15-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, हे संगमयुग चढती कलेचे युग आहे, यामध्ये सर्वांचे भले होत आहे, त्यामुळे म्हटले जाते चढती कला त्यामुळे सर्वांचे भले."

प्रश्न:-
बाबा सर्व ब्राह्मण मुलांना खूप शुभेच्छा देतात कां?

उत्तर:-
कारण बाबा म्हणतात, तुम्हीं माझी मुले मनुष्या पासून देवता बनत आहात. तुम्हीं आता रावणाच्या तावडी तून सुटत आहात, तुम्हीं स्वर्गाची राजाई प्राप्त करता, सन्मानाने पास होता, मी नाही, त्यामुळे बाबा तुम्हाला फार फार शुभेच्छा देतात. तुम्हीं आत्मे पतंग आहात, तुमची डोर बाबाच्या हातामध्ये आहे. मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवितो.

गीत:-
शेवटी तो दिवस आला आज. . . . .

ओम शांती।
ही अमरकथा कोण सांगत आहे?, अमरकथा म्हणा, सत्य नारायणाची कथा म्हणा किंवा तिजरी ची कथा म्हणा. तीन मुख्य आहेत. आता तुम्ही कोणा समोर बसले आहात आणि कोण तुम्हाला सांगत आहे? सत्संग तर यांनी पण फार केले आहेत. तिथे तर सर्व मनुष्य पाहण्यात येतात. म्हणतात फलाना संन्याशी कथा सांगत आहे. शिवानंद सांगत आहेत. भारतामध्ये तर अनेक सत्संग आहेत. गल्ली गल्ली मध्ये सत्संग आहेत. माता पण पुस्तक घेऊन सत्संग करतात. तर तिथे मनुष्याला पाहावे लागते परंतु इथे तर आश्चर्यकारक गोष्ट आहे. तुमच्या बुद्धी मध्ये कोण आहे? परमात्मा. तुम्हीं म्हणता, आता बाबा समोर आले आहोत. निराकार बाबा आम्हाला शिकवित आहेत. मनुष्य म्हणतात, ते ईश्वर तर नाव रूपा पासून वेगळे आहेत. बाबा म्हणतात कि, नाव रूपा पासून वेगळी कोणती वस्तू नसते. तुम्ही मुले जाणता कि, इथे कोणी पण साकार मनुष्य शकवित नाहीत आणि कुठे पण जावा, साऱ्या जगामध्ये साकारच शिकवित आहेत. हे तर सर्वोच्च पिता आहेत, ज्यांना निराकार ईश्वर पिता म्हटले जाते. ते निराकार साकार मध्ये येऊन शिकवित आहेत, ही बिल्कुल नवीन गोष्ट आहे. जन्मोजन्मी तुम्ही ऐकत आले आहात, हा अमुक पंडित आहे, गुरु आहे. अनेकानेक नावे आहेत. भारत तर फार मोठा आहे. जे पण काय शिकवित आहेत, समजावतात, ते तर मनुष्यच आहेत. मनुष्य च शिष्य बनले आहेत. अनेक प्रकारचे मनुष्य आहेत. अमुक सांगत आहेत. नेहमी शरीराचे नाव घेतले जाते. भक्तीमार्गा मध्ये निराकारला बोलावतात कि, हे पतित पावन या. तेच येऊन मुलांना समजावत आहेत. तुम्हीं मुले जाणता कि, कल्प कल्प सारी दुनिया जी पतीत झाली आहे, त्यांला पावन करणारा एकच निराकार पिता आहे. तुम्ही इथे जे बसले आहात, तुमच्या मध्ये पण कांही कच्चे आहेत, कांही पक्के आहेत, कारण अर्धा कल्प तुम्ही देहअभिमानी बनले होता. आता देहीअभिमानी या जन्मा मध्ये बनायचे आहे. तुमच्या देहामध्ये राहणारी जी आत्मा आहे, त्याला परमात्मा समजावत आहेत. आत्माच संस्कार घेऊन जाते. आत्मा शरीराद्वारे म्हणते कि, मी अमुक आहे. परंतु आत्मअभिमानी तर कोणीच नाहीत. बाबा म्हणतात, जे या भारता मध्ये सूर्यवंशी, चंद्रवंशी होते, तेच यावेळी येऊन ब्राह्मण बनतील. मग देवता बनतील. मनुष्य देह अभिमाना मध्ये राहण्याच्या सवयीचे आहेत, देहीअभिमानी राहणे विसरून गेले आहेत, त्यामुळे बाबा वारंवार म्हणतात कि, देहीअभिमानी बना. आत्माच वेगवेगळे शरीर घेऊन अभिनय करत आहे. ही आत्म्याची कर्मेंद्रिये आहेत. आता बाबा मुलांना म्हणतात, मनमनाभव. बाकी फक्त गीता वाचून कोणते राज्य भाग्य थोडेच मिळू शकते. तुम्हाला यावेळी त्रिकालदर्शी बनविले जाते. रात्रं दिवसाचा फरक आहे. बाबा समजावतात, मी तुम्हाला राजयोग शिकवित आहे. कृष्ण तर सतयुगाचे राजकुमार आहेत. जे सूर्यवंशी देवता होते, त्यांच्या मध्ये कांही ज्ञान नाही. ज्ञान तर प्राय:लोप होऊन जाते. ज्ञान आहेच सद्गती साठी. सतयुगात दुर्गति मध्ये कोणी आसत नाही. ते आहेच सतयुग.आता कलियुग आहे. भारतामध्ये प्रथम सूर्यवंशी ८ जन्म मग चंद्रवंशी १२ जन्म घेतात. हा एक जन्म आता तुमचा सर्वात चांगला जन्म आहे. तुम्ही प्रजापिता ब्रह्मा मुख्य वंशावली आहात. हा सर्वोत्तम धर्म आहे. देवता धर्माला सर्वोत्तम धर्म म्हणत नाहीत. ब्राह्मण धर्म सर्वात उंच आहे. देवता तर प्रारब्ध भोगत आहेत. आज-काल अनेक समाजसेवक आहेत. तुमची आत्मिक सेवा आहे. ते शरीराची सेवा करणारे आहेत. आत्मिक सेवा एकदाच होत आहे. पूर्वी हे समाजसेवक इ. नव्हते. राजा राणी राज्य करत होते. सतयुगा मध्ये देवी-देवता होते. तुम्हींच पूज्य होता मग पुजारी बनता. लक्ष्मी नारायण द्वापार मध्ये जेंव्हा वाममार्गा मध्ये जातात, मग मंदिर बनवितात. पहिल्या प्रथम शिवाचे बनवितात. ते सर्वांचे सद्गती दाता आहेत तर त्यांची पूजा जरूर झाली पाहिजे. शिवबाबानी आत्म्यांना निर्विकारी बनविले होते ना. मग देवतांची पूजा होते. तुम्हीच पूज्य होता मग पुजारी बनता. बाबांनी समजावले आहे, चक्राची आठवण करत राहा. शिडी उतरत उतरत तुम्ही एकदम खाली येऊन पडले आहात. आता तुमची चढती कला आहे. म्हणतात पण कि, चढती कला त्यामुळे सर्वांचे भला. साऱ्या दुनियेतील मनुष्यमात्रा ची आता चढती कला होत आहे. पतित पावन येऊन सर्वांना पावन बनवित आहेत. जेंव्हा सतयुग होते तर चढती कला होती आणि इतर सर्व आत्मे मुक्तीधाम मध्ये होते.

