20-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, तुम्हीं ईश्वरीय संप्रदाय आहात, तुम्हाला ज्ञानसूर्य बाबा मिळाले आहेत,
आता तुम्ही जागे झाले आहात, तर दुसऱ्यांना पण जागे करा.
प्रश्न:-
अनेक
प्रकारच्या समस्येचे कारण तथा त्याचे निवारण काय आहे ?
उत्तर:-
जेंव्हा देह अभिमाना मध्ये येता तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. मायेची
ग्रहचारी बसते. बाबा म्हणतात देहीअभिमानी बना, सेवे मध्ये तत्पर राहा. आठवणीच्या
यात्रे मध्ये राहा, तर ग्रहचारी नाहीशी होईल.
ओम शांती।
आत्मिक मुला जवळ बाबा आले आहेत, श्रीमत देणे किंवा समजावण्यासाठी. हे तर मुले समजत
आहेत कि, विश्वनाटका नुसार सारे कार्य होणार आहे. बाकी थोडा वेळ राहिला आहे. या
भारताला रावणपुरी पासून विष्णुपुरी बनवायचे आहे. आता बाबा पण गुप्त आहेत. शिक्षण पण
गुप्त आहे. सेवाकेंद्रे तर अनेक आहेत. लहान मोठ्या गावांमध्ये लहान-मोठी सेवाकेंद्रे
आहेत, आणि मुले पण फार आहेत. आता मुलांनी आव्हान केले आहे आणि लिहिले पण आहे.
जेंव्हा कोणते पुस्तक बनवितात तर त्यामध्ये लिहायचे आहे. आम्ही या आपल्या भारत भूमी
ला स्वर्ग बनवूनच सोडू. तुम्हाला पण आपली भारत भूमी फार प्रिय आहे, कारण तुम्ही
जाणत आहात, हा भारत स्वर्ग होता. याला पाच हजार वर्षे झाली. भारत फार शानदार
होता,त्याला स्वर्ग म्हटले जाते. तुम्हां ब्रह्मा मुखवंशावलीला हे ज्ञान आहे. या
भारताला श्रीमता वर आम्ही स्वर्ग जरूर बनवू. सर्वांना रस्ता सांगायचा आहे. किटकिट
ची गोष्ट नाही. आपसा मध्ये बसून मत मांडले पाहिजे कि, या प्रदर्शनीतील चित्राद्वारे
आम्ही अशी कोणती प्रसिद्धी करू, जे वर्तमानपत्रां मध्ये पण चित्र येतील.आपसा मध्ये
यावरती कार्यशाळा केली पाहिजे. जसे गव्हर्नमेंट चे लोक आपसा मध्ये भेटतात, विचार
करतात कि, भारताला आम्ही कसे सुधारू? हे जे एवढे मतभेद झाले आहेत. त्यांना आपसा
मध्ये बसून ठिक करू आणि भारता मध्ये शांती सुख कसे स्थापन करायचे. त्या गव्हर्मेंटचा
पण पुरुषार्थ चालतो. तुमच्या पण पांडव गव्हर्मेंटचे गायन आहे.. ही मोठी ईश्वरीय
गव्हर्मेंट आहे. याला खरे तर म्हटले जातेच, पावन ईश्वरीय गव्हर्मेंट. पतित-पावन बाबा
पतित मुलांना पावन दुनिया चे मालक बनवित आहेत. हे मुलेच जाणतात. मुख्य भारताचा आदि
सनातन देवी देवता धर्म आहे. हे पण मुले जाणतात कि, हा रुद्ध ज्ञान यज्ञ आहे. रुद्र
म्हटले जाते, ईश्वरीय पित्याला शिवाला. गायन पण आहे, बरोबर बाबांनी येऊन रुद्र
ज्ञान यज्ञ रचला होता. त्यांनी तर कालावधी फार लांबलचक दिला आहे. अज्ञान निंद्रे
मध्ये झोपलेले आहेत. आता तुम्हाला बाबानी जागविले आहे. तुम्हाला मग इतरांना जागे
करायचे आहे. विश्वनाटका नुसार तुम्ही जागत आले आहात. यावेळे पर्यंत ज्यांनी जस जसा,
जेवढा जेवढा पुरुषार्थ केला आहे, तेवढाच कल्पा पूर्वी पण केला होता. होय, युद्धाच्या
मैदाना मध्ये चढ-उतार तर होतच आहे. कधी मायेचा जोर होतो, कधी ईश्वरीय मुलांचा जोर
होतो. कधी कधी सेवा फार चांगली तीव्र गतीने चालते, कधी कुठे मुला मध्ये मायेची
विघ्ने पडतात. माया एकदम बेहोश करून टाकते. युद्धाचे मैदान तर आहे ना. रावण माया
रामच्या मुलांना बेहोश करते. लक्ष्मणा साठी पण गोष्ट आहे ना.
