11-05-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही या डोळ्यांनी जे काही पाहता, ही सर्व जुन्या दुनियेची सामग्री आहे,
ही नष्ट होणार आहे, म्हणून या दुःखधाम ला बुद्धीने विसरून जावा"
प्रश्न:-
मनुष्यांनी
बाबां वरती कोणता दोष लावला आहे परंतु तो दोष कोणाचाही नाही?
उत्तर:-
इतका मोठा जो विनाश होतो, मनुष्य समजतात भगवानच करतात, दुःख पण तेच देतात तर सुख पण
तेच देतात. हा खूप मोठा दोष देत आहेत. मुलांनो, मी तर नेहमी सुखदाता आहे, मी
कोणालाही दुःख देऊ शकत नाही. जर मी विनाश करवेल तर सर्व पाप माझ्यावरती येईल, हे
सर्व अविनाशी नाटकं नुसार होत राहते. मी करवत नाही.
गाणे:-
हे रात्रीच्या
प्रवाशानो(आत्म्यांनो)थकुन जाऊ नका, सतयुगी सकाळ दूर नाही.
ओम शांती।
मुलांना शिकवण्यासाठी अनेक छान गीतं आहेत. गीताचा अर्थ स्पष्ट केल्या मुळे ज्ञानाचे
रहस्य सहज समजून येईल. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही सर्व दिवसाच्या यात्रा
वरती आहोत, रात्री ची यात्रा पूर्ण होत आहे. भक्तीमार्ग रात्रीची यात्रा आहे.
अंधारामध्ये धक्के खातात. अर्धाकल्प रात्रीची यात्रा करत उतरत आले आहात. आता
दिवसाच्या यात्रे वर आले आहात. ही यात्रा एकाच वेळेस करतात. तुम्ही जाणता आठवणीचे
यात्रे द्वारे, आम्ही तमोप्रधान पासुन सतोप्रधान, बणुन सतयुगा चे मालक बनत आहोत.
सतोप्रधान बनल्यामुळे च सतयुगाचे मालक, तमो प्रधान बनल्यामुळे कलियुगाचे मालक बनतात.
त्या दुनियेला स्वर्ग म्हटले जाते. या दुनियेला नर्क म्हटले जाते. आता तुम्ही मुलं
बाबांची आठवण करतात. बाबा द्वारे सुखच मिळते. जे, दुसरे काही समजावू शकत नाहीत,
त्यांनी फक्त आठवणी मध्ये ठेवावे, शांतीधाम आम्हा आत्म्यांचे घर आहे, सुखधाम
स्वर्गाची बादशाही आहे, आणि हे दुःखधाम रावण राज्य आहे. आता बाबा म्हणतात, या
दुःखधामाला विसरा. जरी येथे राहतात परंतु बुद्धीमध्ये हे राहावे की या डोळ्यांनी जे
काही पाहतो, हे रावण राज्य आहे. या शरीराला पाहता, ही सारी जुन्या दुनिये ची सामग्री
आहे. ही सारी सामग्री या यज्ञामध्ये स्वाहा होणार आहे. ते पतित ब्राह्मण लोक यज्ञ
करतात, तर यज्ञा मध्ये तीळ, जवस इत्यादी सामग्री स्वाहा करतात. उच्च ते उच्च तर
शिवपिता आहेत, त्यांच्या नंतर ब्रह्मा आणि विष्णू आहेत. शंकरा ची काहीच भुमिका नाही.
विनाश तर होणारच आहे. बाबा विनाश त्यांच्याद्वारे करतात, ज्यांच्यावर काही पाप
लागणार नाही. जर म्हणू, भगवान विनाश करतात, तर सर्व दोष त्यांच्या वरती येईल म्हणून
या सर्व विनाशाची नाटकांमध्ये नोंद आहे. हे नाटक आहे ज्याला कोणी जाणत नाहीत.
