31-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- एक पिताच नंबर एक अभिनेता आहे,जो पतितांना पावन बनवण्याचा अभिनय
करतो,पित्यासारखा अभिनय कोणी करू शकत नाही."
प्रश्न:-
संन्याशांचा
योग शारीरिक योग आहे,आत्मिक योग बाबाच शिकवतात,कसे?
उत्तर:-
संन्याशी ब्रह्म तत्त्वाशी योग लावायला शिकवतात.ते तर रहाण्याचे ठिकाण आहे.तर तो
शारीरिक योग झाला.तत्त्वाला परम म्हणू शकत नाही.तुम्ही मुले परमात्म्याशी योग लावता
यामुळे तुमचा योग आत्मिक योग आहे. हा योग बाबाच शिकवू शकतात, दुसरे कोणीही शिकवू
शकत नाही कारण की तोच तुमचा आत्मिक पिता आहे.
गीत:-
तू प्रेमाचा
सागर आहेस...
ओम शांती।
मुलांनो,खूप लोक ओम शांती म्हणतात म्हणजेच आपल्या आत्म्याची ओळख देतात.परंतु स्वत:
समजू शकत नाहीत.ओम शांतीचा अनेक अर्थ काढतात.कोणी म्हणतात ओम म्हणजे भगवान.परंतु
नाही,हे आत्माच म्हणते ओम शांती.मज आत्म्याचा स्वधर्म आहेच शांत म्हणूनच म्हणतात मी
शांत स्वरूप आहे.हे माझे शरीर आहे ज्याने आपण कर्म करतो.किती सहज आहे.तसे बाबा पण
ओम शांती म्हणतात.परंतु मी सर्वांचा पिता होण्याच्या नात्याने, बीजरूप असल्याने जे
रचना रूपी झाड आहे,कल्पवृक्ष त्याच्या आदि-मध्य-अंताला जाणतो.जसे तुम्ही कोणतही झाड
पाहिले तर त्याच्या आदि मध्य अंताला जाणाल,ते बीज तर जड़ आहे. तर बाबा समजावतात हा
कल्पवृक्ष आहे,याच्या आदि मध्य अंताला तुम्ही जाणू शकत नाही, मी जाणतो.मला म्हणतातच
ज्ञानाचा सागर.मी तुम्हा मुलांना बसून आदि मध्य अंताचे रहस्य समजावत आहे.हे जे नाटक
आहे,ज्याला ड्रामा म्हणतात, ज्याचे तुम्ही अभिनेते आहात बाबा म्हणतात मी पण अभिनेता
आहे.मुले म्हणतात हे बाबा पतित -पावन अभिनेता बनून या,येऊन पतितांना पावन बनवा.आता
बाबा म्हणतात मी अभिनय करत आहे.माझा अभिनय केवळ संगमयुगावरच आहे.ते पण मला माझे
शरीर नाही.मी या शरीराद्वारे अभिनय करतो.माझे नाव शिव आहे.मुलांनाच समजावणार ना.
