14-04-2021
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,अंतर्मुखी बनून ज्ञानरूप अवस्थेमध्ये राहून महावाक्यांना धारण करा, तेव्हा
आपले व अन्य आत्म्यांचे कल्याण करू शकाल,आपले मन व दिल रुपी मंदिराला ईश्वरीय
गुणरूपी मूर्तीनी सजवा आणि पवित्र संकल्पांचा सुगंध पसरवा"
प्रश्न:-
सर्वोत्तम खरी
सेवा कोणती आहे? यथार्थ सेवेचे सूक्ष्म रूप काय आहे?
उत्तर:-
जेव्हा एखाद्या कडून काही चूक होते तेव्हा त्याला सावधान करून,सुक्ष्म रुपाने आपली
योग शक्ती त्यांना पाठवून त्यांच्या अशुद्ध विचारा़ंना भस्म करणे, हीच सवोत्तम खरी
सेवा आहे. त्याच बरोबर स्वतःवर लक्ष ठेवणे की, मन्सामध्ये अशुद्ध विचार येवू न
देणे.या मध्ये स्वतः पण सावध राहणे व दुसर्या प्रति अशी दिव्य सेवा करणं हेच सेवेचे
सुक्ष्म व महीन रहस्य आहे.
ओम शांती।
प्रथम प्रत्येक पुरुषार्थी मुलांना अंतर्मुखता अवश्य धारण करायची आहे. अंतर्मुखी
अवस्थेमध्ये मोठे कल्याण लपलेले आहे, या अवस्थेमध्येच अचल स्थिर धैर्यवत निर्माण
चित्त इत्यादी गुणांची धारणा होऊन संपूर्ण ज्ञानमय अवस्था प्राप्त होऊ
शकते.अंतर्मुखी न झाल्यामुळे, संपूर्ण ज्ञान रूप अवस्था प्राप्त होत नाही, कारण जे
काही महावाक्य ऐकली जातात, जर त्याच्या खोलीमध्ये जाऊन ग्रहण केले नाही, फक्त त्या
महा वाक्यांना ऐकून रिपीट केले तर ते महावाक्य साधारण वाक्य बनले जातात. जो
ज्ञानरूप अवस्थेमध्ये स्थित होऊन महावाक्य ऐकत नाही त्या महावाक्यांवर मायेची सावली
पडते.मायेच्या अशुद्ध प्रकंपनाने भरलेली महावाक्य ऐकून वर्णन करण्याने,स्वतःसहीत
इतरांचे कल्याण होण्याऐवजी अकल्याण होते, म्हणून हे गोड मुलांनो अंतर्मुखी बना. आपले
हे मन मंदिराप्रमाणे आहे,जसे मंदिरामध्ये नेहमी सुगंधी वातावरण असते, असं मन मंदिर
जेव्हा पवित्र बनते, तेव्हा संकल्पही पवित्र निर्माण होतात. जसे मंदिरामध्ये फक्त
देवी देवतांची चित्रे ठेवली जातात, ना की राक्षसांची.असेच तुम्ही मुलं आपल्या ह्रदय
रुपी मंदिरामध्ये सर्व ईश्वरीय गुण रुपी मूर्तींना सजवा.ते गुण आहेत,
निर्मोही,निर्भय, निरलो्भ, निरहंकार, धैर्यवत इत्यादी कारण ही सर्व तुमचीच दिव्य
लक्षणं आहेत. तुम्हा मुलांना आपल्या मनरूपी मंदिराला संपूर्ण प्रकाशमय अर्थात शुद्ध
बनवायचे आहे.जेव्हा मन रुपी मंदिर प्रकाशमय होईल, तेव्हाच आपल्या प्रकाशाने प्रिय
वैकुंठ देशांमध्ये जाऊ शकाल.तेव्हा आपल्या मनरूपी मंदिराला उज्वल बनवण्याचा प्रयत्न
करा व मना सहित सर्व विकारी कर्म इंद्रियांना वश करा ,फक्त आपल्याच प्रति नाही परंतु
दुसऱ्या प्रतीही ही दिव्य सेवा करायची आहे. खरंतर सेवेचा अर्थ अतिसूक्ष्म आणि
