17-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, ज्ञानसागर बाबाद्वारे तुम्ही मास्टर ज्ञानसागर बनले आहात, तुम्हाला
ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही त्रिनेत्री, त्रिकालदर्शी आणि
त्रिलोकीनाथ आहात.
प्रश्न:-
विश्वाची
आत्मिक सेवा तुम्हा मुला शिवाय कोणी करू शकत नाही,का ?
उत्तर:-
कारण तुम्हालाच सर्वोच्च परमात्मा(शिवबाबा) पासून शक्ती मिळाली आहे. प्रथम तुम्हां
आत्म्याला सर्वोच्च परमात्म्या कडून ज्ञानाचे इंजेक्शन मिळत आहे. ज्यामुळे तुम्ही
पाच विकारावर स्वतः विजय प्राप्त करता आणि दुसऱ्याला पण करविता. अशी सेवा आणखीन कोणी
करू शकत नाहीत. कल्प कल्प तुम्हीं मुलेच ही आत्मिक सेवा करतात.
ओम शांती।
बाबाच्या आठवणी मध्ये बसायचे आहे आणि कोणत्या पण देहधारीच्या आठवणी मध्ये बसायचे
नाही. नवीन जे येतात ते बाबाला तर ओळखतच नाहीत. त्यांचे नाव तर फार सोपे शिवबाबा आहे.
पित्याला मुले ओळखत नाहीत, किती आश्चर्य आहे. शिवबाबा उंच ते उंच सर्वांचे सदगती
दाता आहेत. सर्व पतितांचा पावन कर्ता, सर्वांचे दुःखहर्ता पण म्हणतात, परंतु ते कोण
आहेत, हे कोणी ओळखत नाहीत, शिवाय तुम्हा बी.के.च्या. तुम्ही त्यांचे नातू, नाती
आहात. ते तर जरूर आपल्या पित्याला आणि त्यांच्या रचनेच्या आदि, मध्य, अंताला जाणतील.
बाबा कडून मुलेच सर्व कांही जाणत आहेत. ही पतित दुनिया आहे. सर्व कलियुगी पतिताना
पावन कसे बनवितात, ते तर बी.के. शिवाय दुनिये मध्ये कोणी पण जाणत नाहीत. कलियुगी
दुर्गती मधून काढणारे सदगती दाता बाबाच आहेत. शिवजयंती पण भारता मध्येच होते. जरूर
ते येतात , परंतु भारता मध्ये येऊन काय देतात, हे भारतवासी जाणत नाहीत. प्रत्येक
वर्षी शिवजयंती साजरी करतात, परंतु ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही, त्यामुळे बाबाला
ओळखत नाहीत.
गीत:-
नयनहीन को राह दिखाओ.
. .
हे मनुष्याने बनविलेले गीत आहे कि, आम्ही सर्व नयनहीन आहोत. हे स्थूल नयन तर
सर्वांना आहेत, परंतु स्वतःला नयनहीन कां म्हणत आहेत? ते बाबा समजावत आहेत कि,
ज्ञानाचा तिसरा नेत्र कोणालाही नाही. बाबाला न ओळखणे हे अज्ञान आहे. बाबाला बाबा
द्वारेच ओळखणे याला म्हटले जाते ज्ञान. बाबा ज्ञानाचा तिसरा नेत्र देत आहेत,
त्यामुळे तुम्ही साऱ्या रचनेच्या आदि, मध्य, अंताला ओळखत आहात. ज्ञान सागराची मुले
तुम्ही मास्टर ज्ञान सागर बनत आहात. तिसरा नेत्र म्हणजेच त्रिनेत्री, त्रिकालदर्शी,
त्रिलोकीनाथ बनत आहात. भारतवासी हे जाणत नाहीत कि, हे लक्ष्मी नारायण जे सतयुगा चे
मालक होते, त्यांना हा वरसा कसा मिळाला? ते कधी आले? मग कोठे गेले? मग कसे राज्य
घेतले? कांही च ओळखत नाहीत. हे देवता पावन होते ना. पावन तर जरूर बाबाच बनवतील.
तुम्हां भारतवासीना बाबा समजावत आहेत. जे देवतांना, शिवा ला मानतात. शिवाचा जन्म पण
भारता मध्येच झाला आहे. उंच ते उंच भगवान आहेत. शिवजयंती पण इथेच साजरी करतात.
