19-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, आपल्या गोड बाबाची आठवण करा, तर तुम्हीं सतोप्रधान देवता बनाल.सर्व आधार
आठवणी च्या यात्रे वर आहे."
प्रश्न:-
जशी बाबा ची
ओढ मुलांना होते, तशी कोणत्या मुलांची ओढ सर्वांना होईल?
उत्तर:-
जे फूल बनले आहेत. जसे लहान मुले फुलां सारखी असतात, त्यांना विकारा ची माहिती च
नसते, तर ते सर्वांना आकर्षित करतात ना. तसे तुम्हीं मुले पण जेंव्हा फुल म्हणजे
पवित्र बनाल तर सर्वांना आकर्षित कराल. तुमच्या मध्ये विकारांचा कोणता पण काटा नसला
पाहिजे.
ओम शांती।
आत्मिक मुले जाणतात कि, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. आपल्या भविष्याचे पुरुषोत्तम
मुख पाहत आहात? पुरुषोत्तम शरीर पाहत आहात? तुम्हाला असे वाटते कां, आम्ही परत नवीन
दुनिया, सतयुगा मध्ये यांच्या ( लक्ष्मी नारायणा) वंशावळी मध्ये जाऊ, म्हणजे सुखधाम
मध्ये जाऊ, अथवा पुरुषोत्तम बनू. बसल्या बसल्या हे विचार येतात, विद्यार्थी जे शिकत
आहेत किंवा ज्या वर्गां मध्ये शिकत आहेत, ते जरूर बुद्धी मध्ये राहते ना. मी
बॅरिस्टर किंवा अमुक बनेल. तसे तुम्हीं पण जेंव्हा इथे बसले आहात, तर हे जाणता कि,
आम्ही विष्णू च्या राजधानी मध्ये जाऊ. विष्णू चे दोन रूप आहेत, लक्ष्मी नारायण, देवी
देवता. तुमची बुद्धी आता अलौकिक आहे. आणखीन कोणत्या मनुष्याच्या बुद्धी मध्ये या
गोष्टी रमण करणार नाहीत. तुम्हां मुलांच्या बुद्धी मध्ये या सर्व गोष्टी आहेत. हा
कांही साधारण सत्संग नाही. येथे बसले आहात तर समजा कि, सत बाबा ज्यांना शिव म्हटले
जाते, त्यांच्या संगती मध्ये बसले आहात. शिवबाबा रचयिता आहेत, तेच रचनेच्या आदि
मध्य अंता ला ओळखत आहेत, आणि हे ज्ञान देत आहेत. जसे की कालची गोष्ट सांगत आहेत. इथे
बसले आहात, तर हे आठवणीत येते कि, आम्ही आले आहोत, पुनर्जीवित होण्यासाठी म्हणजे हे
शरीर बदलून देवता शरीर घेण्यासाठी. आत्मा म्हणते कि, आमचे हे तमोप्रधान जुने शरीर
आहे, याला बदलून असे लक्ष्मी नारायण बनायचे आहे. मुख्य लक्ष्य किती श्रेष्ठ आहे.
शिकविणारे शिक्षक जरूर शिकणाऱ्या विद्यार्थ्या पेक्षा हुशार असतील ना. शिकवित आहेत,
चांगले कर्म शिकवित आहेत, तर जरुर उंच आहेत ना. तुम्ही जाणता, आम्हाला सर्वात
सर्वोच्च भगवान शिकवित आहेत. भविष्या मध्ये आम्ही ते देवता बनू. आम्ही जे शिकत आहे,
ते भविष्य नवीन दुनिया साठी. आणखीन कोणाला नवीन दुनियेची माहिती पण नाही. तुमच्या
बुद्धी मध्ये आता आले आहे, हे लक्ष्मी नारायण नवीन दुनियेचे मालक होते. तर जरुर मग
त्याची पुनरावृत्ती होईल. तर बाबा समजावत आहेत, तुम्हाला शिकून मनुष्या पासून देवता
बनवित आहे. देवता मध्ये पण जरूर क्रमवारी ने आहेत. दैवी राजधानी आहे ना. तुमचा सारा
दिवस याच विचारा मध्ये गेला पाहिजे कि, आम्ही आत्मा आहोत. आमची आत्मा जी फार पतीत
होती, ती आता पावन बनण्या साठी पावन बाबा ची आठवण करत आहे. आठवणी चा अर्थ पण समजायचा
आहे. आत्मा आठवण करत आहे, आपल्या गोड पित्याची. बाबा स्वतः म्हणत आहेत, मुलांनो,
माझी आठवण करा, तर तुम्ही सतोप्रधान देवता बनाल. सारा आधार आठवणी च्या यात्रेवर आहे.
