02-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्हाला सदगती करण्याची सर्वात वेगळी मतं मिळाली आहे की,देह सहित देहाचे
सर्व धर्म त्याग करुन आंतरमुखी अभिमानी बना,माझीच आठवण करा"
प्रश्न:-
जे परमात्माला
नावां रूपापेक्षा वेगळे म्हणतात,त्यांना तुम्ही कोणता प्रश्न विचारू शकतात?
उत्तर:-
त्यांना विचारा गीते मध्ये जे दाखवतात की,अर्जुनाला अखंड ज्योती स्वरूपाचा
साक्षात्कार झाला,बस करा मी सहन करू शकत नाही.तर परत नावांरूपा पेक्षा वेगळे कसे
म्हणू शकतात. बाबा म्हणतात,मी तुमचा पिता आहे, वडिलांचे रूप पाहून तर मुलगा खुश
होईल,तो कसे म्हणू शकेल मी सहन करू शकत नाही.
गीत:-
तेरे द्वार खडा
है भगवान..
ओम शांती।
भक्त म्हणतात, खूप कंगाल बनलो आहोत,हे बाबा आम्हा सर्वांची झोळी भरा.भक्त तर जन्म
जन्मांतर गायन करत राहतात.सतयुगामध्ये भक्ती नसते. तेथे पावन देवी देवता असतात.
भक्तांना कधीच देवता म्हटले जात नाही.जे स्वर्गवासी देवी-देवता असतात,तेच परत
पुनर्जन्म घेत-घेत नरकवासी पुजारी,कंगाल,भक्त बनतात.बाबा मुलांना सन्मुख समजवतात.
बाबांना एक पण मनुष्य जाणत नाहीत.ते जेव्हा येतील,तेव्हा आपला परिचय
देतील.भगवंतालाच बाबा म्हटले जाते.सर्व भक्तांचा एकच भगवान आहे,बाकी सर्व भक्त
आहेत.चर्च इत्यादीमध्ये जातात, तर जरुर भक्त झाले ना.या वेळेत सर्व पतित तमोप्रधान
आहेत म्हणून सर्व बोलवतात की, हे पतित पावन बनवणारे या.हे बाबा आम्हा भक्तांची झोळी
भरा.भक्त भगवंताकडून धन मागतात.तुम्ही मुलं काय मागतात?तुम्ही म्हणतात बाबा आम्हाला
स्वर्गाचे मालक बनवा,तेथे तर खूप धन असते.हिरे रत्नांचे महल असतात.आता तुम्ही
जाणतात,आम्हाला भगवंता द्वारे राजाईचा वारसा मिळतो.हीच खरी गीता आहे.ती गीता नाही.ते
पुस्तक इत्यादी तर भक्तिमार्गासाठी बनवले आहेत,त्यांना भगवंताने ज्ञान दिले
नाही.भगवान तर या वेळेत नरापासून नारायण बनवण्यासाठी राजयोग शिकवत आहेत.राजा सोबत
प्रजा पण जरूर असेल,फक्त लक्ष्मीनारायण तर बनणार नाहीत,सर्व राजधानी बनते.आता तुम्ही
मुलं जाणतात,भगवान कोण आहेत आणि दुसरे कोणीही जाणत नाहीत.तुम्ही म्हणतात,हे ईश्वर
पिता,तर सांगा,तुमच्या ईश्वर पित्याचे नाव रूप देश कोणते आहे,न भगवंताला जाणतात,न
त्यांच्या रचनेला जाणतात.बाबा म्हणतात कल्पाच्या संगम युगा मध्ये मी येतो,सर्व
रचनेच्या आदी मध्य अंतचे रहस्य, मी रचनाकारच येऊन समजावतो. काहीजण म्हणतात, तो
नावारुपा पेक्षा वेगळा आहे,ते येऊ शकत नाहीत.तुम्ही जाणतात बाबा आले आहेत,शिवजयंती
पण निराकारची गायन केली जाते.कृष्णाची पण जयंती गायन केली जाते.आता शिवजयंती कधी
असते ते पण माहिती व्हायला पाहिजे ना.जसे ख्रिश्चन लोकांना माहित होते कि, येशू
