23-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- बुद्धीमध्ये निरंतर एक बाबांचीच आठवण राहिली तरी अहो सौभाग्य "
प्रश्न:-
ज्या मुलांना
सेवा करण्याची आवड असेल त्यांची लक्षणं काय असतील?
उत्तर:-
ते मुखाने ज्ञान सांगितल्या शिवाय राहू शकत नाहीत.ते आत्मिक सेवेमध्ये आपली हाडे-
पण स्वाह: करतील.त्यांना आत्मिक ज्ञान ऐकवण्यामध्ये खूप खुशी होईल.खुशी मध्येच नाचत
राहतील.ते आपल्यापेक्षा मोठ्यांचा खूप आदर ठेवतील, त्यांच्यापासून शिकत राहतील.
गीत:-
बदलून जाईल
दुनिया......
ओम शांती।
मुलांनी गीताच्या दोन ओळी ऐकल्या.हे वचनाचे गीत आहे ज्याप्रमाणे कोणाचा साखरपुडा
असतो तर हे वचन देतात की स्त्री-पुरुष कधीही एक- दुसऱ्याला सोडणार नाहीत. काहींचे
आपापसात पटत नसेल तर सोडूनही देतात.इथे तुम्ही मुले कोणासोबत प्रतिज्ञा करत
आहात?ईश्वरा सोबत.ज्याच्या सोबत तुम्हा मुलांचा किंवा सजनीचा साखरपुडा झाला
आहे.परंतु असा जो विश्वाचे मालक बनवत आहे,त्यालाही सोडून देतात.इथे तुम्ही मुले बसला
आहात तुम्ही जाणत आहात आता बेहदचे बापदादा आले की आले.तुमची जी अवस्था इथे राहते,ती
बाहेर सेंटरवर राहू शकत नाही.इथे तुम्ही समजाल बापदादा आले की आले.बाहेर सेंटरवर
समजतात बाबांनी ऐकवलेली मुरली आली की आली.इथे आणि तिथे खूप अंतर राहते कारण की इथे
बेहदच्या बापदादांच्या समोर तुम्ही बसले आहात.तिथे तर समोर नाहीत.असे वाटते समोर
जाऊन मुरली ऐकावी.इथे मुलांच्या बुद्धीमध्ये येते-बाबा आले की आले.ज्याप्रमाणे इतर
सतसंग असतात तिथे ते समजतात आमका स्वामी येणार आहे.परंतु हे विचारही सर्वांचे एकरस
असू शकत नाहीत. काहींचा बुद्धीयोग तर अनेक ठिकाणी भटकत राहतो.काहींना पतीची आठवण
येईल,काहींना संबंधीयांची आठवण येईल.बुद्धीयोग एका गुरु सोबतही टिकत नाही.एखादा
विराळाच असेल जो स्वामीच्या आठवणीमध्ये बसला असेल.इथे सुद्धा असेच आहे.सर्व
शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहतात असे नाही.बुद्धी कुठे ना कुठे धावत
राहते.मित्र-संबंधी इ. ची आठवण येईल.संपूर्ण वेळ एकाच शिवबाबांच्या आठवणीमध्ये
राहिले मग तर अहो सौभाग्य.एखादा विराळाच निरंतर आठवणी मध्ये राहू शकतो.इथे बाबांच्या
समोर राहिल्यामुळे तर खूप खुशी व्हायला पाहिजे.अतिंद्रिय सुख गोपी वल्लभच्या गोप
गोपीनां विचारा,हे इथले गायन आहे.इथे तुम्ही बाबांच्या आठवणी मध्ये बसले आहात,जाणत
आहात आम्ही आता ईश्वराच्या मांडीवर (गोद) आहोत नंतर दैवी मांडीवर असणार.खुशाल
काहींच्या बुद्धीमध्ये सेवेचे विचारही चालतात.या चित्रामध्ये हा बदल करावा,असे
लिहावे.परंतु चांगली मुले असतील ती समजतील आता तर बाबांकडून ऐकायचे आहे.दुसरा
कोणताही संकल्प येऊ देणार नाहीत.बाबा ज्ञान रत्नांनी झोळी भरण्यासाठी आले आहेत,तर
