27-05-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोडमुलांनो" निश्चय, ज्ञान आणि योगाने बसतो, साक्षात्काराने नाही. साक्षात्काराची
नाटकांमध्ये नोंद आहे, बाकी त्यांने कोणाचे कल्याण होत नाही"
प्रश्न:-
बाबा कोणती
ताकत दाखवत नाहीत पण बाबांजवळ जादू अवश्य आहे?
उत्तर:-
मनुष्य समजतात ईश्वर तर शक्तिशाली आहे, तो मेलेल्या मनुष्याला पण जिवंत करू शकतो,पण
बाबा म्हणतात ही ताकद मी दाखवत नाही. बाकी कोणी नवविध भक्ति करत असेल तर त्यांना
साक्षात्कार करवतो. हेही नाटकांमध्ये नोंद आहे. साक्षात्कार करण्याची जादू बाबांजवळ
आहे म्हणून काही मुलांना घरी बसल्या ही ब्रह्मा किंवा विष्णूचा साक्षात्कार होतो.
गाणे:-
कोण आले
माझ्या मनाच्या दरवाजातून.....
ओम शांती।
हे मुलांच्या अनुभवाचे गीत आहेत. सत्संग तर खूप आहेत, खास भारतामध्ये तर खूप सत्संग
आहेत, अनेक मत-मतांतरे आहेत, खरे पाहता तो काही सत्संग नाही. सत्संग एकच असतो. बाकी
तुम्ही तिथे कुणा विद्वान,आचार्य, पंडितांचे तोंड पाहता, बुद्धी योग तिकडे जातो.
येथील गोष्ट वेगळी आहे. हा सत्संग एकदाच फक्त संगमयुगावरच असतो. ही तर खूप नविन
गोष्ट आहे, त्या बेहद च्या पित्याला शरीर तर कोणतेच नाही. असे म्हणतात मी तुमचा
निराकार शिवपिता आहे. तुम्ही इतर सत्संगामध्ये गेल्यानंतर शरीराकडे पाहता, ग्रंथ
आठवुन सांगतात, अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, ते तर तुम्ही जन्म जन्मांतर ऐकत आले
आहात. आता आहे नवीन गोष्ट. बुद्धीने आत्मा जाणते, बाबा म्हणतात - हे माझ्या लाडक्या
मुलांनो, हे माझ्या शाळीग्रामा नों! तुम्ही मुले जाणता पाच हजार वर्षापूर्वी या
शरीराद्वारे बाबांनी आम्हाला शिकवले होते. तुमची बुद्धी एकदम दूर निघून जाते. तर
बाबा आले आहेत.बाबा अक्षर किती गोड आहे. तो आहे मात पिता. कुणी ऐकले तर म्हणतील
माहित नाही यांचे मात-पिता कोण आहेत? त्यांना जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हाही ते
विचारात पडतात. कधी ब्रम्हा तर कधी श्रीकृष्णाला पाहतात. विचार करत राहतात की हे
काय आहे? ब्रह्मा चाही घरबसल्या अनेकांना साक्षात्कार होतो. ब्रह्माची तर कोणीही
पूजा करत नाही. कृष्ण इ. तर पूजा करतात. ब्रह्माला तर कोणीही जाणत नाही. प्रजापिता
ब्रह्मा तर आता आला आहे, हा आहे प्रजापिता. बाबा बसून समजावतात की सारी दुनिया पतित
आहे तर नक्कीच, हे ही खूप जन्मांच्या शेवटी पतित आहे. कुणीही पावन नाही म्हणून तर
कुंभमेळा मध्ये, हरिद्वार गंगा सागर च्या मेळाव्यामध्ये जातात, समजतात आंघोळ
केल्याने पवित्र बनू. पण या नद्या काही पतित-पावन थोडीच आहेत. नद्या तर सागरा पासून
तयार होतात. खरे तर तुम्ही ज्ञानगंगा आहात,महत्व तुमचे आहे. तुम्ही ज्ञानगंगा जिकडे
तिकडे उगम पावता, ते लोक मग दाखवतात, बाण मारला आणि गंगा निघाली. बाण मारण्याची तर
गोष्टच नाही. या ज्ञान गंगा तर विदेशामध्ये ही जातात.शिव बाबा म्हणतात मी तर
नाटकाच्या बंधनामध्ये बांधलो आहे.सर्वांची भुमिका ठरलेली आहे. माझीही भुमिका
निश्चित आहे. काही तर समजतात भगवान तर खूप शक्तिशाली आहे, मेलेल्या मनुष्याला जिवंत
करू शकतो. हे सर्व खोटे आहे. मी शिकवण्या साठी येतो. बाकी काय ताकद दाखवणार.
