16-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"
गोड मुलांनो , बाबा तुम्हाला पुरुषोत्तम बनविण्यासाठी शिकवत आहेत , तुम्ही आता
कनिष्ठ पासून उत्तम पुरूष बनत आहात , सर्वात उत्तम देवता आहेत .
प्रश्न:-
येथे तुम्ही
मुलं कोणते कष्ट घेता, जे सतयुग मध्ये घ्यावे लागत नाहीत?
उत्तर:-
येथे देहा सहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून,आत्म अभिमानी होऊन, शरीर सोडण्या
साठी खूप कष्ट घ्यावे लागतात. सतयुगा मध्ये कोणतेही कष्ट न घेता,सहज देहत्याग
कराल.आता हेच कष्ट किंवा अभ्यास करता की, आपण आत्मा आहोत. आपल्याला या जुन्या
दुनियेला, जुन्या शरीराला सोडुन,नवीन घ्यायचे आहे. सतयुगामध्ये या अभ्यासाची गरज
नाही.
गीत:-
दूर देशा मध्ये
राहणारे ……..
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुले जाणतात की, पुन्हा म्हणजे कल्पापूर्वी. याला म्हणले जाते परत
म्हणजे दूर देशामध्ये राहणारे, दुसऱ्या देशामध्ये आले आहेत. हे फक्त त्या एकासाठी
आहे, त्यांना सर्वजण आठवण करतात, ते विचित्र आहेत. ब्रह्मा विष्णू शंकराला देवता
म्हटले जाते. शिवभगवानुवाच ,मी परमधाम मध्ये राहतो. त्यांना सुखधाम मध्ये कधी बोलवत
नाहीत, दुःखधाम मध्ये बोलवतात. ते संगमयुगा मध्ये येतात. हे तर मुलं जाणतात सतयुगा
मध्ये संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही पुरुषोत्तम राहाल.असे मध्यम, कनिष्ठ तेथें नसतात.
उत्तम ते उत्तम पुरुष हे लक्ष्मी-नारायण आहेत, त्यांना असे बनवणारे श्री श्री
शिवबाबांनाच म्हटले जाते. आज-काल संन्यासी इत्यादी सुध्दा स्वतःला श्री श्री
म्हणतात. तर बाबाच येऊन या सृष्टीला पुरुषोत्तम बनवतात. सतयुगी दुनियेमध्ये उत्तम
ते उत्तम पुरुष राहतात. उत्तम ते उत्तम आणि कनिष्ठ ते कनिष्ठ चा फरक यावेळी तुम्ही
समजता. कनिष्ठ मनुष्य आपला नीचपणा दाखवितात. आता तुम्ही समजता आपण काय होतो, आता
पुन्हा आपण स्वर्गवासी पुरुषोत्तम बनत आहोत. हे संगमयुग आहे. तुम्हाला विश्वास आहे
की,ही जुनी दुनिया आता नवीन बनत आहे. जुनी ती नवीन आणि नवीन ती जुनी जरूर बनते.
नवीनला सतयुग आणि जुन्याला कलियुग म्हणले जाते. बाबा खरे आहेत,ते सत्य सांगणारे
आहेत .त्यांना सत्य म्हणले जाते. सर्वच सत्य सांगतात. ईश्वर सर्वव्यापी आहेत,हे खोटे
आहे. आता बाबा म्हणतात खोटे ऐकू नका. वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका.लौकिक शिक्षणाची
गोष्ट वेगळी आहे. ती तर अल्पकाळ सुखासाठी आहे. दुसरा जन्म घेतला तर परत शिक्षण
घ्यावे लागते. हे शिक्षण 21 पीढी आणि 21 जन्मासाठी आहे. पिढी म्हणजे वृद्धपणा
पर्यंत म्हणले जाते. तेथे कधी अवेळीअचानक मृत्यू होत नाही.येथे तर पहा अवेळी मृत्यू
होत राहतो. ज्ञाना मध्ये पण मृत्यू होतो. तुम्ही आता मृत्यूवर विजय प्राप्त करता.