बाबां सोबतच बुद्धीचा योग लावायचा आहे.क्रमवार धारणा करणारे तर असतातच.काही चांगल्या
प्रकारे ऐकून धारण करतात.काही कमी धारण करतात.बुद्धीयोग इतर ठिकाणी धावत राहिला तर
धारणा होणार नाहीत.कच्चे राहतील.एक-दोन वेळा मुरली ऐकली धारणा झाली नाही तर नंतर ती
सवय पक्की होऊन जाईल.नंतर कितीही ऐकत राहिले,धारणा होणार नाही. कोणाला सांगू शकणार
नाहीत. ज्याच्या धारणा असतील त्यांना सेवा करण्याची आवड असेल. खूप उत्साहाने सेवा
करेल,विचार करेल कि जाऊन धन दान करू कारण की हे धन एक बाबांशिवाय इतर कोणाजवळ ही
नाही. बाबाही जाणतात,सर्वजण धारणा करू शकत नाहीत.सर्वजण एकरस उच्च पद प्राप्त करू
शकत नाहीत म्हणूनच बुद्धी इतर ठिकाणी भटकत राहते.भविष्य भाग्य एवढे उच्च बनत नाही.
नंतर काहीजण स्थूल सेवेमध्ये आपली हाडे पण देतात.सर्वांना खुश करतात.जसे भोजन
बनवतात खाऊ घालतात.हा सुद्धा विषय आहे ना.ज्याला सेवेची आवड असेल तो मुखाने
सांगितल्याशिवाय राहणार नाही. नंतर बाबा पाहतात, देह-अभिमान तर नाही? मोठ्यांचा आदर
ठेवतात की नाही?मोठ्या महारथींचा आदर तर ठेवावाच लागतो.हो,काही- काही छोटे ही हुशार
होऊन जातात तर असे होऊ शकते मोठ्यांनाही त्यांचा आदर ठेवावा लागतो कारण की त्यांच्या
बुद्धीने प्रगती केली आहे.सेवेची आवड पाहून बाबा ही खुश होतील ना,हे चांगली सेवा
करतील.संपूर्ण दिवस प्रदर्शनी वर समजावण्याचा सराव करायला पाहिजे.प्रजा तर खूप बनते
ना दुसरा तर कोणताही उपाय नाही.सूर्यवंशी,चंद्रवंशी, राजा-राणी,प्रजा सर्व इथेच
बनतात.किती सेवा करायला पाहिजे.मुलांच्या बुद्धीमध्ये हे तर आहे-आम्ही आता ब्राह्मण
बनलो आहे.घर ग्रहस्था मध्ये राहिल्यामुळे प्रत्येकाची अवस्था आपापली आहे ना.घर-दार
तर सोडायचे नाही.बाबा म्हणतात घरामध्ये खुशाल राहा परंतु बुद्धीमध्ये हा निश्चय ठेवा
की, जुनी दुनिया नष्ट झाली की झाली.आमचे आता बाबांशी काम आहे.हे सुद्धा जाणत आहात
कल्पां पूर्वी ज्यांनी ज्ञान घेतले होते तेच घेतील.सेकंद प्रति सेकंद हुबेहूब
पुनरावृत्त होत आहे. आत्म्यामध्ये ज्ञान राहते ना. बाबांच्या जवळ ही ज्ञान राहते
ना. तुम्हा मुलांनाही बाबांच्या सारखे बनायचे आहे.मुद्दे धारण करायचे आहेत.सर्व
मुद्दे एकाच वेळेला समजावून सांगितले जात नाहीत. विनाशही समोर उभा आहे.हा तोच विनाश
आहे,सतयुग-त्रेता मध्ये तर कोणतेही युद्ध नसते.ते तर नंतर जेव्हा खूप धर्म होतात,
सैनिक इ.येतात तेव्हा लढाई सुरू होते.प्रथम आत्मे सतोप्रधान पासून उतरतात नंतर
सतो,रजो, तमो अवस्था होते.तर हे ही सर्व बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. कशाप्रकारे
राजधानी स्थापन होत आहे.इथे बसले आहात तर बुद्धीमध्ये ठेवायचे आहे की शिवबाबा येऊन
आम्हाला खजाना देत आहेत,ज्याला बुद्धीमध्ये धारण करायचे आहे. चांगली-चांगली मुले
