ओम शांती. आत्मिक मुलांना हा तर निश्चय आहे की,आम्हाला आत्माभिमानी बनायचे आहे आणि बाबांची आठवण करायचे आहे.माया रुपी रावण जो आहे,श्रापित व दुःखी बनवतो. श्राप अक्षरच दुःखाच्या आहे, वारसा अक्षर सुखाचे आहे.जी मुलं इमानदार आज्ञाधारक आहेत ते चांगल्या रीतीने जाणतात.जो आज्ञाधारक नाही तो मुलगाच नाही,जरी स्वतःला काही पण समजतात परंतु बाबाच्या हृदयावर चढू शकत नाहीत,वारसा मिळू शकत नाही.जे मायेच्या मतानुसार चालतात आणि बाबांच्या आठवण करत नाहीत, कुणाला समजावून सांगू शकत नाहीत, म्हणजे स्वतःलाच श्रापित करतात.मुलं जाणतात माया खूपच जबरदस्त आहे.जर बेहदच्या बाबांना मानत नाहीत म्हणजेच मायेला मानतात.अशी म्हण आहे ना,प्रभूची आज्ञा डोक्या वरती. तर बाबा म्हणतात,मुलांनो पुरुषार्थ करून बाबांची आठवण करा,तर मायेच्या गोदी मधून निघून प्रभूच्या गोदीमध्ये याल.बाबा तर बुद्धिवानांचा बुद्धिवान आहे.बाबाचे नाही म्हणणार तर बुद्धीला कुलूप लागेल.कुलुप उघडणारे तर एकच बाबा आहेत.श्रीमत वरती चालणार नाही तर त्यांचे काय हाल होतील? मायेच्या मतावर काहीच पद मिळू शकणार नाही,जरी ऐकतात परंतु सुधारणा करू शकत नाहीत,ना दुसऱ्यांना करवू शकतात,तर त्यांचे काय हाल होतील?बाबा तर गरिब निवास आहेत.मनुष्य गरिबांना दान देतात,तर बाबा पण येऊन बेहदचे दान करतात. ज श्रीमता वरती चालत नाही तर एकदम बुद्धीला कुलूप लागेल,परत काय प्राप्ती करतील.श्रीमत वरती चालणारी बाबांची मुलं आहेत.बाबा तर दयावान आहेत.असे समजतात बाहेर गेल्यानंतर माया एकदम नष्ट करेल. कोणी अपघात करतात तर स्वतःच आपला सत्यानाश करतात.बाब तर समजावत राहतात,आपल्यावरती दया करा आणि स्वतःच्या मता वरती चालू नका.श्रीमता वरती चालल्या मुळे खुशीचा पारा चढेल,लक्ष्मी नारायणचा चेहरा कसा आनंदी आहे,पहा.बाबा अविनाश ज्ञानरत्न देतात तर त्यांचा निराधार का करायला पाहिजे? ज्ञान रत्ना झोळी द्वारे भरायला पाहिजे परंतु झोळी भरत नाहीत कारण बाबांची आठवण करत नाहीत.आसुरी चलन चालतात.बाबा अनेक वेळेस समजवत राहतात,स्वता:वरती दया करा आणि दैवी गुणांची धारणा करा.मनुष्य खूप धक्के खात राहतात.संन्याशी इत्यादीं च्या कडे जात राहतात.असे समजतात मनाला शांती पाहिजे, वास्तव मध्ये हे अक्षर चुकीचे आहे,याचा काहीच अर्थ नाही.शांती तर आत्म्याला पाहिजे ना. आत्मा स्वतः शांत स्वरूप आहे,असे पण नाही म्हणत की आत्म्याला शांती कशी मिळेल? असे म्हणतात मनाला शांती कसे मिळेल.आता मन काय आहे, बुद्धी काय आहे,आत्मा काय आहे? काहीच जाणत नाहीत.जे काही म्हणतात किंवा करतात ते सर्व भक्ती मार्गातील आहे.भक्तीमार्ग खाली उतरत उतरत जातात.जरी कोणाच्या जवळ खूप धनसंपत्ती आहे परंतु तरीही रावण राज्यातच आहेत ना.
