17-01-21 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
14.10.87 ओम शान्ति
मधुबन
ब्राह्मण जीवन- बाबा
बरोबर सर्व संबंध अनुभव करण्याचे जीवन
आज बापदादा आपल्या
अनेक वेळा भेटणाऱ्या मुलांना, अनेक कल्पा मध्ये भेटणाऱ्या मुलांना, परत भेटण्यासाठी
आले आहेत. हे अलौकिक, अव्यक्त मिलन, भविष्य सुवर्ण युगा मध्ये पण होऊ शकत नाही.
फक्त यावेळी या विशेष युगालाच वरदान आहे. बाबा आणि मुलांची भेट, यामुळे या युगाचे
नावच संगमयुग आहे. म्हणजे एकमेकांना भेटण्याचे युग. अशा युगा मध्ये, अशी श्रेष्ठ
भेट साजरे करणारे, तुम्ही विशेष अभिनय करणारे आत्मे आहात. बापदादा पण अशा कोटी मध्ये
कोणी श्रेष्ठ भाग्यवान आत्म्याला पाहून हर्षित होत आहेत, आणि आठवण करून देतात, आदि
पासून अंतापर्यंत किती आठवणी करून दिल्या आहेत. आठवण केली तर फार लांब यादी निघेल.
एवढ्या आठवणी दिल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सर्व स्मृति स्वरूप बनले आहात. भक्ती
मध्ये तुम्हा स्मृती स्वरूप आत्म्याची आठवण,स्मृती रूपामध्ये, भक्त पण प्रत्येक वेळी
स्मरण करत आहेत. तुम्हा स्मृतीस्वरूप आत्म्यांची प्रत्येक कर्माच्या विशेषता ची
आठवण करतात. भक्ती ची विशेषता स्मरण म्हणजे किर्तन करणे होय. स्मरण करत करत मस्ती
मध्ये किती मग्न होऊन जातात. अल्पकाळा साठी त्यांना पण आणखीन कोणती सुधबुध राहत नाही.
स्मरण करून करून त्यामध्ये लीन होतात, म्हणजे लवलीन होऊन जातात. हा अल्प काळाचा
अनुभव, त्या आत्म्यासाठी किती प्रेमळ आणि वेगळा आहे. असे कां होते? कारण ज्या
आत्म्याचे स्मरण करत आहेत, ते आत्मे स्वतः बाबा च्या स्नेहा मध्ये नेहमी लवलीन
राहीले आहेत. बाबाच्या सर्व प्राप्ती मध्ये नेहमी लवलीन राहिले आहेत, त्यामुळे अशा
आत्म्यांचे स्मरण केल्यानेच, अल्पकाळा साठी, तुम्हा वरदानी आत्म्याद्वारे ओंजळभर
रूपाने अनुभूती प्राप्त होऊन जाते. तर विचार करा, जेंव्हा स्मरण करणाऱ्या भक्त
आत्मांना पण एवढा अलौकिक अनुभव होत आहे, तर तुम्हां स्मृती स्वरूप वरदाता, विधाता
आत्म्यांना प्रत्यक्ष जीवना मध्ये किती अनुभव प्राप्त होत असेल. या अनुभुतीने नेहमी
पुढे चालत राहा.
प्रत्येक पावला मध्ये वेगवेगळ्या स्मृती स्वरूपाचा अनुभव करत चला. जशी वेळ, जसे
कर्म, त्या स्वरूपाची स्मृती, प्रत्यक्ष रूपांमध्ये अनुभव करा. जसे अमृतवेळेला
दिवसाचा आरंभ होतो, बाबा बरोबर मिलन साजरे करून, मास्टर वरदाता बनून, वरदाता कडून
वरदान घेणारे, श्रेष्ठ आत्मे आहात, प्रत्यक्ष भाग्यविधाता द्वारे, भाग्य प्राप्त
करणारे, पद्मा पदम भाग्यवान आत्मे आहात. या श्रेष्ठ स्वरूपाची स्मृती ठेवा. वरदानी
वेळ आहे, वरदाता, विधाता बरोबर आहेत. मास्टर वरदानी बनून, स्वतः पण संपन्न बनत आहात,
आणि इतर आत्म्यांना पण वरदान देणारे, वरदानी आत्मे आहात. या स्मृती स्वरूपाला
प्रत्यक्ष करा. असे नाही कि, हे तर आहेच. परंतु वेगवेगळ्या स्मृती स्वरूपाला,
वेळेनुसार अनुभव करा, तर फार विचित्र खुशी, विचित्र प्राप्तीचे भांडार बनाल, आणि
नेहमी मनातून प्राप्तीचे गीत, स्वतःच निरंतर शब्दाच्या रूपामध्ये निघत राहतील. जे
प्राप्त करायचे होते ते केले. याप्रकारे वेगवेगळ्या वेळी आणि कर्मा प्रमाणे स्मृती
स्वरूपाचा अनुभव करत राहा. मुरली ऐकताना हीच स्मृती ठेवा कि, ईश्वरी विद्यार्थी
जीवन म्हणजे भगवंताचा विद्यार्थी आहे. स्वतः भगवान माझ्या साठी परमधाम मधून
शिकविण्या साठी येत आहेत. हीच विशेष प्राप्ती आहे, जे स्वतः भगवान येत आहेत. या
आठवणी मध्ये जेव्हा मुरली ऐकत आहात तर किती नशा होईल. जर साधारण रीतीने, नियमा
नुसार सांगणारा सांगत आहे आणि ऐकणारा ऐकत आहे, तर एवढा नशा राहणार नाही. परंतु
भगवानाचे आम्ही विद्यार्थी आहोत, या आठवणीला स्वरूपामध्ये आणून मग ऐका, तेंव्हा
अलौकिक नशेचा अनुभव होईल. समजले?
