29-10-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, उठता-बसता बुध्दीमध्ये ज्ञानाचे चिंतन केले तर तुम्हाला अपार खुशी
होईल...”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
कुणाच्या संगतीपासून स्वत:ला सांभाळले पाहिजे?
उत्तर:-
ज्यांच्या बुध्दीमध्ये बाबांची आठवण राहत नाही, ज्यांची बुध्दी इकडे-तिकडे भटकत
राहते, त्यांच्या संगतीपासून तुम्हाला स्वत:चा सांभाळ केला पाहिजे. त्यांचा स्पर्श
सुध्दा करुन घ्यायचा नाही कारण बाबांची आठवण न करणारी मुले वातावरण बिघडवतात.
प्रश्न:-
मनुष्यांना
पश्चात्ताप कधी होईल?
उत्तर:-
जेव्हा त्यांना हे माहित होईल की, शिकवणारा स्वयं भगवान आहे. तेव्हा त्यांचे तोंड
बघण्यासारखे होईल आणि मग ते पश्चात्ताप करतील की, आम्ही गफलत केली परमात्म्याचे
ज्ञान ऐकले नाही.
ओम शांती।
आता आत्मिक यात्रा तर मुलांनी चांगल्या प्रकारे समजून घेतली आहे. कोणतीही हठयोगाची
यात्रा नसते. ही आठवण आहे, आठवण करण्यामध्ये कोणताच त्रास नाही. बाबांची आठवण करणे
यांमध्ये कोणताही त्रास नाही. हा वर्ग आहे. याठिकाणी कायदेशिररित्या बसणे आवश्यक आहे.
तुम्ही बाबांची मुले आहात. मुलांची पालना होत आहे. कोणती पालना? अविनाशी ज्ञान
रत्नांचा खजिना मिळत आहे. बाबांची आठवण करण्यामध्ये कोणताच त्रास नाही. फक्त माया
बुध्दीचा योग तोडते. बाकी कसेही बसलात तरी त्याचा आठवणीशी काही संबंध नाही. खुप मुले
हठयोग्या प्रमाणे 3-4 तास बसतात. संपुर्ण रात्रभर सुध्दा बसतात. पुर्वी तुमची भट्टी
होती, ती गोष्ट वेगळी होती, तेव्हा तुम्हाला काहीच धंदा व्यवहार नव्हता म्हणून हे
शिकविले जात होते. आता बाबा सांगतात कि, तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहा. धंदा
व्यवहार सुध्दा जरुर करा. कोणतेही कार्य करतांना बाबांची आठवण करु शकता. ही अवस्था
यायला वेळ लागतो, आता तर सातत्याने बाबांची आठवण तुम्ही करु शकला तर तुमची कर्मातीत
अवस्थाच होईल. बाबा समजावतात. मुलांनो ड्राम्यानुसार आता थोडासा वेळ बाकी आहे. सर्व
हिशोब बुध्दीत आहे. म्हणतात कि, येशु ख्रिस्ताच्या अगोदर 3 हजार वर्षापुर्वी भारतच
होता. त्याला स्वर्ग म्हटले जात होते. आता त्यांना 2 हजार वर्षे पुर्ण होतात. 5
हजार वर्षांचा हिशोब सिध्द होतो.
असे चित्र दिसते की, तुमचे नाव विदेशामधूनच प्रसिध्द होईल कारण भारतवासींच्या
पेक्षाही त्यांची बुध्दी तेज आहे. भारतात येऊन ते शांती मागतात. भारतवासींनीच लाखों
वर्षे म्हणून आणि परमात्म्याला सर्वव्यापी मानून सर्वांची बुध्दी बिघडवून टाकलेली
आहे. तमोप्रधान बनले आहेत. ते विदेशही एवढे तमोप्रधान बनले नाहीत. त्यांची बुध्दी
फार तेज आहे. त्यांच्या आवाजाने भारतवासी जागे होतील. कारण भारतवासी एकदम गाढ
निद्रेत झोपी गेले आहेत, ते थोडेसे झोपलेत. त्यांचा आवाज होईल, विदेशातून आले होते.
