25-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबाच्या आठवणीमध्ये राहण्याचे कष्ट करा, तर पावन बनत जाल, आता तुम्हाला बाबा शिकवत आहेत, परत सोबत घेऊन जातील"

प्रश्न:-
कोणता संदेश तुम्ही, सर्वांना द्यायचा आहे?

उत्तर:-
आता घरी जायचे आहे, म्हणुन पावन बना. पतित-पावन बाबा म्हणतात, माझी आठवण करा, तर पावन बनत जाल, हा संदेश सर्वांना द्या. बाबांनी आपल्या परिचय मुलांना दिला आहे. आता तुमचे कर्तव्य आहे, बाबांना प्रसिद्ध करणे. असे म्हटले जाते, मुलगा वडिलांना प्रत्यक्ष करतो.

गाणे:-
मरायचे तुझ्या गल्लीमध्ये, जगायचे पण तुझ्या गल्ली मध्ये…

ओम शांती।
मुलांनी गीताचा अर्थ ऐकला की, बाबा आम्ही आपल्या रुद्रमाळे मध्ये गुंफले जाऊ. हे गीत भक्ती मार्गातील आहे. जी पण दुनिया मध्ये सामग्री आहे, जप, तप, पूजा-पाठ ही सर्व भक्ती मार्गातील आहे. भक्ती रावण राज्य आहे आणि ज्ञान रामराज्य आहे. ज्ञानाला नाँलेज किंवा शिक्षण म्हटले जाते. भक्तीला शिक्षण म्हटले जात नाही, त्यामध्ये कोणता मुख्य उद्देश नसतो की, आम्ही काय बनणार आहोत?भक्ती काही शिक्षण नाही. राजयोग शिकणे, हा अभ्यास आहे. शिक्षण एकाच जागेवरती, शाळेमध्ये दिले जाते. भक्तीमध्ये तर अनेक ठिकाणी धक्के खात राहतात. शिक्षण म्हणजे अभ्यास, त्याला पूर्ण रीतीने शिकायला पाहिजे. मुलं जाणतात, आम्ही विद्यार्थी आहोत. अनेक आहेत जे स्वतःला विद्यार्थी समजत नाहीत, कारण शिकत नाहीत. न पित्याला पिता समजतात, शिवबाबांना सदगती दाता समजतात. असे पण आहेत, ज्यांच्या बुद्धीमध्ये काहीच बसत नाही. ही राजधानी स्थापन होत आहे ना, यामध्ये सर्व प्रकारचे पाहिजेत. बाबा आले आहेत, पतीतां ना पावन बनवण्यासाठी. बाबांनाच बोलवतात, पतित-पावन या. आता बाबा म्हणतात तुम्ही पावन बना, माझी आठवण करा. प्रत्येकाला बाबांचा संदेश द्यायचा आहे. यावेळेत भारत वेश्यालय आहे, अगोदर भारत शिवालय होता. आता दोन्ही मुकुट नाहीत. हे पण तुम्ही मुलं जाणता, आता पतित-पावन बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर, तुम्ही पतीता पासून पावन बनाल. आठवण करण्यामध्ये च कष्ट आहेत. खूप कमी मुलं आहेत, जे आठवणी मध्ये राहतात. भक्तमाळ पण थोड्यांची आहे ना. धना भक्त, नारद, मीरा इत्यादी भक्तांचे नाव प्रसिद्ध आहेत. हे ज्ञाना पण, सर्वच घेणार नाहीत. कल्पा पूर्वी ज्यांनी हे ज्ञान घेतले होते, तेच घेतील. असे म्हणतात बाबा आम्ही कल्पा पूर्वी आपणास भेटलो होतो, शिक्षण घेण्यासाठी किंवा आठवणी ची यात्रा करण्यासाठी. आता बाबा आले आहेत, तुम्हा मुलांना घेऊन जाण्यासाठी. बाबा समजवतात, तुमची आत्मा पतित आहे, म्हणून बोलवतात, येऊन पावन बनवा. आता माझी आठवण करा आणि पवित्र बना. बाबा शिकवतात आणि सोबत पण घेऊन जातात. मुलांना खूप खुश राहायला पाहिजे. स्वयम् भगवान शिकवत आहेत. कृष्णा ला पिता म्हणू शकत नाहीत. कृष्णाला पतित-पावन पण म्हणत नाहीत. हे