06-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, स्वतःला पहा मी फुला सारखे बनलो आहे, देह अहंकारा मध्ये येऊन काट्यासारखे तर बनत नाही? बाबा आले आहेत, तुम्हाला काट्या पासून फुलासारखे बनवण्यासाठी"

प्रश्न:-
कोणत्या निश्चयाच्या आधारा मुळे बाबांशी खुप प्रेम होऊ शकते?

उत्तर:-
प्रथम स्वतःला आत्मा निश्चय करा, तर बाबांशी प्रेम राहील. हा पण निश्चय पाहिजे की, निराकार शिव पिता या भागीरथ (ब्रह्माचा रथा) मध्ये विराजमान आहेत. आम्हाला यांच्याद्वारे शिकवत आहेत. जेव्हा निश्चय कमी होतो, तर प्रेम पण कमी होते.

ओम शांती।
काट्या पासून फुलासारखे बनवणारे भगवान अथवा बागवान भगवानुवाच. मुलं जाणतात आम्ही येथे काट्या पासून फुला सारखे बनण्यासाठी आलो आहोत. प्रत्येक जण समजतात आम्ही पूर्वी काट्यां सारखे होतो, आता फुला सारखे बनत आहोत. बाबांची महिमा तर खूप करतात, हे पतित पावन. ते नावाडी, बागवान, पाप कटेश्वर आहेत. अनेक नाव आहेत परंतु चित्र सर्व जागी एकच आहेत. त्यांची महिमा खूप करतात, ज्ञानाचे सागर, सुखाचे सागर. आता तुम्ही जाणता, आम्ही त्या एका पित्या जवळ बसलो आहोत. काट्यां सारख्या मनुष्याला आता आम्ही फुलासारखे बनवण्यासाठी आलो आहोत. हाच मुख्य उद्देश आहे. आता प्रत्येकाने स्वतःला विचारायचे आहे की माझ्या मध्ये किती गुण आहेत? मी सर्वगुणसंपन्न बनलो आहे? अगोदर देवतांची महिमा करत होते, स्वतःला काट्यासारखे समजत होते, मज निर्गुणा मध्ये कोणतेच गुण नाहीत, असे समजत होते, कारण ५ विकार आहेत. देह अभिमान पण खूप मोठा विकार आहे. स्वतःला आत्मा समजता तर बाबांच्या सोबत खूप प्रेम राहील. आता तुम्ही जाणता निराकार बाबा या रथा वरती विराजमान आहेत. हा निश्चय होता, होता परत कमी होतो. तुम्ही म्हणतात आम्ही शिवबाबा जवळ आलो आहोत. ते रथामध्ये विराजमान आहेत, बिल्कुल पक्का निश्चय पाहिजे. यामध्येच संशय मध्ये येतात. कन्याचे लग्न होते तर ती समजते पती कडून खूप सुख मिळेल, परंतु काय सुख मिळते? लगेच अपवित्र बनते. कन्या आहे तर, मात पिता इत्यादी सर्व तिच्या पाया पडतात, कारण पवित्र आहे. अपवित्र बनली आणि सर्वांच्या पुढे पाया पडावे लागते. आज सर्व तिच्या पाया पडत होते, उद्या दुसऱ्यांच्या पाया पडू लागते. आता तुम्ही मुलंच संगम युगा मध्ये आहात, उद्या कुठे असाल? आज हे घर घाट काय आहे, खूपच खराब दुनिया झाली आहे. या दुनियेला वेश्यालय पण म्हटले जाते. विकारा द्वारे संतती होते. तुम्ही शिवालय मध्ये होते. आज पासून पाच हजार वर्षापूर्वी खूप सुखी होते. दुःखाचे नाव नव्हते, आता परत असे श्रेष्ठ बनण्यासाठी