02-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,खुदा, ईश्र्वर तुमचा दोस्त आहे,रावण दुश्मन आहे म्हणून खुदा सोबत प्रेम करतात आणि रावणाला जाळतात"

प्रश्न:-
कोणत्या मुलांना अनेकांचे आशीर्वाद स्वता:च मिळतात?

उत्तर:-
जे मुलं आठवणीमध्ये राहून स्वत:पण पवित्र बनतात आणि दुसर्यांना पण आपल्यासारखे पवित्र बनवतात,त्यांना अनेकांचे आशीर्वाद स्वतः मिळतात.ते खूप उच्चपद प्राप्त करतात.बाबा तुम्हा मुलांना श्रेष्ठ बनवण्यासाठी एकच श्रीमत देतात, मुलांनो कोणत्याही देहधारी ची आठवण न करता माझी आठवण करा.

गीत:-
शेवटी तो दिवस आला आज, ज्याची आम्ही वाट पाहत होतो...

ओम शांती।
ओम शांती चा अर्थ तर इतर पित्याने आत्मिक मुलांना समजावला आहे.ओम म्हणजे मी आत्मा आहे आणि हे माझे शरीर आहे.आत्मा तर दिसून येत नाही. आत्म्या मध्येच चांगले किंवा वाईट संस्कार असतात.आत्म्यामध्ये मन बुद्धी आहे,शरीरामध्ये बुद्धी नाही. मुख्यतः आत्माच आहे.शरीर तर माझे आहे.आत्म्याला कोणी पाहू शकत नाही.शरीराला आत्मा पाहू शकते,आत्म्याला शरीर पाहू शकत नाही.आत्मा निघून जाते,तर शरीर जड बनते.आत्म्याला पाहू शकत नाही. शरीराला पाहू शकतो.तसेच आत्म्याचे जे पिता आहेत, ज्याला

ईश्वरीय पिता म्हणतात,ते पण दिसून येत नाहीत,त्यांना समजले जाते,जाणले जाते. आम्ही आत्मे सर्व भाऊ भाऊ आहोत.शरीरामध्ये येतात,तर म्हणाल आम्ही सर्व भाऊ भाऊ आहेत किंवा बहीण भाऊ आहेत.आत्मे तर सर्व भाऊ भाऊ आहेत.आत्म्याचे पिता परमपिता परमात्मा आहेत.शारीरिक भाऊ-बहीण एट दोघां पाहू शकतात.आत्म्याचे पिता एकच आहेत,त्यांना पाहू शकत नाहीत. तर आत्ता बाबा आले आहेत,जुन्या दुनियेला नवीन बनवण्यासाठी. नवीन होती सतयुग होती,जुनी दुनिया कलयुग आहे.जुनी दुनिया तर नष्ट व्हायला पाहिजे ना.जुने घर नष्ट होते,परत नवीन घर बांधतात ना.तसेच ही जुनी दुनिया पण नष्ट होणार आहे.सतयुगाच्या नंतर त्रेता द्वापर कलियुग नंतर परत सतयुग जरूर येईल.विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती जरूर होईल. सतयुगा मध्ये देवी-देवतांचे राज्य असते.सूर्यवंशी आणि चंद्रवंशी, त्यांना म्हटले जाते लक्ष्मीनारायण राजघराणे,राम सीताचे राजघराणे.हे तर सहज आहे ना.परत द्वापर कलियुगा मध्ये दुसरे धर्म येतात. परत देवता जे पवित्र होते,ते अपवित्र बनतात,यालाच रावण राज्य म्हटले जाते.रावणाला वर्ष वर्ष जाळतात परंतु जळत नाही,परत परत जाळत राहतात.हा सर्वांचा मोठा दुश्मन आहे म्हणून त्याला जाळण्याची परंपरा आहे.भारताचा क्रमांक एकचा दुश्मन कोण आहे आणि परत क्रमांक एक चा दोस्त नेहमी सुख देणारा खुदा आहे.खुदा ला दोस्त म्हणतात ना.यावरती एक गोष्ट पण आहे.तर खुदा दोस्त आहे आणि रावण दुश्मन आहे.खुदा जो दोस्त आहे त्यांना कधी जाळणार नाहीत.रावम दुश्मन आहे म्हणून दहा तोंडाचा रावण बनवून त्यांना वर्ष वर्ष जाळतात.गांधीजीची पण इच्छा होती की,आम्हाला रामराज्य हवे.राम राज्यांमध्ये सुख आहे,तर रावण राज्यामध्ये दुःख आहे.आता हे कोण सन्मुख समजावत आहेत, पतित-पावन शिवपिता,शिवबाबा.

