01-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्हाला आपसामध्ये खूप खूप आंत्मिक प्रेमाने राहायचे आहे,कधीच मतभेदा
मध्ये यायचे नाही"
प्रश्न:-
प्रत्येक
ब्राह्मण मुलांना आपल्या मनाला कोणती गोष्ट विचारायची आहे?
उत्तर:-
आपल्या मनाला विचारा,(१) मी ईश्वराच्या हृदयावर राज्य करत आहे! (२) माझ्यामध्ये दैवी
गुणांची धारणा किती झाली आहे? (३)मी ब्राह्मण,ईश्वरीय सेवेत विघ्न तर घालत नाही!(४)
नेहमी खिरखंड म्हणजे गोड राहतो!आमचे आपसामध्ये एकमत आहे.(५)मी नेहमी श्रीमताचे पालन
करतो?
गीत:-
भोलेनाथ पेक्षा
श्रेष्ठ कोणी नाहीत…
ओम शांती।
तुम्ही मुलं आत्ता ईश्वरीय संप्रदाय आहात,अगोदर आसुरी संप्रदाय होते.आसुरी
संप्रदायाला हे माहित नाही की, भोलानथ कोणाला म्हटले जाते.हे पण माहित नाही की,ते
वेगवेगळे आहेत.शिव पिता आहेत,काहीच जाणत नाहीत.आता तुम्ही ईश्वरीय संप्रदाय किंवा
ईश्वरीय परिवाराचे आहात. तो तर रावणाचा आसुरी परिवार आहे,खूप फरक आहे. आता तुम्ही
ईश्वरीय परिवारामध्ये ईश्वरा द्वारा शिकत आहात की,एक दोघा सोबत आत्मिक स्नेह कशा
प्रकारे पाहिजे.एक दोघांमध्ये, ब्राह्मण कुळामध्ये हा आत्मिक स्नेह येथेच भरायचा
आहे.जे पूर्णपणे प्रेमळ बनले नाहीत तर,श्रेष्ठ पद मिळवू शकणार नाहीत.तेथे तर एक
धर्म,एक राज्य असते.आपसामध्ये कोणतेच मतभेद भांडणे इत्यादी नसतात.येथे तर राजाई
नाही.ब्राह्मणांमध्ये देह अभिमान असल्यामुळे मतभेदा मध्ये येतात. असे मतभेदा मध्ये
येणारे,सजा खाऊन पास होतात,परत तेथे एक धर्मांमध्ये राहतात,तर तेथे शांती
राहते.आत्ता ते तर आसुरी संप्रदाय किंवा आसुरी परिवाराचे आहेत. येथे तर ईश्वरीय
परिवाराचे आहेत. भविष्यासाठी दैवी गुण धारण करत आहेत.बाबा सर्वगुणसंपन्न
बनवतात,सर्व तर बनत नाहीत.जे श्रीमतावरती चालतात,तेच माळेचे मणी बनतात.जे बनणार
नाहीत,ते प्रजा मध्ये येतात.ते तर दैवी शासन आहे.शंभर टक्के पवित्रता शांती संपत्ती
राहते. या ब्राह्मण कुळांमध्ये आता दैवी गुण धारण करायचे आहेत.काही तर चांगल्या
प्रकारे दैवी गुण धारण करतात, दुसर्यांना पण करवतात.ईश्वरीय कुळाचा आपसामध्ये
आत्मिक स्नेह पण तेव्हाच असेल,जेव्हा देही अभिमानी बनतील,यामुळे पुरुषार्थ करत
राहतील.अंत काळामध्ये सर्वांची अवस्था एकरस,एकसारखी तर होऊ शकत नाही,परत सजा खाऊन
पदभ्रष्ट बनते.कमी पद प्राप्त करतील.ब्राह्मणांमध्ये जर कोणी आपसमध्ये खिरखंड बणून
राहत नाहीत,तर आपसमध्ये खरट पाण्यासारखे राहतात.दैवी गुणांची धारणा करत नाहीत,तर
उच्चपद कसे मिळवू शकतील.खारट पाण्यासारखे राहिल्यामुळे कधी- कधी ईश्वरीय सेवेमध्ये
विघ्न घालत राहतात,त्याचा परिणाम काय होईल? ते एवढे उच्चपद प्राप्त करू शकणार
नाहीत.एकीकडे खिरखंड होण्याचा पुरुषार्थ करतात, दुसरीकडे माया खारट पाण्यासारखे
बनवते,यामुळे सेवा करण्याच्या ऐवजी सेवेमध्ये विघ्न घालतात. बाबा सन्मुख
समजवतात,तुम्ही ईश्वरीय परिवाराचे आहात,ईश्वराच्या सोबत राहतात.कोणी सोबत राहतात,
कोणी दुसऱ्या गावांमध्ये राहतात परंतु एकत्र आहेत ना. बाबा पण भारतामध्येच येतात.
