21-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,आता तुम्ही पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करत आहात, पुरुषोत्तम देवता आहेत
कारण ते पावन आहेत,तुम्ही पावन बनत आहात"
प्रश्न:-
बाबांनी तुम्हा
मुलांना शरण का दिली आहे?
उत्तर:-
कारण तुम्ही सर्व कचऱ्याच्या डब्यात पडले होते.बाबा तुम्हाला कचऱ्याच्या डब्यातून
काढून फुलासारखे बनवत आहेत.आसुरी गुण असणाऱ्यांना दैवी गुणवान बनवत आहेत.विश्व नाटका
नुसार बाबांनी येऊन आम्हाला उकिरड्या मधून काढून,दत्तक घेऊन आपले बनवले आहे"
गीत:-
हे कोण आले आज
माझ्या मनाचे द्वारे सकाळी सकाळी…
ओम शांती।
रात्रीला दिवस बनवण्या साठी बाबांना यावे लागते.आता तुम्ही मुलं जाणता की बाबा आले
आहेत. अगोदर आम्ही शद्र वर्णाचे होतो.शुद्र बुद्धी होतो.वर्णाचे चित्र पण समजवण्या
साठी चांगले आहे.मुलं जाणतात की,आम्ही वर्णा मध्ये कसे चक्कर लावत आहोत.आता आम्हाला
परमपिता परमात्माने शुद्र पासून ब्राह्मण बनवले आहे.कल्प कल्पा मध्ये आम्ही
ब्राह्मण बनत आहोत.ब्राह्मणाला पुरुषोत्तम म्हणत नाहीत.पुरुषोत्तम तर देवतांना
म्हणतात.ब्राह्मण येथे पुरुषार्थ करत आहेत,पुरुषोत्तम बनण्यासाठी, पतीता पासून पावन
बनण्यासाठी.स्वतःला पाहिले पाहिजे की,आम्ही किती पावन बनलो आहोत,विद्यार्थी पण
अभ्यासामध्ये विचार सागर मंथन करतात ना,समजतात की या शिक्षणा द्वारे हे बनू.तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की,आम्ही आत्ता ब्राह्मण बनलो आहोत,देवता बनण्यासाठी.हे
अमुल्य जीवन आहे,कारण तुम्ही ईश्वरीय संतान आहात,ईश्वर तुम्हाला राजयोग शिकवत
आहेत,पतीता पासून पावन बनवत आहेत.पावन देवता बनत आहेत.वर्णावर समजवणे फार चांगले
आहे,सोपे आहे.सन्याशी इ.या गोष्टी समजत नाहीत.बाकी 84 जन्माचा हिशेब समजू शकतात.हे
पण समजतात आम्ही 84 जन्म घेत नाहीत.हो,पुनर्जन्म घेतात परंतु कमी जन्म घेतात.तुम्ही
स्पष्ट केल्याने लगेच समजतील.ज्ञान समजवण्याची पण युक्ती पाहिजे.तुम्ही मुलं येथे
समोर बसला आहात,तर बाबा बुद्धीला उजाळा देतात.जसे इतर मुलं पण ताजेतवाने होण्यासाठी
येतात. तुम्हाला तर बाबा रोज उत्साही करतात की धारणा करा.बुद्धीमध्ये हेच विचार करा
की,आम्ही८४जन्म कसे घेतो?कसे शुद्र पासून ब्राह्मण बनलो आहोत.ब्रह्माची मुले
ब्राह्मण. आता ब्रह्मा कोठून आले?बाबा समजवतात यांचे नाव ब्रह्मा ठेवतो.हे जे
ब्रह्माकुमार कुमारी आहेत,तर हे कुटुंब झाले ना.तर जरूर दत्तक घेतात.बाबाच दत्तक
घेतात,त्यांना पिता म्हटले जाते.दादा म्हणत नाही. पित्याला पिताच म्हटले
