23.04.2021 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबांचे हे एक आश्चर्यकारक दुकान आहे, ज्यामध्ये सर्व विविध प्रकारचे सामान मिळते, त्या दुकानाचे तुम्ही मालक आहात "

प्रश्न:-

या आश्चर्यकारक दुकानीची नक्कल कोणीही करू शकत नाही, का?

उत्तर:-

कारण की ते स्वत: सर्व खजान्यांचे भांडार आहेत. ज्ञानाचे, सुखाचे,पवित्तेचे इ. सर्व गोष्टीचे सागर आहेत. ज्याला जे हवे ते मिळू शकते.निवृती मार्गामधील सन्याशांकडे हे सामान मिळू शकत नाही. कोणीही स्वत:ला बाबांसारखे सागर म्हणवून घेवू शकत नाही.

गीत:-

तुम्हे पाके हमने जहान पा लिया...

ओम शान्ती. आता विश्वपित्याच्या समोर मुले बसलेली आहेत.यांना जगतपिता किंवा बेहद्दचे दादा म्हणता येईल. आशा भाग्यवान मुलांना बाबा आणि दादा संपुर्ण ज्ञान देत आहेत. मर्यादित ज्ञान आता संपले. आता वडीलांचे कडून अमर्यादित वारसा घ्यायचा आहे. हे एकच दुकान आहे. आम्हाला काय पाहिजे हे मनुष्याला माहित नाही.बेहदच्या विश्वपित्याचे दुकान तर खुपचं मोठ्ठे आहे. त्यांना सुखाचा सागर, पवित्रतेचा सागर, आनंदाचा सागर, ज्ञानाचा सागर ...एखाद्या मोठ्या दुकानदाराकडे विवीध प्रकारचे सामान असते. तर हे आहेत बेहदचे विश्वपिता, या़ंच्या जवळ तर विवीध प्रकारचे सामान आहे. काय काय आहे ? बाबा ज्ञानाचे सागर आहेत.सुखाचा,शांतीचा सागर आहे. त्यांच्याकडे हे आश्चर्यकारक अलौकिक सामान आहे .त्यांचे गायन आहे सुखकर्ता दुखहर्ता . एक बाबा चे दुकान सोडले तर अशाप्रकारे दुसरे दुकान नाही. ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे काय सामान आहे ? काहीही नाही. सर्वात श्रेष्ठ सामान बाबांच्या जवळ आहे, म्हणूनच त्यांचे गायन केले जाते-तुम्ही हो माता, पिता तुम्हीच….. अशाप्रकारे कुणाची महिमा गायली जात नाही. मनुष्य शांती मिळण्यासाठी किती भटकत असतात . कोणाला औषध हवे तर कोणाला काय पाहिजे. ही सर्व मर्यादित दुकाने आहेत. साऱ्या विश्वात, सर्वांच्या जवळ मर्यादित,सिमीत सामान आहे.हा एकच विश्व पिता आहे, ज्याच्याकडे अमर्यादित खजाने आहेत, म्हणूनच त्यांचे गायन आहे पतित-पावन, मुक्ती जीवन मुक्तिदाता, ज्ञानाचे सागर, आनंदाचे सागर. सर्व विविध सामान आहे. यादी करायची तर खूपच मोठी होईल. ज्या पित्याकडे हे सामान आहे, त्यावर मुलांचाही हक्क आहे. परंतु हे कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही.की, अशा पित्याची आम्ही मुलं आहोत, तर पित्याच्या प्रॉपर्टीचे आम्ही मालक असायला हवे. बाबा येतात पण भारतातच. बाबांच्या कडे ज्या विविध वस्तू आहेत, त्या बरोबर घेऊन येतात, त्या वस्तू मिळवण्यासाठी तर मुलांना जावे लागत नाही. बाबा म्हणतात मलाच कल्प-कल्प यावे लागते. कल्पाच्या संगमावर येऊन सर्व गोष्टी देऊन जातो. मी जे तुम्हाला साहित्य देतो ते पुन्हा मिळू शकत नाही.अर्ध्या कल्पा साठी तुमचे भंडारे भरपूर होतात. अशी कोणतीही चीजवस्तू राहत नाही की ज्यासाठी तुम्हाला मागावे लागेल.वैश्विक नाटका प्रमाणे, तुम्ही सर्व वारसाहक्क घेऊन पुन्हा हळू हळू शिडी उतरता. पुनर्जन्म पण जरूर घ्यावाच लागेल. ८४ जन्म पण घ्यावे लागतात. ८४ चे चक्र म्हणतात परंतु अर्थ समजत नाहीत. ८४ च्या चक्रा ऐवजी चौर्‍यांशी लाख जन्म म्हणतात. माया चुका करवते. हे सर्व आता तुम्ही समजू शकता पण पुढे विसरून जाता. यावेळेला ही सामुग्री घेतात व सत्ययुगात राज्य करता. परंतु त्यांना हे आठवत नाही की हि राजाई आम्हाला कोणी दिली ? लक्ष्मीनारायण चे राज्य कधी होते ?

