03-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही खऱ्या खऱ्या सत्य बाबाकडून सत्य कथा ऐकून नरापासून नारायण बनतात, तुम्हाला २१ जन्मासाठी बेहद्दच्या बाबा कडून वारसा मिळतो"

प्रश्न:-
कोणत्या आज्ञेचे पालन करणारे मुलंच पारसबुद्धी बनतात?

उत्तर:-
बाबांची आज्ञा आहे,देहाच्या सर्व संबंधाना विसरून बाबांची आठवण करा,हीच सद्गती साठी सद्गुरूची श्रीमत आहे.जे या श्रीमताचे पालन करतात,म्हणजेच देही अभिमानी बनतात,तेच पारस बुद्धी बनतात.

गीत:-

आज अंधारामध्ये आहेत मनुष्य…

ओम शांती।
ही कलियुगी दुनिया आहे.सर्व अज्ञान अंधारामध्ये आहेत.हाच भारत ज्ञान प्रकाशामध्ये होता.जेव्हा हा भारत स्वर्ग होता.हे भारतवासी आत्ता स्वतःला हिंदू म्हणतात,वास्तविक देवी-देवता होते.भारतवासी स्वर्गवासी होते. तेव्हा कोणता धर्म नव्हता,एकच धर्म होता.स्वर्ग, वैकुंठ,बहिश्त,हेवन सर्व भारताचीच नावे आहेत.भारत प्राचीन,पवित्र,खूप खूप धनवान होता,आता तर भारत कंगाल आहे कारण आता कलियुगी आहे.ते सतयुग होते.तुम्ही सर्व भारतवासी होते.तुम्ही जाणतात आम्ही अंधारामध्ये आहोत,जेव्हा स्वर्गामध्ये होतो,तर प्रकाशामध्ये होतो.स्वर्गाचे राज-राजेश्वर,राज- राजेश्वरी लक्ष्मीनारायण होते,त्यांना सुखधाम म्हटले जाते.नवीन नवीन मुलं येतात तर बाबा परत समजावतात.बाबा पासूनच आम्हाला स्वर्गाचा वारसा घ्यायचा आहे,ज्याला जीवनमुक्ती म्हटले जाते.आत्ता सर्व जीवन बंधनांमध्ये आहेत.खास भारत बाकी दुनिया रावणाच्या जेल मध्ये शोक वाटिके मध्ये आहेत.असे नाही की रावण फक्त लंकेमध्ये होता आणि राम भारतामध्ये होते आणि रावणाने सीतेचे अपहरण केले.या सर्व दंतकथा आहेत.गीताच मुख्य सर्व शास्त्रांमध्ये शिरोमणी श्रीमत म्हणजेच भगवंताने गायन केलेली आहे.मनुष्य तर कोणाची सद्गती करू शकत नाहीत.सतयुगामध्ये जीवनमुक्त देवी-देवता होते,ज्यांनी हा वारसा कलियुगाच्या अंत मध्ये मिळवला होता.भारताला हे माहीत नव्हते,ना कोणत्या ग्रंथांमध्ये आहे.ग्रंथ तर सर्व भक्तिमार्गाचे आहेत.ते सर्व भक्तिमार्गाचे ज्ञान आहे.सद्गती मार्गाचे ज्ञान मनुष्यमात्रा मध्ये नाही.बाबा म्हणतात मनुष्य, मनुष्याचे गुरु बनू शकत नाहीत.गुरु कोणाची सद्गती करू शकत नाहीत. ते गुरु म्हणतात,भक्ती करा,दान पुण्य करा.भक्ती द्वापरयुगा पासून चालत आलेली आहे.सतयुगामध्ये ज्ञानाचे प्रारब्ध आहे.असे नाही तेथे पण हे ज्ञान चालते.हा जो वारसा भारताला होता, हा बाबा पासून संगमयुगामध्येच मिळाला होता,जो परत आत्ता तुम्हाला संगमयुगामध्ये मिळत आहे.भारत वासी नर्कवासी महान दुखी बनतात,तेव्हाच बोलवत राहतात की,हे पतित-पावन, दुखहर्ता सुखकर्ता या.कोणाचे? सर्वांचे,कारण खास भारत आणि बाकी दुनिया मध्ये ५ विकार आहेत. बाबाच पतितपावन आहेत.बाबा म्हणतात,मी कल्प-कल्पाच्या संगम युगामध्ये येतो आणि सर्वांचे सद्गती दाता बनतो.अबला,अहिल्या, गणिका आणि गुरु लोक,जे आहेत त्यांचा पण उद्धार मलाच करायचा आहे,कारण ही तर पतित दुनिया आहे.पावन दुनिया सतयुगाला म्हटले जाते.भारतामध्ये लक्ष्मीनारायण चे राज्य होते.हे भारतवासी जाणत नाहीत की,हेच स्वर्गाचे मालक होते.पतित खंड म्हणजे खोटा खंड,पावन खंड म्हणजे सत्य खंड.भारत पावन खंड होता.लक्ष्मीनारायणाचे सूर्यवंशी घराने होते.हा भारत अविनाशी खंड आहे,याचा कधी विनाश होत नाही. जेव्हा यांचे राज्य होते तर दुसरा कोणता खंड नव्हता.ते सर्व नंतर येतात.ग्रंथांमध्ये सर्वात मोठी चुक हीच केली आहे,जे कल्प लाखो वर्षाचे लिहिले आहे.