01-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, अनेक देह धारींचे प्रेम काढुन, एका विदेही बाबांची आठवण करा, तर आपले सर्व अवयव शीतल होतील"

प्रश्न:-
जे दैवी कुळांचे आत्मे आहेत, त्यांची चिन्ह काय असतील?

उत्तर:-
दैवी कुळाच्या आत्म्याला या जुन्या जगापासून सहजपणे वैराग्य येईल. २)त्यांची बुद्धिमत्ता अमर्यादित असेल. शिवालय मध्ये चालण्यासाठी, ते पावन फुलासारखे, शुद्ध होण्यासाठी प्रयत्न करतील. ३)कोणतीही आसुरी चलन नसेल. ४) कोणतेही आसुरी कृत्ये तर केली नाहीत, हे दररोज तपासुन पाहतील. शिव पित्याला सत्य सांगतील. काहीच लपवणार नाहीत.

गाणे:-
न ते आपल्या पासून विभक्त होतील, न आम्ही त्यांच्या पासुन…

ओम शांती।
आता या बेहदच्या गोष्टी आहेत. हदच्या गोष्टी सर्व नष्ट झाल्या आहेत. दुनिये मध्ये तर अनेकांची आठवण केले जाती. अनेक देहधारी सोबत प्रेम आहे. विदेही तर एकच आहेत, त्यांनाच परमपिता परमात्मा, शिव असे म्हणतात. आता तुम्हाला त्यांच्या बरोबर बुध्दीयोग जोडावा लागेल. कुठल्याही देहधारींची आठवण यायला नको. ब्राह्मणांना भोजन खाऊ घालणे इत्यादी, हे सर्व कलियुगातील विधी आणि संस्कार आहेत. स्वर्गातील विधी संस्कार आणि कलियुगातील विधी संस्कार पूर्णपणे भिन्न आहेत. येथे कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. जो पर्यंत ती अवस्था येत नाही तो पर्यंत प्रयत्न चालू राहतात. बाबा म्हणतात की, जुन्या जगामधून जे होऊन गेले आहेत, आणि जे आहेत त्यांना विसरले पाहिजे. दिवसभर हेच बुध्दीत राहायला पाहिजे, कोणाला काय समजावून सांगायचे. प्रत्येकाला सांगायचे आहे, तुम्ही येऊन आपला भूतकाळ, वर्तमान काळ आणि जगाच्या भविष्याला समजून घ्यावे, जे कोणास ठाऊक नाही. भूतकाळ कधी सुरू झाला? आता वर्तमान काय आहे. त्याची सुरुवात सुवर्ण काळापासून झाली आहे. तर सुवर्ण काळापासून आतापर्यंत अजून काय घडले आहे, आणि भविष्य काय आहे, हे जगाला अजिबात ठाऊक नाही. आपल्याला माहित आहे, म्हणूनच आपण चित्रे इत्यादी बनवित आहोत. हे अमर्यादित नाटक आहे. ते खोटी सिमीत नाटकं बनतात. कथाकार वेगळे आहेत आणि बाकीचे नाटकातील देखावे बनवणारे वेगळे आहेत. हे सर्व रहस्य अजूनही तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आपण आता जे पाहता ते राहणार नाही. विनाश होईल. तर आपल्याला सुवर्ण युगातील नवीन जगाचे खूप चांगले देखावे दर्शवावे लागतील. जसे अजमेर मध्ये सोनी द्वारका आहे, तसेच त्या मधील देखावे घेऊन, एक नवीन विश्व बनवा आणि पुन्हा त्यांना दर्शवा. या जुन्या जगाला आग लागेल, याचा एक नकाशा देखील आहे. आणि हे नवीन जग उदयास येत आहे. अशाप्रकारे आपण या प्रकारची काळजी घेत, चांगला सराव केला पाहिजे. आपण हे समजून घ्या यावेळी, मनुष्य पत्थर दगड बुद्धी सारखेच आहेत. तुम्ही खुप समजाऊन सांगता तरीही बुद्धीमध्ये बसत नाही. हे आपण स्पष्ट करता. जसे नाटकातील सुंदर देखावे दृश्यास्पद बनवतात, असे एखाद्याच्या मदतीने स्वर्गाचे देखावे खूप चांगले केले पाहिजेत. ते लोक कल्पना चांगल्या प्रकारे देतील. टिप सांगतील. त्यांचे स्पष्टीकरण देऊन, आपण असे एक चांगले केले पाहिजे की, मनुष्य येऊन समजतील. खरं तर, सुवर्ण काळात एकच धर्म होता. तुमच्यातही क्रमवारी नुसार आहेत, ज्यांना समज आहे, धारणा होते. शरीराच्या अहंकारी बुद्धीला छी छी म्हणतात. देही अहंकारीला गुल गुल, फूल म्हणतात. आता तुम्ही फूल बनाल. शरीर -अहंकारी पणामुळे काटेरी झुडपेच राहिली. तुम्हा मुलांना तर या जुन्या जगापासून वैराग्य आहे. आपल्याकडे अमर्याद शहाणपणा आणि अमर्याद विरक्ती आहे. आम्हाला या वेश्यागृहाचा द्वेष आहे. आत्ता, आम्ही शिवालयाला जाण्यासाठी फुल बनत आहोत. फुलां सारखे बनत बनत जर कोणी वाईट चलन चालतात, तर