28-02-21 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
10.11.87 ओम शान्ति
मधुबन
शुभ चिंतक मणी बनून
विश्वाला चिंतेपासून मुक्त करा.
आज रत्नाकर पिता
आपल्या चारही बाजूच्या विशेष शुभचिंतक मण्यांना पाहत आहेत . रत्नाकर पित्याचे मणी
विश्वात आपल्या शुभचिंतक किरणांनी प्रकाश पसरवत आहेत, कारण आज या कृत्रिम चमक
असणाऱ्या विश्वात सर्व आत्मे चिंतामणी (चिंताग्रस्त )आहेत .अशा क्षणिक चमकणाऱ्या
चिंताग्रस्तांना तुम्ही शुभचिंतक मणी आपल्या शुभ चिंतनाच्या शक्तीद्वारे परिवर्तन
करत आहात. ज्याप्रमाणे सूर्याची किरणे दूरवरचा अंधार संपवतात, त्याप्रमाणे तुम्ही
शुभचिंतक मणी आपल्या शुभ संकल्प रुपी प्रकाशाने वा किरणांनी विश्वाच्या चारही
दिशांना प्रकाशित करत आहात . आजकाल अनेक आत्म्यांना असे वाटते की ,एखादा दैवी
प्रकाश गुप्त रूपाने आपले कार्य करत आहे , परंतु हे कार्य कोठून केले जात आहे हे
त्यांना समजत नाही. 'कुणी तरी आहे ' येथपर्यंत जाणीव होत आहे . शेवटी शोधत शोधत
स्थानावर पोहोचतीलचं .ही जाणीव तुम्हा शुभचिंतक मण्यांच्या श्रेष्ठ संकल्पाची चमक
आहे .बापदादा प्रत्येक मुलाच्या मस्तका द्वारे मण्यांची चमक पाहत आहेत, कारण
क्रमांकानुसार चमकणारी आहेत .सगळेच शुभचिंतक मणी आहेत परंतु क्रमांकानुसार.
शुभचिंतक बनणे ही सहज मन्सा सेवा आहे ,जी चालता-फिरता प्रत्येक ब्राह्मण आत्मा
अज्ञानी आत्म्यां प्रति सहज करू शकतात . तुम्ही सर्वांच्या शुभ चिंतक बनण्यासाठीच्या
कंपनांच्या वातावरणाला वा चिंताग्रस्त आत्म्यांच्या वृत्तीला खूप सहज परिवर्तन कराल.
आजच्या मनुष्य आत्म्यांच्या जीवनामध्ये चारही बाजूंनी मग खुशाल ,व्यक्ती द्वारे वा
वैभवा द्वारे व्यक्तीमध्ये स्वार्थाच्या कारणांनी, वैभवाच्या अल्पकालीन प्राप्तीच्या
कारणाने ,थोड्या काळासाठी श्रेष्ठ प्राप्तीची अनुभूती होते ,परंतु अल्प काळाचा आनंद
थोड्या वेळात चिंतेत बदलतो , म्हणजेच वैभव किंवा व्यक्ती चिंता संपणाऱ्या नसून
उत्पन्न करण्याच्या निमित्त बनतात , अशा कोणत्या न कोणत्या चिंतेमध्ये व्याकूळ
असणाऱ्या आत्म्यांना शुभचिंतक खूपच थोडे दिसत असतात . शुभचिंतक आत्म्यांचा थोड्या
वेळेसाठीचा संपर्क देखील अनेक चिंता मिटविण्याचा आधार बनतो. आज विश्वाला शुभचिंतक
आत्म्याची आवश्यकता आहे , म्हणून तुम्ही शुभचिंतक मणी विश्वाला अतिप्रिय आहात.जेव्हा
संपर्कात येतात तेव्हा अनुभव करतात की ,असे शुभचिंतक दुनियेत दिसत नाहीत.