बाबा जरूर विचारतात कि, मुलांनो, किती वेळ आठवण करत आहात? आठवण करण्या मध्ये च
मायेचे युद्ध होते. तुम्हीं स्वतः समजता कि, ही यात्रा नाही, परंतु जसे कि, युद्ध
आहे. या मध्ये विघ्न फार पडतात. आठवणीचे यात्रेमध्ये राहण्यातच माया विघ्न घालते,
म्हणजे आठवण विसरून टाकते. असे म्हणतात पण कि, बाबा, आम्हाला तुमची आठवण करण्या
मध्ये मायेचे फार वादळ येतात. क्रमांक एकचे वादळ आहे, देहअभिमानाचे. मग आहे काम,
क्रोध लोभ, मोह…. आज काम विकाराचे वादळ, उद्या क्रोधाचे वादळ आले,लोभाचे वादळ आले….
आज आमची अवस्था चांगली राहिली, कोणते पण वादळ आले नाही. आठवणीच्या यात्रेमध्ये सारा
दिवस राहिलो, फार खुशी झाली. बाबाची फार आठवण केली. आठवणी मुळे प्रेमाचे अश्रू
वाहिले. बाबाच्या आठवणी मध्ये राहिल्या मुळे तुम्ही गोड बनत आहात.
तुम्ही मुले हे पण समजत आहात कि, आम्ही माया कडून हार खाऊन, कुठे येऊन पोहोचले आहोत.
मुले हिशोब काढतात. कल्पा मध्ये किती महिने, किती दिवस आहेत. बुद्धी मध्ये येत आहे
ना. जर कोणी म्हणेल, लाखो वर्षाचे आयुष्य आहे, तर मग हिशोब थोडाच करू शकाल. बाबा
समजावत आहेत, हे सृष्टीचे चक्र फिरत राहते. या साऱ्या चक्रा मध्ये आम्ही किती जन्म
घेतले आहेत. कसे राजधानी मध्ये जात आहोत. हे तर जाणता ना. ही बिल्कुल नवी गोष्टी,
नवीन ज्ञान आहे, नवीन दुनियेसाठी. नवीन दूनिया स्वर्गाला म्हटले जाते. तुम्हीं
म्हणता, आम्ही आता मनुष्य आहोत, देवता बनत आहोत. देवता पद उंच आहे. तुम्ही मुले
जाणत आहात, आम्ही सर्वात वेगळे ज्ञान घेत आहोत. आम्हाला शिकविणारे फारच वेगळे
विचित्र आहेत. त्यांना हे साकार चित्र नाही. ते निराकार आहेत. तर विश्व नाटका मध्ये
पाहा, किती चांगला अभिनय करत आहोत. बाबा शिकवितात कसे? तर स्वतः सांगतात, मी अमुक
शरीरा मध्ये येतो. कोणच्या शरीरा मध्ये येतो,हे पण सांगतात. मनुष्य गोंधळून जातात,
काय एका च शरीरा मध्ये येतात. परंतु हे तर नाटक आहे ना. यामध्ये बदल होऊ शकत नाही.
या गोष्टी तुम्ही ऐकतात आणि धारण करतात आणि सांगत आहात. कसे आम्हाला शिवबाबा शिकवित
आहेत? आम्ही मग इतर आत्म्यांना शिकवित आहोत.आत्मा शिकत आहे. आत्मा शिकते आणि शिकविते.
आत्मा अति मूल्यवान आहे. आत्मा अविनाशी, अमर आहे. फक्त शरीर नाहीशी होते. आम्ही
आत्मे आमच्या परमपिता परमात्मा कडून ज्ञान घेत आहोत. रचियता आणि रचनेच्या आदि मध्ये
अंताचे, 84 जन्माचे ज्ञान घेत आहोत. ज्ञान कोण घेत आहे? आत्मा. आत्मा अविनाशी आहे.
