01-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,गरीब निवाज बाबा तुम्हाला कवडी पासून हिऱ्यासारखे lबनवण्यासाठी आले आहेत,तर तुम्ही नेहमी त्यांच्या श्रीमतावर चाला"

प्रश्न:-
प्रथमत: तुम्ही सर्वांना कोणते एक रहस्य समजावून सांगायचे आहे?

उत्तर:-
बाप दादाचे.तुम्ही जाणता येथे आम्ही त्याच्या जवळ आलो आहोत,जे दोन्ही एकत्र आहेत. शिवाची आत्मा पण यांच्यामध्ये आहे.ब्रह्माची आत्मा पण आहे.एक आत्मा आहे,दुसरे परमात्मा आहेत.तर प्रथमतः हे रहस्य सर्वांना समजावून सांगा की, हे बाप दादा दोन्ही एकत्र आहेत.हे दादा भगवान नाहीत.मनुष्य भगवान असू शकत नाहीत.भगवान निराकारलाच म्हटले जाते.ते पिता शांतीधाम मध्ये राहणारे आहेत.

गीत:-
शेवटी तो दिवस आला आज, ज्याची आम्ही वाट पाहत होतो….

ओम शांती।
बाबा,दादा द्वारा म्हणजे शिवबाबा ब्रह्मा दादाद्वारे समजावत आहेत,हे पक्के करा.लौकिक संबंधामध्ये पिता वेगळे,दादा वेगळे असतात.पित्याकडुन दादांचा वारसा मिळतो.असे म्हणतात दादांचा वारसा मिळतो.ते गरिब निवाज आहेत.गरीब निवाज त्यांनाच म्हटले जाते,जे येऊन गरिबांना मुकुटधारी सिरताज बनवतात.तर प्रथम हा निश्चय पक्का व्हायला पाहिजे की, हे कोण आहेत?तसे तर दिसण्यामध्ये मनुष्यच आहेत,यांना सर्व ब्रह्मा म्हणतात.तुम्ही सर्व ब्रह्माकुमार कुमारी आहात.तुम्ही जाणता, आम्हाला शिवबाबा कडून वारसा मिळतो.जे सर्वांचे पिता आहेत,ते वारसा देण्यासाठी आले आहेत.बाबा सुखाचा वारसा देतात, परत अर्ध्याकल्पा नंतर रावण दुःखाचा श्राप देतात.भक्ती मार्गामध्ये भगवंताला शोधण्यासाठी खूप धक्के खातात,मिळत कोणालाही नाहीत.भारतवासी गायन करतात तुम्हीच मात पिता आहात,आम्ही आपले मुलं आहोत, परत म्हणतात तुम्ही जेव्हा याल तर आमचे तुम्ही एकच असणार,दुसरे कोणी नाही.बाकीच्या सोबत आम्ही ममत्व ठेवणार नाहीत.आमचे तर एकच शिवबाबा आहेत.तुम्ही जाणतात, हे शिव पिता गरीब निवाज आहेत.गरिबांना सावकार बनवणारे,कवडीतुल्य मनुष्यांना हिरे तुल्य बनवणारे आहेत,म्हणजेच कलयुगी पतित कंगाल पासून सतयुगी मुकुटधारी बनवण्यासाठी बाबा आले आहेत.तुम्ही मुलं जाणतात,आम्ही येथे बापदादांच्या जवळ आलो आहोत.हे दोघे एकत्र आहेत.शिवाची आत्मा पण यांच्यामध्ये पण आहे,ब्रह्मांची आत्मा पण आहे,तर दोन झाले ना. एक आत्मा आहे,दुसरी परमात्मा आहे.तुम्ही सर्व आत्मे आहात. गायन पण केले जाते,आत्मे परमात्मा वेगळे राहिले खूप काळ... प्रथम क्रमांका मध्ये भेटणारे तुम्ही आत्मेच आहात,म्हणजेच जे आत्मे आहेत,ते परमात्मा पित्याला भेटतात. ज्यांच्यासाठीच बोलवत राहतात,हे ईश्वर,हे पिता.तुम्ही त्यांची मुलं झाले ना.पित्याकडून जरूर वारसा मिळतो.बाबा म्हणतात भारत जो मुकुटधारी होता,तो आता खूप कंगाल गरीब बनला आहे.आता मी परत तुम्हा मुलांना मुकुटधारी बनवण्यासाठी आलो आहे.तुम्ही दुहेरी मुकुटधारी बनतात.एक मुकुट पवित्रतेचा असतो,त्यामध्ये प्रकाश दाखवतात.दुसरा रत्नजडित मुकुट असतो.तर प्रथम हे रहस्य सर्वांना समजावून सांगायचे आहे की, बापदादा एकत्र आहेत.हे ब्रह्मा भगवान नाहीत.