ओम शांती:- मुले जेंव्हा जन्मतात तर आपल्या बरोबर कर्मा नुसार नशीब घेऊन येतात. कोणी सावकारा जवळ, कोणी गरीबा जवळ जन्म घेतात. पिता पण समजतात कि, वारसदार आला आहे. जसे दान पुण्य केले असेल, त्यानुसार जन्म मिळत राहतो. आता तुम्हां गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांना कल्पा नंतर परत बाबा येऊन समजावत आहेत. मुले पण जाणत आहेत कि, आम्ही आमचे नशीब घेऊन आलो आहोत, स्वर्गाच्या बादशाहीचे नशीब घेऊन आलो आहोत, ज्यांनी चांगल्या रीतीने ओळखले आहे आणि बाबाची आठवण करत राहतात. आठवणी बरोबर नशीबाचा संबंध आहे. जन्म घेतला आहे तर बाबाची आठवण पण राहिली पाहिजे. जेवढी आठवण कराल, तेवढे नशीब उंच राहील. किती सोपे आहे. सेकंदा मध्ये जीवनमुक्ती मिळते. तुम्ही आले आहात, सुखधाम चे नशीब प्राप्त करण्यासाठी. आता प्रत्येक जण षुरषार्थ करत आहे. प्रत्येकाने स्वतःला पाहिले पाहिजे कि, आम्ही कसा पुरुषार्थ करत आहोत. जसे मम्मा बाबा आणि सेवाधारी मुलं पुरुषार्थ करतात, त्यांचे अनुकरण केले पाहिजे. सर्वांना बाबाचा परिचय द्यायचा आहे. बाबाचा परिचय दिला, तर रचनेच्या आदि, मध्य, अंता चा पण मिळून जातो. ऋषी मुनी इत्यादी कोणी पण रचनाकार आणि रचनेच्या आदि, मध्य, अंताचे ज्ञान देऊ शकत नाहीत. आता तुमच्या बुद्धीत सारे चक्र स्मृती मध्ये राहत आहे. दुनिये मध्ये कोणी पण बाबा आणि वारशा ला ओळखत नाहीत. तुम्हा मुलांनी आता बाबा आणि आपल्या नशिबाला ओळखले आहे. आता बाबा ची आठवण करायची आहे. शरीर निर्वाहा साठी कर्म पण करायचे आहे. घरदार पण सांभाळायचे आहे. कोणी निर्बंधन असेल तर, ते चांगली सेवा करू शकतात. मुलं-बाळं कोणी नसतील तर त्यांना सेवा करण्यासाठी चांगली संधी आहे. स्त्रियांना पती किंवा मुलाचे बंधन राहते. जर मुले नसतील तर ते बंधनमुक्त आहेत ना. ते जसे वानप्रस्थी आहेत. मग मुक्तीधाम मध्ये जाण्या साठी संगत पण पाहिजे. भक्ती मार्गा मध्ये तर संगत मिळते, साधू इत्यादींची, निवृत्ती मार्ग वाल्यांची. ते निवृत्तीमार्ग वाले, प्रवृत्ती मार्गाचा वरसा देऊ शकत नाहीत. तुम्ही मुलेच देऊ शकता. तुम्हाला बाबांनी रास्ता सांगितला आहे. भारताचा इतिहास भूगोल आणि 84 जन्म पण सांगायचे आहेत. भारतवासी च 84 जन्म घेतात. एकाची गोष्ट नाही. सूर्यवंशी, चंद्रवंशी, मग वैश्य वंशी. . .. घराण्या मध्ये येतात, क्रमवार तर आहेत ना. भारताचे प्रथम क्रमांकाचे राजकुमार श्रीकृष्ण आहेत, ज्यांना पाळण्या मध्ये झोका देतात. दुसऱ्या क्रमांकाला झोका देत नाहीत, कारण कला