10-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्हाला गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत,कमल फुल समान पवित्र बनायचे आहे,एका बाबाच्या मतावर चालायचे आहे, सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न आणायचे नाहीत"

प्रश्न:-
कोणत्या मुलांना माया,जोरात आपला पंजा मारते? मोठे लक्ष्य कोणते आहे?

उत्तर:-
जे मुलं देह अभिमानामध्ये राहतात,त्यांना माया जोरात पंजा मारते.परत नाव रूपामध्ये फसतात. देहाभिमान आला आणि मायेची चापट लागली,यामुळे पद भ्रष्ट होते. देह अभिमान नष्ट करणे,हे मोठे लक्ष आहे.बाबा म्हणतात,देही अभिमानी बना.जसे बाबा आज्ञाधारक सेवक सेवक आहेत,खूप निरंहकारी आहेत, असेच निरंहकारी बना,कोणताही अहंकार यायला नको.

गीत:-

न,ते आमच्या पेक्षा वेगळे राहतील,ना आम्ही त्यांच्यापासून...

ओम शांती।
मुलांनी गीत ऐकले.मुलं म्हणतात,आम्ही बाबाचे होतो आणि बाबा आमचे होते,जेव्हा मुळवतन मध्ये होते.तुम्हा मुलांना ज्ञान तर चांगल्या प्रकारे मिळाले आहे.तुम्ही जाणतात आम्ही चक्र लावले आहे. आता परत आम्ही त्यांचे बनलो आहोत.बाबा राजयोग शिकवून स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी कल्पपुर्वी प्रमाणे आले आहेत.आता बाबा म्हणतात,हे मुलांनो,तर मुलांना येथे मधुबन मध्ये तर राहायचे नाही. तुम्ही आपल्या गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत कमलफुल समान पवित्र राहायचे आहे.कमळाचे फूल पाण्या मध्ये राहते परंतु पाण्या पेक्षा वेगळे राहते,त्याला पाणी लागत नाही. तुम्हाला गृहस्थ व्यवहारांमध्ये राहायचे आहे फक्त पवित्र बनायचे आहे.हा तुमचा अनेक जन्माच्या अंत चा जन्म आहे.जे पण मनुष्यमात्र आहेत,त्या सर्वांना पावन बनवण्यासाठी मी आलो आहे. पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत,त्यांच्याशिवाय पावन कोणी बनवू शकत नाही.तुम्ही जाणता अर्ध्याकल्पा पासून आम्ही शिडी उतरत आलो आहोत.८३ जन्म तुम्हाला जरूर पूर्ण करायचे आहेत आणि ८४ जन्माचे चक्र पूर्ण करून जेव्हा जडजडीभुत अवस्था होईल तेव्हा मला यावे लागते,मध्येच कोणी पतित-पावन बनू शकत नाही. कोणीही न रचनाकाराला जाणतात,न रचनेला.या वैश्विक नाटका नुसार सर्वांना कलियुगामध्ये पतित तमोप्रधान बनायचेच आहे. बाबा येऊन सर्वांना पावन बनवून शांतीधाम मध्ये घेऊन जातात आणि तुम्हाला बाबा पासून सुखधामचा वारसा मिळतो.सतयुगा मध्ये कोणते दुःख नसते.आता तुम्ही जिवंतपणी बाबाचे बनले आहात.बाबा म्हणतात तुम्हाला गृहस्थ व्यवहारांमध्ये राहायचे आहे.बाबा कधी कोणाला म्हणत नाहीत की,तुम्ही घरदार सोडा,नाही.गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत अंतिम जन्मांमध्ये पवित्र बनायचे आहे.बाबांनी कधी म्हटले आहे का की,तुम्ही घर-दार सोडा,नाही.तुम्ही ईश्वरीय सेवार्थ स्वतःहूनच त्याचा त्याग केला आहे. काही मुलं घर गृहस्था मध्ये राहून पण ईश्वरीय सेवा करतात.घरदार सोडवले जात नाही.बाबा कोणालाही तसे सांगत नाहीत.तुम्ही तर स्वतः सेवेसाठी निघाले आहात.बाबानी कोणाला सोडवले नाही.तुमचे लौकिक पिता लग्न करण्यासाठी सांगतात,तुम्ही करत नाही,कारण तुम्ही जाणतात,आता मृत्यू लोकाचा अंत आहे.लग्न करणे तर बरबादी होईल परत पावन कसे बनायचे? आम्ही का नाही भारताला स्वर्ग बनवण्याच्या सेवेमध्ये तत्पर राहायचे? मुलं म्हणतात की रामराज्य हवे.असे बोलवतात,पतित पावन सिताराम या,भारताला स्वर्ग बनवा.असे गायन करत राहतात परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. संन्यासी लोक म्हणतात,या वेळेत सुख कागविष्टा समान आहे,बरोबर असेच आहे.येथे तर सुख काहीच नाही.मुलं म्हणतात परंतु कोणाच्या बुद्धी मध्ये येत नाही.बाबा काही दुःखासाठी ही सृष्टीची रचना करत नाहीत.बाबा म्हणतात,काय तुम्ही विसरले होते की,स्वर्गामध्ये दुःखा चे नाव नसते.तेथे कंस इत्यादी कुठून आले? आता बेहद्दचे बाबा जे ऐकवतात,त्यांच्या मतावरती चालायचे आहे.आपल्या मतावर चालून बरबादी करतात.आश्चर्यवत ऐकतात,सांगतात आणि ज्ञान सोडतात किंवा निंदक बनतात.अनेक जाऊन विघ्न आणतात,त्यांचे परत काय होईल? हिऱ्यासारखे जीवन बनवण्याऐवजी कवडी सारखे बनतात.अंत काळात सर्वांना आपला साक्षात्कार होईल. अशा चलन मुळे हे पद मिळाले.येथे तर तुम्हाला कोणते पाप कर्म करायचे नाही कारण तुम्ही पुण्यात्मा बनत आहात.पापाचा परत शंभर पटीने दंड मिळतो.जरी स्वर्गा मध्ये याल परंतु अगदीच कमी पद मिळेल.येथे तुम्ही राजयोग शिकण्यासाठी आले आहात परत प्रजा बनतात.पदांमध्ये तर खूप फरक पडतो ना.हे पण समजवले जाते,यज्ञामध्ये काही देऊन परत घेतात,तर चांडाळ चा जन्म मिळतो. काही मुलं चलन पण अशी चालतात,ज्यामुळे त्यांचे पद कमी होते.

