10-02-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही या विद्यापीठांमध्ये जुन्या दुनिया पासून मरून नवीन दुनिया मध्ये जाण्यासाठी आले आहात,आता तुमचे प्रेम एका भगवंता बरोबर झाले आहे"

प्रश्न:-
कोणत्या विधीद्वारे बाबांची आठवण तुम्हाला सावकार बनवते?

उत्तर:-
बाबा बिंदू आहेत.तुम्ही बिंदू बनून बिंदूची आठवण करा,तर सावकार बनाल.जसे एकाच्या पुढे बिंदू लावा तर दहा होईल,परत बिंदू लावा १००,परत बिंदू लावा तर १००० होतात.असेच बाबाच्या आठवणीने बिंदू लागत जातात, तुम्ही धनवान बनत जाता. आठवणी द्वारेच कमाई होत जाते.

गीत:-

महफिलमे जल उठी शमा….

ओम शांती।
या गीताचा अर्थ खूप विचित्र आहे,प्रीत कशासाठी बनलेली आहे,कोणा सोबत बनली आहे,?भगवंताशी,कारण या दुनियेशी मरुन त्यांच्याजवळ जायचे आहे.असे प्रेम कधी कोणाच्या सोबत होते काय?जे हा विचार येईल की मरून जाऊ,परत कोणी प्रेम करतील?गीताचा अर्थ खूप आश्चर्यकारक आहे.शमा सोबत परवाने प्रेम करून चक्र लावून जळून मरतात.तुम्हाला बाबांच्या प्रेमात शरीर सोडायचे आहे,अर्थात बाबांची आठवण करत करत शरीर सोडायचे आहे.हे फक्त एका साठीच म्हणले जाते.बाबा जेव्हा येतात तर त्यांच्याशी प्रेम केले जाते,त्यांना या दुनिये पासून मरावे लागते. भगवंताशी प्रेम करतात,तर मरुन कुठे जातील? जरूर भगवंताच्या जवळ जातील.मनुष्य दान-पुण्य, तीर्थयात्रा इत्यादी करतात, भगवंताजवळ जाण्यासाठी. शरीर सोडते वेळेस पण मनुष्याला म्हणतात की,भगवंताची आठवण करा.भगवान तर खूपच प्रसिद्ध आहेत.ते येतात तेव्हा,सर्व दुनिया नष्ट करतात.तुम्ही जाणता आम्ही या विद्यापीठांमध्ये आलो आहे,जुन्या दुनियेपासून मरून नवीन दुनिया मध्ये जाण्यासाठी. जुन्या दुनियेला पतित दुनिया,नर्क म्हटले जाते.बाबा नवीन दुनिया मध्ये जाण्यासाठी रस्ता सांगतात, फक्त माझी आठवण करा,मी स्वर्गीय ईश्वर पिता आहे. त्या पित्याकडून तुम्हाला धन मिळते, मिळकत घर इत्यादी मिळते. मुलींना तर वारसा मिळत नाही, त्यांना दुसऱ्या घरी पाठवतात, म्हणजेच ती तर वारीस झाली नाही. हे भगवान तर सर्व आत्म्यांचे पिता आहेत,त्यांच्याजवळ सर्वांना यायचे आहे.कोणत्या वेळेस जरूर बाबा येतात आणि सर्वांना घरी घेऊन जातील कारण नवीन दुनिया मध्ये खूप थोडे मनुष्य असतात.जुन्या दुनिया मध्ये तर खूप आहेत.नवीन दुनिया मध्ये मनुष्य थोडे आणि सुख खूप असते.जुन्या दुनिया मध्ये खूप मनुष्य आहेत,तर दुःख पण खूप आहे,म्हणून बोलवत राहतात.बापू गांधीजी पण म्हणत होते,फक्त त्यांना जाणत नव्हते.असे समजतात की,पतित-पावन परमपिता परमात्मा आहेत.तेच विश्वाचे मुक्तिदाता आहेत.राम सीतेला तर सर्व दुनिया मानणार नाहीत.सर्व दुनिया परमपिता परमात्मा ला मुक्तिदाता,मार्गदर्शक म्हणते,दुःखापासून मुक्त करतात. अच्छा दुःख देणारे कोण आहेत? बाबा तर दुःख देऊ शकत नाहीत, कारण ते पतित-पावन आहेत.पावन दुनिया सुखधाम मध्ये घेऊन जाणारे आहेत.तुम्ही त्या आत्मिक पित्याची मुलं आहात.जसे पिता तशीच मुलं. लौकिक पित्याचे लौकिक म्हणजेच शारीरिक मुलं आहेत.आता तुम्हा मुलांना हे समजायचे आहे की आम्ही आत्मा आहोत,परमपिता परमात्मा आम्हाला वारसा देण्यासाठी आले आहेत.आम्ही त्यांची मुलं बनलो,तर स्वर्गाचा वारसा जरूर मिळेल.ते स्वर्ग स्थापन करणारे आहेत.आम्ही विद्यार्थी आहोत,हे विसरायचे नाही. मुलांच्या बुद्धी मध्ये राहते की, शिवबाबा मधुबन मध्ये मुरली वाजवतात.ती बांबूची मुरली तर वाजवत नाहीत.कृष्णाचे रास करणे, मुरली वाजवणे,हे सर्व भक्ती मार्गाचे आहे.बाकी ज्ञानाची मुरली तर शिवबाबाच वाजवतात. तुमच्याजवळ चांगले चांगले गीत बनवणारे पण येतील.गीत सहसा पुरुषच बनवतात.तुम्हाला ज्ञानाचे गीत गायचे आहेत,ज्यामुळे शिवबाबा ची आठवण येईल.

