12-05-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्हाला नावाडी मिळाला आहे,या कलियुगाच्या किनाऱ्या मधून सतयुगाच्या
किनार्याकडे घेऊन जाण्यासाठी, तुमचे पाय आता या जुन्या दुनिये मध्ये नाहीत.
तुमच्या नावेचा लंगर सोडला आहे"
प्रश्न:-
जादूगर बाबाची
आश्चर्यकारक जादूगरी कोणती आहे,जे दुसरे कोणी करू शकत नाहीत"
उत्तर:-
कवडी तुल्य आत्म्याला हिरेतुल्य बनवणे,बागवान बणुन काट्यांना फुलासारखे बनवणे,ही
खूप मोठी आश्चर्यकारक जादूगरी आहे. जे जादूगर बाबाच करतात, दुसरे कोणी नाही. मनुष्य
पैसे कमवण्यासाठी फक्त जादूगार बनतात परंतु बाबा सारखी जादू कोणी करू शकत नाहीत.
ओम शांती।
सृष्टिचक्र किंवा नाटकामध्ये दुसरा कोणता सत्संग इत्यादी मध्ये असे समजत नाहीत. न
कथा करणारे पिता आहेत,न ती मुलं आहेत. वास्तव मध्ये ते शिष्य पण नाहीत. येथे तुम्ही
मुलं पण आहात विद्यार्थी पण आहात आणि शिष्य पण आहात. बाबा मुलांना सोबत घेऊन जातात.
बाबा जातील परत मुलं पण याच दुनिया पासून आपल्या सुंदर दुनिया मध्ये जाऊन राज्य
करतील. मुलांच्या बुद्धीमध्ये यायला पाहिजे,या शरीरांमध्ये राहणारी आत्मा आहे,ती
खूप खुश होती. तुमची आत्मा खूप खुश व्हायला पाहिजे. बेहद चे पिता आले आहेत,जे
सर्वांचे पिता आहेत. हे पण तुम्ही मुलंच जाणाता. बाकी साऱ्या दुनिया मध्ये तर सर्व
अज्ञानी आहेत. रावणाने तुम्हाला खूप गैर समजतुदार बनवले आहे. विद्यार्थी जीवन पण
एकाच वेळेस होते,जेव्हा भगवान येऊन शिकवतात. तुमच्या बुद्धी मध्ये आहे,बाकीचे आपल्या
कामधंदा मध्येच असतात. प्रथम त्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी येत नाहीत की भगवान
शिकवत आहेत. त्यांना तर आपल्याच धंद्याची आठवण येत राहते. तर तुम्ही मुलं जाणता की
भगवान आम्हाला शिकवत आहेत,तर खूप आनंदीत राहायला पाहिजे. बाकी तर सर्व भाई पैशां
वाल्यांची मुलं आहेत. तुम्ही तर भगवंताची मुलं बनले आहात. तर मुलांना खूप खुशी
व्हायला पाहिजे. काही तर खूप आनंदित राहतात. काहीजण म्हणतात बाबा मुरली चालवू शकत
नाही,असे असे होते इत्यादी. . अरे मुरली कठीण थोडीच आहे. जसे भक्ती मार्गामध्ये
साधुसंत इत्यादी ना कोणी विचारतात,आम्ही ईश्वराला कसे भेटू परंतु ते जाणत नाहीत. ते
फक्त बोटाने इशारा करतात की भगवंताची आठवण करा. बस खुश होतात. ते कोण आहेत,दुनिया
मध्ये कोणी जाणत नाहीत. आपल्या पित्याला कोणी जाणत नाहीत. हे अविनाश नाटक,असेच
बनलेले आहे,तरीही विसरतील. असे नाही की तुमच्या मध्ये पण सर्व पिता आणि रचनेला
जाणतात. कुठे कुठे चलन अशी असते,गोष्ट विचारू नका. तो नशाच उडुन जातो. आता तुम्हा
मुलांचे पाय,जुन्या दुनिया मध्ये जसे की नाहीत. तुम्ही जाणतात,कलियुगी दुनिया मधुन
पाय निघाले आहेत. नावे नी किनारा सोडला आहे. आता आम्ही जात आहोत. बाबा आम्हाला कुठे
घेऊन जातात,हे बुद्धी मध्ये आहे, कारण बाबांना नावाडी पण आहेत, तर बागवान पण आहेत.
