10-05-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
08.01.86 ओम शान्ति
मधुबन
धरतीचे पवित्र तारे
आज ज्ञानसूर्य बाबा
आपल्या अनेक प्रकारच्या विशेषता संपन्न विशेष ताऱ्यांना पाहत आहेत. प्रत्येक
ताऱ्याची विशेषता विश्वाला परिवर्तन करण्या साठी प्रकाश देणारे आहे. आजकाल
विश्वामध्ये ताऱ्याचा शोध विशेष करतात कारण त्याचा प्रभाव पृथ्वीवर पडतो. वैज्ञानिक
आकाशामधील तार्यांचा शोध लावतात, बाबा तर आपल्या पवित्र ताऱ्यांच्या विशेषता पाहत
आहेत. जेव्हा आकाशातील तारे इतक्या दूरवरून आपला चांगला किंवा वाईट प्रभाव घालू
शकतात, तर तुम्ही पवित्र तारे या विश्वाला परिवर्तन करण्याचा, पवित्रता सुख-शांती
स्थापन करण्याचा प्रभाव खुप सहज घालू शकता. तुम्ही धरतीचे तारे, ते आकाशातील तारे.
धरतीचे तारे या विश्वाला हलचल पासून सुरक्षित करून, सुखी संसार, सुवर्ण संसार
बनवणारे आहात. यावेळी प्रकृती आणि व्यक्ती दोघेही हलचल करण्याच्या निमित्त आहेत
परंतु तुम्ही पुरुषोत्तम आत्मे विश्वाला सुखाचा श्वास, शांतीचा श्वास देण्याच्या
निमित्त आहात. तुम्ही धरतीचे तारे, सर्व आत्म्याच्या सर्व अशा पूर्ण करणारे,
प्राप्ती स्वरूप तारे, सर्वांच्या निराशाला, आशे मध्ये बदलणारे, श्रेष्ठ आशांचे तारे
आहात. तर आपल्या श्रेष्ठ प्रभावाला तपासून पहा की, मज शांतीच्या ताऱ्याची,
पवित्रतेच्या ताऱ्याची, सुखरूप ताऱ्यांची, नेहमी सफलतेच्या ताऱ्यांची, सर्व अशा
पूर्ण करणाऱ्या तार्यांची, संतुष्टतेचा प्रभाव असणाऱ्या ताऱ्यांचा, प्रभाव
पाडण्याची चमक आणि झलक किती आहे? किती प्रभाव पाडत आहात? प्रभावाची गती किती आहे?
जसे त्या तार्यांची गती तपासतात, तसेच आपल्या प्रभावाची गती स्वतः चेक करा, कारण
विश्वामध्ये या वेळेत पवित्र ताऱ्याची आवश्यकता आहे. तर बापदादा विविधता पूर्ण
ताऱ्यांना पाहत होते.
हे आत्मिक तार्यांचे
संघटन खूप श्रेष्ठ आहे आणि खूपच सुखदाई आहे. असे आपल्याला चमकणारा तारा समजतात का?
