01-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,सुख आणि दुःखाच्या खेळाला तुम्हीच जाणतात,अर्धाकल्प सुख,अर्धाकल्प दु:ख
आहे,बाबा दुःख दूर करून सुख देण्यासाठी येतात"
प्रश्न:-
काही मुलं
कोणत्या एका गोष्टी मध्ये स्वतःलाच खुश करून पोपटा सारखे समजतात?
उत्तर:-
काही मुलं समजतात आम्ही तर संपूर्ण बनलो,आम्ही सर्वगुण संपन्न बनलो,असे समजून
स्वतःलाच खूश करतात.हे पण पोपटा सारखे झाले ना.बाबा म्हणतात,गोड मुलांनो आता खूप
पुरार्षार्थ करायचा आहे.तुम्ही पावन बनाल तर,परत पावन दुनिया पण पाहिजे.राजधानी
स्थापन होत आहे, एक तर जाऊ शकत नाही.
गीत:-
तुम्हीच
माता,पिता तुम्हीच आहात…..
ओम शांती।
ही मुलांना स्वतःची ओळख मिळाली आहे.बाबा पण असे म्हणतात आम्ही सर्व आत्मे आहोत,सर्व
मनुष्यच आहेत.मोठा असेल किंवा छोटा असेल, राष्ट्रपती किंवा राजाराणी,सर्वच मनुष्य
आहेत.आता बाबा म्हणतात सर्व आत्मे आहेत,मी सर्वांचा पिता आहे म्हणून मला म्हणतात
परम पिता, परमात्मा म्हणजे सर्वोच्च आत्मा.मुलं जाणतात आम्हा आत्म्याचे ते पिता
आहेत,आम्ही सर्व भाऊ आहोत.परत ब्रह्मा द्वारे भाऊ बहिणीचे उच्च-नीच कुळ होते.आत्मे
तर सर्व आत्माच आहेत.हे पण तुम्हीच समजतात.मनुष्य तर काहीच समजत नाहीत.तुम्हाला बाबा
सन्मुख समजवतात,बाबांना तर कोणी जाणत नाहीत.मनुष्य गायन करतात हे भगवान, हे मात
पिता,कारण उच्च ते उच्च तर एक असायला पाहिजेत ना.ते सर्व आत्म्याचे पिता
आहेत,सर्वांना सुख देणारे आहेत.सुख आणि दुःखाच्या खेळाला तुम्हीच जाणतात.मनुष्य तर
समजतात सुख आहे आणि लगेच दुःख पण आहे.हे समजत नाहीत अर्धाकल्प सुख आणि अर्धाकल्प
दुःख आहे. सतोप्रधान,सतो,रजो,तमो आहेत ना.शांतीधाम मध्ये आम्ही आत्मा आहोत,तर तेथे
सर्व खऱ्या सोन्यासारखे आहेत,बनावट,भेसळ काहीच नाही. जरी आप आपली भूमिका नोंदलेली
आहे परंतु आत्मे सर्व पवित्र राहतात. अपवित्र आत्मा राहू शकत नाही.या वेळेत परत
कोणीही पवित्र आत्मा,येथे होऊ शकत नाही.तुम्ही ब्राह्मण कुलभूषण पण पवित्र बनत आहात.
