08-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,आत्ता भारत खास आणि बाकी सर्व दुनिये वरती ब्रहस्पतीची दशा बसणार आहे,बाबा
तुम्हा मुलां द्वारे भारताला सुखधाम बनवत आहेत"
प्रश्न:-
१६ कला
संपूर्ण बनण्यासाठी तुम्ही मुलं कोणता पुरुषार्थ करतात?
उत्तर:-
योगबळ जमा करण्याचा पुरुषार्थ करतात.योगबळा द्वारे तुम्ही १६ कला संपूर्ण
बनतात.यासाठी बाबा म्हणतात,विकाराचे दान दिले तर ग्रहण सुटले. काम विकार जो अधोगती
करणारा आहे,याचे दान द्या, तर तुम्ही सोळा कला संपुर्ण बनाल.(२) देह अभिमानाला
सोडून देही अभिमानी बना,शरीराचे भान सोडून द्या.
गीत:-
तुम्हीच
माता-पिता……
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी आपल्या आत्मिक पित्याची महिमा ऐकली.ते गात राहतात आणि येथे
तुम्ही प्रत्यक्षात बाबा कडून वारसा घेत आहात.तुम्ही जाणतात बाबा आमच्या द्वारेच
भारताला सुखधाम बनवत आहेत.ज्यांच्या द्वारे बनवत आहेत,ते जरूर सुखधामचे मालक
बनतील.तर मुलांना खूप खुश राहायला पाहिजे.बाबांची महिमा अपरंपार आहे,त्यांच्याद्वारे
आम्ही वारसा घेत आहोत.आता तुम्हा मुलांवरती आणि सर्व दुनिया वरती ब्रहस्पतीची
अविनाश दशा आहे. आता तुम्ही ब्राह्मण जाणतात, भारत खास आणि सर्व दुनिया वरती आता
बृहस्पतीची दशा बसणार आहे,कारण तुम्ही आता सोळा कलासंपन्न बनत आहात.या वेळेत तर
कोणती कला नाही. मुलांना खूप खुशी राहायला पाहिजे.असे नाही की येथे खुशी आहे आणि
बाहेर गेल्यानंतर गायब होईल.ज्यांची महिमा गायन करतात, ते आत्ता तुमच्या सन्मुख हजर
आहेत.बाबा समजवतात पाच हजार वर्ष पूर्व,तुम्हाला राजाई देऊन गेलो होतो.आता तुम्ही
पहाल हळू-हळू सर्व बोलवत राहतील. तुमचे पण बोधवाक्य,सुविचार निघत राहतील.जसे इंदिरा
गांधी म्हणत होती,एक धर्म,एक भाषा एक राज्य हवे,त्यामध्ये पण आत्माच म्हणते ना.आत्म
जाणते बरोबर भारतामध्ये एक राजधानी होती,जी आता समोर आहे.तुम्ही समजता कधीही सर्व
नष्ट होईल.ही काही नवीन गोष्ट नाही.भारताला परत १६ कलासंपन्न जरूर बनायचे आहे.असे
म्हणतात पण,दान दिले तर ग्रहण सुटेल.बाबा पण म्हणतात, विकारांचे,अवगुणांचे दान
द्या.हे रावण राज्य अडीचहजार वर्ष आहे.बाबा येऊन या पासून सोडवतात.यामध्ये पण काम
विकार खूप मोठा अवगुण आहे.तुम्ही देह अभिमानी बनले आहात.आत्ता देही अभिमानी बनावे
लागेल.शरीराचे भान सोडावे लागेल.या गोष्टींना तुम्ही मुलंच समजतात.दुनिया हे जाणत
नाही.भारत जो १६कला संपूर्ण होता,संपूर्ण देवतांचे राज्य होते,आता ग्रहण लागले आहे.
