27-02-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- बाबा आले आहेत तुम्हाला रावण राज्यापासून मुक्त करून सदगती देण्यासाठी
नर्क वासियांना स्वर्गवासी बनवण्यासाठी"
प्रश्न:-
बाबांनी तुम्हा
भारतवासी मुलांना कोण-कोणत्या स्मृती करून दिल्या आहेत?
उत्तर:-
हे भारतवासी मुलांनो! तुम्ही स्वर्गवासी होते.आज पासून 5 हजार वर्षापूर्वी भारत
स्वर्ग होता,हिरे रत्नांचे महल होते. तुम्ही संपूर्ण विश्वाचे मालक होता. धरती आकाश
सर्व तुमचे होते. भारत शिवबाबांनी स्थापन केलेले शिवालय होते.तिथे पवित्रता होती.आता
नंतर असा भारत बनणार आहे.
गीत:-
नयन हीन को
राह दिखाओ प्रभू.....
ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलांनी हे गीत ऐकले.कोणी सांगितले?आत्म्यांच्या आत्मिक पित्याने.तर
आत्मिक पित्याला आत्मिक मुलांनी म्हटले हे बाबा. त्यांना ईश्वरही म्हटले जाते,पिता
ही म्हटले जाते.कोणता पिता? परमपिता कारण की पिता दोन आहेत-एक लौकिक,दुसरा
पारलौकिक.लौकिक पित्याची मुले पारलौकिक पित्याला बोलवतात-हे बाबा.अच्छा बाबांचे
नाव?शिव.तो तर निराकार पुजला जातो.त्यांना सुप्रीम फादर (परमआत्मा)असे म्हटले जाते.
लौकिक पित्याला सुप्रीम म्हटले जात नाही.उंच ते उंच सर्व आत्म्यांचा पिता एकच
आहे.सर्व जीवात्मे त्या पित्याची आठवण करतात.आत्मे हे विसरले आहेत की आमचा पिता कोण
आहे. बोलावतात हे परमपिता,आम्हा नेत्रहीनानां नेत्र द्या, तर आम्ही आपल्या पित्याला
ओळखू.भक्तीमार्गाच्या धक्यांपासून सोडवा.सदगती साठी तिसरा नेत्र घेण्यासाठी,बाबांना
भेटण्यासाठी बोलावतात कारण की बाबाच कल्प-कल्प भारतामध्ये येऊन भारताला स्वर्ग
बनवतात.आता कलियुग आहे, कलियुगा नंतर सतयुग येणार आहे.हे आहे पुरुषोत्तम संगमयुग.
बेहदचा पिता येऊन जे पतित भ्रष्टाचारी बनले आहेत त्यांना पुरुषोत्तम बनवतात.हे (लक्ष्मी-नारायण)
पुरुषोत्तम भारतामध्ये होते.लक्ष्मी- नारायणाच्या घराण्याचे राज्य होते.आज पासून 5
हजार वर्षापूर्वी सतयुगामध्ये श्री लक्ष्मी- नारायणाचे राज्य होते.ही मुलांना स्मृती
करून देत आहेत.तुम्ही भारतवासी आजपासून 5 हजार वर्षांपूर्वी स्वर्गवासी होते.आता तर
सर्व नर्कवासी आहेत.आजपासून 5 हजार वर्षापूर्वी भारत स्वर्ग होता.भारताची खूप महिमा
होती,हिरे-रत्नांचे महल होते.आता तर काहीच नाही.त्यावेळी दुसरा कोणताही धर्म
नव्हता,फक्त सूर्यवंशी होते.चंद्रवंशी सुद्धा नंतर येतात.बाबा समजावतात तुम्ही
सूर्यवंशी घराण्याचे होते. आत्तापर्यंत या लक्ष्मी-नारायणाचे मंदिर बनवत राहतात
परंतु लक्ष्मी-नारायणाचे राज्य केव्हा होते,कसे मिळवले,हे कोणालाही माहित नाही.पूजा
करतात,जाणत नाहीत.तर अंधश्रद्धा झाली ना.शिवाची, लक्ष्मी-नारायणाची पूजा करतात,
जीवन परिचय जाणत नाहीत. आता भारतवासी स्वतः म्हणतात-आम्ही पतित आहोत. आम्हा पतीतांना
पावन बनवणारे बाबा या.येऊन आम्हाला दुःखांपासून,रावण राज्यापासून मुक्त करा.बाबाच
येऊन सर्वांना मुक्त करतात.मुले जाणतात सतयुगामध्ये बरोबर एक राज्य होते.बापूजी
सुद्धा म्हणत होते आम्हाला पुन्हा एकदा रामराज्य पाहिजे,ग्रहस्थ धर्म जो पतित बनला
आहे तो पावन पाहिजे. आम्ही स्वर्गवासी बनावे असे वाटते.आत्ता नरकवासींचे चे काय हाल
आहेत,पहात आहात ना. याला म्हटले जाते नरक,असुरी दुनिया.हा भारत दैवी दुनिया
होता.बाबा बसून समजावत आहे तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत,न की ८४ लाख.बाबा समजावतात
तुम्ही खरे पाहता शांतीधाम चे राहणारे आहात.इथे तुम्ही अभिनय करण्यासाठी आलेले
आहात.84 जन्मांचा अभिनय केला आहे.पुनर्जन्म तर अवश्य घ्यावा लागतो ना.८४ पुनर्जन्म
असतात.
