04-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,ही कयामत म्हणजे विनाशाची वेळ आहे,रावणाने सर्वांना कब्रदाखल केले आहे,बाबा
अमृत वर्षा करून सोबत घेऊन जाण्यासाठी आले आहेत"
प्रश्न:-
शिवबाबांना
भोला भंडारी म्हटले जाते,का?
उत्तर:-
कारण भोलानाथ जेव्हा येतात,तर गणिका,अहिल्या,कुब्जा इत्यादींचे पण कल्याण करून
त्यांना विश्वाचे मालक बनवतात. बाबा पतित दुनिया मध्ये येतात आणि पतित शरीरांमध्ये
येतात,तर भोलेनाथ झाले ना.भोलेनाथ बाबा सूचना देतात, गोड मुलांनो,अमृत प्रशन करा,
विकार रुपी विषाला सोडा.
गीत:-
दूर देशाचे
राहणारे,आले परक्यांच्या देशांमध्ये…..
ओम शांती।
आत्मिक मुलांनी गीत ऐकले म्हणजे या शरीराच्या कानाद्वारे गीत ऐकले.दूर देशाचे
प्रवासी येतात,तुम्ही पण प्रवासी आहात ना.जे पण मनुष्य आहेत,ते सर्व प्रवासी
आहेत.आत्म्याचे कोणते घर नाही,आत्मा तर निराकार आहे.निराकारी दुनिया मध्ये
राहणारे,निराकारी आत्मे आहेत.त्यांना म्हटले जाते निराकारी आत्म्यांचे घर,देश किंवा
लोक,या दुनियेला जीव आत्म्यांचा देश म्हणले जाते.तो आत्म्यांचा देश आहे परत येथे
येऊन शरीरांमध्ये जेव्हा प्रवेश करतात,तर निराकार पासून साकार बनतात.असे नाही
की,आत्म्याचे कोणते रूप नाही.आत्म्याचे रूप पण जरूर आहे आणि नाव पण आहे.इतकी छोटी
आत्मा खूप मोठी भूमिका करते.प्रत्येक आत्म्यामध्ये भूमिका वठवण्याची खूप नोंद
आहे.नोंद एकाच वेळेत केली जाते,परत अनेक वेळेस त्याची पुनरावृत्ती होत राहते.तसेच
आत्म्याची पण या शरीरा मध्ये नोंद आहे,ज्यामध्ये ८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे.
जसे बाबा निराकार आहेत,तसेच आत्मा पण निराकार आहे.कुठे कुठे ग्रंथामध्ये लिहिले
आहे,आत्मा नावा रुपापेक्षा वेगळी आहे परंतु नावा रूपापेक्षा वेगळे कोणती वस्तू असू
शकत नाही.आकाश तर पोलार आहे परंतु नाव तर आहे ना आकाश.नावाशिवाय कोणती गोष्ट असू
शकत नाही.मनुष्य म्हणतात परमपिता परमात्मा.आता दूर देशांमध्ये तर सर्व आत्मे
राहतात.हा साकार देश आहे,यामध्ये पण दोन राज्य चालतात,रामराज्य आणि रावण
राज्य.अर्धाकल्प राम राज्य आहे आणि अर्धा कल्प रावण राज्य आहे.बाबा कधी मुलांना
दुःखाचे राज्य थोडेच देतील.काहीजण म्हणतात ईश्वरच दुख सुख देतात. बाबा समजवतात मी
कधीच मुलांना दुःख देत नाही.माझे नावाच दुखहर्ता सुखकर्ता आहे. ही मनुष्यांची चूक
आहे, ईश्वर कधीच दुःख देत नाहीत.या वेळेत दु:खधाम आहे.रावण राज्यांमध्ये दुःखच दुःख
मिळते, सुखाचे नाव नाही.सुखधाम मध्ये परत दुःखाचे नाव असत नाही.बाबा स्वर्गाची
स्थापना करतात.आता तुम्ही संगमयुगा मध्ये आहात,त्याला नवीन दुनिया तर कोणीही
म्हणणार नाही.नवीन दुनियाचे नाव सतयुग आहे.तीच परत जुनी होते,तर त्याला कलियुग
म्हटले जाते.नवीन गोष्ट चांगली आणि जुनी गोष्ट खराब दिसून येते. तर जुन्या गोष्टीला
नष्ट केले जाते. मनुष्य काम विकार रुपी विषाला सुख समजतात.गायन पण केले जाते,अमृत
सोडून विष का खातात. परत असे म्हणतात,तुझ्यामुळे सर्वांचे भले.आपण जे कराल
त्याद्वारे सर्वांचे भले,चांगले होईल, नाहीतर रावण राज्यांमध्ये मनुष्य वाईटच काम
करतात.हे तर आता मुलांना माहित झाले आहे की, गुरुनानकला पाचशे वर्ष झाले, परत कधी
येतील?तर म्हणतील त्यांची आत्म्याची ज्योती तर ज्योती मध्ये सामावली,परत कसे येतील.
