19-04-2020    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   30.12.1985  ओम शान्ति   मधुबन


विशाल बुद्धी ची लक्षणे


आज सर्व स्नेही सहयोगी,सहज योगी मुलांना,स्नेहाचे सागर सर्व खजान्या चे विधाता,वरदाता बाबा आत्मिक मिलन करण्यासाठी आले आहेत.हे आत्मिक स्नेहा चे मिलन म्हणजेच आत्म्याचे मिलन,विचित्र मिलन आहे.साऱ्या कल्पा मध्ये असे आत्मिक मिलन होऊ शकत नाही.या संगम युगा मध्येच या आत्मिक मिलन चे वरदान मिळाले आहे.या वरदानी वेळेत वरदाता बाबा द्वारे वरदानी मुलं हे अविनाश वरदान मिळवतात.बाबांचा पण विधाता आणि वरदाताची अविनाशी भूमिका या वेळेत चालते.अशा वेळेत वरदानाचे अधिकारी आत्मे,आपला नेहमीचा अधिकार प्राप्त करतात.अशा आत्मिक मेळ्याला पाहून बापदादा पण हर्षित होतात.बापदादा पाहत आहेत,अशी श्रेष्ठ प्राप्ती करणारे कसे भोळे साधारण,आत्मे विश्वाच्या पुढे निमित्त बनले आहेत.कारण सर्व लोक राजविद्या, विज्ञानाची विद्या, अल्पकाळाचा राज्याधिकार किंवा धर्मनेत्याचा अधिकार यालाच आजच्या दुनिया मध्ये विशेष आत्मे मानतात.परंतु बाप दादा कोणती विशेषता पाहतात? सर्वात प्रथम स्वतःला आणि बाबांना जाणल्या ची विशेषता,जी तुम्हा ब्राह्मण मुलांमध्ये आहे, ती कोणत्याही प्रसिद्ध आत्म्या मध्ये नाही,म्हणून भोळे साधारण असताना सुध्दा वरदाता पासुन वरदान घेऊन,जन्म जन्मासाठी विशेष पूज्य आत्मे बनतात.जे आजचे प्रसिद्ध आहेत,ते पण पूज्य आत्म्यांच्या पुढे नमन वंदन करतात.असे विशेष आत्मे बनले.असा आत्मिक नशा अनुभव करतात.नाउम्मीद आत्म्यांना पण उमेदवार बनवणे,हीच बाबांची विशेषता आहे. बापदादा वतन मध्ये पण मुलांना पाहून हर्षित होत होते.जर कोणत्याही अनळोखी आत्म्याला म्हटले ही सारी सभा विश्वा मधील राज्य अधिकारी आत्म्याची आहेत तर मानतील?आश्चर्य करतील,परंतु बापदादा जाणतात बाबांना हृदयाचे स्नेही,मनाची श्रेष्ठ भावना असणारे आत्माच प्रिय आहेत. हृदयाचा स्नेह च श्रेष्ठ प्राप्ती करण्याचा मुळ आधार आहे.हृदयाचा स्नेह दूरदूर वरुन मधुबन निवासी बनवतो.दिला राम बाबांना हृदयाचा स्नेह पसंत आहे म्हणून जे पण आहेत,जसे पण आहेत परंतु परमात्म्याला पसंद आहात,म्हणून आपले बनवले.दुनिया वाले आणखी वाटच पहात आहेत.बाबा येतील त्या वेळेस,असे होईल, तसे होईल.परंतु तुमच्या मुखाद्वारे,मनाद्वारे काय निघते ? सर्व मिळवले आहे.तुम्ही संपन्न बनले आणि ते बुद्धिवान आत्तापर्यंत शोधण्या मध्येच वेळ नष्ट करत आहेत, म्हणून म्हटले आहे भोलेनाथ बाबा आहेत.बाबांना ओळखण्याच्या विशेषतेने विशेष आत्मा बनवले आहे. ओळखले,प्राप्त केले,आता काय करायचे आहे?