स्वर्गाच्या सुखाचे वर्णन केले जाते. सर्व विविध सुखं दिली जातात.त्यानंतर पुढे हे सुख सुद्धा प्राय:लोप होते. अर्ध्या कल्पा नंतर रावण येऊन सर्व सुखं हिरावून घेतो. एखाद्यावर रागवल्यास म्हणतात ना, तुझ्या शरीरातील सर्व गुण व शक्ती संपलेल्या आहेत. तुम्ही पण जो सर्वगुणसंपन्न 16 कला संपूर्ण होता .त्या सर्व कला नष्ट झालेल्या आहेत. एक पित्याशिवाय दुसरे कोणाचेही हे गायन नाही. म्हणतात ना पैसा असेल तर लाडका ना फिरून या. विचार करा की, स्वर्गामध्ये किती भरपूर धनसंपत्ती होती.आता ती थोडीच आहे. सर्व नष्ट होते. धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट बनतात. मग त्यामुळे धनसंपत्तीही गायब होऊन जाते व पतित बनायला सुरुवात होते. बाबा समजावून सांगतात. तुम्हाला भरपूर धन संपत्ती दिली होती. तुम्हाला हिऱ्या प्रमाणे मौल्यवान बनविले होते.तुम्हास दिलेली धनसंपत्ती आपण कोठे हरवून बसलात?. आता पुन्हा बाबा म्हणतात की आपला वारसा हक्क पुरुषार्थ करून मिळवा. तुम्हाला माहीतच आहे की-बाबा आम्हाला पुन्हा स्वर्गाची बादशाही देत आहेत आणि म्हणतात की हे मुलांनो माझी आठवण करा की, ज्यामुळे तुमच्या आत्म्यावर जो गंज चढलेला आहे तो निघून जाईल. मुलं म्हणतात बाबा आम्ही विसरून जातो. हे काय ? कन्या जेव्हा लग्न करते तेव्हा तिला पतिचा विसर पडतो काय ? मुलं कधी आपल्या पित्याला विसरतात काय ? बाबा तर दाता आहेत. वारसा मुलांना घ्यायचा आहे. तर जरुर आठवण करावी लागेल. बाबा समजाऊन सांगतात . बऱ्याच कालावधीनंतर भेटलेल्या गोड-गोड मुलांनो - आठवणीच्या प्रवासात राहाल तर विकर्म विनाश होईल. दुसरा कोणताही उपाय नाही.भक्ती मार्गामध्ये तीर्थयात्रा गंगास्नान इ. जे करत आलेले आहात, त्यामुळे पतित बनतच आलेले आहात. प्रगतीचा प्रश्नच नाही . तसा कायदा नाही. सर्वांचीच उतरती कला आहे. असं जे म्हणतात अमका मुक्ती मध्ये गेला. हे खोटं बोलतात. परत कोणीही जाऊ शकत नाहीत. बाबा आलेले आहेत तुम्हाला १६ कला संपूर्ण बनवण्यासाठी. तुम्हीच तर गात होता ना. मज-निर्गुण मधे काहीच गुण नाहीत.... आता तुम्हाला माहीतच आहे की बाबा तुम्हाला गुणवान बनवतात. आम्हीच गुणवान पूज्य होतो. आम्हीच वारसा मिळवलेला होता. पाच हजार वर्षे झाली. बाबा पण म्हणतात की मला वारसा देऊन गेलो होतो. शिवजयंती रक्षाबंधन दसरा इत्यादी सन साजरे करतात. परंतू आता काहिही समजत नाहित. सर्व काही विसरून जातात. पुन्हा बाबा येऊन आठवण करून देतात. तुम्हीच होता, पुन्हा तुम्ही राज्य भाग्य गमावलेले आहे. बाबा समजावून सांगतात. आता ही सारी दुनिया पुरानी जडजडीभूत आहे. दुनिया तर हीच आहे. हा भारतच नवा होता, आता पुन्हा पुराना झालेला आहे. स्वर्गात नेहमी सुख असते. पुन्हा द्वापार पासून जेव्हा दुःख सुरू होते. तेव्हापासून पुन्हा वेदशास्त्र आधी बनतात. भक्ती करता करता जेव्हा तुम्ही भक्तीपूर्ण करता तेव्हा भगवान येतात ना . ब्रह्मा चा दिवस व ब्रह्माची रात्र अर्धा अर्धा असेल ना. ज्ञानाला दिवस व भक्तीला रात्र म्हणतात त्यांनी तर कल्पा ची आयुष्य मर्यादा उल्टी सुल्टी केलेली आहे. तर प्रथम तुम्ही सर्वांना बसून बाबाची महिमा ऐकवा. बाबा ज्ञानाचा सागर आहे. शांतीचा सागर आहे. कृष्णाला थोडेच म्हणता येईल- निराकार, पतित पावन, सुखाचा सागर... नाही त्यांची महिमाच वेगळी आहे . दिवस रात्रीचा फरक आहे. शिव परमात्मा यालाच बाबा म्हणतात. कृष्णाला बाबा हे अक्षर शोभत नाही. केवढी मोठी चूक आहे ! पुन्हा लहान-लहान चुका करत 100 टक्के विसरलेले आहेत. संन्याशांना याचा फायदा मिळत नाही . मुळातच ते निवृत्ती मार्गाचे आहेत. तुम्ही आहात प्रवृत्ती मार्ग वाले. तुम्ही संपूर्ण निर्विकारी होता. निर्विकारी दुनया होती. ही आहे विकारी दुनिया. पुन्हा म्हणतात-काय सतयुगात मुले जन्माला येतच नव्हती ? तिथे सुद्धा विकार होते. आरे, सतयुग आहे . संपूर्ण निर्विकारी दुनिया . संपूर्ण निर्वीकारी, पुन्हा विकारी कसे काय बनू शकतात.? पुन्हा सतयुगात इतके मनुष्य असणे हे कसे काय शक्य आहे.? तिथे इतके मनुष्य असणे थोडेच शक्य आहे . भारताच्या शिवाय इतर कोणत्ताही खंड असणार नाही. ते म्हणतात पण आम्हाला पटत नाही. हे जग तर सदैव बहरलेले असते. काहिही समजत नाही. बाबा समजावून सांगतात की,भारत सुवर्ण काळात होता. आता तर लोहकाळत, पत्थरबुध्दी आहे. आता तुम्ही मुलांनी हे नाटक समजून घेतलेले आहे. गांधी इत्यादी रामराज्य हवे असे म्हणत असताना, पुढे महाभारत लढाई सुरू झाली. बस सर्वखेळ खलास. पुढे काय झाले ? काहीही दाखवलेले नाही. बाबा बसून या गोष्टी सांगतात. हे तर बिलकुल सोप आहे. शिवबाबा निशितच येतात म्हणून तर शिवजयंती सादर करतात. शिव बाबा आहेत स्वर्गाचे निर्माते . स्वर्गाचे दरवाजे उघडणारे परमपिता. शिव बाबांनी स्वर्गाचे दरवाजे उघडले ते सर्व स्वर्गातच येतील.