08-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,श्रीमतानुसार कल्याणकारी बनायचे आहे,सर्वांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे"

प्रश्न:-
कोणत्याही प्रकारची चूक होण्याचे मुख्य कारण कोणते आहे?

उत्तर:-
देह अभिमा.देह अभिमानामुळे च मुलांकडून खूप चुका होतात,ते सेवा करू शकत नाहीत.त्यांच्याकडून असे कर्म होतात,जे सर्व द्वेष करतात.बाबा म्हणतात,मुलांनो आत्म अभिमानी बना.कोणतेही अकर्तव्य करू नका. खिरखंड बनून,सेवेचे चांगले नियोजन करा.मुरली ऐकून त्याची धारणा करा,यामध्ये बेपर्वा बनवू नका.

गीत:-

आकाश सिंहासन सोडून तुम्ही धरतीवरती या...

ओम शांती।
आत्मिक मुलांप्रती आत्मिक पित्याची श्रीमत आहे.आता मी सर्व सेवा केंद्राच्या मुलांशी गोष्टी करत आहे.आता जेव्हा त्रिमूर्ती, सृष्टिचक्र(गोळा),झाड,शिडी, लक्ष्मीनारायणचे चित्र आणि कृष्णाचे चित्र,हे ६ चित्र मुख्य आहेत. ही जशी काही पूर्ण प्रदर्शनी आहे, यामध्ये सर्व ज्ञान सामावलेले आहे.जसे नाटकाचे पोस्टर जाहिरातीसाठी बनवले जातात,तर ते कधी पाऊस,इत्यादीमध्ये खराब होत नाहीत.असेच हे पण मुख्य चित्र बनवायला पाहिजेत.मुलांना आत्मिक सेवा वाढवण्यासाठी,भारतवासी मनुष्यांच्या कल्याण करण्यासाठी श्रीमत मिळत राहते.असे गायन पण करतात,ते कल्याणकारी पिता आहेत, तर जरूर कोणीतरी अकल्याणकारी पण असतील. ज्यामुळे बाबांना येऊन परत कल्याण करावे लागते.आत्मिक मुलं, ज्यांचे कल्याण होत आहेत, ते या गोष्टीला समजू शकतात.जसे आमचे कल्याण झाले आहे,असे आम्ही दुसऱ्याचे पण कल्याण करु.जसे बाबांचे चिंतन चालते की,कसे कल्याण करावे.युक्ती सांगत आहेत.सहा बाय नऊच्या सीट वरती चित्रं बनवायला पाहिजेत. दिल्लीसारख्या शहरांमध्ये,अनेक जण येतात,जिथे शासनाचे संसद भवन,सचिवालय इत्यादी असते,तिकडे पण खूप लोक येतात,तेथे चित्र लावायला पाहिजेत, त्याद्वारे अनेकांचे कल्याण होईल, म्हणून बाबा मत देत राहतात.असे चित्रं पत्र्यावरती बनवायला पाहिजेत. देही अभिमानी बनून,बाबांच्या सेवेमध्ये लागायचे आहे.बाबा मत देतात, हे चित्र इत्यादी इंग्रजीमध्ये बनवायला पाहिजेत.हे सहा चित्र मुख्य जागेवरती लावायला पाहिजेत. जर असे मुख्य स्थानावरती चित्र लावले तर,तुमच्याकडे शेकडो लोक समजण्यासाठी येतील परंतु मुलांमध्ये देहाभिमान असल्यामुळे खूप चुका होतात.असे काही समजू नका की,मी पक्का देही अभिमानी आहे.चुका तर अनेक होत राहतात, खर सांगत नाहीत.असे समजावले जाते,असे कोणते कर्तव्य करू नका,ज्यामुळे द्वेष इत्यादी होईल की, यांच्यामध्ये खूप देहाभिमान आहे. तुम्ही नेहमी युद्धाच्या मैदानात आहात.दुसऱ्या ठिकाणी तर दहा वीस वर्षापर्यंत युद्ध चालत राहते. तुमचे तर मायेशी अंत काळापर्यंत युद्ध आहे परंतु हे गुप्त असल्यामुळे याला कोणी जाणत नाहीत.गिते मध्ये जी महाभारत लढाई आहे,ती शारीरिक दाखवली आहे परंतु ही आत्मिक आहे.आत्मिक युद्ध पांडवाचे आहे.ते शारीरिक आहे,जे परमपिता परमात्माच्या विपरीत बुद्धि आहेत.तुम्ही ब्राह्मण कुळभूषणाची प्रीत बुद्धी आहे.तुम्ही दुसऱ्यांशी संगत तोडून एक बाबाशी संगत जोडली आहे.अनेक वेळेस देह अभिमानामुळे विसरतात,परत आपलेच पद भ्रष्ट करतात. परत अंत काळांमध्ये खूप पश्चाताप करावा लागेल परत काहीच करू शकणार नाहीत.ही तर कल्प कल्पाची बाजी आहे.यावेळेत कोणते अकर्तव्य कार्य करतात तर, कल्प-कल्पासाठी पद भ्रष्ट होते,खूप नुकसान होते.