बाबा समजावत आहेत, गोड गोड मुलांनो, माझा जन्म भारतामध्येच होत आहे. शिवबाबा आले होते असे गायन आहे. आता परत आले आहेत. याला राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ म्हटले जाते. स्वराज्य प्राप्त करण्यासाठी यज्ञ रचलेला आहे. विघ्न पण पडत होते, आता पण पडत आहेत. माता वर अत्याचार होत आहेत. म्हणतात, बाबा आम्हाला हे नंगन करत आहेत. आम्हाला सोडत नाहीत. बाबा आमचे रक्षण करा. दाखवतात, द्रौपदीची रक्षा झाली. आता तुम्ही २१ जन्मासाठी बाबा कडून वरसा घेण्यासाठी आले आहात. आठवणीच्या यात्रेमध्ये राहून आपल्याला पवित्र बनायचे आहे. मग विकारा मध्ये गेला तर खलास, एकदम खाली पडाल, त्यामुळे बाबा म्हणतात, पवित्र जरूर राहायचे आहे. जे कल्पा पूर्वी बनले होते तेच पवित्रतेची प्रतिज्ञा करतील, मग कोणी पवित्र राहू शकतात, कोणी राहू शकत नाहीत. मुख्य गोष्ट आठवणीची आहे. आठवण करा, पवित्र राहा आणि स्वदर्शन चक्र फिरवा तर मग उंच पद मिळेल. विष्णूची दोन रुपे राज्य करतात ना. परंतु विष्णूला जे शंख चक्र दिले आहे, ते देवतांना नव्हते. लक्ष्मीनारायण ला पण नव्हते. विष्णू तर सूक्ष्मवतन मध्ये राहतात, त्यांना चक्राच्या ज्ञानाची गरज नाही. तिथे बोलणे नसते, हावभाव चालतात. आता तुम्ही जाणता कि, आम्ही शांतीधामचे राहणारे आहोत. ती निराकारी दुनिया आहे. आता आत्मा काय वस्तू आहे ते पण मनुष्यमात्र समजत नाहीत. म्हणतात आत्माच परमात्मा आहे. आत्म्या साठी म्हणतात एक चमकता तारा आहे, जो भृकुटी च्या मध्या मध्ये राहत आहे. या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. जरी कोणी किती पण प्रयत्न केला, काचेमध्ये बंद करून पाहतात कि, आत्मा कशी निघते? प्रयत्न करतात परंतु कोणाला पण माहित पडत नाही. आत्मा काय वस्तू आहे, कशी निघत आहे? बाकी एवढे म्हणतात, आत्मा चांदणी सारखी आहे. दिव्यदृष्टी शिवाय त्याला पाहू शकत नाहीत. भक्ती मार्गामध्ये अनेकांना साक्षात्कार होतो. लिहिले पण आहे, अर्जुनाला साक्षात्कार झाला, अखंड ज्योती आहे. अर्जुन म्हणाले, मी सहन करू शकत नाही. बाबा समजावतात एवढे तेजोमय इ. कांहीपण नाही. जशी आत्मा शरीरा मध्ये प्रवेश करते, माहित थोडेच पडते. आता तुम्ही पण जाणता कि, बाबा कसे प्रवेश करून बोलतात. आत्मा येऊन बोलत आहे. हे पण विश्व नाटकांमध्ये सारे नोंदलेले आहे. यामध्ये कोणत्या ताकदीची गोष्ट नाही. आत्मा कांही शरीर सोडून जात नाही. ही साक्षात्काराची गोष्ट आहे. आश्चर्यकारक गोष्ट आहे ना. बाबा म्हणतात, मी पण साधारण तना मध्ये येतो. आत्म्याला बोलावतात ना. पूर्वी आत्म्याला बोलावून त्यांना विचारात पण होते. आता तर तुम्ही तमोप्रधान बनले आहात. बाबा येतातच त्यासाठी कि, येऊन पतितांना पावन बनवितात. म्हणतात पण 84 जन्म आहेत, तर समजले पाहिजे कि, जे प्रथम येतात त्यांनीच जरूर 84 जन्म घेतले असतील. ते तर लाखो वर्ष म्हणतात. आता बाबा समजावतात कि, तुम्हांला स्वर्गामध्ये पाठवले होते. तुम्ही जाऊन राज्य केले होते. तुम्हां भारतवासीना स्वर्गा मध्ये पाठविले होते. राजयोग संगम युगावर शिकविला होता. बाबा म्हणतात, मी कल्पाच्या संगमयुगावर येतो. गीते मध्ये मग युगे युगे अक्षर लिहिले आहे.