सर्व आत्म्या वरती दया येते?सर्व आत्मेच आहेत,एकच बेहदचा परिवार आहे.आपल्या परिवाराची कोणतेही आत्मा वरदाना पासून वंचित राहायला नको.असा उमंग उत्साह मनामध्ये येतो की,आपल्याच प्रवृत्ती मध्ये व्यस्त झाला आहात?बेहदच्या स्थिती मध्ये स्थिर आहात,बेहदच्या आत्म्याचा सेवेचा संकल्पच सहज सफलतेचे सहज साधन आहे.आत्ता सेवांची सुवर्ण जयंती साजरी करत आहात ना.त्यासाठी विशाल प्रोग्राम बनवले आहेत ना. जितका विशाल कार्यक्रम बनवला आहे,तेवढेच विशाल मन,विशाल उमंग आणि विशाल रूपा ची तयारी केली आहे? हाच विचार करता,भाषण करायला मिळेल तर करू,निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी मिळाल्या तर वाटू.हीच तयारी केली आहे का, यालाच विशाल तयारी म्हटले जाते का? जी सेवा मिळाली ती पूर्ण करणे यालाच विशाल उमंग म्हटले जात नाही.सेवा करणे हे आज्ञाकारी बनण्याची लक्षण आहेत परंतु बेहदची विशाल बुद्धी,विशाल उमंग उत्साह फक्त याला म्हटले जात नाही. विशालता ची लक्षणं आहेत,प्रत्येक वेळेत आपल्याला मिळालेल्या सेवे मध्ये नवीनता आणने. भोजन खाऊ घालण्याची सेवा असेल किंवा भाषण करण्याची सेवा असेल परंतु प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक वेळेत नवीनता भरणे यालाच म्हटले जाते विशालता.जे एक वर्षापूर्वी केले, त्यामध्ये काही ना काही आत्मिकते ची नविनतेची सेवा जरूर करा.असा उमंग उत्साह मना मध्ये येतो? की विचार करतात जसे चालत आहे तसेच होईल.प्रत्येक वळेत विधी आणि बुद्धी बदलत राहते. जसा वेळ जवळ येत आहे,तसेच प्रत्येक आत्म्याला बाबांचा,परिवाराच्या जवळीकतेचा विशेष अनुभव करावा. मनन करा कि कोणती नवीनता आणायची आहे.आत्ता संमेलनाचे विशाल कार्य करत आहात ना.सर्व करत आहेत की,जे मोठे आहेत तेच करत आहेत? सर्वांचे कार्य आहे ना? प्रत्येकाला विचारायचे आहे,मला नवीनते साठी सेवांमध्ये पुढे जायचेच आहे. जरी निमित्त थोड्यांनाच बनायचे असते,जसे भाषण तर थोडेच करतील.इतकी सारी सभा करेल काय?प्रत्येकाचे आपापली सेवा वाटून घेऊन,प्रत्येक कार्य संपन्न करायचे असते,परंतु सर्वांना निमित्त बनायचे आहे.कोणत्या गोष्टींमध्ये,चहूबाजूला जिथे पण सेवेसाठी निमित्त आहात,परंतु ज्या वेळेत कोणते विशाल कार्य जिथे पण होते,त्या वेळेस दूर बसून पण,त्यावेळे पर्यंत नेहमी प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वकल्याणाची श्रेष्ठ भावना आणि श्रेष्ठ कामना जरूर असायला पाहिजे.जसे आज-काल व्हीआयपी स्वतः पोचत नाहीत, तर शुभकामना पाठवतात ना. तर तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहात का? तुम्ही सर्व विशेष आत्म्याची शुभ भावना,शुभकामना त्या कार्याला अवश्य सफल बनवेल.