12-04-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुमचे हे आश्चर्यकारक विद्यापीठ आहे,ज्यामध्ये बिघडीला बनवणारे भोलेनाथ
बाबा,शिक्षक बनून तुम्हाला शिकवत आहेत"
प्रश्न:-
या कयामतच्या
वेळेत तुम्ही मुलं सर्वांना कोणते लक्ष देतात?
उत्तर:-
हे आत्म्यांनो आत्ता पावन बना,पावन बनल्याशिवाय परत जाऊ शकत नाहीत.अर्धाकल्पाचा जो
रोग लागलेला आहे, त्यापासून मुक्त होण्यासाठी,तुम्ही सर्वांना सात रोज भट्टीमध्ये
बसवतात.पतितांच्या संगा पासून दूर रहा,कोणाची आठवण यायला नको,तेव्हा काहीतरी
बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होईल.
गीत:-
रात्र घालवली
झोपून,दिवस घालवला खाऊन,हिऱ्या सारखा अमुल्य जन्म कवडी सारखा वाया घालवला...
ओम शांती।
हे मुलांना कोणी म्हटले? कारण शाळेमध्ये बसले आहेत,तर जरूर शिक्षकांनी
म्हटले.प्रश्न येतो की हे शिक्षकांनी म्हटले की पित्याने, की सद्गुरु ने म्हटले?हे
वाक्य कोणी म्हटले? मुलांच्या बुद्धीमध्ये प्रथमतः यायला पाहिजे की,आमचे बेहदचे पिता
आहेत,त्याला परमपिता परमात्मा म्हणतात.तर पित्याने पण म्हटले,शिक्षकांनी पण
म्हटले,तर सोबत सद्गुरूनी पण म्हटले. तुमच्या बुद्धी मध्ये आहे,जे विद्यार्थी
आहेत.दुसऱ्या कॉलेज व विद्यापीठांमध्ये शिक्षक शिकवतात, त्यांना काही पिता किंवा
गुरु म्हणत नाहीत.ही पाठशाला आहे परत विद्यापीठ म्हणा किंवा कॉलेज म्हणा. शिक्षण तर
आहे ना.प्रथम हे समजायचं आहे की,पाठशाला मध्ये आम्हाला कोण शिकवत आहे? मुलं जाणतात,
ते निराकार जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत, सर्वांचे सद्गती दाता आहेत,ते आम्हाला
शिकवत आहेत.ही सर्व रचना,त्या रचनाकाराची संपत्ती आहे.तर स्वतः बसून रचनेच्या आदी
मध्य अंतचे रहस्य समजवतात.तुम्हा मुलांनी जन्म बाबांजवळ घेतला आहे,तुम्ही बुद्धीने
जाणता,आम्ही सर्व आत्म्यांना तो पिता आहे,ज्याला ज्ञानाचे सागर, ज्ञानसंपन्न म्हटले
जाते.ज्ञानाचे सागर आहेत, पतित पावन आहेत. ज्ञानाद्वारेच सद्गती होते, मनुष्य
पतितापासून पावन बनतात.आता तुम्ही मुलं येथे बसले आहात, दुसऱ्या कोणत्या शाळेमध्ये,
कोणाच्या बुद्धीमध्ये राहत नाही की, आम्हाला ज्ञानाचे सागर निराकार, शिव पिता शिकवत
आहेत.हे येथेच तुम्ही जाणतात.तुम्हालाच समजवले जाते,खास भारत आणि बाकी सर्व
दुनियेमध्ये कोणीही समजणार नाहीत,की आम्हाला निराकार परमपिता परमात्मा शिकवत आहेत.
