09-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्ही आत्ता अमरलोक स्थापन करण्यासाठी निमित्त आहात,जेथे कोणतेही दुःख
किंवा पाप होणार नाही,ती निर्विकारी दुनिया आहे"
प्रश्न:-
ईश्वरीय
परिवाराचे आश्चर्यकारक नियोजन कोणते आहे?
उत्तर:-
ईश्वरीय परिवाराचे नियोजन आहे,"कुटुंब नियोजन करणे".एक सत्य धर्म स्थापन करून अनेक
धर्माचा विनाश करणे.मनुष्य कुटुंब नियोजन करण्यासाठी अनेक योजना बनवतात.बाबा
म्हणतात त्यांचे नियोजन चालू शकणार नाही, मीच नवीन दुनियेची स्थापना करतो,तर बाकी
सर्व आत्मे वरती, घरी चालले जातात.खूप थोडे आत्मे राहतात.
ओम शांती।
हे घर पण आहे आणि विद्यापीठ पण आहे आणि संस्था पण आहे.तुम्हा मुलांची आत्मा जाणते
की,शिवबाबा आहेत आणि आत्मे शाळीग्राम आहेत,ज्यांचे हे शरीर आहे,शरीर असे म्हणू शकत
नाही, माझी आत्मा.तर आत्मा म्हणते माझे शरीर,आत्मा अविनाशी असून,शरीर तर विनाशी आहे.
आता तुम्ही स्वतःला आत्मा समजतात,आमचे शिवबाबा आहेत, ते सर्वोच्च ईश्वरीय पिता आहेत.
आत्मा जाणते ते आपले सर्वोच्च पिता पण आहेत.सर्वोच्च शिक्षक पण आहेत आणि सर्वोच्च
गुरु पण आहेत.भक्तिमार्गा मध्ये बोलवतात हे ईश्वरीय पिता. मृत्यूच्या वेळेस पण
म्हणतात,हे भगवान,हे ईश्वर. सर्वजण बोलवत राहतात परंतु कोणाच्या बुद्धीमध्ये अर्थ
सहित बसत नाही.सर्व आत्म्यांचे पिता तर एकच आहेत,परत म्हटले जाते हे पतित पावन. तर
गुरु पण झाले ना. आम्हाला दुःखापासून मुक्त करून शांतीधाम मध्ये घेऊन चला,असे
म्हणतात,तर पिता पण झाले आणि परत पतित-पावन सद्गुरु पण झाले.परत सृष्टी चक्र कसे
फिरते, मनुष्य ८४ जन्म कसे घेतात,ते बेहद चा इतिहास भूगोल ऐकवतात, म्हणून शिक्षक पण
झाले.अज्ञान काळामध्ये पिता वेगळे,शिक्षक वेगळे आणि गुरु वेगळे असतात. हे तर शिक्षक
आणि गुरु एकच आहेत.खूप फरक आहे ना.बेहद्दचे बाबा,मुलांना बेहद्दचा वारसा देतात.ते
पण हद्दचा वारसा देतात. विश्वाचा इतिहास भूगोल तर कोणी जाणत नाहीत.हे कुणालाच माहीत
नाही की,लक्ष्मीनारायण ने राज्य कसे मिळवले, कितीवेळ राज्य केले,परत त्रेताच्या
राम-सीता ने किती वेळ राज्य केले,काहीच जाणत नाहीत.आता तुम्ही मुलं समजतात,बेहद्दचे
बाबा आम्हाला शिकवण्यासाठी आले आहेत,परत बाबा सद्गतीचा रस्ता सांगतात. तुम्ही ८४जन्म
घेत घेत पतित झाले आहात,आत्ता पावन बनायचे आहे. ही पतित तमोप्रधान दुनिया आहे.
प्रत्येक गोष्ट सतो,रजो,तमोगुणी मध्ये येते ना.सृष्टी आहे तीचे पण आयुष्य आहे.ही जी
सृष्टी आहे,ती नवीन पासून जुनी आणि जुन्या पासून परत नवीन होते.हे तर सर्वच
जाणतात.सतयुगामध्ये भारत होता, देवी-देवतांचे राज्य होते अच्छा, परत काय
झाले?त्यांनी पुनर्जन्म घेतला.सतोप्रधान पासून सतो,परत सतो पासून रजो,तमोगुणी आले.
