25-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो - ज्याप्रमाणे पित्याचा अभिनय आहे सर्वांचे कल्याण करणे,अश्याप्रकारे पित्यासमान कल्याणकारी बना, आपले आणि सर्वांच कल्याण करा"

प्रश्न:-
मुलांची कोणती एक विशेषता पाहुन बापदादा खूप खुश होतात?

उत्तर:-
गरीब मुले बाबांच्या यज्ञात 8 आणे,एक रुपया पाठवतात.म्हणतात बाबा या बदल्यात आम्हाला महल द्या. बाबा म्हणतात मुलांनो,हा एक रुपया पण शिवबाबांच्या खजिन्यात जमा झाला.तुम्हाला २१ जन्मांकरिता महल मिळतील. सुदामाचे उदाहरण आहे ना. विनामूल्य तुम्हा मुलांना विश्वाची बादशाही मिळते.बाबा गरीब मुलांच्या या विशेषतेवर खूप खुश होतात.

गीत:-

तुम्हे पाके हमने......

ओम शांती।
गोड-गोड मुले समजतात की बाबांकडून आता बेहदचा वारसा घेत आहोत.मुले म्हणतात की बाबा तुमच्या श्रीमतानुसार आम्ही पुन्हा एकदा बेहदचा वारसा प्राप्त करत आहोत.नवी गोष्ट नाहीये.मुलांना ज्ञान मिळाले आहे.जाणतात सुखधामचा वारसा आम्ही कल्प-कल्प मिळवत रहातो. कल्प-कल्प ८४ जन्म तर घ्यावे लागतात.बरोबर आपण बेहदच्या पित्याकडून २१ जन्मांचा वारसा घेतो नंतर हळुहळू गमावतो.बाबानीं समजावले आहे हा अनादि बनलेला खेळ आहे. तुम्हा मुलांना खात्री होते.हे पण जाणता नाटका मध्ये सुख खुप आहे.नंतर रावणाकडून दु:ख मिळते.आता तुम्ही अजून थोडे आहात,पुढे जाऊन खूप वृध्दी होत जाईल.मनुष्यापासून देवता बनाल.जरूर मनातून समजाल आपण कल्प-कल्प पित्याकडून वारसा घेतो.जे-जे येऊन ज्ञान घेतील ते समजतील आता ज्ञान सागर पित्याकडून सृष्टीच्या आदी-मध्य-अंताचे ज्ञान मिळाले आहे.बाबाच ज्ञानाचा सागर,पतितांना पावन बनवणारा आहे अर्थात मुक्ती-जीवन मुक्ती मध्ये घेऊन जाणारा आहे.हे पण तुम्ही आता जाणता.गुरू तर खूप जणांनी केले आहे ना.शेवटी गुरूंना पण सोडून येऊन ज्ञान घेतील.तुम्हाला पण आता हे ज्ञान मिळाले आहे.जाणता या आधी अज्ञानी होतो.सृष्टीचे चक्र कसे फिरते.शिवबाबा,ब्रह्मा,विष्णू, शंकर कोण आहेत,हे काहिच जाणत नव्हते.आता माहीत झालय की आपणच विश्वाचे मालक होतो तर तुमच्या बुद्धी मध्ये खूप चांगला नशा चढायला हवा.पित्याला आणि सृष्टी चक्राला आठवत राहिले पाहिजे.अल्फ आणि बे(पिता आणि वारसा). बाबा समजावतात की या आधी तुम्ही काही जाणत नव्हता.ना पित्याला,ना त्यांच्या रचनेला जाणत होता.संपूर्ण सृष्टीचे मनुष्य ना बाबाला,ना रचनेच्या आदी-मध्य-अंताला जाणतात. आता तुम्ही शुद्रापासून ब्राह्मण बनलात.बाबा सर्व मुलांशी बोलत आहे.किती भरपूर मुले आहेत. सेंटर किती आहेत.आता तर सेंटर खोलतील.तर बाबा समजावतात या आधी तुम्ही काहीच जाणत नव्हता.आता क्रमवार पुरूषार्थानुसार जाणता.हे पण जाणत आहात आता आपण पित्याद्वारे पतिता पासून पावन बनत आहोत.दुसरे तर बोलवत राहतात,तुम्ही आहे गुप्त. ब्रह्माकुमार-कुमारी म्हणतात परंतु समजत नाही की यांना शिकविणारा कोण आहे?