ब्रह्मा दादा आहेत.बाबा नेहमी सही पण करतात,बापाला.प्रजापिता ब्रह्मा पण सर्वांचे झाले ना,ज्यांना आदम पण म्हटले जाते.त्यांना आजोबांचे आजोबा पूर्वज म्हटले जाते.मनुष्य सृष्टीमध्ये प्रजापिता झाले.प्रजापिता ब्रह्माद्वारा ब्राह्मणांची स्थापना होते,परत ब्राह्मणच देवता बनतात.देवता परत क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतात.यांना म्हटले जाते प्रजापिता ब्रह्मा,मनुष्य सृष्टीचे पूर्वज.प्रजापिता ब्रह्मा चे अनेक मुलं आहेत.बाबा बाबा म्हणत राहतात.हे साकार बाबा आहेत, शिवबाबा निराकार बाबा आहेत.असे गायन पण केले जाते, प्रजापिता ब्रह्मा नवीन मनुष्य सृष्टी ची स्थापना करतात.आता तुमचीही जुनी खाल,कातडी आहे.ही पतित दुनिया, रावण राज्य आहे.आता रावणाची सारी दुनिया नष्ट होईल, त्यासाठीही महाभारत लढाई आहे. परत सतयुगामध्ये,या रावण दुष्मनाला कोणी जाळणार नाहीत. रावण च नसेल.रावणाने दुःखाची दुनिया बनवली आहे.असे पण नाही ज्यांच्याजवळ पैसे खूप आहेत,मोठे बंगले आहेत,ते स्वर्गामध्ये आहेत. बाबा समजवतात,कोणाच्या जवळ करोडो रुपये आहेत परंतु हे तर सर्व मातीमध्ये मिळणार आहेत.नवीन दुनिये मध्ये परत नवीन खाणी निघतील,ज्यापासून नवीन दुनियेचे राजवाडे इत्यादी सर्व बनवले जातील.ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे.मनुष्य सद्गती साठी भक्ती करतात,आम्हाला पावन बनवा,आम्ही विकारी बनलो आहोत,असे बोलवत राहतात. विकारीला पतित म्हटले जाते.सतयुगा मध्ये संपूर्ण निर्विकारी आहेत.तेथे मुलं योगबळा द्वारे होतात.तेथे विकार नसतात,न देह अभिमान,न काम करतोय... म्हणून तेथे रावणाला कधीच जाळत नाहीत.येथे तर रावण राज्य आहे. आता बाबा म्हणतात,तुम्ही पवित्र बना.ही पतित दुनिया तर नष्ट होणार आहे.जे श्रीमतावर पवित्र राहतात,तेच बाबाच्या मतावर चालून,विश्वाच्या बादशाहीचा वारसा घेतात.या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना.सतयुगामध्ये खूप थोडे मनुष्य राहतात.दिल्लीच राजधानी असते.जेथे लक्ष्मीनारायण चे राज्य असते.दिल्ली सतयुगामध्ये परीस्थान होती.दिल्लीलाच गादी होती.रावणाच्या राज्यामध्ये पण दिल्लीच राजधानी आहे,राम राज्यांमध्ये पण दिलीच राजधानी राहते.राम राज्यांमध्ये तर हिऱ्या रत्नांचे महल असतात,खूप सुख असते.आता बाबा म्हणतात तुम्ही विश्वाचे राज्य गमावले आहे,मी परत तुम्हाला ते देतो.तुम्ही माझ्या मतावर चाला,श्रेष्ठ बनायचे आहे तर फक्त माझी आठवण करा आणि कोणत्या देहधारी ची आठवण करू नका. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा,तर तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल. तुम्ही माझ्या जवळ याल.माझ्या गळ्यातील माळ बनून,परत विष्णूच्या गळ्यातील माळ बनाल.