30-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- ज्ञानाच्या मुद्यांना आठवणीमध्ये ठेवा तर खुशी राहील. आता तुम्ही स्वर्गाच्या दरवाजावर उभे आहात, बाबा मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता दाखवत आहेत"

प्रश्न:-
आपले रजिस्टर ठीक ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे?

उत्तर:-
लक्ष ठेवायचे आहे की, मन- वचन - कर्मा द्वारे कुणाला दुःख तर नाही दिले? आपला स्वभाव खूप चांगला आणि गोड असायला हवा. माया नाक - कान पकडेल असे कोणते कर्म करु नये,ज्यामुळे कुणाला दुःख मिळेल. जर दुःख दिले तर खूप पश्चाताप करावा लागेल. रजिस्टर खराब होईल.

गाणे:-
अंधाना(ज्ञान हीन ) रस्ता दाखव हे प्रभू......

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावत आहेत. रस्ता खूप सोपा समजावून सांगितला जातो, तरीही मुले धक्के खात राहतात. इथे बसले आहात तर समजता कि आम्हाला बाबा शिकवत आहेत, शांतीधाम मध्ये जाण्याचा रस्ता सांगत आहेत. खूप सोपे आहे. बाबा म्हणतात रात्रंदिवस जेवढी होईल तेवढी माझी आठवण करा. ती भक्ती मार्गाची यात्रा पायी चालुन करतात. खूप धक्के खावे लागतात. इथे तुम्ही बसलेले आहात तरी आठवणीची यात्रा करत आहात. हे ही बाबांनी समजावले आहे- दैवी गुण धारण करायचे आहेत. आसुरी अवगुणांना नष्ट करत चला. कोणतेही असुरी कर्म करू नका,ज्यामुळे विकर्म बनतात. बाबा आले आहेत तुम्हा मुलांना सदैव सुखी बनवण्यासाठी. कुणी राजाचा मुलगा असेल तर तो पित्याला आणि राजाईला पाहून खुश होईल ना.खुशाल राजाई आहे परंतु शरीराचे रोग इत्यादी तर होतच असतात ना. इथे तुम्हा मुलांना निश्चय आहे की शिवबाबा आलेले आहेत, ते आम्हाला शिकवत आहेत. नंतर आम्ही स्वर्गा मध्ये जाऊन राज्य करणार. तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख नसेल. तुमच्या बुद्धीमध्ये रचनाकार आणि रचनेच्या आदि - मध्य- अंताचे ज्ञान आहे. हे ज्ञान दुसऱ्या कोणा मनुष्याच्या बुद्धी मध्ये नाही. तुम्ही मुलं आता समजता अगोदर आम्हालाही हे ज्ञान नव्हते. बाबांना आम्ही ओळखत नव्हतो. मनुष्य भक्तीला खूप उत्तम समजतात, अनेक प्रकारची भक्ती करतात. तिथे आहेत सर्व स्थूल गोष्टी. सूक्ष्म गोष्ट कोणतीच नाही. आता अमरनाथ च्या यात्रेमध्ये स्थूल मध्ये जाणार ना. तिथेही शिवलिंग आहे. कोणा जवळ जातो, मनुष्यांना काहीच माहित नाही. आता तुम्ही मुले कुठेही धक्के खाण्यासाठी जाणार नाही. तुम्ही जाणता आम्ही शिकत आहोत नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी. जिथे हे वेद शास्त्र इत्यादी नसतात. सत्य युगामध्ये भक्ती नसते. तिथे आहे सुख. जिथे भक्ती आहे तिथे दुःख आहे. हे गोळ्या चे(सृष्टी चक्राचे) चित्र खूप छान आहे. स्वर्गाचे गेट यामध्ये खूप स्पष्ट आहे. हे बुद्धीमध्ये राहायला पाहिजे. आता आम्ही स्वर्गाच्या गेटवर बसलो आहोत. खूप खुशी व्हायला पाहिजे. ज्ञानाचे पॉईंट आठवुन तुम्ही मुले खूप खुश राहू शकता. जाणत आहात आता आम्ही स्वर्गाच्या गेटमधून जात आहे. तिथे खूप थोडे मनुष्य असतात. इथे किती मनुष्य आहेत.किती धक्के खात राहतात. दान पुण्य करतात, साधू च्या पाठीमागे भटकतात तरीही बोलवत राहतात- हे प्रभू अंधाना रस्ता दाखव.... रस्ता नेहमी मुक्ती जीवनमुक्तीचा मागतात. ही जुनी दुःखाची दुनिया आहे, तेही तुम्ही जाणत आहात.