28-05-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो - देही अभिमानी बणुन बाबांची आठवण करा,तर आठवणीचे बळ जमा होईल,आठवणीच्या
बळाने तुम्ही सार्या विश्वाचे राज्य घेऊ शकता"
प्रश्न:-
कोणती गोष्ट
तुम्हा मुलांच्या संकल्प - स्वप्नांमध्ये ही नव्हती, ती आता आता प्रत्यक्षात होत
आहे?
उत्तर:-
तुमच्या संकल्प स्वप्नांमध्ये ही नव्हते की आम्ही भगवंता द्वारे राज योग शिकुन
विश्वाचे मालक बनू. राजाई घेण्यासाठी ज्ञान घेऊ. आता तुम्हाला खूप खुशी आहे की
सर्वशक्तिमान पित्याकडून शक्ती घेऊन आम्ही सतयुगाचे स्वराज्य अधिकारी बनत आहोत.
ओम शांती।
येथे मुली बसतात योग करवण्यासाठी. खरेतर इथे त्यांनीच बसायला पाहिजे जे देही
अभिमानी बणुन बाबांच्या आठवणीमध्ये बसतात .जर आठवणी मध्ये बसले नाही तर त्यांना
शिक्षक म्हणू शकत नाही,आठवणी मध्ये शक्ती आहे ज्ञानामध्ये शक्ती नाही. याला म्हटले
जाते- आठवणीचे बळ. योग बळ संन्याशाचं अक्षर आहे. बाबा कठिन शब्दांचा वापर करत
नाहीत. बाबा म्हणतात मुलांनो आता बाबांची आठवण करा. ज्याप्रमाणे लहान मुलं
आई-वडिलांची आठवण करतात ना.ते तर देहधारी आहेत. तुम्ही मुले आहात विचित्र. हे
चित्र(शरीर)तुम्हाला येथे भेटते. तुम्ही विचित्र देशांमध्ये राहणारे आहात. तिथे
चित्र नसते. प्रथम हे पक्के करायचे आहे,आम्ही तर आत्मा आहोत,म्हणून बाबा म्हणतात-
मुलांनो, देही अभिमानी बना, स्वतःला आत्मा निश्चय करा. तुम्ही निर्वाण देशांमधून
आला आहात. ते तुम्हा सर्व आत्म्याचे घर आहे. इथे भुमिका वठण्यासाठी आले आहात.प्रथम
कोण येते? हेही तुमच्या बुद्धीमध्ये आहे. दुनिया मध्ये कोणी नाही, त्याला हे ज्ञान
आहे. आता बाबा म्हणतात ग्रंथ इत्यादी जे काही वाचले आहेत, ते सर्व विसरून जा.
कृष्णाची महिमा, आमच्या ची महिमा किती करतात. गांधीजींची ही किती महिमा करतात. जसे
की ते राम राज्य स्थापन करून गेले आहेत.परंतु शिव भगवानु वाच आदी सनातन राजा-राणी
च्या राज्याचा जो कायदा होता, बाबांनी राजयोग शिकवून राजाराणी बनवले, त्या ईश्वरीय
रीती रिवाजा लाही तोडून टाकले.असे म्हणाले,आम्हाला राजाई नको, आम्हाला प्रजेचे
प्रजेवर राज्य हवे आहे. आता त्याचे काय हाल झाले आहेत, दुःख च दुःख आहे,भांडणं करत
राहतात. अनेक मतं निर्माण झाली आहेत. आता तुम्ही मुले
श्रीमता वर राज्य घेत आहात. एवढी तुमच्या मधे ताकत असते की तिथे सेनेची गरज राहत
नाही. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते,अद्वेत राज्य
होते. दोन धर्म नव्हते त्यामुळे टाळी वाजवू शकत नाही. त्याला म्हटलेलेच आहे- अद्वेत
राज्य. तुम्हा मुलांना बाबा देवता बनवत आहेत. नंतर द्वैत पासून दैत्य बनतात रावणा
द्वारे. आता तुम्ही मुले जाणत आहात की आम्ही भारतवासी संपूर्ण विश्वाचे मालक होतो.
