19-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही या कबरिस्तान ला परिस्तान बनवित आहात, त्यामुळे तुम्हाला जुनी
दुनिया कबरिस्तान पासून पूर्ण वैराग्य आले पाहिजे.
प्रश्न:-
बेहदचे बाबा
आपल्या आत्मिक मुलांचे आश्चर्यकारक सेवक आहेत, कसे?
उत्तर:-
बाबा म्हणतात मुलांनो, मी तुमचा धोबी आहे. तुम्हां मुलांचे काय तर साऱ्या दुनियेची
घाण कपडे सेकंदांमध्ये स्वच्छ करतो. आत्मा रुपी वस्त्र स्वच्छ बनल्यामुळे शरीर पण
शुद्ध मिळते. असे आश्चर्यकारक सेवक आहेत, जे मनमनाभव च्या छू मंत्राद्वारे सर्वांना
सेकंदा मध्ये स्वच्छ करतात.
ओम शांती।
ओम शांती चा अर्थ मुलांना बाबांनी समजावला आहे. मज आत्म्याचा स्वधर्म शांत आहे.
शांतीधाम जाण्यासाठी कांही पुरुषार्थ करावा लागत नाही. आत्मा स्वतः शांतस्वरूप,
शांतीधाम मध्ये राहणारी आहे. होय, थोडावेळ शांत राहू शकते. आत्मा म्हणते, मी
कर्मेद्रियांच्या ओझाने थकली आहे. मी माझ्या स्वधर्मामध्ये स्थिर होते. शरीरा पासून
वेगळी होते, परंतु कर्म तर करायचेच आहे. शांती मध्ये कुठपर्यंत बसू शकाल. आत्मा
म्हणते, आम्ही शांतीदेशाचे रहिवासी आहोत. फक्त या शरीरा मध्ये आल्याने बोलायला लागले.
मी आत्मा अविनाशी असून माझे शरीर विनाशी आहे. आत्मा पावन आणि पतित बनते. सतयुगा
मध्ये पाच तत्व पण सतोप्रधान असतात. इथे पाच तत्व पण तमोप्रधान आहेत. सोन्या मध्ये
भेसळ झाल्यामुळे सोने खोटे झाले आहे. मग त्याला साफ करण्यासाठी अग्नी मध्ये टाकतात.
त्याचे नाव योग अग्नी आहे. दुनिये मध्ये अनेक प्रकारचे हठयोग इत्यादी शिकवितात.
त्याला योग अग्नी म्हणत नाहीत. योग अग्नी ही आहे, यामुळे पाप जळतात. आत्माला पतिता
पासून पावन बनविणारा परमात्मा आहे. बोलावतात पण हे पतित पावन या. विश्वनाटका नुसार
सर्वांना पतित तमोप्रधान बनायचे आहे. हे झाड याचे बीज वर आहे. बाबांना जेव्हा
बोलतात त्यावेळी बुद्धी वर जाते. यांच्या कडून तुम्ही वरसा घेत आहात. ते आता खाली
आले आहेत.ते म्हणतात मला यावे लागते. मनुष्य सृष्टीचे जे झाड आहे, अनेक वेगवेगळ्या
धर्माचे ते आता पतित तमोप्रधान आहे. जडीजडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे. बाबा
मुलांना समजावत आहेत. सतयुगा मध्ये देवता, कलियुगा मध्ये असुर आहेत. बाकी असुर आणि
देवतांचे युद्ध झाले नाही. तुम्हीं या आसुरी पाच विकारावर योगबळाने विजय प्राप्त
करत आहात. बाकी कोणत्या हिंसक युद्धाची गोष्ट नाही. तुम्ही कोणत्या पण प्रकारची
हिंसा करत नाहीत. कधी कोणाला हात पण लावत नाहीत. तुम्हीं डबल अहिंसक आहात. काम कटारी
चालवणे हे तर सर्वात मोठे पाप आहे. बाबा म्हणतात ही काम कटारी आदि, मध्य, अंत, दुःख
देते. विकारा मध्ये गेले नाही पाहिजे. देवतांच्या समोर जाऊन महिमा गातात कि, तुम्ही
सर्वगुणसंपन्न. . . . आत्मा म्हणते आम्ही पतित बनले आहोत, तेंव्हा तर बोलावतात कि,
हे पतित पावन या. जेंव्हा पावन असतात तेंव्हा कोणाला बोलावत नाहीत. त्याला स्वर्ग
म्हटले जाते. इथे तर साधुसंत इत्यादी, किती धुन लावतात. हे पतित पावन सिताराम. . .
