27-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- कधीही कायदा आपल्या हातात घेऊ नका,जर कोणाची चूक असेल तर बाबांना
सांगा,बाबा सावधान करतील."
प्रश्न:-
बाबांनी कोणते
कंत्राट (कॉन्ट्रॅक्ट)घेतले आहे?
उत्तर:-
मुलांचे अवगुण काढण्याचे कंत्राट बाबांनी घेतले आहे.मुलांच्या कमी कमजोरी बाबा
ऐकतात तर त्या काढण्यासाठी प्रेमाने समजावून सांगतात.जर तुम्हा मुलांना कोणाची कमी
दिसली तरीही तुम्ही कायदा आपल्या हातात घेऊ नका.कायदा हातात घेणे ही सुद्धा चूक आहे.
ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुले बाबांजवळ ताजेतवाने(रिफ्रेश)होण्यासाठी येतात कारण की मुले
जाणतात- बेहद च्या बाबांकडून बेहद विश्वाची बादशाही घ्यायची आहे. हे कधीही विसरायला
नको परंतु विसरून जातात.माया विसरायला लावते.विसरले नाही तर खूप खुशी मध्ये
राहतील.बाबा समजावतात-मुलांनो या बैजला सतत पहात रहा.चित्रांना ही पहात
रहा.चालता-फिरता बैज कडे पहात रहा तर माहित पडेल,बाबांच्या द्वारे बाबांच्या आठवणीने
आम्ही असे बनत आहोत.दैवीगुणही धारण करायचे आहेत.ही ज्ञान मिळण्याची वेळ आहे.बाबा
म्हणतात गोड-गोड मुलांनो.... रात्रंदिवस गोड-गोड म्हणत राहतात.मुले गोड-गोड बाबा
म्हणू शकत नाहीत. म्हणायला तर दोघांनीही पाहिजे. दोघेही गोड आहेत ना.बेहद चे
बापदादा.परंतु काही देह- अभिमानी फक्त शिवबाबांना गोड-गोड म्हणतात.काही मुले तर
रागामध्ये येऊन नंतर कधी बाप दादांनाही काहीतरी म्हणतात. कधी बाबांना म्हणतात तर
दादांनाही म्हणतात,गोष्ट एकच होऊन जाते.कधी ब्राह्मणी वर, कधी आपापसात नाराज होऊन
जातात.तर बेहदचा पिता सन्मुख मुलांना शिकवण देत आहे. गावागावांमध्ये मुले तर खूप
आहेत,सर्वांना लिहत राहतात. तुमचा समाचार येतो,तुम्ही खूप रागवता.बेहदचे पिता याला
देह-अभिमान म्हणतात.बाबा सर्वांना म्हणतात-मुलांनो,देही- अभिमानी भव.सर्व मुले
खालीवर होत राहतात,यामध्येही माया ज्याला समर्थ पहलवान आहे,असे पाहते तर, त्यांच्या
सोबतच युद्ध करते. महावीर हनुमान साठी दाखवले आहे की त्यांनाही हलवण्याचा खूप
प्रयत्न केला.या वेळीच सर्वांची परीक्षा घेत आहे. मायेसोबत हार-जीत सर्वांची होतच
राहते.युद्धामध्ये स्मृती- विस्मृती सर्व होत असते.जे जेवढे स्मृतीमध्ये
राहतात,निरंतर बाबांची आठवण करण्याचा प्रयत्न करतात ते चांगले पद प्राप्त करू
शकतात.बाबा मुलांना शिकवण्यासाठी आले आहेत, म्हणूनच शिकवत राहतात.श्रीमतावर चालत
राहायचे आहे.श्रीमतावर चालल्यानेच श्रेष्ठ बनाल,यामध्ये कोणावर बिघडण्याची गरजच
नाही.बिघडणे म्हणजे क्रोध करणे.चुका इ.करत असतील तर बाबांजवळ समाचार सांगायचा
आहे.स्वतः कोणालाही सांगायचे नाही,नाहीतर जसे की कायदा हातामध्ये घेतल्यासारखे होईल.
