11-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, विजयी माळेमध्ये येण्यासाठी निरंतर बाबांची आठवण करा,आपला वेळ वाया घालू नका, राजयोगा च्या अभ्यासा वरती पूर्णपणे ध्यान द्या"

प्रश्न:-
शिवपिता आपल्या मुलांना कोणती एक विनंती करतात?

उत्तर:-
गोड मुलांनो,बाबा विनंती करतात की,चांगल्या रीतीने अभ्यास करत राहा.शिव पित्याच्या गाडीची लाज ठेवा. असे कोणते खराब काम करू नका, ज्यामुळे बाबांचे नाव बदनाम होईल. सत बाप,सत शिक्षक,सद्गुरूची कधी निंदा करू नका.प्रतिज्ञा करा जोपर्यंत राजयोगाचे शिक्षण आहे,तोपर्यंत पवित्र जरूर राहायचे आहे.

गीत:-
तुम्हाला प्राप्त केल्यानंतर सर्व काही मिळाले..

ओम शांती।
हे कोणी म्हटले की तुम्हाला प्राप्त केल्यानंतर सर्व काही मिळाले. आता तुम्ही विद्यार्थी आहात,तर मुलं पण आहात.तुम्ही जाणतात बेहदचे बाबा आम्हा मुलांना विश्वाचे मालक बनवण्या साठी आले आहेत.त्यांच्या समोर आम्ही बसलो आहोत आणि आम्ही राजयोग शिकत आहोत म्हणजेच विश्वाचे ताजधारी राजकुमार राजकुमारी बनण्यासाठी.तुम्ही येथे शिकण्यासाठी आले आहात.हे गित तर भक्ती मार्गातील आहे.बुद्धी द्वारे मुलं जाणतात,आम्ही विश्वाचे राजकुमार कुमारी बनू.बाबा ज्ञानाचे सागर आहेत,सर्वोच्च आत्मिक शिक्षक,आत्म्याला सन्मुख शिकवत आहेत.आत्मा या शरीररूपी कर्मेंद्रिया द्वारे जाणते की,आम्ही बाबाकडून विश्वाचे ताजधारी,राजकुमार राजकुमारी बनण्यासाठी पाठशाला मध्ये बसलो आहोत.खूप नशा राहायला पाहिजे. आपल्या मनाला विचारा,इतका नशा,आम्हा विद्यार्थ्यांमध्ये आहे काय? नवीन गोष्ट पण नाही.आम्ही कल्प कल्फ विश्वाचे ताजधारी राजकुमार राजकुमारी,बनण्यासाठी बाबा कडे आलो आहोत. जे बाबा पिता पण आहेत आणि शिक्षक पण आहेत.बाबा विचारतात,तर सर्वजण म्हणतात,आम्ही तर सूर्यवंशी ताजधारी, राजकुमार राजकुमारी किंवा लक्ष्मी नारायण बनू.आपल्या मनाला विचारायला पाहिजे,आम्ही असा पुरषार्थ करतो का?बेहदचे बाबा जे स्वर्गाचा वारसा देण्यासाठी आले आहेत,ते आमचे पिता, शिक्षक,गुरु पण आहेत,तर जरुर वारसा पण जरुर श्रेष्ठ ते श्रेष्ठ देतील ना.पाहयचे आहे,आम्हाला इतकी खुशी आहे की आज आम्ही शिकत आहोत,ऊद्या ताजधारी राजकुमार बनू,कारण हे संगम युग आहे ना. तर या किनार्‍यावरती आहात,त्या स्वर्गाच्या किनार्‍याला जाण्यासाठी शिकत आहात.तेथे तर सर्वगुणसंपन्न १६कला संपन्न बणून जायचे आहे.आम्ही असे लाईक बनलो आहोत,हे आपल्या मनाला विचारायचे आहे.एका नारद भक्ता ची गोष्ट नाही.तुम्ही सर्व भक्त होते,बाबा भक्ती पासून सोडवतात.तुम्ही जाणतात आम्ही त्याची मुलं बनलो आहोत,त्यांच्याकडून वारसा घेण्यासाठी,विश्वाचे ताजधारी राजकुमार बनण्यासाठी आलो आहोत. बाबा म्हणतात खुशाल आपल्या ग्रहस्त व्यवहारांमध्ये राहा.वानप्रस्थ अवस्था असणाऱ्यांना ग्रहस्थ व्यवहारा मध्ये राहायचे नाही आणि कुमार कुमारींना पण ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत नाहीत.