08-12-2019 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
10.03.1985 ओम शान्ति
मधुबन
संतुष्टता
आज दिलवाले
बाबा,आपल्या स्नेही हृदयासिन मुलांबरोबर मनातील गोष्टी करण्यासाठी आले आहेत.दिलवाला
बाबा आपल्या,खऱ्या हृदयाच्या मुलां बरोबर,मनातील देवाण-घेवाण करण्यासाठी, मनाचे
हालचाल ऐकण्यासाठी आले आहेत. आत्मिक पिता, आत्म्या बरोबर आत्मिक गोष्टी करत आहेत.हा
आत्म्याचा,आत्मिक संवाद फक्त याच वेळेस अनुभव करू शकता.त्यामध्ये इतकी स्नेहाची
शक्ती आहे,जे आत्म्याचे रचनाकार बाबांना आत्मिक संवाद करण्यासाठी निर्वाण पासून
वाणीमध्ये घेऊन येतात.असे श्रेष्ठ आत्मे आहात,जे बंधनमुक्त बाबांना पण,स्नेहाच्या
बंधनांमध्ये बांधतात.दुनियावाले बंधनापासून सोडवण्यासाठी पुकारत आहेत आणि तुम्ही
बंधन मुक्त बाबांना स्नेहाच्या बंधनांमध्ये बांधत आहात,बांधण्यामध्ये हुशार आहात
ना.जेव्हापण आठवण करतात तर,बाबा हजर होतात,हजूर हाजर आहेत ना.तर आज विशेष परदेशी
मुलाबरोबर आत्मिक संवाद करण्यासाठी आले आहेत.या हंगामामध्ये विशेष परदेशी मुलांची
भेटण्याची पाळी आहे.जास्तीत जास्त परदेशी मुलं आले आहेत.मधुबन निवासी तर आहेतच
मधुबन श्रेष्ठ स्थानाचे निवासी.एका स्थानावरती बसून विश्वाच्या अनेक आत्म्यांचे
मिलन मेळा पाहणारे आहात.जे मधुबन मध्ये येतात, तर ते जातात पण,परंतु मधुबन निवासी
तर नेहमीच येथे राहतात.आज विशेष परदेशी मुलांना बाबा विचारत आहेत की,तुम्ही सर्व
संतुष्टमणी बनून बाप दादांच्या ताजमध्ये चमकत आहात?सर्व संतुष्टमणी आहात,नेहमी
संतुष्ट आहात.कधी स्वतः पासुन असंतुष्ट,तर कधी ब्राह्मण आत्म्या पासून असंतुष्ट,तर
कधी आपल्या संस्कारा द्वारे असंतुष्ट,तर कधी वातावरणाच्या प्रभाव द्वारे
असंतुष्ट,असे तर होत नाहीत ना.नेहमी सर्व गोष्टी द्वारे संतुष्ट आहात?कधी
संतुष्ट,कधी असंतुष्ट असे संतुष्ट मणी बनू शकत नाहीत.तम्ही सर्वांना सांगितले की
आम्ही संतुष्ट आहोत,परत असे तर म्हणणार नाही,आम्ही तर संतुष्ट आहोत परंतु दुसरे
असंतुष्ट करतात.काही पण झाले तरी,जे संतुष्ट आत्मे आहेत,ते कधीच आपली संतुष्टतेची
विशेषता सोडू शकत नाहीत.संतुष्टता ब्राह्मण जीवनाचा विशेष गुण किंवा खजाना
आहे,विशेष जीवनाचा शृंगार आहे.जसे कोणती प्रिय वस्तु असते,तर प्रिय वस्तूला कधीच
सोडत नाहीत.संतुष्टता च विशेषता आहे.संतुष्टता ब्राह्मण जीवन परिवर्तन करण्याचा आरसा
आहे.साधारण जीवन आणि ब्राह्मण जीवना मध्ये खूप फरक आहे.साधारण जीवनामध्ये कधी
संतुष्ट,तर कधी असंतुष्ट.ब्राह्मण जीवना मधील संतुष्टतेच्या विशेषतेला पाहून अज्ञानी
पण प्रभावित होतात.हे परिवर्तन अनेक आत्म्यांना परिवर्तन करण्याचे निमित्त
बनते.सर्वांच्या मुखाद्वारे हेच निघते कि,हे नेहमी संतुष्ट अर्थात खुश राहतात.जिथे
संतुष्टता आहे तेथे,खुशी जरूरआहे.असंतुष्टता आनंदाला गायब करते.हीच ब्राह्मण जिवनाची
महिमा आहे.नेहमी संतुष्ट नाही तर साधारण जीवन आहे.संतुष्टता सफलतेचा सहज आधार
आहे.संतुष्टता सर्व ब्राह्मण परिवाराचे,स्नेही बनवण्याचे श्रेष्ठ साधन आहे.जे
