24-11-2019 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
12.03.1985 ओम शान्ति
मधुबन
सत्यतेची शक्ती
आज सत्य पिता सत
शिक्षक सतगुरु आपल्या सत्यतेच्या शक्ती स्वरुप मुलांना पाहत आहेत. सत्य ज्ञान व
सत्याची शक्ती किती महान आहे त्यांच्या अनुभवी आत्म्यांना पाहत आहेत. सर्व दुरदुर
राहणारी मुले वेगळे धर्म वेगळी मान्यता, वेगळ्या रिती रिवाजात राहणारे पण या
ईश्वरीय विश्वविद्यालयाकडे व राजयोगाकडे का आकर्षित झाले? सत्य बाबाचा सत्य परिचय
मिळाला, म्हणजे सत्य ज्ञान मिळाले, खरा परिवार मिळाला, खरा स्नेह मिळाला, खज्या
प्राप्तीचा अनुभव झाला. तेव्हा सत्यतेच्या शक्तीकडे आकर्षित झाले. जीवन जगत होते
प्राप्ती पण होती यथाशक्ती ज्ञान पण होते. परंतु सत्य ज्ञान नव्हते त्यामुळे
सत्यतेच्या शक्तीने सत्य बाबांचे बनविले.
सत्य शब्दाचे दोन अर्थ आहेत. सत्य, सत्यता पण आहे आणि सत्य अविनाशी पण आहे. तर
सत्यतेची शक्ती. अविनाशी पण आहे, त्यामुळे अविनाशी प्राप्ती, अविनाशी संबंध अविनाशी
स्नेह, अविनाशी परिवार आहे. हाच परिवार 21 जन्म वेगवेगळ्या नांवारुपात भेटत राहतो.
परंतू ओळखत नाहीत. आता जाणतो कि, आम्हीच वेगळ्या संबंधाने परिवारामध्ये येत राहू.
या अविनाशी प्राप्तीला ओळखल्याने दूर देशातील असून पण आपला सत्य परिवार, सत्य पिता,
सत्य ज्ञानाकडे ओढले आहेत. जिथे सत्यता पण आहे, आणि ती अविनाशी आहे, हीच परमात्माची
ओळख आहे. तर जसे तुम्ही सर्व या विशेषतेच्या आधारावर आकर्षित झालात, असेच सत्यतेच्या
शक्तीला, सत्य ज्ञानाला विश्वात प्रसिध्द करावयाचे आहे. 50 वर्षे झाली जमिन तयार
केली, स्नेहात आणले, संपर्कात आणले. राजयोगाचे आकर्षणमध्ये आणले, शक्तीच्या अनुभवाने
आकर्षण मध्ये आणले. आता बाकी काय राहिले? जसा परमात्म एक आहे, ही सर्व वेगवेगळ्या
धर्मवाल्यांची मान्यता आहे. असे यथार्थ सत्य ज्ञान एकाच बाबाचे आहे किंवा एकच रस्ता
आहे, हा आवाज जोपर्यंत उंच जात नाही, तो पर्यंत आत्म्यांचे अनेक काडीच्या आधाराकडे,
भटकणे बंद होणार नाही. आता हेच समजत आहेत की, हा पण एक रस्ता चांगला आहे. परंतु
शेवटी पण एका बाबाचा एकच परिचय, एकच रस्ता आहे. अनेकता हा संभ्रम नष्ट होणेच, विश्व
शांतीचा आधार आहे. या सत्यतेचा परिचय किंवा सत्य ज्ञानाच्या शक्तीचे वारे जो पर्यंत
चोहीकडे पसरणार नाही, तोपर्यंत प्रत्यक्षतेच्या झेंड्याखाली, सर्व आत्मे सहारा घेऊ
शकणार नाहीत. तर सुवर्ण जयंतीचे वेळी, जेव्हा बाबाचे घरी विशेष निमंत्रण देऊन
बोलावता, आपला मंच आहे. श्रेष्ठ वातावरण आहे, स्वच्छ बुध्दीचा प्रभाव आहे, स्नेहाची
धरणी आहे, पवित्र पालना आहे, अशा वातावरणामध्ये आपल्या सत्य ज्ञानाला प्रसिध्द
करणेच प्रत्यक्षतेचा प्रारंभ आहे. आठवते का, जेव्हा प्रदर्शनी द्वारे विहंग
मार्गाद्वारे सेवेची सुरुवात झाली, तेव्हा काय करत होता? मुख्य ज्ञानातील प्रश्नांचा
फॉर्म भरुन घेत होता ना. परमात्मा सर्वव्यापी आहे कि नाही? गीतेचा भगवान कोण आहे?