मुद्दे लिहून ठेवतात.लिहून ठेवणे चांगले आहे.त्यामुळे बुद्धीमध्ये अनेक विषय
येतील.आज या विषयावर समजावून सांगू.बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला किती खजाना दिला
होता.सतयुग-त्रेता मध्ये तुमच्याजवळ भरपूर धन होते. नंतर वाममार्गामध्ये गेल्यामुळे
ते कमी होत गेले.खुशी सुद्धा कमी होत गेली.काहीना काही विकर्म व्हायला सुरुवात
होते.उतरता- उतरता कला कमी होऊन जातात.सतोप्रधान,सतो
रजो,तमो अवस्था असतात ना.सतोपासुन रजो मध्ये येतात तर पटकन येतात असे नाही.हळू-हळू
उतरतील.तमोप्रधान मध्ये ही हळू-हळू सिढी उतरत जातात, कला कमी होत जातात. दिवसेंदिवस
कमी होत जातात. आता उंच भरारी(जम्प)घ्यायची आहे.तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे
आहे त्यासाठी वेळही पाहिजे.गायन ही आहे चढेल तो चाखेल वैकुंठ रस....काम विकाराची
थप्पड लागल्या नंतर तर एकदम चकनाचूर होऊन जातात.हाडे-हाडे तुटून जातात. काही लोक
आपला जीवघात करतात,आत्मघात नाही,जीवघात म्हटले जाते.इथे तर बाबांकडून वारसा घ्यायचा
आहे.बाबांची आठवण करायची आहे कारण की बाबांकडून बादशाही मिळत आहे.स्वतःला विचारायचे
आहे आम्ही बाबांची आठवण करून भविष्यासाठी किती कमाई केली आहे? आंधळ्याची काठी बनलो
आहे?घराघरामध्ये संदेश द्यायचा आहे की ही जुनी दुनिया बदलत आहे.बाबा नव्या
दुनियेसाठी राजयोग शिकवत आहेत.सिढी मध्ये सर्व दाखवले आहे.हे बनवण्यामध्ये मेहनत
लागते.संपूर्ण दिवस विचार चालत राहतात,असे सहज बनवावे जे कोणालाही समजेल.संपूर्ण
दुनिया तर येणार नाही.देवी-देवता धर्माचेच येतील.तुमची सेवा तर खूप चालणार
आहे.तुम्ही तर जाणत आहात आमचा हा क्लास केव्हा पर्यंत चालेल.ते तर कल्पाचे आयुष्य
लाखो वर्ष समजतात.तर शास्त्र इ.ऐकवत राहतात.समजतात जेव्हा अंत होईल तेव्हा सर्वांचे
सदगती दाता येतील आणि जे आमचे शिष्य असतील त्यांची गती होऊन जाईल नंतर आम्हीही जाऊन
ज्योती मध्ये सामावून जाऊ.परंतु असे तर होणार नाही.तुम्ही जाणत आहात आम्ही अमर
पित्याद्वारे खरी-खरी अमरकथा ऐकत आहोत.तर अमर पिता जे सांगत आहेत,ते मानले पाहिजे,
फक्त म्हणतात-माझी आठवण करा,पवित्र बना.नाहीतर सजा खुप खावी लागेल,पदही कमी
मिळेल.सेवेमध्ये मेहनत करायची आहे, दधीचि ऋषि चे उदाहरण आहे.हाडेसुद्धा सेवेमध्ये
देऊन टाकली.आपल्या शरीराचा विचारही न करता संपूर्ण दिवस सेवेमध्ये राहणे,याला म्हटले
जाते सेवेमध्ये हाडे देणे.एक आहे शारीरिक हड्डी सेवा,दुसरी आहे आत्मिक हड्डी
सेवा.आत्मिक सेवा करणारे आत्मिक ज्ञान सांगत राहतील.धन दान करून खुशी मध्ये नाचत
राहतील. दुनियेमध्ये मनुष्य जी सेवा करतात ते सर्व शारीरिक आहे. शास्त्र ऐकवतात,ती
काही आत्मिक सेवा तर नाही.आत्मिक सेवा तर फक्त बाबा येऊन शिकवतात.आत्मिक पिताच येऊन
आत्मिक मुलांना शिकवत आहेत.
