28-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- आता हे नाटक पूर्ण होत आहे, तूम्हाला परत घरी जायचे आहे, यासाठी या दुनियेतील ममत्व काढुन टाका, घराची आणि नविन राज्याची आठवण करा"

प्रश्न:-
दानाचे महत्व केंव्हा आहे,त्याचा मोबदला कोणत्या मुलांना प्राप्त होतो?

उत्तर:-
दानाचे महत्व तेंव्हा आहे जेंव्हा दान दिलेल्या वस्तू मध्ये ममत्व नसेल. जर दान केले नंतर आठवले तर त्याचे फळ मोबदल्यात प्राप्त होऊ शकत नाही. दान करतात दुसर्या जन्मासाठी म्हणून या जन्मा मध्ये तुमच्याकडे जे काही आहे त्यापासून ममत्व काढुन टाका. विश्वस्त बणून सांभाळा. इथे तुम्ही जे ईश्वरीय सेवेत लावता, हॉस्पिटल किंवा कॉलेज खोलता त्याद्वारे अनेकांचे कल्याण होते, त्याच्या मोबदल्यात 21 जन्मासाठी मिळते.

ओम शांती।
मुलांना आपले घर आणि आपली राजधानी आठवणीत आहे का? इथे जेंव्हा बसता तेंव्हा बाहेरचे घर घाट, काम - धंदा इ. विचार करायला नको. बस आपले घर आठवले पाहिजे. आता या जून्या दुनियेतून नव्या दूनियेत जायचे आहे, ही जूनी दुनिया नष्ट होणार आहे. सर्व आगीत स्वाहा होईल. जे काही या डोळ्या नी पाहत आहात मित्र - सम्बधी इ. सर्व नष्ट होणार आहे. हे ज्ञान बाबाच मुलांना समजावतात. मुलांनो, आता परत आपल्या घरी जायचे आहे. नाटक पूर्ण होत आहे. हे आहे 5 हजार वर्षाचे चक्र दुनिया तर आहेच, परंतु तिला चक्र लावायला 5 हजार वर्ष लागतात. जे पण आत्मा आहेत सर्वांना परत जायचे आहे. ही जुनी दुनिया च खत्म होणार आहे. बाबा खुप चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी समजावतात. काहीजण कंजूष असतात तर फुकटात आपली मिळकत घालवून बसतात. भक्ती मार्गात दान- पुण्य तर करतात ना. कुणी धर्म शाळा बनविली, कुणी हॉस्पिटल बनवले, बुद्धि मध्ये समजतात याचे फळ दुसऱ्या जन्मात मिळेल. कोणतीही अपेक्षा न ठेवता अनासक्त होऊन कुणी करेल - असे होत नाही. खूप जण म्हणतात फळाची अपेक्षा आम्ही ठेवत नाही. परंतु नाही, फळ अवश्य मिळते. समजा कोणाकडे पैसा आहे तो धार्मिक कार्यासाठी दिला तर बुद्धी मधे हे राहील की आम्हाला दुसर्या जन्मा मधे मिळेल. जर ममत्व गेले ही वस्तू माझी आहे असे समजले तर तिथे मिळणार नाही. दान दुसर्या जन्मासाठी केले जाते. जेंव्हा की दुसर्या जन्मा मध्ये मिळते तर मग या जन्मात ममत्व का ठेवतात,म्हणून विश्वस्त बणवले जाते मग ममत्व निघून जाईल. कुणी चांगल्या साहुकाराकडे जन्म घेतो तर म्हणतात त्याने कर्म चांगली केली आहेत. कुणी राजा राणी जवळ जन्म घेतात, कारण की दान - पुण्य केले आहे. परंतु ती आहे अल्पकाळ एक जन्माची गोष्ट. आता तर तुम्ही हे शिक्षण घेता. जाणता या शिक्षणाने आम्हाला हे बनायचे आहे,तर दैवी गुण धारण करायचे आहेत. इथे दान करता त्याद्वारे ही यूनिवर्सिटी, हॉस्पिटल खोलता. दान केले तर त्यामधून ममत्व काढुन टाकले पाहिजे कारण की तुम्ही जाणता कि आम्ही भविष्यात 21 जन्मा साठी बाबांकडून घेत आहोत. हे बाबा घर इ. बनवतात ते तात्पुरते आहे. नाहीतर एवढे सगळे कूठे राहणार. देतात सर्व शिवबाबाना. धनी तोच आहे. तो यांच्याद्वारे करवतात. शिवबाबा तर राज्य करत नाहीत. स्वतः दाता आहे. त्यांचे ममत्व कोणामध्ये असेल! आता बाबा श्रीमत देतात की मृत्यु समोर उभा आहे. अगोदर तुम्ही कुणाला देत होता तर मरण्याचा विषय नव्हता. आता बाबा आले आहेत तर जूनी दूनिया नष्ट होणार आहे. बाबा म्हणतात. मी आलोच आहे या पतित दुनियेला खत्म करण्यासाठी. या रुद्र यज्ञात सारी जूनी दूनिया खत्म होणार आहे. जे काही आपले भविष्य बनवाल तर नव्या दूनियेत मिळेल. नाहीतर इथेच सर्व खत्म होईल. कूणी न कूणी खावून टाकेल. आजकाल मनुष्य उधारही देतात. विनाश झाला तर सगळे खत्म होईल. कूणी कूणाला काही देणार नाही. सर्व राहून जाईल. आज चांगले आहेत,उद्या दिवाळ निघते.कुणालाही काही पैसा मिळणार नाही. कुणाला दिले आणि तो मेला नंतर कोण परत देणार. तर काय केले पाहिजे? भारताच्या 21 जन्मांच्या कल्याणासाठी आणि आपल्या 21 जन्मांच्या कल्याणासाठी यामधे लावायला पाहिजे. तुम्ही आपल्यासाठीच करता. जाणता श्रीमतावर आम्ही ऊंच पद प्राप्त करतो,ज्याद्वारे 21 जन्म सुख शांती मिळेल. याला म्हणतात अविनाशी बाबांची आत्मिक हॉस्पिटल आणि यूनिवर्सिटी, ज्याद्वारे आरोग्य, धन आणि आनंद मिळतो. काहींना आरोग्य आहे पैसा नाही तर आनंदी राहू शकत नाही. दोन्ही असेल तर सुखी राहू शकतात. बाबा तुम्हाला 21 जन्मा साठी दोन्ही देतात. ते 21 जन्मासाठी जमा करायचे आहे. मुलांचे काम आहे युक्ती रचणे. बाबांच्या येण्याने गरीब मुलांचे भाग्य खुलते. बाबा आहेतच गरीब निवाज. साहूकाराच्या भाग्यात या गोष्टी नाहीत. यावेळी भारत सर्वात गरीब आहे. जो साहूकार होता तोच गरीब बनला आहे. यावेळी सर्व पाप आत्मा आहेत. जिथे पुण्य आत्मा आहे तिथे पाप आत्मा एकही नाही. ते आहे सतयुग सतोप्रधान, हे आहे कलियुग तमोप्रधान. तुम्ही आता पूरूषार्थ करत आहात सतोप्रधान बनण्याचा. बाबा तुम्हा मुलांना आठवण करून देतात तर तुम्ही समजतात बरोबर आम्ही स्वर्गवासी होतो. नंतर आम्ही 84 जन्म घेतले आहेत. बाकी 84 लाख योनी तर थापा आहेत. काय एवढे जन्म जनावराच्या योनीत राहिलो! हे शेवटचे मनुष्याचे पद आहे? काय आता परत जायचे आहे?

