17-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हीं ब्राह्मणा पासून देवता बनत आहात, तुम्हीं भारताला स्वर्ग बनवित आहात, तर तुम्हाला आपल्या ब्राह्मण जातीचा नशा पाहिजे."

प्रश्न:-
खऱ्या ब्राह्मणा़च्या मुख्य निशानी कोणत्या आहेत?

उत्तर:-
१. खऱ्या ब्राह्मणांचा या जुन्या दुनियातून जहाजाचा नांगर उचललेला असेल, त्यांनी जसा या जुन्या दुनियेचा किनारा सोडलेला असेल.
२. खरे ब्राह्मण ते आहेत जे हाताने काम करतात आणि बुद्धीने नेहमी बाबाच्या आठवणी मध्ये राहतात म्हणजे कर्मयोगी असतात.
३. ब्राह्मण म्हणजे कमल फुला सारखे.
४. ब्राह्मण म्हणजे नेहमी आत्माभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करणारे.
५. ब्राह्मण म्हणजे काम महाशत्रू वर विजय प्राप्त करणारे.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मीक मुलांना समजावत आहेत. कोणती मुले? हे ब्राह्मण. हे कधी विसरू नका कि, आम्ही ब्राह्मण आहोत, देवता बनणारे आहोत. वर्णाची पण आठवण करायची आहे. इथे तुम्ही आपसा मध्ये फक्त ब्राह्मणच ब्राह्मण आहात. ब्राह्मणाला बेहदचे बाबा शिकवित आहेत. हे ब्रह्मा शिकवित नाहीत. शिवबाबा शिकवितात. ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांना शिकवित आहेत. शुद्रा पासून ब्राह्मण बनल्या शिवाय देवी-देवता बनू शकत नाहीत. वरसा शिवबाबा कडून मिळतो. ते शिवबाबा तर सर्वांचे पिता आहेत. या ब्रह्माला तर ग्रेट ग्रेट ग्रँड फादर म्हटले जाते.लौकिक पिता तर सर्वांना असतात. पारलौकिक पित्याला भक्ती मार्गांमध्ये आठवण करतात. आता तुम्ही मुले समजता कि,हे अलौकिक पिता त्यांना कोणी ओळखत नाहीत. जरी ब्रह्माचे मंदिर आहे, इथे पण प्रजापिता आदिदेवाचे मंदिर आहे. त्यांना कोणी महावीर म्हणतात, दिलवाला पण म्हणतात. परंतु खरेतर दिल घेणारे शिवबाबा आहेत ना कि प्रजापिता आदिदेव ब्रह्मा. सर्व आत्म्यांना सदा सुखी बनविणारे, खूष करणारे एकच बाबा आहेत. हे पण फक्त तुम्हीच जाणत आहात. दुनियेतील मनुष्य कांहीपण जाणत नाहीत. तुच्छ बुद्धी आहेत. आम्ही ब्राह्मणच शिवबाबा कडून वरसा घेतो. तुम्हीं पण हे वारंवार विसरून जाता. आठवण तर फार सोपी आहे. योग अक्षर संन्याशानी ठेवले आहे. तुम्ही तर बाबांची आठवण करता. योग साधारण अक्षर आहे. याला योग आश्रम पण म्हटले जात नाही, मुले आणि बाबा बसले आहेत. मुलांचे कर्तव्य आहे, बाबाची आठवण करणे. आम्ही ब्राह्मण आहोत, आजोबा कडून वरसा घेत आहोत, ब्रम्हा द्वारे. त्यामुळे शिवबाबा म्हणतात, जेवढे होईल तेवढी आठवण करत राहा. चित्र पण जरुर ठेवा, तर आठवण येईल. आम्ही ब्राह्मण आहोत, बाबा कडून वरसा घेत आहोत. ब्राह्मण कधी आपल्या जातीला विसरतात कां? तुम्हीं शुद्रांच्या संगती मध्ये आल्याने, ब्राह्मणपणाला विसरून जाता. ब्राह्मण तर देवता पेक्षा पण उंच आहेत, कारण तुम्हीं ब्राह्मण ज्ञानसंपन्न आहात. भगवानाला जानी जाननहार म्हटले जाते. त्यांचा पण अर्थ समजत नाहीत. असे नाही कि, सर्वांच्या मनामध्ये काय आहे, ते पाहतात. नाही, त्यांना सृष्टीच्या आदि, मध्य, अंताचे ज्ञान आहे. ते बीजरूप आहेत. झाडाच्या आदि,मध्य,अंताला जाणत आहेत. अशा बाबाची फार आठवण केली पाहिजे. यांची आत्मा पण त्या बाबाची आठवण करत आहेत. ते बाबा म्हणतात, हे ब्रह्मा पण माझी आठवण करतात. तेंव्हा ते हे पद प्राप्त करतात. तुम्हीं पण आठवण केली तर पद मिळेल. पहिल्या प्रथम तुम्ही अशरीरी आले होता मग अशरीरी बनून परत जायचे आहे. आणखीन सर्व तुम्हाला दुःख देणारे आहेत, त्यांची आठवण कां करायची. जेंव्हा कि,मी तुम्हाला भेटलो आहे, मी तुम्हाला नवीन दुनिये मध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तिथे कोणी दु:खी नसतात. तो दैवी संबंध आहे. इथे पहिल्या प्रथम दुःख, स्त्री-पुरुषाच्या संबंधा मध्ये होते कारण विकारी बनतात. तुम्हाला आता मी त्या दुनियेसाठी लायक बनवित आहे, जिथे विकाराची गोष्ट नसते. या काम महाशत्रूचे गायन आहे, जो आदि, मध्य,अंता ला दुःख देत आहे. क्रोधा साठी असे म्हणत नाहीत कि, हा आदि,मध्य, अंता ला दुःख देत आहे, नाही. काम विकाराला जिंकायचे आहे, तोच आदि, मध्य,अंता ला दुःख देत आहे. पतित बनवित आहे. पतित अक्षर विकारावर पडले आहे. या शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. तुम्हीं जाणत आहात, आम्ही स्वर्गाचे देवी-देवता बनत आहोत. जोपर्यंत हा निश्चय होत नाही, तोपर्यंत कांही प्राप्ती होणार नाही.

