11-11-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांनो मनामनाभव या वशीकरण मंत्रा द्वारे तुम्ही मायेवरती विजय प्राप्त करू
शकता, याच मंत्राची सर्वांना आठवण करुन द्या.
प्रश्न:-
नाटकामध्ये
सर्वात चांगले नोकर कोण कोण आहेत, आणि कसे?
उत्तर:-
जुन्या दुनियाची स्वच्छता करणारे सर्वात चांगले नोकर, नैसर्गिक आपत्ती आहे.भूकंप
होतो,महापूर येतो,स्वच्छता होते,यासाठी भगवान कोणाला ही सूचना देत नाहीत.बाप कसे
मुलांचा विनाश करतील,हे तर नाटकांमध्ये नोंद आहे.रावण राज्य आहे ना, याला ईश्वरी
आपत्ती म्हणता येत नाही.
ओम शांती।
बाबाच मुलांना समजवतात मुलांनो, मनमनाभव, असे नाही की मुलं बाबांना समजून सांगू
शकतात.मुलं म्हणणार नाहीत शिवबाबा मनमनाभव,नाही. तसे तर जरी मुलं आप आपसा मध्ये
चर्चा करतात,मत घेतात परंतु जो मुख्य महामंत्र आहे, जो बाबाच देतात.गुरु लोक मंत्र
देतात, ही पद्धत कोठून निघाली आहे? पिता नवीन सृष्टि रचणारे आहेत,तेच प्रथम मंत्र
देतात मनमनाभव. त्याचे नावच आहे वशीकरण मंत्र अर्थात माये वरती विजय मिळवण्याचा
मंत्र. हे काही मनामध्ये जपयाचा नाही,हे तर समजून घ्यायचे आहे.बाबा अर्थ सहित
समजवतात.जरी गीतेमध्ये आहे परंतु अर्थ कोणीच समजत नाहीत. हा गीतेचा अध्याय पण
आहे,फक्त नाव बदली केले आहे.अनेक मोठ मोठी पुस्तके इत्यादी भक्तिमार्ग मध्ये
बनवतात.वास्तव मध्ये हे तर प्रत्यक्ष बाबा मुलांना समजवतात.बाबांच्या आत्म्यां मध्ये
ज्ञान आहे,तसेच मुलांची आत्मा पण ज्ञान धारण करते, बाकी सहज करून समजावण्यासाठी हे
चित्र इत्यादी बनवले आहेत.तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये हे सर्व ज्ञान आहे.तुम्ही
जानता बरोबर आदी सनातन देवी देवता धर्म होता, दुसरा कोणता खंड नव्हता, परत हे दुसरे
खंड झाले आहेत.ते पण चित्र एका साईडला ठेवायला पाहिजे.जिथे तुम्ही दाखवता भारतामध्ये
लक्ष्मीनारायणचे राज्य होते.त्यावेळेत दुसरा कोणताही धर्म नव्हता.आता तर अनेक धर्म
झाले आहेत,परत हे सर्व नसतील.हे बाबांचे नियोजन आहे,त्या बिचाऱ्यांना चिंता लागून
राहिली आहे.तुम्ही मुल समजता हे तर अगदी बरोबर आहे. बाबा येऊन स्थापना करतात,असे पण
लिहिले आहे,कुणाची स्थापना?नवीन दुनियेची.यमुनेच्या किनाऱ्या वरती राजधानी होती.तिथे
एकच धर्म होता,झाड अगदीच लहान होते,या झाडाचे ज्ञान पण बाबाच देतात.चक्राचे ज्ञान
देतात.सतयुगा मध्ये एकच भाषा असते,दुसरी कोणतीभाषा नसते.तुम्ही सिद्ध करून करू शकता
एकच भारत होता,एकच राज्य होते,एकच भाषा होती,स्वर्गामध्ये सुख शांती होती.दुःखाचे
नाव रूप नव्हते.आरोग्य,संपत्ती, आनंद सर्व काही होते.भारत नवीन होता,त्यावेळेस
आयुष्य पण जास्त होते कारण पवित्रता होती. पवित्रते मुळे मनुष्य निरोगी
राहतात,अपवित्रता मुळे पहा मनुष्यांचे काय हाल झाले आहेत.बसल्या बसल्या अकाली मृत्यु
होत राहतात,जवानांचा पण मृत्यू होतो,खूप दुःख होते.स्वर्गामध्ये अचानक मृत्यू होत
नाही,आयुष्यवान असतात.वृद्धावस्था झाल्यानंतरच मृत्यू होतो. कुणालाही समजून सांगा,
तर हे बुद्धीमध्ये बसवा,बाबांची आठवण करा,तेच पतित पावन आहेत,तेच सदगती दाता आहेत.
