13-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही बाबांच्या जवळ आले आहात,आपले झोपलेले भाग्य जागृत करण्यासाठी,भाग्य जागृत करणे म्हणजे विश्वाचे मालक बनणे"

प्रश्न:-
कोणते खुराक मुलांना बाबा समान,बुद्धिवान बनवते?

उत्तर:-
हे शिक्षण आहे,तुम्हा मुलांच्या बुद्धीचे खुराक.जे रोज शिक्षण घेतात,म्हणजेच हा खुराक घेतात,त्यांची बुद्धी पारस बनते. पारसनाथ बाबा,जे बुद्धीवानांचे बुद्धी आहेत,तुम्हाला आप समान पारस बुद्धी बनवतात.

गीत:-

तकदीर जगा कर आई हूं..

ओम शांती।
गीताची ओळ ऐकून पण,गोड गोड मुलांच्या अंगावर शहारे यायला पाहिजेत.हे तर साधारण गीत आहे,परंतु यांचे रहस्य कोणी जाणत नाहीत.बाबाच येऊन गीत,ग्रंथ इत्यादीचा अर्थ समजवतात.गोड गोड मुलं हे पण जाणतात की,कलियुगामध्ये सर्वांचे भाग्य झोपलेले आहे.सतयुगामध्ये सर्वांचे भाग्य जागृत असते. झोपलेल्या भाग्याला जागृत करणारे आणि श्रीमत देणारे किंवा पुरुषार्थ करून घेणारे एक बाबाच आहेत. बाबा सम्मुख मुलांचे भाग्य जागृत करतात.जसे मुलं होतात तर भाग्य जागृत होते.असे म्हणतात मुलगा झाला आणि त्यांनाही माहीत झाले की आम्ही वारस आहोत.तसेच ही पण बेहद्दची गोष्ट आहे.मुलं जाणतात,कल्प-कल्प आमचे भाग्य जागृत होते,परत झोपते.पावन बनतात तर भाग्य जागृत होते.पावन गृहस्थ अक्षर म्हटले जाते.आश्रम अक्षर पवित्र असते.पवित्र ग्रहस्थ आश्रम,याच्या विरोधात अपवित्र पतीत ग्रहस्थ धर्म आहे.आश्रम म्हणू शकत नाही.ग्रहस्थ धर्म तर सर्वांचा आहे.जनावरांमध्ये पण आहे.मुलं तर सर्वांनाच होतात.जनावराल पण म्हणाल ग्रहस्त धर्मामध्ये आहेत. आता तुम्ही मुलं जाणता,आम्ही स्वर्गामध्ये पवित्र ग्रहस्थ आश्रम मध्ये होतो.देवी देवता होतो,त्यांची महिमा पण गायन करतात,सर्वगुण संपन्न,सोळाकला संपन्न.. तुम्ही स्वत: पण गायन करत होते.आता समजता,आम्ही मनुष्या पासून देवता परत बनत आहोत.गायन पण आहे मनुष्यापासून देवता...ब्रह्मा विष्णू शंकर पण देवता म्हणतात. ब्रह्मा देवताए नमः परत म्हणतात शिव परमात्माए नम: आता त्यांचा अर्थ पण तुम्ही जाणतात.ते तर फक्त अंधश्रद्धा मध्ये म्हणतात. आता शंकर देवताए नम: म्हणाल. मनुष्य शिवासाठी म्हणतात शिव परमात्माए नम: तर फर्क झाला ना.ते देवता झाले आणि ते परमात्मा झाले. शिव आणि शंकरला एक म्हणू शकत नाही. तुम्ही जाणता आम्ही बरोबर पत्थर बुद्धी होतो,आता पारस बुद्धी बनत आहोत.देवतांना तर पत्थर बुद्धी म्हणणार नाही,परत रावण राज्यांमध्ये शिडी उतरायची आहेच. पारस बुद्धी पासून पत्थर बुद्धी बनायचे आहे.सर्वात बुद्धिवान तर एकच बाबा आहेत.आता तुमच्या बुद्धीमध्ये दम राहिला नाही. बाबा त्यांना सन्मुख पारस बुद्धी बनवतात.तुम्ही येथ पारस बुद्धी बनण्यासाठी येता.पारसनाथचे मंदिर पण आहे,तेथे यात्रा भरते परंतु हे कोणाला माहित नाही की, पारसनाथ कोण आहेत? वास्तव मध्ये पारस बनवणारे तर बाबाच आहेत,ते बुद्धीवानांची बुद्धी आहेत.हे ज्ञान तुम्हा मुलांच्या बुद्धी साठी खुराक आहे,ज्याद्वारे बुद्धी चे खूप परिवर्तन होते.ही दुनिया काट्याचे जंगल आहे.एक-दोघांना दुःख देत राहतात.आता तमोप्रधान रौरव नर्क आहे.गरुड पुराणा मध्ये खूप आश्र्चर्यकारक गोष्टी लिहिल्या आहेत.आता तुम्हा मुलांच्या बुद्धीला खुराक मिळत आहे, बेहद्दचे बाबा खुराक देत आहेत.हे शिक्षण आहे, याला ज्ञानामृत पण म्हणतात. कोणते जल इत्यादी नाही.आज काल तर सर्वच गोष्टींना अमृत म्हणतात.गंगाजल पण अमृत म्हणतात.देवतांचे पाय धुऊन पाणी ठेवतात,त्याला पण अमृत म्हणतात. आता हे पण बुद्धी द्वारे समजण्याची गोष्ट आहे ना.ही अंचली अमृत आहे की, पतित-पावन गंगाचे जल अमृत आहे.अंचली जे देतात,ते असे म्हणत नाहीत की,हे पतितांना,पावन बनवणारे आहे.गंगाजल साठी म्हणतात,पतित पावनी आहे.असे म्हणतात मनुष्याचा मृत्यू झाला,तर गंगाजल मुखा मध्ये हवे. महाभारता मध्ये दाखवतात,अर्जुनाने बाण मारला, आणि परत अमृत जल पाजले. तुम्हा मुलांनी कोणते बाण इत्यादीत चालवले नाहीत. एक गाव आहे,जिथे बाणाद्वारे लढाई करतात,तेथील राजाला ईश्वराचा अवतार मानतात.आता ईश्वराचा अवतार तर कोणी होऊ शकत नाही.वास्तव मध्ये खरे सद्गुरू एकच आहेत,जे सर्वांचे सदगती दाता आहेत.ते सर्वांना सोबत घेऊन जातात.बाबांच्या शिवाय परत कोणी घेऊन जाऊ शकत नाही.