तुम्हा मुलांना चित्रा वरती समजवण्याचा पण खूप अभ्यास करायचा आहे.बाबा सर्व सेवा केंद्रावर वरील मुलांना समजावत राहतात, क्रमानुसार तर आहेत ना.काही मुलं राज्यपद मिळवण्याचा पुरूषार्थ करत नाहीत तर प्रजा मध्ये जाऊन कोणते पद मिळवतील.सेवा करत नाही तर स्वतः वरती दया करत नाहीत,की आपण काय बनू परत समजले जाते नाटकांमध्ये यांची भूमिका अशीच आहे. स्वतःचे कल्याण करण्यासाठी ज्ञानाच्या सोबत योग पण पाहिजे.योगा मध्ये राहत नाही तर काहीच कल्याण होत नाही. योगा शिवाय पावन बनू शकत नाहीत.ज्ञान तर खूप सहज आहे परंतु स्वतःचे कल्याण पण करायचे आहे. योगामध्ये न राहिल्यामुळे काहीच कल्याण होत नाही.योगा शिवाय पावन कसे बनाल?ज्ञान वेगळी गोष्ट आहे,योग वेगळी गोष्ट आहे.योगा मध्ये खूप कच्चे आहेत.बाबांची आठवण करण्याची अक्कलच येत नाही. तर आठवणी शिवाय विकर्म विनाश कसे होतील, परत सजा खूप खावी लागेल,खूप पश्चाताप करावा लागेल.ते स्थूल कमाई करत नाही तर कोणती सजा खात नाहीत.यामध्ये तर डोक्या वरती खुप पापांचे ओझे आहे,त्याची खूप सजा खावी लागेल.मुलं बणुन जर श्रीमता वर चालत नाहीत,तर खुप सजा मिळेल. बाबा म्हणतात, स्वतःची दया करा आणि योगामध्ये राहा,नाहीतर फुक आपला घात कराल.जसे कोणी इमारतीवरून खाली पडतात परंतु मरत नाहीत तर दवाखान्यातच पडून राहतात, त्यांना खूप त्रास होत राहतो,उगीच स्वतःला धक्का दिला,मेले नाही बाकी काय कामाचे राहिले.येथे पण असेच आहे. खुप प्रगती करायची आहे.श्रीमता वरती चालणार नाही तर खाली पडाल, अधोगती होईल.पुढे चालून प्रत्येकाला आपल्या पदाचा साक्षात्कार होईल,की काय बनू शकतो?जे सेवाधारी आज्ञाधारक असतील,तेच उच्चपद प्राप्त करतील,नाहीतर दासदासी जाऊन बनतील,परत सजा पण खूप खडक मिळेल.त्या वेळेत दोघे धर्माराजाचे रुप बनतात परंतु मुलं समजत नाहीत,चुका करत राहतात.सजा तर येथेच खावी लागेल ना.जितकी जे सेवा करतील तेवढेच शोभून दिसतील,नाहीतर काहीच कामाचे राहणार नाहीत.दुसऱ्याचे कल्याण करू शकत नाहीत तर स्वतःचे तरी कल्याण करा.बंधनयुक्त माता पण आपले कल्याण करत राहतात.बाबा तरीही मुलांना खबरदार करत राहतात, नावा रुपा मध्ये फसल्यामुळे माया खूप धोका देते.असे म्हणतात बाबा अमकी ला पाहिल्या मुळे आम्हाला खराब संकल्प चालतात.बाबा समजवतात कर्मेंद्रिया द्वारे कधीच खराब काम करायचे नाही.कोणत्या मनुष्याची चलन ठीक नाही,तर त्यांना सेवा केंद्रा वरती येऊ देऊ नका.शाळेमध्ये कोणाची बदचलन असते,तर खूप मार खातात. शिक्षक सर्वांच्या पुढे सांगतात,यांची तशीच चलन आहे,त्यामुळे यांना शाळेमधून काढले जाते.तुमच्या सेवा केंद्रा वरती पण असे खराब दृष्टी असणारे आले,तर त्यांना पळून लावायला पाहिजे.बाबा म्हणतात कधी कुद्रुष्टी जायला नाही पाहिजे.सेवा करत नाहीत,बाबांची आठवण करत नाहीत, तर जरूर काही तरी अवगुण आहेत. चांगली सेवा करतात,त्यांचे नाव पण प्रसिद्ध होते.थोडा पण संकल्प जातो, दृष्टी जाते तर समजायला पाहिजे,मायेचा आघात होत आहे.