23-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, पावलोपावली श्रीमतावर चालत राहा, ही ब्रह्माची मत आहे कां शिवबाबाची,
यामध्ये गोंधळून जाऊ नका.
प्रश्न:-
चांगली बुद्धी
असणारी मुले कोणती गोष्ट सहजच समजू शकतात?
उत्तर:-
ब्रह्मा बाबा समजावत आहेत कां शिवबाबा ही गोष्ट चांगली बुद्धी असणारी मुले सहज समजू
शकतात. कांहीजण तर यामध्येच गोंधळून जातात. बाबा म्हणतात मुलांनो, बापदादा दोघे
एकत्र आहेत, तुम्ही गोंधळू नका. श्रीमत समजून चालत राहा. ब्रह्मानी दिलेल्या मताचे
जबाबदार पण शिवबाबा आहेत.
ओम शांती।
आत्मिक पिता मुलांना समजावत आहेत, तुम्हीं समजत आहात, आम्ही ब्राह्मण च आत्मिक
पित्याला ओळखत आहोत. दुनिये मध्ये कोणी पण मनुष्य मात्र आत्मिक पिता, ज्याला
ईश्वरीय पिता किंवा परमपिता परमात्मा म्हणतात, त्यांना ओळखत नाहीत. जे़व्हा ते
आत्मिक पिता येतात, तेंव्हाच आत्मिक मुलांना परिचय देतात. हे ज्ञान सृष्टीच्या
सुरुवातीला नव्हते, ना सृष्टीच्या अंताला राहते. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे. हे
सृष्टीचा अंत आणि सुरुवातीचे संगमयुग आहे. या संगमयुगा ला पण ओळखत नाहीत, तर बाबाला
कसे ओळखू शकतील. म्हणतात, हे पतित-पावन या, येऊन पावन बनवा, परंतु हे माहित नाही
कि, पतित-पावन कोण आहेत, आणि ते कधी येतात. बाबा म्हणतात, मी जो आहे, जसा आहे, मला
कोणीही ओळखत नाहीत. जेंव्हा मी येऊन ओळख देतो, तेंव्हा मला जाणतात, मी स्वतःचा आणि
सृष्टीच्या आदि, मध्य, अंता चा परिचय संगमयुगावर एकदाच येऊन देत आहे. कल्पा नंतर
परत येतो. तुम्हाला जे सांगत आहे, ते मग प्राय:लोप होते. सतयुगा पासून कलियुगा च्या
अंता पर्यंत कोणी पण मनुष्यमात्र, मज परमपिता परमात्माला ओळखत नाहीत. ना ब्रह्मा,
विष्णू, शंकर ला ओळखतात. मला मनुष्यच बोलावतात. ब्रह्मा, विष्णू, शंकर थोडेच
बोलावतात. मनुष्य दुःखी होतात, तेंव्हा बोलावतात. सूक्ष्मवतन ची तर गोष्टच नाही.
आत्मिक पिता येऊन, आपल्या आत्मिक मुलांना म्हणजे आत्म्यांना बसून सांगत आहेत. बरें,
आत्मिक पित्याचे नांव काय आहे? बाबा ज्यांना म्हटले जाते, जरूर कांही नाव असेल ना.
बरोबर नाव शिव एकच गातात. हे प्रसिद्ध नाव आहे, परंतु मनुष्यांनी अनेक नांवे ठेवली
आहेत. भक्ती मार्गा मध्ये, स्वतःच्याच बुद्धीने हे लिंग रूप बनविले आहे. तरी पण शिव
च नांव आहे. बाबा म्हणतात, मी एकदाच येतो, येऊन मुक्ती, जीवनमुक्ती चा वरसा देतो.
