25-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,प्रत्येकाची नाडी पाहून प्रथम त्याला अल्फ म्हणजे शिवबाबा वरती निश्चय
करावा,नंतर पुढच्या चित्रावरती समजाऊन सांगा, शिवबाबाच्या निश्चया शिवाय ज्ञान देणे
म्हणजे वेळ वाया घालवणे आहे"
प्रश्न:-
कोणता एक
मुख्य पुरुषार्थ शिष्यवृत्ती घेण्याचा अधिकारी बनवतो?
उत्तर:-
अंतरमुखतेचा.तुम्हाला खुप अंतर्मुखी राहायचे आहे.बाबा तर कल्याणकारी आहेत,ते कल्याणा
साठीच मत देतात.जे अंतर्मुखी योगी मुलं आहेत,ते कधी देह अभिमाना मध्ये येऊन रूसणार
व भांडणार नाहीत,त्यांचे वागणे खूपच उत्तम शानदार असेल.ते फार थोडे बोलतात,यज्ञ
सेवेमध्ये आवड ठेवतात.ज्ञानाची जास्त बडबड करत नाहीत.आठवणी मध्ये राहून सेवा करतात.
ओम शांती।
सहसा असे पाहिले जाते की प्रदर्शनी च्या सेवेचा समाचार पण येतो, तर मूळ गोष्ट
बाबांच्या परिचयाची आहे.त्यावर पूर्ण निश्चय बसल्या शिवाय इतर जे काही समजवता,ते
कुणाच्या बुद्धीत बसणे अवघड आहे.जरी चांगले आहे, चांगले आहे म्हणतात परंतु बाबा ची
ओळख नाही.प्रथम तर बाबाची ओळख व्हावी.माझी आठवण करा,मी पतितपावन आहे,माझी आठवण
केल्याने तुम्ही पतीता पासून पावन बनाल.ही मुख्य गोष्ट आहे. भगवान एक आहे,तेच
पतितपावन ज्ञानाचे सागर,सुखाचे सागर,तेच उच्च ते उच्च आहेत.हा निश्चय झाला तर
भक्तिमार्ग मधील जे ग्रंथ, वेद, भागवत, गीता इत्यादी आहेत,सर्वांचे खंडन होईल.भगवान
तर स्वतः म्हणतात,हे मी सांगितले नाही.मी दिलेले ज्ञान ग्रंथांमध्ये नाही.ते
भक्तिमार्ग मधील ज्ञान आहे.मी तर ज्ञान देऊन सद्गती करून निघून जातो,नंतर हे ज्ञान
प्रायलोप होऊन जाते.ज्ञानाचे प्रारब्ध पूर्ण झाल्या नंतर भक्तिमार्ग सुरू
होतो.जेव्हा बाबा वरती निश्चय असेल,तर समजतील भगवानुवाच,हे भक्ती मार्गातील ग्रंथ
आहेत.ज्ञान आणि भक्ती अर्धा अर्धा चालते.भगवान जेव्हा येतात,तेव्हा परिचय देतात,मी
सांगतो की ५००० वर्षाचे कल्प आहे.मी तर ब्रह्मा मुखाद्वारे समजवतो.तर मुख्य गोष्ट
बुद्धी मध्ये बसवायची आहे कि, भगवान कोण आहेत.ही गोष्ट जोपर्यंत बुद्धीत बसत नाही,तो
पर्यंत पुढच्या चित्रावर समजून सांगण्याचा काहीच फायदा होणार नाही.सर्व कष्ट या