मनुष्य भगवान असू शकत नाही.भगवान तर निराकारला च म्हटले जाते.ते पिता शांतीधामला राहणारे आहेत.जेथे तुम्ही सर्व आत्मे राहतात,ज्याला निर्वाण धाम किंवा वानप्रस्थ म्हटले जाते.परत तुम्हा आत्म्यांना शरीर धारण करून येथे भूमिका वठवायची आहे.अर्धा कल्प सुखाची भूमिका आहे आणि अर्धा कल्प दुःखाची आहे.जेव्हा दुःखाचा अंत होतो तेव्हा बाबा म्हणतात मी येतो.हे पूर्वनियोजित नाटक बनलेले आहे.तुम्ही मुलं येथे भट्टीमध्ये आले आहात.येथे मधुबनला आल्यानंतर,बाहेरच्या कोणाची आठवण यायला नको.येथे मात पिता आणि मुलं आहेत आणि येथे शूद्र संप्रदाय नाहीत.जर ब्राह्मण नाहीत,त्यांना शूद्र म्हटले जाते. त्यांचा संग तर येथे नाही.येथे तर ब्राह्मणांचा संग आहे.ब्राह्मण मुलं जाणतात की,शिवबाबा ब्रह्माद्वारे आम्हाला नरकापासून सोडवून स्वर्गाच्या राजधानीचे मालक बनवण्यासाठी आले आहेत.आता आम्ही मालक नाहीत कारण आम्ही पतित आहोत.आम्ही पावन होतो परत ८४चे चक्र घेऊन सतो,रजो,तमो मध्ये आलो आहोत. शिडी मध्ये 84 जन्माचा हिशोब लिहिलेला आहे.बाबा सन्मुख मुलांना समजवतात.ज्या मुलांना प्रथम भेटतात,परत त्यांनाच प्रथम सतयुगा मध्ये यायचे आहे.तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत.रचनाकार आणि रचनेचे सर्व ज्ञान,हे एका बाबां कडेच आहे.तेच मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. जरूर बीजा मध्येच ज्ञान असेल ना, या झाडाची कशी उत्पत्ती,पालना आणि विनाश होतो.हे तर बाबाच समजवतात. तुम्ही आत्ता जाणतात,आम्ही भारतवासी गरीब आहोत.जेव्हा देवी देवता होते,तर खूप सावकार होते.हिऱ्या सोबत खेळत होते.हिऱ्यांच्या राजवाड्यात राहत होते.आता बाबा स्मृती देतात की,तुम्ही कसे ८४ जन्म घेतात. बाबांना बोलवतात की,हे पतित-पावन, गरीब निवाज या. आम्हा गरिबांना स्वर्गाचे मालक, परत बनवा.स्वर्गामध्ये खूप सुख होते,आता तर खूप दुःखं आहेत.मुलं जाणतात,या वेळेत सर्व पूर्णपणे पतीत बनले आहेत.आता कलियुगाचा अंत आहे,परत सतयुग असायला हवे.प्रथम भारतामध्ये एकच आदी सनातन देवी देवता धर्म होता,आता तो प्रायलोप म्हणजे नष्ट झाला आहे,त्यामुळे सर्व स्वतःला हिंदू म्हणतात.या वेळेत ख्रिश्चन खूप झाले आहेत कारण हिंदू धर्माचे धर्मांतरित झाले आहेत.तुम्हा देवी-देवतांचे वास्तविक कर्म श्रेष्ठ होते.तुम्ही पवित्र प्रवृत्ती मार्गाचे होते.आता रावण राज्यांमध्ये पतित प्रवृत्ती मार्गाचे बनले आहात म्हणून दुःखी बनले आहात.सतयुगाला शिवालय म्हटले जाते,बाबांचा स्थापन केलेला स्वर्ग.बाबा म्हणतात मी येऊन तुम्हा मुलांना शूद्रा पासून ब्राह्मण बनवून तुम्हाला सुर्यावांशी चंद्रवंशी राजधानीचा वारसा देतो. हे बाप दादा आहेत,यांना विसरू नका.शिवबाबा ब्रह्मा द्वारा आम्हाला स्वर्गाचे लायक बनवत आहेत, कारण पतित आत्मा तर मुक्तिधाम मध्ये जाऊ शकत नाहीत,जोपर्यंत पावन बनत नाहीत.आता बाबा म्हणतात मी येऊन तुम्हाला पावन बनवण्याचा रस्ता सांगतो.मी येऊन तुम्हाला पदमपती स्वर्गाचे मालक बनवून गेलो होतो,बरोबर तुम्हाला स्मृती आली आहे की,आम्ही स्वर्गाचे मालक होतो,त्या वेळेस खूप थोडे मनुष्य होते,आता तर असंख्य मनुष्य झाले आहेत,परत सतयुगामध्ये नऊ लाख असतात.