27-04-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- तुमचा स्वधर्म शांत आहे,खरी शांती, शांतीधाम मध्ये मिळू शकते,ही गोष्ट
सर्वांना सांगायची आहे,स्वधर्मा मध्ये रहायचे आहे"
प्रश्न:-
कोणते एक
ज्ञान बाबां जवळ आहे जे आता तुम्ही शिकत आहात?
उत्तर:-
पाप आणि पुण्याचे ज्ञान. भारतवासी जेंव्हा बाबांना अपशब्द बोलू लागतात,तेंव्हा पाप
आत्मा बनतात आणि जेंव्हा बाबांना आणि नाटकाला जाणतात,तेंव्हा पुण्यात्मा बनतात.हे
शिक्षण तुम्ही आताच घेत आहात.तुम्ही जाणता सर्वांना सदगति देणारे एक बाबाच
आहेत.मनुष्य,मनुष्याला सदगति अर्थात मुक्ती-जीवनमुक्ती देऊ शकत नाही.
ओम शांती।
बाबा सन्मुख मुलांना समजावतात की, ही आहे पाप आत्म्यांची दुनिया किंवा भारतालाच
म्हणू की भारत पुण्य आत्म्यांची दुनिया होती,जिथे देवी -देवतांचे राज्य होते.हा
भारत सुखधाम होता दुसरा कोणताही खंड नव्हता एकच भारत होता. चैन किंवा सुख त्या
सतयुगात होते ज्याला स्वर्ग म्हणतात.हा आहे नर्क.भारतच स्वर्ग होता, आता नर्क बनला
आहे.नरकात सुख-शांती कुठून येणार. कलियुगाला नर्क म्हणतात. कलियुग अंताला अजूनच
रौरव नर्क म्हटले जाते.दु:खधाम म्हटले जाते.भारतच सुखधाम होता,जेंव्हा या
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते.भारतीयांचा गृहस्थ धर्म पवित्र होता.पवित्रता पण
होती,सुख-शांती पण होती, संपत्ती पण खूप होती.आता तोच भारत पतित बनला आहे सर्व
विकारी बनले आहेत.हे आहे दु:खधाम.भारत सुखधाम होता. आणि जिथे आपण आत्मे निवास करतो
ते शांतीधाम आहे.शांती तिथे शांतीधाम मध्येच मिळू शकते.आत्मा शांत तिथेच राहू
शकते,ज्याला गोड घर निराकारी दुनिया म्हटले जाते.ते आहे आत्म्यांचे घर.तिथे जेंव्हा
राहते तेंव्हा आत्मा शांतीमधे आहे.बाकी शांती कुठे जंगलात जाऊन वगैरे मिळत
नाही.शांतीधाम तर ते आहे.सतयुगात सुख पण आहे, शांती पण आहे.इथे दु:खधामात शांती होऊ
शकत नाही.शांतीधाम मध्ये मिळू शकते.सुखधाम मध्ये पण कर्म होते,शरीराने अभिनय बजवायचा
असतो.या दु:खधाम मध्ये एकही मनुष्य नाही,ज्याला सुख-शांती आहे.हे आहे भ्रष्टाचारी
पतितधाम,तेंव्हा तर पतित- पावनला बोलावतात.परंतु त्या बाबांना कोणी जाणत नाही
म्हणून तर विनाधनीचे बनले आहेत. अनाथ असल्याने आपसात युद्ध- भांडण करतात.किती दु:ख-
अशांती,मारा-मारी आहे.हे आहेच रावण राज्य.रामराज्य मागतात. रावण राज्यात न सुख
