28-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- कधीही खोट्या(मिथ्या)अहंकारा मध्ये येऊ नका,या रथाचा ही खूप-खूप आदर
ठेवा"
प्रश्न:-
तुम्हा
मुलांमध्ये पदमापदम भाग्यशाली आणि दूर्भाग्यशाली कोण आहेत?
उत्तर:-
ज्यांचे वागणे देवतां सारखे आहे,सर्वांना सुख देतात ते आहेत पदमापदम भाग्यशाली आणि
जे नापास होतात त्यांना दुर्भाग्यशाली म्हणतात.काही- काही महान दुर्भाग्यशाली
बनतात,सर्वांना दुःख देत राहतात.सुख देणे जाणतच नाहीत.बाबा म्हणतात मुलांनो आपला
चांगल्या प्रकारे सांभाळ करा सर्वांना सुख द्या,लायक बना.
ओम शांती।
आत्मिक पिता बसून आत्मिक मुलांना समजावत आहे.तुम्ही या पाठशाळेमध्ये बसून उच्च दर्जा
प्राप्त करता. मनामध्ये समजत आहात आम्ही खूप उंच ते उंच स्वर्गाचे पद प्राप्त करत
आहोत.अशा मुलांना तर खूप खुशी व्हायला पाहिजे.जरी सर्वांना निश्चय आहे तरी सर्व
एकसारखे असू शकत नाहीत.प्रथम पासून शेवट पर्यंत नंबर तर असतातच.पेपर मध्ये ही प्रथम
पासून शेवट पर्यंत नंबर असतात.काही नापास होतील तर काही पासही होत राहतील.तर
प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा-बाबा जे आम्हाला एवढे उच्च बनवत आहेत,किती लायक
बनलो आहे?आमक्या पेक्षा चांगला आहे का कमी आहे?हे शिक्षण आहे ना. पाहायलाही मिळते,जे
एखाद्या विषयामध्ये कमजोर असतात ते खाली घसरतात.भले माॅनीटर(वर्ग मंत्री)असेल तरीही
एखाद्या विषयांमध्ये कमी असेल तर खाली घसरेल.कुणीतरी एखादाच स्कॉलरशिप घेतो.हीसुद्धा
शाळा आहे.तुम्ही जाणत आहात आम्ही सर्व शिकत आहे,यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे
पवित्रतेची.पवित्र बनण्यासाठी बाबांना बोलवले आहे ना.जर खराब दृष्टी काम करत असेल
तर स्वतःला जाणीव होत राहील.बाबांना लिहितात,बाबा आम्ही या विषयामध्ये कमी आहोत.
आम्ही नापास होऊ, असेही समजतात.यामध्ये सर्वात पहिला विषय आहे-पवित्रता. अनेक जण
लिहितात बाबा आम्ही हार खाल्ली,तर त्याला काय म्हणावे?त्यांच्या मनाला समजत असेल-मी
आता चढू शकणार नाही.तुम्ही पवित्र दुनिया स्थापन करत आहात ना.तुमचे उद्दिष्टच हे
आहे.बाबा म्हणतात- मुलांनो,माझीच आठवण करा आणि पवित्र बना तर या लक्ष्मी-नारायणाच्या
घराण्यांमध्ये जाऊ शकता.शिक्षक तर समजू शकतात हा एवढे उच्चपद प्राप्त करू शकतो किंवा
नाही?तो परम शिक्षक आहे.हे दादा ही शाळेमध्ये गेले आहेत ना.काही-काही मुले अशी खराब
कामे करतात शेवटी शिक्षकांना सजा द्यावी लागते. सुरुवातीला खूप कडक शिक्षा देत
होते.आता शिक्षा इ.कमी केली आहे त्यामुळे विद्यार्थी जास्तच बिघडले आहेत.आज काल
विद्यार्थी किती गोंधळ करतात. विद्यार्थ्यांना नवे रक्त(न्यू ब्लड) म्हणतात ना.ते
पहा काय करत आहेत!आग लावतात,आपले तारुण्य दाखवतात.ही आसुरी दुनिया आहे.तरुण मुलेच
खूप खराब असतात,त्यांची दृष्टी खूप खराब असते.दिसायला तर खूप चांगले दिसतात.ज्या
प्रमाणे म्हणतात ना-ईश्वराचा अंत प्राप्त करू शकत नाही अशा प्रकारे यांचा ही अंत
प्राप्त करू शकत नाहीत,की कोणत्या प्रकारचे मनुष्य आहेत.होय,ज्ञानाविषयी बुद्धीने
माहित पडते हा कसा शिकत आहे याचे वागणे कसे आहे.कोणतीही गोष्ट बोलतात तर जसे की
मुखातून फुल निघत आहे,काही जण तर असे बोलतात जसे की दगड मारतात. पाहिले तर खूप
चांगले मुद्दे इ. लिहितात परंतु आहेत पत्थर बुद्धी.बाहेरचा शो आहे.माया खूप
शक्तिशाली आहे म्हणूनच गायन आहे आश्चर्यवत ऐकतात,स्वतःला शिवबाबा ची संतान म्हणतात,
इतरांना ऐकवतात,सांगतात नंतर सोडून जातात,अर्थात निंदक बनतात.हुशार निदंक बनत
नाहीत,असे नाही,चांगले-चांगले हुशारही निंदक बनतात.त्या सेनेमध्ये ही असे होत राहते.
