30-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो :- तुम्ही बाबां द्वारे सन्मुख शिकत आहात , तुम्हांला सतयुगाच्या बादशाहीच्या लायक बनवण्यासाठी पावन जरूर बनायचे आहे "

प्रश्न:-
बाबांच्या कोणत्या कर्त्तव्याला तुम्ही मुलेच जाणता?

उत्तर:-
तुम्ही जाणता की आपले बाबा,पिता पण आहेत,शिक्षक आणि सतगुरू पण आहेत.बाबा कल्पाच्या संगमयुगावर येतात, जुन्या दुनियेला नवीन बनवायला, एक आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करायला.बाबा आता आम्हा मुलांना मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी शिकवत आहेत.हे कर्त्तव्य आम्हा मुलांशिवाय दुसरे कोणी जाणत नाही.

गीत:-
भोलानाथ पेक्षा निराळे........

ओम शांती।
ओम शांतीचा अर्थ तर मुलांना सारखा-सारखा समजावला आहे.ओम म्हणजे मी आत्मा आहे आणि माझे हे शरीर आहे.शरीर पण म्हणू शकते की माझी ही आत्मा आहे.जसे शिवबाबा म्हणतात तू माझा आहे.मुले म्हणतात बाबा तुम्ही आमचे आहात.तसे आत्मा पण म्हणते माझे शरीर.शरीर म्हणेल- माझी आत्मा.आता आत्मा जाणते-मी अविनाशी आहे. आत्म्या शिवाय शरीर काही करू शकत नाही.शरीर तर आहे, म्हणतात माझ्या आत्म्याला त्रास देऊ नका.माझी आत्मा पाप आत्मा आहे व माझी आत्मा पुण्य आत्मा आहे. तुम्ही जाणता माझी आत्मा सतयुगात पुण्य आत्मा होती.आत्मा स्वतः पण म्हणेल- मी सतयुगात सतोप्रधान अथवा खरे सोने होती.सोने नाही,हे एक उदाहरण दिले जाते.आपली आत्मा पवित्र होती,सोन्याच्या युगामध्ये होती.आता तर म्हणतात अपवित्र आहे. दुनियाचे हे जाणत नाहीत. तुम्हाला तर श्रीमत मिळते.तुम्ही आता जाणता आपली आत्मा सतोप्रधान होती,आता तमोप्रधान बनली आहे.प्रत्येक गोष्ट अशी होते.बाल,युवा,वृध्द..... प्रत्येक गोष्ट नव्या पासून जुनी जरूर होते.दुनिया पण पहिले सोन्याच्या युगामध्ये होती परत तमोप्रधान लोह युगामध्ये आली आहे,तेंव्हाच दु:खी झाली आहे.

