02-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,बाबांच्या श्रीमताचा आदर ठेवणे म्हणजे, मुरली कधीच न चुकवणे,प्रत्येक
आज्ञेचे पालन करणे"
प्रश्न:-
मुलांना कोणी
विचारले कसे आहात,तर तुम्हाला कोणते उत्तर नशेने द्यायला पाहिजे?
उत्तर:-
तुम्ही बोला परवाह थी पार ब्रह्म मध्ये राहणाऱ्यांची, ते मिळाले बाकी काय पाहिजे.जे
प्राप्त करायचे होते, ते मिळाले.तुम्हा मुलांना कोणत्याच गोष्टीची काळजी
नाही.तुम्हाला बाबांनी आपले बनवले,तुमच्या डोक्यावरती ताज ठेवला,परत काळजी कोणत्या
गोष्टीची.
ओम शांती।
बाबा समजवतात मुलांच्या बुद्धीमध्ये जरूर असेल की बाबा पिता पण आहेत,शिक्षक पण आहेत
आणि सर्वोच्च गुरु पण आहेत,याच आठवणींमध्ये जरूर असतील. ही आठवण कधी कोणी शिकवू शकत
नाहीत,बाबाच कल्प-कल्प येऊन शिकवतात.तेच ज्ञानाचे सागर,पतित-पावन आहेत. ते पिता
आहेत,शिक्षक आहेत आणि गुरु पण आहेत.आता हे समजवले जाते,जेव्हा ज्ञानाचा तिसरा नेत्र
मिळाला आहे.मुलं जरी समजत असतील परंतु शिवपित्यालाच विसरतात,तर शिक्षक, गुरु कसे
आठवणीत येतील.माया खूप प्रबळ आहे,जी तिन रुपामध्ये महिमा असून सुद्धा तिघांना
विसरायला लावते,इतकी सर्व शक्तीवान आहे.मुलं पण लिहतात,बाबा आम्ही विसरतो.माया अशा
प्रकारे प्रबळ आहे.वैश्विक नाटकानुसार खूप सहज आहे.मुलं समजतात,असे दुसरे कोणी होऊ
शकत नाही. तेच बाबा शिक्षक सद्गुरु खरेखुरे आहेत,यामध्ये थापा मारण्याची कोणती
गोष्ट नाही. मनामध्ये समजायचे आहे ना परंतु माया विसरायला लावते.मुलं म्हणतात,आम्ही
हार खाल्ली,तर पावला पावला मध्ये पदम कसे होतील.देवतांनाच कमळफुलाचे चिन्ह दाखवतात
ना.सर्वांना तर देऊ शकत नाहीत.हे तर ईश्वराचे शिक्षण आहे,मनुष्यांचे नाही.मनुष्यांचे
हे शिक्षण कधी होऊ शकत नाही. जरी देवतांची महिमा केली जाते परंतु तरीही उच्च ते
उच्च एक शिवपिताच आहेत.देवतांचा मोठेपणा काय आहे?आज गदाई उद्या राजाई.आता तुम्ही
लक्ष्मीनारायण सारखे बनण्याचा पुरुषार्थ करत आहात.तुम्ही जाणतात,यामध्ये खूप नापास
होतात.इतकेच शिक्षण घेतात,जेवढे कल्पापूर्वी पास झाले होते. वास्तवमध्ये ज्ञान खूप
सहज आहे परंतु माया विसरायला लावते.बाबा म्हणतात,आपली दिनचर्या लिहा, चार्ट लिहा
परंतु लिहू शकत नाहीत. किती दिवस लिहिणार?जरी लिहतात, तपासतात दोन तास आठवणी मध्ये
राहिलो?ते पण त्यांनाच माहिती होते,जे बाबाच्या श्रीमताचे आचरण करतात.बाबा तर
समजवतील,या बिचार्यांना लाज वाटत असेल,नाहीतर श्रीमतानुसार चालायला पाहिजे.परंतु
दोन टक्के मुलंच दिनचर्या लिहित असतील. मुलांना श्रीमताची तेवढी कदर नाही. मुरली
मिळून पण वाचत नाहीत. मनामध्ये जरूर येते,बाबा तर सत्यच सांगतात,आम्हीच जर मुरली
वाचत नाहीत,तर बाकी दुसऱ्यांना काय समजावून सांगणार?बाबांनी आठवण्याची यात्रा करवली.