तुम्ही जाणता ते अमरलोक आणि हे मृत्युलोक आहे. तेथे जेव्हा वृद्ध होतात त्यावेळी
साक्षात्कार होतो, आपण हे शरीर सोडून आता लहान मुल बनणार आहे. वृद्धावस्था पूर्ण
झाल्यानंतर शरीर सोडतात. नवीन शरीर घेणे चांगले आहे ना. बसल्या-बसल्या आनंदाने शरीर
सोडून देतात.येथे तर त्या अवस्थेमध्ये शरीर सोडण्यासाठी कष्ट लागतात. येथील कष्ट
तेथे मग सहज होते. येथे देहासहित सर्व काही विसरायचे आहे. स्वतःला आत्मा समजायचे आहे,
या जुन्या दुनियेला सोडायचे आहे. नवीन शरीर घ्यायचे आहे. आत्मा सतोप्रधान होती,
त्यावेळी शरीर सुंदर मिळते. पुन्हा काम चितेवर बसल्यामुळे तमोप्रधान बनतात, म्हणून
देह सुध्दा सावळे प्राप्त होतात. सुंदर पासून सावळे बनले. कृष्णाचे नाव तर कृष्णच
आहे, परंतु त्यांना सावळा का म्हणतात? चित्रांमध्ये सुद्धा कृष्णाचे चित्र सावळे
बनवितात परंतु अर्थ माहीत नाही. आता तुम्ही समजता सतोप्रधान होतो, त्यावेळी सुंदर
होतो. आता तमोप्रधान सावळे बनलो आहोत. सतोप्रधानला पुरुषोत्तम म्हणतात, तमोप्रधानला
कनिष्ठ म्हणले जाते. बाबा तर परमपवित्र आहेत. ते सुंदर बनविण्यासाठी येतात.
यात्रेकरू आहेत ना. कल्प कल्प येतात, नाहीतर जुन्या दुनियेला नवीन कोण बनविणार! ही
तर पतीत छी-छी दुनिया आहे. या गोष्टींना दुनियेमध्ये कोणी जाणत नाही. आता तुम्ही
जाणता, बाबा आम्हाला पुरुषोत्तम बनविण्या साठी शिकवत आहेत. पुन्हा देवता बनण्यासाठी
आम्ही ब्राह्मण बनलो आहोत. तुम्ही संगमयुगी ब्राम्हण आहात. दुनिया हे जाणत नाही की
आता संगमयुग आहे. शास्त्रांमध्ये तर कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष लिहिलेले आहेत, मग
समजतात कलयुग अजून लहान आहे. आता तुम्ही समजता आम्ही इथे उत्तम ते उत्तम, कलियुगी
पतिता पासून सतयुगी पवित्र, मनुष्या पासून देवता बनण्यासाठी आलो आहोत. ग्रंथामध्ये
पण लिहिलेले आहे, मूत पलीती कपड धोए(खराब मनुष्याला स्वच्छ बनवतात ) परंतु ग्रंथ
वाचणारे सुद्धा अर्थ जाणत नाहीत. या वेळी बाबा येऊन संपूर्ण दुनियेच्या मनुष्यांना
स्वच्छ बनवितात. तुम्ही त्या बाबांसमोर बसला आहात. बाबाच मुलांना समजवितात. हे
रचियता आणि रचनेचे ज्ञान आहे, दुसरे कोणी जाणत नाही. बाबा ज्ञानाचे सागर आहेत. ते
सत्य आहेत, चैतन्य आहेत, अमर आहेत. पुनर्जन्म रहित आहे. शांतीचे सागर, सुखाचे सागर,
पवित्रतेचे सागर आहेत. त्यांनाच बोलवितात की, येऊन आम्हाला वारसा द्या. तुम्हाला आता
बाबा 21 जन्मासाठी वारसा देत आहेत. हे अविनाशी शिक्षण आहे. शिकविणारे पण अविनाशी
बाबा आहेत. अर्धाकल्प तुम्ही राज्य प्राप्त करता, मग रावण राज्य होते. अर्धाकल्प
रामराज्य आणि अर्धाकल्प रावणराज्य.
