19-05-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्ही आता शांतीधाम सुखधाम मध्ये जाण्यासाठी ईश्वरीय धाम मध्ये बसले
आहात,हा सतचा संग आहे,जेथे तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात.
प्रश्न:-
तुम्ही मुलं
बाबा पेक्षा उच्च आहात,कनिष्ठ नाहीत,कसे ?
उत्तर:-
बाबा म्हणतात मुलांनो,मी विश्वाचा मालक बनत नाही,तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो,तर
ब्रह्मांडचे पण मालक बनवतो.मी उच्च ते उच्च पिता तुम्हा मुलांना नमस्ते करतो म्हणून
तुम्ही मुलं माझ्यापेक्षा उच्च झाले.मी तुम्हा मालकांना सलाम करतो,नमस्ते
करतो.तुम्ही परत असे श्रेष्ठ बनवणाऱ्या बाबांना नमस्ते करतात.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना नमस्ते,मुलं प्रतिसाद पण करत नाहीत, बाबा नमस्ते,कारण मुलं
जाणतात बाबा आम्हाला ब्रह्मांडचे मालक बनवतात आणि विश्वाचे मालक पण बनवतात. बाबा तर
फक्त ब्रह्मांडचे मालक बनतात, विश्वाचे मालक बनत नाहीत.मुलांना ब्रह्मांड आणि विश्व
दोघांचे मालक बनवतात,तर सांगा मोठे कोण झाले? मुलं मोठी झाली ना,म्हणून मुलांना परत
नमस्ते करतात.बाबा तुम्हीच आम्हाला ब्रह्मांड आणि विश्वाचे मालक बनवतात म्हणून
तुम्हाला नमस्ते.मुसलमान लोक पण मालेकम सलाम,सलाम मालेकुम म्हणतात ना.तुम्हा
मुलांना ही खुशी आहे.ज्यांना निश्चय आहे, निश्चया शिवाय कोणी येथे येऊ शकत नाही.
येथे जे येतात ते जाणतात,आम्ही कोणत्या मनुष्य,गुरूच्या जवळ आलो नाही.मनुष्य
पित्याकडे,शिक्षका कडे, किंवा मनुष्य गुरूच्या जवळ जातात. तुम्ही येतात आत्मिक
पिता,आत्मिक शिक्षक,आत्मिक सद्गुरूच्या जवळ.ते मनुष्य तर अनेक आहेत.हे तर एकच
आहेत.हा परिचय कोणाला पण नाही.भक्तिमार्ग मधील ग्रंथांमध्ये आहे की,रचनाकार आणि
रचनेला कोणी जाणत नाहीत,न जाणल्यामुळे त्यांना नास्तिक म्हटले जाते.जे चांगल्या
रीतीने शिकलेले आहेत,ते समजतात आम्हा सर्वाचे पिता एकच निराकार आहेत.ते येऊन
पिता,शिक्षक,सद्गुरू बनतात. गीते मध्ये कृष्णाचे नाव प्रसिद्ध आहे. गीता सर्व
शास्त्र शिरोमणी आहे,सर्वात उत्तम ते उत्तम आहे.गितेलाच मात-पिता म्हटले
जाते.बाकीचे पण ग्रंथ आहेत, त्यांना मात-पिता म्हणत नाहीत. श्रीमद्भगवत गिता
माता,असे गायन आहे.भगवंताच्या मुख कमला द्वारे निघालेले गितेचे ज्ञान.उच्च ते उच्च
पिता आहेत,तर जरूर उच्च ते उच्च चे गायन केलेली गिता निर्माता आहे.बाकी सर्व ग्रंथ
गितेची रचना आहेत,पाने आहेत.रचने द्वारे कधी वारसा मिळू शकत नाही,मिळाला तोही अल्प
काळासाठी मिळतो.दुसरे अनेक ग्रंथ आहेत,ज्यांचा अभ्यास केल्यामुळे अल्प काळाचे सुख
मिळते,तेही एका जन्मासाठी.जे मनुष्य,मनुष्यला शिकवतात.प्रत्येक प्रकारचे जे शिक्षण
आहे,ते अल्प काळासाठी,मनुष्य मनुष्यांना शिकवतात.अल्प काळाचे सुख मिळाले परत
दुसऱ्यां जन्मा मध्ये सुरुवाती पासून शिकावे लागेल.येथे तर एक निराकार बाबाच
