16-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,आता अविनाशी नाटकाचे चक्र पूर्ण होत आहे, तुम्हाला खिरखंड बणुन नवीन दुनिये मध्ये यायचे आहे,तेथे सर्व खीरखंड आहेत आणि येथे खार्‍या पाण्यासारखे आहेत"

प्रश्न:-
तुम्ही त्रिनेत्री मुलं कोणत्या ज्ञानाला जाणून त्रिकालदर्शी बनले आहात?

उत्तर:-
तुम्हाला आत्ता साऱ्या विश्वाच्या इतिहास भूगोलाचे ज्ञान आहे,सतयुगा पासुन कलियुग अंत पर्यंत इतिहास भूगोल तुम्ही जाणतात.तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे,आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते.संस्कार आत्म्या मध्ये असतात.आता बाबा म्हणतात,मुलांनो नावारूपा पासुन वेगळे समजा.स्वतःला अशरीरी आत्मा समजा.

गाणे:-
हे आत्मा धैर्य धर,आता सुखाचे दिवस आले की आले…

ओम शांती।
कल्प कल्प मुलांना म्हटले जाते आणि मुलांना वाटते लवकर सतयुगा मध्ये जावे,तर या दुःखापासून मुक्त होऊ.परंतु हे नाटक हळूहळू चालणारे आहे,बाकी थोडे दिवस आहेत.मोठ्या मनुष्य द्वारे पण तुम्ही ऐकत आहात की,ही दुनिया बदलणार आहे.जे पण मोठे मोठे आहेत,जसे पोप आहेत,ते पण म्हणतात दुनिया बदलणार आहे. अच्छा,परत शांती कशी होईल? यावेळेस तर सर्व खाऱ्या पाण्या सारखे आहेत.आता आम्ही खीर खंड बनत आहोत.दुसरीकडे दिवसेंदिवस खाऱ्या पाण्यासारखे बनतात, आपसामध्ये भांडून नष्ट होतील, त्याची तयारी करत आहेत.अविनाश नाटकाचे चक्र पूर्ण होत आहे,जुनी दुनिया नष्ट होत आहे,नवीन दुनियेची स्थापना होता आहे.नविन दुनियाच जुनी परत जुन्या दुनिये पासुन नवीन बनते.याला दुनियेचे चक्र म्हटले जाते, जे फिरत राहते.असे नाही लाखो वर्षाच्या नंतर जुनी दुनिया नवीन होईल,नाही.तुम्ही मुलं चांगल्या रीतीने जाणतात,भक्ती अगदीच वेगळी आहे.भक्तीचा संबध रावणाच्या सोबत आहे.ज्ञानाचा संबंध रामाच्या सोबत आहे.हे तुम्ही आत्ता समजत आहात.तुम्ही बाबांना बोलवतात, हे पतित पावन या,आणि नविन दुनियेची स्थापना करा.नवीन दुनिये मध्ये जरूर सुख असते.आता लहान मुलं किंवा मोठे,सर्वांनी जाणले आहे की,आता घरी जायचे आहे.हे नाटक पूर्ण होत आहे,आम्ही परत सतयुगा मध्ये जाऊ,परत ८४ चे चक्र चालू होईल.स्व आत्म्याला सृष्टीचक्राचे दर्शन होते,म्हणजे आत्म्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे,त्याला त्रिनेत्री म्हटले जाते.आता तुम्ही त्रिनेत्री आहात,बाकी सर्व मनुष्याला स्थूल नेत्र आहेट.ज्ञानाचा नेत्र कोणालाच नाही.जेव्हा त्रिनेत्री बनतील तेव्हाच त्रिकालदर्शी बनतील,कारण आत्म्याला ज्ञान मिळते ना.आत्मा शरीर सोडून दुसरे घेते.संस्कार आत्म्या मध्ये राहतात, आत्म विनाशी आहे.आता बाबा म्हणतात नावा-रूपा पेक्षा वेगळे बना.स्वतःला अशरीरी समजा.देह समजू नका.हे पण जाणता आम्ही अर्ध्या कल्पा पासून परमात्म्याची आठवण करत आलो.या दुनिये मध्ये जेव्हा जास्त दुःख होते,तेव्हा जास्त आठवण करतात.आता तर खूपच दुःख आहे,यापूर्वी एवढे दुःख नव्हते. जेव्हापासून परदेशी लोक आले, तेव्हापासून भारता मधील राजे लोक पण आपसा मध्ये लढत राहिले, वेग वेगळे झाले.सतयुगा मध्ये तर एकच राज्य होते.