शांती सर्वत्र कशी स्थापन होऊ शकते. हे कुणीतरी सांगा, म्हणून बाबा सुध्दा भारतातच
येतात. ही गोष्ट तर तुम्ही मुलेच सांगू शकता कि, दुनियेत पुन्हा ती शांती कधी आणि
कशी होईल? तुम्ही मुले जाणता बरोबर स्वर्ग होता. नव्या दुनियेत भारत स्वर्ग होता.
हे दुसरे कुणी जाणत नाहीत. लोकांच्या बुध्दीत हेच बसले आहे कि, ईश्वर सर्वव्यापी आहे
आणि कल्पाचे आयुष्य लाखों वर्षे आहे. सर्वांत जास्त भारतवासींचीच बुध्दी दगडासारखी
बनली आहे. हे गीता शास्त्र वगैरे सर्व भक्तीमार्गातील आहे. पुन्हा हे सर्व असेच बनले.
भले ड्रामा म्हणा तरीही बाबा आपल्याकडून पुरुषार्थ करुन घेतात. तुम्ही मुले जाणता
विनाश तर होणारच आहे. बाबा नव्या दुनियेची स्थापना करण्यासाठी आलेत. ही तर खुशीची
गोष्ट आहे. जेव्हा कुणी मोठी परीक्षा पास करतात. तेव्हा आतून खुशी होते ना! आम्ही
सुध्दा ही परिक्षा पास करुन देवता बनणार आहोत. पण सर्व भिस्त शिक्षणावर आहे.
तुम्ही मुले जाणता कि, बाबा आम्हाला शिकवून-सवरुन देवता बनवत आहेत. बरोबर येथे
स्वर्ग होता. मनुष्य तर गोंधळून गेले आहेत. बेहदच्या पित्याजवळ जे ज्ञान आहे ते
तुम्हा मुलांना देतात. तुम्ही बाबांची महिमा करता-बाबा ज्ञानाचे सागर आहेत, पुन्हा
सर्वांच्यावर आर्शिवाद सुध्दा करतात. खजिना सुध्दा त्यांच्याजवळ संपूर्ण आहे.
तुम्ळाला एवढे साहुकार कोण बनवते? येथे तुम्ही का आलात? वारसा प्राप्त करण्यासाठी,
जर एखादा व्यक्ती शरीराने धडधाकट आहे पण त्यांच्याजवळ धन नाही तर धनाशिवाय काय फायदा?
वैकुंठामध्ये तुमच्याजवळ अपार धन आहे. येथे जे-जे साहुकार आहेत, त्यांना खुप नशा आहे
कि, आमच्याजवळ फार धन आहे. हे कारखाने वगैरे आहेत. पण शरीर सोडले तर सर्व काही
समाप्त. तुम्ही तर जाणता कि, आम्हाला बाबा 21 जन्मांसाठी एवढा खजिना देतात. बाबा
स्वत: तर खजिन्यांचे मालक बनत नाहीत. तुम्हा मुलांना मालक बनवतात. हे सुध्दा तुम्ही
जाणता कि, संपूर्ण विश्वात ईश्वराशिवाय कुणीच शांती स्थापन करु शकत नाही. सर्वांत
एक नंबरला हे त्रिमुर्ती गोळ्याचे चित्र आहे. या चक्रात संपूर्ण ज्ञान भरलेले आहे.
तुमच्याकडे अशी काही मजेशीर वस्तू असेल तर लोक समजतील कि, यांमध्ये जरुर काहीतरी
रहस्य आहे. मुले छोटी-छोटी खेळणी बनवतात पण ती काही बाबांना आवडत नाहीत. बाबा तर
म्हणतात मोठी चित्रे बनवा कि, लांबूनच वाचून एखाद्याला समजेल. मोठ्या वस्तूवर
लोकांचे लक्ष लगेच जाते. यांमध्ये स्पष्ट दाखवले आहे, त्याबाजूला कलियुग, याबाजूला
सतयुग. मोठमोठ्या चित्रांकडे लोकांचे लक्ष लगेच आकर्षित होते. फिरायला येणारे सुध्दा
पाहतील व चांगल्याप्रकारे समजून घेतील. हे सुध्दा जाणतात कि, येशु ख्रिस्तांपुर्वी
3 हजार वर्ष अगोदर स्वर्ग होता. बाहेर असे कुणी जाणत नाही. 5 हजार वर्षांचा हिशोब
तुम्ही स्पष्ट करुन सांगता तर हे चित्र इतके मोठे बनवा कि, लांबूनच लोक पाहु शकतील
आणि त्यामधील अक्षरेही वाचू शकतील. ज्यावरुन लोकांना कळेल कि, खरोखर दुनियेचा शेवट
तर होणारच. बाँब तर तयार होतच आहेत. नैसर्गिक आपत्तीही येईल. तुम्ही विनाश हा शब्द
ऐकता तर आतून तुम्हाला खुप आनंद झाला पाहिजे. पण ज्ञानच नसेल तर आनंदही होणार नाही.
