08-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा मुलांना अविनाशी कमाई करवण्या साठी, आता तुम्ही ज्ञान रत्नाची, जेवढी कमाई करू इच्छितात, तेवढा वेळ करु शकतात"

प्रश्न:-
आपल्या आसुरी संस्काराला बदलून, दैवी संस्कार बनवण्यासाठी कोणता विशेष पुरुषार्थ करायला पाहिजे?

उत्तर:-
संस्काराला बदलण्यासाठी जितके शक्य आहे, तेवढे देही अभिमानी राहण्याचा अभ्यास करा. देहाभिमाना मध्ये आल्यामुळे च आसुरी संस्कार बनतात. बाबा आसुरी संस्काराला दैवी संस्कार बनवण्यासाठी आले आहेत. पुरुषार्थ करा प्रथम मी देही आत्मा आहे, नंतर हे शरीर आहे.

गाणे:-
रात्र घालवली झोपून, दिवस घालवला खाऊन, हिऱ्या सारखा मनुष्य जन्म कवडी सारखा घालवला.

ओम शांती।
हे गीत तर मुलांनी अनेक वेळेस ऐकले आहे. आत्मिक मुलां प्रती आत्मिक बाबा सावधानी देत राहतात. ही वेळ खाण्यासाठी नाही परतू खूप भारी कमाई करण्या साठी आहे. कमाई करण्यासाठीच बाबा आले आहेत. कमाई पण खूप आहे, ज्याला जेवढी कमाई करायची आहे, तेवढी करू शकतात. ही भविष्यासाठी, अविनाशी ज्ञान रत्ना द्वारे झोळी भरण्या साठीची कमाई आहे. ती भक्ती आहे, हे ज्ञान आहे. मनुष्य हे जाणत नाहीत की, भक्ति कधी सुरू झाली, जेव्हा रावण राज्य सुरू होते तेव्हा भक्ती सुरु होती. ज्ञान तेव्हा सुरू होते, जेव्हा बाबा येऊन राम राज्याची स्थापना करतात. ज्ञान नविन दुनिये साठी आणि भक्ती जुन्या दुनिये साठी आहे. आता बाबा म्हणतात, प्रथम तर स्वतःला देही(आत्मा) समजायचे आहे. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, आम्ही प्रथम आत्मा आहोत परंतु अविनाशी नाटका नुसार मनुष्य सर्व चुकीचे झाले आहेत. यामुळे उल्टे समजले आहे, प्रथम आम्ही शरीर आहोत नंतर आत्मा. बाबा म्हणतात हे तर विनाशी आहे, याला तुम्ही घेता, आणि सोडत राहता. संस्कार आत्म्या मध्ये राहतात. देह अभिमान मध्ये आल्यामुळे संस्कार आसुरी बनतात. परत आसुरी संस्काराला दैवी बनवण्यासाठी बाबांना यावे लागते. ही सारी रचना रचनाकार बाबांची आहे. त्यांना सर्व पिता म्हणतात. जसे लौकिक पित्याला पण पिताच म्हणतात. पिता आणि मम्मा हे दोन अक्षरं खूप गोड आहेत. रचनाकार तर शिव पित्यालाच म्हणनार ना. ते प्रथम माताला दत्तक घेतात आणि रचना करतात. बाबा पण म्हणतात मी येऊन यांच्या मध्ये प्रवेश करतो, यांचे नाव पण प्रसिद्ध आहे, त्यांना भागीरथ म्हणतात. मनुष्याचे चित्र दाखवतात, कोणत्या नंदी इत्यादीचे नाही. भागीरथ मनुष्यांचे तन आहे. बाबाच येऊन मुलांना आपला परिचय देतात. तुम्ही नेहमी म्हणा आम्ही बापदादांच्या जवळ जातो. फक्त पिता म्हटल्यामुळे तर निराकार होतात. निराकार पित्याच्या जवळ तर तेव्हाच जाऊ शकतात, जेव्हा हे शरीर सोडून द्याल, तसे तर कोणीही जाऊ शकत नाही. हे ज्ञान तेच देतात. हे ज्ञान फक्त त्यांच्या कडेच आहे. अविनाश रत्नांचा खजाना आहे. बाबां कडे अविनाश ज्ञान रत्नाचा खजाना आहे. बाबा ज्ञानाचे सागर आहेत, पाण्याची गोष्टच नाही. ज्ञान रत्नाचे भांडार आहेत, त्यांच्या मध्ये ज्ञान आहे. ज्ञानाला पानी म्हटले जात नाही. जसे मनुष्याला डॉक्टर, वकिलाचे ज्ञान आहे, हे पण ज्ञान आहे. या ज्ञानासाठी ऋषीमुनी इत्यादी सर्व म्हणतात रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंतचे ज्ञान आम्ही जाणत नाहीत. ते तर एक रचनाकार च जाणतात. झाडाचे बीजरूप पण तेच आहेत. सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान त्यांच्यामध्ये आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ऐकवतील. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे, तर तुम्ही या ज्ञानामुळे देवता बनतात. ज्ञान घेऊन परत त्याचे भाग्य प्राप्त होते. स्वर्गामध्ये ज्ञानाची आवश्यकता राहणार नाही. असे नाही की देवतांमध्ये ज्ञान नाही, तर अज्ञानी आहेत, नाही. ते तर या ज्ञानाद्वारे हे पद प्राप्त करतात. बाबांनाच बोलवतात की हे बाबा, आम्हाला पतिता पासून पावन कसे बनायचे, त्यासाठी रस्ता किंवा ज्ञान सांगा, कारण जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता, आम्ही शांतीधाम वरून आलो आहोत. तेथे शांती मध्ये राहतात. येथे भूमिका, अभिनय करण्यासाठी आले आहोत. ही जुनी दुनिया आहे, तर जरूर नवीन दुनिया पण होती. ती केव्हा होती, कोण राज्य करत होते, हे कोणी जाणत नाहीत. तुम्ही आत्ता बाबा द्वारे जाणले आहे. बाबाच ज्ञानाचे सागर, सद्गती दाता आहेत, त्यांनाच बोलवतात, तुम्ही येऊन आमचे दुःख दूर करा, सुख शांती द्या. आत्मा जाणते परंतू तमोप्रधान झाल्यामुळे परत बाबाच येऊन परिचय देतात. मनुष्य न आत्म्याला जाणतात, न परमात्म्याला जाणतात. आत्म्याचे ज्ञान नाही, ज्यामुळे परमात्म अभिमानी बनत नाहीत. अगोदर तुम्ही पण जाणत नव्हते. आता ज्ञान मिळाले आहेत तर समजतात बरोबर चेहरा मनुष्याचा होता आणि कर्म माकडा सारखे होते.

