07-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,जेव्हा भारत स्वर्ग होता, तेव्हा तुम्ही प्रकाशामध्ये म्हणजे ज्ञानी
होते,आत्ता अज्ञानाचा अंधार आहे,परत प्रकाशा कडे चला"
प्रश्न:-
बाबा आपल्या
मुलांना कोणती एक गोष्ट ऐकवण्यासाठी आले आहेत?
उत्तर:-
बाबा म्हणतात, गोड मुलांनो, मी तुम्हाला 84 जन्माची कहाणी ऐकवतो.तुम्ही जेव्हा
प्रथम जन्मामध्ये होते,तर एकच दैवी धर्म होता,परत तुम्हीच दोन युगानंतर नंतर
मोठ-मोठे मंदिर बनवले,भक्ती सुरू केली.आता तुमचा अंतिम जन्म आहे.तुम्हीच बोलवले
दुखहर्ता सुखकर्ता या.तर मी आलो आहे.
गीत:-
आज अज्ञान
अंधारामध्ये आहेत मनुष्य...
ओम शांती।
तुम्ही मुलं जाणतात, आत्ता ही कलयुगी दुनिया आहे,सर्व अज्ञानाच्या अंधारा मध्ये
आहेत. यापूर्वी प्रकाशामध्ये होते,जेव्हा भारत स्वर्ग होता.हेच भारतवासी स्वतःला
हिंदू समजतात,जे वास्तविक मध्ये देवी-देवता होते. भारतामध्येच स्वर्ग होता,जेव्हा
दुसरा कोणता धर्म नव्हता.एकच धर्म होता.स्वर्ग,वैकुंठ,बहिश्त,हेवन इत्यादी सर्व
भारताची नावे आहेत. भारत पवित्र आणि प्राचीन धनवान होता.आता तर भारत खूपच गरीब आहे
कारण आता कलियुग आहे. तुम्ही जाणतात आम्ही अज्ञान अंधारामध्ये आहोत.जेव्हा स्वर्ग
होता तेव्हा प्रकाशामध्ये होतो. स्वर्गाचे राज राजेश्वर,राज राजेश्वरी श्री
लक्ष्मी-नारायण होते,त्याला सुखधाम सुद्धा म्हटले जाते.बाबा कडून तुम्हाला स्वर्गाचा
वारसा घ्यायचा आहे,ज्याला जीवनमुक्ती म्हटले जाते.आता तर सर्व जीवन बंधनांमध्ये
आहेत.खास भारत आणि आम दुनिया रावणाच्या जेलमध्ये,शोक वाटिका मध्ये आहेत.असे नाही
रावण फक्त लंका मध्ये होता आणि राम-भारता मध्ये होते,रावणा नी येऊन सीतेचे अपहरण
केले,या सर्व दंतकथा आहेत.गीता मुख्य आहे,सर्व शास्त्रमई शिरोमणी श्रीमत, म्हणजे
भगवंतांनी भारतामध्येच ऐकवलेली आहे. मनुष्य तर कोणाची सद्गती करू शकत
नाहीत.सतयुगामध्ये जीवनमुक्त देवी-देवता होते,ज्यांनी हा वारसा कलियुगाच्या अंतमध्ये
प्राप्त केला होता.भारतवासींना हे माहित नाही,ना कोणत्या ग्रंथांमध्ये
आहे.ग्रंथांमध्ये सर्व भक्तिमार्गाचे ज्ञान आहे.सद्गतीमार्गाचे ज्ञान मनुष्य मात्रा
मध्ये बिलकुल नाही.सर्व भक्ती शिकवणारे आहेत.असे म्हणतात ग्रंथ वाचा दान पुण्य
करा,ही भक्ती द्वापार युगा पासून चालत येते.सतयुगामध्ये ज्ञानाचे प्रारब्ध आहे.असे
नाही की,तिथे पण हे ज्ञान चालत येते.हा जो वारसा भारताला मिळाला होता,तो
संगमयुगामध्येच मिळाला होता,तो परत तुम्हाला मिळत आहे. भारतवासी जेव्हा नर्कवासी
बनतात, तेव्हा बोलवतात,हे पतित-पावन दुखहर्ता सुखकर्ता, कोणाचे?सर्वांचे, कारण खास
भारत आम सर्व दुनिये मध्ये पाच विकार आहेत.बाबाच पतित-पावन आहेत. बाबा म्हणतात, मी
कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगा मध्ये येतो, सर्वांचे सद्गती दाता बनतो.अहिल्या,
गणिका आणि जे पण गुरु लोक इत्यादी आहेत, सर्वांचा उद्धार मलाच करावा लागतो,कारण ही
तर पतित दुनिया आहे.पावन दुनिया सतयुगाला म्हटले जाते.भारतामध्ये लक्ष्मी नारायणाचे
राज्य होते.