काट्यांना फुला सारखे बनवतात. त्यांच्या सारखे बागवान कोणीच नाहीत. काट्यांना
फुलासारखे बनवतता,ही जादुगरी काय कमी थोडीच आहे. आज-काल जादूगार पण खूप निघाले आहेत.
ही ठगा ची दुनिया आहे. बाबा तर कवडी तुल्य आत्म्याला हिरे तुल्य बनवतात. बाबा
सद्गुरु आहेत. सदगुरु अकाल असे म्हणतात. खुप नशे द्वारे म्हणतात. आता जेव्हा,स्वतः
ईश्वरच म्हणतात सद्गुरू एकच आहेत,सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत,परत स्वतःला गुरु
का म्हणायला पाहिजे. न ते समजतात,न लोक काही समजतात. या जुन्या दुनिया मध्ये काय
ठेवले आहे?मुलांना जेव्हा माहिती होते,बाबा नवीन घर बनवत आहेत,परत असे कोण
असेल,नवीन घराशी नफरत आणि जुन्या घराशी प्रेम करेल. बुद्धीमध्ये नवीन घराची आठवण
येते. तुम्ही बेहद बाबाची मुलं आहात,तर तुम्हाला स्मृती राहायला पाहिजे की,बाबा
आमच्यासाठी नवीन दुनिया बनवत आहेत. आम्ही त्या नवीन दुनिये मध्ये जात आहोत. त्या
नवीन दुनियाची अनेक नावं आहेत. सतयुग,हेवन,पँराडाइज,
स्वर्ग,वैकुंठ इत्यादी. तुमची बुद्धी आता जुन्या दुनिये पासून परावृत्त झाली
आहे,कारण जुन्या दुनिया मध्ये दुःखच दुःख आहे. त्याचे नाव आहे,हेल,काट्याचे
जंगल,रौरव नर्क,कंसपुरी. याचा अर्थ पण कोणी जाणत नाहीत. पत्थर बुद्धी आहेत ना.
भारताचे हाल कसे झालेआहेत?बाबा म्हणतात,यावेळेत सर्व पत्थर बुद्धी आहेत. यथा राजा
राणी,तथा प्रजा. येथे तर प्रजेचे प्रजे वरती राज्य आहे,म्हणून सर्वांचे
स्टॅम्प(पोस्टाचे तिकिट) बनवत राहतात.
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे,बाबा उच्च ते उच्च आहेत. परत दुसऱ्या नंबर मध्ये
उच्च कोण आहेत. ब्रह्मा विष्णू शंकर चे तर काहीच श्रेष्ठत्व नाही. शंकराचे वस्त्र
इत्यादी कसे बनवले आहेत. त्यांच्यासाठी तर म्हणतात, ते भांग पित होते,धतुरा खात होते
इत्यादी. ही तर खूप निंदा केली आहे. अशा गोष्टी नसतात. ते आपल्या धर्मालाच विसरले
आहेत. आपल्या देशासाठी काय काय म्हणत राहतात. खूपच बेइज्जती करतात,तेव्हा बाबा
म्हणतात माझी पण बेइज्जती,शंकराची,ब्रह्माची पण बेइज्जती करतात. विष्णूची बेइज्जती
होत नाही. वास्तव मध्ये त्यांची पण गुप्त रितीने करतात,कारण विष्णूच राधाकृष्ण आहेत.