बाबा म्हणतात-देहासहित सर्व काही विसरुन स्वत:ला आत्मा समजा, आपला आत्म्याचा योग
आपल्या पित्याशी जोडा. ही मेहनत आहे. पवित्र बनूनच पवित्र दुनियेत यायचे आहे. तुम्ही
समजता कि, आम्हीच बादशाही घेतो आणि पुन्हा हरवतो. हे तर फार सोपे आहे. उठता-बसता,
चालता-फिरता तुमच्या बुध्दीत ज्ञानाचे चिंतन चालले पाहिजे, जसे बाबांच्याजवळ ज्ञान
आहे. बाबा शिकवून देवता बनविण्यासाठी आले आहेत. तर मुलांना सुध्दा त्याची अपार खुशी
झाली पाहिजे ना! स्वत:ला विचारा एवढी खुशी आहे? आम्ही बाबांची एवढी आठवण करतो का?
चक्राचे सुध्दा संपूर्ण ज्ञान बुध्दीत आहे तर एवढी खुशी पण चढली पाहिजे. बाबा
सांगतात माझी आठवण करा आणि एकदम खुश राहा. तुम्हाल शिकविणारा पहा कोण आहे! जेव्हा
सर्वांना हे माहित होईल तेव्हा सर्वांचे चेहरे हे बघण्यासारखे होतील. पण त्यांना
समजण्यासाठी अजून थोडा वेळ आहे. अजून देवता धर्मातील आत्म्यांची संख्या फार थोडी आहे.
सर्व राजाई अजून स्थापन झालेली नाही. कितीतरी मनुष्यांना अजून बाबांचा संदेश देणे
बाकी आहे. बेहदचा पिता स्वर्गाची बादशाही देत आहे. तुम्ही सुध्दा त्या पित्याची
आठवण करा. बेहदचा पिता तर बेहदचे सुख देणार ना. मुलांमध्ये तर अपार ज्ञानाची खुशी
झाली पाहिजे. आणि जेवढी बाबांची आठवण कराल तेवढी आत्मा पवित्र बनेल.
ड्राम्यानुसार तुम्ही मुले जेवढी सेवा करुन प्रजा बनविता आणि ज्यांचे कल्याण होते
त्यांचे तुम्हाला आशिर्वाद मिळतात. गरीबांची सेवा करता. त्यांना निमंत्रण देत राहा,
रेल्वेमध्येही तुम्ही खुप सेवा करु शकता. एवढ्याशा लहान बॅजमध्ये किती ज्ञान भरले
आहे. सर्व शिक्षणचे सार यांमध्ये आहे. बॅज तर खुप खुप आणि सुंदर बनवले पाहिजेत कि,
जे कुणाला भेट म्हणून सुध्दा देऊ शकतो. कुणाला ज्ञान सांगणे फार सोपे आहे. फक्त
शिवबाबंची आठवण करा. शिवबाबंकडूनच वारसा मिळतो. बाबा आणि बाबांचा वारसा अर्थात
स्वर्गाची बादशाही. कृष्णपुरीची आठवण करा. मनुष्यांचे मत किती गोंधळात टाकते. काहीच
समजत नाही. विकारासाठी किती त्रास देतात. काम विकारासाठी किती वेडे होतात. काहीच
समजत नाहीत, सर्वांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे, बाबांना जाणत नाहीत. पण हे नाटकामध्ये
नोंद आहे. सर्वांची मानसिक शक्ती संपलेली आहे. बाबा सांगतात-मुलांनो, तुम्ही पवित्र
बना म्हणजे असे स्वर्गाचे मालक बनाल पण हेही समजत नाही. आत्म्याची ताकद सर्व निघून
गेली आहे. किती समजावतात पण तरीही पुरुषार्थ केला पाहिजे आणि करायला शिकवले पाहिजे.
