24-05-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.01.86  ओम शान्ति   मधुबन


स्वस्त सौदा आणि बचती चे अंदाजपत्रक.


रत्नागर बाबा आपल्या मोठ्यात मोठा सौदा, व्यापार करणाऱ्या सौदागर मुलांना पाहून आनंदीत होत आहेत. खूप मोठा सौदा आणि सौदागर दुनियाच्या भेटीमध्ये खूप साधारण आणि भोळे आहेत. भगवंताशी सौदा करणारे कोणते आत्मे भाग्यवान बनले? हे पाहून आनंदित होत आहेत. इतका मोठा सौदा, तो ही एक जन्माचा, जो२१जन्म नेहमी मालामाल करतो. द्यायचे काय आहे आणि घ्यायचे काय आहे? अगणित करोडोची कमाई किंवा करोडोंचा सौदा खूपच सहज करतात. सौदा करण्या मध्ये वेळ पण वास्तव मध्ये एक सेकंद लागतो आणि खूप सस्ता सौदा केला आहे. एका सेकंदामध्ये आणि एका बोल मध्ये सौदा केला, हृदया पासून म्हणले 'माझे बाबा' या एका बोल द्वारे इतक्या मोठ्या अगणित खजान्या चा सौदा केला, तर सस्ता सौदा आहे ना. न इतके कष्ट आहेत, ना इतका वेळ द्यावा लागतो. दुसरा कोणताही हदचा सौदा करण्यामध्ये खूप वेळ द्यावा लागतो, कष्ट पण करावे लागतात आणि दिवसेंदिवस सौदे पण महाग होत जातात. आणि सौदा कुठपर्यंत चालेल, एका जन्माची पण खात्री नाही. तर आत्ता श्रेष्ठ सौदा केला की आणखी विचारच करत आहात की, करायचा तर आहे?पक्का सौदा केला आहे ना. बापदादा आपल्या सौदागर मुलांना पाहत होते. सौदागर यादीमध्ये कोण कोणते प्रसिद्ध आहेत. त्या दुनियेतील प्रसिद्ध लोकांची यादी बनवतात. खास डिक्शनरी पण बनवतात. बाबाच्या डिक्शनरी मध्ये कोणाची नावं आहेत. ज्यांच्या मध्ये दुनियेतील लोकांचे आकर्षण जात नाही, त्यांनीच बाबांशी सौदा केला आणि परमात्म डोळ्याचे तारे बनले, विशेष आत्मा बनले. निराशवादी आत्म्यांना आशावादी बववले, असा नशा नेहमी राहतो का? परमात्मा डिक्शनरी चे, विशेष अती महत्त्वाचे व्यक्ती आम्ही आहोत, म्हणून गायन आहे, भोळ्यांचे भगवान. तसे तर चतुर हुशार आहेत परंतु त्यांना भोळी मुलंच पसंद आहेत. दुनियेतील

बाह्यमुखी चतुराई बाबांना पसंद नाही. त्यांचे कलियुगा मध्ये राज्य आहे, आत्ता लखपती आणि आत्ता रोडपती बनतात, परंतु तुम्ही नेहमी साठी करोडपती बनतात. भयाचे राज्य नाही, निर्भय आहात.