साक्षात्काराची ही जादू आहे.नौधा भक्ति करतात तर मी साक्षात्कार करवतो.जसे कालीचे
रूप दाखवतात, त्यावर तेल वाहतात. आता अशी काली तर नाही, परंतु कालीची नौधा भक्ति,
खूप जण करतात. खरे पाहता काली तर जगदंबा आहे. कालीचे असे रूप तर नाही,परंतु नऊ
प्रकारची भक्ति केल्याने भावनेचे भाडे मिळते. काम चितेवर बसल्याने काळे बनले,आता
ज्ञान चितेवर बसल्याने गोरे बनता.जी काली आता जगदंबा बनली आहे ती साक्षात्कार कशी
करवेल. ती तर आता खूप जन्मांच्या शेवटच्या जन्मात आहे. देवता तर आता नाहीत. तर ते
काय साक्षात्कार करवणार. बाबा समजावतात ही साक्षात्काराची चावी माझ्या हातात आहे.
अल्पकाळासाठी भावना पुर्ण करण्यासाठी साक्षात्कार करवतो. परंतु ते कुणीही मला भेटत
नाहीत. उदाहरण एका काली चे देतात. अशाप्रकारे खूप आहेत हनुमान गणेश इत्यादी. भले
सिख लोकांनी गुरु नानकांची खूप भक्ती केली,तर त्यांनाही साक्षात्कार होतो.
साक्षात्कार मीच करवतो. ते कसे साक्षात्कार करवतील. त्यांच्याकडे साक्षात्कार
करण्याची चावी नाही. हे बाबा म्हणतात मला विनाश आणि स्थापनेचा साक्षात्कारही शिव
बाबांनी करवला, परंतु साक्षात्काराने कोणाचे कल्याण होत नाही. असे तर अनेकांना
साक्षात्कार होत होते. आज ते नाहीत. अनेक मुलं म्हणतात आम्हाला जेव्हा साक्षात्कार
होईल तेव्हाच निश्चय बसेल. परंतु निश्चय साक्षात्काराने होऊ शकत नाही. निश्चय बसतो
ज्ञान आणि योगाने. पाच हजार वर्षापूर्वी ही मी म्हटले होते की, हे साक्षात्कार मी
करवतो. मीरा लाही साक्षात्कार झाला.असे नाही की आत्मा स्वर्गामध्ये गेली,नाही.
बसल्या - बसल्या साक्षात्कार होतो परंतु मला कोणीही प्राप्त करू शकत नाही.बाबा
म्हणतात कोणत्याही गोष्टीवर संशय असेल तर टीचर बहिणींना विचारा. हे तर तुम्ही जाणता
मुलीही नंबर वार आहेत, नद्याही नंबर वार असतात. कुणी तर तलाव आहे,तेथे खूप खराब
घाणेरडे पाणी असते. तिथेही श्रद्धा भावनेने मनुष्य जातात. ती आहे भक्तिमार्गाची
अंधश्रद्धा. कधीही कोणाकडून भक्ती सोडवू नका. जेव्हा ज्ञान समजेल तेव्हा भक्ती
स्वतः सुटेल. बाबाही नारायणाचे भक्त होते, चित्रांमध्ये पाहिले लक्ष्मी दासी बनून
नारायणाचे पाय चोपत आहे, तर हे चित्र अजिबात आवडले नाही. सतयुगामध्ये असे होत नाही.
तर मी एका चित्रकाराला सांगितले की लक्ष्मीला या दासी पणा पासून मुक्त कर.ब्रह्मा
बाबा भक्त होते परंतु ज्ञान त्यांना माहीत नव्हते. भक्त तर सर्वच आहेत. परंतु आम्ही
बाबांची मुलं मालक आहोत. मुलांना ब्रह्मांडाचे ही मालक बनवतात.असे म्हणतात तुम्हाला
राज्य भाग्य देतो. असे बाबा कधी पाहिले? अशा बाबांची खुप आठवण करायची आहे. त्यांना
तुम्ही या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांच्याशी योग लावायचा आहे. आठवण आणि ज्ञान
दोन्ही खूप सहज आहे. बीज आणि झाडाला जाणायचे आहे. तुम्ही त्या निराकारी झाडांमधून
साकारी झाडांमध्ये आले आहात. बाबांनी साक्षात्काराचे रहस्य समजावले आहे. झाडाचे
रहस्यही समजावले आहे. कर्म - अकर्म - विक्रमाची गतीही बाबाने समजावली आहे. पिता,
शिक्षक, गुरु तिघांकडून ही शिकवण मिळत आहे. आता बाबा म्हणतात मी तुम्हाला अशी शिकवण
देतो, असे कर्म शिकवतो ज्यामुळे तुम्ही एकवीस जन्मान साठी सदैव सुखी बणुन जाता.
