07.04.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन
"गोड मुलांनो,बेहद च्या बाबा सोबत इमानदार रहा,तर पूर्णपणे शक्ती मिळेल, मायावरती विजय प्राप्त होईल." प्रश्न:- बाबांच्या जवळ मुख्य अधिकार कोणता आहे,त्याची लक्षणे कोणती आहेत? उत्तर:- बाबांच्या जवळ मुख्य ज्ञानाचे अधिकार आहेत,ज्ञानसागर आहेत म्हणून,तुम्हा मुलांना शिकवण्या साठी येतात.आपल्या सारखे ज्ञानसंपन्न बनवतात.तुमच्याजवळ शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.शिक्षणा द्वारेच तुम्ही उच्चपद प्राप्त करतात. गीत:- ही दुनिया बदलून जाईल....... ओम शांती. भक्त भगवंताची महिमा करतात.आता तुम्ही भक्त तर नाहीत. तुम्ही तर भगवंताची मुलं बनले आहात.ते पण इमानदार मुलं पाहिजेत. प्रत्येक गोष्टींमध्ये इमानदार राहायचे आहे.पत्नीचे शिवाय पतीच्या किंवा पतीचे शिवाय पत्नीच्या दुसरीकडे दृष्टी गेली तर त्यांना बेवफा म्हणतात.आता येथे पण बेहदचे पिता आहेत,त्यांच्या सोबत इमानदार आणि बेवफा दोन्ही राहतात.इमानदार बणुन परत बेवफा बनतात.बाबा तर सर्वोच्च अधिकारी आहेत,सर्वशक्तिमान आहेत ना,तर त्यांची मुलं पण अशीच व्हायला पाहिजेत.बाबा मुलांना,रावणा वरती विजय प्राप्त करण्याची युक्ती सांगतात म्हणून त्यांना सर्वशक्तिमान म्हटले जाते. तुम्ही पण शक्ती सेना आहात ना.तुम्ही पण स्वतःला सर्वशक्तिमान म्हणाल. बाबा मध्ये जी शक्ती आहे,ते आम्हाला देतात.ते सांगतात तुम्ही माया वरती विजय कसा मिळवू शकता.तर तुम्हाला पण शक्तिवान बनायचे आहे.बाबा ज्ञानाचे अधिकारी आहेत,ज्ञानाचे सागर आहेत ना.जसे ते लोक अधिकारी आहेत ग्रंथाचे,भक्तिमार्गाचे.आता तुम्ही सर्वशक्तीमान अधिकारी,ज्ञान संपन्न बनतात.तुम्हाला पण हे ज्ञान मिळते,ही पाठशाळा आहे.यामध्ये जे ज्ञान तुम्ही शिकतात,त्याद्वारे उच्चपद मिळवू शकता.ही एकच पाठशाला आहे. तुम्हाला तर येथेच शिकायचे आहे. दुसरी कोणती प्रार्थना इत्यादी करायची नाही.तुम्हाला शिक्षणाद्वारे वारसा मिळतो.मुख्य उद्देश आहे.तुम्ही मुलं जाणता बाबा ज्ञानसंपन्न आहेत.त्यांचे शिक्षण वेगळे आहे.ज्ञानाचे सागर बाबाच आहेत,तर तेच जाणतात.तेच आम्हाला सृष्टीच्या आधी मध्य अंतचे ज्ञान देतात.दुसरे कोणी देऊ शकत नाहीत.बाबा सन्मुख येऊन,ज्ञान देऊन परत चालले जातात.या शिक्षणाचे प्रारब्ध कोणते मिळते,ते ही तुम्ही जाणतात.बाकी जे पण सत्संग इत्यादी आहेत किंवा गुरु इत्यादी आहेत,ते सर्व भक्ति मार्गाचे आहेत.आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे.हे पण तुम्ही जाणतात, त्यांच्या मध्ये काही,हे ज्ञान घेणारे असतील,ते निघून येतील.तुम्हा मुलांना सेवेच्या वेग वेगळ्या युक्त्या शोधायचे आहेत.आपला अनुभव ऐकवुन अनेकांचे भाग्य बनवायचे आहे.तुम्हा सेवाधारी मुलांची स्थिती खूप निर्भय अडोल आणि योग युक्त पाहिजे.योगा मध्ये राहून सेवा कराल तर सफलता मिळू शकते. मुलांनो तुम्हाला स्वतःला पूर्णपणे सांभाळायचे आहे.