22.04.2021 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलानो, बाबा आले आहेत, भारताला मुक्त करण्यासाठी, तुम्ही मुले यावेळी बाबाचे मदतगार बनत आहात, भारतच प्राचीन खंड आहे."

प्रश्न:-

उच्च ध्येया मध्ये अडथळा करणाऱ्या लहान-लहान गोष्टी कोणत्या आहेत?.

उत्तर:-

जर थोडा पण कोणता छंद असेल, अनासक्त वृत्ती नसेल, चांगले परिधान करणे, चांगले खाण्या मध्ये बुद्धी भटकत राहणे, तर या गोष्टी उच्च ध्येय गाठण्यामध्ये अडचणी निर्माण करतात,त्यामुळे बाबा म्हणतात मुलांनो, वनवासा मध्ये राहा. तुम्हाला तर सर्व कांही विसरायचे आहे. या शरीराची पण आठवण राहू नये.

ओम शांती:- मुलांना समजावले आहे कि, हा भारतच अविनाशी खंड आहे. आणि याचे मूळ नाव भारत खंड आहे. हिंदुस्थान नाव तर नंतर पडले आहे. भारताला म्हटले जाते अध्यात्मिक खंड. हा प्राचीन खंड आहे. नवीन दुनिये मध्ये जेव्हा भारत खंड होता, तर दुसरा कोणता खंड नव्हता. मुख्य आहे, इस्लामी, बौद्ध आणि ख्रिश्चन. आता तर अनेक खंड आहेत. भारत अविनाशी खंड आहे. त्याला स्वर्ग म्हटले जाते. नवीन दुनिये मध्ये नवा खंड एक भारत होता. नवीन दूनिया रचणारे परमपिता परमात्मा आहेत. स्वर्गाचे रचियता हेवनली गॉड फादर आहेत. भातशरतवाशी जाणतात कि,हा भारत अविनाशी खंड आहे. भारत स्वर्ग होता. जेंव्हा कोणी मरतो, तर म्हणतात कि, स्वर्गाला गेला. समजतात, स्वर्ग कुठे वर आहे. दिलवाला मंदिरा मध्ये वैकुंठाचे चित्र छतावर दाखविले आहे. हे कोणाच्या बुद्धी मध्ये येत नाही कि, भारत स्वर्ग होता. आता नाही. आता तर नरक आहे. तर हे पण अज्ञान आहे. ज्ञान आणि अज्ञान दोन गोष्टी आहेत. ज्ञानाला दिवस म्हटले जाते, अज्ञानाला रात्र. घोर प्रकाश आणि घोर अंधार म्हटले जाते. प्रकाश म्हणजे उदय, अंधार म्हणजे उतरणे. मनुष्य सूर्यास्त पाहण्यासाठी सनसेट वर जातात. या सर्व हद्दच्या गोष्टी आहेत. यासाठी म्हटले जाते, ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र. आता ब्रह्मा तर प्रजापिता आहेत. तर जरूर प्रजेचे पिता आहेत. ज्ञान अंजन सद्गुरुने दिले, अज्ञान अंधाराचा विनाश झाला. या गोष्टी दुनिया मधील कोणी समजू शकत नाहीत. या नवीन दुनिये साठी नवीन ज्ञान आहे. स्वर्गा साठी स्वर्गीय ईश्वरी पिताचे ज्ञान पाहिजे. गायन पण आहे, पिता ज्ञानसंपन्न आहेत, तर ते शिक्षक झाले आहेत, पित्याला म्हटले जाते पतित-पावन आणि इतर कोणाला पण पतित-पावन म्हटले जात नाही. श्रीकृष्णला पण म्हणू शकत नाही. पिता तर सर्वांचे एकच आहेत. श्रीकृष्ण तर सर्वाचे पिता नाहीत. ते जेंव्हा मोठे होतात, स्वयंवर करतात, तेव्हा एक, दोन मुलांचे पिता बनतील. राधे कृष्णाला राजकुमार राजकुमारी म्हटले जाते. कधी स्वयंवर पण झाले असेल, स्वयंवरा नंतरच माता पिता बनू शकतात. त्यांना कधी कोणी जगाचे ईश्वरी पिता म्हणू शकत नाहीत. जगाचे ईश्वरीय पिता फक्त एकच निराकार बाबाला म्हटले जाते. ग्रेट ग्रेट ग्रँड फादर शिवाबाबा ला म्हटले जाते नाही. ग्रेट ग्रेट ग्रँड फादर प्रजापिता ब्रह्मा आहेत. त्यांच्यातून वंशावळ निघत आहे. ते निराकारी ईश्वरीय पिता निराकार आत्म्याचे पिता आहेत. निराकार् आत्मे जेंव्हा आहे. शरीरा मध्ये असतात, तेंव्हा