26-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- संगमयुगावर तुम्हाला नवे आणि निराळे ज्ञान मिळत आहे,तुम्ही जाणत आहात
आम्ही सर्व आत्मे अभिनेता आहोत एकाचा अभिनय दुसऱ्या सारखा असू शकत नाही"
प्रश्न:-
मायेवर विजय
मिळवण्यासाठी तुम्हा आत्मिक योद्ध्यांना (क्षत्रियांना) कोणती युक्ती मिळाली आहे?
उत्तर:-
हे आत्मिक क्षत्रिय,तुम्ही सदैव श्रीमतावर चालत राहा. आत्म-अभिमानी बनून बाबांची
आठवण करा,रोज सकाळी- सकाळी उठून आठवणीमध्ये राहण्याचा अभ्यास करा तर मायेवर विजय
प्राप्त करू शकाल.उल्ट्या-सुल्ट्या संकल्पांपासून वाचाल.आठवणीची गोड युक्ती मायाजीत
बनवेल.
गीत:-
जिसका साथी है
भगवान....
ओम शांती।
हे मनुष्यांनी बनवलेले गीत आहेत.यांचा अर्थ कुणी काहीच जाणत नाही.भक्त लोक गीत भजन
इ.गातात,महिमा करतात परंतु जाणत काहीच नाहीत.महिमा खूप करतात.तुम्हा मुलांना काही
महिमा करायची गरज नाही.मुले पित्याची कधी महिमा करत नाहीत.पिता जाणतो ही माझी मुले
आहेत. मुले जाणतात हा आमचा पिता आहे.ही आता बेहद ची गोष्ट आहे.तरी ही सर्वजण बेहद
च्या पित्याची आठवण करतात. आत्तापर्यंत ही आठवण करत राहतात.ईश्वराला म्हणतात-हे
बाबा,त्यांचे नाव शिवबाबा आहे. जसे आम्ही आत्मे आहोत तसे शिवबाबा आहेत.तो परमात्मा
आहे,ज्याला सुप्रीम म्हटले जाते,त्यांची आम्ही मुले आहोत. त्यांना सुप्रीम सोल (परमआत्मा)
म्हटले जाते.त्यांचे निवासस्थान कुठे आहे?परमधाम मध्ये.सर्व आत्मे तिथे
राहतात.आत्माच अभिनय करत आहे.तुम्ही जाणता नाटकामध्ये कलाकार क्रमवार
असतात.प्रत्येकाच्या अभिनया नुसार त्यांना पगार मिळतो.सर्व आत्मे जे तिथे
राहतात,सर्व अभिनेता आहेत, परंतु क्रमवार सर्वांना अभिनय मिळाला आहे.आत्मिक पिता
बसून समजावत आहे की आत्म्यामध्ये कशाप्रकारे अविनाशी अभिनय नोंदला गेला आहे.सर्व
आत्म्यांचा अभिनय एक सारखा असू शकत नाही. सर्वांमध्ये एक सारखी ताकत नाही.तुम्ही
जाणत आहात की सर्वात चांगला अभिनय त्यांचा आहे जे प्रथम शिवाच्या रुद्र माळे मध्ये
आहेत.नाटकामध्ये जे खूप चांगले-चांगले कलाकार असतात त्यांची किती महिमा होते.फक्त
त्यांना पाहण्यासाठी सुद्धा लोक जातात.हे तर बेहद चे नाटक आहे.या बेहदच्या
नाटकांमध्ये सुद्धा उंच एक पिता आहे.उंच ते उंच अभिनेता, रचनाकार,दिग्दर्शक असेही
म्हणू शकतो ते सर्व हदचे अभिनेता,दिग्दर्शक इ.आहेत. त्यांनासुद्धा आपला छोटा अभिनय
मिळाला आहे.आत्मा अभिनय करते परंतु देह- अभिमाना मुळे असे म्हणतात की मनुष्याचा असा
अभिनय आहे. बाबा म्हणतात अभिनय सारा आत्म्याचा आहे.आत्म-अभिमानी बनावे लागते.बाबांनी
समजावले आहे सतयुगामध्ये आत्म- अभिमानी असतात.बाबांना जाणत नाहीत.इथे कलियुगामध्ये
तर आत्म-अभिमानी ही नाहीत आणि बाबांनाही जाणत नाहीत. आता तुम्ही आत्म-अभिमानी बनत
आहात.बाबांनाही जाणत आहात.
