24-01-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   17.10.87  ओम शान्ति   मधुबन


ब्राह्मण जीवणाचा श्रंगार- पवित्रता


आज बापदादा आपल्या विश्वातील चोहीकड च्या विशेष भविष्या मध्ये, पुज्य बनणाऱ्या मुलांना पाहत आहेत. साऱ्या विश्वामध्ये किती थोडे अमुल्य रत्न पुजनीय बनत आहेत. पूजनीय आत्मेच विश्वासाठी विशेष पृथ्वी वरील तारे बनत आहेत. जसे या शरीरा मध्ये प्राण नाही, तर जग नाही. असे विश्वा मध्ये पूजनीय पृथ्वी वरील तारे तुम्ही श्रेष्ठ आत्मे नसाल तर विश्वाचे पण महत्त्व नाही. स्वर्णयुग किंवा आदियुग किंवा सतोप्रधान युग,नवीन संसार, तुम्हां विशेष आत्म्या पासून सुरू होत आहे. नवीन विश्वाचे आधारमूर्त, पुजनीय आत्मे तुम्हीं आहात‌. तर तुम्हां आत्म्याचे किती महत्त्व आहे. तुम्ही पुज्य आत्मे संसारा साठी नवीन प्रकाश आहात. तुमची चढती कला विश्वामध्ये श्रेष्ठ कला आणण्यासाठी निमित्त बनत आहे. तुम्हीं उतरत्या कले मध्ये येता तर संसाराची पण उतरती कला होते. तुम्ही परिवर्तन होता तर विश्व पण परिवर्तन होते. एवढे महान आणि महत्त्वाचे आत्मे आहात‌.

आज बापदादा सर्व मुलांना पाहत आहेत. ब्राह्मण बनणे म्हणजे पूज्य बनणे, कारण ब्राह्मणच देवता बनत आहेत. आणि देवता म्हणजे पूजनीय. सर्व देवता पूजनीय तर आहेतच, तरी पण क्रमवारीने जरूर आहेत. कोणत्या देवतांची पूजा विधीपूर्वक आणि नियमित रूपाने होते आणि कोणाची पूजा विधीपूर्वक आणि नियमित रूपाने होत नाही. कोणाच्या प्रत्येक कर्माची पूजा होते आणि कोणाची प्रत्येक कर्माची पूजा होत नाही. कोणाचा विधिपूर्वक दररोज शृंगार होतो आणि कोणीचा शृंगार रोज होत नाही, वरून वरून थोडाफार शृंगार करतात, परंतु विधीपूर्वक होत नाही. कोणा समोर सारा वेळ कीर्तन होत आहे आणि कोणा समोर कधी कधी किर्तन होत आहे. या सर्वांचे कारण काय आहे? ब्राह्मण तर सर्व म्हटले जातात, ज्ञान योगाचे शिक्षण तर सर्व घेत आहेत, तरीपण एवढे अंतर कां? धारणा करण्या मध्ये अंतर आहे. तरीपण विशेष कोणत्या धारणे च्या आधारावर क्रमांक बनत आहेत, ते जाणता कां ?

पुजनीय बनण्याचा विषेश आधार पवित्रतेवर आहे. जेवढे सर्व प्रकारच्या पवित्रतेचा अंगीकार करतात, तेवढे सर्व प्रकारचे पूजनीय बनतात आणि जे निरंतर विधीपूर्वक आदि, अनादि विशेष गुणाच्या रुपामध्ये पवित्रतेला सहज धारण करतात, तेच विधीपूर्वक पूज्य बनतात. सर्व प्रकारची पवित्रता कोणती आहे ? जे आत्मे सहज, स्वतः प्रत्येक संकल्पामध्ये, बोलण्यामध्ये, कर्मामध्ये, सर्व म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी आत्मे, सर्वांच्या संपर्कामध्ये नेहमी पवित्रवृत्ती, दृष्टी, प्रकंपण, यथार्थ संपर्क संबंध निभावतात, त्याला सर्व प्रकारची पवित्रता म्हटले जाते. स्वप्नांमध्ये पण स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्या आत्म्यासाठी सर्व प्रकारच्या पवित्रते मध्ये कोणती पण कमी नसावी. समजा, स्वप्नांमध्ये पण ब्रह्मचर्य खंडित होत आहे किंवा कोणत्या आत्म्याप्रति, कोणत्या प्रकारची ईर्षा किंवा जोशाचे अधिन होऊन कर्म होत आहे किंवा बोल निघत आहेत, क्रोधाच्या अंशरूपाने व्यवहार होत आहे, तर त्याला पण पवित्रतेचे खंडन मानले जाईल. विचार करा, जर स्वप्नाचा पण प्रभाव पडत आहे तर साकार मध्ये केलेल्या कर्मांचा किती प्रभाव पडत असेल. त्यामुळे खंडित मूर्ती कधी पूजनीय होत नाही. असं नाही कि,खंडित मूर्ती मंदिरामध्ये ठेवत नाहीत. आजकालच्या संग्रहालयामध्ये ठेवतात. तिथे भक्त जात नाहीत. फक्त एवढेच गायन होते कि, फार जुनी मूर्ती आहे‌, बसं. त्यांनी स्थूल अंगाच्या खंडित मूर्तीला खंडित म्हटले आहे परंतु खऱ्या रूपात कोणत्या प्रकारच्या पवित्रते मध्ये खंडन झाले,तर ते पूज्यपदा पासून खंडित होऊन जातात. अशी चार प्रकारची पवित्रता, विधीपूर्वक असेल तर पूजा पण विधीपूर्वक होते.

