15-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, सद्गुरूची पहिली पहिली श्रीमत आहे देही-अभिमानी बना, देह अभिमान सोडून
द्या.
प्रश्न:-
यावेळी तुम्ही
मुलं कोणतीही इच्छा किंवा कामना ठेवू शकत नाही, का?
उत्तर:-
कारण की तुम्ही
सर्व वयोवृद्ध आहात. तुम्ही जाणता या डोळ्यांनी जे काही पाहतो त्याचा विनाश होणार
आहे. आता तुम्हाला काहीच नाही पाहिजे, पूर्ण गरीब बनायचे आहे. जर अशी कोणती महागडी
गोष्ट घालाल तर ती आकर्षित करेल, परत देह अभिमानमध्ये फसत राहाल. यामध्ये कष्ट आहे.
जेव्हा कष्ट करून पूर्ण देही अभिमानी बनाल, तेव्हा विश्वाची बादशाही मिळेल.
ओम शांती।
येथे १५ मिनिट किंवा अर्धा तास मुले बसली आहेत, बाबा पण १५ मिनिट बसवतात की, स्वतःला
आत्मा समजुन बाबांना आठवण करा. हे ज्ञान एकाच वेळी मिळते, परत कधी भेटणार नाही.
सतयुगामध्ये असे नाही म्हणणार,आत्म-अभिमानी होऊन बसा. हे एकच सदगुरू म्हणतात,
त्यांच्यासाठी म्हणले जाते, एक सदगुरूच तारतात, बाकी सर्व बुडवतात. येथे बाबा
तुम्हाला देहीअभिमानी बनवितात. स्वतः सुद्धा देही आहेत ना. समजवण्यासाठी म्हणतात,
मी तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता आहे, त्यांना तर देही बनून बाबांना आठवण करायची नाही.
आठवण सुद्धा तेच करतील जे आदी सनातन देवी-देवता धर्माचे आहेत, ते तर खूप आहेत ना,
नंबरानुसार पुरुषार्था अनुसार. ही मोठी गोष्ट समजण्याची आणि समजविण्याची आहे.
परमपिता परमात्मा तुम्हा सर्वांचे पिता पण आहेत आणि ज्ञानाचे सागर पण आहेत.
आत्म्यामध्ये ज्ञान राहते ना. तुमची आत्मा संस्कार घेऊन जाते. बाबांमध्ये तर
आधीपासूनच संस्कार आहेत. ते पिता आहेत, हे तर तुम्ही जाणता ना. परत त्यांच्यामध्ये
दुसरी विशेषता आहे, की त्यांच्यामध्ये मुळातच ज्ञान आहे, बीजरूप आहेत. जसे बाबा
तुम्हाला बसून समजावितात तसे तुम्हाला पण दुसऱ्यांना समजावयाचे आहे. बाबा मनुष्य
सृष्टीचे बीजरूप आहेत, ते सत आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचे सागर आहेत, त्यांना या
संपूर्ण झाडाचे ज्ञान आहे. आणखी कोणालाच या झाडाचे ज्ञान नाही. याचे बीज बाबा आहेत,
ज्यांना परमपिता परमात्मा म्हणले जाते. जसे आंब्याचे झाड आहे, तर त्याचे रचनाकार
बीज म्हणणार. ते जसे पिता झाले परंतु ते जड आहे. जर चैतन्य असले असते तर त्याला
समजले असते, माझ्यामधून संपूर्ण झाड कसे निघते. परंतु ते जड आहे त्याचे बीज
जमिनीमध्ये पेरले जाते. हे तर आहे चैतन्य बीज रूप. ते उंच ते उंच आहेत. पद सुद्धा
तुम्ही उंच प्राप्त करता. स्वर्गामध्ये सुद्धा उंच पद पाहिजे ना. हे मनुष्य नाही
समजत. स्वर्गामध्ये देवी-देवतांची राजधानी आहे. राजधानीमध्ये राजा, राणी, प्रजा,
गरीब- साहुकार इत्यादी हे सर्व कसे बनलेत. आता तुम्ही जाणता आदी सनातन देवी देवता
धर्माची स्थापना कशी होत आहे, कोण करत आहेत? ईश्वर. बाबा परत म्हणतात, मुलांनो जे
काही होते, ते नाटकाच्या योजनेनुसार. सर्वकाही नाटकाच्या वश आहेत. बाबा पण म्हणतात
मी सुद्धा नाटकाच्या वश आहे. मला सुद्धा भूमिका मिळालेली आहे. तीच भूमिका वटवतो.
