27-04-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो - आपल्या प्रगतीसाठी रोज रोजनिशी लिहा,सर्व दिवस भर वागणे कसे
राहिले,तपासून पहा -यज्ञा प्रती इमानदार राहिले?"
प्रश्न:-
कोणत्या
मुलांच्या विषयी बाबांना खूप आदर आहे? त्याची लक्षणे काय आहेत?
उत्तर:-
जी मुले बाबा बरोबर खरे,यज्ञा प्रती इमानदार आहेत,काहीही लपवत नाहीत, त्या मुला
विषयी बाबांना खूप आदर आहे.आदर असल्यामूळे प्रेमाने उठवतात.सेवा करण्यासाठी पाठवतात.
मुलांना खरे बोलून श्रीमत घेण्याची अक्कल असायला हवी.
गीत:-
महफिल मे जल
उठी शमा......
ओम शांती।
आता हे गीत तर चुकीचे आहे कारण तुम्ही शमा तर नाही.आत्म्याला वास्तवात शमा नाही
म्हटले जात.भक्तांनी अनेक नावे ठेवली आहेत. न जाणल्या मुळे म्हणतात- नेती - नेती,
आम्ही नाही जाणत, नास्तिक आहोत. तरीही जे नाव आले ते बोलत राहतात. ब्रह्मा, शमा,
दगड, धोंड्याला ही परमात्मा म्हणतात कारण भक्तिमार्गात कुणीही बाबांना अर्थ सहित
जाणत नाहीत,ओळखू शकत नाहीत. बाबांनाच येऊन आपला परिचय द्यावा लागतो.ग्रंथ इ. कुठेही
बाबांचा परिचय नाही म्हणून त्यांना नास्तिक म्हटले जाते. आता मुलांना बाबांनी परिचय
दिला आहे,परंतु स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे, यामधे खूपच बुद्धी चे काम
आहे.यावेळी सर्व दगड बुद्धी आहेत. आत्म्या मधे बुद्धी आहे. कर्म इंद्रिय द्वारे
समजते की - आत्म्याची बुद्धी पारस आहे का दगड आहे? सर्व काही आत्म्या वर अवलंबून आहे.
मनुष्य तर म्हणतात आत्मा च परमात्मा आहे. तो तर निर्लेप आहे म्हणून जे हवे ते
करा.मनुष्य असून बाबांना च ओळखत नाहीत. बाबा म्हणतात माया रावणाने सर्वांची दगडाची
बुद्धी बनवली आहे. दिवसें दिवस तमोगुणी जास्ती होत जातात. मायेचा खूप जोर आहे,सुधरत
नाहीत. मुलांना समजावले जाते रात्री,दिवसभराची दिनचर्या लिहा- काय काय केले? आम्ही
जेवण देवतांच्या सारखे खाल्ले?वागणे नियमानुसार होते, का अडाण्या सारखे होते?दररोज
आपला दिनचर्या नाही लिहली तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. खूप जणांना माया चापट
मारते.लिहतात की आज आमचा बुद्धी योग अमक्या च्या नावा रुपात गेला,आज हे पाप कर्म
झाले. असे खरे लिहणारा कोटी मधुन एखादाच असतो.बाबा म्हणतात मी जो आहे जसा आहे, मला
कुणी जाणत नाही. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केली तर काही बुद्धी मधे बसेल.
बाबा म्हणतात जरी चांगली चांगली मुले आहेत, खूप चांगले ज्ञान सांगतात,पण योग काहीच
नाही.ओळख पूर्ण नाही, समझ काहीच नाही म्हणून कुणाला समजाऊन सांगू शकत नाहीत. सार्या
दुनियेचे मनुष्य मात्र रचता आणि रचनेला बिल्कूल जाणत नाहीत,याचा अर्थ काहीच जाणत
नाहीत.हे पण नाटकामधे नोंद आहे. नंतरही होणार आहे.पाच हजार वर्षानंतर ही वेळ येईल
आणि मला येऊन समजावून सांगावे लागेल. राजाई घेणे कमी गोष्ट नाही! खूप कठीण आहे. माया
चांगलाच आघात करते, मोठे युद्ध चालते. बॉक्सिंग होते ना.खूप हुशार जे असतात
त्यांचीच बॉक्सिंग असते. तरीही एकदोघां ना बेशुद्ध पाडतात ना. असे म्हणतात बाबा
मायेचे वादळ खूप येतात. तरीही खूप थोडेचे खरे लिहतात. खूप आहेत जे लपवतात. समजत नाही
मी बाबांना कसे खरे सांगू?काय श्रीमत घेऊ? वर्णन करू शकत नाहित. बाबा जाणतात माया
खूप बलशाली आहे.खरे सांगायला खूप लाज वाटते. त्यांच्या हातून कर्म असे होतात जे
सांगायला लाज वाटते. बाबा तर खूप आदर देऊन उठवतात. हा खूप चांगला आहे,याला सर्व
प्रकारच्या सेवे साठी पाठवून देईन. बस देह अभिमान आला,मायेची चापट खाल्ली,पडला खाली.
