14-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुमचे प्रेम शरीराशी असायला नको,एका विदेही सोबत प्रेम करा,देहाला पाहुन पण पाहू नका"

प्रश्न:-
बुद्धीला स्वच्छ बनवण्याचा पुरुषार्थ कोणता आहे,स्वच्छ बुद्धीची लक्षणं कोणते असतील?

उत्तर:-
देही अभिमानी बनल्या मुळेच बुद्धी स्वच्छ बनेल.असे देही अभिमानी मुलंच स्वतःला आत्मा समजून एक बाबांशी प्रेम करतील.बाबा द्वारेच ऐकतील परंतु जे मुढमती आहेत,ते देहधारी सोबत प्रेम करत राहतील.

ओम शांती।
ओम शांती कोणी म्हटले आणि कोणी ऐकले?दुसऱ्या सत्संगा. मध्ये जिज्ञासू ऐकतात. महात्मा किंवा गुरु इत्यादीने ऐकवले असे म्हणतात.येथे परमात्म्या नी ऐकवले आणि आत्म्याने ऐकले,ही तर नवीन गोष्ट आहे ना.देही अभिमानी बनावे लागेल.काहीजण येथे पण देह अभिमानी होऊन बसतात.तुम्हा मुलांना देही अभिमानी होऊन बसायचे आहे.मी आत्मा या शरीरा मध्ये विराजमान आहे. शिव बाबा आम्हाला समजतात,हे बुद्धी मध्ये चांगल्या प्रकारे आठवणीत राहिले पाहिजे.मज आत्म्याचा संबंध परमात्म्याच्या सोबत आहे.परमात्मा येऊन या शरीरा द्वारे ऐकवतात,तर हे दलाल झाले ना.तुम्हाला समजवणारे पण तेच आहेत,यांना पण तेच वारसा देतात.तर बुद्धी एक बाबा कडे जायला पाहिजे.समजा वडिलांची पाच सात मुलं आहेत,त्यांचा बुद्धी योग वडिलां कडेच राहतो,कारण वडीलां कडून वारसा मिळतो,भावा द्वारे वारसा मिळू शकत नाही.नेहमी वडिलां कडूनच मिळतो. आत्म्याला वारसा मिळत नाही.तुम्ही जाणता आत्मिक रूपामध्ये आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत.आम्हा सर्व आत्म्याचा संबध एक परमपिता परमात्मा च्या सोबत आहे.ते म्हणतात माझीच आठवण करा,मज एका सोबतच प्रीत ठेवा.रचना सोबत प्रीत ठेवू नका.देही अभिमानी बना.माझ्या शिवाय दुसऱ्या कोणत्या देहधारीची आठवण करतात,तर त्याला देह अभिमानी म्हणले जाते.जरी हे देहधारी तुमच्या समोर आहेत परंतु तुम्ही यांना पाहू नका.बुद्धीमध्ये शिव बाबांची आठवण यायला पाहिजे.ते तर फक्त असेच भाऊ भाऊ म्हणतात.आता तुम्ही जाणतात आम्ही आत्मा आहोत,परमपिता परमात्मा ची संतान आहोत. परमात्मा पित्याकडून वारसा मिळतो.ते बाबा म्हणतात तुमचे प्रेम एका बरोबरच असायला पाहिजे.मी स्वतःहून तुमचा