ब्रह्ममध्ये विलीन होण्याची पण गोष्ट नाही.हे नाटक बनलेले आहे,सृष्टीचे चक्र अनादी फिरत राहते.विश्वाचा इतिहास भूगोलाची कशी पुनरावृत्ती होत राहते, हे पण तुम्ही मुलं जाणतात. दुसरे कोणीच जाणत नाहीत.मनुष्य म्हणजे आत्मे,आपल्या रचनाकार पित्याला जाणत नाहीत.ज्याची आठवण पण करतात,हे ईश्वर पिता.हदच्या पित्याला कधी ईश्वर पिता बनू शकत नाहीत.ईश्वर पिता हे शब्द,खूप आदराने म्हणतात. त्यांच्यासाठीच गायन करतात, पतित-पावन दुखहर्ता सुखकर्ता आहेत.एकीकडे म्हणतात ते दुखहर्ता सुखकर्ता आहेत आणि जेव्हा कोणी दुःख देतात किंवा कोणाचा मुलगा इत्यादी मरतो.तर असे म्हणतात,ईश्वरच दुख सुख देतात.ईश्वराने आमचा मुलगा घेतला, हे काय केले? आता महिमा तर गातात आणि परत काही होते तर ईश्वराची निंदा करतात.असे म्हणतात ईश्वराने मुलगा दिला, जर त्यांनी परत घेतला तर,तुम्ही का रडतात.ईश्वराच्या जवळ गेला ना. सतयुगा मध्ये कधी कोणी रडत नाही.बाबा समजवतात सतयुगा मध्ये रडण्याची आवश्यकता नाही. आत्म्याला आपल्या हिशेबा नुसार जाऊन दुसरी भूमिका वठवयाची आहेत.ज्ञान नसल्यामुळे मनुष्य खूप रडतात,जसे वेडे होतात.येथे तर बाबा समजवतात,अम्माचा मृत्यू झाला तरीही ज्ञानाचा हलवा खात राहा,नष्टोमोहा बनायचे आहे.आमचे तर एक बाबा दुसरे कोणी नाही.अशी अवस्था मुलांची व्हायला पाहिजे. मोहजीत राजाची कथा पण ऐकली आहे ना.या सर्व दंतकथा आहेत, यामध्ये कधी दुःखाची गोष्ट नसते.न कधी अकाली मृत्यू होतो.मुलं जाणतात,आम्ही काळा वरती विजय मिळवतो.बाबांना महाकाळ पण म्हणतात.महाकाळ तुम्हाला काळावरती विजय मिळवून देतात, म्हणजेच काळ कधी खात नाही. काळ आत्म्याला खाऊ शकत नाही. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते, त्यांना म्हणतात काळाने खाल्ले. बाकी काळ कोणती गोष्ट नाही. मनुष्य महिमा गात राहतात, समजत काहीच नाहीत.गायन करतात अच्युतम केशवम माधव... अर्थ काहीच समजत नाहीत. बिल्कुलच मनुष्य बेसमजदार झाले आहेत.बाबा समजवतात, पाच विकार तुमच्या बुद्धीला खूप खराब करतात.अनेक मनुष्य बद्रीनाथ येथे जातात.आज दोन लाख गेले,चार लाख गेले... अनेक अधिकारी पण तीर्थ करण्यासाठी जातात.तुम्ही तर जात नाहीत, तर ते म्हणतात हे ब्रह्मकुमार कुमारी तर नास्तिक आहेत,कारण भक्ती करत नाहीत. तुम्ही परत म्हणतात,जे भगवंताला जाणत नाहीत ते नास्तिक आहेत. बाबांना तर कोणी जाणत नाहीत, म्हणून यास अनाथ दुनिया म्हटले जाते.आपसामध्ये भांडत राहतात. ही सर्व दुनिया बाबा चे घर आहे ना. बाबा सर्व दुनियाच्या मुलांना पतितां पासून पावन बनवण्यासाठी येतात. अर्धाकल्प बरोबर पावन दुनिया होते ना.गायन पण करतात राम राजा,राम प्रजा,राम सावकार आहे... तेथे परत अधर्माची गोष्ट कसे होऊ शकते.असे म्हणतात तेथे वाघ बकरी एकत्र पाणी पित होते, परत तेथे रावण इत्यादी कोठून येईल,काहीच समजत नाहीत. परदेशी लोक अशा गोष्टी ऐकून हसत राहतात.तुम्ही मुलं जाणतात ज्ञानाचे सागर बाबा येऊन आम्हाला ज्ञान देतात. ही पतित दुनिया आहे ना.आता प्रेरणा द्वारे पतितांना पावन बनवतील काय? हे पतित पावन या,येऊन आम्हाला पावन बनवा,तर जरुर भारतामध्येच आले असतील ना.आत्ता पण म्हणतात मी ज्ञानाचा सागर आलो आहे.तुम्ही मुलं जाणता,शिवबाबा मध्ये सर्व ज्ञान आहे.तेच बाबा मुलांना सन्मुख या सर्व गोष्टी समजतात.ग्रंथांमध्ये सर्व दंतकथा आहेत,नाव ठेवले आहे व्यास भगवंताने,हे ग्रंथ बनवले.आता तो व्यास होता भक्तिमार्गाचा.हे व्यासदेव आहेत, त्यांची मुलं तुम्ही सुखदेव आहात. आता तुम्ही सुखाचे देवता बनत आहात. सुखाचं वारसा,व्यासाकडून म्हणजे शिवाचार्या कडून घेत आहात.व्यासाची मुलं तुम्ही आहात परंतु मनुष्य संभ्रमित व्हायला नको म्हणून म्हटलं जाते शिवाची मुलं. त्यांचे खरे नाव तर शि्व आहे.तर बाबा म्हणतात,कोणत्या देहधारीला पाहू नका,जेव्हा शिवबाबा समोर बसले आहेत.आत्म्याला जाणले जाते,परमात्म्याला पण जाणले जाते.ते परमपिता परमात्मा शिव आहेत.तेच पतितापासून पावन बनण्याचा रस्ता दाखवतात.ते म्हणतात,मी तुम्हा सर्वांचा पिता आहे.आत्म्याची अनुभूती केली जाते,पाहिले जाऊ शकत नाही. बाबा विचारतात,आता तुम्ही स्वतःच्या आत्म्याची अनुभती केली आहे काय? इतक्या लहान आत्म्यामध्ये अविनाश भूमिका नोंदलेली आहे.जसे एक रेकॉर्ड आहे.