तुम्ही आता स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत.ते संपर्ण निर्विकारी आहेत. तुम्हाला
थोडेच संपूर्ण निर्विकारी म्हणू शकतो.जरी शंकराचार्य असतील किंवा दुसरे कोणी
असतील,देवता शिवाय कोणाला संपूर्ण निर्विकारी म्हणू शकत नाही.या गोष्टी तुम्हीच
ज्ञान सागराच्या मुखाद्वारे ऐकतात.हे पण जाणता ज्ञानसागर एकाच वेळेस येतात.मनुष्य
तर पुनर्जन्म घेऊन,येत राहतात. कोणी ज्ञान ऐकुन गेलेले,संस्कार घेऊन गेले,तर परत
येतात आणि ज्ञान घेतात. समजा ६-८वर्षाचा असेल,कोणा कोणा मध्ये चांगली समज पण
येते.आत्मा तर तीच आहे ना.ज्ञान ऐकणे त्यांना चांगले वाटते.आत्मा समजते आम्हाला बाबा
कडून तेच ज्ञान मिळत आहे.मनामध्ये खुशी राहते,तर दुसऱ्यांना पण शिकवण्यास सुरू
करतात,चपळता येते.जसे लढाई करणारे ते संस्कार घेऊन जातात,तर लहानपणी तेच काम खुशीने
करायला सुरु करतात.आता तुम्हाला तर पुरुषार्थ करून,नविन दुनियाचे मालक बनायचे
आहे.तुम्ही सर्वांना समजावू शकता,पाहिजे तर तुम्ही नवीन दुनिये चे मालक बनू शकतात
किंवा शांतीधाम चे मालक बनू शकता.शांतीधाम तुमचे घर आहे,तेथून तुम्ही येथे भूमिका
करण्यासाठी आले आहात,हे पण कोणी जाणत नाहीत, कारण आत्म्याची माहिती नाही. तुम्हाला
पण प्रथम थोडेच माहिती होते की, आम्ही निराकारी दुनिये मधून येथे आलो आहोत.आम्ही
आत्मा बिंदू आहोत.सन्याशी लोक,जरी म्हणतात,भ्रुकुटीच्या मध्ये आत्मा ताऱ्यासारखे
राहते,तरीही बुद्धीमध्ये मोठे रुपच येते.शाळीग्राम म्हटल्याने रूप मोठे समजतात.आत्मा
शाळीग्राम आहे ना.यज्ञ स्थापन करतात तर, त्यामध्ये मोठे मोठे शाळीग्राम बनवतात.
पूजाच्या वेळेत शाळीग्रामाचे मोठे रूपच बुद्धीमध्ये राहते.बाबा म्हणतात हे सर्व
अज्ञान आहे.ज्ञान तर मीच ऐकवू शकतो,दुसरे कोणी दुनियेत ऐकवू शकत नाही.हे कोणी समजत
नाहीत,की आत्मा बिंदी आहे,परमात्मा पण बिंदी आहे.ते तर अखंड ज्योती स्वरुप ब्रह्म
म्हणतात.ब्रह्मला च भगवान समजतात आणि परत स्वतःलाच भगवान म्हणतात.असे म्हणतात आम्ही
भूमिका करण्यासाठी,अभिनय करण्यासाठी छोट्या आत्म्याचे रूप धारण करतो, परत मोठी
ज्योति होऊन मिसळून जातो.लीन होतात,म्हणजे मिसळून गेल्यानंतर भूमिकाच नष्ट होईल.हे
खूपच चुकीचे होते.
आता बाबा येऊन सेकंदामध्ये जीवनमुक्ती देतात परत अर्ध्या कल्पानंतर शिडी उतरत जीवन
बंधनांमध्ये येतात.परत बाबा येऊन जीवनमुक्त बनवतात,म्हणून त्यांना सर्वांचे सद्गती
दाता म्हटले जाते.तर जे पतित पावन पिता आहेत,त्यांचीच आठवण करायची आहे.त्यांच्या
आठवणी द्वारेच पावन बनू शकतात, नाही तर बनू शकत नाहीत.उच्च ते उच्च पिताच आहेत.अनेक
मुलं समजतात आम्ही तर संपूर्ण बनलो,आम्ही तर तयार झालो आहोत,असे समजुन स्वतालाच खुश
करतात.हे पण पोपटा सारखे झाले.बाबा म्हणतात,गोड मुलांनो आता खूप पुरुषार्थ करायचा
आहे.पावन बनायचे आहे तर दुनिया पण पावन पाहिजे.एक तर जाऊ शकत नाही. कोणी कितीही
