18-01-21 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
17.10.87 ओम शान्ति
मधुबन
"18 जानेवारी
पिताश्रीजीं च्या पुण्य स्मृती दिवसा वर सकाळ च्या क्लास मध्ये ऐकवण्या साठी बापदादा
चे अनमोल महावाक्य गोड मुलांनो , एक बाबा च्या आठवणी ने तुम्ही सर्वोच्च बनत आहात ,
तर चुकून पण कधी इतरांची आठवण करायची नाही ."
ओम शांती :-
बेहदचे बाबा मुलांना समजावत आहेत,गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजून, तुमच्या
पित्याची आठवण करा, आणि आपल्या घराची आठवण करा. यालाच म्हटले जाते शांतीचा स्तंभ,
सुखाचा स्तंभ. स्तंभ फार उंच असतो. तुम्ही तेथे जाण्या साठी पुरुषार्थ करत आहात.
उंच ते उंच शांतीचा स्तंभ, तुम्ही तेथे कसे जाऊ शकता, हे पण उंच स्थाना वर राहणारे
बाबा शिकवित आहेत. मुलांनो, स्वतःला आत्मा समजा. आम्ही आत्मे शांतीधामचे निवासी
आहोत. ते बाबा चे घर आहे.अशी सवय चालता-फिरताना करायची आहे. स्वतःला आत्मा समजा आणि
शांतीधाम सुखधाम ची आठवण करा. बाबा जाणत आहेत, यामध्येच मेहनत आहे. जे आत्मअभिमानी
होऊन राहतात, त्यांना महावीर म्हटले जाते. आठवणीने तुम्ही महावीर, सर्वोच्च बनत
आहात. सर्वोच्च अर्थात शक्तिवान.
मुलांना खुशी झाली पाहिजे, स्वर्गाचे मालक बनविणारे बाबा, विश्वाचे मालक बनविणारे
बाबा आम्हाला शिकवित आहेत. आत्म्याची बुद्धी बाबाकडे जाते, आत्म्याचे प्रेम एका बाबा
बरोबर आहे. सकाळी सकाळी उठून बाबा बरोबर गोड गोड गोष्टी करा. बाबा तुमची तर कमाल आहे,
स्वप्नां मध्ये पण नव्हते कि, तुम्ही आम्हाला स्वर्गाचे मालक बनवाल. बाबा आम्ही
तुमच्या उपदेशा वर जरूर चालू. कोणते पाप कर्म करणार नाही. बाबा जसा पुरषार्थ करीत
आहेत, मुलांना पण सांगत आहेत. शिवबाबा ना अनेक मुले आहेत, काळजी तर राहते ना. किती
मुलांचा सांभाळ होत आहे. येथे तुम्ही ईश्वरीय परिवारा मध्ये बसले आहात. बाबा समोर
बसले आहेत. तुमच्या बरोबर खाऊ, तुमच्या बरोबर बसू�. तुम्ही जाणत आहात, शिवबाबा
यांच्या मध्ये येऊन ज्ञान देत आहेत, गोड मुलांनो माझी एकट्याची आठवण करा. देहसहित
देहाच्या सर्व संबंधा ना विसरून जावा. हा अंतिम जन्म आहे. ही जुनी दुनिया, जुने
शरीर, नष्ट होणार आहे. अशी म्हण पण आहे कि, तुम्ही मेला तर सारे जग मेले. पुरषार्था
साठी थोडा संगमचा वेळ आहे. मुलं विचारतात कि, बाबा हे शिक्षण किती दिवसांपर्यंत
चालेल? जो पर्यंत दैवी राजधानी स्थापन होत नाही, तो पर्यंत सांगत राहील. परत
परिवर्तन होऊन नवीन दुनिये मध्ये जाल. हे जुने शरीर आहे. कांही ना कांही कर्मभोग
चालत राहतो. यामध्ये बाबा मदत करतील, अशी इच्छा ठेवायची नाही. दिवाळे निघाले, आजारी
पडला, बाबा म्हणतात हा तुमचा हिसाब किताब आहे. होय. तरी पण योगा मुळे आयुष्य वाढेल.