विमाना सहित दुसऱ्या देशामध्ये निघून जातात.इथेही असे होत राहते,स्थापनेमध्ये खूप
मेहनत लागते.मुलांनाही शिक्षणामध्ये मेहनत,शिक्षकांनाही शिकवण्यामध्ये मेहनत करावी
लागते.पाहिले जाते हा सर्वांना त्रास देत आहे,शिकत नाही तर शाळेमध्ये छड्या देतात.हा
तर पिता आहे पिता काहीही म्हणत नाहीत.बाबांजवळ हा नियम नाही,इथे तर बिलकुल शांत
राहायचे असते.बाबा तर सुखदाता,प्रेमाचा सागर आहे.तर मुलांचे वागणे ही देवतां सारखे
असायला पाहिजे ना.तुम्हा मुलांना बाबा सदैव म्हणतात तुम्ही पदमापदम भाग्यशाली
आहात.परंतु पदमापदम दुर्भाग्यशालीही बनतात.जे नापास होतात त्यांना तर दुर्भाग्यशाली
म्हणतात ना.बाबा जाणतात-शेवटपर्यंत हे होतच राहते.कोणी ना कोणी महान दुर्भाग्यशाली
अवश्य बनतात.वागण्यावरून असे समजते की हे थांबू शकणार नाहीत.एवढे उच्च बनण्याच्या
लायक नाहीत,सर्वांना दुःख देत राहतात.सुख देणे जाणतच नाही तर त्यांची हालत काय होईल!
बाबा सदैव म्हणतात-मुलांनो, स्वतःला चांगल्या प्रकारे संभाळा,हे सुद्धा नाटका नुसार
होणारच आहे,अजूनच लोखंडा पेक्षाही खराब होऊन जातात.तेही चांगले-चांगले,कधी चिठ्ठी
ही लिहित नाहीत. बिच्चाऱ्याचे काय हाल होतील!
बाबा म्हणतात-मी आलो आहे सर्वांचे कल्याण करण्यासाठी. आज सर्वांची सदगती करतो, नंतर
उद्या दुर्गती होऊन जाते. तुम्ही म्हणाल आम्ही काल विश्वाचे मालक होतो,आज गुलाम बनलो
आहे.आता सारे झाड तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे.हे आश्चर्यकारक झाड आहे.
मनुष्यांना हे सुद्धा माहित नाही. आता तुम्ही जाणता कल्प म्हणजे पूर्ण ५ हजार
वर्षाचे ऍक्युरेट झाड आहे.एका सेकंदाचा ही फरक पडू शकत नाही.या बेहद च्या झाडाचे
तुम्हा मुलांना आता ज्ञान मिळत आहे.ज्ञान देणारा वृक्षपती आहे.बीज किती छोटे आहे.
