03-09-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, हे रहस्य सर्वांना ऐकवा की आबू सर्वांत मोठे तिर्थ आहे, स्वत: भगवंतानी येथुन सर्वांची सद्गती केली आहे”

प्रश्न:-
कोणती एक गोष्ट जर मनुष्यांनी समजली तर येथे गर्दी होईल?

उत्तर:-
मुख्य गोष्ट समजून घेतली की, बाबांनी जो राजयोग शिकवला होता, तो परत शिकवत आहेत, ते सर्वव्यापी नाहीत. बाबा यावेळेत आबूमध्ये येऊन विश्वामध्ये शांती स्थापन करत आहेत, त्याचीच जड यादगार दिलवाडा मंदिर पण आहे. आदी देव येथे चैतन्य मध्ये बसले आहेत, हे चैतन्य दिलवाडा मंदिर आहे, ही गोष्ट समजली तर आबूची महिमा होईल आणि येथे गर्दी होईल. आबूचे नाव प्रसिध्द झाले तर येथे अनेक लोक येतील.

ओम शांती।
मुलांना योग शिकवला. दुसऱ्या ठिकाणी स्वत:च शिकतात, शिकवणारे पिता असत नाहीत. एक दोघे स्वत:च शिकतात. येथे तर बाबा स्वत: मुलांना शिकवत आहेत. तेथे तर मित्र संबंधी इ.ची आठवण येत राहते, इतकी आठवण करु शकत नाहीत म्हणून देही अभिमानी खुप कमी बनतात. येथे तर देही अभिमाना तुम्हाला खुप लवकर बनायला पाहिजे, परंतू अनेक आहेत ज्यांना काहीच माहिती नाही. शिवबाबा आमची सेवा करत आहेत, आम्हाला म्हणतात स्वत:ला आत्मा समजून बाबांची आठवण करा. जे बाबा विराजमान आहेत त्यांची आठवण करावी लागेल. अनेक मुलं आहेत, ज्यांना निश्चय नाही की शिवबाबा ब्रह्मा तनाद्वारे आम्हाला शिकवत आहेत. जसे दुसरे लोक म्हणतात, आम्ही कसा निश्चय करायचा, असे येथे पण आहेत. जर पुर्ण निश्चय झाला तर खुप प्रेमाने बाबांची आठवण करत करत स्वत:मध्ये शक्ती जमा करत, खुप सेवा करतील. कारण साऱ्या विश्वाला पावन बनवायचे आहे ना. योगामध्ये पण कमी आहे तर ज्ञानामध्ये पण कमी आहे. ऐकतात तरी धारणा होत नाहीत. धारणा जर केली तर दुसऱ्यांना पण धारणा करवतील. बाबांनी समजवले होते, ते लोक संमेलन इ. करत राहतात, विश्वामध्ये जर शांती पाहिजे असे म्हणतात परंतू विश्वामध्ये शांती कधी होती, कोणत्या प्रकारे झाली होती, काहीच जाणत नाहीत. कोणत्या प्रकारची शांती होती, तीच पाहिजे ना. हे तर तुम्ही मुलंच जाणतात विश्वामध्ये सुख शांतीची स्थापना आता होत आहे. बाबा आले आहेत दिलवाडा मंदिरामध्ये आदी देव पण आहेत आणि विश्वामधील शांतीचे दृश्य पण आहे. कुठे पण सम्मेलन इ.मध्ये तुम्हाला बोलवतात तर तुम्ही विचारा विश्वामध्ये शांती कोणत्या प्रकारची पाहिजे? या लक्ष्मी नारायणच्या राज्यात विश्वामध्ये शांती होती. दिलवाडा मंदिरामध्ये पुर्णपणे यादगार आहे. विश्वामध्ये शांतीचे उदाहरण तर पाहिजे ना. लक्ष्मी नारायणाच्या चित्राद्वारे पण समजत नाहीत. पत्थर बुध्दी आहेत ना. तर त्यांना सांगायला पाहिजे ना की, विश्वामध्ये शांतीचे उदाहरण तर हे लक्ष्मी नारायण आहेत आणि यांची राजधानी पाहायची असेल तर दिलवाडा मंदिरामध्ये पाहू शकता. मॉडेलच दाखवले जाईल ना, ते आबूमध्ये पहा. मंदिर बनवणारे जाणत नाहीत की ज्यांनी हे यादगार बनवले आहे, त्यांचे नाव दिलवाडा मंदिर ठेवले आहे. आदी देवांना पण बसवले आहे, वरती स्वर्ग दाखवला आहे. जसे ते जड आहेत तुम्ही चैतन्य मध्ये आहात. मधुबनला चैतन्य दिलवाडा मंदिर नाव ठेवू शकतो. परंतू माहित नाही किती गर्दी होईल मनुष्य संभ्रमित होतील. हे काय आहे. समजून सांगण्यामध्ये खुप कष्ट लागतात. अनेक मुलं पण समजत नाहीत. जरी जवळ बसले आहेत, समजत काहीच नाहीत. प्रदर्शनीमध्ये अनेक प्रकारचे मनुष्य येतात, ढेर मठ पंथ आहेत, वैष्णव धर्माचे पण आहेत. वैष्णव धर्माचा अर्थ पण समजत नाहीत. कृष्णाची बादशाही कुठे आहे, हे पण जाणत नाहीत. कृष्णाच्या राजाईला पण स्वर्ग वैकुंठ म्हणले जाते.

