10-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,पतित जगापासून नाता तोडून एका बाबांशी बुद्धी योग लावा तर,मायेपासून हार होऊ शकणार नाही"

प्रश्न:-
समर्थ बाप सोबत असताना पण यज्ञा मध्ये अनेक विघ्न का पडतात,कारण काय ?

उत्तर:-
हे विघ्न तर नाटकां नुसार पडणारच आहेत कारण जेव्हा यज्ञामध्ये आसुराचे विघ्न पडतील तेव्हा तर पापाचा घडा भरेल.यामध्ये बाबा काहीच करू शकत नाहीत.हे तर अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे. विघ्न तर पडणारच आहेत परंतु विघ्नापासून तुम्हाला घाबरायचे नाही.

गीत:-

कोण आहे माता आणि कोण पिता आहे…

ओम शांती।
मुलांनी बेहद्दच्या बाबांचा आदेश ऐकला,हे तर या जगतचे मम्मा-बाबा आहेत.हे जे तुमचे नाते आहे,देहाच्या सोबत आहे,कारण देहाच्या अगोदर माता असते परत परत भाऊ-बहीण इत्यादी होतात. तर बेहद्दच्या बाबाचे म्हणने आहे की, जगत मध्ये तुमचे जे मात-पिता आहेत,त्यांच्यापासून बुद्धीयोग तोडा.या जगताशी नाते ठेवू नका, कारण हे सर्व कलियुगी खराब संबंध आहेत.जगत म्हणजे दुनिया.या पतित दुनियेशी बुद्धीयोग तोडून मज एका सोबत जोडा आणि परत नवीन दुनिये सोबत जोडा कारण आता तुम्हाला माझ्या जवळ यायचे आहे. फक्त बुद्धी योग जोडण्याची गोष्ट आहे,दुसरी कोणती गोष्ट नाही आणि काही कष्ट पण नाहीत.बाबा बरोबर स्नेहाचे संबंध तेच जोडतील ज्यांना श्रीमत मिळते.सतयुगा मध्ये प्रथम संबंध चांगले सतोप्रधान असतात परत खाली उतरत जातात,परत जे सुखाचे संबंध आहेत ते हळूहळू कमी कमी होत जातात.आत्ता तर अगदीच या जुन्या दुनियेशी संबंध तोडावे लागतील. बाबा म्हणतात माझ्या सोबत संबंध जोडा, श्रीमतानुसार चाला आणि जे पण देहाचे संबंध आहेत,त्या संबंधाना सोडून द्या म्हणजे विसरा.विनाश तर होणारच आहे.मुलं जाणतात, ज्यांना परमपिता परमात्मा म्हणतात,ते पण अविनाशी नाटकांनुसार सेवा करत आहेत.ते पण नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलेले आहेत.मनुष्य समजतात ते तर सर्वशक्तिमान आहेत.जसे कृष्णा ला पण सर्वशक्तिमान मानतात, त्यांना सुदर्शन चक्र दिले आहे.ते समजतात,त्या द्वारे गळा कापतात, परंतु असे समजत नाहीत की देवता हिंसाचे काम कसे करतील?ते तर करु शकत नाहीत.देवता साठी म्हटले जाते,अहिंसा परमोधर्म होता. त्यांच्यामध्ये हिंसा आली कुठून?ज्यांच्या मनामध्ये जे आले ते लिहले.धर्माची खूप निंदा केली आहे. बाबा म्हणतात या ग्रंथा मध्ये तर खरे काहीच नाही,पिठामध्ये मीठा एवढे सत्य आहे.हे पण लिहिले आहे रुद्र ज्ञान यज्ञ रचला होता,त्यामध्ये आसुर विघ्न घालत होते.अबला नारी वरती अत्याचार होत होते,हे तर ठीक लिहिले आहे.आता तुम्ही समजता ग्रंथांमध्ये सत्य काय आहे आणि काय खोटे आहे.भगवान स्वतः म्हणतात या रुद्र ज्ञान यज्ञांमध्ये विघ्न जरूर पडतील,अशी नाटकामध्ये नोंद आहे.असे नाही की परमात्मा सोबत आहेत,तर विघ्नाला दूर करतील,यामध्ये बाबा काय करतील. हे अविनाशी नाटकांमध्ये होणारच आहेत.हे सर्व विघ्न घालतात तेव्हा तर पापाचा घडा भरेल.बाबा समजावतात, अविनाशी नाटकांमध्ये जे नोंद आहे,ते होणारच आहे. आसुरांचे विघ्न जरूर पडतील. आपली राजधानी स्थापन होत आहे. अर्धाकल्प मायेच्या राज्यांमध्ये मनुष्य खूप तमोप्रधान बुद्धी, भ्रष्टाचारी बनतात, परत त्यांना श्रेष्ठचारी बनवणे बाबांचे काम आहे. अर्धा कल्प भ्रष्टाचारी बनण्यामध्ये लागतो,परत एका सेकंदामध्ये बाबा श्रेष्ठाचारी बनवतात.