आहे,न शांती आहे.रामराज्यात सुख- शांती दोन्ही होते.आपसात कधी युद्ध-भांडण करत
नव्हते,तिथे ५ विकार नसतात.इथे ५ विकार आहेत.पहिला देह-अभिमान मुख्य आहे.परत
काम,क्रोध. भारत जेंव्हा स्वर्ग होता तेंव्हा हे विकार नव्हते.तिथे देही- अभिमानी
होते.आता सर्व मनुष्य देह-अभिमानी आहेत.देवता होते देही-अभिमानी.देह-अभिमानी मनुष्य
कोणाला सुख देऊ शकत नाहीत,एक दोघांना दु:खच देतात.असे नका समजू-कोणी
लखपती,करोडपती,पदमपति आहे तर सुखी आहेत,नाही.हा तर सर्व मायेचा दिखावा आहे.मायेचे
राज्य आहे.आता त्यांच्या विनाशाकरिता हे महाभारत युद्ध समोर उभे आहे.यानंतर
स्वर्गाचे दरवाजे उघडणार आहेत. अर्ध्याकल्पानंतर परत नर्काचे दरवाजे उघडतील.या
गोष्टी कोणत्या ग्रंथांमध्ये नाहीत.भारतवासी म्हणतात जेंव्हा भक्ती करू तेंव्हा
भगवान भेटतील.बाबा म्हणतात जेंव्हा भक्ती करत-करत बिल्कुल खाली उतरतात,तेंव्हा मला
स्वर्गाची स्थापना करायला अर्थात भारताला स्वर्ग बनवण्यासाठी यावे लागते.भारत जो
स्वर्ग होता,तो नर्क कसा बनला?रावणाने बनवला. गीतेच्या भगवंताकडून तुम्हाला राज्य
मिळाले,२१ जन्म स्वर्गात राज्य केले.परत भारत द्वापरपासून कलीयुगात आला अर्थात उतरती
कला झाली, यामुळे सर्व बोलवत राहतात-हे पतित-पावन ये.पतित मनुष्याला सुख-शांती पतित
दुनियेत मिळू शकत नाही.किती दु:ख सहन करतात.आज पैसे चोरी झाले, आज नुकसान झाले,आज
रोगी झाले.दु:खच दु:ख आहे ना. आता तुम्ही सुख-शांतीचा वारसा मिळवण्याचा पुरूषार्थ
करत आहात,बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेण्याचा पुरुषार्थ करत आहात.सदा सुखी बनवणारा
एक बाबाच आहे.सदा दु:खी बनवणारा रावण आहे.या गोष्टी भारतवासी जाणत नाहीत. सतयुगात
दु:खाच्या गोष्टी नसतात कधी रडावे लागत नाही.नेहमी सुखच सुख आहे.तिथे देह- अभिमान
अथवा काम,क्रोध इ. नसतात.जोपर्यंत ५ विकारांचे दान देत नाहीत, तोपर्यंत दु:खाचे
ग्रहण सुटू शकत नाही.असे म्हणतात, द्या दान तर सुटेल ग्रहण. यावेळी संपूर्ण भारताला
५ विकारांचे ग्रहण लागले आहे. जोपर्यंत हे ५ विकारांचे दान देत नाही तोपर्यंत १६ कला
संपूर्ण देवता बनू शकत नाही.बाबा सर्वांचा सदगती दाता आहेत. असे म्हणतात गुरू शिवाय
गति नाही. परंतु गतिचा अर्थ पण समजत नाहीत.मनुष्याची गति-सदगति म्हणजे
मुक्ती-जीवनमुक्ती.ते तर बाबाच देऊ शकतात.यावेळी सर्वांची सदगति होणार आहे.
