12-01-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,राजयोगाचे शिक्षण आणि दैवी चरित्राचे रजिस्टर ठेवा, रोज तपासून पहा
की,माझ्या द्वारे कोणती चूक तर झाली नाही"
प्रश्न:-
तुम्ही मुलं
कोणत्या पुरुषार्था द्वारे राजाईचा तिलक प्राप्त करू शकता?"
उत्तर:-
नेहमी आज्ञाधारक राहण्याचा पुरुषार्थ करा.संगमयुगामध्ये आज्ञाधारकचा तिलक घ्या,तर
राजाईचा तिलक मिळेल.आज्ञा न मानणाऱ्यांना राजांचा तिलक प्राप्त होऊ शकत नाही.कोणताही
आजार सर्जन पासून लपवू नका.लपवला तर, पद कमी होईल.बाबा जसे प्रेमाचे सागर बना,तर
राजाईचा तिलक मिळेल.
ओम शांती।
आत्मिक पिता मुलांना समजावत आहेत,शिक्षण म्हणजे समज.तुम्ही मुलं समजतात,हे शिक्षण
खूप सहज आणि खूप उच्च आहे आणि खूप मोठे पद देणारे आहे.हे फक्त तुम्ही मुलंच जाणतात
की,हे शिक्षण आम्ही विश्वाचे मालक बनवण्यासाठी शिकत आहोत.तर शिकणाऱ्यांना खूप खुशी
व्हायला पाहिजे.हे खूप खूप उच्च शिक्षण आहे.हा तोच गीतेचा भाग आहे. संगमयुग पण
आहे.तुम्ही मुलं आता जागृत झाले आहात.बाकी तर अज्ञानी निद्रामध्ये झोपले आहेत. गायन
पण आहे मायेच्या निद्रेमध्ये झोपले आहेत.तुम्हाला बाबांनी येऊन जागृत केले आहे.फक्त
एक गोष्ट समजावून सांगतात,गोड मुलांना आठवणीच्या यात्रेच्या, बळा द्वारे तुम्ही
संपूर्ण विश्वावर राज्य करतात.जसे कल्पापूर्वी केले होते. ही स्मृती पण बाबा
देतात.मुलं पण समजतात,आम्हाला स्मृती आली आहे.कल्प कल्प आम्ही या योगबळा द्वारे
विश्वाचे मालक बनतो आणि परत दैवी गुण धारण करायचे आहेत. योगावरती पूर्ण लक्ष द्यायचे
आहे.या योगबळा द्वारे तुम्हा मुलांमध्ये आपोआप दैवी गुण येतात.बरोबर ही परीक्षा
मनुष्यापासून देवता बनण्याची आहे.तुम्ही येथे योग बळाद्वारे मनुष्यापासून देवता
बनण्यासाठी आले आहात आणि हे पण जाणता की आमचे द्वारे संपूर्ण विश्व पवित्र
होईल.पवित्र होते,आत्ता अपवित्र बनले आहे.सर्व चक्राच्या रहस्याला तुम्हा मुलांनी
समजले आहे आणि मनामध्ये पण आहे.जरी कोणी नवीन असतील तरी,या गोष्टी खूप सहज
समजण्याच्या आहेत.तुम्ही देवता पुज्य होते,परत पुजारी तमोप्रधान बनले आणि कोणी असे
सांगू शकत नाहीत.बाबा स्पष्ट करून सांगतात, तो भक्तिमार्ग आहे आणि हा ज्ञानमार्ग
आहे.भक्ती पूर्ण झाली,पाठीमागच्या गोष्टीचे चिंतन करू नका.त्या तर विकारांमध्ये
जाण्याच्या गोष्टी आहेत.बाबा आत्ता निर्विकारी बनवण्याच्या गोष्टी ऐकत आहात.मुलं पण
जाणतात आम्हाला दैवी गुण धारण जरूर करायचे आहेत.रोज दिनचर्या लिहायला पाहिजे