प्राणांपेक्षा प्रिय एकच बाबा आहेत कारण की तेच तुम्हा मुलांना सर्व दुःखा पासून
दूर करून अपार सुखामध्ये घेऊन जातात. तुम्ही निश्चयाने म्हणता, ते आमचे
प्राणांपेक्षा प्रिय पारलौकिक पिता आहेत. प्राण आत्म्याला म्हटले जाते. सर्व
मनुष्यमात्र त्यांना आठवण करतात, कारण की अर्ध्या कल्पासाठी दुःखा पासून सोडवून
शांती आणि सुख देणारे आहेत. तर प्राणापेक्षा प्रिय आहेत ना. तुम्ही जाणता
सतयुगामध्ये आम्ही सदा सुखी राहतो. बाकी सर्व शांतीधाम मध्ये जातील. मग परत रावण
राज्यांमध्ये दुःख सुरू होते. दुःख आणि सुखाचा खेळ आहे. मनुष्य समजतात येथे आता सुख
पण आहे, आणि दुःखपण आहे. परंतु नाही, तुम्ही जाणता, स्वर्ग वेगळा आहे, आणि नर्क
वेगळा आहे. स्वर्गाची स्थापना बाबा म्हणजे राम करतात. नरकाची स्थापना रावण करतो,
ज्याला प्रत्येक वर्षी जाळतात. परंतु का जाळतात? कोण आहे? काहीच जाणत नाहीत. किती
खर्च करतात. किती गोष्टी बसून सांगतात, रामाची सीता भगवतीला रावण घेऊन गेला.
मनुष्यपण समजतात असे झाले असेल.
आता तुम्ही सर्वांच्या जीवनाला जाणता. याचे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. संपूर्ण
सृष्टीच्या इतिहास आणि भूगोलाचे ज्ञान कोणत्याही मनुष्य मात्राला नाही. बाबाच
जाणतात. त्यांना विश्वाचे रचयिता पण नाही म्हणले जाणार. विश्व तर आहेच, बाबा येऊन
फक्त ज्ञान देतात कि, सृष्टीचक्र कसे फिरते. भारतामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य
होते, मग काय झाले? देवतांनी कोणासोबत युद्ध केले का? कधीच नाही. अर्ध्या कल्पा
नंतर रावण राज्य सुरू झाल्याने देवता वाम मार्गामध्ये जातात. बाकी असे नाही की
युद्धा मध्ये कोणी त्यांना हरविले. लष्कर इत्यादीची कोणती गोष्ट नाही. न युद्धाने
राज्य घेतात, न गमवतात. येथे तर आठवणी मध्ये राहुन पवित्र बणुन, तुम्ही पवित्र
राज्य स्थापन करता. बाकी हातामध्ये कोणती वस्तू नाही. ते डबल अहिंसक आहेत. एक तर
पवित्रतेची अहिंसा आणि दुसरे म्हणजे तुम्ही कोणाला दुःख देत नाहीत. सर्वात मोठी
हिंसा काम कटारीची आहे,जी आदी मध्य अंत दुःख देते. रावण राज्यामध्ये दुःख सुरू होते.
रोग, आजार सुरू होतात. अनेक आजार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे औषधे निघत राहतात. आजारी
पडतात. तुम्ही या योग बळाद्वारे 21 जन्म निरोगी बनता. तिथे दुःख किंवा रोगाचे नाव
निशाण राहत नाही. त्यासाठी तुम्ही शिकत आहात. तुम्ही मुले जाणता, ईश्वर आम्हाला
शिकवून भगवान भगवती बनवत आहेत. शिक्षण किती सोपे आहे. अर्ध्या-पाऊण तासामध्ये
संपूर्ण सृष्टी चक्राचे ज्ञान समजवता. ८४ जन्मसुद्धा कोण-कोण घेतात हे तुम्ही जाणता.
ईश्वर आम्हाला शिकवितात, ते निराकार आहेत. त्यांचे सत्य नाव शिव आहे. कल्याणकारी
आहेत ना. सर्वांचे कल्याणकारी, सर्वांचे सदगती दाता, उंच ते उंच शिवबाबा आहेत.
