26-05-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, नेहमी याच नशेमध्ये राहा की, आम्ही संगमयुगी ब्राह्मण आहोत, आम्ही जाणतो
ज्या बाबांना सर्व बोलवतात, तेच आमच्या सन्मुख आहेत"
प्रश्न:-
ज्या मुलांचा
बुद्धीयोग ठीक असेल, त्यांना कोणता साक्षात्कार होत राहील?
उत्तर:-
नवीन राजधानी मध्ये काय काय असेल, कसे आम्ही शाळेमध्ये शिकू, परत राज्य करू, हे
सर्व साक्षात्कार जसे जसे, संपुर्णतेच्या जवळ येतील, तसे होत राहतील परंतु ज्यांची
बुद्धी ठीक आहे, जे आपल्या शांतीधाम आणि सुखधामची आठवण करतात, कामधंदा करत पण एका
बाबांच्या आठवणी मध्ये राहतात, त्यांना सर्व साक्षात्कार होतील.
गाणे:-
ओम नमः शिवाय.
.
ओम शांती।
भक्ती मार्गामध्ये जे पण सत्संग होतात, त्यांच्या मध्ये सर्व गेले असतील, तेथे तर
म्हणतील बोला, वाह गुरू किंवा रामाचे नाव घ्यायला सांगतील. येथे मुलांना तसे काहीच
करण्याची आवश्यकता नाही. एकाच वेळेस म्हटले, सारखे सारखे म्हणायची आवश्यकता नाही.
बाबा एकच आहेत, त्यांचे मत पण एकच आहे. ते म्हणतात, माझीच आठवण करा. प्रथम शिकुन
परत येथे येऊन बसा. आम्ही ज्या शिव पित्याची मुलं आहेत, त्यांची आठवण करायची आहे.
हे पण तुम्ही, आत्ता ब्रह्मा द्वारा जाणले आहे की, आम्हा सर्व आत्म्यांचे पिता एकच
आहेत. दुनिया तर हे जाणत नाही, तुम्हीच जाणता आम्ही सर्व त्या पित्याची मुलं आहोत,
त्यांना सर्व ईश्वरीय पिता (गॉडफादर) म्हणतात. आता शिवपिता म्हणतात, मी साधारण तना
मध्ये तुम्हाला शिकवण्या साठी येतो. तुम्ही जाणतात बाबा यांच्या तना मध्ये आले
आहेत. आम्ही त्यांचे बनलो आहोत. बाबाच येऊन पतिता पासुन पावन बनण्याचा रस्ता
सांगतात. हे सर्व दिवस बुद्धी मध्ये राहते. तसे तर शिवबाबा चे संतान तर सर्वच आहेत,
परंतु हे तुम्ही जाणता, दुसरे कोणीही जाणत नाहीत. आता तुम्ही मुलं समजता, आम्ही
आत्मा आहोत, आम्हाला आदेश आहे की, बाबांची आठवण करा. मी तुमचा बेहदचा पिता आहे.
सर्व ओरडत राहतात, की हे पतित पावन या, आम्ही पतित बनलो आहोत. हे देह म्हणत नाही,
आत्मा शरीरा द्वारे म्हणते. ८४ जन्म आत्मा घेते ना. हे बुद्धीमध्ये राहिले पाहिजे,
आम्ही कलाकार आहोत. बाबांनी आम्हाला आत्ता त्रिकालदर्शी बनवले आहे. आदी मध्य अंतचे
ज्ञान दिले आहे. बाबांना सर्व बोलतात ना. आता पण ते म्हणतात, की तुम्ही या आणि
तुम्ही संगमयुगी ब्राह्मण म्हणतात, बाबा आले आहेत. या संगम युगाला पण तुम्ही जाणता,
हे पुरुषोत्तम युगाचे गायन केले जाते. कलियुगाच्या अंत काळात आणि सतयुगाची सुरुवात
या दोघांच्या संगमा ला पुरुषोत्तम युग असते. सतयुगा मध्ये सत्पुरुष तर कलियुगामध्ये
खोटे पुरुष असतात. सतयुगा मध्ये जे होऊन गेले, त्यांचे चित्र आहेत, सर्वात प्राचीन
चित्र तर हे आहेत. यापेक्षा प्राचीन चित्र कोणतेच नसतात. तसे तर खूप मनुष्य फालतू
चित्र बनवत राहतात. हे तुम्ही जाणताच कोण कोण होऊन गेले, जसे अंबा (देवी)चे चित्र
बनवले आहे किंवा कालीचे चित्र आहे. तर असे अनेक भुजा असणाऱ्या देवी थोड्याच असतात.
