12-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,खराब संगती पासून सुरक्षीत राहून,राजयोगाच्या अभ्यासा वरती पुर्णपणे लक्ष
द्या,तर कोणतेही वादळ येणार नाहीत, बाकी मायेला दोष देऊ नका"
प्रश्न:-
कोणती एक
गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,तर नाव किनाऱ्याला लागेल?
उत्तर:-
"बाबा आपला जो हुकूम" असे नेहमी बाबाच्या आदेशावर चालत राहा,तर तुमची नाव किनार्याला
लागेल.आदेशावर चालणारे मायेच्या आघाता पासून सुरक्षित राहतील.बुद्धीचे कुलुप उघडले
जाईल.नेहमी आनंदामध्ये राहाल.कोणते उलटे कर्म करणार नाहीत.
गीत:-
तुम्ही पाके
हमने जहां पा लिया है…
ओम शांती।
गोड गोड सर्व सेवा केंद्रा वरील मुलांनी गीत ऐकले.सर्व मुलं जाणतात की,बेहद्दच्या
बाबा पासून पाच हजार वर्षापूर्वी सारखेच आम्ही विश्वाची बादशाही घेत आहोत.कल्प कल्प
आम्हीच बादशाही घेत आलो आहोत.बादशाही घेतात परत गमावतात.मुलं जाणतात आता आम्ही
बेहद्दच्या बाबांची गोद घेतली आहे.आम्ही त्यांची मुलं बनलो आहोत.हे पण बरोबर आहे.घर
बसल्या बसल्या पुरुषार्थ करत राहतात. बेहद बाबा पासून उच्चपद मिळवण्यासाठी हे
शिक्षण घेतात.तुम्ही जाणतात ज्ञानसागर पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता शिवबाबा आमचे
पिता आहेत, शिक्षक पण आहेत,सद्गुरु पण आहेत.त्यांच्याद्वारे आम्ही वारसा घेत
आहोत.तर आम्हाला खूप पुरुषार्थ करायला पाहिजे.उच्च पद मिळवण्यासाठी अज्ञान काळामध्ये
पण शाळेमध्ये शिकतात, तर क्रमानुसर गुणाप्रमाणे पास होतात. आपल्या अभ्यासानुसार तेथे
तर असे कोणी म्हणणार नाही की,माया आम्हाला विघ्न आणते किंवा वादळ येते.चांगल्या
प्रकारे अभ्यास करत नाहीत,तर खराब संगतीमध्ये जाऊन फसतात.खेळाकडे कल राहतो, म्हणून
अभ्यास करत नाहीत,नापास होतात.बाकी याला मायाचे वादळ म्हणणार नाही.चाल चलन ठीक राहत
नाही, तर शिक्षक पण प्रमाणपत्र देतात,यांची चलन चांगली नाही.खराब संगत लागली आहे,
यामध्ये रावणाला दोषी बनवण्याची गोष्टच नाही.मोठ मोठ्या चांगल्या चांगल्या
मनुष्यांची काही मुलं तर, चांगले शिक्षण घेतात, काही तर दारू प्यायला लागतात,खराब
कर्म करत राहतात. तर बाबा पण म्हणतात, तुम्ही तर कुपात्र बनले आहात.त्या
शिक्षणामध्ये खूप विषय असतात, इथे तर एकाच प्रकारचे शिक्षण आहे.तेथे मनुष्य
शिकवतात.येथे मुलं जाणतात की आम्हाला भगवान शिकवत आहेत.आम्ही चांगल्या प्रकारे
शिकून विश्वाचे मालक बनू शकतो.मुलं तर खूप आहेत,परत कोणी शिक्षण घेतात,कोणी खराब
संगती मध्ये येतात.याला मायेचे वादळ म्हणणार काय ? खराब संगती मध्ये येऊन कोणी शिकत
नाहीत,त्यामध्ये माया किंवा शिक्षक किंवा पिता काय करतील. शिकू शकत नाहीत तर आपल्या
घरी चालले जातात.हे तर वैश्विक नाटका नुसार प्रथम भट्टीमध्ये यायचे होते, शरण
घेतली.कोणाला पतीने मारले, तंग केले,तर कोणला वैराग्य आले. घरामध्ये चालू शकले
नाहीत,परत कोणी तर येथे येऊन पण घरी गेले. हे राजयोगाचे ज्ञान घेऊ शकले नाही तर,परत
जाऊन नोकरी इत्यादी केली किंवा लग्न केले.हे तर एक कारण आहे,मायेच्या वादळा मुळे
आम्ही शिकू शकत नाही.हे तर समजत नाहीत की खराब संगत मध्ये येऊन हे हाल झाले.