कधी आवेश इत्यादी येऊ द्यायचा नाही,पक्के योग युक्त पाहिजेत.बाबाने समजवले आहे,वास्तव मध्ये तुम्ही सर्व वानप्रस्थी आहात,वाणी पासून दूर अवस्था असणारे आहात. वानप्रस्थी म्हणजे वाणी पासून दूर घराची आणि बाबांची आठवण करणारे, याशिवाय कोणती इच्छा नाही.आम्हाला चांगले कपडे पाहिजेत इत्यादी या सर्व खराब इच्छा आहेत.देह अभिमान असणारे सेवा करू शकत नाहीत,देही अभिमानी बनावे लागेल.भगवंताच्या मुलांमध्ये तर शक्ती पाहिजे,ती योगाची शक्ती आहे.बाब तर सर सर्व मुलांना जाणू शकतात ना.बाबा लगेच सांगतील,यांच्यामध्ये हे अवगुण आहेत, ते काढून टाका.बाबाने समजवले आहे, शिवाच्या मंदिरांमध्ये जावा,तुम्हाला अनेक भक्त मिळतील.अनेक जण आहेत,जे काशी मध्ये जाऊन निवास करतात,समजतात काशिनाथ आमचे कल्याण करतील.तेथे तुम्हाला अनेक ग्राहक मिळतील परंतु यामध्ये हुशार बुद्धी पाहिजेत.गंगास्नान करणाऱ्यांना पण जाऊन समजावू शकता,मंदिरा मध्ये जाऊन समजून सांगा.गुप्त वेशामध्ये जाऊ शकता,हनुमान चे उदाहरण आहे.वास्तव मध्ये तुम्हीच हनुमान आहात.यामध्ये चप्पल मध्ये बसण्याची गोष्ट नाही.यामध्ये खूप हुशार समजदार पाहिजेत.बाबांनी समजवले आहे,आता कोणीच कर्मातीत बनले नाहीत,काही ना काही अवगुण जरूर आहेत. तुम्हा मुलांना नशा राहायला पाहिजे की,हे एकच दुकान आहे.जेथे सर्वांना यावे लागेल.एके दिवशी संन्यासी इत्यादी सर्व येतील.एकच दुकान आहे तर जातील कुठे?जे खूप भटकले असतील,त्यांनाच रस्ता मिळेल आणि समजतील हे एकच दुकान आहे,सर्वांचे सदगती दाता एकच पिता आहेत ना. असा जेव्हा नशा चढेल तेव्हा ची गोष्ट आहे.बाबांचे हेच कर्तव्य आहे ना,मी आलो आहे,पतितांना पावन बनवुन शांतीधाम सुखधाम चा वारसा देण्यासाठी,तुमचा पण हाच धंदा आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे,ही जुनी दुनिया आहे,त्याच इतके आयुष्य आहे. थोड्या दिवसात तुम्ही समजून जाल,ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे.सर्व आत्म्याच्या बुद्धीमध्ये येईल,नवीन दुनियेची ची स्थापना होईल,तेव्हाच जुन्या दुनियेचा विनाश होईल.पुढे चालून म्हणाल,बरोबर भगवान येथे आहेत. पित्यालाच विसरले आहेत. त्रिमूर्ती मध्ये शिवाचे चित्र गायब केले आहे,तर कोणत्याच कामाचे राहिले नाहीत.रचनाकार तर तेच आहेत ना. शिवाच्या चित्रा मध्ये हे स्पष्ट होते,ब्रह्मा द्वारे स्थापना.प्रजापिता ब्रह्मा असतील तर जरूर ब्रह्मा कुमार कुमारी पण असायला पाहिजेत.ब्राह्मण वर्ण सर्वात उच्च असतो.ब्रह्माची संतान आहोत. ब्राह्मणाला कसे स्थापन करतात,ते कोणी जाणत नाहीत.बाबा तुम्हाला शूद्रा पासुन ब्राह्मण बनवतात.या खूपच रहस्य युक्त गोष्टी आहेत.बाबा जेव्हा सन्मुख येतील तेव्हाच समजवतील.जे देवता होते तेच आता शुद्र बनले आहेत.त्यांना कसे शोधायचे,त्यासाठी युक्ती शोधायची आहे,ज्यामुळे समजतील ब्रह्माकुमार- कुमारीचे कार्य तर खूप मोठे आहे. अनेक पत्रके इत्यादी वाटतात.