26-10-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बुध्दीला शुध्द बनवायचे आहे तर एका बाबाच्या आठवणीत राहा, आठवणीनेच आत्मा स्वच्छ बनत जाईल...”

प्रश्न:-
वर्तमान वेळी मनुष्य आपला वेळ आणि पैसे, व्यर्थ कसे घालवत आहेत?

उत्तर:-
जेव्हा कोणी शरीर सोडतात तर त्यांचे मागे किती पैसा इ. खर्च करत राहत आहेत. जेव्हा शरीर सोडुन निघून गेले तर त्यांची काहीच किंमत राहत नाही, त्यामुळे त्यांचे मागे जे काही करतात, त्यात आपला वेळ आणि पैसे वाया घालतात.

ओम शांती।
आत्मिक पिता, आत्मिक मुलांना समजावत आहेत, हे पण असे म्हणतात ना, मग बाबा आहेत कि दादा आहेत. दादा पण म्हणतात कि, आत्मिक पिता तुम्हा मुलांना हे ज्ञान सांगत आहेत-भुतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळाचे. खरे तर सतयुगापासून कोण कोण आले, काय झाले, त्याचा इतिहास-भुगोल तर फार आहे. सतयुग त्रेताचा काही इतिहास-भुगोल नाही, इतर सर्वांचा इतिहास-भुगोल आहे, बाकी देवी देवतांना लाखो वर्ष अगोदर घेऊन गेले आहेत. ही आहेच बेहदची बेसमजी. तुम्ही पण बेहदच्या बेसमजी मध्ये होता. आता थोडे थोडे समजत आहेत. काही तर आता पर्यंत काहीच समजत नाहीत. पुष्कळ काही समजण्यासारखे आहे. बाबांनी आबूच्या महिमेवर समजावले आहे, यावर विचार केला पाहिजे. तुमच्या बुध्दीमध्ये आले पाहिजे, तुम्ही येथे बसले आहात. तुमचे स्मृतीस्थळ दिलवाडा मंदीर कधी बनविले आहे, किती वर्षानंतर बनले आहे. म्हणतात कि 1250 वर्ष झाली आहेत, तर बाकी किती वर्षे राहिली? 3750 वर्षे राहिली. तर त्यांनी पण आताची स्मृती आणि वैकुंठाची स्मृती बनविली आहे. मंदिराची पण स्पर्धा असते ना. एक दोघापेक्षा चांगले बनवावे. आता तर पैसेच कुठे आहेत जे बनवतील. पैसा तर फार होता, तर सोमनाथचे मंदीर किती मोठे बनविले आहे. आता तर बनवू शकत नाहीत. जरी आग्रा इ. ठिकाणी बनवितात परंतू ते सर्व आहे फालतू. मनुष्य तर अंधारात आहेत ना. जो पर्यंत बनवतील तोपर्यंत विनाश पण येईल. या गोष्टी कोणी पण जाणत नाही. तोडतात आणि बनवित राहतात. पैसे फुकटात येत राहतात. सर्व वाया जात राहते. वेळेचा अपव्यय, पैशाचा अपव्यय, शक्तीचा अपव्यय, कोणी मरते तर किती वेळ वाया घालवितात. आम्ही काही पण करत नाही. आत्मा तर निघून गेली, बाकी शरीर काय कामाचे. साप कातडी सोडून देतो, त्याची काय किंमत आहे काय. काही पण नाही. भक्तीमार्गात शरीराची किंमत आहे. जड चित्राची किती पूजा करतात. परंतू ते कधी आले, कसे आले. काही पण माहित नाही. याला म्हटले जाते भुतपुजा. पाच तत्त्वाची पुजा करत आहेत. समजा हे लक्ष्मी-नारायण स्वर्गामध्ये राज्य करत होते, बरं 150 वर्ष आयुष्य पुर्ण झाले, शरीर सोडले, बस. शरीर तर काही कामाचे राहिले नाही. त्यांची काय किंमत राहते. आत्मा निघून गेली, शरीर चांडाळाचे हाती देऊन टाकले, ते रिती रिवाजानूसार जाळून टाकतात. असे नाही त्याची माती घेऊन चोहोबाजूला पसरवतील, नांव करण्यासाठी. काही पण नाही. येथे तर किती करतात. ब्राह्मणाला खावू घालतात, हे करतात. तिथे असे काही असत नाही. शरीर तर काही कामाचे राहिले नाही. शरीराला जाळतात. बाकी चित्र राहते. ते पण तंतोतंत चित्र असत नाही. ही आदी देवाची दगडाची मुर्ती तंतोतंत थोडीच आहे. पुजा जेव्हा सुरु केली, त्यावेळच्या दगडाची आहे. मुळात जे होते, ते तर जळून नष्ट होते ना, मग भक्तीमार्गात हे काढले आहे. या गोष्टीवर पण विचार चालतो ना. आबूच्या महिमेला तर चांगल्या रितीने सिध्द करावयाचे आहे. तुम्ही पण येथे बसले आहात. येथेच बाबा साऱ्या विश्वाला नर्कापासून स्वर्ग बनवित आहेत, तर हेच सर्वांत उंच ते उंच तीर्थ आहे. आता एवढी भावना राहिली नाही, फक्त एक शिवामध्ये भावना आहे, कोठेही जावा, शिवाचे मंदीर जरुर आहे. अमरनाथला पण शिवाचेच आहे. असे म्हणतात कि, शंकराने पार्वतीला कथा सांगितली. तिथे तर कथेची गोष्टच नाही. मनुष्याला तर काहीच समज नाही. आता तुम्हाला समज आली आहे, पुर्वी माहित होते, काय?

