27-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो-आठवणीच्या यात्रेमधे स्पर्धा कराल तर पुण्य आत्मा बनाल,स्वर्गाची बादशाही मिळेल"

प्रश्न:-
ब्राह्मण जीवनात जर अतिंद्रीय सुखाचा अनुभव होत नसेल तर काय समजायला पाहिजे?

उत्तर:-
जरुर सूक्ष्म मध्ये काही ना काही पाप होतात. देह-अभिमानात राहील्यानेच पाप होतात,ज्या कारणाने त्या सुखाची अनुभूती करु शकत नाही.स्वतःला गोप गोपी समजत असूनही अतिंद्रीय सुखाची भासना येत नाही,अवश्‍य काही चूक होते त्यामुळे बाबांना खरे सांगून श्रीमत घेत रहा.

ओम शांती।
निराकार भगवानुवाच. आता निराकार भगवान म्हटले जाते शिवाला,त्यांची नावे भले भक्ती मार्गात किती तरी ठेवली आहेत,खूप नावे आहेत म्हणून तर विस्तार आहे.बाबा स्वतः येऊन सांगतात की हे मुलांनो,मज आपल्या पिता शिवाची तुम्ही आठवण करत आले आहात-हे पतित-पावन,नाव तर अवश्य एकच असेल.अनेक नावे चालू शकत नाही.शिवाए नम: म्हणतात तर एकच शिव नाव झाले.रचता पण एक झाला.अनेक नावांनी तर गोंधळून जातात.जसे तुझे नाव पुष्पा आहे त्याच्या बदल्यात तुला शीला म्हटले तर तू प्रतिसाद देशील?नाही.समजशील दुसऱ्या कोणाला बोलवत आहे.ही पण अशीच गोष्ट झाली.त्याचे नाव एक आहे परंतु भक्तीमार्ग असल्या कारणाने,अनेक मंदिरे बनवल्यामुळे वेगवेगळी नावे दिली आहेत.नाही तर नाव प्रत्येकाचे एक असते.गंगा नदीला यमुना नदी म्हणणार नाही. कोणत्याही वस्तूचे एक नाव प्रसिद्ध असते.हे शिव नाव ही प्रसिद्ध आहे.शिवाए नम:गायले आहे.ब्रह्मा देवताए नम:,विष्णु देवताए नम:,नंतर म्हणतात शिव परमात्माए नम: कारण तो आहे उच्च ते उच्च.मनुष्याच्या बुद्धी मध्ये राहते उच्च ते उच्च निराकाराला म्हणतात.त्यांचे नाव एकच आहे.ब्रह्माला ब्रह्मा,विष्णुला विष्णुच म्हणतात. अनेक नावे ठेवल्याने गोंधळून जातात.प्रतिसादही मिळत नाही आणि त्यांच्या स्वरूपाला ही जाणत नाहीत.बाबा मुलांशीच येऊन बोलतात.शिवाए नम: म्हणतात तर एक नाव ठीक आहे. शिव शंकर म्हणणे पण चूकीचे होऊन जाते.शिव,शंकर नाव वेगळे आहे.जसे लक्ष्मी-नारायण नाव वेगवेगळे आहे.तिथे नारायणाला तर लक्ष्मी-नारायण म्हणणार नाही.आजकाल तर स्वतःची दोन-दोन नावे ठेवतात. देवतांच्या वर अशी डबल नावे नव्हती.राधेचे वेगळे,कृष्णाचे वेगळे,इथे तर एकाचेच नाव राधाकृष्ण,लक्ष्मीनारायण ठेवतात.बाबा बसून समजावत आहेत रचता एकच आहे,त्यांचे नावही एक आहे.त्यांनाच जाणायचे आहे.म्हणतात आत्मा एक तार्‍या सारखी आहे,भ्रकुटी च्या मध्ये चमकतो सितारा परत म्हणतात आत्मा सो परमात्मा. तर परमात्मा ही तारा झाला ना. असे नाही की आत्मा छोटी किंवा मोठी होते.गोष्टी खूप सहज आहेत.

