16-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, शिवबाबांनी रचलेल्या या रुद्र ज्ञान यज्ञाचा तुम्हाला फार फार सांभाळ
करावयाचा आहे, हा बेहदचा यज्ञ स्वराज्य प्राप्त करण्यासाठी आहे."
प्रश्न:-
या रुद्र
ज्ञान यज्ञाचा आदर कोणत्या मुलांना राहतो?
उत्तर:-
जे याच्या विशेषतेला जाणत आहेत. तुम्हाला माहित आहे कि, या रुद्र यज्ञातून आम्ही
कौडी पासून हिऱ्या सारखे बनत आहोत, यामध्ये सर्व जुनी दुनिया स्वाहा होत आहे, या
जुन्या शरीराला पण स्वाहा करायचे आहे. कोणते पण असे बेकायदेशीर कर्म होऊ नये,
ज्यामुळे यज्ञा मध्ये विघ्न पडेल. जेंव्हा असे ध्यान राहील, तेव्हा आदर ठेवू शकाल.
गीत:-
माता ओ माता.
. . .
ओम शांती।
मुलांनी गीत ऐकले. ज्यांनी बनविले आहे ते बिचारे तर मातांना ओळखतच नाहीत. नाव जगदंबा
ऐकले आहे. परंतु ती कोण होती, काय करून गेली, हे कोणाला पण माहित नाही, शिवाय तुम्हां
मुलांच्या. जगदंबा असेल तर जरूर पिता पण असेल. मुले पण आहेत आणि मुली पण आहेत. जे
जगदंबे जवळ जातात, त्यांच्या बुद्धी मध्ये ही समज नाही, फक्त मूर्तीचे पुजारी आहेत.
देवी समोर जाऊन भीक मागतात. आता हा राजस्व अश्वमेघ अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ आहे.
याचे निर्माता आहेत, मात पिता, ततत्वम. तुम्ही पण यज्ञाचे निर्माते आहात. तुम्हा
सर्व मुलांना या यज्ञाची फार काळजी घ्यायची आहे. यज्ञा प्रती फार आदर असला पाहिजे.
यज्ञाची पूर्ण सांभाळ केली जाते. हे मुख्यालय आहे, आणखीन पण शाखा आहेत. मम्मा बाबा
आणि तुम्ही मुले आपले भविष्य हिऱ्या सारखे बनवित आहात, या यज्ञाद्वारे. तर अशा
यज्ञाचा किती सांभाळ आणि इज्जत केली पाहिजे. किती प्रेम असले पाहिजे. हा आमच्या
मम्मा जगदंबेचा यज्ञ आहे. मम्मा बाबाचा यज्ञ, तोच आमचा यज्ञ. यज्ञा ची वाढ करायची
असते, यज्ञा मध्ये येऊन अनेक मुले आपल्या पित्याकडून वारसा घेतील. जरी स्वतः घेऊ
शकत नाहीत, स्वतःला वेळ नसेल, तरी पण इतरांना निमंत्रण दिले पाहिजे. याचे नावच आहे
राजस्व अश्वमेघ ज्ञान यज्ञ, यातून स्वराज्य मिळत आहे. या यज्ञा मध्ये जुन्या शरीराला
पण स्वाहा करायचे आहे. बाबाचे बनायचे आहे.यज्ञ कांही घर नाही, ही बेहदची गोष्ट आहे.
ज्या यज्ञा मध्ये सारे विश्व स्वाहा होणार आहे. पुढे चालून तुम्ही पाहाल कि, या
यज्ञाचा किती आदर ठेवला जाईल. इथे अनेकांना त्याचा आदर नाही. एवढी सर्व यज्ञातील
मुले आहेत. मुले निर्माण होत आहेत, तर या यज्ञाची किती इज्जत ठेवली पाहिजे. परंतु
अनेक असे आहेत ज्यांना काहींच कदर नाही. हा एवढा मोठा यज्ञ आहे, ज्यातून मनुष्य कौडी
पासून हिऱ्या सारखे, भ्रष्टाचारी पासून श्रेष्ठाचारी बनत आहेत, त्यामुळे बाबा म्हणत
आहेत, तर यज्ञ रचत राहा,एक जरी श्रेष्ठाचारी बनला तरी अहो सौभाग्य. एवढे लाखो मंदिर
इत्यादी आहेत, तिथे कोणी श्रेष्ठाचारी बनत नाहीत. इथे तर फक्त तीन पैर पृथ्वीचे
पाहिजेत. कोणी आला तर एकदम जीवन सुधारून जाईल. किती इज्जत असली पाहिजे यज्ञाची.
