"नवीन वर्षा मधे नवीनतेचे अभिनंदन"
आज चोहू बाजूचे सर्व स्नेही सहयोगी आणि शक्तिशाली मुलांचे अमृत वेळे पासून गोड गोड मनातील श्रेष्ठ संकल्प, स्नेहाचे वायदे, परिवर्तनाचे वायदे, बाबांसारखे बनण्याचा उमंग उत्साहाचा दृढ संकल्प म्हणजे अनेक आत्मिक संगीत भरलेले मनाचे गीत, मनाचे मित जवळ पोहोचले, मनाचे मित सर्वांचे गोड गीत ऐकून, श्रेष्ठ संकल्पाने अती हर्षित होत आहेत. मनाचे मित आपल्या सर्व आत्मिक मितला, ईश्वरीय मित्रांना, सर्व गीतांना प्रतिसाद देत आहेत. नेहमी प्रत्येक संकल्पा मध्ये, प्रत्येक सेकंदात, प्रत्येक बोलण्यात, आनंदी आणि आरोग्य संपन्न राहण्यासाठी अभिनंदन करत आहेत. मनाच्या मितच्या कार्यामध्ये सह्योगा च्या संकल्पाने हातामध्ये हात असावा. चोहीकड च्या मुलांचे संकल्प, पत्र, कार्ड आणि त्याबरोबर आठवणीची निशाणी स्नेहाची भेट सर्व बाप दादा पर्यंत पोहोचले. बापदादा नेहमी प्रत्येक मुलाच्या बुद्धी रुपी मस्तकावर वरदानाचा, नेहमी विजयी बनण्याचा, आशीर्वादाचा हात नवीन वर्षाच्या अभि-नंदना मध्ये सर्व मुलांना देत आहेत. नवीन वर्षामध्ये नेहमी प्रत्येक प्रतिज्ञेला प्रत्यक्ष रूपामध्ये आणणे, म्हणजे प्रत्येक पावला मध्ये बाबांचे अनुकरण करण्याचा विशेष स्मृती स्वरूपाचा टिळा सद्गुरु सर्व आज्ञाकारी मुलांना देत आहेत.आजची सजावट आहे, नेहमी नवीन सेकंद आहे,नेहमी नवीन संकल्प आहे, त्यामुळे प्रत्येक सेकंदाला अभिनंदन आहे. नेहमी नवीन ते साठी अभिनंदन केले जाते,कोणती पण नवीन वस्तू असेल, नवीन कार्य असेल तर शुभ आशीर्वाद जरूर देतात. शुभ आशीर्वाद नवीनतेला दिले जातात. तुम्हा सर्वांसाठी नेहमीच नवीनता आहे, संगम युगाची ही एक विशेषता आहे, संगम युगातील प्रत्येक कर्म उडती कलेमध्ये जाण्याचे आहे, त्या कारणाने नेहमी नवीन ते नवीन आहे. सेकंदा पूर्वी जी अवस्था होती,गती होती, ती दुसऱ्या सेकंदा मधे त्यापेक्षा उंच आहे. म्हणजे उडत्या कलेच्या दिशेने आहे, त्यामुळे प्रत्येक सेकंदाची स्थिती, गती उंच म्हणजे नवी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना प्रत्येक सेकंदा तील संकल्पाच्या नवीन तेला शुभाशीर्वाद आहेत. संगम युग आहेच अभिनंदनाचे युग नेहमी तोंड गोड, जीवन गोड, संबंध गोडचा अनुभव करण्याचे युग आहे. बाप दादा नवीन वर्षामध्ये फक्त शुभ व्हावे म्हणत नाहीत तर संगम युगातील प्रत्येक सेकंदाची, संकल्पाचा श्रेष्ठते चे अभिनंदन करत आहेत, लोक तर आज शुभ आशीर्वाद देतील, उद्या काही नाही. बाप दादा नेहमीसाठी शुभाशीर्वाद देताहेत, अभिनंदन करतात. नवीन युगाच्या जवळ येण्यासाठी शुभ आशीर्वाद देतात. संकल्पाचे गीत फार चांगले ऐकले. ऐकून ऐकून बाप दादा गीताचे संगीत आणि रहस्यामधे समाविष्ट झाले.