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या स्मृती स्वरूपाच्या अनुभवा मध्ये किती नशा राहतो. तसेच
साऱ्या दिवसा मध्ये प्रत्येक कर्मा मध्ये बाबा बरोबर, स्मृति स्वरूप बनून चला. कधी
भगवानाचा मित्र किंवा सोबती रूपाचा, कधी जीवनसाथी रूपाचा, कधी भगवान माझा मुरब्बी
मुलगा आहे, म्हणजे पहिला पहिला हक्कदार, पहिला वारस आहे. कोणी फार सुंदर आणि लायक
मुलगा असतो, तर माता पित्याला किती नशा राहतो कि, माझा मुलगा कुलदीपक आहे, किंवा
कुळाचे नाव प्रसिद्ध करणारा आहे. ज्याचा भगवान मुलगा बनतो, त्यांचे नाव किती
प्रसिद्ध होईल. त्यांच्या किती कुळाचे कल्याण होईल. तर जेंव्हा कधी दुनियेतील
वातावरणाने, या वेगवेगळ्या समस्या मध्ये, थोडे पण स्वतःला एकटे किंवा उदास अनुभव
करता, तर त्यावेळी अशा सुंदर मुलाच्या रूपा मध्ये खेळा, मित्र रूपा मध्ये खेळा, कधी
थकून जाता, तर मातेच्या रूपा मध्ये, गोदी मध्ये झोपून जावा, सामावून जावा. कधी उदास
होऊन जाता, तर सर्व शक्तीवान स्वरूपा मध्ये, मास्टर सर्वशक्तिमाना च्या स्मृती
स्वरूपाचा अनुभव करा, तर उदासी पासून दिलखुश होऊन जाल. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या
संबंधा मध्ये, वेगवेगळ्या आपल्या स्मृतीच्या स्वरूपाला, प्रत्यक्ष रूपामध्ये अनुभव
करा. तर बाबाची नेहमी साथ स्वतःच अनुभव कराल आणि हे संगम युगाचे ब्राह्मण जीवन,
नेहमीच अमुल्य अनुभव होत राहील.
आणखीन एक गोष्ट आहे कि, एवढे सर्व संबंध निभावण्या मध्ये एवढे व्यस्त राहाल,
ज्यामुळे मायेला येण्याची वेळच मिळणार नाही. जसे लौकिक मध्ये मोठे प्रवृती वाले,
नेहमी हेच म्हणतात कि, प्रवृत्तीला सांभाळण्या मध्ये एवढे व्यस्त राहत आहोत,
ज्यामुळे आणखीन कोणती गोष्ट आठवणीतच येत नाही, कारण फार मोठी प्रवृत्ती आहे. तर
तुम्हां ब्राह्मण आत्म्याची प्रभू बरोबर प्रीत निभावण्याची पण प्रभू प्रवृत्ती किती
मोठी आहे. तुमची प्रभुप्रीत ची प्रवृत्ती झोपले तरी चालत राहते. जरी योगनिद्रे मध्ये
आहात तरी तुमची निद्रा नसून, ती योगनिद्रा आहे. झोपे मध्ये पण प्रभू मिलन साजरे करु
शकता. योगाचा अर्थच आहे मिलन. योगनिद्रा म्हणजे अशरीरी पणाच्या स्थितीची अनुभूती
करणे. तर ही पण प्रभूप्रीत आहे ना. तर तुमच्या सारखी मोठ्यातील मोठी प्रवृत्ती,
कोणाची पण नाही. एक सेकंद पण तुम्हांला वेळ नाही, कारण भक्ती मध्ये भक्ताचे
रूपामध्ये पण गीत गात राहतात कि, फार दिवसानंतर प्रभू तुम्ही भेटले आहात, तर मोजून
त्याचा हिशोब पूर्ण घेऊ. तर एक एका सेकंदाचा हिशोब घेणारे आहात. साऱ्या कल्पातील
भेटण्याचा हिशोब, या छोट्याशा एक जन्मांमध्ये पूर्ण करत आहात. पाच हजार वर्षाच्या
हिशोबाने, हा छोटासा जन्म कांही दिवसा सारखाच आहे ना. थोड्या दिवसा मध्ये एवढ्या
लांब वेळेचा हिशोब पूर्ण करायचा आहे. त्यामुळे म्हणतात कि, श्वासोश्वास आठवण करा.
