03-04-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आपली अवस्था पहा, माझे मन बाबाशी लागते की,कोणत्या कर्म संबंधा मध्ये लागलेले आहे"

प्रश्न:-
आपले कल्याण करण्यासाठी कोणत्या दोन गोष्टीचा हिशेब दररोज पाहायचा आहे?

उत्तर:-
योग आणि चलनचा हिशेब रोज तपासून पहा.कोणत्या सेवे मध्ये तर विघ्न आणत नाही.नेहमी आपल्या मनाला विचारा,आम्ही बाबांची किती आठवण केली?आपला वेळ कोणत्या प्रकारे सफल केला? दुसऱ्यांना तर पाहत नाही?कोणाच्या नाव रुपा मध्ये तर मन लागलेले नाही.

गीत:-
हे प्राणी,तू आपला चेहरा मन रुपी दर्पण मध्ये पहा..

ओम शांती।
हे कोणी म्हटले?बेहद च्या पित्यानी म्हटले,हे आत्म्यानो.प्राणी म्हणजे आत्मा.असे म्हणतात ना, आत्मा निघून गेली म्हणजे प्राण निघून गेला.आता बाबा सन्मुख समजवतात, हे आत्म्यानो आठवण करा.फक्त या जन्माला पाहिचे नाही परंतु ज्या वेळे पासून तुम्ही तमोप्रधान बनला आहात, तर शिडी खाली उतरत पतित बनले आहात.तर जरूर पाप केले असतील. आता ही तर समजण्याची गोष्ट आहे. अनेक जन्म जन्मांतर चे पाप डोक्यावरती आहेत.हे कसे माहिती होइल.स्वतःला पाहायचे आहे,आमचा योग किती लागतो?बाबाच्या सोबत योग चांगला असेल तेवढेच विकर्म विनाश होतील.बाबांनी म्हटले आहे माझी आठवण करा तर मी खात्री देतो,तुमचे विकर्म विनाश होतील.स्वतःच्या मनाला विचारा माझा बाबाच्या सोबत किती वेळ योग असतो.जितका आम्ही योग लाऊ,पवित्र बनू,पाप नष्ट होत जातील, योग वाढत जाईल.पवित्र बनणार नाही तर योग पण लागणार नाही.असे पण काही जण आहेत,जे सर्व दिवसामध्ये पंधरा मिनिट पण आठवणीत राहत नाहीत.तर स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे,माझे मन शिव बाबाशी आहे की देहधारी सोबत आहे.कर्म सबंधी इत्यादी शी आहे? माया वादळा मध्ये मुलांना त्रास देईल,स्वतः पण समजतात माझी अवस्था कशी आहे? शिवबाबांशी मन लागते का?की कोणत्या देहधारी शी आहे. कर्म संबंधी शी मन लागते,तर समजायला पाहिजे,आमचे विकर्म खूप आहेत,ज्यामुळे माया खड्ड्या मध्ये घालते. विद्यार्थी समजू शकतात की,मी पास होईल की नाही.चांगल्या रीतीने शिकतो की नाही.क्रमानुसार तर असतात ना.आत्म्याला स्वतःचे कल्याण करायचे आहे. बाबा सूचना देतात,जर तुम्ही पुण्य आत्मा बणुन उच्चपद मिळू इच्छितात तर,त्यामध्ये पवित्रता प्रथम आहे.तुम्ही पवित्र आले होते,परत पवित्र बणुन जायचे आहे.पतित कधीच उच्चपद मिळवू शकत नाही.नेहमी आपल्या मनाला विचारायला पाहिजे, आम्ही किती बाबांची आठवण करतो? आम्ही काय करतो? हे तर जरूर आहे, शेवटी बसलेल्या मुलांचे मन खात राहते. उच्च पद मिळवण्यासाठी पुरुषार्थ करतात परंतु चलन पण पाहिजे ना. बाबांची आठवण करुन आपल्या डोक्यावरील पापाचे ओझे उतरायचे आहे.बाबांच्या आठवणी शिवाय,पापाचे ओझे उतरु शकत नाहीत.तर बाबांच्या सोबत खुप योग पाहिजे.त्याची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. वेळ जवळ येत जातो,शरीरावर तर काहीच भरवसा नाही.अचानकच कसे कसे अपघात होत राहतात.अचानक मृत्यूची तर फुल सीजन आहे.तर प्रत्येकाने स्वतःला तपासायचे आहे,आपले कल्याण करायचे आहे.सर्व दिवसाचा हिशोब पाहायचा आहे,योग आणि चलन चा. आम्ही साऱ्या दिवसांमध्ये किती पाप केले? मनसा वाचा मध्ये प्रथम येतात,परत कर्मणा मध्ये येतात.आत्ता मुलांना राईटियस बुद्धी मिळाली आहे, कि आम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहेत. कोणाला धोखा तर नाही दिला? फालतू खोटे तर नाही बोलले?सेवे मध्ये विघ्न तर नाही आणत?कोणाच्या नावां रूपामध्ये फसले तर यज्ञ पित्याची निंदा करतात.