शास्त्रांमध्ये कुठेच लिहिलेले नाही.त्याच गीतेच्या भगवान शिवानी येऊन मुलांना राजयोग शिकवला आहे.हे तुमच्या बुद्धी मध्ये येत ना.गीता पण तुम्ही वाचली असेल.हे पण आत्ता समजता-ज्ञान मार्ग खूप वेगळा आहे.विद्युत मंडळी कडून जे शास्त्र वगैरे शिकून पदवी घेतात ते सर्व भक्ती मार्गाचे शास्त्र आहेत. हे ज्ञान त्यांच्या मध्ये नाहीये.हे तर बाबाच येऊन आदी-मध्य-अंताचे ज्ञान देतात.हे तर बाबांनी येऊन तुमच्या बुद्धीचा टाळा उघडला आहे. तुम्हाला माहीत आहे आधी तुम्ही काय होता,आता काय बनले आहात.बुद्धी मध्ये सर्व चक्र आले आहे.पहिले थोडेच समजत होते. दिवसेंदिवस ज्ञानाचा तिसरा डोळा चांगलाच उघडत जातो.हे पण कोणालाही माहीत नाही की भगवान कधी आला,तो कोण होता-ज्याने येऊन गीतेचे ज्ञान ऐकवले.तुम्ही मुले आता जाणता. बुद्धी मध्ये सर्व चक्राचे ज्ञान आहे. केव्हां पासून आपण हार खातो आणि कसे वाम मार्गात जातो, कशी शिडी उतरतो.हे चित्रात किती सहज समजावले आहे.८४ जन्मांची शिडी आहे कशी उतरतात परत चढतात.पतित- पावन कोण आहे?पतित कोणी बनवले?हे तुम्ही आता जाणता ते फक्त गातात-पतित-पावन.हे थोडेच समजतात की रावण राज्य कधी पासून सुरू होते?पतित कधीपासून बनलात?हे ज्ञान आहे आदी सनातन देवी-देवता धर्म वाल्यांसाठी.बाबा म्हणतात की मीच आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना केली होती. हा विश्वाचा इतिहास-भूगोल बाबांशिवाय कोणीही समजावू नाही शकत.तुमच्यासाठी जसे की ही एक गोष्ट आहे.कसे राज्य मिळवतात,कसे गमावतात.हा आम्ही इतिहास-भूगोल शिकवतो. ही बेहदची गोष्ट आहे.आपण ८४ चे चक्र कसे लावतो,आपण विश्वाचे मालक होतो मग रावणाने राज्य घेतले,हे ज्ञान बाबानीं दिले आहे.मनुष्य दसरा वगैरे सण साजरे करतात परंतु काहीच ज्ञान नाही.जसे तुम्हाला हे ज्ञान नव्हते, आता ज्ञान मिळत आहे तर तुम्ही खुशीत राहता.ज्ञान खुशी देते. बेहदचे ज्ञान बुद्धी मध्ये आहे. बाबा तुमची झोळी भरत आहे. म्हणतात ना-झोळी भरुन दे. कोणाला म्हणतात?साधू-संत इ. नां नाही म्हणत.भोलानाथ शिवबाबाला म्हणतात,त्याच्याकडेच भीक मागतात.तुमचा तर आता खुशीचा पारावार नाही.तुम्हाला खूप खुशी असायला पाहिजे. बुद्धी मध्ये किती ज्ञान आले आहे. बेहद बाबां कडून बेहदचा वारसा मिळत आहे.तर आता स्वतःचे आणि दुसऱ्यांचे पण कल्याण करायच आहे.सर्वांचे कल्याण करायचे आहे.आधी तर एक- दोघांच अकल्याणच करायचे कारण आसुरी मत होती.आता तुम्ही श्रीमतावर आहात तर स्वतःचे ही कल्याण करायचे आहे.तुम्हाला वाटते की हे बेहदचे शिक्षण सर्वांनी घ्यावे,सेंटर खोलली जावीत.म्हणतात बाबा प्रदर्शनी द्या,प्रोजेक्टर द्या आम्ही सेंटर खोलतो.आम्हाला जे ज्ञान मिळाले आहे,ज्याने बेहदच्या खुशीचा पारा चढला आहे तो दुसऱ्यांनी पण अनुभव करावा.नाटकानुसार हा पण पुरुषार्थ चालत राहतो.बाबा आले आहेत भारताला पुन्हा स्वर्ग बनवण्यासाठी.तुम्ही जाणत आहात आपण आधी नर्कवासी होतो,आता स्वर्गवासी बनत आहे. हे चक्र तुमच्या बुद्धी मध्ये नेहमी फिरत राहिले पाहिजे,ज्यामुळे सदैव तुम्ही खुशीमध्ये राहाल. दुसऱ्यांना सांगण्याचा पण नशा राहील.