12-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्हाला कमाई करण्याची खूप आवड पाहिजे,या शिक्षणा मध्येच कमाई आहे.
प्रश्न:-
ज्ञानाशिवाय
कोणत्या खुशी ची गोष्ट पण विघ्न रूप बनते?
उत्तर:-
साक्षात्कार होणे ही तर खुशी ची गोष्ट आहे परंतु जर अर्थ सही ज्ञान नसेल तर आणखीनच
संभ्रमित होतात.समजा कोणाला बाबांचा साक्षात्कार झाला,बिंदू पाहिला,तर काय समजतील,
आणखीन संभ्रमित होतील म्हणून ज्ञाना शिवाय साक्षात्काराचा काहीच फायदा नाही.यामध्ये
आणखीनच मायाचे विघ्न येतात.अनेकांना साक्षात्काराचा उलटा नशा चढतो.
गीत:-
तकदीर जगावर
आई हूॅ….
ओम शांती।
गोडगोड मुलांनी गीत ऐकले.नवीन मुलांनी ऐकले,जुन्या मुलांनी पण ऐकले.कुमारांनी पण
ऐकले की, ही पाठशाला आहे. पाठशाळे मध्ये कोणते ना कोणते भाग्य बनवले जाते.तेथे तर
अनेक प्रकारचे भाग्य आहे.कोणी सर्जन बनवण्याचे,कोणी वकिल बनण्याचे भाग्य
बनवतात.भाग्याला मुख्य लक्ष म्हटले जाते.भाग्य बनवण्याशिवाय पाठशाला मध्ये काय
शिकवतील.आता मुलं जाणतात की,आम्ही आपले भाग्य बनवण्यासाठी आलो आहे.नवीन दुनियेसाठी
आपले राज्य भाग घेण्यासाठी आलो आहे.हा राजयोग नवीन दुनियेसाठीच आहे.ते जुन्या
दुनियेसाठी आहे.ते जुन्या दुनिया साठी वकील,अभियंता,डॉक्टर इत्यादी बनवतात.ते
बनत-बनत आता जुन्या दुनियेमध्ये खुप थोडा वेळ राहिला आहे.ते तर सर्व नष्ट होईल.ते
भाग्य आहे या मृत्यू लोकांसाठी आणि एका जन्मासाठी. तुमचे हे शिक्षण नवीन दुनियेसाठी
आहे.तुम्ही नवीन दुनियेसाठी भाग्य घेऊन आले आहात.नवीन दुनिये मध्ये तुम्हाला राज्य
भाग्य मिळेल. कोण शिकवत आहेत?बेहद्दचे बाबा,त्यांच्याद्वारे भाग्य मिळवायचे आहे.जसे
डॉक्टर पासून डॉक्टरीचा वारसा मिळवतात,ते होते या एका जन्मासाठी.एक तर पित्याकडून
वारसा मिळतो,दुसरा वारसा मिळतो आपल्या शिक्षणाद्वारे.अच्छा,जेव्हा वृध्द होतात,तर
गुरूच्या जवळ जातात.त्यांना काय हवे असते,तर म्हणतात,आम्हाला शांतीधाम मध्ये
जाण्याचे शिक्षण द्या.आम्हाला सद्गती द्या,येथून आम्हाला शांतीधाम मध्ये घेऊन
चला.आता बाबा पासून वारसा मिळतो,शिक्षका पासून वारसा मिळतो,या एका जन्मासाठी. बाकी
गुरु द्वारे काहीच मिळत नाही. शिक्षकाद्वारे शिकून काय ना काय वारसा मिळेल.शिक्षक
बनतील, शिलाई शिक्षक बनतील,कारण आजीविका तर पाहिजे ना.पित्याचा वारसा असूनही
शिकतात,की आम्ही आपली कमाई करू.गुरुद्वारे काहीच कमाई होत नाही.कोणी गीतेचा चांगल्या
प्रकारे अभ्यास केला,परत गीते वरती प्रवचन इत्यादी करतात.हे सर्व अल्प काळासाठी सुख
आहे.आता तर या मृत्युलोका मध्ये थोडा वेळ आहे, जुनी दुनिया नष्ट होणार आहे.तुम्ही
जाणता आम्ही नवीन दुनियेचे भाग्य बनवण्यासाठी आलो आहे.ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे.
