21-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही इथे आले आहात, सर्वशक्तीमान बाबा कडून शक्ती घेण्यासाठी म्हणजे दिव्या मध्ये ज्ञानाचे तेल टाकण्यासाठी."

प्रश्न:-
शिवाच्या वरातीचे गायन कां आहे ?

उत्तर:-
कारण शिवबाबा जेंव्हा परत घरी जातात, तर सर्व आत्म्यांचा झुंड त्यांच्या मागोमाग निघून जातो.मुलवत़न मध्ये पण आत्म्यांचा मनोरा (छत) लागलेला आहे. तुम्ही पवित्र बनणारी मुले बाबा बरोबर जात आहात,तुम्ही बरोबर जात असल्यामुळे वरातीचे गायन आहे.

ओम शांती।
मुलांना पहिल्या प्रथम एकच मुद्दा समजून घ्यायचा आहे कि, आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत, आणि ते सर्वांचे पिता आहेत. त्यांना सर्वशक्तिमान म्हटले जाते. तुमच्या मध्ये सर्व शक्ती होती, तुम्ही विश्वावर राज्य करत होता. भारता मध्ये च या देवी-देवतांचे राज्य होते, म्हणजे तुम्हां मुलांचे राज्य होते. तुम्ही पवित्र देवी-देवता होता. तुमचे कुळ किंवा राजधानी होती. ते सर्व निर्विकारी होते. कोण निर्विकारी होते? आत्मे. आता परत तुम्ही निर्विकारी बनत आहात. जसे कि सर्वशक्तिमान बाबाची आठवण करून, त्यांच्या कडून शक्ती घेत आहात. बाबाने सांगितले आहे, आत्माच 84 जन्माचा अभिनय करत आहे. त्यामध्ये जी सतोप्रधान ताकत होती, ती मग दिवसेंदिवस कमी होत गेली आहे. सतोप्रधान पासून तमोप्रधान बनायचे आहे. जसे बॅटरी ची ताकद कमी होते, तर मोटर उभी राहते. बॅटरी खाली(डिस्चार्ज) होऊन जाते. आत्म्या ची बॅटरी संपूर्ण डिस्चार्ज होत नाही, कांही ना कांही ताकद राहते. जसे कोणी मेला तर दिवा पेटवितात, त्यामध्ये तेल टाकत राहतात कि, ज्योत विझू नये. बॅटरी ची ताकत कमी होते तर मग तिला चालले करण्यासाठी ठेवतात. आता तुम्ही मुले समजत आहात, तुमची आत्मा सर्वशक्तिमान होती, आता परत तुम्ही सर्वशक्तिमान बाबा बरोबर आपला बुध्दीयोग लावत आहात. तर बाबाची शक्ती आमच्या मध्ये येते, कारण शक्ती कमी झाली आहे, थोडी जरूर राहते. एकदम नष्ट झाली तर मग शरीर राहत नाही. आत्मा बाबाची आठवण करून करून बिल्कुल पवित्र होऊन जाते. सतयुगा मध्ये तुमची बॅटरी संपूर्ण भरलेली असते, मग थोडी थोडी कमी होत जाते. त्रेता पर्यंत मीटर कमी होतो, ज्याला कला म्हटले जाते. मग म्हणतात, आत्मा जी सतोप्रधान होती, ती सतो बनली, ताकद कमी होत जाते. तुम्ही समजता कि आम्ही मनुष्या पासून देवता सतयुगा मध्ये बनतो. आता बाबा म्हणतात, माझी आठवण करा, तर तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल. आता तुम्ही तमोप्रधान बनले आहात, तर ताकदी चे दिवाळे