बाबांनी सुचना दिल्या होत्या की जिथे निमंत्रण आहे, तेथे जाऊन सांगा, विश्वामध्ये शांती कधी होती? हे आबू सर्वांत श्रेष्ठ, उंच तिर्थ आहे. कारण येथे शिवपिता विश्वाची सद्गती करत आहेत. आबू पर्वतावरती त्यांचे उदाहरण पाहायचे असेल तर दिलवाडा मंदिर पाहुन या. विश्वामध्ये शांती कशी स्थापन होत आहे, त्यांचे उदाहरण आहे. ऐकुन खुप खुश होतील. जैन लोक पण खुश होतील. तुम्ही म्हणाल ते प्रजापिता ब्रह्मापिता आहेत आदी देव आहेत. तुम्ही समजवतात तरीही समजत नाहीत. ब्रह्माकुमारी माहित नाही काय सांगतात, असे म्हणत राहतात. तर तुम्हा मुलांना आबूची एवढी महिमा करुन समजावयाला पाहिजे. आबू मोठ्यात मोठे तिर्थ आहे. मुंबई मध्ये पण समजावू शकतो, आबू पर्वत मोठ्यात मोठे तिर्थ आहे कारण परमपिता परमात्मानी आबूमध्ये येऊन स्वर्गाची स्थापना केली आहे. कसे स्वर्गाची स्थापना करतात, ते स्वर्गाचे आणि आदी देवाचे मॉडेल आबूमध्ये आहे, ज्याला कोणते पण मनुष्य समजत नाहीत. आम्ही आता जाणतो, तुम्ही जाणत नाहीत, म्हणून तुम्हाला समजवत आहोत. प्रथम तुम्ही विचारा की विश्वामध्ये शांती कोणत्या प्रकारची पाहिजे, कधी पाहिली आहे? विश्वामध्ये शांती तर यांच्या राज्यामध्ये होती. एकच आदी सनातन देवी देवता धर्म होता, लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. चला तर यांच्या राजधानीचे मॉडेल तुम्हाला आबूमध्ये दाखवू. ही तर जुनी पतित दुनिया आहे. नविन दुनियेचे मॉडेल तर येथे आहे, नविन दुनिया आता स्थापन होत आहे. तुम्ही जाणतात म्हणून सांगतात. सर्व जाणत नाहीत, न सांगू शकतात, न समजून येते. गोष्टी तर खुप सहज आहेत. वरती स्वर्गाची राजधानी दाखवली आहे, खाली आदी देव बसले आहेत, ज्यांना एडम पण म्हणले जाते. हे सर्व दिलवाडा मंदिरमध्ये पाहू शकता. तेच मनुष्य सृष्टीचे मुख्य आहेत. अशाप्रकारे तुम्ही त्यांची महिमा कराल. तर ती ऐकुन खुश होतील. आहे पण बरोबर, कृष्णाची महिमा करतात परंतू जाणत काहीच नाहीत. कृष्ण तर वैकुंठाचे महाराजा विश्वाचे मालक होते. त्यांचे तुम्ही मॉडेल पाहू इच्छिता तर चला आबूमध्ये, तुम्हाला वैकुंठाचे मॉडेल दाखवतो. कसे पुरुषोत्तम संमयुगावरती राजयोग शिकवत आहेत, ज्यामुळे परत विश्वाचे मालक बनले आहेत. ते पण मॉडेल दाखवावे. संगमयुगाची तपस्या पण दाखवतात. प्रत्यक्षात जे झाले आहे त्यांचे यादगार स्मृती स्थळ दाखवू. शिवबाबा ज्यांनी लक्ष्मी नारायणाचे राज्य स्थापन केले. त्यांचे पण चित्र आहे, अंबाचे पण मंदिर आहे. अंबाला काही 10-20 भुजा नाहीत. भुजा तर दोनच असतात. तुम्ही या तर तुम्हाला दाखवू. वैकुंठ पण आबूमध्ये दाखवू. आबूमध्ये बाबांनी येऊनच साऱ्या विश्वाला स्वर्ग बनवले आहे. सद्गती दिली आहे. आबू सर्वांत मोठे तिर्थ आहे, सर्व धर्माची सद्गती करणारे तर एकच पिता आहेत, त्यांचे यादगार आबूमध्ये पाहण्यासाठी चला. आबूची महिमा तर खुप करु शकता. तुम्हाला सर्व यादगार दाखवू. क्रिश्चन लोक पण जाणू इच्छितात की, प्राचिन भारताचा राजयोग कोणी शिकवला? काय गोष्ट होते? बोला, आबूमध्ये चला. वैकुंठ पण पुर्णपणे बरोबर छतामध्ये दाखवले आहे. तुम्ही असे बनवू शकत नाही. हे तर चांगल्या रितीने सांगायचे आहे. पर्यटक धक्के खात राहतात, ते पण समजून घेतील. तुमचे आबूचे नाव प्रसिध्द झाले तर खुप येतील. आबू खूप प्रसिध्द होईल. जेव्हा कोणी विचारतात, विश्वामध्ये शांती कशी होती, चला आम्ही समजावू सांगतो, मॉडेल पण सर्व दाखवतो. असे मॉडेल दुसरीकडे कोठे नाही. आबूच सर्वांत उंच मोठे तिर्थ आहे, जिथे बाबांनी येऊन विश्वामध्ये शांती, सद्गती ची स्थापना केली. या गोष्टी दुसरे कोणी जाणत नाहीत. तुमच्यामध्ये पण नंबरानुसार आहेत, जरी मोठे महारथी संग्रहालय समजवणारे आहेत, परंतू ठिक रिती कोणाला समजावून सांगत नाहीत. बाबा पाहतात ना, बाबा सर्व काही जाणतात जे पण जिथे आहेत त्यांना समजवतात. कोण कोण पुरुषार्थ करतात, कोणते पद प्राप्त करतील? यावेळेत जर मृत्यू झाला तर काहीच पद मिळवू शकणार नाहीत. आठवणीच्या यात्राचे कष्ट समजत नाहीत. बाबा रोज नवनविन गोष्टी समजवतात, अशाप्रकारे समजावून तुम्ही घेऊन या. येथे तर यादगार कायम आहे.