पुरुषार्थ करताना थकायचे नाही. हार्टफेल सुध्दा (हताश) व्हायचे नाही. एवढी मेहनत
घेतली, भाषण केले, पण एकही आत्मा तयार झाली नाही. तुम्ही जे ज्ञान सांगितले, ते
ज्यांनी ऐकले त्यांच्यावर छाप तर पडली. शेवटी सर्व जाणून घेतील. तुम्हा
ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारींची महिमा खुप होणार आहे. पण चालचलन पाहतात एकदम
बेसमजदार पणाची आहे. काही आदरच नाही, कारण पुर्ण ओळख (परिचय) नाही. बुध्दी बाहेरच
भटकत राहते. बाबांची आठवण केली तर मदत मिळेल. बाबांची आठवण जे करीत नाहीत ते पतित
आहेत. तुम्ही पवित्र बनत आहात. जे बाबांची आठवण करीत नाहीत त्यांची बुध्दी जरुर कुठे
न कुठेतरी भटकत राहते. अशा लोकांचा स्पर्श सुध्दा करुन घ्यायचा नाही कारण बाबांची
आठवण न केल्यामुळे अशी मुले वातावरण खराब करतात. पवित्र आणि अपवित्र एकत्र राहू शकत
नाहीत म्हणून बाबा या जुन्या सृष्टीचा विनाश करतात. दिवसेंदिवस कायदे सुध्दा कडक
होतील. बाबांची आठवण जर नाही केली तर फायद्याऐवजी आणखीनच नुकसान होते. बाबांच्या
आठवणीवर पवित्रतेची सारी भिस्त आहे. एकाच ठिकाणी बसायची आवश्यकता नाही. येथे एकत्र
बसण्यापेक्षा डोंगरावर जाऊन वेगळे वेगळे बसाल तर फार चांगली गोष्ट आहे. जे आठवण
करीत नाहीत ते पतित आहेत. त्यांची संगत करु नका. चालचलनवरुनच कळते. आठवणीशिवाय
पवित्र बनू शकत नाही. प्रत्येकावर पापाचे ओझे खुप मोठे आहे. प्रत्येक जन्माचे
आठवणीच्या यात्रेशिवाय हे ओझे खाली होणार नाही. म्हणजेच सर्व जण पतित आहेत. बाबा
म्हणतात, मी तुम्हा मुलांसाठी सर्व पतित दुनिया नष्ट करतो. त्यांचा संगच नको. पण
इतकी सुध्दा बुध्दी नाही की, कुणाची संगत केली पाहिजे. तुमचे पवित्र प्रेम पवित्र
सोबतच असले पाहिजे. एवढी तर बुध्दी पाहिजे ना. गोड पिता व गोड राजधानी शिवाय आणखी
कुणाची आठवण करु नका. एवढा सर्व त्याग करणे सोपे काम नाही. बाबांचे तर मुलांच्यावर
अफाट प्रेम आहे. मुलांनो, पावन बनाल तर तुम्ही पावन दुनियेचे मालक बनाल. मी
तुमच्यासाठी पवित्र दुनियेची स्थापना करीत आहे. ही पतित दुनिया एकदम खत्म करतात.
येथे या पतित दुनियेत प्रत्येक वस्तू तुम्हाला दु:ख देते. आयुष्य पण कमी होत आहे.
यालाच म्हटले जाते कि, कवडीची सुध्दा किंमत नाही. कौडी आणि हीरा यामध्ये फरक तर आहे
ना. तर तुम्हा मुलांना किती खुशी झाली पाहिजे. गायन सुध्दा आहे कि, खऱ्याला कशाचीच
भीती नसते. तुम्ही सतयुगात खुशीत नाचत असता. येथे कोणत्याही वस्तूवर प्रेम करु नका.
