13-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांनो, बाबाच्या श्रीमता वरती चालणेच बाबांचा आदर्श करणे आहे, मनमता वर
चालणारी मुलं अनादर करतात"
प्रश्न:-
ग्रहस्थ
व्यवहारांमध्ये राहणाऱ्यां साठी कोणत्या एका गोष्टीसाठी,बाबा मनाई करत नाहीत परंतु
एक सूचना देतात,ती कोणती?
उत्तर:-
बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही खुशाल सर्वांच्या सबंध संपर्कामध्ये या,कोणती पण नोकरी
ईत्यादी करा,संपर्कामध्ये यावे लागते,रंगीत कपडे घालावे लागतात,बाबांची मनाई
नाही.बाबा तर फक्त सूचना देतात,मुलांनो देह सहित देहाच्या सर्व संबंध मधुन ममत्व
काढून माझी आठवण करा.
ओम शांती।
शिवबाबा सन्मुख मुलांना समजवतात अर्थात आपल्यासारखे बनवण्याचा पुरुषार्थ करतात,जसे
मी ज्ञानाचा सागर आहे,तसेच मुलांनी पण बनावे.हे तर गोड मुलं जाणतात,सर्व एकसारखे
बनणार नाहीत.पुरुषार्थ तर प्रत्येकाला आप आपला करावा लागतो.शाळेमध्ये अनेक
विद्यार्थी शिक्षण घेतात,परंतु सर्वच चांगल्या मार्काने पास होत नाहीत,तरीही शिक्षक
पुरुषार्थ करवतात. तुम्ही मुलं पण पुरुषार्थ करत आहात.बाबा विचारतात तुम्ही काय
बनणार?सर्व उत्तर देतात, आम्ही नरापासून नारायण,नारी पासून लक्ष्मी बनण्यासाठी आलो
आहोत.हे तर ठीक आहे,परंतु आपला पुरुषार्थ पण तपासायचा आहे.बाबा श्रेष्ठ ते श्रेष्ठ
आहेत,शिक्षक पण आहेत,तर गुरु पण आहेत.या पित्याला कोणीच जाणत नाही.तुम्ही मुलं जाणता
शिवबाबा आमचे पिता पण आहेत,शिक्षक पण आहेत आणि सद्गुरू पण आहेत परंतु ते जसे आहेत
तसे त्यांना ओळखणे खूपच कठीण आहे. बाबांना जाणले तर शिक्षकाला विसरतील, परत गुरूला
पण विसरतील.त्याचा आदर मुलांनी ठेवायला पाहिजे.आदर कशाला म्हटले जाते?बाबा जे
शिकवतात,ते चांगल्या रीतीने शिकणे म्हणजेच खूप आदर ठेवणे.बाबत तर खूपच गोड
आहेत.मनामध्ये खूपच खुशीचा पारा चढायला पाहिजे. कापारी खुशी राहायला पाहिजे.
प्रत्येकाने स्वत:ला विचारायला पाहिजे,आम्हाला अशी खुशी आहे का? एक सारखे तर सर्व
बनू शकत नाहीत. शिक्षणा मध्ये पण खूपच फरक असतो. त्या शाळेमध्ये पण खूप फरक राहतो.
तिथे तर साधारण शिक्षक शिकवतात, हे तर असाधारण, अद्वितीय शिक्षक आहेत.असे शिक्षक
दुसरे कोणी असत नाहीत.कोणालाच माहिती नाही की, निराकार पिता शिक्षक पण बनतात.
कृष्ण तर देवता आहेत ना. तसे तर अनेकांचे नाव कृष्ण असते परंतु कृष्ण म्हणल्यानंतर
श्रीकृष्ण समोर येतात.ते तर देहधारी आहेत ना. तुम्ही जाणतात हे शरीर त्यांचे नाही,
स्वतः म्हणतात मी भाड्याने घेतले आहे.ब्रह्मा पण अगोदर मनुष्य होते,आत्ता पण मनुष्य
आहेत. हे भगवान नाहीत. भगवान तर एकच निराकार आहेत. तुम्हा मुलांना अनेक रहस्य समजवले
आहेत. परंतु तरीही पिता समजणे, शिक्षक समजणे, हे पूर्णतः आता होऊ शकत नाही.घडी घडी
विसरतात.देहधारी कडे बुद्धी चालले जाते.आता बाबा पिता शिक्षक आणि सद्गुरू आहेत, हा
निश्चय बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे बसलेला नाही.आता तर मुलं विसरतात. विद्यार्थी
कधी शिक्षकाला विसरतील का? वसतिग्रहा मध्ये जे राहतात, ते तर कधीच विसरू शकत नाहीत.