पित्याची मिळकत पण भस्म होईल,परत हात खाली होतील.आता नवीन दुनियेसाठी कमाई
पाहिजे.जुन्या दुनियाचे मनुष्य तर ती करू शकत नाहीत. नवीन दुनियेची कमाई करणारे
शिवबाबा आहेत.येथे तुम्ही नवीन दुनियेचे भाग्य बनवण्यासाठी आले आहात.बाबा तुमचे पिता
पण आहेत, शिक्षक पण आहेत आणि गुरु पण आहेत.आणि ते येतातच संगम मध्ये.भविष्यासाठी
कमाई करणे शिकवतात.आता या जुन्या दुनिये मध्ये थोडेच दिवस आहेत.हे दुनियाचे मनुष्य
जाणत नाहीत.ते म्हणतात नवीन दुनिया परत कधी येईल,हे तर थापा मारणारे आहेत. असे
समजणारे पण खूप आहेत. बाबा म्हणतात नवीन दुनियेची स्थापना होत आहे,मुलगा म्हणेल या
तर थापा आहेत.तुम्ही मुलं समजता नवीन दुनियेसाठी,हे आमचे पिता, शिक्षक,सद्गुरु
आहेत.बाबा शांती धाम सुखधाम मध्ये घेऊन जाण्यासाठी येतात.कोणी भाग्य बनवत नाहीत तर
ते काहीच समजत नाहीत.एका घरांमध्ये पत्नी राजयोगाचा अभ्यास करते,तर पती करत
नाही,मुलं करतात,तर मात पिता करत नाहीत,असे होत राहते. सुरुवातीला अनेक परिवार आले
परंतु मायेचे वादळ आल्यामुळे, आश्र्चर्यवत ऐकले,सांगितले आणि बाबांना सोडून
गेले.गायन पण आहे आश्र्चर्यवत ऐकतात,बाबाचे बनतात,राजयोग शिकतात,तरीही निघून
जातात.ही पण अविनाश नाटकाची भावी आहे.बाबा स्वत: म्हणतात,हाय अविनाश नाटक,हाय
माया.नाटकाची च गोष्ट झाली ना. पती-पत्नी एक दोघांना घटस्फोट देतात.मुलं पित्याला
घटस्फोट देतात,येथे तर तसे नाही.येथे तर घटस्पोट देऊ शकत नाहीत.बाबा तर आले
आहेत,मुलांना खरी कमाई करून देण्यासाठी.पिता थोडेच कोणाला खड्ड्यामध्ये घालतील. बाबा
तर पतित-पावन,दयावान आहेत.बाबा येऊन दुःखापासून मुक्त करतात,मार्गदर्शक बनून सोबत
घेऊन जातात.असे कोणी लौकिक गुरु म्हणणार नाहीत की,मी तुम्हाला सोबत घेऊन जाईल.असे
गुरु कधी पाहिले,कधी ऐकले? गुरु लोकांना तुम्ही विचारा,इतके तुमचे शिष्य आहेत,तुम्ही
शरीर सोडल्यानंतर, या शिष्यांना पण सोबत घेऊन जाणार का?असे कधी कोणीही म्हणणार नाही.
की,मी शिष्यांना सोबत घेऊन जाईल.हे तर होऊ शकत नाही. कधी कोणी म्हणू शकणार नाही
की,मी तुम्हा सर्वांना निर्वाणधाम किंवा मुक्तीधाम मध्ये घेऊन जाईल. असा प्रश्न कोणी
विचारू शकणार नाही,आम्हाला तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकाल काय?ग्रंथांमध्ये भगवानुवाच
आहे,मी तुम्हाला सोबत घेऊन जाईल.मच्छरा सदृश्य सर्व जातील.सतयुगा मध्ये खूप थोडे
मनुष्य असतात,कलियुगामध्ये तर असंख्य मनुष्य आहेत.शरीर सोडून बाकी आत्मा हिशोब
चुक्त करून,कर्मभोग चुक्त करून जातील.जायचे तर जरूर आहे. इतके मनुष्य राहू पण शकणार
नाहीत.तुम्ही मुलं चांगल्या रीतीने जाणतात,की आत्ता आम्हाला घरी जायचे आहे.हे शरीर
तर सोडायचे आहे.तुम्ही मेले तर दुनिया पण मेल्या सारखीच आहे.स्वतःला फक्त आत्मा
समजून पित्याची आठवण करायची आहे.हे जुने शरीर सोडायचे आहे.ही दुनिया पण जुनी आहे.जसे
जुन्या घरामध्ये बसून, नवीन घर समोर तयार होते,तर समजतात आमच्यासाठी नवीन घर बनत