ख्रिस्ताचा जन्म कधी झाला,ख्रिश्चन धर्म कधी स्थापन झाला.ही तर भारताची गोष्ट
आहे.भगवान भारताची झोळी कधी भरतात? भक्त बोलवत राहतात,हे भगवान झोळी भरा,सद्गती
मध्ये घेऊन जावा,कारण आम्ही दुर्गती मध्ये पडलो आहोत,तमोप्रधान आहोत.आत्माच
शरीरासोबत भोगते.काही मनुष्य,साधू संत इत्यादी म्हणतात,आत्मा निर्लेप आहे.असे
म्हणतात की आत्मा निर्लेप आहे.असे ही म्हणतात चांगले किंवा वाईट संस्कार आत्म्या
मध्ये राहतात,त्या आधारावर आत्मा जन्म घेते.परत म्हणतात आत्मा तर निर्लेप आहे.कोणीही
बुद्धिवान नाहीत,जे समजावून सांगतील.यामध्ये अनेक मतं आहेत. जे घरातून रुसून
जातात,ते ग्रंथ इत्यादी बनवतात.श्रीमद्-भगवद्गीता तर एकच आहे.व्यासने जे श्लोक
इत्यादी बनवले, ते काही भगवंतांनी म्हटलेले नाहीत.भगवान निराकार जे ज्ञानाचे सागर
आहेत,ते सर्व मुलांना समजवतात की, भगवान एकच आहेत.भारत वासींना हे माहित नाही.असे
गायन पण करतात,ईश्वराची मत वेगळी आहे. अच्छा कोणती गत मत वेगळी आहे.ईश्वराची गत मत
वेगळी आहे, हे कोणी म्हटले?आत्मा म्हणते, त्यांची सद्गती करण्याचे जे मत मिळत
आहे,त्यालाच श्रीमत म्हटले जाते.कल्प कल्प तुम्हाला येऊन समजावतो की, मनमनाभव.देहाचे
सर्वधर्म त्याग,आत्म अभिमानी भव, माझीच आठवण करा.आता तुम्ही मनुष्या पासून देवता
बनत आहात. या राजयोगाचे मुख्य लक्ष लक्ष्मीनारायण बनणे आहे. शिक्षणाद्वारे कोणी राजा
बनत नाहीत,अशी कोणती शाळा नाही.
गीते मध्येच आहे, तुम्हा मुलांना राजयोग शिकवतो.मी येतो पण तेव्हाच,जेव्हा कोणत्याही
राज्याचे राज्य राहत नाही.मला एक पण मनुष्य जाणत नाहीत.बाबा म्हणतात,तुम्हा मुलांनी
इतके मोठे लिंग बनवले आहे,तसे काही माझे रूप नाही. मनुष्य तर म्हणतात, अखंड ज्योती
रूप परमात्मा, तेजोमय आहे.अर्जुनाने म्हटले बस करा,मी सहन करू शकत नाही.अरे मुलगा
पित्याचे रूप पाहून,सहन करू शकणार नाही,हे कसे होऊ शकते.मुलगा तर पित्याला पण खुश
होतो ना.बाबा म्हणतात माझे काही असे रूप थोडेच आहे.मी तर परमपिता आहे,दूर राहणारा
आहे. परम आत्मा म्हणजे परमात्मा,परत गायन करतात मनुष्य सृष्टीचे बीजरुप आहेत,त्यांची
भक्त महिमा करतात.सतयुगा मध्ये कोणी महिमा करत नाहीत,कारण तेथे सुख आहे. गायन पण
आहे,दुःखामध्ये स्मरण सर्व करतात,सुखांमध्ये कोणी करत नाहीत.याचा अर्थ पण समजत
नाहीत,फक्त पोपटासारखे म्हणत राहतात.सुख कधी असते,दुःख कधी असते,ही भारताची गोष्ट
आहे ना.पाच हजार वर्षापूर्वी भारत स्वर्ग होता,परत त्रेतामध्ये दोन कला कमी
झाल्या.सतयुग त्रेतामध्ये दुःखाचे नाव नसते,आहेच सुखधाम.स्वर्ग म्हणल्यामुळे तोंड
गोड होते.स्वर्गामध्ये परत दु:ख आले कोठून.असे समजतात,तेथे पण कंस जरासंध इत्यादी
होते परंतु असे होऊ शकत नाही.