बाबा म्हणतात कोणाला दुःख देऊ नका.एका बाबाच्या आठवणीत रहा,ही तर जबरदस्त काळजी आहे.जर आम्ही आठवणीत राहू शकत नाही,तर आमची काय गती होईल?या वेळेत जर गफलत केली तर अंत काळात खूप पश्चाताप करावा लागेल,हे पण समजता जे हलके पद मिळवणारे आहेत,ते हल्के कमी पदच मिळवतील. बुद्धी द्वारे समजू शकतो आम्हाला काय करायचे आहे. सर्वांना हाच मंत्र द्या की बाबांची आठवण करा.लक्ष तर सर्व मुलांना मिळाले आहे.या गोष्टीला दुनिया वाले समजू शकत नाहीत.प्रथम मुख्य गोष्ट आहे कि,बाबांची आठवण करणे. रचनाकार आणि रचनेचे ज्ञान तर मिळाले आहे.रोज रोज कोणते ना कोणते नवीन ज्ञानाचे मुद्दे समजवण्या साठी दिले जातात.जसे विराट रुपाचे चित्र आहे,यावरती पण समजावू शकता, कसे वर्णांमध्ये येतात,हे पण शिडीच्या बाजूला ठेवण्याचे चित्र आहे.सर्व दिवस बुद्धीमध्ये हे चिंतन राहावे,की कसे कोणाला समजावून सांगावे?सेवा करण्या मुळे पण बाबांची आठवण राहील.बाबांच्या आठवणी द्वारे विकर्म विनाश होतील.स्वतःचे पण कल्याण करायचे आहे. बाबांनी समजवले आहे, तुमच्या वरती ६३ जन्माचे पाप आहे. पाप करत करत सतोप्रधान पासुन तमो प्रधान बनले आहात.आता माझे बणुन कोणते पाप कर्म करु नका.खोटे बोलणे सैतानी करणे,घरा मध्ये फुट पाडणे,ऐकीव गोष्टी वर विश्वास ठेवणे, हा धोबी पणा खुपच खराब आहे.बाबांशी योग नष्ट करतात,तर खूपच पाप झाले ना.शासनाचे पण फितुर असतात,शासनाच्या गुप्त गोष्टी कोणत्या दुष्मनाला ऐकवुन खूप नुकसान करतात,परत त्यांना खूप कडक सजा मिळते.तर मुलांच्या मुखाद्वारे नेहमी ज्ञानाच्या गोष्टीच निघायला पाहिजेत.उल्टे सुल्टे समाचार पण विचारायला नाही पाहिजेत.कसे कोणाला समजावून सांगतात?सर्व दिवस हेच विचार चालायला पाहिजेत. चित्रांच्या पुढे जाऊन बसायला पाहिजे. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान तर आहेना. भक्ती मार्ग मध्ये अनेक प्रकारच्या चित्रांची पूजा करत राहतात,काहीच जाणवत नाही.अंधश्रद्धा मूर्तिपूजा इ. गोष्टींमध्ये भारतात प्रसिद्ध आहे.आत्ता तुम्ही या गोष्टी समजवण्या मध्ये खूप कष्ट करतात.प्रदर्शनी मध्ये पण अनेक मनुष्य येतात.मनुष्य वेगवेगळे प्रकारचे असतात,कोणी तर समजतात,हे पाहण्या योग्य समजणे योग्य आहे,पाहू असे म्हणतात.परत सेवा केंद्रा मध्ये जात नाहीत.दिंवसे दिवस दुनियेची हालत खूपच खराब होत जात आहे. भांडणे खुप आहेत,परदेशा मध्ये काय काय होत आहे,गोष्टी विचारू नका. अनेक मनुष्य मरत राहतात. तमोप्रधान दुनिया आहे ना.जरी म्हणतात बॉम्ब बनवायला नाही पाहिजे परंतु ते म्हणतात तुमच्या जवळ तर खूप आहेत, परत आम्ही का नाही बनवायचे? बाँम्बस नाही बनवले तर गुलाम होऊन राहावे लागेल.जे काही मत निघते ते विनाशा साठीच आहे.विनाश होणार च आहे.असे म्हणतात शंकर प्रेरक आहे परंतु यामध्ये प्रेरणाची तर गोष्टच नाही. आम्ही तर अविनाशी नाटकावर अवलंबुण आहोत.माया खूपच तेज आहे.आमच्या मुलांना पण विकारांमध्ये घेऊन जाते.किती समजावले जाते,देहा सोबत प्रेम करू नका,नावा रूपांमध्ये फसू नका,परंतु माया तमोप्रधान अशी आहे,जी देहामध्ये फसवते,एकदम नाकालाच पकडते,माहित पण होत नाही. बाबा खूप समजावत राहतात,

