18.04.2021 प्रभात:मुरली ओम शांती "अव्यक्त बापदादा” रिवाइज 14.12.1987 मधुबन


संगमयुगी ब्राह्मण जीवनाच्या तीन विशेषता

आज बापदादा आपल्या सर्व नेहमी बरोबर राहणाऱ्या, नेहमी सहयोगी बनून, सेवेचे सोबती बनून सेवा करणारे, आणि बरोबर चालणाऱ्या, श्रेष्ठ मुलांना पाहून हर्षित होत आहेत. बरोबर राहणारे अर्थात सहज स्वतः योगी आत्मे. नेहमी सेवे मध्ये सहयोगी, साथी बनून चालणारे म्हणजे ज्ञानी तू आत्मे, खरे सेवाधारी. बरोबर चालणारे म्हणजे समान आणि संपन्न कर्मातीत आत्मे.बापदादा सर्व मुलां मध्ये या तीन विशेषता पाहत आहेत कि,या तिन्ही गोष्टी मध्ये कुठ पर्यत संपूर्ण बनले आहेत? संगमयुगातील श्रेष्ठ ब्राह्मण जीवनातील विशेषता, या तिन्ही ची आवश्यकता आहे. योगी तु आत्मा, ज्ञानी तु आत्मा आणि बाबा सारखे कर्मातीत आत्मा, या तीन पैकी जर एक पण विशेषतेची कमी असेल, तर ब्राह्मण जीवनातील विशेषतांचे अनुभवी न बनणे, म्हणजे संपूर्ण ब्राह्मण जीवनाचे सुख किंवा प्राप्ती पासून वंचित राहणे होय. कारण बापदादा सर्व मुलांना संपूर्ण वरदान देत आहेत. असे नाही कि, यथा शक्ती योगी भव किंवा यथा शक्ती ज्ञानी तु आत्मा भव असे वरदान देत नाहीत. त्याच बरोबर संगमयुग जे सार्‍या कल्पा मध्ये विशेष युग आहे, या युगाला अर्थात वेळेला पण वरदानी वेळ म्हटले जाते, कारण वरदाता बाबा वरदान देण्यासाठी यावेळीच येत आहेत. वरदाता आल्यामुळे वेळ पण वरदानी झाला आहे. या वेळेला हे वरदान आहे. सर्व प्राप्ती मध्ये पण संपूर्ण प्राप्तीची हीच वेळ आहे. संपूर्ण स्थितीला प्राप्त करण्याची पण हीच वरदानी वेळ आहे. आणि साऱ्या कल्पा मध्ये कर्मानुसार प्रारब्ध प्राप्त करता किंवा जसे कर्म तसे फळ स्वतः प्राप्त होत राहते, परंतु या वरदानी वेळेवर एक पाऊल तुमचे कर्म आणि पदमगुणा बाबाद्वारे मदतीच्या रूपा मध्ये सहज प्राप्त होत आहे. सतयुगा मध्ये एकाचे पदम गुणा प्राप्त होत नाही, परंतु आता प्राप्त झालेल्या प्रारब्धाचा रूपा मध्ये भोगण्याचे अधिकारी बनत आहात. फक्त जमा केलेले खाऊन खाली उतरत येत आहात. कला कमी होत जातात. एक युग पूर्ण झाल्याने कला पण 16 कले पासून 14 होऊन जात आहे ना. परंतु संपूर्ण प्राप्ती कोणत्या वेळेची, जे 16 कला संपूर्ण बनाल? त्या प्राप्तीची वेळ या संगमयुगाची आहे. यावेळी बाबा खुल्या मनाने सर्व प्राप्तीचे भंडार वरदानाचा रूपामध्ये, वरशाच्या रुपामध्ये आणि शिक्षणाच्या फळस्वरूप प्राप्तीच्या रूपामध्ये, तिन्ही संबंधांमध्ये, तीन रूपामध्ये विशेष खुले भंडार, भरपूर भंडार मुला समोर ठेवत आहेत. जेवढ्या तेवढ्याचा हिशोब ठेवत नाहीत, एकाचा पदम गुणा हिशोब ठेवत आहेत. फक्त आपला पुरुषार्थ केला आणि प्रारब्ध प्राप्त केली, असे म्हणत नाहीत. परंतु दयाळू बनून, दाता बनून, विधाता बनून, सर्व संबंधी बनून, स्वतः प्रत्येक सेकंदा मध्ये मदतगार बनत आहेत. एका सेकंदाची हिंमत आणि अनेक वर्षा सारख्या मेहनतीने मदतीच्या रूपामध्ये नेहमी सहयोगी बनत आहेत,कारण जाणत आहेत कि, अनेक जन्मातील भटकणारे निर्बल आत्मे आहेत, थकलेले आहेत, त्यामुळे तेवढा सहयोग देत आहेत, मदतगार बनत आहेत.बाबा स्वतः प्रस्ताव देतात की, सर्व प्रकारचे ओझे मला द्या. ओझे उचलण्याचा प्रस्ताव देत आहेत. भाग्यविधाता बनून ज्ञानसंपन्न बनवितात, श्रेष्ठ कर्माचे ज्ञान स्पष्ट समजावून, भाग्याची रेषा ओढण्याची लेखणी तुमच्या हातामध्ये देत आहेत. भाग्याची रेषा जेवढी लांब ओढू इच्छिता, तेवढी ओढू शकता. सर्व खुल्या खजान्याची किल्ली तुमच्या हातामध्ये दिले आहे. आणि किल्ली पण किती सोपी आहे. जर मायेचे वादळ आले, तरी पण छत्रछाया बनून नेहमी सुरक्षित ठेवतात. जिथे छत्रछाया आहे तिथे वादळ काय करेल. सेवाधारी पण बनतात, परंतु त्याच बरोबर बुद्धीवानाची बुद्धी बनून आत्म्यांना प्रेरणा देतात, ज्यामुळे नाव मुलांचे आणि काम बाबाचे सहज होऊन जाते. एवढ्या लाडाने आणि प्रेमाने लाडके बनून पालना करतात, जे नेहमी अनेक झोक्या मध्ये झोके घेत राहतात. पाय खाली ठेवू देत नाहीत. कधी खुशीच्या झोक्यामध्ये, कधी सुखाच्या झोक्यामध्ये, कधी बाबाच्या गोदीच्या झोक्यामध्ये, आनंद, प्रेम, शांतीच्या झोक्यामध्ये झुलत राहा. झुलणे म्हणजे मौज करणे. ही सर्व प्राप्ती वरदानी वेळेची विशेषता आहे. यावेळी वरदाता विधाता झाल्यामुळे, पिता आणि सर्व संबंध निभावल्यामुळे बाबा दयाळू आहेत. एकाचे पदम देण्याची विधी या वेळेची आहे. अंताला हिसाब किताब नाहीशा करणारे,आपल्या सोबत्या कडून काम करून घेतील. सोबती कोण आहेत, ओळखता ना? मग एकाचे पदमगुणा हा हिशोब समाप्त होऊन जाईल. आता दयाळू आहेत, मग हिसाब किताब सुरू होईल. यावेळी तर माफ पण करून टाकतात. मोठ्या चुकीला पण माफ करुन आणखीन मदतगार बनून, पुढे घेऊन जातात. फक्त मनापासून जाणीव होणे म्हणजे माफ होणे. जसे दुनियेतील माफी घेतात,तसे येथे त्या रीतीने माफी घेऊ शकत नाहीत. जाणीवेची विधीच माफी आहे. तर हृदया पासून जाणीव होणे, कोणाच्या सांगण्याने किंवा वेळेनुसार चालविण्याच्या हेतुने, ही माफी मंजूर होत नाही. कांही मुले चतुर पण आहेत. वातावरण पाहून म्हणतात, आता तर जाणीव करून घ्या, माफी मागा, पुढचे पुढे पाहू‌. परंतु बाबा ज्ञानसंपन्न आहेत, जाणतात, मग हसून सोडून देतात, परंतु माफी मंजूर करत नाहीत‌. विना विधीची सिद्धी तर मिळणार नाही ना. विधी एका पावलाची आणि सिद्धी पदम पावला एवढी होईल. परंतु एका पावलाची विधी तर यथार्थ पाहिजे ना. तर या वेळेची विशेषता किती आहे किंवा वरदानी वेळ कसा आहे, हे सांगितले.

