11-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , हे पुरुषोत्तम संगम युग परिवर्तन होण्याचे युग आहे , आता तुम्हाला कनिष्ठ पासून उत्तम पुरुष बनायचे आहे .

प्रश्न:-
बाबांच्या सोबत कोणत्या मुलांचे गायन केले जाते ?

उत्तर:-
जे शिक्षक बणुन अनेकांचे कल्याण करण्याच्या निमित्त बनतात,त्यांचे गायन बाबांच्या सोबत होते,कारण करन करावनहार बाबा मुलां द्वारे,अनेकांचे कल्याण करतात,तर मुलांची पण महिमा गायन होते,असे म्हणतात.बाबा,अमक्यानी आमच्या वरती दया केली,जे आम्ही खुपच श्रेष्ठ बनलो.शिक्षका शिवाय आशीर्वाद मिळू शकत नाही.

ओम शांती।
आत्मिक पिता,आत्मिक मुलांना विचारतात.बाबा समजवतात आणि विचारतात पण.आता बाबांना मुलांनी जाणले आहे.जरी सर्वव्यापी म्हणतात परंतु त्यापूर्वी बाबांना ओळखायला पण पाहिजे ना.बाबा कोण आहेत, ओळखून परत विचारले पाहिजे,बाबांचे निवास स्थान कोठे आहे.बाबांना जाणतच नाही तर त्यांचे निवासस्थान कसे माहिती होईल.ते तर म्हणतात ईश्वर नावा रूपा पेक्षा वेगळा आहे,म्हणजे नाहीतच.तर जी गोष्ट नाहीच,त्याचे राहण्याचे स्थान कसे विचारू शकतील.हे तर आत्ता तुम्ही मुलंच जाणतात.बाबांनी प्रथम स्वतःची ओळख करून दिली आहे.परत राहण्याच्या स्थाना वरती पण समजवले आहे.बाबा म्हणतात मी तुम्हाला परिचय करून देण्यासाठी आलो आहे.मी तुम्हा सर्वांचा पिता आहे,ज्यांनाच परमपिता म्हटले जाते. आत्म्याला तर कोणी जाणत नाहीत.बाबाच नावां रुपा पेक्षा वेगळे आहेत,तर मुलं कोठुन येतील.मुलं आहेत तर जरूर पिता पण आहेत,याद्वारे सिद्ध होते की ते नावारूपा पेक्षा वेगळे नाहीत.मुलांचे नाव रूप आहे,जरी ते कितीही सूक्ष्म आहेत. आकाश पण सूक्ष्म आहे,नाव तर आहे ना.आकाश सूक्ष्म आहे,तसे बाबा पण खूपच सूक्ष्म आहेत.मुलं वर्णन करतात आश्चर्यकारक तारा आहे,जे यांच्या मध्ये प्रवेश करतात,त्यांना आत्मा म्हटले जाते.बाबा तर परमधाम मध्येच राहतात,ते राहण्याचे स्थान आहे.वरती नजर जाते ना.वरती बोटाने ईशारा करुन आठवण करतात,तर जरूर कोणती वस्तू असेल ना,ज्याची आठवण करतात.परमपिता परमात्मा म्हणतात ना.तरीही नावारूपा पेक्षा वेगळे मानणे,यालाच अज्ञान म्हटले जाते.बाबाला जाणने यालाच ज्ञान म्हटले जाते.हे पण तुम्ही समजता, आम्ही पूर्वी अज्ञानी होतो,बाबांना जाणत नव्हतो आणि स्वतःला पण जाणत नव्हतो.आता समजता आम्ही आत्मा आहोतं,शरीराला विनाशी म्हटले जाते,तर जरूर कोणती गोष्ट आहे ना.अविनाशी कोणते नाव नाही.