आता बाबा समजावतात- मृत्यू समोर उभा आहे. 40-50 हजार वर्ष नाहीत. मनुष्य तर बिल्कुल घोर अंधारात आहे. म्हणून म्हणतात दगडाची बुद्धी. आता तुम्ही दगड बुद्धी पासून परीस बुद्धी बनता. या गोष्टी काही सन्यासी इ. थोडीच सांगु शकतात. आता बाबा तुम्हाला आठवण करून देतात की परत जायचे आहे. जेवढे होऊ शकते आपले बॅग बैगेज (सामान) ट्रांसफर करा. बाबा, हे सर्व घ्या, आम्ही सतयुगामध्ये 21 जन्मा साठी घेऊ. हे बाबा पण दान - पुण्य करत होते. खूप शौक होता. व्यापारी लोक 2 पैसे धर्मासाठी खर्च करतात. बाबा 1 आणा ठेवत होते. कुणीही आले तर दरवाजातून रिकामे जायला नको. आता भगवान समोर आला आहे, हे कुणाला माहित नाही. मनुष्य दान-पुण्य करत - करत मरून जातील मग कुठे भेटेल? पवित्र बनत नाहीत, बाबांवर प्रेम करत नाहीत. बाबांनी समजावले आहे यादव आणि कौरवांची आहे विनाशकाळे विपरित बुद्धी. पांडवांची आहे विनाशकाळे प्रीत बुद्धी. युरोप वासी सर्व यादव आहेत जे मिसाइल (अणुबॉम्ब) बनवतात. शास्त्रात तर काय - काय गोष्टी लिहिल्या आहेत. नाटकाच्या नोंदी नुसार, खूप शास्त्र बनली आहेत. यामध्ये प्रेरणा इ. गोष्ट नाही. प्रेरणा म्हणजे विचार. बाकी असे थोडेच आहे की बाबा प्रेरणेने शिकवतात. बाबा समजावतात हा ही एक व्यापारी होता. चांगले नाव होते. सर्व जन इज्जत देत होते. बाबांनी प्रवेश केला आणि निंदा सुरू झाली. शिव बाबांना जाणत नाहीत. न त्यांची निंदा करू शकतात. निंदा यांची होते. कृष्णानी म्हंटले ना - मी लोणी खाल्ले नाही. हे ही म्हणतात कार्य तर सर्व बाबांचे आहे, मी काहीच करत नाही. जादूगार तो आहे, मी थोडीच आहे. फुकट यांची निंदा करतात. मी कुणाला पळवले का? कुणालाही नाही सांगितले की तुम्ही सोडून या. आम्ही तर तिथे होतो,हे स्वतःच निघून आले. फुकट दोष दिला आहे. किती निंदा केली. काय - काय गोष्टी शास्त्रात दिल्या आहेत. बाबा समजावतात हे परत होणारच आहे. या आहेत सर्व ज्ञानाच्या गोष्टी. कुणी मनुष्य हे थोडीच करू शकतो. ते ही इंग्रजांच्या राज्यात कुणाजवळ एवढ्या कन्या - माता येऊन बसतील. कुणी काही करू शकले नाही. कोणाचे संबंधी आले तर एकदम पळवून लावत होते. बाबा तर म्हणत होते खुशाल यांना समजावून घेऊन या. मी काही मना करत नाही परंतु कोणाची हिम्मत होत नव्हती. बाबांची शक्ति होती ना. काही नवीन नाही. हे सर्व नंतरही होणार आहे. निंदा ही होणार आहे. द्रौपदीची ही गोष्ट आहे. या सर्व द्रोपदी आणि दुशासन आहेत एकाची गोष्ट नाही. शास्त्रामध्ये या थापा कुणी लिहिल्या? बाबा म्हणतात हा ही नाटकामधे पार्ट आहे. आत्म्याचे ज्ञान कूणाकडे नाही, बिल्कुल देह- अभिमानी बनले आहेत. देही - अभिमानी बनण्या मधे मेहनत आहे. रावणाने बिल्कुल उल्टे बनवले आहे. आता बाबा सूलटे बनवतात. देही - अभिमानी बनल्याने स्वतः स्मृती राहते की मी आत्मा आहे,हा देह बाजा आहे,वाजवणयासाठी. ही स्मृती राहिली तरी दैवी गुण येतात. तुम्ही कुणाला दुःख देऊ शकत नाही. भारतामधे या लक्ष्मी नारायणच राज्य होते. 