08.04.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबा आले आहेत, तुम्हाला शक्ती देण्यासाठी,तुम्ही देही अभिमान रहाल,बुद्धी जोडाल,तर शक्ती मिळत राहील.

प्रश्न:-

सर्वात मोठा आसुरी स्वभाव कोणता आहे,जो मुलांमध्ये असायला नको?

उत्तर:-

अशांती पसरवणे,हा सर्वात मोठा आसुरी स्वभाव आहे.अशांती पसरवणाऱ्या मुलां द्वारे मनुष्य तंग होतात.ते जिथे जातील तेथे अशांत करतील,म्हणून भगवंता द्वारे सर्व शांतीचे वरदान मागतात.

गीत:-

ही गोष्ट आहे दिवा आणि वादळाची…

ओम शांती.गोड गोड फार फार वर्षानी भेटलेल्या मुलांनी गिताची लाइन ऐकली. गित तर हे भक्ती मार्गातील आहे,परत त्याला ज्ञान मार्गामध्ये परिवर्तन केले जाते आणि दुसरे कोणी परिवर्तन करू शकत नाही.तुमच्या मध्ये पण क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणेच जाणू शकतात.दिवा काय आहे,वादळ काय आहे,दिवा काय आहे,मुलं जाणतात. आत्म्याची ज्योती विझलेली आहे.आता बाबा आले आहेत,ज्योती जागृत करण्यासाठी.कोणाचा मृत्यू होतो,तर दिवा प्रज्वलित ठेवतात,त्याची खूप खबरदारी घेतात.असे समजतात जर दिवा विझला तर,आत्म्याला अंधारातून जावे लागेल म्हणून दिवा प्रज्वलित ठेवतात.आता सतयुगा मध्ये अशा गोष्टी होत नाहीत.तेथे तर प्रकाशच असतो. भुख इत्यादीची पण गोष्ट नसते.तेथे तर खूप चांगल्या प्रकारची मिठाई असते.येथे तर खूप अंधार आहे.खराब दुनिया आहे.सर्वांची ज्योती विझलेली आहे.सर्वात जास्त ज्योती तुमची विझलेली होती.खास तुमच्यासाठी बाबा येतात.तुमची ज्योत विझलेली आहे, आता शक्ती कुठून मिळेल?मुलं जाणतात शक्ती तर बाबा पासूनच मिळेल.शक्ती किंवा करंट जास्त असते तर बल्बचा प्रकाश जास्त पडतो.तर आत्ता तुम्ही शक्ती,करंट घेत आहात,तेही मोठ्या मशीनद्वारे.पहा मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक मनुष्य राहतात,किती लाईट पाहिजे.जरूर इतकी मोठी मशनरी पण पाहिजे.या बेहदच्या गोष्टी आहेत.साऱ्या दुनियेच्या आत्म्याची ज्योत विझलेलीआहे,त्यांना शक्ती द्यायची आहे.