30-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुमची आठवणीची यात्रा बिलकुल गुप्त आहे,तुम्ही मुले आता मुक्तिधाम मध्ये
जाण्याची यात्रा करत आहात."
प्रश्न:-
स्थूलवतन वासी
पासून सूक्ष्मवतन वासी फरिश्ता बनण्याचा पुरुषार्थ कोणता आहे?
उत्तर:-
सूक्ष्मवतनवासी फरिश्ता बनायचे असेल तर आत्मिक सेवेमध्ये आपली हाडे पण स्वाहा
करा.हाडे स्वाहा केल्याविना फरिश्ता बनू शकत नाही कारण की फरिश्ते बिगर हाडा-मासांचे
असतात.या बेहद च्या सेवेमध्ये दधिची ऋषी प्रमाणे हाडे लावायची आहेत,तेव्हाच व्यक्त
पासून अव्यक्त बनाल.
गीत:-
हे आत्म्यांनो
धैर्य धरा..
ओम शांती।
मुलांना या गीताद्वारे इशारा मिळाला आहे की धैर्य ठेवा.मुले जाणतात आम्ही श्रीमतावर
पुरुषार्थ करत आहोत आणि जाणत आहेत की आम्ही या गुप्त योगाच्या यात्रेवर आहोत.ती
यात्रा आपल्या वेळेवर पूर्ण होते.मुख्य आहे ही यात्रा,ज्याला तुमच्याशिवाय इतर
कोणीही जाणत नाही.यात्रेवर अवश्य जायचे आहे आणि घेऊन जाणारा पंडा ही असायला
पाहिजे.याचे नाव पांडव सेना ठेवले आहे.आता यात्रेवर आहेत.स्थूल लढाईची गोष्टच
नाही.प्रत्येक गोष्ट गुप्त आहे.यात्रा सुद्धा मोठी गुप्त आहे, ग्रंथा मध्ये ही
आहे,बाबा म्हणतात माझी आठवण करा तर माझ्या जवळ येऊन पोहचाल.ही तर यात्रा आहे ना.बाबा
सर्व ग्रंथाचे सार सांगत आहेत. प्रत्यक्ष कृतीमध्ये आणत आहेत. आम्हा आत्म्यांना
आपल्या निर्वाण धाम मध्ये यात्रेवर जायचे आहे.विचार केला तर समजू शकता.ही आहे
मुक्तिधाम ची खरी यात्रा.मुक्तिधाम मध्ये जावे असे सर्वांना वाटते.यात्रा करण्यासाठी
कोणीतरी मुक्तिधामचा रस्ता सांगावा.परंतु बाबा तर स्वतःच आपल्या वेळेवर
येतात,ज्यावेळेला कोणीही जाणत नाही.बाबा येऊन समजावतात तेंव्हा मुलांना निश्चय
होतो.बरोबर ही खरी यात्रा आहे ज्याचे गायन आहे.भगवानाने ही यात्रा शिकवली
होती.मनमनाभव, मध्याजी भव.ही अक्षरे सुद्धा तुमच्या खुप कामाची आहेत. फक्त कोणी
सांगितले?ही चूक केली आहे.म्हणतात देहासहित देहाच्या संबंधांना विसरून जा.
यांना(ब्रह्मा बाबानां)ही देह आहे. यांना सुद्धा समजावणारा दुसरा आहे,ज्याला स्वतःचा
देह नाही तो विचित्र पिता आहे,त्यांना कोणतेही चित्र नाही,इतर सर्वांचे चित्र
आहेत.सारी दुनिया चित्रशाळा आहे.विचित्र आणि चित्र अर्थात जीव आणि आत्म्याचे हे
मनुष्य स्वरूप बनले आहे.तर तो पिता आहे विचित्र. समजावतात मला या चित्राचा आधार
घ्यावा लागतो.बरोबर शास्त्रांमध्ये आहे भगवानांनी सांगितले होते जेव्हा कि महाभारत
युद्ध ही चालू होते.राजयोग शिकत होते अवश्य राजाई स्थापन झाली होती.ते
लक्ष्मी-नारायणाचे राज्य स्थापन झाले होते.आता तुमच्या बुद्धी मध्ये आहे-सतयुग
होते,आता कलियुग आहे.नंतर बाबा त्याच गोष्टी समजावत आहेत.असे तर कोणी म्हणू शकत नाही
की मी परमधाम मधून आलो आहे तुम्हाला परत घेऊन जाण्यासाठी. परमपिता परमात्मा ब्रह्मा
द्वारे म्हणू शकतात,दुसऱ्या कोणाच्या द्वारे म्हणू शकत नाहीत.सूक्ष्म वतन मध्ये
आहेतच ब्रह्मा-विष्णु- शंकर.ब्रह्मा साठी ही समजावले आहे की तो आहे अव्यक्त ब्रह्मा
आणि हा आहे व्यक्त.तुम्ही आता फरिश्ता बनत आहात.फरिश्ते स्थूलवतन मध्ये नसतात.
