31-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाप नावाडी बणुन आला आहे. तुम्हा सर्वांची नौका विषय सागरामधून क्षीरसागरामध्ये घेऊन जाण्यासाठी, आता तुम्हाला या किनाऱ्यावरुन त्या किनाऱ्यावर जायचे आहे...”

प्रश्न:-
तुम्ही मुले प्रत्येकाची भुमिका पाहात असतानाही, कुणाचीही निंदा करु शकत नाही, असे का?

उत्तर:-
कारण की तुम्हाला माहित आहे हे अनादि बनलेले नाटक आहे, ज्यामध्ये प्रत्येक कलाकार आप-आपली भुमिका सादर करत आहे. कोणाचा काहीही दोष नाही. हा भक्तीमार्ग पुन्हा असणार आहे. यामध्ये जराही बदल होऊ शकत नाही.

प्रश्न:-
कोणत्या दोन शब्दामध्ये साऱ्या चक्राचे ज्ञान सामावले आहे?

उत्तर:-
आज आणि काल. काल आम्ही सतयुगामध्ये होतो, आज 84 जन्मांचे चक्र फिरुन नर्कामध्ये पोहोचलो आहोत. उद्या पुन्हा स्वर्गामध्ये जाणार आहे.

ओम शांती।
मुले आता समोर बसलेली आहेत. जिथून येतात तिथे म्हणजे सेंटरवर जेव्हा राहतात तेव्हा असे समजत नाहीत की, आम्ही उंच ते उंच बाबांच्या समोर बसलो आहोत. तोच आमचा शिक्षक आहे. तोच आमच्या नावेला पलीकडे घेऊन जाणार आहे. ज्यालाच गुरु असे ही म्हणतात. येथे तुम्ही असे समजता कि, आम्ही समोर बसलो आहोत. आम्हाला या विषय सागरामधून क्षीरसागरामध्ये होऊन जात आहेत. पलीकडे घेऊन जाणारा बाप समोर बसलेला आहे. तो एकच शिवबाबांची आत्मा आहे. ज्यालाच परम किंवा उंच ते उंच भगवान असे म्हटले जाते. आता तुम्ही मुले समजता कि, आम्ही उंच ते उंच शिवबाबांच्या समोर बसलो आहे. तो या ब्रह्माच्या शरीरामध्ये बसलेला आहे. तोच तुम्हाला पलीकडे घेऊन जातो. त्यांना शरीर पण गरजेचे आहे. नाहीतर श्रीमत कसे देणार. आता तुम्हा मुलांना निश्चय आहे. बाबा आमचा पिता पण आहे, शिक्षक पण आहे आणि पलीकडे होऊन जाणारा ही आहे. आता आम्ही आत्मे आपल्या घरी शांतीधामला जाणार आहोत. बाबा आम्हाला रस्ता सांगत आहेत. तिथे सेवाकेंद्रामध्ये बसणे आणि येथे समोर बसण्यामध्ये रात्रं दिवसाचा फरक आहे. तिथे असे नाही समजणार की आम्ही समोर बसलो आहोत. येथे ती जाणीव होते. आता आम्ही पुरुषार्थ करत आहोत. पुरुषार्थ करविणाऱ्याला खुशी राहते. आता आम्ही पावन बनून घरी जात आहोत. ज्याप्रमाणे नाटकामधील कलाकारांना समजते की आता नाटक पुर्ण झाले, आता पिता आलेला आहे. आम्हा आत्म्यांना घेऊन जायला. हे सुध्दा समजावतात तुम्ही घरी कसे जाऊ शकता, तो पिता पण आहे. नौका किनाऱ्याला लावणारा नाविक पण आहे. लोक गात राहतात. परंतू समजत काहीच नाहीत, की नाव कशाला म्हटले जाते. काय तो शरीराला घेऊन जाईल? आता तुम्ही मुले जाणता कि तो आमच्या आत्म्याला पलीकडे घेऊन जातो. आता आत्मा या शरीरासोबत वैश्यालया मध्ये विषय वैतरणी नदीमध्ये पडलेली आहे. आम्ही मुळचे रहिवासी शांतीधामचे आहोत. आम्हाल पलीकडे घेऊन जाणारा म्हणजेच घरी घेऊन जाणारा पिता भेटला आह.तुमची राजधानी होती जी माया रावणाने हिसकावून घेतली आहे. ती राजधानी परत मिळवायची आहे. बेहदचे पिता म्हणतात, मुलांनो आता आपल्या घराची आठवण करा. तिथे जाऊन पुन्हा क्षीरसागरामध्ये यायचे आहे. येथे आहे विषयाचा सागर आणि तिथे आहे क्षीरसागर आणि मुलवतन आहे. शंतीचा सागर तीन धाम आहेत. हे आहे दु:खधाम.

