कर्मातीत स्थितीची रहस्ययुक्त परिभाषा
आज विदेही बाप दादा आपल्या विदेही स्थितित स्थिर राहणाऱ्या श्रेष्ठ मुलांना पाहत आहेत. प्रत्येक ब्राह्मण आत्मा विदेही बनण्याच्या किंवा कर्मातीत बनवण्याच्या श्रेष्ठ लक्ष्याला घेऊन संपूर्ण स्थितीच्या जवळ येत आहेत. तर आज बाप दादा मुलांच्या कर्मातीत स्थितीच्या जवळीकतेला पाहत होते की, कोण - कोण किती जवळ पोहोचलेले आहेत, " ब्रह्मा बाबाचे अनुकरण" कुठपर्यंत केले आहे किंवा करत आहेत?सर्वांचे लक्ष्य बाबा समान आणि समिप बनण्याचे आहे परंतु प्रत्यक्षात क्रमांकानुसार बनतात . या देहात राहून विदेही म्हणजेच कर्मातीत बनण्याचे उदाहरण ब्रह्मा बाबा आहेत. कर्मातीत बनण्याची विशेषता काय आहे ? जोपर्यंत हा देह आहे, कर्मेन्द्रियां सोबत या कर्म क्षेत्रावर भूमिका निभावत आहेत, तोपर्यंत कर्मा विना एक सेकंद देखील राहू शकत नाहीत. कर्मातीत म्हणजे कर्म करतानाही कर्म बंधनाच्या बंधनातून मुक्त. एक आहे बंधन आणि दुसरा आहे संबंध. कर्मेंद्रिया द्वारे कर्माच्या संबंधात येणे वेगळी गोष्ट आहे, कर्माच्या बंधनात बांधले जाणे वेगळी गोष्ट आहे. कर्मबंधन कर्माच्या हद्दच्या फळाला वशीभूत बनवत असते. वशीभूत शब्दच सिद्ध करतो की,जो कुणाच्याही वशीभूत होतो तो भूता समान भटकणारा बनतो. ज्याप्रमाणे अशुद्ध आत्मा भूत बनून जेव्हा प्रवेश करते तेव्हा मनुष्य आत्म्याचे काय हाल होतात ? परवश होऊन भटकत राहतात. अशा कर्माच्या वशीभूत होऊन अर्थात कर्माच्या विनाशी फळाच्या इच्छेच्या वशीभूत होतात, तेव्हा कर्म देखील बंधनात बांधून, बुद्धी द्वारे भटकवत राहतात, यालाच म्हटले जाते कर्मबंधन, जे स्वतःला व दुसऱ्याला देखील त्रास देते. कर्मातीत् म्हणजे जे कर्माच्या वश होत नाही परंतु मालक बनून, अधिकारी बनून कर्मेंद्रिययांच्या संबंधात येणारे . विनाशी कामना पासून अनासक्त राहून इंद्रियांच्या द्वारे कर्म करणारे. कर्माने आत्म्याला आपल्या वश न करता आत्म्याने अधिकारी बनून कर्म करावे . कर्मेन्द्रिय आपल्या आकर्षणात आकर्षित करतात अर्थात कर्माच्या वशीभूत बनतात, वश होतात, बंधनात बांधले जातात. कर्मातीत म्हणजे कर्मापासून वेगळे . डोळ्याचे काम आहे पाहणे परंतु पहाण्याचे कार्य करवणारे कोण आहे? डोळे कर्म करतात आणि आत्मा कर्म करवून घेणारी आहे . तेव्हा करवुन घेणारी आत्मा कर्मेंद्रियांच्या वशीभूत होते, तेव्हा त्यास कर्मबंधन म्हणतात,तेव्हा कर्म करवुन घेणारे बना व कर्म करवुन घ्या, याला कर्म संबंधात येणे म्हणतात. कर्मातीत आत्मा संबंधात येते परंतु बंधनात बांधली जात नाही. कधी कधी म्हणतात ना की, बोलायचे नव्हते परंतु बोलले गेले, करायचे नव्हते परंतु केले गेले, यालाच म्हटले जाते कर्माच्या बंधनात वशीभूत आत्मा .अशी आत्मा कर्मातीत स्थितीच्या जवळ जाईल की दूर?
