28-04-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,योगानेच आत्म्यांची गंज निघेल, बाबांकडून पूर्ण वारसा मिळेल, यामुळे जेवढे
होईल तेवढे योगबल वाढवा."
प्रश्न:-
देवी देवतांचे
कर्म श्रेष्ठ होते,आता सर्वांचे कर्म भ्रष्ट का बनलेत?
उत्तर:-
कारण आपल्या मूळ धर्माला विसरले आहेत.धर्म विसरल्यानेच जे कर्म करतात ते भ्रष्ट
होतात.बाबा तुम्हाला आपल्या सतधर्माची ओळख देतात,सोबतच संपूर्ण विश्वाचा
इतिहास-भूगोल ऐकवतात,जो सर्वांना सांगायचा आहे,बाबांचा सत्य परिचय द्यायचा आहे.
गीत:-
हे प्राणी तू
आपला चेहरा मन दर्पण रुपी आरशात पहा........
ओम शांती।
हे कोण म्हणाले आणि कोणाला? बाबांनी म्हटले मुलांना.ज्या मुलांना पतित-पावन बनवत
आहेत.मुले जाणतात आम्ही भारतवासी जे देवी-देवता होतो,ते आता ८४ जन्माचे चक्र लावून
सतोप्रधान पासून सतो, रजो,तमो आणि आता तमोप्रधान बनलो आहे.आता परत पतितांना पावन
बनवणारे बाबा म्हणतात, आपल्या मनाला विचारा की कुठपर्यंत आपण पुण्य आत्मा बनलो आहे?
तुम्ही सतोप्रधान पवित्र आत्मा होते,जेंव्हा पहिले- पहिले तुम्ही देवी-देवता म्हटले
जात होते,ज्याला आदि सनातन देवी-देवता धर्म म्हटले जात होते. आता कोणी भारतवासी
आपल्याला देवी-देवता धर्माचे म्हणत नाहीत.हिंदू तर कोणताही धर्म नाही.परंतु पतित
असल्याने स्वतःला देवी-देवता म्हणू शकत नाही.सतयुगात देवता पवित्र होते. पवित्र
प्रवृत्ती मार्ग होता,यथा राजा-राणी तथा प्रजा पवित्र होते. भारतवासींना बाबा आठवण
करून देतात की तुम्ही पवित्र प्रवृत्ती मार्ग वाले आदि सनातन देवी-देवता धर्माचे
होता,ज्याला स्वर्ग म्हटले जायचे.तिथे एकच धर्म होता.पहिला नंबर महाराजा-
महाराणी,लक्ष्मी-नारायण होते. त्यांची पण घराणेशाही होती आणि भारत खूप धनवान होता,
ते सतयुग होते.परत आले त्रेता मध्ये तेंव्हा पण पूज्य देवी-देवता व क्षत्रिय म्हटले
जायचे ते लक्ष्मी- नारायणाचे राज्य,ते सीता-रामाचे राज्य,ती पण घराणेशाही चालली. जसे
ख्रिश्चनांमध्ये एडवर्ड दी फस्ट,सेकण्ड ......असे चालते. भारतातही असे होते.५ हजार
वर्षांची गोष्ट आहे अर्थात ५ हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य
होते. परंतु त्यांनी हे राज्य कसे आणि केव्हा मिळवले-हे कोणीच जाणत नाही.तेच
सूर्यवंशी राज्य परत चंद्रवंशी मध्ये आले कारण पुनर्जन्म घेत-घेत शिडी उतरायची
आहे.हा भारताचा इतिहास- भूगोल कोणी जाणत नाही.रचनाकार बाबा आहेत तर जरूर सतयुगी
नवीन दुनियेचे रचनाकार झाले.बाबा म्हणतात मुलांनो,तुम्ही आजपासून ५ हजार
वर्षांपूर्वी स्वर्गात होते.हा भारत स्वर्ग होता मग नर्कात आलात.दुनिया तर या
जगाच्या इतिहास-भूगोलाला जाणत नाही.ते तर फक्त मागचा इतिहास जाणतात,तो ही अपुर्ण.