अंबाला पण दोनच भुजा असतील ना. मनुष्य हात जोडतात आणि पूजा करत राहतात. भक्तिमार्ग
मध्ये अनेक प्रकारचे चित्र बनवले आहेत. मनुष्याच्या वरतीच वेग वेगळ्या प्रकारचा
शृंगार करतात तर रूप बदलते. हे चित्र इत्यादी वास्तव मध्ये काहीच नाहीत. हे सर्व
भक्तिमार्गाचे आहेत. येथे तर मनुष्य अपंग जन्म घेत राहतात. सतयुगा मध्ये असे जन्म
होत नाहीत. तुम्हीच जाणतात, आदी सनातन देवी देवता धर्म होता. येथे तर पहा सर्वांचे
वस्त्र वेगवेगळे आहेत, खूप भिन्नता आहे. तेथे तर यथा राजा तथा प्रजा असतात. जितके
संपूर्णतेच्या जवळ जाल, तर तुम्हाला आपल्या राजधानीचे वस्त्र, इत्यादी चा पण
साक्षात्कार होत राहिल. तुम्ही पहा आम्ही, अशाप्रकारे शाळे मध्ये जातो, हे, हे
करतो. हे पण तेच पाहतील, ज्यांची बुद्धी चांगली आहे. आपल्या शांतीधाम सुखधामची आठवण
करतात. कामधंदा करायचं आहे. भक्ती मार्गामध्ये पण करतात ना. अगोदर ज्ञान काहीच
नव्हते. ही सर्व भक्ती आहे. त्याला भक्तीचे ज्ञान म्हटले जाते. ते हे ज्ञान देऊ शकत
नाहीत, की तुम्ही विश्वाचे मालक कसे बनू शकता. आता तुम्ही राजयोगाचे शिक्षण घेऊन,
भविष्या मध्ये विश्वाचे मालक बनतात. तुम्ही जाणता हे शिक्षण आहे, नवीन दुनिया
अमरलोका साठी. बाकी अमरनाथ येथे, शंकराने पार्वतीला अमर कथा ऐकवली नाही. ते तर शिव
शंकरला एकच दाखवतात. आता बाबा मुलांना समजवत आहेत, तर हे (ब्रह्मा)पण ऐकतात. बाबां
शिवाय सृष्टीच्या आदी मध्यचे रहस्य कोण समजावू शकतात. हे कोणी साधुसंत इत्यादी
नाहीत. जसे तुमचे, गृहस्थ व्यवहारा मध्ये वस्त्र आहेत, तसेच यांचे पण वस्त्र आहेत.
घरामध्ये पिता मुलं असतात, फर्क काहीच नाही. बाबा या रथा वरती सवार होऊन मुलांकडे
येतात. या भाग्यशाली रथाचे गायन केले आहे. कधी नंदीबैला वरती सवारी पण दाखवतात,
मनुष्याने उलटे समजले आहे. मंदिरामध्ये कधी नंदीबैल असू शकतो का? कृष्ण राजकुमार
आहेत, ते थोडेच बैला वरती बसतील? भक्तिमार्गा मध्ये मनुष्य खूपच संभ्रमित झाले
आहेत. मनुष्याला भक्तिमार्गाचा नशा आहे आणि तुम्हाला ज्ञान मार्गाचा नशा आहे.