कमी होऊन जातात. जे पहिल्या क्रमांकाला होते, त्यांची पूजा होते. मनुष्य समजत नाहीत कि, कृष्ण एक आहे कि दोन-तीन आहेत. कृष्णाची राजधानी चालत आहे, हे कोणाला पण माहित नाही. पूजा फक्त क्रमांक एक ची होते. गुण तर क्रमवार मिळतात. तर पुरुषार्थ केला पाहिजे कि, कां आम्ही पहिला क्रमांक घेऊ नये. मम्मा बाबा चे अनुकरण करा, तर त्यांच्या राजधानी मध्ये याल.जे चांगली सेवा करत आहेत, ते चांगल्या महाराजाच्या घरांमध्ये जन्म घेतील. तिथे तर महाराजा महाराणी आहेत. त्यावेळी कांही राजा राणी नाव असत नाही. ते नंतर सुरू होते.व्दापार मध्ये जेंव्हा बनतात, तर त्यांवेळी जे जास्त मालमत्ता वाले आहेत,त्यांना राजा म्हटले जाते. मग महाराजांचे नाव कमी होऊन जाते,प्राय:लोप होऊन जाते. परत जेंव्हा भक्ती मार्ग सुरू होतो, तेंव्हा गरीब- सावकारा मध्ये फरक तर राहतो ना. आता तुम्ही मुलेच शिवबाबाची आठवण करत आहात आणि त्यांच्या कडून वारसा घेत आहात. इतर सत्संगा मध्ये मनुष्य बसून कथा सांगत आहेत, मनुष्य मनुष्याला भक्ती शिकवित आहेत. ते ज्ञान देऊन सद्गती करू शकत नाहीत. वेद शास्त्र इत्यादी सर्व भक्ति मार्गाचे आहेत. सद्गती तर ज्ञानानेच होत आहे. पुनर्जन्मा ला पण मानत आहेत. मध्येच कोणी पण परत घरी जाऊ शकत नाहीत. अ़ंत काळात बाबा येऊन सर्वांना घेऊन जातात. एवढे सर्व आत्मे तेथे जाऊन थांबतात? सर्व धर्माचे विभाग तर वेगवेगळे आहेत ना. तर हे पण समजावयाचे आहे. हे कोणाला पण माहित नाही कि, आत्म्याचे पण झाड आहे. तुम्हां मुलांच्या बुद्धी मध्ये साऱ्या झाडाचे ज्ञान आहे. आत्म्यांचे पण झाड आहे, जीवात्म्यांचे पण झाड आहे. मुलांनी ओळखले आहे कि, आम्ही हे जुने शरीर सोडून घरी जात आहोत." मी आत्मा" या शरीरा पासून वेगळी आहे. हे समजणे म्हणजे जिवंतपणीच मरणे होय. तुम्ही मेला तर सारी दुनिया मेली. मित्र संबंधी इत्यादी सर्वांना सोडून दिले. प्रथम पूर्ण शिक्षण घेऊन पदाचे अधिकारी बनून मग जायचे आहे. बाबाची आठवण करणे तर फार सोपे आहे. जरी कोणी आजारी असेल, त्यांना पण सांगितले पाहिजे कि, शिवबाबा ची आठवण करा,तर विकर्म विनाश होतील. जे पक्के योगी आहेत त्यांच्या साठी लवकर मरणे (शरीर सोडणे) पण चांगले नाही, कारण ते योगा मध्ये राहून आत्मिक सेवा करू शकतात. मेल्यानंतर ते सेवा करू शकणार नाहीत. सेवा करून स्वतःचे उच्च पद बनवायचे आहे,आणि इतर बंधू-भगिनी ची सेवा पण करायची आहे. ते पण बाबा कडून वर्सा प्राप्त करतील. आम्ही आपसा मध्ये भाऊ भाऊ आहोत, एका बाबा ची मुले आहोत.
बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. पुर्वी पण असे सांगितले होते. कोणाला पण समजावून सांगू शकता. बेहनजी किंवा भाईजी तुमची आत्मा तमोप्रधान झाली आहे. जी सतोप्रधान होती, आता परत तमोप्रधान पासून सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनिये मध्ये जायचे आहे. आत्म्याला सतोप्रधान आठवणीच्या यात्रेने बनवायचे आहे. आठवणी चा पूर्ण चार्ट ठेवला पाहिजे. ज्ञानाचा चार्ट ठेवू शकत नाहीत. बाबा तर ज्ञान देत राहतात. तपास करायचा आहे कि, माझ्यावर जे विकर्माचे ओझे आहे, ते कसे उतरेल, त्यासाठी आठवणीचा चार्ट ठेवला जातो. आम्ही किती तास आठवण केली? मुळवतनची पण आठवण करतात, मग नवीन दुनियेची पण आठवण करतात.सृष्टीचा विनाश पण होणार आहे,त्याची पण तयारी होत आहे. बॉम्ब इत्यादी पण बनवत आहेत. एकीकडे म्हणतात कि, आम्ही असे असे मृत्यूसाठी सामान बनवित आहोत, दुसरीकडे म्हणतात, मृत्यू साठी सामान बनवू नका. समुद्राच्या खाली पण मारण्यासाठी सामान ठेवले आहे, वर येवून बॉम्ब सोडून मग समुद्रा मध्ये निघून जायचे. अस अशा वस्तू बनवित राहतात. ते आपल्याच विनाशा साठी आहेत. मृत्यू समोर उभा आहे. एवढे मोठ मोठे महल बनवतात.तुम्ही जाणत आहात कि, हे सर्व माती मध्ये मिसळून जाईल. कोणाचे जमिनी मध्ये दबून जाईल... लढाई जरूर होणार आहे. प्रयत्न करून सर्वांचे खिसे खाली करतील. चोर पण घरात घुसून चोरी करतात. लढाई साठी किती खर्च करतात. हे सर्व मातीमोल होणार आहे. घरे इत्यादी सर्व पडतील.बाॅम्बस इत्यादी टाकल्यामुळे सृष्टीचे तीन भाग खलास होऊन जातील. बाकी एक भाग राहून जाईल. भारत एका हिश्या मध्ये आहे ना. बाकी इतर सर्व नंतर आलेले आहेत. आता भारताचा च भाग वाचेल. मृत्यु तर सर्वांचा होणार आहे, तर कां आम्ही बाबा कडून पूर्ण वरसा घेऊ नये. त्यासाठी बाबा म्हणतात लौकिक संबंधी बरोबर पण तोड निभावून घ्यायची आहे. बाकी बंधन नसतील तर बाबा मत देतात कि, कां सेवे मध्ये लावू नये. स्वतंत्र आहात तर अनेकांचे कल्याण करू शकता. बरे, बाहेर कुठे जाऊ शकत नसाल, तर आपल्या मित्र संबंधी वर दया केली पाहिजे. पूर्वी म्हणत होता कि, बाबा दया करा. आता तर तुम्हाला रास्ता मिळाला आहे तर इतरावर पण दया केली पाहिजे, जसे बाबा दया करतात. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. संन्याशी लोक तर हठयोग इत्यादी साठी किती मेहनत करत आहेत. इथे तर तसे कांहीच नाही. फक्त आठवण करा तर पाप भस्म होऊन जातील, यामध्ये कांही त्रास नाही. फक्त बाबाच्या आठवणी ची गोष्ट आहे. उठता, बसता, कर्मेंद्रिया द्वारे कर्म पण करा, फक्त बुद्धीचा योग बाबा बरोबर लावा. खरी खुरी सजनी बनायचे आहे, त्या साजनची. ते स्वतः सांगत आहेत कि, हे सजनी, हे मुलांनो! भक्ती मार्गा मध्ये तर फार आठवण केली. परंतु आता मज साजन ची आठवण करा तर तुमचे पाप भस्म होतील. मी खात्री देत आहे. कांही कांही गोष्टी ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. भगवाना द्वारे गीता ऐकल्यामुळे तुम्ही जीवनमुक्ती प्राप्त करत आहात. मनुष्या द्वारे गीता ऐकल्यामुळे जीवनबंधना मध्ये आले आहात. शिडी उतरत आले आहात. प्रत्येक गोष्टी मध्ये विचार सागर मंथन करायचा आहे. आपली बुद्धि चालवायची आहे. ही बुद्धीची यात्रा आहे, ज्यामुळे विकर्म विनाश होतील. वेद, शास्त्र, यज्ञ,तप इत्यादी केल्यामुळे पाप नाहीसे होत नाहीत. खालीच उतरत आले आहात. आता तुम्हाला