25-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो :- तुम्हाला आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ अवश्य करायचा आहे,कारण की आठवणीच्या बळाने तुम्ही विकर्माजीत बनाल"

प्रश्न:-
कोणता विचार आला तर पुरुषार्थ कमी होईल?ईश्वरीय मदतगार मुले कोणती सेवा करत राहतील?

उत्तर:-
काही मुले समजतात अजुन खुप वेळ आहे,नंतर पुरुषार्थ करू,परंतु मृत्यूचा काही नियम थोडीच आहे.उद्या-उद्या म्हणत मरून जाल म्हणूनच असे समजू नका अजून खूप वर्ष पडले आहेत,शेवटी पुरुषार्थ करू.असा विचार अजूनच खाली आणेल. जेवढे होईल तेवढे आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करून,श्रीमतावर आपले कल्याण करत रहा.आत्मिक ईश्वरीय मदतगार मुले आत्म्यांना मदत करून,पतीतांना पावन बनवण्याची सेवा करत राहतील.

गीत:-
ओम नमो शिवाय....

ओम शांती।
हे तर मुलांना समजावले आहे निराकार पिता साकार शिवाय कोणतेही कर्म करू शकत नाही.अभिनय करू शकत नाही.आत्मिक पिता येऊन ब्रह्मा द्वारे आत्मिक मुलांना समजावत आहे.योगबळानेच मुलांना सतोप्रधान बनायचे आहे नंतर सतोप्रधान विश्वाचे मालक बनायचे आहे.हे मुलांच्या बुद्धी मध्ये आहे.कल्प-कल्प बाबा येऊन राजयोग शिकवत आहेत. ब्रह्मा द्वारे येऊन आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत.म्हणजेच मनुष्याला देवता बनवत आहेत.मनुष्य जे देवी- देवता होते तेच आता बदलून शूद्र पतित बनले आहेत.भारत जेव्हा पारसपुरी होता तेव्हा पवित्रता- सुख-शांती सर्व होती.ही 5 हजार वर्षाची गोष्ट आहे.ऍक्युरेट हिसाब-किताब बाबा बसून समजावत आहेत.त्यांच्या पेक्षा उंच तर कोणीच नाही.सृष्टी किंवा झाडा,ज्याला कल्पवृक्ष म्हणतात त्याच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य बाबाच सांगू शकतात.भारताचा जो देवी देवता धर्म होता तो आता लोप पावला आहे.देवी-देवता धर्म तर आता राहिलेलाच नाही. अवश्य देवतांचे चित्र आहेत.हे तर भारतवासी जाणत आहेत.सतयुगामध्ये लक्ष्मी- नारायणाचे राज्य होते.भले शास्त्रांमध्ये कृष्णाला द्वापर युगामध्ये घेऊन गेले आहेत ही चूक केली आहे.बाबाच येऊन चुकलेल्यांना पूर्ण रस्ता सांगत आहेत.रस्ता दाखवणारा येतो तेव्हाच सर्व आत्मे मुक्तीधाम मध्ये निघून जातात म्हणूनच त्यांना सर्वांचा सदगती दाता असे म्हटले जाते.रचयिता एकच असतो. एकच सृष्टी आहे.दूनियेचा इतिहास-भूगोल एकच आहे,तो पुनरावृत्त होत राहतो.सतयुग,त्रेता,द्वापर, कलियुग नंतर होते संगमयुग. कलियुगामध्ये आहेत पतित,सतयुगामध्ये आहेत पावन. सतयुग होते तर अवश्य कलियुगाचा विनाश होईल. विनाशाच्या अगोदर स्थापना होईल.सतयुगामध्ये तर स्थापना होणार नाही नाही.भगवान तेव्हाच येणार जेव्हा पतित दुनिया असेल.सतयुग तर आहेच पावन दुनिया.पतित दुनियेला पावन दुनिया बनवण्यासाठी ईश्वराला यावे लागते.आता बाबा खूप सहज युक्ती सांगत आहे.देहाचे सर्व संबंध सोडून देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करा. कुणीतरी एक पतित-पावन आहे ना.भक्तांना फळ देणारा एकच भगवान आहे.भक्तांना ज्ञान देत आहे.पतित दुनियेमध्ये ज्ञानसागर पावन बनवण्यासाठी येतात. योगाने तुम्ही पावन बनता.बाबां शिवाय तर कोणी पावन बनवू शकत नाही.या सर्व गोष्टी इतरांना समजावण्यासाठी बुद्धीमध्ये बसवल्या जातात.