26-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो-सर्वात मोठा आजार देह-अभिमानाचा आहे, यामुळेच पतन झाले आहे,म्हणून आता देही-अभिमानी बना"

प्रश्न:-
तुम्हा मुलांची कर्मातीत अवस्था कधी होईल?

उत्तर:-
जेंव्हा योगबळाने कर्मभोगावर विजय प्राप्त कराल. संपुर्ण देही-अभिमानी बनाल.हा देह-अभिमानाचा रोगाच खूप मोठा आहे,यामुळे दुनिया पतित झाली आहे.देही-अभिमानी बनाल तर ती खुशी,तो नशा राहिल,वागणे पण सुधारेल.

गीत:-

रात्रीच्या प्रवाशांनों थकुन जाऊ नका.........

ओम शांती।
प्रवासीचा अर्थ तर मुलांनी ऐकला.तुम्हा ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मणांशिवाय दुसरे कोणीही समजावू शकत नाही.तुम्ही जेंव्हा देवी-देवता होता,तेंव्हा होता तर मनुष्य परंतु तुमच चरित्र खूप चांगले होते. तुम्ही सर्वगुणसंपन्न,१६ कला संपूर्ण होता.तुम्ही विश्वाचे मालक होता.हिऱ्यापासून कौडीसारखे कसे बनला,हे कोणी मनुष्य नाही जाणत.तुम्ही पण क्रमवार पुरूषार्थानुसार पलटी खाल्ली आहे (परिवर्तन झाले आहात) आता तुम्ही देवता बनलेले नाही. पुन्हा नव्याने बनत आहात.कोणी थोडे बदलले आहे,कोणाचे ५ टक्के,कोणाचे १० टक्के ....चरित्र बदलत जाते.दुनियेला हे माहीत नाही भारतच स्वर्ग होता,म्हणतात पण क्राइस्टच्या ३ हजार वर्षापूर्वी भारता मध्ये देवी-देवता होते, त्यांच्यात असे गुण होते ज्यामुळे त्यांना भगवान भगवती म्हणायचे. आता तर ते गुण नाहीत. मनुष्याला समजत नाही,भारत जो एवढा सावकार होता,त्याचे पतन कसे झाले.ते पण बाबाच बसून समजावत आहेत.ज्यांचे चरित्र सुधारले आहे तेही समजावून सांगु शकतात.बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही देवी-देवता होता तेव्हा आत्म-अभिमानी होता परत जेंव्हा रावण राज्य सुरू झाले तेंव्हा देह-अभिमानी बनले आहात.हा देह-अभिमानाचा सर्वात मोठा आजार तुम्हाला लागला आहे.सतयुगात तुम्ही आत्म-अभिमानी होता,खूप सुखी होता,कोणी तुम्हांला असे बनवले?हे कोणीच जाणत नाही. बाबा बसून समजावत आहेत तुमचे पतन का झाले आहे.आपल्या धर्माला विसरून गेले आहात.भारत कौडीतुल्य बनला.त्याचे मुळ कारण काय आहे?देह-अभिमान.हे पण नाटक बनले आहे.मनुष्य हे नाही जाणत की भारत एवढा सावकार होता परत गरीब कसा बनला,आपण आदी सनातन देवी-देवता धर्माचे होतो परत आपण कसे धर्म भ्रष्ट,कर्म भ्रष्ट बनलो.बाबा समजावतात,रावण राज्य असल्याने तुम्ही देह-अभिमानी बनला,तर तुमचे हे हाल होऊ लागले.शिडी पण दाखवली आहे -कसे पतन झाले,कौडीतुल्य बनण्याचे मुख्य कारण देह- अभिमान आहे.हे पण बाबा बसून समजावत आहेत.शास्त्रामध्ये कल्पाचे आयुष्य लाखों वर्ष सांगितले आहे.आजकाल ख्रिश्चन लोक समजदार आहेत.ते पण म्हणतात-क्राइस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी स्वर्ग होता,भारतवासी हे समजू शकत नाही की जुना भारतच होता ज्याला स्वर्ग,हेविन म्हटले जाते.आजकाल तर भारताच्या पूर्ण इतिहास-भूगोलाला जाणतच नाहीत,थोड्या मुलांमध्ये थोडे ज्ञान आहे तर देह-अभिमान येतो. समजतात आमच्या सारखा कोणी नाही.बाबा समजावतात भारताची अशी दुर्दशा का झाली? बापू गांधी पण म्हणायचे-पतित- पावन ये,येऊन रामराज्य स्थापन कर.आत्म्याला जरुर कधी बाबांकडून सुख मिळाले आहे,म्हणून पतित-पावन ची आठवण करतात.

