20-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुमचे नवीन झाड फार गोड आहे,या गोड झाडालाच किडे लागतात,किडे नष्ट करण्याचे
औषध मनमनाभव आहे"
प्रश्न:-
सन्माना ने
उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षणे कोणती आहेत?
उत्तर:-
ते फक्त एका विषयावर पूर्ण ध्यान देतील.स्थूल म्हणजे प्रत्यक्ष सेवेचा विषय पण
चांगला आहे, त्यामुळे अनेकांना सुख मिळते,याचे पण गुण मिळतात परंतु त्याचबरोबर
ज्ञान पण पाहिजे,चलन पण चांगली पाहिजे.दैवी गुणावर पूर्ण लक्ष पाहिजे.ज्ञानयोग
पूर्ण असेल तर सन्मानाने उत्तीर्ण व्हाल.
गीत:-
ते आमच्या
पासून वेगळे होणार नाहीत..
ओम शांती।
मुलांनी गीत ऐकले? मुलांचे कोणावर प्रेम जडले आहे? मार्गदर्शक सोबत.मार्गदर्शक काय
काय दाखवत आहेत?स्वर्गामध्ये जाण्याच गेट दाखवत आहेत. मुलांनी नाव पण दिले आहे
स्वर्गाकडे जाण्याचे गेट.स्वर्गाचे गेट कधी उघडते,आता तर नर्क आहे ना. स्वर्गाचे
गेट कधी उघडते आणि कोण उघडते,हे तुम्ही मुलंच जाणतात. तुम्हाला सदैव खुशी
राहते.स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता तुम्हाला माहित आहे. मेळा,प्रदर्शनाद्वारी तुम्ही
हे समजवता कि,मनुष्य स्वर्गाच्या गेटमध्ये कसे जावू शकतात?अनेक चित्र तुम्ही बनवले
आहेत.बाबा विचारतात या सर्व चित्रांमध्ये कोणते चित्र चांगले आहे?ज्याद्वारे तुम्ही
कोणाला पण समजावू शकता की,हे स्वर्गाकडे जाण्याचे गेट आहे.सृष्टिचक्रा च्या
चित्राद्वारे स्वर्गात जाण्याचे गेट सिद्ध होते.ते बरोबर आहे,त्या बाजूला वरती
नरकाचे गेट आहे,या बाजूला स्वर्गाचे गेट आहे,बिलकुल स्पष्ट आहे. तेथुन सर्व आत्मे
शांतीधाम मध्ये जातात नंतर स्वर्गामध्ये येतात.हे गेट आहे,साऱ्या चक्राला गेट म्हणत
नाहीत.संगम युग वरती दाखवले आहे,ते आहे गेट.जेथुन आत्मे निघून जातात नंतर नवीन
दुनिया मध्ये येतात.बाकीचे सर्व शांतीधाम मध्ये राहतात.काटा दाखवला आहे.हा नर्क
आहे,तो स्वर्ग आहे.सर्वात चांगले समजवण्या साठी हे चित्र आहे. एकदम स्पष्ट आहे,हे
स्वर्गाचे द्वार आहे.हे बुद्धी द्वारे समजण्याची गोष्ट आहे.अनेक धर्माचा विनाश एका
धर्माची स्थापना होत आहे.तुम्ही जाणता की,आम्ही सुखधामला जात आहोत बाकी सर्व
शांतीधाम ला जातील.गेट तर चांगले स्पष्ट आहे.हे सृष्टीचक्राचे चित्र मुख्य
आहे,यामध्ये नरकाचे द्वार,स्वर्गाचे द्वार,फारच स्पष्ट आहे.स्वर्गाच्या द्वारी,जे
कल्पापुर्वी गेले होते,तेच जातील बाकी सर्व शांतीधाम मध्ये जातील.नरकाचे द्वार बंद
होत आहे.शांती आणि सुखाचे द्वार उघडत आहे.सर्वात उत्तम चित्र हे आहे.बाबा नेहमी
म्हणतात,त्रिमूर्ती आणि हे चक्र उत्तम चित्र आहेत.जे पण कोणी येतील,त्यांना अगोदर
या चित्रावरती सांगा,स्वर्गामध्ये जाण्याचे हे फाटक आहे.हा नर्क,हा स्वर्ग आहे.