तर बाबा म्हणतात मी येऊन स्वर्गाची स्थापना आणि शंकराद्वारे विनाश करतो. सर्वजण कल्पापुर्वी प्रमाणे तयारी करत आहेत.अनेक बॉम्स बनवत राहतात.पाच हजार वर्षांपूर्वी पण,ही महाभारत लढाई लागली होती.भगवंतानी येऊन, राजयोग शिकवून,मनुष्याला नरापासून नारायण बनवले होते.तर जरुर कलियुगी जुन्या दुनिया चा विनाश व्हायला पाहिजे.सर्व भंबोरला म्हणजे विश्वाला आग लागेल, नाहीतर विनाश कसा होईल. आज-काल बाॅम्बस मध्ये पण अग्नी भरत राहतात.मुसळधार पाऊस, भूकंप इत्यादी सर्व होतील तेव्हाच विनाश होईल.जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना होते.हे संगम युग आहे. रावण राज्य मुर्दाबाद होऊन रामराज्य जिंदाबाद होईल.नवीन दुनिये मध्ये कृष्णाचे राज्य होते. लक्ष्मीनारायण च्या ऐवजी कृष्णाचे नाव घेत राहतात,कारण कृष्ण सुंदर आहे,सर्वात प्रिय मुलगा आहे. मनुष्यांना ते माहीत नाही की,कृष्ण वेगळ्या राजधानीचे आणि राधे वेगळ्या राजधानीची होते.भारत मुकुटधारी होता.आता तर गरीब आहे,परत बाबा येऊन मुकटधारी बनवतात.आता बाबा म्हणतात पवित्र बनून माझीच आठवण करा, तर तुम्ही सतोप्रधान बनाल.परत जे सेवा करून आपल्यासारखे बनवतील,ते उच्चपद प्राप्त करतील, दुहेरी मुकुटधारी बनतील. सतयुगामध्ये राजाराणी आणि प्रजा सर्व पवित्र राहतात.आता तर प्रजेचे राज्य आहे.दोन्ही ताज नाहीत. बाबा म्हणतात जेव्हा अशी परिस्थिती होते,तेव्हा मी येतो.आता मी तुम्हा मुलांना राजयोग शिकवत आहे.मीच पतितपावन आहे.आता तुम्ही माझी आठवण करा,तर तुमच्या आत्म्या मधून भेसळ निघून जाईल,परत सतोप्रधान बनाल.आत्ता श्याम पासून सुंदर बनायचे आहे.सोन्यामध्ये भेसळ झाल्यामुळेच काळे पडते म्हणून आता भेसळ काढून टाकायची आहे.बेहद्दचे बाबा म्हणतात,तुम्ही काम चितेवर बसून काळे झाले आहात,आत्ता ज्ञान चितेवर बसा आणि सर्वांपासून महत्व काढून टाका.तुम्ही मज साजनाच्या सजनी आहात.भक्त तर सर्व भगवंताची आठवण करतात. सतयुग त्रेतामध्ये भक्ती नसते.तेथे तर ज्ञानाचे प्रारब्ध आहे.बाबा येऊन ज्ञानाद्वारे रात्रीला दिवस बनवतात.असे नाही ग्रंथ इत्यादी मुळे दिवस होईल.ती सर्व भक्तिमार्गाची सामग्री आहे. ज्ञानसागर पतित-पावन एकच बाबा आहेत,ते येऊन सृष्टिचक्राचे ज्ञान मुलांना समजवतात आणि योग शिकवतात.ईश्वराच्या सोबत योग लावणारे योग योगेश्वर आणि परत राजराजेश्वर राजराजेश्वरी बनतात. तुम्ही ईश्वराद्वारा राजांचे राजा बनतात.जे पावन राजे होते,तेच परत पतित बनतात.तुम्हीच पुज्य आणि परत तुम्हीच पुजारी बनतात. आत्ता जेवढे शक्य होईल तेवढे आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे.जसे साजन सजनीची आठवण करते ना.जसे कन्याचा साखरपुडा झाल्यानंतर,एक दोघांची आठवण करत राहतात.आता हे जे साजन आहेत,त्यांच्या तर खूप सजनी भक्तिमार्गा मध्ये आहेत. दुःखामध्ये सर्व ईश्वराची आठवण करतात,हे भगवान दुःख दूर करा, सुख द्या.येथे तर न शांती आहे,न सुख आहे.सतयुगा मध्ये दोन्ही आहेत.