स्वतःची मेहनत करा. कृपा मागू नका. बाबा ची जेवढी आठवण कराल, त्यामध्ये च कल्याण आहे.
जेवढे होईल तेवढे योग बळाने काम करून घ्या. गायन पण आहे कि, मला पापणी मध्ये लपवा..
प्रिय वस्तूला नुरे रतन, प्राण प्यारे म्हणतात. हे बाबा तर फार प्रिय आहेत, परंतु
गुप्त आहेत. त्यांच्या साठी असे प्रेम असले पाहिजे, जे कांही विचारू नका. मुलांनी
तर बाबाला पापणी मध्ये लपविले पाहिजे. पापणी कांही हे डोळे नाहीत. हे तर बुद्धी
मध्ये आठवणीत ठेवायचे आहे. अति प्रिय निराकार बाबा आम्हाला शिकवित आहेत. ते ज्ञानाचे
सागर, सुखाचे सागर, प्रेमाचे सागर आहेत. अशा अतिप्रिय बाबा वर किती प्रेम केले
पाहिजे. मुलांनी किती निष्काम सेवा केली पाहिजे. पतित शरीरा मध्ये येऊन, तुम्हां
मुलांना हिऱ्या सारखे बनवित आहेत. किती गोड बाबा आहेत. तर मुलांना पण असे गोड बनायचे
आहे. किती निरहंकारी पणे बाबा तुम्हा मुलांची सेवा करत आहेत, तर तुम्हा मुलांनी पण
तेवढी सेवा केली पाहिजे. श्रीमत् वर चालले पाहिजे. कुठे आपली मत चालवले तर नशिबाला
ठोकर माराल. तुम्हीं ब्राह्मण ईश्वरीय संतान आहात. ब्रह्माची मुले भाऊ-बहीण आहात.
ईश्वराचे नातू- नाती आहात. त्यांच्या कडून वर्सा घेत आहात. जेवढा पुरुषार्थ कराल,
तेवढे पद प्राप्त होईल. या मध्ये साक्षी राहण्याचा फार अभ्यास केला पाहिजे. बाबा
म्हणतात, गोड मुलांनो, हे आत्म्यानों, माझी एकट्याची आठवण करा. चुकून पण बाबा शिवाय
कोणाची आठवण करायची नाही. तुमची प्रतिज्ञा आहे, बाबा माझे तर तुम्हीच आहात. आम्ही
आत्मा आहोत, तुम्ही परमात्मा आहात. तुमच्या कडून वर्सा घ्यायचा आहे. तुमच्या कडून
राजयोग शिकत आहोत, ज्यामुळे राज्य भाग्य प्राप्त होईल.
गोड मुलांनो, तुम्हीं जाणता कि, हे अनादि विश्व नाटक आहे. या मध्ये पराजय आणि
विजयाचा खेळ चालत आहे. जे होत आहे ते ठीक आहे. रचनाकाराला नाटक जरूर पसंत आहे ना,
तर रचनाकाराच्या मुलांना पण पसंत असले पाहिजे. या नाटका मध्ये बाबा एकच वेळेत मुलां
जवळ, मुलांची हृदया पासून, अति प्रेमाने सेवा करण्यासाठी येतात.बाबाला तर सर्व मुलं
प्रिय आहेत. तुम्ही जाणता कि, सतयुगा मध्ये पण सर्व एक दोघा वर फार प्रेम करतात.
जनावरा मध्ये पण प्रेम असते. असे कोणते जनावर नाही, जे प्रेमाने राहत नाहीत. तर
तुम्हा मलांना इथे मास्टर प्रेमाचे सागर बनायचे आहे. येथे बनाल तर ते संस्कार
अविनाशी बनून जातील. बाबा म्हणतात, कल्पा पूर्वी प्रमाणे हुबेहूब तसेच प्रिय
बनविण्यासाठी आलो आहे. कधी कोणती मुलं रागावलेले बाबा ऐकतात, तर बाबा मुलांना
सांगतात कि, मुलांनो, क्रोध करणे ठीक नाही, त्यामुळे तुम्ही पण दुःखी व्हाल आणि
दुसऱ्याला पण दु:खी कराल. बाबा नेहमी साठी सुख देणारे आहेत तर मुलांना पण बाबा सारखे
बनायचे आहे. एक-दोघांना कधी दुःख देऊ नका.