त्यांना परमपिता म्हणले जाते, आणि सर्वांना भाऊ म्हणले जाते.अजून तर कोणाला पिता,
शिक्षक, गुरु म्हणले जात नाही. ते सर्वांचे परम पिता पण आहेत, शिक्षक सदगुरू पण
आहेत. यागोष्टी विसरल्या नाही पाहिजे. परंतु मुले विसरतात, कारण नंबरनुसार
पुरुषार्थ अनुसार राजधानी स्थापन होत आहे. प्रत्येक जण जसा पुरुषार्थ करतात, ते
लगेच माहिती पडते, हे बाबांना आठवण करतात किंवा नाही? देशी अभिमानी बनले आहेत किंवा
ना? हे ज्ञानामध्ये हुशार आहेत, वागणुकीवरून समजते. बाबा कोणाला काही आदेश देत
नाहीत निघून जातील. काळजीत पडू नये की, हे बाबांनी काय सांगितले, दुसरे काय म्हणतील!
बाबा सांगू शकतात की आमके-आमके कशी सेवा करतात. संपूर्ण आधार सेवेवर आहे. बाबा पण
येऊन सेवा करतात ना. मुलांनीच बाबांची आठवण करायची आहे. आठवणीचा विषयच अवघड आहे.
बाबा आठवण आणि ज्ञान शिकवितात. ज्ञान तर खूप सोपे आहे. बाकी आठवणीमध्ये नापास होतात.
देह-अभिमान येतो. परत हे पाहिजे, ही चांगली वस्तू आहे. असे-असे विचार चालतात.
बाबा म्हणतात, येथे तुम्ही वनवासामध्ये आहात ना. तुम्हाला तर आता वानप्रस्थ मध्ये
जायचे आहे. परत तुम्ही अशी कोणतीही वस्तू वापरू शकत नाहीत. तुम्ही वनवासामध्ये आहात
ना. जर अशी कोणती दुनियेतील वस्तू असेल तर ती स्वतःकडे आकर्षित करेल. शरीर पण
आकर्षित करेल. सारखे सारखे देह अभिमानामध्ये घेऊन येईल. यामध्ये कष्ट आहे. कष्टा
शिवाय विश्वाची बादशाही कशी मिळू शकेल. कष्ट सुद्धा नंबरानुसार पुरुषार्था अनुसार
कल्प-कल्प करत आले आहात. परिणाम प्रत्यक्ष होत जाईल. शाळेमध्ये पण नंबरानुसार
पुढच्या वर्गात जातात. शिक्षक समजतात, अमक्याने चांगले कष्ट घेतले आहेत. याला
शिकण्याची आवड आहे, अनुभव होतो. त्यामध्ये तर एका वर्गातून दुसऱ्या वर्गात, परत
तिसऱ्या वर्गात जातात. येथे तर एकाच वेळी शिकावे लागते. पुढे जाऊन जेवढे तुम्ही जवळ
येत जाल तेवढे तुम्हाला समजत जाईल, हा खूप कष्ट करतो, जरूर उंच पद प्राप्त करेल. हे
तर समजते, कोणी राजा-राणी बनतात, कोण काय बनतात, कोण काय बनतात. प्रजा पण खूप बनते.
सर्व वर्तणुकीने समजून येते. हे देह अभिमानामध्ये किती राहतात, यांचे बाबांवर किती
प्रेम आहे. बाबांच्या सोबत प्रेम पाहिजे ना, भावा-भावांचे नाही. भावा सोबतच्या
प्रेमाने काहीच मिळणार नाही. वारसा सर्वांना एका बाबांकडूनच मिळणार आहे. बाबा
म्हणतात मुलांनो, स्वतःला आत्म समजून मला आठवण करा, तर तुमचे पाप नष्ट होतील. मूळ
गोष्ट तर हीच आहे. आठवणीने शक्ती मिळेल. दिवसेंदिवस बॅटरी भरत जाईल कारण ज्ञानाची
धारणा होत जाते ना. तीर लागत जातो. दिवसेंदिवस तुमची प्रगती नंबरानुसार होत राहते.