बाबा समजावतात आमची मुले जे शुद्र पासून बदलून ब्राह्मण बनतात ते पण पूर्ण देही- अभिमानी नाही बनत.सारखे- सारखे देह-अभिमानात येतात.हा आहे सर्वात जुना रोग,ज्यामुळे असा हाल झाले आहे.देही- अभिमानी बनण्यात खूप मेहनत आहे.जेवढे देही-अभिमानी बनाल तेवढे बाबांची आठवण कराल. मग खूप खुशी रहायला पाहिजे. गायले जाते-चिंता होती पार ब्रह्म मध्ये राहणाऱ्या परमेश्वराची तो मिळाला आहे,त्याच्या कडून २१ जन्मांचा वारसा मिळतो.बाकी काय पाहिजे.तुम्ही फक्त देही- अभिमानी बना,माझी आठवण करा.भले संसारात रहा.सारी दुनिया देह-अभिमानात आहे.भारत जो एवढा उच्च होता त्याचे पतन झाले आहे.इतिहास- भूगोल काय आहे,हे कोणी सांगू शकत नाही.या गोष्टी कोणत्याही शास्त्रात नाहीत.देवता आत्म-अभिमानी होते.जाणत होते एक शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे.परमात्म-अभिमानी नव्हते.तुम्ही जेवढी बाबांची आठवण कराल,देही-अभिमानी रहाल तेवढे खूप गोड बनाल.देह-अभिमानात आल्यानंतरच युद्ध,भांडण,माकड चेष्टा होते,हे बाबा समजावतात.हे बाबा पण समजतात.मुले देह- अभिमानात येऊन शिवबाबांना विसरतात.चांगली-चांगली मुले देह-अभिमानात राहतात.देही - अभिमानी बनतच नाहीत.तुम्ही कोणालाही हा बेहदचा इतिहास- भूगोल समजावू शकता.बरोबर सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी होती. नाटक कुणालाही माहीत नाही. भारत जो एवढा घसरला, घसरण्याचे मुळ कारण आहे देह- अभिमान.मुलांमध्ये पण देह- अभिमान येतो.हे नाही समजत की आम्हाला मार्गदर्शन कोण करत आहे.नेहमी समजा-शिवबाबा सांगत आहेत.शिवबाबांची आठवण न केल्यामुळेच देह-अभिमानात येतात.सारी दुनिया देह- अभिमानी बनली आहे तेव्हां बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, आत्मा या देहा द्वारे ऐकते, भूमिका बजावते.बाबा किती छान समजावतात.भले भाषण तर खूप छान करतात परंतु वागणेही चांगले पाहिजे ना.देह-अभिमान आल्यानेच नापास होतात.ती खुशी व नशा रहात नाही.मग खूप मोठे विकर्म पण त्यांच्या कडून होतात,ज्यामुळे मोठ्या शिक्षेचे पात्र होतात.देह-अभिमानी बनल्याने खूप नुकसान झेलतात. खूप शिक्षा मिळते.बाबा म्हणतात हे ईश्वरीय विश्वाचे शासन आहे ना.मज ईश्वराच्या शासनाचा उजवा हात आहे धर्मराज.तुम्ही चांगले कर्म कराल तर त्याचे फळ चांगले मिळते.वाईट कर्म कराल तर त्याची शिक्षा खावी लागते. सगळयांना गर्भ जेल मध्ये पण शिक्षा मिळते.त्यावर एक गोष्ट पण आहे.या सगळ्या गोष्टी या वेळच्या आहेत.महिमा एक बाबांची आहे. दुसऱ्या कोणाची महिमा नाही यामुळे लिहिले जाते त्रिमूर्ती शिव जयंती हिरेतुल्य आहे.बाकी सर्व आहे कौडीतुल्य. शिवबाबां शिवाय कोणी पावन बनवू शकत नाही.पावन बनवतात परत रावण पतित बनवतो.ज्यामुळे सगळे देह- अभिमानी बनले आहेत.आता तुम्ही देही-अभिमानी बनता.ही देही-अभिमानी अवस्था २१ जन्म चालते.तर बलिहारी(महिमा) एकाची गायली जाते.भारताला स्वर्ग बनवणारा शिवबाबा आहे,हे कोणाला माहित नाही की शिवबाबा कधी आले,त्यांचा इतिहास तर पहिल्यांदा पाहिजे.शिव म्हटले जाते परम पिता परमात्म्याला.