इतके जन्म घेतले.भारतामध्ये पाच हजार वर्षांपूर्वी जेव्हा लक्ष्मीनारायणचे राज्य
होते,तेथे मनुष्यांचे सरासरी आयुष्य सव्वाशे ते दीडशे वर्षे होते,त्याला अमर लोक
म्हटले जाते.अकाली मृत्यू कधी होत नाही आणि हा मृत्यू लोक आहे.अमर लोक मध्ये मनुष्य
अमर राहतात,आयुष्य पण जास्त असते. सतयुगा मध्ये पवित्र ग्रहस्थ आश्रम होता,
निर्विकारी दुनिया म्हटले जाते.आता तर विकारी दुनिया आहे.आता तुम्ही मुलं
जाणतात,आम्ही शिवबाबाचे संतान आहोत.बाबा कडून वारसा मिळतो. हे दादा, हे
आजोबा,आजोबाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. ब्रह्माला प्रजापिता म्हटले जाते.आदी
देवी,आदी देव,आदम बिबी.ते निराकार ईश्वरीय पिता आहेत आणि हे प्रजापिता साकारी पिता
झाले.यांना आपले शरीर आहे, शिवबाबांना तर आपले शरीर नाही.तर तुम्हाला वारसा शिवबाबा
कडून ब्रह्मा द्वारे मिळतो. आजोबाच्या मिळकत तर पित्याद्वारे मिळते ना. शिवबाबा
कडून ब्रह्मा द्वारे, परत तुम्ही मनुष्या पासून देवता बनतात.मनुष्यापासून देवता
बनवण्यासाठी ईश्वराला वेळ लागत नाही….कोणी बनवले भगवंताने, ग्रंथांमध्ये पण महिमा
करतात ना,महिमा तर खूप आहे. जसे बाबा म्हणतात, ईश्वराची आठवण करा तर बादशाही तुमची
आहे. गुरुनानक पण म्हणतात,जप साहेब, तर सुख मिळेल.त्या निराकार अकाल मूर्त बाबांचीच
महिमा गातात.बाबा म्हणतात माझी आठवण करा,तर सुख मिळेल.आत्ता बाबांची च आठवण
करतात.लढाई पूर्ण होईल, परत लक्ष्मीनारायणच्या राज्यामध्ये एकच धर्म असेल.या
समजण्याच्या गोष्टी आहेत.भगवानुवाच,पतित पावन ज्ञानाचे सागर,भगवंतालाच म्हटले
जाते,तेच दुखहर्ता सुखकर्ता आहेत. जेव्हा आम्ही बाबांचे मुलं आहोत, तर जरूर आम्ही
सुखामध्ये पाहिजे.बरोबर भारतवासी सतयुगामध्ये होते,बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये
होते.आता तर सर्व आत्मे येथे येत आहेत,परत आम्ही जाऊन देवी-देवता बनू.स्वर्गामध्ये
भूमिका वठवू. ही जुनी दुनिया दुखधाम आहे.नवीन दुनिया सुखधाम आहे.घर जुने होते तर
त्यामध्ये उंदीर साप निघतात.ही दुनिया पण अशी आहे.या कल्पाचा कालावधी पाच हजार वर्ष
आहे. आता अंतकाळ आहे, गांधीजींची इच्छा होते की,नवीन दुनिया नवीन दिल्ली असायला
हवी,रामराज्य हवे परंतु हे तर बाबांचे काम आहे. देवतांच्या राज्यालाच रामराज्य
म्हणतात.नवीन दुनियेमध्ये जरूर लक्ष्मीनारायणाचे राज्य असेल. प्रथम तर राधे -कृष्ण
दोन्ही वेगवेगळ्या राजधानीचे होते,परत त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर लक्ष्मीनारायण
बनतात.जरूर यावेळेत श्रेष्ठ कर्म केले असतील. बाबा तुम्हाला कर्म,अकर्म,विकर्माची
गती समजवत आहेत.रावण राज्यांमध्ये मनुष्य,जे कर्म करतात ते कर्म, विकर्म
