20-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, साऱ्या कल्पा तील हे सर्वोत्तम कल्याणकारी संगमयुग आहे, यामध्ये तुम्ही
मुले आठवणी च्या गोडव्याने सतोप्रधान बनत आहात."
प्रश्न:-
अनेक
प्रकारच्या प्रश्नाच्या उत्पत्तीचे कारण किंवा त्या सर्वांचे निवारण काय आहे?
उत्तर:-
जेंव्हा देहअभिमाना मध्ये येता, त्यामुळे संशय निर्माण होतात आणि संशय आल्यामुळेच
अनेक प्रश्नांची उत्पत्ती होते. बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांना जो धंदा दिला आहे,
पतीत पासून पावन बना आणि बनवा, या धंद्या मध्ये राहिल्याने च सर्व प्रश्न नाहीसे
होऊन जातील.
गीत:-
तुम्हाला
प्राप्त करून आम्ही सारे जग प्राप्त केले. . .
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलाने गीत ऐकले. हे कोणी म्हटले, गोड गोड आत्मिक मुलांनो, जरूर
आत्मिक पिता च म्हणू शकतात. गोड गोड आत्मिक मुले, आता समोर बसली आहेत आणि बाबा फार
प्रेमाने समजावत आहेत. आता तुम्ही जाणत आहात, आत्मिक पित्या शिवाय सर्वांना सुख
शांती देणारे किंवा सर्वांना या दुःखा पासून मुक्त करणारे, दुनिये मध्ये आणखीन कोणी
मनुष्य असू शकत नाहीत. त्यामुळे दुःखा मध्ये बाबाची आठवण करतात. तुम्ही मुले समोर
बसले आहात, जाणता कि, बाबा आम्हाला सुखधाम च्या लायक बनवित आहेत. सदा सुखधाम चे
मालक बनविणारे, बाबा सन्मुख आले आहेत. आता समजत आहात, समोर ऐकल्याने आणि दूर राहून
ऐकण्या मध्ये फार फरक आहे. मधुबन मध्ये सन्मुख येतात. मधुबन प्रसिद्ध आहे. मधुबन
मध्ये त्यांनी कृष्णाचे चित्र दाखवले आहे. परंतु कृष्ण तर नाहीत. तुम्ही मुले जाणत
आहात, या मध्ये मेहनत आहे. स्वतःला वारंवार आत्मा निश्चित करायचे आहे. मी आत्मा बाबा
कडून वरसा घेत आहे. बाबा साऱ्या चक्रामध्ये एकाच वेळी येतात. हे कल्पातील उत्तम
संगमयुग आहे. याचे नाव पुरुषोत्तम ठेवले आहे. हे संगमयुग आहे, ज्या मध्ये सर्व
मनुष्य मात्र उत्तम बनत आहेत. आता तर सर्व मनुष्य मात्राचे आत्मे तमोप्रधान आहेत.
मग सतोप्रधान बनतात. सतोप्रधान असाल तर उत्तम आहात. तमोप्रधान बनल्यामुळे मनुष्य
कनिष्ठ बनले आहेत. तर आता बाबा आत्म्यांना समोर बसवून समजावत आहेत. सारा अभिनय
आत्माच करत आहे, न कि शरीर. तुमच्या बुद्धी मध्ये आले आहे कि, आम्ही आत्मा मूळ
निराकारी दुनिया किंवा शांतीधाम चे राहणारे आहोत. हे कोणाला पण माहित नाही. ना स्वतः
समजावू शकतात. तुमच्या बुद्धीचे आता कुलूप उघडले आहे. तुम्ही समजत आहात, बरोबर आत्मे
परमधाम मध्ये राहतात. ते निराकारी जग आहे. हे साकारी जग आहे. इथे आम्ही सर्व आत्मे
कलाकार अभिनय करत आहोत. पहिल्या प्रथम आम्ही अभिनय करण्यासाठी येत आहोत, मग नंबरवार
येत जात राहतात. सर्व कलाकार एकत्र येत नाहीत, वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार येतात,
जातात. सर्व एकत्र तेंव्हा येतात जेंव्हा नाटक पूर्ण होते. आता तुम्हाला माहिती
मिळाली आहे. आम्ही आत्मे मूळ शांतीधाम चे रहिवासी आहोत, इथे अभिनय करण्यासाठी आले
आहोत. बाबा सारा वेळ अभिनय करण्या साठी येत नाहीत. आम्ही पण अभिनय करत करत
सतोप्रधान पासून तमोप्रधान बनले आहोत. आता तुम्हां मुलांना समोर ऐकल्या मुळे फार मजा
वाटते. एवढी मजा मुरली वाचल्याने मिळत नाही. इथे सन्मुख आहात ना.