मन,वाणी, कर्म (कर्मा मध्ये संबंध संपर्क येतो) आणि स्वप्ना मध्ये पण पवित्रता, याला म्हटले जाते संपूर्ण पवित्रता. कांही मुले अलबेलेपना मध्ये आल्याने, जरी मोठे आहेत, किंवा लहान आहेत, या गोष्टीमध्ये चालविण्याचा प्रयत्न करतात कि, माझा भाव फार चांगला होता परंतु बोलून गेलो, किंवा माझे लक्ष्य असे नव्हते परंतु झाले, किंवा म्हणतात कि, हंसी मजाक मध्ये म्हटलं किंवा केले, हे पण चालविणे आहे, त्यामुळे पूजा पण केल्यासारखी होत आहे. हा अलबेलापन संपूर्ण पुज्य स्थितीला क्रमवारी मध्ये घेऊन जातो. हे पण अपवित्रतेच्या खात्यामध्ये जमा होत आहे. सांगितले होते कि, पूज्य पवित्र आत्म्याची निशाणी ही आहे, त्यांची चार प्रकारची पवित्रता स्वाभाविक, सहज आणि नेहमीसाठी असते. त्यांना विचार करावा लागत नाही,परंतु पवित्रतेची धारणा स्वतःच,यथार्थ संकल्प, बोल, कर्म आणि स्वप्नामध्ये आणते. यथार्थ म्हणजे एक तर युक्तियुक्त, दुसरे यथार्थ म्हणजे प्रत्येक संकल्पा मध्ये अर्थ असेल, बिना अर्थाचा संकल्प होणार नाही. असे नाही कि, असेच बोलून गेलो, मुखातून निघाले, केले,कर्मातून होऊन गेले, अशी पवित्र आत्मा, नेहमी प्रत्येक कर्मामध्ये म्हणजे दिनचर्ये मध्ये यथार्थ युक्तीयुक्त राहते. त्यामुळे पूजा पण त्यांच्या प्रत्येक कर्माची होते म्हणजे पूर्ण दिनचर्ये ची होते. उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कर्माचे दर्शन होत राहते. जरी ब्राह्मण जीवनातील बनलेल्या दिनचर्ये प्रमाणे कोणते पण कर्म यथार्थ किंवा निरंतर होत नसेल, तर त्यामधील अंतरामुळे पूजेमध्ये पण आंतर पडते. समजा कोणी अमृतवेळेला उठण्याच्या दिनचर्ये मध्ये विधीपूर्वक उठत नाहीत, तर पूजेमध्ये पण त्यांचे पुजारी त्यांच्या विधीमध्ये खाली वर होतात म्हणजे पुजारी पण वेळेवर उठून पूजा करत नाहीत, जेंव्हा येईल तेंव्हा करतात, म्हणजे अमृतवेळेला जागृत स्थितीचा अनुभव करत नाहीत, मजबुरीने किंवा कधी सुस्तीने, कधी चुस्तीच्या रूपामध्ये बसतात तर पुजारी पण मजबुरीने किंवा सुस्तीने पूजा करतात, विधीपूर्वक पूजा करत नाहीत. तसे प्रत्येक दिनचर्ये तील कर्माचा प्रभाव पूजनीय बनण्यामध्ये पडत आहे. विधीपूर्वक न चालणे, कोणत्या पण दिनचर्ये मध्ये वर खाली होणे, हे पण अपवित्रतेच्या अंशामध्ये मोजले जाते, कारण आळस आणि अलबेलापन पण विकार आहेत.जे यथार्थ कर्म नाही ते विकार आहेत. तो अपवित्रतेचा अंश झाला ना. त्यामुळे पुज्य पदांमध्ये क्रमवारीने बनतात. तर पाया काय झाला? पवित्रता.