पाठशाळा काही माकडे किंवा जनावरांची नसते.परंतु बाबा म्हणतात की या ५ विकारांच्या
कारणाने चेहरा तर मनुष्यासारखा आहे पण कर्तव्य माकडांसारखे आहे.मुलांना बाबा
समजावतात की पतित तर सर्व स्वतःला म्हणवतात.परंतु हे जाणत नाहीत की आपल्याला पतित
कोण बनवतो आणि पावन नंतर कोण येऊन बनवतो?पतित-पावन कोण?ज्याला बोलावतात,काही समजू
शकत नाही.हे पण जाणत नाही आपण सगळे अभिनते आहोत.मी आत्मा हे शरीर घेऊन अभिनय
करते.आत्मा परमधाम वरून येते,येऊन अभिनय करते. भारतावरच सर्व खेळ बनला आहे.भारत
पावन आणि भारत पतित कोणी बनवला आहे? रावणाने.गातातही की रावणाचे लंकेवर राज्य
होते.बाबा बेहद मध्ये घेऊन जातात.हे मुलांनो,ही सारी सृष्टी बेहदचे बेट आहे.ती तर
हदची लंका आहे.या बेहदच्या बेटावर रावणाचे राज्य आहे. पहिले रामराज्य होते आता रावण
राज्य आहे.मुले म्हणतात बाबा राम राज्य कुठे होते?बाबा म्हणतात मुलांनो ते तर इथे
होते ना,जे सर्वांना पाहिजे. तुम्ही भारतीय आदि सनातन देवी देवता धर्माचे आहात,हिंदू
धर्माचे नाही.गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या लाडक्या मुलांनो तुम्हीच पहिले-पहिले
भारतामध्ये होता.तुम्हाला ते सतयुगाचे राज्य कोणी दिले होते?अवश्य स्वर्गाची स्थापना
करणारा पिताच हा वारसा देईल.बाबा समजावतात किती वेगवेगळ्या धर्मात धर्मांतर झाले
आहेत.मुसलमानांचे जेंव्हा राज्य होते तर अनेकांना मुसलमान बनवले.ख्रिश्चनांचे राज्य
होते तर अनेकांना ख्रिश्चन बनवले.बौद्धांचे इथे राज्य पण झाले नाही तरी पण अनेकांना
बौद्धि बनवले.आपल्या धर्मात धर्मांतर केले आहे.आदि सनातन धर्म जेंव्हा लोप पावतो
तेंव्हा तर त्या धर्माची स्थापना होईल.तर बाबा तुम्हा सर्व भारतवासींना म्हणतात की
गोड-गोड मुलांनो, तुम्ही सगळे आदि सनातन देवी- देवता धर्माचे होता.तुम्ही ८४ जन्म
घेतले आहेत.ब्राह्मण, देवता,क्षत्रिय......वर्णामधे आले. आता परत देवता वर्णांमध्ये
जाण्यासाठी ब्राह्मण वर्णामधे आले आहात.गातातही ब्राह्मण देवताए नम:,पहिले
ब्राह्मणांचे नाव घेतात.ब्राह्मणांनीच भारताला स्वर्ग बनवले आहे.हा आहेच भारताचा
प्राचीन योग. सुरूवातीला जो राजयोग होता, ज्याचे गीतेत वर्णन आहे.गीतेचा योग कोणी
शिकवला होता?हे भारतवासी विसरले आहेत.बाबा समजावतात की मुलांनो योग तर मी शिकवला
होता.हा आहे आत्मिक योग.बाकी सर्व आहे शारीरिक योग.संन्याशी इ. शारीरिक योग शिकवतात
म्हणतात ब्रह्म शी योग लावा.तो तर चुकीचा होऊन जातो.ब्रह्म तत्त्व तर राहण्याचे
ठिकाण आहे. तो काही परम आत्मा नाही झाला.बाबांना विसरले आहेत. तुम्ही पण विसरले
होते.तुम्ही आपल्या धर्माला विसरले आहात. हे पण नाटकामध्ये नोंदले आहे. विदेशात योग
नव्हता.हठयोग आणि राजयोग इथेच आहे.ते निवृत्ती मार्गाचे संन्यासी कधी राजयोग शिकवू