बाबा म्हणतात,मज ईश्‍वराची आठवण करा.शिवाला बिंदू म्हणतात, व्यापारी लोक बिंदू देतात,तर शिव म्हणतात.एका च्या पुढे बिंदू लिहा तर दहा होईल परत बिंदू लिहा तर शंभर होईल परत बिंदू लिहा तर हजार होईल.तर तुम्हाला पण शिव बाबांची आठवण करायची आहे,जितकी आठवण कराल तर बिंदू लागत जाईल,तुम्ही अर्ध्या कल्पासाठी सावकार बनतात.स्वर्गामध्ये गरीब कोणीही नसते,सर्व सुखी राहतात.दुःखाचे नाव नाही.बाबांच्या आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतात.तुम्ही खूप धनवान बनतात,याला म्हटले जाते खऱ्या पित्याद्वारे खरी कमाई,हीच सोबत येईल.मनुष्य खाली हात येतात,तुम्ही तर भरलेल्या हाताने जाल.बाबांची आठवण करायची आहे.बाबानी समजवले आहे पवित्रता असेल,तर शांती संपत्ती पण मिळेल.तुम्ही आत्मा प्रथम पवित्र होते,परत अपवित्र बनले आहात.सन्याशांना पण सेमी पवित्र म्हणणार.तुमचा आहे पूर्ण संन्यास. तुम्ही जाणतात,ते किती सुख घेतात.अगोदर लोक ईश्वराला सर्वव्यापी म्हणत होते, सर्वव्यापी म्हटल्यामुळे अधोगतीच झाली. दुनिया मध्ये अनेक प्रकारच्या यात्रा असतात, कारण कमाई होते ना, त्यांचा तर धंदा आहे.असे म्हणतात सर्व धंद्या मध्ये धूळ,शिवाय नरापासून नारायण बनण्याच्या.हा धंदा कोणी विरळाच करू शकतात. बाबाचे बनवून सर्वकाही बाबांना द्यायचे आहे,कारण तुमची इच्छा आहे,नवीन शरीर मिळावे.बाबा म्हणतात तुम्हाला कृष्णपुरी मध्ये पाठवले होते जेव्हा आत्मा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनली होती.कृष्णपुरी मध्ये असे म्हणणार नाही कि,आम्हाला पावन बनवा. येथे सर्व मनुष्य बोलवत राहतात की,हे मुक्तिदाता, या पाप आत्म्याच्या दुनिया मधून आम्हाला मुक्त करा.आता तुम्ही जाणतात, बाबा आले आहेत,आम्हाला आपल्या सोबत घेऊन जातात.तेथे जाणे तर चांगले आहे ना.मनुष्य शांतीची इच्छा ठेवतात.आता शांती कशाला म्हणतात? कर्मा शिवाय तर कोणी राहू शकत नाही शांती शांतीधाम मध्ये आहे,परत शरीर घेऊन कर्मतर करायचेच आहे.सत्ययुगा मध्ये काम करत शांती पण राहते.शांती मध्ये मनुष्याला खूप दुःख होते,कारण असे म्हणतात शांती कशी मिळेल. आता तुम्ही मुलं जाणतात, शांतीधाम तर माझे घर आहे.सुखधाम मध्ये शांती पण आहे आणि संपन्नता पण आहे.सर्व काही आहे.आता ते पाहिजे की, फक्त शांती पाहिजे.येथे तर दु:खधाम आहे म्हणून पतितपावन बाबांनाच बोलवत राहतात.भगवंताशी भेटण्यासाठी भक्ती करतात.भक्ती पण प्रथम अव्यभिचारी असते,परत व्यभिचारी होते.भक्ती मध्ये काय काय करत राहतात.व्यभिचारी भक्ती मध्ये पहा काय काय करतात.शिडीच्या चित्रांमध्ये खूप चांगली माहिती आहे,परंतु प्रथम तर सिद्ध करायला पाहिजे,भगवान कोण आहेत? श्रीकृष्णाला असे कोणी बनवले, अगोदरच्या जन्मांमध्ये कोण होते? समजून सांगण्यासाठी युक्ती पाहिजे.