निश्चय होण्यामध्ये उशीर थोडाच लागतो. अशी खूप मुलं आहेत,ज्यांना निश्चय होतो,ते लगेच प्रतिज्ञा करतात परंतु माया पण पैलवान आहे ना.काहीना काही मनसांमध्ये वादळ आणते. पुरुषार्थ करून कर्मणा मध्ये येऊ द्यायचे नाही.सर्वजण पुरुषार्थ करत आहेत.कर्मातीत अवस्था तर कोणाची झाली नाही,काहीना काही कर्मेंद्रिया द्वारे चुका होत राहतात. कर्मातीत अवस्थे पर्यंत पोहोचण्यासाठी मध्येच मायेचे विघ्न जरूर येतील.बाबांनी समजवले आहे,पुरुषार्थ करत करत अंतकाळामध्ये कर्मातीत अवस्था होईल,परत हे शरीर पण राहणार नाही.यासाठी थोडा वेळ लागतो. विघ्न काही ना काही पडत राहतात. कुठे माया हरवते,बॉक्सिंग आहे ना. बाबाच्या आठवणीमध्ये राहण्याची इच्छा असते,परंतु राहू शकत नाहीत. थोडा फार वेळ शिल्लक आहे,तर हळूहळू ती अवस्था बनवायची आहे. कोणी जन्मताच राजा तर बनत नाहीत.लहान मुलगा हळूहळू मोठा होईल ना,यामध्ये पण वेळ लागतो. आता तर बाकी थोडा वेळ राहीला आहे.सर्व पुरुषार्था वरती आधारित आहे,लक्ष द्यायचे आहे.आम्ही कसेही करून बाबा पासून वारसा जरूर घेऊ.मायेचा सामना जरूर करू म्हणून प्रतिज्ञा करतात. माया पण कमी नाही,हलक्या रुपामध्ये पण येत राहते.पैलवानाच्या समोर आणखीनच पैलवान बनवून येते.या गोष्टी कोणत्या ग्रंथांमध्ये नाहीत.बाबा म्हणतात,तुम्हा मुलांना आत्ता समजावतो.बाबाद्वारे तुम्ही सद्गतीला प्राप्त करतात.परत या ज्ञानाची आवश्यकता राहत नाही. ज्ञानाद्वारे सद्गती होते.सदगती सतयुगाला म्हटले जाते.तर गोड गोड मुलांना लक्ष मिळाले आहे.हे पण समजतात,अविनाश नाटकानुसार झाडाची वृद्धी होण्यामध्ये वेळ लागतो.विघ्न तर खूप येतात, परिवर्तन करावे लागते.कवडी पासून हिऱ्यासारखे बनावे लागते. रात्रंदिवसा चा फरक आहे.देवतांचे मंदिर आज पर्यंत बनवत राहतात. तुम्ही ब्राह्मण आता मंदिर बनवणार नाहीत,कारण तो भक्तिमार्ग आहे. दुनियेला हे माहीत नाही की आता भक्तिमार्ग नष्ट होऊन ज्ञान मार्ग जिंदाबाद होणार आहे.हे फक्त तुम्हा मुलांना माहिती आहे,मनुष्य समजतात कलियुग आणखी लहान मुलगा आहे.त्यांचा सारा आधार ग्रंथावरती आहे.तुम्हा मुलांना बाबा सन्मुख सर्व वेद ग्रंथ इत्यादीचे रहस्य समजवतात.बाबा म्हणतात आज पर्यंत तुम्ही जे शिकले आहात,ते सर्व विसरा,त्याद्वारे काही सदगती होणार नाही.जरी अल्प काळाचे सुख मिळत आले आहे.नेहमी सुख मिळेल असे होऊ शकत नाही.हे क्षणभंगुर सुख आहे.मनुष्य दुःखामध्ये राहतात. मनुष्य जाणत नाही की,सतयुगा मध्ये दुःखाचे नाव रूप नसते.त्यांनी सतयुगासाठी पण अशा गोष्टी लिहिल्या आहेत.तेथे कृष्णपुरी मध्ये कंस इत्यादी आसुर होते.कृष्णाने जेलमध्ये जन्म घेतला,अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.आत्ता श्रीकृष्ण स्वर्गाचा प्रथम क्रमांकाचा राजकुमार आहे,त्यांनी कोणते पाप केले?या सर्व दंतकथा आहेत.हे पण तुम्ही आत्ता समजतात,जेव्हा बाबांनी सत्य सांगितले आहे.बाबाच येऊन सत्यखंडाची स्थापन करतात.सत्य खंडांमध्ये खूप सुख होते.खोट्या खंडांमध्ये तर खूप दुःख आहे.या सर्व गोष्टी तुम्ही विसरले आहात.तुम्ही जाणतात आम्ही श्रीमतानुसार सत्य खंडाची स्थापना करून,त्याचे मालक बनू.