आमच्यामध्ये हे विकार जबरदस्त आहेत.हे का म्हणतात की मायेचे वादळ लागले,तेव्हा आम्ही
विकारात गेलो.हे तर आपल्या वरती अवलंबून आहे.
बाप शिक्षक सद्गुरु पासून जे शिक्षण मिळते,तर त्यावरती चालले पाहिजे.कोणी चालत
नाहीत तर कोणाची खराब संगत आहे किंवा काम विकाराचा नशा किंवा देह अभिमानाचा नशा
आहे.सर्व सेवा केंद्रावरती जाणतात की,आम्ही बेहद्दच्या बाबा पासून विश्वाची बादशाही
घेण्यासाठी शिकत आहोत. निश्चय बसला नाही तर,येथे थांबू शकत नाहीत,आणखी पण खूप आश्रम
आहेत.परंतु तेथे प्राप्ती काहीच नाही.मुख्य लक्षच नाही.ते सर्व लहान मोठे मठ
पंथ,लहान फांद्या वगैरे आहेत.झाडाची वृध्दी तर होणारच आहे.येथे तर सर्व संबंध
आहेत.गोड दैवी झाडाचे जे आहेत,ते निघून येतील.सर्वात गोड कोण असतील? जे सतयुगाचे
महाराजा महाराणी बनतात.आता तुम्ही समजतात,जे प्रथम क्रमांकामध्ये येतात त्यांनी
जरुर चांगले शिक्षण घेतले असेल.तेच सूर्यवंशी घराण्या मध्ये गेले आहेत.असे पण आहेत
गृहस्थ व्यवहारांमध्ये राहून अर्पण जीवनामध्ये आहेत, खूप सेवा करत आहेत,फर्क आहे
ना.जरी मधुबन मध्ये राहतात परंतु शिकू शकत नाहीत,तर दुसऱ्या सेवेमध्ये लागून
राहतात.अंत काळात राजाईचे थोडे पद प्राप्त करतील.असे पाहिले जाते,गृहस्थ
व्यवहारामध्ये राहणारे खूप हुशार बनतात,शिक्षण घेतात आणि दुसऱ्यांना पण
शिकवतात.सर्व तर गृहस्थी नाहीत किंवा कुमार-कुमारींना गृहस्थी म्हणणार नाही.आणि जे
वानप्रस्थी आहेत,ते पण साठ वर्षाच्या नंतर सर्व काही मुलांना देऊन,स्वतः कोणत्या
साधू इत्यादींच्या संगती मध्ये जाऊन राहतात.आजकाल तर तमोप्रधान आहेत,तर मरेपर्यंत
धंदा इत्यादी सोडत नाहीत.अगोदर साठ वर्षानंतर वानप्रस्थ अवस्थे मध्ये जात होते आणि
काशीमध्ये जाऊन राहत होते. हे तर मुलांनी समजले आहे,परत कोणीही जाऊ शकत
नाही.सद्गतीला प्राप्त करू शकत नाहीत.बाबाच मुक्ती जीवनमुक्ती दाता आहेत.ते पण सर्व
जीवन मुक्ती प्राप्त करू शकत नाहीत.काही तर मुक्ती मध्ये जातात.आता आदी सनातन
देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे,परत जो जितका पुरुषार्थ करेल.त्यामध्ये पण
कुमारींना चांगली संधी आहे.पारलौकिक बाबांचे वारीस बनतात.येथे तर सर्व मुलं बाबा
पासून वारसा घेण्याचे हक्कदार आहेत.तेथे तर मुलींना वारसा मिळत नाही.मुलांना लालच
राहते.असे पण आहेत,जे समजतात की हा पण वारसा मिळेल,तो पण वारसा मिळेल,त्या वारशाला
का सोडायचे?दोन्हीकडे शिकत राहतात. असे अनेक प्रकारचे आहेत.आता हे तर समजतात,जे
चांगले शिकतात ते उच्चपद मिळवतात.प्रजा मध्ये पण खूप सावकार बनतात.येथे राहणाऱ्यांना
तर आतमध्येच राहावे लागते.दास दासी बनतात.परत त्रेताच्या अंतमध्ये तीन चार जन्म
राजाईपद मिळू शकेल.त्यापेक्षा तर जे सावकार चांगले आहेत,जे सतयुगापासून त्यांची
सावकारी कायम राहते.गृहस्थ व्यवहारामध्ये राहून सावकारी पद का नाही घ्यायचे.