ओम शांती.आत्मिक पिता मुलांना समजवत आहेत,हे तर मुलं समजतात,बरोबर आम्ही आत्मा
आहोत.आम्हाला परमपिता परमात्मा शिकवत आहेत.बाकी काय म्हणतात,माझी आठवण करा तर तुम्ही
स्वर्गाचे मालक बनाल. यामध्ये शिवपिता पण आले, शिक्षक आणि शिकवणारे पण आले.अगदी कमी
वाक्यात सर्व ज्ञान येते.येथे तुम्ही ज्ञानाची उजळणी,(रिवाइज) करण्यासाठी येतात.बाबा
पण समजतात,कारण तुम्ही स्वतः म्हणतात,आम्ही विसरतो म्हणून येथे उजळणी करण्यासाठी
येतो.जरी कोणी येथे राहतात तरी पण उजळणी करत नाहीत,भाग्यामध्ये नाही.बाबा तर
पुरुषार्थ करवतात.पुरुषार्थ करवणारे तर एक बाबाच आहेत. यामध्ये कोणाची खात्री होऊ
शकत नाही,न विशेष कोणासाठी शिक्षण आहे.त्या शिक्षणामध्ये तर खास शिकवण्यासाठी
शिक्षकाला बोलवतात.हे तर भाग्य बनवण्यासाठी सर्वांना शिकवतात. एका एकाला किती वेगळं
शिकवणार,असंख्य मुलं आहेत.त्या शिक्षणामध्ये कोण्या मोठ्या माणसाचा मुलगा असेल, तर
त्यांना खास शिक्षण देतात.ते जाणतात हे तर बुध्दू आहेत,म्हणून त्यांना शिष्यवृत्ती
घेण्यालायक बनवतात. हे बाबा तर असे करत नाहीत.हे तर सर्वांना एकरस शिकवतात.तर हे
झाले शिक्षकांनी विशेष पुरुषार्थ करून घेणे. हे तर विशेष कोणाला, वेगळ्या प्रकारचे
खास शिक्षण देत नाहीत.विशेष शिक्षण म्हणजे, शिक्षक काही कृपा करतील.तसे तर ते जरी
पैसे घेतात,खास वेळ काढून शिकवतात,त्यामुळे ते जास्त शिकून हुशार बनतात.येथे तर
जास्त काही शिकवण्याची गोष्टच नाही.यांची तर गोष्टच नाही.एकच महामंत्र मनामनाभवचा
देतात.आठवणी द्वारे काय होते,हे तर समजतात बाबाच पतित-पावन आहेत.तुम्ही जाणतात,आठवण
केल्यामुळेच पावन बनाल.
आता तुम्हा मुलांना ज्ञान आहे, जेवढी आठवण कराल,तेवढे पावन बनाल.कमी आठवण कराल,तर
कमी पावन बनाल.हे तर तुम्हा मुलांच्या पुरुषार्थावर आधारीत आहे. बेहद बाबांची आठवण
करुन,आम्हाला लक्ष्मीनारायण सारखे बनायचे आहे,त्यांची महिमा तर प्रत्येक जण
जाणतात.असे म्हणतात तुम्ही पुण्य आत्मा आहात, आम्ही पाप आत्मा आहोत.अनेक मंदिर
आहेत,तेथे काय करण्यासाठी जातात? दर्शन केल्यामुळे तर काहीच फायदा होत नाही.एक
दोघांना पाहून जातात, बस दर्शन करण्यासाठी जातात. आमके यात्रेला गेले, मग आम्ही पण
जाऊन यावे. याद्वारे काय होईल, काहीच फायदा नाही. तुम्ही मुलांनी पण यात्रा केल्या
आहेत. जसे सण इत्यादी साजरे करतात, तसेच यात्रा पण एक उत्सव,सण समजतात.आता तुम्ही
आठवणीच्या यात्रेला पण एक सण उत्सव समजतात. तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये
राहतात.अक्षर एकच मनमनाभव आहे. ही तुमची यात्रा अनादी आहे.ते पण म्हणतात आम्ही
यात्रा तर अनादी करत आलो आहोत.परंतु तुम्ही आत्ता ज्ञान सहित म्हणतात,आम्ही कल्प
