17-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांना , बाबा ज्ञानाचे सागर आहेत , ते सर्व काही जाणतात , ही त्यांची उलट
महिमा आहे , बाबा तुम्हाला पतिता पासून पावन बनविण्यासाठी येतात .
प्रश्न:-
बाबांच्या
सोबत सर्वात अधिक महिमा कोणाची आहे आणि कशी?
उत्तर:-
1) बाबांसोबत भारताची पण महिमा खूप आहे.भारतच अविनाशी खंड आहे.भारतच स्वर्ग बनतो.
बाबांनी भारतीयांनाच धनवान,सुखी आणि पवित्र बनविले आहे.
2) गीतेची सुद्धा अपरम अपार महिमा आहे,सर्वशास्त्रमई शिरोमणी गीता आहे.
3) तुम्हा
चैतन्य ज्ञान गगांची सुद्धा खूप महिमा आहे. तुम्ही प्रत्यक्ष सागरा मधून निघाल्या
आहात.
ओम शांती।
ओम शांती चा अर्थ तर नवीन आणि जुन्या मुलांनी समजला आहे.तुम्हा मुलांना समजले आहे
आपण सर्व आत्मा परमात्माची मुले आहोत.परमात्मा उंच ते उंच आहेत आणि खूप प्रेमळ
सर्वांचे माशूक आहेत.मुलांना ज्ञान आणि भक्तीचे रहस्य तर समजविले आहे,ज्ञान म्हणजे
दिवस - सतयुग त्रेता, भक्ती म्हणजे रात्र द्वापार कलयुग. भारताचीच गोष्ट
आहे.सुरुवातीला तुम्ही भारतवासीच येता.८४ चे चक्र सुद्धा तुम्हा भारतवासींचे च आहे.
भारतच अविनाशी खंड आहे.भारत खंडच स्वर्ग बनतो,दुसरा कोणताच खंड स्वर्ग बनत
नाही.मुलांना समजाविले आहे,नवीन सृष्टीमध्ये भारतच असतो.भारतालाच स्वर्ग म्हणले
जाते.भारतामध्ये राहणारेच पुन्हा ८४जन्म घेऊन नर्क वासी बनतात.तेच पूर्ण स्वर्गवासी
बनतील. या वेळी सर्व नर्कवासी आहेत, तरी सुद्धा दुसरे सर्व खंड विनाश होऊन भारतच
राहील.भारत खंडाची महिमा अपरंपार आहे. भारता मध्येच येऊन बाबा तुम्हाला राजयोग
शिकवितात. हे गीताचे पुरुषोत्तम संगमयुग आहे. भारतच पुन्हा पुरुषोत्तम बनणार आहे.आता
तो आदि सनातन देवी देवता धर्मच नाही,राज्य सुद्धा नाही तर ते युग सुद्धा नाही.तुम्ही
मुले जाणता विश्वाचे निर्माते सर्वशक्तिमान एकालाच म्हणले जाते.भारत वासी ही खूप
मोठी चूक करतात की, ईश्वराला अंतर्यामी म्हणतात,सर्वांच्या मनातले ते जाणतात,असे
समजतात. बाबा म्हणतात मी कोणाच्याच मनातील ओळखत नाही.माझे तर कामच आहे पतितांना
पावन बनविणे. खूप जण म्हणतात शिवबाबा तुम्ही तर सर्वांच्या मनातले ओळखता.बाबा
म्हणतात मी ओळखत नाही,मी कोणाच्याच मनातले ओळखत नाही.मी तर येऊन पतितांना पावन
बनवितो.मला तर पतित दुनियेमध्येच बोलवितात. आणि मी एकदाच येतो जेव्हा जुन्या
दुनियेला नवीन बनवायचे असते. मनुष्यांना हे माहित नाही, ही दुनिया जुन्या पासून
नवीन आणि नव्या पासून जुनी केव्हा होते?प्रत्येक गोष्ट नवीन पासून जुनी सतो,रजो, तमो
मध्ये येते. शरीर वानप्रस्थ झाले तर ते सोडून पुन्हा बाल्य अवस्थेमध्ये प्रवेश करतो.