आता तुम्ही समजत आहात कि, भारत देवी-देवतांचे स्थान होते. आता नाही. चित्र पाहता,
ते होते जरूर. आम्ही तेथील रहिवाशी होतो. पहिल्या प्रथम आम्ही देवता होतो. आपल्या
अभिनयाची आठवण कराल का विसरून जाल. बाबा म्हणतात, तुम्ही इथे हा अभिनय केला आहे. हे
विश्व नाटक आहे. नवीन दुनिया मग जरूर जुनी दुनिया होत आहे. पहिल्या प्रथम वरून जे
आत्मे येतात, तर ते सुवर्ण युगामध्ये येतात. या सर्व गोष्टी आता तुमच्या बुद्धीमध्ये
आहेत. तुम्ही विश्वाचे मालक महाराजा महाराणी होता. तुमची राजधानी होती. आता तर
राजधानी नाही. आता तुम्ही शिकत आहात, आम्ही राजाई कशी चालवू. तेथे वजीर नसतात. मत
देणाऱ्यांची आवश्यकताच नसते. ते तर श्रीमता द्वारे सर्वोत्तम बनले आहेत. मग त्यांना
दुसऱ्या कडून मत घेण्याची आवश्यकताच नाही. जर कोणा कडून मत घेतली, तर समजून येते
कि, त्यांची बुद्धी कमजोर आहे. आता जी श्रीमत मिळत आहे, ती सतयुगा मध्ये पण कायम
राहते. आता तुम्ही समजत आहात, पहिल्या प्रथम बरोबर या देवी-देवतांचे, अर्धा कल्प
राज्य होते. आता तुमची आत्मा ताजीतवानी होत आहे. हे ज्ञान परमात्म्या शिवाय कोणी पण
आत्मा देऊ शकत नाही. आता तुम्हा मुलांना देही अभिमानी बनायचे आहे. शांती धाम मधून
येऊन, येथे तुम्ही बोलत आहात. बोलल्या शिवाय कर्म होऊ शकत नाही. ही फार समजण्याची
गोष्ट आहे. जसे बाबा मध्ये सारे ज्ञान आहे, तसेच तुमच्या आत्म्या मध्ये पण ज्ञान आहे.
आत्मा म्हणते कि, आम्ही एक शरीर सोडून, संस्कारा नुसार मग दुसरे शरीर घेतो.
पुनर्जन्म पण जरूर घेतो. आत्म्याला जो अभिनय करावा लागतो, ती करते. संस्कारा नुसार
दुसरा जन्म घेतात. आत्म्याची दिवसेंनुदिवस पवित्रतेची ताकद कमी होत जाते. पतित
अक्षर द्वापार पासून निघाले आहे. तरीपण थोडासा फरक जरूर पडत आहे. तुम्ही नवीन घर
बनवता, एक महिन्या नंतर कांहीतरी फरक जरूर पडतो. आता तुम्ही मुले समजत आहात, बाबा
आम्हाला वरसा देत आहेत. बाबा म्हणतात, मी आलो आहे, तुम्हा मुलांना वरसा देण्यासाठी.
जेवढा जे पुरुषार्थ करतील, तेवढे पद मिळेल. बाबा जवळ कोणता फरक नाही. बाबा जाणतात,
मी आत्म्यांना शिकवित आहे. आत्म्याचा हक्क आहे, बाबा कडून वरसा घेण्याचा. यामध्ये
स्त्री पुरुषाचा भेद राहत नाही. तुम्ही सर्व मुले आहात. बाबा कडून वरसा घेत आहात.
