26-04-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो:-देवता बनायचे असेल तर अमृत प्या आणि पाजा,अमृत पिणारेच श्रेष्ठाचारी
बनतात."
प्रश्न:-
यावेळी सतयुगी
प्रजा कोणत्या आधारावर तयार होत आहे?
उत्तर:-
जे या ज्ञानाने प्रभावित होतात,खूप छान,खूप छान म्हणतात पण अभ्यास करत नाहीत,मेहनत
करू शकत नाही, ते प्रजा बनतात.प्रभावित होणे म्हणजे प्रजा बनणे.सूर्यवंशी राजा -राणी
बनण्यासाठी तर कष्ट पाहिजेत.अभ्यासावर पूर्ण लक्ष हवे.आठवण करत आणि करवून घेत राहाल
तर उच्च पद मिळू शकते.
गीत:-
तू रात्र
घालवली झोपून दिवस घालवला खाऊन......
ओम शांती।
मुलांनी गीत ऐकले की आपले जीवन हिऱ्या सारखे होते.आता कौडीसारख झाले आहे.ही तर
सामान्य गोष्ट आहे. छोटी मुले पण समजू शकतात. बाबा खूप सहज रीतीने समजावतात,जे कोणी
छोटी मुले पण समजू शकतील. सत्यनारायणाची कथा ऐकवतात तर छोटी-छोटी मुले पण बसतात.
परंतु त्या सतसंगात जे समजावतात त्या सर्व कथा आहेत.कथा कोणते ज्ञान नाही, बनवलेल्या
कहाण्या आहेत.गीतेची कहाणी, रामायणाची कहाणी, वेगवेगळे ग्रंथ आहेत,ज्यांच्या कहाण्या
बसून ऐकवतात.त्या सर्व आहेत कथा.कहाण्यांपासून काही फायदा होतो का?ही आहे
सत्यनारायणाची अर्थात नरा पासून नारायण बनण्याची खरी कथा.हे ऐकून तुम्ही नराचे
नारायण बनाल.ही अमर कथा पण झाली. तुम्ही निमंत्रण पण देता की,तुम्ही या तर तुम्हाला
अमरकथा ऐकवू, तर तुम्ही अमरलोक मध्ये जाल.तरी पण कोणी समजत नाहीत.ग्रंथामधील कहाणी
ऐकत राहतात. मिळत काहीच नाही. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात जाऊन दर्शन करून
येऊ,महात्म्याचे दर्शन करून येऊ,ही एक परंपरा चालत आली आहे.ऋषी-मुनी जे होऊन गेले
आहेत त्यांच्या पाया पडत आले आहेत.त्यांना विचारा,रचता आणि रचनेची कहाणी माहित
आहे?तर म्हणतील नाही.आता तुम्ही मुले समजता की ही रचता आणि रचनेची कहाणी तर खूप सहज
आहे.अल्फ आणि बे ची कहाणी आहे.भले प्रदर्शनीत जे येतात ते कहाणी तर ठीक ऐकतात परंतु
पवित्र बनत नाहीत.समजतात ही विकारात जाण्याची परंपरा तर अनादि आहे.मंदिरात
देवतांच्या पुढे जाऊन तर गातात तुम्ही संपूर्ण निर्विकारी आहात....परत बाहेर जाऊन
म्हणतात विकारात जाणे तर अनादि आहे.याशिवाय दुनिया कशी चालेल?लक्ष्मी-नारायण यांना
पण मुलं होती ना,असे बोलतात तर अशांना काय म्हणणार.मनुष्याचा लकब (पद) तर देऊ शकत
नाही.लक्ष्मी-नारायणाच्या राज्यात देवता पण मनुष्य होते,किती सुखी होते.तुम्हा
मुलांना बाबा खूप सहज गोष्ट सांगतात,बरोबर या भारतातच स्वर्ग होता.लक्ष्मी-
नारायणाचे राज्य होते.चित्र पण आहे,हे तर सर्व मानतील की सतयुगात त्यांचे राज्य
होते.तिथे कोणी दु:खी नव्हते,संपूर्ण निर्विकारी होते,त्यांची मंदिरे पण मोठी-मोठी
बनवली होती.त्यांना ५ हजार वर्ष झाली.आता ते नाहीत.आता तर कलियुगाचा अंत आहे.मनुष्य
आपसात युद्ध-भांडण करतात.भगवान तर वरतीच निर्वाणधाम मध्ये राहतात.खरे तर आपण आत्मे
पण तिथेच राहतो,इथे भुमिका बजावण्यासाठी येतो.प्रथम आपण लक्ष्मी-नारायणाच्या
राज्यात होतो.तिथे खूप सुख-आनंद होता, परत आपल्याला ८४ जन्म घ्यावे लागले.८४ चे
चक्र गायले जाते.आपण सूर्यवंशी मध्ये १२५० वर्ष राज्य केले आहे.तिथे खूपच सुख होते,
संपूर्ण निर्विकारी होतो,हिरे-रत्नांचे महल होते. आपण राज्य केले परत ८४ जन्मात यावे
लागले.हे दुनियेच्या इतिहास-भूगोलाचे चक्र फिरत राहते.अर्धा कल्प सुख होते.
