07-03-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   14.11.87  ओम शान्ति   मधुबन


पुज्य देव आत्मा बनण्याचे साधन-पवित्रतेची शक्ती


आज आत्मिक शमा आपल्या आत्मिक परवान्याला पाहत आहेत.प्रत्येक परवाना आपल्या उमंग उसाच्या पंखा द्वारे उडत-उडत या आत्मिक संघटनामध्ये पोहोचला आहे.हे आत्मिक संघटन विचित्र अलौकिक संघटन आहे, ज्याला आत्मिक पिता आणि मुलंच जाणतात.या आत्मिक आकर्षणाच्या पुढे मायाचे अनेक प्रकारचे आकर्षण,तुच्छ वाटतात,असार अनुभव होतात.हे आत्मिक आकर्षण नेहमीसाठी वर्तमान आणि भविष्य अनेक जन्मासाठी आनंदीत बनवणारे आहे.अनेक प्रकारच्या दुःख अशांतीच्या लाटापासून किनारा करणारे आहे, म्हणून सर्व आत्मिक परवाने या संघटनांमध्ये पोहोचले आहेत.बापदादा सर्व परवान्याला पाहून,आनंदीत होत आहेत.सर्वांच्या मस्तकावरती पवित्र स्नेह,पवित्र स्नेहाचे संबंध,पवित्र जीवनाची पवित्र दृष्टी वृत्तीची लक्षणं चमकत आहेत.सर्वांच्या वरती सर्व पवित्रतेच्या लक्षणाचे सूचक,प्रकाशाचा मुकुट चमकत आहे.संगमयुगी ब्राह्मण जीवनाची विशेषता,पवित्रतेची लक्षणं, हा प्रकाशाचा मुकुट, जो प्रत्येक ब्राह्मण आत्म्यांना बाबा द्वारे प्राप्त होतो.महान आत्मा,परमात्म भाग्यवान आत्मा,उच्च ते उच्च आत्म्याचे हे मुकुट लक्षण आहे. तर तुम्ही सर्व, असे मुकुटधारी बनले आहात?बापदादा किंवा मात पिता प्रत्येक मुलांच्या जन्मापासून पवित्र भवचे वरदान देतात.पवित्रता नाही तर ब्राह्मण जीवन नाही.आदी स्थापना पासून आत्तापर्यंत पवित्रते वरतीच विघ्न आले आहेत कारण पवित्रतेचा पाया,२१ जन्माचा पाया आहे. पवित्रतेची प्राप्ती तुम्हा ब्राह्मण आत्म्यांना उडत्या कलाकडे सहज घेउन जाण्याचा आधार आहे.जशी कर्माची गती रहस्य युक्त आहे,तर पवित्रतेची परिभाषा पण अती रहस्य युक्त आहे. पवित्रता मायेच्या अनेक विघ्न पासून सुरक्षित राहण्याचा आधार आहे. पवित्रतेला च सुखशांती ची माता म्हटले जाते.कोणत्याही प्रकारची अपवित्रता दुःख किंवा शांतीचा अनुभव होते?तर सर्व दिवस भरामध्ये तपासून पहा, कोणत्या वेळेत दु:ख किंवा अशांतीची लाट अनुभव होते,तर त्याचे बीज अपवित्रता आहे.परत ते मुख्य विकाराच्या कारणामुळे असेल किंवा विकाराच्या सूक्ष्म रुपाच्या कारणामुळे असेल.पवित्र जीवन म्हणजे दुखा अशांती चे नाव रूप नाही.कोणत्याही कारणामुळे दुःखाचा जरा पण अनुभव होत आहे,तर संपूर्ण पवित्रतेची कमी आहे.पवित्र जीवन म्हणजे बापदादा द्वारा प्राप्त झालेले वरदानी जीवन आहे.ब्राह्मणांच्या संकल्पा मध्ये किंवा मुखामध्ये,हे शब्द कधीच यायला नकोत की,या कारणामुळे किंवा या व्यक्तीच्या व्यवहारामुळे मला दुःख होते.कधी साधारण रिती मध्ये असे बोल पण बोलतात किंवा अनुभव करतात.हे पवित्र ब्राह्मण जीवनाचे बोल नाहीत.ब्राह्मण जीवन म्हणजेच प्रत्येक सेकंद सुखमय जीवन.मग ते दुःखाचे दृश्य असेल,तरीही जेथे पवित्रतेची शक्ती आहे,ते कधी दु:खाच्या दृश्या मध्ये दुःखाचा अनुभव करणार नाहीत परंतु दुखहर्ता सुखकर्ता बाप समान दुःखाच्या वातावरणामध्ये, दुःखमय व्यक्तींना,सुखशांतीचे वरदानी बनून सुखशांतीची ओंजळ देतील.मास्टर सुखकर्ता बनून दुःखाला आत्मिक सुखाच्या वातावरणामध्ये परिवर्तन करतील,यालाच म्हटले जाते दुखहर्ता सुखकर्ता.

