12-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , आठवणीमध्ये राहण्याचा अभ्यास करा , तर नेहमी हर्षित मुख रहाल , बाबा ची मदत मिळत राहील , कधीच कोमे जणार नाहीत .

प्रश्न:-
तुम्हा मुलांना , हे ईश्वरीय विद्यार्थी जीवन , कोणत्या नशेमध्ये व्यतीत करायचे आहे ?

उत्तर:-
नेहमी नशा राहावा की,आम्ही या अभ्यासाद्वारे राजकुमार राजकुमारी बनणार आहोत.हे जीवन हसत खेळत,ज्ञानाचा डान्स करत व्यतीत करायचे आहे.नेहमी वारस बणुन फुलां सारखे बनण्याचा पुरुषार्थ करत राहायचं आहे.हे राजकुमार राजकुमारी बनण्याचे महाविद्यालय आहे.येथे शिकायचे पण आहे आणि शिकवायचे पण आहे.प्रजा पण बनवायची आहे,तेव्हाच राजा बनू शकाल.बाबा तर ज्ञानाचे सागर आहेत त्यांना शिकण्याची आवश्यकता नाही.

গীতঃ-
लहानपणीचे दिवस विसरू नका,आज हसताय,उद्या रडू नका.

ओम शांती।
हे गीत खास मुलांसाठी आहे,जरी गीत सिनेमां मधील आहे परंतु काही गीत तुमच्यासाठी पण आहेत.जे सुपात्र मुलं आहेत,त्यांना गीत ऐकत त्याचा अर्थ,आपल्या मनामध्ये समजून घ्यायचा आहे.बाबा समजवतात,हे माझ्या लाडक्या मुलांनो,कारण तुम्ही माझी मुलं आहात ना.जेव्हा मुलं बनतील तेव्हा तर बाबांच्या वारशाची आठवण राहील.बाबांचे मुलंच बनले नाही,तर आठवण करावी लागेल.मुलांना स्म्रुती राहते,आम्ही भविष्यामध्ये बाबाकडून वारसा घेऊ.हा राज योग आहे प्रजायोग नाही.आम्ही भविष्यामध्ये राजकुमार राजकुमारी बनू.आम्ही त्यांची मुल आहोत,बाकी जे पण मित्र संबंधी इत्यादी आहेत,त्या सर्वांना विसरायचे आहे.एक बाबां शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको,देह पण आठवणीत यायला नको.देह अभिमानला सोडून देही अभिमानी बनायचे आहे.देह अभीमाना मध्ये आल्यामुळे अनेक प्रकारचे संकल्प विकल्प येऊन नुकसान करतात.आठवणीमध्ये राहण्याची सवय लावली तर,नेहमीच हर्षित मुख,उमललेल्या फुलासारखे राहाल.आठवण विसरली तर फुल सुकून जाईल.हिंमत ठेवली तर बाबा पण मदत करतात.बाबांची मुलंच बनले नाहीतर,बाबा मदत कशा प्रकारे करतील,कारण त्यांचे मात पिता परत रावण माया आहे.तर त्यांच्यापासून खाली उतरण्यासाठी मदत मिळते.तर हे गीत तुम्हा मुलांवरती बनवलेले आहेत.लहानपणीचे दिवस विसरू नका.बाबांची आठवण करायची आहे,आठवण केली नाही तर आज हसताय,वुद्या रडावे लागेल.आठवण केल्यामुळे नेहमी हर्षित मुख रहाल.तुम्ही मुलं जाणता एकच गीता ग्रंथ आहे, ज्यामध्ये काही श्लोक बरोबर आहेत. युद्धाच्या मैदानामध्ये मरतील तर स्वर्गामध्ये जातील असे ग्रंथा मध्ये लिहिले आहे परंतु यामध्ये युद्धा ची गोष्ट नाही.मुलांना बाबा पासून शक्ती घेऊन,माये वरती विजय मिळवायचा आहे.तर जरूर बाबांची आठवण करावी लागेल,तेव्हा तुम्ही स्वर्गाचे मालक बनू शकाल.त्यांनी परत हत्यार,शस्त्र इत्यादी दाखवले आहेत.ज्ञान कटारी,ज्ञान बाण ई.ऐकले आहे,तर त्यांनी स्थूल रूपामध्ये हत्यार शस्त्र इत्यादी दाखवले आहेत. वास्तव मध्ये या ज्ञानाच्या गोष्टी आहेत,बाकी इतक्या भुजा इत्यादी कोणाला असत नाहीत.तर हे युद्धाचे मैदान आहे ना.योगामध्ये राहून शक्ती घेऊन विकारावरती विजय मिळवायचा आहे. बाबांची आठवण केल्यामुळे,वारसा आठवणीत येईल.वारीसच वारसा घेतील,वारिस नाही बनले तर,प्रजा बनतात.हा राज योग आहे,प्रजा योग नाही. हे ज्ञान बाबा शिवाय कोणी देऊ शकत नाही.बाबा म्हणतात,मी साधारण तनाचा आधार घेऊन येतो.प्रकृतीचा आधार घेतल्या शिवाय तुम्हाला राज योग कसे शिकवू.आत्मा शरीराला सोडते,तर परत कोणतीही गोष्ट करू शकत नाही.परत जेव्हा शरीर धारण करेल,मुलगा थोडा मोठा होईल,त्यावेळेस बुद्धी चालेल.लहान मुलं तर पवित्रच असतात,त्यांच्यामध्ये विकार नसतात.संन्यासी लोक तर शिडी चढून परत खाली उतरतात.