निघाले आहे. मग बाबाची आठवण केल्याने पूर्ण ताकद येईल, कारण तुम्ही जाणत आहात, देहा सहित देहाचे जे पण सर्व संबंध आहेत, ते सर्व नष्ट होणार आहेत, मग तुम्हाला बेहद चे राज्य मिळत आहे. बाबा पण बेहदचे आहेत, तर वरसा पण बेहदचा देत आहेत. आता तुम्ही पतित आहात, तुमची ताकद फारच कमी झाली आहे. हे मुलांनो, आता तुम्ही माझी आठवण करा, मी सर्वशक्तीमान आहे, माझ्या द्वारे सर्वशक्तीचे राज्य मिळत आहे. सतयुगा मध्ये देवी देवता साऱ्या विश्वाचे मालक होते. पवित्र होते, दैवी गुणवान होते. आता ते दैवीगुण नाहीत. सर्वांची बॅटरी पूर्ण रिकामी होऊ लागली आहे. मग आता बॅटरी चार्ज करायची आहे. परमपिता परमात्मा बरोबर योग लावल्या शिवाय बॅटरी चार्ज होऊ शकत नाही. ते बाबा सदा पवित्र आहेत. इथे सर्व अपवित्र आहेत. जेंव्हा पवित्र होतात तर मग बॅटरी भरत राहते. तर आता बाबा समजावत आहेत, एकाची आठवण करायची आहे. सर्वोच्च भगवान आहेत. बाकी सर्व त्यांची रचना आहे. रचने कडून रचनेला कधी वरसा मिळत नाही. रचियता तर एकच आहेत. ते बेहदचे पिता आहेत. बाकी तर सर्व हदचे आहेत.बेहदच्या बाबाची आठवण केल्यामुळे बेहदची राजाई मिळते. तर मुलांनी मनातून समजले पाहिजे कि, आमच्या साठी बाबा नवीन दूनिया स्वर्गाची स्थापना करत आहेत. विश्व नाटका नुसार स्वर्गाची स्थापना होत आहे. तुम्ही़ जाणत आहात सतयुग येणार आहे. सतयुगा मध्ये नेहमी साठी सुख राहते. ते कसे मिळत आहे? बाबा सांगत आहेत, माझी एकट्याची आठवण करा. मी नेहमी पवित्र आहे. मी कधी मनुष्य तन घेत नाही. ना दैवी तन, ना मनुष्य तन घेतो, म्हणजे मी जन्म मरणा मध्ये येत नाही. फक्त तुम्हा मुलांना स्वर्गाची राजाई देण्यासाठी, जेव्हा हे साठ वर्षाच्या वानप्रस्थ अवस्थेमध्ये असतात, तेंव्हा यांच्या तनामध्ये मी येतो. हेच पूर्ण सतोप्रधान पासून तमोप्रधान बनले आहेत. क्रमांक एक सर्वोच्च भगवान आहेत, मग सूक्ष्मवतन वासी ब्रह्मा, विष्णू, शंकर यांचा साक्षात्कार होतो. सूक्ष्म वतन मध्यात आहे. तिथे शरीर असत नाही. सूक्ष्म शरीर फक्त दिव्यदृष्टी ने पाहिले जाते. मनुष्य सृष्टी तर इथेच आहे. बाकी ते सर्व फक्त साक्षात्कारा साठी फरिश्ते आहेत. तुम्ही मुले पण अंता ला जेंव्हा संपूर्ण पवित्र होऊन जाता, तर तुमचा पण साक्षात्कार होतो. असे फरिश्ते बनून मग सतयुगा मध्ये जाऊन स्वर्गाचे मालक बनाल. हे ब्रह्मा, विष्णूची आठवण करत नाहीत, ते पण शिवबाबा ची आठवण करत आहेत, आणि विष्णू बनत आहेत. तर हे समजले पाहिजे कि, त्यांनी राज्य कसे घेतले. लढाई इत्यादी तर कांही पण होत नाही. देवता हिंसा कसे करतील.

