06-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही महावीर आहात,तुम्हाला मायेच्या वादळाला घाबरायचे नाही,एका बाबां
शिवाय दुसऱ्या कोणाची काळजी न करता, पवित्र जरूर बनायचे आहे"
प्रश्न:-
मुलांमध्ये
कोणती हिम्मत असेल,तर खूप उच्चपद प्राप्त करू शकतात?
उत्तर:-
श्रीमतावरती चालून पवित्र बनवण्याची हिम्मत हवी.जरी कितीही गोंधळ(हंगामा) झाला,
त्रास सहन करावा लागला,परंतु बाबांनी जी पवित्र बनण्याची श्रेष्ठ मत दिली
आहे,त्यावरती निरंतर चालत राहिल्याने,खूप उच्च पद मिळू शकते.कोणत्याही गोष्टी मध्ये
घाबरायचे नाही.काहीही झाले, तरीही नवीन काहीच नाही.
गीत:-
भोलेनाथ पेक्षा
श्रेष्ठ कोणीही नाही….
ओम शांती।
हे भक्तिमार्गाचे गीत आहे,ज्ञान मार्गामध्ये गीत इत्यादीची काहीच आवश्यकता
नाही.कारण गायन आहे,बाबांकडून आम्हाला बेहद्दचा वारसा मिळत आहे.जी भक्तिमार्ग मध्ये
परंपरा आहे,ती ज्ञानात होऊ शकत नाही.मुलं कविता इत्यादी दुसऱ्यांना ऐकवण्यासाठी
बनवतात,त्याचा अर्थ पण तुम्ही जोपर्यंत समजावत नाही,तोपर्यंत कोणी समजू शकणार
नाही.आता तुम्हा मुलांना बाबा मिळाले आहेत,तर आनंदाचा पारा चढायला पाहिजे.बाबांनी
८४ जन्माच्या चक्राचे ज्ञान पण ऐकवले आहे.तर आनंद व्हायला पाहिजे की आम्ही आता
स्वदर्शन चक्रधारी बनलो आहोत.बाबा कडून विष्णुपुरी चा वारसा घेत आहोत.
निश्चयबुद्धीच विजयंती बनतील. ज्यांना निश्चय आहे,ते तर सतयुगात येतीलच.तर मुलांना
खूप खुशी राहायला पाहिजे,पित्याचे अनुकरण करायला हवे.मुलं जाणतात निराकार शिवबाबांनी
ज्या वेळेपासून, यांच्यामध्ये प्रवेश केला आहे, तर खूप हंगामा,गोंधळ झाला
आहे.पवित्रते वरती खूप भांडणं होतात.मुलं मोठी होतात तर म्हणतात,लग्न
करा.लग्नाशिवाय काम कसे चालेल.जरी मनुष्य गीतेचा अभ्यास करतात परंतु त्याद्वारे
काहीच समजत नाहीत. सर्वात जास्त बाबांना अभ्यास होता, एक दिवसपण गीता वाचल्याशिवाय
राहत नव्हते.जेव्हा माहीत झाले की,गीतेचे भगवान शिव आहेत,तेव्हा नशा चढला की,आम्ही
तर विश्वाचे मालक बनत आहोत.हे तर शिवभगवानुवाच आहे परत पवित्रते वरती पण खूप गोंधळ
झाला.यामध्ये बहादुरी पाहिजे ना. तुम्ही महावीर महावीरनी आहात. एका शिवाय कोणाची
काळजी करायची नाही.पुरुष रचनाकार आहेत,रचनाकार स्वतः पावन बनत आहेत,तर रचनेला पण
पावन बनवतात.याच गोष्टीवर खूप भांडणं होतात,मोठ-मोठ्या घरा मधून निघून
येतात.कोणाचीही काळजी करायची नाही.ज्यांच्या भाग्यामध्ये नाही,ते कसे समजतील.पवित्र
राहायचे आहे तर राहा,नाहीतर जाऊन आपला प्रबंध करा,इतकी हिंमत पाहिजे ना.बाबा च्या
समोर खूप हंगामे झाले.बाबांना कधी दुःख झाले का?अमेरिका पर्यंत वर्तमानपत्रांमध्ये