त्यांना आपले विद्यार्थी जीवन आहे.ब्रह्मचर्य मध्येच शिक्षण घेतात.आत्ता हे शिक्षण पण खूप श्रेष्ठ आहे,यामध्ये पवित्र बनायचे आहे, नेहमीसाठी.तेथे ब्रह्मचर्य मध्ये शिकून परत विकारांमध्ये जातात.येथे तुम्ही ब्रह्मचर्य मध्ये राहून पूर्ण शिक्षण घेत आहात.बाबा म्हणतात मी पवित्रते चा सागर आहे, तुम्हाला पण बनवतो.तुम्ही जाणतात अर्धा कल्प आम्ही पवित्र राहत होतो.बाबा बरोबर प्रतिज्ञा पण केली होती,बाबा का नाही,आम्ही पवित्र बणुन पवित्र दुनियेचे मालक बनायचे?बाबा खूप श्रेष्ठ आहेत,जरी साधारण तना मध्ये आहेत परंतु आत्म्याला नशा तर चढतो ना.बाबा आले आहेत,पवित्र बनवण्यासाठी.बाबा म्हणतात,तुम्ही विकारांमध्ये जात जात,वेश्यालय मध्ये पडले आहात.तुम्ही सतयुगा मध्ये पवित्र होते,हे राधे कृष्ण पवित्र राजकुमार राजकुमारी आहेत ना.रुद्र माळ पण पहा, विष्णू ची माळ पण पहा.रुद्रमाळ तीच विष्णुची माळा बनेल. विजयंती माळेमध्ये येण्यासाठी बाबा समजवतात,प्रथम तर निरंतर बाबाची आठवण करा,आपला वेळ वाया घालवू नका.पैशाच्या पाठीमागे लागुन माकडासारखे बनू नका.माकडं फुटाणे खातात.आत्ता बाबा तुम्हाला ज्ञान रत्न देत आहेत,परत कवड्या किंवा फुटाण्याच्या पाठीमागे गेले तर काय हाल होतील? रावणाच्या जेल मध्ये चालले जाल.बाबा येऊन जेल पासून सोडवतात.बाबा म्हणतात,देहाचे सर्व संबंधाचा बुद्धीने त्याग करा. स्वतःला आत्मा निश्चय करा.बाबा म्हणतात,मी कल्प कल्प भारता मधेच येतो, भारतवासी मुलांनाच राजकुमार राजकुमारी बनवतो.खूप सहज शिकवतात, असे पण म्हणत नाहित,काही ४-८ तास येथे येऊन बसा, नाही. ग्रहस्थ व्यवहारा मध्ये राहत,स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तर,तुम्ही पतिता पासून पावन बनाल.विकारांमध्ये जाणाऱ्यांना पतित म्हटले जाते.देवता पावन आहेत,म्हणुन त्यांच्या महिमा चे गायन आहे.बाबा समजवतात ते अल्प काळाचे क्षणभंगुर सुख आहे.सन्याशी म्हणतात,सुख काग विष्टा समान आहे. परंतु त्यांना हे माहित नाही की,देवतांना खूप सुख आहे.नावच आहे सुखधाम.हे दुःख धाम आहे.या गोष्टीला दुनिये मधील कोणी जाणत नाहीत.बाबा येऊन कल्प कल्प समवजतात,देही अभिमानी बनवतात.स्वतःला आत्मा समजा.तुम्ही आत्मा आहात, ना की शरीर.देहाचे तुम्ही मालक आहात. देह तुमचा मालक नाही.८४ जन्म घेत घेत तुम्ही तमोप्रधान बनले आहात. तुमचे मन आणि शरीर दोन्ही पतित बनले आहेत.देह अभिमानी बनल्यामुळे तुमच्या द्वारे पाप कर्म होत आले आहेत.आता तुम्हाला देही अभिमानी बनायचे आहे, माझ्या सोबत घरी यायचे आहे.आत्मा आणि शरीर दोघांना शुद्ध बनवण्यासाठी बाबा म्हणतात, मनमनाभव.बाबांनी तुम्हाला रावण राज्या पासून अर्धा कल्पा साठी स्वतंत्रता दिली होती. आता परत स्वतंत्रता देत आहेत. तुम्ही स्वतंत्र राज्य करत होते.तेथे पाच विकाराचे नाव नाही.