27-10-2019    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   27.02.1985   ओम शान्ति   मधुबन


“शिव शक्ती पांडव सेना विशेषता”
 


आज बापदादा अमृतवेळेपासून विशेष सन्मुख आलेल्या दुरदेशात राहणाऱ्या, ह्दयापासून जवळ राहणाऱ्या डबल विदेशी मुलांना पहात होते. बाबा आणि दादांचा एकमेकांत आज गोड वार्तालाप चालला होता. कोणत्या गोष्टीवर? ब्रह्माबाबा विशेष डबल विदेशी मुलांना पाहून हर्षित होऊन बोलले की, कमाल आहे मुलांची कि, जे एवढ्या दूर देशवासी असून सुध्दा, नेहमी स्नेहाने एकाच लगनमध्ये राहतात कि, सर्वांना कोणत्याही पध्दतीने बाप दादाचा संदेश जरुर पोहचवू. त्यासाठी काही मुले, डबल कार्य करुन, लौकिक आणि अलौकिक मध्ये डबल व्यस्त असून पण, स्वत:चे आरामला न पाहता, रात्रंदिवस त्याच लगनमध्ये लागले आहेत. स्वत:च्या खाण्या पिण्याची काळजी न करता, सेवेच्या धुंदीत आहेत. ज्या पवित्रतेच्या गोष्टीला अनैसर्गिक जीवन समजतात, त्या पवित्रतेला प्राप्त करण्यासाठी, अपवित्रतेच्या त्याग करण्यासाठी, हिम्मतीने, दृढ संकल्पाने, बाबाच्या स्नेहाने, आठवणीच्या यात्रेद्वारे, शांतीच्या प्राप्तीच्या आधरे, शिक्षण आणि परिवाराच्या संगाच्या आधारे स्वत:च्या जीवनात धारणा केली आहे. ज्याला अवघड समजत होते, ती सोपी झाली आहे. ब्रह्मा बाबा विशेष पांडव सेनेला पाहून, मुलांची महिमा गात होते. कोणत्या गोष्टीची? प्रत्येकाचे मनात आहे कि, पवित्रता हे योगी बनण्याचे पहिले साधन आहे. पवित्रताच बाबाचे स्नेहाला अनुभव करण्याचे साधन आहे, पवित्रताच सेवेमध्ये सफलतेचा आधार आहे. हा शुभ संकल्प प्रत्येकाचे ह्दयात पक्का आहे. आणि पांडवाची कमाल पण ही आहे, जे शक्तींना पुढे करुन, सुध्दा स्वत:ला पुढे नेहण्यासाठी उमंग उत्साहात चालले आहेत. पांडवाचा तीव्र पुरुषार्थ करण्याचा वेग, प्रगतीला प्राप्त करणारा दिसत आहे. बहुसंख्य याच वेगाने पुढे चालत आहेत.