बाबा म्हणतात,अशाप्रकारे श्रीमतावर चालल्यामुळे तुम्ही उच्चपद प्राप्त करू शकाल.आम्हाला हे शिक्षण घेऊन,सूर्यवंशी महाराजा महारानी बनायचे आहे.सर्वांची इच्छा उच्चपद मिळवण्याची असते.सर्वांचा पुरुषार्थ चालत राहतो.जे चांगले पक्के भक्त असतात,ते हातामध्ये चित्र सोबत ठेवतात,तर सारखी त्यांची आठवण यावी.बाबा पण म्हणतात त्रिमूर्ती चे चित्र तुम्ही सोबत ठेवा,तर नेहमी आठवण येईल.बाबांची आठवण केल्यामुळे आम्ही सूर्यवंशी घराण्यामध्ये जाऊ.आपल्या खोलीमध्ये त्रिमूर्तीचे चित्र लावलेले पाहिजे.तर सारखे त्याच्यावरती लक्ष जाईल.बाबा द्वारे आम्ही सूर्यवंशी घराण्यामध्ये जाऊ.सकाळी उठताच चित्रावरती नजर जाईल,हा पण एक पुरुषार्थ आहे.बाबा म्हणतात,चांगले चांगले भक्त खूप पुरुषार्थ करतात. डोळे उघडल्या नंतर लगेच कृष्णाची आठवण यावी,म्हणून चित्र समोर ठेवतात.तुमच्या साठी आणखीनच सहज आहे.जर सहज आठवण येत नाही तर माया त्रास देते.तर हे चित्र मदत करतील.शिव बाबा आम्हाला ब्रह्मा द्वारे विष्णुपुरी चे मालक बनवत आहेत.आम्ही बाबाद्वारे विश्वाचे मालक बनत आहोत,हे स्मृतीमध्ये राहिल्यामुळे खूप मदत मिळेल.जी मुलं समजतात,आठवण घडीघडी विसरते,त्यांना बाबा मत देतात,चित्र समोर ठेवा तर बाप आणि वारसा आठवण येईल.परंतु ब्रह्माची आठवण करायची नाही. ज्यावेळेस साखरपुडा करतात,तर ब्राह्मणाची थोडीच आठवण करायची असते.तुम्ही बाबांची चांगल्याप्रकारे आठवण करत राहा तर बाबा पण तुमची आठवण करतील.आठवणी द्वारे आठवण येते.आता साजनचे कर्तव्य तुम्हाला माहिती आहे. शिवाचे भक्त तर खूप आहेत. शिव-शिव म्हणत राहतात परंतु ते चुकीचे आहे, शिवकाशी विश्वनाथ परत गंगा म्हणतात.गंगा नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन बसतात.हे समजत नाही की, ज्ञानसागर तर शिवपिता आहेत.काशीमध्ये अनेक परदेशी इत्यादी पाहण्यासाठी जातात.मोठ-मोठे घाट बनवले आहेत,तरीही सर्वांना शिवा चे मंदिर आकर्षित करते.सर्व मंदिरांमध्ये जातात,मंदिर तर कोणाच्या जवळ जाणार नाही.देवतां चे मंदिर खूप आकर्षित करते. शिवबाबा पण आकर्षित करतात. शिवबाबाच क्रमांक एक आहेत नंतर हे ब्रह्मा-सरस्वतीच विष्णू, परत विष्णूच ब्रह्मा बनतात. ब्राह्मणच विष्णुपुरीचे देवता बनतात.विष्णुपुरी चे देवताच ब्राह्मण बनतात.आता तुमचा धंदा हा आहे.आम्हीच देवता बनत आहोत, परत दुसऱ्यांना पण रस्ता सांगायचं आहे.बाकी सर्व जंगलामध्ये घेऊन जाणारे आहेत. तुम्ही जंगलापासून निघून बागेमध्ये जातात.शिवबाबा येउन काट्याला फुल बनवतात.तुम्ही पण हा धंदा करत राहा.या गोष्टींना तुम्ही जाणतात,कोणी राजाराणी तर नाही. ज्यांना तुम्ही समजून सांगा.गायन पण आहे.पांडवांना तीन पाऊल पृथ्वीचे मिळाले नव्हते.बाबा समर्थ होते,तर त्यांना विश्वाची बादशाही दिली.आता पण तीच भूमिका वठवणार.कृष्णाला तर कोणते विघ्न येऊ शकत नाहीत.आता बाबा आले आहेत,बाबा पासून वारसा घ्यायचा आहे.यासाठी कष्ट घ्यायचे आहेत. नवीन नवीन गोष्टी निघत राहतात. असे पाहण्यात येते प्रदर्शनी द्वारे समजावून सांगितले तर, चांगला प्रभाव पडतो.