07-02-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   29.10.87  ओम शान्ति   मधुबन


तन,मन, धन आणि संबंधाची शक्ती.


आज सर्वशक्तिवान बाबा आपल्या शक्तीशाली मुलांना पाहत आहेत. प्रत्येक ब्राह्मण आत्मा शक्तिशाली बनली आहे परंतु क्रमानुसार आहेत. सर्वशक्ती बाबांचा वारसा आणि वरदाताचे वरदान आहे.बाबा आणि वरदाता,या दुहेरी संबंधा द्वारे प्रत्येक मुलांना ही श्रेष्ठ प्राप्ती,जन्मापासूनच होते.जन्मापासूनच बाबा सर्व शक्तींचा अर्थात जन्मसिद्ध अधिकाराचे अधिकारी बनवतात. सोबत वरदाताच्या नात्याद्वारे जन्म होताच,मास्टर सर्वशक्तिमान बनवून "सर्व शक्ती भव"चे वरदान देतात.सर्व मुलांना एकाद्वारे एकसारखाच दुहेरी अधिकार मिळतो परंतु धारण करण्याची शक्ती,क्रमानुसार बनवते.बाबा सर्वांना नेहमी आणि सर्व शक्तिशाली बनवतात परंतु मुलं यथाशक्ती बनतात.तसे तर लौकिक जीवनामध्ये किंवा अलौकिक जीवनामध्ये सफलतेचा आधार शक्तीच आहेत.जितकी शक्ती तेवढी सफलता मिळते.मुख्य शक्ती तनाची,मनाची,धनाची आणि संबंधाची आहे.चारही शक्ती आवश्यक आहेत.जर चारमध्ये एक शक्ती कमी आहे,तर जीवनामध्ये नेहमी सफलता मिळत नाही. अलौकिक जीवनामध्ये पण चारही शक्ती आवश्यक आहेत.या अलौकिक जीवनामध्ये आत्मा आणि प्रकृती दोन्हीची तंदुरुस्ती आवश्यक आहे.जेव्हा आत्मा निरोगी आहे,तर त्यांचा हिसाब किताब किंवा तनाचा रोग सुळापासून काटा बनल्यामुळे स्वस्थितीमुळे स्वस्थ,निरोगी अनुभव करतात.त्यांच्या चेहऱ्यावरती आजारी पडण्याचे कष्ट किंवा चिन्ह राहत नाहीत.मुखावरती कधी आजारी पडण्याचे वर्णन होत नाही. कर्मभोगाच्या वर्णनाच्या ऐवजी कर्म भोगाच्या स्थितीचे वर्णन करतात कारण आजारीचे वर्णन पण आजाराच्या वृद्धीचे कारण बनते.ते कधीच आजारपणाच्या कष्टाचे अनुभव करत नाहीत,दुसऱ्यांना कष्ट ऐकवून,कष्टाची आणखीनच वृध्दी करत नाहीत.परिवर्तन शक्तीद्वारे कष्टाला संतुष्टतेमध्ये परिवर्तन करून,संतुष्ट राहून दुसऱ्यांमध्ये पण संतुष्टता पसरवते,अर्थात मास्टर सर्वशक्तिमान बनून शक्तीच्या वरदाना मधुन,वेळेनुसार सहनशक्ती, सामवण्याच्या शक्तीचा प्रयोग करतील आणि वेळेवर शक्तीचे वरदान किंवा वारसा कार्यामध्ये लावणे,हेच त्याच्यासाठी वरदान म्हणजेच आशीर्वाद,औषधाचे काम करेल,कारण सर्वशक्तिमान बाबा द्वारा ज्या सर्व शक्ती प्राप्त आहेत, त्या जशी परिस्थिती,जशी वेळ आणि ज्या विधीद्वारे आपण कार्यामध्ये लावू इच्छितो,तसेच रूपा द्वारे ह्या शक्ती आपल्या सहयोगी बनू शकतील.या शक्तींना किंवा प्रभू वरदानाला,ज्या रूपांमध्ये पाहिजे ते रूप धारण करू शकतात.आत्ता- आतल्या शीतलतेच्या रूपामध्ये, आत्ता आत्ता अग्नीच्या रुपामध्ये.पाण्याच्या शीतलतेचा पण अनुभव करू शकतात,तर अग्नी ज्वालास्वरुपाचे पण काम करू शकते आणि औषधाचे पण काम करू शकतात आणि शक्तिशाली बनवण्यासाठी खुराकाचे पण काम करू शकतात,फक्त वेळेवर कार्यामध्ये लावण्याच्या अधिकारी बना.या सर्व शक्ती तुम्हा मास्टर सर्वशक्तीमानच्या सेवाधारी आहेत. जेव्हा आदेश द्या आणि हजर हजर म्हणून सहयोगी बनतील,परंतु सेवा घेणारे पण इतके चतुर सुजन पाहिजेत.तर तनाची शक्ती,आत्मिक शक्तीच्या आधारावर,नेहमी अनुभव करू शकतील,म्हणजेच नेहमी स्वस्थ राहण्याचा अनुभव करू शकतील.