शिवबाबा म्हणाले, पांडवांनी आपला विशेष आदर करण्याची धारणा चांगली दाखविली आहे. त्या बरोबर हसण्यासारखी गोष्ट पण सांगितली. मध्ये मध्ये संस्कारांचा खेळ पण खेळतात. परंतू तरी पण प्रगतीचा उमंगा बरोबर बाबाचे अति स्नेही असल्यामुळे, समजतात कि, स्नेहा पाठोपाठ हे परिवर्तनच बाबाला प्रिय आहे. त्यामुळे समर्पण होतात. बाबा जे सांगतात, जे इच्छितात, तेच करु. या विचाराने स्वत: स्वत:मध्ये परिवर्तन करतात. प्रेमापोटी कष्ट वाटत नाही. स्नेहा पोटी सहन करणे, सहन करणे वाटत नाही, त्यामुळे बाबा बाब म्हणत पुढे वाटचाल करत आहेत. या जन्मातील शरीराचे पुरुषत्त्वाचे संस्कार, म्हणजे ह्दच्या रचता पणाचे असले तरी पण स्वत:चे परिवर्तन चांगले केले आहे. स्वत: बाबाला समोर ठेवून निरहंकारी आणि नम्रता भाव, या धारणेचे लक्ष्य आणि लक्षण चांगले धारण केले आहे, आणि करत आहेत. दुनियेतील वातावरणामध्ये, संपर्कात येऊन, तरी पण आठवणीच्या लगनची छत्रछाया असल्यामुळै सुरक्षित राहण्याचा पुरावा चांगला देत आहेत. ऐकल्या पांडवाच्या गोष्टी. बापदादा आज माशुका ऐवजी आशिक झाले आहेत, त्यामुळे पाहून पाहून हर्षित होत आहेत. दोघांचे मुलांवरती विशेष स्नेह तर आहेच ना. तर आज अमृतवेळेपासून मुलांच्या विशेषतेची वा गुणांची माळा स्मरण केली. तुम्ही लोकांनी 63 जन्मामध्ये माळा स्मरण केली आणि बाबा त्या मोबदल्यात आता माळा स्मरण करुन, प्रतिसाद देत आहेत. अनुभवामध्ये, चांगल्या लगनद्वारे पुढे वाटचाल करत आहेत. एका डोळ्यात बाबा, दुसरे डोळ्यात सेवा दोन्ही डोळ्यात हेच सामावले आहे. विशेष परिवर्तन हे आहे जे स्वत:चा अलबेला पण नाजुक पणाचा त्याग केला आहे. हिम्मतवान शक्ती स्वरुपा बनली आहे. बापदादा आज विशेष लहान लहान वयाच्या शक्तींना पाहत होते. या युवा अवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या अल्पकाळाच्या आकर्षणाला सोडून, एकाच बाबाचे आकर्षणामध्ये, चांगलया उमंग-उत्साहामध्ये चालत आहेत. संसाराला असार संसार अनुभव करुन, बाबालाच संसार बनविला आहे. आपले तन-मन-धनाला बाबा आणि सेवेमध्ये लावून, प्राप्तीचा अनुभव करुन पुढे उडती कलेमध्ये जात आहेत. सेवेच्या जिम्मेदारीचा ताज चांला धारण केला आहे. थकावटीला कधी कधी जाणून पण, बुध्दीवरती कधी कधी ओझे अनुभव करुन पण, बाबाचे अनुकरण करावयाचेच आहे, बाबाला प्रत्यक्ष करावयाचेच आहे, या दृढतेने, यासर्व गोष्टीला नष्ट करुन, तरी पण सफलतेला प्राप्त करत आहेत, त्यामुळे बापदादा जेव्हा मुलांच्या प्रेमाला पाहतात तर वारंवार हेच वरदान देतात कि, हिम्मत बच्चे मददे बाप, सफलता तुमचा जन्मसिध्द अधिकार आहेच. बाबाची साथ असल्यामुळे प्रत्येक परिस्थितीला असे पार करतात, जसे लोण्यातून कसे काढणे, सफलता मुलांच्या, गळ्यातील माळ आहे. सफलतेची माळ तुम्हा मुलांचे स्वाग करणार आहे. तर मुलांच्या त्याग, तपस्या आणि सेवेवर बापदादा पण समर्पित होत आहेत. स्नेहा मुळे कोणती पण अडचण वाटत नाही. असे आहे ना. जिथे स्नेह आहे, स्नेहाचे दुनियेमध्ये किंवा बाबाचे संसारामध्ये, बाबाचे भाषेमध्ये अवघड शब्दच नाही. शक्ती सेनेची विशेषता आहे, कठीणला सोपे करणे. प्रत्येकाचे मनात हा उमंग आहे कि, सर्वांत जास्त, आणि लवकरात लवकर संदेश देण्याच्या निमित्त बनून, बाबासमोर आत्मिक गुलाबाचा गुच्छ घेऊन जावे. जसे बाबांनी आम्हाला बनविले. तसे आम्ही इतरांना बनवून बाबा समोर घेऊन जावे. शक्ती सेना एक दोघांचे सहयोगाने, संघटित रुपामध्ये भारतामधून कोणती तरी विशेष नविनता, विदेशात करण्याच्या शुभ उमंग उत्साहामध्ये आहेत. जिथे संकल्प आहे, तिथे सफलता अवश्य आहे. शक्ती सेना प्रत्येक जण, आपआपल्या वेगवेगळ्या स्थानावर वृध्दी आणि सिध्दीला प्राप्त करण्यामध्ये सफल होत आहेत. एक एकाच्या गुणाचे किती गायन करावे परंतू वतनमध्ये एका एका मुलांचे गुण बापदादा वर्णन करत होते. देशातील विचार करुन करुन काही राहिलेत, परंतू विदेश वाले ओळखून अधिकारी बनले. ते पाहत राहतील, तुम्ही बाबा बरोबर घरी पोहचाल. ते ओरडतील, आणि तुम्ही वरदानांच्या दृष्टीने तरी पण काही ना काही ओंजळ देत राहाल.

