11-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही सर्वोत्तम सौभाग्यशाली ब्राह्मण कुळभुषण आहात,तुम्हाला स्वतः भगवान शुभेच्छा देत आहेत"

प्रश्न:-
बाबा मुलांना संगम युगामध्येच सृष्टीचा समाचार ऐकवतात, सतयुगामध्ये नाही, का?

उत्तर:-
कारण सतयुग आहेच सृष्टीच्या सुरुवातीची वेळ,त्या वेळेत सर्व सृष्टीचा समाचार म्हणजे सृष्टीच्या आदी मध्यं अंतचे ज्ञान कसे ऐकवतील,जोपर्यंत सृष्टीच्या वर्तुळाची पुनरावृत्ती होत नाही, तोपर्यंत समाचार कसे ऐकवू शकतील? संगम युगामध्ये तुम्ही मुलं बाबा द्वारे पूर्ण समाचार ऐकतात. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो.

ओम शांती।
आज आहे त्रिमूर्ती शिवजयंती, म्हणजेच ब्राह्मण जयंती,म्हणजे संगमयुग जयंती चा शुभ दिवस.अनेक आहेत ज्यांना बाबा ईश्वरीय जन्मसिध्द अधिकाराच्या शुभेच्छा पण देऊ शकत नाहीत.अनेक आहेत ज्यांना माहित नाही की,शिवबाबा कोण आहेत,त्यांच्याद्वारे काय मिळणार आहे ,ते शुभेच्छा कसे समजू शकतील? नवीन मुलं तर समजू शकणार नाहीत.ही ज्ञानाची रास(डान्स) आहे.असे म्हणतात श्रीकृष्ण रास करत होते.येथे मुली राधा-कृष्ण बनून रास करतात परंतु अशाप्रकारच्या रासची तर गोष्टच नाही.तेथे तर सतयुगामध्ये लहानपणी राजकुमार आणि राजकुमारी सोबत रास करतील.मुलं जाणतात हे बाप दादा आहेत, दादांना आजोबा म्हटले जाते.हे दादा तर शारीरिक पिता झाले.ही तर आश्चर्यकारक गोष्ट आहे.ते दादा आत्मिक आहेत आणि हे शारीरिक आहेत,त्यांना बाप दादा म्हणतात. बाबा पासून दादाद्वारे वारसा मिळतो,वारसा आजोबाचा असतो. सर्व आत्मे भाऊ भाऊ आहेत,तर वारसा पित्यापासून मिळतो.बाबा म्हणतात,तुम्हा आत्म्यांना आप-आपले शरीर,आप-आपले कर्मेंद्रिये आहेत,मला निराकार म्हणतात.तर जरूर मला शरीर पाहिजे,तेव्हा तर मुलांना राजयोग शिकवू शकतो किंवा मनुष्यांपासून देवता,पतितापासून पावन बनण्याचा मार्ग सांगू शकतो किंवा आत्मरुपी खराब वस्त्राला स्वच्छ करू शकतो,तर जरुर मोठे धोबी म्हणजे परीट आहेत ना.संपूर्ण विश्वाच्या आत्म्याला आणि शरीराला स्वच्छ करतात.ज्ञान आणि योगाद्वारे तुम्हा आत्म्यांना स्वच्छ केले जाते. आज तुम्ही मुलं आले आहात,तुम्ही जाणतात आम्ही शिवबाबांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. बाबा परत म्हणतात तुम्ही ज्यांना शुभेच्छा देतात,ते पिता पण तुम्हा मुलांना शुभेच्छा देतात कारण तुम्ही सर्वोत्तम स्वभाग्यशाली ब्राह्मण कुळभूषण आहात.देवता एवढे उत्तम नाहीत जेवढे तुम्ही आहात.ब्राह्मण देवता पेक्षा उच्च आहेत.उच्च ते उच्च तर शिव पिता आहेत,परत ते ब्रह्मा तनामध्ये येतात,त्यांची तुम्ही मुलं खूप उच्च ते उच्च ब्राह्मण बनतात. ब्राह्मणाच्या शेंडीचे गायन आहे, त्याच्यानंतर देवता आहेत.सर्वात वरती शिव पिता आहेत.