12-04-2020 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
23.12.1985 ओम शान्ति
मधुबन
कामजीत -सर्व हदच्या
इच्छा पासून दूर.
बाप दादा आपल्या
छोट्याशा श्रेष्ठ सुखी संसाराला पाहत आहेत.एकी कडे खूप मोठा असार संसार आहे,तर
दुसरीकडे छोटासा सुखी संसार आहे.या सुखी संसारांमध्ये नेहमी सुख शांती संपन्न
ब्राह्मण आत्मे आहेत,कारण पवित्रता स्वच्छतेच्या आधारा वरती,हे सुख शांतीमय जीवन
आहे.जिथे पवित्रता किंवा स्वच्छता आहे,तिथे कोणतेही दुःख अशांतीचे नाव रूप नाही.
पवित्रतेचे किल्ल्या मध्ये,हा छोटासा सुखी संसार आहे.जर पवित्रतेच्या किल्ल्या मधुन
संकल्पा द्वारा पण बाहेर जातात,तेव्हाच दु:ख आणि अशांतीचा प्रभाव अनुभव करतात.हे
बुद्धी रुपी पाय,किल्ल्याच्या मध्ये राहिले तर, संकल्प तर काय स्वप्नांमधे पण दुःख
अशांती ची लाट येऊ शकत नाही.दुःख आणि अशांतीचा जर पण प्रभाव अनुभव होतो तर,आवश्य
काही ना काही अपवित्रतेचा प्रभाव आहे. पवित्रता फक्त कामजीत जगतजीत बनणे च नाही
परंतु काम विकारा चा वंश सर्व सिमीत च्या इच्छा आहेत.कामजीत म्हणजेच सर्व इच्छा वरती
विजय,कारण इच्छांचा खुप विस्तार आहे. इच्छा एक वस्तूची असते, दुसरी व्यक्ती द्वारा
थोड्या प्राप्तीची इच्छा,तिसरी सबंध निभावण्या मध्ये अनेक प्रकारच्या इच्छा उत्पन्न
होतात, चौथी सेवा भावनां मध्ये हदच्या इच्छा उत्पन्न होतात. या चार प्रकारच्या इच्छा
समाप्त करणे म्हणजेच नेहमीसाठी दुखा अशांती ला जिंकणे.आता स्वतःला विचारा या चार
प्रकारच्या इच्छाला समाप्त केले आहे का?जर कोणत्याही विनाशी वस्तू जर बुद्धीला
आपल्याकडे आकर्षित करतात,तर जरूर इच्छेचे रुप लगाव झाले.श्रेष्ठ रूपामध्ये शब्दाला
परिवर्तन करुन म्हणतात,इच्छा नाही परंतु चांगले वाटते,मग ती वस्तू असेल किंवा
व्यक्ती असेल परंतु कुणाचे प्रती विशेष आकर्षण आहे, तीच वस्तू किंवा व्यक्ती चांगली
वाटते,म्हणजेच इच्छा आहे.सर्व चांगले वाटते,हे यथार्थ आहे, परंतु हेच चांगले
वाटते,हे अयथार्थ आहे. हे रॉयल रुपाच्या इच्छा आहेत.मग कोणाची सेवा चांगली
वाटते,कुणाची पालना चांगली वाटते,कुणाचे गुण चांगले वाटतात,कोणाचे कष्ट चांगले
वाटतात,कोणाचा त्याग चांगला वाटतो, कोणाचा स्वभाव चांगला वाटतो परंतु चांगुल पणाचा
सुगंध घेणे,किंवा चांगल्या गोष्टी स्वता: मध्ये धारण करणे वेगळी गोष्ट आहे.परंतु या
चांगल्या मुळे हेच चांगले आहेत किंवा चांगली आहे,असे म्हणने हे इच्छा मध्ये
बदलते.हीच इच्छा आहे.जे दु:ख आणि अशांतीचा सामना करू शकत नाही.एक आहे चांगल्या च्या
पाठीमागे,स्वता:ला चांगलं बनवण्या पासुन वंचित करणे.दुसरी,दुशमणी ची इच्छा पण खाली
