23-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,सर्वात चांगला दैवी गुण आहे शांत राहणे,हळू बोलणे,गोड बोलणे,तुम्ही मुलं आत्ता बोलण्यापेक्षा शांती आणि परत शांती मधून शांतीधाम मध्ये जातात,त्यामुळे जास्त बोलू नका"

प्रश्न:-
कोणत्या मुख्य धारणेमुळे सर्व दैवी गुण स्वतः येत राहतील?

उत्तर:-
मुख्य पवित्रतेची धारणा आहे. देवता पवित्र आहेत,त्यामुळे त्यांच्या मध्ये दैवी गुण आहेत.या दुनिया मध्ये तर,कोणा मध्ये पण दैवी गुण नाहीत.रावण राज्यात दैवी गुण कुठून येतील?तुम्ही श्रेष्ठ मुलं आता दैवी गुण धारण करत आहात.

गीत:-
भोलेनाथ पेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीत, बिगडीला सुधारणारे एकच भोलेनाथ आहेत.

ओम शांती।
आता मुलं समजतात की बिगडी ला बनवणारे एकच आहेत.भक्ती मार्गामध्ये तर अनेक ठिकाणी जातात,अनेक तीर्थयात्रा इत्यादी करतात.बिगडीला बनवणारे, पतितांना-पावन बनवणारे एकच आहेत.मार्गदर्शक मुक्तिदाता पण एकच आहेत.आता गायन तर करतात परंतु अनेक मनुष्य अनेक धर्म,पंथ,ग्रंथ असल्यामुळे अनेक रस्ते शोधत राहतात. सुख शांती साठी सत्संगामध्ये जात जातात ना. ते जाणत नाहीत,ते मायावी मस्ती मध्येच मस्त राहतात.हे पण तुम्ही मुलं जाणता की आता,कलियुगाचा अंत आहे.मनुष्य जाणत नाहीत,की सतयुग कधी,असते,आता कोणते युग आहे? हे तर कोणी मुलगा पण समजू शकतो,नवीन दुनियामध्ये सुख आणि जुन्या दुनिया मध्ये जरूर दुःख असते.या जुन्या दुनिया मध्ये अनेक मनुष्य आहेत,अनेक धर्म आहेत. तुम्ही कोणालाही समजावू शकता की हे कलियुग आहे.सतयुग पूर्वी झाले आहे,तेथे एकच आदी सनातन धर्म होता,दुसरा कोणता धर्म नव्हता.बाबांनी अनेक वेळेत समजावले आहे.तरीपण समजवत आहेत.जे येतात,त्यांना नवीन आणि जुन्या दुनिये मधील फरक दाखवला पाहिजे.