शिक्षक ज्ञान देतात ना. गुरु लोक सुद्धा पवित्रतेची शिकवण देतात किंवा अनेक कथा
ऐकवतात परंतु धारणा अजिबात होत नाही.येथे तर बाबा म्हणतात अंत मते सो गती होईल.
मनुष्य मरतो तेव्हा सांगितले जाते कि राम राम म्हणा म्हणजे बुद्धी तिकडे जाईल. आता
बाबा म्हणतात तुमचा साकार मधून योग निघाला. आता मी तुम्हाला खूप चांगले कर्म करायला
शिकवतो. श्रीकृष्णाचे चित्र बघा, जुन्या दुनियेला लाथ मारतो आणि नवीन दुनियेमध्ये
येत आहे. तुम्ही ही जुन्या दुनियेला लाथ मारून नवीन दुनियेमध्ये जात आहात. तर तुमची
नरकाकडे लात आहे आणि स्वर्गाकडे तोंड आहे. स्मशानामध्ये गेल्या नंतर मेलेल्या
मनुष्याचे तोंड स्मशानाकडे करतात आणि पाय गावा कडे करतात. तर हे चित्र ही असेच
बनवले आहे. मम्मा बाबा आणि तुम्ही मुले, तुम्हाला मम्मा आणि बाबांचा अनुकरण करायचं
आहे, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या गादीवर बसाल. राजाच्या मुलांना राजकुमार राजकुमारी
म्हणतात ना. तुम्ही ही जाणता आम्ही भविष्यामध्ये राजकुमार राजकुमारी बनतो. असा कुणी
पिता, शिक्षक आणि गुरु असेल जो तुम्हाला असे कर्म करायला शिकवेल! तुम्ही सदा
काळासाठी सुखी बनता. हे तर बाबांचा वरदान, आहे ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. असे
नाही, आमच्यावर त्यांची कृपा आहे. फक्त बोलल्याने काही होणार नाही. तुम्हाला अभ्यास
करावा लागेल. फक्त आशीर्वादाने तुम्ही बनू शकणार नाही.त्यांच्या मतावर चालायचे आहे.
ज्ञान आणि योगाची धारणा करायची आहे. बाबा समजवतात मुखाने राम राम म्हणणे सुद्धा
आवाज करणे आहे. तुम्हाला आवाजाच्या पलीकडे जायचे आहे. शांत राहायचे आहे. खेळही खूप
चांगले चांगले निघत आहेत. अशिक्षितांना बुध्दू म्हटले जाते. बाबा म्हणतात की आता
सर्वांना विसरून तुम्ही बिल्कुल बुध्दू बना. मी तुम्हाला जे मत देत आहे, त्याच्यावर
चालत राहा. परमधाम मध्ये तुम्ही सर्व आत्मे अशरीरी राहता नंतर येथे येऊन शरीर धारण
करता, तेव्हा तुम्हाला जीवात्मा असे म्हटले जाते.आत्मा म्हणते मी एक शरीर सोडून
दुसरे घेते. तर बाबा म्हणतात मी तुम्हाला अतिशय चांगले कर्म करायला शिकवतो. शिक्षक
शिकवतात, यामध्ये शक्ती ची काय गरज आहे.साक्षात्कार करवतात, याला जादु असे म्हणतात.
मनुष्याला देवता बनवणे, अशी जादूगरी कोणी करू शकत नाही.बाबा सौदागर ही आहे जुने
घेऊन नवीन देतो.याला जुने लोखंडाचे भांडे म्हटले जाते. याचे काहीही मूल्य नाही. आज
काल तर तांब्याला ही पैसे भेटत नाहीत. तिथे तर सोन्याचे नाणे असतात. आश्चर्य आहे
ना. कशापासून काय झाले आहे!बाबा म्हणतात मी तुम्हाला नंबर एक चे कर्म शिकवतो.
मनमनाभव बना. नंतर आहे ज्ञान ज्याद्वारे तुम्ही स्वर्गाचे राजकुमार बनाल. आता देवता
धर्म जो लोप पावला आहे, तो पुन्हा स्थापन होत आहे. मनुष्यांना तुमच्या नवीन गोष्टी
ऐकून खूप आश्चर्य वाटते, म्हणतात की स्त्री आणि पुरुष दोघेही एकत्र राहून कसे
पवित्र राहू शकतात- हे कसे शक्य आहे! बाबा तर म्हणतात खुशाल एकत्र रहा, नाहीतर कसे
समजणार. दोघां मध्ये ज्ञानाची तलवार ठेवायची आहे, एवढी बहादुरी दाखवायची आहे.