भारतवासी हे जाणत नाहीत की, हे स्वर्गाचे मालक होते.पतित खंड म्हणजे खोटा खंड,पावन
खंड म्हणजे सत्य खंड होता.भारत पावन खंड होता,ज्याचा कधी विनाश होत नाही.जेव्हा
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, तर दुसरा कोणता खंड नव्हता,बाकी सर्व खंड नंतर बनतात.
मनुष्यांनी तर कल्पाचे लाखो वर्ष,आयुष्य लिहिले आहे. बाबा म्हणतात कल्पाचे आयुष्य
५००० वर्ष आहे.ते परत म्हणतात मनुष्य ८४लाख जन्म घेतात. मनुष्याला कुत्रा, मांजर,
गाढव इत्यादी सर्व बनवले आहे परंतु कुत्र्या-मांजराचे जन्मच वेगळे आहेत,८४ लाख योनी
आहेत. मनुष्यांची योनी तर एकच आहे. त्यांचे 84 जन्म आहेत.बाबा म्हणतात,भारतवासी
आपल्या धर्माला पूर्वनियोजित नाटकांनुसार विसरले आहेत.कलियुगाच्या अंतमध्ये बिल्कुल
च पतित बनले आहेत,परत बाबा संगमयुगा मध्ये येऊन पावन बनवतात.याला दु:खधाम म्हटले
जाते,परत भारत सुखधाम होईल.बाबा म्हणतात हे मुलांनो,तुम्ही भारतवासी स्वर्गवासी होते
परंतु तुम्ही ८४ जन्माची शिडी उतरत आलेले आहात.सतो रजो तमो गुणा मध्ये जरूर यायचे
आहे.तुम्ही देवता सारखे धनवान, नेहमी आनंदी,आरोग्यवान संपत्तीवान,दुसरे कोणी असत
नाही. भारत खूप सावकार होता,हिरे मोती तर दगडासारखे पडलेले असतात. दोन्ही युगाच्या
नंतर भक्तिमार्गा मध्ये खूप मोठ-मोठे मंदिर बनवतात.ते पण खूप भारी मंदिर बनवतात.
