29-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- ग्रेट ग्रेट ग्रँड फादर अर्थात सर्वधर्म पित्यांचाही आदि पिता आहे
प्रजापिता ब्रह्मा, ज्याच्या कर्तव्याला तुम्ही मुलेच जाणत आहात"
प्रश्न:-
कर्मांना
श्रेष्ठ बनवण्याची युक्ती काय आहे?
उत्तर:-
या जन्मा मधले कोणतेही कर्म बाबांपासून लपवू नका,श्रीमतानुसार कर्म करा तर प्रत्येक
कर्म श्रेष्ठ होईल.सर्व काही कर्मावर अवलंबून आहे.जर कोणी पाप कर्म करून लपवतात तर
त्याची शिक्षा 100 पटीने मिळते,पाप वाढत राहतात, बाबांशी योग तुटून जातो.नंतर अशा
लपवणाऱ्यांचा सत्यानाश होऊन जातो,म्हणून खऱ्या बाबांसोबत खरे रहा.
ओम शांती।
गोड-गोड फार वर्षांनी भेटलेली मुले हे तर समजत आहेत या जुन्या दुनियेमध्ये आता आम्ही
थोड्या दिवसाचे वाटसरू आहोत.दुनिया मधील मनुष्य तर समजतात 40 हजार वर्ष अजून येथे
राहायचे आहे.तुम्हा मुलांना तर निश्चय आहे ना.या गोष्टी विसरू नका.इथे बसले आहात तर
तुम्हा मुलांना मनामध्ये खूप खुशी व्हायला पाहिजे.या डोळ्यांनी जे काही पहात आहात
हे तर विनाश होणार आहे.आत्मा तर अविनाशी आहे.हे ही बुद्धीमध्ये आहे आम्ही आत्म्याने
पुर्ण 84 जन्म घेतले आहेत,आता बाबा घेऊन जाण्यासाठी आले आहेत.जुनी दुनिया जेव्हा
पूर्ण होते तेव्हा बाबा धयेतात नवी दुनिया बनवण्यासाठी. नव्या दुनियेपासून
जुनी,नंतर जुन्या दुनियेपासून नवी दूनिया, या चक्राचे ज्ञान तुमच्या बुद्धी मध्ये
आहे.अनेक वेळा आम्ही हे चक्र लावले आहे.आता हे चक्र पूर्ण होत आहे.नंतर नव्या
दुनियेमध्ये आम्ही थोडे देवताच राहणार.मनुष्य असणार नाही. आम्ही आता मनुष्यापासून
देवता बनत आहोत.हा तर पक्का निश्चय आहे ना.बाकी सर्व काही कर्मावर अवलंबून
आहे.मनुष्य उलटे कर्म करतात तर मन खात राहते म्हणूनच बाबा विचारतात या जन्मांमध्ये
असे काही पाप तर नाही केले?हे आहेच छी-छी रावण राज्य.हेही तुम्ही समजत आहात.दुनिया
हे जाणत नाही की रावण कोणत्या वस्तूचे नाव आहे. बापूजी म्हणत होते रामराज्य पाहिजे
परंतु अर्थ समजत नव्हते. रामराज्य कशा प्रकारचे असते,हे आता बेहद चा पिता समजावत
आहे.ही तर धुंधकारी दुनिया है. आता बेहद चा पिता मुलांना वारसा देत आहे.तुम्ही आता
भक्ती करत नाही.आता बाबांचा हात मिळाला आहे.बाबांच्या आधाराशिवाय तुम्ही विषय वैतरणी
नदीमध्ये बुडत होते,अर्धाकल्प भक्तीच आहे. ज्ञान मिळाल्याने तुम्ही नवी दुनिया
सतयुगामध्ये निघून जात आहात.आता तुम्हा मुलांना हा निश्चय आहे-आम्ही बाबांची आठवण
करत-करत पवित्र बनून जाणार,नंतर पवित्र राज्यामध्ये येणार.हे ज्ञानही आता
पुरुषोत्तम संगमयुगावर तुम्हाला मिळत आहे.हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. जेव्हा कि
तुम्ही छी-छी पासून गुल-गुल(स्वच्छ),काट्यां पासून फूल बनत आहात.कोण बनवत
आहे?बाबा.बाबांना ओळखले आहे.आम्हा आत्म्यांचा तो बेहद चा पिता आहे.लौकिक पित्याला