आपल्या जीवनाला समजू शकतात,मुलं तर पवित्र असतात,म्हणून मुलं आणि महात्मा एक सारखेच म्हणतात.तर तुम्ही मुलं जाणता,हे शरीर सोडून राजकुमार राजकुमारी बनायचे आहे.अगोदर पण आम्हीच बनलो होतो.आता परत बनत आहोत,असे विचार विद्यार्थ्यांनाच राहतात.हे पण त्यांच्या बुद्धी मध्ये येते,जे मुलं बनतील,तेच प्रामाणिक,इमानदार होऊन श्रीमता वर चालत राहतील,नाहीतर श्रेष्ठ पद मिळू शकणार नाही.शिक्षकांनी तर हे सर्व अभ्यास केलेलाच आहे.असे नाही की ते शिकतात आणि परत शिकवतात,नाही शिक्षक अगोदरच शिकलेले आहेत.त्यांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते.सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान दुसरे कोणी जाणू शकत नाही.प्रथम तर निश्चय पाहिजे,ते पिता आहेत.जर कुणाच्या भाग्या मध्ये नाही,तर मनामध्ये खिटखिट चालत राहते,माहित नाही चालू शकू किंवा नाही.बाबां नी समजवले आहे,तुम्ही जेंव्हा बाबाच्या गोदी मध्ये याल तर हे विकाराचे आजार परत आणखी जास्त होतील.वैद्य लोक पण म्हणतात,सुरुवातीला आजारपण जास्त वाढेल.बाबा पण म्हणतात तुम्ही मुलं बनाल तर देह अभिमानाची आणि काम क्रोधाचे आजारपण वाढेल,नाहीतर परीक्षा कशी होईल? कुठेही संभ्रमित झाले तर विचारत रहा.जेव्हा तुम्ही पैहलवान बनतात तर माया खूप त्रास देईल.तुम्ही बॉक्सिंग करत आहात.बाबांचा मुलगा बनले नाहीतर बॉक्सिंग ची गोष्टच नाही.ते तर आपल्याच संकल्प विकल्पा मध्ये गोते खात राहतात,न कोणती मदत मिळेल.बाबा समजवतात मम्मा बाबा म्हणतात,तर बाबांचा मुलगा बनावे लागेल,परत मनामध्ये पक्के होऊन जाते,हे आमचे पिता आहेत.बाकी हे युद्धाचे मैदान आहे,यामध्ये घाबरायचे नाही की,माहित नाही वादळा मध्ये थांबू शकू किंवा नाही,याला कमजोर म्हटले जाते. यामध्ये तर सिंह बनायचे आहे.पुरूषार्था साठी श्रेष्ठ मत घ्यायला पाहिजे,बाबांना विचारायला पाहिजे.अनेक मुलं आपली अवस्था लिहून पाठवतात,बाबांनाच प्रमाणपत्र द्यायचे आहे.ब्रह्मा बाबा पासून लपवू शकतात परंतु शिवबाबा पासून तर लपवू शकत नाहीत.अनेक जण आहेत,जे लपवतात परंतु शिवबाबा पासून काहीच लपवू होऊ शकणार नाहीत.चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईटा कर्माचे फळ वाईटच होते.सतयुगा त्रेता मध्ये तर सर्व चांगलेच असते.चांगले-वाईट,पाप पुण्य येथेच होते.स्वर्गा मध्ये तर दान पुण्य पण करत नाहीत,प्रारब्धच आहे.आम्ही येथे संपूर्णपणे समर्पित होतो,तर बाबा २१ जन्मासाठी त्याचा मोबदला देतात.बाबाचे अनुकरण करायचे आहे.जर उल्टे काम केले,तर बाबांचे नाव बदनाम कराल,म्हणून सावधानी पण द्यावी लागते.रूप बसंत सर्वांना बनवायचे आहे.आम्हाला बाबांनी शिकवले आहे,परत दुसऱ्यांना पण शिकवायचे आहे.खऱ्या ब्राह्मणांनी,खरी गीता ऐकावयची आहे.दुसऱ्या कोणत्या ग्रंथाची गोष्टच नाही,मुख्य गीता आहे,बाकी त्यांची मुलं आहेत.त्याद्वारे कोणाचे कल्याण होत नाही,मला पण भेटू शकत नाहीत.मीच येवुन परत सहज ज्ञान,सहज योग शिकवतो.सर्व शास्त्र शिरोमणी गीता आहे,त्या गीते द्वारेच वारसा मिळतो.कृष्णाला गीते पासून वारसा मिळाला आहे.गीते चे पिता आहेत,ते बसून वारसा देत आहेत,बाकी गीता ग्रंथाद्वारे वारसा मिळू शकत नाही.रचनाकार एक बाबाच आहेत,बाकी सर्व त्यांची रचना आहे.प्रथम नंबरचा ग्रंथ गीता आहे, नंतर अनेक ग्रंथ बनतात,त्याद्वारे वारसा मिळू शकत नाही.मुक्ती तर सर्वांना मिळणार आहे,सर्वांना परत जायचे आहे.बाकी स्वर्गाचा वारसा राज योगाच्या अभ्यासामुळे मिळतो,परत जो जितका शिकेल.बाबा सन्मुख शिकवत आहेत.जोपर्यंत निश्चय नाही की, कोण शिकवत आहे,तर काय समजतील? प्राप्ती पण करू शकणार नाहीत.तरीही बाबा ऐकवत राहतात.ज्ञानाचा विनाश कधी होत नाही.जितके सुख मिळेल,तेवढे दुसऱ्यांना पण सुख देतील.प्रजा बनवतील तर स्वतः राजा पण बनतील.