मनुष्याला माहीतच नाही. कलियुगाचे आयुष्य हजारो वर्ष सांगतात तर बिचारे अंधारा मध्ये आहेत ना.तुमच्या मध्येही क्रमा नुसार आहेत जे जाणतात, बरोबर आमचे बाबा आम्हाला राज योग शिकवत आहेत. ज्याप्रमाणे वकील योग, इंजिनियर योग असतो ना. शिकवणार्या शिक्षकांचीच आठवण येते. वकिलीच्या ज्ञानाने मनुष्य वकील बनतो. हा आहे राज योग. आमच्या बुद्धीचा योग आहे परमपिता परमात्म्याच्या सोबत. इथे तर खुशीचा पारा एकदम चढायला हवा. खूप गोड बनायचे आहे. स्वभाव खूप छान असायला पाहिजे. कोणालाही दुःख देऊ नका. वाटतही असते कोणाला दुःख देऊ नये. परंतु माया नाक कान पकडून चुका करायला लावते. नंतर मनामध्ये पश्चाताप करतात- मी विनाकारण त्याला दुःख दिले. परंतु रजिस्टर तर खराब झाले ना.असा प्रयत्न करायला हवा- कोणालाही मनसा- वाचा - कर्मना दुःख देऊ नका. बाबा येतात- आम्हाला असे देवता बनवण्यासाठी. हे कधी कोणाला दुःख देतात का! लौकिक शिक्षक शिकवतात, तर कोणाला दुःख देत नाहीत ना. हा, मुले शिकत नसतील तर थोडीशी सजा देतात. आज-काल न मारण्याचाही नियम काढलेला आहे. तुम्ही आत्मिक शिक्षक आहात, तुमचे काम आहे, शिकवणे आणि त्यासोबत संस्कार घडवणे. शिकवण्यासाठी प्रदर्शनी इत्यादीचा प्रबंध करतात. सर्वजण प्रदर्शनी आणि प्रोजेक्टर मागतात. प्रोजेक्टर ही हजारो घेतील. प्रत्येक गोष्ट बाबा खूपच सहज सोपी करून सांगतात. अमरनाथ येथे पण, सेवा करणे सोपे आहे. तुम्ही चित्रांवर समजावून सांगू शकता. ज्ञान आणि भक्ती काय आहे? ज्ञान एका बाजूला, भक्ती एका बाजूला. यापासून स्वर्ग यापासून नर्क- एकदम स्पष्ट आहे. तुम्ही मुले आता जे शिकत आहात हे खूप सोपे आहे, चांगले शिकवता, परंतु आठवणी ची यात्रा कुठे करता. ही आहे सारी बुद्धी ची गोष्ट. आम्हाला बाबांची आठवण करायची आहे, यामध्येच माया विघ्न आणते. योग करू देत नाही. बाबा म्हणतात तुम्ही सर्व योगामध्ये खुप कमजोर आहात. चांगले - चांगले महारथी ही खूप कमजोर आहेत. समजतात यांच्यामध्ये हे ज्ञान खूप चांगले आहे म्हणून महारथी आहेत. बाबा म्हणतात घोड्यावर बसणारे पायी चालणारे ही आहेत. महारथी तेच,जे आठवणीमध्ये राहतात. उठता-बसता आठवणीमध्ये राहिले तर विकर्म विनाश होतील, आणि पावन बनाल. नाहीतर सजाही खावी लागेल आणि पदही भ्रष्ट होईल म्हणून आपला चार्ट ठेवा तर तुम्हाला माहित पडेल, बाबाही स्वतः म्हणतात मीही पुरुषार्थी आहे. क्षणोक्षणी बुद्धी दुसरीकडे जाते. बाबांना तर खूप काळजी असते ना. तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. त्यासोबत आपले वागणेही सुधरायचे आहे. पवित्र बणुन जर विकारांमध्ये गेले तर केलेली कमाई नष्ट होऊन जाईल. कोणावर रागवले रुसले तर याचा अर्थ असुर बनले. अनेक प्रकारची माया येते. संपूर्ण तर कोणी बनलेले नाही. बाबा पुरुषार्थ करून घेतात. कुमारी साठी तर खूप सोपे आहे, यामध्ये स्वतः मजबूत बनायला पाहिजे.खरे मन पाहिजे. जर मनामध्ये दुसरे कोणी असेल तर चालू शकणार नाही. कुमारीनीं, मातांनी तर भारताला स्वर्ग बनवण्याच्या सेवेमध्ये लागायचे आहे. यामध्ये मेहनत आहे.कष्ट केल्या शिवाय काहीही भेटत नाही. तुम्हाला २१ जन्मा साठी राजाई मिळते तर किती कष्ट करायला पाहिजे. ते शिक्षण बाबा यासाठी शिकू देतात- म्हणतात जोपर्यंत इथे पक्के होत नाही तोपर्यंत ते शिक्षण घ्या. असे व्हायला नको की दोन्ही जगामधून निघून जाल. कुणाच्या नाव रूपामध्ये फसुन मेले तर नष्ट होऊन जातात.