सोमनाथ चे मंदीर मोठ्यात मोठे होते.फक्त एक मंदिर तर नसेल ना. दुसरे राजे पण मंदिर
बनवत असतील ना.अनेक मंदिर लुटून घेऊन गेले.बाबा तुम्हा मुलांना स्मृती
देतात.तुम्हाला खूप सावकार बनवले होते.तुम्ही सर्वगुणसंपन्न सोळा कलासंपन्न होते,
यथा महाराजा,महाराणी. त्यांना भगवान भगवती म्हटले जाते परंतु बाबांनी समजवले
आहे,भगवान एकच आहेत,तेच पिता आहेत. फक्त ईश्वर किंवा प्रभू म्हटल्यामुळे आठवण येत
नाही,कारण ते सर्वांचे पिता आहेत.बाबा ज्ञानाच्या गोष्टी ऐकवत आहेत.आता तुमच्या
अनेक जन्माच्या अंतकाळातील हा जन्म आहे.एकाची गोष्ट नाही,न हे कोणते युध्दाचे मैदान
आहे.भारतवासी हे विसरले आहेत की,त्यांचे राज्य होते.सतयुगाचा कालावधी हजारो वर्षाचा
केल्यामुळे खूप दूर गेले आहेत.बाबा समजवतात मनुष्याला भगवान म्हटले जात नाही.मनुष्य
कोणाची सद्गती करू शकत नाहीत,अशी म्हण पण आहे,सर्वांचे सद्गतीदाता,पतित-पावन,सुख
कर्ता एकच आहेत.एकच खरे बाबा आहेत,जे सत्य खंडाची स्थापना करतात. पूजा पण करतात
परंतु भक्तिमार्गामध्ये तुम्ही ज्यांची पूजा करत आले आहात,एकाचे पण
कर्तव्य,आत्मचरित्र जाणत नाहीत, म्हणून बाबा समजवतात तुम्ही शिवजयंती तर साजरी
करतात ना. बाबा नवीन दुनियेचे रचनाकार आणि स्वर्गीय ईश्वरीय पिता आहेत. ते बेहदचे
सुख देणारे आहेत. सतयुगामध्ये खूप सुख होते.ते कसे आणि कोणी स्थापन केले,हे बाबाच
सन्मुख समजवतात.नर्कवासींना स्वर्गवासी बनवणे किंवा भ्रष्टाचारीला श्रेष्टाचारी
देवता बनवणे, हे तर एक पित्याचे काम आहे.बाबा म्हणतात,मी तुम्हा मुलांना पावन
बनवतो.तुम्ही स्वर्गाचे मालक बनतात.तुम्हाला पतित कोण बनवते, हा रावण.मनुष्य
म्हणतात दुःख पण ईश्वरच देतात. बाबा म्हणतात मी तर सर्वांना इतके सुख देतो,जे परत
तुम्ही पित्याची आठवण पण करत नाहीत.परत जेव्हा रावण राज्य होते,तर सर्वांची पूजा
करावयास लागतात.हा तर तुमचा अनेक जन्मातील अंतचा अंतिम जन्म आहे.असे म्हणतात, बाबा
आम्ही किती जन्म घेतले, बाबा म्हणतात गोड गोड भारत वासी आत्म्यांनो,आता तुम्हाला
बेहद्दचा वारसा देत आहे.मुलांनो तुम्ही ८४जन्म घेतले आहेत,आता तुम्ही २१ जन्मासाठी
बाबा कडून वारसा घेण्यासाठी आले आहात. सर्व एकत्र येणार नाहीत.तुम्हीच सतयुगाचे
सूर्यवंशी पद परत घेत आहात,म्हणजेच सत्य बाबापासून सत्य नरापासून नारायण बनण्याचे
ज्ञान ऐकत आहात. हे ज्ञान आहे आणि ती भक्ती आहे.ग्रंथ इत्यादी सर्व भक्तिमार्गासाठी
आहेत.हे ज्ञान मार्गासाठी नाहीत.हे अध्यात्मिक ज्ञान आहे.परमात्मा सन्मुख ज्ञान देत
आहेत, मुलांना देही अभिमानी बनायचे आहे, स्वतःला आत्मा समजून माझीच आठवण करा. बाबा
समजवतात,आपल्यामध्ये चांगले किंवा वाईट संस्कार असतात,ज्यानुसार मनुष्याला चांगला
किंवा वाईट जन्म मिळतो. बाबा सन्मुख समजवतात, हे जे पावन होते,अंतिम जन्मांमध्ये
