27-09-2019
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो,तुम्ही सर्व आत्म्यांना कर्मबंधनापासून मुक्त करणारे संकटकालिन सैनिक आहात,
तुम्हाला कर्मबंधनामध्ये फसायचे नाही”
प्रश्न:-
कोणता अभ्यास
करत राहा तर आत्मा खुपच शक्तीशाली बनेल?
उत्तर:-
जेव्हा कधी
वेळ मिळेल तेव्हा शरीरापासून वेगळे अशरीरी बनण्याचा अभ्यास करा. अशरीरी झाल्यामुळे
आत्म्यामध्ये परत शक्ती भरेल. तुम्ही गुप्त सैनिक आहात, तुम्हाला सुचना मिळतात,
सावधान! अर्थात एका बाबांच्या आठवणीमध्ये राहा, अशरीरी बनण्याचा अभ्यास करा, अशरीरी
बना.
ओम शांती।
ओमशांतीचा अर्थ तर बाबांनी खुपच चांगल्यारितीने समजवला आहे. जिथे मिलट्री असते तर
म्हणतात, सावधान. त्यांचे सावधान म्हणजे शांती. येथे पण बाबा म्हणतात सावधान अर्थात
एका शिवपित्याच्या आठवणीमध्ये राहा. मुखाद्वारे बोलावे लागते नाही तर वास्तवमध्ये
बोलण्यापासून दूर व्हायचे आहे. सावधान, बाबांच्या आठवणीमध्ये आहात? बाबांच्या सुचना
मिळतात किंवा श्रीमत मिळते. तुम्ही आत्म्याला पण ओळखले आहे, बाबांना पण ओळखले आहे
तर, बाबांच्या आठवणीशिवाय तुम्ही विकर्माजीत किंवा सतोप्रधान पवित्र बनू शकत नाहीत.
मुळ गोष्ट आहे की, बाबा म्हणतात लाडक्या गोड गोड मुलांनो, स्वत:ला आत्मा समजून
बाबांची आठवण करा. यासर्व वर्तनमान संगमयुगातील गोष्टी आहेत. ती पण मिलट्री आहे,
तुम्ही पण मिलट्री आहात. गुप्त मिलट्री असते ना. तुम्ही पण गुप्त आहात. तुम्ही
बाबांच्या आठवणीमध्ये मगन होतात, लीन होतात. यालाच गुप्त म्हणले जाते. कोणी ओळखू
शकत नाहीत, कारण तुम्ही गुप्त आहात. तुमची आठवणीची यात्रा गुप्त आहे, फक्त बाबा
म्हणतात माझी आठवण करा कारण बाबा जाणतात, आठवण केल्यामुळेच या बिचाऱ्यांचे कल्याण
होईल. आता तुम्हाला बिचाराच म्हणनार ना. स्वर्गामध्ये बिचारे नसतात. बिचारा
त्यांनाच म्हणले जाते जे कोणत्या तरी बंधनामध्ये फसलेले असतात. हे पण तुम्ही समजता,
तुम्हाला प्रकाश स्तंभ लाइट हाऊस म्हणले जाते. बाबांना पण लाइट हाऊस म्हणले जाते.
