11-04-21    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   10.12.87  ओम शान्ति   मधुबन


तन मन धन आणि संबंधांचा श्रेष्ठ सौदा.


आज सर्व खजान्याचे सागर रत्नाकर बाबा आपल्या मुलांना पाहून आनंदीत होत आहेत की,सर्व खजाण्याचे रत्नाकर बाबांची सौदागर मुलं म्हणजे सौदा करणारे कोण आहेत आणि कोणा सोबत सौदा केला आहे? परमात्मा -सौदा देणारे आणि परमात्माशी सौदा करणारे चेहरे किती भोळे आहेत. आणि सौदा किती मोठा आहे.हा इतका मोठा सौदा करणारे,सौदागर आत्मे आहेत,हे दुनियेला समजून येत नाही.दुनिया ज्या आत्म्यांना अती गरीब समजून,असंभव समजून किनारा केला की,या कन्या,माता परमात्म प्राप्तीच्या काय अधिकारी बनणार? परंतु बाबांनी प्रथम माता कन्यांना इतक्या मोठ्या त मोठा सौदा करणारे श्रेष्ठ आसामी बनवले. ज्ञानाचा कलश प्रथम माता कन्यांना दिला.यज्ञ-माता जगदंबा निमित, गरीब कन्याला बनवले. मातांच्याजवळ तरीही काहीना काही स्वतःशी लपवलेली संपत्ती असते परंतु कन्या माता पेक्षा गरीब असतात.तर शिव पित्याने गरिबातल्या गरीबांना प्रथम सौदागर बनवले आणि सौदा किती मोठा केला,जे गरीब कुमारी पासून जगदंबा धनाची देवी लक्ष्मी बनवले. तर आज पर्यंत जरी कितीही करोडपती आहेत परंतु लक्ष्मी कडून धन जरूर मागतील,पूजा जरूर करतील.रत्नगर बाबा आपल्या सौदागर मुलांना पाहून आनंदित होत आहेत.एका जन्माचा सौदा केल्यामुळे अनेक जन्म सौदा केल्यामुळे,मालामाल,भरपूर होतात. आणि ते निमित्त सौदा करणारे जरी कितीही मोठे व्यापारी असतील परंतु ते फक्त धनाचा,वस्तूचा,सौदा करतील.एकच बेहद्दचे बाबा आहेत,ते धनाचा सौदा पण करतात, मनाचा सौदा पण करतात,तनाचा पण सोदा करतात आणि नेहमी श्रेष्ठ संबंधाचा पण सौदा करतात.असा दाता कोणी पाहिला?चारही प्रकारचे सौदा केले आहेत ना?तन नेहमी तंदुरुस्त राहिल,मन नेहमी आनंदीत,धनाचे भंडार नेहमी भरपूर आणि संबंधांमध्ये निस्वार्थ स्नेह असेल आणि गॅरंटी खात्री आहे.आज काल ज्या मूल्यवान वस्तू असतात, त्याची गॅरंटी, पाच-दहा वर्षाची देतील आणखी काय करतील? परंतु रत्नागर बाबा किती वर्षासाठी गॅरंटी देतात आणि किती जन्माची गॅरंटी देतात. चारही खजान्या पैकी एकाची पण कमी होऊ शकत नाही.परत ते प्रजाचे प्रजा बनतील,त्यांना पण शेवटच्या जन्मापर्यंत म्हणजे त्रेताच्या अंत काळापर्यंत चारही गोष्टी प्राप्त होतील.असा सौदा कधी केला आहे?पक्का सौदा केला आहे की कच्चा? परमात्माशी किती स्वस्त सौदा केला आहे आणि काय दिले, कोणती कामाची गोष्ट दिली.

