29-03-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो-तुम्ही रुप बसंत(गुणवान)आहात,तुमच्या मुखातून सदैव ज्ञान रत्नच निघायला पाहिजेत,जेंव्हा पण नवीन कोणी आले तर त्याला पित्याची ओळख करून द्या."

प्रश्न:-
आपली अवस्था एकरस बनवण्याचे साधन कोणते आहे?

उत्तर:-
संगतीची संभाळ करा तर अवस्था एकरस बनत जाईल. नेहमी सेवा लायक विद्यार्थ्यांची संगत केली पाहिजे.जर कोणी ज्ञान आणि योगाच्या व्यतिरिक्त उलट्या गोष्टी करेल,मुखातून रत्नांच्या बदल्यात दगड(अपशब्द)काढत असेल तर त्यांच्या संगती पासून नेहमी सावधान राहायला पाहिजे.

गीत:-

रात्रीच्या प्रवाश्यांनो थकून जाऊ नका.......

ओम शांती।
ज्ञान आणि विज्ञान. याला म्हणतात अल्फ (पिता) आणि बे(बादशाही).बाबा ज्ञान देतात अल्फ आणि बे चे.दिल्ली मध्ये ज्ञान विज्ञान भवन आहे परंतु ते कोणी अर्थ जाणत नाहीत.ज्ञान आणि योग तुम्ही मुले जाणता.योगाने आम्ही पवित्र बनतो,ज्ञानाने आमची चोळी(आत्मा)रंगते.आम्ही साऱ्या चक्राला जाणतो.योगाच्या यात्रेसाठी पण हे ज्ञान मिळते.ते काही योगासाठी ज्ञान देत नाहीत. ते तर स्थूल मध्ये आसन वगैरे शिकवतात.ही आहे सूक्ष्म आणि मूळ गोष्ट.गीते पण त्याच्यांशी संबंधित बनवलेली आहेत.बाबा म्हणतात हे मुलांनो,हे मूलवतनच्या प्रवाश्यांनो,पतित- पावन पिताच सर्वांचा सदगति दाता आहेत.तेच सर्वांना घरी जाण्याचा रस्ता सांगत आहेत. तुमच्याकडे मनुष्य समजण्यासाठी येतात.कोणाकडे येतात?प्रजापिता ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारींकडे येतात तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे-तुम्ही कोणाकडे आले आहात?मनुष्य साधू संत महात्म्यांकडे जातात. त्यांचे नाव पण असते-अमुक महात्मा जी.इथे तर नावच आहे प्रजापिता ब्रह्माकुमार कुमारी.बी. के.तर खूप आहेत.तुम्हाला विचारायचे आहे-कोणाकडे आले आहात?प्रजापिता ब्रह्मा तुमचा कोण लागतो?तो तर सर्वांचा पिता झाला ना.कोणी म्हणतो तुमच्या महात्मा जी,गुरुजींचे दर्शन करायचे आहे.बोला,तुम्ही गुरू कसे म्हणता.नावच ठेवले आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी तर तो पिता झाला ना,न की गुरू. प्रजापिता ब्रह्माकुमार कुमारी म्हणजेच यांचा कोणी पिता आहे. तो तर तुमचा पण पिता झाला. बोला,आम्ही बी.के.च्या पित्याला भेटू इच्छितो.प्रजापिताचे नाव कधी ऐकले आहे?एवढे मुले आणि मुली आहेत.बाबांविषयी माहित होईल तेंव्हा समजेल बेहदचा पिता आहे.प्रजापिता ब्रह्माचा पण जरुर कोणी पिता असेल.तर कोणीही आल्यावर त्यांना विचारा कोणाकडे आले आहात?बोर्डवर काय लिहीले आहे?जेंव्हा की इतके सेंटर आहेत.ब्रह्माकुमार कुमारी इतके आहेत तर जरुर पिता असेल. गुरू असणार नाही.पहिले तर हे बुद्धितून काढून टाका,समजा की हे घर आहे,कोणत्या कुटुंबात आलो आहे.आम्ही प्रजापिता ब्रह्माची संतान आहे तर जरूर तुम्ही पण असाल.अच्छा तर ब्रह्मा कोणाचा मुलगा आहे? ब्रह्मा,विष्णू,शंकराचा रचता तो परमपिता परमात्मा शिव आहे. तो आहेच बिंदी.त्यांचे नाव शिव आहे.