16-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, पावलो पावली श्रीमता वर चाला, नाही तर माया दिवाळं काढेल. हे डोळे फार
धोका देत आहेत. याची फार काळजी घ्या."
प्रश्न:-
कोणत्या
मुलाकडून माया फार विकर्म करविते? यज्ञा मध्ये विघ्न रूप कोण आहेत?
उत्तर:-
ज्यांना स्वतःचा अहंकार असतो, त्यांच्या कडून माया फार विकर्म करविते. असे खोटा
अहंकार वाले, मुरली पण वाचत नाहीत. असे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना माया चापट
मारून, कवडी तुल्य बनविते. यज्ञा मध्ये विघ्न रूप ते आहेत, ज्यांच्या बुद्धीमध्ये
परचिंतना च्या गोष्टी राहतात, ही फार वाईट सवय आहे.
ओम शांती।
आत्मिक मुलांना बाबानी समजावले आहे कि, इथे तुम्हां मुलांना या विचारा मध्ये जरूर
बसायचे आहे कि, हे पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत, सर्वोच्च गुरू पण आहेत. आणि हे पण
जाणत आहात कि, बाबाची आठवण करून पवित्र बनून, पवित्र धाम मध्ये जायचे आहे. बाबांनी
सांगितले आहे, पवित्र धाम मधून च तुम्ही खाली उतरले आहात. अगोदर तुम्ही सतोप्रधान
होता. मग सतो,रजो,तमो मध्ये आलात. आता तुम्ही समजत आहात, आम्ही खाली उतरले आहोत. जरी
तुम्ही संगमयुगा वर आहात, परंतु ज्ञानाने तुम्ही हे जाणत आहात कि, आम्ही आता किनारा
केलेला आहे. मग जर आम्ही शिवबाबा च्या आठवणी मध्ये राहत आहोत, तर शिवालय दूर नाही.
शिवबाबा ची आठवण करत नाहीत, तर शिवालय फार दूर आहे. शिक्षा भोगावी लागते, तर फार
दूर आहात. तर बाबा मुलांना काही जास्त त्रास देत नाहीत. एक तर वारंवार सांगतात कि,
मन्सा, वाचा, कर्मणा पवित्र बनायचे आहे. हे डोळे फार धोका देत आहेत. फार काळजी घेऊन
चालायचे आहे.
बाबांनी सांगितले आहे. ध्यान आणि योग बिल्कुल वेगळे आहे. योग म्हणजे आठवण. डोळे उघडे
असले तरी आठवण करू शकता. ध्याना ला योग म्हणत नाहीत. ध्याना मध्ये जातात तर त्याला
ना ज्ञान, ना योग म्हटले जाते. ध्याना मध्ये जाणाऱ्यावर माया फार वार करते, त्यामुळे
या मध्ये फार खबरदार राहिले पाहिजे. बाबाची आठवण पण कायद्या नुसार पाहिजे. कायद्या
विरुद्ध कोणते काम केले तर माया एकदम खाली पाडते. ध्यानाची तर कधी इच्छा पण ठेवली
नाही पाहिजे. इच्छा मात्र अविद्या. तुम्हाला कोणती पण इच्छा ठेवायची नाही. बाबा
तुमच्या सर्व इच्छा न मागता पूर्ण करत आहेत, जर बाबाच्या आज्ञा वर चालला तर. जर
बाबाच्या आज्ञेचे उल्लंघन करून, उलट्या रस्त्याने चालला तर होऊ शकते कि, स्वर्गाला
जाण्या ऐवजी नरका मध्ये जाऊन पडाल. गायन पण आहे कि, हत्तीला मगरी ने खाल्ले.