हा विशेष दिवस विशेष कंगन बांधले पाहिजे आणि कोणत्याही हदच्या गोष्टींमध्ये संकल्प शक्ती,वेळेची शक्ती, व्यर्थ न घालवता प्रत्येक संकल्प द्वारे,प्रत्येक वेळी विशाल सेवेच्या निमित्त बणुन मन्सा शक्ती द्वारे पण सहयोगी बनायचे आहे.असे नाही आबू मध्ये संमेलन होत आहे,आम्ही तर अमक्या देशामध्ये आहोत,नाही.तुम्ही सर्व विशाल कार्यामध्ये सहयोगी आहात.वातावरण बनवा. जेव्हा विज्ञानाच्या शक्तीद्वारे एका देशापासून दुसऱ्या देशात पर्यंत रॉकेट पाठवतात, तर शांतीच्या शक्तीद्वारे तुम्ही शुभ भावना,कल्याणाची भावना द्वारा, मनसा द्वारे सहयोगी बनू शकत नाही काय? कोणी साकार मध्ये, वाणी पासुन, कर्मा द्वारे निमित्त बनतील.काही मन्सा सेवेमध्ये निमित्त बनतील परंतु जितके दिवस कार्यक्रम चालत आहे,मग ते पाच दिवस किंवा सहा दिवस चालेल, इतका वेळ प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला सेवेचे कंगन बांधलेले हवे.प्रत्येक आत्मा स्वता:ला जवाबदार समजावे.याचा भाव हा नाही की,सर्व जवाबदार आहेत,तर भाषणाची संधी पण मिळायला पाहिजे. काही विशेष सेवा मिळाली तरच जवाबदार आहोत,याला जवाबदार म्हणत नाहीत.जिथे पण असेल, जी पण सेवा मिळाली असेल,मग ती दूर बसण्याची असेल किंवा स्टेजवर येण्याची असेल,मला सहयोगी बनायचे आहे.याला म्हटले जाते साऱ्या विश्वामध्ये सेवेची आत्मिक लाट पसरवणे. खुशीची उमंग उत्साहाची लाट पसरावी.असे सहयोगी आहात.या संमेलना मध्ये नवीनता दाखवणार ना? सुवर्ण जयंती आहे तर,चहू बाजूला सुवर्णयुग येणार आहे,या खुशीची लाट पसरायला हवी.भयभित आत्मे आहेत, नाऊम्मीद आत्मे आहेत, त्यांच्यामध्ये श्रेष्ठ भविष्याची आशा उत्पन्न करा. भयभीत आत्म्यां मध्ये खुशीची लाट उत्पन्न व्हावी.ही सुवर्ण जयंतीची सुर्वण सेवा आहे. हेच लक्ष ठेवा.स्वत आपण प्रत्येक कार्यामध्ये होऊन खऱ्या सोन्या सारखे बणुन सुवर्ण जयंती साजरी करायची आहे.समजले.जे आजपर्यंत केले नाही, ते करून दाखवायचे आहे. अशा आत्म्याला निमित्त बनवा की,ते अनेक आत्म्यांच्या सेवेच्या निमित्त बनतील.विचार करतच बसतील परंतु करू करु म्हणत वेळ निघून जातो आणि अंत काळात जे मिळेल,त्यांनाच घेऊन येतील.संख्या तर वाढत जाते परंतु विशाल सेवेचा कार्यक्रम ठेवतातच यासाठी,की असे आत्मे यावेत जे अनेकांच्या निमित्त बनावेत.चोहू बाजूला सेवा चालत राहते ना.आपपल्या स्थाना वरती पण अशा आत्म्यांचे कार्य तर चालवत राहतात म्हणून आतापासून सुवर्ण जयंतीची स्वतःच्या सेवची आणि स्वतःच्या सोबत अन्य विशेष आत्म्यांच्या सेवेची लाट पसरावा.समजले काय करायचे आहे?