मनुष्य जरी नांव घेतात, मुक्तिधाम, निर्वाणधाम, परंतु जाणत काहीच नाहीत. ना बाबाला
जाणतात, ना देवतांना. हे कोणाला पण माहित नाही कि, बाबा भारता मध्ये येऊन, कशी
राजधानी स्थापन करत आहेत. शास्त्रां मध्ये पण कोणती अशी गोष्ट नाही कि, परमपिता
परमात्मा कसे येऊन, आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहेत. असे नाही,
सतयुगा मध्ये देवतांना हे ज्ञान होते, जे मग नष्ट झाले. नाही. जर देवतां मध्ये हे
ज्ञान असते, तर चालत आले असते. इस्लामी, बौद्धी इत्यादी जे पण आहेत, त्यांचे ज्ञान
चालत आले आहे. सर्व जाणत आहेत, हे ज्ञान प्राय:लोप होऊन जाते. मी जेंव्हा येतो, तर
जे आत्मे पतित बनून, राज्य घालवून बसली आहेत, त्यांना येऊन मग पावन बनवित आहे. भारता
मध्ये राज्य होते, मग घालवले कसे, हे पण कोणाला माहित नाही. त्यामुळे बाबा म्हणतात,
मुलांची किती तुच्छ बुद्धी झाली आहे. मी मुलांना, हे ज्ञान देऊन, प्रारब्ध देत आहे.
मग सर्व विसरून जातात. कसे बाबा आले, कसे मुलांना शिक्षण दिले, हे सर्व विसरून
जातात. हे पण विश्व नाटका मध्ये नोंदलेले आहे. मुलांना विचार सागर मंथन करण्याची
चांगली बुद्धी पाहिजे.
बाबा सांगत आहेत, जे शास्त्र इत्यादी तुम्हीं वाचत आले आहात. ते सतयुग त्रेतामध्ये
वाचत नाहीत. तिथे ते नव्हतेच. तुम्हीं हे ज्ञान विसरून गेले आहात, मग गीता इत्यादी
शास्त्र कुठून आले? ज्यांनी गीता ऐकून, हे पद प्राप्त केले, तेच ओळखत नाहीत, तर मग
इतर कसे ओळखू शकतील. देवता पण ओळखू शकत नाहीत. आम्हीं मनुष्या पासून देवता कसे बनू.
हा पुरुषार्थाचा अभिनय पण बंद झाला आहे. तुमची प्रालब्ध सुरू होते. तिथे हे ज्ञान
कसे असू शकते. बाबा म्हणतात, हे ज्ञान तुम्हाला परत मिळत आहे, कल्पापूर्वी प्रमाणे,
तुम्हाला राजयोग शिकवून प्रालब्ध दिली जाते. मग तिथे तर दुर्गती होत नाही. तर
ज्ञानाची गोष्ट पण निर्माण होत नाही. ज्ञान आहेच सद्गती प्राप्त करण्यासाठी. ते
देणारे एक बाबा आहेत. सद्गती आणि दुर्गती हे अक्षर येथून निघाले आहे. सद्गतीला
भारतवासीच प्राप्त करतात. समजतात कि,स्वर्गीय ईश्वरीय पित्याने, स्वर्ग निर्माण केला
होता. कधी निर्माण केला? हे कांही पण माहित नाही. शास्त्रां मध्ये लाखो वर्षे लिहीले
आहेत. बाबा म्हणतात, मुलांनों, तुम्हांला परत हे ज्ञान देत आहे, मग हे ज्ञान नष्ट
होऊन जाते, तर भक्ती सुरू होते. अर्धा कल्प ज्ञान आहे, अर्धा कल्प भक्ती आहे. हे पण
कोणी समजत नाहीत. सतयुगा चे आयुष्य पण लाखो वर्ष म्हणतात. तर माहित कसे पडेल. 5000
वर्षाची गोष्टच विसरून गेले आहेत, तर मग लाखो वर्षाची गोष्ट कसे समजू शकतील.