अनेकांना ज्ञान देणारे, भोग लावणारे, आज नाहीत, कारण कायद्याचे उल्लंघन करतात,
त्यामुळे पूर्ण मायावी बनतात.देवता बनता- बनता, राक्षस बनून जातात, त्यामुळे या
मार्गां मध्ये खबरदारी फार घेतली पाहिजे. स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे. बाबा तर
मुलांना सावधान करत आहेत. श्रीमता चे उल्लंघन करू नका. आसुरी मतावर चालल्या मुळे,
तुमची उतरती कळा झाली आहे. कुठून एकदम कुठे पोहचले आहात. एकदम खाली पोहचले आहात. आता
पण श्रीमता वर नाही चाललात, बेपरवाही केली, तर पद भ्रष्ट बनाल. बाबानी काल पण
समजावले होते, जे कांही श्रीमताच्या आधारा शिवाय करत आहात, त्यामुळे फार नुकसान होत
आहे. बिगर श्रीमता शिवाय कराल तर खाली पडतच राहाल. बाबानी सुरुवाती पासून मातांना
निमित्त केले, कारण कलश पण मातांना मिळत आहे. वंदे मातरम चे गायन आहे. बाबानी
मातांची समिती बनविली होती. त्यांच्या कडे सर्व कांही सुपूर्द केले होते. मुली
विश्वास पात्र असतात. ज्यादा करून पुरूषच दिवाळे मारतात. तर बाबा पण कलश माता वर
ठेवतात. या ज्ञान मार्गा मध्ये माता पण दिवाळे मारतात. जे पद्मा पदम भाग्यशाली
बनणारे आहेत, ते पण माये कडून हार खाऊन दिवाळे मारतात. यामध्ये स्त्री-पुरुष दोघे
दिवाळे मारू शकतात. त्यामध्ये फक्त पुरुष दिवाळे मारतात. इथे पहा किती तर हार खाऊन
निघून गेलेत, म्हणजे दिवाळे मारले ना. बाबा समजावत आहेत, भारतवासी चे पूर्ण दिवाळे
निघाले आहे. माया किती जबरदस्त आहे. समजू शकत नाहीत कि, आम्ही काय होतो? कुठून एकदम
खाली उतरून पडले आहोत. इथे पण उंच चढता चढता मग श्रीमताला विसरून, स्वतःच्या मतावर
चालत आहेत, त्यामुळे दिवाळे निघते. मग सांगा त्यांचे काय हाल होईल. ते तर दिवाळे
मारतात, मग ५-७ वर्षा नंतर उभे राहतात. इथे तर 84 जन्मासाठी दिवाळे मारत आहेत. मग
उंच पद प्राप्त करू शकत नाहीत. दिवाळे मारतच राहतात. किती महारथी जे अनेकांना उठवित
होते, आज ते नाहीत. दिवाळयामध्ये आहेत. इथे उंच पदे तर फार आहेत, परंतु जर खबरदारी
नाही घेतली तर वरून एकदम खाली पडतात. माया त्यांना गिळून टाकते. मुलांनी फार खबरदार
राहिले पाहिजे. स्वतःच्या मतावर कमिटी इ. बनविणे, त्यामध्ये कांही ठेवले नाही. बाबा
बरोबर बुध्दियोग ठेवा, ज्यामुळे सतोप्रधान बनाल. बाबाचे बनून, मग बाबा बरोबर योग
ठेवला नाही, श्रीमताचे उल्लंघन केले, तर एकदम खाली पडतात. संबंध च नाहीसा होऊन जातो.
त्यांचा संबंध तुटून जातो. संबंध तुटला तर तपासले पाहिजे कि, माया आम्हाला एवढी तंग
कां करत आहे. प्रयत्न करून बाबा बरोबर संबंध जोडला पाहिजे. नाही तर बॅटरी चार्ज कशी
होईल. विकर्म केल्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते.उंच चढता चढता खाली पडतात.
जाणतात कि, असे कांही आहेत. सुरुवातीला अनेक मुलं येऊन बाबाचे बनले. भट्टी मध्ये आले,
मग आता ते कोठे आहेत? खाली पडले कारण जुनी दुनियेची आठवण आली. आता बाबा म्हणतात, मी
तुम्हाला बेहदचे वैराग्य देत आहे. या जुन्या पतीत दुनिये बरोबर मन लावू नका. मन
स्वर्गा सोबत लावा. यामध्ये मेहनत आहे. जर हे लक्ष्मी नारायण बनू इच्छित आहात, तर
मेहनत केली पाहिजे. बुद्धी एक बाबा बरोबर असली पाहिजे. जुन्या दुनिये पासून वैराग्य.
