29-12-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   27.03.1985   ओम शान्ति   मधुबन


कर्मातीत अवस्था


आज बापदादा चहू बाजूच्या मुलांना विशेष पाहण्यासाठी चक्कर लावत होते. ज्याप्रमाणे भक्तीमार्गात तुम्ही सर्वांनी खुप वेळा प्रदक्षिणा घातल्या, तर बापदादांनी सुध्दा आज चहूबाजूच्या सर्व खऱ्या ब्राह्मण मुलांच्या ठिकाणी प्रदक्षिणा घातली. सर्व मुले जिथे राहतात ती ठिकाणेही पाहिली आणि मुलांची स्थितीसुध्दा पाहिली. ठिकाणे वेगवेगळी व विधिपुवर्क सजविलेली होती. काही ठिकाणे स्थुल साधनांनी आकर्षित करणारी होती तर काही ठिकाणे असणारे तपस्येचे वातावरण जे आकर्षित करणारे होते. काही ठिकाणी त्याग आणि श्रेष्ठ भाग्य म्हणजे साधेपणा परंतू श्रेष्ठता अशा प्रकारचे वातावरण खुप आकर्षित करणारे होते. काही काही तर एकदम साधारण दिसत होते. ईश्वरीय आठवण करण्यासाठी बनलेली सर्व सेवाकेंद्र वेगवेगळ्या रुपामध्ये पाहिली. स्थिती काय पाहिली? यामध्येही वेगवेगळ्या प्रकारची ब्राह्मण मुलांची स्थिती पाहिली. वेळेनुसार मुलांची तयारी कुठपर्यंत झाली आहे, हे पाहण्यासाठी ब्रह्मा बाबा गेले होते. ब्रह्मा बाबा म्हणाले-मुले सर्व बंधनातून, बंधनमुक्त योगयुक्त, जीवनमुक्त सदैव तयारच आहेत. फक्त वेळेची वाट पाहत आहेत. अशी तयारी आहे का? सर्व तयारी झाली, आता फक्त वेळेची वाटच पाहत आहोत? बापदादा चर्चा करीत होते. शिवबाबा म्हणाले-सर्वत्र चक्कर लावून पाहिले की, मुले किती बंधनमुक्त बनली आहेत. किती योगयुक्त बनली आहेत. कारण बंधनमुक्त आत्माच जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करु शकते. कोणताही हदचा सहारा नाही म्हणजेच बंधनापासून किनारा केला आहे. जर कोणत्याही प्रकारचा लहान मोठा, स्थुल अथवा सुक्ष्म, मनाने किंवा कर्माने, कोणताही साहरा अजूनही होत असाल तर बंधनापासून किनारा होऊ शकत नाही. तर हे दाखविण्यासाठी आज ब्रह्मा बाबांना विशेष सहल करविली, काय पाहिजे?

