23-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, स्वतःला राज तिलक देण्याच्या लायक बनवा, जितके शिकाल श्रीमता वरती चालाल, तर राजतिलक मिळेल"

प्रश्न:-
कोणत्या स्मृतीमध्ये राहाल तर तर रावणाची स्मृती, विस्मृत होईल?

उत्तर:-
नेहमी स्मृती राहावी की, आम्ही स्त्री-पुरुष नाहीत, आम्ही आत्मा आहोत. आम्ही मोठे बाबा (शिवबाबा)पासून छोटे बाबा (ब्रह्मा)द्वारा वारसा घेत आहोत. ही स्मृती रावण पणाला विस्मृत करेल. जेव्हा स्मृती झाली, आम्ही एक बाबांची मुलं आहोत, तर रावण पणाची स्मृती समाप्त झाली. ही पण पवित्र राहण्याची खूपच चांगली युक्ती आहे. परंतु यामध्ये कष्ट घ्यायला पाहिजेत.

गाणे:-
तुम्हाला प्राप्त करून आम्ही, सर्व काही मिळवले…

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहेत. सर्वांना भृकुटी मध्येच तिलक देतात. या जागी आत्म्याचे निवासस्थान आहे, दुसरे परत राजतिलक पण येथेच दिला जातो. ही आत्म्याची खुण आहे ना. आता बाबा कडून आत्म्याला स्वर्गाचा वारसा पाहिजे. विश्व राजाई चा तिलक पाहिजे. तुम्ही सूर्यवंशी चंद्रवंशी महाराजा महाराणी बनण्या साठीच शिकत आहात. हे शिक्षण घेणे म्हणजे, स्वतःसाठी राजतिलक देणे होय. तुम्ही शिकण्यासाठी आले आहात. आत्मा जी येथे निवास करते, ती म्हणते, बाबा आम्ही आपल्या कडून विश्वाचे स्वराज्य अवश्य प्राप्त करू. स्वतःसाठी प्रत्येकाला पुरुषार्थ करायचा आहे. मुलं म्हणतात बाबा, आम्ही बनवुन दाखवू. तुम्ही आमच्या चलन ला पाहत रहा, कशी चलन आहे? तुम्ही पण जाणू शकता, आम्ही स्वतःला राजाई तिलक देण्या लायक आहोत की नाही?तुम्हा मुलांना बाबांना सुपात्र बनवून दाखवायचे आहे. बाबा आपले नाव जरूर प्रसिद्ध करु?आम्ही आपले मदत गार बणुन, म्हणजेच स्वता:चे मदतगार बणुन, भारता वरती आपले राज्य करू. भारतवासी म्हणतात, आमचे राज्य आहे, परंतु त्या बिचार्‍यांना माहीत नाही, की आम्ही विषय वैतरणी नदीमध्ये पडलो आहोत. आम्हा आत्म्याचे राज्य तर नाही ना. आता तर आत्मा उलटी लटकली आहे. खाण्यासाठी अन्न पण मिळत नाही, जेव्हा अशी परिस्थिती होते, तेव्हा बाबा म्हणतात, आता तर माझ्या मुलांना खाण्यासाठी पण मिळत नाही. आता मी जाऊन राजयोग शिकवतो. तर बाबा शिकवण्या साठी आले आहेत. बेहद पित्याची आठवण करतो. ते नवीन दुनियाची स्थापना करणारे आहेत. बाबा पतित पावन, ज्ञानाचे सागर पण आहेत. या ज्ञानाच्या गोष्टी तुमच्याशिवाय कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाहीत. हे फक्त तुम्ही मुलं जाणता. बरोबर आमचे बाबा ज्ञानाचे सागर, सुखाचे सागर आहेत. ही महिमा चांगल्या प्रकारे आठवण करा, विसरू नका. बाबांची महिमा आहे ना, ते पुनर्जन्म राहित आहेत. कृष्णाची महिमा वेगळी आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती ची महिमा वेगवेगळी असते. बाबा म्हणतात मला पण, या अविनाश नाटकांमध्ये भूमिका मिळाली आहे. या नाटकांमध्ये कलाकाराला माहिती तर व्हायला पाहिजे ना, हे बेहदचे नाटक आहे, याचा कालावधी किती आहे?जर जाणत नाहीत, तर त्यांना बेसमज म्हणाल, परंतु हे कोणी समजत नाहीत. बाबा येऊन फरक सांगतात की, मनुष्य काय होते आणि काय बनतात?आता तुम्ही समजू शकता, मनुष्यांना तर काहीच माहिती नाही, की 84 जन्म कसे घेतात. भारत खूप श्रेष्ठ होता, चित्र आहेत ना. सोमनाथ मंदिरां मधून खूप धन लुटून घेऊन गेले. अथाह धन होते. आता तुम्ही मुलं बेहदच्या पित्याला भेटण्यासाठी आले आहात. मुलं जाणतात बाबा कडुन आम्ही श्रीमता द्वारे राजाई तिलक घेण्यासाठी आलो आहोत. त्यासाठी पवित्र जरूर बनावे लागेल. जन्म जन्मांतर विषय वैतरणी नदीमध्ये बुडत, थकले तर नाहीत ना?असे म्हणतात, आम्ही खूप पापी आहोत, मज निर्गुण मध्ये काहीच गुण नाहीत. तर याचा अर्थ असा होतो की, कधी जरुर गुण होते, ते आत्ता नाहीत.