कल्प यात्रा करत आलो आहोत. बाबाच येऊन ही यात्रा शिकवतात. ती चारधामची यात्रा तर
जन्म जन्मांतर करत आले आहात.हे बेहद्दचे बाबा म्हणतात माझी आठवण करा,तर तुम्ही पावन
बनाल.असे तर कोणी कधी सांगितले नाही की,यात्रेद्वारे तुम्ही पावन बनाल.मनुष्य
यात्रेला जातात तर त्या वेळेस पावन राहतात, आजकाल तर तेथे पण खराब झाले आहेत,पावन
राहत नाहीत.या आत्मिक यात्रेची कोणालाही माहिती नाही.तुम्हाला आता बाबांनी सांगितले
आहे,ही आठवणीची यात्रा खरीखुरी आहे.ते यात्रेचे चक्र लावतात आणि जसेच्या तसेच
राहतात.चक्र लावत राहतात.जसे वास्को द गामाने सृष्टीचे चक्र लावले.हे पण चक्र लावत
राहतात ना. गायन पण आहे,चहूबाजूला जाऊन आले, तरीही ईश्वरापासून दूर
राहिले.भक्तिमार्गा मध्ये काही कोणी भेटू शकले नाही.भगवान कोणाला भेटले नाही.
भगवंतापासून दूरच राहिले. तिर्थयात्रा करुन परत घरी येऊन पाच विकारमध्ये जातात,त्या
सर्व खोट्या यात्रा आहेत.आता तुम्ही मुलं जाणतात,हे पुरुषोत्तम संगमयुग आहे,जेव्हा
बाबा आले आहेत.एक दिवस सर्व जाणतील बाबा आले आहेत.भगवान शेवटी मिळतील, परंतु कसे?
हे तर कोणी जाणत नाहीत.हे तर गोड गोड मुलं जाणतात की, आम्ही श्रीमतावर भारताला परत
स्वर्ग बनवत आहोत.भारताचेच तुम्ही नाव घ्याल, त्यावेळेत दुसरा कोणता धर्म नसतो.
संपूर्ण विश्व पवित्र बनते.आता अनेक धर्म आहेत.बाबा येऊन तुम्हाला सर्व झाडाची
स्मृती देतात, तुम्हीच देवता होते परत क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनले. आता तुम्हीच
ब्राह्मण बनले आहात.हा हम सो चा अर्थ खूप सहज समजवतात. ओमचा अर्थ मी आत्मा आहे,परत
आम्ही आत्मा चक्र लावतो.ते तर म्हणतात,आम्ही आत्माच परमात्मा, परमात्माच आत्मा
आहेत.एक पण नाहीत,ज्यांना हमसो चा अर्थ माहिती आहे.तर बाबा म्हणतात हा मंत्र
आहे,नेहमी आठवणीत ठेवायला पाहिजे.चक्र बुद्धीमध्ये नसेल तर चक्रवर्ती राजे कसे बनाल?
आता आम्ही ब्राह्मण आहोत परत आम्हीच देवता बनू.हे तुम्ही कोणालाही जाऊन विचारा,
कोणीच सांगू शकणार नाहीत.ते तर ८४ जन्माचा पण अर्थ समजत नाहीत. भारताची प्रगती आणि
अधोगतीचे गायन आहे.हे ठीक आहे. सतोप्रधान, सतो,तमो...
सूर्यवंशी,चंद्रवंशी,वैश्यवंशी.आता तुम्हा मुलांना सर्व माहिती झाले आहे. बीजरूप
बाबांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते.ते या चक्रा मध्ये येत नाहीत.असे नाही आम्हीच
जीवात्मा व परमात्मा बनतो,नाही. बाबा आपल्या सारखे ज्ञान संपन्न बनवतात,आपल्या सारखे
ईश्वर बनवत नाहीत.या गोष्टींना चांगल्या प्रकारे समजायचे आहे,तेव्हा बुद्धीमध्ये
चक्र चालू शकेल,याचे नाव स्वदर्शन चक्र ठेवले आहे.तुम्ही बुद्धी द्वारे समजू
शकतात,आम्ही कसे ८४ च्या चक्रा मध्ये येतो. यामध्ये सर्व येते.वेळ पण येतो,वर्ण पण
येतात, वंशावळ पण येते.
आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे सर्व ज्ञान असायला पाहिजे.ज्ञाना द्वारेच उच्च
पद मिळते.ज्ञान असेल तर दुसऱ्यांना पण देऊ शकाल.येथे कोणाकडून परिक्षा पेपर इत्यादी
लिहून घेतले जात नाहीत.त्या शाळेमध्ये जेव्हा परीक्षा असते,तर परीक्षा पेपर
परदेशातून येतात.जे परदेशात शिक्षण घेत असतील त्यांना तर त्याचा परिणाम तेथेच माहिती
होत राहतो.त्यांच्यामध्ये कोणी मोठा शैक्षणिक अधिकारी असेल,तर त्या पेपरची तपासणी
करत राहतील.तुमच्या परीक्षा पेपरची तपासणी कोण करेल.तुम्ही स्वतः कराल. स्वतःला जे
पाहिजे ते बनवू शकता.पुरुषार्था द्वारे जे पाहिजे ते पद बाबा कडून घेऊ
शकता.प्रदर्शनी इत्यादींमध्ये मुलं विचारतात,काय बनणार? देवता बनणार,की वकिल
बनणार,काय बनणार?जितकी बाबाची आठवण कराल,सेवा कराल,तेवढे फळ मिळेल.जे चांगल्या
प्रकारे बाबांची आठवण करतात,ते समजतात आम्हाला सेवा पण करायची आहे.प्रजा पण बनवायची
आहे ना.राजधानी स्थापन होत आहे,तर त्यामध्ये सर्व पाहिजेत.तेथे वजीर नसतात.वजीराची
आवश्यकता त्यांनाच राहते,ज्यांना अक्कल कमी असते.तुम्हाला तर तेथे मत घेण्याची
आवश्यकता राहत नाही.बाबांकडे स्थूल गोष्टीचे मत घेण्यासाठी येतात, पैशाचे काय करायचे?
धंदा कसा करायचा? बाबा म्हणतात या दुनिया च्या गोष्टी बाबांच्या जवळ घेऊन येऊ नका.
होय कोण संभ्रमित असतील तर, काही ना काही सांगतात. हे काही माझे काम नाही. माझा तर
ईश्वरीय धंदा आहे मार्ग दाखवण्याचा.तुम्ही विश्र्वाचे मालक कसे बनाल.तुम्हाल श्रीमत
मिळाली आहे, बाकी सर्व आसूरी मत आहे.सतयुगा मध्ये श्रीमत आहे. कलियुगामध्ये आसुरी
मत आहे.तेथे सुखधाम आहे.तेथे असे म्हणणार नाही की, आनंदी आहात? तुमची तब्येत कशी आहे?
हे अक्षर तेथे नसतात.येथे विचारले जाते,काही कष्ट तर नाहीत? तब्येत ठीक आहे? यामध्ये
खूप गोष्टी येतात.स्वर्गात दुःखच नसते,जे विचारतील.
ही दुःखाची दुनिया आहे.वास्तविक तुम्हाला कोणी विचारू शकत नाही?जरी माया विकारात
घेऊन जाणारी असेल तरीही,बाबा भेटले आहेत ना.तुम्ही म्हणाल तुम्ही काय विचारत
आहात?आम्ही तर ईश्वराची मुलं आहोत,आम्हाला तुम्ही कसे आहात,हे का विचारतात?परवाह थी
पार ब्रह्म मध्ये राहणारे बाबा मिळाले आहेत,तर कोणत्या गोष्टीची काळजी करायची.हे
नेहमी आठवण करायला पाहिजे,आम्ही कोणाची मुलं आहोत.हे पण बुद्धीमध्ये ज्ञान आहे
की,जेव्हा आम्ही पावन बनू,तर लढाई सुरू होईल.जेव्हा पण तुम्हाला कोणी विचारेल,तुम्ही
कसे आहात,तर तुम्ही बोला आम्ही तर नेहमी आनंदी आहोत.आजारी असलो तरही बाबाच्या आठवणी
मध्ये आहोत.तुम्ही स्वर्गापेक्षा पण जास्त आनंदी येथे आहात.जेव्हा स्वर्गाची बादशाही
देणारे बाबा मिळाले आहेत,जे आम्हाला एवढे लायक बनवतात,तर आम्हाला कसली
काळजी.ईश्वराच्या मुलांना कोणती काळजी असेल? तेथे देवतांना पण कोणतीही काळजी
नसते.देवतांच्या वरती तर ईश्वर आहेत ना. तर ईश्वरीय मुलांना कोणती काळजी होऊ शकते?