फरिश्त्यांना हाडे मांस नसतात. इथे या आत्मिक सेवेमध्ये हाडे इ. सर्व नष्ट करतात
नंतर फरिश्ता बनून जातात.आता तर हाडे आहेत ना.हे सुद्धा लिहिले आहे- आपली हाडे
सुद्धा सेवेमध्ये देऊन टाकली.म्हणजे आपली हाडे सुद्धा नष्ट करून टाकतात.स्थूल वतन
पासून सूक्ष्मवतनवासी बनायचे आहे.इथे आम्ही हाडे देऊन सूक्ष्म बनतो.या सेवेमध्ये
सर्व स्वाहा करायचे आहे.मनुष्य तर सर्व काळाचे शिकार होऊन जातील.तुमच्यामध्ये जे
महावीर आहेत ते तर अडोल राहतील. बाकी काय-काय होत राहील! विनाशाचे दृश्य तर होणारच
आहेत ना.अर्जुनाला विनाशाचा साक्षात्कार झाला.एका अर्जूनाची गोष्ट नाही.तुम्हा
मुलांना विनाश आणि स्थापनेचा साक्षात्कार होत आहे.सुरुवातीला बाबांनाही विनाशाचा
साक्षात्कार झाला. त्यावेळी ज्ञान तर काहीच नव्हते. पाहिले सृष्टीचा विनाश होत आहे.
नंतर चतुर्भुज चा साक्षात्कार झाला.समजू लागले हे तर चांगले आहे.विनाशा नंतर आम्ही
विश्वाचे मालक बनत आहोत,तर खुशी झाली.दुनियेला हे माहित नाही की विनाश तर चांगला आहे.
शांतीसाठी प्रयत्न करतात परंतु शेवटी विनाश तर होणारच आहे. आठवण करतात पतित-पावन
ये, तर बाबा अवश्य येऊन पावन दुनिया स्थापन करतील,ज्यामध्ये आम्ही राज्य करणार
आहोत.हे तर चांगले आहे ना.पतित-पावन ची आठवण का करतात?कारण की दुःख आहे.पावन
दुनियेमध्ये देवता आहेत,पतीत दुनियेमध्ये तर देवतांचे पाय येऊ शकत नाहीत.तर अवश्य
पतीत दुनियेचा विनाश व्हायला पाहिजे. महाविनाश झाला असे गायनही आहे.त्यानंतर काय
होते?एक धर्माची स्थापना ती ही अशा प्रकारेच होईल ना.इथूनच राजयोग शिकतील.विनाश
होईल बाकी भारतामध्ये कोण वाचेल? जे राजयोग शिकतात,ज्ञान देतात तेच वाचतील.विनाश तर
सर्वांचा होणार आहे,यामध्ये घाबरण्याची गरज नाही.पतित-पावन ला बोलवतात जेव्हा तो
येतो तेव्हा खुशी व्हायला पाहिजे ना.बाबा म्हणतात विकारांमध्ये जाऊ नका.या
विकारांवर विजय मिळवा किंवा दान द्या तर ग्रहण सुटेल.भारताचे ग्रहण अवश्य
सुटते.काळ्यापासून गोरा बनायचे आहे.सतयुगामध्ये पवित्र देवता होते,ते अवश्य इथे बनले
असतील.
तुम्ही जाणत आहात आम्ही श्रीमतावर निर्विकारी बनत आहे.भगवानुवाच,हे गुप्त आहे.
