15-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, प्रत्येकाचे पाप ओढून घेणारे उत्तम टिप कागद एक शिवबाबा आहेत, त्यांची आठवण करा तर पाप नष्ट होतील.

प्रश्न:-
आत्म्यावर सर्वात तीव्र डाग कोणते आहेत, त्याला नष्ट करण्यासाठी कोणती मेहनत करा ?

उत्तर:-
आत्म्यावर देह अभिमानाचे फार तीव्र डाग पडले आहेत, वारंवार कोणत्या तरी देहधारी च्या नाव रूपा मध्ये फसतात. बाबा ची आठवण न करता देहधारी ची आठवण करत राहतात. एक दोघांच्या मनाला दुःख देतात. हे डाग नष्ट करण्यासाठी देही अभिमानी बनण्याची मेहनत करा.

गीत:-

मुखडा देख ले प्राणी. . . .

ओम शांती।
गोड गोड सर्व सेवाकेंद्रा तील मुलांनी गीत ऐकले. आता स्वतःला पाहायचे आहे कि, किती पुण्य आहे, आणि किती पाप नष्ट झाले आहेत. सारी दुनिया साधु संत इत्यादी बोलावत आहेत कि, हे पतित-पावन, एकच पतिताना पावन बनविणारे बाबा आहेत. बाकी सर्वां मध्ये पाप आहेत. हे तर तुम्ही जाणत आहात कि, आत्म्या मध्ये पाप आहेत. पुण्य पण आत्म्या मध्येच आहे. आत्माच पावन, आत्माच पतित बनत आहे. येथे सर्व आत्मे पतित आहेत. पापांचे डाग लागले आहेत, त्यामुळे पापआत्मा म्हटले जाते. आता पाप निघेल कसे? जेंव्हा कोणत्या वस्तूवर शाई किंवा तेल पडले तर टिप कागद त्यावर ठेवतात. तो सारा ओढून घेतो. आता सर्व मनुष्य आठवण करत आहेत एकाचीच, कारण तेच टिप कागद आहेत, पतित पावन आहेत. त्यांच्या शिवाय आणखीन कोणी टिप कागद नाही. ते तर जन्मोजन्मी गंगा स्नान करून आणखीनच पतित बनले आहेत. पतिता ना पावन करणारा एकच शिवबाबा टिप कागद आहेत. ते तर आहेतच लहानात लहान एक बिंदी. सर्वांचे पाप नष्ट करतात. कोणत्या युक्तीने? फक्त म्हणतात, माझी टीप कागदाची फक्त आठवण करा. मी तर चैतन्य आहे ना. तुम्हाला आणखीन कोणता त्रास देत नाही. तुम्ही पण आत्मा बिंदी, बाबा पण बिंदी आहेत. म्हणतात, फक्त माझी आठवण करा, तर तुमचे सर्व पाप नाहीसे होतील. आता प्रत्येकाने आपल्या मनाला विचारले पाहिजे कि, आठवणीने किती पाप नष्ट झाले आहेत? आणि आम्ही किती केले आहेत? बाकी किती पाप राहिले आहे? हे माहित कसे पडेल? दुसऱ्याला पण रस्ता दाखवत राहा कि, एका टिप कागदाची आठवण करा. सर्वांना ही मत देणे चांगले आहे ना, हे पण आश्चर्य आहे, ज्यांना मत देली, ते तर बाबा ची आठवण करतात, आणि जे मत देतात ते स्वतः आठवण करत नाहीत, त्यामुळे पाप नष्ट होत नाहीत. पतित पावन तर एकालाच म्हटले जाते. अनेक पापे लागली आहेत. काम विकाराचे पाप, देह अभिमानाचे तर पहिल्या नंबरचे पाप आहे, जे सर्वांत खराब आहे. आता बाबा म्हणतात, देहीअभिमानी बना. जेवढी माझ्या एकट्या ची आठवण कराल, तर तुमच्या मध्ये जी भेसळ पडली आहे, ती नाहीशी होईल. आठवण करायची आहे. इतरांना पण हा रस्ता दाखवायचा आहे. जेवढे इतरांना समजावून सांगाल तर तुमचे पण भले होईल‌. या धंद्या मध्ये लागले पाहिजे. इतरांना पण हे सांगायचे आहे कि, बाबाची आठवण करा तर पुण्यात्मा बनाल. तुमचे काम आहे, दुसऱ्यांना पण सांगायचे कि, पतित-पावन एक आहेत. जरी तुम्ही ज्ञान नद्या अनेक आहात, परंतु तुम्ही सर्वांना सांगत आहात कि, एकाची आठवण करा. ते एकच पतित-पावन आहेत. त्यांची फार महिमा आहे. ज्ञानाचे सागर पण तेच आहेत. त्या एका पित्याची आठवण करणे, देही अभिमानी होऊन राहाणे, ही एकच गोष्ट फार अवघड आहे. बाबा फक्त तुमच्या साठी सांगत नाहीत परंतु बाबाच्या ध्याना मध्ये सर्व सेवाकेंद्राची मुले आहेत. बाबा तर सर्व मुलांना पाहत आहेत ना. जिथे चांगली सेवाधारी मुले राहतात, शिवबाबा ची बाग आहे ना. जी चांगली बाग असेल त्यांचीच बाबा आठवण करतात. सावकार मनुष्याला चार-पाच मुले असतील, तर त्यामध्ये जो मोठा मुलगा असेल, त्याची आठवण करतात. फुले पण वेगवेगळ्या प्रकारची आहेत ना. तर बाबा पण आपल्या मोठ्या बागेची आठवण करतात. कोणाला पण हा रस्ता सांगणे सहज आहे, शिवबाबा ची आठवण करा. तेच पतित पावन आहेत. स्वतः म्हणतात, माझी आठवण केल्यामुळे तुमची पापे नष्ट होतील. किती उत्तम टिप कागद आहे, साऱ्या दुनिये साठी. सर्व त्यांची आठवण करत आहेत. कोणाला पण हा रस्ता सांगणे सोपे आहे, शिवबाबा ची आठवण करा.