जाते.संपत्ती पित्याकडून मिळते.कोणी काका-मामा किंवा दुसरे पण दत्तक घेतात.जसे
बाबांनी सांगितले होते, एक मुलीला कोणी,कचऱ्याच्या डब्यात टाकले होते,कोणीतरी उचलून
कोणाच्या पदरी दिली,कारण त्यांना स्वतःचे मूल नव्हते.तर मुलगी ज्यांनी दत्तक
घेतली,त्यांनाच आई-बाबा म्हणेल ना.मग ही आहे बेहद ची गोष्ट. तुम्ही मुले पण जसे
कचऱ्याच्या डब्यात पडले होते.विषय वैतरणी नदीमध्ये पडले होते,खूप खराब झाले
होते.अविनाशी नाटका नुसार बाबांनी येऊन,त्या कचऱ्यातून काढून दत्तक घेतले
आहे.मनुष्य आहेत देह अभिमानी.कामक्रोध पण मोठे विकार आहेत ना.तर तुम्ही रावणाच्या
मोठ्या उकिरड्या मध्ये पडले होते.खरे तर तुम्ही शरणार्थी पण आहात.आता तुम्ही
बेहदच्या बाबांची शरण घेतली आहे.उकिरड्या मधुन निघून फुलासारखे देवता बनता.यावेळी
सारी दुनियाच कचऱ्याच्या मोठ्या डब्यात पडली आहे.बाबा तुम्हा मुलांना कचऱ्यातून
काढून आपले बनवतात परंतु उकिरड्यात राहणारे असे वेडे आहेत,जरी बाहेर काढले तरी
पण,त्यांना चांगलं वाटत नाही. बाबा येऊन बेहदच्या उकिरड्या मधून बाहेर काढत
आहेत.बाबांना बोलवतात की,बाबा आम्हाला फुलासारखे बनवा,जंगलात पडलो आहोत.बाबा मुलांना
बागेमध्ये घेऊन जात आहेत.शूद्रा पासून ब्राह्मण बनले आहात,नंतर देवता बनाल. देवतांची
राजधानी असते.ब्राह्मणाची राजधानी नसते,नाव आहे परंतु पांडवाची राजाई नसते.बेहदची
रात्र पुर्ण होऊन आता पूर्ण दिवस सुरू होत आहे.गीत ऐकले ना,कोण आले सकाळी माझ्या
मनाच्या द्वारे.बाबा येतात,रात्रीला नाहीसे करून दिवस बनवण्यासाठी,म्हणजे स्वर्गाची
स्थापना करण्या साठी.हे जरी बुद्धीमध्ये राहिले तरी खुशी होईल.नवीन दुनिया मध्ये,जे
उच्चपद प्राप्त करणारे आहेत,ते कधी आपला आसुरी स्वभाव बनवणार नाहीत.यज्ञाद्वारे एवढे
उच्च बनवतात तर,यज्ञाची फार प्रेमाने सेवा करतील. अशा यज्ञामध्ये तर हाडे पण दिली
पाहिजेत.स्वतःला पाहिले पाहिजे, अशा वागण्याने उच्चपद कसे मिळवू. बेसमज लहान मुले
तर नाहीत ना. आपण समजू शकतो,राजा कसे प्रजा कसे बनतात.बाबांनी रथ पण अनुभवी घेतला
आहे,जे राजे इत्यादींना चांगल्या प्रकारे ओळखत होते.राजांच्या दास दासींना पण फार
सुख मिळते.ते तर राज महल मध्येच राहतात परंतु त्यांना दास दासी म्हटले जाते.जे
राजाराणी खातात,ते त्यांना पण मिळते.बाहेरचे थोडेच खाऊ घालतात.दास दासी मध्ये पण
क्रमानुसार असतात.दासी पण कोणी शृंगार करणारी,कोणी मुलांना सांभाळणारी,कोणी झाडू
मारणारी पण असते.आत्ताच्या राजां कडे एवढ्या दास दासी आहेत,तर स्वर्गामध्ये किती
