16-04-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलानो, अल्फ आणि बे (अल्लाह आणि बादशाही) ची आठवण करा, तर रमणिक बनाल. बाबा पण
रमणिक आहेत. तर त्यांची मुले पण रमणिक असली पाहिजेत."
प्रश्न:-
देवतांच्या
चित्रांचे आकर्षण सर्वांना कां होत आहे? त्यांच्या मध्ये कोणता विशेष गुण आहे?
उत्तर:-
देवता फार रमणिक आणि पवित्र आहेत. रमणिकते मुळे त्यांच्या चित्रा चे आकर्षण होते.
देवतां मध्ये पवित्रतेचा विशेष गुण आहे. ज्या गुणांमुळेच अपवित्र मनुष्य नमन करतात.
रमणिक तेच बनतात, ज्यांच्या मध्ये सर्व दैवीगुण आहेत, जे नेहमी खुश राहतात.
ओम शांती।
आत्मा आणि परमात्मा चा मेळा किती आश्चर्यकारक आहे. अशा बेहदच्या बाबाची तुम्ही सर्व
मुले आहात तर मुले पण किती रमणिक असली पाहिजेत. देवता पण रमणिक आहेत ना. परंतु
राजधानी फार मोठी आहे. सर्व एक सारखे रमणिक असू शकत नाहीत. तरी पण कांही कांही मुले
फारच रमणिक जरूर आहेत. रमणिक कोण बनतात? जे नेहमी खुशी मध्ये राहतात, ज्यांच्या
मध्ये दैवी गुण आहेत. हे राधे कृष्ण इत्यादी रमणिक आहेत ना. त्यांच्या मध्ये फार
आकर्षण आहे. कोणते आकर्षण आहे? पवित्रतेचे, कारण त्यांची आत्मा पण पवित्र आहे, तर
शरीर पण पवित्र आहे. पवित्र आत्मे अपवित्रला आकर्षित करतात. त्यांच्या पायावर
झुकतात. त्यांच्या मध्ये किती ताकत आहे. जरी संन्यासी आहेत, तरी पण ते देवतांच्या
समोर जरूर नम्र होतात.. जरी कांही फार घमंडी असतात, तरी पण देवतांच्या समोर किंवा
शिवा समोर जरूर झुकतात. देवींच्या चित्रा समोर पण झुकतात, कारण बाबा पण रमणिक आहेत,
तर बाबा ने बनविलेले देवी-देवता पण रमणिक आहेत. त्यांच्या मध्ये पवित्रतेचे आकर्षण
आहे. त्यांचे ते आकर्षण आतापर्यंत चालत आले आहे. तर जेवढं त्यांच्या मध्ये आकर्षण
आहे, तेवढे तुमच्या मध्ये पण आकर्षण असले पाहिजे, जे समजतात, आम्ही हे लक्ष्मी
नारायण बनू. तुमचे या वेळचे आकर्षण अविनाशी होऊन जाते. सर्वांचे होत नाही. नंबरवार
तर आहेत ना. भविष्या मध्ये चे उंच पद प्राप्त करणारे आहेत, त्यांच्या मध्ये इथेच
आकर्षण असते, कारण आत्मा पवित्र बनलेली आहे. तुमच्या मध्ये पण जास्त आकर्षण त्यांचे
आहे, जे खास आठवणीच्या यात्रेमध्ये राहतात. यात्रे मध्ये पवित्रता जरूर पाळतात.
पवित्रते मध्येच आकर्षण आहे. पवित्रतेचे आकर्षण मग शिक्षणा मध्ये पण आकर्षित करतात.
हे तुम्हाला आता माहीत झाले आहे. तुम्ही यांच्या लक्ष्मी नारायणाच्या व्यवसायाला
जाणले आहे. त्यांनी पण किती बाबाची आठवण केली असेल. ही जी यांनी राजाई प्राप्त केली
आहे. ती जरूर राजयोगा द्वारेच प्राप्त केली असेल. यावेळी तुम्ही हे पद प्राप्त
करण्यासाठी आलेले आहात. बाबा तुम्हाला राजयोग शिकवित आहेत. हा तर पक्का निश्चय करून
येथे आले आहात ना. बाबा पण तेच आहेत, शिकविणारे पण तेच आहेत. बरोबर पण तेच घेऊन
जातील. तर हे गुण नेहमी असले पाहिजेत. नेहमी हर्षित मुख राहा. नेहमी हर्षित तेंव्हा
राहाल, जेंव्हा बाबा अल्फ च्या आठवणी मध्ये राहाल. तेव्हा बे (बादशाही) ची पण आठवण
राहील, आणि त्यामुळे रमणिक पण फार राहाल. तुम्ही मुले जाणता कि, आम्ही इथे रमणिक
बनून मग भविष्या मध्ये असे रमणिक बनू. येथील शिक्षणच अमरपुरी मध्ये घेऊन जाईल. हे
खरे बाबा तुम्हाला तुमची खरी कमाई करत आहेत. ही खरी कमाई बरोबर घेऊन जायचे आहे,
एकवीस जन्मासाठी. भक्तीमार्गा मध्ये जी कमाई करता ती तर अल्पकाळा च्या सुखासाठी आहे.