भाग्यवान मुलंच शरीराचे भान विसरून स्वतःला अशरीरी समजून बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करू शकतात. बाबा रोज- रोज समजावतात- मुलांनो तुम्ही शरीराचे भान विसरा. आम्ही अशरीरी आत्मा आता घरी जात आहोत, हे शरीर इथेच सोडून द्यायचे आहे, ते तेव्हा सोडाल जेव्हा निरंतर बाबांच्या आठवणी मध्ये राहून कर्मातीत अवस्था होईल. यामध्ये बुद्धीची गोष्ट आहे परंतु कोणाच्या भाग्या मध्ये नसेल तर सांगून काय उपयोग. बुद्धीमध्ये हे राहायला पाहिजे की आम्ही अशरीरी आलो होतो,नंतर सुखाच्या कर्म संबंधांमध्ये बांधलो गेलो नंतर रावण राज्यामध्ये विकारी बंधनामध्ये फसलो. आता पुन्हा बाबा सांगत आहेत अशरीरी बनून जायचे आहे. स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. आत्माच पतित आहे. आत्माच म्हणते हे पतित पावन ये. आता तुम्हाला पतिता पासून पावन बनवण्याची युक्ती ही सांगत आहेत. आत्मा आहे अविनाशी. तुम्ही आत्मे इथे शरीरामध्ये आलेले आहात भूमिका बजावण्यासाठी. हेही बाबांनी समजावले आहे, ज्यांना कल्पा पुर्वी समजावले होते तेच येत राहतील. आता बाबा सांगतात कलियुगी संबंधांना विसरा. आता तर परत जायचे आहे, ही दुनिया नष्ट होणार आहे. यामध्ये काही सार नाही म्हणून तर धक्के खात राहतात. भक्ती करतात ईश्वराला भेटण्यासाठी. समजतात भक्ती खूप चांगली आहे. खूप भक्ती केली तर भगवान भेटेल आणि सद्गती मध्ये घेऊन जाईल. आता तुमची भक्ती पूर्ण होत आहे. तुमच्या मुखातून 'हे राम', 'हे भगवान' हे भक्तीचे शब्द निघायला नको. हे बंद व्हायला पाहिजे. बाबा म्हणतात फक्त माझी आठवण करा. ही दुनिया तमोप्रधान आहे. सत्तो प्रधान सत युगामध्ये राहतात. सतयुग आहे चढती कला नंतर उतरती कला होते. त्रेतायुगालाही वास्तव मधे स्वर्ग म्हटले जात नाही. स्वर्ग फक्त सतयूगालाच म्हटले जाते. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आदि- मध्य- अंताचे ज्ञान आहे. आदि म्हणजे सुरुवात,मध्य, नंतर अंत. मध्येच रावण राज्य सुरू होते. बाबा भारतामध्येच येतात. भारतच पतित आणि पावन बनतो. 84 जन्मही भारतवासी घेतात. बाकी तर नंबर वार दुसऱ्या धर्माचे येतात. झाडाची वाढ होते मग त्या वेळेसच येतात. या गोष्टी दुसऱ्या कोणाच्या बुद्धीमध्ये नसतात. तुमच्या मध्ये ही सर्व धारण करू शकत नाहीत. हे ८४ चे चक्र बुद्धीमध्ये राहिले तरीही खुशी होईल. आता बाबा आले आहेत आम्हाला घेऊन जाण्यासाठी. मनुष्याला हेही माहित नाही की शांती कशाला म्हणतात. आत्मा तर आहे शांत स्वरूप. हे कर्म इंद्रिय भेटल्या नंतर कर्म करावे लागते. बाबा जो शांतीचा सागर आहे, तो सर्वांना घेऊन जातो. तेव्हा सर्वांना शांती मिळेल. सत्य युगामध्ये तुम्हाला शांतीही, मिळते सुखही मिळते. बाकी सर्व आत्मे निघून जातील शांतीधाम मध्ये. बाबांनाच शांतीचा सागर म्हटले जाते. हे पण खूप मुलं विसरून जातात कारण देह अभिमाना मध्ये राहतात,देही- अभिमानी बनत नाहीत. बाबा शांती तर सर्वांनाच देतात ना. संगम युगाच्या चित्रावर नेऊन दाखवा. यावेळी सर्व अशांत आहेत. सत्य युगामध्ये तर एवढे धर्मच नसणार. सर्वजण शांती मध्ये निघून जातील. तिथे मन भरून शांती मिळते. तुमच्या राज्यामध्ये शांती ही, आहे सुखही आहे. तुम्हाला सतयुगा मध्ये पवित्रता, सुख-शांती सर्व भेटते. मुक्तिधाम म्हटले जाते,गोड घराला. तिथे कुणी पतित दुःखी असणार नाही. सुखदुःखाची गोष्टच नाही. शांतीचा अर्थच समजत नाहीत.राणीच्या हाराचे उदाहरण देतात ना. आता बाबा म्हणतात शांती सुख सर्वच घ्या. आयुष्यमान भव...... तिथे नियमानुसार मुलगाही होईल. मुलगा व्हावा यासाठी कोणताही पुरुषार्थ करावा लागत नाही. शरीर सोडण्याची वेळ येते तेव्हा साक्षात्कार होतो आणि खुशीने शरीर सोडतात. ज्याप्रमाणे बाबांना खुशी होते ना- शरीर सोडल्यानंतर मी हे (नारायण) बनणार आहे, आता शिकत आहे. तुम्ही ही जाणता की आम्ही सत युगामध्ये जाणार आहोत. संगम युगा वरच तुमच्या बुद्धी मध्ये या गोष्टी राहतात. तर किती खुशी व्हायला पाहिजे. जेवढे शिक्षण मोठे तेवढी खुशी होते. आम्हाला भगवान शिकवतात. ध्येय समोर आहे तर किती खुशी व्हायला पाहिजे. परंतु चालता-चालता घसरून पडतात.

