20-04-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलानो, तुम्ही देह अभिमानाचे दार बंद करा, तर माया चे वादळ येणे बंद होऊन जाईल."
प्रश्न:-
ज्या मुलांची
विशाल बुद्धी आहे त्यांची लक्षणे सांगा?
उत्तर:-
(१) त्यांना सारा दिवस सेवेचेच विचार चालत राहतात (२) ते सेवे शिवाय राहू शकत नाहीत
(३) त्यांच्या बुद्धी मध्ये राहते कि, कसे साऱ्या विश्वाला घेराव टाकून, सर्वांना
पतिता पासून पावन बनवायचे, ते विश्वाला दुःखधाम पासून सुखधाम बनवण्याची सेवा करत
राहतात (४) ते अनेकांना आपल्या सारखे बनवीत राहतात.
ओम शांती।
आत्मिक पिता गोड गोड मुलांना समजावत आहेत. मुलांनो,स्वतःला आत्मा समजून तुमच्या
पित्याची आठवण करा. तर तुमचे सर्व दुःख नेहमी साठी नाहीसे होतील. स्वतःला आत्मा
समजून सर्वांना भाऊ भाऊ च्या दृष्टीने पाहा. तर मग देहाची दृष्टी, वृत्ती बदलून
जाईल. बाबा पण अशरीरी आहेत. तुम्ही आत्मे पण अशरीरी आहात. बाब आत्म्याला पाहत आहेत.
सर्व अकाल तख्तावर विराजमान आत्मे आहेत. तुम्ही पण आत्मा भाऊ,भाऊ च्या दृष्टीने पाहा.
यामध्ये फार मेहनत आहे. देहाच्या भाना मध्ये आल्यानेच माया चे वादळ येतात.हे
देहअभिमानाचे दार बंद करा, तर मायेचे वादळ येणे बंद होईल. हे देहीअभिमानी बनण्याचे
शिक्षण सार्या कल्पा मध्ये या पुरुषोत्तम संगमयुगावरच बाबाच तुम्हां मुलांना देत
आहेत. गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांनो, तुम्ही जाणत आहात, आता आम्ही नरकाचा
किनारा सोडून पुढे जात आहोत. हे पुरुषोत्तम संगमयुग बिल्कुलच वेगळे युग आहे(कलियुग
आणि सतयुगाच्या संगम मधील युग).समुद्राच्या मध्या मध्ये तुमची नाव आहे. तुम्ही ना
सतयुगा मध्ये आहात, ना कलियुगा मध्ये आहात. तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगी सर्वोत्तम
ब्राह्मण आहात. संगमयुग ब्राह्मणा साठीच आहे. ब्राह्मण शेंडी म्हणजे उच्च आहेत. हे
ब्राह्मणाचे फार छोटे युग आहे. हे एक जन्माचे युग असते. हे तुमच्या खुशीचे युग आहे.
खुशी कोणत्या गोष्टीची आहे? भगवान आम्हाला शिकवित आहेत. अशा विद्यार्थ्यांना किती
खुशी झाली पाहिजे. तुम्हाला आता साऱ्या चक्राचे ज्ञान बुद्धी मध्ये आहे. आता आम्ही
च ब्राह्मण आहोत, मग आम्ही च देवता बनू. प्रथम आपल्या गोड घरी जाऊ, मग नवीन दुनिया
मध्ये येऊ. आम्ही ब्राह्मणच स्वदर्शन चक्रधारी आहोत. आम्हीच ही बाजोली खेळत आहोत.
