17-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, बाबांच्या आठवणी सोबत ज्ञान धनाने संपन्न बना, बुध्दि मध्ये संपूर्ण ज्ञान
फिरत राहिले पाहिजे, तर खूप आनंद होईल, सृष्टी चक्राच्या ज्ञानाने तुम्ही चक्रवर्ती
राजा बनाल”.
प्रश्न:-
कोणत्या
मुलांचे( मनुष्यांचे) प्रेम बाबांसोबत राहू शकत नाही?
उत्तर:-
जे रौरव नरकामध्ये राहणाऱ्या विकारी सोबत प्रेम करतात, अशा मनुष्यांचे प्रेम
बाबांवर होऊ शकत नाही. तुम्हा मुलांनी बाबांना ओळखले आहे, त्यामुळे तुमचे प्रेम
बाबांवर आहे.
प्रश्न:-
कोणालासतयुगामध्ये येण्याचा हुकुम नाही?
उत्तर:-
बाबांना सुद्धा सतयुगामध्ये यायचे नाही, तर तेथे मृत्यू सुद्धा येत नाही. जसे
रावणाला सतयुगामध्ये येण्याचा हुकुम नाही. बाबा म्हणतात,मुलांनो मला सुद्धा
सतयुगामध्ये येण्याचा हुकुम नाही. बाबा तुम्हाला सुखाधामच्या लायक बनवून घरी निघून
जातात, त्यांनासुद्धा मर्यादा मिळालेल्या आहेत.
ओम शांती।
आत्मिक पिता बसून आत्मिक मुलांना समजवत आहे. आत्मिक मुलांनो आठवणीच्या यात्रेमध्ये
बसला आहात का? मनामध्ये हे ज्ञान आहे ना, की आम्ही आत्मा आठवणीच्या यात्रेमध्ये
आहोत. यात्रा अक्षर जरूर मनामध्ये यायला पाहिजे. जसे ते लोक यात्रा करतात, हरिद्वार,
अमरनाथ मध्ये जाण्याची. यात्रा पूर्ण केली आणि परत येतात. येथे तुम्हाला मुलांच्या
बुद्धी मध्ये आहे, आम्ही शांतीधाम जातो. बाबांनी येऊन हात पकडलेला आहे. हात धरून
घेऊन जातात. असे म्हणतात पण, हात धरा…कारण विषय सागरामध्ये पडले आहात. आता तुम्ही
बाबांची आठवण करा आणि घरची आठवण करा. मनामध्ये यायला पाहिजे आम्हीजात आहोत. यामध्ये
तोंडाने काही बोलायचे नाही. आतमध्ये फक्त ही आठवण राहिले पाहिजे, बाबा आलेले आहेत
घेऊन जाण्यासाठी. आठवणीच्या यात्रेमध्ये जरूर राहायचे आहे. आठवणीच्या यात्रेने तुमचे
पाप नष्ट होतील, तेव्हाच परत त्या लक्ष पर्यंत पोहचाल. किती स्पष्ट बाबा समजवितात.
जसे लहान मुलांना समजविले जाते. नेहमी बुद्धीमध्ये असावे की, आपण बाबांची आठवण करत
आहोत. बाबांचे काम आहे, पवित्र बनवून, पवित्र दुनियेमध्ये घेऊन जाणे. मुलांना घेऊन
जातात. आत्म्यालाच यात्रा करायची आहे. घरी पोहचाल तर बाबांचे कार्य पूर्ण होईल. बाबा
येतातच पतितांपासून पवित्र बनवून घरी घेऊन जाण्यासाठी. शिक्षण तर येथेच शिकवितात.
