22-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आता ही चढत्या कलेची वेळ आहे, भारत गरीबा पासून सावकार बनत आहे, तुम्हीं बाबा कडून सतयुगाच्या बादशाहीचा वरसा घेत आहात."

प्रश्न:-
बाबा चे कोणते नांव श्रीकृष्णाला देऊ शकत नाहीत?

उत्तर:-
बाबा गरीब निवाज आहेत. श्रीकृष्णाला असे म्हणत नाहीत. ते तर फार धनवान आहेत, त्यांच्या राज्या मध्ये सर्व सावकार असतात. बाबा जेंव्हा येतात, तर सर्वात गरीब भारत आहे. भारताला सावकार बनवितात. तुम्हीं म्हणता कि, आमचा भारत स्वर्ग होता, आता नाही. परत बनणार आहे. गरीब निवाज बाबाच भारताला स्वर्ग बनवित आहेत.

गीत:-
शेवटी तो दिवस आला आज. . . .

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलानी हे गीत ऐकले. जशी आत्मा गुप्त आहे, आणि शरीर प्रत्यक्ष आहे. आत्मा या डोळ्या द्वारे दिसून येत नाही, अदृश्य आहे, जरूर आहे, परंतु या शरीरा मध्ये झाकलेली आहे, त्यामुळे म्हटले जाते, आत्मा गुप्त आहे. आत्मा स्वतः म्हणते, मी निराकार आहे, इथे साकार मध्ये येऊन गुप्त बनलो आहे. आत्म्याची निराकारी दुनिया आहे. त्यामध्ये तर गुप्त ची गोष्ट नाही. परमपिता परमात्मा पण तेथे राहतात, त्यांना म्हटले जाते सुप्रीम. उंच ते उंच आत्मा, दूर ते दूर राहणारे परमात्मा. बाबा म्हणतात, जसे तुम्ही गुप्त आहात, मला पण गुप्त यावे लागते. मी गर्भजेल मध्ये येत नाही. माझे एकच नाव शिव चालत आले आहे. मी या तना मध्ये येत आहे, तरी पण माझे नाव बदलत नाही. यांच्या आत्म्याचे जे शरीर आहे, त्यांचे नाव बदलत आहे. मला तर शिव म्हणतात, सर्व आत्म्यांचा पिता. तर तुम्ही आत्मे या शरीरा मध्ये गुप्त आहात. या शरीरा द्वारे कर्म करत आहात. मी पण गुप्त आहे. तर मुलांना हे ज्ञान आता मिळत आहे कि, आत्मा या शरीरा मध्ये झाकलेली आहे. आत्मा अदृश्य आहे, शरीर दृश्य आहे. मी पण अशरीरी आहे. बाबा अदृश्य या शरीरा द्वारे सांगत आहेत. तुम्ही पण अदृश्य आहात, शरीरा द्वारे ऐकत आहात. तुम्ही जाणता कि, बाबा आले आहेत, भारताला परत गरीबा पासून सावकार बनविण्यासाठी. तुम्ही म्हणता आमचा भारत. प्रत्येक जण आपल्या राज्यासाठी म्हणतात, आमचा गुजरात, आमचा राजस्थान, आमचे आमचे म्हणाल्याने, त्यामध्ये मोह राहतो. आमचा भारत गरीब आहे. हे सर्व मानत आहेत, परंतु त्यांना हे माहीत नाही कि, आमचा भारत सावकार कधी होता, कसा होता, तुम्हां मुलांना फार नशा आहे. आमचा भारत, जो फार सावकार होता, दुःखाची गोष्टच नव्हती. सतयुगा मध्ये दुसरा कोणता धर्म नव्हता. एकच देवी देवता धर्म होता, हे कोणाला पण माहित नाही. तो जो जगाचा इतिहास भूगोल आहे, तो कोणी समजत नाही. आता तुम्ही चांगल्या रीतीने समजत आहात, आमचा भारत फार सावकार होता. आता फार गरीब आहे. आता परत बाबा आले आहेत सावकार बनविण्यासाठी. भारत सतयुगा मध्ये फार सावकार होता. जेंव्हा देवी-देवतांचे राज्य होते, मग ते राज्य कुठे गेले. हे कोणी समजत नाही. ऋषी-मुनी इत्यादी पण म्हणतात, आम्ही रचता आणि रचनेला ओळखत नाही. बाबा म्हणतात, सतयुगा मध्ये पण देवी-देवतांना रचता आणि रचनेच्या आदि,मध्य, अंताचे ज्ञान नव्हते. जर त्यांना पण ज्ञान असते कि, आम्ही शिडी उतरत कलियुगा मध्ये जाऊ, तर बादशाहीचे सुखच राहणार नाही, चिंता लागेल. आता तुम्हाला चिंता लागली आहे कि, आम्ही सतोप्रधान होतो, मग आम्ही सतोप्रधान कसे बनू,आम्ही आत्मे जे निराकारी दुनिये मध्ये राहत होतो, तेथून मग कसे सुखधाम मध्ये जाऊ, हे पण ज्ञान आहे. आता आम्ही चढत्या कलेमध्ये आहोत. ही 84 जन्मांची शिडी आहे. विश्वनाटका नुसार प्रत्येक कलाकार क्रमवार आपापल्या वेळेवर येऊन अभिनय करत आहेत. आता तुम्हीं मुले जाणत आहात कि, गरीब निवाज कोणाला म्हटले जाते, हे दुनिया ओळखत नाही. गीता मध्ये पण ऐकले, शेवटी तो दिवस आला आज, ज्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो.. . सर्व भक्त .भगवान कधी येऊन आम्हा भक्तांना या भक्तिमार्गा तून सोडून, सद्गती मध्ये घेऊन जातील, हे आता समजले आहे. बाबा परत या शरीरा मध्ये आले आहेत. शिवजयंती पण साजरी करतात, तर जरूर आले असतील. असे पण नाही कि, मी कृष्णाच्या तना मध्ये येतो. नाही. बाबा म्हणतात, कृष्णाच्या आत्म्याने 84 जन्म घेतले आहेत, त्यांच्या फार जन्मातील अंताचा, हा अंतिम जन्म आहे. जे पहिल्या क्रमांकामध्ये होते, ते आता अंत मध्ये आहेत,ततत्वम. मी तर साधारण तना मध्ये येतो. तुम्हाला येऊन सांगत आहे कि, तुम्ही कसे चौऱ्यांशी जन्म घेतले आहेत. सरदार लोक पण समजतात कि, एको अंकार, परमपिता परमात्मा पिता आहे. ते बरोबर मनुष्याला देवता बनविणारे आहेत. तर कां नाही आम्ही पण देवता बनू. जे देवता बनलेले असतील, ते एकदम चिकटतील. देवी-देवता धर्माचा एक पण स्वतःला समजत नाही. इतर धर्माचा इतिहास फार लहान आहे. कोणाचा ५०० वर्षाचा, कोणाचा १२५० वर्षाचा, तुमचा इतिहास ५००० वर्षाचा आहे. देवता धर्म वाले स्वर्गा मध्ये येतील‌. इतर धर्म तर नंतर येतात. देवता धर्म वाले पण आता विश्व नाटकानुसार इतर धर्मामध्ये बदलून गेले आहेत. तरी असे बदलून जातील, मग आपापल्या धर्मांमध्ये परत येतील.

बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही तर विश्वाचे मालक होता. तुम्ही समजत आहात, बाबा स्वर्गाची स्थापना करणारे आहेत, तर कां आम्ही स्वर्गा मध्ये जाणार नाही, बाबा कडून आम्हीं वरसा जरूर घेऊ. त्यामुळे सिद्ध होते कि, हे आमच्या धर्माचे आहेत. जे असणार नाही, ते येणारच नाहीत. तो म्हणेल दुसऱ्या धर्मामध्ये कां जाऊ. तुम्हीं मुले जाणता,सतयुग नवीन दुनिये मध्ये देवतांना फार सुख होते, सोन्याचे महल होते. सोमनाथच्या मंदिरा मध्ये किती सोने होते. असा कोणता दुसरा धर्म असतच नाही. सोमनाथ मंदिरा सारखे एवढे भारी मंदिर कोणते असणार नाही. फार हिरे जवाहरात होते. बुद्ध इत्यादींचे कांही हिरे जवाहराताचे महल थोडेच असतील. तुम्हां मुलांना, ज्या बाबांनी एवढे उंच बनविले आहे, त्यांची तुम्हीं केवढी इज्जत ठेवली आहे. इज्जत ठेवली जाते ना. समजतात कि, चांगले कर्म करून गेले आहेत. आता तुम्हीं समजत आहात, सर्वात चांगले कर्म पतीत पावन बाबाच करून जातात. तुमची आत्मा म्हणते कि, सर्वात उत्तम ते उत्तम सेवा बेहदचे बाबा येऊन करतात. आम्हाला रंका पासून राव, बेगर पासून प्रिन्स बनवितात. जे भारताला स्वर्ग बनवितात, त्यांची आता कोणी इज्जत ठेवत नाहीत. तुम्हीं जाणत आहात कि, उंच ते उंच मंदिराचे गायन आहे, ज्यांना लुटून नेहले. लक्ष्मी नारायणाच्या मंदिराला कधी कोणी लुटले नाही. सोमनाथ च्या मंदिराला लुटले आहे. भक्ती मार्गामध्ये पण फार धनवान असतात. राजा मध्ये पण नंबरवार आहेत ना. जे उंच पदाचे असतात, त्यांची लहान पदवाले इज्जत ठेवतात. दरबारा मध्ये पण नंबरवार बसतात. बाबा तर अनुभवी आहेत ना. येथील दरबार पतित राजांचे आहे. पावन राजांचा दरबार कसा असेल. जेंव्हा त्यांच्या जवळ एवढे धन आहे, तर त्यांची घरे पण तेवढीच चांगली असतील. आता तुम्हीं जाणता कि, बाबा आम्हाला शिकवित आहेत, स्वर्गाची स्थापना करत आहेत. आम्ही स्वर्गाचे महाराणी महाराजा बनत आहोत. मग आम्ही खाली उतरत-उतरत भक्त बनू. मग पहिल्या प्रथम शिवबाबाचे पुजारी बनतो. ज्यांनी स्वर्गाचे मालक बनविले, त्यांची पूजा करतो. ते आम्हांला फार सावकार बनवित आहेत. आता भारत किती गरीब आहे, जी जमीन 500 रुपया मध्ये घेतली होती, त्याची किंमत आज 5000 पेक्षा पण अधिक झाली आहे. हे सर्व कृत्रिम दाम आहेत. तेथे तर जमिनीचे मूल्य नसते, ज्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्या. पुष्कळ जमीन पडलेली असेल. गोड नदीवर तुमचे महल असतील. मनुष्य फार थोडे असतील. प्रकृती दासी बनेल. फळ आणि फुले फार चांगली मिळत राहतील. आता तर किती मेहनत करावी लागते, तरी पण अन्न मिळत नाही. मनुष्य फार तहानेने, भुकेने मरतात‌. हे गीत ऐकल्याने तुमच्या अंगावर शहारे आले पाहिजेत. बाबाला गरीब निवाज म्हणतात. गरीब निवाज चा अर्थ समजला ना. कोणाला सावकार बनवित आहेत? जरूर येथे येतात, त्याला सावकार बनवितील ना. तुम्हीं मुले समजत आहात, आम्हाला पावन पासून पतित बनण्यासाठी ५००० वर्षे लागली. आता परत झटक्यात बाबा पतिता पासून पावन बनवित आहेत. उंच ते उंच बनवित आहेत. एका सेकंदा मध्ये जीवनमुक्ती मिळत आहे. म्हणतात, बाबा, आम्ही तुमचे आहोत. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्हीं विश्वाचे मालक आहात. मुलगा जन्मला आणि वारिस बनला. किती खुशी होत आहे. मुलीला पाहून चेहरा उतरतो. इथे तर सर्व आत्मे मुले आहेत. आता माहीत झाले आहे कि, आम्ही पाच हजार वर्षा पूर्वी स्वर्गाचे मालक होते. बाबा ने असे बनविले होते. शिवजयंती पण साजरी करतात, परंतु हे समजत नाहीत कि, ते कधी आले होते. लक्ष्मी नारायणाचे राज्य होते, हे पण कोणी समजत नाहीत. जयंती साजरी करतात, फक्त शिवलिंगाचे मोठ मोठे मंदिर बनवितात. परंतु ते कसे आले, येऊन काय केले, कांही पण माहित नाही, याला म्हटले जाते, अंधश्रद्धा. त्यांना हे माहित नाही कि, आमचा धर्म कोणता होता, केंव्हा स्थापन झाला. इतर धर्मवाल्यांना तर माहित आहे कि, बुद्ध कधी आले, तिथी, तारीख पण आहे. शिवबाबा ची, लक्ष्मी नारायणाची कोणती तिथी तारीख नाही. ५००० वर्षाच्या गोष्टीला, लाखो वर्ष लिहले आहे. लाखो वर्षाची गोष्ट तर कोणाला आठवणीत येईल?, भारता मध्ये देवी देवता धर्म कधी होता, हे समजत नाहीत. लाखो वर्षाच्या हिशोबाने तर भारताची लोकसंख्या सर्वात मोठी असली पाहिजे. भारताची जमीन पण सर्वात मोठी असली पाहिजे. लाखो वर्षामध्ये किती मनुष्य जन्म घेतील, बेसुमार मनुष्य होऊन जातील. तेवढे तर नाहीत ना. आणखीन कमी झाले आहेत, या सर्व गोष्टी बाबा समजावत आहेत. मनुष्य ऐकतात तर म्हणतात, या गोष्टी तर कधी ऐकल्या नाहीत ना, ना कोणत्या शास्त्रा मध्ये वाचले. या आश्चर्यकारक गोष्टी आहेत.आता तुम्हां मुलांच्या बुद्धी मध्ये साऱ्या चक्राचे ज्ञान आहे. हे फार जन्मातील अंतातील अंता मध्ये आता पतित आत्मा आहेत, जे सतोप्रधान होते, ते आता तमोप्रधान आहेत, मग सतोप्रधान बनायचे आहे. तुम्हां आत्म्यांना आता शिक्षण मिळत आहे. आत्मा काना द्वारे ऐकत आहे, तर शरीर डोलते, कारण आत्मा ऐकत आहे ना. बरोबर, आम्ही आत्मे 84 जन्म घेतो. 84 जन्मांमध्ये 84 आई-वडील जरूर भेटले असतील. हा पण हिशोब आहे ना. बुद्धी मध्ये येते कि, आम्ही 84 जन्म घेत आहोत, मग कमी जन्म वाले पण असतील. असे थोडेच सर्व 84 जन्म घेतील. बाबा बसून समजावत आहेत, शास्त्रा मध्ये काय, काय लिहिले आहे. तुमच्या साठी तरीपण 84 जन्म म्हणतात, माझ्या साठी तर अनगिनत, बेसुमार जन्म घेतले म्हणतात. कण कणा मध्ये, दगड धोंड्या मध्ये मला ठोकले आहे. बसं, जिकडे पाहावे तिकडे तूच तू आहे. कृष्ण च कृष्ण आहे. मथुरा, वृंदावन मध्ये असे म्हणत राहतात. कृष्णच सर्वव्यापी आहे. राधेपंथ वाले मग म्हणतात, राधे च राधे. तुम्ही पण राधे आम्ही पण राधे.