भक्तीमार्गा मध्ये बोलावतात. या सर्व तुम्ही नवीन गोष्टी ऐकत आहात. यथार्थ रूपाने कोणत्या पण शास्त्रां मध्ये नाहीत. बाबा म्हणतात, मी समोर बसून तुम्हां मुलांना समजावत आहे. मग हे सारे ज्ञान नाहीसे होऊन जाईल. मग जेंव्हा बाबा येतील, तेंव्हा येऊन यथार्थ ज्ञान सांगतील. मुलांना स्वत: समोर सांगून वारसा देत आहेत. मग नंतर शास्त्र बनतात. यथार्थ तर बनू शकत नाहीत. कारण खर्‍याची दुनिया नाहीशी होऊन, खोट्याचा खंड बनलेला आहे. तर खोट्या वस्तूच असतील. कारण उतरती कला होत आहे. खऱ्या मार्गाने तर चढती कला होते. भक्ती रात्र आहे. अंधारा मध्ये ठोकरे खावे लागतात. डोके टेकावे लागते. असा घोर अंधार आहे. मनुष्याला तर कांही पण माहित नाही. दारोदार धक्के खात राहतात‌. या सूर्याचा पण उदय आणि अस्त होत आहे. जी मुले जाऊन पाहतात. आता तर तुम्हा मुलांना त्या सूर्याचा उदय झालेला पाहायचा आहे. भारताचे उत्थान आणि भारताचे पतन. भारत असा बुडालेला आहे, जसा सूर्य बुडत आहे. सत्यनारायणा च्या कथेमध्ये दाखवले आहे कि, भारताची नाव खाली जात आहे. मग बाबा येऊन त्याला मुक्त करत आहेत. तुम्हीं या भारताला परत मुक्त करत आहात. हे तुम्ही मुले जाणत आहात. तुम्ही निमंत्रण पण देता. नवनिर्माण प्रदर्शनी, नाव पण बरोबर ठीक आहे. नवीन दुनिया कशी स्थापन होत आहे. त्याची प्रदर्शनी चित्रा द्वारे समजून सांगायचे आहे. तर तेच नाव ठेवले, तरी चांगले आहे. नवीन दुनिया कशी स्थापन होत आहे किंवा उदय कसा होत आहे, हे तुम्हीं दाखवतात. जेव्हा जुन्या दुनियेचे पतन होत आहे, ते़व्हा दाखवत आहेत कि, उत्थान कसे होईल. ही पण एक गोष्ट आहे, राज्य घेणे आणि घालविणे. पाच हजार वर्षापूर्वी काय होते? म्हणतात, सूर्यवंशी चे राज्य होते मग चंद्रवंशी राज्य स्थापन झाले. ते तर एक दोघा कडून राज्य घेतात. दाखवितात, लोकांचे राज्य घेतले. ते काही शिडी समजत नाहीत. बाबा समजावत आहेत कि, तुम्ही सुवर्ण युगातून चांदीच्या युगामध्ये आलात. शिडी उतरत आलात. ही 84 जन्माची शिडी आहे. उतरायचे असते मग चढायचे पण असते. उत्थान आणि पतनाचे रहस्य समजावयाचे आहे. भारताचे पतन किती वेळ, उत्थान किती वेळ. प्रगती आणि अधोगती. भारतवासी यांना विचार सागर मंथन करायचे आहे. मनुष्याला उत्साहा मध्ये कसे आणायचे आणि मग निमंत्रण पण द्यायचेआहे. बंधू-भगिनींनो, येऊन समजा. अगोदर सांगायचे आहे. शिवबाबा च्या महिमेचा एक बोर्ड असला पाहिजे. पतित-पावन, ज्ञानाचे सागर, पवित्रता, सुख, शांतीचा सागर, संपत्तीचा सागर, सर्वांचे सदगती दाता, जगत पिता, जगत शिक्षक, जगद्गुरु शिवबाबा कडे येऊन, आपला सूर्यवंशी, चंद्रवंशी चा वरसा घ्या. त्यामुळे मनुष्याला बाबाची माहिती पडेल. बाबाची आणि कृष्णाची महिमा वेगळी आहे. हे तुमच्या मुलांच्या बुद्धी मध्ये बसलेले आहे. सेवाधारी जी मुले आहेत, ते सारा दिवस धावपळ करत राहतात. आपली लौकिक सेवा असून, पण सुट्टी घेऊन, या सेवेमध्ये लागतात. हे ईश्वरीय शासन आहे. खास मुली जर अशा सेवेमध्ये लागल्या, तर त्यांचे फार नाव होईल. सेवाधारी मुलींची पालना पण चांगल्या रीतीने होऊ शकेल, कारण शिवबाबाचा भंडारा भरपूर आहे. ज्या भंडाऱ्या मधून खायचे, तो भंडारा भरपूर काल कंटक दूर.