बाबा म्हणतात न कल्प लाखो वर्षाचे असते,ना सतयुग लाखो वर्षाचे असते. कल्पाचे आयुष्य ५००० वर्ष आहे. ते परत म्हणतात मनुष्य चौर्‍यांशी लक्ष जन्म घेतात.मनुष्याला कुत्रा मांजर इत्यादी बनवले आहे परंतु त्यांचा जन्म वेगळा आहे.84 लाख योनी आहेत.मनुष्यांची योनी तर एकच आहे,त्यांचे ८४ जन्म आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो तुम्ही आदी सनातन देवी-देवता धर्माचे होते. भारतवासी आपल्या धर्माला नियोजित नाटकानुसार विसरले आहेत.कलियुगाच्या अंतमध्ये अगदी पतित बनले आहेत.परत बाबा येऊन संगम युगामध्ये पावन बनवतात.याला दुखधाम म्हटले जाते,परत सुखांमध्ये भूमिका असेल.बाबा म्हणतात मुलांनो,तुम्ही भारतवासीच स्वर्गवासी होते,परत तुम्ही ८४ जन्माची शिडी उतरत आले आहात.सतो रजो तमो मध्ये मध्ये जरूर यायचे आहे.तुम्हा देवता सारखे धनवान,नेहमी आनंदी, नेहमी निरोगी, कोणी नसतात.भारत खूप सावकार होता.हिरे रत्न तर मोठमोठ्या दगडासारखे असतात.अनेक तर नष्ट झाले आहेत.बाबा तुम्हा मुलांना स्मृती देतात की,तुम्हाला खूप सावकार बनवले होते,तुम्ही सर्व गुण संपन्न सोळा कला संपूर्ण होते. यथा राजाराणी तथा प्रजा..यांना भगवान भगवती म्हणू शकतात.परंतू बाबांनी समजवले आहे,भगवान एकच आहेत,ते पिता आहेत परंतु फक्त ईश्वर किंवा प्रभू म्हटल्यामुळे आठवण राहत नाही की,ते सर्व आत्म्याचे पिता आहेत.हे बेहद्दचे पिता आहेत,ते समजवतात की, भारतवासी तुम्ही जयंती साजरी करतात परंतु वास्तविक मध्ये बाबा कधी आले होते,हे कोणीच जाणत नाहीत.ते लोहयुगी,पत्थर बुद्धी आहेत.पारसनाथ होते परंतु या वेळेत पत्थरनाथ आहेत.नाथ पण म्हणू शकणार नाहीत कारण राजाराणी तर नाहीत.प्रथम येथे दैवी राजस्थान होते,परत आसुरी राजस्थान बनते.हा खेळ आहे,ते हद्दचे नाटक आहे,हे बेहद्दचे नाटक आहे.विश्वाचा इतिहास भूगोल सुरूवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही मुलंच जाणतात,दुसरे कोणी जाणत नाहीत.भारतामध्ये जेव्हा देवी-देवता होते,तर सर्व सृष्टीचे मालक होते आणि भारतामध्येच होते.बाबा भारतवासींनाच स्मृती देतात.सतयुगामध्ये आदी सनातन देवी-देवता,यांचा श्रेष्ठ धर्म,श्रेष्ठ कर्म होते,परत८४ जन्मांमध्ये उतरावे लागते.हे बाबांच सन्मख गोष्टी ऐकवतात की,आता तुमच्या अनेक जन्माच्या शेवटचा जन्म आहे.एका ची गोष्ट नाही.न युध्दाचे मैदान इत्यादी आहे.भारतवासी हे पण विसरलेत की,यांचे म्हणजे लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. सतयुगाचे आयुष्य लांबलचक केल्यामुळे खुप दूर गेले आहेत. बाबा समजवतात की,मनुष्याला भगवान म्हणू शकत नाहीत.मनुष्य मनुष्याची सद्गती करू शकत नाही. अशी म्हण आहे की,सर्वांचे सद्गती दाता,पतितांचे-पावन कर्ता एकच आहेत.हा खोटा खंड आहे.सत्य बाबा, सत्य खंड स्थापन करणारे आहेत.भक्त पूजा करतात परंतु भक्ती मार्गामध्ये ज्याची पूजा करत आले आहेत,एकाचे पण चरित्र जाणत नाहीत.शिवजयंती तर साजरी करतात.बाबा नवीन दुनिया चे रचनाकार आहेत, स्वर्गीय पिता आहेत, सुख देणारे आहेत.सतयुगा मध्ये सुख होते.ते कसे आणि कोणी स्थापन केले?नरकवासींना स्वर्गवासी बनवणे,भ्रष्टाचारींना श्रेष्टाचारी देवता बनवणे.हे तर बाबांचे च काम आहे.तुम्हा मुलांना पावन बनवतो,तुम्ही स्वर्गाचे मालक बनतात,परत तुम्हाला पतित कोण बनवते? रावण.मनुष्य म्हणतात, सुख दुःख, ईश्वरच देतात.बाबा म्हणतात मी तर सर्वांना सुख देतो,अर्ध्या कल्पा साठी सुख,परत तुम्ही बाबाचे स्मरण करणार नाहीत.जेव्हा रावण राज्य होते,तर सर्वांची पूजा करावयास लागतात.हा तुमचा अनेक जन्मातील अंतिम जन्म आहे.मुलं म्हणतात बाबा आम्ही किती जन्म घेतले आहेत.