22-01-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही बाबा जवळ ताजेतवाने होण्यासाठी आले आहात, बाबा आणि वारशा ची आठवण करा, तर नेहमी ताजेतवाने रहाल."

प्रश्न:-
समजदार मुलांची मुख्य निशाणी काणती आहे?

उत्तर:-
जे समजदार आहेत, त्यांना अपार खुशी होईल. जर खुशी नसेल, तर ते बुद्धु आहेत. समजदार म्हणजे पारस बुद्धी बनणारे. ते दुसऱ्यांना पण पारस बुद्धी बनवतील. आत्मिक सेवे मध्ये व्यस्त राहतील.ते बाबाचा परिचय दिल्या शिवाय राहू शकत नाहीत.

ओम शांती।
बाबा समजावत आहेत, हे दादा पण समजत आहेत, कारण बाबा, दादा द्वारा समजावत आहेत. तुम्ही जसे समजत आहात, तसे दादा पण समजत आहेत. दादाला भगवान म्हटले जात नाही. हे भगवानुवाच आहे. बाबा मुख्य गोष्ट समजावत आहेत कि, देही अभिमानी बना. असे का म्हणत आहेत? कारण स्वतःला आत्मा समजल्या मुळे आम्ही पतित-पावन, परमपिता परमात्मा कडून, पावन बनणारे आहोत. हे बुद्धी मध्ये ज्ञान आहे. सर्वांना समजावयाचे आहे, बोलावतात पण कि, आम्ही पतित आहोत. नवीन दुनिया पावन जरूर होईल. नवीन दुनिया बनविणारे, स्थापन करणारे बाबा आहेत. त्यांनाच पतित-पावन बाबा म्हणून बोलावतात. पतित पावन, पिता म्हणून बोलावतात. पित्याला आत्मा बोलावते, शरीर बोलावत नाही. आमच्या आत्म्याचा पिता पारलौकिक आहे, तेच पतित पावन आहेत. हे तर चांगल्या रीतीने आठवण केले पाहिजे. ही नवीन दुनिया आहे, कां जुनी दुनिया आहे, हे तर समजू शकता ना. असे पण बुध्दु आहेत, जे समजतात, आम्हाला सुख अपार आहे. आम्ही जसे कि, स्वर्गा मध्ये बसलो आहोत. परंतु हे पण समजले पाहिजे कि, कलियुगा ला कधी स्वर्ग म्हणून शकत नाहीत. नावच कलियुग आहे, पुरानी पतित दुनिया. फरक आहे ना. मनुष्याच्या बुद्धी मध्ये हे पण बसत नाही. फारच जर्जर अवस्था झाली आहे. मुले शिकत नाहीत तर म्हणतात कि, तुम्ही तर पत्थरबुद्धी आहात. बाबा पण लिहतात, गावां मधील तर फारच पत्थरबुद्धी आहेत. समजत नाहीत, कारण दुसर्‍यांना समजावत नाहीत. स्वतः पारसबुध्दी बनता, तर दुसऱ्यांना पण बनविले पाहिजे. पुरषार्थ केला पाहिजे, या मध्ये लाजण्याची तर गोष्टच नाही. परंतु मनुष्यांच्या बुद्धी मध्ये अर्धा कल्प उलटे अक्षरे पडल्यामुळे तर ते विसरत नाहीत. कसे विसरतील? विसरण्याची ताकत पण एका बाबा जवळच आहे. बाबा शिवाय हे ज्ञान तर कोणी देऊ शकत नाही. म्हणजेच ते सर्व अज्ञानी आहेत. त्यांचे ज्ञान मग कोठून येईल. जो पर्यंत ज्ञानसागर बाबा येऊन सांगत नाहीत. तमोप्रधान म्हणजे अज्ञानी दुनिया. सतोप्रधान म्हणजे दैवी दुनिया. फरक तर आहे ना. देवी देवता पुनर्जन्म घेत आहेत. वेळ पण फिरत राहतो.बुद्धी पण कमजोर होत जाते. बुद्धीचा योग लावल्याने, जी ताकद मिळते, मग ती नष्ट होऊन जाते.