बाबांना अनेक लिहितात, बाबा आम्ही आमच्या घरामध्ये उघडू. होय, मुलांनो, खुशाल
यज्ञभूमी,सेवाकेंद्र बनवा. कोणाचे ना कोणाचे कल्याण होईल. या यज्ञाची फार मोठी
माहिमा आहे. यज्ञाची भूमी आहे, जिथे मुली इतरांचे कल्याण करत राहतील. अशा या
ज्ञानाचा फार मान ठेवला पाहिजे. परंतु ज्ञान पूर्ण नसल्यामुळे तेवढा आदर ठेवत नाहीत.
यज्ञा मध्ये विघ्न घालणारे अनेक आहेत. हा शिवबाबाचा यज्ञ आहे. तर माता पिता एकत्र
आहेत. या मम्मा बाबा कडून तर कांही पण मिळत नाही. बेहदच्या बाबा कडूनच सर्व कांही
मिळत आहे. ते एकच आहेत. मम्मा बाबा शरीरधारीला म्हटले जाते. निराकारला तर शरीरच नाही.
तर बाबा म्हणतात कि, साकार चे पण गुलाम बनू नका. माझी एकट्याची आठवण करा. हे बाबा
पण माझी आठवण करत आहेत. चित्रा मध्ये दाखवतात, राम, कृष्ण, ब्रह्मा इत्यादी सर्व
त्यांची आठवण करत आहेत. तसे तर नाही. तिथे तर कोणी आठवण करत नाहीत. त्यांना
प्रारब्ध मिळाली आहे. त्यांना आठवण करण्याची आवश्यकताच काय आहे. आम्ही पतित बनले
आहोत, आम्हालाच पावन बनण्यासाठी आठवण करायची आहे. महिमा एकाचीच आहे. त्यांच्या मुळे
यांचा मान आहे. तुम्हाला कोणत्या पण देहधारी ची आठवण करायची नाही. देहधारी कडून
त्यांचा परिचय मिळत आहे परंतु आठवण त्यांची करायची आहे. बाबा पण देहधारी आहेत, सर्व
परिचय देत आहेत, परंतु अनेक अशी पण बेसमज मुले आहेत, जे म्हणतात, आम्ही तर
प्रत्यक्ष शिवबाबा कडून प्रेरणेने ज्ञान घेऊ शकतो. जर तसे असते, तर मग या रथामध्ये
त्यांना येण्याची काय आवश्यकता होती? असे पण आहेत, जे समजतात या साकारा बरोबर आमचे
काय काम. बाबा म्हणतात, मनमनाभव, त्यांची आठवण करा, परंतु यांच्या द्वारेच तर
म्हणत आहेत ना. मग क्रमवार आदर ठेवला पाहिजे. आदर तेच ठेवतील जे क्रमवार गादीवर
बसणारे असतील. मम्मा बाबा प्रथम राजगादीवर बसतील. मग त्यांचे अनुकरण करायचे आहे.
परंतु प्रजा बनविली पाहिजे. पद पण फार उंच आहे. भिण्याचे कांही कारण नाही. विमाना
मध्ये कोणी नवीन बसले, तर त्यांना भीती वाटते. कोणी तर चंद्रावर पण जातात. सवयीची
गोष्ट आहे ना. परंतु त्यातून फायदा कांही पण होत नाही, हे तुम्ही जाणत आहात. ते
समजत आहेत कि, चंद्रावर पण राजधानी बनवू. परंतु असे कांही पण होणार नाही. उतरती कला
आहे ना. उतरती कला आणि चढती कलेला पण मुले समजत आहेत. चित्र पण आहेत, हे लक्ष्मी
नारायण राज्य करत होते.
आज तर पाहा भारत किती गरीब आहे. ही तर खरी गोष्ट आहे. त्यांनी तर स्वतःच लिहिले आहे,
तर या शिडी मध्ये दाखविले पाहिजे. तिथे हिऱ्याचे महल चमकत आहेत, इथे मग कवड्या
दाखविल्या पाहिजेत. पूर्वी कवड्या चालत होत्या. गुरुद्वारा मध्ये कवड्या ठेवत होते.