बाबा म्हणतात,मुलांनो तुम्ही आपल्या जन्माला जाणत नाहीत,तुम्ही पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत.तुम्ही २१ जन्मासाठी बाबा कडून वारसा घेण्यासाठी आले आहात,म्हणजेच खऱ्या खऱ्या सत्य बाबा पासून सत्यकथा नरापासून नारायण बनण्याचे ज्ञान ऐकतात.हे ज्ञान आहे,ती भक्ती आहे.हे अध्यात्मिक ज्ञान परमात्मा येऊन देतात.मुलांना देही अभिमानी बनावे लागेल, स्वतःला आत्मा निश्चय करून माझीच आठवण करा.शिव बाबाच सर्व आत्म्याचे पिता आहेत.सर्व आत्मे परमधाम मधुन भूमिका वठवण्यासाठी या शरीरांमध्ये येतात.यालाच धर्मक्षेत्र म्हटले जाते.खूप भारी खेळ आहे.आत्म्या मध्ये चांगले किंवा वाईट संस्कार राहतात,त्यानुसारच मनुष्याला चांगला किंवा वाईट जन्म मिळतो.हे जे पावन होते,आता पतित आहेत.तुम्ही पण असेच बनतात.मज पित्याला, या परक्याच्या रावणाच्या दुनिया मध्ये पतित शरीरामध्ये यावे लागते.यायचे पण त्यांच्यामध्येच आहे जे प्रथम क्रमांक मध्ये जाणार आहेत. सूर्यवंशीच पूर्ण ८४ जन्म घेतात.हे ब्रह्मा आणि ब्राह्मण आहेत.बाबा रोज रोज समजवतात परंतु पत्थर बुद्धीला पारस बुद्धी बनवणे मावशीचे घर नाही.हे आत्म्यांनो आत्ता आत्म अभिमानी बना,बाबाची आठवण करा आणि राजाईची आठवण करा.देहाच्या सर्व संबंधाला सोडा, तर पारसबुद्धी बनाल.मरायचे तर सर्वांनाच आहे.सर्वांची आत्ता वानप्रस्थ अवस्था आहे.एका सद्गुरु शिवाय सर्वांचे सद्गती दाता कोणी होऊ शकत नाहीत.बाबा म्हणतात,हे भारतवासी मुलांनो,तुम्ही प्रथम पारसबुद्धी होते.असे गायन पण आहे की,आत्मा परमात्मा वेगळे राहिले खूप काळ.तर प्रथम तुम्ही भारतवासी देवी-देवता धर्माचे आले आहात आणि बाकी धर्माचे सर्व नंतर येतात,तर त्यांचे जन्म पण थोडेच होतात.सर्व सृष्टीचे झाड कसे फिरते,ते बाबाच सन्मुख समजवतात.जे धारण करू शकतात, त्यांच्यासाठी खूप सहज आहे.आत्माच धारण करते. पुण्य आत्मा आणि पाप आत्मा बनते.तुमचा अंतिम ८४वा जन्म आहे.तुम्ही वानप्रस्थ अवस्थांमध्ये आहात.वानप्रस्था असणारे मंत्र घेण्यासाठी गुरु करतात. तुम्हाला आता बाहेरचे मनुष्य गुरु करायचे नाहीत,तुम्हा सर्वांचा पिता, शिक्षक आणि सद्गुरु आहे.मलाच हे पतितपावन शिव बाबा म्हणतात.आता स्मृती आली आहे,सर्व आत्म्यांचे हे पिता आहेत.आत्मा सत्य आहे, चैतन्य आहे,कारण अमर आहे.सर्व आत्म्यामध्ये भूमिका नोंदलेली आहे.बाबा पण सत चैतन्य आहेत, ते मनुष्य सृष्टीचे बीजरूप असल्यामुळे म्हणतात की, मी सर्व झाडाच्या आदी मध्य अंतला जाणतो.यामुळे मला ज्ञानसंपन्न म्हटले जाते. तुम्हाला पण सर्व ज्ञान आहे की,बीजापासून झाड कसे निघते,झाडाची वृद्धी होण्यासाठी वेळ लागतो. बाबा म्हणतात मी बीजरूप आहे आणि शेवटी सर्व झाड जडजडीभुत अवस्थेला प्राप्त होते.आता देवी-देवता धर्माचा पाया तर नाही,प्रायलोप आहे,तेव्हा बाबाला यावे लागते.एका धर्माची स्थापना करून बाकी सर्वांचा विनाश करतात. प्रजापिता ब्रह्मा द्वारे बाबा आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करतात. तुम्ही भ्रष्टाचारी पासून श्रेष्ठाचारी बनण्यासाठी आले आहात.हे नाटक बनलेले आहे,याचा शेवट होऊ शकत नाही,बाबा येतात.आत्मा सर्व भाऊ भाऊ आहेत,मुळवतन मध्ये राहणारे आहेत.त्या एकाच पित्याची सर्व आठवण करतात,दुःखामध्ये सर्व आठवण करतात.रावण राज्यांमध्ये दुःखच आहे.हे तर स्मरण करतात,बाबा सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत,त्यांचीच महिमा आहे. बाबा आले नाही तर पावन, कोण बनवेल? ख्रिश्चन, इस्लामी इत्यादीचे मनुष्य पण,या वेळेत सर्व तमोप्रधान आहेत.सर्वांना पुनर्जन्म जरूर घ्यायचा आहे.

