15-05-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुमचे मुख आत्ता स्वर्गाकडे आहे,तुम्ही नरका पासुन किनारा करून स्वर्गाकडे
जात आहात,म्हणून बुद्धीचा योग नाटका मधुन काढून टाका"
प्रश्न:-
सर्वात
श्रेष्ठ आणि सूक्ष्म लक्ष कोणते आहे,त्याला प्राप्त कोण करू शकतात?
उत्तर:-
तुम्ही मुलं स्वर्गाकडे तोंड करतात,तर माया तुमचे तोंड नरका कडे घेऊन जाते.माया
अनेक वादळ आणते,त्या वादळाला दूर करणे च सूक्ष्म लक्ष आहे.या लक्ष्याला प्राप्त
करण्यासाठी नष्टमोहा बनावे लागेल. निश्चय आणि हिंमतच्या आधारावर त्या वादळाला दूर
करु शकतात. विकारी लोकां मध्ये राहत,निर्विकार हंस बनणे,हेच कष्ट आहेत"
गाणे:-
निर्बल
आत्म्याची लढाई बलवान मायेशी,ही गोष्ट आहे दिवा आणि वादळाची..
ओम शांती।
जी मुलं समंजस आहेत ते चांगल्या रीतीने समजतात.ज्यांचा बुद्धीयोग शांतीधाम आणि
स्वर्गाकडे आहे,त्यांनाच मायचे वादळ येतात. बाबा आता तुमचे तोंड स्वर्गाकडे
करतात.अज्ञान काळा मध्ये जुन्या घरापासून तोंड नवीन घराकडे जाते, कधी तयार होईल?आता
तुम्हा मुलांच्या लक्षात आहे,कधी आपल्या स्वर्गाची स्थापना होईल आणि आम्ही सुखधाम
मध्ये जाऊ.या दुःखधाम मधून सर्वांना जायचे आहे.साऱ्या सृष्टीचा मनुष्य मात्राला बाबा
समजवतात राहतात,मुलांनो आता स्वर्गाचे गेट उघडत आहे.आता तुमचा बुद्धी योग स्वर्गाकडे
पाहिजे.स्वर्गा मध्ये जाणाऱ्या साठी पवित्र म्हटले जाते.नरकामध्ये जाणाऱ्यां साठी
अपवित्र म्हटले जाते.ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत बुद्धी योग स्वर्गाकडे लावायचा
आहे.असे समजा पित्याचा बुद्धी योग स्वर्गाकडे आहे आणि मुलाचा नर्का कडे आहे,तर ते
एका घरामध्ये कसे राहू शकतात.हंस आणि बगळे एकत्र कसे राहू शकतात?खूपच कठीण
आहे.त्याचा बुद्धीयोग पाच विकाराकडे आहे,तो नर्का कडे जाणारा आहे,तो स्वर्गाकडे
जाणारा हा नर्का कडे,दोघे एकत्र राहू शकत नाहीत.खूप मोठे लक्ष आहे.पिता
पाहतात,माझ्या मुलाचे तोंड नरका कडे आहे,नरका मध्ये जाण्या शिवाय राहू शकत नाही,परत
काय करायला पाहिजे?जरूर घरामध्ये भांडणं होतील?काही असे म्हणतील हे कोणत्या प्रकारचे
ज्ञान आहे,मुलांनी लग्न करायचे नाही.ग्रहस्थ व्यवहारांमध्ये अनेक जण राहतात. मुलांचे
तोंड नरकाकडे आहे,त्याची इच्छा आहे नरकामध्ये जायची.पिता म्हणतात,नरका कडे
बुध्दीयोग लावू नका परंतु ऐकत नाहीत,परत काय करायला पाहिजे?यामध्ये खूप नष्टोमोहा
स्थिती पाहिजे.हे सर्व ज्ञान आत्म्या मध्ये आहे.पित्याची आत्मा म्हणते,यांची आम्ही
रचना केली आहे,तरीही माझे ऐकत नाहीत.काही तर ब्राह्मण बनले,परत बुद्धी नरका कडे
जाते,एकदम रसातळा मध्ये जातील.