आम्ही बाबांकडून ज्ञान घेत आहोत.तुमचे दुसरे भाऊ- बहिण जे जाणत नाही त्यांना पण रस्ता दाखवणे तुमचा धर्म आहे. जसा बाबांचा अभिनय आहे सर्वांचे कल्याण करणे तसा आपला पण अभिनय आहे सर्वांचे कल्याणकारी बनणे.बाबांनी कल्याणकारी बनवले आहे तर स्वतःचे पण कल्याण करायचे आहे इतरांचे पण करायचे आहे.बाबा म्हणतात तुम्ही आमक्या एका सेंटर् वर जा,जाऊन सेवा करा.एका ठिकाणी बसुन सेवा करायची नाही.जेवढा जो हुशार आहे तेवढी त्यांना आवड असते,जाऊन आम्ही सेवा करू.आमके सेंटर नवीन खोलले,हे तर जाणतात कोण-कोण सेवा करण्यायोग्य आहे,कोण-कोण आज्ञाधारक, प्रामाणिक,हुकुम मानणारे आहे. अज्ञान काळात पण कपूत मुलांवर पिता नाराज होतो.हा तर बेहदचा पिता म्हणतो मी खूप साधारण पध्दतीने समजावतो, यामध्ये घाबरण्याचे काही कारण नाही.हे तर जो करेल त्याला मिळेल.श्राप किंवा नाराज होण्याची गोष्ट नाही.बाबा समजावतात का नाही चांगली सेवा करुन स्वतःचे आणि इतरांचे ही कल्याण करत.जेवढे जे अनेकांच कल्याण करतात तेवढे बाबा पण खुश होतात.बागेत बाबा पाहतात हे फूल किती सुंदर आहे.ही सर्व बाग आहे.बागेला पाहण्यासाठी म्हणतात-बाबा आम्ही सेंटरला चक्र लावून येवू.कशी-कशी फूले आहेत!कशी सेवा करत आहेत!गेल्यावर माहित पडते.कसे खुशीत नाचत राहतात.बाबांना पण येऊन सांगायचे बाबा आमक्याला आम्ही असे समजावले.आज स्वतःच्या पतिला,भावाला घेऊन आले आहे.समजावले आहे बाबा आले आहेत,ते कसे हिऱ्या सारखे जीवन बनवतात.ऐकल्यानंतर त्यांनाही वाटते आम्ही पण पहावे. मुलांमध्ये उमंग येतो,घेऊन येतात.विश्वाचा इतिहास-भूगोल जाणला पाहिजे.तुम्ही जाणू शकता भारत सर्व विश्वाचा मालक होता.आता तर काय हालत आहे. सतयुग-त्रेता मध्ये किती सुख होते.आता परत बाबा विश्वाचे मालक बनवत आहेत.हे पण जाणता दुनियेमध्ये शेवटी खुप हंगामा होणार आहे.युद्ध बंद थोडच होणार आहे.कुठे ना कुठे लढाई लागत राहते.जिथे पहावे तिथे भांडणच आहे.किती कोंडमारा झाला आहे.विदेशात काय-काय होत आहे.समजत नाही आम्ही काय करतोय.किती वादळ येत राहतात.मनुष्य ही मरतात.किती दु:खाची दुनिया आहे.तुम्ही मुले जाणता-या दु:खाच्या दुनियेतून बस आता गेलो की गेलो.बाबा धैर्य देत आहेत.ही छी-छी दुनिया आहे. थोडया दिवसात आम्ही जगावर शांततेने राज्य करू.यात तर खुशी व्हायला हवी ना.सेंटर्स खोलत राहतात.आता बघा सेंटर खोलतात,बाबा लिहितात आता चांगल्या-चांगल्या मुलांनो जा.जे हृदयामध्ये असतात त्यांचे नावही लिहून देतो.अनेकांच कल्याण होते.असे खूप लिहितात-बाबा मी तर बंधनात आहे.चांगले सेंटर खोलले तर खूप येऊन वारसा घेतील.हे पण जाणता की हे सर्व विनाश होणार आहे तर का नाही अनेकांच्या कल्याणार्थ कामी लावू.नाटकामध्ये त्यांची अशी भूमिका आहे.प्रत्येक जण स्वतःची भूमिका बजावत आहे.दया येते. दुसऱ्यांना पण बंधनमुक्त करायला काही तरी मदद करू.त्यांनाही वारसा मिळावा.बाबांना किती चिंता असते.सगळे काम चितेवर जळून मेले आहेत.सर्व स्मशान झाले आहे.म्हणतातही -अल्लाह येऊन स्मशाना मधून उठवून सर्वांना घेऊन जातो.