मनुष्य जाणत नाहीत की, शिवबाबा कधी येतात? काय करतात? तुम्हाला बाबा द्वारे आत्ता
परिचय मिळाला आहे.रचनाकार आणि रचनेच्या आधी मध्य अंतला तुम्ही जाणतात.दुनियावी
लोकांना हे माहित नाही की,हे चक्र कसे फिरते?आता कोणती वेळ आहे? अगदीच अज्ञानाच्या
काळोखा मध्ये आहेत.
तुम्हा मुलांना रचनाकार पित्याने येऊन सर्व समाचार ऐकवला आहे, सोबत समजावून सांगतात
की,हे शाळीग्राम मुलांनो,माझी आठवण करा.हे शिवपिता आपल्या मुलांना म्हणतात,तुम्ही
पावन बनू इच्छितात ना.तुम्ही बोलवत आले आहात.आत्ता मी आलो आहे.शिवबाबा
येतातच,भारताला पावन बनवण्यासाठी,परत रावण वेश्यालय बनवतो.स्वतःच गायन करतात की
आम्ही पतित विकारी आहोत.भारत सतयुगामध्ये संपूर्ण निर्विकारी होता.निर्विकारी
देवतांची, विकारी मनुष्य पूजा करतात,परत निर्विकारीच विकारी बनतात.हे कोणालाच माहीत
नाही,परत पुजारी विकारी बनतात.पुज्य तर निर्विकारी होते, परत पुजारी विकारी बनतात,
तेव्हा तर बोलावतात, हे पतित पावन या,येऊन निर्विकारी बनवा.बाबा म्हणतात,या अंतिम
जन्मांमध्ये तुम्ही पवित्र बना.माझी आठवण करा,तर तुमचे पाप भस्म होतील आणि तुम्ही
तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल,परत चंद्रवंशी क्षत्रिय परिवारामध्ये याल.या वेळेत
ईश्वरीय परिवाराचे आहात परत दैवी परिवारामध्ये २१ जन्म राहाल.या ईश्वरीय
परिवारामध्ये तुम्ही हा अंतिम जन्म पास करतात.यामध्ये तुम्हाला पुरुषार्थ करून
सर्वगुणसंपन्न बनायचे आहे.तुम्ही पुज्य होते बरोबर राज्य करत होते,परत पुजारी बनले
आहात.हे समजावून सांगावे लागेल ना.भगवान पिता आहेत आम्ही त्यांची मुलं आहोत तर
परिवार झाला ना.गायन पण करतात तुम्हीच मातपिता,आम्ही तुमची मुलं आहोत,तर परिवाराचे
झाले ना.आत्ता बाबा कडून खूप सुख मिळते.बाबा म्हणतात,तुम्ही माझे कुटुंब आहात,परंतु
पुर्व नियोजीत नाटकानुसार रावण राज्यांमध्ये आल्यामुळे तुम्ही दु:खामध्ये येतात,तर
बोलवतात.या वेळेत तुम्ही बरोबर कुटुंबातील आहात. परत तुम्हाला भविष्य २१ जन्मासाठी
वारसा देतो. हा वारसा परत दैवी परिवारामध्ये २१ जन्म कायम राहील.दैवी परिवार सतयुग