बाबानी युक्ती सांगितले आहे कि, माझी आठवण केल्यामुळे तुमच्यावर जे देह अभिमानाचे डाग पडले आहेत ते नाहीसे होतील. देही अभिमानी बनण्या मध्येच मेहनत आहे. बाबाला कोणी खरे सांगत नाहीत. कोणी कोणी चार्ट लिहून पाठवतात, मग थकून जातात.मोठे ध्येय आहे. माया नशा एकदम तोडून टाकते, मग लिहिणे पण सोडून देतात. अर्धा कल्पाचा देह अभिमान आहे, तो सुटत नाही. बाबा म्हणतात फक्त हाच धंदा करत राहा. बाबाची आठवण करा आणि दुसऱ्याकडून करून घ्या. बसं, सर्वात उंच धंदा हाच आहे. जे स्वतः आठवण करत नाहीत, ते हा धंदा करणारच नाहीत. बाबाची आठवण, हीच योग अग्नी आहे, त्यामुळे पाप नष्ट होतील, त्यामुळे विचारले जाते कि, कुठ पर्यंत पाप नष्ट झाले आहेत? जेवढे बाबा ची आठवण कराल, तेवढा खुशीचा पारा चढत राहील. प्रत्येकाच्या मनाला ओळखू शकाल. दुसऱ्याला पण त्यांच्या सेवेद्वारे ओळखू शकाल. दुसऱ्यांना रस्ता सांगत आहेत, बाबाची आठवण करा. ते पतित-पावन आहेत. इथे ही तर पतित तमोप्रधान दुनिया आहे. सर्व आत्म्ये आणि शरीर तमोप्रधान आहेत. आता परत घरी जायचे आहे. तिथे सर्व आत्मे पवित्र राहतात. जेंव्हा पवित्र बनतील तेव्हाच घरी जातील. दुसऱ्यांना पण हाच रस्ता दाखविला पाहिजे. बाबा युक्ती तर फार सहज सांगत आहेत. शिवबाबा ची आठवण करा. हा टीप कागद ठेवा, तर सर्व पाप ओढून घेतले जाईल. तुमचे विकर्म विनाश होतील. मूळ मुख्य गोष्ट आहे पावन बनणे. मनुष्य पतित बनले आहेत, तेंव्हा तर बोलावत आहेत कि, हे पतित-पावन या, येऊन सर्वांना पावन बनवून, बरोबर घेऊन जावा.असे लिहिले पण आहे, सर्व आत्म्यांना पावन बनवून घेऊन जातात, मग कोणी पण पतित आत्मा राहत नाही. हे पण सांगितले आहे, पहिल्या प्रथम स्वर्गवासीच येतील. बाबा जे औषध देत आहेत, ते सर्वांसाठी आहे. जो पण भेटेल, त्यांना हेच औषध द्यायचे आहे. तुम्ही पित्या जवळ जाऊ इच्छित आहात, परंतु आत्मा पतित असल्यामुळे जाऊ शकत नाही. पावन बनाल तर जाऊ शकाल. हे आत्म्यानो, माझी आठवण करा तर मी घेऊन जाईल, मग तेथून तुम्हाला सुखा मध्ये पाठवितो, परत जेंव्हा जुनी दुनिया होते, तेंव्हा तुम्ही दुःख प्राप्त करता. मी कोणाला दुःख देत नाही. प्रत्येकाने स्वतःला पाहिले पाहिजे कि, मी आठवण करत आहे? जेवढी आठवण कराल, तेवढा खुशीचा पारा चढेल. किती सोपे औषध आहे,दुसरे कोणी साधु संत इत्यादी या औषधाला ओळखत नाहीत. कुठे पण लिहलेले नाही. ही बिल्कुल नवीन गोष्ट आहे. पापाचे ओझे काही शरीराला लागलेले नाही. एवढी लहानशी आत्मा,बिंदी मध्येच सारी भूमिका भरलेली आहे. आत्मा पतित असेल तर त्याचा शरीरावर पण प्रभाव पडतो. आत्मा पावन बनली तर मग शरीर पण पवित्र मिळते. दु:खी, सुखी आत्माच बनत आहे. शरीराला घाव लागला तर आत्म्याला दुःखाची भासना होते. म्हटले पण