13-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलानो, उंच पर प्राप्त करायचे असेल तर बाबा बरोबर नेहमी खरे राहा, कोणती पण चूक झाली तर बाबा कडून क्षमा मागा, आपल्या मतावर चालू नका."

प्रश्न:-
कोणते लाल कधी लपू शकत नाहीत?

उत्तर:-
ज्यांचे ईश्वरीय परिवारा बरोबर प्रेम आहे, ज्यांना रात्रं दिवस सेवेची आवड राहते, असे सेवाधारी जे आज्ञाधारी आणि प्रामाणिक आहेत, कधी पण मनमता वर चालत नाहीत, बाबा बरोबर खऱ्या आणि स्वच्छ मनाने राहतात, ते कधी लपू शकत नाहीत.

गीत:-

तुम्ही हो माता पिता तुम्ही हो. . . .

ओम शांती।
गीता मध्ये खात्री कोणाची होती? माता पिता बरोबर मुलांची खात्री आहे कि, बाबा तुम्ही तर आमचे एक आहात, दुसरे कोणी नाही. किती उंच ध्येय आहे. अशा श्रेष्ठ बाबाच्या श्रीमतावर कोणी चालले तर खात्री आहे कि,वरसा जरूर उंच प्राप्त करतील. परंतु बुद्धि म्हणते कि, मोठे उंच ध्येय दिसून येत आहे. जे कोटी मध्ये कोणी, कोणी मध्ये कोणी फक्त माळे चे मणके बनतात. म्हणतात पण कि, तुम्ही मात पिता, परंतु माया फार जबरदस्त आहे, जे कोणी मुश्किलीनेच खात्री पूर्वक चालतात. प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे कि, खरा खुरा मी माता-पित्याचा बनलो आहे? बाबा म्हणतात, नाही. फार थोडे आहेत, तेंव्हा तर पाहा माळा कितीची बनत आहे? किती कोटी मध्ये फक्त 8 ची वैजंयती माळा बनत आहे‌, कांही म्हणतात एक आणि करतात दुसरे, त्यामुळे बाबा पण म्हणतात, पाहा, कसे आश्चर्य आहे. बाबा किती प्रेमाने समजावत आहेत, परंतु चांगली मुले फार थोडी निघतात. (माळेचे मणके) मुलांमध्ये एवढी ताकत नाही, जे श्रीमता वर चालू शकतील, तर जरूर रावणाच्या मतावर आहेत, त्यामुळे तेवढे पद प्राप्त करू शकत नाहीत. कोणी विरळेच माळेचे मणके बनतात, ते पण लाल लपून राहत नाहीत. ते हृदया मध्ये बसतात. रात्रंदिवस सेवेचीच ओढ लागलेली असते. ईश्वरीय संबंधा मध्ये प्रेम राहते. बाहेर त्यांची बुद्धी कुठे जात नाही. तसे प्रेम दैवी परिवारा बरोबर ठेवायचे आहे. अज्ञान काळा मध्ये पण मुलांचे पित्या बरोबर, बहिणीचे भावावर आपसात फारच प्रेम राहते. इथे तर कांही कांहीचा थोडा पण बाबा बरोबर योग नाही. खात्री तर फार देतात. भक्ती मार्गा मध्ये गातात, आता तर मुले सन्मुख आहेत. विचार केला जातो कि, भक्तिमार्गा मध्ये जे गात होते, किती प्रेमाने आठवण करत होते. इथे तर आठवणच करत नाहीत. बाबाचे बनण्या मध्ये माया शत्रु बनते. बुद्धी बाहेर भटकते, तर माया चांगल्या रीतीने खाली पाडते. ते स्वतः समजत नाहीत कि, आम्ही जे कांही करत आहोत, ते खाली पडण्यासाठीच करत आहोत. स्वतःच्या मताने खाली पडत राहतात. त्यांना माहीतच पडत नाही कि, आम्ही काय करत आहोत. कांही तरी कमतरता मुलांमध्ये आहेत ना. म्हणतात एक आणि करतात दुसरे. नाहीतर बाबा कडून वरसा किती उंच मिळत आहे. खरेपणाने बाबाच्या सेवे मध्ये किती लागले पाहिजे. परंतु माया फार जबरदस्त आहे. कोटी मध्ये कोणी बाबाला पूर्ण ओळखतात. बाबा म्हणतात, कल्प कल्प असेच होत आले आहे. पूर्ण प्रामाणिक, आज्ञाकारी न झाल्यामुळे त्या बिचाऱ्यां चे पद तसे होऊन जाते. म्हणतात पण कि, बाबा आम्ही राजयोग शिकून नरा पासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनू. राम-सीता बनणार नाही.हात पण उंच करतात, परंतु वागणे पण तसे पाहिजे ना.