तुम्हा ब्राह्मणांना वेगळे ज्ञान मिळत आहे.तुम्ही आत्म्याला जाणले आहे की आम्ही
सर्व आत्मे अभिनेता आहोत.सर्वांना अभिनय मिळाला आहे,जो एकाचा दुसऱ्या सारखा असू शकत
नाही.तो अभिनय सर्व आत्म्यांमध्ये आहे.तसे पाहीले तर जे नाटक बनवतात तो सुद्धा
अभिनय आत्माच धारण करते. चांगला अभिनय सुद्धा आत्माच करते.आत्माच म्हणते मी
गव्हर्नर आहे,आमका आहे.परंतु आत्म- अभिमानी बनत नाहीत. सतयुगामध्ये समजतील की मी
आत्मा आहे.एक शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे.परमात्म्याला तिथे कोणीही जाणत नाही
यावेळी तुम्ही सर्व काही जाणत आहात.शूद्र आणि देवतांपेक्षाही तुम्ही ब्राह्मण उत्तम
आहात.एवढे भरपूर ब्राह्मण कुठून येतील,जे बनतील.प्रदर्शनीमध्ये लाखो येतात.जो
चांगल्या प्रकारे समजून घेईल,ज्ञान ऐकेल तो प्रजा बनेल. एका-एका राजाची खूप प्रजा
असते.तुम्ही खूप प्रजा बनवत आहात.प्रदर्शनी,प्रोजेक्टर मूळे काहीजण समजून चांगलेही
बनतील.शिकतील,योग लावतील. ते आता निघत जातील.प्रजा ही निघेल नंतर साहूकार,राजा-राणी,
गरीब इ.सर्व निघतील.राजकुमार- राजकुमारी अनेक असतात.सतयुगापासुन त्रेतायुगा पर्यंतचे
राजकुमार-राजकुमारी बनणार आहेत.फक्त 8 किंवा 108 तर असणार नाही.परंतु आता सर्व बनत
आहेत.तुम्ही सेवा करत राहता.हे सुद्धा नवीन नाही.तुम्ही काही कार्यक्रम घेतला
होता,हीसुद्धा नवीन गोष्ट नाही. अनेक वेळा केले आहे नंतर संगमयुगावर हाच धंदा कराल
आणखी काय कराल!बाबा पतीतांना पावन बनवण्यासाठी येतात.याला दुनियेचा इतिहास-भूगोल असे
म्हटले जाते.क्रमवार तर प्रत्येक गोष्टीमध्ये असतातच. तुमच्यामध्ये जे चांगले भाषण
करतात तर सर्वजण म्हणतील की यांनी खूप चांगले भाषण केले. दुसऱ्याचे ऐकले तरीही
म्हणतील की पहिल्यांदा यांनी सांगितले ते चांगले समजावत होते.तिसरा नंतर
त्याहीपेक्षा चांगला असेल तर म्हणतील की हा तर त्यांच्या पेक्षाही चांगला
आहे.प्रत्येक गोष्टींमध्ये पुरुषार्थ करावा लागतो की आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे कसे
जावे.जे हुशार असतात ते भाषण करण्यासाठी लगेच हात वरती करतील.तुम्ही सर्व पुरुषार्थी
आहात,पुढे जाऊन तुम्ही प्रशिक्षित बनाल.ज्याप्रमाणे मम्मा स्पेशल प्रशिक्षिका होती
ना. बाबांविषयी तर माहिती पडू शकत नाही कारण की दोघे एकत्र आहेत.तुम्ही समजू शकणार
नाही की कोण सांगत आहे.तुम्ही सदैव समजा की शिवबाबा समजावत आहेत.बाप आणि दादा दोघेही
जाणतात परंतु ते अंतर्यामी आहेत.बाहेरून म्हणतात हे तर खूप हुशार आहेत.बाबा सुद्धा
महिमा ऐकून खुश होतात. लौकिक पित्याचाही एखादा मुलगा चांगल्या प्रकारे शिकून उच्चपद
प्राप्त करतो तेव्हा पिता समजतो की हा मुलगा चांगले नाव कमावेल.हे सुद्धा समजतात कि
आमका मुलगा या आत्मिक सेवेमध्ये हुशार आहे.मुख्य तर भाषण आहे,कोणाला बाबांचा संदेश
देणे,समजावून सांगणे. बाबांनी उदाहरण सुद्धा सांगितले होते की कोणाला 5 मुले होती
तर कोणी तरी विचारले की तुम्हाला किती मुले आहेत तर म्हणाला की दोन मुले
आहेत.म्हणाला तुम्हाला तर 5 मुले आहेत! म्हणाला सुपुत्र(चांगली) दोन आहेत.इथे सुद्धा
असे आहे.मुले तर अनेक आहेत.बाबा म्हणतात की ही डॉक्टर निर्मला मुलगी खूप चांगली
आहे.खूप प्रेमाने लौकिक पित्याला समजावून सेंटर खोलले आहे.ही भारताची सेवा आहे.
