19-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, जेव्हा पण वेळ मिळेल तर एकांतामध्ये बसून खऱ्या साजनची आठवण करा, कारण आठवणीने स्वर्गाची बादशही मिळेल."

प्रश्न:-
बाबा मिळाले आहेत तर कोणता निष्काळजीपणा नाहीसा झाला पाहिजे?

उत्तर:-
काही मुले अलबेले बनून म्हणतात कि, आम्ही तर बाबाचेच आहोत. आठवणीची मेहनत करत नाहीत. वारंवार आठवण विसरून जातात. हा निष्काळजीपणा आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, जर आठवणी मध्ये राहिला तर आतून कायमची खुशी राहील. कोणत्या पण प्रकारचा घुटका येणार नाही. जसे बंधनमुक्त माता आठवणीमध्ये तडफतात. दिवस-रात्र आठवण करतात. तसे तुम्ही पण निरंतर आठवणीत राहिले पाहिजे.

गीत:-
तकदीर जगाकर आई हूँ. . . . .

ओम शांती।
बाबानी मुलांना समजावले आहे. तुम्ही पण म्हणता ओम शांती,बाबा पण म्हणतात ओम शांती, म्हणजे तुम्ही आत्मे शांत स्वरूप आहात. बाबा पण शांत स्वरूप आहेत. आत्म्याचा स्वधर्म शांत आहे. परमात्म्याचा पण स्वधर्म शांत आहे. तुम्ही पण शांतीधाम मध्ये राहणारे आहात. बाबा पण म्हणतात कि, मी पण तेथील राहणारा आहे. तुम्ही मुले पुनर्जन्म घेत आले आहात. मी घेत नाही. मी या रथामध्ये प्रवेश करतो. हा माझा रथ आहे. शंकराला जर विचारले, विचारू तर शकणार नाहीत, परंतु समजा, सूक्ष्मवतन मध्ये जाऊन कोणी विचारले तर म्हणतील, हे सूक्ष्म शरीर माझे आहे. शिवबाबा म्हणतात, हे माझे शरीर नाही. मी हे उधार घेतले आहे. कारण मला पण कर्मेन्द्रियाचा आधार पाहिजे. पहिली मुख्य गोष्ट समजावयाची आहे कि, पतित-पावन ज्ञानाचे सागर श्रीकृष्ण नाहीत. श्रीकृष्ण सर्व आत्म्यांना पतिता पासून पावन बनवित नाहीत. ते तर येऊन पावन दुनिये मध्ये राज्य करतात. प्रथम राजकुमार बनतात, मग महाराजा बनतात. त्यांच्या मध्ये हे ज्ञान नाही. रचनेचे ज्ञान तर रचता मध्ये असेल ना. श्रीकृष्णाला रचना म्हटले जाते.रचता बाबाच येऊन ज्ञान देत आहेत. आता बाबा रचत आहेत. म्हणतात कि, तुम्ही माझी मुले आहात. तुम्ही पण म्हणत आहात, बाबा आम्ही तुमचे आहोत. म्हटले पण जाते, ब्रह्मा द्वारा ब्राह्मणांची स्थापना. नाही तर ब्राह्मण कुठून येतील‌. सूक्ष्म वतन वाले ब्रह्मा काही दुसरे नाहीत. वरचे ते खालचे, तेच वरचे आहेत. एकच आहेत. बरं, विष्णू आणि लक्ष्मी नारायण पण एकच आहेत, ते कुठले आहेत. ब्रह्मा ते विष्णू बनत आहेत. ब्रह्मा सरस्वतीच ते लक्ष्मी नारायण, मग ते सारा कल्प 84 जन्मानंतर येऊन संगमयुगा वर ब्रह्मा-सरस्वती बनत आहेत. लक्ष्मी नारायण पण मनुष्य आहेत. त्यांचा देवी देवता धर्म आहे. विष्णु ला पण चार भुजा दिल्या आहेत. हा प्रवृत्ती मार्ग दाखविला आहे. भारता मध्ये सुरुवाती पासूनच प्रवृत्ती मार्ग चालत आला आहे. त्यामुळे विष्णूला चार भुजा दिल्या आहेत. इथे ब्रह्मा-सरस्वती आहेत. ही सरस्वती दत्तक मुलगी आहे. यांचे मूळ नाव लखीराज होते. मग त्यांचे नाव ब्रह्मा ठेवले. शिवबाबानी यांच्या मध्ये प्रवेश केला‌ आणि राधेला आपले बनविले, नाव सरस्वती ठेवले. सरस्वतीचे ब्रह्मा कांही लौकिक पिता नाहीत. या दोघांचे लौकिक पिता आपापले होते‌. आता ते नाहीत. शिवबाबानी ब्रह्मा द्वारे दत्तक घेतले आहे. तुम्ही तर दत्तक मुले आहात. ब्रह्मा पण शिवबाबाचा मुलगा आहे. ब्राह्मणाच्या मुख कमळाद्वारे रचत आहेत. त्यामुळे ब्राह्माला पण माता म्हटले जाते. तुम्ही माता पिता आम्ही तुमची मुले तुमच्या कृपेने खूप सुख मिळते . . . गायन करतात ना. तुम्ही ब्राह्मण येऊन बालक बनले आहात. हे समजण्यासाठी बुद्धी फार चांगली पाहिजे. तुम्ही मुले शिवबाबा कडून वरसा घेत आहात. ब्रह्मा कांही स्वर्गाचे रचता किंवा ज्ञान सागर नाहीत. ज्ञानसागर एकच बाबा आहेत. आत्म्याचे पिता ज्ञानाचे सागर आहेत. आत्मा पण ज्ञानसागर बनत आहे. परंतु यांना ज्ञानाचे सागर म्हणत नाहीत, कारण सागर एकच आहे. तुम्ही सर्व नद्या आहात. सागराला स्वतःचे शरीर नाही. नद्यांना आहे. तुम्ही ज्ञान नद्या आहात. कलकत्त्या मध्ये ब्रह्मपुत्रा नदी फार मोठी आहे, कारण तिचा सागरा बरोबर संबंध आहे, त्यांचा मेळा फार मोठा लागतो. इथे पण मेळा लागत आहे. सागर आणि ब्रह्मपुत्रा दोन्ही एकत्र आहेत. हे चैतन्य आहेत, ते जड आहेत. या गोष्टी बाबा समजावत आहेत‌‌. शास्त्रा मध्ये नाहीत. शास्त्र भक्तिमार्गाचा विभाग आहे. हा ज्ञान मार्ग आहे, तो भक्तिमार्ग आहे. अर्धा कल्प भक्तिमार्गाचा विभाग चालतो‌, त्यामध्ये ज्ञानसागर नाहीत. परमपिता परमात्मा, ज्ञानाचे सागर बाबा संगमयुगावर येऊन, ज्ञान स्नानाने सर्वांची सदगती करत आहेत.

