28-03-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   27.11.87  ओम शान्ति   मधुबन


बेहदचे वैरागीच खरे राजऋषी


आज बापदादा सर्व राजऋषींच्या दरबाराला पाहत आहेत.सर्व कल्पात राजांचे दरबार अनेक वेळा लागतात,परंतु या राजऋषींचा दरबार केवळ संगमयुगातच लागत असतो. राजाही असावा आणि ऋषी ही असावा.ही विशेषता यावेळच्या दरबाराची गायलेली आहे.एका बाजूला राज्य अर्थात सर्व प्राप्तीचे अधिकारी दुसऱ्या बाजूला ऋषी अर्थात बेहदची वैराग्य वृत्ती.एका बाजूला सर्व प्राप्तीच्या अधिकाराची नशा आणि दुसऱ्या बाजूला बेहद वैराग्याची अलौकिक नशा.जेवढे श्रेष्ठ भाग्य तेवढाच श्रेष्ठ त्याग.दोन्हींचा समतोल.यालाच म्हणतात राजऋषी.अशा राजऋषींच्या समतोलास पाहत आहेत.क्षणात अधिकारीपणाचा नशा आणि क्षणात वैराग्य वृत्तीचा नशा या अभ्यासात कुठपर्यंत स्थित होऊ शकतात?अर्थात दोन्ही स्थितीचा समान अभ्यास कुठपर्यंत करत आहात.हे तपासत होते. क्रमवार अभ्यासु तर सगळी मुलं आहेतच. वैराग्य म्हणजे दूर जाणे नव्हे, परंतु सर्व प्राप्ती असतानाही हदच्या आकर्षणात मन किंवा बुद्धीला येऊ न देणे.बेहद अर्थात मी संपूर्ण संपन्न आत्मा पित्यासमान सदैव सर्व कर्मेन्द्रियांच्या राज्याची अधिकारी.मन,बुद्धी,संस्कार या सूक्ष्म शक्तींचे देखील अधिकारी. संकल्प मात्र देखील अधीनता नसावी.यालाच म्हणतात राजऋषी अर्थात बेहदची वैराग्य वृत्ती.हा जुना देह किंवा देहाची जुनी दुनिया किंवा व्यक्त भाव,वैभवांचा भाव या आकर्षणापासून सदैव आणि सहज दूर राहणारे.

ज्याप्रमाणे विज्ञानाची शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणा पासून दूर करते,त्याप्रमाणे शांतीची शक्ती या सर्व हदच्याआकर्षणा पासून दूर घेऊन जाते,यालाच म्हणतात संपूर्ण संपन्न पित्यासमान स्थिती, तर अशा स्थितीचे अभ्यासू बनलात का?स्थुल कर्मेन्द्रिय ही तर खूप मोठी गोष्ट आहे. कर्मेन्द्रियजीत बनणे खूप सहज आहे,परंतु मन,बुद्धी,संस्कार या सूक्ष्म शक्तींवर विजय मिळवणे हा सूक्ष्म अभ्यास आहे.ज्यावेळी जो संस्कार अनुभवासा वाटेल,तो संकल्प,तोच संस्कार सहजपणे मिळवता येईल त्यालाच म्हणतात सूक्ष्म शक्तींवर विजय,अर्थात राजऋषि स्थिती, ज्याप्रमाणे स्थुल कर्मेन्द्रियांना आदेश देतात की हे करा!हे करू नका!हात खाली करा!हात वर करा!तेव्हा वर-खाली होतो ना? असे संकल्प,संस्कार आणि निर्णय शक्ती,बुद्धी अशीच आदेशानुसार चालली पाहिजे . आत्मा अर्थात राजा.मनाला अर्थात संकल्प शक्तीला आदेश देतो,आता एकाग्रचित्त होऊन एका संकल्पात स्थित हो! तेव्हा राजाचा आदेश त्या क्षणाला त्या प्रकारे मानला पाहिजे,हीच राज्य अधिकाऱ्याची निशाणी आहे, असे नाही की,3-4 मिनिटाच्या अभ्यासानंतर मन तयार होईल किंवा एकाग्रतेच्या ऐवजी अस्वस्थतेच्या नंतर मन एकाग्र होईल,याला काय म्हणाल? अधिकारी म्हणाल?तर अशी तपासणी करा!कारण सुरुवातीलाच सांगितले आहे की अंतिम समयाचा अंतिम निकाल एका सेकंदाचा एकच प्रश्न असेल, या सूक्ष्म शक्तींचे अधिकारी बनण्याचा अभ्यास जर होत नसेल अर्थात तुमचे मन तुम्हा राजाचा आदेश एका घडी ऐवजी तीन घडी नंतर मानत असेल तर तो राज्य अधिकारी म्हणवला जाईल का?किंवा एक सेकंदाच्या अंतिम परीक्षेत पास होईल का? किती गुण मिळतील?

