23-12-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड मुलांनो, पावलो पावली, श्रीमतावर चालणे हाच चांगला चार्ट आहे, ज्या मुलांना
श्रीमताची कदर आहे, ते मुरली जरुर वाचतील....!!!
प्रश्न:-
तुम्हा
ईश्वरीय मुलांना कोणता प्रश्न, कोणी पण विचारु शकत नाही?
उत्तर:-
तुम्हा मुलांना
असे कोणी ही विचारु शकत नाही की, तुम्ही आनंदी खुश आहात? कारण तुम्ही म्हणता कि,
आम्ही सदैव आनंदी आहोत. काळजी होती दूर ब्रह्ममध्ये राहणाऱ्या बाबाची, ते मिळाले
आहेत त्यामुळे आता कोणत्या गोष्टीची काळजी नाही. बाबा जेव्हा पाहतात कि, याचे वर
मायेचा आघात झाला आहे, त्यामुळे विचारतात कि मुलांनो, आनंदी खुशीत आहात?
ओम शांती।
बाबा समजावतात कि, मुलांच्या बुध्दीमध्ये हे जरुर आहे कि, बाबा पिता पण आहेत,
शिक्षक आणि गुरु पण आहेत. अशा आठवणीत जरुर राहतात. अशी आठवण कोणी शिकवू शकत नाही.
कल्प कल्प बाबाच येऊन शिकवत आहेत. ते ज्ञानाचे सागर पतित पावन आहेत. हे आता समजावले
जाते, जेव्हा ज्ञानाचा तिसरा डोळा, दिव्य बुध्दी मिळाली आहे. जरी मुले समजतात परंतू
बाबांचीच आठवण विसरतात, मग शिक्षक, गुरु कसे आठवणीत येईल. माया फारच प्रबळ आहे, जे
बाबाच्या तिन्ही रुपालाच विसरुन टाकते. असे म्हणतात आम्ही हार खाल्ली. तसे तर पावला
पावलामध्ये पद्म आहेत, परंतू हार खाल्ली तर पद्म कसे मिळतील? देवतांनाचा पद्माची
निशाणी देत आहेत. हे ईश्वराचे शिक्षण आहे. मनुष्याचे शिक्षण असे कधी असू शकत नाही.
जरी देवतांची महिमा करतात, तरी पण उंच ते उंच आहेत एक बाबा. बाकीच्यांची महिमा काय
आहे? आज गधाई उद्या राजाई. आता तुम्ही पुरुषार्थ करुन असे बनत आहात. तुम्ही जाणता
पण कि या पुरुषार्थात नापास फार होत आहेत. ज्ञान तर फार सोपे आहे, तरी पण फारच थोडे
पास होत आहेत. का? माया वारंवार विसरुन टाकते. बाबा सांगतात कि, आपला चार्ट ठेवा,
परंतू लिहत नाहीत. किती बसून लिहतील, जरी लिहला तरी, कधी वर, कधी खाली. चांगला
चार्ट त्यांचा आहे, जे पावलो पावली श्रीमतावर चालतात, बाबा तर समजतात कि, या
बिचाऱ्यांना लाज वाटत असेल. नाही तर श्रीमत अंमलात आणली पाहिजे. 1-2 टक्के
मुश्कीलीने लिहतात. श्रीमताची एवढी कदर नाही. मुरली मिळते तरी पण वाचत नाहीत.
त्यांचे मनाला जरुर वाटत असेल कि, बाबा सांगतात तर खरे, आम्ही मुरली वाचत नाही तर
इतरांना काय शिकवू?