जगदंबा, जगतपिता ब्रह्मा आणि सरस्वतीचा जन्म पण इथेच होत आहे. भारता मध्येच साजरा
करतात. तसेच लक्ष्मी नारायण चा जन्म पण इथेच होत आहे, तेच राधे कृष्ण आहेत. हे पण
भारतवासी जाणत नाहीत. म्हणतात पतित-पावन या, तर जरूर सर्व पतित आहेत. साधू-संत
ऋषी-मुनी इत्यादी सर्व बोलावत आहेत कि, आम्हाला पावन बनविण्यासाठी या. दुसरीकडे
कुंभमेळा इ. ठिकाणी जातात पाप धुण्यासाठी. समजतात गंगा पतित पावनी आहे. बोलावतात पण
कि, पतित-पावन या, तर मनुष्य कोणाला कसे पावन बनवू शकतील? बाबा समजावत आहेत, तुम्ही
पहिल्या प्रथम देवी-देवता धर्माचे होता, तर सर्व पावन होता. आता पतित आहात. म्हटले
पण जाते कि, प्रभू रस्ता दाखवा. तर कोणता रस्ता? म्हणतात बाबा जीवनमुक्तीचा रस्ता
सांगा. आमच्या मध्ये पाच विकार आहेत. बाबा आम्ही सर्व स्वर्गा मध्ये होतो, तर
निर्विकारी होतो. आता विकारी पतित बनले आहोत, त्याचे कांही रहस्य तर समजावून सांगा.
ही कांही दंतकथा नाहीत. बाबा सांगत आहेत, श्रीमत भगवत गीता किंवा परमात्म्याने
सांगितलेली गीता आहे. पतितांना पावन बनविणारे निराकार भगवान आहेत. मनुष्याला भगवान
म्हटले जात नाही. बाबा म्हणतात, एवढे मोठे गुरु असून पण भारत एवढा पतित कौडी सारखा
कां बनला आहे. कालची गोष्ट आहे कि, भारत स्वर्ग होता. बाबा ने भारताला स्वर्गाची
भेट दिली होती. भारतवासी येऊन पतितांना राजयोग शिकवून पावन बनविले होते. आता परत
बाबा मुलांजवळ सेवाधारी बनून आले आहेत. बाबा आत्मिक सेवाधारी आहेत. बाकी इतर सर्व
मनुष्य शरीराचे सेवाधारी आहेत. संन्याशी पण शरीराचे सेवाधारी आहेत. ते पुस्तक
इत्यादी बसून सांगतात. बाबा म्हणतात कि, मी निराकार साकार साधारण वृध्द शरीरा मध्ये
प्रवेश करुन, मुलांना येऊन सांगत आहे. हे भारतवासी मुलांनो, पाहा, आत्मिक पिता
आत्म्याला समजावत आहेत. हे ब्रह्मा सांगत नाहीत, परंतु ते निराकार बाबा या शरीराचा
आधार घेत आहेत. शिवाला तर स्वतःचे शरीर नाही. शालीग्राम आत्म्याला स्वत:चे आपले
शरीर आहे. पुनर्जन्म घेत घेत पतित बनले आहेत. आता तर सारी दुनिया पतित आहे. पावन तर
एक पण नाही.तुम्ही सतोप्रधान होता, मग त्यामध्ये भेसळ झाल्याने सतो पासून रजो,तमो
मध्ये आले आहात. तुम्हां भारतवासी जवळ शिवबाबा येऊन शरीर धारण करत आहेत, ज्याला
भागीरथ पण म्हटले जाते. मंदिरा मध्ये शंकराचे चित्र दाखवतात, कारण ते शिव शंकराला
एकच समजत आहेत. ते समजत नाहीत कि, शिव तर निराकार आहेत, शंकर तर आकारी आहेत. शिव
शंकर एकत्र कसे म्हणतात. बरं, मग बैलावर स्वारी कोण करतात? शिव की शंकर. सूक्ष्मवतन
मध्ये बैल कुठून आला? शिव राहतात मुलवतन मध्ये, शंकर सूक्ष्मवतन मध्ये. मूलवतन मध्ये
सर्व आत्मे आहेत. सूक्ष्मवतन मध्ये फक्त ब्रह्मा, विष्णू, शंकर आहेत, तिथे जनावर
असत नाहीत. बाबा म्हणतात, मी साधारण वृध्द तना मध्ये प्रवेश करून तुम्हाला सांगत आहे.
