24-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"शिव
भगवानुवाच-गोड मुलांनो, तुम्ही माझी आठवण करा आणि माझ्यावर प्रेम करा कारण मी
तुम्हाला नेहमीसाठी सुखी बनवण्यासाठी आलो आहे"
प्रश्न:-
ज्या
मुलांकडून चुका होत राहतात त्यांच्या मुखातून कोणते शब्द स्वतः निघतात?
उत्तर:-
नशिबात जे असेल ते मिळेल.स्वर्गामध्ये तर जाणारच आहे.बाबा म्हणतात हे शब्द
पुरुषार्थी मुलांचे नाहीत.उच्च पद मिळवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.जेव्हा बाबा
उच्च पद देण्यासाठी आले आहेत तर चुका करू नका.
गीत:-
बालपणाचे दिवस
विसरू नका....
ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलांनी गीताच्या ओळीचा अर्थ समजला.तुम्ही आता जिवंत असताना बेहदच्या
पित्याचे बनले आहात.आता फक्त तुम्ही ब्राह्मण मुले बेहदच्या पित्याचे बनले
आहात.संपूर्ण कल्प तर हदच्या पित्याचे बनले आहात.आता फक्त तुम्ही ब्राह्मण मुले
बेहदच्या पित्याचे बनले आहात.तुम्ही जाणत आहात बेहदच्या पित्याकडून आम्ही बेहदचा
वारसा घेत आहोत.जर बाबांना सोडले तर बेहदचा वारसा मिळू शकणार नाही.भले तुम्हाला
समजते परंतु थोड्या मध्ये तर कोणी खुश होऊ शकत नाही. मनुष्याला धन हवे
असते.धनाशिवाय सुख असू शकत नाही.धनही पाहिजे,शांती ही पाहिजे,निरोगी काया ही
पाहिजे.तुम्ही मुलेच जाणत आहात दुनियेमध्ये आज काय आहे,उद्या काय होणार आहे. विनाश
तर समोर उभा आहे. आणखी कोणाच्या बुद्धीमध्ये या गोष्टी नाहीत.जरी समजले की विनाश
समोर उभा आहे,तरीही काय करावे,हे समजत नाही. तुम्ही मुले समजता केव्हाही युद्ध होऊ
शकते,थोडी ठिणगी पडली तर आग लागायला उशीर होणार नाही.मुले जाणत आहेत ही जुनी दुनिया
नष्ट झाली म्हणजे झाली म्हणूनच आता लवकरच बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबांची
सदैव आठवण करत राहाल तर खूप हर्षित राहाल.देह अभिमाना मध्ये आल्यामुळे बाबांना
विसरून दुःखी होतात. जेवढी बाबांची आठवण कराल तेवढे बेहदच्या पित्याकडून सुख
मिळेल.येथे तुम्ही आले आहात असे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी.राजा-राणी आणि प्रजेचे
नोकर-चाकर बनणे-यामध्ये खूप फरक आहे ना.आत्ताचा पुरुषार्थ नंतर कल्प- कल्पांतरासाठी
कायमस्वरूपीचा होऊन जातो.शेवटी सर्वांना साक्षात्कार होईल-आम्ही किती पुरुषार्थ केला
आहे?आताही बाबा म्हणतात आपल्या अवस्थेला पहात राहा.अतिशय गोड बाबा ज्यांच्यामुळे
स्वर्गाचा वारसा मिळत आहे,त्यांची आम्ही किती आठवण करतो.तुमचे सर्व काही योगावर
अवलंबून आहे. जेवढी आठवण कराल तेवढी खुशी ही होईल.समजतील आता आम्ही जवळ येऊन पोहोचलो
आहे.काहीजण थकून जातात, माहित नाही ध्येय अजून किती दूर आहे.पोहोचल्यानंतर मेहनतही
सफल होईल.आत्ता तुम्ही ज्या ध्येयाकडे चालले आहात,हे दुनिया जाणत नाही. दुनियेला
हेही माहीत नाही की ईश्वर कोणाला म्हटले जाते. असेही म्हणतात तो दगड-धोंड्या मध्ये