त्यांना शिकवणारे तर मनुष्य शिक्षक आहेत आणि परत असे पण ज्ञान नाही,जे समजतील आम्ही
आत्मा आहोत.आत्माच शिकते,आत्माच सर्व काही करते.अमकी नोकरी आत्म करते,या
कर्मेंद्रिया द्वारे.त्यांना हे आठवणीत राहते की,मी अमका आहे.लगेच आपले नाव रूप
आठवणीत येते.आम्ही हे करतो, आम्ही असे करतो,शरीराचे नावच आठवण येते,परंतु ते चुकीचे
आहे. आम्ही प्रथम तर आत्मा आहोत ना, परत हे शरीर घेतले आहे.शरीराचे नाव बदलत
राहते,आत्म्याचे नाव तर बदलत नाही.आत्मा तर एकच आहे. बाबांनी म्हटले मज आत्म्याचे
नाव एकच शिव आहे.ही सारी दुनिया जाणते बाकी इतके सर्व नावं शरीरावरती ठेवली जातात.
शिव बाबानां तर शिवच म्हणणार, बस. त्यांचे तर शरीर दिसून येत नाही. मनुष्याच्या वरती
तर नावं पडतात, मी आमका आहे.आम्हाला आमके शिक्षक शिकवत आहेत.नाव तर घेतील ना.वास्तव
मध्ये आत्माच शरीराद्वारे शिक्षकाचे काम करते, त्यांच्या आत्म्याला शिकवतात.
संस्कार आत्म्यामध्ये मध्येच असतात.कर्मेन्द्रिय द्वारा शिकते, भूमिका आठवते.आपल्या
संस्करा नुसार परंतु देहा वरती जी नावं पडली आहेत,त्याच्यावरती सर्व धंदा इत्यादी
चालतो.येथे तुम्ही मुलं जाणतात,आम्हाला निराकार पिता शिकवत आहेत.तुमची बुद्धी कुठे
चालली कुठे जाते.आम्ही आत्मा त्या पित्याचे बनलो आहोत.आत्मा समजते,निराकार पिता
आम्हाला या साकार द्वारेरा शिकवतात,त्यांचे नाव शिव आहे.शिवजयंती पण साजरी करतात,ते
पिता आहेत,त्यांनाच परमपिता परमात्मा म्हटले जाते.ते सर्व आत्म्याचे पिता आहेत.आता
त्यांची जयंती कशी साजरी करणार? आत्मा शरीरामध्ये प्रवेश करते किंवा गर्भामध्ये
येते,परमधाम वरून येते.हे कोणाला माहिती होत नाही.ख्रिस्ताला धर्म संस्थापक म्हणतात,
त्यांची आत्मा प्रथम परमधून यायला पाहिजे.सतोप्रधान आत्मा येते.कोणतेही विकर्म केले
नाहीत.प्रथम सतोप्रधान,परत सतो, रजो,तमो मध्ये येते, तेव्हा विकर्म होतात.प्रथम
आत्मा जी येइल,ती सतोप्रधान असल्यामुळे,कोणतेही दुःख भोगू शकत नाही.अर्धा वेळ जेव्हा
पूर्ण होतो,तेव्हा विकर्म करायला लागते.
आज पासून पाच हजार वर्षापूर्वी बरोबर सूर्यवंशी राज्य होते,बाकी सर्व धर्म नंतर आले
आहेत. भारतवासी विश्वाचे मालक होते. भारताला अविनाशी खंड म्हटले जाते,दुसरा कोणता
खंड नव्हता.तर शिवबाबा बिगडीला बनवणारे, भोलेनाथ शिवालाच म्हटले जाते, ना की
शंकराला.भोलेनाथ शिव बिगडीला बनवणारे आहेत.शिव आणि शंकर एक नसून वेग-वेगळे
आहेत.ब्रह्मा विष्णू शंकर ची काहीच महिमा नाही,महिमा फक्त एक शिवाची आहे.जे बिगडीला
बनवतात.ते म्हणतात मी साधारण तना मध्ये येतो,त्यांनी ८४ जन्म पूर्ण केले.आता खेळ
पूर्ण झाला,हे जुने वस्त्र,जुने संबंध पण नष्ट होणार आहेत.आता कोणाची आठवण करायची?