असा फार्म भरुन घेत होता ना. त्यांचे मत लिहून घेत होता. प्रथम विचारत होता? तर
प्रथम असा आरंभ केला, परंतू पुढे चालून या गोष्टीला गुप्त रुपात ठेवून, संपर्क
स्नेहाला पुढे करुन जवळ आणले. यावेळी, जेव्हा मधुबनच्या भुमीवर येत आहेत, तर सत्य
परिचय, स्पष्ट परिचय दया. हे पण चांगले आहे. ही तर पटवून देण्याची गोष्ट आहे. परंतू
एकाच बाबांचा एक खरा परिचय, बुध्दीमध्ये स्पष्ट यावा, ती पण वेळ आता येणार आहे.
फक्त सरळ म्हणत राहता कि, बाबा हे ज्ञान देत आहेत, बाबा आले आहेत, हे जाणतात की, हे
परमात्म ज्ञान आहे? परमात्म्याचे कर्तव्य चालू आहे? ज्ञानात नविनता आहे, याचा अनुभव
करत आहेत? अशी कार्यशाळा कधी ठेवली आहे? ज्यामध्ये परमात्मा सर्वव्यापी आहे कि नाही,
एकाचवेळी येतात कि, वारंवार येतात? असा स्पष्ट परिचय त्यांना मिळाला तर समजतील कि
दुनियेमधे जे ऐकले नाही ते येथे ऐकले. असे जे विशेष वक्ता बणून येतात, त्यांचे
बरोबर या ज्ञानातील मुद्यांचा वार्तालाप केल्याने त्यांचे बुध्दीमध्ये हे येईल. त्या
बरोबर जे भाषण करता, त्यामध्ये पण स्वत:च्या परिवर्तनाचा अनुभव सांगून, एक एक वक्ता,
एक एका ज्ञानाच्या गोष्टीला स्पष्ट करु शकता. असा एकदम विषय ठेवू नका कि, परमात्मा
सर्वव्यापी नाही, परंतू एका बाबाला एकाच रुपात ओळखल्याने काय काय विशेष प्राप्ती
झाली, त्या प्राप्तींना ऐकवत ऐकवत सर्वव्यापीच्या गोष्टी स्पष्ट करु शकता. एक
परमधाम निवासी समजून आठवण केल्याने बुध्दी कशी एकाग्र होते किंवा पित्याचे संबंधाने
किंवा प्राप्तीची अनुभूती होते. या रितीने सत्यता आणि निर्भयता दोन्ही रुपात सिध्द
करु शकता. ज्यामध्ये अभिमान पण वाटू नये कि हे लोक स्वत:ची महिमा करत आहेत. नम्रता
आणि दयेच्या भावनेमुळे अभिमानाची जाणीव होत नाही. जसे मुरली ऐकताना कोणी पण अभिमानी
म्हणत नाही. अधिकाराने बोलतात, असे म्हणतात. जरी शब्द कितीही कठोर असले तरी अभिमानी
म्हणत नाहीत. अधिकारी पणाची जाणीव करतात. असे का होत आहे? जेवढे पण अधिकारी आहेत,
तेवढीच नम्रता आणि दयेची भावना आहे. तसे तर बाबा मुला समोर बोलतात. परंतू तुम्ही
सर्व या विशेषतेद्वारे मंचावर या विधीने स्पष्ट करु शकता. जसे सांगितले की, असाच एक
मुद्या सर्वव्यापीची घ्या, दुसरा नांवारुपापासून वेगळा घ्या, तिसरा नाटकातील मुद्ये
बुध्दीत ठेवा. आत्म्याच्या नविन विशेषतांना बुध्दीत ठेवा. जे पण विशेष विषय आहेत,
त्यांचे लक्ष्य ठेवून, अनुभव आणि प्राप्तीच्या आधाराने स्पष्ट करत जावा, ज्यामुळे
समजतील कि, या सत्य ज्ञानामुळेच सतयुगाची स्थापना होत आहे. भगवानुवाच काय विशेष आहे,
ते शिवाय भगवानाचे कोणी सांगू शकत नाही. विशेष सुविचार ज्यांना तुम्ही स्पष्ट
शब्दात म्हणता कि, जसे मनुष्य, मनुष्यांचा कधी सद्गुरु, सतपिता बनू शकत नाही.