आता तुम्ही मुले बाबाची आठवण करून राजाई घेत आहात. कोणी मानो अथवा ना मानो. गीतेमध्ये पण आहे, हे मुलांनो,देहा सहित देहाचे सर्व धर्म सोडून, माझी एकट्याची आठवण करा. त्यांना तर देह च नाही, ज्यामुळे ममत्व राहील. ते म्हणतात कि, मी थोड्या वेळे साठी यांचे शरीर भाड्याने घेत आहे. नाही तर मी ज्ञान कसे देऊ? मी बीजरूप आहे ना. या साऱ्या झाडाचे ज्ञान माझ्या जवळ आहे. आणखीन कोणाला माहित नाही. सृष्टीचे आयुष्य किती आहे? कसे याची स्थापना, पालना, विनाश होत आहे? मनुष्यांना तर माहीत असले पाहिजे. मनुष्य शिकत आहेत, जनावरे तर शिकणार नाहीत ना. ते हदचे शिक्षण घेत आहेत. बाबा तुम्हाला बेहदचे शिक्षण देत आहेत, ज्यामुळे तुम्ही बैहदचे मालक बनत आहात. तर हे समजावले पाहिजे कि, भगवान कोणत्या मनुष्याला किंवा देहधारी ला म्हटले जात नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकर ला पण सूक्ष्म देह आहे ना. त्यांचे नाव वेगळे आहे. त्यांना भगवान म्हटले जात नाही. हे शरीर तर या दादाच्या आत्म्याचे तख्त आहे. अकाल तख्त आहे ना. आता हे अकाल मूर्त बाबाचे तख्तआहे. अमृतसर मध्ये पण एक अकालतख्त आहे ना.मोठ मोठे जे आहेत, ते तिथे अकाल तख्ता वर जाऊन बसतात. आता बाबा समजावत आहेत, सर्व अकालमुर्त आत्मे या रथामध्ये आहेत. आत्मा अकाल आहे, ज्याला काळ खाऊ शकत नाही. बाकी रथ तर बदलत राहतो. अकाल मूर्त आत्मा या रथामध्ये बसली आहे. अगोदर लहान रथ असतो, मग मोठा होत जातो. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. आत्मा अकाल आहे. बाकी त्यामध्ये चांगले किंवा वाईट संस्कार असतात. तेंव्हा तर म्हटले जाते, कर्माचे हे फळ आहे. आत्म्याचा कधी विनाश होत नाही. आत्म्याचे पिता एक आहेत. हे तर समजले पाहिजे ना. हे बाबा कोणत्या शास्त्रातील गोष्टी सांगतात कां? शास्त्र इत्यादी वाचल्यामुळे माघारी तर कोणी जाऊ शकत नाहीत. शेवटी सर्व जातील. जसे टोळ किंवा मधमाशी चा झुंड जात आहे ना. मधमाशी मध्ये पण एक राणी असते, तिच्या मागे सर्व जातात. बाबा पण जातील, तेव्हा त्यांच्या मागे सर्व आत्मे जातील. तिथे मूलवतन मध्ये जसे सर्व आत्म्यांचा मिनार( छत) आहे. इथे मग मनुष्यांचा झुंड आहे. तर हा झुंड पण एके दिवशी जाणार आहे. बाबा येऊन सर्व आत्म्यांना घेऊन जातात. शिवा ची वरात म्हटले जाते. मुले म्हणा किंवा सजनी म्हणा. बाबा येऊन मुलांना आठवणी ची यात्रा शिकवित आहेत. पवित्र बनल्या शिवाय तर आत्मा जाऊ शकत नाही. जेंव्हा पवित्र बनेल तर पहिल्या प्रथम शांतीधाम ला जाईल. तिथे जाऊन सर्व निवास करतील. तेथून मग हळूहळू खाली येत राहतात, वृद्धी होत जाते. तुम्ही पण पहिल्या प्रथम बाबाच्या मागे जाल. तुमचा बाबा बरोबर किंवा सजनी चा साजन बरोबर योग आहे. राजधानी बनत आहे. सर्व एकत्र येत नाहीत. तिथे सर्व आत्म्यांची दुनिया