20-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुमचा धंदा आहे मनुष्याला जागे करणे,रस्ता सांगणे, जेवढे तुम्ही देहीअभिमानी बनून बाबाचा परिचय सांगाल, तेवढे कल्याण होईल."

प्रश्न:-
गरीब मुले आपल्या कोणत्या विशेषतेच्या आधाराने सावकारा पेक्षा पुढे जाऊ शकतात?

उत्तर:-
गरीबा मध्ये दान पुण्य करण्याची फार श्रद्धा असते. गरीब भक्ती पण फार लगन मध्ये करतात. साक्षात्कार पण गरीबानाच होतो. सावकारांना आपल्या धनाचा नशा राहतो. त्यांचे पाप जास्त होते, त्यामुळे गरीब मुलेच त्यांच्या पेक्षा पुढे जातात.

गीत:-

ओम नमः शिवाय. . .

ओम शांती।
तुम्ही माता पिता आम्ही तुमचे बालक.. . . ही तर जरूर परमपिता परमात्म्याची महिमा गायली जाते. ही तर स्पष्ट महिमा आहे, कारण ते रचनाकार आहेत. लौकिक माता-पिता पण मुलांचे रचनाकार आहेत. पारलौकिक बाबाला पण रचनाकार म्हटले जाते. बंधू, सहाय्यक. . फार महिमा गात आहेत. लौकिक पित्याची एवढी महिमा नाही. परमपिता परमात्म्याची महिमा वेगळी आहे. मुले पण महिमा करतात, ज्ञानाचे सागर आहेत, ज्ञानसंपन्न आहेत. त्यांच्या मध्ये सारे ज्ञान आहे. हे ज्ञान कांही शरीर निर्वाहाच्या शिक्षणाचे नाही. त्यांना ज्ञानाचे सागर, ज्ञानसंपन्न म्हटले जाते. त्यांच्या जवळ ज्ञान आहे, ते कोणते ज्ञान? हे सृष्टीचक्र कसे फिरत आहे, त्याचे ज्ञान आहे. तर तेच ज्ञानसागर, पतित-पावन आहेत. कृष्णाला कधी पतित-पावन किंवा ज्ञानाचे सागर म्हणत नाहीत. त्यांची महिमा फारच वेगळी आहे. दोघे भारतवासी आहेत. शिवबाबा ची पण भारता मध्येच महिमा आहे. शिवजयंती पण येथे साजरी करतात. कृष्णाची जयंती पण साजरी करतात. गीता जयंती पण साजरी करतात. तीन मुख्य जयंती आहेत. आता प्रश्न निर्माण होतो कि, पहिली जयंती कोणाची झाली असेल? शिवाची कां कृष्णाची? मनुष्य तर बाबाला विसरलेले आहेत. कृष्णाची जयंती मोठ्या धुमधडाक्या मध्ये, प्रेमाने साजरी करतात. शिवजयंती चे एवढे कोणाला माहित नाही. ना गायन आहे. शिवाने येऊन काय केले. त्यांच्या चरित्राची कोणाला माहिती नाही. कृष्णाच्या तर फार गोष्टी लिहिल्या आहेत. गोपिकांना पळविले, हे केले. कृष्णाच्या चरित्राचे खास एक मासिक पण निघत आहे. शिवाचे चरित्र इत्यादी कांही पण नाही. कृष्णाची जयंती कधी झाली? मग गीतेची जयंती कधी झाली? कृष्ण जेंव्हा मोठे होतात. तेव्हा तर ज्ञान सांगतील. कृष्णाच्या लहानपनाला तर दाखवतात. टोपली मध्ये ठेवून नदी पार घेऊन गेले. मोठेपणाचे दाखवितात, रथावर उभे आहेत, चक्र चालवत आहेत. १६-१७, वर्षाचे असतील. बाकी चित्र लहानपणाचे दाखवितात. आता गीता कधी सांगितली. त्यावेळी तर सांगितली