17-05-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
13.01.86 ओम शान्ति
मधुबन
ब्राह्मण जीवन- नेहमी
खुशीचे जीवन
आज बापदादा आपल्या
पवित्र आणि आनंदी हंसाची सभा पाहत आहेत.सर्व पवित्रतेच्या सोबतच आनंदामध्ये पण
नेहमी राहता का?होली म्हणजे पवित्रता ची प्रत्यक्ष लक्षणं आनंदी अर्थात खुशी, नेहमी
प्रत्यक्ष रूपांमध्ये दिसून येईल.जर खुशी नाही तर अवश्य कोणती ना कोणती अपवित्रता
म्हणजे संकल्प किंवा कर्म यथार्थ नाहीत,तेव्हाच खुशी होत नाही.पवित्रता फक्त पाच
विकारास म्हटले जात नाही परंतु संपूर्ण आत्म्यासाठी,देव आत्मा
बनण्यासाठी,अयथार्त,व्यर्थ,
साधारण संकल्प,बोल व कर्म पण संपूर्ण पवित्रता म्हटले जाणार नाही.संपूर्ण
अवस्थेच्या जवळ पोहोचण्या साठी वर्तमान वेळेप्रमाण,व्यर्थ आणि साधारण कर्म पण
व्हायला नकोत,हे पण चेक करा(तपासा) आणि चेंज करा, परिवर्तन करा.जितके श्रेष्ठ
संकल्प,बोल आणि कर्म असतील, तेवढीच नेहमी खुशीची झलक,खुष नसीबी चमक अनुभव होईल आणि
अनुभव करवेल.बापदादा सर्व मुलांच्या या दोन गोष्टी तपासत होते,की पवित्रतेची किती
धारणा केली आहे?व्यर्थ आणि साधारणता किती आहे?आत्मिक खुशी,अविनाशी खुशी,आंतरिक खुशी
किती राहते?सर्व ब्राह्मण मुलांचे ब्राह्मण जीवन धारण करण्याचे लक्षच आहे,नेहमी खुश
राहणे.खुशीचे जीवन व्यतीत करण्यासाठी ब्राह्मण बनले आहात,ना की पुरुषार्थाचे कष्ट,
की कोणत्या न कोणत्या गोष्टींमध्ये संभ्रमित राहण्यासाठी ब्राह्मण बनले आहात.आत्मिक
अंतरीक खुशी किंवा अतिइंद्रिय सुख,जे सर्वकल्पा मध्ये प्राप्त होऊ शकत नाहीत,ते
प्राप्त करण्यासाठी ब्राह्मण बनले आहात.परंतु तपासून पहा खुशी कोणते साधन,कोणत्या
साधनाच्याआधारावरती,कोणत्या सिमित प्राप्तीच्या आधारावरती किंवा थोड्या वेळेच्या
सफलतेच्या आधारावरती मान्यता किंवा नाव प्रसिध्द होण्याच्य आधारावरती,मनातील सिमित
इच्छाच्या आधारावरती,किंवा हेच चांगले वाटते,मग ती व्यक्ती किंवा स्थान किंवा
वैभव,असे मन पसंतीच्या प्रमाण,खुशीच्या प्राप्तीचा आधार तर नाही ना?या आधार द्वारे
खुशीची प्राप्ती,ही काही वास्तविक खुशी नाही,अविनाशी खुशी नाही.आधार डगमग झाला
तर,खुशी पण डगमग होते.अशी खुशी प्राप्त करण्यासाठी ब्राह्मण तर बनले नाहीत ना? अल्प
काळाच्या प्राप्ती द्वारे खुशी,हे तर त्या दुनियेतील लोकां कडे पण आहे.त्यांचा पण
सुविचार आहे,खा,प्या मौज करा,परंतु तो अल्पकाळाचा आधारा जर नष्ट झाला,तर खुशी पण
नष्ट होते.असेच ब्राह्मण जीवना मध्ये पण, या आधारा द्वारे खुशीची प्राप्ती झाली तर