आता बेहद चा पिता आले आहेत तुम्हा मुलांना बेहद चा वारसा देण्यासाठी.तुम्हा मुलां (आत्म्यां)
सोबत बोलत आहेत.इतर सत्संगामध्ये मनुष्य,मनुष्याला भक्तिमार्गाच्या गोष्टी ऐकवत
असतात.अर्धा कल्प भारत जेव्हा स्वर्ग होता तेव्हा एकही पतित नव्हता.या वेळी एकही
पावन नाही.ही आहेच पतित दुनिया. गीतेमध्ये कृष्ण भगवानुवाच असे लिहिले आहे.त्यांनी
तर गीता ऐकवली नाही.हे लोक आपल्या धर्मशास्त्राला ही जाणत नाहीत. आपल्या धर्मालाच
विसरून गेले आहेत.हिंदू काही धर्म नाही.मुख्य चार धर्म आहेत.प्रथम आहे आदि सनातन
देवी-देवता धर्म.सूर्यवंशी आणि चंद्रवंशी दोन्ही मिळून म्हटले जाते देवी-देवता धर्म
देवताई राज्य.तिथे दुःखाचे नाव नव्हते. 21 जन्म तर तुम्ही सुखधाम मध्ये होते,नंतर
रावण राज्य भक्तिमार्ग सुरू होतो. भक्तिमार्ग आहेच खाली उतरण्याचा मार्ग.भक्ती आहे
रात्र, ज्ञान आहे दिवस.आता आहे घोर अंधाराची रात्र.शिवजयंती आणि शिवरात्री दोन
अक्षर येतात. शिवबाबा केव्हा येतात?जेव्हा रात्र होते.भारतवासी घोर अंधारामध्ये
येतात तेव्हा बाबा येतात.बाहुल्यांची पूजा करत राहतात,एकाच्या ही जीवन परिचयाला
जाणत नाहीत.भक्ती मार्गाचे शास्त्रही बनणारच आहेत. वैश्विक नाटक,सृष्टी चक्राला
समजून घ्यायचे आहे.ग्रंथामध्ये हे ज्ञान नाही.ते आहे भक्तीचे ज्ञान, तत्त्वज्ञान.ते
काही सदगती मार्गाचे ज्ञान नाही.बाबा म्हणतात-मी येऊन तुम्हाला ब्रह्मा द्वारे
यथार्थ ज्ञान सांगत आहेत.बोलवतात ही आम्हाला सुखधाम,शांतीधाम चा रस्ता सांग.बाबा
म्हणतात आजपासून 5 हजार वर्षांपूर्वी सुखधाम होते,ज्यामध्ये तुम्ही सार्या विश्वावर
राज्य करत होते. सूर्यवंशी घराण्याचे राज्य होते. बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये
होते.तेथे 9 लाख गायले जातात. तुम्हा मुलांना आज पासून 5 हजार वर्षांपूर्वी खूप
साहुकार बनवले होते.एवढे धन दिले होते नंतर तुम्ही ते कुठे गमावले?तुम्ही किती
सावकार होते.भारताला काय म्हणावे.भारतच सर्वात उंच ते उंच खंड आहे.खरे पाहता हे
सर्वांचे तीर्थ आहे,कारण की पतित-पावन बाबांचे जन्मस्थान आहे.जे पण धर्म
आहेत,सर्वांची बाबा येऊन सदगती करतात.आता रावणाचे राज्य साऱ्या सृष्टीमध्ये
आहे,फक्त लंकेमध्ये नव्हते.सर्वांमध्ये 5 विकारांचा प्रवेश आहे.जेव्हा सूर्यवंशी
राज्य होते तेव्हा हे विकार नव्हते.भारत निर्विकारी होता.आता विकारी आहे.