आत्त श्रीमता वरती चालून श्रेष्ठ बनायचे आहे,तर स्वतःला विचारा आमच्यामध्ये विकार किती आहेत. बाबा म्हणतात एक तर माझीच आठवण करा आणि कोणते भांडण करू नका,नाहीतर तुम्ही पवित्र कसे बनवा.तुम्ही इथे आला आहात विजय माळे मध्ये गुंफण्या साठी,येण्यासाठी.नापास झाले तर माळेमध्ये येऊ शकणार नाही. कल्प कल्पाची बादशाही गमावून बसाल. परत अंत काळात खूप पश्चाताप करावा लागेल.त्या शिक्षणा मध्ये पण रजिस्टर राहते.लक्षणं पण दिसतात. हे पण शिक्षण आहे.सकाळी उठून तुम्ही स्वतः अभ्यास करत राहा. दिवसा तर काम करायचे आहे.वेळ मिळत नाही तर,भक्ती पण मनुष्य सकाळी उठून करतात.हा तर ज्ञानमार्ग आहे.भक्ती मध्ये पूजा करत करत,परत बुद्धी मध्ये कोणत्या-ना कोणत्या देहधारी ची आठवण येत राहते.येथे पण तुम्ही बाबाची अआठवण करतात,परत धंदा इत्यादी आठवणीत येतो.बाबांची आठवण करा तेवढे पाप नष्ट होतील.

तुम्ही मुलं पुरुषार्थ करत करत,जेव्हा बिलकुल पवित्र बनाल,तेव्हा माळा पुर्ण बनेल. पूर्ण पुरुषार्थ केला नाही तर प्रजे मध्ये चालले जाल.चांगल्या प्रकारे योग लावाल,आपले सामान भविष्यासाठी परिवर्तन कराल,तर त्या मोबदल्या मध्ये भविष्यात मिळेल. ईश्वर अर्थ दान देतात तर दुसऱ्या जन्मात त्याचा मोबदला मिळतो. आता बाबा म्हणतात,मी प्रत्यक्ष आलो आहे.आता तुम्ही जे काही करता,ते आपल्या भविष्यासाठी करता.मनुष्य दान पुण्य करतात ते अप्रत्यक्ष.या वेळेत तुम्ही बाबांची खूप मदत करतात.तुम्ही जाणतात हे पैसे इ.सर्व नष्ट होतील,तर का नाही बाबांचे मदतगार बनायचे.बाबा राजाई कशी स्थापन करतील.कोणते लष्कर सेना किंवा दारूगोळा इ नाही.सर्व काय गुप्त आहे.कन्या ला हुंडा पण कोणी कोणी गुप्त दान देतात.पेटी बंद करून चावी हातामध्ये देतात. काही तर खूप दिखावा करतात.काही जण गुप्तदान देतात.बाबा पण म्हणतात तुम्ही तर सजनी आहात, तुम्हाला मी विश्वाचे मालक बनवण्यासाठी आलो आहे.तुम्ही गुप्त मदत करत आहात.आत्मा जाणते,या मध्ये बाहेरचा दिखावा काहीच नाही. ही विकारी पतितक दुनिया आहे. सृष्टीची वृद्धी होणारचआहे,आत्म्यांना जरूर यायचे आहे.जन्म तर आणखीन जास्तच होतील.असे म्हणतात या हिशोबाने धान्य मिळणार नाही.ही आसुरी बुद्धी आहे.तुम्हा मुलांना ईश्वरीय बुध्दी मिळाली आहे.भगवान शिकवत आहेत,तर त्यांचा खूप आदर ठेवायला पाहिजे,खूप चांगल्या रीतीने शिकायला पाहिजे.काही मुलं आहेत ज्यांना अभ्यासाची आवड नाही.तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये तर हे राहायला पाहिजे,की आम्ही बाबा द्वारे ताजधारी राजकुमार राजकुमारी बनत आहोत.आता बाबा म्हणतात,माझ्या मता वरती चाला. माझी आठवण करा.तुम्ही सारखे म्हणता,आम्ही विसरतो.जर विद्यार्थी म्हणतील आम्ही अभ्यास विसरतो तर शिक्षक काय करणार?आठवण करणार नाहीतर विकर्म विनाश होणार नाहीत.शिक्षक सर्वा वरती कृपा किंवा आशीर्वाद करतील का? येथे आशीर्वाद किंवा कृपे ची गोष्ट नाही.बाबा म्हणतात तुम्ही अभ्यास करत रहा.जरी धंदा इत्यादी करतात परंतु शिक्षण जरुरी आहे.तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे, दुसऱ्यांना पण रस्ता दाखवत रहा. मनाला विचारायला पाहिजे आम्ही बाबांची सेवा किती करतो.किती लोकांना आपल्यासारखे पवित्र बनवतो.त्रिमूर्तीचे चित्र समोर आहे.हे शिवबाबा आहेत,ते ब्रह्मा आहेत.या शिक्षणाद्वारे हे बनतात,परत 84 जन्मा नंतर असे बनाल.शिवबाबा, ब्रह्मा मध्ये प्रवेश करून ब्राह्मणां ना असे श्रेष्ठ बनवत आहेत.तुम्ही ब्राह्मण बनले आहात,आता आपल्या मनाला विचारायचे आहे,आम्ही पवित्र बनलो आहोत?दैवी गुण धारण करत आहोत?जुन्या देहाला विसरलो आहोत? ही तर पुराणी चप्पल आहे ना.आत्मा पवित्र बनेल तर चप्पल पण म्हणजे शरीर पण चांगले मिळेल.हे जुने शरीर सोडून नवीन शरीर घेऊ.हे चक्र फिरत राहते.आज जुन्या चप्पल म्हणजे जुन्या शरीरा मध्ये आहोत,उद्या आम्ही देवता बनू इच्छितो.बाबा द्वारा भविष्य अर्ध्या कल्पासाठी विश्वाचे ताजधारी राजकुमार राजकुमारी बनत आहोत.आमच्या त्या राजाईला कोणी हिरावून घेऊ शकत नाही.तर बाबाच्या श्रीमता वरती चालायला पाहिजे ना.स्वतःला विचारा आम्ही किती आठवण करतो,किती स्वदर्शन चक्रधारी बनतो आणि बनवतो.जे करतील ते मिळवतील.बाबा रोज शिकवतात.सर्वांच्या जवळ मुरली तर जाते.अच्छा मुरली मिळाले नाही, सात दिवसाचा साप्ताहिक कोर्स तर घेतला आहे ना,बुद्धीमध्ये ज्ञान तर आले आहे ना.सुरुवातीला भट्टी बनली,परत कोणी कच्चे निघाले, कारण मायेचे वादळ पण येते ना. सहा-आठ महिने पवित्र बणुन परत देह अभिमाना मध्ये येऊन आपलाच घात करतात.माया खूप प्रबळ आहे. अर्ध्या कल्पा पासून हार खाल्ली आहे.आत्ता पण हार खाल तर, आपले पद गमावून बसाल. क्रमानुसार पद तर आहेत ना.कोणी राजा राणी,कोणी वजीर,कोणी प्रजा, कोणाला हिऱ्या मोत्यांचे महल पण मिळतील.प्रजे मध्ये पण कोणी खूप सावकार असतात,हिऱ्या मोत्यांचे महल असतात,येथे पण पहा,प्रजे कडून कर्ज घेत राहतात.तर प्रजा सावकार झाली की राजा? अंधेर नगरी आहे ना,या आत्ताच्या गोष्टी आहेत.आता तुम्हा मुलांना निश्चय राहायचा आहे की,आम्ही विश्वाचे ताजधारी,राजकुमार कुमारी बनण्यासाठी शिकत आहोत.आम्ही वकील किंवा इंजिनिअर बनू,तर हे कधी कॉलेजमध्ये विसरतात का? काही तर चालता-चालता मायाच्या वादळामुळे शिक्षण सोडून देतात. . बाबा आपल्या मुलांना एक विनंती करतात,गोड मुलांनो चांगल्या रीतीने शिक्षण घ्याल तर चांगले पद मिळवाल.पित्याच्या दाढीची लाज ठेवा,तुम्ही असे कोणते खराब काम करू नका,ज्यामुळे बाबांचे नाव बदनाम होईल.सत शिक्षक,सत पिता, सद्गुरूची निंदा करणारे कधीच उच्चपद प्राप्त करू शकत नाहीत.या वेळेत तुम्ही हिऱ्या सारखे बनतात,तर कवडीच्या पाठीमागे का लागायला पाहिजे? बाबांना साक्षात्कार झाला तर,लगेच हिऱ्याचा धंदा सोडून दिला.अरे २१ जन्मासाठी बादशाही मिळते,परत हे काय करणार ?सर्व काही दिले.आम्ही तर विश्वाची बादशाही घेत आहोत.हे पण जाणतात विनाश होणार आहे.