09-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,शांत राहणे पण खूप मोठा गुण आहे,तुम्ही शांत राहून बाबांची आठवण करत
राहा,तर खूप कमाई जमा होत राहील"
प्रश्न:-
कोणते बोल
कर्म संन्यासला सिद्ध करतात,ते बोल तुम्ही बोलू शकत नाहीत?
उत्तर:-
या वैश्विक नाटकांमध्ये असेल तर,मी करेल,बाबा म्हणतात हा तर कर्मसंन्यास
झाला.तुम्हाला कर्म तर आवश्य करायचे आहेत.पुरुषार्था शिवाय तर पाणी पण मिळू शकत नाही
म्हणून ड्रामा(वैश्विक नाटक)म्हणून सोडायचे नाही. नवीन राजधानीमध्ये उच्च पद
मिळवायचे असेल तर खूप पुरुषार्थ करा.
ओम शांती।
प्रथम तर मुलांना सावधानी मिळते, बाबा ची आठवण करा आणि वारशाची आठवण करा, मनमनाभव.हे
अक्षरं व्यासने लिहिली आहेत. संस्कृत मध्ये तर बाबांनी समजवले नाही.बाबा तर
हिंदीमध्ये समजवतात,मुलांना म्हणतात की,बाबा आणि वारशाची आठवण करा.हे सहज अक्षरं
आहेत की,मुलांनो मज पित्याची आठवण करा.लौकिक पिता असे कधी म्हणणार नाहीत की,मुलांनो
मज पित्याची आठवण करा,तर ही नवीन गोष्ट आहे. बाबा म्हणतात मुलांनो आपल्या निराकार
पित्याची आठवण करा.हे पण मुलं समजतात की,आत्मिक पिता,आम्हा आत्म्याशी गोष्टी करत
आहेत.नेहमी मुलांना म्हणतात की,पित्याची आठवण करा, हे शोभत नाही.आमचे कर्तव्य आहे
आत्मिक पित्याची आठवण करणे,तेव्हाच विकर्म विनाश होतील.मुलांना निरंतर आठवण
करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.या वेळेत कोणी निरंतर आठवण करू शकत नाही,त्यासाठी
वेळ लागतो. बाबा(ब्रह्मा)पण म्हणतात मी पण निरंतर आठवण करू शकत नाही,ती अवस्था तर
अंत काळामध्ये होईल.तर मुलांना प्रथम पुरुषार्थ बाबांची आठवण करण्याचा करायचा
आहे.शिव बाबा द्वारे वारसा मिळतो.भारतवासींच गोष्ट आहे. ही स्थापना होत आहे,दैवी
राजधानीची,बाकी जे धर्म स्थापन करतात, त्यामध्ये काही अवघड नाही, त्याच्यानंतर येत
राहतात.येथे देवी-देवता धर्माचे जे आहेत त्यांना ज्ञानाद्वारे समजावून सांगावे लागते,
कष्ट लागतात. गीता-भागवत ग्रंथांमध्येही नाही की,बाबा संगमयुगा मध्ये येतात आणि
राजधानी स्थापन करतात.गीतेमध्ये लिहिले आहे पांडव डोंगरावरती गेले,प्रलय
झाला,इत्यादी. वास्तव मध्ये अशा गोष्टी नाहीत.तुम्ही आत्ता भविष्य २१ जन्मासाठी
शिकत आहात.बाकी त्या शाळेमध्ये तर या जन्मासाठीच शिकत राहतात.साधुसंत इत्यादी जे पण
आहेत,ते भविष्यासाठी शिकतात कारण ते समजतात आम्ही हे शरीर सोडून मुक्तिधाम मध्ये
चालले जाऊ, ब्रह्म मध्ये विलीन होऊ.आत्मा परमात्म्या मध्ये विलीन होईल. ते पण
