21-02-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   06.11.87  ओम शान्ति   मधुबन


निरंतर सेवाधारी बनवण्याचे साधन, चार प्रकारची सेवा


आज विश्व कल्याणकारी, विश्व सेवाधारी बाबा आपल्या विश्व सेवाधारी, सहयोगी सर्व मुलांना पाहत होते कि, प्रत्येक मुलगा निरंतर सहजयोगी बरोबर निरंतर सेवाधारी कुठपर्यंत बनलेला आहे? कारण आठवण आणि सेवा दोन्हीचा समतोल नेहमी ब्राह्मण जीवना मध्ये बापदादा आणि सर्व श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्या द्वारे आशीर्वादा साठी पात्र बनवत आहे. या संगमयुगावरच ब्राह्मण जीवना मध्ये परमात्म आशीर्वाद आणि ब्राह्मण परिवाराचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळे या लहानशा जीवना मध्ये सर्व प्राप्ती आणि नेहमी साठी सदाकाळाची प्राप्ती सहज प्राप्त होत आहेत. या संगमयुगाला विशेष आशीर्वादाचे युग म्हटले जाते, त्यामुळेच या युगाला महान युग म्हटले जाते. स्वतः बाबा प्रत्येक श्रेष्ठ कर्म,प्रत्येक श्रेष्ठ संकल्पा च्या आधारावर, प्रत्येक ब्राह्मण मुलाला, प्रत्येक वेळी मना पासून आशीर्वाद देतात. हे ब्राह्मण जीवन परमात्मा आशीर्वादाच्या पालनेने वृध्दी होणारे जीवन आहे. भोलानाथ बाबा सर्व आशीर्वादाच्या झोळ्या, मोठ्या मनाने मुलांना देत आहेत. परंतु हे सर्व आशीर्वाद घेण्याचा आधार आठवण आणि सेवेचा समतोल आहे. जर निरंतर योगी आहात तर त्याबरोबर निरंतर सेवाधारी पण आहात. सेवेचे महत्व नेहमी बुद्धी मध्ये राहाते ना?

कांही मुले समजतात, सेवेची जेव्हा संधी मिळते, किंवा कोणते साधन किंवा वेळ जेंव्हा मिळतो, तेंव्हाच सेवा करतो. परंतु बापदादा आठवण जशी निरंतर,सहज अनुभव करतात, तशी सेवा पण निरंतर आणि सहज होऊ शकते. तर आज बापदादा सेवाधारी मुलांचा, सेवेचा चार्ट पाहत होते. जोपर्यंत निरंतर सेवाधारी बनत नाहीत, तोपर्यंत नेहमीच्या आशीर्वादचे अनुभवी बनू शकत नाहीत. जसे वेळेनुसार, सेवेच्या संधी नुसार, कार्यक्रमा नुसार सेवा करत आहात, त्यावेळी सेवेचे फलस्वरूप बाबाची आणि परिवाराची आशीर्वाद किंवा सफलता प्राप्त करत आहात. परंतु सदाकाळा साठी नाही. त्यामुळे कधी आशीर्वादा मुळे सहज स्व किंवा सेवेमध्ये उन्नती अनुभव करता, आणि कधी मेहनती नंतर सफलता अनुभव करता, कारण निरंतर आठवण आणि सेवेचा समतोल नाही. निरंतर सेवाधारी कसे बनू शकाल, आज त्या सेवेचे महत्त्व सांगत आहेत.

साऱ्या दिवसा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेवा करू शकता. त्यामध्ये एक आहे स्वतःची सेवा म्हणजे स्वतः संपन्न आणि संपूर्ण बनण्याचे नेहमी लक्ष ठेवणे. तुमच्या शिक्षणाचे जे मुख्य विषय आहेत, त्या सर्वां मध्ये स्वतःला सन्मानाने पास करायचे आहे. त्यामध्ये ज्ञान स्वरूप, याद स्वरूप, धारणा स्वरूप, सर्वांमध्ये संपन्न बनायचे आहे. हीच स्वसेवा नेहमी बुद्धी मध्ये ठेवा. हीच स्व सेवा स्वतःच तुमच्या संपन्न स्वरूपा द्वारे सेवा करत राहील. परंतु त्याची विधी आहे, लक्ष्य आणि तपास. स्वतःची तपासणी करायचे आहे, दुसऱ्याची करायची नाही. दुसरी विश्व सेवा आहे., वेगवेगळ्या साधना द्वारे, वेगवेगळ्या विधी द्वारे, वाणी द्वारे किंवा संबंध संपर्का द्वारे करत आहात. हे तर सर्व चांगल्या रीतीने जाणत आहात. तिसरी सेवा आहे, यज्ञ सेवा जी तन आणि धना द्वारे करत आहात.