जेव्हा येथे नर्क असतो तेव्हाच शिवबाबा येतात स्वर्ग बनविण्यासाठी. शिवबाबा स्वर्गाचे दरवाजे उघडतील आणि नर्काचे दरवाजे बंद करतील. या गोष्टी काही अवघड नाहीत. महिमा फक्त एक शिव बाबा ची आहे. शिवबाबाचे हे एकच अलौकिक दुकान आहे. सर्व आत्म्यांचे पिता शिवबाबा आहेत. या विश्व पित्याकडून भारताला स्वर्गाचे सुख मिळते. विश्वपिता शिवबाबा स्वर्गाची स्थापना करतात. खूप सुख होतं. मग आम्ही नर्कामध्ये का पडलेले आहोत ? हे कोणालाच माहीत नाही. बाबा समजावून सांगतात की तुम्हीच देवी-देवता होता आणि तुम्हीच पतित बनलेले आहात. देवी देवतांनाच 84 जन्म घ्यावे लागतात. आता येऊन पतित बनलेले आहात त्यांनाच पुन्हा पावन बनवायचे आहे. बाबा चा जन्म आहे त्याच प्रमाणे रावणाचा ही जन्म आहे. हे कोणालाच माहीत नाही.कोणालाही विचारा की तुम्ही रावणाला केंव्हापासून जाळता ? हे अनादी काळापासून चालत आलेलं आहे असंच म्हणतील. या सर्व गुह्य गोष्टीचे 'राज' बाबा समजून सांगतात. त्या परमपिता शिव परमात्मा च्या एकाच झोपडीची महिमा आहे.सुख शांती पवित्रता मनुष्याला मनुष्याकडून मिळू शकत नाही. फक्त एकाला थोडीच शांती मिळालेले होती. ते खोटं बोलतात की फलाण्या कडून शांती मिळाली.अरे खरी शांती तर शांतीधाम मध्येच मिळणार आहे. इथे तर एकाला शांती मिळाली तर दुसरा अशांत करेल. आणि दोघेही अशांत होतील. खरतर सुख, शांती, पवित्रता इ.गोष्टीचा खरा व्यापारी एक शिव बाबाच आहे. त्यांना भेटूच व्यापार करा. म्हणूनच त्यांना म्हणतात सौदागर, पवित्रता सुख शांती संपत्ती सर्वकाही त्यांच्याजवळ आहे. अप्राप्त कोणतीच गोष्ट नाही. स्वर्गाचे तुम्हाला राज्य मिळते जे शिवबाबा देण्यासाठी आलेले आहेत. घेणारे घेत घेत थकून जातात. खरंतर मी येतो देण्यासाठी. आणि तुम्ही घेण्यामध्ये आळशी बनता. आणि मुले म्हणतात, बाबा मायेची वादळं येतात. हां तुम्हाला पद ही खूप श्रेष्ठ प्राप्त होते. तुम्ही स्वर्गाचे मालक बनता ही काय कमी गोष्ट आहे ? यासाठी थोडी मेहनत करावी लागेल. श्रीमतावर चालत राहा. शिवबाबा ची मदत तर मिळतच आहे. ती पुन्हा दुसऱ्यांना पण द्यावी लागेल. दान करावी लागेल. पवित्र बनायचं असेल तर पाच विकारांचे दान जरूर द्यावेच लागेल. मेहनत तर करावीच लागेल . बाबांची आठवण करावीच लागेल. मुख्य आहे, 'आठवण, ज्यामुळे बुथ्दिवरील गंज निघून जाईल. प्रतिज्ञा पण जरूर करा की बाबा आम्ही विकारांमध्ये कधीच जाणार नाही. कोणावर रागवणार नाही. आपल्या आठवणी मध्ये जरूर राहू. नाही तर इतके विकर्म विनाश कसे काय होतील ? बाकी ज्ञान तर एकदम सोपे आहे. 84 जन्माचे चक्र कसे पूर्ण करतो ही गोष्ट तुम्ही कोणालाही समजावू शकता. बाकी आठवणी मध्येच मेहनत आहे. भारताचा पुराना योग प्रसिद्ध आहे. काय ज्ञान देतात ? " मनमना भव " अर्थात " मामेकंम यादकरो " तर तुमचे विकर्म विनाश होतील. तुम्ही गात पण होता, आपन जेव्हा याल तेंव्हा इतर सर्व संग तोंडुन, एक आपल्याशी संग जोडून आपल्यावर समर्पण होईन. एक तुमच्या शिवाय इतर कोणाचेही आठवण करणार नाही. प्रतिज्ञा केलीच आहे तर मग विसरला का ? म्हणतात ना हाथ कार्डे दिल्ल यार्डे ……कर्मयोगी तर तुम्हीच आहात.धंदा आदी करताना बुद्धीयोग एक बाबाशी लावायचा आहे. एक माशुक बाबा स्वतः सांगतात तुम्ही अशीकांनी अर्धा कल्प माझी आठवण केलेली आहे . आता मी आलेलो आहे . " माझी आठवण करा " ही आठवणच क्षणाक्षणाला विसरते. या मध्येच खरी मेहनत आहे. कर्मातित अवस्था प्राप्त झाल्यास मग हे शरीरच सोडावे लागेल. ज्यावेळी राजधानी स्थापन होईल त्यावेळी तुम्हाला कर्मातीत अवस्था प्राप्त होईल. आता तर सर्व पुरुषार्थी आहेत. सर्वात जास्त मम्मा, बाबा आठवण करतात. सूक्ष्म वतनमध्ये सुद्धा तेच दिसतात.