तुम्ही म्हणतात, संगम युगा वरती बाबा आम्हाला शिकवत आहेत. तुम्ही या दुनिया मध्ये
आहात परंतु बुद्धी द्वारे जाणता की, आम्ही ब्राह्मण आहोत, संगम युगा मध्ये आहोत.
बाकी सर्व मनुष्य कलियुगामध्ये आहेत. या अनुभवाच्या गोष्टी आहेत. आम्ही आत्ता
कलियुगा मधून निघत आहोत. बाबा आले आहेत हे जुन्या दुनियेचे परिवर्तन होत आहे. हे
तुमच्या बुद्धी मध्ये आहे दुसरे कोणी जाणू शकत नाहीत. जर एकाच घरामध्ये राहणारे
आहेत, एकाच परिवाराचे आहेत, त्यामध्ये पण पिता म्हणतील आम्ही संगमयुगी आहोत, मुलगा
म्हणेल नाही, आम्ही तर कलयुगा मध्येच आहोत. हे पण आश्चर्य आहे ना. मुलं जाणतात आमचे
शिक्षण पूर्ण होईल आणि विनाश होईल. विनाश होणे पण आवश्यक आहे. तुमच्यामध्ये पण कोणी
जाणतात, जर हे समजले दुनिया विनाश होणार आहे, तर नवीन दुनियेच्या तयारी मध्ये
लागतील. संपूर्ण बनण्यासाठी तयारी करतील, बाकी थोडा वेळ आहे. बाबांचे तर बणुन जावे.
भूक मरतील तेही प्रथम बाबा परत मुलं, हा तर शिवबाबांचा भंडारा आहे. तुम्ही शिवबाबां
च्या भंडाऱ्या द्वारे भोजन करतात. ब्राह्मण भोजन बनवतात म्हणून ब्रह्मा भोजन म्हटले
जाते, जे पवित्र ब्राह्मण आहेत आठवणी मध्ये राहून भोजन बनवतात. ब्राह्मणांच्या
शिवाय शिवबाबांच्या आठवणीमध्ये कोणी राहू शकत नाही. ते ब्राह्मण लोक थोडेच बाबाच्या
आठवणीमध्ये राहतात. शिवबाबा चा भंडारा हा आहे, जिथे ब्राह्मण भोजन बनवतात. ब्राह्मण
योगामध्ये राहतात, पवित्र तर आहेतच, बाकी योगाची गोष्ट आहे. या मध्येच कष्ट घ्यावे
लागतात. थापा चालू शकत नाहीत. असे पण कोणी म्हणू शकत नाही, मी संपूर्ण योगी आहे
किंवा 80 टक्के योगी आहे. कोणीही म्हणू शकत नाही. ज्ञान पण पाहिजे. तुम्हा
मुलांमध्ये पण जे योगी आहेत, ते आपल्या दृष्टी द्वारे कोणालाही शांत करू शकतात. ही
पण शक्ती आहे, एकदम सन्नाटा होतो, जेव्हा तुम्ही अशरीरी बनतात परत बाबांची आठवण
राहते, हीच खरी आठवण आहे परत हा अभ्यास करायचा आहे. जसे तुम्ही येथे आठवणीमध्ये
बसता, परत हा अभ्यास करायला पाहिजे. तरी सर्व काही आठवणी मध्ये राहत नाहीत. कुठे
कुठे बुद्धी जात राहते, तर परत ते नुकसान करतात. येथे संदल वर त्यांनाच बसवायला
पाहिजे, जे समजतील मी योग शिक्षक आहे. बाबांच्या आठवणीमध्ये समोर बसले आहेत, तर
दुसर्या कुणाकडे जायला नको, तेव्हाच एकदम शांती होईल. तुम्ही अशरीरी बणुन
बाबांच्या आठवणी मध्ये राहतात, ही खरी आठवण आहे. सन्याशी पण शांती मध्ये बसतात, ते
कोणाच्या आठवणी मध्ये राहतात? ती काही वास्तविक आठवण नाही, कोणाला फायदा मिळू शकत
नाही. सृष्टीला शांत करू शकत नाहीत, बाबांना जाणत नाहीत. ब्रह्मला च भगवान समजत
राहतात, तसे तर नाही. आता तुम्हाला श्रीमत मिळत आहे की, माझी आठवण करा. तुम्ही
जाणतातच आम्ही ८४ जन्म घेतो. प्रत्येक जन्मा मध्ये थोडी थोडी कला कमी होत जाते.