आता बाबा आबूची किती महिमा करत आहेत. सर्व तीर्थामध्ये हे महान तीर्थ आहे. बाबा समजावतात तर फारच, परंतू जेव्हा अनन्य मुलांचे बुध्दीत बसेल, आता तर देहअभिमान फार आहे. ज्ञान तर पुष्कळ पाहिजे. अति शुध्दी आली पाहिजे. आता तर योग फारच मश्कीलीने कोणाचा लात आहे. योगाबरोबर मग ज्ञान पण पाहिजे. असे नाही फक्त योगामध्ये राहायचे आहे. योगासाठी ज्ञान जरुर पाहिजे. दिल्लीमध्ये ज्ञान-विज्ञान भवन नांव ठेवले आहे, परंतू त्याचा अर्थ काय आहे, हे समजतात थोडेच? ज्ञान-विज्ञान तर सेकंदाचे आहे. शांतीधाम, सुखधाम. परंतू मनुष्यामध्ये थोडी पण बुध्दी नाही. अर्थ तर सेकंदाचे आहे. शांतीधाम सुखधाम. परंतु मनुष्यामध्ये थोडी पण बुध्दी नाही. अर्थ थोडेच समजतात. चिन्मयानंद इ. किती मोठे मोठे सन्यासी आहेत, गीता सांगत आहेत, किती त्यांचे अनेक शिष्य आहेत. सर्वांत मोठा जगाचा गुरु तर एकच बाबा आहेत. बाप आणि शिक्षकापेक्षा मोठा गुरु असतो. स्त्री कधी दुसरा पति करत नाही, तर गुरु पण दुसरा केला नाही पाहिजे. एक गुरु केला, त्यांनेच सद्गती केली पाहिजे, मग इतर गुरु का? सतगुरु तर एकच बेहदचे बाबा आहेत. सर्वांची सद्गती करणारा आहे. परंतू या गोष्टीला पुष्कळ आहेत जे बिल्कुल समजत नाहीत. बाबांनी सांगितले आहे ही राजधानी स्थापन होत आहे, तर नंबरवार असतील ना. काही तर थोडे पण समजत नाहीत. नाटकात भुमिकाच तशी आहे. शिक्षक तर समजू शकतात. ज्या शरीराद्वारे समजावत आहेत, त्यांना पण माहित पडत असेल. हे तर गुळ जाणेल गुळाची पिशवी जाणेल. गुळ की गोथरी जाने. गुड शिवबाबाला म्हटले जाते, ते सर्वांच्या अवस्थेला जाणतात. प्रत्येकाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतात-कोण किती शिकत आहे, किती सेवा करतात. किती बाबांच्या सेवेत जीवन सफल करतात. असे नाही, या ब्रह्माने घरदार सोडले आहे, त्यामुळे लक्ष्मी-नारायण बनत आहेत. मेहनत करत आहेत ना. हे ज्ञान फार उंच आहे. कोणी जरी बाबांची अवज्ञा केली तर ते एकदम दगड बनून पडतात. बाबांनी सांगितले होते, ही इंद्रसभा आहे. शिवबाबा ज्ञान वर्षा करत आहेत. त्यांची अवज्ञा केली तर शास्त्रामध्ये लिहले आहे कि, पत्थरबुध्दी बनले, त्यामुळे बाबा सर्वांना लिहत राहतात. बरोबर तपासुन कोणाला घेऊन या. असे नाही, विकारी अपवित्र येथे येऊन बसेल. नाही तर मग घेऊन येणाऱ्या ब्रह्मणीवर दोष लागतो. असे कोणाला घेऊन येऊ नये. मोठी जबाबदारी आहे. फार उंच ते उंच बाबा आहेत. तुम्हाला विश्वाची बादशाही देत आहेत तर त्यांचा किती आदर केला पाहिजे. अनेकांना मित्र संबंधी इ. ची आठवण येते. बाबाची आठवण काहीच नाही. मनामध्ये घुटका खात राहतात. बाबा सांगतात कि, ही आहे आसुरी दुनिया आता दैवी दुनिया बनत आहे, आमचे मुख्य लक्ष्य हे आहे. हे लक्ष्मी नारायण बनायचे आहे. जी पण चित्रे आहेत, सर्वांच्या आत्मकथेला तुम्ही जाणत आहात. मनुष्यांना समजाविण्यासाठी किती मेहनत केली जाते. तुम्ही पण समजता कि, हा थोडा चांगला बुध्दीवान आहे. हे तर काही समजत नाही. तुम्हा मुलांमध्ये ज्यांनी जेवढे ज्ञान उचलले आहे. त्यानुसारच सेवा करत आहेत. मुख्य गोष्ट आहे गीतेच्या भगवानाची, सुर्यवंशी देवी देवतांचे हे एकच ग्रंथ आहे, वेगवेगळे नाही. ब्राह्मणांचे पण वेगळे नाही. या फार समजण्याच्या गोष्टी आहेत. या ज्ञानमार्गात पण चालता चालता जर विकारात गेला, तर ज्ञान वाहुन जाईल. फार चांगले चांगले जावून विकारी बनले, तर पत्थरबुध्दी झाले. यात मोठी समज पाहिजे. बाबा जे सांगत आहेत, त्याला उगारायचे आहे. येथे तर तुम्हाला फार सोपे आहे. काही गोरख धंदा, गोंधळ इ. नाही. बाहेर राहिल्याने धंदा इ. ची किती चिंता राहते. माया फार वादळ आणते. येथे तर काही गोरखधंदा नाही. एकांत फार आहे. बाबा तरी पण मुलांना पुरुषार्थ करवित राहतात. हे बाबा पण पुरुषार्थी आहेत. पुरुषार्थ करविणारे तर बाबा आहेत. यामध्ये विचार सागर मंथन करावे लागते. येथे तर बाबा मुलांबरोबर बसले आहेत. जे पुर्ण सहयोग देतात, त्यांनाच सेवाधारी म्हटले जाते. बाकी घुटका खाणारे तर नुकसान करतात, आणखीनच गैरसोय करतात, विघ्न घालतात. हे तरी जाणता कि, महाराजा, महाराणी बनले तर त्यांचे दास-दासी पण पाहिजेत. ते पण येथुनच येतील. सारा आधार शिक्षणावर आहे. या शरीराला पण खुशीने सोडावयाचे आहे. दु:खाची गोष्ट नाही. पुरुषार्थासाठी तर वेळ मिळाला आहे. ज्ञान सेकंदाचे आहे, बुध्दीमध्ये आहे, शिवबाबांकडून वारसा मिळत आहे. थोडे पण ज्ञान ऐकले, शिवबाबाची आठवण केली, तरी पण येऊ शकतात. प्रजा तर फार बनणार आहे, आमची राजधानी सुर्यवंशी-चंद्रवंशी येथे स्थापन होत आहे. बाबाचे बनून जर निंदा करतील तर फार बोझा चढेल. एकदम जसे रसातळाला जातील. बाबांनी सांगितले आहे, जे आपली पुजा करतात, ते पुज्य कसे म्हणू शकतात. सर्वांचा सद्गती दाता, कल्याण करणारे तर एकच बाबा आहेत. मनुष्य तर शांतीचा पण अर्थ समजत नाहीत. हठयोगाने प्राणायाम इ. करणे, त्यालाच शांती समजत आहेत. त्यामध्ये पण फार कष्ट लागतात, कोणाचा मेंदू खराब होऊन जातो. प्राप्ती काहीच नाही. ती आहे अल्पकाळाची शांती जसे सुखाला अल्पकाळ कागविष्ट समान म्हणतात, तशी ती शांती पण कागविष्टा समान आहे. ती आहेच अल्प काळासाठी बाबा तर 21 जन्मांसाठी तुम्हाला सुख शांती दोन्ही देत आहेत. काही तर शांतीधाम मध्ये शेवटापर्यंत राहतात. ज्यांची भुमिका आहे, ते एवढे सुख थोडेच पाहू शकातत. तेथे पण नंबरवार पद तर आहेत ना. जरी दास दासी असले, परंतू आत थोडेच राहतात. कृष्णाला पण पाहू शकणार नाहीत. सर्वांचे वेगवेगळे महल असतात ना. काही वेळ असेल पाहण्यासाठी जसे पहा पोप येतात, तर त्यांचे दर्शन करण्यासाठी किती लोक जातात. असे फार निघतील, ज्यांचा फार प्रभाव असेल. लाखो मनुष्य जातील दर्शन करण्यासाठी. येथे शिवबाबाचे दर्शन कसे होईल? ही तर समजण्याची गोष्ट आहे.