आत्मा किती छोटी आहे.बाबाही खूप छोटे आहेत,या डोळ्यांनी पाहू शकत नाही.भले
विवेकानंदांच्या बद्दल सांगतात-ते म्हणाले त्यांच्या मधून ज्योत निघून माझ्यामध्ये
सामावली. अशी कुठे ज्योत निघून नंतर थोडीच सामावू शकते.काय निघाले?हे समजत नाहीत.असे-
असे साक्षात्कार तर खूप होतात, परंतु ते लोक मान देतात,नंतर महिमा ही
लिहितात.भगवानुवाच -कोणत्याही मनुष्याची महिमा नाही.महिमा आहे तर फक्त देवतांची आहे
आणि जो असा देवता बनवणारा आहे त्याची महिमा आहे.बाबांनी कार्ड खूप चांगले बनवले
होते.जयंती साजरी करायची असेल तर एक शिवबाबांची करायला पाहिजे.या लक्ष्मी-नारायणाला
ही असा बनवणारा शिवबाबा आहे ना.बस एकाचीच महिमा आहे,त्या एकाची आठवण करा.हे स्वतः
म्हणतात उंच ते उंच बनतो नंतर खाली उतरतो.हे कोणालाही माहित नाही-उंच ते उंच लक्ष्मी-
नारायण ८४ जन्मानंतर खाली उतरतात,तत् त्वम.तुम्हीच विश्वाचे मालक होते,नंतर काय बनले
आहात!सतयुगामध्ये कोण होते? तुम्हीच सर्वजण क्रमवार पुरुषार्थ अनुसार होता.राजा-राणी
होते, सूर्यवंशी-चंद्रवंशी राजधानीचे ही होते.बाबा किती चांगल्या प्रकारे
समजावतात.या सृष्टी चक्रा चे ज्ञान तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये चालता-फिरता राहिले
पाहिजे. तुम्ही चैतन्य प्रकाश घर आहात. सर्व ज्ञान बुद्धी मध्ये राहायला
पाहिजे.परंतु ती अवस्था झालेली नाही,होणार आहे.जे सन्मानाने पास होतील त्यांची ही
अवस्था होईल.सर्व ज्ञान बुद्धी मध्ये असेल.बाबांचे लाडके,प्रेमळ मुलेही तेव्हाच
म्हणू शकतो.अशा मुलांवर बाबा स्वर्गाची राजाई कुर्बान करतात.म्हणतात मी राजाई करत
नाही,तुम्हाला देतो, याला निष्काम सेवा म्हटले जाते. मुले जाणतात बाबा आम्हाला
डोक्यावर चढवतात,तर अशा बाबांची किती आठवण करायला पाहिजे.हे सुद्धा नाटक बनले
आहे.बाबा संगमयुगावर येऊन सर्वांना क्रमवार पुरुषार्थ नुसार सदगती देतात.प्रथम
क्रमांक सर्वश्रेष्ठ एकदम पवित्र,नंतर शेवटी बिलकुल अपवित्र. आठवण आणि प्रेम तर बाबा
सर्वांना देतात.
बाबा किती चांगल्या प्रकारे समजावतात,कधीही खोट्या अहंकारा मध्ये येऊ नका.बाबा
म्हणतात-खबरदार राहायचे आहे, रथाचा ही मानसन्मान,आदर ठेवायचा आहे.यांच्याद्वारे तर
बाबा आपल्याला समजावत आहेत ना.यांनी तर कधीही कोणाचे बोलणे खाल्ले नव्हते. सर्वजण
प्रेम करत होते.आता तर पहा किती निंदा करत राहतात. काहीजण विश्र्वासघातकी बनून पळून
जातात तर त्यांची काय गती होईल,नापास होतील ना!बाबा समजावतात माया अशी आहे, म्हणून
खूप खबरदारी ठेवत रहा.माया कोणालाही सोडत नाही.सर्व प्रकारची आग लावते. बाबा
म्हणतात माझी सर्व मुले काम चितेवर चढून काळे कोळसे बनले आहेत.सर्व तर एक सारखे
नसतात.न सर्वांचा एक सारखा अभिनय आहे.याचे नावच आहे वेशालय,किती वेळा काम चितेवर
चढले असतील.रावण किती जबरदस्त आहे,बुद्धीला च पतीत बनवतो.इथे येऊन बाबांकडून शिक्षण
घेणारे ही असे बनतात. बाबांच्या आठवणीशिवाय खराब डोळे कधीही बदलू शकत नाहीत म्हणूनच
सूरदास ची गोष्ट आहे. आहेत तर बनवलेल्या गोष्टी, दृष्टांत ही देतात.आता तुम्हा
मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळत आहे.अज्ञान म्हणजे अंधार.म्हणतात ना तू तर
आंधळा,अज्ञानी आहेस.आता ज्ञान आहे गुप्त,यामध्ये काही बोलायचे नाही.एका सेकंदामध्ये
सर्व ज्ञान येते,सर्वात सहज ज्ञान आहे.तरीही शेवटपर्यंत मायेची परीक्षा चालत
राहते.यावेळी तर वादळाच्या मध्ये आहात,पक्के व्हाल नंतर वादळ येणार नाहीत,घसरणार
