11-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,प्राणेश्वर बाबा आले आहेत,तुम्हा मुलांना प्राणदान देण्यासाठी, प्राणदान
देणे म्हणजेच तमोप्रधान पासून सतोप्रधान बनणे"
प्रश्न:-
अविनाश
नाटकाच्या प्रत्येक रहस्याला जाणल्यामुळे कोणते दृश्य तुमच्यासाठी नवीन नाही?
उत्तर:-
यावेळेत सर्व दुनियेमध्ये हंगामा,जो गोंधळ आहे,विनाश काळात विपरीत बुद्धी बनून
आपल्या कुळाचा नाश करण्यासाठी अनेक साधनं बनवतात.ही कोणती नवीन गोष्ट नाही,कारण
तुम्ही जाणतात, ही दुनिया तर बदलणार आहे.महाभारत लढाई नंतरच आमची नवीन दुनिया येईल.
गीत:-
हे कोण आले आज
सकाळी सकाळी-सकाळी,माझ्या मनाच्या द्वारे ….
ओम शांती।
सकाळी सकाळी हे कोण येऊन मुरली चालवत आहेत. दुनिया तर खूपच अंधारामध्ये आहे. तुम्ही
आत्ता,ज्ञानसागर पतित-पावन प्राणेश्वर बाबांकडून मुरली ऐकत आहात.ते प्राण वाढवणारे
ईश्वर आहेत.असे म्हणतात,हे ईश्वर आम्हाला दुःखापासून सोडवा.ते हद्दची मदत मागतात.आता
तुम्हा मुलांना बेहद्दची मदत मिळत आहे,कारण ते बेहद्दचे पिता आहेत ना. तुम्ही
जाणतात आत्मा पण गुप्त आहे.मुलांचे शरीर तर प्रत्यक्ष आहे.तर बाबांचे श्रीमत
मुलांप्रति आहे.सर्व शास्त्रमई शिरोमणी गीता प्रसिद्ध आहे,फक्त गितेमध्ये
श्रीकृष्णाचे नाव लिहिले आहे. आता तुम्ही जाणता,श्रीमत भगवानुवाचा आहे.हे पण समजले
आहे की,भ्रष्टाचारीला श्रेष्टाचारी बनवणारे एकच आहेत.तेच नराला नारायण बनवतात.कथा
पण सत्यनारायणाची आहे,गायन पण अमर कथेचे आहे.अमरपुरी चे मालक बनवण्यासाठी किंवा
नरापासून नारायण बनण्यासाठी, एकच गोष्ट आहे.हा मृत्युलोक आहे. भारतच अमरपुरी होता.हे
कोणालाही माहिती नाही.येथेच अमर बाबांनी पार्वतींना ज्ञान ऐकवले आहे,एक पार्वती
किंवा एक द्रोपदी नव्हती.हे तर अनेक मुलं आहेत.शिवबाबा ब्रह्मा द्वारे ऐकवत
आहेत,मुलांना समजावून सांगत आहेत,मुलांनो आत्म अभिमानी बनायचे आहे आणि बाबाच बनवू
शकतात. दुनिया मध्ये एक पण मनुष्य मात्र नाही ज्यांना आत्म्याचे ज्ञान आहे,तर
परमात्म्याचे ज्ञान कसे होऊ शकते? असे म्हणतात आम्ही आत्माच परमात्मा आहोत.खूप
मोठ्या चूकीमध्ये सर्व फसलेले आहेत.अगदीच दगड बुद्धी आहेत.परदेशी पण दगड बुद्धी
आहेत.हे बुद्धीमध्ये येत नाही की,आम्ही जे बाॅम्बस बनवत आहोत,ते आपलाच नाश
करण्यासाठी आहेत,संपूर्ण दुनियेचा नाश करण्यासाठी बनवत आहोत. तर या वेळेत बुद्धी
कोणाची काहीच कामाची राहिलेली नाही. आपल्याच विनाशासाठी सर्व तयारी करत आहेत.तुम्हा
मुलांना ही काही नवीन गोष्ट नाही.तुम्ही जाणतात आविनाश नाटकानुसार त्यांची पण ही
भूमिका आहे.अविनाश नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलेले आहेत.दगड बुद्धी नसतील तर असे
काम करू शकतील काय?संपूर्ण कुळाचा नाश करत आहेत,आश्चर्य आहे ना,काय करत आहेत.बसल्या