तुम्ही जाणले आहे कि, आम्ही बेहदच्या बाबा कडून स्वर्गाच्या सुखाचे नशीब बनवित आहोत. बरोबर आम्ही सतयुगा त्रेता मध्ये पूज्य देवी देवता होतो. आता आम्ही पुजारी मनुष्य आहोत. मग मनुष्या पासून तुम्ही देवता बनत आहात. ब्राह्मण तेच देवता धर्मामध्ये येतात, मग क्षत्रिय, वैश्य शूद्र बनतात‌.जन्म घेत घेत खाली उतरावे लागते. हे पण तुम्हाला बाबाने सांगितले आहे. तुम्ही तुमच्या जन्माला ओळखत नव्हता. 84 जन्म पण तुम्हीच घेत आहात. जे पहिल्या प्रथम येतात, तेच पूर्ण 84 जन्म घेतात. आठवणीनेच तुमच्यातील भेसळ निघून जाते. आठवणी मध्येच मेहनत आहे. जरी काही मुले ज्ञाना मध्ये हुशार आहेत, परंतु आठवणी मध्ये कच्चे आहेत. बंधनयुक्त माता योगा मध्ये स्वतंत्र असलेल्या पेक्षा चांगल्या आहेत. त्या तर शिवबाबा ला भेटण्यासाठी रात्रंदिवस तडपत आहेत. तुम्ही भेटले आहात. तुम्हाला म्हटले जाते आठवण करा, तर तुम्ही वारंवार विसरून जात आहात. तुम्हाला तुफान फार येतात. ते आठवणी मध्ये तडपत आहेत. तुम्ही तडपत नाहीत. त्यांना घरी बसून पण उंच पद मिळून जाते. तुम्ही मुले जाणत आहात, बाबाच्या आठवणी मध्ये राहिल्याने आम्हाला स्वर्गाची बादशाही मिळत आहे. जसे मुल गर्भातून बाहेर निघण्यासाठी तडपते, तसे बंधनयुक्त माताचे आहे, तडफडून तडफडून बोलावत आहेत. शिवबाबा या बंधनातून बाहेर काढा. दिवस-रात्र आठवण करतात. तुम्हाला बाबा मिळाले आहेत तर तुम्ही निष्काळजी बनले आहात. आम्ही बाबाची मुले आहोत. आम्ही हे शरीर सोडून जाऊन राजकुमार बनू, ही आतून स्थायी खुशी राहिली पाहिजे. परंतु माया आठवण करू देत नाही. आठवणी मुळे खुशी मध्ये फार राहाल. आठवण केली नाही तर घुटके खात राहाल. अर्धा कल्प तुम्ही रावण राज्या मध्ये दुःख पाहिले आहे. अकाली मृत्यु होत आले आहेत. दुःख तर आहेच. जरी किती पण सावकार असाल दुःख तर होत आहे ना. अकाली मृत्यू होऊन जातात. सतयुगा मध्ये असे अकाली मरत नाहीत. कधी आजारी पडत नाहीत. वेळेवर बसल्या बसल्या स्वतःचे एक शरीर सोडून दुसरे घेतात. त्याचे नाव सुखधाम आहे. मनुष्य तर स्वर्गा तील गोष्टीला कल्पना समजत आहेत. म्हणतात स्वर्ग कुठून आला. तुम्ही ओळखत आहात, आम्ही तर स्वर्गा मध्ये राहणारे मग 84 जन्म घेत आहोत. हा सारा खेळ भारतावरच बनलेला आहे. तुम्ही ओळखले आहे, आम्ही 21 जन्म पावन देवी देवता होतो, मग आम्ही क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनून आता परत ब्राह्मण बनले आहोत. हे स्वदर्शन चक्र फार सहज आहे. हे शिवबाबा बसून समजावत आहेत.