आता तुम्ही समजले आहात, आम्ही विश्वाचे मालक सर्व गुण संपन्न होतो. आता काहीच गुण राहिले नाहीत. हे पण बाबाच समजवतात. मुलांचे रचनाकार बाबाच आहेत. तर बाबांना सर्व मुलावर दया येते. बाबा म्हणतात माझी पण, या अविनाशी नाटकांमध्ये भूमिका आहे. खूप तमोप्रधान झाले आहेत. खोटे बोलणे, भांडण करणे, पाप इ. करणे, काय काय करत राहतात. सर्व भारतवासी मुले विसरले आहेत की, आम्ही कधी काळी विश्वाचे मालक डबल मुकुटधारी होतो. बाबा त्यांना स्मृति देतात, तुम्ही विश्वाचे मालक होते परत तुम्ही ८४जन्म घेतले. तुम्ही आपल्या ८४ जन्माला विसरला आहात. हे आश्चर्य आहे ना, ८४ जन्माच्या ऐवजी ८४लाख जन्म म्हणतात. कल्पाचे आयुष्य पण लाखो वर्ष आहे, असे समजतात. खूपच घोर अंधारा मध्ये आहेत. खुपच खोटी दुनिया आहे. भारतच सत्य खंड होता, आत्ता असत्य खंड बनला आहे. असत्य खंड कोणी बनवला आणि सत्य खंड कोणी बनवला, हे कोणालाच माहिती नाही. रावणाला तर बिलकुलच जाणत नाहीत. भक्त लोक रावणाला जाळतात. कोणी धार्मिक मनुष्य असेल तर, तुम्ही त्यांना सांगा की, मनुष्य काय काय करत आहेत. सतयुग ज्याला स्वर्ग हेवन, पॅराडाईज म्हणतात, तर मग रावण आसुर तेथे कोठुन आला. नरकातील मनुष्य तेथे कसे असू शकतात? तर समजतील, हे तर चुकीचे आहे. तुम्ही रामराज्या च्या चित्रावरती पण समजावू शकता. यामध्ये रावण आला कुठून? तुम्ही समजावून सांगतात, तरीही समजत नाहीत. थोडे लोकच समजून घेतात. तुम्ही फार थोडे आहात, तरीही तुमच्या पैकी किती जण ज्ञान घेत राहतील, तेही पुढे जाऊन पाहू शकाल. तर बाबांनी समजले आहे, आत्म्याची खुण पण येथेच दाखवतात. मोठे चिन्ह राजाई च्या तिलकचे आहे. आता बाबा आले आहेत, आपल्याला मोठा तिलक कसा घ्यायचा, तुम्ही स्वराज्य कसे प्राप्त करू शकता? तो रस्ता दाखवत आहेत. याचेच नाव राजयोग ठेवले आहे. बाबाच शिकवणारे आहेत. कृष्ण पिता होऊ शकत नाही. तो तर मुलगा आहे परत राधे बरोबर स्वयंवर झाल्यानंतर त्यांना एक मुलगा होईल. बाकी कृष्णाला इतक्या राण्या इत्यादी नसतात, हे तर खोटे आहे परंतु याची पण अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे. अशा गोष्टी परत ऐकताल. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, कसे आम्ही आत्मे परमधाम मधून आपली भूमिका करण्यासाठी येतो. एक शरीर सोडून दुसरे घेतो, हे तर खूप सहज आहे ना. लहान मुलाला शिकवतात असे बोला, तर शिकवल्या मुळे तो शिकतो. तुम्हाला पण बाबा काय शिकवतात, फक्त म्हणतात माझी आणि वारशाची आठवण करा. तुम्ही गायन पण करतात, तुम मात पिता. . आत्माच गायन करते ना, बरोबर खूप सुख मिळतात. तुम्ही मुलं जाणता, शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. भागीरथ तर मनुष्याचा रथ आहे ना. यामध्ये परमपिता परमात्मा विराजमान आहेत, परंतु रथाचे नाव काय आहे?आत्ता तुम्ही जाणता, रथा चे नाव ब्रह्म ठेवले आहे कारण ब्राह्मा द्वारा ब्राह्मणांची स्थापना करतात. प्रथम ब्राह्मण चोटी असतात, परत देवता बनतात. ब्राह्मण पाहिजेत त्यामुळे विराट रूप दाखवले आहे. तुम्ही ब्राह्मणच परत देवता बनतात. बाबा तर खूप चांगल्या रीतीने समजून सांगतात, तरीही मुलं विसरतात. बाबा म्हणतात, मुलांनो नेहमी ठेवा लक्ष्यात ठेवा, आम्ही स्त्री-पुरुष नाहीत आम्ही आत्मा आहोत. आम्ही मोठे बाबा (शिवबाबा) पासून छोट्या बाबा (ब्रह्मा) द्वारे वारसा घेत आहोत, तर रावण पणाची स्मृतीच विस्मृत होऊन जाईल. ही पवित्र राहण्याची युक्ती खूपच चांगली आहे. बाबांच्या कडे पती-पत्नी दोघे येतात, दोघे