तुम्ही शिववंशी आहात. ते रचनाकार आहेत, ही रचना आहे. बाबूल नाव फार गोड आहे. शिव साजन पण आहेत ना. शिवबाबा ची महिमा वेगळी आहे. निराकार अक्षर लिहिल्या मुळे समजत आहेत कि, त्यांना कांही आकार नाही. अतिप्रिय शिवबाबा आहेत. परमप्रिय तर लिहायचे आहे. यावेळी युद्धाचे मैदान त्यांचे पण आहे, तर तुमचे पण आहे. शिवशक्ती म्हणून गायन आहे. परंतु चित्रां मध्ये देवीना पण हत्यार देऊन, हिंसक दाखविले आहे. खरे तर तुम्ही योग किंवा आठवणीच्या बळाने विश्वाची बादशाही घेत आहात. हत्यार इत्यादीची गोष्टच नाही. गंगेचा प्रभाव मोठा आहे. अनेकांना साक्षात्कार होतो. भक्ती मार्गामध्ये आहे कि, गंगाजल मिळाले, तेंव्हा उध्दार होईल. त्यामुळे गंगा गुप्त म्हटली जाते. असे म्हणतात बाण मारला आणि गंगा प्रगट झाली. गोमुखा मध्ये पण गंगा दाखवितात. तुम्ही विचारता, तर म्हणतात कि, गुप्त गंगा निघत आहे. त्रिवेणी वर पण सरस्वतीला गुप्त दाखवितात. मनुष्याने अनेक गोष्टी बनविल्या आहेत. इथे तर एकच गोष्ट आहे. फक्त अल्फ अल्लाह बसं. अल्ला येऊन स्वर्ग स्थापन करत आहेत. खुदा स्वर्ग स्थापन करत आहेत. ईश्वर स्वर्ग स्थापन करत आहेत. वास्तवा मध्ये ईश्वर तर एकच आहे. ते तर आपापल्या भाषां मध्ये नावे ठेवतात. परंतु हे समजत आहेत कि, अल्लाह कडून स्वर्गाची बादशाही मिळेल. इथे तर बाबा म्हणतात, मन मना भव. बाबांची आठवण केल्याने, वरशाची आठवण जरूर येते. रचताची रचना स्वर्ग आहे. असे थोडीच म्हणतात कि, रामाने नरक रचला. भारतवासीना हे माहीतच नाही कि, निराकार रचता कोण आहेत. तुम्ही जाणतात कि, नरकाचा रचनाकार रावण आहे, ज्याला जाळतात. रावण राज्यांमध्ये भक्तिमार्गाचे कलम किती मोठे आहे. रावणाचे रूप पण मोठे भयंकर बनविले आहे.असे बोलतात पण की रावण आमचा शत्रू आहे. बाबानी अर्थ समजावला आहे. विस्तार मोठा आहे, तर रावणाचे शरीर पण मोठे बनवितात. शिवबाबा तर बिंदी आहेत. परंतु चित्र मोठे बनवितात. नाही तर बिंदीची पूजा कशी करायची. पुजारी तर बनायचे आहे ना. आत्म्या साठी म्हणतात कि,भृकुटी च्या मध्ये अजब तारा चमकत आहे. आणि मग म्हणतात, आत्मा हाच परमात्मा आहे. तर मग हजार सूर्या पेक्षा जादा तेजोमय कसा असेल, आत्म्याचे वर्णन तर करतात. परंतु समजत नाहीत. जर परमात्मा हा हजार सुर्या पेक्षा तेजस्वी आहे, तर प्रत्येका मध्ये प्रवेश कसे करतील. किती अयथार्थ गोष्टी आहेत,ऐकून कसे बनले आहेत?