03-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,सर्वांना हाच संदेश द्या की,बाबांचा आदेश आहे,या पुरुषोत्तम संगम युगामध्ये पवित्र बना,तर सतयुगाचा वारसा मिळेल"

प्रश्न:-
कोणता स्वस्त सौदा सर्वांना सांगा?

उत्तर:-
या अंतीम जन्मांमध्ये बाबांच्या श्रीमतावर चालून पवित्र बना,तर २१ जन्मासाठी विश्वाची बादशाही मिळेल,हा खूपच स्वस्त सौदा आहे.हा सौदा करणे तुम्ही सर्वांना शिकवा,तुम्ही सांगा आता शिवबाबांची आठवण करून पवित्र बना,तर पवित्र दुनियेचे मालक बनाल.

ओम शांती।
आत्मिक मुलं जाणतात, आत्मिक बाबा समजवतात की, प्रदर्शनी किंवा मेळाव्यामध्ये, कार्यक्रम करतात तर या चित्रावरती मनुष्यांना समजून सांगा की,बाबा पासून आता वारसा घ्यायचा आहे. कोणता वारसा?मनुष्यापासून देवता बनणे किंवा बेहद्दच्या बाबा पासून अर्ध्याकल्पा साठी स्वर्गाचे राज्य कसे घ्यायचे? हे समजून सांगायचे आहे.बाबा सौदागर तर आहेत, त्यांच्याशी हा सौदा करायचा आहे. हे तर मनुष्य जाणतात,देवी-देवता पवित्र राहतात.भारतामध्ये जेव्हा सतयुग होते,तर देवी-देवता पवित्र होते. जरूर त्यांनी स्वर्गासाठी काही प्राप्ती केली असेल.स्वर्गाची स्थापना करणाऱ्या बाबां शिवाय, कोणीही प्राप्ती करू शकत नाही. पतित पावन बाबाच,पतितांना पावन बनवून,पावन दुनियेचे राज्य देतात.हा सौदा खूपच स्वस्त आहे. फक्त म्हणतात हा तुमचा अंतिम जन्म आहे,जोपर्यंत मी येथे आहे, पवित्र बना.मी पवित्र बनवण्यासाठी आलो आहे.तुम्ही या अंतिम जन्मांमध्ये पावन बनण्याचा पुरुषार्थ कराल,तर पावन दुनिया चा वारसा मिळेल.हा सौदा तर खूपच स्वस्त आहे.तर बाबांना विचार आला की, मुलांना अशाप्रकारे समजावयाला पाहिजे की,बाबांचा आदेश आहे पवित्र बना.हे पुरुषोत्तम संगम युग आहे,जे पवित्र बनण्याचे युग आहे.हे उत्तम ते उत्तम पुरुष देवता आहेत. लक्ष्मीनारायण चे राज्य चालले ना. दैवी विश्वाची राजाई,तुम्हाला बाबा पासून वारशा मध्ये मिळू शकते. बाबांच्या मतावरती या अंतिम जन्मांमध्ये पवित्र बना. ही पण एक युक्ती सांगतात,योगाद्वारे स्वतःला तमोप्रधान पासून सतोप्रधान कसे बनवू शकतात.मुलांच्या कल्याणासाठी खर्च तर करायचा आहे.पैसे खर्च केल्याशिवाय शिवाय राजधानी स्थापन होऊ शकणार नाही.आता लक्ष्मीनारायणची राजधानी स्थापन होत आहे,मुलांना पवित्र जरूर बनायचे आहे.मनसा वाचा कर्मणा कोणतेही उलटेसुलटे काम करायचे नाही.देवतांना कधी कोणते खराब विचार येत नाहीत. मुखाद्वारे असे कोणते वचन निघत नाहीत,ते सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम आहेत.जे होऊन जातात त्यांची महिमा केली जाते.आता तुम्हा मुलांना पण तेच देवी-देवता बनवण्यासाठी आलो आहे.