29-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुमचे हे ब्राह्मण कुळ खुप निराळे आहे, तुम्ही ब्राह्मणच ज्ञान संपन्न आहात, तुम्ही ज्ञान, विज्ञान आणि अज्ञानाला जाणत आहात"

प्रश्न:-
कोणत्या सहज पुरुषार्थाने तुम्हा मुलांचे मन,सर्व गोष्टींमधून बाजूला होईल?

उत्तर:-
फक्त आत्मिक धंदा करत रहा,जेवढी आत्मिक सेवा करत रहाल तेवढे इतर सर्व गोष्टींमधून मन स्वतः बाजूला जाईल.राजाई घेण्याच्या पुरुषार्थाला लागाल,परंतु सेवे सोबत जी रचना निर्माण केली आहे,त्यांचा ही सांभाळ करायचा आहे.

गीत:-
जे शिव साजन सोबत आहेत त्यांच्या साठी ज्ञानाचा वर्षाव आहे....

ओम शांती।
साजन, प्रियकर म्हंटले जाते बाबांना.आता बाबांच्या समोर तर सर्व मुले बसली आहेत. मुले जाणतात आम्ही काही साधू संता समोर बसलो नाही. तो पिता ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानानेच सदगती मिळते,म्हंटले जाते ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. विज्ञान अर्थात देही अभिमानी बनणे आठवणीच्या यात्रेमध्ये राहणे आणि ज्ञान अर्थात सृष्टी चक्राला जाणने. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान - याचा अर्थ मनुष्य बिलकुलच जाणत नाहीत.आता तुम्ही आहात संगमयूगी ब्राह्मण. तुमचे हे ब्राह्मण कुळ निराळे आहे,याला कुणी जाणत नाही. शास्त्रात या गोष्टी नाहीत की,ब्राह्मण संगमयुगावर असतात. हे ही जाणतात प्रजापिता ब्रह्मा होऊन गेले आहेत,त्यांना आदिदेव म्हणतात. आदिदेवी जगत अंबा,ती कोण आहे! हे दुनिया जाणत नाही. जरूर ब्रह्माची मुख वंशावळी असेल. ती काही ब्रह्मा ची पत्नी नाही.दत्तक घेतात ना. तुम्हालाही मी दत्तक घेतले आहे.ब्राह्मणांना देवता म्हणू शकत नाहीत. इथे ब्रह्माचे मंदिर आहे,तो ही मनुष्य आहे ना. ब्रह्मा सोबत सरस्वतीही आहे. नंतर देवींची ही मंदिरे आहेत. सर्व येथील मनुष्य आहेत. मंदिर एकाचे बनवले आहे. प्रजापिताची तर खूप सारी प्रजा असेल ना. आता बनत आहे. प्रजापिता ब्रह्माचे कुळ वाढत आहे.दत्तक मुलं आहेत.आता तुम्हाला बेहद च्या पित्याने धर्माची मुलं बनवले आहते.ब्रह्मा ही बेहद पित्याचा मुलगा आहे,यांनाही वारसा त्यांच्या कडून भेटतो. तुम्हा नातवंडांना वारसा त्यांच्या कडून मिळतो. ज्ञान तर कुणाजवळ नाही कारण ज्ञानाचा सागर एक आहे,तो पिता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुणाला सदगती मिळत नाही.आता तुम्ही भक्ती मधुन ज्ञानामधे सदगती साठी आला आहात.सतयुगाला म्हंटले जाते सदगती. कलियुगाला दुर्गती म्हंटले जाते,कारण की रावणाचे राज्य आहे.सदगती ला रामराज्यही म्हणतात, सूर्यवंशीही म्हणतात. यथार्थ नाव सूर्यवंशी, चंद्रवंशी आहे. मुले जाणतात आम्हीच सूर्यवंशी कुळाचे होतो, नंतर 84 जन्म घेतले, हे ज्ञान कोणत्या शास्त्रात नाही,कारण शास्त्र आहेत भक्ती मार्गासाठी. ते तर सर्व विनाश होऊन जाईल. येथील जे संस्कार घेऊन जातील तिथे सर्व बनवतील. तुमच्यामध्ये ही राजाई चे संस्कार भरले जात आहेत. तुम्ही राज्य कराल ते (वैज्ञानिक) नंतर त्या राज्यात येऊन, जी कला शिकतात ते करतील,सूर्यवंशी, चंद्रवंशी राज्यामध्ये जरुर येतील.त्यांच्याकडे फक्त विज्ञानाचे ज्ञान आहे. ते त्यांचे संस्कार घेऊन जातील. ते ही संस्कार आहेत. ते ही पुरुषार्थ करतात,त्यांच्याकडे ती विद्या आहे. तुमच्याकडे दूसरी कोणती विद्या नाही. तुम्ही पित्याकडुन राजाई घ्याल. धंद्यामध्ये ते संस्कार असतात ना. किती खिटपिट (त्रास) असते. परंतु जोपर्यंत वानप्रस्थ अवस्था होत नाही तोपर्यंत घरचा सांभाळ करावा लागतो. नाहीतर मुलांना कोण सांभाळणार. इथे तर येऊन बसू शकत नाही. असे म्हणतात जेंव्हा या धंद्यात पूर्ण पणे लागु तेंव्हा तो सुटू शकतो. सोबत रचनेला ही जरूर सांभाळावे लागते. होय कुणी चांगल्याप्रकारे आत्मिक सेवा करतात तर त्यापासून मन बाजूला जाते. समजतील जेवढा वेळ या आत्मिक सेवेमध्ये देऊ, तेवढे चांगले आहे. बाबा आले आहेत पतिता पासून पावन बनण्याचा मार्ग दाखविण्यासाठी,तर मुलांनाही ही सेवा करायची आहे.