प्रेमाने कष्ट करा.स्नेह अशी वस्तू आहे स्नेहा मुळे न करणारे आत्मे पण करतात, वेळ नसताना पण वेळ काढतात.हा तर आत्मिक स्नेह आहे.तर धरनी बनवा. असा विचार करू नका,ही धरनीच अशी आहे.हे लोकच असे आहेत.तुम्ही कसे होते,परिवर्तन झाले ना,शुभ भावना चे सदैव श्रेष्ठ फळ मिळते. अच्छा. आपल्या घरी आले आहात,तर बाबांना पण खुशी आहे परंतु वेळ तर हदची आहे ना.जेवढी संख्या तेवढीच विभागणी होते ना.समजा चार पदार्थ असतील परंतु घेणार आठ असतील तर काय करणार?त्याच विधी प्रमाण चालावे लागते.बापदादा असे तर म्हणू शकत नाहीत,इतके का आले आहेत? खुशाल या, स्वागत आहे परंतु वेळेप्रमाणे विधी पण बनवावी लागते.होय अव्यक्त वतन मध्ये वेळेची सीमा नाही.

महाराष्ट्र पण कमल करून दाखवेल. कोणत्या अशा महान आत्म्याला निमित्त बनवून दाखवा,तेव्हा म्हणाल महाराष्ट्र. दिल्ली तर निमित्त आहेच.असे नाही की आत्ता संमेलन खूप केलेत.आता जितके होईल,नाही. प्रत्येक वर्षी करायचे आहेत आणि पुढे जायचे आहे.आता तर अनेक आत्मे आहेत ज्यांना निमित्त बनवू शकता.दिल्ली वाल्यांना पण विशेष निमित्त बनायचे आहे.राजस्थान काय करेल? राजस्थान नेहमी प्रत्येक कार्यामध्ये नंबर एक होणार आहे, कारण राजस्थान मध्ये नंबर एक मुख्यालय आहे.मग ते क्वालिटी मध्ये किंवा कॉन्टिटी मध्ये दोन्ही मध्ये क्रमांक एक आहे.डबल विदेशी पण कमाल दाखवेल ना.प्रत्येक देशांमध्येही या खुशखबरी ची लाट जावी,तेव्हा सर्व तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील. लोक पण खूप भयभीत आहेत ना. अशा आत्म्याची आत्मिक खुशीची लहर असली पाहिजे,जे समजतील फरिश्ता बणुन,शुभ संदेश देण्याचे निमित्त बनलेली आत्मा आहेत.समजले.आता पाहू कोणता झोन नवीनता करेल. संख्या घेऊन येतात की महान आत्मे घेऊन येतात, परत बापदादा त्याचा परिणाम ऐकवतील.नवीनता पण करायची आहे. नवीनते मध्ये पण नंबर मिळतील, अच्छा.

सर्व स्वराज्य विश्व राज्याच्या अधिकारी आत्म्यांना,नेहमी बेहदच्या सेवेमध्ये बेहदच्या वृत्ती मध्ये राहणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, विशाल हृदय विशाल बुद्धी विशाल उमंग उत्साहा मध्ये राहणाऱ्या विशेष आत्म्यांना,नेहमी स्वतःला प्रत्येक सेवेमध्ये निमित्त बणुन निर्माण करणाऱ्या, नेहमी श्रेष्ठ आणि बाप समान सेवेमध्ये सफलता प्राप्त करणाऱ्या,अशा आत्म्यांना आत्मिक पित्याची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