आहे.बुद्धी नवीन घराकडे चालली जाईल,असे बनवा, असे करा,सर्व ममत्व जुन्या पासून नष्ट
होऊन,नवीन घरा मध्ये जाते. ती झाली हद्दची गोष्ट.ही तर दुनिया ची गोष्ट आहे.जुन्या
दुनिये पासून ममत्व काढून,नवीन दुनिये मध्ये लावायचे आहे.तुम्ही जाणता ही जुनी
दुनिया तर नष्ट होणार आहे. नवीन दुनिया स्वर्ग आहे,त्यामध्ये आम्ही राज्यपद
मिळवतो.जितके योगामध्ये राहाल,ज्ञानाची धारण कराल,दुसऱ्याला समजावून सांगाल,तेवढा
खुशीचा पारा चढेल. खूप मोठी परीक्षा आहे,आम्ही स्वर्गाचा २१ जन्मासाठी वारसा मिळवत
आहोत.सावकार बनणे तर चांगले आहे ना,दीर्घायुष्य मिळाले तर चांगलेच आहे ना.सृष्टी
चक्राची आठवण कराल,जितके आपल्यासारखे बनवाल,तेवढा फायदा आहे.राजा बनायचे असेल
तर,प्रजा पण बनवावी लागेल. प्रदर्शनीमध्ये अनेक जण येतात,ते सर्व प्रजा बनतील,कारण
या अविनाशी ज्ञानाचा विनाश होत नाही.बुद्धीमध्ये येईल,पवित्र बनून, पवित्र दुनियाचे
मालक बनायचे आहे.पुरुषार्थ जास्त कराल तर, प्रजा मध्ये उच्चपद मिळेल,नाहीतर प्रजा
मध्ये कनिष्ठ पद मिळेल. क्रमानुसार तर असतात ना, रामराज्याची स्थापना होत आहे, रावण
राज्याचा विनाश होईल. सतयुगामध्ये तर देवता असतात. बाबांनी समजवले आहे,आठवणीच्या
यात्रा द्वारे तुम्ही सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. मालक तर राजा,प्रजा सर्व
असतात.प्रजा पण म्हणेल भारत आमचा सर्वात उच्च आहे.बरोबर भारत उच्च होता.आता थोडाच
आहे,जरूर होता.आता तर अगदीच गरीब बनला आहे.प्राचीन भारत सर्वांपेक्षा सावकार
होता.तुम्ही जाणतात,बरोबर आम्ही भारतावासी सर्वात उच्च कुळाचे होतो.दुसरे कोणाला
देवता म्हणू शकत नाही.आता तुम्ही मुली हे शिकत आहात आणि दुसऱ्यांना पण समजावून
सांगायचे आहे. मनुष्यांनाच समजायचे आहे ना. तुमच्याजवळ चित्र पण आहेत, तुम्ही सिद्ध
करून सांगू शकता, त्यांनी हे पद कसे मिळवले.तिथी तारीख सहित,तुम्ही स्पष्ट करू
शकता,आता परत शिवबाबा कडून हे पद मिळवत आहोत. त्यांचे चित्र पण आहे.शिव परमपिता
परमात्मा आहेत.बाबा म्हणतात ब्रह्मा द्वारे तुम्हाला २१ जन्माचा वारसा
मिळतो.सूर्यवंशी देवी देवता विष्णुपुरी चे तुम्ही मालक बनू शकता.शिवबाबा,दादा
ब्रह्मा द्वारा हा वारसा देत आहेत.प्रथम यांची आत्मा ऐकते.आत्माच धारण करते. मुख्य
गोष्ट ही आहे.चित्र तर शिवाचे दाखवतात,हे चित्र परमपिता परमात्मा शिवाचे
आहे.ब्रह्मा,विष्णू, शंकर तर सूक्ष्म वतनच्या देवता आहेत.प्रजापिता ब्रह्मा तर जरूर
येथे पाहिजेत.प्रजापिता ब्रह्मा चे मुलं ब्रह्मकुमार कुमारी अनेक आहेत.जोपर्यंत
ब्रह्माचे मुलं बनले नाहीत,ब्राह्मण बनले नाहीत,तर शिवबाबा कडून वारसा कसा
घेतील.कुख वंशावळ तर होऊ शकत नाही.गायन पण आहे मुख वंशावळ.तुम्ही म्हणाल आम्ही
प्रजापिता ब्रह्माचे मुखवंशावळ आहोत.ते गुरूंचे शिष्य असतात.येथे तर तुम्ही एकालाच
पिता शिक्षक आणि सद्गुरु म्हणतात.ते पण ब्रह्माला म्हणत नाहीत,निराकार शिव बाबा पण
आहेत.ज्ञानाचे सागर आहेत. सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान देतात.शिक्षक पण ते