आता कृष्ण छोटा मुलगा आहे,तर महात्मा पेक्षा श्रेष्ठ गायन केले जाते. या ब्रह्मांनी
तर नंतर संन्यास केला,तो तर छोटा मुलगा,पवित्रच आहे,पाप इ. ला जाणत नाही. ते उच्च
ते उच्च शिवबाबा आहेत, तरीही बिचार्यांना माहित नाही, प्रजापिता ब्रह्मा कुठे
असायला पाहिजेत. प्रजापिता ब्रह्मा ला शरीरधारी दाखवतात. अजमेर मध्ये त्यांचे मंदिर
आहे. ब्रह्माला दाढी-मिशा दाखवतात,शंकर किंवा विष्णूला दाखवत नाहीत. तर ही समजून
घेण्याची गोष्ट आहे ना. प्रजापिता ब्रह्मा सुक्षमवतन मध्ये कसे असतील,ते तर येथे
असायला पाहिजेत. यावेळेत ब्रह्माची किती संतान आहेत,प्रजापिता ब्रह्मा कुमारी कुमारी
इतके ढेर आहेत, तर जरूर प्रजापिता ब्रह्मा पण असतील,असे लिहिले आहे. चैतन्य मध्ये
आहेत,तर जरूर काही केले असेल ना. प्रजापिता ब्रह्मा फक्त मुलंच स्थापना करतात की
आणखी काय करतात. जरी आदी देव ब्रह्मा,आदी देवी सरस्वती म्हणतात परंतु त्यांची भूमिका
काय आहे,हे कोणालाच माहिती नाही. रचनाकार आहेत तर जरूर याच सृष्टी वरून गेले असतील.
जरूर ब्राह्मणां ना शिवबाबा ने दत्तक घेतले असेल,नाहीतर ब्रह्मा कुठून येतील?ही
नवीन गोष्ट आहे ना. जोपर्यंत बाबा आले नाहीत तोपर्यंत कोणी जाणू शकत नाहीत. ज्याची
जी भूमिका आहे,तीच वठवतात. गौतम बुद्धाने कोणती भूमिका वठवली,कधी आले,काय केले,हे
तर जाणतात. ते काही गुरु,शिक्षक, किंवा पिता नाहीत,कारण सद्गती तर करू शकत नाहीत.
ते फक्त आपल्या धर्माचे रचनाकार झाले, गुरु नाहीत. बाबा तर मुलांची स्थापना
करतात,परत शिकवतात. पिता शिक्षक आणि गुरु तिन्ही आहेत. दुसऱ्यांना थोडेच म्हणणार
तुम्ही शिकवा. दुसऱ्या कोणाजवळ हे ज्ञान नाही. ज्ञानाचे सागर आहेत, तर जरूर ज्ञानच
ऐकवतील ना. बाबांनी स्वर्गाचे राज्य भाग्य दिले होते,आता परत देत आहेत. बाबांना
तुम्ही परत पाच हजार वर्षानंतर भेटले आहात. मुलांच्या मनामध्ये खुशी पाहिजे,ज्याला
सारी दुनिया शोधत आहेत,ते भगवान आम्हाला भेटले आहेत. बाबा म्हणतात,मुलांनो तुम्ही
पाच हजार वर्षानंतर परत भेटले आहात. मुलं म्हणतात,होय बाबा आम्ही आपणास अनेक वेळेस
भेटलो आहोत. जरी कोणी तुम्हाला मारेल,त्रास देईल,तरी मनामध्ये खुशी आहे ना. शिवबाबा
ना भेटण्याची, आठवण तर आहे ना. आठवणी द्वारे पाप नष्ट होतात. निर्बल माता,बंधन
असणाऱ्या मातांचे आणखीच जास्त पाप नष्ट होतात,कारण ते जास्त शिवबाबा ची आठवण करतात.
