30-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबांचे श्रीमत तुम्हाला सदैव सुखी बनवणारे आहे,म्हणून देहधारींचे मत सोडून एक बाबांच्या श्रीमता वर चाला"

प्रश्न:-
कोणत्या मुलांच्या बुद्धीचे भटकणे अजून बंद झालेले नाही?

उत्तर:-
ज्यांना उच्च ते उच्च बाबांच्या मता मधे किंवा ईश्वरीय मता मधे भरोसा नाही,त्यांचे भटकणे अजून बंद झाले नाही. बाबांवर पूर्ण निश्चय नसल्याने दोन्हीकडे पाय ठेवतात.भक्ती,गंगा स्नान इ. पण करतात आणि बाबांच्या मतावर ही चालतात. अशा मुलांचे काय हाल होईल? श्रीमतावर पूर्ण चालत नाहीत म्हणुन धक्के खातात.

गीत:-
या पापाच्या दुनिये पासुन दूर घेऊन चल जिथे सुख चैन असेल.....

ओम शांती।
मुलांनी हे भक्तांचे गीत ऐकले. आता तुम्ही असे म्हणत नाही.तुम्ही जाणता आम्हाला उच्च ते उच्च पिता भेटला आहे, तो एकच उच्च ते उच्च आहे. बाकी जे पण मनुष्य मात्र आहेत,सर्व नीच ते नीच आहेत.उच्च ते उच्च मनुष्य भारतात या देवी-देवता होत्या.त्यांची महिमा आहे सर्वगुणसंपन्न..... आता मनुष्याला हे माहीत नाही की या देवतांना एवढे उच्च कुणी बनवले.आता तर एकदमच पतित बनले आहेत.पिता आहे उच्च ते उच्च.साधू संत इ. सर्व त्याची साधना करतात. अशा साधूंच्या पाठीमागे मनुष्य अर्धा कल्प भटकला आहे.आता तुम्ही जाणता पिता आलेला आहे,आम्ही बाबांच्या जवळ जातो.ते आम्हाला श्रीमत देऊन श्रेष्ठ ते श्रेष्ठ, सदा सूखी बनवतात.रावणाच्या मताने तूम्ही किती तुच्छ बुद्धी बनले आहात. आता तुम्ही दुसर्या कुणाच्या मतावर चालू नका.मज पतितपावन बाबांना बोलवले आहे, तरीही बूडवणारे जे आहेत,त्यांच्या पाठीमागे का धावता. एकाची मत सोडून अनेकांच्या जवळ धक्के का खात राहता? काही मुले ज्ञानही ऐकतात तरीही जाऊन गंगा स्नान ही करतात, गुरूंच्या जवळ ही जातात..... बाबा म्हणतात ती गंगा काही पतित पावनी नाही. तरीही तुम्ही मनुष्य मतावर जाऊन स्नान इ. करता,तर बाबा काय म्हणतील - मी उच्च ते उच्च पिता आहे,माझ्या मतामधे भरोसा नाही. एका बाजूला आहे ईश्वरीय मत,दूसरीकडे आहे आसुरी मत.त्यांचे हाल काय होतील. दोन्हीकडे पाय ठेवला तर चिरून जातील.बाबा मधे पुर्ण निश्चय ठेवत नाहीत.असे म्हणताही, बाबा आम्ही तुमचे आहोत. तुमच्या श्रीमतावर आम्ही श्रेष्ठ बणू.आम्हाला उच्च ते उच्च बाबांच्या मतावर आपले पाऊल ठेवायचे आहे.