बनतात.सतयुगा मध्ये कर्म अकर्म बनतात.गीतेमध्ये पण आहे परंतु नाव बदलले आहे.हीच चूक
आहे.कृष्ण जयंती तर सतयुगात असते.शिव तर निराकार परमपिता आहेत.कृष्ण साकार मनुष्य
आहेत.प्रथम शिवजयंती असते,परत कृष्ण जयंती होते.भारतामध्येच साजरी करतात,शिवरात्री
म्हणतात.बाबा येऊन भारताला स्वर्गाचे राज्य देतात.शिवजयंतीच्या नंतर कृष्ण जयंती
असते,त्या नंतर राखी पौर्णिमा असते,कारण पवित्रता पाहिजे.जुन्या दुनियेचा विनाश पण
पाहिजे,परत लढाई लागते तर सर्व नष्ट होते.परत तुम्ही येऊन नवीन दुनिया मध्ये राज्य
करतात.तुम्ही या जुन्या मृत्यूलोकसाठी शिकत नाहीत.तुमचे शिक्षण नवीन दुनिया, अमर
लोकांसाठी आहे.असे तर कोणते कॉलेज नसते.आता बाबा म्हणतात त्या मृत्युलोकाचा अंत
आहे,म्हणून लवकर शिकून हुशार बनायचे आहे.ते पिता पण आहेत, पतित-पावन पण आहेत आणि
शिकवत पण आहेत.तर हे ईश्वर पित्याचे विद्यापीठ झाले. भगवानुवाच आहे ना.कृष्ण तर
सतयुगाचे राजकुमार आहेत.ते पण शिवबाबा पासून वारसा घेतात. यावेळेत सर्व भविष्यासाठी
वारसा घेत आहेत,परत जितके शिकाल तेवढा वारसा मिळेल,नाही शिकले तर पद कमी होईल.कुठे
पण राहा, अभ्यास करत राहा,मुरली तर परदेशात पण मिळू शकते.बाबा रोज समजवतत
राहतात,मुलांनो बाबाची आठवण करा,त्यामुळे तुमचे विकर्म विनाश होतील.आत्म्यामध्ये जी
भेसळ झाली आहे,ते निघून जाईल.आत्मा १००% पवित्र बनणार आहे.आत्ता तर अपवित्र
आहे.मनुष्य भक्ती तर खूप करत राहतात,तिर्थयात्रा इत्यादी साठी लाखो मनुष्य जातात.
हे तर जन्म जन्मांतर तर चालत आले आहे.अनेक मंदिर इत्यादी बनवत,कष्ट करत राहतात,तरीही
शिडी उतरत आलेले आहेत.आता तुम्ही जाणता,आम्ही चढती कला द्वारे सुखधाम मध्ये जात
आहोत, परत उतरायचे आहे,परत कला कमी होत जातात.नवीन घर दहा वर्षानंतर,जरुर त्याचा
भपका जरूर कमी होईल.तुम्ही नवीन दुनिया सतयुगा मध्ये होते.बाराशे पन्नास वर्षानंतर
रामराज्य झाले.आता तर अगदीच तमोप्रधान आहेत.असंख्य मनुष्य झाले आहेत.ही जुनी दुनिया
झाली आहे.ते लोक परत कुटुंब नियोजनासाठी अनेक नियोजन करत राहतात.किती संभ्रमित होत
राहतात.आम्ही लिहतो हे तर ईश्वर पित्याचे काम आहे.सतयुगामध्ये नऊ-दहा लाख मनुष्य
जाऊन राहतील,बाकी इतर सर्व आपल्या गोड घरी परमधाम मध्ये चालले जातील.हे ईश्वराचे
कुटुंब नियोजन आहे.एका धर्माची स्थापना आणि बाकी सर्व धर्माचा विनाश होतो.हे तर
शिवपिता आपले काम करत आहेत.मनुष्य म्हणतात विकारांमध्ये खुशाल जावा परंतु मुलं
व्हायला नकोत.असे करत करत काहीच होणार नाही.हे नियोजन तर आता शिवपित्याच्या हाता
मध्ये आहे.बाबा म्हणतात,मी दु:खधाम ला सुखधाम बनवण्यासाठी आलो आहे.प्रत्येक ५०००
वर्षानंतर मी येतो. कलियुगाच्या शेवटी व सतयुगाच्या सुरुवातीला येतो.आता संगम युग