तुम्ही ओळखले आहे, शिवबाबा ब्रह्माच्या रथामध्ये आले आहेत. जे ब्रह्मा आहेत, तेच सतयुगाच्या आदि मध्ये श्रीकृष्ण होते. 84 जन्म घेऊन पतित बनले आहेत. मग त्यांच्या मध्ये बाबाने प्रवेश करून दत्तक घेतले आहे. आता म्हणतात, मी या तना चा आधार घेऊन, तुम्हाला आपले बनविले आहे. मग तुम्हाला स्वर्गाच्या राजधानी साठी लायक बनवित आहेत. जे लायक बनतात, तेच राजाई मध्ये येतील. यामध्ये वागणे चांगले पाहिजे. मुख्य पवित्रता आहे.यावर मुलीवर अत्याचार होत आहेत. कुठे कुठे पुरुषावर पण अत्याचार होतात. विकारा साठी एक दोघाला तंग करतात. इथे माता अनेक आहेत, त्यामुळे शिवशक्ती सेना नाव ठेवले आहे. गायन आहे वंदे मातरम. आता तुम्ही ज्ञान चितेवर बसले आहात. काम चिते वरून उतरून गोरे बनण्यासाठी. द्वापार पासून काम चितेवर बसले आहात. एक दोघाला विकारी बनविण्याचा हाथीयाला विकारी ब्राह्मण बांधतात. तुम्ही निर्विकारी ब्राह्मण आहात. तुम्ही तो रद्द करून, ज्ञान चितेवर बसवित आहात. काम चिंतेमुळे काळे बनले आहात. ज्ञान चितेने गोरे बनाल. बाबा म्हणतात, भले एकत्र राहा. परंतु प्रतिज्ञा करायची आहे कि, आम्ही विकारा मध्ये जाणार नाही. त्यामुळे बाबा आंगठी पण घालतात. शिवबाबा, पिता पण आहेत, साजन पण आहेत. सर्व सीताचे राम आहेत. तेच पतित पावन आहेत. बाकि रघुपती राघव राजाराम ची गोष्ट नाही. त्यांनी संगमयुगावरच ही प्रालब्ध प्राप्त केली होती. त्यांना हिंसक बाण दाखविणे चुकीचे आहे. चित्रां मध्ये पण दिले नाही पाहिजेत, फक्त लिहायचे चंद्रवंशी. मुलाना समजावले पाहिजे, शिवबाबा यांच्या द्वारे आम्हाला या चक्राचे रहस्य समजावत आहेत. सत्यनारायणाची कथा होते ना. ती मनुष्याने बनविलेली कथा आहे. नरा पासून नारायण कोण बनवित नाहीत‌. सत्यनारायणा च्या कथेचा अर्थच आहे, नरापासून नारायण बनणे. अमर कथा पण सांगतात, परंतु अमरपुरी मध्ये तर कोणी जात नाहीत. मृत्युलोक अडीच हजार वर्षे चालतो. तिजरी ची कथा माता ऐकतात. खरेतर ही तिसरा ज्ञानाचा नेत्र देण्याची कथा आहे. आता ज्ञानाचा तिसरा नेत्र आत्म्याला मिळाला आहे. तर आत्म अभिमानी बनायचे आहे. मी या शरीराद्वारे आता देवता बनत आहे. माझ्या मध्ये संस्कार आहेत‌. सर्व मनुष्य देहअभिमानी आहेत. बाबा येऊन देही अभिमानी बनवित आहेत. लोक तरी पण म्हणतात, आत्मा परमात्मा एक आहेत. परमात्म्याने ही सर्व रूपे धारण केली आहेत‌. बाबा म्हणतात, हे सर्व चुकीचे आहे. याला मिथ्या अभिमान, मिथ्या ज्ञान म्हटले जाते. बाबा सांगत आहेत, मी बिंदी सारखा आहे. तुम्ही पण ओळखत नव्हता. हे पण ओळखत नव्हते. आता बाबा समजावत आहेत, यामध्ये संशय आला नाही पाहिजे. निश्चय झाला पाहिजे. बाबा जरूर सत्यच बोलत आहेत. संशय बुद्धि