09.04.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,मुलांनो तुमचा हा खुप किंमती वेळ आहे,यामध्ये तुम्ही बाबांचे पूर्णपणे मदतगार बना,मदतगार मुलंच उच्चपद प्राप्त करतात.

प्रश्न:-

सेवाधारी मुलं कोणते कारण (बहाणेबाजी) देऊ शकत नाहीत?

उत्तर:-

सेवाधारी मुलं हे कारण देऊ शकत नाहीत,बाबा येथे गर्मी आहे,येथे थंडी आहे म्हणून सेवा करू शकत नाहीत.थोडी गर्मी झाली किंवा थंडी पडली तर नाजूक बनायचे नाही.असे नाही आम्ही तर सहन करू शकत नाही. या दुःखामध्ये गर्मी सर्दी,सुख दु:ख,निंदा स्तुती सर्व सहन करायचे आहे.कोणते ही कारण द्यायचे नाही.

गीत:-

धैर्य धरा,सुखाचे दिवस आले की,आले…

ओम शांती. मुल जाणतात सुख आणि दुःख कशाला म्हटले जाते.या जीवना मध्ये सुख कधी मिळते आणि दुःख कधी मिळते,ते फक्त तुम्ही ब्राह्मणच क्रमानुसार पुरुषार्थ अनुसार जाणतात. हे आहे दुःखाची दुनिया,यामध्ये थोड्या काळासाठी,दु:ख सुख,स्तुती निंदा सर्व काही सहन करावे लागते.या सर्व गोष्टीतून जायचे आहे.कोणाला थोडी गर्मी लागली तर म्हणतात आम्ही थंडीमध्ये राहू.आता मुलांना तर गर्मी मध्ये किंवा थंडी मध्ये सेवा करायची आहे. या वेळेत थोडे फार दुःख असले तरी नवीन गोष्ट नाही कारण हे दुःखधाम आहे.आता तुम्हा मुलांना सुखधाम मध्ये जाण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे.हा तर तुमचा खूपच किमती वेळ आहे,यामध्ये कोणतेही कारण चालू शकणार नाही.बाबा सेवाधारी मुलांना म्हणतात,जे सेवा जाणतच नाहीत ते तर काहीच कामाचे नाहीत.येथे बाबा आले आहेत,भारताला तर काय विश्वाला सुखधाम बनवण्यासाठी.तर ब्राह्मण मुलांना बाबाचे मदतगार बनायचे आहे. बाबा आले आहेत तर त्यांच्या श्रीमतावर चालायला पाहिजे.भारत जो स्वर्ग होता,तो आत्ता नर्क आहे,त्याला स्वर्ग बनवायचा आहे.हे पण आत्ता माहिती झाले आहे. सतयुगा मध्ये या पवित्र राज्यांचे राज्य होते,खूप सुखी होते परत अपवित्र राजे बनतात.ईश्वर अर्थ दान पुण्य केल्यामुळे तर त्यांच्यामध्ये शक्ती येते.आता तर प्रजेचे प्रजे वरती राज्य आहे परंतु हे कोणी भारताची सेवा करू शकत नाहीत.भारताची किंवा दुनियाची सेवा तर एक बाबाच करतात.आता बाबा मुलांना म्हणतात,गोड मुलांनो आता माझे मदतगार बना.बाबा खूप प्रेमाने समजवतात,देही अभिमानी मुलंच समजतात.देह अभिमानी काय मदत करू शकतील,कारण मायेच्या साखळ्या मध्ये फसले आहेत.आत्ता बाबांना सूचना दिल्या आहेत की सर्वांना मायाच्या साखळ्या पासुन,गुरूंच्या साखळ्या पासून सोडवा.तुमचा धंदाच हा आहे.बाबा म्हणतात,माझे जे मदतगार बनतील तेच श्रेष्ठ पद मिळवतील.बाबा स्वतः समजवतात,मी जो आहे जसा आहे,साधारण रुपा मध्ये असल्यामुळे मला पूर्ण रितीने जाणत नाहीत.बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवतात,हे पण जाणत नाहीत.हे लक्ष्मी नारायण विश्वाचे मालक होते,हे पण कोणालाच माहिती नाही.आता तुम्ही समजता की यांनी कसे राज्य मिळवले, परत कसे गमावले.मनुष्याची तर बिल्कुलच तुच्छ बुद्धी आहे.आत्ता बाबा आले आहेत,सर्वांच्या बुद्धीचे कुलूप उघडण्यासाठी,पत्थर बुद्धी पासून पारस बुद्धी बनवण्यासाठी.बाबा म्हणतात आत्ता मदतगार बना.लोक ईश्वरीय सेवाधारी म्हणतात परंतु मदतगार तर बनत नाहीत.