14-03-21 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.11.87 ओम शान्ति
मधुबन
शांतीची शक्ती जमा
करण्याचे साधन -अंतरमुखी आणि एकांतवासी स्थिती.
आज सर्वशक्तिमान
बापदादा आपल्या शक्ती सेनेला पाहत आहेत. ही आत्मिक सेना विचित्र सेना आहे. नाव
आत्मिक सेना आहे परंतु विशेष शांतीची शक्ती आहे,शांती देणारी अहिंसक सेना आहे.तर आज
बापदादा प्रत्येक शांती देवा मुलांना पाहत आहेत की,प्रत्येकाने शांतीची शक्ती किती
जमा केले आहे?ही शांतीची शक्ती,या अध्यात्मिक सेनेचे विशेष शस्त्र आहे.सर्वच
शस्त्रधारी आहेत परंतु क्रमानुसर आहेत. शांतीची शक्ती संपूर्ण विश्वाला अशांती
पासून शांत बनवणारी आहे, न फक्त मनुष्य आत्म्यांना परंतु प्रकृतीला पण परिवर्तन
करणारी आहे.शांतीच्या शक्तीला आत्ता आणखी रहस्य युक्त रुपाने जाणने आणि अनुभव करणे
आवश्यक आहे.जितके शांतीच्या शक्तीमध्ये शक्तिशाली बनाल,तेवढे शांतीच्या शक्तीचे
महत्त्व,महानताचा अनुभव जास्त करू शकणार.आता वाणीच्या शक्तीमुळे,सेवेच्या साधनाची
शक्ती अनुभव करत आहे आणि अनुभव द्वारा सफलता पण प्राप्त करत आहात. परंतु वाणीची
शक्ती किंवा स्थूल सेवेच्या साधना पेक्षा जास्त,शांतीची शक्ती अतिश्रेष्ठ
आहे.शांतीच्या शक्तीचे साधन पण श्रेष्ठ आहे.जसे वाणीच्या सेवेचे साधन,चित्र
प्रोजेक्टर किंवा व्हिडिओ इत्यादी बनवतात,असेच शांतीच्या शक्तीचे साधन,शुभ
संकल्प,शुभ भावना आणि डोळ्यांची भाषा आहे.जसे मुखाच्या भाषेद्वारे बाबांचे किंवा
रचनेचा परिचय देतात,असेच शांतीच्या शक्तीच्या आधारावरती, डोळ्याच्या भाषे
द्वारे,डोळ्याद्वारा बाबाचा अनुभव करवू शकतात.जसे प्रोजेक्टर द्वारा चित्र दाखवतात,
तसेच आपल्या मस्तकाच्या मध्ये चमकणारे आपले किंवा बाबांचे चित्र स्पष्ट दाखवू
शकतात.जसे वर्तमान वेळेत वाणी द्वारा आठवणीच्या यात्रेचा अनुभव करवतात,असे शांतीच्या
शक्ती द्वारा,तुमच्या चेहऱ्या द्वारे (ज्याला मुख म्हणतात) वेगवेगळ्या आठवणीच्या
स्थितीचा स्वतःच अनुभव करवेल.अनुभव करणाऱ्यांना हे सहज माहीत होईल की,या वेळेत
बीजरूप स्थितीचा अनुभव होत आहे किंवा फरिश्ता रूपाचा अनुभव होत आहे किंवा वेगवेगळ्या
गुणांचा अनुभव तुमच्या शक्तिशाली चेहऱ्या द्वारे स्वतः होत राहील.जसे वाणीद्वारे
आत्म्यांना स्नेहाच्या सहयोगाची भावना उत्पन्न करतात तसेच,जेव्हा तुम्ही
शुभभावना,स्नेहाच्या भावनाच्या स्थितीमध्ये स्वतः स्थिर राहाल.तर जशी आपली भावना
असेल,तशीच त्याची भावना पण उत्पन्न होईल. आपली शुभ भावना,त्यांच्या भावनेला
प्रज्वलित करेल.जसे दीपक, दीपकांना प्रज्वलित करतो, तसे आपली शक्तीशाली शुभ भावना
दुसऱ्यांमध्ये पण सर्व श्रेष्ट भावना सहजच उत्पन्न करेल.जसे वाणी द्वारा,आत्ता सर्व
स्थूल कार्य करत राहतात,असेच शांतीच्या शक्तीचे श्रेष्ठ साधन,शुभ संकल्पाच्या
शक्तीद्वारे स्थूल कार्य पण असे सहज करू शकतात किंवा करवू शकतात.जसे विज्ञानाच्या
शक्तीचे साधन टेलीफोन, वायरलेस आहे असेच,हे शुभ संकल्प,समोर गोष्टी करणे,टेलीफोन