तुम्ही मुले जाणता की नवीन दुनियेमध्ये भारत किती श्रेष्ठ होता. भारताची महिमा
अपरंपार आहे. एवढा सुखी,धनवान,पवित्र दुसरा कोणता खंड बनत नाही.पुन्हा सतोप्रधान
बनविण्यासाठी बाबा येतात.सतोप्रधान दुनियेची स्थापना होत आहे.त्रिमूर्ती
ब्रह्मा,विष्णू,शंकर यांना कोणी रचले? उंच ते उंच शिवबाबा आहेत.त्रिमूर्ती ब्रह्मा
परंतु अर्थ समजत नाही.वास्तव मध्ये त्रिमूर्ती शिव न की ब्रम्हा म्हणले
पाहिजे.देवांचे देव महादेव असे गायन आहे.शंकराला श्रेष्ठ मानतात,तर मग त्रिमूर्ती
शंकर म्हटले पाहिजे ना,मग त्रिमूर्ती ब्रम्हा का म्हणले जाते?शिव रचियता
आहेत.परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारा ब्राह्मणांची स्थापना करतात असे गायन
आहे.भक्तिमार्ग मध्ये ज्ञानाच्या सागर बाबांना जानी जाननहार असे म्हणतात,आता ही
महिमा अर्थ सहित नाही.तुम्ही मुले जाणता बाबा द्वारे आपल्याला वारसा मिळतो.ते स्वतः
आम्हा ब्राह्मणांना शिकवितात कारण की ते पिता आहेत,सर्वोच्च शिक्षक आहेत. विश्वाच्या
इतिहास भूगोलाचे चक्र कसे फिरते हे पण समजावितात,ते ज्ञानाचे सागर आहेत.बाकी असे
नाही की ते जानी जाननहार आहेत.ही चूक आहे.मी फक्त येऊन पतितांना पावन बनवितो. २१
जन्मासाठी राज्य भाग्य देतो.भक्तिमार्ग मध्ये अल्प काळाचे सुखा आहे.त्याला संन्यासी,
हटयोगी जाणत नाहीत.ब्रह्मला आठवण करतात. आता ब्रह्म तर ईश्वर नाही. ईश्वर तर एक
निराकार शिव आहेत. जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत. आम्हा आत्म्याचे राहण्याचे ठिकाण
ब्रह्मांड, गोड घर आहे.तेथून आत्मा येथे भूमिका वटविण्यासाठी येते.आत्मा म्हणते
आम्ही एक शरीर सोडून दुसरं -तिसरं घेत राहतो. ८४ जन्म सुद्धा भारत वासियांचे
आहेत.ज्यांनी खूप भक्ती केली आहे,तेच पुन्हा घेतील, जास्त समजतील.
बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारांमध्ये खुशाल राहा,परंतु श्रीमतावर चालत रहा. तुम्ही
सर्व आत्मा आशिक एका परमात्म माशुकचे आहात.भक्ती मार्गापासून तुम्ही आठवण करत आले
आहात.आत्मा बाबांना आठवण करते. हे दुःखधाम आहे. आपण आत्मे वास्तवात शांतीधामचे
राहणारे आहोत.नंतर आलो सुखधाम मध्ये,नंतर आपण ८४ जन्म घेतले. 'हम सो, सो हम' चे
रहस्य बाबांनी समजवले आहे.ते तर म्हणतात आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा. आता
बाबांनी समजवले आहे, आपण देवता, क्षत्रिय, वैश्य सो शूद्र बनतो.आता आपण ब्राह्मण
बनलो आहोत देवता बनण्यासाठी. हा खरा अर्थ आहे. तो बिल्कुल चुकीचा अर्थ आहे.सतयुगा
मध्ये एक देवी देवता धर्म,अद्वैत धर्म होता.त्यानंतर दुसरे धर्म आले तर,द्वैत बनले.