गोष्टी वरती आधारित आहेत. बाबा थडग्या मधून उठवण्यासाठी येतात.ग्रंथ इत्यादी
वाचल्याने तर ते जागृत होणार नाहीत.परमात्मा ज्योती स्वरूप असून,त्यांची मुलं पण
ज्योती स्वरूपच आहेत.परंतू तुम्हा मुलांची आत्म पतित बनली आहे. त्यामुळे ज्योत
विझलेली आहे.तर मग तमोप्रधान झाले आहात.प्रथम बाबा चा परिचय न देता,जे कष्ट घेता,
अभिप्राय इत्यादी लिहितात,ते काहीच कामाचे राहत नाही.यामुळे सेवा होत नाही.निश्चय
झाला तर समजतील बरोबर ब्रहमा द्वारे बाबा ज्ञान देत आहेत.मनुष्य ब्रह्माला पाहून
खूप गोंधळून जातात,कारण बाबाची ओळख नाही.तुम्ही सर्व जाणता भक्तिमार्ग आता संपत आला
आहे. कलियुगामध्ये भक्तिमार्ग आहे आणि संगम युगावरती ज्ञान मार्ग आहे. आम्ही
संगमयुगी आहोत आणि राजयोग शिकत आहोत.दैवी गुण धारण करत आहोत.नवीन दुनिये साठी जे
संगम युगावरती नाहीत,ते दिवसें दिवस तमोप्रधान बनत जातील.त्या बाजूला तमोप्रधानता
वाढत जाते,या बाजूला संगम युग पूर्ण होत आहेत.या समजण्याच्या गोष्टी आहेत ना.असे
समजणारे पण क्रमानुसार आहेत.बाबा रोज पुरुषार्थ करवित आहेत.निश्चय बुद्धी विजयंती
मुलांमध्ये बडबड करण्याची सवय नकोय.बाबांची आठवण करत नाहीत.आठवण करणे कष्टाचे काम
आहे.आठवण करायचे सोडून आपली बडबड करत राहतात. बाबाच्या निश्चया शिवाय दुसर्या
चित्राकडे जायचे नाही,परत काहीच समजणार नाहीत.अल्फ म्हणजे शिवबाबां वरती निश्चय नाही
तर बाकीच्या चित्रावर समजणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.कोणाची नाडी ओळखत
नाहीत.प्रदशनी किंवा मेळ्यांचे उद्घाटन करणाऱ्यांना पण प्रथम बाबांचा परिचय द्यायचा
आहे. ज्ञानाचे सागर बाबा आहेत.बाबा हे ज्ञान आत्ताच देत आहेत.सतयुगा मध्ये ज्ञानाची
गरज राहत नाही,नंतर भक्ती सुरू होते.बाबा म्हणतात,जेव्हा दुर्गती होते,भक्ती मध्ये
माझी निंदा पूर्ण होती,तेव्हा मी येतो.अर्धा कल्प निंदा होणारच आहे.ज्याची पण पूजा
करतात त्यांच्या कर्तव्याची माहिती नाही.तुम्ही मुलं बसून समजतात परंतु स्वतःचा
बाबाशी योग नाही,तर इतरांना काय समजावून सांगणार. शिवबाबा, शिवबाबा म्हणत राहतात
परंतु योगामध्ये बिलकुल राहत नाहीत. तर विकर्म कसे विनाश होतील. धारणा पण होणार नाही.
एका बाबांची आठवण करणे,हीच मुख्य गोष्ट आहे.