प्रयत्न केला की आम्ही तर लवकर कर्मातीत बनू परंतु होऊ शकत नाही.राजधानी स्थापन होत
आहे.जरी कोणी विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप हुशार बनतात परंतु परीक्षा तर वेळेवरच
होइल,लवकर होऊ शकत नाही.परिक्षा लवकर होऊ शकणार नाही.हे पण असंच आहे.जेव्हा वेळ
येईल तेव्हा तुमच्या अभ्यासाचा परिणाम निघेल.कितीही चांगला पुरुषार्थी असेल परंतु
असे म्हणू शकत नाही,आम्ही तयार आहोत.नाही,१६ कला संपुर्ण कोणी बनू शकत नाही.खुप
पुरुषार्थ करायचा आहे.आपल्या मनाला फक्त खुश करायचे नाही की आम्ही तर संपुर्ण
बनलो.नाही,संपुर्ण तर अंत काळात बनतील.पोपट पंची करायची नाही.ही तर सर्व राजधानी
स्थापण होत आहे.होय इतके तर समजतो,बाकी थोडा वेळ आहे.मुसळ (मिसाइल) पण निघाले
आहेत.त्याला बनवण्यामध्ये प्रथम थोडा वेळ लागतो,नंतर खुप लवकर बनवत राहतात.हे पण
सर्व नाटका मध्ये नोंद आहे.विनाशा साठी बाँम्बस बनवत राहतात ना. गिते मध्ये पण मुसल
अक्षर आहे.ग्रंथा मध्ये परत असे लिहले आहे,की पोटातुन लोखंड निघाले,परत हे झाले.या
सर्व खोट्या गोष्टी आहेत. बाबा येऊन समजवतात, त्यांनाच मिसाइल म्हणले जाते.या विनाशा
च्या अगोदर,तुम्हाला तमोप्रधान पासुन सतोप्रधान बनायचे आहे.मुलं जाणतात आम्ही आदी
सनातन धर्माचे होतो. खऱ्या सोन्या सारखे होतो.भारता ला सत्य खंड म्हणले जाते.आत्ता
खोटा खंड बनला आहे.सोने पण खरे आणि खोटे असते.आता तुम्ही मुलं जाणता, बाबांची महिमा
कोणती आहे.ते मनुष्य स्रुष्टी चे बिजरुप आहेत,सत्य आहेत,चैतन्य आहेत.यापुर्वी तर
फक्त गायन करत होते.आता तुम्ही समजता,बाबा सर्व गुण,आमच्या मध्ये भरत आहेत. बाबा
म्हणतात,सर्व प्रथम आठवणीची यात्रा करा, माझी आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश
होतील.माझे नावच आहे,पतित पावन.गायन पण करतात,पतित पावन या,परंतू ते येउन काय करतात
हे जाणत नाहीत.एक सिता तर नसणार.सर्व सिता असतील. बाबा तुम्हा मुलांना बेहद मध्ये
घेऊन जाण्यासाठी बेहदच्या गोष्टी ऐकवत आहेत.तुम्ही बेहदच्या बुद्धी द्वारे जाणतात
की पुरुष आणि स्त्री सर्व सिता आहेत.सर्व रावणाच्या तुरुंगा मध्ये आहेत.बाबा
म्हणजेच राम येऊन सर्वांना रावणाच्या तुरुंगा मधुन काढतात. रावण कोणता मनुष्य
नाही.हे समजवले जाते, प्रत्येका मध्ये 5 विकार आहेत म्हणून रावणाचे राज्य म्हटले
जाते.नावच आहे विकारी दुनिया,ती आहे निर्विकारी दुनिया,दोन्ही वेग-वेगळी नावं
आहेत.हे वेश्यालय आणि ते शिवालय आहे.निर्विकारी दुनियाचे हे लक्ष्मी नारायण विश्वाचे
मालक होते. त्यांच्यापुढे विकारी मनुष्य जाऊन डोके टेकवतात.विकारी राजे,त्या
निर्विकारी राज्यांच्या पुढे डोके टेकवतात.हे पण तुम्हीच जाणतात.मनुष्याला कल्पाच्या
आयुष्याची माहितीच नाही,तर समजू कसे शकतील की,रावण राज्य कधी सुरू होते.अर्धे अर्धे
व्हायला पाहिजे ना. रामराज्य,रावण राज्य कधीपासून सुरू झाले,खूपच संभ्रमित झाले
आहेत.
