25-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- बाबांच्या श्रीमतावर तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात,म्हणून
त्यांच्या श्रीमताचे शास्त्र आहे, सर्व शास्त्र शिरोमणी श्रीमद्भगवद्गीता"
प्रश्न:-
सतयुगामध्ये
प्रत्येक वस्तू चांगल्यात चांगली सतोप्रधान असते का?
उत्तर:-
कारण की तिथे मनुष्य सतोप्रधान आहेत,जेव्हा मनुष्य चांगले असतात तेव्हा सामग्री पण
चांगली असते आणि मनुष्य वाईट असतात तेव्हा सामग्री सुद्धा नुकसान कारक असते.
सतोप्रधान सृष्टीमध्ये कोणतीही वस्तू अप्राप्त नाही,कुठूनही काही मागावे लागत नाही.
ओम शांती।
बाबा या शरीराद्वारे समजावत आहेत.यांना(ब्रह्मा बाबांना)जीव म्हटले जाते
यांच्यामध्येही आत्मा आहे आणि तुम्ही मुले जाणत आहात परमपिता परमात्मा सुद्धा
यांच्यामध्ये आहे.हे तर प्रथम पक्के व्हायला पाहिजे म्हणूनच यांना दादा ही
म्हणतात.हा तर मुलांना निश्चय आहे.या निश्चया मध्येच रमून जायचे आहे.बरोबर बाबांनी
ज्यांच्या मध्ये प्रवेश केला आहे किंवा अवतार घेतला आहे त्यांच्यासाठी बाबा स्वतः
म्हणतात मी यांच्या खूप जन्मांच्या अंतच्या ही अंत काळात येतो.मुलांना समजावले गेले
आहे, हे सर्वशास्त्र शिरोमणी गीतेचे ज्ञान आहे.श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत.श्रेष्ठ ते
श्रेष्ठ मत आहे उंच ते उंच भगवानाचे.ज्याच्या श्रीमताने तुम्ही मनुष्यापासून देवता
बनत आहात.तुम्ही भ्रष्ट मनुष्यापासून श्रेष्ठ देवता बनत आहात. यासाठीच तुम्ही येत
आहात. बाबाही स्वतः म्हणतात मी येतो तुम्हाला श्रेष्ठाचारी निर्विकारी मतवाले
देवी-देवता बनवण्यासाठी.मनुष्या पासून देवता बनण्याचा अर्थही समजावून घ्यायचा
आहे.विकारी मनुष्यापासून निर्विकारी देवता बनवण्यासाठी येतात. सतयुगामध्ये मनुष्य
राहतात परंतु दैवीगुण वाले.आता कलियुगामध्ये आहेत आसुरी गुण वाले.सर्व मनुष्य सृष्टी
आहे,परंतु ते आहेत ईश्वरीय बुद्धी,हे आहेत असुरी बुद्धी.तिथे ज्ञान,इथे भक्ती.
ज्ञान आणि भक्ती वेगवेगळी आहे ना.भक्तीची पुस्तके किती आणि ज्ञानाची पुस्तके किती
आहेत. ज्ञानाचा सागर पिता आहे. त्याचेही एक पुस्तक असायला पाहिजे.जे पण धर्म स्थापन
करतात त्यांचे पुस्तक एक असायला पाहिजे.त्याला धार्मिक पुस्तक(धर्मग्रंथ)असे म्हटले
जाते.पहिले धार्मिक पुस्तक आहे गीता,श्रीमद्भगवद्गीता.हे सुद्धा मुले जाणतात-प्रथम
आदी सनातन देवी-देवता धर्म आहे न की हिंदू धर्म.गीते मुळे हिंदू धर्म स्थापन झाला
आणि गीता श्रीकृष्णाने गायिली आहे असे मनुष्य समजतात.कोणाला विचारले तर म्हणतात
परंपरेपासून ही श्रीकृष्णाने गायली आहे. कोणत्याही शास्त्रांमध्ये शिवभगवानुवाच असे
नाही. श्रीमद् कृष्ण भगवानुवाच लिहिले आहे,ज्यांनी गीता वाचली असेल त्यांना सहज
समजेल.आता तुम्ही समजता याचं गीता ज्ञानामुळे मनुष्यापासून देवता बनले आहेत, जे