चौथी मन्सा सेवा आहे. आपली शुभ भावना, श्रेष्ठ कामना,श्रेष्ठ वृत्ती, श्रेष्ठ प्रकंपना द्वारे कोणत्या पण ठिकाणी राहत असला तरी अनेक आत्म्यांची सेवा करू शकता. त्याची विधी आहे, प्रकाश स्तंभ आणि शक्ती स्तंभ बनणे. प्रकाश स्तंभ एकाच ठिकाणावर स्थित असून दुर दुर ची सेवा करत आहे. तसेच तुम्ही सर्व एका स्थानावर बसून पण अनेकांच्या सेवेअर्थ निमित्त बनू शकता. एवढा शक्तींचा खजाना जमा आहे. त्यामुळे सहज करू शकाल. यामध्ये स्थूल साधन किंवा संधी किंवा वेळेची समस्या नाही, फक्त प्रकाश आणि शक्तीने संपन्न बनवण्याची आवश्यकता आहे. नेहमी मन,बुद्धी व्यर्थ विचार करण्या पासून मुक्त राहीली पाहिजे. मनमनाभव च्या मंत्राचे सहज स्वरूप झाले पाहिजे. ही चार प्रकारची सेवा काय निरंतर सेवाधारी बनवू शकत नाही? चारीही सेवेमध्ये प्रत्येक वेळी कोणती ना कोणती सेवा करत राहा, तर सहज निरंतर सेवाधारी बनू शकाल, आणि निरंतर सेवेमध्ये उपस्थित झाल्यामुळे, नेहमी व्यस्त राहिल्यामुळे, सहज मायाजीत बनू शकाल. चारीही सेवेमध्ये, ज्यावेळी जी सेवा करू शकता, ती करा, परंतु सेवे शिवाय एक सेकंद पण वंचित राहू नका. 24 तासाचे सेवाधारी बनायचे आहे. 8 तासाचे योगी किंवा सेवाधारी नाही, परंतु निरंतर सेवाधारी. सहज आहे ना? आणि दुसरे कांही नसेल तर स्वतःची सेवा तर चांगली आहे. ज्यावेळी जी संधी मिळेल, ती सेवा करू शकता.

कांही मुले शरीराच्या कारणामुळे किंवा वेळ न मिळाल्या मुळे समजतात कि, आम्ही तर सेवा करू शकत नाही. परंतु जर चार पैकी कोणत्या पण सेवेमध्ये, विधी पूर्वक व्यस्त राहिला तर सेवेच्या विषया मध्ये गुण जमा होतात आणि हे मिळालेले गुण शेवटच्या निकाला मध्ये जमा होतात. जसे वाणी द्वारे सेवा करणाऱ्याचे गुण जमा होतात, तसे यज्ञसेवा किंवा स्वतःची सेवा किंवा मन्सा सेवा, यांचे पण तेवढेच महत्त्व आहे, त्यामध्ये पण तेवढे गुण जमा होतील. प्रत्येक प्रकारच्या सेवेचे गुण तेवढेच आहेत. परंतु जे चारीही प्रकारची सेवा करतात, त्यांचे तेवढे गुण जमा होतात. जे एक किंवा दोन प्रकारची सेवा करतात त्यांचे गुण त्यानुसार जमा होतात, तरीपण जर चार प्रकारची सेवा करू शकत नाहीत, दोन प्रकारची करू शकतात, तरी पण निरंतर सेवाधारी आहेत. तर निरंतर सेवेमुळे गुण वाढवू शकता, त्यामुळे ब्राह्मण जीवन म्हणजे निरंतर सेवाधारी, सहजयोगी.