तर एकदम सोडून द्यायला पाहिजे,नाहीतर वृध्दी होऊन नुकसान होते.बाबांची आठवण करत राहिले तर सुरक्षित राहातील.बाबा सर्व मुलांना सावधान करतात,खबरदार रहा,आपल्या कुळाचे नाव बदनाम करू नका.काहीजण गंधर्व विवाह करून एकत्र राहतात,तरी खूप नाव प्रसिद्ध होतात.काही तर परत खराब बनतात.येथे तुम्ही आले आहात, सदगती करण्यासाठी, दुर्गती करण्यासाठी नाही.वाईटात वाईट काम विकार आहे,परत क्रोध विकार आहे. बाबाकडून वारसा घेण्यासाठी येतात परंतु माय आघात करून श्रापित बनवते,तर एकदम खाली पडतात, म्हणजे स्वतःला श्रापित करतात. तर बाबा समजवतात खूप संभाळ करायची आहे.कोणी खराब दृष्टी असणारे आले,तर त्यांना एकदम बंद करायला पाहिजे.असे दाखवतात,अमृत पिण्यासाठी आले आणि बाहेर जाऊन तसेच बणुन खराब कार्य केले.ते परत ज्ञान सांगू शकणार नाहीत.बुद्धीचे कुलुप बंद होते.बाबा म्हणतात सेवे मध्ये तत्पर राहायला पाहिजे.बाबाची आठवणीमध्ये राहत,अंत काळात घरी जायचे आहे. गीत पण आहे ना,हे रात्रीच्या प्रवाशाने थकून जाऊ नका.आत्म्याला घरी जायचे आहे.आत्माच प्रवासी आहे. आत्म्याला रोज समजावले जाते.आता तुम्ही शांतीधामचे प्रवासी आहात.तर आता बाबांची,घराची आणि वारशाची आठवण करत रहा.स्वताला पाहायला पाहिजे,माया कुठे धोका तर देत नाही. मी आपल्या पित्याची आठवण करतो? उच्च ते उच्च बाबांच्या कडेच दृष्टी राहावी,हाच खूप उच्च पुरुषार्थ आहे. बाबा म्हणतात,मुलांनो कुदृष्टी सोडून द्या.देह अभिमान म्हणजे कुदृष्टी,देही अभिमानी म्हणजे शुद्ध दृष्टी.तर मुलांची दृष्टी बाबाकडे राहायला पाहिजे.वारसा खूप उच्च आहे,विश्वाची बादशाही कमी गोष्ट आहे का? स्वप्नांमध्ये पण कोणाला नसेल,या अभ्यासाद्वारे व योगाद्वारे विश्वाची बादशाही मिळते.अभ्यास करून उच्चपद प्राप्त कराल,तर पिता पण खूश होतील,शिक्षक पण खुश होतील आणि सद्गुरू पण खुश होतील. आठवण करत राहाल तर बाबा पण
उत्साह देत राहतील.बाबा म्हणतात मुलांनो, हे अवगुण काढून टाका, नाहीतर मोफत आपले नाव बदनाम कराल.बाबा तर विश्वा चे मालक बनवतात.भारतवासीच १००टक्के सौभाग्यशाली होते, परत १००% टक्के दुर्भाग्यशाली बनले.परत तुम्हाला सौभाग्यशाली बनवण्या साठी,तुम्हाला शिकवले जाते.
बाबांनी समजले आहे, जे मोठे मोठे धार्मिक नेते आहेत,ते पण तुमच्या जवळ येतील,योग शिकून जातील. संग्रहालया मध्ये प्रवासी येतात,त्यांना पण तुम्ही समजू शकता की आत्ता स्वर्गाचे गेट्स उघडणार आहेत.कल्प वृक्षा वरती समजवा,पहा तुम्ही अमक्या वेळेत येतात.भारत वासीची भूमिका अमक्या वेळेत आहे.तुम्ही हे ज्ञान ऐकले,परत आपल्या देशांमध्ये जाऊन सांगा,शिवपित्याची आठवण करा तर तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल.योग शिकण्या साठी सर्व इच्छा ठेवतात.हठयोगी सन्याशी त्यांना योग शिकवू शकत नाहीत.तुमचे संस्था परदेशा मध्ये पण जाईल,समजवण्या साठी खूप व्यक्ती पाहिजेत.जे मोठे मोठे धार्मिक नेते आहे,त्यांना येयचे तर आहे.