शकत नाही.जो जाणतो तोच शिकवु शकतो. संन्यासी लोक तर राजाई पण सोडतात.गोपीचंद राजाचे
उदाहरण आहे ना.राजाई सोडून जंगलात निघून गेला.त्याची पण गोष्ट आहे.संन्यासी तर
राजाई सोडवणारे आहेत,ते परत राजयोग का शिकवतील.यावेळी सर्व झाड वठुन गेले आहे.आता
पडेल की पडेल.कोणतेही झाड जेंव्हा वठून जाते तर शेवटी त्याला पाडावे लागते.तसे हे
मनुष्य सृष्टी रूपी झाड पण तमोप्रधान आहे,यात काही सार नाही.याचा अवश्य विनाश
होईल.त्या अगोदर आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना इथे करायला हवी.सतयुगात कोणी
दुर्गती झालेला नसतो.हे विदेशात जाऊन योग शिकवतात परंतु तो हठयोग आहे.हा आहे
राजयोग,याला आत्मिक योग म्हणतात.ते सर्व शारीरिक योग आहेत.मनुष्य,मनुष्याला शिकवणारे
आहेत.बाबा मुलांना समजावतात की मी तुम्हांला एकदाच हा राजयोग शिकवतो आणि कोणी
कदाचित शिकवू शकणार नाही.आत्मिक पिता आत्मिक मुलांना शिकवतात की मामेकम(माझी)आठवण
करा तर तुमचे सर्व पाप मिटतील.हठयोगी कधी असे म्हणू शकत नाहीत.बाबा आत्म्यांना
समजावतात.ही नवी गोष्ट आहे. बाबा तुम्हाला आता देही- अभिमानी बनवत आहेत.बाबांना देह
नाही.यांच्या तनामधे येतात, यांचे नाव बदलतात कारण मरजीवा बनले आहेत.जसे गृहस्थी
जेव्हा संन्याशी बनतात तर मरजीवा बनले,गृहस्थ आश्रम सोडून निवृत्ती मार्ग घेतला.तर
तुमचे पण मरजीवा बनल्यावर नाव बदलते.पहिले सुरूवातीला सर्वांची नावे आणली होती नंतर
जे आश्चर्यवत सुनंती,कथंती, भागंती झाले(आश्चर्याने ऐकतात,इतरांना सांगतात,पळून
जातात)तर नावे आणणे बंद झाले यामुळे आता बाबा बोलतात की आम्ही नाव देऊ आणि पळून
जातील तर फालतू होऊन जाते.सुरूवातीला येण्याऱ्यांची जी नावे ठेवली,ती खूप रमणीक
होती.आता ठेवत नाहीत.त्यांचे ठेऊ जे नेहमी कायम राहतील.अनेकांची नावे ठेवली परत
बाबांना सोडून गेल्यामुळे आता नाव बदलत नाहीत.बाबा समजावतात की हे ज्ञान
ख्रिश्चनांच्या बुद्धिमधे पण बसेल.एवढे समजतील की भारताचा योग निराकार बाबांनीच
शिकवला होता.बाबांची आठवण करूनच पाप भस्म होतील आणि आपण आपल्या घरी निघून जाऊ.जो या
धर्माचा असेल आणि धर्मांतर झाले असेल तर तो टिकेल.तुम्ही जाणता की मनुष्य,मनुष्याची
सदगति करू शकत नाही.हा दादा पण मनुष्य आहे,हा म्हणतो की मी कोणाची सदगति करू शकत
नाही.हे तर बाबा आपल्याला शिकवतात की तुमची सदगति पण आठवणीने होईल.बाबा म्हणतात
मुलांनो,हे आत्म्यांनो माझ्या सोबत योग लावा तर तुमचे विकर्म विनाश होतील.तुम्ही
पहिले सुवर्णयुगात पवित्र होता परत खाद (कट)पडली आहे.जे पहिले देवी देवता २४ कैरेट
सोने होते,आता लोहयुगात येऊन पोहोचले आहेत.हा योग कल्प-कल्प तुम्हाला शिकावा
लागतो.तुम्ही जाणता यामध्ये पण कोणी पूर्ण जाणतो,कोणी कमी जाणतो. कोणी तर असेच इथे
