26-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- ब्रह्मा बाबा शिव बाबांचा रथ आहे,दोघांचा एकत्र अभिनय चालतो,यामध्ये जराही संशय यायला नको"

प्रश्न:-
मनुष्य दुःखांपासून सुटण्यासाठी कोणती युक्ति करतात,ज्याला महापाप म्हटले जाते?

उत्तर:-
मनुष्य जेव्हा दुःखी होतात तेव्हा स्वतःला मारण्याचे अनेक उपाय करतात.जीव घात करण्याचा विचार करतात, समजतात यामुळे आम्ही सर्व दुःखांपासून मुक्त होऊन जाऊ. परंतु या सारखे महापाप दुसरे कोणतेही नाही.आणखीनच दुःखामध्ये फसतात कारण की ही अपार दुःखांची दुनिया आहे.

ओम शांती।
मुले बाबांना विचारत आहेत,आत्मा परमात्म्याला विचारत आहे.आम्ही परमपिता परमात्माच्या समोर बसलो आहोत. हे तर तुम्ही जाणत आहात. त्यांना आपला रथ नाही. भ्रकुटीच्या मध्ये बाबांचे निवासस्थान आहे हा तर निश्चय आहे ना.बाबा स्वतः म्हणतात मी यांच्या भृकुटी मध्ये बसतो,यांचे शरीर कर्जाऊ(लोन)घेतले आहे.आत्मा भृकुटी च्या मध्ये आहे आणि बाबाही तिथेच बसतात.ब्रह्मा आहे तर शिवबाबाही आहे.ब्रह्मा नसेल तर शिवबाबा बोलणार कसे?शिवबाबांची सदैव वरती आठवण करतात.आता तुम्हा मुलांना माहित आहे आम्ही इथे बाबांच्या जवळ बसलो आहोत.शिवबाबा वरती आहेत असे नाही,त्यांच्या प्रतिमेची पुजा केली जाते.या खूप समजण्याच्या गोष्टी आहेत.तुम्ही जाणत आहात बाबा ज्ञानाचे सागर आहेत.ज्ञान कुठून ऐकवतात?काय वरून ऐकवतात?इथे खाली आला आहे.ब्रह्माच्या मुखाद्वारे ऐकवत आहेत.काहीजण आम्ही ब्रह्माला मानत नाही असे म्हणतात.परंतु शिवबाबा ब्रह्मा मुखाद्वारे स्वतः म्हणतात की माझी आठवण करा.ही समजण्याची गोष्ट आहे ना.परंतु माया खूप जबरदस्त आहे.एकदमच तोंड फिरवून पाठीमागे ढकलून देते.आता तुमचे तोंड शिवबाबांनी समोर फिरवले आहे.समोर बसले आहेत तरीही ब्रह्मा तर काहीच नाही,असे जे समजतात त्यांची गती काय होईल!दुर्गतीला प्राप्त करतात.ज्ञान काहीही नाही. मनुष्य ओ गॉड फादर असे बोलावतात.तर मग तो गॉड फादर ऐकतो का? त्यांना बोलावतात ना मुक्तिदाता ये,की तिथेच बसून मुक्त करतील?कल्प-कल्प पुरुषोत्तम संगमयुगावरच बाबा येतात ज्यांच्यामध्ये येतात त्यांनाच जर काढून टाकले तर काय म्हणायचे!नंबरवन तमोप्रधान.निश्चय असूनही माया एकदम तोंड फिरवते.तिच्या मध्ये एवढे बळ आहे जे एकदम कवडी तुल्य बनवते.असेसुद्धा कोणत्या ना कोणत्या सेंटरवर आहेत म्हणूनच बाबा म्हणतात खबरदार राहायचे आहे.भले ऐकलेल्या गोष्टी इतरांनाही ऐकवत राहतात परंतु ते जसे काही पंडिता सारखे होऊन जाते.ज्याप्रमाणे बाबा पंडिताची गोष्ट सांगतात ना.त्याने सांगितले राम-राम म्हटल्याने सागर पार होऊन जाल.हीसुद्धा एक गोष्ट बनवलेली आहे.तुम्ही यावेळी बाबांच्या आठवणी मुळे विषय सागरा मधून क्षीरसागरामध्ये जात आहात ना. त्यांनी भक्तिमार्गा मध्ये खूप सार्‍या कथा बनवल्या आहेत. अशा गोष्टी तर होत नाहीत.ही एक गोष्ट बनवली आहे.पंडित इतरांना सांगत होता,स्वतःची एकदमच दुरवस्था होती.स्वतः विकारांमध्ये जात राहणे आणि इतरांना सांगणे निर्विकारी बना, त्याचा परिणाम काय होईल. असेही ब्रह्माकुमार-कुमारी आहेत-स्वतःला निश्चय नाही,इतरांना सांगत राहतात म्हणूनच काही-काही ठिकाणी ऐकवणाऱ्या पेक्षाही ऐकणारे पुढे निघून जातात.जे अनेकांची सेवा करतात ते अवश्य सर्वांना आवडू लागतात ना.पंडित खोटा निघाला तर त्याच्यावर प्रेम कोण करणार!नंतर जो प्रत्यक्षा मध्ये आठवण करतो त्याच्यावर प्रेम जाईल.चांगल्या-चांगल्या महारथीनांही माया गिळून टाकते. खूप जणांना गिळून टाकले. बाबाही समजावतात अजून कर्मातीत अवस्था झाली नाही.पूर्ण संबंध(कनेक्शन)आहे.