जरी ते काही पण म्हणतील, कोणी कलियुगाचा कालावधी १०००० वर्षाचा म्हणतील,कोणी ३०००० वर्षाचा कालावधी म्हणतील, अनेक मत आहेत ना.आता त्यांच्या जवळ ग्रंथाचे मत आहे.अनेक ग्रंथ, अनेक मतं आहेत.मनुष्यांचे अनेक मत आहेत ना.ते ग्रंथ पण लिहितात तर मनुष्यच ना.देवता कोणते ग्रंथ इत्यादी लिहीत नाहीत.सतयुगा मध्ये देवी देवता धर्म असतो,त्यांना मनुष्य पण म्हणू शकत नाहीत.तर जेव्हा कोणी मित्र संबंधित इत्यादी भेटतात, तर त्यांना बसून हे सांगितले पाहिजे. ही विचार करण्याची गोष्ट आहे. नवीन दुनिया मध्ये खूप थोडे मनुष्य असतात.जुन्या दुनिये मध्ये तर खुप वृद्धी होत आहे.सत्ययुगा मध्ये एक देवी-देवता धर्म होता,मनुष्य पण थोडे होते,दैवी गुण असतातच देवतांमध्ये. मनुष्य मध्ये असत नाहीत,तेव्हा तर मनुष्य देवतांच्या समोर जाऊन नमस्कार करतात.देवतांची महिमा गातात,ते जाणतात की स्वर्गवासी आहेत.आम्ही नरकवासी कलियुगी आहोत.मनुष्यामध्ये दैवी गुण नाहीत. कोणी म्हणतात आमच्या मध्ये खूप चांगले दैवी गुण आहेत,बोला नाही. दैवी गुण असत नाहीत,रावण राज्य आहे ना.नवीन झाडांमध्ये दैवी गुण असणारे राहतात नंतर झाड जुने होते.रावण राज्यामध्ये दैवी गुण धारण करणारे नसतात.सत्ययुगा मध्ये आदी सनातन देवी देवतांचा प्रवृत्ती मार्ग होता.प्रवृत्तिमार्ग असणाऱ्यांची महिमा केली जाते. सतयुगा मध्ये आम्ही पवित्र देवी देवता होतो.संन्यास मार्ग नव्हता. अनेक मुद्दे आहेत परंतु सर्व मुद्दे कोणाच्या बुद्धीमध्ये राहत नाहीत. ज्ञानाचे मुद्दे विसरून जातात,त्यामुळे नापास होतात.दैवी गुण धारण करत नाहीत.एक दैवी गुण चांगला आहे,ते म्हणजे,जास्त कोणाशी बोलू नका,गोड बोलणे,खूप कमी बोलले पाहिजे, कारण तुम्हा मुलांना शांती मध्ये आणि शांती मधून शांतीधाम मध्ये जायचे आहे.त्यामुळे बोलणे फार कमी केले पाहिजे.जे फार थोडे शांती पुर्वक बोलतात, तर समजतात हे उच्च घरातील आहेत.मुखातून सदैव रत्न निघावेत.