आज वतन मध्ये गीत माले चा कार्यक्रम अमृत वेळेपासून ऐकत होतो. अमृत वेळ पण देशविदेशाच्या हिशोबाने आपापली आहे. प्रत्येक मुलगा समजतो की अमृत वेळेला संगीत आहे, बाप दादा तर निरंतर ऐकत आहेत.प्रत्येक गीता ची रीत पण फार प्रिय आहे. संगीत पण प्रत्येकाचे आपापले आहे. परंतु बाप दादांना सर्वांचे गीत प्रिय आहेत. शुभमंगल तर केले आहे, मुखाद्वारे केले वा मनाद्वारे द्वारे केले, रीती प्रमाणे दिली किंवा प्रीतीची रीत निभावण्याचा संकल्पाने दिली. आता पुढे काय करायचे आहे? जसे सेवेमध्ये 50 (1986 मधे) वर्षे पूर्ण होत आहेत. तसे सर्वश्रेष्ठ संकल्प किंवा वायदे पूर्ण कराल की संकल्पा पर्यंत ठेवाल? वायदे तर प्रत्येक वर्षी फार चांगले करतात. ज्याप्रमाणे आजच्या दुनियेमध्ये दिवसेंदिवस किती चांगले चांगले कार्ड बनवतात, हीच महानता आहे, या महान ते मध्ये जो उठेल तो अर्जुन, जे कोण बनेल, सर्व समजतात आम्ही बनू, दुसरा अर्जुन बनत आहे, की भीम बनत आहे, त्याला पाहायचे नाही. मला क्रमांक एक अर्थात अर्जुन बनायचे आहे, हे अर्जुन असे म्हटले जाते, हे भिम, असे गायले जात नाही. अर्जुनाची विशेषता नेहमी बिंदु ची आठवण ठेवून विजयी बनायचे आहे.असे नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनणारे अर्जुन, नेहमी गीता ज्ञान ऐकणे, आणि मनन करणारे अर्जुन, नेहमी विदेही, जिवंतपणी सर्व मेलेले आहेत,असे बेहद च्या वृत्ती वाले, अर्जुन कोण बनणार? बनायचे आहे, की फक्त बोलायचे आहे. नवीन वर्ष म्हणजे नेहमी प्रत्येक सेकंदात नवीनता. मनामध्ये, वाणीमध्ये, कर्मामध्ये, संबंधांमध्ये नवीनता आणा, हेच नवीन वर्षासाठी चे अभिनंदन, नेहमी बरोबर ठेवा. प्रत्येक सेकंदात प्रत्येक वेळी स्थितीची टक्केवारी पुढेपुढे राहावी. ज्याप्रमाणे कोणी ठिकाण्यावर पोहोचण्यासाठी जेवढी पावले टाकतील तेवढे पाऊल ठिकाणाच्या जवळ जातील. तिथल्या तिथे थांबत नाहीत. तसे प्रत्येक सेकंद वा प्रत्येक पाऊल जवळ आणि संपूर्णतेच्या जवळ आल्याचे लक्षण स्वतःमध्ये अनुभव होईल, आणि दुसऱ्याला पण अनुभव होईल, याला म्हटले जाते टक्केवारी वाढवणे, म्हणजे पाऊल पुढे टाकणे. टक्केवारीची नवीनता गतीची नवीनता याला म्हटले जाते. तर प्रत्येक वेळी नवीनता आणत चला सर्व विचारतात नवीन काय करायचे? अगोदर स्वतःमध्ये नवीनता आणा तर सेवेमध्ये नवीनता आपोआप येईल. आज काल लोक कार्यक्रमांमध्ये नवीन ता पाहत नाहीत. परंतु प्रभावाची नवीन ता पाहतात तर स्वतः मधील नवीन ते मध्ये प्रभावाची नवीन ता स्वतः येईल.