वरदानी वेळेवर पण वरदान नाही घेतले तर आणखीन कोणत्या वेळी घ्याल? वेळ समाप्त झाला आणि वेळे प्रमाणे,या वेळेची विशेषता पण सर्व समाप्त होऊन जाईल, त्यामुळे जे करायचे आहे, जे घ्यायचे आहे, जे बनायचे आहे, ते आता वरदानाच्या रूपामध्ये, बाबाच्या मदतीने वेळवर करून घ्या, बनून घ्या. मग ही हिऱ्यासारखी संधी मिळू शकणार नाही. वेळेची विशेषता तर ऐकली. वेळेच्या विशेषतेच्या आधारावर ब्राह्मण जीवनातील ज्या तीन विशेषता सांगितल्या, या तिन्ही मध्ये संपूर्ण बना. तुम्हा लोकांचे विशेष बोधवाक्य पण हे आहे 'योगी बना, पवित्र बना. ज्ञानी बना,कर्मातीत बना'. जेंव्हा बरोबर जायचेच आहे, तर नेहमी बरोबर राहणारेच बरोबर जातील. जे बरोबर राहात नाहीत ते बरोबर कसे येतील? वेळेवर तयारच झाले नाहीत, बरोबर जाण्यासाठी, कारण बाबा सारखे बनणे, म्हणजे तयार होणे होय. समानताच हात आणि साथ आहे. नाही तर काय होईल? पुढच्याला पाहत पाहत मागे मागे येत राहतील, तर हे सोबती झाले नाहीत. सोबती तर बरोबर चालतील. फार काळ बरोबर राहणे, सोबती बनून सहयोगी बनणे, हा भूतकाळाचा संस्कारच सोबती बनवून बरोबर घेऊन जाईल. आता तर बरोबर राहत नाहीत, यातून सिद्ध होते कि, दूर राहत आहेत. तर दूर राहण्याचा संस्कार, बरोबर चालण्याच्या वेळी पण लांबचा अनुभव करेल, त्यामुळे आता पासून तीन विशेषतेला चेक करा. नेहमी बरोबर राहा‌. नेहमी बाबाचे सोबती बनून, सेवा करा. करावनहार बाबा, मी निमित्त करनहार आहे. तर कधी पण सेवा हलचल मध्ये येणार नाही. जिथे एकटेपणा आला तर त्यामुळे मी पणा येतो, मग माया मांजर, म्याव म्याव करत राहते. तुम्ही मी, मी, करता, ती म्हणते, मी येऊ, मी येऊ. मायेला मांजरीन म्हणता ना. तर सोबती बनून सेवा करा. कर्मातीत बनण्याची पण परिभाषा मोठी रहस्ययुक्त आहे, ती नंतर सांगेन.