सर्व आत्मे भाऊ भाऊ आहेत. ज्यांना बाबा शिकवित आहेत, वरसा देत आहेत. बाबा आत्मिक
मुला बरोबर बोलत आहेत. हे प्रिय गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांनो. तुम्ही फार
वेळ अभिनय करून करून आता मग येऊन भेटले आहात. आपला वारसा घेण्यासाठी. हे पण विश्व
नाटकांमध्ये नोंदलेले आहे. सुरुवाती पासून अभिनय नोंदलेला आहे. तुम्ही कलाकार अभिनय
करण्यासाठी कर्म करत आहात. आत्मा अविनाशी आहे, यामध्ये अविनाशी अभिनय भरलेला आहे.
शरीर तर बदलत राहते, बाकी आत्मा फक्त पवित्र पासून अपवित्र बनते, पतीत बनते.सतयुगा
मध्ये पावन असते, याला म्हटले जाते पतीत दुनिया. जेंव्हा देवतांचे राज्य होते, तर
निर्विकार जग होते. आता नाही. हा खेळ आहे ना. नवीन दुनिया मग जुनी दुनिया बनते, जुनी
दुनिया मग नवीन दुनिया बनते,आता सुखधाम स्थापन होत आहे. सर्व आत्मे मुक्तिधाम मध्ये
राहतील. आता हे बेहदचे नाटक पूर्ण होत आहे. सर्व आत्मे मच्छरा सारखे निघून जातील.
यावेळी जी पण आत्मा येते तर पतीत दुनिये मध्ये त्यांची काय किंमत आहे. किंमत त्यांची
आहे, जे पहिल्या प्रथम नवीन दुनिये मध्ये येतात. तुम्ही जाणता कि, जी नवीन दुनिया
होती ती मग जुनी झाली आहे. नवीन मध्ये आम्ही देवी-देवता होतो. तिथे दुःखाचे नाव नसते.
इथे तर अथाह दु:ख आहे. बाबा येऊन दुःखाच्या दुनिये पासून मुक्त करत आहेत. ही जुनी
दुनिया जरूर बदलणार आहे. तुम्ही समजत आहात, बरोबर आम्ही सतयुगाचे मालक होतो. मग 84
जन्मा नंतर असे बनले आहोत. आता मग बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तुम्ही स्वर्गाचे
मालक बनाल. तर आम्ही स्वतःला आत्मा निश्चय करून,बाबाची आठवण करू. कांही तर मेहनत
करावी लागेल ना. राजाई प्राप्त करणे, कांही सोपे थोडेच आहे. बाबांची आठवण करायची आहे.
हे मायेचे आश्चर्य आहे. जे वारंवार तुम्हाला विसरून टाकत आहे्. त्यासाठी उपाय केला
पाहिजे. असे नाही कि, माझे बनल्यामुळे आठवण येत राहील, बाकी पुरुषार्थ काय करायचा.
नाही. जो पर्यंत जिवंत आहात, तोपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. ज्ञान अमृत पीत राहायचे
आहे. हे पण समजत आहात, आमचा हा शेवटचा जन्म आहे. या शरीराचे भान सोडून आत्म अभिमानी
बनायचे आहे. गृहस्थ व्यवहारा मध्ये पण राहायचे आहे. पुरुषार्थ जरूर करायचा आहे.