तुम्ही म्हणता कि, सर्व मनुष्य कुंभकर्णाच्या निंद्रेमध्ये झोपले आहेत. तुम्ही
ईश्वरीय संप्रदाय असे म्हणत आहात. ज्यांना ज्ञानसूर्य भेटला आहे आणि जागे झाले आहेत,
तेच समजतील. यामध्ये एक दोघांना सांगण्याची पण कोणती गोष्ट नाही. तुम्ही जाणत आहात,
बरोबर आम्ही ईश्वरी संप्रदाय आहोत. बाकी दुसरे सर्व झोपलेले आहेत. ते हे जाणत नाहीत
कि, परमपिता परमात्मा आले आहेत. मुलांना वरसा देण्यासाठी. हे बिल्कुल विसरून गेले
आहेत. बाबा भारता मध्येच येतात, भारता मध्ये येऊन स्वर्गाचे मालक बनवितात. भारत
स्वर्गाचा मालक होता. यामध्ये कोणता संशय नाही. परमपिता परमात्म्याचा जन्म पण इथेच
होत आहे. शिवजयंती साजरी करताना, जरूर त्यांनी येऊन कांही तरी केले असेल ना. बुद्धि
म्हणते कि, जरूर येऊन स्वर्गाची स्थापना केली होती. प्रेरणेने थोडेच स्थापना होते.
इथे तर तुम्हां मुलांना राजयोग शिकविला जातो. आठवणी ची यात्रा समजावली जाते.
प्रेरणेने कोणता आवाज होतच नाही. समजतात कि, शंकराची पण प्रेरणा होते. तेंव्हा ते
यादव बॉम्ब इत्यादी बनवितात. परंतु यामध्ये प्रेरणेची कोणती गोष्टच नाही. तुम्ही
समजत आहात कि, त्यांचा अभिनय आहे, विश्व नाटकामध्ये हे बॉम्ब इत्यादी बनविण्याचा,
प्रेरणेची गोष्टच नाही. विश्वनाटका नुसार विनाश तर जरुर होणारच आहे. गायन पण आहे
कि, महाभारत लढाई मध्ये बाॅम्बच कामाला आले. तर जे होऊन गेले आहे ते मग पुनरावृत्त
होईल. तुम्हीं खात्री करता कि, आम्ही भारता मध्ये स्वर्ग स्थापन करू. जिथे एक धर्म
असेल. तुम्ही असे लिहीत नाहीत कि, अनेक धर्माचा विनाश होईल. ते तर चित्रां मध्ये
लिहिले आहे. स्वर्गाची स्थापना होते, तर दुसरा कोणता धर्म नसतो. आता तुम्हाला समजले
आहे. सर्वात मोठा अभिनय शिवाचा आहे. ब्रह्मा चा आणि विष्णूचा आहे. ब्रह्मा सो विष्णू,
विष्णू सो ब्रह्मा. ही तर मोठी रहस्य युक्त गोष्ट आहे. विष्णू पासून ब्रह्मा कसे
बनतात. ब्रह्मा पासून मग विष्णू कसे बनतात. हे समजदार मुलांच्या बुद्धी मध्ये
झटक्यात येते. दैवी संप्रदाय तर बनत आहे. एकाची गोष्ट नाही. या गोष्टीला तुम्ही
मुलेच समजत आहात. दुनिये मध्ये एक पण मनुष्य समजत नाही. जरी लक्ष्मी नारायण किंवा
विष्णूची पूजा करतात, परंतु त्यांना हे माहित नाही कि, विष्णूची दोन रूपे, लक्ष्मी
नारायण आहेत. जे नवीन दुनिये मध्ये राज्य करतात. बाकी चार भुजा वाला कोणता मनुष्य
नसतो. सूक्ष्मवतन मध्ये हे मुख्य लक्ष्य प्रवृत्ती मार्गाचे दाखवितात. या साऱ्या
जगाच्या इतिहास भूगोलाचे कसे चक्र लागत आहे. हे कोणी समजत नाही. बाबाला ओळखत नाहीत
तर बाबाच्या रचनेला कसे ओळखतील. बाबाच रचनेच्या आदि,मध्य, अंताचे ज्ञान सांगत आहेत.
ऋषी-मुनी पण म्हणत होते, आम्ही ओळखत नाही. बाबाला ओळखले तर रचनेच्या आदि, मध्य,
अंताला पण ओळखतील. बाबा म्हणतात मी एकाच वेळी येऊन, तुम्हा मुलांना पण सारे ज्ञान
देतो. तर रचता आणि रचनेच्या आदि,मध्य, अंता ला जाणायचे कसे?बाबा स्वतः म्हणतात, मी
संगमयुगा शिवाय कधीच येत नाही,मला संगमयुगातच बोलवतात. पावन सतयुगाला म्हटले जाते.