बाबासारखे सारखे समजवतात, एका डोळ्यामध्ये शांतीधाम तर दुसऱ्या डोळ्यामध्ये सुखधाम
ठेवा. तुम्ही जसे लाइट हाऊस आहात. उठता-बसता चालता तुम्ही लाइट राहा. सर्वांना
सुखधाम शांतीधामचा रस्ता दाखवत राहा. या दु:खधाममध्ये सर्वांची नाव अटकलेली आहे,
तेव्हा तर म्हणतात हे नावाडी माझी नाव किनाऱ्याला लावा. सर्वांची जीवन रुपी नाव फसली
आहे. त्यांना किनाऱ्याला कोण लावेल? ते काही संकट कालीन सैनिक तर नाहीत. असेच नाव
ठेवले आहे. वास्तवमध्ये मुक्त करणारे सैलक्शन आर्मी तर तुम्ही आहात, सर्वांना मुक्त
करत आहात. सर्वच 5 विकाराच्या साखळ्यामध्ये अटकलेले आहेत, म्हणून म्हणतात आम्हाला
मुक्त करा. तेव्हाच बाबा म्हणतात, आठवणीच्या यात्रेद्वारे तुमची नाव किनाऱ्याला
लागेल. आता तर सर्व फसलेले आहेत. बाबांना बागवान पण म्हणतात. या वेळेतीलच सर्व
गोष्टी आहेत. तुम्हाला फुलासारखे बनायचे आहे. आता तर सर्व काटे आहेत, कारण हिंसक
आहेत. आता अहिंसक बनायचे आहे. पावन बनायचे आहे. जे धर्म स्थापन करण्यासाठी येतात,
ते तर पवित्र आत्मे असतात. ते अपवित्र होऊ शकत नाहीत. प्रथम जेव्हा येतात तर पवित्र
असल्यामुळे त्याची आत्मा किंवा शरीराला दु:ख मिळू शकत नाही कारण त्यांच्यावरती कोणते
पाप नाही. आम्ही जेव्हा पवित्र होतो तर कोणते पाप नव्हते, तर दुसऱ्यांचे पण होत
नव्हते. प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. तेथून आत्मे येतात धर्म स्थापन
करण्यासाठी, ज्यांची परत राजाई चालते. शिख धर्माची पण राजाई असते. सन्याशांची राजाई
चालत येत नाही, राजे थोडेच बनतात. शिख धर्मामध्ये महाराजा इ. आहेत ते जेव्हा येतात
स्थापना करण्यासाठी तर नविन आत्मा येते. येशू ख्रिस्ताने येऊन ख्रिश्चन धर्म स्थापन
केला, बुध्दाने बुध्द धर्म, इब्राहिम ने इस्लाम सर्वांच्या नावाची राशी जुळते. देवी
देवता धर्माचे नाव जुळत नाही. निराकार बाबाच येऊन देवी देवता धर्माची स्थापना करतात.
ते देहधारी नाहीत. बाकी जे पण धर्म स्थापक आहेत, त्यांच्या देहाचे नाव आहे, हे तर
देहधारी नाहीत. राजाई नविन दुनियेत चालते. तर बाबा म्हणतात, मुलांनो स्वत:ला आत्मिक
मिलट्री जरुर समजा. त्या मिलट्रीचे कमांडर इ. असतात म्हणतात, सावधान तर लगेच उभे
राहतात. आता ते तर प्रत्येक जण आप आपल्या गुरुची आठवण करतात किंवा शांतीमध्ये
राहतात. परंतू ती तर खोटी शांती होते. तुम्ही जाणता आम्ही आत्मा आहोत, आमचा धर्मच
शांत आहे. परत आठवण कोणाची करायची आहे. आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे. ज्ञान सहित
आठवण केल्यामुळेच पाप नष्ट होतात. हे ज्ञान कोणामध्ये नाही. मनुष्य थोडेच समजतात,
आम्ही आत्मा शांत स्वरुप आहोत. आम्हाला शरीरापासून अशरीरी वेगळे होऊन बसायचे आहे.
येथे तुम्हाला ती शक्ती मिळत आहे ज्या द्वारे तुम्ही स्वत:ला आत्मा समजून बाबांच्या
आठवणीमध्ये बसू शकता. बाबा समजवतात, कसे स्वत:ला आत्मा समजून अशरीरी होऊन बसा.
तुम्ही जाणतात, आम्हा आत्म्यांना आता परत जायचे आहे. आम्ही परमधामचे राहणारे आहोत.
इतके दिवस घर विसरलो होतो दुसरे कोणी. थोडेच समजतात, आम्हाला घरी जायचे आहे. पतित
आत्मा तर परत जाऊ शकत नाही. न कोणी समजाऊ शकत नाहीत की कोणाची आठवण करायची. बाबा
समजवतात आठवण एकाचीच करायची आहे. दुसऱ्या कोणाची आठवण केलयामुळे काय फायदा? समजा
भक्ती मार्गामध्ये शिवशिव म्हणत राहतात, माहिती तर कोणालाच नाही की, याद्वारे काय
होईल. शिवाची आठवण केल्यामुळेच पाप नष्ट होतील, हे कोणालाच माहिती नाही, आवाज ऐकतील,
ते पण जरुर होईलच. या गोष्टीमुळे काहीच फायदा नाही. बाबा तर यासर्व गुरुंचे अनुभवी
आहेत.