आता तुम्हाला बाबा समजावत आहेत, त्यामुळे तुम्ही किती ताजेतवाने होत आहात. तुम्ही ताजेतवाने होता आणि आरामा मध्ये होता. बाबा पण लिहितात, मुलांनो, येऊन ताजेतवाने व्हा आणि आराम पण प्राप्त करा. ताजेतवाने झाल्या नंतर तुम्ही सतयुग विश्रामपुरी मध्ये जाता. तिथे तुम्हाला फार आराम मिळतो. तिथे सुख, शांती, संपत्ती इ. सर्व कांही तुम्हाला मिळते. तर बाबा जवळ ताजेतवाने होण्यासाठी आराम घेण्यासाठी येता. ताजेतवाने पण शिवबाबा करत आहेत. आराम पण बाबा जवळ मिळत आहे. आराम म्हणजे शांत. थकल्या नंतर आराम घेतात ना! कोणी कुठे, कोणी कुठे, आराम घेण्यासाठी जातात. त्यामध्ये तर ताजेतवाने होण्याची गोष्टच नाही. इथे तुम्हाला बाबा रोज समजावत आहेत, तर तुम्ही इथे येऊन ताजेतवाने होता. आठवण केल्या मुळे तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनत आहात. सतोप्रधान बनण्यासाठी तुम्ही इथे येत आहात. त्यासाठी कोणता पुरुषार्थ आहे? गोड गोड मुलांनो, बाबाची आठवण करा. बाबाने सारे शिक्षण तर दिले आहे. हे सृष्टी चक्र कसे फिरत आहे, तुम्हाला आराम कसा मिळत आहे. आणखीन कोणी पण या गोष्टी समजत नाहीत, तर त्यांना पण सांगितल्या पाहिजेत, कारण ते पण तुमच्या सारखे ताजेतवाने होऊन जातील. तुमचे कर्तव्यच हे आहे, सर्वांना संदेश द्यायचा आहे. अविनाशी ताजेतवाने व्हायचे आहे. अविनाशी आराम घ्यायचा आहे. सर्वांना हा संदेश द्या. हीच आठवण द्यायची आहे कि, बाबा आणि वरसा ची आठवण करा. आहे तर फार सोपी गोष्ट. बेहदचे बाबा स्वर्ग रचत आहेत. स्वर्गा चा वारसा देत आहेत. आता तुम्ही संगमयुगा वर आहात. मायेचा श्राप आणि बाबाच्या वरशा ला तुम्ही जाणत आहात. जेंव्हा माया रावणाचा श्राप मिळतो तर पवित्रता पण नाहीशी होते, सुख शांती पण नाहीशी होते, तर धन पण नाहीसे होते. कसे हळूहळू नाहीसे होत आहे, ते पण बाबांनी समजावले आहे. किती जन्म लागतात, दु:खधाम मध्ये कोणाला आराम थोडाच मिळतो? सुखधाम मध्ये आराम च आराम आहे. मनुष्या ला भक्ती किती थकवित आहे.जन्मजन्मांतर भक्ती थकवते. कंगाल करत आहे. हे पण आता तुम्हाला बाबांनी समजावले आहे. नवीन नवीन येतात तर किती समजावले जाते. प्रत्येक गोष्टीवर मनुष्य फार विचार करतात. समजतात कुठे जादू तर लागू नये, अरे, तुम्हीं म्हणता जादूगर. तर मी पण म्हणतो,मी जादूगार आहे परंतु जादू कोणती ती नाही, जी भेड बकरी इत्यादी बनवेल. जनावर तर नाहीत ना. हे बुद्धी द्वारे समजले जाते. गायन पण आहे कि, सूर मंडल च्या साजला…... यावेळी मनुष्य जसे बकरी सारखे आहेत. या गोष्टी इथल्यासाठी आहेत. सतयुगा मध्ये गात नाहीत, यावेळेचे गायन आहे. चंडिका चा किती मेळा लागतो. विचारा, ती कोण होती? तर म्हणतात देवी. आता असले नाव तर तिथे आसत नाही. सतयुगा मध्ये तर सदैव चांगली नांवे असतात. श्री रामचंद्र, श्रीकृष्ण ...