22-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो - एकांत मध्ये बसुन स्वतःशी गोष्टी करा, आम्ही अविनाशी आत्मा आहोत, शिवपित्या कडुन ऐकत आहोत, हा सराव करा"

प्रश्न:-
जे मुलं आठवण करण्यात आळशी आहेत, त्यांच्या तोंडातून कोणते शब्द निघतात?

उत्तर:-
ते म्हणतात- आम्ही शिवबाबाची मुलं तर आहोत च. आम्ही आठवणी मध्येच आहोत. परंतू बाबा म्हणतात की, ते सर्व गप्पा मारतात, दुर्लक्ष करतात. यामध्ये तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, पहाटे लवकर उठून, स्वता:ला आत्मा समजुन बसा. आत्मिक संवाद करा. आत्माच गोष्टी करते, आता तुम्ही आत्म अभिमानी, बनत आहात. फक्त आत्मपप-जागरूक मुलंच स्मरणार्थ चार्ट ठेवतील, फक्त ज्ञानाच्या गोष्टी सांगणार नाहीत.

गाणे:-
हे आत्मा तू मन रुपी दर्पण मध्ये स्वता:चा चेहरा पहा, किती पाप आणि किती पुण्य जमा आहेत

ओम शांती।
आत्मिक मुलांना समजावून सांगण्यात आले आहे, प्राण आत्म्याला म्हणले जाते. आता पिता आत्म्यांना समजावून सांगतात. ही गाणी तर भक्ती मार्गाची आहेत. हे तर फक्त त्याचे रहस्य समजावले जाते. आता जेव्हा तुम्ही इथे बसलात, तर स्वत: ला आत्मा समजून घ्या. तुम्हाला शरीराची जाणीव सोडून द्यावी लागेल. आम्ही आत्मा खूपच लहान बिंदू आहोत. मी या देहाद्वारे भूमिका निभावत आहे. हे आत्म्याचे ज्ञान कोणीही जाणत नाहीत. हे बाबाच स्पष्ट करतात, स्वत:ला आत्मा समजून घ्या, मी एक लहान आत्मा आहे. आत्माच सर्व भुमिका करते, या शरीरा द्वारे, तर शरीराची जाणीव काढून टाकली जाते. हे कठोर परिश्रम घ्यायचे आहेत. आम्ही आत्मा या सर्व नाटकांचे कलाकार आहोत. सर्वोच्च अभिनेता सर्वोच्च पिता, परमात्मा आहेत. बुद्धीमध्ये राहते की, ते पण लहान बिंदी आहेत, ज्ञानाचे सागर, आनंदाचे सागर आहेत, त्यांची खुप महिमा आहे. छोटा मुद्दा आहे. आम्ही आत्मा देखील लहान बिंदू आहोत. आत्म्याला शिवाय दिव्य दृष्टी, पाहू शकत नाही. आपण आत्ता या नवीन गोष्टी ऐकत आहात. जगाला काय माहित आहे? तुमच्यातही असे फार कमी लोक आहेत, जे अचूकपणे समजतात आणि बुद्धिमत्तेत असे आहे की आपण आत्म्ये लहान बिंदू आहोत. या नाटकातील आमचे शिवपिता मुख्य अभिनेते आहेत. सर्वोच्च अभिनेता, सर्वोच्च पिता आहेत, नंतर दुसरे येतात. आपल्याला माहिती आहे की, पिता तर ज्ञानाचे महासागर आहेत परंतु शरीराशिवाय आपल्याला ज्ञान ऐकवू शकत नाहीत. शरीरा द्वारेच बोलू शकतात. अशरीरि झाल्यामुळे कर्म इंद्रिय विभक्त होतात. भक्ती मार्गात तर शारीरिक लोकांची आठवण करतात. सर्वोच्च पिता, सर्वोच्च आत्मा यांचे नाव, रुप, देश, काळ या बद्दल माहित नाही. फक्त म्हणतात नावा रुपा पेक्षा वेगळा आहे. बाप स्पष्टीकरण देतात: नाटकानुसार जे क्रमांक एकचे सतोप्रधान होते, त्यांनाच पुन्हा सतोप्रधान बनले पाहिजे. तामोप्रधान पासून सतोप्रधान होण्यासाठी आपण ही, गोष्ट दृढ केली पाहिजे की, आपण आत्मा आहोत, आत्मा या शरीरा द्वारे बोलते. त्यांना ज्ञान आहे. हे ज्ञान इतर कोणा मध्ये नाही की, आपल्या मध्ये ८४ जन्मांची अविनाशी भुमिका नोंदलेली आहे. हे खूप नवीन मुद्दे आहेत. एकांतात बसून स्वता:शी बोलायचे आहे की - मी एक आत्मा आहे, शिव पित्या कडुन ऐकत आहे. धारणा आत्म्या मध्ये होते. माझ्या आत्म्यात भुमिका नोंदलेली आहे. मी अविनाशी आत्मा आहे, हे मनात पक्के करायचे आहे. तमोप्रधान पासून आपल्याला सतोप्रधान बनले पाहिजे. देह - अहंकारी लोकांना आत्म्याबद्दल माहिती नाही, ते मोठ मोठी पुस्तके स्वत: कडे ठेवतात. अहंकार किती आहे. हा तमोप्रधान संसार आहे. उच्च ते उच्च आत्मा तर कोणीही नाहीत. आपल्याला माहित आहे की, आता तमोप्रधान पासून सतोप्रधान बनण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ही गोष्ट आतमध्ये शिरली पाहिजे. असे बरेच लोक आहेत जे ज्ञान ऐकवतात, पण आठवण करत नाहीत. आतमध्ये ती अंतर्मुखता राहायला पाहिजे. आम्हाला बाबा च्या आठवणी द्वारे पतिता पासून पावन बनायचे आहे, फक्त पंडित बनायचे नाही, यावर पुजाऱ्या चे उदाहरण आहे. मातांना म्हणत होते, राम राम म्हणल्या मुळे नदीच्या किनाऱ्या कडे सहज जाल. तर असे लबाड बनायचे नाही. असे बरेच आहेत.

