05.03.2021 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन
"गोड मुलांनो,जसे बापदादा दोघे निरहंकारी आहेत,देही अभिमानी आहेत,असे पित्याचे अनुकरण करा, तर नेहमी प्रगती होत राहील" प्रश्न:- उच्च पदाच्या प्राप्ती साठी कोणती खबरदारी ठेवणे आवश्यक आहे? उत्तर:- उच्च पद मिळवायचे असेल तर खबरदारी ठेवा की, मन्सामध्ये पण कोणाला,माझ्या द्वारे दुःख व्हायला नको.(२) कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रोध यायला नको.(३) बाबा चे बनून बाबाच्या कार्यामध्ये,या रुद्र यज्ञांमध्ये विघ्न रूप बनायला नको.(४ ) जर कोणी मुखाद्वारे बाबा बाबा म्हणत असतील आणि चलन चांगली नसेल,तर उच्च पद मिळू शकणार नाही. ओम शांती. मुलं चांगल्या प्रकारे जाणतात की,बाबा कडून वारसा घ्यायचा आहे जरूर.कशाप्रकारे? श्रीमतावरती.बाबांनी समजवले आहे,एकच गीता शास्त्र आहे, ज्यामध्ये श्रीमद भगवानुवाच आहे. भगवान तर सर्वांचे पिता आहेत. श्रीमद् भगवानुवाच तर, जरूर भगवंताने येऊन श्रेष्ठ बनवले असेल,तेव्हा तर त्यांची महिमा आहे.श्रीमद्भगवद्गीता म्हणजेच श्रीमत भगवानुवाच.भगवान तर जरूर उच्च उच्च आहेत ना.श्रीमत पण त्या एका ग्रंथांमध्येच गायन केलेली आहे आणि दुसऱ्या कोणत्या शास्त्रामध्ये श्रीमत भगवानुवाच नाही.श्रीमत कोणाची पाहिजे, ते लिहिणारे पण समजू शकत नाहीत. त्यामध्ये चूक का झाली? ते पण बाबा येऊन समजवतात.रावण राज्य सुरू झाल्यानंतर,रावणाच्या मतावर चालतात.प्रथमत: मोठी चूक तर रावण मत असणाऱ्यांनी केली आहे.रावणाची चापट लागते.असे म्हटले जाते, शंकर बॉम्स इत्यादी बनवण्यासाठी प्रेरणा देतात.तसेच पाच विकास रुपी रावण मनुष्याला पतित बनवण्यासाठी प्रेरक आहे, तेव्हातर बोलवतात, हे पतित पावन या, तर पतित पावन एकच झाले ना. याद्वारे सिद्ध होते की,पतित बनवणारे वेगळे आहेत,पावन बनवणारे दुसरे आहेत.दोन्ही एक होऊ शकत नाहीत.या गोष्टी तुम्हीच क्रमानुसार पुरुषार्थ नुसार समजतात.असे समजू नका की सर्वांना निश्चय आहे,क्रमानुसार तर असतातच.जितका निश्चय तेवढी खुशी वाढत राहते.बाबांच्या श्रीमतावर चालायचे असते. श्रीमता वरती आम्हाला स्वराज्य मिळवायचे आहे.मनुष्यापासून देवता बनण्यामध्ये उशीर लागत नाही. तुम्ही पुरुषार्थ करत राहतात,मम्मा बाबांचे अनुकरण करतात.जसे ते आपल्यासारखे बनवण्याची सेवा करतात,तुम्ही पण समजतात, आम्ही काय सेवा करत आहोत आणि मामा बाबा कशा प्रकारे सेवा करत आहेत.बाबानी समजवले होते की,शिवबाबा आणि ब्रह्मा दादा दोन्ही एकत्र आहेत.तर समजायला पाहिजे की सर्वात जवळ आहेत. यांचे संपूर्ण रुप सूक्ष्मवतन मध्ये पाहिजे,तर जरूर हे हुशार असतील.