तुम्ही मुले जाणता कि, शिवबाबा आहेत सकाळचे साई... रात्रीला दिवस किंवा सकाळ
बनविण्यासाठी आले आहेत. साई बेहदच्या बाबाला महटले जाते.ते एकच साईबाबा, भोलानाथ
शिवाबाबा आहेत. नाव च भोलानाथ आहे. भोळ्या कन्या, माता वर ज्ञानाचा कलश ठेवतात.
त्यांनाच विश्वाचे मालक बनवत आहेत. किती सोपा उपाय सांगत आहेत. किती प्रेमाने तुमची
ज्ञानाने पालना करत आहेत. आत्म्याला पावन बनविण्यासाठी, आठवणी च्या यात्रे मध्ये
राहा. योगाचे स्नान करायचे आहे. ज्ञान शिक्षण आहे. योग स्नाना द्वारे पाप भस्म
होतात. स्वतःला आत्मा समजण्याचा अभ्यास करायचा आहे, तर या देहाचा अहंकार बिल्कुल
तुटला पाहिजे. योगाने पवित्र सतोप्रधान बनून बाबा जवळ जायचे आहे. कांही मुले या
गोष्टीला चांगल्या रीतीने समजत नाहीत. खरा खरा आपला चार्ट सांगत नाहीत. अर्धा कल्प
खोट्या दुनिये मध्ये राहिल्यामुळे, तर खोटे ह्रदयात जाम बसले आहे. खरेपणाने आपला
चार्ट बाबाला सांगितला पाहिजे. तपासले पाहिजे कि, आम्ही पाऊण घंटा बसलो, यामध्ये
किती वेळ स्वतःला आत्मा समजून बाबाची आठवण केली. कांहीना खरे सांगण्या मध्ये लाज
वाटते. हे तर झटक्यात सांगतात कि, एवढी सेवा केली, एवढ्यां ना समजावले, परंतु
आठवणीचा चार्ट किती राहिला, ते खरे सांगत नाहीत. आठवणी मध्ये न राहिल्यामुळेच कोणाला
ला बाण लागत नाही. ज्ञान तलवारी मध्ये धार भरत नाही. कांही म्हणतात आम्ही तर निरंतर
आठवण करत आहोत, बाबा म्हणतात, ती अवस्था नाही, निरंतर आठवणी मध्ये राहिलात, तर
कर्मातीत अवस्था होऊन जाईल. ज्ञाना मध्ये पराकाष्टा दिसून येईल, या मध्ये फार कष्ट
आहे. विश्वाचे मालक असे थोडेच बनू शकाल. एक बाबा शिवाय आणखीन कोणाची आठवण राहू नये.
या देहाची पण आठवण येऊ नये. ही अवस्था तुमची अंत काळात होईल. आठवणी च्या यात्रे
मुळेच तुमची कमाई होते. जरी शरीर सुटले तर कमाई करू शकणार नाहीत. तर आत्मा संस्कार
घेऊन जाईल, परंतु शिक्षक तर पाहिजेत ना, जे मग आठवण करून देतील. बाबा वारंवार आठवण
करून देतात. अशी फार मुले आहेत, जे गृहस्थ व्यवहारा मध्ये राहतात, नोकरी इत्यादी पण
करतात, आणि उंच पद प्राप्त करण्यासाठी श्रीमता वर चालून, स्वतःचे भविष्यासाठी जमा
करत राहतात. बाबा कडून मत घेतात, पैसे आहेत तर त्याला सफल कसे करायचे. बाबा म्हणतात,
सेवाकेंद्र उघडा, त्यामुळे अनेकांचे कल्याण होईल. मनुष्य दान पुण्य इत्यादी करतात,
दुसऱ्या जन्मा मध्ये त्याचे फळ मिळते.तुम्हाला पण भविष्य एकवीस जन्मा साठी राज्य
भाग्य मिळत आहे. तुमची ही नंबरएक ची बँक आहे. यामध्ये चार आणे टाकले तर भविष्या
मध्ये हजार बनून जातात. दगडा पासून सोने बनून जाते. तुमची प्रत्येक वस्तू पारस बनून
जाते. बाबा म्हणतात, गोड मुलानो,उंच पद प्राप्त करायचे असेल तर माता पित्याचे पूर्ण
अनुकरण करा आणि स्वतःच्या कर्मेंद्रिया वर नियंत्रण ठेवा. जर कर्मेंद्रिये वश
नसतील,किंवा वागणे ठीक नसेल तर उंच पदा पासून वंचित होऊन जाल. स्वतःचे वागणे
सुधारायचे आहे. जास्त इच्छा ठेवायच्या नाहीत.
