14-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुमचा संग फारच चांगला पाहिजे,खराब संगतीचा रंग लागला तर विकारांमध्ये जाल,कुसंग बुध्दीला तुच्छ बनवतो"

प्रश्न:-
आता तुम्हा मुलांना कोणता उमंग उत्साह यायला पाहिजे?

उत्तर:-
तुम्हाला उमंग उत्साह यायला पाहिजे की,गावा गावांमध्ये जाऊन सेवा करावी.तुमच्या जवळ जे काही आहे,ते सर्व सेवार्थ आहे.बाबा मुलांना श्रीमत देतात,मुलांनो या जुन्या दुनिये पासून आपली बुद्धी रुपी पल्लव मुक्त करा. कोणत्याही गोष्टींमध्ये ममत्व ठेवू नका, या जुन्या दुनियेत मन लावू नका.

गाणे:-
पापाच्या दुनिये पासून कुठे दूर घेऊन चल,जिथे चैन आणि शांती असेल.

ओम शांती।
पाप आत्म्याची दुनिया आणि पुण्यात्मा ची दुनिया,अशी नावं आत्म्या वरतीच ठेवली जातात.आत्ता येथे दुःख आहे म्हणून बोलावतात.पुण्य आत्म्याच्या दुनिया मध्ये बोलवत नाहीत,की कुठे घेऊन चला.तुम्ही मुलं समजतात हे कोणी पंडित किंवा संन्यासी ग्रंथवादी इत्यादी ऐकवत नाहीत,हे(ब्रह्मा)तर स्वतः म्हणतात,मी हे ज्ञान जाणत नव्हतो,रामायण ग्रंथ इत्यादी तर पुष्कळ वाचत होतो.बाकी हे ज्ञान मी तुम्हाला ऐकवतो,हे ब्रह्मा पण ऐकतात.आता ही पाप आत्म्याची दुनिया आहे.पुण्य आत्म्या साठी फक्त म्हणाल की,हे होऊन गेले,बस पूजा करून येतील. शिवाची पूजा करून येतील.तुम्ही मुलं आत्ता कोणाची पूजा कराल?तुम्ही जाणता उच्च ते भगवान शिव आहेत,ते आज्ञाधारक पिता शिक्षक आणि आज्ञाधारक धर्मसंस्थापक आहेत.सोबत घेऊन जाण्याची खात्री देतात,बाकी कोणते गुरु इत्यादी असे खात्री देऊ शकत नाही.ते पण सर्वांना थोडेच घेऊन जातील.आता तुम्ही समोर बसले आहात,येथून आपल्या घरी गेल्यानंतर तुम्ही विसरून जाता.येथे सन्मुख ऐकण्या मध्ये आनंद होतो.बाबा म्हणतात मुलांनो चांगल्या रीतीने अभ्यास करा,गफलत करू नका, कुसंगती मध्ये फसू नका,नाहीतर आणखीनच तुच्छ बुद्धी व्हाल.मुलं समजतात आम्ही काय होतो? किती पाप केले?आता आम्ही असे श्रेष्ठ देवता बनत आहोत,ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे,परत हे घर इत्यादीची काय काळजी करायची?या दुनियेचे जे काय आहे,ते सर्व विसरायचे आहे,नाहीतर योग मार्गामध्ये विघ्न येतील.यामध्ये मन लागत नाही.आम्ही नवीन दुनिया मध्ये हिरे मोत्यांचे महल बनवू.येथील पैसे इ. कोणत्या गोष्टी चांगल्या वाटतात,तर शरीर सोडते वेळी त्यामध्ये मोह जाईल.माझे माझे कराल तर अंत काळात त्या समोर येतील.हे तर सर्व येथेच नष्ट होणार आहे.आम्ही आपल्या राजधानी मध्ये जाऊ,म्हणून यामधुन ममत्व काढून टाकायचे आहे.तेथे खूपच सुख राहते,नावच स्वर्ग आहे.आता आम्ही आपल्या वतन मध्ये जाऊ, हे तर रावणाचे वतन आहे.आपले नाही. यापासून मुक्त होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.जुन्या दुनिया पासून आपले पल्लव मुक्त करायचे आहे, म्हणून बाबा म्हणतात कोणत्याच गोष्टींमध्ये ममत्व ठेवू नका.पोट काही जास्त खात नाही,फालतू गोष्टी वरती खर्च पुष्कळ होतो.तुम्हा मुलांना सेवा करण्यासाठी उमंग उत्साह असायला पाहिजे.अनेक मुलं आहेत ज्यांना गावा गावांमध्ये सेवा करण्याची आवड आहे, बाकी ज्यांना सेवेची आवड नाही,ते काही कामाचे नाहीत.जसे पिता तसेच मुलांना बनायला पाहिजे,त्यांचा परिचय द्यायचा आहे.बाबांची आठवण करा आणि बाबा पासून वारसा घ्या.मुलांना आवडते आम्ही बाबांचा परिचय देण्यासाठी जातो,तर बाबा पण हिम्मत देतात.बाबा सेवा करण्यासाठी आले आहेत,सेवा करण्यासाठीच सर्व काही आहे.बाबांचा परिचय सर्वांना द्यायचा आहे,बाबा एकच आहेत.भारतामध्येच आले होते,भारतामध्ये देवतांचं राज्य होते,कालचीच गोष्ट आहे. लक्ष्मी नारायणाचे राज्य होते,परत राम सिता आले,परत विकारां मध्ये गेले,रावण राज्य सुरू झाले.शिडी उतरत उतरत आता परत प्रगती करणे, सेकंदाची गोष्ट आहे.