तर मनसा वाचा कर्मणा,कोणतेही असे खराब काम करायचे नाही.देवता संपूर्ण निर्विकारी होते,हे गुण पण, तुम्ही आत्ताच धारण करू शकता, कारण या मृत्युलोकामध्ये तुमचा हा अंतिम जन्म आहे.पतित दुनियेला मृत्युलोक,पावन दुनियेला अमर लोक म्हटले जाते.आत्ता मृत्यूलोक चा विनाश समोर उभा आहे.जरूर अमरमपुरी ची स्थापना होईल.ही तीच महाभारत लढाई आहे,ज्याचे वर्णन ग्रंथांमध्ये केले आहे,ज्याद्वारे जुन्या विकारी दुनिया चा विनाश होतो,परंतु हे ज्ञान कोणामध्ये नाही. बाबा म्हणतात सर्व अज्ञान निद्रेमध्ये झोपले आहेत.पाच विकाराचा नशा राहतो ना.आता बाबा म्हणतात पवित्र बना.मास्टर ईश्वर तर बनणार ना.लक्ष्मीनारायण ला भगवान भगवती म्हणतात,म्हणजे ईश्वरा द्वारे हा वारसा मिळालेला आहे.आत्ता तर भारत पतित आहे.मनसा वाचा कर्मणा कर्तव्यच असे करतात. कोणतीही गोष्ट प्रथम बुद्धीमध्ये येते,परत मुखाद्वारे निघते. कर्मणामध्ये आल्यामुळेच विकर्म बनतात.बाबा म्हणतात,स्वर्गा मध्ये कोणतेही विकर्म होत नाहीत.येथे विकर्म होतात,कारण रावण राज्य आहे.आता बाबा म्हणतात,उर्वरित आयुष्य पवित्र बना.पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे, पवित्र बनून परत माझ्यासोबत बुद्धीचा योग लावायचा आहे, ज्याद्वारे तुमचे जन्म जन्मांतरचे पाप नष्ट होतील,तेव्हाच २१ जन्मासाठी स्वर्गाचे मालक बनाल. बाबा निमंत्रण देतात,हे तर समजवत राहतात की,यांच्याद्वारे बाबां वारसा देतात.ते शिवबाबा आहेत,हे दादा आहेत म्हणून नेहमी बापदादा म्हणतात.शिवबाबा,ब्रह्मा दादा.बाबा खुप स्वस्त सौदा करतात.मृत्युलोकाचा विनाश समोर आहे,अमर लोकांची स्थापना होत आहे.प्रदर्शनी मेळा करतातच यासाठी की,भारताचे कल्याण व्हावे.शिवपिताच भारतामध्ये राम राज्य स्थापन करतात.रामराज्या मध्ये जरूर पवित्रच असतील.बाबा म्हणतात,मुलांनो काम विकार महाशत्रू आहे.पाच विकारालाच माया म्हटले जाते,याला जिंकल्याने तुम्ही जगतजीत बनाल.जगतजीत देवी देवताच आहेत,तर दुसरे कोणी जगतजीत बनू शकत नाहीत. बाबांनी समजवले होते,की जर क्रिश्चन आपसामध्ये मिळाले,तर सर्व सृष्टीवरती राज्य करू शकतात परंतु हा कायदा नाही.हे बाॅम्बस जे आहेत,ते जुन्या दुनियेला नष्ट करण्यासाठी आहेत.कल्प कल्प असेच नवीन दुनियेपासून जुनी आणि जुन्या पासून नवीन दुनिया होते.नविन दुनियेमध्ये ईश्‍वरी राज्य असते,त्यालाच राम राज्य म्हटले जाते‌.ईश्वराला न जाणल्यामुळेच राम राम जपत राहतात.तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी धारण व्हायला पाहिजेत.बरोबर आम्ही ८४ जन्मांमध्ये सतोप्रधान पासून तमोप्रधान बनलो,आता परत सतोप्रधान जरूर बनायचे आहे. शिवबाबांच्या श्रीमतानुसार चालाल,तर तुम्ही २१ जन्मासाठी पवित्र दुनियेमध्ये उच्चपद प्राप्त कराल.