आमचे हे विद्यार्थी जीवन आहे,हसत खेळत,ज्ञानाचा डान्स करत,आम्ही जाऊन राजकुमार बनू.विद्यार्थी जाणतात आम्हाला राजकुमार बनायचे आहे,तर खुशीचा पारा चढेल. हे राजकुमार राजकुमारी बनण्याचे महाविद्यालय आहे.स्वर्गामध्ये राजकुमार राजकुमारींचे महाविद्यालय वेगळे असते, विमानातुन महाविद्यालय मध्ये जातात,विमान पण अपघात विरहीत असतात,मोडू शकत नाहीत.कधी कोणत्याही प्रकारचा अपघात होत नाही. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.एक तर बाबांशी पूर्णपणे बुद्धी योग ठेवा,दुसरे म्हणजे बाबांना सर्व समाचार द्या,कोण कोण काट्या पासून कळी बनत आहेत.बाबांशी पूर्णपणे संबंध ठेवायचा आहे,जे परत शिक्षक सूचना देत राहतील.कोण वारस बणुन फुलां सारखे बनण्याचा पुरुषार्थ करतआहेत.काट्या पासून कळी तरी बनावेत,परत फुल तेव्हाच बनतील जेव्हा मुलगा बनतील.नाही तर कळीच बणुन राहतील,म्हणजे प्रजा मध्ये येतील.आत्ता जो जसा पुरुषार्थ करेल,तसेच पद मिळेल.असे नाही एकाने चांगला,पुरुषार्थ केला तर,आम्ही त्यांची शेपटी पकडू.भारतवासी असे समजतात,परंतु शेपटी पकडण्याची गोष्टच नाही.जो करेल त्याला मिळेल.जे पुरुषार्थ करतील,२१पिढी त्यांचे प्रारब्ध मिळेल. वृध्द तर जरुर होतील परंतु अकाली मृत्यु होणार नाही.खूपच भारी पद आहे.बाबा समजतात यांचे भाग्य बनले आहे,वारस बनला आहे.आता पुरुषार्थी आहेत परत समाचार पण येतो.बाबा हे विघ्न येतात,असे होते.प्रत्येकाला जमाखर्च द्यायचा आहे.इतके कष्ट दुसऱ्या सत्संगामध्ये होत नाहीत.बाबा लहान मुलांना पण संदेशी बनवतात.लढाई मध्ये संदेश देणारे पण पाहिजेत ना.हे लढाई चे मैदान आहे,येथे तुम्ही सन्मुख ऐकतात,तर खूप चांगले वाटते,दिल खुश होते,बाहेर गेल्याने बगळ्यांचा संग मिळतो,तर खुशी गायब होते.तेथे मायेची धूळ आहे ना,म्हणून पक्के बनावे लागेल.

