05-05-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुमचे प्रेम एका बाबा सोबत पाहिजे कारण तुम्हाला अमर्यादीत वारसा मिळत
आहेत, तुम्ही प्रेमाने म्हणता माझे बाबा"
प्रश्न:-
कोणत्याही
देहधारी मनुष्याच्या वाक्यांची, वचनाची तुलना बाबांशी करू शकत नाहीत का?
उत्तर:-
कारण बाबांचे एक एक बोल महावाक्य आहेत. ज्या महावाक्याला ऐकणारे महान म्हणजेच
पुरुषोत्तम बनतात. बाबांचे महावाक्य सुंदर अर्थात फुलासारखे बनवतात. मनुष्याचे बोल
महावाक्य नाहीत, त्यांच्या पासून तर आणखीनच दुर्गति होत आली.
गाणे:-
ही दुनिया
बदलून जाईल…
ओम शांती।
गिताची प्रथम लाइन मुलांनी ऐकली, बाकी सर्व गित कोणत्याही कामाचे नाही. भगवत
गीतेमध्ये
भगवानुवाच मनमनाभव, मध्याजीभव हे अक्षर बरोबर आहेत. त्याला म्हटले जाते पिठामध्ये
मीठा एवढेच सत्य. आत्ता भगवान कोणाला म्हटले जाते, हे तर मुलं चांगल्या रीतीने
जाणतात. भगवान शिव बाबांनाच म्हटले जाते. शिवबाबा येऊन शिवालय स्थापन करतात. बाबा
येतात कुठे? वेशालय मध्ये येतात. स्वतःयेऊन म्हणतात, हे गोड गोड, लाडक्या मुलांनो,
फार फार वर्षांनी भेटलेल्या आत्मिक मुलांनो, ऐकते तर आत्माच ना. तुम्ही जाणता आम्ही
आत्मा अविनाशी आहोत. हा देह तर विनाशी आहे. आम्ही आत्मा आहोत. आम्ही आत्मा आपल्या
परमपिता परमात्मा द्वारे महावाक्य ऐकत आहोत. एका परमपिता परमात्मा चे महावाक्य आहेत,
जे महान पुरुष पुरुषोत्तम बनवतात. बाकीचे जे पण महात्मा, गुरू, इ. आहेत त्यांचे काही
महावाक्य नाहीत. शिवोहम जे म्हणतात ते पण बरोबर वाक्य नाही. आता तुम्ही बाबांपासून
महावाक्य ऐकुन सुंदर बनतात. काटे आणि फुलांमध्ये खूप फरक आहे ना. आता तुम्ही मुलं
जाणता आम्हाला कोणी मनुष्य ऐकवत नाहीत. या ब्रह्माच्या रथामध्ये शिवबाबा विराजमान
आहेत. ती पण आत्माच आहे परंतु त्यांना परमात्मा म्हटले जाते. आता पतित आत्मा म्हणते,
हे परमत्मा तुम्ही येऊन आम्हाला पावन बनवा. ते परमपिता, परम बनवणारे आहेत. तुम्ही
पुरुषोत्तम अर्थात सर्व पुरुषांमध्ये उत्तम पुरुष बनतात. ते देवता आहेत. परमपिता
अक्षर खूपच गोड आहे. सर्वव्यापी म्हटल्यामुळे गोडपणा राहत नाही. तुमच्यामध्ये पण
खूप थोडे आहेत, जे प्रेमाने मनापासुन आठवण करतात. ते स्त्री-पुरुष तर एक दोघांना
आठवण करतात. हे आहे आत्म्यानी परमात्मा ची आठवण करणे, तेही खूप प्रेमाने. भक्ती
मार्गामध्ये इतक्या प्रेमाने पूजा करत नाहीत, ते प्रेम राहत नाही. परमात्माला जाणतच
नाहीत, तर ते प्रेम कसे राहील. आता तुम्हा मुलांचे खुप प्रेम आहे. आत्मा म्हणते माझे
बाबा. आत्मे भाऊ भाऊ आहेत ना. प्रत्येक भाऊ म्हणतात, बाबांनी आम्हाला आपला परिचय
दिला आहे, परंतु ते प्रेम म्हटले जात नाही. ज्यांच्या द्वारे काही मिळते तिथे प्रेम
राहते. मुलांचे प्रेम पित्यामध्ये असते, कारण पित्या द्वारे वारसा मिळतो. जितका
वारसा जास्त तेवढे मुलांचे जास्त प्रेम राहते. पित्याच्या जवळ काहीच संपत्ती नाही,
आजोबा कडे आहे, तर परत पित्यामध्ये एवढे प्रेम राहत नाही, तर आजोबा कडे जाते.