शांती धाम, सुख धाम चे मालक तर बाबाच बनवणार आहेत. बाबा म्हणतात - ज्याच्या शरीरात मी प्रवेश केला आहे,त्यांनी तर १२ गुरू केले, तरीही तमोप्रधानच बनला आहे,फायदा काहीच झाला नाही. आता बाबा भेटले तर सर्वांना सोडून दिले.उच्च ते उच्च पिता भेटले, बाबांनी सांगितले- वाईट ऐकु नक, वाईट पाहू नका..... परंतु मनुष्य बिल्कुल पतित तमोप्रधान बुद्धी आहेत.येथेही खूप आहेत,जे श्रीमतावर चालू शकत नाहीत,ताकत नाही. माया धक्के खायला लावते कारण रावण आहे दुश्मन, राम आहे मित्र. कुणी राम म्हणतात तर कुणी शिव म्हणतात. खरे नाव आहे शिवबाबा. मी पुनर्जन्म घेत नाही.माझे नाटकामधे नाव शिव ठेवले आहे. एका वस्तूची 10 नावे ठेवल्यामुळे मनुष्य गोंधळले आहेत,ज्याला जे वाटले ते नाव ठेवले. खरे माझे नाव शिव आहे. मी या शरीरात प्रवेश करतो. मी काही कृष्ण इ. मधे येत नाही. ते समजतात विष्णु तर सुक्ष्मवतन मधे राहणारा आहे. खरेतर ते आहे युगल (जोडी) रूप,प्रवृत्ति मार्गाचे. बाकी 4 हात कुणाला नसतात. चार भुजा म्हणजे प्रवृत्ती मार्ग, दोन भुजा आहेत निवृत्ती मार्गाच्या. बाबांनी प्रवृत्ती मार्गाचा धर्म स्थापन केला आहे. सन्यासी निवृत्ती मार्गाचे आहेत. प्रवृत्ती मार्ग वालेच नंतर पतिता पासून पावन बनतात, म्हणून सृष्टीला थोपविण्यात,पवित्र बनण्याची सन्याशाची भुमिका आहे.ते ही लाखो करोडो आहेत. मेळा भरल्यावर खूप येतात, ते स्वयंपाक बनवत नाहीत, गृहस्थी लोकांच्या पालनेवर चालतात.कर्म सन्यास केला मग जेवण कुठे खाणार?तर गृहस्थी कडे खातात.गृहस्थी लोक समजतात - हे पण आमच्याकडून दान झाले. हा पण पुजारी पतित होता, नंतर आता श्रीमतावर चालून पावन बनत आहे.बाबांकडून वारसा घेण्याचा पुरुषार्थ करत आहे, म्हणून म्हणतात पित्याचे अनुकरण करा.माया प्रत्येक गोष्टीत पछाड़ते. देह अभिमाना मुळे मनुष्य चुका करतात.जरी गरीब असो किंवा साहूकार परंतु देह - अभिमान सुटायला हवा. देह - अभिमान सुटण्यासाठी खूप मेहनत आहे.बाबा म्हणतात तुम्ही स्वतःला आत्मा समजुन,शरीरा द्वारे अभिनय करा. तुम्ही देह - अभिमान मधे का येता? नाटकानुसार देह - अभिमान मधे यायचेच आहे.या वेळी तर पक्के देह अभिमानी बनले आहात.बाबा म्हणतात तुम्ही तर आत्मा आहात. आत्माच सर्व काही करते.आत्मा शरीरापासून वेगळी झाली तर शरीराला कापले तरी आवाज काही निघेल? नाही.आत्माच म्हणते- माझ्या शरीराला दुःख देऊ नका.आत्मा अविनाशी आहे,शरीर विनाशी आहे. स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा.देह - अभिमान सोडा.