तुम्ही येथे आले आहात. मनुष्यांना शिवालयची माहितीच नाही. स्वर्गाला शिवालय म्हटले जाते. शिवबाबांनी स्वर्गाची स्थापना केली. बाबा तर सर्वजण म्हणतात परंतु विचारा ते कुठे आहेत? तर म्हणतील ते तर सर्वव्यापी आहेत, मांजर, कुत्रा, मगर मासे इत्यादी मध्ये आहेत. तर खूप फरक झाला ना. बाबा म्हणतात तुम्ही पुरुषोत्तम होते, परत ८४ जन्म भोगून कसे बनले आहात? नर्कवासी बनले आहात, म्हणून सर्व बोलवतात, हे पतित पावन तुम्ही या. आता बाबा पावन बनवण्यासाठी आले आहेत, ते म्हणतात या अंतिम जन्मांमध्ये विष पिणे म्हणजे विकारी होणे बंद करा, तरीही समजत नाहीत. सर्व आत्म्यांचे पिता म्हणतात पवित्र बना, सर्व सर्वजण म्हणतात पण बाबा. तर प्रथम आत्म्याला त्या बाबांची आठवण येते परत या बाबाची आठवण येते. निराकार मध्ये ते बाबा परत साकार मध्ये ब्रह्मा बाबा. परमात्मा या पतित आत्म्याला सन्मुख समजवतात. तुम्ही पण प्रथम पवित्र होते, बाबांच्या सोबत राहत होते, परत तुम्ही येथे भूमिका वठवण्या साठी आले. या सृष्टी चक्राला चांगल्या रीतीने समजून घ्या. आता मी सतयुगा मध्ये, नविन दुनिया मध्ये जाणार आहोत. तुमची इच्छा आहे ना, स्वर्गामध्ये जावे. तुम्ही म्हणत होते कृष्णासारखा मुलगा असावा, आता मी आलो आहे तुम्हाला असे बनवण्यासाठी. स्वर्गा मध्ये कृष्णा सारखेच मुलं असतात. सतोप्रधान फुला सारखे असतात ना. आता तुम्ही कृष्णपुरी मध्ये जात आहात. तुम्ही तर स्वर्गाचे मालक बनतात. स्वतःला विचारायचे आहे, आम्ही फुलासारखे किती बनलो आहोत? कुठे देह अहंकारा मध्ये येऊन, विकारी तर नाही बनत? मनुष्य स्वतःला आत्मा समजण्याच्या ऐवजी देह समजतात. आत्म्याला विसरल्यामुळे पित्याला पण विसरले आहेत. शिवबाबा ना त्यांच्या द्वारेच जाणल्यामुळे वारसा मिळतो. बेहद बाबा कडुन वारसा तर सर्वांना मिळतो. सर्वांना वारसा मिळतो. एक पण राहू शकत नाही. बाबा येऊन सर्वांना पावन बनवतात, निर्वाण धाम मध्ये घेऊन जातात. ते तर म्हणतात ज्योती, ज्योत सामावले, ब्रह्म मध्ये मिळाले. ज्ञान काहीच नाही. तुम्ही जाणतात, आम्ही कोणा जवळ आलो आहोत? हा काही मनुष्याचा सत्संग नाही. आत्मा, परमात्मा पासुन वेगळी झाली, आत्ता संग मिळाला आहे. खराखुरा सत संग पाच हजार वर्षांमध्ये एकाच वेळेस होतो. सतयुगा मध्ये सत्संग होत नाही. बाकी भक्ती मार्गामध्ये तर अनेकानेक सत्संग आहेत. आता वास्तव मध्ये सत तर एकच बाबा आहेत. आता तुम्ही त्यांच्या संगती मध्ये बसले आहात. ही पण स्मृती हवी, मी ईश्वरीय विद्यार्थी आहोत. स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहेत, तरी आहो सौभाग्य.