बेहद चा पिता म्हणु शकत नाही. पारलौकिक पिता आत्म्यांच्या हिशोबाने सर्वांचा पिता
आहे. नंतर ब्रह्माचे ही कर्तव्य पाहिजे ना.तुम्ही मुले सर्वांच्या कर्तव्याला जाणत
आहात.विष्णूच्या ही कर्तव्याला जाणत आहात.किती सजलेला आहे.स्वर्गाचा मालक आहे
ना.याला तर संगम चा म्हणू शकतो. मुलवतन,सूक्ष्मवतन, स्थूलवतन हे ही संगम मध्येच
येतात ना.बाबा समजावतात जुनी दुनिया आणि नव्या दुनियेचा हा संगम आहे.बोलवतातही-हे
पतित पावन ये.पावन दुनिया आहे नवी दुनिया आणि पतीत दुनिया आहे जुनी दुनिया.हेसुद्धा
तुम्ही जाणता बेहद च्या पित्याचाही अभिनय आहे.निर्माता,दिग्दर्शक आहे ना. सर्वजण
त्याला मानतात तर अवश्य त्याचे काहीतरी कर्तव्य असेल ना!त्यांना मनुष्य म्हटले जात
नाही,त्यांना तर शरीरही नाही.बाकी सर्वांना मनुष्य किंवा देवता असे
म्हणतात.शिवबाबांना तर न देवता, न मनुष्य म्हणू शकतो,कारण की त्यांना शरीरच नाही.हे
तर तात्पुरते घेतले आहे. स्वतः म्हणतात गोड-गोड मुलांनो मी शरीरा शिवाय राजयोग कसा
शिकवणार!मला मनुष्याने दगड-धोंड्या मध्ये आहे असे म्हटले आहे,परंतु आता तर तुम्ही
मुले समजत आहात मी कसा येतो!आता तुम्ही राजयोग शिकत आहात.कुणी मनुष्य तर शिकवू शकत
नाही.देवतांनी सतयुगी राज्य कसे घेतले?अवश्य पुरुषोत्तम संगमयुगावर राजयोग शिकले
असतील.तर हे स्मरण करुन आता तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे.आम्ही आता 84
चे चक्र पूर्ण केले आहे. बाबा कल्प-कल्प येतात.बाबा स्वतः म्हणतात हा खूप जन्मांच्या
अंताचा जन्म आहे.श्रीकृष्ण जो सतयुगाचा राजकुमार होता,तोच नंतर 84 चे चक्र
लावतो.तुम्ही शिवाचे तर 84 जन्म सांगणार नाही.तुमच्या मध्येही क्रमवार पुरुषार्थ
नुसार जाणत आहेत. माया खूप कडक आहे, कोणालाही सोडत नाही.हे बाबा चांगल्या प्रकारे
जाणतात.असे समजू नका की बाबा अंतर्यामी आहेत.नाही,सर्वांच्या वागण्यावरून
जाणतात.समाचार येतात-माया एकदम कच्चे पोटामध्ये टाकून देते.अशा खूप गोष्टी तुम्हा
मुलांना माहित पडत नाहीत,बाबांना तर सर्व माहित पडते.नंतर मनुष्य समजतात बाबा
अंतर्यामी आहेत. बाबा म्हणतात मी अंतर्यामी नाही.प्रत्येकाच्या वागण्यावरून सर्व
माहित पडते.खुपच छी-छी वागतात.बाबा मुलांना खबरदार करतात.माये पासून सांभाळायचे
आहे.माया अशी आहे कोणत्या ना कोणत्या रूपाने एकदम खाऊन टाकते.तरीही बाबा समजावतात
तेही बुद्धीमध्ये बसत नाही म्हणून मुलांनी खूप खबरदार राहायचे आहे.काम महाशत्रू
आहे.माहीतही पडत नाही की आम्ही विकारामध्ये गेलो आहे,असेही होते म्हणूनच बाबा
म्हणतात काहीही चूक इ.झाली तर स्पष्टपणे सांगा,लपवू नका. नाहीतर शंभर पटीने पाप
होईल, जे मनामध्ये खात राहते.एकदम खाली घसरतात.खऱ्या बाबांसोबत बिलकुल खरे असले
पाहिजे,नाहीतर खूप नुकसान होते.यावेळी माया खूप कडक आहे.ही रावणाची दुनिया आहे.
