05-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,येथे सर्व काही गुप्त आहे,म्हणून तुम्हाला कोणताही दिखावा करायचं नाही,आपल्या नवीन राजधानीच्या नशेमध्ये राहायचे आहे"

प्रश्न:-
श्रेष्ठ धर्म आणि दैवी कर्माच्या स्थापनेसाठी तुम्ही मुलं कोणते कष्ट घेत आहात?

उत्तर:-
तम्ही आता पाच विकाराला सोडण्याचे कष्ट घेत आहात,कारण या विकारांनी सर्वांना भ्रष्ट बनवले आहे.तुम्ही जाणतात या वेळेत सर्व दैवी धर्म आणि कर्मभ्रष्ट झालेले आहेत.बाबा श्रीमत देऊन श्रेष्ठ धर्म आणि श्रेष्ठ दैवी कर्माची स्थापना करतात.तुम्ही श्रीमता वर चालून बाबाच्या आठवणी द्वारे विकारावरती विजय मिळवतात. राजयोगाच्या शिक्षणाद्वारे स्वतःला राज तिलक देतात.

गीत:-
तुम्हाला प्राप्त केल्यानंतर सर्व काही मिळाले….

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलंच बाबा म्हणतात.मुलं जाणतात हे बेहद्दचे बाबा सुख देणारे आहेत, म्हणजेच ते सर्वांचे पिता आहेत. त्यांची सर्व बेहद्दची मुलं,आ्त्मे आठवण करत राहतात.कोणत्या ना कोणत्या प्रकारेआठवण करत राहतात परंतु त्यांना माहीत नाही की,आम्हाला त्या परमपिता परमात्मा द्वारे विश्वाची बादशाही मिळते.तुम्ही जाणतात आम्हाला बाबा विश्वाची बादशाही देतात,ती

अटल,अखंड,अडोल आहे,तीच आमची बादशाही २१ जन्म कायम राहते.संपूर्ण विश्वावरती आमचे राज्य होते,ज्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही,लुटू शकत नाही. आमची राजाई अडोल आहे,कारण तेथे एकच धर्म आहे,द्वैत नाही.ते अद्वैत राज्य आहे,तर आपल्या राजधानीचा नशा चढायला पाहिजे. असे गीत घरी ठेवायला पाहिजेत. तुमचे सर्व काही गुप्त आहे आणि मोठमोठ्या मनुष्याचा तर खूप दिखावा असतो.तुमचा काहीच दिखावा नाही.तुम्ही पाहतात बाबांनी ज्यांच्या मध्ये प्रवेश केला आहे,ते खूप साधारण राहतात.हे पण मुलं जाणतात,येथे प्रत्येक मनुष्य चुकीचे,खराब काम करत राहतात, म्हणून बेसमज म्हटले जाते.बुध्दीला कुलुप लागले आहे. तुम्ही खूप समजदार होते.विश्वाचे मालक होते.आता मायानी खूप बेसमजदार बनवले आहे,जे काही च कामाचे राहीले नाहीत.बाबांना भेटण्यासाठी,यज्ञ,तप इत्यादी खूप करत राहतात परंतु मिळत काहीच नाही.असेच धक्के खात राहतात.