आज फक्त तीन गोष्टी चेक करा. आणि वेळेच्या विशेषतेचा लाभ कुठ पर्यंत प्राप्त केला आहे? कारण वेळेचे महत्त्व ओळखणे, म्हणजे महान बनणे. स्वतःला ओळखणे, बाबाला ओळखणे, जेवढे हे महत्त्वाचे आहे तेवढेच वेळेला ओळखणे पण आवश्यक आहे. तर समजले काय करायचे आहे? बापदादा निकाल सांगतील, त्यापूर्वी स्वतःचा निकाल स्वतः पाहा, कारण बापदादांनी निकाल जाहीर केला तर निकाल ऐकून विचार येईल कि, आता तर निकाल जाहीर झाला आहे, आता काय करायचे, आता जो आहे, जसा आहे, ठीक आहे,त्यामुळे बापदादा म्हणतात, हे तपासून पहा, चेक करा. हा अप्रत्यक्ष निकाल सांगत आहेत, कारण पहिल्या पासूनच सांगितले आहे कि, निकाल सांगेन आणि वेळ पण दिला आहे. कधी सहा महिने, कधी एक वर्ष दिले आहे. तरी पण कांही हा विचार करतात कि, सहा महिने तर पूर्ण झाले, कांही सांगितले नाही. परंतु सांगितले कि, आता तरी पण कांही काळ दयाळूपणाचा आहे, वरदानाचा आहे. आता चित्रगुप्त, गुप्त आहे. मग प्रत्यक्ष होतील त्यामुळे बाबाला दया येते, चला, एक वर्ष आणखीन देऊ, तरी पण मुले आहेत. बाबाला वाटले तर काय करू शकणार नाहीत. सर्वांची एक एक गोष्ट जाहीर करू शकतात. कांही भोळानाथ समजत आहेत ना. तर कांही मुले आता पण बाबाला भोळा बनवित आहेत. भोळानाथ तर आहे परंतु महाकाळ पण आहे. आता ते रूप मुला समोर दाखवित नाहीत. नाहीतर समोर उभे राहू शकणार नाहीत, त्यामुळे ओळखून पण भोळानाथ बनत आहेत,माहित नाही, असे दाखवित आहेत. परंतु कशासाठी? मुलांना संपूर्ण बनविण्यासाठी. समजले? बापदादा हे सर्व नखरे पाहून हसतात. काय काय खेळ करत आहेत, सर्व पहात राहतात, त्यामुळे ब्राह्मण जीवनाच्या विशेषतांना स्वतःमध्ये चेक करा, आणि स्वतःला संपन्न बनवा. अच्छा.