आता आम्ही सतयुगा पासुन कलियुगा पर्यंत सर्व इतिहास-भूगोल जाणला आहे.सतयुग त्रेता मध्ये एकच राज्य होते.असे एकच राज घराणे कोणाचे नसते.ख्रिश्चन मध्ये पण आप आपसामध्ये वेगवेगळे गट आहेत.स्वर्गामध्ये तर सर्व विश्व एकाच हातामध्ये असते.ते फक्त सतयुग त्रेता मध्ये होते.हा अमर्यादित इतिहास-भूगोल आता तुमच्या बुद्धी मध्ये आहे.दुसऱ्या कोणत्या सत्संगामध्ये इतिहास भूगोल अक्षर ऐकणार नाहीत.तेथे तर रामायण महाभारत इत्यादी ऐकवत राहतात. येथे त्या गोष्टी नाहीत.येथे तर विश्वाचा इतिहास भूगोलाचे ज्ञान आहे.तुमच्या बुद्धी मध्ये आहे,श्रेष्ठ ते श्रेष्ठ आपले शिव पिता आहेत. बाबांचे धन्यवाद आहेत,ज्यांनी सर्व ज्ञान ऐकवले आहे.एक आहे आत्म्याचे झाड,दुसरे आहे मनुष्यांचे झाड.मनुष्य झाडाच्या वरती कोण आहेत.सर्वात श्रेष्ठ,पूर्वज,आजोबा ब्रम्हालाच मानतात.हे जाणतात ब्रह्मा मुख्य आहेत,परंतु ब्रह्माचा इतिहास भूगोल,कोणी जाणत नाहीत.आता तुमच्या बुद्धी मध्ये आहे,बाबा सर्वश्रेष्ठ आहेत,ते परमधाम मध्ये राहतात. परत सूक्ष्मवतन चे पण तुम्हाला माहिती आहे.मनुष्य फरीश्ता बनवतात म्हणून सूक्ष्मवतन दाखवले आहे.तुम्ही आत्मा जातात,शरीर तर सूक्ष्मवतन मध्ये जाऊ शकत नाही. आत्मा कशी जाते,याला तिसरा नेत्र म्हटले जाते,दिव्यदृष्टी किंवा ध्यान पण म्हणतात.तुम्ही ध्यानामध्ये ब्रह्मा, विष्णू, शंकराला पाहतात.दुसरे लोक म्हणतात,शंकराने तीसरा नेत्र उघडल्याने विनाश होतो.आता याद्वारे तर कोणी समजू शकत नाहीत.आता तुम्ही जाणता विनाश तर अविनाश नाटका नुसार होणारच आहे.आपसा मध्ये लढाई करून विनाश होईल. बाकी शंकर काय करतात?या अविनाश नाटका नुसार नावं ठेवले आहेत.तर समजावे लागते ब्रह्मा विष्णू शंकर तीन आहेत.स्थापने साठी ब्रह्मा आहेत,पालन करण्या साठी विष्णू आणि विनाशासाठी शंकर असे म्हणतात.वास्तव मध्ये हे पूर्वनियोजित नाटक आहे.शंकराची भूमिका काहीच नाही.ब्रह्मा आणि विष्णु ची भूमिका तर सर्वकल्पा मध्ये आहे.ब्रह्माच विष्णू आणि विष्णूच ब्रह्मा बनतात.ब्रह्माचे ८४ जन्म पूर्ण झाले तर,विष्णू चे पण पूर्ण झाले.शंकर तर जन्म मृत्यू पासून वेगळेआहेत म्हणून शिव आणि शंकराला एकत्र केले आहे.वास्तव मध्ये शिवाची तर खूप मोठी भूमिका आहे,तेच राजयोग शिकवतात.