जसे त्या ताऱ्यांना पाहण्यासाठी खूप इच्छुक असतात. आता अशी वेळ येत आहे, जे तुम्हा
पवित्र ताऱ्यांना पाहण्यासाठी सर्व इच्छुक असतील. तुम्हा ताऱ्यांना शोधतील कि, हा
शांतीचा प्रभाव, सुखाचा प्रभाव बनवण्याचा प्रभाव, कोठून येत आहे? याचे पण संशोधन
करतील. आता तर प्रकृतीचे संशोधन करण्याकडे लागलेले आहेत. जेव्हा प्रकृतीच्या संशोधना
पासून थकून जातील, तेव्हा हे आत्मिक संशोधन करण्याचा विचार येईल. त्याच्या पूर्वी
तुम्ही पवित्र ताऱ्यांनो स्वतःला संपन्न बनवा. कोणत्या-ना-कोणत्या गुणांचा शांतीचा
किंवा शक्तीच्या विशेषता आपल्या मध्ये भरण्याची विशेष तीव्र गतीने तयारी करा. तुम्ही
पण संशोधन करा, सर्व गुण आहेत परंतु तरीही कमीत कमी, एक गुणांच्या विशेषते द्वारे
स्वतःला विशेष संपन्न बनवा. जसे डॉक्टर सर्व साधारण रोगाचे ज्ञान तर ठेवतातच परंतु
त्याच सोबत कोणत्या न कोणत्या रोगाचे, विशेष ज्ञान घेतात. त्या विशेषते मुळे
प्रसिद्ध होतात. तर सर्व गुण संपन्न बनवायचे आहेच, परंतू एका विशेषतेला, स्वता:
मध्ये विशेष रूपा मध्ये आणत, सेवेमध्ये वापरत पुढे जात
चला. भक्तीमध्ये
प्रत्येक देवीची महिमा आहे, प्रत्येकाची विशेषता वेगवेगळी गायन केले जाते आणि पूजा
पण त्याच विशेषते प्रमाणे होते. जसे सरस्वतीला विशेष विद्याची देवी म्हणून पूजा
करतात आणि मानतात, शक्तीस्वरूप ची विशेषता आहे, परंतु विद्याची देवी म्हणून पूजा
करतात. लक्ष्मीला धनाची देवी म्हणून पूजा करतात. असे आपल्या मध्ये सर्व गुण सर्व
शक्ती असून सुद्धा एका विशेषते मध्ये विशेष संशोधन करून, स्वतःला प्रभावशाली बनवा.
या वर्षामध्ये प्रत्येक गुणाचे, प्रत्येक शक्तीचे संशोधन करा. प्रत्येक गुणांच्या
खोली मध्ये जावा. त्याच्या महानते द्वारा महानतेचा अनुभव करू शकाल. आठवणीच्या वेग
वेगळ्या अवस्थचे संशोधन करा, त्याच्या खोली मध्ये जावा. चांगले अनुभव करा,
अनुभवाच्या सागरा मध्ये फक्त वर-वरून लाटांचे अनुभवी बनू नका. हा संपूर्ण अनुभव नाही.
अंतर्मुखी बणुन रहस्ययुक्त अनुभवाच्या रत्ना द्वारे, बुद्धीला भरपूर बनवा, कारण
प्रत्यक्ष वेळ जवळ येत आहे. संपन्न बना, संपूर्ण बना, तर आत्म्यापुढे अज्ञानाचा पडदा
दूर होईल. तुमच्या संपूर्णतेच्या प्रकाशा मुळे हा पडदा स्वतः दूर होईल, म्हणून
संशोधन करा. तीव्र प्रकाशाची किरणे बना, तेव्हाच स्वर्ण जयंती साजरी केली असे म्हणू
शकाल. सुवर्ण जयंती ची विशेषता, प्रत्येका द्वारे, सर्वांना हाच अनुभवा व्हावा,
दृष्टी द्वारे सोनेरी शक्तीची अनुभूती व्हावी. जसे प्रकाशाची किरणे, आत्म्याला
सुवर्ण बनवण्याची शक्ती देत आहेत. तर प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म सोनेरी असावे.
सोनेरी बनवण्यासाठी तुम्ही निमित्त आहात. हे स्वर्णजयंती चे वर्ष स्वतःला पारसनाथची
मुलं मास्टर पारसनाथ समजा. कशी पण लोखंडा सारखी आत्मा असेल परंतू पारसच्या संगती
द्वारे लोखंड पण पारस बनते. हे लोखंड आहे, हा विचारच करू नका. मी पारस आहे, हे
समजायचे आहे. लोखंडाला पण पारस बनवणे हेच लक्ष्य आणि लक्षण नेहमी स्मृतीमध्ये ठेवा,
तेव्हा पवित्र ताऱ्यांचा प्रभाव विश्वाच्या नजरेमध्ये येईल. आता तर बिचारे घाबरत
आहेत, अमका तारा येत आहे. परत खुश होतील, पवित्र तारे येत आहेत. चोहूबाजूला
विश्वामध्ये पवित्र तार्यांचे रिमझिम अनुभव होईल. सर्वांच्या मुखाद्वारे हाच आवाज
निघेल की, भाग्यशाली तारे, सफलता चे तारे आले आहेत, सुखशांतीचे तारे आले आहेत. आता
तर दुर्बीण घेऊन पाहतात ना, परत तिसऱ्या नेत्रा द्वारे पाहतील परंतु हे वर्ष तयारीचे
आहे. चांगल्या प्रकारे तयारी करा. अच्छा, कार्यक्रमांमध्ये काय कराल. बापदादांनी
वतन मध्ये दृष्य दाखवले होते, कोणत्या दृश्य होते? संमेलनाच्या स्टेजवरती तर
वक्त्यांना च बसवतात ना. संमेलनाचे स्टेज म्हणजे वक्त्याची स्टेज. ही रूपरेखा बनवता
ना. एखाद्या विषयावरती भाषण तर नेहमीच करतात आणि चांगले करत राहतात परंतु या
स्वर्णजयंती मध्ये भाषण करण्याची वेळ कमी हवी आणि प्रभाव जास्त पडायला हवा. त्या
वेळेतच वेगवेगळे वक्ते आपले प्रभावशाली भाषण करू शकतात, त्याची पण रूपरेखा काय हवी.