आजच्या दुनिया मध्ये धन पण आहे आणि भय पण आहे. जितके धन आहे त्यावेळेत भया मध्येच भोजन करतात, भया मधेच झोपतात आणि तुम्ही बेफिक्र बादशहा बनतात, निर्भय बनतात. भयाला पण भुत म्हटले जाते. तुम्ही त्या भुता पासून सुटलात ना. कोणते भय आहे?जिथे माझे पणा, मी पणा असेल तेथे, भय जरूर असेल. 'माझे बाबा', फक्त एकच शिवबाबा आहेत, जे निर्भय बनवतात. त्यांच्या शिवाय कोणते ही सोन्याचे हरण जरी, माझे आहे तर भय आहे. तर तपासून पहा माझे माझे, हा संस्कार ब्राह्मण जीवनामध्ये कोणत्याही सुक्ष्म रूपामध्ये तर राहिला नाही ना?हिरक जयंती, स्वर्णजयंती साजरी करत आहात ना. चांदी किंवा सोने खरे तेव्हाच बनते, जेव्हा अग्नी मध्ये जाळुन, जी काही भेसळ आहे, त्याला काढून टाकतात. खरी हीरक जयंती किंवा सुवर्णजयंती आहे ना. जयंती साजरी करण्या साठी खरे चांदी खरे सोना बनावेच लागेल. असे नाही जे हिरक जयंती वाले आहेत ते, चांदी सारखेच राहतील. हे तर वर्षाच्या हिशोबा मुळे हीरक जयंती म्हणतात परंतु तुम्ही स्वर्णजयंती चे अधिकारी, सुवर्णयुग वासी आहात. तर तपासून पहा खरे सोने किती बनले आहात. सौदा तर केला आहे परंतू आले आणि फक्त खाल्ले, असे तर नाही ना. असा सौदा केला आहे, जो २१ पिढी पर्यंत नेहमी संम्पन राहाल. तुमची वंशावळ पण मालामाल राहील, न फक्त २१ जन्म पर्यंत राहिल, परंतू द्वापर युगा मध्ये पण भक्त आत्मा असल्यामुळे कोणती ही कमी राहणार नाही. इतके धन द्वापर मध्ये पण राहील, जे

दान-पुण्य चांगल्या प्रकारे करू शकाल. कलियुगाच्या अंत मध्ये पण पहा, अंतिम जन्मामध्ये भिकारी तर बनले नाही ना, दाळ भाकरी खाणारे बनले ना. काळे धन तर नाही, परंतु दाळ भाकरी तर आहे ना. या वेळेतील कमाईचा सौदा पूर्ण कल्प भिकारी बनू देणार नाही. इतके जमा केले आहे, जे अंतिम जन्मां पर्यंत दाळ रोटी खाऊ शकतात, इतका बचतीचा हिशेब ठेवतात?अंदाजत्रक बनवता येते ना. जमा करण्या मध्ये हुशार आहात ना, नाहीतर २१ जन्म काय कराल? कमाई करणारे बनणार की, राज्य अधिकारी बणुन राज्य करणार?राजाई परिवाराला कमावण्याची आवश्यकताच नसते. प्रजेला कमवावे लागते. त्यांच्यामध्ये पण क्रमानुसार आहेत. सावकार आणि साधारण प्रजा. तेथे गरीब तर नसतात परंतु राजाई परिवाराच्या पुरुषार्थाचे भाग्य, राज्य प्राप्त करतात. जन्म जन्मांतर राजाई परिवाराचे अधिकारी बनतात. राज्य सिंहासनाचे अधिकारी प्रत्येक जन्मा मध्ये बनत नाहीत परंतु राजाई परिवाराचे अधिकारी जन्म जन्म मिळत राहते. तर आत्ता अंदाजपत्रक बनवा, बचत करण्याची योजना बनवा. आजकालच्या जमान्या मध्ये टाकाऊ पासून चांगले बनवतात. टाकाऊ गोष्टीलाच चांगले बनवतात. तर तुम्ही सर्व पण बचत खाते नेहमी स्मृतीमध्ये ठेवा, त्याचे अंदाजपत्रक बनवा. संकल्पशक्ती, वाणीची शक्ती, कर्माची शक्ती, वेळेची शक्ती, कधी आणि कोणत्या कार्यामध्ये लावायचे आहे. असे व्हायला नको, सर्व शक्ती व्यर्थ जातील. जर संकल्प पण साधारण आहेत, व्यर्थ आहे, तर व्यर्थ आणि साधारण दोन्ही बचत झाली नाही परंतु गमावले. संपूर्ण दिवस आपला चार्ट, दिनचर्या बनवा. या शक्तीला कार्यामध्ये लावून किती वृद्धी केली, कारण जितके कार्यामध्ये लावाल तेवढी शक्ती वाढेल. तसे तर सर्व जाणता संकल्प शक्ती आहे परंतु कार्यामध्ये लावण्याचा अभ्यासा मध्ये क्रमानुसार आहेत. काही तर न कार्यामध्ये लावतात, न पाप काम करतात परंतु साधारण दिनचर्या मध्ये कमावले आणि गमावले, तर जमा झाले नाही. साधारण सेवेची दिनचर्या किंवा साधारण प्रवृत्तीची दिनचर्या याला अंदाजपत्रका मध्ये जमाचे खाते तर म्हणणार नाही. फक्त हे तपासून नका की, जेवढी शक्य होती, तेवढी सेवा केली, अभ्यास पण केला. कोणाला दुःख नाही दिले, कोणते ही उलटे काम केले नाही. परंतू दुःख नाही दिले, तर सुख दिले का?जितकी आणि जसी सेवा करायला पाहिजे तेवढी, केले का?जसे बापदादा नेहमी सूचना देतात की, मी पणा, माझे पणाचा त्यागच खरी सेवा आहे. अशी सेवा केली का?उलटे बोलले नाही, परंतु असे बोल बोलले, जे कोणत्या ना कोणत्या निराशवादी आत्म्याला, आशावादी बनवले. हिंमतहिन ला हिंमतवान बनवले. खुशीच्या उमंग उत्साहा मध्ये कुणाला आणले?हे जमा करणे, बचत करणे आहे. असेच २ तास, ४ तास गेले, ती बचत झाली नाही. सर्व शक्ती बचत करून बचत करा. असे बजेट म्हणजे अंदाजपत्रक बनवा. या वर्षी अंदाजपत्रक बणवून कार्य करा. प्रत्येक शक्तीला कार्यामध्ये कसे लावता येईल, याचे नियोजन करा. ईश्वरीय बजेट असे बनवा, ज्यामुळे विश्वातील प्रत्येक आत्म्याला काहीना काही प्राप्ती होईल आणि तुमचे गुणगान करतील. सर्वांना काही ना, काही द्यायचे आहे, तर मुक्ती द्या किंवा जीवनमुक्ती द्या. मनुष्य आत्म्याला तर काय, प्रकृतीला पण पावन बनवण्याची सेवा करत आहात. ईश्वरीय बजेट म्हणजे सर्व आत्मे, प्रकृती सहित, सुखी व शांत बनावेत. ते शासन बजेट बनवते, इतके पाणी देऊ, इतकी घरं बनवू, इतकी वीज तयार करू. तुम्ही कोणते बजेट बनवतात, जे सर्वाना अनेक जन्मापर्यंत मुक्ती आणि जीवनमुक्ती मिळेल, असे बजेट बनवा. भिकारी पणा पासून, दुःखा पासून मुक्त करा. अर्धा कल्प तर आरामशीर राहतील. त्यांची इच्छा पूर्ण तर होईल. ते लोक तर मुक्तीची इच्छा ठेवतात, जाणत नाहीत परंतु मागत राहतात. तर स्वतःच्या प्रती आणि विश्वाच्या प्रति ईश्वरीय बजेट बनवा, समजले काय करायचे आहे?हिरक आणि सुवर्णजयंती दोन्ही या वर्षामध्ये करत आहात ना. तर हे महत्त्वाचे वर्ष आहे.

