21-03-21 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
22.11.87 ओम शान्ति
मधुबन
मदतीच्या सागरा कडून
पदमगुणा मदत घेण्याची विधी
आज बापदादा आपल्या
चोहीकडच्या हिंमतवान मुलांना पाहत आहेत. आदि पासून आता पर्यंत प्रत्येक ब्राह्मण
आत्मा हिंमतीच्या आधाराने, बापदादाची मदत घेण्यासाठी पात्र बनलेली आहेत आणि "हिंमत
मुलांची मदत बाबाची" या वरदानाने पुरुषार्था मध्ये, क्रमवारीने पुढे चालत आहेत.
मुलांची एका पावलाची हिंमत आणि बाबाची पदम पावलाची मदत, प्रत्येक मुलांना प्राप्त
होत आहे, कारण हा बापदादाचा वायदा म्हणा, वरसा म्हणा, सर्व मुलांसाठी आहे. आणि याच
श्रेष्ठ सहज प्राप्ती मुळेच ६३ जन्माचे निर्बल आत्मे बलवान बनून, पुढे वाटचाल करत
आहेत. ब्राह्मण जन्म घेताच, पहिली हिंमत कोणती धारण केली? पहिली हिंमत, जे असंभव ला
संभव करून दाखविले. पवित्रतेच्या विशेषतेची धारणा केली. हिंमतीने दृढ संकल्प केला
कि, आम्हाला पवित्र बनायचेच आहे आणि बाबांनी पदमगुणा मदत दिली कि, तुम्ही आत्मे आदि,
अनादि पवित्र होता, अनेक वेळा, पवित्र बनले आहात, आणि बनत राहाल. नवीन गोष्ट नाही,
अनेक वेळेच्या श्रेष्ठ स्थितीला परत फक्त पुनरावृत करत आहात. आता पण तुम्हां पवित्र
आत्म्याचे भक्त, तुमच्या जड चित्रा समोर पवित्रतेची शक्ती मागत आहेत, तुमच्या
पवित्रतेचे गीत गात आहेत, त्या बरोबर तुमच्या पवित्रतेची निशाणी, प्रत्येक पुज्य
आत्म्यावर प्रकाशाचा ताज आहे. अशा स्मृती द्वारे समर्थ बनविले म्हणजे बाबाच्या
मदतीमुळे तुम्ही निर्बल पासून बलवान बनले. एवढे बलवान बनता, जे विश्वाला आव्हान
करण्यासाठी निमित्त बनले आहात कि, आम्ही विश्वाला पावन बनवूनच दाखवू. निर्बला पासून
एवढे बलवान बनले आहात, जे द्वापारचे नामीग्रामी ऋषि,मुनी, महान आत्मा, ज्या गोष्टीला
खंडन करत आहेत कि, प्रवृत्ती मध्ये राहून पवित्र राहणे, असंभव आहे आणि स्वतः आजकाल
च्या वेळेनुसार, स्वतःसाठी पण कठीण समजत आहेत आणि तुम्ही त्यांच्या समोर नैसर्गिक
रीतीने वर्णन करत आहात कि, हे तर आत्म्याचे आदि, अनादि निजी स्वरूप आहे, यामध्ये
अवघड काय आहे? याला म्हटले जाते हिंमत मुलांची मदत बाबाची. असंभव, सहज अनुभव झाले
आणि होत राहील. जेवढे ते असंभव समजत आहेत, तेवढे तुम्हीं अती सहज म्हणत आहात. तर
बाबाच्या ज्ञानाच्या शक्तीच्या मदतीने आणि आठवणीने, आत्म्याची पावन स्थितीचा,
अनुभूतीच्या शक्तीच्या मदतीने, परिवर्तन केले आहे. या पहिल्या पाऊलाच्या हिंमतीने,
बाबाची पदमगुणा मदत मिळते.