बाकी आंतर काय राहिले?खुशीच्या सागराचे मुलं बनले आहात तर प्रत्येक संकल्पा
मध्ये,प्रत्येक सेकंद खुशीच्या लाटेमध्ये राहणारे आहात.नेहमी खुशीचे भांडार
आहात,याला म्हटले जाते,पवित्र आणि आनंदी हंस.बापदादा पहात होते,जे लक्ष आहे,विना
कोणत्या सीमित आधाराच्या,नेहमी अंतरीक खुशीमध्ये राहण्याचे,त्या लक्ष्यापासून दूर
जाऊन,सिमित प्राप्तीच्या छोट्या छोट्या गल्लीमध्ये फसल्यामुळे,काही मुलं लक्ष
म्हणजेच उद्देशापासून दूर जातात.महामार्ग सोडून गल्लीमध्ये फसतात.आपले लक्ष,खुशीला
सोडून सिमित प्राप्तीच्या पाठीमागे लागतात. आज नाव झालं किंवा काम झाले किंवा इच्छा
पूर्ण झाली तर खुशी आहे.मनपंसत,संकल्प पसंत प्राप्ती झाली तर खूप खुशी
आहे.त्यामध्ये थोडे पण कमी झाले,तर लक्ष तेथेच राहते.लक्ष सीमित बनते,म्हणून
बेहदच्या अविनाशी खुशी पासून किनारा होतो.तर बापदादा मुलांना विचारतात,काय ब्राह्मण
यासाठी बनले आहात का?यामुळे हे आत्मिक जीवन अवलंबले आहे का?हे तर साधारण जीवन
आहे,याला श्रेष्ठ जीवन म्हणू शकत नाही.
कोणते पण काम करा, कितीही मोठ्या सेवा चे कार्य असू द्या,परंतु जी सेवा आंतरिक
खुशी,आत्मिक आनंद,बेहदच्या प्राप्ती पासून दूर घेऊन जाते,अर्थात मर्यादांमध्ये घेऊन
येते,आज खुशी,उद्या संभ्रम,आज खुशी उद्या व्यर्थ विचारांमध्ये येतात,खुशी पासून
वंचित करते,अशी सेवा सोडून द्या,परंतु खुशीला सोडू नका.खरी सेवा नेहमी,बेहद
स्थितीचा खुशीचा अनुभव करवते,अनुभूती नाही तर ती मिक्स सेवा आहे,खरी सेवा
नाही.नेहमी हे लक्षात ठेवा,सेवा द्वारा स्वप्रगती,स्व प्राप्ती,संतुष्टता आणि
महानतेची अनुभूती झाली?जिथे संतुष्टतेची महानता असेल,तेथे अविनाशी प्राप्तीची
अनुभूती होईल.सेवा म्हणजे फुलांच्या बागेला हरभरा करणे.सेवा म्हणजे फुलांच्या
बागेचा अनुभव करणे,ना की काट्याच्या जंगला मध्ये फसणे.संभ्रम,अप्राप्ती, मनातील
गोंधळ,आता आनंदात, आत्ता अप्राप्ती, संशय हे काटे आहेत. या काट्यांना किनारा करणे
म्हणजे बेहद खुशीचा अनुभव करणे.काही ही झाले,हदच्या प्राप्तीचा त्याग जरी करावा
लागला,काही गोष्टींना सोडावे लागले,तरी गोष्टींना सोडा परंतु खुशीला सोडू
नका.ज्यासाठी आले आहात,त्या आपल्या लक्षा पासून दूर जाऊ नका.ही सूक्ष्म तपासणी
करा.आनंदीत आहात परंतु अल्पकाळाच्या प्राप्तीच्या आधारा द्वारे आनंदी राहणे, याला
तर खुशी समजत नाहीत ना? कुठे साईड सीन लाच लक्ष समजलं जात तर नाही ना? कारण साईड
सीन पण आकर्षण करणारे असतात परंतु लक्ष प्राप्त करणे म्हणजे बेहदचे राज्याधिकारी