बाबा तर म्हणतात,अगोदर तुमचे १०० % नुकसान होते,आता बाबा १००% फायद्यामध्ये घेऊन जातात, तर श्रीमता वर चालायला पाहिजे ना. प्रत्येक मुलाला कल्याणकारी बनायचे आहे.सर्वांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे.सुख स्वर्गामध्ये आहे,तर नरका मध्ये दुःख आहे, कारण ही विकारी दुनिया आहे, आणि ती निर्विकारी दुनिया आहे. आता विकारी दुनिया बनली आहे, परत बाबा निर्विकारी दुनिया बनवतात.या गोष्टीला दुनिये मध्ये कोणी जाणत नाहीत.तर मुख्य चित्र कायमस्वरूपी जागेवर लावायला पाहिजेत.प्रथम क्रमांक मध्ये दिल्ली मुख्य आहे,नंतर मुंबई,कलकत्ता आहे.कोणी ऑर्डर दिल्यानंतर टीनच्या शीट वरती बनवू शकतात। आग्र्यामध्ये फिरण्यासाठी अनेक लोक जातात.मुलं सेवा तर खूप चांगली करत आहेत आणखी काही कर्तव्य करून दाखवा.हे चित्र बनवण्यामध्ये काही कष्ट तर नाहीत, फक्त अनुभव पाहिजे.चांगले चित्र पाहिजेत,जे दूरवरून पण कोणी वाचू शकतील.सृष्टीचक्र पण मोठे बनवू शकतात,त्याची सुरक्षा पण करायला पाहिजे की, कोणी खराब करायला नको.यज्ञामध्ये आसुराचे विघ्न पडतात,कारण या नवीन गोष्टी आहेत.ते दुकान काढून बसले आहेत.शेवटी सर्वांचे कल्याण कसे आणि कधी झाले,भारताला तमोप्रधान कोण बनवते,परत सतोप्रधान कोण बनवतात,हे चक्र कसे फिरत राहते, या गोष्टी कोणी जाणत नाहीत.संगम युगाला पण जाणत नाहीत.मनुष्य समजतात,भगवान युगे-युगे येतात. कधी म्हणतात,भगवान नावारुपापेक्षा वेगळा आहे.भारत प्राचीन स्वर्ग होता.हे पण म्हणतात ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षापूर्वी देवतांचे राज्य होते परत कल्पाचे आयुष्य लांबलचक केले आहे.तर मुलांना देहीअभिमानी बनण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.अर्धा कल्प सतयुग त्रेतायुगा मध्ये तुम्ही आत्म अभिमानी होते परंतु परमात्म अभिमानी नव्हते. येथे तर तुम्ही देह अभिमानी बनले आहात.परत देही अभिमानी बनावे लागेल.यात्रा अक्षर आहे परंतु अर्थ समजत नाहीत.मनमनाभव चा अर्थ आहे,आत्मिक यात्रेवरती राहा.हे आत्म्यांनो,मज पित्याची आठवण करा. कृष्ण तर असे म्हणू शकत नाहीत,ते गीतेचे भगवान कसे होऊ शकतात.त्यांच्यावरती कोणता कलंक पण लागू शकत नाही.हे पण बाबांनी समजावले आहे,जेव्हा शिडी उतरतात,तर अर्धाकल्प काम चिते वरती बसून काळे बनतात.आत्ता लोहयुग आहे,तर त्यांचे संप्रदाय पण काळे म्हणजे विकारी होतील परंतु सर्वांचे सावळे रूप कसे बनवायचे? चित्र इत्यादी जे बनवले आहेत,ते पण समजून बनवले नाहीत.त्यांनाच परत श्यामसुंदर कसे म्हणू शकता? त्यांना अंधश्रद्धाने बाहुल्यांची पूजा करणारे म्हणले जाते.बाहुल्यांचे नाव, रूप, कर्तव्य होऊ शकत नाही.तुम्ही पण अगोदर त्यांची पूजा करत होते ना,अर्थ काहीच समजत नव्हते.तर बाबांनी समजले आहे,प्रदर्शनीचे जे मुख्य चित्र बनवले आहेत,त्यासाठी कमिटी बनवून, लगातार प्रदर्शनी च्या नंतर प्रदर्शनी करत राहतील. बंधनमुक्त तर खूप आहेत,कन्या पण बंधन मुक्त आहेत.वानप्रस्थी पण बंधन मुक्त आहेत.तर मुलांना बाबा. जे दिशानिर्देश देतात,ते आचरणा मध्ये आणायला पाहिजेत.हे गुप्त पांडव आहेत.