निराकार आहेत,जे साकार द्वारे ज्ञान ऐकवतात.आत्माच बोलते. आत्मा म्हणते,माझ्या
शरीराला त्रास देऊ नका.आत्मा दुखी होते,तर समज दिली जाते,जेव्हा विनाश समोर
आहे.पारलौकिक बाबा येतात,अंत काळात सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी.बाकी जे पण सर्व
काही आहे,हे सर्व विनाश होणार आहे.याला मृत्युलोक म्हणले जाते.स्वर्ग तर येथेच
पृथ्वीवर असतो.दिलवाडा मंदिर बनले आहे. खाली तपस्या करत आहेत,वरती स्वर्ग
आहे,नाहीतर कुठे दाखवणार. वरती देवतांचे चित्र दाखवले आहेत,ते पण येथेच असतील ना.
समजावून सांगण्याची खूप युक्ती पाहिजे.मंदिरांमध्ये जाऊन समजावयाला पाहिजे.हे शिव
बाबांचे स्मृतिस्थळ आहे,बाबा आम्हाला शिकवत आहेत.शिव वास्तव मध्ये बिंदू आहेत परंतु
बिंदू ची पूजा कशी होईल,फळं फूल इत्यादी अर्पण करण्यासाठी मोठे रूप बनवले आहे.इतके
मोठे रूप कोणाचे नसते.गायन पण आहे भुकटीच्या मध्ये एक अजब तारा चमकतो.ते सूक्ष्म
बिंदू आहेत.मोठी गोष्ट असेल तर,वैज्ञानिक लगेच त्यांना पकडू शकतील.न इतके हजार
सुर्या पेक्षा तेजस्वी आहेत, तसे काहीच नाही.कसे कसे भक्त लोक येतात,ते म्हणतात बस
आम्हाला त्यांचा चेहरा दिसून आला. बाबा समजतात,त्यांना परमपिता परमात्माचा पूर्ण
परिचय मिळाला नाही,आणखी भाग्य जागृत झाले नाही.जोपर्यंत बाबांना जाणले नाही, हे
समजले नाही की, मी आत्मा बिंदू समान आहे, शिवबाबा पण बिंदू आहेत,त्यांची आठवण करायची
आहे.असे समजून त्यांची आठवण कराल, तेव्हाच विकर्म विनाश होतील. बाकी हे दिसून
येते,तसे दिसते, याला मायेचे विघ्न म्हटले जाते. आता तर खुशी मध्ये आहेत, आम्हाला
बाबा मिळाले आहेत.कृष्णाचा साक्षात्कार करून खूप आनंदामध्ये रास करतात परंतु
त्याद्वारे काही सद्गती होत नाही.हे साक्षात्कार तर असेच होत राहतात.जर चांगल्या
प्रकारे शिकणार नाहीत,तर प्रजा मध्ये चालले जातात. साक्षात्काराचा फायदा तर मिळणार
आहे ना. भक्तिमार्ग मध्ये खूप कष्ट केल्यानंतर साक्षात्कार होतो.येथे थोडे पण कष्ट
घेतात तर साक्षात्कार होतो परंतु फायदा काहीच नाही. कृष्णपुरी मध्ये, साधारण प्रजा
बनतील.आता तुम्ही मुलं जाणतात, बाबा आम्हाला हे ज्ञान ऐकवत आहेत.बाबांचा आदेश
आहे,पवित्र जरुर बनायचे आहे. परंतु काहीजण पवित्र पण राहू शकत नाहीत.कधी पतित पण
येथे लपून येतात, तर ते आपलेच नुकसान करतात, स्वतःलाच फसवतात.बाबाला फसवण्याची तर
गोष्टच नाही. बाबांना फसवून काय पैसे घेणार आहेत काय?शिवबाबांच्या श्रीमतावर
कायदेशीर चालले नाहीतर,काय हाल होतील. असे समजले जाईल भाग्यामध्ये नाही.जे शिकत नाही
ते दुसऱ्यांना पण दुःख देत राहतात,परत एक तर खूप सजा खावी लागेल आणि पद पण भ्रष्ट
होईल.कोणतेही काम कायद्याच्या विरुद्ध करायला नको. बाबत तर समजवतात तुमची चलन ठीक
नाही.बाबा तर कमाई करण्याचा रस्ता दाखवतात,परत कोणी करतात कोणी करत नाहीत, त्यांचे
भाग्य.सजा खाऊन परत शांतीधाम मध्ये जायचेच आहे.पद भ्रष्ट होईल,काहीच मिळणार नाही.