बाबा म्हणतात, हे अर्जुन या सर्वांना सोडा. सतगुरु मिळाले आहेत, तर यांची आवश्यकता
नाही. सतगुरु नाव किनाऱ्याला लावतात. बाबा म्हणतात, मी तुम्हाला आसुरी संसारापासून
दूर घेऊन जातो. विषय सागरापासून दूर जायचे आहे. यासर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत.
नावाडी तर नाव चालवणारे असतात, परंतू समजवण्यासाठी ही नावे दिली आहेत. बाबांना,
प्राणेश्वर अर्थात प्राण देणारे बाबा, ते अमर बनवतात. प्राण आत्म्याला म्हणले जाते.
आत्मा निघून जाते तर म्हणतात, प्राण निघुन गेला. परत शरीराला ठेवून पण घेत नाहीत.
आत्मा आहे तर शरीर पण व्यवस्थित आहे. आत्म्याशिवाय तर शरीरामध्ये वास येतो. परत
त्यांना ठेवून काय करणार. जनावर पण असे करत नाहीत. फक्त एक माकडच असते. तिच्या
मुलांचा मृत्यू होतो. वास येतो तरी मुडदयाला सोडत नाही. ते तर जनावर आहेत, तुम्ही
तर मनुष्य आहात ना. शरीराचा मृत्यू झाला तर म्हणतात, लवकर बाहेर काढा. मनुष्य
म्हणतात स्वर्गवासी झाले. जेव्हा प्रेताला घेऊन जातात तर पुजा इ. करुन समजतात आता
हे स्वर्गामध्ये जाणार आहेत तर, परत त्याचे तोंड स्मशानाकडे करतात. तुम्ही
कृष्णाच्या चित्रामध्ये दाखवले आहे, नर्काला लात मारत आहे. कृष्णाचे हे शरीर तर नाही.
त्यांचे नावरुप बदलत राहते. अनेक गोष्टी समजावून बाबा म्हणतात, मनमनाभव. येथे येऊन
बसतात तर लक्ष दयायला पाहिजे की बुध्दी एका शिवपित्याकडेच लागली पाहिजे. तुमचे लक्ष
नेहमीच समोर पाहिजे. जो पर्यंत जगायेच आहे तर बाबांची आठवण करायची आहे. आठवणी मुळेच
जन्म जन्मांतराचे पाप नष्ट होतात. आठवण केली नाही तर पाप नष्ट होणार नाहीत. बाबांची
आठवण करायची आहे, आठवण करताना डोळे बंद करायचे नाहीत. सन्याशी लोक डोळे बंद करुन
बसतात. कोणी कोणी तर स्त्रीचे तोंड पण पाहत नाहीत, पट्टी बांधून बसतात. तुम्ही
जेव्हा येथे बसतात तर रचनाकार आणि रचनाच्या आदी मध्य अंतचे स्वदर्शन चक्र फिरवत
राहायचे आहे. तुम्ही लाइट हाऊस आहात ना. हे दु:खधाम आहे, एका डोळ्यामध्ये दु:खधाम
तर दुसऱ्या डोळ्यामध्ये सुखधाम आहे. उठता-बसता स्वत:ला लाइट हाऊस समजा. बाबा
वेगवेगळ्या प्रकारे समजवत राहतात. तुम्ही स्वत:ला सांभाळत राहा. लाइट हाऊस
बनल्यामुळे आपलेच कल्याण होत राहते. बाबांची आठवण करत राहा, जेव्हा कोणी
रस्त्यामध्ये भेटले तर त्यांना पण सांगा. ओळखीचे खुप भेटत राहतात, ते तर एक दोघांना
राम राम करत राहतात. त्यांना सांगा तुम्हाला माहिती आहे की, हे दु:खधाम आहे, ते
शांतीधाम आणि सुखधाम आहे. तुम्ही शांतीधाम सुखधाम मध्ये जाऊ इच्छिता का? हे तिन
चित्र कोणाला पण समजवणे खुपच सहज आहे. तुम्हाला इशारा देतात. लाइट हाऊस पण ईशारा
देतात. ही नाव तर रावणाच्या जेलमध्ये अडकली आहे. मनुष्य मनुष्याला मुक्त करु शकत
नाहीत. त्या तर सर्व कृत्रिम हदच्या गोष्टी आहेत. या बेहदच्या गोष्टी आहेत. सामाजिक
संस्थेची पण सेवा नाही. वास्तवमध्ये खरी सेवा ही आहे, सर्वांची विकारात बुडालेली
नाव किनाऱ्याला लावणे. तुमच्या बुध्दीमध्ये आहे, मनुष्यांची कशाप्रकारे सेवा करायची?