तुम्ही मुले आता सतयुगी दुनियेमध्ये जाण्यासाठी तयारी करत आहात.तिथे तुमच्याकडून
कोणतेही विकर्म होणार नाही.ते आहेच रामराज्य.तिथे खूप थोडे असतात.आता तर रावण
राज्यामध्ये सर्व दुखी आहेत ना. क्रमवार पुरुषार्थ अनुसार हे सारे ज्ञान तुमच्या
बुद्धी मध्ये आहे.या सिढीच्या चित्रामध्ये सर्व ज्ञान येऊन जाते.बाबा म्हणतात हा
शेवटचा जन्म पवित्र बना तर पवित्र दुनियेचे मालक बनाल. तुम्हाला अशा प्रकारे
समजावून सांगायचे आहे जेणेकरून मनुष्यांना माहित पडेल की आम्ही सतोप्रधान पासून
तमोप्रधान बनलो आहोत,नंतर आठवणीच्या यात्रेने सतोप्रधान बनणार आहोत.पाहिल्यानंतर
बुद्धी चालेल,हे ज्ञान कोणाच्याही जवळ नाही.म्हणतील या सिढीमध्ये इतर धर्मांचा
समाचार कुठे आहे.तो मग या गोळ्या मध्ये(सृष्टिचक्रा मध्ये)लिहिला आहे.ते नव्या
दुनियेमध्ये तर येत नाहीत.त्यांना शांती मिळते.भारतवासी स्वर्गामध्ये होते ना.बाबाही
भारतामध्ये येऊन राजयोग शिकवत आहेत म्हणूनच भारताचा प्राचीन योग सर्वांना शिकावा
वाटतो.या चित्रांमुळे ते स्वतः समजून जातील.बरोबर नव्या दुनियेमध्ये फक्त भारतच
होता.आपल्या धर्मालाही समजतील.भले क्राइस्ट धर्म स्थापन करण्यासाठी आला. यावेळी तो
सुद्धा तमोप्रधान आहे. हे रचता आणि रचनेचे किती मोठे ज्ञान आहे.
तुम्ही सांगू शकता आम्हाला कोणाच्याही पैशाची गरज नाही. पैसे आम्ही काय करणार.