बाबा म्हणतात यावेळी सर्व दुनिया पतित आहे, यामध्ये पण कोणाचा दोष नाही. हे नाटक
पुर्वंपार बनलेले आहे. जोपर्यंत मी येत नाही, त्याला आपला अभिनय करायचा आहे. ज्ञान
आणि भक्ती मग वैराग्य आहे. जुन्या दुनिये पासून वैराग्य,हे बेहदचे वैराग्य आहे.
त्यांचे हदचे वैराग्य आहे. तुम्ही जाणता कि,ही जुनी दुनिया आता नाहीशी होणार आहे.
नवीन घर बनवितात तर जुन्या घरापासून वैराग्य येते.बेहदचे बाबा सांगत आहेत, आता
तुम्हाला स्वर्ग रुपी घर बनवून देत आहे. आता तर नरक आहे. स्वर्ग नवीन दुनिया आहे.
नरक जुनी दुनिया. आता जुन्या दुनिये मध्ये राहून आम्ही नवीन दूनिया बनवित आहोत.
जुन्या कबरिस्थान वर आम्ही परिस्थान बनवितो. हाच यमुनेचा किनारा आहे. यावर महल
बनतील. ही दिल्ली, यमुना नदी इत्यादी असेल. बाकी हे जे दाखवितात पांडवाचे किल्ले
होते. या सर्व दंतकथा आहेत. विश्वनाटकानुसार मग जरूर हे बनेल. जसे तुम्ही यज्ञ दान
इत्यादी करत आले आहात, परत पण करावे लागेल. प्रथम तुम्ही शिवाची भक्ती करत होता.
फस्क्लास मंदिर बनविता. त्याला व्याभिचारी भक्ती म्हटले जाते. आता तुम्हीं ज्ञान
मार्गामध्ये आहात. हे अव्याभिचारी ज्ञान आहे. एकाच शिवबाबा कडून तुम्हीं ऐकत आहात.
ज्यांची पहिल्या प्रथम तुम्ही भक्ति सुरुवात केली. त्यावेळी इतर कोणता धर्म नव्हता.
तुम्हींच होता. तुम्ही फार सुखी होता. देवता धर्म फार सुख देणारा आहे. नांव घेतले
तरी तोंड गोड होते. तर तुम्हीं एका बाबा कडून ज्ञान ऐकत आहात. बाबा म्हणतात, आणखीन
कोणाकडून ऐकू नका. हे तुमचे अव्यभिचारी ज्ञान आहे. बेहदच्या बाबाचे तुम्ही बनले
आहात. बाबा कडूनच वरसा मिळेल नंबरवार पुरुषार्था नुसार. बाबा पण थोड्या वेळेसाठी
साकार मध्ये येतात. म्हणतात मला तुम्हा मुलांना ज्ञान द्यायचे आहे. माझे कायमचे
शरीर नाही. मी यांच्या मध्ये प्रवेश करतो. शिवजयंती नंतर लगेच गीताजयंती येते.
त्यातूनच ज्ञान सुरू होत आहे. हे आत्मिक ज्ञान तुम्हाला सुप्रीम आत्माच देत आहे.