तो आमचा दादा आहे. तुमची आत्मा पण त्यांची संतान आहे.ब्रह्माची तुम्ही पण संतान आहात.तर तुम्ही असे म्हणा की आम्ही बापदादाला भेटू इच्छितो. त्यांना असे समजावुन सांगा की त्यांची बुद्धि बाबांकडे जाईल.समजेल मी कोणाकडे आलो आहे प्रजापिता ब्रह्मा आमचा पिता आहे.तो आहे सर्व आत्म्यांचा पिता.तर पहिले हे समजा आम्ही कोणाकडे आलो आहे.असे युक्तीने समजवायचे जे त्यांना माहीत होईल ही शिवबाबाची संतान आहे.हे एक कुटुंब आहे.त्यांना बाबा आणि दादाचा परिचय होऊन जाईल.तुम्ही समजावू शकता-सर्वांचा सदगति दाता निराकार पिता आहे.ते प्रजापिता ब्रह्मा द्वारे सर्वांची सदगति करतात.त्यांना सगळे बोलावतात.पाहात आहात ना- किती भरपूर मुले आहेत जी येऊन बाबांकडून वारसा घेत आहेत.पहिले त्यांना पित्याचा परिचय मिळाला तर समजेल आम्ही बापदादाला भेटायला आलो आहे.बोला,आम्ही त्यांना बापदादा म्हणतो.ज्ञान सागर, पतित-पावन ते शिवबाबा आहेत ना.नंतर समजवायला पाहिजे- भगवान सर्वांचा सदगति दाता निराकार आहे,तो ज्ञानाचा सागर आहे.ब्रह्मा द्वारे बेहदचा वारसा घेत आहोत.तर तो समजेल हे ब्रह्माकुमार कुमारी शिवबाबांची संतान आहेत,तोच सर्वांचा पिता आहे.भगवान एकच आहे.तेच आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतात.तो स्वर्गाचा रचता,सर्वांचा पिताही आहे, शिक्षकही आहे,गुरूही आहे.सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावतात अर्थात त्रिकालदर्शी बनवतात.जो पण पहा-समजण्यास लायक आहे, तर त्यांना हे समजवायला पाहिजे.पहिल्यांदा हे विचारा- तुमचे पिता किती आहेत? लौकिक आणि पारलौकिक.पिता तर सर्वव्यापी होऊ शकत नाही. लौकिक पित्याकडून हा वारसा मिळतो,पारलौकिक कडून हा वारसा मिळतो.मग त्यांना सर्वव्यापी कसे म्हणता येईल.ही अक्षरे लिहून घ्या आणि धारण करा.हे समजवायला अवश्य लागते.समजावणारे तुम्ही आहात.हे घर आहे,आमचा कोणी गुरू नाही.पहात आहात हे सगळे ब्रह्माकुमार कुमारी आहेत.वारसा आम्हाला निराकार शिवबाबाच देतात जे सर्वांचे सदगति दाता आहेत.ब्रह्माला सर्वांचा सदगति दाता पतित-पावन मुक्तीदाता म्हणू शकत नाही.ही शिवबाबांचीच महिमा आहे जो पण येईल त्याला हेच समजवा की हा सर्वांचा बापदादा आहे.तो पिता स्वर्गाचा रचता आहे.ब्रह्मा द्वारे विष्णू पुरीची स्थापना करतात.असे तुम्ही कोणाला ही समजावले तर मग पित्याजवळ येण्याची गरजच रहाणार नाही.त्यांना तर सवय झाली आहे, म्हणतील गुरूजींचे दर्शन करायचे आहे ....भक्ती मार्गात गुरूची खूप महिमा करतात.वेद शास्त्र यात्रा हे सर्व गुरूच शिकवतात.तुम्हाला समजवायचे आहे मनुष्य गुरू होऊ शकत नाही.ते सर्व भक्ती मार्गाचे शास्त्र वाचणारे आहेत.त्याला शास्त्रांचे ज्ञान म्हटले जाते,ज्याला तत्त्वज्ञान म्हणतात.इथे आपल्याला ज्ञान सागर पिता शिकवतात.हे आध्यात्मिक ज्ञान आहे.ज्ञान सागर ब्रह्मा विष्णू शंकराला म्हणू शकत नाही.