सतयुग-त्रेताच्या इतिहास- भूगोलाला कोणी जाणत नाही. ऋषी-मुनी पण म्हणून गेले आम्ही
रचनाकार आणि रचनेच्या आदि- मध्य-अंताला जाणत नाही. जाणणार पण कोणी, कसे,बाबा
तुम्हालाच सन्मुख सांगत आहेत. शिवबाबा भारतातच दिव्य जन्म घेतात,ज्यांची शिवजयंती
पण असते.शिवजयंती नंतर पाहिजे गीताजयंती.परत सोबतच असायला हवी कृष्ण जयंती.परंतु या
जयंतीचे रहस्य भारतवासी जाणत नाहीत की शिवजयंती कधी झाली.दुसऱ्या धर्माचे तर लगेच
सांगतील-बुद्ध जयंती,ख्रिस्त जयंती केंव्हा झाली.भारतवासीयांना विचारा शिवजयंती
केव्हा झाली?कोणी सांगणार नाही.शिव भारतात आले,येऊन काय केले?कोणी जाणत नाहीत.शिव
झाले सर्व आत्म्यांचे पिता.आत्मा आहे अविनाशी.आत्मा एक शरीर सोडून दुसर घेते.हे ८४
चे चक्र आहे.ग्रंथात तर ८४ लाख जन्मांची थाप मारली आहे.बाबा येऊन बरोबर गोष्ट
सांगतात. बाबां शिवाय बाकी सर्व रचनाकार आणि रचनेसाठी खोटे बोलतात कारण हे आहेच
मायेचे राज्य. प्रथम तुम्ही पारस बुद्धी होता, भारत पारसपुरी होता.सोने,हिरे,
रत्नांचे महल होते.बाबा बसून रचनाकार आणि रचनेच्या आदि- मध्य-अंताचे रहस्य अर्थात
दुनियेचा इतिहास-भूगोल सांगतात.भारतवासी हे जाणत नाहीत की आम्हीच प्रथम देवी-देवता
होतो,आता पतित, कंगाल,अधर्मी बनलो आहोत, आपल्या धर्माला विसरलो आहे.हे पण नाटका
नुसार होणार आहे. तर हा जगाचा इतिहास-भूगोल बुद्धिमधे यायला हवा.उच्च ते उच्च सर्व
आत्म्यांचा पिता मूलवतन मध्ये राहतात,परत आहे सूक्ष्मवतन.हे आहे स्थूल वतन.
सूक्ष्मवतन मध्ये फक्त ब्रह्मा- विष्णू-शंकर राहतात.त्यांचा दुसरा कोणता
इतिहास-भूगोल नाही.हे तीन मजले आहेत.ईश्वर एक आहे.त्यांची रचना पण एक आहे, जे चक्र
फिरत राहते.सतयुग पासून त्रेता परत द्वापर,कलीयुग मध्ये यावे लागेल.८४ जन्मांचा
हिशोब पाहिजे ना,जो कोणीच जाणत नाही.ना कोणत्या शास्त्रात आहे.८४ जन्मांचा अभिनय
तुम्ही मुलेच बजावता.बाबा तर या चक्रात येत नाहीत.मुलेच पावन पासून पतित बनतात
यामुळे ओरडतात-बाबा येऊन आम्हाला परत पावन बनवा.एकालाच सर्व बोलावतात,रावण राज्यात
जे सर्व दु:खी होऊन गेलेत,त्यांना येऊन सोडवा परत रामराज्यात घेऊन चला.अर्धाकल्प आहे
रामराज्य अर्धाकल्प आहे रावण राज्य. भारतवासी जे पवित्र होते तेच पतित बनले
आहेत.वाम मार्गात जाण्याने पतित होणे सुरू झाले.भक्ती मार्ग सुरू होतो. आता तुम्हा
मुलांना ज्ञान ऐकवले जाते,ज्यामुळे अर्धाकल्प २१ जन्मांसाठी तुम्ही सुखाचा वारसा
मिळवता.अर्धाकल्प ज्ञानाचे प्रारब्ध चालते,परत रावण राज्य होते.उतरणे चालू
होते.तुम्ही दैवी राज्यात होता परत आसुरी राज्यात आले आहात,
याला हेल(नर्क)पण म्हणतात. तुम्ही हेविन(स्वर्ग)मध्ये होता परत ८४ जन्म घेऊन
नर्कामध्ये येऊन पडले आहात.ते सुखधाम होते.हे आहे दु:खधाम,१०० टक्के कंगाल गरीब
आहेत.