भक्त समजतात की,आम्ही नवविध भक्ती करतो, तर साक्षात्कार होतो. त्यांना वाटते
साक्षात्कार झाला म्हणजे भगवंत भेटले.लक्ष्मीची पूजा केली,तिचे दर्शन झाले,बस आम्ही
तर पार झालो,यामध्येच खुश होतात.परंतु आहे काहीच नाही.अल्पकाळाचे सुख मिळते, दर्शन
झाले खलास.असे तर नाही मुक्ती,जीवनमुक्ती ला प्राप्त केले, काहीच नाही.बाबांनी शिडी
वरती समजवले होते,भारत उच्च ते उच्च होता.भगवान पण उच्च ते उच्च आहेत.भारतामध्ये
उच्च ते उच्च वारसा लक्ष्मीनारायण चा आहे.जेव्हा स्वर्ग होता,सतोप्रधान होते,परत
कलियुग अ़ंतमध्ये सर्व तमोप्रधान बनतात.असे म्हणतात,आम्ही अगदीच तमोप्रधान बनलो
आहोत.बाबा म्हणतात,मी कल्पाच्या संगमयुगा मध्ये राजयोग शिकवण्यासाठी येतो.मी जसा
आहे,जो आहे,मला अर्थसहीत कोणी जाणत नाहीत.तुमच्या मध्ये पण क्रमवार पुरुषार्था
नुसार जाणतात.शिडीचे चित्र दाखवयाचे आहे.ही भारताची शिडी आहे.सतयुगामध्ये देवी देवता
होते.पाच हजार वर्ष पुर्व भारत असा होता.ग्रंथामध्ये लाखो वर्षाचे कल्प दाखवले
आहे.बाबा म्हणतात लाख वर्षाचे नाही,कल्प तर पाच हजार वर्षाचे आहे.सतयुग त्रेता नवीन
दुनिया,द्वापर कलियुग जुनी दुनिया आहे.अर्धे-अर्धे असते ना.नवीन दुनियेमध्ये तुम्ही
भारत वासी होते.बाबा समजवतात, गोड मुलांनो,आता तुम्ही स्वतःच्या जन्माला जाणत
नाहीत,बाकी रथ इत्यादीची गोष्टच नाही.कृष्ण तर सतयुगाचे राजकुमार आहेत.कृष्णाचे ते
रूप शिवाय दिव्यदृष्टी,पाहू शकत नाहीत.हे चैतन्यरूप रूपा मध्ये तर सतयुगामध्ये
होते,परत ते रुप कधीच होऊ शकत नाही.परत नाव, रुप,काल सर्व बदलते.८४ जन्म घेतात.८४
जन्मांमध्ये ८४ मातपिता मिळतात.वेगवेगळे नाव, रूप, कर्तव्य होत राहतात.आता ही
भारताचे शिडी आहे.तुम्ही आता ब्राह्मण कुळभूषण आहात.बाबांनी कल्पापूर्वी पण येऊन
तुम्हाला देवी-देवता बनवले होते.तेथे तुम्ही सर्वोत्तम कर्म करत होते,तुम्ही २१
जन्म सुखी होते.परत तुम्हाला या दुर्गती मध्ये कोणी पोहोचवले.मी कल्पा पूर्वी
तुम्हाला सद्गती दिली होती,परत ८४ जन्म घेत, जरूर उतरावे लागेल.सूर्यवंशी मध्ये ८
जन्म,चंद्रवंशी मध्ये १२ जन्म,परत असे उतरत आले.तुम्हीच पुज्य देवता होते,परत
तुम्हीच पुजारी पतित बनले आहात.भारत आत्ता कंगाल आहे.भगवानुवाच तुम्ही जे १०० %
पवित्र आणि सदानिरोगी, सदा संपत्तीवान होते.कोणताही रोग, दुःखाची गोष्ट
नव्हती,सुखधाम होते.त्याला अल्लाह ची बाग म्हटले जाते.अल्लाह ने बागेची निर्मिती
केली.जे देवी-देवता होते,ते आता काट्यासारखे बनले आहेत.आता जंगल बनले आहे.
जंगलामध्ये काटे टोचतात.बाबा म्हणतात काम विकार महाशत्रू आहे,याला जिंकायचे आहे.या
विकाराने आदी मध्य अंत,तुम्हाला दुःख दिले आहे. एक दोघं वरती काम कटारी चालवणे, हे
सर्वात मोठे पाप आहे. बाबा आपला परिचय देतात की,मी परमधाम मध्ये राहणारा परमात्मा
आहे.मला सृष्टीचे बीजरूप म्हणतात,मी परमात्मा,सर्वांचा पिता आहे.सर्व आत्मे पित्याला
बोलवतात की,हे परमपिता परमात्मा.जशी तुमची आत्मा ताऱ्यासारखी आहे,बाबा पण परम आत्मा
तारा आहे,लहान-मोठा नाही.बाबा म्हणतात मी अंगठ्या सारखा पण नाही.मी परमात्मा
आहे.तुम्हा सर्वांचा पिता आहे, त्यांना परमपिता ज्ञानाचे सागर म्हटले जाते.बाबा
समजवतात,मी ज्ञान सागर,मनुष्य सृष्टीच्या झाडाचे बीजरूप आहे.मला भक्त लोक