संतुष्ट राहतील त्याच्याप्रती, स्वतःच सर्वांचा स्नेह मिळतो.संतुष्ट आत्म्याला
नेहमीच,श्रेष्ठ कार्यक्रमांमध्ये सहयोगी बनवण्याचा प्रयत्न करतील.त्यांना कष्ट करावे
लागणार नाहीत की,मला सहयोगी बनवा,किंवा मला विशेष आत्म्याच्या यादीमध्ये स्थान
द्या.विचार पण करावा लागणार नाही,सांगावं पण लागणार नाही.संतुष्टतेच्या विशेषता मुळे
स्वतःच प्रत्येक कार्यामध्ये सुवर्णसंधी चालून येईल. स्वतः कार्य अर्थ निमित्त
बनलेल्या आत्म्यांना,संतुष्ट आत्म्याच्या प्रती संकल्प येईल आणि संधी मिळत
राहील.संतुषटता नेहमीच सर्वांचे स्वभाव संस्कार मिळवणारी असते.संतुष्ट आत्मा कधी
कोणत्याच सभाव संस्कारा द्वारे घाबरणारे असत नाही,असे संतुष्ठ आत्मा बनले आहात
ना.जसे भगवान स्वतः तुमच्याजवळ आले,तुम्ही नाही आले,भाग्य स्वतः तुमच्याकडे
आले,घरबसल्या भगवान मिळाला,भाग्य मिळाले.घर बसल्या,बसल्या सर्व मिळाले. सर्वांच्या
जवळ सेवांमध्ये जवळ येण्याची संधी मिळत राहते. विशेषतः पुढे घेऊन जाते,जे संतुष्ठ
राहतात,त्यांना स्वतः सर्वांकडून प्रेम मिळते,दिखाव्याचे प्रेम नाही.एक असते कुणाला
खुश करण्यासाठी बाहेरून स्नेह देणे,मनापासून स्नेह देणे,आणि नाराज व्हायला नको
म्हणून स्नेह द्यावा लागतो,परंतु ते नेहमीच स्नेह घेण्याचे पात्र बनत नाहीत.संतुष्ट
आत्म्याला नेहमीच सर्वांकडून, मनापासूनचे स्नेह मिळते,मग ते नवीन असतील किंवा
जुने,कोणी त्यांना जाणत असेल किंवा नसेल परंतु संतुष्टता त्याची ओळख करून
देते.प्रत्येकाची इच्छा होईल त्यांच्याशी गोष्टी करू,त्यांच्याबरोबर बसू.तर असे
संतुष्ट आहात ना?पक्के आहात ना. असे तर नाही म्हणत,बनत आहोत, नाही, बनलो आहोत.
संतुष्ट आत्मे नेहमीच मायाजीत आहेत.ही नेहमी मायजीत असणाऱ्यां ची सभा आहे ना.मायेशी
घाबरणाऱ्यां ची तर सभा नाही ना.माया कोणाजवळ येते,सर्वा जवळ येते ना. असे कोणी
आहेत,जे म्हणतात माझ्या कडे माया येत नाही.सर्वांकडे येते,परंतु कोणी
घाबरतात,कोणीओळखुन सांभाळ करतात.लक्ष्मण रेषे मध्ये राहणारी,बाबांची आज्ञा धारक
मुलं,मायेला ओळखून आपले रक्षण करतात.मायेला ओळखण्या मध्ये उशीर करतात किंवा चूक
करतात,ते मायेला घाबरतात. जसे गोष्ट ऐकली ना, सीतेने धोका खाल्ला कारण मायेला ओळखू
शकली नाही.मायेच्या स्वरुपाला न ओळखल्यामुळे धोका मिळतो,जर ओळखले की,हा ब्राह्मण
नाही,भिकारी नाही,रावण आहे तर शोक वाटिका चा इतका अनुभव करावा लागला नसता परंतु
ओळखण्या मध्ये उशीर केला त्यामुळे धोका खाल्ला आणि धोक्यामुळे दुःख मिळाले.योगी
पासून बन वियोगी बनले,नेहमी सोबत राहण्यापासून दूर झाले.प्राप्ती स्वरूप आत्म्या
पासुन पुकारणारे आत्मे बनले,कारण मायेला ओळखण्या मध्ये कमी पडले.मायेच्या रूपाची
ओळखण्याची शक्ती कमी असल्यामुळे,मायेला पळून लावण्याच्या ऐवजी स्वतः घाबरतात.मायेची
ओळख कमी का होते,वेळेवर का ओळखत नाहीत,नंतर का येते.याचे कारण?नेहमी बाबांच्या
श्रेष्ठमता वरती चालत नाहीत.कधी आठवण करतात,कधी आठवण करत नाहीत.कधी उमंग उत्साहा