की,आम्ही किती वेळ आठवणीमध्ये राहतो.माझ्या द्वारे काय चूक झाली,चूक झाल्याने खूप
जखम होते.त्या शिक्षणामध्ये पण चरित्र पाहिले असते. येथे पण चरित्र पाहिले जाते.बाबा
तर तुमच्या कल्याणासाठी म्हणतात.त्या शाळेमध्ये पण शिक्षण आणि चरित्राचे रजिस्टर
ठेवतात.येथे पण मुलांना दैवी चरित्रवान बनायचे आहे. चूक होऊ नये म्हणून सांभाळ
करायची आहे.माझ्या द्वारे कोणती चूक तरझाली नाही.कचेरी पण करतात. दुसर्या कोणत्या
शाळेमध्ये कचरे इत्यादी होत नाही. स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे.बाबानी समजवले
आहे, मायेमुळे काही ना काही आवज्ञा होत राहतात.सुरुवातीला कचरी होत होती.सर्व मुलं
खरे सांगत होते. बाबा समजावून सांगतात,जर खरे सांगितले नाही तर,चुका आणखीनच वृध्दी
होत राहतील.उल्टा चुकीचा दंड मिळेल.चुक न सांगितल्यामुळे, इमानदार चा तिलक मिळणार
नाही आणि राजाईचा पण तिलक मिळू शकणार नाही.जर आज्ञा मानत नाहीत, इमानदार बनत नाहीत,
तर राज्य मिळू शकत नाहीत.सर्जन वेगवेगळ्या प्रकारे समजवत राहतात.सर्जन पासून जर
आजार लपवला,तर पद पण कमी होईल. सर्जनला सांगितल्यामुळे काही मार तर पडणार नाही
ना.बाबा फक्त सावधान करतात.जर परत अशी चूक कराल, तर नुकसान होईल, पद खूप कमी
होईल.तेथे तर नैसर्गिक दैवी चलन असते.येथे पुरुषार्थ करायचा आहे.सारखे सारखे नापास
व्हायचे नाही.बाबा म्हणतात मुलांनो जास्त चुका करू नका.बाबा प्रेमाचे सागर आहेत,
मुलांना पण असेच बनायचे आहे. जसे बाबा तशीच मुलं आहेत.बाबा तर राजा बनत नाहीत.यथा
राजा राणी तथा प्रजा.बाबा तर राजा बनत नाहीत.तुम्ही जाणतात,बाबा आम्हाला
आपल्यासारखे बनवतात. बाबांची जी महिमा करतात, ती तुमची पण असायला हवी.बाबा सारखे
बनायचे आहे.माया खूप प्रबळ आहे,तुम्हाला रजिस्टर ठेवू देत नाही.मायेच्या फंद्यामध्ये
पूर्ण फसले आहेत. मायेच्या तुरुंगातून तुम्ही निघू शकत नाहीत.खरे सांगत नाहीत.तर
बाबा म्हणतात बिनचूक आठवणीचा तख्ता ठेवा.सकाळी लवकर उठून बाबांची आठवण करा.बाबांची
महिमा करा.बाबा तुम्ही आम्हाला विश्वाचे मालक बनवतात,तर आम्ही तुमचीच महिमा
करू.भक्तिमार्गामध्ये खूप महिमा गायन करतात. त्यांना तर काहीच माहिती नाही.देवतांची
पण महिमा नाही.महिमा तर तुम्हा ब्राह्मणांची आहे.सर्वांना सद्गती देणारे बाबाच
आहेत.ते रचनाकार आहेत, दिग्दर्शक पण आहेत.सेवा पण करतात आणि मुलांना समजतात
पण.प्रत्यक्षामध्ये म्हणतात. ते तर फक्त भगवानुवाच ग्रंथाद्वारे ऐकत राहतात.गीता
वाचत राहतात परंतु त्याद्वारे काय मिळते? खूप प्रेमाने बसून वाचतात,भक्ती