तुम्हीही ऐका,इतरांनाही ऐकवा.हे चित्र इ.छापा.या चित्रांचा उपयोग करायचा आहे.असा
हॉल बनवा जिथे हे ज्ञान ऐकवले जाईल.बाकी पैसे घेऊन आम्ही काय करणार.तुमच्याच घराचे
कल्याण होत आहे.तुम्ही फक्त सोय करा.अनेक जण येऊन म्हणतील रचता आणि रचनेचे ज्ञान तर
खूप चांगले आहे.हे सर्व मनुष्यांना समजून घ्यायचे आहे. परदेशा मधले हे ज्ञान ऐकून
खूप पसंत करतील.खूप खुश होतील. समजतील आम्हीही बाबांसोबत योग लावला तर विकर्म विनाश
होतील.सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे.समजतील हे ज्ञान तर ईश्वरा शिवाय कोणीही
देऊ शकत नाही.म्हणतात खुदाने बहिश्त स्थापन केला परंतु ते कसे येतात,हे कोणालाही
माहीत नाही. तुमच्या गोष्टी ऐकून खुश होतील नंतर पुरुषार्थ करून योग
शिकतील.तमोप्रधान पासून सतोप्रधान बनण्यासाठी पुरुषार्थ करतील.सेवेसाठी तर खूप
विचार करायला पाहिजे.भारतामध्ये कला दाखवली तर नंतर बाबा बाहेरही पाठवतील.ही मिशन
जाईल.अजून तर वेळ बाकी आहे ना.नवी दुनिया बनण्यासाठी उशीर थोडीच लागणार आहे. कुठेही
भूकंप इ.होतात तर 2-3 वर्षांमध्ये एकदम नवीन घरे इ.बनवतात.कारागीर खूप असतील,सामान
सर्व तयार असेल तर बनवण्यामध्ये उशीर थोडीच लागेल.विदेशामध्ये घरे कसे बनतात-मिनट
मोटर.तर स्वर्गा मध्ये किती लवकर बनवत असतील.सोने-चांदी इ.खूप तुम्हाला मिळते.
खाणींमधून तुम्ही सोने,चांदी,हिरे घेऊन येता.कला तर सर्व शिकत आहात.विज्ञानाचा किती
घमंड चालू आहे.हे विज्ञान नंतर तिथे कामाला येईल.इथे शिकणारे नंतर दुसरा जन्म तिथे
घेऊन हे काम करतील.त्यावेळी तर सर्व दुनिया नवी होऊन जाते रावण राज्य नष्ट होऊन
जाते.5 तत्व पण कायद्यानुसार सेवा करतात,स्वर्ग बनतो.तिथे असा कोणताही उपद्रव होत
नाही,रावण राज्य नाही,सर्व सतोप्रधान आहेत. सर्वात चांगली गोष्ट आहे की तुम्हा
मुलांचे बाबांवरती खूप प्रेम असायला पाहिजे.बाबा खजाना देत आहेत.तो धारण करून
दुसऱ्यांना दान द्यायचे आहे. जेवढे दान द्याल तेवढे एकत्र होत जाईल.सेवा केली नाही
तर धारणा कशी होणार?सेवेमध्ये बुद्धी चालायला पाहिजे.सेवा तर भरपूर होऊ
शकते.दिवसेंदिवस प्रगती करायची आहे. आपली सुद्धा प्रगती करायची आहे.अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. सदैव
आत्मिक सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे.ज्ञान धन दान करून खुशीमध्ये नाचायचे आहे. स्वतः
धारण करून इतरांकडूनही धारणा करवून घ्यायची आहे.
2. बाबा जो ज्ञानाचा खजाना देत आहे,त्याने आपली झोळी भरायची आहे.मुद्दे लिहून
ठेवायचे आहेत.नंतर विषयावर समजावून सांगायचे आहे.ज्ञान धनाचे दान करण्यासाठी
उत्साहित राहायचे आहे.
वरदान:-
"निराकार सो
साकार" - या मंत्राच्या स्मृतीने सेवेचा अभिनय वठवणारे आत्मिक सेवाधारी भव
ज्याप्रमाणे बाबा
निराकार सो साकार बनून सेवेचा अभिनय वठवत आहेत असे मुलांनीही या मंत्राच्या यंत्राला
स्मृती मध्ये ठेवून सेवेचा अभिनय वठवायचा आहे. ही साकार सृष्टी,साकार शरीर रंगमंच
आहे.रंगमंच(स्टेज) आधार आहे,अभिनेता आधार मुर्त आहे,मालक आहे.या स्मृतीने अनासक्त
बनून अभिनय करा तर सुगंधा(सेन्स)सोबत सारस्वरूप(इसेंसफुल),आत्मिक सेवाधारी बनून जाल.
बोधवाक्य:-
साक्षी बनून
प्रत्येक खेळाला पाहणारेच साक्षी दृष्टा आहेत.