तुमच्या जवळ नकाशा पण पाहिजे,ज्याद्वारे तुम्ही समजावू शकता,आज पहा हा नकाशा
आहे,उद्याचा हा नकाशा असेल.कोणालाही तुम्ही चांगल्या रितीने ऐकवू शकता.हे पूर्ण
रीतीने समजायचे आहे,हा भारत अविनाश अखंड आहे.जेव्हा देवी देवता धर्म होता तर दुसरा
कोणताही धर्म नव्हता.आता तो आदी सनातन देवी देवता धर्म नाही.लक्ष्मीनारायण कोठे गेले?
कोणीच सांगू शकत नाही,कोणा मध्ये शक्ती नाही सांगण्याची.तुम्ही मुलं चांगल्या रीतीने
रहस्य मुक्त समजावू शकता,यामध्ये संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही.तुम्ही सर्वकाही
जाणता आणि परत त्याची उजळणी पण करू शकता.तुम्ही कोणालाही विचारू शकता,हे देवता कुठे
गेले?तुमचा प्रश्न ऐकून चकित होतील.तुम्ही तर निशचया द्वारे सांगतात,कसे हे 84 जन्म
घेतात.बुद्धीमध्ये तर आहे ना,तुम्ही लगेच म्हणाल सतयुग नवीन दुनिया मध्ये आपले
राज्य होते. एकच आदी सनातन देवी देवता धर्म होता,दुसरा कोणता धर्म नव्हता.सर्व काही
नवीन होते.प्रत्येक गोष्ट सतोप्रधान होती.सोने पण खूप होते, खाणींमधून सहज निघत
होते,ज्याचे परत इमारती साठी विटा इत्यादी बनवत होते.स्वर्गामध्ये सर्व काही
सोन्याच्या असते,खानी सर्व भरपूर असतात, त्याची नक्कल तर करणार नाहीत.त्यावेळेस खरे
सोने भरपूर असते.येथे तर खऱ्याचे नाव नाही. नकली दागिन्यांचा फार जोर आहे,यामुळे
म्हणले जाते,खोटी माया,खोटी काया,खोटा सर्व संसार. संपत्ती पण खोटी आहे,हिरे-मोती
नकली, वेगवेगळ्या प्रकारचे निघतात, जे पारखू पण शकत नाहीत,खरे आहेत की खोटे
आहेत.स्वर्गामध्ये तर खोट्या वस्तू नसतात.विनाश होतो तर सर्व धरती मध्ये चालले
जातात.मोठ मोठे दगड,हिरे इत्यादी घरामध्ये लावतात.तेथे सर्व हे कोठून येईल,कोण
खाणींमधून काढतील.भारतामध्ये खूप कारागीर लोक आहेत,हुशार होत जातील परत ही कला कुसर
स्वर्गामध्ये पण येईल.ताज इत्यादी फक्त हिऱ्याचे थोडंच बनवतील,ते तर बिलकुल शुद्ध
खरे हिरे असतात.लाईट,टेलिफोन,मोटर्स इत्यादी अगोदर काहीच नव्हते.बाबांच्या या
जीवनामध्ये काय काय निघाले आहे.शंभर वर्ष झाले आहेत,हे सर्व निघाले आहे.स्वर्गामध्ये
तर खूप चांगले कारागीर असतात,आजपर्यंत शिकत राहतात, हुशार होत राहतील.त्याचा पण
मुलांनी साक्षात्कार केला आहे.तेथे हेलिकॅप्टर पण खूपच चांगले असतात,कधीही अपघात
होऊ शकत नाही.लहान मुलं पण सतोप्रधान चांगल्या बुधदीचे असतात. काही दिवसातच तुम्हाला
सर्व साक्षात्कार होत जातील.आपल्या गावा जवळ येतात,तर ते झाड इत्यादी दिसून
येतात.मनामध्ये खुशी होत राहते, आता आपल्या घरा जवळ आलो,घरामध्ये पोहोचलो की
पोहोचलो.तुम्हाला असे साक्षात्कार होत राहतात. मुलं समजतात,सर्वात प्रिय सर्वात
विश्वासू बाबाच आहेत.ते परम आत्मा आहेत,त्यांची खूप प्रेमाने सर्व आठवण
करतात.भक्तिमार्ग मध्ये पण तुम्ही ईश्वराची आठवण करत होते ना. हे माहीत नव्हते कि
लहान आहेत की मोठे आहेत.गायन पण आहे भ्रकुटीमध चमकतो अजब सितारा, तर जरूर बिंदू