तुम्हाला विश्वाचे राज्य फक्त आठवणीच्या बळा द्वारे मिळाले होते.आता पुन्हा भेटणार
आहे. कल्प - कल्प भेटते,फक्त आठवणीच्या बळाने. ज्ञानामध्ये ही बळ आहे. ज्याप्रमाणे
वकील बनले म्हणजे बळ आहे ना. ते आहे पाई पैशाचे बळ. तुम्ही योग बळाने विश्वा वरती
राज्य करता. सर्वशक्तिमान पित्याकडून बळ मिळत आहे. तुम्ही म्हणता - बाबा, आम्ही
कल्प - कल्प तुमच्याकडून सतयुगाचे स्वराज्य घेतो नंतर गमावतो, पुन्हा घेतो.
तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळाले आहे. आता आम्ही श्री मतावर श्रेष्ठ विश्वाचे राज्य घेत
आहात. विश्व सुद्धा श्रेष्ठ बनून जाते. हे रचनाकार आणि रचनेचे ज्ञान तुम्हाला आता
आहे. या लक्ष्मी नारायणाला पण, हे ज्ञान नसेल की आम्ही हे राज्य कसे घेतले?येथे
तुम्ही शिकत आहात नंतर जाऊन राज्य करता. कुणी चांगल्या घरांमध्ये जन्म घेतला तर असे
म्हणतात की यांनी पूर्वीच्या जन्मांमध्ये चांगले कर्म केले आहेत, दान पुण्य केले
आहे. जसे कर्म करू तसा जन्म भेटतो. आता तर हे आहे रावणाचे राज्य. इथे जे पण कर्म
करता ते विकर्मच होत आहे. शिडी उतरायची आहे. सर्वात मोठा देवी देवता धर्म त्यांनाही
सीडी उतरायची आहे. सतो, रजो, तमो मध्ये यावे लागते. प्रत्येक वस्तू नव्या पासून
पुन्हा जुनी होते. आता तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे. तुमच्या संकल्प
स्वप्नांमध्ये ही नव्हते की आम्ही विश्वाचे मालक बनणार आहोत. भारत वासी जाणतात की
या लक्ष्मी नारायणाचे राज्य संपूर्ण विश्वावर होते. पूज्य होतो नंतर पुजारी बनलो
आहोत. गायनही आहे स्वतःपूज्य, स्वतःच पुजारी. आता तुमच्या बुद्धी मध्ये हे असायला
पाहिजे. हे नाटक तर खूप आश्चर्यकारक आहे. कशाप्रकारे आम्ही 84 जन्म घेतो, हे
कोणालाच माहीत नाही. शास्त्रांमध्ये 84 लाख जन्म सांगितले आहेत. बाबा म्हणतात या
सर्व भक्ती मार्गाच्या थापा आहेत. रावण राज्य आहे ना. राम राज्य आणि रावण राज्य कसे
असते, हे तुम्हा मुलांशिवाय कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही. रावणाला प्रत्येक वर्षी
जाळतात तर तो शत्रु आहे ना.रावण कोण आहे, त्याला का जाळतात- कुणीही जाणत नाही. जे
स्वतः ला संगम युगी समजतात त्यांच्या आठवणींमध्ये राहते की आम्ही पुरुषोत्तम बनत
आहोत. भगवान आम्हाला राज योग शिकवून नरा पासून नारायण, भ्रष्टाचारी पासून
श्रेष्ठाचारी बनवत आहेत. तुम्ही मुले जाणता की आम्हाला उंच ते उंच निराकार भगवान
शिकवतात. किती खुशी व्हायला पाहिजे? शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये हे
राहते ना - मी विद्यार्थी आहे.ते तर साधारण शिक्षक, शिकवतात,येथे तर तुम्हाला स्वतः
भगवान शिकवत आहे. जर ज्ञानाने तुम्हाला एवढे उच्चपद प्राप्त होते, तर किती चांगल्या
प्रकारे शिकायला पाहिजे.खूप सोपे आहे,फक्त सकाळी अर्धा-पावून तास शिकायचे आहे.