पाण्याची गोष्ट नाही. पाण्याला थोडेच ज्ञान म्हणता येईल.पतीता पासून पावन ज्ञानाने
बनाल, पाण्या पासून थोडेच पावन बनाल. नद्या तर साऱ्या दुनिया मध्ये आहेत. हे तर
ज्ञानसागर शिवबाबा आहेत. यांच्या मध्ये प्रवेश करून ज्ञान सांगत आहेत. इथे जेव्हा
कोणी मरतात तर मुखामध्ये गंगेचे पाणी टाकतात. समजतात हे पाणी पतिता पासून पावन
बनविणारे आहे,त्यामुळे स्वर्गामध्ये जाईल. इथेपण गोमुखा वर जातात. खरेतर गोमुख
तुम्ही चैतन्य आहात. तुमच्या मुखातून ज्ञान अमृत निघत आहे. गाईपासून दूध मिळते.
पाण्याची तर गोष्ट नाही. हे आता तुम्हाला माहित पडले आहे. तुम्हीं जाणता. नाटका
मध्ये जे एकदा होऊन गेले, ते मग पाच हजार वर्षांनंतर होईल.हुबेहुब पुनरावृत्ती होते.
हे बाबा समजावत आहेत. जे सर्वांचे सदगती दाता आहेत. आता तर सर्व दुर्गती मध्ये पडले
आहेत. पूर्वी तुम्ही जाणत नव्हता कि, रावणाला कां जळतात. आता तुम्ही समजत आहात.
बेहदचा दसरा होणार आहे. साऱ्या सृष्टीवर रावणाचे राज्य आहे ना.ही सारी जी पृथ्वी आहे,
ती लंका आहे. रावण कांही हद मध्ये राहत नाही. रावणाचे राज्य साऱ्या सृष्टीवर आहे.
भक्ती पण अर्धा कल्प चालते. प्रथम अव्यभिचारी भक्ती असते, परत व्याभिचारी भक्ती सुरू
होते. दसरा, रक्षाबंधन इत्यादी सर्व आताचे सण आहेत. शिवजयंती नंतर कृष्णजयंती येते.
आता कृष्णपुरी स्थापन होत आहे. आज कंसपुरी मध्ये आहात. उद्या कृष्णपुरी मध्ये जाल.
कृष्ण थोडेच इथे असतात. कृष्ण जन्म घेतातच सतयुगा मध्ये. ते प्रथम राजकुमार आहेत.
शाळेमध्ये शिक्षणासाठी जातात, जे़व्हा मोठे होतात, तेंव्हा गादीचे मालक बनतात. बाकी
ही रासलीला इत्यादी, तर आपसा मध्ये खुशी साजरी करतात. बाकी कृष्ण कोणाला बसून ज्ञान
सांगतील हे होऊ शकत नाही. सारी महिमा एका शिवबाबा ची आहे. जे पतितांना पावन बनवत
आहेत. तुम्हीं कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याला समजावा तर म्हणतात, तुम्हीं बरोबर सांगत
आहात, परंतु ते इतर कोणाला सांगू शकत नाहीत. त्यांची गोष्ट कोणी ऐकणार नाहीत. बी.
के. बनले आणि सर्व म्हणतात याला जादू लागली आहे.बी.के. चे नाव ऐकले, बसं, समजतात
जादू करत असतील. थोडे कोणाला ज्ञान दिले तर म्हणतात, या बी.के. जादू लावतात. बसं,
या तर आपल्या दादा शिवाय कोणाला मानत नाहीत. भक्ती इत्यादी कांही करत नाहीत. बाबा
तर म्हणतात, कोणाला सांगू नका कि,भक्ती करू नका. ज्ञानाने स्वतःच सुटून जाईल.
तुम्ही भक्ती सोडता, विकार सोडता, त्यावर हंगामा करतात. बाबांनी सांगितले आहे मी
रुद्र ज्ञान यज्ञ रचतो. त्यामध्ये असुर संप्रदायाचे विघ्न घालतात. हा शिवबाबा चा
बेहदचा यज्ञ आहे. ज्यामध्ये हे मनुष्या पासून देवता बनतात. गायन पण आहे कि, ज्ञान
यज्ञातून विनाश ज्वाला प्रज्वलीत झाल्या. जेंव्हा जुन्या दुनियेचा विनाश होतो,
तेंव्हा तर तुम्ही नवीन दुनिये मध्ये राज्य कराल. मनुष्य म्हणतात, आम्ही म्हणतो
शांती असावी, आणि या बी.के. म्हणतात, विनाश व्हावा. बाबा सांगत आहेत ही सारी जुनी
दुनिया, या ज्ञान यज्ञा मध्ये स्वाहा होऊन जाईल. या जुन्या दुनियेला आग लागणार आहे.
