13-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, अमृत वेळेला दुसऱ्या सर्व विचाराला बंद करुन, एक बाबांची प्रेमाने आठवण करा, बाबांशी गोड गोड गोष्टी करा"

प्रश्न:-
मुलांची प्रत्येक गोष्ट अर्थ सहित आहे, अर्थ सहित वाक्य कोण बोलू शकतात?

उत्तर:-
जे देही अभिमानी आहेत, तेच प्रत्येक वाक्य अर्थ साहित बोलू शकतात. बाबा तुम्हाला संगमयुगा मध्ये, जे पण शिकवतात, सर्व अर्थ सहित आहे. देह अभिमानामध्ये मनुष्य जे काही बोलतात, ते सर्व विना अर्थ म्हणजे अनर्थ आहे. त्याद्वारे काही फळ निघत नाही, फायदा होत नाही.

गाणे:-
नेत्र हीन अज्ञानी लोकांना रस्ता दाखव, हे प्रभू.......

ओम शांती।
हे सर्व गीत इत्यादी भक्ती मार्गातील आहेत. तुमच्यासाठी गीतांची आवश्यकताच नाही. कोणत्याच कष्टाची गोष्ट नाही. भक्तीमार्गा मध्ये तर खूप कष्ट आहेत. अनेक रिती रिवाज आहेत, ब्राह्मणांना जेवू घालणे, तिर्था वरती विधी इत्यादी करणे, इत्यादी. सर्व कष्टा पासून बाबा सोडवतात. ज्ञान मार्गामध्ये असे काही करायचे नाही. मुखाद्वारे शिव शिव पण बोलायचे नाही. हे कायद्यानुसार नाही, याद्वारे काही फळाची प्राप्ती होत नाही. बाबा म्हणतात मनामध्ये समजायचे आहे की, मी आत्मा आहे. बाबा म्हणतात, अंतर्मुख होऊन माझीच आठवण करा. तर बाबा प्रतिज्ञा करतात, तुमचे पाप भस्म होतील. ही योग अग्नी आहे, ज्याद्वारे तुमचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही परत चालले जाल. इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. या सर्व स्वतःसोबत गोष्टी करण्याच्या युक्त्या आहेत. तुम्ही स्वतःशी गोष्टी करत राहा. बाबा म्हणतात मी कल्पकल्प तुम्हाला युक्ती सांगतो. हे पण जाणतात, या झाडाची वाढ हळूहळू होत राहते. मायाचे वादळ पण त्यावेळेस येतात, जेव्हा मी येऊन तुम्हा मुलांना मायेच्या बंधनापासून सोडवतो. सतयुगा मध्ये कोणतेच बंधन नसते. हे पुरुषोत्तम युग पण तुमच्या बुद्धीमध्ये अर्थ सहित आहे. येथील प्रत्येक गोष्ट अर्थ सहित आहे. देह अभीमानी ज्या गोष्टी करतील, त्या अनर्थ आहेत. देही म्हणजे आत्म अभिमानी ज्या गोष्टी करतात, त्या अर्थ सहित असतात, त्यांच्याद्वारे फळ निघते. आता भक्तिमार्ग मध्ये खूप कष्ट आहेत. असे समजतात, तिर्थ यात्रा इ. करणे, हे सर्व भगवंताच्या जवळ पोहोचण्याचे मार्ग आहेत, परंतु मुलांनी समजले आहे, वापस कोणीही जाऊ शकत नाही. प्रथम क्रमांका मध्ये जे, विश्वाचे मालक लक्ष्मीनारायण होते, त्यांचेच ८४ जन्म होतात, तर परत दुसरे कसे कोणी कसे सुटू शकतात. सर्वच चक्रा मध्ये येतात, तर कृष्णासाठी कसे म्हणू शकता, की ते नेहमी कायमच आहेत. होय कृष्णाचे नाव चालते येते बाकी आत्मा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये जरूर असेल, या सर्व गोष्टी मुलांना बाबांनी समजावल्या आहेत. हे शिक्षण आहे. विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षणा वरती लक्ष द्यायचे आहे. रोज आपला चार्ट किंवा दिनचर्या लिहण्यासाठी वेळ कायम करा. व्यापारी लोकांना खूप बंधन असतात, नोकरी करणाऱ्या वरती बंधन नसते. ते तर आपले काम पूर्ण केले आणि बंधनापासून मुक्त झाले. व्यापार्‍यांना तर कधी ग्राहकांना पुरवठा करावा लागतो, तर बुध्दीयोग बाहेर जातो. तर प्रयत्न करून वेळ काढायला पाहिजे. अमृतवेळ चांगली आहे. त्यावेळेस दुसऱ्या सर्व विचारांना बंद करायला पाहिजे. कोणतेच विचार यायला नको. बाबांची आठवण राहावी. बाबांच्या महिमा मध्ये लिहायला पाहिजे ज्ञानाचे सागर, पतित-पावन. बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवतात, तर त्यांच्या श्रीमता वर चालायला पाहिजे ना. सर्वात चांगली श्रीमत मिळते, मनमनाभव. दुसरे कोणी असे बोलू शकत नाही. कल्प कल्प तमोप्रधान पासुन सतोप्रधान बनण्याचे मत मिळते. बाबा म्हणतात माझीच आठवण करा, याला वशीकरण मंत्र म्हटले जाते. अर्थ सहित आठवण केल्यामुळेच खुशी होईल.