बाबांनी तुम्हा मुलांना स्वर्गाचा वारसा देण्यासाठी, ब्राह्मण ब्राह्मणी बनवले आहे.या लक्ष्मी-नारायणला पहा,यांची अनेक मंदिर बनवली आहेत,डोके टेकवतात.भारतवासींना हे माहीत व्हायला पाहिजे की,हे पण मनुष्य आहेत.लक्ष्मीनारायण दोन्ही वेगवेगळे आहेत.येथे तर एका मनुष्यावरती दोन-दोन नाव ठेवले आहेत.एकाचे नाव लक्ष्मी-नारायण म्हणजे स्वतःला विष्णू चतुर्भुज म्हणतात, लक्ष्मी-नारायण किंवा राधे कृष्ण नाम ठेवतात,तर चतुर्भुज झाले ना.ते विष्णू तर सुक्ष्मवतनचे मुख्य लक्ष आहे.तुम्ही या विष्णुपुरी चे मालक बनाल.हे लक्ष्मीनारायण विष्णुपुरी चे मालक आहेत.विष्णूला चार भुजा देतात.दोन लक्ष्मीच्या दोन नारायणच्या आहेत.तुम्ही म्हणाल आम्ही विष्णुपुरी चे मालक बनत आहोत.

अच्छा,बाबाच्या महिमा चे गीत ऐकवा.संपूर्ण दुनियेमध्ये सुरुवातीपासून आज पर्यंत कोणाची इतकी महिमा नाही,शिवाय एका शिव पित्याच्या,क्रमानुसार तर आहेतच.सर्वात जास्त सर्वोत्तम महिमा परमपिता परमात्म्याची आहे, ज्याची तुम्ही सर्व मुल आहात. आम्ही ईश्वरी संतान आहोत.असे पण म्हणतात ईश्वर तर स्वर्गाचे रचनाकार आहेत,परत आम्ही नरकामध्ये का पडले आहोत. ईश्वराचा येथे जन्म आहे.क्रिश्चन म्हणतील,आम्ही ख्रिस्ताचे आहोत.हे भारतवासींना विसरले आहे की, आम्ही परमपिता परमात्मा शिवाचे प्रत्यक्षात मुलं आहोत.बाबा येतात तर मुलांना आपले बनवून राज्यभाग्य देतात.आज बाबा चांगल्या प्रकारे समजवत आहेत, कारण नवीन मुलं पण खूप आहेत, यांच्यासाठी समजणे कठीण आहे. होय तरीही स्वर्गवासी बनतात. स्वर्गामध्ये सूर्यवंशी राजाराणी आहेत,दासदासी पण आहेत,प्रजा पण असते.त्यांच्या मध्ये कोणी गरीब कोणी सावकार असतात,त्यांच्या पण दास-दासी असतात.सर्व राजधानी येथेच स्थापन होत आहे,हे तर कोणाला माहित नाही.सर्वांची आत्मा सतोप्रधान आहे.ज्ञानाचा तिसरा नेत्र कोणाला नाही.आत्ता गीता मध्ये बाबांची महिमा ऐकली,ते सर्वांचे पिता आहेत.भगवंताला पिता म्हणतात,बेहद्दचे सुख देणारे पिता आहेत.हाच भारत आहे,ज्यामध्ये बेहद्दचे सुख होते,लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते.हे लक्ष्मीनारायण लहानपणी राधेकृष्ण आहेत,परत स्वयंवरानंतर लक्ष्मी-नारायण नाव होते. याच भारतामध्ये पाच हजार वर्षापूर्वी देवतांचे राज्य होते, लक्ष्मीनारायण शिवाय दुसऱ्या कोणाचे राज्य नव्हते,कोणता खंड नव्हता.तर आता भारतवासीयांना जरूर माहिती व्हायला पाहिजे की, लक्ष्मी-नारायणने अगोदरच्या जन्मांमध्ये कोणते कर्म केले आहेत. जसे म्हणतात,बिर्लाने कोणते कर्म केले आहेत,जे धनवान बनले आहेत. असे जरुर म्हणतील,पूर्व जन्मामध्ये दान-पुण्य केले असेल.कोणाजवळ खूप धन असते,तर कोणाजवळ खाण्यासाठी पण काही नसते कारण कर्म तसे केले आहेत. कर्माला तर मानतात ना.