घेऊन येते.एक प्रभावित होण्याची इच्छा.दुसरी आहे,कोणाशी वैर किंवा इर्षाची भावना.ती
पण सुख आणि शांती ला समाप्त करते.नेहमीच मन हलचल मध्ये येते.प्रभावित होण्याची
लक्षणं लगाव आणि झुकाव आहे.असेच इर्षा किंवा दुश्मनीचा भाव त्याची लक्षणे जिद्द करणे
किंवा सिद्ध करणे.दोन्ही भावामध्ये खूप शक्ती आणि वेळ नष्ट होतो.हे माहित पण होत
नाही.दोन्ही खूप नुकसान देणारे आहेत. स्वतः पण दुःखी आणि दुसर्यांना पण दु:खी
करतात.अशा स्थितीमध्ये,आत्म्याचे हेच बोल असतात, दुःख घ्यायचे आणि दुःख द्यायचे
आहे.काही झाले तरी परंतु हे करायचेच आहे.ही इच्छा त्यावेळेस बोलते.ब्राह्मण आत्मा
बोलत नाही, म्हणून काय होते,सुख आणि शांतीच्या संसारा मधुन बुद्धी रुपी पाय बाहेर
निघतो.म्हणून या रॉयल इच्छा च्या वरती पण विजयी बना.या इच्छा पासून इच्छा मात्रम
अविद्याच्या स्थितीमध्ये या. हे जे संकल्प करतात की,दोन्ही भावांमध्ये मी हे गोष्ट
करून दाखवेल, कोणाला दाखवणार ?बाबांना की ब्राह्मण परिवाराला?कोणाला दाखवणार?असं
समजा हे करून दाखवणार नाही परंतु खाली पडुन दाखवणार.ही कमाल आहे काय,जे
दाखवणार.खाली पडणे म्हणजे दाखवण्याची गोष्ट नाही.हा हदच्या प्राप्तीचा नशा,मी सेवा
करून दाखवेल. मी नावं प्रसिद्ध करून दाखवेल.हे शब्द तपासुन पहा,श्रेष्ठ आहेत.सिंहाची
भाषा करतात परंतु बकरी बनतात.जसे आजकाल कोणी सिंहाचा,कोणी हातीचा,कोणी रावणाचा,कोणी
रामाचा मुखवटा घालतात.तर ही माया सिंहाचा मुखवटा घालते.मी हे करून दाखवेल,असे करेल
परंतु माया आपल्या वश करून बकरी बनवते.मी पणा येणे म्हणजे काही ना काही हदची इच्छा
होणे.ही भाषा युक्तीयुक्त बोला आणि भावना पण युक्तीयुक्त ठेवा.ही हुशारी नाही परंतु
प्रत्येक कल्पा मध्ये सूर्यवंशी पासून चंद्रवंशी बनण्याची हार खाणे आहे.तर अशी
हुशारी दाखवू नका.अभिमान मध्ये येऊ नका,ना अपमान करु नका.दोन्ही भावना,शुभ
भावना,शुभकामना पासून दूर घेऊन जातात.तर तपासून पहा जरा पण, संकल्प मात्र पण,अभिमान
किंवा अपमानाची भावना राहिली तर नाही? जेथे अभिमान आणि अपमानाची भावना आहे,तिथे कधी
कोणत्याही सन्माना च्या स्थिती मध्ये स्थितीत राहू शकत नाही.स्वमान सर्व इच्छा
पासून किनारा करेल आणि नेहमीच सुखाच्या संसारा मध्ये,सुख शांतीच्या झोक्यामध्ये झोके
घेत राहाल.त्यालाच म्हटले जाते सर्व कामजीत जगजीत.तर बाप दादा सुखी संसाराला पाहत
होते.सुखाच्या संसारा मधून,आपल्या स्वदेशा मधुन दुसऱ्याच्या देशांमध्ये बुद्धी रुपी
पाय का घेऊन जातात?परधर्म परदेश दुःख देणारा आहे.तर सुखाच्या सागर बाबांची
मुलं,सुखाच्या संसाराचे अनुभवी आत्मे आहात.अधिकारी आत्मे आहात,तर नेहमी सुखी
राहा,शांत राहा,समजले.