कोणालाही माहिती नाही की, पिता कोणाला म्हटले जाते आणि परत ते ज्ञान कसे देतात? हे पण तुम्ही जाणतात, बाबा आपला परिचय मुलांना देतात. नव नवीन मुलांना बाबा भेटत नाहीत. बाबा म्हणतात सन शोज फादर, मुलंच वडिलांना प्रसिद्ध करतात. बाबांना कोणाशी भेटण्याचे किंवा गोष्टी करायच्या नाहीत. जर इतके वर्ष बाबा नव नवीन मुलांशी भेटत होते, याची पण अविनाशी नाटकामध्ये नोंद होती. अनेक मनुष्य येत होते. मिलिट्री वाल्यांना पण बाबांनी समजावले आहे, त्यांचा पण उद्धार करायचा आहे. त्यांना त्यांची नौकरी तर करायची आहे ना, नाहीतर दुश्मन लढाई करतील. फक्त बाबांची आठवण करायची आहे. असे गीतेमध्ये लिहले आहे, जे युद्धाच्या मैदाना मध्ये शरीर सोडतील, ते स्वर्गा मध्ये जातील, परंतु असेल तर जाऊ शकत नाहीत. स्वर्ग स्थापन करणारे, जेव्हा येतील तेव्हाच जातील. स्वर्ग कसा आहे, हे कोणीही जाणत नाहीत. आता तुम्ही मुलं पाच विकारा सोबत युद्ध करतात, बाबा म्हणतात अशरीरी भव. स्वतःला आत्मा निश्चय करून माझी आठवण करा. दुसरे कोणी असे म्हणू शकत नाही. सर्वशक्तिमान एक बाबां शिवाय दुसऱ्या कोणाला म्हणू शकत नाही. ब्रह्मा विष्णू शंकराला पण म्हणू शकत नाही. सर्व शक्तिवान एक पिताच आहेत. विश्व अधिकारी, ज्ञानाचे सागर एका बाबांना च म्हटले जाते. हे जे साधुसंत इत्यादी आहेत, ते ग्रंथाची अधिकारी आहेत. भक्तीचे पण अधिकारी नाहीत, ग्रंथाचे अधिकारी आहेत. त्यांचे सर्व ग्रंथा वरती आधारित आहे. ते समजतात भक्तीचे फळ भगवंताला द्यायचे आहे. भक्ती कधी सुरू केली, कधी पूर्ण होईल, हे पण माहिती नाही. भक्त समजतात भक्तीमुळे भगवान खुश होतील. भगवंताला भेटण्याची इच्छा राहते परंतु ते कोणत्या भक्तीमुळे खूश होतील, जरूर त्यांचीच भक्ती कराल तेव्हाच खुश होतील ना. तुम्ही शंकराची भक्ती कराल तर, शिव पिता कसे खुश होतील. काय हनुमानाची भक्ती कराल तर, शिव पिता खुश होतील. साक्षात्कार होतो, बाकी काहीच मिळत नाही. बाबा म्हणतात, मी जरी साक्षात्कार करवतो परंतु असे नाही की मला येवुन भेटतील, नाही. तुम्ही मुलंच भेटतात. भगत भक्ती करतात, भगवंताला भेटण्यासाठी. असे म्हणतात माहित नाही, भगवान कोणत्या रूपामध्ये भेटतील, याला अंधश्रद्धा म्हटले जाते. आता तुम्हाला बाबा भेटले आहेत. तुम्ही जाणतात, ते निराकार बाबा जेव्हा शरीर धारण करतील तेव्हाच आपला परिचय देतील कि, मी तुमचा पिता आहे. ५००० वर्षा अगोदर पण तुम्हाला राज्य भाग्य दिले होते, परत तुम्हाला चौऱ्यांशी जन्म घ्यावे लागले. हे सृष्टी चक्र फिरत राहते. द्वापर युगाच्या नंतरच दुसरे धर्म येतात, आपापला धर्म येऊन स्थापन करतात. यामध्ये कोणता मोठे पणा नाही. मोठेपणा कोणाचाच नाही. ब्रह्माचा मोठेपणा तेव्हाच आहे, जेव्हा शिवबाबा प्रवेश करतात, नाहीतर हे धंदा करत होते. त्यांना थोडेच माहिती होते, माझ्या मध्ये भगवान येतील. बाबांनी प्रवेश करून समजावले कि, कसे मी यांच्या