04-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड गोड सेवाधारी मुलांनो, असे कोणतेही काम करायचे नाही, ज्यामुळे सेवेमध्ये कोणते विघ्न येईल"

प्रश्न:-
संगम युगामध्ये तुम्हा मुलांना अगदी अचूक,तंतोतंत बरोबर, बनायचे आहे,अचूक कोण बनू शकतात?

उत्तर:-
जे मुलं बाबांच्या सोबत नेहमी खरे राहतात,मनामध्ये एक बाहेर दुसरे असे करत नाही (२) जे शिवबाबांच्या शिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टी मध्ये जात नाहीत.(३) प्रत्येक पाऊल श्री मतानुसार टाकतात,कोणतीही चुक करत नाहीत,तेच बिनचूक, तंतोतंत बरोबर बनतात.

गीत:-

लहानपणाचे दिवस विसरू नका,आज हसताय वुद्या रडू नका...

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गीताचे दोन अक्षरं ऐकले,तर हा निश्चय करतात, बेहद्द चे पिता बेहद्द सुखाचा वारसा देत आहेत.अशा बाबांचे आम्ही येऊन मुलं बनलो आहोत.तर बाबाच्या श्रीमतावर चालायला पाहिजे ना. नाही तर काय होईल?आत्ता हसतात आम्ही महाराजा महाराणी बनू आणि जर हात सोडून दिला तर परत जाऊन साधारण प्रजा बनतील.स्वर्गामध्ये तर जरुर येतील.असे पण नाही सर्वच स्वर्गा मध्ये येणारे आहेत.जे सतयुग त्रेता मध्ये येणारे असतील,तेच येतील.सतयुग त्रेता दोघांना मिळून स्वर्ग म्हटले जाते.पण प्रथम जे नवीन दुनिया मध्ये येतील,ते चांगले सुख मिळवतील,बाकीचे नंतर येणार आहेत,ते काही ज्ञान घेणार नाहीत.ज्ञान घेणारे सतयुग त्रेता मध्ये येतील,बाकी रावण राज्यांमध्ये येतील.ते थोडेसे सुख मिळवतील. सतयुग त्रेतामध्ये तर खूप सुख आहे ना,म्हणून पुरुषार्थ करून बाबा पासून बेहद सुखाचा वारसा घ्यायला पाहिजे आणि ही महान खुशखबर लिहा,जे निमंत्रण पत्रिका छपाई करतात,त्यामध्ये लिहायला पाहिजे,उच्च ते उच्च बाबांची खुशखबर.प्रदर्शनीमध्ये तुम्ही लिहितात,नवीन दुनिया ची स्थापना कशी होत आहे,जाणुन घ्या.तर हे स्पष्ट आणि मोठ्या अक्षरांमध्ये लिहायला पाहिजे,बाबा ज्ञानाचे सागर, पतित पावन, सद्गती दाता, गीतेचे भगवान शिव,कसे ब्रह्माकुमार कुमारी द्वारे परत संपूर्ण विकारी भ्रष्टाचारी पतित दुनियाला, सतयुगी संपूर्ण निर्विकारी पावन श्रेष्ठाचारी दुनिया बनवत आहेत.ही खुशखबर येऊन ऐका किंवा समजून घ्या.शासनाला तुमची प्रतिज्ञा आहे की, आम्ही भारताला परत श्रेष्ठाचारी शंभर टक्के पवित्रता सुखशांतीचे दैवी स्वराज्य कसे स्थापन करत आहोत आणि या विकारी दुनिया चा विनाश कसा होईल,ते येऊन समजून घ्या.असे स्पष्ट लिहायला पाहिजे.कार्ड मध्ये असे लिहायला पाहिजे,की मनुष्य चांगल्या प्रकारे समजतील. प्रजापिता ब्रह्माकुमार कुमारी कल्पापूर्वी सारखेच वैश्विक नाटका नुसार परमपिता परमात्मा शिवच्या श्रीमता वरती सहज राज योग आणि पवित्रतेच्या बळा द्वारे आपल्याच तन-मन-धनाद्वारे भारताला असे श्रेष्ठ कसे बनवत आहेत,ते येऊन समजून घ्या.असे कार्डा मध्ये स्पष्ट लिहायला पाहिजे, जे कोणीही समजून घेतील.हे ब्रह्माकुमार कुमारी शिवबाबांच्या मतावरती रामराज्याची स्थापना करत आहेत, गांधीजीची पण हीच इच्छा होती. वर्तमानपत्रांमध्ये पण असे पुर्ण निमंत्रण छपायला पाहिजे.