देश विदेशचे दोन्ही स्नेही मुलं आपल्या घरी किंवा पित्याच्या घरी आपला अधिकार
घेण्यासाठी पोहोचले आहात. तर अधिकारी मुलांना पाहून बाप दादा पण आनंदित होतात.जसे
आनंदामध्ये आले आहात,तसेच नेहमी आनंदी राहण्याची विधी,या दोन गोष्टीचा संकल्पा मध्ये
पण त्याग करून नेहमीसाठी भाग्यवान बणुन जावा. भाग्य बनण्यासाठी आले आहात परंतु
भाग्य बनवण्या सोबत मनाद्वारे कोणती कमजोरी उडत्या कलेमध्ये विघ्नरुप बनते,ती सोडून
जावा.या कमजोरीं ना सोडणे म्हणजेच भाग्य बनवणे आहे,अच्छा.
नेहमी सुखाच्या
संसारा मध्ये राहणारे
सर्व इच्छाजीत,नेहमी सर्व आत्म्याच्या प्रती शुभ भावना आणि शुभकामना ठेवणाऱ्या
श्रेष्ठ आत्म्यांना,नेहमी स्वमानच्या स्थिती मध्ये स्थित राहणाऱ्या विषेश आत्म्यांना
बापदादांची प्रेमपुर्वक आठवण आणि नमस्ते.
१२/४/२० प्रभात मुरली ओम शांती अव्यक्त बापदादा रिवाइज मधुबन मधूरते द्वारा कडव्या
धरणीला पण मधुर बनवा.
आज मोठ्यात मोठे पिता,आजोबा आपल्या गोड मुलांना भेटण्यासाठी आले आहेत.आजोबा
ब्रह्माचे गायन आहे.निराकार बाबांनी साकार सृष्टीची स्थापना करण्यासाठी ब्रह्माला
निमित्त बनवले.मनुष्य सृष्टीचे रचनाकार असल्या मुळे,मनुष्य सृष्टीचे यादगार
वृक्षाच्या रूपामध्ये दाखवले आहे.बीज गुप्त असते,प्रथम दोन पत्ते ज्याद्वारे खोड
निघते,तेच वृक्षाचे आदी देव,
आदी देवी,मातपिता च्या स्वरूपामध्ये वृक्षाचा पाया,ब्रह्मा निमित्त बनतात.
त्याद्वारे ब्राह्मण तना प्रगट होतो आणि ब्राह्मण तना मधून अनेक शाखा उत्पन्न
होतात,म्हणून आजोबा ब्रह्माचे गायन आहे.ब्रह्माचे अवतरण होणे,म्हणजेच वाईट दिवस
समाप्त होऊन,मोठ्यात मोठा दिवस सुरू होणे.रात्र नष्ट होऊन ब्रह्मा मुर्हत सुरू
होतो.वास्तव मध्ये ब्रह्मा मुहूर्त,परंतू म्हणतात ब्रह्म मुहर्त,म्हणून ब्रह्माचे
बुजर्ग रूप दाखवतात.सर्वोच्च पिता,निराकारी पिता
मुलांना खूप भेट देतात,जे २१ जन्म खात राहतात.दाता पण आहेत तर विधाता पण आहेत.ज्ञान
रत्नाच्या थाळ्या भरभरून देतात.शक्तींची सुवर्ण भेट अगणित स्वरूपामध्ये देतात.
गुणांच्या दागिन्यांची पेटी भरभरून देतात.अनेक श्रुंगारा च्या पेट्या तुमच्याजवळ
आहेत.रोज नवीन श्रुंगार करा,तरीपण अगणित आहेत.ही भेट नेहमी सोबत जाणारी आहे.ते
बक्षीस तर येथेच राहतात परंतु हे तर सोबत येतील.इतक्या ईश्वरीय भेटीद्वारे संपन्न
होतात,जे कमाई करण्याची आवश्यकताच राहत नाही.भेटीद्वारे खात राहाल आणि कष्टापासून
मुक्त व्हाल.