८४ जन्मांचे चक्र लावतात,तेच भारतवासी पूज्य पासून पुजारी बनले आहेत.यालाच दूनियेचा
इतिहास-भूगोल म्हटले जाते.हे आहे सर्व तुम्हा भारतीयांचे चक्र, दुसरे धर्माचे तर ८४
जन्म घेत नाहीत.ते सतयुगात नसतातच. सतयुग त्रेता मध्ये फक्त भारतच
होता.सूर्यवंशी,चंद्रवंशी परत वैश्यवंशी,शुद्रवंशी.....आता परत येऊन तुम्ही
ब्राह्मणवंशी बनले आहात,देवता वंशी बनण्यासाठी. हे आहेत भारताचे वर्ण.आता तुम्ही
ब्राह्मण बनल्याने शिवबाबां कडून वारसा घेत आहात.बाबा तुम्हाला शिकवत आहेत.५ हजार
वर्षांपूर्वी प्रमाणे कल्प-कल्प तुम्ही पावन बनून परत पतित बनत आहात.सुखधाम मध्ये
जाऊन परत दु:खधाम मध्ये येता.परत शांतीधाम मध्ये जायचे आहे, ज्याला निराकारी दुनिया
म्हटले जाते.आत्मा काय आहे,परमात्मा काय आहे,हे कोणीच मनुष्य जाणत नाहीत.आत्मा पण
एक तारा बिंदी आहे.असे म्हणतात- भृकुटीच्या मध्ये तारा चमकतो, छोटीशी बिंदी
आहे,ज्याला दिव्य दृष्टीने पाहू शकतो.खरे पाहता तारा पण म्हणू शकत नाही.तारा तर खूप
मोठा आहे-फक्त दूर असल्याने छोटा दिसतो.हे फक्त एक उदाहरण दिले जाते.आत्मा एवढी छोटी
आहे जसा वरती तारा छोटा दिसतो.बाबांची आत्मा पण एक बिंदी प्रमाणे आहे.त्यांना परम
आत्मा म्हटले जाते.त्यांची माहिमा वेगळी आहे.मनुष्य सृष्टीचे बीजरूप असल्याने
त्यांच्या मध्ये सर्व ज्ञान आहे. तुमच्या आत्म्याला पण आता ज्ञान मिळत आहे.आत्माच
ज्ञान ग्रहण करत आहे,इतक्या छोट्या बिंदी मध्ये ८४ जन्मांचा अभिनय नोंद आहे.तो पण
अविनाशी,८४ जन्मांचे चक्र लावत आले आहेत.याचा शेवट होऊ शकत नाही.देवता होतो, दैत्य
बनलो परत तसेच देवता बनायचे आहे.हे चक्र चालत आले आहे.बाकी तर सर्व जमिनीचे लहान
तूकडे आहेत. इस्लामी,बौद्धी वगैरे काही ८४ जन्म घेत नाहीत.हाच भारत सतयुगात सत्यवादी
सावकार होता परत ८४ जन्म घेऊन विकारी बनले आहेत.ही विकारी दुनिया आहे.५ हजार
वर्षांपूर्वी पवित्रता होती,शांती पण होती, संपत्ती पण होती.बाबा मुलांना आठवण करून
देतात.मुख्य आहे -पवित्रता यामुळे म्हणतात विकारीला निर्विकारी बनवणारे बाबा या.तेच
सदगति देणारे आहेत,यामुळे तेच सतगुरू आहेत.आता तुम्ही बाबां द्वारे गरिबा पासून
राजकुमार बनत आहात किंवा नराचे नारायण,नारीपासून लक्ष्मी बनत आहात.तुमचा हा राजयोग
आहे.भारतालाच आता बाबांकडून राजाई मिळत आहे. आत्माच ८४ जन्म घेते.आत्माच