आता पाहिजे तर पुरुषार्थ करा किंवा नका करु.पाहिजे तर आठवणी मध्ये राहून दुसऱ्यांना रस्ता दाखवा पाहिजे तर दाखवू नका.प्रदर्शनी द्वारे अनेकांना मुलं रस्ता दाखवत आहेत,स्वतःचे पण कल्याण करायचे आहे.हा सौदा खूपच स्वस्त आहे.फक्त या अंतिम जन्मात पवित्र राहिल्यामुळे, शिवबांच्या आठवणीत आठवण केल्यामुळे, तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल.खूप स्वस्त सौदा आहे,याद्वारे जीवनाचे परिवर्तन होते.असे विचार करायला पाहिजेत. बाबांच्या जवळ समाचार येतात, राखी बांधण्यासाठी जातात,तर कोणी म्हटले की,यावेळेत जेव्हा तमोप्रधान दुनिया आहे,यामध्ये पवित्र राहणे तर असंभव आहे.आत्ता त्या बिचाऱ्यांना माहीतच नाही की,आता संगमयुग आहे,बाबाच पवित्र बनवतात.यांचे मदतगार परमपिता परमात्मा आहेत.त्यांना हे माहीत नाही की, येथे प्राप्ती खूप भारी आहे.पवित्र बनल्यामुळे पवित्र दुनियेचे मालक बनतात.बाबा म्हणतात या मायारूपी पाच विकाराला जिंकल्यामुळे तुम्ही जगजीत बनाल. तर आम्ही का नाही पवित्र बनायचे? खूपच चांगला सौदा आहे.बाबा म्हणतात कामविकार महाशत्रू आहे, याला जिंकल्यामुळे तुम्ही पवित्र बनाल. मायाजीत जगजित बनाल. ही योगबळाद्वारे मायेला जिंकण्याची गोष्ट आहे.परमपिता परमात्मा समजवतात की,माझी आठवण करा तर, आत्म्या मधील भेसळ निघून जाईल.तुम्ही सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. बाबा संगमावरतीच वारसा देतात. सर्वात उत्तम पुरुष लक्ष्मीनारायण होते,त्यांनाच मर्यादा पुरुषोत्तम देवी-देवता धर्माचे म्हटले जाते. बाबा खूप चांगल्या प्रकारे समजावत राहतात परंतु कधीकधी या ज्ञानाच्या गोष्टी पण मुलं विसरतात.परत विचार येतो की भाषणांमध्ये हे मुद्दे समजवले नाहीत.तसे तर समजावण्याचे मुद्दे खूप आहेत,असे होत राहते.वकील लोक पण काही काही मुद्दे विसरतात,परत जेव्हा ते मुद्दे आठवणीत येतात,परत केस लढत राहतात.डॉक्टर लोकांचे पण असेच होते,विचार येतो की,या आजारासाठी हे औषध ठीक आहे. इथे पण ज्ञानाचे मुद्दे खुप आहेत. बाबा म्हणतात,आज तुम्हाला रहस्य युक्त गोष्टी समजावत आहे, परंतु समजणारे सर्व पतित आहेत. असे म्हणतात,हे पतित पावन या…. परत कोणाला पतित म्हटले तर बिघडतात.ईश्वराच्या समोर खरे बोलतात,हे पतित पावन या,येऊन आम्हाला पावन बनवा.ईश्वराला विसरतात,परत खोटे बोलतात, म्हणून खूप युक्ती द्वारे समजावयाचे आहे, ज्यामुळे साप पण मरेल आणि काठी पण मोडणार नाही.बाबा म्हणतात उंदरा पासून पण गुण ग्रहण करा.उंदीर युक्ती द्वारे असे चावतो की,त्याचे रक्त पण निघत नाही आणि माहिती पण होत नाही.तर मुलांच्या बुद्धी मध्ये सर्व ज्ञानाच्या गोष्टी राहिल्या पाहिजेत.