रचनाकारा ला कोणी जाणत नाहीत, त्यामुळे विना धनीचे बनले आहेत. कोणी धनी नाही. जर घरी
पिता नसतील आणि मुलं आपसा मध्ये भांडतात, तर दुसरे लोक म्हणतात तुमचे कोणी धनी
नाहीत का?आता करोडो मनुष्य आहेत, त्यांचे कोणी धनी धोणी नाहीत. राष्ट्र राष्ट्रा
मध्ये लढत राहतात. एकाच घरांमध्ये मुलं पित्याच्या सोबत, पती पत्नी सोबत भांडत
राहतात. दुःखांमध्ये आहेच अशांती. असे नाही भगवान पिताच दुःख देतात. मनुष्य समजतात
सुख-दु:ख भगवानच देतात परंतु बाबा कधीच दुख देऊ शकत नाहीत. त्यांना तर सुखदाता
म्हटले जाते, सुखदाता परत दुःख कसे देतील?बाबा म्हणतात मी, तुम्हाला खूप सुखी बनवतो.
एक तर तुम्ही स्वतःला आत्मा समजा. आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. ते परमधाम
राहण्याचे स्थान आहे, त्याला शांतीधाम पण म्हटले जाते. हे अक्षर बरोबर आहे.
स्वर्गाला परमधाम म्हणू शकत नाही. परम म्हणजे दूर ते दूर. स्वर्ग तर याच दुनियेत
असतो. मुळवतन तर खुप दूर आहे, जेथे आम्ही आत्मे राहतो. सुख-दुःखाची भूमिका तुम्ही
इथेच वठवतात. हे जे म्हणतात, अमका स्वर्गवासी झाला, हे चुकीचे आहे. आत्ता तर स्वर्ग
तर नाहीच. आता कलियुग आहे. या वेळेत तुम्ही संगमयुगी आहात, बाकी सर्व कलयुगी आहेत.
एकाच घरा मध्ये पिता कलयुगी तर मुलगा संगमयुगी आहे. पत्नी संगमयुगी तर पती कलियुगी
आहे इ. खूपच फरक होतो. पत्नी ज्ञान घेते आणि पती ज्ञान घेत नाही, तर एक दोघांना साथ
देत नाहीत. घरांमध्ये खिट-खिट होते. पत्नी फुला सारखे बनते आणि पती काट्या सारखेच
राहतो. एकाच घरांमध्ये मुलगा जाणतो आम्ही संगमयुगी पुरुषोत्तम पवित्र देवता बनत
आहोत परंतु पिता म्हणतात, लग्न बरबादी करून नर्कवासी बना. आत्ता आत्मिक पिता
म्हणतात, मुलांनो पवित्र बना. आत्ताची पवित्रता २१जन्म चालेल. हे रावण राज्य नष्ट
होणार आहे. ज्याच्या सोबत दुश्मनी असते, त्याचा पुतळा जाळतात. जसे रावणाला जाळतात.
तर दुश्मनाची खुप घ्रुणा यायला पाहिजे परंतु हे कोणाला माहित नाही की, रावण कोण आहे?
रावणाला जाळण्यासाठी खूप खर्च करतात, मनुष्याला जाळण्यासाठी इतका खर्च करत नाहीत.
स्वर्गामध्ये अशी कोणतीच गोष्ट नसते, तेथे तर विद्युत दाहिनी मध्ये ठेवले आणि नष्ट
झाले. तेथे हा विचार नसतो की, यांची माती कामाला येईल. तेथील रिती रिवाज असे आहेत,
जे कोणते कष्ट किंवा थकान होईल. इतके सुख तेथे राहते. तर बाबा समजवतात माझीच आठवण
करण्याचा पुरुषार्थ करा. हे आठवणीचे युद्ध आहे. बाबा मुलांना समजवतात, गोड मुलांनो
स्वतःवरती लक्ष द्या. माया कान, नाक कापायला नको, कारण दुश्मन आहे ना. तुम्ही
बाबांची आठवण करता आणि माया दूर करते, म्हणून बाबा म्हणतात प्रत्येकाला दिवसभराची
दिनचर्या लिहायला पाहिजे की, मी किती बाबांची आठवण केली, कुठे मन पळाले? डायरीमध्ये
नोंद करा, किती वेळ बाबांची आठवण केली. स्वतःला तपासायला पाहिजे, तर माया पण पाहिल,
हे तर चांगले बहादूर आहेत, स्वतःवरती चांगले लक्ष देतात. पूर्ण पणे स्वता: कडे लक्ष
द्यायचे आहे. आता तुम्हा मुलांना बाबा येऊन स्वता:चा परिचय देतात. ते म्हणतात खुशाल
घरदार इत्यादी संभाळा फक्त बाबांची आठवण करा. हे काही त्या सन्याशा सारखे नाहीत, ते
तर भिक मागुन उदरनिर्वाह करतात, तरीही कर्म तर करावे लागते ना. तुम्ही त्यांना पण
म्हणू शकता, तुम्ही तर हठयोगी आहात, राजयोग शिकवणारे एकच भगवान आहेत. आता तुम्ही
मुलं संगमयुगा वरती आहात. या संगम युगाची पण आठवण करावी लागेल. आता आम्ही संगम
युगावरती सर्वोत्तम देवता बनत आहोत. आम्ही उत्तम पुरुष म्हणजे पूज्य देवता होतो,
आत्ता कनिष्ठ बनलो आहोत. कोणत्याही कामाचे राहिलो नाही. आता आम्ही किती श्रेष्ठ
बनतो?मनुष्य ज्यावेळेस वकील इत्यादी चा अभ्यास करतात, त्यावेळेस ते पद मिळत नाही.