भक्त स्मरण करत आहेत, तुम्ही स्मृती स्वरूप बनत आहात. तर तुम्हाला सेकंदाची पण
फुरसत आहे? किती मोठी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्ती समोर ती छोटीशी प्रवृत्ती
आकर्षित करत नाही, आणि सहज स्वतःच देहासहित,देहाचे संबंध आणि देहाचे पदार्थ किंवा
प्राप्ती पासून नष्टोमोहा, स्मृति स्वरूप बनाल. हाच शेवटचा पेपर माळेचे, क्रमवारीने
मणके बनवेल.
जेंव्हा अमृतवेळे पासून योगनिद्रे पर्यंत वेगवेगळ्या स्मृती स्वरूपाचे अनुभवी बनाल
तर फार काळाचे स्मृती स्वरूपाचा अनुभव, अंतामध्ये स्मृती स्वरूपाच्या प्रश्नां मध्ये
सन्मानाने पास होणारे बनवेल. फार रमणिक जीवनाचा अनुभव कराल, कारण जीवना मध्ये
प्रत्येक मनुष्य आत्म्याची आवड विविधता आहे, हेच इचछितात. तर या साऱ्या दिवसांमध्ये,
वेगवेगळे संबंध, वेगवेगळ्या स्वरूपाच्या, नवीनतेचा अनुभव करा. जसे दुनिये मध्ये पण
म्हणतात कि, पिता पण पाहिजेत, परंतु पित्या बरोबर जर जीवन साथीचा अनुभव नाही झाला,
तरी पण ते जीवन कमी समजतात. मुलगा नसेल तरी पण जीवन कमी समजतात. प्रत्येक संबंधाला
संपन्न जीवन समजतात. तरी हे ब्राह्मण जीवन भगवंता बरोबर, सर्व संबंध अनुभव करणारे
संपन्न जीवन आहे. एका पण संबंधाची कमतरता राहू नये. एक संबंध जरी भगवंता बरोबर कमी
असेल, तर कोणती ना कोणती आत्मा त्या संबंधा मध्ये, आपल्याकडे आकर्षित करेल. जसे
कांही मुले कधी कधी म्हणतात कि, पित्याचा रुपा मध्ये तर आहेतच, परंतु सखा किंवा सखी
अथवा मित्राचे पण लहान रूप आहे ना, त्यासाठी तर आत्मे पाहिजेत, कारण पिता तर मोठे
आहेत ना. परंतु परमात्म संबंधा मध्ये कोणता पण लहान किंवा हलका आत्म्याचा संबंध
मिसळला, तर सर्व शब्द नाहीसा होऊन जातो, आणि यथाशक्तीच्या रांगेमध्ये येतात.
ब्राह्मणाच्या भाषांमध्ये, प्रत्येक गोष्टीं मध्ये, सर्व शब्द येत आहे. जिथे सर्व
आहे, तिथेच संपन्नता आहे. जरी दोन कला पण कमी झाल्या तर दुसऱ्या माळेचे मणके बनाल,
त्यामुळे सर्व संबंधा मधील सर्व स्मृती स्वरूप बना. समजले? जेंव्हा भगवान स्वतःच
सर्व संबंधाचा अनुभव करण्यासाठी सांगत आहेत, तर त्याचा स्वीकार केला पाहिजे ना. अशी
सुवर्णसंधी भगवंता शिवाय आणि या वेळीच, ना कधी आणि ना कोणी करू शकणार नाही. कोणी
पिता पण बनेल आणि मुलगा पण बनेल, असे होऊ शकते कां ? ही एकाचीच महिमा आहे. एकाचीच
महानता आहे, त्यामुळे सर्व संबंधाने स्मृति स्वरूप बनायचे आहे. यामध्ये मजा आहे ना?
