23-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, मुक्त करणारे खरे सैनिक बनून, सर्वांना या पापाच्या दुनियेतून पुण्याच्या
दुनिये मध्ये घेऊन जायचे आहे. सर्वांची बुडालेली नाव तिरा पार लावायची आहे."
प्रश्न:-
कोणता निश्चय
प्रत्येक मुलाच्या बुद्धीमध्ये नंबरवार बसत आहे?
उत्तर:-
पतित-पावन आमचे अति प्रिय बाबा आम्हाला स्वर्गाचा वरसा देत आहेत. हा निश्चय
प्रत्येका च्या बुद्धी मध्ये नंबरवार बसत आहे. जरी पूर्ण निश्चय कोणाला पण झाला, तर
माया समोर उभी आहे. बाबाला विसरल्या मुळे नापास होतात, ज्यांना निश्चय बसला आहे, ते
पावन बनण्याच्या पुरुषार्था मध्ये लागतात. बुद्धी मध्ये राहते आता तर घरी जायचे आहे्.
ओम शांती।
गोडगोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति सुप्रभात. मुले हे तर जाणत आहेत कि,
सतयुगा मध्ये नेहमीच सुप्रभात. चांगला दिवस, चांगले सर्व कांही, चांगली रात्र. सर्व
चांगले चांगले आहे. इथे तर ना सुप्रभात आहे, ना शुभरात्री आहे. सर्वात खराब रात्र
आहे. तर सर्वात चांगले काय आहे? पहाट. ज्याला अमृतवेळा म्हटले जाते. तुमची प्रत्येक
वेळ चांगली आहे. मुले जाणत आहेत कि, यावेळी आम्ही योग योगेश्वर आणि योग योगेश्वरी
आहोत. ईश्वर जे तुमचे पिता आहेत, ते येऊन योग शिकवित आहेत. म्हणजे तुम्हां मुलांचा
एका ईश्वरा बरोबर योग आहे. तुम्हा मुलांना योगेश्वर नंतर ज्ञानेश्वर बाबाची ओळख झाली
आहे. योग लावल्या नंतर मग बाबा तुम्हाला साऱ्या चक्राचे ज्ञान समजावत आहेत. ज्यामुळे
तुम्ही पण ज्ञानेश्वर बनत आहात. ईश्वर पिता मुलांना येऊन ज्ञान योग शिकवित आहेत.
कोणते ईश्वर? निराकार बाबा. आता बुद्धीने काम घ्यायचे आहे. गुरु लोकांची तर अनेक मते
आहेत. कोणी म्हणते, कृष्णा बरोबर योग लावा. मग त्यांचे चित्र पण देतात. कोणी साई
बाबा, कोणी महर्षी बाबा, कोणी मुसलमानाचे, कोणी पारशीचे, सर्वांना बाबा बाबा म्हणत
राहतात. म्हणतात, सर्व भगवान च भगवान आहेत. आता तुम्ही जाणत आहात. मनुष्य भगवान होऊ
शकत नाहीत. या लक्ष्मी नारायणाला भगवान भगवती म्हणू शकत नाहीत. भगवान तर एक निराकार
आहेत. ते तुम्हा सर्व आत्म्यांचे पिता आहेत. त्यांना शिवबाबा म्हटले जाते. तुम्हीच
जन्मजन्मांतर सत्संग करत आले आहात. कोणता ना कोणता संन्यासी, साधू, पंडित इत्यादी
जरूर असतात. लोक समजत आहेत कि, हे आमचे गुरु आहेत. आम्हाला कथा सांगत आहेत. सतयुगा
मध्ये कथा इत्यादी होत नाहीत. बाबा समजावत आहेत, फक्त भगवान किंवा ईश्वर म्हटल्याने
गोडी वाटत नाही. ते पिता आहेत. तर बाबा म्हटल्याने संबंध स्नेहपूर्वक होऊन जातात.