प्रत्येकाचा हिसाब पाहिला जातो. बेहदचा पिता तर केवळ पतिताना पावन बनण्याची मत देतात, तो पावन बनण्याचा रस्ता सांगतात.बाकी सर्व पहाणी करणे, सल्ला देणे यांचा धंदा आहे. शिवबाबा म्हणतात. मला कोणतीही गोष्ट धंद्या विषयी विचारु नका. मला तुम्ही बोलवले आहे की येऊन पतिताना पावन बनव,तर मी यांच्याद्वारे तुम्हाला बनवत आहे. हा ही पिता आहे, यांच्या मतावर चालायला हवे. त्यांची आत्मिक मत, यांची शारिरीक मत. यांच्या वरही किती जबाबदारी आहे. हे ही म्हणतात बाबांचा आदेश आहे मामेकम म्हणजे माझीच आठवण करा. बाबांच्या मतावर चाला. बाकी मुलांना काहीही विचारायचे असेल, नोकरी मधे कसे चालावे, या सर्व गोष्टी हे साकार बाबा चांगल्याप्रकारे समजावून सांगू शकतात, अनुभवी आहेत, हे सांगतील. असे - असे मी करतो, यांना पाहून शिकायचे आहे, हे शिकवत राहतील कारण हे आहेत सर्वात पुढे. सर्व वादळे सुरुवातीला यांच्याजवळ येतात म्हणून सर्वात शक्तीशाली हे आहेत, तेंव्हाच उच्च पद प्राप्त करतात. माया शक्तिशाली होऊन लढते. यांनी पटकन सर्व सोडून दिले, यांचा पार्ट होता. बाबांनी यांच्याकडून हे करून घेतले. करनकरावनहार तर तो आहे ना. खुशी ने सोडून दिले, साक्षात्कार झाला. आता आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. ही पाई पैशाची वस्तु आम्ही काय करणार. विनाशाचा साक्षात्कारही करविला. समजून गेले, या जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे.आम्हाला परत राजाई मिळत आहे तर पटकन ते सोडून दिले. आता तर बाबांच्या मतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा. नाटकानुसार भट्टी बनणार होती.मनुष्य थोडेच समजतात की हे सर्व का निघून आले.हा कुणी साधू संत तर नाही. हा तर साधारण आहे, यांनी कुणाला पळविले नाही. कृष्णाचे चरित्र काहीही नाही. कोणत्याही मनुष्याची महीमा नाही. महीमा आहे एक बाबांची,बस. बाबाच येऊन सर्वांना सुख देतात. तुमच्याशी बोलतात तुम्ही येथे कुणाकडे आले आहात? तुमची बुद्धी तिथेही (परमधाम मधे) जाईल, येथेही जाईल कारण तुम्ही जाणता शिवबाबा तिथे राहणारे आहेत. आता यांच्यामधे आले आहेत. बाबांकडून आम्हाला स्वर्गाचा वारसा मिळणार आहे. कलियूगानंतर जरुर स्वर्ग येणार आहे. कृष्णही बाबांकडून वारसा घेऊन राज्य करतात, यामधे चरित्राचा विषयच नाही. जसे राजाजवळ राजकुमार जन्माला येतो, शाळा शिकून मोठा होऊन राजगादीवर बसतो. यामध्ये महीमा किंवा चरित्राची गोष्ट नाही. उच्च ते उच्च एक पिताच आहे. महीमा त्यांची होते! हे ही त्यांचा परिचय देतात. जर ते म्हणाले मी सांगतोय तर मनुष्य समजतील,हे स्वतः साठी म्हणतात. या गोष्टी तुम्ही मुले समजतात, भगवानाला कधीही मनुष्य म्हणू शकत नाही. तो तर एकच निराकार आहे. परमधाम मधे राहतात. तुमची बुद्धी वरतीही जाते आणि खालीही येते. बाबा दूरदेशातून परक्या देशात येऊन आम्हाला शिकवून नंतर निघून जातात. स्वतः म्हणतात मी सेकंदात येतो. उशीर लागत नाही. आत्माही सेकंदात एक शरीर सोडून दुसर्या मधे जाते. कुणी पाहू शकत नाही. आत्मा खुप वेगवान आहे. गायनही आहे सेकंदात जीवन मुक्ती. रावण राज्याला जीवनबंध राज्य म्हणतात. मुलगा जन्माला आला आणि पित्याचा वारसा मिळाला. तुम्ही ही बाबांना ओळखले आणि स्वर्गाचे मालक बनले नंतर त्यामधे क्रमानुसार पदे आहेत- पुरुषार्थानूसार. बाबा खुप चांगल्याप्रकारे समजावतात,दोन पिता आहेत-एक लौकिक आणि दुसरे पारलौकिक. गातातही दुःखामधे आठवण सर्वच करतात, सूखामधे करत नाहीत. तुम्ही जाणता आम्ही भारतवासी जेंव्हा सुखी होतो तेंव्हा आठवण करत नव्हतो. नंतर आम्ही 84 जन्म घेतले. आत्म्यामधे विकार मिक्स होतात तेंव्हा डिग्री कमी होते. 16 कला संपूर्ण नंतर 2 कला कमी होतात. कमी पास झाल्यामुळे रामाला बाण दाखविला आहे. बाकी काही धनुष्य तोडला नाही. ही एक निशाणी दाखवली आहे. या आहेत सर्व भक्ती मार्गाच्या गोष्टी. भक्ती मधे मनुष्य किती भटकतो. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे, तर भटकणे बंद होते.

