06-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो,पुण्यात्मा बनायचे असेल तर एका,बाबांची आठवण करा,तर अशुध्दी निघुन जाईल,आत्मा पावन बनेल"

प्रश्न:-
कोणते स्मृती राहील तर कधीही कोणत्या गोष्टींमध्ये संभ्रमित होऊ शकत नाहीत?

उत्तर:-
वैश्विक नाटकाची.हे पूर्वनियोजित नाटक आहे,आता या मध्ये काहीच बदल होणार नाही. हे अनादी नाटक चालत राहते. यामध्ये कोणत्या गोष्टींमध्ये संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही.काही मुलं म्हणतात माहित नाही,हा आमचा अंतिम ८४ वा जन्म आहे की नाही,यामध्ये संभ्रमित होतात. बाबा म्हणतात, तुम्ही संभ्रमित होऊ नका,मनुष्य पासून देवता बनण्याचा पुरुषार्थ करत राहा.

ओम शांती।
मुलांना ओम शांती चा अर्थ तर माहित आहे की,मी आत्मा आहे आणि मज आत्म्याचा स्वधर्म शांती आहे.मी आत्मा शांत स्वरूप, शांतीधामची राहणारी आहे,हा पाठ पक्का करत जावा.हे कोण समजावत आहे?शिव बाबा.शिवबाबांची च आठवण करायची आहे.त्यांना आपला रथ नाही म्हणून त्यांना नंदी दाखवतात. मंदिरांमध्ये पण नंदी ठेवतात.त्याला म्हटले जाते पूर्ण अज्ञान.बाबा मुलांना किंवा आत्म्यांना समजवतात.हे आत्म्यांचे पिता शिव आहेत,त्यांची नावं तर खूप आहेत.अनेक नावे असल्यामुळे संभ्रमित होतात, वास्तव मध्ये यांचे नाव शिव आहे. शिवजयंती पण भारतामध्ये साजरी केली जाते.ते निराकार बाबा आहेत, येऊन पतितांना पावन बनवतात. कोणी भागीरथ,तर कोणी नंदी म्हटले आहे.बाबाच सांगतात की,मी कोणत्या भाग्यशाली रथा मध्ये येतो. मी ब्रह्माच्या तना मध्ये प्रवेश करतो, ब्रह्मा द्वारा भारताला स्वर्ग बनवतो. तुम्ही सर्व भारतवासी जाणतात की, लक्ष्मीनारायणाचे राज्य होते.तुम्ही सर्व भारतवासी मुलं आदी सनातन देवी-देवता धर्माचे होते,स्वर्गवासी होते.पाच हजार वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो,तर सर्वांना सतोप्रधान स्वर्गाचे मालक बनवले होते.परत पुनर्जन्म जरूर घ्यावा लागेल.बाबा खूप स्पष्ट करून सांगतात.आता शिव जयंती साजरी करतात.( या २०२१ वर्षी लिहाल ८५ वी शिवजयंती ) बाबांचे अवतरण होऊन आता ८५ वर्ष पूर्ण झाले.सोबतच ब्रह्मा विष्णू शंकर चे पण अवतरण आहे.त्रिमूर्ती ब्रह्माची जयंती कोणी दाखवत नाहीत,दाखवायची जरुर आहे, कारण बाबा म्हणतात मी ब्रह्मा द्वारा स्थापना परत करत आहे.ब्राह्मण बनवत जातो.तर ब्राह्मा आणि ब्राह्मण वंशीचा पण जन्म झाला, परत दाखवतो की तुम्हीच विष्णुपुरी चे मालक बनाल.बाबाच्या आठवणी द्वारे तुमच्यामधील अशुध्दी निघून जाईल.जरी भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे, परंतु तो कोणी शिकवला होता,हे कोणी जाणत नाहीत.बाबा स्वतः म्हणतात मुलांनो,तुम्ही मज पित्याची आठवण करा,वारसा तुम्हाला माझ्या द्वारेच मिळतो.मी तुमचा पिता आहे.मी कल्प कल्प येतो,येऊन तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतो, कारण तुम्हीच देवी-देवता होते परत 84 जन्म घेत घेत येऊन पतित बनले आहात,रावणाच्या मतावर चालतात. ईश्वरीय मता द्वारे तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात.