सर्वश्रेष्ठ मनुष्य बनवितात.बाबा शिकऊन, हुशार बनवून मग म्हणतात, तुम्ही जाऊन
दुसऱ्यांना शिकवा. या ब्रम्हाकुमार आणि कुमारीनां शिकवणारे शिवबाबा आहेत. ब्रम्हा
द्वारे तुम्हाला दत्तक घेतात. प्रजापिता ब्रम्हा कोठून आले? या गोष्टी मध्येच
गोंधळुन जातात. यांना दत्तक घेतले, असे म्हणतात खूप जन्माच्या अंतच्या जन्मामध्ये…
आता खूप जन्म कोणी घेतले. या लक्ष्मी नारायण यांनीच, पूर्ण ८४ जन्म घेतले, त्यामुळे
कृष्णा साठी शाम-सुंदर म्हणले जाते. आम्हीच सुंदर होतो मग दोन कला कमी झाल्या. कला
कमी होता-होता आता काहीच कला राहिल्या नाहीत. आता तमोप्रधान पासून सतोप्रधान कसे
बनायचे? बाबा म्हणतात मला आठवण करा तर तुम्ही पवित्र बनाल. हे पण तुम्ही जाणता की,हे
रुद्र ज्ञान यज्ञ आहे. आता यज्ञा मध्ये ब्राह्मण पाहिजेत. तुम्ही खरे ब्राह्मण आहात,
खरी गीता ऐकविणारे, त्यामुळे तुम्ही लिहिता, सत्य गीता पाठशाला. त्या गीतेमध्ये तर
नावच बदललेले आहे. होय ज्यांनी कल्पा पूर्वी वारसा घेतला होता, तेच घेतील. आता
स्वतःच्या मनाला विचारा,आपण पूर्ण वारसा घेऊ? मनुष्य शरीरात सोडतात तर रिकाम्या
हाताने जातात. ते तर विनाशी धन सोबत येणार नाही. तुम्ही शरीर सोडाल तर झोळी भरून
घेऊन जाल. कारण की तुम्ही 21 जन्मासाठी तुम्ही आपली मिळकत जमा करत आहात. मनुष्यांची
तर सर्व मिळकत मातीत मिसळून जाईल.त्यामुळे आपण का नाही,बाबांना देऊन त्याच्या
मोबदल्यात घ्यावे. जे खूप दान करतात, ते तर दुसऱ्या जन्मांमध्ये सावकार बनतात, बदली
करतात ना. आता तुम्ही २१ जन्मासाठी नवीन दुनियेमध्ये बदली करून घेतात. तुम्हाला
बदल्यात २१ जन्मासाठी मिळते. ते तर एकच जन्मासाठी अल्प काळासाठी बदली करतात. तुम्ही
तर २१ जन्मासाठी बदली करता. बाबा तर दाता आहेत. हे तर नाटकांमध्ये नोंद आहे. जे
जेवढे करतील तेवढे प्राप्त होईल. ते अप्रत्यक्षरीत्या दान पुण्य करतात, तर अल्प काळा
साठी, त्याचा मोबदला मिळतो. येथे प्रत्यक्ष आहे. आता सर्व काही नवीन दुनियेमध्ये
स्थानांतरित करायचे आहे. ब्रह्मा बाबांना पहा यांनी किती हिंमत दाखवली. तुम्ही
म्हणता सर्वकाही ईश्वराने दिले. आता बाबा म्हणतात,हे सर्वकाही मला द्या. मी तुम्हाला
विश्वाची बादशाही देतो. ब्रह्मा बाबांनी तर लगेच दिले, विचार केला नाही. पूर्ण शक्ती
दिली. आम्हाला विश्वाची बादशाही मिळते तो नशा चढला. मुले इत्यादींचा विचार केला नाही.
देणारे तर ईश्वर आहे मग, कोणाची जबाबदारी थोडीच राहते. 21 जन्मासाठी स्थानांतरित कसे
करायचे असते, हे या ब्रम्हा बाबांकडून शिका, त्यांचे अनुकरण करा. प्रजापिता
ब्रह्माने केले ना. ईश्वर दाता आहेत. त्यांनी यांच्याकडून करविले. तुम्ही जाणता आपण
आलो आहोत बाबांकडून विश्वाची बादशाही घेण्यासाठी. दिवसेंदिवस वेळ कमी होत जातो.