बाबा समजवतात असे कर्म करू नका,राजा राणीच्या ऐवजी प्रजा मध्ये कमी पद मिळेल.यज्ञामध्ये समर्पित होऊन परत सोडून जातात, तर काय बनतील?हे पण बाबा समजतात मुलांनो कोणतेही विकर्म करू नका,नाही तर शंभर पटीने सजा मिळेल,परत नुकसान का करायला पाहिजे? येथे म्हणजे मधुबन मध्ये राहणाऱ्या पेक्षा घर गृहस्थ व्यवहारा मध्ये राहत,जे सेवा करतात,ते खूप उच्च पद मिळवतात. असे खूप गरीब आहेत, आठ आणे किंवा एक रुपया पाठवतात आणि काही हजार रुपये पण देतात,तरीही गरिबांचे उच्च पद होते कारण ते काही पापकर्म करत नाहीत.पाप केल्यामुळे शंभर पटीने सजा मिळते. तुम्हाला पुण्यआत्मा बनुन सर्वांना सुख द्यायचे आहे.दुःख दिले तर परत कमिटी बसते,साक्षात्कार होतो की, तुम्ही हे -हे केले,आता त्याची सजा मिळेल आणि पद पण भ्रष्ट होईल. ऐकत राहतात तरीही काही मुलं उलटी चलन सोडत नाहीत. आपसामध्ये खिरखंड बनून राहतात,तर कोणी खारट पाण्यासारखे राहतात.तर ते खूप विघ्न आणतात.कोणाच्या नावा रूपामध्ये फसतात,तर खूप पाप होते.माया जशी काही एक उंदीर आहे,फुक पण देते,चावत राहते, तरीही रक्त निघत नाही आणि माहिती पण होत नाही.मायापण असेच रक्त काढते म्हणजे असे कर्म करवते की ज्यांची माहिती होत नाही.पाच विकार एकदम डोके च खराब करतात.बाबा सावधानी तर देतील ना.असे व्हायला नको,जे कमिटी च्या समोर म्हणतील की, आम्हाला सावधान थोडेच केले. तुम्ही जाणतात ईश्वर शिकवत आहेत.स्वतः खूप निरंहकारी आहेत. असे म्हणतात मी आज्ञाधारक सेवक आहे.काही मुलांमध्ये खूप अहंकार राहतो.बाबाचे बनवून असे असे काम करतात, ते विचारू नका.यापेक्षा तर बाहेर जे गृहस्थ व्यवहारांमध्ये राहतात ते खूप श्रेष्ठ बनतात. देह अभिमाना मध्ये आल्यामुळेच माया जोरात पंजा मारते.देहअभिमान नष्ट करणे मोठे लक्ष आहे.देह अभिमाना मध्ये आले आणि चापट लागली.तर देह अभिमनामध्ये का यायला पाहिजे? ज्यामुळे पद भ्रष्ट होईल. असे व्हायला नको स्वर्गामध्ये जाऊन झाडू मारावा लागेल.जर बाबांशी कोणी विचारले,आत्ता मी काय बनेल,तर बाबा सांगू शकतात स्वतः पण समजतात की,मी कीती सेवा करतो?आम्ही किती लोकांना सुख दिले आहे.