करतात,माहित नाही,त्याद्वारे काय मिळेल? शिडी उतरत आलो आहोत.तमोप्रधान बनायचे च आहे,
पूर्वनियोजित नाटकांमध्ये नोंद तशी आहे.हे शिडीचे रहस्य बाबा शिवाय कोणी समजाऊ शकत
नाहीत.शिवबाबा ब्रह्मा द्वारे समजवतात.हे पण यांच्याद्वारे समजून परत तुम्हाला
शिकवतात. मुख्य मोठे शिक्षक, मोठे सर्जन तर बाबाच आहेत,त्यांचीच आठवण करायची
आहे.बाबा असे म्हणत नाहीत की ब्राह्मणीची आठवण करा.आठवण तर एकाचीच करायची आहे.कधीही
कोणत्या व्यक्ती सोबत मोह ठेवायचा नाही. एका बाबा कडून शिक्षण घ्यायचे आहे,निर्मोही
पण बनायचे आहे, हेच कष्ट घ्यायचे आहेत.सर्व जुन्या दुनिये पासून वैराग्य हवे,ही
दुनिया तर नष्ट झालेली च आहे.यामध्ये प्रेम किंवा आसक्ती काहीच नको.खूप मोठ्या
इमारत इत्यादी बनवत राहतात.त्यांना हे माहीत नाही की,ही जुनी दुनिया नष्ट होणार
आहे.तुम्ही मुलं जागृत झाले आहात आणि दुसऱ्यांना पण जागृत करत आहात.बाबा जागृत
करतात आणि म्हणतात,स्वतःला आत्मा समजा. शरीर समजतात तर जसे झोपले आहात.स्वतःला आत्मा
समजा आणि बाबांची आठवण करा.आत्मा पतित आहे,तर शरीर पण पतितच मिळते.आत्मा पावन तर
शरीर पण पावन मिळते.
बाबा समजवतात,तुम्हीच या देवी देवता घराण्याचे होते परत तुम्हीच बनाल,खूप सहज
आहे.अशा बेहदच्या बाबांची आठवण का करणार नाही? सकाळी उठून पण बाबांची आठवण करा,बाबा
आपली तर कमाल आहे.तुम्ही आम्हाला खूप उच्च देवी देवता बनवून परत निर्बंधांमध्ये
बसतात.इतके श्रेष्ठ तर कोणी बनवू शकत नाही.तुम्ही खूप सहज करून सांगतात.बाबा
म्हणतात जितका वेळ मिळेल,काम धंदा करत,बाबांची आठवण करत राहा.आठवणी द्वारेच तुमचे
जीवन रूपी नाव कलयुगातून शिवालय मध्ये जाईल. शिवालयाची पण आठवण करायची
आहे.शिवबाबांचा स्थापन केलेला स्वर्ग,तर दोघांची आठवण येते. शिव बाबांची आठवण
केल्यामुळेच आम्ही स्वर्गाचे मालक बनू.हे शिक्षण नवीन दुनियेसाठी आहे.बाबा पण नवीन
दुनिया स्थापन करण्यासाठी येतात,तर जरूर बाबा येऊन काही कर्तव्य करतील ना.तुम्ही
पाहता पूर्वनियोजित नाटकं नुसार सर्व होत आहे.तुम्हा मुलांना पाच हजार वर्ष पूर्व
आठवणी ची यात्रा आणि सृष्टीच्या आदी मध्य अंतचे रहस्य सांगत आहेत.तुम्ही जाणतात
प्रत्येक पाच हजार वर्षांनंतर बाबा आपल्यासमोर येतात.आत्माच बोलते,शरीर तर बोलणार
नाही. बाबा मुलांना शिक्षा देतात, आत्म्याला पवित्र बनायचे आहे. आत्म्याला एकाच
वेळेत पवित्र बनायचे असते.बाबा म्हणतात मी अनेक वेळेस तुम्हाला शिकवले परत शिकवत
राहील,असे कोणी संन्यासी म्हणू शकत नाहीत.बाबा म्हणतात मुलांनो वैश्विक नाटकं