या वर्षामध्ये प्रभावशाली बनण्याची विशेषता दाखवा. आपसामधे ब्राम्हण आत्मे जेव्हा संपर्कामध्ये येतात, तर नेहमी प्रत्येकासाठी मनातील भावना, स्नेह, सहयोग आणि कल्याणाची भावना प्रभावशाली असावी. प्रत्येक बोल कोणाला हिम्मत, उल्हास देणारे प्रभावशाली असावेत. व्यर्थ नसावेत. साधारण बोलचाल मध्ये अर्धा अर्धा तास पण घालविता. मग विचार करता की याची प्राप्ती काय झाली. असे ना चांगले, ना वाईट साधारण बोलचाल हे पण प्रभावशाली बोल नाहीत ना. असेच प्रत्येक कर्म फलदायक असावे. स्वतःसाठी, वा दुसऱ्यासाठी तर आपसा मध्ये पण प्रत्येक रुपात आत्मिक बना. सेवेमध्ये पण आत्मिक प्रभावशाली बना. मेहनत चांगली करता, मनापासून करता, असे तर सर्व म्हणतात, परंतु हे राज योगी फरिश्ते आहेत, आत्मिकता आहे तर येथेच, परमात्म कार्य हेच आहे, परमात्म्याची मुले आहेत, हेच संपन्न जीवन, संपूर्ण जीवन आहे, असा प्रभाव असावा. सेवेमध्ये आणखीन प्रभावशाली व्हायचे आहे, आता असे वातावरण पसरवा ज्यामुळे म्हणतील की आम्ही पण चांगले बनु, तुम्ही फार चांगले आहात. अशी भक्त माळा बनत आहे. परंतु आता विजयमाला म्हणजे स्वर्गाचे अधिकारी बनणाऱ्यां ची माळा अगोदर तयार करा. पहिल्या जन्मासाठीच 9 लाख पाहिजेत, भक्त माळा फार लांब आहे. राज्याचे अधिकारी, राज्य करण्याचे नाही, राज्यामध्ये येण्याचे अधिकारी ते पण आत्ताच पाहिजेत. तर आता असे वातावरण बनवा, जे चांगले म्हणणारे, चांगले बनून संपर्कात येणारे कमीत कमी प्रजेच्या संबंधांमध्ये तरी यावेत. तरीपण तुमच्या संपर्कामध्ये येत आहेत, त्यांना स्वर्गाचे अधिकारी तर बनविणार ना. असे सेवेमध्ये प्रभावशाली बना. हे वर्ष प्रभावशाली बनवणे आणि प्रभावा द्वारे बाबांना प्रत्यक्ष करण्याच्या विशेषते द्वारे विशेष रूपात साजरे करा. स्वतः प्रभावित व्हायचे नाही, परंतु बाबांवर प्रभावित करा, समजले. जसे भक्ती मध्ये म्हणतात ना की, ही सर्व परमात्म्याची रूपे आहेत. ते उलट्या भावनेने म्हणताहेत. परंतु ज्ञानाच्या प्रभावाने, तुमच्या सर्वांच्या रूपात, बाबांचा अनुभव करतील. ज्याला पण पाहतील तर परमात्म स्वरूपाची अनुभूती होईल. तेव्हा नवयुग येईल. आता प्रथम जन्माची प्रजाच तयार केली नाही. शेवटी प्रजा तर सहज बनेल. परंतु पहिल्या जन्माची प्रजा, जसा राजा शक्तिशाली असेल तर प्रथम प्रजा पण शक्तिशाली असेल. तर संकल्पाच्या बीजाला सदा फलस्वरूपात आणा. प्रतिज्ञेला प्रत्यक्ष तेच्या रूपात नेहमी आणत राहा. डबल विदेशी काम करतील. सर्वात डबल फायदा घेतील ना. प्रत्येक सेकंदाच्या नवीन ते द्वारे, प्रत्येक सेकंदात बाबांचे शुभाशीष घेत रहा. अच्छा.
नेहमी प्रत्येक संकल्पात, नवीनतेची महानता दाखवणारे, प्रत्येक क्षणी उडती कलेचा अनुभव करणारे, नेहमी प्रभावशाली बनून बाबांचा प्रभाव प्रत्यक्ष करणारे, आत्म्यामध्ये नवीन जीवन बनविण्याची नवीन प्रेरणा देणारे, नवीन युगाचे अधिकारी बनविण्याची श्रेष्ठ लहर पसरविणारे, असे सदा वरदानी, महादानी आत्म्यांना, बाप दादांची सदा नवीनतेच्या संकल्पा बरोबर प्रेमळ आठवण आणि नमस्ते.