बाबा मम्मा सर्वांना सुख देतात,तर अनेक जण खूष होतात. बाबा मुंबईमध्ये ज्ञानाचा डान्स करत होते कारण चात्रक खुप होते ना. बाबा म्हणतात चात्रक मुलां पुढे ज्ञानाचा डान्स करतो,तर चांगले चांगले ज्ञानाचे मुद्दे निघतात.चात्रक मुलं आकर्षित करतात.तुम्हालापण असे बनायचे आहे,तेव्हा तर अनुकरण कराल.श्रीमतावर चालायचे आहे,आपल्या मतावर चालून बदनामी करतात,तर स्वतःचेच खूप नुकसान होते.आता बाबा तुम्हाला समजदार बनवत आहेत.भारत स्वर्ग होता ना.आता असे कोणी थोडेच समजतात. भारतासारखा पावन देश दुसरा कोणताही नाही.असे म्हणतात परंतु समजत नाहीत की, आम्ही भारतवासी स्वर्गवासी होतो.तेथे खूप सुख होते.गुरू नानकने पण भगवंताची महिमा केले आहे,ते येथे येऊन आत्मारुपी खराब वस्त्र स्वच्छ करतात, ज्याची महिमा आहे,ते एकोअंकार... शिवलिंगाच्या ऐवजी अकालतख्त नाव ठेवले आहे.आता बाबा तुम्हाला सर्व सृष्टीचे रहस्य समजवतात.मुलांनो एक पण पाप कर्म करायचे नाही,तसे केल्यास शंभर पटीने सजा होईल मिळेल. माझी निंदा केली तर पद भ्रष्ट होईल. स्वतःची खूप संभाळ करायची आहे. आपले जीवन हिऱ्यासारखे बनवायचे आहे, नाहीतर खूप पश्चाताप करावा लागेल.जे काही उलटे केले आहे, त्याचे मन खात राहते.काय,कल्प कल्प मी असे करेल,ज्यामुळे पद भ्रष्ट होईल.बाबा म्हणतात मातपित्याचे अनुकरण करू इच्छितात तर, खऱ्या हृदयाने सेवेमध्ये तत्पर राहा.माया कुठे ना कुठे पकडू शकते.सेवाकेंद्राच्या मुख्यला तर खूपच निरंहकारी बनून राहायचे आहे.बाबा किती निरंकारी आहेत.काही मुलं तर दुसऱ्याकडून सेवा घेत राहतात.बाबा खूप निरहंकारी आहेत.कधी कोणावरती रागवत नाहीत.मुलं जर इमानदार बनले नाही तर,पिता त्यांना समजाऊ शकतात,तुम्ही काय करत आहात? बेहद्दचे बाबा जाणतात, सर्व मुलं एक सारखे तर राहत नाहीत. काही अपात्र पण असतात.बाबा समज देत राहतात.अनेक मुलं आहेत.हे तर वृद्धीला प्राप्त करत हजारोच्या अंदाज मध्ये होतील.बाबा मुलांना सावधानी देत राहतात,काही गफलत,चालढकल पणा करू नका.येथे पतिता पासून पावन बनण्यासाठी आले आहात,तर कोणत्याही परिस्थितीत पतित काम करू नका.न नावा रूपामध्ये फसवायचे आहे,ना देहाभिमाना मध्ये यायचे आहे.देही अभिमानी बनून बाबांची आठवण करत राहा,