श्री श्रेष्ठ ला म्हटले जाते. सतयुगी संप्रदायाला श्रेष्ठ म्हटले जाते. कलियुगी विकारी संप्रदायाला श्रेष्ठ कसे म्हणतील. श्री म्हणजे श्रेष्ठ. आताचे मनुष्य तर श्रेष्ठ नाहीत. गायन पण आहे, मनुष्या पासून देवता... मग देवता पासून मनुष्य बनतात, कारण पाच विकारा मध्ये जातात. रावण राज्या मध्ये सर्व मनुष्यच मनुष्य आहेत. तिथे देवता आहेत. त्याला दैवी जग, याला मनुष्य जग म्हटले जाते. दैवी जगाला दिवस म्हटले जाते. मनुष्य जगाला रात्र म्हटले जाते. प्रकाशाला दिवस म्हटले जाते. रात्र अज्ञान अंधाराला म्हटले जाते. या फरकाला तुम्ही जाणत आहात. तुम्ही समजत आहात, आम्ही अगोदर कांही पण जाणत नव्हतो. आता सर्व गोष्टी बुद्धी मध्ये आहेत. ऋषी मुनींना विचारतात, रचता आणि रचनेच्या आदि, मध्य, अंता ला जाणत आहात, तर ते पण नेती नेती म्हणतात, आम्ही जाणत नाही. आता तुम्ही समजत आहात, आम्ही पण पूर्वी नास्तिक होतो. बेहदच्या बाबाला ओळखत नव्हतो. ते मूळ अविनाशी बाबा, आत्म्याचे बाबा आहेत. तुम्ही मुले जाणता कि, आम्ही त्या बेहदच्या बाबाचे बनले आहोत, जे कधीच जळत नाहीत. इथे तर सर्व जळत आहेत, रावणाला पण जाळतात. शरीर आहे ना. तरीपण आत्म्यांला कोणी जाळू शकत नाहीत. तर मुलांना बाबा हे गुप्त ज्ञान सांगत आहेत, जे बाबा जवळ आहे. हे आत्म्यां मध्ये गुप्त ज्ञान आहे. आत्मा पण गुप्त आहे. आत्मा या मुखाद्वारे बोलत आहे, त्यामुळे बाबा म्हणतात, मुलांनो, देहअभिमानी बनू नका. देहीअभिमानी बना. नाहीतर जसे उलटे बनता. स्वतःला आत्म विसरून जातात. नाटकाच्या रहस्याला पण चांगल्या रीतीने समजले पाहिजे. नाटका मध्ये जी नोंद आहे, ती हुबेहूब पुनरावृत्त होत आहे. हे कोणाला माहित नाही. विश्व नाटका नुसार सेकंद सेकंद कसे चालत राहते, याचे पण ज्ञान बुद्धी मध्ये आहे. आकाशा चा कोणीही अंत प्राप्त करू शकत नाहीत. जमिनी चा प्राप्त करू शकतात. आकाश सूक्ष्म आहे, जमीन तर स्थुल आहे. कांही वस्तूचा अंत प्राप्त करू शकत नाहीत. जरी म्हणतात आकाश च आकाश आहे, पाताळ च पाताळ आहे. शास्त्रा मध्ये ऐकले आहे ना. तर वर जाऊन पण पाहतात. तिथे पण दुनिया बनवविण्याचा प्रयत्न करतात. जग निर्माण तर फार केले आहे ना. भारता मध्ये फक्त एकच देवी-देवता धर्म होता, इतर खंड इत्यादी नव्हते, परत खूप झाले आहेत, तुम्ही