जी मुलं ज्ञानी तू आत्मा बरोबर योगी बनत नाहीत, त्यांच्या मध्ये देहाभिमाना चा अंश
जरूर असणार.योगा शिवाय समजावणे काहीच कामाचे नाही.तर देह अभिमाना मध्ये कोणाला ना,
कोणाला तंग करत राहतात.मुलं भाषण चांगले करतात,तर समजावे की आम्ही ज्ञानी तू आत्मा
आहोत. बाबा म्हणतात,ज्ञानी तू आत्मा तर झाले परंतु योगाची कमी आहे. योगाच्या
विषयावर पुरुषार्थ खूप कमी आहे.बाबा अनेक वेळेस समजावतात,चार्ट ठेवा,आपली दिनचर्या
लिहा. मुख्य योगाची गोष्ट आहे.मुलांमध्ये योग नाहीतर,कोणते पद प्राप्त
करतील.योगामध्ये च अनेक मुलं नापास आहेत.असे समजतात आम्ही शंभर टक्के आहोत परंतु
बाबा म्हणतात दोन टक्केच आहेत.बाबा(ब्रह्मा)स्वता: सांगतात की भोजन करताना आठवणीत
राहतो, नंतर विसरून जातो.आंघोळ करताना पण बाबांची आठवण करा. जरी मी त्यांचा मुलगा
आहे,तरी पण आठवण विसरून जाते.असे समजतात,नंबर एक मध्ये जाणारे आहेत परंतु ज्ञान आणि
योगामध्ये पण हुशार पाहिजेत.तरीपण बाबा म्हणतात योगा मध्ये खूपच कष्ट आहेत,प्रयत्न
करुन पहा.परत अनुभव सांगा.असे समजा टेलर कपडे शिवत आहे,तर तपासले पाहिजे की बाबाच्या
आठवणीत राहतो का? तो खूपच गोड साजन आहे,त्यांची जेवढी आठवण कराल तेवढे विकर्म विनाश
होतील आणि आम्ही सतोप्रधान बनू.स्वतः किती वेळ आठवणीत राहतो,बाबाला निकाल सांगितला
पाहिजे. आठवणीत राहिल्यानेच कल्याण होईल बाकी जास्त समजवल्याने कल्याण होणार
नाही.समजत काहीच नाहीत.शिवबाबा शिवाय काम कसे चालेल.बाबांची माहिती नाही,बाकी तर
बिंदू,बिंदूच होऊन जातो.ईश्वरा बरोबर बिंदू दिल्याने फायदा होत राहील.योग नसेल तर
सारा दिवस वेळ वाया घालवत राहतात.बाबाला पण दया येते हे,कोणते पद प्राप्त
करतील.नशिबात नसेल तर बाबा पण काय करतील.बाबा तर वारंवार समजावत आहेत,दैवी गुणांची
धारण करा,आठवणीत रहा.आठवण करणे फारच आवश्यक आहे.आठवणीत प्रेम असेल तरच,श्रीमता वर
चालतील.प्रजा तर पुष्कळ बनत राहते.तुम्ही येथे आले आहातच लक्ष्मीनारायण बनण्यासाठी.
यामध्येच खूप कष्ट आहेत.जरी स्वर्गामध्ये जाल परंतू सजा खाऊन परत कनिष्ठ पद प्राप्त
कराल.बाबा सर्व मुलांना ओळखतात,जी मुलं योगामध्ये कच्ची आहेत,ते देह अभिमाना मध्ये
रुसतात,लढत भांडत राहतात.जे पक्के योगी आहेत,त्यांचे वागणे ऊत्तमअसते,ते फार थोडे
बोलतील. यज्ञ सेवेची आवड राहील, यज्ञा मध्ये हाडे पण देतील.असे पण काही आहेत परंतु
बाबा म्हणतात आठवणीत रहा,तर बाबांशी प्रेम होईल आणि खुशी पण राहील.