दास दासी असतील.सर्वांकडे आपापली जबाबदारी असते.राहण्याचे स्थान वेगळे असेल,ते काही
राजाराणींच्या महला सारखे सजवलेले नसेल.जसे नोकराचे घर असते ना.महला मध्ये येतील
जरूर,परंतु नोकराच्या घरांमध्येच राहतील.तर बाबा चांगल्या प्रकारे समजवतात
की,स्वतःवरती दया करा.आम्ही उच्च ते उच्च बनू.आम्ही आता शुद्रा पासून ब्राह्मण बनलो
आहोत,आहो सौभाग्य.हे संगमयुग खूप कल्याणकारी आहे,तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये
कल्याण सामावले आहे.भंडाऱ्या मध्ये पण योगा मध्ये राहून भोजन बनवले,तर अनेकांचे
कल्याण होईल.श्रीनाथ मंदिरांमध्ये, श्रीनाथांच्या आठवणी मध्येच,शांतीने भोजन
बनवतात.भक्त आपल्या भक्ती मध्येच मस्त राहतात. तुम्हाला मग ज्ञानामध्ये मस्त राहायचे
आहे.कृष्णाची अशी भक्ती करतात,काही विचारू नका. वृंदावन मध्ये दोन मुली आहेत,पूर्ण
भक्तीन आहेत,ते म्हणतात की बस आम्ही येथेच राहू,येथेच कृष्णाच्या आठवणी मध्ये शरीर
सोडू.त्यांना अनेक जण म्हणतात,चांगल्या घरांमध्ये राहा,ज्ञान द्या.असे म्हणतात आम्ही
इथेच राहतो,तर त्यांना भक्तशिरोमणी म्हणाल.कृष्णावर किती समर्पित होतात.आता तुम्हाला
बाबा वरती समर्पित व्हायचे आहे.प्रथम सुरुवातीला शिवबाबा वर किती समर्पित
झाले,अनेकानेक आले.जेव्हा भारतात आले,तर अनेकांना आपले घरदार इ. आठवणीत येऊ
लागले,अनेक जण निघून गेले.कधी कसली दशा,कधी कसली दशा बसते.बाबांना समजवले आहे,कोणी
पण आले तर,त्यांना विचारा कोठे आले आहात?आपण बाहेर बोर्ड पाहिला ना,ब्रह्माकुमार
कुमारी.तर हा परिवार आहे ना.एक आहे निराकार परमपिता परमात्मा,दुसरे प्रजापिता
ब्रह्मा चे पण गायन आहे.ही सर्व शिवबाबांची मुलं आहेत.वारसा त्यांच्या कडूनच
मिळतो.ते मत देतात की माझी आठवण करा,तर तुम्ही पतीतापासून पावन बनाल.कल्पापूर्वी असे
श्रेष्ठ मत दिले होते.हे खूप उच्च शिक्षण आहे,हे पण तुमच्या बुद्धी मध्ये आहे.आम्ही
बाबा कडुन खुप वारसा घेत आहोत.तुम्ही मुलं मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण
घेतात.तुम्हाला दैवी गुण जरूर धारण करावयाचे आहेत.तुमचे खाणे-पिणे बोलणे-चालणे,खूप
उत्तम असले पाहिजे.देवता खूप थोडे खातात, त्यांच्या मध्ये कोणतीच लालच नसते. ३६
प्रकारचे भोजन बनते परंतु खूप थोडे खातात.खाण्या पिण्याची लालच ठेवणे याला पण आसुरी
चलन म्हटले जाते.दैवी गुण धारण करावयाचे आहेत,तर खाणे-पिणे फार शुद्ध आणि साधारण
असले पाहिजे परंतु माया अशी आहे,जी एकदम पत्थर बुद्धी बनवते,त्यामुळे पद पण तसेच
प्राप्त करतात.बाबा म्हणतात की स्वतःचे कल्याण करण्यासाठी दैवी गुण धारण करा.