मध्ये प्रवेश केला. कसे यांना दाखवले की, जे माझे आहे, ते तुझेच आहे आणि जे तुझे आहे ते माझे आहे. पहा. माझे मदतगार बनतात, आपल्याच तन-मन-धनाने, तर त्या मोबदल्यात स्वर्गाची बादशाही मिळते. बाबा म्हणतात, मी साधारण तना मध्ये प्रवेश करतो. तुम्ही आपल्या जन्माला जाणत नव्हते, मी कधी येतो, कसे येतो हे कोणालाच माहिती नाही. आता तुम्ही पाहतात, मी साधारण तना मध्ये आलो आहे, यांच्याद्वारे तुम्हाला ज्ञान आणि योग शिकवत आहेत. ज्ञान तर खूप सहज आहे. नरकाचे फाटक बंद होऊन स्वर्गाचे फाटक कसे उघडते, हे पण तुम्ही जाणतात. रावणाचे राज्य सुरू होते म्हणजे नरकाचे द्वार उघडते. नवीन आणि जुन्या दूनियेला अर्ध्या अर्ध्या मध्ये ठेवले जाते. आता बाबा म्हणतात मी तुम्हा मुलांना पावन होण्याची युक्ती सांगतो. बाबांची आठवण करा, तर जन्म जन्मांतरचे पाप नष्ट होतील. या जन्मातील पाप पण सांगायचे आहेत. आठवणी मध्ये तर राहतात ना, किती पाप केले आहेत? किती दान पुण्य केले आहे? यांना(ब्रह्माना) आपल्या लहान पणा पासून माहिती आहे. कृष्णाचे नाव आहे सावळा आणि गोरा, श्याम सुंदर म्हणतात, याचा अर्थ पण कोणाच्या बुध्दी मध्ये येत नाही. नाव शामसुंदर आहे, म्हणुन चित्र पण काळे बनवले आहेत. रघुनाथ च्या मंदिरामध्ये पहा, तेथे पण काळेच, हनुमान च्या मंदिरा मध्ये पण पहा, सर्वांना काळे बनवतात. ही पतित जुनी दुनिया आहे ना. आता तुम्हा मुलांना शुद्ध काळजी पाहिजे, आम्ही सावळ्या पासुन सुंदर कसे बनायचे?त्यासाठी तुम्ही बाबांच्या आठवणी मध्ये राहतात. बाबा म्हणतात हा अंतिम जन्म आहे, माझी आठवण करा तर पाप भस्म होतील. बाबा घेऊन जाण्या साठी आले आहेत, हे तुम्ही जाणता ना?तर जरुर येथेच शरीर सोडतील. शरीरा सहित थोडंच घेऊन जातील. पतित आत्मे तर जाऊ शकत नाहीत. जरूर बाबा पावन बनवण्याची युक्ती सांगतील. तर म्हणतात, माझी आठवण करा, तर विकर्म नाश होतील. भक्ती मार्गात अंधश्रद्धा आहे. शिव काशी म्हणतात, परत असे पण म्हणतात, शिवानी सृष्टीवर गंगा आणली, भागीरथ मधुन गंगा निघाली. आता डोक्यातून पाणी कसे येऊ शकेल? भागीरथ डोंगरावर बसला आहे काय?ज्याच्या जटा मधुन गंगा येईल. सागरा पासून ढग बनतात, तर पाऊस पडतो, ज्यामुळे सर्व दुनिया मध्ये पाणी होते. नद्या तर सर्व देशांमध्ये आहेत. डोंगरा वरती बर्फ जमतो, ते पण पाणी येत राहते. डोंगरां मध्ये, गुफे मध्ये जे पाणी राहते, ते परत विहिरी मध्ये येत राहते. ते पण पावसाच्या आधारा वरच आहे. पाऊस पडला नाही तर, विहरी पण आटतात. असे म्हणतात, बाबा आम्हाला पावन बनवून स्वर्गा मध्ये घेऊन चला. आमची इच्छा आहे, स्वर्ग कृष्णपुरी मध्ये जाण्याची. विष्णुपुरी बद्दल तर कोणालाच माहिती नाही. कृष्णाचे भक्त म्हणतात, जेथे पहा तेथे कृष्णच कृष्ण आहे. अरे तुम्ही म्हणता परमात्मा सर्वव्यापी आहे, तर असे का म्हणत नाही, जिकडे पाहावे तिकडे परमात्माच परमात्मा आहे. परमात्मा चे भक्त परत