आत्ता पुनर्जन्म नरकामध्येच मिळतो.असे नाही की सुखामध्ये चालले जातात. जसे हिंदू धर्माचे म्हणतात, स्वर्गवासी झाले,तर जरुर नरकामध्ये होते ना.आता स्वर्गा मध्ये गेले तर तुमच्या मुखामध्ये गुलाब.जेव्हा स्वर्गवासी झाले,परत त्यांना नरकातील आसुरी वैभव का खाऊ घालतात?पित्र खाऊ घालतात ना. बंगालमध्ये तर मासे,अंडी इत्यादी खाऊ घालतात,त्यांना हे सर्व खाण्याची काय आवश्यकता आहे? परत तर कोणी जाऊ शकत नाहीत.जेव्हा प्रथम क्रमांकला पण ८४ जन्म घ्यावे लागतात.या ज्ञानामध्ये काहीच कष्ट नाहीत. भक्तिमार्ग मध्ये खूप कष्ट आहेत.राम राम जपत अंगावर शहारे येतात.हा सर्व भक्तिमार्ग आहे.हे सूर्य चंद्र इत्यादी प्रकाश देणारे आहेत, तर ते देवता थोडेच आहेत. वास्तव मध्ये ज्ञानसूर्य ज्ञान चन्द्रमा आणि ज्ञान तारे, येथील मुलांची महिमा आहे, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) या अंतीम ८४व्या जन्मांमध्ये,कोणतेही पाप कर्म करायचे नाहीत. पुण्यात्मा बनण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. संपूर्ण पावन बनायचे आहे.

(2)आपल्या बुद्धीला पारस बुद्धी बनवण्यासाठी, देहाच्या सर्व संबंधांना विसरून आत्म अभिमानी बनण्याचा अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
सोबत आणि सोबतीला समजून सोबत निभावणारे श्रेष्ठ भाग्यवान भव

वैश्विक नाटकाच्या भाग्य प्रमाण,तुम्ही थोडेसे आत्मे आहात,ज्यांना सर्व प्राप्ती करणाऱ्या श्रेष्ठ ब्राह्मणांची सोबत मिळाली आहे.खऱ्या ब्राह्मणांची सोबत चढती कला आहे.ते कधी अशी संगत करत नाहीत, ज्यामुळे अधोगती होईल. ते नेहमी श्रेष्ठ सोबती मध्ये राहतात, एक बाबांनाच आपला सोबती बनवतात, त्यांच्याशीच प्रेमाची रीत निभावतात,ते श्रेष्ठ भाग्यवान आहेत.

बोधवाक्य:-
मन आणि बुद्धीला एकाच शक्तिशाली स्थितीमध्ये स्थिर करणेच एकांतवासी बनणे आहे.