भगवंताला तर ज्ञान सागर म्हणले जाते.जर ते कार्य प्रेरणा द्वारे करतील,तर मग सृष्टीचे ज्ञान कसे देतील.बाबा समजवतात मुलांनो, प्रेरणाची तर कोणतीच गोष्ट नाही. बाबांना सृष्टीवर यावेच लागते.बाबा म्हणतात मुलांनो,माझ्यामध्ये सृष्टिचक्राचे ज्ञान आहे.मला ही भूमिका मिळाले आहे,म्हणून मला ज्ञानाचे सागर,ज्ञानसंपन्न म्हणतात.ज्ञान कशाला म्हटले जाते,ते तर जेव्हा मिळेल तेव्हाच माहिती होईल.ज्ञान मिळालेच नाही तर अर्थ कसा माहिती होईल?अगोदर तुम्ही पण म्हणत होते,ईश्वर प्रेरणा देतात,ते सर्वकाही जाणतात.आम्ही जे पाप करतो,ते ईश्वर पाहतात.बाबा म्हणतात हा धंदा मी करत नाही.हे तर जसे जे कर्म करतात त्याची सजा स्वतःच भोगतात.मी काही सजा देत नाही.न प्रेरणा द्वारे सजा देतो.मी प्रेरणे द्वारे केले,तर जसे सजा पण मीच दिली.कोणाला म्हटले यांना मारा,तर हा पण दोष आहे.असे सांगणारे पण फसतात.शंकर प्रेरणा देतील तर,ते पण फसतील.बाबा म्हणतात,मी तुम्हा मुलांना सुख देण्यासाठी आलो आहे.तुम्ही माझी महिमा करतात,बाबा तुम्ही येऊन दुःखापासून मुक्त करा.मी थोडेच दुःख देतो.