बाबा तर उठवण्यासाठी स्तुती पण करतात. प्रेमानी उठवतात. तू तर खूप चांगला आहेस
स्थूल सेवेत पण चांगला आहेस.सन्मुख सांगतात की ध्येय खूप मोठे आहे. देह आणि देहाचे
सर्व संबंध सोडून स्वतः ला आत्मा समजणे,हा पुरुषार्थ करणे बुद्धीचे काम आहे. सर्व
पुरूषार्थी आहेत. किती मोठी राजाई स्थापन होत आहे. बाबांची सर्व मुलं आहेत,
विद्यार्थी ही आहेत, अनुयायी पण आहेत. हे सार्या दुनियेचा पिता आहते.सर्व त्या एकाला
बोलवतात. तो येऊन मुलांना समजावत रहातो. तरीही एवढा आदर थोडाच राहतो. मोठे मोठे
मनुष्य येतात, किती आदरानी त्यांचा पाहुणचार केला जातो. किती दिखावा केला जातो.
यावेळी तर आहेत सर्व पतित परंतु स्वतःला समजतात थोडच. मायेने बिल्कुल तुच्छ बुद्धी
बनवले आहे. असे म्हणतात सतयुगाचे आयुष्य एवढे मोठे आहे. तर बाबा म्हणतात १००% बेसमझ
झाले ना. मनुष्य असून काय काम करत राहतात.पाच हजार वर्षाच्या गोष्टीला लाखो वर्ष
म्हणतात! हे ही बाबा येऊन समजावतात. पाच हजार वर्षांपूर्वी या लक्ष्मी नारायणचे
राज्य होते. हे दैवी गुण वाले मनुष्य होते. म्हणून त्यांना देवता, आसुरी गुण
वाल्यांना असुर म्हटले जाते.असुर आणि देवतांच्या मधे रात्रं दिवसाचा फरक आहे. किती
मारामारी भांडणे होतात. खूप तयारी होत राहते.या यज्ञात सारी दुनिया स्वाहा
होते,म्हणून ही सर्व तयारी व्हायला हवी ना. बॉम्ब निघाले तर नंतर बंद थोडेच होणार
आहेत.थोड्याच वेळात सर्वां कडे भरपूर होतील कारण विनाश तर पटापट व्हायला हवा
ना,नंतर हॉस्पिटल वैगेरे थोडेच असणार आहते. कुणाला समजणार ही नाही, मावशीचे घर
थोडेच आहे. विनाश- साक्षात्कार काही पाई - पैसे ची गोष्ट नाही.सार्या दुनियेची आग
पाहू शकाल का? साक्षात्कार होतो - फक्त आगच आग लागली आहे. सारी दुनिया नष्ट होणार
आहे.किती मोठी दुनिया आहे.आकाश तर नाही जळणार.याच्या मधे जे काही आहे,सर्व विनाश
होणार आहे.सतयुग आणि कलियुगात रात्रं दिवसाचा फरक आहे. किती मनुष्य आहेत,जनावरं
आहेत, किती सामग्री आहे. हे ही मुलांच्या बुद्धी मधे खुप कमी बसते.विचार करा, ५
हजार वर्षाची गोष्ट आहे. देवी देवतांचे राज्य होते ना,किती थोडे मनुष्य होती.आता
किती मनुष्य आहेत. आता आहे कलियुग, याचा जरूर विनाश होणार आहे.आता बाबा आत्म्यांना
सांगतात माझीच आठवण करा,समजून आठवण करायची आहे. असेच शिव - शिव तर खूप जण म्हणतात.
छोटी मुलं ही म्हणतात पण बुद्धी मधे समजत काहीच नाही. अनुभवां द्वारे म्हणत नाहीत
की तो बिंदी आहे. आम्ही ही एवढी छोटी बिंदी आहे. असे समजून आठवण करायची आहे.