सदैव शुभचिंतक राहण्याचा विशेष आधार शुभ चिंतन आहे ,ज्याचे सदैव शुभचिंतन राहते तो
अवश्य शुभचिंतक आहे. जर कधीकधी व्यर्थ चिंतन किंवा परचिंतन होत असेल तर तो सदैव
शुभचिंतक राहू शकत नाही.शुभचिंतक आत्मा इतरांच्याही व्यर्थ चिंतनाला समाप्त करत
असतात, तर प्रत्येक श्रेष्ठ सेवाधारी म्हणजेच सदा शुभचिंतकांच्या शुभ चिंतनाचा
शक्तिशाली खजाना सदैव भरपूर राहील.भरपूर असल्यामुळेच इतरांच्या प्रति शुभ चिंतक बनू
शकतात. शुभचिंतक म्हणजे सर्व ज्ञान रत्नांनी भरपूर आणि असा ज्ञानसंपन्न दाता बनुन
इतरांप्रति सदैव शुभचिंतक बनू शकतात . तर तपासा की दिवसभरात किती वेळ शुभचिंतन चालते
, कि परचिंतन? शुभचिंतन सदैव आपल्या संपन्नतेच्या नशेमध्ये राहत असते.त्यामुळे
शुभचिंतक स्वरूपाद्वारे दुसऱ्यां प्रति देत जातो आणि स्वतः भरत राहतो . पर चिंतन आणि
व्यर्थ चिंता करणारे नेहमी रिकामे असल्याने स्वतःला कमजोर अनुभव करतात, त्यामुळे
शुभचिंतक बनून इतरांना देण्याच्या पात्र बनत नाहीत . वर्तमान काळात सर्वांची चिंता
मिटविण्याच्या निमित्त बनणारी शुभचिंतक मण्यांची आवश्यकता आहे ,जे चिंतेच्या ऐवजी
शुभ चिंतनाच्या विधीचे अनुभवी बनवतील ,जेथे शुभचिंतन असेल तिथे चिंता स्वतः समाप्त
होईल, तेव्हा सदैव शुभचिंतक बणून गुप्त सेवा करत आहात ना?
हे जे विश्व सेवेचे नियोजन केले आहे या नियोजनाला सहज यशस्वी बनविण्याचा आधार देखील
शुभचिंतक स्थिती आहे . विविध प्रकारचे आत्मे संबंध संपर्कात येतील. अशा आत्म्यां
प्रति शुभचिंतक बनणे म्हणजेच त्या आत्म्यांना हिंमतीची पंख देणे आहे, कारण सर्व
आत्मे चिंतेच्या चितेवर असल्यामुळे आपले हिम्मत- उमंग -उत्साहाचे पंख कमजोर केले आहे
. तुम्हा शुभचिंतक आत्म्यांची शुभ भावना त्यांच्या पंखामध्ये शक्ती भरेल, आणि
तुमच्या शुभ चिंतक भावनांच्या आधारे उडु लागतील म्हणजेच सहयोगी बनतील नाहीतर, नाराज
होतात की , सुखमय संसाराची निर्मिती करण्याची आमच्यात काय ताकत आहे ? जे स्वतःला
बनवू शकत नाहीत ते विश्वाला काय बनवणार ? विश्वाला बदलविणे खूप कठीण समजतात कारण
वर्तमानात सर्व सत्तांचा परिणाम पाहात आहेत, त्यामुळे अवघड वाटते . अशा कमजोर
आत्म्यांना , चिंतेच्या चितेवर बसलेल्या आत्म्यांना ,तुमची शुभचिंतक शक्ती आनंदित
करेल . ज्याप्रमाणे बुडणाऱ्याला काडीचा आधार आनंदित करतो , हिंमत देतो ,तेव्हा तुमची
शुभचिंतक स्थिती त्यांचा आधार होईल. चिंतेच्या चितेवर जळणाऱ्या आत्म्यांना
शितलतेच्या जलाचा अनुभव येईल.
सर्वांचा सहयोग प्राप्त करण्याचा आधार देखील शुभचिंतक स्थिती आहे, जो सर्वांप्रती
शुभचिंतक आहे त्यांना सर्वांकडून स्वतः सहयोग प्राप्त होतो .शुभचिंतक भावना
इतरांच्या मनामध्ये सहयोगाची भावना सहज आणि स्वतः उत्पन्न करेल . शुभचिंतक आत्म्यां
प्रति प्रत्येकाच्या मनामध्ये स्नेह उत्पन्न होत असतो आणि स्नेहच सहयोगी बनवतो. जेथे
स्नेह असतो, तेथे वेळ, संपत्ती ,सहयोग नेहमीच समर्पित होण्यासाठी तयार होत असतात.