तुम्ही आता जाणता रावणाने कसे हरवले आहे.आधी थोडच समजत होते.आपण सराफ लक्षपति आहे,एवढी मुले आहेत, नशा तर राहतोच ना.आता समजता आम्ही पूर्ण पतित होतो. भले जुन्या दुनियेत कितीतरी लक्षपति,करोडपती आहेत परंतु हे सर्व कौडीतुल्य आहे.आता गेले की गेले.माया पण किती बलवान आहे.बाबा म्हणतात मुलांनो सेंटर खोला,अनेकांच कल्याण होईल. गरीब लवकर जागे होतात, श्रीमंतांचे जागणे जरा कठीण आहे.आपल्या खुशीमध्येच मस्त राहतात.मायाने एकदम आपल्या अधीन केले आहे.समजावले की समजते पण परंतु सोडायचे कसे?भिती वाटते की यांच्यासारखे सर्व सोडावे लागेल. भाग्यात नसेल तर चालू शकत नाहीत.जसे की सोडणच कठीण आहे.त्यावेळी वैराग्य येते-बरोबर छी-छी दुनिया आहे.मग तिथले तिथेच राहिले.कोट्या मध्ये कोणी निघतो.मुंबई मध्ये शेकडो येतात, कोणा-कोणाला रंग लागतो. समजतात भविष्याकरिता काही बनवू.कौडी बदल्यात आम्हाला हिरा मिळेल.बाबा समजावतात ना-बैग बैगेज सर्व स्वर्गामध्ये ट्रांसफर करा.तिथे २१ जन्मांकरिता तुम्हाला राज्य- भाग्य मिळेल.कोणी-कोणी एक रुपया ८ आणा पण पाठवतात. बाबा म्हणतात एक रुपया पण तुमचा शिवबाबांच्या खजिन्यात जमा झाला.तुम्हाला २१ जन्मांकरिता महल मिळतील. सुदामाचे उदाहरण आहे ना.अशा-अशांना पाहून बाबानां खूप खुशी होते.विनामूल्य तुम्हा मुलांना विश्वाची बादशाही मिळते. युद्ध वगैरे काहीच नाही.ते तर थोड्या तुकड्यासाठी ही किती भांडतात.तुम्हाला फक्त म्हणतात मनमनाभव.बस इथे बसायची गरज नाहीये,चालता-फिरता बाबांची आणि वारसाची आठवण करा.खुशीत रहा.खाणे-पिणे ही शुद्ध ठेवायचे आहे.तुम्ही जाणता आपली आत्मा कुठपर्यंत पवित्र बनली आहे,जी पुन्हा जाऊन राजकुमाराचा जन्म घेईल.पुढे जाऊन दुनियेची हालत खूप खराब होणार आहे.खाण्यासाठी अन्न मिळणार नाही तर गवत खाऊ लागतील.मग अस थोडच बोलतील लोण्याविना आम्ही राहू नाही शकत.काहीच मिळणार नाही.आता पण किती ठिकाणी मनुष्य गवत खाऊन जगत आहेत.तुम्ही तर खूप मजेत बाबांच्या घरात बसला आहात. घरात पहिले बाबा मुलांना खाऊ घालतात ना.जमाना खूप खराब आहे.इथे तुम्ही खूप सुखामध्ये बसला आहात.फक्त बाबांची आणि वारसाची आठवण करत रहा स्वतःचे आणि दुसऱ्यांचे ही कल्याण करायच आहे.पुढे चालून स्वतःच येतील,भाग्य उजळेल. उजळणार तर आहे ना.बेहदची राजधानी स्थापन होणार आहे. प्रत्येकजण कल्पा पूर्वीप्रमाणे पुरुषार्थ करत आहे.मुलांनी तर खूप खुशीत राहायला पाहिजे. बापदादांचे चित्र पाहून खुशीमध्ये शहारे यायला पाहिजेत.तो खुशीचा पारा स्थिर रहायला हवा. अच्छा.