बेहदचे बाबा वरसा देण्यासाठी आले आहेत, त्यांच्या श्रीमता वर किती चालले पाहिजे. फार आहेत, ज्यांनी शपथ घेतली आहे कि, आम्ही श्रीमता वर चालणार नाही. ते लपून राहत नाहीत. कोणाच्या नशिबा मध्ये नसेल तर देह आभिमान अगोदर चापट मारतो, मग काम विकार आहे. काम नसेल तर क्रोध, लोभ आहे. सर्व तर शत्रू आहेत. मोह पण अशी गोष्ट आहे, जो बिल्कुल सत्यानाश करून टाकतो. लोभ पण कमी नाही. फारच जबरदस्त शत्रू आहेत. पाई पैशाची वस्तू चोरी करतात. हा पण लोभ आहे ना. चोरी करण्याची फार वाईट सवय आहे. आतुन मन खात राहते कि, आम्ही पाप करत आहोत, तर काय प्राप्ती करू. शिवबाबा च्या यज्ञा मध्ये येऊन, बाबा जवळ आम्ही असे काम कसे करू शकतो. माया फार उल्टे काम करवित आहे. किती पण समजावले,तरी पण सवय जात नाही. कोणी नाव रूपां मध्ये फसतात.देह अभिमाना मुळे नाव रूपां मध्ये फसून जातात. प्रत्येक सेंटरचे बाबाला सारे माहीत पडत आहे. बाबा पण काय करतील, समजावले तर पाहिजे. किती सेवाकेंद्रे आहेत. किती बाबा जवळ समाचार येतात. काळजी तर वाटते ना. मग समजावून सांगावे लागते, माया कांही कमी नाही.फार तंग करत आहे. चांगल्या चांगल्या मुलांना म्हटले जाते, मोठे म्हणून घेणे तर मोठे दुःख प्राप्त करणे. इथे तर दुःखाची कोणती गोष्टच नाही. जाणतात कल्पा पूर्वी पण असेच झाले होते. ईश्वराचे बनून मग मायेच्या वश होऊन जातात. कोणते ना कोणते विकर्म करत राहतात, तेंव्हा बाबा म्हणतात, प्रतिज्ञा तर फार मुले करतात कि, बाबा, आम्ही तुमच्या श्रीमतावर जरूर चालू, परंतु चालत नाहीत, त्यामुळे माळा पाहा किती लहान बनत आहे, बाकी तर प्रजा आहे. किती मोठे ध्येय आहे, यामध्ये मनाची मोठी स्वच्छता पाहिजे. म्हण पण आहे कि, सच तो बिठो नच. जर बाबा बरोबर खरे चालत राहाल, तर सतयुगा मध्ये कृष्णा बरोबर जाऊन रास कराल. सतयुगा मध्ये कृष्णाची रास पण प्रसिद्ध आहे. रासलीला राधे कृष्णा ची दाखवतात. त्यानंतर रामलीला दाखवतात. परंतु नंबरवन मध्ये राधे कृष्णाची रासलीला आहे, कारण यावेळी ते बाबा बरोबर फारच खरे राहतात, तर किती उच्च पद मिळत आहे. हात तर अनेक उभे करतात, परंतु माया कशी आहे. प्रतिज्ञा करतात तर त्यावर चालले पाहिजे ना. मायेच्या भुताला पिटाळून लावले पाहिजे.देहअभिमाना च्या मागे सर्व भूत आपोआप येतात. बाबा म्हणतात,देही अभिमानी बनून बाबाची आठवण करा. त्यामध्ये पण पहाटे सकाळी बसून वार्तालाप करा. बाबाची महिमा करा. भक्ती मार्गां मध्ये जरी आठवण करतात, परंतु महिमा तर कोणाचीच नाही. कृष्णाची आठवण करतात. महिमा करतात, लोणी चोरले, तिला पळवले. अकासुर, बकासुरा ला मारले, हे केले. बसं, आणखीन काय म्हणतील. हे सर्व खोटे आहे. तीळ मात्र खरे नाही. मग रस्ता काय दाखवतील. मुक्तीला च ओळखत नाहीत.या वेळी सार्‍या विश्‍वावर रावणाचे राज्य आहे. सर्व यावेळी पतित आहेत. मनुष्य भ्रष्टाचाराचा अर्थ पण समजत नाहीत. हे पण ओळखत नाहीत कि, सतयुगा मध्ये निर्विकारी देवता होते. गायन पण आहे कि, सर्वगुणसंपन्न, 16 कला संपूर्ण. परंतु मग म्हणतात, तिथे पण रावण, कंस, जरासंघ इत्यादी होते.त्यांना म्हटले जाते कि, पवित्र बना, तर म्हणतात देवतांना पण मुले इत्यादी होती ना. अरे, तुम्ही गायन करता कि, सर्वगुण संपन्न... संपूर्ण निर्विकारी, मग विकाराची गोष्ट कशी असू शकेल. तुम्ही पण निर्विकारी बना, तर म्हणतात सृष्टी कशी वाढेल.मुले कशी जन्म घेतील. मंदिरा मध्ये जाऊन महिमा गातात. मग घरी गेल्या नंतर ती महिमा विसरून जातात. आता तुम्ही तपास करून पाहा. घरी जाऊन समजावले तर ऐकणार नाहीत. तेथील गोष्ट तेथेच राहिली. पवित्र बनण्या साठी सांगितले तर म्हणतात,वाह, याशिवाय दुनिया कशी चालेल. त्यांना माहीतच नाही कि, निर्विकारी दुनिया कशी चालत आहे.

