29-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- पावन बनाल तर आत्मिक सेवेच्या लायक बनाल, देही-अभिमानी मुलं आत्मिक यात्रा करतील आणि दुसऱ्यांना पण ही यात्रा करवतील"

प्रश्न:-
संगमयुगावर तुम्ही मुलं जी कमाई करता,ही खरी कमाई आहे -कशी?

उत्तर:-
आताची जी कमाई आहे ती २१ जन्मापर्यंत चालते,याचे कधीही नुकसान होत नाही.ज्ञान ऐकणे आणि ऐकवणे,आठवण करणे आणि करवणे-ही आहे खरी-खरी कमाई,जे खरा-खरा पिताच तुम्हाला शिकवतो.अशी कमाई साऱ्या कल्पात कोणीही करू शकत नाही.दुसरी कोणतीही कमाई सोबत येत नाही.

गीत:-
आम्हाला त्या मार्गावर चालायचे आहे.....

ओम शांती।
भक्ती मार्गात तर मुलांनी खूप धक्के खाल्ले आहेत. भक्ती मार्गात खूपच भावनेने यात्रा करायला जातात रामायण वगैरे ऐकतात.असे प्रेमाने बसून कथा ऐकतात-ज्यामुळे रडायला पण येते.आमच्या भगवानाची सीता भगवतीचे रावणनी अपहरण केले.परत रामायण ऐकताना रडतात.या सर्व आहेत दंतकथा, ज्याने फायदा काहीच नाही. बोलवत पण रहातात-हे पतित- पावन या,येऊन आम्हा दु:खी आत्म्यांना सुखी बनवा.हे नाही समजत की आत्मा दु:खी होते कारण ते तर आत्म्याला निर्लेप म्हणतात.समजतात आत्मा सुख दु:खापासून अनासक्त आहे.हे का म्हणतात?कारण समजतात- परमात्मा सुख दु:खापासून अनासक्त आहे,तर मुले परत सुख दु:खात कशी येतील?या सर्व गोष्टींना आता मुलांनी जाणले आहे.या ज्ञान मार्गात पण कधी ग्रहचारी बसते,कधी काय होते.कधी प्रफुल्लित राहतत,कधी कोमेजलेला चेहरा राहतो.हे आहे मायेशी युद्ध.मायेवरच विजय मिळवायचा आहे.जेंव्हा बेशुद्ध होतात तेंव्हा संजीवनी बुटी दिली जाते-मनमनाभव.भक्ती मार्गात दिखावा खूप आहे. देवतांच्या मूर्तींना किती सजवतात,खरे दागिने घालतात. ते दागिने तर ठाकुरची संपत्ती झाली.ठाकुरची संपत्ती जे पुजारी व विश्वस्त आहेत त्यांची होते. तुम्ही मुलं जाणता की आम्ही चैतन्य मध्ये खूप हिरे दागदागिन्यांनी सजलेले होतो. परत जेंव्हा पुजारी बनतो तेंव्हा पण खूप दागिने घालतो.आता काहीच नाही.चैतन्य रूपात पण घातले परत ज़ड रूपात पण घातले.आता दागिने नाहीत. बिल्कुल साधारण आहोत.बाबा म्हणतात मी साधारण शरीरामध्ये येतो.कोणत्या राजाई इ.चा थाटमाट नाही.संन्याशांचे पण खूप थाटमाट असतात.आता तुम्ही समजले आहे.बरोबर सतयुगात कसे आम्ही आत्मे पवित्र होतो. शरीर पण आमचे पवित्र होते. त्यांचा शृंगार पण खूप चांगला असतो.कोणी सुंदर असेल तर त्यांना सजण्याची पण आवड असते.तुम्ही पण सुंदर होतात तेंव्हा खूप छान-छान दागिने घालत होते.हिऱ्यांचे मोठे हार इ. घालत होता.इथे प्रत्येक गोष्ट सावळी आहे.बघा,गायी पण सावळ्या होत गेल्या आहेत.बाबा जेंव्हा श्रीनाथ कडे गेले होते तेंव्हा खूप चांगल्या गायी होत्या.कृष्णाची गाय खूप छान दाखवतात.इथे तर बघा कोणी कसे,कोणी कसे आहेत कारण कलीयुग आहे.अशा गायी तिथे नसतात.तुम्ही मुले विश्वाचे मालक बनता.तुमची सजावट पण तिथे अशी सुंदर राहते.विचार करा- गायी तर अवश्य असायला पाहिजेत.तिथल्या गायींचे शेण पण कसे असेल.किती ताकत असेल. जमीनीला खत पाहिजे ना. खत टाकले की चांगले अन्न मिळते.तिथे सर्व गोष्टी खूप शक्तिशाली असतात.इथे तर कोणत्या गोष्टीत ताकत नाही. प्रत्येक गोष्ट शक्तीहीन झाली आहे.मुली सूक्ष्मवतन मध्ये जातात.किती छान-छान मोठी फळे खायच्या,शूबीरस इ. प्यायच्या.हे सर्व साक्षात्कार करवले जायचे.माळी तिथे कसे फळे इ.कापून देतात.सूक्ष्मवतन मध्ये तर फळे इ.असू शकत नाही.हा साक्षात्कार होतो.वैकुंठ तरीही इथेच असेल ना.मनुष्य समजतात वैकुंठ कुठे वरती आहे. वैकुंठ ना सूक्ष्मवतन,ना मूलवतन मध्ये असते,इथेच असते.इथे ज्या मुली साक्षात्कार करतात ते परत या डोळ्यांनी पहाल.जसे पद अशी सामग्री पण राहते.राजांचे महल पहा, कसे छान-छान असतात.जयपुर मध्ये खूप छान-छान महल बनवले आहेत. फक्त महल पाहण्यासाठी मनुष्य जातात, तिकीट पण असते. खास महल पाहण्यासाठी ठेवतात.स्वत: परत दुसऱ्या महालात राहतात.ते पण आता कलीयुगात.ही आहेच पतित दुनिया.कोणी स्वतःला पतित थोडीच समजतात.तुम्ही आता समजता-आम्ही तर पतित होतो. काही कामाचे नव्हतो परत आम्ही गोरे बनू.ती दुनियाच सुंदर असेल. इथे भले अमेरिका इ.मध्ये सुंदर महल आहेत.परंतु इथल्या प्रमाणे काहीच नाही कारण हे तर अल्पकाळ सुख देणारे आहेत. तिथे तर सुंदर महल असतात.सुंदर गायी असतात. तिथे गवळी पण असतात. श्रीकृष्णाला गवळी म्हणतात ना. इथे जे गायींना सांभाळणारे आहेत,ते म्हणतात आम्ही गूजर (गवळी)आहोत.

