14-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,बाबा जे शिक्षण तुम्हाला शिकवतात,ते बुद्धीमध्ये ठेवून सर्वांना शिकवायचे
आहे, प्रत्येकाला शिव पित्याचा आणि सृष्टीचक्राचा परिचय द्यायचा आहे"
प्रश्न:-
आत्मा
सतयुगामध्ये पण भूमिका वठवते आणि कलियुगामध्ये पण परंतु आंतर कोणते आहे?
उत्तर:-
सतयुगामध्ये जेव्हा भूमिका वठवते,तर त्यामध्ये कोणतेही पापकर्म होत नाही,प्रत्येक
कर्म तेथे अकर्म होते,कारण तेथे रावण नसतो.परत कलियुगामध्ये जेव्हा भूमिका वठवते,तर
प्रत्येक कर्म विकर्म किंवा पाप कर्म बनतात, कारण येथे विकार आहेत.आता तुम्ही
संगमयुगामध्ये आहात. तुम्हाला सर्व ज्ञान आहे.
ओम शांती।
आता हे तर मुलं जाणतात की,आम्ही बाबाच्या सन्मुख बसलो आहोत.बाबा पण जाणतात,मुलं
माझ्या समोर बसले आहेत.हे पण तुम्ही जाणतात बाबा आम्हाला शिक्षा देतात,त्या परत
दुसऱ्याला द्यायचे आहेत. प्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे,कारण सर्व बाबांना आणि
बाबांच्या ज्ञानाला विसरले आहेत. आत्ताच बाबा शिकवतात,हे शिक्षण परत पाच हजार
वर्षांनंतरच मिळेल. हे ज्ञान दुसरे कोणी देऊ शकत नाही.मुख्य बाबांचा परिचय देणे
आहे.परत हेच समजून सांगायचे आहे,आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत.सर्व दुनियातील जे पण आत्मे
आहेत,ते सर्व आपसामध्ये भाऊ भाऊ आहेत.सर्वांना आप आपली भूमिका मिळालेली आहे,जे या
शरीराद्वारे वठवतात.आता बाबा आले आहेत नवीन दुनिया मध्ये घेऊन जाण्यासाठी,त्याला
स्वर्ग म्हणतात. परंतु आम्ही सर्व भाऊ पतित आहोत,एक पण पावन नाही.सर्व पतितांना
पावन बनवणारे,तर एकच पिता आहेत.ही आहेच पतित विकारी भ्रष्टाचारी रावणाची
दुनिया.रावणाचा अर्थच आहे,पाच विकार स्त्रियांमध्ये पाच विकार पुरुषांमध्ये.बाबा
खूप सहज रीतीने समजवतात.तुम्ही पण असे समजावू शकतात.तर प्रथम हे समजून सांगा,आम्हा
आत्म्याचे ते पिता आहेत.आम्ही सर्व भाऊ आहोत.तुम्ही विचारा हे ठीक आहे, लिहा,आम्ही
सर्व भाऊ भाऊ आहोत.आमचे पिता पण एकच आहेत.आम्हा सर्व आत्म्याचे ते परम आत्मा
आहेत,त्यांना पिता म्हटले जाते.हे पक्के बुद्धीमध्ये बसवा तर सर्वव्यापीच्या गोष्टी
निघून जातील. प्रथम अल्लाहची म्हणजे ईश्वराचा परिचय पाहिजे.तुम्ही सांगा,हे चांगल्या
प्रकारे लिहा.अगोदर सर्वव्यापी म्हणत होतो,आता आम्ही समजतो की,ईश्वर सर्वव्यापी
नाहीत. आम्ही सर्व भाऊ आहोत,सर्व आत्मे म्हणतात, हे ईश्वरीय पिता, परमपिता.प्रथम तर
हा निश्चय करावयाचा आहे की,आम्ही आत्मा आहोत,परमात्मा नाहीत.न आपल्या मध्ये परमात्मा
व्यापक आहेत.सर्वां मध्ये आत्मा व्यापक आहे.आत्मा शरीराच्या आधारे भूमिका वठवते,हे