गेले,हे पण नवीन काहीच नाही.हे तर कल्पा पूर्वीसारखेच होत आहे,यामध्ये घाबरण्याची
गोष्ट नाही.आम्हाला तर आपल्या पित्याकडून वारसा घ्यायचा आहे.आपल्या रचनेला पण
विकारापासून वाचवायचे आहे. बाबा जाणतात सारी रचना या वेळेत पतित आहे.मलाच सर्वांना
पावन बनवायचे आहे.सर्वजण बोलवतात,हे पतित-पावन, मुक्तिदाता या,तर त्यांना सुद्धा दया
येते. दयावान आहेत ना.तर बाबा समजतात मुलांनो,कोणत्या गोष्टींना घाबरू
नका,घाबरल्यामुळे श्रेष्ठ पद मिळू शकणार नाही.मातावरती अत्याचार होतात,हे पण लक्षणं
आहेत,द्रौपदीला नग्न करत होते. बाबा तर २१ जन्मासाठी नग्न होण्यापासून म्हणजे विकारी
होण्यापासून वाचवतात.दुनिया या गोष्टीला जाणत नाहीत,त्यामुळे पतित तमोप्रधान जुनी
सृष्टी तर बनायची च आहे.प्रत्येक गोष्ट नवीन परत जुनी जरुर होते.जुन्या घराला
सोडावेच लागते.नवीन दुनिया स्वर्णिम होती, जुनी दुनिया तर लोहयुगी आहे,नेहमी असेच
राहू शकत नाही.तुम्ही मुलं जाणतात हे सृष्टिचक्र आहे.देवी-देवतांच्या राज्यांची परत
स्थापना होत आहे.बाबा पण म्हणतात,परत तुम्हाला गीता ज्ञान देत आहे.रावण राज्यांमध्ये
तर दुःखच दुःख आहे. रामराज्य कशाला म्हटले जाते,हे पण कोणी समजत नाहीत.बाबा
म्हणतात,मी स्वर्ग किंवा रामराज्याची स्थापना करण्यासाठी आलो आहे.तुम्हा मुलांनी
अनेक वेळेस राज्य केले आहे आणि परत गमावले आहे.हे सर्वांच्या बुद्धीमध्ये आहे.२१
जन्म सतयुग त्रेतामध्ये असतात,त्याला म्हटले जाते एकवीस पिढी म्हणजे जेव्हा
वृद्धावस्था होते, तेव्हाच शरीर सोडतात.अकाली मृत्यू कधीच होत नाही.आता तुम्ही जसे
त्रिकालदर्शी बनले आहात. तुम्ही जाणतात बाबा कोण आहेत? मंदिरं खूप बनवले आहेत.मूर्ती
तर घरांमध्ये पण ठेवू शकतात परंतु भक्तिमार्गाची पूर्वनियोजित नाटकांमध्ये नोंद
आहे.बुध्दीने काम घेतले जाते ना. कृष्णाची किंवा शिवाची मूर्ती तर घरी पण ठेवू
शकतात.गोष्ट तर एकच आहे,इतके दूर का जातात?कारण त्यांच्याजवळ जाण्यामुळे कृष्णपुरी
चा वारसा मिळेल.आता तुम्ही जाणतात,जन्म जन्मांतर आम्ही भक्ती करत आलो आहोत.रावण
राज्याचा दिखावा खूप आहे.हा तर अंतकाळातील दिखावा आहे.हे रामराज्या मध्ये होते,तेथे
विमान इत्यादी सर्व होते,परत हे सर्व गायब झाले,परत या वेळेत सर्व निघाले आहेत.आता
हे सर्व शिकत आहेत. जे शिकणारे आहेत,ते संस्कार घेऊन जातील.तेथे येऊन परत विमान
बनवतील.भविष्यामध्ये तुम्हाला सुख देणाऱ्या गोष्टी आहेत. हे विज्ञान परत
स्वर्गामध्ये पण कामाला येईल.आता हे विज्ञान दुःखासाठी आहे,परत तेथे सुखासाठीच
असेल.आता स्थापन होत आहे.बाबा नवीन राजधानी स्थापन करतात,तर तुम्हा मुलांना महावीर
बनायचे आहे.दुनियेमध्ये थोडेच कोणी जाणतात की भगवान आले आहेत.