स्वयं ईश्वर येऊन ज्यांना पावन बनवतात,त्यांनाच म्हणतात आत्ता दुसर्यांना पण आपल्या सारखे पावन बनवा.श्रीमता वरती चाला.बाबा आले आहेत,पावन स्वर्गवासी बनवण्यासाठी.. तुम्ही ब्राह्मण मुलंच जाणतात,हा मृत्युलोक आहे.घर बसल्या बसल्या अचानक मृत्यू होत राहतो, तर का नाही आम्ही कष्ट करून,बाबा पासून पूर्ण वारसा घेऊन,आपले भविष्य जीवन उज्ज्वल बनवायचे. मनुष्यांची जेव्हा वानप्रस्थ अवस्था होते,तर समजतात आत्ता भक्ती करायला पाहिजे.जोपर्यंत वानप्रस्थ अवस्था नाही,जो पर्यंत वानप्रस्थ अवस्था नाही,तो पर्यंत खूप धन इ.कमवतात.आता तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे,तर का नाही बाबांचे मदतगार बनायला पाहिजे. मनाला विचारायला पाहिजे,आम्ही बाबाचे मदतगार आहोत.सेवाधारी मुलं प्रसिद्ध आहेत.चांगले कष्ट करत आहेत. योगामध्ये राहिल्यामुळे सेवा करू शकाल.आठवणीचे शक्तीद्वारे साऱ्या दुनियेला पवित्र बनवायचे आहे.साऱ्या विश्वाला पावन बनवण्यासाठी तुम्ही निमित्त बनले आहात.तुमच्यासाठी परत पवित्र दुनिया पण जरूर पाहिजे,म्हणून प्रतित दुनियेचा विनाश होणार आहे. आता सर्वांना हे,सांगत रहा देहअभिमान सोडा.एक बाबांची आठवण करा,तेच पतित पावन आहेत. सर्वजण त्यांचीच आठवण करतात.साधु संत इत्यादी सर्व बोटाने ईशारा करतात की,परमात्मा एक आहे,तेच सर्वांना सुख देणारे आहेत. ईश्वर किंवा परमात्मा म्हणतात परंतु त्यांना कोणीच जाणत नाहीत.कोणी गणेशाला,कोणी हनुमानला,कोणी आपल्या गुरुची आठवण करतात.आता तुम्ही जाणतात,ते सर्व भक्ती मार्गातील आहेत.भक्तिमार्ग पण अर्धाकल्प चालणार आहे.मोठे मोठे ऋषी-मुनी सर्व नेती नेती म्हणजे माहित नाही माहित नाही करत आले.रचनाकार आणि रचनेला आम्ही जाणत नाही.बाबा म्हणतात,ते त्रिकालदर्शी तर नाहीत. ज्ञानाचे सागर तर एकच बाबा आहेत.ते भारतामध्ये येतात,शिवजयंती पण साजरी करतात आणि गीताजयंती पण साजरी करतात.कृष्णाची आठवण तर करतात परंतू शिवाला जाणतच नाहीत. शिव बाबा म्हणतात पतित-पावन ज्ञानाचा सागर तर मीच आहे,कृष्णा साठी तर म्हणू शकत नाहीत.गितेचे भगवान कोण आहेत? हे खूप चांगले चित्र आहे.बाबा हे सर्व चित्र इत्यादी बनवत राहतात,मुलांच्या कल्याणासाठी. शिवबाबांची महिमा तर संपूर्ण लिहायला पाहिजे.सर्व या वरतीच आधारित आहे. परम पवित्र आहे.पवित्र बनल्या शिवाय कोणी परमधाम मध्ये जाऊ शकत नाहीत.मुख्य गोष्ट पवित्र बनण्याचीच आहे.तो पवित्र धाम आहे,जिथे सर्व आत्मे राहतात.येथे तुम्ही अभिनय करत पतित बनले आहात.जे सर्वात जास्त पावन होते,तेच परत पतित बनले आहेत.देवी देवता धर्माचे नाव लक्षणच गायब झाले आहे.देवता धर्म बदलुन हिंदू धर्म नाव ठेवले आहे.तुम्ही स्वर्गाचे राज्य घेता आणि परत गमावतात.हा हार आणि जीत चा खेळ आहे.माये पासून हरल्यानंतर हार आणि मायेला जिंकल्या नंतर जीत आहे.मनुष्य रावणाचे खूप मोठे चित्र बणुन खर्च करत राहतात, परत एकाच दिवशी नष्ट करतात,कारण दुश्मन आहे ना,परंतु हा तर बाहुल्यांचा खेळ झाला.शिवबाबांचे चित्र बनवून पूजा करून परत तोडतात.देवींचे चित्र पण असेच बनवतात परत जाऊन विसर्जन करतात.काहीच समजत नाहीत.आता तुम्ही मुलं बेहदचा इतिहास-भूगोल जाणतात की,हे दुनियचे चक्र कसे फिरते.सतयुग त्रेता बद्दल कोणालाच माहिती नाही.देवतांचे चित्र पण खराब बनवलेले आहेत.