जास्त मुले मोठ्या मोठ्या बंधनातून मुक्त झाली आहेत. जी स्पष्ट दिसणारी बंधने आहेत अथवा दोऱ्या आहेत त्यापासून तर किनारा केला आहे. परंतू अजून काही काही अशी अत्यंत सुक्ष्म प्रकारची बंधने अथवा दोऱ्या राहिल्या आहेत ज्याला बुध्दीशिवाय पाहू किंवा जाणू शकत नाही. ज्याप्रमाणे आजकालचे विज्ञानवादी सुक्ष्म वस्तुना शक्तीशाली काच अर्थात दुर्बिणद्वारे पाहू शकतात. साधारण रितीने पाहू शकत नाही. त्याप्रमाणे सुक्ष्म पारखण्याच्या शक्तीद्वारे मात्र त्या सुक्ष्म बंधनांना पाहू शकतो अथवा सुक्ष्म बुध्दीच्या द्वारे जाणू शकतो. जर वर वर पाहिले तर न पाहिल्यामुळे अथवा न जाणल्यामुळे ते स्वत:ला बंधनमुक्तच समजतात. ब्रह्मा बाबांनी असे सुक्ष्म सहारे तपासून पाहिले, सर्वांत जास्त सहारा दोन प्रकारचा पाहिला : - एक अत्यंत सुक्ष्म स्वरुप कोणता न कोणता सेवेमध्ये असणारा साथी त्याचा सुक्ष्म सहारा पाहिला, यामध्ये सुध्दा अनेक प्रकार पाहिले. सेवेमध्ये सहयोगी असल्यामुळे, सेवेमध्ये वाढ करण्यासाठी निमित्त बनल्यामुळे किंवा विशेष एखादी विशेषता, विशेष गुण असल्यामुळे, विशेष एखादा संस्कार मिळता-जुळता असल्यामुळे किंवा वेळोवेळी एखादी जास्त मदत मिळाल्यामुळे, अशा कारणांनी, रुप असते कि तो सेवासाथी आहे, सहयोगी आहे. परंतू विशेष प्रभाव असल्यामुळे सुक्ष्म लगावाचे रुप बनते. याचा परिणाम काय होतो? हे विसरतात कि, ही तर बाबांची देणगी आहे. समजतात कि, हा खुप चांगला सहयोगी आहे, चांगल्या विशेषता आहेत, गुणवान आहे. पण वेळोवेळी बाबांनी इतका सुंदर सहारा दिला आहे, हे विसरतात. संकल्पाने जरी एखादया आत्म्याकडे बुध्दीचे झुकते माप असेल तर हे झुकते मापच सहारा बनते. तर साकारमध्ये सहयोगी असल्यामुळे वेळेवर बाबांच्या ऐवजी तो व्यक्तीच पहिल्यांदा आठवेल. दोन-चार मिनीटे जरी स्थुल सहारा आठवला तर त्यावेळी बाबांचा सहारा लक्षात असेल का? दुसरी गोष्ट जर दोन-चार मिनीटांसाठी सुध्दा जर आठवणीच्या यात्रेची तार तुटली तर तार तुटल्यानंतर पुन्हा जोडण्याची मेहनत घ्यावी लागेल कारण निरंतरमध्ये अंतर पडले ना. मनामध्ये दिलारामच्या ऐवजी कोणत्याही बाजूला, कोणत्याही कारणामुळे मनाचे झुकते माप असेल, यांच्याशी बोलायला फार आवडते, यांच्यासोबत बसणे आवडते यांच्यासोबत हा शब्द म्हणजेच मनात काळेबेरे आहे. यांच्यासोबत हा विचार येतो म्हणजेच कमजोरी आहे. तसे तर सर्वजणच मला आवडतात परंतू यांच्यासोबत मात्र खुपच आवडते. सर्वांशी आत्मिक प्रेमाने राहणे, बोलणे अथवा सेवेमध्ये सहयोग घेणे व देणे ही दुसरी गोष्ट आहे. विशेषता पहा, गुण पहा परंतू यांचाच हा गुण खुपच चांगला आहे, हा जो शब्द आहे यांचाच हा शब्द मध्ये आणू नका. हा यांचाच शब्द खुप मोठी गडबड करतो आणि यालाच लगाव असे म्हणतात, मग बाहेरचे रुप सेवा असेल, ज्ञान असेल, योग असेल, परंतू जेव्हा यांच्यासोबतच योग करायचा आहे, यांचाच योग चांगला आहे. हा यांचाच शब्द नको. हेच सेवेमध्ये सहयोगी बनू शकतात. हेच साथी म्हणून पाहिजेत. तर समजले का?लगावाची निशाणी काय आहे ते. म्हणून हेच, हा शब्द काढून टाका. सर्वजणच चांगले आहेत, विशेषता पहा. सहयोगी बना पण आणि इतरांना सहयोगी बनवा पण परंतू सुरुवातीला थोडे असते व पुन्हा वाढत वाढत त्यांचे विक्राळ रुप बनत जाते. मग स्वत:च त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता पण बाहेर पडता येत नाही. कारण तोपर्यंत संस्कार पक्के बनतात. सुरुवातीला संस्कार खुप सुक्ष्म असतात नंतर पक्के बनतात तेव्हा ते संस्कार सोडणे फार अवघड होते. सहारा एक बाबा आहेत. कुणी मनुष्यात्मा सहारा नाही. बाबा कोणालाही सहयोगी निमित्त बनवितात पण बनविणाऱ्याला कधी विसरु नका, बाबांनी बनविले. बाबांनामध्ये घेतल्यामुळे जिथे बाबा आहेत तिथे पाप नाही. बाबामध्ये नसतील तर पाप होते. तर एक आहे सहारा.

