22-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलानो, बाबांना ज्ञानी तू आत्मा मुलेच प्रिय आहेत, त्यामुळे बाबा सारखे मास्टर ज्ञानसागर बना."

प्रश्न:-
कल्याणकारी युगा मध्ये बाबा सर्व मुलांना कोणती स्मृती देत आहेत?

उत्तर:-
मुलांनो,तुम्हाला आपले घर सोडून पाच हजार वर्ष झाली आहेत. तुम्ही पाच हजार वर्षांमध्ये 84 जन्म घेतले, आता हा शेवटचा जन्म आहे, वानप्रस्थ अवस्था आहे, त्यामुळे आता घरी जाण्याची तयारी करा, मग सुखधाम मध्ये जाल. भले गृहस्थ व्यवहारा मध्ये राहा, परंतु या अंतिम जन्मांमध्ये पवित्र बनून, बाबांची आठवण करा.

गीत:-

महफिल मे जल उठी शमा. . . .

ओम शांती।
मुलांनी हे समजले आहे कि, भगवान एक आहे, गॉड इज वन. सर्व आत्म्यांचा पिता एक आहे. त्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते. सृष्टीचा रचियता एक आहे. अनेक होऊ शकत नाहीत. या सिद्धांता नुसार मनुष्य स्वतःला भगवान म्हणू शकत नाहीत. आता तुम्ही ईश्वरीय सेवेसाठी निमित्त बनले आहात. ईश्वर नवीन दुनिया स्थापन करत आहेत, ज्याला सतयुग म्हटले जाते, ज्यासाठी तुम्ही लायक बनत आहात. सतयुगा मध्ये कोणी पतित असत नाहीत. आता तुम्ही पावन बनत आहात. म्हणतात, पतित पावन मीच आहे आणि तुम्हा मुलांना श्रेष्ठ मत देत आहे कि, मज निराकार पित्याची आठवण केल्याने, तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल. याद रुपी योग अग्नीने तुमचे पाप नाश होतील. साधू इत्यादी तर म्हणतात कि, ईश्वर सर्वव्यापी आहे. एकीकडे म्हणतात भगवान एक आहे, मग इथे तर अनेक स्वतःला भगवान म्हणत आहेत. श्री श्री 108 जगद्गुरु म्हणत आहेत. आता जगाचे गुरु तर एकच बाबा आहेत. साऱ्या जगाला पावन बनविणारे एक परमात्मा साऱ्या दुनियेला दुःखा पासून मुक्त करत आहेत. तेच दु:खहर्ता सुखकर्ता आहेत. मनुष्याला असे म्हणू शकत नाहीत. हे पण तुम्ही मुले समजत आहात. ही पतित दुनिया आहे. सर्व पतित आहेत. पावन दुनिये मध्ये यथा महाराजा महारानी तथा प्रजा आहेत. सतयुगा मध्ये पूज्य महाराजा महाराणी होते. मग भक्तीमार्गा मध्ये पुजारी बनतात. सतयुगा मध्ये जे महाराजा महाराणी होते, त्यांच्या जेंव्हा दोन कला कमी होतात, तर राजा राणी म्हटले जाते. या सर्व सविस्तर गोष्टी आहेत. नाही तर एका सेकंदा मध्ये जिवनमुक्ती मिळते. बाबा समजावत आहेत, भले गृहस्थ व्यवहारा मध्ये राहा परंतु हा अंतिम जन्म पवित्र राहा. आता वानप्रस्थ अवस्था आहे. वानप्रस्थ किंवा शांतीधाम एकच गोष्ट आहे. तिथे आत्मे ब्रह्म तत्वा मध्ये राहतात, ज्याला ब्रह्मांड म्हटले जाते. खरे तर आत्मा कांही अंड्या सारखी नाही. आत्मा तारा आहे. बाबांनी सांगितले आहे, जे पण आत्मे आहेत या नाटका मध्ये कलाकार आहेत. जसे कलाकार नाटका मध्ये वेष बदलतात, वेगवेगळे अभिनय करतात, हे पण बेहदचे नाटक आहे. आत्मे या सृष्टीवर 5 तत्वा पासून बनलेल्या शरीरा मध्ये प्रवेश करुन अभिनय करत आहेत सुरुवाती पासून. परमात्मा आणि ब्रह्मा, विष्णू, शंकर सर्व कलाकार आहेत. नाटका मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेष अभिनय करण्यासाठी मिळतात.