पवित्रतेची धारणा फार महीन आहे. पवित्रतेच्या आधारावरच कर्माची विधी आणि गतीचा आधार आहे. पवित्रता फक्त मोठी गोष्ट नाही. ब्रह्मचारी राहिले किंवा निर्मोही झाले, फक्त यालाच पवित्रता म्हणत नाहीत. पवित्रता ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे. तर प्रत्येक वेळी पवित्रतेच्या शृंगाराची अनुभूती चेहऱ्याद्वारे, चलनद्वारे इतरांना झाली पाहिजे. दृष्टीमध्ये, मुखामध्ये, हातामध्ये, पायामध्ये, नेहमी पवित्रतेचा श्रंगार प्रत्यक्ष झाला पाहिजे. कोणी जरी चेहऱ्याकडे पाहिले तर चेहऱ्याद्वारे त्यांना पवित्रतेचा अनुभव होईल. जसे इतर प्रकारच्या चेहऱ्याचे वर्णन करतात, असे वर्णन करतील कि, यांच्या चेहऱ्यावर पवित्रता दिसत आहे, डोळ्यांमध्ये पवित्रतेची झलक आहे, मुखावर पवित्रतेचे हास्य आहे. इतर कोणतीही गोष्ट त्यांच्या नजरेमध्ये येणार नाही. याला म्हटले जाते पवित्रतेच्या शृंगाराने, शृंगारलेली मूर्ती. समजले ? पवित्रतेची तर आणखीन फार गुह्यता आहे, ती नंतर सांगितली जाईल. जशी कर्माची गती गहन आहे, तशी पवित्रतेची परिभाषा पण फार गुह्य आहे, आणि पवित्रताच पाया आहे.

आज गुजरात निवासी आले आहेत. गुजरात निवासी नेहमी हलके बनून नाचतात आणि गातात. जरी शरीराने किती पण जाड असले, तरी हलके बनून नाचतात. गुजरातची विशेषता आहे, नेहमी हलके राहणे, नेहमी खुशीमध्ये नाचत राहणे, आणि बाबाचे व स्वतःच्या प्राप्तीचे गीत गाणे. लहानपणा पासूनच चांगले नाचत-गात आहेत. ब्राह्मण जीवनामध्ये काय करत आहात? ब्राह्मण जीवन म्हणजे मजेची जीवन. गरबा नृत्य करतात तर मजे मध्ये येतात. जर मजे मध्ये आले नाहीत तर जास्त करू शकत नाहीत. मौज मस्ती मध्ये थकावट होत नाही, अथक बनतात. तर ब्राह्मण जीवन म्हणजे नेहमी मौज मध्ये राहण्याची जीवन. ती आहे स्थूल मौज आणि ब्राह्मण जीवनामध्ये मनाची मौज आहे.नेहमी मन मौज मध्ये नाचत आणि गात राहतात. ते लोक हलके बनून नाचणे आणि गाण्याचे अभ्यासी आहेत. तर त्यांना ब्राह्मण जीवनामध्ये पण डबल हलके बनणे अवघड वाटत नाही. तर गुजरात म्हणजे नेहमी हलके राहणाचे अभ्यासी म्हणा, वरदानी म्हणा. तर साऱ्या गुजरातला वरदान मिळाले आहे, डबल हलके. मुरली द्वारे पण वरदान मिळत आहे ना.