आता तर कोणी पैसे पण ठेवत नाहीत. शिडी तर फार चांगली आहे, यामध्ये भरपूर काही लिहू
शकता. मम्मा बाबा बरोबर मुलांचे पण चित्र असावे आणि वर आत्म्याचे झाड पण असावे. नव
नवीन चित्रे तयार होत जातील. समजावून सांगणे पण सोपे होईल. उतरती कळा कशी होत आहे,
मग प्रगती कशी होते. आम्ही निराकारी दुनिये मध्ये जाऊन मग साकारी दुनिये मध्ये येतो,
समजावून सांगणे फार सोपे आहे. समजत नाहीत तर समजले पाहिजे कि, नशिबा मध्ये नाही.
नाटकाला साक्षी होऊन पाहिले जाते. मुलांना यज्ञाचा फार आदर असला पाहिजे. यज्ञातील
एक पैसा पण न विचारता घेणे किंवा मात पित्याच्या परवानगी शिवाय कोणाला देणे, हे
महापाप आहे. तुम्ही तर मुले आहात, कोणत्या वेळी कोणती पण वस्तू मिळू शकते. जास्त
घेऊन कां ठेवली पाहिजे. विचार येतो कि, माहित नाही परत नाही मिळाली तर, ती
ठेवल्यामुळे मग मन खात राहते, कारण बेकायदा काम आहे ना. वस्तू तर तुम्हाला कधी पण
मिळू शकतील. बाबांनी सांगितले आहे, अंतकाळात अचानक कोणी पण मरु शकतीत. तर अंतकाळी
जे पाप केले असेल, ती कचरा पट्टी सर्व समोर येईल, त्यामुळे बाबा नेहमी समजावतात,
मनामध्ये कोणती दुविधा नसली पाहिजे. मन स्वच्छ असेल तर अंताचे वेळी कांही पण समोर
येणार नाही. यज्ञातून तर सर्व कांही मिळत राहते. अनेक मुले आहेत, त्यांच्या जवळ
पुष्कळ पैसा आहे. त्यांना म्हणतात जेंव्हा आवश्यकता असेल, तेंव्हा मागून घेऊ.ते
म्हणतात, बाबा कधी पण आवश्यकता पडली तर आम्ही बसलो आहोत. जरी ते पवित्र राहत नाहीत,
खाण्या पिण्याचे पण पथ्य पाळत नाहीत. परंतु असा प्रण करतात, बाबा आमच्या जवळ फार
पैसे पडून आहेत, तसेच नाहीसे होऊन जातील. मध्येच कोणी खाऊन टाकील, त्यामुळे जेंव्हा
पाहिजेत, तेंव्हा मागवून घ्या. बाबा म्हणतात, आम्ही तर काय करणार. घरे बांधायची
असतात, तर आपोआपच येत राहतात. तर अनेक मुले बसली आहेत आपल्या घरामध्ये. तर अशी मुले
पण उंच पद प्राप्त करतात. प्रजे मध्ये पण कांही कमी पद नाहीत. राजा पेक्षा पण कांही
सावकार फार धनवान असतात, त्यामुळे मनामध्ये असा कोणता विचार केला नाही पाहिजे. तुमचा
वायदा आहे, बाबा तुम्ही जे खाऊ घालाल. . . तरी पण त्यावर चालले नाही तर दुर्गती
होऊन जाते. बाबा सद्गती देण्यासाठी आले आहेत. जर उंच पद प्राप्त केले नाही तर
दुर्गती म्हणावी ना. तिथे पण अनेक सावकार, कोणी कमी पदाचे, कोणी उंच पदवाले तर आहेत
ना. मुलांना श्रीमता वर पुरुषार्थ करायचा आहे. आपल्या मता वर चालल्याने स्वतःलाच
धोका देत आहेत. हा शिवबाबा ने रचलेला ज्ञान यज्ञ आहे. याचे नावच आहे राजस्व अश्वमेघ
अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ. शिवबाबा येऊन स्वराज्य देत आहेत. कोणाच्या नशिबा मध्ये
नसेल, नाव प्रसिद्ध होणार नसेल तर मुखातून चांगले चांगले मुद्दे निघणार नाहीत.