या विराट रूपाला पण तुम्ही ब्राह्मण मुलेच जाणत आहात. बुद्धी मध्ये सारा दिवस या
गोष्टीचे स्मरण झाले पाहिजे. गोड मुलांनो, तुमचा हा फार प्रेमळ परिवार आहे, तर
तुम्हा प्रत्येकाला फार प्रेमळ बनले पाहिजे. बाबा पण गोड आहेत तर मुलांना पण असे
गोड बनवित आहेत. कधी कोणावर राग करायचा नाही. मन्सा, वाचा, कर्मणा कोणाला दुःख
द्यायचे नाही. बाबा कधी कोणाला दुःख देत नाहीत. जेवढे बाबांची आठवण कराल, तेवढे गोड
बनत जाल. बसं, या आठवणीनेच तुमची नाव पार होईल. ही आठवणी ची यात्रा आहे. आठवण करत
करत शांतीधाम व्दारे सुखधाम जायचे आहे. बाबा आलेच आहेत, मुलांना सदा सुखी
बनविण्यासाठी. भूतांना पळविण्याची युक्ती बाबा सांगत आहेत. माझी आठवण करा तर हे भूत
निघून जातील. कोणत्या पण भुताला बरोबर घेऊन जाऊ नका. कोणा मध्ये भूत असेल, तर इथेच
माझ्या जवळ सोडून जावा. तुम्ही म्हणत आहात बाबा येऊन, आमच्या भूताना काढून पतीता
पासून पावन बनवा. तर बाबा किती फुला सारखे बनवित आहेत. बाबा आणि दादा दोन्ही मिळून
तुम्हा मुलांचा श्रंगार करत आहेत. माता पिता तर मुलांचा श्रंगार कर करतात ना. ते
हदचे पिता हे बेहदचे पिता आहेत. तर मुलांना फार प्रेमाने चालायचे आणि चालवायचे आहे.
सर्व विकारांचे दान दिले पाहिजे. दे दान तर सुटेल ग्रहण. यामध्ये कोणते कारण
इत्यादीची गोष्ट नाही. प्रेमाने तुम्ही कोणाला पण वश करू शकता. प्रेमाने समजावून
सांगा. प्रेम फार गोड वस्तू आहे. सिंहाला, हत्तीला, जनावराला पण तुम्ही प्रेमाने वश
करू शकता. ते तर तरी पण आसुरी मनुष्य आहेत. तुम्ही तर आता देवता बनत आहात. तर दैवी
गुण धारण करून फार गोड बनायचे आहे. एक-दोघांना भाऊ भाऊ किंवा भाऊ-बहिणीच्या दृष्टीने
पाहा. आत्मा आत्म्याला कधी दुःख देऊ शकत नाही. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, मी
तुम्हाला स्वर्गाचे राज्य भाग्य देण्यासाठी आलो आहे. आता तुम्हाला जे पाहिजे ते
माझ्या कडून घ्या. मी तर तुम्हाला विश्वाचे मालक दुहेरी ताजधारी बनविण्यासाठी आलो
आहे. परंतु तुम्हाला मेहनत करायची आहे. मी कोणावर ताज ठेवणार नाही. तुम्हाला आपल्या
पुरुषार्था नुसार स्वतःला राजतिलक द्यायचा आहे. बाबा पुरुषार्था च्या युक्ती सांगत
आहेत कि, असे असे विश्वाचे मालक डबल ताजधारी इ. स्वतःला बनवू शकता. शिक्षणा वर
पूर्ण ध्यान द्यायचे आहे. कधी पण शिक्षण सोडू नका. कोणत्या पण कारणाने रुसून शिक्षण
सोडून दिले, तर फार फार नुकसान होईल. नुकसान आणि फायद्याला पाहत राहा. तुम्ही
ईश्वरीय विद्यापीठाचे विद्यार्थी आहात. ईश्वर पित्याकडून शिकत आहात. शिकून पूज्य
देवता बनत आहात. तर विद्यार्थी पण असे नियमित असले पाहिजेत. विद्यार्थी जीवन हेच
चांगले जीवन आहे. जेवढे शिक्षण शिकाल आणि वागणे सुधाराल तेवढे अति चांगले बनाल. गोड
मुलांनो, आता तुमचा परतीचा प्रवास आहे. जसे सतयुगा तून त्रेता, द्वापार, कलियुगा
पर्यंत खाली उतरत आले आहात. तसे आता तुम्हाला लोहयुगा पासून सुवर्णयुगा पर्यंत जायचे
आहे. जेंव्हा चांदीच्या युगापर्यंत पोहोचाल तर मग या कर्मेंद्रियांची चंचलता नाहीशी
होऊन जाईल. त्यासाठी जेवढी बाबांची आठवण कराल, तेवढेच तुमच्या आत्म्यां मधील
रजो,तमोचा गंज निघत जाईल, आणि जेवढा गंज निघून जाईल, तेवढे बाबा चुंबका कडे तुमचे
आकर्षण वाढत राहील. आकर्षण वाढत नाही, तर जरूर गंज लागलेला आहे.गंज एकदम निघून
चांगले सोने बनून जाल. ती अंतिम कर्मातीत अवस्था आहे. तुम्हाला गृहस्थ व्यवहारा
मध्ये, प्रवृत्ती मध्ये राहत कमळ फुला सारखे बनायचे आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो,
घर गृहस्थीला पण सांभाळा,शरीर निर्वाहा साठी कामकाज पण करा,त्या बरोबर हे शिक्षण पण
घेत राहा. गायन पण आहे, हाताने काम करा, मनाने बाबाची आठवण करा. कामकाज करताना एका
मात पित्याची आठवण करायची आहे. तुम्ही अर्धा कल्पाच्या सजनी आहात. नवविध भक्ती मध्ये
पण पाहा, कृष्ण इत्यादी ला किती प्रेमाने आठवण करत आहेत. ती नौधा भक्ती आहे, अटल
भक्ती. कृष्णाची अटल आठवण राहते, परंतु त्यातून कोणला मुक्ती मिळत नाही. हे मग
निरंतर आठवण करण्याचे ज्ञान आहे. बाबा म्हणतात, माझी पतित-पावन पित्याची आठवण करा.