तुम्ही म्हणाल आज पासून साडेचार हजार वर्षा नंतर गुरुनानक येतील. तुमची बुद्धी
साऱ्या विश्वाच्या इतिहास-भूगोलाचे चक्र लावत राहते.यावेळेस सर्व तमोप्रधान
आहेत,याला कायामतची वेळ म्हटले जाते.सर्व मनुष्य जसे मृतवत आहेत.सर्वांचे ज्योती
विझलेली आहे.बाबा सर्वांना जागृत करण्यासाठी येतात.जे मुलं काम चिते वरती बसून भस्म
झाले आहेत, त्यांना अमृत वर्षाद्वारे जागृत करून सोबत घेऊन जातात.माया रावणाने काम
चीतेवर बसून कब्रदाखल केले आहे.सर्व अज्ञान निद्रेमध्ये झोपले आहेत.आत्ता बाबा
ज्ञानामृत देतात, आत्ता ज्ञानामृत कुठे आणि ते पाणी कुठे? शीख लोकांचा मोठा दिवस
असतो,त्यावेळेस खूप धूमधाम करून,तलाव स्वच्छ करतात, माती काढतात,यामुळे अमृतसर नाव
ठेवले आहे.अमृताचा तलाव.गुरुनानकांनी पण खूप महिमा केली आहे.स्वतः म्हणतात एक ओंकार,
सतनाम.. ते नेहमीच सत्य बोलणारे आहेत. सत्यनारायणाची कथा आहे ना. मनुष्य भक्तिमार्ग
मध्ये खूप भक्ती करत आले आहेत.अमर कथा,तिजरीची कथा...असे म्हणतात पार्वतीला कथा
ऐकवली.ती तर सूक्ष्मवतन मध्ये राहणारी आहे.तेथे कोणती कथा ऐकवली.या सर्व गोष्टी
बाबाच सन्मुख समजावतात की, वास्तव मध्ये अमर कथा ऐकवून अमर लोक मध्ये घेऊन
जाण्यासाठी मी आलो आहे.मृत्युलोक मधून अमर लोक मध्ये घेऊन जातो,बाकी सूक्ष्मवतन
मध्ये पार्वतीने कोणता गुन्हा केला,ज्यामुळे अमर कथा ऐकवावी लागली.ग्रंथांमध्ये तर
अनेक कथा लिहिल्या आहेत. सत्यनारायणाची खरी कथा तर नाही.तुम्ही अनेक वेळा
सत्यनारायणाची कथा ऐकली असेल,परत सत्यनारायण तर कोणी बनले नाहीत.आणखीनच विकारत जात
राहतात.आता तुम्ही समजता आम्ही नरापासून नारायणा,नारी पासून लक्ष्मी बनत आहोत.ही कथा
अमरलोक मध्ये जाण्यासाठी खरी सत्यनारायणाची कथा आणि तिजरीची कथा आहे. तुम्हा
आत्म्यांना तिसरा नेत्र मिळाला आहे.बाबा समजवतात तुम्हीच सुंदर पुज्य होते परत८४
जन्माच्या नंतर तुम्हीच पुजारी बनले आहात म्हणून गायन आहे तुम्हीच पुज्य,तुम्हीच
पुजारी.मी तर सदैव पुज्य आहे.तुम्हाला येऊन पुजारी पासून पुज्य बनवतो.ही पतित दुनिया
आहे.सतयुगा मध्ये पुज्य पावन मनुष्य,या वेळेत पुजारी पतित मनुष्य आहेत.साधू संत
गायन करत राहतात,पतित पावन सिताराम.हे वाक्य बरोबर आहे.सर्व सिता वधू आहेत.असे
म्हणतात, हे राम येऊन आम्हाला पावन बनवा.सर्व भक्तीन बोलवतात, आत्मा बोलावते,हे राम.
