16-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही तुमची जीवन दोर एका बाबा बरोबर बांधली आहे, तुमचा संबंध एका बरोबर आहे, एका बरोबरच सर्व संबंध निभावायचे आहेत."

प्रश्न:-
संगमयुगावर आत्मा आपली दोरर परमात्म्या बरोबर जोडते, त्याचा रिवाज अज्ञाना मध्ये कोणत्या रीतीने चालत आला आहे?

उत्तर:-
लग्नाचे वेळी पत्नीचा पदर पतीबरोबर बांधतात. स्त्री समजते कि, जीवनभर त्यांचे सोबती बनून राहायचे आहे. तुम्हीं तर आता तुमचा पदर बाबा बरोबर जोडला आहे. तुम्हीं जाणता कि,आमची अर्धाकल्पा साठी बाबा कडून पालना होईल.

गीत:-
जीवनाची दोर तुमच्याबरोबर बांधली. . .

ओम शांती।
पाहा, गीता मध्ये म्हटले आहे, जीवनाची दोर तुमच्या बरोबर बांधली. जशी कोणती कन्या आहे, ती आपली जीवनाची दोर पती बरोबर बांधते. समजते कि, जीवनभर त्यांचे सोबती होऊन राहायचे आहे. त्यांना सेवा करायची आहे. असे नाही कि, कन्येला त्यांची सेवा करायची आहे. नाही, संपूर्ण जीवन त्यांना पालना करायची आहे. तुम्हीं मुलांनी पण जीवनाची दोर बांधली आहे. बेहदचे बाबा म्हणा, शिक्षक म्हणा, गुरु म्हणा, जे पण म्हणा. . . . ही आत्म्याची जीवन दोर, परमात्मा बरोबर बांधायची आहे. ती हदची स्थूल गोष्ट आहे. ही सूक्ष्म गोष्ट आहे. कन्येच्या जीवनाची दोरी पती बरोबर बांधली जाते. ती त्यांच्या घरी जाते. पाहा, प्रत्येक गोष्ट समजण्याची बुद्धी पाहिजे. कलियुगा मध्ये सर्व आसुरी मता च्या गोष्टी आहेत. तुम्हीं जाणता, आम्ही जीवनाची डोर एका बरोबर बांधली आहे. तुमचा संबंध एका बरोबर आहे. एका बरोबर सर्व संबंध निभावायचे आहेत, कारण त्यांच्या कडून आम्हाला फार चांगले सुख मिळत आहे. ते तर आम्हाला स्वर्गाचे मालक बनवत आहेत. तर अशा बाबाच्या श्रीमतावर चालले पाहिजे. ही आत्मिक डोर आहे. आत्माच श्रीमत घेत आहे. आसुरी मत घेतल्याने तर खाली पडले आहेत. आता आत्मिक पित्याच्या श्रीमतावर चालले पाहिजे.