श्रीमता वरती चाला परंतु चालत नाहीत. रावणाची मत लगेच बुद्धीमध्ये येते. रावण जेलमधून सोडत नाही.

बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा आणि मज पित्याची आठवण करा.आम्ही गेलो की गेलो.अर्ध्या कल्पाच्या रोगा पासून आम्ही सुटत आहोत.तेथे तर निरोगी काया आहे.येथे तर खूप रोगी आहेत.हा रौरव नर्क आहे ना.जरी ते लोक गरूडपूरान इत्यादी वाचतात परंतु वाचणे किंवा ऐकणाऱ्यांना,समज काहीच नाही.बाबा स्वता: म्हणतात, पूर्वी भक्तीचा नशा खूप होता.भक्तीमुळे भगवान मिळेल,हे ऐकून खुश होऊन भक्ती करत होते. पतीत बनतात तेव्हा तर बोलवतात.हे पतितपावन या.भक्ती करतात हे तर चांगलेच आहे,परत भगवंताची आठवण का करतात?असे समजतात भगवान भक्तीचे फळ देतो.कोणते फळ देतील हे कोणालाच माहिती नाही.बाबा म्हणतात गीता वाचणाऱ्याला पण समजावयला पाहिजे,तेच आपल्या धर्माच्या आहेत. प्रथम मुख्य गोष्ट गीतेमध्ये भगवानुवाच आहे.आता गीते चे भगवान कोण आहेत?भगवंताचा परिचय तर पाहिजे ना? तुम्हाला माहिती झाले आहे,आत्मा काय आहे, परमात्मा काय आहेत? मनुष्य ज्ञानाच्या गोष्टी ला किती घाबरतात.भक्ती खूप चांगली वाटते. ज्ञाना पासून तीन कोस दूर पळतात.अरे पावन बनणे तर चांगले आहे ना.आता पावन दुनियेची स्थापना,पतीत दुनिये चा विनाश होत आहे परंतु काहीच ऐकत नाहीत.बाबांच्या सूचना आहेत,वाईट ऐकू नका,वाईट पाहू नका इत्यादी परंतु माया परत म्हणते बाबाच्या गोष्टी ऐकू नका. मायेची सूचना आहे,शिवबाबा चे ज्ञान ऐकू नका.माया अशी जोरा मध्ये चापट मारते,जे बुद्धीत काहीच बसत नाही.बाबांची आठवण करू शकत नाहीत,मित्र संबंधी ची आठवण येते. बाबांची आज्ञा मानत नाहीत.बाबा म्हणतात माझीच आठवण करा आणि परत इमानदार न बनता,असे म्हणतात आम्हाला अमक्याची आठवण येते.त्यांची आठवण येईल तर विकारांमध्ये जातील.या गोष्टी द्वारे नफरत यायला पाहिजे.बिल्कुल खराब दुनिया आहे.आमच्या साठी तर नवीन दुनिया स्थापन होत आहे.तुम्हा मुलांना बाबा आणि सृष्टिचक्रा चा परिचय मिळाला आहे,तर त्या अभ्यासा मध्येच लागून राहिला पाहिजे.बाबा म्हणतात स्वतःच्या मनाला पहा.नारदाचे उदाहरण पण आहे ना.तर बाबा म्हणतात स्वतःला पहा,आम्ही बाबाची आठवण किती करतो.आठवणी द्वारेच पाप भस्म होतील.कोणत्याही परिस्थितीमध्ये शिव बाबांची आठवण करायची आहे. दुसऱ्या कोणाशी प्रेम करायचे नाही. शेवटी शिवबाबा ची आठवण राहावी आणि प्राण तना मधून निघावेत. शिवबाबा ची आठवण असावी आणि सुदर्शन चक्राचे ज्ञान असावे.सुदर्शन चक्रधारी कोण आहेत,हे पण कोणालाच माहिती नाही.ब्राह्मणांना हे ज्ञान कोणी दिले.ब्राह्मणाला सुदर्शन चक्रधारी कोण बनवतात.परमपिता परमात्मा,ते बिंदी आहेत.तर काय बाबा पण स्वदर्शन चक्रधारी आहेत,होय.प्रथम तर तेच आहेत,नाहीतर आम्हा ब्राह्मणांना कोण बनवेल.सारी रचनाच्या आदी मध्य अंतचे ज्ञान त्यांच्यामध्ये आहे.तुमची आत्मा पण बनते.ते पण आत्माच आहेत.भक्तिमार्ग मध्ये विष्णुला चक्रधारी बनवले आहे.आम्ही सांगतो परमात्म त्रिकालदर्शी,त्रिमूर्ती,त्रिनेत्री आहेत.ते आम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनवतात.ते पण जरुर मनुष्य तना मध्ये येऊन ऐकवतील.रचनाच्या आदी मध्य अंतचे ज्ञान,रचनाकारच ऐकावतील ना.