बाबा म्हणतात मी कल्पापुर्वी पण आलो होतो,जे काही पास झाले ते कल्प-कल्प होत राहील.बाबा परत येऊन यांच्यामध्ये प्रवेश करतील,या दादांना सोडवतील.परत या सर्वांचे पालन करतील.तुम्ही जाणता आम्ही सतयुगामध्ये होतो.आम्हा भारतवासींनाच ८४जन्म घ्यावे लागतील.प्रथम तुम्ही सर्वगुणसंपन्न सोळा कलासंपन्न होते.यथा राजा राणी तथा प्रजा क्रमानुसार असतात. सर्व तर राजा बनू शकत नाहीत.तर बाबा समजवतात,सतयुगामध्ये तुमचे ८ जन्म,त्रेता मध्ये १२ जन्म….घेतले आहेत.असे स्वतःला समजा की आम्ही,ही भूमिका वठवली आहे. प्रथम सूर्यवंशी राजधानीमध्ये भूमिका वठवली,परत चंद्रवंशीमध्ये खाली उतरत वामर्गामध्ये आले.परत आम्ही ६३ जन्म घेतले. भारतवासीनेच पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत बाकी कोणते धर्म इतके जन्म घेत नाहीत. गुरुनानकला पाचशे वर्ष झाले,अंदाजित त्यांचे १२-१४ जन्म झाले असतील.हा हिशोब काढला जातो.क्रिश्चीयन ने दोन हजार वर्षांमध्ये ६०च्या आसपास जन्म घेतले असतील.वृद्धी होत जाते, पुर्नजन्म घेत राहतात.बुद्धीमध्ये हा विचार करा की,आम्ही ८४ जन्म भोगले आहेत परत सतोप्रधान बनवायचे आहेच.जे काही पास झाले ते वैश्विक नाटक.हे नाटक बनले आहे, त्याची परत पुनरावृत्ती होत राहते.बेहद्दच्या इतिहासा मध्ये तुम्हाला घेऊन जातात.तुम्ही पुनर्जन्म घेत आले आहात.आता तुम्ही ८४ जन्म पूर्ण केले आहेत.आता बाबांनी स्मृती दिली आहे की,तुमचे घर शांतीधाम आहे,आत्म्याचे रूप काय आहे? बिंदू.परमधाम मध्ये जसे बिंदूंचे झाड आहे.आत्म्याचे पण क्रमानुसार झाड आहे,क्रमानुसार खाली येत राहतात.परमात्मा पण बिंदी आहे,असे नाही की इतके मोठे लिंग आहे.बाबा म्हणतात,तुम्ही माझी मुलं बनतात,तर मी तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवतो.प्रथम तुम्ही माझे बनतात,तर मी तुम्हाला स्वर्गाचे मालक बनववतो.प्रथम तुम्ही माझे बनले,परत मी तुम्हाला शिकवतो.असे म्हणतात,बाबा आम्ही तुमचे आहोत,सोबत शिकायचे आहे. माझे बनले आहात,आणि अभ्यास सुरु झाला.बाबा म्हणतात,हा तुमचा अंतीम जन्म आहे,तर कमलफुल समान पवित्र बना.मुलं वायदा करतात,बाबा आम्ही आपल्याकडून वारसा घेण्यासाठी कधीच पतित बनणार नाहीत.६३ जन्म तर पतित बनलो आहोत. ही ८४ जन्माची कहाणी आहे.बाबा येऊन सहज स्पष्ट करतात.जसे लौकिक पिता सांगतात ना,तर हे बेहदचे पिता आहेत,ते येऊन आत्म्यांना मुलं मुलं म्हणून गोष्टी करतात.शिवरात्रि पण साजरी करतात.हा अर्ध्या कल्पाचा दिवस आहे आणि अर्ध्या कल्पाची रात्र आहे.आता रात्रीचा अंत आणि दिवसाच्या आदीचा संगम आहे.भारत सतयुग होता,तर दिवस होता.सतयुग त्रेताला ब्रह्माचा दिवस म्हणले जाते.तुम्ही ब्राह्मण आहात ना.तुम्ही ब्राह्मण जाणतात की,आमची आत्ता रात्री आहे.तमो प्रधान भक्ती आहे.अनेक तीर्थक्षेत्रावर धक्के खात राहतात.सर्वांची पूजा करत राहतात,जिथे तीन रस्ते मिळतात त्याची पण पूजा करतात. मनुष्याच्या शरीराची पण पूजा करत राहतात.संन्यासी लोक स्वतःला शिवोहम म्हणून घेतात,परत माता जाऊन त्यांची पूजा करतात.बाबा खूप अनुभवी आहेत.बाबा म्हणतात मी पण खूप पूजा केली आहे परंतु त्यावेळेस ज्ञान नव्हते,फळं फूलं इत्यादी अर्पण करत होते.लोटी मनुष्या वरती चढवत होते.ही पण ठगी झाली ना,परंतु तरी हे सर्व होईल.भक्तांचे रक्षक भगवान आहेत कारण सर्व दुःखी आहेत ना.बाबा समजवतात द्वापर पासून तुम्ही गुरु करत आले आहात आणि भक्तिमार्गा मध्ये उतरत आलेले आहात.आज पर्यंत साधू लोक साधना करत राहतात.बाबा म्हणतात मी त्यांचा उद्धार करतो.संगम युगामध्ये तुमची सद्गती होते,परत तुम्ही ८४ जन्म घेतात.बाबांना म्हटले जाते ज्ञानाचे सागर म्हणून सृष्टीचे बीज रूप, सतच्चिदानंद स्वरूप आहेत, त्यांचा कधी विनाश होत नाही त्यांच्यामध्ये ज्ञान आहे.ज्ञानाचे सागर,प्रेमाचे सागर आहेत,तर जरुर त्यांच्याद्वारे वारसा मिळाला पाहिजे.आता तुम्हा मुलांना वारसा मिळत आहे. शिवबाबा आहेत ना.ते पण बाबा आहेत,हे पण तुमचे पिता आहेत. परत बाबा ब्रह्मा द्वारा तुम्हाला शिकवत आहेत,म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी म्हटले जाते. अनेक ब्रह्माकुमार-कुमारी आहेत.ते असे म्हणतात,आम्हाला दादा पासून वारसा मिळतो.मुलं म्हणतात बाबा आम्हाला नरकापासून स्वर्गवासी बनवतात.बाबा म्हणतात हे मुलांनो, माझीच आठवण करा,तर तुमच्या डोक्यावर जे पापाचे ओझे आहे,ते भस्म होईल,परत तुम्ही सतोप्रधान बनाल.