21.04.2021 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन
"गोड मुलानो, तुम्ही आता सत्य बाबा कडून खऱ्या गोष्टी ऐकून प्रकाशा मध्ये आले आहात, तर तुमचे कर्तव्य आहे, सर्वांना अंधारातून काढून प्रकाशा मध्ये आणणे." प्रश्न:- जेंव्हा तुम्ही मुले कोणाला ज्ञान सांगता तर कोणती एक गोष्ट जरूर आठवणीत ठेवा?" उत्तर:- मुखातून वारंवार बाबा, बाबा म्हणत राहा, त्यामुळे आपले पण नाहीसे होऊन जाईल. वारशाची पण आठवण राहील. बाबा म्हटल्याने सर्वव्यापीचे ज्ञान पहिल्या पासून नाहीसे होऊन जाईल. जर कोणी म्हटले भगवान सर्वव्यापी आहे, तर त्यांना सांगा, बाबा सर्वांच्या मध्ये कसे असू शकतील. गीत:- आज अंधेरे मे है इंसान... ओम शांती:- मुलांने, काय म्हटले आणि कोणाला बोलावले हे ज्ञानाचे सागर अथवा हे ज्ञान सूर्य बाबा. भगवाना ला बाबा म्हटले जाते. भगवान पिता आहे. तर तुम्ही सर्व मुले आहात. मुले म्हणतात, आम्ही आंधारा मध्ये येऊन पडले आहोत. तुम्ही आम्हाला प्रकाशा मध्ये घेऊन जावा. बाबा म्हटल्याने सिद्ध होते कि, पित्याला बोलावत आहेत. बाबा अक्षर म्हटल्याने प्रेम निर्माण होते, कारण बाबा कडून वरसा घेतला जातो. फक्त ईश्वर किंवा प्रभू म्हटल्याने पित्या च्या वारशाची गोडी वाटत नाही. बाबा म्हटल्याने वरशाची आठवण येते. तुम्ही बोलावता कि, बाबा आम्ही आंधारा मध्ये येऊन पडले आहोत. तुम्ही आता परत ज्ञानाने आमचा दीपक जागृत करा, कारण आत्म्याचा दिवा विझलेला आहे. मनुष्य मरतो, तर बारा दिवस दिवा लावतात. कोणी तरी तेल टाकण्यासाठी बसवितात, कारण दिवा विझू नये. बाबा समजावत आहेत, तुम्ही भारतवासी प्रकाशा मध्ये म्हणजे दिवसा मध्ये होता, आता आंधार रात्री मध्ये आहात. 12 तास दिवस व 12 तास रात्र. ती आहे बेहदची गोष्ट, येथे बेहदचा दिवस आणि बेहदची रात्र आहे. याला म्हटले जाते ब्रह्माचा दिवस, सतयुग, त्रेता, ब्रह्माची रात्र, द्वापार, कलियुग. रात्रीला अंधार असतो, मनुष्य भटकतात. भगवंताला शोधण्यासाठी चोहीकडे फेऱ्या मारतात, परंतु परमात्म्याला प्राप्त करू शकत नाहीत. परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी भक्ती करतात. द्वापार पासून भक्ती सुरू होते अर्थात रावण राज्य सुरू होते. दसऱ्याची पण एक गोष्ट बनविले आहे. गोष्टी नेहमी मनोकल्पीत बनवितात. जसे सिनेमा, नाटक इत्यादी बनवितात. श्रीमद्भगवद्गीता च खरी आहे. परमात्म्या ने मुलांना राजयोग शिकविला. राजाई दिली. मग भक्तिमार्गा मध्ये बसून गोष्ट बनविले आहे. व्यासा ने गीता सांगितली अर्थात गोष्ट बनविली. खरी गोष्ट तर बाबा द्वारे तुम्ही आता ऐकत आहात. नेहमी बाबा, बाबा म्हटले पाहिजे. परमात्मा आमचे बाबा आहेत, नवीन दुनियेचे रचियता आहेत, तर जरुर त्यांच्या कडून आम्हाला स्वर्गाचा वारसा मिळाला पाहिजे. आता तर 84 जन्म भोगून, आम्ही नरका मध्ये येऊन पडले आहोत. बाबा समजावतात, मुलांनो, तुम्ही भारतवाशी सूर्यवंशी, चंद्रवंशी होता, विश्वाचे मालक