दिवसें दिवस अकल्याणच होत जाते जाते. जितके-जितके मनुष्य तमोप्रधान बनत जातात,तेवढे अकल्याण होत जाते.ऋषीमुनी ज्यांचे गायन आहे, ते पवित्र होते.ते तर आम्हाला ईश्वरा बद्दल,खरी माहित नाही,असे म्हणत होते, म्हणजे नेती नेती करत होते.आता तर तमोप्रधान बनले आहोत,म्हणून शिवोहम,ततत्वम म्हणजे तुम्ही पण शिव आहात आणि आम्ही पण शिव आहोत आणि सर्वव्यापी आहोत असे समजतात.तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सर्वा मध्ये आहेत असे म्हणतात.ते लोक फक्त परमात्मा म्हणतात,परमपिता कधीच म्हणणार नाहीत.परमपिता ज्यांना परत सर्वव्यापी मानणे चुकीचे होते म्हणून परत ईश्वर किंवा परमात्मा म्हणतात.पिता अक्षर बुद्धीमध्ये येत नाही.काही जण पिता म्हणतात, परंतू नाममात्र.जर परमपिता समजत असतील तर बुद्धी एकदम चमकून जाईल.बाबा स्वर्गाचा वारसा देतात,ते स्वर्गिय ईश्वरीय पिता आहेत,परत आम्ही नरकामध्ये का पडलो आहोत.आता आम्हाला स्मृति आली आहे की,मुक्ती जीवनमुक्ती कशी मिळू शकते.हे कोणाचे बुद्धीमध्ये येत नाही,पतित बनले आहेत.आत्मा प्रथम सतोप्रधान समजदार होती परत सतो,रजो, तमो मध्ये येते.आत्ता बेसमजदार बनली आहे.आता तुम्हाला समजले आहे,बाबांनी स्मृती दिली आहे,जेव्हा नवीन दुनियेमध्ये भारत होता,तर आमचे राज्य होते,एक मत,एक भाषा,एक धर्म, एकच महाराजा महाराणीचे राज्य होते, परत द्वापार युगामध्ये वाममार्गाला सुरूवात होते परत प्रत्येकाच्या कर्मावर आधारीत होते.कर्मानुसार एक शरीर सोडून दुसरे घेतात.आता बाबा म्हणतात,मी तुम्हाला असे कर्म शिकवतो,जे २१ जन्म तुम्ही बादशाही घेतात.जरी तेथे हदचे पिता मिळतात परंतु तेथे तर हे ज्ञान राहू शकत नाही की,राजाईचा वारसा बेहद्दच्या बाबाने दिला आहे.परत द्वापरयुगा पासून रावणाचे राज्य सुरू होते,विकारी संबंध होतो.परत कर्मानुसार जन्म मिळतो.भारतामध्ये राज्य होते तर पुजारी राजे पण होते.सतयुगा मध्ये सर्व पुज्य होते,तेथे पूजा किंवा भक्ती काही होत नाही,परत द्वापर मध्ये जेव्हा भक्ती सुरु होते तर यथा राजा तथा प्रजा पुजारी भक्त बनतात.मोठ्यात मोठे राजे जे सूर्यवंशी पुज्य होते,तेच पुजारी बनतात.