गांधीजी पण गीता ऐकवून पूर्ण करत होते तर म्हणत होते,हे पतित पावन सिताराम.आता
तुम्ही जाणता,गीता काही कृष्णाने ऐकवली नाही.बाबा म्हणतात,मत घेत राहा की,ईश्वर
सर्वव्यापी नाहीत.गीतेच भगवान शिव आहेत, ना की कृष्ण.प्रथम तर विचारा गीतेचे
भगवान कोणाला म्हटले जाते.भगवान निराकार ला म्हणणार की साकारला?कृष्ण तर साकार मध्ये
आहेत,शिव तर निराकर आहेत.ते फक्त या तनाचा आधार घेतात,बाकी माताच्या गर्भा द्वारे
जन्म घेत नाहीत.शिवाला तर शरीरच नाही.येथे मनुष्य लोकांमध्ये स्थूल शरीर आहे.बाबा
येऊन खरी सत्यनारायणाची कथा ऐकवतात. बाबांची महिमा आहे पतित-पावन सर्वांचे सद्गती
दाता,सर्वांचे मुक्तिदाता,दुखहर्ता सुखकर्ता. अच्छा सुख कोठे आहे,येथे तर होऊ शकत
नाही.सुख तर दूसऱ्या जन्मामध्ये मिळेल,जेव्हा जुनी दुनिया नष्ट होईल आणि स्वर्गाची
स्थापन होईल.अच्छा मुक्ती कोणापासून करतात,रावणाच्या दुःखापासून.हे तर दुखधाम आहे
ना.अच्छा परत मार्गदर्शक पण बनतात.हे शरीर तर नष्ट होते बाकी आत्म्यांना घेऊन
जातात.प्रथम साजन परत सजनी जातात.ते अविनाशी आहेत,सर्वांना दुःखापासून सोडवून
पवित्र बनवून घरी घेऊन जातात. लग्न करून जेव्हा येतात तर प्रथम पति असतो,नंतर पत्नी
असते, परत वराती असतात.आता तुमची माळ पण अशीच आहे,वरती शिवबाबा फूल,त्यांना नमस्कार
करतात,परत युगलदाणा ब्रह्मा-सरस्वती,परत तुम्ही आहात.जेव्हा बाबाचे मदतगार
बनतात.फुलं शिवबाबांच्या आठवणी द्वारेच सूर्यवंशी विष्णूची माळ बनते.ब्रह्मा-सरस्वती
च लक्ष्मी-नारायण बनतात.लक्ष्मीनारायण परत ब्रह्मा-सरस्वती बनतात.यांनी कष्ट केले
आहेत तेव्हाच पूज्य बनतात. कोणाला माहित नाही की माळ कशी आहे.असेच माळ जपत
राहतात.१६१०८ची माळ मंदिरामध्ये ठेवली जाते,परत कोणी कुठून, कोणी कुठून जपत राहतात.
बाबा मुंबईच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये जाऊन माळ जपत होते,राम राम म्हणत
होते,कारण फुलं तर एक बाबा आहेत ना.फुलाला राम राम म्हणतात, परत सर्व माळेवर डोके
टेकवतात.ज्ञान काही च नव्हते.पादरी पण हातामध्ये माळ घेऊन जपत राहतात. तुम्ही विचारा
कोणाची मारा जपतात,तर त्यांना सांगता येत नाही.असे म्हणतात ख्रिस्ताच्या आठवणीमध्ये
जपत राहतो.त्यांना हे पण माहीत नाही की,ख्रिस्ताची आत्मा कुठे आहे.तुम्ही जाणतात
ख्रिस्ताची आत्मा पण तमोप्रधान आहे. तुम्ही तमोप्रधान गरीब होते,आता गरीब पासून
राजकुमार बनत आहात.भारत राजकुमार होता, आता गरीब आहे,परत राजकुमार बनेल,बनवणारे तर
शिवपिताच आहेत.तुम्ही मनुष्यापासून राजकुमार बनतात.एक राजकुमारांचे कॉलेज पण
होते.जेथे राजकुमार राजकुमारी जाऊन शिकत होते.
