ आत्म्यांना विजय नेहमी आहेच. प्रत्येकानी स्वत:चे नावानिशी विशेष प्रेमळ आठवणाचा स्विकार करावा. (दिल्ली पांडवभवन मध्ये टैलेक्स बसविला आहे.) दिल्ली निवासी पांडव भवन मधील सर्व मुलांना विशेष सेवेचे अभिनंदन. कारण हे साधन सेवेसाठीच बनले आहेत. साधनाचा धन्यवाद नाही, सेवेचा धन्यवाद. नेहमी या साधनाद्वारे बेहदची सेवा अविनाशी करत राहाल. आनंदाने या साधनाद्वारे बाबाचा संदेश विश्वात पोहचेल, त्यामुळे बापदादा पाहात आहेत, मुलांना सेवेचा उमंग उत्साह, खुशी किती आहे. या खुशीत नेहमी पुढे जात राहा. पांडव भवनसाठी सर्व विदेशी मुले, खुशीचे प्रमाणपत्र देत आहेत, त्याला म्हटले जाते बाबासारखे पाहुणचारामध्ये नेहमी पुढे राहणे. जसे ब्रह्मा बाबांनी किती पाहुणचार करुन दाखविला. तर पाहुणचारामध्ये अनुकरण करणारे बाबाला प्रसिध्द करतात. बाबाचे नाव प्रत्यक्ष करत आहेत, त्यामुळे बापदादा सर्वांतर्फे प्रेमळ आठवण देत आहेत.

अमृतवेळेला 6 वाजता बापदादांनी परत मुरली चालवली व प्रेमाने आठवण दिली :- (25-03-85)
आजच्या दिवशी नेहमी स्वत:ला डबल लाइट समजूनउडती कलेचा अनुभव करा. कर्मयोगीची भुमिका वठविताना कर्म आणि आठवणीचा समतोल तपासा कि कर्म आणि आठवण म्हणजे योग, दोन्ही शक्तीशाली आहे? जर कर्म शक्तीशाली राहिले आणि आठवण कमी राहिली तर समतोल नाही. आणि आठवण शक्तीशाली आणि कर्म शक्तीशाली नाही तरी पण समतोल नाही. तरी कर्म आणि आठवणीचा समतोल ठेवा. सारा दिवस या श्रेष्ठ स्थितीमध्ये राहिल्याने स्वत:ची कर्मातीत स्थिती जवळ आल्याचा अनुभव होईल. सारा दिवस कर्मातीत अवस्था किंवा अव्यक्त फरिश्ता स्वरुप स्थितीमध्ये चालत फिरत राहणे. आणि खालच्या स्थितीत येऊ नका. आज खाली यायचे नाही, वरच राहणे. जर कोणी कमजोरीने खाली आलेच तर एकमेकाला आठवण देऊन, समर्थ बनवून सर्वांना उंच स्थितीचा अनुभव करावा. हा आजच्या शिक्षणाचा गृहपाठ आहे. गृहपाठ जास्त आहे, अभ्यास कमी आहे.

असे नेहमी बाबाचे अनुकरण करणारे नेहमी बाबासारखे बनण्याचे लक्ष्य धारण करुन पुढे चालणारे, उडत्या कलेचे अनुभवी मुलांना बापदादांचा ह्दय व मन, स्नेह व प्रेमाची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात.

वरदान:-
मधुरतेद्वारे बाबांच्या जवळ असल्याचा साक्षात्कार करणारे महान आत्मा भव

ज्या मुलांच्या विचारात मधुरता, बोलण्यात मधुरता आणि कर्मात मधुरता आहे तेच बाबांच्या जवळ आहेत, त्यामुळे बाबा पण त्यांना रोज म्हणतात. गोड गोड मुलांनो आणि बाबा पण प्रतिसाद देतात, गोड गोड मुलांनो. तर हे दररोजचे मधूर बोल मधुरता संपन्न बनवितात. अशा मधुरतेला प्रत्यक्ष करणारे, श्रेष्ठ आत्मेच महान आहेत. मधुरताच महानता आहे. मधुरता नाही तर महानतेचा अनुभव होत नाही.

सुविचार:-
कोणतेही कार्य हल्के (डबल लाइट) बणून करा तर मनोरंजनाचा अनुभव होईल.