रहस्ययुक्त आहे.असं नाही कि कुणाला च्याच्या चुकांवर फक्त सावधान करणे, इथपर्यंत
मर्यादित नाही परंतु त्याला सूक्ष्म रीतीने आपली योगशक्ती पोहोचवणे व त्याच्या
अशुद्ध संकल्पाना भस्म करणे ही खरी सर्वोत्तम सेवा आहे. त्याचबरोबर स्वतःवरही लक्ष
ठेवून फक्त वाचा किंवा कर्मना पर्यंत मर्यादित न राहता मनसा मध्येही कोणतेही अशुद्ध
संकल्प उत्पन्न होत असेल तर त्याच प्रकंपन अन्य आत्म्या पर्यंत सूक्ष्म रीतीने जाऊन
अकल्याण करते.त्याच ओझं स्वतःवर येते आणि त्याचे बंधन बनले जाते म्हणून हे मुलांनो
स्वतः सावध रहा आणि पुन्हा दुसर्यां पती हीच दिव्य सेवा करा.हेच आपल्या सेवाधारी
मुलांचं अलौकिक कर्तव्य आहे. अशी सेवा करणाऱ्यांना स्वतः साठी दुसऱ्या कडून कोणतीही
सेवा घ्यावी लागत नाही.स्वतः प्रति कोणतीही चूक झाली तरी बुद्धी योग बलाद्वारे
त्याला दुरुस्त करतो. असा तीव्र पुरुषार्थी थोड्या सावधानीने जाणून घेऊन स्वतःमध्ये
परिवर्तन करतो व पुढच्या भविष्यासाठी स्वतावर लक्ष ठेवून चालतो.हेच विशाल बुद्धी
मुलांचं कर्तव्य आहे. हे माझ्या प्राणप्रिय मुलांनो परमात्मा द्वारा रचलेल्या या
अविनाशी राजस्व ज्ञान यज्ञाप्रती तन-मन-धनाला संपूर्ण रीतीने स्वाहा करण्यामध्ये
रहस्य लपलेले आहे. ज्यावेळी आपण म्हणतो की मी तन-मन-धन सहित यज्ञामध्ये अर्पण झालो
म्हणजेच मेलो आहे, त्याच वेळी स्वतःचं अस काहीही राहत नाही, म्हणून पहिल्यांदा मनाला
संपूर्ण रीतीने सेवेमध्ये लावायचे आहे. सर्वकाही यज्ञासाठी किंवा परमात्माच्या प्रति
आहे तेथे पुन्हा आपल्या प्रती काहीही राहत नाही धनही व्यर्थ खर्च करू शकत नाही. मन
ही व्यरथअशुद्ध संकल्प विकल्पा कडे धाऊ शकत नाहीत कारण परमात्म्याला अर्पण केलेले
आहे.परमात्मा तर आहेच शुद्ध शांत स्वरूप, यामुळे अशुद्ध संकल्प स्वतः शांत होऊन
जातात.जर मन मायेच्या हातामध्ये दिले तर माया विविध रूपाने अनेक प्रकारच्या
विकल्पांना उत्पन्न करून मनरूपी घोड्यावर स्वार होते. जरी आत्तापर्यंत मुलांना
विकल्प येत असतील तर समजले पाहिजे की अजूनही मन पूर्ण रीतीने अर्पण झालेले नाही,
स्वाहा झालेले नाही, म्हणजेच मन हे ईश्वरीय मन बनलेले नाही, म्हणून हे सर्वंश त्यागी
मुलांनो ह्या गोष्टींना जाणून कर्म करत राहा. साक्षी होऊन स्वतःला पाहून खबरदारी
पूर्वक चला. स्वयम् गोपी वल्लभ सर्व प्रिय गोपिकांना समजावून सांगत आहेत की, तुमचं
वास्तविक खरं प्रेम कोणते आहे. हे प्रिय मुलांनो तुम्हाला एकमेकाच्या प्रति
प्रेमयुक्त सावधानी ठेवायची आहे कारण जेवढे प्रिय फूल असेल, तेवढी श्रेष्ठ पालना.