बाबा समजावतात-गोड गोड मुलांनो, स्वत:ला आत्मा समजून बाबांची आठवण करा. सांगणारा कोण आहे, कोणाच्याद्वारे सांगत आहे? दिवसभर गोड-गोड मुलांनो म्हणत राहतात, आता आत्मा पतित आहे. त्यामुळे शरीरही असेच मिळणार. आता तुम्ही समजता आम्ही खऱ्या खऱ्या सोन्याचे दागिने होतो. नंतर खाद पडत-पडत खोटे बनलो आहोत. आता तो खोटेपणा कसा काढणार यासाठी या आठवणीच्या यात्रेची भट्टी आहे. अग्नीमध्ये सोने पक्के बनते ना. बाप सतत समजावत आहेत, ही समजूत जी तुम्हाला देत आहे ती कल्प-कल्प देत आलो आहे. माझी भुमिका आहे पुन्हा 5 हजार वर्षांनी येऊन सांगतो कि, मुलांनो पावन बना. सतयुगामध्येही तुमची आत्मा पावन होती, शंतीधाम मध्येही पवन आत्मा असते. ते तर आहे आमचे घर किती गोड घर आहे. जिथे जाण्यासाठी मनुष्य किती प्रयत्न करत असतात. बाप समजावतात आता सर्वांना जायचे आहे, नंतर भुमिका बजावण्यासाठी यायचे आहे. हे तर मुलांना समजले आहे. मुलं जेव्हा दु:खी होतात तेवहा म्हणतात हे भगवान आम्हाला तुझ्याजवळ बोलवं, आम्हाला येथे दु:खामध्ये का सोडले आहे. माहित आहे पिता परमधाममध्ये राहतो तर म्हणतात-हे भगवान आम्हाला परमधाममध्ये बोलवं. सतयुगामध्ये असे म्हणणार नाही. तिथे तर सुखचं सुख आहे. येथे अनेक दु:ख आहेत. म्हणून बोलतात हे भगवान, आत्म्याला आठवण राहते. परंतू ईश्वराला जाणत बिल्कुल नाही. आता तुम्हा मुलांना बाबांचा परिचय मिळाला आहे. पिता राहतातच परमधाममध्ये, घराचीच आठवण करत राहतात. असे कधी नाही म्हणत की राजधानी मध्ये बोलवं, राजधानी साठी काही ही म्हणत नाहीत. बाप तर राजधानी मध्ये राहत ही नाही. ते राहतो शांतीधाममध्ये. सर्व शांती मागत आहेत. परमधाममध्ये भगवानाजवळ जरुर शांतीच असणार. ज्याला मुक्तीधाम म्हटले जाते. ते आहे आत्म्यांचे राहण्याचे ठिकाण. जिथून आत्मे येतात. सतयुगाला घर नाही म्हणू शकत ती आहे राजधानी, तुम्ही आता कुठून कुठून आलेले आहात. येथे येऊन समोर बसले आहात. बाबा, मुलांनो-मुलांनो म्हणून तुमच्याशी बोलतात. पित्याच्या रुपात मुलांनो मुलांनो पण म्हणतो नंतर शिक्षक बनून सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य किंवा इतिहास-भुगोलही समजावतात. या