तुम्ही जाणत आहात कि, आम्ही बाबा मम्मा ची मुले बनले आहोत. ज्यामुळे आम्हाला
स्वर्गाचे सुख मिळत आहे. असा कोणता पण सत्संग असत नाही, जे समजत आहेत कि, आम्ही या
सत्संगा तून मनुष्या पासून देवता किंवा नर्कवासी पासून स्वर्गवासी बनत आहोत. आता
तुमचा सत्य बाबा बरोबर संग आहे आणि सर्वांचा असत्या बरोबर संग आहे. गायन पण आहे
सत्संग तारतो, शरीराचा संग बडवितो. बाबा म्हणतात, आत्माभिमानी, देहअभिमानी बना. मी
तुम्हा मुलांना आत्म्याला शिकवित आहे. हे आत्मिक ज्ञान आत्म्यासाठी सुप्रीम परमात्मा
येऊन देत आहेत. बाकी सर्व भक्तिमार्ग आहे. तो कांही ज्ञान मार्ग नाही. बाबा म्हणतात,
मी सर्व वेद, शास्त्राचे, सृष्टीच्या आदि,मध्य, अंताला जाणत आहे. अधिकारी मीच आहे.
ते भक्तिमार्गाची अधिकारी आहेत.फार शास्त्र इत्यादी वाचत आहेत. तर त्यांना म्हटले
जाते, शास्त्राचे अधिकारी. तुम्हाला बाबा खरे येऊन सांगत आहेत. आता तुम्ही जाणत
आहात. सत्याचा संग तारतो, खोट्याचा संग बुडवितो. आता बाबा तुम्हा मुला द्वारे
भारताला मुक्त करत आहेत. तुम्ही आत्मिक मुक्त करणारे सैनिक आहात. मुक्त करत आहात.
बाबा म्हणत आहेत कि, भारत स्वर्ग होता, तो आता नर्क बनलेला आहे. बुडालेला आहे. बाकी
अशा कोणत्या सागरा खाली गेलेला नाही. तुम्ही सतोप्रधान पासून तमोप्रधान बनले आहात.
सतयुग, त्रेता सतोप्रधान आहे. ही मोठी बोट आहे. तुम्ही बोटी मध्ये बसलेले आहात. ही
पापाची नगरी आहे. कारण सर्व पापआत्मे आहेत. वास्तवा मध्ये गुरु एक आहे. त्याला कोणी
ओळखत नाहीत. नेहमी म्हणत आहेत, गॉड फादर. असे म्हणत नाहीत कि, ईश्वरीय पिता आणि
धर्मस्थापक.नाही, फक्त पिता म्हणतात. तेच पतित पावन आहेत. तर गुरु पण बनतात.
सर्वांचे पतित-पावन सदगती दाता एकच आहे. या पतित दुनिये मध्ये कोणी पण मनुष्य सदगती
दाता किंवा पतित-पावन होऊ शकत नाही. बाबा सांगतात कि, किती अशुध्दी, भ्रष्टाचार आहे.
आता तुम्हां कन्या माता द्वारे सर्वांचा उद्धार करायचा आहे.
तुम्ही सर्व ब्रह्माकुमार कुमारी भाऊ बहीण झाले आहात. नाही तर आजोबा चा वारसा कसा
मिळेल. आजोबा कडून वरसा 21 पिढी म्हणजे स्वर्गाची राजाई मिळत आहे. कमाई किती मोठी
आहे. ही खरी कमाई आहे. खऱ्या बाबा कडून मिळते. बाबा पिता पण आहेत. शिक्षक पण आहेत.
सद्गुरु पण आहेत, प्रत्यक्षात करून दाखविणारे आहेत. असे नाही कि, गुरु मेला तर
शिष्याला गादी मिळेल. ते शरीराचे गुरु आहेत. हे आत्म्याचे गुरु आहेत. चांगल्या
रीतीने या गोष्टीला समजायचे आहे. ही बिल्कुल नवीन गोष्ट आहे. तुम्ही जाणता कि,
आम्हाला कोणी मनुष्य शिकवित नाहीत. आम्हाला शिवबाबा ज्ञानाचे सागर पतित-पावन या
शरीराद्वारे शिकवित आहेत. तुमची बुद्धी शिवबाबा कडे आहे. त्या सत्संगा मध्ये
मनुष्या कडे बुद्धी जाते. तो सर्व भक्तीमार्ग आहे. आता तुम्ही गात आहात, तुम्ही मात
पिता आम्ही बालक तुमचे. . . ते तर एक आहेत ना. परंतु बाबा म्हणत आहेत कि, मी कसे
येऊन तुम्हाला आपले बनवित आहे. मी तुमचा पिता आहे, तर यांच्या तनाचा आधार घेत आहे.
