19-03-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलानो, हे शिक्षण कमाईचे साधन आहे, त्यामुळे तुम्ही मनुष्या पासून देवता बनत आहात,
२१ जन्मा साठी खरी कमाई होत आहे."
प्रश्न:-
बाबा ज्या गोड
गोड गोष्टी सांगत आहेत, त्या धारण केंव्हा होतील?
उत्तर:-
जेव्हा बुद्धीवर परमत आणि मनमता चा प्रभाव राहणार नाही. जी मुले दुसऱ्याचे ऐकून त्या
गोष्टीवर चालतात, त्यांच्या बुद्धी मध्ये धारणा होऊ शकत नाही. ज्ञाना शिवाय इतर
कांही पण कोणी सांगत असेल, तर तो तुमचा शत्रू आहे. खोट्या गोष्टी सांगणारे अनेक
आहेत. त्यामुळे वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, मनुष्या पासून देवता बनण्यासाठी एका
बाबाच्या श्रीमता वरच चालायचे आहे.
गीत:-
आमचे तीर्थ
वेगळे आहेत. . .
ओम शांती।
या गीता मध्ये जसे कि, स्वतःची महिमा काही केली आहे. खरे तर स्वतःची महिमा केली जात
नाही. या तर सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत. जे भारतवासी फार समजदार होते, ते आता
बेसमज बनले आहेत. आता प्रश्न निर्माण होत आहे कि, समजदार कोण होते? हे कुठे पण
लिहिले नाही. तुम्ही गुप्त आहात. किती आश्चर्यकारक गोष्टी आहेत. एक तर बाबा सांगत
आहेत कि, माझ्या द्वारेच मुले मला ओळखू शकतात. मग माझ्या द्वारेच सर्व कांही ओळखू
शकतात. सृष्टीच्या आदि,मध्य, अंताचा जो खेळ आहे, त्यांना समजू शकता. आणखीन कोणी पण
ओळखत नाहीत. आणखीन एक मुख्य चुक केली आहे कि, निराकार परमपिता परमात्म्या ऐवजी
कृष्णाचे नाव लिहले आहे. पहिल्या नंबरचा ग्रंथ ज्याला श्रीमद्भगवद्गीता म्हटले जाते,
ते चुकीचे झाले आहे. त्यामुळे पहिल्या प्रथम तर हे सिद्ध करायचे आहे कि, भगवान एक
आहे. मग विचारायचे आहे कि, गीतेचा भगवान कोण? भारताचा आदि सनातन देवी देवता धर्म आहे.
जर नवीन धर्म म्हटला तर ब्राह्मण धर्मच म्हणावा. प्रथम ब्राह्मण शेंडी आहे, मग देवता
आहेत. उंच ते उंच ब्राह्मण धर्म आहे. जे ब्राह्मण ब्रह्मा व्दारे परमपिता परमात्मा
रचत आहेत, तेच ब्राह्मण देवता बनत आहेत. मुख्य गोष्ट भगवान सर्वांचा पिता आहे. नवीन
दुनियेचा रचियता आहे, जरूर नवीन दुनियेची रचना करतील ना. नवीन दुनिये मध्ये नवा
भारत असतो. जन्म पण भारता मध्ये घेत आहेत. भारताला स्वर्ग बनवित आहेत ब्रह्मा द्वारे.