कुमारी सोबत वार्तालाप:-

नेहमी कुमारी जीवन निर्दोष जीवन गायन केलेले आहे.कुमारी जीवन म्हणजे श्रेष्ठ गायन,पूजन केले जाते. असे श्रेष्ठ आणि पूज्य आत्मा स्वतःला समजतात का? सर्व कुमारी विशेष कोणती कमाल करून दाखवणारे आहात ना,की फक्त अभ्यास करणार आहात. विश्व सेवाधारी बनणार की, गुजरातची सेवा करणारे बनणार, की मध्यप्रदेशाची,की अमक्या स्थानाची सेवा करायची आहे,असे तर नाही ना.संपुर्ण असणारे,नेहमी दुसऱ्यांना पण तयार करतात.तर तुम्ही कुमारी जे पाहिजे ते करू शकतात.आजचे शासन पण म्हणते,आम्ही करू शकत नाही,ते हे करतात.अशा राज्यांमध्ये राहून सेवा करायची आहे, तर इतकी शक्तिशाली सेवा होईल,तेव्हा सफलता मिळेल.या ज्ञानाच्या अभ्यासा मध्ये नंबर घेतला आहे.हेच लक्ष ठेवायचे आहे की,नंबर एक घ्यायचा आहे.नेहमी हीच विशेषता दाखवा की कमी बोला, परंतु ज्यांच्या पण समोर जाल,त्यांना आपल्या श्रेष्ठ जीवना द्वारे धडा मिळेल. मुखा द्वारे तर अनेक ऐकवणारे आहेत, ऐकणारे पण आहेत परंतु जीवना द्वारे धडा शिकतील, ही विशेषता आहे. तुमचे जीवनच शिक्षक बणुन जाईल. मुखाद्वारे शिकवणारे नाही,मुखाद्वारे सांगावे लागते,परंतु मुखाद्वारे सांगितल्या नंतर, पण जर जीवनामध्ये धारणा होत नाही,तर ते मानत नाहीत.असे म्हणतात,ऐकवणारे तर खूप आहेत, म्हणून लक्षात ठेवा जीवना द्वारे कुणाला बाबा चे बनवायचे आहे. आजकल ऐकण्या ची आवड पण ठेवत नाहीत परंतु पाहू इच्छितात.पाहा,रेडिओ ऐकण्याची गोष्ट आहे, टी.व्ही. पाहण्याची गोष्ट आहे, तर काय पसंत करतात. ऐकण्यापेक्षा पाहणे पसंत करतात.तर तुमच्या जीवनामध्ये पण पाहू इच्छितात,कसे चालतात,कसे उठतात,कसे आत्मिक दृष्टी ठेवतात. हेच लक्ष ठेवा, समजले. संगम युगा वरती कुमारींचे महत्त्व काय आहे? त्याला जाणतात ना.संगम युगामध्ये सर्वात महान कुमारी आहेत,तर स्वतःला महान समजून सेवेमध्ये सहयोगी बनले आहात की, बनायचे आहे.कोणते लक्ष आहे, डबल भूमिका वठवण्याचे लक्ष आहे की,नोकरीची टोपली उठवणार आहात. अच्छा.

वरदान:-
बालक आणि मालक पणच्या समानते द्वारे सर्व खजान्या मध्ये संपन्न भव.

जसे बाल पणाचा नशा सर्वांमध्ये आहे, असे बालक म्हणजेच मालक अर्थात बाप समान संपन्न स्थितीचा अनुभव करा.मालक पणाची विशेषता आहे जेवढे मालक तेवढेच विश्व सेवाधारी चे संस्कार नेहमी उदय राहवेत.मालक पणाचा नशा आणि विश्व सेवाधारी चा नशा समान रुपा मध्ये हवी,तेव्हा बाप समान बनाल.बालक आणि मालक दोन्ही स्वरुप प्रत्यक्ष कामांमध्ये येईल तेव्हा सर्व खजान्या द्वारे संपन्न स्थितीचा अनुभव करू शकाल.

सुविचार:-
ज्ञानाच्या अखुट खजान्याचे अधिकारी बना तर चिंता नष्ट होऊन जाईल.


सूचना:- आज आंतरराष्ट्रीय योग दिवस रविवार आहे.संध्याकाळी साडेसहा ते साडेसात पर्यंत सर्व भाऊ बहिणी संघटित रूपामध्ये एकत्र होऊन योग अभ्यासामध्ये अनुभव करा कि,मी आत्मा बाबाच्या सोबत एकत्रित आहे, मी सर्व शक्तीद्वारे संपन्न मास्टर ज्ञान सूर्य आहे,माझ्या द्वारे सर्व शक्तीचे किरणे निघून चोहू बाजूला पसरत आहेत.