5 हजार वर्षाची गोष्ट आहे. जर कुणी लाखो वर्ष म्हणतात तर घोर अंधारात आहेत. नाटका नुसार जेंव्हा वेळ पूर्ण होते तेंव्हा बाबा पुन्हा आले आहेत. आता बाबा म्हणतात माझ्या मतावर चाला. मृत्यू समोर उभा आहे. नंतर मनातील आशा राहून जाईल. मरायचे तर आहेच. ही तीच महाभारत लढाई आहे. जेवढे स्वतःचे कल्याण कराल तेवढे चांगले आहे. नाहीतर तुम्ही रिकाम्या हाताने जाल. सारी दुनिया रिकाम्या हाती जाणार आहे. फक्त तुम्ही मुले भरलेल्या हाताने अर्थात धनवान बनून जाता. हे समजण्यासाठी खूप विशाल बुद्धी पाहिजे. किती धर्माचे मनुष्य आहेत. प्रत्येकाची आपली भूमिका आहे. एकाची भूमिका दुसर्या सारखी नाही. सर्वांचे चेहरे आपले - आपले आहेत,किती चेहरे आहेत,हे सर्व नाटका मध्ये नोंद आहे. आश्चर्याची गोष्ट आहे ना. आता बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समझा. मी आत्मा 84 चे चक्र पूर्ण करते,मी आत्मा या नाटकामधे कलाकार आहे, यातून बाहेर पडू शकत नाही, मोक्ष मिळू शकत नाही. मग प्रयत्न करणे पण फालतू गोष्ट आहे. बाबा म्हणतात नाटकांमधून कुणी निघून जाईल, दुसरा कुणी येईल - असे होऊ शकत नाही. एवढे सर्व ज्ञान सर्वांच्या बुद्धी मधे राहू शकत नाही. सारा दिवस असे ज्ञानाचे चिंतन करायला हवे. एक घडी अर्धी घडी.....ही आठवण करा नंतर त्याला वाढवत चला. 8 तास भले स्थूल सर्विस करा, आराम पण करा, या आत्मिक शासनाच्या सेवे मधे पण वेळ द्या. तुम्ही स्वतःची सर्विस करता,ही आहे मुख्य गोष्ट. आठवणींच्या यात्रे मधे रहा,बाकी ज्ञानामुळे उच्च पद मिळते. आठवणीचा आपला पूर्ण चार्ट लिहा. ज्ञान तर सोपे आहे. जसे बाबांच्या बुद्धी मधे आहे की मी मनुष्य सृष्टी चा बीज रूप आहे, याच्या आदी - मध्य - अंताला जाणतो. आम्ही ही बाबांची मुले आहोत. बाबांनी हे समजावले आहे, कसे हे चक्र फिरते. त्या कमाई साठी ही तुम्ही 8-10 तास देत असता ना. चांगले गिर्हाईक आल्यानंतर रात्रीचा आळस येत नाही. जांभई दिली तर समजतात की हा थकलेला आहे. बुद्धी कुठे बाहेर भटकत असेल. सेंटर वर ही खूप ख़बरदार रहायला हवे. जी मुले दुसर्याचे चिंतन करत नाहीत, आपल्या शिक्षणामध्ये मस्त राहतात त्यांची उन्नती सदैव होत राहते. तुम्हाला दुसर्याचे चिंतन करून आपले पद भ्रष्ट करायचे नाही. खराब ऐकू नका, खराब पाहू नका..... कुणी चांगले बोलत नाही तर एका कानाने एका दुसर्याने सोडून द्या. नेहमी स्वतःला पहायला हवे, न कि दुसर्या कडे. आपले शिक्षण सोडायचे नाही. खूप असे रुसून बसतात. यायचे बंद करतात, परत येतात. नाही आले तर जाणार कुठे? शाळा तर एकच आहे. आपल्या पायावर कुर्हाड मारून घ्यायची नाही. तुम्ही आपल्या शिक्षणामध्ये मस्त रहा. खूप खुश रहा. भगवान शिकवतो बाकी काय पाहिजे. भगवान आमचा बाप, शिक्षक, सतगुरु आहे, त्यांच्याशी बुद्धीचा योग लावला जातो. तो आहे सार्या दुनियेचा नंबर वन प्रियकर (माशूक) जो तुम्हाला नंबर वन विश्वाचे मालक बनवतो.