नैसर्गिक संकटे पण येतील. विनाश तर होणारच आहे. मोहरी सारखे सर्व मनुष्य दळून नाहीसे
होतील. बाकी आत्मा वाचेल. हे तर कोणी पण समजू शकते कि, आत्मा अविनाशी आहे. आता ही
बेहदची होळी होणार आहे, ज्यामध्ये सर्व शरीर नाहीशी होतील, बाकी आत्मे पवित्र बनून
निघून जातील.अग्नी मध्ये वस्तू शुद्ध होतात ना. हवन करतात, शुद्धते साठी. या सर्व
भौतिक गोष्टी आहेत. आता तर सारी दुनिया स्वाहा होणार आहे. विनाशाच्या अगोदर जरूर
स्थापना पण झाली पाहिजे. कोणाला पण समजावले तर प्रथम सांगा, स्थापने नंतर विनाश,
ब्रद्मा द्वारे स्थापना. प्रजापिता तर प्रसिद्ध आहेत ना. आदिदेव आणि आदिदेवी. जगदंबे
ची पण लाखो मंदिरे आहेत. किती मेळे लागतात. तुम्ही जगदंबा ची मुले आहात, ज्ञान
ज्ञानेश्वरी मग बनाल राज राजेश्वरी. तुम्ही फार धनवान बनत आहात. परत भक्ती
मार्गामध्ये लक्ष्मीला दिवाळी मध्ये विनाशी धन मागतात. इथे तर सर्व कांही मिळत आहे.
आयुष्यमान भव:,पुत्रवान भव:.तुम्ही जाणता आमचे आयुष्य दीडशे वर्षाचे असते. बाबा
म्हणतात, जेवढा योग लावाल, तेवढे आयुष्य वाढत राहते. तुम्हीं ईश्वरा बरोबर योग
लावून, योगेश्वर बनत आहात, मनुष्य तर भोगेश्वर आहेत. म्हटले पण जाते विकारी मुत
पलिती कपड धोये…... बाबा म्हणतात, मला धोबी पण म्हणतात. मी सर्व आत्म्याला येऊन
स्वच्छ करत आहे,परत शरीर पण नवीन शुद्ध मिळेल. बाबा म्हणतात, मी सेकंदा मध्ये साऱ्या
दुनियेचे कपडे स्वच्छ करतो. फक्त मनमनाभव झाल्यामुळे आत्मा आणि शरीर पवित्र बनतात,
छू मंत्र आहे ना. सेकंदा मध्ये जीवनमुक्ती किती सोपा उपाय आहे. बाबाची आठवण करा तर
पावन बनाल. चालताना, फिरताना फक्त बाबाची आठवण करा. आणखीन कोणता थोडा पण त्रास
तुम्हाला देत नाही. फक्त आठवण करत राहा. आता तुमची एक एका सेकंदा मध्ये चढती कला
होत आहे.
बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांचा सेवक बनून आलो आहे. तुम्ही बोलावले आहे, हे पतित
पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा. बरं, मुलांनो, आलो आहे तर सेवक झालो ना. जेंव्हा
तुम्हीं फार पतित बनले आहात, तेंव्हाच जोराने ओरडतात. आता मी आलो आहे. मी कल्प कल्प
येऊन तुम्हां मुलांना हा मंत्र देत आहे. माझी आठवण करा तर तुम्हीं पावन बनाल.