शास्त्रांचा मक्तेदार(अथॉरिटी)पण परमपिता परमात्म्याला म्हणतात. दाखवतात,परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे सर्व वेदांचे शास्त्रांचे सार यांच्या द्वारे समजवतात. बाबा म्हणतात मला कोणी जाणतच नाही तर वारसा कुठून मिळेल.बेहदचा वारसा बेहदच्या पित्याकडूनच मिळतो.आता हे बाबा काय करत आहेत?हे होळी आणि धूलिवंदन आहे ना.ज्ञान आणि विज्ञान अक्षर फक्त दोन आहेत.मनमनाभवचे पण ज्ञान देतात.माझी आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील.तर हे ज्ञान विज्ञान आहे होळी आणि धूलिवंदन.मनुष्यांमध्ये ज्ञान नसल्याने ते एक दोघांच्या मुखात धूळ टाकतात.आहे पण असे. गति सदगति कोणाची ही होत नाही.धूळच मुखात टाकतात. ज्ञानाचा तिसरा डोळा कोणाकडेही नाही.दंतकथा ऐकत आले आहेत.त्यांना म्हटले जाते अंधश्रद्धा.आता तुम्हा आत्म्यांना ज्ञानाचा तिसरा डोळा मिळाला आहे. तुम्हा मुलांना वारसाच्या प्राप्ती साठी मत द्यायचे आहे तर त्यांना माहीत होईल.हे ब्रह्मा द्वारे वारसा घेत आहेत इतर कोणाकडून मिळू शकत नाही.सगळ्या सेंटर वर हे नाव लिहिले आहे-प्रजापिता ब्रह्माकुमार कुमारी.जर गीता पाठशाळा लिहाल तर सामान्य गोष्ट होईल.आता तुम्ही बी.के. लिहाल तर बाबांचा परिचय देऊ शकाल.मनुष्य बी.के.नाव ऐकून घाबरतात यामुळे गीता पाठशाळा नाव लिहितात.परंतु यात घाबरण्याचे काही कारण नाही. बोला हे घर आहे.तुम्ही जाणता कोणाच्या घरी आले आहात? या सर्वांचा पिता आहे प्रजापिता ब्रह्मा.भारतीय प्रजापिता ब्रह्माला मानतात.ख्रिश्चन पण समजतात आदि देव होऊन गेले आहेत, ज्यांचे हे मनुष्य वंशावली आहेत. बाकी ते मानतील आपल्या क्राइस्टलाच,क्राइस्टला,बुद्धाला पिता समजतात.वंशावळ आहे ना.खरे तर बाबांनी ब्रह्मा द्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना केली आहे.तो झाला ग्रेट- ग्रेट ग्रँड फादर(आजोबांचे ही आजोबा).पहिले बाबांचा परिचय द्यायचा आहे.ते म्हणतील आम्ही तुमच्या बाबांना भेटू इच्छितो. बोला,वारसा शिवबाबां कडून मिळतो,ब्रह्मा बाबा कडून नाही. तुमचा पिता कोण आहे?आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना कोणी केली?बाबांचे नाव ऐकून समजतील ही सर्व ब्रह्माकुमार कुमारी शिवबाबांची मुले आहेत.शिवबाबांकडून ब्रह्मा द्वारे गति व सदगतिचा वारसा मिळतो.ते यावेळी आम्हाला जीवनमुक्ती देत आहेत.बाकी सगळे मुक्ती मध्ये जातील.हे ज्ञान तुमच्या बुद्धि मध्ये रहायला पाहिजे.कोणी ही येईल त्याला समजवा,कोणाला भेटू इच्छिता? तो तर आमचा पण आणि तुमचा पण पिता आहे.गुरू गोसावी तर नाही.हे तर तुम्ही समजता.जसे की होळी धूलिवंदन करवतात. नाही तर होळी धूलिवंदनाचा काही अर्थ निघत नाही.ज्ञानाने चोळी(आत्मा)रंगवतात.आत्मा या शरीरात आहे.ती पवित्र बनल्यावर शरीर पण पवित्र मिळेल.हे तर पवित्र शरीर नाही. हे नष्ट होणार आहे.गंगा स्नान शरीराला करवतात परंतु पतित- पावन बाबांशिवाय कोणी नाही. पतित आत्मा बनते तर आत्मा पाण्याने स्नान करून पावन कशी होईल.हे कोणाला माहित नाही.ते तर आत्मा सो परमात्मा म्हणतात.आत्मा निर्लेप आहे. आता जे समजदार बनले आहेत, तेच धारण करु आणि करवू शकतात.