एक होते खरे प्रेम,दुसरे होते कृत्रिम प्रेम. खरे प्रेम बाबांशी तेव्हाच होईल,जेव्हा स्वतःला आत्मा समजाल.आता तुम्हा मुलांचे दुनिया मध्ये कृत्रिम प्रेम आहे,हे तर नष्ट ठेवणार आहे.सेवा करणारे कधीच उपाशी मरणार नाहीत,तर मुलांना सेवेची आवड पाहिजे.तुमची ईश्वरीय संस्था खूप सरळ आहे.कोणी समजत नाहीत कि,धर्म कसे स्थापन होतात?ख्रिस्त आले,क्रिश्चन धर्म स्थापन केला.धर्माची वृध्दी होत गेली.त्यांच्या मतावर चालत चालत उतरत आले. आता तुम्हा मुलांना देही अभिमानी बनायचे आहे.अर्धा कल्प रावण राज्यामध्ये,बाबांना विसरलो.आता बाबा नी येऊन सुजाग केले आहे.बाबा म्हणतात अविनाश नाटका नुसार तुम्हाला उतरायचे होते.यामध्ये तुमचाही दोष नाही.रावण राज्या मध्ये दुनियाची अशी हालत होते.बाबा म्हणतात मी आलो आहे,तुम्हाला शिकवण्यासाठी. तुम्ही परत आपली राजाई घ्या.बाकी काही कष्ट देत नाहीत.बाजारच्या खराब गोष्टी खाऊ नका आणि माझी आठवण करा.आता तुम्ही मुलं जाणता हे सृष्टीचे चक्र आहे,ज्याची परत पुनरावृत्ती होईल.तुमच्या बुद्धीमध्ये नाटकाचे आदी मध्य अंतचे ज्ञान आहे.तुम्ही कोणालाही समजावू शकता,प्रथम तर बाबांची आठवण राहायला पाहिजे.सेवेमध्ये आपसात मिळून सोबती बनवायला पाहिजे.मातांना पण सेवा करायला जायला पाहिजे,यामध्ये घाबरण्याची कोणतीच गोष्ट नाही.चित्र इत्यादी सर्व तुम्हाला मिळतील.तुमची सेवा जास्त होईल,असे म्हणतील तुम्ही चालले जाल,परत आम्हाला कोण शिकवतील?तुम्ही सांगा आम्ही सेवा करण्यासाठी तयार आहोत,सेवा केद्राला लागणाऱ्या घराची सोय करा,अनेकांच्या कल्याणासाठी निमित्त बनाल.बाबा मुलांना सेवेसाठी हिमंत देतात.मुलां मध्ये हिम्मत आहे तर,सेवेची वृध्दी पण होते.ही काही यात्रा नाही,जी दहा-पंधरा दिवस चालून परत बंद होईल.ही यात्रा तर चालतच राहते.हे आत्मा आणि परमात्मा चे मिलन होते,यालाच खरी यात्रा म्हटले जाते.ती तर आत्ता चालत आहे.यात्रा बंद तेव्हाच होईल जेव्हा सेवा पूर्ण होईल.अविनाश नाटका नुसार मुलांना सेवेची खूप आवड पाहिजे.जे बेहदच्या बाबां मध्ये ज्ञान आहे,तेच मुलांच्या बुद्धी मध्ये आहे.उच्च ते उच्च बाबा द्वारे आम्ही खूप श्रेष्ठ बनत आहोत.अशा गोष्टी स्वतःबरोबर करायच्या आहेत.आपसा मध्ये चर्चा करा.बाबांची श्रीमत घेऊन,सेवा करायला पाहिजे.काही गोष्टीची आवश्यकता आहे,तर बाबा दुल्हेलाल बसले आहेत.हे सर्व पूर्व नियोजित नाटकांमध्ये नोंद आहे.काळजीची कोणतीच गोष्ट नाही,नाहीतर नवीन दुनियेची स्थापना कशी होईल.दुसरी गोष्ट,म्हणजे जे करतील त्यांना मिळेल. आता तुम्ही मुलं पत्थर बुद्धी पासून हिऱ्या सारखे बनतात.बाबा ज्ञानाद्वारे इतके सरळ करतात,माया परत त्याला पकडून दूर घेऊन जाते.