तुम्हाला आपले बनवून मग शिकवित आहेत, मनुष्याला देवता बनविण्यासाठी. प्रथम तुम्ही
शुद्र वर्णाचे होता. मग पुढे ब्राह्मण वर्णाचे, मग दैवीवर्णां मध्ये जाता, शेवटी
वृद्धी होत राहते. एका धर्मातून अनेक धर्म होतात. फांदया सर्व धर्माच्या बनत जातात,
प्रत्येक धर्माच्या निघत आहेत. तीन शाखा आहेत ना. ही मुख्य आहे. प्रत्येकातून
आपापल्या शाखा निघत आहेत. मुख्य पाया आहे. मग 3 शाखा मुख्य आहेत. आदि सनातन देवी
देवता धर्म खोड आहे. ते आता सर्व राजयोग शिकत आहेत. दिलवाला मंदिर फार चांगले
बनविलेले आहे, त्यामध्ये सारे रहस्य समजावले आहे. मुले इथे बसली आहेत. कल्पा पूर्वी
पण तुम्ही राजयोगाची तपस्या केली होती. जसे ख्रिस्तचे स्मृती स्थळ ख्रिश्चन
देशांमध्ये आहे. तसे तुम्हां मुलांनी इथे तपश्या केली आहे. तेव्हा तुमचे पण
स्मृतिस्थळ इथेच आहे. फार सोपे आहे, परंतु कोणी पण ओळखत नाहीत. संन्यासी लोक तर
म्हणतात कि, या सर्व कल्पना आहेत. जसे जे कल्पना करतात. तुमच्या साठी पण म्हणतात
कि, हे चित्र इत्यादी सर्व कल्पनेने बनविलेली आहेत. जोपर्यंत बाबा ला ओळखत नाहीत,
तोपर्यंत कल्पना समजत आहेत. ज्ञानसंपन्न तर एक बाबाच आहेत ना. तर मुख्य आहे बाबाचा
परिचय करून देणे. ते बाबा स्वर्गाचा वरसा देत आहेत. कल्पा पूर्वी पण दिला होता. मग
84 जन्म घ्यायचे आहेत. भारतवासी 84 जन्म घेत आहेत. मग संगमयुगावर बाबा येऊन राजधानी
ची स्थापना करत आहेत. तुम्ही मुलांनी बाबा द्वारे समजून घेतले आहे. जेंव्हा चांगल्या
रीतीने समजतील, बुद्धीमध्ये बसेल तेंव्हा खुशी मध्ये येत राहाल.
हे शिक्षण कमाईचे फार साधन आहे. शिक्षणानेच मनुष्य बॅरिस्टर इत्यादी बनत आहेत. परंतु
हे शिक्षण मनुष्याला देवता बनविणारे आहे. प्राप्ती किती भारी आहे. त्याच्या सारखी
प्राप्ती कोणी करू शकत नाहीत. ग्रंथा मध्ये पण गायन आहे कि, मनुष्याला देवता करताना
कांही घाव बसत नाहीत. परंतु मनुष्याची बुद्धी चालत नाही. जरूर तो देवी देवता धर्म
प्राय:लोप झालेला आहे. तेंव्हा तर लिहित आहेत कि, मनुष्या पासून देवता बनायचे. देवता
सतयुगा मध्ये होते. त्यांना जरूर भगवानाने संगमयुगावर रचले असेल. कसे रचले? ते ओळखत
नाहीत. गुरु नानकांनी पण परमात्म्याची महिमा केली आहे. त्यांच्या सारखी महिमा कोणी
केलेली नाही. त्यामुळे ग्रंथाला भारतामध्ये वाचत आहेत. गुरु नानकाचा कलियुगा मध्ये
अवतार होतो. ते धर्म स्थापक आहेत. राजाई तर शेवटी निर्माण झाली. बाबाने तर हा देवी
देवता धर्म स्थापन केला आहे. खरेतर नवीन दुनिया ब्राह्मणांची आहे. शेंडी जरी
ब्राह्मणाची असेल, परंतु राजधानी देवी देवता धर्म पासून सुरू होत आहे. तुम्हीं
ब्राह्मण रचले आहात. तुमची राजधानी नाही. तुम्ही स्वतःसाठी राजधानी स्थापन करत आहात.
फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. मनुष्य तर कांहीच जाणत नाहीत. पहिल्या प्रथम स्वतःला
माहित झाले तर आपल्या कडून दुसऱ्याला माहित होईल. तुम्ही क्षुद्रा पासून ब्राह्मण
बनले आहात. ब्रह्माला पण आता बाबा कडूनच माहित पडले आहे. एकाला सांगितले तर मुलांना
पण सांगायचे आहे. यांच्या तना द्वारे तुम्हा मुलांना समजावत आहेत. या अनुभवाच्या
गोष्टी आहेत. ग्रथा मधून तर कोणी कांही पण समजत नाहीत. बाबा म्हणतात, साऱ्या कल्पा
मध्ये एकाच वेळी मी असाच येऊन सांगत आहे. इतर अनेक अधर्माचा विनाश, एक धर्माची
स्थापना करत आहे. हा पाच हजार वर्षाचा खेळ आहे, तुम्ही मुले जाणत आहात. आम्ही 84
जन्म घेतले आहेत. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा दाखवतात. ब्रह्मा, विष्णू ही कोणाची
मुले आहेत? दोन्ही मुले शिवाची आहेत. ते रचयिता आहेत, ती रचना आहे. या गोष्टीला कोणी
समजू शकत नाहीत. बिल्कुल नवीन गोष्टी आहेत. बाबा पण सांगतात या नवीन गोष्टी आहेत.
कोणत्या शास्त्रां मध्ये या गोष्टी नाहीत. ज्ञानाचा सागर बाबा आहेत. तेच गीतेचे
भगवान आहेत. भक्ती मार्गा मध्ये शिवजयंती पण साजरी करतात. सतयुग, त्रेता मध्ये साजरी
करत नाहीत. तर जरुर संगमयुगा वरच येत असतील. या गोष्टी तुम्ही समजत आहात आणि इतरांना
सांगत आहात. सांगणाऱ्या बाबाची महिमा जी आहे, तीच मुलांची असली पाहिजे. तुम्हाला पण
मास्टर ज्ञानाचे सागर बनायचे आहे. प्रेमाचे सागर, सुखाचे सागर इथे बनायचे आहे.
कोणाला दुःख द्यायचे नाही. फार गोड बनायचे आहे. तुम्ही जे कडवट एकदम विषा सारखे
होता,आत्ता परत तुम्ही निर्विकारी ब्राह्मण बनत आहात. ईश्वराची संतान बनत आहात.
विकारी पासून निर्विकारी देवता बनत आहात. अर्धा कल्प तुम्ही पतित बनत बनले, आता
फारच जडजडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहात. जीर्ण कपड्याला सटका लावला तर तो फाटून
जातो. इथे पण ज्ञानाचे सटके लावले तर तुटून जातात. कोणाचे कापड इतके घाण असते, जे
साफ करण्यासाठी फार वेळ लागतो. मग तिथे पण हलके पद मिळते. बाबा धोबी आहेत. तुम्ही
त्यांच्या बरोबर मदतगार आहात. धोबी पण नंबरवार आहेत. इथे पण नंबरवार आहेत. धोबीने
चांगले कपडे स्वच्छ केले नाहीत, तर त्यांना नाव्ही म्हणतात. आज काल कपडे साफ स्वच्छ
करण्यासाठी शिकले आहेत. पुर्वी गावा मध्ये तर फारच अस्वच्छ कपड्यांची धुलाई होत होती.
ही कला पण बाहेरच्या कडून आली आहे. बाहेरचे थोडी इज्जत देत आहेत. पैसे इत्यादीची
मदत करत आहेत. ते जाणत आहेत कि, हे फार मोठ्या वंशावळीचे आहेत. आता खाली उतरले आहेत.
जे खाली आले आहेत, त्यांच्यावर दया येते ना. बाबा म्हणतात, तुम्हाला किती धनवान
बनविले होते. मायेने काय हालत करून टाकली आहे. तुम्ही आता समजत आहात. आम्ही विजय
माळे मध्ये होतो. मग 84 जन्म घेऊन, आता काय बनले आहोत, आश्चर्य आहे ना. तुम्ही
समजावून सांगू शकता. तुम्ही भारतवासी तर स्वर्गवासी होता. भारत स्वर्ग होता. मग खाली
उतरत उतरत नर्कवासी पण बनायचे आहे. आता बाबा सांगत आहेत, पवित्र बनून स्वर्गवासी बना.
मनमनाभव. शिवभगवानुवाच, माझी एकट्याची आठवण करा. आठवणीच्या यात्रेने तुमचे सर्व
पाप नाहीसे होतील. ग्रंथा मध्ये लिहिले आहे, कृष्णाने पळवून नेहले. पटराणी बनविले.