जे चांगली सेवा करतात त्यांचे मन पण पुरावा देते. विद्यापीठांमध्ये जे चांगले शिकतात,तर जरूर हुशार बनतील. क्रमानुसार तर असतातच ना.कोणी बुध्दू पण असतात.शिवबाबांना आत्मा म्हणते,माझ्या बुद्धीचे कुलूप उघडा.बाबा म्हणतात मी तर कुलुप उघडण्यासाठीच आलो आहे,परंतू तुमचे कर्म असे आहेत,जे कुलूप उघडत नाही.परत बाबा काय करतील.खूप पापं केले आहेत. आता बाबा त्यांना काय करतील. शिक्षकांना विद्यार्थी म्हणतात, आम्ही कमी अभ्यास करतो,तर शिक्षक काय करतील.शिक्षक काही कृपा तर करणार नाहीत ना? त्यांच्यासाठी खास वेळ देतील.ते तर तुम्हाला मना नाही.सेवा केंद्रा मध्ये प्रदर्शनी असते,त्यावरती समजावून सांगण्याचा सराव करत राहा.भक्तिमार्ग मध्ये तर कोणी म्हणेल माळ जपा,कोणी म्हणेल मंत्राची आठवण करा.येथे तर बाबा स्वतःचा परिचय देतात.बाबांची आठवण करायची आहे,ज्याद्वारे वारसा मिळेल.तर बाबा पासून पूर्ण वारसा घ्यायला पाहिजे ना. यामध्ये पण बाबा म्हणतात, विकारांमध्ये कधी जायचे नाही. थोडी पण विकाराची चव घेतली तर परत वृध्दी होत जाईल.सिगरेट इत्यादीची चव एकदा घेतली तर त्यांचा रंग लगेच लागतो.परत ती खराब सवय सोडणे कठीण होते. खूप कारण देत राहतात.कोणतीही खराब सवय लागायला नको.सर्व खराब सवयी नष्ट करायच्या आहेत. बाबा म्हणतात,जिवंतपणी शरीराचे भान सोडून माझी आठवण करा.देवतांना प्रसाद पण नेहमी पवित्र लावला जातो.तर तुम्ही पण पवित्र भोजन ग्रहण करायाला पाहिजे.आजकाल तर देशी तुप मिळत नाही,तेल खात राहतात. स्वर्गामध्ये तेल इत्यादी नसते.येथे तर दूध डेअरी मध्ये शुध्द तुप ठेवले जाते,मिक्स पण ठेवले जाते. दोन्ही वरती लिहिलेले असते शुध्द तुप,किमंती मध्ये फरक पडतो. आता तुम्हा मुलांना फुलासारखे उमललेले,आनंदित राहायचे आहे. स्वर्गामध्ये तर नैसर्गिक सुंदरता असते.तेथे प्रकृती पण सतोप्रधान असते.लक्ष्मीनारायण सारखी नैसर्गिक सुंदरता येथे कोणी बनवू शकत नाही.त्यांना डोळ्याने कोणी थोडेच पाहू शकतात,साक्षात्कार होतो परंतु साक्षात्कार झाल्यामुळे कोणी चित्र थोडेच बनवू शकतात. होय,कोणत्या कलाकाराला साक्षात्कार झाला आणि त्याच वेळेत चित्र बनवले तर होऊ शकेल, परंतु कठीण आहे.तर तुम्हा मुलांना खूप नशा राहायला पाहिजे.आता आम्हाला बाबा घेण्यासाठी आले आहेत.बाबांकडून आम्हाला स्वर्गाचा वारसा मिळत आहे.आत्ता आमचे ८४ जन्म पूर्ण झाले.असे विचार बुद्धीमध्ये राहिल्यामुळे,खुशी होईल.विकारांचा जरापण विचार यायला नको.बाबा म्हणतात,काम विकार महाशत्रू आहे ना.द्रोपदीने पण यासाठीच बोलवले होते,तीला काही पाच पती नव्हते.ती तर बोलवत होती की,मला दुशासन नग्न करत आहे,त्याच्यापासून वाचवा.परत पाच पती कसे होऊ शकतात?अशी गोष्ट होऊ शकत नाही.तुम्हाला सारखे सारखे नवनवीन ज्ञानाचे मुद्दे मिळत राहतात,तर बदल करावा लागेल. काही ना काही बदल करून लिहायला पाहिजे.