मुलांनी गीत पण ऐकले. प्रतिज्ञा करतात कि, तुमच्या मतावर चालू, कारण श्रीमतावर चालण्या मध्येच कल्याण आहे. बाबा तर म्हणतात, श्रीमाता वर चाला, नाहीतर शेवटी मृत्यू येईल. मग न्यायसभे समोर सर्व सांगावे लागेल. तुम्ही ही पापे केली आहेत. आपल्या मतावर चालून, मग कल्प कल्पा चे डाग लागतील. असे नाही कि, एक वेळा नापास झाले तर दुसऱ्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिकतील. नाही. आता नापास झाले तर कल्प, कल्प होतील, त्यामुळे पुरुषार्थ फार करायचा आहे. पावलो पावली श्रीमतावर चाला. मनात कांही पण घाण राहू नये. हृदयाला शुद्ध बनवायचे आहे. नारदाला पण सांगितले ना- स्वतःचा चेहरा आरशा मध्ये पाहा, तर पाहिले मी तर माकडा सारखा आहे. हा एक दृष्टांत आहे. स्वतःला विचारायचे आहे कि, आम्ही कोठ पर्यंत श्रीमता वर चालत आहोत. बुद्धी कुठे बाहेर तर भटकत नाही? देह अभिमाना मध्ये तर नाही?देही अभिमानी बनून सेवे मध्ये राहिले पाहिजे.सारा आधार योगावर आहे. भारताचा योग प्रसिद्ध आहे.ते तर निराकार बाबाच निराकार मुलांना समजावत आहेत. याला सहज राजयोग म्हटले जाते. लिहिले पण आहे कि, निराकार बाबाने सहज राजयोग शिकविला. फक्त कृष्णाचे नाव टाकले आहे. तुम्हीं जाणत आहात, आम्हाला असे लक्ष्मी नारायण बनायचे आहे. पुण्यात्मा बनायचे आहे. पापा ची कोणती गोष्टच नाही. बाबाच्या आठवणी मध्ये राहून त्यांची सेवा करायची आहे. एवढे उंच पद प्राप्त करायचे आहे तर कांहीतरी मेहनत करावी लागेल ना. संन्याशी इत्यादी तर म्हणतात कि, गृहस्थ व्यवहारा मध्ये राहून कमलफुला सारखे राहणे, हे तर होऊ शकत नाही. संपूर्ण बनण्या मध्ये अनेक नापास होऊन जातात, कारण आठवण करत नाहीत. आता प्राचीन योग बाबा शिकवित आहेत. बाबा म्हणतात, योग तर मी स्वतः येऊन शिकवित आहे. आता माझी आठवण करा. तुम्हाला माझ्या जवळ यायचे आहे. ही आठवणीची यात्रा आहे. तुमचे गोड शांती धाम ते आहे. हे पण जाणत आहात कि,आम्ही भारतवासीच भारता मध्ये येऊन पूर्ण वरसा प्राप्त करू. तर बाबा वारंवार समजावत आहेत कि, प्रतिज्ञेवर पूर्ण चाला. चुका झाल्या तर बाबा ची माफी मागा. पाहा,हा मुलगा माफी मागण्यासाठी खास बाबा जवळ एका दिवसासाठी आला आहे. थोडी चूक झाली तर हा इकडे आला, कारण मनाला खात आहे, तर त्याला वाटले, बाबा समोर जाऊन सांगावे. किती बाबा विषयी आदर आहे. अनेक मुले अशी आहेत,जे यांच्या पेक्षा पण जास्त विकर्म करत राहतात, माहित पण पडत नाही. मी तर म्हणतो, वाह,मुलगा, फार चांगला आहेस. थोड्या पण चूकीची माफी मागण्या साठी आला आहे. बाबाचे नेहमी सांगणे आहे कि, चुका सांगून क्षमा घ्या, नाहीतर पापात वाढ होत राहील.