बाबा म्हणतात अव्यभिचारी म्हणजे फक्त माझीच आठवण करा. जसे भक्ती मध्ये एका शिवाची पूजाच अव्यभिचारी आहे परत व्यभिचारी पूजा झाल्यामुळे अनेकांची भक्ती करत राहतात. प्रथम अद्वैत भक्ती एका ची भक्ती करत होते. ज्ञान पण त्या एकाचे ऐकायचे आहे. तुम्ही मुल ज्याची भक्ती करत होते, ते स्वयम् भगवान तुम्हाला समजवत आहेत, गोड मुलांनो आता मी आलो आहे, हे भक्ती पर्व समाप्त झाले. तुम्ही प्रथम एक शिव बाबा चे मंदिर बनवले, त्या वेळेत तुम्ही अव्यभिचारी भक्त होते, म्हणून खूप सुखी होते, परत व्यभिचारी भक्त बनल्यामुळे द्वैत मध्ये आले. तेव्हा थोडे दुःख झाले. एक बाबाच सर्वांना सुख देणारे आहेत. बाबा म्हणतात मी येऊन तुम्हा मुलांना मंत्र देतो. मंत्र पण एकाचा ऐका. येथे कोणते देहधारी नाहीत. येथे तुम्ही बापदादा कडे येतात. शिवबाबा पेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, सर्वजण आठवण पण त्याचीच करतात. भारत च स्वर्ग होता. लक्ष्मी नारायण चे राज्य होते. त्यांना असे कोणी बनवले?ज्याची तुम्ही पूजा करतात. कोणालाही माहिती नाही, महालक्ष्मी कोण आहे, महालक्ष्मीचा पूर्वीचा जन्म कोणता होता?तुम्ही मुलं जाणतात ती जगदंबा आहे. तुम्ही सर्व माता आहात, वंदे मातरम. साऱ्या जगा वरती तुम्ही आपला डाव जमवत आहात. भारत माता काही एकीचे नाव नाही, तुम्ही सर्व शिवापासून योग बळा द्वारे शक्ती घेतात. शक्ती घेण्यामध्ये माया विघ्न आणते. युद्धामध्ये कोणी हात लावतात तर बहादूर होऊन लढायला पाहिजे ना. असे नाही हात लावला आणि तुम्ही फसले, ही मायाची लढाई आहे. बाकी कौरवाचे आणि पांडवाची काही लढाई झालेली नाही. त्यांचे आपसामध्ये युद्ध आहे. मनुष्य जेव्हा भांडण करतात, तर जमिनीच्या १-२ गुंठ्या साठी एकमेकांचा खून करतात. हे सर्व पूर्वनियोजित नाटक आहे. राम राज्य आणि रावण राज्य. आता तुम्हा मुलांनाही ज्ञान आहे, आम्ही राम राज्यांमध्ये जाऊ, तेथे खूप सुख आहे, नाव च सुखधाम आहे.