आत्ता बाबांनी ज्ञान दिले आहेत तर आम्ही पण ज्ञानसंपन्न बनलो आहोत. रचनाकार आणि रचनेचे ज्ञान मिळाले आहे. तुम्ही जाणता आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत, तर खूप नशा राहायला पाहिजे. बाबा ज्ञानाचे सागर आहेत, त्यांच्यामध्ये बेहदचे ज्ञान आहे. तुम्ही कोणा जवळ पण जाता, सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान तर काय परंतू आत्म काय गोष्ट आहे, हे पण जाणत नाहीत. बाबांची आठवण करतात, दुखहर्ता सुखकर्ता, तरीही ईश्वर सर्वव्यापी आहे असे म्हणतात. अविनाश नाटका नुसार त्यांचा पण काही दोष नाही. माया बिलकुलच तुच्छ बुद्धी बनवते. किड्यांना घाणी मध्येच सुख वाटते. बाबा घाणी मधुन काढण्यासाठी येतात. मनुष्य तर दलदली मध्ये फसलेले आहेत. ज्ञानाची माहिती नाही तर काय करतील? दलदलीमध्ये फसलेले आहेत, परत त्यांना बाहेर काढणे कठीण जाते. त्यांना बाहेर काढले तर परत विकारांमध्ये जातात. काही मुलं दुसऱ्यांना ज्ञान देता देता, स्वता:च विकारा मध्ये जातात, कारण बाबाच्या श्रीमता विरुद्ध कार्य करतात. दुसऱ्यांना घाणी मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः विकारांमध्ये जातात, परत त्यांना काढण्यासाठी खूप कष्ट होते, कारण माये कडुन हार होते. पापामुळे मन खात राहते. मायेशी लढाई आहे ना. आत्ता तुम्ही युद्धाच्या मैदानामध्ये आहात. ती बाहुबळा द्वारे लढणारी सेना आहे. तुम्ही अहिंसक सेना आहात. तुम्ही अहिंसा द्वारे राज्य घेतात. हिंसा पण दोन प्रकारचे असते ना. एक आहे काम कट्यार चालवणे आणि दुसरी अवस्था आहे कुणाला मारणे. तुम्ही आता डबल अहिंसक बनत आहात. ही ज्ञानबळा ची लढाई कोणी जाणत नाहीत. अहिंसा कोणाला म्हटले जाते, हे पण कोणी जाणत नाहीत. भक्तिमार्गाची सामग्री खूप भारी आहे. गायन पण करतात, पतित पावन या परंतु मी कसे येऊन पावन बनवतो, हे कोणी जाणत नाहीत. गीतेमध्ये चूक केली आहे, जे मनुष्याला भगवान म्हटले आहे. ग्रंथ मनुष्यांनी बनवले आहेत, ते मनुष्य वाचतात. देवतांना ग्रंथ इत्यादी वाचण्याची आवश्यकता नाही. तेथे कोणते ग्रंथ नसतात. ज्ञान भक्ती परत आहे वैराग्य. कशाचे वैराग्य? भक्तीचे, जुन्या दुनियाचे वैराग्य, जुन्या शरीराचे वैराग्य. या डोळ्यांनी जे काही पाहता, ते राहणार नाही. या साऱ्या छी छी दुनिया पासून वैराग्य आहे. बाकी नवीन दुनियेचा दिव्यदृष्टी द्वारे साक्षात्कार करतात. नवीन दुनिया साठी शिकतात. हे शिक्षण काही या जन्मासाठी नाही, दुसरे जे पण शिक्षण आहे, ते याच जन्मा साठी असते. आता तर संगम आहे, येथे जे तुम्ही जे शिकतात, त्याचे फळ