त्यांच्याद्वारे पैसे मिळतील असे समजतात. आत्ता तर बेहदचे पिता आहेत. तुम्ही मुलं
जाणता आम्हाला शिवपिता शिकवत आहेत, ही तर खूपच खुशीची गोष्ट आहे. भगवान आमचे पिता
आहेत, या रचनाकारा ला कोणीच जाणत नाहीत. शेवटी त्यांना न जाणल्या मुळे स्वतःलाच पिता
म्हणून घेतात. लहान मुलांना विचारले तुमचे पिता कोण? परत विचारलं त्यांचे पिता कोण?
तर म्हणतात मीच आहे. आता तुम्ही मुलं जाणता, त्या सर्व पित्यांचा पिता जरूर आहे.
आम्हाला जे बेहदचे पिता मिळाले आहेत, त्यांचे पिता कोणीच नाहीत. ते उच्च ते उच्च
पिता आहेत, तर मुलांना खूप खुशी राहायला पाहिजे. मनुष्य यात्रेवरती जातात, तर ती
खुशी राहत नाही, कारण प्राप्ती काहीच नाही, फक्त दर्शन करण्यासाठी जातात. त्यामध्ये
खूप धक्के खात राहतात, धक्के खाऊन, पाया पडुन कपाळ घासले जाते परत पैसे पण खर्च
होतात आणि प्राप्ती पण काहीच होत नाही. भक्तिमार्ग मध्ये जर प्राप्ती असते तर,
भारतवासी खूप सावकार झाले असते. हे मंदिर इत्यादी बनवण्यामध्ये करोडो रुपये खर्च
करतात. तुमचे सोमनाथचे एक मंदिर तर नव्हते ना. सर्व राजांच्या जवळ मंदिर असते.
तुम्हाला खूप पैसे दिले होते, पाच हजार वर्षापूर्वी तुम्हाला विश्वाचे मालक बनवले
होते. एक बाबाच असे म्हणतात, आजपासून पाच हजार वर्षापूर्वी तुम्हाला राजयोग शिकवुन
असे बनवले होते. आत्ता तुम्ही काय बनले आहात. बुद्धी मध्ये यायला पाहिजे ना, आम्ही
किती उच्च होतो, पुनर्जन्म घेत एकदम भिकारी बनलो आहोत. कवडी तुल्य झालो आहोत. परत
आम्ही बाबां कडे जात आहोत. जे बाबा आम्हाला विश्वाचे चे मालक बनवतात. ही एकच यात्रा
आहे, जेव्हा आत्म्यांना शिवपिता भेटतात. तर मनापासून ते प्रेम राहायला पाहिजे.
तुम्ही मुलं जेव्हा येथे येतात तर बुध्दी मध्ये राहायला पाहिजे, आम्ही पित्या कडे
जात आहोत, ज्यांच्याद्वारे आम्हाला परत विश्वाची बादशाही मिळते. ते पिता आम्हाला
शिक्षण देतात, मुलांनो दैवी गुण धारण करा सर्वशक्तिमान पतित-पावन मज पित्याची आठवण
करा. मी कल्प कल्प येऊन म्हणतो की, तुम्ही माझीच आठवण करा तर विकर्म विनाश होतील.
मनामध्ये यायला पाहिजे आम्ही बेहदच्या पित्याकडे आलो आहोत. बाबा म्हणतात मी तर
गुप्त आहे, आत्मा म्हणते मी पण गुप्त आहे. तुम्ही समजता आम्ही शिवबाबा कडे जात आहोत,
ब्रह्मा दादांच्या जवळ पण जात आहोत. जे एकत्रित आहेत, त्यांना आम्ही भेटण्यासाठी
जातो, ज्यांच्याद्वारे आम्ही विश्वाचे मालक बनतो. मनामध्ये खूप खुशी व्हायला पाहिजे.