जे विद्यार्थी वसतिग्रहा मध्ये राहतात त्यांना तर पक्के असेल ना. येथे तर तो पण
पक्का निश्चय नाही.नंबरानुसार पुरुषार्थ प्रमाणे वसतिग्रहा मध्ये बसले आहेत,तर जरुर
विद्यार्थी पण आहेत परंतु हा पक्का निश्चय नाही.मुलं जाणतात आपापल्या पुरुषार्थ
प्रमाणे पद घेत आहेत. त्या शिक्षणामध्ये पण कोणी वकील बनतात, इंजिनीयर बनतात,
डॉक्टर बनतात. येथे तर तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात,तर अशा विद्यार्थ्यांची बुद्धी
कशी असली पाहिजे,चलन, बोलचाल खूपच चांगली पाहिजे. बाबा समजवतात, मुलांनो तुम्हाला
कधीच रडायचे नाही, तुम्ही विश्वाचे मालक बनतात, तर गोंधळ करायचा नाही. गोंधळ करणे
म्हणजेच रडणे.बाबा म्हणतात जे रडतात ते आपली बादशाही गमावतात.विश्वाची श्रेष्ठ
बादशाही गमावून बसतात.आम्ही नरापासून नारायण बनण्यासाठी आलो आहोत असे म्हणतात परंतु
ती चलन कुठे आहे? नंबरा नुसार सर्व पुरुषार्थ करत आहेत.काहीजण तर चांगल्या प्रकारे
पास होऊन शिष्यवृत्ती घेतात,काही तर नापास होतात. नंबर वर तर आहेतच. तुमच्यामध्ये
पण काहीजण शिकतात, तर काहीजण शिकत पण नाहीत.जसे गावातील मुलांना अभ्यास करणे चांगले
वाटत नाही, गवत कापायला सांगितलेत तर खुशीने गवत कापतात. त्यामध्ये ते स्वतंत्र
जीवन समजतात,अभ्यास करणे बंधन समजतात.असे पण खूप आहेत.साहुकारा मध्ये पण जमीनदार
लोक खूप असतात, स्वतःला स्वतंत्र समजून खूप खुशी मध्ये राहतात.नोकरीचे नाव तर नाही
ना. अधिकारी पण नोकरी करतात ना.आता तुम्हा मुलांना बाबा विश्वाचे मालक बनवण्यासाठी
शिकवत आहेत,नौकरी करण्यासाठी शिकवत नाहीत.तुम्ही तर या राजयोगाच्या शिक्षणामुळे
विश्वाचे मालक बनणार आहात.हे शिक्षण खूपच श्रेष्ठ झाले ना.तुम्ही तर विश्वाचे मालक
अगदी स्वतंत्र बनतात.गोष्टी खूपच सहज आहेत.एकाच अभ्यासा द्वारे तुम्ही इतके श्रेष्ठ
उच्च महाराजा महारानी बनतात,ते पण पवित्र. तुम्ही तर म्हणतात कोणत्याही धर्माचा असू
द्या,तो येऊन शिक्षण घेऊ शकतो.शिक्षण खूपच श्रेष्ठ आहे असे समजतील. तुमची बुद्धी आता
खूपच विशाल बनली आहे. सिमित बुद्धी पासून बेहद बुद्धीमध्ये नंबरा नुसार पुरुषांर्थ
प्रमाणे आले आहात.खूपच खुशी राहते, आम्ही सर्व विश्वाचे मालक बनत आहोत.वास्तव मध्ये
नोकरी तर स्वर्गा मध्ये पण असते, दास दासी, नोकर चाकर, इत्यादी तर पाहिजेत ना. जे
खूप शिकलेले आहेत, त्यांच्यापुढे कमी शिकलेले नोकरी करतील,म्हणून बाबा म्हणतात