घराघरांमध्ये संदेश द्यायचा आहे.असे म्हणू नका की भगवान आला आहे. खूप युक्तीने समजावून सांगावे लागते.बोला,तो पिता आहे ना. एक आहे लौकीक पिता,दुसरा आहे पारलौकिक पिता.दुःख झाल्यानंतर पारलौकिक पित्याची आठवण करतात.सुखधाम मध्ये कोणीही आठवण करत नाहीत. सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाच्या राज्यांमध्ये सुखच सुख होते. पवित्रता,सुख,शांती होती. बाबांचा वारसा मिळाला मग का बोलावतील.आत्मा जाणत आहे आम्हाला सुख आहे.हे तर कोणीही म्हणेल तिथे सुखच सुख आहे.बाबांनी दुःखासाठी तर सृष्टी रचलेली नाही.हा पूर्वापार बनलेला खेळ आहे.ज्यांचा अभिनय शेवटी आहे,2-4 जन्म घेतात ते अवश्य बाकीचा वेळ शांती मध्येच राहतील.बाकी नाटकाच्या खेळा मधून निघून जातील,असे तर होऊ शकत नाही.खेळामध्ये तर सर्वांना यावे लागते.एक-दोन जन्म मिळतात. बाकीचा वेळ जसे की मोक्षा मध्ये आहे.आत्मा अभिनेता आहे ना. काही आत्म्यांना उच्च अभिनय मिळाला आहे काहींना कमी.हे सुद्धा तुम्ही आता जाणत आहात, गायले जाते ईश्वराचा अंत कोणी पाहू शकत नाही.बाबाच येऊन रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचा अंत सांगतात.जोपर्यंत रचयिता स्वतः येत नाही तोपर्यंत रचनेला कोणीही जाणू शकत नाही. बाबाच येऊन सांगतात.मी साधारण शरीरामध्ये प्रवेश करतो. मी ज्याच्या मध्ये प्रवेश करतो तो आपल्या जन्मांना जाणत नाही. त्यांना बसून 84 जन्माची कहाणी सांगत आहे.कोणाच्याही अभिनयामध्ये बदल होऊ शकत नाही.हा पूर्वापार बनलेला खेळ आहे.हेसुद्धा कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाही.बुद्धीमध्ये तेव्हा बसेल जेव्हा पवित्र होऊन समजतील. चांगल्या प्रकारे समजण्यासाठी 7 दिवसाची भट्टी आहे.भागवत इ. सुद्धा 7 दिवस ठेवतात.इथे सुद्धा समजून येते-कमीत कमी 7 दिवसा शिवाय कोणालाही समजू शकत नाही.काही-काहींना तर चांगले समजते.काही-काहींना तर 7 दिवस समजावून सुद्धा काहीच समजत नाही.बुद्धीमध्ये बसत नाही.म्हणतात आम्ही तर 7 दिवस आलो.आमच्या बुद्धी मध्ये काहीच बसत नाही.उच्चपद प्राप्त करायचे नसेल तर बुद्धी मध्ये बसणार नाही.अच्छा तरीही त्यांचे कल्याण तर झाले ना.प्रजा तर अशीच बनते.बाकी राज्य-भाग्य घेणे त्यामध्ये तर गुप्त मेहनत आहे.बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतात.आता करा किंवा नका करू परंतु बाबांचे डायरेक्शन हेच आहे.आवडत्या वस्तू ची आठवण केली जाते ना. भक्ती मार्गामध्ये ही गातात हे पतित-पावन ये.आता तो मिळाला आहे,म्हणत आहे माझी आठवण करा तर कट उतरून जाईल. बादशाही सहज थोडीच मिळणार आहे.काहीतरी मेहनत करावी लागेल ना.आठवणी मध्येच मेहनत आहे.मुख्य आहे आठवणी ची यात्रा.खूप आठवण करणारे कर्मातीत अवस्था प्राप्त करतात. पूर्ण आठवण न केल्याने विकर्म विनाश होणार नाहीत.योगबळाने च विकर्माजीत बनायचे आहे. अगोदर ही योगबळाने विकर्मांना जिंकले आहे.लक्ष्मी-नारायण एवढे पवित्र कसे बनले जेव्हा की कलियुगाच्या अंताला कोणीही पवित्र नाही.यामध्ये तर स्पष्ट आहे हा गीतेच्या ज्ञानाचा एपिसोड(भाग)पुनरावृत्त होत आहे."शिव भगवानुवाच" चुका तर होत राहतात ना.बाबाच येऊन अचूक बनवतात.भारताचे जे पण शास्त्र आहेत ते सर्व भक्तिमार्गाचे आहेत.बाबा म्हणतात मी जे सांगितले होते ते कोणालाही माहित नाही.