हे आत्मिक ब्राह्मण जीवनच नेहमी स्वस्थ जीवन आहे.वरदाता पासून नेहमी निरोगी भवचे वरदान मिळाले आहे. बापदादा पाहतात पण,प्राप्त झालेल्या वरदानाला काही मुलं वेळेवर कार्यामध्ये लावून लाभ घेऊ शकत नाहीत कारण शक्ती म्हणजे सेवाधारीना आपल्या विशालता आणि विशाल बुद्धी द्वारा सेवा घेऊ शकत नाहीत.मास्टर सर्वशक्तिमान, ही स्थिती काही कमी नाही.ही श्रेष्ठ स्थिती पण आहे,सोबतच प्रत्यक्ष परमात्मा द्वारा,परम पदवी पण आहे.पदवीचा नशा पण खूप राहतो. पदवी अनेक कार्य सफल करते.तर ही परमात्म पदवी,स्वमान आहे, यामध्ये खूप खुशी आणि शक्ती भरलेली आहे.जर या एकच स्वमानच्या स्थिती रुपी आसना वर स्थिर राहा,तर या सर्व शक्ती सेवेसाठी नेहमी हजर अनुभव होतील.तुमच्या आदेशाचे वाट पाहतील.तर मास्टर सर्वशक्तिमानच्या स्वमाना मध्ये स्थिर होत नाहीत,तर शक्तीला आदेशामध्ये चालवण्याच्या ऐवजी, तर नेहमीच बाबांना अर्ज करत राहतात की,शक्ती द्या,हे आमचे कार्य करा,असे होईल तर,तसे होईल.ही मनाची शक्ती आहे,जी अलौकिक जीवनामध्ये वारसा आणि वरदानामध्ये प्राप्त होते.

याच प्रकारे तिसरी धनशक्ती म्हणजेच ज्ञानधनाची शक्ती आहे. ज्ञान-धन धनाची प्राप्ती पण स्वतः करते,जिथे ज्ञानधन आहे,तिथे प्रकृती स्वतःच दासी बनते.हे स्थुल धन प्रकृतीच्या साधनासाठी आहे. ज्ञानधनाद्वारे प्रकृतीचे सर्व साधान स्वतः प्राप्त होतात म्हणून ज्ञानधन सर्व धनाचा राजा आहे.जेथे राजा आहे,तेथे सर्व पदार्थ स्वतः प्राप्त होतात,कष्ट करावे लागत नाहीत. जर कोणताही लौकिक पदार्थ मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात, तर याचे कारण ज्ञानधनाची कमी आहे.वास्तव मध्ये ज्ञानधन पद्ममपती बनवणारे आहे. परमार्थ व्यवहाराला स्वतःच सिद्ध करतो.तर परमार्थ धन असणारे परमार्थी बनतात.संकल्प करण्याची पण आवश्यकता नाही,स्वतःच सर्व आवश्यकता पूर्ण होत राहतात. ज्ञानधनाची इतकी शक्ती आहे,जे अनेक जन्म,हे ज्ञानधन राजांचे राजा बनवते.तर धनाची शक्ती पण सहज प्राप्त होते.

याच प्रकारे संबंधाची शक्ती. संबंधाच्या शक्तीच्या प्राप्तीची इच्छा यामुळे होते,कारण संबंधांमध्ये स्नेह आणि सहयोगाची प्राप्ती होते.या अलौकिक जीवनामध्ये संबंधाची शक्ती दुहेरी रूपामध्ये प्राप्त होते. तुम्ही जाणता दुहेरी संबंधाची शक्ती कशी प्राप्त होते?एक बाप द्वारा सर्व संबंध, दुसरे म्हणजे दैवी परिवारा द्वारा संबंध.तर दुहेरी संबंध झाले ना.बाबांशी आणि आपसामध्ये पण. तर संबंधाद्वारा नेहमी निस्वार्थ स्नेह, अविनाश स्नेह आणि अविनाशी सहयोग नेहमीच प्राप्त होत राहतो. त्या संबंधाची शक्ती पण आहे.तसेच बाबा मुलांकडून काय इच्छा ठ़ेवतात किंवा मुलगा बाबांकडून काय इच्छा ठेवतो.सहयोगासाठी आणि वेळेवर सहयोग मिळावा.तर या अलौकिक जीवनामध्ये,चारही शक्तींची प्राप्ती,वरदानाच्या रूपामध्ये,वारशाच्या रूपामध्ये आहे.जिथे चार प्रकारची शक्ती प्राप्त आहे,त्यांची प्रत्येक वेळेची स्थिती कशी असेल?मास्टर सर्वशक्तिमान,या स्थितीच्या आसनावर नेहमी स्थिर आहात काय?यालाच दुसर्‍या शब्दांमध्ये स्वतःचे राजे किंवा राजयोगी म्हटले जाते. राजाचे भंडार नेहमी भरपूर राहते.राजयोगी म्हणजे नेहमी शक्तीचे भंडार भरपुर राहते, समजले.याला म्हटले जाते श्रेष्ठ ब्राह्मण अलौकिक जीवन.नेहमी मालक बनून सर्वशक्ती कार्या मध्ये लावा.यथाशक्ती च्या ऐवजी नेहमी शक्तिशाली बना.तक्रार करणाऱ्या ऐवजी,नेहमी खुश राहणारे बना.अच्छा.