विनाश होत आहे,मुक्तीचे गेट उघडत आहे.यावेळी आम्ही स्वर्गामध्ये जाऊ बाकीचे सर्व
शांतीधाम मध्ये जातील. खूप सोपे आहे,स्वर्गाच्या गेटमध्ये तर सर्व जाणार नाहीत.तेथे
तर देवी-देवतांचे राज्य होते,तुमच्या बुद्धीमध्ये आहे,स्वर्गाच्या गेट मध्ये
जाण्यासाठी आम्ही आत्ता लायक बनतात.जेवढा अभ्यास कराल,जेवढे शिकाल तेवढे नवाब
बनाल.रडाल तर खराब बनाल.सर्वात चांगले चित्र या सृष्टीच्या चक्राचे म्हणजे गोळ्याचे
आहे.बुद्धी द्वारे समजू शकता,एक वेळेस चित्र पाहिले,परत बुद्धीने काम घ्यायचे
असते.तर मुलांना सर्व दिवस हेच विचार चालायला पाहिजेत,की कोणते चित्र मुख्य
आहे,ज्यावरती आम्ही चांगल्या प्रकारे समजावू शकतो? स्वर्गाकडे जाण्याचे गेट हे
इंग्रजी अक्षर चांगले आहे.आता तर अनेक भाषा झाल्या आहेत.हिंदी अक्षर हिंदुस्तान
पासून निघाले आहे. हिंदुस्तान अक्षर काही बरोबर नाही, याचे मूळ नाव तर भारतच
आहे,भारत खंड म्हणतात.आत्ता तर गल्ली इत्यादीचे नावं पण बदलतात. खंडाचे नाव थोडेच
बदलले जाते. महाभारत अक्षर आहे ना.सर्वत्र भारतच म्हटले जाते.महिमा पण करतात,भारत
माझा देश आहे. हिंदूधर्म म्हटल्याने भाषेला पण हिंदी म्हणले आहे.हे बरोबर
नाही.सतयुगा मध्ये तर सर्व खरे खुरेच असते.खरे खरे परिधान करणे,खरे खाणे,खरे
बोलणे,येथे तर सर्व खोटे झाले आहे. स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता,हे अक्षर चांगले
आहे.चला मी तुम्हाला स्वर्गाच्या द्वारी जाण्याचे द्वार दाखवतो.अनेक भाषा झाल्या
आहेत. बाबा तुम्हा मुलां साठी श्रेष्ठ मत देत आहेत.बाबाच्या मतासाठी म्हटले
जाते,तुमची गत मत वेगळी आहे. मुलांना किती सोपी मत देत आहेत. भगवंताच्या मता वरती
तुम्हाला चालायला पाहिजे.डॉक्टरच्या मतानुसार डॉक्टर,भगवंताच्या मतानुसार भगवान
भगवती बनायचे आहे,भगवानुवाच आहे.त्यामुळे बाबांनी म्हटले होते,प्रथम हे सिद्ध करा
भगवान कोणाला म्हटले जाते? स्वर्गाचे मालक जरूर भगवान भगवतीच बनतील.ब्रह्म तत्वा
मध्ये तर काहीच नाही.स्वर्ग पण येथेच आहे आणि नर्क पण येथेच आहे. स्वर्ग आणि नर्क
दोन्ही बिलकुल वेगळे आहेत.मनुष्याची बुद्धी फारच तमोप्रधान झाली आहे.काहीच समजत
नाहीत.सतयुग लाखो वर्ष चालते,असे म्हणतात.कलयुगा साठी म्हणतात,अजून ४०००० वर्ष
चालेल.फारच घोर अंधकारा मध्ये आहेत.