म्हणतात बाबा. जेव्हा स्मृती आले आहे की, आम्ही एकाच पित्याची मुलं आहोत, तर रावण पणाची स्मृती, विस्मृत व्हायला पाहिजे. हेच कष्ट मुलांना घ्यायला पाहिजेत. कष्टा शिवाय काहीच होऊ शकणार नाही. आम्ही बाबाचे बनलो आहोत, तर त्यांचीच आठवण करतो. बाबा पण म्हणतात माझी आठवण करा तर, विकर्म विनाश होतील. ८४ जन्माची गोष्ट पण खूपच सहज आहे. बाकी एक बाबांची आठवण करण्या मध्येच कष्ट आहेत. बाबा म्हणतात, पुरुषार्थ करून कमीत कमी आठ तास आठवण करा. एक घडी, अर्धी घडी तुम्ही माझी आठवण करा. मुरली च्या वर्गामध्ये या, तर स्मृती येईल, बाबा आम्हाला शिकवत आहेत. आता तुम्ही बाबांच्या सन्मुख आहात ना, म्हणून बाबा मुलांनो-मुलांनो, म्हणुन समजावत राहतात. तुम्ही मुलं ऐकतात. बाबा म्हणतात वाईट गोष्ट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट विचार पण करू नका. हे आत्ताची च गोष्ट आहे. आता तुम्ही मुलं जाणता, आम्ही ज्ञानसागर बाबांच्या कडे आलो आहोत. ज्ञानसागर बाबा तुम्हाला साऱ्या सृष्टीचे ज्ञान ऐकवत आहेत, परत कोणी ज्ञान घेतील, कोणी घेणार ही नाहीत. हे त्यांच्यावरती आधारित आहे. बाबा येऊन आम्हाला, आत्ता ज्ञान देत आहेत. आत्ता आम्ही राजयोग शिकत आहोत. तर कोणताही ग्रंथ किंवा भक्तीचा अंश पण राहणार नाही. भक्तिमार्ग मध्ये ज्ञान काहीच नाही, परत ज्ञानमार्ग मध्ये भक्ती काहीच नाही. ज्ञानसागर जेव्हा येतील तेव्हा ज्ञान ऐकवतील ना. त्यांचे ज्ञान सद्गती साठी आहे. सद्गती दाता एकच आहेत, त्यांनाच भगवान म्हटले जाते. सर्वजण एकाच पतितपावन ला बोलवतात, परत दुसरे कोणी कसे होऊ शकतात?आता बाबा द्वारे तुम्ही मुलं खऱ्या गोष्टी ऐकत आहात. बाबा म्हणतात, मुलांनो मी तुम्हाला खूप सावकार बनवून गेलो होतो, पाच हजार वर्षाची गोष्ट आहे. तुम्ही दुहेरी मुकुटधारी होते, पवित्रते चा पण मुकुट होता. परत जेव्हा रावण राज्य होते, तुम्ही पुजारी बनतात. आता बाबा शिकवण्यासाठी आले आहेत, तर त्यांच्या श्रीमता वरती चालायला पाहिजे, दुसऱ्यांना पण समजावयाचे आहे. बाबा म्हणतात मला हे शरीर भाड्याने घ्यावे लागते. महिमा सर्व एकाचीच आहे. मी तर त्यांचा रथ आहे, नंदीबैल नाही. सर्व महिमा तुमची आहे. बाबा तुम्हाला हे ज्ञान ऐकवत आहेत, मी पण ऐकतो. मला एकट्याला कसे ऐकवतील, तुम्हाला पण ऐकवतात. तर मी पण ऐकतो. हे पण पुरुषार्थी, विद्यार्थी आहेत, तुम्ही पण विद्यार्थी आहात. हे पण राजयोगाचे शिक्षण घेत आहेत. बाबांच्या आठवणी मध्ये राहतात, खूप खुशी होते. लक्ष्मीनारायण ला पहा पाहून खुशी होते की, आम्ही असे बनणार आहोत. तुम्ही इथे स्वर्गाचे राजकुमार राजकुमारी बनण्यासाठी आले आहात, राजयोग आहे ना. मुख्य उद्देश पण आहे. बाबा शिकवणारे सन्मुख आहेत, तर इतकी खुशी का होत नाही? मनामध्ये खूप खुशी राहायला पाहिजे. बाबां कडे आम्ही कल्प कल्प वारसा घेत आहोत. आम्ही ज्ञानसागरा जवळ येतो, पाण्याच्या सागराची गोष्टच नाही. हे तर बाबा सन्मुख समजावत आहेत. तुम्ही देवता बनण्यासाठी राजयोग शिकतात. मुलांना खूप खुशी राहायला पाहिजे, आम्ही आपल्या घरी जात आहोत. आता जे जितके शिकतील, तेवढे श्रेष्ठ पद मिळवतील. प्रत्येकाला पुरुषार्थ करायचा आहे. खूप मोठी लॉटरी आहे. काही मुलं ज्ञान समजून पण सोडून जातात. माया खूपच प्रबल आहे. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्वतःला राजतिलक देण्याच्या, लायक बनवायचे आहे. सुपात्र मुलगा म्हणून पुरावा द्यायचा आहे. आपली चलन खूपच श्रेष्ठ बनवायची आहे. बाबांचे पूर्ण मदतगार बनायचे आहे.