संकटे अशी येतील की विचारू नका. व्यापाऱ्यांचा श्वास तर मुठीत असतो,कोणी जमघट ना
येऊ. पोलिसांना पाहून मनुष्यांना भोवळ येते. पुढे चालून खूप त्रास देतील. सोने
इत्यादी काहीच ठेवू देणार नाहीत. बाकी तुमच्याजवळ काय असेल! पैसाच राहणार नाही जे
काही खरेदी करू शकाल. नोट इत्यादी पण चालू शकणार नाही. राज्य बदलून जाते. शेवटी खूप
दुखी होऊन मरतील. खूप दुःख नंतर मग सुखी येईल. हा खुने नाहक खेळ आहे. नैसर्गिक
आपत्ती पण येईल. या अगोदर बाबांकडून पूर्ण वारसा तर घेतला पाहिजे. खुशाल फिरा, फक्त
बाबांची आठवण करा, तर पवित्र बनाल. बाकी संकटे खूप येतील. खूप हाय हाय करत राहतील.
तुम्हा मुलांना आता अशी सवय लावायची आहे की, जे शेवटी फक्त एका बाबांची आठवण राहावी.
त्यांच्या आठवणी मध्ये राहून शरीर सोडायचे आहे, दुसऱ्या कोणत्या मित्र संबंध
इत्यादींची आठवण येऊ नये. हा अभ्यास करायचा आहे. बाबांची आठवण करायची आहे आणि
नारायण बनायचे आहे. हा अभ्यास खूप केला पाहिजे. नाहीतर खूप पश्चाताप होईल. दुसऱ्या
कोणाची आठवण आली तर नापास होतील. जे पास होतील ते विजयी माळे मध्ये गुंफले जातील.
स्वतःला विचारायला पाहीजे, बाबांची किती आठवण करतो? काही ही हातात असेल तर ते
अंतकाळी आठवणीत येईल. हातात नसेल तर आठवणीमध्ये पण येणार नाही. बाबा म्हणतात
आमच्याजवळ तर काहीच नाही. ही माझी वस्तू नाही. त्या ज्ञानापेक्षा हे ज्ञान घेतले तर
२१ जन्मासाठी वारसा मिळेल. नाहीतर स्वर्गाची बादशाही मिळणार नाही. तुम्ही येथे बाबां
कडुन वारसा घेण्यासाठी येता. पवित्र तर जरूर बनले पाहिजे. नाही तर शिक्षा भोगून,
हिशोब पूर्ण करून जावे लागेल. पद काही मिळणार नाही. श्रीमतावर चाललात तर
श्रीकृष्णाला मांडीवर घ्याल. म्हणतात ना कृष्णासारखा पती मिळावा, मुलगा मिळावा.
कोणीतर खूप चांगल्या पद्धतीने समजतात, कोणी उलट सुलट बोलतात.
अच्छा ,
गोड - गोड फार - फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बाप दादांची
प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार .
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1) जसे ब्रह्मा
बाबांनी आपले सर्व काही स्थानांतरित करून आपली पूर्ण शक्ती बाबांना दिली, विचार केला
नाही. असे बाबांचे अनुकरण करून २१ जन्माचे प्रालब्ध जमा करायची आहे.
2) अभ्यास करायचा आहे
अंतकाळा मध्ये एका बाबांशिवाय दुसरी कोणतीच वस्तू आठवणीं मध्ये येता कामा नाही. आमचे
काहीच नाही सर्व बाबांचे आहे. अल्फ आणि बे, याच स्मृतीमध्ये राहून, पास होऊन
विजयीमाळे मध्ये यायचे आहे.
वरदान:-
प्रेम आणि
प्रेममई स्थितीच्या अनुभवाद्वारे सर्वकाही विसरणारे नेहमी देही अभिमानी भव .
कर्मामध्ये, वाणीमध्ये,
संपर्कामध्ये, व संबंधांमध्ये प्रेम आणि स्मृती व स्थिती मध्ये प्रेममई राहा, तर
सर्व काही विसरुन देही अभिमानी बनू शकाल. प्रेमच बाबांच्या जवळच्या संबंधांमध्ये
आणतो, सर्वस्व त्यागी बनवितो. या प्रेमाच्या वैशिष्ट्यांनी व प्रेममई स्थितीमध्ये
राहिल्याने सर्व आत्म्यांचे भाग्य व नशिबाला जागऊ शकाल. हे प्रेमच नशिबाच्या
कुलुपाची चावी आहे. ही मास्टर-की आहे. यानेच कोणत्याही दुर्भाग्यशाली आत्म्यांना
भाग्यशाली बनवू शकता
बोधवाक्य:-
स्वतःच्या
परिवर्तनाची वेळ निश्चित करा विश्वाचे परिवर्तन स्वतः होईल .