18-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, आठवणी मध्ये राहून दुसऱ्याकडून आठवणीचा अभ्यास करून घ्या, योग
करविणाऱ्याचा बुद्धीयोग इकडे तिकडे भटकला नाही पाहिजे."
प्रश्न:-
कोणत्या
मुलावर फार मोठी जबाबदारी आहे? त्यांनी कोणते ध्यान जरूर ठेवले पाहिजे?
उत्तर:-
जी मुले निमित्त शिक्षक बनून दुसऱ्याकडून योग करून घेतात, त्यांच्यावर फार मोठी
जबाबदारी आहे. जेंव्हा योग करून घेतात, त्यावेळी बुद्धी बाहेर भटकली तर ते सेवा
करण्याची ऐवजी सेवा न करणारे बनतात. त्यामुळे हे ध्यान ठेवले पाहिजे कि, माझ्या
द्वारे पुण्याचे काम होत आहे.
गीत:-
ओम नमः शिवाय.
. . .
ओम शांती।
बाबा सर्व मुलांना पहिल्या प्रथम इथे बसून लक्ष्या मध्ये टिकून राहण्यासाठी दृष्टी
देत आहेत कि, जसे मी शिवबाबाच्या आठवणी मध्ये बसलो आहे. तुम्ही पण शिवबाबाच्या आठवणी
मध्ये बसा. प्रश्न निर्माण होतो कि, जे समोर बसले आहेत, योग करून घेण्यासाठी ते सारा
वेळ शिवबाबाच्या आठवणीमध्ये राहतात कां? त्यामुळे इतरांना पण ओढ लागेल. आठवणी मध्ये
राहिल्या मुळे फार शांती मध्ये राहतात. अशरीरी होऊन शिवबाबाच्या आठवणी मध्ये राहाल
तर इतरांना पण शांती मध्ये घेऊन जाल, कारण शिक्षक होऊन बसले आहेत ना. जर शिक्षकच
योग्य रीतीने आठवणी मध्ये बसले नाहीत, तर दुसरे राहू शकणार नाहीत. प्रथम तर हा
विचार केला पाहिजे कि, मी जो त्या माशुक बाबा चा आशिक आहे, त्यांच्या आठवणी मध्ये
बसलो आहे? प्रत्येकाने स्वतःला असे विचारले पाहिजे. जर बुद्धी इतरत्र जात आहे, देह
अभिमाना मध्ये येतात, तर ते सेवा करत नाहीत, उलट नुकसान करण्यासाठी बसले आहेत. ही
गोष्ट समजून घ्यायची आहे ना. कांही सेवा तर केली नाही, असेच बसले आहेत, तर नुकसानच
करतील. शिक्षकांचा च बुध्दीयोग भटकत असेल, तर ते मदत काय करतील. जे शिक्षक होऊन बसले
आहेत त्यांनी स्वतःला विचारले पाहिजे कि, मी पुण्याचे काम करत/ करीत आहे? जर पापाचे
काम कराल तर दुर्गतीला प्राप्त होतील, पदभ्रष्ट होऊन जातील. जर अशांना गादीवर बसविले,
तर तुम्ही पण जबाबदार आहात. शिवबाबा तर सर्वांना ओळखतात . हे बाबा पण सर्वांच्या
अवस्थेला ओळखतात. शिवबाबा म्हणतात, हे शिक्षक होऊन बसले आहेत आणि यांची बुद्धी
इतरत्र भटकते. हे काय इतरांना मदत करतील? तुम्ही ब्राह्मण मुले निमित्त बनले आहात,
शिवबाबा चे बनुन त्यांच्या कडून वरसा घेण्यासाठी. बाबा म्हणतात हे आत्म्यानो, माझी
एकट्याची आठवण करा. शिक्षक होऊन बसले आहात तर आणखीनच चांगल्या रीतीने त्या अवस्थे
मध्ये बसा. तसे तर प्रत्येकाला बाबांची आठवण करायची आहे. विद्यार्थी आपल्या अवस्थेला
समजू शकतात, ते जाणू शकतात कि, आम्ही पास होऊ की नाही. शिक्षक पण जाणतात. जरी विशेष
शिक्षक ठेवतात, ते पण जाणतात. त्या शिक्षणा मध्ये तर कोणी विशेष शिक्षक ठेवू
इच्छितात, तर ठेवू शकतात. इथे जर कोणी म्हणेल आम्हाला योगा मध्ये बसवा, तर बाबाच्या
आठवणी मध्ये बसायचे आहे. बाबाचा आदेश आहे कि, माझी एकट्याची आठवण करा. तुम्ही आशिक
आहात, चालताना, फिरताना आपल्या माशूका ची आठवण करा. संन्यासी ब्रह्मची आठवण करतात.