तुम्ही लिहतात,थोड्याच वेळामध्ये आम्ही या भारताला परिस्थान बनवू.तुम्ही आव्हान करतात ना. बाबा मुलांना म्हणतात,मुलगा वडिलांना प्रत्यक्ष करतो आणि पिता मुलांना प्रत्यक्ष करतात.पिता कोणते?शिव आणि शाळीग्राम. गायन त्यांचे आहे.शिवबाबा जे समजवतात,त्याचे अनुकरण करा. पित्याचे अनुकरण करा,हे गायन पण त्यांचे आहे. लौकिक पित्याचे अनुकरण केल्यामुळेच,तुम्ही पतित बनले आहात.येथे तर अनुकरण करतात पावन बनवण्यासाठी.फरक तर आहे ना.बाबा म्हणतात,मुलांनो अनुकरण करुन पवित्र बना. अनुकरण केल्यामुळेच स्वर्गाचे मालक बनाल.लौकिक पित्याचे अनुकरण केल्यामुळे ६३जन्म तुम्ही शिडी खाली उतरत आले आहात. बाबांचे अनुकरण करून प्रगती करायची आहे,त्यांच्या सोबत जायचे आहे.बाबा म्हणतात,हे एक-एक रत्न लाखो रुपयांचे आहेत.तुम्ही बाबांना जाणून, बाबांकडून वारसा मिळवतात. सन्याशी तर म्हणतात ब्रह्मामध्ये विलीन होऊन जाऊ.विलीन तर व्हायचे नाही,परत यायचे आहे.प्रथम सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे.पारलौकिक पिता वारसा देतात,पावन बनण्यासाठी,ते पतित पावन आहेत.लौकिक पित्याला पतित-पावन म्हणणार नाहीत.ते स्वतः बोलवत राहतात, हे पतित पावन या.तर दोन पित्याचा परिचय सर्वांना द्यायचा आहे. लौकिक पिता म्हणतात,लग्न करून पतित बनायचे.पारलौकिक पिता म्हणतात,पावन बना.माझी आठवण केल्यामुळे तुम्ही पावन बनाल.एक बाबाच सर्वांना पावन बनवणारे आहेत.हे ज्ञानाचे मुद्दे समजण्यासाठी,खूप चांगले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानाचे मुद्दे विचार सागर मंथन करून समजावत राहा.तुमचा हा धंदा झाला ना.तुम्हीच पतितांना पावन बनवणारे आहात. पारलौकिक बाबा म्हणतात पावन बना,जेव्हा विनाश समोर आहे.आता काय करायला पाहिजे.जरूर पारलौकिक बाबाच्या मतावर चालायला पाहिजे ना.ही पण प्रतिज्ञा प्रदर्शनी मध्ये लिहायला पाहिजे.पारलौकिक पित्याचे अनुकरण करु,पतित बनणे सोडून देऊ.सर्व पवित्रतेची गोष्ट आहे.तुम्हा मुलांना रात्रं दिवस खुशी व्हायला पाहिजे,बाबा आम्हाला स्वर्गाचा वारसा देत आहे.ईश्वर आणि बादशाही.आता तुम्हीच समजतात, शिवजयंती म्हणजेच भारताच्या स्वर्गाची जयंती. गीताच सर्व शास्त्र मई शिरोमणी आहे,गीतामाता आहे. वारसा तर पित्याकडूनच मिळेल.गीतेचे रचनाकर शिव बाबा आहेत.त्यांच्यापासून पावन बनण्याचा वारसा मिळतो.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आम्ही ईश्वरीय विद्यार्थी आहोत,ही स्मृती नेहमी ठेवायची आहे.कोणती खराब सवय लावायची नाही,ती सवय नष्ट करायची आहे.विकाराचा जर आपण विचार यायला नको.