काही मुलं ज्ञानाचे स्पष्टीकरण खूप चांगले देतात, परंतु योग नाही. दिवसभर देहभानात राहतात. अन्यथा, बाबांना चार्ट पाठवावा - मी यावेळी उठतो, मी इतका वेळ आठवण करतो. काहीच बातम्या देत नाहीत. ज्ञानाच्या थापा मारतात, योग नाही. जरी अनेकांना ज्ञान देत असले तरी, ते योगामध्ये कच्चे आहेत. पहाटे उठुन बाबांची आठवण करा. बाबा, तुम्ही सर्वात प्रिय आहात. हे किती विचित्र नाटक आहे. हे रहस्य कोणालाही ठाऊक नाही. न आत्म्याला किंवा न परमात्म्याला जाणतात. माणसं या वेळी जनावरा पेक्षा खराब आहेत. आम्ही पण असेच होतो. मायाच्या राज्यात अशी दुर्दशा आहे. हे ज्ञान आपण कोणालाही देऊ शकता, म्हणा तुम्ही आत्मा आता तमोप्रधान आहात, आत्ता तुम्हाला सतोप्रधान बनायचे आहे. प्रथम, स्वत: ला एक आत्मा समजा. गरिबांना अधिक सोयीस्कर आहे, सावकाराला तर खूप लफडे आहेत.