प्रयत्न करायला पाहिजे,आम्ही राज्यपद घेऊ.परंतु जर बाहेर गेले तर का नाही प्रजा
मध्ये चांगले पद मिळवण्याचा पुरुषार्थ करायचा.ते पण उच्चपद झाले ना.येथे राहणाऱ्या
पेक्षा बाहेर राहणारे खूप उच्च पद मिळवू शकतात.सर्व पुरुषार्थ वरती अवलंबून
आहे.पुरुषार्थ कधी लपून राहू शकत नाही.प्रजा मध्ये जे मोठमोठे सावकार बनतील,ते लपून
राहू शकत नाहीत.असे नाही बाहेर राहणाऱ्यांना काही कमी पद मिळेल. अंतकाळात राजाईपद
मिळणे चांगले की, प्रजा मध्ये सुरुवातीपासून उच्च पद मिळवणे चांगले?गृहस्थ व्यवहारा
मध्ये राहणाऱ्यांना इतके मायाचे तुफान, वादळ येत नाहीत. येथे राहणाऱ्यांना आणखी
जास्तच वादळं येतात.हिम्मत करतात आम्ही शिवबाबांच्या शरण मध्ये बसलो आहोत.परंतु
संगदोषामुळे अभ्यास करू शकत नाहीत.अंत काळामध्ये सर्वांना माहित पडेल,साक्षात्कार
होईल,कोणाला कोणते पद मिळेल. क्रमानुसार तर शिकत राहतात ना. कोणीतर सेवा केंद्र
आपसामध्ये मिळून चालवतात.कुठे तर सेवा केंद्र चालवणाऱ्या पेक्षा अभ्यास करणारे
विद्यार्थी हुशार बनतात.सर्व पुरुषार्थ वरती अवलंबून आहे.असे नाही की मायेचे
तुफान,वादळ येत नाहीत. आपली चाल चलन बरोबर ठेवायची आहे.श्रीमतावर चालत नाहीत. लौकिक
मध्ये पण असे होते.शिक्षक किंवा मात पिताच्या मतावर चालत नाहीत.तुम्ही अशा पित्याची
मुलं बनले आहात,ज्यांना कोणीच पिता नाहीत.तेथे तर बाहेरच्या वातावरणामध्ये खूप जावे
लागते. काही मुलं खराब संगती मध्ये फसतात,तर नापास होतात.असे का म्हणतात,माया चे
वादळ येतात.ही आपली मुर्खता आहे.श्रीमतावरती चालत नाहीत.अशा खराब संगतीमुळे नापास
होतात.