तुम्हाला नवीन दुनिया मध्ये मिळेल. बेहदच्या बाबा द्वारे खूप मोठे भाग्य तुम्हाला मिळते. बेहदच्या बाबाकडून बेहद सुखाची प्राप्ती होते. तर मुलांना पूर्ण पुरुषार्थ करून श्रीमता वर चालायला पाहिजे. बाबा श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहेत, त्यांच्याद्वारे तुम्ही श्रेष्ठ बनत आहात. ते तर सदैव श्रेष्ठच आहेत. तुम्हाला श्रेष्ठ बनवतात, परत तुम्ही ८४ जन्म घेत घेत भ्रष्ठ बनतात. बाबा म्हणतात, मी तर कधी जन्म मृत्यू मध्ये येत नाही. मी आत्ता भाग्यशाली रथामध्ये प्रवेश करतो, ज्यांना तुम्ही मुलांनी ओळखले आहे. तुमचे आत्ता छोटे झाड आहे. झाडालाच वादळ पण लागतात. पानझड होत राहते. अनेक फुल निघतात परत वादळ लागल्यामुळे खाली पडतात. काही काही चांगल्या रीतीने फळे लागतात, परत मायेच्या वादळामुळे खाली पडतात. माया पण खूप जबरदस्त आहे. त्या दुनियेत बाहुबळ आहे आणि या दुनिये मध्ये आठवणीचे बळ आहे. तुम्ही आठवण अक्षर पक्के करा. ते लोक योग योग अक्षर म्हणत राहतात. तुमची आठवण आहे. चालता-फिरता बाबांची आठवण करा, याला योग म्हणणार नाही. योग अक्षर सन्याशांचा प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारचे योग शिकवतात. बाबा खूप सरळ आणि स्पष्ट सांगतात, उठता-बसता, चालता-फिरता आठवण करा. तुम्ही अर्ध्या कल्पाच्या सजनी आहात. आत्ता मी आलो आहे, आत्म्याला कोणीही जाणत नाहीत म्हणून बाबा येऊन अनुभती करवतात. खूप समजण्याच्या रहस्य युक्त गोष्टी आहेत. आत्मा अती सूक्ष्म आणि अविनाशी आहे. न आत्मा विनाश होणारी आहे, ना त्याची भूमिका विनाश होऊ शकते. या सूक्ष्म गोष्टी, मोठ्या बुद्धी वाले समजू शकत नाहीत. ग्रंथांमध्ये या गोष्टी नाहीत.