तेव्हा शुभचिंतक स्नेही बनवेल आणि स्नेह सगळ्या प्रकारच्या सहयोगाने समर्पित बनवेल
म्हणून, सदैव शुभ चिंतनाने संपन्न रहा, शुभचिंतक बनून सर्वांना स्नेही सहयोगी बनवा.
शुभचिंतक आत्मा सर्वांच्या संतुष्टतेचे सहज प्रमाणपत्र घेऊ शकतो , शुभचिंतक सदैव
प्रसन्न व्यक्तिमत्त्वामध्ये राहू शकतात. विश्वा समोर विशेष व्यक्तिमत्व बनू शकतात.
अलीकडे महान व्यक्तीमत्व असणारे आत्मे फक्त प्रसिद्ध म्हणजेच नाव मोठे असते ,परंतु
तुम्ही आत्मिक व्यक्तीमत्व असणारी फक्त प्रसिद्धच नाही तर गायन सोबत पूजन योग्य
देखील बनतात. कोणत्याही मोठ्या धर्म क्षेत्रात, राज्य क्षेत्रात, विज्ञानाच्या
क्षेत्रात ,व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहेत, परंतू तुम्हा आत्मिक व्यक्तीमत्वा प्रमाणे
63 जन्म पूजनीय बनू शकले नाहीत. म्हणून ही शुभचिंतक बनण्याची विशेषता आहे. सगळ्यांना
जी आनंदाची, आधाराची, हिमतीच्या पंखांची ,उमंग उत्साहाची ,प्राप्ती होते या
प्राप्तीच्या आशीर्वादाने काही मुलं अधिकारी तर काही भक्त आत्मा बनतात, म्हणून अनेक
जन्मासाठी पूज्य बनतात, शुभचिंतक म्हणजे खूप काळासाठीचे पूज्य आत्मे ,म्हणून हे
विशाल कार्य सुरू करण्यासोबतच इतरही कार्यक्रम बनवतात, त्या सोबतच स्वतः प्रति
कार्यक्रम बनवा की:-
1) सदैव प्रत्येक आतम्या प्रति आणि अनेक प्रकारच्या भावनांचे परिवर्तन करून एक शुभ
चिंतक भावना सदैव ठेवाल.
2) सगळ्यांना स्वतःच्या पुढे ठेवण्याचा श्रेष्ठ सहयोग सदैव देत राहू.
3) सुखमय संसार अर्थ श्रेष्ठ विश्व बनवण्यासाठी सर्वांच्या प्रती श्रेष्ठ
कामनेद्वारे सहयोगी बनु .
4) सदैव व्यर्थ चिंतन, पर चिंतनाला समाप्त करून म्हणजेच भूतकाळातील बाबींना बिंदू
लावून, बिंदू म्हणजेच मणी बनुन सदैव विश्वाला, सर्वांना आपल्या श्रेष्ठ भावना ,श्रेष्ठ
कामना ,स्नेहाची भावना ,समर्थ बनवण्याच्या भावनांच्या किरणांनी प्रकाश देत राहू .
हा स्वतःचा कार्यक्रम सर्व कार्यक्रमाच्या यशाचा पाया आहे . या पायाला सदैव मजबूत
ठेवा , तर प्रत्यक्षतेचा आवाज स्वतः बुलंद होईल . समजलात ? सगळे कार्याच्या निमित्त
आहात ना? जेव्हा विश्वाला सहयोगी बनवतात ,तर पहिले तुम्ही निमित्त बनतात . छोटे,मोठे
,आजारी, आरोग्यदायी, महारथी, घोडेस्वार सगळे सहयोगी आहेत .प्यादे तर नाहीच .