बुद्धी द्वारे काम घेतले जाते की,प्रदर्शनी द्वारे प्रभावित होतात की प्रोजेक्टर द्वारे.प्रदर्शनी मध्ये समजून सांगितल्यामुळे चेहरा पाहून समजावले जाऊ शकते.तुम्ही समजवता गीताचे भगवान शिव पिता आहेत, तर पित्यापासून परत वारसा घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.सात दिवस द्यायचे आहेत. तुम्ही हे लिहून द्या,नाहीतर बाहेर गेल्यानंतर माया विसरवते.तुमच्या बुद्धीमध्ये आले आहे,आम्ही ८४ जन्माचे चक्र लावले.आत्ता जायचे आहे.तर मग तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे.हे चित्र सोबत असायला पाहिजेत,खूप चांगली आहेत.बिर्ला इत्यादी हे पण जाणत नाही की,या लक्ष्मीनारायणने हे राज्य कधी आणि कसे घेतले. तुम्ही जाणता तर तुम्हाला खूप खुशी राहायला पाहिजे. लक्ष्मीनारायणचे चित्र घेऊन लगेच कोणालाही समजून सांगू शकतात,त्यांनी हे पद कसे मिळवले.या गोष्टी समजून घेण्याच्या आणि समजून सांगण्याचसाठी आहेत.हे लक्ष खूप श्रेष्ठ आहे.जो जसा शिक्षक असतो, तशीच सेवा करत राहतात.बाबा पाहतात कोण कोण सेवा केंद्र सांभाळत आहेत,आपल्या अवस्थेनुसार.नशा तर सर्वांना आहे, परंतु विवेक,बुद्धि म्हणते की समजून सांगणारा जितका हुशार असेल तेवढी चांगली सेवा होईल.सर्वच हुशार बनू शकत नाहीत.सर्वांना एक सारखा शिक्षक पण मिळू शकत नाही.जसे कल्पा पूर्वी चालले होते, तसे चालत आहे.बाबा म्हणतात आपल्या अवस्थेला जमवत राहा. कल्प-कल्प ची बाजी आहे.बाबा पाहतात कल्पापूर्वी सारखाच प्रत्येकाचा पुरुषार्थ चालत आहे.जे काही होत आहे ते कल्पापूर्वी पण असेच झाले होते,परत आनंद पण राहतो तर शांती पण राहते.बाबा म्हणतात,कर्म करताना बाबांची आठवण करा,बुद्धीचा योग परमधाम मध्ये राहिला पाहिजे,तर खूप कल्याण होईल.जे करेल त्यांना मिळेल. चांगले करतील तर चांगलेच मिळेल.मायेच्या मतावरती सर्व खराब काम करत आले आहेत. आता श्रीमत मिळते,चांगले करा तर चांगले होईल.प्रत्येक जण आपल्यासाठी कष्ट करतात.जसे करतील तसे मिळेल, तर का नाही आम्ही सेवा करत राहायचे? योगाद्वारे आयुष्य वाढेल, आठवणीच्या यात्रे द्वारे निरोगी बनायचे आहे,तर का नाही आम्ही बाबाच्या आठवणीमध्ये रहावे. आम्ही प्रयत्न का करायचे नाहीत?ज्ञान तर अगदी सहज आहे. लहान मुलं पण समजतात आणि समजवतात परंतु ते योगी तर झाले नाही.हे तर पक्के करायचे आहे कि, बाबांची आठवण करा तर सारखे सारखे विसरतात.तर चित्र ठेवायला पाहिजेत, हे चांगलेच आहे.सकाळी चित्र पाहत आठवण येत राहील. शिवबाबा द्वारे आम्ही विष्णुपुरी चा वारसा घेत आहोत.हे त्रिमूर्ती चे चित्र मुख्य आहे,याचा अर्थ तुम्हाला आत्ता समजला आहे.दुनिये मध्ये त्रिमूर्ती चे चित्र दुसऱ्या कोणाजवळ नाही.हे तर बिलकुल सहज आहे.आम्ही लिहू किंवा नाही,हे तर सर्व जाणतात, ब्रह्मा द्वारे स्थापना,विष्णू द्वारे पालना,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) मायेच्या बॉक्सिंग मध्ये कधी हरायचे नाही,याचे लक्ष ठेवायचे आहे.कल्पा पूर्वीच्या स्मृति द्वारे आपली अवस्था श्रेष्ठ बनवायची आहे.आनंद आणि शांती मध्ये राहायचे आहे.