गोष्टी काही शास्त्रांमध्ये नाहीत. तुम्हा मुलांना माहित आहे मुलवतन आहे, आम्हा आत्म्यांचे घर. सुक्ष्मवतन तर आहे दिव्य दृष्टीची गोष्ट. बाकी सतयुग, त्रेता द्वापर, कलियुग तर येथेच असते. भुमिकाही तुम्हीच बजावता. सुक्ष्मवतनचा काही भुमिका नाही ती तर साक्षात्काराची गोष्ट आहे. काल आणि आज हे तर चांगल्याप्रकारे बुध्दीमध्ये असले पाहिजे. काल आम्ही सतयुगात होतो. नंतर 84 जन्म घेत-घेत आज आम्ही नर्कामध्ये आलो आहे. बाबांना नर्कामध्येच बोलावतात. सतयुगात तर भरपुर सुख आहे. तर कुणी बोलवतच नाही. येथे तुम्ही शरीरामध्ये आहात म्हणून बोलू शकता. बाबाही म्हणतात मी जानी-जाननहार (सर्व काही जाणतो) आहे. अर्थात सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतो परंतु तुम्हाला ऐकवणार कसे. विचार करण्याची गोष्ट आहे ना म्हणूनच असे लिहलेले आहे बाबा रथ (शरीर) घेतात, म्हणतात माझा जन्म तुमच्यासारखा होत नाही. मी यांच्यामध्ये प्रवेश करतो रथाचाही परिचय देतो ही आत्मा पण नाव रुप धारण करत-करत तमोप्रधान बनली आहे. यावेळी सर्व पोरके आहेत, कारण पित्याला ओळखत नाहीत. तर सर्व पोरके झालेत. आपा-आपसात भांडत असतील तर असे म्हणतता ना, मुलां-मुलींना भांडण का करता? म्हणून बाबा म्हणतात मला तर सर्व विसरुन गेले आहात. आत्माच म्हणते मुलां-मुलींनो लौकिक बापही असेच म्हणतो. बेहदचे बाबा ही म्हणतो मुलां-मुलींनो तुमचे हे हाल कसे झाले? कुणी धनी-धोणी आहे का नाही? तुम्हाला बेहदचे बाबा जे स्वर्गाचे मालक बनवतो. ज्याला तुम्ही अर्धाकल्पापासून बोलवत आहात, त्यांच्यासाठी असे म्हणता की तो दगड धोंड्यात आहे. बाबा आता समोर बसून समजावतात. आता तुम्ही मुलें समजता की आम्ही बाबांच्याजवळ आलो आहे. बाबाच आम्हाला शिकवत आहे. आमची नाव किनाऱ्याला लावतात कारण ही नाव खुप जुनी झाली आहे. तर म्हणतात ही नाव किनाऱ्याला लावून आम्हाला नविन दया. जुनी नाव धोकादायक असते. कुठे रस्त्यामध्ये तुटली. अपघात झाला तर, तुम्ही म्हणता आमची नाव जुनी झाली आहे. आम्हाला नविन दया. याला वस्त्रही म्हणतात, नाव ही म्हणतात. मुले म्हणतात आम्हालाही असे (लक्ष्मी-नारायणासारखे) वस्त्र हवे आहेत.