आता तुम्ही जे निर्विकारी बनवतात, त्याचे प्रारब्ध २१ जन्म मिळत राहते, परत भक्तिमार्ग सुरू होतो. देवतांचे मंदिर बनवून पूजा करत राहतात.हे फक्त भारतामध्ये होते. ८४ जन्माची कहाणी,जे बाबा ऐकवतात,हे पण भारतवासीं साठीच आहे.दुसऱ्या धर्माचे जे आहेत,ते नंतर येतात.परत वृद्धी होत-होत अनेक होतात.वेगवेगळ्या धर्माचे,चेहरे,चाल चलन,वेग वेगळे असते. भक्ती मार्गासाठी सामग्री पण पाहिजे ना.जसे बीज खूप छोटे असते, तरीही झाड खूप मोठे होते. झाडांची पाने इत्यादी मोजू शकत नाही.तसेच भक्तींचा पण विस्तार होतो.अनेकानेक ग्रंथ बनवत जातात.आता बाबा मुलांना म्हणतात,भक्तिमार्गाची सामग्री सर्व नष्ट होईल.आता मज पित्याची आठवण करा.भक्तीचा प्रभाव खूप आहे ना. खूप सुंदर आहे,नाच, गाणी,इत्यादी खूप खर्च करत राहतात.आता बाबा म्हणतात मज पित्याची आणि वारशाची आठवण करा.आपल्या आदी सनानात धर्माची आठवण करा.तुम्ही अनेक प्रकारची भक्ती तर जन्म जन्मांतर करत आला आहात.जे आत्म्याचे राहण्याचे स्थान आहे,त्यालाच परमात्मा समजतात.ब्रह्म किंवा तत्वाची आठवण करतात.वास्तवमध्ये संन्यासी जेव्हा सतोप्रधान आहेत तर त्यांना जंगलामध्ये जाऊन, शांतीमध्ये राहायचे आहे.असे नाही की त्यांना ब्रह्म मध्ये जाऊन विलीन व्हायचे आहे.ते समजतात ब्रह्म च्या आठवणी मध्ये राहून,शरीर सोडल्यामुळे ब्रह्म मध्येच विलीन होऊन जाऊ.बाबा म्हणतात विलीन कोणी होऊ शकत नाही.आत्मा तर अविनाशी आहे ना.ती विलीन कशी होऊ शकेल.भक्तीमार्गामध्ये खूप माथाकूट करत राहतात,परत म्हणतात भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतील.आता कोण बरोबर आहे? ते म्हणतात आम्ही ब्रह्म तत्वा सोबत योग लावून ब्रह्म मध्ये विलीन होऊ.गृहस्थ धर्माचे म्हणतात,भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पतितांना पावन बनवण्यासाठी येतील.असे नाही की वरुन प्रेरणा द्वारे शिकवतील.शिक्षक घरी बसून प्रयत्न करतील काय!प्रेरणा अक्षरच नाही.प्रेरणाद्वारे कोणते काम होत नाही.जर शंकराच्या प्रेरणाद्वारे विनाश होतो,असे म्हणले जाते परंतु हे पूर्वनियोजित नाटकांमध्ये नोंद आहे.त्यांनी हे मुसळ इत्यादी बनवायचे आहेत. ही फक्त महिमा गायन केली जाते.कोणीही आपल्या मोठ्यांची महिमा जाणत नाहीत. धर्मस्थाकाला पण गुरु म्हणतात, परंतु ते तर फक्त धर्म स्थापन करतात.गुरु त्यांना म्हटले जाते,जे सद्गती करतात.ते तर धर्म स्थापन करण्यासाठी येतात.त्यांच्या पाठीमागे त्यांची वंशावळी येत राहते.सदगती तर कोणाची करत नाहीत,तर त्यांना गुरु कसे म्हणणार? गुरु तर एकच आहेत, त्यांना सर्वांचे सदगती दाता म्हटले जाते.भगवान पिताच येऊन सर्वांची सदगती करतात.मुक्ती जीवनमुक्ती देतात,त्यांची आठवण कधी कोणी विसरू शकत नाहीत.जरी पतीशी खूप प्रेम राहते,तरीही हे भगवान म्हणतात,कारण तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत.बाबा सन्मुख समजवतात,ही सर्व रचना आहे. रचनाकार पिता तर मीच आहे. सर्वांना सुख देणारा एकच पिता आहेत.भाऊ भावाला वारसा देऊ शकत नाही.वारसा नेहमी पित्याकडून मिळतो.तुम्हा सर्व बेहद्द च्या मुलांना,बेहद्दचा वारसा देतात म्हणून माझी आठवण करतात,हे परमपिता क्षमा करा,दया करा, समजत काहीच नाहीत.भक्तिमार्गा मध्ये अनेक प्रकारची महिमा करतात.हे पण पूर्वनियोजित नाटका नुसार आपली भूमिका वठवत राहतात.बाबा म्हणतात मी काही यांच्या बोलवण्यावरून येत नाही,हे तर पूर्वनियोजित नाटक आहे. अविनाश नाटकांमध्ये माझी येण्याची नोंद आहे.अनेक धर्माचा विनाश,एक धर्माची स्थापना किंवा कलियुगाचा विनाश आणि सतयुगाची स्थापना करायची असते.मी माझ्या वेळेनुसार आपोआप येतो.या भक्तिमार्गाचे पण पूर्वनियोजित नाटकांमध्ये नोंद आहे.जेव्हा भक्ती मार्गाची भूमिका पूर्ण होईल,तेव्हा मी येतो.मुलं पण म्हणतात,आता आम्ही जाणले आहे,पाच हजार वर्षाच्या नंतर परत येऊन,परत आपणास भेटलो आहोत.कल्पा पूर्वी पण बाबा तुम्ही ब्राह्मण तनामध्ये आले होते.हे ज्ञान तुम्हाला आता मिळते,परत कधी मिळणार नाही.हे ज्ञान आहे,ती भक्ती आहे. ज्ञानाचे प्रारब्ध चढती कला आहे.सेकंदामध्ये जीवनमुक्ती म्हटले जाते.असे म्हणतात जनक राजानी सेकंदामध्ये जीवन मुक्ती मिळवली. काय फक्त एक जनक ला जीवन मुक्ती मिळाली.जीवन मुक्ती म्हणजे या रावणाच्या राज्या मधून मुख्यतः करतात.

बाबा जाणतात सर्व मुलांची खूप दुर्गति झाली आहे.त्यांची परत सदगती होणार आहे.दुर्गती पासून परत उच्च गती,मुक्ती जीवन मुक्ती प्राप्त करतात.प्रथम मुक्ती मध्ये जाऊन परत जीवन मुक्ती मध्ये येतात‌.शांती मधून परत सुखधाममध्ये येतात.या चक्राचे सर्व रहस्य बाबांनी समजावले आहे. तुमच्यासोबत दुसरे धर्मपण येतात, मनुष्य सृष्टीची वृद्धी होत जाते. बाबा म्हणतात या वेळेत,हे मनुष्य सृष्टीचे झाड तमोप्रधान जडजडीभूत झाले आहे.आदी सनातन देवी-देवता धर्माचा पाया सर्व सडला आहे, बाकी सर्व धर्म उभे आहेत.भारतामध्ये एक पण स्वतःला देवी-देवता धर्माचे समजत नाहीत.तसे तर देवता धर्माचे आहेत परंतु या वेळेत समजत नाहीत की आम्ही आदी सनातन देवी-देवता धर्माचे होतो,कारण देवता तर पवित्र होते.ते समजतात आम्ही तर पवित्र नाहीत‌.आम्ही असे,अपवित्र,पतित स्वतःला देवता कसे म्हणू शकतो.हे पण अविनाश नाटकानुसार हिंदू म्हणण्याचा रीतिरिवाज आहे.

