07.05.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन
"गोड मुलांनो, श्रीमतच तुम्हाला श्रेष्ट बनवणारी आहे, म्हणून श्रीमताला विसरू नका, आपल्या मन मताला सोडून एका बाबांच्या मतावर चाला" प्रश्न:- पुण्यात्मा बनवण्याची युक्ती कोणती आहे? उत्तर:- पुण्यात्मा बनायचे आहे तर खऱ्या हृदयापासून प्रेमाने एका बाबांची आठवण करा. (२) कर्मेंद्रिया द्वारे कोणतेही वाईट कर्म करू नका, सर्वांना रस्ता दाखवा, आपल्या मनाला विचारा, हे पुण्य जमा करण्याचे काम किती करतो? (३)स्वतःला तपासा, असे कोणते कर्म व्हायला नको ज्याची शंभर पटीने सजा खावी लागेल. तर हे तपासल्या मुळे पुण्यात्मा बनाल. ओम शांती:- आत्मिक पिता सन्मुख मुलांना समजवतात. हे तर मुलांना माहिती आहे कि, आता आम्ही शिवबाबाच्या मतावरती चालत आहोत. त्यांचे उच्च मत आहे. दुनिया हे पण जाणत नाही, बाबा कसे मुलांना श्रेष्ठ बनवण्यासाठी श्रेष्ठ मत देत आहेत. या रावण राज्यांमध्ये कोणतेही मनुष्यमात्र, मनुष्यांना श्रेष्ठ मत देऊ शकत नाहीत. तुम्ही आत्ता ईश्वरीर मता नुसार चालत आहात. या वेळेत, तुम्हा मुलांना पतित पासून पावन बनवण्यासाठी, ईश्वरीय मत मिळत आहे. आता तुम्हाला माहिती झाले आहे की, आम्ही तर विश्वाचे मालक होतो. हे ब्रह्मा जे मालक होते, त्यांना पण माहिती नव्हते. विश्वाचे मालक परत एकदम पतित बनतात. हा खेळ खूप चांगल्या रीतीने बुद्धी द्वारा समजण्याचा आहे. सत्य-असत्य काय आहे, यामध्ये बुद्धीची लढाई आहे. सर्व दुनिया चुकीची आहे, एकच बरोबर आणि खरे बोलणारे आहेत. ते तुम्हाला सत्य खंडाचे मालक बनवतात, तर त्यांच्या मतावर चालायला पाहिजे. आपल्या मतावर चालण्यामुळे धोका खाल परंतु ते गुप्त आहेत. ते आहेत पण निराकार. अनेक मुलं गफलत करतात, असे समजतात, ही तर दादाची मत आहे. माया श्रेष्ठ मत घेऊ देत नाही. श्रीमता वर चालायला पाहिजे ना. बाबा तुम्ही जे म्हणाल, ते आम्ही जरुर मानू परंतू काही जण मानत नाहीत. क्रमानुसार पुरुषार्थ प्रमाणे श्रीमतावर चालतात, बाकी तर आपलीच मत चालवतात. बाबा आले आहेत श्रेष्ठ मत देण्यासाठी. अशा बाबांना सारखेच विसरतात. माया श्रेष्ठ मत घेऊ देत नाही. श्रीमत तर खूप सहज आहे ना. दुनिया मध्ये कोणालाही ही समज नाही की, आम्ही तर तमोप्रधान आहोत. माझे मत प्रसिद्ध आहे, श्रीमद भगवतगिता. भगवान आता म्हणतात, मी पाच हजार वर्षानंतर येऊन, भारताला श्रीमत देऊन श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवतो. बाबा तर सावधान करतात, मुलं श्रीमता वर चालत नाहीत. बाबा तर रोज रोज समजावत राहतात, मुलांनो श्रीमता वर चालणे विसरू नका. या ब्रह्माची तर गोष्टच नाही. शिवपित्याचे