तुम्हा मुलांची संगत खूपच चांगली पाहिजे.खराब संगत केल्यामुळे विकारांमध्ये जाल.बाबा सिनेमा इत्यादी पाहण्यासाठी मना करतात.ज्याला सिनेमा पाहण्याची सवय झाली,ते पतित बनल्याशिवाय राहू शकत नाहीत.येथे तर प्रत्येकाचे कार्य व्यवहार खराब आहे, नावच वेश्यालय आहे.या वेश्यालयाला पूर्णपणे आग लागणार आहे.कुंभकरण सारखे आसुरी निद्रे मध्ये झोपले आहेत. तुम्ही समजता आम्ही शिवालय मध्ये जात आहोत.अगोदर आम्ही पण माकडा सारखे होतो,या वरतीच रामायण मध्ये गोष्टी आहेत.आता तुम्ही बाबांचे मदतगार बनले आहात.तुम्ही आपल्या शक्ती द्वारे राज्य स्थापन करत आहात, परत हे रावण राज्य नष्ट होईल.बाबा तुम्हा मुलांना अनेक प्रकारच्या युक्त्या सांगत राहतात. कुणाला दान करणार नाही तर फळ पण कसे मिळेल?प्रथम तर दहा पंधरा लोकांना,बाबांचा परिचय देऊन नंतर भोजन करायला पाहिजे.प्रथम शुभ काम करून या,यामध्ये तुमचे कल्याण आहे.कोणत्याही देहधारी ची आठवण करू नका.ही तर पतित दुनिया आहे.पतीत पावन एक बाबांची आठवण करा तर,पावन दुनिये चे मालक बनाल. अंतमती सो गती होईल.तर कोणाला ना कोणाला बाबांचा परिचय देऊन परत भोजन करायला पाहिजे.तुम्ही सर्वांना हेच सांगा,बाबांची आठवण केल्यामुळे तुम्ही इतके उच्च बनाल.अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता पदाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

रात्री क्लास १७/३/६८.