चोहीकडेच्या सर्व योगी तु आत्मा, ज्ञानी तु आत्मा, बाबा सारख्या कर्मातीत, श्रेष्ठ आत्म्यांना, नेहमी स्वतःच्या, वेळेच्या महत्वाला ओळखून, महान बनणाऱ्या महान आत्म्यांना, नेहमी बाबाच्या सर्व संबंधाचा, प्राप्तीचा लाभ घेणाऱ्या, समजदार, विशाल बुद्धी, स्वच्छ बुद्धी, सदा पावन मुलांना, बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि नमस्ते.

पार्टी बरोबर वार्तालाप:- नेहमी स्वतःला सर्व शक्तीने संपन्न मास्टर सर्वशक्तीवान आत्मा अनुभव करत आहात? बाबांनी सर्व शक्तींचा खजाना वारशा मध्ये दिला आहे. तर सर्व शक्ती तुमचा वरसा म्हणजे खजाना आहे. आपला खजाना बरोबर ठेवला आहे ना. बाबानी दिला आणि मुलांचा झाला. तर जी वस्तू स्वतःची असते, ती आपोआप आठवणीत राहते. त्या ज्या पण वस्तू आहेत, त्या विनाशी आहेत, आणि हा वरसा व शक्ती अविनाशी आहेत. आज वरसा मिळाला, उद्या नाहीसा झाला, असे नाही. आज खजाने आहेत, उद्या कोणी जाळून टाकतील, कोणी लुटून नेतील, असा खजाना नाही. जेवढा खर्चाल, तेवढा वाढणारा आहे. जेवढा ज्ञानाचा खजाना वाटाल तेवढाच वाढत राहील. सर्व साधन पण आपोआपच प्राप्त होत राहतील. तर नेहमी साठी वरशाचे अधिकारी बनले आहात. ही खुशी राहत आहे ना. वरसा पण किती श्रेष्ठ आहे. कोणती अप्राप्ती नाही. सर्व प्राप्ती आहेत. अच्छा.

अमृत वेळेला निरोप घेते वेळी दादी बरोबर तसेच दादी निर्मल शांता बरोबर बापदादाची मुलाखात

महारथीच्या प्रत्येक पावला मध्ये सेवा आहे. जरी बोलले, जरी नाही बोलले, परंतु प्रत्येक कर्म, प्रत्येक वागण्या मध्ये सेवा आहे. सेवे शिवाय एक सेकंद पण राहू शकत नाहीत.जरी मन्सा सेवे मध्ये असाल, जरी वाचा सेवे मध्ये, जरी संबंध संपर्का मध्ये, परंतु निरंतर योगी पण आहेत, तर निरंतर सेवाधारी पण आहेत‌. चांगले आहे, जो मधुबन मध्ये खजाना जमा केला तो सर्वांना वाटण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी जात आहात. महारथीचे कोणत्या स्थानावर राहणे पण अनेक आत्म्यांना स्थूल सहारा होऊन जातो. जसे बाबा छत्रछाया आहेत, तसे बाबा सारखी मुले पण छत्रछाया बनतात. सर्व पाहून किती खुश होतात. तर हे वरदान सर्व महारथींना आहे. नेत्राचे वरदान, मस्तकाचे वरदान, किती वरदान आहेत. प्रत्येक कर्म करणाऱ्या, निमित्त कर्मेंद्रियांना वरदान आहे‌. नेत्रा द्वारे पाहत आहात, तर काय समजत आहेत? सर्व समजत असतात कि, बाबाच्या दृष्टीचा या आत्म्याच्या दृष्टीद्वारे अनुभव होत आहे. तर नेत्राला वरदान झाले ना. मुखाला वरदान आहे, या चेहऱ्याला वरदान आहे, पावला पावला मध्ये वरदान आहे. किती वरदान आहेत, काय मोजू शकाल! इतरांना तर वरदान देत आहात, परंतु तुम्हाला पहिल्या पासूनच वरदान मिळाले आहेत. जे पण पाऊल उचलाल, वरदाना ची झोळी भरलेली आहे. जसे लक्ष्मीला दाखवतात ना- त्यांच्या हातातून धन सर्वाना मिळतच राहत आहे. थोड्या वेळेसाठी नाही, नेहमी संपत्ती ची देवी बनून संपत्ती देतच राहते. तर हे कोणाचे चित्र आहे? तर किती वरदान आहेत. बाबा तर म्हणतात, कोणते वरदान राहिलेच नाही. तर मग काय द्यायचे? वरदाना द्वारेच श्रंगार करून चालत आहात. असे म्हटले जाते कि, हात फिरविला तर वरदान मिळाले. तर बाबांनी तर "समान भव"चे वरदान दिलेले आहे, यामध्ये सर्व वरदान येतात. जेंव्हा बाबा अव्यक्त झाले, तर सर्वांना "समान भव'चे वरदान दिले ना. फक्त समोर असलेल्यांना नाही, सर्वांना दिले. सूक्ष्म रूपा मध्ये सर्व महावीर बाबा समोर होते आणि वरदान मिळाले. अच्छा.