नंतर लढाई पूर्ण झाल्यानंतर बदली होऊन जाल. प्रथम रुद्र माळ बनते.या गोष्टी इतर कोणी जाणत नाही.तुम्ही समजत आहात विनाश समोर उभा आहे.आता तुम्ही आहात अल्पसंख्य,ते आहेत बहुसंख्य. तर तुमचे कोण ऐकेल.जेव्हा तुमची वृद्धी होईल तेव्हा तुमच्या योग बळाने अनेकजण आकर्षित होऊन येतील.जेवढा तुमचा गंज निघून जाईल तेवढे बळ भरले जाईल. बाबा जानी जाननहार आहेत,असे नाही.इथे येऊन सर्वांना पाहतात, सर्वांच्या अवस्थेला जाणतात. पिता मुलांच्या अवस्थेला जाणणार नाहीत का?सर्व काही माहित पडते.यामध्ये अंतर्यामी ची कोणतीही गोष्ट नाही.आसुरी बोलणे,चालणे,वागणे इ.सर्व प्रसिद्ध होते.तुम्हाला तर देवी-देवतांसारखे बनायचे आहे. देवता सर्वगुणसंपन्न आहेत ना.आता तुम्हाला असे बनायचे आहे.कुठे ते राक्षस,कुठे देवता! परंतु माया कोणालाही सोडत नाही,नाजूक बनवते.एकदम मारून टाकते.५ शिड्या आहेत ना.देह-अभिमान आल्यानेच वरून एकदम खाली घसरतात. घसरला आणि मेला.आज-काल स्वतःला मारण्यासाठी कसले- कसले उपाय करतात.21व्या मजल्यावरून उडी मारतात,तर एकदम मरून जातात.नंतर हॉस्पिटल मध्ये पडून राहावे,दुःख भोगत राहावे असे व्हायला नको.५ व्या मजल्यावरून पडला आणि मेला नाही,तर किती दुःख भोगत राहतात.काहीजण स्वतःला पेटवतात.जर कोणी त्यांना वाचवले तर त्यांना किती दुःख सहन करावे लागते.जळून गेले तर आत्मा पळून जाईल ना! म्हणूनच जीव घात करतात, शरीराला नष्ट करतात.समजतात शरीर सोडल्याने दुःखापासून मुक्त होऊन जाऊ.परंतु हे सुद्धा महापाप आहे,अजूनच जास्त दुःख भोगावे लागते कारण की ही अपार दुःखांची दुनिया आहे, तिथे आहे अपार सूख.तुम्ही मुले समजता आम्ही आता परत जात आहे,दुःखधाम मधून सुखधाम मध्ये जात आहे.आता बाबा जे सुखधामचे मालक बनवत आहेत त्यांची आठवण करायची आहे. यांच्याद्वारे बाबा समजावत आहेत,चित्रही आहेत ना.ब्रह्मा द्वारे स्वर्गाची स्थापना.तुम्ही म्हणता बाबा आम्ही अनेक वेळा स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आलो आहे.बाबासुद्धा संगमा वरच येतात जेव्हा की दुनियेला बदलायचे आहे.तर बाबा म्हणतात मी आलो आहे तुम्हा मुलांना दुःखापासून सोडवून सुखाच्या पावन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी.बोलतातही-हे पतित पावन.... त्यांना हे थोडीच समजते की आम्ही महाकाळाला बोलवत आहे की, आम्हाला या दुनियेतून घरी घेऊन चला. अवश्य बाबा येतील.आम्ही मेल्या नंतरच शांती होईल ना.शांती- शांती करत राहतात.शांती तर आहे परमधाम मध्ये.परंतु या दुनियेमध्ये शांती कशी होणार- जोपर्यंत एवढे भरपूर मनुष्य आहेत!सतयुगामध्ये सुख-शांती होती.आता कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत.ते जेव्हा नष्ट होतील तेव्हा एका धर्माची स्थापना होईल,तेव्हाच तर सुख शांती होईल ना!हाहाकारा नंतरच पुन्हा जय-जयकार होईल.पुढे चालून पाहा मृत्यूचा बाजार किती गरम होणार आहे!विनाश अवश्य होणार आहे.एका धर्माची स्थापना बाबा येऊन करतात.राजयोग ही शिकवतात.बाकी सर्व अनेक धर्म नष्ट होऊन जातील.गीतेमध्ये काही दाखवलेले नाही.५ पांडव आणि कुत्रा हिमालयावर मरून गेले.नंतर परिणाम काय झाला? प्रलय दाखवला आहे.सगळीकडे पाणी होते परंतु संपूर्ण दुनिया पाणी-पाणी होऊ शकत नाही. भारत तर अविनाशी पवित्र खंड आहे.त्यामध्येही आबु सर्वात पवित्र तीर्थस्थान आहे जिथे बाबा येऊन तुम्हा मुलांच्या द्वारे सर्वांची सदगती करत आहेत.देलवाडा मंदिरामध्ये किती चांगले स्मृतिचिन्ह(यादगार)आहे.किती अर्थपूर्ण आहे.परंतु ज्यांनी बनवले आहे त्यांना माहीत नाही. तरीही चांगले समजदार तर होते ना.द्वापर मध्ये अवश्य चांगले समजदार असतील. कलियुगामध्ये तमोप्रधान असतात.द्वापर मध्ये तरीही तमो बुद्धी असतील.जिथे तुम्ही बसले आहात,हे सर्व मंदिरांमध्ये उंच आहे.