सतोप्रधान म्हणजे सुधारलेली, तमोप्रधान म्हणजे बिघडलेली. गीतेमध्ये ही म्हणतात,बिगडीला बनवणारा.......जुनी दुनिया बिघडलेली आहे कारण रावण राज्य आहे आणि सर्व पतित आहेत.सतयुगात सर्व पावन होते, त्याला नवीन निर्विकारी दुनिया म्हटले जाते.ही जुनी विकारी दुनिया आहे.आता कलीयुग लोहयुग आहे.या सर्व गोष्टी काही शाळा,काॅलेज मध्ये शिकवल्या जात नाहीत.भगवान येऊन शिकवतात आणि राजयोग शिकवतात.गीतेत लिहले आहे भगवानुवाच-श्रीमत भगवत गीता. श्रीमत म्हणजे श्रेष्ठ मत.श्रेष्ठ ते श्रेष्ठ उच्च ते उच्च भगवान आहेत. त्यांचे नाव अचूक शिव आहे. रूद्र जयंती किंवा रूद्र रात्री कधी ऐकले नसेल.शिवरात्री म्हणतात. शिव तर निराकार आहेत.आता निराकाराची रात्री व जयंती कशी साजरी केली पाहिजे.कृष्णाची जयंती तर ठीक आहे.अमक्याचा मुलगा आहे,त्यांची तिथी तारीख दाखवतात.शिवासाठी तर कोणी जाणत नाही की कधी जन्माला आला.हे तर जाणले पाहिजे ना. आता तुम्हाला समजले आहे की श्रीकृष्णाने सतयुग इ.मध्ये कसा जन्म घेतला.तुम्ही म्हणाल त्यांना तर ५ हजार वर्षे झाली.ते पण म्हणतात ख्रिस्ताच्या ३ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. इस्लामींच्या आधी चंद्रवंशी, त्यांच्या आधी सूर्यवंशी होते. शास्त्रात सतयुग लाखों वर्षांचे दिल गेले आहे.गीता आहे मुख्य. गीता द्वारेच देवी-देवता धर्म स्थापन झाला आहे.तो सतयुग-त्रेता पर्यंत चालला अर्थात गीता शास्त्रा द्वारे आदि सनातन देवी-देवता देवता धर्माची स्थापना,परमपिता परमात्म्याने केली.परत तर अर्धाकल्प ना कोणते ग्रंथ झाले,ना कोणते धर्म स्थापक झाले.बाबांनी येऊन ब्राह्मणांना देवता-क्षत्रिय बनवले.म्हणजे बाबा ३ धर्म स्थापन करतात.हा आहे गुप्त धर्म.याचे आयुष्य थोडे राहते.तर सर्व शास्त्रमई शिरोमणी गीता भगवंताने गायली आहे.बाबा पुनर्जन्मात येत नाहीत.जन्म आहे,परंतु बाबा म्हणतात,मी गर्भ जेल मध्ये येत नाही.माझे पालन होत नाही.सतयुगात जी मुले होतात ती गर्भ महलात राहतात.रावण राज्यात गर्भ जेल मध्ये यावे लागते.पाप जेल मध्ये भोगले जातात.गर्भात म्हणतात, आम्ही पाप करणार नाही,परंतु ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया.बाहेर आल्यावर परत पाप करायला लागतात. तिथले तिथे राहिले...... इथे पण खूप प्रतिज्ञा करतात आम्ही पाप करणार नाही.एक दोघांवर काम-कट्यार चालवणार नाही कारण हा विकार आदि- मध्य-अंत दु:ख देतो.सतयुगात विष नाही.तर मनुष्य आदि-मध्य- अंत २१ जन्म दु:ख भोगत नाहीत कारण रामराज्य आहे.त्याची स्थापना बाबा आता परत करत आहेत. संगमयुगावरच स्थापना होईल ना.जे पण धर्म स्थापन करायला येतात त्यांना कोणतेही पाप करायचे नाही.अर्धा वेळ आहे पुण्य आत्मा,परत अर्ध्या वेळा नंतर पाप आत्मा बनतात.तुम्ही सतयुग त्रेता मध्ये पुण्य आत्मा असता, परत पाप आत्मा बनता. सतोप्रधान आत्मा जेंव्हा वरून येते तर तिला शिक्षा होऊ शकत नाही.येशू ख्रिस्तची आत्मा धर्म स्थापन करण्यासाठी आली, त्यांना कोणती शिक्षा मिळू शकत नाही.म्हणतात-येशू ख्रिस्तला सुळावर चढवले परंतु त्यांच्या आत्म्याने कोणते विकर्म इ.केले नाही.ते ज्यांच्या शरीरात प्रवेश करतात त्यांना दु:ख होते, ते सहन करतात.जसे यांच्यात बाबा येतात,ते तर आहेतच सतोप्रधान. कोणतही दु:ख त्रास यांच्या आत्म्याला होतो,शिवबाबांना होत नाही.ते तर सदैव सुख-शांतीत राहतात.सदैव सतोप्रधान आहेत. परंतु येतात तर या जुन्या शरीरात ना.तसे येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने ज्याच्यात प्रवेश केला त्या शरीराला दु:ख होऊ शकते,येशू ख्रिस्ताची आत्मा दु:ख भोगू शकत नाही कारण सतो-रजो- तमो मध्ये येते.नवीन-नवीन आत्मे येतात ना.त्यांना पहिले जरूर सुख भोगावे लागेल,दु:ख भोगू शकत नाही.कायदा नाही सांगत. यांच्यात बाबा आहेत, कोणताही त्रास यांना(ब्रह्माला)होतो, ना की शिवबाबांना.परंतु या गोष्टी तुम्ही जाणता दुसऱ्या कोणाला माहित नाहीत.