तुम्ही मुले जेवढे देही -अभिमानी बनाल तेवढे तंदुरुस्त आणि निरोगी बनाल. या योगबळाने तूम्ही 21 जन्म निरोगी बनाल. जेवढे बनाल तेवढे पदही उच्च मिळेल.सजा मिळण्या पासून वाचाल,नाहीतर सजा खूप खावी लागेल. तर किती देही - अभिमानी बनायला हवे. काहींच्या भाग्यात हे ज्ञान नाही.जोपर्यंत तुमच्या कूळामधे येत नाहीत अर्थात ब्रह्मा मुख वंशावली बनत नाही तर ब्राह्मण बनल्या शिवाय देवता कसे बनणार.खुशाल येतात खूप, बाबा - बाबा लिहतात अथवा म्हणताही परंतु फक्त म्हणायचे म्हणून.एक दोन पत्र लिहून गायब होतात. ते ही सतयुगात येतात परंतु प्रजेत.प्रजा तर खूपच बनते.पुढे चालून खूप दुःख होईल,तर खूप येतील.आवाज होईल भगवान आला आहे. तुमचेही खूप सेंटर उघडतील.तुम्ही मुलं देही - अभिमानी बनण्यास कमी पडत आहात. अजून खूप देह - अभिमान आहे.शेवटी थोडाही देह - अभिमान असेल तर पद कमी होईल.मग येऊन दास - दासी बनतील.दास - दासीही नंबर वार खूप असतात. राजांना दासी हुंड्यामधे मिळतात,साहूकार लोकांना भेटत नाहीत. मुलांनी पाहिले आहे, राधा,अनेक दासी हुंड्यामधे घेऊन जाते. पुढे जाऊन तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. हल्की दासी बनण्यापेक्षा साहूकार प्रजा बनणे चांगले आहे. दासी अक्षर खराब आहे.प्रजेत साहूकार बनणे तरीही चांगले आहे.बाबांचे बनल्याने माया अजूनच लाड करते. पहीलवानाशी पहलवान बणून लढते. देह - अभिमान येतो. शिव बाबांशी तोंड फिरवतात. बाबांची आठवण करणे सोडून देतात.अरे, खायला वेळ आहे आणि असे बाबा जे विश्वाचे मालक बनवतात त्यांचीच आठवण करायला वेळ नाही. चांगली - चांगली मुले शिव बाबांना विसरून देह - अभिमानात येतात. नाहीतर असे बाबा जे जीवन दान देतात,त्यांची आठवण करून पत्र तर लिहावे.पण इथे विचारूच नका. माया एकदम नाकाला पकडून उडवून लावते. पाऊलो पाऊली श्रीमतावर चालले तर पाऊला मधे पद्मा ची(खुप) कमाई आहे. तुम्ही खूप धनवान बनता तिथे मोजमाप नसते.धन - दौलत, शेती इ. सर्व मिळते.तिथे तांबे, लोखंड, पितळ इ. असत नाही.सोन्याचे शिक्के असतात.महल सोन्याचे बनवतात,तर तिथे काय नसेल. येथे तर आहे भ्रष्टाचाराचे राज्य,जसे राजा - राणी तशी प्रजा. सतयुगामधे जसे राजा-राणी तशी प्रजा सर्व श्रेष्ठाचारी असतात. परंतु मनुष्याच्या बुद्धि मधे थोडेच बसते. तमोप्रधान आहेत.बाबा समजावतात - तुम्हीही असेच होते. हा ही असाच होता.आता मी येऊन देवता बनवतो तरीही बनत नाहीत.एक दुसऱ्याशी भांडत राहतात. मी खूप चांगला आहे,असा आहे..... असे कुणीच समजत नाही की आम्ही नरकात पडलो आहोत.हे ही तुम्ही मुलं जाणता क्रमवार पुरुषार्थ नुसार.मनुष्य बिल्कुल नरकामधे पडले आहेत, दिवस -रात्र चिंता करतात. ज्ञानमार्गा मधे जे आपल्या समान बनविणयाची सेवा करत नाहीत, तुझे - माझे करतात, ते रोगी आजारी आहेत. बाबांच्या शिवाय दुसर्या कुणाची आठवण केली तर व्यभिचारी झाले ना.बाबा म्हणतात दुसर्या कुणाचे ऐकू नका,माझे ऐका. माझी आठवण करा. देवतांची आठवण आली तरीही चांगले आहे, मनुष्याची आठवण करून काही फायदा नाही. इथे तर बाबा म्हणतात तुम्ही माथा का झुकवता. तुम्ही या बाबांकडे जेंव्हा येता तेंव्हा शिव बाबांची आठवण करून या. शिव बाबांची आठवण करत नाही याचा अर्थ पाप करता.बाबा म्हणतात - पहिल्यांदा पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करा. शिव बाबांची आठवण करा. खूप पथ्य आहेत. खूप कमी जणांना समजते. एवढी बुद्धी नाही. बाबांशी कसे वागावे, यामधे खूप मेहनत घेतली पाहिजे. माळेचा दाना बनणे काही मावशीचे घर नाही.मुख्य आहे बाबांची आठवण करणे.तुम्ही बाबांची आठवण करू शकत नाही.बाबांची सेवा, बाबांची आठवण किती केली पाहिजे.बाबा रोज सांगतात रोजनिशी (दिनचर्या) लिहा. ज्या मुलांना आपले कल्याण करण्याचा विचार येतो - ते सर्वप्रकारे पूर्ण पथ्य पाळतील. त्यांचे खान - पान खूप सात्विक असेल.