नुसार,शिकवण्यासाठी आलो आहे, परत पाच हजार वर्षानंतर असेच येऊन शिकवेल.कल्पा पूर्वी
तुम्हाला शिकवून राजधानी स्थापन केली होती.अनेक वेळा तुम्हाला शिकवून राजाईची
स्थापना केली आहे.या खूपच आश्चर्यकारक गोष्टी बाबा समजावतात. श्रीमत खूप श्रेष्ठ
आहे,श्रीमता द्वारे विश्वाचे मालक बनतो.खूप मोठे पद मिळते. कोणाला मोठी लॉटरी
मिळते,तर माथाच खराब होतो.काही तर चालता-चालता निराशाजनक बनतात.आम्ही आता शिकू शकत
नाहीत.आम्ही विश्वाची बादशाही कसे घेऊ?तुम्हा मुलांना तर खूप खुशी असायला
पाहिजे.बाबा म्हणतात अतिइंद्रिय सुख आणि खुशी च्या गोष्टी माझ्या मुलांना
विचारा.तुम्ही सर्वांना आनंदाच्या गोष्टी ऐकण्यासाठी जातात.तुम्हीच विश्वाचे मालक
होते,परत ८४ जन्म भोगून गुलाम बनले.गायन पण आहे की, मी गुलाम, गुलाम तुझा.असे
समजतात,स्वतःला नीच समजणे, लहान होऊन चालणे चांगले आहे. पहा बाबा कोण आहेत?त्यांना
तर कोणी जाणत नाहीत.बाबांना फक्त तुम्हीच जाणले आहे.बाबा कसे येऊन,सर्वांना मुलं
मुलं म्हणून समजावत राहतात.हा परमात्माचा आणि मुलांचा मेळा आहे. त्यांच्याद्वारे
आम्हाला स्वर्गाची बादशाही मिळते.बाकी गंगास्नान इत्यादी केल्यामुळे स्वर्गाचे
राज्य मिळत नाही.गंगास्नान तर खूप वेळेस केले आहे.तसे तर पाणी सागरा मधून येते परंतु
हा पाऊस कसा पडतो, हे पण आश्चर्य आहे. या वेळेत बाबा तुम्हाला सर्व काही
समजवतात.धारण पण आत्माच करते,ना की शरीर.तुम्हाला जाणीव होते की, बरोबर बाबा आम्हाला
किती श्रेष्ठ बनवत आहेत.आता तुम्हा मुलांना जाणीव झाली आहे की, बाबा आम्हाला खूप
श्रेष्ठ बनवत आहेत.आता बाबा म्हणतात मुलांनो स्वत: वरती दया करा. कोणतेही अवज्ञा करू
नका.देही अभिमानी बनू नका.मोफत आपले पद कमी करू नका.शिक्षक तर समजावून सांगतील
ना.तुम्ही जाणतात,बाबा बेहदचे शिक्षक आहेत.दुनिये मध्ये अनेक भाषा आहेत.कोणतीही
गोष्ट छपाई करतात तर,सर्व भाषेमध्ये छापायला पाहिजे.कोणते साहित्य छापतात तर,
सर्वांना एक एक प्रत पाठवून द्या.एक प्रत वाचनालयामध्ये पण पाठवायला पाहिजे. खर्चाची
कोणतीच गोष्ट नाही.बाबांचा भंडारा भरपूर होईल. पैसे आपल्याजवळ ठेवून काय करणार.घरी
तर घेऊन जाऊ शकणार नाही.जर काही घरी घेऊन गेले,तर परमात्म्याच्या यज्ञा मधून चोरी
होईल.तोबा तोबा अशी बुद्धी कोणाची व्हायला नको.परमात्मा च्या यज्ञामध्ये चोरीसारखे
महान पाप आत्मा तर कोणी कोणी होऊ शकत नाही.खूप अधम गती होते. बाबा म्हणतात,हे सर्व
पूर्वनियोजित नाटक आहे.तुम्ही राजाई कराल, तर ते तुमचे सेवक बनतील.सेवका शिवाय
राजाई कशी चालेल.कल्पा पूर्वी पण अशी स्थापना केली होती. आता बाबा म्हणतात स्वतःचे