तुमच्या पैकी एक पण चांगल्या रीतीने हे ज्ञान घेऊन जातील,तर अनेकांना समजून सांगू शकतील.एकाच्या बुद्धीमध्ये आले तर परत पेपर मध्ये पण येईल. ही पण नाटकांमध्ये नोंद आहे, नाहीतर बाबांची आठवण करणे कसे शिकतील? बाबांचा परिचय सर्वांना भेटणार आहे,कोणी ना कोणी निघतील. संग्रहालया मध्ये खूप जुन्या गोष्टी पाहण्या साठी जातात.येथे परत तुमचे हे प्राचीन ज्ञान अनेक जण ऐकतील. त्यांच्यापैकी काही चांगल्या रीतीने समजतील.येथून दृष्टी घेऊन जातील, किंवा तुमची संस्था बाहेरच्या देशात पण जाईल.तुम्ही म्हणाल बाबांची आठवण करा तर त्यांना आपल्या धर्मामध्ये उच्चपद प्राप्त होईल.पुनर्जन्म घेत सर्व खालीच उतरले आहात.खाली उतरणे म्हणजे तमोप्रधान बनणे.पोप इत्यादी असे म्हणू शकणार नाही की,पित्याची आठवण करा,पित्याला तर जाणतच नाहीत.तुमच्याजवळ खूप चांगले ज्ञान आहे.चित्र पण सुंदर बनत राहतात. सुंदर गोष्ट असेल तर ती संग्रहालयामध्ये आणखीनच सुंदर दिसते.अनेक जण पाहण्यासाठी येतील. जितके मोठे चित्र असतील,तेवढे चांगल्या रीतीने समजावू शकतात.आवड असायला हवी,आम्ही अशा प्रकारे समजावून सांगू.नेहमी तुमच्या बुद्धीमध्ये राहावे कि,आम्ही ब्राह्मण आहोत.तर जितकी सेवा कराल तेवढा मान मिळेल.येथे पण मान मिळेल,तर स्वर्गामध्ये पण मान मिळेल. तुम्हीच पूज्य बनतात.हे ईश्वरीय ज्ञान धारण करायचे आहे.बाबा म्हणतात सेवे वरती तत्पर रहा,बाबा कुठेपण सेवेसाठी पाठवतील,यामध्ये पण कल्याण आहे. सर्व दिवस बुद्धीमध्ये सेवेचे विचार चालायला पाहिजे.परदेशी मुलांना पण बाबांचा परिचय द्यायचा आहे.सर्वात विश्वासू,बाबांची आठवण करा, कोणत्या ही देहधारीची आठवण करु नका.आता होलसेल मृत्यू समोर आहे. होलसेल आणि किरकोळ व्यापार तर होतो ना. बाबा होलसेल व्यापारी आहेत,वारसा पण होलसेल मध्ये देतात.२१ जन्मा साठी विश्वाची राजाई घ्या. मुख्य चित्र आहेत, त्रिमूर्ती, गोळा, झाड, शिडीआणि गितेचे भगवान कोण आहेत? हे चित्र तर खूपच चांगले आहेत,त्यामध्ये बाबांची पूर्ण महिमा आहे.बाबांनीच कृष्णाला असे बनवले आहे.हा वारसा ईश्वरीय पित्याने दिला आहे.कलियुगा मध्ये असंखय मनुष्य आहेत.सत्ययुगी मध्ये खूप थोडे राहतील.ही आदलाबदली कोणी केली तर आपण कोणीच जाणत नाहीत,तर प्रवासी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जातात, ते पण येऊन बाबांचा परीचय घेतील.सेवा करण्यासाठी ज्ञानाचे अनेक मुद्दे मिळत राहतात.परदेशांमध्ये पण सेवा करण्यासाठी जायचे आहे.एकीकडे तुम्ही बाबाचा परीचय राहाल,तर दुसरीकडे मारामारी चालत राहील. यामधे थोडे मनुष्य असतील तर जरूर बाकीचा विनाश होईल.विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते.जे झाले त्याची परत पुनरावृत्ती होईल. कोणाला पण समजून सांगण्याची अक्कल पाहिजे.अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- १) नेहमी एक बाबाकडे च दृष्टी ठेवायची आहे. देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करून मायेच्या धोक्यापासून सुरक्षित राहायचे आहे.कधीच कुदृष्टी ठेवून आपल्या कुळाचे नाव बदनाम करायचे नाही.
- २) सेवेसाठी भागदौड करत राहायचे आहे.सेवाधारी आज्ञाकारी बनायचे आहे. स्वतःच्या आणि दुसऱ्याचे कल्याण करायचे आहे.कोणती ही बदचलन चालायची नाही.