परीक्षा पास केली तर पदवीची टोपी मिळाली, परत शासकीय नोकरी करत राहतात. आता तुम्ही
जाणतात, आम्हाला उच्च भगवान शिकवत आहेत, तर जरूर उच्चपद पण देतील. हाच मुख्य उद्देश
आहे. आता बाबा म्हणतात माझीच आठवण करा, मी जो आहे, जसा आहे ते तर समजवले आहे.
आत्म्याचा पिता बिंदू आहे, माझ्यामध्ये सर्व ज्ञान आहे. तुम्हाला अगोदर हे थोडेच
माहित होते की, आत्मा बिंदू आहे, त्यामध्ये साऱ्या ८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे.
येशू ख्रिस्त भूमिका करून गेले,
तर परत येतील ना. येशू ख्रिस्ताची आत्मा पण आता तमोप्रधान असेल. जे उच्च ते उच्च
धर्म संस्थापक आहेत, ते आत्ता तमोप्रधान आहेत. हे (ब्रह्मा) पण म्हणतात मी अनेक
जन्माच्या अंत मध्ये तमोप्रधान बनलो आहे. आता परत सतोप्रधान बनत आहे, तत् त्वम(
तुम्ही ही बनत आहात)
आत्ता तुम्ही जाणतात, आम्ही देवता बनण्या साठी ब्राह्मण बनलो आहोत. विराट रुपाच्या
चित्राचा ही कोणी अर्थ जाणत नाहीत. आता तुम्ही मुलं जाणतात, आत्मा गोड घरा मध्ये
राहते, तर पवित्र आहे ना. येथे आल्यामुळे पतित बनते. तेव्हा तर म्हणतात, हे पतित
पावन येऊन आम्हाला पवित्र बनवा, नंतर आम्ही आपल्या मुक्तिधाम घरी जाऊ. हे ज्ञानाचे
मुद्दे धारण करण्यासाठी आहेत. मनुष्य जाणत नाहीत की, मुक्ती जीवनमुक्ती कशाला म्हटले
जाते? मुक्तिधाम तर शांतीधाम ला म्हटले जाते. जीवन मुक्तिधाम ला सुखधाम म्हटले जाते.
येथे दुःखाचे बंधन आहे. जीवनमुक्ती ला सुखाचे सबंध म्हणू शकतो. आता दुःखाचे बंधन
दूर होईल. आम्ही उच्चपद घेण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. तर हा नशा राहायला पाहिजे.