ज्या मुलांच्या मुखातून रत्न बाहेर पडतात,त्यांना रुप बसंत म्हटले जाते.ज्ञान विज्ञाना शिवाय बाकी आपसात काही घेणे-देणे करतात तर जसे दगड मारतात.सेवेच्या बदल्यात निंदा करतात.63 जन्म एक दोघांना दगड मारत आलेत.आता बाबा म्हणतात तुम्हाला ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी करुन मनाला खुश करायचे आहे.परचिंतनाच्या गोष्टी ऐकायला नाही पाहिजे.हे ज्ञान आहे ना.दगड तर सारी दुनिया एक दोघांना मारत आहे.तुम्ही मुले तर रुप-बसंत आहात.तुम्हाला ज्ञान विज्ञानाशिवाय ना काही ऐकायचे आहे,ना ऐकवायचे आहे.जे उलट्या गोष्टी करतात त्यांची संगत खराब आहे.जे खूप सेवा करणारे आहेत,त्यांचा संग तारणारा आहे....कोणी ब्राह्मण रूप बसंत(गुणवान)आहे,कोणी ब्राह्मण बनून उलट्या सुलटया गोष्टी करतात.अशांची संगत नाही केली पाहिजे अजूनच नुकसान करतील.बाबा सारखे सारखे सावध करतात.उलट्या सुलटया गोष्टी एक दोघांत कधी करु नका. नाही तर आपला पण सत्यानाश, दुसऱ्यांचा पण सत्यानाश करतात -तर मग पद भ्रष्ट होऊन जातात. बाबा किती सहज ऐकवतात.छंद असला पाहिजे,बाबा आम्ही जाऊन अनेकांना हे ज्ञान देतो. तेच बाबांची खरी मुले आहेत. सेवा लायक मुलांची बाबा पण महिमा करतात.त्यांची संगत केली पाहिजे.कोणी चांगल्या विद्यार्थ्यांची संगत ठेवतात,बाबांना विचारा तर सांगू शकतात,कोणाची संगत केली पाहिजे.कोण बाबांच्या हृदयावर चढले आहे,ते लगेच सांगतील. सेवा करण्याऱ्यांचा बाबांना पण सन्मान आहे.कोणी-कोणी तर सेवा पण करु शकत नाही.अशी अनेकांना संगत मिळाल्याने अवस्था वर खाली होते.हा कोणी स्थूल सेवेत चांगले आहेत तर,तर ते पण वारसा मिळवू शकतात- अल्फ आणि बे-समजावणे तर खूप सहज आहे.कोणाला पण सहज सांगा-बाबांची आणि वारसाची आठवण करा.बस, अक्षरच दोन आहेत-अल्फ आणि बे.हे तर बिल्कुल सहज आहे. कोणी ही आले तर त्यांना फक्त म्हणा-बाबांचा आदेश आहे मामेकम (माझी)आठवण करा, बस.सगळ्यात मोठी विचारपूस ही आहे.बाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुम्हाला स्वर्गाचा वारसा मिळेल.प्रत्येक सेंटर मध्ये असे क्रमवार आहेत. कोणी तर विस्ताराने समजावू शकतात.समजावू शकत नसाल तर फक्त हे सांगा.कल्पापूर्वी पण बाबांनी सांगितले होते की माझी आठवण करा आणि कोणत्याही देवता इ.ची पण आठवण करू नका.बाकी परचिंतन,आमका असे म्हणतो,हे करतो....काहीही करु नका.हे बाबांनी तुम्हाला होळी आणि धूलिवंदन खाऊ घातले.बाकी रंग वगैरे लावणे तर आसुरी मनुष्यांचे काम आहे. कोणी कोणाची निंदा बसून ऐकवत असेल तर ऐकायची नाही.बाबा किती चांगल्या गोष्टी सांगतात-मनमनाभव,मध्याजी भव.कोणीही आले तर त्याला समजावून सांगा-शिवबाबा सर्वांचा पिता आहे,ते तर म्हणतात माझी आठवण करा तर स्वर्गाचा वारसा मिळेल.गीतेचे भगवान पण ते आहेत.मृत्यू समोर उभा आहे.तर तुम्हा मुलांचे काम आहे सेवा करणे.बाबांची आठवण करवणे.हे आहेत महान मंत्र,त्याने राजधानीचा तिलक मिळेल.किती सहज गोष्ट आहे बाबांची आठवण करा आणि करवुन द्या तर बेडा पार होईल. अच्छा.

