15-09-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   28.01.1985   ओम शान्ति   मधुबन


विश्व सेवेचे सहजसाधन मन्सा सेवा


आज सर्वशक्तिमान आपल्या शक्ती सेना, पांडव सेना, आत्मिक सेनेला पहात आहेत. सेनेचे महावीर आपल्या आत्मिक शक्तीद्वारे किती विजयी बनले आहेत? विशेष तीन शक्तींना पहात आहेत. प्रत्येक महावीर आत्म्याची मन्साशक्ती किती स्व परिवर्तना प्रति आणि सेवेच्या प्रति धारण केली आहे? असेच वाचा शक्ती, कर्मणा शक्ती अर्थात श्रेष्ठ कर्माची शक्ती किती जमा केली आहे. विजय रत्न बनण्यासाठी या तिन्ही शक्ती आवश्यक आहेत. तिन्ही पैकी जर एक शक्ती पण कमी आहे तर वर्तमान प्राप्ती आणि प्रालब्ध कमी होते. विजय रत्न अर्थात तिन्ही शक्तीद्वारे संपन्नविश्व सेवाधारी विश्व राज्य अधिकारी बनण्याचा आधार या तिन्ही शक्तींमध्ये संपन्न बनणे सेवाधारी बनणे आणि विश्व सेवाधारी बनणे ,विश्व राजन बनणे किंवा सतयुगी राजन बनणे यामध्ये पण खूप अंतर आहे. सेवाधारी अनेक आहेत, विश्व सेवाधारी कोणी कोणी आहेत. सेवाधारी अर्थात तिन्ही शक्तींची नंबरानुसार यथाशक्ति धारणा. विश्व सेवाधारी अर्थात तिन्ही शक्तींमध्ये संपन्नता. आज प्रत्येकाच्या तिन्ही शक्तीची टक्केवारी पहात होते.

सर्वश्रेष्ठ मन्सा शक्तीद्वाराकोणी आत्मा सन्मुख असेल, जवळ असेल, किंवा कितीही दूर असेल, सेकंदांमध्ये त्या आत्म्याला प्राप्तीच्या शक्तीची अनुभूती करू शकतो. मन्साशक्ती कोणत्याही आत्म्याची मानसिक हालचालीच्या स्थिती पण अचल बनवू शकते.मानसिक शक्ती अर्थात शुभ भावना, श्रेष्ठ कामना या श्रेष्ठ भावने द्वारे कोणत्या पण आत्म्याच्या संशय बुद्धीला भावनात्मक बुद्धी बनू शकतो. या श्रेष्ठ भावनाद्वारे कोणत्या पण आत्म्याचा व्यर्थ भाव परिवर्तन करून समर्थ भावना बनू शकतो. श्रेष्ठ भावने द्वारे कोणत्या पण आत्म्याच्या स्वभावाला बदलू शकतो श्रेष्ठ भावनेच्या शक्तीद्वारे आत्म्याला भावनांच्या फळाची अनुभूती करू शकतो. श्रेष्ठ भावना द्वारे भगवंताच्या जवळ आणू शकतो. श्रेष्ठ भावना कोणत्याही आत्म्याची भाग्याची रेषा बदलू शकते. श्रेष्ठ भावना हिम्मत हीन आत्म्याला हिंमतवान बनवते. याच श्रेष्ठ भावनांच्या विधी प्रमाण मन्सासेवा कोणत्या पण आत्म्याची करू शकतो. मन्सा सेवा वर्तमान वेळे प्रमाण अति आवश्यक आहे, मन्सासेवा तेच करू शकतात, ज्यांची स्वतःची मन्सा अर्थात संकल्प सदा सर्वांच्या प्रति श्रेष्ठ आहेत. निस्वार्थ आहे, नेहमी पर उपकाराची सद्भावना आहे, अपकारी वरती पण उपकाराची श्रेष्ठ भावना आहे. नेहमी दाता पणाची भावना हवी. सदा स्व परिवर्तन स्वतःच्या श्रेष्ठ कर्माद्वारे दुसर्यांना पण श्रेष्ठ कर्माची प्रेरणा देणारे पाहिजेत. यांनी अगोदर करावे नंतर मी काही करेल किंवा मी थोडे करेल, त्यांनी पण थोडे करावे, या भावनेपेक्षा दूर. कोणी करत नाही तरीही त्यांच्या प्रती दयेची भावना, सदा सहयोगाची भावना, हिम्मत वाढवण्याची भावना, याला मन्सा सेवाधारी म्हणले जाते. मन्सा सेवा एका स्थाना वरती स्थित होऊन पण करू शकतो.