मुलांना समजवले आहे,हे ज्ञान सागराचा दरबार आहे,भक्तिमार्गा मध्ये इंद्राच्या
दरबाराचे गायन आहे. नीलम परी,माणिक परी,पुखराज परी अनेक नावं ठेवली आहेत,कारण
ज्ञानाचा डान्स करतात ना. वेगवेगळ्या परी आहेत,त्या पण पवित्र पाहिजेत.जर कोणी
अपवित्र मनुष्याला घेऊन आले,तर दंड पडतो, यामध्ये खूप पावन पाहिजेत.हे लक्ष्य खूप
श्रेष्ठ आहे,म्हणून झाड लवकर वृध्दीला प्राप्त होत नाही.बाबा जे ज्ञान देतात,त्यांना
कोणी जाणत नाहीत,कारण ग्रंथांमध्ये हे ज्ञान नाही. त्यामुळे थोडा निश्चय झाला परत,
माया एकच चापट मारून विकारांमध्ये घेऊन जाते.मायेचे वादळ आहे ना.छोट्याशा दीपकाला
तर मायेचे वादळ,एकच चापट मारते आणि येऊन विकारात घेऊन जाते. दुसऱ्यांना विकारात जात
असलेले पाहून स्वतः पण विकारांमध्ये जातात,यामध्ये तर समजण्यासाठी खुप मोठी बुद्धी
पाहिजे.गायन पण आहे,आबला वरती तर अत्याचार झाले.बाबा समजवतात,मुलांनो काम महाशत्रू
आहे,यामुळे तुम्हाला खूप नफरत यायला पाहिजे.अगोदर अशा गोष्टी नव्हत्या.नरक तर आता
आहे ना.द्रौपदीने बोलवले होते,ही आत्ता ची गोष्ट आहे.खूप चांगल्या रीतीने समजावले
जाते,तरीही बुद्धीमध्ये बसत नाही.
हे सृष्टिचक्र म्हणजे गोळ्या चे चित्र खूपच चांगले आहे,स्वर्गाकडे जाण्याचे गेट.या
गोळ्याच्या चित्रा वरती खूप चांगल्या रीतीने समजू शकतात,शिडीच्या चित्रामध्ये नाही,
जितके सृष्टि चक्राच्या चित्रा वरती समजू शकतात.दिवसेंदिवस चित्रांमध्ये सुधारणा
होत जाते.बाबा म्हणतात,मुलांनो आज बिलकुल नवीन श्रीमत देतो,अगोदरच सर्व श्रीमत कशी
मिळेल?ही कशी दुनिया आहे,यामध्ये किती दुःख आहे.किती मुलांमध्ये मोह राहतो.मुलाचा
मृत्यू होतो,तर एकदम वेडे होतात.आता दुःख आहे,असे नाही की सावकार सुखी आहेत,अनेक
प्रकारचे रोग लागले आहेत.परत दवाखान्यांमध्ये पडून राहतात,गरीब जनरल वॉर्डमध्ये आणि
सावकार स्वतंत्र रूम मध्ये राहतात.दुःख तर जसे सावकाराला तसेच गरिबाला पण होते,फक्त
त्यांची खोली चांगली असते,चांगल्या प्रकारे देखभाल होते.आता तुम्ही मुलं जाणता बाबा
आम्हाला शिकवत आहेत,अनेक वेळेस शिकवले आहे. आपल्या मनाला विचारायला पाहिजे, आम्ही
चांगल्या रीतीने शिकतो की नाही?किती लोकांना शिकवतो? जर चांगल्या रीतीने शिकणार नाही
तर काय पद मिळेल?रोज रात्री आपली दिनचर्या तपासायची आहे,आज कुणाला दुःख तर नाही
दिले?श्रीमत म्हणते कोणाला दुःख देऊ नका आणि सर्वांना रस्ता दाखवा.आपल्या कुळाचे
असतील,तर लगेच ज्ञान घेतील,यामध्ये बुद्धी रुपये भांडे सोन्याचे म्हणजे पवित्र
पाहिजे, ज्यामध्ये ज्ञानामृत थांबू शकेल.असे म्हणतात ना वाघिणीच्या दुधासाठी
सोन्याचे भांडे पाहिजे,कारण तिचे दूध खूप शक्तिशाली असते.परत त्यांचा मुलांमध्ये
मोह खुप असतो. कोणाला पाहिले तर एकदम क्रोधीत होतात,समजतात मुलांना कोणी मारायला
नको.येथे पण खुप आहेत ज्यांचा मोह मुलं,पती इत्यादी मध्ये राहतो.आता तुम्ही मुलं
जाणता, स्वर्गाचे गेट उघडत आहे.कृष्णाच्या चित्र मध्ये खूप स्पष्ट लिहिले आहे,या
लढाईच्या नंतर स्वर्गाचे गेट उघडतात.स्वर्ग मध्ये खूप थोडे मनुष्य असतात बाकी सर्व
मुक्तिधाम मध्ये जातील.सजा पण खूप खावी लागेल,जे पण पाप कर्म केलेत,एक एक एख जन्माचा
साक्षात्कार करत,सजा खात राहतील,परत नव्या पैशाचे पद मिळेल.बाबांच्या आठवणीमध्ये न
राहिल्यामुळे विकर्म विनाश होत नाहीत.