लक्ष्मीनारायण ची राजधानी होती ना,भारत स्वर्ग होता.आता विकाराचे ग्रहण लागलेले आहे,
म्हणून बाबा समजवतात,तुम्ही विकाराचे दान दिले तर ग्रहण सुटेल.हा काम विकारच अधोगती
करणारा आहे,म्हणून बाबा म्हणतात हे दान द्या,तर तुम्ही १६ कला संपुर्ण बनाल.दान
देणार नाही तर बनू शकणार नाहीत.आत्म्याला आप आपली भूमिका मिळाली आहे.हे पण तुमच्या
बुद्धीमध्ये आहे. तुमच्या आत्म्या मध्ये खूप भूमिका नोंदलेली आहे.तुम्ही विश्वाचे
राज्य भाग्य घेतात.हे नाटक आहे.अनेक कलाकार आहेत.यामध्ये सर्वात चांगले कलाकार,हे
लक्ष्मीनारायण आहेत.यांची क्रमांक एक ची भूमिका आहे.विष्णू सो ब्रह्मा-सरस्वती परत
ब्रह्मा-सरस्वतीच विष्णू बनतात.हे८४ जन्म कसे घेतात,सर्व चक्र बुद्धीमध्ये
येते.ग्रंथ वाचल्यामुळे थोडेच समजू शकतात.ते तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष
म्हणतात,परत तर स्वस्तिका बनू शकत नाही.व्यापारी लोक हिशोबाच्या वहीत स्वस्तिक
काढतात,गणेशाची पूजा करतात.ही तर बेहदची वही आहे.स्वस्तिका मध्ये चार भाग असतात.जसे
जगन्नाथ पुरी मध्ये भाताचा हंडा ठेवतात,तो शिजल्यानंतर त्याचे चार भाग होतात.तेथे
भाताचाच भोग लावतात कारण तिकडे भात खूप खातात.श्रीनाथ द्वारे मध्ये तांदूळ होत
नाही.तेथे तर सर्व तुपातील चांगलेचांगले पदार्थ बनवतात.जेव्हा भोजन बनवतात,खूप
स्वच्छतेने, तोंड बंद करून,प्रसाद बनवतात. भोग लावून परत सर्व लोकांना प्रसाद
मिळतो,परत तो दुकानांमध्ये जाऊन ठेवतात.तेथे खूप गर्दी होते. बाबांनी पाहिलेले
आहे.आता तुम्हा मुलांना कोण शिकवत आहेत, सर्वात विश्वासू बाबा येऊन तुमचे सेवक बनले
आहेत,तुमची सेवा करत आहेत.इतका नशा चढलेला आहे?आम्हाला बाबा शिकवत आहेत.आत्म सर्व
काही करते ना. मनुष्य परत म्हणतात आत्मा निर्लेप आहे.तुम्ही जाणतात आत्म्यामध्ये ८४
जन्माची अविनाशी भूमिका भरलेली आहे,त्याला परत निर्लेप म्हणणे म्हणजे रात्रं दिवसाचा
फरक होतो.जेव्हा कोणी चांगल्या रीतीने महिना-दीड महिना बसून समजतील,तेव्हा ह्या
गोष्टी बुद्धीमध्ये बसतील.ज्ञानाचे मुद्दे तर खूप निघत राहतात.ही जसे कस्तुरी
आहे.मुलांना जेव्हा पूर्ण निश्चय बसतो,तर ते समजतात बरोबर परमपिता परमात्मा येऊन
दुर्गतीपासून,सदगती करतात. बाबा म्हणतात तुमच्यावर आता बृहस्पतीची दशा आहे.मी
तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवले,आता परत रावणाने राहूची दशा बसवली आहे.आता बाबा
स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी परत आले आहेत. तर स्वतःचे नुकसान करायला नको. व्यापारी
लोक आपले खाते नेहमी व्यवस्थीत ठेवतात.नुकसान करणाऱ्याला अशिक्षित म्हटले जाते.आता
हा तर सर्वात मोठा व्यापार आहे.काही लोकच हा व्यापार करू शकतात.हा अविनाशी व्यापार
आहे,बाकी सर्व व्यापार तर मातीमध्ये मिळतील.आता तुमचा खरा व्यापर होत आहे.बाबा
ज्ञानाचे सागर,सौदागर,रत्नाकर आहेत. प्रदर्शनीमध्ये अनेक येतात,सेवाकेंद्रा मध्ये
कोणी मुश्किल येतात.भारत तर खुप लांबरुंद आहे ना,तुम्हाला सर्व ठिकाणी जायचे आहे.