चांगल्या रीतीने अभ्यास करा,तर तुम्ही असे लक्ष्मीनारायण सारखे बनू शकतात.असे अनेक
जण म्हणतात, परंतु अभ्यास नाही केला तर कसे बनतील?अभ्यास करत नाहीत तर बाबांचा
अनादर करतात. बाबा म्हणतात जितकी तुम्ही आठवण कराल,तर तुमचे विर्कम विनाश होतील.मुलं
म्हणतात बाबा,जसे तुम्ही चालवा.बाबा मत पण ब्रह्मा द्वारे देतील परंतु ब्रह्मा ची
मत पण घेत नाहीत. काहीजण तर मनुष्याच्या विकारी मतावर चालत राहतात. शिवबाबा या रथा
वर विराजमान आहेत,तरी त्यांना पण मत देतात.आपले मत चालवतात,ज्याला पाई पैशाचे, कवडी
तुल्य मत म्हणले जाते, त्यावरती चालतात. रावणाच्या मतावर चालुन-चालुन या वेळेत कवडी
तुल्य बनले आहेत.आता राम शिवबाबा मत देत आहेत.निश्चय मध्येच विजय आहे, यामध्ये कधीच
नुकसान होणार नाही. नुकसानाला पण बाबा फायद्यामध्ये बदलतात. आता राम शिवबाबा मत देत
आहेत परंतु जे निश्चय बुद्धी आहेत त्यांना. संशय बुद्धी वाल्यांच तर मन खात राहतील.
निश्चयध बुद्धी वाल्यांना कधीच संशय येणार नाही, त्यांचे नुकसान कधीच होऊ शकत नाही.
बाबा सुद्धा खात्री देतात मुलांनो श्रीमतावर चालल्यामुळे तुमचे कधीच अकल्याण होऊ
शकत नाही.मनुष्य मताला देहधारीचे मत म्हणले जाते,येथे तर आहेच मनुष्याचे मत.गायन पण
केले जाते, मनुष्य मत, ईश्वरीय मत आणि दैवी मत. आता तुम्हाला ईश्वरीय मत मिळत आहे,
ज्याद्वारे तुम्ही मनुष्यापासून देवता बनतात,परत तेथे तर स्वर्गच आहे. तुम्ही खूप
सुख प्राप्त करतात, दुःखाची कोणतीच गोष्ट नसते,तेही कायमस्वरूपी सुख मिळते.यावेळेस
तुम्हाला भविष्याची पण जाणीव होते.
आता हे पुरुषोत्तम संगमयुग आहे,जेव्हा श्रीमत मिळते.बाबा म्हणतात मी कल्प कल्पाच्या
संगम युगा वरती येतो.त्यांच्या मतावर तुम्ही चालतात. बाबा म्हणतात मुलांनो ग्रहस्थ
व्यवहारामध्ये खुशाल रहावा, कोण म्हणते कपडे इत्यादी बदली करा.खुशाल कोणते पण कपडे
घाला,अनेकांच्या सबंध संपर्कामध्ये यावे लागते, रंगीत कपड्यासाठी बाबा मनाई करत
नाहीत.कोणते पण कपडे घाला त्याच्याशी काही संबंध नाही.बाबा म्हणतात देह सहित देहाचे
सर्व संबंध विसरा,बाकी कोणतेही कपडे घाला,फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण
करा.हा पक्का निश्चय करा.हे पण जाणता आत्मच पतित आणि पावन बनते. त्याला महान आत्मा
म्हणतात, महान परमात्मा म्हणणार नाहीत. असे म्हणने पण शोभत नाही.अनेक चांगल्या
गोष्टी समजुन घेण्याच्या आहेत.सद्गुरु, सर्वांना सद्गती देणारे तर एकच पिता आहेत.