जुन्या दुनियेला विसरणे हे तर चांगले आहे. मग आठवण कोणाची करायची? शांतीधाम, सुखधाम
ची. जेवढे होईल तेवढे उठता-बसता, चालता फिरताना बाबाची आठवण करा.बेहद सुखाच्या
स्वर्गाची आठवण करा. हे तर फार सोपे आहे. जर या दोन्ही इच्छे पासून उलटे चालला तर
पदभ्रष्ट होईल. तुम्ही इथे आले आहात नरा पासून नारायण बनण्यासाठी. सर्वांना सांगता
कि, तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे, कारण आता परतीचा प्रवास चालू आहे.
जगाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती म्हणजे नरका पासून स्वर्ग, मग स्वर्ग पासून
नरक. हे चक्र फिरत राहत आहे. बाबांनी सांगितले आहे, येथे स्वदर्शन चक्रधारी होऊन बसा.
याच आठवणी मध्ये राहा, आम्ही किती वेळा हे चक्कर मारले आहे. आम्ही स्वदर्शन चक्रधारी
आहोत. आता परत देवता बनायचे आहे. दुनिये मध्ये कोणी पण या रहस्याला समजत नाहीत. हे
ज्ञान तर देवतांना सांगायचे नाही. ते तर पवित्रच आहेत. त्यांच्या मध्ये ज्ञान नाही,
जे शंख वाजवतील. पवित्र पण आहेत, त्यामुळे त्यांना निशाणी देण्याची आवश्यकता नाही.
निशाणी तेंव्हा देतात, जेंव्हा दोघे एकत्र चतुर्भुज होतात. तुम्हाला पण देत नाहीत
कारण तुम्ही आज देवता उद्या मग खाली पडतात. माया खाली पाडत आहे ना. बाबा देवता
बनवितात, माया परत राक्षस बनवते. अनेक प्रकारे माया परीक्षा घेत आहे. बाबा जेंव्हा
समजावतात तेंव्हा माहीत पडते. खरेतर आमची अवस्था राहिलेली नाही. किती बिचारे आपले
सर्व कांही शिवबाबा च्या भंडाऱ्या मध्ये जमा करतात, तरीपण कधी माये कडून हार खातात.
शिवबाबाचे बनले आहेत, मग विसरून कां जाता, यामध्ये योगाची यात्रा मुख्य आहे.
योगामुळे पवित्र बनायचे आहे. ज्ञाना बरोबर पवित्रता पण पाहिजे. तुम्ही बोलवता पण
बाबा येऊन आम्हाला पावन बनवा, जे आम्ही स्वर्गा मध्ये जाऊ. आठवणी ची यात्रा आहे
पावन बनून, उंच पद प्राप्त करण्यासाठी. जे निघून जातात, तरीपण काही ना काही
ऐकल्यामुळे, शिवालया मध्ये जरूर येतील. मग पद कसले पण मिळते, परंतु येतात जरूर. एक
वेळा जरी आठवण केली, तर स्वर्गा मध्ये येतील. बाकी उंच पद मिळत नाही. स्वर्गाचे नाव
ऐकून खुश व्हायचे नाही. नापास होऊन, कवडी मोलाचे पद प्राप्त करणे, यामध्ये खुश
व्हायचे नाही. जरी स्वर्ग असला परंतु त्यामध्ये पद तर अनेक आहेत ना. जाणीव तर होत
आहे ना. मी नोकर आहे, मी मेहतर आहे. हे शेवटी तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील.