भविष्यासाठी झाले परंतु भविष्यासाठी शिकवणारे तर एकच आत्मिक पिता आहेत,दुसरे कोणी
नाही. गायन पण आहे, जे सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत. हे बाबाच समजवतात.ते पण साधना
करत राहतात. ब्रह्ममध्ये विलीन होण्याची साधना आहे.विलीन तर कोणी होत नाही.ब्रह्म
तर काही भगवान नाहीत.हे सर्व चुकीचे आहे. खोट्या खंडांमध्ये सर्व खोटेच बोलणारे
आहेत, सत्य खंडांमध्ये सर्व सत्य बोलणारे आहेत. तुम्ही जाणतात सत्य खंड भारतामध्येच
होता. आता खोटा खंड आहे.बाबा पण भारतामध्येच येतात.शिवजयंती साजरी करतात परंतु ते
थोडेच जाणतात की, शिवाने येऊन भारताला सत्य खंड बनवले आहे.ते समजतात येतच नाहीत, ते
तर नावारूपा पेक्षा वेगळे आहेत.फक्त महिमा जे गायन करतात, पतित-पावन ज्ञानाचे सागर,
तर असेच पोपटासारखे म्हणतात. बाबा येऊन समजवतात,कृष्ण जयंती साजरी करतात. गीता जयंती
पण आहे,असे म्हणतात कृष्णाने येऊन गीता ऐकवली. शिवजयंती चे कोणालाही माहिती नाही
की, शिव येऊन काय करतात.येतील पण कसे? जेव्हा म्हणतात ना,ते नावा रूपापेक्षा वेगळे
आहेत.बाबा म्हणतात मीच मुलांना समजावतो, परत हे ज्ञान प्राय:लोप होते.बाबा स्वतः
सांगतात मी येऊन भारताला स्वर्ग बनवतो. कोणीतरी पतित-पावन असतील ना. मुख्य भारताचीच
गोष्ट आहे.भारतच पतित आहे, पतित-पावनलाच भारतामध्ये बोलतात.ते स्वतः म्हणतात
विश्वामध्ये आसुरांचे राज्य चालत आहे, बॉम्ब इत्यादी बनवत राहतात, त्याद्वारे विनाश
होणार आहे. तयारी पण करत आहेत. जसे ते रावणाने प्रेरित केलेले आहेत.रावणाचे राज्य
कधी खलास होईल? भारतवासी म्हणतात जेव्हा कृष्ण येतील,तुम्ही समजतात शिव बाबा आले
आहेत, ते सर्वांचे सद्गती दाता आहेत.बाबा म्हणतात माझी आठवण करा,ही अक्षरं दुसरे
कोणी म्हणू शकत नाहीत. बाबा म्हणतात माझी आठवण करा,तर आत्म्या मधील भेसळ निघून
जाईल.तुम्ही सतोप्रधान होते,आता तुमच्या मध्ये अशुध्दी झाली आहे, ती आठवणी द्वारे
निघेल.यास आठवणी ची यात्रा म्हटले जाते. मी पतित पावन आहे माझी आठवण केल्यामुळेच
तुमच्या विकर्माचा विनाश होईल.याला योग अग्नी म्हटले जाते.सोन्याला अग्नी मध्ये
घालून त्याच्यातून भेसळ बाहेर काढतात.परत सोन्यामध्ये भेसळ करण्यासाठी पण अग्नी
मध्ये टाकतात.बाबा म्हणतात,ती कामचिता आहे आणि ही ज्ञान चिता आहे.या योग अग्नी
द्वारे भेसळ,अशुध्दी निघेल आणि तुम्ही कृष्णपुरी मध्ये जाण्यासाठी लायक बनाल.कृष्ण
जयंती दिनी कृष्णाला बोलवतात. तुम्ही जाणतात कृष्णाला पण शिव पित्याकडून वारसा