दुसरी गोष्ट कोणत्या ना कोणत्या साकार साधनांना सहारा बनविले आहे. साधन आहे तर सेवा आहे. साधनांमध्ये थोडेसे वर खाली झाले तर सेवा सुध्दा खालीवर होते. साधनांचा कार्यामध्ये वापर करणे वेगळी गोष्ट आहे. परंतू साधनांच्या वशीभुत होऊन सेवा करणे म्हणजे साधनांना सहारा बनविल्याप्रमाणे आहे. साधने ही सेवा वाढविण्यासाठी असतात म्हणून त्या साधनांना त्याच पध्दतीने वापरले पाहिजे, साधनांना आधार बनवू नका. आधार एक बाबा आहेत. साधने तर विनाशी असतात. अविनाशी साधनांचाआधार एक बाबा आहेत, साधने तर विनाशी असतात. विनाशी साधनांना आधार बनविणे म्हणजे जसे साधन विनाशी आहे त्याप्रमाणे स्थिती सुध्दा कधी उच्च तर कधी मध्यम, कधी कनिष्ठ बदलत राहील. अविनाशी एकरस स्थिती राहणार नाही. तर दुसरी गोष्ट विनाशी साधनांना सहारा, आधार समजू नका. साधने निमित्त मात्र आहेत. सेवेसाठी आहेत. सेवेसाठी कार्यात वापर करा आणि अनासक्त बना. साधनांच्या आकर्षणामध्ये मनाला आकर्षित होऊ देऊ नका. तर हे दोन प्रकारचे सहारे सुक्ष्म रुपाने आधार बनविताना पाहिले. जेव्हा कर्मातीत अवस्था होणार आहे तर प्रत्येक व्यक्ती, वस्तू, कर्माच्या बंधनातून अतीत होते, अनासक्त होते, याला कर्मातीत अवस्था असे म्हणतात. कर्मातीत म्हणजे कर्मापासून न्यारे होणे, असे नाही. कर्माच्या बंधनापासून अनासक्त होणे. अनासक्त बणुन कर्म करणे म्हणजे कर्मापासून वेगळे, कर्मातीत अवस्था म्हणजे बंधनमुक्त, योगयुक्त, जीवनमुक्त अवस्था.

आणि विशेष गोष्ट ही पाहिली कि, वेळोवेळी पारखण्याच्या शक्तीमध्ये काही मुले कमजोर होतात. पारखु शकत नाहीत म्हणून धोका मिळतो. पारखण्याची शक्ती कमजोर होण्याचे कारण आहे, बुध्दीच्या लगन मध्ये एकाग्रता नाही. जिथे एकाग्रता आहे तिथे पारखण्याची शक्ती आपोआप वाढते. एकाग्रता म्हणजे एका बाबांसोबत सदैव लगनमध्ये मगन राहणे. एकाग्रतेची निशाणी म्हणजे सदैव उडत्या कलेचा अनुभव होऊन त्यामध्ये एकरस स्थिती होते. एकरस याचा अर्थ असा नाही कि, तिच गती असेल तर एकरस म्हणता येईल, नाही. एकरस म्हणजे सदैव उडती कला व त्याची जाणीव होणे, यामध्ये एकरस अवस्था. जे काल होते त्यापेक्षा आज त्या टक्के वारीमध्ये वाढ झाल्याचा अनुभव होईल. याला म्हणतात उडती कला. तर स्व-प्रगतीसाठी, सेवेच्या उन्नतीसाठी पारखण्याची शक्ती खुप आवश्यक आहे. पारखण्याची शक्ती कमजोर असल्यामुळे आपल्या कमजोरीला कमजोरी समजत नाहीत. आणखीनच आपली कमजोरी लपविण्यासाठी सिध्द अथवा जिद्द केली जाते. या दोन गोष्टी लपविण्याचे विशेष साधन आहे. आतून कधी जाणीवही होईल परंतू तरीही पुर्ण पारखण्याची शक्ती नसल्यामुळे स्वत:ला सदैव बरोबर आणि हुशार सिध्द करतील. समजले! कर्मातीत तर बनायचे आहे ना. नंबर तर काढायचा आहे ना म्हणून तपासून पहा. चांगल्याप्रकारे योगयुक्त बनून पारखण्याची शक्ती धारण करा. एकाग्रबुध्दी बनून पुन्हा तपासा. मग जी काही सुक्ष्म कमजोरी असेल ती स्पष्ट दिसून येईल. असे व्हायला नको कि, तुम्ही समजत असाल मी एकदम बरोबर आहे, खुप चांगल्याप्रकारे चालत आहे. मीच कर्मातीत बनेन आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ही सुक्ष्म बंधने उडूच देणार नाहीत. आपल्याकडे खेचतील. मग वेळेवर काय करणार? बांधलेला व्यक्ती जर त्याला उडावेसे वाटले तर उडेल कि, खाली येईल, तर ही सुक्ष्म बंधने वेळेवर नंबर काढण्यात अथवा सोबत जाण्यामध्ये अथवा सदैव तयार राहण्यामध्ये बंधन बनू नयेत, म्हणून ब्रह्माबाबा तपासून पाहत होते. ज्याला हे सहारा समजतात तो सहारा नाही परंतू तो बंधनाचा श्रेष्ठ वाटणारा दोर आहे. जसे सोन्याच्या हरिणाचे उदाहरण आहे ना. सीतेला कुठे नेले. तर सोन्याचे हरिण हे बंधन आहे, त्याला सोने समजणे म्हणजे आपले श्रेष्ठ भाग्य हरविणे. सोने नाही पण भाग्य हरविणे आहे, रामाला गमविले व अशोक वाटिकाही गमवली.