कांहीपण समजत नाहीत, बाबा किती सहज समजावत आहेत.कल्पाचे आयुष्य 5000 वर्ष आहे. युग
पण चार आहेत. चारी ची समान वेळ 1250 वर्षे आहे. ब्राह्मणांचे हे मधले युग आहे,त्या
चार युगापेक्षा खूप चांगल्या लहान आहे. तर बाबा वेगवेगळ्या पद्धतीने, नव- नवीन
मुद्दे सहज रीतीने, मुलांना समजावत राहतात. धारणा तुम्हांला करायची आहे.मेहनत
तुम्हाला करायची आहे. विश्व नाटकानुसार जे समजावत आलो आहे, तो अभिनय चालत आला आहे.
जे सांगायचे होते, ते आज सांगत आहे. ते ज्ञान बाहेर येत राहते. तुम्हीं ऐकत आले
आहात. तुम्हांलाच धारणा करायची आणि करवायची आहे. मला तर धारणा करायची नाही. तुम्हाला
सांगत आहे, धारणा करवित आहे. माझ्या आत्म्या मध्ये जो अभिनय आहे, पतितां ना पावन
करण्याचा. जे कल्पा पूर्वी समजावले होते, तेच बाहेर येत राहते. मी पहिल्या पासून
ओळखत नव्हतो कि, काय सांगायचे आहे. जरी यांची आत्मा, विचार सागर मंथन करते. हे
विचार सागर मंथन करून सांगतात, कां शिवबाबा सांगतात, ही मोठी गुह्य गोष्ट आहे.
यामध्ये चांगली बुद्धी पाहिजे. जे सेवे मध्ये तत्पर असतात, त्यांचाच विचार सागर
मंथन चालतो.
खरेंतर कन्या बंधन मुक्त आहेत. त्या आत्मिक शिक्षणा मध्ये लागल्या पाहिजेत, बंधन तर
कोणतेच नाही. कुमारी चांगल्या प्रकारे ज्ञान घेऊ शकतात, त्यांना शिकणे आणि शिकवायचे
आहे. त्यांना पैसे कमविण्याची गरज नाही. कुमारीने जर चांगल्या रीतीने हे ज्ञान घेतले,
तर सर्वात चांगले आहे. समजदार असेल, तर बसं, याच आत्मिक कमाई मध्ये लागेल. कांहीतरी
छंद म्हणून लौकिक शिक्षण घेतात. त्यांना सांगितले पाहिजे, यामध्ये काही फायदा नाही.
तुम्हीं हे आत्मिक शिक्षण घेऊन, सेवे मध्ये लागा. ते शिक्षण तर कांही कामाचे
नाही.शिकुन निघून जातात गृहस्थ व्यवहारा मध्ये. गृहस्थी माता बनून जातात. कन्याना
तर या ज्ञाना मध्ये चालले पाहिजे. पावलो पावली श्रीमता वर चालून, धारणा केली
पाहिजे.मम्मा सुरुवातीला आली, आणि मग याच शिक्षणा मध्ये लागली. किती तरी कन्या
निघून गेल्या आहेत. कुमारीला चांगली संधी आहे. श्रीमता वर चालाल, तंनं ल. ही श्रीमत
आहे कां ब्रह्माची मत आहे. यामध्येच गोंधळून जातात. तरी पण हा बाबाचा रथ आहे ना.
यांच्या कडून कांही चूक झाली, तुम्ही श्रीमता वर चालत राहा, तर ती आपोआप ठीक होईल.
श्रीमत मिळतेच ब्रह्मा बाबा द्वारे. नेहमी समजले पाहिजे, श्रीमत मिळत आहे, मग कांही
पण झाले, तरी जबाबदार शिवबाबा आहेत. यांच्या कडून कांही होऊन गेले, बाबा म्हणतात,
मी जबाबदार आहे. नाटका मध्ये हे रहस्य नोंदलेले आहे. त्यामध्ये पण सुधारणा होईल.