तुम्हीं जाणत आहात, आम्हीं आत्म्याची जीवन डोर परमात्म्या बरोबर बांधली आहे, तर आम्हाला त्यांच्याकडून 21 जन्मासाठी नेहमी सुखाचा वरसा मिळत आहे. त्या अल्प काळाच्या जीवन दोर ने तर खाली उतरत आले आहात. 21 जन्मांची खात्री आहे. तुमची कमाई किती जबरदस्त आहे. यामध्ये दुर्लक्ष केले नाही पाहिजे. माया दुर्लक्ष फार करविते. या लक्ष्मी नारायणाने जरूर कोणाशी जीवन दोर बांधली, त्यामुळे 21 जन्माचा वरसा मिळाला. तुम्हां आत्म्याची परमात्म्या बरोबर जीवन दोरर बांधली जाते. कल्प कल्प त्याची तर मोजदाद नाही. बुद्धी मध्ये बसले आहे, आम्ही शिवबाबाचे बनले आहोत. त्यांच्या बरोबर जीवन डोर बांधली आहे. प्रत्येक गोष्ट बाबा समजावत आहेत. तुम्हीं जाणत आहात, कल्पा पूर्वी पण बांधली होती. आता शिवजयंती साजरी करतात, परंतु कोणाची करतात, माहिती नाही. शिवबाबा जे पतित-पावन आहेत, ते जरूर संगमयुगावरच येतात. हे तुम्ही जाणता, दुनिया जाणत नाही, त्यामुळे गायन आहे कि, कोटी मध्ये कोणी जाणतात. आदि सनातन देवी देवता धर्म प्राय:लोप झाला आहे, आणि सर्व शास्त्र,गोष्टी इ. आहेत. तो धर्मच नाही तर जाणतील कसे. आता तुम्ही जीवनाची दोर बांधत आहात. आत्म्याची परमात्मा बरोबर दोर जुटली आहे, यामध्ये शरीराची गोष्टच नाही. जरी घरा मध्ये बसून राहा, बुद्धीने आठवण करायचे आहे. तुम्हा आत्म्यांची जीवनदोर बांधलेली आहे. पदर बांधतात ना. तो स्थूल पदर आहे, हा आत्म्याचा परमात्मा बरोबर योग आहे. भारता मध्ये शिवजयंती साजरी करतात, परंतु ते कधी येतात, हे कोणाला पण माहित नाही. कृष्णा ची जयंती कधी, रामाची जयंती कधी, हे पण जाणत नाहीत. मुले त्रिमूर्ती शिवजयंती अक्षर लिहितात परंतु यावेळी तीन मुर्त्या तर नाहीत.तुम्ही म्हणाल शिवबाबा ब्रह्मा द्वारे सृष्टी रचत आहेत, तर ब्रह्मा साकार मध्ये जरूर पाहिजेत ना‌, बाकी विष्णू आणि शंकर यावेळी कुठे आहेत. जे तुम्ही त्रिमूर्ती म्हणता, ही फार समजण्याची गोष्ट आहे. त्रिमूर्ती चा अर्थच ब्रह्मा, विष्णू, शंकर आहे.यावेळी ब्रह्मा द्वारे स्थापना होत आहे. विष्णू द्वारे सतयुगा मध्ये पालना होईल. विनाशा चे काम अंता मध्ये होईल. हा आदि सनातन देवी देवता धर्म, भारताचा एकच आहे. ते तर सर्व येतात धर्म स्थापन करण्यासाठी. प्रत्येक जण ओळखत आहे, हा धर्म स्थापन झाला आणि त्यांचा संवत हा आहे. अमुक वेळी, अमुक धर्म स्थापन झाला. भारताची कोणाला माहिती नाही. गीता जयंती शिवजयंती कधी झाली कोणाला माहित नाही. कृष्ण आणि राधेच्या वयामध्ये दोन-तीन वर्षांचा फरक असेल. सतयुगा मध्ये जरूर प्रथम कृष्णाने जन्म घेतला असेल मग राधेने. परंतु सतयुग कधी होते हे कोणाला माहित नाही. तुम्हाला पण समजण्यासाठी फार वर्षे लागली. तर दोन दिवसांमध्ये कोण कुठपर्यंत समजेल. बाबा तर फार सहज सांगत आहेत. ते बेहदचे पिता आहेत, जरूर त्यांच्या कडून सर्वांना वरसा मिळाला पाहिजे ना. ओ गॉड फादर म्हणून आठवण करतात. लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे. ते स्वर्गा मध्ये राज्य करत होते, परंतु त्यांना हा वरसा कोणी दिला? जरुर स्वर्गाच्या रचियता ने दिला असेल. परंतु कधी, कसा दिला हे कोणी जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता, जेंव्हा सतयुग होते तेंव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता. सतयुगा मध्ये आम्ही पवित्र होतो, कलियुगा मध्ये आम्ही पतित आहोत. तर संगमयुगावर ज्ञान दिले असेल, सतयुगा मध्ये नाही. तिथे तर प्रारब्ध आहे. जरूर पूर्वीच्या जन्मा मध्ये ज्ञान घेतले असेल. तुम्हीं पण आता घेत आहात. तुम्ही जाणत आहात आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना बाबा करतात. कृष्ण तर सतयुगा मध्ये असतात, त्यांना ही प्रालब्ध कुठून मिळाली? लक्ष्मी नारायण च राधे कृष्ण आहेत, हे कोणी जाणत नाही. बाबा म्हणतात ज्यांनी कल्पा पूर्वी समजले होते, तेच समजतील. हे कलम लागत आहे. अति गोड झाडा चे कलम लागत आहे. तुम्ही जाणत आहात, आज पासून पाच हजार वर्षापूर्वी पण बाबांनी येऊन मनुष्याला देवता बनविले होते. आता तुम्ही बदलून जात आहात. अगोदर ब्राह्मण बनायचे आहे. झोका खेळतात तर उंच जरूर जातात. बरोबर आम्ही आता ब्राह्मण बनले आहोत. यज्ञा मध्ये जरूर ब्राह्मण पाहिजेत. हा शिव किंवा रुद्र चा यज्ञ आहे. रुद्र ज्ञान यज्ञ म्हटले जाते. कृष्णाने यज्ञ रचला नाही. या रुद्र ज्ञान यज्ञा तून विनाश ज्वाला प्रज्वलित होते. हा शिवबाबा चा यज्ञ पतीतांना पावन बनविण्यासाठी आहे. रुद्र शिवबाबा निराकार आहेत. ते यज्ञ कसे रचतात. जोपर्यंत मनुष्य तना मध्ये येत नाहीत. मनुष्यच यज्ञ रचतात. सूक्ष्म वा मूलवतन मध्ये या गोष्टी नसतात. बाबा समजावतात हे संगमयुग आहे. जेंव्हा लक्ष्मी नारायणाचे राज्य होते, त्यावेळी सतयुग होते. आता परत तुम्ही तसे बनत आहात. जीवनाची डोर आत्म्याची परमात्म्या बरोबर आहे. ही दोर कां बांधली आहे? नेहमी सुखाचा वरसा प्राप्त करण्यासाठी. तुम्हीं जाणत आहात, बेहदच्या बाबा कडून आम्ही हे लक्ष्मी नारायण बनत आहोत. बाबांनी समजावले आहे तुम्हीं त्या देवी-देवता धर्माचे होता. तुमचे राज्य होते. नंतर तुम्ही पुनर्जन्म घेऊन क्षत्रिय धर्मामध्ये आला. सूर्यवंशी राजाई संपून गेली मग चंद्रवंशी आले. तुम्हाला माहित आहे, आम्ही हे चक्र कसे फिरतो. एवढे एवढे जन्म घेतले. भगवानुवाच, हे मुलांनो, तुम्ही आपल्या जन्माला ओळखत नव्हते, मी ओळखत आहे. आता यावेळी या तनामध्ये दोन मूर्ती आहेत. ब्रह्माची आत्मा आणि शिव परमात्मा. यावेळी दोन मूर्ती एकत्र आहेत. ब्रह्मा आणि शिव. शंकर तर कधी अभिनय करण्यासाठी येत नाहीत. बाकी विष्णू सतयुगा मध्ये आहेत. आता तुम्हीं ब्राह्मणा पासून देवता बनता. हम सो चा अर्थ खरा तर हा आहे. त्यांनी म्हटले आहे, आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा. किती फरक आहे. रावणाच्या येण्याने, रावणाची मत सुरू झाली आहे.सतयुगा मध्ये तर हे ज्ञानच प्राय:लोप होऊन जाते. हे सर्व होणे विश्व नाटकांमध्ये नोंदलेले आहे ना. तेंव्हा तर बाबा येऊन स्थापना करतात. आता संगम आहे. बाबा म्हणतात मी कल्प कल्प, कल्पाच्या संगमयुगावर येऊन, तुम्हांला मनुष्या पासून देवता बनवित आहे. ज्ञान यज्ञ रचत आहे. बाकी जे आहे, ते या यज्ञामध्ये स्वाहा होऊन जाते. ही विनाश ज्वाला या यज्ञातून प्रज्वलित होणार आहे. पतीत दुनियेचा तर विनाश होणार आहे. नाहीतर पावन दुनिया कशी बनेल. तुम्हीं म्हणता हे पतित पावन या, तर पतित दूनिया आणि पावन दुनिया एकत्र राहील कां? पतीत दुनियेचा विनाश होईल, यामध्ये तर खूश झाले पाहिजे. महाभारताचे युद्ध लागले होते, त्यातून स्वर्गाचे द्वार उघडते. म्हणतात हे तेच महाभारताचे युद्ध आहे. हे तर चांगले आहे. पतीत दुनिया नाहीशी होऊन जाईल. शांती साठी डोके खाण्याची आवश्यकता नाही. तुम्हांला जो तिसरा नेत्र मिळाला आहे, तो कोणाला नाही .तुम्हां मुलांना खुशी झाली पाहिजे. आम्ही बेहदच्या बाबा कडून परत वरसा घेत आहोत. बाबा, आम्ही अनेक वेळा तुमच्या कडून वरसा घेतला आहे. रावणाने मग शाप दिला. या गोष्टी आठवण करणे सोपे आहे. बाकी सर्व दंतकथा आहेत. तुम्हाला एवढे सावकार बनविले मग गरीब कां झालात? हे सर्व विश्व नाटकांमध्ये नोंदलेले आहे. गायन पण आहे, ज्ञान, भक्ती, वैराग्य. भक्ती तून वैराग्य तेंव्हा होते, जेंव्हा ज्ञान मिळते. तुम्हाला ज्ञान मिळाले, तेंव्हा भक्ती पासून वैराग्य आले. साऱ्या जुन्या दुनिये पासून वैराग्य. हे तर कबरिस्तान आहे. 84 जन्माचे चक्र घेतले. आता घरी जायचे आहे. माझी आठवण करा तर माझ्याजवळ पोहचाल. विकर्म विनाश होऊन जातील, आणखीन कोणता उपाय नाही. योग अग्नीने पाप भस्म होतील. गंगा स्नानाने होणार नाहीत.