तसेच मायाजीत बनण्यासाठी, किती पण वेगवेगळ्या रूपाने माया वार करण्यासाठी, आदि
पासून आता पर्यंत येत राहते, कधी राॅयल रुपाने येईल, कधी प्रसिद्ध रूपाने येईल, कधी
गुप्त रूपाने येईल, आणि कधी नकली ईश्वरीय रूपाने येईल.६३ जन्म मायेचे साथी बनून
राहिले आहात. अशा पक्या साथीला सोडणे, पण अवघड होत आहे,त्यामुळे वेगवेगळ्या रूपा
मध्ये ती पण वार करण्यासाठी मजबूर आहे, आणि तुम्ही इथे मजबूत आहात. एवढे वार झाले,
तरीपण जी हिंमतवान मुले आहेत आणि बाबाच्या पदमगुणा मदतीचे पात्र मुले आहात, मदती
मुळे मायेच्या वाराला आव्हान करत आहात कि, तुझे काम येण्याचे आहे आणि आमचे काम विजय
प्राप्त करण्याचे आहे.मायेच्या आघात करण्याला खेळ समजत आहात, मायाच्या सिंह रूपाला,
मुंगी समजत आहात, कारण समजत आहात कि, हे मायेचे राज्य आता समाप्त होणार आहे आणि
आम्हा अनेक वेळेच्या विजयी आत्म्यांचा विजय १०० टक्के निश्चित आहे, त्यामुळे हाच "निश्चित"
पणाचा नशा, बाबाच्या पदमगुणा मदतीचा अधिकार प्राप्त करवीत आहे. तर जिथे हिंमत
मुलांची, मदत सर्वशक्तिमान बाबाची आहे, तिथे असंभवला संभव करणे किंवा मायेला,
विश्वाला आव्हान करणे, कांही मोठी गोष्ट नाही, असे समजत आहात ना?
बापदादा हा निकाल पाहत होते कि, आदि पासून आता पर्यंत प्रत्येक मुलगा, हिंमतीच्या
आधारावर मदतीचा पात्र बनून कुठपर्यंत सहज पुरुषार्थी बनून पुढे चालत आहे, कुठ
पर्यंत पोहचला आहे. तर काय पाहिले? बाबाची मदत अर्थात दाताची देन, वरदाताचे वरदान
तर सागरा सारखे आहेत. परंतु सागरा कडून घेणारी कांही मुले सागरा सारखी भरपूर बनून
इतरांना पण बनवित आहेत आणि कांही मुले मदतीच्या विधीला न ओळखल्याने, मदत घेण्या ऐवजी
आपल्याच मेहनतीने, कधी तीव्रगतीने, कधी हिंमत हारून खेळामध्ये खाली वर होत आहेत आणि
कांही मुले कधी मदत, कधी मेहनत घेतात. फार काळ मदत पण आहे परंतु कुठे-कुठे निष्काळजी
पणामुळे मदतीच्या विधीला वेळेवर विसरून जात आहेत आणि हिंमत ठेवण्या ऐवजी निष्काळजी
पणामुळे अभिमाना मध्ये येतात कि, आम्ही तर सदा पवित्र आहोतच, बाबा आम्हाला मदत
करणार नाहीत तर कोणाला करणार, बाबा बांधलेले आहेत. या अभिमाना मुळे हिंमती द्वारे
मदतीच्या विधीला विसरून जातात. निष्काळजी पणाचा अभिमान आणि स्वतः वर लक्ष न देण्याचा
अभिमान, मदती पासून वंचित करत आहे. समजत आहेत कि, आता पर्यत फार योग केला आहे,
ज्ञानी तू आत्मा पण बनले आहेत, योगी तू आत्मा पण बनले आहेत, सेवाधारी पण फार
प्रसिद्ध बनले आहेत, सेवाकेंद्राचे इन्चार्ज पण बनले आहोत, सेवेची राजधानी पण बनली
आहे, प्रकृती पण सेवे योग्य बनली आहे आरामा मध्ये जीवन व्यतीत होत आहे. हे आहे लक्ष
न दिल्यामुळे निष्काळजीपणा, त्यामुळे जोपर्यंत जीवन आहे, तो पर्यंत शिक्षण आणि
संपूर्ण बनण्याचे लक्ष, बेहदच्या वैराग्य वृत्तीचे लक्ष द्यायचे आहे,हे विसरून गेले
आहेत. ब्रह्मा बाबा ला पाहिले आहे, अंतिम संपूर्ण कर्मातीत स्थिती पर्यंत स्वतःवर,
सेवे वर, बेहदच्या वैराग्य वृत्तीवर, विद्यार्थी जीवनाच्या रीती वर लक्ष देऊन,
निमित्त बनून दाखविले, त्यामुळे आदि पासून अंतापर्यंत हिंमत मध्ये राहिले, हिंमत
देण्यासाठी निमित्त बनले, तर बाबाचे नंबरवन मदतीचे पात्र बनून, नंबरवन प्राप्तीला
प्राप्त झाले. भविष्य निश्चित असले तरी निष्काळजी बनले नाहीत. नेहमी आपल्या तीव्र
पुरुषार्थाचे अनुभव, मुलांसमोर अंतापर्यंत सांगत राहिले. मदतीच्या सागरा मध्ये असे
सामावून गेले होते, जे आता पण बाबा सारखे, प्रत्येक मुलांना अव्यक्त रूपामध्ये पण
मदतगार आहेत. याला म्हटले जाते, एका पाऊलाची हिंमत आणि पदम गुणा मदतीचे पात्र बनणे.