२) आम्ही विद्यार्थी आहोत, भगवान आम्हाला शिकवत आहेत, याच खुशीने अभ्यास करायचा आहे. कधीपण पुरुषार्थ मध्ये कमजोर बनायचे नाही.

वरदान:-
नियंत्रण करण्याच्या शक्तीद्वारे एक सेकंदा मध्ये, परिस्थिती मधुन मार्ग काढुन, आदराने पास होणारे भव.

आत्ता शरीरांमध्ये येयचे आणि आता शरीरा पासून अनासक्त बणुन अव्यक्त स्थितीमध्ये स्थिर रहायचे आहे. जितका गोंधळ होईल, तेवढीच स्वतःची स्थिती अतिशय शांत हवी, यासाठी सामवण्याची शक्ती पाहिजे. एक सेकंदामध्ये विस्तारा पासून सार मध्ये या आणि एका सेकंदात मध्ये सार मधून विस्तार मध्ये या. असे नियंत्रण करण्याची शक्ती असणारेच विश्वावर अधिराज्य करू शकतात. हाच अभ्यास अंतिम एका सेकंदाच्या परिस्थितीमध्ये आदराने पास करेल.

बोधवाक्य:-
वानप्रस्थ स्थितीचा अनुभव करा आणि दुसर्यांना पण करवा तर लहानपणाचे खेळ समाप्त होतील.