आता तुम्ही जाणत आहात कि, आम्ही शिडी कशी उतरतो, मग चढतो. चढती कला मग उतरती कला. आता हे संगमयुग आहे, सर्वांच्या चढते कलेचे युग. सर्व चढत आहेत. सर्व वर जातील, मग तुम्ही स्वर्गा मध्ये अभिनय करण्यासाठी येता. सतयुगा मध्ये दुसरा कोणता धर्म नसतो. त्याला निर्विकारी दुनिया म्हटले जाते. मग देवी-देवता वाममार्गा मध्ये जाऊन सर्व विकारी बनतात. यथा राजा तथा प्रजा. बाबा समजावतात, हे भारतवासी, तुम्ही निर्विकारी जगा मध्ये होता. आता विकारी जगा मध्ये आहात. अनेक धर्म आहेत, बाकी एक देवी-देवता धर्म नाही. जेंव्हा तो नाही, तेंव्हा तर मग स्थापना होते. बाबा म्हणतात, मी ब्रह्मा द्वारे येऊन आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहे. इथेच करतील ना. सूक्ष्मवतन मध्ये तर करणार नाहीत. लिहिले पण आहे, ब्रह्मा द्वारे आदि सनातन देवी देवता धर्माची रचना रचत आहेत. तुम्हाला यावेळी पावन म्हणत नाहीत. पावन बनत आहात. वेळ तर लागत आहे ना. पतिता पासून पावन कसे बनायचे,हे कोणत्या पण शास्त्रांमध्ये नाही. खरेतर महिमा तर एका बाबाची आहे. त्या बाबाला विसरल्या मुळेच अनाथ बनले आहात. आपसात भांडत राहतात. मग म्हणतात, सर्व मिळून एक कसे होतील. भाऊ भाऊ आहेत ना. बाबा तर अनुभवी आहेत. भक्ती पण यांनी पूर्ण केली आहे. सर्वात अधिक गुरु यांनी केले आहेत. आता बाबा म्हणतात, या सर्वांना सोडा. आता मी तुम्हाला भेटलो आहे. सर्वांचा सदगती दाता, एक सत श्रीअकाल म्हणतात ना. अर्थ समजत नाहीत. शिकत तर फार राहतात. बाबा समजावतात, आता सर्व पतित आहेत, मग पावन दुनिया बनेल. भारतच अविनाशी होता. हे कोणाला माहित नाही. भारताचा कधी विनाश होत नाही आणि कधी प्रलय होत नाही. हे जे दाखवतात, सागरातुन पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण आले, आता पिंपळाच्या पानावर तर मुलगा येऊ शकत नाही. बाप समजावतात, तुम्ही गर्भातून जन्म फार आरामा मध्ये घेता. तेथे गर्भ महल म्हटले जाते. इथे गर्भ जेल आहे.सतयुगा मध्ये गर्भ महल आहे. आत्म्याला पूर्वीपासूनच साक्षात्कार होतो, हे शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे. तिथे आत्मअभिमानी राहतात. मनुष्य तर ना रचियताला, ना रचनेच्या आदि, मध्य,अंता ला ओळखतात. आता तुम्ही ओळखता.बाबा ज्ञानाचे सागर आहेत. तुम्ही मास्टर सागर आहात. तुम्ही( माता) नद्या आहात आणि हे गोप ज्ञान मानसरोवर आहेत. या ज्ञान नदी आहेत. तुम्ही सरोवर आहात. प्रवृत्ती मार्ग पाहिजे ना. तुमचा पवित्र गृहस्थ आश्रम होता. आता पतित आहे. बाबा म्हणतात हे नेहमी आठवणीत ठेवा कि, आम्ही आत्मा आहे. एका बाबांची आठवण करायची आहे. बाबाने आदेश दिला आहे, कोणत्या पण देहधारी ची आठवण करू नका. या डोळ्यांनी जे कांही पाहत आहात ते सर्व नाहीसे होऊन जाईल, त्यामुळे बाबा म्हणतात, मनमना भव, मध्याजी भव. या कबरिस्थान ला विसरून जावा.मायेची वादळे तर अनेक येतील, त्याला घाबरायचे नाही. फार वादळे आली, तरी कर्मेंद्रिया द्वारे कर्म करायचे नाही. वादळ तेंव्हा येतात, जेंव्हा तुम्ही बाबाची आठवण विसरता. ही आठवणी ची यात्रा एकाच वेळी होते. ती मृत्यूलोकातील यात्रा आहे. अमर लोकांची यात्रा ही आहे. तर आता बाबा म्हणतात, कोणत्या पण देहधारी ची आठवण करू नका. मुले शिवजयंतीला किती तारा पाठवितात. बाबा म्हणतात ततत्वम. तुम्हां मुलांना पण बाबा शुभेच्छा देतात. खरेतरं तुमचे अभिनंदन आहे, कारण तुम्ही मनुष्या पासून देवता बनता. मग जे सन्मानाने पास होतात, त्यांना जास्त मार्क आणि चांगला क्रमांक मिळतो. बाबा तुमचे अभिनंदन करतात कि, आता तुम्ही रावणाच्या तावडीतून सुटत आहात. सर्व आत्मे पतंग आहेत, सर्वांची दोर बाबाच्या हातामध्ये आहे. ते सर्वांना घेऊन जातील. सर्वांचे सद्गती दाता आहेत. परंतु तुम्ही स्वर्गाची राजाई प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) सन्मानाने पास होण्यासाठी एका बाबाची आठवण करा, कोणत्या पण देहधारीची नाही. या डोळ्यांनी जे दिसत आहे, त्याला पाहून पण पाहू नका.