दिवसभर काम धंद्यामध्ये आठवण विसरते म्हणून सकाळी येथे येऊन आठवणीमध्ये बसायचे आहे.
म्हटले जाते बाबांची खूप प्रेमाने आठवण करा-बाबा, तुम्ही आम्हाला शिकवण्यासाठी आले
आहात, आता आम्हाला हे माहित झाले आहे की तुम्ही पाच हजार वर्षानंतर येऊन आम्हाला
शिकवता. बाबांच्या जवळ मुले आल्यानंतर बाबा त्यांना विचारतात या आधी कधी भेटले
होते? असा प्रश्न कुणीही साधू-संन्यासी इत्यादी विचारू शकत नाहीत. तिथे तर
सत्संगामध्ये वाटेल तेव्हा जाऊन बसतात. खूप जणांना पाहून सर्वजण जातात. तुम्हीही
आता समजता - आम्ही गीता, रामायण इत्यादी किती खुशीने जाऊन ऐकत होतो. समजत तर काहीच
नव्हते. ती सर्व भक्ती ची खुशी आहे.खूप खुशी मध्ये नाचत राहतात. परंतु नंतर खाली
उतरत येतात. अनेक प्रकारचे हटयोग इत्यादी करतात. निरोगी राहण्यासाठी सर्व काही करत
असतात. तर बाबा समजावतात या सर्व भक्ती मार्गाच्या रिती रिवाज आहेत,रचनाकाराला आणि
रचनेला कोणीही जाणत नाही. तर बाकी काय राहिले. रचता रचनेला जाणल्याने तुम्ही कशा
पासून काय बनतात आणि न जाणल्यामुळे तुम्ही काय बनले आहात? तुम्ही जाणल्यामुळे
श्रीमंत बनता.न जाणल्यामुळे भारतवासी गरीब बनले आहेत. थापा मारत राहतात. काय-काय
दुनियेमध्ये होत राहते. किती पैसे, सोने इत्यादी लुटतात! आता तुम्ही मुलं जाणता-
तिथे तर आम्ही सोन्याचे महल बनवणार आहोत. वकिलाचे शिक्षण घेतल्यानंतर मनामध्ये हा
विचार असतो ना मी,ही परीक्षा पास केल्यानंतर असे करणार, घर बांधणार. तुमच्या
बुद्धीमध्ये असे का येत नाही की आम्ही स्वर्गाचे राजकुमार राजकुमारी बनण्यासाठी
शिकत आहोत. किती खुश राहायला पाहिजे? परंतु बाहेर गेल्यानंतर खुशी गायब होते.
छोट्या छोट्या मुली या ज्ञानामध्ये येतात. संबंधीं ना काहीच समजत नाही, समजतात
यांच्याकडे जादू आहे. असे म्हणतात आम्ही हे ज्ञान घेऊ देणार नाही. या
परिस्थितीमध्ये जोपर्यंत लहान आहेत,तोपर्यंत आई-वडिलांचे ऐकावे लागते. आम्ही
त्यांना घेऊ शकत नाही, खूप कटकट होते. सुरुवातीला किती कटकट झाली. मुलगी म्हणत होती
मी अठरा वर्षाची आहे, वडील म्हणत होते नाही, सोळा वर्षाची आहे, लहान आहे, भांडण
करून घेऊन जात होते. लहान आहे म्हटल्यानंतर वडील म्हणतील तसेच वागावे लागते. समजदार
असेल तर, जे पाहिजे ते करू शकते. असे कायदे आहेत ना. बाबा म्हणतात की तुम्ही जेव्हा
बाबां जवळ येता तेव्हा कायदा आहे, आपल्या लौकिक पित्याकडून चिठ्ठी घेऊन या. नंतर
संस्कारही पाहिले जातात. संस्कार ठिक नसतील तर परत पाठवावे लागते. खेळामध्ये ही असे
होते. चांगले खेळत नसतील तर त्यांना म्हणतात तू मैदानातून बाहेर जा. इज्जत घालवतात.