दादीं बरोबर वार्तालाप:-
शक्तिशाली संकल्पाचा सहयोग विशेष करून आजची गरज आहे. स्वतःचा पुरुषार्थ वेगळी गोष्ट आहे. परंतु श्रेष्ठ संकल्पाचा सहयोग याची विशेष आवश्यकता आहे. हीच सेवा तुम्हा विशेष आत्म्याची आहे. संकल्पाने सहयोग देणे, ही सेवा वाढवायची आहे. वाणी द्वारे समजावून सांगण्याची वेळ संपली आहे. आता श्रेष्ठ संकल्पाने परिवर्तन करावयाचे आहे. श्रेष्ठ भावनेने परिवर्तन करणे, या सेवेची आवश्यकता आहे. या बळाची सर्वांना आवश्यकता आहे. संकल्प तर सर्व करत आहेत, परंतु संकल्पाने बळ भरणे याची आवश्यकता आहे. तर जेवढे जे स्वतः शक्तिशाली आहेत, तेवढे इतरांमध्ये पण संकल्पा द्वारे बळ भरू शकतात. जसे आज-काल सूर्याची शक्ती जमा करून, कितीतरी कार्य सफल करत आहेत ना. तसेच ही पण संकल्पाची शक्ती एकत्रित करून, त्याद्वारे इतरांमध्ये पण बळ भरू शकता. कार्य सफल करू शकता. ते स्पष्ट म्हणतात की आमच्या मध्ये हिम्मत नाही तर त्यांना हिम्मत द्यायची आहे. वाणी द्वारे पण हिम्मत येत आहे, परंतू सदा काळासाठी नाही. वाणी बरोबरच श्रेष्ठ संकल्पाची सूक्ष्म शक्ती जादा कार्य करत आहे. जेवढी जी सूक्ष्म वस्तू आहे, तेवढी ती जादा सफलता देत आहे. वाणी पेक्षा संकल्प सूक्ष्म आहे ना, तर आज याची आवश्यकता आहे. ही संकल्पशक्ती फार सूक्ष्म आहे. ज्याप्रमाणे इंजेक्शनद्वारे रक्तामध्ये शक्ती भरतात ना. तसेच संकल्प पण इंजेक्शनचे काम करते त्यामुळे वृत्ती द्वारे संकल्पा द्वारे, संकल्पाची शक्ति येते आता या सेवेची फार आवश्यकता आहे. अच्छा.
शिक्षका (टीचर बहिणीं) बरोबर वार्तालाप:-
निमित्त सेवाधारी बनल्याने भाग्याची प्राप्ती झाली आहे. याचा अनुभव करता का? सेवेसाठी निमित्त बनणे म्हणजे सुवर्णसंधी मिळणे, कारण सेवाधारी ला स्वतः आठवण आणि सेवे शिवाय इतर काहीच राहत नाही. जर खरे सेवाधारी असाल तर दिवस-रात्र सेवेमध्ये व्यस्त असल्याकारणाने सहजच प्रगतीचा अनुभव होतो. ही माया जीत बनण्याची वेगळी लिफ्ट आहे. तर निमित्त सेवाधारी जेवढे पुढे जाऊ इच्छिता, तेवढे सहजच पुढे जाऊ शकता. हे विशेष वरदान आहे. तरीही जादा लिफ्ट वा सुवर्ण संधी मिळाली आहे, त्याचा लाभ घेतला आहे? सेवाधारी स्वतः सेवेचा मेवा खाणारी आत्मा बनतात कारण सेवेचा प्रत्यक्ष फळ आता मिळत आहे. चांगली हिम्मत ठेवली आहे. हिम्मत ठेवणार्या आत्म्यावर बाप दादाचा मदतीचा हात नेहमीच राहतो. याच मदतीने पुढे चालत आहात, आणि चालत राहणार आहात, हाच बाबाच्या मदतीचा हात नेहमीसाठी आशीर्वाद बनत आहे. बाप दादा सेवाधारी ना पाहून विशेष खुश होत आहेत. कारण बाप समान कार्यामध्ये निमित्त बनले आहात. नेहमी आपल्या सारख्या शिक्षकांची वृद्धी करत चला. नेहमी नवीन उमंग, नवीन उत्साह स्वतःमध्ये धारण करा आणि इतरांना पण दाखवा. तुमचा उमंग पाहून स्वतः सेवा होत राहील, यावेळी कोणत्यातरी सेवेच्या नवीनतेची योजना बनवा अशी योजना करा, ज्यामुळे विहंग मार्गाच्या सेवेचे विशेष साधन बनेल. जेवढे युक्त बनाल तेवढी नवीनता जाणवेल. असे करावयाचे आहे. आणि आठवणीच्या बळाने सफलता मिळत राहील. तर विशेष कोणते तरी कार्य करून दाखवा.