तुम्ही सर्व शिकत आहात, पटरानी बनण्यासाठी. परंतु या गोष्टीला कोणी समजू शकत नाहीत.
आता बाबांनी येऊन मुलांना समजावले आहे. बाबा सांगत आहेत, मी कल्प, कल्प तुम्हाला
समजावून सांगण्यासाठी येत आहे. तर प्रथम भगवान एक आहे, हे सिद्ध करून मग सांगा,
गीतेचा भगवान कोण आहे. राजयोग कोणी शिकविला आहे ? भगवानच ब्रह्मा द्वारा स्थापना
करत आहेत. नंतर विनाश, मग पालना करत आहेत. हे जे ब्राह्मण आहेत तेच मग देवता बनत
आहेत. या गोष्टी पण ते समजून घेतील, ज्यांनी कल्पा पूर्वी समजले आहेत. सेकंदा
सेकंदाला जे होत आहे, या वेळेपर्यंत ते समजतील. नाटका मध्ये तुम्हाला फार पुरषार्थ
करायचा आहे, हे तर मुले समजत आहेत. आता आमची ती अवस्था बनलेली नाही. वेळ लागेल
कर्मातीत अवस्था होऊन जाईल. तर मग सर्व नंबरवार पास होतील. त्यानंतर मग लढाई पण
लागेल. आपसा मध्ये खिटपिट होत राहते. तुम्ही जाणत आहात, जिकडे तिकडे पाहा, युद्धाची
तयारी करत आहेत. सर्वत्र तयारी करत आहेत. तुम्ही जे कांही दिव्यदृष्टी द्वारे पाहिले
आहे, ते मग या डोळ्याने पाहाल. विनाशा चा साक्षात्कार केलेला आहे, मग ते तसे
डोळ्यानी पाहाल. स्थापनेचा पण साक्षात्कार केलेला आहे. मग प्रत्यक्षात राजाई पण
पाहाल. तुम्हा मुलांना तर फार खुशी झाली पाहिजे. हे तर जुने शरीर आहे. योगाद्वारे
आत्मा पवित्र बनत आहेत, मग हे जुने शरीर पण सोडायचे आहे. 84 जन्माचे चक्र पूर्ण होत
आहे. मग जरूर सर्वांना नवीन शरीर मिळेल. या पण समजण्याच्या फार सोप्या गोष्टी आहेत.
सांगू पण शकता कि, कलियुगा नंतर सतयुग जरूर येईल. अनेक धर्मांचा विनाश जरूर होणार
आहे. मग आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापने साठी बाबाला यावे लागते. आता तुम्हीं
ब्राह्मण बनले आहात, देवता बनण्यासाठी. दुसरे कोणी होऊ शकत नाहीत. तुम्ही जाणत आहात,
आम्ही शिवबाबाचे बनले आहोत. शिवबाबा आम्हाला वरसा देत आहेत.
शिवजयंती म्हणजेच भारताला वरसा मिळाला आहे. शिवबाबा आले होते, येऊन काय केले.
इस्लामी, बौध्दी इत्यादीने तर येऊन, आपला धर्म स्थापन केला. बाबांनी येऊन काय केले?
जरूर स्वर्गाची स्थापना केली. कशी स्थापना केली, कशी स्थापना होत आहे, ते तुम्हीं
जाणत आहात. मग सतयुगा मध्ये हे सर्व विसरून जाल. हे पण समज आहात, 21 जन्माचा वरसा
आता आम्ही घेत आहोत. हे विश्व नाटका मध्ये नोंदले आहे. जरी तिथे समजतात हे पिता
आहेत, हा मुलगा आहे, मुलांना वरसा मिळत आहे. परंतु ती प्रालब्ध आताचीच आहे. खरी
कमाई करून 21 जन्मासाठी, तुम्हीं वरसा पण आता प्राप्त करत आहात. 84 जन्म तर
घ्यायचेच आहेत. सतोप्रधान पासून मग सतो,रजो,तमो मध्ये यायचे आहे. हे चांगल्या रीतीने
आठवण केल्यामुळे मग खुशी मध्ये पण राहाल. समजावून सांगण्या मध्ये फार मेहनत लागते.