ब्राह्मण जीवन कशासाठी आहे! मजे मध्ये आणि मौज मध्ये राहण्यासाठी. तर ही अलौकिक मौज
साजरी करा. मजेच्या जीवनाचा अनुभव करा.
आज दिल्ली दरबार वाले आले आहेत, राज दरबारवाले आहात, कां दरबारा मध्ये फक्त पाहणारे
आहात? दरबारा मध्ये राज्य करणारे आणि पाहणारे दोन्ही पण बसले आहेत. तुम्ही सर्व कोण
आहात? दिल्लीच्या दोन विशेषता आहेत. एक दिल्ली दिलारामा ची दिल आहे, दुसरे राजगादी
चे स्थान आहे. दिल आहे तर हृदयामध्ये कोण राहील? दिलाराम. तर दिल्ली निवासी म्हणजे
हृदया मध्ये नेहमी दिलाराम ला ठेवणारे. असे अनुभवी आत्मा आणि आता पासून स्वराज्य
अधिकारी, ते भविष्यातील विश्व राज्य अधिकारी. हृदया मध्ये जेव्हा दिलाराम आहे तर
राज्य अधिकारी आता आहात आणि नेहमी राहाल. तर नेहमी स्वतःचे जीवना मध्ये पहा कि, या
दोन्ही विशेषता आहेत. हृदया मध्ये दिलाराम आणि मग अधिकारी पण. अशी सुवर्णसंधी,
सोन्या पेक्षा पण हिरा बनण्याची संधी घेणारे, किती भाग्यवान आहात.
आता तर सेवेचे फार चांगले साधन मिळाले आहे. मग देशांमध्ये असो किंवा विदेशा मध्ये.
जसे नाव आहे, तसेच सुंदर कार्य आहे. नाव ऐकूनच सर्वांना उमंग येत आहे. "सर्वांच्या
स्नेहाने, सहयोगाने सुखमय संसार" हे तर मोठे कार्य आहे. एका वर्षापेक्षा पण अधिक आहे.
तर जसे कार्याचे नाव ऐकूनच सर्वांना उमंग येत आहे, तसे कार्य पण उमंगाने करा. जसे
सुंदर नाव ऐकून, खुश होत आहात, तसे कार्य होताना नेहमी खुश होऊन जाल. हे पण सांगितले
आहे ना, प्रत्यक्षते चा पडदा हालविण्याचा किंवा पडदा उघडण्याचा आधार बनले आहात, आणि
बनत राहाल. सर्वांचे सहयोगी, जसे कार्याचे नाव आहे, तसेच स्वरूप बनून सहज कार्य करत
राहा. तर मेहनत निमित्तमात्र आणि सफलता पदमगुणा अनुभव करत रहाल. असे अनुभव कराल, जसे
कि करावनहार निमित्त बनवून करत आहेत. मी करत आहे, असे नाही, त्यामुळे सहयोगी बनणार
नाहीत. करावनहार करून घेत आहेत. चालवणारे कार्याला चालवत आहेत. जसे तुम्हां सर्वांना
जगदंबाचे बोधवाक्य आठवणीत आहे कि, हुकमी हुकम चालवत आहेत. हेच बोधवाक्य नेहमी स्मृती
स्वरूपा मध्ये आणल्याने सफलतेला प्राप्त करत राहाल. बाकी चोहीकडे उमंग उत्साह चांगला
आहे. जिथे उमंग उत्साह आहे तिथे सफलता स्वतःच जवळ येऊन, गळ्यातील माळ बनून जाते.
हे विशाल कार्य अनेक आत्म्यांना सहयोगी बनवून जवळ आणेल, कारण प्रत्यक्षते चा पडदा
उघडल्या नंतर या विशाल रंगमंचावर, प्रत्येक वर्गातील आत्म्यांना अभिनय करण्यासाठी
रंगमंचावर प्रत्यक्ष झाले पाहिजे. प्रत्येक वर्गाचा अर्थच आहे, विश्वातील सर्व
आत्म्यातील, वेगवेगळ्या वृक्षाचे संघटन रूप, कोणता पण वर्ग राहू नये, जो नाव ठेवल
कि, आम्हाला तर संदेश मिळाला नाही. त्यामुळे नेत्या पासून गरीब झोपडी पर्यंत वर्ग
आहेत. शिकलेले सर्वात उच्च वैज्ञानिक आहेत आणि जे न शिकलेले आहेत, त्यांना पण हे
ज्ञान देणे पण सेवा आहे. तर सर्व वर्ग म्हणजे विश्वातील प्रत्येक आत्म्यांना संदेश
पोहचवायचा आहे. किती मोठे कार्य आहे, असे कोणी म्हणू शकत नाही कि, आम्हाला तर सेवेची
संधीच मिळत नाही. जरी कोणी आजारी असेल, तर आजारी, आजारी पडलेल्यांची सेवा करेल.