तरीपण बाबा आहेत ना. बाप दादा दोघे एकत्र आहेत, तर गोंधळून जातात. माहित पडत नाही,
शिवबाबा म्हणतात कां ब्रह्मा म्हणतात. जर समजले शिवबाबाच मत देत आहेत, तर कधी पण
हालणार नाहीत. शिवबाबा जे सांगत आहेत, ते सत्य आहे. तुम्ही म्हणता कि, तुम्हीच आमचे
पिता, शिक्षक, गुरु आहात. तर श्रीमता वर चालले पाहिजे ना. जे सांगतो त्यावर चाला.
नेहमी समजा शिवबाबा सांगत आहेत, ते कल्याणकारी आहेत. यांची जबाबदारी पण त्यांच्यावर
आहे. त्यांचा रथ आहे ना. गोंधळून कां जाता, माहित नाही कि, ही ब्रह्माची मत आहे कां
शिवबाबाची. तुम्हीं कां समजत नाही कि,शिवबाबा समजावत आहेत. श्रीमत जी सांगते, ते
करत राहा. दुसऱ्या च्या मतावर तुम्हीं कां येता. श्रीमतावर चालल्यामुळे कधी झुटका
येणार नाही. परंतु चालू शकत नाहीत, गोंधळून जातात. बाबा म्हणतात, तुम्ही श्रीमता वर
निश्चय ठेवा, तर मी जबाबदार आहे. तुम्ही निश्चय च ठेवत नाहीत, तर मग मी पण जबाबदार
नाही. नेहमी समजा श्रीमतावर चालायचे आहे. ते जे सांगतात, जरी प्रेम केले, जरी मारले.
. . हे त्यांच्या साठीच गायन आहे. या मध्ये लाथ इत्यादी मारण्याची तर गोष्टच नाही.
परंतु कोणाचा निश्चय बसणे फार मुश्कील आहे.निश्चय पुर्ण बसला तर कर्मातील अवस्था
होऊन जाईल. परंतु ती अवस्था येण्या मध्ये पण वेळ लागतो. ती अंताला होईल, यामध्ये
निश्चय फार अडोल पाहिजे. शिवबाबा कडून तर कोणती चूक होऊ शकत नाही, यांच्या कडून होऊ
शकते. हे दोघे एकत्र आहेत. परंतु तुम्हाला निश्चय पण ठेवायचा आहे कि, शिवबाबा
समजावत आहेत, त्यावर आम्हाला चालायचे आहे. तर बाबाची श्रीमत समजून चालत राहा. तर
उलटे पण सुलटे होऊन जाईल. कांही वेळा गैरसमज पण होऊन जातो. शिवबाबा आणि ब्रह्माबाबा
ची मुरली ला पण फार चांगल्या रीतीने समजायचे आहे. शिवबाबांनी सांगितले,ते यांनी
सांगितले. असे नाही कि, ब्रह्मा बोलतच नाहीत. परंतु बाबांनी सांगितले आहे,बरे, समजा,
हे ब्रम्हा कांही समजत नाहीत, शिवबाबा सर्व कांही सांगत आहेत. शिवबाबा च्या रथाला
स्नान घालत आहे. शिवबाबा च्या भंडाऱ्याची सेवा करत आहे. ही आठवण राहिली तरी पण
चांगले आहे. शिवबाबा च्या आठवणीत राहून, कांही पण केले, तर अनेका पेक्षा पुढे जाऊ
शकाल, मुख्य गोष्ट आहे, शिवबाबाची आठवण. अल्फ आणि बे. बाकी सर्व सविस्तर आहे.
बाबा जे सांगत आहेत, त्यावर लक्ष दिले पाहिजे. बाबाच पतित पावन, ज्ञानाचे सागर आहेत
ना. तेच पतित क्षुद्राला येऊन, ब्राह्मण बनवित आहेत. ब्राह्मणांना च पावन बनवित
आहेत. क्षुद्रांना पावन बनवित नाहीत. या सर्व गोष्टी कांही भागवत इत्यादी मध्ये
नाहीत. थोडे थोडे अक्षर आहेत, मनुष्यां ना तर हे पण माहित नाही कि, राधे कृष्ण च
लक्ष्मी नारायण आहेत. गोंधळून जातात. देवता तर सूर्यवंशी चंद्रवंशी आहेत. लक्ष्मी
नारायणाची राजधानी, सीता रामाची राजधानी. बाबा म्हणतात, भारतवासी गोड मुलांनो, आठवण
करा, लाखो वर्षाची तर गोष्टच नाही. कालची गोष्ट आहे. तुम्हांला राज्य दिले होते.