रामराज्यात होतो परत मनुष्यांची वृध्दी होत गेली.सतयुगात ९ लाख होते.सतयुग अंताला ९
लाखापासून दोन करोड झाले, परत १२ जन्म त्रेता मध्ये खूप सुख चैन मध्ये होतो.एकच
धर्म होता.मग काय झाले?परत रावण राज्य चालू झाले.रामराज्य आणि रावण राज्य. बाबा खूप
सहज रीतीने समजावत आहेत.छोट्या-छोट्या मुलांना पण असे समजावले पाहिजे आणखी काय
झाले?मोठे-मोठे सोने हिरे-रत्नांचे महल भूकंपामधे खाली गेले.भारतीयांच्या विकारी
बनण्यानेच भूकंप झाला,परत रावण राज्य सुरू झाले.पवित्र पासून अपवित्र झाले.असे
म्हणतात पण सोन्याची लंका खाली गेली.काही तरी वाचले असेल ना,ज्यांचे परत मंदिर वगैरे
बनवले असतील.भक्ती मार्ग सुरू झाला-मनुष्य विकारी होऊ लागले.परत रावण राज्य आले, तर
आयुष्य पण कमी झाले. आपण निर्विकारी योगी पासून विकारी भोगी बनलो,यथा राजा राणी तथा
प्रजा सर्व विकारी बनले.ही कहाणी किती सहज आहे.छोट्या-छोट्या मुली पण ही कहाणी
ऐकवतील तर मोठ- मोठ्या माणसांची मान खाली जाईल.आता बाबा बसून सांगतात,तोच ज्ञान
सागर पतित- पावन आहे.अच्छा व्दापर मध्ये पतित बनले परत दुसरे धर्म पण सुरू
झाले.अमृताचा जो नशा होता तो खलास झाला.युद्ध- भांडण होऊ लागली.द्वापर पासून आपण
उतरलो आणि कलियुगात आपण अजूनच विकारी बनलो. दगडांच्या मूर्ती बनवू लागलो.
हनुमान,गणेशाची......दगडा सारखी बुद्धी बनली,तर दगडाची पूजा करू लागलो.समजत होतो की
भगवान दगड-मातीत आहे.असे करत-करत भारताचे हे हाल झाले आहेत, आता परत बाबा
म्हणतात,विष सोडून अमृत पिऊन पवित्र बना आणि परत राजाई घ्या.विष सोडाल तर परत तुम्ही
मनुष्यापासून देवता बनाल.परंतु विष सोडत नाहीत.