बाबा म्हणतात, मायाने तुम्हाला मूर्ख बनविले आहे. एप्रिल फुल करतात ना. आता मी तुम्हाला लक्ष्मी नारायणा सारखे बनविण्यासाठी आलो आहे. चित्र तर फार चांगली आहेत. आज आम्ही काय आहोत, उद्या आम्ही काय बनू ? परंतु माया कमी नाही. माया दोर बांधू देत नाही. ओढाताण होत आहे. आम्ही बाबाची आठवण करतो मग माहित पडत नाही, काय होत आहे? विसरून जातात. यामध्ये मेहनत आहे. त्यामुळे भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. त्यांना वरसा कोणी दिला, हे कोणी समजत नाहीत. बाबा म्हणतात, मुलांनो, मी तुम्हाला परत वरसा देण्यासाठी आलो आहे. हे तर बाबाचे काम आहे. यावेळी सर्व नर्कवासी आहेत. तुम्हीं खुश होत आहात. इथे कोणी येतात, समजून घेतात, तर खुशी होते. बरोबर ठीक आहे. ८४ जन्माचा हिशोब आहे. बाबा कडून वरसा घ्यायचा आहे. बाबा जाणतात, अर्धा कल्प भक्ती करून तुम्ही थकले आहात. गोड मुलांनो, बाबा तुमची सर्व थकावट दूर करतात. आता भक्ती अंधाराचा मार्ग पूर्ण होत आहे. कुठे हे दु:खधाम, कुठे ते सुखधाम. मी दुःखधाम ला सुखधाम बनविण्यासाठी कल्पाच्या संगमयुगावर येतो. बाबा चा परिचय द्यायचा आहे. बाबा बेहदचा वरसा देणारे आहेत. एकाचीच महिमा आहे. शिवबाबा नसते तर तुम्हाला पावन कोण बनवेल. विश्व नाटकांमध्ये सारी नोंद आहे. कल्प कल्प तुम्ही मला बोलावता कि, हे पतित-पावन या. शिवाची जयंती आहे. म्हणतात ब्रह्माने स्वर्गाची स्थापना केली, मग शिवाने काय केले, ज्यामुळे शिवजयंती साजरी करतात. कांहीपण समजत नाहीत. तुमच्या बुद्धी मध्ये ज्ञान एकदम बसले पाहिजे. डोर एका बरोबर बांधली आहे, मग इतर कोणा बरोबर बांधायची नाही, नाही तर खाली पडाल. पारलौकिक बाबा साधारण आहेत. कोणता थाटमाट नाही. ते पिता तर मोटारी मध्ये, विमाना मध्ये फिरतात. हे बेहदचे बाबा म्हणतात, मी पतित दूनिया, पतित शरीरामध्ये, मुलांच्या सेवे साठी येतो. तुम्ही बोलावले आहे, हे अविनाशी सर्जन या, येऊन आम्हाला इंजेक्शन द्या. इंजेक्शन लागत आहे. बाबा म्हणतात, योग लावा तर तुमचे पाप भस्म होतील. बाबा आहेतच 63 जन्माचे दुखहर्ता, 21 जन्मांचे सुखकर्ता. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आपल्या बुद्धीची आत्मिक डोर, एकाबरोबर बांधायची आहे. एकाच्या श्रीमतावर चालायचे आहे.