सन्याशी,कोणीही असतील तरी त्यांना नवीन आणि जुन्या दुनियेतील फरक सांगितला पाहिजे.सतयुगा मध्ये दैवी गुण असणारे देवता होते,तो प्रवृत्तिमार्गी होता.त्या सन्याशाचा तर धर्मच वेगळा आहे,तरीपण हे तर समजतात कि,नवीन सृष्टी सतोप्रधान होती,आता तमोप्रधान आहे.आत्मा तमोप्रधान बनते,तर शरीर पण तमोप्रधान मिळते.आता आहेच पतित दुनिया.सर्वांना पतितच म्हणावे लागेल.ती सतोप्रधान पावन दुनिया आहे.तीच नवीन दुनिया आता जुनी दुनिया होते.यावेळी सर्व मनुष्य आत्मे नास्तिक आहेत,त्यामुळेच उपद्रव होतात.धनीला न ओळखल्यामुळे एकमेकात भांडत राहतात. रचनाकार आणि रचनेला जाणल्यामुळे अस्तिक म्हटले जाते.संन्यास धर्मातील तर नवीन दुनियेला ओळखतच नाहीत. तर ते येथे येतच नाहीत.बाबांनी समजावले आहे,आता सर्व आत्मे तमोप्रधान बनले आहेत,नंतर सर्व आत्म्यांना सतोप्रधान कोण बनवेल? ते तर बाबाच बनवू शकतात.सतयुगा मध्ये थोडे मनुष्य असतात,बाकी सर्व मुक्तिधाम मध्ये राहतात.ब्रह्म तत्व आहे,जेथे आम्ही आत्मे निवास करतो,त्याला म्हटले जाते ब्रह्मांड.आत्मा तर अविनाशी आहे.हे अविनाशी नाटक आहे,ज्यामध्ये सर्व आत्म्याची भुमिका आहे.नाटक कधी सुरू झाले?हे कोणी सांगू शकत नाही.हे अनादी नाटक आहे ना.बाबा सृष्टीची स्थापना करतात,जेव्हा पतित होतात, तेव्हाच बोलवतात,मध्ये कोणीच बोलवत नाहीत.ते आहे पावन दुनिया,रावण पतित बनवतात, परत परमपिता परमात्मा येऊन पावन बनवतात जरूर.अर्धे,अर्धे जरूर आहे.ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र आहे.ज्ञानाने दिवस होतो तेथे अज्ञान नाही.भक्तिमार्गाला अंधार मार्ग म्हटले जाते.देवता पुनर्जन्म घेत घेत नंतर अंधारांमध्ये येतात,त्यामुळे शिडीच्या चित्रामध्ये दाखवले आहे की,मनुष्य कसे सतो,रजो,तमो मध्ये येतात.आता सर्वांची अवस्था जिर्ण झाली आहे.बाबा परिवर्तन करण्यासाठी म्हणजे मनुष्या पासुन देवता बनवण्यासाठी येतात.जेव्हा देवता होते तर आसुरी गुणधारी मनुष्य नव्हते.आत्ता या आसुरी गुण धारण करणाऱ्यांना दैवी गुण धारी कोण बनवेल? आता तर अनेक मनुष्य,अनेक धर्म आहेत,भांडत राहतात.सतयुगा मध्ये अनेक धर्म नाहीत तर दुःखाची कोणतीच गोष्ट नाही.ग्रंथांमध्ये अनेक दंतकथा लिहिल्या आहेत.जन्मोजन्मी वाचत आलो आहोत.बाबा म्हणतात ते सर्व भक्ती मार्गातील ग्रंथ आहेत,त्याद्वारे मला प्राप्त करू शकत नाहीत.मला तर स्वतः एका वेळेस घेऊन सर्वांची सद्गती करायची आहे.असेच परत कोणी जाऊ शकत नाही.खूप शांतीने बसून समजवले पाहिजे,उपद्रव पण होऊ नये.त्या लोकांना स्वतःचं अहंकार तर राहतोच ना.साधुसंत बरोबर शिष्य पण राहतात,ते लगेच म्हणतील यांना पण ब्रह्माकुमारीची जादू लागली आहे,शहाणे म्हणजे समजदार आहेत,ते म्हणतील या विचार करण्याच्या गोष्टी आहेत.या प्रदर्शनीमध्ये अनेक प्रकारचे मनुष्य येतात ना.प्रदर्शनी इत्यादी ठिकाणी कोणी आले तर,त्यांना मोठ्या धैर्याने समजवले पाहिजे.जसे बाबा धेर्य देऊन समजवतात,मोठ्याने बोलू नये. प्रदर्शनी मध्ये तर अनेक एकत्र येतात, त्यांना सांगितले पाहिजे,तुम्ही थोडा वेळ काढून,एकांत मध्ये समजून घ्याल तर,रचनाकार आणि रचनेचे रहस्य समजावतो.