बाबा म्हणतात मी पण येथे आहे, आदी देव पण येथे आहे, वैकुंठ पण येथे आहे. आबूची महिमा खुप होईल. आबू माहित नाही किती प्रसिध्द होईल. जसे कुरुक्षेत्राला चांगले बनवण्यासाठी करोडो रुपये उडवत राहतात. असंख्य मनुष्य एकत्रित होतात, इतकी दुर्गंधी होते विचारु नका. खुप गर्दी होते. समाचार आला होता, भजन मंडळीची एक बस नदीमध्ये बुडाली. येथे सर्व दु:ख आहे ना. अकाले मृत्यू होत राहतो. तिथे तर असे काहीच होत नाही. यासर्व गोष्टी तुम्ही समजावू शकता. वार्तालाप करणारा खुपच समजदार पाहिजे. बाबा ज्ञानाचा पंप करत आहेत, बुध्दीमध्ये बसवत आहेत. दुनिया थोडीच या गोष्टीला जाणते. ते समजतात नविन दुनियाची सहल करायला जातो. बाबा म्हणतात ही जुनी दुनिया नष्ट झाली की झाली. पाच हजार वर्षाचे चक्र आहे. जुन्या दुनियेचा मृत्यू समोर आहे. याला अज्ञान अंधार म्हणले जाते. कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपले आहेत. कुंभकर्ण अर्धाकल्प झोपेत होता, अर्धाकल्प जागत होता. तुम्ही पण कुंभकर्ण होते. हा खेळ खुपच आश्चर्यकारक आहे. या गोष्टीला सर्व थोडेच समजतात. काही तर असेच भावनेमध्ये येतात. एवढे सर्व जात आहेत पाहतात, तर ते पण येतात. आम्ही शिवबाबांच्या जवळ जात आहोत, शिवबाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत. त्या बेहदच्या पित्याची आठवण केल्यामुळे बेहदचा वारसा मिळतो बस. तर ते पण म्हणतात शिवबाबा आम्ही तुमची मुलं आहोत, तुमच्याकडून वारसा जरुर घेऊ. बस नाव किनाऱ्याला लागते. भावनेचे पण भाडे मिळते. भक्तीमार्गात तर अल्पकाळाचे सुख आहे. येथे तुम्ही मुलं जाणतात की बेहदच्या पित्याकडून बेहदचा वारसा मिळतो. ते भावनेचे भाडे आहे, अल्पकाळ सुख मिळते. येथे तुम्हाला 21 जन्मासाठी भावनेचे फळ मिळते. बाकी साक्षात्कार इ.मध्ये काहीच नाही. कोणी म्हणतात साक्षात्कार व्हावा, तेव्हा बाबा समजतात, यांनी काहीच समजले नाही. साक्षात्कार करायचे आहे तर जाऊन नवविध भक्ती करा. त्याद्वारे काहीच मिळत नाही. दुसऱ्या जन्मात चांगले बनू शकतात. जर चांगला भक्त असेल तर चांगला जन्म मिळेल. ही गोष्ट तर वेगळी आहे. ही जुनी दुनिया बदलत आहे. बाबा दुनिया बदलवणारेच आहेत. यादगार स्मृर्तीस्थळ पण आहे ना. खुप जुने मंदिर आहे. काही पडझड होते तर परत दुरुस्त करतात. परंतू ती शोभा तर कमी होत जाते. यातर सर्व विनाशी गोष्टी आहेत. तर बाबा समजवतात, मुलांनो एक तर स्वत:चे कल्याण करण्यासाठी स्वत:ला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. अभ्यासाची गोष्ट आहे. बाकी हे जे मथुरा मध्ये मधुबन, कुंज गल्ली जे बनवले आहे, ते काहीच नाही. न गोप गोपिंकांचा खेळ आहे. हे समजून सांगण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात. एक