साखरपुडा माझ्या बरोबर करतो, देहधारी शी साखरपुडा करत नाही.दुसरे जे पण संबंध आहेत,ते देहाचे संबंध आहेत.या वेळेत तुम्हाला देही अभिमानी बनायचे आहे.आम्ही आत्मा बाबा कडुन ऐकतो,तर बुद्धी बाबा कडे जायला पाहिजे.बाबा यांच्या बाजूला बसुन आम्हाला ज्ञान देतात.त्यांनी शरीर भाड्याने घेतले आहे.आत्मा या शरीर रुपी घरांमध्ये येऊन भूमिका वठवते, जसे की ती आपल्याला शरीर रुपी घरा मध्ये बंद करते,भूमिका वठवण्यासाठी. तसे तर ती फ्री आहे,परंतु या शरीरामध्ये प्रवेश करून आपल्याला या घरामध्ये बंद करण्याची भूमिका वठवते.आत्माच एक शरीर सोडुन दुसरे घेते,अभिनय करते.या वेळेत जेवढे दही अभिमानी बनतील तेवढे उच्चपद प्राप्त करतील. ब्रह्मा बाबांच्या शरीरा मध्ये तुमचे प्रेम राहायला नाही पाहिजे,रिंचक मात्र पण नाही.हे शरीर काहीच कामाचे नाही.मी या शरीरा मध्ये प्रवेश केला आहे,फक्त तुम्हाला समजून सांगण्या साठी.हे रावणाचे राज्य,दुसऱ्यांचा देश आहे. रावणाला जाळतात परंतू समजत नाहीत.चित्र इत्यादी जे बनवतात त्यांना पण जाणत नाहीत. बिल्कुलच मुढमती आहेत.रावण राज्या मध्ये सर्व मुढमती आहेत.देह अभिमान आहे ना.तुच्छ बुद्धी बनले आहेत.बाबा म्हणतात,जे मुढमती अहतील, ते देहाची आठवण करत राहतील,देहाशी प्रेम करतील.स्वच्छ बुद्धी तर स्वतःला आत्मा समजून परमात्माची आठवण करून परमात्मा द्वारे ऐकत राहतील,यामध्येच कष्ट आहेत.हा तर बाबांचा रथ आहे. अनेकांना यांच्याशी स्नेह होतो.जसे हुसेनचा घोडा असतो,त्याला खुप सजवतात.आता महिमा तर हुसेनची आहे,ना की घोड्याची.जरुर मनुष्याच्या तना मध्ये हुसेनची आत्मा आली असेल ना.त्या गोष्टीला समजत नाहीत.आता याला राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ म्हटले जाते.अश्व नाव ऐकून त्यांनी परत घोडा समजले आहे.त्यांना स्वाहा करतात.या सर्व भक्ती मार्गातील गोष्टी आहेत.आता तुम्हाला सुंदर बनवणारा प्रवाशी तर हा आहे ना... आता तुम्ही जाणतात,आम्ही प्रथम गोरे होतो,परत सावळे बनलो. जे पण आत्मे प्रथम येतात,ते प्रथम सतोप्रधान असतात,परत सतो,रजो तमो मध्ये येतात.बाबा येऊन सर्वांना सुंदर बनवतात.जे पण धर्म स्थापक येतात,ते सर्व सुंदर असतात,नंतर काम चिता वरती बसून काळे बनतात.प्रथम सुंदर परत शाम बनतात.हे क्रमांक एक मध्ये येतात,तर सर्वात जास्त सुंदर बनतात. लक्ष्मी नारायण सारखे नैसर्गिक सुंदर तर कोणी होऊ शकत नाही.

