18-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, सुख देणाऱ्या एका बाबाची आठवण करा, या थोड्या वेळेमध्ये योगबळ जमा करा, तर
अंत काळात ते फार कामाला येईल.
प्रश्न:-
बेहदच्या
वैरागी मुलांनो, तुम्हांला कोणती आठवण नेहमी राहिली पाहिजे?
उत्तर:-
हे आमचे छी छी शरीर आहे, याला सोडून परत घरी जायचे आहे, ही आठवण नेहमी ठेवा. बाबा
आणि वरसा आठवणीत ठेवा, दुसरे काही पण आठवणीत येऊ नये. हे बेहदचे वैराग्य आहे. कर्म
करताना आठवण करण्याचा असा पुरुषार्थ करा, त्यामुळे पापांचे ओझे डोक्यावरून उतरेल.
आत्मा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनेल.
ओम शांती।
बाबा मुलांना रोज फार सोप्या गोष्टी सांगत आहेत. ही ईश्वरी पाठशाला आहे. बरोबर गीते
मध्ये पण सांगितले आहे, भगवानुवाच. भगवान पिता सर्वांचा एक आहे. सर्व भगवान होऊ शकत
नाहीत. होय, सर्व मुलं एक पित्याची होऊ शकतात. हे जरुर बुद्धी मध्ये आले पाहिजे कि,
बाबा स्वर्ग नवीन दुनियेची स्थापना करणारे आहेत. त्या पित्याकडून आम्हाला स्वर्गाचा
वरसा जरूर मिळला होता. भारता मध्येच शिवजयंती ची महिमा केली जाते. परंतु शिवजयंती
कशी होते, हे तर बाबाच येऊन समजावत आहेत. बाबा कल्पाच्या संगमयुगावर येतात. मुलांना
परत पतिता पासून पावन बनवितात, म्हणजे वरसा देतात. यावेळी सर्वांना रावणाचा शाप आहे,
त्यामुळे सर्व दुःखी आहेत. आता कलियुग जुनी दुनिया आहे. हे नेहमी आठवणीत ठेवा कि,
आम्ही ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहोत. जे पण स्वतःला ब्रह्मकुमार कुमारी समजत
आहेत, त्यांनी जरूर हे समजले पाहिजे कि, कल्प कल्प आजोबा कडून ब्रह्मा द्वारे वरसा
घेत आहोत. एवढी अनेक मुले आहेत, आणखीन कोणाला असू शकत नाहीत. ते सर्वांचे पिता आहेत.
ब्रह्मा पण मुलगा आहे. सर्व मुलांना आजोबा कडून वरसा मिळत आहे. त्यांचा वरसा
सतयुगाची राजधानी आहे. हे बेहद चे पिता जेंव्हा स्वर्गाचे रचियता आहेत, तर जरूर
आम्हाला स्वर्गाची राजाई मिळाली पाहिजे. परंतु हे विसरून गेले आहेत, आम्हाला
स्वर्गाची बादशाही होती. परंतु निराकार पिता कसे देतात, जरूर ब्रह्मा द्वारे देतील.
भारता मध्ये यांचे राज्य होते. आता कल्पाचा संगम आहे. संगम वर ब्रह्मा आहेत, तेंव्हा
तर बी.के. म्हटले जाते. अंधश्रद्धेची कोणती गोष्टच नाही. दत्तक घेतात. आम्ही
ब्रह्माकुमार कुमारी आहोत. ब्रह्मा शिवबाबा चा मुलगा आहे, आम्हाला शिवबाबा कडून परत
स्वर्गाची बादशाही मिळत आहे. अगोदर पण मिळाली होती, ज्याला 5000 वर्षे झालीत. आम्ही
देवी-देवता धर्माचे होतो. शेवट पर्यंत वाढ होत राहते. जसे क्राईस्ट आले, ख्रिश्चन
धर्म आता पर्यंत आहे. वृध्दी होत राहते. ते जाणतात कि,क्राईष्ट द्वारे आम्ही खिश्चन
झाले आहोत. आज पासून दोन हजार वर्षा पूर्वी क्राईष्ट आले होते. आता वृध्दी होत आहे.