तर ही (ब्रह्मा) माझी स्त्री आहे. तर मुलगा पण आहे. यांच्या द्वारे शिवबाबा मुलांना
दत्तक घेत आहेत. त्यामुळे ही मोठी मम्मा झाली. यांना कोणी माता म्हणत नाही.
सरस्वतीला जगदंबा म्हटले जाते. त्यांना तुमचा सांभाळ करण्या साठी नियुक्त केले आहे.
सरस्वती ज्ञान ज्ञानेश्वरी, ती छोटी मम्मा आहे. या फार रहस्ययुक्त गोष्टी
आहेत.तुम्ही आता हे गुह्य शिक्षण घेत आहात. तुम्हाला सन्मानाने पास व्हायचे आहे. हे
लक्ष्मी नारायण सन्मानाने पास होत आहेत. त्यांना सर्वात मोठी शिष्यवृत्ती मिळत आहे.
कोणती शिक्षा खावी लागत नाही. बाबा म्हणतात, जेवढे होईल तेवढी आठवण करा. याला
भारताचा प्राचीन योग म्हटले जाते. बाबा सांगतात, तुम्हाला सर्व वेद, शास्त्रांचे
सार सांगत आहे. मी तुम्हाला राजयोग शिकविला, ज्यामुळे तुम्हीं प्रारब्ध प्राप्त केली.
मग ज्ञान नाहीसे होऊन जाते. मग परंपरा कशी चालू शकेल. तेथे कोणते शास्त्र इत्यादी
असत नाही. इतर धर्म वाले इस्लामी, बुद्धी इत्यादी जे आहेत. त्यांचे ज्ञान नाहीसे
होत नाही. त्यांची परंपरा चालत येते. सर्वांना माहीत आहे, परंतु बाबा सांगत आहेत
कि, मी तुम्हाला जे ज्ञान सांगत आहे. ते कोणी जाणत नाहीत. भारत दु:खी बनून जातो.
त्याला येऊन सदासुखी बनवित आहे. बाबा म्हणतात, मी साधारण तना मध्ये बसलो आहे. तुमची
बुद्धी बाबा बरोबर आहे. आत्म्यांचे पिता परमपिता परमात्मा आहेत. सर्व मुलांचे ते
पिता आहेत, त्यांची सर्व मुले आहेत. सर्व आत्मे यावेळी पतित आहेत. बाबा म्हणतात, मी
प्रत्यक्षात आलो आहे. विनाश समोर उभा आहे. जाणत आहात, आग लागेल, सर्वांचे शरीर नष्ट
होऊन जातील. सर्व आत्म्यांना परत घरी जायचे आहे. असे नाही कि, ब्रह्म मध्ये लीन
व्हायचे आहे किंवा ज्योती मध्ये सामावून जायचे आहे. ब्रह्मो समाजी मग ज्योती
पेटवितात. त्याला ब्रह्म मंदिर म्हणतात. खरेतर ब्रह्म तत्व आहे. जिथे सर्व आत्मे
राहतात. आमचे पहिले मंदिर ते होते. पवित्र आत्मे तिथे राहत आहेत. या गोष्टी कोणी
मनुष्य समजत नाहीत. ज्ञानाचे सागर बाबा तुम्हा मुलाला समजावत आहेत कि, आता तुम्ही
ज्ञानेश्वर आहात, नंतर राज राजेश्वर बनत आहात. तुमच्या बुद्धी मध्ये आहे कि, पतित
पावन अति प्रिय बाबा येऊन आम्हाला स्वर्गाचा वरसा देत आहेत. काहींच्या बुद्धीमध्ये
हे पण बसत नाही. एवढे बसले आहेत, यांच्या मध्ये कोणी 100 % निश्चित बुद्धि नाहीत,
कोणी 80% आहेत, कोणी 50% आहेत. कांही ते पण नाहीत. ते तर मग बिल्कुल नापास झाले.