यांना तर पाहून सुध्दा न पहिल्यासारखे करा. डोळे उघडे असून सुध्दा झोपेचे सोंग घेता
आले पाहिजे. परंतू ती हिम्मत, ती अवस्था पाहिजे. हा तर निश्चय आहे कि, ही जुनी
दुनिया राहणार नाही. एवढा खुशीचा पारा चढला पाहिजे. स्वत:ला जाणीव करुन दिली पाहिजे
की, जर आम्ही शिवबाबांची आठवण केली तर विश्वाची बादशाही मिळेल. हठयोग करुन बसण्याची
आवश्यकता नाही. खाता-पिता, काम करत असतांना शिवबाबांची आठवण करा. हे सुध्दा जाणता
कि, राजधानी स्थापन होत आहे. बाबा थोडेच म्हणतात दासी बना. बाबा तर सांगतात पावन
बनण्याचा पुरुषार्थ करा. बाबा पावन बनण्याचा पुरुषार्थ करवून घेतात आणि तुम्ही
पुन्हा अपवित्र बनता, किती खोटे वागता, पाप करता. सदैव, शिवबाबांची आठवण करा तर
सर्व पापे योगाच्या अग्नीत स्वाहा होतील. हा बाबांचा यज्ञ आहे ना! खुप मोठा यज्ञ आहे.
ते लोक यज्ञ रचतात. लाखों रुपये खर्च करतात. येथे तर तुम्ही जाणता कि, संपुर्ण
दुनिया यांमध्ये स्वाहा होणार आहे. विदेशातून आवाज निघेल आणि तोच आवाज भारतात पसरेल.
एक तर बाबांसोबत बुध्दीचा योग असेल तर पापे जळून जातील आणि पुन्हा उच्च पदही मिळेल.
बाबांचे तर कर्तव्यच आहे मुलांच्याकडून पुरुषार्थ करुन घेणे. लौकिक पिता तर मुलांची
सेवा करतात व त्यांच्याकडून सेवा करुनही घेतात. हे पिता सांगतात कि, मी तुम्हा
मुलांना 21 जन्मांचा वारसा देतो तर अशा पित्याची आठवण जरुर केली पाहिजे की, ज्यामुळे
तुमची पापे नष्ट होतील. बाकी पाण्याने थोडीच पापे धुतली जातात. पाणी तर सर्वत्र आहे.
विदेशात सुध्दा नद्या आहेत. तर काय इथल्या नद्या पावन बनवतात आणि विदेशातील नद्या
पतित बनवतात का? मनुष्यांना काहीच समजत नाही. बाबांना तर दया येते ना! बाबा
समजावतात-मुलांनो, गफलत करुन नका. बाबा इतके सुंदर बनवतात तर मेहनत केली पाहिजे ना!
स्वत:वर दया करा. अच्छा. गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची
प्रेमपुर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. येथील
कोणत्याही वस्तूमध्ये मन व बुध्दी अडकवू नका, पाहुन सुध्दा पाहिल्यासारखे करा. डोळे
उघडे असले तरी जसा झोपेचा नशा चढतो, तसा खुशीचा नशा चढला पाहिजे.
2. सर्व भिस्त
पवित्रेवर आहे म्हणून पतिताचा स्पर्श होऊ नये याची काळजी घ्या. गोड बाबा आणि गोड
राजधानी शिवाय इतर काही सुध्दा आठवू नका.
वरदान:-
सेवेद्वारे
मेवा (फळ) प्राप्त करणारे सर्व हदच्या इच्छांपासून अलिप्त सदैव संपन्न आणि समान भव
सेवेचा अर्थ आहे मेवा
(फळ) देणारी. जर एखादी सेवा असंतुष्ट करते तर ती सेवा, सेवा नाही. अशी सेवा भले
सोडून दया परंतू संतुष्टता सोडू नका. ज्याप्रमाणे शरीराला तृप्त करणारे सदैव
संतुष्ट राहतात त्याचप्रमाणे मनाला तृप्त करणारे सुध्दा संतुष्ट राहतात. संतुष्टता
तृप्तीची निशाणी आहे. तृप्त झालेल्या आत्म्यामध्ये कोणतीही हदची इच्छा, मान, शान,
सुट, साधन कशाचीही भुक नसते. ते हदच्या सर्व इच्छांतून अलिप्त सदैव संपन्न आणि समान
असतात.
बोधवाक्य:-
खऱ्या
मनापासून नि:स्वार्थ सेवा करत राहणे म्हणजे पुण्याचा खाता जमा करणे होय..!