फक्त स्वतःला आत्मा निश्चय करून, बाबांची आठवण करायची आहे. त्वमेव माताच पिता... हे
सर्व भक्तीमार्गाची महिमा आहे. तुम्हाला फक्त एक अल्फ ची आठवण करायची आहे. एकच अति
गोड वस्तू आहे. इतर सर्व गोष्टी सोडून, एका अति गोड ( बाबा ची) आठवण करायची आहे. आता
तुमची आत्मा तमोप्रधान बनली आहे, त्याला सतोप्रधान बनविण्यासाठी आठवणीच्या
यात्रेमध्ये राहा. सर्वांना हे सांगा, बाबा कडून सुखाचा वरसा मिळत आहे. सुख सतयुगा
मध्ये असते. सुखधाम स्थापन करणारे बाबा आहेत. बाबाची आठवण करणे फार सोपे आहे, परंतु
मायेचा विरोध फार होत आहे. त्यामुळे प्रयत्न करून बाबाची आठवण करा. तर त्यातील भेळ
मिसळ निघून जाईल. सेकंदा मध्ये जीवनमुक्तीचे गायन आहे. आम्ही आत्मा आत्मिक पित्याची
मुले आहोत. तेथील राहणारे आहोत. मग आम्हाला आमचा अभिनय रिपीट करायचा आहे. या नाटका
मध्ये सर्वात जास्त आमचा अभिनय आहे. सुख पण सर्वात जास्त आम्हाला मिळत आहे. बाबा
म्हणतात, तुमचा देवी देवता धर्म फार सुख देणारा आहे, आणि बाकी इतर शांतीधाम मध्ये
आपोआप निघून जातील, हिसाब किताब चुक्तु करून. जास्ती विस्तारा मध्ये आम्ही कां जावे.
बाबा येतातच सर्वांना परत घरी घेऊन जाण्यासाठी. मच्छरा सारखे सर्वांना घेऊन जातील.
सतयुगा मध्ये फार थोडे असतात. ही सारी नाटकां मध्ये नोंद आहे. शरीर नाहीसे होऊन जाते,
आत्मा जी अविनाशी आहे,ती हिसाब किताब चुक्तु करून निघून जाते. असे नाही कि, आत्मा
आग्नी मध्ये पडल्यामुळे पवित्र होते. आत्म्याला आठवणी रुपी योगअग्नी ने पवित्र
व्हायचे आहे. योगाची ही अग्नी आहे. त्यांनी मग नाटक बनविले आहे. सीता आग्नी मधून
पार झाली.आग्नी द्वारे कोणी थोडेच पावन होऊ शकते. बाबा समजावत आहेत, तुम्ही सर्व
सीता यावेळी पतित आहात. रावणाच्या राज्या मध्ये आहात. आता एका बाबाची आठवण करून,
तुम्हाला पावन बनायचे आहे. राम एकच आहेत. आग्नि अक्षर ऐकल्या मुळे समजतात, आगीतून
पार झाली. कुठे योग अग्नी, कुठे ती अग्नी. आत्मा परमपिता परमात्म्या बरोबर योग
लावूनच पतिता पासून पावन बनेल. रात्रं दिवसाचा फरक आहे. नरका मध्ये सर्वच सीता रावणा
च्या जेल मध्ये, शोक वाटिके मध्ये आहेत. येथील सुख तर काग विष्ठे समान आहे. भेट केली
जाते.स्वर्गामध्ये खूप सुख आहे.तुम्हा आत्म्यांचा आता शिव साजन बरोबर साखरपुडा झाला
आहे, तर आत्मा स्त्री झाली ना. शिवबाबा म्हणतात, फक्त माझी आठवण करा, तर तुम्ही
पावन बनाल. शांतीधाम ला जाऊन मग सुखधाम मध्ये जायचे आहे. तर मुलांना ज्ञान रत्नाने
झोळी भरायची आहे. कोणत्या पण प्रकारच्या संशया मध्ये यायचे नाही. देह अभिमाना मध्ये
आल्याने मग अनेक प्रकारचे प्रश्न उठतात, मग बाबा जो धंदा देत आहेत,ते करत नाहीत.
मूळ गोष्ट आहे आम्हाला पतिता पासून पावन बनायचे आहे. इतर गोष्टी सोडून द्यायच्या
आहेत. राजधानी मध्ये जो रिती रिवाज आहे तो चालेल. जसे महल बनविले होते, तसे बनवतील.
मूळ गोष्ट पवित्र बनण्याची आहे. बोलतात पण कि, हे पतित पावन ….पावन बनल्यामुळे सुखी
बनत आहात. सर्वात पावन देवी देवता आहेत.
आता तुम्ही एकवीस जन्मा साठी सर्वोत्तम पावन बनत आहात. त्याला संपूर्ण निर्विकारी
पावन म्हटले जाते. तर बाबा जी श्रीमत देत आहेत, त्यावर चालले पाहिजे. कोणता पण
संकल्प निर्माण करण्याची आवश्यकता नाही. प्रथम आम्ही पतिता पासून पावन तर बनू.