दुहेरी परदेशी बाप दादांच्या जवळ नेहमी हृदयाचे चित्र बनवून पाठवतात.पत्र पण हृदयाच्या आकारा मध्ये लिहतील,भेट पण हृदयाच्या आकाराचे पाठवतील.तर हृदय दिले ना.परंतु कोणते हृदय दिले.एका ह्रदयाचे किती तुकडे झाले होते.माता, पिता, काका, मामा खूप मोठी यादी आहे.एक तर संबंधा मध्ये हृदय दिले,दुसरे वस्तूमध्ये पण हृदय दिले,तर ह्रदय लावणाऱ्या वस्तू किती आहेत,किती व्यक्ती आहेत. सर्वांमध्ये हृदय मन लावत-लावत तुकडे-तुकडे झाले आहेत.बाबानी अनेक तुकडे असणाऱ्या ह्रदयाला एकाशी जोडले आहे आणि दिले काय आणि घेतले काय?आणि सौदा करण्याची विधी खूप सहज आहे आणि सेकंदाचा सौदा आहे ना."बाबा" शब्दच विधी आहे.एका शब्दाची विधी आहे,यामध्ये किती वेळ लागतो,फक्त बाबा मनापासून म्हटले बाबा तर सेकंदामध्ये सौदा झाला.खूप सहज विधी आहे, शिवाय कोणत्या युगामध्ये हा सौदा करू शकत नाहीत.तर सौदागर मुलांचा चेहरा पाहत होते,दुनियेच्या तुलनेमध्ये खूप भोळे आहेत परंतु कमाल तर या भोळ्यांनीच केली आहे.सौदा करण्यामध्ये हुशार निघाले ना.आज कालचे मोठे मोठे प्रसिद्ध धनवान,धन कमावण्याच्या ऐवजी धनाला सांभाळण्या मध्येच व्यस्त आहेत.त्याच संभ्रमामध्ये बाबाला ओळखण्यासाठी वेळ मिळत नाही.स्वतःला वाचवण्यासाठी,धनाला वाचवण्यासाठीच,वेळ जातो.जरी बादशहा पण आहेत परंतु काळजी करणारे बादशहा आहेत,कारण तरीही काळे धन आहे ना म्हणून चिंता करणारे बादशहा आहेत. आणि तुम्ही जरी बाहेरून बिना कवडीचे आहात परंतु बेफिक्र बादशाहा आहात.गरिब असताना पण बादशाहा.यज्ञाच्या सुरुवातीला सही काय करत होते,गरीबा पासून राजकुमार(बेघर टू प्रिन्स).आता पण बादशहा आणि भविष्यामध्ये पण बादशाहा. आज-कालचे जे क्रमांक एकचे धनवान आहेत त्यांच्यासमोर, तुमच्या त्रेता अंतमधील प्रजा पण जास्त धनवान असेल.आज कालच्या संख्याच्या हिशोबा अनुसार विचार करा,धन तर तेच असेल आणखीनच दबलेले धन पण निघेल.तर जितकी मोठी संख्या आहे,त्या प्रमाणात धन वाटलेले आहे.तेथे संख्या पण किती असेल?त्या हिशोबाने नुसार पहा किती धन असेल?प्रजेला पण कोणती अप्राप्त वस्तू नसेल,तर बादशहा झाले ना. बादशहाचा अर्थ हा नाही की सिंहासन वरती बसतील.बादशहा म्हणजे भरपूर, कोणती अप्राप्ती नाही,कोणती कमी नाही.तर असा सौदा केला आहे, की करत आहात?की अद्याप विचारच करत आहात. कधी कोणती मोठी गोष्ट स्वस्त आणि सहज मिळते,तर सर्व सर्व ससंशयामध्ये येतात की, माहित नाही हे ठीक आहे की नाही? अशा संभ्रमा मध्ये तर नाहीत ना? कारण भक्ती मार्गातील मनुष्यांनी सहजला खूप कठीण केले आहे. आणि संभ्रम निर्माण केला आहे.जे आज पण बाबांना त्याच रूपामध्ये शोधत राहतात.लहान गोष्टीला मोठी गोष्ट बनवली आहे म्हणून संभ्रमित झाले आहेत. उच्च ते उच्च भगवंताना भेटण्याची विधि पण खूप कष्टप्रद बनवली आहे.त्या चक्रामध्ये भक्त आत्मा विचारात पडले आहेत. भगवान भक्तीचे फळ देण्यासाठी आले आहेत परंतु भक्त संभ्रमित झाल्यामुळे पाना पाना ला पाणी देण्यामध्येच व्यस्त आहेत.किती पण तुम्ही संदेश देतात,तर काय म्हणतात इतके उच्च भगवान,असे सहज आले आहेत,हे कसे होऊ शकते? म्हणून बाबा हसत होते की आजकाल चे भक्त पण प्रसिद्ध आहेत आणि धनवान व्यक्ती पण प्रसिद्ध आहेत. काही त्यांच्या धंद्यामुळे प्रसिद्ध आहेत, तर काही आपल्याच व्यसामुळे प्रसिद्ध असल्यामुळे व्यस्त आहेत.परंतु तुम्हाला साधारण आत्म्यांनी बाबांशी सौदा केला आहे. पांडवांनी पक्का सौदा केला आहे ना? दुहेरी परदेशी सौदा करण्यामध्ये तर हुशार आहेत ना.सौदा तर सर्वांनी केला आहे परंतु सर्व गोष्टीमध्ये क्रमानुसार असतात.बाबांनी तर सर्वांना एक सारखाच सर्व खजाना दिला आहे,अखुट सागर आहे ना. बाबांना देण्यामध्ये क्रमानुसार देण्याची आवश्यकता नाही.

