03.05.2020 प्रभात:मुरली ओम शांती "अव्यक्त बापदादा” रिवाइज 06.01.1986 मधुबन


संगमयुग जमा करण्याचे युग

आज सर्व मुलांच्या तीन्ही काळाला जानणारे त्रिकालदर्शी बापदादा, सर्व मुलांचे जमा चे खाते पाहत आहेत. हे तर सर्वच जाणतात की साऱ्या कल्पा मध्ये श्रेष्ठ खाते जमा करण्याची वेळ, फक्त हेच संगमयुग आहे. छोटेसे युग, छोटेसे जीवन आहे परंतु या युगामध्ये, या जीवनाचे वैशिष्ट आहे, जे आता जितके जमा करू इच्छितो, तेवढे करू शकतात. या वेळेत श्रेष्ठ खात्याच्या प्रमाणे पूज्य पद पण मिळते आणि परत पुजारी पासुन पुज्य पण बनतात. यावेळेत श्रेष्ठ कर्माचे, श्रेष्ठ ज्ञानाचे, श्रेष्ठ संबंधाचे, श्रेष्ठ शक्तींचे, श्रेष्ठ गुणांचे सर्वश्रेष्ठ खाते आता जमा करत आहात. द्वापरयुगा पासून भक्तीचे खाते, अल्पकाळासाठी आत्ता आत्ता केले, लगेच त्याचे फळ खाल्ले आणि नष्ट झाले. भक्तीचे खाते अल्प काळासाठी यामुळे आहे कारण आता कमावले आणि लगेच खाल्ले. जमा करण्याचे अविनाशी खाते तर जन्म जन्मांतर चालत राहते, ते पण अविनाशी खात्यात जमा करण्याची आत्ताची वेळ आहे, म्हणून या श्रेष्ठ वेळेला पुरुषोत्तम युग किंवा धर्माऊ युग म्हटले जाते. परमात्म अवतरण युग म्हटले जाते. प्रत्यक्ष बाबा द्वारे प्राप्त शक्तींचे युग, याचे गायन आहे. या युगामध्ये बाप विधाता आणि वरदाता ची भूमिका वठवतात म्हणून या युगाला वरदानी युग पण म्हटले जाते. या युगामध्ये स्नेहा मुळे बाबा भोले भंडारी बनतात, जे एकाचे पदमगुणा फळ देतात. एकाचे पदमगुणा जमा होण्याचे विशेष भाग्य आत्ताच प्राप्त होते, दुसऱ्या युगामध्ये जितके आणि तेवढ्याचा हिशोब आहे. तर अंतर झाले ना, कारण आता प्रत्यक्ष शिवपिता वारसा आणि वरदान दोन्ही रूपामध्ये प्राप्ती करण्याचे निमित्त आहेत. भक्तीमध्ये भावनाचे फळ आहे. आत्ता वारसा आणि वरदानाचे फळ आहे, म्हणून या वेळेच्या महत्त्वला जाणुन, प्राप्तीला जाणुन, जमाच्या खात्याला जाणुन, त्रिकालदर्शी बणुन प्रत्येक पाऊल टाकता का? या वेळेतला एक सेकंद, साधारण वेळे पेक्षा खुप मोठा आहे, ते जाणतात का? सेकंदांमध्ये किती जमा करू शकतात आणि सेकंदांमध्ये किती गमावतात? हे चांगल्या रीतीने हिशेब जाणतात का? असे तर नाही, साधारण रितीने काही कमावले आणि काही गमावले. असा अमूल्य वेळ तर वाया घालवत नाही ना? ब्रह्माकुमार कुमारी तर बनले परंतु अविनाश वारसा आणि विशेष वरदानाचे अधिकारी बनले? कारण यावेळेचे अधिकारी जन्म जन्मांतरचे अधिकारी बनतात. या वेळेतील कोणत्या-ना-कोणत्या स्वभाव किंवा संस्कार वा संबंधाच्या आधीन राहणारे आत्मे जन्म जन्मांतरचे अधिकारी बनण्याचे ऐवजी अधिकारी प्रजा पदाचे अधिकारी बनतात. राज्य अधिकारी बनत नाहीत. प्रजा पदाचे अधिकारी बनतात. योगी बनण्यासाठी राज्याधिकारी बनण्यासाठी आले आहात परंतु आधीनतेच्या