हे सर्व रहस्य बाबा बसून आता समजावतात.या सहज राजयोगानेच स्थापन झाली होती नंतर भक्ती मार्गात याच गोष्टी गायल्या जातात.या संगमयुगावर जे काही होते,ते गायले जाते. भक्ती मार्ग सुरू होतो तशी परत शिवबाबांची पूजा होते.पहिले- पहिले भक्ती कोण करतात,तेच लक्ष्मी-नारायण जेंव्हा राज्य करत होते तेंव्हा पूज्य होते परत वाम मार्गात येतात.तर परत पूज्य पासून पुजारी बनतात.बाबा समजावतात,तुम्हा मुलांना पहिले-पहिले बुद्धीत यायला पाहिजे की निराकार परमात्मा यांच्या द्वारे आम्हाला शिकवतो. असे अजून कोणतेही ठिकाण दूनियेत असू शकत नाही,जिथे असे समजावतात.बाबाच येऊन भारताला परत स्वर्गाचा वारसा देतात.त्रिमूर्तीच्या खाली लिहिले आहे-विश्वाचे दैवी स्वराज्य तुमचा जन्म सिद्ध अधिकार आहे. शिवबाबा येऊन तुम्हा मुलांना स्वर्गाच्या बादशहीचा वारसा देत आहेत,लायक बनवत आहेत. तुम्ही जाणता बाबा आम्हाला लायक बनवत आहेत,आम्ही पतित होतो ना.पावन बनून जाऊ परत हे शरीर राहणार नाही. रावणाद्वारे आपण पतित बनलो आहे परत परमपिता परमात्मा पावन बनवून पावन दुनियेचे मालक बनवतात.तोच ज्ञानाचा सागर पतित-पावन आहे.हे निराकार बाबा आम्हाला शिकवत आहेत.सर्व तर एकत्र शिकू शकत नाहीत.समोर तुम्ही थोडे बसले आहात बाकी सर्व मुले जाणतात -आता शिवबाबा ब्रह्माच्या शरीरामध्ये बसून सृष्टीच्या आदि- मध्य-अंताचे ज्ञान सांगत असतील.ती मुरली लिहून येईल आणि दुसऱ्या सतसंगात असे थोडच समजतील.आजकाल टेप मशीन पण निघाली आहे यामुळे भरून पाठवतात.ते म्हणतील अमुक नावाचा गुरू सांगत आहे, बुद्धीत मनुष्यच राहतो.इथे तर ही गोष्ट नाही.हे तर निराकार बाबा ज्ञानी आहेत.मनुष्याला ज्ञानी म्हटले जातं नाही.गातात ईश्वर ज्ञानसंपन्न,शांतीसंपन्न,आशिर्वाद संपन्न आहेत, तर त्यांचा वारसा पण पाहिजे ना.त्यांच्यात जे गुण आहेत ते मुलांना मिळाले पाहिजेत ना,आता मिळत आहेत. गुणांना धारण करून आम्ही असे लक्ष्मी-नारायण बनत आहोत. सर्व तर राजा-राणी बनणार नाहीत.गायले जाते राजा-राणी वजीर.....तिथे वजीर पण नसतो. महाराजा-महाराणी मध्ये शक्ती असते.जेंव्हा विकारी बनतात तेव्हा वजीर इ.असतात.सूरूवातीला मंत्री इ.पण नव्हते.तिथे तर एक राजा- राणीचे राज्य चालते.त्यांना वजीर ची काय गरज,सल्ल्याची गरज नाही,जेंव्हाकी स्वत: मालक आहेत.हा आहे इतिहास-भूगोल. परंतु पहिले-पहिले तर उठता- बसता हे बुद्धित यायला हवे की आम्हाला बाबा शिकवतात,योग शिकवतात.आठवणीच्या यात्रेवर राहायचे आहे.आता नाटक पूर्ण होत आहे,आपण बिल्कुल पतित बनलो आहे कारण विकारात जातो यामुळे पाप आत्मा म्हटले जाते.सतयुगात पाप आत्मा नसतात.तिथे आहेत पुण्य आत्मे. ते आहे प्रारब्ध,ज्यासाठी तुम्ही आता पुरूषार्थ करत आहात. तुमची आहे आठवणीची यात्रा, ज्याला भारताचा योग म्हणतात. परंतु अर्थ तर समजत नाहीत योग अर्थात आठवण.