जसे आजकालचे विनाशकारी आत्मे म्हणतात,विनाशाची इतकी सामग्री तयार केली आहे, ज्यामुळे अशा अनेक दुनिया विनाश होऊ शकतात. बाबा पण म्हणतात,बाबा जवळ इतका खजाना आहे,जे संपूर्ण विश्वातील आत्मे,तुम्हा सारखे समजदार बनून,सौदा केला तरी अखूट आहे.जितकी तुम्हा ब्राह्मणांची संख्या आहे,त्याच्यापेक्षा पदम् गुणा जास्त आले,तरी घेऊ शकतात. इतका भरपूर खजाना आहे परंतु घेण्यामध्ये क्रमानुसार होतात.खऱ्या मनापासून सौदा करणारे हिंमतवान थोडेच निघतात,म्हणून दोन प्रकारच्या माळेचे पूजन होते. कुठे अष्ट रत्न आणि कुठे १६ हजारातील शेवटचे रत्न‌. खूप अंतर झाले ना. सौदा करण्यामध्ये तर एक सारखे आहेत,शेवटचा नंबर पण म्हणतो बाबा आणि प्रथम क्रमांकाचे पण म्हणतात बाबा. शब्दांमध्ये अंतर नाही .सौदा करण्याची विधी एक सारखी आहे आणि देणारा दाता पण एक सारखंच देत राहतात.ज्ञानाचा खजाना किंवा शक्तीचा खजाना जे काही संगम युगी खजाने जाणतात ते सर्वांच्या जवळ एक सारखेच आहेत. कोणाला सर्व शक्ती दिल्या आहेत,कोणाला एक शक्ती दिली किंवा कोणाला एक गुण किंवा कोणाला सर्व गुण दिले असे अंतर नाही. सर्वांची एकच पदवी आहे आधी मध्य अंतचे ज्ञान जाणारे त्रिकालदर्शी, मास्टर सर्वशक्तिमान. असे नाही की कोणी सर्वशक्तिमान आहेत,कोणी फक्त शक्तिवान आहेत, असे नाही.सर्वांना सर्वगुणसंपन्न बनणारी देव आत्मा म्हणतात, गुण मुत म्हणतात.खजाना सर्वांच्या जवळ आहे. एक महिन्या पासून अभ्यास करणाराही असे ज्ञान वर्णन करतात जसे 50 वर्षाची मुलं वर्णन करतात. जर एक एक गुणावरती शक्ती वरती भाषण करण्यासाठी सांगाल तर खूप चांगल्या प्रकारे भाषण करू शकतात. बुद्धीमध्ये आहे म्हणून तर करू शकतात ना.म्हणजे खजाना सर्वांच्या जवळ आहे तर कोणते अंतर राहिले. क्रमांक एकचा सौदागर खजान्याला स्वतः प्रति मनन करण्या च्या कार्यामध्ये लावतात. त्याच अनुभवाच्या अधिकारा द्वारे अनुभवी बनवून दुसऱ्यांना पण देत राहतात.कार्यामध्ये लावणे म्हणजे खजान्याची वृद्धी करणे. एक आहे फक्त वर्णन करणारे,आणि दुसरे आहेत मननम् करणारे.तर मनन करणारे ज्यांना पण देतात ते स्वतः अनुभवी असल्यामुळे दुसऱ्यांना पण अनुभवी बनवू शकतात.वर्णन करणारे दुसऱ्यांना पण वर्णन करणारे बनवतात.महिमा करत राहतील परंतु अनुभवी बनणार नाहीत,स्वतः महान बनणार नाहीत, परंतु महिमा करणारे बनतील.

तर क्रमांक एक म्हणजे मनन शक्तीद्वारे खजान्याचे अनुभवी बनवून अनुभवी बनवणारे म्हणजेच दुसऱ्यांना पण धनवान बनवणारे.