बाबा समजावतात, मुलांनो, मन्सा,वाचा, कर्मणा तंतोतंत बनायचे आहे. मेहनत आहे. दुनिये मध्ये हे कोणाला पण माहित नाही की, तुम्ही़ भारताला स्वर्ग बनवित आहात. पुढे चालून समजतील. इच्छा पण आहे कि, एक जग, एक राज्य, एक धर्म, एक भाषा असावी. तुम्ही समजू शकता कि, सतयुगा मध्ये आज पासून पाच हजार वर्षांपूर्वी, एक राज्य, एक धर्म होता, त्याला स्वर्ग म्हटले जाते. राम राज्य आणि रावण राज्याला पण कोणी ओळखत नाहीत. शंभर टक्के तुच्छ बुद्धी पासून आता तुम्ही स्वच्छ बुद्धी बनत आहात. नंबरवार पुरुषार्था नुसार. बाबा तुम्हाला शिकवित आहेत. फक्त बाबाच्या मतावर चाला. बाबा म्हणतात कि, जुन्या दुनिया मध्ये राहून कमल फुला सारखे पवित्र राहा, माझी आठवण करत राहा. बाबा आत्म्याला समजावत आहेत. मी आत्म्यांना शिकवित आहे, या कर्मेंद्रिया द्वारे. तुम्हीं आत्मे पण कर्मेंद्रिया द्वारे ऐकत आहात. मुलांना आत्मअभिमानी बनायचे आहे. हे तर जुने छी छी शरीर आहे. तुम्ही ब्राह्मण पुजेच्या लायक नाहीत. तुम्हीं गायन लायक आहात. पुजनिय लायक देवता आहात. तुम्ही श्रीमता वर विश्वाला पवित्र स्वर्ग बनवित आहात, त्यामुळे तुमचे गायन आहे. तुमची पूजा होत नाही, गायन फक्त तुम्हा ब्राह्मणांचे आहे. ना कि देवतांचे. बाबा तुम्हालाच शुद्रा पासून ब्राह्मण बनवित आहेत. जगदंबा किंवा ब्रह्मा इत्यादीचे मंदिर बनवितात, परंतु त्यांना हे माहित नाही कि, हे कोण आहेत? जगतपिता तर ब्रह्मा आहेत ना., त्यांना देवता म्हणत नाहीत. देवतांची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतात. आता तुमची आत्मा पवित्र बनत आहे. शरीर पवित्र बनत नाही. आता तुम्ही ईश्‍वराच्या मतावर भारताला स्वर्ग बनवित आहात. तुम्हीं पण स्वर्गाच्या लायक बनत आहात. सतोप्रधान जरूर बनायचे आहे. फक्त तुम्ही ब्राह्मणच ज्यांना बाबा शिकवित आहेत. ब्राह्मणांचे झाड वृध्दीला प्राप्त होत आहे.ब्राह्मण जे पक्के बनतात, तेच मग जाऊन देवता बनतात. हे नवीन झाड आहे. मायाची वादळं पण लागतात. सतयुगा मध्ये कोणते वादळ नसते. इथे माया बाबाची आठवण करू देत नाही. आम्हाला वाटते कि, बाबाची आठवण करावी. तमो पासून सतोप्रधान बनावे. सारा आधार आठवणीवर आहे. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. विलायत वाले पण इच्छितात कि प्राचीन योग कोणीतरी येऊन शिकवावा. आता योग पण दोन प्रकारचे आहेत. एक हठयोगी आहेत दुसरे राजयोगी आहेत. तुम्ही राजयोगी आहात. हा भारताचा प्राचीन राजयोग आहे. जे बाबा शिकवित आहेत. फक्त गीते मध्ये माझ्या ऐवजी कृष्णाचे नांव टाकले आहे. किती फरक झाला आहे. शिवजयंती होते तर तुमची वैकुंठाची पण जयंती होते, त्यामध्ये श्रीकृष्ण राज्य करतात. तुम्हीं जाणत आहात शिवबाबा ची जयंती आहे, तर गीतेची पण जयंती आहे, वैकुंठाची पण जयंती आहे. ज्यामध्ये तुम्ही पवित्र बनत आहात. कल्पापूर्वी प्रमाणे स्थापना होत आहे. आता बाबा म्हणतात, माझी आठवण करा. आठवण न केल्यामुळे माया कांही ना कांही विकर्म करविते. आठवण केली नाही तर चापट लागते. आठवणी मध्ये राहिल्याने चापट खात नाहीत. ही बॉक्सिंग आहे. तुम्ही जाणत आहात, आमचे शत्रू कोणी मनुष्य नाहीत, रावण शत्रू आहे.