जेव्हा विज्ञानाची शक्ती अल्पकाळासाठी कोणतेही दुःख-दर्द समाप्त करते,तर पवित्रतेची शक्ती अर्थात शांतीचे शक्ती दुःख-दर्द समाप्त करू शकत नाही काय?विज्ञानाच्या औषधामध्ये अल्पकाळाची शक्ती आहे, तर पवित्रतेच्या शक्ती मध्ये,पवित्रतेच्या आशीर्वादा मध्ये किती मोठी शक्ती आहे? वेळेप्रमाण जेव्हा आजच्या व्यक्ती या औषधामुळे कारणे अकारणे तंग होतात,आजार अतीमध्ये जातील, तर वेळेवर तुम्ही पवित्र देव किंवा देवींच्या जवळ आशीर्वाद घेण्यासाठी येतील की,आम्हाला दु:ख अशांती पासून नेहमीसाठी दूर करा.पवित्रतेची दृष्टी वृत्ती साधारण शक्ती नाही.ही थोड्या वेळेसाठीची शक्तिशाली दृष्टी किंवा वृत्ती सदा काळाची प्राप्ती करवणारी आहे. जसे आता शारीरिक डॉक्टर आणि शारीरिक दवाखाने वेळेप्रमाणे वाढत जातात,तरीही डॉक्टर्सना वेळ नाही,दवाखान्यात जागा नाही.रोग्यांची नेहमीच रांग लागलेली असते,असेच पुढे चालून दवाखान्यात किंवा डॉक्टराकडे जाण्यासाठी, औषध-पाणी करण्यासाठी,इच्छा असून जाऊ शकणार नाहीत.अनेक जण निराश होतील तर काय कराल?बहुतांश निराश होतील तर काय करतील?जेव्हा औषधामुळे निराश होतील तर कुठे जातील?तुम्हा लोकांच्या जवळ रांग लागेल.जसे आत्ता तुमच्या किंवा पित्याच्या जड चित्राच्या समोर 'ओ दयाळू दया करा' म्हणून आशीर्वाद मागत राहतात.तसेच तुम्हा चैतन्य पवित्र पुज्य आत्म्याच्या जवळ " हे पवित्र देवी किंवा पवित्र देव"आमच्या वरती दया करा,असे आशीर्वाद मागण्यासाठी येतील.आज अल्पकाळ सिद्धी असणाऱ्याकडे शफा घेण्यासाठी किंवा सुख-शांतीची दया घेण्यासाठी खूप भटकत राहतात.असे समजतात दूरवरून तरी दृष्टी पडेल.तर तुम्ही परमात्मा विधि द्वारा सिद्धी स्वरूप बनले आहात.जेव्हा अल्पकाळचे आधार समाप्त होतील,तर कुठे जातील?