बाबांनी विमानाद्वारे पत्रके वाटण्यासाठी पण समजवले आहे.कमीत कमी वर्तमान पेपर एवढा,पत्रकाचा कागद असायला हवा,त्यामध्ये मुख्य मुद्दे,सिडीचे चित्र इत्यादी पण येऊ शकते.मुख्य इंग्रजी आणि हिंदी भाषा आहे.तर मुलांना सर्व दिवस विचार करायला पाहिजे,सेवा कशी वाढेल.हे पण जाणतात, अविनाशी नाटका नुसार पुरुषार्थ होत राहतो.असे समजले जाते हे सर्वात चांगली सेवा करतात,त्यांचे पद पण श्रेष्ठ असेल.प्रत्येक कलाकारा ची आप आपली भूमिका आहे.ही पण लाईन जरूर लिहायला पाहिजे.बाबा पण या नाटकांमध्ये निराकारी दुनिया मधून साकारी शरीराचा आधार घेऊन, भूमिका वठवतात.आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे,कोण कोण किती काळ भूमिका करतात.तर ही लाईन पण मुख्य आहे.तुम्ही स्पष्ट करू शकता,या सृष्टीच्या चक्राला जाणल्यामुळे मनुष्य स्वदर्शन चक्रधारी बणुन चक्रवर्ती राजा विश्वाचे मालिक बणू शकतात.तुमच्या जवळ सर्व ज्ञान आहे ना.बाबांच्या जवळ गीताचे ज्ञान आहे,ज्याद्वारे मनुष्य नरा पासून नारायण बनतात.सर्व ज्ञान बुद्धी मध्ये आले तर परत पूर्ण बादशाही पाहिजे.तर मुलांना असे विचार करून बाबांच्या सेवेमध्ये लागायला पाहिजे.जयपूरमध्ये पण हे आत्मीक संग्रहालय कायम स्वरूपी असायला हवे.असे लिहायला पाहिजे,हे ज्ञान समजल्या मुळे मनुष्य,विश्वाचे मालक बनू शकतात.जे पाहतील,एक-दोघांना ऐकवत राहतील. मुलांना नेहमी सेवा करायची आहे.मम्मा पण खूप सेवा करत आहे.त्यांना निमित्त बनवले होते.हे कोणत्या ग्रंथांमध्ये नाही कि,सरस्वती कोण आहे.प्रजापिता ब्रह्मा ची फक्त एकच मुलगी असेल का, अनेक मुलं असतील.अनेक नावा वाले आले असतील.ती तरीही दत्तक होती.जसे तुम्ही आहात.एक मुख्य चालले जातात,तर दुसऱ्याला निमित्त बनवले जाते.पंतप्रधान पण दुसरे निवडुन देतात.त्यांना लायक समजले जाते,तेव्हा त्यांना पसंत करतात.त्यांचा कालावधी पूर्ण होतो,तर परत दुसऱ्यांना निवडतात.बाबा मुलांना प्रथम चाल चलन शिकवतात,की तुम्ही कसा दुसऱ्यांच्या सन्मान करायचा.जे शिकलेले नसतात त्यांना सन्मान,आदर पण ठेवता येत नाही.जे जास्त हुशार आहेत,त्यांचा आदर ठेवावा लागतो. मोठ्यांचा सन्मान ठेवल्यामुळे ते पण शिकतात.न शिकलेले तर बुध्दू असतात. बाबा न शिकलेल्या मुलांना पण पुढे करतात.आजकल स्त्रियांचा खूप मान आहे,त्यांना पुढे करतात.तुम्ही मुलं जाणता,आम्हा आत्म्या चा साखरपुडा परमात्म्याच्या सोबत झालेला आहे. तुम्ही खूप खुश होता,आम्ही तर विष्णुपुरी चे मालक बनू.कन्यांचा न पाहता पण बुद्धी योग लागतो.हे पण आत्मा जाणते,हा आत्मा आणि परमात्म्या चा आश्चर्यकारक साखरपुडा आहे. एका बाबांची च आठवण करावी लागेल.ते तर म्हणतात,गुरुची आठवण करा.अमका मंत्र आठवण करा.हे तर बाबाच सर्व काही आहेत.ब्रह्मा द्वारे येऊन साखरपुडा करतात,ते म्हणतात मी तुमचा पिता आहे.माझ्या पासून वारसा मिळतो.कन्याचा साखरपुडा होतो,तर परत विसरत नाही.तुम्ही का विसरतात?कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी वेळ लागतो.