सांगितले होते, तुमच्या या दुनिये मध्ये यथाशक्ति,जशी वेळ असते. यथा आणि तथा. आणि वतन मध्ये तर यथा आणि तथा ची भाषाच नाही. इथे दिवस आणि रात्र पण पाहावी लागते. तिथे ना दिवस, ना रात्र, ना सूर्योदय होतो,ना चंद्रमा. दोन्ही पासून दूर आहेत. यायचे तर तिथे आहे ना. मुले वार्तालाप मध्ये म्हणतात कि, कुठपर्यंत? बापदादा म्हणतात, तुम्ही सर्व म्हणा कि, आम्ही तयार आहोत, तर आता करू, मग कधीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. केंव्हा तोपर्यंत आहे, जोपर्यंत सर्व माळ तयार होत नाही. आता नांवे काढत बसला तर 108 मध्ये पण विचार करावा लागतो कि, यांचे नाव घ्यावे कां नको ? आता 108 च्या माळे मध्ये सर्व 108 ची नांवे सांगीतली. नाही, तर फरक होऊन जाईल. बापदादानी आताच टाळी वाजविली तर ठकाठक सुरु होईल. एकी कडून प्रकृती एकी कडून व्यक्ती. काय उशीर लागेल. परंतु बाबाचा सर्व मुलां मध्ये स्नेह आहे.हात पकडला मग तर बरोबर याल. हाता मध्ये हात मिळवणे म्हणजे समान बनणे. तुम्हीं म्हणता, सर्व समान म्हणजे सर्व क्रमांक एक चे बनणार नाहीत, परंतु नंबर एक नंतर नंबर दुसरा असतो. बरं, बाप समान बनले नाहीत परंतु क्रमांक एकचा मणका जो असेल, तो समान असेल. तिसरा दुसरा सारखा असेल. चौथा तिसरा सारखा समान बनेल. असे तर समान बनून, एक दोघांच्या समीप येत येत माळा तयार होईल. अशा अवस्थे पर्यंत पोहोचणे म्हणजे समान बनणे. 108 चा मणका,107 बरोबर तर मिळेल ना. त्यांच्या सारखी विशेषता जरी आली,तरीपण माळा तयार होऊन जाईल. क्रमवार तर होणारच आहेत. समजले? बाबा तर म्हणतात, असा कोणी आहे, जो खात्री देईल कि होय,आम्ही सर्व तयार आहेत? बापदादाला तर सेकंद लागतो. दृष्य दाखविले होते ना. टाळी वाजविली आणि पऱ्या आल्या.अच्छा.

चोहीकडच्या परमपूज्य श्रेष्ठ आत्म्यांना, सर्व संपूर्ण पवित्रतेच्या ध्येयापर्यंत पोहचणाऱ्या तीव्र पुरषार्थी आत्म्यांना, नेहमी प्रत्येक कर्मामध्ये विधीपूर्वक कर्म करणाऱ्या सिद्धी स्वरूप आत्म्यांना, नेहमी प्रत्येक वेळी, पवित्रतेच्या शृंगाराने सजलेल्या विशेष आत्म्यांना बापदादा च्या स्नेहसंपन्न, प्रेमपूर्वक आठवणीचा स्वीकार व्हावा.

पार्टी बरोबर वार्तालाप:-
(१) विश्वामध्ये सर्वात जास्त श्रेष्ठ भाग्यवान स्वतःला समजता? सारे विश्व, ज्या श्रेष्ठ भाग्यासाठी बोलले जाते कि, आमचे भाग्य उजळून निघाले... तुमचे भाग्य तर उजळले आहे. यापेक्षा मोठी खुशी ची गोष्ट आणखीन कोणती असेल. भाग्यविधाता आमचे पिता आहेत, असा नशा आहे ना. ज्यांचे नावच भाग्यविधाता आहे, त्याचे भाग्य किती असेल. यापेक्षा मोठे भाग्य कोणते असू शकते? तर नेहमी या खुशीमध्ये राहा, भाग्य तर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पित्या जवळ जी पण मालमत्ता असते, मुले त्याचे अधिकारी असतात. तर भाग्यविधात्या जवळ काय आहे? भाग्याचा खजाना. त्या खाजण्यावर तुमचा अधिकार आहे. तर नेहमी वाह माझे भाग्य आणि भाग्यविधाता बाबा. हे गीत गात खुशीमध्ये उडत राहा. ज्यांचे एवढे श्रेष्ठ भाग्य आहे, त्याला आणखीन काय पाहिजे? भाग्यामध्ये सर्व कांही येते. भाग्यवाना जवळ तन-मन-धन-जन सर्व का़ंही असते. श्रेष्ठ भाग्य म्हणजे अप्राप्त कोणती वस्तू नाही. कोणती अप्राप्ती आहे? घर चांगले पाहिजे, मोटारगाडी चांगली पाहिजे, नाही. ज्याला मनाची खुशी मिळाली आहे, त्यांना सर्व प्राप्ती झाल्या आहेत. मोटारगाडी तर काय, परंतु कारुन चा खजाना मिळाला आहे. कोणती अप्राप्त वस्तू नाहीच. असे भाग्यवान आहात. विनाशी इच्छा काय करायच्या. ज्या आज आहेत, उद्या नाहीत, त्यांच्या इच्छा काय ठेवायच्या. त्यामुळे नेहमी अविनाशी खजान्याच्या खुशीमध्ये राहा, ज्या आता पण आहेत आणि बरोबर पण येतील. हे घर ,मोटारगाडी किंवा पैसे बरोबर येणार नाहीत. परंतु हे अविनाशी खजाने, अनेक जन्म बरोबर राहतील. कोणी हिसकावून नेणार नाही, कोणी लुटणार नाहीत. स्वतः पण अमर बनलात आणि खजाने पण अविनाशी मिळतात. जन्म जन्म हे श्रेष्ठ प्रालब्ध बरोबर राहील. किती मोठे भाग्य आहे. जिथे कोणती इच्छा नाही, इच्छा मात्रं अविद्या आहे, असे श्रेष्ठ भाग्य, भाग्यविधाता बाबाद्वारे प्राप्त झाले आहे.