कर्मातीत अर्थात देह, देहाचे संबंध, पदार्थ, लौकिक,अलौकिक दोन्ही संबंधाने, परंतु देहामध्ये किंवा संबंधात जर अधीनता असेल तर संबंध देखील बंधन मानले जाईल. संबंध शब्द निराळा आणि प्रियतेचा अनुभव करवुन देणारा आहे.आजच्या सर्व आत्म्यांचा संबंध बंधनाच्या रुपात बदलला आहे,जेथे संबंध बंधनाच्या रुपात बनतात, तेव्हा बंधन सदैव स्वतःला कोणत्या ना कोणत्या रूपात त्रास देत राहतात, दुःखाच्या लहरींचा अनुभव करवेल, उदासीचा अनुभव देईल, विनाशी प्राप्ती असून देखील अल्पकाळासाठी सुखाचा अनुभव देतील, सुखा सोबत प्राप्तीच्या स्वरूपाचा अनुभव होईल, आता- आता प्राप्ती असूनही अप्राप्त स्थितीचा अनुभव होईल, भरपूर असूनही रिकामेपणाचा अनुभव येईल, सगळे असतानाही आणखी काही पाहिजे असा अनुभव येईल आणि जेथे पाहिजे ! पाहिजे ! आहे तेथे कधीच समाधान राहणार नाही. मन संतुष्ट, तन देखील संतुष्ट आणि दुसरे देखील संतुष्ट, हे नेहमी होणार नाही . कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे स्वतःवर नाराज किंवा दुसऱ्यांवर इच्छा नसतानाही नाराज राहतात, कारण नाराज म्हणजे राजला, रहस्याला न समजणारे. अधिकारी बनून कर्मेंद्रियां कडून कर्म करण्याचे रहस्य जर समजले नाही तर नाराज होणारच ना ? कर्मातीत कधी नाराज होणार नाहीत कारण ते कर्म संबंध आणि कर्म बंधनाच्या रहस्याला जाणतात, कर्म करा परंतु वशीभूत होऊन नाही, अधिकारी, मालक होऊन करा. कर्मातीत म्हणजे आपल्या मागील कर्मांच्या हिशोबाच्या बंधनापासून मुक्त, खुशाल मागील कर्मांच्या हिशोबाच्या फलस्वरूपात शरीराचा आजार असेल, मनाचे संस्कार इतर आत्म्याच्या संस्काराच्या सोबत टकराव करत असतील परंतु कर्मातीत, कर्म भोगाच्या वशीभुत न होता मालक बनुन नष्ट करायचे आहेत.कर्मयोगी बनून कर्मभोग मिटवायचे आहेत, ही कर्मातीत बनण्याची लक्षणं आहेत . योगाने कर्मभोगला हसुन, सुळाचा काटा करून भस्म करणे अर्थात कर्मभोग समाप्त करणे होय. कर्म भोग व्याधीचे रूप बनता कामा नये जर व्याधीचे रूप बनले,तर ते स्वतः सदैव व्याधीचेच वर्णन करत राहतील, मनानेही आणि मुखाने ही वर्णन करत राहतील . दुसरी गोष्ट, व्याधीचे रूप झाल्याने स्वतः दुःखी आणि दुसऱ्यांनाही दुखी करतील,ते ओरडत राहतील आणि कर्मातीत वाला पुढे निघून जाईल, कुणाला थोड्याशा वेदना झाल्या की खूप रडत राहतात आणि कुणाला खूप वेदना होऊनही पुढे चालत राहतात.