आज विशेष बापदादानी काय केले? सारे संगठन पाहून बापदादा भाग्यवान मुलांचे, भाग्य बनण्याची महिमा गात होते. दुरचे जवळचे झाले आणि जवळचे आबूमध्ये राहणारे किती दुरचे झाले. जवळ असून सुध्दा दुर आहेत. आणि तुम्ही दूर राहून पण जवळ आहात. ते पाहणारे आणि तुम्ही दिलतख्तावर सदा राहणारे. किती प्रेमाने मधूबन ला येण्याचे साधन बनवितात. दर महा हे गीत गातात कि, बाबाला भेटायचे आहे, जायचे आहे. जमा करायचे आहे. तर ही लगन पण मायाजीत बनण्याचे साधन बनते. जर सहज तिकीट मिळाले, तर लगनमध्ये विघ्न जादा पडतात. परंतु थेंबे थेंबे तळे साचवतात, त्यामुळे थेंब थेंब जमा करण्यामध्ये बाबाची आठवण सामावलेली असल्याने, हे पण नाटकामध्ये जमा होत आहे, कल्याणकारी आहे. जर जास्त पैसे मिळाले तर माया पण येईल, मग सेवा विसरेल, त्यामुळे धनवान बाबाचे अधिकारी मुले बनत नाहीत.