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) समजदार बनून सर्वांना पित्याचा परिचय द्यायचा आहे. मुखातून अपशब्द बोलून निंदा करायची नाही.ज्ञान-योगा शिवाय दुसरी कोणतीही चर्चा करायची नाही.

२) जो रुप-बसंत(गुणवान)आहे,सेवालायक आहे त्याचीच संगत करायची आहे.जो उलट्या- सुलटया गोष्टी ऐकवतो त्यांची संगत करायची नाही.

वरदान:-
पारतंत्र्याच्या बंधनाला समाप्त करुन खऱ्या स्वतंत्रतेचा अनुभव करणारे मास्टर सर्वशक्तिवान भव

विश्वाला सर्व शक्तींचे दान देण्यासाठी स्वतंत्र आत्मा बना. सर्वात पहिली स्वतंत्रता जुन्या देहाच्या आतील संबंधा पासून हवी.कारण देहाची पारतंत्र्यता अनेक बंधनात वाटत नसताना ही बांधुन टाकते.पारतंत्र्यता कायम खालच्या दिशेला घेऊन जाते. दु:खी किंवा उदास स्थितीचा अनुभव करवते.त्यांना कोणताही आधार स्पष्ट दिसत नाही.न दु:खाचा कोणताही अनुभव,न खुशीचा अनुभव,मधल्या भोवऱ्यात असतात.म्हणुनच मास्टर सर्व शक्तीवान बणून सर्व बंधनातून मुक्त बना.आपला खरा स्वतंत्रता दिवस साजरा करा.

बोधवाक्य:-
परमात्म मिलनामध्ये सर्व प्राप्तींच्या मौजेचा अनुभव करत संतुष्ट आत्मा बना.