पाण्याची गंगा नदी तर सर्व भारतामध्ये आहे.हे पण तुम्हाला समजावून सांगावे लागेल,
पतितपावन काही पाण्याची गंगा नदी नाही.तुम्हा ज्ञान गंगेला जावे लागेल.चोहूबाजूला
प्रदर्शनी इत्यादी होत राहते.दिवसें-दिवस चित्र बनत राहतात.असे सुंदर चित्र
पाहिजेत,ते पाहिल्यानंतर आनंद होईल,हे तर ठिक समजवत आहेत.आता लक्ष्मीनारायणची
राजधानी स्थापन होत आहे.शिडीचे चित्र पण खूप चांगले आहे.आता ब्राह्मण धर्माची
स्थापना होत आहे.हे ब्राह्मणच परत देवता बनतात.तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात,तर
स्वतःच्या मनाला विचारत राहा, माझ्या मध्ये कोणता लहान-मोठा विकार तर नाही.काम
विकाराचा काटा तर नाही,क्रोधाचा काटा पण खूप खराब आहे.देवता कधी क्रोध करत नाहीत.असे
दाखवतात शंकरांनी तिसरा नेत्र उघडल्यामुळे विनाश होतो,हा पण एक कलंक लावलेला
आहे.विनाश तर होणारच आहे.सूक्ष्मवतन मध्ये शंकराच्या गळ्यात साप इत्यादी थोडेच असू
शकतात.सूक्ष्मवतन आणि मूळ वतन मध्ये बाग-बगीचे,साप इत्यादी काहीच नसतात,ते तर येथेच
असतात.स्वर्ग पण येथेच असतो. या वेळेत मनुष्य काट्यासारखे आहेत,म्हणून याला काट्याचे
जंगल म्हटले जाते.सतयुग फुलांची बाग आहे,तुम्ही पाहता बाबा सुंदर बाग बनवत
आहेत.सर्वांना सुंदर बनवतात. स्वतः तर खुपच सुंदर आहेत.सर्व सजनींना किंवा मुलांना
सुंदर बनवतात.रावणाने अगदीच काळे बनवले आहे.आता तुम्हा मुलांना खुशी व्हायला पाहिजे
की, आमच्यावरती बृहस्पतीची दशा बसली आहे.अर्धा वेळ दुःख,अर्धा वेळ सुख असेल तर
त्यानी काय फायदा होईल? नाही. ७५ %सुख आणि २५% दुःख आहे.हे पूर्वनियोजित नाटक
आहे.अनेक लोक विचारतात हे विनाशी नाटक असे का बनले आहे?अरे हे तर अनादी आहे ना.का
बनले? हा प्रश्नच येऊ शकत नाही.हे अनादी अविनाश नाटक बनलेले आहे.हे नाटक
पुर्वनियोजीत आहे, कोणालाही मोक्ष मिळू शकत नाही. ही तर अनादी सृष्टी चालत येते,
चालतच राहील.प्रलय होत नाही. बाबा नवीन दुनिया बनवतात परंतु त्यामध्ये गुंजाईस किती
आहे.जेव्हा मनुष्य पतित दुःखी होतात,तेव्हा बोलवतात.बाबा येऊन सर्वांची काया कल्पतरु
बनवतात, ज्यामुळे तुमचा कधी अकली मृत्यू होणार नाही.तुम्ही काळावरती विजय
मिळवतात,तर मुलांना खूप पुरुषार्थ करायला पाहिजे.जितके उच्चपद मिळेल तेवढे चांगले
आहे.पुरुषार्थ तर प्रत्येक जण जास्त कमाईसाठीच करतात.लाकडाचा व्यापारी पण म्हणेल
आम्ही जास्त कमाई करू.कोणी फसवून पण पैसे कमवतात, पैशामुळे च संकट येतात.तेथे तुमचे
पैसे कोणी लुटू शकणार नाही.आता पहा दुनिया मध्ये काय काय होत आहे. स्वर्गामध्ये
अशाप्रकारची कोणतीच दुःखाची गोष्ट नसते.आता तुम्ही बाबा पासून वारसा घेत आहात.तर
स्वतःला तपासायला पाहिजे,आम्ही स्वर्गामध्ये जाण्याचे लायक आहोत? नारदाचे उदाहरण आहे.