स्वर्गामध्ये कधीच कोणाचा अचानक मृत्यू होत नाही.आता तुम्ही मुलं समजतात,बाबा
आम्हाला परत देवी-देवता बनवत आहेत.अगोदर हे बुद्धीमध्ये नव्हते.कल्पाचे आयुष्य किती
आहे,हे पण जाणत नव्हतो,आता त्याची स्मृती आली आहे.हे पण मुलं समजतात आत्म्याला चा
पाप आत्मा,पुण्यात्मा म्हणले जाते.पाप परमात्मा कधीच म्हणले जात नाही. परत काही
म्हणतात परमात्मा सर्वव्यापी आहेत,ही तर खूपच बेसमजी झाली ना.आता तुम्ही जाणतात पाच
हजार वर्षांनंतर पाप आत्म्यांना, पुण्यात्मा बनवण्यासाठी बाबा येतात,एकाला नाही
सर्व मुलांना.तुम्हा मुलांना पापात्म्या पासुन पुण्यात्मा बनवणारा मीच बेहदचा पिता
आहे,तर जरूर मुलांना सुख देईल.सतयुगा मध्ये पवित्र आत्मे असतात. रावणावरती विजय
मिळवल्यामुळे तुम्ही पुण्यात्मा बनतात. तुम्हाला जाणीव होते माया खूपच विघ्न घालते,
एकदम नाकामध्ये दम आणते. तुम्ही समजतात माया बरोबर कसे युद्ध चालते,त्यांनी परत
कौरव आणि पांडवाचे युद्ध, लष्कर, इत्यादी काय काय दाखवले आहे. या मनोविकारा
बरोबरच्या युद्धाचे कोणालाच माहिती नाही, हे गुप्त आहे.यांना तुम्हीच जाणतात. मायेशी
आम्हा आत्म्यांना युद्ध करायचे आहे.बाबा म्हणतात काम विकार सर्वात मोठा दुश्मन
आहे.योगबळा द्वारे तुम्ही त्याच्यावरती विजय मिळवता.योग बळा चा अर्थ पण कोणी समजत
नाहीत.सतोप्रधान होते तेच,तमोप्रधान बनले आहेत.बाबा स्वता:म्हणतात अनेक जन्माच्या
अंत मध्ये मी यांच्या मध्ये प्रवेश करतो.तेच तमोप्रधान बनले आहेत,तुम्ही पण तसेच
बनले आहात.बाबा एकाला थोडेच सांगतील,नंबरा नुसार सर्वांना सांगत राहतात.नंबरा नुसार,
कोण कोण आहेत हे तुम्हाला माहिती झाले आहे.पुढे चालून तुम्हाला सर्वकाही माहिती
होईल.माळेचा पण तुम्हाला साक्षात्कार करवतील.शाळेमध्ये जेव्हा दुसऱ्या वर्गात
जातात,त्यांच्या गुणांचे सर्वांना माहिती होते.बाबांनी मुलीला विचारलं,तुमच्या
परीक्षेचे पेपर कोठून येतात,ती म्हणाली लंडन वरून. आता तुमचे पेपर्स कोठून येतील,
परमधाम वरून. तुमचे पेपर वरून येतील.सर्व साक्षात्कार करतील,खूपच आश्चर्यकारक
अभ्यास आहे.कोण शिकवतात, कोणालाच माहिती नाही.कृष्ण भगवानुवाच म्हणतात.अभ्यासा मध्ये
सर्व नंबरा नुसार आहेत.तर खुशी पण नबंरा नुसारच होते.हे जे गायन आहे अतिइंद्रिय सुख
गोप गोपी ना विचारा,ही अंत काळातील गोष्ट आह. बाबा जाणतात हा मुलगा कधीच विकारात
जाणार नाही परंतु माहित नाही काय होते,अभ्यासच करत नाही, भाग्या मध्ये नाही.त्यांना
असेच म्हणले,तुम्ही जाऊन आपले घर बसवा तर लगेच चालले जातील. कुठून निघून, कुठे कुठे
जातात.त्यांची चलन बोलचाल तसेच होते. ते समजतात आम्हाला इतके पैसे मिळाले तर आम्ही
जाऊन वेगळे राहू. चलना द्वारे समजले जाते,याचा अर्थ निश्चय नाही. लाचारी हालत मध्ये
