24-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही यावेळी बाबा बरोबर सेवे मध्ये मदतगार बनले आहात, त्यामुळे तुमचे स्मरण होत आहे, पूजन नाही, कारण शरीर अपवित्र आहे."

प्रश्न:-
कोणता नशा तुम्हाला मुलांच्या बुद्धीमध्ये निरंतर राहीला पाहिजे?

उत्तर:-
आम्हीं शिवबाबा ची मुले आहोत, त्यांच्या कडून राजयोग शिकून, स्वर्गाच्या राजाई चा वरसा घेत आहोत, हा नशा तुम्हाला निरंतर राहिला पाहिजे. विश्वाचे मालक बनायचे आहे तर फार खबरदारीने शिकायचे आणि शिकवायचे आहे. कधी पण बाबाची निंदा करायची नाही. कोणा बरोबर पण भांडण-तंटे करायचे नाहीत. तुम्ही कवडी पासून हिऱ्या सारखे बनत आहात, तर चांगल्या रीतीने धारणा करायची आहे.

गीत:-
जो पिया के साथ है. . .

ओम शांती।
मुलांनी समजले आहे. जे बाबा बरोबर आहेत, ते बापदादा बरोबर आहेत. आता तर दोन्ही आहेत ना. हे चांगल्या रीतीने समजावले आहे, ब्रह्मा द्वारा परमपिता परमात्मा शिव स्थापना कशी करतात? ते तर जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणत आहात, त्यांना स्वतःचे शरीर नाही. कृष्णा ला तर स्वतःचे शरीर आहे. असे तर म्हटले जात नाही कि, परमात्मा श्रीकृष्णाच्या शरीराद्वारे. . . नाही. श्रीकृष्ण तर सतयुगाचे राजकुमार आहेत. परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत, तर जरुर ब्रह्मामध्ये प्रवेश करावा लागेल. आणखीन कोणता उपाय नाही. प्रेरणा इ.ची तर गोष्टच नाही. बाबा ब्रह्मा द्वारे सर्व सांगत आहेत. विजय माळा ज्याला रुद्र माळा म्हटले जाते. जे मनुष्य पुजत आहेत, स्मरण करत आहेत. तुम्ही मुले समजत आहात,ही रुद्र माळा फक्त स्मरण केली जाते. मेरू तर म्हटले जाते,ब्रह्मा-सरस्वतीला, बाकी मुलांची माळ आहे. विष्णूची माळ तर एक आहे, पुजली जात आहे. यावेळी तुम्ही पुरुषार्थी आहात. तुमचे स्मरण शेवटी होत आहे. आत्म्यांची माळा आहे कां जीव आत्म्यांची? प्रश्न निर्माण होतो ना. विष्णूची माळा म्हटले तर चैतन्य जीव आत्म्याची माळा. लक्ष्मी नारायणा ची पुजा केली जाते ना, कारण त्यांची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहेत. रुद्र माळा ती तर फक्त आत्म्यांची आहे, कारण शरीर तर अपवित्र आहे. ते तर पुजले जाऊ शकत नाही. आत्मा कशी पुजली जात आहे? तुम्ही म्हणता कि, रुद्र माळा पुजली जात आहे. परंतु नाही, पुजली जात नाही. जेंव्हा नावच आहे स्मरणे. जे पण मणके आहेत, ते तुम्हा मुलांचे स्मरण होत आहे, जेंव्हा शरीरा मध्ये आहात. मणके तर ब्राह्मणाचे आहेत. स्मरण कोणाचे करत आहेत? हे पण कोणाला माहित नाही. हे ब्राह्मण आहेत, जी भारताची सेवा करत आहेत. त्यांची आठवण करत आहेत. जगदंबा व इतर देवी अनेक आहेत, त्यांची आठवण केली पाहिजे? पुजणे लायक लक्ष्मी नारायण बनत आहेत. तुम्हीं नाही, कारण तुमचे शरीर पतित आहे. आत्मा पवित्र आहे, परंतु ती पुजली जात नाही, स्मरण केले जाते. कोणी पण तुम्हाला विचारले तर तो समजलेला असला पाहिजे. तुम्ही ब्राह्मणी आहात. तुमची आठवण देवीच्या रूपा मध्ये आहे. तुम्ही श्रीमता वर स्वतः पावन बनत आहात, तर ही माळा प्रथम ब्राह्मणांची समजली पाहिजे, मग देवतांची. विचार सागर मंथन केल्याने निष्कर्ष निघेल. जेंव्हा आत्मे शाळीग्राम रूपा मध्ये आहेत, तेंव्हा पुजले जातात. शिवाची पूजा होते, तर सालिग्राम ची पण होते, कारण आत्मा पवित्र आहे, शरीर नाही.स्मरण फक्त तुमचे केले जाते कां? तुम्ही शरीरा बरोबर सेवा करत आहात. तुमची पूजा होऊ शकत नाही, मग जे़ंव्हा शरीर सोडता, तेंव्हा तुम्ही पण शिवा बरोबर पुजले जाता. विचार केला जातो ना. तुम्ही यावेळी ब्राह्मण आहात. शिवबाबा पण ब्रह्मा मध्ये येत आहेत, तर ब्रह्मा पण साकार मध्ये आहेत. तुम्ही मेहनत करत आहात. ही माळ जशी साकार ची आहे. ब्रह्मा सरस्वती आणि तुम्ही ज्ञान गंगा. तुम्ही भारता ला स्वर्ग बनविले. हा रुद्र यज्ञ रचला. जी पूजा केली जाते, त्या मध्ये फक्त शिव आणि सालिग्राम आहेत. त्यामध्ये ब्रह्मा सरस्वती किंवा तुम्हा मुलांचे नाव नाही. इथे तर सर्वांचे नाव आहे. तुमचे स्मरण करत आहेत. कोण कोण ज्ञान गंगा होत्या. ते तर ज्ञानाचे सागर आहेत. ही ब्रह्मपुत्रा मोठी नदी आहे. ही ब्रह्मा माता पण आहे. सागर एक आहे, बाकी गंगा तर वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या आहेत. नंबरवार ज्यांना चांगले ज्ञान आहे, त्यांना सरोवर म्हटले जाते. महिमा पण आहे. म्हणतात, मानसरोवर मध्ये स्नान केल्यामुळे अति सुंदर बनून जातात. तर तुमची माळा स्मरण केली जाते.स्मरण म्हणत आहेत ना. स्मरण करा, ते तर फक्त राम राम म्हणत आहेत. परंतु तुम्ही जाणत आहात, स्मरण कोणाचे होईल? जे जास्त सेवा करत आहेत. पहिले बाबा आहेत फुल, मग मेरू, जी फार मेहनत करत आहेत, मग रुद्र माळा, तीच विष्णूची माळा बनत आहे. तुमची फक्त आत्मा पुजली जाते. तुम्ही आता स्मरण लायक आहात. स्मरण तुमचे होत आहे. बाकी पूजा होऊ शकत नाही, कारण आत्मा पवित्र, शरीर अपवित्र आहे. अपवित्र वस्तू कधी पुजली जात नाही. जेंव्हा रुद्र माळ बनण्या लायक बनता, मग शेवटी तुम्ही शुद्ध बनता. तुम्हाला साक्षात्कार होईल, सन्मानाने पास कोण कोण होत आहेत. सेवा केल्यामुळे प्रसिद्धी फार होऊन जाते. माहित पडत जाईल, विजय माळे मध्ये नंबरवार कोण कोण येतील. या गोष्टी फार गुह्य आहेत.