सेवा केंद्रावरती किंवा मधुबनला खूप येतात परंतु येथे तर बाबा पासून वारसा घेण्याची
गोष्ट आहे.मुलं म्हणतात,बाबा आम्ही तर स्वर्गाचे सूर्यवंशी राजाईपद मिळवू.हा राजयोग
आहे ना.विद्यार्थी शिष्यवृत्ती घेतात ना.जे चांगल्या मार्काने पास होतात,त्यांनाच
शिष्यवृत्ती मिळते.ही माळ त्यांचीच बनलेली आहे,ज्यांनी शिष्यवृत्ती घेतली
आहे.जितक्या जास्त मार्कांनी पास होतील तशी शिष्यवृत्ती मिळते.हे माळ बनलेली
आहे.शिष्यवृत्ती घेणाऱ्यांची वृद्धी होत-होत हजारो बनतील.राज्यपद घेणे म्हणजे
शिष्यवृत्ती आहे ना.जे चांगल्या रीतीने शिकतात ते गुप्त राहू शकत नाहीत.अनेक नवीन
मुलं पण जुन्या पेक्षा पुढे जातात.जसे पहा काही मुली म्हणतात,आम्हाला हे शिक्षण खूप
चांगले वाटते.आम्ही प्रतिज्ञा करतो की,शारीरिक शिक्षणाचा कोर्स पूर्ण करून,आम्ही
राजयोगाच्या शिक्षणामध्ये तत्पर राहून आपले जीवन हिऱ्यासारखे बनवू.आपली खरी कमाई
करून,२१ जन्मासाठी वारसा मिळवू.खूप खुशी होते.तुम्ही जाणता वारसा आत्ता घेतला नाही,
तर कधीच घेऊ शकणार नाही. शिक्षणाची आवड असते ना, काहींना तर काहीच आवडत नसते.जुन्या
मुलांना पण इतकी आवड नाही,जितकी नवीन मुलांना आहे.हे पण आश्चर्य आहे ना.असे
म्हणाल,अविनाश नाटकानुसार ज्यांच्या भाग्य मध्ये नाहीतर भगवान पण काय करतील.शिक्षक
तर शिकवतात ना,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक मुलांना आत्मिक पित्याचा नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) स्वतःचे
अवगुण लपवणे,म्हणजे स्वतःला फसवणे आहे म्हणून कधीच स्वतःला फसवायचे नाही.
(२) आपले श्रेष्ठ भाग्य बनवण्यासाठी कोणतेही काम कायद्याविरुद्ध करायचे
नाही.राजयोगाच्या अभ्यासाची आवड ठेवायची आहे. आपल्यासारखे बनवण्याची सेवा करायची आहे.
वरदान:-
प्रत्येक पाऊल
आदेशावरती चालून मायेला समर्पित करणारे,सहजयोगी भव.
जी मुलं प्रत्येक
पाऊल श्रीमतावर,आदेशावर चालतात,त्यांच्या पुढे संपूर्ण विश्व समर्पित होते.सोबत माया
पण आपल्या वंश सहीत समर्पित होते.प्रथम तुम्ही बाबा वरती बळी जावा,तर माया आपोआप
तुमच्यावरती बळी जाईल.तुम्ही श्रेष्ठ स्वमाना मध्ये राहत,बाबाच्या श्रीमतानुसार
चालत राहा,तर जन्म जन्मांतरच्या त्रासापासून मुक्त बनाल.आत्ताचे सहजयोगी आणि भविष्या
मधील सहज जीवन असेल.तर असे सहज जीवन बनवा.
बोधवाक्य:-
स्वतःच्या
परिवर्तना द्वारे दुसऱ्याचे परिवर्तन करणेच जीवनदान देणे आहे.