मनमनाभव चा अर्थ पण आहे, मनमनाभव, मध्याजी भव म्हणजे बाबाची आठवण करा, तर विष्णुपुरी
चे मालक बनाल. तुम्हीं विष्णुपुरी चे राज्य घेण्यासाठी आले आहात. रावणपुरी नंतर
विष्णुपुरी आहे. कंसपुरी नंतर कृष्णपुरी,किती सोपे समजावले जाते. बाबा म्हणतात या
जुन्या दुनिये पासून ममत्व नाहीसे करा. आता आम्ही 84 जन्म पूर्ण केले आहेत. हे जुने
शरीर सोडून आम्ही नवीन दुनियेमध्ये जावू.आठवणीने तुमचे पाप नाहीसे होतील. या मध्ये
हिम्मत ठेवली पाहिजे. ते तर ब्रह्म ची आठवण करतात. समजतात ब्रह्म मध्ये लीन होऊन
जाऊ. परंतु ब्रह्म तर राहण्याचे ठिकाण आहे. ते लोक तपस्ये मध्ये जाऊन बसतात. बसं,
आम्ही ब्रह्म मध्ये जाऊन लीन होऊ. परंतु परत तर कोणी जाऊ शकत नाहीत. ब्रह्म बरोबर
योग लावल्याने पावन तर बनणार नाहीत. एक पण जाऊ शकत नाही. पुनर्जन्म तर घ्यायचा आहे.
बाबा येऊन खरे सांगत आहेत. सचखंड बाबा स्थापन करत आहेत. रावण येऊन झूठखंड बनवित आहे.
आता हे संगमयुग आहे. यामध्ये तुम्ही उत्तम ते उत्तम बनत आहात, त्यामुळे याला
पुरुषोत्तम म्हटले जाते. तुम्हीं कवडी पासून हिऱ्या सारखे बनत आहात. ही बेहद ची
गोष्ट आहे. उत्तम ते उत्तम मनुष्य देवता आहेत. तर आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगा
मध्ये बसले आहात. तुम्हाला पुरुषोत्तम बनविणारे उंच ते उंच बाबा आहेत. उंच त्या उंच
स्वर्गाचा वरसा तुम्हाला देत आहेत, मग तुम्हीं हे विसरता का? बाबा म्हणतात माझी
आठवण करा. मुले म्हणतात बाबा कृपा करा, तर आम्हीं विसरणार नाही. हे कसे होऊ शकते.
बाबाच्या आदेशावर चालायचे आहे ना. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तुम्ही पतिता
पासून पावन बनाल. माझ्या मतावर चाला ना. बाकी आशीर्वाद काय करू. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) बाबाच्या
प्रत्येक आदेशावर चालून स्वतःला कवडी पासून हिऱ्या सारखे बनवायचे आहे. एका बाबाच्या
आठवणी मध्ये राहून स्वतःच्या वस्त्राला स्वच्छ बनवायचे आहे.
(२) आता नवीन घरा मध्ये जायचे आहे, त्यामुळे या जुन्या घरा पासून बेहदचे वैराग्य
ठेवायचे आहे. नशा राहिला पाहिजे कि, या जुन्या कबरिस्तान वर आम्ही परिस्तान बनवितो.
वरदान:-
संगमयुगा च्या
श्रेष्ठ चित्राला समोर ठेवून, भविष्याचे दर्शन करणारे, त्रिकालदर्शी भव:
भविष्या पूर्वी सर्व
प्राप्तीचा अनुभव तुम्ही संगमयुगी ब्राह्मण करत आहात. आता डबल ताज, तख्त, तिलकधारी,
सर्व अधिकारीमूर्त बनत आहात. भविष्या मध्ये तर सोन्याचा चमचा असेल, परंतु आता हिऱ्या
सारखे बनत आहात. जीवनच हिरा बनत आहे. तिथे सोने हिऱ्याचे झोक्या मध्ये झोका घ्याल,
इथे बापदादा च्या गोदी मध्ये अतींद्रिय सुखाच्या झोक्या मध्ये झुलता. तर
त्रिकालदर्शी बनून वर्तमान आणि भविष्या तील श्रेष्ठ चित्राला पाहून, सर्व प्राप्तीचा
अनुभव करा.
बोधवाक्य:-
कर्म आणि
योगाचा समतोलच, परमात्म आशीर्वादाचा अधिकारी बनवितो.