द्वापारानंतर आसुरी रावण राज्य सुरू होते.सत युगामध्ये रावण राज्य नसते, मग हे पाच
विकार पण येऊ शकत नाहीत. ती संपूर्ण निर्विकारी दुनिया आहे. राम सीता ला १४ कला
संपूर्ण म्हटले जाते.रामाला बाण का दिला आहे, हे मनुष्य जाणत नाही.हिंसेची तर
गोष्टच नाही.तुम्ही ईश्वरीय विद्यार्थी आहात.तर हे बाबा पण आहेत आणि तुम्हा
विद्यार्थ्यांचे शिक्षक पण आहेत आणि तुम्हा मुलांना सद्गती देऊन,स्वर्गामध्ये घेऊन
जातात.तर पिता शिक्षक गुरु तिन्ही झाले ना.त्यांची तुम्ही मुलं बनले आहेत. तर खूप
आनंद झाला पाहिजे.मनुष्य तर काहीच जाणत नाही, रावण राज्य आहे ना.प्रत्येक वर्षी
रावणाला जाळतात परंतु रावण कोण आहे,हे जाणत नाहीत.तुम्ही मुले जाणता, हा रावण
भारताचा सर्वात मोठा शत्रु आहे.हे ज्ञान तुम्हा मुलांना ज्ञानसागर बाबांकडून
प्राप्त होते.ते बाबा ज्ञानाचे सागर,आनंदाचे सागर आहेत.ज्ञान सागरामधून तुम्ही मुले
ढग भरून जाऊन वर्षा करतात. ज्ञानगंगा तुम्ही मुले आहात.बाबा म्हणतात मी आता तुम्हाला
पावन बनविण्यासाठी आलो आहे, हा एक जन्म पवित्र बना,मला आठवण करा तर तुम्ही
तमोप्रधान पासून, सतोप्रधान बनाल.मीच पतित-पावन आहे,जेवढे शक्य होईल तेवढी आठवण करा.
मुखाने शिवबाबा शिवबाबा पण म्हणायचे नाही.जसे आशिक माशुक आठवण करतात, एकदा पाहिले,
बस, बुद्धीमध्ये त्यांची आठवण राहते. भक्तिमार्ग मध्ये सुद्धा जो,ज्या देवतेची पूजा
करतो,त्यांची आठवण करतो,त्यांचा साक्षात्कार होतो.ते अल्पकाळासाठी आहे.भक्ती करत
खाली उतरत आले.आता मृत्यू समोर उभा आहे हाहाकारा नंतर जय जय कार होणार आहे .
भारतामध्येच रक्ताच्या नद्या वाहतील. युद्धाचे चिन्ह पण दिसून येत आहेत.तमोप्रधान
बनले आहेत.आता तुम्ही सतोप्रधान बनत आहात.जे कल्पापूर्वी देवता बनले आहेत,तेच येऊन
बाबांकडून वारसा घेतील. थोडी भक्ती केली असेल तर ज्ञान सुद्धा कमी घेतले.मग
प्रजेमध्ये क्रमा अनुसार पद प्राप्त करतील.चांगले पुरुषार्थी श्रीमतावर चालुन चांगले
पद प्राप्त करतील.वर्तणूक पण चांगली असेल.दैवी गुण पण धारण करायचे आहेत, ते मग 21
जन्म चालतील. आता सर्व आसुरी गुण आहेत. आसुरी दुनिया,पतित दुनिया आहे ना. तुम्हा
मुलांना विश्वाचा इतिहास-भूगोल पण समजाविला आहे ना. या वेळेत बाबा म्हणतात आठवण
करायचे कष्ट घ्या,तर तुम्ही खरं सोनं बनाल.सतयुग सोन्याची दुनिया आहे,खरं सोनं नंतर
मग त्रेतामध्ये चांदीची भेसळ होते.कला कमी होत जातात.आता कोणत्याच कला नाहीत.जेव्हा
अशी अवस्था होते त्यावेळेस बाबा येतात हे सुद्धा नाटकांमध्ये नोंद आहे.