बाबा म्हणतात ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत,कमळ फुला सारखे पवित्र राहा,यामध्ये
घाबरण्याची गोष्टच नाही.जास्त काय करतील,निंदा करतील.निंदा तर या ब्रह्माची पण खूप
झाले आहे ना.कृष्णाची पण निंदा करतात,असे ग्रंथामध्ये दाखवले आहे.आता कृष्णाची तर
निंदा होऊ शकत नाही.निंदा तर कलियुगामध्ये करतात.तुमचे रूप जे आता आहे,ते परत
कल्पाच्या नंतर या वेळेत होईल,मध्येच कधी होऊ शकत नाही.जन्म जन्मांतर चेहरे बदलत
जातात,हे पण अविनाश नाटक बनलेले आहे.८४ जन्मामध्ये जी चेहरेपट्टी असेल,तीच परत
घेतील.आता तुम्ही जाणतात, हे चेहरे बदलून परत दुसऱ्या जन्म मध्ये आम्ही
लक्ष्मीनारायण सारखे बनू.तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे.ही नवीन गोष्ट आहे
ना.बाबा पण नवीन आणि गोष्टी पण नवीन आहेत.या गोष्टी कोणाला लवकर समजून येत
नाहीत.जेव्हा भाग्या मध्ये असेल,तेव्हा थोडेफार समजतील,बाकी महावीर त्यांनाच म्हटले
जाते,जे कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाहीत,अडोल राहतील.आता ती अवस्था होऊ शकणार
नाही,होणार जरूर आहे.महावीर कोणत्याही परिस्थितीशी घाबरणार नाहीत.ती अवस्था
अंतकाळात होईल,म्हणून गायन आहे,अतिंद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप गोष्टींना
विचारा.बाबा आले आहेत,तुम्हा मुलांना स्वर्गाचे लायक बनवण्यासाठी.कल्पा पूर्वी
सारखाच नरकाचा विनाश होणार आहे.सतयुगा मध्ये एकच धर्म असेल.त्यांची इच्छा असते की,
एकच धर्म असायला हवा.हे पण कोणाला माहित नाही की,राम राज्य रावण राज्य वेगवेगळे
आहे.आता बाबा मध्ये पूर्ण निश्चय आहे,तर श्रीमतावर चालावे लागेल.तर प्रत्येकाची नाडी
पाहिली जाते, त्यानुसार परत मत दिले जाते.ब्रह्मा बाबांनी पण मुलाला म्हटले,जर लग्न
करायचे असेल तर जाऊन करा,खूप मित्र संबंध इत्यादी बसले आहेत.ते तुमचे लग्न करून
देतील, परत कोणी ना कोणी निघतात.तर प्रत्येकाची नाडी पाहिली जाते.मुलं विचारतात,बाबा
ही परिस्थिती आहे, आम्ही पवित्र राहू इच्छितो परंतु आमचे संबंधी आम्हाला घरामधून
बाहेर काढतात,आता काय करावे? अरे हे पण का विचारतात?पवित्र तर राहायचे आहे.जर
पवित्र राहू शकत नाहीत,तर जाऊन लग्न करा. जर समजा कोणाचा साखरपुडा झाला असेल,खुश
करायचे आहे, तर हरकत नाही.लग्न जेव्हा होते, तेव्हा म्हणतात ना,पती तुमचा गुरु
आहे.अच्छा तुम्ही त्यांच्याकडून लिहून घ्या,तुम्ही मानता ना,मी तुमचा गुरु ईश्वर
आहे.अच्छा आता मी आदेश देतो की,पवित्र राहायचे आहे.हिम्मत पाहिजे ना.लक्ष खूप उच्च
आहे,प्राप्ती पण खूप जबरदस्त आहे.काम विकाराची आग तेव्हाच लागते,जेव्हा प्राप्तीची