अत्याचार होतात तेव्हा तर,बुद्धी शिवबाबा कडे जाते. शिवबाबा रक्षा करा. तर आठवण करणे
चांगलेच आहे ना. जरी रोज मार खाल्ला,शिवबाबांची आठवण केली,हे पण चांगलेच आहे ना. अशा
मारासाठी तर कुर्बान जायला पाहिजे. मार पडते म्हणून आठवण करतात. गंगाजल मुखामध्ये
हवे, गंगेचा किनारा हवा,तेव्हा प्राण तना मधुन निघावेत,असे म्हणतात. तुम्हाला जेव्हा
मार मिळतो,तेव्हा बुद्धीमध्ये अल्लाह आणि बादशाही आठवणीत ठेवावी बस. बाबा
म्हटल्यामुळे वारसा जरूर आठवणीत येईल,असा कोणी पण नसेल ज्याला बाबा म्हटल्यानंतर
वारसा आठवणीत येणार नाही. बाबांच्या सोबत मिळकत पण जरूर आठवणीत येईल. तुम्हाला
शिवबाबांच्या सोबत वारसा जरूर आठवण येईल. ते तर तुम्हाला विषय विकारासाठी मारुन,
शिवबाबांची आठवण करुन देतात. तुम्ही बाबा पासून वारसा घेतात, पाप नष्ट होतात. हे पण
अविनाश नाटकांमध्ये,तुमच्यासाठी गुप्त कल्याण च आहे. जसे म्हटले जाते कल्याणकारी
लढाई आहे,तर मार खाणे पण चांगले झाले ना. आजकल मुलं प्रदर्शनी,मेळा इत्यादीची सेवा
जोरात करत आहेत. नवनिर्माण प्रदर्शनी सोबत लिहा,स्वर्गाकडे जाण्याचे गेट. दोन्ही
अक्षरं पाहिजेत. नवी दुनिया कशी स्थापन होते,त्यांचे प्रदर्शन आहे,तर मनुष्य ऐकून
खूश होतील. नवीन दुनिया कशी स्थापन होत आहे,त्यांच्यासाठी चित्र बनवले आहेत,येऊन पहा.
नवीन दुनिया कडे जाण्याचा रस्ता,हे अक्षरं पण ठीक आहेत. ही जी लढाई आहे, याद्वारे
स्वर्गाचे गेट उघडतात. गीते मध्ये पण आहे,भगवान आले होते, त्यांनी राजयोग शिकवला
होता. मनुष्य पासून देवता बनवले होते, तर जरूर नवीन दुनियेची स्थापना पण केली असेल.
मनुष्य चंद्रावरती जाण्यासाठी खूप प्रयत्न करतात, तेथे गेल्यानंतर पाहतात,येथे तर
डोंगरच डोंगर आहेत,मनुष्य काही दिसून येत नाहीत,असे ऐकवतात. या द्वारे फायदा काय
झाला?आता तुम्ही खऱ्या शांती मध्ये जात आहात,अशरीरी बनतात. ती शांतीची दुनिया आहे.
तुम्ही तर मृत्यू इच्छितात,शरीर सोडून जाऊ इच्छितात. बाबांना पण मृत्यु देण्यासाठीच
बोलवतात,येऊन आपल्यासोबत मुक्ती जीवनमुक्ती मध्ये घेऊन चला. परंतु अर्थ थोडेच
समजतात. पतित पावन आले तर, जसे आम्ही काळाला बोलवतो. आता तुम्ही समजतात,बाबा आले
आहेत,ते म्हणतात चला घरी आणि आम्ही घरी जातो. बुद्धी काम करते ना. येथे अनेक मुलं
असतील ज्यांची बुद्धी कामधंदा इत्यादी कडे जात राहते. अमका आजारी पडला, काय
झाले?अनेक प्रकारचे विचार येतात. तुम्ही इथे बसले आहात आत्म्याची बुद्धी बाबा आणि
वारशा कडे राहावी. आत्माच आठवण करते ना. समजा कोणाचा मुलगा लंडनमध्ये आहे, समाचार
मिळाला आजारी आहे,तर बुद्धी तिकडे जाते. ज्ञान बुद्धीमध्ये बसू शकत नाही. येथे बसले
आहेत तरीही,बुद्धीमध्ये त्यांचीच आठवण येत राहते. कोणाचा पती आजारी पडला
तर,पत्नीच्या मनामध्ये गोंधळ होतो. बुद्धी तर जाते ना. तर तुम्ही पण येथे बसले
आहात,सर्व काही करत बाबांची आठवण करत राहा,तरी आहो सोभाग्य. जसे पती किंवा गुरूची
आठवण करतात,
तुम्ही शिव पित्याची आठवण करा. तुम्हाला आपला एक मिनिट पण वाया घालवयचा नाही.