मुख्य गोष्ट बाबा समजवतात,बुध्दी योग बाबांशी लावा. किती गोड बाबा आहेत.देही अभिमानी बना.किती मोठे पिता आहेत,साऱ्या दुनिये तील मनुष्यांना पावन करणारे सर्वोच्च बाबा आले आहेत,सर्वांची ज्योती जागृत करण्यासाठी.साऱ्या दुनियाच्या मनुष्यमात्राची ज्योती जागृत करतात.बाबा कोण आहेत,कसे आहेत,काय करतात हे तर कोणी जाणत नाहीत.त्यांना ज्योती स्वरूप पण म्हणतात परत सर्वव्यापी पण म्हणतात. ज्योती स्वरूप ला बोलवतात कारण ज्योती विझलेली आहे.साक्षात्कार पण होतो,अखंड ज्योती चा.असे दाखवतात अर्जुनाने म्हटले मी तेज प्रकाश सहन करू शकत नाही,खुप शक्ती आहे.तर आता या गोष्टीला तुम्ही मुलंच समजतात.सर्वांना समजावयाचे आहे की तुम्ही आत्मा आहात.आत्मे परमधाम वरून येथे येतात.प्रथम आत्मा पवित्र आहे,त्याच्यामध्ये भरपूर शक्ती आहे,सतोप्रधान आहे.सुर्वण युगा मध्ये पवित्र आहेत,परत त्यांना अपवित्र पण बनायचे आहे.जेव्हा अपवित्र बनतात,तेव्हा ईश्वराला बोलवतात, येऊन आम्हाला मुक्त करा म्हणजे दुःखापासून मुक्त करा.मुक्त करणे आणि पावन बनवणे दोन्हीचा अर्थ वेगळा आहे.जरूर कोणा द्वारे तरी पतित बनले आहेत,तेव्हा तर म्हणतात बाबा मुक्त करा.येथून शांतीधाम मध्ये घेऊन चला. शांतीचे वरदान द्या.आता बाबांनी समजवले आहे,येथे शांत राहू शकत नाहीत.शांती तर शांतीधाम मध्ये आहे. सतयुगा मध्ये,एक धर्म एकच राज्य आहे, तर शांती राहते.कोणताही गोंधळ नाही.येथे मनुष्य अशांती मुळे तंग होतात.एकाच घरांमध्ये किती भांडणे होत राहतात.समजा पती पत्नीचे भांडणे होतात,तर माता पिता,मुलं, भाऊ बहिण,सर्व तंग होतात.अशांती करणारे मनुष्य जेथे जातील तेथे अशांतीच करतील,कारण आसुरी स्वभाव आहे ना.आता तुम्ही जाणता सातयुग सुखधाम आहे.तेथे सुख आणि शांती दोन्ही आहेत आणि इथे तर फक्त शांती आहे.त्याला म्हटले जाते गोड शांतीचे घर.मुक्तिधाम मध्ये राहणाऱ्यांना फक्त एवढेच सांगायचे आहे की, तुम्हाला मुक्ती पाहिजे ना,तर शिव पित्याची आठवण करा.