आत्ता बाबा तुम्हाला देत आहेत.राजयोग शिकवत आहेत. पवित्रता ही शिकवत आहेत.काम
महाशत्रू आहे,यामुळेच तुम्ही हार खाल्ली आहे.आता परत त्याच्यावर विजय मिळवल्याने
तुम्ही विश्वाचे मालक बनून जाता. हे तर खूप सहज आहे.बेहदचा पिता बसुन यांच्या द्वारे
तुम्हाला शिकवत आहे.तो आहे सर्व आत्म्यांचा पिता.नंतर मग हा आहे मनुष्यांचा बेहदचा
पिता. नावच आहे प्रजापिता ब्रह्मा.तुम्ही कोणालाही विचारले ब्रह्माच्या पित्याचे
नाव सांगा तर गोंधळून जातील.ब्रह्मा-विष्णू-शंकर आहे रचना.या तिघांचा कोणीतरी पिता
असेल ना.तुम्ही दाखवता या तिघांचा पिता निराकार शिव आहे.ब्रह्मा-विष्णू-शंकराला
सूक्ष्मवतनचे देवता दाखवले आहे.त्यांच्यावरती शिव आहे. मुले जाणतात शिवबाबांची मुले
आहेत. जे पण आत्मे आहेत त्यांना आपले शरीर तर असेल. तो तर सदैव निराकार परमपिता
परमात्मा आहे.मुलांना माहित झाले आहे निराकार परमपिता परमात्म्याची आम्ही मुले आहोत.
आत्मा शरीराद्वारे बोलत आहे- परमपिता परमात्मा.किती सोप्या गोष्टी आहेत.याला म्हटले
जाते अल्फ बे(पिता आणि वारसा). कोण शिकवत आहे?गीतेचे ज्ञान कोणी सांगितले?निराकार
पित्याने.त्यांच्यावर कोणताही ताज इ.नाही.तो ज्ञानाचा सागर, बीजरूप,चैतन्य
आहे.तुम्हीसुद्धा चैतन्य आत्मा आहात ना!सर्व झाडांच्या आदी-मध्य-अतांला तुम्ही जाणत
आहात.तुम्ही माळी नाहीत परंतु समजू शकता कसे बीज टाकतात,त्यापासून कशाप्रकारे झाड
तयार होते.ते झाड तर आहे जड,हे आहे चैतन्य.तुमच्या आत्म्यामध्ये ज्ञान आहे,इतर
कोणाच्याही आत्म्यामध्ये ज्ञान नसते.बाबा चैतन्य मनुष्य सृष्टीचा बीजरूप आहे.तर झाड
ही मनुष्याचे असेल.ही चैतन्य रचना आहे. बीज आणि रचनेमध्ये फरक तर आहे ना!आंब्याचे
बीज टाकल्याने आंबा तयार होतो, नंतर झाड किती मोठे होते.अशाप्रकारे मनुष्याच्या
बीजापासून किती मनुष्य निर्माण होतात.जड बीजा मध्ये कोणतेही ज्ञान नाही.हा तर
चैतन्य बीजरूप आहे. त्याच्यामध्ये सर्व सृष्टी रुपी झाडाचे ज्ञान आहे की कशी
उत्पत्ती,पालना आणि नंतर विनाश होतो.हे खूप मोठे झाड नष्ट होऊन नंतर दुसरे नवे झाड
कसे उभे होते!हे सर्व गुप्त आहे. तुम्हाला ज्ञानही गुप्त मिळत आहे. बाबाही गुप्त आले
आहेत.तुम्ही जाणत आहात हे कलम लागत आहे.आता तर सर्व पतित बनले आहेत.अच्छा बीजातून
प्रथम क्रमांकाला जे पान निघाले ते कोण होते? सतयुगाचे पहिले पान तर कृष्णालाच
म्हणतात, लक्ष्मी-नारायणाला नाही.नवे पान छोटे असते.नंतर मोठे होते.तर या बीजाची
किती महिमा आहे.हे तर चैतन्य आहे ना.नंतर पाने ही निघतात.त्यांची महिमा तर होत
असते.तुम्ही आता देवी-देवता बनत आहात.दैवी गुण धारण करत आहात.मुख्य गोष्टच ही आहे
की आम्हाला दैवी गुण धारण करायचे आहेत, यांच्यासारखे बनायचे आहे. चित्रही आहेत.हे
चित्र जर नसते तर बुद्धीमध्ये ज्ञानच आले नसते. हे चित्र खूप उपयोगी येतात. भक्ती