संस्कारामुळे, विधाताचे मुलंअसून सुद्धा राज्याधिकारी बनू शकत नाहीत, म्हणून नेहमी हे तपासून पहा की, स्व अधिकारी किती बनले आहोत. जे स्व अधिकारी बनू शकत नाहीत, ते विश्वाचे राज्य कसे मिळवू शकतील. विश्वाचे राज्याधिकारी बनण्याचे चैतन्य माँडेल आत्ता स्वराज्य अधिकारी बनल्यामुळे तयार होते. कोणती पण गोष्ट प्रथम मॉडेल रूपामध्ये तयार केली जाते. तर प्रथम या मॉडेलला पहा. स्व अधिकारी म्हणजे सर्व कर्मेन्द्रिय रुपी प्रजेचे राजा बनणे. प्रजेचे राज्य आहे की राजाचे राज्य आहे? हे तर जाणू शकता ना. प्रजेचे राज्य आहे तर राजा बनू शकणार नाहीत. प्रजेच्या राज्यांमध्ये राजवंश समाप्त होतो. कोणतीही एक कर्मेंद्रिया धोका देते, तर स्वराज्य अधिकारी म्हणू शकणार नाही. असे कधीच विचार करायचे नाहीत, की एक-दोन कमजोरी तर राहतात ना. संपूर्ण तर अंत काळात बनायचे आहे परंतु अनेक काळाची एक पण कमजोरी वेळेवर धोका देते. अनेक काळाचे आधीन बनण्याचे संस्कार अधिकारी बनू देत नाहीत, म्हणून अधिकारी म्हणजे स्व अधिकारी. अंत काळामध्ये संपूर्ण होऊ या धोक्यामध्ये राहू नका. अनेक काळाचे स्व अधिकार्‍याचे संस्कार, अनेक काळाचे विश्व अधिकारी बनवतील. थोड्या वेळेचे स्वराज्य अधिकारी थोड्या वेळेसाठी विश्वराज्य अधिकारी बनू शकतील. जे आत्ता बाबाच्या समानतेच्या आज्ञा प्रमाण बाबाचे हृदयासीन बनतात तेच राज्य सिंहासन अधिकारी बनतात. बाप समान बणने, जसे ब्रह्मा बाप, संपुर्ण आणि समान बनले, असेच संपुर्ण आणि समान बना. राज्य सिंहासनाचे अधिकारी बना. कोणत्याही प्रकारच्या आलबेल पणा मध्ये आपल्या अधिकाराचा वारसा किंवा वरदाना मध्ये कमतरता करू नका. तर जमाच्या खात्याला तपासून पहा. नवीन वर्ष सुरू झाले ना. पुर्वीचे खाते तपासून पहा आणि नवीन खाते वेळ आणि बाबांच्या वरदाना द्वारे जास्तीत जास्त जमा करा. असे व्हायला नको, फक्त कमावले आणि खाल्ले. अमृतवेळेला योग केला, जमा केले. मुरली क्लासमध्ये अभ्यास करुन जमा केले आणि परत सर्व दिवसांमध्ये परिस्थितीच्या वश होऊन, मायेच्या वश होऊन, आपल्या संस्काराच्या वश, जे जमा केले ते, युद्ध करत विजय बनण्यांमध्ये खर्च केले. तर परिणाम काय निघाला? जमा केले आणि खाल्ले, तर जमा काय झाले? म्हणून जमाच्या खात्याला नेहमी तपासून, पुढे जात रहा. असेच आपल्या दिनचर्या मध्ये, चार्ट मध्ये राईट करू नका. मुरली क्लास केला, होय केला, योग केला, होय परंतु जसे शक्तिशाली योग वेळे प्रमाणे व्हायला पाहिजे, तसा केला का? वेळ चांगल्या रितीने घालवला, परंतू आनंद झाला. वर्तमान तर बनले परंतु वर्तमानाच्या सोबत जमा पण केले? इतका शक्तिशाली अनुभव केला? चालत आहोत, फक्त हेच तपासून पाहू नका. कोणालाही विचारा कसे चालत आहात, तर म्हणतात खूप चांगल्या प्रकारे चालत आहोत परंतु गती काय आहे? हे तपासून