तुम्ही जाणता की देह-अभिमाना मुळे पतन होते.असे होईल तेव्हांच बाबा उत्थान करण्यासाठी येतात.उत्थान आणि पतन,दिवस आणि रात्र,ज्ञान सूर्य प्रगटला,अज्ञान अंधाराचा विनाश.सगळ्यात जास्त अज्ञान आहे हा देह-अभिमान.आत्म्याचा तर कोणालाच पत्ता नाहीये.आत्मा सो परमात्मा म्हणतात तर किती पाप आत्मा झाले आहेत यामुळेच पतन झाले आहे.८४ जन्म घेतले आहेत,शिडी खाली उतरत आलो आहे.हा खेळ बनला आहे.हा दुनियेचा इतिहास-भूगोल तुम्ही मुले जाणता आणि कोणी नाही जाणत.विश्वाचे पतन कसे झाले. ते तर समजतात की विज्ञानाने खूप प्रगती झाली आहे.हे नाही समजत की दुनिया अजूनच पतित नर्क बनली आहे.देह- अभिमान खूप आहे.बाबा म्हणतात आता तुम्हाला देही- अभिमानी बनायचे आहे.चांगले- चांगले महारथी खूप आहेत.ज्ञान खूप छान सांगतात परंतु देह- अभिमान पूर्ण गेला नाही.देह- अभिमानामुळे कोणा मध्ये क्रोधाचा अंश,कोणा मध्ये मोहाचा अंश,काही ना काही आहे.चरित्र सुधारायला हवे ना.खूप-खूप गोड बनायला हवे.तेव्हां उदाहरण देतात-वाघ बकरी एकत्र पाणी पितात.तिथे कोणी अशी दु:ख देणारी जनावरे पण नसतात.या गोष्टी पण समजणारा एखादाच असतो.क्रमवार समजणारे आहेत.कर्मभोग संपून,कर्मातीत अवस्था होणे,हे कठीण आहे. खूप देह-अभिमानात येतात. माहीत नाही पडत-आम्हाला हे मत कोण देते.श्रीमत,श्रीकृष्णा द्वारे कशी मिळेल.शिवबाबा म्हणतात यांच्याशिवाय श्रीमत कसे देऊ.माझा स्थाई (ठरलेला) रथ हा आहे.देह-अभिमानात येऊन उल्टी-सुल्टी कामे करून फुकट स्वतःचे नुकसान करू नका.नाही तर परिणाम काय होईल?खूप छोटे पद मिळेल. शिकलेल्या पुढे बिन शिकलेला भारे वाहील.खूपजण म्हणतात भारताचा इतिहास-भूगोल जसा पूर्ण पाहिजे तसा नाही.तर त्यांना समजवावे लागेल.तुमच्या शिवाय तर कोणी समजावू शकत नाही . परंतु देही-अभिमानी स्थिती पाहिजे,तेच उच्च पद मिळवू शकतात.आता तर कर्मातीत अवस्था कोणाची झाली नाही. यांच्या(बाबांच्या)वर तर खूप झंझट आहे.किती चिंता राहते. भले समजतात सर्व नाटकानुसार होत आहे.तरी पण समजावण्यासाठी युक्ती तर रचावी लागते ना यामुळे बाबा म्हणतात तुम्ही जास्त देही- अभिमानी बनू शकता.तुमच्यावर कोणते ओझे नाही, बाबां वर तर ओझ आहे.मुख्य तर हा आहे ना- प्रजापिता ब्रह्मा.परंतु हे कोणालाच माहित नाही की यांच्यात शिवबाबा बसले आहेत. तुमच्या मध्ये पण कोणी निश्चय ठेवणे अवघड आहे.तर हा दुनियेचा इतिहास-भूगोल जाणला पाहिजे ना.भारतात स्वर्ग कधी होता,परत कुठे गेला?कसे पतन झाले?हे कोणालाच माहित नाही.जोपर्यंत तुम्ही नाही समजावत तोपर्यंत कोणी समजू शकत नाही यामुळे बाबा मार्गदर्शन करतात.लिहायला वाचायला शिका तरच शाळांमध्ये दुनियेचा इतिहास-भूगोल सांगु शकाल.भारताचे पतन कसे झाले यावर भाषण केले पाहिजे.भारत हिऱ्यासारखा होता तो परत कौडीसारखा कसा बनला?किती वर्ष लागली?आम्ही समजावतो. अशी पत्रक विमानाद्वारे खाली टाकू शकता.समजणारा हुशार पाहिजे.शासनाला वाटते तर शासनाचे सभाग्रह विज्ञान भवन,जे दिल्लीत आहे तिथे सर्वांना बोलावले पाहिजे.वर्तमान पत्रात पण टाका.पत्र सर्वांना पाठवा.आम्ही तुम्हाला सर्व जगाचा इतिहास-भूगोल सुरूवातीपासून शेवटपर्यंत समजावतो.आपणहून येतील जातील.पैशाची तर गोष्टच नाहीय.समजा आपल्याला कोणी भेटले,प्रेझेंट(भेट)दिली तर आपण घेऊ शकत नाही.सेवा करण्याच्या कामी लावू,बाकी आपण घेऊ शकत नाही.बाबा म्हणतात मी तुमच्याकडून दान घेऊन काय करु जे परत भरुन द्यावे लागेल.मी पक्का सराफ आहे.अच्छा.