हे जरूर समजावयाला पाहिजे की,प्रजापिता ब्रह्माकुमार- कुमारी आपल्या तन-मन-धनाद्वारे भारताला असे श्रेष्ठाचारी पावन कसे बनवत आहेत,हे समजून घ्या.तर मनुष्य असे कधीच समजणार नाहीत की,हे काही भिख किंवा देणगी इत्यादी मागतात.बाकी दुनिया मध्ये तर सर्व देणगीवर चालत राहते.येथे तुम्ही म्हणतात,आम्ही ब्रह्माकुमार-कुमारी, आपल्याच तन मन धनाद्वारे स्थापना करत आहोत.आम्ही स्वत:च स्वराज्य घेत आहोत, तर जरूर खर्च पण करणार.जे कष्ट करतात, त्यांनाच २१ जन्मासाठी वारसा मिळतो.भारतवासीच २१ जन्मासाठी श्रेष्टाचारी दुहेरी मुकुटधारी बनतात.हे लक्ष्मीनारायण दुहेरी मुकुटधारी आहेत ना.आता तर कोणताही ताज राहिलेला नाही. हे तर चांगल्या रीतीने समजावे लागेल.बाबा समजवतात अशाप्रकारे लिहा,तर बिचाऱ्यांना माहित पडेल की,ब्रह्माकुमार- कुमारी काय करत आहेत.मोठ्या लोकांचा आवाज होईल तर परत गरीब लोक पण ऐकतील,नाही तर गरीबांची कोणती गोष्ट ऐकत नाहीत.सावकारांचा तर आवाज लगेच प्रसिद्ध होतो.तुम्ही स्पष्ट करून सांगा की,आम्ही खास भारताला स्वर्ग बनवत आहोत, बाकी सर्वांना शांतीधाम मध्ये पाठवतो,असे समजून सांगायचे आहे.भारत पाच हजार वर्षांपूर्वी स्वर्ग होता,आता तर कलियुग आहे.ते सत्ययुग होते.आता सांगा सतयुगामध्ये किती मनुष्य होते. आता तर कलियुगाचा अंत आहे. हीच महाभारत महाभारी लढाई आहे,बाकी कोणत्या वेळेत तर अशी लढाई लागेल, लागलेली नाही. हे पण तिसरे महायुद्ध अंत काळात झालेले आहे,प्रयत्न करत राहतात. आता तर ऍटोमिक बॉम्बस बनवत राहतात.कोणाचे ऐकत नाहीत.ते म्हणतात,जे बॉम्बस बनवले आहेत, ते सर्व समुद्रामध्ये बुडवा,तर आम्ही बनवणार नाहीत.तुम्ही ठेवा आणि आम्ही बनवायचे नाही,हे कसे होऊ शकते. तुम्ही मुलं जाणतात,ही तर भावी बनलेले आहे,किती पण त्यांना मत द्या समजणार नाहीत. विनाश होणार नाही तर राज्य कसे कराल.तुम्हा मुलांना तर निश्चय आहे ना.संशय बुद्धी जे आहेत,ते तर भागंती होतात.बाबांचे बनून परत निंदक बनायचे नाही.तुम्हाला तर आठवण शिव बाबांची करायची आहे आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये काहीच फायदा नाही.खऱ्या बाबांसोबत खरे राहायचे आहे.आत एक, बाहेर दुसरी गोष्ट ठेवाल,तर आपलेच नुकसान कराल.कल्प कल्पांतर साठी कधीही उच्च पद मिळू शकणार नाही म्हणून या वेळेत खूपच बिनचूक बनायचे आहे.काही चूक करायची नाही, जितके शक्य होईल श्रीमतावर चालायचे आहे.निरंतर आठवण तर अंतकाळात राहील.बाबांच्या शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको.गायन पण आहे अंतकाळात जे स्त्रीचे आठवण करतील... ज्यांच्यामध्ये मोह असेल तर त्यांची आठवण येईल.पुढे चालून तुम्ही जितके जवळ याल तेवढे साक्षात्कार होत जातील.बाबा प्रत्येकाला दाखवतील तुम्ही असे-असे काम केले, सुरुवातीला तुम्ही साक्षात्कार पण केले आहेत. सजा भोगत होते,खूप ओरडत होते. बाबा म्हणतात तुम्हाला दाखवण्यासाठी यांची शंभर पटीने सजा कमी केली,तर असे काम करायचे नाही, ज्यामुळे बाबांच्या सेवेमध्ये विघ्न येतील.अंत काळात तुम्हा सर्वांना साक्षात्कार होतील, अशा प्रकारे तुम्ही बाबांच्या सेवेमध्ये विघ्न घालून खूप नुकसान केले. आसुरी संप्रदाय आहेत ना.ज्यांनी विघ्न आणले त्यांना खूप सजा मिळते.