म्हणून त्यांचा खजाना नेहमी वाढत जातो आणि वेळे प्रमाण स्वतःपुरते आणि दुसऱ्या प्रती कार्यामध्ये लावल्यामुळे सफलता स्वरूप नेहमी राहतात. फक्त वर्णन करणारे दुसर्यांना पण धनवान बनवू शकत नाहीत आणि स्वतः प्रति वेळेप्रमाणे जी शक्ती,जो गुण,ज्या ज्ञानाच्या गोष्टी उपयोगात आणायला पाहिजेत,त्या वेळेवर करू शकत नाहीत,म्हणून खजाण्याचा भरपूर स्वरूपाचा सुख आणि दाता बनून देण्याचा अनुभव करू शकत नाहीत.धन असुनही धना द्वारे सुख घेऊ शकत नाहीत. शक्ती असताना ही वेळेवर शक्तीद्वारे सफलता मिळवू शकत नाहीत. गुण असतानाही वेळे प्रमाण त्या गुणांचा वापर करू शकत नाहीत. फक्त वर्णन करू शकतात.धन सर्वांच्या जवळ आहे परंतु दानाचे सुख वेळे प्रमाण वापर केल्यामुळे अनुभव होते.जसे आज काल वेळे प्रमाण,कोणत्या विनाशी धनवानाच्या जवळ धन बँकेत असेल,आलमारी मध्ये असेल, गादीखाली असेल,परंतु न स्वतः कार्यामध्ये लावतील न दुसऱ्यांना त्याचा वापर करू देतील.ना स्वतः लाभ घेतील ना दुसऱ्यांना लाभ घेऊ देतील,तर धन असतानी पण सुख घेतले नाही ना.गादी खालीच धन राहील आणि स्वतः चालले जातील. तर हे वर्णन करणे म्हणजे वापर न करणे.नेहमी गरीब दिसून येतील.हे धन जर स्वतः प्रति किंवा दुसऱ्या प्रती वेळेनुसार वापरले नाही,फक्त बुद्धी मध्ये ठेवले तर,न स्वत: विनाशी धनाच्या नशेमध्ये, आनंदामध्ये राहतील,न दुसऱ्यांना देऊ शकतील.नेहमीच काय करावे, कसे करावे,या विधीद्वारे चालत राहतील,म्हणून दोन माळा बनल्या आहेत.एक मनन करणाऱ्यांची आणि दुसरी वर्णन करणाऱ्यांची.तर तुम्ही कोणते सौदागर आहात, क्रमांक एकचे की दुसऱ्या क्रमांकाचे.या खजाण्याची हीच अट आहे की, जितके दुसऱ्यांना द्याल तेवढेच कार्यामध्ये लावल्यानंतर त्याची वृद्धी होईल.वृद्धी होण्याची ही विधी आहे. या विधीचा अवलंब न केल्यामुळे स्वतःमध्ये पण वृध्दी होत नाही, आणि दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये पण वृध्दी होत नाही.संख्याची पण वृद्धी म्हणत नाहीत,संपन्न बनण्याच्या वृध्दी.काही विद्यार्थी संख्यामध्ये येतात परंतु आज पर्यंत म्हणत राहतात की,समजत नाही योग काय आहे?बाबा ची आठवण कशी करायची?आणखी शक्ती मिळत नाही.तर विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये आहेत,रजिस्टर मध्ये तर नाव आहे,परंतु धनवान तर बनले नाहीत,मागतच राहतील.कधी कोणत्या शिक्षका जवळ जातील, मदत द्या,कधी बाबांशी आत्मिक संवाद करतील,मदत द्या.तर भरपूर झाले नाही ना.जे स्वतः प्रति मनशक्ती द्वारे धनामध्ये वृध्दी करतात,ते दुसऱ्यांना धना मध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात.मनन शक्ती म्हणजे धनाला वाढवणे.तर धनवानची खुशी,धनवानचे सुख अनुभव करणे,समजले.मनन शक्तीचे खूप महत्त्व आहे.अगोदर पण थोडा इशारा दिला आहे.आणखी पण मनन शक्तीचे महत्त्व स्पष्ट करेल. तपासणी करण्याचे काम देत राहतात.परिणाम स्पष्ट होईल आणि तुम्ही म्हणाल,आम्हाला माहीतच नाही,ही गोष्ट बापदादानी सांगितली नाही,म्हणून बाबा रोज ऐकवत राहतात.तपासणे म्हणजेच परिवर्तन करणे,अच्छा.