त्रेता पर्यंत चालतो,परत रावण राज्य झाल्यामुळे विसरतात की,आम्ही दैवी परिवाराचे
आहोत.वाम मार्गात गेल्यामुळे आसुरी परिवाराचे बनतात.६३ जन्म शिडी उतरत आलेले आहात.हे
सर्व ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे.तुम्ही कोणालाही समजावू शकतात.वास्तविक तुम्ही
देवी-देवता धर्माचे आहात. सतयुगाच्या अगोदर कलियुग होते. संगमयुगामध्ये तुम्हाला
मनुष्यापासून देवता बनवले होते.मध्येच हे संगम युग आहे. तुम्हाला ब्राह्मण
धर्मापासून परत दैवी धर्मांमध्ये घेऊन जातात.लक्ष्मी नारायणने हे राज्य कसे घेतले,
हे समजावून सांगितले जाते.त्याच्या अगोदर आसुरी राज्य होते,परत दैवी राज्य कधी आणि
कसे झाले. बाबा म्हणतात,कल्प कल्प संगम युगामध्ये येऊन,तुम्हाला
ब्राह्मण,देवता,क्षत्रिय धर्मामध्ये घेऊन येतो. हा भगवंताचा परिवार आहे.सर्व जण
ईश्वरीय पिता म्हणतात परंतु बाबांना न झाल्यामुळे विनाधनीचे बनले आहेत,म्हणून बाबा
काळोखा मधून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी येतात.आता स्वर्ग स्थापन होत आहे.तुम्ही
मुलं शिकत आहात, दैवी गुण धारण करत आहात.हे पण माहिती व्हायला पाहिजे, शिवजयंती
साजरी करतात ना.स्वर्गिय पिता,स्वर्गाची स्थापना करण्यासाठी स्वर्गांमध्ये तर येणार
नाहीत ना.असे म्हणतात,मी नर्क आणि स्वर्गाच्या संगम मध्ये येतो.
शिवरात्री म्हणतात ना,तर रात्री मध्ये येतो.हे तर तुम्ही मुलंच समजू शकतात.जे
समजतात,ते दुसऱ्यांना पण धारणा करवतात. हृदयावरती पण तेच राज्य करतात,जे मनसा वाचा
कर्मणा सेवेमध्ये तत्पर राहतात.जशी जशी सेवा करतात, तेवढे हृदयावर राज्य करतात. कोणी
सर्वांगीण सेवा करणारे असतात.सर्व काम शिकायला पाहिजे ना.भोजन बनवणे,चपात्या
करणे,भांडी घासणे इत्यादी पण सेव आहे ना.बाबा ची आठवण प्रथम करायची आहे. त्यांच्या
आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील.येथील वारसा मिळालेला आहे.तेथे सर्व गुण संपन्न
राहतात.यथा राजा-राणी तथा प्रजा, दुःखाची गोष्टच नसते.या वेळेत सर्व नर्कवासी आहेत.