चांगल्या रितीने शिकाल तर तुम्हालाच फायदा मिळेल.बाबा आर्शिवाद देत नाहीत,तुम्ही
तुमच्या पुरुषार्थाने प्राप्त कराल.स्वतःला पाहिले पाहिजे की,आम्ही किती सेवा
करतो?आम्ही या पुरुषार्था द्वारे काय बनू शकतो?यावेळी शरीर सुटले तर काय
मिळेल?बाबांना जर कोणी विचारले तर,बाबा लगेच सांगतील. अशा चलनाद्वारे समजले जाते
की,हे पद प्राप्त कराल.पुरुषार्थ करत नाही तर कल्प कल्पा साठी स्वत:चे नुकसान
कराल.चांगली सेवा करणारे जरूर चांगले पद प्राप्त करतील. मनात येते की,हे दास दासी
बनतील, असे बोलू पण शकत नाहीत. शाळेमध्ये पण विद्यार्थी समजतात की,आम्ही श्रेष्ठ बनू
की,कनिष्ठ बनू.दासदासी मध्ये पण ज्येष्ठ आणि कनिष्ठ असतात.ज्येष्ठांचा दर्जा उच्च
असतो.सावकार मध्ये पण उच्च आणि कनिष्ठ असतात.झाडू मारणाऱ्या दासीला,महला मध्ये
येण्याचा आदेश नसतो.या सर्व गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता.शेवटी तर
आणखीनच स्पष्ट समजू शकाल.उच्च बनवणाऱ्यां चा मान पण ठेवला पाहिजे ना.पहा कुमारका
आहे,त्या ज्येष्ठ आहेत तर मान ठेवला पाहिजे ना.बाबा मुलांना लक्ष देण्यासाठी
सांगतात,जे महारथी मुलं आहेत,त्यांचा मान ठेवा.मान ठेवणार नसेल तर स्वतः वरती पापाचे
ओझे चढवाल.या सर्व गोष्टी बाबा लक्षात आणून देतात.फार काळजी घेतली
पाहिजे.क्रमानुसार कोणाचा मान कसा ठेवला पाहिजे,बाबा तर प्रत्येकाला ओळखतात
ना.कोणाला थोडे समजावले तर विरोधी बनण्यास उशीर करत नाहीत.परत कुमारी, मातांना पण
बंधन घालतात.त्रास सहन करावा लागतो.सहसा माताच लिहितात की,बाबा आम्हाला फार तंग करत
आहेत,आम्ही काय करू? अरे तुम्ही जनावर थोडेच आहात? जे,ते जबरदस्ती करतील.मनातून
पवित्र बनायचे नसते,तेव्हा तर विचारतात,की काय करू?यामध्ये तर विचारण्याची गोष्टच
नाही.आत्मा आपलाच मित्र आहे,आत्मा आपलाच शत्रू आहे,जे पाहिजे ते करा.बाबांना विचारणे
म्हणजे,मनात आहे.मुख्य गोष्ट आठवणीची आहे.बाबाच्या आठवणी द्वारे तुम्ही पावन बनतात.
हे लक्ष्मीनारायण क्रमांक एकचे पावन आहेत ना.मम्मा खूप सेवा करत होती.असे तर कोणी
म्हणू शकत नाही,मी मम्मा पेक्षा हुशार आहे.मम्मा ज्ञाना मध्ये सर्वात हुशार होती.