मनुष्य तर फक्त राम राम म्हणत राहतात. ख्रिश्चन लोक क्राईस्टची आठवण करतात. माळा कोणाची असेल? ईश्वर तर एक आहे. बाकीचे जे बरोबर बसले आहेत, त्यांची माळा बनत असेल. या माळेला तुम्ही आता फक्त समजत आहात. आपले आदि सनातन देवी देवता धर्म वाले समजत नाहीत, तर इतर कसे समजतील. सर्वाना पतिता पासून पावन बनविणारे तर एकच बाबा आहेत. क्राईष्ट साठी असे म्हणत नाहीत कि, ते पतित-पावन बनविणारे आहेत. त्यांना जन्म मरण मध्ये येऊन खाली उतरायचेच आहे. खरेतर त्यांना गुरु पण म्हणू नये, कारण सर्वांचा सदगती दाता एकच बाबा आहेत. ते तर जेंव्हा अंत येतो, झाड जडजडीभूत होऊन जाते, तेंव्हा बाबा येऊन सर्वांचे सदगती करतात. आत्मा वरून येते धर्म स्थापन करण्यासाठी. त्यांना तर जन्म मरणा मध्ये यायचे आहे. सद्गुरु एकच आहे. ते सर्वांचे सदगती दाता आहेत. खरेतर मनुष्य कोणी सतगुरु होऊ शकत नाही. ते तर फक्त येतातच धर्म स्थापन करण्यासाठी, त्यांच्या मागे सर्व येत राहतात अभिनय करण्यासाठी. जेव्हा सर्व तमोप्रधान अवस्थेला प्राप्त करतात, तेव्हा मी येऊन सर्वांची सदगती करतो. सर्व परत जात आहेत, मग सुरवाती पासून चक्र सुरू होत आहे. तुम्ही राजयोग शिकत आहात. तेच राजाई प्राप्त करतात, मग राजा बनोत किंवा प्रजा बनोत.प्रजा तर पुष्कळ बनत आहे. राजाई पद प्राप्त करण्या मध्ये मेहनत आहे. अंताला पूर्ण माहिती पडेल. कोण विजय माळे मध्ये, ओवले जातील. जे शिकले नाहीत ते शिकलेल्या समोर पाणी भरतील. सतयुगा मध्ये येतील, परंतु नोकर-चाकर बनावे लागेल. हे सर्वांना माहीत होऊन जाईल. जसे परीक्षेच्या दिवसा मध्ये सर्वांना माहित पडते कि, कोण कोण पास होईल. शिक्षणावर लक्ष नसेल तर नापास होऊन जातात. तुमचे हे बेहदचे शिक्षण आहे. ईश्वरीय विश्व विद्यालय तर एक आहे, जिथे मनुष्या पासून देवता बनायचे आहे, त्यामध्ये नंबरवार पास होत आहेत. शिक्षण एकच राजयोगाचे आहे, राजाई पद प्राप्त करण्या मध्ये मेहनत आहे, आणि सेवा पण करायची आहे. जे राजा बनतील त्यांना मग आपली प्रजा पण बनवायची आहे. चांगल्या चांगल्या मुली मोठ-मोठी सेवाकेंद्रे संभाळत आहेत, जास्त प्रजा बनवित आहेत. बाबा पण सांगत आहेत, मोठा बगीचा बनवा, तर बाबा पण येऊन पाहतील. आता तर फार लहान आहे. मुंबई मध्ये तर लाखो बनून जातील. सूर्यवंशी ची तर सारी राजधानी होत आहे, तर अनेक बनून जातील. जे मेहनत करत आहेत ते राजा बनतात, इतर तर प्रजा बनत जातात. गायन पण आहे कि, हे प्रभू तुमची सदगती ची लीला. तुम्ही म्हणत आहात वाह बाबा! तुमची गती मत. . . सर्वांचे सदगती करण्याची श्रीमत, ही सर्वात वेगळी आहे. बाबा बरोबर घेऊन जात आहेत, सोडून जात नाहीत. निराकारी, आकारी, साकारी लोकाला पण ओळखत नाहीत. फक्त सृष्टी च्या आदि मध्य, अंताला जाणणे, ते पण संपूर्ण ज्ञान नाही. प्रथम तर मुळवतन ला ओळखले पाहिजे. जिथे आम्ही आत्मे राहतो. या साऱ्या सृष्टी चक्राला ओळखल्या मुळे तुम्ही चक्रवर्ती राजा बनत आहात. या सर्व किती समजण्याच्या गोष्टी आहेत. ते तर म्हणत आहेत, शिव नाव रूपा पासून वेगळे आहेत. चित्र पण आहे, तरी पण म्हणतात नाव रूपा पासून वेगळे. मग सर्वव्यापी पण म्हणतात. एका खासदाराने म्हटले होते कि, हे मी मानत नाही कि, ईश्वर सर्वव्यापी आहे. मनुष्य एक दोघाला मारतात, हे काय ईश्वराचे काम आहे? पुढे चालून या