सारखाच असेल ना. त्यांनाच सर्वोच्च आत्मा म्हणजेच परमात्मा म्हणले
जाते.त्यांच्यामध्ये तर सर्व कला आहेतच, ज्ञानाचे सागर आहेत, तर ते ज्ञान ऐकतील
ना.ते जेव्हा ऐकवतील तेव्हाच माहिती होईल.तुम्हीपण यापूर्वी काय जाणत होते?फक्त
भक्ती करत होते.आता तर समजता हे आश्चर्य आहे.आत्म्याला या डोळ्यांनी पाहू शकत नाही
त्यामुळे त्याला पण विसरले आहेत.बेहद नाटकांमध्ये भूमिका अशी आहे,ज्याला विश्वाचे
मालक बनवतात,त्याचेच नाव गीते मध्ये लिहिलेले आहे आणि मालक बनवणाऱ्या चे नाव गायब
केले आहे. कृष्णाला त्रिलोकीनाथ वैकुंठनाथ म्हणतात,अर्थ काहीच समजत नाहीत, फक्त
मोठेपणा देतात.भक्तिमार्गा मध्ये अनेक गोष्टी बनवल्या आहेत,भगवंता मध्ये इतकी ताकत
आहे,ते हजारो सूर्यापेक्षा तेजोमय आहेत,सर्वांना भस्म करतात,अशा गोष्टी बनवल्या
आहेत.बाबा म्हणतात मी मुलांना कसे भस्म करेल? असे तर होऊ शकत नाही.मुलांचा पिता
मुलांचा विनाश कसे करतील?नाही.ही तर बेहदच्या नाटकांमध्ये नोंद आहे.जुन्या दुनियेचा
विनाश होईल. जुन्या दुनियाच्या विनाशासाठी,या नैसर्गिक आपत्ती जसे की,नौकर
आहेत,खुपच जबरदस्त नौकर आहेत.असे पण नाही की,त्यांना बाबा सूचना देतात की तुम्ही
विनाश करा,नाही.वादळ, दुष्काळ पडतो,भगवान म्हणतील का असे करा? कधीच म्हणू शकत
नाहीत.ही तर बेहदच्या नाटकांमध्ये नोंद आहे.बाबा म्हणत नाहीत,बाँबस बनवा, हे सर्व
रावणाची मत आहे,हे पूर्वनियोजित नाटक आहे.रावणाचे राज्य आहे तर,आसुरी बुद्धीच
बनतात.अनेक मनुष्यांचा मृत्यू होत राहतो,अंत काळात सर्व नष्ट होईल.हा पूर्वनियोजित
खेळ आहे,याची पुनरावृत्ती होत राहते,बाकी असे नाही शंकराने तिसरा नेत्र उघडला
त्यामुळे विनाश झाला. याला ईश्वरी आपत्ती पण म्हणू शकत नाही, हे तर नैसर्गिकच आहे.
आता बाबा तुम्हा मुलांना श्रीमत देत आहेत, कुणाला दुःख देण्याची गोष्टच नाही.बाबा
तर सुखाचा रस्ता दाखवणारे आहेत.अविनाश नाटकानुसार घर जुने होत राहते.बाबा म्हणतात
ही सारी दुनिया जुनी झाली आहे,नष्ट व्हायला पाहिजे. आप आपसा मध्ये कसे लढत
राहतात,आसुरी बुद्धीचे आहेत ना.जेव्हा ईश्वरीय बुद्धीचे आहेत तर कोणीही लढाई इत्यादी
करत नाहीत.बाबा म्हणतात मी तर सर्वांचा पिता आहे,माझे सर्वां वरती खूपच प्रेम
आहे.बाबा येथे पाहत,जी अनन्य श्रेष्ठ मुलं आहेत, त्यांच्याकडे नजर जाते ना. बाबांना
खूपच प्रेमाने आठवण करतात,सेवा करत राहतात.मधुबन मध्ये असून पण बाबांची नजर सेवाधारी
मुलांकडे जात राहते,कधी डेहराडून, कधी मेरठ,कधी दिल्ली इत्यादी.मुलं माझी खूप
प्रेमाने आठवण करतात,मी पण त्यांची आठवण करतो.माझी आठवण करत नाहीत तरी पण मी
सर्वांची आठवण करतो,कारण मला सर्वांना घेऊन जायचे आहे. होय,जे माझ्या द्वारा
सृष्टिचक्राच्या ज्ञानाला समजतात,नंबरा नुसार ते परत ऊच्च पद मिळवतात.या
महत्त्वाच्या गोष्टी आहेत,शिक्षक हदचे असतात,हे बेहद चे आहेत.तर मुलांच्या मनामध्ये