बाबा म्हणतात मी भारत खंडामध्ये येतो.भारताला येऊन उच्च बनवत आहे.सतयुगा मध्ये
तुम्ही विश्वाचे मालक होते.सद्गती मध्ये होते,मग दुर्गती कोणी केली? रावणाने.कधी
सुरू झाली?( द्वापर पासून).अर्ध्या कल्पा साठी सदगती एका सेकंदामध्ये प्राप्त करता
आणि २१ जन्माचा वारसा मिळतो.जेव्हा पण चांगले मनुष्य येतील तर प्रथम त्यांना बाबांचा
परिचय द्या.बाबा म्हणतात,या ज्ञाना द्वारेच तुमची सद्गती होईल.तुम्ही मुलं जाणता,हे
नाटक सेकंद सेकंद चालत राहते.हे बुद्धीत राहिले तरी पण,तुम्ही चांगल्या रितीने
स्थिर राहाल.येथे बसले आहात,तरीपण बुद्धीमध्ये ठेवा, सृष्टिचक्र जू सारखे हळू हळू
फिरत राहते.सेकंद सेकंद टिक टिक होत राहते.वैश्विक नाटका नुसार सर्व भूमिका चालू आहे
म्हणजे अभिनय चालू आहे.एक सेकंद गेला,नाटका फिरत राहते.हे बेहदचे नाटक आहे,ते
वृध्दाच्या बुद्धीमध्ये बसणार नाही, ज्ञान पण बसू शकणार नाही.जसे फोनोची तबकडी फिरत
राहते,तसेच आमच्या आत्म्या मध्ये नोंद आहे. सूक्ष्म आत्म्यामध्ये एवढा सारी भूमिका
नोंदलेले आहे,यालाच कारागिरी म्हटले जाते.पाहण्यात तर काहीच दिसून येत नाही,या खूपच
समजण्याच्या गोष्टी आहेत.मोठ्या बुद्धी वाले समजू शकत नाहीत, यामध्ये आम्ही जे
बोलतो,वेळ निघून जाते,परत त्याची पाच हजार वर्षांनी पुनरावृत्ती होईल.अशी समज
कोणाजवळ नाही. जे महारथी आहेत,ते वारंवार या गोष्टी वरती ध्यान देऊन समजावत राहतात.
त्यामुळे बाबा म्हणतात,प्रथम तर आठवणीची गाठ बांधा.आता घरी जायचे आहे,देहाचे सर्व
संबंध सोडून द्यायचे आहेत,म्हणजे विसरायचे आहेत.जेवढे होईल तेवढी बाबांची आठवण करत
राहा.हा पुरुषार्थ गुप्त आहे.बाबा श्रीमत देतात,बाबांचा परिचय देत राहा.जे मुलं
आठवण कमी करतात,तर परिचय पण कमीच देतात.प्रथम तर बाबांचा परिचय बुद्धीमध्ये
बसवा.त्यांच्याकडून लिहून घ्या,बरोबर ते आमचे पिता आहेत. देहा सहित सर्व काही सोडून
एका बाबा ची आठवण करायची आहे. बाबाच्या आठवणी द्वारेच तुम्ही तमोप्रधान
पासुन,सतोप्रधान बनाल. मुक्तिधाम,जीवन मुक्तिधाम मध्ये तर दुःख दर्द
नसतेच.दिवसेंदिवस चांगल्या गोष्टी समजावल्या जातात. आपसामध्ये पण या गोष्टी करा.
लायक पण बनले पाहिजे ना.ब्राह्मण होऊन जर बाबांची आत्मिक सेवा करणार नाही तर,काय
कामाचे? राजयोगाच्या शिक्षणाला चांगल्या रीतीने धारण केले पाहिजे ना.बाबा जाणतात असे
अनेक आहेत,ज्यांच्या मध्ये काहीच सुधारणा होत नाही. अर्थसहित बाबांची आठवण करत
नाहीत. राजाराणी सारखे उच्च पद प्राप्त करण्यासाठी कष्ट आहेत.जे कष्ट करतील तेच
उच्चपद प्राप्त करतील.आठवणीचे कष्ट कराल तेव्हाच राजाई मध्ये जाऊ शकाल. क्रमांक
एकलाच शिष्यवृत्ती मिळते.हे लक्ष्मीनारायण शिष्यवृत्ती घेतलेले आहेत, नंतर
क्रमानुसार आहेत.खूप मोठी परीक्षा आहे.शिष्यवृत्ती घेणाऱ्यांची माळ बनलेली आहे.अष्ट