ते कांही नेहमी बरोबर येणार नाही. तर या शिक्षणा मध्ये मुलांना फार खबरदार राहिले
पाहिजे. तुम्ही साधारण आहात. तुम्हाला शिकविणारे पण बिल्कुल साधारण रूपा मध्ये आहेत.
मग शिकणारे पण साधारणच आहेत. नाही तर लाज वाटेल. आम्ही उंच कपडे कसे घालू. आमचे
मम्मा बाबा किती साधारण आहेत. तर आम्हाला पण साधारण राहायचे आहे. हे कां साधारण
राहत आहेत, कारण वनवासा मध्ये आहेत ना. आता तुम्हाला जायचे आहे. इथे कांही लग्न
करायचे नाही. ते लोक जेंव्हा लग्न करतात. तर कुमारी वनवासा मध्ये राहते. मळलेले कपडे
घालते. तेल इत्यादी लावतात. कारण सासर घरी जाणारी असते. ब्राह्मणा द्वारे लग्न होते.
तुम्हाला पण सासर घरी जायचे आहे. रावणपुरी पासून रामपुरी किंवा विष्णुपुरी मध्ये
जायचे आहे. तर ही वनवासाची परंपरा यामुळे ठेवली आहे कि, कोणता पण अभिमान देहाचा
किंवा कपड्या इत्यादीचा येऊ नये. कोणाला हलकी साडी आहे. दुसऱ्यांना पाहतात कि,
यांच्या जवळ तर भारी साडी आहे. तर विचार येतो कि, हे तर वनवासा मध्ये नाहीत. परंतु
तुम्ही वनवासा मध्ये असे साधारण राहता, तरी पण कोणाला एवढे उंच ज्ञान द्या. एवढा नशा
राहिला पाहिजे. तर त्याला पण बाण लागेल. जरी भांडी घासत असाल किंवा कपडे स्वच्छ करत
असाल. तुमच्या समोर कोणी आला तर तुम्ही झटक्यात त्यांना अल्फ ची आठवण द्या. तुम्हाला
तो नशा चढलेला पाहिजे आणि साध्या कपड्या मध्ये बसून कोणाला ज्ञान द्याल. तर ते पण
आश्चर्य खातील. यांच्या मध्ये किती उंच ज्ञान आहे. हे ज्ञान तर गीतेचे आहे आणि
भगवानाने दिलेले आहे. राजयोग तर गीतेचे ज्ञान आहे. तर असा नशा चढला पाहिजे. जसे बाबा
आपले उदाहरण सांगतात. समजा, मी मुलाबरोबर कोणता खेळ खेळतो. कोणी जिज्ञासु समोर आला,
तर झटक्यात त्यांना बाबाचा परिचय देतो. योगाची ताकद असल्यामुळे ते पण तिथेच उभे
राहून आश्चर्य करतात कि, हे एवढे साधारण यांच्या मध्ये एवढी ताकद मग कांही पण बोलू
शकत नाहीत. मुखातून कोणती गोष्ट निघणार नाही. जसे तुम्ही वाणी पासून दूर होऊन जाता.
तसे ते पण वाणी पासून दूर होऊन जातात. हा नशा आतून असला पाहिजे. कोणी पण बंधू अथवा
भगिनी आली तर त्यांना एकदम उभे करून विश्वाचे मालक बनण्याचे मत देऊ शकता. आत मध्ये
एवढा नशा असला पाहिजे. आपल्या लगन मध्ये उभे राहिले पाहिजे. बाबा नेहमी म्हणतात
तुमच्या जवळ ज्ञान तर आहे परंतु योगाची धार नाही. पवित्रता आणि आठवणी मध्ये
राहिल्याने ती धार येत राहते. आठवणीच्या यात्रेमुळे तुम्ही पवित्र बनत आहात. ताकद
मिळत आहे. ज्ञान तर धनाची गोष्ट आहे. जसे शाळेमध्ये शिकून एम.ए.बी.ए. इत्यादी करतात.
तर तेवढे मग पैसे मिळतात. येथील दुसरी गोष्ट आहे. भारताचा प्राचीन योग तर प्रसिद्ध
आहे. ही आठवण आहे. बाबा सर्वशक्तिमान आहेत, तर मुलांना बाबाकडून शक्ती मिळते.