कर्म,अकर्म, विकर्माची गती तर गीताच्या भगवंताने ऐकवली होती.ज्याची महिमा ऐकली.भगवान तर एकच आहेत. मनुष्याला भगवान म्हटले जात नाही. आता बाबा कुठे आले आहेत.बाबा समजवतात समोर महाभारत लढाई आहे.तर अतिगोड बाबा समजवतात,त्यांना दुःखामध्ये सर्व आठवण करतात.दुःखामध्ये सर्व आठवण करतात,सुखामध्ये कोणी नाही.शिवबाबांना दुखा मध्येच सर्व आठवण करतात सुखामध्ये कोणी करत नाहीत.स्वर्गामध्ये तर दुःख नसते,तेथे बाबा द्वारे मिळवलेला वारसा असतो.पाच हजार वर्षांपूर्वी जेव्हा शिव बाबा आले,तर भारताला स्वर्ग बनवले,आता तर नर्क आहे. बाबा स्वर्ग बनवण्यासाठी आले आहेत.दुनियेला तर हे पण माहित नाही,ते म्हणतात आम्ही सर्व अंध आहोत.अंधाची काठी प्रभू तुम्ही या, येऊन आम्हाला ज्ञाननेत्र प्रदान करा. तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे.जेथे आम्ही आत्मे राहतो,ते शांतीधाम आहे.बाबा पण तेथेच राहतात.तुम्ही आत्मे आणि मी राहतो.यांच्या आत्म्याला म्हणतात,मी तुम्हा सर्वा आत्म्याचा पिता तेथे राहतो.तुम्ही पुनर्जन्माची भुमिका वठवत आले आहात,मी पुनर्जन्म घेत नाही.तुम्ही विश्वाचे मालक बनतात, मी बनत नाही.तुम्हाला ८४ जन्म घ्यावे लागतात.तुम्हाला समजवले होते की,हे मुलांनो तुम्ही स्वतःच्या जन्माला जाणत नाहीत. चौर्‍यांशी लक्ष जन्म म्हणतात,या खोट्या गोष्टी आहेत.मी ज्ञानाचा सागर,पतित-पावन आहे.मी तेव्हाच येतो,जेव्हा सर्व पतित असतात. तेव्हा तर सृष्टीच्या आदी मध्यं अंतचे रहस्य समजावून,त्रिकालदर्शी बनवतो.अनेक जण विचारतात प्रथम मनुष्य कसे रचले,भगवंतांनी सृष्टी कशी रचली.एका ग्रंथांमध्ये दाखवतात,प्रलय झाला परत सागरामध्ये पिंपळाच्या पानावरती कृष्ण बालक आला.बाबा म्हणतात अशी कोणती गोष्ट नाही.हे नाटक आहे.सतयुग त्रेता दिवस आहे आणि द्वापर कलियुग रात्र आहे.मुलं बाबांना शुभेच्छा देतात.बाबा म्हणतात,तुम्हाला पण शुभेच्छा. तुम्ही पण शंभर टक्के दुर्भाग्यशाली पासून १०० टक्के सौभाग्यशाली बनतात.तुम्ही भारतवासीच होते परंतु तुम्हाला माहित नाही.बाबा येऊन सांगतात.तुम्ही आपल्या जन्माला जाणत नव्हते,मी येऊन सांगतो.तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत. बाबा तुम्हाला संगम युगामध्ये सर्व सृष्टीचा समाचार ऐकवतात.सतयुगा मध्ये थोडेच ऐकवतील.ज्यावेळेत सृष्टीच्या आदी मध्य अंत झालाच नाही,तर त्याचा समाचार कसे समजावतील.मी अंत काळामध्ये, कल्पाच्या संगमयुगे येतो.ग्रंथांमध्ये तर युगे युगे लिहले आहे.कृष्ण भगवानुवाच गीते मध्ये लिहिले आहे. सर्व धर्माचे कृष्णाला भगवान थोडेच मानतील.भगवान तर निराकार आहेत ना.ते सर्व आत्म्याचे पिता आहेत.बाबा पासून वारसा मिळतो. तुम्ही सर्व आत्मा आहात. परमात्म्याला सर्वव्यापी म्हटल्यामुळे पितृत्व भाव होतो.