तेथे दुःखाचे नाव रूप नसते. आता जेव्हा बाबा आले आहेत, अशी राजाई देण्यासाठी, तर मुलांना खूप पुरुषार्थ करायला पाहिजे ना. बाबा म्हणतात मुलांनो थकुन जाऊ नका. शिव बाबांची आठवण करत राहा, ते पण बिंदी आहेत, आम्ही आत्मा पण बिंदी आहोत. येथे भूमिका करण्यासाठी आलो आहोत, आता भूमिका पूर्ण झाली. आत्ता बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म नष्ट होतील. विकर्म तर आत्म्या वरतीच चढतात. शरीर तर येथेच नष्ट होतात. काही मनुष्य तर आपल्या शरीराला नष्ट करतात परंतु याद्वारे काही पाप नष्ट होत नाहीत. पापात्मा म्हणले जाते. साधू संत इ. म्हणतात, आत्माच- परमात्मा आहे, असे अनेक वेग वेगळी मत आहेत. आता तुम्हाला एकच श्रीमत मिळत आहे. बाबांनी तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे. आत्माच सर्वकाही जाणते. अगोदर ईश्वराच्या बद्दल काहीच जाणत नव्हते. सृष्टीचक्र कसे फिरते, आत्म किती छोटी आहे. प्रथम आत्म्याची अनुभूती करवतात. आत्मा खूपच सुक्ष्म आहे, त्याचा साक्षात्कार होतो. त्या सर्व भक्तीमार्गात गोष्टी आहेत. ज्ञानाच्या गोष्टी तर बाबाच समजवतात. ते पण भ्रकुटीच्या बाजूला येऊन बसतात. हे पण लगेच समजतात. या सर्व नवीन गोष्टी बाबाच समजवतात. हे चांगल्या रीतीने आठवण करा, विसरू नका. बाबांची जितकी आठवण कराल तेवढे विकर्म नाश होतील. तुमचे भविष्य, विकर्म नष्ट होण्या वरतीच आधारीत आहे. तुम्हा मुलांच्या सोबत भारत खंड पण सर्वात भाग्यशाली आहे, यासारखा भाग्यशाली दुसरा कोणताही खंड नाही. येथे बाबा अवतरित होतात, ज्याला अल्लाहची बाग म्हटले जाते. तुम्ही जाणता बाबा परत भारताला फुलांची बाग बनवत आहेत. तेथे जाण्यासाठी आम्ही शिक्षण घेत आहोत. साक्षात्कार पण करतो, हे पण जाणतात तीच महाभारताची लढाई आहे, परत अशी लढाई कधीच लागत नाही. मुलांसाठी नवीन दुनिया पण जरूर पाहिजे. नवीन दुनिया होती, तेव्हा भारत स्वर्ग होता. पाच हजार वर्ष झाले, लाखो वर्षाची गोष्टच नाही. कल्पाचा अवधी लाखो वर्ष असते तर मनुष्य अगणित, असंख्य झाले असते. हे पण कोणाच्या बुद्धी मध्ये बसत नाही, इतका अवधी असू शकत नाही, कारण लोकसंख्या इतकी नाही.

आता तुम्ही मुलं समजतात, आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी आम्ही विश्वा वरती राज्य करत होतो, दुसरे कोणते खंड नव्हते, ते तर नंतर येतात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत, बाकी कोणाच्या बुद्धीमध्ये बिलकुल नाहीत. थोडा पण इशारा देतात तर समजतात, गोष्टी तर बरोबर आहेत, आमच्या पूर्वी जर कोणता धर्म होता. आता तुम्ही समजावून सांगू शकता एक आदी सनातन धर्म होता, तो आत्ता प्रायलोप झाला आहे. कोणी आपल्याला देवता धर्माचे म्हणू शकत नाहीत. असे समजत नाहीत की, आम्ही आदी सनातन देवीदेवता धर्माचे होतो, परत तो धर्म कोठे गेला? हिंदूधर्म कोठून आला? कोणाचेही या गोष्टी मध्ये चितंन चालत नाही. तुम्ही मुलं समजू शकता, बाबाच ज्ञानाचे सागर, ज्ञानाचे अधिकारी आहेत. तर जरूर येऊन ज्ञानच ऐकवतील. ज्ञानाद्वारेच सदगती होते, यामध्ये प्रेरणेची गोष्ट नाही. बाबा म्हणतात, जसा मी आता आलो आहे, असेच कल्प कल्पांतर येतो. कल्पा नंतर पण येऊन, परत सर्व मुलांना भेटेल. तुम्ही पण असेच चक्र लावतात. तुम्ही राज्य घेता, परत गमावतात. हे नाटक आहे, तुम्ही सर्व कलाकार आहात. आत्मा कलाकार होऊन, रचनाकार, निर्माता, मुख्य कलाकारां ना जाणले नाही, तर ते काय कामाचे आहेत?तुम्ही मुलं जाणता, कशी आत्मा शरीर धारण करते आणि अभिनय करते. आता परत जायचे आहे. आता या जुन्या दुनियेचा अंत आहे. खूप सहज गोष्टी आहेत. तुम्ही मुलं जाणता, बाबा कसे गुप्त बसले आहेत. गोदरी मध्ये करतार पाहिले. आता पाहिले म्हणा किंवा जाणले म्हणा एकच गोष्ट आहे. आत्म्याला पाहू शकतात परंतु त्याद्वारे काहीच फायदा नाही. कोणालाही समजून येऊ शकणार नाही. नवविध भक्ती मध्ये खूप साक्षात्कार करत होते. अगोदर तुम्हा मुलांना पण खूप साक्षात्कार केले होते, अनेक कार्यक्रम वतन मधुन येत होते. परत अंत काळामध्ये पण तुम्ही साक्षात्कार करत राहाल. आता राजयोगाचे शिक्षण घेऊन हुशार बना. अभ्यास करणार नाही परत परिणाम काय निघेल, तोंडच पिवळे होईल, परत समजतील आम्ही खूप वेळ वाया घालवला. जितके बाबाच्या आठवणीमध्ये राहाल, आठवणीच्या शक्तीद्वारेच पाप नष्ट होतील. जितके बाबांच्या आठवणीमध्ये राहाल, तेवढा खुशीचा पारा चढेल.