परंतु जसे शिवबाबा निरहंकारी आहेत,देही अभिमानी आहेत,तसेच दादा पण निरहंकारी आहेत.दादा म्हणतात शिवबाबाच समजावत राहतात.जेव्हा मुरली चालते तर बाबा स्वतः म्हणतात की,समजा शिवबाबाच यांच्याद्वारे ऐकवत आहेत.हे ब्रह्मा पण जरूर ऐकत असतील.हे ऐकणार नाहीत आणि ऐकवणार नाहीत, तर उच्चपद कसे मिळेल.परंतु आपला देह अभिमान सोडून म्हणतात,असे समजा की शिवबाबा ऐकवत राहतात.आम्ही पुरुषार्थ करत राहतो.शिवबाबाच समजतात.यांनी तर पतित पणा पास केलेला आहे.मम्मा तर कुमारी होती.तर मम्मानी उच्च स्थिती प्राप्त केली ना. तुम्ही पण कुमारी मम्माचे अनुकरण करा.गृहस्थींनी बाबांचे अनुकरण करायला पाहिजे.प्रत्येकानी समजायचे आहे की,मी पतित आहे, मला पावन बनायचे आहे.मुख्य गोष्ट बाबांनी आठवणीची यात्रा शिकवली आहे.यामध्ये देहाभिमान राहायला नको.अच्छा कोणी मुरली ऐकवू शकत नाहीत,तर आठवणीच्या यात्रेमध्ये रहा.यात्रेवर राहून मुरली चालू शकता परंतु यात्रा विसरते, तरीही हरकत नाही.मुरली ऐकवून परत आठवणीच्या यात्रेमध्ये तत्पर राहायला पाहिजे.कारण ती वाणी पेक्षा परे वानप्रस्थ अवस्था आहे. मुख्य गोष्ट आहे देहीअभिमानी बनून बाबांची आठवण करत राहणे, चक्राची आठवण करत राहणे. कोणालाही दुःख द्यायचे नाही,हेच समजावत राहायचे की, बाबांची आठवण करत राहा.ही यात्रा आहे. मनुष्य जेव्हा मरतात,तर म्हणतात स्वर्गवासी झाले.अज्ञान काळामध्ये कोणीही स्वर्गाचे आठवण करत नाहीत.स्वर्गाची आठवण करणे, म्हणजे येथून मरणे.असे तर कोणी आठवण करत नाहीत.आता तुम्ही मुलं जाणतात,आम्हाला परत जायचे आहे.जितकी तुम्ही माझी आठवण कराल,तेवढा खुशीचा पार चढेल,वारसा आठवणीत राहील. जितकी बाबांची आठवण कराल तेवढे आनंदी राहाल.बाबा ची आठवण न केल्यामुळे संभ्रमित बनतात,संशय घेत राहतात,तुम्ही इतका वेळ आठवण करु शकत नाही.बाबांनी साजन सजनी चे उदाहरण सांगितले आहे.तो जरी कामधंदा करत असेल आणि ती चरखा इत्यादी चालवत राहते, तरीही तिच्यासमोर साजन येऊन उभा राहतो.सजनी साजन ची आठवण करते,परत साजन सजनीची आठवण करत राहतो. येथे तर तुम्हाला फक्त एक बाबांची आठवण करायची आहे. बाबांना तुमची आठवण करायची नाही. बाबा तर सर्वांचे साजन आहेत. तुम्ही मुलं लिहतात,बाबा तुम्ही आमची आठवण करता का?अरे जे सर्वांचे साजन आहेत,ते परत तुम्हा सजनीची आठवण कसे करतील? असे होऊ शकत नाही,ते तर साजन आहेत,सजनी बनू शकत नाहीत. तुम्हालाच आठवण करायची आहे. तुम्हा प्रत्येकाला सजनी बनायचे आहे,त्या साजन ची. जर ते सजनी बनले तर किती लोकांची आठवण करावी लागेल,असे होऊ शकत नाही.