नष्ट होणाऱ्या गोष्टीची आठवण केली जात नाही.नवीन घर घर बनते,तर जुन्या घराशी मन
लागत नाही.ही परत बेहद्दची गोष्ट आहे.सर्वांचे सद्गती होते म्हणजे रावणाच्या
राज्यापासून सर्व मुक्त होतात.रावणाने सर्वांना बिघडवले आहे.भारत कंगाल भ्रष्टाचारी
झाला आहे.ते तर भ्रष्टाचार फक्त पैसे घेणे-देणे, चोरी फसवणूक इत्यादी ला
समजतात.परंतु बाबा म्हणतात प्रथम भ्रष्टाचार आहे काम विकारांमध्ये जाणे.शरीर विकारा
द्वारे बनते म्हणून याला विकारी दुनिया म्हटले जाते. सतयुगाला निर्विकारी दुनिया
म्हटले जाते.आम्ही सतयुगा मध्ये प्रवृत्ती मार्गाचे देवी-देवता होतो. असे म्हणतात
पवित्र बनल्यामुळे, विकारा शिवाय मुलं कसे होतील? तुम्ही सांगा,आम्ही आपली राजधानी
बाहुबळा द्वारे नाही,तर योगबळा द्वारे स्थापन करत आहोत,तर काय योगबळा द्वारे मुलं
होऊ शकणार नाहीत.जेव्हा सर्व दुनिया निर्विकारी आहे,पवित्र गृहस्थ आश्रम आहे.यथा
राजा-राणी संपूर्ण निर्विकारी तथा प्रजा.येथे संपूर्ण विकारी आहेत, सतयुगामध्ये
कोणतेही विकार नसतात,त्याला म्हटले जाते ईश्वरीय राज्य.ईश्वर पित्यांनी स्थापन
केलेले आहे.आता तर रावण राज्य आहे. शिवबाबाची पूजा होते,ज्यांनी स्वर्ग स्थापन
केला.रावण ज्यांनी नर्क बनवला, त्याला जाळत आले आहेत.द्वापरयुग कधी सुरू झाले,हे पण
कोणाला माहिती नाही.ही पण समजून घेण्याची गोष्ट आहे.ही तमोप्रधान आसुरी दुनिया
आहे.ती ईश्वरीय दुनिया आहे,त्याला स्वर्ग दैवी पावन दुनिया म्हटले जाते.हा नर्क
पतित दुनिया आहे.या गोष्टी तेच समजतील, जे रोज रोज राजयोगाचे शिक्षण घेत आहेत.अनेक
जण म्हणतात आमक्या जागी शाळा थोडीच आहे.अरे मुख्य कार्यालय तर आहे ना.तुम्ही जाऊन
मार्गदर्शन घेऊ शकता,ही मोठी गोष्ट तर नाही. सृष्टीचक्रा ला सेकंदांमध्ये समजले
जाते.सतयुग त्रेतायुग झाले,परत द्वापार कलियुग पण झाले,आता संगमयुग आहे.नवीन दुनिया
मध्ये जाण्यासाठी शिकायचे आहे. प्रत्येकाचा हक्क आहे शिकणे.मुलं म्हणतात,बाबा आम्ही
नोकरी करतो. अच्छा एक आठवडा ज्ञान घेऊन, परत तुम्ही कुठेही जाऊ शकता, मुरली मिळत
राहिल.प्रथम सात दिवस भट्टीमध्ये जरुर राहायचे आहे. जरी सात रोज येतील परंतु
सर्वांची बुद्धी तर एक सारखी नाही.सात दिवस भट्टी म्हणजे कुणाची आठवण यायला
नको.कोणाशी पत्र व्यवहार पण नको.सर्व एकसारखे तर समजू शकत नाहीत.येथे पतितांना पावन
बनायचे आहे.हा पतितपणा पण एक रोग आहे.मनुष्य अर्ध्या कल्पाचे महारोगी आहेत,त्यांना
वेगळे बसवावे लागेल.कोणाचा संग लागायला नको.बाहेर जातील उलटे-सुलटे खातील,पतितांनी
बनवलेले भोजन खातील.सतयुगा मध्ये देवता पावन आहेत ना. त्यांच्यासाठी पहा खास मंदीर
बनवतात.देवतांना पतित स्पर्श पण करू शकणार नाहीत.या वेळेत तर मनुष्य अगदीच पतित