आता तुम्ही पहाल विनाशा मध्ये होलसेल मृत्यू होतील.होलसेल महाभारी लढाई लागेल.सर्व नष्ट होऊन जाईल.एक खंड शिल्लक राहील.भारत पण खूप छोटा असेल, बाकी सर्व नष्ट होऊन जातील. स्वर्ग किती छोटा असेल.आता हे ज्ञान तुमच्या बुद्धी मध्ये आहे. कोणाला समजावण्या मध्येही उशीर लागतो.हे पुरुषोत्तम संगमयुग आहे.इथे किती असंख्य मनुष्य आहेत आणि तिथे किती थोडे मनुष्य असतील,हे सर्व नष्ट होऊन जातील.दुनियेचा इतिहास-भूगोल पुन्हा एकदा पुनरावृत्त होईल.अवश्य स्वर्गा पासून सुरुवात होईल.शेवटी तर येणार नाहीत.हे नाटकाचे चक्र अनादी आहे,जे फिरतच राहते. या बाजूला कलियुग,त्या बाजूला आहे सतयुग.आम्ही संगमावर आहे.हेही तुम्ही समजत आहात. बाबा येतात,बाबांना तर अवश्य पाहिजे ना.तर बाबा समजावत आहेत,तुम्ही आता घरी जात आहात.नंतर हे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे,तर दैवी गुणही धारण करायचे आहेत.