कृष्णाचे वंशावळी आहोत. वास्तविक कृष्णाचे वंशावळी म्हणू शकत नाही.कृष्णाच्या राजधानीचे म्हणू शकतो.आदि सनातन देवी-देवता धर्माचे होते परत पतित बनले तर स्वत:ला हिंदू म्हणवतात.विचारा तुम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहात की हिंदू धर्माचे आहात? आजकाल सर्व हिंदू लिहितात. हिंदू धर्म कोणी स्थापना केला? देवी-देवता धर्म कोणी स्थापन केला? हे पण कोणी जाणत नाही.बाबा हा प्रश्न विचारतात आदि सनातन देवी-देवता धर्म कोणी स्थापन केला? शिवबाबा ब्रह्मा द्वारे करत आहेत.राम किंवा शिवबाबांच्या श्रीमतावर आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन झाला.परत रावण राज्य होते, विकारात जातात.भक्तीमार्ग सुरू होतो तेंव्हा हिंदू म्हणून घेतात. आता स्वतःला कोणी देवता म्हणू शकत नाही.रावणाने विकारी बनवले आहे,बाबा येऊन निर्विकारी बनवतात.तुम्ही ईश्वरीय मतावर देवता बनता.बाबाच येऊन तुम्हा ब्राह्मणांना देवता बनवतात.शिडी कशी उतरतात,हे तुम्हा मुलांच्या बुद्धित क्रमवार बसते.तुम्ही जाणता बाकी सर्व मनुष्य आसुरी मतावर चालत आहेत आणि तुम्ही ईश्वरीय मतावर चालत आहात. रावणाच्या मतावर तुम्ही शिडी उतरत आले आहात.८४ जन्मानंतर परत प्रथम जन्म होईल.ईश्वरीय बुद्धिने तुम्ही साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य- अंतला जाणता.हे तुमचे जीवन खूप अमूल्य आहे,यांचा पराक्रम आहे.जेंव्हा बाबा येऊन आम्हाला इतके पावन बनवतात.आम्हाला आत्मिक सेवेच्या लायक बनवतात.ते आहेत शारीरिक समाज सेवक,जे देह-अभिमानात राहतात.तुम्ही देही-अभिमानी आहात.आत्म्यांना आत्मिक यात्रेवर घेऊन जातात.बाबा समजावतात तुम्ही सतोप्रधान होता,आता तमोप्रधान बनले आहात.सतोप्रधानला पावन,तमोप्रधानला पतित म्हटले जाते.आत्म्यामध्येच खाद पडली आहे.आत्म्यालाच सतोप्रधान बनवायचे आहे.जेवढे आठवणीत राहाल तेवढे पवित्र बनाल.नाही तर कमी पवित्र बनाल.पापांचे ओझे डोक्यावर राहून जाईल. आत्मे तर सर्व पवित्र असतात परत प्रत्येकाचा अभिनय वेगळा आहे.सर्वांचा एकसारखा अभिनय होऊ शकत नाही.सर्वात उच्च बाबांचा अभिनय मग ब्रह्मा- सरस्वतीचा किती अभिनय आहे. जो स्थापन करतो,तोच पालना पण करतो.मोठा अभिनय त्यांचा आहे.प्रथम आहेत शिवबाबा परत आहे ब्रह्मा-सरस्वती,जे पुनर्जन्मात येतात.शंकर तर फक्त सूक्ष्मरूप धारण करतात.असे नाही की शंकर कोणाचे शरीर कर्जाऊ घेतात.कृष्णाला स्वतःचे शरीर आहे.इथे फक्त शिवबाबा भाड्याने शरीर घेतात.पतित शरीर, पतित दुनियेत येऊन सेवा करतात, मुक्ती-जीवनमुक्ती मध्ये घेऊन जाण्याची.प्रथम मुक्ती मध्ये जावे लागेल.ज्ञानी एकच पिता पतित- पावन आहे,त्यांनाच म्हणतात शिवबाबा.शंकराला बाबा म्हणणे शोभत नाही.शिवबाबा अक्षर खूप गोड आहे.शिवाला कोणी रुई वाहतात,कोणी काय वाहतात.कोणी दूध पण वाहतात.