जेव्हा मधूबन मध्ये येण्यासाठी आपल्या घरातून निघतात, मनामध्ये खुप खुशी व्हायला
पाहिजे. बाबा आम्हाला शिकवण्यासाठी आले आहेत, आम्हाला दैवी गुण धारण करण्याची युक्ती
सांगतात. घरातून निघताना मनामध्ये खूप खुशी राहायला पाहिजे. जसे कन्याचे लग्न होते
पतीला भेटते, दागिने इत्यादी घालते, तर चेहराच हर्षित होतो. तो चेहरा तर दुःख
मिळवण्या साठी हर्षित होतो. तुमचा चेहरा तर नेहमी सुख मिळवण्यासाठी हर्षित होतो, तर
अशा बाबांच्या जवळ आल्यामुळे खूप खुश राहायला पाहिजे. आम्हाला आमचे बेहदचे पिता
मिळाले आहेत. सत्ययुगा मध्ये जाऊ तर परत कला कमी होत जातात. आता तुम्हा ब्राह्मण
ईश्वरीय संतानला, भगवान शिकवत आहेत. ते आमचे पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत, शिकवुन
पावन बनवून सोबत घेऊन जातात. आम्ही आत्मा आता, छी छी रावण राज्या पासून मुक्त होतो.
मनामध्ये खूप खुशी राहायला पाहिजे, जेव्हा शिवपिता विश्वाचे मालक बनवतात, तर हे
राजयोगाचे शिक्षण खूप चांगल्या प्रकारे शिकायला पाहिजे. जे विद्यार्थी चांगल्या
रीतीने अभ्यास करतात, ते चांगले गुण घेऊन पास होतात. मुलं म्हणतात, बाबा आम्ही तर
श्रीनारायण बनू. ही सत्यनारायणाची कथा म्हणजेच नरा पासून नारायण बनण्याची कथा आहे.
त्या खोट्या कथा तर तुम्ही जन्म जन्मातर ऐकत आले आहात. आता बाबा कडुन तुम्ही एकाच
वेळेत तुम्ही खरी-खुरी कथा ऐकतात. परत ती प्रथा भक्तिमार्गा मध्ये चालल येते. जसे
बाबांचे अवतरण झाले, त्यांची वर्ष वर्ष जयंती साजरी करतात, महाशिवरात्रि साजरी
करतात. आता ते कधी आले? काय केले? काहीच माहिती नाही. कृष्ण जयंती साजरी करतात, ते
कधी आले, कसे आले, काहीच माहिती नाही. असे म्हणतात कंसपुरी मध्ये आले. आता ते पतित
दुनिया मध्ये कसे जन्म घेतील. मुलांना खूप खुशी राहायला पाहिजे, आम्ही बेहदच्या
पित्याकडे जात आहोत. अनुभव पण ऐकवतात, आम्हाला अमक्या द्वारे ज्ञानबाण लागला, बाबा
आले आहेत. बस त्या दिवसापासून आम्ही बाबांची आठवण करतो.
ही तुमच्या मोठ्यात मोठ्यात बाबांच्या, जवळ येण्याची यात्रा आहे. बाबा तर चैतन्य
आहेत, मुलांच्या जवळ जातात. त्या जड यात्रा आहेत. येथे तर बाबा चैतन्य मध्ये आहेत.
जसे आम्ही बोलतो, तसेच परमात्मा पिता पण शरीरा द्वारे बोलतात. हे शिक्षण भविष्य २१
जन्माच्या शरीर निर्वाह साठी आहे. ते शिक्षण तर फक्त एका जन्मासाठी असते. आता कोणते
शिक्षण घ्यायला पाहिजे, कोणता धंदा करायला पाहिजे? बाबा म्हणतात दोन्ही करा.
संन्याशा सारखे घरदार सोडून जंगलामध्ये जायचे नाही. प्रवृत्ती मार्ग आहे ना.