मनुष्य अनेक तिर्थ इत्यादी करत राहतात,मिळत काहीच नाही.गीत पण आहे ना,चोहूबाजूला
फिरलो, तरीही ईश्वरापासून दूर राहिलो. आता बाबा तुम्हाला खूप चांगली यात्रा
शिकवतात.यामध्ये कोणतेच कष्ट नाहीत,फक्त माझीच आठवण करा,तर विकर्म विनाश होतील.मुलं
ऐकतात.हे माझे भाड्याने घेतलेले शरीर आहे.या बाबांना तर खूप खुशी होते.मी शिवबाबांना
भाड्याने शरीर दिले आहे.बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवतात.नाव पण भागीरथ आहे.आता
तुम्ही मुलं रामपुरी मध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करतात, तर पुरुषार्था मध्ये तत्पर
राहायला पाहिजे.काटा का बनायला पाहिजे.तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणी आहात.सर्वांचा
आधार मुरली आहे. मुरली तुम्हाला मिळणार नाही,तर तुम्हाला श्रीमत कशी मिळेल.असे नाही
फक्त ब्राह्मणीला च मुरली ऐकावयची आहे,कोणीही मुरली वाचून,ऐकवू शकतात.बोलायला
पाहिजे,आज तुम्ही मुरली ऐकवा. आता तर प्रदर्शनीचे चित्रं, समजवण्यासाठी खूप चांगले
बनले आहेत.हे मुख्य चित्र आपल्या दुकानावर ठेवा,तर अनेकांचे कल्याण होईल.तुम्ही
सांगा,आम्ही तुम्हाला समजावून सांगतो की, हे सृष्टीचे चक्र कसे फिरते.कल्याण
करण्यामध्ये थोडा वेळ गेला तर काय हरकत आहे.त्या व्यापारा सोबत आपण या रत्नाचा वापर
करू शकता.हे बाबाचे अविनाश ज्ञान रत्ना चे दुकान आहे.शिडीचे चित्र क्रमांक एकचे आहे
आणि गीतेचे भगवान शिवचे चित्र पण क्रमांक एकचे आहे.भारतामध्ये शिव भगवान आले
होते,ज्याची जयंती साजरी करतात,आता परत बाबा आले आहेत.यज्ञाची पण स्थापन केली
आहे.तुम्हा मुलांना राज योगाचे ज्ञान ऐकवत आहेत. बाबा राजांचे राजा बनवतात,बाबा
म्हणतात मी तुम्हाला सूर्यवंशी राजा राणी बनवतो,ज्यांना परत विकारी राजा पण नमस्ते
करतात.तर स्वर्गाचे महाराजा महाराणी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायला पाहिजे.बाबा
काही घर इत्यादी बनवण्यासाठी ना करत नाहीत, खुशाल बनवा,पैसे पण मातीमध्ये मिळून
जातील, त्यापेक्षा का नाही घर बनवून आरामशीर राहायचे.पैसे कामांमध्ये लावायला
पाहिजेत,घर पण बनवा,खाण्यासाठी पण ठेवा.दान-पुण्य पण करतात ना. जसे काश्मीर चे राजा
होते,जी काही संपत्ती होती,ती सर्व आर्यसमाजींना दाध मध्ये दिली. आपल्या जातीधर्मासाठी
करतात ना. इथे तर ती गोष्टच नाही.सर्व मुल आहेत. तर जात-पात इत्यादीची गोष्टच
नाही.या तर देहाच्या जाती आहेत.मी तर तुम्हा आत्म्याला पवित्र बनवून विश्वाची
बादशाही देतो.अविनाशी नाटकानुसार भारतवासीच राज्य भाग्य घेतील. आता तुम्ही मुलं
जाणतात,आमच्या वरती बृहस्पतीची दशा बसलेली आहे.श्रीमत म्हणते माझीच आठवण करा, दुसरी
कोणती गोष्ट नाही.भक्तिमार्गा मध्ये व्यापारी लोक काही ना काही जरूर धर्मासाठी
काढतात.त्याचा मोबदला पण दुसऱ्या जन्मांमध्ये मिळतो.आता तर मी प्रत्यक्षात आलो
आहे.तर तुम्ही सर्व काही या कार्यामध्ये लावा,मला तर काहीच नकोय.मला काही बनवायचे
आहे काय?हे सर्व तुम्हा ब्राह्मणांसाठीच आहे.गरीब सावकार सर्व एकत्र राहतात.