आहे. आता तुम्ही मुले जाणत आहात आम्ही बाबांचे बनलो आहोत. आता बाबांच्याच मतावर
चालायचे आहे.भले परदेशामध्ये आहात,तिथे राहत असतानाही फक्त बाबांची आठवण करायची
आहे.तुम्हाला श्रीमत मिळत आहे.आत्मा तमोप्रधान पासून सतोप्रधान आठवणी शिवाय होऊ शकत
नाही.तुम्ही म्हणता बाबा आम्ही तुमच्या कडून पूर्ण वारसा घेऊ.ज्याप्रमाणे आमचे मम्मा
बाबा वारसा घेत आहेत आम्ही पुरुषार्थ करून त्यांच्या गादीवर अवश्य बसू.मम्मा बाबा,
राज-राजेश्वरी बनतात तर आम्हीही बनू.परीक्षा तर सर्वांसाठी एकच आहे.तुम्हाला खूप
थोडे शिकवले जाते फक्त बाबांची आठवण करा.याला म्हटले जाते सहज राजयोगाचे बळ.तुम्ही
समजता योगाने खूप बळ मिळते.समजतात आम्ही काही विकर्म केले तर त्याची सजा खूप खावी
लागेल.पदभ्रष्ट होऊन जाईल.आठवणी मध्येच माया विघ्न आणते,गायले जाते सद्गुरुचा निंदक
उच्च पदाची प्राप्ती करू शकत नाही.ते तर म्हणतात गुरुचा निंदक.... निराकारा बद्दल
कोणाला माहितही नाही.गायन पण आहे भक्तांना फळ देणारा भगवान. असे नाही की जास्ती
भक्ती करणारे थोडी भक्ती करणार्यांना फळ देतील,नाही.भक्ती म्हणजे भक्ती.रचना,रचनेला
वारसा कसा देणार? वारसा रचयिता कडूनच मिळतो.यावेळी सर्व भक्त आहेत. जेव्हा ज्ञान
मिळते तेव्हा आपोआपच भक्ती सुटुन जाते. ज्ञान जिंदाबाद होते.ज्ञानाशिवाय तर सदगती
कशी मिळणार. सर्वजण आपला हिसाब-किताब चुकता करून निघून जातात.तर आता तुम्ही मुले
जाणत आहात विनाश समोर उभा आहे. त्याअगोदर पुरुषार्थ करून बाबांकडून पूर्ण वारसा
घ्यायचा आहे.
तुम्ही जाणत आहात आम्ही पावन दुनियेमध्ये जात आहोत,जे ब्राह्मण बनतील तेच निमित्त
बनतील.ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण बनल्याशिवाय तुम्ही बाबांचा वारसा घेऊ शकत नाही.
पिता मुलांची रचना वारसा देण्यासाठी करतो.शिवबाबांची तर आपण मुले आहोतच.मुलांना
वारसा देण्यासाठी सृष्टीची रचना करतात.शरीर धारीलाच वारसा देणार ना.आत्मे तर वरती
राहतात.तिथे तर वारसाच्या प्रारब्धाची गोष्टच नाही.तुम्ही आता पुरुषार्थ करून
प्रारब्ध घेत आहात,जे दुनियेमध्ये कोणालाही माहित नाही.आता वेळ खूप जवळ येत
आहे.बॉम्ब ठेवण्यासाठी बनवलेले नाहीत. तयारी खूप होत आहे.आता बाबा आम्हाला आज्ञा
देत आहेत की माझी आठवण करा.नाहीतर शेवटी खूप रडावे लागेल.राज- विद्येच्या
परीक्षेमध्ये काही जण नापास होतात तर रागामध्ये जाऊन बुडून मरतात.इथे तर रागावण्याची
गोष्टच नाही.शेवटी तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. आम्ही काय-काय बनणार आहोत तेही
माहिती होईल.बाबांचे काम आहे पुरुषार्थ करवणे.मुले म्हणतात बाबा आम्ही कर्म करत
असताना आठवण करणे विसरून जातो,नंतर काहीजण म्हणतात आम्हाला आठवण करण्यासाठी वेळ
भेटत नाही,तर बाबा म्हणतात अच्छा वेळ काढून आठवणीमध्ये बसा.बाबांची आठवण
करा.आपापसात जेव्हा भेटता तेव्हासुद्धा बाबांची आठवण करण्याचा प्रयत्न करा. एकत्र