नसेल, जेंव्हा लिहितात अमकीला पळवले, हे केले. त्यावेळी तर ज्ञान शोभणार तर नाही. ज्ञान तर जेंव्हा वृद्ध होतील, तेंव्हा सांगतील. गीता पण कांही काळा नंतर सांगितली असेल. आता शिवाने काय केले. कांही माहीत नाही, अज्ञान निद्रे मध्ये झोपलेले आहेत. बाबा म्हणतात कि, माझ्या चरित्राची तर कोणाला माहिती नाही. मी काय केले?. मलाच पतित पावन म्हणत आहेत.मी येतो, तर माझ्याबरोबर गीता आहे, मी साधारण वृद्ध अनुभवी तना मध्ये येतो. शिवजयंती तुम्ही भारतामध्येच साजरी करता. कृष्ण जयंती, गीता जयंती, या तीन मुख्य आहेत. रामाची जयंती तर नंतर होते. या वेळी जे कांही होत आहे, ते मग नंतर साजरे करतात. सतयुगा मध्ये जयंती इत्यादी होत नाहीत. सुर्यवंशी पासून चंद्रवंशी वरसा घेतात. आणखीन कोणाची महिमा नाही. फक्त राजांचा राज्याभिषेक साजरा करतात. जन्मदिवस तर आज-काल सर्व साजरे करतात. ही तर साधारण गोष्ट आहे. कृष्णाने जन्म घेतला, मोठे होऊन राजधानी चालवली, यामध्ये महीमेची तर गोष्टच नाही. सतयुग त्रेता मध्ये सुखाचे राज्य चालत आले. ते राज्य कधी कसे स्थापन झाले, हे तुमच्या मुलांच्या बुद्धी मध्ये आहे. बाबा म्हणतात कि, मुलांनो, मी कल्प कल्प, कल्पाच्या संगमयुगावर येतो. कलियुगाचा अंत पतित दुनिया आहे. सतयुग आदि पावन दुनिया आहे. मी पिता पण आहे, तुम्हां मुलांना वरसा पण देत आहे. कल्पा पूर्वी पण तुम्हाला वारसा दिला होता. त्यामुळे तुम्ही साजरे करत आले आहात. परंतु नाव विसरून गेल्यामुळे, कृष्णाचे नाव लिहले आहे. मोठ्यात मोठे शिव आहेत ना? पहिल्या प्रथम जेव्हा त्यांची जयंती होईल, तेंव्हा मग साकार मनुष्याची होईल. आत्मे तर सर्व वरून खाली उतरत आहेत. माझे पण अवतरण आहे. कृष्णाने मातेच्या गर्भातून जन्म घेतला, पालना घेतली. सर्वांना पुनर्जन्मा मध्ये यायचेच आहे. शिवबाबा पुनर्जन्म घेत नाहीत, येत तर आहेत ना. तर हे सर्व बाबा समजावत आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकर त्रिमूर्ती दाखवित आहेत ना. ब्रह्मा व्दारे स्थापना, कारण शिवाला तर स्वतःचे शरीरच नाही. स्वतः सांगत आहेत, मी यांच्या वृध्द तना मध्ये येतो, ते स्वतःच्या जन्माला ओळखत नाहीत. यांच्या फार जन्मातील अंताचा हा जन्म आहे. हे पहिल्या प्रथम समजावले पाहिजे. शिवजयंती मोठी कां श्रीकृष्ण जयंती मोठी? जर कृष्णाने गीता सांगितली, तर गीता जयंती नंतर कृष्ण काही वर्षा नंतर आले असतील, जेंव्हा कृष्ण मोठे होतील. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत ना. परंतु वास्तवा मध्ये शिव जयंती नंतर गीता जयंती झाली. हे पण मुद्दे बुद्धीमध्ये ठेवले पाहिजेत, मुद्दे तर अनेक आहेत. लिहिल्या शिवाय ते आठवणीत राहणार नाहीत. बाबा एवढे जवळ आहेत, त्यांचा रथ आहे, ते पण म्हणतात कि, सर्व मुद्दे वेळेवर आठवणीत येणे अवघड आहे. बाबा ने सांगितले आहे, सर्वांना दोन पित्याचे रहस्य समजावा. शिवबाबा ची जयंती साजरी करतात,तर जरूर आले असतील. जसे ख्रिस्त, बुद्ध इत्यादी येऊन आपला धर्म स्थापन करतात. ती पण आत्मा येऊन, प्रवेश करून धर्म स्थापन करते. ते स्वर्गीय ईश्वरी पिता आहेत. सृष्टीचे रचियता तर जरूर नवीन सृष्टी रचतील. जुनी थोडीच रचतिल. नवीन सृष्टीला स्वर्ग म्हटले जाते. आता नरक आहे. बाबा म्हणतात, मी कल्प, कल्पाच्या संगमावर येऊन तुम्हा मुलांना राजयोगाचे ज्ञान देत आहे. हा भारताचा प्राचीन योग आहे. कोणी शिकविला? शिवबाबा चे नाव तर विसरून गेले आहेत. एक तर म्हणतात, गीतेचा भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू इ.चे नाव देतात. शिवबाबा ने राजयोग शिकविला होता. हे कोणाला माहित नाही. शिवजयंती निराकाराची जयंतीच दाखवत आहेत. ते कसे आले, येऊन काय केले? ते तर सर्वांचे सद्गती दाता, मुक्तिदाता, मार्गदर्शक आहेत. आता सर्व आत्म्यांना मार्गदर्शक पाहिजे. परमात्मा ते पण आत्मा आहेत. जसे मनुष्याला मार्गदर्शन पण मनुष्य करतात. तसे आत्म्यांचे मार्गदर्शक पण आत्मा पाहिजेत. ते तर सुप्रीम आत्माच म्हणतात. मनुष्य तर सर्व पुनर्जन्म घेऊन, पतित बनले आहेत. मग पावन बनवून, परत घरी कोण घेऊन जाणार‌. बाबा म्हणतात, मीच येऊन पावन होण्याची युक्ती सांगत आहे. तुम्ही माझी आठवण करा. कृष्ण तर म्हणू शकत नाहीत कि, देहाचे संबंध सोडा. ते तर 84 जन्म घेतात. सर्व संबंधा मध्ये येतात. बाबाला तर स्वतःचे शरीर नाही. तुम्हाला ही आत्मिक यात्रा, बाबा शिकवित आहेत. हे आत्मिक पित्याचे, आत्मिक मुलासाठी, आत्मिक ज्ञान आहे. कृष्ण कोणाचे आत्मिक पिता थोडेच होतील. सर्वांचा आत्मिक पिता मी आहे, मीच मार्गदर्शक बनू शकतो, मुक्तिदाता, मार्गदर्शक, आशीर्वाद देणारा, शांती देणारा, सदा पवित्र, हे सर्व माझ्या साठीच म्हणतात. आता तुम्हा आत्म्यांना ज्ञान देत आहे. बाबा म्हणतात, मी या शरीराद्वारे तुम्हाला देत आहे. तुम्ही पण शरीराद्वारे ज्ञान घेत आहात. ते ईश्वरी पिता आहेत. त्यांचे रूप पण सांगितले आहे. जशी आत्मा बिंदू आहे, तसे परमात्मा पण बिंदू आहेत. नैसर्गिक आहे ना. खरेतर पहिले नैसर्गिक तरी हे आहे. एवढ्या छोट्या आत्म्यामध्ये 84 जन्माचा अभिनय आहे. हे नैसर्गिक आहे. बाबाचा पण नाटका मध्ये अभिनय आहे. भक्तीमार्गा मध्ये पण तुमची सेवा करत आहेत. तुमच्या आत्म्या मध्ये 84 जन्माचा अविनाशी अभिनय आहे. याला नैसर्गिक म्हटले जाते. याचे वर्णन कसे करायचे. किती छोटीशी आत्मा आहे. या गोष्टी ऐकून आश्चर्य वाटते. आत्मा आहेच ताऱ्या सारखी. 