सर्व विशेष ख्रिसमस दिवस साजरा करण्यासाठी आले आहात.बाप दादा किशमिश दिवस
म्हणतात.किशमिश दिवस म्हणजे मधुरते चा दिवस.नेहमी गोड बनण्याचा दिवस.गोड जास्त
खातात आणि खाऊ घालतात.तोंड गोड तर थोड्या वेळापुरते होते परंतु स्वतः गोड बणुन नेहमी
मुखामध्ये गोड बोल रहावेत.गोड खाल्ल्याने आणि खाऊ घातल्याने आनंदी होतात,असेच गोड
बोला,स्वतःला पण खूश करतात आणि दुसर्यांना पण खूश करतात.
तर त्यामुळे नेहमी सर्वांचे तोंड गोड करतात.नेहमी गोड दृष्टी,गोड बोल,गोड कर्म.हेच
किशमिश दिवस साजरा करणे आहे.साजरा करणे म्हणजे बनणे. कोणालाही दोन घडी गोड दृष्टी
द्या, गोड बोल बोला,तर त्या आत्म्याला नेहमी भरपूर कराल.या दोन घडीची मधुर
दृष्टी,बोल द्वारे त्या आत्म्याची सृष्टी बदलेल.हे दोन मधुर बोल,नेहमी बदलण्या साठी
निमित्त बनतील. मधुरता अशी विशेष धारणा आहे,जे कडव्या धरणीला पण मधुर बनवतात. तुम्हा
सर्वांना पण बदलण्याचा आधार, बाबांचे दोन मधुर बोलच आहेत ना. गोड मुलांनो,तुम्ही
गोड शुद्ध आत्मा आहात,या दोन मधुर बोलाने परिवर्तन केले ना.गोड दृष्टीने परिवर्तन
झाले ना. असेच मधुरते द्वारा दुसऱ्यांना पण मधुर बनवा.असे तोंड गोड
करा,समजले,क्रिसमस दिवस साजरा केला ना.नेहमी या भेटीद्वारे आपली झोळी भरपूर
करा.नेहमी मधुरते ची भेट सोबत ठेवा.या द्वारे नेहमी गोड रहा आणि गोड बनवा.अच्छा.
नेहमी ज्ञान रत्ना द्वारे बुद्धी रुपी झोळी भरणारे,नेहमी सर्व शक्तीद्वारे शक्तिशाली
आत्मा बणुन शक्तीद्वारे नेहमी संपन्न बनणारे,सर्व गुणांच्या दागिन्या द्वारे नेहमी
शृंगार केलेले,श्रेष्ठ आत्म्यांना नेहमी मधुरते द्वारे मुख गोड करणाऱ्या गोड
मुलांना,बापदादा ची प्रेमपुर्वक आठवण आणि नमस्ते.
अव्यक्त
बापदादा ची कुमारसोबत वार्तालाप:-
कुमार म्हणजे तीव्र गतीने पुढे जाणारे. थांबणे चालणे,थांबणे चालणे असे नाही.कशी पण
परिस्थिती असू द्या परंतु स्वता:ला नेहमी शक्तिशाली आत्मा समजून पुढे जात
रहा.परिस्थिती किंवा वातावरणाचा प्रभावा मध्ये येणारे नाही परंतु आपला स्पष्ट
प्रभाव दुसऱ्या वरती टाकणारे.श्रेष्ठ प्रभाव म्हणजे आत्मिक प्रभाव,दुसरा नाही.असे
कुमार आहात ना.परिस्थिती येथील परंतु तुम्ही हालणारे तर नाही ना.परिस्थितीमध्ये पास
होणारे आहात ना.नेहमी हिंमतवान आहात ना.जिथे हिंमत आहे तिथे बाबांची मदत
आहेच.हिम्मत मुलांची मदत बाबांची.प्रत्येक कार्य स्वतःला पुढे ठेवून दुसऱ्यांना पण
शक्तीशाली बनवत चला.