हे एकच पिता, शिक्षक, सदगुरू आहेत. जे देही-अभिमानी बनण्याचे शिक्षण देतात, अजून
दुसरे कोणी देऊ शकत नाहीत, दुसरे तर सर्व देह अभिमानी आहेत, आत्म अभिमानीचे ज्ञान
कोणाला मिळतच नाही. कोणी मनुष्य पिता, शिक्षक, गुरु होऊ शकत नाही. प्रत्येक जण आपा-
आपली भूमिका वठवत आहेत. तुम्ही तटस्थ होऊन पाहता. संपूर्ण नाटक तुम्हाला तटस्थ होऊन
पाहायचे आहे. भूमिका पण वठवयाची आहे. बाबा रचनाकार, निर्माता, अभिनेता आहेत. शिवबाबा
येऊन भूमिका वठवितात. सर्वांचे पिता आहेत ना. मुलं किंवा मुली सर्वांना एक सारखा
वारसा देतात. एक पिता आहेत, बाकी सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. वारसा बाबां कडूनच
प्राप्त होतो. या दुनियेची कोणतीही वस्तू बुद्धीमध्ये आठवणीत राहू नये. बाबा
म्हणतात जे काही पाहता ते सर्व नश्वर आहे.आता तुम्हाला घरी जायचे आहे. ती लोकं
ब्रह्मची आठवण करतात, म्हणजे घराची आठवण करतात. समजतात ब्रह्म मध्ये लीन होऊन जाऊ.
याला म्हणले जाते अज्ञान-मनुष्य मुक्ती-जीवन मुक्तीसाठी जे काही सांगतात. ते सर्व
चूक, जी काही युक्ती रचतात, सर्व चुकीचे आहे. बरोबर रस्ता एक बाबाच सांगतात. बाबा
म्हणतात मी तुम्हाला राजांचा राजा बनवितो नाटकाच्या नियोजनानुसार. काही म्हणतात
आमच्या बुद्धी मध्ये बसत नाही, बाबा आमचे तोंड उघडा, कृपा करा. बाबा म्हणतात यामध्ये
बाबांना तर काही करण्याची गोष्ट नाही. मुख्य गोष्ट आहे तुम्हाला आदेशावर चालायचे आहे.
बाबांचाच योग्य आदेश मिळतो, बाकी सर्व मनुष्यांचे चुकीचे आदेश आहेत. कारण
सर्वांमध्ये 5 विकार आहेत. खाली उतरत उतरत चुकीचे बनतात. काय-काय रिद्धी सिद्धी
इत्यादी करत राहतात. त्यामध्ये सुख नाही. तुम्ही जाणता, हे सर्व अल्प काळाचे सुख आहे.
त्यांना म्हणले जाते कागविष्ठे प्रमाणे सुख. शिडीच्या चित्रावर खूप चांगल्या प्रकारे
समजावयाचे आहे. कोणत्याही धर्म वाल्यांना तुम्ही दाखवू शकता तुमचा धर्म स्थापन
करणारे आमक्या-आमक्या वेळी येतात. ख्रिस्त आमक्या वेळी आले. जे दुसऱ्या-दुसऱ्या
धर्मामध्ये गेले आहेत त्यांना हा धर्मच चांगला वाटेल, लगेच निघून येतील. बाकी
दुसऱ्यांना चांगले वाटणार नाही तर, ते पुरुषार्थ कसा करतील? मनुष्य मनुष्यांना
फाशीवर चढवितात, तुम्हाला तर एका बाबांनाच आठवण करायची आहे, ही खूप गोड फाशी आहे.
आत्म्याच्या बुद्धिचा योग बाबांकडे आहे. आत्म्यालाच म्हणले जाते, बाबांना आठवण करा.