तुम्ही भारताला स्वर्ग बनवत आहात.या भारताला नर्क रावणाने बनवला आहे.एक सीता कैद मधे
नव्हती परंतु तुम्ही सर्व सीता रावणाच्या कैद मध्ये होता. बाकी ग्रथामध्ये सर्व
दंतकथा आहेत.हा भक्तिमार्ग सुद्धा नाटकांमध्ये आहे.तुम्ही जाणता सतयुगापासुन जे काही
होऊन गेले आहे ते पुन्हा पुनरावृत्त होणार आहे.स्वतःच पूज्य स्वतःच पुजारी
बनतात.बाबा म्हणतात मला येऊन पुजारी पासून पूज्य बनवायचे आहे.सुरुवातीला स्वर्णिम
युगामध्ये नंतर लोखंडाच्या दुनियेमध्ये जायचे आहे.सतयुगामध्ये सूर्यवंशी
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. रामराज्य तर चंद्रवंशी होते.
यावेळी तुम्ही सर्व आत्मे क्षत्रिय (योद्धे) आहात.लढाईच्या मैदानामध्ये येणाऱ्यांना
क्षत्रिय म्हटले जाते.तुम्ही आहात आत्मिक क्षत्रिय.बाकी ते आहेत शारीरिक
क्षत्रिय.त्यांना म्हटले जाते शारीरिक बळाने युद्ध करणे. सुरुवातीला मल्लयुद्ध होत
होते. आपसा मधे लढत होते नंतर विजय मिळवत होते.आता तर पहा बॉम्ब इ.बनवले आहेत.
तुम्हीसुद्धा क्षत्रिय आहात,ते सुद्धा क्षत्रिय आहेत.तुम्ही श्रीमतावर मायेवर विजय
मिळवत आहात. तुम्ही आत्मिक क्षत्रिय आहात. आत्मे या शरीराच्या कर्मेंद्रिया द्वारे
सर्व काही करत आहेत. आत्म्याला बाबा येऊन शिकवत आहेत-मुला,माझी आठवण केल्याने माया
खाणार नाही.तुझे विकर्म विनाश होतील आणि तुला उलटेसुलटे संकल्प येणार नाहीत. बाबांची
आठवण केल्याने खुशी पण होईल म्हणूनच बाबा समजावत आहेत की सकाळी उठून अभ्यास करा.बाबा
तुम्ही किती गोड आहात.आत्मा म्हणते-बाबा.बाबांनी परिचय दिला आहे-मी तुमचा पिता आहे,
तुम्हाला सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान सांगण्यासाठी आलो आहे.हे मनुष्य सृष्टीचे
उलटे झाड आहे. ही विविध धर्माची मनुष्य सृष्टी आहे,याला विराट लीला असे म्हटले
जाते.बाबांनी समजावले आहे की या मनुष्य झाडाचा मी बीजरूप आहे.माझी आठवण करतात.कोण
कोणत्या झाडाचे आहे,कोण कोणत्या झाडाचे आहे.नंतर क्रमवार निघतात.हे नाटक बनले
आहे.मान्यता आहे की आमक्याने धर्मसंस्थापक पैगंबरला पाठवले.परंतु तिथून पाठवले जात
नाही.हे नाटका नुसार पुनरावृत्त होत आहे.हे एकच आहेत जे धर्म आणि राजधानी स्थापन
करत आहेत.हे दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. आता संगम आहे.विनाशाची ज्वाळा प्रज्वलित