पित्याला कधी वारसा मिळतो का? वारसा तर मुलांना मिळतो.तुम्ही आत्मा सर्व मुलं आहात.शिव पित्याचा वारसा जरूर पाहिजे.हदच्या वारशापासून तुम्ही खुश होत नाहीत,म्हणून बोलवतात,तुमच्या कृपे द्वारे सुख खूप मिळते.आता परत रावणा द्वारे दुःख मिळाल्यामुळे बोलवतात. सर्व आत्मे बोलवतात,कारण यांना दुःख आहे म्हणून आठवण करतात,बाबा येऊन सुख द्या.आता या ज्ञानाद्वारे स्वर्गाची मालक बनतात.तुमची सद्गती होते म्हणून गायन आहे, सर्वांचे सद्गती दाता एक पिताच आहेत.बाबा आता सर्व दुर्गतीमध्ये आहेत परत सर्वांची सद्गती होते. जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, तुम्ही स्वर्गा मध्ये होते,बाकी सर्व मुक्तिधाम मध्ये होते.आता आम्ही बाबा द्वारे राजयोग शिकत आहोत. बाबा म्हणतात मी कल्पाच्या संगम युगामध्ये तुम्हाला शिकवतो,मनुष्या पासून देवता बनवतो.आता तुम्हा मुलांना सर्व रहस्य समजावतो. शिवरात्री कधी झाली,हे तर माहित असायला पाहिजे.काय झाले शिव बाबा कधी आले? काहीच जाणत नाहीत,तर पत्थर बुद्धी झाले ना. आता तुम्ही पारस बुद्धी बनत आहात.भारत पारसपुरी सुवर्णयुग होता.लक्ष्मी नारायणलाच भगवान भगवती म्हणतात,त्यांना वारसा भगवंताने दिला आहे,परत देत आहेत.तुम्हाला परत भगवान भगवती बनवत बनवत आहेत.आता हा तुमचा अनेक जन्माच्या अंतचा जन्म आहे.बाबा म्हणतात विनाश समोर उभा आहे.यास रुद्र ज्ञानयज्ञ म्हटले जाते.ते सर्व पदार्थाचे यज्ञ करतात,ही तर ज्ञानाची गोष्ट आहे. यामध्ये बाबा मनुष्यांना देवता बनवतात.तुम्ही शिवबाबांना येण्याच्या शुभेच्छा देतात.बाबा परत म्हणतात,मी एकटा थोडेच येतो, मला पण शरीर पाहिजे.ब्रह्मा तना मध्ये यावे लागते.प्रथम सूक्ष्मवतन ची रचना करावी लागते,म्हणून त्यांच्या मध्ये प्रवेश केला आहे,हे पतित होते.८४ जन्म घेऊन पतित बनले आहेत.सर्वजण बोलवतात.आता बाबा म्हणतात,मी तुम्हाला परत वारसा देण्यासाठी आलो आहे. बाबाच भारताला स्वर्गाचा वारसा देतात.स्वर्गाचे रचनाकार बाबा आहेत,तर जरूर स्वर्गाची भेट देतील.आता तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात.भविष्यामध्ये मनुष्यांपासून २१ जन्मासाठी देवता बनण्याची ही पाठशाळा आहे. तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात.२१पिढी तुम्ही सुख मिळवतात.स्वर्गा मध्ये अचानक मृत्यू होत नाही.जेव्हा शरीराचे आयुष्य पूर्ण होते,तेव्हा साक्षात्कार होतो. एक शरीर सोडून दुसरे घेतात, सापाचे उदाहरण आहे.तर तुम्ही मुलं बाबांना शुभेच्छा देतात,बाबा परत तुम्हाला शुभेच्छा देतात.तुम्ही आत्ता दुर्भाग्यशाली पासून सौभाग्यशाली बनतात,पतित मनुष्यापासून पावन देवता बनतात.चक्र फिरत राहते.हे तर तुम्हा मुलांना समजावयाचे आहे. परत हे प्रायलोप होते.