फुलांना किमती बनवण्यासाठी माळ्याला काटे काढावे लागतात,त्याच पद्धतीने तुम्हाला
कुठली ही सावधानी दिली म्हणजे समजलं पाहिजे जसं काही माझ्या पालने साठीच ही सेवा
केलेलीआहे. ह्या पालनेला अथवा सेवेला रीगार्ड द्यायचा आहे.हीच संपूर्ण बनवण्याची
युक्ती आहे.हेच ज्ञान सहित खरं अंतरीक प्रेम आहे.ह्या दिव्य प्रेमाने एकमेकाला खूप
रिगार्ड दिला पाहिजे.प्रत्येक गोष्टी मध्ये प्रथम स्वतःला सावध करायच आहे.हीच
निर्माणचित अति मधुर अवस्था आहे.अशा प्रेमपूर्वक व्यवहारामुळे तुम्ही इथेच सतयुगाचा
आंतरिक अनुभव कराल. तेथे तर हे प्रेम नैसगि्र असते परंतु या संगम युगाच्या गोड वेळी
एकमेकासाठी सेवा करण्यासाठी, हे अति रमनिक प्रेम आहे. याच शुद्ध प्रेमाचे जगामध्ये
गायन केलेले आहे. तुम्हा प्रत्येक चैतन्य फुलाला नेहमी हर्षित मुख राहायचे आहे कारण
निश्चय बुद्धी झाल्यामुळे तुमच्या नसा नसा मध्ये संपूर्ण ईश्वरीय शक्ती सामावलेली
आहे. आकर्षण शक्ती आपला दिव्य चमत्कार अवश्य दाखवत असते. जशी छोटी निर्दोष मुलं
शुद्ध पवित्र असल्यामुळे सदैव हसत राहतात आणि आपल्या रमणिक चरित्राने सगळ्यांना
आकर्षित करतात.तसे तुम्हा मुलांचे रमणिक जीवन झाले पाहिजे,त्यासाठी तुम्हाला
कोणत्याही युक्तीने आपल्या आसुरी स्वभावावर विजय प्राप्त करायचा आहे.जेव्हा एखादा,
क्रोध वश होऊन तुमच्य समोर येतो, तेव्हा तुम्ही त्याच्या समोर ज्ञान स्वरूप होऊन
लहान मुला प्रमाणे हसत राहा, तर तो स्वतः शांत होऊन जाईल, म्हणजेच विस्स्मृत
स्वरूपातून स्मृती स्वरूपामध्ये येईल. त्याला माहिती नसेल की सूक्ष्म रीतीने
त्याच्यावर विजय प्राप्त करून मालक बनलोय. मालक आणि बालकपणाची सर्वोत्तम शिरोमणी
विधी आहे, ईश्वर जसा संपूर्ण ज्ञानस्वरूप आहे, तसाच प्रेम स्वरूपआहे. ईश्वरा मध्ये
हे दोन्ही गुण सामावलेले आहेत परंतु प्रथम ज्ञान आणि नंतर प्रेम. जर कोणी पहिल्यांदा
ज्ञानरूप बनण्याशिवाय फक्त प्रेम रुप बनतात, तर ते प्रेम अशुद्ध खात्यामध्ये घेऊन
जाते, म्हणून प्रेमाला विलिन करून, प्रथम ज्ञानरूप बनून वेग वेगळ्या रूपामध्ये
आलेल्या मायेला जिंकून पुन्हा प्रेम रूप बनायचे आहे. जर ज्ञानाशिवाय प्रेम असेल,तर
कोठेही विचलित व्हाल. जर कोणी ज्ञानाशिवाय ध्यानामध्ये जातात, तर कित्येक वेळा
मायेमध्ये फसतात. माया त्यांच्यावर वार करते म्हणून बाबा म्हणतात, हे मुलांनो, हे
ध्यान पण एक सुताची साखळी आहे परंतु ज्ञानरूप बनून पुन्हा ध्यानामध्ये गेल्यानेच
आनंदाचा अनुभव होतो. तर प्रथम आहे ज्ञान आणि नंतर ध्यान.ध्यानीष्ठ अवस्थे पेक्षा
ज्ञानिष्ट अवस्था श्रेष्ठ आहे म्हणून हे मुलांनो पहिल्यांदा ज्ञानरूप बनून पुन्हा
प्रेमस्वरूप बना. ज्ञानाशिवाय प्रेमरूप बनणं हे पुरुषार्थी जीवनामध्ये विघ्न स्वरूप
बनते.