पतित कलियुगाला म्हटले जाते. तर जरुर मी पतित दुनियेच्या अंतमध्ये येतो
ना.कलियुगाच्या अंतामध्ये येऊन पतितांना पावन बनवितो. सतयुगाच्या आदि मध्ये पावन
आहेत. ही तर सोपी गोष्ट आहे ना. मनुष्य कांही पण समजत नाहीत कि, पतित-पावन बाबा कधी
येतात. आता तर कलियुगाचा अंत आहे. जरी म्हणतात, अजून चाळीस हजार वर्ष पडले आहेत,परत
तर किती पतीत बनतील. किती दुःख होईल. सुख तर होणारच नाही. कांही पण माहीत नसल्यामुळे
बिल्कुल घोर अंधारा मध्ये आहेत. तुम्हीच समजत आहात. तर मुलांना आपसा मध्ये भेटले
पाहिजे. चित्रावर चांगल्या रीतीने समजावले पाहिजे. हे पण विश्वनाटका नुसार चित्र
इत्यादी सर्व बनली आहेत. मुले समजतात कि, जी वेळ निघून गेली आहे, तसे हुबेहूब नाटक
चालत राहते. मुलांची अवस्था पण कधी खाली, कधी वर होत राहते. फार समजण्याची गोष्ट आहे.
कधी कधी ग्रहचारी येऊन बसते तर त्याला नाहीसे करण्यासाठी किती प्रयत्न करतात. बाबा
वारंवार म्हणतात कि, मुलांनो, तुम्ही देहअभिमना मध्ये येता, त्यामुळे टक्कर होते.
यामध्ये देही अभिमानी बनायचे आहे. मुलांमध्ये देहअभिमान फार आहे. तुम्ही देही
अभिमानी बना, तर बाबा ची आठवण राहील. आणि सेवे मध्ये प्रगती करत राहाल. ज्यांना उंच
पद प्राप्त करायचे आहे, ते नेहमी सेवे मध्ये लागलेले असतात. नशिबा मध्ये नसेल तर मग
पुरुषार्थ पण करत नाहीत. स्वतः म्हणतात, बाबा आम्हाला धारणा होत नाही. बुद्धी मध्ये
बसत नाही. ज्यांना धारणा होते तर त्यांना खुशी पण फार होते. समजतात शिवबाबा आले
आहेत. आता बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्हीं चांगल्या रीतीने समजून, मग इतरांना सांगा.
कोणीतरी सेवे मध्येच लागले आहेत.पुरषार्थ करत राहतात. हे पण मुले जाणतात कि, जो
सेकंद निघून गेला, तो नाटका मध्ये नोंदलेला आहे, मग तसाच पुनरावृत्त होईल. मुलांना
समजावले जाते कि, बाहेर भाषण इ. ऐकण्यासाठी अनेक प्रकारचे नवीन येतात, तुम्हीं समजत
आहात, गीता, वेद,शास्त्र इत्यादी वर किती मनुष्य भाषण करतात. त्यांना काही हे थोडेच
माहित आहे कि, इथे ईश्वर स्वतःचा आणि आपल्या रचनेच्या आदि,मध्य, अंताचे रहस्य
समजावत आहेत. रचियताच येऊन सारे ज्ञान सांगत आहेत. त्रिकालदर्शी बनविणे, हे बाबाचे
काम आहे. शास्त्रां मध्ये या गोष्टी नाहीत. या नवीन गोष्टी आहेत. बाबा वारंवार
समजावत आहेत कि, कुठे पण पहिल्या प्रथम हे समजावून सांगा कि, गीतेचा भगवान कोण आहे.
श्रीकृष्ण कि निराकार शिव? या गोष्टी प्रोजेक्ट रवर तुम्हीं समजाऊ शकत नाहीत.
प्रदर्शनी मध्ये चित्र समोर असते, त्यावर समजावून, तुम्हीं विचारू शकता. आता सांगा
गीतेचा भगवान कोण? ज्ञान सागर कोण आहे? कृष्णाला तर म्हणू शकत नाहीत. पवित्रता, सुख,
शांतीचे सागर, मुक्तिदाता, मार्गदर्शक कोण आहेत? पहिल्या प्रथम तर लिहिले पाहिजे,
फॉर्म भरला पाहिजे, मग सर्वांची त्यावर सही घेतली पाहिजे.
