09-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हा सर्वांचे प्रेम एक बाबांशी हवे, बाबांनी तुम्हाला आत्म्याशी प्रेम करायला शिकवले आहे, शरीराशी नाही"

प्रश्न:-
कोणत्या पुरुषार्था मध्येच माया विघ्न आणते? मायाजीत बनण्याची युक्ति कोणती आहे?

उत्तर:-
तुम्ही पुरुषार्थ करता की, आम्ही बाबांची आठवण करून आपल्या पापाला भस्म करू. तर या आठवणी मध्येच मायाचे विघ्न येतात. उस्ताद बाबा तुम्हाला मायाजीत बनण्याची युक्ती सांगतात. तुम्ही उस्तादला ओळखून आठवण करा तर खुशी पण राहील, पुरुषार्थ पण होइल आणि सेवा पण खूप होईल, मायाजीत पण बनाल. गित:-या पापाच्या दुनिये पासून कुठे दूर घेऊन चल, जिथे सुख चैन असेल. . .

ओम शांती।
आत्मिक मुलांनी गीत ऐकले, अर्थ पण समजला. दुनिये मध्ये कोणीही या गीताचा अर्थ समजत नाहीत. मुलं समजतात आमच्या आत्म्याचे प्रेम परमपिता परमात्मा सोबत आहे. आत्मा आपल्या परम पिता परमात्माला बोलवते. प्रेम आत्म्या मध्ये आहे, की शरीरा मध्ये? आता बाबा शिकवतात, प्रेम आत्म्या मध्ये व्हायला पाहिजे. शरीर तर नष्ट होणार आहे. प्रेम तर आत्म्या मध्ये आहे. आता बाबा समजवतात, तुमचे प्रेम परमात्मा पित्या मध्ये असायला पाहिजे, शरीराशी नाही. आत्माच आपल्या पित्याला बोलवते की, पुण्य आत्म्याच्या दुनिया मध्ये घेऊन चला. तुम्ही समजता आम्ही पापात्मा होतो, आता परत पुण्यात्मा बनत आहोत. बाबा तुम्हाला युक्ती द्वारे पुण्यात्मा बनवतात. बाबा मुलांना सांगतील, तेव्हा तर अनुभव होइल आणि समजतील की, आम्ही बाबा द्वारे, बाबाच्या आठवणी द्वारे, पवित्र पुण्यात्मा बनत आहोत. आमचे पाप भस्म होत आहे, बाकी गंगा इत्यादींमध्ये काही पाप धुतले जात नाही. मनुष्य गंगास्नान करतात, अंगाला माती लावतात परंतु याद्वारे काही पाप धुतले जात नाही. आत्म्याचे पाप तर योगाद्वारे नष्ठ होतील. आत्म्यामध्ये भेसळ आहे, हे तर मुलांना माहिती आहे आणि निश्चय पण आहे. आम्ही बाबांची आठवण करू तर, आमचे पाप नष्ट होतील, तर पुरुषार्थ पण करायला पाहिजे ना. या पुरुषार्था मध्येच माया विघ्न आणते. जे पहिलवान आहेत त्यांच्याशी माय पहिलवान होऊन लढाई करते, कच्च्या मुलांशी काय लढाई करणार. मुलांना नेहमी विचार चालला पाहिजे, आम्हाला मायाजीत, जगजीतचा अर्थ पण कोणी समजत नाहीत. आत्ता तुम्ही मुलांना समजवले जाते, तुम्ही कसे माया वरती विजय प्राप्त करू शकता. माया पण समर्थ आहे ना. तुम्हा मुलांना उस्ताद मिळाला आहे. त्या उस्तादला पण क्रमानुसार जाणतात. जे जाणतात त्यांना खुशी पण राहते, पुरुषार्थ पण स्वतः करतात, सेवा पण खूप करतात. अमरनाथला खूप लोक जातात. आता सर्व मनुष्य म्हणतात, विश्वा मध्ये शांती कशी होईल? आता तुम्हा सर्वांना स्पष्ट करून सांगायचे आहे की, सतयुगा मध्ये कशी सुख-शांती होती, सर्व विश्वा मध्ये शांती होती. या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते, दुसरा कोणताही धर्म नव्हता. आज पासून पाच हजार वर्ष झाले, जेव्हा सतयुग होते, परत सृष्टीचे चक्र फिरणार आहे. चित्राद्वारे तुम्ही बिलकुल स्पष्ट करून सांगू शकता, की कल्पा पूर्वी पण असेच चित्र बनवले होते, त्यामध्ये सुधारणा होत जाते. कुठे मुलं चित्रांमध्ये तिथी तारीख लिहायला विसरतात. लक्ष्मीनारायच्या चित्रांमध्ये तिथे तारीख जरूर असायला पाहिजे. मुलांच्या बुद्धी मध्ये बसले आहे ना, आम्ही स्वर्गवासी होतो. आत्ता परत बनायचे आहे. जितका जो पुरुषार्थ करेल, तेवढे पद मिळवतील. आता बाबा द्वारे तुम्ही ज्ञानाचे अधिकारी बनले आहात. भक्ती आता खलास होईल, सतयुग त्रेता मध्ये भक्ती थोडीच असेल, नंतर अर्धा कल्प भक्ती चालते. हे पण तुम्हा मुलांना समजले आहे, अर्धा कल्पा नंतर रावण राज्य सुरू होते. सर्व खेळ भारता वरतीच आहे. ८४ चे चक्र पण भारता साठीच आहे. भारतच अविनाशी खंड आहे, हे पण पूर्वी माहीत नव्हते. लक्ष्मीनारायणला च देवी-देवता म्हणतात. खूप श्रेष्ठ, उच्चपद आहे आणि शिक्षण पण खूप सहज आहे. हे ८४चे चक्र पूर्ण करून आम्ही परत जात आहोत. ८४चे चक्र म्हणल्यामुळे