तुम्ही खरे सोन्यासारखे,खरे दागिने होते,आत्मा आणि शरीर दोघे सतोप्रधान होते.आत्मा परत सतो रजो,तमो होते,तर शरीर पण तसेच तमोगुणी मिळते.बाबा तुम्हाला मत देतात की,मुलांनो माझीच आठवण करा. मला बोलतात हे पतित-पावन या.भारताचा प्राचीन राजयोग प्रसिद्ध आहे.तो आत्ता तुम्हाला शिकवत आहे की, माझ्या सोबत योग ठेवा, तर तुमच्यातील भेसळ निघून जाईल. जितकी आठवण कराल,तेवढी अशुध्दता निघून जाईल.आठवण च मुख्य गोष्ट आहे.बाबांनी ज्ञान तर दिले आहे,सतयुगामध्ये यथा राजा तथा प्रजा,सर्व पवित्र असतात.आता सर्व पतित आहेत.बाबा म्हणतात त्यांच्या अनेक जन्मांच्या अंतच्या जन्मांमध्ये मी प्रवेश करतो,त्याला म्हटले जाते भाग्यशाली रथ.हे शिकून परत प्रथम क्रमांक मध्ये जातात,क्रमानुसार तर बनतात ना.मुख्य एकाचे नाव होते. बाबांनी मुलांना ८४ जन्माचे रहस्य पण चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे.तुम्ही आदी सनातन देवी-देवता धर्माचे आहात,ना की हिंदू धर्माचे.तुमचे कर्म श्रेष्ठ,धर्म श्रेष्ठ होते परत रावणाची प्रवेश झाल्यानंतर धर्म कर्म भ्रष्ट बनले. स्वतःला देवी-देवता सांगण्यात लाज वाटते,म्हणून हिंदू नाव ठेवले आहे. वास्तव मध्ये देवी-देवता धर्माचे होते, तुम्हीच ८४ जन्म घेतले आहेत,परत पतित बनले आहात.८४ चे चक्र भारतवासींसाठी आहे,परत तर सर्वांना जायचे आहे.प्रथम तुम्ही जातात,जशी वरात जाते ना.शिवबाबांना साजन पण म्हणतात ना. सजनी या वेळेत तमोप्रधान बनल्या आहेत,त्यांना सुंदर बनवून घेऊन जातो.आत्म्याला पावन बनवून घेऊन जातात,यांना मुक्तिदाता, मार्गदर्शक म्हटले जाते.बेहद्दचे पिता घेऊन जातात.त्यांचे नाव ठेवले आहे शिवबाबा.नाव शरीरावर पडते परंतु परमात्मा चे नाव आहे.ब्रह्मा विष्णू शंकराचे तर सूक्ष्म शरीर आहे. शिवबाबांना तर कोणते शरीर नाही. त्यांना शिवबाबा च म्हणतात.मुलं म्हणतात, हे मात पिता आम्ही तुमचे बालक बनलो आहोत.दुसऱ्यांना बोलवत राहतात,कारण त्यांना माहिती होत नाही,जर सर्वांना माहिती पडेल तर,माहित नाही काय होईल.दैवी झाडाचे कलम लागत आहे.हिऱ्या पासून कवडी सारखे बनण्यामध्ये ८४ जन्म लागतात. परत नवीन चक्र सुरु होते.विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत राहते.बाबा समजवतात तुम्ही पुर्ण ८४ जन्म घेतले आहेत. ८४ लाख तर होऊ शकत नाहीत.ही फार मोठी चूक आहे.८४ लक्ष समजल्यामुळे कल्पाचे आयुष्य पण लाखो वर्षे केले आहे.हे अगदीच खोटे आहे.भारत आत्ता खोटा खंड आहे.सत्यखंडा मध्ये तुम्ही नेहमी सुखी होते.या वेळेत तुम्ही २१ जन्माचा वारसा घेतात.सर्व आधार पुरुषार्था वरती अवलंबून आहे.राजधानी मध्ये जे पाहिजे ते पद मिळू शकते,यामध्ये जादू इत्यादीची गोष्टच नाही.होय मनुष्य पासून देवता जरूर बनतात. ही तर चांगली जादू आहे ना.तुम्ही सेकंदामध्ये जाणतात की,आम्ही बाबा ची मुलं बनले आहोत. कल्प-कल्प बाबा आम्हाला स्वर्गाचे मालक बनवतात.अर्धा कल्प भटकत आले आहात,स्वर्गवासी तर कोणी झाले नाहीत.बाबा येऊन तुम्हा मुलांना लायक बनवतात.बरोबर येथेच महाभारत लढाई लागली होती आणि राज योग शिकवला होता. शिव बाबा म्हणतात मीच येऊन तुम्हाला शिकवतो,ना की येशू ख्रिस्त. आत्ता तुमचा अनेक जन्माचा अंतिम जन्म आहे,यामध्ये संभ्रमित होऊ नका.तुम्ही भारतवासी आहात, तुमचा धर्म खूप सुख देणारा आहे, बाकी धर्म तर वैकुंठा मध्ये येऊ शकत नाहीत.हे नाटक अनादी चालत राहते,कधी बनले हे सांगू शकत नाहीत.याचा अंत कधी होत नाही.विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत राहते.हे संगम युग खूप लहान युग आहे.ब्राह्मणांची शेंडी आहे.बाबा तुम्हा ब्राह्मणांना देवता बनवत आहेत.तुम्हाला ब्रह्माची मुलं जरूर बनावे लागेल.तुम्हाला वारसा दादा कडून मिळतो,जोपर्यंत स्वतःला ब्रह्मकुमार-कुमारी समजत नाहीत, तोपर्यंत वारसा कसा मिळेल.तरी काही ना काही ऐकतात,तर साधारण प्रजा मध्ये येतात. यायचे तर जरूर आहे.शिव बाबा ब्रह्मा द्वारा ब्राह्मण, देवता,क्षत्रिय धर्माची स्थापना करतात.गीते शिवाय दुसरा कोणताही ग्रंथ नाही.गीता सर्वोत्तम दैवी धर्माचा ग्रंथ आहे,ज्याद्वारे तीन धर्म स्थापन होतात.ब्राह्मण पण येथेच बनायचे आहे,देवता पण येथेच बनतील,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) प्रत्येकाच्या भूमिकेला निश्चित समजून नेहमी निश्चिंत राहायचे आहे. हे पूर्वनियोजित नाटक आहे,या वैश्विक नाटकात अडोल राहायचे आहे.