बाबा म्हणतात तुम्ही बोलवत होता की हे पतित-पावन ये.परंतु तो पावन कसे बनवतो,कोणीही जाणत नाही.गंगेला पतित-पावनी समजतात.पतित-पावन तर एकच बाबा आहे.बाबा म्हणतात मी आधी पण सांगितले होते- मनमनाभव,मामेकम (माझी) आठवण करा.फक्त नाव बदलले आहे.मुले समजतात की बाबांची आठवण केल्याने वारसा मिळणारच आहे.मनमनाभव म्हणण्याची ही गरज नाही.परंतु बिल्कुलच बाबांना आणि वारसाही विसरून गेले आहेत म्हणून म्हणतो मज पित्याची आणि वारसा ची आठवण करा. बाबा आहे स्वर्गाचा रचता तर अवश्य बाबांची आठवण करुन आम्हाला स्वर्गाची बादशाही मिळेल.मुलगा जन्माला आला आणि पिता म्हणेल वारस आला. मुलीसाठी असे म्हणणार नाही. तुम्ही आत्मे तर सर्व मुलेच आहात.म्हणतात ही आत्मा एक तारा आहे.मग अंगठयासारखी कशी असेल.आत्मा एवढी सूक्ष्म वस्तू आहे,या डोळ्यांनी दिसत नाही.हो त्याला दिव्य दृष्टीने पाहू शकतो कारण अव्यक्त वस्तू आहे. दिव्य दृष्टीतून चैतन्य पाहता आले परत गायब झाले.मिळाले तर काहीच नाही,फक्त खुश होतात.याला म्हणतात भक्तीचे अल्प सुख.हे आहे भक्तीचे फळ.ज्याने खूप भक्ती केली आहे त्याला आपोआपच कायद्याप्रमाणे या ज्ञानाचे फळ मिळते.ब्रह्मा आणि विष्णू एकत्र दाखवतात.ब्रह्मा सो विष्णू,भक्तीचे राजाईचे फळ विष्णूच्या रुपात मिळत आहे. विष्णू किंवा कृष्णाचा साक्षात्कार तर खूप केला असेल.परंतु समजले जाते-वेगवेगळ्या नावा रूपात भक्ती केली आहे. साक्षात्काराला योग किंवा ज्ञान म्हटले जात नाही.नौधा भक्तीने साक्षात्कार झाला.आता साक्षात्कार नाही झाला तरी हरकत नाही.एम ऑब्जेक्ट(उद्दीष्ट)आहेच मनुष्यापासून देवता बनण्याचे.तुम्ही देवी-देवता धर्माचे बनता.बाकी पुरूषार्थ करवण्यासाठी बाबा फक्त म्हणतात इतरांच्या संगतीपासून बुद्धीचा योग हटवून,देहापासूनही हटवून बाबांची आठवण करा.