किंवा वायरलेस द्वारा कार्य करण्याचा अनुभव करवतील.अशा शांतीच्या शक्ती मध्ये
विशेषता आहेत.शांतीची शक्ती कमी नाही परंतु आता वाणीच्या शक्तीला, साधनांना जास्त
कार्यामध्ये लावतात म्हणून हे सहज वाटते.शांतीच्या शक्तीच्या साधनांचा प्रयोग केला
नाही म्हणून त्याचा अनुभव नाही.ते सहज वाटते आणि हे कष्टाचे वाटते. परंतु वेळेच्या
परिवर्तन प्रमाणे, शांतीच्या शक्तीचे साधन,प्रयोगांमध्ये आणावे लागतील,म्हणून हे
शांती देवा,श्रेष्ठ आत्म्यांनो,शांतीच्या शक्तीला अनुभवामध्ये आणा.जसे वाणीचा
अभ्यास करत-करत वाणीचे शक्तिशाली झाले आहेत,असेच शांतीच्या शक्तीचे अभ्यासी बनत
जावा.पुढे चालून वाणी किंवा स्थूल साधनांच्या द्वारे सेवेसाठी वेळ मिळणार नाही.अशा
वेळेत शांतीच्या शक्तीचे साधन आवश्यक असतील, कारण जितके जे महान शक्तिशाली असतात,तर
ते अती सूक्ष्म असतात. तर वाणी पेक्षा शुद्ध संकल्प जास्त सूक्ष्म आहेत म्हणून
सूक्ष्मचा प्रभाव शक्तिशाली होईल.आत्ता पण अनुभवी आहात,जिथे वाणी द्वारा कोणते
कार्य यशस्वी होत नाही,तर म्हणतात,हे वाणी द्वारा समजणार नाहीत,शुभभावना द्वारे
परिवर्तन होतील.जेथे वाणी कार्याला सफल करू शकत नाही,तेथे शांतीच्या शक्तीचे
साधन,शुभ संकल्प,शुभ भावना,डोळ्यांच्या भाषे द्वारा,दया आणि स्नेहाची अनुभूती कार्य
यशस्वी करू शकते.जसे आत्ता पण कोणी वाद-विवाद करणारे येतात,तर वाणी द्वारे आणखीनच
जास्त वाद- विवाद मध्ये येतात,त्यांना आठवणी मध्ये बसून शांतीच्या शक्तीचा अनुभव
करवतात ना.एक सेकंद पण जर आठवणी द्वारे शांतीचा अनुभव करतात,तर स्वतः आपल्या
वाद-विवादच्या बुद्धीला शांतीच्या अनुभूती पुढे समर्पित करतात.तर या शांतीच्या
शक्तीचा अनुभव वाढवत चला.आताही शांतीच्या शक्तीची अनुभूतीची खूप कमी आहे. शांतीच्या
शक्तीचा रस आज पर्यंत बहुतांश आत्म्याने ओंजळीत इतकाच अनुभव केला आहे.हे शांती देवा,
आपले भक्त,आपल्या जड चित्राद्वारे शांतीची शक्तीच जास्त मागतात,कारण शांतीमध्येच
सुख सामवले आहे.ते अल्पकाळ चा अनुभव पण करतात.तर बापदादा पाहत होते की,शांतीच्या
शक्तीचे अनुभवी आत्मा किती आहेत? वर्णन करणारे किती आहेत आणि प्रयोग करणारे किती
आहेत.यासाठी अंतरमुखी आणि एकांतवासी बनण्याची आवश्यकता आहे.बाह्यमुखता मध्ये येणे
सहज आहे परंतू अंतरमुखीचा अभ्यास आता वेळ प्रमाण खूप पाहिजे.काही मुलं
म्हणतात,एकांतवासी बनण्यासाठी वेळ मिळत नाही. अंतर्मुखी स्थितीचा अनुभव करण्यासाठी
वेळ मिळत नाही, कारण सेवेची प्रवृत्ती,वाणीच्या शक्तीची प्रवृत्ती खूप वाढलेली आहे
परंतु यासाठी काही एकत्रित पणे अर्धा तास,एक तास काढण्याची आवश्यकता नाही.सेवेच्या
प्रवृत्ती मध्ये राहत,मध्ये-मध्ये एवढा वेळ मिळू शकतो,जे एकांतवासी बनण्याचा अनुभव
करू शकतो. एकांतवासी म्हणजे कोणत्याही एका शक्तिशाली स्थितीमध्ये स्थिर राहणे, मग
बीजरुप स्थिती मध्ये स्थिर राहा किंवा प्रकाशस्वरुप,शक्तीस्वरुप स्थितीमध्ये स्थिर
राहा,म्हणजे विश्वाला शांती आणि प्रकाश देणारे,या अनुभवा मध्ये स्थिर राहा.