बाबा म्हणतात - मी एक सामान्य शरीरात च घेतो. , न फार गरीब, ना जास्त सावकार. आता तुम्ही जाणतात, कल्प कल्प बाबा येऊन, आम्हाला पावन कसे व्हावे, हे शिकवतात. बाकी तुमचा व्यवसाय इत्यादी मध्ये खिटपीट आहे, त्या साठी बाबा आले नाहीत. तुम्ही पुकारता, हे पतित पावन या. तर बाबा पावन बनवण्याची युक्ती सांगत आहेत. हे ब्रह्मा स्वत: पण काहीच जाणत नव्हते. एक अभिनेता असुन, नाटकाची सुरूवात, मध्य आणि शेवट माहित नसल्याने, तर काय म्हणनार? सृष्टीच्या या चक्रात आपण कलाकार आहोत, हे कोणालाही ठाऊक नाही. जरी म्हणतात, आत्मा मूळ वतन मध्ये वास्तव्य करते परंतु अनुभवाद्वारे सांगत नाहीत. तुम्हाला तर आता वास्तविक दृष्ट्या माहित आहे, आम्ही आत्मा मूळ वतनचे रहिवासी आहोत. आपण आत्मा अविनाशी आहोत. आपल्या बुद्धीमध्ये हे लक्षात ठेवले पाहिजे. अनेकांचा योग नाही. शरीर अभिमाना मुळे चुकाही खूप होतात. मूलभूत गोष्ट म्हणजे, आत्म अभिमानी होणे. तर ही शुध्द काळजी राहिली पाहिजे, आपल्याला सतोप्रधान बनले पाहिजे. सतोप्रधान बनण्याची इच्छा असणार्‍या मुलांचे मुखा मधुन दगड (फालतू गोष्टी) कधीच बाहेर येणार नाहीत. जर आपण चुकलो असेल तर, ताबडतोब बाबांना कळवतील. बाबा आमच्या कडून ही चुक झाली, क्षमा करा, लपवणार नाहीत. तिला लपविण्या मुळे पुढे वाढ होते. बाबांना खबर देत रहा. बाबा लिहितात, तुमचा योग बरोबर नाही. पावन बनणेच मुख्य गोष्ट आहे. तुम्हा मुलांच्या बुध्दी मध्ये ८४ जन्मांची कहाणी आहे. जितके शक्य होईल तेवढे सतोप्रधान बनायचे आहे. शरीराचे भान विसरायचे आहे. आपण राजऋषी आहात. हठयोगी कधी राजयोग शिकवू शकत नाहीत. राजयोग बाबाच शिकवतात. ज्ञान पण बाबाच देतात. बाकी या वेळी तमोप्रधान भक्ती आहे. संगम युगातच पिता येतात आणि ज्ञान सांगतात. जेव्हा बाबा आले आहेत, तर भक्ती संपली पाहिजे, हे जग पण नष्ट झाले पाहिजे. ज्ञान आणि योगाद्वारे सुवर्णकाळाची स्थापणा होत आहे. भक्ती भिन्न आहे. मानव म्हणतात, सुख दु: ख इथेच आहे. सध्या तुम्हा मुलांवरती खूप जबाबदारी आहे. आपल्या कल्याणासाठी योजना करत रहा. हे देखील स्पष्ट केले आहे की, शुद्ध पावन जग शांतीधाम आणि सुखधाम आहे. हे अशांतिधाम, दुधाधाम आहे. पहिली मुख्य गोष्ट म्हणजे योग. जर योग नसेल तर ज्ञानाची लबाडी, त्या पंडिता सारखी आहे. आजकाल तर रिद्धी आणि सिद्धी ही खुप आहे, याचा ज्ञानाशी संबंध नाही. माणूस किती खोट्या प्रकारात अडकला आहे. अपवित्र आहेत. पिता स्वत: म्हणतात, मी अशुद्ध जगात, पतित शरीरा मध्ये आलो आहे. इथे कोणी पवित्र नाही. हे स्वत: ला भगवान म्हणत नाहीत. ते म्हणतात: मीसुद्धा अपवित्र आहे आणि पावन बनले तर, देवदूत बनाल. तुम्हीही ही पवित्र देवदूत व्हाल. तर मूळ गोष्ट म्हणजे आपण शुद्ध पावन कसे व्हावे?आठवण करणे खूप महत्वाचे आहे. ती मुले जी लक्षात ठेवण्यास असक्षम आहेत, ते म्हणतात: आम्ही तर शिवबाबाची मुलं तर आहोत च. आठवणी मध्ये तर आहोतच. परंतू बाबा म्हणतात या सर्व थापा आहेत, आळस आहे. यामध्ये आपल्याला पहाटे उठुन, आत्मा समजण्याचे प्रयत्न करावे लागतील. आत्मिक संवाद करावा लागेल. आत्माच गोष्टी करते. आता तुम्ही आत्म अभिमानी बनतात. ज्याने चांगले काम केले त्याचे कौतुक करतात ना. ती शरीराची स्तुती आहे. ही तर परमपिता परमात्माची ही स्तुती आहे. तुम्हाला हे समजते. ही शिडी दुसऱ्या कोणाच्या बुद्धीमधे राहणार नाही. आम्ही ८४ जन्म कसे घेतो आणि खाली येत राहतो. आता पापाचे भांडे भरले आहे, मग तो शुद्ध कसा होईल? म्हणूनच ते शिव पित्याला बोलवतात. आपण पांडव संप्रदाय आहात. धार्मिक आणि राजकीय पण असावा. बाबा सर्व धर्मा बद्दल सर्व काही सांगतात. दुसरे कोणीही समजावून सांगू शकत नाही. बाकी धर्म स्थापन करणारे आणखी काय करतात, इतरांना ही त्यांच्या नंतर खाली यावे लागते. बाकी ते काही मोक्ष देत नाहीत. शिव पिताच आहेत, जे शेवटी येऊन सर्वांना शुद्ध करुन, परत घेऊन जातात, म्हणूनच त्यांच्या शिवाय इतर कोणाची ही स्तुती होऊ शकत नाही. ब्रह्माची किंवा तुमची स्तुती नाही. बाबा आले नसते तर काय केले असते? आता बाबा तुम्हाला चढत्या कलेकडे घेऊन जातात. हे गातात पण, आपल्या मुळे सर्वाचे चांगले होते. तथापि, त्यांना अर्थ समजत नाही. कौतुक तर खुप करतात.