आता तुम्ही मुले जाणता आम्ही युद्धाच्या मैदानामध्ये आहोत. कल्प - कल्प बाबा येऊन
आम्हाला मायेवरती विजय प्राप्त करून देतात. मुख्य गोष्ट आहे पावन बनण्याची पतित
बनले आहेत विकारामुळे. बाबा म्हणतात काम महा शत्रू आहे हा अत्यंत दुःख देणारा आहे.
जे ब्राम्हण बनतील तेच पुन्हा देवता धर्मामध्ये येतील. ब्राह्मणांमध्ये ही नंबर वार
असतात.ज्योती वर पतंग येतात. काही तर जळून मरतात काही चक्कर मारून निघून जातात.
येथे ही असेच आहे कुणी एकदम फिदा होते, कुणी ऐकून निघून जाते. सुरुवातीला तर
रक्ताने लिहून देत होते - बाबा आम्ही तुमचे आहोत, तरीही माया हरवते. एवढे माये
बरोबर युद्ध चालते, याला युद्ध स्थळ असेही म्हटले जाते. हेही तुम्ही समजता परमपिता
परमात्मा ब्रम्हा द्वारे सर्व वेद शास्त्रांचे सार समजावत आहेत. चित्र खूप बनवले
आहेत नारदाचे ही उदाहरण या वेळेचे आहे. हे सर्व म्हणतात - आम्ही लक्ष्मी किंवा
नारायण बनणार. बाबा म्हणतात स्वतःला विचारा- आम्ही लायक आहोत? आमच्या मध्ये कोणता
विकार तर नाही? नारद भक्त तर सर्व आहेत ना. हेही एक उदाहरण दिले आहे. भक्ती मार्ग
वाले म्हणतात आम्ही श्री लक्ष्मीला वरू शकतो का? बाबा म्हणतात नाही, जेव्हा ज्ञान
ऐकाल तेव्हा सद्गती ला प्राप्त व्हाल. मी पतित-पावन च सर्वांची सद्गती करणारा आहे.
आता तुम्ही समजत आहात, बाबा आम्हाला रावण राज्या राज्यापासून मुक्त करत आहेत. ती
आहे शरीराची यात्रा. भगवानुवाच- मनमनाभव. बस, यामध्ये धक्के खाण्याची गरज नाही. ते
सर्व आहेत भक्तिमार्गाचे धक्के. अर्धा कल्प ब्रह्मा चा दिवस, अर्धा कल्प ब्रह्मा ची
रात्र. तुम्ही समजता की आम्हा सर्व बी. के. चा अर्धा कल्प दिवस असेल. आम्ही
सुखधामामधे असणार. तिथे भक्ती नसेल.आता तुम्ही मुले जाणता आम्ही सर्वात साहुकार बनत
आहोत, तर किती खुशी व्हायला पाहिजे. तुम्ही सर्व पहिले कडक दगड होते, आता बाबा
तुम्हाला घडवत आहेत. बाबा जवाहरी पण आहे ना. नाटका नुसार बाबांनी रथ पण अनुभवही
घेतला आहे. गायनही पण आहे गावा मधला मुलगा. कृष्ण गावामधला मुलगा कसा असू शकतो. तो
तर सतयुगामध्ये होता. त्याला तर पाळण्या मध्ये झोके देतात. मुकुट घालतात मग गावा
मधला मुलगा असे का म्हणतात? गावामधली मुले सावळी असतात. आता तुम्ही सुंदर
बनण्यासाठी आले आहात. बाबा तुम्हाला ज्ञानाची धार लावत आहेत. हा सत्याचा संग
कल्प-कल्प, कल्पामधे एकदाच मिळतो. बाकी सर्व आहेत खोटे संग म्हणुन बाबा म्हणतात
वाईट ऐकून नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका अशा गोष्टी ऐकू नका जिथे माझी आणि
तुमची निंदा करत राहतात. ज्या कुमारी ज्ञानामध्ये येतात, त्या तर असे म्हणू शकतात
की पित्याच्या संपती मध्ये माझा हिस्सा आहे,का नाही मी भारताच्या सेवेसाठी
सेवाकेंद्र सुरु करायचे?. कन्यादान तर द्यायचे आहे. तो हिस्सा मला द्या, तर मी
सेवाकेंद्र सुरु करेल.अनेकांचे कल्याण होईल. अशी युक्ती केली पाहिजे. ही आहे तुमची
ईश्वरीय मिशन. तुम्ही दगडा सारख्या बुद्धीला परिसा सारखे बनवता. जे आपल्या धर्माचे
असतील ते येतील. एकाच घरामध्ये देवी-देवता धर्माचे फुल येईल. बाकीचे येणार नाहीत.