तर तुम्हा मुलांना बाबांची आठवण करण्याचे खूप कष्ट घ्यायचे आहेत. ज्ञान तर खूप सहज आहे. विनाशकाळात प्रित बुद्धी आणि विनाश काळ विपरीत बुद्धी, हे आठवणीसाठी म्हटले जाते. आठवण चांगल्या प्रकारे करतात, तर प्रित बुद्धी म्हटले जाते. स्वतःला विचारायचे आहे आम्ही बाबाची किती आठवण करतो? हे पण समजतात बाबांची आठवण करत करत जेव्हा कर्मातीत अवस्था होईल तेव्हा, हे शरीर सुटेल आणि लढाई लागेल. जितके बाबांशी प्रेम असेल तितके, तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल. परिक्षा तर एकाच वेळेस होते ना. जेव्हा अंतकाळ येतो, तर सर्वांची प्रित बुद्धी होते. त्यावेळेस परत विनाश होतो, तोपर्यंत भांडण इत्यादी लागत राहतात. परदेशी लोक पण समजतात, मृत्यू समोर आहे. कोणी प्रेरक आहे, आमच्या कडुन बॉम्बस बनवतात, परंतु काय करू शकतात? अविनाश नाटकांमध्ये तशीच नोंद आहे. आपल्याच विज्ञानाच्या बळा द्वारे आपल्याच कुळाचा नाश करतात. मुलं म्हणतात, पावन दुनिया मध्ये घेऊन चला, तर शरीराला थोडेच घेऊन जातील. बाबा काळांचे काळ आहेत, या गोष्टी कोणी जाणत नाहीत. हे पण गायन पण आहे मिरूँवा मौत मलुका शिकार(सर्वांचा मृत्यू होईल परंतू आपल्या नविन दुनियची खुशी होईल. ते लोक म्हणतात विनाश बंद होऊन शांती व्हायला पाहिजे. अरे विनाशा शिवाय सुख शांती कसे स्थापन होईल, म्हणून सृष्टीचक्रा वरती समजून सांगा. आता स्वर्गाचे गेट उघडत आहे. बाबा म्हणतात, या वरती एक पुस्तक पण छापा, शांतीधाम सुखधाम कडे जाण्याचे गेट. याचा अर्थ पण समजत नाहीत. खूप सहज आहे परंतु करोडो मधून कोणी समजतात. तुम्ही प्रदर्शनी इत्यादी मध्ये कधीच दिल शिकस्त, नाराज होऊ नको. प्रजा तर बनते ना. लक्ष मोठे आहे, कष्ट घ्यायचे आहेत. आठवण करण्याचे कष्ट घ्यायचे आहेत, यामध्येच अनेक जण नापास होतात. आठवण पण अव्यभिचारी पाहिजे. माया विसरायला लावते. विश्वाचे मालक कष्टाशिवाय थोडेच बनू शकतात. पूर्ण रीतीने पुरुषार्थ करायला पाहिजे. आम्ही सुखधामचे चे मालक होतो. अनेक वेळेस चक्र लावले आहे. आता बाबा ची आठवण करायची आहे, माया खूप विघ्न आणते. बाबांच्या कडे, सेवा समाचार येतात, आज विद्युत मंडळीला समजावले, आज ही सेवा केली. अविनाशी नाटका नुसार मातांचे नाव प्रसिद्ध होणारच आहे. मुलांनाही हा विचार बुध्दी मध्ये ठेवायचा आहे. त्यांना पुढे करायचे आहे. चैतन्य दिलवाडा मंदिर आहे, तुम्ही चैतन्य मध्ये बनाल, परत तुम्ही राज्य करत राहा. भक्तिमार्गा चे मंदिर इत्यादी राहणार नाहीत. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) एक बाबांशी अव्यभिचारी प्रेम ठेवत कर्मातीत अवस्था प्राप्त करायची आहे. हा जुना देह आणि जुन्या दुनिये पासून बेहदचे वैराग्य पाहिजे.

(२) कोणतेही कर्तव्य बाबाच्या श्रीमता विरुद्ध करायचे नाही. युद्धाच्या मैदानामध्ये कधी हार खायची नाही. डबल अहिंसक बनायचे आहे.

वरदान:-
आपल्या आत्मिक प्रकाशा द्वारे वातावरणाला परिवर्तन करण्याची सेवा करणारे, सहज सफलता मूर्त भव.

जसे साकार सृष्टीमध्ये रंगीत लाईट लावतात, तसेच वातावरण होते. जर हिरव्या रंगाची लाईट लावली तर चहूबाजू ला तसाच प्रकाश पसरतो. लाल लाईट लावली तर आठवणीचे वातावरण तयार होते. जेव्हा स्थुल लाईट वातावरण परिवर्तन करते, तर तुम्ही प्रकाश स्तंभ, पवित्रतेचा प्रकाश व सुखाच्या प्रकाशा द्वारे वातावरण परिवर्तन करण्याची सेवा करा. तेव्हा सफलता मूर्त बनाल. स्थुल लाईट डोळ्याने पाहतात, आत्मिक लाईट अनुभवाद्वारे जाणतील.

बोधवाक्य:-
व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ आणि संकल्प घालवणे, ही पण अपवित्रता आहे.