बाबा खूपच प्रेमाने शिकवतात,खूप सुविधा पण देतात.असे अनेक आहेत,जे चांगले चांगले म्हणून परत गायब झाले.कोणी एखाद्याच ज्ञान घेतो.येथे ज्ञानाचा नशा पाहिजे.दारूचा पण नशा असतो.कोणी दिवाळं मारल असेल आणि दारू पिला असेल,तर जोरात नशा चढतो,तर तो समजतो,मी राजांचा राजा आहे.येथे तर तुम्हा मुलांना रोज ज्ञानामृत चा ग्लास मिळतो.दिवसेंदिवस धारणा करण्यासाठी अनेक गोष्टी मिळत राहतात,ज्याद्वारे बुद्धीचे कुलुप उघडते,म्हणून कसेही करून मुरली जरूर ऐकायची आहे.जसे गीतेचा रोज पाठ करतात ना,येथे पण रोज बाबा पासून शिकायचे आहे,विचारायला पाहिजे माझी प्रगती होत नाही,कारण काय आहे? येऊन समजायला पाहीजे.तेच येतील ज्यांना पूर्ण निश्चय आहे की,हे आमचे पिता आहेत.असे नाही,निश्चिय बुद्धी होण्यासाठी पुरुषार्थ करत आहेत.निश्चय तर एकच असतो,त्यामध्ये टक्केवारी होत नाही.बाबा एक आहेत,त्यांच्याकडून वारसा मिळतो.येथे हजारो शिक्षण घेत आहेत,तरी पण म्हणतात निश्चय कसा करू?त्यांना र्दुभाग्यशाली म्हटले जाते,भाग्यशाली तेच आहे जे बाबांना ओळखून मानतील.कोणी राजाकडे दत्तक जातात तर त्यांना लगेच निश्चय होतो,असे नाही म्हणणार निश्चय कसा होईल?हा राज योग आहे,बाबा तर स्वर्गाचे रचनाकर आहेत,तर स्वर्गाचे मालक बनवतात.निश्चय होत नाही तर तुमच्या भागामध्ये नाही.दुसरे कोणी काय करू शकतात.मानत नाही तर पुरुषार्थ कसा करतील?ते लंगडत चालतील.बेहदच्या बाबा कडून भारतवासींना कल्प कल्प स्वर्गाचा वारसा मिळतो.देवता तर स्वर्गामध्ये असतात.कलियुगामध्ये राजाई तर नाही.प्रजेचे प्रजे वरती राज्य आहे,पतित दुनिया आहे,त्याला पावन दुनिया बाबाच बनवतात,नाही तर कोण बनवेल.भाग्या मध्ये नाहीतर तर समजत नाहीत,हे तर खूपच सहज समजण्याची गोष्ट आहे.लक्ष्मी नारायणला राज्याचे भाग्य कधी मिळाले,जरूर पाठी मागच्या जन्मातील कर्माचे फळ आहे.लक्ष्मीनारायण स्वर्गाचे मालक होते.आत्ता नरक आहे तर असे श्रेष्ठ कर्म किंवा राजयोग शिवाय बाबांच्या कोणीही शिकू शकत नाही.आत्ता सर्वांचा अंतिम जन्म आहे.बाबा राजयोग शिकवत आहेत.द्वापरयुगा मध्ये थोडेच शिकवतील.द्वापार युगाच्या नंतर सत्ययुग थोडेच येईल.येथे तर चांगले समजतात,बाहेर गेल्यामुळे परत खाली होतात,ज्ञान रत्न निघून जातात.ज्ञान ऐकत ऐकत परत जर विकारांमध्ये गेलो, म्हणजेच आपल्या कुळाला कलंक लावला,भाग्याला कुलूप लावले.घरांमध्ये पण मुलं असे काही कर्तव्य करतात,तर म्हणतात हा मुलगा मेलेला चांगला. तर हे बेहदचे बाबा म्हणतात कुल कलंकित बनू नका,जर विकारांचे दान देऊन परत घेतले तर पदभ्रष्ट होईल.पुरुषार्थ करुन विकारावर विजय मिळवायचा आहे.काही चूक होते तर परत उभे रहा.सारखे सारखे चुका करत राहतात,तर हार होऊन बेहोश पडतील.बाबा खूपच समजवतात परंतु ज्ञान आचरणात आणायला पाहिजे.माया खूपच हुशार आहे.पवित्रतेची प्रतिज्ञा करून,जर परत विकारात गेले तर खूपच नुकसान होते.पवित्रते द्वारे आपली नाव किनाऱ्याला लागते.पवित्रता होती तर भारताचे भाग्य चमकत होते.आत्ता तर खूपच अज्ञानाचा काळोख आहे, अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात . आत्मिक पित्याचा , आत्मिक मुलांना नमस्ते .