हे जे पण अल्पकाळचे सिद्धी असणारे आहेत,अल्पकाळची काही ना काही पवित्रतेच्या विधीद्वारे अल्पकाळची सिद्धि प्राप्त करतात, हे नेहमीसाठी चालू शकत नाही.हे पण सुवर्णयुगी आत्म्यांना,म्हणजेच परमधाम वरून आत्ताच आलेल्या आत्म्यांना,पवित्र मुक्तिधाम मधून आल्यामुळे आणि वैश्विक नाटकाच्या नियम प्रमाण सतो प्रधान अवस्था असल्यामुळे पवित्रतेच्या फलस्वरूप अल्पकाळची सिद्धी प्राप्त होते.परंतु थोड्यावेळातच सतो रजो तमो तिन्ही अवस्था पास करणारे आत्मे आहेत म्हणून नेहमीसाठी सिद्धी राहू शकत नाही.परमात्म विधीद्वारे सिद्धी नाही,म्हणून कुठे न कुठे स्वार्थ किंवा अभिमान सिद्दीला समाप्त करतो.परंतू तुम्ही पवित्र आत्मे नेहमी सिद्धी स्वरूप आहात.नेहमी सदा काळासाठी प्राप्ती करणारे आहात,फक्त चमत्कार दाखवणारे नाहीत परंतु चमकणारे ज्योती स्वरूप बनणारे आहात. अविनाशी भाग्याचा चमकणारा सितारा बनवणारे आहात,म्हणून हे सर्व आधार आता थोड्यावेळासाठी आहेत आणि शेवटी तुम्हा पवित्र आत्म्याचे जवळ प्राप्ती करण्यासाठी येतील.तर इतकी सुखशांतीची माता पवित्र आत्मा बनले आहात?इतका आशीर्वादाचा भांडार जमा आहे की,आपल्यासाठी पण आज पर्यंत आशीर्वाद मागत राहतात?

काही मुलं आत्ता पण वेळेप्रमाण, बाबा पासून मागत राहतात की,या गोष्टी मध्ये थोडा आशीर्वाद करा,तर मग मागणारे दाता कसे बनतील? म्हणून पवित्रतेच्या शक्तीच्या महानतेला जाणून पवित्र म्हणजेच पूज्य देवआत्मा आत्ता पासूनच बना.असे नाही की,अंत काळात बनू.ही अनेक वर्षाची जमा झालेली शक्ती अंत काळात कामांमध्ये येईल.तर समजले पवित्रतेची परिभाषा काय आहे? नेहमी सुख शांतीचा आधार,ही पवित्रतेची परिभाषा आहे. साधारण गोष्ट नाही.ब्रह्मचारी राहतात, पवित्र बनले परंतु पवित्रतेचा आधार मग तो संकल्पा द्वारे किंवा वृत्ती द्वारे वातावरणा द्वारे,वाणी द्वारे,संपर्का द्वारे सुख शांतीची माता बनणे यालाच पवित्र आत्मा म्हटले जाते.पवित्र आत्मा किती पवित्र बनले आहेत,हे स्वतःच स्वतः ची तपासणी करा.अच्छा. आज अनेक जण आले आहेत,जसे पाण्याचा बंधारा फुटतो,तर हे कायद्याचा पण बांध तोडून आले आहेत.तरीही कायद्यामध्ये फायदा तर आहेच.जे कायद्याप्रमाणे आले,त्यांना जास्त मिळते आणि जे लाटे नुसार वाहून येतात,तर वेळेप्रमाण त्यांना तेवढेच मिळू शकते.तरीही पहा,बंधन मुक्त बापदादा पण बंधना मध्ये येतात. स्नेहाचे बंधन आहे,स्नेहाच्या सोबतच वेळेचे पण बंधन आहे,शरीराचे पण बंधन आहे ना.परंतु प्रेमाचे बंधन आहे म्हणून बंधनामध्ये असून पण स्वतंत्र आहेत.बापदादा तर म्हणतील खुशाल या,आपल्या घरी पोहोचले आहात, अच्छा. चोहोबाजूच्या सर्व परम पवित्र आत्म्यांना,नेहमी सुख शांतीची माता पावन आत्म्यांना,नेहमी पवित्रतेच्या शक्तीद्वारे अनेक आत्म्यांना,दु:ख-दर्द पासून दूर करणाऱ्या देव आत्म्यांना, परमात्म विधि द्वारा सिद्धी स्वरूप आत्म्यांना, बापदादाची स्नेहसंपन्न प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वसतिगृहातील कुमारी सोबत वार्तालाप:-( इंदर ग्रुप)
सर्व पवित्र महान आत्मे आहात ना? आज कालच्या महात्मा पेक्षापण अनेक पटीने श्रेष्ठ आहात.पवित्र कुमारींचे नेहमी पूजन होते.तर तुम्ही सर्व पावन, पूज्य,शुद्ध आत्मे आहात ना?कोणती अशुध्दी तर नाही ना?नेहमी आपसामध्ये एकमत,स्नेही,सहयोगी राहणारे आत्मे आहात ना.संस्कार मिळवणे येते ना, कारण संस्कार मिळवणेच महानता आहे.संस्काराची टक्कर व्हायला नको म्हणून नेहमी संस्कर मिळवण्याची रास करत राहा. खूप चांगले भाग्य मिळाले आहे, लहानपणापासूनच महान बनले.नेहमी खुशी मध्ये राहता ना? कधी कोणी मनात रडत तर नाहीत ना? निर्मोही आहात? कधी लौकिक परिवाराची आठवण येते? दोन्ही अभ्यासामध्ये हुशार आहात ना? दोन्ही अभ्यासामध्ये नेहमी क्रमांक एक राहायचे आहे. जसे बाबा क्रमांक एक आहेत,असे मुलं पण क्रमांक एकच आहेत. सर्वांत क्रमांक एकचे मुलंच बाबांचे प्रिय आहेत समजले,अच्छा.