आता शिक्षण नाही घेतले,तर फार उशीर होईल,परत पश्चाताप करावा लागेल. मुलांना सर्व साक्षात्कार होईल.बाबा म्हणतात,तुम्ही बोलवताच हे पतित पावन या.आता मी पतित दुनिये मध्ये,तुमच्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला म्हणतो पावन बना.तुम्ही परत सारखे सारखे विकारांमध्ये जातात.मी तर काळाचा काळ आहे. काळ आहे सर्वांना घेऊन जातो. स्वर्गामध्ये जाण्यासाठी बाबा येऊन रस्ता दाखवतात. बाबा ज्ञान देतात की सृष्टीचक्र कसे फिरते. हे बेहदचे ज्ञान आहे.ज्यांनी कल्पा पूर्वी शिकले आहे,तेच येऊन शिकतील.तो पण साक्षात्कार होत राहील.निश्चय होईल की,बेहदचे बाबा आले आहेत,ज्या भगवंताला भेटण्यासाठी एवढी भक्ती केली,ते येऊन शिकवत आहेत.अशा भगवान पित्याशी आम्ही वार्तालाप तर करू. बाबांना खूप आनंदा मध्ये येऊन भेटायला पाहिजे,जर पक्का निश्चय असेल तर.फसवण्याची गोष्ट तर नाही.असे पण खूप आहेत,पवित्र बनत नाहीत,दररोज मुरली ऐकत नाहीत,तरी म्हणतात,आम्हाला बाबांच्या कडे घेऊन चला.असेच फिरण्यासाठी येतात.बाबा मुलांना समजवतात,तुम्हा मुलांना गुप्त आपली राजधानी स्थापन करायची आहे.पवित्र बनाल,तर तमोप्रधान पासून,सतोप्रधान बनाल.हा राजयोग बाबाच शिकवतात.बाकी ते तर हठयोगी आहेत.बाबा म्हणतात,स्वताला आत्मा समजुन माझी आठवण करा.हा निश्चय ठेवा की,आम्ही बेहदच्या बाबाकडून विश्वाचे ताजधारी राजकुमार राजकुमारी,बनण्यासाठी आलो आहोत,परत श्रीमता वर पण चालायला पाहिजे ना.माया अशी आहे,जे बुद्धी योग तोडते.बाबा समर्थ आहेत,तर माया पण समर्थ आहे.अर्धाकल्प रामराज्य आहे,अर्धा कल्प रावण राज्य आहे.हे पण कोणी जाणत नाहीत.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती,मातपिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदा नशा राहावा की,आम्ही आज शिकत आहोत,उद्या राजकुमार राजकुमारी बनू.स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे,आम्ही असा पुरुषार्थ करतो का?बाबांचा इतका आदर आहे? राजयोगाच्या अभ्यासाची आवड आहे?

२) बाबांच्या कर्तव्या मध्ये गुप्त रितीने मदतगार बनायचे आहे. भविष्यासाठी आपले सामान परिवर्तन करायचे आहे.कवडी च्या पाठीमागे लागून, वेळ न घालवता,हिऱ्या सारखा बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
संतुष्टते च्या विशेषते द्वारा सेवांमध्ये सफलता मूर्त बनणारे संतुष्टमणी भव.

सेवेचा विशेष गुण संतुष्टता आहे.जर नाव सेवा आहे आणि स्वतः पण नाराज होतात किंवा दुसऱ्याला नाराज करतात,तर अशी सेवा न करणे चांगले आहे.तर जिथे स्वतःच्या प्रती किंवा संपर्का मध्ये संतुष्टता नाही,ती सेवा न स्वतःला फळाची प्राप्ती करवते,न दुसऱ्यांना म्हणून प्रथम एकांतवासी बणुन स्वतःच्या परिवर्तना द्वारे संतुष्टमणीचे वरदान प्राप्त करून,परत सेवा करा,तेव्हा सफलता मूर्त बनाल.

बोधवाक्य:-
दगडाला तोडण्या मध्ये वेळ न घालवता,त्याला उडी मारून पार करा.