मनुष्याला माहिती नाही की, भगवंताची का आठवण केली जाते?असे पण म्हणतात तुम्ही मात पिता, आम्ही बालक, परंतु अर्थ जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता, शिवाच्या चित्रावरती समजावून सांगू शकता, हे ज्ञानाचे सागर, पतित-पावन आहेत. त्यांची आठवण करायची आहे. असे म्हणतात तेच बाबा आले आहेत, सुखाचा रस्ता दाखवण्यासाठी. हे शिक्षण आहे यामध्ये जितका पुरुषार्थ करताल, तेवढे उच्चपद प्राप्त कराल. हे कोण साधू संत आहेत, ज्यांची गादी चालत येते. ही तर शिवबाबाची गादी आहे. असे नाही हे जातील, परत दुसरे कोणी गादी वरती बसतील. बाबा तर सर्वांना घेऊन जातात. काही मुलं फालतू विचारांमध्ये आपला वेळ वाया घालवतात. असे विचार करतात, खूप धन कमवू, नातवंडे खातील, नंतर कामाला येईल, बँक लॉकरमध्ये जमा करू, मूलंबाळं खात राहतील, परंतु शासन कोणाला ही सोडणार नाही, म्हणून जास्त विचार न करता आपल्या भविष्य कमाई मध्ये लागायला पाहिजे. आता मुलांना पुरुषार्थ करायचा आहे, असे नाही जे अविनाश नाटकांमध्ये असेल, ते होईल.

पुरुषार्था शिवाय तर भोजन पण मिळणार नाही, परंतु कोणाच्या भाग्या मध्ये नाहीतर असे विचार येतात. भाग्या मध्ये नाहीतर परत ईश्वरीय पुरुषार्थ पण काय करतील?ज्यांच्या भाग्या मध्ये आहे, ते चांगल्या प्रकारे धारण करतात आणि करवतात. बाबा तुमचे शिक्षक पण आहेत, गुरु पण आहेत, तर त्यांची आठवण करायला पाहिजे ना. सर्वात प्रिय शिक्षक आणि गुरुच असतात, त्यांचीच आठवण करायला पाहिजे. बाबा युक्ती तर खूप सांगतात, तुम्ही साधुसंत इत्यादी ला निमंत्रण देऊ शकतात. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) पुरुषार्थ करून आपल्या भविष्य कमाई मध्ये लागायला पाहिजे. अविनाश नाटका मध्ये असेल तर करू, असे म्हणून पुरुषार्थ हीन बनयचे नाही.

(२) संपूर्ण दिवसामध्ये जे पाप होतात किंवा कुणाला दुःख देतात, तर त्याची नोंद करायची आहे. बाबांना खरे सांगायचे आहे, स्वच्छ बनून एका बाबांच्या आठवणी द्वारे, सर्व कर्मभोग नष्ट करायचा आहे.

वरदान:-
प्रत्येक संकल्प किंवा कर्माला श्रेष्ठ आणि सफल बनवणारे ज्ञानस्वरूप समजदार भव.

जे ज्ञानस्वरुप समजदार बणुन कोणतेही संकल्प किंवा कर्म करतात, ते सफलता मुर्त बनतात. त्याचीच आठवण भक्ती मार्गामध्ये, कोणतेही कार्य सुरू करताना स्वस्तिक काढतात किंवा गणेशाला नमन करतात. हे स्वस्तिक म्हणजे स्व स्थितीमध्ये स्थित होणे आणि गणेश म्हणजे ज्ञानसंपन्न स्थितीचे सुचक आहे. तुम्ही मुलं जेव्हा स्वत: ज्ञान संपन्न बणुन प्रत्येक संकल्प कराल, तर सहज सफलतेचा अनुभव होत राहील.

बोधवाक्य:-
ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे खुशी, म्हणून खुशीचे दान करत चला.