(२)जिवंतपणी शरीराचे भान विसरून,बाबांची आठवण करायची आहे.वेगवेगळ्या ज्ञानाच्या मुद्द्याचा विचार सागर मंथन करून,पतितांना पावन बनवण्याचा धंदा करायचा आहे.

वरदान:-
जन्मसिद्ध अधिकाराच्या नशे द्वारा लक्ष्य आणि लक्षण समान बनवणारे श्रेष्ठ भाग्यवान भव.

जसे लौकिक जन्मांमध्ये स्थुल संपत्ती जन्मसिद्ध अधिकार असते,तसेच ब्राह्मण जीवनामध्ये दिव्य गुण रुपी संपत्ती,ईश्वरीय सुख, शक्ती जन्मसिद्ध अधिकार आहे.जन्मसिध्द अधिकाराचा नशा नैसर्गिक रूपामध्ये राहील,तर कष्ट करण्याची आवश्यकता नाही.या नशेमध्ये राहिल्यामुळे लक्ष आणि लक्षण समान होतील.स्वतःला जो आहे जसा आहे,जे श्रेष्ठ बाबा आणि परिवाराचा आहे,तसेच जाणत आणि मानत,श्रेष्ठ भाग्यवान बना.

बोधवाक्य:-
प्रत्येक कर्म स्वस्थिती मध्ये स्थिर होऊन करा, तर सहजच सफलताचे तारे बनाल.