सतयुगा मध्ये ज्ञानाची आवश्यकता राहत नाही. आत्ता तुम्ही दुर्गती मध्ये आहात, तेव्हा तर ज्ञानाद्वारे सद्गती मिळते. बाबा येऊन स्वर्गाची स्थापना करतात.सर्वांचे सद्गुरु एकच आहेत, बाकी भक्तिमार्गाच्या कर्मकांडा द्वारे कोणाची सद्गती होत नाही.सर्वांना शिडी खाली उतरावी लागते.भारत सतोप्रधान होता,परत ८४ जन्म घ्यावे लागले,तुम्हाला आत्ता प्रगती करायची आहे.मुक्तिधामला आपल्या घरी जायचे आहे.आता नाटक पूर्ण होत आहे.ही जुनी दुनिया नष्ट होईल. भारताला अविनाशी खंड म्हटले जाते.बाबा चे जन्मस्थान कधी नष्ट होत नाही. तुम्ही शांतीधाम मध्ये जाऊन परत याल,येऊन राज्य कराल.पावन आणि पतित भारतामध्येच बनतात.८४ जन्म घेत घेत,आत्ता पतित बनले आहात.योगी पासून भोगी बनले आहात.हे रौरव नर्क आहे.महान दुःखाची वेळ आहे. आता तर आणखी खूप दुःख येणार आहे,कारण नसताना खून होत राहतील.बसल्या बसल्या बॉम्बस पडतील.तुम्ही काय गुन्हा केला आहे, कारण नसताना सर्वांचा विनाश होईल.साक्षात्कार तर मुलांनी केला आहे.आता तुम्ही सृष्टीला जाणले आहे.तुमच्या जवळ ज्ञानाची तलवार आणि ढाल आहे.तुम्ही ब्रह्माची मुख वंशावळ ब्राह्मण आहात.प्रजापिता बाबा आहेत.कल्पा पूर्वी पण यांनी मुख वंशावळीची रचना केली होती. बाबा म्हणतात मी कल्प कल्प येतो, यांच्या मध्ये प्रवेश करून तुम्हाला मुख वंशावळ बनवतो.ब्रह्मा द्वारे स्वर्गाची स्थापना करतो.स्वर्गा मध्ये तर भविष्यामध्ये जाल.ही छी-छी खराब दुनिया,तर नष्ट व्हायला पाहिजे.बेहद्दचे बाबा नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी येतात.बाबा म्हणतात,मी तुम्हा मुलांना हाता मध्ये स्वर्ग घेऊन आलो आहे.तुम्हाला कोणते कष्ट देत नाही.तुम्ही सर्व द्रोपदी आहात,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) देवता पेक्षा उच्च,आम्ही सर्वोत्तम ब्राह्मण आहोत, याच आत्मिक नशेमध्ये राहायचे आहे.ज्ञान आणि योगाद्वारे आत्म्याला स्वच्छ बनवायचे आहे.

(२)सर्वांना शिवबाबांच्या अवतरणाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत.बाबांचा परिचय देऊन पतिता पासून पावन बनवायचे आहे.रावण दुश्मना पासून मुक्त करायचे आहे.

वरदान:-
प्रत्येक संकल्प बाबांच्या पुढे अर्पण करुन,कमजोरीं ना दूर करणारे नेहमी स्वतंत्र भव.

कमजोरी दूर करण्याचे सहज साधन आहे,जे काही संकल्पा मध्ये येते, बाबांना अर्पण करा.सर्व जिम्मेवारी बाबांना द्या,तर स्वतः स्वतंत्र बनाल. फक्त एक द्रढ संकल्प ठेवा की, मी बाबांचा आणि बाबा माझे.जेव्हा या अधिकार स्वरूपामध्ये स्थिर व्हाल तर आधिनता आपोआप निघून जाईल.प्रत्येक सेकंद हे तपासून पहा की,मी बापसमान सर्व शक्तीचे अधिकारी,मास्टर सर्वशक्तिमान आहे?

बोधवाक्य:-
श्रीमताच्या इशार्‍याप्रमाणे सेकंदांमध्ये अनासक्त आणि प्रिय बनणेच तपस्वी आत्म्याची लक्षणं आहेत.