तर बापदादा पाहत होते कि, कांही मुले मदतीचे पात्र असून पण मदती पासून वंचित का
राहत आहेत? याचे कारण सांगितले कि, हिंमतीच्या विधीला विसरल्यामुळे, अभिमान म्हणजे
निष्काळजीपणा आणि स्वतःवर लक्ष न ठेवल्यामुळे. विधी नसल्यामुळे वरदाना पासून वंचित
राहतात. सागराची मुले असून पण लहान लहान तलाव बनले आहेत. जसे तळ्याचे पाणी थांबलेले
असते,तसे पुरुषार्था मध्ये थांबून राहतात, त्यामुळे कधी मेहनत, कधी आनंदा मध्ये
राहतात. आज पाहिले तर फार आनंदा मध्ये आहेत आणि उद्या पाहिले तर लहानशा दगडा मुळे
त्याला हटविण्याच्या मेहनती मध्ये लागतात. डोंगर पण नाही, लहानसा दगड आहे. महावीर
पांडव सेनेचे आहेत, परंतु लहानसा खडा- दगड पण पहाड बनतो. त्याच मेहनती मध्ये लागतात.
मग फार हसवितात. जर त्यांना कोणी म्हटले कि, हा तर लहान दगड आहे, तर हसण्याची गोष्ट
काय म्हणतात? तुम्हाला काय माहित, तुमच्या समोर आले तर माहित पडेल. बाबाला पण
म्हणतात, तुम्हीं तर निराकार आहात, तुम्हाला पण काय माहित. ब्रह्मा बाबा ला पण
म्हणतात, तुम्हाला तर बाबाची मदत आहे, तुम्हाला काय माहित. फार चांगल्या चांगल्या
गोष्टी करतात. परंतु त्याचे कारण आहे लहानशी चूक. हिंमत मुलांची मदत बाबाची या
रहस्याला विसरून जात आहेत. ही पण नाटका तील कर्माची गुह्य गती आहे. हिंमत मुलांची
मदत बाबाची, जर ही विधी, कायद्या मध्ये नसती, तर सर्व विश्वात अगोदर राजा बनले असते.
एकाच वेळी सर्व तख्तावर बसतील कां? नंबरवार बनण्याचे विधान या विधी मुळेच बनले आहे.
नाही तर सर्व बाबाला बोलतील कि, ब्रह्मालाच कां पहिला नंबर बनविले, आम्हाला पण बनवू
शकता? त्यामुळे हा ईश्वरीय कायदा, नाटका नुसार बनलेला आहे. निमित्त मात्र हे विधान
नोंदलेले आहे कि, एक पाऊल हिंमतीचे आणि पदम पावले मदतीची. मदतीचे सागर असून पण ही
विधानाची विधि नाटका मध्ये नोंदलेले आहे. तर जेवढी पाहिजे तेवढी हिंमत ठेवा आणि मदत
घ्या. यामध्ये कमी ठेवत नाहीत. जरी एका वर्षाचा मुलगा असेल, कोणी पन्नास वर्षाचा
मुलगा असेल, जरी समर्पित असतील, नाहीतर प्रवृती मधील असतील, सर्वांचा अधिकार समान
आहे. परंतु विधीद्वारे प्राप्ती आहे. तर ईश्वरीय विधानाला समजले ना?
हिंमत तर चांगली ठेवली आहे. इथ पर्यत येण्याची हिंमत पण ठेवत आहात, तेंव्हा तर
पोहचले आहात ना. बाबाचे बनले आहात, तरी पण हिंमत ठेवली आहे, तेंव्हा बनले आहात.