पहा. मुंगीच्या चालीने चालत आहोत की, रॉकेटच्या चालीने उडत आहात? या वर्षामध्ये सर्व गोष्टींमध्ये शक्तिशाली बनण्याची गती आणि टक्केवारी ला तपासून पहा? किती टक्केवारी मध्ये जमा करत आहोत? पाच रुपये पण म्हणाल जमा झाले, आणि पाचशे रुपये पण जमा केले असे म्हणतात. जमा तर केले परंतु किती जमा केले? समजले काय करायचे आहे. सुवर्णजयंती कडे जात आहात, हे सर्व वर्ष सुवर्ण जयंतीचे आहे ना. तर तपासून पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये सुवर्णयुगी म्हणजे सतो प्रधान अवस्था आहे? की सतो म्हणजे चांदी सारखी अवस्था आहे? पुरुषार्थ पण सतोप्रधान सुवर्णयोगी हवा, सेवा पण सुवर्णयुगी हवी. जरा पण जुन्या संस्काराची भेसळ नको, असे नाही आजकाल चांदीच्या वरती पण सोन्याचे पाणी देतात, बाहेरून तर सोने वाटते परंतु आत मध्ये काय असते, भेसळ असते. तर सेवेमध्ये अभिमान आणि अपमान मिक्स नको, याला म्हटले जाते सुवर्णयुगी सेवा. स्वभावा मध्ये सिद्ध आणि जिद्द करण्याचा भाव नको, ही भेसळ आहे. या भेसळीला समाप्त करून सुवर्णयुगी स्वभाव असणारे बना. संस्कारां मध्ये नेहमी होय, असे करा. जशी वेळ तशी सेवा, तसेच स्वतःला परिवर्तन करणे म्हणजेच खऱ्या सोन्या सारखे बनणे. मला परिवर्तन व्हायचे आहे, दुसरा करेल तर मी करेल, ही जिद्द होते, हे खऱ्या सोन्या सारखे नाही. ही भेसळ समाप्त करून सुवर्ण युगी बना. संबंधां मध्ये नेहमी प्रत्येक आत्म्याचे प्रती शुभ भावना, कल्याणाची भावना हवी, स्नेहाची भावना हवी, सहयोगाची भावना हवी. कसाही स्वभाव असणारा असुद्या परंतु आपला नेहमी श्रेष्ठ भाव हवा. या सर्व गोष्टींमध्ये स्व परिवर्तन करणे म्हणजेच सुवर्ण जयंती साजरी करणे होय. संस्कारा मधील भेसळ समाप्त करणे म्हणजेच स्वर्ण जयंती साजरी करणे. समजले, वर्षाची सुरुवात तर, सुर्वण स्थिती द्वारे करा, सहज आहे ना. ऐकण्याच्या वेळेत तर सर्वच समजतात की, करायचेच आहे परंतु जेव्हा समस्या समोर येते, तेव्हा विचार करतात, हे तर खूपच अवघड आहे. परिस्थितीच्या वेळेतच स्वराज्य अधिकारी पदाचा अधिकार दाखवण्याची वेळ असते. परिस्थितीच्या वेळेसच विजयी बनावे लागते. परीक्षेच्या वेळेतच क्रमांक एक घेण्याची वेळ असते. समस्या स्वरूप नाही परंतु समाधान स्वरुप बना. समजले यावर्षी काय करायचे आहे? तेव्हाच सुवर्ण जयंती ची समाप्ती, संपन्न बनण्याची स्वर्णजयंती म्हटले जाईल. दुसरी कोणती नवीनता कराल? बापदादांच्या जवळ तर सर्वांचे मुलांचे संकल्प पोहचतात ना. कार्यक्रमांमध्ये नवीन काय करायचे? सुर्वण विचार ऐकण्याचा मुद्दा, विषय ठेवला आहे ना. सोनेरी संकल्प, सोनेरी विचार, सोन्यासारखे बनवतील आणि सोन्याचे युग घेऊन येतील. हा विषय ठेवला आहे ना. अच्छा, आज वतन मध्ये या विषयावरती आत्मिक सुसंवाद झाला, ते परत ऐकवू. अच्छा.