बाबा समजवतात,गोड मुलांनो विश्वाचे मालक बनण्या साठी,बाबांनी जी तुम्हाला पत्थ सांगितले आहेत,त्याची पालना करा,आठवणी मध्ये राहून भोजन बनवा.योगा मध्ये राहून खावा. बाबा स्वता: म्हणतात माझी आठवण करा तर तुम्ही विश्वाचे मालक परत बणुन जाल.बाबा पण परत आले आहेत.आता विश्वाचे पूर्णपणे मालक बनायचे आहे.मात पित्याचे अनुकरण करायचे आहे,फक्त पिता तर होऊ शकत नाहीत.संन्यासी लोक म्हणतात आम्ही सर्व पिताच आहोत.आत्माच परमात्मा आहे,ते तर चुकीचे होते.येथे तर माता पिता दोन्ही पुरुषार्थ करतात. मात पित्याचे अनुकरण करा,हे येथील अक्षरं आहेत.आता तुम्ही जाणतात,जे विश्वाचे मालक होते,पवित्र होते,ते आता परत अपवित्र बनले आहेत,परत पवित्र बनत आहेत. आम्हीपण त्यांच्या श्रीमता वरती चालून हे पद प्राप्त करतो. ते यांच्या द्वारे श्रीमत देतात,त्यावरती चालायला पाहिजे.अनुकरण करत नाहीत फक्त बाबा बाबा म्हणुन तोंड गोड करतात.अनुकरण करणाऱ्या मुलांनाच सुपात्र म्हणतात.तुम्ही जाणता बाबांचे अनुकरण करण्यामुळे आम्ही राजाई मध्ये चालले जाऊ.ही समजण्याची गोष्ट आहे.बाबा फक्त म्हणतात माझी आठवण करा तर विकर्म होतील.बस,कोणालाही हे समजून सांगा,तुम्ही कसे 84 जन्म घेत घेत अपवित्र बनले आहात.आत्ता परत पवित्र बनायचे आहे.जितकी आठवण कराल,तेवढे पवित्र बनाल.खुप आठवण करणारे च नविन दुनियेत प्रथम येतील. परत आपल्या सारखे बनवायचे आहे. प्रदर्शनी मध्ये मम्मा बाबा तर समजवण्या साठी जाणार नाहीत.परदेशा मधुन कोणी मोठा मनुष्य आला तर, त्यांना पाहण्यासाठी खूप मनुष्य जातात.तुम्हाला पाहण्या साठी कोण आले आहेत.हे बाबा तर खूप गुप्त आहेत.बाबा म्हणतात मी या ब्रह्मा द्वारे बोलतो, मीच या मुलाचा जवाबदार आहे.तुम्ही हमेशा समजा शिवबाबा बोलत आहेत,तेच शिकवत आहेत. तुम्हाला शिवबाबांनाच पाहयचे आहे, ब्रह्माला नाही.स्वतःला आत्मा समजा आणि परमात्मा पित्याची आठवण करा.आम्ही आत्मा आहोत.आत्म्या मध्येच सर्व भूमिका नोंदलेली आहे.