गोष्टीला समजतील. जे़ंव्हा तुमची पण वृध्दी होईल. बाबानी रात्री पण समजावले होते, जे स्वतःला हुशार समजतात, त्यांनी अशी पत्रे लिहावीत. हे पूर्ण ज्ञान काय आहे, त्याना समजले पाहिजे. लिहू शकता, आम्ही पूर्ण ज्ञान देऊ शकतो. मुळवतन चे ज्ञान देऊ शकतो, निराकार बाबाचा पण परिचय देऊ शकतो, मग प्रजापिता ब्रह्मा आणि त्यांच्या ब्राह्मण धर्मा विषयी पण समजावू शकतो. लक्ष्मी नारायण मग राम-सीता त्यांची राजधानी कशी चालते, मग त्यांची राजाई कोण हिसकावून घेत आहे, तो स्वर्ग कुठे गेला. जसे म्हटले जाते, नर्क कुठे गेला? नाहीसा झाला. स्वर्ग पण नाहीसा होईल. त्यावेळी पण भूकंप इत्यादी होतात. ते हिरे जवाहराताचे महल इत्यादी कसे नाहीसे झाले, जे कोणी बाहेर काढू शकत नाहीत. सोने, हिरे जवाहराताचे महल कधी खालून निघाले नाहीत. सोमनाथ इ. चे मंदिर तर नंतर बनले आहे, त्यापेक्षा त्यांची घरे चांगली असतील. लक्ष्मी नारायणा चे घर कसे असेल? ती सारी मालमत्ता कुठे गेली? अशा गोष्टी जेंव्हा विद्वान ऐकतील, तर आश्चर्य करतील, यांचे ज्ञान तर जबरदस्त आहे. मनुष्य तर कांही पण ओळखत नाहीत, फक्त सर्वव्यापी म्हणतात. या सर्व समजण्याच्या आणि समजावून घेण्याच्या गोष्टी आहेत. तुम्हाला धन मिळत आहे, मग दान करायचे आहे. बाबा तुम्हाला देत आहेत, तुम्ही पण देत राहा. हा अखुट खजाना आहे, सारा आधार धारणेवर आहे. जेवढी धारणा, तेवढे उंच पद मिळेल. विचार करा कुठे कौडी, कुठे हिरा. हिऱ्याची किंमत सर्वात जास्त आहे. कौडी ची किंमत सर्वात कमी. आता तुम्ही कौडी पासून हिरा बनत आहात. या गोष्टी कधी कोणीच्या स्वप्ना मध्ये पण येणार नाहीत.फक्त समजतात बरोबर लक्ष्मी नारायणाचे राज्य होते, जे होऊन गेले आहे. बाकी हे राज्य कधी कोणी दिले, हे कांही जाणत नाहीत. राजाई कोणी दिली? इथे तर कांही पण नाही. राजयोगा द्वारे स्वर्गाची राजाई मिळत आहे‌. हे आश्चर्य आहे ना. चांगल्या रीतीने मुलांच्या बुद्धीं मध्ये नशा राहिला पाहिजे. परंतु माया मग तो स्थाई नशा राहू देत नाही. आम्ही शिवबाबाची मुले आहोत. हे ज्ञान शिकून, आम्ही विश्वाचे मालक बनू. हे कधी कोणाच्या बुध्दी मध्ये आले असेल काय! तर बाबा समजावतात कि, मुलांनी किती मेहनत केली पाहिजे. गुरुचे निंदक उंच पद प्राप्त करत नाहीत. ही येथील गोष्ट आहे. त्यांचे तर मुख्य लक्षच नाही. तुमचे तर मुख्य लक्ष आहे. पिता, शिक्षक, गुरु तीन आहेत. तुम्ही जाणत आहात, या शिक्षणाने आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. किती खबरदारीने शिकले आणि शिकविले पाहिजे. अशी कोणती गोष्ट नसावी, ज्यामुळे निंदा होईल. ना कोणा बरोबर भांडण लढाई करायची आहे. सर्वांशी गोड बोलायचे आहे. बाबाचा परिचय ध्यायचा आहे. बाबा म्हणतात दान द्या, तर सुटेल ग्रहण. नंबरवन दान आहे देहअभिमानाचे. या वेळी तर तुम्ही आत्म अभिमानी आहात आणि परमात्मा अभिमानी बनत आहात. हे अमुल्य जीवन आहे. बाबा म्हणतात, मी तुम्हाला कल्प कल्प असे शिकविण्या साठी येतो, मग तुम्ही विसरून जातात. हे पण विश्व नाटका मध्ये नोंदलेले आहे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) सर्वांशी गोड बोलायचे आहे, अशी कोणती गोष्ट करायची नाही, ज्यामुळे बाबाची निंदा होईल. देह अभिमानाचे दान देऊन, आत्म अभिमानी आणि परमात्म अभिमानी बनायचे आहे.