तुम्ही मुले तुमच्या जन्माला ओळखत नाहीत. सतयुगा पासून तुम्ही किती जन्म घेतले आहेत?
84 जन्म घेतले आहेत. आता हा शेवटचा जन्म आहे. भारत जो अमरलोक पावन होता, तो आता
मृत्यूलोक पतित आहे. सर्वांचा सदगती दाता तर एक आहे ना. रुद्र माला पण आहे, परमपिता
परमात्मा निराकार शिवाची. श्री श्री 108 रुद्र माळा म्हटली जाते. सर्व शिवाच्या
गळ्यातील हार आहेत. बाबा तर पतित-पावन आहेत, सर्वांचे सदगती दाता, सर्वांना वरसा
देणारे. लौकिक पित्या कडून हदचा वरसा मिळत आहे, ज्याला संन्याशी कांग विष्टा समान
सुख समजत आहेत. बाबा म्हणतात कि, बरोबर तुमचे हे सुख काग विष्टे सारखे आहे. बाबा
येऊन पतितांना पावन म्हणजे काट्यांना फुल ज्ञान देऊन बनवित आहेत. हे गीतेचे ज्ञान
आहे. हे ज्ञान कोणी मनुष्य समजावू शकत नाही. ज्ञानाचे सागर पतित-पावन बाबाच समजावून
सांगत आहेत. बाबा कडूनच वरसा मिळत आहे, जो तुम्ही घेत आहात. तुम्हीच फक्त सदगती कडे
जात आहात. आता तर संगमयुगा वर आहात, ते तर कलियुगा मध्ये आहेत. आता कलियुगाचा अंत
आहे. महाभारताचे युद्ध पण समोर उभे आहे.जेंव्हा पाच हजार वर्षापूर्वी पण तुम्हीं
राजयोग शिकत होता, तर जगाला आग लागली होती. आता तुम्ही राजयोग शिकत आहात, हे लक्ष्मी
नारायण बनण्यासाठी. बाकी तर भक्तिमार्ग आहे. बाबा जेंव्हा येतात, तर येऊन स्वर्गाचे
दार उघडतात. बाबा म्हणतात कि, या शिवशक्ती भारत माता तर भारताला स्वर्ग श्रीमतावर
बनवीत आहेत. तुम्ही शिवशक्ती भारत माता आहात, ज्या भारताला स्वर्ग बनवित आहेत.
तुम्ही शिवाची संतान आहात, त्यांचीच आठवण करत आहात. शिवा पासून शक्ती घेऊन पाच
विकार रूपी शत्रूवर विजय प्राप्त करत आहात. तुम्हीं मुलानी पाच हजार वर्षापूर्वी पण
भारताची आत्मिक सेवा केली होती. ते समाजसेवक शरीराची सेवा करत आहेत. ही आत्म्याची
सेवा आहे. सुप्रीम,सर्वोच्च परमात्मा येऊन आत्म्याला इंजेक्शन देत आहेत, शिकवित
आहेत. आत्माच ऐकत आहे. तुम्ही आत्मे आहात. तुम्ही 84 जन्म घेत आहात. एक शरीर सोडून
दुसरे घेता. 84 जन्म घेऊन, 84 आई-वडील बनविले आहेत. सतयुग त्रेता मध्ये तुम्ही
स्वर्गाचे सुख प्राप्त केले, आता परत बेहदच्या बाबा कडून सुखाचा वरसा घेत आहात.
बरोबर भारतालाच हा वरसा मिळाला होता. भारतामध्येच या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते.
तिथे दैत्य इत्यादी कोणी नव्हते. तुम्ही जाणत आहात कि, आता या जुन्या दुनियेला आग
लागणार आहे. मी येऊन ज्ञान यज्ञ रचत आहे. तुम्ही सर्व पवित्र देवता बनत आहात. हजारो
आहेत, जे देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहेत. बाबा आले आहेत मुलांची सदगती
करण्यासाठी. तुम्हां मुलांना काट्या पासून फूल बनवित आहेत. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा
नेत्र देत आहेत, ज्यामुळे तुम्ही साऱ्या नाटकाला, आणि शिवबाबाच्या भूमिकेला ओळखत
आहात. ब्रह्मा आणि विष्णू चा काय संबंध आहे, ते पण जाणत आहात. ते दाखवत आहेत कि,
विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले. ब्रह्माच जाऊन विष्णू बनत आहेत. ब्राह्मण परत
देवता बनतात. विष्णू पासून ब्रह्मा बनण्या मध्ये पाच हजार वर्षे लागतात. हे तुम्हाला
ज्ञान आहे. तुम्हां ब्राह्मणाच्या नाभी कमळाद्वारे विष्णुपुरी प्रगट होत आहे.