पक्के करा.अच्छा,परत सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान पण ऐकवतात. दुसरे तर कोणी
जाणत नाहीत की,या सृष्टीचक्राचा कालावधी किती आहे.बाबाच शिक्षकाच्या रूपांमध्ये
सन्मुख समजवत आहेत.लाखो वर्षाची गोष्ट नाही.हे चक्र अनादी बनलेले आहे,त्याला जाणावे
लागेल.सतयुग त्रेता पूर्ण झाले,याची नोंद घ्या. त्याला म्हटलं जातं स्वर्ग आणि सेमी
स्वर्ग,म्हणजे स्वर्गा सारखे.येथे देवी-देवतांचे राज्य चालते.ते १६ कला ते १४
कला.हळू हळू कला कमी कमी होत जातात.दुनिया जुनी तर जरूर होते ना.सतयुगाचा प्रभाव
खूप भारी आहे.नावच स्वर्ग आहे,नवीन दुनिया..त्याचीच महिमा करायची आहे.नवीन दुनिया
मध्ये एकच आदी सनातन देवी-देवता धर्म आहे.प्रथम तर पित्याचा परिचय,परत सृष्टिचक्राचा
परिचय द्यायचा आहे.चित्र पण तुमच्या जवळ आहेत,निश्चिय करण्यासाठी. हे सृष्टीचे चक्र
फिरत राहते. सतयुगा मध्ये लक्ष्मीनारायणाचे राज्य होते, त्रेतायुगामध्ये राम सिताचे
राज्य होते.हे अर्धा कल्प झाले,दोनयुग झाले,परत द्वापर कलियुग येते.द्वापरमध्ये
रावण राज्य.देवता वाम मार्गामध्ये जातात,तर विकाराची पद्धत चालू होते.सतयुग
त्रेतामध्ये सर्व निर्विकारी राहतात. एक आदी सनातन देवी देवता धर्म राहतो.चित्र पण
दाखवायचे आहेत आणि मुखाद्वारे पण समजावयाचे आहे.बाबा आम्हाला शिक्षक बनवून असे
शिकवत आहेत.बाबा आपला परिचय स्वतः येऊन देतात.स्वतः म्हणतात मी येतो,पतितांना पावन
बनवण्यासाठी,तर मला शरीर जरूर पाहिजे,नाहीतर मी गोष्टी कसे करू. मी चैतन्य आहे,सत्य
आहे आणि अमर आहे.आत्मा सतो रजो तमो मध्ये येते.आत्माच पावन आणि पतित बनते,म्हणून
म्हटले जाते पतित आत्मा,पावन आत्मा.आत्म्या मध्येच सर्व संस्कार आहेत. भूतकाळातील
कर्म किंवा विकर्माचे संस्कार आत्माच घेऊन येते.सतयुगामध्ये विकार नसतात.कर्म
करतात,भूमिका वठवतात परंतु ते कर्म अकर्म होतात.गीतेमध्ये पण अक्षर आहे, आता तुम्ही
प्रत्यक्षात समजत आहात.तुम्ही जाणतात बाबा आले आहेत,जुन्या दुनियेला बदलण्यासाठी आणि
नवीन दुनिया बनवण्यासाठी,जेथे कर्म अकर्म होतात,त्यालाच सतयुग म्हटले जाते.आणि परत
जेथे सर्व कर्म विकर्म होतात,त्याला कलियुग म्हटले जाते.तुम्ही आता संगमयुगा मध्ये
आहात.बाबा दोन्हीकडील गोष्टी समजवतात.सतयुग-त्रेता तर पवित्र दुनिया आहे.तेथे कोणते
पाप होत नाही.जेव्हा रावण राज्य सुरू होते,तेव्हाच पाप होतात.तेथे विकाराचे नाव
राहत नाही.चित्र तर समोर आहेत,रामराज्य आणि रावण राज्य.बाबा समजवतात,हे शिक्षण
आहे.बाबांशिवाय कोणी जाणत नाहीत.शिक्षण तर तुमच्या बुद्धीमध्ये राहायला
पाहिजे,बाबाची आठवण पण येते आणि चक्र पण बुद्धीमध्ये येते.सेकंदामध्ये सर्व आठवण
येते, वर्णन करण्यामध्ये उशीर लागू शकतो. झाड असे होते,बीज आणि झाड सेकंदांमध्ये