बाबा सांगतात कि, माझी आठवण करा तर स्वर्गाचे मालक बनाल, यामध्ये बाबा पण येतात,
शिकविणारे शिक्षक पण येतात. सद्गती दाता पण येतात, थोड्या थोड्या शब्दात सारे ज्ञान
येते. येथे तुम्ही येतातच या गोष्टीची पुनरावृत्ती करण्यासाठी, बाबा पण हेच समजावतता
कि, कारण तुम्ही स्वत: म्हणता कि, आम्ही विसरुन जातो, त्यामुळे येथे येतो,
पुनरावृत्ती करण्यासाठी. जरी कोणी करत असेल तरी पण पुनरावृत्ती होत नाही. नशीबात
नसेल, तर पुरुषार्थ पण काय करतील, पुरुषार्थ करविणारे तर एकच बाबा आहेत. यात कोणाची
खास खातरी पण होत नाही. लौकिक शिक्षणात तर जादा शिकण्यासाठी शिक्षक नेमतात. येथे तर
नशीब बनविण्यासाठी सर्वांना एकरस शिकविले जाते. एक एकेला वेगवेगळे कोठपर्यात शिकवावे,
किती पुष्कळ मुले आहेत. लौकिक शिक्षणामध्ये कोण्या मोठ्या मनुष्याचा मुलगा असेल तर
त्यांचे विनंती नुसार, त्याला जादा पण शिकवितात. शिक्षक ओळखतात कि हा मंद बुध्दी आहे,
त्यामुळे त्याला शिकवून शिष्यवृत्ती घेण्यालायक बनवितात. येथे हे शिक्षक तसे करत
नाहीत. येथे तर सर्वांना एक सारखे शिकवत आहेत. वेगळा जादा पुरुषार्थ म्हणजे शिक्षक
काही कृपा करतात. त्यासाठी पैसे पण घेतात, वेगळी वेळ देवून शिकवतात, ज्यामुळे ते
जास्त शिकून हुशार होतात. शिवबाबा तर सर्वांना एकच मंत्र देतात, मनमनाभव. बस,
बाबांचे एक पतित पावन आहेत, त्यांच्यात आठवणीने आम्ही पावन बनू. हे तुमच्या मुलाचे
हातात आहे, जेवढी आठवण कराल, तेवढे पावन बनाल, सारे अवलंबून स्वत:चे पुरुषार्थावर
आहे. ते तर तीर्थावर यात्रा करण्यासाठी जातात. एकमेकाला पाहून पण जातात. तुम्ही
मुलांनी पण फार यात्रा केल्या आहेत, तरी पण काय झाले. खालीच उतरत आले आहात. यात्रा
कशासाठी आहे, यापासून काय मिळेल, काही पण माहित नव्हते. आता तुमची आहे आठवणीची
यात्रा अक्षरच एक आहे-मनमनाभव. ही यात्रा तुमची अनादि आहे. ते पण म्हणतात कि, आम्ही
ही यात्रा अनादि काळापासून करत आलो आहोत. आता तुम्ही ज्ञान सहित म्हणता कि, आम्ही
कल्प कल्प ही यात्रा करत आहे. ही यात्रा स्वत: बाबा येऊन शिकवत आहेत. त्या
यात्रेमध्ये किती धक्के खातात. किती गोंधळ असतो. ही यात्रा आहे अगदी शांतीची. एका
बाबाचीच आठवण करावयाची आहे. याद्वारेच पावन बनायचे आहे. तुम्हाला बाबांनी ही खरी खरी
आत्मिक यात्रा शिकविली आहे. त्या यात्रा तर तुम्ही जन्मो-जन्मी करतच आलात, तरी पण
गातात कि, चोहीकडे लावल्या फेऱ्या---तरी पण भगवानापासून दूरच राहिलो. यात्रेवरुन
आल्यावर मग विकारामध्ये गेले तर काय फायदा. आता तुम्ही मुले जाणता कि, हे आहे
पुरुषोत्तम संगमयुग, ज्यावेळी बाबा येतात. एके दिवशी सर्व जाणतील कि, बाबा आले आहेत.