बाबा म्हणतात-गोड गोड मुलांनो स्वर्गवासी बनू इच्छिता? प्रत्येक 5 हजार वर्षानंतर हे कपडे जुने होतात. नंतर नविन देत आहेत. हा आहे आसुरी चोला (शरीर) आत्मा पण आसुरी आहे. मनुष्य गरीब असेल तर कपडे पण गरीबीचे घालणार. साहुकार असेल तर कपडे ही साहुकारांसारखेच घालणार. यागोष्टी आता तुम्ही जाणत आहात. येथे तुम्हाला नशा चढतो की आम्ही कोणा समोर बसलो आहोत. सेंटरवर बसल्यावर तुम्हाला अशी जाणीव होणार नाही. येथे समोर असल्यावर खुशी होते कारण बाबा प्रत्यक्ष बसून समजावतात. तिथे कुणी समजावले तर बुध्दीयोग इकडे-तिकडे पळत राहतो. म्हणतात ना गोरख धंदयामध्ये फसलेले आहेत. वेळ कुठे भेटतो. मी तुम्हाला समजावत आहे. तुम्हीही समजता बाबा या मुखाद्वारे आम्हाला समजावत आहेत. या मुखाची ही किती महिमा आहे. गऊ मुखामधील अमृत पिण्यासाठी कुठे-कुठे धक्के खात राहतात. किती कष्टाने जातात. मनुष्य समजतच नाही की हे गऊमुख काय आहे किती मोठे समजदार लोकं तिथे जातात. यामध्ये फायदा काय? आणखीनच वेळ वाया जातो. बाबा म्हणतात हा सुर्यास्त वगैरे काय पाहणार. फायदा तर यात काहीच नाही. फायदा तर शिक्षणमध्ये आहे. गीतेमध्ये शिक्षण आहे ना. गितेमध्ये हठयोग वगैरे काहीच नाही. त्यामध्ये तर राजयोग आहे. तुम्ही येता राजाई घेण्यासाठी. तुम्हाला माहित आहे या आसुरी दुनियेमध्ये किती भांडणे-मारामारी आहेत. बाबा तर आम्हाला योगबळाद्वारे पावन बनवून विश्वाचे मालक बनवतात. देवींना हत्यार (शस्त्र) दिले आहेत परंतू हत्यार वगैरे असे काही नसते. कालीला पहा किती भयानक बनवले आहे. हे सर्व आपापल्या मनाच्या भ्रमानुसार बनविले आहे. देवी अशा 4-8 भुजा असणाऱ्या असतात का? तो सर्व भक्तीमार्ग आहे. जे बाप समजावतात. हे एक बेहदचे नाटक आहे. यामध्ये कोणाची निंदा वगैरे काही नाही. अनादि नाटक बनलेले आहे. यामध्ये काहीही फरक पडत नाही. ज्ञान कशाला म्हणतात. भक्ती कशाला म्हणतात हे बाबा समजावतात. भक्तीमार्ग तरीही तुम्हाला करावाच लागतो. असेच तुम्ही 84 चे चक्र लावत लावत खाली येणार, हे अनादि बनलेले खुप छान नाटक आहे, जे बाबा समजावतात. या नाटकाचे रहस्य समजल्यावर तुम्ही विश्वाचे मालक बनता. आश्चर्य आहे ना, भक्ती कशाप्रकारे चालते. ज्ञान कशाप्रकारे चालते, हा खेळ अनादी बनलेला आहे. यामध्ये काही बदल होऊ शकत नाही ते तर म्हणतात ब्रह्म तत्त्वामध्ये लीन झाला. ज्योती-ज्योतीमध्ये सामावली. ही संकल्पाची दुनिया आहे. ज्याला जे वाटते ते बोलत राहतात. हा तर पुर्वनियोजीत खेळ आहे. मनुष्य सिनेमा पाहुन येतात काय त्याला संकल्पाचा खेळ म्हणू शकतो. बाबा बसून समजावतात-मुलांनो हे बेहदचे नाटक आहे. जे हुबेहुब पुनवृत्त होते. बाबाच येऊन हे ज्ञान देतात, कारण तो ज्ञानांनी संपन्न आहे. मनुष्य सृष्टीचा बीजरुप आहे, चैतन्य आहे. त्यांच्याकडे सर्व ज्ञान आहे. मनुष्यांनी तर लाखों वर्षांचे आयुष्य दाखविले आहे. बाबा म्हणतात ऐवढे आयुष्य