बाबा म्हणतात तुमची आत्मा खूप पतित आहे,उडू शकत नाही. पंख कापले आहेत. रावणाने सर्व आत्म्याचे पंख कापले आहेत. शिव बाबा म्हणतात माझ्याशिवाय कुणी पावन बनवू शकत नाही. सर्व कलाकार इथेच आहेत, वाढत राहतात, परत कुणी जाऊ शकत नाही. अच्छा!

गोड - गोड फार - फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात - पिता बाप - दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. स्वतः चे चिंतन आणि शिक्षणामध्ये मस्त रहायचे आहे. दुसऱ्याकडे पहायचे नाही. जर कुणी चांगले बोलत नसेल तर एका कानाने ऐकून दुसर्याने काढून टाका. रुसून शिक्षण (मुरली) सोडायचे नाही.
2. जिवंतपणी सर्वकाही दान करून ममत्व काढुन टाकायचे आहे. पूर्ण अर्पण करून विश्वस्त (ट्रस्टी) बनून हल्के रहायचे आहे. देह - अभिमानी बनून सर्व दैवी गुण धारण करायचे आहेत.

वरदान:-
आपल्या मूळ संस्कारांच्या परिवर्तना द्वारे विश्व परिवर्तन करणारे उदाहरण स्वरुप भव.

प्रत्येकामध्ये आपला जो मूळ संस्कार आहे, ज्याला स्वभाव म्हणतात, जो वेळे वर पुढे जाण्यासाठी अडथळा निर्माण करतो त्या मूळ संस्कारांचे परिवर्तन करणारे उदाहरण स्वरुप बना तेंव्हा विश्वाचे परिवर्तन होईल. आता असे परिवर्तन करा जे कुणी असे वर्णन करायला नको की यांचा हा संस्कार तर पहिल्यापासूनच आहे. जेंव्हा टक्केवारी मधे, अंश मात्र (थोडाही) जुना कोणता संस्कार दिसायला नको,वर्णन व्हायला नको तेंव्हा म्हंटले जाईल हे संपुर्ण परिवर्तनाचे उदाहरण स्वरुप आहेत.

बोधवाक्य:-
आता प्रयत्न करण्याची वेळ निघून गेली, म्हणून मनापासून प्रतिज्ञा करून जीवनाचे परिवर्तन करा.