दिल्लीला म्हणतात नवी
दिल्ली, जुनी दिल्ली.परंतु आता नवी तर नाही.नव्या दुनियेमध्ये नवी दिल्ली
असते.जुन्या दुनियेमध्ये जुनी दिल्ली असते.बरोबर यमुनेचा किनारा होता,दिल्ली
परिस्तान होती.सतयुग होते ना. देवी-देवता राज्य करत होते. आता तर जुन्या दुनियेत
जुनी दिल्ली आहे.नवीन दुनियेत तर या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. भारतवासी हे
विसरलेत नवीन भारत,नवीन दिल्ली तर त्यांचे राज्य होते अजून कोणताही खंड नव्हता.हे
कोणीच जाणत नाही. शासन हे शिकवत नाही. समजतात हा अपूर्ण इतिहास आहे.जेंव्हा पासून
इस्लामी,बौद्धि आलेत.लक्ष्मी-नारायणाच्या राज्याची कोणालाच माहिती नाही.हे बाबाच
बसून समजावतात की संपूर्ण सृष्टीचे चक्र कसे फिरते.जेंव्हा भारत स्वर्ग होता तेंव्हा
स्वर्णिम यूग होते.आता तोच भारत पहा काय बनला आहे.परत भारताला हिऱ्यासारखा कोण
बनवेल? बाबा म्हणतात जेंव्हा तुम्ही खूप पाप आत्मा बनता तेंव्हा मी येतो पुण्य आत्मा
बनवण्यासाठी.हे नाटक बनले आहे,ज्याला कोणीच जाणत नाही.हे ज्ञान बाबां शिवाय कोणी
देऊ शकत नाही.ज्ञानी बाबाच आहेत,ते येऊन शिकवतात. मनुष्य,मनुष्याला कधी सदगति देऊ
शकत नाहीत. जेंव्हा देवी-देवता होते, ते एक दोघांना सुख द्यायचे.कोणीही आजारी,रोगी
नव्हते.येथे तर सर्व रोगी आहेत.आता बाबा आले आहेत परत स्वर्ग बनवण्यासाठी. बाबा
स्वर्ग बनवतात,रावण नर्क बनवतो.हा खेळ आहे याला कोणीच जाणत नाहीत.ग्रंथाचे ज्ञान आहे
तत्त्वज्ञान,भक्ती मार्ग. तो कोणता सदगति मार्ग नाही.हे कोणते ग्रंथाचे तत्त्वज्ञान
नाही. बाबा कोणत्याही ग्रंथाचे ज्ञान सांगत नाहीत.इथे आहे आध्यात्मिक ज्ञान.बाबांना
आध्यात्मिक पिता म्हणतात.तो आहे आत्म्यांचा पिता....बाबा म्हणतात मी मनुष्य सृष्टीचा
बीजरूप आहे, यामुळे ज्ञानी आहे.या मनुष्य सृष्टी रूपी झाडाचे आयुष्य किती आहे. कशी
वृध्दी होते परत कसा भक्ती मार्ग सुरू होतो,हे मी जाणतो. तुम्हा मुलांना हे ज्ञान
देऊन स्वर्गाचा मालक बनवतो, मग तुम्ही मालक बनता.हे ज्ञान तुम्हाला एकदाच मिळते परत
हरवून जाते,परत सतयुग त्रेता मध्ये या ज्ञानाची गरज लागत नाही.हे ज्ञान फक्त तुम्हा
ब्राह्मणांना आहे. देवतांमध्ये हे ज्ञान नसते.तर परंपरेने हे ज्ञान येऊ शकत नाही.
हे फक्त तुम्हा मुलांना एकदाच मिळते, ज्याद्वारे तुम्ही जीवनमुक्त बनता.बाबां कडून
वारसा घेता. तुमच्या कडे खूप येतात,म्हणतात मनाला शांती कशी मिळेल.परंतु हे म्हणणे
चूक आहे.मन-बुद्धि आत्म्याचे इंद्रिय आहेत,जसे शरीराची इंद्रिये आहेत. आत्म्याला
दगड बुद्धि पासून परिस बुद्धि बाबाच बनवतात-जी सतयुग त्रेता पर्यंत चालते.नंतर दगड
बुद्धि बनतात.आता परत तुम्ही दगड बुद्धी पासून पारस बुद्धी बनता.तुमची परिस बुद्धि
जी होती त्यात खाद (कट)पडत गेली आहे.आता परत परिस बुद्धी कसे होणार?बाबा म्हणतात,हे
आत्म्यांनो माझी आठवण करा. आठवणीच्या यात्रेनेच तुम्ही पवित्र बनाल आणि माझ्या जवळ