श्रीमतावर चालत राहा.माया खूप प्रबळ आहे.बाबा सर्व काही समजावून सांगतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाप सामान निरहंकारी बनायचे आहे. कोणाकडून ही सेवा घ्यायची नाही. कोणाला दुःख द्यायचे नाही.असे कोणते पाप कर्म व्हायला नको, ज्याची सजा खावी लागेल. आपसामध्ये खिरखंड बनून राहायचे आहे.

(२)एका बाबाच्या श्रीमतावर चालायचे आहे,आपल्या मतावर नाही.

वरदान:-
दिव्य बुद्धीच्या विमानाद्वारे विश्वाची देख-रेख करणारे मास्टर रचनाकार भव.

ज्याची बुद्धी जास्त दिव्य आहे,दिव्यताच्या आधारावरती तेवढाच वेग तीव्र आहे.तर दिव्य बुद्धीच्या विमानाद्वारे एका सेकंदांमध्ये, स्पष्ट रूपाद्वारे विश्वाची परिक्रमा करून,सर्व आत्म्याची देख-रेख करा,त्यांना संतुष्ट करा. जितके तुम्ही चक्रवर्ती बनून चक्र लावाल,तेवढेच चोहोबाजूने आवाज निघेल की,आम्ही लोकांनी ज्योती पाहिली,चालणारे फरिश्ता पाहिले. यासाठी स्वतःच्या कल्याणाच्या सोबत,विश्व कल्याणी, मास्टर रचनाकार बना.

बोधवाक्य:-
मास्टर दाता बनून अनेक आत्म्यांना,प्राप्तीचा अनुभव करवणेच ब्रह्मा बाप समान बनणे आहे.


मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य:-

ईश्वर सर्वव्यापी नाहीत त्याचे प्रमाण काय आहे.

शिरोमणी गीतेमध्ये जे भगवानुवाच आहे,मुलांनो जिथे जिंकणं आहे, तिथे मी आहे,हे पण परमात्मा चे महावाक्य आहेत.डोंगरांमध्ये जो हिमालय पर्वत आहे,त़ो पण मी आहे आणि सापांमध्ये कालिया नाग मी आहे,म्हणून पर्वतामध्ये उंच ते उंच पर्वत कैलास पर्वत दाखवतात आणि सापांमध्ये कालीया नाग आहे, तर याद्वारे सिद्ध आहे कि परमात्मा जर सर्व सापांमध्ये फक्त कालिया नागामध्ये आहे,तर सर्व सापामध्ये त्याचा वास नाही झाला ना.जर परमात्मा सर्वात उंच पर्वतामध्ये आहे,म्हणजेच छोट्या पर्वतांमध्ये नाही आणि परत म्हणतात जिथे जिथे जिंकणं आहे तिथे माझा जन्म आहे,म्हणजेच हरणाऱ्या मध्ये नाही.आता या गोष्टी सिद्ध करतात की परमात्मा सर्वव्यापी नाही.तिकडे असे पण म्हणतात आणि दुसरीकडे तसे पण म्हणतात की परमात्मा अनेक रूपांमध्ये येतात.जसे परमात्म्याला २४ रुपामध्ये दाखवतात,असे म्हणतात की,मगर मासे इत्यादी सर्व रूपं त्यांची आहेत. आता हे तर त्यांचे खोटे ज्ञान आहे, असेच परमात्म्याला सर्वत्र समजून बसले आहेत.जेव्हाकी यावेळेस कलियुगामध्ये सर्वत्र माया व्यापक आहे, तर परत परमात्मा व्यापक कसे होऊ शकतात.गीतेमध्ये पण म्हटले आहे की,मी माया मध्ये व्याप्त नाही.याद्वारे सिध्द होते कि, परमात्मा सर्वत्र नाहीत.