बोलावतात पण कि, हे पतित पावन, परंतु समजत कांही पण नाहीत. हे पण समजत नाहीत,
पतित-पावन कोण आहेत? ही पतीत दुनिया आहे, ती पावन दुनिया आहे. मुख्य गोष्टच आहे,
पावन बनण्याची. पावन कोण बनवितात? हे कांही पण माहित नाही. पतित-पावन म्हणून
बोलावतात, परंतु त्यांना सांगा, तुम्हीं पतित आहात, तर ते बिगडून जातात. स्वतःला
विकारी कोणी समजत नाहीत. असे म्हणतात गृहस्था मध्ये तर सर्वच होते. राधा कृष्ण,
लक्ष्मी नारायण ला पण मुले होती ना. तिथे योगबळाने मुले होतात, हे विसरून गेले आहेत.
त्याला निर्विकारी स्वर्ग म्हटले जाते. ते शिवालय आहे. बाबा म्हणतात, पतीत दुनिये
मध्ये एक पण पावन नाही. हे बाबा तर पिता, शिक्षक, आणि सद्गुरू आहेत. जे सर्वांची
सदगती करत आहेत. तिथे तर एक गुरु निघून गेला, तर मग मुलाला गादीवर बसवितात. आता ते
कसे सद्गती मध्ये घेऊन जातील? सर्वांचा सदगती दाता तर एकच आहे. यामध्ये फक्त देवी
देवता असतात, बाकी एवढी सर्व आत्मे शांतीधाम ला निघून जातात. रावण राज्या पासून
मुक्त होतात. बाबा सर्वांना पवित्र बनवून घेऊन जातात. पावन पासून मग कोणी झटक्यात
पतित बनत नाहीत. नंबरवार उतरत आहेत. सतोप्रधान पासून सतो, रजो, तमो…. तुमच्या बुद्धी
मध्ये 84 जन्माचे चक्र बसले आहे. तुम्ही जसे आता प्रकाश स्तंभ आहात. ज्ञानाने या
चक्राला ओळखले आहे कि, हे चक्र कसे फिरत आहे. आता तुम्हां मुलांना इतर सर्वांना
रास्ता सांगायचा आहे. सर्व बोटी आहेत, तुम्ही वैमानिक आहात, रस्ता सांगणारे.
सर्वांना सांगा, तुम्हीं शांतीधाम,सुखधाम ची आठवण करा. कलियुग दु:खधाम ला विसरून
जावा. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) जोपर्यंत
जिवंत आहात, तोपर्यंत ज्ञानामृत पीत राहायचे आहे. स्वतःची झोळी ज्ञान रत्नांनी
भरायची आहे. संशया मध्ये येऊन, कोणते प्रश्न निर्माण करायचे नाहीत.
(२) योग आग्नीने आत्मरुपी सीतेला पावन बनवायचे आहे. कोणत्या गोष्टीच्या विस्तारा
मध्ये जास्त न जाता, देही अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. शांतीधाम आणि सुखधाम
ची आठवण करायची आहे.
वरदान:-
देही अभिमानी
स्थिती मध्ये स्थित होऊन, नेहमी विशेष अभिनय करणारे संतुष्टमणी भव.
जी मुले विशेष अभिनय
करणारी आहेत, त्यांचे प्रत्येक कर्म विशेष असते, कोणते पण कर्म साधारण नसते. साधारण
आत्मा कोणते पण कर्म देहअभीमानी बनून करतात. जे देहीअभिमानी स्थिती मध्ये स्थित
होऊन कर्म करतात, ते स्वतः नेहमी संतुष्ट राहतात आणि दुसऱ्यांना पण संतुष्ट करतात,
त्यामुळे त्यांना संतुष्टमणीचे वरदान स्वतःच प्राप्त होत आहे.
बोधवाक्य:-
प्रयोगी आत्मा
बनून, योगा च्या प्रयोगाने सर्व खजान्यां ना वाढवित चला.