ज्याने विकर्म विनाश होतात परत हे शरीर सोडून घरी जाऊ,त्याला गोड घर म्हटले जाते.आत्मा म्हणते,आम्ही त्या शांतीधामचे रहिवासी आहोत.आम्ही तिथून निवस्त्र(अशरीरी)आलो आहे,इथे भुमिका बजावण्यासाठी शरीर घेतले आहे.हे पण समजावले आहे, माया ५ विकारांना म्हटले जाते.ही ५ भुतं आहेत.काम विकाराचे भूत,क्रोधाचे भूत, क्रमांक एक आहे देह-अभिमानाचे भूत. बाबा समजावतात-सतयुगात हे विकार नसतात,त्याला निर्विकारी दुनिया म्हटले जाते.विकारी दुनियेला निर्विकारी बनवणे,हे तर बाबांचे काम आहे.त्यांनाच सर्वशक्तिमान ज्ञानाचा सागर, पतित-पावन म्हटले जाते.यावेळी सर्व भ्रष्टाचाराने जन्म घेतात. सतयुगात निर्विकारी दुनिया आहे. बाबा म्हणतात आता तुम्हाला विकारी पासून निर्विकारी बनायचे आहे.म्हणतात याशिवाय मुले कशी जन्म घेतील.बाबा समजावतात आता तुमचा हा अंतिम जन्म आहे.मृत्यूलोक संपणार आहे परत यानंतर विकारी लोक असणार नाहीत यामुळे बाबांशी पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे.म्हणतात बाबा आम्ही तुमच्या कडून वारसा अवश्य घेऊ.ते खोटी शपथ घेतात.ईश्वर ज्याच्यासाठी शपथ घेतात,त्यांना तर जाणत नाहीत. तो कधी कसा येतो त्यांचे नाव, रूप,देश,काळ काय आहे,काहीच जाणत नाहीत.बाबा येऊन स्वतःचा परिचय देतात. आता तुम्हाला परिचय मिळत आहे. दुनियेत कोणीच ईश्वराला जाणत नाहीत. बोलवतात पण,पूजा पण करतात,परंतु कर्त्तव्याला जाणत नाहीत.आता तुम्ही जाणता-परम पिता परमात्मा आपला पिता, टीचर,सतगुरू आहे.हा बाबांनी स्वतः परिचय दिला आहे की मी तुमचा पिता आहे.मी या शरीरात प्रवेश केला आहे.प्रजापिता ब्रह्मा द्वारे स्थापना होते.कोणाची ब्राह्मणांची.परत तुम्ही ब्राह्मण शिकून देवता बनता.मी येऊन तुम्हाला शुद्र पासून ब्राह्मण बनवतो.बाबा म्हणतात मी येतोच -कल्पाच्या संगमयुगावर.कल्प ५ हजार वर्षांचे आहे.हे सृष्टी चक्र तर फिरत राहते.मी येतो,जुन्या दुनियेला नवीन बनवायला जुन्या धर्मांचा विनाश करण्यासाठी परत मी आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतो.मुलांना शिकवतो परत तुम्ही शिकून २१ जन्मांसाठी मनुष्यापासून देवता बनता.देवता तर सूर्यवंशी,चंद्रवंशी,प्रजा सर्व काही आहे. बाकी पुरूषार्थ अनुसार उच्च पद मिळणार.आता जो जितका पुरूषार्थ करेल तोच कल्प-कल्प चालेल. समजतात, कल्प-कल्प असा पुरूषार्थ करतात,असेच पद जाऊन मिळवणार.हे तुम्हा मुलांच्या बुद्धिमधे आहे की आम्हाला निराकार भगवान शिकवतो. त्यांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील.आठवणी शिवाय विकर्म विनाश होऊ शकत नाही. मनुष्यांना हे पण माहीत नाही की आपण किती जन्म घेतो.शास्त्रात कोणी 84 लाख जन्म असे लिहिले आहे.आता तुम्ही जाणता ८४ जन्म आहेत.हा शेवटचा जन्म आहे परत आपल्याला स्वर्गात जायचे आहे.पहिले मूलवतन मध्ये जाऊन मग स्वर्गात येणार आहे.अच्छा.

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१ ) बाबांशी जी पवित्र बनण्याची प्रतिज्ञा केली आहे त्याच्या वर पक्के राहायचे आहे.काम,क्रोध इ. भुतांवर विजय अवश्य मिळवायचा आहे.

२ ) चालता-फिरता प्रत्येक कार्य करताना शिकवण्याऱ्या बाबांना आठवणीत ठेवायचे आहे.आता नाटक पूर्ण होत आहे यामुळे या शेवटच्या जन्मात पवित्र जरूर बनायचे आहे.

वरदान:-
एक लगन, एक भरोसा, एकरस अवस्थे द्वारे सदा निर्विघ्न बनणारे निवारण स्वरूप भव

सदैव एक बाबांची लगन,बाबांच्या कर्तव्याच्या लगन मध्ये असे मगन रहा जसे की संसारात कोणतीही वस्तू व व्यक्ती आहे पण-हा अनुभवच व्हायला नको.असे एक लगन,एक भरोसा,एकरस अवस्थेत राहणारी मुले सदैव निर्विघ्न बनून चढत्या कलेचा अनुभव करतात.ते कारणाला परिवर्तन करून निवारण रूप बनवतात.कारणाला बघून कमजोर बनत नाहीत,निवारण स्वरूप बनतात.

बोधवाक्य:-
अशरीरी बनणे, बिनतारी(वायरलेस)सेट आहे, निर्विकारी(वाइसलेस)बनणे बिनतारी सेट ची सेटिंग(सुव्यवस्था)आहे.