मिळून बसल्याने तुम्ही चांगली आठवण कराल,मदत मिळेल.मुख्य गोष्ट आहे बाबांची आठवण
करणे.काहीजण परदेशामध्ये जातात,तिथे सुद्धा फक्त एक बाबांची आठवण करा. बाबांच्या
आठवणीनेच तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल.बाबा म्हणतात फक्त एक गोष्ट आठवणी
मध्ये ठेवा-बाबांची आठवण करा.योग बळाने सर्व पाप भस्म होऊन जातील.बाबा म्हणतात
मनमनाभव.माझी आठवण करा तर विश्वाचे मालक बनाल.मुख्य आठवणीची गोष्ट आहे.कुठेही
जाण्याची आवश्यकता नाही.घरामध्ये रहा, फक्त बाबांची आठवण करा. पवित्र बनले नाहीतर
आठवण करू शकणार नाही.असं थोडेच आहे,वर्गामध्ये सर्वजण येऊन शिकतील.मंत्र घेतला नंतर
खुशाल कुठेही निघून जा.सतोप्रधान बनण्याचा रस्ता तर बाबांनी सांगितलेला आहे.तसे तर
सेंटर वर आल्यामुळे नवीन-नवीन मुद्दे ऐकायला मिळतात.जर कोणत्या कारणामुळे येऊ शकत
नसाल, पाऊस पडत असेल,करप्यु लागलेला असेल,कोणीही बाहेर जाऊ शकत नसेल तर मग काय
करणार?बाबा म्हणतात काही हरकत नाही.असे नाही कि शिवाच्या मंदिरामध्ये
लोटा(तांब्या)चढवावाच लागेल. कुठेही राहताना तुम्ही आठवणीमध्ये राहा. चालता-फिरता
आठवण करा, इतरांनाही हे सांगा कि बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील आणि
देवता बनाल. अक्षरही दोन आहेत-रचनाकार पित्याकडूनच वारसा घ्यायचा आहे.रचनाकार एकच
आहे.तो किती सहज रस्ता सांगत आहे.बाबांची आठवण करण्याचा मंत्र मिळाला आहे.बाबा
म्हणतात हे बालपण विसरून जाऊ नका.जर बाबांना विसरला तर,आज हसत आहात उद्या रडावे
लागेल.बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायला पाहिजे.असे खूप आहेत,म्हणतात स्वर्गामध्ये तर
जाणार आहोत ना,जे नशिबामध्ये असेल.... त्यांना पुरुषार्थी म्हणू शकत नाही.मनुष्य
उच्चपद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करतात. आता जेव्हा की पित्याकडून उच्च पद मिळत
आहे तर चुका का कराव्यात?शाळेमध्ये जे शिकलेले नसतील त्यांना शिकलेल्यांच्या पुढे
चाकरी करावी लागते. बाबांची पूर्ण आठवण केली नाहीतर प्रजे मध्ये जाऊन नोकर-चाकर
बनाल,यामध्ये थोडेच खुश व्हायला पाहिजे. मुलं समोर येऊन ताजेतवाने होऊन जातात.काही
बंधनांमध्ये आहेत,हरकत नाही,घरामध्ये बसून बाबांची आठवण करत रहा.किती समजावतात,
मृत्यू समोर उभा आहे,अचानक लढाई सुरू होऊन जाईल. पाहायला मिळते युद्ध जसे की सुरू
झाले म्हणजे झाले.रेडिओ मधून सर्व काही माहित पडते. म्हणतात थोडीही गडबड केली तर
आम्ही असे करू.अगोदरच सांगून ठेवतात.बॉम्ब बनवणाऱ्यांना खूप अभिमान आहे.बाबाही
म्हणतात मुलं योग बळामध्ये अजून हुशार झालेली नाहीत.लढाई सुरू होईल,असे नाटका नुसार
होणारच नाही. अजून मुलांनी पूर्ण वारसा घेतलेला नाही.अजून पूर्ण राजधानी स्थापन
झालेली नाही. थोडा वेळ पाहिजे.पुरुषार्थ करवत राहतात.माहित नाही केव्हा काहीही होऊ
शकते,विमान,रेल्वे घसरून खाली पडते.मृत्यु किती सहज उभा आहे.धरती सुद्धा हलत