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) या युद्धाच्या मैदानामध्ये मायेला घाबरायचे नाही, बाबाकडून पुरुषार्था साठी श्रीमत घ्यायची आहे. इमानदार आज्ञाधारक बणुन चालत राहायचे आहे.

(२) आत्मिक नशेमध्ये राहण्यासाठी ज्ञानामृतचा पेला दररोज प्यायचा आहे.मुरली रोजा ऐकायची आहे.भाग्यवान बनण्यासाठी बाबा मध्ये कधीच संशय येऊ द्यायचा नाही.

वरदान:-
शांतीच्या शक्तीच्या साधनांद्वारे विश्वाला शांत बनवणारे आत्मिक शस्त्रधारी भव :-

शांतीच्या शक्तीचे साधन आहे शुभ संकल्प,शुभ भावना आणि डोळ्याची भाषा.जसे मुखाच्या भाषा द्वारे बाबांचा व रचनेचा परिचय देतो,असेच शांतीच्या शक्तीच्या आधारा वर डोळ्याच्या भाषेद्वारे, डोळ्याने बाबांचा अनुभव करवू शकता.स्थुल साधना पेक्षा जास्त,शांतीची शक्ती अति श्रेष्ठ आहे.आत्मिक सेनेचे हे विशेष शस्त्र आहे,या शस्त्रा द्वारे अशांत विश्वाला,शांत बनवू शकता.

बोधवाक्य:-
निर्विघ्न राहणे आणि निर्विघ्न बनवणे हीच खरी सेवा आहे .