तुम्ही जाणता मी आत्मा शरीर धारण करते.अगोदर तुम्ही देह अभिमानी होते,आता देही अभिमानी आहात.तुम्ही जाणतात आम्ही आत्मा ८४जन्म घेतो.त्याचा अंत होऊ शकत नाही.प्रथम देह अभिमानी होते,आता देही अभिमानी बनला आहात.तुम्ही जाणतात,आम्ही आत्मा ८४ जन्म कसे घेतो,त्याचा अंत होऊ शकत नाही.काहीजण विचारतात हे अविनाश नाटक कधी सुरू झाले? परंतु हे तर अनादी आहे,कधी विनाश होऊ शकत नाही,याला म्हटले जाते पुर्व नियोजीत अविनाशी वैश्विक नाटक.तर बाबा सर्व मुलांना समजवतात,जसे अशिक्षित मुलांना शिक्षण दिले जाते.आत्मा शरीरांमध्ये राहते,हे पत्थर बुद्धी आत्म्यासाठी भोजन आहे.बुद्धीला समज मिळते. तुम्हा मुलांसाठी बाबांनी चित्र बनवले आहेत.खूप सहज आहेत,हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू शंकर.आता ब्रह्माला त्रिमूर्ती का म्हणतात? देव देव महादेव.एक दोघांच्या वरती ठेवतात,अर्थ काहीच जाणत नाहीत.आता ब्रह्मा देवता कसे होऊ शकतात.प्रजापिता ब्रह्मा येथे असायला हवेत.ह्या गोष्टी कोणत्या ग्रंथांमध्ये नाहीत.बाबा म्हणतात मी या शरीरांमध्ये प्रवेश करून, यांच्याद्वारे तुम्हाला ज्ञान देतो, यांना आपले बनवतो.यांच्या अनेक जन्माच्या अंत मध्ये येतो.हे पण पाच विकाराचा सन्यास करतात. सन्यास करणाऱ्यांना योगी, ऋषी म्हटले जाते.आता तुम्ही राजयोगी बनले आहात.तुम्ही प्रतिज्ञा करतात. ते संन्यासी लोक तर घरदार सोडून जातात.येथे तर स्त्री-पुरुष एकत्र राहून प्रतिज्ञा करतात,आम्ही विकारांमध्ये कधी जाणार नाही.तुम्ही मुलं जाणतात शिवबाबा रचनाकार आहेत.मुळ गोष्ट विकारांना सोडण्याची आहे.