-बसल्या आज ठीक चालत आहेत, उद्या मिलिट्री बिघडली तर राष्ट्रपती ला पण मारतात.अशा
घटना होत राहतात.कोणीही सहन करत नाहीत, शक्तिशाली आहेत ना. आजकल दुनिया मध्ये खूप
हंगामा, गोंधळ आहे.दगडासारखे बुद्धीचे पण खूप आहेत.आता तुम्ही मुलं जाणता,विनाश
काळात विपरीत बुद्धी आहेत, त्यांच्यासाठी विनाशाचे गायन आहे. आता ही दुनिया बदलणार
आहे.हे पण जाणतात,बरोबर महाभारत लढाई लागली होती.बाबांनी राजयोग शिकवला
होता.ग्रंथांमध्ये तर संपूर्ण विनाश दाखवला आहे, परंतु संपूर्ण विनाश तर होत नाही,
परत तर प्रलय होईल.मनुष्य कोणतेही राहणार नाहीत,फक्त पाच तत्व राहतील,असे तर होऊ
शकत नाही.प्रलय होईल तर मनुष्य कुठून येतील.असे दाखवतात श्रीकृष्ण पिंपळाच्या
पानावरती अंगठा चोखत आला, अशाप्रकारे कसे काय येऊ शकेल.ग्रंथांमध्ये तर अशा गोष्टी
लिहल्या आहेत,तुम्ही विचारू नका.आता तुम्हा कुमारी द्वारे या विद्वानांपण ज्ञानाचे
बाण लागत आहेत,ते पण पुढे चालून ज्ञान घेण्यासाठी येतील.जितकी जितकी तुमच्या
सेवेमध्ये वृध्दी होईल, बाबांचा परिचय सर्वांना मिळत राहील,तेवढा तुमचा प्रभाव
वाढेल. होय,विघ्न पण येतील.हे पण गायन आहे, आसुरी संप्रदायांचे यज्ञामध्ये खूप
विघ्न पडतात.बिचारे दगड बुद्धी मनुष्य काहीच जाणत नाहीत,हे काय आहे.असे म्हणतात
त्यांचे ज्ञानच वेगळे आहे.हे पण तुम्ही समजतात,नवीन दुनिये साठी नवीन गोष्टी
आहेत.बाबा म्हणतात हा राजयोग तुम्हाला दुसरे कोणी शिकवू शकत नाहीत.ज्ञानयोग बाबाच
शिकवतात,सद्गती दाता एक बाबाच आहेत,तेच पतित-पावन आहेत,तर जरूर पतितांनाच ज्ञान
देतील.तुम्ही मुलं समजतात, आम्ही पारस बुद्धी बनून पारसनाथ बनतो.मनुष्याने मंदिर
इत्यादी खूप बनवले आहेत परंतु ते कोण आहेत काय करून गेले,काहीच समजत नाहीत.पारसनाथचे
मंदिर पण आहे, परंतु कोणालाही माहिती नाही.भारत पारस पुरी होता.सोने हिरे रत्नांचे
महल होते,कालची गोष्ट आहे.ते तर लाखो वर्ष फक्त एका सतयुगासाठी म्हणतात आणि बाबा
म्हणतात सर्व बेहद्द चे नाटकच पाच हजार वर्षाचे आहे. म्हणून म्हटले जाते आजचा भारत
काय आहे,उद्याचा भारत कसा असेल? लाखो वर्ष ची गोष्ट कोणाच्या बुद्धीमध्ये राहू पण
शकणार नाही.तुम्हा मुलांना आत्ता स्मृती आली आहे.तुम्ही जाणतात बाबा प्रत्येक पाच
हजार वर्षानंतर येऊन आम्हाला स्मृती देतात,तुम्ही मुलं स्वर्गाचे मालक होते,पाच
हजार वर्षाची गोष्ट आहे.कोणालाही विचारले लक्ष्मीनारायणाचे राज्य कधी होते,किती
वर्ष झाले,तर लाखो वर्ष म्हणतात.तुम्ही समजू शकता,हे तर पाच हजार वर्षाची गोष्ट
आहे.असे म्हणतात ख्रिस्तपूर्व इतके वर्ष स्वर्ग होता.बाबा तर भारतामध्येच येतात.हे
तर मुलांना समजले आहे,बाबा ची जयंती साजरी करतात,तर जरुर काही करण्यासाठी आले असतील.