सगळ्यांची करंगळी हवी आहे. प्रत्येक विटेचे महत्त्व आहे , कुणी पायाची वीट आहे ,
कुणी वरच्या भिंतीशी वीट आहे , परंतु एक एक वीट महत्त्वाची आहे ,तुम्ही सर्व समजतात
? आम्ही कार्यक्रम करत आहोत! वा समजतात की कार्यक्रम करणारे बनवतात , कार्यक्रम
बनविणार्यांचा कार्यक्रम आहे ,आमचा कार्यक्रम म्हणतात ना! तर बाप दादा मुलांच्या
विशाल कार्याला ,कार्यक्रमाला पाहून हर्षित होत आहेत .देश-विदेशात विशाल कार्याचा
उमंग उत्साह चांगला आहे ,प्रत्येक ब्राह्मण आत्म्यांमध्ये विश्वाच्या आत्म्यांसाठी
दयाभाव आहे की ,आपल्या सर्व भाऊ बहिणींनी पित्याच्या प्रत्यक्षतेचा आवाज ऐकला पाहिजे
की पिता आपले कार्य करत आहे. बाबांच्या जवळ यावे ,संबंधात यावे ,अधिकारी बनावे,
पूज्य देवता बनावे किंवा 33 करोड नावांचे गायन करणारे बनावे परंतु आवाज जरूर ऐकावा
. असा उमंग आहे ना? अजून ९ लाख झाले नाहीत. तर समजले ना ! आपला कार्यक्रम आहे ,आपलेपणाच,
आपल्या कार्यक्रमात आपले विश्व बनवेल. अच्छा!
आज 5 ठिकाणांहून आलेले आहात , त्रिवेणी म्हणतात ,परंतु पाच नद्या सागरा जवळ आलेल्या
आहेत, तर नदी आणि सागराचा हा मेळा श्रेष्ठ मेळा आहे . सर्व नवे-जुने आनंदाने नाचत
आहेत, जेव्हा निराशेतून आशा मिळते आणि आनंदी होतात जून्यांना देखील अचानक संधी
मिळाली आहे , तेव्हा अधिक आनंद होत आहे . विचार करत बसले होते ,माहित नाही केव्हा
भेटू ? आता भेटू हा विचार देखील केला नव्हता! केव्हाचा जेव्हा होतो तेव्हा आनंदाचा
अनुभव वेगळा असतो . अच्छा आज विदेशीना देखील विशेष याद प्यार देत आहेत . विशेष
सेवाधारी( जयंती बहीण )आली आहे ना ? विदेश सेवेसाठी पहिली निमित्त बनली आहे.
वृक्षाला पाहून बीजाची आठवण येते,बीजरूप परिवार विदेश सेवेसाठी निमित्त बनला आहे
तेव्हा निमित्त परिवाराला बाबा आठवण देत आहेत.
विदेशातील सर्व निमित्त बनलेले सेवाधारी मुलं सदैव पित्याला प्रत्यक्ष करण्याच्या
प्रयत्नांमध्ये उमंग उत्साहाने रात्रंदिवस झटत आहेत . त्यांना वारंवार हाच आवाज
कानात गुंजत आहे की विदेशातील बुलंद आवाजाने भारतात शिवपित्याला प्रत्यक्ष करावयाचे
आहे . हा आवाज सदैव सेवेसाठी पाऊल पुढे नेत राहील , विशेष सेवेच्या उमंग उत्साहाचे
कारण आहे, मनापासून असणारे प्रेम, स्नेह! प्रत्येक पावलागणिक , प्रत्येक क्षणाला ,
मुखामध्ये बाबा ! बाबा ! शब्द राहत असतो. जेव्हा काही पत्र किंवा भेट पाठवली जाईल
तेव्हा त्यात हृदयाचे चित्र नेहमीच बनवतात , त्याचे कारण आहे , हृदयात नेहमी
दिलाराम आहे . मन दिलं आणि मन घेतलं आहे . देण्या घेण्यामध्ये हुशार आहेत , त्यामुळे
प्रेमाचा व्यापार करणारी , हृदयापासून आठवण करणारी ,आपली निशाणी हृदयच पाठवत असतात,
आणि हीच हृदयाची आठवण हृदयस्थ स्नेह लांब असताना देखील अधिक जवळचा अनुभव करवत असतो
. भूमिका नसताना देखील अव्यक्त पालनेचा अनुभव चांगला करत आहेत . बाप आणि दादा
दोन्हींचा संबंध अनुभव करणा-याचं विशेषतेच्या कारणाने आपल्या या सफलते मध्ये खूप
सहजपणे पुढे जात आहेत. तेव्हा प्रत्येक देशवासी आपलं नाव पहिलं आहे असे समजतात का ?