वर जायचे आहे. फक्त शिडी द्वारे कोणी समजू शकणार नाहीत, जोपर्यंत त्यावर कोणी समजावून सांगत नाहीत. जसे लहान मुलांना चित्र दाखवून शिकविले जाते. हा हत्ती आहे. जेंव्हा हत्ती पाहतात, तर चित्राची पण आठवण येते. जसे तुमच्या बुद्धी मध्ये आले आहे. चित्रांमध्ये नेहमी लहान वस्तू दाखवली जाते. तुम्ही ओळखले आहे कि, वैकुंठ तर मोठे असेल ना. मोठी राजधानी असेल. तिथे हिरे रत्नांचे महल असतात, ते मग प्राय:लोप झाले आहेत. सर्व वस्तू गायब झाल्या आहेत. नाही तर हा भारत गरीब कसा बनला? सावकारा पासून गरीब, गरीबा पासून सावकार बनायचे ची आहे. हे विश्व नाटक पूर्वंपार बनलेले आहे, त्यामुळे शिडी वर समजावून सांगितले जाते, नवीन नवीन येतात त्यांना समजावून सांगितल्यामुळे अभ्यास होऊन जातो, मुख उघडले जाईल. सेवेच्या लायकीचे मुलांना बनविले जाते. कांही सेवाकेंद्रा वर तर कांही मुले फार अशांती निर्माण करतात. बुद्धीयोग बाहेर भटकत राहतो, त्यामुळे नुकसान करतात. वायुमंडळ खराब करतात. नंबरवार तर आहेत ना. मग बाबा म्हणतात, तुम्ही शिकले नाहीत, त्यामुळे तुमची ही अवस्था झाली आहे. दिवसेनुदिवस जास्त साक्षात्कार होत राहतील. पाप करणाऱ्यांना शिक्षा पण मिळत राहतील. मग त्यांना वाटेल, उगीचच आम्ही पाप केले. बाबाला सांगितल्यामुळे, पश्चाताप केल्यामुळे, कांही कमी होऊ शकेल. नाहीतर वृद्धी होत राहील. असे होत राहते. स्वतःला पण वाटते, नंतर मग म्हणतात, काय करावे, आमची ही सवय नाहीशी होत नाही, त्यापेक्षा घरी जाऊन राहावे. कांहीतर चांगली सेवा करतात. कांही विघ्न पण घालतात. आमच्या सेने मध्ये कोण कोण बहादूर आहेत, त्यांची नावे बाबा सांगतात. बाकी लढाई इत्यादी ची कोणती गोष्ट नाही. ही बेहद ची गोष्ट आहे. चांगली मुले असतील तर बाबा जरूर त्यांची महिमा करतात. मुलांना फार दयाळू, कल्याणकारी बनायचे आहे. आंधळ्याची काठी बनायचे आहे. सर्वांना रास्ता सांगायचं आहे कि, बाबाची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. पापआत्मा आणि पुण्यात्मा म्हणतात ना. असे थोडेच आहे कि, आत्मा परमात्मा आहे किंवा आत्मा-परमात्मा बनून जाते. हे सर्व चुकीचे आहे. परमात्म्या वर थोडेच पाप लागते. त्यांची तर नाटका मध्ये भुमिका आहे सेवा करण्याची. मनुष्यच पाप आत्मा, पुण्यात्मा बनतात. जे सतोप्रधान होते तेच तमोप्रधान बनले आहेत. यांच्या तना मध्ये बाबा बसून सतोप्रधान बनवीत आहेत, तर त्यांच्या मतावर चालले पाहिजे ना.
आता बाबांनी तुम्हा मुलांना विशाल बुद्धी बनविले आहे. आता तुम्ही जाणत आहात कि, राजधानी कशी स्थापन होत आहे. बाबाच ब्रह्मा तना मध्ये येऊन ब्रह्मा मुख वंशावली मुलांना राजयोग शिकवून देवी-देवता बनवत आहेत. परत पुनर्जन्म घेत उतरायचे आहे. आता परत सर्व पुनरावृत्ती करायची आहे. बाबा परत ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत. योगबळाने तुम्ही पाच विकारावर विजय प्राप्त करून, जगतजीत बनत आहात. बाकी लढाई इत्यादी ची कोणती गोष्ट नाही. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य सारांश:-
- (१) बंधनमुक्त बनून बाबाच्या सेवेमध्ये लागायचे आहे, तेंव्हाच भाग्यवान बनाल. दयाळू बनून अनेकांना रास्ता सांगायचा आहे. आंधळ्याची काठी बनायचे आहे.
- (२) या शरीरातून ममत्व काढून जिवंतपणीच मरायचे आहे, कारण आता परत घरी जायचे आहे. आजारा मध्ये पण एका बाबाची आठवण करायची आहे, तर विकर्म विनाश होतील.