फरिश्तापनाच्या स्थिती द्वारा, दुसर्यांना पण अव्यक्क्त स्थिती चा अनुभव करा.एक
सेकंद किंवा एक मिनिट जरी या स्थितीमध्ये एकाग्र होऊन राहिले,तर ती एक मिनिटाची
स्थिती स्वतः आपल्याला आणि दुसर्यांना पण खूप लाभदायक होऊ शकते,यासाठी फक्त अभ्यास
पाहिजे.आता असे कोण आहे ज्याला एक मिनिट पण वेळ मिळू शकत नाही.जसे प्रथम ट्रॅफिक
कंट्रोलचा(विचाराचे नियंत्रण) कार्यक्रम बनला,तर काही विचार करत होते,ते कसे होऊ
शकेल? सेवेची प्रवृत्ती खूप मोठी आहे,व्यस्त राहतो,परंतु लक्ष्य ठेवले तर होत आहे
ना.कार्यक्रम चालत आहे ना. सेवाकेंद्रावरती ट्रॅफिक कंट्रोल चा कार्यक्रम चालू
आहे,की कधी चुकवतात,कधी चालवतात.हा एक ब्राह्मण कुळाचा नियम आहे.जसे दुसरे नियम
आवश्यक समजतात, असे हे पण प्रगतीसाठी किंवा सेवेच्या सफलता साठी,सेवा केंद्राच्या
वातावरणासाठी आवश्यक आहे.असे अंतर्मुखी एकांतवासी बनण्यासाठी,अभ्यासाचे लक्ष घेऊन,
मनापासून मध्ये मध्ये वेळ काढा. महत्त्व असनाऱ्यांना स्वतःच वेळ मिळतो.महत्व नाही
तर वेळ पण मिळू शकत नाही.एका शक्तिशाली स्थितीमध्ये आपल्या मनाला बुद्धीला स्थिर
करणेच एकांतवासी बनणे आहे.जसे साकार ब्रह्मांना पाहिले, संपूर्णतेच्या जवळिकतेची
लक्षणं सेवा मध्ये राहत,समाचार ऐकत,एकांतवासी बनत होते.हा अनुभव केला ना.एक तासाचा
समाचाराला पाच मिनिटांमध्ये,त्याचे सर्व रहस्य समजून,मुलांना पण खूष केले आणि आपल्या
अंतर्मुख एकांतवासी स्थितीचा अनुभव करवला.संपूर्णतेची लक्षणे अंतर्मुखी एकांतवासी
स्थिती,चालता-फिरता ऐकत,कामकाज करत अनुभव करवला.पित्याचे अनुकरण करू शकत नाही
काय?ब्रह्माबाबा पेक्षा जास्त जिम्मेवारी आणखी कोणाची आहे काय? ब्रह्मा बाबांनी
कधीच असे म्हटले नाही की,मी खूप व्यस्त आहे परंतु मुलासाठी उदाहरण मूर्त बनले.अशाच
प्रकारे आत्ता वेळे प्रमाण या अभ्यासाची आवश्यकता आहे.सर्व सेवेचे साधनं असतानी पण
शांतीच्या शक्तीची,सेवेची आवश्यकता आहे,कारण शांतीची शक्ती,अनुभूती करवणारी शक्ती
आहे.वाणी शक्तीचा बाण तर खूप करून बुद्धी पर्यंत पोहोचतो आणि अनुभूतीचा बाण
मनापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचतो.तर वेळेप्रमाणे एक सेकंदांमध्ये अनुभूती करा,हेच
वेळेप्रमाणे आवश्यक आहे.ऐकणे किंवा ऐकवणे यापासून थकले आहेत.शांतीच्या शक्तीच्या
साधना द्वारा दृष्टीने खुश कराल.शुभ संकल्पा द्वारे आत्म्याच्या व्यर्थ संकल्पांना
समाप्त कराल.शुभ भावना द्वारे बाबांच्या कडे स्नेहाची भावना उत्पन्न कराल,असेच त्या
आत्म्यांना शांतीच्या शक्तीद्वारे संतुष्ट कराल,तेव्हा तुमच्या चैतन्यशक्ती, शांती
देवआत्म्यांच्या पुढे शांती देवा, शांती देवा म्हणून त्याची महिमा करतील आणि हेच
अंतिम संस्कार घेऊन गेल्यामुळे,भक्त आत्मा बनून तुमच्या जड चित्राची महिमा करतील.हे
विचाराचे नियंत्रण करण्याचे( ट्रॅफिक कंट्रोल) महत्त्व पण खूप मोठे आहे आणि खूप
आवश्यक आहे,हे परत स्पष्ट करतो. परंतु शांतीच्या शक्तीच्या महत्वाला स्वतः ओळखा आणि
सेवा सेवेमध्ये लावा.समजले.