मधुबन येण्याची संधी तर सर्वांना मिळत आहे ना.या प्राप्त झालेल्या भाग्याला नेहमी सोबत ठेवा. भाग्यविधात्याला सोबत ठेवणे म्हणजेच भाग्याला सोबत ठेवणे. तीन विभागाचे आले आहेत, वेगवेगळ्या स्थानाच्या तीन नदी एकत्र आल्या आहेत,याला त्रिवेणी संगम म्हटले जाते.बापदादा तर वरदाता बनुन सर्वांना वरदान देतात. वरदानाला कार्यामध्ये लावणे,हे प्रत्येकाच्या वरती आधारित आहे, अच्छा.

चोहूबाजूच्या सर्व वारसा आणि वरदानाच्या अधिकारी श्रेष्ठ आत्म्यांना,सर्व मास्टर सर्वशक्तिमान श्रेष्ठ आत्म्यांना,नेहमी संतुष्टतेची लाट पसरवणाऱ्या संतुष्ठ आत्म्यांना, नेहमी परमार्थ द्वारे व्यवहारांमध्ये सिद्धी प्राप्त करणाऱ्या महान आत्म्यांना,बापदादाचा स्नेह आणि शक्तिसंपन्न प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

"सर्वांच्या सहयोगाद्वारे सुखमय संसार" या कार्यक्रमा बाबत अव्यक्त बापदादाच्या प्रेरणा.

हा विषय असा आहे,जे स्वतः सर्व सहयोग देण्याचे निमंत्रण देतील. सह्योगा द्वारे परत संबंधांमध्ये येतील म्हणून आपोआप निमंत्रण देतील,फक्त शुभभावना शुभकामना संपन्न,सेवेमध्ये सेवाधारी बनवून प्रगती करत राहतील.शुभभावनेचे फळ प्राप्त होणार नाही,असे होऊ शकत नाही.सेवाधारींच्या शुभ भावना शुभकामनाची धरती सहज फळ देण्याचे निमित्त बनते.फळं तयार आहेत फक्त धरणी तयार होण्यासाठी थोडा उशीर लागतो. फळं तर फटाफट मिळतील, आता ती धरणी तयार होत आहे.तसे करणे आवश्यक आहे परंतु जे विशेष आत्मा आहेत, त्यांच्यापैकी जवळ आले नाहीत, मग ते राज्यसत्ता असणाऱ्यांची सेवा असो किंवा धर्मसत्ता असणार्‍यांची सेवा असो परंतु सहयोगी बनून समोर यावेत, वेळेवरती सहयोगी बनावेत,याची आवश्यकता आहे,त्यासाठी शक्तिशाली ज्ञानबाण लागतील. असे पाहिले जाते,शक्तिशाली बाण तेच असतात,ज्यामध्ये सर्व आत्म्यांच्या सहयोगाची भावना हवी, खुशीची भावना हवी, सद्भावना हवी.याद्वारे प्रत्येक कार्य सहज सफल होते.आत्ता जे पण सेवा करतात,ते वेगवेगळे करतात. परंतु जसे अगोदरच्या काळामध्ये, कोणतेही कार्य करण्यासाठी जात होते,तर सर्व परिवाराचे आशीर्वाद घेऊन जात होते,ते आशीर्वादच कार्य सहज बनवते.तर वर्तमान सेवांमध्ये हे करा,तर कार्य करण्याच्या अगोदर सर्वांच्या शुभकामना शुभकामना घ्या, सर्वांच्या संतुष्टतेचे बळ भरा,तेव्हा शक्तिशाली फळं निघतील.आता इतके कष्ट करण्याची आवश्यकता नाही,सर्व खोकले झाले आहेत.कष्ट करण्याची जरूरत नाही थोडेच बळ भरा आणि उडून येथे येतील,असे खोकले आहेत.आज काल तर सर्व समजत आहेत की कोणती तरी शक्ती पाहिजे,जे सर्वांना नियंत्रण करेल.राज्य असो किंवा धर्म असो.मनापासून सर्व शोधत