एक दिवस विशेष अर्ध्या तासासाठी हा कार्यक्रम ठेवा आणि जसे बाहेरचे किंवा विशेष
भाषण करणारे, भाषण करतात, ते खुशाल सुरू राहावे परंतु अर्ध्या तासासाठी एक दिवस
स्टेजच्या पुढे, वेगवेगळे वय असणारे, एक छोटासा मुलगा, एक कुमारी, एक पवित्र युगल
हवे, पवित्र प्रवृत्ती मध्ये राहणारे युगल हवे, एक बुजर्ग हवा. वेग वेगळे,
चंद्रासारखे स्टेजवरती बसायला हवेत आणि प्रकाश प्रखर नको, साधारण राहावा आणि एक एक,
तीन मिनिटांमध्ये आपले विशेष स्वर्ण वाक्य ऐकावेत, की असे श्रेष्ठ जीवन बनवणारे
स्वर्ण महावाक्य कोणते आहेत, ज्याद्वारे आम्ही जीवन बनवले. लहान कुमार किंवा मुलीने
सांगावेत, मुलांसाठी स्वर्ण महावाक्य कोणते मिळाले. कुमारी जीवनासाठी कोणते सोनेरी
महावाक्य मिळाले आणि बाल ब्रह्मचारी युगल साठी कोणते सोनेरी महावाक्य मिळाले आणि
प्रवृत्ती मध्ये राहणाऱ्या विश्वस्त आत्म्याला कोणते सोनेरी महावाक्य मिळाले.
बुजर्ग व्यक्ती साठी कोणते सोनेरी महावाक्य मिळाले. त्यांनी तीन तीन मिनिट बोलावे
परंतु शेवटी स्वर्ण महावाक्य सुविचाराच्या रुपयांमध्ये साऱ्या सभेने बोलावेत. आणि
ज्याची पाळी आहे बोलण्याची त्याच्यावरती खास लाईट द्या. प्रकाश तिकडे करा, त्यामुळे
स्वतःच सर्वांचे लक्ष तिकडे जाईल. शांतीचा प्रभाव हवा. जसे कोणी नाटक करतात, तसेच
दृश्य हवे. भाषण सुरू राहावे परंतु दृश्याच्या रूपामध्ये राहावे आणि जास्तीत जास्त
तीन मिनिटच बोलायला पाहिजे. अगोदर पासूनच तयारी करा आणि दुसर्या दिवशी परत याच
रूपरेखा द्वारे वेगवेगळ्या वर्गाचे पण भाषण हवेत. जसे कोणी डॉक्टर आहेत, कोणी
व्यापारी आहेत, कोणी अधिकारी आहेत असे वेगवेगळ्या वर्गाचे तीन तीन मिनिट भाषण करतील
की, अधिकाऱ्यांचे कर्तव्य करत असताना, कोणत्या मुख्य सोनेरी धारणा द्वारे
कार्यामध्ये सफल राहिले. ते सफलतेचे मुख्य मुद्द्याच्या रूपांमध्ये, सोनेरी
महावाक्य रूपांमध्ये सांगावेत. भाषणच असतील परंतु त्याची रूप रेखा थोडी, वेगवेगळ्या
प्रकारची हवी. हे ईश्वरीय ज्ञान खूप विशाल आहे आणि प्रत्येक वर्गासाठी विशेष काय आहे,
हे तीन तीन मिनिटांमध्ये अनुभव, अनुभवाच्या रीतीने सांगू नका, परंतु अनुभव करून
ऐकावयचे आहेत. वातावरण असे शांतीचे पाहिजे, जे ऐकणाऱ्यांना पण बोलण्याची हिम्मत
व्हायला नको. प्रत्येक ब्राह्मणां नी हेच लक्षात ठेवा की, जितका वेळ कार्यक्रम चालतो,
ट्रॅफिक ब्रेक रेकाँर्ड (विचाराला नियत्रंण करुन बाबांचे गित ऐकणे) वाजते, तर सर्व
एकच शांतीचे वातावरण बनवतात. असे या वेळेस या वातावरणाला शक्तिशाली बनवण्यासाठी
मुखाचे भाषण नाही परंतु शांती चे भाषण करायचे आहे. मी एक वक्ता आहे, बांधलेला आहे.