चंद्रमा ची कला कमी होते, पाहिल्या नंतर माहिती होते. आता कोणी संपूर्ण बनले नाहीत.
पुढे चालून तुम्हाला साक्षात्कार होतील. आत्मा खूप छोटी आहे, त्याचा पण साक्षात्कार
होऊ शकतो, नाहीतर मुली कसे सांगतील की, यांच्यामध्ये पवित्रते ची शक्ती कमी आहे,
यांच्यामध्ये जास्त आहे. दिव्यदृष्टी द्वारेच आत्म्याला पाहू शकतात, हे सर्व अविनाश
नाटकांमध्ये नोंदलेले आहे. बाबा म्हणतात माझ्या हाता मध्ये काहीच नाही, हे अविनाश
नाटक माझ्या द्वारे करवते. हे सर्व अविनाश नाटका नुसार चालत राहते. भोग लावणे
इत्यादी पण सर्व या अविनाश नाटकांमध्ये नोंदलेले आहे. सेकंद सेकंद कार्य होत राहते.
आता बाबा समजवतात की पावन कसे बनायचे आहे. बाबांची आठवण करायची आहे. आत्मा खूप छोटी
आहे, जी पतीत बनली आहे, परत पावन बनायचे आहे. या आश्चर्यकारक गोष्टी आहेत ना. कुदरत
म्हणतात ना. बाबा कडून तुम्ही सर्व कुदरती गोष्टी ऐकत राहतात. सर्वात कुदरती गोष्ट
आहे आत्मा आणि परमात्मा ची, जे कोणी जाणत नाहीत. ऋषी मुनी इत्यादी कोणीही जाणत
नाहीत. इतकी छोटी आत्माच पारस बुद्धी, परत पत्थर बुद्धी बनते. बुद्धी मध्ये हेच
चिंतन चालत राहावे की, आम्ही आत्मा पत्थर बुद्धी बनलो होतो, आता परत बाबांची आठवण
करून पारस बुद्धी बनत आहोत. लौकिक रितीने तर पिता पण मोठे तर शिक्षक, गुरु पण मोठेच
मिळतात. हे तर एकच बिंदू, पिता आहेत, शिक्षक आहेत आणि गुरु पण आहेत. सारा कल्प
तुम्ही देहधारीची आठवण केली, आता बाबा म्हणतात, माझी आठवण करा. तुमच्या बुद्धीला
खूप सूक्ष्म बनवतात, विश्वाचे मालक बनणे काही काही कमी गोष्ट आहे का? हे कोणी विचार
करत नाहीत, हे लक्ष्मी नारायण सतयुगा चे मालक कसे बनले? तुम्हीपण क्रमानुसार,
पुरुषार्था प्रमाणे जाणतात. नवीन कोणी या गोष्टीला जाणू शकत नाही. प्रथम मोठ्या
रूपा द्वारे समजवले, आत्ता महिनतेने समजवले जाते. मनुष्य परत मोठ मोठे लिंग बनवत
राहतात. मनुष्यांचे पण खूप मोठे मोठे चित्र बनवतात परंतु असे नाही. मनुष्यां चे
शरीर तर असेच असतात. भक्तिमार्ग मध्ये तर काय काय बनवले आहे. मनुष्य खूपच संभ्रमित
झाले आहेत. बाबा म्हणतात ज्या गोष्टी झाल्या त्या परत होतील. आता तुम्ही बाबाच्या
श्रीमता वरती चाला. यांना पण बाबानी श्रीमत दिली, साक्षात्कार करवला ना. तुम्हाला
मी बादशाही देतो, आता हीच सेवा करत रहा. आपला वारसा घेण्याचा पुरुषार्थ करा, बाकी
सर्व सोडून द्या, तर हे निमित्त बनले. सर्वच असे निमित्त बनू शकत नाहीत. ज्यांना
नशा चढला ते बाबांकडे आले. आम्हाला तर राजाई मिळत आहे, परत हे पैसे काय करणार? तर
आत्ता बाबा मुलांना पुरुषार्थ करवतात, राजधानी स्थापन होत आहे. मुलं म्हणतात आम्ही
लक्ष्मी नारायण पेक्षा कमी बनणार नाही. तर श्रीमता वर चालून दाखवा. चूँ चा करू नका.