मुक्तीच्या नंतर जीवनमुक्ती जरूर आहे.प्रथम जीवनमुक्ती होते,परत जीवन बंधना मध्ये येतात.अर्धा अर्धा आहे. सतोप्रधान परत सतो रजो,तमो मध्ये जरूर यायचे आहे.अंत काळामध्ये जे एखादा जन्म घेत असतील, ते काय सुख दुःखाचा अनुभव करतील.तुम्ही तर सर्व अनुभव करतात.तुम्ही जाणता इतके जन्म सुखामध्ये राहतो,इतके जन्म दुःखामध्ये राहतो.अमके धर्म नविन दुनिया मध्ये येऊ शकत नाहीत. त्यांची भूमिका नंतर आहे,नवीन खंड आहेत,त्यांच्या साठी जसे की नवीन दुनिया आहे.जसे बौध्दी खंड,ख्रिश्चन खंड नविन झाले ना.त्यांना पण सतो, रजो,तमो मधुन यावे लागते.झाड पण असेच होते ना.हळू हळू वृध्दी होत जाते.प्रथम जे निघाले ते खाली राहतात.तुम्ही पाहिले आहे ना,नवीन नवीन पानं कशा प्रकारे निघतात.लहान लहान हिरवी पानं निघत राहतात,परत फुलं निघतात.नविन झाड खुप लहान असते.जेव्हा बीज पेरले जाते,त्यांची पूर्ण पणे पालन पोषण केले नाही तर सडुन जाते.तुम्ही पण पूर्ण रितीने पालन करत नाही तर सडुन जातात.बाबा येऊन मनुष्या पासून देवता बनवतात, त्यामध्ये पण क्रमानुसार बनतात. राजधानी स्थापन होते ना.अनेक जण नापास होतात.मुलांची जशी अवस्था आहे,तसेच प्रेम बाबाकडून मिळते. काही मुलांना बाहेरून प्रेम करावे लागते,काही जण लिहतात,आम्ही नापास झालो,पतित बनलो.आता त्यांना कोण हात लावेल.ते बाबाच्या ह्रदयासिन बनू शकत नाहीत.पवित्र राहणाऱ्यालाच बाबा वारसा देऊ शकतात.प्रथम एका एकाला पूर्ण समाचार विचारून हिशेब घेतात.जशी अवस्था तसेच प्रेम मिळते.बाहेरुन जरी प्रेम करतात परंतु मनातुन जाणतात,हे बिल्कुलच बुध्दू आहेत.सेवा करू शकत नाहीत.विचार पण चालत राहतो ना.अज्ञान काळामध्ये मुलगा चांगला कमावणारा असेल तर पिता पण खूप प्रेम करतात.कोणी इतके कमावणारे नसेल तर पिता पण एवढे प्रेम करू शकत नाही.तर तेथे पण असेच आहे.मुलं बाहेर सेवा करतात ना. जरी कोणत्याही धर्माचा असेल त्यांना समजावयला पाहिजे.बाबांना मुक्तिदाता म्हटले जाते.मुक्तीदाता आणि मार्गदर्शक कोण आहेत,त्यांचा परिचय द्यायचा आहे.सर्वोच्च ईश्वरीय पिता येतात, सर्वांना मुक्त करतात.बाबा म्हणतात तुम्ही खूपच पतित बनले आहात, काहीच पवित्रता नाही.आता माझी आठवण करा.बाबा नेहमीच पवित्र आहेत,बाकी सर्व पवित्र पासून अपवित्र जरूर बनतात.पुनर्जन्म घेता घेता,उतरत येतात.या वेळेत सर्व पतित आहेत म्हणून बाबा मत देतात,मुलांनो तुम्ही माझी आठवण करा,तर पावन बनाल.आता मृत्यू तर समोर उभा आहे. जुन्या दुनिये चा आता अंत आहे.मायेचा खुप दिखावा आहे,म्हणून मनुष्य समजतात येथे तर स्वर्ग आहे.विमाने, लाईट,इत्यादी काय काय निघाले आहेत, हा सर्व मायेचा दिखावा आहे.हे सर्व नष्ट होणार आहे.परत स्वर्गाची स्थापना होईल.हे लाईट इत्यादी सर्व स्वर्गामध्ये पण असतात.आता हे सर्व,स्वर्गा मध्ये कसे येतील?जरूर कारागिर पण पाहिजेत ना.तुमच्याजवळ खूप चांगले चांगले कारागीर लोक पण येतील.ते राजाई मध्ये तर येणार नाहीत तरीही तुमच्या प्रजे मध्ये येतील.इंजिनिअर, चांगले चांगले कारागीर येतील.हे फॅशन सर्व बाहेरच्या देशाकडून येत राहते.तर बाहेरील देशात पण तुम्हाला शिवबाबांचा परिचय द्यायचा आहे. तुम्हाला पण योगामध्ये राहण्या साठी खूप पुरुषार्थ करायचा आहे.यामध्येच मायेचे वादळ येतात.बाबा म्हणतात फक्त माझी आठवण करा.ही तर चांगली गोष्ट आहे ना.येशू ख्रिस्त यांची रचना आहे,रचनाकार सर्वोच्च आत्मा तर एकच आहेत,बाकी सर्व रचना आहे.वारसा रचनाकारा कडुनच मिळतो.असे चांगले चांगले मुद्दे आहेत त्यांना वहीमध्ये नोंद करायचे आहेत.