मनुष्य परमात्मा होऊ शकत नाही. असे विशेष मुद्ये जे वेळो वेळी ऐकत आले आहात, त्याची
रुप रेखा बनवा. ज्यामुळे सत्य ज्ञानाची स्पष्टता होईल. नविन दुनियेसाठी हे नविन
ज्ञान आहे. नविनता आणि सत्यता दोन्हीचा अनुभव व्हावा. जसे संमेलन करता, सेवा फार
चांगली होते. संमेलनासाठी जे पण साधन बनविता, कधी कोणता विषय, कधी काय बनविता,
त्यामध्ये पण साधन घेता कि, संपर्काला पुढे वाढवावयाचे आहे. हे पण साधन चांगले आहे
कारण संधी मिळते भेटत राहण्याची. परंतु जसे आता जे पण येतात, म्हणतात कि होय, ही
फार चांगली गोष्ट आहे. योजना चांगली आहे, विषय चांगला आहे, सेवेचे साधन पण चांगले
आहे. असे म्हणोत कि, नविन ज्ञान आज स्पष्ट समजले. असे विशेष 5-6 जण जरी तयार झाले
तरी, सर्वांमध्ये तर असा वार्तालाप होऊ शकत नाही. परंतू विशेष जे येत आहेत. तिकीट
काढून घेऊन येता. विशेष पालना पण करता. त्यांचेमध्ये पण जे विशेष आहेत, त्यांचे
बरोबर असे वार्तालाप करुन त्यांचे बुध्दीत स्पष्ट बसविणे जरुरीचे आहे. अशी कोणती तरी
योजना बनवा, ज्याद्वारे त्यांना असे वाटू नये कि यांना फार आपला नशा आहे, परंतू
सत्यता वाटावी. याला म्हटले जाते कि बाण पण लागावा आणि जख्म पण होऊ नये, ओरडू नयेत,
परंतू खुशीमध्ये नाचावेत. भाषणांची रुपरेखा पण नविन बनवा. विश्व शांतीची भाषणे तर
फार केली. आध्यात्मिकतेची आवश्यकता आहे, आध्यात्मिक शक्ती शिवाय काही होऊ शकत नाही.
असे तर वर्तमानपत्रामध्ये येते, परंतू आध्यात्मिक शक्ती काय आहे! आध्यात्मिक ज्ञान
काय आहे. याचा मुळ स्त्रोत कोण आहे! आता तेथ पर्यंत गेले नाहीत. त्यांनी समजाव कि,
भगवानाचे कार्य चालू आहे. आता म्हणतात कि, माता फार चांगले काम करत आहेत. वेळेनुसार
असे पण वातावरण बनवावे लागते. जसे मुलगा पित्याला प्रसिध्द करतो, तसे पित्याने
मुलाला प्रसिध्द करावे, आता पिता मुलाला प्रसिध्द करत आहेत, असे होत आहे. तर असा
बुलंद आवाजाने प्रायक्षतेचा झेंडा फडकावा समजले.
सुवर्ण जयंतीमध्ये काम करावयाचे आहे, हे समजले ना! दुसज्या जागेवर तरी पण वातावरणाला
पाहावे लागते.परंतू बाबाचे घरी तरी, आपले घर आहे, आपला मंच आहे, तर अशा ठिकाणी या
प्रत्यक्षेचा आवाज बुलंद करु शकता. तर थोडे पण या गोष्टीमध्ये निश्चय बुध्दी झाले,
तर तेच आवाज बुलंद करतील. आता अवस्था काय आहे, संपर्कात आणि स्नेहामध्ये स्वत:
यावेत, तशी सेवा करत आहात. इतरांना पण स्नेह आणि संपर्कात आणत आहात. जेवढे स्वत:
जमेल तेवढी सेवा करत आहात. ही पण सफलताच म्हणावी ना. परंतू आता आणखीन पुढे जावा.