काय शिकवतात ते पहायला येता.ब्रह्माकुमार कुमारी इतके भरपूर मुले आहेत.अवश्य
प्रजापिता ब्रह्मा असेल ना ज्याची एवढी मुले येऊन बनली आहेत,अवश्य काही असेल तर
जाऊन त्यांना विचारू तर खरे. तुम्हाला प्रजापिता ब्रह्मा कडून काय मिळते?विचारले
पाहिजे ना. पण इतकी बुद्धी पण नाही. भारतासाठी खास म्हणतात. गायले पण जाते दगडबुद्धी
पासून परिसबुद्धी.परिसबुद्धी पासून दगडबुद्धी.सतयुग त्रेता मध्ये परिसबुद्धी
सुवर्णयुगी होते नंतर चांदीच्या युगात दोन कला कमी झाल्या यामुळे नाव पडले चंद्रवंशी
कारण नापास झाले आहेत.ही पण पाठशाळा आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जे कमी असतात ते नापास
होतात.राम सीता नंतर त्यांचे घराणे संपूर्ण नाही म्हणून सूर्यवंशी बनू शकत
नाही.नापास तर कोणी होतील ना कारण परीक्षा खूप मोठी आहे.अगोदर शासनाची आई.सी.एस.ची
मोठी परीक्षा असायची.सर्व थोडेच शिकू शकत होते.कोट्या मध्ये कोणी निघतात.कोणाला
वाटते आम्ही सूर्यवंशी महाराजा महारानी बनू तर त्यात पण खूप मेहनत पाहिजे.मम्मा बाबा
सुद्धा श्रीमतावर शिकत आहेत.ते पहिल्या नंबरात शिकतात परत जे मात-पित्याचे अनुकरण
करतात तेच त्यांच्या सिंहासनावर बसतील.सूर्यवंशी ८ घराणे चालतात.जसे एडवर्ड द
फस्ट,द सेकण्ड(ख्रिश्चनांच्या गुरुंची गादी)चालते.तुमचा संबंध या ख्रिश्चनांशी अधिक
आहे.ख्रिश्चन घराण्याने भारताची राजाई हिरावून घेतली.भारताचे खूप धन घेऊन गेले मग
विचार करा सतयुगात किती भरपूर धन असेल.त्या तुलनेत तर इथे काहीच नाही.तिथे सर्व खाणी
भरपूर होतात.आता तर प्रत्येक वस्तूंच्या खाणी संपतात.पून्हा चक्र पुनरावृत्त होईल
तर परत सर्व खाणी भरून जातील.गोड- गोड मुलांनो तुम्ही आता रावणावर विजय मिळवून
राजाई घेत आहात परत अर्ध्या कल्पानंतर हा रावण येईल परत तुम्ही राजाई गमावून बसाल.
आता तुम्ही भारतीय कौडी सारखे बनले आहात.मी तुम्हाला हिऱ्या सारखे बनवले.रावणाने
तुम्हाला कौडी सारखे बनवले.समजत नाहीत की हा रावण कधी आला? आपण त्याला का जाळतो.
म्हणतात की हा रावण परंपरेपासून चालत आला आहे. बाबा समजावतात की अर्ध्या कल्पानंतर
हे रावण राज्य सुरू होते.विकारी बनल्याने स्वतःला देवी-देवता म्हणू शकत नाही.
वास्तविक तुम्ही देवी-देवता धर्माचे होता.तुमच्या इतके सुख कोणी पाहू शकत
नाही.सर्वात जास्त गरीब पण तुम्ही बनले आहात.दुसऱ्या धर्माचे नंतर वृद्धि प्राप्त
करतात.ख्रिस्त आला, पहिले तर खूप थोडे होते.जेंव्हा खूप होतील तेंव्हाच राजाई करू
शकतील.तुम्हाला तर पहिल्यांदा राजाई मिळेल.या तर सर्व ज्ञानाच्या गोष्टी आहेत.बाबा
म्हणतात हे आत्म्यांनो मज पित्याची आठवण करा. अर्धाकल्प तुम्ही देह-अभिमानी राहीले
आहात.आता देही-अभिमानी बना सारखे- सारखे हे विसरता कारण अर्धाकल्पाची कट चढली आहे.