कुमार आहेतच उडत्या कलेमध्ये जाणारे.जे नेहमी निर्बंध आहेत तेच उडती कले मध्ये
येणारे आहेत.तर निर्बंधन कुमार आहात ना.मनाचे पण बंधन नाही.तर नेहमी बंधनांना
समाप्त करून निर्बंधन बणुन उडत्या कलांमध्ये येणारे कुमार आहात ना.कुमार आपल्या
शारीरिक शक्ती आणि बुद्धीची शक्ती सफल करत आहात ना.लौकिक जीवनामध्ये आपल्या शारीरिक
शक्तीला आणि बुद्धीच्या शक्तीला विनाशकारी कार्यामध्ये लावत राहतात आणि आत्ता
श्रेष्ठ कार्यामध्ये लावणारे आहात.हलचल करणारे नाहीत परंतु शांती स्थापन करणारे
आहात.असे श्रेष्ठ कुमार आहात ना.कधी लौकिक जीवनाचे संस्कार तर उदय होत नाहीत
ना.अलौकिक जीवन म्हणजे नविन जन्म असणारे.तर नविन जन्मा मध्ये जुन्या गोष्टी राहत
नाहित.तुम्ही सर्व नविन जन्म असणारे श्रेष्ठ आत्मे आहात ना.कधी पण स्वता:ला साधारण
न समजता शक्तिशाली समजा.संकल्पा मध्ये पण हलचल मध्ये येऊ नका.असे प्रश्न तर नाही
करत कि,व्यर्थ संकल्प येतात, काय करावे? भाग्यवान कुमार आहात. एकवीस जन्म भाग्याचे
खात राहाल.स्थुल सूक्ष्म दोन्ही कमाई ची चिंता नाही. अच्छा.
निरोप घेताना प्रेमपूर्वक आठवण:- सर्व देश-विदेश दोन्हीकडच्या मुलांचे, या विशेष
दिवशी, कार्ड पण आले,पत्र पण आले आणि आठवण पण मिळाली.बापदादा सर्व,गोड गोड
मुलांना,या मोठ्या दिवशी नेहमी मधुरता द्वारे श्रेष्ठ बना आणि श्रेष्ठ बनवा.याच
वरदना सोबत स्वतः पण वृद्धीला प्राप्त करत राहा आणि सेवेमध्ये पण वृध्दी करत
जावा.सर्व मुलांना श्रेष्ठ ते श्रेष्ठ पित्याची मोठ्यात मोठी प्रेमपूर्वक आठवण आणि
त्यासोबत स्नेहाचे शुभेच्छा स्विकार करा.
सुप्रभात. नेहमी गोड बनण्याच्या शुभेच्छा.
वरदान:-
सहन
शक्तीद्वारे अविनाशी आणि मधुर फळ प्राप्त करणारे, सर्वांचे स्नेही भव.
सहन करणे म्हणजे मरणे
नाही परंतु सर्वांच्या मनामध्ये स्नेहा द्वारे जिंकणे आहे.कसाही विरोधी असेल रावणा
पेक्षा जास्त तेज असेल,एक वेळेस नाही दहा वेळेस सहन करावे लागले,तरीही ही सहनशक्ती
चे फळ अविनाशी आणि मधुर आहे.फक्त ही भावना ठेवू नका कि आम्ही इतके सहन केले तर,
यांनी पण थोडे फार सहन करावे. अल्पकाळाच्या फळाची भावना ठेवू नका,दयाभाव ठेवा, हाच
सेवाभाव आहे.सेवाभाव असणारे सर्व कमजोरी ला सामावतील,त्यांचा सामना करणार नाहीत.
सुविचार:-
जे झाले त्याला
विसरून झालेल्या गोष्टीपासून सावधानी घेऊन पुढच्या साठी नेहमी सावधान रहा.