नांव बदनामीतून प्रसिध्द झाले. पुर्वी घाबरत होते, आता येऊ इच्छित आहेत, हा फरक झाला
ना. पुर्वी नांव ऐकू इच्छित नव्हते, आता नाव घेण्याची इच्छा ठेवत आहेत. हे पण 50
वर्षांत विजयाला प्राप्त केले आहे. जमीन तयार करायला पण वेळ लागतो. असे समजू नका 50
वर्षे यात गेली, तर मग आता काय होईल. अगोदर जमिनीमध्ये, नांगर चालवून योग्य
बनविण्यासाठी वेळ लागतो, बी पेरण्यास वेळ लागत नाही. शक्तीशाली बियापासून शक्तीशाली
फळ निघते. आतापर्यंत जे झाले तेच होणार होते, तेच योग्य झाले. समजले.
विदेशी मुलांना पाहून :- हे चात्रक चांगले आहेत. ब्रह्मा बाबांनी फार काळ आवाहन
केल्यानंतर तुमचा जन्म झाला आहे. विशेष आवाहनानंतर जन्मले आहात. उशीर जरुर झाला आहे,
परंतू निरोगी आणि चांगले जन्मले आहात. बाबाचा आवाज जात होता, परंतू वेळ आल्यानंतर
जवळ पोहचले आहात. विशेष ब्रह्मा बाबा खुष होत आहेत. बाबा खुष्ज्ञ झाले तर मुले पण
खुश होणारच परंतू विशेष ब्रह्मा बाबाचा स्नेह आहे, त्यामुळे अनेकांनी ब्रह्मा
बाबांना न पाहता पण, अनुभव करता कि जसे यांना पुर्वी पाहिलेच आहे. चित्राद्वारे पण
चैतन्यतेचा अनुभव करत आहात. ही विशेषता आहे. ब्रह्मा बाबांच्या स्नेहाचा विशेष
सहयोग तुम्हा आत्म्यांना आहे. भारतवासी प्रश्न करतात ब्रह्मा बाबाच का, हेच का----परंतू
विदेशी मुले येताच ब्रह्मा बाबाचे स्नेहात बांधले जातात. तर या विशेष सहयोगाचे
वरदान आहे, त्यामुळे पाहिले नसले तरी पालनेचा अनुभव जास्त करत आहेत. ह्दयापासून
म्हणता ब्रह्मा बाबा. तर हा विशेष सुक्ष्म स्नेहाचा संबंध आहे. असे नाही की बाबाला
वाटते, हे माझे मागे कसे आले. ना तुम्हाला वाटते, ना ब्रह्मा बाबाला वाटते, समोरच
आहेत. आकार रुपात पण साकारा सारखीच पालना करत आहेत, असा अनुभव करत आहेत ना. थोड्या
वेळेत किती चांगले शिक्षक तयार झाले आहेत. विदेशातील सेवेला किती वेळ झाला आहे? किती
शिक्षक तयार झाले आहेत? चांगले आहे, बापदादा मुलांच्या सेवेची ओढ पाहत आहेत, कारण
विशेष सुक्ष्म पालना मिळत आहे ना. जसे ब्रह्मा बाबाचे विशेष संस्कार काय पाहिले,
सेवेशिवाय राहू शकत होते? त्यामुळे विदेशात दूर राहणाज्यांना या विशेष पालनेच्या
सहयोगामुळे सेवेचा उमंग जादा राहत आहे.
सुवर्ण जयंती मध्य आणखीन काय केले आहे? स्वत: पण सुवर्ण आणि जयंती पण सुवर्ण, चांगले
आहे, दोन्हीकडे लक्ष जरुर ठेवा. स्वत: आणि सेवा, स्वत:ची प्रगती आणि सेवेची प्रगती.