परीक्षा तर द्यावीच लागणार आहे. मनुष्यांना या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटते कारण की
ग्रंथा मध्ये अशा काही गोष्टी दिलेल्या नाहीत. इथे तर प्रत्यक्षात मेहनत करावी
लागते. गंधर्व विवाह ची गोष्ट इथलीच आहे. आता तुम्ही पवित्र बनत आहात. तर बाबा
म्हणतात बहादुरी दाखवा. संन्याशा समोरही उदाहरण दाखवायचे आहे. समर्थ बाबाच सर्व
दुनियेला पावन बनवत आहेत. बाबा म्हणतात खुशाल एकत्र राहा परंतु ब्रह्मचर्याचे पालन
करा. या सर्व युक्ती आहेत. खूप जबरदस्त प्राप्ती आहे, फक्त एक जन्म बाबांच्या
श्रीमता वर पवित्र राहायचं आहे. तुम्ही ज्ञान आणि योगाने 21 जन्मासाठी निरोगी बनता,
यामध्ये मेहनत आहे. तुम्ही आहात शक्ती सेना. मायेवर विजय मिळवून जगतजीत बनत आहात.
सगळे थोडीच बनणार आहेत. जी मुले पुरुषार्थ करतील तीच उंच पद प्राप्त करतील. तुम्ही
भारताला पवित्र बनवून नंतर भारतावरच राज्य करता. युद्ध करून कधीही सृष्टीची बादशाही
मिळू शकत नाही. हे आश्चर्य आहे ना. यावेळी सर्वजण एकमेकांशी भांडून नष्ट होऊन जातील
आणि लोणी भारताला मिळेल, मिळवून देणाऱ्या आहेत वंदेमातरम. जास्त संख्या मातांची
आहे. आता बाबा म्हणतात जनम जन्मांतर तुम्ही गुरु करत आले, शास्त्र वाचत आले. आता मी
तुम्हाला समजावत आहे - स्वतःला विचारा, बरोबर काय आहे? सतयुग आहे सत्य दुनिया. माया
असत्य बनवते. आता भारतवासी,अधर्मी बनले आहेत. धर्म नसल्यामुळे शक्ती राहिलेली नाही.
अधर्मी, असत्य, कायद्याचे उल्लंघन करणारे, गरीब बनले आहेत. बेहद चा पिता आहे म्हणून
बेहद च्या गोष्टी समजावून सांगत आहेत,म्हणतात की पुन्हा एकदा तुम्हाला आत्मिक
शक्तिशाली बनवत आहे. स्वर्ग बनवणे तर शक्तिशाली चे काम आहे, परंतु गुप्त आहे. गुप्त
योद्धे आहेत. बाबांचे मुलांवर खूप प्रेम आहे,तेच मत देतात. पित्याचे मत, शिक्षकाचे
मत, गुरूचे मत, सोनाराचे मत, धोबयाचे मत - यामध्ये सर्वांची मतं येतात. अच्छा.
गोड - गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात - पिता बाप - दादांची
प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. या एका
शेवटच्या जन्मांमध्ये बाबांच्या श्री मतावर चालून घर ग्रहस्थ मध्ये राहत पवित्र
राहायचे आहे.यामध्ये बहादुरी दाखवायची आहे.
2. श्री मतावर सदैव
श्रेष्ठ कर्म करायचे आहेत. आवाजाच्या पलीकडे जायचे आहे, जे काही वाचले किंवा ऐकले
आहे ते सर्व विसरून बाबांची आठवण करायची आहे.
वरदान:-
शुभ चिंतना
द्वारे ज्ञानाच्या सागरामध्ये सामावणारे अतिंद्रीय सुखाचे अनुभवी भव.
ज्याप्रमाणे सागरा
मध्ये राहणारे जीव जंतू सागरामध्ये सामावलेले असतात,बाहेर पडण्याची त्यांची इच्छा
नसते, माशेही पाण्यामध्ये राहतात, सागर आणि पाणीच त्याचा संसार आहे. अशाप्रकारे
तुम्ही मुलेही शुभचिंतन ना द्वारे ज्ञानसागर बाबांमध्ये सदैव सामावलेले रहा,
जोपर्यंत सागरामध्ये सामावून घेण्याचा अनुभव केला नाही तोपर्यंत अतींद्रिय सुखाच्या
झोपाळ्या मध्ये झोका घेण्याचा, सदैव हर्षित राहण्याचा अनुभव करू शकणार नाही. यासाठी
स्वतःला एकांतवासी बनवा अर्थात सर्व आकर्षणाच्या प्रकंपणा पासून अंतर्मुखी बना.
बोधवाक्य:-
आपल्या
चेहऱ्याला असा चालता-फिरता संग्राहलय बनवा ज्यामध्ये बाबा बिंदू दिसतील.