ज्याप्रमाणे आशिक माशूक(प्रेमी युगल)कामही करतात परंतु मन माशूक(प्रियकरा)कडे लागलेले असते.बाबा पण म्हणतात माझी आठवण करा तरीही बुद्धी इकडे- तिकडे धावते.आता तुम्ही जाणता आपणाला उतरायला एक कल्प लागला आहे.सतयुगा पासून शिडी उतरतात.थोडी-थोडी खाद(कट)पडत जाते.सतोपासून तमो बनतात.परत आता तमो पासून सतो बनण्यासाठी बाबा उडी मारायला लावतात.सेकंदात तमोप्रधान पासून सतोप्रधान बनतात. तर गोड-गोड मुलांना पुरूषार्थ करावा लागेल.बाबा तर शिकवण देतच राहतात.चांगली-चांगली संवेदनशील मुले स्वतः अनुभव करतात-खरच खूप कठीण आहे. कोणी सांगितात,कोणी तर बिल्कुल सांगत नाहीत.आपली अवस्था सांगितली पाहिजे.बाबांची आठवणच करत नाही तर वारसा कसा मिळेल. कायद्याप्रमाणे आठवणच करत नाहीत समजतात आम्ही तर शिवबाबांचे आहोतच. आठवण न केल्याने घसरतात. बाबांची निरंतर आठवण केल्याने खाद (कट)निघते,लक्ष द्यावे लागते.जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत पुरुषार्थ चालत राहील. बुद्धी ही म्हणते-आठवण सारखी -सारखी विसरली जाते.या योगबळाने तुम्ही बादशाही प्राप्त करता.सगळे तर एकसारखी धाव घेऊ शकत नाही,कायदा नाही. स्पर्धेत पण जरासा फर्क पडतो. प्रथम क्रमांक,नंतर अधिक पुढे येतात.इथे पण मुलांची स्पर्धा आहे.मुख्य गोष्ट आहे आठवण करण्याची.हे तर समजता आपण पाप आत्म्याचे पुण्य आत्मा बनत आहे.बाबांनी मार्गदर्शन दिले आहे,आता पाप केले तर ते शंभर गुणा होईल.खूप आहेत जे पाप करतात,सांगत नाहीत.परत वृध्दी होत जाते.नंतर शेवटी नापास होतात.सांगायला लाज वाटते. खरे न सांगितल्याने स्वत:ला धोका देतात.कोणाला भिती वाटते-बाबांनी आमची ही गोष्ट ऐकली तर काय म्हणतील.कोणी तर छोटी चूकही सांगायला येतात.परंतु बाबा त्यांना म्हणतात,मोठ्या-मोठ्या चूका तर खूप चांगली-चांगली मुलेही करतात.चांगल्या-चांगल्या महारथींना पण माया सोडत नाही.माया पहलवानांनाच चक्रा मध्ये आणते,यामध्ये बहादूर बनावे लागेल.खोटे तर चालू शकत नाही.खरे सांगून हल्के व्हाल.किती बाबा समजावतात तरीपण काही ना काही चालतच राहते.अनेक प्रकारच्या गोष्टी होत राहतात.आता जर बाबां कडून राज्य घ्यायचे आहे तर बाबा म्हणातात की बुद्धि दुसरीकडून हटवा.तुम्हा मुलांना आता ज्ञान मिळाले आहे ,पाच हजार वर्षापूर्वी भारत स्वर्ग होता.तुम्ही आपल्या जन्मांना पण जाणले आहे.कोणाचा उलटा सुलटा जन्म होतो,त्याला सदोष म्हटले जाते. आपल्या कर्मानुसारच असे होते. बाकी मनुष्य तर मनुष्यच असतात.तर बाबा समजावतात की एक तर पवित्र राहायचे आहे, दूसरे खोटे,पाप काही करायचे नाही.नाही तर खूप नुकसान होईल.पहा एकाकडून थोडी चूक झाली,आला बाबांकडे.बाबा क्षमा करा.असे काम परत कधी करणार नाही.बाबा म्हणतात अश्या चूका अनेकांकडून होतात, तुम्ही तर खरे सांगता,काही तर सांगतच नाहीत.काही-काही खूप चांगल्या मुली आहेत,कुठे ही कधी बुद्धि जात नाही.जशी मुंबई मध्ये निर्मला डॉक्टर आहे, नंबरवन बिल्कुल साफ मन, मनात कधी उलटा विचार येणार नाही त्यामुळे हृदयाजवळ आहे. अशा अजूनही मुली आहेत.तर बाबा समजावतात फक्त खऱ्या मनाने बाबांची आठवण करा. कर्म तर करायचे आहे.बुद्धियोग बाबांशी लावा.हाथ कामाकडे मन बाबांकडे.ती अवस्था नंतरची आहे.ज्याचे गायन आहे- अतिंद्रीय सुख गोप गोपिंना विचारा जे या अवस्थेला प्राप्त करतात.जे पाप कर्म करतात त्यांची ही अवस्था होत नाही. बाबा चांगल्याप्रकारे जाणतात म्हणून तर भक्ती मार्गातही चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ मिळते.देणारा तर बाबा आहे ना. जे कोणाला दु:ख देतील तर अवश्य दु:ख भोगतील.जसे कर्म केले आहे तसे तर भोगावेच लागेल.इथे तर बाबा स्वत:च हजर आहे,समजावत राहतात तरीपण शासन आहे,धर्मराज तर माझ्या सोबत आहे ना.यावेळी माझ्या पासून काही लपवू नका.असे नाही की बाबा जाणतात,आम्ही शिवबाबां कडून मनामध्ये क्षमा मागतो,नशीबात नाही तर असेच होत राहते.खोटे कधी लपू शकत नाही.बाबा तरीही मुलांना समजावतात.कौडी चोर तो लाखाचा चोर म्हणतात यामुळे सांगितले पाहिजे ना की आमच्या कडून हा गुन्हा झाला.जेंव्हा बाबा विचारतात तेंव्हा सांगतात चूक झाली,स्वतःच का नाही सांगत. बाबा जाणतात खूप मुले लपवतात.बाबांना सांगितल्याने श्रीमत मिळेल.कुठून चिठ्ठी येते विचारा काय उत्तर द्यायचे आहे. सांगितल्याने श्रीमत मिळेल. अनेकां मध्ये खूप खराब सवय आहे-तर ते लपवतात.कोणाला लौकिक घरातून मिळते.बाबा म्हणतात भले वापरा तर बाबा जबाबदार झाले.अवस्था पाहून कोणाला म्हणतात यज्ञात पाठवा.तुम्हाला बदलून देईल तर ठीक आहे,नाही तर ते आठवत राहील.बाबा खूप खबरदार करतात.मार्ग खूप उच्च आहे. पदोपदी डॉक्टरचे मत घ्यायचे आहे.बाबा शिकवण देतील की अशी-अशी चिठ्ठी लिहा तर बाण लागेल,परंतु देह-अभिमान अनेकांमध्ये आहे.श्रीमता वर न चालून आपल खाते खराब करतात.श्रीमता वर चालण्याने प्रत्येक परिस्थितीत फायदा आहे. रस्ता किती सहज आहे.फक्त आठवणीने तुम्ही विश्वाचे मालक बनता.वृध्द महिलांना म्हणतात फक्त बाबा आणि वारसा ची आठवण करा.प्रजा नाही बनवत तर राजा राणी पण बनू शकत नाही.तरीही जे लपवतात,त्यांच्यापेक्षा उच्च पद मिळवू शकतात.बाबांचे कर्तव्य आहे समजावणे.कोणी परत असे म्हणायला नको की आम्हाला माहीत नव्हते.बाबा सर्व मार्गदर्शन देतात.चूक लगेच सांगितली पाहिजे.हरकत नाही,परत करु नका.याच्यात घाबरण्याचे कारण नाही.प्रेमाने समजावले जाते. बाबांना सांगण्यात कल्याण आहे. बाबा लाडाने प्रेमाने समजावतील.नाही तर मनातून एकदम उतरतील.यांच्या मनातून उतरला तर शिवबाबांच्या मनातून पण उतरला.असे नाही की आपण डायरेक्ट घेऊ शकतो, काहीच होणार नाही.जेवढे समजावले जाते-बाबांची आठवण करा,तेवढी बुद्धि बाहेर धावत राहते.या सर्व गोष्टी बाबा डायरेक्ट बसून समजावतात, ज्यांचे नंतर शास्त्र बनतात.यात गीताच भारताचे सर्वोत्तम शास्त्र आहे.गायले पण आहे सर्वशास्त्रमई शिरोमणी गीता,जी भगवानाने गायली.बाकी सर्व धर्म तर नंतर येतात.गीता झाली माता-पिता,बाकी सर्व झाली मुले. गीतेमधेच भगवानुवाच आहे. कृष्णाला तर दैवी संप्रदाय म्हणू शकतो.देवता तर फक्त ब्रह्मा विष्णू शंकर आहेत.भगवान तर देवतांपेक्षा उच्च झाला.ब्रह्मा विष्णू शंकर तिघांना रचणारा शिवच आहे.बिल्कुल स्पष्ट आहे. ब्रह्मा द्वारे स्थापना,असे तर कधी म्हणत नाही कृष्णा द्वारे स्थापना. ब्रह्माचे रूप दाखवले आहे.कशाची स्थापना? विष्णूपुरीची.हे चित्र तर मनात छापले गेले पाहिजे.आपण शिवबाबां कडून यांच्या द्वारे वारसा घेतो.बाबां शिवाय दादेचा (आजोबांचा)वारसा मिळू शकत नाही.जेंव्हा कोणीही भेटले तर हे सांगा की बाबा म्हणतात मामेकम (माझी)आठवण करा.अच्छा.