कमविणे आणि जमा करणे, आपल्या खऱ्या कमाईचे जमा करणे, यात बळ आहे. खऱ्या कमाईचे धन बाबांच्या कार्यात सफल होत आहे. जर असेच धन आले तर तन लागत नाही. आणि तन नाही लागले तर मन पण खली वर होईल, त्यामुळे तन, मन, धन तिन्ही पण लागत आहे. त्यामुळे संगम युगावर कमविले आणि ईश्वरीय बँकेत जमा केले, हे जीवनच नंबर एक जीवन आहे. कमविले आणि लौकिक विनाशी बँकेत जमा केले, तर ते सफल होत नाही. कमविले आणि अविनाशी बँकेमध्ये जमा केले तर एक पद्मगुणा बनते. 21 जन्मासाठी जमा होऊन जाते. ह्दयापासून केलेले दिलाराम जवळ पोहचते. जर कोणी दाखविण्याच्या रितीने केले तर दाखविल्यानेच नष्ट होते. दिलाराम पर्यंत पोहचत नाही, त्यामुळे तुम्ही मनापासून करणारे चांगले आहात. मनापासून दान करणारे पण पद्म पद्मपती बनतात, आणि दाखविणारे हजार करणारे पण पद्मापद्म पति बनत नाहीत. मनापासून ची कमाई, स्नेहाची कमाई, खरी कमाई आहे. कमविता कशासाठी? सेवेसाठी, ना कि स्वत:चे आरामासाठी? तर ही आहे खऱ्या मनापासूनची कमाई. जे एकाचे पद्मगुणा बनते. जर स्वत:चे आरामासाठी कमविता किंवा जमा करता, तर येथे जर आराम केला. परंतू तेथे इतरांना आराम देण्यासाठी निमित्त बनाल. दास दासी काय करतात. राजाई घराण्याला आराम देण्यासाठी असतात. येथील आरामामुळे तेथे आराम देण्यासाठी निमित्त बनावे लागेल, त्यामुळे जे प्रेमाने खऱ्या मनाने कमविता, सेवेमध्ये लावता. ते सफल करत आहात. अनेक आत्म्याची दुवा घेत आहात. ज्यांच्यासाठी निमित्त बनता, तेच मग तुमचे भक्त बनून तुमची पुजा करतील, कारण तुम्ही त्या आत्म्यासाठी सेवा केली, तर सेवेचा परतावा ते तुमच्या जड चित्राची सेवा करतात, पुजा करतात. 63 जन्म सेवेचा परतावा तुम्हाल देत आहेत. बाबांकडून तर मिळतेच, परंतू त्या आत्म्याकडून पण मिळेल. ज्यांना संदेश देता, आणि ते अधिकारी बनत नाहीत तर मग ते या रुपात परत करतात. जे अधिकारी बनतात, ते तर तुमच्या संबंधात येतात. कोणी संबंधात येतात, कोणी भक्त बनतात, कोणी प्रजा बनतात. वेगवेगळ्या प्रकारचा निकाल निघत आहे. समजले! लोक पण विचारतात ना कि तुम्ही सेवेच्या मागे का पडत आहात. खा, प्या, मजा करा. काय मिळते जे एवढे दिवसरात्र सेवेच्या मागे लागता. मग तुम्ही काय म्हणता? जे आम्हाला मिळाले आहे ते, अनुभव करुन पाहा. अनुभवीच या सुखाला ओळखतील, हे गीत गात आहात ना. अच्छा

नेहमी स्नेहात सामावलेले, नेहमी त्यागाचे भाग्य अनुभव करणारे, नेहमी एकाला पद्मगुणा बनविणारे, नेहमी बापदादाचे अनुकरण करणारे, बाबालाच संसार अनुभव करणारे, अशा दिलतख्त नशीन मुलांना दिलाराम बाबांची प्रेमळ आठवण आणि नमस्ते.

विदेशी भाऊ बहिणी बरोबर वैयक्तिक मुलाखत :-
1. स्वत:ला भाग्यवान आत्मे समजत आहात? एवढे भाग्य तर बनविले जे भाग्यविधाता पण स्थानावर पोहचाल. समजता ते कोणते स्थान आहे? शांतीच्या ठिकाणी पोहचणे पण भाग्य आहे. तर हे पण भाग्य प्राप्त करण्याचा रस्ता सापडला. विश्व नाटकानुसार भाग्य प्राप्त करण्याच्या ठिकाणी पोहचलात. भाग्याची रेषा येथेच ओढली जाते. तर आपले श्रेष्ठ भाग्य बनविले. आता फक्त थोडा वेळ दया. वेळ पण आहे आणि संग पण करु शकात. आणखी न कोणती अवघड गोष्ट तर नाही. जे अवघड असते, त्यासाठी थोडा विचार केला जातो. सोपे आहे ते करा. यामध्ये ज्या पण जीवनातील अल्पकाळाच्या आशा किंवा इच्छा आहेत, त्या अविनाशी प्राप्तीने पुर्ण होतील. या अल्पकाळातील इच्छांच्या मागे जाणे, असेच आहे जसे स्वत:च्या सावलीच्या मागे जाणे. जेवढे सावलीच्या मागे जाल, तेवढी ती पुढे जाईल, प्राप्त होत नाही. परंतू तुम्ही पुढे वाटचाल करा तर ती स्वत:च मागे मागे येईल. तर अशा अविनाशी प्राप्तीकडे जाणाऱ्याचे मागे, विनाशी गोष्टी सर्व पुर्ण होतात. समजले. सर्व प्राप्तीचे साधन हे आहे. थोडा वेळेचा त्याग सदाकाळाचे भाग्य बनवतो. तर नेहमी या लक्ष्याला समजून पुढे वाटचाल करा. यात फार खुशीचा खजाना मिळेल. जीवनात सर्वांत मोठ्यातील मोठा खजाना खुशी आहे. जर खुशी नाही तर जीवन नाही. तर अविनाशी खुशीचा खजाना प्राप्त करु शकता.