बाबा तुम्हा मुलांचा किती ज्ञान शृंगार करून सतयुगा चे महाराजा महाराणी बनवित आहेत.
यामध्ये सहनशीलते चा गुण फार चांगला आहे. देहा वर अती मोह ठेवायचा नाही. योगाने च
काम करून घ्यायचे आहे. बाबा ला किती पण खोकला इ. होतो, तरी पण नेहमी सेवेवर तत्पर
राहतात. ज्ञान योगाने शृंगार करून, मुलांना लायक बनवत आहेत. तुम्ही आता ईश्वरीय गोदी
मध्ये, मात पित्या च्या गोदी मध्ये बसले आहात. बाबा ब्रह्मा मुखाद्वारे तुम्हा
मुलांना जन्म देत आहेत. तर ही माता झाली. परंतु तुमची बुद्धी तरी पण शिवबाबा कडेच
जाते. तुम्ही माता पिता आम्ही तुमचे बालक.. तुम्हाला सर्वगुणसंपन्न इथे बनायचे आहे.
वारंवार माये कडून हार खायची नाही. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
अव्यक्त
महावाक्य .
सर्व योगयुक्त आणि युक्तीयुक्त स्थिती मध्ये, स्थिर होऊन आपले कार्य करता? कारण
वर्तमान वेळे नुसार, संकल्प, वाणी आणि कर्म हे तीन पण युक्तीयुक्त पाहिजे, तेंव्हाच
संपन्न आणि संपूर्ण बनू शकाल. चोहीकडचे वातावरण योगयुक्त आणि युक्तीयुक्त असावे. जसे
युद्धाच्या मैदाना मध्ये जेंव्हा योद्धा, युद्धा साठी शत्रु समोर उभा राहतो, तर
त्यांचा स्वतःवर आणि स्वतःच्या शस्त्रा वर म्हणजे आपल्या शक्ती वर किती लक्ष राहते.
आता तर वेळ जवळ आलेली आहे, तर समजा कि, युद्धा च्या मैदाना वर समोर येण्याची वेळ आहे.
अशावेळी चोहीकडे सर्व शक्तींने, स्वत: वर लक्ष ठेवले पाहिजे. जर थोडे पण लक्ष कमी
असेल, तर जसे वेळे नुसार चोहीकडे तनाव वाढत आहे, तसे चोहीकडे सर्वत्र तनावाच्या
वातावरणा चा प्रभाव, युद्धा मध्ये उपस्थित असलेल्या आत्मिक पांडव सेनेवर पण पडतो.
दिवसेनुदिवस जसे संपूर्णतेची वेळ जवळ येत आहे, तर दुनिये मध्ये तनाव आणखीन वाढेल,
कमी होणार नाही. ओढातानीचे जीवन सर्वाना अनुभव होईल, जसे कि सर्वत्र ताणले जात आहेत.