रचनाकाराची कोणालाच माहिती नाही,तर रचनेबद्दल चे ज्ञान कसे मिळेल.आता तुम्ही समजता शिव बाबा स्वदर्शन चक्रधारी आहेत.ते ज्ञानाचे सागर आहेत,ते जाणतात आम्ही कसे ८४ च्या चक्र मध्ये कसे येतो.स्वतः तर पुनर्जन्म घेत नाहीत,त्यांना ज्ञान आहे, जे आम्हाला ऐकवतात.तर प्रथम शिवबाबा स्वदर्शन चक्रधारी झाले ना. शिव बाबा आम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनवतात,पावन बनवतात कारण पतित-पावन आहेत.रचनाकार पण तेच आहेत.बाबा मुलांच्या जीवनाला जाणतात.शिवबाबा ब्रम्हा द्वारे स्थापना करतात.तेच करता करविता आहेत ना. तुम्ही स्वतः शिका आणि दुसर्यांना पण शिकवा.बाबा शिकवतात परत म्हणतात तुम्ही दुसऱ्यांना पण शिकवत राहा.तर शिवबाबाच तुम्हाला स्वदर्शन चक्रधारी बनवतात.ते म्हणतात मला सृष्टि चक्राचे ज्ञान आहे,तेव्हा तर ऐकवतो.तर ८४ जन्म कसे घेतात,ही८४ जन्माची गोष्ट बुद्धीमध्ये राहायला पाहिजे.हे बुद्धी मध्ये राहील तर चक्रवर्ती राजा बनू शकतात. हे ज्ञान आहे,बाकी योगाद्वारे पाप नष्ट होतात.सर्व दिवसाची दिनचर्या पहा. बाबाची आठवण नाही कराल,तर दिनचर्या पण काय तपासणार?सर्व दिवसांमध्ये काय काय केले, हे तर आठवणीत राहते ना.असे पण मनुष्य आहेत,आपली दिनचर्या रोज लिहतात, किती ग्रंथ वाचले,किती पुण्य केले. तुम्ही तर म्हणता किती वेळ आठवण केली,किती खुशी मध्ये,आनंदामध्ये येऊन बाबांचा परिचय दिला.बाबा द्वारे ज्ञानाचे मुद्दे तर मिळाले आहेत,त्यांचे सारखे मंथन करायचे आहे.जे ज्ञान मिळाले आहे,त्याला बुद्धीमध्ये ठेवून रोज मुरली वाचा,हे पण चांगले आहे. मुरली मध्ये ज्ञानाच्या गोष्टी येतात,त्यांचे सारखे मंथन करायला पाहिजे.मधुबन मध्ये राहणाऱ्या पेक्षा पण परदेशात राहणारे जास्त आठवण करतात.अनेक बंधनयुक्त माता आहेत,बाबांना कधी पाहिले नाही,खूप आठवण करतात.नारायणी नशा चढलेला आहे, घरी बसून साक्षात्कार होतो,ऐकता ऐकता निश्चय होऊन जातो.बाबा म्हणतात स्वतःला तपासत रहा की आम्ही किती उच्च पद मिळवू शकतो? माझी चलन कशी आहे?कोणत्या खानपान ची लालसा तर नाही?कोणती खराब सवय राहयला नाही पाहिजे. मुख्य गोष्ट आहे अव्यभिचारी आठवणी मध्ये राहणे. मनाला विचारा,आम्ही बाबांची कितीआठवण करतो?कितीवेळ दुसऱ्यांची आठवण करतो?ज्ञानाची धारणा पण करायची आहे,तसेच पाप पण नष्ट करायचे आहेत.कोणी कोणी असे पाप केले आहेत,जे विचारू नका. भगवान म्हणतात असे करा,परंतु ते म्हणतात आम्ही मायाच्या वश आहोत. अच्छा,मायाच्या वश रहा.तुम्हाला तर श्रीमतावर चालायचे आहे,का आपल्या मतावर?अशा परिस्थिती मध्ये किंवा अवस्थेमध्ये आम्ही किती मार्काने पास होऊ?कोणते पद मिळवू? २१जन्माचे नुकसान होते,जेव्हा कर्मातीत अवस्था होईल परतदेह अभिमानाचे नाव पण राहणार नाही,म्हणून बाबा म्हणतात देही अभिमान बना. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बापदादा ची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणे साठी मुख्य सारांश:- (१)कोणते पण कर्तव्य असे करायची नाही,ज्यामुळे यज्ञ पित्याची निंदा होईल.बाबा द्वारा राईट बुद्धी मिळाले आहे,त्या बुद्धी द्वारे श्रेष्ठ कर्म करायचे आहेत.कोणालाही दुःख द्यायचे नाही.