श्रीमतावर चालत नाहीत,अशा चलन मुळे नापास होतात.अनेकांना लालच राहते.कोणामध्ये
क्रोध,कोणामध्ये चोरीची सवय,शेवटी तर सर्व माहिती होते.अमके-अमके,अशा कारणामुळे
ज्ञान सोडून गेले.समजले जाते,शुद्र कुळाचे बनले.त्यांना परत ब्राह्मण म्हणणार
नाहीत.परत शुद्र जाऊन बनतात.ज्ञान-योग सोडून देतात. थोडे पण ज्ञान समजले,तर
प्रजामध्ये येतील.खूप मोठे झाड आहे.कुठून कुठून येतात.देवी-देवता धर्माचे,जे दुसऱ्या
धर्मामध्ये परिवर्तित झाले आहेत,ते निघून येतील.अनेक जण येतील,तर सर्व आश्चर्य
खातील. दुसऱ्या धर्माचे पण मुक्तीचा वारसा घेऊ शकतात.येथे कोणीही येऊ शकते.आपल्या
घरामध्ये उच्च पद मिळवायचे असेल,ते पण येऊन लक्ष घेऊन जातील.बाबांनी तुम्हाला
साक्षात्कार करवला होता,ते पण येऊन लक्ष घेऊन जातील.असे नाही की,येथे राहूनच
लक्ष्यापर्यंत पोहचू शकतील. कोणत्याही धर्माचा लक्ष घेऊ शकतो. लक्ष मिळाले,बाबांची
आठवण करा, शांतीधामची आठवण करा तर, आपल्या धर्मामध्ये उच्च पद मिळवू शकाल.त्यांना
जीवनमुक्ती तर मिळणार नाही,न स्वर्गा मध्ये येतील. मन लागणार नाही.मन त्यांचेच
लागते,जे येथील आहेत.अंतकाळात आत्मे आपल्या पित्याला तर जाणतील.अनेक सेवा
केंद्रामध्ये असे आहेत,ज्यांचे ज्ञान योगावरती लक्ष नाही.तर समजले जाते उच्चपद मिळू
शकणार नाही. निश्चय असेल तर असे म्हणू शकत नाहीत की, वेळ नाही. परंतु भाग्यामध्ये
नाही तर म्हणतात, वेळ नाही,हे हे काम आहे.भाग्या मध्ये असेल तर दिवस रात्र
पुरुषार्थ करायला लागतील.चालता-चालता खराब संगती मध्ये जातात,त्याला ग्रहचारी म्हटले
जाते.बृहस्पतीची दशा बदलून मंगळची दशा होते. कदाचित पुढे चालून उतरतील.काही
साठी,बाबा म्हणतात राहूची दशा बसली आहे.भगवंताचे पण मानत नाहीत.काहीजण समजतात,हे तर
ब्रह्मा म्हणतात.मुलांना हे माहित होत नाही की,कोण आहेत,जे श्रीमत देतात.देहाभिमाना
मुळे साकार साठी समजतात.देही अभिमानी होऊन समजायचे आहे की,शिवबाबा जे म्हणतात,ते
आम्हाला करायचे आहे. सर्व जिम्मेवारी शिवबाबा वरती आहे. शिवबाच्या मतावर चालायला
पाहिजे ना.देह अभिमाना मध्ये आल्यामुळे शिवबाबांना विसरतात. परत शिवबाबा जवाबदार
राहू शकत नाहीत.त्यांचे आदेश तर लगेच धारण करायला पाहिजे परंतु समजत नाहीत की,कोण
समजावत आहेत? तेही बाकी आदेश देत नाहीत, फक्त बाबा म्हणतात मी तुम्हाला श्रीमत
देतो,एक तर माझी आठवण करा आणि मी जे ज्ञान ऐकवत आहे, त्याची धारणा करा आणि
दुसऱ्याकडून करून घ्या.बस हाच धंदा करा. अच्छा "बाबा जो आपला आदेश".राजांच्या पुढे
पण असे म्हणत राहतात,जो आदेश.ते राजा हुकूम करत होते.हा शिव बाबा चा आदेश आहे.सारखे
सारखे म्हणायला पाहिजे,"जो आदेश शिवबाबा".तर तुम्हाला खुशी पण राहील.तुम्ही समजाल
शिवबाबा आदेश देत आहेत.शिव बाबांची आठवण राहील,तर बुद्धीचे कुलुप उघडेल.शिवबाबा
म्हणतात,सवय लागायला पाहिजे,तर नाव किनाऱ्याला लागेल,परंतु हे अवघड आहे.सारखे सारखे
विसरतात.असे का म्हणायला पाहिजे की,माया विसरवते.आम्ही विसरतो म्हणून उलटे काम होत
राहतात.