पहिल्या प्रथम सतोप्रधान, मग् रजो,तमो मध्ये आलो आहोत. तुम्ही सतयुगा मध्ये
सतोप्रधान होता, मग रजो-तमो मध्ये आलात. तमोप्रधान सृष्टी पासून सतोप्रधान जरूर होत
आहे. नवीन दुनिये मध्ये आदि सनातन देवी देवता धर्म होता. मुख्य धर्म चार आहेत. तुमचा
धर्म अर्धा कल्प चालतो. इथे पण तुम्ही त्याच धर्माचे आहात, परंतु विकारी बनल्यामुळे
तुम्ही स्वतःला देवी-देवता म्हणू शकत नाहीत. तुम्ही आदि सनातन देवी देवता धर्माचे
होता, परंतु वाममार्ग मध्ये गेल्यामुळे तुम्ही पतित बनले आहात, त्यामुळे स्वतःला
हिंदू म्हणत आहात. आता तुम्हीं ब्राह्मण बनले आहात. उंच ते उंच शिवबाबा आहेत मग
तुम्ही ब्राह्मण आहात. तुम्हां ब्राह्मणांचा सर्वोच्च वर्ण आहे. ब्रह्माची मुले बनले
आहात. परंतु वारसा ब्रह्मा कडून मिळत नाही. शिव बाबा ब्रह्मा द्वारे स्वर्गाची
स्थापना करत आहेत. तुमच्या आत्म्याने आता बाबाला ओळखले आहे. बाबा म्हणतात कि, माझ्या
द्वारे मला जाणल्यामुळे साऱ्या सृष्टीच्या आदि, मध्य, अंताचे ज्ञान समजता. ते ज्ञान
मलाच आहे.मी ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर,पवित्रतेचा सागर आहे. 21 जन्म तुम्हीं
पवित्र बनत आहात, आता विषय सागर मध्ये पडले आहात. आता ज्ञानाचे सागर बाबा तुम्हाला
पतिता पासून पावन बनवित आहेत. कोणत्या गंगेचे पाणी पावन बनवू शकत नाही. स्नान
करण्यासाठी जातात, परंतु ते पाणी कांही पतित पावन नाही. या नद्या तर सतयुगा मध्ये
पण असतात, तर कलियुगा मध्ये पण आहेत. पाण्या मध्ये फरक राहात नाही. म्हणतात पण कि,
सर्वांचा सदगती दाता एक राम, तेच ज्ञानाचे सागर, पतित-पावन आहेत.
बाबा येऊन ज्ञान सांगत आहेत, त्यामुळे तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात. सतयुग त्रेता
मध्ये भक्ती शास्त्र इत्यादी कांहीपण नसते. तुम्ही बाबा कडून नेहमी सुखाचा वरसा घेत
आहात. असे नाही, तिथे तुम्हाला गंगा स्नान करायचे आहे किंवा कोणती यात्रा करायची आहे.
तुमची ही आत्मिक यात्रा आहे, जो कोणी मनुष्य शिकवू शकत नाही. बाबा सर्व आत्म्यांचे
पिता आहेत, शरीराचे पिता तर अनेक आहेत. आत्मिक पिता एकच आहेत. हे पक्के पक्के
आठवणीत ठेवा. बाबा पण विचारतात, तुम्हाला किती पिता आहेत, तर गोंधळून जातात कि, हे
काय विचारत आहेत. सर्वांचा एकच पिता असतो. दोन, तीन पिता कसे होतील. बाबा समजावतात
त्या परमात्मा पित्याची आठवण दुःखामध्ये करतात. दुःखामध्ये नेहमी म्हणतात, हे
परमपिता परमात्मा, आम्हाला दुःखा पासून मुक्त करा. तर दोन पिता झाले ना.एक शरीराचे
पिता, दुसरे आत्म्यांचे पिता. ज्यांची महिमा करतात कि, तुम्ही माता पिता आम्ही तुमची
मुले. . . . तुमच्या कृपेने भरपूर सुख मिळते. लौकिक माता पित्या कडून भरपूर सुख
मिळत नाही. जेव्हा दुःख होते तर त्या पित्याची आठवण करतात. हे बाबाच असे प्रश्न
विचारतात, दुसरे तर कोणी विचारू शकत नाहीत. भक्तीमार्गा मध्ये तुम्ही गात आले आहात,
बाबा तुम्हीं आलात तर आम्ही तुमच्या शिवाय आणखीन कोणाचे ऐकणार नाही. इतर सर्व दुःख
देत आहेत. तुम्हीं सुख देणारे आहात. तर बाबा येऊन आठवण देतात कि, तुम्हीं काय
म्हणाला होता. तुम्हीं जाणत आहात, तुम्हाला ब्रह्माकुमार कुमारी म्हटले जाते.