शिव बाबांचा खूप मोठा दरबार आहे,त्यांचा उजवा हात धर्मराज पण आहे,त्या हद्दच्या सजा आहेत.येथे तर २१जन्माचे नुकसान होते,पदभ्रष्ट होतात.प्रत्येक गोष्टीमध्ये बाबा समजावत राहतात. असे कोणी म्हणू शकत नाही की, आम्हाला माहीत नव्हते,म्हणून बाबा सर्व सावधानी देत राहतात.नाहीतर कोणते पद मिळेल.बाबा पाहतात, प्रत्येक सेवा केंद्रामध्ये अनेक जण ज्ञान सोडून जातात,तंग करतात विकारी बनतात.शाळेमध्ये तर पूर्ण रीतीने अभ्यास करायला पाहिजे ना.नाहीतर काय पद मिळेल. पदांमध्ये पण खूप फरक पडतो ना. जसे येथे दुखधाम मध्ये कोणी राष्ट्रपती आहेत,कोणी सावकार आहेत,कोणी गरीब आहेत,तसेच सुखधाम मध्ये पण पद, क्रमानुसार असतील.जे श्रेष्ठ बुद्धिमान मुलं असतील,ते बाबा कडून पूर्ण वारसा घेण्याचा प्रयत्न करतील.मायेची बॉक्सिंग आहे ना,माया खूप प्रबळ आहे,म्हणून हारणे-जिंकणे चालत राहते.अनेक जण येतात परत निंदक बनवून चालले जातात. चालता चालता नापास होतात. अनेक जण म्हणतात हे कसे होऊ शकते.हे तर कधी ऐकले नाही की, ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहून पवित्र राहू शकतो.अरे भगवानुवाच आहे ना, काम महाशत्रू आहे.गीतेमध्ये पण हे अक्षरं आहेत.तुम्ही जाणतात सतयुगामध्ये दैवी गुण असणारे मनुष्य आणि कलियुगामध्ये आसुरी गुण वाले मनुष्य आहेत.आसुरी गुण असणारे दैवी गुण असणाऱ्यांची महिमा गायन करत राहतात.खूप फर्क आहे.आता तुम्ही समजता आम्ही काय होतो आणि काय बनत आहोत.येथे तुम्हा सर्वांना गुण धारण करायचे आहेत.खान-पान इत्यादी पण सतोगुणी ग्रहण करायचे आहे.देवतांना काय खाऊ घालतात,ते पाहायचे आहे.श्रीनाथ मंदिरांमध्ये जाऊन पहा,किती प्रकारचे भोजन किंवा शुद्ध भोजन बनवतात.तेथे वैष्णवच आहेत, आणि जगन्नाथपुरी मध्ये पहा काय मिळते,भात.तेथे भक्ती मार्गाचे खूप खराब चित्र आहेत.जेव्हा राजाई होती, तर ३६ प्रकारचे भोजन मिळत होते.तर श्रीनाथ मंदिरामध्ये खूप चांगला प्रसाद बनवतात.पुरी आणि श्रीनाथचे वेग वेगळे आहे.पुरीच्या मंदिरामध्ये खूप खराब चित्र आहेत, तेही देवतांच्या ड्रेसमध्ये आहेत.तर प्रसाद पण विशेष भाताचा लावतात.त्यामध्ये तुप पण घालत नाहीत,हा फरक दाखवतात.भारत काय होता,आत्ता काय बनला आहे. आता तर काय हालत आहे,अन्न पण मिळत नाही.त्यांचे नियोजन आणि शिव बाबांच्या नियोजनामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे.ते सर्व नियोजन मातीमध्ये मिसळून जाईल.नैसर्गिक आपत्ती येईल.अन्न धान्य ईत्यादी काहीच मिळणार नाही.कुठे पाऊस खूप पडतो,तर कुठे बिल्कुल पडत नाही.कुठे खूप नुकसान होते.यावेळी तत्व पण तमोप्रधान आहेत.तर पाऊस पण उलट्या सुलट्या वेळेवर पडत राहतो.हवा पण तमोप्रधान आहे, सुर्याकडून इतकी उष्णता वाढते,जे तुम्ही विचारू नका.या नैसर्गिक आपत्ती पण वैश्विक नाटकामध्ये नोंदलेल्या आहेत.त्यांची विनाशकाले विपरीत बुद्धि आहे. तुमचे बाबांच्या सोबत प्रीत आहे.अज्ञान काळामध्ये पण चांगल्या मुला वरती मात-पिताचे प्रेम राहते ना.बाबा म्हणतात क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे प्रेमपूर्वक आठवण.जितकी जितकी सेवा कराल,सेवा तर करायची आहे ना. भारताची खास,बाकी दुनियेची.