साक्षी पणाची अवस्था
खूप गोड आणि सुंदर आहे. ही अवस्था भविष्यमय जीवनाचा पाया आहे.कारण जेव्हा एखाद्याला
शारीरिक भोगना येते तेव्हा तो साक्षी, सुखस्वरुप अवस्थेत स्थिर होवुन
भोगतो,भुतकाळातील कर्मांचा भोग चु्कतू करतो,आणि त्याच बरोबर भविष्य ही सुखमय बनवितो.
साक्षी साक्षी पणाची ही अवस्था भुत आणि भविष्य दोघांशी संबंध ठेवणारी आहे. या
रहस्याला जानणारा कोणीही असा म्हणणार नाही की,माझी ही सुंदर वेळ फक्त हिसाब किताब
चुकतू करण्यामध्ये गेली, नाही. ही सुंदर पुरुषार्थ ची सुंदर वेळ आहे, ज्या वेळेला
दोन्ही कार्य संपूर्ण रीतीने सिद्ध होतात. अशा दोन्ही कार्यांना सिद्ध करणारा तीव्र
पुरुषार्थीच अतींद्रिय सुखाच्या आनंदात राहतो. या विविध विराट वैश्विक नाटकां मधील
प्रत्येक गोष्टी मधे तुम्हा मुलांना संपूर्ण निश्चय पाहिजे कारण हा अनादी ड्रामा
अगदी प्रमाणिक आहे. हा ड्रामा प्रत्येक जीव प्राण्याकडून त्यांचा पार्ट पूर्ण रीतीने
बजावून घेतो.याची ड्रामामध्ये नोंद आहे. मग तो पार्ट चूकीचा असला तरीही तो पूर्ण
रीतीने बजावून घेतो. पण नाटकामध्ये नोंद आहे. जर बरोबर चुक दोन्ही भूमिका नोंद आहेत
तेव्हा कोणत्याही गोष्टींमध्ये संशय उठवणे हे ज्ञान नाही, कारण प्रत्येक कलाकार आपली
आपली भूमिका वठवत आहे .जसे सिनेमांमध्ये अनेक कलाकार वेग वेगळ्या नाव रूपाने आपापली
भुमिका करतात, त्यांना पाहून त्यांच्या बद्दल द्वेष येईल किंवा आनंद होईल असं होत
नाही, कारण माहिती आहे की हा एक खेळ आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापली चांगली
किंवा वाईट भुमिका मिळालेली आहे. त्त्याच प्रमाणे या आनादि बनलेल्या सिनेमाला पण
साक्षी होऊन एकरस अस्वस्थेत हर्षित मुख होवून होऊन बघत राहा. संघटनांमध्ये ही गोष्ट
चांगल्या रीतीने धारण करायची आहे. एकमेकाला ईश्वरीय रुपामध्ये बघायचं आहे, अनुभवाचे
ज्ञान घेऊन सर्व ईश्वरीय गुणांची धारणा करायची आहे.आपल्या लक्ष स्वरूपाच्या
स्मृतीमध्ये शांत चित्त निर्माण्चित्त धैऱ्यवत गोडवा, शीतलता इत्यादी सर्व दैवी गुण
धारण करायचे आहेत.धैर्यवत अवस्था धारण करण्याचा मुख्य पाया आहे, थोडे थांबा आणि वाट
पहा. आपल्या हृदयामध्ये पहिल्यांदा धैर्यवताचा गुण धारण करून पुन्हा विराट ड्रामाला
साक्षी होऊन बघा. जोपर्यंत कोणतेही रहस्य ऐकण्याची वेळ जवळ येईल तोपर्यंत धैर्य वत
गुणाची धारणा करायची आहे. याचा खूप काळाचा पुरुषा्रथ नसेल तर घाबरून नापास
व्हाल.म्हणून दैवी गुणधारी बनण्याच पहिला पहिला ईश्वरीय पाया पक्का करणे गरजेचं आहे.