बाबा म्हणतात माझ्या वरती पापाचे ओझे थोडेच आहे,जे कुणाची आठवण करू. तुमच्यावरती ओझे आहे.बाबाची आठवण करणार नाही,तर पापाचे ओझे कसे उतरेल.बाकी मला कोणाची आठवण का करावी लागेल?आठवण तर तुम्हा आत्म्यांना करायची आहे.जेवढी आठवण कराल तेवढे पुण्य आत्मा बनाल.पाप नष्ट होतील,खूप मोठे लक्ष आहे.देही अभीमानी बनण्यामध्ये मध्येच कष्ट आहेत.हे ज्ञान सर्व तुम्हाला मिळत आहे. तुम्ही त्रिकालदर्शी क्रमवार पुरुषार्थ नुसार बनत आहात.सर्व चक्र तुमच्या बुद्धीमध्ये राहायला पाहिजे. बाबा समजवतात,तुम्ही प्रकाशस्तंभ आहात ना,प्रत्येकाल शांतीधाम आणि सुखधामचा रस्ता दाखवतात. या सर्व नवीन गोष्टी तुम्ही ऐकत आहात.तुम्ही जाणतात बरोबर आम्ही आत्मे शांतीधाम चे रहिवासी आहोत,येथे भूमिका करण्यासाठी आले आहोत.आम्ही कलाकार आहोत.हे चिंतन बुद्धीमध्ये चालत राहिले तर मस्ती चढलेली राहिल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमची भूमिका आहे.आता कर्मातीत अवस्थेमध्ये जरूर जायचे आहे, परत स्वर्णिम युगामध्ये यायचे आहे.याच धुन मध्ये राहत,स्वतःचे कल्याण करायचे आहे,फक्त पंडित बनवायचे नाही.दुसऱ्यांना शिकवत राहाल,आणि स्वतः त्या अवस्थेमध्ये राहणार नाही,तर त्याचा परिणाम होणार नाही. आपला पण पुरुषार्थ करायचा आहे.ब्रह्मा बाबा पण म्हणतात,मी पण आठवण करण्याचे प्रयत्न करत राहतो.कधी मायचे वादळ असे येतात,तर बुद्धीचा योग तोडून टाकतात.अनेक मुलं दिनचर्या पाठवतात,आश्चर्य वाटते की,हे तर माझ्यापेक्षा हुशार आहेत.पुरषार्था मध्ये तीव्रता येते तर दिनचर्या लिहायला सुरु करतात, परंतु जर तीव्र पुरुषार्थ केला,तर क्रमांक एक मध्ये चालले जातील परंतु फक्त दिनचर्या लिहण्यापर्यंत च मजल जाते.असे समाचार येत नाहीत की,बाबा इतक्या आत्म्यांना आपल्यासारखे बनवले.आणि ते पण लिहतील,बाबा आम्हाला यांनी रस्ता दाखवला.असे समाचार येत नाहीत,तर बाबा काय समजतील,फक्त दिनचर्या लिहिल्यामुळे काम चालणार नाही.आपल्यासारखे पण बनवायचे आहे.रूप आणि बसंत दोन्ही बनायचे आहे,नाहीतर बाप समान बनणार नाहीत.रूप आणि बसंत दोन्ही तंतोतंत म्हणजे बिनचूक बनायचे आहे,यामध्येच कष्ट आहेत.देहअभिमान सर्व नष्ट करतो.रावणाने देह अभिमानी बनवले आहे.आता तुम्ही देही अभिमानी बनत आहात,परत अर्ध्या कल्पाच्या नंतर माया रावण देहीअभिमानी बनवतो. देहीअभिमानी तर खूप गोड बनतात.संपूर्ण तर आतापर्यंत कोणी बनले नाहीत म्हणून बाबा नेहमी म्हणतात की,कोणालाही दुःख देऊ नका.सर्वांना बाबा चा परिचय द्या,बोलचाल मध्ये खूप मधुरता आणि नम्रता पाहिजे. ईश्वरीय संतांनच्या मुखाद्वारे नेहमी रत्न निघायला पाहिजेत. तुम्ही मनुष्यांना जीवनदान देत आहात.