(चिमण्यांचा आवाज झाला) पाहा, किती भांडत आहेत. यावेळी साऱ्या दुनिये मध्ये
भांडण-तंटे आहेत. मनुष्य पण आपसा मध्ये भांडत राहतात. मनुष्याला समजण्याची बुद्धी
आहे. पाच विकार पण मनुष्यातच आहेत. जनावरा ची तर गोष्टच नाही. हे विकारी जग आहे. जग
मनुष्या साठी म्हटले जाते. कलियुगा मध्ये असुरी संप्रदाय आहे. सतयुगा मध्ये दैवी
संप्रदाय आहे. आता तुम्हाला या साऱ्या फरका ची माहिती आहे. तुम्ही सिद्ध करून सांगू
शकता. शिडी मध्ये पण फार स्पष्ट दाखविले आहे. खाली पतित आहेत, वर पावन आहेत. यामध्ये
फार स्पष्ट आहे. शिडी मुख्य आहे. उतरती कला आणि चढती कला. ही शिडी फार चांगली आहे.
या मध्ये असे काय लिहावे,जे मनुष्य बिल्कुल चांगल्या रितीने समजून जातील कि, बरोबर
ही पतित दुनिया आहे. पावन दुनिया स्वर्ग होता. इथे सर्व पतित आहेत, पावन एक पण नाही.
रात्रंदिवस असे विचार चालले पाहिजेत. आत्मप्रकाश मुलगा लिहीत आहे, बाबा हे चित्र
बनवावे. बाबा म्हणतात, विचार सागर मंथन करून, कोणते पण चित्र बनवा. परंतु शिडी फार
चांगली बनली पाहिजे. यावर खूप समजावून सांगू शकता. 84 जन्म पूर्ण करून, मग प्रथम
जन्म घेतला आहे,परत उतरती कले पासून चढत्या कले मध्ये जायचे आहे. या मध्ये
प्रत्येकाचा विचार चालला पाहिजे. नाही तर सेवा कशी करू शकाल. चित्रा वर समजावणे
फार सोपे आहे. सतयुगा नंतर शिडी उतरावी लागते. हे पण मुले जाणत आहेत. आम्ही अभिनय
करणारे कलाकार आहोत. येथून बदलून सर्व सतयुगा मध्ये जात नाहीत. प्रथम शांतीधाम मध्ये
जायचे आहे, होय,तुमच्या मध्ये पण क्रमवार आहेत. जे स्वतःला अभिनय करणारे समजत आहेत.
या नाटकात, दुनिये मध्ये असे कोणी सांगू शकत नाही कि, आम्ही अभिनय करणारे आहोत.
आम्ही लिहितो पण कि, अभिनय करणारे कलाकार असून पण नाटकाच्या, रचियताला, डायरेक्टरला
आणि आदि, मध्य, अंताला कोणी समजत नाहीत. तर ते खूपच बेसमज आहेत. हे तर भगवानुउवाच
आहे. शिवभगवानुवाच ब्रह्मा तनाद्वारे. ज्ञानसागर ते निराकार आहेत. त्यांना आपले
शरीर नाही. फार समजण्याच्या युक्त्या आहेत. तुम्हां मुलांना फार नशा राहिला पाहिजे.
आम्ही कोणाची ग्लानी थोडेच करत आहोत. ही तर बरोबर गोष्ट आहे ना. जे पण मोठ मोठे
आहेत, त्या सर्वांचे चित्र तुम्ही टाकू शकता. शिडी कोणाला पण दाखवू शकता. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) भारता
मध्ये सुख-शांती ची स्थापना करणे किंवा भारताला स्वर्ग बनविण्या साठी आपसा मध्ये
कार्यशाळा करायची आहे. श्रीमता वर भारताची अशी सेवा करायचे आहे.
(२) सेवेमध्ये उन्नती करण्यासाठी किंवा सेवे मध्ये उंच पद प्राप्त करण्यासाठी, देही
अभिमानी राहण्याची मेहनत करायची आहे. ज्ञानाचा विचार सागर मंथन करायचा आहे.
वरदान:-
आपल्या
श्रेष्ठ धारणेने, त्यागा मध्ये भाग्याचा अनुभव करणारे, खरे त्यागी भव:
ब्राह्मणांची श्रेष्ठ
धारणा आहे संपूर्ण पवित्रता. या धारणे साठी गायन आहे. प्राण गेला तरी धर्म जाऊ नये.
कोणत्या प्रकारच्या परिस्थिती मध्ये, धारणे साठी, कांहीपण त्याग करावा लागला, सहन
करावे लागले, सामना करावा लागला, साहस ठेवावे लागले, तर खुशी खुशी मध्ये करा.
यामध्ये त्यागाला त्याग न समजता, भाग्याचा अनुभव करा. तेंव्हा खरे त्यागी म्हटले
जाईल. असे धारणावाले च खरे ब्राह्मण आहेत.
बोधवाक्य:-
सर्व शक्तींना
आपल्या अधीन ठेवणारेच, मास्टर सर्वशक्तिमान आहेत.