योगामध्ये राहणाऱ्यांना वेळेवर मदत मिळते.असे होऊ शकते ऐकणारे, ऐकवणाऱ्या पेक्षा पण जास्त बाबांना प्रिय वाटतील.तर बाबा स्वतः सन्मुख समजवतील.तर असे समजावयाचे आहे,जे समजतील पवित्र बनणे तर खूप चांगले आहे.या अंतिम जन्मांमध्ये पवित्र राहिल्यामुळे आम्ही २१ जन्म पवित्र दुनिया चे मालक बनू.भगवानुवाच हा अंतिम जन्म पवित्र बना,तर आम्ही खात्री देतो की,पूर्वनियोजित नाटका नुसार, तुम्ही २१ जन्मासाठी वारसा मिळवू शकतात.हे तर आम्ही कल्प-कल्प वारसा मिळवत राहतो. ज्यांना सेवेची आवड असेल,ते समजतील,आम्ही जाऊन समजावून सांगू.भागदौड करावी लागेल.बाबा तर ज्ञानाचे सागर आहेत,ते ज्ञानाची खूप वर्षा करत राहतात.ज्यांची आत्मा पवित्र आहे,तर धारणा पण होत राहते.आपले नाव प्रसिद्ध करून दाखवतात.प्रदर्शनी, मेळ्याद्वारे माहित होऊ शकतो की, कोण कशा प्रकारे सेवा करतात. शिक्षकानी तपासायला पाहिजे की, कोण कसे समजवतात.सहसा लक्ष्मीनारायण किंवा शिडीच्या चित्रावर चांगल्याप्रकारे समजावयाचे आहे.योगबळा द्वारे परत असे लक्ष्मी-नारायण बनू शकतात.लक्ष्मीनारायणच आदी देव,आदी देवी होते.चतुर्भुज मध्ये लक्ष्मी-नारायण दोघे येतात.दोन भुजा लक्ष्मीच्या,दोन नारायणच्या आहेत.हे पण भारतवासी जाणत नाहीत.महालक्ष्मीला चार भुजा आहेत.याचा अर्थ ते युगल,जोडी आहेत.विष्णू छत्रभुज आहेत. प्रदर्शनीमध्ये तर रोज रोज समजावले जाते.रथाला पण दाखवले जाते.असे म्हणतात अर्जुन रथामध्ये बसले होते,कृष्ण रथ चालवत होते.या सर्व दंतकथा आहेत.आता या ज्ञानाच्या गोष्टी आहेत.असे दाखवतात ज्ञान अमृताचा कलश लक्ष्मीच्या डोक्यावर ठेवला आहे.वास्तव मध्ये कलश तर जगदंबा वरती ठेवला आहे,जी परत लक्ष्मी बनते.हे पण समजावून सांगावं लागेल,सतयुगा मध्ये एकच धर्म,एकाच मताचे मनुष्य असतात.देवतांचे एक मत आहे.देवतांनाच श्री म्हटले जाते, बाकी कोणाला म्हटले जात नाही. तर बाबांचा विचार चालला होता की,समजावण्यासाठी अक्षर थोडेच पाहिजेत.या अंतिम जन्मांमध्ये पाच विकाराला जिंकल्यामुळे,तुम्ही रामराज्याचे मालक बनाल.हा तर खूपच स्वस्त सौदा आहे.बाबा येऊन अविनाश रत्नाचे दान देतात.बाबा ज्ञानाचे सागर आहेत.तेच ज्ञान रत्न देतात. इंद्रसभेमध्ये कोणी सब्जपरी, पुखराज परी पण आहेत.हे तर सर्व मदत करणारे आहेत.रत्नांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणून ९ रत्न दाखवले आहेत.हे तर जरूर आहे,जे चांगल्या प्रकारे शिकतील, त्यांचे पद पण उच्च दर्जाच्या असेल,क्रमानुसार तर आहेत ना.पुरुषार्थ करण्याची हीच वेळ आहे‌.हे तर मुलं समजतात की, आम्ही बाबांच्या गळ्यातील माळेचे मणी बनतो.