विनश्यंती. ते पूर्ण वरसा घेणार नाहीत. आत्म अभिमानी बनण्या मध्येच मेहनत आहे. भोजन बनविताना, बुद्धी बाबा कडे लागली पाहिजे. प्रत्येक गोष्टी मध्ये हा अभ्यास केला पाहिजे. चपाती लाटताना आपल्या साजनची आठवण करत राहा. हा अभ्यास प्रत्येक गोष्टी मध्ये पाहिजे. जेवढा वेळ मिळेल, आठवण करायची आहे. आठवणीने तुम्ही सतोप्रधान बनाल. आठ तास कर्मासाठी सुट्टी आहे. मध्ये पण एकांता मध्ये जाऊन बसले पाहिजे. तुम्हा सर्वांना बाबाचा परिचय पण सांगायचा आहे. आज ऐकले नाही, तर उद्या येतील. बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत. आम्ही स्वर्गा मध्ये होतो. आता परत नर्कवासी बनले आहोत. आता परत बाबा कडून वरसा मिळाला पाहिजे. भारतवाशींनाच समजावत आहेत. बाबा भारता मध्ये येत आहेत. तुमच्या जवळ मुसलमान लोक पण येतात. ते पण सेंटर सांभाळत आहेत. म्हणतात शिवबाबाची आठवण करा. शिख पण येतात, ख्रिश्चन पण येतात. पुढे चालून अनेक येतील. हे ज्ञान सर्वां साठी आहे, कारण ही सहज आठवण आहे आणि बाबाचा सहज वरसा आहे. परंतु पवित्र तर जरूर बनावे लागेल. दे दान तर सुटेल ग्रहण. आता भारतावर राहूचे ग्रहण आहे, मग बृहस्पतीची दशा सुरू होईल 21 जन्मासाठी. प्रथम बृहस्पतीची दशा असते, मग शुक्राची दशा. सूर्यवंशी वर बृहस्पति ची दशा, चंद्रवंशी वर शुक्राची दशा बसते. मग कमी होऊन जाते. सर्वात खराब आहे राहु ची दशा. बृहस्पती कोणी गुरु असत नाही. ही वृक्षपतीची दशा आहे. वृक्षपती बाबा येतात, तर ब्रहस्पतीची आणि शुक्र ची दशा होते. रावण येतो तर राहूची दशा होऊन जाते. तुम्ही मुलावर आता बृहस्पती ची दशा बसली आहे. फक्त वृक्षपतीची आठवण करा. पवित्र बना. बस. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) प्रत्येक कार्य करताना आत्मा अभिमानी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. देहाचा अहंकार नाहीसा होऊन जाईल, त्यासाठी मेहनत करायची आहे.

(२) सतयुगी राजाई च्या लायक बनण्यासाठी आपले वागणे उत्तम बनवायचे आहे. पवित्रता सर्वात उंच वागणे आहे. पवित्र बनल्या मुळेच पवित्र दुनियेचे मालक बनाल.

वरदान:-
भोळेपणा बरोबर सर्वोच्च अधिकारी बनून मायेचा सामना करणारे शक्ती स्वरूप भव:

कधी कधी भोळेपण फारच मोठे नुकसान करून टाकते. सरलता भोळे रूप धारण करते, परंतु असे भोळे बनू नका. जो सामना करू शकणार नाहीत. सरलते बरोबर सामावणे आणि सहन करण्याची शक्ती पाहिजे. जसे बाबा भोळेपणा बरोबर सर्वोच्च अधिकारी आहेत. तसे तुम्ही पण भोळेपणा बरोबर शक्तीस्वरूप पण बना, तर मायेचा गोळा लागणार नाही. माया सामना करण्या ऐवजी नमस्कार करेल.

बोधवाक्य:-
आपल्या हृदयामध्ये आठवणीचा झेंडा फडकवा तर प्रत्यक्षते चा झेंडा फडकत राहील.