दोघांसाठी हे शिक्षण आहे. सर्व तर शिक्षण घेणार नाहीत. कोणी चांगल्या रीतीने शिकतील,
कोणी कमी शकतील. कोणाला तर लगेच ज्ञानाचा बाण लागतो. काहीजण तर गरम तव्या सारखे
बोलत राहतात. काही म्हणतात, होय आम्ही समजण्या साठी प्रयत्न करू. काहीजण म्हणतात हे
तर एकांतामध्ये समजण्याच्या गोष्टी आहेत, परत गायब होतात. कोणाला ज्ञानाचा बाण लगेच
लागतो, तर समजून घेतात. काहीजण म्हणतात आम्हाला वेळ नाही, तर समजले पाहिजे ज्ञानाचा
बाण लागला नाही. पहा यांना (ब्रह्माला)ज्ञानाचा बाण लागला तर लगेच सर्व सोडून दिले
ना. त्यांनी असे समजले, बादशाही मिळत आहेत त्यापुढे हे काय आहे? आम्हाला तर बाबा
पासून राजाई मिळत आहे. आता बाबा म्हणतात, तो धंदा इत्यादी करा, फक्त एक आठवडा
चांगल्या रीतीने समजून घ्या. गृहस्थ व्यवहार पण सांभाळायचा आहे. मुलांचा सांभाळ तर
करायचा आहे. सन्याशी तर रचना करून परत पळून जातात. बाबा म्हणतात तुम्ही रचना केली
आहे, तर चांगल्या रीतीने संभाळ करा. समजा स्त्री किंवा मुलगा तुमचे मानतात, तर ते
सुपात्र आहेत, समजा मानत नाहीत तर अपात्र आहेत. सुपात्र आणि अपात्र ची माहिती तर
होते ना. बाबा म्हणतात तुम्ही श्रीमता वरती चालाल तर श्रेष्ठ बनाल, नाही तर वारसा
मिळू शकणार नाही. पवित्र बणुन सुपात्र मुलगा बणुन नाव प्रसिद्ध करा. ज्ञानाचा बाण
लागला तर म्हणतील, बस आता तर आम्ही खरी कमाई करू. बाबा आले आहेत, शिवालय मध्ये घेऊन
जाण्यासाठी. तर शिवालय मध्ये जाण्यासाठी लायक पण बनवायचे आहे. कष्ट घ्यायचे आहेत.
तुम्ही समजावून सांगा, शिव बाबाची आठवण करा, मृत्यू समोर उभा आहे. कल्याण त्यांचे
पण करायचे आहे ना. तुम्ही समजून सांगा, आत्ता आठवण करा तर विकर्म विनाश होतील.
तुम्हा मुलींचे कर्तव्य आहे, माहेर आणि सासर चे कल्याण करणे. जेव्हा तुम्हाला
बोलवतात तर तुमचे कर्तव्य आहे, त्यांचे कल्याण करणे. दयाळू बनायला पाहिजे. पतित
तमोप्रधान मनुष्यांना सतो प्रधान बनवण्याचा रस्ता दाखवायचा आहे. तुम्ही जाणतात
प्रत्येक गोष्ट नवीन पासुन जुनी होते. नर्का मध्ये सर्व पतीत आत्मे आहेत, तेव्हा तर
गंगा नदी मध्ये स्नान करून, पावन होण्यासाठी जातात. प्रथम तर समजायला पाहिजे, आम्ही
तर पतित आहोत, म्हणून तर पावन बनायचे आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा, तर तुमचे
पाप नष्ट होतील. साधुसंत इत्यादी जे पण आहेत, सर्वांना माझा संदेश द्या, की शिवपिता
म्हणतात माझी आठवण करा. या योग अग्नी द्वारे किंवा आठवणीच्या यात्रे द्वारे तुमचे
पाप नष्ट होतील, आत्म्या मधील भेसळ निघून जाईल. तुम्ही पवित्र बणुन माझ्या जवळ याल.
मी तुम्हा सर्वांना सोबत घेऊन जाईल. जसे विंचू असतो, जिथे नरम गोष्ट पाहिली की डंक
मारतो, दगडाला डंक मारेल का? तुम्हीपण बाबांचा परिचय द्या. हे पण बाबांनी समजवले आहे,
माझे भक्त कोठे असतात, शिवाच्या मंदिरा मध्ये, कृष्णाच्या मंदिरामध्ये, लक्ष्मी
नारायणच्या मंदिरामध्ये. भक्त माझी भक्ती करत राहतात, ते पण माझीच मुलं आहेत ना.