तर तुमचे पाप नाहीसे होतील. परंतु माया पण मोठी पहिलवान आहे. कोणाला सोडत नाही.
माये कडून वारंवार हार खाल्ल्याने, तर खांदे खाली करून पश्चाताप केला पाहिजे. बाबा
गोड मुलांना श्रेष्ठ मत देतात श्रेष्ठ बनण्यासाठी. बाबा पाहतात, तेवढी मेहनत मुले
करत नाहीत. त्यामुळे बाबाला दया येते. जर हा अभ्यास आता नाही केला, तर मग शिक्षा
फार खावी लागेल, आणि कल्प कल्प पाई पैशाचे पद प्राप्त होईल. मूळ गोष्ट गोड मुलांना
बाबा समजावत आहेत, देही अभिमानी बना. देहा सहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून
माझ्या एकट्याची आठवण करा. पावन पण जरूर बनायचे आहे. कुमारी जेंव्हा पवित्र असते तर
सर्व तिच्या समोर डोके टेकतात. लग्न केल्यानंतर मग पुजारी बनुन जाते. सर्वा समोर
डोके टेकावे लागते. कन्या अगोदर पित्याचे घरी असते, तर एवढे जास्त संबंध आठवणीत येत
नाहीत. लग्ना नंतर देहाचे संबंध पण वाढतात. मग पती, मुलांमध्ये मोह वाढत जातो. सासू
सासरे इत्यादी सर्व आठवणीत येत राहतात. अगोदर तर फक्त आई वडीला बरोबरच असतो. येथे
तर मग त्या सर्व संबंधाना विसरावे लागते. कारण हे एकच तुमचे खरे खरे माता-पिता आहेत.
हा ईश्वरीय संबंध आहे. गातात पण त्वमेव माता च पिता त्वमेव….. हे मात पिता तुम्हाला
विश्वाचे मालक बनवित आहेत. त्यामुळे बाबा म्हणतात, माझी बेहदच्या पित्याची आठवण करा,
आणि कोणत्या पण देहधारीशी ममत्व ठेवू नका. स्त्री पतीची किती आठवण करते. ते तर गटर
मध्ये पाडतात म्हणजे विकारी बनवतात. हे बेहदचे बाबा तर तुम्हाला स्वर्गा मध्ये घेऊन
जातात. अशा गोड बाबाची फार प्रेमाने आठवण करा आणि स्वदर्शनचक्र फिरवत राहा. या
आठवणीच्या बळाने तुमची आत्मा कंचन बनून स्वर्गाचे मालक बनेल. स्वर्गाचे नाव ऐकले तरी
मन खुश होते. जे निरंतर आठवण करतात आणि इतरांना पण आठवण करवितात, तेच उंच पद
प्राप्त करतात. हा पुरुषार्थ करून करून तुमची ती अवस्था बनून जाईल. ही तर दुनिया पण
जुनी आहे, देह पण जुना आहे,देहधारीचे सर्व संबंध पण जुने आहेत. त्या संबंधा पासून
बुद्धी योग काढून एका बाबा बरोबर जोडायचा आहे. त्यामुळे अंतकाळाला तरीपण त्या एका
बाबाची आठवण राहील आणि कोणता संबंध आठवणीत असेल, तर मग अंताला पण ती आठवण येईल आणि
पद भ्रष्ट होईल. अंतकाळाला जे बाबाची आठवणी मध्ये राहतील तेच नरा पासून नारायण
बनतील. बाबाची आठवण असेल तर मग शिवालय दूर नाही. गोड गोड फार वर्षांनी भेटलेली मुले
बेहदच्या बाबा जवळ येतातच ताजेतवाने होण्यासाठी. कारण मुले जाणत आहेत बेहदच्या बाबा
कडून बेहद विश्वाची बादशाही मिळत आहे. हे कधी विसरले नाही पाहिजे. हे सदैव आठवणीत
राहिले, तरी पण मुलांना अपार खुशी होईल. हा बैज चालताना फिरताना वारंवार पाहत राहा.