आम्ही या जुन्या दुनियेची आठवण का करू!आम्ही तर नव्या दुनियेची आठवण करणार आहे,जिथे
आता जात आहोत. पिता नवे घर बनवत असेल तर मुले समजतात ना आमच्यासाठी नवे घर बनत
आहे.खुशी राहते. ही बेहद ची गोष्ट आहे. आमच्यासाठी नवी दुनिया स्वर्ग बनत
आहे.स्वर्गा मध्ये अवश्य राहण्यासाठी घरे ही असतील. आम्ही आता नव्या दुनियेमध्ये
जाणार आहे.जेवढी बाबांची आठवण करू तेवढे सुंदर फुल बनू.आम्ही विकाराच्या वशीभूत
होऊन काटे बनलो होतो.बाबा जाणतात माया कच्चांना तर एकदम खाऊन टाकते.तुम्ही समजता जे
येत नाहीत ते तर मायेच्या वश झाले आहेत ना! बाबांच्या जवळ तर येतच नाहीत.अशाप्रकारे
माया खूप जणांना खाऊन टाकते.खूप चांगले-चांगले म्हणतात आम्ही असे करू,आम्ही हे
करू,आम्ही तर यज्ञासाठी प्राण देण्यासाठी तयार आहोत.ते आज नाहीत. तुमची लढाई माये
सोबत आहे. दुनियेमध्ये माये सोबत लढाई कशी होते,हे कोणीही जाणत नाही.आता तुम्हा
मुलांना बाबांनी ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे, ज्याद्वारे तुम्ही अंधारातून
प्रकाशा मध्ये आले आहात.आत्म्यालाच हा ज्ञान नेत्र देतात तेव्हा बाबा म्हणतात
स्वतःला तुम्ही आत्मा समजा.बेहद च्या पित्याची आठवण करा.भक्ती मध्ये ही तुम्ही आठवण
करत होता ना. म्हणत ही होता तुम्ही आल्यानंतर आम्ही बळी,जाऊ.कसे बलिहार जाणार!हे
थोडेच जाणत होतो.तुम्ही आता समजत आहात, जसे आम्ही आत्मा आहोत तसे बाबाही आत्माच
आहेत. बाबांचा आहे अलौकिक जन्म. तुम्हा मुलांना कसे चांगल्या रितीने शिकवत
आहेत!स्वतः म्हणतात हा तर तोच बाबा आहे, जो कल्प- कल्प आमचा पिता बनतो.आम्ही ही
बाबा-बाबा म्हणतो,बाबा ही मुलांनो-मुलांनो म्हणतात.तेच शिक्षकाच्या रूपामध्ये
राजयोग शिकवत आहेत.दुसरे तर कुणी राजयोग शिकवू शकत नाही. तुम्हाला विश्वाचे मालक
बनवत आहेत,तर अशा बाबांचे बनुन नंतर त्या शिक्षकाची शिकवण ही घ्यायला पाहिजे ना.खुशी
मध्ये मन भरून आले पाहिजे.जर छी-छी बनले तर ती खुशी होणार नाही.भले कितीही प्रयत्न
करा परंतु जसे की तो आमचा जात वाला भाऊ नाही.इथे मनुष्यांची किती आडनावे असतात.तुमचे
आडनाव पहा किती मोठे आहे! हा तर आहे मोठ्यात मोठा ग्रेट- ग्रेट ग्रँड फादर