आहेत,फक्त ब्राह्मण आत्म्यांच्या सेवेच्या विधीमध्ये अंतर पाहिजे, तोच मंत्र बनेल.आता तो मंत्र चालवा आणि सफलता होईल. पन्नास वर्ष कष्ट केले,हे सर्व पण होणे आवश्यक होते,अनुभवी बनले ना.आता प्रत्येक कार्यामध्ये हेच लक्ष ठेवा की,"सर्वांच्या सहयोगा द्वारे सफलता"ब्राह्मणांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे.बाकी दुनिये साठी तर "सर्वांच्या सहयोगाद्वारे सुखमय संसार" हा विषय आहे.

अच्छा.आता तर तुम्हा सर्वांच्या सिद्धीचे प्रत्यक्ष रूप दिसून येईल, कोणते बिघडलेले कार्य पण तुमच्या दृष्टी द्वारे,तुमच्या सहयोगा द्वारे सहज निराकरण होईल,ज्यामुळे भक्तीमध्ये धन्य-धन्य करून बोलावतात.या सर्व सिद्धी पण तुमच्यासमोर प्रत्यक्ष रूपामध्ये येतील.काही सिद्धीच्या प्रथे द्वारे, तुम्ही लोक म्हणणार नाही की,हे होऊन जाईल परंतु तुमचे हे मार्गदर्शन स्वतः सिद्धी प्राप्त करत राहील,तेव्हा तर प्रजा लवकर लवकर बनेल.सर्व बाजूने निघून तुमच्याकडे येतील.ही सिद्धीची भूमिका पण आता चालेल परंतु प्रथम इतके शक्तिशाली बना,जे सिद्धीला स्वीकार करू नका, तेव्हाचे प्रत्यक्षता होईल नाहीतर सिद्धी देणारेच सिद्धी मध्ये फसून जातील, परत काय कराल? तर या सर्व गोष्टी येथून सुरू झाल्या आहेत. बाबा चे गायन आहे,ते सर्जन आहेत, डॉक्टर आहेत,अभियंता आणि वकील पण आहेत, न्यायाधीश पण आहेत.याचा प्रत्यक्ष अनुभव करतील,तेव्हाच चोहूबाजूने बुध्दी निघून एकीकडे येईल.आता तर तुमच्या पाठीमागे गर्दी होणार आहे.बापदादा हे दृश्य पाहत आहेत आणि कधीकधी आत्ताचे दृश्य पाहतात तर खूप फरक वाटतो. तुम्ही कोण आहात,ते बाबा जाणतात,खूप आश्चर्यकारक भूमिका आहे,जे स्वप्नात पण येत नाही,फक्त थोडा वेळ आहे.जसे पडदा कधी कधी अटकतो,झेंडा फडकताना कधी अटकतो,असेच थोडे अटकले आहे.तुम्ही जे आहात,जसे आहात,खूप महान आहात.जेव्हा तुमची विशेषता प्रत्यक्षात होईल,तेव्हा ईष्ट बनाल. शेवटी तर भक्त माळ पण प्रत्यक्ष होईल परंतु प्रथम ठाकूर दैवी गुणांनी भरपूर होतील,तर भक्त पण तयार होतील ना,अच्छा.

वरदान:-
स्वतःच्या आरामाचा त्याग करून सेवा करणारे,नेहमी संतुष्ट नेहमी हर्षित भव.

सेवाधारी स्वतःच्या रात्रं दिवसाच्या आरामाचा त्याग करून सेवांमध्येच आरामाची जाणीव करतात,त्यांच्या संपर्का मध्ये राहणाऱ्या किंवा संबंधांमध्ये येणाऱ्यांना पण जवळीकतेचा असा अनुभव करतात,जसे शितलतेची शक्ती, शांतीच्या झऱ्या खाली बसले आहेत.श्रेष्ठ चरित्रवान सेवाधारी कामधेनू बनून नेहमीसाठी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात.असे सेवाधारींना नेहमी हर्षित आणि नेहमी संतुष्ट राहण्याचे वरदान स्वतः मिळत जाते.

सुविचार:-
ज्ञान स्वरूप बनायचे आहे,तर प्रत्येक क्षण अभ्यासावर लक्ष द्या,बाबा आणि राजयोग शिक्षणाशी समान प्रेम हवे.