17.04.2021 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन
"गोड मुलानो, बाबा जवळ जे सामान आहे, त्याचा पुर्ण अंत तुम्हाला मिळाला आहे. तुम्ही त्याला धारण करा आणि करवून घ्या." प्रश्न:- त्रिकालदर्शी बाबा नाटकाच्या आदि, मध्य,अंताला ओळखून पण उद्याची गोष्ट, आज सांगत नाहीत, कां? उत्तर:- बाबा म्हणतात, मुलांनो, जर मी पहिल्या पासूनच सांगितले तर नाटकातील मजाच निघून जाईल. हा कायदा नाही. सर्व कांही ओळखून पण मी नाटकाच्या वश आहे, अगोदर सांगू शकत नाही. त्यामुळे काय होईल, तुम्ही त्याची चिंता सोडून द्या. गीत:- मरना तेरी गली मे. . . . ओमशांती:- ते पारलौकिक पिता आत्म्याचे आहेत. आत्म्या बरोबर बोलतात. त्यांना मुलांनो, मुलांनो म्हणण्याचा अभ्यास झाला आहे. जरी शरीर मुलीचे आहे, परंतु आत्मा तर सर्व मुलेच आहेत. प्रत्येक आत्मा वारसदार आहे, म्हणजे वारसा घेण्याचे हक्कदार आहेत. बाबा येऊन सांगत आहेत, मुलांनो, तुम्ही प्रत्येक जण वारसा घेण्याचे हकदार आहात. बेहदच्या बाबा ची फार आठवण करायची आहे. यामध्येच मेहनत आहे. बाबा परमधाम मधून आले आहेत, आम्हाला शिकविण्या साठी. साधु संत तर आपल्या घरातून येतात किंवा कोणी गावा कडून येतात, बाबा तर परमधाम वरून येऊन आम्हाला शिकवितात. हे कोणाला माहित नाही. बेहद चे बाबाच पतित-पावन, गॉडफादर, ईश्वरीय पिता आहेत. त्यांना ज्ञानाचे सागर पण म्हटले जाते. सर्वोच्च सत्ता आहे ना. कोणते ज्ञान आहे? ईश्वरी ज्ञान. बाबा मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. सत चित आनंद स्वरूप आहेत. त्याची फार मोठी महिमा आहे. त्यांच्या जवळ हे वख्खर (सामुग्री) आहे. कोणा कडे दुकान असेल तर म्हणतात, आमच्या दुकाना मध्ये हे नमुने आहेत. बाबा पण म्हणतात, मी ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर, शांतीचा सागर आहे. माझ्या जवळ हे सर्व सामान तयार आहे. मी संगमयुगा वर येतो, वाटप करण्यासाठी. जे कांही माझ्या जवळ आहे, सर्व वाटप करत आहे. मग जेवढे जो धारण करेल किंवा जेवढा पुरुषार्थ करेल, मुले जाणत आहेत, बाबा जवळ काय काय आहे, आणि तंतोतंत जाणत आहेत आज-काल कोणाला कोणी आपला अंत सांगत नाहीत. गायन पण आहे कि, कोणाचे माती मध्ये दबून जाईल... या सर्व आताच्या गोष्टी आहेत. आग लागून सर्व कांही नष्ट होईल. राजा जवळ फार मोठ्या मजबूत गुफा असतात, जरी भूकंप झाला, जोराने आग लागली, तरीही आतून बाहेर निघू शकतात. तुम्ही मुले जाणत आहात, येथील कोणती पण वस्तू तेथे कामाला येत नाही. खाणी पण सर्व पहिल्या पासून भरपूर होऊन जातात. सायन्स पण अत्याधुनिक बनून तुमच्या कामाला येत आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये हे सारे ज्ञान आहे. मुले जाणत आहेत, आम्ही सृष्टी च्या आदि, मध्य, अंताला जाणले आहे. बाकी अंताचा थोडा तुकडा आहे, त्याला पण ओळखू शकाल. बाबा पहिल्या पासूनच कसे काय सांगू शकतील. बाबा म्हणतात, मी पण नाटका च्या वश आहे. जे ज्ञान आता पर्यंत मिळाले आहे, ते नाटका मध्ये नोंदलेले आहे. जो सेकंद निघून गेला त्याला नाटक समजले पाहिजे. बाकी उद्या जे होणार आहे ते पाहिले जाईल, उद्याची गोष्ट आज सांगू शकणार नाहीत. या नाटकातील रहस्याला मनुष्य समजत नाहीत. कल्पाचे आयुष्यच किती लांबलचक केले आहे. या नाटकाला समजण्याची पण हिंमत पाहिजे, आम्मा मेली तरी हलवा खावा, म्हणजे ज्ञान मुरली एका.