अविनाशी म्हणजेच ज्याचा विनाश होत नाही.तर जरूर कोणती वस्तू आहे. मुलांना चांगल्या रीतीने समजावले आहे,गोड-गोड मुलांनो,ज्यांना मुलं मुलं म्हणतात,ते आत्मे अविनाश आहेत.हे आत्म्याचे पिता परमपिता परमात्मा सन्मुख समजवतात.हा खेळ एकाच वेळेस होतो,जेव्हा बाबा येऊन मुलांना आपला परिचय देतात,मी पण कलाकार आहे,कशी भूमिका वठवतो,हे पण तुमच्या बुद्धीमध्ये आहे. जुने म्हणजे पतीत,आत्म्याला नवीन पावन बनवतात,तर शरीर पण खूपच सुंदर बनते.हे तर तुमच्या बुद्धीमध्ये आहे ना.आता तुम्ही बाबा बाबा म्हणतात, ही भूमिका चालत आहे ना.आत्मा म्हणते बाबा आले आहेत, आम्हाला शांतीधाम घरी घेऊन जाण्यासाठी. शांतीधामच्या नंतर सुखधाम आहे. शांतीधाम च्या नंतर दुःखधाम तर होऊ शकत नाही.नवीन दुनिया मध्ये सुखच म्हटले जाते.या देवी देवता चैतन्य मध्ये असतील आणि यांना कोणी विचारतील तुम्ही कुठले रहीवाशी आहात,तर म्हणतील आम्ही स्वर्गाचे रहिवासी आहोत.आता हे जड मूर्ती तर म्हणू शकत नाहीत.तुम्ही तर म्हणू शकता ना,आम्ही वास्तविक स्वर्गामध्ये राहणारे देवी-देवता होतो,परत ८४ चे चक्र लावून आता संगम युगा वरती आलो आहोत.हे परिवर्तन होण्याचे पुरुषोत्तम संगमयुग आहे.मुलं जाणतात आम्ही खूपच उत्तम पुरुष बनत आहोत.आम्ही प्रत्येक पाच हजार वर्षानंतर सतोप्रधान बनतो, सतोप्रधान पण नंबरानुसारच म्हणणार.तर ही सारी भूमिका आत्म्याला मिळाली आहे,असे नाही म्हणणार मनुष्याला भूमिका मिळाली आहे.मज आत्म्याला ही भूमिका मिळाली आहे.मी आत्मा ८४जन्म घेतो,मी आत्मा वारस आहे, वारस नेहमी पुरूष असतात,स्त्री नाही.तर आता तुम्हा मुलांना हे चांगल्या रीतीने समजायचे आहे की,आम्ही सर्व आत्मे पुरुष आहोत.सर्वांना बेहदच्या पित्या कडून वारसा मिळत आहे.हदच्या लौकिक पित्याकडून फक्त मुलांनाच वारसा मिळतो,मुलींना नाही.असे पण नाही,आत्मा नेहमीच स्त्री बनते,तुम्ही कधी पुरुष तर कधी स्त्रीचे शरीर धारण करतात. यावेळेस तुम्ही सर्व पुरुष आहात,सर्व आत्म्यांना एका पित्याकडून वारसा मिळत आहे.सर्व मुलंच आहेत,सर्वांचे पिता पण एकच आहेत.बाबा म्हणतात हे मुलांनो,तुम्ही सर्व आत्मे पुरुष आहात. तुम्ही माझी आत्मिक मुल आहात,परत भूमिका करण्यासाठी स्त्री-पुरुष दोघे पाहिजेत,तेव्हा तर मनुष्य सृष्टिची वृद्धी होईल.या गोष्टी तुमच्या शिवाय कोणी पण जाणत नाहीत.जरी म्हणतात आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत परंतु समजत नाहीत.