बनणे.लक्ष्यापासून किनारा करणारे विश्वाचे राज्य अधिकारी बनू शकत नाहीत,राज घराण्या
मध्ये पण येऊ शकत नाहीत, म्हणून लक्ष,उद्देश नेहमी स्मृतीमध्ये ठेवा.नेहमी स्वतःला
विचारा,ंचालता चालता कोणत्या न कोणत्या गल्ली मध्ये तर पोहोचत नाही ना.अल्प
काळाच्या प्राप्ती ची खुशी नेहमी साठी च्या खुशनसीब बनण्या पासुन किनारा तर करत
नाही. थोड्या मध्ये खुश होणारे तर नाहीत ना?स्वतःलाच स्वता: तर नाही खुश करत?मी जशी
आहे तशी ठीक आहे,खुश आहे. अविनाशी खुशीची लक्षणे आहेत,त्यांना दुसऱ्याकडून पण नेहमी
खुशी,आशीर्वाद आवश्य प्राप्त होईल.बाप दादा आणि निमित्त मोठ्या आत्म्यांचा स्नेहाचे
आशीर्वाद,मनात अलौकिक आत्मिक खुशीच्या सागरामध्ये अनुभव करवतील.अलबेला मध्ये हे
विचार करू नका,मी तर ठीक आहे परंतु दुसरे मला ओळखत नाहीत.काय सूर्याचा प्रकाश लपू
शकतो? सत्यतेचा सुगंध कधी लपू शकत नाही,मिटू शकत नाही म्हणून कधी धोका खाऊ नका.हा
पाठ पक्का करा,प्रथम आपली बेहदची अविनाशी खुशी,परत दुसऱ्या गोष्टी.बेहद खुशीची सेवा
केली किंवा सर्वाच्या स्नेहाची,सर्वा द्वारे अविनाशी सन्मान प्राप्त होण्याचे
खुशनसीबी म्हणजे श्रेष्ठ भाग्य स्वतःचे अनुभती करवते.जे नेहमी खुश आहेत,ते खुशनशीब
आहेत.कष्टविना,बिना इच्छा किंवा न सांगता सर्व प्राप्ती सहज होतील. हा पाठ पक्का
केला?
बापदादा पाहतात, कशासाठी आले आहेत? कुठे जायचे आहे आणि कुठे जात आहेत?सीमित
गोष्टींना सोडले परत सीमित गोष्टींमध्येच जात आहेत,तर अमर्यादित खुशीचा अनुभव कधी
करणार?बापदादांना मुलां वरती स्नेहा येते,दया तर म्हणणार नाही कारण भिकारी थोडेच
आहात.दाता विधाता ची मुलं आहात,दुःखी मनुष्य वरती दया केली जाते.तुम्ही तर सुखरूप
सुखदाता ची मुलं आहात.समजले, या वर्षासाठी काय करायचे आहे?बापदादा या वर्षी
वेगवेगळ्या गोष्टीवर लक्ष देण्यास सांगत आहेत.या वर्षी विशेष स्वतःवरती लक्ष
ठेवण्या साठी वेळ दिला पाहिजे.दुनिया वाले तर फक्त म्हणतात खा, प्या,मजा करा परंतु
बापदादा म्हणतात आपण खा आणि दुसर्यांना पण खाऊ घाला.आनंदामध्ये रहा आणि दुसर्यांना
पण आनंदित करा,अच्छा.
नेहमी अविनाशी अमर्यादित खुशीमध्ये राहणारे,प्रत्येक कर्मा मध्ये खुशीचा अनुभव
करणारे,नेहमी सर्वांना खुशीचा खजाना देणारे,नेहमी खुशीचा सुगंध पसरवणारे,नेहमी
खुशीचा उमंग उत्साहा च्या लाटेमध्ये राहणारे,नेहमी खुशी ची झलक आणि चमक मध्ये
राहणारे,श्रेष्ठ लक्ष्याला प्राप्त करणारे,श्रेष्ठ आत्म्यांना बाप दादाची नेहमी
पवित्र आणि आनंदी राहण्यासाठी प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