आमचे बाबा येथे आहेत. ते पिता शिक्षक आणि गुरु पण बनतात. तीन्ही भूमिका आता वठवतत आहेत. मुलांना आपले बनवतात. बाबा म्हणतात आठवणी द्वारेच विकर्म विनाश होतील. बाबांची आठवण केल्यामुळेच पाप नष्ट होतात आणि तुम्हाला प्रकाशाचा मुकुट मिळेल. ही पण खुण दाखवली आहे, बाकी असे नाही की प्रकाश दिसून येतो. ही पवित्रता ची खुण आहे. हे ज्ञान दुसऱ्या कोणा कडुन मिळू शकत नाही. देणारे एक बाबाच आहेत. त्यांच्या मध्ये सर्व ज्ञान आहे. बाबा म्हणतात मी सृष्टीचा बीजरूप आहे. हे उल्टे झाड आहे ना. हे कल्पवृक्ष आहे. प्रथम दैवी फुलांचे झाड होते, आता काट्याचे जंगल बनले आहे, कारण पाच विकारां मध्ये आले आहेत. प्रथम मुख्यतःदेह अभिमान आहे. तेथे देह अभिमान असत नाही. सर्वजण समजतात आत्मा आहोत, बाकी परमात्मा पित्याला जाणत नाहीत. आम्ही आत्मा आहोत, बस दुसरे कोणते ज्ञान नाही. सापाचे उदाहरण आहे, आता तुम्हाला समजवले जाते की, जन्म जन्मातंराची ही जुनी सडलेली चमडी आहे म्हणजे शरीर आहे, हे आता तुम्हाला सोडायचे आहे. आत्ता आत्मा आणि शरीर दोन्ही पतित आहेत. आत्मा पवित्र होईल परत हे शरीर पण सोडून देईल. आत्मे सर्व परमधाम ला जातील. आता हे ज्ञान तुम्हाला आहे की, हे नाटक पूर्ण होत आहे. आता आम्हाला बाबांच्या जवळ जायचे आहे, म्हणून आठवण करायची आहे. या देहाला सोडायचे आहे. शरीर तर नष्ट होते तर दुनिया पण नष्ट होऊन परत नवीन घरांमध्ये नवीन संबंध होतील. ते परत पुनर्जन्म येथेच घेतात. तुम्हाला तर पुनर्जन्म फुलांच्या दुनिया मध्ये घ्यायचा आहे, त्यांना पवित्र म्हटले जाते. तुम्ही जाणतात आम्हीच फुलासारखे होतो, परत काट्यासारखे बनले आहोत. आता परत फुलाच्या दुनिया मध्ये जायचे आहे. पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. हा खेळपाल आहे ना. मीरा ध्याना मध्ये खेळत होती. तिला ज्ञान नव्हते. ती काही स्वर्ग मध्ये गेली नाही. येथेच कुठे असेल. या ब्राह्मण कुळाची असेल तर ती ज्ञान घेत असेल. असे नाही कृष्णा बरोबर रास केला म्हणून वैकुंठ मध्ये गेली असेल. तसे तर खूप रास करत राहतात. ध्यानामध्ये जाऊन पाहुन येत होते, परत विकारी बनले. गायन पण आहे ना चढे तो चाखे वैकुंठ रस, गिरे तो चकनाचुर. . बाबा पण प्रलोभन देतात, तुम्ही स्वर्गा मध्ये मालक बनू शकता, जर ज्ञान शिकाल तर. बाबांना सोडले तर गटर मध्ये पडाल, म्हणजे विकारांमध्ये जाल. आश्चर्यवत बाबाचे ज्ञान ऐकतात, ज्ञान दुसर्यांना पण ऐकवतात आणि स्वतः पळून जातात, अहो माया खूप भारी जखम करते. आता तुम्ही बाबाच्या श्रीमता वरती देवता बनतात. आत्मा आणि शरीर दोन्ही पण श्रेष्ठ पाहिजेत ना. देवतांचा जन्म विकारा द्वारे होत नाही. ती निर्विकारी दुनिया आहे. त्या दुनिया मध्ये पाच विकार असत नाहीत. शिवबाबांनी स्वर्ग बनवला होता, आत्ता तर नर्क आहे. आता तुम्ही परत स्वर्गवासी बनण्यासाठी आले आहात, जे चांगल्या रीतीने शिकतात तेच स्वर्गामध्ये जातात. तुम्ही परत शिकत आहात, कल्प कल्प शिकत राहाल. हे पूर्वनियोजित नाटक आहे, यामधुन कोणीही सुटू शकत नाही. जे काही पाहता, मच्छर उडून गेला, कल्पा नंतर पण असाच उडेल. हे सर्व समजण्यासाठी चांगली बुद्धी पाहिजे. हे शूटिंग होत राहते, हे कर्मक्षेत्र आहेना. येथे परमधाम वरून भूमिका करण्या साठी आले आहोत.