खूपच खुशी व्हायला पाहिजे.बाबा म्हणतात सर्वांची भूमिका एकसारखी होऊ शकत नाही, यांची
तर भूमिका होती परंतु त्यांचे अनुकरण करणारे करोडो मधून कोणीच निघतात.बाबा आम्ही
सात दिवसाचा मुलगा आहे,एक दिवसाचा मुलगा आहे,असे म्हणतात,तर लहान मुला सारखे झाले
ना. बाबा प्रत्येक गोष्ट समजत राहतात,नदी पण बरोबर ओलांडून आले होते.बाबांची
प्रवेशता झाल्यानंतर लगेच ज्ञान देणे सुरू झाले, त्यांची खूप महिमा आहे. ती गीता तर
तुम्ही जन्म जन्मांतर अनेक वेळेस वाचली आहे,खूपच फरक आहे.कुठे कृष्ण भगवानुवाच कुठे
शिव परमात्मा वुवाच. रात्रंदिवसा चा फरक आहे.तुमच्या बुद्धी मध्ये आहे आम्ही सत्य
खंडांमध्ये होतो,सुख पण खूप पाहिले आहे,७५% सुख असते. बाबांनी हे अविनाशी नाटक
सुखासाठीच बनवले आहे,ना की दुःखासाठी.हे तर ज्या वेळेस तुम्ही विकारांमध्ये जातात
तर तुम्हाला दुःख मिळते.लढाई तर इतक्या लवकर लागू शकत नाही.तुम्हाला खूप सुख मिळत
राहते,अर्ध्ये अर्धे असल्यानंतर इतकी मजा येणार नाही.साडेतीन हजार वर्ष कोणतीच लढाई
इत्यादी नसते.रोग इ. पण नसतात. येथे तर पहा अनेक नवीन नवीन आजार होत राहतात.सतयुगा
मध्ये असे कोणते किडे इ.नसतील जे धान्यांला खाऊन टाकतील,त्याचे नावच चाहे
स्वर्ग.तुम्हाला जगाचा नकाशा पण दाखवायला पाहिजे,तेव्हा समजू शकतील. वास्तव मध्ये
भारतच होता दुसरा कोणताही धर्म नव्हता परत नंबरा नुसार दुसरे धर्म स्थापन करण्यासाठी
येतात.आता तुम्हाला विश्वाच्या इतिहास भूगोलाची माहिती आहे.तुमच्या शिवाय बाकी सर्व
नेती नेती म्हणतात.आम्ही त्यांना जाणत नाही,त्यांचे काहीच नाव रूप देश काळ नाही असं
म्हणतात.नाव रुप नाही तर देश पण होऊ शकत नाही.मनुष्य तर काहीच समजत नाहीत.आता बाबा
आपला परिचय मुलांना देत आहेत. अच्छा.
गोड गोड,फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) नेहमीच
अपार खुशी मध्ये राहण्यासाठी,जे बेहदचे पिता आहेत,ते ज्या बेहदच्या गोष्टी
ऐकतात,त्यांचे स्मरण करायचे आहे.बाबांचे अनुकरण करत राहायचे आहे.
(२) नेहमी निरोगी राहण्यासाठी पवित्रतेला धारण करायचे आहे.पवित्रते द्वारेच आरोग्य,
संपत्ती आणि आनंदाचा वारसा बाबांकडून घ्यायचा आहे.
वरदान:-
शक्तिशाली
आठवणी द्वारे सेकंदांमध्ये करोडोची कमाई करणारे,पद्मापदम भाग्यशाली भव.
तुमची आठवण
एवढी शक्तिशाली पाहिजे,ज्यामुळे एका सेकंदा द्वारे करोडोंची कमाई जमा होत
राहील.ज्यांच्या प्रत्येक पावला मध्ये पद्म जमा होतील म्हणून पद्मापदम भाग्यशाली
म्हणले जाते. जेव्हा कोणाची चांगली कमाई होते,तर त्यांच्या चेहऱ्यावर चमक आणि खुशी
दिसुन येते, तर तुमच्या चेहऱ्या द्वारे करोडोंच्या कमाईचा नशा दिसून यायला पाहिजे.
असा आत्मिक नशा, आत्मिक खुशी असायला हवी ज्याचा अनुभव दुसरे लोक करतील की,हे खूपच
वेगळे लोक आहेत.
बोधवाक्य:-
या अविनाश
नाटकांमध्ये सर्वच चांगले होणार आहे, या स्मृती द्वारे बेफिक्र बादशहा बना.