कर्मातीत स्थितीमध्ये राहणारे देहाचा मालक असल्याने कर्मभोग असूनही अनासक्त बनण्याचे अभ्यासू असतात. ते मध्ये - मध्ये अशरीरी स्थितीचा अनुभव आजारापासून वेगळा करतात. जसे विज्ञानाच्या साधनाद्वारे बेशुद्ध करतात, तेव्हा वेदनाही विसरल्या जातात, वेदनांचा अनुभव होत नाही, कारण औषधाची गुंगी असते, तेव्हा कर्मातीत अवस्था असणारे अशरीरी बनण्याच्या अभ्यासामुळे, मध्ये-मध्ये हे आत्मिक इंजेक्शन घेत असतात, त्यामुळे सुळापासून काट्याचा अनुभव येतो आणि म्हणजे, "फॉलो फादर"(ब्रह्मा बाबा चे अनुकरण ) असल्याकारणाने विशेष आज्ञाकारी बनण्याचे प्रत्यक्ष फळ, त्यापासून विशेष मनापासून आशीर्वाद मिळतात. एक - आपला अशरीरी बनण्याचा अभ्यास, दुसरा -आज्ञाकारी बनण्याचे प्रत्यक्ष फळ म्हणजे बाबांचा आशिर्वाद, तो आजार म्हणजे कर्मभोगाला सुळा पासून काटा बनवणे. कर्मातीत श्रेष्ठ आत्मा कर्मभोगला कर्मयोगाच्या स्थितीमध्ये परिवर्तन करत असते . तर असा अनुभव आहे का किंवा खूप मोठी गोष्ट समजता ? सहज आहे की अवघड? छोट्या गोष्टीला मोठी बनवणे किंवा मोठ्या गोष्टीला छोटी बनवणे, हे आपल्या स्थितीवर अवलंबून आहे. व्यथित होणे किंवा आपल्या अधिकारपणाच्या नशेत राहणे, हे आपल्या वरती आहे, काय झाले ! जे झाले ते चांगले ! हे आपल्यावर आहे, हा निश्चय वाईटला चांगल्या मध्ये बदलू शकतो,कारण हिशोब नष्ट केल्यामुळे किंवा वेळेनुसार प्रत्यक्ष परीक्षा नाटका नुसार झाल्यामुळे काही गोष्टी चांगल्या रूपात समोर येतील, आणि अनेक वेळा चांगले असूनही बाहेरचे रूप नुकसान कारक असेल किंवा ज्याला तुम्ही म्हणतात की, हे या रूपापेक्षा चांगले नाही त्या गोष्टी येतात, आतापर्यंत अशा अनेक रूपात गोष्टी आलेल्या आहेत आणि येत राहतील, परंतु नुकसानीच्या पडद्यामागे फायदा लपलेला होता, बाहेरून नुकसानीचा पडदा दिसतो, जर थोडावेळ धैर्य व सहनशील स्थितीत राहुन अंतर्मुख होऊन पाहिल्यास बाहेरच्या पडद्यामागे जे लपले आहे तेच तुम्हाला पाहायला मिळेल. वरचे पाहूनही पाहणार नाहीत कारण होली हंस आहात ना! जेव्हा तो हंस दगड आणि रत्नांना वेगळे करू शकतो तर पवित्र हंस ही आपल्या लपलेल्या फायद्याला घेऊ शकेल, नुकसानीत लपलेल्या फायद्याला शोधून काढेल. समजलं! लवकर घाबरतात ना ? त्याने काय होते ? जो चांगला विचार आला होता, घाबरल्यामुळे निघून जातो, तेव्हा घाबरू नका. कर्माला पाहून कर्म बंधनामध्ये फसू नका. काय झालं, कसं झालं,असे व्हावयास नको होते, माझ्याकडूनच का असे होते, माझे भाग्यच असे आहे . अशा दोऱ्या बांधत राहतात.
हे संकल्प दोर बनतात, म्हणून कर्माच्या बंधनात येतात, व्यर्थ संकल्पच कर्म बंधनाच्या सूक्ष्म दोऱ्या आहेत, कर्मातीत आत्मा म्हणेल, जे होत आहे ते चांगले ! मी पण चांगला! बाबा पण चांगले! ड्रामा पण चांगला! हे संकल्प बंधनाला कापणाऱ्या कात्रीचे काम करेल, बंधन कापल्यावर कर्मातीत बनाल. कल्याणकारी बाबांचे मुलं असल्याने संगम युगातील प्रत्येक सेकंद कल्याणकारी आहे, प्रत्येक सेकंदाचा तुमचा धंदा कल्याणकारी असेल, सेवाही कल्याणकारी असेल, ब्राह्मणाचा व्यवसाय विश्व परिवर्तन- विश्व कल्याणी आहे . अशा निश्चय बुद्धी आत्म्याला प्रत्येक क्षण निश्चितच कल्याणकारी आहे . समजलं!