काही-काही बिघडतात, भगवंताजवळ पण समदृष्टी नाही. कोणाला राजवाड्यात तर कोणाला
झोपडीमध्ये ठेवतात.शिवबाबांना विसरतात. शिवबाबांच्या आठवणीत राहिले तर कधी अशा
गोष्टी करणार नाहीत.सर्वांना विचारले तर जाते ना.असे पाहिले जाते,हे त्यांच्या
घरामध्ये आरामशीर राहतात,तर थोडाफार तसा प्रबंध करावा लागतो,म्हणून म्हणतात सर्वांची
खात्री करा.कोणती गोष्ट नसेल,तर मिळू शकते.पित्यांचे तर मुलांवर प्रेम असते ना.इतके
प्रेम दुसरे कोणी करू शकत नाही.मुलांना खूप समजावून सांगतात,पुरुषार्थ करा,
दुसऱ्यासाठी पण युक्ती शोधा. यामध्ये फक्त पृथ्वीचे तीन पाऊल पाहिजेत, जेथे मुली
येऊन समजावून सांगत राहतील.कोणत्या मोठ्या मनुष्याचा हॉल घ्या,आम्ही फक्त चित्र
ठेवतो.एक-दोन तास, सकाळ-संध्याकाळ आम्ही येऊन मुरलीचा वर्ग करू,खर्च सर्व आमचा,नाव
आपले होईल.अनेक जण येऊन कवडीपासून हिऱ्या सारखे बनतील,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) जे पन
मनामध्ये,आत्म्यांमध्ये विकारी काटे आहेत, त्यांना तपासून काढायचे आहेत.रामपुरी
मध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे.
(२)अविनाश ज्ञान रत्नाचा सौदा करून कोणाचेही कल्याण करण्यासाठी वेळ द्यायचा आहे.
दैवी गुणांनी शृंगारीक बनवून दुसऱ्यांचा शृंगार करायचा आहे.
वरदान:-
पूर्णविरामा
द्वारे श्रेष्ठ स्थिती रुपी पदक प्राप्त करणारे महावीर भव.
या अनादी अविनाशी
नाटकांमध्ये आत्मिक सेनेमधील सेनेला कोणी पदक देत नाही परंतु अविनाशी नाटकानुसार ते
श्रेष्ठ स्थिती रुपी पदक स्वतःच प्राप्त होते.हे पदक त्यांनाच प्राप्त होते,जे
प्रत्येक आत्म्याची भूमिका साक्षी होऊन पूर्णविराम सहज लावतात.अशा आत्म्यांचा पाया
अनुभवाच्या आधारावर होतो,म्हणून कोणतीही समस्या रुपी भिंत त्यांना थांबवू शकत नाही.
बोधवाक्य:-
प्रत्येक
परिस्थिती रूपी डोंगराला पार करून,आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचणारे उडणारे पक्षी बना.