आम्ही काय बनू, आमच्या कडून कोणते विकर्म झाले, ज्यामुळे अशी हालत झाली. मी महाराणी
कां बनली नाही? पावलो पावली तुम्हाला खबरदारीने चालायचे आहे, श्रीमतावर चालले तर
तुम्ही पदमपती बनू शकता. काळजी घेतली नाही तर पदमपती बनू शकणार नाहीत. मंदिरा मध्ये
देवतांना पदमपती ची निशाणी दाखवतात. फरक तर समजू शकता ना. दर्जा मध्ये पण फार फरक
आहे. आता पण पहा किती दर्जे आहेत. केवढा थाट राहतो. आहे तर अल्प काळाचे सुख. तर आता
बाबा सांगतात कि,ज्यासाठी हात उंच करतात, तर तेवढा पुरुषार्थ केला पाहिजे. हात उंच
करणारे पण स्वतः नाहीसे झाले आहेत. म्हटले जाते कि, हे देवता बनणारे होते.
पुरुषार्थ करून नाहीसे झाले. हात उंच करणे सोपे आहे, अनेकांना समजावणे पण सोपे आहे,
महारथी सांगणारे पण गायब झाले आहेत. इतरांचे कल्याण करत, स्वतः आपले अकल्याण करून
बसले आहेत, त्यामुळे बाबा समजावतात, खबरदार राहा. अंतर्मुख होऊन, बाबाची आठवण करायची
आहे. कोणत्या प्रकाराने? बाबा आमचे पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत, सद्गुरु पण आहेत.
आम्ही जात आहोत, आमच्या गोड घरी. हे सर्व ज्ञान मना मध्ये राहिले पाहिजे. बाबा मध्ये
ज्ञान आणि योग दोन्ही आहेत. तुमच्या मध्ये पण असले पाहिजे. जाणता कि, शिवबाबा
शिकवित आहेत तर ज्ञान पण झाले, आठवण पण झाली. ज्ञान आणि योग दोन्ही एकत्र चालले
पाहिजे. असे नाही कि योगा मध्ये बसून शिवबाबा ची आठवण करत राहिला, तर ज्ञान विसरून
जाल. बाबा योग शिकवितात तर ज्ञान विसरून जाते कां. सारे ज्ञान त्यांच्या मध्ये राहते.
तुम्हा मुलां मध्ये हे ज्ञान असले पाहिजे. शिकले पाहिजे. जसे कर्म मी करेल, मला
पाहून इतर पण करतील. मी मुरली वाचली नाही,तर इतर पण वाचणार नाहीत. मी जर दुर्गतीला
प्राप्त केले, तर इतर पण दुर्गातीला प्राप्त होतील. मी निमित्त बनेल, इतरांना खाली
पाडण्यासाठी. कांही मुले मुरली वाचत नाहीत, खोट्या अहंकारा मध्ये राहतात. माया
झटक्यात वार करते. पावला पावला वर श्रीमत घेतली पाहिजे. नाहीतर कांही ना कांही
विकर्म बनून जाते. फार मुले चुका करतात, मग सत्यानाश होऊन जातो. दुर्लक्ष केल्यामुळे
माया चापट मारून कवडी तुल्य बनविते, यामध्ये फार समज पाहिजे. अहंकार आल्यामुळे माया
फार विकर्म करीत आहे. जेंव्हा कोणती कमिटीत इ. बनविता तर त्यामध्ये मुख्य 1-2 माता
जरूर असल्या पाहिजेत. त्यांच्या मतावर काम झाले पाहिजे. कलश तर लक्ष्मी वर ठेवला आहे
ना. गायन पण आहे, अमृत पाजत होती, तर आसुर पण बसून पीत होते. मग कुठे यज्ञा मध्ये
विघ्न घालत होते, अनेक प्रकारचे विघ्न घालणारे आहेत. सारा दिवस बुद्धी मध्ये
परचिंतना च्या गोष्टी राहतात. हे फार खराब आहे. कोणत्या पण गोष्टीं मध्ये शिवबाबा
कडे रिपोर्ट करा. सुधारणारे तर एकच बाबा आहेत. तुम्ही स्वतःच्या हाता मध्ये घेऊ नका.