भ्रष्टाचारी आहेत.शरीर काम रुपी विषा द्वारे बनते म्हणून याला भ्रष्टाचारी म्हटले
जाते.सन्यांशाचे शरीर पण काम विकार रुपी विषा द्वारे बनले आहे. बाबा म्हणतात,प्रथम
आत्म्याला पवित्र बनवायचे आहे,परत शरीर पण पवित्र पाहिजे,म्हणून जुने अपवित्र
शरीर,सर्व विनाश होतील. सर्वांना परत जायचे आहे,ही कयामतची वेळ आहे.सर्वांना पवित्र
बनून वापस जायचे आहे. भारतामध्येच होळी साजरी करतात. येथे पाच तत्त्वाचे शरीर
सतोप्रधान आहे.सतयुगामध्ये शरीर पण सतोप्रधान असतात.श्रीकृष्णाचे चित्र आहे
ना.नर्काला लात मारत आहेत,कारण सतयुगामध्ये जायचे आहे. अंतविधीच्या वेळेत जेव्हा
स्मशानभूमीत घेऊन जातात,तर आगोदर तोंड शहराकडे असते आणि पाय स्मशानाकडे असतात.परत
स्मशानभूमीत जातात,तर तोंड स्मशानाकडे करतात.आता तुम्ही स्वर्गामध्ये जात आहात,तर
तुमचे तोंड स्वर्ग कडे आहे,शांतीधाम आणि सुखधाम, पाय दुखधाम कडे आहेत.ती तर मृत
शरीराची गोष्ट झाली.येथे तर पुरुषार्थ करायचा आहे.गोड घराची आठवण करत करत तुम्ही
आत्मे गोड घरी चालले जाल. हा बुद्धीचा अभ्यास आहे.हे सर्व रहस्य बाबाच
समजवतात.तुम्ही जाणतात आत्ता आम्हाला घरी जायचे आहे,हे जुने वस्त्र,जुनी दुनिया
आहे.हे नाटक पूर्ण झाले म्हणजे ८४ जन्म भूमिका वठवली.हे पण समजवले आहे,की सर्वच ८४
जन्म घेत नाहीत.जे नंतर येतात,दुसऱ्या धर्मामध्ये तर जरूर त्यांचे कमी जन्म
होतील.इस्लामी पेक्षा बौद्धाचे कमी,त्याच्या पेक्षा ख्रिश्चनचे कमी जन्म होतात.
गुरुनानक तर आत्ता आले आहेत, पाचशे वर्ष झाले,तर ते थोडेच ८४ जन्म घेतील.हिशेब केला
जातो.पाच हजार वर्षांमध्ये इतके जन्म तर पाचशे वर्षांमध्ये किती जन्म झाले असतील,१२-१३
जन्म. ख्रिस्ताला दोन हजार वर्ष झाले आहेत,तर किती जन्म होतील,अर्ध्यापेक्षा कमी
होतील हिशेब आहे ना.यामध्ये कोणी किती घेतले,कोणी किती,अचूक तर कोणी सांगू शकत
नाहीत.या गोष्टी मध्ये जास्त वेळ वाया घालवायचा नाही.तुमचे काम आहे बाबांची आठवण
करणे.फालतू गोष्टींमध्ये वेळ जायला नको.बाबांची आठवण करणे आणि चक्राला जाणने.बाकी
आठवणी द्वारेच पाप नष्ट होतील. यामध्येच कष्ट आहेत म्हणून भारताचा भारतात प्राचीन
योग म्हणतात,जे शिवबाबाच शिकवतात. सतयुग त्रेतामध्ये तर योगाची गोष्टच नाही.परत
भक्तिमार्गा मध्ये हठयोग सुरू होतो.हा तर सहज योग आहे. बाबा म्हणतात माझी आठवण
केल्यामुळेच तुम्ही पावन बनाल. मुख्य गोष्ट आठवण करण्याचीच आहे.कोणते पाप काम करायचे
नाही.देवी देवतांचे मंदिर आहेत, कारण पावन आहेत.पुजारी लोक तर पतित आहेत,पावन
देवतांना स्नान इत्यादी करवतात.वास्तवमध्ये पतितांचा हात पण लागला नाही पाहिजे.या