नेहमी हिंमतीच्या विधीने, मदतीचे पात्र बनून चालणे आणि कधी कधी विधीने सिद्धी
प्राप्त करणे, यामध्ये अंतर होऊन जाते. नेहमी प्रत्येक पावला मध्ये, हिंमतीने मदतीचे
पात्र बनून, नंबरवन बनण्याचे लक्ष्याला प्राप्त करा. नंबरवन एक ब्रह्मा बनतील, परंतु
फर्स्ट डिव्हीजन मध्ये संख्या आहे, त्यामुळे नंबरवन म्हटले जाते. समजले? फर्स्ट
डिव्हिजन मध्ये तर येऊ शकता ना? याला नंबरवन मध्ये येणे म्हणतात. कधी निष्काळजी
पणाचे लीला मुलांची सांगेण. फार चांगली लीला करत आहेत. बापदादा तर नेहमी मुलांची
लीला पाहतात. कधी तीव्र पुरुषार्थी ची लीला पण पाहतात, कधी निष्काळजी पणाची लीला पण
पाहतात. अच्छा.
कर्नाटक वाल्यांची विशेषता काय आहे? प्रत्येक झोनची आपापली विशेषता आहे. कर्नाटक
वाल्यांची आपली फार चांगली भाषा आहे. भावनेच्या भाषे मध्ये हुशार आहेत. तसे तर हिंदी
कमी समजत आहेत, परंतु कर्नाटक ची विशेषता आहे, भावनेच्या भाषे मध्ये नंबरवन त्यामुळे
भावनेचे फळ नेहमी मिळत आहे, आणखीन कांही बोलणार नाहीत परंतु नेहमी बाबा,बाबा बोलत
राहतात. ही भावनेची श्रेष्ठ भाषा जाणत आहेत. भावनेची धरणी आहे ना.
चोहीकडच्या हिंमत वाल्या मुलांना, नेहमी बाबा ची मदत प्राप्त करणाऱ्या पात्र
आत्म्यांना, नेहमी विधानाला ओळखून विधि द्वारे सिद्धी प्राप्त करणाऱ्या, श्रेष्ठ
आत्म्यांना,नेहमी ब्रह्मा बाबा सारखे शेवट पर्यंत शिक्षण आणि पुरुषार्था च्या विधी
मध्ये चालणाऱ्या, श्रेष्ट, महान, बाप समान मुलांना, बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
नमस्ते.
पार्टी बरोबर अव्यक्त
बापदादा ची मुलाखत :-
(१) स्वतःला डबल लाईट फरिश्ता अनुभव करत आहात? डबल लाईट स्थिती, फरिश्तेपना ची
स्थिती आहे. फरिस्ता म्हणजे प्रकाश. जेंव्हा बाबाचे बनले आहात, तर सारे ओझे बाबाला
दिले आहे ना? जेंव्हा ओझे हलके झाले तर फरिश्ता बनता. बाबा आलेच आहेत,ओझे समाप्त
करण्यासाठी. तर जेंव्हा बाबा ओझे समाप्त करणारे आहेत, तर तुम्हीं सर्वांनी ओझे
समाप्त केले आहे ना? कोणते लहानसे गाठोडे लपून तर ठेवले नाही? सर्व कांही दिले आहे,
कां थोडे थोडे वेळेसाठी ठेवले आहे? थोडे थोडे जुने संस्कार आहेत की, ते पण नष्ट झाले
आहेत? जुना स्वभाव, जुना संस्कार, तो पण खजाना आहे ना. तो पण दिला आहे? जर थोडा पण
राहिला असेल तर तो वरून खाली घेऊन येईल, फरिश्ता बनून उडत्या कलेचा अनुभव करू देणार
नाही. कधी उंच तर कधी खाली येत राहाल, त्यामुळे बापदादा म्हणतात, सर्व देऊन टाका.
ही रावणाची संपत्ती आहे ना. रावणाची संपत्ती आपल्या जवळ ठेवली, तर दुःखच प्राप्त
होईल. फरिश्ता म्हणजे थोडी पण रावणाची संपत्ती नसावी, जुना स्वभाव किंवा संस्कार
येत आहे कां? म्हणत आहात ना, इच्छा तर नव्हती परंतु होऊन गेले, केले किंवा होऊन गेले.
तर यातून सिद्ध होते कि, लहानसे जुने गाठोडे आपल्या जवळ ठेवलेले आहे. कचरा पट्टीची
गाठोडे आहे. तर नेहमी साठी फरिस्ता बनणे हेच ब्राह्मण जीवन आहे. मागील सर्व नाहीसे
होऊन गेले. जुने खाते भस्म केले आहे. आता नवीन गोष्टी, नवीन खाते. जर थोडे पण जुने
कर्ज राहिले असेल, तर नेहमीच माया येत राहील, कारण कर्जाला मर्ज म्हटले जाते,
त्यामुळे सारेच खाते समाप्त करा. नवीन जीवन मिळाले आहे, तर जुने सर्व समाप्त करा.