परमधाम घरा मध्ये सर्व आत्मे शरीरा शिवाय राहतात. मग जेव्हा पाच तत्वाचे शरीर तयार होते, तेंव्हा त्यामध्ये प्रवेश करतात. 84 शरीर मिळत आहेत, तर नाव पण तेवढे बदलत राहतात. आत्म्याचे नाव एकच आहे. आता शिवबाबा तर पतित-पावन आहेत. त्यांना स्वतःचे शरीर नाही. शरीराचा आधार घ्यावा लागतो. म्हणतात, माझे नाव शिव आहे. जरी जुन्या शरीरा मध्ये येतो. त्यांच्या शरीराचे नाव त्यांचे आहे. त्यांचे व्यक्त नाव आहे, मग अव्यक्त नाव पडते. एका धर्माचा दुसऱ्या धर्मा मध्ये जातो, तर नाव बदलतात.तुम्ही पण शुद्र धर्मा पासून बदलून ब्राह्मण धर्मा मध्ये आले आहात, तर नाव बदलत आहे. तुम्ही लिहित आहात, शिवबाबा द्वारे ब्रह्मा. शिवबाबा परमपिता परमात्मा आहेत, त्यांचे नाव बदलत नाही. शिवबाबा ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत, आदि सनातन देवी देवता धर्माची. जो प्राय:लोप झालेला आहे. ते पावन पूज्य होते तेच पतित पुजारी बनले आहेत. 84 जन्म पूर्ण केले आहेत. आता परत देवी देवता धर्म स्थापन होत आहे. गायन पण आहे परमपिता परमात्मा येऊन ब्रह्मा द्वारे परत स्थापना करत आहेत, तर ब्राह्मण जरूर पाहिजेत. ब्राह्मा आणि ब्राह्मण कुठून आले? शिवबाबा घेऊन ब्रह्मा द्वारे दत्तक घेत आहेत. म्हणतात तुम्ही माझे आहात. शिवबाबा ची मुले तर आहातच मग ब्रह्मा द्वारे नातू बनत आहात. पिता तर एक आहे, साऱ्या प्रजेचा. एवढी सर्व मुले कुमार कुमारी आहेत. त्यांना शिवबाबा ब्रह्मा द्वारे दत्तक घेत आहेत. मनुष्य ना हे थोडेच माहित आहे. बाबा येऊन आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापन करत आहेत. तर असे नाही कि, सुरूवाती पासून येत राहतात. जसे दाखवतात कि, प्रलय झाला मग पानावर सागरातून आले. . . आता या तर सर्व गोष्टी बनविल्या आहेत.या जगाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत राहते. आत्मा अमर आहे. त्यामध्ये अभिनय पण अमर आहे. अभिनय कधी नाहीसा होत नाही. सतयुगा मध्ये त्याच लक्ष्मी नारायणाची सुर्यवंशी राजधानी चालत आली आहे. कधी बदलत नाही. दुनिया नवीन पासून जुनी, जुन्या पासून नवीन होत राहते. प्रत्येकाला अविनाशी अभिनय मिळाला आहे.बाबा म्हणतात, भक्तीमार्गा मध्ये भक्त ज्या भावनेने भक्ती करतात, तसा साक्षात्कार करवितो, कोणाला गणेशचा, हनुमानाचा पण साक्षात्कार करून देतो. त्यांची ती शुभ भावना पूर्ण करतो. हे पण विश्व नाटकामध्ये नोंदलेले आहे. मनुष्य मग समजत आहेत कि, भगवान सर्वां मध्ये आहे, त्यामुळे सर्वव्यापी म्हणतात. भक्त माळ पण आहे, पुरुषा मध्ये नारद शिरोमणी चे गायन आहे, स्त्रियांमध्ये मीराचे. भक्त माळ वेगळी आहे, रुद्र माळ वेगळी आहे, ज्ञानाची माळ वेगळी आहे.भक्तांची माळ कधी पुजली जात नाही. रुद्र माळ पुजली जाते. वर फुल आहे मग मेरू. . . मग मुले आहेत, जे राजगादीवर बसतात. रुद्र माळच विष्णूची माळ आहे. भक्तांच्या माळेचे फक्त गायन होते. हे रुद्र माळ तर सर्व जपतात. तुम्ही भक्त नसून ज्ञानी आहात. बाबा म्हणतात मला ज्ञानी तु आत्मा प्रिय वाटतात. बाबा ज्ञानाचे सागर आहेत, तुम्हा मुलांना ज्ञान देत आहेत. माळा पण तुमची पुजली जाते. 