माहिती नाही.बाबा म्हणतात इतकी, मोठी प्राप्ती होते,तर जरूर एक जन्म पवित्र राहीले
तर काय मोठी गोष्ट आहे.मी तुमचा पती ईश्वर आहे,माझी आज्ञा आहे पवित्र राहावे
लागेल.बाबा युक्ती तर खूप सांगतात.भारतामध्ये हा कायदा आहे,पत्नीला म्हणतात,पती
तुमचा ईश्र्वर आहे,त्यांच्या आज्ञे मध्ये राहायचे आहे.पतीचे पाय चोपायचे आहेत,कारण
समजतात लक्ष्मीने पण नारायणचे पाय चोपले होते.ही परंपरा कोठून निघाली?भक्ती
मार्गातील चित्रा पासून घेतली आहे. सतयुगामध्ये तर अशा गोष्टी होत नाहीत.नारायण कधी
थकतील का? जे लक्ष्मी कडून पाय चोपून घ्यावे लागतील.सतयुगामध्ये तर अशी गोष्टच
नसते.थकण्याची तर गोष्ट नसते,ही तर दुःखाची गोष्ट झाली ना.तेथे दुःख दर्द कोठून
आले.तेव्हा बाबांनी त्या फोटोमधून, लक्ष्मीचे पाय चोपत असल्याचे चित्र काढून
टाकले.नशा राहतो ना.बाबांना लहानपणापासूनच वैराग्य राहत होते,म्हणून भक्ती पण खूप
करत होते.तर बाबा युक्ती पण सांगत राहतात.तुम्ही जाणतात आम्ही एक बाबांची मुलं
आहोत.तर आपसामध्ये भाऊ-बहीण झाले ना.आजोबा कडून वारसा घेत आहोत.बाबांना बोलवतातच
पतित दुनियेमध्ये या.हे पतित पावन,सर्व सीतांचे राम.बाबांना सत्य म्हटले जाते,ते
सत्य खंड स्थापन करणारे आहेत ना.ते सर्व सृष्टीच्या आदी मध्य अंताचे सत्य ज्ञान
देतात. तुमची आत्मा पण आता सागरा सारखी बनत आहे.
गोड मुलांनी खूप हिम्मत ठेवायला पाहिजे.आम्हाला बाबाच्या श्रीमतावरती चालायचे
आहे.बेहद्दचे बाबा,स्वर्गाचे मालक बनवतात,तर पुरुषार्थ करुन पूर्ण वारस घ्यायचा
आहे.बळी जायचे आहे.तुम्ही त्यांना आपले वारस बनवाल,तर ते तुम्हाला २१ जन्मासाठी
वारसा देतील.बाबा मुलांच्या वरती बळी जातात.मुलं म्हणतात हे तन-मन-धन सर्व आपले आहे.
आता बाबा तर पिता पण आहेत, तर मुलगा पण आहे.गायन पण आहे,त्वमेव माताश्च:पिता त्वमेव.
एकच महिमा खूप जबरदस्त आहे. त्यांना म्हटले जाते सर्वांचे दुखहर्ता
सुखकर्ता.सतयुगामध्ये पाच तत्त्व पण सुख देणारे असतात,कलियुगा मध्ये पाच तत्व पण
तमोप्रधान असल्यामुळे दुःख देतात.तेथे तर सुखच आहे.हे नाटक पुर्वनियोजीत आहे.तुम्ही
जाणतात,ही तीच पाच हजार वर्षा पूर्वीची लढाई आहे. आता स्वर्गाची स्थापना होत आहे,
तर मुलांना नेहमी खुशी मध्ये राहायला पाहिजे.भगवंतांनी तुम्हाला दत्तक घेतले
आहे,तुम्हा मुलांचा बाबा श्रुंगार पण करत राहतात,राजयोग पण शिकवतात. अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांपूर्वी भेटलेल्या, मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) नेहमी बाप
समान बनण्याची हिंमत ठेवायची आहे.बाबा वरती पूर्ण बळी जायचे आहे.