आता पित्याने स्पष्ट केले आहे की, अकाल, अविनाशी तर आत्मा आहे, हे त्याचे सिंहासन आहे. काल कधीही आत्म्याला खात नाही. आत्म्याला एक शरीर सोडून दुसरी भुमिका करायची आहे. बाकी घेण्यासाठी कोणी काळ येत नाही. तुम्हाला देह सोडताना वाईट वाटत नाही. शरीर सोडून दुसरी भुमिका करायला गेले, रडण्याची काय गरज आहे? आम्ही आत्मा भाऊ - भाऊ आहोत. तुम्हालाही हे आता माहित आहे. गायन आहे, आत्मा परमात्मा बऱ्याच दिवसांपासून दूर राहिले. . . बाबा कोठे येऊन भेटतात. त्यांना हे पण माहिती नाही. तुम्हाला आता सर्वकाही समजावून सांगितले आहे. तुम्ही कधी पासुन ऐकतच आले आहात? ते कोणतीही पुस्तके वगैरे चा आधार घेत नाहीत. फक्त समजुन सांगण्या साठी संदर्भ देतात. पिता सत्य आहेत, तर खरी निर्मिती करतात, सत्य सांगतात. सत्या पासुन विजय, खोट्या गोष्टींतून हार होते. सत्य पिता सत्यखंड स्थापन करतात. तुम्ही रावणा कडुन हारले आहात. हा सर्व खेळ बनलेला आहे. आपणास माहित आहे, की आपले राज्य स्थापन केले जात आहे, नंतर हे सर्व होणार नाहीत. हे सर्व नंतर आले आहेत. हे जगाचे चक्र आपल्या बुद्धीमध्ये ठेवणे खुप सोपे आहे. जे पुरुषार्थी मुलं आहेत, त्यांना फक्त यामुळे आनंद होणार नाही, की आम्ही ज्ञान चांगल्या प्रकारे सांगतो. ज्ञाना सोबतच योग आणि वागणुक पण चांगली पाहिजे. तुम्हाला खूप गोड बनायचे आहे. कोणालाही दु: ख द्यायचे नाही. प्रेमाने समजावून सांगायला हवे. पवित्रते वरती च खूप गोंधळ होतो. तेही नाटकानुसार होते. हे पुर्व नियोजित नाटक आहे. असे नाही भाग्यात असेल तर मिळेल. नाही, तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. देवता सारखे दैवी गुण धारण करायचे आहेत. खारट पाण्या सारखे वागायचे नाही. स्वता:ला तपासले पाहिजे की, आपण उलटी चलन चालून पित्याचा इज्जत तर घालवत नाही. सतगुरूंची निंदा करणणऱ्यांचे पद श्रेष्ठ बनत नाही. हे तर खरे पिता, खरे शिक्षक आहेत. आत्म्याला आता आठवते, बाबा ज्ञानाचे सागर, आनंदाचे सागर आहेत. मी नक्कीच ज्ञान देऊन गेलो आहे म्हणुन तर गायन होते. यांच्या आत्म्यात काही ज्ञान होते का? आत्मा म्हणजे काय, नाटक काय आहे, हे कोणालाही माहिती नाही. मनुष्यांनी च जाणने आवश्यक आहे. जेव्हा रुद्र यज्ञ स्थापन करतात, तर आत्म्यांची पुजा करतात, त्यांची पुजा चांगली की, दैवी शरीराची पूजा चांगली?हे शरीर तर पाच तत्वाचे आहे, म्हणून एका शिवबाबाची उपासना करणे च अव्यभिचारी पूजा आहे. आता आपल्याला फक्त त्यांचेच ऐकायचे आहे, म्हणून असे म्हणतात की, येथे वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका इ. . निंदेच्या गोष्टी ऐकू नका. फक्त माझे ऐका. हे अव्यभिचारी ज्ञान आहे. मुख्य गोष्ट अशी आहे की, जेव्हा शरीराचे भान नष्ट होईल, तेव्हाच आपण थंड होऊ शकाल. जर तुम्ही पित्याच्या आठवणीत राहिल्यास, तुम्ही आपल्या मुखा द्वारे उलट- सुलट बोलणार नाहीत, कुदृष्टी जाणार नाही. पाहत असुन दिसणार नाही. आपला ज्ञानाचा तिसरा डोळा खुला आहे. बाबा येऊन तुम्हाला त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनवले आहे. आता तुम्हाला तीन काळाचे, तिन्ही लोकांचे ज्ञान आहे. अच्छा.