मिळतो.कृष्ण स्वर्गाचे मालक होते.बाबांनी कृष्णाला हे पद दिले आहे.राधा-कृष्णच परत
लक्ष्मी-नारायण बनतात.राधा कृष्णा चा जन्मदिवस साजरा करतात. लक्ष्मी नारायण बद्दल
कोणालाच माहिती नाही.मनुष्य अगदीच गोंधळून गेले आहेत.आता तुम्ही मुलं समजता तर
दुसऱ्याला समजावून सांगायचे आहे. प्रथम विचारायचे आहे,गीतेमध्ये जे आहे,माझीच आठवण
करा,हे कोणी म्हटले.ते समजतात कृष्णाने म्हटले आहे.तुम्ही समजतात निराकार भगवंताने
म्हटले आहे,त्यांच्या कडूनच उच्च अर्थातच श्रेष्ठ पद मिळते. उच्च ते उच्च परमपिता
परमात्माच आहेत. त्याच्याच जरूर श्रेष्ठ ते श्रेष्ठ मताचे गायन आहे.त्या एकाच्या
श्रीमता द्वारे सर्वांचे सद्गती होते.गीतेचे भगवान ब्रह्मा विष्णू शंकर ला पण म्हणू
शकत नाहीत.ते परत शरीरधारी श्रीकृष्णला म्हणतात.तर याद्वारे सिद्ध होते की कुठेतरी
चूक जरूर आहे.तुम्ही समजता मनुष्यांची खूप मोठी चूक आहे. राजयोग तर बाबांनी शिकवला
आहे, तेच पतित-पावन आहेत.ज्या मोठ्या चूका झालेल्या आहेत,त्या सुधारण्यासाठी जोर
द्यायचा आहे.एक तर ईश्वराला सर्वव्यापी समजणे,दुसरे परत गीतेच्या भगवंताला कृष्ण
समजणे,परत कल्प लाखो वर्षाचे समजणे,या मोठ्या चुका आहेत. कल्प तर लाखो वर्षाचा होऊ
शकत नाही आणि परमात्मा पण सर्वव्यापी होऊ शकत नाहीत.असे म्हणतात ते प्रेरणा द्वारे
सर्व काही करतात परंतु नाही.प्ररणे द्वारे थोडेच पावन बनू शकतात.हे तर बाबा सन्मुख
समजवतात माझीच आठवण करा. प्रेरणा अक्षर चुकीचे आहे.जरी म्हटले जाते शंकराच्या
प्रेरणे द्वारे बॉम्बस इत्यादी बनवतात.हे पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.या यज्ञा
द्वारेच विनाश ज्वाला प्रज्वलित होते.प्रेरणा द्वारे करत नाहीत.हे तर विनाशासाठी
निमित्त बनले आहेत.हे पण अनादि नाटकांमध्ये नोंद आहे.शिवबाबांची सर्व भूमिका
आहे.त्यांच्या नंतर ब्रह्मा विष्णू शंकर ची भूमिका आहे.ब्रह्माच ब्राह्मणांची रचना
करतात,तेच परत विष्णुपुरी चे मालक बनतात.परत ८४ चे चक्र लावून तुम्ही येऊन
ब्रह्मावंशी बनले आहात.लक्ष्मीनारायणाच परत येऊन ब्रह्मा-सरस्वती बनतात. हे पण
समजवले आहे की,यांच्याद्वारे दत्तक घेतात म्हणून यांना मोठी मम्मा म्हटले जाते.ती
परत निमित्त बनली आहे. ज्ञानाचा कलश मातांना दिला जातो. सर्वात मोठी विना सरस्वतीला
दिली आहे.सर्वात हुशार आहे.बाकी विना इत्यादी काहीच नाही.सरस्वतीची ज्ञान मुरली
चांगली होती.महिमा पण त्यांचीच होते.नावे तर खूप दिली आहेत.देवींची पूजा होते.तुम्ही