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१ ) लक्ष्य खूप मोठे आहे यामुळे पदोपदी डॉक्टरचे मत घ्यायचे आहे.श्रीमता वर चालण्याने फायदा आहे,बाबां पासून काही लपवायचे नाही.

२) देह आणि देहधारीं पासून बुद्धिचा योग हटवून एक बाबांशी लावायचा आहे.कर्म करताना ही एक बाबांच्या आठवणीत राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
शक्तींच्या किरणां द्वारे कमी,कमजोरी रूपी चिखलाला भस्म करणारे मास्टर ज्ञान सूर्य भव

जी मुले ज्ञान सूर्या प्रमाणे मास्टर सूर्य आहेत ते आपल्या शक्तींच्या किरणांनी कोणत्याही प्रकारचा चिखल अर्थात कमी व कमजोरी, सेकंदात भस्म करतात.सूर्याचे काम आहे चिखलाला असे भस्म करणे ज्याद्वारे नाव,रूप,रंग सदाकाळासाठी समाप्त होऊन जाईल.मास्टर ज्ञान सूर्याची प्रत्येक शक्ती खूप कमाल करू शकते पण वेळेवर वापरता आली पाहिजे.ज्या वेळी ज्या शक्तीची गरज असेल त्या वेळी त्या शक्तीचा वापर करा आणि सर्वांच्या कमजोरींना भस्म करा तेंव्हाच म्हणतील मास्टर ज्ञान सूर्य.

बोधवाक्य:-
गुणमूर्त बनून आपल्या जीवन रुपी फुलदाणी मध्ये दिव्यतेचा सुगंध पसरवा.