आज पंजाब विभाग आला आहे ना. पंजाब मध्ये सेवेचे महत्त्व पण,शांतीच्या शक्तीचे
आहे.शांतीच्या शक्तीद्वारे हिंसक वृत्ती असणार्यांना पण अहिंसक बनवू शकतो.जसे
स्थापनेच्या सुरुवातीच्या वेळेमध्ये पाहिले की,हिंसक वृत्ती असणारे आत्मिक शांतीच्या
शक्तीच्या पुढे परिवर्तित झाले ना.तर हिंसक वृत्तीना शांत बनवणारी,शांतीची शक्ती
आहे.वाणी ऐकण्यासाठी तयार होत नाहीत. जेव्हा प्रकृतीच्या शक्तीद्वारे गर्मी किंवा
थंडीची लाट चोहूबाजूला पसरते तर प्रकृती पतीच्या शांतीची लाट चोहूबाजूला पसरू शकत
नाही काय?विज्ञानाचे साधन पण गर्मी ला थंडीच्या वातावरणामध्ये बदलू शकतात,तर आत्मिक
शक्ती,आत्म्यांना बदलू शकत नाही काय? तर पंजाब निवासींनी काय ऐकले? सर्वांना जाणीव
व्हावी की कोणी शांतीचे पुंज,शांतीची किरणे देत आहेत.असेच सेवा करण्याची संधी,
पंजाबला मिळाली आहे. कार्यक्रम,प्रदर्शनी इत्यादी तर करत राहतात परंतु या शक्तीचा
अनुभव करा आणि अनुभव करवा.फक्त आपल्या मनाची एकाग्र वृत्ती, शक्तिशाली वृत्ती
पाहिजे.प्रकाश स्तंभ जितका शक्तिशाली असेल, तेवढाच दूरपर्यंत प्रकाश देऊ शकतो. तर
पंजाब निवासींसाठी ही वेळ या शक्तीच्या प्रयोगामध्ये आणण्याची आहे,समजले,अच्छा.
आंध्रप्रदेशाचा ग्रुप पण आला आहे.ते काय करतील?वादळाला शांत करतील. आंध्रमध्ये वादळ
खूप येतात ना. वादळाला शांत करण्यासाठी पण शांतीची शक्ती पाहिजे.वादळामध्ये मनुष्य
भटकतात.तर भटकणाऱ्या आत्म्यांना शांतीचा अनुभव करवणे,ठिकाणा देणे,ही आंध्राची
विशेषता आहे.जर शरीरा द्वारे भटकतात,तर प्रथम मन भटकते परत शरीर भटकते.मनाच्या
स्थिर होण्यामुळे परत शरीराच्या ठिकाण साठी पण बुद्धी काम करेल. जर मनाचा ठिकाण होत
नाही,तर शरीराच्या ठिकाण्यासाठी बुद्धी काम करत नाही.म्हणून सर्वांच्या मनाला
ठिकाण्यावरती लावण्यासाठी,या शक्तीला कार्यामध्ये लावा.दोघांना वादळापासून सुरक्षित
करायचे आहे. तेथे हिंसाचे वादळ आहे.येथे समुद्राचे वादळ आहे.ते व्यक्तींचे आहे.येथे
प्रकृतीची आहे परंतु दोन्ही कडे वादळ आहेत.वादळ असणाऱ्यांना शांतीचे बक्षीस
द्या.बक्षीस वादळाला पण बदलून टाकेल.अच्छा.