श्रीमतावर चालून तुम्ही बादशाही प्राप्त करता.बाबा म्हणतात तुम्हाला नरापासून
नारायण बनायचे आहे.सेकंदामध्ये राजाई मिळू शकते.सुरुवातीला मुली चार 4-5 दिवसही
स्वर्गामध्ये जाऊन राहत होत्या.शिवबाबा येऊन मुलांना स्वर्गाचाही साक्षात्कार करवत
होते.किती मान-शान नी देवता येत होते.तर मुलांना मनापासून वाटते बरोबर गुप्त
वेशामध्ये येणारा बाबा आम्हाला समजावत आहे.ब्रह्मा तना मध्ये येतात.ब्रह्माला शरीर
तर इथे पाहिजे ना.प्रजापिता ब्रह्मा द्वारे स्थापना.बाबांनी समजावले आहे- कुणीही आले
तर त्यांना विचारा कोणाजवळ आले आहात?बी.के. जवळ.अच्छा ब्रह्माचे नाव कधी ऐकले
आहे?प्रजापिता तर आहे ना.आम्ही सर्व त्यांचे येऊन बनलो आहे.अवश्य अगोदर ही बनलो
होतो.ब्रह्मा द्वारे स्थापना तर सोबत ब्राह्मणही असायला पाहिजे.बाबा ब्रह्मा द्वारे
कोणाला समजावत आहेत?शूद्रांना तर समजावणार नाहीत.हे आहेत ब्रह्मा मुख वंशावली
ब्राह्मण,शिव बाबांनी ब्रह्मा द्वारे आम्हाला आपले बनवले आहे.ब्रह्माकुमार- कुमारी
भरपूर आहेत,किती सेंटर आहेत.सगळीकडे ब्रह्माकुमारी शिकवत आहेत.इथे आम्हाला आजोबांचा
वारसा मिळत आहे.भगवानुवाच, तुम्हाला राजयोग शिकवत आहे. तो निराकार असल्याकारणाने
यांच्या शरीराचा आधार घेऊन आम्हाला ज्ञान ऐकवत आहेत. प्रजापिताची तर सर्व मुले
असतील ना!आम्ही आहोत प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. शिवबाबा आजोबा आहेत.त्यांनी
दत्तक घेतले आहे.तुम्ही जाणत आहात आम्ही ब्रह्मा द्वारे आजोबांकडून शिकत आहोत.हे
लक्ष्मी-नारायण दोघे स्वर्गाचे मालक आहेत ना.भगवान तर एक उंच ते उंच निराकार आहेत.
मुलांमध्ये धारणा खूप चांगल्याप्रकारे असायला पाहिजे. प्रथम समजावून सांगा भक्ती
मार्गामध्ये दोन पिता आहेत.स्वर्गा मध्ये आहे एक पिता.पारलौकिक पित्या द्वारे
विश्वाची बादशाही मिळाली मग आठवण का करतील.दुःखच नाही ज्यामुळे आठवण करावी
लागेल.गातात दुखहर्ता सुखकर्ता.ती आत्ताची गोष्ट आहे.जे घडून जाते त्याचे गायन
होते.महिमा एकाची आहे. तो एक पिताच येऊन पतीतांना पावन बनवत आहे.मनुष्य थोडीच
समजतात.ते तर पाठीमागच्या कथा बसून लिहितात.तुम्ही आता समजत आहात-बरोबर बाबांनी
राजयोग शिकवला,ज्यामुळे बादशाही मिळाली.84 चे चक्र पूर्ण केले.आता आम्ही शिकत
आहोत,नंतर 21 जन्म राज्य करू.असे देवता बनू.असे कल्पा पूर्वी बनलो होतो.समजत आहात
आम्ही पूर्ण 84 जन्मांचे चक्र पूर्ण केले आहे.आता नंतर सतयुग त्रेता मध्ये जाऊ
म्हणून तर बाबा विचारतात अगोदर किती वेळा भेटले आहात?ही प्रत्यक्ष गोष्ट आहे
ना!नवीन कोणी ऐकले तर समजतील अवश्य 84 चे चक्र आहे.जे सुरुवातीचे असतील त्यांचे
चक्र पूर्ण झाले असेल. बुद्धीने विचार करायचा आहे.या घरामध्ये याच ड्रेस मध्ये बाबा
आम्ही तुम्हाला अनेक वेळा भेटलो आहे आणि भेटत राहू. पतिता पासून पावन,पावन पासून
पतित होतच आलो आहे. कोणतीही गोष्ट सदैव नवीनच राहावी,हे तर होऊ शकत नाही. जुनी
अवश्य बनते.प्रत्येक वस्तू सतो-रजो-तमो मधे येते.आता तुम्ही मुले जाणत आहात नवी
दुनिया येत आहे.त्याला स्वर्ग म्हटले जाते.हा नर्क आहे.ती पावन दुनिया आहे.अनेकजण
बोलावतात-हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनव कारण की दुःख वाढत चालले आहे.परंतु हे
समजत नाहीत की आम्हीच पूज्य होतो नंतर पुजारी बनलो आहे. द्वापर मध्ये पुजारी
बनलो.अनेक धर्म होत गेले.बरोबर पतिता पासून पावन,पावन पासून पतित होत आले
आहेत.भारतावरच सर्व खेळ आधारीत आहे.