विचार करा. भारता मध्ये पण किती थोड्या जमिनीवर देवता राहत होते. जमुने चा किनारा होता. दिल्ली परिस्तान होती, याला कबरिस्तान म्हटले जाते, जिथे अकाले मृत्यु होतो. अमरलोक ला परिस्थान म्हटले जाते. तिथे नैसर्गिक सुंदरता असते. भारताला खरे तर परिस्थान म्हटले जाते. हे लक्ष्मी नारायण परिस्तान चे मालक होते. किती शोभावान होते. सतोप्रधान आहेत ना. नैसर्गिक सुंदरता होती. आत्मा पण चमकत राहते. मुलांना दाखविले होते, कृष्णाचा जन्म कसा होतो. साऱ्या खोली मध्ये जसा चमत्कार होतो. तर बाबा मुलांना समजावत आहेत, आता तुम्ही परिस्थान मध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. नंबरवार तर जरूर पाहिजेत. एक सारखे तर सर्व असत नाहीत. विचार केला जातो, एवढी लहान आत्मा, खूप मोठा अभिनय करत आहे. शरीरातून आत्मा निघून गेली तर शरीराचे काय हाल होतात. साऱ्या जगातील कलाकार, तेच अभिनय करत आहेत, जो अनादि बनलेला आहे. ही सृष्टी पण अनादि आहे. यामध्ये प्रत्येकाचा अभिनय पण अनादि आहे. त्याला तुम्ही आश्चर्यकारक तेंव्हा म्हणतात, जेंव्हा जाणता कि, हे सृष्टी रुपी झाड आहे. बाबा किती चांगल्या रीतीने समजावत आहेत. नाटका मध्ये तरीपण ज्यांच्या साठी जेवढा वेळ लागतो, तेवढे समजण्या साठी वेळ घेतात. बुद्धी मध्ये फरक आहे ना. आत्मा मन बुद्धी सहित आहे ना, तर किती फरक राहतो. मुलांना माहित पडते कि, आम्हाला शिष्यवृत्ती घ्यायची आहे. तर मनातून खुशी होते ना. इथे पण आत आल्या नंतर मुख्य उद्देश समोर पाहण्यात येत आहे, तर जरुर खुशी होईल ना. आता तुम्ही जाणत आहात, असे बनण्यासाठी आम्ही इथे शिक्षण घेण्यासाठी आले आहोत. नाहीतर कधी कोणी येणार नाहीत. हे मुख्य लक्ष्य आहे. अशी कोणती शाळा, कुठे पण नसेल, जिथे दुसऱ्या जन्मातील मुख्य लक्ष्या ला पाहिले जाते. तुम्ही पाहत आहात, हे स्वर्गाची मालक होते, आम्हीच असे बनणार आहोत. आता आम्ही संगमयुगावर आहोत. ना त्या राजाई चे आहोत, ना या राजाई चे आहोत. आम्ही मधोमध आहोत,आता जात आहोत. नावाडी बाबा पण निराकार आहेत. बोट आत्मा पण निराकार आहे. बोटीला ओढून परमधाम ला घेऊन जात आहेत. निराकार बाबा निराकार मुलांना घेऊन जात आहेत. बाबा मुलांना बरोबर घेऊन जात आहेत. हे चक्र पूर्ण होत आहे. मग हुबेहूब पुनरावृत्ती होत आहे. एक शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे. लहान बनून मग मोठे बनाल. जसे आंब्याच्या कोयी ला जमिनी मध्ये गाडले तर त्यामधून मग आंबे निघतात. ते हदचे झाड आहे, हे मनुष्य सृष्टी रुपी झाड आहे. याला वेगळे झाड म्हटले जाते. सतयुगा पासून कलियुगा पर्यंत सर्व अभिनय करत आहेत. अविनाशी आत्मा 84 च्या चक्रामध्ये अभिनय करत आहे. लक्ष्मी नारायण जे होते, ते आता नाहीत, चक्र लावून आता परत श्रेष्ठ बनत आहेत.