ज्यांना सांगितले होते त्यांनी पद प्राप्त केले. 21 जन्मांचे प्रारब्ध मिळाले नंतर ज्ञान लोप पावले जाते.तुम्ही चक्र लावून आले आहात.कल्पा पूर्वी ज्यांनी ऐकले आहे तेच येतील. आता तुम्ही जाणत आहात, आम्ही मनुष्यांना देवता बनवण्याचे कलम लावत आहोत. हे दैवी झाडाचे कलम आहे.ते लोक त्या झाडांचे कलम लावत राहतात.बाबा येऊन फरक सांगत आहेत.बाबा दैवी फुलांचे कलम लावत आहेत.ते लोक तर जंगलाचे कलम(वृक्षारोपण)करत राहतात.तुम्ही दाखवता-कौरव काय करत होते,पांडव काय करत होते.त्यांचे काय नियोजन आहे आणि तुमचे काय नियोजन आहे. ते आपला प्लॅन बनवतात की दूनिया वाढू नये.मनुष्य जास्त वाढू नयेत,म्हणून कुटुंबनियोजन करतात त्यासाठी खूप मेहनत करत राहतात.बाबा तर खूप चांगली गोष्ट सांगत राहतात, अनेक धर्म विनाश होतील आणि एकच देवी-देवता धर्माचे कुटुंब स्थापन करत आहेत.सतयुगामध्ये एकच आदि सनातन देवी-देवता धर्माचे कुटुंब होते आणि एवढे सर्व कुटुंब नव्हते.भारतामध्ये किती कुटुंब आहेत.गुजराती कुटुंब,महाराष्ट्रीय कुटुंब.....खरे पाहता भारतवासींचे एक कुटुंब असायला पाहिजे.अनेक कुटुंब असतील तर अवश्य एक दुसऱ्यामध्ये वाद-विवाद होत राहतील.नंतर नागरी युद्घ (सिविलवार)होते.कुटुंबामध्ये सुद्धा आपसा मधे युद्ध होते. ज्याप्रकारे ख्रिश्चनांचे आपले कुटुंब आहे.त्यांचेसुद्धा आपसा मधे भांडण लागते.आपसात दोन भाऊ सुद्धा भेटत नाहीत, पाण्याचीसुद्धा वाटणी केली जाते. सिक्ख धर्म वाले समजतील समजतात आम्ही आपल्या सिक्ख धर्म वाल्यांना जास्ती सुख द्यावे,ओढ लागते ना तर प्रयत्न करत राहतात.जेव्हा अंत होणार असतो तेव्हा नागरी युद्ध इत्यादी सर्व होते.आपसात लढायला सुरुवात करतात.विनाश तर होणारच आहे.बॉम्ब भरपूर बनवत राहतात.मोठे युद्ध जेव्हा लागले होते त्यामध्ये दोन बॉम्ब सोडले होते,आता तर भरपूर बनवले आहेत.समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना.तुम्ही समजावयाचे आहे ही तीच महाभारताची लढाई आहे.मोठे- मोठे लोक जे पण आहेत,ते म्हणतात जर या लढाईला बंद केले नाही तर संपूर्ण दुनियेला आग लागेल.आग तर लागणारच आहे,हे तुम्ही जाणत आहात. बाबा आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. राजयोग आहेच सतयुगाचा.तो देवी-देवता धर्म आता लोप पावला आहे.चित्रसुद्धा बनले आहेत.बाबा म्हणतात कल्पा पूर्वीप्रमाणे जे विघ्न पडले असतील तेच पडतील.अगोदर थोडीच माहित पडते.नंतर समजले जाते कल्पा पूर्वीही असेच झाले असेल.हे पूर्वापार बनलेले नाटक आहे.नाटकामध्ये आम्ही बांधलो गेलो आहे. आठवणीच्या यात्रेला विसरून जायचे नाही,यालाच परीक्षा म्हटले जाते.आठवणीच्या यात्रेमध्ये थांबू शकत नाहीत, थकून जातात.गीत आहे ना-रात के राही थक मत जाना...... याचा अर्थ कोणी समजू शकत नाही.ही आठवणीची यात्रा आहे.ज्या द्वारे रात्र पूर्ण होऊन दिवस येईल. अर्धाकल्प पूर्ण होऊन नंतर सुख सुरू होईल.बाबांनीच मनमनाभव चा अर्थही समजावला आहे.फक्त गीतेमध्ये कृष्णाचे नाव टाकल्यामुळे ती ताकत राहिलेली नाही.आता कल्याण तर सर्वांचे होणार आहे.याचा अर्थ आम्ही सर्व मनुष्यांचे कल्याण करत आहोत.खास भारत आणि त्या नंतर दुनिया.श्रीमतावर आम्ही सर्वांचे कल्याण करत आहोत. कल्याणकारी जे बनतील तर वारसाही त्यांनाच मिळेल. आठवणीच्या यात्रे शिवाय कल्याण होऊ शकत नाही.