मनुष्याची अशी पत्थरबुद्धी आहे,जे हे पण समजत नाहीत कि, बी.के. कोण आहेत. मम्मा बाबा
कोण आहेत. हे का़ही साधु संत तर नाहीत. साधू संन्याशी ला गुरु म्हणतात. माता-पिता
म्हणत नाहीत. हे बाबा येऊन दैवी धर्म, दैवी राज्य स्थापन करतात. जिथे हे लक्ष्मी
नारायण राजा राणी राज्य करत होते. पहिले पवित्र होते, मग अपवित्र बनले आहेत. जे
पुज्य होते ते मग 84 जन्म घेतात. पहिल्या प्रथम बेहदच्या बाबा कडून 21 जन्माचा
सुखाचा वरसा मिळतो. कुमारी ती आहे जी 21 कुळाचा उद्धार करते. हे तुमचे गायन आहे.
तुम्हीं कुमारी आहात. गृहस्थी नाहीत. जरी मोठे आहात परंतु मरजीवा बनले आहात, सर्व
बाबाची मुले-मुली बनले आहेत. प्रजापिता ब्रह्मा ची अनेक मुले आहेत, आणखीन वाढ होत
राहते. मग हे सर्व देवता बनतील. हा शिवबाबा चा यज्ञ आहे. याला राजस्व यज्ञ म्हणले
जाते.स्वराज्य प्राप्त करणारा यज्ञ. आत्म्यांना बाबा कडून स्वर्गाच्या राज्याचा वरसा
मिळत आहे. या राजस्व अश्वमेघ ज्ञान यज्ञा मध्ये काय करायचे आहे? शरीरा सहित जे
कांही आहे, ते अर्पण करायचे आहे, म्हणजे स्वाहा करायचे आहे. या यज्ञा नंतर तुम्ही
मग राज्य प्राप्त करता. बाबा आठवण देतात कि, भक्तीमार्गा मध्ये तुम्हीं गात होता
कि, हे बाबा, तुम्हीं जेंव्हा याल तर आम्ही समर्पित होऊ, अर्पण होऊ. आता तुम्ही
स्वतःला सर्व ब्रह्माकुमार, कुमारी तर समजत आहात. जरी आपल्या गृहस्थ व्यवहारा मध्ये
राहतात परंतु पावन राहायचे आहे, कमल फुलासारखे. स्वतःला आत्मा समजा. आम्ही बाबाची
मुले आहोत. तुम्हीं आत्मे आशिक आहात. बाबा म्हणतात, मी एकच माशूक आहे. तुम्हीं
माशुक ला बोलावत आहात. तुम्हीं अर्धा कल्पाचे आशिक आहात, ज्याला परमपिता परमात्मा
म्हटले जाते, ते निराकार आहेत. आत्मा पण निराकार आहे, जी या शरीराद्वारे अभिनय करत
आहे. भक्तीमार्गा मध्ये पण तुम्हाला अभिनय करायचा आहे. भक्ति रात्र आहे. अंधारा
मध्ये मनुष्य ठेचा खातात. द्वापार पासून तुम्ही ठेचा खात आले आहात. यावेळी महादु:खी
बनले आहात. आता जुन्या दुनियाचा अंत आहे. हे पैसे इत्यादी सर्व माती मध्ये मिळून
जातील. जरी कोणी करोडपती आहे, राजा आहे, मुले जन्माला आली, तर समजतात,हे धन आमच्या
मुलांसाठी आहे. आमची मुले,नातू खातील. बाबा म्हणतात, कोणी पण खाणार नाहीत. ही
दुनियाच नाहीशी होणार आहे. बाकी थोडा वेळ आहे. विघ्न फार पडतील. आपसा मध्ये भांडतील.