प्रथम तर सांगा, मुक्तीधाम मध्ये जाण्यासाठी, बाबांना भेटण्यासाठी गुरु करतात, परंतू
काहीच भेटत नाही. भेटण्याचा रस्ता तर बाबाच सांगतात. ते समजवतात, हे ग्रंथ इ.
वाचल्यामुळे भगवान भेटतील, आशा ठेवल्यावर शेवटी कोणत्या न कोणत्या रुपामध्ये ईश्वर
भेटतील. कधी भेटतील, हे बाबांनी तुम्हाला सर्व काही समजवले आहे. तुम्ही चित्रामध्ये
दाखवले आहे की, एकाची आठवण करायची आहे. जे पण धर्म स्थापक आहेत, ते पण इशारा देतात
कारण तुम्ही शिक्षा, ज्ञान दिले आहे तर ते पण वरती इशारा करतात. साहेबांची आठवण करा,
ते पिताच सतगुरु आहेत. बाकी तर अनेक प्रकारचे समज देणारे आहेत, त्यांना गुरु म्हणले
जाते. अशरीरी बनण्याची शिक्षा कोणी जाणत नाहीत. तुम्ही म्हणाल शिवबाबांची आठवण करा.
ते लोक शिवाच्या मंदिरामध्ये जातात तर हमेशा शिवाला बाबा म्हणण्याची सवय लागली आहे.
दुसऱ्या कोणाला बाबा म्हणत नाहीत, परंतू ते निराकार तर नाहीत, शरीरधारी आहेत. शिव
तर निराकार आहेत, खरे बाबा आहेत. ते तर सर्वांचे बाबा झाले. सर्व आत्मे अशरीरी आहेत.
तुम्ही मुलं जेव्हा येथे बसतात तर याच धुनमध्ये बसा. तुम्ही जाणतात, आम्ही कसे फसलो
होतो. आता बाबांनी रस्ता दाखवला आहे, बाकी सर्व फसले आहेत, सुटत नाहीत. सजा खाऊन
सर्व सुटतील तुम्हा मुलांना समजवत राहतात, सजा खाऊन थोडेच पद मिळेल. सजा खुप खातात
तर पद भ्रष्ट होते. थोडी सजा मिळते तर पद पण चांगले मिळेल. हे काट्याचे जंगल आहे.
सर्व एक दुसऱ्यांना विकारी बनवत राहतात. स्वर्गाला ईश्वरीय बाग म्हणले जाते.
क्रिश्चन लोक म्हणतात, स्वर्ग होता. कधी साक्षात्कार पण करतात, होऊ शकते जे दैवी
देवता धर्माचे असतात तर परत आपल्या धर्मामध्ये येऊ शकतात. बाकी फक्त पाहिले तर काय
होईल? फक्त साक्षात्कार झाल्यामुळे स्वर्गामध्ये कोणी जाऊ शकत नाही. जो पर्यंत
बाबांना जाणून ज्ञान घेत नाहीत, तो पर्यंत. सर्व जण तर येऊ शकत नाहीत. देवता तर खुप
थोडे असतात. आता तर इतके हिंदू आहेत, वास्तवमध्ये देवता होते ना, हे पतित आहेत.