(२) स्वता:ला बाबा जवळ राहणारे श्रेष्ठ आत्मा अनुभव करत आहात? बाबाचे बनले, ही खुशी नेहमी राहते? दुःखाच्या दुनिये मधून निघून, सुखाच्या संसारामध्ये आले आहात. दुनिया दुःखामध्ये ओरडत आहे आणि तुम्हीं सुखाच्या संसारामध्ये, सुखाच्या झोक्यामध्ये झुलत आहात. किती अंतर आहे. दुनिया हुडकत आहे आणि तुम्ही मिलन साजरे करत आहात. तर नेहमी आपल्या सर्व प्राप्तिला पाहून, हर्षित राहा. काय काय मिळाले आहे, त्याची यादी काढा, तर फार मोठी यादी तयार होईल. काय काय मिळाले? तनाव्दारे खुशी मिळाली, तर तन पण तंदुरुस्त आहे, मनामध्ये शांती मिळाली तर शांती मनाची विशेषता आहे, आणि धनामध्ये एवढी शक्ती आहे, जी दाळ भाकरी, छत्तीस प्रकारा सारखी अनुभव होईल. ईश्वरीय आठवणी मध्ये दाळ भाकरी पण किती श्रेष्ठ लागते. दुनियेत छत्तीस प्रकार आहेत आणि तुमची दाळ भाकरी आहे, तर श्रेष्ठ काय लागेल? दाळ भाकरी चांगली आहे ना, कारण प्रसाद आहे . जेंव्हा भोजन बनविता तर आठवणी मध्ये बनविता, आठवणी मध्ये खाता तर प्रसाद झाला. प्रसादाचे महत्त्व आहे ना. तुम्हीं सर्व रोज प्रसाद खात आहात. प्रसादा मध्ये किती शक्ती आहे. त्यामुळे तन-मन-धन सर्वांमध्ये शक्ती येते, त्यामुळे म्हणतात, अप्राप्त कोणती वस्तू ब्राह्मणांच्या खजान्या मध्ये नाही. तर नेहमी या प्राप्ती ला समोर ठेवून खुशीत राहा, हर्षित राहा. अच्छा.

वरदान:-
कर्माद्वारे गुणांचे दान करणारे, डबल लाईट(दुहेरी हलके ) फरिश्ता भव:

जी मुले कर्माद्वारे, गुणांचे दान करतात, त्यांची चलन आणि चेहरा, दोन्ही फरिश्त्यां सारखे दिसून येतात. ते डबल लाईट म्हणजे प्रकाशमय आणि हलकेपणा ची अनुभूती करतात. त्यांना कोणते पण ओझे वाटत नाही. प्रत्येक कर्मामध्ये मदतीची भासना येते. जसे कोणती शक्ती चालवित आहे. प्रत्येक कर्माद्वारे महादानी बनल्यामुळे, त्यांना सर्वांचे आशीर्वाद किंवा सर्वांच्या वरदानाच्या, प्राप्तीचा अनुभव होतो.

सुविचार:-
सेवेमध्ये सफलतेचा तारा बना. कमजोर नाही.