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१ ) सदैव अपार खुशीमध्ये राहण्यासाठी बेहदचे ज्ञान बुद्धी मध्ये ठेवायचे आहे.ज्ञान रत्नांनी आपली झोळी भरुन स्वतःचे आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे.ज्ञानामधे खूप-खूप हुशार बनायचे आहे.

२) भविष्य २१ जन्मांच्या राज्य भाग्याचा अधिकार घेण्यासाठी आपले बैगबैगेज सर्व ट्रांसफर करायचे आहे.या छी-छी दुनियेपासून सुटण्याची युक्ती रचायची आहे.

वरदान:-
प्रत्येक कर्म रुपी बीजाला फलदायी बनवणारे योग्य शिक्षक भव

योग्य शिक्षक त्याला म्हटले जाते- जो स्वतः शिकवणी स्वरूप हवा कारण शिकवण देण्याचे सगळ्यात सहज साधन आहे स्वरुपाद्वारे शिकवण देणे.ते आपल्या प्रत्येक पावला द्वारे शिकवण देतात,त्यांचे प्रत्येक बोल वाक्य नाही परंतु महावाक्य म्हटले जातात.त्यांचे प्रत्येक कर्म रुपी बीज फलदायी असते, निष्फळ नाही.अशा योग्य शिक्षकाचा संकल्प आत्म्यांना नवीन सृष्टीचा अधिकारी बनवतो.

बोधवाक्य:-
मनमनाभव च्या स्थिती मध्ये रहा तर अलौकिक सुख व मनरस स्थितीचा अनुभव कराल.