नेहमी श्रेष्ठ सौदा स्मृतीमध्ये ठेवणारे, नेहमी जमा चे खाते वाढवणारे, नेहमी प्रत्येक शक्तीला कार्यामध्ये लावून वृध्दी करणारे, नेहमी वेळेच्या महत्वाला जाणून महान बनणारे आणि बनवणारे, असे श्रेष्ठ धनवान श्रेष्ठ समजदार मुलांना, बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. कुमारसोबत वार्तालाप:- कुमार जीवन पण भाग्यशाली जीवन आहे कारण उल्टी शिडी चढण्या पासून वाचले. कधी संकल्प तर येत नाही, उल्टी शिडी चढण्याचा. चढणारे पण उतरत आहेत. सर्व प्रवृत्ती मध्ये राहणारे पण स्वतःला कुमार कुमारी म्हणतात. तर शिडी उतरले ना. तर नेहमी आपल्या श्रेष्ठ भाग्याला स्मृतीमध्ये ठेवा. कुमार जीवन म्हणजे बंधनापासून मुक्त जीवन, नाहीतर पहा किती बंधनां मध्ये राहतात. तर बंधना मध्ये फसण्या पासून वाचले ना. मनापासून पण स्वतंत्र, संबंधा पासून पण स्वतंत्र, कुमार जीवनच स्वतंत्र आहे. कधी स्वप्ना मध्ये विचार तर येत नाही, की कोणी थोडी सहयोगी भेटायला पाहिजे, कोणी सोबती पाहिजे. आजार पणा मध्ये मदत होईल, कधी असा विचार करत तर नाहीत ना. बिलकुल विचार येत नाही ना. कुमार जीवन म्हणजे नेहमी उडणारे पक्षी, बंधनांमध्ये फसणारे नाही. कधी कोणता विचार पण यायला नको. नेहमी निर्बंध बणुन पुढे चालत चला.