पार्टी बरोबर वार्तालाप:-
1) सर्व खजान्यांनी संपन्न श्रेष्ठ आत्मा आहात, असा अनुभव करता का? किती खजाने मिळाले आहेत ते जाणता का मोजू शकता का? अविनाशी आहेत आणि मोजता न येणारे आहेत. तर एकाएका खजान्याची आठवण करा. खजान्याला आठवण केल्याने खुशी होते. जेवढे खजाने आठवणीत ठेवाल, तेवढे समर्थ बनत जाल. आणि जेथे समर्थ आहे, तेथे व्यर्थ नष्ट होऊन जाते. व्यर्थ संकल्प, व्यर्थ वेळ, व्यर्थ बोल सर्व बदलून जाते असा अनुभव करता का? परिवर्तन झाले आहे ना. नवीन जीवनात आलेले आहात. नवीन जीवन, नवीन उमंग, नवीन उत्साह, प्रत्येक वेळ नवीन, प्रत्येक क्षण नवा. तर प्रत्येक संकल्पा मध्ये नवा उमंग, नवा उत्साह ठेवा, काल काय होतो, आज काय बनलो. आता जुना संकल्प, जुना संस्कार तर राहिला नाही ना. थोडा पण नको. तर सदा याच उमंगाने पुढे चालत राहा. जेव्हा सर्व काही प्राप्त केले तर भरपूर झालात ना. भरपूर वस्तू कधी हलचल मध्ये येत नाही. संपन्न बनणे म्हणजे अचल बनणे. तर आपल्या स्मृतीला समोर ठेवा की आम्ही खुशीच्या खजान्याने भरपूर भंडार बनलो आहे. जिथे खुशी आहे तिथे सदा काळासाठी दुःख दूर होते. तर जेवढे स्वतः खुश राहाल तेवढे दुसऱ्यांना खुश कराल, तर खुश राहा आणि खुशखबर सांगत राहा.
2) नेहमी विस्ताराला प्राप्त होणारी आत्मिक बाग आहे ना. आणि तुम्ही सर्व आत्मिक गुलाब आहात ना. ज्याप्रमाणे सर्व फुलांमध्ये गुलाबाची श्रेष्ठ महिमा आहे. तो आहे अल्पकाळासाठी सुगंध देणारा. तुम्ही कोण आहात? आत्मिक गुलाब म्हणजे अविनाशी सुगंध देणारे. नेहमी आत्मिक ते च्या सुगंधा मध्ये राहणारे आणि आत्मिक गुलाब बनवून सुगंध देणारे. असे बनलेत ना? सर्व आत्मिक गुलाब आहात, की इतर दुसरे पण वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत, परंतु जेवढी गुलाबाच्या फुलांची किंमत आहे तेवढी इतरांची नाही. परमात्म बागेतील नेहमी उमललेली फुले आहात. कधी कोमेजणार नाही. संकल्पाने पण आणि माया द्वारे पण कोमेजणारी नाहीत. माया येते म्हणून कोमेजून जाता. माया जीत बनाल तर नेहमी उमललेले बनाल. जसे बाबा अविनाशी आहेत, तसे मूलं पण नेहमी अविनाशी गुलाब आहेत. पुरुषार्थ पण अविनाशी आहे तर प्राप्ती पण अविनाशी आहे.
3) नेहमी स्वतःला सहयोगी अनुभव करता का? सोपे वाटते की अवघड वाटते? बाबांचा वारसा, मुलांचा अधिकार आहे. तर अधिकार नेहमी सहज मिळतो. ज्याप्रमाणे लौकिक पित्याचा अधिकार मुलांना सहज प्राप्त होत आहे. त्याप्रमाणे तुम्हीपण आधिकारी आहात. अधिकारी झाल्याने सहज योगी आहात. मेहनत करण्याची गरज नाही. पित्याची आठवण करणे कधी अवघड वाटतच नाही. हे बेहद चे पिता आहेत आणि अविनाशी पिता आहेत. त्यामुळे सदा सहयोगी आत्मे आहात. भक्ती म्हणजे मेहनत, ज्ञान म्हणजे सहज फळाची प्राप्ती. जेवढे संबंधाने आणि स्नेहा नी आठवण करता तेवढे सहज अनुभव होत आहे. नेहमी आपले हे वरदान आठवणीत ठेवा की मी आहेच सहज योगी. तर जशी स्मुर्ती असेल तशी स्थिती स्वतः बनेल. अच्छा.