म्हणतात,परमात्मा सच्चिदानंद स्वरूप,ज्ञानाचे सागर आहेत, सुखाचे सागर आहेत.महिमा
खूप आहे.जर नाव रुप देश काळ नाही,तर बोलवतात कोणाला? साधुसंत इत्यादी सर्व तुम्हाला
भक्तिमार्गाचे ग्रंथ ऐकवतात.मी तुम्हाला येऊन राजयोग शिकवतो. बाबा समजवतात तुम्ही,
पतित-पावन,मज ज्ञान सागर बाबांना म्हणतात. तुम्ही मास्टर ज्ञानाचे सागर
बनतात.ज्ञानाद्वारे सद् गती मिळते.भारताला सद्गती बाबाच देतात.सर्वांचे सद्गती दाता
तर ते एकच आहेत.सर्वांची दुर्गती परत कोण करते,रावण.आत्ता तुम्हाला कोण समजवत आहे?हे
परम आत्मा आहेत.आत्मा तर चांदनी सारखी अतिसूक्ष्म आहे.परमात्मा अनादी वैश्विक
नाटकांमध्ये भूमिका वठवतात. रचनाकार,दिग्दर्शक मुख्य कलाकार आहेत.बाबा समजवतात,
उच्च ते उच्च भूमिका करणारे कोण आहेत?उच्च ते उच्च भगवान आहेत.ज्यांच्या सोबत तुम्ही
आत्मे मुलं सर्व राहतात.असे म्हणतात,परमात्मा सर्वांना पाठवणारे आहेत.ही पण
समजण्याची गोष्ट आहे.हे नाटक अनादी बनलेले आहे.मला तुम्ही ज्ञानाचे सागर, संपूर्ण
सृष्टीच्या आदी मध्य अंतला जानणारे आहेत,असे म्हणतात.आता हे ग्रंथ इत्यादी चा
अभ्यास करतात,यांना बाबा जाणतात.बाबा म्हणतात मी प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे,सर्व
ग्रंथाचे रहस्य समजावतो.असे दाखवतात विष्णूच्या नाभी द्वारे ब्रह्मा निघाले. तर
कोठून निघाले.मनुष्य तर जरूर येथेच असतील ना.यांच्या नाभीद्वारे ब्रह्मा निघाले,परत
भगवंताने सन्मुख,यांच्याद्वारे सर्व वेद,ग्रंथ इत्यादी रहस्य ऐकवले.आपले पण नाव रूप
देश काळ समजावले. मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहे ना.या वृक्षाची उत्पत्ती पालना विनाश
कसा होतो,हे पण कोणी जाणत नाहीत.याला विविधते चे झाड म्हटले जाते.सर्व क्रमानुसार
आपल्या वेळेवर येतात.प्रथम क्रमांकामध्ये देवी-देवता धर्माची स्थापना करतो,जेव्हा
तो धर्म नाही. बाबा म्हणतात, मनुष्य खूपच तुच्छ बुद्धी बनले आहेत.देवतांची,
लक्ष्मीनारायण ची पूजा करतात परंतु त्यांचे राज्य सृष्टीवर कधी होते, ते काही जाणत
नाहीत.आता भारताचा तो देवता धर्मच राहीला नाही,फक्त चित्र राहिले आहेत, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) मास्टर
ज्ञान सागर बनून,पतिता पासून पावन बनवण्याची सेवा करायची आहे. बाबांनी जे सर्व
ग्रंथाचे रहस्य ऐकवले आहे,ते बुद्धीमध्ये ठेवून नेहमी आनंदी राहायचे आहे.
(२) एक बाबाच्या श्रीमताचे,प्रत्येक क्षणी पालन करायचे आहे.देहाचे सर्व धर्म त्याग
करून आत्म-अभिमानी बनण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.
वरदान:-
आपल्या दिव्य
अलौकिक जन्माच्या स्मृती द्वारे,मर्यादे मध्ये राहणारे,मर्यादा पुरुषोत्तम भव.
जसे प्रत्येक कुळाच्या
मर्यादाची रेषा असते,तसेच ब्राह्मण कुळाच्या मर्यादाची रेषा आहे.ब्राह्मण म्हणजे
दिव्य आणि अलौकिक जन्म घेणारे मर्यादा पुरुषोत्तम.ते संकल्पामध्ये पण कोणत्या
आकर्षणाच्या वश होऊन,मर्यादांचे उल्लंघन करू शकत नाहीत.जे मर्यादाच्या रेषाचे
संकल्पा मध्ये पण उल्लंघन करतात,ते बाबांच्या आधाराचा अनुभव करू शकत नाहीत. मुलाच्या
ऐवजी मागणारे भक्त बनतात.ब्राह्मण म्हणजे मागणे, आळवणे बंद.कधीही प्रकृती किंवा
मायेच्या मोहताज नाही.ते नेहमी बाबांच्या सिरताज राहतात.
बोधवाक्य:-
शांतिदूत बनून
आपल्या तपस्या द्वारे विश्वामध्ये शांतीचे किरणे पसरवत राहा.