माळेमध्ये मी वरती आहे, परत दोघे ब्रह्मा-सरस्वती आहेत. तेच सतयुगाचे महाराजा महाराणी बनतात.त्यांचीच सर्व माळ आहे,जे सर्व क्रमानुसार गादीवर बसतात.मी या भारताला या ब्रह्मा-सरस्वती आणि ब्राह्मणांद्वारे स्वर्ग बनवतो.जे कष्ट करतात,परत त्यांचे स्मृतीस्थळ यादगार बनतात.आत्म्यांची रुद्र माळ आहे आणि मनुष्यांची विष्णूची माळ आहे.आत्म्याचे राहण्याचे स्थान,ते निराकारी परमधाम आहे,यालाच ब्राह्मांड म्हणतात.आत्मा काही अंड्या सारखी नाही,आत्मा तर बिंदू सारखी आहे.आम्ही सर्व आत्मे त्या गोड घरांमध्ये राहणारे आहोत. बाबांच्या सोबत आपण आत्मे राहतो.ते मुक्तिधाम आहे.सर्व मनुष्यांची इच्छा असते,आम्ही मुक्तिधाम मध्ये जाऊ,परंतु वापस तर कोणीही जाऊ शकत नाही. सर्वांना भूमिका वठवायचीच आहे, तोपर्यंत बाबा तुम्हाला तयार करत राहतात.तुम्ही तयार व्हाल,परत जे पण आत्मे आहेत,ते सर्व आत्मे येतील,परत सर्व नष्ट होईल.तुम्ही जाऊन नवीन दुनियेमध्ये राज्य कराल,परत क्रमानुसार चक्र चालत राहील.गीता मध्ये पण ऐकले की, शेवटी तो दिवस आला आज, ज्याची आम्ही वाट पाहत होतो. तुम्ही जाणतात जे भारतवासी नर्कवासी आहेत,ते परत सर्गवासी बनतील.बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये जातील.थोडक्यात समजावून सांगायचे आहे.अल्फ बाबा,बे म्हणजे बादशाही.अल्फला बादशाही मिळते.आता बाबा म्हणतात,मी तेच राज्य,परत स्थापन करतो.तुम्ही 84 जन्म भोगून आता पतित बनले आहात.रावणाने पतित बनवले आहे.परत पावन कोण बनवेल.भगवान ज्यांना पतित-पावन म्हणतात,तुम्ही कसे पतिता पासून पावन, परत पावन पासून पतित बनतात,या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होईल. हा विनाशच यासाठी आहे.असे म्हणतात ब्रह्माचे आयुष्य ग्रंथांमध्ये शंभर वर्ष लिहिले आहे.हे जे ब्रह्मा आहे त्यांच्यामध्ये बाबा विराजमान होऊन वारसा देतात,त्यांचे पण शरीर सुटून जाईल.आत्म्यांचे पिता आत्म्यांना सन्मुख शिकवत आहेत. मनुष्य मनुष्यांना पावन बनवू शकत नाहीत.देवतांचा जन्म विकारा पासून होत नाही.पुनर्जन्म सर्व घेत आले आहेत ना.बाबा खूप चांगल्या प्रकारे समजतात,ज्यामुळे भाग्य बनेल,बाबा येतातच मनुष्यमात्राचे भाग्य बनवण्यासाठी.सर्व पतित दुखी आहेत ना. त्राही त्राही करून विनाश होईल म्हणून,बाबा म्हणतात त्राही त्राही करण्याच्या अगोदर,मज बेहद्दच्या पित्यापासून वारसा घेत राहा.हे जे काही दुनिया मध्ये पाहतात,हे सर्व नष्ट होईल. भारताची प्रगती आणि भारताची अधोगती यावरतीच खेळ बनलेला आहे.दुनियेचे प्रगती.स्वर्गा मध्ये कोण कोण राज्य करतात, ते बाबा सन्मुख समजवतात.भारताची प्रगती तर देवतांचे राज्य,भारताची अधोगती रावणाचे राज्य होते. आता नवीन दुनिया बनत आहे. बाबा पासून नवीन दुनिया चा वारसा घेण्यासाठी शिकत आहोत. खूपच सहज आहे.