हे शरीर तर येथे सोडून द्यायचे आहे तुम्हाला हे संपूर्ण ज्ञान आहे, तुम्ही इथे बसून
काय करतात.वाणीपासून दूर जाण्याचा पुरुषार्थ करतात. बाबा म्हणतात सर्वांना
माझ्याजवळ यायचे आहे, तर काळाचे काळ झाले ना. तो काळ तर एकालाच घेऊन जातो, ते सुद्धा
काळ काही नाही घेऊन जात. तर आता तुमचा बुद्धि योग, आपल्या घरी जाण्यासाठी आहे. शरीर
सोडण्याला मरणे म्हणले जाते. शरीर नष्ट होते, आत्म निघून जाते. बाबांना बोलवितात पण
यासाठी की बाबा येऊन आम्हाला या सृष्टीवरून घेऊन चला. येथे आम्हाला रहायचे नाही.
नाटकाच्या नियमानुसार आता परत जायचे आहे. म्हणतात बाबा येथे अपार दुःख आहे, आता येथे
रहायचे नाही. ही खूप छी-छी दुनिया आहे. मरायचे पण जरूर आहे. सर्वांची वयोवृद्ध
अवस्था आहे. आता वाणीपासून दूर जायचे आहे. तुम्हाला कोणी काळ खाणार नाही. तुम्ही
आनंदाने जातात. शास्त्र इत्यादी जे काही आहे ते सर्व भक्तिमार्गाचे आहेत. हे पुन्हा
असतील. नाटकाची हि खूप खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. हा टेप, हे घड्याळ जी काही यावेळी
पाहतात, ते सर्व पुन्हा असेल. यामध्ये गोंधळून जाण्याची गोष्ट नाही. विश्वाचा
इतिहास-भूगोल पुनरावृत्तीचा अर्थच आहे, हुबेहू पुनरावृत्ती. आता तुम्ही जाणता
आम्हीच परत देवी-देवता बनत आहोत, तेच पुन्हा बनतील. यामध्ये थोडा सुद्धा फरक पडणार
नाही. यासर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.
तुम्ही जाणता ते बेहद्दचे पिता पण आहेत, शिक्षक सदगुरू आहेत. असा कोणी मनुष्य असू
शकणार नाही. यांना तुम्ही बाबा म्हणतात. प्रजापिता ब्रह्मा म्हणतात. हे सुद्धा
म्हणतात माझ्याकडून तुम्हाला वारसा मिळणार नाही. बाबा म्हणतात या गोष्टींमध्ये
गोंधळून जाऊ नका. बोला आम्ही ब्रम्हा ला ईश्वर किंवा देवता इत्यादी म्हणतच नाही.
बाबांनी सांगितले आहे खूप जन्माच्या अंतामध्ये, वयोवृद्ध अवस्थेमध्ये मी
यांच्यामध्ये प्रवेश करतो, संपूर्ण विश्वाला पवित्र बनवण्यासाठी. झाडामध्ये पण दाखवा
पहा एकदम शेवटी उभे आहेत. आता तर सर्व तमोप्रधान जडजडीभूत अवस्थेमध्ये आहेत ना. हे
सुद्धा तमोप्रधान ते मध्ये उभे आहेत. तोच चेहरा आहे. यांच्यामध्ये बाबा प्रवेश करून
यांचे नाव ब्रह्मा ठेवतात. नाहीतर तुम्ही सांगा ब्रम्हा नाव कोठून आले? हे आहेत
पतित ते आहेत पावन. ते पवित्र देवताच परत 84 जन्म घेऊन पतित मनुष्य बनतात. हे
मनुष्यापासून देवता बनणारे आहेत. मनुष्यांना देवता बनवणे, हे बाबांचेच काम आहे. या
सर्व खूप आश्चर्यकारक समजण्याच्या गोष्टी आहेत. ब्रह्मा, देवता बनतात सेकंदांमध्ये,
परत ते 84 जन्म घेऊन ब्रह्मा बनतात. यांच्यामध्ये बाबा प्रवेश करून शिकवितात, तुम्ही
सुद्धा शिकता. यांचे सुद्धा कुळ आहे ना. लक्ष्मी-नारायण, राधे-कृष्णाचे मंदिर पण आहे.