रत्न आहेत ना, त्यानंतर १०० आहेत, त्यानंतर १६००० रत्न आहेत.तर माळे मध्ये
येण्यासाठी खूप पुरुषार्थ करायला पाहिजे.अंतर्मुखी राहिल्यामुळे आणि पुरुषार्थ
केल्यामुळेच शिष्यवृत्ती मिळू शकेल. तुम्हाला फार चांगल्या रीतीने अंतर्मुखी राहायचे
आहे.बाबा तर कल्याणकारी आहेत,ते कल्याण करण्यासाठी श्रीमत देत आहेत.कल्याण तर साऱ्या
दुनियाचे होणार आहे,परंतु क्रमानुसार होईल. तुम्ही जे बाबा जवळ,राज योगाचा अभ्यास
करण्यासाठी आले आहात, तुमच्यामध्ये पण जे चांगले विद्यार्थी आहेत,ते अभ्यासा वरती
लक्ष देतील. काहीजण तर अजिबात लक्ष देत नाहीत.असे पण अनेक समजतात की,जे भाग्या मध्ये
असेल,त्यांच्या बुद्धीमध्ये लक्ष स्पष्ट राहत नाही.तर मुलांना आठवणीचा चार्ट ठेवायचा
आहे.आपली दिनचर्या लिहायची आहे.आम्हाला आता परत घरी जायचे आहे.ज्ञान यर येथेच सोडून
जायचे आहे.ज्ञानाची भूमिका पूर्ण होत आहे. आत्मा मात्र अतिसूक्ष्म आहे,त्यात खूप
भूमिका नोंदलेले आहे, हे आश्चर्य आहे ना.हे सर्व अविनाश नाटक आहे,अंतर्मुखी बणुन
स्वतःबरोबर बोलत रहा,तर तुम्हाला खुशी होईल.बाबा येऊन अशा गोष्टी सांगतात
की,आत्म्याचा कधी विनाश होत नाही.वैश्विक नाटकामध्ये एक एक मनुष्याची,एक एक वस्तूची
भुमीका नोंदलेले आहे.याला बेअंत तर म्हणत नाही.याचा अंत तर मिळतो परंतु हे अनादी
आहे.अनेक वस्तू आहेत याला निसर्ग म्हणतात.ईश्वराची रचना पण म्हणू शकत नाही.बाबा
म्हणतात माझी पण या वैश्विक नाटकांमध्ये भूमिका आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती,मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) योगा मध्ये
खूप कष्ट घ्यायचे आहेत,प्रयत्न करुन पहा कर्म करताना किती वेळ बाबांची आठवण
राहते.बाबांच्या आठवणीत राहिल्यानेच कल्याण होईल.गोड साजन ची खूप प्रेमाने आठवण
करायची आहे.आठवणीचा चार्ट म्हणजे दिनचर्या लिहायची आहे.
(२) सूक्ष्म बुद्धीने
या नाटकाचे रहस्य समजायचे आहे.हे खूप कल्याणकारी नाटक आहे,आम्ही जे करतो,बोलतो ते
परत पाच हजार वर्षानंतर पुनरावृत्त होईल,त्याला अर्थ सहित समजून खुशी मध्ये राहायचे
आहे.
वरदान:-
आपल्यामध्ये
स्नेहाची देवाण घेवाण करत सर्वांना सहयोगी बनवणारे सफलता मूर्त भव.
ज्ञान देणे आणि
घेण्याची अवस्था संपली.आत्ता स्नेहाची देवाण-घेवाण करा.जे पण समोर येतील,सबंध
संपर्कात येतील स्नेह द्या आणि घ्या. त्याला म्हटले जाते सर्वांचे स्नेही व
प्रेमी.ज्ञानदान अज्ञानी ना करा परंतु ब्राह्मण परिवारामध्ये गुणांचे महा दानी
बना.संकल्प मध्ये पण कोणा विषयी स्नेहा शिवाय दुसरे काही यायला नको.जेव्हा
सर्वांसाठी स्नेह असतो, तर स्नेहाचा प्रतिसाद सहयोग आहे आणि सहयोगा मुळे सफलता
प्राप्त होते.
बोधवाक्य:-
एका
सेकंदामध्ये व्यर्थ संकल्पांना पूर्णविराम लावा,हाच तीव्र पुरुषार्थ आहे.