जसे आठवणी साठी लक्ष ठेवता कि, आठवण निरंतर राहावी, नेहमी आठवणीची तार जोडलेली राहावी, तसेच सेवे मध्ये पण नेहमी तार जोडलेली राहावी. जसे आठवणी मध्ये पण वेगवेगळ्या स्थितीचा अनुभव करता, कधी बीजरूपाचा, कधी फरिश्ता रुपाचा, कधी मनन करण्याचा, कधी वार्तालापा चा, परंतु स्थिती वेगळी असली तरी आठवणीच्या विषयाने निरंतर आठवणी मध्ये गणना होते. तसे या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेचे रूप असावे. परंतु सेवे शिवाय जीवन नाही. श्वासो श्वास आठवण आणि श्वासो श्वास सेवा असावी, याला समतोल म्हटले जाते. तेंव्हाच प्रत्येक वेळी आशीर्वाद प्राप्त करण्याचा अनुभव नेहमी करत राहाल आणि मनातून नेहमी स्वतःच आवाज निघेल कि, आशीर्वादाने पालना होत आहे, आशीर्वादा मुळे उडती कलेच्या अनुभवाने उडत आहोत. मेहनती पासून आणि युद्धा पासून मुक्त व्हाल. काय, कां, कसे या प्रश्ना पासून मुक्त होऊन नेहमी प्रसन्न राहाल. सफलता नेहमी जन्मसिद्ध अधिकाराच्या रुपामध्ये अनुभव करत राहाल. माहित नाही काय होईल. सफलता मिळेल कां नाही, माहित नाही, आम्ही पुढे चालू शकतो की नाही. असा माहित नाहीचा विचार, परिवर्तन होऊन मग मास्टर त्रिकालदर्शी स्थितीचा अनुभव कराल. विजय होणारच आहे. हा निश्चय आणि नशा नेहमी अनुभव होईल. हीच आशीर्वादा ची निशाणी आहे. समजले?

ब्राह्मण जीवनामध्ये, महान युगामध्ये, बापदादा चे अधिकारी बनून, तरीही मेहनत करावी लागते, नेहमी युद्धाच्या स्थिती मध्ये जीवन जात आहे. हे मुलांचे मेहनतीचे जीवन बापदादा पाहू शकत नाहीत, त्यामुळे निरंतर योगी निरंतर सेवाधारी बना. समजले?

जुन्या मुलांची आशा पूर्ण झाली ना. पाण्याची सेवा करणाऱ्या सेवाधारी मुलांना बाबा शब्बासी देतात, जे अनेक मुलांची आशा पूर्ण करण्या मध्ये रात्रंदिवस सहयोगी आहेत. निद्राजीत पण बनले आहेत, तर प्रकृतीजीत पण बनले आहेत. तर मधुबन मधील सेवाधारी, जे योजना बनविणारे आहेत, जे पाणी आणणारे, किंवा आरामाने स्वागत करणारे, राहणारे, भोजन वेळेवर तयार करणारे, जे पण वेगवेगळ्या सेवेसाठी निमित्त आहेत, त्या सर्वांचे आभार माना. बापदादा तर देतच आहेत. दुनिया पाणी, पाणी करून ओरडत आहे आणि बाबाची मुले किती सोपे कार्य करत आहेत. बापदादा सर्व सेवाधारी मुलांची सेवा पाहत राहतात. किती आरामा मध्ये तुम्हा मुलांना मधुबन निवासी निमित्त बनून संधी देत आहेत. तुम्ही पण सहयोगी बनले आहात ना? जसे ते सहयोगी बनले आहेत, तर तुम्हाला त्याचे फळ मिळत आहे, तसे तुम्ही सर्व जण प्रत्येक कार्यामध्ये, जशी वेळ, त्यानुसार चालत राहा, तर तुमच्या सहयोगाचे फळ इतर ब्राह्मणांना मिळत राहील.