आहे.जेव्हा पतित दुनियेपासून पावन दुनिया बनते.जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन
दुनियेची स्थापना,हे तर बाबांचे काम आहे.सतयुगा मध्ये तर एकच धर्म
होता.लक्ष्मीनारायण विश्वाचे मालक महाराजा महाराणी होते.हे पण तुम्हीच जाणतात.ही
माळ कोणाची बनलेली आहे,वरती फुल शिवबाबा आहेत परत युगलमणी ब्रह्मा-सरस्वती
आहेत,त्यांची ही माळ आहे,जी विश्वाला नरकापासून स्वर्ग,पतित पासून पावन बनवते.जे
सेवा करून जातात,त्यांची आठवण केली जाते.तर बाबा समजवतात हे सतयुगामध्ये पवित्र होते
ना.प्रवृत्ती मार्ग पवित्र होता,आता तर पतित आहे.गायन पण आहे की,पतित पावन या आणि
आम्हाला पावन बनवा.सतयुगा मध्ये अशाप्रकारे बोलवत नाहीत.सुखामध्ये कोणीही बाबांचे
स्मरण करत नाहीत, दुःखामध्ये सर्व स्मरण करतात. बाबाच मुक्तिदाता,दयावान आहेत, येऊन
सर्वांना मुक्ती जीवनमुक्ती देतात.त्यांनाच बोलवतात येऊन आम्हाला गोड घरी परमधामला
घेऊन चला.आता तर काहीच सुख नाही.हे प्रजाचे प्रजावरती राज्य आहे.सतयुगामध्ये तर
राजाराणी प्रजा सर्व असतात.बाबा सांगतात तुम्ही कसे विश्वाचे मालक बनतात. तेथे
तुमच्याजवळ खूप अगणित धन राहते.सोन्याच्या विटांनी घरं बनवत राहतात.मशीन द्वारे
सोन्याच्या विटा काढत राहतात. त्यामध्ये सजावट हिरे रत्नांची करत राहतात.द्वापरयुगा
मध्ये पण अनेक हिरे रत्न होते,ते सर्व लुटून घेऊन गेले.आता तर काहीच सोनं दिसून येत
नाही. हे पण अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे.बाबा म्हणतात मी प्रत्येक पाच हजार
वर्षानंतर येतो,जुन्या दुनियेच्या विनाशासाठी.हे एटॉमिक बॉम्स इत्यादी बनले आहेत,हे
विज्ञान आहे.बुद्धी द्वारे अशा गोष्टी काढत राहतात,ज्याद्वारे आपल्याच कुळाचा विनाश
करतात.हे काही ठेवण्यासाठी थोडेच बनवले आहेत. याची रंगीत तालीम होत राहते. जोपर्यंत
राजधानी स्थापन झाली नाही तोपर्यंत लढाई लागू शकत नाही.तयारी होत आहे,त्यासोबत
नैसर्गिक आपत्ती पण होईल.सतयुगा मध्ये इतके मनुष्य नसतात.
आता मुलांना या जुन्या दुनियेला विसरायचे आहे.बाकी गोड घर, स्वर्गाच्या बादशाही ची
आठवण करायची आहे.जसे नविन घर बनते तर परत बुध्दी मध्ये नवीन घराची आठवण येते ना.आता
नवीन दुनियाची स्थापना होत आहे.बाबा सर्वांची सद्गती दाता आहेत.सर्व आत्मे चालले
जातील,बाकी शरीर येथेच नष्ट होतील.बाबाच्या आठवणी द्वारे आत्मा पवित्र बनेल.पवित्र
जरुर बनायचे आहे, देवता पवित्र आहेत,त्यांच्यापुढे कधी बिडी तंबाखू इत्यादी ठेवले
जात नाही.ते वैष्णव आहेत,विष्णुपुरी म्हटले जाते.ती निर्विकार दुनिया आहे आणि ही
विकारी दुनिया आहे.आत्ता निर्विकार दुनिये मध्ये जायचे आहे.थोडा वेळ बाकी आहे. हे
तर स्वतः पण समजतात, ॲटॉमिक बाॅम्बस द्वारे सर्व नष्ट होईल.लढाई तर लागणारच आहे. असे