शेवटी भगवान मिळेल कसा? हे तर कोणी पण ओळखत नाही. कोणी तर समजतात कि, कुत्र्या
मांजरामध्ये भेटेल. कामे याद्वारे भगवान मिळेल? किती खोटे आहे. खोटेच खाणे, खोटेच
पिणे, खोटीच रात्र घालविणे, त्यामुळे हे आहेच खोटे खंड, खरा खंड स्वर्गाला म्हटले
जाते. भारतच स्वर्ग होता. स्वर्गामध्ये सर्व भारतवासी होते, आज तेच भारतवासी नर्कात
आहेत. हे तर तुम्ही गोड गोड मुले जाणतात कि, आम्ही बाबांकडून श्रीमत घेऊन भारताला
परत स्वर्ग बनवत आहोत. त्यावेळी भारतामध्ये इतर कोणीच असत नाही. सारे विश्व पवित्र
बनून जाते. आता तर अनेक धर्म आहेत. बाबा साऱ्या झाडाचे ज्ञान देत आहेत. तुम्हाला
परत आठवण देत आहेत, तुम्हीच देवता होते, मग वैश्य, शुद्र बनलात. आता तुम्ही
ब्राह्मण बनले आहात. असे शब्द कधी कोणते सन्यासी उदासी, विद्वानांकडून ऐकले आहेत?
आम्हीच होतोचा अर्थ बाबा किती सोपे करुन सांगत आहेत. आम्ही ते म्हणजे मी आत्मा आहे,
आम्ही आत्मे अस असे चक्र लावत आहे. ते तर म्हणतात कि, आम्ही आत्माच परमात्मा आहोत,
आणि परमात्माच तो आत्मा आहे. एक पण नाही ज्याला आम्ही आहोत चा अर्थ माहित आहे. बाबा
सांगतात कि, हा जो आम्ही ते आहोत चा मंत्र आहे, नेहमी बुध्दीत ठेवला पाहिजे. नाही
तर चक्रवर्ती राजा कसे बनू. ते तर 84 चा अर्थ पण समजत नाहीत. भारताचेच उत्थान आणि
पतन गायले जात,सतोप्रधान, सतो, रजो, तमो, सुर्यवंशी, चंद्रवंशी.
आता तुम्हा मुलांना सर्व काही माहित झाले आहे. एक बाबालाच बीजरुप ज्ञानाचा सागर
म्हटले जाते. ते या सृष्टी चक्रात येत नाहीत. असे नाही की आम्ही आत्मेच परमात्मा
बनतो. नाही, बाबा त्यांचेसारखे ज्ञानसंपन्न बनवत आहेत. स्वत: सारखे ईश्वर बनवत
नाहीत, या गोष्टीला चांगले प्रकारे समजले पाहिजे, तेव्हाच बुध्दीमध्ये चक्र चांगले
फिरेल. तुम्ही बुध्दीद्वारे समजू शकता कि, आम्ही कसे 84 चे चक्रामध्ये येतो. यात
वेळ, वर्ण, वंशावळी सर्व येते. या ज्ञानानेच उंच ते उंच बनत आहोत. ज्ञान असेल तर
इतरांना पण दयाल. त्या शाळेमध्ये जेव्हा परीक्षा असते तेव्हा प्रश्नावली तयार करतात.
प्रश्नावली विलायत मधून येते. जे विलायत मध्ये शिकतात, त्यांचे मध्ये पण कोण मोठा
शिक्षण मंत्री असेल तर तपासणी करत असेल. येथे तुमचे पेपरची कोण तपासणी करेल? तुम्ही
स्वत:च कराल. स्वत: जे पाहिजे ते बना. शिकून जे पद पाहिजे ते बाबांकडून दया. जेवढी
बाबाची आठवण कराल. दुसऱ्याची सेवा कराल, तेवढेच फळ मिळेल. त्यांना सेवा करण्याची
काळजी असते कि, राजधानी स्थापन होत आहे, तर प्रजा पण पाहिजे ना. तेथे वजीर इत्यादीची
गरज राहत नाही. येथे तर जेव्हा अक्कल कमी होते तेव्हा मंत्र्याची गरज भासते. येथे
बाबा जवळ पण मत घेण्यासाठी येतात, बाबा पैसे आहेत, काय करु? धंदा कसा करु? बाबा
सांगतात कि, या दुनियेतील धंदे इत्यांदीच्या गोष्टी येथे आणू नका. परंतू, कोणी उदास
झाला असेल, तर थोडा फार आधार देण्यासाठी सांगतो. परंतू हा काही माझा धंदा नाही. माझा
धंदा आहे तुम्हाला पतितापासून पावन बनवून. विश्वाचा मालक बनविण्याचा. तुम्हाला
बाबांकडून नेहमी श्रीमत घेत राहावयाचे आहे. आता तर सर्वांची आहे आसुरी मत. तेथे तर
सुखधाम आहे. तेथे कधीच असे विचारत नाहीत कि, समाधानी आनंदी आहात? तब्येत ठीक आहे?