बाबा आम्हाला शिकवत आहे.बाबा आमचे शिक्षक,सद्गुरू आहेत. बाबांनी आमच्यावरती ताज
ठेवला आहे.आम्ही ताजधारी बनत आहोत.तुम्ही जाणतात आम्हाला विश्वाचा ताज कसा
मिळतो.बाबा ताज देत नाहीत.हे पण तुम्ही जाणतात,सतयुगामध्ये पिता आपल्या मुलांना ताज
देतात, त्याला इंग्रजीमध्ये क्राऊन प्रिन्स, ताजधारी राजकुमार म्हणतात.येथे
जोपर्यंत पित्याचा ताज मुलांना मिळतो, तोपर्यंत मुलांना उत्सुकता राहते, कुठे
पित्याचा मृत्यू होईल तर,ताज आम्हाला मिळेल.त्यांची इच्छा असते,राजकुमारा पासून
महाराजा बनावे.सतयुगा मध्ये तर अशा गोष्टी नसतात.आपल्या वेळेनुसार कायद्यानुसार,
पिता मुलांना ताज देऊन स्वता: किनारा करतात. तेथे वानप्रस्थची चर्चा होत
नाही.मुलांना महल इत्यादी बनवून देतात, सर्व आशा पूर्ण होतात.तुम्ही समजू
शकता,सतयुगामध्ये सुखच सुख आहे.प्रत्यक्षा मध्ये सर्व सुख तेव्हाच मिळेल,जेव्हा तेथे
जाऊ.ते तुम्हीच जाणू शकता,स्वर्गा मध्ये काय काय असेल.एक शरीर सोडून परत कुठे
जाल.आता त्तुम्हाला प्रत्यक्षात बाबा शिकवत आहेत. तुम्ही जाणतात,आम्ही खरोखर
स्वर्गामध्ये जाऊ. ते तर म्हणतात आम्ही स्वर्गामध्ये जातो,माहिती पण नाही, स्वर्ग
कशाला म्हणतात. जन्मजन्मांतर अज्ञानाच्या गोष्टी ऐकत आले आहात.आता बाबा तुम्हाला
सत्य गोष्टी ऐकवतात, अच्छा.
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) नेहमी खुश
राहण्यासाठी बाबाच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. शिक्षणाद्वारे आपल्यावरती राजाईचा
ताज ठेवायचा आहे.
(२) श्रीमता वरती भारताला स्वर्ग बनवण्याची सेवा करायची आहे. नेहमी श्रीमताचा आदर
ठेवायचा आहे.
वरदान:-
बाबांशी
कनेक्शन आणि रिलेशन द्वारा मन्सा शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण पाहणारे,सूक्ष्म सेवाधारी
भव.
जसे वाणीची शक्ती
किंवा कर्माच्या शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण दिसून येते, तसेच सर्वात शक्तिशाली
शांतीच्या शक्तीचे प्रत्यक्ष प्रमाण पाहण्यासाठी बापदादासोबत निरंतर स्पष्ट कनेक्शन
आणि रिलेशन हवे, यालाच योगबळ म्हटले जाते.असे योगबळ असणारे आत्मे,दूर राहून पण
आत्म्याला सन्मखचा अनुभव करू शकतात.आत्म्याचे आव्हान करून त्यांना परिवर्तन करू
शकतात, हीच सूक्ष्म सेवा आहे, यासाठी एकाग्रतेच्या शक्तीला वाढवा.
बोधवाक्य:-
आपल्या सर्व
खजाण्याला सफल करणारेच महादानी आत्मा आहेत.