माझ्यापासून राज्य घेतले होते, आता पूज्य पासून पुजारी बनले. देवतांचे भक्त असतात
ना. नंबर एक शिवाची अव्यभिचारी भक्ती करणे आहे, परत खाली उतरतात तर भूत पूजा सुरु
करतात. शिवाच्या पुजाऱ्याला समजून सांगणे सहज होते. हे सर्व आत्म्यांचे पिता शिवबाबा
आहेत. स्वर्गाचा वारसा देतात. आता बाबा म्हणतात माझी आठवण करा, तर विकर्म विनाश
होतील. आम्ही तुम्हाला संदेश देतो. आता बाबा म्हणतात, पतित-पावन ज्ञानसागर मीच आहे.
ज्ञान पण ऐकवत आहे. पावन बनण्यासाठी योग पण शिकवत आहे. ब्रह्मा तनाद्वारे संदेश देत
आहे, की तुम्ही माझी आठवण करा. आपल्या 84 जन्माची आठवण करा. तुम्हाला भक्त मंदिरात
मिळतील आणि परत कुंभमेळ्या मध्ये मिळतील. तेथे तुम्ही समजावून सांगू शकता, पतित
पावन गंगा नदी आहे की, परमात्मा? तर मुलांना ही खुशी राहायला पाहिजे, आम्ही कुणाकडे
जात आहोत. खूप साधारण आहेत, काय मोठेपणा दाखवतील? शिवबाबा काय करतील, ज्यामुळे मोठे
मनुष्य दिसून येतील. सन्याशा सारखे कपडे तर घालू शकत नाहीत. बाबा म्हणतात मी तर
साधारण तन घेतो. तुम्हीच मत द्या मी काय करू? या रथाचा काय शृंगार करू? ते लोक
हुसेनच्या घोड्याची मिरवणुक काढतात, त्याचा शृंगार करतात. भक्ती मार्गा मध्ये,
शिवबाबांचा रथ नंदी दाखवला आहे. नंदीच्या मस्तकावर शिवाचे गोल गोल चित्र दाखवतात.
आता शिवबाबा नंदी मध्ये कसे येतील? मंदिरामध्ये नंदी का ठेवला आहे? शंकराची सवारी
म्हणतात ना. सूक्ष्मवतन मध्ये शंकर ची सवारी असते का? या सर्व गोष्टी भक्तिमार्ग
मध्ये नोंद आहेत. ही सर्व भक्ती आहे. अविनाश नाटकांमध्ये नोंद आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आपल्याशी
प्रतिज्ञा करायची आहे की, आम्ही खरी कमाई करून, स्वतःला शिवालय मध्ये जाण्यासाठी
लायक बनवू. सुपात्र मुलगा बणुन श्रीमता वर चालून बाबांचे नाव प्रसिद्ध करू.
(२) दयाळू बणुन
तमोप्रधान मनुष्याला, सतोप्रधान बनवायचे आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे.
मृत्यूच्या पूर्वी सर्वांना, बाबांची आठवण द्यायची आहे.
वरदान:-
होय, या पाठा
द्वारे सेवांमध्ये महान बनणारे, सर्वांच्या आशीर्वादाचे पात्र भव.
कोणतीही सेवा खुशी आणि
उमंग उत्साह द्वारे करत, नेहमी लक्ष राहावे की, जी सेवा होत आहे, त्यामध्ये सर्वांचे
आशीर्वाद मिळावेत. कारण जिथे आशीर्वाद असतील, तेथे कष्ट होत नाहीत. आता हेच लक्ष
ठेवा की ज्यांच्या पण सबंध संपर्क मध्ये येऊ, त्यांचे आशीर्वाद घेत जाऊ. होय, आम्ही
करू हा पाठ आशीर्वाद घेण्याचे साधन आहे. कोणी चुकीचे असेल तर त्याला चुकीचे म्हणून,
धक्का देण्याच्या ऐवजी आधार देऊन उभा करा, सहयोगी बनवा तर, त्याद्वारे पण
संतुष्टताचे आशीर्वाद मिळतील. जे आर्शिवाद घेण्यामध्ये महान बनतात, ते स्वतः महान
होतात.
बोधवाक्य:-
कष्ट
करण्याच्या सोबत आपली अवस्था पण मजबूत बनवण्याचे लक्ष ठेवा.