सर्वांची उतरती कला आहे,परत आता चढती कला होईल.बाबा सर्वांना दुःखापासून सोडवून
सुखामध्ये घेऊन जातात, म्हणून बाबांना मुक्तिदाता म्हटले जाते.येथे तुम्हाला नशा
राहतो,आम्ही बाबांकडून वारसा घेत आहोत, लायक बनत आहोत. लायक तर त्यांनाच म्हणनार,जे
दुसऱ्यांना राजाई पदाचे लायक बनवतात.बाबांनी समजावले आहे, शिकणारे तर खूप येतील,असे
नाही की सर्वजण ८४ जन्म घेतील. जे थोडासा अभ्यास करतील,तर उशिरा येतील,ते जन्म पण
कमी घेतील ना.कोण८०,कोण ८२,कोणी लवकर येतात आणि कोणी उशिरा येतात.सर्व अभ्यासावर
अवलंबून आहे.साधारण प्रजा नंतर येईल. त्यांचे ८४ जन्म होऊ शकत नाहीत, नंतर येत
राहतात.जे अगदी शेवटी येतात, त्रेताच्या अंतमध्ये येऊन जन्म घेतील. परत वाम मार्गा
मध्ये जातात,उतरण्यासाठी सुरू होते. भारतवासीने कसे ८४ जन्म घेतले आहेत,त्यांची ही
शिडी आहे.हे सृष्टिचक्र नाटकाच्या रुपामध्ये आहेत.जे पावन होते, तेच आता पतित बनले
आहेत, परत पावन देवता बनायचे आहे.बाबा जेव्हा येतात तर सर्वांचे कल्याण होते,
म्हणून याला खूप अमुल्य युग म्हटले जाते.बाबांची च महिमा आहे, जे सर्वांचे कल्याण
करतात. सतयुगामध्ये सर्वांचे कल्याण होईल, कोणते दुःख नसते.हे तर समजून सांगावे
लागेल की,आम्ही ईश्वरीय कुटुंबाचे आहोत.ईश्वर सर्वांचे पिता आहेत.येथे तुम्ही मात
पिताचे गायन करत राहतात.तेथे तर फक्त पिता म्हटले जाते.येथे तुम्हा मुलांना मातपिता
मिळतात.येथे तुम्हा मुलांना दत्तक घेतले जाते.पिता रचनाकार आहेत,तर माता पण असेल
ना,नाहीतर रचना कशी होईल.स्वर्गिय पिता स्वर्गाची कशी स्थापना करतात,हे ना भारतवासी
जाणतात,ना परदेशी लोक जाणतात.आता तुम्ही जाणतात, नवीन दुनिया ची स्थापना आणि जुन्या
दुनियेचा विनाश होत आहे, तर जरूर संगमयुगा मध्येच होईल. आता तुम्ही संगमयुगा मध्ये
आहात. आता बाबा समजवतात,माझीच आठवण करायची आहे.आत्म्याला परमपित्याची आठवण करायची
आहे.आत्मा आणि परमात्मा वेगळे राहिले खूप काळ,सुंदर यात्रा कोठे असेल.सुंदर यात्रा
जरुर येथेच असेल.परमात्मा पिता येथे येतात, यालाच कल्याणकारी सुंदर यात्रा म्हटले
जाते.जीवनमुक्ती'चा वारसा सर्वांना देतात.जीवन बंधनापासून मुक्त होतात.शांतीधाम
मध्ये सर्व जातात,परत जेव्हा येतात तेव्हा सतोप्रधान राहतात.धर्मस्थापना अर्थ
येतात.खाली जेव्हा त्यांची जनसंख्या वृद्धि होईल तेव्हाच राजाईसाठी पुरूषार्थ करू
शकतील,तो पर्यंत कोणते भांडण इत्यादी होत नाही.सतोप्रधान पासून रजो मध्ये जेव्हा
येतात,तेव्हाच लढाई,भांडणं सुरू करतात.प्रथम सुख परत दुःख.आता अगदीच दुर्गतीला
मिळाले आहेत.या कलियुगी दुनियेचा विनाश परत,सतयुगी दुनीयेची स्थापना होणार
आहे.विष्णुपुरी ची स्थापना ब्रह्मा द्वारे करत आहेत.जसा पुरुषार्थ करतात त्यानुसार
विष्णुपरी मध्ये येऊन प्रारब्ध मिळवतात.या खूपच चांगल्या समजून घेण्याच्या गोष्टी
आहेत.या वेळेत तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे की, आम्ही ईश्वरापासून