कधीही कोणते भाषण इत्यादी करायचे असेल तर आपसा मध्ये भेटून,दोन चार वेळेस त्याची पुनरावृत्ती करा,परत त्यामध्ये सुधारणा करून तयार करा,तर चांगले भाषण करू शकाल.मुख्य गोष्ट एकच आहे,गीताच्या भगवंताची. त्याच्यावर तुम्ही विजय मिळवला,तर सर्व गोष्टींमध्ये विजय होऊन जाईल. यासाठी संमेलन करा.समजत राहतील झाडाची वृध्दी तर जरूर होईल.वादळ तर सर्वांना लागतात,अनेक जण लिहितात,बाबा आम्ही काम विकारा कडून हरलो,याला म्हटले जाते केलेली सर्व कमाई नष्ट करणे.क्रोध इत्यादी केला तर म्हणाल,थोडे नुकसान झाले. यासाठी समजावे लागते,काम विकाराला जिंकल्यामुळे,जगजीत बनू शकतात.काम विकारा द्वारे हरल्या नंतर केलेली सर्व कमाई नष्ट होते,दंड पडतो.लक्ष खूप मोठे आहे,म्हणून खूप खबरदारी घ्यावी लागते.तुम्ही मुलं जाणता पाच हजार वर्षापूर्वी पण आम्हाला बादशाही मिळाली होती, आता परत दैवी राजधानी ची स्थापना होत आहे.या शिक्षणाद्वारे आम्ही त्या राजधानी मध्ये जात आहोत.सर्व आधार राजयोगाच्या अभ्यासा वरती आहे. शिक्षण आणि धारणा द्वारेच तुम्ही बाप समान बनाल.रजिस्टर पण पाहिजे ना, ज्यामुळे माहिती होईल,किती लोकांना तुम्ही पवित्र बनवले?जितकी जास्त धारणा कराल,तेवढे गोड बनाल.खूप प्रेमळ मुलं पाहिजेत.तुम्हा मुलांसाठी तो दिवस आला आज,ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत होते कि,मुक्ती मध्ये जाऊ.बाबा सर्वांना एकत्रच मुक्ती जीवनमुक्त देतात.जे देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करतात,ते जीवनमुक्ती मध्ये येतील.बाकी सर्व मुक्ती मध्ये जातील. हिशेब कोणी काढू शकत नाहीत.काही राहतील पण,विनाशाचा साक्षात्कार करतील.ही कल्याणा ची वेळ पण पाहतील.प्रत्येक गोष्टींमध्ये पुरुषार्थ करावा लागतो.असे पण नाही आठवणीमध्ये बसाल,तर काम होऊन जाईल.सेवा केंद्रा साठी घर मिळून जाईल,नाही.ते तर अविनाश नाटकांमध्ये असेल तरच होईल.इच्छा ठेवायच्या नाहीत.पुरुषार्थ करायचा आहे.बाकी तेच होते, जे पूर्व नियोजित नाटकांमध्ये आहे.पुढे चालून तुमची वृत्ती पण भावा भावा सारखी पवित्र होईल.जितका पुरुषार्थ कराल,तेवढी पवित्र वृत्ती राहिल.आम्ही अशरीरी आलो होतो,८४ जन्माचे चक्र पूर्ण झाले.आत्ता बाबा म्हणतात,कर्मातीत अवस्थां मध्ये जायचे आहे.तुम्हाला वास्तव मध्ये कोणत्याही ग्रंथ इत्यादी वरती वाद-विवाद करण्याची आवश्यकता नाही.मुख्य गोष्ट आठवण करणे आणि सृष्टी चक्राचे आदी मध्य अंतला समजले आहे.चक्रवर्ती राजा बनवायचे आहे,या सृष्टीच्या चक्राला फक्त समजायचे आहे. याचेच गायन आहे,सेकंदा मध्ये जीवनमुक्ती.तुम्हा मुलांना आश्चर्य वाटत असेल,अर्धा कल्प भक्ती चालते,ज्ञान काहीच नाही.ज्ञान तर फक्त बाबा जवळच आहे.बाबा द्वारेच जाणू शकतो. हे बाबा खूपच असाधारण आहेत, म्हणून करोडो मधून काहीच निघतात. ते शिक्षक असे थोडेच म्हणतील,हे तर म्हणतात, मी पिता शिक्षक आणि गुरु आहे.तर मनुष्य ऐकून आश्चर्य खातील. भारताला भारतमाता म्हटले जाते. कारण अंबा चे नाव खूप प्रसिद्ध आहे. आंबाची खूप मोठी यात्रा भरते.अंबा अक्षर खूपच गोड आहे.लहान मुलं पण मातेला च प्रेम करतात,कारण माता खाऊ पिऊ घालते,पालन पोषण करते. आता अंबाचा पिता पण पाहिजे ना.ही तर मुलगी दत्तक आहे,हिचा पती तर नाही.ही नवीन गोष्ट आहे ना.प्रजापिता ब्रह्मा जरूर दत्तक घेतील ना.या सर्व गोष्टीं बाबाच येऊन तुम्हा मुलांना समजवतात.खूप मोठी यात्रा भरते,पूजा होते कारण तुम्ही मुलं सेवा करत आहात.मम्मानी अनेकांना शिकवले आहे,तेवढे कोणी शिकू शकणार नाही.मम्माचे नाव खूपच प्रसिद्ध आहे, यात्रा पण खूप मोठी भरते.आता तुम्ही मुलं जाणतात,बाबांनी जे रचनेच्या आदी मध्यं अंतचे सर्व रहस्य तुम्हा मुलांना समजावले आहे.तुम्हाला बाबांच्या घराची पण माहिती झाली आहे. बाबांशी पण प्रेम आहे,घराशीही प्रेम आहे.हे ज्ञान तुम्हाला आता मिळते,या राजयोगाच्या शिक्षणामुळे खूप कमाई होते,तर खुशी राहायला पाहिजे ना. तुम्ही तर खूपच साधारण आहात. दुनियेला हे माहिती नाही,बाबाचं हे ज्ञान देतात.सर्व नव-नवीन गोष्टी मुलांना ऐकवतात.शिक्षणामुळे नवीन दुनिया बनते,तर जुन्या दुनियेपासून वैराग येते. तुला मुलांच्या मना मध्ये ज्ञानाचा आनंद राहतो.बाबांची आणि घराची आठवण करायची आहे.घरी तर सर्वांना जायचे आहेच.बाबा तर सर्वांना म्हणतील, मुलांनो,मी तुम्हाला मुक्ती,जीवनमुक्ती देण्यासाठी आलो आहे परत तुम्ही विसरून का जाता?मी तुमचा बेहदचा पिता आहे.राज योग शिकवण्यासाठी आलो आहे,तर काय तुम्ही मुलं श्रीमत वरती चालणार नाहीत?परत खूप नुकसान होईल.हे बेहदचे नुकसान आहे.बाबांचा हात सोडला तर कमाई मध्ये नुकसान होईल.अच्छा शुभ रात्री,ओम शांती.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) या दुनिया मध्ये जे काही आहे,त्याला विसरायचे आहे.बाबा सारखे आज्ञाधारक बणुन सेवा करायची आहे. सर्वांना बाबाचा परिचय द्यायचा आहे.