आता जाणतात,आम्ही येथेच पुज्य बनतो, परत पुजारी बनवून आपलीच पूजा करतो.आता आम्ही
ब्राह्मण आहोत परत आम्हीच पूजा देवी-देवता बनू.यथा राजा राणी तथा प्रजा.देवी मध्ये
पण जे उच्च पद मिळवतात,तर मंदिर पण त्यांचे अनेक बनतात,नाव पण त्यांचे प्रसिद्ध
होते,जे चांगल्या रीतीने शिक्षण घेतात,आणि शिकवतात.तर आता तुम्ही जाणतात, पुज्य
पुजारी आम्हीच बनतो.शिवबाबा तर नेहमीच पुज्य आहेत.सूर्यवंशी देवी-देवताच होते,तेच
पुजारी परत भक्त बनतात.स्वतः पुज्य आणि स्वतःच पुजारीची शिडी पण खूप चांगल्या रीतीने
समजवतात.चित्रा शिवाय तुम्ही कोणालाही समजावू शकतात.जे शिकून जातात त्यांच्या बुद्धी
मध्ये सर्व ज्ञान आहे.८४ जन्माचे सीडी भारत वासीच चढतात,उतरतात.त्यांचेच ८४ जन्म
आहेत.पुज्य होतो,परत आम्हीच पुजारी बनलो. हा हम सो, सो हम चा अर्थ पण तुम्ही
चांगल्या रीतीने समजतात.आत्मा-परमात्मा तर होऊ शकत नाही. बाबांनी हम सो, सोहम चा
अर्थ पण समजावला आहे.आम्हीच देवता, क्षत्रिय,परत पुजारी,परत ब्राह्मण बनतो.हम सो,
सोहम चा दुसरा अर्थ कोणताच नाही.पुजारी आणि पुज्य पण भारतवासीच बनतात.दुसऱ्या धर्मा
मध्ये कोणी पूज्य पुजारी बनत नाहीत. तुम्हीच सूर्यवंशी चंद्रवंशी बनतात, ही समज खूप
चांगली मिळाली आहे. आम्हीच देवी-देवता होतो,आम्ही आत्मेच निर्वाण धाम मध्ये राहणारे
आहोत.हे चक्र फिरत राहते.जेव्हा दुःख समोर येते तर बाबांची आठवण करतात.बाबा म्हणतात
मीच दुःखाच्या वेळेत येऊन सृष्टीला बदलतो.असे नाही की नवीन सृष्टी ची स्थापना करतो,
नाही.जुन्याला नवीन बनवण्यासाठी मी येतो.बाबा संगमयुगा मध्ये येतात.आता नवीन दुनिया
बनत आहे आणि जुनी दुनिया नष्ट होत आहे.ही बेहद्दची गोष्ट आहे.
तुम्ही तयार होऊन जाल, तर सारी राजधानी पण तयार होईल.कल्प कल्प ज्यांनी जे पद
मिळवले,त्यानुसार पुरुषार्थ करत राहतात.असे नाही की वैश्विक नाटकांमध्ये पुरुषार्थ
केला असेल तर होईल.पुरुषार्थ करावा लागतो,परत म्हटले जाते कल्पापूर्वी पण असाच
पुरुषार्थ केला होता.नेहमी पुरुषार्थ ला पुढे केले जाते.भाग्यावरती अवलंबून राहायचे
नाही.पुरुषार्था शिवाय प्रारब्ध मिळू शकत नाही. पुरुषार्थ केल्याशिवाय पाणी पण मिळू
शकत नाही.कर्मसंन्यास अक्षर चुकीचे आहे.बाबा म्हणतात ग्रहस्थ व्यवहारांमध्ये
राहा.बाबा सर्वांना येथे तर बसवून ठेवणार नाहीत.शरणार्थीचे गायन केलेले आहे.भट्टी
बनणार होती म्हणून त्यांना तंग केले गेले.तर त्यांनी येऊन बाबांच्या जवळ शरण घेतली.