ते समजतात कि, आम्ही ब्रह्म मध्ये जाऊन विलीन होऊ. जे जास्त आठवण करत असतील, त्यांची
अवस्था चांगली राहते. प्रत्येका मध्ये कांही ना कांही तरी विशेषता आहे ना.असे
म्हणतात आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. स्वतःला पण आठवणी मध्ये राहायचे आहे. बाबा
जवळ कांही खरे पण आहेत, कांही खोटे पण आहेत. स्वत: निरंतर आठवणी मध्ये राहाणे, हे
फार मुश्कील आहे. काहीजण बाबा बरोबर फारच खरे राहतात. हे बाबा पण आपला स्वतःचा
अनुभव, तुम्हा मुलांना सांगत आहेत कि, थोडा वेळ आठवणी मध्ये राहतो, मग विसरून जातो.
कारण माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. अनेक मुले आहेत. तुम्हा मुलांना हे पण माहित
पडत नाही कि, ही मुरली शिवबाबा ने चालवली का ब्रह्माबाबा ने चालवली. कारण ते दोघे
एकत्र आहेत ना. हे म्हणत आहेत कि, मी पण शिवबाबाची आठवण करतो. हे बाबा पण मुलां
कडून योग करून घेतात. हे बसले तर तुम्ही पाहता कि, किती शांतता होऊन जाते, अनेकांना
आकर्षित करतात. बाबा आहेत ना. म्हणतात मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. स्वतः
पण राहायचे आहे, फक्त पंडित बनायचे नाही. आठवणी मध्ये राहिले नाही तर अंताला नापास
होऊन जाल. बाबा मम्माचे तर उंच पद आहे, बाकी आता तर माळा बनलेली नाही. एक पण मणका
संपूर्ण बनलेला नाही. पूर्वी माळा बनवित होतो, मुलांना उत्साह देण्यासाठी. परंतु
पाहिले आहे कि, मायेने अनेकांना नष्ट करून टाकले. सारा आधार सेवे वर आहे. तर जे
समोर योग करून घेण्यासाठी बसतात, त्यांनी समजले पाहिजे कि, मी खरा शिक्षक होऊन बसलो
आहे. नाही तर सांगितले पाहिजे कि, माझी बुद्धी इकडे तिकडे निघून जाते. मी इथे
बसण्याच्या लायकीचा नाही. स्वतःच सांगितले पाहिजे. असे पण नाही कि, स्वतःच कोणीही
येऊन बसावे. कोणी असे आहेत, ते मुखाद्वारे मुरली सांगत नाहीत, परंतु आठवणी मध्ये
राहतात. परंतु इथे तर दोन्ही मध्ये हुशार असले पाहिजे. साजन फार प्रिय आहेत, त्यांची
तर फार आठवण केली पाहिजे. या मध्ये मेहनत आहे. बाकी प्रजा बनणे तर सोपे आहे. दास
दासी बनणे मोठी गोष्ट नाही. ज्ञान घेऊ शकत नाहीत. जसे पाहा यज्ञाची भंडारी आहे,
सर्वांना फार खूष करते, कोणाला दुःख देत नाही, सर्व तिची महिमा करतात. वाह,
शिवबाबाची भंडारी तर नंबरवन आहे. अनेकांच्या मनाला खूष करते. बाबा पण मुलांच्या
मनाला खूष करत आले आहेत. बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि चक्राला बुद्धी मध्ये ठेवा.