ही ज्ञानाची गोष्ट आहे.जरी ख्रिश्चन लोक भारतवासीं पेक्षा सुंदर गोरे आहेत, कारण तिकडे थंड हवामाना मध्ये राहतात,परंतु सतयुगा मध्ये तर नैसर्गिक सुंदरता आहे.आत्मा आणि शरीर दोन्ही सुंदर आहेत,यावेळी सर्वप्रथम सावळे आहेत,परत बाबा येऊन सर्वांना सुंदर बनवतात.प्रथम सतोप्रधान पवित्र होते परंतु उतरत उतरत काम चितेवरती बसून काळे झाले आहेत.आता बाबा आले आहेत सर्वांना पवित्र बनवण्यासाठी.बाबांची आठवण केल्यामुळेच पावन बनाल.तर एकाची आठवण करायची आहे.देहधारीशी प्रेम करायचे नाही.बुद्धीमध्ये रहावे की आम्ही एका बाबांचे आहोत,तेच सर्व काही आहेत.जे डोळ्याने दिसत आहे,ते सर्व विनाश होईल.हे डोळे पण नष्ट होतील.परमपिता परमात्मा ला म्हटले जाते,त्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र आहे. त्रिकालदर्शी त्रिनेत्री त्रिलोकिनाथ ही पदवी त्यांची आहे.आता तुम्हाला तिन्ही लोकांचे ज्ञान आहे,परत हे नष्ट होते. ज्यांच्यामध्ये ज्ञान आहे,तेच येऊन देतात.तुम्हाला बाबा ८४ जन्माचे ज्ञान देतात.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा.मी यांच्या शरीरा मध्ये प्रवेश करून तुम्हाला पावन बनवण्या साठी आलो आहे.माझी आठवण केल्यामुळे तुम्ही पावन बनाल,दुसऱ्या कोणाची आठवण केल्यामुळे सतोप्रधान बनू शकणार नाही,पाप नष्ट होणार नाहीत, तर म्हणाल विनाशकाले विपरीत बुद्धि विनाशंती.मनुष्य तर खूप अंधश्रद्धा मध्ये आहेत,देहधारी मध्येच मोह ठेवतात. आता तुम्हाला देही अभिमानी बनायचे आहे.एका मध्येच मोह ठेवायचा आहे. दुसऱ्या कोणा मध्ये मोह गेला तर बाबांशी विपरीत बुध्दी आहेत.बाबा खूप समजवतात माझी आठवण करा, यामध्येच कष्ट आहेत.तुम्ही म्हणतात आम्हा पतितांना येऊन पावन बनवा. बाबाच पावन बनवतात.तुम्हा मुलांच्या ८४ जन्माचा इतिहास-भूगोल बाबा सांगत आहेत ना.आठवण करणे खुप अवघड विषय आहे.बाबांची आठवण करण्या मध्ये कोणीही हुशार नाहीत.

जी मुलं आठवण करण्या मध्ये हुशार नाहीत,ते जसे पंडित आहेत.ज्ञानामध्ये जरी हुशार असले,तरी आठवण करत नाहीत,तर पंडित झाले ना.बाबा पंडिता ची एक गोष्ट ऐकवतात.ज्यांनी ऐकले त्यांनी परमात्माची आठवणी जीवन नौका किनार्याला लावली.पंडिताचे उदाहरण पण तुमच्या साठी आहे.बाबांची आठवण कराल तर तुमची नाव किनाऱ्या ला लागेल,फक्त मुरली मध्ये हुशार असतील तर किनारा भेटणार नाही.आठवणी शिवाय विकर्म विनाश होणार नाहीत.हे सर्व द्रुष्टांत बनवले आहेत.बाबा सन्मुख यर्थात समजवतात.त्यांना निश्चय झाला.एकच गोष्ट पकडली आहे,की परमात्माची आठवण केल्या मुळे किनारा येईल, फक्त ज्ञान असेल,योग नाही तर उच्च पद मिळू शकणार नाही.असे खूप आहेत,जे आठवणी मध्ये राहत नाहीत. मुख्य गोष्ट आहे आठवण करणे.अनेक मुलं चांगली सेवा करणारे आहेत परंतु बुद्धीयोग ठीक नसेल तर,देह अभिमाना मध्ये फसतील.योग असणारे कधीच देह अभिमाना मध्ये फसणार नाहीत. अशुद्ध संकल्प येणार नाहीत. आठवणीमध्ये कच्चा असेल तर मायेचे वादळ येते.योगाद्वारे कर्मेंद्रिया एकदम वश होतात.बाबा बरोबर आणि चुकीचे समजण्याची बुद्धीपण देतात.दुसऱ्याच्या देहाकडे बुद्धी गेल्यामुळे विपरीत बुध्दी विनशंती व्हाल.ज्ञान वेगळे आहे,योग वेगळे आहे.योगा मुळे आरोग्य,ज्ञाना मुळे संपत्ती मिळते.योगाद्वारे शरीराचे आयुष्य वाढते.आत्मा लहान-मोठी होत नाही.आत्मा म्हणेल माझ्या शरीराचे आयुष्य मोठे आहे.आता आयुष्य लहान आहे,परत अर्ध्या कल्पा साठी शरीराचे आयुष्य मोठे होईल.आम्ही तमोप्रधान पासुन सतोप्रधान बनू.आत्मा पवित्र बनते, सर्व आत्म्याला पवित्र बनवण्या वरती अवलंबून आहे.पवित्र बनले नाही तर पद पण कमी होईल.