शासन कायदा हातामध्ये घेऊ देत नाही.एखाद्याने थप्पड मारली तर त्याला थप्पड मारू शकत
नाही. रिपोर्ट केल्यानंतर त्यांच्यावर केस होईल.इथेसुद्धा मुलांनी कधीही समोर
कोणालाही काही म्हणायचे नाही,बाबांना सांगा.सर्वांना सावध करणारा एक बाबा आहे.बाबा
खूप गोड युक्ती सांगतील.गोड बोलून शिकवतील.देह-अभिमानी बनल्याने आपलेच पद कमी
करतात.नुकसान का करून घ्यायचे.जेवढे होईल तेवढी खूप प्रेमाने बाबांची आठवण करत
रहा.बेहद च्या बाबांची खूप प्रेमाने आठवण करा,जो बाबा विश्वाची बादशाही देत
आहे.फक्त दैवीगुण धारण करायचे आहेत. कोणाचीही निंदा करायची नाही. देवता कोणाची निंदा
करतात का?काही मुले तर निंदा केल्याशिवाय राहत नाहीत.तुम्ही बाबांना सांगा,तर बाबा
खूप प्रेमाने समजावून सांगतील! नाहीतर वेळ वाया जातो.निंदा करण्यापेक्षा बाबांची
आठवण करा तर खूप-खूप फायदा होईल. कोणाशीही वाद-विवाद न करणे खूप चांगले आहे.
तुम्ही मुले मनामध्ये समजत आहात-आम्ही नव्या दुनियेची बादशाही स्थापन करत आहोत.
मनामध्ये किती नशा राहायला पाहिजे.मुख्य आहे आठवण आणि दैवीगुण.मुले चक्राची तर आठवण
करतातच,ते तर सहज आठवणीत येईल.84 चे चक्र आहे ना.तुम्हाला सृष्टीचा आदि-
मध्य-अंत,कालावधी माहित आहे,नंतर इतरांनाही खूप प्रेमाने परिचय द्यायचा आहे.बेहद चा
पिता आम्हाला विश्वाचे मालक बनवत आहे.राजयोग शिकवत आहे.विनाशही समोर उभा आहे.आत्ता
संगमयुग आहे,जेव्हा कि नवी दुनिया स्थापन होत आहे आणि जुनी दुनिया नष्ट होत आहे.बाबा
मुलांना सावधान करत राहतात- सिमर-सिमर सुख पाओ,कलह क्लेश मिटे सब तन के...अर्ध्या
कल्पा साठी कलह क्लेश नष्ट होऊन जातील.बाबा सुखधाम स्थापन करत आहेत.नंतर माया रावण
दुःखधाम स्थापन करते. हेसुद्धा तुम्ही मुले क्रमवार पुरुषार्थ नुसार जाणत आहात.
पित्याचे मुलांवर किती प्रेम असते.बाबांचे प्रेम सुरुवातीपासून आहे.बाबांना माहित
आहे,मी जाणतो-मुले जी काम चितेवर काळी झाली आहेत,त्यांना गोरे बनवण्यासाठी जात
आहे.बाबा तर ज्ञानसंपन्न(नॉलेजफुल) आहे,मुले हळूहळू ज्ञान घेत आहेत.नंतर माया
विसरायला लावते.खुश राहू देत नाही.मुलांचा तर दिवसेंदिवस खुशीचा पारा चढलेला असायला
पाहिजे.सतयुगामध्ये पारा चढलेला होता.आत्ता नंतर आठवणीच्या यात्रेने चढवायचा आहे.तो
हळूहळू चढेल.हार-जीत होता-होता नंतर क्रमवार पुरुषार्थ अनुसार कल्पा पूर्वीप्रमाणे
आपले पद प्राप्त कराल.बाकी वेळ तर तेवढाच लागतो जेवढा कल्प-कल्प लागतो.पास ही तेच
होतील जे कल्प-कल्प होत असतील.बापदादा साक्षी होऊन मुलांच्या अवस्थेला पाहतात आणि
समजावून सांगत राहतात. बाहेर सेंटर इत्यादीवर राहतात तर एवढे
रिफ्रेश(ताजेतवाने)राहात नाहीत.सेंटरवर येऊन नंतर बाहेरच्या वातावरणामध्ये निघून
जातात,म्हणून इथे मुले रिफ्रेश होण्यासाठी येतात.बाबा लिहितात ही-परिवारा सहित
सर्वांना आठवण आणि प्रेम द्या. तो आहे हद चा पिता,हा आहे बेहद चा पिता.बाबा आणि दादा
दोघांचे खूप प्रेम आहे कारण की कल्प-कल्प प्रेमळ सेवा करतात आणि खूप प्रेमाने करतात.