आहेत,जे २१ जन्मासाठी वारसा देतात,असा वारसा कोणी मनुष्य देऊ शकत नाहीत.ते तर कवडी
तुल्य बनवतात,बाबा येऊन हिरे तुल्य बनवतात.आता बाबा मुलांना सन्मुख समजवत
आहेत,तुम्ही सर्व ईश्वराची मुलं आहात ना.सर्वव्यापी म्हटल्यामुळे अर्थ काहीच समजत
नाहीत.सर्वा मध्ये परमात्मा आहेत,तर परत सर्वच पिता होतात.पिताचा पिता झाले,परत
वारसा कोणा द्वारे मिळेल? कोणाचे दुःख कोण दूर करेल? बाबांना च दुखहर्ता सुखकर्ता
म्हटले जाते.सर्व पिताच पिता झाले तर,याचा अर्थ पण काही निघत नाही.बाबा मुलांना
समजवतात,हे रावण राज्य आहे.हे पण नाटकांमध्ये नोंदलेले आहे, म्हणून चित्रांमध्ये
स्पष्ट करून सांगितले आहे.
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे,आम्ही पुरुषोत्तम संगमयुगा मध्ये आहोत.बाबा
पुरुषोत्तम बनवण्यासाठी आले आहेत.जसे वकील डॉक्टर इत्यादी शिक्षण घेतात,ज्याद्वारे
त्यांना पद मिळते.असे समजतात या शिक्षणाद्वारे आम्ही अमके बनू.येथे तुम्ही सतच्या
संगामध्ये बसले आहात.ज्याद्वारे तुम्ही सुद्धा सुखधामध्ये जातात.धाम पण दोन आहेत,एक
सुखधाम दुसरे शांतीधाम आहे.हे ईश्वराचे धाम आहे.बाबा रचनाकार आहेत ना.बाबा द्वारे
समजून,जे हुशार बनतात,त्यांचे कर्तव्य आहे,सेवा करणे.तुम्ही आत्ता समजून हुशार झाले
आहात,तर शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन समजून सांगा.त्यांना सांगा या शिवपिंडी वरती
फळं,फूलं, तूप,लोणी, धोत्र्याचे फुल,गुलाबाचे फुल असे विविध प्रकार अर्पण
करतात,कृष्णाच्या मंदिरांमध्ये तर धोत्र्याचे फूल अर्पण करत नाहीत.तेथे तर खूप
सुगंधित फुलंच घेऊन जातात. शिवाच्या पुढे तर धोत्र्याचे फुल, गुलाबाचे फूल,अर्पण
करतात,याचा अर्थ पण कोणीच जाणत नाहीत.या वेळेत तुम्हा मुलांना बाबा शिकवतात,कोणी
मनुष्य शिकवत नाहीत.बाकी सर्व दुनिया मध्ये,मनुष्य मनुष्यांना शिकवतात.तुम्हाला
भगवान शिकवत आहेत.कोणत्या मनुष्याला भगवान कदाचित म्हटले जात नाही.लक्ष्मी नारायणला
पण भगवान म्हणत नाहीत,त्यांना देवीदेवता म्हटले जाते. ब्रह्मा विष्णू शंकरला पण
देवता म्हणतात.भगवान एक पिताच आहेत,ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत.सर्वजण म्हणतात हे
परमपिता परमात्मा,त्यांचे खरे नाव शिव आहे आणि तुम्ही मुलं शाळीग्राम आहात.पंडित
लोक जेव्हा रुद्र यज्ञ स्थापन करतात तर शिवाचे खूप मोठे लिंग बनवतात आणि शाळीग्राम
छोटे-छोटे बनवतात. शाळीग्राम आत्म्याला म्हटले जाते.शिव म्हटले जाते
परमात्म्याला,ते सर्वांचे पिता आहेत.आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत,बंधुत्व भाव असे
म्हणतात.शिवपित्या ची मुलं आम्ही भाऊ भाऊ आहोत,परत भाऊ बहीण कसे झाले?प्रजापिता
ब्रह्मा च्या मुखाद्वारे प्रजेची रचना केली जाते.ते ब्राह्मण आणि ब्राह्मणी
आहेत.आम्ही प्रजापिता ब्रह्मा ची संतान आहोत, त्यामुळे ब्रह्मकुमार कुमारी म्हणतात.