होता, दुसरा कोणता धर्म नव्हता, त्याला स्वर्ग किंवा कृष्णपुरी म्हटले जाते. येथे कंसपुरी आहे. बापदादा आठवण देत आहेत. लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. बाबा ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर, पतित-पावन आहेत, ना की पाण्याची गंगा. सर्व सजनींचा एकच भगवान साजन आहे. हे मनुष्य जाणत नाहीत. त्यामुळे विचारले जाते कि, आत्म्याचा पिता कोण आहे? तर गोंधळून जातात. म्हणतात, आम्ही तर ओळखत नाही. अरे, आत्मा, तुम्ही आपल्या पित्याला ओळखत नाहीत. म्हणतात, गॉड फादर. मग विचारले जाते, त्यांचे नाव रूप काय आहे? ईश्वराला ओळखता? तर म्हणतात, ते सर्वव्यापी आहेत. अरे, मुलांचा पिता कधी सर्वव्यापी असतो काय? रावणाच्या आसुरी मतावर किती अडाणी बनले आहेत. देहअभिमान नंबरवन आहे. स्वतःला आत्मा निश्चय करत नाहीत. म्हणतात, मी फलाना आहे, ही तर झाली शरीराची गोष्ट. मुळात स्वतः कोण आहे, हे जाणत नाहीत. मी न्यायाधिश आहे, मी हा आहे. . 'मी-'मी' म्हणत राहतात, परंतु हे चुकीचे आहे. मी आणि माझे या दोन गोष्टी आहेत. आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाश आहे. नाव शरीरावर पडते. आत्म्याचे कांही नाव ठेवले जात नाही. बाबा म्हणतात, माझे नाव शिव च आहे. शिवजयंती पण साजरी करतात. आता निराकाराची जयंती कशी होऊ शकते? ते कोणा मध्ये येतात, हे कोणाला माहित नाही. सर्व आत्म्याचे नाव आत्माच आहे. परमात्म्याचे नाव शिव आहे. बाकी सर्व सालीग्राम आहेत. आत्मे मुले आहेत, एक शिव सर्व आत्म्यांचा पिता आहे. ते बेहदचे पिता आहेत, त्यांना सर्व बोलावत आहेत कि, येऊन आम्हाला पावन बनवा, आम्ही दुःखी आहोत. आत्मा बोलावत आहे, दुःखामध्ये सर्व मुले आठवण करतात आणि मग हीच मुले सुखा मध्ये राहतात, तर कोणी पण आठवण करत नाहीत. रावणाने दुःखी बनविले आहे. बाबा समजावत आहे,हा रावण तुमचा जुना शत्रू आहे. हा पण नाटकाचा खेळ बनलेला आहे. तर आता सर्व आंधारा मध्ये आहेत. त्यामुळे बोलतात कि, हे ज्ञान सूर्य या. आम्हाला प्रकाशा मध्ये घेऊन चला. भारत सुखधाम होता. तर कोणी बोलावत नव्हते. कोणती अप्राप्त वस्तू नव्हती. येथे तर ओरडत राहातात, हे शांती देवा, बाबा येऊन समजावत आहेत, शांती तर तुमचा स्वधर्म आहे. गळ्यातील हार आहे. आत्मा शांतिधामची रहिवाशी आहे. शांतीधाम मधून मग सुखधाम मध्ये जाते. तिथे तर सुखच सुख आहे. तुम्हाला ओरडण्याची गरज नाही. दुःखा मध्ये ओरडतात, दया करा, दु:खहर्ता सुखकर्ता बाबा या. शिवबाबा, गोडबाबा परत या. येतात जरूर तेंव्हा तर शिवजयंती साजरी करतात. श्रीकृष्ण स्वर्गाचे राजकुमार आहेत. त्यांची पण जयंती साजरी करतात. परंतु कृष्ण कधी आले, हे कोणाला माहित नाही. राधे कृष्ण स्वयंवरा नंतर लक्ष्मी नारायण बनतात. हे कोणी पण ओळखत नाही.