(२) एक दोघांना उल्टा सुल्टा समाचार विचारायचं नाही.आपसा मध्ये ज्ञानाच्या गोष्टी करायच्या आहेत.खोटे,शैतानी कर्म करणे,घरामध्ये फूट पाडणे,अशा गोष्टी सोडून मुखाद्वारे नेहमी ज्ञानाचे रत्नच काढायचे आहेत.खराब गोष्टी ऐकायच्या नाहीत आणि ऐकावयाच्या नाहित.

वरदान:-
खुशीच्या अखुट खजान्या द्वारे भरपूर,नेहमी बेफिक्र बादशाह भव. खुशीच्या सागरा द्वारे रोज खुशीचा अखुट खजाना मिळत आहे,म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये खुशी गायब होऊ शकत नाही.कोणत्याही गोष्टीचे फिक्र राहू शकत नाही.असे नाही संपत्तीचे काय होईल,परिवाराचे काय होईल? परिवर्तनच होईल ना.जुन्या दुनिया मध्ये किती पण श्रेष्ठ आहे परंतु सर्व जुनेच आहे,म्हणून बेफिक्र बनले. जे होईल ते चांगलेच होईल. ब्राह्मणां साठी सर्व चांगले आहे,काहीच वाईट नाही.तुमच्याजवळ अशी बादशाही आहे,ज्याला कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

बोधवाक्य:-
या संसरा ला एक अलौकिक खेळ आणि परिस्थितीला खेळणी समजून चाला,तर कधीच निराश होणार नाहीत.