काही मुलं मुरली पण चुकवतात, अनेक मुलं यामध्ये निष्काळजी राहतात.असे समजतात आम्ही
मुरली वाचली नाही,तर काय होईल? आम्हाला तर सर्व ज्ञान आहे.
मुरलीची काळजी करत नाहीत.असे देहाभिमानी अनेक आहेत,ते आपलेच नुकसान करतात.बाबा
जाणतात म्हणुन विचारतात,काही मुरली वाचल्या नसतील.माहित नाही,त्यामध्ये काही चांगले
मुद्दे असतील.ज्ञानाचे मुद्दे तर रोज मुरली मध्ये येतात.असे पण अनेक जण सेवा
केंद्रावरती असतात,परंतु धारणा होत नाही,ज्ञानच नाही.श्रीमता वरती चालत नाहीत, तर
पद पण थोडेच मिळेल.सत पिता,सत शिक्षकाची निंदा केल्यामुळे उच्चपद मिळू शकत नाही
परंतु सर्व जन राजा तल बनू शकत नाहीत.प्रजा पण बनते. क्रमानुसार राजधानीमध्ये पद
असतात,सर्व आठवणी वरती आधारित आहेत.ज्या बाबांकडून विश्वाची राजाई मिळते त्यांची
आठवण करू शकत नाही का? भाग्या मध्ये नाहीतर पुरुषार्थ पण करत नाहीत.बाबा तर म्हणतात
आठवणीच्या यात्रे द्वारेच पाप नष्ट होतील.तर पुरूषार्थ पण करायला पाहिजे ना.बाबा
काही असे पण म्हणत नाहीत,खाऊपिऊ नका.हा काही हठयोग नाही.चालता-फिरता सर्व काम
करता,जसे सजनी साजन ची आठवण करते,तसेच तुम्ही पण आठवणीत रहा.त्यांचे नावं-रूपा साठी
प्रेम असते.लक्ष्मीनारायण विश्वाचे मालक कसे बनले?हे कोणालाही माहिती नाही.तुम्ही
तर म्हणत आहात,ही तर कालची गोष्ट आहे.हे राज्य करत होते.मनुष्य लाखो वर्षाची गोष्ट
म्हणतात.मायेने मनुष्याला बिल्कुलच पत्थर बुद्धी बनवले आहे.आता तुम्ही पत्थर बुद्धी
पासून पारस बुद्धी बनत आहात. पारसनाथचे मंदिर पण आहे परंतु ते कोण आहेत?हे कोणी जात
नाहीत. म्हणून बिलकुलच घोर अंधारा मध्ये आहेत.आता बाबा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी
समजवतात, तरीही प्रत्येकाच्या बुद्धीवर अवलंबून आहे. शिकवणारे तर एकच आहेत. शिकणारे
अनेक होतील,गल्ली गल्ली मध्ये तुमची पाठशाला होईल. स्वर्गाकडे जाण्याचे गेट.मनुष्य
एक पण नाही,जे समजतात,आता आम्ही नरकामध्ये आहोत.बाबा समजवतात सर्व पुजारी
आहेत.सतयुगा मध्ये पूज्य असतात,कलियुगा मध्ये पुजारी असतात.मनुष्य परत समजतात
भगवानच पूज्य आणि भगवानच पुजारी बनतात.तुम्ही पण भगवान,आ्म्ही पण भगवानच
आहोत.तुम्हीच भगवान आहात,तुम्हीच सर्व खेळ करतात. तुम्ही पण भगवान,आम्ही पण भगवान
आहोत,काहीच समजत नाहीत.हे रावण राज्य आहे.तुम्ही काय होते,आता काय बनतात? मुलांना
खूप नशा राहायला पाहिजे, बाबि म्हणतात माझी आठवण करा,तर तुम्ही पुण्यात्मा बनाल.