मनुष्यच ओरडत राहतात, ओ गॉड फादर,हे ईश्वरीय पिता. . बरं, त्यांचं नाव काय आहे. तर म्हणतात नाव रूपा पासून वेगळा आहे. अरे, तुम्ही म्हणता, गॉड फादर मग नाव रूपा पासून वेगळे म्हणतात. आकाश मोकळे आहे. त्याला पण आकाश नाव आहे. तुम्ही म्हणता आम्ही पित्याच्या नावा रुप इ. जाणत नाही. स्वतःला तर जाणत आहात. होय, आम्ही आत्मा आहोत. बरं, आत्म्याचे नाव रूप सांगा. मग म्हणतात,आत्माच परमात्मा आहे. आत्मा नाव रुपा पासून वेगळी तर होऊ शकत नाही. आत्मा एक बिंदी ताऱ्या सारखी आहे. भृकुटी मध्ये राहते. ज्या लहान आत्म्या मध्ये 84 जन्माचा अभिनय नोंदलेला आहे. या फार समजण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे सात दिवस भट्टी चे गायन आहे. व्दापार पासून रावण राज्य सुरू होते. तेंव्हा पासून विकारांची प्रवेशता झाली आहे. शिडी उतरत आले आहात. आता सर्वांना ग्रहण लागलेले आहे, काळे झाले आहेत. त्यामुळे बोलावतात, हे ज्ञान सूर्य या, येऊन आम्हाला प्रकाशा मध्ये घेऊन जावा. ज्ञान अंजन सद्गुरु ने दिले, अज्ञान अंधार विनाश. . बुद्धी मध्ये बाबा येतात. असे नाही, ज्ञान अंजन गुरूने दिले.. . गुरु तर अनेक आहेत. त्यांच्या कडे ज्ञान कुठले. त्यांचे थोडेच गायन आहे. ज्ञानसागर, पतित-पावन, सर्वांचा सदगती दाता एकच बाबा आहे. मग दुसरे कोणी ज्ञान देऊ शकत नाहीत. साधू लोक म्हणतात, भगवतालाला भेटण्याचे अनेक रस्ते आहेत. शास्त्र वाचणे, यज्ञ,तप इत्यादी करणे, हे सर्व भगवंताला भेटण्याचे रस्ते आहेत. परंतु पतीत मग पावन दुनिये मध्ये जाऊ कसे शकतात. बाबा म्हणतात, मी स्वतः येतो. भगवान तर एकच आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर पण देवता आहेत. त्यांना भगवान म्हणत नाहीत. त्यांचे पण पिता शिव आहेत. प्रजापिता ब्रह्मा तर येथेच आहेत ना. प्रजा इथे आहे. नाव पण लिहिलेले आहे, प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्था. तर मुले आहेत. अनेक बी.के. आहेत. वारसा शिवा कडून मिळत आहे, ना की ब्रह्मा कडून. वारसा आजोबा कडून मिळतो. ब्रह्मा द्वारा स्वर्गा मध्ये जाण्याचे लायक बनवित आहेत. ब्रह्मा द्वारा मुलांना दत्तक घेतले आहे. मुलं पण म्हणतात, बाबा आम्ही तुमचे आहोत. तुमच्या कडून वारसा घेऊ. ब्रह्मा द्वारे विष्णुपुरी ची स्थापना होत आहे. शिवबाबा राजयोग शिकवित आहेत. श्रीमता अथवा श्रेष्ठ ते श्रेष्ठ भगवानाची गीत आहे. भगवान एकच निराकार आहेत. बाबा समजावत आहेत, तुम्ही मुलांनी 84 जन्म घेतले आहेत. आत्मा-परमात्मा वेगळे अनेक काळा साठी राहिले आहेत... फार काळा पासून वेगळे तर भारतवासी होते. दुसरा कोणता धर्म नव्हता. तेच प्रथम वेगळे झाले आहेत. बाबा पासून वेगळे होऊन, इथे अभिनय करण्यासाठी आले आहेत. बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, आता मज, पित्याची आठवण करा. ही आठवणी ची यात्रा आहे, अथवा योग अग्नी आहे. तुमच्या डोक्यावर जे पापाचे ओझे आहे, ते या योग अग्नीने नाहीशी होईल. हे गोड मुलांनो, तुम्ही सुवर्णयुगा तून लोहयुगा मध्ये आले आहात, आता माझी आठवण करा. हे बुद्धीचे काम आहे