शिकते,शरीराद्वारे.शरीर शिकत नाही.आत्मा संस्कार घेऊन जाते. मी आत्मा या शरीराद्वारे
शिकते- याला देही-अभिमानी म्हणतात. आत्मा सोडून जाते तर शरीर काही कामाचे राहत
नाही.आत्मा म्हणते,आता मी पुण्य आत्मा बनत आहे.मनुष्य देह- अभिमानात येऊन म्हणतात
हे करतो.....तुम्ही आता समजता आपण आत्मा आहोत,हे आमचे शरीर मोठे आहे.परमात्मा पित्या
द्वारे मी आत्मा शिकत आहे. बाबा म्हणतात,माझी आठवण करा.तुम्ही सोन्याच्या युगात
सतोप्रधान होता परत तुमच्यात कट पडला आहे.खाद (कट) पडत-पडत तुम्ही पावन पासून पतित
बनले.आता परत पावन बनायचे आहे यामुळे म्हणतात-हे पतित-पावन ये,येऊन आम्हाला पावन
बनवा,तर बाबा सल्ला देतात हे पतित आत्म्यांनो माझी आठवण कराल तर तुमच्यातली गंज (कट)
निघेल आणि तुम्ही पावन बनून जाल.याला प्राचीन योग म्हटले जाते. या आठवणीने अर्थात
योग अग्नीने खाद(कट)भस्म होईल.मूळ गोष्ट आहे- पतित पासून पावन बनणे.साधू- संत वगैरे
सर्व पतित आहेत. पावन बनण्याचा उपाय बाबाच सांगतात-माझी आठवण करा.हा शेवटचा जन्म
पवित्र बना.खाता- पिता,चालता-फिरता माझी आठवण करा कारण तुम्हा सर्व
आत्म्यांचा(आशिकांचा) माशूक मी आहे.तुम्हाला आम्ही पावन बनवले होते परत पतित बनले
आहात.सर्व भक्त आशिक आहेत. माशूक म्हणतात कर्म पण खुशाल करा.बुद्धीने माझी आठवण करत
रहा तर विकर्म विनाश होतील.ही मेहनत आहे.तर वारसा मिळवण्यासाठी बाबांची आठवण करायला
पाहिजे ना.जे जास्ती आठवण करतील त्यांना वारसा पण जास्ती मिळेल.ही आहे आठवणीची
यात्रा.जे जास्त आठवण करतील तेच पावन बनून येऊन माझ्या गळ्यातील हार बनतील.सर्व
आत्म्यांचा निराकारी दुनियेत एक समूह बनलेला आहे.त्याला निराकारी झाड म्हटले जाते.हे
आहे निराकारी झाड,निराकारी दुनियेतून सर्वांना क्रमवार यायचे आहे,येतच रहायचे
आहे.झाड किती मोठे आहे.आत्मा इथे येते भूमिका बजावण्यासाठी.जे पण सर्व आत्मे
आहेत,सर्व या नाटकाचे अभिनेते आहेत.आत्मा अविनाशी आहे,त्याच्या मध्ये अभिनय पण
अविनाशी आहे.नाटक कधी बनले,हे सांगू शकत नाही.हे चालतच राहते. भारतवासी पहिले-पहिले
सुखात होते परत दु:खात आले परत शांतीधाम मध्ये जायचे आहे. परत बाबा सुखधाम मध्ये
पाठवतील.यात जो जेवढा पुरुषार्थ करून उच्च पद मिळवेल.बाबा राजधानी स्थापन करत
आहेत.यात पुरुषार्था अनुसार राजाई मध्ये पद मिळेल. सतयुगात तर खूप थोडे मनुष्य