असे समजतात कि, मेल्यानंतर जाऊन दुसरा जन्म घेतील. आम्ही रडायचे कशासाठी? बाबांनी सांगितले आहे, वर्तमानपत्रा मध्ये तुम्ही लिहू शकता. ही प्रदर्शनी आज पासून पाच हजार वर्षापूर्वी, या तारखेला, या ठिकाणी, याच रितीने झाली होती. जगाच्या इतिहास भूगोला ची पुनरावृत्ती होत आहे. असे लिहिले पाहिजे, ते तर जाणत आहात. ही दूनिया बाकी थोड्या दिवसा साठी आहे. हे सर्व नाहीसे होऊन जाईल. आम्ही तर पुरुषार्थ करून विकर्माजीत बनू, मग द्वापार पासून विकर्म संवत सुरू होईल, म्हणजे विकर्म करण्याचा संवत. यावेळी तुम्ही विकर्मा वर विजय प्राप्त करत आहात, तर विकर्माजीत बनून जाता. पाप कर्माला श्रीमताने जिंकून, विकर्माजीत बनायचे आहे. तेथे तुम्ही आत्मा अभिमानी बनत आहात. तिथे देह अभिमान असत नाही. कलियुगा मध्ये देहअभिमान आहे. संगमयुगावर तुम्ही देह अभिमानी बनत आहात. परमपिता परमात्म्याला ओळखत आहात. हा शुद्ध अभिमान आहे. तुम्ही ब्राह्मण सर्वात उंच आहात. तुम्ही सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण आहात. हे ज्ञान फक्त तुम्हाला मिळत आहे. दुसरे कोणाला मिळत नाही. तुमचे हे सर्वोत्तम कुळ आहे. गायन पण आहे कि, अतींद्रियसुख गोपीवल्भच्या मुलांना विचारा. तुम्हाला आता लॉटरी मिळाली आहे. कोणती वस्तू मिळाली तर त्याची एवढी खुशी होत नाही. जेव्हा गरीबा पासून सावकार बनता, तर खुशी होते. तुम्ही पण ओळखत आहात, जेवढा आम्ही पुरुषार्थ करू तेवढा बाबा कडून राजधानीचा वरसा घेऊ. जो जेवढा पुरुषार्थ करेल तेवढे प्राप्ती होईल. मुख्य गोष्ट बाबा सांगत आहेत, मुलांनो, आपल्या अतिप्रिय बाबाची आठवण करा. ते सर्वांचे अतिप्रिय पिता आहेत. ते येवून सर्वांना सुख शांती देत आहेत. आता देवी-देवतांची राजधानी स्थापन होत आहे. तिथे राजा राणी म्हणत नाहीत, तिथे महाराजा महाराणी म्हणतात. जर भगवान भगवती म्हटले, तर मग यथा राजा राणी तथा प्रजा. सर्व भगवान भगवती होऊन जातील. त्यामुळे भगवान भगवती म्हटले जात नाही. भगवान एक आहे. मनुष्याला भगवान म्हटले जात नाही. सूक्ष्मवतन वासी ब्रह्मा, विष्णू, शंकर ला पण देवता म्हणतात. स्थूलवतन वासीला आम्ही भगवान भगवती कसे म्हणावे? सर्वोच्च आहे मूलवतन मग सूक्ष्मवतन, हे तिसर्या क्रमांकाचे आहे. हे तुमच्या बुद्धी मध्ये राहिले पाहिजे. आम्हा आत्म्यांचे पिता शिवबाबा आहेत. मग शिक्षक पण आहेत, गुरु पण आहेत, सोनार, बॅरिस्टर इत्यादी सर्व आहेत. सर्वांना रावणाच्या तुरुंगातून सोडवत आहेत. शिवबाबा किती मोठे बॅरिस्टर(वकिल) आहेत. तर अशा पित्याला कां विसरले पाहिजे?