सतयुगामध्ये दैवी संप्रदाय होते. तेच नंतर ८४ जन्म भोगून आता आसुरी संप्रदाय बनले
आहेत नंतर दैवी संप्रदाय बनतात.भारत खूप साहुकार होता.आता गरीब बनला आहे म्हणून भीक
मागत आहेत.
बाबा म्हणतात तुम्ही किती सावकार होते.तुमच्यासारखे सुख कोणाला मिळू शकत नाही.तुम्ही
संपूर्ण विश्वाचे मालक होते,धरती आकाश सर्व काही तुमचे होते. बाबा आठवण करून देत
आहेत, भारत शिवबाबांनी स्थापन केलेले शिवालय होते.तिथे पवित्रता होती,त्या नव्या
दुनियेमध्ये देवी-देवता राज्य करत होते. भारतवासी तर हे सुद्धा जाणत नाहीत की
राधा-कृष्णाचा आपसात काय संबंध आहे?दोघे वेगवेगळ्या राजधानीचे होते स्वयंवरा नंतर
लक्ष्मी-नारायण बनले आहेत.हे ज्ञान कोणत्याही मनुष्यामध्ये नाही.परमपिता परमात्मा
ज्ञानाचे सागर आहे, तेच तुम्हाला आत्मिक ज्ञान देत आहेत,हे अध्यात्मिक ज्ञान फक्त
एक बाबाच देऊ शकतात.आता बाबा म्हणतात-आत्म-अभिमानी बना.मज आपल्या परमपिता परमात्मा
शिवा ची आठवण करा. आठवण केल्यानेच सतोप्रधान बनाल.तुम्ही इथे मनुष्यापासून देवता
किंवा पतीता पासून पावन बनण्यासाठी येता.आता हे आहे रावण राज्य.भक्ती मार्गामध्ये
रावण राज्य सुरू होते.रावणाने काही एका सीतेला चोरलेले नाही. तुम्ही सर्व भक्ती
करणारे, रावणाच्या मुठी मध्ये आहात. सारी सृष्टी 5 विकार रुपी रावणाच्या कैद मध्ये
आहे.सर्व शोकवाटीके मध्ये दुखी आहेत. बाबा येऊन सर्वांना मुक्त करतात. आता बाबा
पुन्हा स्वर्ग बनवत आहेत.असे नाही की ज्यांच्याजवळ खूप धन आहे,ते स्वर्गामध्ये
आहेत.नाही,आता आहे नर्क.सर्वजण पतित आहेत म्हणून गंगे मध्ये जाऊन स्नान
करतात,समजतात गंगा पतित-पावनी आहे.परंतु पावन तर कोणीही बनत नाही. पतित-पावन तर
शिवबाबांनाच म्हटले जाते न की नद्यांना.हा सर्व भक्तिमार्ग आहे.बाबाच गोष्टी येऊन
समजावत आहेत.आता तुम्ही हे तर जाणत आहात एक आहे लौकीक पिता दुसरे प्रजापिता ब्रह्मा
आहेत. अलौकिक पिता आणि तो पारलौकिक पिता. तीन पिता आहेत.शिवबाबा, प्रजापिता ब्रह्मा
द्वारे ब्राह्मण धर्म स्थापन करतात.ब्राह्मणांना देवता बनवण्यासाठी राजयोग
शिकवतात.एकदाच बाबा येऊन आत्म्यांना राजयोग शिकवत आहेत.आत्मे पुनर्जन्म
घेतात.आत्माच म्हणते-मी एक शरीर सोडून दुसरे घेते.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून
मज पित्याची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल.कोणत्याही देहधारी ची आठवण करू नका.आता
हा आहे मृत्यू लोकाचा अंत.अमरलोकची स्थापना होत आहे.बाकी सर्व अनेक धर्म नष्ट होऊन
जातील.सतयुगामध्ये एकच देवता धर्म होता.नंतर त्रेता मध्ये चंद्रवंशी राम-सीता.तुम्हा
मुलांना संपूर्ण चक्राची आठवण करून देत आहेत.शांतीधाम, सुखधाम ची स्थापना बाबाच
करतात.मनुष्य,मनुष्याला सदगती देऊ शकत नाहीत.ते सर्व भक्ती मार्गातले गुरु
आहेत.भक्ती मार्गामध्ये मनुष्य अनेक प्रकारचे चित्र बनवून पूजा करून नंतर जाऊन
म्हणतात बुडून जा,बुडून जा.खूप पूजा करतात,खाऊ घालतात पिऊ घालतात,आता खातात तर
ब्राह्मण लोक.याला बाहुल्यांची पूजा असे म्हटले जाते.किती अंधश्रद्धा आहे.आता
त्यांना कोणी समजावून सांगावे.