असेच बुद्धी अर्थात निर्णय शक्तीवर देखील अधिकार असावा,अर्थात ज्यावेळी जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्या घडीला निर्णय करणे यालाच म्हणतात बुद्धीवर अधिकार.असे नाही की असा निर्णय घेण्याऐवजी असा घेतला असता तर खूप बरे झाले असते!तर योग्य वेळी आणि योग्य निर्णय घेणे ही राज्य अधिकारी आत्म्याची निशाणी आहे.तर चेक करा की!संपूर्ण दिवसात राज्य अधिकारी अर्थात या सूक्ष्म शक्तींना देखील आदेशानुसार चालवणारे कुठपर्यंत बनलेले आहात?रोज आपल्या कर्मचाऱ्यांचा दरबार लावा. तपासा,की स्थूल कर्मेंद्रिय किंवा सूक्ष्म शक्ती हे कर्मचारी नियंत्रणात राहिले की नाही? आतापासूनच राज्य अधिकारी बनण्याचे संस्कार अनेक जन्म राज्य अधिकारी बनवतील. समजलं!याप्रकारे संस्कार कुठे धोका तर देत नाही ना?आदी, अनादी संस्कार,अनादी शुद्ध,श्रेष्ठ पावन संस्कार आहेत.सर्वगुण स्वरूप संस्कार आहेत,आणि आदि देव आत्म्याचे राज्य अधिकारीपणाचे संस्कार,सर्व प्राप्ती स्वरूपाचे संस्कार आहेत . संपन्न संपूर्णतेचे नैसर्गिक संस्कार आहेत.तर संस्कार शक्तीच्यावर राज्य अधिकारी अर्थात सदैव अनादि,आदि संस्कार अनुभवयास हवे.नैसर्गिक संस्कार असावेत.मध्य अर्थात द्वापारयुगा पासून सुरु होणारे संस्कार आपल्याकडे आकर्षित करता कामा नये.संस्कारांनी वशीभूत होऊन मजबूर होऊ नका.असे म्हणतात ना!की माझे जुने संस्कार आहेत,वास्तवात अनादी आणि आदी संस्कार हेच जुने आहेत,हे तर मध्य द्वापारयुगापासून आले आहेत. तेव्हा जुने संस्कार आदीचे की द्वापारयुगाचे आहे? कोणतेही हदचे आकर्षण आकर्षित करत असेल तर त्यास संस्कार राज्य अधिकारी म्हणता येईल का? राज्यामध्ये एक शक्ती किंवा एखादा कर्मचारी म्हणजेच कर्मेंद्रिये जर आदेशानुसार चालत नसेल तर त्याला संपूर्ण राज्य अधिकारी म्हणता येईल का? तुम्ही सर्व मुलं आव्हान करतात की आम्ही एक राज्य एक धर्म एक मत स्थापन करणार आहोत, हे आव्हान सर्व ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी करता ना?तर ते केव्हा स्थापन होणार?भविष्यात स्थापन होईल का?स्थापनेच्या निमित्त कोण आहे?ब्रह्मा आहे की विष्णू आहे?ब्रह्मा द्वारे स्थापना होते ना!जेथे ब्रम्हा आहे तेथे ब्राह्मण देखील बरोबर हवे.ब्रह्मा द्वारा अर्थात ब्राह्मणांच्या द्वारे स्थापना केव्हा होईल ? सत्ययुगात तर पालना असेल ना? ब्राह्मण किंवा ब्राह्मण द्वारे आताच स्थापना व्हावयास हवी.स्वराज्या मध्ये पहा,की एकमत,एक धर्म (धारणा),एकमत आहे का?जर एक कर्मेन्द्रिय देखील मायेच्या अधीन असेल,तर एक राज्य,एक मत,कसे म्हणता येईल?तर पहिल्यांदा तपासा?की एक राज्य, एक धर्म,स्वतःच्या राज्यांमध्ये स्थापन केले आहे का?की मायेच्या सिंहासनावर बसले जातात?तर कधी तुमच्या सिंहासनावर बसले जातात? आव्हानाला प्रत्यक्षात आणतात की नाही हे तपासा.भलेही तुम्ही अनादी संस्कार आणि मध्याचे संस्कार अनुभवाल परंतु अधिकारीपण म्हणता येणार नाही.तर राज ऋषी म्हणजे सर्व राज्य अधिकारी.राज्य अधिकारी सदैव आणि सहज तेव्हा होतील जेव्हा ऋषी अर्थात बेहद्चे वैराग्य वृत्तीचे अभ्यासू होतील.वैराग्य म्हणजे लगाव नाही.सदैव पित्याचे प्रिय!हे प्रियपणच निराळे बनवते. पित्याचे प्रिय बनून निराळे बनण्याचे कार्य करणे यालाच म्हणतात बेहदचे वैरागी.पित्याचे प्रिय नसाल तर निराळेही बनू शकत नाही.तेव्हा मोहात पडतील,पित्याचे प्रिय असाल तर कोणत्याही व्यक्ती वा वैभवाचे प्रिय बनणार नाहीत.ते सदैव आकर्षणा पासून दूर म्हणजेच निराळे असतील,याला म्हणतात निर्लेप स्थिती.कोणत्याही हदच्या आकर्षणाच्या लेपा मध्ये येणारे नाहीत,रचना किंवा साधनांच्या निर्लेपात राहून कार्य करतील, असे बेदेह वैरागी खरे राज ऋषि आहात का?असे म्हणू नका कि, एक किंवा दोनच कमजोरी आहेत किंवा फक्त एक सूक्ष्म शक्ती किंवा कर्मेन्द्रिय नियंत्रणात नाही,बाकी सर्व ठीक आहे,परंतु जेथे एक देखील कमजोरी आहे,तर ते मायेची द्वार आहे,भलेही छोटे किंवा मोठे द्वार असो परंतु द्वार आहे,जर द्वार उघडे राहिले तर मायाजीत जगतजीत कसे बनाल?