असे कां म्हणतात, बाबा आम्ही विसरुन जातो. मायेचे वादळ फार येतात. बाबा म्हणतात, हे तर होणारच आहे. कांही तर मेहनत करावी लागेल ना. हे मायेशी युद्ध आहे. तुम्हा पांडवांचे कोणत्या कौरवा बरोबर युद्ध झालेले नाही. पांडव कसे युद्ध करतील. मग तर हिंसक होऊन जातील. बाबा कधीही हिंसा शिकवित नाहीत. कांही पण समजू शकत नाहीत. खरे तर आमचे कोणशीही युध्द नाही. बाबा फक्त युक्ती सांगत आहेत कि, माझी आठवण करा, तर मायेचा आघात होणार नाही. यावर पण एक गोष्ट आहे, त्यांना विचारले, अगोदर सुख पाहिजे कां दुःख? तर म्हणाला सुख. दु:ख सतयुगा मध्ये नसते. तुम्ही ओळखले आहे, यावेळी सर्व सीता रावणाच्या शोक वाटिके मध्ये आहेत. ही सारी दुनिया सागराच्या मध्ये लंका आहे. आता सर्व रावणाच्या जेल मध्ये पडले आहेत. सर्वांची सद्गती करण्यासाठी बाबा आले आहेत. सर्व शोक वाटिके मध्ये आहेत. स्वर्गा मध्ये सुख आहे, नर्का मध्ये दुःख आहे. याला शोक वाटिका म्हणतात. ते अशोक स्वर्ग आहे.फार मोठे अंतर आहे. तुम्हा मुलांना प्रयत्न करून बाबाची आठवण करायची आहे. तर खुशीचा पारा चढेल. बाबाच्या मता वर नाही चालला, तर सावत्र आहात, मग प्रजे मध्ये जातील. सख्खे असाल तर राजधानी मध्ये येतील. राजधानी मध्ये येवू इच्छिता तर श्रीमता वर चालले पाहिजे. कृष्णाची मत मिळत नाही. मत पण दोनच आहेत. आता तुम्ही श्रीमत घेत आहात, मग सतयुगा मध्ये त्याचे फळ भोगाल. परत व्दापर मध्ये रावणाची मत मिळते. सर्व रावणाच्या मतावर असुर बनले आहेत. तुम्हाला ईश्वरीय मत मिळत आहे. मत देणारे एकच बाबा आहेत. ते ईश्वर आहेत. तुम्ही ईश्वरीय मतावर किती पवित्र बनत आहात. पहिले पाप आहे, विषय सागरा मध्ये गटांगळ्या खाणे. देवता विषय सागरा मध्ये गटांगळ्या खात नाहीत. म्हणतात, काय तिथे मुले होत नाहीत. मुले कां होत नाहीत, परंतु ती निर्विकारी दुनिया आहे, संपूर्ण निर्विकारी.तिथे कोणते विकार असत नाहीत. बाबांनी सांगितले आहे. देवता फक्त आत्मअभिमानी आहेत, परमात्म अभिमानी नाहीत. तुम्ही आत्म अभिमानी पण आहात आणि परमात्म अभिमानी पण आहात. अगोदर दोन्ही नव्हता. सतयुगा मध्ये परमात्म्याला ओळखत नाहीत. आत्म्याला ओळखतात कि, आम्ही आत्मा हे जुने शरीर सोडून मग जाऊन नवीन शरीर घेऊ. अगोदरच माहित पडते. आता जुने सोडून नवीन घ्यायचे आहे. मुलगा होतो, तरी पण अगोदरच साक्षात्कार होतो. योगबळाने तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनत आहात. तर काय योगबळाने मुले होऊ शकणार नाहीत. योगबळाने कोणत्या पण वस्तू ला तुम्ही पावन बनवू शकता. परंतु तुम्ही आठवण विसरून जाता. काहींना अभ्यास होऊन जातो. संन्याशी लोक पण असे आहेत, ज्याना भोजनाचे महत्व राहते, त्यावेळी मंत्र म्हणून परत खातात. तुम्हाला पण पथ्य सांगितले आहे. कांही पण मांस,दारू प्यायची नाही. तुम्ही देवता बनत आहात ना. देवता कधी कचरा पट्टी खात नाहीत. तर असे पवित्र बनायचे आहे. बाबा म्हणतात, माझ्या व्दारे तुम्ही मला ओळखल्या मुळे सर्वकांही ओळखत आहात. मग ओळखण्याचे कांहीच राहणार नाही. सतयुगा मध्ये शिक्षण पण दुसरे असते. या मृत्युलोकां तील शिक्षणाचा अंत आहे. मृत्यू लोकातील सारा कारभार नाहीसा होऊन,परत अमर लोकांची सुरुवात होईल. एवढा मुलांना नशा चढला पाहिजे. अमर लोकाचे मालक होतो. तुम्हा मुलांना अतींद्रियसुख, परमसुखा मध्ये राहायचे आहे. परमपिता परमात्मा