एकीकडे प्रकृतीच्या लहान संकटा मुळे नुकसानीचा तनाव, दुसरीकडे या दुनियेतील सरकार
कडून कायद्याचा तनाव, तिसरीकडे व्यवहारां मध्ये कमीचा तनाव आणि चौथीकडे लोकिक संबंधी
इत्यादी पासून स्नेह आणि स्वातंत्र्य मिळाल्या मुळे खुशीची भावना अल्पकाळा साठी
राहते, ते समाप्त होऊन, भीतीच्या अनुभूतीच्या तनावा मुळे, चोहिकडे तनाव लोकांमध्ये
वाढेल. चोहीकड च्या तनावा मुळे आत्मे तडपतील. जिथे जाल तिथे तनाव. जसे शरीरा मध्ये
पण कोणती शिर ताणली जाते, तर किती त्रास होतो. बुद्धी ओढली जाते, तसेच हे वातावरण
वाढत जाईल. जसे कि, कोणता ठिकाणा नजर येणार नाही, काय करावे? जर होय म्हटले, तरी पण
ओढाताण, नाही म्हटले तरी पण ओढाताण, कमविले तरी अवघड, न कमवले तरी पण अवघड. एकत्र
केले तरी पण अवघड, नाही केले तरी पण अवघड. असे वातावरण बनत जाईल. अशावेळी तनावाचा
प्रभाव आत्मिक पांडव सेने वर पडू नये, स्वतः तनावा मध्ये येण्याची समस्या नसेल पण
वातावरणाचा प्रभाव कमजोर आत्म्यांवर सहज पडतो.भितीच्या विचाराने वाटते कि,काय होईल?
कसे होईल? या गोष्टीचा प्रभाव पडू नये, त्यासाठी कोणत्या ना कोणत्या, अधून मधून,
बाबाच्या आठवणीचा विशेष कार्यक्रम मधुबन कडून अधिकृतपणे गेला पाहिजे. ज्यामुळे
आत्म्यांचा किल्ला मजबूत होईल.
आजकाल सेवा पण फार वाढत आहे,परंतु वाढण्या बरोबर युक्तीयुक्त पण पाहिजे. आज-काल
संबंध आणि संपर्का मध्ये राहणारे जादा येतील. स्वरूप बनणारे कमी येतील. सर्व एक
सारखे निघणार नाहीत. दिवसेनुदिवस श्रेष्ठता नसलेले कमजोर आत्मे म्हणजे प्रजेची
संख्या जादा येईल, त्यांना एक गोष्ट चांगली वाटेल, तर दुसरी वाटणार नाही. सर्व
गोष्टी मध्ये निश्चय होणार नाही. तर संपर्कातील जे आहेत, त्यांना जे पाहिजे,
त्यानुसार त्यांना संपर्का मध्ये ठेवले पाहिजे. वेळ जशी नाजूक येत आहे, तसे समस्ये
प्रमाणे त्यांना नियमित विद्यार्थी बनणे अवघड होईल. परंतु संपर्का मध्ये पण
अनेकानेक येतील, कारण शेवटची वेळ आहे ना. तर शेवटची स्थिती कशी असेल? जसे प्रथम
उमंग, उत्साह होता, तसा विरळा कोणीचा असेल. बहुसंख्येने संबंध आणि संपर्क वाले
येथील. तर हे लक्ष पाहिजे. असे नाही कि, संपर्का तील आत्म्याना न परखल्यामुळे,
संपर्का पासून त्यांना वंचित करावे. मोकळ्या हाताने कोणी पण जाऊ नये. नियमा वर जरी
चालू शकत नसले, परंतु ते स्नेहा मध्ये राहू इच्छितात, तर अशा आत्म्यां वर पण लक्ष
जरूर ठेवले पाहिजे. समजून घेतले पाहिजे कि, हा वर्ग तिसऱ्या अवस्थे मधील आहे, तर
त्यांना त्याप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. अच्छा. ओम शांती.
वरदान:-
स्नेहाने सर्व कमजोरी ला समर्पित करणारे समर्थी स्वरुप भव .
स्नेहाची निशाणी
समर्पणता आहे. स्नेहा च्या मागे समर्पित झाल्याने, कोणती ही अवघड किंवा असंभव गोष्ट
पण संभव आणि सहज अनुभव होते. तर समर्थी स्वरूपा च्या वरदाना द्वारे, सर्व कमजोरी ना
मजबुरीने नाही, हृदया पासून अर्पण करा, कारण सत्य बाबा जवळ सत्य च स्वीकार होत आहे्.
तर फक्त बाबाच्या स्नेहाचे गीत गाऊ नका, परंतु स्वतः बाबा सारखे अव्यक्त स्थिती
स्वरूप बना, तर सर्व तुमचे गीत गातील.
सुविचार:-
संकल्प आणि स्वप्नां
मध्ये पण एका दिलारामा ची आठवण राहिल , तर त्यांना खरे तपस्वी म्हणाल .