कुमारी सोबत वार्तालाप:- सेवांमध्ये पुढे जाण्यासाठी खूप छान संधी मिळाली आहे. ही छान संधी छान भेट आहे. या संधीला उपयोगात आणता येते ना. जितके स्वतःला शक्ती बनवाल, तेवढी सेवा पण शक्तिशाली कराल. जर स्वतः कोणत्या गोष्टींमध्ये कमजोर असाल तर, सेवा पण कमजोर होईल, म्हणून शक्तिशाली बणुन, शक्तिशाली सेवाधारी बना. अशी तयारी करत चला, जे वेळ आल्यावर सफलता पूर्वक सेवा करु शकाल आणि त्यामध्ये आपला नंबर पुढे घेऊन चला. आता तर अभ्यासा मध्ये वेळ द्यावा लागतो परत एकच काम असेल, म्हणुन जिथे पण प्रशिक्षण करत रहा. निमित्त बनलेल्या आत्म्याच्या सहयोगाने तयारी करत रहा, तर योग्य सेवाधारी बनाल. जितके पुढे जाताल, तेवढा आपलाच फायदा आहे.

सेवाधारी शिक्षक बहिणी सोबत वार्तालाप:-

१) सेवाधारी म्हणजे नेहमी निमित्त. असा निमित्त भाव सेवांमध्ये स्वतःच सफलता देतो. निमित्त भाव नाही तर सफलता होऊ शकत नाही. नेहमी बाबाचे होते, बाबाचे आहात आणि बाबा चे रहाल, अशी प्रतिज्ञा केली आहे ना. सेवाधारी म्हणजे प्रत्येक पाऊल बाबाच्या पावलावर ठेवणारे. याला म्हणतात बाबांचे अनुकरण करणारे. प्रत्येक पाऊल श्रेष्ठ मता वरती श्रेष्ठ बनणारे, सेवाधारी आहेत ना. सेवेमध्ये सफलता प्राप्त करणे, हे सेवाधारीचे श्रेष्ठ लक्ष आहे. तर सर्व अशी श्रेष्ठ सेवा करण्याचे लक्ष ठेवणारे आहात ना. आपण जितके सेवांमध्ये किंवा स्वतःमध्ये व्यर्थ समाप्त होते, तेवढेच स्व आणि सेवा समर्थ बनते. तर व्यर्थला नष्ट करुन नेहमी समर्थ बना. हेच सेवाधारीची वैशिष्ट आहे. जितके स्वतः निमित्त बनलेले आत्मे शक्तीशाली असतील, तेवढी सेवा शक्तिशाली होईल. सेवाधारीचा अर्थच आहे, सेवेमध्ये नेहमी उमंग उत्साह देणे. स्वतः उमंग उत्साहा मध्ये राहणारेच, दुसर्यांना पण उमंग उत्साह देऊ शकतात. तर नेहमी प्रत्यक्ष रूपामध्ये, उमंग उत्साह दिसून यायला पाहिजे. असे नाही मी तर मनामध्ये विचार करत राहतो परंतु बाहेरून दिसून येत नाही. गुप्त पुरुषार्थ वेगळी गोष्ट आहे परंतु लपू शकत नाही. चेहऱ्यावर तिने उमंग उत्साहाची झलक स्वतःच दिसून येईल. बोलाल किंवा नाही बोलाल परंतु चेहराच बोलेल, झलक दिसून येईल, असे सेवाधारी आहात? सेवेची सुवर्णसंधी मिळणे पण श्रेष्ठ भाग्याची लक्षणं आहेत. सेवाधारी बनण्याचे भाग्य प्राप्त झाले, आता सेवाधारी क्रमांक एक चे आहेत की क्रमांक दोन चे आहात, हे पण भाग्य बनवायचे आहे आणि पाहायचे आहे. फक्त एक भाग्य नाही परंतु भाग्यशाली बना. जितके भाग्य जमा करत जातात, तेवढाच क्रमांक स्वतः पुढे जात राहील, त्याला म्हटले जाते पद्मापदम भाग्यवान. एका विषय मध्ये नाहीत परंतु सर्व विषयांमध्ये सफलता सरुप. अच्छा.