असतील.आदि सनातन देवी- देवता धर्माचे झाड खूप छोटे आहे,बाकी सगळे विनाश होतील. हा
आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन होत आहे अर्थात स्वर्गाचे गेट उघडत आहे.५ हजार
वर्षांपूर्वी पण या युद्धानंतर स्वर्गाची स्थापना झाली होती. अनेक धर्म विनाश झाले
होते.या युद्धाला म्हटले जाते, कल्याणकारी युद्ध.आता नर्काचे दरवाजे उघडलेत,नंतर
स्वर्गाचे दरवाजे उघडतील. स्वर्गाचे दरवाजे बाबा उघडतात,नर्काचे दरवाजे रावण
उघडतो.बाबा वारसा देतात,रावण श्राप देतात.या गोष्टी दुनिया जाणत नाही,तुम्हा मुलांना
समजावतो. शिक्षण मंत्रींना पण बेहदचे ज्ञान हवे आहे.ते तर तुम्हीच देऊ शकता.परंतु
तुम्ही गुप्त आहात. तुम्हाला ओळखतच नाहीत.तुम्ही योगबळाने आपली राजाई घेत
आहात.लक्ष्मी-नारायणाने हे राज्य कसे घेतले हे तर तुम्ही जाणता.याला म्हणतात गुप्त
कल्याणकारी युग.जेंव्हा बाबा येऊन पावन बनवतात.कृष्णाला तर सर्वांचा पिता म्हणणार
नाही. पिता निराकाराला म्हटले जाते, त्या पित्याची आठवण करायची आहे,पावन पण बनायचे
आहे. विकारांना जरूर सोडावे लागेल. भारत निर्विकारी होता आता विकारी,दु:खधाम
आहे.कौडीतुल्य आहे.हा नाटकाचा खेळ आहे,ज्याला बुद्धिने धारण करून दुसऱ्यांना पण
करवायचा आहे.अच्छा.
गोड-गोड फार
वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आठवणीने
पावन बनून बाबांच्या गळ्यातील हार बनायचे आहे.कर्म करताना पण बाबांच्या आठवणीत
राहुन विकर्माजीत बनायचे आहे.
२) पुण्य आत्मा
बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे.देह- अभिमान सोडून देही-अभिमानी बनायचे आहे.
वरदान:-
सन्मानाने पास
होण्यासाठी सर्वांद्वारे संतुष्टतेचा परवाना प्राप्त करणारे संतुष्टमणी भव
जी मुले स्वतः
स्वतःशीच, आपल्या पुरुषार्थ व सेवेनी, ब्राह्मण परिवाराच्या संपर्काने सदा संतुष्ट
रहातात त्यांनाच संतुष्टमणि म्हटले जाते.सर्व आत्म्यांच्या संपर्का मध्ये स्वत:ला
संतुष्ट ठेवणे व सर्वांना संतुष्ट करणे-यात जे विजयी बनतात ते विजयमाळे मध्ये
येतात.सन्मानाने पास होण्यासाठी सर्वांद्वारे संतुष्ट तेचा ची परवाना मिळाला
पाहिजे.हा परवाना घेण्यासाठी फक्त सहन करणे व सामावण्याची शक्ती धारण करा.
बोधवाक्य:-
दयावान बनून
सेवेद्वारे निराश आणि थकलेल्या आत्मायांना आधार द्या.