आता या राजयोगाच्या अभ्यासामध्ये कोणी तर खूप हुशार होतात, कोणी आणखी शिकतच आहेत. कोणी शिकत शिकत जुन्या पेक्षा पुढे जातात. ज्ञानसागर तर सर्वांना शिकवत राहतात. बाबांचे बनले आणि विश्वाचा वारशाचे अधिकारी बनले. तुमची आत्मा जी पतित आहे, तिला पावन जरुर बनायचे आहे. त्यासाठी सहज उपाय आहे, बेहदच्या बाबाची आठवण करत जावा, तर तुम्ही असे श्रेष्ठ बनू शकता. तुम्हा मुलांना या जुन्या दुनिये पासून वैराग यायला पाहिजे. बाकी मुक्तिधाम जीवन मुक्तिधाम आहे, आणि कुणाला पण आम्ही आठवण करत नाही, शिवाय बाबांच्या. पहाटे उठून अभ्यास करायचा आहे. आम्ही आलो होतो, परत अशरीरी बणुन जायचे आहे. तर कोणत्याही देह धारीला आम्ही का आठवण करावी? पहाटे अमृतवेला उठून अशा गोष्टी करायच्या आहेत. पहाटेला अमृतवेळ म्हटले जाते. ज्ञानामृत तर ज्ञानाच्या सागरा जवळच आहे. तर ज्ञानसागर म्हणतात, पहाटेची वेळ खूप चांगली आहे. सकाळी उठुन खूप प्रेमाने बाबांची आठवण करत जावा. बाबा तुम्ही पाच हजार वर्षांनंतर मिळाले आहात. आता बाबा म्हणतात माझी आठवण करा तर पाप नष्ट होतील. श्रीमता वरती चालायचे आहे. सतोप्रधान जरुर बनायचे आहे. बाबांची आठवण करण्याची सवय लागेल तर, खशीमध्ये बसुन आठवण करत राहाल. शरीराचे भान नष्ट होऊन जाईल. परत देहाचे भान राहणार नाही. खुशी खूप होईल. तुम्ही खुश होते, जेव्हा पवित्र होते. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान राहायला पाहिजे. जे प्रथम येतात, ते जरुर 84 जन्म घेतात, परत चंद्रवंशी कमी घेतील, परत इस्लामी, बौध्दी, क्रिश्चन आणखी कमी जन्म घेतील. क्रमानुसार झाडाची वृद्धी होत राहते ना. मुख्य देवी देवता धर्म आहे, त्याद्वारे तीन धर्म निघतात, परत अनेक धर्माच्या फांद्या निघतात. आता तुम्ही अविनाश नाटकाला जाणत आहात. हे नाटक खूपच हळूहळू फिरत राहते, चालत राहते, म्हणून गायन आहे सेकंदामध्ये जीवनमुक्ती. आत्मा आपल्या पित्याची आठवण करते. बाबा आम्ही आपली मुलं आहोत. आम्ही तर स्वर्गामध्ये असायला पाहिजे, परत तेथे नरकामध्ये का पडलो आहोत? बाबा तर स्वर्गाची स्थापना करणारे आहेत, परत आम्ही नरकामध्ये का आहोत? तुम्ही स्वर्गामध्ये होते, ८४ जन्म घेत घेत सर्व काही विसरले. आता परत माझ्या मतावरती चाला. बाबाच्या आठवणी द्वारेच विकर्मा विनाश होतील, कारण आत्म्या मध्येच भेसळ झाली आहे. शरीर आत्म्याचा दागिना आहे. आत्मा पवित्र तर शरीर पण पवित्र मिळते. तुम्ही जाणता आम्ही स्वर्गामध्ये होतो, आता परत बाबा आले आहेत, तर बाबा पासून पूर्ण वारसा घ्यायला पाहिजे. पाच विकार सोडायचे आहेत. देह अभिमान सोडायचा आहे. काम धंदा करत बाबांची आठवण करायची आहे. आत्मा आपल्या साजन ची अर्ध्याकल्पा पासुन आठवण करत आली आहे. आता ते साजन आले आहेत, म्हणतात तुम्ही काम चितावर बसल्यामुळे काळे बनले आहात. आता मी सुंदर बनवण्यासाठी आलो आहे. त्यासाठी योग अग्नी पाहिजे. ज्ञानाला चिता म्हणणार नाही. योगाची चिता आहे. आठवणीच्या चिते वरती बसल्यामुळेच विकर्म विनाश होतात. ज्ञान म्हटले जाते नाँलेजला. बाबा तुम्हाला सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान देतात. उच्च ते उच्च शिव पिता आहेत, परत ब्रह्मा विष्णू शंकर, परत सूर्यवंशी चंद्रवंशी, परत दुसऱ्या धर्माच्या शाखा आहेत. हे कल्पवृक्ष खूप मोठे होते. आता या झाडाचे खोड तर नाही, म्हणून वडाच्या झाडाचे उदाहरण दिले जाते. देवी देवता धर्म नष्ट झाला आहे. धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट बनले आहेत. आता तुम्ही मुलं श्रेष्ठ बनण्यासाठी श्रेष्ठ कर्म करत आहात. आपल्या दृष्टीला पवित्र बनवतात. तुम्हाला आता भ्रष्ट कर्म करायचे नाहीत. कुदृष्टी जायला नको. लक्ष्मीला वरण्यासाठी लायक बनायचे आहे. आम्ही स्वतःला आत्मा समजून आठवण करतो. रोज दिनचर्ये ला तपासा, साऱ्या दिवसांमध्ये देह अभिमानाच्या वश कोणते विकार तर नाही केले, नाहीतर शंभर पटीने सजा मिळेल. माया चार्ट पण ठेवू देत नाही. दोन-चार दिवस लिहून परत सोडतात. बाबांना काळजी राहते ना, दया येते. मुलं माझी आठवण करतील तर त्यांचे पाप नष्ट होतील. यामध्ये कष्ट आहेत. स्वतःच स्वतःचे नुकसान करायचे नाही. ज्ञान तर खूप सहज आहे, अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादा ची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) पहाटे अमृतवेळेला उठून बाबांशी गोड गोड गोष्टी करायचे आहेत. अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. ध्यान राहावे की बाबाच्या आठवणी शिवाय कोणतीही आठवण यायला नको.