अविनाशी वस्तू मध्ये मोह ठेवला पाहिजे, ना की विनाशी वस्तू मध्ये.इतके वर्ष तुम्ही
विनाशी शरीरा मध्ये मोह ठेवत आले आहात. आता समजत आहात कि, आम्ही आत्मा आहोत. शरीराचे
भान सोडले पाहिजे. कांही कांही मुले लिहितात पण, माझ्या आत्म्याने हे काम केले,
माझ्या आत्म्याने आज हे भाषण केले, माझ्या आत्म्याने आज बाबाची फार आठवण केली, ते
सर्वोच्च आत्मा आहेत, ज्ञानसंपन्न. तुम्हा मुलांना किती ज्ञान देत आहेत, मूलवतन,
सूक्ष्मवतन ला तुम्ही जाणत आहात. मनुष्याच्या बुद्धी मध्ये तर कांही पण नाही.
तुमच्या बुद्धीं मध्ये आहे कि, रचयिता कोण आहेत. या मनुष्य सृष्टीचा निर्माता कोण
आहे, तर जरुर कर्तव्या मध्ये येत आहेत.
तुम्ही जाणत आहात, इतर कोणी मनुष्य जाणत नाहीत, ज्यांना आत्मा आणि परमात्म्या
पित्याची आठवण राहते. बाबा ज्ञान देत आहेत कि, स्वतःला आत्मा समजा. तुम्ही स्वतःला
शरीर समजल्या मुळे उलटे लटकले आहात. आत्मा सत चित आनंद स्वरुप आहे. आत्म्या ची
सर्वात जास्त महिमा आहे. एक पिता आत्म्याची किती महिमा आहे. तेच दुख:हर्ता सुखकर्ता
आहेत. डास इ.ची तर महिमा करत नाहीत कि, ते दुख:हर्ता सुखकर्ता आहेत. ज्ञानाचे सागर
आहेत. नाही, ही बाबा ची महिमा आहे. तुम्ही पण प्रत्येक स्वतः दुख:हर्ता सुखकर्ता
आहात, कारण त्या पित्याची मुले आत्मा तर सर्वांचे दुःख नाहीसे करून, सुख देतात, ते
पण अर्ध्या कल्पा साठी. हे ज्ञान आणखीन कोणा मध्ये नाही. ज्ञान संपन्न तर एकच बाबा
आहेत. आमच्या मध्ये ज्ञान नाही. एका बाबाला ओळखत नाहीत, तर बाकी मग काय ज्ञान असेल.
आता तुम्हाला वाटते कि, आम्ही अगोदर ज्ञान घेत होतो, कांही पण समजत नव्हतो. लहान
मुला मध्ये ज्ञान नसते, आणखीन कोणते अवगुण पण नसतात, त्यामुळे त्यांना महात्मा
म्हटले जाते, कारण पवित्र आहेत. जेवढा लहान मुलगा तेवढा नंबर एकचे फुल. बिल्कुल जशी
कर्मातीत अवस्था आहे. कर्म विकर्मा ला कांही पण जाणत नाहीत. फक्त स्वतःला जाणतात,
ते फुल आहेत, त्यामुळे सर्वांना आकर्षित करतात. जसे आता बाबा आकर्षित करत आहेत. बाबा
आले आहेत, सर्वांना फुल बनविण्या साठी. तुमच्या मध्ये पण काही फार खराब काटे
आहेत.पाच विकार रूपी काटे आहेत ना. यावेळी तुम्हाला फुल आणि काट्याचे ज्ञान आहे.