84 जन्म बरोबर भोगत आहे. सुख पण ते बरोबर भोगते. हे नैसर्गिक आहे. बाबा पण आत्मा, परमात्मा आहेत. त्यांच्या मध्ये सारे ज्ञान भरलेले आहे. जे मुलांना सांगत आहेत. या नवीन गोष्टी आहेत. नवीन मनुष्य ऐकून म्हणतात, यांचे ज्ञान तर कोणत्या शास्त्र इ.मध्ये नाहीच. तरी पण ज्यांनी कल्पापूर्वी ऐकले आहे, वरसा घेतला आहे, तेच वृध्दीला प्राप्त होत राहतील. वेळ लागत आहे. प्रजा खूप बनते . ते तर सोपे आहे. राजा बनण्यामध्ये मेहनत आहे. मनुष्य जे फार धन दान करतात, तर ते राजाई घरांमध्ये जन्म घेतात. गरीब पण आपले हिमतीनुसार, जे कांही दान करतात, तर ते पण राजा बनतील. जे पूर्ण भक्त असतात, ते दान पुण्य पण करतात. सावकारा कडून पाप जास्त होतात. गरीबा मध्ये श्रद्धा फार असते. ते फार प्रेमाने थोडे थोडे दान करतात, तर त्यांना फार मिळते. गरीब भक्ती पण फार करतात. दर्शन द्या, नाहीतर आम्ही गळा कापून टाकतो. सावकार असे म्हणत नाहीत. साक्षात्कार पण गरीबांना होतो. तेच दान पुण्य करतात. राजे पण तेच बनतात. पैसे वाल्यांना अहंकार राहतो. इथे पण गरिबांना 21 जन्माचे सुख मिळत आहे. गरीब जास्त आहेत, सावकार शेवटी येतील. जो भारत एवढा उंच होता. मग तो एवढा गरीब कसा झाला. तुम्ही समजत आहात‌. भूकंप इत्यादी मध्ये सर्व महल नाहीसे होतील. मग गरीब होऊन जातील. रावण राज्य असल्यामुळे हाहाकार होऊन जातो. तर मग अशा वस्तू राहत नाहीत. प्रत्येक वस्तूचे आयुष्य तर असतेच ना. तिथे जसे मनुष्याचे आयुष्य जास्त असते, तसे घराचे पण आयुष्य मोठे असते. सोन्याची मोठ मोठी घरे बनवत जातील. सोन्याचे तर आणखीनच मजबूत असतात. नाटका मध्ये पण दाखविले आहे ना. युद्ध होते, मग घरे तुटून फुटून जातात. मग बनवितात. त्यांची बनावट अशी असते. हे जे स्वर्गाचे महल इत्यादी बनवितात. हे तर दाखवत नाहीत, मिस्त्री लोक कसे घर बनवितात. समजतात कि, हीच घरे असतील. पुढे चालून तुम्हाला साक्षात्कार होईल. असे बुद्धीला वाटते. या गोष्टी मध्ये मुलांचा काही संबंध नाही. मुलांना तर शिक्षण घ्यायचे आहे. स्वर्गा चे मालक बनायचे आहे. स्वर्ग आणि नरक अनेक वेळा होऊन गेले आहे. आता दोन्ही होऊन गेले आहेत. आता संगम आहे. सतयुगा मध्ये हे ज्ञान असत नाही. यावेळी तुम्हा मुलांना पूर्ण ज्ञान आहे. लक्ष्मी नारायणाला हे राज्य कोणी दिले. आता तुम्हा मुलांना माहित झाले आहे. त्यांनी हा वरसा कसा घेतला. हे शिक्षण घेऊन स्वर्गाचे मालक बनले आहेत. मग तिथे जाऊन महल इत्यादी बनवतील. सर्जन पण मोठ-मोठे हॉस्पिटल बनवित आहेत ना.