बाबा समजावून सांगतात.- मी ज्याच्या शरिरात प्रवेश करतो त्याचा हा शेवटचा जन्म आहे. तोही पुरुषार्थ करत आहे. कर्मातीत अवस्था आता कोणाला प्राप्त झालेली नाही. कर्मातीत अवस्था प्राप्त झाल्यास हे शरीर राहू शकत नाही.बाबा तर या गोष्टी खूप सुंदर रीतीने समजावून सांगतात. आता समजून घेणाऱ्याच्या बुद्धीवर आहे. स्वर्गाची निर्मिती करणारा पिता एकच आहे. त्यांच्या जवळच ज्ञानाचं सार भांडार आहे. तोच खरा जादुगर आहे. अन्य कोणाकडून सुख शांती पवित्रतेचा वारसा मिळू शकत नाही. बाबा खूप सुंदररिती समजावून सांगतात. मुलांच्या कडून धारणा करून घेतात आणि करवून पण घेतात. जितक्या धारणा करतात तितका वारसा मिळतो. दिवसेंदिवस खूप शक्तिशाली ज्ञान मिळत जात आहे. लक्ष्मीनारायण कडे पहा किती सुंदर व गोड आहेत. त्यांच्यासारखं गोड बनायला हंव. अच्छा .

ठे मिठे शिथीलदे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रुहानी बच्चो को नमस्ते. अन्य कोणत्याही सत्संगामध्ये कशाप्रकारे बोललं जात का? ही आमची बिल्कुल नवी भाषा आहे . ज्याला(स्पिरिच्युअल नॉलेज) "अध्यात्मिक ज्ञान " म्हटले जाते, अच्छा