मनामध्ये दया येते.शिकत नसतील किंवा चांगले वागत नसतील,श्रीमतावर चालत नसतील तर दया
येते-हे कमी पद प्राप्त करतील.बाबा दुसरे काय करू शकतात!इथे(मधुबन) आणि तिथे
राहण्यामध्ये खूप फरक आहे.परंतु सर्वजण तर इथे राहू शकत नाहीत.मुलांची वृद्धी होत
राहते.सोय करत राहतात. हेही बाबांनी समजावले आहे-हे आबू सर्वात श्रेष्ठ तीर्थ
आहे.बाबा म्हणतात मी इथेच येऊन संपूर्ण सृष्टीला 5 तत्वां सहित सर्वांना पवित्र
बनवतो.किती सेवा आहे. एकच बाबा आहेत जे येऊन सर्वांची सदगती करतात.तेही अनेक वेळा
केली आहे.हे माहित असूनही नंतर विसरून जातात- म्हणून बाबा म्हणतात माया खूप जबरदस्त
आहे.अर्धा कल्प यांचे राज्य चालते.माया हरवते नंतर बाबा उठवतात.खूपजण लिहितात बाबा
आम्ही घसरलो, म्हणजे विकारात जातात,अच्छा नंतर घसरू नका.तरीही घसरतात.घसरतात आणि
नंतर चढायचे सोडून देतात.किती घाव बसतात.सर्वांनाच घाव बसतात. सर्व काही शिक्षणावर
अवलंबून आहे.शिक्षणामध्येच योग आहे. आमका मला हे शिकवत आहे. तुम्ही आता समजत आहात
बाबा आम्हाला शिकवत आहेत.तुम्ही इथे खूप ताजेतवाने होता. गायनही आहे जो आपली
निंदा(ग्लानी)करतो तो पण आपला मित्र आहे.भगवानुवाच-माझी निंदा खूप करतात.मी येऊन
मित्र बनतो.किती निंदा करतात,मी तर समजतो सर्व माझीच मुले आहेत. माझे यांच्यावर किती
प्रेम आहे. निंदा करणे चांगली गोष्ट नाही. यावेळी खूप खबरदारी ठेवायला
पाहिजे.भिन्न-भिन्न अवस्था वाली मुले आहेत,सर्व पुरुषार्थ करत राहतात.कोणती चूक झाली
तर पुरुषार्थ करून अचूक बनायचे आहे.माया सर्वांना चुका करायला
लावते.बॉक्सिंग(युद्ध)आहे ना.काही वेळा अशा प्रकारे घाव बसतो ज्यामुळे खाली
घसरतात.बाबा सावध करतात-मुलांनो अशा प्रकारे हारल्याने, केलेली कमाई नष्ट होऊन
जाते.5 व्या मजल्यावरून खाली पडतात.म्हणतात बाबा अशी चूक नंतर कधी होणार नाही.आता
क्षमा करा.बाबा क्षमा काय करणार.बाबा तर म्हणतात पुरुषार्थ करा.बाबा जाणतात माया
खूप प्रबळ आहे.अनेकांना हरवते.शिक्षकाचे काम आहे चुकल्यानंतर शिकवून अचूक बनवणे.असे
नाही की एखाद्याने चूक केली तर नेहमी ती चूक होत राहील.नाही,चांगल्या गुणांचे गायन
होते.चुकांचे गायन होत नाही.अविनाशी वैद्य तर एकच बाबा आहे.ते औषध देतील.तुम्ही मुले
आपल्या हातामध्ये कायदा का घेता.ज्यांच्यामध्ये क्रोधाचा अंश असेल ते निंदा करत
राहतील.सुधारणे बाबांचे काम आहे,तुम्ही सुधारणारे थोडीच आहात.काही जणांमध्ये
क्रोधाचे भूत आहे.स्वतः बसून कोणाची निंदा करणे म्हणजे आपल्या हातामध्ये कायदा
घेणे,यामुळे ते सुधारणार नाहीत.अजूनच वाद-विवाद होत राहतील.नाराज होऊन जातील.सर्व
मुलांसाठी एक बाबा बसले आहेत.आपल्या हातामध्ये कायदा घेऊन कोणाची निंदा करणे,ही
सर्वात मोठी चूक आहे.कोणता ना कोणता अवगुण तर सर्वांमध्येच असतो.सर्व तर संपूर्ण
बनले नाहीत.श्रीमतावर सर्वजण सुधारत आहेत.संपूर्ण तर शेवटी बनायचे आहे.यावेळी सर्व
पुरुषार्थी आहेत.बाबा सदैव अडोल राहतात.मुलांना प्रेमाने शिकवण देत राहतात.शिकवण
देणे बाबांचे काम आहे.नंतर त्यावर चालो न चालो त्याचे नशीब.पद किती कमी होऊन
जाते.श्रीमतावर चालल्यामुळे असे काही केल्यामुळे पदभ्रष्ट होऊन जाईल.आत मध्ये मन