काट्यांचे जंगल पण असते. बाभळी चा काटा सर्वात मोठा असतो. त्या काट्या पासून पण फार
वस्तू बनवितात. त्याचे साम्य मनुष्या बरोबर करतात. बाप समजावत आहेत, यावेळी फार
दुःख देणारे, मनुष्य काटे आहेत. त्यामुळे याला दुःखाची दुनिया म्हटले जाते. म्हणतात
पण बाबा सुखदाता आहेत. माया रावण दुख:दाता आहे. मग सतयुगा मध्ये माया नसते. तर या
कोणत्या पण गोष्टी नसतात. विश्व नाटका मध्ये एक अभिनय दोन वेळा होत नाही. बुद्धी
मध्ये आहे, साऱ्या दुनिये मध्ये जो अभिनय होत आहे, तो सर्व नवीन आहे. तुम्ही विचार
करा, सतयुगा पासून आता पर्यंत, दिवस बदलत जातात. अभिनय बदलत जातो. 5000 वर्षा च्या
पूर्ण अभिनया चे नोंद आत्म्यां मध्ये भरलेली आहे, ती बदलू शकत नाही. प्रत्येक
आत्म्या चा स्वतःचा अभिनय भरलेला आहे. ही एक गोष्ट पण कोणी समजू शकत नाही. आता आदि
मध्य अंता ला तुम्ही जाणत आहात. ही पाठशाळा आहे ना. सृष्टी च्या आदि मध्य अंताला
जाणत आहात, आणि मग बाबाची आठवण करून, पवित्र बनण्याचे शिक्षण घेत आहात. यापूर्वी
जाणत होता कां, आम्हाला असे बनायचे आहे. बाबा किती स्पष्ट करून समजावत आहेत. तुम्ही
पहिल्या नंबर मध्ये असे होता, मग तुम्ही खाली उतरत उतरत, आता काय बनले आहात. दुनिया
तर पाहा काय बनली आहे. अनेक मनुष्य आहेत. या लक्ष्मी नारायणा च्या राजधानी चा विचार
करा. काय होईल. हे जिथे राहत होते, कसे हिरे जवाहराताचे महल असतात. बुद्धी मध्ये
येते,आता आम्ही स्वर्गवासी बनत आहोत. तिथे आम्ही आमची घरे इत्यादी बनवू. असे नाही
कि, खालून द्वारका बाहेर येईल. जसे शास्त्रां मध्ये दाखविले आहे. शास्त्र नाव चालत
आले आहे, आणखीन कोणते नाव तर ठेऊ शकत नाही. आणखी पुस्तके शिक्षणा साठी आहेत. दुसऱ्या
कादंबऱ्या आहेत, बाकी याला पुस्तक अथवा शास्त्र म्हणतात. ती शिक्षणाची पुस्तके आहेत.
शास्त्र शिकणाऱ्याला भक्त म्हटले जाते. भक्ती आणि ज्ञान दोन गोष्टी आहेत. आता
वैराग्य कशाचे? भक्तीचे का ज्ञानाचे? जरूर म्हणतील भक्तीचे. आता तुम्हाला ज्ञान
मिळत आहे, ज्यामुळे तुम्ही एवढे उंच बनत आहात. आता बाबा तुम्हाला सुखदाई बनवित
आहेत.सुखधाम ला स्वर्ग म्हटले जाते. सुखधाम मध्ये तुम्हीं जाणारे आहात, तर
तुम्हालाच शिकवित आहेत. हे ज्ञान पण तुमची आत्मा घेत आहे. आत्म्याचा कोणता धर्म नाही.
ती तर आत्मा आहे. मग आत्मा जेंव्हा शरीरा मध्ये येते, तर शरीराचे धर्म वेगळे आहेत.
आत्म्या चा धर्म काय आहे? एक तर आत्मा बिंदू सारखी आहे आणि शांत स्वरूप आहे.
शांतीधाम,मुक्तिधाम मध्ये राहत आहे. आता बाबा समजावत आहेत, सर्व मुलांचा हक्क आहे,
फार मुले आहेत, जे इतर धर्मा मध्ये धर्मांतरित झाली आहेत. ते मग येऊन आपल्या मूळ
धर्मां मध्ये येतील. जे देवी देवता धर्म सोडून, दुसऱ्या धर्मा मध्ये गेले आहेत, ती
सर्व पाने परत येतील, आपल्या जागेवर. या सर्व गोष्टीला इतर कोणी समजू शकत नाहीत.
पहिल्या प्रथम तर बाबा चा परिचय द्यायचा आहे. यामध्ये सर्व गोंधळून जातात. तुम्ही
मुले जाणत आहात कि, आम्हाला कोण शिकवित आहेत? बाबा शिकवित आहेत. कृष्ण तर देहधारी
आहे. यांना (ब्रह्माला) दादा म्हणतात. सर्व भाऊ भाऊ आहेत ना. मग पदा वर आहे. हे
भावाचे शरीर आहे, हे बहिणी चे शरीर आहे. हे पण तुम्ही आता जाणत आहात. आत्मा तर एक
लहान तारा आहे. एवढे सर्व ज्ञान छोट्या ताऱ्यां मध्ये आहे. तारा शरीरा शिवाय बोलू
शकत नाही. तार्याला अभिनय करण्यासाठी शरीर पाहिजे. ताऱ्यांची दुनियाच वेगळी आहे.