त्यांना रस्ता दाखवायचा आहे आणि समजून सांगायचे आहे.तुम्ही परमात्मा ची मुलं आहात ना.त्यांच्याकडून तुम्हाला स्वर्गाची राजाई मिळायला पाहिजे.परत आत्ता ती का नाही? आठवण करा,बरोबर बाबा पासून वारसा मिळाला होता ना.तुम्ही भारतवासी देवी-देवता होते, तुम्हीच ८४ जन्म घेतले आहेत. तुम्ही समजा की आम्हीच लक्ष्मीनारायण कुळाचे होतो, स्वतःला कमी का समजता?जर म्हणता,बाबा सर्व थोडेच असे बनतील? तर बाबा समजतात हे आपल्या कुळाचे नाहीत.आत्ताच हलचल मध्ये यायला लागले आहेत.तुम्हीच ८४ जन्म घेतले आहेत.बाबांनी २१ जन्माचे प्रारब्ध जमा केले, ते खाल्ले, परत समाप्त होणे सुरू झाले.गंज चढत-चढत तमोप्रधान कवडी सारखे बनले आहेत.भारतात शंभर टक्के पवित्रता होती.यांना हा वारसा कुठून मिळाला? कलाकारच सांगू शकतील ना. मनुष्यच कलाकार आहेत,त्यांना हे माहीत व्हायला पाहिजे की,या लक्ष्मीनारायणला बादशाही कोठून मिळाल? खूप चांगले चांगले ज्ञानाचे मुद्दे आहेत.जरूर अगोदरच्या जन्मा मध्ये राज भाग्य मिळवले असेल.बाबाच पतितपावन आहेत. बाबाच म्हणतात,मी तुम्हाला कर्म अकर्म, विकर्माची गती समजावतो.रावण राज्यांमध्ये मनुष्याकडून कर्म विकर्म होतात. तेथे तुमचे कर्म अकर्म होतात.ती दैवी सृष्टी आहे.मी रचनाकार आहे,तर जरूर मला संगम युगामध्ये यावे लागेल.हे रावण राज्य आहे.ते ईश्वरी राज्य आहे. ईश्वर आता स्थापना करत आहेत.तुम्ही सर्व ईश्वराची मुल आहात.आम्हाला वारसा मिळत आहे.भारत पवित्र होता आता अपवित्र बनला आहे.हे पूर्वनियोजित नाटक आहे, यामध्ये जरा पण फरक पडू शकत नाही.सर्वांचे झाड आप आपले आहे,हे विविधतेचे जाड आहे ना.देवता धर्माचे च परत देवता धर्मामध्ये येतील.ख्रिश्चन धर्माचे आपल्या धर्मामध्ये आनंदी आहेत आणि दुसर्यांना पण आपल्या धर्मामध्ये आकर्षित करून घेतले आहे.भारत आपल्या धर्माला विसरल्यामुळे, तो धर्म चांगला समजून, चालले जातात,धर्मांतरित होतात. परदेशात मध्ये नोकरीसाठी अनेक जण जातात कारण तेथे कमाई चांगली आहे.हे नाटक खूपच आश्चर्यकारक बनलेले आहे.याला समजण्यासाठी चांगली बुद्धी पाहिजेविचार सागर मंथन केल्यामुळे सर्वकाही समजून येते.हे पूर्वनियोजित अनादि नाटक आहे.तुम्हा मुलांना आपल्या समान नेहमी सुखी बनवायचे आहे.तुमचा पतितांना पावन बनविण्याचा धंदा आहे. जसे बाबा चा धंदा,तसेच तुमचा धंदा आहे.तुमचा चेहरा नेहमी देवता सारखा आनंदित राहिला पाहिजे.तुम्ही जाणता आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. तुम्ही फार गोड मुलं आहात. क्रोध येऊ नये यासाठी खूप खबरदार राहायला पाहिजे.