तुमच्या लोका बरोबर सर्वांच्या दुवा आर्शिवाद आणि दवा आहेतच, त्यामुळे मोठा आजार पण छोटा होऊन जातो. फक्त रूपरेखा दाखवित आहे. परंतु आपला हक्क दावू शकत नाही. ते सुळा पासून काट्या चे रुप बनते. बाकी तर बाबाचा हात आणि साथ नेहमी आहेच. प्रत्येक पाऊला मध्ये, प्रत्येक बोलण्या मध्ये, बाबांची दुवा आणि दवा मिळत राहते. त्यामुळे बेफिकर राहा. ( यापासून मुक्त कधी होऊ?) तसे मुक्त व्हायचे असेल तर मग सूक्ष्मवतन मध्ये पोहचा. त्यामुळे इतरांना पण बळ मिळत राहते. तुम्हा लोकांचे हे आजार, सेवा करत आहेत. तर आजार, आजार नाहीत. सेवेचे साधन आहेत. नाही तर इतर सर्व समजतील कि, यांना तर मदत आहे, यांना अनुभव थोडाच आहे. परंतु अनुभवी बनून इतरांना हिंमत देण्याच्या सेवे साठी थोडीशी रूपरेखा दाखवित आहात. नाही तर सर्व नाराज होतील. तुम्ही सर्व उदाहरण रूपामध्ये थोडीशी रुपरेखा पाहता. बाकी चुक्तू झाला आहे, फक्त रुपरेखा मात्र राहिलेला आहे. अच्छा.

विदेशी बंधू-भगिनी बरोबर:-

हृदयापासून प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावना ठेवणे, हाच हृदयातून आभार आहे. बाबाचे प्रत्येक पावला मध्ये, प्रत्येक मुलांसाठी, हृदयातून आभार निघत आहेत. संगमयुगाला सर्व आत्म्या प्रति नेहमी साठी आभार देण्याची वेळ म्हणावे. पूर्ण संगमयुग आभार दिवस आहे. नेहमी एक दोघाला शुभकामना, शुभ भावना देत राहा, आणि बाबा पण देत आहेत. अच्छा.

वरदान:-

खुशी बरोबर शक्तीला धारण करून विघ्नांना दूर करणारे विघ्नजीत भव:

जी मुले जमा करणे जाणतात, ते शक्तिशाली बनतात. जरी आता आता कमविले, आणि आता आता वाटले, स्वतःमध्ये सामावले नाही, तर शक्ती भरणार नाही. फक्त वाटल्याची
किंवा दान केल्याची खुशी राहील. खुशी बरोबर शक्ती असेल तर सहजच विघ्नांना दूर करणारे विघ्न जीत बनाल. मग कोणते पण विघ्न लगन मध्ये अडचण करणार नाहीत. त्यामुळे जसे चेहर्‍या वरुन खुशीची झलक दिसून येते. तसे शक्तीची झलक पण दिसली पाहिजे.

सुविचार:-

परिस्थितीला घाबरण्या ऐवजी त्यांना शिक्षक समजून धडा शिका.

||| ओम शांती |||

सूचना:- आज महिन्यातील तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, बाबा च्या सर्व मुलांनी, सायंकाळी ६-३० ते ७-३० वाजे पर्यंत विशेष परमधाम मध्ये उंच स्थानावर स्थित होऊन लाईट,माईट हाऊस बनून, प्रकृती सहित पूर्ण विश्वाला सर्च लाईट देण्याची सेवा करा.