सर्व वारसा आणि वरदानाच्या डबल अधिकारी भाग्यवान आत्म्यांना, नेहमी स्वराज्य अधिकारी श्रेष्ठ आत्म्यांना, नेहमी स्वतःला सुर्वण स्थितीमध्ये स्थिर करणाऱ्या खऱ्या सोन्यासारख्या मुलांना, नेहमी स्व परिवर्तन च्या लगन द्वारे विश्व परिवर्तना मध्ये पुढे जाणाऱ्या विशेष आत्म्यांना, बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

मिटिंग मध्ये आलेल्या डॉक्टरांसोबत अव्यक्त बापदादा चा वार्तालाप:-

आपल्या श्रेष्ठ उमंग उत्साहा द्वारे नेहमी आनंदी बनवण्याच्या सेवेमध्ये लागलेले आहात ना. डॉक्‍टरांचे विशेष कार्य आहे प्रत्येक आत्म्याला, खुशी, आनंद देणे

प्रथम औषध आनंद आहे, आनंद अर्धा आजार तर नष्ट करतो ना. तर आत्मिक डॉक्टर्स म्हणजे आनंदाचे औषध देणारे, तर असे डॉक्टर आहात ना. एक वेळ पण खुशीची झलक आत्म्याला अनुभव झाली तर, ती आत्मा नेहमी खुशीच्या, आनंदाच्या, झलक द्वारे नेहमी पुढे जात राहील. तर सर्वांना डबल लाईट बनवून पुढे घेऊन जाणारे, डॉक्टर्स आहात ना. ते डाँक्टर बेड वरून उठवतात. ते बेडमध्ये झोपणाऱ्या पेशंटला सुधारतात, चालवतात. तुम्ही जुन्या दुनिये पासून त्याला मुक्त करून, नवीन दुनिये मध्ये घेऊन जावा. असे नियोजन बनवले आहे ना. आत्मिक साधन वापरण्याचे नियोजन केले आहे ना. इंजेक्शन काय आहे, गोळ्या औषधे काय आहेत, रक्तदान देणे म्हणजे काय? असे सर्व आत्मिक साधन बनवले आहेत. कोणाला रक्त देण्याची आवश्यकता आहे, तर आत्मिक रक्त कोणते द्यायचे आहे? हृदयाच्या रोग्याला कोणते औषध द्यायचे आहे? हृदयरोगी म्हणजे दिलशिकस्त पेशन्ट. तर आत्मिक सामग्री पण पाहिजे. जसे ते नवीन शोध लावतात, ते विज्ञानाच्या साधनाद्वारे संशोधन करतात. तुम्ही शांतीच्या साधनाद्वारे नेहमीसाठी निरोगी बनवा. जसे त्यांच्याकडे सर्व यादी आहे, सर्व साधने, मशनरी आहेत. असेच तुमची पण यादी खुप मोठी हवी, असे डॉक्टर आहात ना. नेहमी निरोगी बनवण्यासाठी खूप मोठे साधन हवेत. असा आपला व्यवसाय बनवला आहे? सर्व डॉक्टरने आप आपल्या स्थानावर असा बोर्ड लावला आहे, नेहमी निरोगी, नेहमी संपत्तीवान बनण्याचा दवाखाना. जसे तुम्ही आपल्या व्यवसाय मध्ये लिहितात, असेच हे पण लिहायला पाहिजे, ज्याला पाहुन समजतील आणि म्हणतील चला आत मध्ये जाऊन पाहू. आकर्षण करणारा बोर्ड पाहिजे. त्यामध्ये असे लिहायला पाहिजे, जे परिचय घेतल्या शिवाय कोणी राहू शकणार नाहीत. त्यांना बोलण्याची पण आवश्यकता नाही परंतु स्वतः आपल्या कडे इच्छा नसताना पण येतील. असा बोर्ड आवश्यक आहे. ते तर लिहितात एम. बी. बी. एस इत्यादी तुम्ही परत अशा बोर्ड वरती आत्मिक कर्तव्य, व्यवसाय लिहा, ज्याद्वारे ते समजतील की या ठिकाणी जाणे आवश्यक आहे. अशी आपली आत्मिक पदवी बनवली आहे? की तीच जुनी पदवी लिहितात? (सेवेचे श्रेष्ठ साधन कोणते असायला पाहिजे. ) सेवेचे सर्वात चांगले साधन आहे, समर्थ संकल्पा द्वारे सेवा. समर्थ संकल्प पण असायला हवेत, बोल पण तसेच हवेत आणि कर्म पण तसेच असावेत. तिन्ही सोबत कार्य करायला पाहिजेत. हे शक्तिशाली साधन आहेत. वाणी मध्ये येतात तर शक्तिशाली संकल्पाची टक्केवारी कमी होते की, ती टक्केवारी मध्ये राहते, तर वाणीच्या शक्तीमध्ये फरक पडतो. परंतु तसे नको, तिन्ही सोबत हवेत. जसे कोणत्या पेशंटला एकाच वेळेत सोबत कोणी नाडी पाहतात, कोणी ऑपरेशन करतात, तर सर्व एकत्र करतात ना. नाडी नंतर पाहतील आणि ऑपरेशन अगोदर करतील, तर काय होईल? एकत्रच सर्व कार्य चालते ना. तसेच आत्मिक सेवेचे साधनं पण सोबत चालायला हवेत. बाकी सेवेचे नियोजन बनवले आहे, खूप चांगले आहे, परंतु असे काही साधन बनवा, जे सर्व समजतील, हे आत्मिक डॉक्टर तर नेहमीसाठी निरोगी बनवणारे आहेत, अच्छा.