मग येथे येऊन आत्मा शरीर धारण करत आहे. ते आत्म्याचे घर आहे. आत्मा छोटी बिंदी आहे.
शरीर मोठी वस्तू आहे, तर त्याची किती आठवण करतात. आता तुम्हाला आठवण करायची आहे, एक
परमपिता परमात्म्याची, हेच सत्य आहे. जेंव्हा आत्मा आणि परमात्म्या चा मेळा होतो.
गायन पण आहे कि, आत्मा आणि परमात्मा फार काळ दुर राहिले ..आम्ही बाबा पासून वेगळे
झाले आहोत. आठवण येते कि, किती काळ वेगळे झाले आहोत. बाबा जे कल्प कल्प सांगत आले
आहेत, तेच येऊन सांगत आहेत. यामध्ये थोडा पण फरक पडत नाही. सेकंद सेकंदाला जो अभिनय
चालत आहे, तो नवीन आहे. एक सेकंड निघून गेला, मिनिट निघून गेला, त्याला जसे सोडून
जात आहात. वेळ निघून जात आहे. त्यामुळे म्हणतात, एवढे वर्ष, एवढे दिवस, मिनिट, एवढे
सेकंद निघून गेले आहेत. पूर्ण पाच हजार वर्ष होतात, मग पहिल्या पासून सुरू होत आहे.
तंतोतंत हिशोब आहे ना. मिनिट, सेकंद सर्वांची नोंद होत आहे. आता तुम्हाला कोणी
विचारतात, यांनी कधी जन्म घेतला होता? तुम्ही हिशोब करून सांगता. कृष्णाने पहिल्या
नंबर मध्ये जन्म घेतला. शिवाचे तर मिनिट, सेकंद कांही पण काढू शकणार नाहीत. कृष्णाची
तिथी, तारीख पूर्ण लिहिलेली आहे. मनुष्यांच्या घड्याळा मध्ये फरक पडू शकतो. मिनिट
सेकंदाचा. शिवबाबा च्या अवतरणां मध्ये तर कांहीच फरक पडत नाही. माहित पण पडत नाही
कि, कधी आले. असे पण नाही कि, साक्षात्कार झाला, तेंव्हा आले. नाही, आंदाजाने सांगत
आहेत, बाकी असे नाही कि, त्यावेळी प्रवेश झाला. साक्षात्कार झाला कि, आम्ही अमुक बनू.
अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) सुखधाम
मध्ये जाण्या साठी सुखदायी बनायचे आहे. सर्वांचे दुःख नाहीशी करून सुख द्यायचे आहे.
कधी पण दुखदाई काटे बनायचे नाही.
(२) या विनाशी शरीरां मध्ये आत्माच अति मूल्यवान आहे. तिच अमर अविनाशी आहे. त्यामुळे
अविनाशी वस्तू बरोबर प्रेम करायचे आहे. देहाचे भान विसरायचे आहे.
वरदान:-
एक बळ एक भरोशा
च्या आधारावर,ध्येयाला जवळ अनुभव करणारे हिंमतवान भव.
उंच ध्येय प्राप्त
करण्या अगोदर धुके, वादळ येतात, बोटेला पार जाण्या साठी, भोवऱ्या मधून पार करावे
लागते, त्यामुळे घाबरू नका, थकू किंवा थांबू नका. साथी ला बरोबर ठेवा तर प्रत्येक
मुश्कील सहज होऊन जाईल. हिंमतवान बनून बाबाच्या मदतीचे पात्र बना. एक बळ एक भरोसा
या पाठाला नेहमी पक्के ठेवा, तर भोवऱ्या मधून पार निघून जाल आणि धेय्य जवळ अनुभव
होईल.
बोधवाक्य:-
विश्व
कल्याणकारी ते आहेत, जे प्रकृती सहित प्रत्येक आत्म्या साठी शुभभावना ठेवतात.