ज्ञान समजा. तेच यांच्याद्वारे मत देतात, तेच समजवतात. खान पान खात नाहीत, ते म्हणतात मी तर अभोक्ता आहे. तुम्हा मुलांना श्रीमत देतो. क्रमांक एकची मत आहे, माझी आठवण करा, कोणतेही विकर्म करू नका. स्वतःच्या मनाला विचारा किती पाप केले आहेत? हे तर जाणतात सर्वांच्या, पापाचा घडा भरलेला आहे. या वेळेत सर्व चूकीच्या रस्त्यावर चालत आहेत. तुम्हाला आत्ता बाबा द्वारे चांगला रस्ता मिळाला आहे. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे. गीतेमध्ये जे ज्ञान असायला पाहिजे, ते नाही. ते काही बाबांनी बनवलेली नाही. ही पण भक्ती मार्गामध्ये नोंद आहे. भगवान येऊन भक्तीचे फळ देतील असे म्हणतात. मुलांना समजवले आहे, ज्ञानाद्वारे सदगती होते. सदगती पण सर्वांची होते, तर दुर्गती पण सर्वांची होते. ही तर दुनियाच तमोप्रधान आहे. सतोप्रधान कोणीच नाहीत. पुनर्जन्म घेत घेत अंतकाळ आलेला आहे. आता मृत्यु तर सर्वांच्या डोक्यावर उभा आहे. भारताचीच गोष्ट आहे. भगवतगीता देवी देवधर्माचा ग्रंथ आहे. तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या धर्मांमध्ये गेल्यामुळे काय फायदा होईल? प्रत्येक जण आपापले कुराण, बायबल, इत्यादी शिकत राहतात. आपल्या धर्माला जाणतात. फक्त भारतवासीच इतर धर्मा मध्ये गेले आहेत, बाकी सर्व आपापल्या धर्मांमध्ये पक्के आहेत. प्रत्येक धर्मातील लोकांचा चेहरा वेग वेगळा आहे. बाबा आठवण करून देतात मुलांनो, तुम्ही आपल्या देवी-देवता धर्माला विसरला आहात. तुम्ही स्वर्गाचे देवता होते, हम सो चा अर्थ, आम्हीच देवता होतो परत ब्राह्मण बनलो, हे रहस्य भारतवासींना बाबांनीच ऐकवले आहे, बाकी आम्ही आत्माच-परमात्मा नाही. या गोष्टी तर भक्तिमार्ग मध्ये गुरु लोकांनी बनवल्या आहेत. गुरु पण करोडो आहेत. स्त्रीला म्हणतात पतीच तुमचा गुरु ईश्वर आहे. जेव्हा पतीच ईश्वर आहे, परत हे भगवान, हे राम का म्हणतात? मनुष्याची बुद्धी तर बिलकुलच पत्थर म्हणजे दगडा सारखी बनली आहे. हे स्वतः म्हणतात मी पण असाच होतो. कुठे वैकुंठाचे मालक श्रीकृष्ण, कुठे परत त्यांना गावातील मुलगा म्हटले आहे. श्यामसुंदर म्हणतात ना. त्याचा अर्थ पण थोडंच समजतात. आता बाबांनी तुम्हाला समजवले आहे, जे नंबर एक सुंदर तेच शेवटी तमोप्रधान शाम बनले आहेत. तुम्ही समजले आहे, आम्ही सुंदर होतो, परत ८४ चे चक्र लावले. आत्ता शाम पासून सुंदर बनवण्यासाठी बाबा एकच औषध देतात, माझी आठवण करा, तर तुमची आत्मा पतित पासून पावन बनेल. तुमचे जन्मानंतरचे पाप नष्ट होतील. तुम्ही जाणतात जेव्हा रावण आला, द्वापर युग सुरु झाले, तुम्ही उतरत उतरत पापात्मा बनले. ही पाप आत्म्याची दुनिया आहे, एक पण