म्हणतात,आम्हाला कोणी प्रेरणा करत आहे,जे आम्ही विनाशी साहित्य बनवत आहोत.ते जाणतात
यामुळे आपल्याच कुळाचा विनाश होईल परंतु बनवल्या शिवाय राहू शकत नाहीत.शंकरा द्वारे
विनाशाची नोंद आहे.विनाश समोर आहे. ज्ञानयज्ञा द्वारे विनाश ज्वाला प्रज्वलित
होते.आता तुम्ही स्वर्गाचे मालक बनण्यासाठी शिकत आहात.ही जुनी दुनिया नष्ट होईल. हे
चक्र फिरत राहते,इतिहासाची पुनरावृत्ती जरूर होते.प्रथम आदी सनातन देवी देवता
धर्म,परत चंद्रवंशी क्षत्रिय धर्म,त्यानंतर इस्लामी बौद्धी आले परत जरूर प्रथम
क्रमांकचे येतील आणि सर्व विनाश होईल.तुम्हा मुलांना कोण शिकवत आहेत? निराकार शिव
बाबा,तेच शिक्षक सद्गुरु आहेत.ते येताच शिक्षण सुरु करतात म्हणून लिहिले आहे
शिवजयंती सो गीता जयंती.गीताजयंती सो श्रीकृष्ण जयंती.शिवबाबा सतयुगी दुनिया स्थापना
करतात.कृष्णपुरी सतयुगाला म्हटले जाते.आता तुम्हाला शिकवणारे कोणी साधुसंत मनुष्य
नाहीत.हे तर दुखहर्ता, सुखकर्ता, बेहद्दचे पिता आहेत. तुम्हाला २१ जन्मासाठी वारसा
देतात. विनाश तर होणारच आहे. यावेळेसाठीच म्हटले जाते,कोणाचे धन मातीमध्ये
राहील,कुणाचे राजा खाईल,कुणाचे चोर खाईल, चोरीचकारी पण खूप होईल.आग पण लागणार आहे.या
यज्ञामध्ये सर्व स्वाह होईल.आत्ता थोडी थोडी आग लागते,परत बंद होते.थोडा वेळ
आहे.सर्व आपसात लढतील.सोडवणारे कोणीच नसेल, रक्ताच्या नद्या वाहतील,त्यानंतर परत
दुधाच्या नदी वाहतील.याला काही कारण नसताना खूण म्हटले जाते.मुलांनी याचा
साक्षात्कार पण केला आहे,परत या डोळ्यांनी पाहाल.विनाशाच्या अगोदर बाबांची आठवण
करायची आहेत,तर तमोप्रधान पासून आत्मा सतोप्रधान बनेल.बाबा नवीन दुनिया ची स्थापना
करण्यासाठी तुम्हाला तयार करत आहेत.राजधानी पूर्ण स्थापन होईल,परत विनाश होईल,अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)विष्णुपुरी
मध्ये जाण्यासाठी स्वतःला लायक बनवायचे आहे.संपूर्ण पावन बनवायचे आहे.अशुद्ध खान
पानचा त्याग करायचा आहे. विनाशाच्या अगोदर आपले सर्व काही सफल करायचे आहे.
(२) लवकर राजयोगाचे शिक्षण घेऊन, हुशार बनायचे आहे.कोणते विकर्म व्हायला नको,याचे
ध्यान ठेवायचे आहे.
वरदान:-
त्याग आणि
तपस्या द्वारे सेवे मध्ये सफलता प्राप्त करणारे खरे सेवाधारी भव.
सेवेमध्ये सफलतेचे
मुख्य साधन त्याग आणि तपस्या आहे. त्याग म्हणजे मनसा संकल्पा द्वारे पण
त्याग.कोणत्या परिस्थितीमुळे मर्यादांमुळे मजबुरी मुळे त्याग करणे, हा काही त्याग
नाही परंतु ज्ञान स्वरूपा द्वारे,संकल्प द्वारे त्यागी बना आणि तपस्वी म्हणजे नेहमी
बाबाच्या प्रेमळ आठवणीमध्ये,शांतीच्या सागरामध्ये सामावलेले. असे सेवेमध्ये सफलता
प्राप्त करणारे खरे सेवाधारी आहेत.
बोधवाक्य:-
आपल्या तपस्या
द्वारे,शांतीचे प्रकंपन पसरवणेच विश्व सेवाधारी बनवणे होय.