कोणालाही ओळखता येत नाहीत.बाबा पण गुप्त, ज्ञान पण गुप्त आहे.तेथे मनुष्य,मनुष्यांना ज्ञान देतात.येथे परमात्मा पिता,आत्म्याला ज्ञान देत आहेत परंतु हे समजत नाही की आत्मा ज्ञान घेते,कारण ते तर आत्म्याला निर्लेप म्हणतात. वास्तविक आत्माच सर्व काही करते, पुनर्जन्म पण कर्मानुसार आत्माच घेते. बाबा हे सर्व गोष्टी चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये घालतात.सर्व सेवाकेंद्र वरती क्रमानुसार देही अभिमानी आहेत.जे चांगल्या प्रकारे समजतात आणि परत समजवतात. देह अभिमानी तर काहीच समजत नाहीत,न समजावू शकतात.मी काहीच समजत नाहीत,हा पण देह अभिमान आहे.अरे तुम्ही तर आत्मा आहात.बाबा सन्मुख आत्म्याला समजवतात.बुध्दी चे कुलुप उघडायला पाहिजे.भाग्यामध्ये नाहीतर कुलूप उघडत नाही.बाबा तर भाग्य बनवतात परंतु भाग्य मध्ये नसेल तर पुरुषार्थ करू शकत नाहीत.तसे तर खूप सहज आहे,अल्लाह आणि बादशाही समजणे.बेहद्दच्या पित्याकडून वारसा मिळत आहे.तुम्ही भारतवासी सर्व देवी-देवता होते,प्रजा पण तशीच होती.या वेळेत पतित बनले आहेत. खूप समजावले जाते,स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा.बाबा म्हणतात,मुलांनो मी तुम्हाला देवी देवता बनवले होते,तुम्ही आता काय बनले आहात. हा कुंभी पाक नर्क आहे. विषय वैतरणी नदीमध्ये मनुष्य,जनावरं,पशुपक्षी इत्यादी सर्व सारखे दाखवतात.येथे तर मनुष्य आणखीनच खराब झाले आहेत. मनुष्यांमध्ये क्रोध किती आहे,लाखो लोकांना मारतात.भारत जो वेश्यालय बनला आहे परत याला शिवबाबा शिवालय बनवतात.बाबा खूप चांगल्या प्रकारे समजवत राहतात.श्रीमत देतात की मुलांनो, असे असे करा,चित्र बनवा परत जे मोठे मोठे मनुष्य आहेत त्यांना समजून सांगा.हा प्राचीन योग, प्राचीन ज्ञान सर्वांना सांगायला पाहिजे.मोठा हॉल घेऊन प्रदर्शनी लावायची आहे.त्यांना तर पैसे इत्यादी काहीच घ्यायला नको. तरीही जे ठीक समजतील,ते भाडे घ्या.चित्र तर तुम्ही पहा,चित्र पाहतील तर लगेच पैसे पण परत देतील.फक्त युक्तीद्वारे समजावयाला पाहिजे.अधिकार तर त्यांच्या हातामध्ये असतो ना.पाहिजे तर सर्व काही करू शकतात.ते थोडेच समजतात,विनाश काळात विपरीत बुद्धि विनाशाला प्राप्त होतात. पांडवानी तर भविष्यामध्ये पद मिळवले आहे.तेही भविष्यामध्ये राज्य असेल,आता थोडेच असेल.या इमारती इत्यादी सर्व नष्ट होतील. आता बाबांनी समजावले आहे प्रदर्शनी पण खूप करायला पाहिजेत.खूप चांगल्या प्रकारे, चांगल्या कार्डवरती निमंत्रण द्यायला पाहिजे.तुम्ही प्रथम मोठ्या ना समजून सांगा तर मदत पण करतील.बाकी आळसामध्ये झोपून राहायचे नाही.अनेक मुलं देह अभिमानामध्ये झोपून राहतात.समिती बनवून,खिरखंड होऊन, नियोजन करायला पाहिजे. बाकी मुरली वाचणार नाहीत तर धारणा कशी होईल.असे खूप बेपर्वा आहेत,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांसाठी बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) देह अभीमानी बनून सेवेच्या वेगवेगळे युक्ती शोधायच्या आहेत.आपसामध्ये खीर खंड बनवून सेवा करायची आहे.जसे बाबा कल्याणकारी आहेत तसेच कल्याणकारी बनायचे आहे.