आता दुनियेला कसे माहित पडेल कि हे सर्वांत उंच तीर्थ आहे. दिलवाडा सारखे मंदीर कदाचित आसपास आणखीन पण असेल, ते पण जाऊन पाहिले पाहिजे. कसे बनले आहे. त्यांना ज्ञान सांगण्याची पण आवश्यकता नाही. ते मग तुम्हाला ज्ञान देण्यास सुरुवात करतील. मत देतात ना, हे केले पाहिजे, हे केले पाहिजे. हे तर ओळखत नाहीत, कि यांना शिकविणारा कोण आहे, एक एकाला समजवण्यासाठी मेहनत करावी लागते. त्यावर गोष्ट पण आहे. म्हणत होता, सिंह आला, सिंह आला---- तुम्ही पण म्हणता कि, मृत्यु आला कि आला, तर ते विश्वास करत नाहीत. समजतात कि अजून तर 40 हजार वर्षे पडली आहेत. मृत्यु कसा काय येईल. परंतू विनाश होणार तर आहे जरुर, सर्वांना घेऊन जाईल. तिथे कोणता पण कचरा असत नाही. येथील गाई आणि तेथील गाई मध्ये पण खुप फरक असतो. कृष्ण थोडेच गायी चारत होते. त्यांचे कडे तर दूध हेलीकॉप्टर मध्ये येत राहिल. ती कचरा पट्टी तर दूर राहत असेल. घरासमोर थोडेच कचरा राहिल. तिथे तर अपरंपार सुख आहे. ज्यासाठी पुर्ण पुरुषार्थ करावयाचा आहे. किती चांगली चांगली मुले सेंटरवरुन येतात. बाबा पाहून खुश होतात. नंबरवार पुरुषार्थानुसार फुलं निघत राहतात. फुले जी आहेत ती स्वत:ला पण फुले समजत आहेत. दिल्लीमध्ये पण मुले किती सेवा करत आहेत, दिवस रात्र. ज्ञान पण किती उंच आहे. पुर्वी तर काही जाणत नव्हते. आता किती मेहनत करावी लागते. बाबा जवळ तर सर्व समाचार येत राहतो. कोणाचा सांगतात, कोणाचा सांगत नाहीत, कारण निंदक पण फार होत आहेत. फार हुशार पण निंदक बनत आहेत. तिसऱ्या श्रेणीचे पण निंदक आहेत. थोडे ज्ञान मिळाले तर समजतात कि, आम्ही शिवबाबांचे पण बाबा बनलो. समजत तर नाहीत कि कोण ज्ञान देत आहे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. विश्वाची बादशाही देणाऱ्या बाबाचा फार फार आदर करावयाचा आहे. बाबाच्या सेवेमध्ये आपले जीवन सफल करावयाचे आहे. शिक्षणावर पुर्ण पुर्ण ध्यान दयावयाचे आहे.