जाते, ही दु:खी आत्मा आहे, ही सुखी आत्मा आहे. एवढी लहानशी आत्मा किती अभिनय करत आहे, आश्चर्य आहे ना. बाबा सुख देणारे आहेत, त्यामुळे त्यांची आठवण करतात. दुःख देणारा रावण आहे. सर्वात प्रथम देह अभिमान येतो. आता बाबा समजावत आहेत, तुम्हाला आत्म अभिमानी बनायचे आहे, यामध्ये फार मेहनत आहे. बाबा जाणतात कि, खऱ्या मनापासून, ज्या युक्तीने आठवण केली पाहिजे,तसे कोणी मुश्कीलच आठवण करतात. इथे राहणारे पण विसरून जातात. जर देही अभिमानी बनाल तर कोणते पाप होत नाही. बाबा चा आदेश आहे, वाईट ऐकू नका. . . हे माकडा साठी म्हणत नाहीत. हे तर मनुष्या साठी आहे. मनुष्य माकडा सारखे बनले आहेत, त्यामुळे माकडाचे चित्र बनविले आहे. अनेक असे आहेत, जे सर्व दिवस परचिंतन करत राहतात. त्यामुळे बाबाला समजावून सांगावे लागते. सर्व सेवाकेंद्रा वर कोणी ना कोणी असे आहेत, जे एक दोघाला दुःख देत राहतात. कोणी चांगले पण आहेत, जे बाबाच्या आठवणी मध्ये राहतात. स्वतः समजतात कि, मन्सा, वाचा, कर्मणा, कोणाला दु:ख तर दिले नाही. वाचेने जरी कोणाला दुःख दिले तर दुःखी होऊन मराल. बाबा म्हणतात, तुम्हां मुलांना सर्वांना सुख द्यायचे आहे. सर्वांना सांगायचे आहे कि, देही अभिमानी बना. बाबाची आठवण करा, आणखीन कांही पैशाच्या देवाण घेवाणी ची गोष्ट नाही. फक्त अतिप्रिय बाबा ची आठवण करा, तर तुमचे विकर्म नाहीसे होतील. तुम्ही विश्वाचे मालक बनाल. भगवानुवाच, मनमनाभव, एका बाबाची आणि वारशाची आठवण करा. दुसरे कांही पण आपसा मध्ये बोलू नका, फक्त बाबाची आठवण करा. दुसऱ्याचे कल्याण करा. तुमची अवस्था अशी गोड असली पाहिजे, त्यामुळे कोणी पण येऊन पाहिले तर बोलतील कि, बाबा ची मुले टिप कागद आहेत. आता ती अवस्था बनलेली नाही. बाबाला कोणी विचारले तर बाबा म्हणतील, टिप कागद तर काय, आता तर कागद पण बनलेले नाहीत. बाबा सर्व सेवाकेंद्रा तील मुलांना समजावून सांगतात. मुंबई, कलकत्ता, दिल्ली. . . सर्व ठिकाणी मुले तर आहेत ना. तक्रार येते कि, बाबा हे फार तंग करत आहेत. पुण्यात्मा बनण्या ऐवजी आणखीनच पापआत्मा बनवितात. बाबाला कोणी विचारले तर झटक्यात सांगू शकतील. शिवबाबा तर सर्व कांही ओळखत आहेत. त्यांच्या जवळ सर्व हिसाब किताब आहे. हे बाबा पण सांगू शकतात. चेहऱ्या द्वारे सर्व माहित पडते. जे बाबाच्या आठवणी मध्ये मस्त आहेत, त्यांचा चेहराच खूशनुम: देवता सारखा आहे. आत्मा खुश असेल तर शरीर पण खुश पाहण्यात येते. शरीराला दुःख झाल्यामुळे आत्म्याला पण दुःखाची भासना होते. एक गोष्ट सर्वांना सांगत राहा कि, शिवबाबा म्हणतात, माझी आठवण करा, तर तुमचे पाप विनाश होतील. त्यांनी लिहिले आहे कृष्ण भगवानुवाच, कृष्णाची तर अनेक जण आठवण करतात, परंतु पाप तर नाहीसे होत नाहीत, आणखीनच पतित बनतात. हे