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१ ) देह-अभिमानात येऊन कोणतेही उल्टे-सुल्टे कार्य करायचे नाही.देही-अभिमानी बनण्याचा संपूर्ण पुरूषार्थ करायचा आहे.आपले चरित्र (चलन)सुधारत रहायचे आहे.

२) खूप-खूप गोड,शीतल बनायचे आहे.आतमधे क्रोध मोहाचे जे भूत आहे,त्याला काढून टाकायचे आहे.

वरदान:-
वेळेच्या श्रेष्ठ खजिन्याला सफल करुन सदैव आणि सर्व सफलतामूर्त भव

जी मुले वेळेच्या श्रेष्ठ खजिन्याला स्वतःच्या तसेच सर्वांच्या कल्याणासाठी लावतात त्यांचे सर्व खजाने स्वत: जमा होतात. वेळेचे महत्त्व जाणून त्याला सफल करणारे संकल्पाचा खजिना,खुशीचा खजिना, शक्तींचा खजिना,ज्ञानाचा खजिना आणि श्वासांचा खजिना....हे सर्व खजिने स्वतः जमा करतात.फक्त आळशीपणा सोडून वेळेच्या खजिन्याला सफल कराल तर सदा आणि सर्व सफलतामूर्त बनाल.

बोधवाक्य:-
एकाग्रतेद्वारे सागराच्या तळाशी जाऊन अनुभवांचे हिरे मोती प्राप्त करणे म्हणजेच अनुभवी मूर्त बनणे आहे.