त्यांचे मुख्य कर्तव्य आहे सर्वांना दुःखापासून मुक्त करणे.तेच सुखधाम आणि शांतीधाम चे गेट उघडतात. त्यांनाच म्हणतात हे मुक्तिदाता,दुःखा पासुन मुक्त करून आम्हाला शांतीधाम सुखधाम घेऊन चला.जेव्हा येथे सुखदम आहे,तर बाकी सर्व आत्मे शांतीधाम मध्ये राहतात.स्वर्गाचे गेट तर बाबाच उघडतात.एक गेट उघडतात नवीन दुनियेचे,दुसरे शांतीधाम चे.आता जे आत्मे अपवित्र झाले आहेत,त्यांना बाबा श्रीमत देतात,स्वता:ला आत्मा समजा,माझी आठवण करा,तर तुमचे पाप नष्ठ होतील.आत्ता जे जे पुरुषार्थ करतील ते परत आप आपल्या धर्मात उच्च पद मिळवतील.पुरुषार्थ करणार नाही तर पद कमी मिळवतील.चांगल्या चांगल्या गोष्टीची नोंद करा तर वेळेवर कामांमध्ये येतील.बोला,शिवबाबा चे आम्ही सांगतो,तर मनुष्य म्हणतील,हे कोण आहेत,जे ईश्वरीय पित्याचे कर्तव्य सांगत आहेत.तुम्ही सांगा,आत्म्याच्या रूपामध्ये तर,तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात,परत प्रजापिता ब्रह्मा द्वारा रचना रचतात,तर भाऊ-बहीण होतात.ईश्वरीय पिता,ज्याला मुक्तिदाता मार्गदर्शक म्हणतात,त्यांचे कर्तव्य आम्ही तुम्हाला सांगतो,जरूर आम्हाला ईश्वराने सांगितले आहे,तेव्हा तर तुम्हाला सांगतो.मुलगाच वडिलांना प्रत्यक्ष करतो.हे पण समजायला पाहिजे,आत्मा खूपच छोटा तारा आहे,जो या डोळ्याने पाहू शकत नाही.दिव्य दृष्टी द्वारे साक्षात्कार होऊ शकतो.बिंदी आहे, पाहिल्याने थोडाच फायदा होऊ शकतो. बाबा पण असेच बिंदी आहेत,त्यांना सर्वोच्च आत्मा म्हटले जाते.आत्मा एक सारखी आहे परंतु ती सर्वोच्च आहे, ज्ञानसंपन्न आहे,दयावान आहे. मुक्तिदाता आणि मार्गदर्शक पण आहे. त्यांची खूप महिमा करावी लागेल. जरूर बाबा येतील तेव्हा तर सोबत घेऊन जातील ना.येऊन ज्ञान देतील. बाबाच सांगतात,आत्मा जशी छोटी आहे,तसेच मी पण सुक्ष्म बिंदू आहे. ज्ञान पण जरुर कोणत्या शरीरांमध्ये प्रवेश करून देतील.आत्म्याच्या बाजूला येऊन बसतो.माझ्यामध्ये शक्ती आहे, कर्मेंद्रिया मिळाले तर मी धनी झालो. कर्मेंद्रिया द्वारा सन्मुख समजावतो,यांना म्हणजे ब्रह्माला एडम आदी देव पण म्हटले जाते.एडम म्हणजे पहिला पहिला मनुष्य.मनुष्यांची पण वंशावळ आहे ना.हे माता पिता पण बनतात, यांच्याद्वारे परत रचना होते.आहेत जुनेच परंतु त्यांना पण दत्तक घेतले आहे, नाहीतर ब्रह्मा कुठून येतील.ब्रह्मा पित्याचे नाव कोणी सांगू शकतील का? ब्रह्मा विष्णू शंकर हे कोणाची तरी रचना असतील ना.रचनाकार तर एकच आहेत,त्यांनी दत्तक घेतले आहे.हे जर लहान मुलं बसून सन्मुख ऐकवतील तर,म्हणतील हे तर खूप श्रेष्ठ ज्ञान आहे. ज्या मुलांना चांगली धारणा होते,त्यांना खूप खुश राहील,त्यांना कधी जांभळ्या येणार नाहीत.कोणी समजणारा नसेल तर जांभळ्या देत राहील.