आता तुम्ही म्हणता बाबा आपल्याकडून आम्हाला अनेक वेळेस वारसा मिळाला आहे. आत्म्याला हे चांगल्या रीतीने माहिती झाले आहे. आत्मा,बाबांची जरूर आठवण करते,बाबा आमच्यावरती दया करा.बाबा तुम्ही आत्ता या आणि आम्ही सर्व तुमची मुलं बनतो. देहाच्या सर्व संबंधाला विसरून आम्ही,आत्मा तुमचीच आठवण करू.बाबांनी समजावले आहे,आत्मा समजून माझी आठवण करा.बाबांकडून आम्ही वारसा कसा घेतो,प्रत्येक पाच हजार वर्षांनंतर आम्ही देवता कसे बनतो,हेच जाणायला पाहिजे ना. स्वर्गाचा वारसा कोणा द्वारे मिळतो,हे पण तुम्ही आत्ताच समजतात.बाबा तर स्वर्गवासी बनत नाहीत,मुलांना बनवतात.बाबा स्वता:तर नरका मध्ये येतात.तुम्ही बाबांना बोलवता पण नरकामध्येच.ज्या वेळेस तुम्ही तमोप्रधान बनतात. ही तमोप्रधान दुनिया आहे ना.सतोप्रधान दुनीया होती,पाच हजार वर्षापूर्वी यांचे राज्य होते.या गोष्टींना,या ज्ञानाला तुम्ही,आत्ताच जाणतात,हे मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण आहे.मनुष्या पासूनच देवता बनतात,मुलगा बनला आणि वारस झाला.बाबा म्हणतात तुम्ही सर्व माझी मुलं आहात. तुम्हाला वारसा देतो,तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात, राहण्याचे स्थान मुळवतन किंवा निर्वाण धाम आहे, ज्याला निराकारी दुनिया पण म्हटले जाते.सर्व आत्मे तेथे राहतात,या सूर्य चंद्रा पेक्षाही वरती गोड शांतीचे घर आहे,परंतु तेथे बसायचे नाही,बसून काय कराल?ती तर जशी जड अवस्था झाली. आत्मा जेव्हा भूमिका करेल,तेव्हा तर चैतन्य बनू शकेल.आहे चैतन्य परंतु भूमिका केली नाही तर जड होईल ना. तुम्ही येथे उभे रहा,हात पाय चालवू नका तर,जसे जड झाले ना.तेथे तर नैसर्गिक शांती असते,आत्मा जशी जड आहे,काहीच भूमिका करत नाही.शोभा तर तेव्हाच असते,जेव्हा आत्मा भूमिका करते.शांतीधाम मध्ये काय शोभा असेल. सुखदुःखा पासुन वेगळे राहतात,तेथे काहीच भूमिका करत नाहीत,तर तेथे राहुन काय फायदा? प्रथम सुखाची भूमिका वठवायची आहे.प्रत्येकाला अगोदरच भूमिका मिळालेली आहे.कोणी म्हणतात आम्हाला मोक्ष पाहिजे,बुडबुडा पाण्या मध्ये मिळाला बस,आत्मा जसे की नाही.काहीच भूमिका केली नाही तर,जसे जडच म्हणनार ना. चैतन्य होऊन जड सारखे पडून राहिले तर काय फायदा? भूमिका सर्वांना करायची आहे. मुख्य हिरो हिरोईनच्या भूमिका म्हटले जाते.तुम्हा मुलाला हिरो हिरोईनची पदवी मिळत आहे.आत्मा येथेच भूमिका करते.प्रथम सुखाचे राज्य करते,परत रावणाच्या,दुःखाच्या राज्यामध्ये जाते.आता मुलांना सर्वांना संदेश द्यायचा आहे,शिक्षक बणुन दुसऱ्यांना समजावयाचे आहे.शिक्षक बनत नाही तर त्यांचे पद कमी होईल.शिक्षक बनल्या शिवाय कोणाला आशीर्वाद कसा मिळेल.कुणाला पैसे दिले तर त्यांना खूषी होईल ना.मनामध्ये समजता ब्रह्माकुमार कुमारी आमच्यावरती खूप दया करतात,आम्हाला खूप श्रेष्ट बनवतात.तशी तर महिमा एक बाबांची करतात.बाबा तुम्ही आम्हा मुलांचे खूपच कल्याण करतात.कोणाच्या द्वारे तर होते ना.बाबा करन करावनहार आहेत,तुमच्या द्वारे करवतात.तुमचे कल्याण होते,तर तुम्ही परत दुसऱ्यांचे कल्याण करायचे आहे.जशी सेवा करतात,तर उच्चपद मिळते.राजा बनायचे आहे तर प्रजा पण बनवायची आहे.जे चांगल्या नंबर मध्ये येतात तर,ते राजा बनतात,माळ बनतेना.विचारायचे आहे,मी माळे मध्ये कोणता नंबर बनेल.९ रत्न मुख्य आहेत ना.हिरा बनवणारे मध्ये आहेत.हिऱ्याला मध्ये ठेवतात. माळेमध्ये वरती फुल आहे ना.अंत काळात तुम्हाला माहिती होईल,कोणते मुख्य दाणे बनतात.जे दैवी घराण्यांमध्ये येतील.अंत काळात तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील.कसे हे सजा खातात,दिसुन येईल.सुरुवातीला दिव्यदृष्टी द्वारे तुम्ही पाहत होते. हे पण गुप्त आहे.आत्मा सजा कोठे खाते,हे पण नाटकामध्ये भूमिका आहे.गर्भ जेल मध्ये सजा मिळते.