पतित-पावन आहेत तर जरूर येवून पावन बनवत असतील.ज्ञानसागर आहेत,तर जरूर ज्ञान देतील
ना.योगामध्ये बसून स्वतःला आत्मा समजून बाबाची आठवण करा.तर हे ज्ञान झाले ना.ते तर
हठयोगी आहेत,एका पायावर दुसरा पाय चढवून बसतात,काय काय करत राहतात.तुम्ही माता तर
असे करू शकणार नाहीत.बसू पण शकणार नाहीत.बाबा म्हणतात, गोड मुलांनो,असे काही
करण्याची आवश्यकता नाही.विद्यार्थी शाळेमध्ये कायदेशीर बसतात ना. बाबत तर असे पण
म्हणत नाहीत, पाहिजे तसे बसू शकतात.बसून थकले तर झोपुन जावा.बाबा काय मना करत
नाहीत,हे तर अगदी सहज समजण्याची गोष्ट आहे. यामध्ये कोणतेच कष्ट नाहीत.जरी कितीही
आजारी असाल,माहित नाही ऐकत ऐकत शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहात,प्राण तना मधून निघून
जातील.गायन पण आहे ,गंगा चा किनारा हवा,गंगा जल मुखा मध्ये हवे,तेव्हा प्राण तना
मधून निघावेत.त्या सर्व भक्तिमार्गाचे गोष्टी आहेत.वास्तव मध्ये या ज्ञानामृतच्या
गोष्टी आहेत. तुम्ही जाणतात खरोखर असेच प्राण निघतील.तुम्ही मुलं परमधाम वरून
येतात,आम्हाला सोडून जातात.बाबा म्हणतात मी तुम्हा मुलांना सोबत घेऊन जातो.मी आलो
आहे,तुम्हा मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी.तुम्हाला न आपल्या घरचा रस्ता माहित होता,ना
आत्म्याची माहिती होते.मायाने अगदीच पंख कापले आहेत,म्हणून आत्मा उडू शकत नाही,कारण
ती तमोप्रधान आहे.जोपर्यंत सतोप्रधान बनत नाही तोपर्यंत शांतीधाम मध्ये कशी जाऊ
शकेल.हे पण जाणतात, अविनाशी नाटकानुसार सर्वांना तमोप्रधान बनायचे आहेच.यावेळेस
सर्व झाड अगदीच तमोप्रधान खोखला झाले आहे.मुलं जाणतात,सर्व आत्मे तमोगुणी आहेत.नविन
दुनियेत सतोगुणी आहेत.येथे कोणाची सतोगुणी अवस्था होऊ शकणार नाही.जर पवित्र बनली तर
येथे थांबू शकणार नाही,पळून जाईल.सर्व भक्ती करतात मुक्तीसाठी किंवा शांतीधाम मध्ये
जाण्यासाठी,परंतु कोणीही परत जाऊ शकत नाही.असे कायदा म्हणत नाही.बाबा हे सर्व रहस्य
समजवतात,धारण करण्यासाठी,तरीही मुख्य गोष्ट बाबांची आठवण करणे आणि स्वदर्शन चक्रधारी
बनणे.बीजाची आठवण केल्यामुळे सर्व झाड बुद्धीमध्ये येते.झाड प्रथम लहान असते,परत
मोठे होत जाते.अनेक धर्म आहेत ना.तुम्ही एका सेकंदामध्ये जाणतात,दुनिया मध्ये
कोणालाच माहिती नाही,मनुष्य सृष्टीचे बीजरुप सर्वांचे एक बाबाच आहेत.बाबा सर्वव्यापी
थोडेच होऊ शकतात.मोठ्यात मोठी चुक ही आहे.तुम्ही समजतात,मनुष्याला कधी भगवान म्हटले
जात नाही. बाबा मुलांना सर्व गोष्टी सहज करून समजवतात, ज्यांच्या भाग्या मध्ये
आहे,निश्चय आहे,ते जरुर बाबा कडून वारसा घेतील.निश्चय नसेल तर कधीच समजणार
नाहीत.भाग्या मध्ये नसेल तर पुरुषार्थ पण काय करणार.