राहते.सर्वात जास्त भूकंपाला काम करायचे आहे. धरती हलेल तेव्हाच तर सर्व घरे इ.खाली
पडतील.मृत्यू होण्याआधी बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे.म्हणून खूप प्रेमाने
बाबांची आठवण करायची आहे.बाबा तुमच्या शिवाय आमचे दुसरे कोणीही नाही.फक्त बाबांची
आठवण करत रहा.किती सोप्या पद्धतीने ज्याप्रमाणे छोट्या- छोट्या मुलांना बसून समजावत
आहेत.दुसरा कोणताही त्रास देत नाहीत,फक्त आठवण करा आणि काम चितेवर बसल्यामुळे तुम्ही
जळून मेले आहात, आता ज्ञान चितेवर बसून पवित्र बना.तुम्हाला विचारतात तुमचा उद्देश
काय आहे? बोला,शिवबाबा जो सर्वांचा पिता आहे ते म्हणतात माझी आठवण करा तर तुमचे
विकर्म विनाश होतील आणि तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनून जाल.कलियुगामध्ये
सर्व तमोप्रधान आहेत.सर्वांचा सदगती दाता एकच पिता आहे.
आता बाबा म्हणतात फक्त माझी आठवण करा तर तुमच्या आत्म्यावर चढलेला गंज उतरून जाईल.हा
एवढा संदेश तर देऊ शकता ना.स्वतः आठवण कराल तेव्हा तर इतरांनाही करून देऊ शकाल.स्वतः
आठवण करत असतील तर इतरांना ही रुचीने सांगतील नाही तर मनापासून सांगू शकणार
नाहीत.बाबा समजावतात कुठेही जा जेवढे होईल तेवढी फक्त आठवण करा. जे भेटतील त्यांना
हीच शिकवण द्या-मृत्यू समोर उभा आहे. बाबा म्हणतात तुम्ही सर्व तमोप्रधान पतित बनले
आहात.आता माझी आठवण करा,पवित्र बना.आत्माच पतीत बनली आहे. सतयुगामध्ये पावन आत्मा
असते.बाबा म्हणतात आठवणीनेच आत्मा पावन बनेल, दुसरा कोणताही उपाय नाही.हा संदेश
सर्वांना देत राहा तरीही अनेकांचे कल्याण कराल आणि दुसरा कोणताही त्रास देत नाही.
सर्व आत्म्यांना पावन बनवणारा पतित-पावन पिता एकच आहे. सर्वात उत्तम ते उत्तम पुरुष
बनवणारा आहे बाबा.जे पूज्य होते तेच पुजारी बनले आहेत. रावण राज्यामध्ये आम्ही
पुजारी बनलो आहे,राम राज्यामध्ये पूज्य होतो.आता रावण राज्याचा अंत आहे,आम्ही
बाबांची आठवण केल्यामुळे-पुजारी पासून पुन्हा पूज्य बनत आहोत.इतरांनाही रस्ता
सांगायचा आहे,वृद्ध महिलांनी सुद्धा सेवा करायला पाहिजे.मित्र-संबंधी यांनाही संदेश
द्या.सत्संग,मंदिर इ.ही अनेक प्रकारचे आहेत.तुमचा तर एकच प्रकार आहे.फक्त बाबांचा
परिचय द्यायचा आहे.शिवबाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुम्ही स्वर्गाचे मालक
बनाल.निराकार शिवबाबा सर्वांचा सदगती दाता बाबा, आत्म्यांना म्हणतात माझी आठवण करा
तर तूम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल.हे समजावून सांगणे तर सोपे आहे ना.वृद्ध
महिला ही सेवा करू शकतात.मुख्य गोष्ट ही आहे.लग्नसमारंभ कुठेही जा, कानामध्ये ही
गोष्ट सांगा.गीतेचा भगवान म्हणतो माझी आठवण करा.ही गोष्ट सर्वांना खूप आवडेल.जास्त
बोलण्याची गरज पडणार नाही.फक्त बाबांचा संदेश द्यायचा आहे की बाबा म्हणतात माझी
आठवण करा.अच्छा,असे समजा ईश्वर प्रेरणा करत आहे. स्वप्नामध्ये साक्षात्कार होतात.