8 रत्नांचे पण पूजन होते, कारण ज्ञानी तु आत्मा आहेत, तर त्यांची पूजा होते. आंगठी बनवून घालतात, कारण ते भारताला स्वर्ग बनवित आहेत. सन्मानाने पास होत आहेत तर त्यांचे गायन आहे. 9 वा मणक्यामध्ये शिवबाबाला ठेवतात. त्याला 9 रतन म्हणतात. हे आहे सविस्तर समजावून सांगणे. बाबा तर फक्त म्हणतात, बाबा आणि वारशाची आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील मग तुम्ही निघून घरी जाल. पतित आत्मे पावन दुनिये मध्ये जाऊ शकत नाहीत. इथे सर्व पतित आहेत. देवतांचे शरीर तर पवित्र निर्विकारी आहेत. ते पूज्य आहेत, यथा राजा राणी तथा प्रजा पूज्य आहेत. इथे सर्व पुजारी आहेत. तिथे दुःखाची गोष्टच नसते. त्याला स्वर्ग सुखधाम म्हटले जाते. तिथे सुख, संपत्ती, शांती सर्व होते. आता तर कांहीच नाही त्यामुळे याला नर्क, त्याला स्वर्ग म्हटले जाते. आम्ही आत्म्ये शांतीधाम मध्ये राहणारी आहोत. तिथून येऊन अभिनय करत आहोत. 84 जन्म पूर्ण भोगावे लागतात. आता दुःखधाम आहे, मग आम्ही शांतीधाम ला जातो, त्या नंतर सुखधाम मध्ये जातो. बाबा सुखधामचे मालक बनविण्यासाठी, मनुष्या पासून देवता बनविण्यासाठी पुरषार्थ करून घेत आहेत. तुमचे हे संगमयुग आहे. बाबा म्हणतात, मी कल्पा च्या संगमयुगे येत आहे, युगे युगे नाही. मी संगमयुगा मध्ये एकाच वेळी सृष्टीला बदलण्या साठी येतो. सतयूग होते, आता कलियुग आहे, मग सतयुग आले पाहिजे, हे कल्याण कारी संगमयुग आहे. सर्वांचे कल्याण होणार आहे, सर्वांना रावणाच्या जेल मधून सोडवित आहे. त्यांना दु:खहर्ता सुखकर्ता म्हटले जाते. इथे सर्व दु:खी आहेत. तुम्ही पुरुषार्थ करत आहात, सुखधाम मध्ये जाण्यासाठी. सुखधाम ला जायचे आहे, तर प्रथम शांतीधाम मध्ये जायचे आहे. तुम्हाला अभिनय करत करत पाच हजार वर्षे झाली आहेत. बाबा समजावत आहेत, तुम्ही तुमचे घर सोडून पाच हजार वर्षे झाली आहेत. त्या मध्ये तुम्हीं भारतवासिनी 84 जन्म घेतले आहेत. हा तुमचा शेवटचा जन्म आहे, सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वांना जायचे आहे. गायन पण आहे, ज्ञानाचा सागर किंवा रुद्र. हा ज्ञान यज्ञ आहे. पतित पावन शिव आहेत, परमात्मा पण शिव आहेत. रुद्र नाव भक्तांनी ठेवले आहे. त्यांचे मूळ नाव एकच शिव आहे. शिवबाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत. ब्रह्मा एकच आहेत. हे पतित, मग तेच ब्रह्मा पावन बनत आहेत, तर फरिश्ता बनतात. जे सूक्ष्म वतन मध्ये दाखवितात,ते दुसरे ब्रह्मा नाहीत.ब्रह्मा एकच आहेत. हे व्यक्त, ते अव्यक्त. हे संपूर्ण पावन होतात मग सूक्ष्मवतन मध्ये दाखवितात. तिथे हाडे इत्यादी नसतात. जसे बाबांनी समजावले होते, ज्या आत्म्याला शरीर मिळत नाही, तर ते भटकत राहतात. त्याला भूत म्हटले जाते. जोपर्यंत शरीर मिळत नाही, तोपर्यंत भटकत राहतात. कांही चांगले असतात, कांही वाईट असतात. तर बाबा प्रत्येक गोष्ट समजावून सांगत आहेत. ते ज्ञानाचे सागर आहेत तर जरूर समजावून सांगतील ना.