बाबा मुलांना पुण्यात्मा बनवण्याची युक्ती सांगतात,मुलांनो जुन्या दुनियेचा अंतकाळ
आहे,मी आत्ता प्रत्यक्षात आलो आहे.हे अंत काळातील दान आहे,हे शेवटचे दान आहे.एकदम
समर्पित होऊन जावा.बाबा हे सर्व आपले आहे.बाबा तर देण्यासाठीच सर्व काही करतात.यांचे
काही भविष्य बनावे.मनुष्य ईश्वरार्थ दान पुण्य करतात,ते अप्रत्यक्ष आहे.त्याचे फळ
दूसऱ्या जन्मा मध्ये मिळते.हे पण नाटकांमध्ये नोंदलेले आहे.आता तर मी प्रत्यक्ष आलो
आहे,आता तुम्ही जे करता,त्याचा मोबदला अनेकपटीने मिळेल.सतयुगा मध्ये तर दान
पुण्यांची गोष्टच राहत नाही.येथे कोणाजवळ पैसे आहेत,तर बाबा म्हणतात तुम्ही जाऊन
सेवा केंद्र उघडा.प्रदर्शनी इत्यादी बनवा.गरीब असतील तर म्हणतात,आपल्याच घरांमध्ये
फक्त बोर्ड लावा,स्वर्गाकडे जाण्याचे गेट.स्वर्ग आणि नर्क आहेत ना.आता आम्ही नरक
वासी आहोत, हे पण कोणी समजत नाहीत.जर स्वर्गवासी झाले तर,त्यांना परत नरकामध्ये का
बोलवतात?स्वर्गामध्ये थोडेच कोणी म्हणतील,स्वर्गवासी झाला.तो तर आहेच
स्वर्ग.पुनर्जन्म स्वर्गात मध्येच मिळतो.येथे पुनर्जन्म नरकामध्येच मिळतो.या गोष्टी
पण तुम्ही समजावू शकता.भगवानुवाच, माझीच आठवण करा,कारण मीच पतित-पावन आहे.माझी आठवण
करा तर,तुम्ही पुजारी पासून पूज्य बनाल.जरी स्वर्गामध्ये सर्व सुखी असतील,परंतु
क्रमानुसार पद असतात.खूप मोठे लक्ष्य आहे.कुमारीं ना तर सेवेचा खूप नशा राहायला
हवा.आम्ही भारताला स्वर्ग बनवून दाखवू.कुमारी तीच आहे,जी एकवीस कुळाचा उद्धार
करेल,अर्थात एकवीस जन्मासाठी उध्दार करू शकते अच्छा.
गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) या जुन्या
दुनिया चा शेवट आहे,बाबा प्रत्यक्ष आले आहेत,तर एकदम समर्पित होऊन जावा.बाबा हे
सर्व आपले आहे..या युक्ती द्वारे तुम्ही पुण्यात्मा बनाल.
(२) मुरली कधी
चुकवायची नाही. मुरली मध्ये निष्काळजी बनायचे नाही.असे नाही आम्ही मुरली वाचली नाही
तर काय झाले?आमच्याकडे तर खूप ज्ञान आहे,नाही.हा देहाभिमान आहे.मुरली जरूर वाचायची
आहे.
वरदान:-
निश्चयाच्या
आधारावरती विजयी रत्न बणुन सर्वांच्या प्रती, मास्टर आधार दाता भव.
निश्चय बुद्धी मुलं
विजयी असल्यामुळे नेहमी,खुशी मध्ये नाचत राहतात.ते आपल्या विजयाचे वर्णन करत नाहीत
परंतु विजयी झाल्यामुळे दुसऱ्याची हिम्मत वाढवतात. कोणाला कमजोरी दाखवण्यासाठी
प्रयत्न करत नाहीत परंतु बाप समान मास्टर आधार दाता बनतात,म्हणजेच कमजोर व्यक्तीला
श्रेष्ठ बनवतात. व्यर्थ पासून नेहमी दूर राहतात.व्यर्थ पासून किनारा होणे म्हणजेच
विजयी बनणे.अशी विजयी मुलं सर्वा साठी मास्टर आधार दाता बनतात.
बोधवाक्य:-
निस्वार्थ
निर्विकल्प स्थिती द्वारे सेवा करणारे सफलता मुर्त आहेत.