भारताला स्वर्ग बनवायचे आहे. बाकी सर्वांना शांतीधाम मध्ये पाठवायचे आहे.भारताला स्वर्गाचा वारसा मिळतो,बाकी सर्वांना मुक्तीचा वारसा मिळतो.सर्व चालले जातील,हाहाकार नंतर जयजयकार होईल,कारण नसताना खून होत राहतील.नैसर्गिक आपत्ती पण येत राहते.मृत्यू तर सर्वांचा होणारच आहे. बाबा मुलांना समजवत राहतात,तर पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. बाबांच्या सोबत सदैव आज्ञाधारक, इमानदार बनायचे आहे.सेवाधारी बनायचे आहे.ज्यांनी कल्पा पूर्वी जशी सेवा केली,त्यांना साक्षात्कार होत राहील.तुम्ही त्रयस्थ होऊन पाहत राहाल.तुम्ही आता स्वदर्शन चक्रधारी बनले आहात.नेहमी बुद्धीमध्ये सुदर्शन चक्र फिरत राहिले पाहिजे.आम्ही ८४ जन्म असे घेतले आहेत.आता आम्ही परत घरी जात आहोत.बाबांची पण आठवण राहावी,आणि घराची पण आठवण राहावी.सतयुगाची पण आठवण राहावी.सर्व दिवस बुद्धीमध्ये हे चिंतन करायचे आहे. आता आम्ही विश्वाचे महाराज कुमार बनू.आम्ही श्रीलक्ष्मी-नारायण बनू.नशा चढायला पाहिजे ना. बाबांना तर नशा राहतो.बाबा रोज लक्ष्मीनारायणच्या चित्राला पाहतात,तर मनामध्ये नशा राहतो ना.बस उद्या जाऊन,आम्ही श्रीकृष्ण बनू.परत स्वयमवरा नंतर श्री नारायण बनू.तुम्ही पण असेच बनाल.तुम्ही पण बनणार ना.हा राज योग आहे,प्रजा योग नाही. आत्म्याला परत आपले राज्य भाग्य मिळते.मुलांनी राज्य भाग्य गमावले होते.आता परत राज्य घेत आहेत. बाबा हे चित्र इत्यादी बनवतातच यासाठी की तुम्हा मुलांना पाहून खुशी होईल.२१जन्मासाठी आम्हाला स्वर्गाचे राज्य भाग्य मिळत आहे.खूप सहज आहे.हे शिवबाबा,हे प्रजापिता ब्रह्मा, यांच्याद्वारे राजयोग शिकवत आहेत.परत आम्ही जाऊन असे श्रेष्ठ बनू.पाहिल्यानंतरच खुशीचा पारा चढत राहतो.आम्ही बाबांच्या आठवणी द्वारे,विश्वाचे राजकुमार बनू.खूप खुशी राहायला पाहिजे. आम्हीपण शिकत आहोत,तुम्ही पण शिकत आहात.या राजयोगाच्या शिक्षणा नंतर आम्ही जाऊन असे श्रेष्ठ बनू.सर्व शिक्षणावर आधारित आहे,जितके शिकाल तेवढी कमाई होत राहील ना.बाबांनी स्पष्ट केले आहे.काही काही डॉक्टर इतके हुशार असतात,जे एका ऑपरेशनचे एक लाख रुपये कमवतात,वकीला मध्ये पण असेच असते.काय तर खूप कमावतात,काहींचा तर कोट पण फाटलेला असतो.येथे पण असेच आहे,म्हणून बाबा नेहमी म्हणतात, मुलांनो कोणती चूक करू नका.नेहमी श्रीमता वर चालत राहा. श्री-श्री शिवबाबांच्या द्वारे तुम्ही श्रेष्ठ बनत आहात.तुम्हा मुलांनी बाबा द्वारे अनेक वेळेस वारसा घेतला आहे आणि गमावला आहे.२१ जन्माचा वारसा,अर्ध्याकल्पासाठी मिळत राहतो.अर्धाकल्प २५०० हजार वर्ष सुख मिळते,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आत बाहेर खरे राहायचे आहे.राजयोग शिक्षणामध्ये कधीच चुका करायच्या नाहीत.कधी पण संशय बुद्धी बनून मुरली सोडायची नाही.सेवेमध्ये विघ्नरुप बनायचे नाही.