बुद्धी वरती चालली जाते. आता तुम्हाला मुळवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन सर्व आठवणीत आहे. यापूर्वी थोडेच जाणत होते, सूक्ष्मवतन काय असते? आता तुम्ही समजतात तेथे कसे मुकपटा द्वारे, गोष्टी होतात. अगोदर सिनेमा मुकपटाचे होते. तुम्हाला समजण्यासाठी सहज होते, सायलेन्स मूवी टॉकी( शांती, मुकपट, आणि बोलणे)तुम्ही सर्व जाणतात, लक्ष्मी नारायण च्या राज्यां पासून आत्तापर्यंत सर्व चक्र बुद्धीमध्ये आहे. तुम्हाला ग्रहस्थ व्यवहारां मध्ये ही काळजी राहावी, की आम्हाला पावन बनायचे आहे. बाबा समजवतात, गृहस्थ व्यवहारा मध्ये राहत, जुन्या दुनिये पासून मोह नष्ट करा, मुलांची संभाळ पण जरूर करा, परंतु बुद्धी बाबांकडे पाहिजे. असे म्हणतात, हाताने काम करा आणि बुद्धी बाबांकडे हवी. मुलांना खाऊ घाला, स्नान इत्यादी घाला, बुद्धीमध्ये बाबांची आठवण राहावी, कारण तुम्ही जाणता शरीरावरती पापाचे ओझे खूप आहे, म्हणून बुद्धी बाबांकडे राहावी. त्या साजन ची खुप आठवण करायची आहे. साजन शिव पिता तुम्हाला सर्वांना म्हणतात माझी आठवण करा, ही भूमिका आत्ताच चालत आहे, परत पाच हजार वर्षांनंतर चालेल. बाबा खूपच सहज युक्ती सांगतात, काहीच कष्ट नाहीत. कोणी म्हणतील आम्ही तर हे करू शकत नाही, आम्हाला खूप कष्ट वाटते. आठवणीची यात्रा खूप कठीण आहे. अरे तुम्ही बाबांची आठवण करू शकत नाही. बाबांना थोडेच विसरायला पाहिजे. बाबांची चांगल्या रितीने आठवण करायची आहे, तेव्हाच विकर्म विनाश होतील आणि तुम्ही नेहमी निरोगी बनाल, नाहीतर बनणार नाहीत. तुम्हाला खूप चांगली मत मिळत आहे, एकटीक औषध असते ना. आम्ही खात्री करतो या योगाद्वारे, तुम्ही २१जन्मासाठी कधीच रोगी बनणार नाहीत, फक्त बाबांची आठवण करा, युक्ती खूप सहज आहे. भक्तिमार्गा मध्ये, परिचय नसताना आठवण करत होते. आता बाबा सन्मुख समजवतात. तुम्ही समजता आम्ही कल्पा पूर्वी पण बाबांकडे आलो होतो, पुरुषार्थ केला होता. आत्ता पक्का निश्चय झाला आहे, आम्हीच राज्य करत होतो, परत आम्हीच गमावले आहे, आता परत बाबा आले आहेत, त्यांच्यापासून राज्य भाग्य घ्यायचे आहे. माझी आठवण करा आणि राजाईची पण आठवण करा. मनामनाभव, अंत मती सो गती होईल. आता नाटक पूर्ण होत आहे, बाबा सर्वांना घेऊन जाण्यासाठी आले आहेत. जसे वर-वधूला घेण्यासाठी येतात. सजनीला खूप खुशी होती. आम्ही आपल्या सासरी जात आहोत. तुम्ही सर्व सीता एका रामाच्या आहात. रामच येऊन तुम्हाला रावणाच्या जेल पासून सोडवून घेऊन जातात. मुक्तिदाता एकच आहेत. रावण राज्या पासून मुक्त करतात. हे रावण राज्य आहे असे म्हणतात, परंतु अर्थ सहित समजत नाहीत. आता तुम्हा मुलांना समजवले जाते आणि दुसऱ्यांना समजण्यासाठी चांगल्या चांगल्या ज्ञानाचे मुद्दे दिले जातात. बाबाने समजवले आहे, हे पण लिहा विश्वा मध्ये शांती, कल्पा पूर्वी सारखीच, बाबा स्थापन करत आहेत. ब्रह्मा द्वारा स्थापना होत आहे. विष्णूचे राज्य होते, तेव्हा विश्वामध्ये शांती होती ना. विष्णू आणि लक्ष्मी नारायण आणि राधा कृष्ण कोण होते, हे पण कोणी समजतात थोडेच. विष्णू आणि लक्ष्मी नारायण आणि राधा कृष्णाला ला वेग वेगळे समजतात. आता तुम्ही समजले आहे, स्वदर्शन चक्रधारी पण तुम्हीच आहात. शिवबाबा येऊन सृष्टीचक्राचे ज्ञान देतात. त्यांच्याद्वारे आता आम्ही मास्टर ज्ञानाचे सागर बनलो आहोत. तुम्ही ज्ञान नदी आहात ना, हे तर मुलांचे नाव आहे. भक्तिमार्गा मध्ये मनुष्य खूप स्नान इत्यादी करतात, खूप भटकतात आणि खूप दान पुण्य इत्यादी करतात. सावकार लोक तर खूप दान करतात, सोने पण दान करतात. तुम्ही आत्ता समजतात आम्ही खूप भटकत होतो. आता आम्ही काही हठयोगी तर नाही. आम्ही तर राजयोगी आहोत. पवित्र गृहस्थ आश्रमाचे होतो, परत रावण राज्या मध्ये अपवित्र बनलो. अविनाशी नाटका नुसार, बाबा परत ग्रहस्थ धर्माची स्थापना करत आहेत, दुसरे कोणी करू शकत नाहीत. मनुष्य तुम्हाला म्हणतात आम्ही जर सर्व पवित्र बनलो, तर दुनिया कशी चालेल? तुम्ही समजावून सांगा, इतके सर्व संन्यासी