हे ज्ञान बुद्धी मध्ये चक्र लावायला पाहिजे, फक्त दुनिये मधील गोष्टीं बुध्दी मध्ये राहतील तर काहीच समजले नाही. अगदीच खराब आहेत,परंतु त्यांचे पण कल्याण करायचे आहे.स्वर्गा मध्ये तर जातील परंतु उच्च पद मिळणार नाही. सजा खाऊन जातील,उच्च पद कसे मिळेल,हे तर बाबांनी समजवले आहे. एक तर स्वदर्शन चक्रधारी बना आणि दुसऱ्यांनाही बनवा.योगी पण पक्के बना आणि दुसर्यांना पण बनवा.बाबा म्हणतात माझी आठवण करा,तुम्ही परत म्हणतात बाबा,आम्ही आठवण विसरतो,लाज नाही वाटत.अनेक आहेत जे खरे सांगत नाहीत.बाबानी समजले आहे,कोणी पण आले तर त्यांना,परिचय द्या.८४ चे चक्र पूर्ण होत आहे,परत जायचे आहे.राम गेले,रावण गेले..याचा अर्थ पण खूप सहज आहे.जरूर संगमयुग असेल जेव्हा राम आणि रावणाचं परिवार पण असेलहे पण तुम्हीच जाणतात सर्व विनाश होईल, बाकी थोडेच राहतील.कसे तुम्हाला राज्य मिळते,ते पण पुढे चालून सर्वांना माहिती होईल.अगोदर सर्व सांगणार नाहीत,परत तर तो खेळू होऊ शकणार नाही.तुम्हाला त्रयस्त होऊन पाहायचे आहे.साक्षात्कार होत जातील.या ८४ च्या चक्राला दुनियेमध्ये कोणी जाणत नाहीत.आता तुम्हा मुलांच्या बुध्दी मध्ये आहे,आम्हाला परत जायचे आहे.रावण राज्या मधून आत्ता सुट्टी मिळत आहे, परत आपल्या राजधानीमध्ये येऊ,बाकी थोडे दिवस आहेत.हे चक्र फिरत राहते ना.अनेक वेळेस चक्र लावले आहे. आता बाबा म्हणतात ज्या कर्म बंधना मध्ये फसले आहात त्यांना विसरा. ग्रहस्थ व्यवहारां मध्ये राहत विसरत जावा.आता हे नाटक पूर्ण होत आहे, आपल्या घरी जायचे आहे.या महाभारत लढायच्या नंतरच स्वर्गाचे गेट उघडतील, म्हणून बाबा म्हणतात हे नाव तर खूप चांगले आहे,गेट वे टू हेवन(स्वर्ग कडे जाण्याचा रस्ता).काही जण म्हणतात लढाई तर चालत राहते.तुम्ही सांगा मिसाईल ची लढाई कधी लागली होती, ही मिसाईल ची लढाई अंतिम लढाई आहे.पाच हजार वर्षापूर्वी पण,जेव्हा लढाई लागली होती,तेव्हा या यज्ञाची स्थापना झाली होती.या जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे.नवीन राजधानी ची स्थापना होत आहे.