मनुष्य सुंदर नाही. बाबां शिवाय सुंदर कोणी बनवू शकत नाही. तुम्ही सुंदर स्वर्गवासी बनण्यासाठी आले आहात. आता नर्कवासी शाम आहात, कारण कामचिते वरती चढून काळे बनले आहात. बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे, या विकारावर ती विजय प्राप्त करतील तेच जगतजीत बनतील. काम विकार क्रमांक एकचा आहे. त्यांनाच पतित म्हटले जाते. क्रोधीला पतित म्हटले जात नाही. पतीता पासून पावन बनवण्यासाठी शिवबांना बोलवतात, तर आत्ता बाबा आले आहेत, ते म्हणतात या अंतिम जन्मात पावन बना. जसे रात्रीच्या नंतर दिवस, दिवसाच्या नंतर रात्र होते, तसेच संगमयुगाच्या नंतर सतयुग येते. चक्र फिरत राहते. बाकी आकाशा मध्ये किंवा पातळा मध्ये दुनिया नाही. सृष्टी तर हीच आहे, सतयुग त्रेता. . . येथेच होते. झाड पण एकच आहे, दुसरे कोणते होऊ शकत नाही. काही लोक समजतात, अनेक दुनिया आहेत, त्या सर्व थापा आहेत. बाबा म्हणतात या सर्व भक्ती मार्गातील गोष्टी आहेत. आत्ता बाबा सत्य गोष्टी ऐकवतात, स्वतःला पहा, आम्ही किती श्रीमता वर चालुन, सतोप्रधान अर्थात पुण्यात्मा बनत आहोत. सतोप्रधानला पुण्यात्मा, तमोप्रधानला पापात्मा म्हटले जाते. विकारांमध्ये जाणे तर पाप आहे ना. बाबा म्हणतात आत्ता पवित्र बना. माझे बनले आहात तर माझ्या मतानुसार चालायचे आहे. मुख्य गोष्ट आहे, कोणतेही पाप करू नका. विकारां मध्ये जाणे नंबर एक पाप कर्म आहे, त्यानंतर अनेक पाप करत करत राहतात. अनेकजण चोरी, लुट, फसवणे इत्यादी करत राहतात. अनेकांना सरकार पकडते. आता बाबा तुम्हा मुलांना म्हणतात, स्वतःला विचारा आम्ही कोणते पाप तर करत नाही ना? असे समजू नका, आम्ही चोरी केली, भ्रष्टाचार केला, हे बाबा तर जानी-जाननहार आहेत, ते सर्व जाणतात. नाही, जानी-जाननहारचा अर्थ हा नाही. अच्छा कोणी चोरी केली, बाबांनी जाणले परत काय? चोरी केली त्याचा दंड तर शंभर पटीने होतोच. खूप सजा खातील आणि पद पण भ्रष्ट होईल. बाबा समजवतात, असे काम केले तर दंड भोगावा लागेल. कोण ईश्ववराचा मुलगा बणुन परत चोरी करतात, शिवबाबा ज्यांच्याद्वारे एवढा वारसा मिळतो, त्यांच्या भंडाऱ्या द्वारे चोरी करणे, हे तर खूप मोठे पाप आहे. कोणा कोणा मध्ये चोरीची सवय असते, तर त्यांना जेल पक्षी म्हटले जाते. हे ईश्ववराचे घर आहे ना. सर्व काही ईश्वराचे आहे ना. ईश्वराच्या घरामध्ये येतात, बाबा पासून वारसा वारसा घेण्यासाठी परंतु काही काहींना सवय होते, त्याची परत शंभर पटीने सजा मिळते. सजा पण खूप मिळेल आणि परत जन्म जन्मातंर खराब घराण्यामध्ये जन्म घ्यावा लागेल. तर आपलेच नुकसान केले ना. असे खूप आहेत जे बिलकुलच आठवणी मध्ये राहत नाहीत. काहीच