मध्ये राहतात,कधी राहत नाही.जे नेहमी आठवण करत नाहीत,आज्ञेचे उल्लंघन करतात अर्थात
मर्यादा मध्ये न राहिल्या मुळे,माया वेळेवर धोका देते.माये मध्ये परखण्याची शक्ती
खूप आहे.माया पाहते,या वेळेत हे कमजोर आहेत.तर या प्रकारची कमजोरी मुळे याला आपला
बनवू शकते.मायेच्या येण्याचा रस्ता कमजोरी आहे.जरा सा रस्ता मिळाला तर माया लगेच
पोहोचते.जसे आज काल डाकू काय करतात,दरवाजा बंद आहे,तर खिडकीमधून येतात.जरा पण
संकल्पा मध्ये कमजोरी आहे तर मायेला रस्ता मिळतो,म्हणून मायाजीत बनण्याचे सहज साधन
आहे,नेहमी बाबांच्या आठवणी मध्ये राहणे.आठवणी मध्ये राहणे म्हणजेच,मर्यादे मध्ये
राहणे.एक एक विकाराच्या पाठीमागे विजयी बनण्याच्या कष्टापासून सुटतील.सोबत आहात
तर,जसे बाबा,तसे तुम्ही आहात.संगतीचा रंग स्वतः लागतो,त्याला सोडून फक्त त्याच्या
फांद्या कापण्याचे कष्ट करू नका.आज कामजीत बनले,उद्या क्रोधजीत बनले,नाही.मी नेहमीच
विजयी आहे.जेव्हा बीजरूप द्वारे बीजाला नष्ट कराल तर नेहमीच्या कष्ट करण्या पासून
मुक्त व्हाल,फक्त बीजरूप बाबांना सोबत ठेवा.परत मायेचे बीज असे भस्म कराल,जे परत
त्या बीजापासून अंश मात्र पण वंश निघू शकणार नाही.तसे तर अग्नी मध्ये जळालेले बीज
कधीच फलदायक होऊ शकत नाहीत. तर नेहमी सोबत रहा,संतुष्ट रहा,तर माया काय
करेल,समर्पित होईल ना.मायेला समर्पित करणे येत नाही का?जर स्वतः समर्पित असाल तर
माया त्याच्यापुढे समर्पित आहेच.तर मायेला समर्पित केले की,आत्ता तयारी करत
आहात.काय हालचाल आहे.जसे स्वतःला समर्पित होण्याचा उत्सव साजरा करतात,तसेच मायेला
समर्पित करण्याचा उत्सव साजरा करा.पवित्र बनले म्हणजे उत्सव झाला.मायेला नष्ट
केले.परत गावात मध्ये जाऊन असे पत्र लिहू नका,काय करावे माया आली.आनंदाचे पत्र
लिहिणार ना.अनेक समर्पित उत्सव साजरे केले.आमचे तर झाले परंतु अनेक आत्म्या कडून पण
मायेला समर्पित केले.असे पत्र लिहिणार ना,अच्छा. उमंग उत्साहाने आले आहेत,तेवढेच
बापदादा पण नेहमीच,मुलांना अशा उमंग उत्साहा मध्ये,संतुष्ट रूपामध्ये पाहू
इच्छितात.लगन तर आहेच, लगनची ओळख आहे,इतक्या दूरवरून जवळ पोहोचले आहात.दिवस-रात्र
लगन द्वारे,दिवसांची मोजमाप करत येथे पोहोचले आहेत.लगन नसती तर पोहोचणे पण मुश्कील
झाले असते,म्हणजेच आकर्षण आहे,तर यामध्ये तर पास झाले.पास चे प्रमाणपत्र
मिळाले,ना.प्रत्येक विषयांमध्ये पास झाले.तरीही बापदादा मुलांना निमंत्रण देतात,
कारण मायेला ओळखण्याची नजर तेज आहे.खुप दूर राहून पण बाबांना ओळखले,भारत देशामध्ये
राहणाऱ्यांनी ओळखले नाही परंतु विदेशातील दूर असणाऱ्या मुलांनी ओळखले.बाबांना ओळखून
आपले बनवले.त्यासाठी बाप दादा विशेष निमंत्रण देतात,जसे ओळखण्या मध्ये नंबर घेतला
तसेच माय जीत बनण्यांमध्ये पण नंबर एक बना.तर बाबा घाबरणाऱ्या मुलांना तुमच्याकडे
मायजीत बनण्याचा अनुभव ऐकण्यासाठी पाठवतील.असे उदाहरण मूर्त बनवून दाखवा.जसे मोहजीत
परिवार प्रसिद्ध आहे,तसेच मायाजीत सेंटर पण प्रसिद्ध व्हावा.हे असे सेवाकेंद्र आहे