याल.बाकी जे म्हणतात,मनाची शांती कशी मिळेल?त्यांना सांगा की इथे शांती कशी असणार,
हे आहेच दु:खधाम कारण विकारांची प्रवेशता आहे.हा तर बेहदच्या बाबां कडूनच वारसा मिळू
शकतो.परत रावणाची साथ मिळाल्याने पतित बनतात परत बाबां कडून पावन बनायला सेकंद
लागतो.आता तुम्ही आले आहात बाबां कडून जीवन मुक्तीचा वारसा घेण्यासाठी.बाबा जीवन
मुक्तीचा वारसा देतात आणि रावण जीवन बंधनाचा श्राप देतो यामुळे दु:खच दु:ख
आहे.नाटकाला पण जाणायचे आहे.दु:खधाम मध्ये कोणाला सुख-शांती मिळू शकत नाही. शांती
तर आपल्या आत्म्याचा स्वधर्म आहे,शांतीधाम आत्म्यांचे घर आहे.आत्मा म्हणते-आमचा
स्वधर्म शांती आहे.हा बाजा (शरीर)वाजत नाही,परंतु कुठपर्यंत बसून राहणार.कर्म तर
करायचेच आहे ना.जोपर्यंत मनुष्य नाटकाला समजत नाही तोपर्यंत दु:खी राहतात.बाबा
म्हणतात,मी आहेच गरीब निवाज.इथे गरीबच येतील. सावकारांकरिता तर स्वर्ग इथे
आहे.त्यांच्या नशीबात स्वर्गाचे सुख नाही.बाबा म्हणतात मी गरीब निवाज आहे.सावकारांना
गरीब आणि गरीबांना सावकार बनवतो.सावकार इतके उच्च पद मिळवू शकत नाहीत कारण त्यांना
सावकारीचा नशा आहे.ते प्रजेत येतील.स्वर्गात जरूर येतील.परंतु उच्च पद गरीब
मिळवतील.गरीब सावकार बनतील.त्यांना देह-अभिमान आहे ना की, आम्ही धनवान आहोत.परंतु
बाबा म्हणतात-हे सर्व धन-वैभव मातीत मिसळणार आहे.विनाश होणार आहे,देही- अभिमानी
बनण्यात खूप मेहनत आहे.यावेळी सर्व देह-अभिमानी आहेत.आता तुम्हाला देही- अभिमानी
बनायचे आहे.आत्मा म्हणते आम्ही ८४ जन्म पूर्ण केले आहेत.नाटक पूर्ण होत आहे, आता
परत घरी जायचे आहे. आता कलीयुगाचा अंत,सतयुग आदिचा संगम आहे.बाबा म्हणतात,प्रत्येक
५ हजार वर्षांनी येतो,भारताला परत हिऱ्या सारखे बनवण्यासाठी.हा इतिहास -भूगोल बाबाच
सांगू शकतात. अच्छा.
गोड-गोड फार
वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१ ) बाबांकडून
जीवनमुक्तीचा वारसा घेण्यासाठी पावन जरूर बनायचे आहे.नाटकाचे ज्ञान बुद्धीत ठेऊन
दु:खधाम मध्ये राहत असतानाही दु:खापासून मुक्त व्हायचे आहे.
२ ) धन-वैभव किंवा
सावकारीचा नशा सोडून देही-अभिमानी राहण्याचा पुरूषार्थ करायचा आहे.
वरदान:-
महान आणि
मेहमान- या दोन स्मृती द्वारे सर्व आकर्षणांपासून मुक्त बनणारे उपराम व साक्षी भव
उपराम व साक्षीपणाची
अवस्था बनवण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवा-एक तर मी आत्मा महान आत्मा आहे,दुसरे मी
आत्मा आता या जुन्या सृष्टी मध्ये व जुन्या शरीरात मेहमान (पाहुणा) आहे.या स्मृती
मध्ये येण्याने स्वतः आणि सहजच सर्व कमजोरी व आसक्तीचे आकर्षण समाप्त होईल.महान
समजण्याने जे साधारण कर्म व संकल्प संस्काराच्या वश चालत आहेत,ते बदलतील.महान आणि
मेहमान समजून चालण्याने महिमा योग्यही बनाल.
बोधवाक्य:-
सर्वांच्या
शुभभावना आणि सहयोगाच्या थेंबानी मोठे कार्यही सहज होऊन जाते.