आवाज ऐकायला येतो की बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधान पासून
सतोप्रधान बनाल.तुम्ही स्वतःही फक्त हे चिंतन करत राहा तर नौका पार होऊन जाईल.आम्ही
प्रत्यक्षात बेहद च्या पित्याचे बनलो आहे आणि बाबांकडून 21 जन्मांचा वारसा घेत आहोत
तर किती खुशी व्हायला पाहिजे.बाबांना विसरल्यामुळेच त्रास होतो.बाबा किती सहज
सांगताहेत स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर आत्मा सतोप्रधान बनून जाईल.सर्व
समजतील यांना योग्य मार्ग मिळाला आहे.हा रस्ता कधी कोणीही सांगू शकत नाही.जर ते
म्हणाले शिवबाबांची आठवण करा तर मग साधू इत्यादींच्या जवळ कोण जाईल.अशी वेळ येईल
तुम्ही घराबाहेर निघू शकणार नाही.बाबांची आठवण करता करता शरीर सोडून द्याल.
अंतकाळात जो शिवबाबांचे स्मरण करेल... तो नारायण योनीमध्ये जन्माला जाईल,
लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये येतील ना.प्रत्येक जन्मांमध्ये राजाई पद प्राप्त
करतील.बस फक्त बाबांची आठवण करा आणि प्रेम करा.आठवणीशिवाय प्रेम कसे करणार.सुख मिळते
म्हणून प्रेम केले जाते.दुःख देणाऱ्या वर प्रेम केले जात नाही. बाबा म्हणतात मी
तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवतो म्हणून माझ्यावर प्रेम करा.बाबांच्या मतावर चालायला
पाहिजे ना. अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. खुशी मध्ये
राहण्यासाठी आठवणीची मेहनत करायची आहे.आठवणीचे बळ आत्म्याला सतोप्रधान बनवणारे
आहे.प्रेमाने एक बाबांची आठवण करायची आहे.
2. उच्च पद प्राप्त करण्यासाठी शिक्षणावर पूर्णपणे ध्यान द्यायचे आहे.असे नाही जे
नशिबामध्ये असेल,चुका करणे सोडून, ्पूर्ण वारशाचे अधिकारी बनायचे आहे.
वरदान:-
विचार करणे आणि
कर्म करण्याच्या अंतराला समाप्त करणारे स्व परिवर्तक सो विश्व परीवर्तक भव
कोणताही
संस्कार,स्वभाव,बोल किंवा संपर्क जे योग्य नाही व्यर्थ आहे,त्या व्यर्थला परिवर्तन
करण्याची मशीन तीव्र करा. विचार केला आणि केले.... तेव्हाच विश्व परिवर्तनाची मशिनरी
तेज होईल.आता स्थापनेच्या निमित्त बनलेल्या आत्म्यांचे विचार करणे आणि कर्म
करण्यामध्ये अंतर दिसत आहे,या अंतराला समाप्त करा. तेव्हाच स्व परीवर्तक पासून
विश्व परीवर्तक बनू शकाल.
बोधवाक्य:-
सर्वात
भाग्यवान ते आहेत, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभूतीची भेट प्राप्त केली आहे.