धारणे साठी सारांश :-

१) बाबांच्या कडून जे सुख शांती पवित्रता इ. चा खजाना मिळतो तो सर्वांना द्यायचा आहे. प्रथम विकाराचे दान देऊन पवित्र बनायचे आहे . मग अविनाशी ज्ञान धनाचे दान करायचे आहे.

२) देवता प्रमाणे गोड बनायचे आहे. बाबांच्या बरोबर जी प्रतिज्ञा केलेली आहे. ती सदा स्मृतीत ठेवायची आहे

आणि बाबांच्या आठवणीत राहून विकर्म विनाश पण करायचे आहे.

वरदान:-

आपल्यासाठी व सर्व आत्म्यांचे साठी कायद्याचे पालन करणारे कायदे करणारे ला मेकर सो न्यू वर्ल्ड मेकर भव.

जे स्वतः प्रति ला फुल बनतात. ते दुसऱ्यांच्या साठी सुद्धा कायदेशीर बनू शकतात. जे स्वतः कायदा मोडतात ते दुसऱ्यावर कायदा लावू शकत नाहीत. यासाठी आपणच आपले निरीक्षण करा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मनसा, संकल्प, वाणी द्वारा कर्मामध्ये संबंध संपर्क मध्ये एक दुसऱ्याला सहयोग देण्यामध्ये, सेवेमध्ये कुठे ला ब्रेक तर झाला नाही ना ? जे कायदा करणारे आहेत ते लां ब्रेकर बनू शकत नाहीत . जे यावेळी कायदा बनविणारे म्हणतात तेच शांती स्थापन करणारे नवीन दुनिया बनविणारे बनतात.

बोधवाक्य:-

कर्म करत असताना कर्माच्या चांगल्या व वाईट प्रभावाखाली न येणे म्हणजेच कर्मा तीत अवस्था आहे.

||| ओम शांती |||