आता बाबा समजवतात,हे पाच हजार वर्षांचे चक्र फिरत राहते.तुम्हाला माहिती पडले आहे
आम्ही 84 जन्माची भूमिका वठवत आलो आहोत.परत आम्ही घरी जाणार आहोत.सतयुग त्रेता मध्ये
पण पुनर्जन्म घेत राहतात.ते राम राज्य आहे आणि परत रावण राज्या मध्ये यायचे
आहे.हार-जीत चा खेळ आहे.तुम्ही विकाराला जिंकतात तर स्वर्गाचे मालक बनतात.हार होते
तर नर्काचे मालक बनतात.स्वर्ग वेगळा आहे.कोणाचा मृत्यू होतो,तर म्हणतात स्वर्गवासी
झाले.आता तुम्ही थोडेच असे म्हणनार,कारण तुम्ही जाणतात स्वर्ग कधी असतो.ते तर
म्हणतात ज्योती ज्योत मध्ये सामावली,किंवा निर्वाण गेला.तुम्ही म्हणनार ज्योती
ज्योत तर कोणी सामावत नाहीत.सर्वाचे सदगती दाता तर एकाचे च गायन आहे.स्वर्ग सतयुगाला
म्हणले जाते.आत्ता नर्क आहे.भारताची च गोष्ट आहे.बाकी वरती काहीच नाही.दिलवाडा
मंदिरा मध्ये वरती स्वर्ग दाखवला आहे तर मनुष्य समजतात,बरोबर वरती स्वर्ग आहे.अरे
छता वरती स्वर्ग कसा असेल? बुध्दू आहेत ना.आता तुम्ही स्पष्ट करुन सांगतात.तुम्ही
जाणतात येथेच स्वर्ग होता,परत येथेच नर्कवासी बनतात.आत्ता परत स्वर्गवासी बनायचे
आहे.हे ज्ञानच आहे,नरा पासुन नारायण बनण्याचे.कथा पण सत्यनारायण बनण्याची ऐकतात.राम
सिता ची कथा ऐकत नाहीत,ही नरा पासुन नारायण बनण्याची कथा आहे.उच्च ते उच्च पद
लक्ष्मी नारायण चे आहे.ते परत दोन कला कमी होतात.पुरुषार्थ उच्च पद मिळवण्याचा केला
जातो,परत जर करत नाहीत,तर चंद्रवंशी बनतात.भारतवासी पतित बनतात तर स्वताच्या धर्माला
विसरतात.जरी ख्रिश्चन सतो पासुन तमोप्रधान बनले आहेत,तरीही ख्रिश्चन तर आहेत ना.आदी
सनातन देवी देवता धर्माचे तर स्वता:ला हिंदू समजतात.हे पण समजत नाहीत,आपण वास्तव
मध्ये देवी देवता धर्माचे आहोत. हे आश्चर्य आहे ना.तुम्ही विचारता,हिंदू धर्म कोणी
स्थापन केला,तर गोंधळुन जातात.देवतांची पुजा करतात,तर देवता धर्माचे झाले ना,परंतू
समजत नाहित.हे पण नाटका मध्ये नोंद आहे.तुमच्या बुध्दी मध्ये सर्व ज्ञान आहे.तुम्ही
जाणतात की,आम्ही प्रथम
सूर्यवंशी होतो,परत दुसरे धर्म येतात.आम्ही पुनर्जन्म घेत येतो.तुमच्या मध्ये पण
कोणी अर्थ सहित जाणतात.शाळे मध्ये पण कोणाच्या बुध्दी मध्ये चांगल्या प्रकारे
बसते,कोणाच्या कमी बसते.येथे पण जे नापास होतात,त्यांना क्षत्रिय म्हणले
जाते.चंद्रवंशी मध्ये चालले जातात.दोन कला कमी झाल्या ना.संपुर्ण बनू शकत
नाहीत.तुमच्या बुध्दी मध्ये आता बेहदचा इतिहास भुगोल आहे.त्या शाळे मध्ये तर सिमित
इतिहास भुगोल शिकवतात.ते मुळ वतन,सुक्ष्म वतनला थोडेच जाणतात.साधू संत इ.कोणाच्याच
बुध्दी मध्ये हे ज्ञान नाही.तुमच्या बुध्दी मध्ये आहे,मुळ वतन मध्ये आत्मे राहतात.हे
स्थुल वतन आहे.तुमच्या बुध्दी मध्ये सर्व ज्ञान आहे.ही स्वदर्शन चक्रधारी सेना बसली
आहे.ही सेना बाबा आणि चक्राची आठवण करते.तुमच्या बुध्दी मध्ये ज्ञान आहे.बाकी
हत्यार इ.नाही.