पार्टीसोबत अव्यक्त बापदादांचा वार्तालाप:- नेहमी स्वतःला श्रेष्ठ भाग्यवान समजता? घरबसल्या भाग्यविधाता द्वारा श्रेष्ठ भाग्य मिळाले आहे.घरबसल्या भाग्य मिळणे ही खूप खुशीची गोष्ट आहे.अविनाशी बाबा अविनाशी प्राप्ती करवतात.तर अविनाशी म्हणजे नेहमी,कधीकधी नाही.तर स्वतःच्या भाग्याला पाहून नेहमी खुश राहतात.प्रत्येक वेळेस भाग्य आणि भाग्यविधाताला पाहून,दोन्ही स्वतः आठवणीत राहवे.नेहमी 'वाह श्रेष्ठ भाग्य'हेच गीत गात राहा.हेच मनाचे गीत आहे.जितके हे गीत गायन करतात,तेवढेच नेहमी उडती कलेचा अनुभव करत राहाल. सर्वकल्पामध्ये असे भाग्य प्राप्त करण्याची एकच वेळ आहे म्हणून सुविचार पण आहे की,आता नाही तर कधीच नाही.जे पण श्रेष्ठ कार्य करायचे आहे,ते आत्ताच करायचे आहे.प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक वेळेस हे आठवणीत ठेवा की,आता नाही तर कधीच नाही. ज्यांना हे स्मृतीमध्ये राहते ते कधीच वेळ,संकल्प किंवा कर्म व्यर्थ होऊ देणार नाहीत,नेहमी जमा करत राहतील.विकर्माची तर गोष्टच नाही परंतु व्यर्थ कर्म पण धोका देतात,तर प्रत्येक सेकंद,प्रत्येक संकल्पाचे महत्त्व जाणतात ना.जमाचे खाते नेहमी भरपूर राहावे.प्रत्येक सेकंद किंवा प्रत्येक संकल्प श्रेष्ठ,जमा करत राहा,जर व्यर्थ गमावत नाही,तर २१ जन्मासाठी आपले खाते श्रेष्ठ बनवाल.जितके जमा करायला पाहिजे,तेवढे करत आहात?