माहीतच नाही कि, आठवण कोणाची करायची आहे. परमात्म्याचे रूप काय आहे. जरी सर्वव्यापी म्हटले तरी पण,जशी आत्मा ताऱ्या सारखी आहे, तसे परमात्मा पण ताऱ्या सारखे आहेत, कारण आत्माच परमात्मा आहे असे म्हणतात, तर या हिशोबाने पण बिंदी आहे. छोटीशी प्रवेश करत आहे. सर्व बिंदीना म्हणतात, हे मुलांनो, माझी एकट्याची आठवण करा. कर्मेंद्रिया द्वारे बोलत आहेत. कर्मेंद्रिया शिवाय तर आत्मा आवाज करू शकत नाही. तुम्ही म्हणू शकता, आत्मा आणि परमात्म्याचे रूप तर एकच आहे. परमात्म्या ला मोठे लिंग, किंवा इतर कांही म्हणू शकत नाहीत. बाबा म्हणतात, मी पण अशी बिंदी आहे, परंतु मी पतित-पावन आहे आणि तुम्ही सर्व आत्मे पतित आहात. किती सोपी गोष्ट आहे. आता देही अभिमानी बनून मज पित्याची आठवण करा, इतरांना पण रस्ता सांगा. मी दोनच अक्षर सांगत आहे- मनमनाभव. मग थोडे विस्ताराने सांगत आहे कि, या फांद्या आहेत. प्रथम सतोप्रधान, सतो, रजो, तमो. . . मध्ये येता. पाप आत्मा बनल्यामुळे किती डाग लागले आहेत. ते डाग नाहीसे कसे होतील? ते समजतात कि, गंगा स्नान केल्यामुळे पाप नाहीसे होतील. परंतु ते तर शरीराचे स्नान आहे. आत्म्याने, बाबाची आठवण केल्यामुळेच पावन बनू शकेल. याला आठवणीची यात्रा म्हटले जाते. किती सोपी गोष्ट आहे, जे दररोज बाबा समजावत राहतात. गीते मध्ये पण जोर याच गोष्टीवर आहे- मनमनाभव. वारसा तर मिळेलच फक्त माझी आठवण करा, तर पाप नाहीसे होतील. बाबा अविनाशी टिप कागद आहेत ना. बाबा म्हणतात, माझी आठवण केल्यामुळेच तुम्ही पावन बनाल. मग रावण पतित बनवीत आहे. अशा बाबाची आठवण केली पाहिजे ना. असे पण होते कि,जे आठवण करत नाहीत, त्यांची काय अवस्था होईल. बाबा समजावतात, मुलांनो, इतर सर्व गोष्टी सोडून द्या. फक्त एक गोष्ट आहे कि, देही अभिमानी बना, माझी एकट्याची आठवण करा. बसं. हे तर जाणत आहात, आत्मा एक शरीर सोडून, दुसरे घेते. आत्माच दु:ख सुख भोगते.कधी पण एक दोघांच्या मनाला दुःख देऊ नका. एक दोघाला सुख द्यायचे आहे. तुमचा धंदाच हा आहे. अनेक असे आहेत जे एक-दोघांना दुःख देत राहतात. एक दोघांच्या देहा मध्ये फसले आहेत. सारा दिवस एक दोघांची आठवण करत राहतात‌. माया पण तीव्र आहे. बाबा नाव घेत नाहीत, त्यामुळे बाबा म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी बना. ज्ञान तर फार सोपे आहे. आठवण च अवघड आहे. ते शिक्षण तरी पण १५-२०, वर्षे शिकतात. किती विषय असतात. हे ज्ञान तर फार सोपे आहे. विश्व नाटकाला ओळखणे एक गोष्ट आहे. मुरली चालवणे मोठी गोष्ट नाही. आठवणच फार अवघड आहे. बाबा म्हणतात- ड्रामा. तरी पण पुरुषार्थ करत राहा. बाबाची आठवण करा, तर योग अग्नीमुळे तुमचे पाप भस्म होतील. चांगली चांगली मुले यामध्ये नापास होतात. अच्छा.