कोणाला समजावत नाहीत तर म्हटले जाते, नाव प्रसिद्ध होण्यासाठी आणखीन उशीर आहे,
त्यामुळे समजावून सांगते वेळी मुख्य मुख्य मुद्दे विसरून जात आहेत. हे पण समजावले
पाहिजे- हा राजस्व अश्वमेघ अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ आहे, स्वराज्य प्राप्त करण्या
साठी. बोर्डावर पण लिहू शकता. या यज्ञा मध्ये जुनी दुनिया सर्व स्वाहा होत आहे,
त्यासाठी ही महाभारत लढाई होणार आहे. विनाशा पूर्वी हे स्वराज्य पद घ्यायचे असेल तर
येऊन घ्या. बोर्डावर तर आणखीन कांही लिहू शकता. मुख्य लक्ष्य पण आले पाहिजे. खाली
लिहिले पाहिजे, स्वराज्य पद मिळत आहे. जेवढे होईल तेवढे स्पष्ट लिहिले पाहिजे, जे
कोणी पण वाचून समजू शकतील. बाबा सूचना देत आहेत, असे असे बोर्ड बनवा. हे अक्षर जरूर
लिहा. पुढे चालून या यज्ञाचा प्रभाव फार निघेल. वादळे तर फार येतील. म्हणतात,
खऱ्याची नाव हालेल, डुलेल पण बुडणार नाही. क्षीरसागरा कडे जायचे आहे तर विषयसागर कडे
मन लागले नाही पाहिजे. जे ज्ञान घेत नाहीत, त्यांच्या मागे लागून आपला वेळ वाया
घालवायचा नाही. समजावून सांगणे तर फार फार सोपे आहे.
तुम्हीच पुज्य देवी-देवता होता, आता पुजारी बनले आहात. आता बाबा सांगत आहेत, माझी
एकट्याची आठवण करा, तर भेसळ निघून जाईल. तुमचे पाप भस्म होऊन जाईल. आणखीन कोणता
उपाय नाही. हाच खरा खुरा उपाय आहे. परंतु आठवणी मध्ये राहत नाहीत.देह- अभिमान फार
आहे.देह अभिमान जेंव्हा नष्ट होईल, तेंव्हा आठवणी मध्ये राहू शकाल, मग कर्मातीत
अवस्था होईल. शेवटी कोणती पण वस्तू आठवणीत यायला नको. कांही कांही मुलांना एखाद्या
वस्तू मध्ये एवढा मोह राहतो कि, कांही विचारू नका. शिवबाबाची कधी आठवण करत नाहीत.
अशा बाबांची तर हेतुपुरस्कर आठवण केली पाहिजे. म्हटले पण जाते हाताने काम करा, मनाने
आठवण करा. . . असे फार मुश्किलीने कोणी आठवण करतात. वागणूकीतून सर्व माहित पडते.
यज्ञाचा आदर ठेवत नाहीत. या यज्ञाचा फार सांभाळ केला पाहिजे. सांभाळ केला म्हणजे
बाबांना पण खुश केले. प्रत्येक गोष्टीचा सांभाळ पाहिजे. गरीबांची पाई पाई यज्ञा
मध्ये येत आहे, ज्यामुळे ते पदमपती बनत आहेत. माता ज्यांच्या जवळ कांही पण नाही,
एक-दोन रुपया, आठ आणे यज्ञा मध्ये देत आहेत, त्या पदमपती बनून जातात, कारण फार
भावनेने खुशी मध्ये घेऊन येतात. बाबा म्हणतात, मी तर गरीब निवाज आहे. तुम्हां
मुलासाठी आलो आहे. कोणी आठ आणे घेऊन येतात. बाबा घरासाठी एक ईट लावा. कधी दोन मुठी
धान्य पण घेऊन येतात. त्यांचे तर खूप जमा होते. कण कण मोहरा बरोबर होऊन जाते. असे
थोडेच आहे कि, तुम्हाला गरीबांना दान द्यायचे आहे. गरीबांना तर ते लोक दान देत आहेत.