आता आम्ही आपले राज्य श्रीमता नुसार स्थापन करत आहोत. जगदंबा नंबर एक मध्ये जाते,
आम्ही पण त्यांचे अनुकरण करू. आता जी मुलं मात पित्याच्या ह्रदयासीन बनतात, तेच मुलं
भविष्यामध्ये राजसिंहासन अधिकारी बनतात. हृदयासीन तेच बनतात, जे रात्रं दिवस
सेवेमध्ये राहतात. सर्वांना संदेश द्यायचा आहे कि, बाबांची आठवण करा. पैसे इत्यादी
काहीच घ्यायचे नाहीत. मनुष्य समजतात, हे राखी बांधण्यासाठी आले आहेत, काही तरी
द्यावे लागेल?तुम्ही सांगा आम्हाला काहीच नको, फक्त या पाच विकाराचे दान घेण्यासाठी
आम्ही आलो आहोत, म्हणून पवित्रतेची राखी बांधत आहोत. बाबांची आठवण करा आणि पवित्र
बना, तर देवता बनू शकतात, बाकी आम्ही पैसे काही घेऊ शकत नाही. आम्ही ते ब्राह्मण
नाहीत, फक्त पाच विकाराचे दान द्या तर ग्रहण सुटेल. आता कोणतीही कला राहिली नाही,
सर्वांना ग्रहण लागले आहे. तुम्ही ब्राह्मण आहात ना. जिथे पण जावा बोला, विकारांचे
दान द्या तर ग्रहण सुटेल. पवित्र बना. विकारांमध्ये कधीच जायचे नाही. बाबांची आठवण
करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही फुलासारखे बनाल. तुम्हीच फुलासारखे होते परत
जन्म घेत काट्यासारखे बनले आहात. ८४ जन्म घेत घेत विकारांमध्ये जातच आले, आता परत
जायचे आहे. बाबांनी या तना द्वारे सूचना दिल्या आहेत. ते उच्च ते उच्च भगवान आहेत
त्यांना शरीर नाही. अच्छा ब्रह्मा विष्णू शंकराला शरीर आहे?तुम्ही म्हणाल होय. परंतू
सूक्ष्म शरीर आहे. ती मनुष्याची सृष्टी नाही, खेळ सर्व या सृष्टीवरतीच आहे.
सूक्ष्मतम मध्ये नाटक कसे चालेल?तसे तर मुलवतन मध्ये सूर्य-चंद्र पण नाहीत, तर नाटक
कसे चालेल. हा खूप मोठा मांडवा आहे. पुनर्जन्म पण येथेच होतो, सूक्ष्मतम मध्ये नाही.
आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व बेहदचा खेळ आहे. आत्ता माहिती झाली आहे, आम्ही
देवी-देवता होतो, परत कसे वाममार्गा मध्ये गेलो(विकारी मार्गाला म्हटले जाते).
अर्धाकल्प आम्ही पवित्र होतो, आपल्या च हार आणि जीत चा खेळ आहे. हा कधीही विनाश होत
नाही. भारतच अविनाशी खंड आहे, याचा कधी विनाश होत नाही. आदी सनातन देवी देवता धर्म
होता, तेव्हा दुसरा कोणता धर्म नव्हता. तुमच्या या गोष्टींना तेच जाणतील, ज्यांनी
कल्पापुर्वी मानले होते. पाच हजार वर्षां पेक्षा जुनी गोष्ट कोणती असत नाही. सतयुगा
मध्ये जाऊन प्रथम आपले महल बनवू. असे नाही की सोन्याची द्वारका समुद्राच्या खाली आहे,
जी समुद्राच्या खालून निघुन येईल. असे दाखवतात, सागरा द्वारे देवता रत्नाच्या थाळ्या
भरून देत होते. वास्तवामध्ये ज्ञानसागर बाबा आले आहेत, जे तुम्हा मुलांना ज्ञान
रत्नाच्या थाळ्या भर भरून देत आहेत. शंकराने पार्वतीला कथा ऐकवली असे दाखवतात.
ज्ञान रत्नांनी झोळी भरली आहे. शंकरा साठी म्हणतात, ते भांग धतुरा पित होते, परत
त्यांच्या पुढे जाऊन म्हणताण, आमची झोळी भरा. आम्हाला धन द्या. तर पहा शंकराची पण
खूप निंदा केली आहे. सर्वात जास्त निंदा तर माझी केली आहे. हा पण खेळ आहे, जो परत
होईल. या नाटकाला कोणी जाणत नाहीत. मी येऊन आदी पासून अंत पर्यंत सर्व रहस्य समजवतो.
हे पण जाणता, उच्च ते उच्च शिवपिता आहेत. विष्णू पासुन ब्रह्मा, परत ब्रह्मा पासुन
विष्णू कसे बनतात, हे कोणी समजत नाहीत.