फार फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कधीही कोणाच्या मनाला दु:खी करायचे नाही. सर्वांना सुख द्यायचे आहे. एका बाबाच्या आठवणी मध्ये राहायचे आहे आणि सर्वांना आठवण द्यायची आहे.

(२) पापांचे डाग नाहीसे करण्यासाठी देही अभिमानी बनून अविनाशी टिप कागद बाबाची आठवण करायची आहे. अशी गोड अवस्था बनवायची आहे, त्यामुळे सर्वांचे कल्याण होईल.

वरदान:-
आपल्या सहयोगा द्वारे निर्बल आत्म्यांना वारशाचे अधिकारी बनवणारे वरदानी मूर्त भव:

आता वरदानी मुर्त द्वारे, संकल्प शक्ती ची सेवा करून, निर्बल आत्म्यांना बाबा जवळ आणा. बहुसंख्य आत्म्या मध्ये शुभ इच्छा उत्पन्न होत आहे कि, अध्यात्मिक शक्ती जे कांही करू शकते ते दुसरे कोणी करू शकणार नाही. परंतु अध्यात्मिकते कडे जाण्यासाठी स्वतःला हिम्मत हीन समजत आहेत. त्यांना तुमच्या शक्तीचा आधार द्या, तेंव्हा बाबा जवळ चालत येतील. आता वरदानी मूर्त बनून, तुमच्या सहयोगा द्वारे त्यांना वारशाचे अधिकारी बनवा.

बोधवाक्य:-
आपल्या परिवर्तना द्वारे संपर्क, बोल आणि संबंधा मध्ये सफलता प्राप्त करणारेच सफलता मूर्त आहेत.