सर्वश्रेष्ठ सौदागर आत्म्यांना,सर्व खजान्याला वेळेप्रमाण कार्यामध्ये लावणाऱ्या महान विशाल बुद्धी मुलांना,नेहमी स्वतःला आणि सर्वांना संपन्न अनुभव करून अनुभवी बनवणाऱ्या अनुभवाच्या अधिकारी मुलांना,सर्वशक्तिमान अधिकारी बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

पूर्वझोन मधील भाऊ बहिणींशी अव्यक्त बापदादा चा वार्तालाप:- पूर्वेकडून सूर्य उदय होतो ना.तर पूर्व झोन म्हणजेच नेहमी ज्ञान सूर्य उदय आहेच.पुर्व झोन म्हणजेच,नेहमी ज्ञान सूर्याच्या प्रकाशा द्वारे प्रत्येक आत्म्याला प्रकाशामध्ये घेऊन येणारे, अंधाराला समाप्त करणारे.सूर्याचे काम आहे अंधाराला नष्ट करणे.तर तुम्ही सर्व मास्टर ज्ञानसूर्य म्हणजेच, चहूबाजूचे अज्ञान समाप्त करणारे आहात ना.सर्व याच सेवेमध्ये व्यस्त राहतात की,आपल्याच प्रवृत्तीच्या परिस्थिती मध्ये फसलेले राहतात. सुर्याचे काम आहे प्रकाश देण्याच्या कार्यामध्ये व्यस्त राहणे,परत ती प्रवृत्ती असेल किंवा कोणताही व्यवहार असेल किंवा कोणतीही परिस्थिती समोर असेल परंतु सूर्य, प्रकाश देण्याच्या कार्य शिवाय राहू शकत नाही.तर असे मास्टर ज्ञानसूर्य आहात की कधी संभ्रमा मध्ये येतात. पहिले कर्तव्य आहे ज्ञानाचा प्रकाश देणे.जेव्हा ही स्मृती मध्ये राहते की, परमात्मा द्वारा व्यवहार आणि परिवार दोघांना श्रेष्ठ बनवायचे आहे, तेव्हाच ही सेवा स्वतः होईल.जेथे परमार्थ आहे,तेथे व्यवहार स्वतः सहज सिद्ध होतो आणि परमार्थाच्या भावनेद्वारे परिवारामध्ये पण खरे प्रेम, एकता स्वतः येते.तर परिवार पण श्रेष्ठ आणि व्यवहार पण श्रेष्ठ. परमात्मा व्यवहारा पासून किनारा करत नाही,तर आणखीनच परमात्म कार्यामध्ये व्यस्त राहिल्यामुळे परिवार आणि व्यवहारा मध्ये आधार मिळतो.तर परमार्थामध्ये नेहमी पुढे जात राहा.

नेपाळ निवासींची लक्षणांमध्ये पण सूर्य दाखवतात ना.तसेच राजांमध्ये सूर्यवंशी राजे प्रसिद्ध आहेत,श्रेष्ठ मानले जातात.तर तुम्हीपण मास्टर ज्ञानसूर्य सर्वांना प्रकाश देणारे आहात.

वरदान:-
संगम युगामध्ये प्रत्येक कर्म कलाच्या रूपामध्ये करणारे १६ कला संपूर्ण भव.

संगमयुग विशेष कर्मरूपी कला दाखवण्याचे युग आहे.ज्यांचे प्रत्येक कर्म कलाच्या रूपांमध्ये होते,त्यांच्या प्रत्येक कर्माचे किंवा गुणांचे गायन होते.सोळा कला संपूर्ण म्हणजेच प्रत्येक चलन संपूर्ण कलाच्या रूपांमध्ये दिसून येईल,तीच संपूर्ण अवस्थेची लक्षणं आहेत.जसे साकारचे बोलणे,चालणे सर्वांमध्ये विशेषता पाहिली,तर ही कला झाली ना‌. उठणे-बसणेची कला,पाहण्याची कला,चालण्याची कला...सर्वांमध्ये वेगळेपण आणि विशेषतः होती.तसे त्यांचे अनुकरण करून १६ कला संपूर्ण बना.

सुविचार:-
शक्तिशाली तेच आहेत, जे लगेच पारखून निर्णय करतात.