सर्वात गोड, गोड, फार वर्षा नंतर भेटलेल्या मुलां प्रती, मात पिता बापदादाची - प्रेम पुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञानाचे वर्णन करण्या बरोबरच योगात ही रहा. चांगले शिष्टाचार पाहिजेत. तुम्हाला खूप गोड बनावे लागेल. मुखा द्वारे कधीच कडव्या गोष्टी बोलू नका.

२) अंतर्मुख बणुन एकांत मध्ये बसुन स्वत: शी बोला. शुद्ध पवन होण्यासाठी युक्त्या शोधा. सकाळी - सकाळी उठून बाबांना मोठ्या प्रेमाने आठवा.

वरदान:-
विलक्षण, प्रेमळ व मुक्त मनाने, सर्वांच्या हृदयाचे प्रेम प्राप्त करणारे, नि:संकल्प भव.

ज्या मुलांना अनासक्त राहण्याचे व प्रेमळ राहण्याचे खास कौशल्य आहे, म्हणजेच नि:संकल्प राहण्याची विशेषता म्हणजेच वरदान प्राप्त आहे, ते, सर्वांचे प्रिय बनतात, कारण अनसक्त वृत्ती मुळे प्रत्येकाच्या अंतःकरणातील प्रेम प्राप्त होते. ते त्यांच्या स्वत: च्या दृढनिश्चयी शक्तीशाली स्थिती आणि उत्कृष्ट कर्मामुळे ते अनेकांची सेवा करण्याचे निमित्त बनतात, म्हणून स्वत: पण समाधानी राहतात आणि दुसऱ्यांचे पण कल्याण करतात. त्यांना प्रत्येक कार्यात आपोआप यश मिळते.

बोधवाक्य:-
"बाबा" हा शब्द सर्व खजिन्याची चावी आहे या चावीला नेहमीच सांभाळुन ठेवा.