अच्छा ब्रह्माची कोणी रचना केली? भगवंताने.ब्रह्मा,विष्णू,शंकर हे सर्व रचना
आहे.सूक्ष्मवतन ची पण रचना झाली ना.ब्रह्मा मुख कमल द्वारे तुम्ही मुलं निघाले
आहात.ब्राह्मण ब्राह्मणी म्हणतात.तुम्ही ब्रह्मा मुख वंशावली दत्तक मूल
आहात.प्रजापिता ब्रह्मा मुलांची रचना कसे करतील,जरूर दत्तक घेतील.जसे गुरूंच्या
अनुयायींना शिष्य म्हणतात.तर प्रजापिता ब्रह्मा सर्व दुनियाचे पिता झाले ना,त्यांना
म्हटले जाते आजोबा,पूर्वज.प्रजापिता ब्रह्मा तर येथे पाहिजेत.सूक्ष्म वतन मध्ये पण
ब्रह्मा आहेत.ब्रह्मा विष्णू शंकर च्या नावाचे गायन आहे परंतु सूक्ष्मवतन मध्ये
प्रजा तर नसते.आता ब्रह्मा कुठे आहेत,तुम्ही म्हणाल येथे बसले आहेत, दुसरे म्हणतील
ते होऊन गेले आहेत.ते परत स्वतःला पुजारी ब्राह्मण म्हणतात. आता तर तुम्ही
प्रत्यक्षात आहात. प्रजापिता ब्रह्मा ची मुलं आपसमध्ये भाऊ-बहीण झाले.ब्रह्माला पण
शिवबाबांनी दत्तक घेतले आहे.ते म्हणतात,मी या वृध्द तना मध्ये प्रवेश करून तुम्हाला
राजयोग शिकवतो. मनुष्याला देवता बनवणे हे काही मनुष्याचे काम नाही.बाबांना च
रचनाकार म्हणले जाते.भारतवासी जाणतात,शिवजयंती साजरी केली जाते.शिव पिता
आहेत.मनुष्यांना हे पण माहिती नाही की,देवी-देवतांना हे राज्य कोणी दिले?स्वर्गाचे
रचनाकार परमात्मा आहेत,त्यांना पतित-पावन म्हटले जाते. आत्मा वास्तविक मध्ये पवित्र
असते, परत सतो रजो,तमो मध्ये येते.या वेळेत, कलियुगामध्ये सर्व तमोप्रधान आणि
सतयुगा मध्ये सर्व सतोप्रधान असतात.आज पासुन पाच हजार वर्षापूर्वी लक्ष्मी
नारायणाचे राज्य होते. अडीच हजार वर्ष देवतांचे राज्य चालले, त्यांच्या मुलांनी पण
राज्य केले ना. लक्ष्मी नारायण प्रथम,लक्ष्मीनारायण द्वितीय,असे चालते.मनुष्याला या
गोष्टी बद्दल काहीच माहिती नाही.यावेळेत सर्व तमोप्रधान पतित आहेत.येथे एक पण
मनुष्य पावन होऊ शकत नाहीत. सर्व पुकारतात,हे पतित पावन या.तर पतित दुनिया झाली
ना.यालाच कलियुगी नर्क म्हटले जाते.नवीन दुनियाला स्वर्ग म्हटले जाते,परत पतित कसे
बनले, हे कोणी जाणत नाहीत.भारता मध्ये एक पण मनुष्य नाही,जो आपल्या ८४ जन्माला
जाणतो.मनुष्य जास्तीत जास्त ८४ जन्म आणि कमीत कमी एक जन्म घेतो. भारताला अविनाशी
खंड मानले आहे, कारण या भूमीवरती शिवबाबा चे अतरण होते.भारताचा कधी विनाश होत
नाही.बाकीचे अनेक खंड आहेत,ते सर्व विनाश होतात.यावेळी आदी सनातन देवी देवता धर्म
प्रायलोप झाला आहे. कोणीही स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत,कारण देवता सतोप्रधान
पावन होते,आता तर सर्व पतीत पुजारी बनले आहेत.हे पण बाबाच सन्मुख समजतात.भगवानुवाच
आहे ना. भगवान सर्वांचे पिता आहेत,ते एकाच वेळेत भारतामध्ये येतात.कधी येतात?