तुमच्या सेवेची वाढ तेव्हाच होईल जेव्हा कुमारी मैदानामध्ये उतरतील. बाबा म्हणतात एक दुसऱ्यावर रुसू नका. जेव्हा की तुम्ही जाणत आहात आम्ही अशा दुनियेमध्ये जात आहोत जिथे वाघ आणि शेळी एकत्र पाणी पितात, तिथे तर प्रत्येक वस्तू पाहिल्यानंतर मन खुश होऊन जाते. नावच आहे स्वर्ग. तर कुमारीनीं लौकिक आई-वडिलांना सांगितले पाहिजे- आता आम्ही तिथे जाण्याची तयारी करत आहोत, पवित्र तर जरूर बनायचे आहे. बाबा म्हणतात काम महा शत्रु आहे. आता मी योगिन बनली आहे त्यामुळे पतीत बनू शकत नाही. बोलण्याचे धाडस असायला पाहिजे. अशा कुमाऱी जेव्हा येतील, मग पहा किती लवकर सेवा होते. परंतु नष्टोमोहा असायला पाहिजे. एकदा मेल्यानंतर परत आठवण का यायला पाहिजे. परंतु खूप जणांना घराची, मुलांची इ. आठवण येत राहते. नंतर बाबांसोबत योग कसा लागेल. यामध्ये तर बुद्धीमध्ये हे राहायला पाहिजे की आम्ही बाबांचे बनलो आहोत. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा. अच्छा.

गोड - गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात - पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आपले उंच भाग्य बनवण्यासाठी जेवढे होईल तेवढे - अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. शरिराचा भान बिलकुल विसरून जा. कोणाच्याही नाव रूपाची आठवण यायला नको ही मेहनत करायची आहे.

2. आपल्या वागण्याचा चार्ट ठेवायचा आहे - कधीही असुरा सारखे वागायचे नाही. खऱ्या मनानी नष्टोमोहा मोहा बणुन भारताला स्वर्ग बनवण्याच्या सेवेमध्ये लागायचे आहे.

वरदान:-
आपली महानता आणि महिमा ला जाणून सर्व आत्म्यां मध्ये श्रेष्ठ,विश्वा द्वारे पूजनीय भव

प्रत्येक ब्राह्मण मुलगा चालू वेळेमध्ये विश्वामधील सर्व आत्म्यात पेक्षा श्रेष्ठ आहे आणि भविष्यामध्ये विश्वा द्वारे पूजनीय आहे.क्रमानुसार असूनही शेवटचा मणका ही विश्वा समोर महान आहे. आज पर्यंत भक्त आत्मे सुद्धा शेवटच्या नंबरच्या मणक्याला ही डोळ्यावर ठेवतात कारण की सर्व मुले बाप दादांच्या डोळ्यातील तारे (चांदनी) आहेत, नुरे रत्न आहेत. ज्यांनी एकदाही मनापासून, खऱ्या हृदयापासून स्वतःला बाबांचा मुलगा निश्चय केले,प्रत्यक्ष बाबांचा मुलगा बनला त्याला महान किंवा पूजनीय बनण्याच्या लॉटरीचे वरदान मिळूनच जाते.

बोधवाक्य:-
स्थिती सदैव खजान्यांनी संपन्न आणि संतुष्ट राहिली तर परिस्थिती बदलून जाईल.