मग खाली पडाल. मुख्य योगानेच वाचू शकाल. ज्या योगाची फार कमी आहे. ज्ञान तर फार सोपे आहे. ही तर जशी एक गोष्ट आहे. आज पासून पाच हजार वर्षा पूर्वी कोणाचे राज्य होते, कसे राज्य केले. किती वेळ केले, मग राज्य करत करत कसे विकारा मध्ये फसले. कोणी आक्रमण केले नाही. आक्रमण तर नंतर जेंव्हा वैश्य बनले, तेंव्हा झाले. त्यांच्या कडून तर रावणाने राज्य हिसकावून घेतले. तुम्ही मग रावणावर विजय प्राप्त करून राज्य घेता, हे पण कोणाच्या बुद्धीमध्ये मुश्किलीने बसत आहे. जे बाबा बरोबर पूर्ण प्रामाणिक, आज्ञाकारी आहेत. अज्ञानकाळा मध्ये पण कोणी प्रामाणिक, आज्ञाकारी असतात. कांही नोकर पण फारच ईमानदार असतात. लाखो रुपये पडलेले असतात, कधी एक पण उचलणार नाहीत. म्हणतात शेठजी, तुम्ही किल्या विसरून गेला होता, मी सांभाळ करत बसलो आहे. असे पण असतात. बाबा तर फार चांगल्या रीतीने समजावत आहेत. बुद्धीला पण वाटते कि, या गोष्टीमुळे आम्ही माळेचे मणके बनू शकत नाही. मग तिथे जाऊन दास दासी बनतील. शिकले नाही तर जरूर हीच अवस्था होऊन जाईल. श्रीमता वर चालत नाहीत. बाबा समजावत आहेत, तुमचे लक्ष सारे योगावर पाहिजे. माया एकदम नाकाला धरून योग लावू देत नाही. योग असेल तर सेवा पण फार चांगली होईल. पापाची भीती वाटेल.जसा हा मुलगा तर फार चांगला आहे. खरेपणा असेल तर असा आसावा. चांगल्या चांगल्या मुलापेक्षा याचे पद उंच आहे. आणखी जे सेवा करत आहेत, ते कुठे ना कुठे फसलेले आहेत. कांही पण सांगत नाहीत. सांगून पण सोडत नाहीत. गीता मध्ये पण आहे, प्रतिज्ञा करत आहेत कि, कांही पण झाले तरी,कधी अशा चुका करणार नाही. मूळ गोष्ट देह अभिमानाची आहे. देह अभिमाना मुळे चुका होत आहेत. फार चुका करत आहेत, त्यामुळे सावधानी दिली जाते. बाबा चे काम आहे समजावून सांगणे. नाही सांगितले तर म्हणतील आम्हाला कोणी थोडेच समजावले आहे. यावर पण एक गोष्ट आहे. बाबा पण म्हणतात, मुलानो खबरदार राहा. नाहीतर फार शिक्षा भोगावी लागेल. मग असे म्हणायचे नाही कि, आम्हाला सांगितले कां नाही. बाबा स्पष्ट समजावत आहेत, थोडे पण पाप झाले तर फार वाढत राहील. मग बाबा समोर माथा उंच करू शकत नाहीत. खोटे बोलण्या पेक्षा तर तोबा, तोबा केली पाहिजे. असे समजू नका कि, शिवाबाबा आम्हाला थोडेच पाहत आहेत. अरे, अज्ञान काळा मध्ये पण ते सर्व जाणत आहेत, तेंव्हा तर पाप आणि पुण्याचे फळ देत आहेत. स्पष्ट सांगत आहेत कि, तुम्हीं पाप केले तर तुमच्या साठी फार मोठ्यातील मोठी शिक्षा आहे. बाबा कडून वरसा घेण्यासाठी आले आहात, तर त्याच्या ऐवजी दोन्ही कान तर कापू नका. म्हणतात एक आणि आठवण करतात दुसऱ्याची. बाबाची आठवण केली नाही, तर सांगा त्याची काय गती होईल? खरे खाणे, खरे बोलणे, खरे घालणे. . . ही पण आताची गोष्ट आहे. जे़व्हा बाबा येऊन शिकवित आहेत, तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर खरे वागले पाहिजे. अच्छा