शांतीची भाषा पण कमी नाही. हे ब्राह्मणांचे वातावरण दुसऱ्याला पण त्याच्या अनुभवा
मध्ये घेऊन येते. जितके शक्य होईल, कामकाज समाप्त करुन सर्व ब्राह्मणांनी वातावरण
बनवण्या मध्ये सहभाग घ्यायचा आहे. जर कोणाची ड्युटी असे असेल, त्यांना लवकर जायचे
असेल, तर त्यांनी पुढे बसायला नको. पुढे हलचल व्हायला नको. समजा तीन तासाची भट्टी
आहे, तेव्हा भाषण चांगले होते, असे म्हणणार नाही परंतु भासना चांगली आली, असे
म्हणायला पाहिजे. त्याच्यासोबत जे पण ब्राह्मण येतील त्यांनी समजायला पाहिजे, आम्ही
भट्टी मध्ये आलो आहोत. भाषणा सोबत भासना पण यायला पाहिजे. जे पण ब्राह्मण येतात,
त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, की आम्ही भट्टी करण्या साठी आलो आहोत. फक्त संमेलन
पाहण्यासाठी यायचे नाही परंतु सहयोगी बनायचे आहे. तर या प्रकारे वातावरण असे
शक्तिशाली बनवा, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हलचल मध्ये येणारी आत्मा, थोड्या
वेळापुरती पण शांती आणि शक्तीची अनुभूती करून जावेत. असे वाटायला पाहिजे ३०००ची सभा
नाही परंतु फरिश्त्यांची सभा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी खुशाल हसा परंतु
संमेलनाच्या वेळेस शांतीचे शक्तिशाली वातावरण हवे, तर दुसरे येणारे पण त्याच प्रकारे
बोलतील. जसे वातावरणामध्ये असते, तसेच दुसरे पण बोलणारे तशाच वातावरणामध्ये येतात.
थोड्या वेळा साठी खूप खजाना देण्याचा कार्यक्रम बनवा. कार्यक्रम थोडा आणि गोड असावा.
जर आपले ब्राह्मण हळू बोलतील, तसेच दुसरे पण हळूच बोलतील. आता काय करायचे आहे?
स्वतःला विशेष प्रत्यक्ष तारा प्रत्यक्ष करणार ना? तर हे जयंती चे वर्ष विशेष
स्वतःला संपन्न आणि संपूर्ण बनवण्याचे वर्ष साजरे करा. न स्वतः हलचल मध्ये या, ना
दुसऱ्यां मध्ये गोंधळ करू नका. तर प्रकृती आपले काम करत आहे, तुम्ही आपले काम करा.
अच्छा.
नेहमी पवित्र तारे
बणुन विश्वाला सुख शांतीमय बनवणारे, मास्टर पारसनाथ बणुन पारस दुनिया बनवणारे,
सर्वांना पारस बनवणारे नेहमी अनुभवाच्या सागराच्या, तळांमध्ये अनुभवाचे रत्न जमा
करणारे, प्रकाशाचा झोत बणुन अज्ञानाचा पडदा दूर करणारे, असे विशेष. बाबांना
प्रत्यक्ष करणारे, सर्चलाइट बणुन विशेष सार्यांना बदलाची प्रेमपूर्वक आठवण आणि
नमस्ते. शिक्षका सोबत वार्तालाप:-
नवीन दुनिया
बनविण्याचा ठेका घेतला आहे ना. तर नेहमी नवीन दुनिया बनवण्यासाठी नवीन उमंग, नवीन
उत्साह नेहमी राहतो कि, विशेष दिवसी उमंग राहतो. कधीकधी उमंग उत्साहाने नवीन दुनिया
स्थापन होत नाही. नेहमी उमंग उत्साह असणारेच नवीन दुनिया बनवण्यासाठी निमित्त बनतात.