येथे तुम्हाला कधीच जांभळ्या यायला नाही पाहिजेत.कमाईच्या वेळत कधीच जांभळ्या येत नाहीत.ग्राहक नसेल,धंदा होत नसेल,तर जांभळ्या येत राहतील. येथे पण धारणा होत नाही.काही तर बिल्कुलच समजत नाहीत,कारण देहाभिमान आहे.देही अभिमानी होऊन बसू शकत नाहीत.काहीना काही बाहेरच्या गोष्टी आठवणीत येतात.समजदार मुलं ज्ञानाचे मुद्दे लगेच नोंद करतील,या ज्ञानाच्या गोष्टी तर फारच चांगल्या आहेत.विद्यार्थ्यांची चलन पण शिक्षकांना दिसुन येते. समजदार शिक्षकांची नजर सगळीकडे फिरत राहते,तेव्हा तर अभ्यासाचे प्रमाणपत्र देतात,चाल चलन चे पण प्रमाणपत्र देतात ना.किती दिवस अनुपस्थित राहिले ते पण सांगतात.येथे तर उपस्थित राहतात,परंतु समजत काहीच नाहीत.धारणा होत नाही.काही जन म्हणतात,ज्ञानाची धारणा होत नाही, बुद्धी डल आहे,तर बाबा काय करतील. हा तर तुमच्या कर्माचा भोग आहे.बाबा भाग्य बनवतात,तुमच्या भागामध्ये नाहीतर,काय करतील. शाळेमध्ये पण काही पास,तर काही नापास होतात. हे शिक्षण आहे,जे बाबाच शिकवतात.दुसऱ्या धर्माचे गीता ज्ञान समजत नाहीत.राष्ट्र पाहून समजावे लागते.प्रथम परिचय द्यावा लागेल,ते कसे मुक्तिदाता,मार्गदर्शक आहेत. स्वर्गामध्ये तर हे पाच विकार नसतात. या वेळेत याला म्हटले जाते,सैतान चे राज्य.जुनी दुनिया आहे ना.याला सुर्वण युग म्हटले जात नाही.नवीन दुनिया होती,आता जुनी आहे.मुलांमध्ये ज्यांना सेवेची आवड आहे,तर ज्ञानाचे मुद्दे नोंद करायला पाहिजेत. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांसाठी,प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. १) अभ्यासा मध्ये खूप कमाई आहे म्हणून कमाई खुशी खुशीने करायची आहे. कधी जांभळी इत्यादी यायला नको. बुद्धी इकडे तिकडे भटकायला नको. ज्ञानाचे मुद्दे नोंद करत राहाल,तर धारणा होत राहील.
  2. २) पवित्र बणुन बाबांच्या ह्रदयाच्या प्रेमाचे अधिकारी बनायचे आहे.सेवेमध्ये हुशार बनायचे आहे.चांगली कमाई करायची आणि करवायची आहे.

वरदान:-

स्व कल्याणाच्या सोबत परोपकारी बनणारे मायाजीत विजयी भव.

आजपर्यंत स्व कल्याण मध्ये खूप वेळ जात आहे.आता परोपकारी बना.माया जीत विजय बनण्याच्या सोबतच,सर्व खजान्याचे विधाता बना.प्रत्येक खजान्याला कार्यामध्ये लावा.खुशीचा खजाना,शांतीचा खजाना,शक्तीचा खजाना,ज्ञानाचा खजाना,गुणांचा खजाना,सहयोग देण्याचा खाजाना,दुसऱ्याला वाटा आणि त्यामध्ये वृद्धी करा.जेव्हा आता विधाता पणच्या स्थितीचा अनुभव कराल म्हणजेच परोपकारी बनाल,तेव्हाच अनेक जन्म विश्व राज्य अधिकारी बनू शकाल.

बोधवाक्य:-

विश्व कल्याणकारी बनायचे आहेत तर,आपल्या सर्व कमजोरी ला नेहमीसाठी निरोप द्या.

||| ओम शांती |||

ओम शांती.