बाबा तुम्हा मुलांना दिवसेंदिवस चांगले चांगले मुद्दे सांगत आहेत. तुमचा धंदाच आहे, मनुष्याला जागृत करणे, रस्ता सांगणे. जसे बाबा किती प्रेमाने समजावत आहेत. देहअभिमानाची आवश्यकता नाही. बाबा कधी देह अभिमानी बनत नाहीत. तुम्हाला सर्व मेहनत देहीअभिमानी होण्यासाठी लागत आहे. जे देहीअभिमानी बनून बाबाचा परिचय देतात, ते अनेकांचे कल्याण करत आहेत. प्रथम देह अभिमान आल्यामुळेच मग इतर विकार येतात. लढाई, भांडण, नवाबी मध्ये चालणे देहअभिमान आहे. जरी आपला राजयोग आहे, तरी पण फार साधारण राहायचे आहे. थोड्या गोष्टीं मध्ये अहंकार येतो. घड्याळ फॅशनेबल पाहिले, तर मनात येते हे घालावे. विचार चालत राहतात. त्याला पण देह अभिमान म्हटले जाते. चांगली उत्तम वस्तू असेल, तर त्याचा सांभाळ करावा लागतो. चोरीला गेली तर विचार चालतात. अंताचे वेळी कांही पण आठवणीत आले, तर पद भ्रष्ट होऊन जाईल. ही देह अभिमानाची सवय आहे, मग सेवा करण्या ऐवजी नुकसान पण फार करतील. रावणाने तुम्हाला देहीअभिमानी बनविले आहे. तुम्ही पाहता बाबा किती साधारण चालतात. प्रत्येकाची सेवा पाहिली जाते. महारथी मुलांना आपला शो करायचा आहे. महारथीनाच लिहिले जाते कि, तुम्ही अमुक ठिकाणी जाऊन, भाषण करा. एक दोघांना बोलावत राहतात. परंतु मुलां मध्ये देहअभिमान फार आहे. भाषणा मध्ये जरी चांगले आहेत, परंतु आपसा मध्ये आत्मिक स्नेह नाही.देहअभिमान खारट पाणी बनवितो. कोणत्या गोष्टीं मध्ये झटक्यात बिगडणे,असे पण नसले पाहिजे. त्यामुळे बाबा म्हणतात, कोणाला पण विचारायचे असेल, तर बाबाला जावून विचारा. कोणी म्हणतात, पिताजी तुम्हाला किती मुले आहेत? त्यांना सांगतात, मुले तर अनेक आहेत, परंतु कांही कपूत, कांही सपूत चांगली आहेत. अशा बाबाचे तर आज्ञाकारी, प्रामाणिक बनले पाहिजे ना. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रती, मातपिता, बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा अनेक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) देह अभिमाना मध्ये येऊन कोणत्या पण प्रकारची फॅशन करायची नाही. जास्ती छंद ठेवायचे नाहीत. फार फार साधारण होऊन राहायचे आहे.

(२) आपसा मध्ये फार आत्मिक स्नेहाने चालायचे आहे. कधी पण खारट पाणी व्हायचे नाही. बाबाचा सपूत मुलगा बनायचे आहे. अहंकारा मध्ये कधी यायचे नाही.

वरदान:-
समर्पणते द्वारे बुद्धीला, स्वच्छ बनविणारे, सर्व खाजाण्याने संपन्न भव:

ज्ञानाचा, श्रेष्ठ वेळेचा खजाना, जमा करणे किंवा स्थुल खजान्याला एका पासून लाख गुणा बनविणे म्हणजे जमा करणे. . . या सर्व खजान्या मध्ये संपन्न बनण्याचा आधार, स्वच्छ बुद्धी आणि खरे मन आहे. परंतु बुद्धी स्वच्छ तेंव्हा बनेल, जेव्हा बुद्धी द्वारे बाबाला ओळखून, तिला बाबा समोर अर्पण कराल. शुद्र बुद्धीला अर्पण करणे म्हणजेच देणे, अर्थात दिव्य बुद्धी घेणे होय.

बोधवाक्य:-
"एक बाबा दुसरे कोणी नाही" या विधीद्वारे नेहमी वृध्दीला प्राप्त करत राहा.