मातेश्वरीजीं चे अनमोल महावाक्य

१ ) तमोगुणी मायेचा विस्तार :-

सतोगुणी,रजोगुणी,तमोगुणी हे तीन शब्द म्हणतात ज्याला यथार्थपणे समजणे जरूरीचे आहे.मनुष्य समजतात हे तीन गुण एकत्र चालत राहतात,परंतु विवेक काय म्हणतो-काय हे तीन गुण एकत्र चालत येतात का तिन्ही गुणांची भूमिका वेगवेगळ्या युगात होते?विवेक तर असेच म्हणतो की हे तीन गुण एकत्र नाही चालत जेंव्हा सतयुग आहे तेंव्हा सतोगुण आहे,द्वापर आहे तर रजोगुण आहे आणि कलियुग आहे तर तमोगुण आहे.जेंव्हा सतो आहे तेंव्हा तमो रजो नाही, जेंव्हा रजो आहे तेंव्हा सतोगुण नाही.हे मनुष्य तर असेच समजून बसलेत की हे तीन गुण एकत्र चालत आले आहेत.ही गोष्ट म्हणणे सरासर चुकीची आहे,ते समजतात जेंव्हा मनुष्य खरे बोलतात,पाप कर्म नाही करत तेंव्हा ते सतोगुणी असतात परंतु विवेक सांगतो जेंव्हा आपण म्हणतो सतोगुण,तर या सतोगुणाचा अर्थ आहे संपूर्ण सुख म्हणजे सर्व सृष्टी सतोगुणी आहे. बाकी असे नाही म्हणू शकत की जो खरे बोलतो तो सतोगुणी आहे आणि जो खोटे बोलतो तो कलियुगी तमोगुणी आहे,अशीच दुनिया चालत आली आहे.आता जेंव्हा आपण सतयुग म्हणतो तर त्याचा अर्थ आहे साऱ्या सृष्टी वर सतोगुण सतोप्रधानता हवी.हो, एकेकाळी असे सतयुग होते जिथे सारा संसार सतोगुणी होता.आता ते सतयुग नाही,आता तर आहे कलियुगी दुनिया साऱ्या सृष्टीवर तमोप्रधानतेच राज्य आहे.या तमोगुणी वेळेवर पुन्हा सतोगुण कुठुन आला!आता आहे घोर अंधार ज्याला ब्रह्माची रात्र म्हणतात.ब्रह्माचा दिवस आहे सतयुग आणि ब्रह्माची रात्र आहे कलियुग,तर आपण दोघांना मिळवू नाही शकत.

२ )कलियुगी असार संसारातून सतयुगी सार वाल्या दुनियेत घेऊन जाणे,एक परमात्म्याचेच काम आहे :- या कलियुगी संसाराला असार संसार का म्हणतात?कारण या जगात काही सार नाही म्हणजे कोणत्याही वस्तूमधे ती ताकद नाही राहीली. अर्थात सुख शांती पवित्रता नाही, जी या सृष्टी वर एकेकाळी सुख शांती पवित्रता होती.आता ती ताकद नाही कारण या सृष्टी मध्ये ५ भूतांची प्रवेशता आहे यामुळे या सृष्टीला भितीचा सागर किंवा कर्म बंधनाचा सागर म्हणतात यामुळेच मनुष्य दुखी होऊन परमात्म्याला बोलवत आहेत, परमात्मा आम्हाला भव सागरातून पार कर यातून सिद्ध आहे की जरूर कोणी अभय अर्थात निर्भयतेचा संसार आहे जिथे जाऊ पाहतात यामुळे या संसाराला पापाचा सागर म्हणतात,ज्याला पार करून पुण्य आत्म्यांच्या दुनियेमध्ये जावेसे वाटते.तर दुनिया दोन आहेत, एक सतयुगी सार वाली दुनिया दुसरी आहे कलियुगी असार ची दुनिया.दोन्ही दुनिया या सृष्टीवर असतात.आता परमात्मा ती सार वाली दुनिया स्थापन करत आहे. अच्छा-ओमशांती.