असे म्हणतात आत्माच परमात्मा, तर पित्याचे रूप पण तसेच असेल ना. परंतु पूजे साठी मोठे बनविले आहे. दगडाचे किती मोठमोठे चित्र बनवितात. जसे गुहे मध्ये मोठ मोठे पांडव दाखवितात. ओळखत कांहीच नाहीत. हे शिक्षण आहे. धंदा आणि शिक्षण वेगवेगळे आहे. बाबा शिकवितात, आणि धंदा पण शिकवित आहेत. बोर्डावर पण अगोदर बाबा ची महिमा लिहली पाहिजे. बाबा ची संपूर्ण माहिती द्यायची आहे. या गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये क्रमवार पुरुषार्था नुसार येतात. त्यामुळे महारथी, घोडेस्वार म्हटले जाते. हत्यार इत्यादीची कोणतीही गोष्ट नाही. बाबा बुद्धीचे कुलूप उघडतात. हे गोदरेजचे कुलूप कोणी उघडू शकत नाहीत. बाबा जवळ भेटण्यासाठी येतात? तर बाबा मुलांना विचारतात कि, पूर्वी कधी भेटलो होतो. या जागेवर, या दिवशी, कधी भेटलो होतो? तर मुले म्हणतात, होय, बाबा पाच हजार वर्षापूर्वी भेटलो होतो. आता या गोष्टी असे कोणी विचारू शकत नाहीत. किती गुह्य समजण्याच्या गोष्टी आहेत. किती ज्ञानाच्या युक्ती बाबा समजावत आहेत. परंतु धारणा क्रमवार होत आहे. शिवबाबा ची महिमा वेगळी आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकराची ही महिमा वेगळी आहे. प्रत्येकाचा अभिनय वेग वेगळा आहे. एक दुसऱ्या सारखा नाही. हे अनादि विश्व नाटक आहे. ते मग पुनरावृत्त होत आहे. आता तुमच्या बुद्धी मध्ये बसले आहे कि, आम्ही कसे मलवतन मध्ये जात आहोत, मग येतो. अभिनय करण्यासाठी. सूक्ष्मवतन व्दारे जात आहोत. येते वेळी सूक्ष्मवतन नसते. सूक्ष्मवतनचा साक्षात्कार कधी कोणाला होत नाही. सूक्ष्मवतनचा साक्षात्कार करण्यासाठी कोणी तपस्या करत नाहीत. कारण त्याला ओळखतच नाहीत. सूक्ष्मवतन चा कोणी भक्त थोडाच आहे. सूक्ष्मवतन आता रचत आहेत. वाया सूक्ष्मवतन जाऊन, मग नवीन दुनिये मध्ये यायचे आहे. यावेळी तुम्ही तिथे येत, जात आहात. तुमचा साखरपुडा झाला आहे. हे माहेरघर आहे. विष्णू ला पिता म्हणत नाहीत. तेच सासरघर आहे. जेंव्हा कन्या सासरी जाते, तर जुने कपडे सर्व सोडून जाते‌. तुम्ही जुन्या दुनियेलाच सोडून देत आहात. तुमच्या आणि त्यांच्या वनवासा मध्ये किती फरक आहे. तुम्हाला फार अनासक्त राहायचे आहे. अभिमान सोडायचा आहे. जास्त भारी साडी घालाल, तर झटक्यात देह अभिमान येईल. मी आत्मा आहे, हे विसरून जाल. यावेळी