बैज एकदम ह्दयावर लावत राहा, भगवानाच्या श्रीमताने आम्ही हे बनत आहोत. बस, बैज
पाहून त्यांच्यावर प्रेम करत राहा. बाबा बाबा म्हणत राहा, तर सदैव आठवण राहील. आम्ही
बाबाद्वारे हे बनत आहोत. बाबाच्या श्रीमता वर चालले पाहिजे. गोड मुलांची फार विशाल
बुद्धी पाहिजे. सारा दिवस सेवेचे विचार चालत राहावेत. बाबाला पण अशी मुले पाहिजेत,
जे सेवे शिवाय राहू शकत नाहीत. तुम्हा मुलांना विश्वावर घेराव टाकायचा आहे, म्हणजे
पतित-पावन बनायचे आहे. साऱ्या विश्वाला दुःखधाम पासून सुखधाम बनवायचे आहे. शिक्षकाला
पण शिकविण्या मध्ये मजा येते ना. तुम्ही तर आता फार उंच शिक्षक बनले आहात. जेवढा
चांगला शिक्षक ते अनेकांना आपल्या सारखे समान बनवितात. कधी थकत नाहीत. ईश्वरीय
सेवेमध्ये फार खुशी राहते. बाबाची मदत मिळते. हा मोठा बेहदचा व्यापार पण आहे.
व्यापारी लोकच धनवान बनतात. ते या ज्ञान मार्गा मध्ये पण जास्त उसळी मारतात. बाबा
पण बेहदचे व्यापारी आहेत ना. सौदा मोठा फस्क्लास आहे. परंतु यामध्ये मोठे साहस धारण
केले पाहिजे. नवीन नवीन मुले जुन्या पेक्षा पण पुरुषार्था मध्ये पुढे जाऊ शकतात.
प्रत्येकाचे वैयक्तिक नशीब आहे. तर पुरुषार्थ पण प्रत्येकाला वैयक्तिक करायचा आहे.
स्वतःची पूर्ण चेकिंग केली पाहिजे. असे चेकिंग करणारेच एकदम रात्रंदिवस पुरुषार्था
मध्ये लागतात. असे म्हणतात, आम्ही आमचा वेळ वाया कां घालवू. जेवढे शक्य होईल तेवढा
वेळ सफल करा. स्वतः बरोबर पक्की प्रतिज्ञा करतात,आम्ही बाबाला कधी विसरणार नाही.
शिष्यवृत्ती घेऊनच राहू.अशा मुलांना मदत पण मिळत राहते. असे पण नवीन पुरुषार्थी मुले
तुम्ही पाहाल. साक्षात्कार करत राहाल. जसे सुरवातीला झाला तसा मग शेवटी पण पाहाल.
जेवढे जवळ जात राहाल, तेवढे खुशीमध्ये नाचत राहाल. तिकडे खुने नाहक खेळ पण चालत
राहील.
तुम्हा मुलांची
ईश्वरीय शर्यत चालली आहे. जेवढे पुढे पळत जाल, तेवढे नवीन दुनिये तील देखावे पण जवळ
येत राहतील. खुशी वाढत जाईल. ज्यांना देखावे जवळ दिसत नाहीत, त्यांना खुशी पण
राहणार नाही. आता तर कलियुगी दुनिये पासून वैराग्य आणि सतयुगी नवीन दुनिये बरोबर
खूप प्रेम झाले पाहिजे. शिवबाबा ची आठवण राहिली तर स्वर्गाचा वरसा पण आठवणीत राहील.