ज्ञानाचे रचनाकार बाबा,रचनेच्या आदी मध्य अंतचे ज्ञान समजवत आहेत.बाकी सर्व नेती नेती करत आले आहेत.कोणीही मनुष्य वापस जाऊ शकत नाही.ज्ञानामुळे सद्गती होते परत ज्ञानाची आवश्यकता राहणार नाही.हे ज्ञान बाबा शिवाय कोणी समजावू शकत नाही.जर समजावणारे कोणी वयोवृद्ध असेल,तर मनुष्य समजतात, हे अनुभवी आहेत,जरूर सत्संग इत्यादी केला असेल.कोणी लहान मुलं समजवतील तर,त्यांना वाटेल हे काय जाणतात?तर त्यांच्यावर वृद्धाचा प्रभाव पडू शकतो.बाबा एकदाच येऊन हे ज्ञान समजवतात, तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवत आहेत.माता सन्मुख ज्ञान सांगतील तर खुश होतील.त्यांना सांगा ज्ञानसागर बाबांनी ज्ञानाचा कलश या मातांना दिला आहे.जो आम्ही इतरांना देत आहोत.खूप नम्रतेने बोलले पाहिजे.शिवबाबा ज्ञानाचे सागर आहेत,ते आम्हाला ज्ञान सांगत आहेत,ते म्हणतात माता द्वारे मुक्ती जीवनमुक्तीचे द्वार उघडत आहे.दुसरे कोणी उघडू शकत नाही.आम्ही आता परमात्मा द्वारे शिकत आहोत. आम्हाला कोणी मनुष्य शिकवत नाही.ज्ञानाचे सागर एकच परमपिता परमात्मा आहेत.तुम्ही सर्व भक्तीचे सागर आहात.भक्तीचे अधिकारी आहात,न की ज्ञानाचे अधिकारी.ज्ञानाचा अधिकारी तर मी एकच आहे.महिमा पण एकाची च करतात.तेच उच्च ते उच्च आहेत. आम्ही त्यांनाच मानतो,ते आम्हाला ब्रह्मा द्वारे शिकवत आहेत,त्यामुळे ब्रह्मकुमार कुमारी म्हटले जाते.असे खुप मधुर भाषेत समजुन सांगा.जरी किती शिकलेले असतील,अनेक प्रश्न विचारु देत,प्रथम तर बाबा वरतीच निश्चय करायचा आहे.अगोदर रचनाकार बाबा आहेत.सर्वांचे रचनाकार एक शिवबाबा आहेत,तेच ज्ञानाचे सागर आहेत,पिता शिक्षक सद्गुरु आहेत.प्रथम तर असा निश्चय बुद्धी करा की,रचनेच्या आदी मध्य अंतचे ज्ञान देत आहेत.तेच आम्हाला समजवत आहेत.ते जरूर खरेच सांगतील ना.मग कोणी प्रश्न उठवणार नाहीत.बाबा येतातच संगम युगावरती म्हणतात,फक्त माझीच आठवण करा.आमचे कामच आहे पतितांना पावन बनवण्याचे.आत्ता तमोप्रधान दुनिया आहे.पतित-पावन बाबा शिवाय कोणाला ही जीवनमुक्ती मिळू शकत नाही. सर्व गंगास्नान करण्यासाठी जातात,म्हणजे पतीतच आहेत ना.मी तर म्हणत नाही की गंगा स्नान करा.मी तर म्हणतो माझी एकाची आठवण करा.मी तुम्हा सर्व सजनींचा साजन आहे.सर्व एका साजनची आठवण करत आहेत. रचनेची स्थापना करणारे एकच बाबा आहेत,ते म्हणतात की आत्मा अभिमानी बणुन माझी आठवण करा तर या योग अग्नी द्वारे विकर्म विनाश होतील.आमचे काम आहेच पतीतांना पावन बनवण्याचे.हा योग बाबाच शिकवत आहेत.जेव्हा जुन्या दुनियेचे परिवर्तन होत आहे.विनाश समोर उभा आहे.आता आम्ही देवता बनत आहोत.बाबा खूप सहज स्पष्ट करून सांगतात.बाबा समोर बसून जरी ऐकत असले परंतु सर्व एकरस होऊन ऐकत नाहीत.बुद्धी इकडे तिकडे जात राहते.भक्तीमध्ये पण असे होत राहते.काही तर सारा दिवस वाया घालवतात.बाकी जो वेळ ठरवता,त्यामध्ये पण बुद्धी कोठे कोठे जात राहते.सर्वांची अशी स्थिती होत असेल.माया आहे ना.