असे म्हणतात प्रथम हे लक्ष्मी नारायण होते मग त्यांचा शेवटचा जन्म ब्रह्मा सरस्वती आहे. आता सर्वांना परत जरूर जायचे आहे. स्वर्गांमध्ये तर एवढे मनुष्य नव्हते. ना इस्लामी ना बौध्दी, कोणत्याही धर्माचे वाल कलाकार नव्हते, शिवाय देवी-देवताच्या. ही समज पण कोणा मध्ये नाही. समजदार ला पदवी मिळाली पाहिजे ना. जेवढे जे शिकत आहेत, नंबरवार पुरषार्थ करून पद प्राप्त करत आहेत. तर तुम्हां मुलांना इथे आल्या नंतर हे मुख्य लक्ष्य पाहून, खुशी झाली पाहिजे. खुशीचा तर पारावार नाही. पाठशाळा किंवा शाळा असावी तर अशी. किती गुप्त आहे, परंतु जबरदस्त पाठशाळा आहे. जेवढे मोठे शिक्षण, एवढे मोठे महाविद्यालय. तिथे सर्व सुविधा मिळतात. आत्म्याला शिकायचे आहे, मग सोन्याच्या तख्तावर किंवा लाकडाच्या तख्तावर बसायचे आहे. मुलांना किती खुशी झाली पाहिजे, कारण शिवभगवानु उवाच आहे ना. पहिल्या नंबर मध्ये हे विश्वाचे राजकुमार आहेत. मुलांना आता माहीत झाले आहे, कल्प कल्प बाबा येऊन स्वतःचा परिचय देतात. मी यांच्या मध्ये प्रवेश करून, तुम्हां मुलांना शिकवित आहे. देवता मध्ये हे ज्ञान थोडेच असते. ज्ञाना मुळे देवता बनले आहेत, मग शिक्षणाची गरजच नाही. यामध्ये समजून घेण्यासाठी फार विशाल बुद्धी पाहिजे.अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) या पतित दुनियेचा बुद्धीने संन्यास करून, जुना देह आणि देहाच्या संबंधी ना विसरून, आपली बुद्धी बाबा आणि स्वर्गा कडे लावायची आहे.

(२) अविनाशी आरामाचा अनुभव करण्यासाठी, बाबा आणि वरशा च्या आठवणी मध्ये राहायचे आहे. सर्वांना बाबाचा संदेश देऊन, ताजेतवाने करायचे आहे. आत्मीक सेवे मध्ये लाज वाटली नाही पाहिजे.

वरदान:-
नेहमी बाबा च्या सन्मुख राहून, खुशीचा अनुभव करणारे, अथक आणि आळस रहित भव.

कोणत्या पण प्रकारच्या संस्कार किंवा स्वभावाला परिवर्तन करण्या मध्ये नाराज होणे किंवा अलबेलापण येणे, पण थकणे आहे, यामध्ये अथक बना. अथक चा अर्थ आहे ज्या मध्ये आळस नसावा. जी मुले अशी आळस रहित आहेत, ते नेहमी बाबाच्या सन्मुख राहतात आणि खुशी चा अनुभव करतात. त्यांच्या मना मध्ये कधीपण दुःखाची लहर येत नाही, त्यामुळे नेहमी सन्मुख राहा आणि खुशीचा अनुभव करा.

बोधवाक्य:-
सिद्धी स्वरूप बनण्यासाठी प्रत्येक संकल्पा मध्ये पुण्य आणि बोलण्यातून आशीर्वाद जमा करत चला.