ब्रह्माबाबांचे मुलांवर विशेष प्रेम आहे म्हणून ब्रह्माबाबा सदैव मुलांना आपल्यासारखे सदैव तयार व बंधनमुक्त पाहू इच्छितात. बंधनमुक्त बनल्याचेच दृश्य पाहिले ना. किती वेळात तयार झाला. कुणाच्या बंधनात बांधले का. कोणाची आठवण आली का कि, अमुक कुठे आहे. अमुक एक माझी सेवा साथी आहे. आठवले का? तर सदा तयार ही भुमिका म्हणजे कर्मातीत अवस्थेतील भुमिका पाहिली ना. जेवढे मुलांच्यावर खुप प्रेम होते तेवढेच बाबा वेगळे आणि प्रेमळ होते. बोलावणे आले आणि बाबा गेले. नाहीतर सर्वांत जास्त ब्रह्माबाबांचे प्रेम मुलांवरच होते ना. परंतू जेवढे वेगळे तेवढे प्रेमळ. किनारा कसा करायचा ते पाहिले ना. कोणतीही वस्तू अथवा भोजन जेव्हा तयार होते तेव्हा किनारा सोडते ना. तर संपूर्ण बनणे म्हणजे किनारा सोडणे. किनारा सोडणे म्हणजे किनाऱ्याला आलो. सहारा एकच अविनाशी सहारा आहे. व्यक्ती, वैभव किंवा वस्तू कुणालाही सहारा बनवू नका. यालाच कर्मातीत म्हणतात. काहीही लपवू नका. लपविल्यामुळे त्यामध्ये आणखीनच वाढ होते. गोष्ट मोठी नसते. परंतू लपविल्यामुळे ती गोष्ट फार मोठी होते. जेवढे स्वत:ला बरोबर आहे, हे सिध्द करण्याचा प्रयत्न करतो. जेवढी जिद्द करता तेवढी ती गोष्ट वाढतो, म्हणून एखादी गोष्ट मोठी करु नका. छोट्या रुपातच तिला समाप्त करा. तर सहज होईल आणि खुशी होईल. ही गोष्ट झाली, यातूनही बाहेर पडलो, यामध्ये सुध्दा विजयी बनलो याची खुशी होईल. समजले. विदेशी लोकांमध्ये कर्मातीत अवस्था प्राप्त करण्याचा उमंग-उत्साह आहे ना. तर विदेश वाल्यांना ब्रह्माबाबा विशेष सुक्ष्म पालना देत आहेत. ही प्रेमाची पालना आहे, शिक्षा अथवा सावधानी नाही. समजले. कारण ब्रह्माबाबांनी तुम्हा मुलांना विशेष आवाहन करुन आपले बनवले. ब्रह्मांच्या संकल्पाने तुम्ही झाले आहात, म्हणतात ना-ब्रह्माने संकल्पाने सृष्टी रचली. ब्रह्माच्या संकल्पाने ही ब्राह्मणांची एवढी मोठी सृष्टी रचली ना. तर ब्रह्माच्या संकल्पाने, आवाहन करुन रचलेले विशेष आत्मे आहात. लाडके आहात ना. ब्रह्माबाबा समजतात कि, हे तीव्र पुरुषार्थ करुन प्रथम येण्याचा, यांच्यामध्ये उमंग-उत्साह आहे. विदेशी मुलांच्या विशेषता आणि विशेष श्रृंगार करणे यावर बाबा बोलत आहेत. प्रश्नही विचारतात, पुन्हा लवकर समजूनही घेतात, विशेष समजदार आहात म्हणून बाबा स्वत: प्रमाणे सर्व बंधनातून न्यारे आणि प्यारे बनण्यासाठी इशारा देतात. असे नाही कि, जे समोर आहेत त्यांना सांगत आहेत, बाबा सर्वांना सांगत आहेत. बाबांसमोर सदैव सर्व ब्राह्मण मुले, मग देशातील अथवा विदेशातील सर्व मुले असतात. अच्छा. आज बाबा गप्पा मारत आहेत. सांगितले ना गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा निकाल खुप चांगला आहे. यावरुन सिध्द होते कि, वाढ होणार आहे. उडत्या कलेमध्ये जाणारे आत्मे आहात. ज्यांना योग्य समजले जाते त्यांना संपूर्ण योगी बनण्याचा इशारा दिला जातो. अच्छा.