(२) आम्ही अमरलोकांच्या यात्रेवर जात आहोत, त्यामुळे मृत्यू लोकातील कोणती पण आठवण करायची नाही, या कर्मेंद्रिया द्वारे कोणते पण विकर्म होऊ नये, याचे ध्यान ठेवायचे आहे.

वरदान:-
अतिंद्रिय सुखमय स्थिती द्वारे अनेक आत्म्यांचे आव्हान करणारे, विश्व कल्याणकारी भव:

जेवढी शेवटची कर्मातीत अवस्था जवळ येत जाईल, तेवढे बोलण्या पासून दूर शांत स्वरूपाची स्थिती अति प्रिय वाटेल, या स्थितीमध्ये नेहमी अतींद्रिय सुखाची अनुभूती होईल आणि याच अतिंद्रिय सुखमय स्थिती द्वारे अनेक आत्म्यांना सहज आव्हान करू शकाल. ती शक्तिशाली स्थितीच विश्व कल्याणकारी स्थिती आहे. या स्थिती द्वारे किती पण दूर राहणाऱ्या आत्म्याला संदेश पोहोचवू शकाल.

बोधवाक्य:-
प्रत्येकाच्या विशेषतेला स्मृतीमध्ये ठेवून, विश्वासू बना, तर संघटन एकमत होऊन जाईल.