विषासाठी किती मारतात,त्रास देतात तेव्हा तर द्रौपदीने बोलावले ना.तुम्ही समजता की
अमृत पिल्याशिवाय आम्ही देवता कसे बनू.सतयुगात तर रावण नसतोच. बाबा
म्हणतात,जोपर्यंत श्रेष्ठाचारी बनणार नाही,स्वर्गात येऊ शकणार नाही.जे श्रेष्ठाचारी
होते ते आता भ्रष्टाचारी बनले आहेत. परत आता अमृत पिऊन श्रेष्ठाचारी बनायचे आहे.बाबा
म्हणतात माझी आठवण करा. काय गीता विसरलात? गीतेची रचना मी केली आणि नाव टाकले
कृष्णाचे. या लक्ष्मी-नारायणाला ही राजाई कोणी दिली?जरूर भगवानाने दिली असेल.मागच्या
जन्मी भगवानाने राजयोग शिकवला,परत कृष्णाचे नाव टाकले आहे.तर समजवण्याचा खूप सराव
केला पाहिजे. खूप सहज कहाणी आहे.बाबांना किती वेळ लागला?अर्ध्या तासात इतकी सहज
गोष्ट पण समजू शकत नाहीत, यामुळे बाबा म्हणतात फक्त एक छोटी कहाणी बसून कोणाला
समजावून सांगा.हातात चित्र घ्या. सतयुगात लक्ष्मी-नारायणाचे राज्य परत राम-सीताचे
राज्य.....परत द्वापर मध्ये रावणाचे राज्य झाले.किती सहज कहाणी आहे.बरोबर आपण देवता
होतो परत क्षत्रिय,वैश्य, शुद्र बनलो.आता स्वत:ला देवता न समजल्यामुळे हिंदू
म्हणवतात. धर्म श्रेष्ठ,कर्म श्रेष्ठ पासून धर्म भ्रष्ट,कर्म भ्रष्ट बनले आहेत.असे
छोट्या-छोट्या मुली भाषण करतील तर सर्व सभेत वाहवा होईल.
बाबा सर्व सेवाकेंद्रासाठी ऐकवतात.आता हे मोठे-मोठे शिकत नाहीत तर छोट्या-छोट्या
कुमारींना शिकवा.कुमारींचे नाव पण आहे.दिल्ली,मुंबई मध्ये खूप चांगल्या-चांगल्या
कुमारी आहेत,ज्या शिकलेल्या आहेत.त्यांनी तर उभे राहयला पाहिजे.किती काम करू
शकतात.जर कुमारी उभ्या राहिल्या तर नाव प्रसिद्ध होईल.सावकार घरातील जे आहेत,
त्यांनी हिम्मत ठेवणे कठीण आहे.सावकारीचा नशा राहतो.हुंडा वगैरे मिळतो बस.कुमारी
लग्न वगैरे करून तोंड काळे करतात आणि सर्वांपुढे झुकावे लागते.तर बाबा किती सहज
समजावतात.परंतु पारसबुध्दी बनण्याचा विचारच येत नाही.पहा जे शिकत नाहीत ते पण आजकाल
खासदार, आमदार वगैरे बनले आहेत.शिक्षणाने तर काय-काय बनतात.हे शिक्षण तर खूप सहज
आहे.दुसऱ्यांना पण जाऊन शिकवायला हवे. परंतु श्रीमतावर चालत नाही तर शिकत पण
नाहीत.खूप चांगल्या- चांगल्या कुमारी आहेत परंतु आपलाच नशा चढला आहे.थोडे काम केले
तर समजतात आम्ही खूप काम केले.आता तर खूप काम करायचे आहे.आजकाल फॅशन मध्येच कुमारी
राहतात. तिथे तर नैसर्गिक शृंगार असतो. इथे तर किती कृत्रिम शृंगार करतात.फक्त
केशभूषा करण्याचेच किती पैसे देतात.हा आहे मायेचा भपका.परत मायेचे रावण राज्यात
पतन,परत उत्थान रामराज्या मध्ये.आता रामराज्य स्थापन होत आहे.परंतु तुम्ही कष्ट करा
ना.तुम्ही काय बनाल?जर शिकला नाहीत तर तिथे जाऊन पाई-पैशाची प्रजा बनाल. आजकालची
मोठी-मोठी माणसे तिथे सर्व प्रजे मध्ये येतील. सावकार लोक फक्त छान-छान म्हणत आपल्या
धंद्यात लागतात. खूप चांगले प्रभावित होतात मग काय.शेवटी काय होईल? तिथे जाऊन प्रजा
बनतील.प्रभावित म्हणजे प्रजा.जे मेहनत करतील ते रामराज्यात येतील.ज्ञान समजावणे तर