आता तुम्ही मुलं जाणता की,बाबा आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाण्या साठी असे गुणवान
बनवत आहेत. मुख्य काळजी हीच करायचे आहे की,आम्ही सतोप्रधान कसे बनू. बाबांनी
सांगितले आहे,माझी एकाची आठवण करा,चालता-फिरता काम करताना बुद्धीमध्ये हे आठवणीत
ठेवा.साजन-सजनी पण कर्म तर करतात ना,भक्तीमध्ये पण कर्म तर करतातच ना,तरी
बुद्धीमध्ये त्यांची आठवण राहते.आठवण करण्यासाठी माळ जपतात.बाबा पण वारंवार
समजवतात,मज पित्याची आठवण करा.सर्वव्यापी म्हटल्यावर,मग आठवण कोणाची करायची?बाबा
समजवतात,तुम्ही खूप नास्तीक बनले आहात.मज पित्याला पण ओळखत नाहीत.असे म्हणतात,ओ
गॉडफादर,म्हणजे हे ईश्वरीय पिता, परंतु ते कोण आहेत?याची जरा पण माहिती नाही.आत्मा
म्हणते हे ईश्वरीय पिता,परंतु परम आत्म कसे आहेत?त्यांना म्हणतात परमात्मा अर्थात
सर्वोच्च,उच्च ते उच्च सर्वोच्च आत्मा,परमात्मा.एक पण मनुष्य नाही,ज्याला आपल्या
आत्म्याचे ज्ञान आहे.मी आत्मा आहे,हे शरीर आहे, या दोन वस्तू आहेत ना.हे शरीर पाच
तत्वाचे बनलेले आहे.आत्मा तर अविनाशी बिंदू आहे.ती कोणत्या वस्तू पासून बनते,एवढी
छोटी बिंदु आहे.साधुसंत इत्यादी कोणाला पण माहिती नाही.यांनी(ब्रह्मानी ) तर फार
गुरु केले होते परंतु कोणीही सांगितले नाही की आत्मा कशी आहे? परमपिता परमात्मा कोण
आहेत? असे नाही की,फक्त परत्माला ओळखत नाहीत,आत्म्याला पण ओळखत नाहीत.आत्म्याला
ओळखलं तर परमात्म्याला पण ओळखतील.मुलगा स्वता:ला ओळखेल आणि पित्याला न ओळखेल असे
होत नाही.एवढे समजतात की,आत्मा सूक्ष्म आहे,या डोळ्यांनी पाहू शकत नाही,मग काचेमध्ये
बंद करून कसे पाहू शकतील?दुनिया मध्ये तुमच्यासारखे ज्ञान कोणालाच नाही.तुम्ही जाणता,
की आत्मा बिंदू रूप आहे,तर परमात्मा पण बिंदू आहे.बाकी आम्ही आत्मा पतिता पासून
पावन,पावन पासून पतित बनतो.येथे तर पतीत आत्मा राहत नाही.परमधाम वरुन सर्व पावन
येतात,नंतर पतित बनतात,मग बाबा येऊन पावन बनवतात.ही फारच सोपी आणि सहज गोष्ट
आहे.तुम्ही जाणता ८४ जन्माचे चक्रा मधुन येत,आत्मा तमोप्रधान बनली आहे.आम्ही 84
जन्म घेतो,एकाची गोष्ट नाही.बाबा म्हणतात,मी यांना(ब्रह्माला) समजवतो,तुम्हीपण
ऐकता.मी यांच्या मध्ये प्रवेश केला आहे.तर बाबांनी समजावले आहे,नाव ठेवले पाहिजे
गेट वे टू हेवन.यामध्ये पण समजवले पाहिजे,जो देवी देवता धर्म होता,तो आता प्रायलोप
झाला आहे. कोणालाही माहिती नाही.ख्रिश्चन तर अगोदर सतोप्रधान होते,परत पुनर्जन्म
घेत,घेत तमोप्रधान झाले आहेत.झाड पण जुने जरूर होते. अनेक धर्माचे झाड आहे.झाडाच्या
हिशोबाने तर सर्वधर्म येतात पण शेवटी येतात.हे नाटक पूर्वनियोजित आहे.असे थोडेच आहे