आठवणीत येतील.हे बीज अमक्या झाडाचे आहे,याद्वारे अशा प्रकारचे फळं निघतील.हे मनुष्य
झाड कसे आहे,याचे रहस्य तुम्ही समजतात.मुलांना सर्व समजले आहे,अर्धाकल्प राजाई कशी
चालते,परत रावण राज्य होते.तर जे सतयुग त्रेतावासी आहेत,तेच द्वापार निवासी
बनतात.झाडाची वृद्धी होत राहते.अर्ध्याकल्पाच्या नंतर रावण राज्य सुरू होते,तर
मनुष्य विकारी बनतात.बाबा पासून जो वारसा मिळतो,तो अर्धाकल्प चालतो.ज्ञान ऐकवून
वारसा दिला,ते प्रारब्ध भोगले,म्हणजे सतयुगा मध्ये सुख मिळाले,त्याला सुखधाम सतयुग
म्हटले जाते.तेथे दुःख नसते.खूप सहज समजवत राहतात.एकाला समजवतात किंवा अनेकांना
समजवतात,तर असे लक्ष द्यायचे आहे. समजत आहात का ?होय होय करत आहेत? तुम्ही त्यांना
डायरी मध्ये लिहून घ्यायला सांगा? काही शंका असेल तर विचारा.ज्या गोष्टी कोणी जाणत
नाहीत,ते आम्ही समजावून सांगत आहोत.तुम्ही काहीच जाणत नाहीत,तर काय विचारणार?
बाबा तर बेहद्दच्या झाडाचे रहस्य समजवतात.हे ज्ञान आता तुम्ही समजतात.बाबांनी समजवले
आहे, तुम्ही ८४च्या चक्रामध्ये कसे येतात. हे चांगल्या प्रकारे नोंद करा,परत यावरती
विचार करायचे आहेत. जसे शिक्षक गृहपाठ देतात,परत घरी जाऊन त्याची उजळणी करतात
ना.तुम्ही पण हे ज्ञान देतात, परत पहा काय होते, विचारत रहा. एक-एक गोष्ट चांगल्या
प्रकारे समजावून सांगा,पिता आणि शिक्षकाचे कर्तव्य समजावून सांगा. पिता-शिक्षकाचे
रहस्य समजावून सांगा,परत गुरूंचे रहस्य समजावून सांगा.त्यांना बोलवतातच की येऊन
आम्हा पतितांना पावन बनवा.आत्मा पावन बनते,परत शरीर पण पावन मिळते.जसे सोने तसे
दागिने बनतात.२४ कॅरेट चे सोने घ्या,त्याच्यामध्ये काही मिलावट करणार नाहीत,तर
दागिने पण चांगले सतोप्रधान बनतात. मिलावट केल्यामुळे तमोप्रधान बनतात.प्रथमत: भारत
२४ कॅरेट खरी सोन्याची चिमणी होता, म्हणजे सतोप्रधान नवीन दुनिया होती,परत
तमोप्रधान बनले आहेत. हे दुसरे कोणी मनुष्य गुरु लोक जाणत नाहीत.त्यांनाच बोलवतात
येऊन पावन बनवा.ते तर गुरूंचे काम आहे.वानप्रस्थ अवस्थांमध्ये मनुष्य गुरु
करतात,वाणी पासून दूर चे स्थान निराकारी दुनिया आहे, जेथे आत्मे राहतात.ही साकारी
दुनिया आहे.दोघांचा हा मेळ आहे. तेथे तर शरीरच नाही.तेथे कोणते कर्म नसते.बाबा मध्ये
सर्व ज्ञान आहे,पूर्वनियोजित नाटकानुसार त्यांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते.ते
चैतन्य,सत चित आनंद स्वरूप असल्यामुळे,त्यांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते.बाबांना
बोलवतात, पतित-पावन ज्ञानाचे सागर शिवबाबा,त्यांचे नाव नेहमीच शिव आहे.बाकी सर्व
आत्मे भूमिका वठण्यासाठी येतात,तर वेगवेगळे नाव धारण करतात.बाबांना बोलवतात परंतु