काही मुलं बाबा समोर बसून ध्यानात जातात. हा पण वेळ वाया घालवतात. कमाई तर झालीच नाही. बाबा तर म्हणतात,आठवणीमध्ये राहा,ज्यामुळे विकर्म विनाश होतील, ध्यानामध्ये गेल्या मुळे बुद्धीत बाबा ची आठवण राहत नाही.या सर्व गोष्टींमध्ये फार गोंधळ होतो.तुम्हाला तर डोळे सुद्धा बंद करायचे नाहीत. आठवणीत बसायचे आहे ना.डोळे उघडलेले असावेत,डोळे बंद करून बसणे हा कायदा नाही.बाबा म्हणतात आठवणीमध्ये बसा.असे थोडेच म्हणतात डोळे बंद करा.डोळे बंद करून खांद्ये खाली करून बसले तर बाबा कसे पाहतील.डोळे कधी बंद करायचे नाहीत.डोळे झाकतात म्हणजे काहीतरी गडबड आहे,इतर कोणाची आठवण करत असतील. बाबा तर म्हणतात इतर कोणत्या मित्र संबंधी इत्यादी ची आठवण केली तर तुम्ही खऱ्या सजनी नाहीत. खऱ्या सजनी बनाल तरच उच्चपद प्राप्त कराल.कष्ट सर्व आठवणी मध्ये आहेत. देह अभिमाना मध्ये बाबांना विसरतात, परत धक्के खात राहतात. खूप गोड बनले पाहिजे,वातावरण पण शांत पाहिजे.कोणता आवाज नसावा,कोणी आले तर पाहतील यांचे बोलणे खूप गोड आहे,खूप शांती आहे.थोडाही भांडण-तंटा नसावा, नाहीतर जसे कि पिता शिक्षक गुरु तिघाची निंदा करतात.त्यांचे खूप कनिष्ठ पद होते.मुलांना आता समज मिळाली आहे.बाबा म्हणतात मी तुम्हाला शिकवत आहे,उच्चपद प्राप्त करण्यासाठी.तुम्ही शिकून मग इतरांना शिकवायचे आहे.तुम्ही स्वतः समजू शकतात की,आम्ही कोणाला समजवत नाही तर,कोणते पद मिळेल. प्रजा बनवणार नाही तर कोणते पद मिळेल.योग नाही, ज्ञान नाही तर मग जरूर,जे शिकलेले आहेत त्यांच्या घरी पाणी भरावे लागेल.स्वतःला पाहिले पाहिजे यावेळी नापास झालो तर कनिष्ठ पद मिळेल.तर कल्प कल्पांतर पद कनिष्ठ पण प्राप्त होईल.बाबांचे काम आहे समजावणे,नाही समजले तर स्वता:चे पद भ्रष्ट करतील.कसे कोणाला समजवले पाहिजे,हे पण बाबा सांगत आहेत. जेवढे थोडे आणि हळू बोलाल तेवढे चांगले आहे.खूप चांगली सेवा करतात तर बाबांच्या ह्रदयात बसतात. आठवणीची यात्रा पण जरुर पाहिजे, तरच सतोप्रधान बनतील.सजा खातील तरीपण पद कमी मिळेल. पाप भस्म होत नाही तर,सजा खावी लागेल आणि पद पण कनिष्ठ मिळेल.यालाच घाटा म्हटले जाते.हा पण व्यापार आहे ना,नुकसान करून का घ्यायचे? धारणा करून उच्च बनले पाहिजे.बाबा प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत राहतात. आता जे करतील त्यांनाच मिळेल. तुम्हाला परिस्तानी बनायचे आहे.गुण पण तसेच धारण करायचे आहेत, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कोणा बरोबर पण नम्रता आणि हळुवार बोलले पाहिजे.बोलणे पण मधुर असावे.शांती चे वातावरण पण असावे,कोणताही आवाज नसावा.तर सेवेमध्ये सफलता होईल.

(२) खरी-खुरी सजनी बणुन,एका साजनची आठवण करायची आहे. आठवणीमध्ये कधी डोळे बंद करून, खांदा खाली करून बसायचे नाही. आत्म अभिमानी होऊन राहयचे आहे.

वरदान:-
विशाल बुद्धी द्वारे संघटन ची शक्ती वाढवणारे सफल स्वरुप भव.

संघठन ची शक्ती वाढवणे हे ब्राह्मण जीवनातील पहिले श्रेष्ठ कार्य आहे. यामध्ये जेव्हा कोणती गोष्ट बहुसंख्येने स्वीकारतात तर जेथे बहुमत आहे तेथे मी,असे करणे संघटनेची शक्ती वाढवणे आहे. यामध्ये असे मोठेपण दाखवू नका की माझा विचार तर फार चांगला आहे. जरी कितीही चांगला असले तरी,जेव्हा संघठना मध्ये मतभेद आहे तर,तेथे चांगले पण साधारण होईल. त्यावेळी आपला विचार सोडावा लागला तरी त्या मधे भाग्यच आहे. यामुळे सफलता स्वरुप बनाल.परिवाराच्या संबंधांमध्ये याल.

बोधवाक्य:-
सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी मनाची एकाग्रता वाढवा.