(२) कोणत्या गोष्टींमध्ये घाबरायचे नाही.पवित्र जरूर बनायचे आहे.
वरदान:-
नेहमी दया आणि
कल्याणाच्या दृष्टी द्वारे विश्वाची सेवा करणारे विश्व परिवर्तक भव.
विश्व परिवर्तक किंवा
विश्व सेवाधारी यांचे मुख्य लक्षण आहे,ते दया आणि कल्याणाच्या दृष्टी द्वारे
विश्वाला,संपन्न व सुखी बनवणे.जी अप्राप्त वस्तू आहे,ईश्वरीय सुख, शांती आणि ज्ञान
धनाद्वारे,सर्व शक्तीद्वारे,सर्व आत्म्यांना भिकारी पासून अधिकारी बनवणे.असे
सेवाधारीच आपला प्रत्येक सेकंद सफल करुन,सबंध संपर्क सेवा मध्येच लावतात.त्यांचे
पाहणे, चालणे,खाणे,सर्वांमध्ये सेवा सामावलेली राहते.
बोधवाक्य:-
मान शानचा
त्याग करून,आपल्या वेळेला सेवांमध्ये सफल करणेच,परोपकारी बनणे आहे.
मातेश्वरीजीं चे
अनमोल महावाक्य:-
परमार्थ द्वारे व्यवहार स्वतः सिद्ध होतो भावानुवाच माझ्या द्वारे परम अर्थाला
जाणल्यामुळे परमपदाची प्राप्ती करतात,अर्थात परमात्मा जाणल्यामुळे व्यवहार स्वता:
सिद्ध होतो.तुम्ही पहा,देवतांच्या पुढे प्रकृती तर चरणांची दासी होऊन राहते,हे पाच
तत्व सुखरूप बनून, मन इश्चित सेवा करतात.या वेळेत तर पाहा,मन इच्छित सुख न
मिळाल्यामुळेच मनुष्याला दुःख अशांती प्राप्त होत राहते. सतयुगामध्ये ही प्रकृती
व्यवस्थित राहते.देवतांच्या चित्रांमध्ये पण खूप हिरे रत्न लावलेले असतात,तर
प्रत्यक्षात ते चैतन्य मध्ये असतील तर त्या वेळेस किती वैभव असेल.या वेळेत मनुष्य
भूक मरतात आणि जड चित्रावरती करोडो रुपये खर्च करत राहतात, तर हा फरक झाला ना.जर
त्यांनी असे श्रेष्ठ कर्म केले असेल,तेव्हा त्यांचे स्मृतिस्थळ,मंदिर इत्यादी
बनवलेले आहेत.त्यांचे पूजन पण खूप होत राहते.ते निर्विकारी प्रवृत्ती मध्ये
राहत,कमळफुल समान अवस्थांमध्ये राहतात,परंतु आता तर निर्विकारी प्रवृत्तीच्या ऐवजी
विकारी प्रवृत्ती मध्ये चालले जातात, ज्यामुळे सर्व परमार्थाला विसरून व्यवहाराकडे
लागले आहेत,म्हणून त्याचा परिणाम उलटा येत आहे. आता स्वतः परमात्मा येऊन, विकारी
प्रवृत्ती मधून काढून, निर्विकारी प्रवृत्ती शिकवतात, ज्याद्वारे आपले जीवन
नेहमीसाठी सुखी बनते,म्हणून प्रथम परमार्थ नंतर व्यवहार पाहिजे.परमार्थामध्ये
राहिल्यामुळे व्यवहार आपोआप प्रसिद्ध होतो.