बाबा मुलांच्या कल्याणासाठी किती समजावतात. सर्वप्रकारची पथ्य पाळायला पाहिजेत. तपासून पहा - आमचे खान - पान असे तर नाही? लोभी तर नाही? जोपर्यंत कर्मातीत अवस्था नाही झाली तोपर्यंत माया उल्टे - सूलटे काम करायला लावेल. त्याला वेळ आहे, नंतर माहीत होईल - आता तर विनाश समोर आहे.आग पसरली आहे. तुम्ही पहाल कसे बॉम्ब फेकले जातात.भारतात तर रक्ताच्या नद्या वाहणार आहेत.तिथे बॉम्ब द्वारे एक दुसर्याला नष्ट करतील. नैसर्गिक आपत्ती येईल. संकट सर्वात जास्त भारता समोर आहेत. स्वतः वर खूप लक्ष्य ठेवायला हवे., आम्ही काय सेवा करतो? कितीजणांना आप समान नरापासून नारायण बनवतो? काहीतर भक्ती मधे एवढे फसले आहेत, समजतात या मुली आम्हाला काय शिकवणार?समजत नाहीत की यांना शिकवणारा पिता (भगवान) आहे. थोडे शिकलेले असतील किंवा पैसा असेल तर भांडण करतात.इज्जत घालवतात.सतगुरुची निंदा करणारा उच्च पद प्राप्त करू शकत नाही. नंतर पाई - पैशाचे पद जाऊन मिळवतील. अच्छा.

गोड - गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादा ची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. तुझे - माझे ही काळजी करणे सोडून आपल्या सारखे बनवण्याची सेवा करायची आहे.एक बाबांकडून ऐकायचे आहे,बाबांची च आठवण करायची आहे,व्यभिचारी बनायचे नाही.

2. आपल्या कल्याणासाठी खान - पान चे खूप पथ्य ठेवायची आहेत. कोणत्याही वस्तूमध्ये लोभ ठेवायचा नाही. माया कोणतेही उल्टे काम करवून घेईल म्हणून ध्यान ठेवायचे आहे.

वरदान:-
प्रत्यक्ष जीवनाद्वारे परमात्म ज्ञानाचा पुरावा देणारे धर्म युध्दामधे विजयी भव.

आता धर्मयुद्धा च्या रंगमंचावर यायचे आहे. त्या धर्म युद्धात विजयी बनण्याचे साधन आहे तुमचे प्रत्यक्ष जीवन,कारण की परमात्म ज्ञानाचा प्रत्यक्ष पुरावा तुमचे जीवन आहे. तुमच्या वागण्यातून ज्ञान आणि गूण प्रत्यक्ष दिसायला हवेत कारण आजकाल चर्चा करून आपले मत सिद्ध करू शकत नाही पण प्रत्यक्षात धारणा मूर्त बनून एका सेकंदात कोणालाही शांत करू शकता.

बोधवाक्य:-
आत्म्याला उज्ज्वल बनविण्यासाठी परमात्म्याच्या स्मृतीने मनातील गोंधळ समाप्त करा.