रावण राज्यांमध्ये हे सर्वच बेसमज बनले आहेत.जे बेहद नाटकाचे कलाकार असूनही नाटकाचा
आदी-मध्य-अंतला जाणत नाहीत. तुम्ही अभिनेते आहात ना.तुम्ही जाणता आपण येथे भूमिका
वठविण्यासाठी आलो आहोत.परंतु अभिनेते असून सुद्धा जाणत नाहीत. तर बेहदचे बाबा
म्हणतील ना,तुम्ही बेसमजत बनले आहात.आता तुम्हाला समजदार हिऱ्यासारखं बनविण्यासाठी
आलो आहे.मग रावण वरती विजय प्राप्त करुन सर्वांना सोबत घेऊन जातो,मग या पतित
दुनियेचा विनाश होईल. मच्छरा सारखे सर्वांना घेऊन जातो. तुमचे मुख्य ध्येय समोर उभी
आहे. असे तुम्हाला बनवायचे आहे,तेव्हा तर तुम्ही स्वर्गामध्ये जाणार ना.तुम्ही
ब्रह्मकुमार कुमारी हा पुरुषार्थ करत आहात. मनुष्याची बुद्धी तमोप्रधान आहे म्हणून
ती चालत नाही.एवढे ब्रह्माकुमार कुमारी आहेत तर जरूर प्रजापिता ब्रम्हा पण असेल ना.
ब्राह्मण शेंडी आहेत,ब्राह्मण मग देवता….. चित्रांमध्ये ब्राह्मणाला आणि शिवला
दाखवत नाही. तुम्ही ब्राह्मण आता भारताला स्वर्ग बनवित आहात.
अच्छा,
गोड-गोड फार-फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. उच्च पद
प्राप्त करायचे असेल तर, श्रीमतावर चालून,चांगली वर्तणूक धारण करायची आहे.
2. खरे आशिक बणुन,एका माशुकला आठवण करायचे आहे. जेवढा होईल तेवढा,आठवणीचा अभ्यास
वाढवायचा आहे.
वरदान:-
स्थुल देश आणि
शरीराच्या स्मृती पासून वेगळे सूक्ष्म देशांचे वेषधारी भव .
जसे आजकालच्या
दुनियेमध्ये जसे कर्तव्य तसा वेश धारण करतात, तसे तुम्ही पण ज्यावेळी जसे कर्म करू
इच्छिता तसा वेश धारण करा. कधी साकारी, कधी आकारी.असे बहुरूपी बना तर सर्व
स्वरूपांच्या सुखाचा अनुभव करू शकाल. हे आपलेच स्वरूप आहेत. दुसऱ्यांचे वस्त्र
योग्य येथील किंवा न येतील परंतु स्वतःचे वस्त्र सहज धारण करू शकता त्यामुळे या
वरदानाच्या कार्यामध्ये अभ्यास करा तर अव्यक्त मिलनाचे विचित्र अनुभव करू शकाल.
बोधवाक्य:-
सर्वांचा आदर
करणारे आदर्श बनतात . सन्मान द्या तर सन्मान मिळाले .
मातेश्वरीजींचे
महावाक्य :-
1) मनुष्य
आत्मा आपल्या संपूर्ण मिळकती नुसार भविष्य प्रारब्ध भोगते .
खूप मनुष्य असे समजतात की आमच्या पूर्व जन्माच्या चांगल्या कर्मामुळे आता हे ज्ञान
प्राप्त झाले आहे परंतु अशी गोष्ट नाही, पूर्व जन्मा चे चांगले फळ आहे,हे तर आपण
जाणतो. कल्पाचे चक्र फिरत राहते, सतो रजो तमो बदली होत जातात परंतु ड्रामा अनुसार
पुरुषार्थ ने प्रालब्ध बनवण्याची संधी ठेवली आहे. तेव्हा तर सतयुगामध्ये,कोणी राजा
राणी, कोणी दासी,कोणी प्रजा पद प्राप्त करतात.तर हीच पुरुषार्थांची सिद्धी आहे,तेथे
द्वैत,ईर्षा नसते, तेथे प्रजा पण सुखी आहे. राजा राणी प्रजेचा सांभाळ करतात, जसे की
आई वडील आपल्या मुलांना सांभाळतात.तेथे गरीब साहुकार सर्व संतुष्ट असतात.या एका
जन्माच्या पुरूषार्थ मुळे २१ जन्मासाठी सुख प्राप्त होते. ही अविनाशी प्राप्ती आहे.