पार्टीसोबत वार्तालाप:-

(१) जे अनेक वेळेत विजय आत्मे आहेत, त्यांची लक्षणे काय असतील? त्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये सहज अनुभव होईल. जे कल्प कल्प विजयी आत्मे नाहीत, त्यांना छोटेसे कार्य पण अवघड वाटेल, सहज वाटणार नाही. प्रत्येक कार्या मध्ये प्रथम स्वतःला असे अनुभव करा, जसे की हे कार्य झालेलेच आहे, होईल की नाही प्रश्नच येणार नाही. कार्य झालेलेच आहे, ही जाणीव नेहमी राहावी. नेहमी सफलता आहेच, विजय मिळणारच आहे, असे निश्चित बुद्धी पाहिजेत. कोणती गोष्ट नवीन वाटणार नाही, ही तर खूप जुनी गोष्ट आहे. याच स्मृति द्वारे स्वतःला पुढे करत राहायचे आहे.

(२) एकदम हल्के बनण्याची लक्षणे काय असतील? एकदम हल्के आत्मे नेहमी प्रगतीचा अनुभव करतील, कधी थांबणे, कधी पुढे जाणे, असे नाही. नेहमी प्रगतीचे अनुभवी, असे डबल लाईट आत्मेच डबल अधिकारी बनतील. डबल लाईट(एकदम हल्के) वाले स्वतः उच्च स्थितीचा अनुभव करतील. कोणतीही परिस्थिती येईल, आठवणीत ठेवा, आम्ही तर अगदीच हलके डबल लाईट आहोत. मुलं बनले म्हणजेच हलके बनले. कोणतेही ओझे राहू शकत नाही. अच्छा ओम शांती.

वरदान:-

शुभ चिंतन आणि शुभचिंतक स्थितीच्या अनुभवाद्वारे ब्रह्मा बाप समान मास्टर दाता भव.

ब्रह्मा बाप समान मास्टर दाता बनण्यासाठी, ईर्ष्या, तिरस्कार, नावं ठवणे, या गोष्टीपासून मुक्त राहून, सर्वांच्या प्रती शुभचिंतक बना आणि शुभचिंतन स्थितीचा अनुभव करा. कारण ज्यांच्या मध्ये ईर्ष्याची अग्नी असते ते, स्वतः पण जळतात आणि दुसऱ्यांना पण त्रास देतात. तिरस्कार असणारे स्वतः पण विकारात जातात आणि दुसर्यांना पण तसेच बनवतात आणि नावं ठेवणारे पण एक दुसऱ्याची निंदा करतात, दुसऱ्या आत्म्याला हिंमतहिन बनवून दु:खी करतात, म्हणून या तिन्ही गोष्टी पासून मुक्त राहून शुभचिंतक स्थितीच्या अनुभवा द्वारा दाता ची मुलं मास्टर दाता बना.

सुविचार:-

मन बुद्धी आणि संस्कारावर संपूर्ण राज्य करणारे स्वराज्य अधिकारी बना.

||| ओम शांती |||

ओम शांती.