पतितला देवता म्हणने शोभणार नाही. हा एकच धर्म आहे, ज्याला धर्म भ्रष्ट कर्मभ्रष्ट
म्हणले जाते. आदी सनातन हिंदू धर्म म्हणले जाते. देवता धर्माचा कॉलमच ठेवत नाहीत.
आम्हा मुलांचे सर्वांत प्रिय बाबा आहेत, जे श्रेष्ठ बनवतात. तुम्ही समजाऊ शकतात की,
बाबा कसे येतात. जेव्हा देवतांचे पाऊल पण जुन्या तमोप्रधान सृष्टीवरती पडत नाही, तर
बाबा कसे येतील? बाबा तर निराकार आहेत, त्यांचे स्वत:चे पाय नाहीत म्हणून ब्रह्मा
मध्ये प्रवेश करतात. आता तुम्ही मुलं ईश्वरीय दुनियेमध्ये बसले आहात, ते सर्व आसुरी
दुनियेमध्ये बसले आहेत. हे खुपच लहान संगमयुग आहे. तुम्ही समजतात, आम्ही न दैवी
संसारामध्ये आहोत ना, आसुरी संसारामध्ये, आम्ही तर ईश्वरीय संसारामध्ये आहोत. बाबा
आले आहेत, आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी. बाबा म्हणतात ते माझे घर आहे. तुमच्यासाठी,
मी माझे घर सोडून आलो आहे. भारत सुखधाम बनतो तर मी परत थोडेच त्या दुनियेमध्ये येतो.
मी विश्वाचे मालक बनत नाही, तुम्ही बनतात. आम्ही ब्रह्मांडचे मालक आहोत. ब्रह्मांड
मध्ये सर्व येतात. आता पण ते मालक बनून बसले आहेत ज्यांना यायचे आहे, परंतू ते येऊन
विश्वाचे मालक बनत नाहीत. समजवत तर खुप राहतात. कोणी विद्यार्थी खुप चांगले असतात
तर स्कॉलरशिव घेतात. येथे म्हणतात आम्ही पवित्र राहू परत घरी गेल्यानंतर पतित बनतात,
हे पण आश्चर्य आहे. अशा कच्च्यांना घेऊन येऊ नका. ब्राह्मणीचे काम आहे, तपासून घेऊन
येणे. तुम्ही जाणतात, आत्माच शरीर धारण करते, तिला अविनाशी भुमिका मिळाली आहे. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्ण आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. लाइट हाऊस
बनून सर्वांना शांतीधाम सुखधामचा रस्ता दाखवयाचा आहे. सर्वांची नाव दु:खधाम मधून
काढायची आहे. स्वत:चे कल्याण करायचे आहे.
2. आपल्या शांत स्वरुपामध्ये स्थिर होऊन, शरीरापासून वेगळे होण्याचा अभ्यास करायचा
आहे. आठवणीमध्ये डोळे उघडे ठेवून बसायचे आहे. बुध्दीद्वारे रचनाकार आणि रचनेचे
स्मरण करायचे आहे.
वरदान:-
या अलौकिक
जीवनामध्ये संबंधाच्या शक्तीद्वारे अविनाशी स्नेह आणि सहयोग प्राप्त करणारे श्रेष्ठ
आत्मा भव
या अलौकिक जीवनामध्ये
संबंधाची शक्ती तुम्हा मुलांना डबल रुपामध्ये प्राप्त आहे. एका शिवपित्याद्वारे
सर्व संबंध, दुसरे म्हणजे दैवी परिवाराद्वारे संबंध. या संबंधाद्वारे सदा निस्वार्थ
स्नेह, अविनाशी स्नेह आणि सहयोग नेहमी प्राप्त होत राहतो. तर तुमच्या जवळ संबंधाची
पण शक्ती आहे. असे श्रेष्ठ अलौकिक जीवन असणारी शक्ती संपन्न वरदानी आत्मा आहात
म्हणून तक्रार करणारे नाहीत तर सदा खुश राहणारे बना.
बोधवाक्य:-
कोणतेही
नियोजन विदेही, साक्षी बनून विचार करा आणि सेकंदामध्ये सरळ स्थिती बनवत चला...!