असे म्हणतात, सर्व त्यांचेच रूप आहेत. तेच सर्व लिला करतात. भगवंताने हे रूप धारण केले आहे, ते लीला करण्या साठीच. तर जरूर आत्ता पण लिला करतील ना. परमात्मा ची दुनिया, स्वर्गामध्ये पहा, तेथे कोणत्याच खराब गोष्टी नसतात, अस्वच्छता नसते. येथे तर सगळीकडे अस्वच्छता च अस्वच्छता आहे. असे ही म्हणतात परमात्मा सर्वव्यापी आहे. परमात्माच सुख देतात. मुलांचा जन्म झाला सुख होते, मृत्यू झाला तर दुःख होते. अरे भगवंताने तुम्हाला जी गोष्ट दिली ती परत घेतली, यामध्ये तुम्हाला रडण्याची काय आवश्यकता आहे?सतयुगा मध्ये दुःखाचे नाव नसते. मोह जीत राजाचे उदाहरण पण दिले आहे ना. हे सर्व खोटे उदाहरण आहेत, त्यामध्ये काहीच सार नाही. सतयुगा मध्ये ऋषी मुनी इत्यादी नसतात, आणि इथे पण अशा गोष्टी होऊ शकत नाही. असा कोणी मोहजीत राजा पण होऊ शकत नाही. भगवानुवाच यादव, कौरव, पांडव काय करत आहेत? तुमचा योग बाबांशी आहे. बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलां द्वारे भारताला स्वर्ग बनवतो. आता जे पवित्र बनतात, ते पवित्र दुनियाचे मालक बनतात. कोणी पण भेटतात तर बोला, भगवान म्हणतात माझीच आठवण करा, माझ्याशी प्रेम करा, दुसऱ्या कोणाची आठवण करू नका. ही अव्यभिचारी आठवण आहे. येथे काही जल इत्यादी अर्पण करायचे नाही. भक्ती मार्गामध्ये हा धंदा करत, आठवण करत होते ना. गुरु लोक पण म्हणतात, माझी आठवण करा, आपल्या पतीची ही आठवण करू नका. तुम्हा मुलांना खूप गोष्टी समजवल्या जातात. मुख्य गोष्ट आहे, सर्वांना संदेश द्या. बाबा म्हणतात माझी आठवण करा, बाबा म्हणजेच, शिव भगवान. भगवान निराकार आहेत, कृष्णाला सर्व भगवान मनात नाहीत. कृष्ण तर मुलगा आहे. शिवबाबा यांच्यात आले नसते तर तुम्ही पण नसते. शिव बाबांनी यांच्या द्वारे तुम्हाला दत्तक घेतले आहे, आपले बनवले आहे. हे माता पण आहेत, तर पिता पण आहेत. माता तर साकार मध्ये पाहिजे ना. ते तर पिता आहेत. तर अशा गोष्टींना चांगल्या प्रकारे धारण करा. तुम्हा मुलांना कधीच कोणत्या गोष्टींमध्ये संशय येऊ द्यायचं नाही. राजयोग च्या अभ्यासा ला कधीच सोडायचे नाही. काही मुलं संग दोष मध्ये येऊन, रुसून आपलीच पाठशाला सुरू करतात. जर आपसा मध्ये लढून, भांडण करून आपली पाठशाला सुरू केली तर, तो मूर्खपणा ठरतो. ते रुसतात तर पाठशाला सुरु करण्याचे लायक नाहीत. तसा देह अभिमान चालणार नाही, कारण बुद्धी मध्ये दुश्मनी आहे. त्याचीच आठवण येईल, काहीच समजावू शकणार नाहीत. असे पण होते, ज्यांना ज्ञान देतात ते पुढे जातात आणि स्वतः पाठीमागे राहतात. स्वतः पण समजतात, माझ्यापेक्षा त्यांची अवस्था चांगली आहे. शिकणारे राजा बनतात आणि शिकवणारे दास-दासी बनतात, असे पण आहेत. पुरुषार्थ कडून बाबांच्या गळ्याचा हार बनायचे आहे. बाबा अखेर च्या श्वासा पर्यंत, मी आपलाच बनेल. बाबांच्या आठवणी द्वारेच विषय वैतरणी नदी मधून नाव किनाऱ्याला लागेल. अच्छा.