शेवटाला असे भांडतील, ज्यामुळे रक्ताच्या नद्या वाहतील. तुमचे तर कोणा बरोबर युद्ध
नाही. तुम्हीं योगाबळा मध्ये राहता. तुम्हीं आठवणी मध्ये राहिला तर कोणी पण तुमच्या
समोर वाईट विचाराने आला, तर त्यांना भयंकर साक्षात्कार होतील, आणि तो झटक्यात पळून
जाईल. तुम्हीं शिवबाबा ची आठवण करता, आणि ते पळून जातील. जी पक्की मुले आहेत,
पुरुषार्था मध्ये राहतात कि, माझे तर एकच शिवबाबा, दुसरे कोणी नाही. बाबा समजावतात
कि, हाताने काम कर,.मुलांचा घराचा पण सांभाळ करा परंतु तुम्हां मुलांना बाबाची आठवण
करायची आहे, तरच पापाचे ओझे उतरेल. माझीच आठवण करा, तर तुम्ही तमोप्रधान पासून
सतोप्रधान बनाल, परंतु नंबरवार पुरुषार्थानुसार. मग तुम्ही हे शरीर सोडाल, बाबा
सर्व आत्म्यांना मच्छरा सारखे घेऊन जातील,बाकी सारी दुनिया सजा खात राहील. भारता
मध्ये बाकी थोडे जाऊन राहतील. त्यांच्या साठी हे महाभारताचे युद्ध आहे. इथे तर फार
वृध्दी होईल. प्रदर्शनी, प्रोजेक्टर इत्यादी द्वारे किती ऐकत आहेत, ती प्रजा बनत आहे.
राजा तर एकच असतो, बाकी प्रजा बनतात. वजीर पण प्रजेच्या रांगेमध्ये येतात, खूप प्रजा
बनते. एका राजाची लाखोच्या अंदाजा मध्ये प्रजा असते, तर राजा-राणीला मेहनत करावी
लागेल ना.
बाबा म्हणतात, सर्वकांही करताना, निरंतर माझी आठवण करा. जसे आशिक माशुक असतात,
त्यांचे शारीरिक प्रेम असते. तुम्हीं मुले यावेळी आशिक आहात. तुमचे माशुक आले आहेत.
तुम्हाला शिकवित आहेत. शिकून शिकून तुम्हीं देवता बनाल. आठवणीने विकर्म विनाश होतील,
आणि तुम्हीं सदैव निरोगी पण बनाल. मग 84 च्या चक्राची पण आठवण करायची आहे. सतयुगा
मध्ये एवढे जन्म, त्रेता मध्ये एवढे जन्म. आम्ही देवी देवता धर्म वाल्यानेच पूर्ण
84 चे चक्कर लावले आहे. पुढे चालून तुमची फार वृद्धी होईल. तुमचे सेवा केंद्र
हजारोंच्या अंदाजा मध्ये होतील. गल्ली गल्ली मध्ये समजावत राहाल कि, फक्त बाबाची आणि
वरशाची आठवण करा. आता परत घरी जायचे आहे. हे तर छी छी शरीर आहे. हे बेहदचे वैराग्य
आहे. संन्यासी तर फक्त हदचे घरदार सोडून जातात. ते हठयोगी आहेत, ते राजयोग शिकवू
शकत नाहीत. म्हणतात कि, ही भक्ती पण अनादि आहे. बाबा म्हणतात, ही भक्ती तर व्दापार
पासून सुरु झाली आहे. 84 च्या पायऱ्या उतरून आता तुम्ही तमोप्रधान बनले आहात.
तुम्हीच ते देवी-देवता होता. ख्रिश्चन म्हणतात, आम्ही तेच क्रिश्चन होतो. तुम्ही
जाणता आम्ही सतयुगा मध्ये होतो. बाबाने देवी-देवता धर्माची स्थापना केली. हे जे
लक्ष्मी नारायण होते, ते आता ब्राह्मण बनले आहेत. सतयुगा मध्ये एक राजा राणी होते.