मार्गामध्ये या चित्रांची पूजा होते आणि ज्ञान मार्गामध्ये या चित्रांमुळे तुम्हाला
ज्ञान मिळते की असे बनायचे आहे.भक्ती मार्गामध्ये आम्हाला असे बनायचे आहे असे समजत
नाहीत.भक्ती मार्गामध्ये किती मंदिर बनतात. सर्वात जास्त मंदिर कोणाचे असतील?अवश्य
शिवबाबांचे असतील जो बीजरूप आहे. त्यानंतर जी पहिली रचना आहे त्यांचे मंदिर
बनतील.पहिली रचना हे लक्ष्मी-नारायण आहेत. शिवाच्या नंतर यांची पुजा सर्वात जास्त
होते.माता तर ज्ञान देतात, त्यांची पूजा होत नाही.त्या तर शिकवतात ना.बाबा तुम्हाला
शिकवत आहेत.तुम्ही कोणाचीही पूजा करत नाही.शिकणार्याची आत्ता पूजा करू शकत नाही.
तुम्ही शिकल्यानंतर पुन्हा आडाणी बनाल तेव्हा तुमची पूजा होईल.तुम्ही सो देवी-देवता
बनत आहात.तुम्हीही जाणत आहात जो आम्हाला असे बनवत आहे त्यांची पूजा होईल नंतर आमची
क्रमवार पूजा होईल.नंतर घसरता-घसरता पाच तत्वांची ही पूजा करू लागतात.शरीर 5
तत्त्वांचे आहे ना.5 तत्वांची पूजा करा किंवा शरीराची करा,एकच झाले.हे तर ज्ञान
बुद्धी मध्ये आहे. हे लक्ष्मी-नारायण संपूर्ण विश्वाचे मालक होते.या देवी-देवतांचे
राज्य नव्या सृष्टीमध्ये होते.परंतु केव्हा होते?हे जाणत नाहीत, लाखो वर्षापूर्वी
होते असे म्हणतात.आता लाखो वर्षांची गोष्ट तर कधी कोणाच्या बुद्धीमध्ये राहू शकत
नाही.आता तुम्हाला स्मृती आहे आम्ही आज पासून 5000 वर्षापूर्वी आदि सनातन देवी-देवता
धर्माचे होतो. देवी-देवता धर्म वाले नंतर इतर धर्मामध्ये गेले आहेत.हिंदूधर्म म्हणू
शकत नाही.परंतु पतित असल्यामुळे स्वतःला देवी-देवता म्हणून घेणे शोभत ही नाही.
अपवित्रला देवी-देवता म्हणू शकत नाही.मनुष्य पवित्र देवींची पूजा करतात तर अवश्य
स्वतः अपवित्र आहेत म्हणूनच पवित्र च्या समोर माथा झुकवावा लागतो.भारतामध्ये खास
कन्यांना नमस्कार करतात.कुमारांना नमस्कार करत नाहीत.स्त्रियांना नमस्कार
करतात.पुरुषांना नमस्कार का करत नाहीत? कारण की यावेळी ज्ञान प्रथम मातानांच
मिळते.बाबा यांच्या मध्ये प्रवेश करतात.हे ही समजता बरोबर ही ज्ञानाची मोठी नदी
आहे.ज्ञान नदी ही आहे नंतर पुरुषही आहेत.ही आहे सर्वात मोठी नदी.ब्रह्मपुत्रा नदी
सर्वात मोठी आहे,जी कलकत्त्याच्या बाजूला सागरा मध्ये जाऊन मिळते.तिथे मेळा ही
भरतो.परंतु त्यांना हे माहित नाही की हा आत्मा आणि परमात्माचा मेळा आहे.ती तर
पाण्याची नदी आहे, जिला ब्रह्मपुत्रा असे नाव दिले आहे.त्यांनी तर ईश्वराला ब्रह्म
म्हटले आहे म्हणुनच ब्रह्मपुत्रेला खूप पावन समजतात.मोठी नदी आहे तर ती पवित्र ही
असेल. खरेतर पतित-पावन गंगेला नाही ब्रह्मपुत्रेला म्हटले जाईल.यांचा मेळा ही
भरतो.हा सुद्धा सागर आणि ब्रह्मा नदीचा मेळा आहे. ब्रह्मा द्वारे दत्तक कसे घेतात-या
रहस्ययुक्त समजण्याच्या गोष्टी आहेत, ज्या लोप पावल्या जातात.या तर खूप सहज गोष्टी
आहेत ना.