पतित आहेत.ततत्वम म्हणजे तुम्ही पण असेच बनता.मज पित्याला या जुन्या रावणाच्या
दुनिया मध्ये,पतित दुनिया मध्ये यावे लागते.ते पण त्यांच्या तनामध्ये जे प्रथम
क्रमांक मध्ये जाणार आहेत.सूर्यवंशीच पूर्ण ८४ जन्म घेतात.हे ब्रह्मा आणि ब्रह्मवंशी
ब्राह्मण आहेत.बाबा तर रोज रोज समजवत राहतात, बुद्धीला पारस बुद्धी बनवणे, मावशीचे
घर नाही. हे आत्म्यांनो आत्ता देही अभिमानी बना.हे आत्म्यांनो एका बाबांची आठवण करा
आणि राजाईची आठवण करा.देहाचे सर्व संबंध सोडा,मरायचे तर सर्वांनाच आहे.आत्ता
सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे.एका सद्गुरु शिवाय सर्वांचे सद्गती दाता, दुसरे कोणी
होऊ शकत नाहीत.बाबा म्हणतात हे भारतवासी मुलांनो, तुम्ही अगोदर माझ्यापासून दूर
गेलेले आहात. गायन पण आहे,आत्मा परमात्मा वेगळे राहिले बहूकाळ. प्रथम तुम्ही
भारतवासी देवी-देवता धर्माचे आले होते.दुसऱ्या धर्माचे थोडेच जन्म घेतात.हे सृष्टी
चक्र कसे फिरते, ते बाबाच सन्मुख समजवतात.जे धारणा करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी पण
खूप सहज आहे. आत्मेच धारण करतात,पुण्य आत्मा पाप आत्मे बनतात ना.तुमचा ८४वा अंतिम
जन्म आहे.तुम्ही सर्व वानप्रस्थ अवस्थांमध्ये आहात. वानप्रस्थ अवस्था असणारे, मंत्र
घेण्यासाठी गुरु करतात.तुम्हाला तर आता कोणताही देहधारी गुरु करण्याची आवश्यकता
नाही.तुम्हा सर्वांचा मी पिता शिक्षक आणि गुरु आहे.मला म्हणतात,हे पतित-पावन
शिवबाबा.आत्ता तुम्हाला स्मृती आली आहे,सर्व आत्म्यांचे पिता आहेत.आत्मा सत्य आहे,
चैतन्य आहे कारण आहे सर्व आत्म्यामध्ये भूमिका भरलेली आहे. बाबा चैतन्य आहेत, ते
मनुष्य सृष्टीचे बीज रूप असल्यामुळे म्हणतात, मी सर्व झाडाच्या आधी मध्य अंतला जाणतो,
म्हणून मलाच ज्ञान संपन्न म्हटले जाते.तुम्हाला सर्व ज्ञान आहे, बीजापासून जाड कसे
निघते, झाडाची वृद्धी होण्यामध्ये वेळ लागतो ना.बाबा म्हणतात मी बीजरूप आहे,अंत
मध्ये सर्व झाड जडजडीभुत अवस्थेला प्राप्त होते. देवी-देवता धर्माचा पाया नाही,
गायब आहे.जेव्हा देवता-धर्म गायब होतो,तेव्हा बाबांना यावे लागते. एका धर्माची
स्थापना करून दुसऱ्या सर्वांचा विनाश करतात. प्रजापिता ब्रह्मा द्वारे बाबा आदी
सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहेत.हे सर्व पूर्वनियोजित नाटक आहे,याचा अंत
कधी होत नाही.बाबा अंत काळामध्ये जेव्हा सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान ऐकवयाचे
असेल,तर जरूर संगमयुगामध्येच येतील.तुमचे एक पिता आहेत.आत्मे सर्व परमधाम मध्ये
राहणारे भाऊ भाऊ आहेत.त्या एका बाबांची सर्व आठवण करतात. दुःखामध्ये सर्व स्मरण
करतात,रावण राज्यामध्ये दुःख आहे ना.येथे स्मरण करतात,तर शिवपिता सर्वांचे सदगती
दाता एकच आहेत. त्यांचीच महिमा आहे.बाबा आले नाहीत तर भारताला स्वर्ग कोण बनवेल?