एक गोष्ट चांगल्याप्रकारे बसून समजवा. संम्मेलन मध्ये पण योगी पाहिजेत, तलवारमध्ये धार नसेल तर कुणाला ज्ञानबाण लागणार नाही. तेव्हा बाबा पण म्हणतात, आणखी वेळ आहे. आता तर मानतील की, परमात्मा सर्वव्यापी नाहीत तर खुप गर्दी होईल. परंतू आणखी वेळ आहे. एक गोष्ट समजतील की राजयोग बाबांनी शिकवला होता, जो यावेळेत शिकवत आहेत. शिवाच्या ऐवजी कृष्णाचे नाव लिहले आहे, जो की आता सावळा आहे. खुप मोठी चुक केली आहे. यामुळेच तुमची नाव बुडाली आहे. आता बाबा समजवतात, हे शिक्षण कमाईचे साधन आहे, स्वत:च बाबा मनुष्याला देवता बनवण्यासाठी शिकवण्यास येतात. यामध्ये पवित्र पण जरुर बनायचे आहे. दैवीगुण पण धारण करायचे आहेत. नंबरानुसार तर असतातच जे पण सेवाकेंद्र आहेत, ते सर्व नंबरानुसार आहेत. ही सारी राजधानी स्थापन होत आहे. मावशीचे घर थोडेच आहे. बोला, सतयुगाला स्वर्ग म्हणले जाते. परंतू तेथील राज्य कसे चालते, देवतांचा झुंड पाहायचा असेल तर आबू ला चला. दुसरे कोणते असे ठिकाण नाही जिथे छतामध्ये राजाई दाखवली आहे. जरी अजमेरला स्वर्गाचे मॉडेल आहे, परंतू ती दुसरी गोष्ट आहे. येथे तर आदी देव पण आहे ना. सतयुग कोणी स्थापन केले, हे तर बिनचुक यादगार आहे. आता आम्ही चैतन्य मध्ये नाव लिहू शकत नाही. जेव्हा मनुष्य स्वत: समजतील तर स्वत:च म्हणतील तुम्ही लिहा, आता नाही. आता तर पहा थोड्याच गोष्टीमध्ये काय करतात. क्रोधी खुप आहेत, देह विसरण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, असे नाही जे नसिबामध्ये असेल. पुरुषार्थी असे म्हणनार नाहीत. ते तर पुरुषार्थ करत राहतील परत जेव्हा नापास होतील, तेव्हा म्हणतील जे भाग्यामध्ये होते. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. देही अभिमानी बनण्यासाठी पुर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. असा कधी विचार करायचा नाही की जे नशिबामध्ये असेल समजदार बनायचे आहे.

2. ज्ञान ऐकून त्यास प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे. आठवणीची ताकत जमा करुन परत सेवा करायची आहे. सर्वांना आबू महान तिर्थाची महिमा ऐकवायची आहे.

वरदान:-
बाबांच्या सोबत राहत राहत त्यांच्या सारखेच बनणारे, सर्व आकर्षणाच्या प्रभावापासून मुक्त भव

जिथे बाबांची आठवण आहे, अर्थात बाबांची सोबत आहे, तिथे देहभानाची जाणीव राहत नाही. बाबांच्या सोबत राहणारे दुनियेच्या विकारी वातावरण किंवा आकर्षणाच्या प्रभावापासून दूर होतात. असे सोबत राहणारे बाप समान बनतात. जसे बाबा उच्च आहेत, असेच मुलांची स्थिती पण उच्च बनते. विपरीत परिस्थितीचा प्रभाव त्यांच्यावरती पडू शकत नाही.

बोधवाक्य:-
मन आणि बुध्दी नियंत्रण मध्ये आहे, तर अशरीरी बनणे सहज होते..!