कर्मातीत अवस्थेला प्राप्त करून,परत तर कोणी जाऊ शकत नाहीत.जेव्हा साजन प्रथम जातील परत वरात जाईल.शंकराची गोष्ट नाही,शिवा ची वरात आहे.एकच साजन आहे,बाकी सर्व सजनी आहेत. तर ही शिव बाबांची वरात आहे.मुलांची नावं ठेवली आहेत.उदाहरण देऊन समजवले जाते.बाबा येऊन सुंदर बनवून सर्वांना घेऊन जातात.जे मुलं काम चितेवर बसून पतित बनले आहेत, त्यांना ज्ञानाच्या चितेवर बसवुन पवित्र बनवून सर्वांना घेऊन जातात.तर ही जुनी दुनिया आहे ना.कल्प कल्प बाबा येतात,आम्हाला पवित्र सुंदर बनवून घेऊन जातात.रावण खराब बनवतात आणि बाबा सुंदर बनवतात.तर बाबा खूप युक्ती समजावत राहतात.अच्छा. गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश:- - १ ) खराब खानपान च्या इच्छेला सोडून देही अभिमानी बणुन सेवा करायची आहे. आठवणी द्वारे शक्ती घेऊन निर्भय आणि अडोल अवस्था बनवायची आहे.
- २) जे अभ्यासामध्ये हुशार आहेत, त्यांचा सन्मान ठेवायचा आहे.जे भटकत आहेत,त्यांना रस्ता दाखवण्याची युक्ती शोधायची आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे.
वरदान:- आपल्या तपस्वी स्वरूपा द्वारे सर्वांना प्राप्तीचा अनुभव करवणारे मास्टर विधाता भव. जसा सूर्य विश्वाला प्रकाश आणि अनेक विनाशी प्राप्तीची अनुभूती करवतो,तसेच तुम्ही तपस्वी आत्मे आपल्या तपस्वी स्वरूपा द्वारा सर्वांना प्राप्तीच्या किरणाची अनुभुती करवा. यासाठी प्रथम स्वताचे जमेचे खाते वाढवा.परत जमा केलेल्या खजाने द्वारे मास्टर विधाता बणुन देत जावा.तपस्वी मुर्तचा अर्थच आहे,तपस्या द्वारा शांतीची किरणे चहुबाजूला पसरवत,अनुभूती व्हावी. बोधवाक्य:- स्वतः निर्माण बणुन सर्वांना मान देत चला,हाच खरा परोपकार आहे. ||| ओम शांती |||मातेश्वरीजी चे मधुर महावाक्य. अर्धा कल्प ज्ञान , ब्रह्माचा दिवस आणि अर्धा कल्प भक्ती ब्रह्माची रात्र . अर्धा कल्प ब्रह्माचा दिवस आहे,अर्धा कल्प ब्रह्माची रात्र आहे.आता रात्र पूर्ण होऊन,सकाळ होणार आहे.आता परमात्मा येऊन,अंधाराचा अंत करून प्रकाशाची सुरुवात करतात.ज्ञानामुळे प्रकाश,भक्तीमुळे रात्र होती.गीत मध्ये पण असे म्हणतात,पापाच्या दुनिया पासून दूर घेऊन चल,जिथे चैन आराम, शांती मिळेल.ही बेचैन दुनिया आहे, जिथे चैन नाही.मुक्ती मध्ये न चैन आहे,न बैचेन. सत्ययुग त्रेतायुग आहे चैनची दुनिया,आरामाची दुनिया.ज्या सुखधामची सर्व आठवण करतात. आत्ता तुम्हाला आरामा च्या दुनियेत घेऊन जात आहेत.तेथे कोणती अपवित्र आत्मा जाऊ शकत नाही.ते अंत काळा मध्ये धर्मराज ची सजा खाऊन बंधना पासून मुक्त होऊन,शुद्ध संस्कार घेऊन जातात.कारण तेथे न अशुद्ध संस्कार असतात,न पाप होते.जेव्हा आत्मा आपल्या खऱ्या पित्याला विसरते तेव्हाच हा भुलभुलय्या चा,हार जीतचा खेळ बनतो.म्हणून आपण सर्वशक्तीमान परमात्मा द्वारे शक्ती घेऊन विकारा वरती विजय मिळवून,एकवीस जन्मासाठी राज्य भाग घेत आहोत. अच्छा. ओम शांती.
|
|