10-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, नाटक पूर्ण होत आहे, परत घरी जायचे आहे,कलयुगच्या नंतर परत सतयुगा ची पुनरावृत्ती होईल, हे रहस्य सर्वांना समजून सांगा"

प्रश्न:-
आत्मा भूमिका वठवत वठवत थकली आहे,थकावट येण्याचे मुख्य कारण कोणते आहे?

उत्तर:-
खूप भक्ती केली,अनेक मंदीरं बनवली,खुप पैसे खर्च केले,धक्के खात खात सतोप्रधान आत्मा तमोप्रधान झाल्या मुळे दुःखी झाली.जेव्हा कोणत्या गोष्टीमुळे तंग होतात,तेव्हा थकावट होते.आता बाबा आले आहेत,सर्वांची थकावट दूर करण्यासाठी.

ओम शांती।
आत्मिक पिता सन्मुख मुलांना समजवतात.त्यांचे काय नाव आहे?शिव.येथे जी मुलं बसले आहेत तर मुलांना चांगल्या रीतीने आठवण राहिली पाहिजे.या नाटकांमध्ये जी सर्वांची भूमिका आहे,ती आता पूर्ण होत आहे.नाटक जेव्हा पूर्ण होते तर सर्व कलाकार समजतात,आमची भूमिका अभिनय पूर्ण झाला,आता घरी जायचे आहे.तुम्हा मुलांना बाबांनी आत्ता समज दिली आहे,ही समज दुसऱ्या कोणामध्ये नाही.आत्ता तुम्हाला बाबांनी समजदार बनवले आहे.मुलांनो आता नाटक पूर्ण होत आहे,आता परत नवीन चक्र सुरू होईल.नवीन दुनिया मध्ये सतयुग होते.आता जुन्या दुनिये मध्ये कलियुगाचा अंत आहे,या गोष्टी तुम्हीच जाणतात,ज्यांना बाबा भेटले आहेत. नवीन जे येतात त्यांना समजावयला पाहिजे,आता नाटक पूर्ण होत आहे,कलयुगा नंतर सतयुगाची परत पुनरावृत्ती होईल.इतके जे आहेत,त्यांना परत आपल्या घरी जायचे आहे.आता नाटक पूर्ण होत आहे,याद्वारे मनुष्य समजतील की प्रलय होतो.आता तुम्ही जाणता जुन्या दुनिया चा विनाश कसा होतो.भारतच अविनाशी खंड आहे,बाबा पण येथेच येतात.बाकी दुसरे सर्व खंड विनाश होतील.हे विचार दुसऱ्या कोणाच्या बुद्धीमध्ये येऊ शकत नाहीत. बाबा तुम्हा मुलांना समजवतात,आता नाटक पूर्ण होत आहे,परत त्याची पुनारवृत्ती होईल.अगोदर अविनाशी नाटकाचे नाव पण तुमच्या बुद्धीमध्ये नव्हते.असेच म्हणत होते, हे सृष्टी चक्र नाटक आहे,यामध्ये आम्ही कलाकार आहोत.अगोदर जेव्हा आम्ही म्हणत होतो,तर शरीराला समजत होतो.आता बाबा म्हणतात,स्वताला आत्मा समजा आणि मज पित्याची आठवण करा. आता आम्हाला परत घरी जायचे आहे, ते गोड घर आहे.त्या निराकारी दुनिया मध्ये आम्ही राहतो.हे ज्ञान कोणत्याही मनुष्य मात्रा मध्ये नाही.आता तुम्ही संगम युगा मध्ये आहात.तुम्ही जाणता आत्ता आम्हाला परत जायचे आहे.जुनी दुनिया नष्ट होऊन,परत भक्ती पण समाप्त होईल.प्रथम कोण येतात,कसे येतात,हे धर्म क्रमानुसार येतात. या गोष्टी कोणत्या ग्रंथांमध्ये नाहीत.हे बाबाच नवीन गोष्टी समजवतात, दुसरे कोणी समजावू शकत नाहीत.बाबा पण एकाच वेळेस येऊन समजवतात.ज्ञानसागर बाबा एकदाच येतात,जेव्हा नविन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश करायचा आहे.बाबांच्या आठवणी सोबत,हे चक्र पण बुद्धीमध्ये राहिले पाहिजे.आता नाटक पूर्ण होत आहे,आम्ही जातो घरी.भूमिका वठवत वठवत आम्ही थकलो आहोत.पैसे पण खर्च केले,भक्ती करत करत आम्ही सतो प्रधान पासून तमोप्रधान बनलो,दुनिया जुनी झाली,नाटक जुने म्हणणार नाही. नाटक कधीच जुनी होत नाही.नाटक तर नवीनच आहे,हे चालत राहते,बाकी दुनिया जुनी होती.आम्ही कलाकार दुःखी होतो,थकून जातो.सतयुगा मध्ये थोडेच थकणार.कोणत्या गोष्टींमध्ये तंग होणे किंवा थकण्याची गोष्टच नसते. येथे अनेक प्रकारची तंगी पाहायला मिळते.तुम्ही जाणता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे.नातेवाईक इत्यादी काहीच आठवणीत यायला नकोत.एक बाबांचीच आठवण करायला पाहिजे. ज्याद्वारे विकर्म विनाश होतील.विकर्म विनाश होण्यासाठी दुसरा कोणता उपाय नाही.गीतेमध्ये पण मन मनानाभव अक्षर आहे परंतु अर्थ कोणी समजू शकत नाहीत.बाबा म्हणतात माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा.तुम्ही विश्वाचे वारस अर्थात मालक होते,आता तुम्ही विश्वाचे वारस बनत आहात,तर खूप खुशी व्हायला पाहिजे. आता तुम्ही कवडी पासून हिऱ्यासारखे बनत आहात.येथे तुम्ही बाबा पासून वारसा घेण्यासाठी आले आहात.