(२) प्रीत बुद्धी बनून बाकी संग तोडून एकसंग जोडायचा आहे.कोणतेही असे कर्तव्य करायचे नाही,जे कल्प-कल्पांतर साठी नुकसान होईल.

वरदान:-
नेहमी उमंग उत्साहमध्ये राहून चढती कलेचा अनुभव करणारे महावीर भव:-

महावीर मुलं प्रत्येक सेकंद,प्रत्येक संकल्पा मध्ये,चढती कलेचा अनुभव करतात.त्यांच्या चढती कला सर्वांच्या प्रती कल्याण करण्यासाठी निमित्त बनते.त्यांना थांबणे किंवा थकण्याची अनुभूती होत नाही.ते नेहमी अथक, उमंग उत्साहा मध्ये राहणारे असतात.जे थांबतात त्यांना घोडेस्वर,जे थकतात त्यांना प्यादे म्हटले जाते आणि जे नेहमीच चालणारे आहेत त्यांना महावीर म्हटले जाते.त्यांना माया कोणत्याही रूपांमध्ये आकर्षित करत नाही.

बोधवाक्य:-
शक्तिशाली ते आहेत,जे आपल्या साधनेद्वारे जेव्हा पाहिजे तेव्हा शितल स्वरूप आणि जेव्हा पाहिजे तेव्हा,ज्वाला रूप धारण करू शकतात.


मातेश्वरीजी चे अनमोल महावाक्य.

आत्मा कधी परमात्म्याचा अंश होऊ शकत नाही:-

अनेक मनुष्य असे समजतात,आम्ही परमात्माचा अंश आहोत.आता अंश तर तुकड्याला म्हटले जाते.एकीकडे म्हणतात परमात्मा अनादी अविनाश आहे,तर अशा अविनाशी परत्म्याला तुकडे मध्ये कसे घेऊन येतात.आता परमात्मा कापले कसे जाऊ शकतात,आत्मा तर अजरामर आहे. ते आवश्य आत्म्याला निर्माण करणारे अमर झाले.असे अमर परमात्मा यांना तुकड्यांमध्ये घेऊन येणे म्हणजे परमात्माला विनाशी म्हणण्यासारखे आहे परंतु आम्ही तर जाणतो आम्ही आत्मा,परमात्माचे संतान आहोत.तर आम्ही त्याचे वंशज झालो,म्हणजे मुलं झालो.तर परत अंश कसे होऊ शकतो?म्हणून परमात्माचे महावाक्य आहेत,मुलांनो मी स्वतः अविनाशी जागती ज्योत आहे,मी दिपक आहे कधीच विझत नाही,बाकी सर्व मनुष्य आत्म्यांचा दीपक जागृत होतो आणि विझतो पण.त्या सर्वांना जागृत करणारा मी आहे, प्रकाश आणि शक्ती देणारा मी आहे.बाकी एवढे जरूर आहे की मज परमात्माचा प्रकाश आणि आत्म्याच्या प्रकाशामध्ये फरक अवश्य आहे.जसे बल्ब असतो, तर काही जास्त शक्तिशाली असतात,तर काही कमी शक्तीचे असतात.तसेच आत्मा पण काही खूप शक्तिशाली असतात, काही कमी शक्तिशाली असतात. बाकी परमात्म्याचे शक्ती कमी जास्त होत नाही.तेव्हा तर परमात्मा म्हणतात,परमात्मा सर्व शक्तिवान म्हणजे सर्व आत्म्या पेक्षा त्यांच्यामध्ये शक्ती जास्त आहे.ते सृष्टीचा अंत मध्ये येतात.जर कोणी समजतील परमात्मा सृष्टीच्या मध्ये म्हणजेच युगे-युगे येतात,तर समजा परमात्मा मध्येच आले,तर परमात्मा सर्वांपेक्षा श्रेष्ठ कसे झाले? जर कोणी परमात्म्याला युगे-युगे येतात असे म्हणतात,तर ते काय समजायचे की,परमात्मा नेहमी-नेहमी आपली शक्ती चालवतात.तर काय सर्वशक्तिमान ची शक्ती एवढ्या पर्यंतच आहे,जर मध्येच आपल्या शक्तीद्वारे सर्वांना शक्ती किंवा सद्गती देतील,परत शक्ती कायम असायला पाहिजे,परत दुर्गती का होते.तर याद्वारे सिद्ध होते की,परमात्मा युगे-युगे येत नाहीत,अर्थात मध्ये-मध्ये येत नाहीत.ते फक्त कल्पाच्या अंत काळात आणि एकाच वेळेत आपल्या शक्तीद्वारे सर्वांचे सद्गती करतात.जेव्हा परमात्मानी इतकी मोठी सेवा केली आहे,तर त्यांचे स्मृतिस्थळ पण मोठे शिवलिंग बनवले आहे,म्हणून त्यांची खूप पूजा करतात.तर आवश्य परमात्मा सत्य आहे चैतन्य आहे आणि आनंद स्वरूप पण आहे,अच्छा.