अनेक मुली आहेत ज्या ज्ञान तर चांगल्या देतात परंतु योग नाही, ज्याद्वारे विकार
विनाश होतील.असे अनेक चांगली चांगली मुलं आहेत,ज्यांचा योग बिलकुल नाही. चलन द्वारे
समजले जाते,योगा मध्ये राहत नाहीत तर पाप राहतात,जे परत भोगावे लागतात.यामध्ये
मायेच्या वादळाची गोष्टच नाही.असे समजा ही माझी चूक आहे,मी श्रीमतावर चालत नाही.येथे
तुम्ही राज योग शिकण्यासाठी आले आहे आहात.प्रजा योग शिकवला जात नाही.मात पिता तर
आहेतच. त्यांचे अनुकरण करा तर तुम्ही पण गादीचे मालक बनाल. यांचे तर निश्चित आहे
ना. हे श्री लक्ष्मीनारायण बनतात तर त्याचे अनुकरण करायचे आहे. दुसऱ्या धर्माचे,
मातपित्याचे अनुकरण करत नाहीत.ते तर पित्यालाच मानतात.येथे तर दोन्ही आहेत.ईश्वर तर
रचनाकर आहेत. माता तरीही गुप्त आहे.मात पिता शिकवत राहतात.असे समजवतात, असे काम करू
नका,हे काम करा. शिक्षक काही सजा देतील,तर शाळेमध्ये देतील ना.असे थोडेच म्हणतील की
माझी इज्जत घालवतात.पिता ५-६ मुलांपुढे चापट मारतील,तर मुलगा असे थोडेच म्हणेल
की,पाच-सहा मुलांपुढे का मारले, नाही. तर मुलांना शिक्षण दिले जाते,तरीही चालू शकत
नाहीत. अच्छा गृहस्थ व्यावहारामध्ये राहत, पुरुषार्थ करा.जर येथे बसून सेवेमध्ये
विघ्न आणले,तर जे काही थोडेफार जमा आहे, ते पण नष्ट होईल. शिकायचे नाही तर सोडून
द्या,बस मी चालू शकत नाही.निंदा का करायला पाहिजे.अनेक मुलं आहेत,काही शिक्षण घेतात,
काही सोडून देतात .प्रत्येकाने आपल्या शिक्षणामध्ये मस्त राहायला पाहिजे. बाबा
म्हणतात एक दूसऱ्यांपासून सेवा घेऊ नका.कोणता अहंकार यायला नको.दुसऱ्यापासून सेवा
घेणे,हा पण अहंकार आहे.बाबांना समजावून तर सांगावे लागेल ना, नाहीतर कमिटी
बसेल.तेव्हा म्हणाल मला थोडेच माहिती होते की, कायदे कानून काय आहेत? म्हणून बाबा
समजावून सांगतात, परत साक्षात्कार करून सजा देतील. पुराव्याशिवाय सजा थोडीच मिळू
शकते.कल्पापुर्वी प्रमाणेच बाबा खूप चांगल्या प्रकारे समजावत राहतात.प्रत्येकाचे
भाग्य पाहिले जाते.कोणी सेवा करून आपले जीवन हिऱ्यासारखे बनवतात,काही असे पण आहेत,जे
आपल्या भाग्याला कुलूप लावतात,अच्छा. गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती
बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) सद्गुरु
द्वारा,जे श्रीमत मिळत आहे, त्याच्यावरती चालायचे आहे.मायेला दोष न देता,आपल्या
कमजोरी तपासून त्यांना काढून टाकायच्या आहेत.
(२) अहंकाराचा त्याग करून आपल्या ज्ञान युगामध्ये मस्त राहायचे आहे.कधी दुसऱ्याकडून
सेवा घ्यायची नाही. संगदोष पासून खूप खूप सांभाळ करायचा आहे.
वरदान:-
निश्चयाच्या
आधारावरती नेहमी एकरस अचल स्थिती मध्ये स्थिर राहणारे निश्चिंत भव.
निश्चय बुद्धीचे
लक्षणं आहेत,नेहमी निश्चिंत.ते कोणत्या गोष्टींमध्ये डगमग होऊ शकत नाहीत.नेहमी अचल
राहतील, म्हणून काहीच विचार करू नका,का कसे याच्या मध्ये कधीच जाऊ नका.त्रिकालदर्शी
बनून नेहमीच निश्चित रहा,कारण प्रत्येक पाऊला मध्ये कल्याण आहे.जेव्हा कल्याणकारी
बाबा चा हात पकडला आहे, तर अकल्याणला पण कल्याण मध्ये बदलून देतील म्हणून नेहमी
निश्चिंत राहा.
बोधवाक्य:-
जे नेहमी
स्नेही आहेत,ते प्रत्येक कार्यामध्ये स्वतः सहयोगी बनतात.