तुम्ही जाणता जेव्हा कला कमी होतात,तेव्हा फुलांची बाग सुकुन जाते. आता तुम्ही फुलांची बाग बनत आहात.सतयुग सुंदर बाग आहे,तर खुप सुदंर आहे,परत हळूहळू कमी होत जातात.दोन कला कमी झाल्या तर बाग सुकायला सुरुवात होते.आता तर काट्याचे जंगल झाले आहे.आता तुम्ही जाणता,दुनिये ला काहीच माहिती नाही. हे ज्ञान तुम्हाला मिळत आहे,हे नवीन दुनिये साठी आहे.नवीन दुनिये ची स्थापना होत आहे.स्थापना करणारे, सृष्टीचे रचनाकार आहेत,आठवण पण त्यांची करायची आहे की, येऊन स्वर्गाची स्थापना करा.सुखधाम ची स्थापना करा तर जरूर दुःखधामचा विनाश होईल ना. बाबा रोज-रोज समजावत राहतात, त्याची धारणा करून परत दुसऱ्यांना समजावयचे आहे.प्रथम तर मुख्य गोष्ट समजावयाची आहे,माझे पिता कोण आहेत,ज्यांच्या द्वारे वारसा मिळणार आहे.भक्ती मार्गा मध्ये ईश्वरीय पित्याची आठवण करतात की,आमचे दुःख दूर करा,सुख द्या.तर तुम्हा मुलांच्या बुध्दी मध्ये ही स्मृती राहायला पाहिजे.शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धी मध्ये ज्ञान राहते.विद्यार्थी जीवनामध्ये काम धंद्याची गोष्ट राहत नाही,अभ्यासच आठवणीत राहतो.येथे तर कर्म करत,ग्रहस्थ व्यवहारा मध्ये राहत,बाबा म्हणतात,हा अभ्यास करा.असे म्हणत नाहीत,संन्याशा सारखे घरदार सोडा.हा राज योग आहे आणि प्रवृत्ती मार्ग पण आहे.संन्याशांना पण तुम्ही म्हणू शकता, तुमचा हठयोग आहे.तुम्ही घरदार सोडता,येथे ती गोष्ट नाही.ही दुनिया खूप खराब आहे.काय काय होत आहे,गरीब इत्यादी कसे राहतात,असे पाहिल्या मुळे नफरत येते.परदेशातून जे येतात,त्यांना चांगले चांगले स्थान दाखवतात.गरीब तर खूप घाण जागेमध्ये राहतात,ते थोडेच दाखवतात. हा तर नर्क आहे परंतु त्यामध्ये पण फरक तर खूप आहे ना.सावकार लोक कुठे राहतात आणि गरीब कुठे राहतात.कर्माचा हिशोब आहे ना.सतयुगा मध्ये अशा घाणं जागेत घरं नसतात.तेथे पण फरक तर असतो ना.कोणी सोन्याचे महल बनवतात,कोणी चांदीचे,कोणी विटांचे.येथे तर खूप खंड आहेत.एक युरोप खंडच किती मोठा आहे. स्वर्गामध्ये तर फक्त आम्हीच असतो.हे पण बुद्धीमध्ये राहिले तर हर्षित अवस्था होईल.विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये अभ्यासच आठवणीत राहतो,बाबा आणि वारसा.असे समजले जाते बाकी थोडावेळ आहे.ते तर म्हणतात लाखो, हजारो वर्ष आहेत.येथे तर गोष्टच पाच हजार वर्षांची आहे. तुम्ही मुलं समजू शकतात,आमची राजधानी स्थापन होत आहे,बाकी सारी दुनिया नष्ट होणार आहे.हा अभ्यास आहे ना.बुद्धी मध्ये आठवण राहावे आम्ही विद्यार्थी आहोत,आम्हाला भगवान शिकवत आहेत,तर खूप खुशी राहायला पाहिजे. हे का विसरता? माया खूप प्रबळ आहे, ती विसरवते.शाळेमध्ये सर्व विद्यार्थी शिकत आहेत.सर्वजण जाणतात स्वयम् भगवान आम्हाला शिकवत आहेत.तेथे तर अनेक प्रकारचे शिक्षण दिले जाते, अनेक शिक्षक असतात.येथे तर एकच शिक्षक आहे आणि एकाच प्रकारचे शिक्षण आहे. बाकी नायब शिक्षक जरूर पाहिजेत.बाकी सर्व शाखा आहेत. शिकवणारे एक बाबाच आहेत.बाबा येऊन सर्वांना सुख देतात. तुम्ही जाणतात अर्धाकल्प आम्ही सुखी राहू, तर ही पण खुशी राहिला पाहिजे, शिव बाबा आम्हाला शिकवत आहेत. शिव बाबा रचना करतात स्वर्गाची. आम्ही स्वर्गाचे मालक बनण्यासाठी शिकत आहोत.खूप आनंद राहायला पाहिजे.विद्यार्थी पण खातपीत सर्व काही करत,घराचे काम इत्यादी करतात.होय,कोणी वसतीगृहा मध्ये राहतात,की जास्ती अभ्यासा मध्ये लक्ष राहावे.तर फक्त त्यांचे अभ्यासामध्ये जास्त लक्ष राहते.सेवा करण्यासाठी मुली बाहेर राहतात.अनेक प्रकारचे मनुष्य असतात.येथे तुम्ही खूप सुरक्षित बसले आहात,कोणी आत मध्ये घुसू शकत नाही.येथे दुसरा कोणता संग नाही.पतित मनुष्या बरोबर गोष्ट करण्याची आवश्यकता पण नाही. तुम्हाला कोणाचे तोंड पाहण्याची पण आवश्यकता नाही.तरीही बाहेर राहणारे प्रगती करू शकतात.खूप आश्चर्य आहे. बाहेर राहणारे,अनेकांनाआपल्या सारखे बणुन मधुबनला घेऊन येतात.बाबा समाचार विचारतात,कोणत्या प्रकारच्या पेशंटला घेऊन आले आहात.कोणी खूप खराब पेशंट आहेत,तर त्यांना सात रोज भट्टीमध्ये ठेवले जाते.मधुबन ला कोणत्याही विकारी मनुष्याला घेऊन यायचे नाही.हे मधुबन आहे,जसे तुम्हा ब्राह्मणांचे गाव आहे.येथे बाबा तुम्हा मुलांना सन्मुख समजवतात,विश्वाचे मालक बनवतात.कोणत्या शूद्राला घेऊन आले तर,ते वातावरण खराब करतात.तुम्हा मुलांची चलन पण खूप रॉयल पाहिजे.

पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होत राहतील,तेथे काय काय होईल. जनावरं पण चांगले चांगले असतील. सर्व चांगल्या गोष्टी असतील. सतयुगातील कोणतीच गोष्ट येथे असू शकत नाही.सतयुगा मध्ये परत येथील गोष्टी नसतील.तुमच्या बुद्धीमध्ये आहे,आम्ही स्वर्गा साठी परीक्षा पास करत आहोत.जितके शिका आणि दुसऱ्यांना शिकवा.शिक्षक बणुन दुसऱ्यांना रस्ता दाखवायचा आहे.तुम्ही सर्व शिक्षक आहात,सर्वांना शिकवायचे आहे.प्रथम तर बाबांचा परिचय देऊन सांगायचे आहे,बाबा द्वारे हा वारसा मिळत आहे.भगवतगीता शिवपित्यानी ऐकवली आहे.कृष्णाने पित्या कडुन ऐकून हे पद मिळवले आहे.प्रजापिता ब्रह्मा आहेत तर ब्राह्मण पण येथेच पाहिजेत.ब्रह्म पण शिवबाबा द्वारे शिकत आहेत.तुम्ही आत्ता विष्णुपुरी मध्ये जाण्यासाठी शिकत आहात.हे तुमच्या अलौकिक घर आहे.लौकिक पारलौकिक आणि परत अलौकिक, नवीन गोष्टी आहेत ना.भक्तिमार्ग मध्ये कधी ब्रह्माला आठवण करत नाहीत. ब्रह्मा बाबा कुणाला म्हणता येत नाही. शिवबाबा ची आठवण करतात की, दुःखापासून सोडवा. तेच पारलौकिक पिता आहेत,परत हे अलौकिक पिता आहेत. यांना तुम्ही सूक्ष्मतम मध्ये पाहता परत येथे पण पाहतात.लौकिक पिता तर येथे पाहायला मिळतात.पारलौकिक पिता तर परत परलोक मध्ये पाहू शकता.हे परत अलौकिक आश्चर्यकारक पिता आहेत. या अलौकिक पित्याला समजण्या मध्येच संभ्रमित होतात.शिव बाबासाठी म्हणाल तर,ते निराकार आहेत.तुम्ही म्हणाल ते तर बिंदी आहेत.ते अखंड ज्योती किंवा ब्रह्म म्हणतात.मनुष्यांची अनेक मतं आहेत, तुमचे तर एक मत आहे.एका द्वारे बाबांनी मत द्यायला सुरू केली,परत किती वृध्दी झाली आहे. तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये राहायला पाहिजे,आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत,पतीत पासून पावन बनवत आहेत.रावण राज्यात जरुर तमोप्रधान बनायचे आहे.नावंच पतीत दुनिया आहे. सर्व दु:खी आहेत,तेव्हा तर बाबा ची आठवण करतात की,बाबा आमचे दुःख दूर करून आम्हाला सुख द्या.सर्व मुलं एका बाबांचे च आहेत.सर्व मुलांचा पिता एकच आहे.ते तर सर्वांना सुख देतील ना.नवीन दुनिया मध्ये तर सुखच सुख आहे,बाकी सर्व शांतीधाम मध्ये राहतात. हे बुद्धीमध्ये राहायला पाहिजे.आता आम्ही शांतीधाम मध्ये जाऊ.जितके जवळ जाऊ,तर आजची दुनिया काय आहे,उद्याची दुनिया कशी असेल,सर्व पहात राहाल.स्वर्गाची बादशाही जवळ पहाल.तर मुलांना मुख्य गोष्ट समजवतात, बुद्धीमध्ये आठवण राहावी,की,आम्ही शाळेमध्ये बसलो आहोत.शिवबाबा या रथावर सवार होऊन,आम्हाला शिकवण्या साठी आले आहेत. हा भाग्यशाली रथ आहे.बाबा येतील पण एकदाच. भागीरथ चे नाव काय आहे, हे पण कुणाला माहीत नाही.येथे तुम्ही मुलं जेव्हा बाबाच्या सन्मुख बसतात,बुद्धीमध्ये आठवण रहावी की, बाबा आले आहेत,आम्हाला सृष्टीच्या चक्राचे रहस्य सांगत आहेत.आता नाटक पूर्ण होत आहे,आता मला जायचे आहे. हे बुद्धीमध्ये ठेवणे खूपच सहज आहे परंतु आठवण करू शकत नाहीत.आता चक्र पूर्ण होत आहे,आता आम्हाला जायचे आहे,परत नविन दुनियेत येऊन भुमिका करायची आहे परत आमच्या नंतर अमके येतील.तुम्ही जाणता हे चक्र कसे फिरते,दुनिया वृध्दी कशी होते.नवीन पासून परत जुनी कशी होते.विनाशा साठी तयारी पण पाहतआहात.नैसर्गिक आपत्ती पण येणार आहे.इतके बाँम्बस बनवून ठेवले आहेत,ते कामांमध्ये येतील ना.बाँम्बस द्वारेच इतके काम होईल,जे परत मनुष्यांना लढाई करण्याची आवश्यकताच राहणार नाही.लष्कर ला परत सोडून देतील,बाँम्बस सोडत जातील.परत इतके सर्व मनुष्य नोकरीपासून सुटतील, तर भुक मरतील ना.हे सर्व होणार आहे,परत शिपाई इ.काय करतील.भूकंप होत राहील,बाँम्बस पडतील.एक दोघाला मारत राहतील,कारण नसताना खुन तर होणारच आहेत.तर येथे जेव्हा येऊन बसतात,तर या गोष्टींमध्ये बुद्धी रमण करायला पाहिजे.शांतीधाम सुखधामची