(२) आम्ही अति गोड झाडाचे कलम लावत आहोत, त्यामुळे प्रथम स्वतःला फार फार गोड बनायचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये तत्पर राहून, विकर्म विनाश करायचे आहेत.

वरदान:-
सर्व खजान्यांना, विश्व कल्याणा प्रती वापर करणारे सिद्धी स्वरुप भव:

जसे आपल्या हदच्या प्रवृत्ती मध्ये आपल्या हदच्या स्वभाव संस्काराच्या प्रवृत्ती मध्ये फार वेळ लावतो, परंतु आपापल्या प्रवृत्ती पासून दूर अर्थात उपराम राहा आणि प्रत्येक संकल्प, बोल, कर्म आणि संबंध, संपर्का मध्ये समतोल ठेवा, तर सर्व खजान्याची बचत होऊन, कमी खर्चात मोठे नशीबवान बनाल. आता वेळेचा खजीना, शक्तीचा खजीना आणि स्थूल खजान्या मध्ये कमी खर्चात मोठे नशीबवान बना. त्यांचा स्वतः ऐवजी विश्वकल्याणा साठी वापर करा, तर सिद्धी स्वरूप बनाल.

बोधवाक्य:-
एकाच्या लगन मध्ये नेहमी मगन राहा, तर निर्विघ्न बनाल.