तुम्ही हे आत्मिक शिक्षण राजाई मिळवण्या साठी घेत आहात. तुमच्या आत्मिक धंदा आहे.शारीरिक विद्या तर कामाला येणार नाही,ग्रंथ पण कामाला येणार नाहीत.तर का नाही या धंद्यामध्ये लागून जायला पाहिजे.बाबा तर विश्वाचे मालक बनवतात.विचार करायला पाहिजे,कोणते शिक्षणामध्ये जास्त ध्यान द्यायला पाहिजे.ते तर लौकिक शिक्षणाची पदवी साठी, शिक्षण घेतात,तुम्ही तर राजासाठी शिक्षण घेतात.रात्रं दिवसाचा फरक आहे.ते शिक्षण घेतल्याने फुटाने पण मिळतील किंवा नाही,हे माहीत नाही. कोणाचा मृत्यू झाला तर,फुटाने पण गेले.ही कमाई तर सोबत येईल.मृत्यू तर

डोक्यावरती आहे.प्रथम आपल्याला स्वतःचे पूर्ण पणे कमाई करायची आहे.ही कामाई करत करत दुनियाच विनाश होऊन जाईल.तुमचे शिक्षण पूर्ण होईल,तेव्हाच विनाश होईल.तुम्ही जाणतात,जे पण मनुष्य मात्र आहेत, त्यांच्या मुठ्ठी मध्ये फुटाणे आहेत. त्यालाच माकडासारखे पकडून बसले आहेत.आत्ता तुम्ही ज्ञानाचे रत्न घेत आहात.तर या फुटाण्यांमधून ममत्व काढून टाका.जेव्हा चांगले प्रकारे समजतील तेव्हाच फुटाण्याच्या मुठ्ठीला सोडतील.हे तर सर्व नष्ट होणार आहे,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादा ची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. १)आत्मिक अभ्यास शिकायचा आणि शिकवायचा आहे.अविनाशी रत्ना द्वारे आपले मुठ्ठी भरायची आहे.फुटाण्याच्या पाठीमागे लावून वेळ वाया घालवायचा नाही.
  2. २) आत्ता नाटक पूर्ण होत आहे, म्हणून स्वतःला बंधनापासून मुक्त करायचे आहे.स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे आणि दुसऱ्यांना पण बनवायचे आहे.मातपित्याचे अनुकरण करून राजाई पदाचे अधिकारी बनायचे आहे.

वरदान:-

हदच्या सर्व इच्छांचा त्याग करणारे,खरे तपस्वी मुर्त भव.

हदच्या इच्छांचा त्याग करून,खरे खरे तपस्वी मूर्त बना.तपस्वी मूर्त म्हणजे हदच्या इच्छा मात्र अविद्या रूप.जे घेण्याचा संकल्प करतात ते अल्प काळासाठी घेतात,परंतू नेहमीसाठी गमावतात.तपस्वी बनण्यां मध्ये विशेष विघ्न रुप याच अल्प काळाच्या इच्छा आहेत,म्हणूनच तपस्वी मूर्त बनण्याचा पुरावा द्या,म्हणजेच हदच्या मान शानचा त्याग करून,विधाता बना.जेव्हा विधाता पणाचे संस्कार होतील तेव्हा दुसरे सर्व संस्कार स्वतः नष्ट होतील.

बोधवाक्य:-

कर्माच्या फळाची सूक्ष्म इच्छा ठेवणे पण,फळाला पिकल्या च्या अगोदरच खाणे होय.

||| ओम शांती |||

ओम शांती.