21-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आठवणीत राहून प्रत्येक कर्म करा, तर अनेकांना तुमचा साक्षत्कार होत राहिल...”

प्रश्न:-
संगमयुगामध्ये कोणत्या विधीद्वारे आपल्या ह्दयाला पवित्र बनवू शकता?

उत्तर:-
आठवणीत राहून भोजन बनवा आणि आठवणीत खा, तर ह्दय शुध्द होईल. संगमयुगावर तुम्हा ब्रह्माणाद्वारे बनविलेले पवित्र ब्रह्मा भोजन देवतांना पण फार पसंद आहे. ज्यांना ब्रह्मा भोजनाची कदर आहे, ते ताट धूवून पण पितात. महिमा पण फार आहे. आठवणीत राहून बनविलेले भोजनामधून ताकद मिळते, ह्दय शुध्द होऊन जाते.

ओम शांती।
संगमयुगावरच बाबा आले आहेत. रोज मुलांना सांगावे लागते कि, आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहेत. असे का म्हणतात कि, मुलांनो स्वत:ला आत्मा समजा? मुलांना हे आठवणीत राहावे कि, बरोबर बेहदचे बाबा आहेत, आत्म्याला शिकवीत आहेत, सेवेसाठी वेगवेगळ्या मुद्यावर समजावत आहेत. मुले म्हणतात सेवा नाही, आम्ही बाहेर सेवा कशी करु? बाबा सेवेच्या युक्ती तर फार सोप्या सांगत आहेत. चित्र हातात असावे. रघुनाथांचे काळे चित्र पण असावे, गोरे पण असावे. कृष्णाचे किंवा नारायणाचे चित्र गोरे पण असावे, काळे पण असावे. जरी लहान चित्र असले तरी चालेल. कृष्णाचे एवढे लहान चित्र पण बनवितात. तुम्ही मंदीरातील पुजाऱ्यांना पण विचारु शकता, यांना काळे का बनविले आहे, मुळात तर गोरे होते? खरे तर शरीर काळै असत नाही ना. तुमच्या जवळ फार चांगले चांगले गोरे पण राहतात, परंतु यांना काळे का बनविले आहे? हे तर तुम्हा मुलांना समजावले आहे कि, आत्मा कशी वेगवेगळी नावारुप धारण करुन खाली उतरत आहे. जेव्हा काम चितेवर चढते तेव्हा पासुन काळे बनत आहे. जगन्नाथ किंवा श्रीनाथ मंदिरात पुष्कळ यात्रेकरु येतात, तुम्हाला निमंत्रण पण देतात. सांगा आम्ही श्रीनाथाचे 84 जन्मांची जीवन कहानी सांगतो. बंधू आणि भगिनिंनो येऊन ऐका. असे भाषण इतर कोणी पण करु शकत नाही. तुम्ही सांगू शकता हे काळे कसे बनले? प्रत्येकाला पावन पासून पतित जरुर बनायचे आहे. देवता जेव्हा वाममार्गात गेले, तेव्हा त्यांना काळे बनविले. कामचितेवर बसल्याने लोखंडासारखे बनतात. लोखंडाचा रंग काळा आहे, सोन्याचा सोनेरी, त्यांना म्हणतात गोरे. तेच मग 84 जन्मानंतर काळे बनतात. सिडीचे चित्र पण जरुर हातात असावे. सिडी पण मोठी असावी, कोणी पण दुरुन पाहू शकेल. चांगल्याप्रकारे तुम्ही सांगा कि, भारताची ही अवस्था झाली आहे. लिहले पण आहे प्रगती आणि पतन अधोगती मुलांना सेवेचा फार छंद असला पाहिजे. समजावले पाहिजे हे जगाचे चक्र कसे फिरत आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग---मग हे पुरुषोत्तम संगमयुग पण दाखवायचे आहे. तरी पण जास्त चित्रे घेऊ नका. सिडीचे चित्र मुख्य आहे भारतासाठी. तुम्ही सांगू शकता, आता परत पतितापासून पावन कसे बनू शकता. पतित पावन तर एकच बाबा आहेत. त्यांची आठवण केल्याने सेकंदात जीवनमुक्ती मिळते. तुम्हा मुलामध्ये हे सारे ज्ञान आहे बाकीचे तर सर्व अज्ञानाचे निद्रेत झोपले आहेत. भारतात ज्ञान होते तर फार धनवान होते. आता भारत अज्ञानामध्ये आहे तर किती कंगाल आहे. ज्ञानी मनुष्य आणि अज्ञानी मनुष्य असतात ना. देवी देवता आणि मनुष्य तर परिचीत आहेत. देवता सतयुग त्रेतामध्ये, मनुष्य द्वापर कलियुगामध्ये, मुलांच्या बुध्दीमध्ये सदैव राहिले पाहिजे सेवा कशी करावी? ते पण बाबा समजावतात. सिडीचे चित्र समजावण्यासाठी फार चांगले आहे. बाबा सांगतात कि, गृहस्थ व्यवहारामध्ये राहा. शरीर निर्वाहासाठी धंदा इ. तर करावयाचा आहे. शरीरासाठी विद्या तर शिकली पाहिजे. बाकी जो वेळ मिळेल तिचा सेवेसाठी विचार केला पाहिजे. आम्ही इतराचे कल्याण कसे करु? येथे तर तुम्ही अनेकांचे कल्याण करु शकत नाही. येथे तर येताच बाबाची मुरली ऐकण्यासाठी, तिच्यातच जादू आहे. बाबाला जादूगार म्हणतात ना. गायन पण करतात, तुझ्या मुरलीत जादू आहे. तुमच्या मुखातून जी मुरली वाजते तिच्यात जादू आहे. मनुष्यापासून देवता बनत आहेत. असा कोणी जादूगार नाही शिवाय बाबांच्या. गायन पण करतात मनुष्यापासून देवता करतांना, वेळ लागत नाही. जुन्या दुनियेपासून नविन दुनिया जरुर होणार आहे. जुन्याचा विनाश पण जरुर होणार आहे. यावेळी तुम्ही राजयोग शिकता तर जरुर राजा पण बनाल. आता तुम्ही मुले समजता कि, 84 जन्मानंतर मग पहिल्या नंबरचार जन्म पाहिजे. कारण जगाच्या इतिहास भुगोलाची पुनरावृत्ती होत आहे. सतयुग त्रेता जे पण होऊन गेले आहे, त्याची परत पुनरावृत्ती जरुर होणार आहे.