थोडेच असु शकते. सिनेमा लाखों वर्षांचा असेल तर कोणाच्या बुध्दीत बसणार नाही. तुम्ही तर सारे वर्णन करत असता. लाखों वर्षांची गोष्ट कशी वर्णन करणार. तर तो सर्व आहे भक्तीमार्ग. तुम्हीच भक्तीमार्गाचा भुमिका बजावली. अशाप्रकारे दु:ख भोगत-भोगत अंत आलेला आहे. सारे झाड जड अवस्थेला प्राप्त झालेले आहे. आता तिथे जायचे आहे, स्वत:ला हल्के बनवा. यांनीही हल्के केले ना. तर सर्व बंधन तुटून जातील. नाहीतर मुले, पैसा, कारखाने, ग्राहक, राजे, रजवाडे वगैरे आठवत राहतात. धंदा वगैरे सोडुन दिला तर मग आठवण कशी येणार. येथे तर सर्वकाही विसरायचे आहे. या सर्वांना विसरुन घर आणि राजधानीची आठवण करा. शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे. शांतीधाम वरुन पुन्हा आम्हाला येथे यायचे आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा. यालाच योग-अग्नी असे म्हटले जाते. हा राजयोग आहे ना तुम्ही राजऋषी आहात. ऋषी पवित्र राहणाऱ्यांना म्हटले जाते. तुम्ही पवित्र बनत आहात. राजाई प्राप्त करण्यासाठी. बाबाच तुम्हाला सर्व खरे सांगतात. तुम्हीही समजता हे नाटक आहे. सर्व कलाकार येथे जरुर असले पाहिजे. नंतर बाबा सर्वांना घेऊन जाणार ही ईश्वराची वरात आहे ना. तिथे बाबा आणि मुले राहतात नंतर येथे येतात, भुमिका वठविण्यासाठी. बाबा तर सदैव तिथेच राहतात. माझी आठवणच दु:खामध्ये करतात. तिथे मी काय करणार. तुम्हाला शांतीधाम, सुखधाममध्ये पाठविले बाकी काय पाहिजे. तुम्ही सुखधाममध्ये होते बाकी सर्व आत्मे शंतीधाममध्ये होते नंतर नंबरवार येत गेले. नाटक येऊन पुर्ण झाले बाबा म्हणतात मुलांनो आता टाळाटाळ करु नका. पावन तर जरुर बनायचे आहे. बाबा म्हणतात तीच नाटकानुसार भुमिका सुरु आहे. तुमच्यासाठी नाटकानुसार मी कल्प कल्प येतो. नविन दुनियेमध्ये आता जायचे आहे ना. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आता हे झाड जुने वठलेले आहे. आत्म्याला घरी परतायचे आहे म्हणून स्वत:ला सर्व बंधनापासून मुक्त करुन हल्के बनवायचे आहे. येथे सर्वकाही बुध्दीद्वारे विसरुन जायचं आहे.

2. अनादि नाटकाला बुध्दीमध्ये ठेवून कोणत्याही कलाकाराची निंदा करायची नाही. नाटकाचे रहस्य समजून विश्वाचे मालक बनायचे आहे.

वरदान:-
बुध्दीची साथ आणि सहयोगाच्या हाताद्वारे मौजचा अनुभव करणारे खुशनसीब आत्मा भव

ज्याप्रमाणे सहयोगाची निशाणी हातामध्ये हात दाखवला जातो. असे बाबांचे सदैव सहयोगी बनणे-हा आहे हातामध्ये हात आणि सदैव बुध्दीने सोबत राहणे अर्थात मनाची लगन एकामध्ये असावी. सदैव हिच स्मृती राहु दया कि ईश्वराच्या बागेमध्ये हातामध्ये हात देऊन सोबत-सोबत चाललो आहे. याद्वारे सदैव मनोरंजन कराल. सदा खुश आणि संपन्न राहाल. असे खुशनसीब आत्मे सदैव मौजचा अनुभव करत राहतात.

बोधवाक्य:-
आशिर्वादाचे खाते जमा करण्याचे साधन आहे, संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे...!