"हे शिवबाबा" हा शब्द त्यांना बोलावण्याचा आहे. तुम्हाला हे शब्द म्हणायचे नाहीत. बाबांची आठवण करायची आहे. हाका मारणे भक्तीचा अशं आहे. हे भगवान, असे म्हणणे पण भक्तीची सवय आहे. बाबांनी थोडेच सांगितले आहे - हे भगवान म्हणून आठवण करा. अंतर्मुखी होऊन माझी आठवण करा. स्मरणही करायचे नाही. स्मरण भक्ती मार्गाचे अक्षर आहे. तुम्हाला बाबांचा परिचय मिळाला, आता बाबांच्या श्रीमतावर चाला.अशी बाबांची आठवण करा जसे लौकिक मुले देह धारी पित्याची आठवण करतात. स्वतः देह - अभिमानी आहेत तर आठवणही देह धारी पित्याची करतात. पारलौकिक पिता तर आहेत देही अभिमानी. यांच्यामधे येतात तर देह - अभिमानी बनत नाहीत.असे म्हणतात मी हे कर्जाऊ (भाड्याचे घर) घेतले आहे, तूम्हाला ज्ञान देण्यासाठी मी हे कर्जाऊ घेतले आहे. ज्ञानाचा सागर आहे परंतु ज्ञान देणार कसे. गर्भामधे तर तुम्ही जाता, मी थोडीच गर्भा मधे जातो. माझी गति-मति वेगळी आहे. बाबा यांच्यामधे येतात. हे ही कुणी जाणत नाहीत.असे म्हणतातही ब्रह्मा द्वारा स्थापना. परंतु कशी ब्रह्मा द्वारा स्थापना करतात? काय प्रेरणा देतील! बाबा म्हणतात मी साधारण तनामधे येतो. त्याचे नाव ब्रह्मा ठेवतो कारण की सन्यास करतात ना.