मन्सासेवा आत्मिक वायरलेस सेट आहे.ज्याद्वारे दूरचे संबंध जवळ बनू शकतो. दूर बसलेल्या कोणत्याही आत्म्याला बाबांचे बनण्याचा उमंग उत्साह निर्माण करण्याचा संदेश देऊ शकतात.ज्यामुळे ती आत्मा अनुभव करेल की मला कोणती महान शक्ती बोलवत आहे. काही अनमोल प्रेरणा मला प्रेरत आहे. जसे कोणाला प्रत्यक्ष संदेश देऊन उमंग उत्साहा मध्ये आणतात. असे मन्सा शक्ती द्वारा पण, आत्मा असा अनुभव करेल जसे कोणी संमुख बोलत आहे. दूर असतानाही सन्मुख अनुभव करतील. विश्व सेवाधारी बनण्याचा सहज मार्ग मनसा सेवा आहे. जसे वैज्ञानिक या साकार सृष्टी पासून पृथ्वीपासून अंतरिक्ष यानद्वारे आपले कार्य शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थुल किंवा सूक्ष्ममध्ये जात आहेत. का? सूक्ष्म शक्तिशाली असते. मन्सा शक्ती पण अंतर्मुखी यान आहे. ज्याद्वारे पाहिजे तेथे, जितके लवकर पोहोचू इच्छितात तेवढे पोहोचू शकता. जसे विज्ञानाद्वारे पृथ्वीच्या आकर्षण आपेक्षा दूर जाणारे स्वतः हलके बनतात असे मन्सा शक्तिशाली आत्मा स्वतःच डबल लाईट स्वरूप सदा अनुभव करते. जसे अंतरिक्षयान वाले उंच असल्यामुळे पृथ्वीचे कुठलेही चित्र काढू शकतात, असे शांतीच्या शक्तीद्वारे अंतर्मुखी यानाद्वारे कोणत्या पण आत्म्याला चरित्रवान बनण्याची श्रेष्ठ आत्मा बनण्याची प्रेरणा देऊ शकतात. वैज्ञानिक तर प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ आणि संपत्ती खूप लावतात. परंतु तुम्ही विनाखर्च थोड्या वेळात खूप सेवा करू शकतात. जसे आजकाल कोठे कोठे उडत्या तबकडी पाहतात, ऐकतात. ती पण एक लाईटच दिसून येते. असे तुम्ही मन्सा सेवाधारी आत्म्यांना पुढे चालून अनुभव करतील की कुणी लाईट किंवा बिंदू आला, विचित्र अनुभव करून गेला. हे कोण होते? काय देऊन गेले, ही चर्चा वाढत जाईल. जसे आकाशातील तार्‍याकडे सर्वांची नजर जाते, असेच धरतीच्या ताऱ्यांकडे दिव्य ज्योती, चोहो बाजूंला अनुभव करतील. अशी शक्ती मन्सा सेवाधारीची आहे. समजले? महानता तर खूप आहे परंतु आज इतके ऐकवतो मन्सा सेवेला आणखी तीव्र करा. तेव्हा नऊ लाख तयार होतील. सुवर्णजयंती पर्यंत किती संख्या झाली आहे? हीरक जयंती पर्यंत नऊ लाख तर पाहिजेत ना? नाहीतर विश्व राज्य कशावरती राज्य करतील? नऊ लाख ताऱ्यांचे गायन आहे ना? तार्‍याप्रमाणे आत्म्याचा अनुभव करतील. तेव्हा तर नऊ लाख ताऱ्यांचे गायन होईल. म्हणून आता ताऱ्यांचा अनुभव करवा. अच्छा चोहो बाजूने आलेल्या मुलांना, मधुबन निवासी बनल्याबद्दल शुभेच्छा किंवा मिलन मेळ्याच्या शुभेच्छा याच अविनाशी अनुभवाला नेहमी सोबत ठेवा. समजले?

सदा महावीर बनून,मन्सा शक्तीच्या महानते द्वारे श्रेष्ठ सेवा करणारे सदा श्रेष्ठ भावना आणि श्रेष्ठ कामनाच्या विधीद्वारे, बेहदच्या सेवेची सिद्धी प्राप्त करणारे, आपल्या उच्च स्थिती द्वारे चोहो बाजूच्या आत्म्यांना श्रेष्ठ प्रेरणा देणारे विश्व सेवाधारी, सदा आपल्या शुभ भावने द्वारे अन्य आत्म्यांना भावनेचे फळ देणारे,असे विश्व कल्याणकारी परोपकारी, विश्व सेवाधारी मुलांना बापदादांची प्रेमळ आठवण आणि नमस्ते