आता तुम्हाला समजावले जाते, तो तर बेहदचा पिता आहे. पित्याकडून वारसा मिळाला होता.भारतवासींनी 84 जन्म घेतले आहेत.पुनर्जन्माचा ही हिशोब आहे.कुणीही समजत नाही की 84 जन्म कोण घेते. स्वतःचे श्लोक इ.बनवून ऐकवत राहतात.गीता तीच आहे त्यावर अनेक टीका करतात.गीते पेक्षाही भागवत मोठा बनवला आहे. गीतेमध्ये ज्ञान आहे.भागवत मध्ये जीवन कहानी आहे.खरे पाहता मोठी गीता असायला पाहिजे. ज्ञानाचा सागर पिता आहे,त्यांचे ज्ञान तर चालतच राहते.ती गीता तर अर्ध्या तासात वाचून काढतात.आता तुम्ही ज्ञान तर ऐकतच आले आहात. दिवसेंदिवस तुमच्याजवळ अनेक लोक येत राहतील.हळू-हळू येतील.आत्ताच जर मोठे-मोठे मोठे राजे आले तर उशीर लागणार नाही.लगेच आवाज पसरेल म्हणून युक्तीने हळू-हळू चालत राहते.हे गुप्त ज्ञान आहे. कोणालाही माहित नाही हे काय करत आहेत.रावणा सोबत तुमचे युद्ध कसे आहे.हे तर तुम्हीच जाणता इतर कोणीही जाणू शकत नाही.भगवानुवाच-तुम्ही सतोप्रधान बनण्यासाठी माझी आठवण तर पाप नाश होऊन जातील.पवित्र बनाल तेव्हा तर सोबत घेऊन जाईन.जीवन मुक्ती सर्वांना मिळणार आहे.रावण राज्यापासून मुक्ती होईल.तुम्ही लिहिता आम्ही शिवशक्ती ब्रह्माकुमार-कुमारी परमपिता परमात्माच्या श्रीमतावर,5 हजार वर्षापूर्वी प्रमाणे,श्रेष्ठाचारी दुनिया स्थापन करणार आहोत.5 हजार वर्षापूर्वी श्रेष्ठाचारी दुनिया होती. हे बुद्धीमध्ये बसवायला पाहिजे. मुख्य-मुख्य मुद्दे बुद्धीमध्ये धारण झाले तरच आठवणीच्या यात्रेमध्ये राहतील.दगड बुद्धी आहेत ना.काहीजण समजतात अजून वेळ बाकी आहे नंतर पुरुषार्थ करू.परंतु मृत्यूचा नियम थोडीच आहे.उद्या मरून गेलो तर उद्या-उद्या करत मरून जातील. पुरुषार्थ तर केला नाही म्हणून असे समजू नका की अजून खूप वर्ष शिल्लक आहेत.शेवटी भरून काढू.असे विचार अजूनच खाली आणतील.जेवढे होईल तेवढा पुरुषार्थ करत रहा.श्रीमतावर प्रत्येकाला आपले कल्याण करायचे आहे.स्वतःला तपासून पाहायचे आहे.किती बाबांची आठवण करतो आणि किती सेवा करतो!आत्मिक ईश्वरीय मदतगार तुम्ही आहात ना.तुम्ही आत्म्यांना मदत करता.आत्मा पतिता पासून पावन कशी बनेल त्यासाठी युक्ती सांगता.दुनियेमध्ये चांगले आणि वाईट मनुष्य तर असतातच, प्रत्येकाचा अभिनय आपला- आपला आहे.ही बेहद ची गोष्ट आहे.मुख्य फांद्या मोजल्या जातात.बाकी पाने तर अनेक आहेत.बाबा समजावत राहतात- मुलांनो मेहनत करा.सर्वांना बाबांचा परिचय द्या बाबांशी बुद्धी योग जोडला जाईल.बाबा सर्व मुलांना म्हणतात,पवित्र बना तर मुक्तिधाम मध्ये चालले जाल. दुनियेला थोडीच माहित आहे की महाभारत लढाई मुळे काय होईल.हा ज्ञानयज्ञ रचला आहे कारण की नवी दुनिया पाहिजे. आमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा सर्व या यज्ञामध्ये स्वाहा होऊन जातील.! अच्छा!