आहे. तेथून मग क्रमवार येतात. झाडाची हळूहळू वृध्दी होते. प्रथम तर आदि सनातन देवी देवता धर्म आहे. जे बाबा स्थापन करत आहेत. प्रथम आम्हाला ब्राह्मण बनवतात. प्रजापिता ब्रह्मा आहेत ना. प्रजे मध्ये भाऊ-बहीण होऊन जातात. ब्रह्माकुमार आणि कुमारी अनेक आहेत. जरूर निश्चय बुद्धी बनले आहेत, तेंव्हा तर एवढे अनेक झाले आहेत. ब्राह्मण किती आहेत? कच्चे किंवा पक्के? कोणी तर 99 मार्क्स घेतात. कोणी 10 मार्क घेतात, तर ते कच्चे झाले ना. तुमच्या मध्ये पण जे पक्के आहेत, ते जरूर अगोदर येथील. जे कच्चे आहेत ते शेवटी येतील. ही कलाकारांची दुनिया आहे.जी फिरत राहते, सतयुग, त्रेता. . . हे पुरुषोत्तम संगम युग आहे. हे आता बाबांनी सांगितले आहे. अगोदर तर आम्ही उलटे समजत आले होतो कि, कल्पाचे आयुष्य लाखो वर्षाचे आहे. आता बाबांनी सांगितले आहे, हे तर पूर्ण पाच हजार वर्षाचे चक्र आहे. अर्धा कल्प राम राज्य आहे. अर्धा कल्प रावण राज्य आहे. लाखो वर्षाचे कल्प असेल तर अर्धे अर्धे पण होऊ शकत नाही. दुख आणि सुखाची ही दुनिया बनलेली आहे. हे बेहदचे ज्ञान बेहदच्या बाबा कडून मिळत आहे. शिवबाबा च्या शरीराचे कोणते नाव नाही. हे शरीर तर या दादाचे आहे. बाबा कुठे आहेत? बाबांनी थोड्या वेळेसाठी भाड्याने घेतले आहे. बाबा म्हणतात, मला मुख तर पाहिजे ना. इथे पण गोमुख बनविले आहे. डोंगरातून पाणी तर जिथे तिथे येत राहते. इथे मग गायीचे मुख बनविले आहे. त्यामधून पाणी येते, त्याला गंगाजल समजतात. आता गंगा मग कुठून आली? हे सर्व खोटे आहे. खोटी काया, खोटी माया, खोटा सर्व संसार. भारत जेव्हा स्वर्ग होता, तर त्याला सचखंड म्हटले जाते. मग भारतच जुना बनत आहे, तर खोटा खंड म्हटले जाते. या खोट्या खंडा मध्ये जेंव्हा सर्व पतित बनतात, तेव्हा बोलतात कि, बाबा आम्हाला पावन बनवून, या जुन्या दुनियेतून घेऊन जावा. बाबा म्हणतात, माझी सर्व मुले काम चितेवर बसल्यामुळे काळी झाली आहेत‌. बाबा मुलांना समजावत आहेत कि, तुम्ही तर स्वर्गाचे मालक होता ना. आठवणीत आले आहे ना. मुलांना समजावत आहेत, साऱ्या दुनियेला समजावत नाहीत. तुम्हालाच समजावत आहेत, तर माहित पडेल कि, आमचे पिता कोण आहेत. या दुनिया ला म्हटले जाते काट्याचे जंगल. सर्वात मोठा काम विकाराचा काटा लागतो. जरी इथे भक्त खूप आहेत. शाकाहारी पण आहेत, परंतु असे नाही कि, विकारा मध्ये जात नाहीत. असे तर अनेक बालब्रह्मचारी पण राहतात. लहानपणा पासून च कधी अशुद्ध भोजन इत्यादी खात नाहीत. संन्याशी पण म्हणतात, निर्विकारी बना. तो हद चा संन्यास मनुष्य करतात. दुसऱ्या जन्मां मध्ये मग गृहस्थी जवळ जाऊन, जन्म घेऊन मग घरदार सोडून निघून जातात. सतयुगा मध्ये हे कृष्ण इ. देवता कधी घरदार सोडून जातात कां? नाही. तर त्यांचा हद चा संन्यास आहे. आता तुमचा बेहद चा संन्यास आहे. साऱ्या दुनियेचा, संबंधी इत्यादीं चा पण संन्यास करत आहात. तुमच्या साठी आता स्वर्गाची स्थापना होत आहे. तुमची बुद्धी स्वर्गाकडे जाते, तर शिवबाबाची आठवण करायची आहे.