मेहनत आहे ना. बाबा सर्व आत्म्यांना पावन बनवून सर्वांना घेऊन जातात म्हणून बाबांनी
समजावले होते- संगम युगाच्या चित्रावर घेऊन जा. या बाजूला आहे कलियुग, त्या बाजूला
आहे सतयुग. सत्य युगामध्ये आहेत देवता, कलियुगामध्ये आहेत आसुर. याला म्हटले जाते
पुरुषोत्तम संगम युग. बाबाच पुरुषोत्तम बनवतात. जे शिकतील ते सत युगामध्ये येतील,
बाकी सर्व मुक्तिधाम मध्ये निघून जातील. नंतर आपल्या - आपल्या वेळेवर येतील. हे
गोळ्या चे(सुर्ष्टी चक्राच) चित्र खूप चांगले आहे. मुलांना सेवा करण्याची आवड
असायला पाहिजे. आम्ही अशी-अशी सेवा करून, गरिबांचा उद्धार करून त्यांना स्वर्गाचे
मालक बनवू. अच्छा. गोड - गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात - पिता बाप -
दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. स्वतःला
पाहायचे आहे की आम्ही श्री लक्ष्मी, श्री नारायणा समान बनू शकतो का? आमच्या मध्ये
कोणता विकार तर नाही? आम्ही चक्कर मारणारे पतंग आहोत का फिदा होणारे आहोत? असे
संस्कार तर नाहीत की ज्यामुळे बाबांची इज्जत जाईल.
2. अपार खुशी मध्ये
राहण्यासाठी- सकाळी सकाळी प्रेमानी बाबांची आठवण करायची आहे आणि ज्ञान शिकायचे आहे.
भगवान आम्हाला शिकवून पुरुषोत्तम बनवत आहे, आम्ही संगमयुगी आहोत, या नशेमध्ये मध्ये
राहायचे आहे.
वरदान:-
आत्मिक शक्ती
ला प्रत्येक कर्मामध्ये वापरणारे युक्तीयुक्त, जीवनमुक्त भव
या ब्राह्मण जीवनाची
विशेषताच आहे आत्मीकता. आत्मिकतेच्या शक्तीनेच स्वतःला किंवा सर्वांना परिवर्तन करू
शकता. या शक्तीने अनेक प्रकारच्या शारीरिक बंधनांपासून मुक्ती मिळते. परंतु युक्ती
युक्त बनून प्रत्येक कर्मामध्ये ढील्ले राहण्याच्या बदल्यात आत्मिक शक्ती चा वापर
करा. मंसा-वाचा आणि कर्मणा तिन्ही मध्ये सारखाच आत्मीयतेच्या शक्तीचा अनुभव व्हायला
हवा. जो तिन्ही मध्ये युक्ती युक्त आहे तोच जीवन मुक्त आहे.
बोधवाक्य:-
सत्यतेचा
विशेषते द्वारे खुशी आणि शक्तीची अनुभूती करवत चला.