नाही.नंतर पहा तुमचे झाड किती वाढते.नाव लौकिक तर होणारच आहेत.झाड तर वाढतच आहे.थोडा
विनाश होईल नंतर मग खूप खबरदार राहतील.नंतर बाबांच्या आठवणीची चटक लागेल. समजतील
वेळ खूप कमी आहे. बाबा तर खूप चांगले समजावत आहेत-आपसामध्ये खूप प्रेमाने चाला.डोळे
मोठे करू नका. क्रोधाचे भुत आल्यामुळे चेहराच एकदम बदलून जातो.तुम्हाला तर
लक्ष्मी-नारायणा सारख्या चेहऱ्याचे बनायचे आहे.उद्दिष्ट समोर आहे.साक्षात्कार शेवटी
होतो,जेव्हा बदली होतात.जसे सुरुवातीला साक्षात्कार झाले असे अंतसमयी ही खूप अभिनय
पाहायला मिळतील.तुम्ही खूप खुश राहाल. मिरुआ मौत मलुका शिकार.... (हरणाची शिकार होते
आणि शिकाऱ्याला फायदा होतो)शेवटी खूप दृश्य पहायचे आहेत तेव्हा पश्चातापही होईल-
आम्ही हे केले.नंतर त्याची सजाही खूप कडक मिळते.बाबा येऊन शिकवत आहेत,त्यांचाही मान
ठेवला नाही तर सजा मिळेल.सर्वात कडक सजा त्यांना मिळते जे विकारांमध्ये जातात किंवा
शिवबाबांची खूप निंदा करण्याच्या निमित्त बनतात.माया खूप जबरदस्त आहे.स्थापनेमध्ये
काय-काय होते आहे.तुम्ही तर आता देवता बनत आहात ना. सतयुगामध्ये असुर इ.नसतात.या
संगमयुगावरच्या गोष्टी आहेत.इथे विकारी मनुष्य किती दुःख देतात,मुलींना मारतात,लग्न
अवश्य करा असे म्हणतात. स्त्रीला विकारासाठी किती मारतात,किती सामना करतात. म्हणतात
संन्यासी ही राहू शकत नाहीत.तर मग हे कोण आहेत जे पवित्र राहून दाखवत आहेत.पुढे
चालून अवश्य समजेल.पवित्रते शिवाय देवता बनू शकत नाहीत. तुम्ही समजावता-आम्हाला एवढी
प्राप्ती होत आहे तेव्हा तर सोडले आहे.भगवानुवाच-काम जीते जगजीत(जो काम विकारावर
विजय मिळवतो तो जग जिंकू शकतो).असे लक्ष्मी-नारायण बनणार आहात तर का नाही पवित्र
बनणार.नंतर माया ही खूप त्रास देते.उच्चशिक्षण आहे ना. बाबा येऊन शिकवत आहेत-हे
स्मरण चांगल्या प्रकारे मूले करत नाहीत तर माया थप्पड मारते. माया खूप अवज्ञा करायला
लावते नंतर त्यांचे काय हाल होईल. माया अशी बेपरवाह बनवते, अहंकारा मध्ये आणते,
विचारूच नका.क्रमवार राजधानी बनत आहे तर काही कारणामुळेच बनेल ना.तुम्हाला आता भूत,
वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान मिळत आहे तर किती चांगल्या प्रकारे ध्यान दिले पाहिजे.
अहंकार आला आणि हा मेला. माया एकदम कवडी तुल्य बनवते.बाबांची अवज्ञा झाली तर बाबांची
आठवण करू शकत नाहीत.अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. आपसा मध्ये
खूप प्रेमाने चालायचे आहे.कधीही क्रोधा मध्ये येऊन एक-दुसऱ्याला डोळे दाखवू
नका.बाबांची अवज्ञा करू नका.
2. सन्मानाने पास होण्यासाठी शिक्षण बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. चैतन्य लाईट
हाऊस(प्रकाशाचे घर)बनायचे आहे.दिवस-रात्र बुद्धीमध्ये ज्ञान फिरत राहिले पाहिजे.
वरदान:-
सदैव आपल्या
श्रेष्ठ भाग्याचा नशा आणि खुशी मध्ये राहणारे पदमापदम भाग्यशाली भव
संपूर्ण विश्वामध्ये
जे पण धर्म पिता किंवा जगतगुरु म्हणवणारे आहेत कोणालाही मात- पित्याच्या संबंधाने
अलौकीक जन्म आणि पालना प्राप्त होत नाही.ते अलौकिक मात-पित्याचा अनुभव स्वप्नांमध्ये
ही करू शकत नाहीत आणि तुम्ही पदमापदमपति श्रेष्ठ आत्मे दररोज मात-पित्याची किंवा
सर्व संबंधांची आठवण प्रेम घेण्याच्या पात्र आहात.स्वतः सर्वशक्तिमान बाबा तुम्हा
मुलांचा सेवक बनून प्रत्येक पावला मध्ये साथ निभावत आहे-तर याच श्रेष्ठ भाग्याचा नशा
आणि खुशी मध्ये राहा.
बोधवाक्य:-
तन आणि मनाला
सदैव खुश ठेवण्यासाठी खुशीचे च समर्थ संकल्प करा.