तुम्ही मुले जाणता आता ब्राह्मणांची माळा बणु शकत नाही कारण तुटत राहतात. जेंव्हा ब्राह्मण फायनल बनतात तेंव्हा रुद्र माळा बनते, नंतर विष्णूच्या माळेत जातात. माळेमधे येण्यासाठी आठवणीची यात्रा पाहिजे. आता तुमच्या बुद्धी मधे आहे की आम्ही प्रथम सतोप्रधान होतो नंतर सतो रजो तमो मधे आलो. हम सो चा अर्थ आहे ना. ओमचा अर्थ वेगळा आहे, ओम म्हणजे आत्मा. नंतर तीच आत्मा म्हणते हम सो देवता क्षत्रिय.....ते लोक परत म्हणतात आम्ही आत्मा सो परमात्मा. तुमचा ओम आणि हम सो चा अर्थ बिल्कुल वेगळा आहे. आम्ही आत्मा आहोत नंतर आत्मा वर्णा मधे येते, आम्ही आत्मा सो प्रथम देवता क्षत्रिय बनतो. असे नाही की आत्मा सो परमात्मा ज्ञान पूर्ण नसल्याने अर्थ समजला नाही. अहम ब्रह्मस्मी म्हणतात, हे ही चुकीचे आहे. बाबा म्हणतात मी रचनेचा मालक तर बणत नाही. या रचनेचे मालक तुम्ही आहात. विश्वाचे मालक तूम्ही बणता. ब्रम्ह तर तत्व आहे. तुम्ही आत्मा सो या रचनेचे मालक बनता. आता बाबा सर्व वेद शास्त्रांचा यथार्थ अर्थ बसून सांगतात. आता तर शिकत रहायचे आहे. बाबा तुम्हाला नवीन - नवीन गोष्टी समजावतात. भक्ती काय सांगते, ज्ञान काय सांगते. भक्तिमार्गात मंदिर बनवले,जप तप केले, पैसा बरबाद केला. तुमच्या मंदिरांना अनेकांनी लुटले. हा ही नाटकामधे पार्ट आहे नंतर जरूर त्यांच्याकडून परत मिळणार आहे. आता पहा किती देताहेत. दिवसेंदिवस वाढवत आहेत. हे पण घेत आहेत. त्यांनी जेवढे घेतले आहे तेवढा पूर्ण हिसाब देणार आहेत. तुमचे पैसे जे त्यांनी खाल्ले आहेत, ते हप करु शकत नाही. भारत तर अविनाशी खण्ड आहे ना. बाबांचे जन्म स्थान आहे. इथेच बाबा येतात. बाबांच्या खण्डामधून घेऊन जातात तर परत द्यावे लागेल. वेळेवर पहा कसे भेटते. या गोष्टी तूम्ही जाणता. त्यांना थोडेच माहीत आहे- विनाश कोणत्या वेळी होणार आहे. शासन या गोष्टी मानणार नाही. नाटकामध्ये नोंद आहे, कर्ज उचलत राहतात. परत मिळत आहे. तुम्ही जाणता आमच्या राजधानीतुन खुप पैसे घेऊन गेले आहेत,आता परत करत आहेत. तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी नाही. काळजी असते फक्त बाबांची आठवण करण्याची. आठवणीने पाप भस्म होतील. ज्ञान तर खूप सहज आहे. आता जो जेवढा पुरुषार्थ करेल. श्रीमत तर मिळत राहते. अविनाशी डॉक्टरकडून प्रत्येक गोष्टीत सल्ला घ्यायला हवा. अच्छा!

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ हा आत्मिक धंदा करायचा आहे. आत्मिक धंद्याचे संस्कार लावायचे आहेत.पतितानां पावन बनविण्याची सेवा करायची आहे.

2. अंतर्मुखी बणुन बाबांची आठवण करायची आहे. मुखातून हे शब्द काढायचा नाही. जसा बाबांना अहंकार नाही, असे निरहंकारी बनायचे आहे.

वरदान:-
संगठित रुपामधे एकरस स्थिति च्या अभ्यासा द्वारे विजयाचा नगाड़ा वाजवणारे एवररेडी (तयार) भव

विश्वामध्ये विजयाचा नगाड़ा तेंव्हा वाजेल जेंव्हा सर्वांचे सर्व संकल्प एक संकल्पामधे सामावून जातील. संगठित रूपाने जेंव्हा एक सेकंदात सर्व एकरस स्थिती मधे स्थित होऊन जातील तेंव्हा म्हणतील एवररेडी (तयार). एका सेकंदात एक मत, एकरस स्थिति आणि एक संकल्पामधे स्थित होण्याची निशाणी बोट दाखवले आहे, ज्या करंगळीने कलीयुगी पर्वत उचलला जातो. यासाठी संगठित रुपामधे एकरस स्थिति बनवण्याचा अभ्यास करा. तेंव्हाच विश्वामध्ये शक्ती सेनेचे नाव प्रसिद्धीस येईल.

बोधवाक्य:-
श्रेष्ठ पुरुषार्थामधे थकवा येणे - ही पण आळसाची लक्षणे आहेत.