बाबा म्हणतात आता तुम्ही आहात ईश्वरीय संतान.तुम्ही आता बाबांकडून राजयोग शिकत
आहात.ही राजधानी स्थापन होत आहे.प्रजा तर खूप बनणार आहे. कोटीमध्ये कुणीतरी राजा
बनते. सतयुगाला म्हटले जाते फुलांचा बगीचा.आता आहे काट्यांचे जंगल.आता रावण राज्य
बदलत आहे.हा विनाश होणारच आहे.हे ज्ञान आता फक्त तुम्हा ब्राह्मणांना मिळत
आहे.लक्ष्मी-नारायणाला पण हे ज्ञान राहत नाही.हे ज्ञान लोप पावले जाते.भक्ती
मार्गामध्ये कोणीही बाबांना जाणत नाही. बाबाच रचता आहेत.ब्रह्मा- विष्णु-शंकर सुद्धा
रचना आहेत. परमात्मा सर्वव्यापी म्हटल्याने सर्व पिता होऊन जातात. वारसाचा हक्क
राहत नाही.बाबा तर येऊन सर्व मुलांना वारसा देत आहेत.सर्वांचा सदगती दाता एकच पिता
आहे.हे सुद्धा समजावले आहे 84 जन्म तेच घेतात जे प्रथम सतयुगामध्ये येतात.ख्रिश्चन
लोकांचे जन्म किती असतील?जास्त करून 40 जन्म असतील.हा हिशोब काढला जातो.एक ईश्वराला
शोधण्यासाठी किती धक्के खातात.तुम्ही आता धक्के खाणार नाही.तुम्हाला फक्त एक बाबांची
आठवण करायची आहे.ही आहे आठवणी ची यात्रा. हे आहे पतित-पावन ईश्वर पित्याचे
विद्यापीठ.तुमची आत्मा शिकत आहे.साधुसंत नंतर म्हणतात आत्मा निर्लेप आहे.अरे
आत्म्यालाच कर्मानुसार दुसरा जन्म घ्यावा लागतो. आत्माच चांगले किंवा वाईट काम करत
असते.यावेळी तुमचे कर्म विकर्म होते.सतयुगामध्ये कर्म अकर्म होतात.तिथे विकर्म होत
नाहीत.ती आहे पुण्य आत्म्यांची दुनिया.या सर्व समजून घेण्याच्या आणि समजावून
सांगण्याच्या गोष्टी आहेत.अच्छा!
गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या क्रमवार पुरुषार्था नुसार काट्या पासून फुल
बनणाऱ्या मुलां प्रति माता-पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक
पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. काट्यां
पासून फुल बनून फुलांचा बगीचा (सतयुग) स्थापन करण्याची सेवा करायची आहे.कोणतेही
वाईट कर्म करायचे नाही.
2. आत्मिक ज्ञान जे बाबांकडून ऐकले आहे ते सर्वांना ऐकवायचे आहे.आत्म-अभिमानी
बनण्याची मेहनत करायची आहे.एक बाबांचीच आठवण करायची आहे,कोणत्याही देहधारी ची नाही.
वरदान:-
सदैव आपल्या
श्रेष्ठ कुळाच्या स्मुर्ती द्वारे उंच अवस्थेमध्ये राहणारे गुण मुर्त भव
जे श्रेष्ठ कुळा मधले
असतात ते कधीही जमिनीवर,मातीवर पाय ठेवत नाहीत.देह-अभिमान माती आहे,यामध्ये खाली
येऊ नका,या मातीपासून सदैव दूर रहा.सदैव स्मृती रहावी की उच्च ते उच्च पित्याच्या
श्रेष्ठ कुटुंबातले उच्च अवस्था वाली मुले आहोत, तर खाली नजर जाणार नाही. सदैव
स्वतःला गूण मुरत पाहून उच्च अवस्थेमध्ये स्थित रहा. आपल्या मधल्या अवगुणांना पाहून
नष्ट करत चला.त्याचा सतत विचार केला तर ती कमी तशीच राहील.
बोधवाक्य:-
श्रेष्ठ ते
आहेत जे आपल्या हर्षित मुखाद्वारे पवित्रतेच्या श्रेष्ठतेचा अनुभव करवतात.