होणार आहे.हा शिवबाबांचा ज्ञान यज्ञ आहे. त्यांनी रुद्र नाव ठेवले आहे. प्रजापिता
ब्रह्मा द्वारे तुम्ही ब्राह्मण जन्माला आले आहात.तुम्ही उच्च आहात ना.नंतर अजून
पिढ्या वाढत राहतात.खरे पाहता सर्व ब्रह्माची मुले आहात.ब्रह्मा ला म्हटले जाते
ग्रेट ग्रेट ग्रँड फादर (आजोबा पंजोबा)पिढी आहे सुरुवातीला ब्रह्मा उच्च नंतर पिढी
वाढत जाते.असे म्हणतात ईश्वर सृष्टी कसा रचतो.रचायची तर आहे. जेव्हा ते पतित होतात
तेव्हा त्यांना बोलावतात.तेच येऊन दुःखी सृष्टीला सुखी बनवतात म्हणूनच बोलावतात बाबा
दुखहर्ता सुखकर्ता ये.हरिद्वार नाव ठेवले आहे.हरिद्वार अर्थात हरीचे द्वार.तिथे गंगा
वाहते.असे समजतात आम्ही आंघोळ केल्याने हरीच्या द्वार मध्ये निघून जाऊ.परंतु हरी चे
द्वार आहे कुठे?नंतर ते कृष्णाला म्हणतात.हरीचे द्वार तर शिवबाबा आहे.दुख हर्ता सुख
कर्ता.प्रथम तुम्हाला आपल्या घरी जायचे आहे.तुम्हा मुलांना आपल्या पित्या विषयी आणि
घराविषयी आता माहित पडले आहे.बाबांची गादी थोडी उच्च आहे.फुल वरती आहे नंतर युगल
दाना (जोडमणी) त्याहीपेक्षा खाली.नंतर रुद्र माळा असे म्हणतात.रुद्र माळा सो
विष्णूची माळा.विष्णूच्या गळ्यातला हार तेच नंतर विष्णुपुरी मध्ये राज्य
करतात.ब्राह्मणांची माळा नाही कारण की घडी-घडी तुटून पडतात.बाबा समजावतात की
क्रमवार तर आहेत ना.आज ठीक आहेत उद्या वादळ येते,ग्रहचारी आल्यामुळे थंड पडतात.बाबा
म्हणतात की माझे बनतात, आश्चर्याने ज्ञान ऐकतात,इतरांना सांगतात,ध्यानामध्ये जातात,
माळेमध्ये गुंफले जातात..... नंतर एकदम पळून जातात,चांडाळ बनतात.नंतर माळा कशी बनेल?
तर बाबा समजावतात की ब्राह्मणांची माळा बनत नाही. भक्त माळा वेगळी आहे,रुद्र माळा
वेगळी आहे.भक्त माळेमध्ये मुख्य आहे स्त्रियांमध्ये मीरा आणि पुरुषांमध्ये नारद.ही
आहे रुद्र माळा.संगमयुगावर बाबाच येऊन मुक्ती-जीवनमुक्ती देत आहेत. मुले समजत आहेत
की आम्हीच स्वर्गाचे मालक होतो.आता नरकामध्ये आहोत.बाबा म्हणतात की नरकाला लाथ
मारा,स्वर्गाची बादशाही घ्या,जी तुमची रावणाने हिसकावून घेतली आहे.हे तर बाबाच येऊन
सांगत आहेत.ते या सर्व शास्त्र,तीर्थ इ.ना जाणत आहेत.बीजरूप आहे ना.ज्ञानाचा
सागर,शांतीचा सागर.....हे आत्मा म्हणत आहे.
बाबा समजावत आहेत की हे लक्ष्मी-नारायण सतयुगाचे मालक होते.त्यांच्या अगोदर काय होते?
अवश्य कलियुगाचा अंत असेल तेव्हाच संगमयुग झाले असेल नंतर आता स्वर्ग बनत आहे.