तुम्ही येथे बसले तरी बुध्दीमध्ये हे आठवणीत ठेवावे कि, आम्ही परत जात आहोत मग सतोप्रधान देवी देवता बनू. त्यांना देवता म्हटले जाते. आता मनुष्यात दैवी गुण नाहीत. सेवा तुम्ही कोठेही करु शकता. किती पण धंदा दोरी असेल. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत ही कमाई करत राहिले पाहिजे. मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. पवित्रता असेल तर सुख शांती असते. संपुर्ण पवित्र बनाल तर मग येथे राहू शकणार नाही, कारण आम्हाला शांतीधाममध्ये जरुर जावयाचे आहे. आत्मा पवित्र बनली तर मग आत्मा, या जुन्या शरीराबरोबर राहत नाही. हे तर अपवित्र आहे. 5 तत्त्वच अपवित्र आहेत. शरीर पण त्यापासून बनते. याला मातीचा पुतळा म्हटले जाते. 5 तत्त्वाचे शरीर एक नष्ट होते, दुसरे बनते. आत्मा तर आहेच, आत्मा काही बनत नाही. शरीर प्रथम किती लहान, नंतर किती मोठे बनते. किती कर्मेद्रिये मिळतात ज्याद्वारे आत्मा सर्व भुमिका करते. हे जगच आश्चर्यकारक आहे. सर्वांत आश्चर्यकारक आहेत बाबा, जे आत्म्यांचा परिचय देतात. आम्ही आत्मे किती लहान आहोत. आत्मा प्रवेश करते. प्रत्येक गोष्ट आश्चर्य कारक आहे. जनावरांची शरीरे इ. कशी बनतात, आश्चर्य आहे ना. आत्मा तर सर्वांत लहान आहे. हत्ती किती मोठा आहे, त्यात आत्मा एवढी लहान जावून बसते. बाबा तर मनुष्य जन्माची गोष्ट सांगतात, मनुष्य किती जन्म घेतात? 84 लाख जन्म तर नाहीत. समजावतात कि, जेवढे धर्म आहेत, तेवढे वेगळेपण आहे, प्रत्येक आत्मा किती वेगवेगळे शरीर घेते, आश्चर्य आहे ना. नंतर जेव्हा चक्र पुनरावृत्त होते, प्रत्येक जन्माचे चेहरे, नाव, रुप इ. बदलते. असे म्हणत नाहीत, कृष्ण काळा, कृष्ण गोरा. नाही, त्यांची आत्मा प्रथम गोरी होती, नंतर 84 जन्म घेत घेत काळी बनते. तुमची आत्मा पण वेगवेगळे चेहरे, वेगवेगळे शरीर धारण करुन अभिनय करते. हे पण नाटक आहे.