सुरुवातीला तर मी आत्मा आहे, हे पक्के करा नंतर बाबांचा परिचय चांगल्या रीतीने धारण
करा. अंतर्मुखी मुलंच चांगल्या प्रकारे समजू शकतात, की मी आत्मा बिंदू आहे. आमच्या
आत्म्याला आता ज्ञान मिळत आहे, की आमच्या मधे 84 जन्मां चा पार्ट कसा भरला आहे,नंतर
कशी आत्मा सतोप्रधान बनते. या सर्व खूप अंतर्मुख होऊन समजण्याच्या गोष्ठी आहेत. याला
वेळ लागतो.मुलं जाणतात आमचा हा शेवटचा जन्म आहे.आता आम्ही जातो घरी. हे बुद्धी मधे
पक्के व्हायला पाहिजे की मी आत्मा आहे.शरीराचे भान कमी झाले तर बोलणे
सुधारेल,नाहीतर वागणे एकदमच खराब होते कारण शरीरापासून वेगळे होत नाहीत. देह - भाना
मधे येऊन काहीना काही बोलत राहतात. यज्ञाशी तर खूप ईमानदार रहायला हवं.अजून तर खूप
आळशी आहेत. खानपान वातावरण काहीच सुधारले नाही. अजून तर खूप वेळ हवा आहे. सेवा
करणार्या मुलांना बाबा आठवण करतात,श्रेष्ठ पद तेच प्राप्त करू शकतात. असेच स्वतःला
खुश करणे म्हणजे चणे चावल्या सारखे आहे. यामधे खूप अंतर्मुखता पाहिजे. समजावण्याची
युक्ती पाहिजे. प्रदर्शनी मधे कुणी समजते थोडेच,फक्त म्हणतात की तुमचे बरोबर
आहे.येथेही क्रमानुसार आहेत. निश्चय आह,आम्ही मुलं बनलो आहोत,तर बाबांकडून स्वर्गा
चा वारसा मिळतो. जर आम्ही बाबांची पूर्ण सेवा करत राहिलो तर. आमचा हाच धंदा आहे.
सर्व दिवस विचार सागर मंथन चालू असते. हे बाबाही विचार सागर मंथन करतात ना.नाही तर
हे पद कसे मिळवतील. मुलांना दोघे एकत्र समजाऊन सांगतात. दोन इंजिन मिळाले आहेत कारण
खूप मोठी चढाई आहे. डोंगरावर जातात तर गाडीला दोन इंजिन लावतात. कधी - कधी चालता -
चालता गाडी उभी राहिली तर घसरून परत खाली येते.आमच्या मुलांचे ही असेच आहे. चढता-
चढता, मेहनत करता - करता नंतर चढाई चढू शकत नाहीत. मायेचे ग्रहण किंवा वादळ
आल्यानंतर एकदम खाली घसरून खिळखिळे होऊन जातात. थोडी सेवा केली तर अहंकार
येतो,घसरतात.समजत नाही की बाप आहे त्यासोबत धर्मराज पण आहे. जर काही असे केले तर
आमच्या वर खूप मोठा दंड बसतो. यापेक्षा बाहेर राहणे केंव्हा ही चांगले. बाबांचे
बनून नंतर काही असे वागले तर नाव बदनाम करतात. खूप जखम होते. वारिस बनणे काही
मावशीचे घर नाही. प्रजा मधे कुणी एवढे साहुकार बनतात, विचारूच नका. अज्ञानकालात काही
चांगले असतात, कुणी कसे! नालायक मुलाला तर म्हणतात माझ्या समोरून दूर जा.येथे एक
दोन मुलांची गोष्ट नाही. इथे माया खूपच जबरदस्त आहे. यामधे मुलांना खूप अंतर्मुख
व्हायचे आहे,तर तुम्ही कुणाला समजावुन सांगू शकता. तुमच्या वर बळी हार जातील आणि
नंतर खूप पश्चाताप करतील - आम्ही बाबांना एवढ्या चुकीच्या गोष्टी बोललो. सर्वव्यापी
म्हणणे किंवा स्वतःला ईश्वर म्हणणे, त्यांच्या साठी खुप सजा आहे. असेच थोडीच निघून
जातील. त्यांच्या साठी तर अजूनच अवघड आहे. जेंव्हा वेळ येईल तेंव्हा बाबा या
सर्वांकडून हिशेब घेतील. विनाशाच्या वेळी सर्वांचा हिशेब पूर्ण होईल ना, यामधे खूप
विशाल बुद्धी पाहिजे. मनुष्य तर पहा कोणा, कोणाला शांती पुरस्कार देतात. आता खऱ्या
अर्थाने शांती स्थापन करणारा तर एक आहे ना मुलांनी लिहायला हवे-दुनियेमध्ये पवित्रता,
शांती,समृद्धी भगवंताच्या श्रीमत नुसार स्थापन होत आहे. श्रीमत तर प्रसिद्ध आहे.