तुम्ही मुलं जाणतात, शिवबाबा रचनाकार आहेत.ते नवीन रचना करतात.ते बीजरूप,सत चित,आनंदाचे सागर,ज्ञानाचे सागर आहेत.स्थापना,विनाश,पालना कसे करतात,हे मनुष्य जाणत नाहीत.काही मनुष्य लगेच म्हणतात तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी तर या दुनियेचा विनाश कराल.अच्छा, तुमच्या मुखामध्ये गुलाब.असे म्हणतात हे तर विनाशासाठी निमित्त बनले आहेत.न ग्रंथाला,न भक्तीला,न गुरूंना मानतात,फक्त आपल्या दादाला मानतात. बाबा तर स्वतः म्हणतात,हे पतित शरीर आहे,मी यांच्या मध्ये प्रवेश केला आहे.पतिय दुनिये मध्ये कोणी पावन असत नाही.मनुष्य तर ऐकलेल्या गोष्टीच बोलतात.अशा ऐकीव गोष्टींमुळेच भारताची दुर्गती झाली आहे,तेव्हाच बाबा येऊन खऱ्या गोष्टी ऐकवून, सर्वांची सदगती करतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातापिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाबा पासून सुखाचा वारसा घेऊन सुखाचे देवता बनवायचे आहे. सर्वांना सुख द्यायचे आहे.राजॠषी बनण्यासाठी सर्व विकाराचा संन्यास करायचा आहे.

(२) हे शिक्षणच खुराक आहे. सद्गती साठी ऐकीव गोष्टी सोडून श्रीमतावर चालायचे आहे.एका बाबांचे ऐकायचे आहे.मोहजीत बनायचे आहे.

वरदान:-
नेहमी स्वमनामध्ये स्थिर राहून,निर्मान स्थिती द्वारे़ सर्वांना सन्मान देणारे माननीय पूजनीय भव.

जी बाबांची महिमा आहे,तेच आपले स्वमान आहे.स्वमान मध्ये स्थिर राहा,तर निर्मान बनाल,परत सर्वांद्वारे स्वतःच मान मिळत राहील,मान मागितल्यामुळे मिळत नाही परंतु सन्मान दिल्यामुळे, सर्वमान्य मध्ये स्थिर झाल्यामुळे, स्वमानाचा त्याग केल्यामुळे,सर्वांचे माननीय पूजनीय बनण्याचे भाग्य प्राप्त होते,कारण सन्मान देणे म्हणजेच घेणे आहे.

बोधवाक्य:-
जाननहारच्या सोबत करनहार बनून असमर्थ आत्म्यांना अनुभूतीचा प्रसाद वाटत चला.