आता तर कर्मातीत शब्दाची परिभाषा मोठी आहे, जशी कर्माची गती गहन आहे कर्मातीत स्थितीची परिभाषा देखील मोठी महान आहे, आणि कर्मातीत बनणे गरजेचे आहे . कर्मातीत बनल्याशिवाय बरोबर जाणार नाहीत . कोण बरोबर जाणार? जे समान बनतील .ब्रह्मा बाबांना पाहिलंत ? कर्मातीत स्थितीला कसे प्राप्त केले. कर्मातीत बनणे म्हणजे सोबत जाण्यासाठी पात्र बनणे . आज एवढेच सांगणार आहे. एवढे तपासा ! मग आणखी सांगितले जाईल !अच्छा!
सर्व अधिकारी स्थितीमध्ये स्थिर राहणारे, कर्मबंधनाला कर्माच्या संबंधात परिवर्तन करणारे, कर्मभोगाला कर्मयोगाच्या स्थितीमध्ये,सुळाला काटा बनवणारे, प्रत्येक सेकंदाचे कल्याण करणारे, सदैव ब्रह्मा बाबा समान कर्मातीत स्थितीला जवळ अनुभव करणारे, अशा विशेष आत्म्यांना बाप दादांची गोड आठवण आणि नमस्कार.
अव्यक्त बापदादा ची पार्टीसोबत मुलाखत
१) सदैव स्वतःला समर्थ पित्याचे समर्थ मुले अनुभव करता का ? कधी समर्थ, कधी कमजोर, असे तर नाही ना ? समर्थ अर्थात सदैव विजयी,समर्थाचा कधी पराभव होऊ शकत नाही, स्वप्नात देखील हार होणार नाही. स्वप्न,संकल्प आणि कर्म सर्वांमध्ये सदैव विजयी, यालाच समर्थ म्हणतात,असे समर्थ आहात ? कारण जे आता विजयी बनतात तेच खूप काळापासून विजयी मालेचे गायन-पूजन योग्य बनतात. जर विजयी नसाल,समर्थ नसाल तर गायन-पूजन योग्य बनणार नाहीत . जे सदैव आणि खुप काळाचे विजयी आहेत, तेच खूप काळासाठी विजय माळे मध्ये येतात, आणि जे कधी कधी विजयी बनतात ते कधी - कधी म्हणजेच, सोळा हजाराच्या माळेत येतात,तेव्हा खूप काळासाठीचा हा हिशोब आहे. १६ हजाराची माळा सर्वच मंदिरात असतेच असे नाही.
२) सर्व स्वतःला या विशाल नाटकातील मुख्य अभिनेता आत्मा अनुभव करता का? तुम्हा सर्वांची अभिनेत्याची भूमिका आहे.अभिनेते का बनले आहेत? कारण जो उंच ते उंच बाप शून्य आहे, त्याच्यासोबत भूमिका करत आहात,तर तुम्ही देखील शुन्य अर्थात बिंदू आहात . परंतु तुम्ही शरीरधारी बनतात आणि बाप सदैव बिंदू, तेव्हा शुन्या सोबत भूमिका करणारे मुख्य अभिनेता आहात, ही स्मृती सदैव राहिल्यास योग्य भूमिका निभावाल, स्वतः सावधान राहाल. जसे मर्यादित नाटकामध्ये अभिनेत्याची भूमिका करताना किती सावधान राहतात. सर्वात मोठी भूमिका तुमची आहे, सदैव या नशेत आणि आनंदात राहा. वा ! माझी अभिनेत्याची भूमिका ! ज्याला विश्वातील सारे आत्मे वारंवार पाहतात. हे जे द्वापार युगापासुन किर्तन करत आले आहेत, हे तुमच्या यावेळच्या अभिनेत्याच्या भूमिकेची आठवण आहे. किती छान आठवण बनली आहे . तुम्ही स्वतः अभिनेता बनले आहात, तेव्हा तुमच्या मागे अजूनही तुमचे गायन चालू आहे, शेवटच्या जन्मात देखील तुम्ही गायन ऐकत आहात, गोपी वल्लभाचे देखील गायन आहे, तर गुराख्याचे गोप गोपीकाचे देखील गायन आहे, पित्याचे शिवाच्या रूपात गायन आहे, तर मुलांचे शक्तींच्या रूपात गायन आहे, तेव्हा सदैव अभिनेत्याची भूमिका निभावणारे श्रेष्ठ आत्मे आहात, या आठवणीत, आनंदात पुढे जात राहा.