पार्टी सोबत
वार्तालाप :-
(१) प्रवृतीमध्ये राहत नेहमी अनासक्त आणि बाबांचे प्रिय आहात ना.कधीही प्रवृत्तीचा
लगाव तर होत नाही?जर कुठे ही कोणाशी आकर्षण आहे तर ते,नेहमीसाठी आपल्या जीवनासाठी
विघ्न रूप बनते म्हणून नेहमी निर्विघ्न बणुन पुढे जात राहा. कल्पा पुर्वीसारखे अंगद
बणुनच अचल अडोल राहा.अंगदची विशेषता काय दाखवतात?असे निश्चय बुद्धी जे पाय पण कोणी
हलवू शकणार नाही.माया निश्चय रुपी पाय हलवण्या साठी वेगवेगळे प्रकारे येते परंतु
माया दूर जाईल परंतु निश्चय रुपी पाय हलणार नाही. माया समर्पित होईल,तुम्ही तर
समर्पित होणार नाही.बाबांच्या पुढे समर्पित व्हायचे आहे,मायेच्या पुढे नाही.असे
निश्चय बुद्धी सदा निश्चिंत राहतात.जर थोडी पण कोणती चिंता असेल तर निश्चया मध्ये
कमी आहे.कधी कोणत्या गोष्टीची थोडी पण चिंता होते,तर त्याचे काय कारण असते, जरूर
कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये निश्चया मध्ये कमी आहे,मग तो अविनाशी नाटकांमध्ये
निश्चिय कमी असेल किंवा स्वतःमध्ये निश्चिय कमी असेल किंवा बाबा मध्ये निश्चयाची
कमी असेल.तिन्ही प्रकारच्या निश्चया मध्ये जर आपण कमी असेल तर निश्चिंत राहू शकत
नाहीत.सर्वात मोठा चिंता रोग आहे. चिंता च्या रोगाचे,डॉक्टरा कडे पण औषध
नाही.डाँक्टर तर तात्पुरत्या झोपीच्या गोळ्या देतात परंतु नेहमी साठी चिंता दूर करू
शकत नाहीत.चिंता असणारे जितके प्राप्ती च्या पाठीमागे लागतात तेवढीच प्राप्ती पुढे
जाते म्हणून नेहमी निश्चय रुपी पाय अचल असावेत.नेहमी एक बळ एक भरोसा हाच निश्चय
रुपी पाय आहे. निश्चय म्हणा भरोसा म्हणा एकच गोष्ट आहे.असे निश्चिय बुद्धी मुलांचा
विजय निश्चित आहे.
(२) नेहमी बाबा वर बळी जाणार आहात ना?जो भक्तीमध्ये वायदा केला होता त्याला
निभावणारे आहात ना? कोणता वायदा केला होता? नेहमी तुमच्यावर बळी जाऊ.बळी म्हणजे
नेहमी समर्पित होऊन बलवान बनणारे.तर बळी गेले की जाणार आहात?बळी जाणे म्हणजे माझे
काहीच नाही,माझे पणा नष्ट.माझे शरीर पण नाही, तर कधी देहाभिमान मध्ये येता?माझे आहे
तेव्हाच देहाभिमान येतो.यापेक्षा पण दूर राहणारे,याला म्हटले जाते बळी जाणे.तर माझे
पणा नेहमीसाठी समाप्त करत चला.सर्वकाही तुझे आहे,हाच अनुभव करत चला.जेवढे जास्त
अनुभवी तेवढेच आधिकारी स्वरूप,ते कधीच धोका खाऊ शकत नाहीत.दुःखाच्या लाटेमध्ये येऊ
शकत नाहीत.तर नेहमी अनुभवाच्या गोष्टी सर्वांना ऐकवत चला.अनुभवी आत्मा थोड्या
वेळेमध्ये जास्त सफलता प्राप्त करते.अच्छा.