भविष्य २१जन्माचा,वारसा घेत आहोत. जेवढा पुरुषार्थ करुन,स्वत:ला बिनचूक बनवाल….तुम्हाला
बिनचूक तर बनायचे आहे. घड्याळ पण लिव्हर आणि सलेंडर असतात.लिव्हर घड्याळ खूप बिनचूक
असते.मुलांमध्ये पण कोणी खूप बिनचूक बनतात.काही चुका करतात तर त्यांचे पद कमी
होते.पुरुषार्थ करून बिनचूक बनायला पाहिजे.आता सर्व बिनचुक चालत नाहीत.पुरुषार्थ
करवणारे तर एक बाबाच आहेत. भाग्य बनवण्याच्या पुरुषार्था मध्ये कमी आहे म्हणून पद
कमी होते. श्रीमतावरती न चालल्यामुळे,आसुरी गुण न सोडल्यामुळे,योगामध्ये न
राहिल्यामुळे,हे सर्व होत राहते. योगा मध्ये राहत नाहीत तर जसे पंडिता सारखे
बनतात.योगामध्ये कमी आहे म्हणून शिवबाबा वरती प्रेम राहत नाही.धारणा पण कमी होते तर
खुशी राहत नाही,चेहराच मुडद्या सारखा राहतो.तुमची चाल चलन नेहमी आनंदित पाहिजे.जसे
देवतांची असते.बाबा तुम्हाला खूप वारसा देतात.कोणत्या गरीबाचा मुलगा सावकाराच्या
जवळ दत्तक गेला,तर खूप खुश राहते ना.तुम्ही पण खूप गरीब होते.आता बाबांनी दत्तक
घेतले आहे,तर खुशी राहायला पाहिजे.आम्ही ईश्वरीय संप्रदायाचे बनले आहोत परंतु भाग्या
मध्ये नाहीतर काय केले जाऊ शकते,पद भ्रष्ट होते.पटराणी बनत नाहीत.बाबा पटराणी
बनवण्यासाठीच येतात.तुम्ही मुलं कोणाला पण समजावू शकता की,ब्रह्मा, विष्णू, शंकर
तिन्ही शिवबाबांची मुलं आहेत.भारताला परत ब्रह्मा द्वारे स्वर्ग बनवतात. शंकरा
द्वारे जुन्या दुनियेचा विनाश होतो.भारतामध्ये बाकी थोडे शिल्लक राहतात,प्रलय तर
होत नाही परंतु खूप खलास होतात.जसे की प्रलय झाल्यासारखे वाटते.रात्रं दिवसाचा फरक
पडतो.ते सर्व मुक्तीधाम मध्ये चालले जातील.हे तर पतित पावन बाबांचे काम आहे. बाबा
म्हणतात देही अभिमानी बना, नाही तर जुने संबंधी आठवणीत येत राहतात,त्यांना सोडले आहे
तरी बुद्धी जात राहते.नष्टोमोहा बनले नाहीत,याला व्यभिचारी आठवण म्हटले जाते.सद्गती
मिळवू शकत नाहीत कारण दुर्गतीमध्ये असणाऱ्यांची आठवण करत राहतात,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)
बापदादाच्या ह्रदयासीन बनण्यासाठी मन्सा वाचा कर्मणा सेवा करायची आहे.बिनचूक आणि
सर्वांगीण भूमिका करणारे बनवायचे आहे.
(२) असे देही अभिमानी बनायचे आहे,जे कोणतेही जुने संबंध आठवणीत यायला नकोत.आपसा
मध्ये खूप आत्मिक प्रेमाने राहायचे आहे.खरट पाण्यासारखे बनायचे नाही.
वरदान:-
नेहमी
बाबांच्या सोबतीच्या अनुभवा द्वारे कष्टाची अविद्या करणारे अतिंद्रिय सुख किंवा
आनंद स्वरुप भव.
जसे मुलगा जर बाबाच्या
गोदी मध्ये आहे,तर त्याला थकावट येत नाही. आपल्या पाया द्वारे चालेल तर थकेल पण आणि
रडेल पण.येथे पण तुम्ही मुलं बाबांच्या कडेवरती बसून चालत आहात.काहीच कष्ट किंवा
कठीण अनुभव होत नाही. संगमयुगा मध्ये जे नेहमी सोबत राहणारे आत्मे
आहेत,त्यांच्यासाठी कष्ट अविद्या मात्र अनुभव होते. पुरुषार्थ पण एक नैसर्गिक कर्म
होते,म्हणून नेहमी अतिंद्रिय सुख किंवा आनंदस्वरूप स्वतः बनतात.
बोधवाक्य:-
गुलाब बनून
आपल्या आत्मिक वृत्ती द्वारे वातावरणामध्ये आत्मीयतेचा सुगंध पसरवत रहा.