ज्ञान घेत आहेत.अनेक जण ज्ञानाचा ग पण जाणत नाहीत. कधी अभ्यास करत नाहीत, माया
अभ्यास करू देत नाहीत. सर्व सेवा केंद्रावर ती अशा प्रकारचे आहेत.कधी अभ्यास करत
नाहीत.आश्चर्य आहे ना,खूपच उच्च ज्ञान आहे, स्वयम् भगवान शिकवत आहेत.बाबांनी
सांगितले हे काम करू नका,तरीही मानत नाहीत. उलटे काम करून दाखवतात, राजधानी स्थापन
होत आहे.त्यामध्ये प्रत्येक प्रकारचे पाहिजेत ना. वरून खाली पर्यंत सर्वजण येथेच पद
प्राप्त करतात.दर्जामध्ये फरक तर राहतो ना.येथे पण नंबर आहेत.फरक काय
आहे,स्वर्गामध्ये आयुष्यवान असतात, खूप सुख राहते. येथे कमी आयुष्य आणि दुःख भरपूर
आहे.मुलांच्या बुद्धीमध्ये या आश्चर्यकारक गोष्टी आहेत.कसे हे अविनाश नाटक बनले
आहे,परत कल्प कल्प आम्ही तोच अभिनय करत राहू. इतक्या छोट्याश्या आत्म्यामध्ये किती
भूमिका नोंदलेले आहे.तीच चाल चलन, तोच चेहरा इत्यादी,सृष्टीचे चक्र फिरत राहते.हे
पूर्वनियोजित नाटक आहे,चक्राची पुनरावृत्ती होत राहते. सतोप्रधान, सतो,रजो,तमो मध्ये
येतील,यामध्ये संभ्रमित होण्याची गोष्ट नाही. अच्छा,स्वतःला आत्मा समजता का?
आत्म्याचे पिता शिवबाबा आहेत,हे तर समजता ना. जे सतोप्रधान बनतात तेच परत तमोप्रधान
बनतात परत बाबांची आठवण करा, तर सतोप्रधान बनाल.हे तर चांगले आहे ना.बस,एवढेच
सांगायचे आहे.बोला बेहद चे बाबा स्वर्गाचा वारसा देतात,तेच पतित पावन आहेत.बाबा
ज्ञान देतात,यामध्ये ग्रंथाची गोष्टच नाही, ग्रंथ सुरुवातीला कोठून आले? हे तर
जेव्हा खूप होतात, तेव्हाच नंतर ग्रंथ बनवतात.सतयुगात ग्रंथ नसतात.परंपरा द्वारे
कोणती गोष्ट होत नाही,नाव रूप बदलत जाते. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रतीं मातपिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) कधीच
गोंधळ करायचा नाही,आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत, तर आमची चलन बोलचाल खूपच चांगली
पाहिजे. हे बुद्धीमध्ये सतत राहायला पाहिजे, कधीच रडायचे नाही.
(२ ) निश्चय बुद्धी बणुन एका बाबांच्या मतावरती चालत राहायचे आहे, कधीच संशय घ्यायचं
नाही. निश्चय मध्येच विजय आहे म्हणून आपले पाई पैशाचे मत चालवायचे नाही.
वरदान:-
आपल्या
पुरुषार्थ च्या विधीमध्ये स्वतःच्या प्रगतीचा अनुभव करणारे सफलतेचे तारे भव.
जे आपल्या
पुरुषार्थच्या विधीमध्ये स्वतःच्या प्रगतीचा किंवा सफलतेचा अनुभव करतात तेच सफलता
चे तारे आहेत,त्यांच्या विचारांमध्ये स्वतःच्या पुरुषार्थ प्रती कधीच "माहित नाही,
होईल की नाही, करू शकू किंवा नाही" ही असफलता अंश मात्र पण येणार नाही. स्वतःच्या
प्रती सफलता अधिकाराच्या रूपांमध्ये अनुभव करतील, त्यांना सहज आणि स्वतः सफलता मिळत
राहील.
बोधवाक्य:-
सुख स्वरूप
बणवून सुख द्या,तर पुरुषार्थ मध्ये आशीर्वाद जमा होतील.