तुम्ही येथे शिकून २१ जन्मासाठी स्वर्गामध्ये राजकुमार राजकुमारी बनतात.हे
श्रीकृष्ण राजकुमार आहेत ना,त्यांच्या ८४ जन्माची कहाणी लिहिली आहे.मनुष्य काय
जाणतील? हे तर फक्त तुम्हीच जाणतात.भगवानुवाच ते सर्वांचे पिता आहेत.तुम्ही
ईश्वराद्वारे ऐकतात,जे स्वर्गाची स्थापना करतात,त्याला म्हटले जाते सत्य खंड. हा तर
खोटा खंड आहे.सत्य खंड तर बाबा स्थापन करतात. खोटा खंड तर रावण स्थापन करतात.रावणाचे
रूप बनवतात काहीच समजत नाहीत.कोणालाही माहीत नाही की, शेवटी रावण कोण आहे? त्याला
जाळत राहतात,परत जिवंत होत राहतो.वास्तव मध्ये पाच विकार स्त्रियांमधील व पाच विकार
पुरुषांमधील आहेत,याला रावण म्हटले जाते,त्याला जाळत राहतात.रावणाला जाळून परत सोने
लुटतात.तुम्ही मुलं जाणतात हे काट्याचे जंगल आहे.मुंबईमध्ये बबुलनाथचे मंदिर पण
आहे.बाबा येऊन फुलांसारखे बनवतात.सर्व एक-दोघांना विकारी बनवत जातात,म्हणजेच काम
कटारी चालवत राहतात,म्हणून याला काट्याचे जंगल म्हटले जाते.सतयुगाला अल्लाहची बाग
म्हटले जाते.तेच फुलं काट्यासारखे बनतात, परत काट्या पासून फुल बनतात.आता तुम्ही
पाच विकाराला जिंकतात.या रावण राज्याचा विनाश तर होणारच आहे.शेवटी मोठी लढाई पण
लागेल.खरा दसरा पण होईल,रावण राज्य नष्ट होईल, परत तुम्ही लंका लुटाल.तुम्हाला
सोन्याचे महल मिळतील.आता तुम्ही रावणा वरती विजय मिळवून स्वर्गाचे मालक बनतात.बाबा
संपूर्ण विश्वाचे राज्य भाग्य देतात म्हणून त्यांना शिव भोला भंडारी
म्हणतात.गणिका,अहिल्या, कुब्जा सर्वांना बाबा विश्वाचे मालक बनवतात.बाबा खूपच भोळे
आहेत. पतित दुनिया आणि पतित शरीरामध्ये येतात.बाकीचे स्वर्गाचे लायक नाहीत,ते काम
विकार रुपी विष सोडत नाहीत.बाबा म्हणतात मुलांनो,आता या अंतिम जन्मामध्ये पावन
बना.हे विकार तुम्हाला आदी मध्य अंत दु:खी बनवतात,काय तुम्ही एका जन्मासाठी काम
विकार रुपी विष सोडू शकत नाहीत.मी तुम्हाला ज्ञानामृत देऊन अमर बनवत आहे, तरीही
तुम्ही पवित्र का बनत नाहीत.कामविकारा शिवाय, सिगरेट दारू शिवाय,राहू शकत नाही काय?
मी बेहदचा पिता तुम्हा मुलांना म्हणतो, या एका जन्मामध्ये पावन बना,तर तुम्हाला
स्वर्गाचे मालक बनवेल.जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना करणे,बाबांचे
काम आहे. बाबा संपूर्ण दुनियेला दुःखापासून मुक्त करून,सुखधाम,शांतीधाम मध्ये घेऊन
जाण्यासाठी आले आहेत.आता सर्व धर्माचा विनाश होईल.एका आदी सनातन देवी देवता धर्माची
पुनर्स्थापना होत आहे.ग्रंथांमध्ये पण परमपिता परमात्माला अकालमुर्त म्हणतात.बाबा
महाकाल आहेत, काळाचे काळ एक दोघांना घेऊन जातात.मी तर सर्व घेऊन जातो म्हणून मला
महाकाळ म्हणतात.बाबा येऊन मुलांना खूप समजदार बनवतात,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातापिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) अंतिम
जन्मांमध्ये कामरुपी विषाचा त्याग करून ज्ञान अमृत घ्याचे आहे आणि द्यायचे आहे.पावन
बनायचे आहे.काट्यांना फुलासारखे बनवण्याची सेवा करायची आहे.
(२) विष्णू च्या गळ्यातील माळेचा मणी बनण्यासाठी आठवणी मध्ये राहायचे आहे.बाबा चे
पूर्ण रुपाने मदददगार बनून,बाप समान दुखहर्ता बनायचे आहे.
वरदान:-
अविनाश
नाटकाच्या ढालेस समोर ठेवून खुशीचा खुराक खाणारे नेहमी शक्तिशाली भव.
खुशी रुपी भोजन
आत्म्याला शक्तिशाली बनवते.असे म्हणतात खुशी सारखा खुराक नाही.यासाठी नाटकाच्या
ढालेस चांगल्याप्रकारे कार्यामध्ये लावा.जर नेहमी अविनाश नाटकाची स्मृती राहील तर
कधीच कोमेजून जाणार नाही. खुशी गायब होऊ शकणार नाही, कारण हे नाटकच कल्याणकारी
आहे,म्हणून अकल्याणकारी दृश्यांमध्ये पण कल्याण सामावलेले आहे,असे समजून नेहमी खुश
रहा.
बोधवाक्य:-
परचिंतन आणि
परदर्शन च्या धुळीपासून दूर राहणारेच खरे अनमोल हिरे आहेत.