बाबांची आठवण कराल,तर सेवा करते वेळेस पण बाबांची च आठवण राहील. बाबाने म्हटले आहे
माझ्या भक्तांना समजून सांगा,हे कोणी म्हटले शिवबाबांनी.
कृष्णाच्या भक्तांना काय समजावयाचे?त्यांना सांगा कृष्ण नवीन दुनिया स्थापन करत
आहेत,हे मानतील? रचनाकार तर जरूर ईश्वर पिता आहेत,कृष्ण थोडेच आहेत. परमपिता
परमात्मा जुन्या दुनियेला नवीन बनवत आहेत, हे पण मानतील. नवीनच जुनी आणि परत जुनीच
नवीन होते. फक्त कल्पाचा काळ जास्त दिल्यामुळे मनुष्य घोर अंधारा मध्ये आहेत.
तुमच्यासाठी तर आत्ता हातामध्ये स्वर्ग आहे. बाबा म्हणतात मी तुम्हाला,त्या
स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी आलो आहे. तुम्ही बनणार का?मुलं म्हणतात वाहा! का नाही
बननार?अच्छा माझी आठवण करा आणि परत पवित्र बना. आठवणी द्वारेच पाप भस्म होतात.
तुम्ही मुलं जाणतात, विकर्माचे ओझे आत्म्या वरती आहे,न की शरीरा वरती. जर शरीरा वरती
बोझा असता,तर शरीराला तर जाळतात,त्या सोबतच पाप नष्ट व्हायला पाहिजेत. आत्मा तर
अविनाशी आहे,त्यामध्ये फक्त भेसळ होते. ज्याला काढण्यासाठी बाबा एकच युक्ती सांगतात
की, माझी आठवण करा. पतिता पासून पावन बनण्याची युक्ती पहा कशी चांगली आहे. मंदिर
बनवणारे, शिवाची पूजा करणारे पण भक्त आहेत ना. पुजारीला कधीच पुज्य म्हटले जात नाही.
गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) ज्यांना
सारी दुनिया शोधत आहे,ते बाबा आम्हाला मिळाले आहेत,याच खुशी मध्ये राहायचे आहे.
आठवणी द्वारेच पाप नष्ट होतात म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबा आणि वारशाची
आठवण करायची आहे. एक मिनिट पण वाया घालवायचा नाही.
(२) या जुन्या दुनिये
पासून आपल्या बुद्धीचा लंगर उठला आहे. बाबा आमच्यासाठी नवीन घर बनवत आहेत. हा रौरव
नर्क आणि कंस पुरी आहे. आता आम्ही वैकुंठ पुरी मध्ये जात आहोत. नेहमी याच
स्मृतीमध्ये राहायचे आहे.
वरदान:-
चालता-फिरता
फरिश्ता स्वरुपाचा साक्षात्कार करणारे साक्षात्कार मूर्त भव.
जसे सुरुवातीला
चालता-फिरता ब्रह्मा गायब होऊन श्रीकृष्ण दिसत होते. याच साक्षात्कार द्वारे
सर्वकाही सोडवले. असेच साक्षात्कार द्वारा आत्ता पण सेवा व्हावी. जेव्हा
साक्षात्कार द्वारे प्राप्ती होईल,तर बनण्या शिवाय राहू शकणार नाहीत,म्हणून
चालता-फिरता फरिश्ता स्वरूपाचा साक्षात्कार करवा. भाषण करणारे तर खूप आहेत परंतु
तुम्ही भासना देणारे बना. तेव्हा समजतील हे अल्लाह लोक आहेत.
बोधवाक्य:-
नेहमी आत्मिक
आनंदाचा अनुभव करत राहा, तर कधीच संभ्रमित होणार नाहीत.