पुरुषोत्तम संगम युगामध्ये.या संगम युगालाच पुरुषोत्तम म्हटले जाते.हे संगमयुग
आहे,कलियुगा पासून सतयुग, पतिता पासून पावन बनण्याचे.कलियुगा मध्ये पतित मनुष्य
राहतात,सतयुगा मध्ये पावन देवता आहेत,म्हणून या युगाला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले
जाते. जेव्हा बाबा येऊन पतिता पासुन पावन बनवतात.तुम्ही मनुष्यापासून देवता
पुरुषोत्तम बनण्यासाठी येथे आले आहात.मनुष्य हे पण जाणत नाहीत,की मी आत्मा निर्वाण
धाम मध्ये राहतो, तेथून येथे अभिनय करण्यासाठी येतो. या नाटकाचे आयुष्य पाच हजार
आहे.आम्ही या बेहदच्या नाटकांमध्ये भूमिका वठवतो.इतके सर्व मनुष्य कलाकार
आहेत.नाटकाचे चक्र फिरत राहते,कधीच बंद होत नाही.प्रथम या नाटकांमध्ये सतयुगा मध्ये
देवी-देवता भूमिका करण्यासाठी येतात.परत त्रेता युगा मध्ये क्षत्रिय येतात.या
नाटकाला पण जाणायला पाहिजे ना.हे काट्याचे जंगल आहे,सर्व मनुष्य दुखी आहेत.
कलियुगाच्या नंतर परत सतयुग येते. कलियुगामध्ये असंख्य मनुष्य आहेत, सतयुगा मध्ये
किती असतील,खूपच थोडे असतात.आदी सनातन सूर्यवंशी देवी देवता असतात,ही जुनी दुनिया
आता बदलणार आहे.मनुष्य सृष्टी नंतर, देवतांची सृष्टी असेल.आदी सनातन देवी देवता
धर्म होता परंतु आता स्वतःला देवता म्हणत नाहीत,स्वतःच्या धर्मालाच विसरले आहेत.हे
फक्त भारतात वासीच आहेत,जे आपल्या धर्माला विसरले आहेत.हिंदुस्थाना मध्ये
राहिल्यामुळे हिंदूधर्म म्हणतात.देवता तर पावन होते, हे पतित आहेत,म्हणून स्वतःला
देवता म्हणू शकत नाहीत.देवतांची पूजा करतात,स्वतःला पापी निच म्हणतात. आता बाबा
समजवतात,तुम्हीच पूज्य होते परत तुम्हीच पुजारी पतित बनले.हम सो चा अर्थ पण बाबांनी
समजावला आहे.आम्ही परमात्मा आहोत,हा खोटा अर्थ आहे. खोटी माया, खोटी काया, खोटा
सर्व संसार. सतयुगा मध्ये असे म्हणत नाहीत.सत्य खंडा ची स्थापना बाबाच करतात,परत
रावण खोटा खंड बनवतात.हे पण बाबाचं समजवतात,आत्मा काय आहे? परमात्मा काय आहे?हे पण
कोणी जाणत नाहीत.बाबा म्हणतात,तुम्ही आत्मा सूक्ष्म बिंदू आहात.तुमच्या
आत्म्यामध्ये ८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे.आम्ही आत्मा कसे आहोत,हे कोणी जाणत
नाहीत. तुमच्या आत्म्यामध्ये ८४ जन्माच्या भूमिकेची अविनाशी नोंद आहे,ज्याचा कधी
विनाश होत नाही.हाच भारत फुलांची बाग होता.सुखच सुख होते,आत्ता दुःखच दुःख आहे.हे
बाबा ज्ञान देतात.