कुमारां सोबत :-
सहज योगी कुमार आहात ना ? निरंतरयोगी कुमार,कर्मयोगी कुमार, कारण कुमार जेवढे स्वतःला पुढे घेऊन जाऊ इच्छितात, तितके जाऊ शकतात . का ? निर्बंधन आहेत ! कोणतेही ओझे नाही ! आणि जबाबदारीही नाही म्हणून हलके आहेत, हलके असल्यामुळे जेवढे वर जाऊ इच्छितात तेवढे जाऊ शकतात. निरंतरयोगी, सहज योगी! ही उंच स्थिती आहे . अशा उंच स्थिती असणाऱ्यांना विजयी कुमार म्हणतात. विजयी आहात ? की कधी पराभव - कधी विजय हा खेळ तर खेळत नाही ना ? तर कधी पराभव कधी विजय हे संस्कार असतील तर एकरस स्थितीचा अनुभव होणार नाही. एकाच्या लगन मध्ये मगन राहण्याचा अनुभव होणार नाही.
2. सदैव प्रत्येक कर्मात कमाल करणारे कुमार आहात ना? कोणतेही कर्म साधारण नसावे, कमाल असावे. ज्याप्रमाणे पित्याची महिमा करतात, बाबांची कमाल गातात . असे कुमार, अर्थात प्रत्येक कर्मात कमाल दाखविणारे, कधी कसे, कधी कसे, असे नाही . असे नाही, जेथे कोणी ओढेल तेथे ओढले जाल. पडणारे नाही. कधी कुठे पडाल, कधी कोठे, असे नाही ! कमाल करणारे बना! अविनाशी आणि अविनाशी बनविणारे आहेत, असे आव्हान करणारे बना. अशी कमाल करून दाखवा, ज्यामुळे प्रत्येक कुमार चालता- फिरता फरिस्ता दिसेल दुरूनच फरिस्ता झलक अनुभवयास मिळेल. वाणीने सेवेचे अनेक कार्यक्रम केले, ते तर करणारच, परंतु आज-काल प्रत्यक्ष पुरावा हवा, प्रत्यक्ष प्रमाण! सर्वश्रेष्ठ प्रमाण ! प्रत्यक्ष प्रमाण इतके हवे की सहज सेवा होऊन जाईल. फरिश्तेपणाची सेवा करा, ज्याने मेहनत कमी फळ जास्त मिळेल. फक्त वाणीने सेवा करू नका, परंतु मन, वाणी आणि कर्म तीनही मार्गांनी सेवा करा, यालाच म्हणतात कमाल !अच्छा!
समारोपाच्या वेळी:-
चारही बाजूचे तीव्र पुरुषार्थी, सदैव सेवाधारी, सदैव डबल लाईट बनून इतरांनाही डबल लाईट बनविणारे, सफलतेला अधिकाराने प्राप्त करणारे, सदैव पित्यासमान पुढे जाणारे आणि इतरांनाही पुढे घेऊन जाणारे, असे सदैव उत्साहत राहणारे, श्रेष्ठ आत्म्यांना, स्नेही मुलांना, बाप दादांचा खूप खूप सिक व प्रेमाने गोड आठवण आणि शुभ प्रभात.