तुम्हा मुलांना कधी पण कोणती चिंता नसली पाहिजे. सर्व कलाकार आहेत. एक शरीर सोडून दुसरे घेऊन भुमिका वठवावयाची आहे. प्रत्येक जन्मात संबंध इ. बदलत जातात. तर बाबा समजावतात कि, हे पुर्वपार बनलेले नाटक आहे. आत्माच 84 जन्म घेते, पावन सृष्टी होती. आता पतित आहे, नंतर पावन होणार आहे. सतोप्रधान, तमोप्रधान अक्षर तर आहेत ना. सतोप्रधान सृष्टी मग सतो, रजो, तमो सृष्टी. आता जे तमोप्रधान बनले आहेत, तेच परत सतोप्रधान कसे बनतील? पतितापासून पावन कसे बनतील, पावसाच्या पाण्याने तर पावन बनणार नाहीत. पावसामुळे तर माणसांचा मृत्यू पण होतो. महापूरात तर किती बुडून मरतात. आता बाबा समजावतात कि, हे सर्व खंड राहणार नाहीत. नैसर्गिक संकटे पण मदद करतात. किती माणसे जनावरे इ. वाहवून जातात. असे नाही कि, पाण्याने पावन बनतात, ते तर शरीर नष्ट होते. शरीराला तर पतितापासून पावन बनायचे नाही. पावन बनायचे आहे आत्म्याला, तर पतित पावन तर एक बाबा आहेत. जरी त्यांना जगतगुरु म्हणतात, परंतु गुरुचे तर काम आहे. सद्गती करणे, ते तर एकच बाबा सद्गती दाता आहेत. बाबा सद्गुरुच सद्गती देतात. बाबा तर फार समजावतात, ब्रह्मा बाबा पण ऐकतात. गुरु लोक पण बाजूला शिष्याला बसवितात, शिकण्यासाठी. हे पण त्यांचे बाजूला बसतात. बाबा समजावतात तसे हे पण समजावतात. त्यामुळे गुरु ब्रह्मा नंबर एकला जातात. शंकरासाठी तर म्हणतात डोळे उघडले वर भस्म करतात, मग त्यांना तर गुरु म्हणत नाहीत. तरी पण बाबा सांगतात कि, मुलांनो माझी आठवण करा. काही मुले म्हणतात, धंदया दोरीची चिंता असते, आम्ही स्वत:ला आत्मा समजून बाबाची आठवण कशी करावी? बाबा समजावतात कि, भक्तीमार्गात मध्ये पण तुम्ही हे ईश्वरा, हे भगवान म्हणून आठवण करत होता ना. आठवण तेव्हा करतात जेव्हा कोणते तरी दु:ख होते. मरणाचे वेळी पण म्हणतात, राम राम बोला. फार संस्था आहेत. जे राम नावाचे दान देतात. जसे तुम्ही ज्ञानाचे दान देता, ते मग म्हणतात राम बोला, राम बोला. तुम्ही पण म्हणता शिवबाबाची आठवण करा. ते तर शिवाला जाणतच नाहीत. असेच राम राम म्हणतात, आता हे पण का म्हणतात कि, राम म्हणा, जेव्हा परमात्मा सर्वांत आहे? बाबा समजावतात कि, राम, कृष्णाला परमात्मा म्हणत नाहीत. कृष्णाला तर देवता म्हणतात. रामा साठी पण समजावतात कि ते आहेत, सेमी देवता. दोन कला कमी होतात. प्रत्येक वस्तूच्या कला तर कमी होतातच. कापड पण अगोदर नवे नंतर जुने होत आहे.