नंबरवार जरूर आहेत. अनेक असे आहेत, ज्यांना निश्चय नाही. प्रयत्न करत आहेत कि,
निश्चय व्हावा. बरं, निश्चय झाला तरी पण माया फार कडक आहे. बाबा ला विसरून टाकते.
हे ब्रह्मा स्वतः म्हणत आहेत कि, मी पूर्ण भक्त होतो. 63 जन्म भक्ती केली आहे.
ततत्वम. तुम्ही पण 63 जन्म भक्ती केली आहे. 21 जन्माचे सुख प्राप्त केले, मग भक्त
बनले आहात. भक्ती नंतर वैराग्य येते. संन्यासी लोक पण हे अक्षर सर्व म्हणतात कि,
ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. त्यांना वैराग्य येथे घर दाराचे. त्याला हदचे वैराग्य
म्हटले जाते आणि तुमचे बेहदचे वैराग्य आहे. संन्यासी घरदार सोडून जंगला मध्ये निघून
जात होते, आता तर कुठे जंगलच राहिले नाही. सर्वच झोपड्या खाली पडल्या आहेत. कारण
पहिले सतोप्रधान होते, आता ते तमोप्रधान झाले आहेत. आता त्यांच्या मध्ये कोणती ताकत
राहिली नाही. लक्ष्मी नारायणा च्या राजधानी मध्ये जी ताकत होती, ती पुनर्जन्म घेत
घेत आता पाहा, ते कुठे येऊन पोहचले आहेत. कांही पण ताकत नाही. येथील शासन पण म्हणते
कि, आम्ही धर्माला मानत नाही. धर्मात फार नुकसान आहे. भांडण, तंटे, समारंभ करत
राहतात कि, सर्व धर्मवाले एक मत होऊन जावेत. परंतु त्यांना विचारा, हे कसे होऊ शकेल.
आता तर सर्व परत जाणार आहेत. बाबा आले आहेत, ही दुनिया आता कबरिस्थान बनली आहे. बाकी
हे तर वेगळे झाड आहे. ते कसे होईल, कांही पण समजत नाहीत. भारता मध्ये एक धर्म होता.
त्याला म्हटले जाते अद्वैत मतवाले देवता. व्दैत म्हणजे दैत्य. बाबा म्हणतात तुमचा
हा धर्म फार सुख देणारा आहे. तुम्ही जाणत आहात कि, पुनर्जन्म घेऊन, आम्हाला परत 84
जन्म भोगायचे आहेत.निश्चय असला पाहिजे कि, आम्ही 84 जन्म भोगले आहेत. आम्हाला जायचे
आहे आणि मग परत यायचे आहे. भारतवासीना च समजावत आहेत कि, तुम्ही 84 जन्म पूर्ण केले
आहेत. आता तुमचा हा अनेक जन्मातील अंताचा जन्म आहे. फक्त एकाला म्हणत नाहीत, पांडव
सेनेला समजावतात कि, तुम्ही पंडे आहात, तुम्हीं आत्मिक यात्रा शिकवित आहात. त्यामुळे
पांडव सेना म्हटले जाते. आता ना राज्य कौरवांचे,ना पांडवाचे आहे. ते पण प्रजा तुम्ही
पण प्रजा आहात. सांगतात कि, कौरव-पांडव भाऊ भाऊ होते.पांडवाच्या बाजुला परमपिता
परमात्मा आहेत. बाबा येऊन मायेवर विजय प्राप्त करण्यासाठी शिकवित आहेत. तुम्ही आदि
सनातन देवी देवता धर्म वाले, अहिंसक आहात. अहिंसा परमो धर्म. मुख्य गोष्ट आहे, काम
कटारी चालवायची नाही. भारतवासी समजत आहेत कि, गायीची हत्या करू नका, हीच अहिंसा आहे.