मुलांना आतून राहिले पाहिजे कि, आम्ही आत्मे बाबाची संतान आहोत. परंतु बाबा एवढे
आम्ही पवित्र नाही, आता बनायचे आहे. आता मुख्य लक्ष्य आहे. योगाने तुम्ही पवित्र
बनता. जी आनंदी मुले आहेत ते सारा दिवस याच विचारा मध्ये राहतात. कोणी पण आले तर
त्यांना आम्ही रास्ता सांगू. दया आली पाहिजे. बिचारे आंधळे आहेत. आंधळाची काठी धरून
घेऊन जातात ना. हे सर्व आंधळे आहेत. ज्ञानाचे चक्षु नाहीत.
आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा डोळा मिळाला आहे. तर सर्व कांही तुम्ही ओळखले आहे.
साऱ्या सृष्टीच्या आदि,मध्य,अंता ला आम्ही आता ओळखले आहे. या सर्व भक्तिमार्गा तील
गोष्टी आहेत. तुम्हाला अगोदर पण माहित होते कि, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका.... हे
चित्र कां बनलेले आहे. दुनिया मध्ये कोणी पण याचा अर्थ समजत नाहीत. तुम्ही आता समजत
आहात.जसे बाबा ज्ञानसंपन्न आहेत. त्यांची मुले पण आता ज्ञानसंपन्न बनत आहेत,नंबरवार
षुरषार्था नुसार. कांही कांही ना तर फारच नशा चढतो,वाह, बाबाचा मुलगा बनून आणि बाबा
कडून पूर्ण वरसा नाही घेतला तर मुलगा बनून काय केले.रोज रात्रीला आपला जमाखर्च
पाहिला पाहिजे.बाबा व्यापारी आहेत ना. व्यापाऱ्यांना जमाखर्च काढणे सोपे जाते.
सरकारी नोकरांना जमाखर्च काढणे येत नाही. ना ते सौदागर आहेत. व्यापारी लोक चांगले
समजतात. तुम्ही व्यापारी आहात. तुम्ही स्वतःच्या नफा आणि नुकसानीला समजू शकता. रोज
खाते पाहा.जमा खर्च सांभाळा. घाटा आहे कां फायदा. सौदागर आहात ना. गायन आहे ना, बाबा
सौदागर, रत्नागर आहेत. अविनाशी ज्ञान रत्नांचा सौदा करत आहेत. हे पण तुम्ही ओळखले
आहे, नंबरवार पुरुषार्था नुसार. सर्व कांही तिक्ष्ण बुद्धीचे नाहीत. एका कानाने
ऐकतात मग दुसर्या कानाने निघून जाते. झोळीतील छिद्राद्वारे निघून जाते.झोळी भरत
नाही. बाबा म्हणतात, धन दिल्याने धन नाहीशी होत नाही. अविनाश ज्ञान रतन आहेत ना.
बाबा रुप बसंत आहेत. आत्मा तर आहे, त्यामध्ये ज्ञान आहे. तुम्ही त्यांची मुले पण
रुप बसंत आहात. आत्म्या मध्ये ज्ञान भरले जाते. त्याचे रूप आहे. जरी आत्मा लहान आहे,
रुप तर आहे ना. त्याला ओळखले जाते. परमात्म्याला पण ओळखले जाते. सोमनाथ ची भक्ती
करतात, तर एवढ्या लहान तार्याची कशी पूजा करतील. पूजेसाठी किती मोठे लिंग बनवितात.
शिवलिंग छता एवढे मोठ मोठेपण बनवितात. हे तर लहान छोटे आहे, परंतु पद तर उंच आहे
ना.
बाबाने कल्पापूर्वी पण सांगितले होते कि, या जप-तप इत्यादी ने कांही प्राप्ती होत
नाही. हे सर्व करून पण खाली उतरत आले आहेत. शिडी खाली उतरत आले आहेत. तुमची तर आता
चढती कला आहे. तुम्ही ब्राह्मण प्रथम नंबरचे जीन आहात. गोष्ट आहे ना.जीन ने म्हटले
मला काम दिले नाही तर खाऊन टाकेल. तर त्याला काम दिले. शिडी चढा आणि उतरा. तर त्याला
काम मिळाले.बाबानी पण सांगितले आहे कि, ही बेहदची शिडी तुम्ही उतरता, मग चढत आहात.
तुम्हीच पूर्ण शिडी उतरता आणि चढत आहात. जीन तुम्ही आहात. दुसरे कोणी संपूर्ण शिडी
चढत नाहीत.संपूर्ण शिडीचे ज्ञान प्राप्त केल्याने, तुम्ही किती उंच पद प्राप्त करता.