बाबा मुलांना सुखाचा वारसा देण्यासाठी आले आहेत.स्वर्गाचा रस्ता सर्वांना सांगायचं आहे. बाबा सुखकर्ता दुखहर्ता आहेत, तर तुम्हाला पण सुखकर्ता बनवायचे आहे.कोणाला दुःख द्यायचे नाही,दुःख द्याल तर तुम्हची सजा शंभर पटीने वाढेल. कोणीही सजा खाण्यापासून वाचू शकणार नाहीत.तुम्हा मुलांसाठी तर खास न्यायाधीशाची कमिटी बसते.बाबा म्हणतात तुम्ही सेवेमध्ये विघ्न घालाल,तर खूप सजा मिळेल.कल्प-कल्पांतर तुम्ही साक्षात्कार कराल की, मके हे बनतील.अगोदर जेव्हा साक्षात्कारात पाहत होते,तर बाबा मनाई करत होते की, ऐकवू नका.अंत काळात बिनचूक माहिती होईल.पुढे चालून खूप साक्षात्कार होत राहतील.वृद्धी होत जाईल,आबू पर्वता पर्यंत रांग लागेल.बाबांना कोणीही भेटू शकणार नाहीत.असे म्हणतील अहो प्रभु, तेरी लीला अपरंपार. हे पण गायन केलेले आहे ना. विद्वान पंडित इत्यादी पण नंतर येतील,त्यांचे सिंहासन पण डळमळीत होतील.तुम्ही मुलं तर खूप खुशीमध्ये राहाल,अच्छा. गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.अशी प्रेमपूर्वक आठवण एकाच वेळेस मिळते.जितकी तुम्ही आठवण कराल,तेवढे तुम्हाला प्रेम मिळत राहील.विकर्म विनाश होतात आणि धारणा पण होत राहते. मुलांना खुशीचा पारा चढायला पाहिजे.जे पण येतील त्यांना रस्ता दाखवा.बेहद्दचा वारसा बेहद्दच्या बाबाकडून घ्यायचा आहे.ही काय कमी गोष्ट आहे काय? असा पुरुषार्थ करायला पाहिजे,अच्छा. गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि नमस्ते.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश:- - (1)बोलचाल मध्ये खूप मधुरता व नम्रता पाहिजे. मुखाद्वारे नेहमी रत्न काढायचे आहेत.आपल्या सारखे बनवण्याची सेवा करायचे आहे. कोणाच्याही मनाला दुःखी करायचे नाही.
- (२) क्रोध येऊ नये यासाठी खूप खबरदारी घ्यायची आहे.चेहरा नेहमी देवता सारखा आनंदी ठेवायचा आहे.स्वतःला ज्ञानयोगा द्वारे देवता बनवायचे आहे.
वरदान:- नेहमी पश्चाताप पासून दूर प्राप्ति स्वरूपाच्या स्थितीचा अनुभव करणारे,सद्बुद्धीवान भव. जे मुलं बाबांना आपल्या जीवनाची नौका देऊन मीपणा नष्ट करतात,श्रीमतांमध्ये मनमत मिसळत नाहीत,ते नेहमी पश्चात्ताप पासून दूर प्राप्ती स्वरूपाच्या स्थितीचा अनुभव करतात,त्यांनाच सद्बुद्धीवान म्हटले जाते.असे नेहमी सद्बुद्धी असणारे परिस्थितीला बक्षीस समजून,स्वभाव संस्काराला पुढे जाण्याचा आधार समजून,नेहमी बाबांना सोबती बनवून,त्रयस्थ बनून प्रत्येकाची भूमिका पाहत, नेहमी आनंदि बनून राहतात. बोधवाक्य:- जे सुखदाता बाबांचे सुखदायी मुलं आहेत,त्यांच्या जवळ दुःखाची लाट येऊ शकत नाही. ||| ओम शांती |||ओम शांती.
|
|