एवढे अथाह धन दौलत दिली होती. बाबांनी साऱ्या विश्वाचे तुम्हाला मालक बनविले होते,
आणखीन कोणता खंड नव्हता, मग तुम्हांला काय झाले, विद्वान,आचार्य, पंडित, कोणी पण या
गोष्टीला समजत नाहीत. बाबा म्हणतात, अरे, भारतवासींनो, तुम्हाला राज्य भाग्य दिले
होते ना. तुम्ही पण म्हणता,शिवबाबा म्हणतात कि, एवढे तुम्हाला धन दिले, मग सर्व
तुम्हीं कोठे घालविले. बाबा चा वरसा किती जबरदस्त आहे. बाबा विचारतात ना. किंवा पिता
निघून गेला, तर मित्र संबंधी विचारतात,पित्याने तुम्हाला एवढे पैसे दिले, तर ते
तुम्हीं कुठे घालविले. हे तर बेहदचे बाबा आहेत. बाबाने कवडी पासून हिऱ्या सारखे
बनविले होते. एवढे राज्य दिले मग पैसे कुठे गेले? तुम्हीं काय उत्तर देणार,? कोणाला
पण समजत नाही. तुम्हीं समजत आहात, बाबा बरोबर विचारत आहेत. एवढे कंगाल कसे बनला.
अगोदर सर्व कांही सतोप्रधान होते, मग कला कमी होत गेल्या, तर सर्व कांही कमी होत
गेले. सतयुगा मध्ये तर सतोप्रधान होतो, लक्ष्मी नारायणा चे राज्य होते. राधे कृष्णा
पेक्षा लक्ष्मी नारायणा चे नाव मोठे आहे. त्यांची कांही निंदा लिहिलेली नाही, आणि
इतर सर्वांची निंदा लिहिली आहे. लक्ष्मी नारायणा च्या राज्या मध्ये कोणते राक्षस
इत्यादी दाखवत नाहीत. तर या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बाबा ज्ञानधना ने
झोळी भरत आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो, या माये पासून खबरदार राहा. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) समजदार
बनून खऱ्या सेवे मध्ये लागले पाहिजे. जबाबदार एक बाबा आहेत, त्यामुळे श्रीमता मध्ये
संशय घेतला नाही पाहिजे. निश्चयाने अडोल राहायचे आहे.
(२) विचार सागर मंथन करून, बाबाच्या प्रत्येक सांगण्यावर लक्ष दिले पाहिजे. स्वतः
ज्ञानाला धारण करून, दुसऱ्याला सांगायचे आहे.
वरदान:-
आपल्या
प्रत्यक्ष प्रमाणा व्दारे, बाबाला प्रत्यक्ष करणारे, श्रेष्ठ भाग्यवान भव.
कोणत्या पण गोष्टीला
स्पष्ट करण्यासाठी, अनेक प्रकारचे प्रमाण दिले जातात. परंतु सर्वात श्रेष्ठ प्रमाण,
प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे आहे, ज्यांचे आहे, त्यांच्या
आठवणी मध्ये राहणे. जी मुले आपल्या यथार्थ किंवा अनादी स्वरूपा मध्ये स्थिती राहतात,
तेच बाबाला प्रत्यक्ष करण्या साठी निमित्त बनतात. त्यांच्या भाग्याला पाहून, भाग्य
बनविणारा ची आठवण आपोआपच येते.
बोधवाक्य:-
आपल्या दयेच्या
दृष्टीने, प्रत्येक आत्म्याला परिवर्तन करणारेच पुण्य आत्मा आहेत.