ज्ञानस्वरुप स्थितीमध्ये स्थित राहण्याने शांत स्वरूप अवस्था प्राप्त होते,जेव्हा
ज्ञानी तू आत्मा मुले एकत्र बसून मुरली ऐकतात तेव्हा चारही बाजूला शांतीच वातावरण
बनते कारण जे काही ते महावाक्य ऐकतात, तेव्हा खोलामध्ये आंतरिक शांती मध्ये जातात.
खोलात जाण्यामुळे आंतरिक शांतीची गोडी अनुभवता येते . तेव्हा यासाठी काही खास बसून
मेहनत करायची नाही परंतु ज्ञानाच्या अवस्थेमध्ये स्थिर राहील्याने हा गुण अनायास
येतो. तुम्ही मुलं जेव्हा सकाळी सकाळी उठून एकांतामध्ये बसता तेव्हा शुद्ध
विचारांच्या लहरी उत्पन्न होतात त्यावेळी अवस्था खूप उपराम हवी. पुन्हा आपल्या
शुद्ध संकल्पा मध्ये स्थिर झाल्याने इतर संकल्प आपोआपच शांत होतील.आणि मन अमन होईल
कारण मनाला वश करण्याची ,कोणती तरी ताकत आवश्य पाहिजे. म्हणून प्रथम आपल्या लक्ष
स्वरूपाच्या शुद्ध संकल्पांना धारण करा,जेव्हा आंतरिक बुद्धीयोग कायदे प्रमाण होईल,
तेव्हा तुमची निरसंकल्प अवस्था स्वतः होऊन जाईल,अच्छा.
गोड गोड खूप वर्षांनी
भेटलेल्या ज्ञान गुलजारी, ज्ञानरुपी ताऱ्यांप्रति मात पिता बापदादाचा प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1) आपल्या
लक्ष स्वरूपाच्या स्मृतीने शांत चित्त निर्माण चित्त मिठास शीतलता इत्यादी सर्व दैवी
गुण धारण करायचे आहेत.
2) निश्चय बुद्धी
साक्षी दृष्टा होऊन या खेळाला हर्षित चेहऱ्याने बघत, आंतरिक धैर्यवत अडोल चित्त
राहायचे आहे. साक्षीपनाच्या अवस्थेमध्ये राहण्याचा खूप वेळेचा अभ्यास करण्याचे
परिश्रम घ्यायचे आहेत.
वरदान:-
स्नेह आणि
शक्ती रूपाच्या संतुलना द्वारे सेवा करणारे सफलता मूर्त भव.
जसं एका डोळ्यांमध्ये
बाबाच प्रेम आणि दुसऱ्या मध्ये बाबा द्वारा मिळालेली सेवा, नेहमी स्मृतीमध्ये
राहते,अशा पद्धतीने स्नेही मूर्त बरोबर शक्ती रूप पण बना. स्नेहा बरोबर शब्दांमध्ये
अशी धार असावी की कुणाच्या पण हृदयाला विधी रण करेल ज्याप्रमाणे आई मुलांना
कोणत्याही शब्दाने शिक्षण देते तेव्हा आईच्या धै्यरवत स्नेहामुळे तो शब्द धारदार वा
कडूपणा चा अनुभव करत नाही अशा पद्धतीने ज्ञानाच्या ज्या सत्य गोष्टी आहेत त्यांना
स्पष्ट शब्दांमध्ये सांगा परंतु शब्दांमध्ये स्नेह सामावलेला असेल तर सफलता मूर्त
बनून जाईल
बोधवाक्य:-
सर्वशक्तिमान
बाबाला साथी बनवाल तर पश्चाताप पापापासून मुक्त व्हाल.