बाबांना स्वर्गाचा रचयिता म्हटले जाते,स्वर्ग स्थापन करणारा.हे लक्ष्मी-नारायण
स्वर्गाचे मालक होते.यांना वारसा कुठून मिळाला?स्वर्गाचा रचता बाबांकडून.बाबांचा हा
वारसा आहे.तुम्ही कोणालाही विचारू शकता की या लक्ष्मी- नारायणाला सतयुगाची राजधानी
होती.कशी घेतली?कोणी सांगू शकणार नाही.हा दादा सुद्धा म्हणत होता की मी जाणत
नव्हतो.पूजा करत होतो परंतु जाणत नव्हतो.आता बाबांनी समजावले आहे-हे संगमयुगावर
राजयोग शिकत आहेत.गीते मध्येच राजयोगा चे वर्णन आहे. गीते शिवाय इतर कोणत्याही
शास्त्रांमध्ये राजयोगाची गोष्ट नाही.बाबा म्हणतात की मी तुम्हाला राजांचाही राजा
बनवत आहे.ईश्वरानेच येऊन नरापासून नारायण बनण्याचे ज्ञान दिले आहे.भारताचे मुख्य
शास्त्र आहे गीता.गीता केव्हा रचली गेली,हे कोणीही जाणत नाही.बाबा म्हणतात
कल्प-कल्प संगमावर येतो.ज्यांना राज्य दिले होते ते राज्य गमावून नंतर तमोप्रधान
दुखी बनले आहेत.रावणाचे राज्य आहे.संपूर्ण भारताचीच कहाणी आहे.भारत ऑलराउंड (पूर्ण
चक्र लावणारा) आहे इतर सर्व नंतर येतात.बाबा म्हणतात तुम्हाला 84 जन्माचे रहस्य
सांगत आहे.5 हजार वर्षापूर्वी तुम्ही देवी-देवता होते,तुम्ही आपल्या जन्मानां जाणत
नाही,हे भारतवासीयांनो! बाबा अंत काळामध्ये येतात. सुरूवातीला आले तर आदि अंताचे
ज्ञान कसे सांगणार! सृष्टीची वाढच झालेली नाहीतर समजावणार कसे?तिथे तर ज्ञानाची
गरजच नाही.बाबा आता संगमा वरच ज्ञान देत आहेत. नॉलेजफुल (ज्ञानसंपन्न)आहे ना. अवश्य
ज्ञान सांगण्यासाठी अंता मध्ये यावे लागते.आदि मध्ये तुम्हाला काय सांगणार!या
समजण्याच्या गोष्टी आहेत.भगवानुवाच की मी तुम्हाला राजयोग शिकवत आहे. ही पांडव
शासनाची यूनिवर्सिटी आहे.आता आहे संगम-यादव, कौरव आणि पांडव त्यांनी बसून सेना
दाखवली आहे.बाबा समजावत आहेत यादव,कौरव विनाशकाले विपरीत बुद्धि.एक दुसऱ्या विषयी
वाईट बोलत राहतात.बाबांवर प्रेम नाही.असे म्हणतात की कुत्रा-मांजर सर्वांमध्ये
परमात्मा आहे.बाकी पांडवांची प्रीत बुद्धी होती. पांडवांचा साथी स्वयं परमात्मा
होता.पांडव म्हणजे आत्मिक पंडे.ते आहेत शारीरिक पंडे,तुम्ही आहात आत्मिक पंडे.अच्छा!
गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1.
आत्म-अभिमानी बनून या बेहदच्या नाटकामध्ये हिरोचा अभिनय करायचा आहे.प्रत्येक
अभिनेत्याचा अभिनय आपला- आपला आहे म्हणून कोणाच्याही अभिनयाशी ईर्षा करायची नाही.
2. सकाळी-सकाळी उठून स्वतःच स्वतःशी बोलायचे आहे, अभ्यास करायचा आहे-मी या शरीराच्या
कर्मेन्द्रियां पासून वेगळी आहे,बाबा तुम्ही किती गोड आहात,तुम्ही आम्हाला
सृष्टीच्या आदी-मध्य-अंताचे ज्ञान देत आहात.
वरदान:-
सदैव
देह-अभिमान व देहाच्या दुर्गंधा पासून दूर राहणारे इंद्रप्रस्थ निवासी भव
असे म्हणतात
इंद्रप्रस्थ मध्ये पऱ्यांच्या शिवाय इतर कोणीही मनुष्य निवास करू शकत नाही.मनुष्य
अर्थात जे स्वतःला आत्मा न समजता देह समजतात.तर देह- अभिमान आणि देहाची जुनी
दुनिया,जुन्या संबंधांपासून सदैव वरती उडत राहतात.जराही मनुष्य-पणाची दुर्गंध असायला
नको.देही-अभिमानी स्थिती मध्ये रहा,ज्ञान आणि योगाचे पंख मजबूत असायला हवे तेव्हाच
म्हणू इंद्रप्रस्थ निवासी.
बोधवाक्य:-
आपल्या
तन-मन-धनाला सफल करणारे किंवा सर्व खजान्यांना वाढवणारेच समजदार आहेत.