जिथे माया कधीच आघात करत नाही.मायाने येणे वेगळी गोष्ट आहे आणि घायल करणे वेगळी
गोष्ट आहे. तर यामध्ये पण नंबर घेणारे आहात ना.त्यामध्ये नंबर एक कोण बनेल,लंडन,
ऑस्ट्रेलिया बनेल की अमेरिका बनेल,पँरीस बनेल की जर्मन बनेल,ब्राझील बनेल,कोण
बनेल.बाप दादा अशा मुलांचे चैतन्य संग्रहालय बनवतील.जसे आबूचे संग्रहालय नंबर एक
म्हणतात.सेवांमध्ये पण आणि सजावट मध्ये पण.तर अशा मायाजीत मुलांचे चैतन्य संग्रहालय
हवे.हिम्मत आहे ना?त्यासाठी आता किती वेळ पाहिजे. सुवर्ण महोत्सवा मध्ये पण त्यांना
बक्षीस देऊ,तर अगोदरच काही करून दाखवणार ना. शेवटी आले परंतु नंबर एक
मिळवला.भारतातील मूलं पण स्पर्धा करतील परंतु तुम्ही त्यांच्यापुढे जावा.बापदादा
सर्व मुलांना पुढे जाण्याची संधी देत आहेत,पाहिजे तर आठ नंबर मध्ये या.आठ मुलांनाच
बक्षीस मिळेल.असे नाही फक्त एकाला मिळेल.असे तर नाही विचार करत लंडन,ऑस्ट्रेलिया
जुने आहेत,आम्ही नवीन आलो आहोत.सर्वात छोटे,नविन सेवा केंद्र कोणते आहे.सर्वांत छोटे
जे असतात,ते सर्वांना प्रिय असतात,तसे तर लहानांना म्हटले जाते,मोठे तर मोठे आहेत
परंतु लहान पण बाबांच्या सारखे आहेत.सर्व करू शकतात,कोणती मोठी गोष्ट
नाही.ग्रीस,टैम्पा, रोम शहर तर छोटे आहे.हे तर खूपच उमंग उसामध्ये राहणारे
आहेत.टेम्पा काय करेल, टेम्पल म्हणजे मंदिर बनवेल.ती रमणीक मुलगी आली होती ना,तिला
म्हटले होते, टेम्पाला टेम्पल म्हणजे मंदिर बनवा.जे पण टेम्पा शहरा मध्ये येतील,ते
एकेक चैतन्य मूर्तीला पाहून हर्षित होतील.तुम्ही शक्तिशाली बणुन तयार व्हा,फक्त
तुम्ही राजे तयार व्हा परत प्रजा लगेच बनेल.दैवी घराने बनवण्यासाठी वेळ लागतो.हा
दैवी परिवार राजधानी बनत आहे,परत प्रजा तर खूप येईल, इतकी येईल,तुम्ही म्हणाल बाबा
आता बस करा.त्यापुर्वी राज्याधिकारी सिंहासन अधिकारी तर बना ना. ताजधारी तिलकधारी
बनले,तेव्हा तर प्रजा पण,जी हजूर म्हणेल.ताजधारी नाही तर प्रजा कसे मानेल,हे राजा
आहेत.दैवी परिवार बनवण्यामध्ये तर वेळ लागतो ना. तुम्ही चांगल्या वेळेत पोहोचले,जे
राजाई परिवारामध्ये येण्याचे अधिकारी बनले.आता प्रजा बनण्याची वेळ आहे. राजा
बनण्याची लक्षण जाणता ना. आत्ता पासून स्वराज्य अधिकारी, विश्वराज्य अधिकारी बणुन
जावा. आत्तापासूनच अधिकारी बनणाऱ्यांच्या जवळ आणि सहयोगी बनणाऱ्यांच्या पण जवळ आणि
राज्य चालवणे मध्ये पण सहयोगी बनतील. आत्तापासून सेवेमध्ये सहयोगी आहेत परत तेच
राज्य चालवणे मध्ये सहयोगी बनतील.तर आत्तापासून तपासून पहा,राजे आहात की,कधी प्रजा
पण बनतात,कधी वश,कधी अधिकारी.नेहमीचे राजे आहात.तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात.असा
विचार तर नाही करत ना,आम्ही तर नंतर आलो आहोत,राजे बनू की नाही.दैवी घराण्यामध्ये
येऊ की नाही.नेहमी हाच विचार करा,आम्ही नाही येणार तर कोण येईल?यायचेच आहे.असा
विचार करू नका माहित नाही, येऊ किंवा नाही. माहित नाही, हे होईल किंवा नाही, असा
विचार करू नका.आम्हीच कल्पा पूर्वी केले आहे,करत आहोत आणि नेहमीच करत राहू, समजले.