योगामध्ये अनेकां मध्ये कमतरता आहे,आठवणीत राहू शकत नाहीत. आठवण करणार नाही तर,
विकर्म विनाश कसे होतील?कायदा म्हणतो की शेवटी,आठवणीमध्ये शरीर सोडावे
लागेल.शिवबाच्या आठवणी मध्येच प्राण तना मधून निघून जाईल. एका बाबा शिवाय कोणाची
आठवण येऊ नये.कोठे पण आसक्ती असू नये, हाच अभ्यास करायचा करायचा आहे.आम्ही आलो
होतो,आता अशरीरी होऊन जायचे आहे.मुलांना वारंवार समजावत राहतात,खूप गोड बनायचे
आहे,सोबत दैवी गुण पण पाहिजेत.देह अभिमानाचे भूत आहे ना.स्वतःवरती खूप लक्ष ठेवायचे
आहे,खुप प्रेमाने चालायचे आहे. बाबांची आठवण करा आणि चक्राची पण आठवण करा.कोणाला
समजवले तर आश्चर्य खातील.८४ जन्माची कोणाला आठवण राहत नाही तर,८४ लाख जन्माची कशी
आठवण राहू शकेल?विचार पण करू शकत नाहीत.या चक्राला बुद्धीमध्ये ठेवले तरी,आहो
सौभाग्य. आता हे नाटक पूर्ण होत आहे.जुन्या दुनिया पासून वैराग्य आले पाहिजे.
बुद्धीयोग शांतीधाम सुखधाम मध्ये ठेवा.गीतेमध्ये पण मनमनाभव आहे. कोणीही गीता पाठी
मनमनाभवचा अर्थ समजत नाहीत,तुम्ही मुलं जाणता.भगवानुवाच देहाचे सर्व संबंध
सोडून,स्वतःला आत्मा समजा. कोण म्हटले?कृष्ण भगवान थोडेच आहेत.कोणी म्हणतात आम्ही
ग्रंथालाच मानतो,जरी भगवान आले तरी पण ग्रंथालाच मानणार.बरोबर ग्रंथ वाचत
राहतात.भगवान आले आहेत,राजयोग शिकवत आहेत, स्थापना होत आहे.ते ग्रंथ इत्यादी सर्व
भक्तिमार्गाचे आहेत.भगवंतावर निश्चय बसला तर वारसा घेण्याचा प्रयत्न करतील.मग भक्ती
पण उडून जाईल परंतु जेव्हा निश्चय होईल तेव्हाच बनतील.अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)देवता
बनण्यासाठी खूप उत्तम संस्कार धारण करायचे आहेत. खाणे-पिणे फार साधारण ठेवायचे
आहे.जास्त खाण्याची लालच ठेवायची नाही.आपले कल्याण करण्यासाठी दैवी गुणांची धारणा
करायची आहे.
(२) स्वतःवरती ध्यान
ठेवून सर्वां बरोबर खूप प्रेमाने वागायचे आहे.आपल्यापेक्षा जे जेष्ठ आहेत, त्यांचा
मान ठेवायचा आहे.फार गोड बनायचे आहे.देह अभिमानात यायचे नाही.
वरदान:-
दाता पणाची
स्थिती आणि सामवण्याच्या शक्तीद्वारे सदा विघ्नविनाशक समाधान स्वरूप भव.
विघ्नविनाशक समाधान
स्वरूप बनण्याचे वरदान,विशेष गोष्टीच्या आधारावर प्राप्त होते, (१) नेहमी
स्मृतीमध्ये ठेवा की आम्ही दाताची मुल आहोत,त्यामुळे मला सर्वांना मान द्यायचा
आहे.मान मिळेल स्नेह मिळेल तेव्हाच,स्नेही बनू,नाही.मला द्यायचा आहे.(२)स्वतःसाठी
तसेच संबंध संपर्क मध्ये सर्वा साठी सामावण्याचे शक्तीस्वरूप बनायचे आहे.या दोन
विशेषता द्वारे शुभ भावना शुभकामना द्वारे संपन्न समाधान स्वरूप बनाल.
बोधवाक्य:-
सत्याला आपला
सोबती बनवा,तर तुमची नाव कधी बुडणार नाही.