की,कोणी मध्येच सतयुगात येतील नाही.हा तर अनादी खेळ बनलेला आहे.सतयुगा,मध्ये एकच आदी
सनातन देवी देवता धर्म होता.आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की, आम्ही
स्वर्गामध्ये जात आहोत. आत्म्याला वाटते की,आम्ही तर तमोप्रधान आहोत तर घरी कसे जाऊ
शकतो? स्वर्गात कसे जावे?त्यासाठी सतो प्रधान बनण्याची युक्ती होती पण बाबांनी
सांगितली आहे.बाबा म्हणतात मलाच पतित-पावन म्हणतात.स्वतःला आत्मा समजून मज पित्या
ची आठवण करा, भगवानुवाच लिहलेले आहे.हे पण सर्व म्हणतात,ख्रिस्ताच्या एवढ्या
वर्षापूर्वी भारत स्वर्ग होता,परंतु कसे बनला,नंतर कोठे गेला?हे कोणी समजत
नाहीत.तुम्ही तर चांगल्या प्रकारे समजावता,पूर्वी या सर्व गोष्टी थोडेच समजत
होते.जगामध्ये कोणालाच माहित नाही की,आत्माच चांगले व वाईट बनते.सर्व आत्मे मुलं
आहेत,बाबा ची आठवण करत आहेत.बाबा सर्वांचे साजन आहेत,आणि त्यांच्या सर्व सजनी
आहेत.आता तुम्ही मुलं जाणता,ते साजन आले आहेत.फार गोड साजन म्हणजे प्रियकर
आहेत,नाहीतर सर्व त्यांची आठवण का करतात.कोणी असा मनुष्य नसेल,ज्याच्या मुखाद्वारे
ईश्वराचे नाव येत नसेल.आम्ही जे पुज्य होतो,तेच परत स्वतःचीच पूजा करू लागलो.असे
होऊ शकते की, पूर्वीच्या जन्मात ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला असेल. श्रीनाथला
नैवेद्य दाखवतात,खातात तर पुजारीच.हा सर्व भक्तिमार्ग आहे.
तुम्हा मुलांनी स्पष्ट करायचे आहे की, स्वर्गाचे गेट उघडणारे बाबा आहेत, परंतु
उघडणार कसे,समजवणार कसे?भगवानुवाचा आहे ना,तर जरूर शरीरा द्वारेच सांगतील ना.आत्मा
पण शरीराद्वारे बोलते,ऐकते.बाबा हे सहज स्पष्ट करत आहेत.बीज आणि झाड आहे.तुम्ही मुलं
जाणता नवीन झाड आहे,हळूहळू मग तुमच्या नवीन झाडाला किडे पण फार लागतात, कारण हे
नवीन झाड,फार गोड, कोमल आहे.गोड झाडालाच किडे इत्यादी काही ना काही लागतात,मग औषधाची
फवारणी करावी लागते. बाबांनी पण मनमनाभव चे औषध चांगले दिले आहे.मनमनाभव न
झाल्यानेच किडे खातात.किडे लागलेली वस्तू काय कामाची आहे? ती तर फेकून द्यावी
लागते.कोठे उच्चपद आणि कोठे कनिष्ठ पद, फरक तर आहे ना.गोड मुलांना बाबा समजवत आहेत
की,खूप गोड बना. कोणाबरोबर पण खारट पाण्यासारखे वागू नका.खिरखंड होऊन राहा,
स्वर्गामध्ये तर वाघ शेळी पण खिरखंड होऊन राहतात.तसेच मुलांना पण खिरखंड सारखे
बनायचे आहे परंतु कोणाच्या नशिबात नसेल तर पुरुषार्थ पण काय करतील?नापास
होतात.शिक्षक तर भाग्यवान बनवण्या साठी शिकवतात.शिक्षक तर सर्वांनाच शिकवतात,फरक पण
तुम्ही पहात आहात.वर्गातील विद्यार्थी पण ओळखू शकतात की कोण, कोणत्या विषयांमध्ये