असे शब्द येथेच विचारले जातात. तिथे असे शब्द बोलतच नाहीत. दु:खधामातील असे शब्दच
नाहीत. परंतू बाबा जाणतता कि, मुलामध्ये माया प्रवेश करते त्यामुळे बाबाला विचारावे
लागते कि, ठीक ठाक समाधानी आनंदात आहात? मनुष्य येथील अक्षरांना समजू शकत नाहीत.
कोणी मनुष्य विचारेल तर म्हणू शकता कि, आम्ही ईश्वराची मुले आहोत, आमहाला काय
सुखाच्या गोष्टी विचारता? कळाजी होती दूर ब्रह्ममध्ये राहणाऱ्या बाबांची, आता ते
भेटले आहेत, आत काय काळजी करावयाची. हे नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे. आम्ही कोणाची
मुले आहोत, याचे पण बुध्दीत ज्ञान आहे. जेव्हा आम्ही पावन बनू, मग लडाई सुरु होईल.
तुम्हाला विचारतील जरुर. तुम्ही म्हणाल आम्ही तर नेहमीच समाधानी आहोत. आजारी जरी
असले तरी समाधानी आहोत. बाबांच्या आठवणीत असाल तर स्वर्गापेक्षा पण येथे जास्त
समाधानी आहोत. जेव्हा कि स्वर्गाची बादशाही देणारा बाबा मिळाला आहे. आम्हाला किती
लायक बनवित आहेत, मग आम्हाला काय चिंता आहे. ईश्वराच्या मुलांना कोणत्या गोष्टीची
चिंता. तेथे देवतांना पण चिंता नसते. देवतांपेक्षा उंच आहे ईश्वर. मग ईश्वराचे
मुलाला कोणती चिंता असू शकते. बाबा आम्हाला शिकवितात. बाबा आमचे शिक्षक, सतगुरु
आहेत. बाबा आमचे डोक्यावर मुकुट ठेवतता. याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्राउन प्रिन्स.
पित्याचा मुकुट मुलगा घालतो. तुम्ही समजता कि सतयुगामध्ये सुखच सुख आहे.
प्रत्यक्षात ते सुख तेव्हा प्राप्त होईल, जेव्हा तेथे जाल. ते तर तुम्हीच जाणता.
सतयुगामध्ये काय असते, हे शरीर सोडून आम्ही कोठे जावू. आता तुम्हाला प्रत्यक्षात
बाबा शिकवत आहेत. तुम्ही जाणता कि खरोखर आम्ही स्वर्गात जात आहोत. ते जे म्हणतात कि
अमूक स्वर्गात गेला, परंतू त्यांना हे माहित नाही कि स्वर्ग आणि नरक कोणाला म्हटले
जाते. कल्पाचे आयुष्याचे लाखो वर्ष लिहले आहे. जन्मोजन्मी असले ज्ञान ऐकून ऐकून खाली
आले आहेत. आता तुमच्या बुध्दीत आहे कि, आम्ही कोठे होतो आणि कोठे येऊन पडलो आहे.
सतयुगापासून खालीच येत राहिले. आता आम्ही या संगमयुगात येऊन पोहचलो आहे. कल्प कल्प
बाबा येतात शिकविण्यासाठी. बाबाजवळ तुम्ही राहता ना. हेच आमचे खरे खुरे सतगुरु आहेत,
जे मुक्ती जीवन मुक्तीचा रस्ता सांगत आहेत. जसे ब्रह्मा बाबा पण शिकतात, तसे त्यांना
पाहून, तुम्ही मुले पण शिकत आहात. पावलो पावली सावधानी ठेवावयाची आहे. मनाने वाचेने,
कर्माने फार शुध्द राहायचे आहे. आत कोणता पण अवगुण नको, बाबाला वारंवार मुले विसरुन
जातात. बाबाला विसरल्याने बाबाची शिकवण पण विसरुन जातात. आम्ही विद्यार्थी आहोत हे
पण विसरुन जातात. आहे फार सोपे. बाबाच्या आठवणीतच कमाल आहे. अशी कमाल आणखीन कोणी पण,
पिता शिकवू शकत नाही. या कमालीद्वारेच तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनता.