ब्रह्मा(आजोबांचे ही आजोबा).त्यांना कोणीही जाणत नाही.शिवबाबांना तर सर्वव्यापी
म्हटले आहे.ब्रह्मा बद्दलही कोणाला माहित पडत नाही.ब्रह्मा-विष्णू-शंकराचे चित्रही
आहेत.ब्रह्माला सूक्ष्मवतन मध्ये घेऊन गेले आहेत.जीवनचरित्र काहीच जाणत
नाहीत.सूक्ष्मवतन मध्ये ब्रह्मा दाखवतात नंतर प्रजापिता ब्रह्मा कुठून येणार! तिथे
मुलांना दत्तक घेतील का! कोणालाही माहीत नाही. प्रजापिता ब्रह्मा असे म्हणतात परंतु
त्यांच्या जीवन चरित्राला जाणत नाहीत.बाबांनी समजावले आहे, हा माझा रथ आहे.अनेक
जन्मांच्या अंता मध्ये मी याचा आधार घेतला आहे.हे पुरुषोत्तम संगमयुग गीतेचा
एपिसोड(भाग) आहे.पवित्रताच मुख्य आहे. पतिता पासून पावन कसे बनायचे आहे,हे
दुनियेमध्ये कोणालाही माहित नाही.साधुसंत इ.कधीही असे म्हणत नाहीत की देहा सहित
सर्वांना विसरा.एक बाबांची आठवण करा तर मायेचे पाप कर्म सर्व भस्म होऊन जातील.कोणी
गुरु असे कधीही म्हणणार नाही.
बाबा समजावतात-हा ब्रह्मा कसा बनतो?लहानपणी खेड्यामधला मुलगा होता.सुरुवातीपासून
शेवटपर्यंत,84 जन्म घेतले आहेत.तर नवी दुनियाच नंतर जुनी होऊन जाते.आता तुम्हा
मुलांच्या बुद्धि चे कुलूप उघडले आहे.तुम्ही समजू शकता,धारणा करू शकता.तुम्ही आता
बुद्धिमान बनले आहात.अगोदर बुद्धिहीन होते.हे लक्ष्मी-नारायण बुद्धिवान आहेत आणि इथे
बुद्धिहीन आहेत.समोर पहा हे स्वर्गाचे मालक आहेत ना.कृष्ण स्वर्गाचा मालक होता नंतर
गावामधला मुलगा बनला आहे. तुम्हा मुलांना हे धारण करून नंतर पवित्र ही अवश्य बनायचे
आहे.पवित्रतेची गोष्ट मुख्य आहे. लिहितात-बाबा,मायेने आम्हाला हरवले.डोळे खराब
बनले.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा. बस आता तर घरी जायचे आहे. बाबांची आठवण
करायची आहे. थोड्यावेळासाठी,शरीर निर्वाहासाठी कर्म करून नंतर आम्ही निघून जात
आहे.या जुन्या दुनियेच्या विनाशासाठी लढाईही सुरू होत आहे.हे सुद्धा तुम्ही
पहाल-लढाई कशी सुरू होत आहे?बुद्धीने समजत आहात आम्ही देवता बनत आहे, तर आम्हाला नवी
दुनिया ही पाहिजे म्हणूनच विनाश अवश्य होईल. आम्ही आपली नवी दुनिया श्रीमतावर
स्थापन करत आहे.