बाबा मुलांना अनेक प्रकारची शिकवण देतात.मुलांसाठी समजावले जाते,सर्व आधार योगवर आहे.योगनेच विकर्म विनाश होतील.योगींना ज्ञानाची धारणा पण चांगली होईल. आपल्या धारणेत चालत राहतील कारण परत ऐकवावे पण लागते. ही आहे नवीन गोष्ट-भगवानाने ज्यांना डायरेक्ट ऐकवले,त्यांनीच ऐकले परत तर हे ज्ञान राहत नाही.आता बाबा तुम्हाला जे ऐकवतात ते आता तुम्ही ऐकता. धारणा होते मग तर प्रारब्धाचा अभिनय बजवावा लागतो.ज्ञान ऐकणे,ऐकवणे आता होते. सतयुगात हा अभिनय नसेल. तिथे तर आहेच प्रारब्धचा अभिनय.मनुष्य बॅरिस्टरी शिकतात परत बॅरिस्टर(वकिल) बनून कमवतात.ही किती मोठी कमाई आहे,याला दुनिया जाणत नाहीत.तुम्ही जाणता खरे बाबा आपल्याला खरी कमाई करवत आहेत.यांचे कधी नुकसान होऊ शकत नाही.आता तुम्ही खरी कमाई करता.ती मग २१ जन्म सोबत राहते.ती कमाई सोबत राहात नाही.ही सोबत राहणारी आहे, तर अशा कमाईला सोबत ठेवले पाहिजे.या गोष्टी तुमच्या शिवाय कोणाच्या बुद्धीत नाहीत.तुमच्यात पण सारखे-सारख कोणी विसरतात.बाबा आणि वारशाला कोणी विसरले नाही पाहिजे.फक्त,एकच गोष्ट आहे.बाबांची आठवण करा.ज्या बाबां कडून २१ जन्मांचा वारसा मिळतो,२१ जन्म निरोगी काया राहते.वृद्धकाळापर्यंत अकाली मृत्यू होत नाही.मुलांना किती खुशी व्हायला हवी.बाबांची आठवण मुख्य आहे,यातच माया विघ्न आणते,वादळ आणते. अनेक प्रकारची वादळे येतात. तुम्ही म्हणता-बाबांची आठवण करू,परंतु करू शकत नाही. आठवणीतच खूप नापास होतात. योगाची अनेकांमध्ये कमी आहे. जेवढे होऊ शकेल,योगा मध्ये मजबूत व्हायला पाहिजे.बाकी बीज आणि झाडाचे ज्ञान कोणती मोठी गोष्ट नाही.बाबा म्हणतात माझी आठवण करा.माझी आठवण करून,मला जाणण्याने तुम्ही सर्व काही जाणाल.आठवणीत सर्व काही भरलेले आहे.गोड बाबा,शिव बाबांची आठवण करायची आहे. उच्च ते उच्च भगवान.श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहेत.सर्वोच्च वारसा देतात २१ जन्मांसाठी.सदा सुखी अमर बनवतात.तुम्ही अमरपुरीचे मालक बनता.तर अशा बाबांची खूप आठवण करायला पाहिजे. बाबांची आठवण करणार नाही तर बाकी सर्व काही आठवेल. अच्छा.