2. बापदादा नेहमी मुलांना पुढे जाण्यासाठी उमंग-उत्साह देतात. मुलांचा उमंग बापदादाकडे पोहचतो. मुलांचे मनात आहे की, विश्वातील व्ही.व्ही.आय.पी. (खुप महत्त्वाच्या व्यक्ती) बाबासमोर घेऊन यावे, हा उमंग पण साकार होईल, कारण निस्वार्थ सेवेचे फळ जरुर मिळते. सेवाच स्वत:ची स्थिती बनविते, त्यामुळे असा विचार कधी करु नका कि, सेवा एवढी वाढली आहे, माझी स्थिती तर तशी नाही. परंतू सेवा तुमची स्थिती बनविते. दुसऱ्याची प्रगतीचे स्वत:च्या प्रगतीचे साधन आहे. सेवा स्वत:च शक्तीशाली अवस्था बनवते. बाबाची मदत मिळते ना. बाबाची मदत मिळत मिळत, ती शक्ती वाढत वाढत तशी स्थिती पण बनेल. समजले, त्यामुळे असा विचार कधी करुन नका की, एवढी सेवा मी कशी करेन, माझी स्थिती अशी आहे. नाही. करत चला. बापदादाचे वरदान आहे. पुढे वाटचाल होणारच आहे. सेवेचे गोड बंधन पण, पुढे जाण्याचे साधन आहे. जो ह्दयापासून आणि अनुभवाचे अधिकाराने बोलतो, त्यांचा आवाज ह्दयापर्यंत पोहचतो. अनुभवाच्या अधिकारातील बोल इतरांना पण अनुभव करण्याची प्रेरणा देतात. सेवेमध्ये पुढे जाता जाता जे पेपर येतात, ते पण पुढे जाण्याचेच साधन आहे, कारण बुध्दी चालते, आठवणीत राहण्याचे विशेष लक्ष राहते. तर ही पण विशेष लिफ्ट बनते. बुध्दीमध्ये नेहमी राहते कि, आम्ही वातावरणाला कसे शक्तीशाली बनवू. कोणते पण मोठे रुप घेऊन विघ्न येवो, परंतू तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांचा त्यांत फायदाच आहे. हे मोठे रुप पण आठवणीच्या शक्तीद्वारे लहान होऊन जाते. हे जसे कि कागदाचा सिंह आहे. अच्छा.

वरदान:-
दिवाळीचे वेळी यथार्थ विधीने आपल्या दैवी पदाचे आवाहन करणारे पुज्य आत्मा भव

दिवाळीत प्रथम लोक विधीपुर्वक दिवे लावत होते, दिवा न विझेल याचे ध्यान ठेवत होते, तेल घालत होते, विधीपुर्वक आवाहन करत होते. आता तर दिव्या ऐवजी बल्ब लावतात. दिवाळी साजरी करत नाहीत, आता तर मनोरंजन झाले आहे. आवाहनाची विधी किंवा साधना समाप्त झाली आहे. स्नेह समाप्त होऊन फक्त स्वार्थ राहिला आहे त्यामुळे खरी दाता रुपधारी लक्ष्मी कोणाजवळ येत नाही. परंतू तुम्ही सर्व खऱ्या विधीद्वारे आपल्या दैवी पदाचे आवाहन करत आहात, त्यामुळे स्वत: पुज्य देवी देवता बनत आहात.

सुविचार:-
नेहमी बेहदची वृत्ती, दृष्टी आणि स्थिती ठेवा, तर विश्व कल्याणाचे कार्य संपन्न होईल...!