आता तुम्ही जाणतात आम्ही आत्मे कसे ८४जन्माची भूमिका वठवतो. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इत्यादी बनतो.८४ ची शिडी बुद्धीमध्ये आहे ना.आता जितके शक्य होईल, तेवढी बाबांची आठवण करा,तर पाप नष्ट होतील.कर्म करतअसताना बुद्धीमध्ये बाबांची आठवण राहावी. बाबा द्वारे आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत.बाबा आणि वारशाची आठवण करायची आहे,आठवणी द्वारेच पाप नष्ट होतात.जेवढी आठवण कराल,तेवढा पवित्रतेचा प्रकाश येत राहील,भेसळ निघून जाईल.मुलांनी जेवढे शक्य होईल, तेवढा वेळ काढून आठवण करण्यासाठी उपाय शोधायचा आहे. पहाटेची वेळ चांगली असते.हा पुरुषार्थ करायचा आहे.खुशाल ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहा,मुलांची संभाळ करा परंतु हा अंतिम जन्म पवित्र बना,काम चितेवर चढू नका. आता तुम्ही ज्ञानचिते वरती बसले आहात.हे राजयोगाचे शिक्षण खूपच उच्च आहे, यासाठी बुद्धी रुपी भांडे सोन्याचे पाहिजे.तुम्ही बाबांची आठवण केल्यामुळे सोन्याचे भांडे बनतात.आठवण विसरल्यामुळे लोखंडाचे भांडे बनतात.बाबांची आठवण केल्यामुळे स्वर्गाचे मालक बनतात.हे तर खूप सहज आहे.यामध्ये पवित्रता मुख्य आहे.आठवणीनेच पवित्र बनाल आणि सृष्टिचक्राची आठवण केल्यामुळेच स्वर्गाचे मालक बनाल. आम्हाला घरदार सोडायचे नाही, ग्रहस्थ व्यवहारांमध्ये पण राहायचे आहे.बाबा म्हणतात ६३ जन्म तुम्ही पतित दुनिये मध्ये राहिले,आता शिवालया अमरलोक मध्ये जाण्यासाठी तुम्ही एक जन्म पवित्र राहिले,तर काय झाले.पाच विकाराला जिंकायचे आहे,तेव्हाच जगतजीत बनाल,नाहीतर श्रेष्ठ पद कसे मिळवू शकाल.बाबा म्हणतात मरायचे तर सर्वांनाच आहे, हा अंतिम जन्म आहे,परत तुम्ही जाऊन नवीन दुनिया मध्ये राज्य कराल.हिर रत्नांच्या खाणी भरपूर होतील.तेथे तुम्ही हिरे रत्ना बरोबर खेळत राहणार.तर अशा बाबांचे बनून त्यांच्या मतावर चालायला पाहिजे ना.श्रीमता द्वारेच तुम्ही श्रेष्ठ बनाल. रावणाच्या मताद्वारे तुम्ही भ्रष्टाचारी बनले आहात.आता बाबाच्या श्रीमता वर चालून तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे.बाबांची आठवण करायची आहे,बाकी कोणतेच कष्ट नाहीत.भक्तिमार्ग मध्ये तुम्ही खूप धक्के खाल्ले,आता फक्त बाबांची आठवण करा आणि सृष्टीचक्राची आठवण करा.स्वदर्शन चक्रधारी बना,तर तुम्ही २१ जन्मासाठी चक्रवर्ती राजा बनाल.अनेक वेळेस तुम्ही राज्य घेतले आहे आणि गमावले आहे.अर्धा कल्प सुख आणि अर्धाकल्प दुःख आहे.बाबा म्हणतात, मी कल्प-कल्प संगम युगामध्येच येतो.तुम्हाला सुखधामचे आमचे मालक बनवतो.आता तुम्हाला स्मृती आले आहे,की आम्ही कसे चक्र लावतो.हे चक्र बुद्धीमध्ये ठेवायचे आहे.शिव बाबा ज्ञानाचे सागर आहेत.तुम्ही इथे समोर बसले आहात.उच्च ते उच्च भगवान,प्रजापिता ब्रह्मा द्वारा तुम्हाला वारसा देत आहेत.तर आता विनाश होण्याच्या पूर्वी बाबांची आठवण करा आणि पवित्र बना.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) निरंतर बाबाच्या आठवणी मध्ये राहण्यासाठी,बुद्धीला सोन्याचे भांडे बनवायचे आहे.कर्म करत बाबांची आठवण राहावी, आठवणी द्वारेच पवित्रतेचा प्रकाश येईल.