या गोष्टी वरती जास्त लक्ष द्या, अधोरेखित करा,एक सेकंद पण संकल्पना व्यर्थ जायला नको.व्यर्थ समाप्त होईल,तर नेहमी समर्थ बनाल, अच्छा.आंध्र प्रदेशामध्ये गरिबी खूप आहे ना आणि तुम्ही तर इतके सावकार आहात.चहूबाजूला गरिबी वाढत जाईल आणि तुमच्या इथे सावकारी वाढत जाईल कारण ज्ञानाचे धन आल्यामुळे,हे स्थूल धन पण स्वतःच दाळ रोटी,मिळण्या इतके येत राहील.कोणी ब्राह्मण उपाशी राहातात का? तर स्थुल धनाची गरिबी पण समाप्त होते, कारण समजदार बनत आहात. काम करून स्वतःला खाऊ घालण्यासाठी किंवा परिवाराला खाऊ घालण्यासाठी पण समजदारी येते म्हणून दुहेरी सावकारी येते.शरीराला पण चांगले आणि मनाला पण चांगले, दाल रोटी आरामात मिळत आहे ना. ब्रह्माकुमार कुमारी बनल्यामुळे श्रेष्ठ पण बनले आहात आणि सावकार पण बनले आहात आणि अनेक जन्म मालामाल राहाल.जसे अगोदर चालत होते,राहत होते,कपडे घालत होते, त्यापेक्षा पण आता खूप श्रेष्ठ बनले आहात आणि नेहमी स्वच्छ राहतात. अगोदर कपडे पण खराब घालत होते, आत्ता आत बाहेर दोन्ही स्वच्छ बनले आहात.तर ब्रह्मकुमार बनल्या मुळे फायदा झाला ना.सर्व परिवर्तन होत राहते.अगोदरचा चेहरा पहा, हुशारी पाहा आणि आत्ताचा पण पाहा तर फरक दिसून येतो ना.आता आत्मिकते ची चमक आली म्हणून चेहराच बदलून गेला.तर नेहमी असे खुशी मध्ये नाचत राहा.अच्छा.

दुहेरी परदेशी भाऊ बहिणी सोबत वार्तालाप:-
दुहेरी परदेशी आहात? तसे तर सर्व ब्राह्मण आत्मे याच भारत देशाचे आहेत.अनेक जन्म भारत वर्षात राहिले आहेत,हे तर सेवेसाठी अनेक स्थानावर पोहोचले आहात,म्हणून हे लक्षणं आहेत की,जेव्हा भारतामध्ये येतात म्हणजेच मधुबन धरणीवरती,या ब्राह्मण परिवारामध्ये येतात,तर आपलेपणाचा अनुभव करतात.तसे परदेशातील परदेशी आत्मे,किती पण संपर्का मधील असतील,सबंधा मध्ये असतील परंतु येथे आत्म्याला आपलेपणा जाणवतो, तसे वाटणार नाही.जितके जवळचे आत्मे असतील,तेवढे आपलेपणाची जाणीव होते.विचार करावा लागत नाही की,मी या परिवाराचा होऊ शकतो की नाही.प्रत्येक गोष्ट पण खूप प्रिय वाटते. जशी कोणती आपली गोष्ट असते ना. आपली गोष्ट नेहमी प्रिय वाटते.तर हे लक्षणं आहेत.बापदादा पाहत आहेत, किती दूर राहून पण मनाच्या जवळ राहणारे आहेत.सर्व परिवार आपल्याला श्रेष्ठ भाग्यवानच्या दृष्टीने पाहतात. अच्छा.

वरदान:-
युद्धामध्ये घाबरण्याचे ऐवजी किंवा पाठीमागे जाण्याच्या ऐवजी, बाबांच्या सोबती द्वारे नेहमी विजयी भव.

सेने मधील युध्द करणारे,जे असतात त्यांना सुविचार मिळालेला असतो की, हरणे किंवा पाठीमागे जाणे,हे तर कमजोरांचे काम आहे.योद्धा म्हणजे मारणे किंवा मरणे.तुम्हीपण आत्मिक योद्धे घाबरणारे किंवा पाठीमागे जाणारे नाहीत,नेहमी पुढे जाणारे विजयी बनणारे आहात.असा कधी विचार करू नका की, युद्ध किती कालावधी पर्यंत करत राहायचे,ही तर सर्व जीवनाची गोष्ट आहे परंतु पाच हजार वर्षाच्या भाग्याच्या हिशेबाप्रमाणे,ही तर सेकंदाची गोष्ट आहे.फक्त विशाल बुद्धी बनून,बेहद्दच्या हिशेबाने पाहा आणि बाबांची आठवण केव्हा सोबतीच्या अनुभती द्वारे विजय बना.

सुविचार:-
नेहमी आशा आणि विश्वासाच्या आधारावरती विजयी बना. ओम शांती.