तुम्ही आहातच वनवासा मध्ये. वनवास आणि वानप्रस्थ एकच गोष्ट आहे‌. शरीर सोडायचे आहे, तर साडी नाही सोडणार काय? हलकी साडी मिळाली, तर मन लहान होऊन जाते. यामुळे तर खुशी झाली पाहिजे. चांगले झाले, हलके वस्त्र मिळाले. चांगल्या वस्तूला तर सांभाळावे लागते. हे परिधान करण्याच्या, खाण्याच्या लहान गोष्टी पण, उच्च धेय्या वर पोहचण्या मध्ये अडचण निर्माण करतात. धेय्य फार मोठे आहे. कथे मध्ये पण संगीतले कि, पतीला म्हटले, ही काठी पण सोडून द्या. बाबा म्हणतात, हे जुने कापड, जुनी दुनिया, सर्व खलास होणार आहे. त्यामुळे या साऱ्या दुनिये पासून बुद्धी योग तोडायचा आहे. याला बेहदचा संन्यास म्हटले जाते. संन्याशांनी तर हद्दचा संन्यास केला आहे. आता ते पण गावात, शहरांमध्ये आले आहेत. पूर्वी तर त्यांच्या मध्ये फार ताकत होती. उतरणाऱ्यांची महिमा काय असू शकेल. पण शेवट पर्यंत येत राहतात. अभिनय करण्यासाठी. त्यांच्या मध्ये काय ताकत असेल. तुम्ही तर पूर्ण 84 जन्म घेता. हे सर्व समजण्या साठी किती चांगली बुद्धी पाहिजे. सेवाधारी मुले सेवेसाठी उसळत राहतात. ज्ञानसागर ची मुले असे भाषण करतील, जसे बाबा उसळत आहेत. यामध्ये ढिले व्हायचे नाही. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. (१) बुद्धी द्वारे बेहदचा संन्यास करायचा आहे. परत घरी जाण्याची वेळ आहे. त्यामुळे जुनी दुनिया आणि जुने शरीरा पासून अनासक्त राहायचे आहे.
  2. (२) विश्व नाटकातील प्रत्येक दृष्याला पाहून नेहमी हर्षित राहायचे आहे.

वरदान:-

आपल्या उंच स्थिती मध्ये स्थिर राहून, प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्म करणारे संपूर्ण निर्विकारी भव

संपूर्ण निर्विकारी म्हणजे कोणत्या पण टक्केवारीने,अंशमात्र पण, कोणत्या विकाराकडे आकर्षण होऊ नये. कधी त्याच्या वशीभूत व्हायचे नाही. उंच स्थिती तील आत्मे कोणता साधारण संकल्प करू शकत नाहीत. तर जेंव्हा कोणता पण संकल्प किंवा कर्म करता, त्यावेळी चेक करा कि, जसे ऊंच नाव तसे उच्च काम आहे. जर नाव उच्च आणि काम नीच, तर नाव बदनाम करतात. त्यामुळे लक्ष्या प्रमाणे लक्षण धारण करा. तर म्हटले जाते, संपूर्ण निर्विकारी, म्हणजे अति पवित्र आत्मा.

बोधवाक्य:-

कर्म करताना करन- करावनहार बाबाची स्मृती राहिली, तर स्व पुरुषार्थ आणि योगाचा समतोल ठीक राहील.

||| ओम शांती |||

ओम शांती.