नाही.ज्ञाना द्वारे स्वता:चे दर्शन झाले आहे.बाबा रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य
अंतचे ज्ञान देतात.आता बाबाचा आदेश आहे,रचनाकाराची आठवण करा तर विर्कम विनाश
होतील.जितके जे स्वदर्शन चक्रधारी बनतील, दुसऱ्यांना बनवतील जास्त सेवा
करतील,त्यांना जास्त पद मिळेल.ही तर सहज समजण्याची गोष्ट आहे.बांना विसरले
आहेतच,गीतेमध्ये कृष्णाचे नाव लिहिल्या मुळे.कृष्णाला भगवान म्हणू शकत नाही,त्यांना
पिता म्हणू शकत नाही.वारसा तर पित्या कडून मिळतो.पतित पावन बाबांनाच म्हटले जाते.ते
जेव्हा येतील तेव्हा तर आम्ही परत शांतीधाम मध्ये जाऊ शकू.मनुष्य मुक्तीसाठी खूप
कष्ठ करतात.तुम्ही खूप सहज समजाऊन सांगतात.तुम्ही सांगा पतित-पावन तर परमात्मा
आहेत,परत गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी का जातात?गंगा च्या किनार्यावर जाऊन बसतात
आणि इच्छा ठेवतात,आमचा मृत्यू येथेच व्हावा.पुर्वी बंगालमध्ये जेव्हा
कोणी मृत्यूच्या जवळ होते,तर ते गंगा नदी मध्ये जाऊन हरिबोल म्हणत होते.समजत होते,हे
मुक्त झाले.आता आत्मा तर निघून गेली.पवित्र तर बनली नाही.आत्म्याला पवित्र बनवणारे
तर बाबाच आहेत,त्यांनाच बोलवतात.आता बाबा म्हणतात,माझी आठवण करा तर विकर्म विनाश
होतील.बाबा येऊन जुन्या दुनिये ला नवीन बनवतात.बाकी नवीन रचना करत नाहीत.अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती,मातपिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
1. स्वदर्शन
चक्रधारी बनायचे आहे आणि दुसर्यांना पण बनवायचे आहे.
2. बाबा आणि चक्राची आठवण करायची आहे.बेहद बाबा द्वारे बेहदच्या गोष्टी ऐकून आपली
बुध्दी बेहद मध्ये ठेवायची आहे.हद्द मध्ये यायचे नाही.
वरदान:-
गोड शांतीच्या
प्रेमळ स्थिती द्वारे नष्टोमोहा समर्थ स्वरुप भव:-
देह,देहाचे
सबंध,देहाचे संस्कार,व्यक्ती किंवा वैभव,वातावरण सर्व असताना पण,आपल्याकडे आकर्षित
करायला नको.लोक ओरडत राहतील आणि तुम्ही अचल रहा.प्रकृती माया सर्व अंतिम डाव लावण्या
साठी आपल्याकडे आकर्षित करतील परंतु तुम्ही अनासक्त आणि बाबांचे प्रिय बनण्याच्या
प्रेमळ स्थितीमध्ये रहा,यालाच म्हटले जाते पाहुन पण न पाहणे,ऐकून पण न ऐकणे.ही शांत
स्वरूपाची प्रेमळ स्थिती आहे,जेव्हा अशी स्थिती बनेल तेव्हा म्हणाल नष्टोमोहा,समर्थ
स्वरूपाचे वरदानी आत्मा.
बोधवाक्य:-
पवित्र हंस
बणुन अवगुण रुपी दगड सोडून चांगले गुण रुपी मोती ग्रहण करत चला.