तुम्हा मुलांना आता स्मृती आली आहे,आता तुम्ही शिवजयंती साजरी करता.बाकी इतर कोणी
शिवाला जाणतच नाही.आम्ही जाणत आहे.बरोबर आम्हाला राजयोग शिकवत आहे.ब्रह्मा द्वारे
स्वर्गाची स्थापना होत आहे. अवश्य जे योग शिकतील, स्थापना करतील तेच नंतर राज्य-
भाग्य प्राप्त करतील.आम्ही म्हणतो बरोबर आम्ही कल्प-कल्प बाबांकडून हा राजयोग शिकलो
आहे.बाबांनी समजावले आहे-आता हे 84 जन्मांचे चक्र पूर्ण होत आहे.नंतर नवे चक्र सुरू
होणार आहे. चक्राला तर जाणायला पाहिजे ना.जरी हे चित्रं नसतील तरीही तुम्ही समजावू
शकता.ही तर खूपच सहज गोष्ट आहे.बरोबर भारत स्वर्ग होता,आता नर्क आहे. फक्त ते लोक
समजतात कलियुग अजून लहान बाळ आहे.तुम्ही म्हणता-हा तर कलियुगाचा अंत आहे.चक्र पूर्ण
होत आहे.बाबा समजावतात मी येतो पतित दुनियेला पावन बनवण्यासाठी. तुम्ही जाणत आहात
आम्हाला पावन दुनियेमध्ये जायचे आहे. तुम्ही मुक्ती,जीवन मुक्तिधाम,
शांतीधाम,सुखधाम आणि दुःखधाम लाही समजत आहात. परंतु भाग्यात नसेल तर हा विचार करत
नाहीत की आम्हाला सतयुगामध्ये जायचे आहे.बरोबर आम्हा आत्म्यांचे घर ते शांतीधाम
आहे.तिथे आत्म्याला कर्मइंद्रिय नसल्यामुळे काहीच बोलत नाही. तिथे सर्वांना शांती
मिळते.सतयुगामध्ये एक धर्म आहे.हे अनादी,अविनाशी सृष्टी नाटक आहे जे चक्र लावतच
राहते.आत्मा कधी विनाश होत नाही.शांतीधाम मध्येही थोडावेळ थांबायलाच लागते.या खूप
समजण्याच्या गोष्टी आहेत. कलियुग आहे दुःख धाम.किती अनेक धर्म आहेत,किती हंगामा
आहे.जेव्हा बिलकुल दुःखधाम होते तेव्हाच बाबा येतात.दुःखधामा नंतर आहे पूर्ण
सुखधाम.शांतीधाम मधून आम्ही सुखधाम मध्ये येतो,नंतर दुःख धाम बनते.सतयुगामध्ये
संपूर्ण निर्विकारी इथे संपूर्ण विकारी आहेत.हे समजावणे तर खूप सहज आहे ना.हिम्मत
पाहिजे. कुठेही जाऊन समजावून सांगा.हे सुद्धा लिहिले आहे-हनुमान सत्संगामध्ये
पाठीमागे चपला मध्ये जाऊन बसत होता.तर जे महावीर असतील ते कुठेही जाऊन युक्तीने
ऐकतात,पाहतात काय बोलत आहेत.तुम्ही त्यांचे कल्याण करण्यासाठी,ड्रेस बदलून कुठेही
जाऊ शकता. बाबासुद्धा गुप्त वेशामध्ये तुमचे कल्याण करत आहेत ना. मंदिरांमध्येही
कुठे निमंत्रण मिळाले तर जाऊन समजावायला पाहिजे.दिवसेंदिवस तुम्ही हुशार होत
आहात.सर्वांना बाबांचा परिचय तर द्यायचाच आहे,प्रयत्न करायचा आहे.हे तर गायले आहे,
शेवटी संन्याशी,राजे इ.येतील. राजा जनकाला सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळाली.नंतर तो
त्रेता मध्ये जाऊन अनुजनक बनला.अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. अंतिम
विनाशाचे दृश्य पाहण्यासाठी आपली स्थिती महावीरा सारखी निर्भय,अडोल बनवायची
आहे.गुप्त आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे.
2. अव्यक्त वतनवासी फरिश्ता बनण्यासाठी बेहद सेवेमध्ये दधिची ऋषी प्रमाणे आपली हाडे
स्वाहा करायची आहेत.
वरदान:-
एकांत आणि
अंतर्मुखतेच्या अभ्यासाद्वारे स्वतःला अनुभवांनी संपन्न बनवणारे मायाजीत भव
नॉलेजफुल(ज्ञानी)च्या
सोबत पावरफुल(शक्तिशाली)अर्थात अनुभवी मुर्त बनण्यासाठी एकांतवासी अंतर्मुखी बना.
डगमग होण्याचे कारण आहे अनुभवाची कमी म्हणून फक्त समजणे,समजावणारे किंवा मनन मुर्त
बनू नका.एकांतवासी बनून प्रत्येक मुद्द्याचे अनुभवी बना तर कोणत्याही प्रकारच्या
धोक्यापासून,दुःख किंवा दुविधे पासून वाचाल.कोणाचा मुलगा आहे,प्राप्ती काय आहे-या
पहिल्या पाठाचा अनुभव केला तर मायाजीत सहजच होऊन जाल.
बोधवाक्य:-
जबाबदारी
सांभाळत असतानाही डबल हलके राहणारेच बाबांचे जवळचे रत्न आहेत.