आता तुम्ही मुलं पुरुषार्थ करतात की, आम्ही विष्णू कुळाचे बनावे. विष्णुपुरी चे
मालक बनण्यासाठी तुम्ही ब्राह्मण बनले आहात. तुमच्या मनामध्ये आहे आम्ही ब्राह्मण,
आपल्यासाठी सूर्यवंशी चंद्रवंशी च्या राजधानीची स्थापन करत आहोत. या मध्ये लढाई इ.
ची गोष्ट नाही. देवता आणि आसुराची लढाई कधीच होत नाही. देवता तर सतयुगा मध्ये असतात,
तेथे लढाई कशी होईल. आता तुम्ही ब्राह्मण योगबळा द्वारे विश्वाचे मालक बनतात.
बाहुबळ असणारे विनाशाला प्राप्त होतात. तुम्ही शांतीच्या बळा द्वारे विज्ञान वरती
विजय मिळवतात. आता तुम्हाला आत्म अभिमानी बनायचे आहे. आम्ही आत्मा आहोत, आम्हाला
आपल्या घरी जायचे आहे. आत्मा खूप तीव्र गतीची आहे. आता विमाने अशी निघाली आहेत, ते
एका तासा मध्ये खुप दुर घेउन जातात. आत्मा तर त्यापेक्षा तीव्र गतीची आहे,
सेकंदांमध्ये कुठेही जाऊन जन्म घेते. कोणी परदेशात पण जाऊन जन्म घेतात. आत्म सर्वात
तीव्र गतीचे रॉकेट आहे. यामध्ये मशनरी इ. कोणतीच गोष्ट नाही. शरीर सोडले आणि हे
पळाले. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, आम्हाला घरी जायचे आहे. पतित आत्मा तर जाऊ शकत
नाही. तुम्ही पावन बणुन जाल बाकी तर सर्व सजा खाऊन जातील. सजा तर खूप मिळतात. तेथे
तर र्गभ महलमध्ये आरामशीर राहतात. मुलांनी साक्षात्कार केला आहे, कृष्णा चा जन्म कसा
होतो, कोणतीही घाण इत्यादीची गोष्टच नाही. एकदम जसा प्रकाश होतो. आता तुम्ही
वैकुंठाचे मालक बनण्यासाठी बनतात, तर असा पुरुषार्थ पण करायला पाहिजे ना. शुद्ध
पवित्र खान पान असायला पाहिजे. दाळ भात सर्वात चांगले आहे. ऋषिकेश मध्ये संन्यासी,
एका खिडकीमधून भोजन घेऊन जातात. होय काही कसे, काही कसे असतात. अच्छा.
फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात पिता बापदादा ची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आपल्या
वरती पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे. माये द्वारे आपला संभाळ करायचा आहे. आठवणीचा खरा
चार्ट लिहायचा आहे.
(२) पित्याचे अनुकरण
करून ह्रदयासीन बनायचे आहे. दिवस-रात्र सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे. सर्वांना
संदेश द्यायचा आहे की बाबांची आठवण करा. पाच विकाराचे दान द्या, तर विकारांचे ग्रहण
सुटेल.
वरदान:-
बाबाच्या आठवणी
द्वारे असंतुष्टते च्या परिस्थितीमध्ये नेहमी सुख व संतुष्टतेची अनुभुती करणारे
महावीर भव.
नेहमी बाबा च्या आठवणी
मध्ये राहणारे प्रत्येक परिस्थिती मध्ये संतुष्ट राहतात, कारण ज्ञानाच्या शक्तीच्या
आधारे डोंगरा सारखी परिस्थिती पण मोहरी सारखी अनुभव होते, मोहरी सारखी म्हणजे काहीच
नाही. जरी परिस्थिती असंतुष्टते ची आहे, दुःखाची घटना आहे परंतु दुःखाच्या परिस्थिती
मध्ये सुखाच्या स्थितीमध्ये राहणे, तेव्हा महावीर म्हणू शकतो. काहीही होऊ द्या,
नवीन काहीच नाही, या बाबांच्या स्मृती द्वारे परिस्थिती मध्ये नेहमी एकरस राहू शकता,
परत दुःख अशांतीची लाट पण येणार नाही.
बोधवाक्य:-
आपल्या दैवी
स्वरूपाची नेहमी स्मृती राहील, तर कोणाचीही व्यर्थ नजर जाऊ शकत नाही.