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) हे ईश्वरीय जीवन खूप-खूप अमूल्य आहे,या जीवनात आत्मा आणि शरीर दोघांना पावन बनवायचे आहे.आत्मिक यात्रेत राहून दुसऱ्यांना हीच यात्रा शिकवायची आहे.

२) जितके होईल-खऱ्या कमाईत लागायचे आहे.निरोगी बनण्यासाठी आठवणीत मजबूत व्हायचे आहे.

वरदान:-
मास्टर ज्ञानी बनून अजाणतेपणाला समाप्त करणारे ज्ञान स्वरूप,योग युक्त भव

मास्टर ज्ञानी बनणाऱ्या मध्ये कोणत्याही प्रकारचा अजाणतेपणा राहात नाही,ते असे म्हणून स्वतःला सोडवू शकत नाही की या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या.ज्ञान स्वरूप मुलांमध्ये कोणत्याही गोष्टीचे अज्ञान राहू शकत नाही आणि जे योग युक्त आहेत त्यांना अनुभव होतो जसे की पहिल्या पासून सर्व काही जाणतात.ते हे जाणतात की मायेची छम-छम,रिमझिम कमी नाही,माया पण खूप रुबाबदार आहे यामुळे तिच्या पासून संभाळ करायचा आहे.जे सर्व रूपांनी मायेच्या ज्ञानाला समजलेत त्यांच्यासाठी हारणे असंभव आहे.

बोधवाक्य:-
जो नेहमी प्रसन्नचित्त आहे,तो कधी प्रश्नचित होऊ शकत नाही.