तुम्ही बाबाच्या आठवणी मध्ये राहा. सर्वांना बाबाचा परिचय द्या. तेंव्हा असे बनाल.
माया फार जबरदस्त आहे, कोणाला पण सोडत नाही. नेहमी बाबाला समाचार लिहला पाहिजे.
डायरेक्शन घेत राहिले पाहिजे. तसे तर प्रत्येकाला डायरेक्शन मिळतच राहत आहे. मुले
समजतात कि, बाबानी तर स्वतःच या गोष्टीवर समजावून सांगितले आहे, तर ते अंन्तर्यामी
आहेत. बाबा म्हणतात, नाही, मी तर ज्ञान शिकवित आहे. यामध्ये अंतर्यामी ची गोष्टच
नाही. होय, हे जाणतो कि, ही सर्व माझी मुले आहेत. प्रत्येका च्या आतील आत्मा माझी
मुले आहेत. बाकी असे नाही कि, बाबा सर्वां मध्ये विराजमान आहेत. मनुष्य उलटे समजून
घेत आहेत.
बाबा सांगतात कि, मी जाणत आहे, सर्वांच्या तख्तावर आत्मा विराजमान आहे. ही तर किती
सोपी गोष्ट आहे. तरी पण चुका करून परमात्मा सर्वव्यापी आहे म्हणतात. ही एकच चुक आहे,
ज्यामुळे एवढे खाली पडले आहात. विश्वाचे मालक बनविणाऱ्या ला, तुम्ही शिव्या देता,
त्यामुळे बाबा म्हणतात, यदा यदा हि…... बाबा येथे येतात. तर मुलांना चांगल्या रीतीने,
विचार सागर मंथन करायचे आहे. ज्ञाना वर फार मंथन केले पाहिजे, वेळ दिला पाहिजे,
तेंव्हा तुम्ही स्वतःचे कल्याण करू शकाल. यामध्ये पैसे इ.ची गोष्टच नाही. भुखेने तर
कोणी मरणार नाही. जेवढे जे बाबा जवळ कायदाजमा कराल, तेवढे भाग्य बनेल. बाबाने
समजावले आहे, ज्ञान आणि भक्ती नंतर वैराग्य. वैराग्य म्हणजे सर्व कांही विसरून जायचे
आहे. स्वतःला अलिप्त केले पाहिजे. शरीरा तून आत्मा आता, जात आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात .आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) स्वतःवर
फार नियंत्रण ठेवायचे आहे. श्रीमता मध्ये कधी निष्काळजी पणा करायचा नाही. फार
खबरदार राहायचे आहे. कधी कोणत्या कायद्याचे उल्लंघन करायचे नाही.
(२) अंतर्मुख होऊन एका बाबा बरोबर, बुद्धीचा संबंध जोडायचा आहे. या पतित जुन्या
दुनिये पासून बेहदचे वैराग्य घ्यायचे आहे. बुद्धी मध्ये ठेवा कि, जे कर्म मी करेल,
मला पाहून सर्व करतील.
वरदान:-
स्वमाना च्या
सीटवर स्थित होऊन, मायेला समर्पित करणारे, श्रेष्ठ स्वमानधारी भव.
संगमयुगा तील सर्वात
श्रेष्ठ स्वमान आहे, मास्टर सर्वशक्तिमान च्या आठवणी मध्ये राहणे. जसा कोणी मोठा
अधिकारी किंवा राजा, जेंव्हा स्वमानाच्या सीट वर बसलेला असतो तर दुसरे पण त्यांना
सन्मान देतात, जर स्वतः सीट वर नसेल तर त्यांचा आदेश कोणी मानणार नाहीत, तसे तुम्ही
पण स्वमानधारी बनून आपल्या श्रेष्ठ स्वमाना च्या सीटवर स्थित राहीला, तर माया
तुमच्या समोर समर्पित होऊन जाईल.
बोधवाक्य:-
साक्षीपणा च्या स्थिती
मध्ये राहून दिलारामा बरोबरचा, अनुभव करणारेच लवलीन आत्मा आहेत.