चोहूबाजूच्या शांती देवा,श्रेष्ठ आत्म्यांना,चोहूबाजूच्या अंतर्मुखी महान
आत्म्यांना,नेहमीच एकांतवासी बनून कर्मामध्ये येणाऱ्या कर्मयोगी श्रेष्ठ
आत्म्यांना,नेहमी शांतीच्या शक्तीचा प्रयोग करणाऱ्या श्रेष्ठ योगी
आत्म्यांना,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
दादीजी एक
दिवसासाठी राजपिपला (गुजरात) मध्ये जाण्याची साठी सुट्टी घेत आहेत:-
विशेष आत्म्याच्या प्रत्येक पावला मध्ये पद्मा ची कमाई आहे.मोठ्यांचा सहयोग पण
छत्रछाया बनून,चार चांद लावू शकतात.जिथे पण जावा तिथे सर्वांना एकेकाच्या नावाद्वारे
प्रेमपूर्वक आठवण द्या.नावाची माळ तुम्हा भक्तांनी खूप जपली आहे. आता बाबा ही माळ
सुरू करतील, तर ही माळ मोठी होईल,म्हणून जेथे पण,जी पण मुलं,विशेष आत्मे जातात,तेथे
विशेष उमंग ऊत्साह वाढतो,विशेष आत्म्यांचे जाणे म्हणजे सेवेमध्ये विशेषता
येणे.येथून सुरू होते,फक्त धरणी मध्ये पाय ठेवून जाणे. तेथे भक्तीचरणाला पाय लावून
देणे म्हणजे चक्र लावणे.येथे सेवेमध्ये चक्र लावतात,तेथे फक्त त्यांचे चरण ठेवण्याचे
महत्त्व बनवले आहे परंतु सुरू तर सर्व येथून होते. मग तो अर्धा तास किंवा एक तास
कुठे पण जातात तर,सर्व खुश होतात परंतु येथे सेवा होते. भक्तीमध्ये चरण ठेवल्यामुळे
खुशी चा अनुभव करतात.सर्व स्थापना येथून होते होत आहे.भक्तिमार्गाचा पुर्ण पाया
येथूनच पडतो फक्त रूप बदलते.तर जे पण मेळा,सेवेच्या निमित्त बनले आहेत,अर्थात
बाबांशी मिलन करण्याच्या सेवेचे निमित्त बनले आहेत,त्या सर्वांना बाप दादा
मेळ्याच्या अगोदरच मिलन करत आहेत,भेटत आहेत.हा बाबा आणि मुलांचा मेळा आहे आणि तो
सेवेचा मेळा आहे.तर सर्वांना मनापासुन प्रेमपूर्वक आठवण अच्छा.दुनिये मध्ये रात्रीचे
क्लब असतात आणि येथे अमृतवेळे चा क्लब आहे.दादीना,तुम्ही सर्व अमृतवेळेच्या क्लबचे
सभासद आहात.सर्व पाहून खुश होतात.विशेष आत्म्यांना पाहून पण खुशी होते,अच्छा.
निरोप घेते
वेळेस-सद्गुरुंची प्रेमपुर्वक आठवण (सकाळी सहा वाजता)
वृक्षपती दिवसावरती वृक्षाच्या अगोदर अमूल्य पत्त्यांना ब्रहस्पती पित्याची
प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.बृहस्पतीची दशा तर सर्व श्रेष्ठ आत्म्यावर आहेच. राहूची
दशा आणि अनेक दशा समाप्त झाल्या.आता एक वृक्षपतीची,ब्रहस्पतीची दशा प्रत्येक
ब्राह्मण आत्म्यावरती नेहमीच राहते.तर बृहस्पतीची दशा पण आहे आणि दिवस पण बृहस्पतीचा
आहे आणि वृक्षपती आपल्या वृक्षाच्या सुरुवातीच्या पानाशी भेटत आहेत. तर नेहमी आठवण
आहे आणि नेहमी आठवण राहिल.नेहमी प्रेमामध्ये सामावले आहात आणि नेहमीच प्रिय
राहाल,समजले.
वरदान:-
शक्तिशाली ब्रेक द्वारा वरदानी रुपा द्वारे सेवा करणारे प्रकाश आणि शक्तीशाली भव.
वरदानी रुपामध्ये सेवा
करण्यासाठी प्रथम स्वतःमध्ये शुद्ध संकल्प पाहिजेत किंवा दुसऱ्याच्या संकल्पाला
सेकंदांमध्ये नियंत्रित करण्याचा विशेष अभ्यास पाहिजे. सर्व दिवस शुद्ध संकल्पाच्या
सागरामध्ये राहा आणि जेवढा वेळ पाहिजे शुध्द संकल्पाच्या सागराच्या तळामध्ये जाऊन
शांतीस्वरूप बना. यासाठी विशेष ब्रेक शक्तिशाली पाहिजे.संकल्पा वरती पूर्ण नियंत्रण
पाहिजे आणि बुद्धी व संस्कारावरती पूर्ण अधिकार पाहिजे,तेव्हा प्रकाश आणि
शक्तीस्वरूप बनून वरदानी रूपा द्वारे सेवा करू शकाल.
सुविचार:-
संकल्प,वेळ आणि बोल
यांची बचत करा, तर बाबांच्या मदतीला पकडू शकतात.