2. बाबांकडून जे ज्ञान मिळत आहे, त्यावर विचार सागर मंथन करावयाचे आहे. कधी पण विघ्न रुप बनायचे नाही. गैर सेवा करावयाची नाही. अहंकारात यायचे नाही.

वरदान:-
निराकार आणि साकार दोन्ही रुपाच्या स्मृतीला विधीपुर्वक साजरे करणारे श्रेष्ठ आत्मा भव
 

दिवाळी अनेक जागे झालेल्या दिव्याची स्मृती रुप आहे. तुम्ही चमकणारे आत्मे दिव्याच्या ज्योती सारखे दिसून येता, त्यामुळे चमकणारी आत्मा दिव्य ज्योतीचे स्मृती रुप, स्थुल दिव्याच्या ज्योतीमध्ये दाखवले आहे, तर एकीकडे निराकारी आत्माच्या रुपाची स्मृती आहे, तर दुसरीकडे तुमचेच साकारी दिव्य स्वरुप लक्ष्मीच्या रुपात स्मृती आहे. हिच दिवाळी देवपद प्राप्त करते. तर तुम्ही श्रेष्ठ आत्मा स्वत:ची स्मृती स्वत:च साजरी करत आहात.

बोधवाक्य:-
नकारात्मकतेला साकारात्मकते मध्ये परिवर्तन करण्यासाठी तुमच्या भावनांना शुभ आणि बेहदची बनवा..!