(२) याच लहान संगमयुगा मध्ये बाबा कडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे.आठवणीच्या शक्तीद्वारे आत्मे मधील अशुध्दी काढून, स्वतःला कवडी पासून हिऱ्यासारखे बनवायचे आहे.गोड झाडाच्या कलमांमध्ये येण्यासाठी लायक बनायचे आहे.

वरदान:-
आश्चर्य कारक दृश्य पहात डोंगरा एवढ्या परिस्थिती ला मोहरी सारखे बनवणारे साक्षी दृष्टा भव.

संपन्न बनण्यामध्ये अनेकानेक नवीन नवीन आश्चर्यकारक दृश्य समोर येतात परंतु हे दृश्य त्रयस्थ बनवतील, हलवणार नाहीत. त्रयस्थ स्थिती असताना वरती बसून पाहणे किंवा निर्णय करण्यामध्ये खूप मजा येते,घाबरणार नाहीत.जसे की अनेक वेळेत झालेले दृश्य परत पाहत आहोत.ते राज युक्त,योग युक्त बनवून वातावरणाला दुहेरी पवित्र बनवतात,त्यांना डोंगरासारखी परिस्थिती पण मोहरी सारखी अनुभव होते.

बोधवाक्य:-
परिस्थितीमध्ये आकर्षित होण्याचा ऐवजी त्यांना त्रयस्थ बनून खेळाच्या रूपामध्ये पहा.