अशिक्षित अशिक्षितां ची सेवा करतील. जे पण करू शकता ती संधी आहे, जरी बोलू शकत नसाल
तर मन्सा वातावरणाने, सुखाची वृत्ती, सुखमय स्थिती मधून, सुखमय संसार बनवा. कोणते
पण कारण देऊ शकत नाहीत कि, मी करू शकत नाही, वेळ नाही, उठता-बसता १०-१० मिनिटाची
सेवा करा.सहयोग तर देणार ना? कुठे जाऊ शकत नसाल, तब्येत ठीक नसेल, तर घरात बसून करा,
परंतु सहयोगी जरूर बनायचे आहे, तेंव्हा सर्वाचा सहयोग मिळेल.
उमंग उत्साह पाहून बापदादा पण खुश होत आहेत. सर्वांच्या मना मध्ये इच्छा आहे कि, आता
प्रत्यक्षते चा पडदा उघडून दाखवू. आरंभ तर झाला आहे ना. तर मग सहज होत जाईल. विदेशा
तील मुलांची योजना पण बाप दादा पर्यंत पोहोचत आहे. स्वतः पण उमंगा मध्ये आहेत आणि
सर्वांचा सहयोग पण उमंग उत्साहा मुळे मिळत आहे. उमंगा ला उमंग, उत्साहा ला उत्साह
मिळत आहे. हे पण मिलन होत आहे. तर फार धूमधडाक्या मध्ये या कार्याला पुढे घेऊन जावा.
जे पण उमंग उत्साहाने बनविले आहे, आणखीन बाबाच्या, सर्व ब्राह्मणांच्या सहयोगाने,
शुभकामना, शुभभावने ने, आणखीन पुढे चालत राहा. अच्छा.
चोहीकडे च्या नेहमी आठवण आणि सेवे मधील उमंग उत्साहा तील, श्रेष्ठ मुलांना, नेहमी
प्रत्येक कर्मामध्ये स्मृती स्वरूपाची अनुभूती करणारे, अनुभवी आत्म्यांना, नेहमी
प्रत्येक कर्मा मध्ये बाबाच्या सर्व संबंधाचा अनुभव करणारे, श्रेष्ठ आत्म्यांना,
नेहमी ब्राह्मण जीवना तील मजेचे जीवन घालविणारे, महान आत्म्यांना बापदादा ची अति
संपन्न,स्नेह संपन्न,प्रेमळ आठवणचा स्वीकार करा.
वरदान:-
संगमयुगा मध्ये एकाचे शंभर पटीने प्रत्यक्ष फळ प्राप्त करणारे पद्मा पदम भाग्यशाली
भव:
संगमयुग च एकाचे शंभर
पटीने प्रत्यक्ष फळ देणारे आहे. फक्त एक वेळा संकल्प करा कि, मी बाबाचा आहे. मी
मास्टर सर्वशक्तिमान आहे. तर मायाजीत बनण्या साठी विजयी बनण्याच्या नशेचा अनुभव होत
राहील. श्रेष्ठ संकल्प करणे हेच बीज आहे, आणि त्याचे सर्वात मोठे फळ आहे, जे स्वतः
परमात्मा पिता पण साकार मनुष्य रूपा मध्ये भेटण्या साठी येतात. या फळा मध्ये सर्व
फळे येतात.
सुविचार:-
खरे ब्राह्मण ते आहेत,
ज्यांचा चेहरा आणि कर्मा मध्ये पवित्रते चे व्यक्तिमत्व आणि उत्तमते चा अनुभव होईल.
सूचना:-
आज महिन्यातील तिसरा
रविवार, आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. सायंकाळचे ६-३० ते ७-३० वाजेपर्यंत सर्व बंधू
भगिनी विशेष योग तपस्या करून, आपल्या शुभभावना संपन्न संकल्पा द्वारे, प्रकृती सहित,
विश्वातील सर्व आत्म्यांना शांती आणि शक्तीचे प्रकंपन देण्याची सेवा करा.