कल्याण करायचे असेल तर, श्रीमतावर चाला.दैवी गुणांची धारणा करा.क्रोध करणे,दैवी गुण
नाही.तो आसुरी गुण होतो.कोणी क्रोध केला तर शांत बसायला हवे. प्रतिसाद द्यायचा
नाही.प्रत्येकाच्या चलनद्वारे समजू शकतात.अवगुण तर सर्वांमध्ये आहेत.जेव्हा कोणी
क्रोध करतात, तर त्यांचा चेहरा तांब्या सारखा लाल होतो. मुखाद्वारे बॉम्ब
चालवतात.स्वतःचे नुकसान करतात आणि पद पण भ्रष्ट होते. प्रत्येक गोष्टीची समज असायला
हवी.बाबा म्हणतात,जे पाप करतात तर,ते बाबांना लिहून द्या.बाबांना सांगितल्यामुळे
माफ होईल,ओझे हलके होईल.जन्म जन्मांतर तुम्ही विकारांमध्ये जात आले आहात.या वेळेत
तुम्ही कोणते पाप कर्म कराल तर, शंभर पटीने होईल.बाबांच्या पुढे चूक केली तर त्याचा
शंभर पटीने दंड मिळतो.पाप कर्म केले आणि सांगितले नाही तर आणखीनच वृद्धी होत
राहील.बाबा तर समजाऊन सांगतील ना,स्वतःचे नुकसान करू नका.बाबा मुलांची चांगली बुद्धी
बनवण्यासाठी आले आहेत.तुम्ही जाणतात हे श्रेष्ठ पद कसे मिळेल?ते पण २१ जन्माची
गोष्ट आहे.जे सेवाधारी मुलं आहेत, त्यांचा स्वभाव खूप गोड पाहिजे. काही तर लगेच
बाबांना सांगतात, बाबा ही चूक झाली.बाबा खुश होतात.भगवान खुश झाले तर बाकी काय
पाहिजे.हे तर पिता शिक्षक आणि गुरु तीन्ही आहेत. नाहीतर तिन्ही नाराज होतात.अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातापिता बापदादाची प्रेम पूर्ण आठवण
आणि सुप्रभात. इतर पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(1)
श्रीमतावरती चालून बुध्दी स्वच्छ ठेवायची आहे.कोणतीही अवज्ञा करायची नाही. क्रोधा
मध्ये येऊन मुखाद्वारे बॉम्ब काढायचा नाही. शांत राहायचे आहे.
(२) मनापासून एक बाबांची महिमा करायची आहे.या जुन्या दुनियेशी आसक्ती किंवा प्रेम
ठेवायचे नाही.बेहद्दचे वैरागी आणि निर्मोही बनायचे आहे.
वरदान:-
आपल्या
अव्यक्त शांत स्वरूप द्वारे, वातावरणाला अव्यक्त बनवणारे साक्षात मुर्त भव.
जसे सेवेचे कार्यक्रम
बनवता,तसेच सकाळपासून रात्रीपर्यंत आठवणीच्या यात्रेमध्ये कसे आणि कधी राहायचे, याचे
पण कार्यक्रम बनवा आणि मध्ये-मध्ये दोन-तीन मिनिटासाठी संकल्पाचे वाहतूकीचे
नियंत्रण करून, बंद करा. जेव्हा कोणी व्यक्त भावा मध्ये जास्त दिसून येतात, तर
त्यांना न सांगता आपले अव्यक्त शांत रूप असे धारण करा,जे इशाऱ्या द्वारे
समजतील.यामुळे वातावरण अव्यक्त राहील.वेगळेपण दिसून येईल आणि तुम्ही साक्षात्कार
करवणारे, साक्षात मुर्त बनाल.
बोधवाक्य:-
संपूर्ण
सत्यताच पवित्रतेचा आधार आहे.