हुशार आहेत.येथे पण तसेच आहे,स्थुल म्हणजे प्रत्यक्ष सेवेचा पण विषय आहे ना.जसे भोली
भंडारी आहे,अनेकांना सुख देते. अनेक जण त्यांची आठवण करतात. हे तर ठीक आहे,या
विषयातून पण गुण मिळतात,परंतु सन्मानाने पास होण्यासाठी फक्त एका विषयात नाही
तर,सर्व विषयावरती पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे.ज्ञान पण पाहिजे आणि चलन पण चांगली
पाहिजे,सोबत दैवी गुण पण पाहिजेत.स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे.भोली भंडारी कोणी आले
तर म्हणते,मनमनाभव.शिवबाबांची आठवण करा तर पाप भस्म होतील आणि तुम्ही स्वर्गाचे
मालक बनाल. बाबा ची आठवण करत इतरांना पण परिचय देत राहा,ज्ञानयोग पाहिजे, खूप सोपे
आहे.मुख्य गोष्ट, आंधळ्याची काठी बनायचे आहे. प्रदर्शनीमध्ये पण कोणाला घेऊन या,चला
मी तुम्हाला स्वर्गाचे गेट दाखवतो.हा नरक आहे,हा स्वर्ग आहे.बाबा म्हणतात,माझी आठवण
करा,पवित्र बना,तर तुम्ही पवित्र दुनिये चे मालक बनाल.मनामनाभव. हुबेहुब तुम्हाला
गीता सांगत आहे,त्यासाठी बाबांनी चित्र पण बनवले आहेत.गीतेचे भगवान कोण?स्वर्गाचे
दार कोण उघडतात.शिवबाबाच उघडतात आणि नाव दिले आहे कृष्णाचे.मुख्य चित्र तर दोन
आहेत,बाकी इतर अनेक चित्र आहेत.मुलांना खूप गोड बनवायचे आहे.प्रेमाने बोलायचे आहे.
सर्वांना मन्सा वाचा कर्मणा सुख द्यायचे आहे.पहा भोली सर्वांना खुश करते,तर
त्यांच्यासाठी भेटवस्तू घेऊन येतात,तर त्या म्हणतात,मी तुमच्या कडून का घेऊ? मग
तुमचीच आठवण येईल?शिवबाबाच्या भंडाऱ्या मधुन मिळाले,तर मला शिव बाबांची आठवण
राहील.अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादा ची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आपले उच्च
भाग्य बनवण्यासाठी आपसात खूप खीरखंड,गोड बणुन राहायचे आहे.कधी खारट पाण्या सारखे
वागायचे नाही.सर्व विषयावरती पूर्ण लक्ष द्यायचे आहे.
(२)सदगती साठी बाबांची
श्रेष्ठ मत मिळत आहे,त्यावरती चालायचे आहे आणि सर्वांना श्रेष्ठ मतच सांगायची
आहे.स्वर्गा कडे जाण्याचा रस्ता दाखवायचा आहे.
वरदान:-
शुद्ध
संकल्पाच्या शक्तीला जमा करून,मन्सा सेवेसाठी सहज अनुभवी बना.
अंतर्मुखी बणुन शुद्ध
संकल्पाची शक्ती जमा करा,ही शुद्ध संकल्पशक्ती सहजच आपल्या व्यर्थ संकल्पाला नष्ट
करते आणि दुसऱ्याला पण शुभकामना शुभकामना च्या स्वरूपा द्वारे परिवर्तन करते.शुभ
संकल्पाचा साठा जमा करण्यासाठी मुरलीच्या प्रत्येक मुद्द्याला ऐकण्या बरोबरच शक्ती
रूपामध्ये प्रत्येक क्षणी कार्यामध्ये लावा.जेवढा शुद्ध संकल्पाच्या शक्तीचा साठा
जमा कराल,तेवढी मन्सा सेवा करण्याचे सहज अनुभवी बनाल.
बोधवाक्य:-
मनातून
नेहमीसाठी ईर्ष्या द्वैषा ला निरोप द्याल तर विजय बनाल.