भाग्य मध्ये नाहीतर,असेच बसतात,जे काहीच समजू शकत नाहीत.इतका पण निश्चय नाही की,बाबा
आले आहेत,बेहद्दचा वारसा देण्यासाठी.कोणी नवीन मनुष्य मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन
बसतील,तर ते काय समजतील? काहीच नाही.येथे पण असेच येऊन बसतात.या आविनाशी ज्ञानाचा
विनाश होत नाही.हे पण बाबांनी समजावले आहे,राजधानी स्थापन होत आहे ना.तर नोकर-चाकर
प्रजा,प्रजाचे पण नोकर चाकर,सर्व पाहिजेत ना.तर असे पण खूप येतात.कोणाला खूप
चांगल्या रीतीने समजते,आपले मत पण लिहितात, पुढे चालून काही प्रगती करु शकतील परंतु
त्या वेळेत कठीण आहे,कारण त्यावेळेस खूप गोंधळ होईल.दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत
जाईल.इतके सेवा केंद्र आहेत, चांगल्याप्रकारे समजतील पण.हे पण लिहिले आहे,ब्रह्मा
दरवाजा स्थापना. विनाश पण समोर पाहतात.विनाश तर होणारच आहे.शासन म्हणते जन्मदर कमी
व्हावेत परंतु यामध्ये काय करू शकतील?झाडाची वृद्धी तर होणारच आहे,जोपर्यंत बाबा
आहेत,तोपर्यंत सर्व धर्माच्या आत्म्याला येथे राहयचे आहे.जेव्हा जाण्याची वेळ
असेल,तेव्हा आत्म्याचे येणे बंद होईल.आता तर सर्वांना यायचेच आहे परंतु या गोष्टी
कोणी समजत नाहीत.बापुजी पण म्हणत होते,हे रावण राज्य आहे, आम्हाला रामराज्य
पाहिजे.असे म्हणतात,अमका स्वर्गवासी झाला तर,याचा अर्थ हा नर्क आहे ना. मनुष्य इतके
पण समजत नाहीत,की सर्गवासी झाले तर चांगलेच आहे ना,जरुर नर्कवासी होता.बाबा
समजवतात,मनुष्यांचा चेहरा मनुष्याचा आहे परंतु कर्मतर माकडासारखे आहेत.सर्व गायन
करत राहतात,पतित पावन सिताराम.आम्ही पतित आहोत, पावन बनवणारे बाबा आहेत.त्या सर्व
भक्ती मार्गातील सीता आहेत, बाबा राम आहेत.कोणाला सरळ म्हटले तर मानणार नाहीत.रामाला
बोलवतात,आता तुम्हा मुलांना बाबांनी तिसरा नेत्र दिला आहे. तुम्ही जसे वेगळ्या
दुनियाचे झाले आहात.जुन्या दुनिया मध्ये काय काय करत राहतात.आता तुम्ही
समजतात,तुम्ही मुले गैरसमजदार पासून समजदार बनले आहात.रावणाने तुम्हाला खूप
गैरसमजदार बनवले आहे.बाबा समजवतात या वेळेत सर्व मनुष्य तमोगुणी बनले आहेत.तेव्हा
तर बाबा येऊन सतोगुणी बनवतात. जरी तुम्ही मुलं आपली सेवा करत राहतात,फक्त एक गोष्ट
आठवणीत ठेवा,बाबांची आठवण करा.तमोगुणी पासून सतोगुणी बनण्याचा रस्ता दुसरे कोणी
सांगू शकत नाहीत.सर्वांचा आत्मिक सर्जन एकच आहे.तेच येऊन आत्म्यांना इंजेक्शन
देतात,कारण आत्माच तमोगुणी बनली आहे, त्याला इंजेक्शन पाहिजे.बाबा म्हणतात मुलांनो
स्वतःला आत्मा निश्चय करा आणि आपल्या पित्याची आठवण करा.बुध्दीयोग वरती
लावा.जिवंतपणी फाशी वरती लटका म्हणजेच बुद्धी गोड घरांमध्ये लावा.आम्हाला गोड
शांतीच्या घरांमध्ये जायचे आहे.निर्वाणधाम ला घर म्हटले जाते,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) या जुन्या
दुनियेचा विनाश झालेलाच आहे म्हणून यामधून स्वतःला वेगळे समजायचे आहे.झाडाच्या
वृध्दी सोबत जे परिस्थिती रूपी वादळं येतात,त्यांना घाबरायचे नाही, त्याला पार
करायचे आहे.
(२) आत्म्याला सतोप्रधान बनवण्यासाठी स्वतःला ज्ञान योगाचे इंजेक्शन द्यायचे
आहे.आपला बुद्धीयोग गोड घरांमध्ये लावायचा आहे.
वरदान:-
आपले भाग्य आणि
भाग्यविधाताच्या स्मृती द्वारे,सर्व संभ्रमातून मुक्त राहणारे मास्टर रचनाकार भव.
नेहमी वाह माझे भाग्य
आणि भाग्यविधाता,या मनाच्या सूक्ष्म आवाजाला ऐकत राहा आणि खुशीमध्ये नाचत राहा.जे
जाणायला पाहिजे ते जाणले,जे मिळवायचे आहे ते मिळवले,याच अनुभव मध्ये राहा,तर संभ्रमा
पासून मुक्त बनाल. आता संभ्रमित झालेल्या आत्म्यांना बाहेर काढण्याची वेळ आहे
म्हणून मास्टर सर्वशक्तिमान आहे,मास्टर रचना कार आहे,या स्मृतीद्वारे लहानपणाच्या
लहान-मोठ्या गोष्टींमध्ये वेळ घालवू नका.
बोधवाक्य:-
कमल आसनधारीच
मायेच्या आकर्षणा पासून वेगळे आणि बाबांच्या स्नेहामुळे प्रेमळ, श्रेष्ठ कर्मयोगी
आहेत.