पवित्र राहतात, तर परत दुनिया काही बंद झाली का? अरे सृष्टीची तर खूप वृध्दी झाले आहे ना. खाण्यासाठी धान्य पण नाही आणि परत सृष्टीचे किती वृध्दी करणार ? आता तुम्ही मुलं समजतात, बाबा आमच्या सन्मुख हाजर नाजिर आहेत परंतु त्यांना या डोळ्याद्वारे पाहू शकत नाही, बुद्धी द्वारे जाणतात. बाबा आम्हा आत्म्याला शिकवत आहेत. आमच्या समोर आहेत. जे विश्वामध्ये शांती च्या गोष्टी करतात, त्यांना तुम्ही सांगा विश्वामध्ये शांती तर बाबाच स्थापन करत आहेत. त्यासाठीही जुन्या दुनिया चा विनाश समोर उभा आहे. पाच हजार वर्षापूर्वी पण विनाश झाला होता. आत्ता पण हा विनाश समोर उभा आहे, परत विश्वा मध्ये शांती होईल. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी आहेत. दुनिया मध्ये कोणी जाणत नाहीत. कोणीच नाहीत, ज्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी आहेत. तुम्ही जाणतात सतयुगा मध्ये सर्व विश्वामध्ये शांती होती, एका भारता शिवाय दुसरा कोणता खंड नव्हता, नंतर बाकी सर्व खंड झाले. आता तर किती खंड आहेत. असे म्हणतात भगवान जरूर असेल, परंतु भगवान कोण आणि कोणत्या रुपा मध्ये येतात, हे जाणत नाहीत. कृष्ण तर भगवन होऊ शकत नाहीत, न कोणी प्रेरणा द्वारे किंवा शक्ती द्वारे काम करू शकतात. बाबा तर खूपच प्रिय आणि गोड आहेत, त्यांच्याद्वारे वारसा मिळतो. बाबा स्वर्ग स्थापन करतात, तर परत जरूर जुन्या दुनियेचा विनाश करतील. तुम्ही जाणता सतयुगा मध्ये हे लक्ष्मीनारायण होते. आता परत स्वतः पुरुषार्थ द्वारे असे श्रेष्ठ बनत आहेत, तर नशा राहायला पाहिजे ना. भारतामध्येच राज्य करत होते. शिवबाबा राज्य देऊन गेले होते. असे म्हणणार नाही, शिवबाबा राज्य करून गेले होते, नाही. भारताला राज्य देऊन गेले होते. लक्ष्मीनारायण राज्य करत होते ना, परत बाबा राज्य देण्यासाठी आले आहेत. ते म्हणतात गोड मुलांनो तुम्ही माझी आणि सृष्टीच्या चक्राची आठवण करा. तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत. तुम्ही जर कमी पुरुषार्थ करतात, तर समजले जाते, कमी भक्ती केली आहे. जास्त भक्ती करणारे पुरुषार्थ पण जास्त करतात. बाबा खूप स्पष्ट करून समजवतात परंतु जेव्हा बुद्धीमध्ये बसेल. तुमचे काम आहे पुरुषार्थ करणे. जर भक्ती कमी केली असेल, तर योग पण लागणार नाही. शिवबाबा ची आठवण बुद्धीमध्ये थांबणार नाही. कधीही पुरुषार्था मध्ये थंड बनायचे नाही. माया पहिलवान ला पाहून हृदय बंद पडू द्यायचे नाही. मायेचे वादळ तर खूप येतात. हे पण मुलांना समजले आहे, आत्माच सर्व काही करते. शरीर तर नष्ट होते. आत्मा निघून गेली तर शरीर मातीमध्ये मिसळते, परत ते भेटणार तर नाही, परत त्यांची आठवण करून, रडून काहीच फायदा नाही. ती गोष्ट परत मिळणार का? आत्म्याने जाऊन दुसरे शरीर घेतले. आता तुम्ही खूप उच्च कमाई करत आहात. तुमचे च जमा होत आहे बाकी सर्वांचे नष्ट होईल. बाबा व्यापारी आहेत तर तुम्हाला मुठ्ठी भर तांदळाच्या ऐवजी, २१जन्मासाठी महल देतात, किती व्याज देतात. तुम्हाला जेवढे पाहिजे, भविष्या साठी तुम्ही जमा करू शकता, परंतु असे नाही अंत काळामध्ये जमा करू, त्यावेळेस घेऊन काय करू? मी अनाडी व्यापारी थोडाच आहे. जे कामामध्ये येणार नाही, त्याचे व्याज द्यावे लागेल. अशा लोकांचे थोडेच घेतील. तुम्हाला मुठ्ठीभर तांदळाच्या ऐवजी, २१जन्मा साठी महल मिळतो. खूप व्याज मिळते. बाबा म्हणतात मी क्रमांक एकचा भोळा आहे. तुम्हाला विश्वाची बादशाही देतो, फक्त तुम्ही माझे बणुन सेवा करा. भोलेनाथ आहेत तेव्हा तर त्यांची, सर्व आठवण करतात. आता तुम्ही ज्ञानमार्गात आहात. आता तुम्ही बाबाच्या श्रीमतावर चाला आणि बादशाही घ्या. मुलं म्हणतात, बाबा आम्ही राजाई घेण्यासाठी आलो आहोत, तेही सूर्यवंशी घराण्यांमध्ये. अच्छा, तुमचे तोंड गोड व्हावे. अच्छा.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) श्रीमता वरती चालून बादशाही घ्यायची आहे. मुठ्ठीभर तांदूळ देऊन, २१जन्मा साठी महल घ्यायचा आहे. आपल्याच भविष्या साठी कमाई जमा करायची आहे.