एकीकडे एक राज्य,एक धर्माच्या सुवर्ण दुनियेचे आवाहन करत आहात आणि बरोबरच कमजोरी देखील!अर्थात मायेचे आवाहन करत आहात तर निकाल काय असेल?संभ्रमात राहाल!त्यामुळे यास छोटी गोष्ट समजू नका!वेळ आहे!करू!दुसऱ्यांमध्ये देखील खूप काही आहे!माझ्या तर फक्त एकच गोष्ट आहे!दुसऱ्याला पहाता पहाता स्वतः तसेच राहू नका.ब्रह्मा बाबांना पहा!म्हटले आहे,पित्याचे अनुकरण,सर्वांचे सहयोगी,स्नेही,गुणग्राहक जरूर बना,परंतु ब्रह्मा बाबांचे अनुकरण करा.ब्रह्मा बाबांची शेवटची अवस्था राज ऋषी होती,मुलांचे प्रिय असूनही समोर दिसत असूनही,निराळे होते.बेहदचे वैराग्य हीच स्थिती प्रत्यक्ष पाहिली,कर्मभोग असूनही कर्मेंद्रिय अधिकारी बनले अर्थात संपूर्ण स्थितीचा अनुभव करवल ,म्हणून फोलो फादर म्हणतात.तेव्हा आपल्या राज्य अधिकाऱ्यांना,राज्यकारभार करणाऱ्यांना सदैव पहा ! कोणताही राज्य कारभारी कोठे धोका तर देत नाही ना?समजलं! अच्छा !