जनगणना करताना पण हिंदू धर्म लिहितात,जरी गुजराती असतील तरी पण हिंदू गुजराती लिहतील. त्यांना विचारा की हिंदू धर्म कोठून आला, तर कोणालाही माहिती नाही.ते फक्त म्हणतात आमचा धर्म कृष्णाने स्थापन केला.कधी?तर म्हणतात द्वापरपासून. द्वापरापासूनच हे लोक स्वतःच्या धर्माला विसरून हिंदू म्हणायला लागले,म्हणून त्यांना दैवी धर्मभ्रष्ट म्हटले जाते‌.तेथे सर्व चांगले काम करतात,येथे तर सर्व खराब काम करतात म्हणून देवी-देवता धर्मभ्रष्ट, कर्म भ्रष्ट म्हटले जाते.आता परत श्रेष्ठ धर्म,श्रेष्ठ दैवी कर्माची स्थापना होत आहे,म्हणून म्हटले जाते,आता विकाराला सोडत जावा.हे विकार अर्ध्या कल्पापासून आहेत.आता एका जन्मा मध्ये विकाराला सोडण्याचे कष्ट घ्यायचे आहेत, कष्टाशिवाय थोडीच विश्वाची बादशाही मिळेल.बाबांची आठवण कराल,तेव्हाच तुम्ही स्वतःला राजाईचा तिलक देऊ शकाल, अर्थात राजाईचे अधिकारी बनू शकाल.जितके चांगल्या प्रकारे आठवणींमध्ये राहाल,श्रीमतावर चालाल तर तुम्ही राजांचे राजा बनाल.तुम्हाला शिकवणारे शिक्षक शिकवण्यासाठी आले आहेत. मनुष्यापासून देवता बनण्याची ही पाठशाला आहे.नरापासून नारायण बनण्याची कथा ऐकवत आहेत.ही कथा तर खूप प्रसिद्ध आहे.याला अमर कथा,सत्यनारायणाची कथा,तिजरीची कथा म्हटले जाते. तीन्हीचा अर्थ बाबाच समजवतात. भक्तिमार्ग मध्ये तर खूप कथा आहेत. हे गीत किती चांगले आहे. बाबा आम्हाला संपूर्ण विश्वाचे मालक बनवतात,जे मालकपणा कोणी लुटू शकत नाही,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातापिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) नेहमी ही स्मृती ठेवायची आहे की, आम्ही एकमत,एक राज्य,एक धर्माची स्थापना करण्यासाठी निमित्त आहोत म्हणून एकमत होऊन राहायचे आहे.

(२) स्वतःला राजाईचा तिलक देण्यासाठी विकाराला सोडण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.राजयोगाच्या शिक्षणावरती पूर्ण लक्ष द्यायचे आहे.

वरदान:-
त्रिकालदर्शी स्थिती द्वारा मायेच्या आघाता पासून सुरक्षित राहणारे,अतींद्रिय सुखाचे अधिकारी भव.

संगम युगाचे विशेष वरदान किंवा ब्राह्मण जीवनाची विशेषता अतिइंद्रिय सुख आहे.हा अनुभव दुसऱ्या कोणत्या युगामध्ये होत नाही परंतु या सुखाच्या अनुभूतीसाठी त्रिकालदर्शी स्थिती द्वारा मायेच्या आघाता पासून सुरक्षित रहा.जर नेहमीच मायेकडून आघात होत राहील,तर इच्छा असतानाही अतिंद्रीय सुखाचा अनुभव करू शकणार नाहीत‌. जे अतिंद्रिय सुखाचा अनुभव करतात, त्यांना इंद्रियाचे सुख आकर्षित करू शकत नाही.ज्ञानसंपन्न असल्यामुळे त्यांच्यासमोर ते तुच्छ दिसून येते.

बोधवाक्य:-
कर्म आणि मनसा दोन्ही सेवेचे संतुलन असेल तर, शक्तिशाली वातावरण बनवू शकते.