शरण तर द्यावी लागेल ना.शरण एक परमपिता परमात्मा कडूनच घेतली जाते.गुरु इत्यादीची
शरण घेतली जाते. जेव्हा खूप दुःखी होतात,तर तंग होऊन शरण घेतात.गुरूच्या जवळ कोणी
तंग होऊन जात नाहीत.तुम्ही रावणा पासून खुप तंग झाले आहात.आता रावणा पासून
सोडवण्यासाठी राम आले आहेत,तर तुम्हाला शरण मिळते.तुम्ही म्हणतात बाबा,आम्ही आपले
झाले आहोत.ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत शरण शिवबाबांची घेतली आहे.बाबा आम्ही
आपल्याच मतावर चालू. बाबा श्रीमत देतात,ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत माझी आठवण करा
आणि सर्वांची आठवण सोडून द्या.माझ्या आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील फक्त शरण
घेण्याची गोष्ट नाही.सर्व आठवणी वरती अवलंबून आहे.बाबां शिवाय कोणी असे समजू शकत
नाही. मुलं समजतात,बाबांच्या जवळ इतके लाखो येऊन कुठे राहतील? प्रजा पण आप आपल्या
घरी राहते.प्रजा ला पण आपले घर असते ना.राजांच्या जवळ थोडेच राहतात.तर तुम्हाला
फक्त म्हटले जाते,एकाची आठवण करा.आम्ही आपले आहोत.तुम्ही सेकंदा मध्ये सद्गती चा
वारसा देणारे आहात.राजयोग शिकवून राजांचे राजा बनवतात.बाबा म्हणतात,ज्यांनी
कल्पापुर्वी पण बाबा पासून वारसा घेतला होता.तेच घेतील.अंत काळात सर्वांना सर्व
येऊन बाबा पासून वारसा घ्यायचा आहे.आता तुम्ही पतित झाल्यामुळे स्वतःला देवता म्हणू
शकत नाहीत.बाबा सर्व गोष्टी समजवतात,म्हणतात माझ्या डोळ्यातील ताऱ्यांनो,जेव्हा
तुम्ही सतयुगामध्ये येता,तर तुम्ही १/१/१ पासून राजाई करतात.दुसर्या धर्माची तर
वृद्धी होऊन,जेव्हा लाखांच्या अंदाजामध्ये होते,तेव्हा राजाई चालू होते.तुम्हाला तर
लढाई इत्यादी करण्याची आवश्यकता नाही.तुम्ही योग बळा द्वारे बाबा पासून वारसा घेत
आहात.शांती मध्ये राहून बाबांची आणि वारशाची आठवण करा.अंत काळामध्ये तुम्ही शांत
राहाल,परत हे चित्र इत्यादी कामाला येणार नाहीत.तुम्ही हुशार बनाल.बाबा म्हणतात
फक्त माझी आठवण करा,तर विकर्म विनाश होतील.आता करा, न करा तुमची मर्जी.कोणत्या
देहधारीच्या नावरुपा वरती फसायचे नाही.बाबांची आठवण करा,तर अंत मती सो गती
होईल.तुम्ही माझ्या जवळ याल.चांगल्या मार्काने पास होणाऱ्यांना च राजाई मिळेल.सर्व
आठवणीच्या यात्रेवरती अवलंबून आहे. पुढे चालून नवीन मुलं पण खूप पुढे जातील,अच्छा.
गोड गोड फार फार वर्षापूर्वी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) कोणत्याही
देहधारीच्या नावा रूपामध्ये फसवायचे नाही.एका बाबांच्या श्रीमतावरती चालून सद्गतीला
प्राप्त करायचे आहे.शांत राहायचे आहे.
(२) भविष्य २१ जन्मासाठी चांगल्या रितीने शिकून दुसऱ्यांना पण शिकवायचे आहे. शिकणे
आणि शिकवणे द्वारे नाव प्रसिद्ध होईल.
वरदान:-
आपले
स्वस्वरूप आणि स्वदेशाच्या स्वमानामध्ये स्थिर राहणारे मास्टर मुक्तिदाता भव.
आज कालच्या
वातावरणामध्ये प्रत्येक आत्मा कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या बंधनाच्या वश आहेत.
काही तनाच्या दुःखाच्या वशीभूत आहेत,काही संबंधाच्या, काही इच्छाच्या,कोणी आपल्या
दुःखदाई स्वभाव संस्काराच्या, कोणी प्रभूप्राप्ती न झाल्यामुळे
ओरडतात,बोलवतात,दुःखाच्या वशीभूत होतात,असेच दुःख अशांतीच्या वश आत्मे स्वतःला
मुक्त करू इच्छितात,तर त्यांना दुखमय जीवनापासून मुक्त करण्यासाठी आपल्या स्व
स्वरूप आणि स्वदेशाच्या स्वमाना मध्ये सत्तेत राहून दयाळू बनून मास्तर मुक्तिदाता
बना.
बोधवाक्य:-
नेहमी अचल
अडोल राहण्यासाठी एकरस स्थितीच्या आसनावरती विराजमान रहा.