परंतु बाबा सांगत आहेत, काम कटारी चालवू नका. यालाच मोठ्यातील मोठी हिंसा म्हटले
जाते. सतयुगा मध्ये ना काम कटारी, भांडण, लढाई चालते. इथे तर दोन्ही आहेत. काम कटारी
आदि,मध्य, अंत दुःख देत आहे. तुम्ही शिडी उतरत आहात. 84 जन्म तुम्ही भारतवासीने
घेतले आहेत. या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते, मग पुनर्जन्म घेतात. एक जन्म एक पायरी
आहे. येथून तुम्ही एकदम वर उडी मारत आहात. 84 पायऱ्या उतरण्या मध्ये तुम्हाला पाच
हजार वर्षे लागतात, आणि इथून मग तुम्ही सेकंदा मध्ये चढता. सेकंदा मध्ये जीवनमुक्ती
कोण देतात? बाबा. आता आम्ही एकदम खाली पडले आहोत. आता बाबा म्हणतात, फक्त माझी आठवण
करा. हे बुद्धी मध्ये आठवणीत ठेवायचे आहे कि, आता नाटक पूर्ण झाले. आम्हाला परत घरी
जायचे आहे. आम्हाला आपल्या बाबाची आणि घराची आठवण करायची आहे. प्रथम बाबाची आठवण करा.
तेच तुम्हाला घराचा रस्ता सांगत आहेत. बाबाच्या आठवणी मुळे विकर्म विनाश होतील.
ब्रह्म ची आठवण केल्यामुळे एक पण पाप नाहीसे होत नाही. पतित पावन परमात्माच आहेत.
ते कसे पावन बनवित आहेत. हे दुनिये मध्ये कोणी पण समजत नाहीत. बाबाला येऊन स्वर्गाची
स्थापना करायची आहे. बाबा आले आहेत, त्यामुळे तुम्ही मुले जयंती साजरी करत आहात. कधी
आले, हे सांगू शकत नाहीत कि, यावेळी, या तिथी, तारखेला आले. शिवबाबा कधी आले, कसे
सांगू शकतील. साक्षात्कार फार होत आहेत. अगोदर आम्ही सर्वव्यापी म्हणत होतो किंवा
म्हणत होतो कि,आत्मा हाच परमात्मा आहे. आता माहित झाले आहे. बाबा दिवसेंदिवस गुह्य
गोष्टी सांगत आहेत. तुम्ही साधारण मुले किती मोठे ज्ञान घेत आहात. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) सन्मानाने
पास होण्यासाठी, सजा पासून मुक्त होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आठवणी मध्ये
राहिल्यानेच शिष्यवृत्ती घेण्याचे अधिकारी बनू शकाल
(२) खरे खरे पांडव बनुन सर्वांना आत्मिक यात्रा करावयाची आहे. कोणत्या पण प्रकारची
हिंसा करायची नाही.
वरदान:-
मास्टर
सर्वशक्तिमाना च्या स्मृती द्वारे माया जीत सो जगतजीत विजयी भव:
जी मुले फार विचार
करतात कि, माहित नाही, माया कां आली, तर माया पण घाबरलेला पाहून, आणखीन आघात करते.
त्यामुळे विचार करण्या ऐवजी नेहमी मास्टर सर्वशक्तीमानच्या स्मृती मध्ये राहा, तर
विजयी बनून जाल. विजयी रत्न बनविण्या साठी च हे मायेचे छोटे छोटी रूपे आहेत.
त्यामुळे स्वतःला मायाजीत, जगतजीत समजून मायेवर विजय प्राप्त करा. कमजोर बनू नका.
आवाहन करणारे बना.
बोधवाक्य:-
प्रत्येक
आत्म्या कडून शुभ आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत, तर बेहदची शुभभावना आणि शुभकामने
मध्ये स्थित राहा.