आता प्रत्येकाला स्वतःचे कल्याण करायचे आहे. हड्डी सेवा केली पाहिजे. तुम्हाला फार
रहमदिल बनायचे आहे. मनुष्य मुक्ती जीवनमुक्ती साठी फार धक्के खातात. कोणाला पण सदगती
ची माहितीच नाही. समजत आहेत कि, जेथून आले आहेत तेथे परत जायचे आहे. नाटकाला पण
समजत आहेत, परंतु त्यावर चालत नाहीत. पाहा, क्लास मध्ये कुठे कुठे मुसलमान पण येतात.
ते म्हणतात कि, आम्ही मूळ देवी-देवता धर्माचे आहोत, मग आम्ही मुस्लिम धर्मामध्ये
बदलून गेलो आहोत. आम्ही 84 जन्म भोगले आहेत. सिंध मध्ये पण पाच-सहा मुसलमान येत होते.
आता पण येत आहेत, आता पुढे चालू शकतील की नाही, ते तर पहावे लागेल, कारण माया पण
परीक्षा घेते. कोणी तर पक्के स्थिर राहतात, कोणी स्थिर राहत नाहीत. जे मूळ ब्राह्मण
धर्माचे असतील, ज्यांनी 84 जन्म घेतले असतील, ते तर कधी हालणार नाहीत. बाकी कोणत्या
ना कोणत्या कारणे, अकारणे निघून जातात. देह अभिमान पण फार येतो. तुम्हा मुलांना तर
अनेकाचे कल्याण करायचे आहे. नाही तर काय पद प्राप्त कराल. घरदार सोडले आहे, आपल्या
कल्याणासाठी. बाबा वर कांही मेहरबानी करत नाहीत. बाबाचे बनले आहात, तर मग सेवा पण
तशी केली पाहिजे. तुम्हाला तर राजाईचे पदक मिळत आहे, २१ जन्म नेहमी सुखाची राजाई
मिळते. मायेवर फक्त विजय प्राप्त करायचा आहे आणि इतरांना पण शिकवायचे आहे. कोणी
नापास पण होतात. ते समजतात कि, राजाई घेणे तर फार अवघड आहे. बाबा म्हणतात कि, असे
समजणे कमजोरी आहे. बाबा आणि वारशाची आठवण करणे तर फारच सोपे आहे. मुलांमध्ये हिम्मत
येत नाही राजाई घेण्याची, तर ते भिऊन बसून राहतात. ना स्वतः घेतात, ना दुसऱ्याला
घेऊ देतात. तर परिणाम काय होईल? बाबा समजावत आहेत कि, रात्रंदिवस सेवा करा.
काँग्रेस लोकांनी पण मेहनत केली. किती ओढाताण केली, तेव्हा तर विदेशी कडून राज्य
घेतले. तुम्हाला रावणा कडून राज्य घ्यायचे आहे. तो तर सर्वांचा शत्रू आहे. दुनियेला
माहित नाही कि, आम्ही रावणाच्या मतावर चालत आहोत, त्यामुळे दुःखी आहोत. कोणाला पण
खरे,कायमचे मनाचे सुख थोडेच आहे. शिवबाबा सांगत आहेत, मी तर तुम्हा मुलांना सदासुखी
बनविण्यासाठी आलो आहे. आता श्रीमतावर चालून श्रेष्ठ बनायचे आहे. जे पण भारतवासी
आहेत, ते आपल्या धर्माला विसरून गेले आहेत. यथा राजा राणी तथा प्रजा. आता तुम्हा
मुलांना समज मिळाली आहे कि, सृष्टीचे चक्र कसे फिरत आहे. ते पण वारंवार विसरून जात
आहेत. बुद्धी मध्ये बसतच नाही. जरी ब्राह्मण तर फार बनत आहेत, परंतु काही कच्चे
असल्यामुळे विकारांमध्ये पण जातात. ते म्हणतात आम्ही बी.के. आहोत, परंतु ते नाहीत.