जितके नवीन दुनियाच्या जवळ येत जाल, तेवढाच नवीन विशेष वस्तूंचा विस्तार होत राहील.
नवीन दुनिया मध्ये येणारे पण तुम्ही आहात आणि बनवणारे पण तुम्हीच आहात. तर
बनवण्यामध्ये शक्ती पण लागते, वेळ पण लागतो परंतु जे शक्तिशाली आहेत ते नेहमी
विघ्नाला समाप्त करून पुढे जात राहतात. तर अशा नवीन दुनियाचे आधार मूर्त, तुम्ही
आहात. जर पाया इमारतीचा पाया कमजोर असेल तर काय होईल? नवीन दूनिया बनवण्याचे
कर्तव्य असणारे जे आहेत, त्यांना कष्ट करून पाया भक्कम बनवायचा आहे. असा भक्कम
बनवायचा आहे, ज्यामुळे एकवीस जन्मापर्यंत इमारत मजबूत राहिल. तर आपल्या २१ जन्माची
इमारत तयार करत आहात ना. अच्छा.
(२)- बाबांचे
ह्रदयासिन आत्मे आहोत असा अनुभव करता का? यावेळी हृदयासीन आत्मे आहात परत विश्वाचे
राज्य सिंहासनधारी असाल. बाबांचे ह्रदयासीन तेच बनतात, ज्याच्या मनामध्ये एक बाबांची
आठवणी सामावलेली आहे. जसे बाबांच्या हृदयामध्ये नेहमी मुलं सामावलेले आहेत, असेच
मुलांच्या मनामध्ये बाबांची आठवण नेहमी आणि स्वतःच रहावी. बाबांच्या शिवाय आणखी
आहेच काय? तर सिंहासनधारी आहेत याच नशा आणि खुशी मध्ये राहा.
निरोप घेते वेळेस
गुरुवारी सकाळी ६. ० वाजता वार्तालाप:-
चोहू बाजूच्या स्नेही
सहयोगी मुलांना नेहमी वृक्षपतीची, बृहस्पतीची दशा तर आहेच आणि याच बृहस्पतीच्या दशा
द्वारे श्रेष्ठ बनवण्याच्या सेवेमध्ये पुढे जात आहेत. सेवा आणि आठवण दोघांमध्ये
विशेष सफलता प्राप्त करत आहात आणि करत रहाल. मुलांसाठी संगम युगच बृहस्पतीची वेळ आहे.
प्रत्येक घडी संगम युगाची बृहस्पती म्हणजे भाग्यवान आहे म्हणून भाग्यवान आहात.
भगवंताचे आहात, भाग्य बनवणारे आहात. भाग्यवान दुनियेचे अधिकारी आहात. अशा नेहमी
भाग्यवान मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
वरदान:-
ईश्वरीय
मर्यादेच्या आधारावर विश्वाच्या पुढे उदाहरण बनणारे सहजयोगी भव.
विश्वाच्या पुढे
उदाहरण बनण्यासाठी अमृत वेळेपासून, रात्रीपर्यंत ज्या ईश्वरीय मर्यादा आहेत,
त्यानुसार चालत राहा. विशेष अमृत वेळेचे महत्त्व जाणून, त्या वेळेत शक्तिशाली अवस्था
बनवा, तर सार्या दिवसाचे जीवन महान बनेल. जेव्हा अमृतवेळेला, विशेष बाबा पासून
शक्ती भराल, तर शक्तीस्वरूप होऊन चालण्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये सफलता मिळत
राहील आणि मर्यादा पूर्वक जीवन असल्यामुळे सहज योगी ची अवस्था स्वतः बनेल, परत
विश्व तुमचे जीवन पाहून आपले जीवन बनवतील.
सुविचार:-
आपल्या चलन आणि
चेहऱ्या द्वारे पवित्रता च्या श्रेष्ठत्वाचा अनुभव करवा.