प्रत्येक मुल आपलं नाव पहिलं आहे असे समजून बाप दादांची आठवण स्वीकार करावयाची आहे
.समजलात!
नियोजन तर बनवतच आहात . देश - विदेशात रीती मध्ये थोडेफार अंतर असते परंतु
प्रीतीच्या कारणांनी रीतीचे अंतर एकच वाटते . विदेशातील नियोजन किंवा भारतातील
नियोजन , नियोजन तर एकच आहे ना! फक्त पद्धत थोडीफार वेगळी असते . देश-विदेशातील हा
सहयोग या विशाल कार्याला नेहमीच यश प्राप्त करून देईल. यश तर सदैव मुलांच्या सोबत
आहे . देशातील उमंग उत्साह आणि विदेशातील उमंग उत्साह दोन्हींचे मिळून कार्याला पुढे
नेत आहे आणि सदैव पुढे नेत राहील. अच्छा!
भारताच्या चारही बाजूचे सदैव स्नेही , सहयोगी मुलांचा स्नेह, सहयोगचा शुभ संकल्प,
शुभ आवाज बाप दादांच्या जवळ सदैव पोहोचत असतो . देश-विदेश एकमेकांच्या पुढे आहेत.
प्रत्येक स्थानाची स्वतःची एक विशेषता आहे. भारत,शिव पित्याची अवतरण भूमी आहे , आणि
भारत प्रत्यक्षतेचा आवाज बुलंद करण्याच्या निमित्त बनलेली भूमी आहे . आदी आणि अंताची
भारतातच भूमिका आहे . विदेशाचा सहयोग भारतात प्रत्यक्षता घडवून आणेल , आणि भारताच्या
प्रत्यक्षतेचा आवाज विदेशा पर्यंत पोहोचेल म्हणून भारतातील मुलांची विशेषता सदैव
श्रेष्ठ आहे .भारतीय स्थापनेचे आधार मूर्त आहेत, त्यामुळे भारतवासी मुलांच्या
भाग्याचे सर्व गायन करतात . आठवण आणि सेवा मध्ये सदैव उमंग आणि उत्साहाने पुढे जात
आहेत , आणि पुढे जात राहतील, त्यामुळे भारताच्या प्रत्येक मुलाने आपापल्या नावाने
बाप दादांची आठवण स्विकारावयाची आहे .तर देश-विदेशातील बेहद पित्याचे बेहद सेवाधारी
मुलांना बाप दादांची आठवण आणि नमस्ते.
वरदान:-
सर्व आत्म्यांना शक्तींचे दान देणारे मास्टर बीजरूप भव.
अनेक भक्त आत्मा रुपी
पाने जे सुकून गेले आहेत त्यांना परत आपल्या बिजरूप स्थिती द्वारे शक्तींचे दान द्या.
त्यांना सर्व प्राप्ती करवण्याचा आधार आहे, तुमची 'इच्छा मातरम अविद्या ' स्थिती,
जेव्हा स्वतः 'इच्छा मात्रम अविद्या ' बनाल, तेव्हा इतर आत्म्यांची सर्व इच्छा
पूर्ण करू शकाल. 'इच्छा मात्रम विद्या ' म्हणजेच संपूर्ण शक्तिशाली बीजरूप स्थिती ,
तेव्हा मास्टर बीजरूप बनुन भक्तांचा आवाज ऐका, प्राप्ती करवुन द्या.
सुविचार:-
सदैव परम पित्याच्या
छत्रछायेमध्ये राहणे हे अलौकिक जीवनाच्या सुरक्षेचे साधन आहे.