ऐकत नाहीत. त्यांच्या बुद्धीमध्ये चोरी इत्यादीचे विचार चालत राहतात. असे अनेक सत्संगामध्ये जातात. चप्पल चोरी करणे इत्यादी त्यांचा धंदा राहतो. जिथे सत्संग असेल, तिथे जाऊन चप्पल चोरी करून येतात. दुनिया खूपच खराब आहे. हे ईश्वरा चे घर आहे. चोरीची सवय तर खूप खराब आहे. असे म्हटले जाते एक रुपयाचा चोर काय आणि लाख रुपयाचा चोर काय? आपल्या मनाला विचारायला पाहिजे, आम्ही किती पुण्यात्मा बनलो आहोत? किती वेळ बाबांची आठवण करतो? आम्ही सुदर्शन चक्रधारी किती बनलो आहोत? ईश्वरीय सेवा किती वेळ करतो? किती पाप नष्ट झाले आहेत? आपली दिनचर्या रोज तपासायची आहे, किती पुण्य केले, किती योगा मध्ये राहिलो? किती लोकांना रस्ता दाखवला? धंदा इ. तर जरूर करा, तुम्ही कर्मयोगी आहात. कर्म तर जरुर करायचे आहेत. बाबा हे बैज बनवत राहतात. चांगल्या चांगल्या लोकांना या बैज वरती समजून सांगा. या महाभारताच्या लढाईनंतर स्वर्गाचे दरवाजे उघडतील. कृष्णाच्या चित्रां खाली चांगले लिहायला पाहिजे परंतु मुलांमध्ये इतकी विशाल बुद्धी नाही. थोडे पण धन मिळाले की लगेच नाचायला लागतात. कोणाला धन जास्त असते, तर समजतात आमच्या सारखे दुसरे कोणीच नाहीत. या मुलांना बाबांची काळजी नाही. त्यांना बाबाजे इतका अविनाश ज्ञान रत्नाचा खजाना देतात, त्याची पण कदर राहत नाहीत. बाबा एक गोष्ट सांगतात, तर ते दुसरी गोष्ट करतात. काळजी नसल्या मुळे खूप पाप करत राहतात. श्रीमता वर चालत नाहीत, परत विकारांमध्ये जातात. बाबा म्हणतात, ही पण अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे. त्यांच्या भाग्यातच नाही. बाबा तर जाणतात ना. खूप पाप करतात. जर निश्चित असेल, की बाबा आम्हाला शिकवत आहेत, तर खूप खुशी मध्ये राहायला पाहिजे. तुम्ही जाणतात आम्ही भविष्य नवीन दुनिया मध्ये राजकुमार राजकुमारी बनू. तर खूप खुशी मध्ये राहायला पाहिजे, परंतु मुलं तर आत्तापर्यंत संभ्रमित आहेत. ती अवस्था होत नाही. बाबांनी समजवले आहे, विनाशासाठी रंगीत तालीम पण होत राहते. नैसर्गिक आपत्ती पण येतील, भारताला कमजोर करत जातील. बाबा स्वतः म्हणतात हे सर्व होणारच आहे, नाहीतर विनाश कसा होईल. बर्फाचा पाऊस पडेल, परत शेती इ. चे काय काय हाल होतील. लाखो मरत राहतील. कोणी खरे सांगतात थोडेच. तर बाबा मुख्य गोष्ट समजावून सांगतात, मनाला तपासून पहा, किती बाबांची आठवण करतो. बाबा तुम्ही तर खूप मोठे आहात, कमाल आहे तुमची. तुमचा आदेश आहे, माझी आठवण करा, तर २१ जन्मासाठी कधीच रोगी बनणार नाहीत. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर मी खात्री देतो. बाबा सन्मुख तुम्हाला समजून सांगतात, तुम्ही परत दुसऱ्यांना ऐकवत राहतात. बाबा म्हणतात मज पित्याची आठवण करा, तेही खूप प्रेमाने आठवण करा. तुम्हाला खूप सरळ रस्ता दाखवतो, पतीता पासून पावन होण्यासाठी. कोणी म्हणतात आम्ही तर खूप पाप आत्मा आहोत, अच्छा परत असे पाप करू नका. माझी आठवण करत रहा, तर जन्म जन्मानंतरचे जे पाप आहेत, ते आठवणी मुळे भस्म होईल. बाबांची आठवण करणेच मुख्य गोष्ट आहे. याला म्हटले जाते सहज आठवण. योग आक्षर पण म्हणू नका. संन्याशाचे हठयोग तर अनेक प्रकारचे आहेत. अनेक प्रकारे शिकवत राहतात. या बाबांनी पण खूप गुरु केले होते ना. आत्ता बेहदचे बाबा म्हणतात, या सर्वांना सोडा. या सर्वांचा पण मलाच उध्दार करायचा आहे. दुसऱ्या कोणा मध्ये अशी ताकत नाही, जे असे म्हणू शकतील. बाबांनी म्हटले आहे, मी या साधुसंताचा पण उद्धार करतो, परत हे गुरु कसे बनू शकतात? तर मुख्य गोष्ट एकच बाबा समजवतात, आपल्या मनाला विचारा, आम्ही कोणते पाप कर्म तर नाही करत? कोणाला दुःख तर नाही देत? यामध्ये कोणतेच कष्ट नाहीत. स्वतःला तपासायला पाहिजे, दिवस भरामध्ये किती पाप केले? किती आठवण केली? आठवणी द्वारे पाप भस्म होतील. प्रयत्न करायला पाहिजेत, हे खूप कष्टाचे काम आहे. ज्ञान देणारे एक बाबाच आहेत. बाबा मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता दाखवतात. अच्छा. गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश:- - (१) बाबा जे अविनाशी रत्नाचा खजाना देतात, त्याची काळजी करायची आहे. बेपरवा बणुन पापकर्म करायचे नाहीत. जर निश्चय आहे, भगवान स्वतः आम्हाला शिकवत आहेत, तर अपार खुशी मध्ये राहायचे आहे.
- (२) ईश्वराच्या घरी कधी चोरी इत्यादीचे विचार यायला नको. ही खूप खराब सवय आहे. असे म्हटले जाते, एक रुपयाचा चोर काय आणि लाख रुपयाचा चोर काय? तो चोरच. आपल्या मनाला विचारायला पाहिजे, आम्ही किती पुण्य आत्मा बनलो आहोत?
वरदान:- पुरुषार्थ आणि सेवेमध्ये विधीपूर्वक वृध्दीला प्राप्त करणारे तीव्र पुरुषार्थी भव. ब्राह्मण म्हणजे विधी पूर्वक जीवन. कोणतेही कार्य सफल तेव्हाच होते, जेव्हा विधीद्वारे केले जाते. जर कोणत्याही गोष्टींमध्ये स्वतःच्या पुरुषार्थ किंवा सेवेमध्ये वृद्धी होत नाही, तर जरूर कोणत्या विधीची कमी आहे, म्हणून तपासून पहा, अमृतवेल पासून रात्रीपर्यंत, मनसा वाचा कर्मणा व संपर्क विधी पूर्वक राहिला, अर्थात वृद्धी झाली? जर नाही झाली तर कारणाचा विचार करून, त्याचे निवारण करा, म्हणजे दिल शिकस्त होणार नाहीत. जर विधीपूर्वक जीवन आहे, तर वृद्धी अवश्य होईल आणि तीव्र पुरुषार्थी बनाल. बोधवाक्य:- स्वच्छता आणि सत्यते मध्ये संपन्न बनणेच खरी पवित्रता आहे. ||| ओम शांती |||ओम शांती.
|
|