त्यांना काहीच समजून येत नाही.जरूर भाग्यशाली रथ पण असेल,ज्यांच्यामध्ये बाबा
प्रवेश करुन,तुम्हाला पावन दुनिये मध्ये घेऊन जातात.तर बाबा समजवतात,गोड गोड मुलांनो,
मी त्यांच्या मनामध्ये येतो,जे अनेक जन्माच्या अंत मध्ये आहेत,जे पूर्ण ८४ जन्म
घेतात.भाग्यशाली रथामध्ये यावे लागते.प्रथम क्रमांका मध्ये तर श्रीकृष्ण आहेत.ते
नवीन दुनियाचे मालक आहेत.परत तेच खाली उतरतात.सुवर्ण युगापासून चांदीच्या
युगामध्ये,परत ताम्र,लोह युगामध्ये येतात.आता तुम्ही लोहयुगा पासून सुवर्ण युगी बनत
आहात.बाबा म्हणतात,फक्त मज पित्याची आठवण करा.ज्याच्या मध्ये प्रवेश केला
आहे,त्यांच्या आत्म्या मध्ये तर काहीच ज्ञान नव्हते.यांच्यामध्ये मी प्रवेश करतो
म्हणून यांना भाग्यशाली रथ म्हटले जाते,नाहीतर सर्वात उच्च ते उच्च लक्ष्मीनारायण
आहेत,यांच्या मध्ये प्रवेश करायला पाहिजे. परंतु त्यांच्यामध्ये परमात्मा प्रवेश
करत नाहीत,म्हणून त्यांना भाग्यशाली रथ म्हटले जात नाही.रथामध्ये येऊन पतितांना
पावन बनवायचे आहे,तर जरूर कलियुगी तमोप्रधान असेल ना.स्वतः म्हणतात मी अनेक
जन्मांच्या अंत मध्ये येतो.गीतेमध्ये पण बिनचूक अक्षरं आहेत.गीतेला सर्व शास्त्र
शिरोमणी म्हटले जाते. या संगम युगामध्येच बाबा येऊन, ब्राह्मण कुळ आणि देवता कुळाची
स्थापना करतात.अनेक जन्माच्या अंतकाळात,म्हणजे संगम मध्येच बाबा येतात.बाबा म्हणतात
मी बिजरुप आहे.कृष्ण तर सतयुगाचे रहिवासी आहेत.त्यांना दुसऱ्या ठिकाणी तर कोणी पाहू
शकत नाहीत.पुनर्जन्मामध्ये तर नाव,रुप, देश काळ सर्व बदलते.शारीरिक ठेवणच बदलते.
प्रथम लहान मुलगा सुंदर असतो, परत मोठा होतो,परत शरीर सोडून दुसरे लहान शरीर
मिळते.हा पूर्वनियोजित खेळ,नाटकांमध्ये कायमस्वरूपी आहे.दुसरे शरीर घेतले तर,
त्यांना कृष्ण म्हणणार नाही.त्या दुसऱ्या शरीरा वरती नाव इत्यादी दुसरे
होईल.वेळ,चेहरा, तिथी, तारीख इत्यादी सर्व बदलते. विश्वाच्या इतिहास भूगोलाची
हुबेहूब पुनरावृत्ती म्हणले जाते.तर या नाटकची पुनरावृत्ती होत राहते.सतो रजो
तमोगुणा मध्ये यायचे च आहे.सृष्टीचे नाव,युगाचे नाव सर्व बदलत राहते.आत्ता हे संगम
युग आहे.मी संगम मध्येच येतो.मी तुम्हाला सर्व दुनियाच्या इतिहास भूगोलाचे सत्य
सांगतो. सुरुवातीपासून अंत काळापर्यंत, दुसरे कोणीही जाणत नाहीत. सतयुगाचा कालावधी
किती होता, हे माहीत नसल्यामुळे लाखो वर्षे म्हणतात.आता तुमच्या बुद्धी मध्ये सर्व
गोष्टी आहेत.तुम्ही हे पक्के करायला पाहिजे की बाबाच,पिता शिक्षक आणि सद्गुरु
आहेत,जे परत सतोप्रधान बनवण्यासाठी खूप चांगल्या युक्ती सांगतात.गीतेमध्ये पण
आहे,देहाचे सर्व संबंध विसरून स्वतःला आत्मा समजा.परत आपल्या घरी जरूर जायचे आहे.