बाबानी थोडच म्हटले आहे, मुला बाळाचे काय हाल होतील? अपघातांमध्ये अचानक कोणाचा
मृत्यू होतो, तर कोणी उपाशी मरतात का? कोणी न कोणी मित्र संबंधी इत्यादी त्यांना
खाण्यासाठी देतात. येथे पहा बाबा जुन्या झोपडीमध्ये राहतात, तुम्ही मुलं येऊन
इमारतीमध्ये राहतात. बाबा म्हणतात, मुलांनो चांगल्या रितीने रहा, खा प्या. जे काहीच
घेऊन आले नाहीत, त्यांना पण सर्व काही चांगल्या रीतीने मिळत राहते. या बाबा पेक्षा
चांगल्या रीतीने राहतात. शिव बाबा म्हणतात मी तर रमता योगी आहे. कोणाचे ही कल्याण
करण्या साठी जाऊ शकतो. जे ज्ञानी मुलं आहेत, ते कधी साक्षात्कार इत्यादी च्या
गोष्टी मध्ये खुश होणार नाहीत. योगा शिवाय दुसरे काहीच नाही. या साक्षात्कारा च्या
गोष्टी मुळे खुश व्हायचे नाही. अच्छा
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या, मुलां प्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) योगाची अशी
स्थिती बनवायची आहे, की दृष्टी द्वारे कोणीही शांत होतील. एकदम सन्नाटा होईल,
यासाठी अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे.
२) ज्ञानाच्या खऱ्या नशे मध्ये राहण्यासाठी आठवणीत राहावे की, आम्ही संगमयुगी आहोत,
आता ही जुनी दुनिया बदलणार आहे. आम्ही आपल्या घरी जात आहोत. श्रीमता वरती चालत
राहायचे आहे. बाकी चूँ चाँ करायचे नाही.
वरदान:-
लक्ष्या नुसार
लक्षणा च्या संतुलन कलेद्वारे चढती कलेचा अनुभव करणारे बाप समान संपन्न भव.
मुलांमध्ये विश्व
कल्याणाची इच्छा आहे, तर बाप समान बनण्याची पण श्रेष्ठ इच्छा आहे परंतु लक्ष प्रमाण
जे लक्षण स्वतःमध्ये किंवा सर्वांमध्ये दिसून येतील त्यामध्ये अंतर आहे, म्हणून
संतुलन करण्याच्या कले मध्ये येऊन आता चढती कला मध्ये येऊन या अंतराला नष्ट करा.
संकल्प आहे परंतु दृढता संपन्न संकल्प हवा, तर बाप समान संपन्न बनण्याचे वरदान
प्राप्त होईल. आता जे स्वदर्शन आणि परदर्शन दोन्ही चक्र फिरवतात, व्यर्थ गोष्टीचे
जे त्रिकालदर्शी बनतात, याचे परिवर्तन करून स्वचिंतक स्वदर्शन चक्रधारी बना.
बोधवाक्य:-
सेवेचे भाग्य
प्राप्त होणे, हेच सर्वात मोठे भाग्य आहे.