(२) नेहमी 'वाह- वाह' चे गीत गाणारे आहात ना? 'हाय-हाय' चे गीत समाप्त झाले आहेत,
आणि' वाह-वाह' चे गीत नेहमी मनातून गात राहतात. जे पण श्रेष्ठ कर्म करत आहात तर
मनातून काय निघते? वाह माझे श्रेष्ठ कर्म! किंवा वाह श्रेष्ठ कर्म शिकविणारे! किंवा
वाह श्रेष्ठ वेळ, श्रेष्ठ कर्म करविणारे! तर सदा 'वाह- वाह' चे गीत गाणारे आत्मे
आहात ना? कधी चुकून पण 'हाय' तर निघत नाही? हाय, हे काय झाले- नाही. कोणता दुःखाचे
देखावा पाहून पण 'हाय' शब्द निघाला नाही पाहिजे. काल 'हाय-हाय' चे गीत गात होता आणि
आज 'वाह-वाह'चे गीत गात आहात. एवढे अंतर झाले आहे! ही कोणाची शक्ती आहे? बाबाची का
नाटकाची?( बाबाची) बाबा पण नाटका नुसार आले आहेत ना. तर नाटक पण शक्तिशाली झाले. आता
नाटका मध्ये अभिनय नसता तर बाबा पण काय करतील. बाबा पण शक्तिशाली आहेत आणि नाटक पण
शक्तिशाली आहे. तर दोघांचे गीत गात राहा, वाह नाटक वाह! जे स्वप्ना मध्ये पण नव्हते,
ते साकार मध्ये झाले. घरी बसल्या सर्व कांही मिळाले. घरी बसल्या एवढे भाग्य मिळाले
आहे, त्याला म्हटले जाते हिऱ्याची लॉटरी.
(३) संगमयुगी स्वराज्य अधिकारी आत्मे बनले आहात? प्रत्येक कर्मेंद्रियावर आपले
राज्य आहे? कोणती कर्मेंद्रिया धोका तर देत नाही? कधी संकल्प मध्ये पण हार तर होत
नाही? कधी व्यर्थ संकल्प चालत आहेत? 'स्वराज्य अधिकारी आत्मे आहोत' या निश्चय आणि
नशेने नेहमी शक्तिशाली बनून, मायजीत ते जगतजीत बनतात. स्वराज्य अधिकारी आत्मे,
सहजयोगी,निरंतर योगी बनू शकतात. स्वराज्य अधिकाराचा नशा आणि निश्चयाने पुढे चालत
राहा. माता नष्टोमोहा आहात कि मोह आहे? पांडवांना कधी क्रोधाचा अंशमात्र जोश येत आहे?
कधी कोणी थोडे खाली वर केले तर क्रोध येतो? थोडी सेवेची संधी कमी मिळाली, दुसऱ्याला
जादा मिळाली, तर बहिणी वर थोडा तरी जोश येतो कि, ही काय करत आहे? पाहा, पेपर येईल
कारण थोडा पण देह अभिमान आला तर त्यातून जोश किंवा क्रोध सहजच येतो, त्यामुळे
स्वराज्य अधिकारी अर्थात नेहमीच निरहंकारी, नेहमीच निर्माण बनून सेवाधारी बनणारे.
मोहाचे बंधन पण नष्ट. अच्छा.
वरदान:-
बाबा सारखे आपल्या प्रत्येक बोल व कर्माला स्मृतिस्थळ बनविणारे, दिल तख्तनशीन तेच
राज्य तख्तनशीन भव:
जसे बाबा द्वारे जे
पण बोल निघतात ते स्मृती रूप बनून जातात, तसे जे बाबा सारखे आहेत, ते पण जे बोलतात
ते सर्वांच्या मनामध्ये सामावले जाते, म्हणजे स्मृती स्वरूप बनून जाते, ते ज्या
आत्म्या प्रति संकल्प करतात तर त्यांच्या मनाला लागते. त्यांचे दोन शब्द पण मनाला
आराम देणारे आहेत, त्यांचे व्दारे, जवळीकते चा अनुभव होतो, त्यामुळे त्यांना सर्व
आपले समजत आहेत, अशी समान मुलेच दिलतख्तनशीन तेच राज्य तख्तनशीन बांनतात.
सुविचार:-
आपल्या उडत्या
कलेद्वारे, प्रत्येक समस्येला, विना अडथळ्या शिवाय पार करणारे, उडणारा पक्षी बना.