जितकी शिवबाबांची आठवण करू,तेवढे आम्ही जसे की आठवणीच्या यात्रांमध्ये आहोत. पाप पण लवकर विनाश होतील.हे शिक्षण खूप लांबलचक नाही,फक्त पवित्र राहायचे आहे आणि दैवीगुणां ची धारणा पण करायची आहे. मुखाद्वारे कधी दगड काढायचे नाहीत.दगड काढणारे दगड बुद्धी बनतील.मुखाद्वारे रत्न काढणारेच उच्चपद प्राप्त करतील.हे तर खूप सहज आहे.जिज्ञासूंना पण समजून सांगा,पतित-पावन सर्वांचे मुक्ती जीवनमुक्ती'चे दाता परमपिता परमात्मा शिव म्हणतात,हे भारतवासी आत्मिक मुलांनो, रावणराज्य मृत्यूलोक,या कलियुगी अंतिम जन्मांमध्ये,पवित्र बनल्यामुळे आणि परमपिता परमात्मा शिवाच्या सोबत बुद्धी योगबळाच्या यात्रे द्वारे,तमोगुणी आत्मा सतोप्रधान आत्मा बनून, सर्व सतयुगी विश्वा वरती पवित्रता,सुख, शांती,संपत्ती संपन्न मर्यादा पुरुषोत्तम दैवी स्वराज्य पद परत मिळू शकतात,तेही पाच हजार वर्षा पूर्वीसारखेच,परंतु होणाऱ्या महाभारी विनाशाच्या अगोदर.बाबा आम्हाला वारसा देतात,राजयोग शिकवतात,जितके शिकाल तेवढेच पद मिळेल.परत हे जुने शरीर किंवा या जुन्या दुनियेचा विचार पण यायला नको.ही वेळ आहे जुन्या दुनियेला सोडण्याची. अशा गोष्टी बुद्धीमध्ये मंथन करत राहाल,तर खूपच चांगले होईल.पुढे चालून पुरुषार्थ करत करत वेळ जवळ येईल,परत संशय येणार नाही.तुम्ही पहाल दुनिया पण थोड्यावेळासाठी आहे, तर बुध्दीयोग लावायला पाहिजे ना. सेवा केल्यामुळे मदत पण मिळत राहील.जेवढा कोणाला सुखाचा रस्ता दाखवाल तेवढी खुशी पण राहील.पुरुषार्थ पण चालत राहील. भाग्य पण दिसून येईल.बाबा तर पुरुषार्थ करायचे शिकवतात.कोणी पुरुषार्थ करतात,कोणी करत पण नाहीत.तुम्ही जाणतात, करोडपती पदमपती सर्व असेच नष्ट होतील,अच्छा.

फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातापिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) उच्चपद प्राप्त करण्यासाठी मुखाद्वारे नेहमी रत्नच काढायचे आहेत, दगड नाही.असे कर्म करायचे आहेत,जे मर्यादा पुरुषोत्तम बनवणारे असतील.

(२) या जन्मामध्ये पवित्र करण्याची प्रतिज्ञा करायची आहे.पवित्र बनण्याची युक्ती सर्वांना ऐकवायची आहे.

वरदान:-
नेहमी कल्याणकारी भावने द्वारे गुणग्राही बनणारे अचल अडोल भव.

आपली स्थिती अचल अडोल बनवण्यासाठी नेहमी गुणग्राही बना. जर प्रत्येक गोष्टींमध्ये गुणग्राही बनाल,तर हलचल मध्ये येणार नाहीत.गुणग्राही म्हणजे कल्याणाची भावना.अवगुणांमध्ये पण गुण पाहणे,याला म्हणतात गुणग्राही, म्हणून अवगुण असणाऱ्या व्यक्ती मधून पण गुणग्रहण करा.जसे ते अवगुणांमध्ये दृढ आहेत,तसे तुम्ही गुणांमध्ये दृढ राहा.गुणांचे ग्राहक बना,अवगुणांचे नाही.

बोधवाक्य:-
आपले सर्वकाही बाबांना अर्पण करून,नेहमी हलके रासणारे च फरिश्ता आहेत.