तुम्ही मुलं बाबा द्वारे आता नवीन नवीन गोष्टी ऐकत राहता.सर्वात नवीन गोष्ट
आहे,तुम्हाला मनुष्या पासून देवता बनायचे आहे.तुम्ही जाणतात मनुष्यापासून देवता
बनवण्याचे शिक्षण कोणी मनुष्य देऊ शकत नाहीत.स्वयम् भगवान शिकवत आहेत,त्या भगवंताला
सर्वव्यापी म्हणने ही तर त्यांची निंदा करणे आहे.आता बाबा समजवतात, मी प्रत्येक पाच
हजार वर्षांनंतर येऊन भारताला स्वर्ग बनवतो.रावण नर्क बनवतात,या गोष्टी दुनिये
मध्ये दुसरे कोणी जाणत नाहीत.बाबा तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतात,गायन पण
आहे,मुत पलिती कपड धोये. आत्मा आणि शरीर दोघांनाही पावन बनवतात.स्वर्गा मध्ये विकार
नसतात, ती संपूर्ण विकारी दुनिया आहे.आत्ता विकारी दुनिया आहे.हे पतित पावन या असे
बोलवतात.आम्हाला रावणाने पतित बनवले आहे परंतु जाणत नाहीत, रावण कधी आले?काय केले?
रावणाने खूपच कंगाल बनवले आहे.भारत पाच हजार वर्षापूर्वी खूप सावकार होता, सोने
हिरे जवाहर यांचे महल होते.किती धन होते,आता तर काय हालत झाली आहे.बाबां शिवाय
कोणीच सिरताज बनवू शकत नाहीत.आता तुम्ही म्हणता शिवबाबा भारताला स्वर्ग बनवतात. आता
बाबा म्हणतात,मृत्यू समोर उभा आहे.तुम्ही वानप्रस्थ आहात,आता परत जायचे आहे,म्हणून
स्वतःला आत्मा समजा,माझीच आठवण करा,तर पाप भस्म होतील,अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)आम्ही
ब्रह्मा मुख वंशावळ ब्राह्मण आहोत. स्वतः भगवान,आम्हाला मनुष्या पासून देवता
बनण्याचे शिक्षण देत आहेत. याच नशा आणि खुशी मध्ये राहायचे आहे.पुरुषोत्तम संगम
युगामध्ये पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
(२)आत्ता आपली
वानप्रस्थ अवस्था आहे,मृत्यू समोर उभा आहे,वापस घरी जायचे आहे,म्हणून बाबा च्या
आठवणी द्वारे सर्व पापाला भस्म करायचे आहे.
वरदान:-
मी आत्मिक
यात्री आहे,या स्मृती द्वारे नेहमी उपराम अनासक्त आणि निर्मोही भव.
आत्मिक यात्री नेहमी
आठवणीच्या यात्रेमध्ये पुढे जात राहतात, ही यात्रा नेहमीच सुखदायी आहे.जे आत्मिक
यात्रेमध्ये तत्पर राहतात,त्यांना दुसरी कोणती यात्रा करण्याची आवश्यकता नाही.या
यात्रेमध्ये सर्व यात्रा सामावलेल्या आहेत.मन किंवा तना द्वारे भटकणे बंद होते. तर
नेहमी हीच स्मृती ठेवा की,आम्ही आत्मिक यात्री आहोत. यात्रेकरूचा कोणा मध्येच मोह
नसतो, त्यांना सहजच उपराम आणि निर्मोही बनण्याचे वरदान मिळते.
बोधवाक्य:-
नेहमी वाहा
बाबा,वाहा भाग्य आणि वाहा गोड परिवार,हेच गीत गात रहा.