माया चार्ट, दिनचर्या लिहण्यांमध्ये पण मुलांना सुस्त बनवते.मुलांना आठवणीच्या यात्रेचा चार्ट पण,खूप आवडीने लिहायला पाहिजे.हे तपासायला पाहिजे की,आम्ही बाबांची आठवण करतो की,कोणत्या मित्र संबंधी कडे बुध्दी योग चालला जातो. साऱ्या दिवसा मध्ये कुणाची आठवण राहिली किंवा कोणा सोबत प्रित राहिली,किती वेळ वाया घालवला ? आपला चार्ट ठेवायला पाहिजे परंतु कुणामध्ये ताकत नाही,जे नेहमी चार्ट ठेवू शकतील.फार थोडेच दिनचर्या लिहितात,माया पूर्णपणे लिहू देत नाही. एकदम सुस्त बनवते. चुस्ती निघून जाते. बाबा म्हणतात माझीच आठवण करा. सर्व सजनींचा साजन आहे.

तर साजन ची आठवण करायला पाहिजे ना.साजन पिता म्हणतात,तुम्ही अर्धाकल्प आठवण केली,आता मी म्हणतो माझी आठवण करा,तर विकर्म विनाश होतील.असे बाबा जे सुख देणारे आहेत,त्यांची खुप आठवण करायला पाहिजे.बाकी तर सर्व दुःख देणारे आहेत.ते काही कामांमध्ये येणारे नाहीत.अंत काळात एक परमात्मा पिताच कामाला येतील.अंतकाळाची वेळ,एक हदची असते,एक बेहदची असते.