(२) आपली दृष्टी खूप शुद्ध पवित्र बनवायची आहे. दैवी फुलांची बाग तयार होत आहे, म्हणून फुलासारखे बनण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. काट्यासारखे बनायचे नाही.

वरदान:-
प्रत्येक संकल्प, वेळ, वृत्ती आणि कर्मा द्वारे सेवा करणारे निरंतर सेवाधारी भव.

जसे बाबा खूप प्रिय आहेत, बाबांच्या शिवाय जीवन नाही. असेच सेवे शिवाय पण जीवन नाही. निरंतर योगी च्या सोबत निरंतर सेवाधारी पण बना. झोपल्या वरती पण सेवा व्हावी. झोपल्यानंतर ही कोणी आपल्याला पाहिले, तर आपल्या चेहऱ्या द्वारे शांती आनंदाचे प्रकंपन अनुभव व्हावेत. प्रत्येक कर्म इंद्रिया बाबांच्या आठवणीची स्मृती देणारी सेवा करत रहावी. आपल्या शक्तिशाली वृत्ती द्वारा प्रकंपन पसरत राहा. कर्मयोगी च वरदान देत रहा. प्रत्येक पावला मध्ये करोडोंची कमाई जमा करत रहा. तेव्हा म्हणाल निरंतर सेवाधारी, सेवा योग्य.

बोधवाक्य:-
आपल्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व बुद्धीमध्ये ठेवा, तर सहज माया जीत बनाल.