खात राहील,मी ही चूक केली आहे.आम्हाला खूप मेहनत करावी लागेल.कोणाचाही अवगुण असेल
तर तो बाबांना सांगायचा आहे.प्रत्येकाला सांगणे हा देह-अभिमान आहे.बाबांची आठवण करत
नाहीत. अव्यभिचारी बनायला पाहिजे ना. एकाला ऐकवल्यानंतर तो लगेच सुधरुन
जाईल.सुधाराणारा एकच बाबा आहे.बाकी तर सर्व न सुधारलेले आहेत.परंतु माया अशी
आहे-माथा फिरवून टाकते. बाबा एकाबाजूला तोंड फिरवतात,माया नंतर फिरवून आपल्याकडे
करते.बाबा सुधारून मनुष्याला देवता बनवण्यासाठी आले आहेत.बाकी जागोजागी कोणाचे नाव
बदनाम करणे हे बेकायदा आहे.तुम्ही शिवबाबांची आठवण करा.निर्णयही त्यांच्याकडे आहे
ना.कर्मांचे फळही बाबाच देतात.भले नाटकामध्ये आहे परंतु कोणाचे तरी नाव घेतले जाते
ना.बाबा तर मुलांना सर्व गोष्टी समजावत राहतात.तुम्ही किती भाग्यशाली आहात.किती
पाहुणे येतात. ज्यांच्याकडे खूप पाहुणे येतात,ते खुश होतात.ही मुले पण आहेत, पाहुणे
पण आहेत.शिक्षकाच्या बुद्धीमध्ये तर हेच राहते-मी मुलांना यांच्यासारखे
सर्वगुणसंपन्न कसे बनवू.हे कंत्राट नाटका नुसार बाबांनी घेतले आहे.मुलांनी मुरली
मध्ये कधीही गैरहजर राहायचे नाही. मुरलीचे तर गायन आहे ना- एकही मुरली चुकली तर जसे
की शाळेमध्ये गैरहजर झाले.ही आहे बेहदच्या पित्याची शाळा,यामध्ये एकही दिवस गैरहजर
राहायचे नाही.बाबा येऊन शिकवत आहेत,दुनियेमध्ये कोणाला थोडीच माहित आहे.स्वर्गाची
स्थापना कशाप्रकारे होते,हेही कोणाला माहीत नाही.तुम्हाला सर्व काही माहित आहे.हे
शिक्षण खूप-खूप भरपूर कमाई करण्याचे आहे.जन्मजन्मांतरासाठी या शिक्षणाचे फळ मिळते.
विनाशाचा सर्व संबंध तुमच्या शिक्षणाशी आहे.तुमचे शिक्षण पूर्ण होईल आणि ही लढाई
सुरू होईल.शिकता-शिकता बाबांची आठवण करता-करता जेव्हा अभ्यास पूर्ण होतो,परीक्षा
होऊन जाते तेव्हा लढाई सुरू होते. तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लढाई सुरू होईल.हे
नव्या गोष्टीसाठी बिलकुल नवे ज्ञान आहे म्हणूनच मनुष्य बिचारे गोंधळून जातात.अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. कोणाचेही
अवगुण पाहून त्याची निंदा करू नका. जागोजागी त्याचे अवगुण सांगु नका.आपला गोड
स्वभाव सोडू नका.क्रोधा मध्ये येऊन कोणाचाही सामना करू नका.
2. सर्वांना सुधारणारा एक बाबा आहे,म्हणूनच एक बाबांना सर्व काही सांगायचे आहे,
अव्यभिचारी बनायचे आहे.मुरली मध्ये कधीही गैरहजर राहायचे नाही.
वरदान:-
देह-अभिमानाच्या मी पणाची संपूर्ण आहुती टाकणारे धारणा स्वरूप भव
जेव्हा संकल्प आणि
स्वप्नांमध्ये ही देह-अभिमानाचा मी पणा नसेल,अनादी आत्मिक स्वरूपाची स्मृती
असेल.बाबा- बाबा चा अनहद शब्द निघत राहील तेव्हा म्हणतील धारणा स्वरूप खरे
ब्राह्मण.मी पणा अर्थात जुना स्वभाव,संस्कार रुपी सृष्टीला जेव्हा आपण ब्राह्मण या
महायज्ञा मध्ये स्वाहा करू तेव्हा या जुन्या सृष्टीची आहुती पडेल. तर ज्याप्रमाणे
यज्ञ रचण्यासाठी निमित्त बनले आहात अशाप्रकारे आता अंतिम आहुती टाकून समाप्तीचे ही
निमित्त बना.
बोधवाक्य:-
स्वतःशी,सेवे
शी आणि सर्वांशी संतुष्टतेचे सर्टिफिकेट घेणेच सिद्धी स्वरूप बनणे आहे.