रावण राज्य आणि रामराज्य कशाला म्हणतात हेही तुम्हा मुलांना समजावले जाते.पतिता पासून पावन नंतर पावन पासून पतित कसे बनतात!या खेळाचे रहस्य बाबा बसून समजावत आहेत.बाबा ज्ञानसंपन्न बीजरूप आहेत ना!चैतन्य आहेत.तेच येऊन समजावत आहेत.बाबाच म्हणतील संपूर्ण कल्पवृक्षाचे रहस्य समजले?यामध्ये काय काय होते?तुम्ही यामध्ये किती अभिनय केला आहे?अर्धाकल्प आहे दैवी स्वराज्य.अर्धाकल्प आहे आसुरी राज्य.चांगली- चांगली जी मुले आहेत त्यांच्या बुद्धी मध्ये ज्ञान राहते.बाबा आप समान बनवत आहेत ना! शिक्षकांमध्ये ही क्रमवार असतात.काही तर शिक्षक असूनही नंतर बिघडतात. अनेकांना शिकवून नंतर स्वतः नष्ट झाले.छोट्या-छोट्या मुलांमध्ये वेगवेगळ्या संस्काराचे असतात ना.काही तर पहा नंबर वन शैतान नंतर काही परिस्तान मधे जाण्या लायक.काही असे आहेत जे न ज्ञान घेतात,न आपले वागणे सुधारतात,सर्वांना दुःखच देत राहतात.हेसुद्धा शास्त्रांमध्ये दाखवले आहे की असुर लपून येऊन बसत होते.असुर बनून किती त्रास देतात.हे तर सर्व होत राहते.उंच ते उंच बाबांनाच स्वर्गाची स्थापना करण्यासाठी यावे लागते.माया सुद्धा खूप जबरदस्त आहे.दान देतात तरीही माया बुद्धी फिरवते.अर्ध्यानां तर अवश्य माया खाऊन टाकेल म्हणूनच तर म्हणतात माया खूप प्रबळ आहे.अर्धा कल्प माया राज्य करते तर अवश्य एवढी पहलवान असेल ना.मायेपासून हारणारयांची काय हालत होऊन जाते!अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. कधीही नाजूक बनायचे नाही. दैवीगुण धारण करून आपले वागणे सुधारायचे आहे.

2. बाबांचे प्रेम प्राप्त करण्यासाठी सेवा करायची आहे,परंतु जे दुसऱ्यांना ऐकवतो ते स्वतः धारण करायचे आहे.कर्मातीत अवस्थेमध्ये जाण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
मेहनत आणि महानतेच्या सोबत आत्मीयतेचा अनुभव करवणारे शक्तिशाली सेवाधारी भव

जे पण आत्मे तुमच्या संपर्कामध्ये येतात त्यांना आत्मिक शक्तीचा अनुभव करवा.अशी स्थूल आणि सूक्ष्म अवस्था बनवा ज्यामुळे येणारे आपल्या स्वरूपाचा आणि आत्मीयतेचा अनुभव करतील. अशी शक्तिशाली सेवा करण्यासाठी सेवाधारी मुलांना व्यर्थ संकल्प,व्यर्थ बोल,व्यर्थ कर्माच्या हलचल पासून परे एकाग्रता अर्थात आत्मीयते मध्ये राहण्याचे व्रत घ्यायला पाहिजे. याच व्रताने ज्ञान सूर्याचा चमत्कार दाखवू शकाल.

बोधवाक्य:-
बाबा आणि सर्वांच्या आशीर्वादाच्या विमानामध्ये उडणारेच उडता योगी आहेत.