बाबा म्हणतात-मी तुमच्या सेवेमध्ये उपस्थित होतो.तुम्ही मागणी केली आहे की आम्हा
पतीतांना येऊन पावन बनवा,तर तुमच्या म्हणण्यानुसार मी आलो आहे,तुम्हाला खूप सहज
रस्ता सांगत आहे.मनमनाभव. भगवानुवाच आहे ना फक्त कृष्णाचे नाव दिले आहे.बाबांच्या
नंतर आहे कृष्ण. हा परमधाम चा मालक,तो विश्वाचा मालक.सूक्ष्मवतन मध्ये तर काही होत
नाही.सर्वात पहिला नंबर आहे श्रीकृष्ण,ज्यांना खूप प्रेम करतात.बाकी तर पाठीमागून
आले आहेत. स्वर्गामध्ये तर सर्व जाऊ शकत नाहीत.तर गोड-गोड मुलांना मनापासून खुशी
राहिली पाहिजे. वरवरची खुशी चालू शकत नाही. बाहेरून वेगवेगळ्या प्रकारची मुले
बाबांकडे येत होते,कधी पवित्र राहत नाहीत.बाबा समजावत होते विकारांमध्ये जाता तर मग
येताच कशाला!म्हणायचे-काय करू,राहू शकत नाही.रोज येतो, माहित नाही केव्हा कधी कसा
ज्ञनबाण लागेल.तुमच्या शिवाय सदगती कोण करणार.येऊन बसत होते.माया खूप बलशाली
आहे.निश्चयही होतो-बाबा आम्हाला पतिता पासून पावन स्वच्छ बनवत आहेत.परंतु काय
करू,तरीही खरे बोलत होता- आता अवश्य तो सुधारला असेल. त्याला हा निश्चय
होता-यांच्याद्वारेच आम्ही सुधारणार आहोत.
यावेळी किती कलाकार आहेत. एकाचा चेहरा दुसऱ्या सारखा नाही. नंतर कल्पा नंतरही या
चेहऱ्याने अभिनय पुनरावृत्त करतील. आत्मे तर सर्व फिक्स आहेत ना. सर्व कलाकार एकदम
अचूक अभिनय करत आहेत.काहीही फरक होऊ शकत नाही.सर्व आत्मा अविनाशी आहेत.
त्यांच्यामध्ये भूमीका सुद्धा अविनाशी नोंदली आहे.किती समजण्याच्या गोष्टी आहेत.किती
समजावतात तरीही विसरून जातात.समजू शकत नाहीत.हे सुद्धा नाटकामध्ये होणार आहे.
प्रत्येक कल्पाला राजाई तर स्थापन होतच आहे.सतयुगामध्ये थोडेच येतात-ते सुद्धा
क्रमवार. इथे क्रमवार आहेत ना.एकाचा अभिनय एकालाच माहित,दुसरा कोणी जाणू शकत
नाही.अच्छा!
गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. खऱ्या
बाबांसोबत सदैव खरे राहायचे आहे.बाबांवर पूर्णपणे बलिहार जायचे आहे.
2. ज्ञानाला धारण करून बुद्धिवान बनायचे आहे. मनापासून खुश राहायचे आहे.कोणतेही
कर्म श्रीमताच्या विरुद्ध करून खुशी गमावयाची नाही.
वरदान:-
ज्ञानाच्या
रहस्ययुक्त गोष्टींना ऐकून त्यांना स्वरूपामध्ये आणणारे ज्ञानी तू आत्मा भव
ज्ञानी तू आत्मे
प्रत्येक गोष्टीच्या स्वरूपाचा अनुभव करतात. ज्याप्रमाणे ऐकायला चांगले वाटते,
रहस्ययुक्त पण वाटते परंतु ऐकण्याच्या सोबत सामावणे म्हणजेच स्वरूप बनणे-याचाही
अभ्यास असायला पाहिजे.मी आत्मा निराकार आहे-हे अनेकवेळा ऐकता परंतु निराकारी
स्थितीचे अनुभवी बनुन ऐका. जसा पॉईंट तसा अनुभव.यामुळे शुद्ध संकल्पांचा खजाना जमा
होत जाईल आणि बुद्धी या मध्येच व्यस्त असेल तर व्यर्थ संकल्पा पासून सहज किनारा
होऊन जाईल.
बोधवाक्य:-
ज्ञान किंवा
अनुभवाच्या दुहेरी अधिकारीच मस्त फकीर रमणिक योगी आहेत.