(२) गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत, जुन्या दुनिये पासून मोह नष्ट करून, पूर्ण पावन बनायचे आहे. सर्वकाही करत बुद्धी बाबांकडे लागून राहावी.

वरदान:-
हजार भुजा असणाऱ्या, ब्रह्मा बाबाच्या सोबतचा, निरंतर अनुभव करणारे, खरे स्नेही भव.

वर्तमान काळामध्ये हजार भुजा असणाऱ्या ब्रह्मा बाबांच्या रूपाची भूमिका चालत आहे. जसे आत्म्या शिवाय, भुजा काहीच करू शकत नाहीत तसे बापदादा शिवाय मुलं काहीच करू शकत नाहीत. प्रत्येक कार्यामध्ये प्रथम बाबांचा सहयोग आहे. जो पर्यंत स्थापना ची भूमिका चालत आहे, तोपर्यंत बापदादा मुलांच्या, प्रत्येक संकल्प आणि सेकंदा मध्ये सोबत आहेत, म्हणून कधीच निरोपाचा पडदा घेऊन, वियोगी बनू नका. प्रेमाच्या सागराच्या लाटेमध्ये राहुन गुणगान करा परंतु घायल बनू नका. बाबांच्या स्नेहाचे प्रत्यक्ष स्वरूप सेवां चे स्नेही बना.

बोधवाक्य:-
अशरीरी स्थितीचा अनुभव आणि अभ्यासच नंबर पुढे घेऊन जाण्याचा आधार आहे.