मग उतरता आणि चढता. बाबा म्हणतात, मी तुमचा पिता आहे. तुम्ही मला पतित-पावन म्हणत
आहात ना. मी सर्वशक्तिमान, सर्वोच्च आहे, कारण माझी आत्मा सदैव 100% पवित्र आहे. मी
बिंदूरुप सर्वोच्च आहे. सर्व शास्त्रांचे रहस्य ओळखत आहे. हे सर्व आश्चर्यकारक
ज्ञान आहे. असे कधी ऐकले नसेल कि, आत्म्यां मध्ये चौऱ्यांशी जन्माचा अविनाशी अभिनय
आहे. तो कधी नाहीसा होत नाही, चालतच आला आहे. 84 जन्माचे चक्र फिरत आले आहे. 84
जन्माचे रेकॉर्ड भरलेले आहे. एवढ्या छोट्या आत्म्या मध्ये एवढे ज्ञान आहे.बाबा मध्ये
आहे तर मुलांमध्ये पण आहे. किती अभिनय करत आहेत. हा अभिनय कधी नाहीसा होत नाही.आत्मा
या डोळ्याने दिसून येत नाही. बिंदू आहे.बाबा म्हणतात हे पण असा बिंदू आहे. हे पण
तुम्ही मुले आता समजले आहात. तुम्ही बेहदचे त्यागी आणि राजऋषी आहात.राजऋषी बिलकुल
पवित्र राहतात. सूर्यवंशी चंद्रवंशी जे इथे राजाई प्राप्त करत आहेत.जसे तुम्ही आता
करत आहात. हे तर मुले समजत आहेत कि, आम्ही आता घरी जात आहोत. नावाड्याच्या बोटीमध्ये
बसलेले आहोत, आणि हे पण जाणत आहात कि, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. जायचे पण जरूर आहे.
जुन्या दुनिये पासून नवीन दुनिये मध्ये शांतीधाम द्वारे जायचे आहे. हे मुलांच्या
बुद्धी मध्ये राहिले पाहिजे. जेंव्हा आम्ही सतयुगा मध्ये होतो, तर कोणता खंड नव्हता.
आमचेच राज्य होते. आता परत योगबाळा द्वारे आपले राज्य घेत आहोत, कारण समजावले आहे
कि, योगबाळानेच विश्वाची राजाई प्राप्त करू शकता. बाहुबळाने कोणी प्राप्त करू शकत
नाही. हे बेहदचे नाटक आहे. खेळ बनलेला आहे. या खेळाची माहिती बाबा सांगत आहेत.
सुरवाती पासून साऱ्या सृष्टीचा इतिहास भूगोल सांगत आहेत. तुम्ही सूक्ष्मवतन,मुळवतन
च्या रहस्याला पण चांगल्या रीतीने ओळखले आहे.स्थूलवतन मध्ये यांचे राज्य होते,
अर्थात आमचे राज्य होते. तुम्ही कशी शिडी उतरत आहात, हे पण आठवणीत आले आहे.शिडी चढणे
आणि उतरणे, हा खेळ मुलांच्या बुद्धीमध्ये बसला आहे. आता बुद्धी मध्ये आहे कि, कशी
या जगाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत आहे. यामध्ये आमचा हीरो हीरोइन चा
पार्ट आहे. आम्ही पण हार खातो आणि मग विजय प्राप्त करतो, त्यामुळे हिरो हिरोईन नाव
ठेवले आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आता आम्ही
वनवासा मध्ये आहोत, त्यामुळे फार साधारण राहायचे आहे. कोणता पण अभिमान देहाचा किंवा
कपड्याचा ठेवायचा नाही. कोणते पण कर्म करताना बाबाच्या आठवणीचा नशा चढला पाहिजे.
(२) आम्ही बेहदचे त्यागी आणि राजऋर्षी आहोत, या नशे मध्ये राहून, पवित्र बनायचे आहे.
ज्ञानधनाने भरपूर बनून, दान करायचे आहे. खरा खुरा सौदागर बनून, आपला जमाखर्च ठेवायचा
आहे.
वरदान:-
आठवणीच्या
सर्च लाईट द्वारे वायुमंडळ बनविणारे विजयी रत्न भव:
सेवाधारी आत्म्याच्या
मस्तकावर विजयाचा टिळा लागलेला असतो, परंतु जास्त ठिकाणाची सेवा करायची आहे, त्या
ठिकाणाला पहिल्या पासूनच सर्च लाईटचा प्रकाश टाकायचा आहे.आठवणीच्या सर्च लाईटने असे
वायुमंडळ बनवायचे आहे.ज्यामुळे अनेक आत्मे सहज जवळ येतील, मग कमी वेळेमध्ये सफलता
हजार गुणा होईल. त्यासाठी दृढ संकल्प करा कि, आम्ही विजयी रत्न आहोत, तर प्रत्येक
कर्मा मध्ये विजय सामावलेला आहे.
बोधवाक्य:-
जी सेवा
स्वतःला आणि दुसऱ्याला विघ्नरुप बनवेल, ती सेवा, सेवा नसून ओझे आहे.