(२) जे ज्ञान धन मिळाले आहे, त्याचे दान करायचे आहे, शिक्षणाने राजाई मिळत आहे, या नशेमध्ये कायम राहायचे आहे. लक्ष देऊन शिक्षण शिकायचे आहे.

वरदान:-
एकाग्रतेच्या अभ्यासा द्वारे अनेक आत्म्यांची इच्छा पूर्ण करणारे, विश्व कल्याणकारी भव:

सर्व आत्म्यां ची इच्छा आहे कि, भटकणारी बुद्धी किंवा मनाच्या चंचलते पासून एकाग्र होऊन जावे. तर त्यांच्या या इच्छेला पूर्ण करण्यासाठी प्रथम तुम्ही स्वतः आपल्या संकल्पांना एकाग्र करण्याचा अभ्यास वाढवा, निरंतर एकरस स्थिती मध्ये किंवा एक बाप दुसरे कोणी नाही. . . या स्थिती मध्ये स्थित राहा, व्यर्थ संकल्पांना शुद्ध संकल्पा मध्ये परिवर्तन करा, तेंव्हा विश्व कल्याणकारी भव चे वरदान प्राप्त होईल.

बोधवाक्य:-
ब्रह्मा बाबा सारखे गुण स्वरूप, शक्ती स्वरूप, आणि याद स्वरूप बनणारे च खरे ब्राह्मण आहेत.