सदैव कर्मबंधनमुक्त, योगयुक्त आत्म्यांना, सदैव एक बाबांना सहारा बनविणाऱ्या मुलांना, सदैव सुक्ष्म कमजोरींचा सुध्दा किनारा करणाऱ्या मुलांना, सदैव एकाग्रतेद्वारे परवडणाऱ्या शक्तीशाली मुलांना, सदैव व्यक्ती अथवा वस्तुच्या विनाशी सहाऱ्याचा किनारा करणाऱ्या मुलांना, अशा बाबांच्या समान जीवनमुक्त कर्मातीत स्थितीमध्ये स्थित राहणाऱ्या विशेष मुलांना बापदादांची प्रेमपुर्ण आठवण आणि नमस्ते.

निर्मलशांता दादींना :- सदैव बाबांसोबत राहणारे तर आहातच. जे सुरुवातीपासून बाबांसोबत आहेत, त्यांचा सदैव सोबत राहण्याचा अनुभव कधीही कमी होऊ शकत नाही. बालपणीचा वायदा आहे. तर सदैव सोबतच आहोत आणि सदैव सोबतच राहणार. तर सदैव सोबत राहण्याचा वायदा म्हणा किंवा वरदान म्हणा, मिळालेलेच आहे. तरी सुध्दा ज्याप्रमाणे पित्याच्या प्रीतीची रीती निभावण्यासाठी अव्यक्तमधून व्यक्तमध्ये येतात, त्याप्रमाणे मुले सुध्दा प्रीतीची रीती निभावण्यासाठी पोहोचतात. असेच आहे ना. संकल्पामध्येच नव्हे परंतू स्वप्नात सुध्दा, ज्याला अर्ध चेतन म्हणतात... त्या स्थितीमध्ये सुध्दा बाबांची सोबत कधीच सुटू शकत नाही. इतका पक्का संबंध जोडला गेला आहे. किती जन्मांचा संबंध आहे. पुर्ण कल्पाचा आहे. या जन्माच्या हिशोबाने पुर्ण कल्पभर संबंध राहणार आहे. हे तर या शेवटच्या जन्मांत काही काही मुले सेवा करण्यासाठी विखुरलेले आहेत. ज्याप्रमाणे हे लोक विदेशात पोहोचले, तुम्ही सिंधमध्ये पोहोचला. कुणी कुठे पोहोचले, कुणी कुठे पोहोचले. जर हे विदेशात गेले नसते तर एवढी सेवाकेंद्रे उघडली असती का? अच्छा-सदैव सोबत राहणारी, सोबतीचा वायदा निभावणारी परदादी आहे. बापदादा मुलांच्या सेवेचा उमंग-उत्साह पाहून खुश होतात. वरदानी आत्मे बनलेला आहात. आतापासूनच पहा गर्दी सुरु झाली आहे. जेव्हा अजून वाढ होईल, तेव्हा किती होईल तेव्हा काय कराल. वरदान दया, दृष्टी दया. येथूनच चैतन्य मुर्त्यांची प्रसिध्दी सुरु होईल, जसे सुरुवातीला तुम्हाला सर्वजण देवी-देवी म्हणत होते... शेवटी सुध्दा ओळखून देवी-देवी म्हणतील. जय देवी, जय देवी हे येथूनच सुरु होईल. अच्छा.

वरदान:-
ईश्वरीय विधानाला समजून घेऊन विधिपासून सिध्दी प्राप्त करणारे पहिल्या तुकडीचे अधिकारी भव

एका पाऊलाची हिम्मत आणि अनेक पटीने वडिलांची मदत-अविनाशी नाटकामध्ये या विधानाची विधी नोंदलेली आहे. जर ही विधी, विधानामध्ये नसती तर सर्वच विश्वाचे प्रथम राजा बनले असते. नंबरवार बनण्याचे विधान या विधीमुळेच बनते. तर जेवढी पाहिजे तेवढी हिम्मत ठेवा आणि मदत घ्या. समर्पित असाल, किंवा प्रवृत्तीवाले असाल-समान अधिकार आहे. परंतू विधीनुसार सिध्दी आहे. हे ईश्वरीय विधान समजून घ्या आणि चाल ढकल करण्याची, ही विचित्र लीला समाप्त करा तर पहिल्या तुकडीतील अधिकार मिळेल.

सुविचार:-
संकल्पांच्या खजिन्यांप्रती बचतीचे अवतार बना.