बापदादा हसत होते कि, सतयुगा मध्ये दुधाच्या नद्या वाहतील परंतु संगमवर पाणी तर तुप बनले आहे ना. तुपा ची नदी नळाद्वारे येत आहे. पाणी तुप बनले आहे, त्यामुळे अमुल्य झाले ना. या विधीद्वारे अनेकांना संधी देत राहा. तरी पण पाहा, दुनिये मध्ये आणि तुम्हा ब्राह्मणा मध्ये अंतर आहे ना. कांही ठिकाणी तरीपण तुम्हां मुलांना फार आराम आहे, आणि अभ्यास पण होत आहे, त्यामुळे राजयुक्त बनून, प्रत्येक परिस्थिती मध्ये समाधानी राहण्याचा अभ्यास वाढवत चला. अच्छा.

सर्व निरंतर योगी, निरंतर सेवाधारी, श्रेष्ठ आत्म्यांना, सदा त्रिकालदर्शी बनून, सफलतेच्या अधिकाराचा अनुभव करणारे, सदा प्रसन्नचित, संतुष्ट, श्रेष्ठ आत्म्यांना, प्रत्येक सेकंदा मध्ये आशीर्वादाचा अनुभव करणाऱ्या मुलांना, विधाता, वरदाता, बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

दादीजी बरोबर:- संकल्प केला आणि सर्वांना श्रेष्ठ संकल्पाचे फळ मिळाले. किती आशीर्वादाच्या माळा पडत आहेत. जे निमित्त बनतात, त्यांचे पण बापदादा बरोबर गुण तर गातात ना. त्यामुळे तर बाबा बरोबर मुलांची पण पूजा होत आहे, एकट्या बाबाची होत नाही. सर्वांना किती खुशी प्राप्त होत आहे. या आशीर्वादाच्या माळा, भक्तीमध्ये माळांचे अधिकारी बनविते.

पार्टी बरोबर अव्यक्त बापदादा ची मुलाखात:-

(१) तुम्ही सर्व श्रेष्ठ आत्मे, सर्वांची तहान भागविणारे आहात ना? ते स्थूल जल आहे, आणि तुमच्या जवळ ज्ञानामृत.ते पाणी अल्पकाळासाठी तहान भागवून तृप्त आत्मा बनविते. तर सर्व आत्म्यांना अमृताद्वारे तृप्त करण्यासाठी निमित्त बनले आहात ना. तो उमंग नेहमी राहतो? कारण तहान भागविणे, हे एक महान पुण्य आहे. तहानलेल्या ची तहान भागविणाऱ्याला पुण्य आत्मा म्हणतात. तुम्हीं पण महान पुण्यात्मा बनून सर्वांची तहान भागविणारे आहात. जसे ताहनेने मनुष्य तडपतात, जर पाणी मिळाले नाही तर तहानेने तडपतात ना. तसे ज्ञानामृत न मिळाल्यामुळे, आत्मे दुःख, अशांतीने तडपत आहेत. तर त्यांना ज्ञानामृत देऊन, तहान भागविणारे पुण्यात्मे आहात. तर पुण्याचे खाते अनेक जन्मासाठी जमा करत आहात ना. एका जन्मा मध्येच अनेक जन्मांचे खाते, अनेक जन्मासाठी जमा करत आहात ना? एका जन्मा मध्ये अनेक जन्माचे खाते जमा होत आहे, तर तुम्ही एवढे जमा केले आहे ना? एवढे मालामाल बनले आहात, जे अनेकांना पण वाटू शकाल. स्वतःसाठी पण जमा करा आणि दुसऱ्या ना पण देणारे दाता बना. तर नेहमी हे तपास करा कि, सार्‍या दिवसा मध्ये पुण्यात्मा बनलो,पुण्याचे कार्य केले कां, फक्त स्वतःचेच खाणे,पिणे, मौज मध्ये राहिलात? जमा करणाऱ्याला समजदार म्हटले जाते, जे कमवितात आणि खातात, त्याला समजदार म्हणत नाहीत, जसे भोजन करण्यासाठी वेळ काढता, कारण ते आवश्यक आहे, तसेच पुण्याचे कार्य करण्यासाठी पण आवश्यक आहे. तर नेहमीसाठी पुण्य आत्मा आहात, कधी कधी साठी नाही. संधी मिळाली तर करायचे, नाही, संधी घ्यायची आहे, वेळ मिळणार नाही, वेळ काढावा लागेल, तर जमा करू शकाल. यावेळी जेवढी पण भाग्याची रेषा ओढू शकता, तेवढी ओढा, कारण बाबा भाग्यविधाता आणि वरदाता आहेत. श्रेष्ठ ज्ञानाची लेखणी बाबांनी आपल्या मुलांना दिली आहे. या लेखणी द्वारे जेवढी लांब रेषा ओढू शकाल, तेवढी ओढू शकता. अच्छा.