तसे तर जगा मध्ये अनेक गरीब आहेत.सर्व येऊन इथे बसले तर डोकंच खराब करतील. असे तर
फार म्हणतात, आम्ही यज्ञामध्ये समर्पित होतो. मग सांभाळ करावा लागतो. असे पण नसावे
यज्ञा मध्ये येऊन गोंधळ निर्माण करतील. यज्ञातून तर पुण्यात्मा बनायचे आहे. फार
सांभाळ करायचा आहे.यज्ञाप्रती आदर ठेवायचा आहे. ज्या ईश्वरीय यज्ञातून आम्ही आमचा
शरीर निर्वाह करत आहोत. यज्ञातील पैसा कोणाला देणे, मोठे पाप आहे. हे पैसे आहेतच
त्यांच्या साठी जे कौडी पासून हिऱ्या सारखे बनत आहेत. ईश्वरीय सेवे मध्ये आहेत, बाकि
गरीबांना देणे ,हे दान पुण्य तर जन्मजन्मांतर करत आले आहात. उतरत उतरत पाप आत्माच
बनले आहात.
तुम्ही मुले सर्वांना बाबाचा परिचय देण्यासाठी लहान लहान गावांमध्ये पण प्रदर्शनी
करत राहा. एक गरीब पण निघाला, तर ते पण चांगले आहे, यामध्ये कांही खर्च तर होत नाही.
लक्ष्मी नारायणाने ही राजाई प्राप्त केली, काय खर्च केला. कांही पण नाही. विश्वाची
बादशाही प्राप्त करण्यासाठी खर्च तर कांही पण केला नाही. ते लोक आपसा मध्ये किती
भांडत आहेत. दारूगोळा इत्यादी वर किती खर्च करत आहेत. इथे तर खर्चाची कोणती गोष्टच
नाही. बिना कौडी खर्च सेकंदा मध्ये विश्वाची बादशाही घ्या. अल्फ ची आठवण करा. बे
बादशाही आहेच. बाबा म्हणतात जेवढे होईल, तेवढे खऱ्या मनाने खऱ्या साहेबाला प्रसन्न
करा, तर सत्यखंडाचे मालिक बनाल. खोटे येथे चालणार नाही. आठवण करायची आहे. असे नाही
कि, आम्ही तर मुले आहोतच. आठवण करण्या मध्ये फार मेहनत आहे. कोणतेही विकर्म केले तर
मोठ्या घोटाळ्या मध्ये याल. बुद्धी स्थिर राहणार नाही. बाबा तर अनुभवी आहेत ना. बाबा
सांगत राहतात. काही मुले स्वतःला मिया मिठू समजत आहेत, परंतु बाबा म्हणतात, फार
मेहनत आहे. माया फार विघ्न घालत आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आपल्या या
रुद्र यज्ञाचा फार आदर ठेवायचा आहे. यज्ञाचे वातावरण फार शुद्ध शक्तिशाली
बनविण्यासाठी सहयोगी बनायचे आहे. याचा प्रेमाने सांभाळ करायचा आहे.
(२) स्वतःजवळ कांही पण लपवून ठेवायचे नाही. मन स्वच्छ असेल तर सर्वकांही मिळेल. या
यज्ञाची कौडी कौडी अमुल्य आहे, त्यामुळे एक कौडी पण व्यर्थ घालवायची नाही. याच्या
वृद्धीसाठी सहयोग द्यायचा आहे.
वरदान:-
कारणा ला
निवारणा मध्ये परिवर्तन करून नेहमी पुढे जाणारे समर्थी स्वरुप भव:
ज्ञान मार्गामध्ये
जेवढे पुढे चालत राहाल, तेवढी माया वेगवेगळ्या रूपा मध्ये परीक्षा घेण्यासाठी येईल
कारण या परीक्षाच पुढे जाण्याचे साधन आहेत, ना की खाली पाडण्याचे. परंतु निवारणा
ऐवजी कारणा चा विचार करत राहाल तर वेळ आणि शक्ती व्यर्थ जाईल. कारणा ऐवजी निवारणाचा
विचार करा आणि एका बाबाच्या आठवणीच्या लगन मध्ये मगन राहा, तर समर्थी स्वरूप बनून
निर्विघ्न बनाल.
बोधवाक्य:-
महादानी ते
आहेत जे आपल्या दृष्टी, वृत्ती आणि स्मृतीच्या शक्ती द्वारे, शांतीचा अनुभव करवतील.