त्यांनी तर चित्र बनविले आहे कि, विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले. मग साऱ्या
वेद शास्त्रांचे सार सांगितले. आता तुम्ही ब्रह्मा द्वारे सारे रहस्य समजत आहात.
बाबा सांगत आहेत, मुख्य चार धर्मशास्त्र आहेत, पहिले देवी-देवता धर्माचे शास्त्र
गीता आहे. गीता कोणी सांगितली? शिवबाबांनी. ज्ञानसागर, पतित पावन, सुखाचे सागर
शिवबाबा आहेत. त्यांनी भारताला स्वर्ग बनविला , ना की कृष्णाने. कृष्ण तर माझ्या
कडून ज्ञान ऐकून परत कृष्ण बनतात. तर ही गुप्त गोष्ट झाली ना. नवीन मुले या गोष्टीला
समजू शकत नाहीत, याला नर्क म्हटले जाते, त्याला स्वर्ग म्हटले जाते. शिवबाबा नी
स्वर्गाची स्थापना केली, त्यामध्ये हे लक्ष्मी नारायण राज्य करत होते. आता तुम्ही
मनुष्या पासून देवता बनत आहात. बाबा सांगत आहेत, या मृत्युलोक दु:खधाम मध्ये, तुमचा
हा शेवटचा जन्म आहे. भारत अमरलोक होता. तिथे दुःखाचे नाव नव्हते. भारत परिस्तान
होता. आता कबरिस्तान बनला आहे, परत परिस्तान होईल. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.
ही मनुष्याला देवता बनविणारी पाठशाळा आहे. हा कांही संन्याशांचा सत्संग नाही, जिथे
शास्त्र बसून सांगतात. या गोष्टीला नवीन कोणी समजू शकत नाहीत, जो पर्यंत सात दिवसाचा
कोर्स करत नाहीत. यावेळी सर्व मनुष्यमात्र भक्त आहेत, त्यांची आत्मा पण आठवण करत आहे.
परमात्मा एक माशुकाचे सर्व आशिक आहेत. बाबा येऊन सचखंड बनवित आहेत. अर्ध्या कल्पा
नंतर परत रावण येऊन, झुठखंड बनवतो. आता संगम आहे. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.
अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) बाबाच्या
श्रीमतावर भारताची खरी खरी आत्मिक सेवा करायची आहे. सर्वशक्तीमान बाबा कडून शक्ति
घेऊन 5 विकार रुपी शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे.
(२) मनुष्या पासून देवता बनण्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे. ज्ञानाला धारण करून
काट्या पासून फुल बनायचे आणि बनवायचे आहे.
वरदान:-
श्रीमता द्वारे
नेहमी खुशी आणि हलकेपणा चा अनुभव करणारे मनमत आणि परमता पासून मुक्त भव:
ज्या मुलांचा
प्रत्येक पाऊल श्रीमतानुसार आहे, त्यांचे मन नेहमी संतुष्ट राहते, मनामध्ये कोणत्या
पण प्रकारची हलचल राहत नाही, श्रीमता वर चालल्यामुळे स्वतःच खुशी राहते, हलकेपणाचा
अनुभव होतो, त्यामुळे जेंव्हा पण मनामध्ये हलचल होईल, थोडी पण खुशीची टक्केवारी कमी
झाली, तर तपासून घ्या कि, जरूर श्रीमताची अवज्ञा झाली आहे, त्यामुळे सूक्ष्म तपासणी
करून, मनमत, परमता पासून स्वतःला मुक्त करा.
बोधवाक्य:-
बुद्धी रुपी
विमानाद्वारे वतन मध्ये जाऊन, ज्ञान सुर्याच्या किरणाचा अनुभव करणेच शक्तिशाली योग
आहे.
मातेश्वरी जी चे
अनमोल महावाक्य.