बाबा म्हणतात, यावेळी लग्न करणे बरबाद होणे आहे. एक दोघांची बरबादी करतात. पतित बनवितात. आता पारलौकिक बाबाने आदेश काढला आहे, मुलांनो हा काम महाशत्रू आहे. यावर विजय प्राप्त करा आणि पवित्रतेची प्रतिज्ञा करा. कोणीही पतित बनू नये. जन्मजन्मांतर तुम्ही पतित बनले आहात, या विकारामुळे. त्यामुळे काम महाशत्रू म्हटले जाते. साधु संत सर्व म्हणतात, पतित-पावन या. सतयुगा मध्ये पतित कोणी नसते. बाबा येऊन ज्ञानाने सर्वांची सद्गती करतात. आता सर्व दुर्गती मध्ये आहेत. ज्ञान देणारे कोणीच नाही. ज्ञान देणारा एकच ज्ञान सागर आहे. ज्ञानाने दिवस होतो. दिवस रामाचा आहे, रात्र रावणाची आहे. या अक्षराचा यथार्थ अर्थ पण तुम्ही मुलेच समजत आहात. फक्त पुरुषार्था मध्ये कमजोरी आहे. बाबा तर फार चांगल्या रीतीने समजावत आहेत. तुम्हीं 84 जन्म पूर्ण केले आहेत, आता पवित्र बनून परत जायचे आहे. तुम्हाला तर शुद्ध अहंकार असला पाहिजे. आम्हीं आत्मा बाबाच्या मतावर या भारताला स्वर्ग बनवित आहात, ज्या स्वर्गांमध्ये मग राज्य कराल. जेवढी मेहनत कराल तेवढे पद मिळेल. वाटले तर राजा-राणी बना, नाहीतर प्रजा बना, राजा राणी कसे बनतात, हे पण पाहता. बाबाचे अनुकरण करायचे आहे, आताची गोष्ट आहे. लौकिक संबंधा साठी म्हटले जात नाही. हे बाबा मत देत आहेत. माझी एकट्याची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तुम्हीं समजत आहात, आम्ही आता श्रीमतावर चालत आहोत. अनेकांची सेवा करत आहोत. मुले बाबा जवळ येतात तर शिवबाबा पण ज्ञानाने खुश करतात. हे पण शिकत आहेत ना. शिवबाबा म्हणतात, मी सकाळी येतो, मग कोणी भेटण्यासाठी येतात, तर मग हे समजावू शकत नाहीत. असे म्हणतात कां कि, बाबा तुम्ही येऊनच समजावा, मी समजावू शकत नाही. ही फार गुप्त रहस्ययुक्त गोष्ट आहे ना. मी तर सर्वात चांगले समजावू शकतो. तुम्ही असे कां समजता कि, शिवबाबाच समजावत आहेत, हे समजावत नसतील. हे पण जाणता कि, कल्पा पूर्वी यांनी समजावले होते, तेंव्हा तर हे पद प्राप्त केले आहे. मम्मा पण समजावून सांगत होती ना. ती पण उच्च पद प्राप्त करते. मम्मा बाबा ला सूक्ष्मवतन मध्ये पाहतात तर मुलांना पण त्यांचे अनुकरण करायचे आहे. समर्पित होतात पण गरीबच, सावकार होत नाहीत. गरीबच म्हणतात, बाबा हे सर्वकांही तुमचे आहे. शिवबाबा तर दाता आहेत. ते कधी घेत नाहीत. मुलांना म्हणतात, हे सर्व कांही तुमचे आहे. मी स्वतःसाठी महल इथे ना तिथे बनवितो. तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवितो. आता या ज्ञान रत्नाने तुमची बुद्धी रुपी झोळी भरत आहे. मंदिरा मध्ये जाऊन म्हणतात, माझी झोळी भरा. परंतु कोणत्या प्रकारची, कोणत्या गोष्टीने झोळी भरायची आहे. झोळी भरणारी तर लक्ष्मी आहे. जी पैसे देते. शिवा जवळ तर जात नाहीत, शंकरा जवळ जाऊन म्हणतात, समजतात कि, शिव आणि शंकर एक आहेत, परंतु असे थोडेच आहे.