सर्व भक्तिमार्गाच्या रसम रिवाज आहेत.आता तर आम्ही पावन बनत आहोत.पवित्र बनू परत
देवता बनू.तेथे पूजा इत्यादीची आवश्यकता नसते.सर्वांचे सद्गती दाता एकच बाबा
आहेत,त्यांनाच भोलेनाथ म्हणतात.मी येतो पतित दुनिया पतित शरीरांमध्ये आणि जुन्या
रावण राज्यामध्ये.कोणत्याही तना मध्ये प्रवेश करून मुरली चालवू शकतो,याचा अर्थ हा
नाही की सर्वव्यापी आहेत.प्रत्येकामध्ये आपापली आत्मा आहे.पत्रकामध्ये लिहून घेतले
जाते की,तुमच्या आत्म्याचे पिता कोण आहेत परंतु समजत नाहीत.आत्म्याचे पितात तर एकच
असतील ना.आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत.पिता तर एकच आहेत,त्यांच्याद्वारे जीवनमुक्तीचा
वारसा मिळतो,तेच मार्गदर्शक गाईड आहेत. सर्व आत्म्यांना गोड घरी घेऊन जातात,म्हणून
जुन्या दुनियेचा विनाश होतो.होळी असते ना.शरीर सर्व नष्ट होतील,बाकी सर्व आत्मे
वापस चालले जातील.सतयुगा मध्ये तर खूप थोडे असतील. समजावयाला पाहिजे की स्वर्गाची
स्थापना कोण करतात,विनाश कोण करतात.ते स्पष्ट लिहिले आहे.असे म्हणतात प्रेम करा तर
प्रेम मिळेल.बाबा म्हणतात,जे माझ्या अर्थ खूप सेवा करतात,मनुष्यांना देवता
बनवण्याची,ते खूप प्रिय वाटतात. जे पुरुषार्थ करतात,तेच उच्चपद, वारसा
मिळवतील.परमात्म पित्यापासून सर्वांना वारसा मिळवयाचा आहे.आत्माभिमानी बनावे
लागेल.अनेक जण खूप चुका पण करतात.जुन्या सवयी पक्या झाल्या आहेत ना,तर कितीही समजून
सांगा,तर त्या सुटत नाहीत. त्यामुळे आपल्याच पद कमी करतात,अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) कोणत्याही
गोष्टीच्या वाद-विवादा आपला वेळ वाया घालवायचा नाही.व्यर्थ गोष्टीमध्ये बुद्धी जायला
नको.जेवढे शक्य आहे तेवढे,आठवणीच्या यात्रे द्वारे विकर्म विनाश करायचे आहेत.
आत्माभिमानी राहण्याची सवय लावयाची आहे.
(२) या जुन्या
दुनियेपासून आपले तोंड फिरवायचे आहे.शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे.नवीन घर
बनत आहे,तर जुन्या घरापासून ममत्व नष्ट करायचे आहे.
वरदान:-
मायेच्या
विघ्नाला खेळा समान अनुभव करणारे मास्टर विश्व निर्माता भव.
जसे कोणी बुजुर्ग
व्यक्तीच्या पुढे लहान मुलं,आपल्या लहान पणाच्या अलबेलापना मुळे काही पण
बोलतात,कोणत्या असे कर्तव्य करतात,तर बुजर्ग लोक समजतात, हे तर निर्दोष,अन्जान,लहान
मुलं आहेत.त्यांचा काहीच परिणाम होत नाही.असेच जेव्हा तुम्ही स्वतःला मास्टर विश्व
निर्माता समजाल,तर मायेचे विघ्न मुलांच्या खेळा समान वाटतील.माया कोणत्याही आत्म्या
द्वारे समस्या,विघ्न किंवा परीक्षा पेपर बनून येईल,तर त्यामुळे घाबरणार नाहीत परंतु
त्यांना निर्दोष समजतील.
बोधवाक्य:-
स्नेह,शक्ती
आणि ईश्वरी आकर्षण स्वतःमध्ये भरा,तर सर्व सहयोगी बनतील.