ची आम्ही मुले आहोत, अथवा विद्यार्थी आहोत. परमपिता परमात्मा आम्हाला आता घरी घेऊन जात आहेत. यालाच परमानंद म्हटले जाते. सतयुगा मध्ये या गोष्टी असत नाहीत. या तुम्ही आता ऐकत आहात. यावेळी ईश्वरी परिवाराचे आहात. आताचेच गायन आहे, अतिंद्रियसुख गोप गोपींना विचारा. परमधाम मध्ये राहणारे, बाबा येऊन आमचे पिता, शिक्षक, गुरु बनत आहेत. तिघे पण सेवाधारी आहेत. कोणता अभिमान ठेवत नाहीत, म्हणतात, मी तुमची सेवा करून, तुम्हाला सर्व कांही देऊन, निर्वाण मध्ये जाऊन बसतो. तर सेवाधारी झाले ना. व्हाइसराय इत्यादी नेहमी सही करतात तर आज्ञाकारी सेवाधारी लिहितात. बाबा पण निराकार निरहंकारी आहेत,कसे बसून शिकवित आहेत. एवढे उच्च शिक्षण आणखीन कोणी शिकवू शकणार नाही. एवढे मुद्दे कोणी देऊ शकणार नाहीत. मनुष्य तर ओळखू शकत नाहीत. यांना कोणत्या गुरुने शिकविले नाही, गुरु असेल तर अनेकांचा असेल. एकाचा असेल काय? हे बाबाच पतितांना पावन बनवित आहेत. आदि सनातन देवी धर्माची स्थापना करत आहेत. बाबा म्हणतात, मी कल्प कल्प, कल्पाच्या संगमयुगा वर येतो. म्हणतात ना, बाबा आम्ही कल्पा पूर्वी पण भेटलो होतो. बाबा येऊन पतितांना पावन बनवितात, तेही एकवीस जन्मासाठी. तुम्हां मुलांना पावन बनवित आहे. तर ही सर्व धारणा केली पाहिजे, मग सांगितले पाहिजे. बाबांनी काय समजावले. बाबा कडून आम्ही भविष्य 21 जन्माचा वरसा घेत आहोत.हे आठवणीत ठेवल्याने, खुशी मध्ये राहाल. हा परम आनंद आहे. मास्टर नॉलेजफुल,ब्लीसफुल हे सर्व वरदान बाबा कडून आता तुम्हाला मिळत आहेत. सतयुगा मध्ये तर बुद्धू बनाल. या लक्ष्मी नारायणा ला तर कांही पण ज्ञान नाही. त्यांना असते तर परंपरेने चालत आले असते. तुमच्या सारखा परमानंद देवता ना पण मिळू शकत नाही. अच्छा. गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलाला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश:- - (१) देवता बनण्या साठी खाण्या पिण्याची फार शुद्धता ठेवली पाहिजे. फारच पथ्य पाळून चालायचे आहे. योगबाळा ने भोजनाला दृष्टी देऊन, शुद्ध बनवून स्विकार करायचा आहे.
- (२) परमपिता परमात्म्या ची आम्ही मुले, किंवा विद्यार्थी आहोत. ते आता आम्हाला आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. या नशे मध्ये राहून परमसुख, परमानंदाचा अनुभव करायचा आहे.
वरदान:- स्वतःच्या टेन्शन वर अटेन्शन(तनावावर लक्ष) देऊन, विश्वाचे टेंशन नाहीसे करणारे, विश्व कल्याणकारी भव: जेंव्हा दुसऱ्या प्रती जास्त आटेन्शन दिले तर स्वतःमध्ये टेन्शन चालते. त्यामुळे विस्तार करण्या पेक्षा सार स्वरूपा मध्ये स्थिर राहा.अनेक विचारांना सामावून, चांगले थोडेच संकल्प करा. प्रथम आपल्या टेंशन वर अटेंशन द्या, तेव्हा विश्वा मध्ये जे अनेक प्रकारचे टेन्शन आहे, त्यांना समाप्त करून, विश्व कल्याणकारी बनू शकाल. प्रथम स्वत:च स्वतःला पाहा. आपली सेवा प्रथम करा. आपली सेवा केल्यानंतर दुसऱ्यांची सेवा स्वतः होऊन जाईल. बोधवाक्य:- योगाची अनुभूती करायची असेल तर दृढतेच्या शक्तीने मनाला कंट्रोल करा. ||| ओम शांती |||ओम शांती.
|
|