अशा खऱ्या प्रामाणिक, आज्ञाकारी मुलांसाठी मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) खरेपणाने बाबा च्या सेवे मध्ये राहिले पाहिजे. पूर्ण प्रामाणिक, आज्ञाकारी बनायचे आहे. ईश्वरीय परिवारा बरोबर खरे प्रेम ठेवायचे आहे.

(२) श्रीमता मध्ये मनमत किंवा रावणाची मत मिसळायची नाही. एक बाबा दुसरे कोणी नाही, या खात्री मध्ये पक्के राहायचे आहे. हृदयाला शुद्ध पवित्र बनवायचे आहे.

वरदान:-
या हिऱ्या सारख्या युगामध्ये, हिरा पाहणे, आणि हिरो ची भूमिका करणारे तीव्र पुरुषार्थी भव

जसे रत्नपारखी ची नजर नेहमी हिऱ्या वर पडते, तुम्ही सर्व जवाहिरी आहात, तुमची नजर दगडा कडे जाऊ नये, हिऱ्याला पाहा. प्रत्येकाच्या विशेषते वरच नजर जावी. संगमयुग पण हीरे तुल्य युग आहे. अभिनय पण हिरो चा, युग पण हिऱ्या सारखे, तर हिरा च पाहा, तेंव्हा तुमची शुभ भावनेची किरणे सर्वत्र पसरतील. वर्तमान वेळी या गोष्टी वरच विशेष लक्ष दिले पाहिजे. अशा पुरुषार्थी ला च तीव्र पुरुषार्थी म्हटले जाते.

बोधवाक्य:-
वायुमंडळाला किंवा विश्वाला परिवर्तन करण्या पूर्वी स्वतःचे परिवर्तन करा.