भक्तिमार्गा मध्ये भगवंताच्या जवळ जाण्यासाठी खूप कष्ट करतात.ते मुक्तिधाम आहे,कर्मा
पासून मुक्त. आम्ही निराकारी दुनिया मध्ये जाऊन राहतो. कलाकार घरी गेले तर
भूमिकेपासून मुक्त झाले. सर्वांची इच्छा असते,आम्हाला मुक्ती मिळावी.मोक्ष तर कोणाला
मिळू शकत नाही.हे नाटक आदी अविनाशी आहे.कोणी म्हणतील आम्हाला या नाटकांमध्ये भुमिका
करणे, येणे जाणे पसंत नाही परंतु यामध्ये कोणी काहीच करू शकत नाहीत.हे आदी अविनाशी
नाटक पूर्वनियोजित आहे,एकालाही मोक्ष मिळू शकत नाही. मनुष्यांची तर अनेक प्रकारची
मतं आहेत.हे श्रेष्ठ मत, श्रेष्ठ बनण्यासाठी आहे. मनुष्याला श्रेष्ठ म्हणणार नाहीत,
देवतांना श्रेष्ठ म्हटले जाते, त्यांच्यापुढे सर्व नमस्ते करतात.तर ते श्रेष्ठ झाले
ना.कृष्ण देवता,तर वैकुंठाचे राजकुमार आहेत.ते येथे कसे असतील,न त्यांनी गीता ऐकवली
आहे.शिवाच्या पुढे जाऊन म्हणतात,आम्हाला मुक्ती द्या.ते तर कधी जीवनमुक्ती जीवनबंधना
मध्ये येत नाहीत,म्हणून त्यांनाच बोलवत राहतात, मुक्ती द्या.जीवनमुक्ती पण तेच
देतात,अच्छा.
गोड गोड फार वर्षां नंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आम्ही
सर्व आत्मा रूपामध्ये भाऊ-भाऊ आहोत, हा पाठ पक्का करायचा आणि करावयाचा आहे. आपल्या
मुळ संस्काराची आठवण करून संपूर्ण पावन बनायचे आहे.
(2) २४ कॅरेट सोने म्हणजे सतोप्रधान बनण्यासाठी कर्म अकर्म विकर्माच्या रहस्ययुक्त
गतीला बुद्धीमध्ये ठेवून आता कोणतेही विकर्म करायचे नाहीत.
वरदान:-
वेळेवरती
प्रत्येक गुण किंवा शक्तीचा वापर करणारे, अनुभवी मूर्त भव.
ब्राह्मण जीवनाची
विशेषता अनुभव आहे,जर एक पण गुण किंवा शक्तीचा अनुभव नाही,तर कधी ना कधी विघ्नाच्या
वश बनणार. आत्ता अनुभूतीचा कोर्स सुरु करा.प्रत्येक गुण किंवा शक्तिरूपी खजान्याचा
वापर करा.ज्या वेळेस ज्या गुणांची आवश्यकता आहे,त्यावेळेस त्याचे स्वरूप
बना.ज्ञानाच्या रीतीने बुद्धीच्या लॉकरमध्ये खजान्याला ठेवू नका,त्याचा वापर
करा,तेव्हा विजय बनाल आणि वाह!रे मी, चे गीत नेहमी गात राहाल.
बोधवाक्य:-
नाजूकपणा च्या
संकल्पाला समाप्त करून शक्तिशाली संकल्पाची रचना करणारेच दुहेरी हलके राहतात.