तर एक बाबाच बरोबर गरीब निवाज आहेत. भारत जो सर्वात सावकार होता, आता सर्वात गरीब बनला आहे, त्यामुळे तर मला भारतामध्येच यावे लागते. हे पूर्वंपार बनलेले नाटक आहे. यामध्ये जरा पण फरक पडत नाही. नाटका मध्ये जे चित्रीत झाले, ती हुबेहूब पुनरावृत्त होईल, यामध्ये पैशा चा पण फरक पडत नाही. नाटकाची पण माहिती असली पाहिजे. नाटक म्हणजे नाटक. ते हदचे नाटक आहेत, हे बेहदचे नाटक आहे. या बेहदच्या नाटकातील आदि, मध्य, अंताला कोणी समजत नाहीत. तर गरीब निवाज निराकार भगवानाला च मानतील, कृष्णाला मानणार नाहीत. कृष्ण तर धनवान सतयुगाचे राजकुमार बनत आहेत. भगवानाला तर स्वतःचे शरीरच नाही. ते येऊन तुम्हां मुलांना धनवान बनवित आहेत, तुम्हाला राजयोगाचे शिक्षण देत आहेत. शिक्षणा द्वारे बॅरिस्टर इत्यादी बनून मग कमाई करतात. बाबा पण तुम्हांला आता शिकवित आहेत. तुम्हीं भविष्या मध्ये नरा पासून नारायण बनत आहात. तुमचा जन्म तर होईल ना. असे तर नाही, स्वर्ग कांही समुद्रातून निघेल. कृष्णाने पण जन्म घेतला ना.कंसपुरी इत्यादी तर त्यावेळी नव्हती. कृष्णाचे किती नाव गायले जाते. त्यांच्या पित्याचे गायनच नाही. त्यांचे पिता कुठे आहेत? जरूर कृष्ण कोणाचा मुलगा असेल ना. कृष्ण जेंव्हा जन्म घेतात, तेंव्हा थोडे फार पतित पण असतात. जेंव्हा ते सगळे नाहीसे होतील, तेंव्हा ते गादीवर बसतील. आपले राज्य घेतील, तेंव्हा पासून त्यांचा संवत सुरू होईल. लक्ष्मी नारायणा पासूनच संवत सुरू होत आहे. तुम्हीं पूर्ण हिशोब लिहिता. यांचे राज्य एवढा वेळ, मग त्यांचे एवढा वेळ, तर मनुष्य समजतात, या कल्पाचे आयुष्य वाढू शकत नाही. ५०००वर्षाचा पूर्ण हिशोब आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आले आहे ना. आम्ही काल स्वर्गाचे मालक होता. बाबांनी बनविले होते. तेंव्हा तर त्यांची शिवजयंती आम्ही साजरी करत आहोत. तुम्हीं सर्वांना ओळखत आहात. क्राईष्ट, गुरुनानक इत्यादी मग कधी येतील, याचे तुम्हाला ज्ञान आहे. जगाच्या इतिहास, भूगोलाची हुबेहुब पुनरावृत्ती होत आहे. हे शिक्षण किती सोपे आहे. तुम्हीं स्वर्गाला ओळखत आहात, बरोबर भारत स्वर्ग होता. भारत अविनाशी खंड आहे. भारता सारखी महिमा आणखीन कोणाची होऊ शकत नाही. सर्वांना पतिता पासून पावन बनविणारे एकच बाबा आहेत. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) नाटकाच्या आदि,मध्य, अंता चे ज्ञान बुद्धी मध्ये ठेवून, सर्व चिंता सोडून दिल्या पाहिजेत. एक सतोप्रधान बनण्याची चिंता ठेवली पाहिजे.