बाकी जे पूर्ण रीतीने आदेशावर चालत राहतात, आपल्या सारखे बनवित राहतात, तेच उंच पद
प्राप्त करतात. विघ्न तर पडणार आहेत. अमृत पिता पिता मग जाऊन विघ्न टाकतात. हे पण
गायन आहे, त्यांचे काय पद असेल? कांही मुली तर विकारा साठी मार पण खातात, त्या
म्हणतात कि, बाबा हे दुख थोडे सहन करू. आमचे माशुक तर बाबा आहेत ना.मार खाल्ला तरी
पण आम्ही शिवबाबाची आठवण करतो. त्या खुशीमध्ये फार राहतात. अशा अपार खुशीमध्ये
राहिले पाहिजे. बाबा कडून आम्ही वारसा घेत आहोत, इतरांना पण पण आमच्या सारखे बनवित
आहोत.
बाबाच्या बुद्धीमध्ये तर हे शिडीचे चित्र फार राहते. याला फार महत्त्व देत आहेत.
मुले जी विचार सागर मंथन करून असे चित्र बनवित आहेत, तर बाबा पण त्यांचे आभार
मानतात किंवा असे म्हटले जाते कि, बाबांनी त्यांच्या बुद्धीला स्पर्श केला आहे. शिडी
फार चांगली बनविली आहे. 84 जन्माला ओळखल्या मुळे साऱ्या सृष्टीच्या आदि,मध्य, अंताचे
ज्ञान होऊन जाते. हे फर्स्टक्लास चित्र आहे. त्रिमूर्ती,गोळ्या च्या चित्रा पेक्षा
पण यात चांगले ज्ञान आहे. आता आम्ही चढत आहोत. किती सोपे आहे. बाबा येऊन लिफ्ट देत
आहेत. शांतीने बाबा कडून वारसा घेत आहोत. शिडीचे ज्ञान फार चांगले आहे. समजावयाचे
आहे कि, तुम्ही हिंदू थोडेच आहात, तुम्ही तर देवी-देवता धर्माचे आहात. जर असे
म्हणतात की आम्ही 84 जन्म थोडेच घेतले आहेत. अरे,असे कां समजत नाहीत कि, आम्हीच 84
जन्म घेतले आहेत. परत आठवण केली, तरी तुम्ही मग पहिल्या नंबर मध्ये याल. आपल्या
कुळातील असेल तर असा प्रश्न करणार नाही कि, आम्ही थोडेच 84 जन्म घेऊ?. अरे तुम्ही
का समजत आहात कि, आम्ही नंतर येऊ. बाबा सर्व मुलासाठी म्हणतात, तुम्ही भारतवासीनी
84 जन्म घेतले आहेत. आता परत आपला वारसा घ्या, स्वर्गामध्ये चला. तुम्ही मुले योगा
मध्ये बसत आहात. शिडीची आठवण करा, तर फार मौज मध्ये राहाल. आम्ही 84 जन्म पूर्ण केले
आहेत. आता आम्हाला परत घरी जायचे आहे. किती खुशी होते. सेवा करण्या साठी पण उल्हास
असला पाहिजे. समजावून सांगण्याच्या युक्त्या पण खूप मिळत आहेत. शिडीवर समजावून सांगा.
चित्र तर सर्व पाहिजेत ना. त्रिमूर्ती पण पाहिजे. बाबा सांगत पण आहेत कि, तुम्ही
माझ्या भक्ता जवळ जावा, त्यांना हे ज्ञान सांगा. ते तुम्हाला मंदिरा मध्ये भेटतील.
मंदिरा मध्ये पण या शिडीच्या चित्रावर तुम्ही समजावून सांगू शकता. सारा दिवस बुद्धी
मध्ये हे ठेवले पाहिजे कि, आम्ही बाबा चा परिचय देऊ. कोणाचे तरी कल्याण करू.
दिवसेनुदिवस बुद्धीचे कुलूप उघडत जाईल. ज्याना वरसा घ्यायचा असेल, ते घेत राहतील.