तुम्ही मुले जाणता कि, शिवबाबांनी ब्रह्मा बाबाद्वारे आदि सनातून देवी देवता धर्माची
स्थापना केली आहे, जो धर्म सतयुग आणि त्रेतायुग आर्धाकल्प चालतो. नंतर दुसरे
धर्मातील, वाढत जातात. जसे क्राइस्ट आले, प्रथम ख्रिश्चन फार थोडे होते. जेव्हा फार
होतात, मग राजाई करतात. ख्रिश्चन धर्म पर्यंत आहे. वृध्दी होत राहते. ते जाणतात कि,
क्राइस्टद्वारे आम्ही ख्रिश्चन बनलो आहोत. आजपासून 2 हजार वर्षापुर्वी क्राइस्ट आला
होता. आता त्यांची वृध्दी होत आहे. ख्रिश्चन म्हणतात आम्ही क्राइस्टचे आहोत. प्रथम
एक क्राइस्ट आला, मग त्यांचा धर्म स्थापन होत आहे, वृध्दी होत राहते. एकापासून दुसरा,
दोघापासून चार----मग अशी वृध्दी होत जात आहे. आता पहा ख्रिश्चनांचे झाड किती झाले
आहे. पाया आहे देवी देवता घराणे, त्यामुळे ब्रह्माला ग्रेट ग्रेट ग्रॅण्ड फादर (पुर्वज)
म्हटले जाते. परंतू भारतवासी हे विसरले आहे कि, आम्ही परमपिता परमात्मा शिवाची
प्रत्यक्ष मुले आहोत. ख्रिश्चन पण समजतात कि, आदि देव होऊन गेले आहेत, ज्यांची हे
मनुष्य वंशावली आहेत. बाकी ते मानतात आपले क्राइस्टलाच,ख्रिस्ताला, बुध्दाला पिता
समजतात. वंशावल आहे ना. जसे ख्रिस्ताचे स्मृती स्थळ ख्रिश्चन देशात आहेत. तशी तुम्हा
मुलांना येथे तपस्या केली, तेव्हा तुमचे स्मृती स्थळ पण येथे (आबू मध्ये) आहे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपुर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. मृतशांतची
खरी खरी आत्मिक यात्रा करावयाची आहे. आम्हीच देवता होतोचा, मंत्र नेहमी आठवणीत
ठेवायचा आहे, तेव्हा चक्रवर्ती राजा बनाल.
2. मनाने, वाचेने, कर्माने फार शुध्द राहावयाचे आहे. आत कोणती पण अशुध्दता नसावी.
पावलो पावली सावधान राहावयाचे आहे. श्रीमताची कदर ठेवावयाची आहे.
वरदान:-
बाबा शब्दाच्या
किल्लीने, सर्व खजाने प्राप्त करणारे भाग्यवान आत्मा भव :-
जरी इतर
कोणत्या पण ज्ञानाचे विस्ताराला जाणत नाहीत, किंवा सांगू शकत नाहीत, परंतू एक शब्द
बाबा मनातून म्हणणे, आणि मनापासून इतरांना सांगितला तर विशेष आत्मा बनता,
दुनियेसमोर महान आत्म्याच्या स्वरुपात गायन योग्य बनतात. कारण एक बाबा शब्दच सर्व
खजान्याची वा भाग्याची किल्ली आहे. किल्ली लावण्याची विधी आहे, ह्दयापासून ओळखणे आणि
मानणे. ह्दयापासून बाबा म्हणा, तर खजाने नेहमी हजर आहेत.
बोधवाक्य:-
बापदादाशी
स्नेह आहे तर स्नेहामध्ये जुन्या जगाचा त्याग करुन टाका.