निरोप घेते
वेळेत 14 जानेवारीच्या निमीत्त मकर संक्रातीची प्रेम पूर्वक आठवण:-
आजच्या दिवसाचे महत्व नेहमी गोड खाणे आणि खाऊ घालण्याचे महत्त्व बनवले आहे.काही
खातात आणि काय खाऊ घालतात.ते तिळगुळ खाऊ घालतात आणि खातात.तीळ म्हणजे खूप लहान
बिंदू,कोणती पण गोष्ट होते,छोटीशी असते तर म्हणतात,ही तर तिळा सारखे आहे आणि मोठी
असते तर म्हणतात डोंगर सारखी आहे.तर डोंगर आणि तीळा मध्ये खूप फरक झाला ना. तर
तिळाचे महत्त्व यासाठी आहे,कारण अतिसूक्ष्म बिंदू बनतात.जेव्हा बिंदू बनतात तेव्हा
उडत्या कलेचे पतंग बनतात.तर तिळाचे पण महत्त्व आहे आणि ती नेहमी गोडव्याच्या रुपाने
संघटन मध्ये येतात,असेच तीळ खात नाहीत.मधुरता म्हणजे स्नेहा द्वारे संघटित
रूपांमध्ये येण्याची लक्षणं आहेत.तसेच त्यामध्ये गूळ पडतो,तर चांगले वाटते,असेच खा
तर कडवे लागतील,परंतु त्यामध्ये गूळ मिसळतात तर खूप चांगले वाटते.तर तुम्ही आत्मे
पण जेव्हा मधुरते सोबत सबधां मध्ये येतात तर,तुम्ही पण श्रेष्ठ बनतात.तरी संघटित
मधुरतेचे यादगार आहे,याची पण लक्षणे आहेत.तर नेहमी स्वतःला मधूरतेच्या आधारा वरती
संघटन शक्तीमध्ये घेऊन येणे बिंदुरुप बनणे आणि पतंग बनवून उडती कला मध्ये उडत
राहणे,हे आजच्या दिवसाचे महत्त्व आहे.तर साजरा करणे म्हणजे बनणे,तर तुम्ही बनले
आहात,आणि दुसरे तर फक्त थोड्या वेळासाठी साजरे करतात.यामध्ये दान द्यायचे म्हणजे
ज्या काही कमी कमजोरी आहेत,त्याचे दान द्या.छोटीशी गोष्ट समजून देत रहा.तीळासारखे
समजून देत रहा.मोठी गोष्ट समजू नका,सोडावी लागेल, द्यावी लागेल,नाही.तिळा सारखी
छोटी गोष्ट समजून द्या.आनंदाने छोटी गोष्ट समजून,खुशी द्या.हे दानाचे महत्त्व
आहे,समजले.
नेहमी स्नेही बनणे,नेहमी संघटित रुप मध्ये चालणे आणि नेहमी मोठ्या गोष्टीला छोटे
समजून नष्ट करणे,अग्नी मध्ये जाळणे,हे महत्त्व आहे.तर मकर संक्रात साजरी केली
ना.दृढ संकल्पा च्या अग्नीमध्ये नष्ट केले ना.या दिवशी अग्नी जाळतात.तर संस्कार
परिवर्तना च्या दिवसला ते संक्रात म्हणतात.तुम्ही संस्कार परिवर्तन म्हणाल.अच्छा
सर्वांना स्नेह आणि संघटना च्या शक्ती मध्ये सदा सफल राहण्या साठी,प्रेम पूर्वक
आठवण आणि सुप्रभात.
वरदान:-
नेहमी भगवान
आणि भाग्याच्या स्मृतीमध्ये राहणारे सर्वश्रेष्ठ भाग्यवान भव.
संगम युगामध्ये
चैतन्य स्वरूपामध्ये भगवान मुलांची सेवा करत आहेत.भक्तिमार्गा मध्ये सर्व भगवंताची
सेवा करतात परंतु येथे चेतन्य ठाकूरांची सेवा स्वतः भगवान करत आहेत.अमृतवेळेला
उठवतात,भोग लावतात, झोपवतात.गीता वरती झोपणारे आणि गीता वरतीच उठणारे,असे लाडके
किंवा सर्वश्रेष्ठ भाग्यवान,आम्ही ब्राह्मण आहोत,याच भाग्याच्या खुशी मध्ये
नेहमी,खुश राहणारे फक्त बाबा चे लाडके बना,माया चे नाही. जे मायचे लाडके बनतात,ते
फार नखरे करतात.
सुविचार:-
आपल्या हर्षित
चेहऱ्या द्वारे सर्व प्राप्तीची अनुभूती करवणेच खरी सेवा आहे.
सूचना:-
आज
आंतरराष्ट्रीय योग दिवस,तिसरा रविवार आहे, संध्याकाळी साडेसहा ते साडेसात पर्यंत
सर्व भाऊ बहिणी संघटित रूपामध्ये एकत्रित होऊन,प्रभू प्रेमामध्ये सामावण्या चा
अनुभव करा.नेहमी या स्वमान मध्ये रहा कि,मी आत्मा सर्व प्राप्तीने संपन्न
सर्वश्रेष्ठ भाग्यवान आत्मा आहे.प्रेमाच्या सागर बाबांची प्रेमाचे किरणे निघून,मज
आत्म्या मध्ये सामवत आहेत.तेच प्रेमाचे प्रकंपन चहुबाजूला वातावरणा मध्ये पसरत
आहेत.