खूप सोपे आहे.या कहाणीच्या नशेत कोणी राहील तर बेडा पार होईल म्हणजेच नाव किनाऱ्याला
लागेल.आपण शांतीधाम मध्ये जाऊ परत सुखधाम मध्ये येऊ बस आठवण करत-करवत राहायची
आहे,तेंव्हाच उच्च पद मिळेल.लक्ष शिक्षणावर द्यायचेआहे.चित्र हातात हवे.जसे बाबा
जेंव्हा लक्ष्मी-नारायणाची पूजा करायचे तेंव्हा चित्र खिशात असायचे.चित्र छोटे पण
आहे, लाकेट मध्ये पण बसू शकते,त्यावर समजवायचे आहे.हे बाबा आहेत, त्यांच्याकडून
वारसा मिळत आहे. आता पवित्र बना,बाबांची आठवण करा.या बैजमध्ये किती ज्ञान आहे.यात
सर्व ज्ञान आहे. यावर समजावणे खूप सहज आहे.सेकंदात बाबां कडून स्वर्गाचा
जीवनमुक्तीचा वारसा. कोणी पण समजावेल तर जीवन मुक्ती पदाचा अधिकारी बनेल. बाकी
शिक्षणानुसार उच्च पद मिळेल.स्वर्गात तर येतील ना. मागून येतील तर ना.वृध्दी तर
होईलच.देवी-देवता धर्म उच्च आहे,ते पण तर बनतील ना.प्रजा तर लाखों बनेल.सूर्यवंशी
बनण्यासाठी कष्ट आहे.सेवा करणारेच चांगले पद प्राप्त करू शकतील.त्यांचे नाव पण
प्रसिद्ध आहे-कुमारका आहे,जनक आहे छान सेंटर सांभाळत आहेत. काही तक्रार नाही. बाबा
म्हणतात वाईट ऐकू नका,वाईट बोलू नका तरीही अशा-अशा गोष्टी करतात.असे जाऊन काय
बनतील.एवढी सहज सेवा पण करत नाहीत. छोट्या-छोट्या मुली पण हे समजावू शकतात.वानर सेना
पण प्रसिद्ध आहे. सीता रावणाच्या कैदेत फसली होती तिला सोडवायचे आहे. कथा तर
काय-काय बनवल्या आहेत.असे-असे कोणी भाषण करा.बाकी फक्त म्हणतात अमका खूप प्रभावित
झाला. विचारा,तुम्हाला काय बनायचे आहे? फक्त दुसऱ्यांना म्हणतील यांचे ज्ञान खूप
छान आहे.स्वत: काहीच समजत नाही,याचा काय फायदा.अच्छा.
गोड-गोड फार
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१ ) पारसबुध्दी
बनण्यासाठी अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे.श्रीमतावर शिकायचे आणि शिकवायचे
आहे.हदच्या सावकारीचा नशा,फॅशन वगैरे सोडून या बेहदच्या सेवेत लागायचे आहे.
२ ) वाईट ऐकू
नका,वाईट पाहु नका.....कोणत्याही व्यर्थ गोष्टी करायच्या नाहीत.कोणावर प्रभावित
व्हायचे नाही.सर्वांना सत्यनारायणाची कहाणी ऐकवायची आहे.
वरदान:-
ज्ञानाच्या
प्रकाश-शक्ति द्वारे आपल्या भाग्याला जागवणारे सदा सफलतामूर्त भव
जी मुले ज्ञानाच्या
प्रकाश-शक्तिने आदि-मध्य-अंताला जाणून पुरुषार्थ करतात,त्यांना सफलता नक्की प्राप्त
होते.सफलता प्राप्त होणे पण भाग्याची लक्षणं आहेत. ज्ञानी बनणे पण भाग्याला
जागवण्याचे साधन आहे.ज्ञान फक्त रचयिता आणि रचनेच नाही परंतु ज्ञानी अर्थात
प्रत्येक संकल्प, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कर्मात ज्ञान स्वरूप असेल तेंव्हाच
सफलतामूर्त बनाल.जर पुरुषार्थ योग्य असून पण सफलता दिसत नाही तर, समजले पाहिजे की
ही असफलता नाही,परिपक्वतेच साधन आहे.
बोधवाक्य:-
न्यारे बनून
कर्मेंद्रियांकडून कर्म करा तर कर्मातीत स्थितीचा अनुभव सहज करू शकाल.