खुशाल बाहेर फिरा, कोणते पण कार्य करा, बुद्धीमध्ये हे आठवणीत राहिले पाहिजे. योग
अक्षरांमध्ये यात्रा सिद्ध होत नाही. योग संन्यास्यांचा आहे. ती सर्व मनुष्यांची मत
आहे. अर्धा कल्प तुम्ही मनुष्य मतावर चालता. अर्धा कल्प दैवी मतावर चालत होते. आता
तुम्हाला ईश्वरीय मत मिळाली. योग अक्षर म्हणू नका, आठवणीची यात्रा म्हणा. आत्म्याला
यात्रा करायची आहे. ती असते शारीरिक यात्रा, शरीरासोबत जातात. यामध्ये तर शरीराचे
काम नाही. आत्म्याला माहित आहे, आम्हा आत्म्यांचे ते गोड घर आहे. बाबा आम्हाला
ज्ञान देत आहेत, ज्यामुळे आम्ही पवित्र बनू. आठवण करता-करता तमोप्रधान पासून
सतोप्रधान बनायचे आहे. ही यात्रा आहे. आम्ही बाबांच्या आठवणी मध्ये बसतो, कारण
बाबांच्या जवळच, घरी जायचे आहे. बाबा येतातच पवित्र बनविण्यासाठी. तर मग पवित्र
दुनियेमध्ये जायचेच आहे. बाबा पवित्र बनवितात, परत नंबरानुसार पुरुषार्था अनुसार
तुम्ही पवित्र दुनियेमध्ये जाल. हे ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. आम्ही
आठवणीच्या यात्रेमध्ये आहोत. आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये परत यायचे नाही. बाबांचे
काम आहे आम्हाला घरापर्यंत पोहचविणे. बाबा रस्ता सांगतात, आता तुम्ही तर
मृत्यूलोकांमध्ये आहात. परत अमरलोक, नवीन दुनियेमध्ये असाल. बाबा लायक बनवूनच
सोडतात. सुखामध्ये बाबा घेऊन नाही जाणार. त्यांची मर्यादा असते घरापर्यंत घेऊन जाणे.
हे संपूर्ण ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. फक्त बाबांना आठवण करायची नाही, सोबत
ज्ञानसुद्धा पाहिजे. ज्ञानाने तुम्ही धन कमविता. या सृष्टी चक्राच्या ज्ञानाने
तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. बुद्धीमध्ये हे ज्ञान आहे, यामध्ये चक्र लावलेल आहे.
परत आम्ही घरी जाऊ, पुन्हा नव्याने चक्र सुरू होईल. हे संपूर्ण ज्ञान बुद्धीमध्ये
राहिल,तर खुशीचा पारा चढेल. बाबांना सुद्धा आठवण करायची आहे, शांतीधाम, सुखधामला पण
आठवण करायची आहे. ८४ च्या चक्राची जर आठवण केली नाही, तर चक्रवर्ती राजा कसे बनाल?
फक्त एकालाच आठवण करणे, हे तर संन्यास्यांचे काम आहे, कारण ते बाबांना जाणत नाहीत.
ब्रह्मालाच आठवण करतात. बाबा तर चांगल्या रीतीने मुलांना समजावितात. आठवण
करता-करताच तुमचे पाप नष्ट होणार आहे. प्रथम तर घरी जायचे आहे, ही आहे आत्मिक यात्रा.
गायन पण आहे ना, चहूबाजूला फिरलो, परंतु नेहमी दूर राहिलो...म्हणजे बाबांपासून दूर
राहिलो. ज्या बाबांमुळे बेहदचा वारसा मिळतो, त्यांना तर ओळखतच नाही. किती चक्र लावले
आहेत. प्रत्येक वर्षी कितीतरी यात्रा करतात. पैसे खूप असतात, तर यात्रेची आवड असते.
ही तर तुमची, आठवणीची यात्रा आहे. तुमच्यासाठी नवीन दुनिया बनेल, परत तर नवीन
दुनियेमध्ये येणार आहात, ज्याला अमरलोक म्हणले जाते. तेथे काळ नाही, जे कोणाला घेऊन
जाईल. काळाला आदेश नाही, नवीन दुनियेमध्ये येण्याचा. रावणाची तर ही जुनी दुनिया आहे.