ना. देहासहित देहाचे सर्व संबंध सोडून, माझी एकट्याची आठवण करा. तुम्ही आत्मे आहात ना. हे तुमचे शरीर आहे. मी-मी, आत्मा म्हणते. तुम्हाला रावणाने पतित बनविले आहे. हा खेळ बनलेला आहे. पावन भारत आणि पतित भारत. जेंव्हा पतित बनतात, तेव्हा बाबाला बोलावतात. रामराज्य पाहिजे. म्हणतात पण परंतु अर्थाला समजत नाहीत. ज्ञान देणारे ज्ञानाचे सागर तर एकच बाबा आहेत. बाबा सेकंदा मध्ये वारसा देत आहेत. आता तुम्ही बाबाचे बनले आहात. बाबा कडून सूर्यवंशी, चंद्रवंशी वारसा घेतात. मग सतयुग,त्रेता मध्ये तुम्ही अमर बनता. तिथे असे म्हणत नाही कि, अमक्याचा मृत्यू झाला. सतयुगा मध्ये अकाली मृत्यु होत नाही. तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. दुखाचे नाव राहत नाही. त्याला सुखधाम म्हटले जाते. बाबा म्हणतात,मी तर तुम्हाला स्वर्गाची बादशाही देत आहे. तिथे तर फार वैभव आहेत. भक्ती मार्गा मध्ये मंदिर बनवितात, तर त्यावेळी पण किती धन होते. भारत काय होता! बाकी इतर आत्मे निराकारी दुनिया मध्ये होती. मुलांनी ओळखले आहे, सर्वोच्च बाबा आता स्वर्गाची स्थापना करत आहेत. सर्वोच्च शिवबाबा आहेत. मग ब्रह्मा, विष्णू, शंकर, सूक्ष्मवतनवासी आहेत. त्यानंतर ही दुनिया आहे. ज्ञानाने तुम्हा मुलांची सदगती होत आहे. गायन पण आहे कि, ज्ञान,भक्ती आणि वैराग्य. जुन्या दुनिये पासून वैराग्य येत आहे, कारण सतयुगाची बादशाही मिळत आहे. आता बाबा म्हणत आहेत, मुलांनो, माझी एकट्याची आठवण करा. माझी आठवण केल्यामुळे, तुम्ही माझ्या जवळ याल. अच्छा. गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादाची प्रेम पूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश:- - (१) डोक्यावर जे पापाचे ओझे आहे, त्याला योगाने नाहीसे करायचे आहे. बुद्धीने देहाचे सर्व संबंध सोडून, एका बाबाची आठवण करायची आहे.
- (२) बोलावणे किंवा ओरडण्या पेक्षा आपल्या शांत स्वधर्मा मध्ये स्थित राहायचे आहे. शांती गळ्यातील हार आहे. देह अभिमाना मध्ये येऊन, "मी" आणि "माझे" शब्द म्हणायचे नाहीत. स्वतःला आत्मा निश्चय करायचा आहे.
वरदान:- आपल्या श्रेष्ठ स्थितीद्वारे मायेला, स्वतः समोर झुकविणारे, सर्वोच्च पदाचे अधिकारी भव: जसे महान आत्मे कधी कोणाच्या समोर झुकत नाहीत, त्यांच्या समोर सर्व झुकतात. तसेच बाबानी निवडलेली तुम्ही सर्वश्रेष्ठ आत्मे, कुठे पण आहात, कोणत्या पण परिस्थिती मध्ये किंवा मायेच्या भिन्न,भिन आकर्षण करणाऱ्या रूपा मध्ये, स्वत:ला आकर्षित करु शकत नाहीत. जेंव्हा आता पासूनच नेहमी मातेवर विजय मिळवण्याच्या च्या स्थिती मध्ये स्थिर राहाल, तर सर्वोच्च पदाचे अधिकार प्राप्त होईल. अशा आत्म्या समोर सतयुगा मध्ये, प्रजा सन्मानाने झुकेल आणि व्दापार मध्ये तुम्हां लोकांच्या स्मृतिस्थळा समोर भक्त झुकत राहतात. बोधवाक्य:- कर्म करताना, आठवणीचा समतोल ठीक असेल, तर त्यांना कर्मयोगी म्हणावे. ||| ओम शांती |||ओम शांती.
|
|