(२) सर्व राजऋषि आहेत ना? राज म्हणजे अधिकारी, आणि ऋषी म्हणजे तपस्वी. तपस्येचे बळ सहज परिवर्तन करण्याचा आधार आहे. परमात्मा लगन द्वारे स्वतःला आणि विश्वाला नेहमीसाठी निर्विघ्न बनवू शकता. निर्विघ्न बनणे आणि निर्विध्न बनविणे हीच सेवा करत आहात ना. अनेक प्रकारच्या विघ्ना पासून सर्व आत्म्यांना मुक्त करणारे आहात. तर जीवनमुक्तीचे वरदान बाबा कडून घेऊन, इतरांना देणारे आहात ना. निर्बंधन अर्थात जीवनमुक्त.

(३) हिंमत मुलांची मदत बाबाची. मुलांच्या हिंमतीवर नेहमी बाबाची मदत पद्मगुणा प्राप्त होत आहे.ओझे तर बाबा वर आहे. परंतु ट्रस्टी बनून नेहमी बाबाच्या आठवणी मध्ये पुढे चालत राहा. बाबांची आठवणच छत्रछाया आहे. पूर्वीचा हिशोब सुळा सारखा आहे, परंतु बाबाच्या मदतीने तो काटा बनत आहे. परिस्थिती जरूर येणार आहे, कारण सर्व कांही इथेच चुक्तु करायचे आहे, परंतु बाबा ची मदत काटा बनविते. मोठ्या गोष्टीला लहान बनविते, कारण मोठे बाबा बरोबर आहेत. नेहमी निश्चयाने पुढे चालत राहा. प्रत्येक पावला मध्ये ट्स्टी. ट्स्टी म्हणजे सर्व कांही तुमचे. माझे पण समाप्त. गृहस्थी म्हणजे माझे. बाबाचे असेल, तर मोठी गोष्ट लहान होऊन जाते, आणि माझे असेल तर लहान गोष्ट मोठी होऊन जाते. तुझे तुझे हलका बनविते,आणि माझेपन भारी बनविते. तर जेव्हा पण भारी अनुभव करता, तर तपासा कि, कुठे माझेपण तर नाही. माझ्या ला तुझ्या मध्ये बदली करा, तर त्यावेळेस हलके होऊन जाल. सारे ओझे एका सेकंदा मध्ये नाहीसे होऊन जाईल. अच्छा.

वरदान:-
संतुष्टतेची विशेषता, किंवा श्रेष्ठते द्वारे, सर्वांचे इष्ट बनणारे, वरदानी मूर्त भव:

जे नेहमी स्वतः आणि सर्वां पासून संतुष्ट राहतात, तेच अनेक आत्म्यांचे इष्ट आणि अष्ट देवता बनू शकतात. सर्वात मोठ् यातील मोठा गुण म्हणा,दान म्हणा, किंवा विशेषता, किंवा श्रेष्ठता म्हणा, ती संतुष्टताच आहे. संतुष्ट आत्माच प्रभुप्रिय, लोकप्रिय, आणि स्वयंप्रिय असते. अशी संतुष्ट आत्माच वरदानी रूपा मध्ये प्रसिद्ध होईल. आता यावेळी महादानी पेक्षा पण जादा वरदानी रुपा द्वारे सेवा होईल.

सुविचार:-
विजयी रत्न ते आहेत, ज्यांच्या मस्तकावर नेहमी विजयाचा टिळा चमकत राहतो.