सर्वांना पुनर्जन्म तर जरूर घ्यायचा आहे.आत्ता पुनर्जन्म तर नरकामध्येच मिळतो.असे
नाही की स्वर्गामध्ये चालले जातील.जसे हिंदू धर्माचे म्हणतात स्वर्गवासी झाले, तर
जरूर नरकामध्ये होते.आत्ता स्वर्गामध्ये गेले.तुमच्या मुखामध्ये गुलाब. स्वर्गवासी
झाले तर तुम्ही नरकाचे आसुरी वैभव त्यांना का खाऊ घालतात?बंगालमध्ये तर मासे इत्यादी
पण खाऊ घालतात.अरे त्यांना हे सर्व खाण्याची काय आवश्यकता आहे.असे म्हणतात,अमका पार
निर्वाण मध्ये गेला.बाबा म्हणतात,या सर्व थापा आहेत.परत कोणी जाऊ शकत नाही.जेव्हा
प्रथम क्रमांकालाच ८४ जन्म घ्यावा लागतात.
बाबा समजवतात,यामध्ये काहीच कष्ट नाहीत.भक्ती मार्गामध्ये तर खूप कष्ट आहेत.राम-राम
जपत अंगावर शहारे येतात.तो सर्व भक्ती मार्ग आहे.तुम्ही जाणतात,सुर्य चंद्र पण
प्रकाश देणारे आहेत.हे काही देवता नाहीत.वास्तव मध्ये ज्ञानसुर्य ज्ञानचंद्रमा आणि
ज्ञान तारे आहेत.त्यांची महिमा आहे.ते परत म्हणतात,सुर्य देवताए नमःत्यांना देवता
समजून पाणी देतात.तर बाबा समजवतात,हा सर्व भक्ती मार्ग आहे,जो परत होईल.प्रथम एक
शिवबाबाची अव्यभिचारी भक्ती असते, परत देवतांची, परत उतरतात तर पाहा,तीन रस्ते जिथे
मिळतात,तिथे पण दिवा लावून,तेल घालून पुजा करतात.तत्वाची पण पुजा करतात.मनुष्यांचे
चित्र बनवून पुजतात.आत्ता या द्वारे प्राप्ती तर काही च होत नाही.या गोष्टींना
तुम्ही मुलं च समजतात, अच्छा.
गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा. आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)
आत्म्यामधील वाईट संस्कार काढून टाकण्यासाठी देही अभिमानी राहण्याचा अभ्यास करा.हा
अंतिम ८४ वा जन्म आहे, वानप्रस्थ अवस्था आहे, म्हणून पुण्य आत्मा बनण्याचे कष्ट
घ्यायचे आहेत.
(२) देहाचे सर्व संबंध सोडून एक बाबा आणि राजाईची आठवण करायची आहे.बीज आणि झाडाचे
ज्ञान स्मरण करून नेहमी आनंदीत राहायचे आहे.
वरदान:-
विश्व
परिवर्तनाच्या श्रेष्ठ कार्याची जिम्मेदारी निभावत, एकदम हल्के राहणारे आधारमुर्त
भव.
जे आधारमुर्त असतात,
त्यांच्यावरतीच सर्व जिम्मेदारी राहते.आत्ता तुम्ही ज्या रुपामध्ये,जेथे पण पाऊल
टाकणार,अनेक आत्मे तुमचे अनुकरण करतील,ही जवाबदारी आहे.परंतू ही जवाबदारी अवस्था
बनवण्यामध्ये खूप मदत करते, म्हणून अनेक आत्म्यांचे आर्शिवाद मिळतात.ज्यामुळे
जवाबदारी हलकी होते.ही जवाबदारी थकावट मिटवणारी आहे.
बोधवाक्य:-
मन आणि दिमाख
दोघांचे संतुलन ठेवत सेवा करण्यामुळे सफलता मिळते.