यावेळी तुम्ही ब्राह्मण शेंडी आहात.तुम्ही आहात सर्वात उच्च.संन्याशी ब्रह्मशी योग
लावतात त्याने विकर्म विनाश होत नाहीत.प्रत्येकाला सतो रजो तमो मध्ये अवश्य यायचे
आहे.परत कोणीच जाऊ शकत नाही.जेंव्हा सर्व तमोप्रधान बनतात तेंव्हा बाबा येऊन
सर्वांना सतोप्रधान बनवतात अर्थात सर्वांची ज्योती जागते.प्रत्येक आत्म्याला
आपली-आपली भूमिका मिळाली आहे.तुम्ही आहात हिरो हिरोईन कलाकार. तुम्ही भारतीय खूप
उच्च आहात जे राज्य घेऊन परत गमावतात अजून कोणी राज्य घेत नाही.ते बाहुबळाने राज्य
घेतात.बाबा समजावतात जे विश्वाचे मालक होते तेच बनतील.तर खरा राजयोग बाबां शिवाय
कोणी शिकवू शकत नाही.जे शिकवतात ते सर्व अयथार्थ योग आहेत.परत तर कोणीच जाऊ शकत नाही.
आता शेवट आहे.सर्वजण दु:खातून सुटतात परत क्रमवार येतात.पहिल्यांदा सुख पहायचे आहे
नंतर मग दु:ख पहायचे आहे.या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.म्हणतात हाताने काम करा
मनाने प्रियकराची(बाबांची) आठवण करा.काम करत रहा बाकी बुद्धीयोग बाबांशी असावा.
तुम्ही आत्में आशिक आहात एका माशूकचे.आता तो माशुक(प्रियकर)आला आहे.सर्व
आत्म्यांना(सजनींना)गुल-गुल (सुंदर)बनवून घेऊन जाण्यासाठी.बेहदचा साजन बेहदच्या सजनी
आहेत.म्हणतात मी सर्वांना घेऊन जाईन.परत क्रमवार पुरूषार्थ अनुसार जाऊन पद मिळेल.भले
गृहस्थ व्यवहारात रहा,मुलांना सांभाळा. हे आत्मा तुझे मन बाबांकडे असावे.हाच आठवणीचा
सराव करत रहा.मुले जाणतात आता आम्ही बाबांची आठवण केल्याने स्वर्गवासी बनत आहे.
विदयार्थ्यांना तर खूप खुशीत रहायला पाहिजे.हे तर खूप सहज आहे.नाटका अनुसार सर्वांना
रस्ता सांगायचा आहे.कोणाशी वाद करण्याची गरज नाही.आता तुमच्या बुद्धीत सगळे ज्ञान
आले आहे.मनुष्य आजारातून सुटला की शुभेच्छा देतात.इथे तर सारी दुनिया रोगी आहे.थोडया
वेळात जयजयकार होईल.अच्छा!
गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) खरे-खरे
आशिक बनून हातांनी काम करत बुद्धीने माशूकची आठवण करण्याचा सराव करायचा
आहे.बाबांच्या आठवणीने आपण स्वर्गवासी बनत आहे,या खुशीत रहायचे आहे.
२) सूर्यवंशी घराण्यात सिंहासनधारी बनण्यासाठी मात- पित्याचे पूर्णपणे अनुकरण करायचे
आहे.पित्यासमान ज्ञानसंपन्न बनून सर्वांना रस्ता सांगायचा आहे.
वरदान:-
अतूट संबंधा
द्वारे करंटचा अनुभव करणारे सदैव मायाजीत,विजयी भव
ज्याप्रमाणे विजेची
शक्ती असा करंट लावते ज्यामुळे मनुष्य दूर जाऊन पडतो,शॉक लागतो.अशी ईश्वरीय शक्ती
मायेला दूर फेकुन देईल,असा करंट असायला पाहिजे परंतु करंटचा आधार संबंध आहे.चालता
फिरता प्रत्येक सेकंद बाबांशी संबंध जोडलेला हवा.असा अतूट संबंध असेल तर करंट येईल
आणि मायाजीत, विजयी बनाल.
बोधवाक्य:-
तपस्वी ते
आहेत जे चांगले वाईट कर्म करणाऱ्यांच्या प्रभावाच्या बंधनातून मुक्त आहेत.