आता तुम्ही मुलं बाबांच्या समोर बसले आहात,तर खूप खूश व्हायला पाहिजे.येथे प्रत्यक्ष भासना येते.बाबा आम्हाला शिकवत आहेत.याला मेळा म्हटले जाते.सेवा केंद्रावर तुम्ही जाता,तेथे काही आत्मा आणि परमात्माचा मेळा म्हणत नाहीत. आत्मा-परमात्मा चा मेळा येथे म्हणजे मधुबन मध्ये भरतो.हे पण तुम्ही जाणतात,मेळा भरलेला आहे. बाबा मुलांच्या मध्ये आले आहेत. आत्मा सर्व येथे आहेत.आत्माच आठवण करते,बाबा यावेत.हा सर्वात चांगला मेळा आहे.बाबा येऊन सर्वाना रावण राज्या पासून मुक्त करतात.तर हा मेळा चांगला आहे ना, ज्याद्वारे मनुष्य पारसबुद्धी बनतात. त्या मेळ्यामध्ये तर मनुष्य आणखीच खराब होतात,पैसे बरबाद करतात, मिळत काहीच नाही.त्या मेळ्याला मायावी,आसुरी मेळा म्हटले जाते.हा ईश्वरीय मेळा आहे.रात्रं दिवसाचा फरक आहे.तुम्हीपण अगोदर आसुरी मेळ्या मध्ये होते.आता ईश्वरीय मेळ्या मध्ये आहात.तुम्हीच जाणतात बाबा आलेले आहेत.जर सर्वच जाणतील तर माहित नाही,किती गर्दी होईल? इतक्या इमारती इत्यादी राहण्यासाठी कशा बनवणार?अंत काळाचे गायन आहे,अहो प्रभु,तेरी लीला.कोणती लिला,सृष्टी बदलण्याची लिला.ही सर्वात मोठे लिला आहे.जुनी दुनिया नष्ट होण्याच्या अगोदर नवीन दुनियेची स्थापना होत आहे,म्हणून नेहमी कोणालाही समजून सांगा तर प्रथम स्थापना विनाश परत पालना असे म्हणा.जेव्हा स्थापना पूर्ण होईल तेव्हाच विनाश सुरू होतो,नंतर पालन होईल.तर तुम्हा मुलांना,ही खुशी राहते आम्ही,स्वदर्शन चक्रधारी ब्राह्मण आहोत,परत आम्ही चक्रवर्ती राजा बनू.हे कोणालाच माहिती नाही, या देवतांचे राज्य कुठे गेले?नाव रुप गायब झाले आहे.देवताच्या ऐवजी स्वता:ला हिंदू म्हणतात.हिंदुस्थाना मध्ये राहणार हिंदू आहेत.लक्ष्मी नारायण ला कधी असे म्हणणार नाहीत,त्यांना तर देवता म्हणतात.तर आत्ता या मेळ्या मध्ये अविनाशी नाटका नुसार तुम्ही आले आहात,ही पण या नाटकांमध्ये नोंद आहे.वृध्दी हळूहळू होत राहते.तुमची जी काही भूमिका चालत आहे,तशीच हुबेहूब कल्पा नंतर चालेल.हे चक्र फिरत राहते,परत रावण राज्यांमध्ये आसुरी पालना होईल.तुम्ही आत्ता ईश्वरी मुलं आहात,परत दैवी मुलं बनाल,परत क्षत्रिय बनाल.तुम्ही जे अपवित्र प्रवृत्ती बनले होते,परत पवित्र प्रवृत्ती बनाल.तसे तर हे पण दैवी गुण वाले मनुष्य आहेत.बाकी इतक्या भुजा इत्यादी दिल्या आहेत,विष्णू कोण आहेत,हे कोणी सांगू शकत नाहीत. महालक्ष्मीची पण पूजा करतात. जगत अंबा जवळ कधी धन मागत नाहीत.धन जास्ती मिळाले तरसमजतात, लक्ष्मीची पूजा केली,म्हणून तिने भंडारा भरपूर केला. येथे तुम्ही जगदंबा पासून ज्ञान घेत आहात,परमपिता परमात्मा द्वारे,देणारे तेच आहेत.तुम्ही मुलं बापदादा पेक्षा भाग्यशाली आहात. जगदंबाचा खुप मोठा मेळा भरतो, ब्रह्माचा इतका भरत नाही.ब्रह्मा तर एका जागेवर बसले आहेत.अजमेर मध्ये ब्रह्माचे मोठे मंदिर आहे.देवीचे मंदिरं तर अनेक ठिकाणी आहेत, कारण यावेळी तुमची खूप महिमा आहे.तुम्ही भारताची सेवा करत आहात,पूजा पण तुमची जास्त होते. तुम्ही भाग्यशाली आहात.जगदंबा साठी,कधी असे म्हणणार नाहीत की, ती सर्वव्यापी आहे.तुमची महिमा होत राहते.ब्रह्मा विष्णू शंकरला पण सर्वव्यापी म्हणणार नाहीत.मला तर कणा कणामध्ये आहे असे म्हणतात, खूप निंदा करतात.तुमची मी किती महिमा वृध्दीगत करतो.भारत माता की जय म्हणतात.भारत माता तर तुम्ही आहात ना,धरती नाही.धरती इ.तर आत्ता तमोप्रधान आहे.सतयुगा मध्ये सतोमोप्रधान होते,यामुळे म्हणतात देवतांचे पाय पतित दुनियेत पडू शकत नाहीत.जेव्हा सतोप्रधान धरती होते,तेव्हा येतात.आता तुम्हाला सतोप्रधान बनायचे आहे.श्रीमता वरती चालत बाबांची आठवण करत रहाल,तर उच्चपद मिळेल.हा विचार करायचा आहे. आठवण कराल तर विकर्म विनाश होतील.श्रीमत मिळत राहते.सतयुगा मध्ये तुमची आत्मा पवित्र कंचन होते,तर शरीर पण कंचन मिळते. सोन्यामध्ये भेसळ होते,तर दागिने पण तसेच बनतात.आत्मा खोटी तर शरीर पण खोटेच बनते.भेसळ झाल्यामुळे सोन्याचे मूल्य पण कमी होते.तुमचे मुल्य आता काहीच नाही. यापूर्वी तुम्ही विश्वाचे मालक २४ कॅरेट होते,आता नऊ कॅरेटचे म्हणाल. बाबा मुलांशी आत्मिक संवाद करतात.बाबा मुलांना सन्मुख खुश करतात,ज्या मुळे तुम्ही ऐकत ऐकत परिवर्तन होतात.मनुष्यापासून देवता बनतात.सतयुगा मध्ये हिऱ्या-मोत्याचे महल असतात.स्वर्ग तर खूप सुंदर असेल,तेथील शुभीरस इत्यादी तुम्ही पिऊन येतात.तेथील फळे खूप मोठे असतात.येथे तसे मिळू शकत नाहीत.सूक्ष्मवतन मध्ये तर काहीच नाही.आता तुम्ही प्रत्यक्षामध्ये जातात.हा आत्मा आणि परमात्माचा मेळा आहे,याद्वारे तुम्ही उज्वल बनतात.