श्रीमत भागवत गीता शास्त्रा चा किती मान ठेवतात.कुणी कुणाच्या ग्रंथाला किंवा
मंदिराला काही केले तर किती भांडण करतात. आता तुम्ही जाणता ही दुनिया च जळून भस्म
होणार आहे. ही मंदिरे - मशीद इ. पेटवतात. हे सर्व होण्याच्या अगोदर पवित्र बनायचे
आहे. हीच चिंता लागली पाहिजे. घर दार ही सांभाळायचे आहे. इथे येतात तर भरपूर. इथे
बकरी सारखे तर ठेवायचे नाही ना कारण की हे तर अमूल्य जीवन आहे,यांची तर खूप काळजी
घ्यायला हवी.मधुबन मध्ये लहान मुलांना घेऊन येणे बंद करायला हवे.एवढय़ा मुलांना कुठे
सांभाळणार. मुलांना सुट्टी लागल्यावर म्हणतात दुसरीकडे कुठे जायचे,चला मधुबन ला
बाबांच्या कडे जाऊ. ही तर मग धर्मशाळा होईल. मग युनिवर्सिटी कसे म्हणणार! बाबा पहात
आहेत मग,आदेश देतील मुलांना कुणीही आणू नये. ही बंधने पण कमी होतील. मातांना च दया
येते. हेही मुले जाणतात शिव बाबा तर आहे गुप्त. यांचा ही कोणाला आदर थोडाच आहे.असे
समजतात आमचा तर शिव बाबांशी संबध आहे. एवढेही समजत नाही - शिव बाबा च यांच्या द्वारे
समजावतात ना. माया नाकाला पकडून उलटे काम करायला लावते, सोडतच नाही. राजधानी मधे तर
सर्व हवेत ना. हे सर्व शेवटी साक्षात्कार होतील. सजाचा पण साक्षात्कार होईल. मुलांना
अगोदर, हे साक्षात्कार झाले होते. तरीही काही जण पाप करणे सोडत नाहीत. काही मुलानी
तर ही गाठ बांधली आह,की आम्हाला तर बनायचे च थर्ड क्लास आहे,म्हणून पाप करणे सोडतच
नाहीत.अजुनच चांगल्या प्रकारे आपली सजा तयार करत आहेत. समजवावे तर लागते ना. ही गाठ
नका बांधू की आम्हाला तर थर्ड क्लास बनायचे आहे. आता गाठ बांधा की आम्हाला असे
लक्ष्मीनारायण सारखे बनायचे आहे. काही तर अशी गाठ बांधतात चार्ट लिहतात - आज दिवसभर
आम्ही काही केले तर नाही! असे चार्ट खूप ठेवणारे आज नाहीत. माया खूप सतावते.अर्धा
कल्प मी सुख देतो,तर अर्धा कल्प माया दुःख देते.अच्छा.
गोड - गोड फार - फार वर्षानंतर भेटलेल्या मुला प्रति मात - पिता बाप दादांची
प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1) अंतर्मुखी
बणुन शरीराच्या भाना पासून वेगळे राहण्याचा अभ्यास करायचा आहे,खान-पान, चाल - चलन
सुधारायची आहे, फक्त स्वतःला खुश करून आळशी बनायचे नाही.
2) चढाई खूप उंच आहे,
म्हणून खूप - खूप खबरदार होऊन चालायचे आहे. कोणतेही कर्म सांभाळून करायचे आहे.
अहंकार मधे यायचे नाही. उलटे कर्म करून सजा तयार करू नका. गाठ बांधायची आहे की
आम्हाला या लक्ष्मी नारायण सारखे बनायचे आहे.
वरदान:-
कर्म भोग रूपी
परिस्थिति च्या आकर्षणाला पण समाप्त करणारे संपूर्ण नषटोमोहा भव.
आतापर्यंत प्रकृती
द्वारे बनलेली परिस्थिती अवस्थेला आपल्याकडे काही ना काही प्रकारे आकर्षित करते.
सर्वात जास्त आपल्या देहाचे हिसाब - किताब, राहिलेल्या कर्म भोगा च्या रुपाने येणारी
परिस्थिती, आपल्याकडे आकर्षित करते - जेंव्हा हे पण आकर्षण समाप्त होऊन जाते,तेंव्हा
म्हणू संपूर्ण नष्टोमोहा. कोणतीही देहाची किंवा देहाच्या दुनियेची परिस्थिती स्थिती
ला हलवू शकत नाही - हीच संपूर्ण स्टेज आहे. जेंव्हा अशा स्थिती पर्यंत पोहोचाल
तेंव्हा सेकंदात आपल्या मास्टर सर्वशक्तिमान स्वरुपात सहज स्थित होऊ शकाल.
बोधवाक्य:-
पवित्रता चे
व्रत सर्वात श्रेष्ठ सत्यनारायणा चे व्रत आहे - यामध्येच अतीन्द्रिय सुख सामावले आहे.