कधी हा विचार करू नका,मी विदेशी आहे, हे देशी आहेत.हे भारतीय आहेत,आम्ही विदेशी
आहोत.आपली पद्धत वेगळी आहे,यांची पद्धत वेगळी आहे.हे तर फक्त परिचय देण्यासाठी
म्हणतात,हे डबल परदेशी आहेत.जसे भारतामध्ये पण म्हणतात,हे कर्नाटकचे आहेत, हे उत्तर
प्रदेशाचे आहेत.तसे तर ब्राह्मणच आहात,जरी भारतीय आहात किंवा विदेशी आहात,सर्व
ब्राह्मणच आहात.आम्ही परदेशी आहोत,हा विचार करणेच चुकीचे आहे.नवीन जन्म घेतला नाही
का.नवीन जन्मच ब्रह्मा बाबाच्या गोदीमध्ये झाला ना, हे फक्त परिचय देण्यासाठी म्हटले
जाते परंतु संस्कारांमध्ये किंवा समजण्या मध्ये कधीच अंतर पडू देऊ नका.ब्राह्मण
वंशाचे आहात ना,अमेरिका आफ्रिका वंशाचे तर नाहीत ना.सर्वांचा काय परिचय
देतात.शिववंशी ब्रह्मकुमार कुमारी आहात ना.एकाच वंशाचे झाले ना,कधीही बोलण्या मध्ये
फरक पाडू नका.भारता मधील असे करतात,परदेशा मधील असे करतात, नाही.आम्ही तर एक
आहोत,बाबा एक आहे,रस्ता पण एक आहे,रीतिरिवाज पण एक आहे ,स्वभाव संस्कार पण एक
आहे.परत देशी आणी परदेशी मध्ये अंतर कसे काय?स्वतःला परदेशी म्हणल्यामुळे दूर
जाल.आम्ही ब्रह्मावंशी सर्व ब्राह्मण आहोत.आम्ही परदेशी आहोत,आम्ही गुजराती
आहोत,इत्यादी म्हणून हे होतंय,असे नाही.सर्व एक बाबांचे आहेत.हीच विशेषता आहे,जे
वेगवेगळे संस्कार असून एक झाले ना. वेगवेगळे धर्म,वेगवेगळ्या जाती,सर्व नष्ट
झाले.एकाचे झाले म्हणजेच एक झाले,समजले.अच्छा.
नेहमी संतुष्टतेची विशेषता असणाऱ्या विशेष आत्म्यांना , नेहमी संतुष्टते द्वारा
सेवांमध्ये सफलता मिळणाऱ्या मुलांना , नेहमी राज्याधिकारी सो विश्व राज्याधिकारी
आत्म्यांना , नेहमी निश्चया द्वारे प्रत्येक कार्यामध्ये नंबर एक बनणाऱ्या मुलांना
, बाप दादांची प्रेमपुर्ण आठवण आणि नमस्ते .
वरदान:-
साधनांना
निरलेप किंवा अनासक्त बणुन कार्यामध्ये लावणारे , बेहदचे वैरागी भव :-
बेहदचे वैरागी म्हणजे
कुणा मध्ये पण लगाव नाही,नेहमी बाबांचे प्रिय.हा अनासक्त पणाच वेगळे पणाचा अनुभव
करतो.बाबांचे प्रिय नाही तर अनासक्त पण बनू शकत नाहीत,लगाव मध्ये जे येतील,ते
बाबांचे प्रिय आहेत,तेच सर्व आकर्षणा पासून दूर म्हणजेच वेगळे होतात. यालाच निरलेप
स्थिती म्हटले जाते. कोणत्याही हदच्या अकर्षणा मध्ये येणारे नाही, रचना किंवा
साधनांना निरलेप होऊन कार्यामध्ये लावणे, असे बेहदचे वैरागीच राजऋर्षी आहेत.
सुविचार:-
मनाची सत्यता स्वच्छता
असेल तर साहेब खुश होतील .