(२) आपले चांगले करण्यासाठी श्रीमता वर चालवायचे आहे.या जुन्या दुनियेशी संबंध तोडून टाकायचा आहे. मायेच्या वादळापासून सुरक्षित राहण्यासाठी त्रिमूर्तीचे, लक्ष्मीनारायणचे चित्र समोर ठेवून बाप आणि वारशाची आठवण करायची आहे.

वरदान:-
निर्बल आत्म्यामध्ये शक्तींचा फोर्स भरणारे ज्ञानदाता सो वरदाता भव.

वर्तमान वेळेत निर्बल आत्म्यामध्ये इतकी शक्ती नाही,जे तीव्र वेगाने पुरुषार्थ करू शकतील त्यांना जास्त शक्तीची आवश्यकता आहे.तर तुम्हा विशेष आत्म्यांना स्वतःमध्ये विशेष शक्ती भरून त्यांना पण शक्ती द्यायची आहे. यासाठी ज्ञानदाता च्यासोबत शक्तीचे वरदाता बना. रचनाकाराचा प्रभाव रचनेवरती पडतो म्हणून वरदानी बनवून आपल्या रचनेला सर्व शक्तींचे वरदान द्या.आता या सेवेची आवश्यकता आहे.

बोधवाक्य:-
साक्षी होऊन प्रत्येक खेळ पाहा,तर सुरक्षित राहाल आणि मजा पण येईल.