(२) या पतित दुनियेमध्ये स्वतःला कुसंगा पासून वाचवायचे आहे.बाजारा तील खराब वस्तूखायच्या नाहीत. सिनेमा पाहायचा नाही.

वरदान:-
परमात्म आठवणीच्या गोदीमध्ये सामावणारे संगमयुगी श्रेष्ठ भाग्यवान आत्मा भव.

संगम युग स्वर्गा पेक्षा पण श्रेष्ठ आहे कारण आत्ताचे गायन आहे,अप्राप्त कोणती वस्तू ब्राह्मणांच्या संसारांमध्ये नाही.एक बाबा मिळाले तर सर्व काही मिळाले.आता तुम्ही मुलं कधी अतिंद्रीय सुखाच्या झोक्यामध्ये झोके घेतात,तर कधी खुशी,कधी शांती,कधी ज्ञान,कधी आनंद आणि कधी परमात्मा गोदीमध्ये झोके घेत राहतात.परमात्म गोदी आहेच आठवणीची प्रेमळ अवस्था.ही गोद सेकंदांमध्ये अनेक जन्माचे दुःख दर्द विसरायला लावते,तर या श्रेष्ठ संस्काराला नेहमी स्मृतीमध्ये ठेवून भाग्यवान आत्मा बना.

बोधवाक्य:-
असे सुपात्र बना,जे बाबा तुमचे गीत गातील आणि तुम्ही बाबांचे गीत गाल.