दोन्हीचा तराजू बरोबर ठेवल्याने अनेक आत्म्यांना स्वत:च आशिर्वाद देण्यासाठी
निमित्त बनता, समजले. सेवेची योजना बनविताना प्रथम स्वस्थितीचे लक्ष्य ठेवा, तेव्हा
योजनेमध्ये ताकद भरेल. कल्पना आहे बीज, तर बीजामध्ये जर शक्ती नसेल, शक्तीशाली बीज
नसेल तर किती पण कष्ट करा, श्रेष्ठ फळ मिळणार नाही. त्यामुळे कल्पने बरोबर
स्वस्थितीची ताकद जरुर भरत राहा, समजले, अच्छा.
असे सत्यतेला प्रत्यक्ष करणारे, नेहमी सत्यता आणि निर्माणतेचा तराजू समान ठेवणारे,
प्रत्येक बोलण्याद्वारे एका बाबांच्या परिचयाला सिध्द करणारे, नेहमी स्व
उन्नतीद्वारे विजय प्राप्त करणारे, सेवेमध्ये बाबांच्या प्रत्यक्षतेंचा झेंडा
फडकवणारे, अशा सतगुरुच्या सत्य बाबांच्या, सत्य मुलांना बापदादांची प्रेमळ आठवण आणि
नमस्ते.
निरोपाचे वेळी दादी
भोपाळ जाण्याची सुट्टी घेत आहेत :-
जाण्यामध्ये पण सेवा आहे. राहण्यात पण सेवा आहे. सेवेसाठी निमितत बनलेल्या मुलांच्या
प्रत्येक संकल्पामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये सेवा आहे. तुम्हाला पाहून जेवढा उमंग
उत्साह वाढेल तेवढीच बाबाची आठवण करतील, सेवेमध्ये पुढे जातील, त्यामुळे विजय नेहमी
बरोबर आहेच. बाबाला पण बरोबर घेऊन जात आहात ना, विजयाला पण बरोबर घेऊन जात आहात.
ज्या ठिकाणी जाल, तेथे विजय मिळेल. (मोहिनी बहेनला) चक्कर मारायला जात आहे, चक्कर
मारणे म्हणजे अनेक आत्म्यांना स्व प्रगतीचा सहयोग देणे. त्याच बरोबर जेव्हा
भाषणासाठी संधी मिळते, तर असे नविन भाषण करुन येणे. प्रथम तुम्ही सुरु करा, तर नंबर
एक होऊन जाईल. जिथे पण जाल तर सर्व काय म्हणतील? बापदादांची प्रेमळ आठवण आणली काय?
तर जसे बापदादा स्नेहाची सहयोगाची शक्ती देत आहेत, तसेच तुम्ही पण बाबांकडून घेतलेली
स्नेह, सहयोगाची शक्ती देत जाणे. सर्वांना उमंग उत्साहामध्ये घेऊन जाण्यासाठी कोणते
ना कोणते असे मंत्र बोलत राहणे. सर्व खुशीत नाचत राहतील. आत्मिकतेच्या खुशीत
सर्वांना नाचवणे आणि रमणिकतेद्वारे सर्वांना खुशी खुशीने पुरुषार्थांमध्ये पुढे
घेऊन जाणेस शिकवा. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
वरदान:-
स्वत:चे
चक्राला ओळखून, ज्ञानी तू आत्मा बनणारे प्रभु प्रिय भव.
आत्म्यांची या
सृष्टी चक्रात काय काय भुमिका आहे, त्याला ओळखणे म्हणजेच स्वदर्शन चक्रधारी बणने.
पुर्ण चक्राचे ज्ञानाला बुध्दीमध्ये यथार्थ रितीने धारण करणेच स्वदर्शन चक्र चालविणे
आहे, स्वत:चे चक्राला जाणणे म्हणजेच ज्ञानी तू आत्मा बनणे होय. असे ज्ञानी तू
आत्माच प्रभू प्रिय आहेत. त्यांचे समोर माया उभी राहू शकत नाही. हे स्वदर्शन चक्रच
भविष्यातील चक्रवर्ती राजा बनविते.
सुविचार:-
प्रत्येक मुलगा,
बाबासारखे प्रत्यक्ष प्रमाण बनेल, तर प्रजा लवकर तयार होईल...!!!