बाबा येऊन सत्य गोष्ट सांगत आहेत. बाबाच दु:खहर्ता सुखकर्ता आहेत. तुम्हां मुलांना गृहस्थ व्यवहारांमध्ये राहायचे आहे.धंदा पण करायचा आहे. प्रत्येक जण स्वतःसाठी मत विचारतात कि, बाबा, आम्हाला या गोष्टींमध्ये खोटे बोलावे लागते. बाबा प्रत्येकाची नाडी पाहून मत देतात, कारण बाबा समजतात कि, मी सांगितले आणि त्यांनी केले नाही, अशी मत कां द्यायची. नाडी पाहून मत दिली जाते, ते करू शकतील,सांगितले आणि केले नाही तर आज्ञाधारकरी बनू शकणार नाहीत. प्रत्येकाचा आपापला हिसाब किताब आहे. सर्जन तर एकच आहेत, त्यांच्या जवळ जावे लागते. ते पूर्ण मत देतात. सर्वांनी विचारले पाहिजे, बाबा या परिस्थिती मध्ये आम्हाला कसे चालले पाहिजे? आता काय करावे? बाबा स्वर्गामध्ये तर घेऊन जातात. तुम्हीं जाणत आहात, आम्ही स्वर्गवासी तर बनणार आहोत. आता आम्हीं संगमवासी आहोत. तुम्हीं आता ना नरकामध्ये, ना स्वर्गामध्ये आहात. जे जे ब्राह्मण बनतात, त्यांचा नांगर या छी छी दुनियेतून उठलेला आहे. तुम्ही कलियुगी दुनियेचा किनारा सोडलेला आहे. कांही ब्राह्मण आठवणीच्या यात्रेमध्ये तीव्र चालले आहेत, कोणी कमी. कोणी हात सोडून देतात म्हणजे मग कलियुगा मध्ये निघून जातात. तुम्हीं जाणत आहात, नावाडी आम्हाला आता घेऊन चालले आहेत. त्या यात्रा तर अनेक प्रकारच्या आहेत. तुमची एकच यात्रा आहे. ही बिल्कुल वेगळी यात्रा आहे. होय, वादळे येतात, त्यामुळे आठवणीला तोडून टाकतात.या आठवणी च्या यात्रेला चांगल्या रीतीने पक्के करा. मेहनत करा. तुम्ही कर्मयोगी आहात, जेवढे होईल तेवढे हाताने काम करताना, मनातून बाबाची आठवण करा. अर्धा कल्प तुम्ही आशिक माशूकाची आठवण करत आले आहात. बाबा इथे फार दुःख आहे, आता आम्हाला सुखधामचे मालक बनवा. आठवणीच्या यात्रेमध्ये राहिला, तर तुमचे पाप नष्ट होतील. तुम्हीच स्वर्गाचा वरसा प्राप्त केला होता. आता घालविला आहे. भारत स्वर्ग होता, त्यामुळे म्हणतात, प्राचीन भारत. भारताला फार मान देतात. सर्वात मोठा पण आहे. सर्वात जुना पण आहे. आता भारत किती गरीब आहे त्यामुळे सर्व त्याला मदत करतात. ते लोक समजतात, आमच्या जवळ फार अन्नधान्य