हे शिक्षण मनुष्य पासून देवता बनायचे आहे.हे पण चांगल्या प्रकारे समजायचे आहे. कोणते कोणते धर्म कधी येतात,द्वापर नंतरच दुसरे धर्म येतात.प्रथम सुख भोगतात,परत दुःख.हे सर्व चक्र बुद्धीमध्ये बसायला हवे,ज्याद्वारे तुम्ही चक्रवर्ती महाराज महाराणी बनतात.फक्त अल्फ आणि बादशाहीला समजायचे आहे.आता विनाश तर होणारच आहे.हंगामा इतका होईल जे परदेशामध्ये येऊ पण शकणार नाहीत,म्हणून बाबा समजतात भारत भूमी सर्वात उत्तम आहे.जबरदस्त लढाई लागेल परत परदेशातच राहतील. ५०-६० लाख रुपये दिले तरी भारतात येऊ शकणार नाहीत.भारत भूमी सर्वात उत्तम भुमी आहे.जेथे बाबा येऊन अवतार घेतात.शिवजयंती पण येथेच साजरी केली जाते.फक्त कृष्णाचे नाव घेतल्यामुळे सर्व महिमा नष्ट झाली आहे.सर्व मनुष्यमात्राचे मुक्तिदाता येथे येवून अवतार घेतात.शिवजयंती पण येथेच साजरी करतात.ईश्वर पिताच आहेत, जे येऊन सर्वांना मुक्त करतात.तर अशा बाबांना नमस्ते करायला पाहिजे,त्यांची जयंती साजरी करायला पाहिजे.ते पिता येथे भारतामध्ये येऊन सर्वांना पावन बनवतात,तर भारत खूप मोठे तीर्थ झाले ना. सर्वांना दुर्गती पासून सोडून सद्गती मध्ये घेऊन जातात.हे अविनाश नाटक आहे.आता तुम्ही आत्मे जाणतात,आमचे बाबा आम्हाला या शरीरा द्वारे सर्व रहस्य समजावत आहेत.आम्ही आत्मा या शरीराद्वारे ऐकत आहोत. आत्माभिमान बनायचे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबाची आठवण करा,तर गंज निघून जाईल आणि पवित्र बनून तुम्ही बाबांच्या जवळ येऊ शकाल.जितकी आठवण कराल,तेवढे पवित्र बनाल. दुसऱ्याला पण आपल्यासारखे बनवाल,तर अनेकांचे आशीर्वाद मिळतील,उच्चपद मिळेल,म्हणून गायन पण आहे,सेकंदामध्ये जीवन मुक्ती मिळते.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) श्रीमतावर पवित्र बनून प्रत्येक पाऊल,बाबांच्या मतावर चालून, विश्वाची बादशाही घ्यायची आहे. बाबाच्या समान दुखहर्ता सुखकर्ता बनवायचे आहे.

(२) मनुष्या पासून देवता बनवण्याचे शिक्षण नेहमी घेत राहायचे आहे.सर्वांना आपल्यासारखे बनवण्याची सेवा करून आशीर्वाद मिळवायचे आहेत.

वरदान:-
अधिकारी पदाच्या स्थिती द्वारे बाबांना आपले सोबती बनवणारे,नेहमी विजयी भव.

बाबांना सोबती बनवण्याची सहज पद्धत आहे,अधिकारी पणाचे स्थिती.जेव्हा अधिकारीपदाची स्थिती मध्ये स्थिर राहाल,तेव्हाच व्यर्थसंकल्प किंवा अशुद्ध संकल्पाच्या हालचाल मध्ये किंवा अनेक रसामध्ये बुद्धी डगमग होणार नाही.बुद्धीच्या एकाग्रते द्वारे सामना करणे, पारखण्याची किंवा निर्णय करण्याची शक्ती येईल, ज्यामुळे सहजच मायेच्या अनेक प्रकारच्या आघातापासून विजयी बनाल.

बोधवाक्य:-
राजयोगी तेच आहेत,जे सार मधून विस्तार आणि विस्तार मधून सारमध्ये जाण्याचे अभ्यासी आहेत.