तर बाबा एवढ्या गोष्टी सांगतात, तरीही म्हणतात, माझ्या गोड गोड आत्मिक मुलांनो, स्वत:ला आत्मा समजा. आठवण करत करत सुख प्राप्त करा. हे तर दु:खधाम आहे. बाबाची आणि वारशाची आठवण करा. आठवण करत करत अथाह सुख प्राप्त कराल. कलह क्लेष आजार इ. जे काही आहे, सर्व नष्ट होईल. तुम्ही 21 जन्मांसाठी निरोगी बनता. कलह क्लेष मिटतात सर्व तनाचे, जीवनमुक्ती पद प्राप्त करा. गातात पण प्रत्यक्षात जात नाहीत. तुम्हाला बाबा प्रत्यक्षात समजावतात कि, बाबाची आठवण करा तर तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होतील, सुखी व्हाल. शिक्षा भोगुन, लहान पद प्राप्त करणे चांगले नाही सर्वांना ताजी भाकरी पसंद पडते. आजकाल तर तेलाचा वापर आहे. तेथे तर तुपाच्या नद्या वाहतात. तर मुलांना बाबाची आठवण करावयाची आहे. बाबा असे पण म्हणत नाहीत कि, येथे बसून बाबाची आठवण करा. नाही, चालता, फिरता शिवबाबाची आठवण करावयाची आहे. नौकरी इ. पण करावयाची आहे. बाबाची आठवण बुध्दीत ठेवावयाची आहे. लौकिक बापाची मुले नोकरी इ. करतात तर आठवण करतातच ना. कोणी पण विचारले तर झटक्यात सांगतात, आम्ही कोणाची मुले आहोत. बुध्दीमध्ये पित्याची मालमत्ता आठवणीत राहते. तुम्ही पण बाबाची मुले बनले आहात तर संपत्तीची पण आठवण येते. बाबाचीच आठवण करावयाचीच आहे, आणखीन कोणाशी संबंध नाही. आत्म्यामध्येच सारी भुमिका नोंदलेली आहे, जी प्रगट होत राहते. या ब्राह्मण कुळामध्ये तुमची जी कल्प कल्पाची भुमिका आहे, तिच प्रगट होत राहते. बाबा समजावतात जेवण बनवा, मिठाई बनवा, शिवबाबाची आठवण करा. शिवबाबाच्या आठवणीत बनवा, तर मिठाई खाणाराचे कल्याण होईल. कोणाला साक्षात्कार पण होऊ शकतो. ब्रह्माचा पण साक्षात्कार होऊ शकतो. शुध्द अन्न ग्रहण केले तर ब्रह्माचा, कृष्णाचा, शिवाचा साक्षात्कार होऊ शकतो. ब्रह्मा आहेत येथे ब्रह्माकुमार-कुमारीचे नांव तर आहेच ना. अनेकांना साक्षात्कार होतील, कारण बाबाची आठवण करता ना. बाबा युक्ती तर फार सांगतात. ते मुखाद्वारे राम राम बोलतात, तुम्हाला मुखाद्वारे काही बोलावयाचे नाही. जसे ते लोक समजतात कि, गुरु नानक ला भोग लावत आहे, तुम्ही पण समजता कि, आम्ही शिवबाबाला भोग, लावण्यासाठी बनवित आहे. शिवबाबाची आठवण करत बनविला तर अनेकांचे कल्याण होऊ शकते. त्या भोगामध्ये ताकद निर्माण होते.त्यामुळे बाबा भोजन बनविणाऱ्यांना पण सांगतात कि, शिवबाबांची आठवण करत बनविता का? लिहले पण आहे, शिवबाबांची आठवण आहे? आठवणीत राहुन बनविले तर खाणाऱ्याला पण ताकद मिळेल, ह्दय शुध्द होईल. ब्रह्मा भोजनाची महिमा आहे ना. ब्राह्मणांनी बनविलेले भोजन देवतांना पण पसंद पडते. हे पण शास्त्रामध्ये आहे. ब्राह्मणांनी बनविलेले भोजन खाल्याने बुध्दी शुध्द होऊन जाते, ताकद वाढते. ब्रह्मा भोजनाची फार महिमा आहे. ब्रह्मा भोजनाची ज्यांना कदर राहते, ते ताट धुवून पण पितात. फार उंच समजतात. भोजनाशिवाय तर राहू शकत नाहीत. दुष्काळात अन्नाशिवाय मरुन जातात. आत्माच भोजन खाते, या इंद्रियाद्वारे आस्वाद ती घेते. चांगले वाईट आत्माच म्हणते ना. हे फार स्वादिष्ट आहे. ताकद देणारे आहे. पुढे चालून जसे तुम्ही उन्नतीला प्राप्त कराल, तसे भोजन पण तुम्हाला मिळत राहिल, त्यामुळे मुलांना म्हणतात कि, शिवबाबाची आठवण करुन भोजन बनवा. बाबा जे सांगतात ते अंमलात आणले पाहिजे ना. तुम्ही आहात माहेरचे, जाता सासरघरी. सुक्ष्मवतनमध्ये पण एकमेकांस भेटतात. भोग घेऊन जाता. देवतांना भोग लावतात ना. देवता येतात, तुम्ही ब्राह्मण तेथे जाता. तेथे बैठक होते. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. कोणत्याही गोष्टीची चिंता करावयाची नाही, कारण हे नाटक फारच तंतोतंत बनलेले आहे. सर्व कलाकार यात आप-आपला अभिनय करत आहेत.