जेंव्हा समजतात, तेंव्हा त्यांना फार खुशी होते.जी मुले चांगल्या रीतीने समजतात, ते
मग इतरांना समजावत राहतात. काट्याला फुल बनवित राहतात. हे बेहदचे शिक्षण आहे. वर्सा
पण बेहदचा मिळत आहे. मग यामध्ये त्याग पण बेहदचा आहे. गृहस्थ व्यवहारा मध्ये राहून,
साऱ्या दुनिये चा त्याग करायचा आहे, कारण तुम्ही जाणत आहात कि,ही जुनी दुनिया नाहीशी
होत आहे. आता नवीन दुनिये मध्ये जायचे आहे, त्यामुळे बेहदचा संन्यास करायचा आहे.
संन्याशींचा आहे हदचा संन्यास, आणि त्यांचा हठयोग आहे. यामध्ये हठयोगाची कोणती
गोष्टच नाही. हे तर शिक्षण आहे. पाठशाळे मध्ये शिकायचे आहे. मनुष्या पासून देवता
बनण्यासाठी. शिवभगवानुवाच, कृष्ण होऊ शकत नाहीत. कृष्ण कधी नवीन दुनिया बनवू शकत
नाहीत. त्यांना स्वर्गीय ईश्वरीय पिता म्हटले जात नाही. स्वर्गीय राजकुमार कृष्णाला
म्हणतात. किती गोड गोड गोष्टी समजून घ्यायच्या आणि धारण करायच्या आहेत. दैवी लक्षण
पण पाहिजेत. कधी पण इतर ऐकलेल्या गोष्टी वर चालायचे नाही. व्यासा च्या लिहिलेल्या
गोष्टीवर चालून चालून वाईट गती झाली आहे ना. शिवाय ज्ञानाच्या इतर कोणी कांही सांगत
असेल तर समजा, हा आमचा शत्रू आहे. दुर्गती मध्ये घेऊन जात आहेत. कधी पण परमतावर
चालायचे नाही. मनमत, परमतावर चालला तर हा मेला. बाबा समजावून सांगत आहेत, खोट्या
गोष्टी बोलणारे तर फार आहेत. तुम्हाला बाबा कडूनच ऐकायचे आहे. वाईट ऐकू नका, वाईट
पाहू नका. . . बापदादा आलेच आहेत, मनुष्याला देवता बनविण्यासाठी, तर त्यांच्या
श्रीमतावर चालले पाहिजे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) इथे बाबा
सारखे सुखाचे सागर, प्रेमाचे सागर बनायचे आहे. सर्व गुण धारण करायचे आहेत. कोणाला
पण दुःख द्यायचे नाही.
(२) ऐकलेल्या गोष्टीवर कधी विश्वास ठेवायचा नाही. परमता वर चालायचे नाही. वाईट ऐकू
नका, वाईट पाहू नका. . .
वरदान:-
ब्राह्मण
जीवनातील निती आणि रिती नुसार नेहमी चालणारे व्यर्थ संकल्प मुक्त भव:
जे ब्राह्मण जीवनाची
नीती आणि रीती नुसार नेहमी श्रीमताची आज्ञा आठवणी मध्ये ठेवतात आणि सारा दिवस शुद्ध
प्रवृत्ती मध्ये व्यस्त राहतात, त्यांच्या वर व्यर्थ संकल्प रुपी रावण वार करू शकत
नाही. बुद्धीची प्रवृती शुद्ध संकल्प करणे आहे, वाणीची प्रवृत्ती बाबाद्वारे जे ऐकले
ते सांगायचे आहे, कर्माची प्रवृत्ती कर्मयोगी बनून प्रत्येक कर्म करायचे आहे. या
प्रवृत्ती मध्ये व्यस्त राहणारे, व्यर्थ संकल्पा पासून निवृत्ती प्राप्त करतात.
बोधवाक्य:-
आपल्या
प्रत्येक नवीन संकल्पा द्वारे, नवीन दुनियेतील, नवीन झलक चा साक्षात्कार करा.