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. हे पूर्वापार बनलेले नाटक आहे म्हणून विघ्नांना घाबरायचे नाही.विघ्नांमध्ये आठवणीच्या यात्रेला विसरून जाऊ नका. लक्षात ठेवा-आठवणीची यात्रा कधीही थांबायला नको.

2. पारलौकिक पित्याचा परिचय सर्वांना देऊन पावन बनवण्याची युक्ती सांगायची आहे.दैवी झाडाचे कलम लावायचे आहे.

वरदान:-
सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे बाबांना देऊन सदैव आपली उन्नती करणारे सहजयोगी भव

जी मुले बाबांचे कार्य संपन्न करण्याच्या जबाबदारीचा संकल्प घेतात त्यांना बाबा ही तेवढाच सहयोग देतात.फक्त जो व्यर्थ चे ओझे आहे ते बाबांवर सोडून द्या. बाबांचे बनून बाबांवर जबाबदाऱ्यांचे ओझे सोडून दिल्याने सफलता ही जास्ती आणि उन्नती ही सहज होईल.का आणि काय च्या प्रश्नापासून मुक्त रहा,विशेष पूर्णविराम ची स्थिती राहावी तर सहजयोगी बनून अतींद्रिय सुखाचा अनुभव करत रहाल.

बोधवाक्य:-
मन आणि बुद्धी मध्ये इमानदारी असेल तर बाबा किंवा परिवाराचे विश्वास पात्र बनाल.