आज भिन्न भिन्न स्थानावरून एका स्थानावर पोहोचलेले आहात,यालाच नदी सागराचा मेळा म्हटले जाते,यामध्ये भेटणे ही होते आणि मालही मिळतो, त्यामुळे सगळे मेळ्यात पोहोचलेले आहात.नव्या मुलांच्या सिझनचा शेवटचा समूह आहे.जुन्यांनाही नव्यांबरोबर संधी मिळाली आहे.प्रकृती देखील आत्ता पर्यंत सहयोग देत आहे परंतु त्याचा फायदा घेऊ नका, नाही तर प्रकृती देखील हुशार होईल.अच्छा!

चारही बाजूच्या ऋषी मुलांना, सदैव स्वतःवर राज्य करणारे , सदैव विजयी बनून राज्यकारभार चालवणारे,राज्य अधिकारी मुलांना,सदैव बेहदच्या वैराग्य वृत्ती मध्ये राहणारे,सर्व ऋषीकुमार,कुमारींना,सदैव पित्याचे प्रिय बनून निराळे होऊन कार्य करणारे,निराळे प्रिय मुलांना, सदैव ब्रह्माचे अनुकरण करणारे, प्रामाणिक मुलांना बापदादांची आठवण प्रेम आणि नमस्ते!

पार्टी सोबत अव्यक्त बापदादांची मुलाखत

1.अनेक वेळेचे विजयी आत्मे आहात असा अनुभव करता का? विजयी बनने अवघड वाटते की सहज?कारण जी गोष्ट सहज असते ती सदैव असते,अवघड गोष्ट सदैव नसते.जे कार्य अनेक वेळा केले आहे ते स्वतःच सहज होत जाते,जेव्हा एखादे कार्य नवे असते तेव्हा ते अवघड वाटते परंतु जेव्हा केले जाते तेव्हा ते अवघड कार्यही सहज वाटते. तुम्ही सर्व एका वेळेचे विजय आत्मे नाहीत तर अनेक वेळा विजय झालेले आहात,अनेक वेळा विजय अर्थात सदैव सहज विजयाचा अनुभव करणारे आहात.जे सहज विजयी आहेत त्यांना प्रत्येक पावलाला असेच अनुभव येतात की,हे सर्व कार्य होणारच आहे.प्रत्येक पावलाला विजय मिळणार आहे.होईल की नाही?हा संकल्प देखील उठू शकत नाही,जेव्हा निश्चय आहे की,अनेक वेळा विजयी झालेलो आहोत,तेव्हा होणार की नाही? हा प्रश्न निर्माण होणार नाही. निश्चयाचीे निशाणी आहे नशा, आणि नशेची निशाणी आहे आनंद,ज्याला नशा असेल तो सदैव खुशीत आनंदात राहील. लौकिक विजयात देखील किती आनंद होत असतो.विजय मिळवला की बाजा वाजवतात, तर ज्यांना निश्चय आणि नशा आहे त्यांना आनंद जरूर होणार , तो सदैव आनंदात नाचत राहील. शरीराने कुणी नाचू शकेल,कुणी नाही,परंतु मनात आनंदाने नाचणे हे आजारी व्यक्तीलाही शक्य होते.कुणीही असू द्या,हे नाचणे सहज शक्य आहे,कारण विजयी होणे म्हणजेच स्वतःच आनंदाचा बाजा वाजवणे,जेव्हा बाजा वाजवला जातो आपोआपच पावलेही ताल धरतात,ज्यांना माहीत नाही असे देखील बसल्या जागेवर पाय आणि खांदे हलवत असतात,तर तुम्ही अनेक वेळेचे विजयी आहात,या आनंदात पुढे जात रहा.दुनियेत सगळ्यांना आनंदाची आवश्यकता आहे, भलेही सर्व प्राप्त झाले आहे, परंतु आनंद प्राप्त नसेल तर उपयोग नाही म्हणून अविनाशी आनंद दुनियेला वाटत राहा.