२) सर्वात जास्त आनंद कोणाला आहे, बाबांना की तुम्हाला? का नाही म्हणत मला आहे?द्वापर युगा पासून भक्तीमध्ये पुकारले आणि आत्ता भेटले आहात तर किती खुशी राहिल. ६३ जन्म मिळवण्याची इच्छा ठेवली आणि ६३ जन्माची इच्छा पूर्ण झाली तर किती खुशी होईल. कोणत्याही गोष्टीची इच्छा पूर्ण होते तर, खुशी होते ना. हा आनंद विश्वाला आनंद देणारा आहे. तुम्ही नेहमी खुश राहतात तर सारे विश्व पण खुश होते, अशी खुशी मिळाले आहे ना. जेव्हा तुम्ही बदलता, तर दुनिया पण बदल जाते आणि असे बदलते ज्या दुनिये मध्ये दुःख आणि अशांतीचे नाव रूप राहत नाही. तर नेहमी खुशी मध्ये नाचत रहा. नेहमी आपल्या श्रेष्ठ कर्माच्या खात्यात जमा करत रहा. सर्वांना खुशीचा खजाना द्या. आजच्या संसारा मध्ये खुशी नाही, सर्व खुशीचे भिकारी आहेत, त्यांना खुशी द्वारे भरपूर करा. नेहमी याच सेवा द्वारे पुढे जात रहा. जे आत्मे कमजोर बनले आहेत, त्यांना पण मग उत्साहा मध्ये आणत राहा. काही करू शकत नाहीत, होऊ शकत नाही, असे दिलशिकस्त कमजोर आहेत आणि तुम्ही विजयी बणुन मग उत्साह वाढवणारे बना. नेहमी विजयाच्या स्मृतीचा तिलक हवा. तिलकधारी पण आहेत आणि स्वराज्य अधिकारी पण आहात, याच स्मृती मध्ये नेहमी रहा.

प्रश्न:-
जवळचे तारे आहेत त्यांची लक्षणे काय असतील?

उत्तर:-
त्यांच्यामध्ये समानता दिसून येईल. जवळच्या ताऱ्यांमध्ये बाप दादांचे गुण आणि कर्तव्य प्रत्यक्ष दिसून येतील. जितके जवळ असतील, तेवढी समानता राहील. त्यांचा चेहरा बाप दादाचा साक्षात्कार करणारा दर्पण असेल. त्यांना पाहून बाप दादा चा परिचय प्राप्त होईल. जरी तुम्हाला पाहतील परंतु आकर्षण बाप दादाकडे असेल, याला म्हटले जाते सन शोज फादर, म्हणजे मुलगा वडिलांना प्रत्यक्ष करतो. स्नेही च्या प्रत्येक पाऊला मध्ये ज्याच्याशी स्नेह आहे, त्याची छाप दिसून येते. जितके हर्षित मूर्त तेवढेच आकर्षण मूर्त बनतात, अच्छा.

वरदान:-
सेवा द्वारे आनेकांचे आशीर्वाद प्राप्त करुन नेहमी पुढे जाणारे महादानी भव.

महदानी बनणे म्हणजे दुसऱ्याची सेवा करणे. दुसऱ्यांची सेवा केल्यामुळे स्वतःची सेवा स्वतः होते. महादानी बनणे म्हणजे स्वतःला मालामाल करणे. जेवढ्या आत्म्याला सुख शांती चे ज्ञान दान द्याल तेवढ्या, आत्म्यांच्या प्राप्तीचा आवाज किंवा आभार निघेल, तेवढे तुमच्यासाठी आशीर्वादाचे रूप होईल. आशीर्वादच पुढे जाण्याचे साधन आहे. ज्यांना आशीर्वाद मिळतात, ते नेहमी खुश राहतात. तर रोज अमृतवेळेला महादानी बनण्याचा कार्यक्रम बनवा. कोणता दिवस किंवा वेळ अशी जायला नको, ज्या दिवशी दान केले नाही.

सुविचार:-
आत्ताचे प्रत्यक्ष फळ, आत्म्याला उडत्या कलेचे बळ देणे.