एक भाषा होती. हे पण मुलांनी साक्षात्कारा मध्ये पाहिले आहे. तुम्हीं सर्व आदि
सनातन धर्माचे आहात. तुम्हींच 84 जन्म घेत आहात. ते जे म्हणतात आत्मा निर्लेप आहे
किंवा ईश्वर सर्वव्यापी आहेत, ते चूक आहे. सर्वात आत्मा आहे. मग कसे म्हणता कि,
आमच्या मध्ये परमात्मा आहे. मग तर सर्वच पिता होतील. किती तमोप्रधान बनले आहेत.
पूर्वी जे ऐकत होता, ते मानत आले आहात. आता बाबा येऊन सत्य सांगत आहेत. तुम्हाला
ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. ज्यामुळे तुम्हीं सृष्टीच्या आदि, मध्य,अंताला
ओळखले आहे. अमर कथा पण हीच आहे. बाकी सूक्ष्मवतन मध्ये कथा इत्यादी नसतात. हे सर्व
भक्तिमार्गाचे कलम आहे. तुम्हीं अमर कथा ऐकत आहात, अमर बनण्यासाठी. तिथे तुम्ही
खुशीने एक शरीर सोडून दुसरे घेत आहात. इथे जर कोणी मेला तर रडतात, पडतात. तिथे रोग
इत्यादी नसतात. सदैव नेहमी साठी आरोग्यसंपन्न असतात. आयुष्य पण फार मोठे असते. तिथे
पतीतपणा होत नाही.आता हे सर्व पक्के करायचे आहे कि, आम्ही 84 जन्माचे चक्र पूर्ण
केले. आता बाबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. पावन बनण्याच्या युक्त्या पण
तुम्हाला सांगत आहेत. फक्त बाबाची आणि वरशाची आठवण करा. सतयुगा मध्ये १६ कला
संपूर्ण, मग कला कमी होत जातात. आता तुमच्या मध्ये कोणत्या कला राहिल्या नाहीत. बाबा
दुःखा पासून सोडवून सुखा मध्ये घेऊन जातात. त्यामुळे मुक्तिदाता म्हटले जाते.
सर्वांना आपल्या बरोबर घेऊन जातात. तुमचे गुरु तुम्हाला बरोबर थोडेच घेऊन जातात. ते
गुरु निघून गेले तर त्यांच्या शिष्याला गादीवर बसवितात, मग शिष्या मध्ये फार गडबड
होऊन जाते. आपसा मध्ये गादीसाठी भांडतात. बाबा म्हणतात, मी तुम्हा आत्म्यांला बरोबर
घेऊन जातो. तुम्ही संपूर्ण बदलले नाही, तर सजा खाल,आणि पद पण भ्रष्ट होईल. इथे
राजधानी स्थापन होत आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप बापदादाची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आठवणीचा
असा अभ्यास करायचा आहे, जे वाईट विचारवाले समोर आले तर त्याचे परिवर्तन होईल. माझे
तर एक बाबा दुसरे कोणी नाही, या पुरुषार्था मध्ये राहायचे आहे.
(२) स्वराज्य प्राप्त करण्यासाठी, शरीरा सहित जे कांही आहे, ते अर्पण करायचे आहे,
जेंव्हा या रुद्र यज्ञा मध्ये सर्व कांही स्वाहा कराल, ते़व्हा राज्यपद मिळेल.
वरदान:-
ज्ञानी तू
आत्मा बनून, ज्ञानसागर आणि ज्ञानामध्ये सामावून जाणारे, सर्व प्राप्ती स्वरूप भव:
जे ज्ञानी तू आत्मे
आहेत, ते नेहमी ज्ञानसागर आणि ज्ञानामध्ये सामावलेले असतात, सर्व प्राप्ती स्वरूप
बनल्यामुळे, इच्छां मात्रंम अविद्या स्थिती स्वतःच राहते. जे अंशमात्र पण कोणत्या
स्वभाव संस्काराच्या अधीन आहेत, नाव, मान, शान मागतात, काय, का ? च्या प्रश्ना मध्ये
ओरडतात, बोलतात, आत एक बाहेर दुसरे रूप आहे, त्यांना ज्ञानी तु आत्मा म्हटले जात
नाही.
बोधवाक्य:-
या जीवना मध्ये
अतिंद्रिय सुख व आनंदाची अनुभूती करणारेच सहजयोगी आहेत.