कुमारां प्रतिअव्यक्त बापदादांचे मधुर महावाक्य :-

कुमार ब्रह्मकुमार तर बनलेचपरंतु ब्रम्हकुमार बनल्यानंतर काय बनायचे आहे? शक्तिशाली कुमार नेहमी ज्ञानसंपन्न आणि शक्तिशाली आत्मा असतील. ज्ञानसंपन्न अर्थात रचनाकाराला पण जानणारे, रचनेला पण जानणारे आणि मायेच्या वेगवेगळ्या रूपाला पण जानणारे.असे ज्ञानवान शक्तिशाली नेहमी विजयी आहेत.ज्ञान, जीवनामध्ये धारण करणे अर्थात ज्ञानाला शस्त्र बनवणे. तर शस्त्रधारी शक्तिशाली असतील ना. आज मिलेट्रीवाले कोणत्या आधारावरती शक्तिशाली आहेत? शस्त्र, बंदूक इत्यादी आहेत. तर निर्भय होतात. तर जे ज्ञानवान असतील ते जरूर शक्तिशाली असतील. तर मायेचे पूर्ण ज्ञान आहे. तर काय होईल?कसे होईल? माहित नाही कशी माया आली? तर ज्ञानवान झाले नाहीत ना. ज्ञानवान आत्मा अगोदरच जाणतील की थंडी वाजण्याची शक्यता आहे तर त्याची औषधे घेऊन ठीक करतील, बेसमजला ताप आला तरी फिरत राहतील, आणि ताप वाढत जाईल. अशाप्रकारे माया येते, तर येण्याच्या अगोदरच समजून घेऊन तिला दूर करा. शक्तिशाली मनुष्यांना पाहून दुश्मन लांबूनच पळून जातील. जर माया आली परत तिला नष्ट करा यामध्ये वेळ पण वाया जातो. आणि कमजोरी ची सवय लागते. सारखे सारखे आजारी पडले तर कमजोर होतात. तसेच सारखे सारखे नापास होतील तर म्हणतील हे अभ्यासांमध्ये ‘ढ’ आहेत. असे माया नेहमी येते आणि आघात करते तर हरण्याची सवय लागते, आणि नेहमी हरल्यामुळे कमजोर होतात म्हणून शक्तिशाली बना. अशी शक्तिशाली आत्मा नेहमी प्राप्तीचा अनुभव करते. युद्धामध्ये आपला वेळ वाया घालवत नाही विजयी बनण्याचा आनंद साजरा करते. तर कोणत्याच गोष्टीमध्ये कमजोर बनू नका. कुमार बुद्धी पवित्र आहे.अधरकुमार बनल्यामुळे बुद्धी अनेकांमध्ये विभागली जाते. कुमारांना एकच काम आहे, आपले जीवन बनविणे. अधरकुमारांना तर अनेक जबाबदाऱ्या असतात. तुम्ही त्या जबाबदाऱ्या पासून स्वतंत्र आहात. जे स्वतंत्र असतील तेच प्रगती करतील. ओझे असणारे हळूहळू चालतील, हलके असतील तर पळू शकतील, प्रगती करत राहतील. तर तुम्ही तीव्रवेगी एकरस राहणारे आहात ना? नेहमी तीव्रवेगी अर्थात एकरस असेही नाही सहा महिने झाले, जसे आहेत तसे चालत आहेत, याला तीव्रवेगाने चालणारे म्हणत नाहीत. तीव्र वेगाने चालणारे जसे आज आहेत, तसे उद्या यापेक्षा जास्त प्रगती करणारे परवा आणखीन जास्त प्रगती करणारे असतील, यांनाच तीव्रगती वाले म्हणतील. तर सदा स्वतःला शक्तिशाली कुमार समजा. ब्रह्मकुमार बनले परंतु शक्तिशाली बनले नाही तर विजयी बनू शकत नाहीत. ब्रह्मकुमार बनणे खूप चांगले आहे परंतु शक्तिशाली कुमार नेहमी सोबत, जवळ असतात. आत्ताचे समिप भविष्य राज्यांमध्ये पण जवळ आता स्थिती बनवण्यामध्ये जवळ नाहीत तर भविष्य राज्यांमध्ये पण जवळ राहू शकत नाहीत. आत्ताची प्राप्ती नेहमीसाठी प्रारब्ध बनवते, म्हणून नेहमी सदा शक्तीशाली बना. असे शक्तिशालीच विश्व कल्याणकारी बनू शकतात. कुमारांमध्ये शक्ती तर असते शारीरिक शक्ती किंवा आत्म्याची परंतु विश्व कल्याण करण्यासाठी शक्ती आहे की श्रेष्ठ विश्वाला विनाशकारी बनवण्यासाठी शक्ती आहे? तर कल्याणकारी कुमार आहात ना, अकल्याण कार्य करणारे नाही. संकल्पमध्ये पण नेहमीच सर्वांच्या प्रति कल्याणाची भावना हवी. स्वप्नामध्ये पण कल्याणाची भावना हवी, यालाच म्हणले जाते श्रेष्ठ शक्तिशाली, कुमार शक्तीद्वारे पाहिजे ते कार्य करू शकतात, फक्त संकल्प आणि कर्म दोन्ही सोबत असावे, असे नाही संकल्प आज केला आणि कर्म नंतर केले. संकल्प आणि कर्मचा समतोल पाहिजे, असे शक्तिशाली आहात. असेच शक्तिशाली अनेक आत्म्यांचे कल्याण करू शकतात. तर सदा सेवेमध्ये सफल करणारे आहात की खिटखिट करणारे आहात. मनामध्ये, कर्मामध्ये आपापसात सर्वात ठीक कोणत्याच गोष्टीमध्ये खिटखिट नको. सदा स्वतःला विश्व कल्याणकारी कुमार समजा तर जे पण कार्य करतील, त्यामध्ये कल्याणाची भावना सामावलेली असेल. अच्छा.