गोड गोड, फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कधी कोणत्याच गोष्टींमध्ये संभ्रमित व्हायचे नाही. आपसा मध्ये रुसून राजयोगाचे शिक्षण सोडायचे नाही. दुश्मनी बनवणे पण देहाभिमान आहे. संगदोषा पासुन आपला खूप सांभाळ करायचा आहे. पावन बनायचे आहे. आपल्या चलनाद्वारे बाबांचे नाव प्रसिद्ध करायचे आहे.

२) प्रीत बुध्दी बणुन एका बाबांच्या व्यभिचारी आठवणी मध्ये राहायचे आहे. तन मन धना द्वारे बाबांच्या कार्यामध्ये मदतगार बनायचे आहे.

वरदान:-
स्वतःचे स्वतः परिवर्तन करून विश्वाचे आधार मूर्त बनणारे, श्रेष्ठ पदाच्या अधिकारी भव.

श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी, बाप दादां हेच सांगतात की, मुलांनो स्वतःला परिवर्तन करा. स्वतःला बदलण्याचा ऐवजी परिस्थिती किंवा दुसऱ्यांना बदलण्या साठी विचार करतात किंवा संकल्प येतो की, हे साधन मिळाले, सहयोग मिळाला किंवा आधार मिळाला, तर परिवर्तन होऊ. असे कोणत्याही आधारावरती परिवर्तन होणाऱ्यांचे भाग्य पण आधारा वरतीच राहील. कारण जेवढ्यांचा आधार घेतील, तेवढे जमाच्या खात्यां मध्ये विभागले जाईल, म्हणून नेहमी हेच लक्ष ठेवा की स्वतःला परिवर्तन करायचे आहे. मी स्वतः विश्वाचा आधार मूर्त आहे.

बोधवाक्य:-
संघटने मध्ये उमंग उत्साह आणि श्रेष्ठ संकल्प द्वारे सफलता मिळते.