बाबा समजवतात,आठवण करत राहिले तर अचानक मृत्यू होणार नाही.तुम्हाला अमर बनवतात.प्रथम तर बाबाच्या सोबत प्रित बुध्दी पाहिजे.कुणाचे शरीरा सोबत प्रेम असेल तर,विकारात जातील, नापास होतील.चंद्रवंशी मध्ये चालले जातील.सतयुगी सुर्यवंशी राजाईलाच स्वर्ग म्हटले जाते.त्रेतायुगाला स्वर्ग म्हणू शकत नाही.जसे द्वापर आणि कलियुग आहे,तर कलियुगाला रौरव नर्क, तमोप्रधान म्हटले जाते.द्वापरला इतका नर्क म्हणू शकत नाही,परत तमोप्रधान पासुन,सतोप्रधान बनण्यासाठी आठवण पाहिजे.स्वता पण समजतात आमचे, अमक्याशी खूप प्रेम आहे.त्यांच्या आधारा शिवाय आमचे कल्याण होणार नाही.आता अशा परिस्थितीमध्ये मृत्यू आला तर काय होईल,विनाश काले विपरीत बुद्धी विनशंती.खूपच कमी प्रतीचे पद मिळेल.आजकल दुनिया मध्ये फॅशनची पण खुपच मोठी आपत्ती आहे.स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी शरीराला किती किती टीप टॉप करतात. आता बाबा म्हणतात मुलांनो, कुणाच्याही नावा रूपामध्ये फसू नका.लक्ष्मीनारायण चे ड्रेस पाहा किती श्रेष्ठ आहेत.ते शिवालय आहे,याला वेश्यालय(विकारी) म्हटले जाते.या देवतांच्या पुढे जाऊन म्हणतात,आम्ही वेश्यालय मध्ये राहणारे आहोत. आजकाल फॅशन करणे पण खूप मुसीबत आहे.सर्वांची नजर तिकडे जाते,परत पकडून पळवुन पण घेऊन जातात.सतयुगा मध्ये तर कायदेशीर चलन असते.तेथे नैसर्गिक सुंदरता आहे ना.अंधश्रद्धेची गोष्ट नाही.येथे तर कोणाला पाहिल्यामुळे मन लागते,परत दुसऱ्या धर्मातील मुलींशी किंवा मुलांशी पण लग्न करतात.आता तुमची ईश्वरीय बुद्धी आहे,पत्थरबुध्दी पासुन पारस बुध्दी कोणी बनवू शकत नाही.ते रावण संप्रदाय आहेत.तुम्ही आत्ता राम संप्रदायाचे बनले आहात.पांडव आणि कौरव एकाच संप्रदायाचे होते बाकी यादव युरोपवासी आहेत.गीता द्वारे कोणीच समजत नाहीत की,यादव कसे युरोपवासी आहेत. ते तर यादव संप्रदाय पण येथेच म्हणतात.बाबा सन्मुख समजवतात,यादव युरोपवासी आहेत, ज्यांनी आपल्या विनाशासाठी मिसाईल इत्यादी बनवले आहेत.पांडवाचा विजय होतो,ते जाऊन परत स्वर्गाचे मालक बनतात.परमात्माच येऊन स्वर्गाची स्थापना करतात.ग्रंथांमध्ये दाखवले आहे पांडवा चा मृत्यू झाला,परत काय झाले,काहीच समजत नाहीत.अविनाश नाटकाच्या रहस्याला पण कोणी जाणत नाहीत.बाबांच्या जवळ मुलं येतात, म्हणतात खुशाल दागिने इत्यादी घाला. असे म्हणतात, बाबा येथे दागिने कुठे शोभून दिसतात.पतित आत्मा,पतित शरीराला दागिने कुठे शोभुन दिसतात.स्वर्गात तर आम्ही या दागिन्या मुळे श्रुगांरीत राहू.खूप धन असते,सर्व सुखी असतात.जरी तेथे वाटत असले, हे राजा आहेत,आम्ही प्रजा आहोत परंतु दुःखाची कोणतीच गोष्ट नाही.येथे धान्य मिळत नाही तर मनुष्य दुःखी होतात. स्वर्गामध्ये तर सर्व काही मिळते.दुःख अक्षर मुखाद्वारे निघणार नाही.नावच स्वर्ग आहे.युरोपियन लोक त्याला स्वर्ग (पँराडाईज)म्हणतात.ते समजतात तेथे देवी-देवता राहत होते,त्यामुळे त्यांचे चित्र पण खूप खरेदी करतात परंतु परत कुठे गेले हे कोणालाच माहिती नाही.तुम्ही आता जाणतात,हे चक्र कसे फिरते.नवीन दुनियाच जुनी,परत नवीन दुनिया बनते.देही अभिमानी बनण्या मध्ये खूप कष्ट आहेत.तुम्ही देही अभिमानी बनल्यामुळे अनेक आजारांपासून मुक्त व्हाल.बाबा ची आठवण केल्यामुळेच उच्चपद प्राप्त कराल.अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणत्याही देहधारी ला आपला आधार बनवायचा नाही.शरीरासोबत प्रेम करायचे नाही.हृदयापासून एका बाबांशी प्रेम करायचे आहे.कोणाच्याही नावां रूपामध्ये फसायचे नाही.

२)आठवणीचा चार्ट आवडीने ठेवायचा आहे,यामध्ये सुस्त बनायचे नाही. दिनचर्या मध्ये पाहिचे आहे,माझी बुद्धी कुठे जाते? किती वेळ वाया जातो ?सुख देणाऱ्या बाबांची किती वेळ आठवण राहते?

वरदान:-
विश्व महाराजन यांची पदवी प्राप्त करणारे सर्व शक्तीच्या भंडाऱ्या द्वारे भरपुर भव.

विश्व महाराज यांची पदवी प्राप्त करणारे जे आत्मे आहेत,त्यांचा पुरूषार्थ फक्त आपल्यासाठी नसेल.आपल्या जीवनामध्ये येणारे विघ्न किंवा परीक्षा पास करणे हे तर खूप साधारण आहे, परंतु जे विश्व महाराजन बनणारे आत्मे आहेत,त्यांच्या जवळ आतापासून सर्व शक्तीचा भंडारा भरपूर असेल.त्यांचा प्रत्येक सेकंद प्रत्यक्ष दुसऱ्या प्रती असेल.तन-मन-धन वेळ श्वास सर्व विश्व कल्याणमध्ये सफल होत राहील.

बोधवाक्य:-
एक पण कमजोरी,अनेक विशेषते ला समाप्त करते,म्हणून कमजोरीं ना घटस्फोट द्या.