(१) आत्मा-परमात्म्या मधील अंतर :- आत्मा आणि परमात्मा फारकाळ दूर राहिले आहेत,
सुंदर मेळा तेंव्हा लागतो, जेंव्हा सद्गुरु दलाल.. . जेंव्हा आम्ही हे शब्द म्हणतो,
तर त्याचा यथार्थ अर्थ आहे कि, आत्मा-परमात्मा पासून फार काळ दूर राहिली आहे. फार
काळाचा अर्थ आहे, फार काळा पासून आत्मा-परमात्मा पासून दूर राहिले आहे, तर हेच शब्द
सिद्ध करत आहेत कि, आत्मा आणि परमात्मा दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत, दोघांमध्ये
आंतरिक भेद आहे, परंतु दुनियावी मनुष्यांना माहिती नसल्या कारणाने ते या शब्दाचा
अर्थ असाच घेत आहेत कि, मी आत्माच परमात्मा आहे, परंतु आत्म्यांवर मायेचे आवरण
चढलेले असल्या कारणाने आपल्या मूळ स्वरूपाला विसरून गेली आहे, म्हणतात पण जेंव्हा
मायेचे आवरण निघून जाईल, मग आत्मा तीच परमात्मा आहे. तर ते आत्म्याला वेगळे या
अर्थाने म्हणत आहेत, आणि दुसरे लोक मग या अर्थाने म्हणत आहेत कि, मी आत्माच ती
परमात्मा आहे, परंतु आत्मा स्वतःलाच विसरून गेल्यामुळे दु:खी बनली आहे. जेंव्हा
आत्मा परत स्वतःला ओळखून शुद्ध बनते, तर मग आत्मा परमात्म्याला भेटून एकच होऊन जाते.
तर ते आत्म्याला या अर्थाने वेगळे म्हणत आहेत, परंतु आम्ही तर जाणत आहोत कि, आत्मा
आणि परमात्मा दोन वेगळ्या वस्तू आहेत. आत्मा ना परमात्मा होऊ शकते,आणि ना आत्मा
परमात्म्याला भेटून एक होऊ शकते आणि मग ना परमात्म्या वर कोणते आवरण चढू शकते.
(२) "मनाच्या अशांतीचे कारण आहे- कर्मबंधन. आणि शांतीचा आधार आहे कर्मातीत" :- खरे
तर प्रत्येक मनुष्याची ही इच्छा आवश्य राहते कि, आम्हाला मनाची शांती प्राप्त व्हावी,
त्यासाठी अनेक प्रयत्न करत आले आहेत, परंतु मनाची शांती आता पर्यंत प्राप्त झालेले
नाही, याचे यथार्थ कारण काय आहे? आता प्रथम हा विचार चालणे जरुरीचे आहे कि, मनाच्या
शांतीची पहिले मूळ काय आहे ? मनाच्या अशांतीचे मुख्य कारण आहे- कर्मबंधना मध्ये फसणे.
जोपर्यंत मनुष्य या 5 विकाराच्या कर्मबंधना पासून सुटत नाही, तोपर्यंत मनुष्य अशांती
पासून सुटू शकत नाहीत. जेंव्हा कर्मबंधन नाहीसे होऊन जातात, तेंव्हा मनाची शांती
म्हणजे जीवन मुक्तीची प्राप्ती करू शकतात. आता विचार करायचा आहे कि, हे कर्मबंधन कसे
तुटतील? आणि त्यापासून मुक्त करणारे कोण आहेत? हे तर आम्ही जाणत आहोत कि, कोणती पण
मनुष्य आत्मा कोणत्या पण मनुष्याला मुक्त करू शकत नाही. हा कर्मबंधनाचा हिसाब किताब
तोडणारा फक्त एकच परमात्मा आहे, तेच येऊन या ज्ञान योगबळाने कर्मबंधनातून मुक्त करत
आहेत, त्यामुळेच परमात्म्याला सुखदाता म्हटले जाते. जोपर्यंत पहिल्या प्रथम हे
ज्ञान नाही कि, मी आत्मा आहे, मुळातच मी कोणाची संतान आहे, माझे मूळ गुण काय आहेत?
जेंव्हा हे बुद्धीमध्ये येते, तेंव्हाच कर्मबंधन नष्ट होतात. आता आम्हाला हे ज्ञान
परमात्म्या द्वारेच प्राप्त होत आहे, म्हणजे परमात्म्या व्दारेच कर्मबंधन नष्ट आहेत
.अच्छा.