बेहदचे बाबा म्हणतात, माझी आठवण करा. मनमनाभव, मध्याजी भव. तर तुम्ही देवता बनाल. हा तोच गीतेचा कालखंड आहे. संगमयुग पण आहे. मी संगमयुगा वरच सांगत आहे. राजयोग जरूर पूर्वीच्या जन्मा मध्ये संगमयुगावर शिकले असतील. ही सृष्टी बदलत आहे ना. तुम्ही पतिता पासून पावन बनत आहात. आता हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. जेव्हा आम्ही असे तमोप्रधान पासून सतोप्रधान बनत आहोत. प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजून घेऊन, निश्चय केला पाहिजे. इथे कोणी मनुष्य थोडेच सांगत आहेत. ही श्रीमत आहे, म्हणजे सर्वोच्च मत भगवानाची आहे. बाकी सर्व मनुष्याची मत आहे. मनुष्य मतामुळे खाली पडत आले आहात. आता श्रीमता ने तुम्ही चढत आहात. बाबा मनुष्या ला देवता बनवित आहेत. दैवी मत स्वर्गवासीची आहे, आणि ती मनुष्य मत नर्कवासी ची आहे, ज्याला रावणाची मत म्हटले जाते. रावण राज्य पण कांही कमी नाही. साऱ्या दुनिये वर रावणाचे राज्य आहे. ही बेहदची लंका आहे. ज्यावर रावणाचे राज्य आहे. मग देवतांचे पवित्र राज्य होईल. तिथे फार सुख असते. स्वर्गाची किती महिमा आहे. असे म्हणतात कि, स्वर्गाला गेले, तर जरूर नरका मध्ये होते ना. नरका तून गेले तर जरूर मग परत नरका मध्येच यतील ना. स्वर्ग आता कोठे आहे? या गोष्टी कोणत्या शास्त्रांमध्ये नाहीत. आता बाबा तुम्हाला सारे ज्ञान देत आहेत. बॅटरी चार्ज होत आहे.परत माया संबंध तोडून टाकते. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात -पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) मन वचन कर्माने पवित्र बनून, आत्मरुपी बॅटरीला भरायचे आहे. पक्के ब्राह्मण बनायचे आहे.

(२) मनमत किंवा मनुष्य मत सोडून, एका बाबाच्या श्रीमता वर चालून, स्वतःला श्रेष्ठ बनवायचे आहे. सतोप्रधान बनून बाबा बरोबर उडून जायचे आहे.

वरदान:-
श्रीमताच्या आधारावर खुशी, शक्ती आणि सफलतेचा अनुभव करणारे, सर्व प्राप्ती संपन्न भव.

जी मुले स्वतःला विश्वस्त समजून श्रीमतानुसार चालतात, श्रीमता मध्ये थोडी पण मनमत किंवा परमत मिसळत नाहीत. त्यांना निरंतर खुशी, शक्ती आणि सफलतेची अनुभूती होते. पुरुषार्थ किंवा मेहनत कमी असून पण प्राप्ती जादा होते, तेंव्हा म्हणतात यथार्थ श्रीमता वर चालणारे. परंतु माया ईश्वरी मता मध्ये मनमत किंवा परमता ची उत्तम रूपाने भेसळ करते, त्यामुळे सर्व प्राप्तीचा अनुभव होत नाही. त्यासाठी पारखण्याची आणि निर्णय करण्याची शक्ती धारण करा, तर धोका खाणार नाहीत.

बोधवाक्य:-
बालक पासून मालक ते बनतात, जे तपस्ये च्या बळाने भाग्यविधाता बाबाला आपले बनवितात.