दिवसेंदिवस शिकत पण राहतील, कांही वर ग्रहचारी बसली, तर बाबाला समजावून सांगावे
लागते. ते समजत नाहीत कि, आमच्यावर ग्रहचारी आहे, त्यामुळे आमच्या कडून सेवा होत
नाही. सारी जबाबदारी तुम्हा मुलावर आहे. आपल्या सारखे ब्राह्मण बनवित राहा. सेवेवर
राहिल्यामुळे फार खुशी राहते. अनेकांचे कल्याण होत आहे. बाबांना मुंबई मध्ये सेवा
करण्यासाठी फार मजा येत होती. अनेक नवीन येत राहतात. बाबाचे पण मन होते कि, सेवा
करावी. मुलांना पण असे रहमदिल बनायचे आहे. सेवे वर लागले पाहिजे. मना मध्ये हे
राहिले पाहिजे कि, जोपर्यंत आम्ही कोणाला आपल्या सारखे बनवत नाही, तोपर्यंत भोजन
करायचे नाही. अगोदर पुण्य तर करु. पाप आत्म्याला पुण्यात्मा बनवू, मगच भाकरी खाऊ.
तर सेवेमध्ये लागून राहिले पाहिजे. कोणाचे जीवन सफल करावे मगच भाकरी खावी. आपल्या
सारखे ब्राह्मण बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मुलांसाठी ज्ञानामृत निघत आहे, परंतु बी. के. तेवढे वाचत नाहीत. ते समजतात कि,
आम्हाला थोडेच वाचायचे आहे. हे तर बाहेरवाल्या साठी आहे. बाबा सांगतात, बाहेरचे तर
कांही पण समजत नाहीत, बिगर शिक्षकांच्या. ते ब्रह्माकुमार कुमारी साठीच आहे, ते
वाचून ताजेतवाने होतील, परंतु ते वाचत नाहीत. सर्व सेवाकेंद्रा तील मुलांना विचारत
आहेत कि, सारे ज्ञानामृत कोण वाचतात ? ज्ञानामृत वाचून काय समजतात ?कोठ पर्यंत ठीक
आहे? ज्ञानामृत काढणाऱ्यांचे पण अभिनंदन केले पाहिजे कि,तुम्ही फार चांगले
ज्ञानामृत लिहिले आहे. तुमचे धन्यवाद करत आहोत. मेहनत करायची आहे. ज्ञानामृत वाचायचे
आहे. ते मुलांना ताजेतवाने करण्यासाठी आहे, परंतु मुले वाचत नाहीत. ज्यांचे नाव
प्रसिद्ध आहे त्यांना सर्व बोलावत आहेत कि, बाबा भाषण करण्यासाठी आमच्याकडे अमक्याला
पाठवा. बाबा समजतात कि, स्वतः भाषण करणे जाणत नाहीत, त्यामुळे मागणी करत आहेत. तर
सेवा करणाऱ्यांचा फार आदर केला पाहिजे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) राजाईचे
पदक घेण्यासाठी सर्वांच्या मनाला खूष करायचे आहे. फार फार दयाळू बनून आपले आणि
सर्वांचे कल्याण करायचे आहे. हड्डी सेवा करायची आहे.
(२) देह अभिमाना मध्ये येऊन डिससर्विस करायची नाही. नेहमी पुण्याचे काम करायचे आहे.
आपल्या सारखे ब्राह्मण बनविण्याची सेवा करायची आहे. सेवाधारींचा आदर ठेवायचा आहे.
वरदान:-
आठवण आणि
सेवेच्या डबल लाॅक व्दारे सदा सुरक्षित, सदा खुश आणि सदा संतुष्ट भव:
सारा दिवस संकल्प,
बोल आणि कर्म बाबाची आठवण आणि सेवेमध्ये लागले पाहिजे. प्रत्येक संकल्पा मध्ये
बाबाची आठवण असावी, बोलण्याने बाबा ने दिलेला खजाना दुसऱ्यांना द्या, कर्माद्वारे
बाबाचे चरित्र सिद्ध करा, जर अशी आठवण आणि सेवेमध्ये नेहमी व्यस्त राहाल तर डबल लाक
लागल्यामुळे मग माया कधी येऊ शकणार नाही. जे आठवणीने पक्के लाॅक लावतात, ते नेहमी
सुरक्षित, नेहमी खुश आणि नेहमी साठी संतुष्ट राहतात.
बोधवाक्य:-
"बाबा" शब्दाची
हीरे तुल्य चावी बरोबर असेल, तर सर्व खजान्यांची अनुभुती होत राहील.