स्वर्गाच्या वरशाची आठवण राहिली तर शिवबाबाची पण आठवण राहील. तुम्ही मुले जाणत आहात,
आता आम्ही स्वर्गाकडे जात आहोत. पाय नरका कडे आहेत, डोके स्वर्गा कडे आहे. आता तर
लहान मोठे सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. बाबाला नेहमी हा नशा राहतो. ओहो, आम्ही
जाऊन हे बाळकृष्ण बनू. त्याच्या साठी अगोदरच भेटवस्तू पण पाठवतात. ज्यांना पूर्ण
निष्ठा आहे, त्यास गोपिका भेटवस्तू पाठवतात. त्यांना अतिंद्रिय सुखाची भासना येत
राहते. आम्हीच अमर लोकां मध्ये देवता बनू. कल्पा पूर्वी पण आम्हीच बनलो होतो. मग
आम्ही 84 पुनर्जन्म घेतले आहेत. ही बाजोली आठवण राहिली, तरी पण अहो भाग्य. नेहमी अशा
खुशी मध्ये राहा. फार मोठी लॉटरी मिळाली आहे. 5000 वर्षा पुर्वी पण आम्ही राज्य
भाग्य प्राप्त केले होते. मग उद्या प्राप्त करू. विश्व नाटका मध्ये नोंदलेले आहे.
जसे कल्पा पूर्वी जन्म घेतला होता, तसाच घेऊ. तेच आमचे मात पिता असतील. जे कृष्णाचे
पिता होते, तेच परत बनतील. असे जे सारा दिवस विचार करत राहतात, तर ते फार रमणिकते
मध्ये राहतात. विचार सागर मंथन केला नाही तर ते तंदुरुस्त नाहीत. गाय चारा खाते तर
सारा दिवस रवंथ करत राहते. मुख चालत राहते. मुख चालत नाही, तर समजले जाते, ती आजारी
आहे. इथे पण तसे आहे.
बेहदचे बाबा आणि दादा
दोघांचे गोड-गोड मुलावर फार प्रेम आहे. किती प्रेमाने शिकवित आहेत, काळ्या पासून
गोरा बनवित आहेत. तर मुलांन खुशीचा पारा चढला पाहिजे. पारा चढेल, आठवणीच्या यात्रेने.
बाबा कल्प कल्प फार प्रेमाने सेवा करत आहेत. 5 तत्वा सहित सर्वांना पावन बनवित आहेत.
किती मोठी बेहदची सेवा आहे. बाबा फार प्रेमाने मुलांना शिक्षण देत राहतात, कारण
मुलांना सुधारणे पिता किंवा शिक्षकाचे काम आहे. बाबाची श्रीमत आहे,त्यामुळेच
श्रेष्ठ बनाल, जेवढे प्रेमाने आठवण कराल, तेवढे श्रेष्ठ बनाल. हे पण चार्ट मध्ये
लिहिले पाहिजे. आम्ही श्रीमता वर चालत आहोत ? की आपल्या मतावर चालत आहोत? श्रीमतावर
चालल्यामुळे तुम्ही तंतोतंत तसे बनाल. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी
भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक
पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) स्वतःच
स्वतःशी प्रतिज्ञा करायची आहे कि, आम्ही आमची वेळ वाया घालविणार नाही. संगमयुगाचा
प्रत्येक क्षण सफल करू. आम्ही बाबाला कधी विसरणार नाही. शिष्यवृत्ती घेऊनच राहू.
(२) नेहमी आठवण राहावी
कि, आता आमची वानप्रस्थ अवस्था आहे. पाय नरकाकडे, डोके स्वर्गाकडे आहे. बाजोली ची
आठवण करून अपार खुशी मध्ये राहायचे आहे. देही अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे.
वरदान:-
आपल्या शक्ती
स्वरूप वृत्ती द्वारे पतित वायु मंडळाला परिवर्तन करणारे, मास्टर पतित पावनी भव:
कसले पण वातावरण असले
तरी पण स्वतःची शक्तिशाली वृत्ती वायुमंडळाला बदलू शकते. वायुमंडळ विकारी असेल परंतु
स्वतःची वृत्ती निर्विकारी असावी. जे पतित पावन बनविणारे आहेत. ते पतित
वायूमंडळाच्या वशीभूत होऊ शकत नाहीत. मास्टर पतित पावन बनून, स्वतःच्या शक्तिशाली
वृत्तीने, अपवित्र किंवा कमजोरीच्या वायुमंडळाला नाहीसे करा. त्याचे वर्णन करून
वायुमंडल बनवू नका. कमजोर किंवा पतीत वायुमंडळाला चे वर्णन करणे पण पाप आहे.
बोधवाक्य:-
आता धरणी मध्ये
परमात्मा परिचयाचे बीज टाका, तर प्रत्यक्षता होईल.