2. जीवनमुक्त पद प्राप्त करण्यासाठी किंवा नेहमी सुखी बनण्यासाठी आतून एका बाबाचीच आठवण करावयाची आहे. मुखाद्वारे काही बोलायचे नाही. भोजन बनविताना किंवा खाताना बाबाची आठवणीमध्ये जरुर राहावयाचे आहे.

वरदान:-
नि:स्वार्थ आणि निर्विकल्प स्थितीद्वारे सेवा करणारे सफलता मुर्त भव
 

सेवेमध्ये सफलतेचा आधार तुमची नि:स्वार्थ आणि निर्विकल्प स्थिती आहे. या स्थितीत राहणारे, सेवा करताना स्वत: पण संतुष्ट आणि हर्षित राहतात आणि त्यांचेवर दुसरे पण संतुष्ट राहतात. सेवेमध्ये संगठन होते, आणि संगठन मध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे विचार असतात. परंतू अनेकतेमध्ये गोंधळू नका. असा विचार करु नका, कोणाचे ऐकावे, कोणाचे ऐकू नये. निस्वार्थ आणि निर्विकल्प भावनेने निर्णय घ्या, तर कोणाला पण व्यर्थ विचार येणार नाही आणि सफलता मुर्त बनाल.

बोधवाक्य:-
आता सकाशद्वारे बुध्दीला परिवर्तन करण्याची सेवा आरंभ करा..!