भगवानुवाच,मी तुम्हाला राजयोग शिकवत आहे नंतर ही दुनिया खलास होऊन जाईल.शास्त्र इ.
काहीच राहणार नाहीत.नंतर भक्ती मार्गामध्ये हे शास्त्र असतात.ज्ञान मार्गामध्ये
शास्त्र नसतात.मनुष्य समजतात हे शास्त्र परंपरेपासून चालत आले आहेत.ज्ञान तर काहीच
नाही. कल्पाचे आयुष्यच लाखो वर्ष सांगितले आहे म्हणूनच परंपरा असे म्हणतात.याला
अज्ञान अंधार असे म्हटले जाते.आता तुम्हा मुलांना बेहदचे शिक्षण मिळत आहे,ज्याद्वारे
तुम्ही आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावु शकता.तुम्हाला या देवी-देवतांच्या
इतिहास-भूगोलाचे पूर्ण ज्ञान आहे.हे पूज्य प्रवृत्ती मार्ग वाले होते.आता पतित
पुजारी बनले आहात.सतयुगामध्ये आहे पवित्र प्रवृत्ती मार्ग,इथे कलियुगामध्ये अपवित्र
प्रवृत्ती मार्ग आहे.नंतर शेवटी निवृत्ती मार्ग होतो.तो सुद्धा नाटकामध्ये
आहे.त्याला संन्यास धर्म म्हटले जाते.घरादाराचा संन्यास करून जंगलामध्ये निघून
जातात.तो आहे हदचा संन्यास. या जुन्या दुनियेमध्येच राहतात ना.तुम्ही आता समजता
आम्ही संगमयुगावर आहोत नंतर नव्या दुनियेमध्ये जाणार.तुम्हाला तिथी, तारीख,सेकंदा
सहित सर्व माहित आहे.ते लोक तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष आहे असे म्हणतात याचा
पूर्ण हिशोब काढू शकतो. लाखो वर्षाची तर गोष्ट कोणाच्या आठवणीमध्ये ही राहू शकत
नाही.तुम्ही आता समजू शकता, बाबा काय आहेत,कसे येतात काय कर्तव्य करतात?तुम्ही
सर्वांच्या कर्तव्याला,जन्मपत्रीला ही जाणता.बाकी झाडाची पाने तर खुप असतात.ती
थोडीच मोजू शकतो.या बेहद सृष्टी रुपी झाडाची पाने किती आहेत?5000 वर्षांमध्ये एवढे
करोड आहेत.तर लाखो वर्षांमध्ये किती असंख्य मनुष्य होतील.भक्ती मार्गामध्ये दाखवले
आहे-लिहिले आहे सतयुग एवढ्या वर्षाचे आहे, त्रेता एवढ्या वर्षाचे आहे,द्वापर एवढ्या
वर्षाचे आहे.तर बाबा बसून तुम्हा मुलांना हे सर्व रहस्य समजावत आहेत.आंब्याचे बीज
पाहिल्यानंतर आंब्याचे झाड समोर येईल ना!आता मनुष्य सृष्टीचा बीजरूप तुमच्यासमोर
आहे.तुम्हाला बसून झाडाचे रहस्य समजावत आहेत कारण की तो चैतन्य आहे.सांगतात आपले हे
उलटे झाड आहे.तुम्ही समजू शकता जे पण या दुनियेमध्ये आहेत,जड किंवा चैतन्य,हुबेहूब
पुनरावृत्त होतील. आता किती वृद्धि प्राप्त करत राहतात.सतयुगामध्ये एवढे असू शकत
नाहीत.आमकी वस्तू ऑस्ट्रेलिया मधून,जपानमधून आणली असे म्हणतात. सतयुगामध्ये
ऑस्ट्रेलिया,जपान इ.थोडीच होते.नाटका नुसार तिथली वस्तू इथे येते.सुरुवातीला अमेरिके
मधून गहू इ.येत होते. सतयुगामध्ये तर सर्व काही भरपूर असते .तिथे तर आहेच एक धर्म,