तुम्ही मुलं जेव्हा येथे येतात,तर फ्री आहात,घरदार कामधंदा इत्यादीची काहीच काळजी नाही.तर येथे तुम्हाला आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्यासाठी खूपच छान संधी आहे. तेथे तर घर घाट इत्यादी आठवणीत राहते.मधुबन मध्ये तर काहीच नाही. रात्री दोन वाजता उठून बाबांच्या आठवणी मध्ये बसा.सेवा केंद्रा वरती तर तुम्ही रात्री जाऊ पण शकत नाही, येथे सहज आहे.शिवबाबाच्या आठवणी मध्ये येऊन बसा,दुसऱ्या कुणाची आठवण यायला नको.येथे तुम्हाला खूप मदत मिळते,रात्री लवकर झोपा,परत सकाळी लवकर उठा.पहाटे तीन पासून पाच वाजेपर्यंत बाबांच्या आठवणीमध्ये बसा.बाबा पण येतील,तर मुलं पण खुश होतील.बाबा योग शिकवणारे आहेत.हे ब्रह्मा पण शिकणारे आहेत, तर दोन्ही,पिता आणि दादा येतील.मधुबन मध्ये आणि सेवाकेंद्रा मध्ये योग करण्या मध्ये फरक तर पडतो.येथे काहीच आठवत नाही,यामध्ये खूप फायदा आहे.बाबा मत देतात,हे खूप चांगले होऊ शकते.आता पाहूया मुलं उठू शकतात का?अनेकांना पहाटे उठण्याचा अभ्यास आहे.तुमचा संन्यास पाच विकारांचा आहे आणि सर्व जुन्या दुनिये पासून वैराग्य आहे.अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आता सृष्टी बदलण्याची लिला चालत आहे, म्हणून स्वतःला परिवर्तन करायचे आहे.क्षीरखंड होऊन म्हणजे आपसामध्ये गोड होऊन राहयचे आहे.

(२) पहाटे उठून एका बाबांच्या आठवणी मध्ये बसायचे आहे, त्यावेळेस दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको.जुन्या दुनिये पासून बेहदचे वैरागी बणुन पाच विकाराचा संन्यास करायचा आहे.

वरदान:-
किनारा करण्याच्या ऐवजी क्षणो क्षणी बाबांचा आधार अनुभव करणारे निश्चित बुद्धि विजय भव.

विजय भव चे वरदान आत्म्याला प्रत्येक क्षण स्वताला बाबांच्या आधाराचा अनुभव करतात.त्यांच्या मनामध्ये संकल्प मात्र पण विनाआधार किंवा एकटेपणाचा अनुभव होत नाही.कधी अल्प काळचे सीमित वैराग्य येत नाही.ते कधी कोणत्या कार्याचा,समस्यांचा, व्यक्तींशी किनारा करत नाहीत परंतु प्रत्येक कर्म करताना,सामना करताना सहयोगी बनत,बेहदच्या वैराग्य वृत्ती मध्ये राहतात.

बोधवाक्य:-
एका बाबाच्या संगती मध्ये रहा आणि बाबांनाच आपले सोबती बनवा.