(२) मुरली कधी चुकवायची नाही. नाटकाच्या रहस्याला अर्थ सहीत समजायचे आहे.योग भट्टीमध्ये बाहेरचे काहीच आठवणीत यायला नको.

वरदान:-
स्वता:वरती बापदादांना कुर्बान करणारे,त्यागमूर्ती निश्चय बुद्धी भव.

बाबा मिळाले सर्व काही मिळाले, याच नशेमध्ये राहून,सर्व काही त्याग करणारे,ज्ञान स्वरूप निश्चयबुद्धी मुलं, बाबा द्वारा जेव्हा खुशी,शांती, शक्ती किंवा सुखाची अनुभूती करतात,तर लोक लाज इत्यादीची काळजी न करता,नेहमी प्रगती करत राहतात.त्यांना दुनियाचे सर्व काही तुच्छ,असार अनुभव होतो. असे त्यागमूर्ती निश्चय बुद्धी मुलांवर बापदादा,आपल्या सर्व संपत्ती सहीत बळी,कुर्बान जातात.जसे मुलं संकल्प करतात,बाबा आम्ही आपले आहोत,तर बाबा पण म्हणतात,जे बाबांचे ते सर्व तुमचे आहे.

बोधवाक्य:-
सहजयोगी तेच आहेत, जे आपल्या प्रत्येक संकल्प किंवा कर्माद्वारे बाबांच्या स्नेहाचे प्रकंपन वातावरणात पसरवत राहतात.