तुम्ही पण येथेच बोलविता. बाबा म्हणतात, मी जुन्या दुनियेत, जुन्या शरीरात येतो.
मलासुद्धा नवीन दुनियेमध्ये येण्याचा आदेश नाही. मी तर पतितांनाच पवित्र
बनविण्यासाठी येतो. तुम्ही पवित्र बनून, परत दुसऱ्यांना सुद्धा पवित्र बनविता.
संन्यासी तर सोडून जातात. एकदम निघून जातात. माहीतच पडत नाही कि कोठे गेले, कारण
पोशाख बदलून टाकतात. जसे अभिनेते रूप बदलतात. कधी पुरुषा पासून स्त्री बनतात,कधी
स्त्रीपासून पुरुष बनतात. हे सुद्धा रूप बदलतात. सतयुगामध्ये अशा गोष्टी नसतात.
बाबा म्हणतात, मी येतो नवीन दुनिया बनविण्यासाठी. अर्धा कल्प तुम्ही मुलं राज्य करत
होते, परत नाटकाच्या नियमानुसार द्वापार सुरू होतो, देवता वाममार्ग मध्ये जातात,
त्यांचे अशुद्ध चित्र सुद्धा जगन्नाथ पुरी मध्ये आहेत. जगन्नाथाचे मंदिर आहे. असे
तर त्यांची राजधानी होती, जे स्वतः विश्वाचे मालक होते. ते परत मंदिरामध्ये जाऊन
बंद झाले, त्यांना काळे दाखवितात. या जगन्नाथाच्या मंदिरावर तुम्ही समजाऊ शकता.
दुसरे कोणी याचा अर्थ समजत नाहीत. देवताच पूज्य पासून पुजारी बनतात. ते तर लोक
प्रत्येक गोष्टी मध्ये ईश्वरासाठी म्हणतात, तुम्हीच पूज्य, तुम्हीच पुजारी. तुम्हीच
सुख देतात, तुम्हीच दुःख देतात. बाबा म्हणतात मी तर कोणाला दुःख देत नाही. हे तर
समजण्याची गोष्ट आहे. मुल झालं तर आनंद होतो, मुलं मेलं तर रडतात. म्हणतात ईश्वराने
दुःख दिले. अरे, हे अल्प काळाचे सुख-दुःख, तुम्हाला रावण राज्यांमध्ये मिळते. माझ्या
राज्यांमध्ये दुःखाची गोष्टच होत नाही. त्याला अमर लोक म्हणले जाते. याचे नावच आहे
मृत्युलोक, अचानक मृत्यू होतो. तेथे तर खूप आनंद साजरा करतात. आयुष्य सुद्धा मोठे
असते. मोठे आयुष्य दीडशे वर्षाचे असते. येथेसुद्धा कधीकधी असे कोणाचे असते, परंतु
येथे तर स्वर्ग नाही. कोणी शरीराला खूप सांभाळतात, तर आयुष्य मोठे होते. परत मुले
पण किती होतात. परिवार मोठा होत जातो, वृद्धी लवकर होते. जसे झाडाच्या फांद्या
निघतात, ५० फांद्या, आणि त्यातून ५०निघतील, किती वृद्धी होत जाते. तेथे सुद्धा असे
होते. त्यामुळे याचे उदाहरण वडाच्या झाडाचे दिले जाते. संपूर्ण झाड उभे आहे, खोड
नाही. येथे सुद्धा आदी सनातन देवी देवता धर्माचे खोड नाही. कोणाला माहीतच नाही देवता
केव्हा होते. ते तर लाखो वर्ष म्हणतात, पूर्वी तुम्ही कधी विचार पण करत नव्हते. बाबा
येऊन, यासर्व गोष्टी समजावितात. तुम्ही आता बाबांना ओळखले आहे, आणि संपूर्ण
नाटकाच्या आदी- मध्य-अंत, कालावधी इत्यादी, सर्वकाही समजले आहे. नवीन दुनियेपासून
जुनी, जुन्या पासून नवी कशी बनते, हे कोणी जाणत नाही. आता तुम्ही मुलं आठवणीच्या
यात्रेमध्ये बसला आहात. यात्रा तर तुमची नित्य चालते. बाहेर जा -फिरा परंतु या
आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. ही आहे आत्मिक यात्रा. तुम्ही जाणता भक्ती मार्गामध्ये
आम्ही सुद्धा त्या यात्रेमध्ये जात होतो. खूप वेळा यात्रा केली असेल,जे पक्के भक्त
असतील. बाबांनी समजाविले आहे, एक शिवबाबांची भक्ती करणे, ही अव्यभिचारी भक्ती आहे.