परंतु हे कोणालाच माहित नाही, राधे कृष्ण प्रथम राजकुमार राजकुमारी आहेत, जे परत
लक्ष्मी-नारायण बनतात. हे गरीबा पासून श्रीमंत बनतील. राजकुमार परत गरीब बनतात. किती
सहज गोष्टी आहेत. 84 जन्माची गोष्ट या दोन्ही चित्रांमध्ये आहे. हे, ते बनतात. जोडी
आहे त्यामुळे भुजा दाखवितात. ग्रहस्थ मार्ग आहे ना. एक सदगुरू तुम्हाला पार घेऊन
जातात. बाबा किती चांगल्या प्रकारे समजवितात, परत दैवी गुण सुद्धा पाहिजे.
स्त्रियांना पती विषयी विचारा, किंवा पतींना स्त्रियांविषयी विचारा तर लगेच सांगतील
यांच्यामध्ये हे अवगुण आहेत. या गोष्टीमध्ये हे त्रास देतात, नाहीतर म्हणतील आम्ही
दोघे ठीक चालतो. कोणी कोणाला त्रास देत नाही, दोघे एक-दुसऱ्याचे मदतगार सोबती होऊन
चालतो. काही एक-दोघांना खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात. बाबा म्हणतात यामध्ये
स्वभावाला चांगल्या प्रकारे बदलावे लागते. ते सर्व आसुरी स्वभाव आहेत. देवतांचे दैवी
स्वभाव असतात. या गोष्टी तुम्ही जाणता, असुर आणि देवतांचे युद्ध झाले नाही. जुनी
दुनिया आणि नवीन दुनिया आप-आपसामध्ये कसे भेटू शकतात. बाबा म्हणतात जे झाले आहे
त्यांना बसून लिहिलेले आहे. त्यांना गोष्टी म्हणणार. सण इत्यादी सर्व संगमयुगाचे
आहेत. द्वापारापासून साजरे करत आलो. सतयुगामध्ये साजरा करत नाहीत. या सर्व बुद्धीने
समजायच्या गोष्टी आहेत. देह अभिमानमुळे मुलं खूप गोष्टी विसरून जातात. ज्ञान तर सहज
आहे. सात दिवसांमध्ये संपूर्ण ज्ञान धारण होऊ शकते. मुख्य सावधानी आठवणीच्या
यात्रेमध्ये पाहिजे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. या बेहदच्या
नाटकामध्ये भूमिका करत असतानाही, संपूर्ण नाटकाला तटस्थ होऊन पहायचे आहे. यामध्ये
गोंधळून जायचे नाही. या नाटकातील कोणतीही गोष्ट पाहून बुद्धी मध्ये आठवण येऊ नये.
2. आपल्या आसुरी स्वभावाला बदलून दैवी स्वभाव धारण करायचा आहे. एक दुसऱ्यांचे
मदतगार होऊन चालायचे आहे, कोणाला त्रास द्यायचा नाही.
वरदान:-
हृदयामध्ये एका
दिलारामला समावून एका सोबत सर्व संबंधांची अनुभूती करणारे संतुष्ट आत्मा भव
ज्ञानाला सामावून
घेण्याचे स्थान आहे बुद्धी, परंतु प्रियकराला सामावण्याचे स्थान हृदय आहे. काही काही
प्रेमी खूप बुद्धी लावतात,परंतु बापदादा खऱ्या हृदयावर खुश आहेत. त्यामुळे हृदयाचा
अनुभव हृदय समजेल, दिलाराम समजतील. जे हृदयापासून सेवा करतात किंवा आठवण करतात
त्यांना कष्ट कमी आणि संतुष्टता जास्त मिळते. हृदयावाले नेहमी संतुष्टताचे गीत
गातात. त्यांना वेळेप्रमाणे एकाकडून सर्व संबंधाची अनुभूती होते.
बोधवाक्य:-
अमृतवेळेला
निर्संकल्प बुद्धी होऊन बसा, तर सेवेची नवीन विधी प्राप्त होतील.