जेल मध्ये धर्मराजाला पाहतात,परत म्हणतात आम्हाला यामधून बाहेर काढा. आजारपण इत्यादी होते,तो पण कर्मभोग आहे. सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.बाबा तर खऱ्याच गोष्टी ऐकवतील ना.आता तुम्ही सत्यवान बनतात. सत्यवान त्यांनाच म्हटले जाते,जे बाबा पासून खूप शक्ती घेतात.तुम्ही विश्वाचे मालक बनतात,तर खूप ताकत राहते.हंगामा इत्यादीची कोणती गोष्ट नाही. शक्ती कमी आहे तर अनेक हंगामे होतात.तुम्हा मुलांना खूप शक्ती मिळते,तेही अर्ध्या कल्पा साठी, तरीही नंबरानुसारच शक्ती मिळते.एक सारखी शक्ती मिळत नाही,ना एकसारखे पद मिळते.हे पण अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे.कोणी शेवटी येतात,तर एक दोन जन्म घेतात आणि शरीर सोडतात.दिवाळीला मच्छर होतात,रात्री जन्म घेतात सकाळी मरतात.ते तर अगणित असतात. मनुष्याची तरीही लोकसंख्या मोजली जाते.प्रथम जे येतात,त्यांचे आयुष्य खूप असते.तुम्हा मुलांना खूपच आनंद व्हायला पाहिजे,आम्ही आयुष्यमान बनत आहोत.तुम्ही पूर्ण भूमिका वठवतात.बाबा तुम्हालाच समजावतात,तुम्ही कशी पूर्ण भूमिका करतात.शिक्षणा नुसार परमधाम वरून भूमिका करण्यासाठी येतात.तुमचे शिक्षण नवीन दुनिये साठी आहे.बाबा म्हणतात अनेक वेळेस हे ज्ञान मी तुम्हाला दिलेले आहे.हे शिक्षण अविनाशी आहे.अर्धाकल्प तुम्ही प्रारब्ध भोगतात.त्या विनाशी शिक्षणाद्वारे सुख पण थोडसे मिळते.त्या शिक्षणाद्वारे कोणी वकील बनतात परत,कल्पा नंतर वकिलच बनतील.हे पण तुम्ही जाणता जी सर्वांची भूमिका आहे,तीच भूमिका कल्प कल्प करत जातील.देवता असो किंवा शुद्र प्रत्येकाची भूमिका कल्पापुर्वी प्रमाणेच होते,त्यामध्ये काहीच फरक पडू शकत नाही.प्रत्येक जण आपली भूमिका वठवत आहे.हा सर्व पूर्वनियोजित खेळ आहे.काहीजण विचारतात पुरुषार्थ मोठा आहे की प्रारब्ध मोठे,तसे तर पुरुषार्था शिवाय भाग्य बनू शकत नाही.पुरुषार्था द्वारे प्रारब्ध बनते,ते ही अविनाश नाटक अनुसार.तर सर्व अविनाश नाटका वरती आधारित आहे.कोणी पुरुषार्थ करतात,तर कोणी करत नाहीत.काही जण येतात तरीही पुरुषार्थ करत नाहीत,तर भाग्य कसे बनेल.साऱ्या दुनिया मध्ये जे पण कार्य व्यवहार चालतात,ते सर्व पूर्वनियोजित नाटकं नुसार आहे.आत्म्यामध्ये पण अगोदरच भूमिका नोंदलेली आहे,सुरुवातीपासून अंत पर्यंत. जसे तुमची आत्मा ८४च्या चक्रा मध्ये येते,हिऱ्या सारखी पण बनते आणि कवडी सारखी पण बनते. यासर्व गोष्टी तुम्ही आत्ताच ऐकत आहात,शाळेमध्ये जर कोणी नापास झाले तर त्यांना बुध्दू म्हटले जाते.धारणा होत नाही याला विविधता चे झाड म्हणले जाते.अनेक प्रकारची मुलं आहेत.या विविधता पूर्ण झाडाचे ज्ञान बाबाच समजवतात.कल्पवृक्षा वरती पण समजवतात. वडाच्या झाडाचे उदाहरण आहे,त्याच्या फांद्या खूप पसरतात. मुलं समजतात आत्मा अविनाशी आहे, शरीर तर विनाश होते.आत्माच धारणा करते, आत्माच८४ जन्म घेते.शरीर तर बदलत राहते आत्मा तीच आहे,आत्माच वेगवेगळे शरीर घेऊन भूमिका करते,ही नवीन गोष्ट आहे ना.तुम्हा मुलांना पण ही समज मिळाली आहे.कल्पा पूर्वी पण बाबांनी असे समजले होते.बाबा भारतामध्ये च येतात.तुम्ही सर्वांना संदेश देत राहतात. कोणी ही असे राहायला नको,ज्याला संदेश मिळाला नाही. संदेश ऐकणे सर्वांचा हक्क आहे,परत बाबा पासून वारसा पण घेतील.काही तरी ऐकतील,तरीही बाबाची मुल आहेत ना.बाबा समजवतात, मी तुम्हा सर्वांचा पिता आहे.माझ्या द्वारे या रचनेच्या आधी मध्य अंतला जाणल्या मुळे,तुम्ही हे पद मिळवता,बाकी सर्व मुक्ती मध्ये जातील.बाबा तर सर्वांची सदगती करतात,गायन पण आहे,बाबा तुमची लीला अपरंपार आहे,कोणती लिला,कशी लिला.या जुन्या दुनियेला बदलण्याची लिला आहे. माहिती पडायला पाहिजे ना.मनुष्य च सजमतील ना.बाबा तुम्हा मुलांना येऊन सर्व गोष्टी समजवतात.बाबा ज्ञानाचे सागर आहेत.तुम्हाला पण ज्ञानसंपन्न बनवतात.तुम्ही नंबरानुसारच बनतात.शिष्यवृत्ती घेणार्यांना ज्ञानवान म्हणतात,अच्छा.

फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादा ची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) नेहमी याच स्मृतीमध्ये राहायचे आहे की,आम्ही आत्मा पुरुष आहोत.आम्हाला बाबा कडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. मनुष्यापासून देवता बनण्याचे ज्ञान घ्यायचे आहे आणि दुसऱ्यांना द्यायचे आहे.

(२) साऱ्या दुनिया मध्ये जे पण कार्य व्यवहार चालतो,हे सर्व पूर्वनियोजित नाटकं नुसार आहे.यामध्ये पुरुषार्थ आणि प्रारब्ध दोघांची नोंद आहे.पुरुषार्था शिवाय प्रारब्ध मिळू शकत नाही,या गोष्टीला चांगल्याप्रकारे समजायचे आहे.

वरदान:-
पवित्रते च्या रहस्याला जाणून , सुख शांती संपन्न बनणारे महान आत्मा भव

पवित्रते च्या शक्तीच्या महानतेला जाणून पवित्र अर्थात पुज्य देवात्मा आत्तापासून बना.असे नाही की अंत काळात बनू.हे अनेक वर्षाच्या जमा केलेल्या शक्ती,अंत काळात उपयोगी पडतील. पवित्र बनणे म्हणजे साधारण गोष्ट नाही, ब्रह्मचारी राहतात,पवित्र बनतात,परंतु पवित्रता जननी आहे. संकल्प द्वारे,वृत्ती द्वारे,वातावरणा द्वारे, वाणी द्वारे संपर्का द्वारे, सुख-शांती ची जननी बनणे यालाच महान आत्मा म्हणतात.

बोधवाक्य:-
उच्च स्थितीमध्ये राहून सर्व आत्म्यांना दयेची दृष्टी द्या , प्रंकपन पसरवा .