नंतर देवतांची होते, नंतर पाच तत्वांची भक्ती करतात. देवतांची भक्ती तरी सुद्धा ठीक
आहे. कारण त्यांचे शरीर तरीही सतोप्रधान आहे. मनुष्यांचे शरीर तर पतित आहे. ते तर
पवित्र आहेत. नंतर द्वापर पासून सर्व पतित बनले, खाली उतरत आले. सीडी चे चित्र
सुद्धा तुमच्यासाठी खूप चांगले आहे, समजविण्यासाठी. जिन्नची गोष्ट सांगतात ना. ही
सर्व उदाहरण इत्यादी या वेळेचे आहेत. सर्व तुमच्यावरच बनलेले आहे. भ्रमरी चे उदाहरण
सुद्धा तुमचे आहे, जे किड्यांना आपल्यासारखे ब्राह्मण बनवितात. यावेळेचे सर्व
उदाहरण आहेत.
तुम्ही मुलं पूर्वी देहाची यात्रा करत होते. आता पुन्हा बाबांच्या द्वारे आत्मिक
यात्रा शिकतात. हे तर शिक्षण आहे. भक्तीमध्ये पाहा काय काय करतात. सर्वांच्या पुढे
जाऊन डोके टेकवितात, एकाच्याही कार्याला जाणत नाही. हिशोब केला जातो ना. सर्वात
जास्त जन्म कोण घेतात, नंतर कमी होत जातात. हे ज्ञान सुद्धा आता तुम्हाला मिळाले आहे.
तुम्ही समजता बरोबर स्वर्ग होता. भारतवासीची तर इतकी दगडासारखी बुद्धी बनली आहेत,
त्यांना विचारा स्वर्ग केव्हा होता तर लाखो वर्ष म्हणतील. आता तुम्ही जाणता आम्ही
विश्वाचे मालक होतो. किती सुखी होतो. आता परत आम्हाला गरीब पासून राजकुमार बनायचे
आहे. दुनिया नवीन पासून जुनी होते, तर बाबा म्हणतात, कष्ट करा. हे सुद्धा जाणता,
माया सारखी-सारखी विसरविते.
बाबा समजाविता बुद्धीमध्ये नेहमी मी हे आठवणीत ठेवा, आम्ही चाललो आहोत आमचा या
जुन्या दुनियेतून लंगर उठला आहे. नाव किना-याकडे जाणार आहे. गातात ना आमची नावेला
किनारी घेऊन जा. आता किनारी जाणार आहे. हे त्यांना माहीत नाही. तर मुख्य आहे,
आठवणीची यात्रा. बाबांसोबत वारसा सुद्धा आठवणीमध्ये यायला पाहिजे. मुलं मोठी होतात,
तर बाबांचा वारसा बुद्धी मध्ये राहतो. तुम्ही तर मोठे आहातच,आत्मा लगेच समजते, ही
गोष्ट तर बरोबर आहे. बेहदच्या बाबांचा वारसा स्वर्ग आहे. बाबा स्वर्गाची स्थापना
करतात. तर बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे. बाबा म्हणतात, पवित्र जरूर बनायचे आहे.