(२) निराकारी दुनिया-आत्मा आणि परमात्म्याचे राहण्याचे स्थान:-

आता हे तर आम्ही जाणतो की, जेव्हा आम्ही निराकारी दुनिया मध्ये राहतो,तर निराकार चा अर्थ हा नाही की,त्याचा काही आकार नाही.जरूर कोणती दुनिया आहे परंतु त्याचा स्थुल सृष्टी सारखा आकार नाही. परमात्मा निराकार आहेत परंतु त्यांचे आपले सूक्ष्म रूप आवश्य आहे.तर आम्हा आत्म्याचे आणि परमात्मा चे धाम निराकारी दुनिया आहे.तर जेव्हा आम्ही नवीन दुनिया अक्षर म्हणतो,तर याद्वारे सिद्ध आहे की,ती दुनिया आहे आणि तेथे राहतात, तेव्हा तर दुनियाचे नाव पडले आहे. आता दुनियाचे लोक समजतात की, परमात्म्याचे रूप पण अखंड ज्योति तत्त्व आहे,तर ते झाले परमात्माचे राहण्याचे ठिकाण.त्याला आम्ही विश्रांती धाम म्हणतो.आम्ही परमात्म्याच्या घराला परमात्मा म्हणू शकत नाही.आता दुसरी आकारी दुनिया आहे,जेथे ब्रह्मा, विष्णू, शंकर देवता आकारी रूपांमध्ये राहतात आणि ही साकारी दुनिया आहे, ज्यांचे दोन भाग आहेत. एक निर्विकारी स्वर्गाची दुनिया,जिथे अर्धाकल्प नेहमी सुख आहे,पवित्रता आणि शांती आहे.दुसरी विकारी दुःख आणि अशांतीची दुनिया.आता दोन दुनिया का म्हणतात कारण मनुष्य म्हणतात स्वर्ग आणि नर्क दोन्ही परमात्मा च्या रचलेल्या दुनिया आहेत.यावरती परमात्माचे महावाक्य आहे,मुलांनो मी कधी दुःखाची दुनिया रचलेली नाही,ज्या दुनिया रचना आहे,ती सुखाची दुनिया स्थापना केलेली आहे.आता ही जी दुःख आणि अशांतीची दुनिया आहे, ते मनुष्य आत्मा,स्वताला आणि परमात्म्याला विसरल्यामुळे कर्मभोग भोगत आहे.बाकी असे नाही की, ज्या वेळेस सुखाची दुनिया आहे आणि पुण्यांची दुनिया आहे,तेथे सृष्टी चालत नाही.होय अवश्य जेव्हा आम्ही म्हणतो तिथे देवतांचे निवासस्थान होते,तर तेथे सर्व प्रवृत्ती चालत होती परंतु इतके जरुर आहे की,तेथे विकारी संतती नव्हती, त्यामुळे इतके कर्मबंधन नव्हते.या दुनियेला कर्मबंधन रहित स्वर्गाची दुनिया म्हणतात.तर एक आहे निराकारी दुनिया,दुसरी आकारी दुनिया आहे आणि तिसरी साकारी दुनिया आहे,अच्छा.