सर्व वस्तू भरपूर असतात.इथे सर्व धर्म वृद्धि प्राप्त करत राहतात, तेव्हा त्याबरोबर
सर्व वस्तू कमी होत जातात.सतयुगामध्ये कुठूनही मागत नाहीत.आता तर पहा कुठून-कुठून
मागवतात! शेवटी मनुष्याची वृद्धी होत गेली आहे,सतयुगामध्ये तर कोणतीही वस्तू
अप्राप्त नसते.तिथली प्रत्येक वस्तू सतोप्रधान खूप चांगली असते.मनुष्य ही सतोप्रधान
आहेत.मनुष्य चांगले आहेत तर सामग्री ही चांगली आहे.मनुष्य वाईट आहे तर सामग्री
सुद्धा नुकसानकारक आहे. विज्ञानाची मुख्य वस्तू आहे एटॉमिक बॉम,ज्याद्वारे एवढा
सर्व विनाश होतो.कसे बनवत असतील!बनवणाऱ्या आत्म्यामध्ये पहिल्यापासूनच नाटका नुसार
ज्ञान असेल.जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्यामध्ये ते ज्ञान येते,ज्यांच्यामध्ये
समज असेल तेच काम करतील आणि इतरांना शिकवतील.कल्प-कल्प जो अभिनय केला आहे तोच करत
राहतील.आता तुम्ही किती ज्ञानवान बनत आहात,यापेक्षा जास्त ज्ञान असत नाही.ते आहे
मायेचे ज्ञान,ज्यामुळे विनाश होतो.ते वैज्ञानिक लोक चंद्रावर जातात,शोध घेत राहतात.
तुमच्यासाठी कोणतीही नवीन गोष्ट नाही.हा सर्व मायेचा भभका आहे.खूप देखावा करतात,
अतिशय खोला मध्ये जातात. बुद्धी खूप चालवतात.काहीतरी कमाल करून दाखवावी.खूप कमाल
करून दाखवल्यानंतर नुकसान होते.काय-काय बनवत राहतात.बनवणारे जाणतात यामुळे हा विनाश
होणार आहे. अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. गुप्त
ज्ञानाचे स्मरण करून हर्षित राहायचे आहे.देवतांच्या चित्रांना समोर पाहून,त्यांना
नमन वंदन करण्याच्या बदल्यात यांच्यासारखे बनण्यासाठी दैवीगुण धारण करायचे आहेत.
2. सृष्टीचा बीजरूप पिता आणि त्याच्या चैतन्य रचनेला समजून ज्ञानवान बनायचे आहे,या
ज्ञानापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही ज्ञान असू शकत नाही,याच नशेमध्ये राहायचे आहे.
वरदान:-
जबाबदारी
सांभाळताना आकारी आणि निराकारी स्थितीच्या अभ्यासाद्वारे साक्षात्कारमुर्त भव
ज्याप्रमाणे साकार
रूपामध्ये एवढी मोठी जबाबदारी असतानाही आकारी आणि निराकारी स्थितीचा अनुभव करत
राहिले अशा प्रकारे पित्याचे अनुकरण करा.साकार रुपामध्ये फरिश्ता स्वरूपाची अनुभुती
करवा.कुणी कितीही अशांत किंवा बेचैन घाबरलेला तुमच्यासमोर येईल परंतु तुमची एक
दृष्टी,वृत्ती आणि स्मृतीची शक्ती त्याला बिलकुल शांत करेल.व्यक्त भावामध्ये येईल
आणि अव्यक्त स्थितीचा अनुभव करेल तेव्हाच साक्षात्कारमूर्त असे म्हणतील.
बोधवाक्य:-
जे खरे दया
स्वरूप(रहमदिल)आहेत त्यांना देह किंवा देह अभिमानाचे आकर्षण होऊ शकत नाही.