आठवण करत राहा.मनाला विचारा, आम्हाला कोणाची आठवण येते? बाबांची आठवण करत नाहीत,तर जरूर बुद्धी कुठे भटकत असेल.विकर्म पण विनाश होणार नाहीत आणि पद पण कमी होईल.अच्छा बाबा ची आठवण येत नाही, तर सृष्टीच्या चक्राचे स्मरण करा, तरीही खुशी राहील.श्रीमता वरती चालत नाहीत,सेवा करत नाही तर बाबांचे हृदयासीन पण बनू शकत नाहीत.सेवा करत नाही तर,अनेकांना तंग करत राहतात.काही तर अनेकांना आपल्या सारखे बनवुन बाबांकडे घेऊन येतात, तर बाबा पाहून खुश होतात.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१)नेहमी हर्षित राहण्यासाठी बुद्धीमध्ये शिक्षण आणि शिकवणार्‍या बाबांच्या आठवण राहावी.खाता-पिता सर्व काम करता राजयोगाच्या वरती ध्यान द्यायचे आहे.

२) बाबांच्या हृदयासीन बनण्यासाठी श्रीमतांवरती चालून अनेकांना आपल्यासारखे बनवण्याची सेवा करायची आहे.कोणालाही तंग करायचे नाही.

वरदान:-
कोणत्याही आत्म्याला प्राप्तीची अनुभूती करवणारे यथार्थ सेवाधारी भव.

सेवाभाव म्हणजे प्रत्येक आत्म्याच्या प्रती शुभ भावना,श्रेष्ठ कामनेचा भाव. सेवाभाव म्हणजे प्रत्येक आत्म्याला भावने प्रमाण फळ देणे.सेवा म्हणजे कोणत्याही आत्म्याला प्राप्तीचा मेवा अनुभव करणे.अशा सेवे सोबत तपस्या सोबतच आहे.जिथे यर्थात सेवा भाव आहे,तेथे तपस्याचा भाव वेगळा नाही. ज्या सेवेमध्ये तपस्या भाव नाही,ती सेवा नाही,तर नामधारी सेवा आहे,म्हणून त्याग तपस्या आणि सेवेच्या एकत्रित रूपा द्वारे खरे सेवाधारी बना.

बोधवाक्य:-
नम्रता आणि धैर्यताचा गुण धारण करा,तर क्रोधाग्नी पण शांत होईल.