पवित्रते मुळेच भांडण होतात. ते तर एकदम जसे रौरव नरकामध्ये आहेत. अजूनच जास्त
विकारांमध्ये जात आहेत. त्यामुळे बाबांसोबत प्रेम होऊ शकत नाही. विनाश काले विपरीत
बुद्धी आहेत ना. बाबा येतातच प्रीत बुद्धी बनविण्यासाठी. खूप आहेत ज्यांची
थोडीसुद्धा प्रीत बुद्धी नाही, कधी बाबांना आठवण सुद्धा करत नाही. बाबा कष्ट तर
करवितात. हे सुद्धा जाणता सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी येथे स्थापन होत आहे.
सतयुग-त्रेतामध्ये कोणताच धर्म स्थापन होत नाही. राम कोणता धर्म स्थापन करत नाही.
हे तर स्थापना करणाऱ्या बाबाद्वारे हे बनतात. दुसरे धर्म स्थापक आणि बाबांच्या धर्म
स्थापनेमध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. बाबा येतातच संगमयुगामध्ये जेव्हा दुनियेला
बदलायचे आहे. बाबा म्हणतात, कल्प कल्प, कल्पाच्या संगमयुगामध्ये येतो त्यांनी परत
युगे युगे अक्षर चुकीचे लिहिले आहे. अर्धा कल्प भक्तिमार्ग पण चालणार आहे. तर बाबा
म्हणतात मुलांनो, या गोष्टींना विसरू नका. हे म्हणतात, बाबा आम्ही तुम्हाला विसरून
जातो. अरे, बाबांना तर जनावर पणविसरत नाही, तुम्ही का विसरून जाता? स्वतःला आत्मा
समजत नाही. देह-अभिमानी बनल्यानेच तुम्ही बाबांना विसरता. आता जसे बाबा समजाविता,
तसे तुम्हा मुलांना सुद्धा सवय लागली पाहिजेत. निर्भयतेने बोलले पाहिजे, असे नाही
मोठ्या लोकांच्या समोर तुम्ही गोंधळून जावे. तुम्ही कुमारीच मोठ्यामोठ्या विद्वान
पंडितांच्या समोर जाता, तर निडर होऊन समजवायचे आहे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1.
बुद्धीमध्ये नेहमी आठवण रहावी की आम्ही जात आहोत, आमच्या नावेचा लंगर या जुन्या
दुनियेतून उठला आहे आम्ही आत्मिक यात्रेमध्ये आहोत हीच यात्रा करायची आणि करावयाची
आहे.
2. कोणत्या पण मोठ्या लोकांच्या समोर निर्भयतेने बोलायचे आहे गोंधळून जायचे नाही
देही अभिमानी होऊन समजविण्याची सवय लावायची आहे.
वरदान:-
नेहमी हल्के
राहून बाबांच्या डोळ्यात समावलेली सहज योगी भव
संगमयुगावर जी आनंदाची
खान मिळते, ती दुसऱ्या कोणत्याच युगामध्ये मिळू शकत नाही. यावेळी बाबा आणि मुलांचे
मिलन आहे, वारसा आहे, वरदान आहे. वारसा किंवा वरदान दोन्हींमध्ये कष्ट नाही.
त्यामुळे तुमची उपाधी सहजयोगी आहे. बापदादा मुलांच्या कष्टाला पाहू शकत नाही, बाबा
म्हणतात, मुलांने तुमची सर्व ओझे बाबांना देऊन स्वतः हल्के होऊन जा.एवढे हलके बना,
जे बाबा आपल्या डोळ्यांवर बसवून सोबत घेऊन जातील. बाबांसोबत, स्नेहाची निशाणी आहे.
नेहमी हल्के राहून बाबांच्या डोळ्यांमध्ये सामावून जाणे
बोधवाक्य:-
नकारात्मक
विचार करण्याचा रस्ता बंद करा, तर सफलता स्वरूप बनून जाल