(२) गरीब निवाज बाबा भारताला गरीबा पासून सावकार बनविण्यासाठी आले आहेत, त्यांचे पुरे पुर मदतगार बनायचे आहे. आपल्या नवीन दुनियेची आठवण करून, नेहमी खुशी मध्ये राहायचे आहे.

वरदान:-
एकाच वेळी तीन रूपाने, सेवा करणारे मास्टर त्रिमूर्ती भव

जसे बाबा नेहमी तीन स्वरूपाने सेवेवर उपस्थित आहेत. पिता, शिक्षक आणि सद्गुरु. तसे तुम्ही मुले पण प्रत्येक सेकंदा मध्ये मन, वाणी आणि कर्मा द्वारे एकत्र सेवा करा. तेंव्हा मास्टर त्रिमूर्ती म्हटले जाईल. मास्टर त्रिमूर्ती बनून जे प्रत्येक सेकंदा मध्ये तीन रूपाने सेवेवर उपस्थित राहतात, तेच विश्व कल्याण करू शकतील, कारण एवढ्या मोठ्या विश्वाचे कल्याण करण्यासाठी,जेंव्हा एकाच वेळी तीन रूपाने सेवा होईल, तेंव्हा हे सेवेचे कार्य समाप्त होईल.

बोधवाक्य:-
ब्राह्मण ते आहेत, जे आपल्या शक्तीने वाईटाला चांगल्या मध्ये बदलतील.