या अविनाशी प्राप्ती मुळे अविनाशी ज्ञानाने, अविनाशी पद प्राप्त होते. आता आपण
सतयुगी दुनियेमध्ये जात आहोत.हा सत्य खेळ चालला आहे. येथे काही छू मंत्र ची गोष्ट
नाही.
2) गुरु मत ,
शास्त्रांची मत ही काही परमात्म मत नाही .
परमात्मा म्हणतात मुलांनो हे गुरु मत, शास्त्रांची मत काही माझी मत नाही, हे तर
फक्त माझ्या नावाची मत देतात परंतु, माझी मत तर मी जाणतो ना. माझ्या प्राप्तीचा
ठिकाणा मी येऊन देतो. त्या अगोदर माझा पत्ता कोणी देऊ शकत नाही. गीतेमध्ये जरी
भगवानुवाच लिहिलेले आहे,परंतु गीता सुद्धा मनुष्यांनी बनवलेली आहे. ईश्वर स्वतः
ज्ञानाचे सागर आहेत. ईश्वरने जे महावाक्य ऐकवले आहे,त्याची आठवण गीता बनवली आहे.हे
विद्वान पंडित आचार्य म्हणतात,ईश्वराने संस्कृत मध्ये महा वाक्य उच्चारण केले आहेत,
ते शिकल्याशिवाय परमात्मप्राप्ती होऊ शकत. हे तर अजूनच उलट्या कर्मकांडा मध्ये
फसवितात, वेद शास्त्र वाचून जर सीडी चढले तर मग उतरावी पण लागेल,म्हणजे त्या
सर्वांना विसरून परमात्म सोबत बुद्धीचा योग जोडावा लागेल,कारण परमात्म सरळ म्हणतात
ह्या कर्मकांड, वेद,शास्त्र इत्यादी वाचल्याने माझी प्राप्ती होऊ शकत नाही. ध्रुव,
प्रल्हाद, मीराने काही शास्त्र वाचलीत का? येथे तर शिकलेले सर्व विसरून जावे लागेल.
जसे अर्जुनाने पण शिकले होते, त्यांना पण विसरावे लागले. ईश्वराचे स्पष्ट महावाक्य
आहेत श्वासो श्वास माझी आठवण करा.यामध्ये काही करण्याची गरज नाही.जोपर्यंत हे ज्ञान
नाही तोपर्यंत भक्तीमार्ग चालतो. परंतु ज्ञानाचा दिपक जागृत होतो. त्यावेळेस
कर्मकांड सुटतात.कारण की कर्मकांड करता-करता जर शरीर सुटले तर फायदा काय झाला?
प्रालब्ध तर बनली नाही, कर्म बंधनाचे हिसाब किताबापासून मुक्ती तर मिळाली नाही.लोक
तर समजतात खोटं बोलू नये, चोरी करू नये, कोणाला दुःख देऊ नये, हे तर चांगले कर्म आहे.
परंतू येथे तर कायमस्वरूपी कर्माच्या बंधनापासून सुटायचे आहे, आणि विकर्माच्या
मुळाला काढून टाकायचे आहे. आपण तर सर्व असे इच्छितो,असे बीज पेरावे की ज्यामुळे
चांगल्या कर्माची झाडे येतील.त्यामुळे मनुष्य जीवनाच्या कार्याला जाणून श्रेष्ठ
कर्म करायचे आहे. अच्छा.