एका सेकंदा मध्ये जीवनमुक्ती मिळते. अल्फ आणि बे ची आठवण करा, तर सेकंदा मध्ये जीवनमुक्तीचा वारसा मिळेल. किती सहज आहे. नाव सहज राजयोग आहे. ते समजत आहेत, भारताचा योग हा होता. परंतु तो संन्याशींचा हठयोग आहे. हा तर फारच सहज आहे. योग म्हणजे आठवण. त्यांचा हठयोग आहे. हा सहज आहे. बाबा म्हणतात, मला या प्रकाराने आठवण करा. का़ंही लॉकेट इत्यादी घालण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तर मुले बाबाची आहात. बाबाची फक्त आठवण करा. तुम्हीं इथे अभिनय करण्यासाठी आले आहात. आता सर्वांना परत घरी जायचे आहे, मग तोच अभिनय करायचा आहे. भारतवाशी च सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्यवंशी, शुद्रवंशी बनत आहेत. त्या मध्ये इतर धर्म वाले पण येतात. तुम्ही 84 जन्म घेत आहात. मग तुम्हालाच नंबरवन मध्ये जायचे आहे. मग तुम्ही सतयुगा मध्ये जाल, तर इतर सर्व शांतीधाम मध्ये राहतील. इतर धर्मवाल्या चे वर्ण नाहीत. वर्ण भारता मध्येच आहेत. तुम्हीच सूर्यवंशी चंद्रवंशी बनत आहात. आता ब्राह्मण वर्णा मध्ये आहात. ब्रह्मा वंशी ब्राह्मण बनले आहात. या सर्व गोष्टी बाबा समजावत आहेत. ज्यांच्या बुद्धीमध्ये धारणा होऊ शकत नाही, त्यांना म्हणतात फक्त बाबाची आठवण करा. जसे पित्याला ओळखल्यामुळे मुलांना माहित पडते, ही मालमत्ता आहे. मुलींना तर वरसा मिळत नाही. इथे तुम्ही सर्व शिवबाबा ची मुले आहात, सर्वांचा हक्क आहे. स्त्री किंवा पुरुष सर्वांचा हक्क आहे. सर्वांना शिकवायचे आहे, शिवबाबाची आठवण करा. जेवढी आठवण कराल, तेवढे विकर्म विनाश होतील, पतिता पासून पावन बनाल. आत्म्यांमध्ये जी भेसळ पडली आहे, ती कशी निघेल? बाबा म्हणतात, योगानेच तुमची भेसळ नाहीशी होऊन जाईल. हे पतित शरीर तर इथेच सोडायचे आहे. आत्मा पवित्र बनून जाईल. सर्व मच्छरा सारखे जातील. बुद्धीला पण वाटते कि, सतयुगा मध्ये फार थोडे राहतात. या विनाशा मध्ये किती मनुष्य मरतील. बाकी थोडे जाऊन राहतील. राजे तर थोडेच राहतील, बाकी 9 लाख प्रजा सतयुगा मध्ये राहते. यावर गायन पण आहे कि, 9, लाख तारे, म्हणजे प्रजा. झाड प्रथम लहान असते, मग वृध्दीला प्राप्त होते‌. आता तर किती आत्मे आहेत. बाबा येऊन सर्वांचे मार्गदर्शक बनून, घेऊन जात आहेत. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) योग अग्नीने विकर्माची भेसळ भस्म करून पावन बनायचे आहे. आता वानप्रस्थ अवस्था आहे, त्यामुळे परत घरी जाण्यासाठी संपूर्ण सतोप्रधान बनायचे आहे.

(२) या कल्याणकारी युगा मध्ये बाबासारखे दु:खहर्ता सुखकर्ता बनायचे आहे.

वरदान:-
साधारणतेला समाप्त करुन महानतेचा अनुभव करणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव:

जे श्रेष्ठ पुरुषार्थी मुले आहेत त्यांचा प्रत्येक संकल्प महान असतो कारण त्यांचा प्रत्येक संकल्प, श्वासामध्ये स्वतःच बाबाची आठवण राहते. जसे भक्ती मध्ये म्हणतात कि, अनहद शब्द ऐकू येतात, अजपाजाप चालत राहतो, असा पुरुषार्थ निरंतर केल्याने, त्याला श्रेष्ठ पुरुषार्थ म्हटले जाते. आठवण करायची नाही, स्वतःच आठवण आली पाहिजे, तेंव्हा साधारणता नाहीशी होऊन जाईल आणि महानता येत राहील, हीच पुढे जाण्याची निशाणी आहे.

बोधवाक्य:-
मनन शक्तीद्वारे सागराच्या तळाला जाणारेच रत्नांचे अधिकारी बनतात.