2.स्वतःला भाग्यवान समजून प्रत्येक पावलाला श्रेष्ठ भाग्याचा अनुभव करता का?कारण यावेळी पिता भाग्यविधाता बनून भाग्य देण्यासाठी आला आहे,भाग्यविधाता भाग्य वाटत आहे,वाटते वेळी,जो जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकतो, सगळ्यांना अधिकार आहे जेवढे पाहिजे तेवढे घ्या.तेव्हा अशावेळी किती भाग्य बनवले? हे तपासा! कारण आता नाही तर कधीच नाही,म्हणून प्रत्येक पावलाला भाग्याची रेषा ओढण्याचा कलम बाबांनी सर्व मुलांना दिला आहे.कलम हातात आहे आणि सुट आहे,जेवढी भाग्याची रेषा ओढायची तेवढी ओढू शकता, किती मोठी संधी आहे!तेव्हा सदैव या भाग्यवान वेळेच्या महत्वाला जाणून जमा करताना करत आहात ना?असे व्हावयास नको की,करावयाचे खूप होते परंतु झाले नाही,तेव्हा स्वतः प्रति दोष ठेवू नका.समजलं!तेव्हा सदैव भाग्याची रेषा श्रेष्ठ बनवत चला आणि इतरांनाही श्रेष्ठ भाग्याची ओळख करून द्या."वाह माझे श्रेष्ठ भाग्य" हेच आनंदाचे गीत गात राहा.

3.सदैव स्वतःला स्वदर्शन चक्रधारी श्रेष्ठ आत्मा अनुभव करता का? स्वदर्शन चक्र अर्थात सदैव मायेच्या अनेक चक्रापासून सोडवणारे ,स्वदर्शन चक्र कायम चक्रवर्ती राज्य भाग्याचे अधिकारी बनवेल.या स्वदर्शन चक्राचे ज्ञान या संगमयुगातच प्राप्त होत असते.ब्राह्मण आत्मा आहात, म्हणून स्वदर्शन चक्रधारी आहात. ब्राह्मणांना नेहमीं शेंडी दाखवतात,म्हणजेच उंचीवर! ब्राह्मण म्हणजे सदैव श्रेष्ठ कर्म करणारे,ब्राह्मण म्हणजे सदा श्रेष्ठ धर्मात(धारणा)राहणारे ,असे ब्राह्मण आहात ना?की नामधारी? ब्राह्मण खूप कामाचे आहेत, कारण या अंतिम समयी देखील त्यांचे किती नाव आहे!तुम्हा खऱ्या ब्राह्मणांचीच आठवण चालत आली आहे.कोणतेही श्रेष्ठ काम असेल तर ब्राह्मणांनाच बोलवतात,कारण ब्राह्मण श्रेष्ठ आहेत,तेव्हा कोणत्या काळी इतके श्रेष्ठ बनलात?आत्ताच बनलेले आहात,यामुळे अजूनही श्रेष्ठ कार्याची स्मृति चालत आलेली आहे.प्रत्येक संकल्प, प्रत्येक शब्द,प्रत्येक कर्म श्रेष्ठ करणारे असे स्वदर्शन चक्रधारी श्रेष्ठ ब्राह्मण आहात!या स्मृतीत सदैव राहा!अच्छा!

वरदान:-
आपल्या पूजनाला स्मृतीत ठेवून प्रत्येक कर्म पूजनीय बनविणारे परमपूज्य भव

तुम्हा मुलांच्या प्रत्येक शक्तीचे पूजन देवी-देवतांच्या रूपात होत असते.सूर्य देवता,वायु देवता, पृथ्वी देवी....तसेच निर्भयतेच्या शक्तीचे पूजन काली देवीच्या रूपात होते,सामना करण्याच्या शक्तीचे पूजन दुर्गेच्या रूपात होते, संतुष्ट राहणे आणि करण्याच्या शक्तीचे पूजन संतोषी मातेच्या रूपात होते,वायु समान हलके बनण्याच्या शक्तीचे पूजन पवनपुत्राच्या रूपात होते,तेव्हा आपल्या या पूजनाच्या स्मृतीत राहून कर्म पूजनीय बनवा.तेव्हा परमपूज्य बनाल.

सुविचार:-
जीवनामध्ये संतुष्टता आणि सरळतेचे संतुलन ठेवणेच सर्वात मोठी विशेषता आहे.