(२) सर्वांना ही खुशखबर ऐकवा की,आम्ही पवित्रतेच्या बळा द्वारे श्रीमतावरती आपल्याच तर,मन, धनाच्या सहयोगाद्वारे २१जन्मासाठी भारताला श्रेष्ठाचारी दुहेरी मुकुटधारी बनवण्याची सेवा करत आहोत.

वरदान:-
सेकंदामध्ये संकल्पांना नियंत्रित करून आपल्या पायाला मजबूत बनवणारे,चांगल्या मार्काने पास होणारे भव.

कोणतेही परीक्षा परिपक्व बनवण्यासाठी,पायाला मजबूत करण्यासाठी येतात,त्यामध्ये घाबरू नका.बाहेरची हालचाल एका सेकंदामध्ये थांबवण्याचा अभ्यास करा.किती ही विस्तार असेल,तरीही एका सेकंदामध्ये समेटून घ्या. भूक-तहान,गर्मी-थंडी इत्यादी सर्व काही असतानी पण, संस्कार प्रकट व्हायला नकोत, समेटण्याच्या शक्तीद्वारे नियंत्रण करा.हा खूप वेळेचा अभ्यास चांगल्या मार्काने पास करेल.

बोधवाक्य:-
आपल्या सुख शांतीच्या च्या आधारेद्वारे,लोकांना सुखशांती चा अनुभव करवणेच खरी सेवा आहे.