निरोप घेताना अमृतवेळेला सर्व मुलांना बाबांनी आठवण दिली.

प्रत्येक कार्य मंगल व्हावे, सदा सफल व्हावे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. तसे तर प्रत्येक दिवस संगम युगाचा शुभ आहे, श्रेष्ठ आहे, उमंग उत्साह देणारा आहे म्हणून प्रत्येक दिवसाचे आप आपले महत्त्व आहे. आजच्या दिवशी प्रत्येक संकल्प मंगलमय हवा, अर्थात शुभचिंतक रुपा मधला हवा. कोणाच्या प्रति संकल्प मंगल कामना अर्थात शुभकामना असणारा हवा. प्रत्येक संकल्प शुभचिंतक असणारा पाहिजे. तर आजच्या दिवसाचे महत्त्व, संकल्प, बोल आणि कर्म विशेष स्मृतीमध्ये ठेवा. हीच स्मृति ठेवा कि, प्रत्येक सेकंद बापदादांची आठवण स्वीकार करायची आहे. सर्व दिवस आज प्रेमळ आठवण घेत रहायचे अर्थात प्रत्येक संकल्प, बोलद्वारे प्रेमाच्या लाटेत समावत राहायचे आहे. अच्छा सर्व मुलांना विशेष सुप्रभात.

संमेलनासाठी अव्यक्त बापदादांचा विशेष संदेश :-

बापदादा म्हणतात मुलं संमेलन करत आहेत संमेलनाचा अर्थ आहे सम मिलन.तर जे संमेलनामध्ये येणारे आहेत, त्यांना बापसमान नाही तर आपल्या सारखे निश्चय बुद्धी तर अवश्य बनवायचे आहे. जे पण येतील काही तरी बनून जावेत, फक्त बोलून नको. हे दाताचे घर आहे.तर येणारे हे समजायला नको की आम्ही यांना मदत करायला आलो आहेत.परंतु त्यांनी असे समजावे की, हे तर प्राप्ती करण्याचे घेण्याचे स्थान आहे, देण्याची नाही. येथे प्रत्येक जण लहान-मोठे ज्यांना आपण भेटणार आहेत, त्यांनी संकल्प करायचा आहे की, दृष्टी द्वारे, वायूमंडलात द्वारे,संबंध संपर्क द्वारे, मास्टर दाता बनून राहायचे आहे. सर्वांना काही न काही देऊनच पाठवायचे आहे. हे प्रत्येकाचे लक्ष हवे. येणाऱ्या प्रत्येकांचा आदर करायलाच पाहिजे, परंतु सर्वांचा आदर स्नेह एका शिव पित्या मध्येच त्यामध्ये बसवायचा आहे. बाबा म्हणतात माझे इतके प्रकाश स्तंभ मुले चोहोबाजूला मनसाद्वारे बाबांची किरणे शक्ती रुपी किरणे पसरवतील तर सफलता झालेली आहे. तो एक प्रकाश स्तंभ, लाईट हाऊस अनेकांना रस्ता दाखवतो. तुम्ही तर शक्तिशाली मुले, लाईट हाऊस मुले खूप कमाल करू शकतात. अच्छा. गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
ईश्वरीय सेवेच्या बंधना द्वारे समिप संबंधां मध्ये येणारे श्रेष्ठ परिवाराचे अधिकारी भव.

ईश्वरीय सेवेचे बंधन समिप संबंधां मध्ये आणणारे आहे. जितकी सेवा करताल तेवढेच सेवेचे फळ समिप संबंधांमध्ये घेऊन येते. दिवस रात्र सेवा करतील तेवढे स्वर्गामध्ये आरामशीर सिंहासनावरती बसतील. येथे आराम करते तेथे कष्ट करावे लागतील. एका एका सेकंदाचे, एका एका कार्याचा हिशोब बाबांच्या जवळ आहे.

सुविचार:- 
स्व परिवर्तना द्वारे विश्व परिवर्तनाचे संकल्प वातावरणा मध्ये तीव्र गतीने पसरवा.