आहे, कुठून मागविण्याची आवश्यकता नाही, परंतु हे तर तुम्ही जाणत आहात, विनाश समोर उभा आहे. जे चांगल्या रीतीने समजतात, त्यांना आतून फार खुशी राहते. प्रदर्शनी मध्ये किती येतात. म्हणतात, तुम्हीं सत्य सांगत आहात, परंतु हे समजले पाहिजे कि, आम्हाला बाबा कडून वरसा घ्यायचा आहे. हे थोडेच बुद्धी मध्ये बसत आहे. येथून बाहेर निघून गेले तर खलास. तुम्हीं जाणत आहात, बाबा आम्हाला स्वर्गा मध्ये घेऊन जात आहेत. तिथे ना जेल आहे, ना त्या जेल मध्ये जायचे आहे. आता जेल ची यात्रा पण किती सोपी झाली आहे. मग सतयुगा मध्ये कधी जेलचे तोंड पाहण्यास मिळणार नाही. दोन्ही जेल राहणार नाहीत. इथे सर्व हा मायेचा भपका आहे. मोठ् मोठ्यांना जसे कि, खलास करून टाकते. आज फार मान देतात, उद्या मान खलास होतो. आता प्रत्येक गोष्ट त्वरित होत आहे. मरणे पण त्वरित होत चालले आहे. सतयुगा मध्ये असे कोणते उपद्रव नसतात. पुढे चालून पाहा काय होत आहे. फार भयंकर दृष्य येतील. तुम्हां मुलांना साक्षात्कार पण केला आहे. मुलासाठी मुख्य आठवणीची यात्रा आहे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचे आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) मन्सा, वाचा, कर्मणा फार तंतोतंत बनायचे आहे. ब्राह्मण बनून कोणते पण शुद्राचे कर्म करायचे नाही.

(२) बाबा कडून जी मत मिळत आहे, त्यावर पुरेपूर चालून आज्ञाकारी बनायचे आहे. कर्मयोगी बनून प्रत्येक कर्म करायचे

वरदान:-
अमृतवेळेच्या महत्वाला समजून, यथार्थ रीतीने वापर करणारे नेहमी शक्तिसंपन्न भव:

स्वतःला शक्ती संपन्न बनविण्यासाठी, रोज अमृतवेळला तना ची आणि मनाची सहल करा. जसे अमृतवेळेला वेळेचा पण सहयोग आहे, बुद्धिच्या सतोप्रधान अवस्थेचा पण सहयोग आहे, तर अशा वरदानी वेळेवर, मनाची स्थिती पण सर्वात शक्तिशाली पाहिजे. शक्तीशाली अवस्था म्हणजे बाप समान बीजरूप स्थिती. साधारण स्थिती मध्ये तर कर्म करत राहू शकता, परंतु वरदानाच्या वेळेचा यथार्थ रीतीने वापर करा, तर कमजोरी समाप्त होऊन जाईल.

बोधवाक्य:-
आपल्या शक्तींच्या खजान्याद्वारे, शक्तिहीन, परवश आत्म्यांना शक्तिशाली बनवा.