समजले जाते की, त्यांच्या मध्ये आजुन भूताची प्रवेशता आहे. एकाच घरात नवरा हंस बनतोय, बायकोला समजलं नाही तर अवघड होते. ते सहन करावे लागेल. असे मानले जाते की यांच्या भाग्यात नाही. प्रत्येकजण दैवी कुळाचे होणार नाहीत, जे होणारे असतील तेच बनतील. बऱ्याच लोकांच्या वाईट चलनचा अहवाल येतो. हे, हे आसुरी गुण आहेत, म्हणून बाबा रोज स्पष्टीकरण देतात, रात्री आपल्या दिनचर्या कडे पहा की, आज आपण कोणते आसुरी काम तर केले नाही ? बाबा म्हणतात आयुष्यभर तुम्ही केलेल्या चूका सांगा. जर कोणी मोठी चूक केली तर शल्य चिकित्सकांना सांगायला लाज वाटते, कारण त्याची इज्जत जाते ना. सांगितले नाही तर आपलेच नुकसान होते. माया अशाप्रकारे चापट मारते ज्याचा पूर्णपणे नाश होतो. माया खूप शक्तिशाली आहे. ५ विकारा वरती विजय मिळवत नाहीत, तर बाबा पण काय करतील. बाबा म्हणतात, मी काळांचा काळ असलो तरीही दयाळू आहे. आपण मला बोलवताच येऊन पावन बनवा. माझी नावं दोन्ही आहेत. कसा दयाळू आहे, परत काळांचा काळ आहे, ती भुमीका वठवत आहे. ते काटयांना फुलं बनवतात, तर तुमच्या बुद्धीमध्ये ती खुशी आहे. अमरनाथ बाबा म्हणतात तुम्ही सर्व पार्वती आहात. आता तुम्ही माझीच आठवण करा तर, तुम्ही अमरपुरी मध्ये चालले जाल आणि तुमच्या पापांचा नाश होईल. ती यात्रा करुन तुमची पापे नष्ट होत नाहीत. या भक्ती मार्गाच्या यात्रा आहेत. मुलांना प्रश्न विचारतात तुमचा खर्च कसा चालतो? आम्ही अशा प्रकारे प्रतीसाद दिला, अशी कोणीही बातमी देत ​​नाहीत. इतकी सर्व मुलं ब्रह्मांची संतान ब्राह्मण आहेत, म्हणून आम्हीच आपल्यासाठी खर्च करू ना. राजाई पण श्रीमता वर आम्हीच स्वतःसाठी स्थापन करत आहोत. राजयोग शिकत आहोत तर आपण च खर्च करू. शिवबाबा तर ज्ञानाचे अविनाशी दागदागिने देतात, ज्याद्वारे आम्ही राजांचे राजा बनतो. मुलं जे अभ्यास करतील तेच खर्च करतील ना. आम्हीच आमचा खर्च करतो, आपण कोणतेही दान किंवा देणगी घेत नाही, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. तथापि, मुले फक्त असेच विचारतात की त्यांनी हे देखील विचारले, म्हणून बाबा म्हणाले की, जे दिवसभर सेवा करतात त्यांनी संध्याकाळी दिनचर्या सांगावी. त्याचाही पाठपुरावा असावा. बाकी अनेक येतात. ते सर्व प्रजा बनतात. उच्च पद मिळवू शकणारे थोडेच आहेत. राजे थोडेच असतात, सावकारही थोडेच बनतात. बाकी बरेच गरीब असतात. येथे सुद्धा असेच आहेत, तर दैवी जगात देखील असेच असतील. राज्य स्थापन केले जाते, तेथे क्रमवारी नुसार सर्व पाहिजेत. शिवपिता येऊन राजयोग शिकवतात आणि आदी सनातन देवी देवता धर्माची राजधानी स्थापन करतात. दैवी धर्माची राजधानी होती, आत्ता नाही. शिवपिता म्हणतात, मी पुन्हा स्थापित करतो. तर कोणास समजावून सांगण्यासाठी, चित्र देखील आवश्यक आहेत. बाबाची मुरली ऐकतील. दिवसें दिवस सुधार होत राहतो. आपण आपली स्थिती किती सुधरते, हे पहात रहा. बाबा येऊन विकार रुपी घाणीतून दूर करतात. जितके जे पुष्कळ जणांना विकारातुन काढून टाकण्याची सेवा करतात, तेवढे उच्च पद प्राप्त करतील. तुम्हा मुलांना तर एकदम खिरखंड होऊन राहायला पाहिजे. सत्ययुगा पेक्षा पण श्रेष्ठ बनवतात. बाबा शिकवतात तर हे शिकून आपला जलवा दाखवायचा आहे, त्यामुळे तर बाबा पण बळी जातील. मनात यायला पाहिजे बस, आता तर आम्ही भारताला स्वर्ग बनवण्याचा धंदा करू. कामधंदा इत्यादी तर करतच राहायचे आहे. सर्व प्रथम आपली प्रगती करायची आहे, तसे तर खुप सोपे आहे. मनुष्य सर्व काही करु शकतात. आपल्या कुटुंबा समवेत घरी राहताना, आपल्याला राजाई स्थिती प्राप्त करायची आहे, म्हणून आपली दिनचर्या लिहा. दिवस भराचा फायदा आणि नुकसान काढा. आपण जर दिनचर्या तपासत नाही तर, सुधरणे फार कठीण आहे. बाबांचा विश्वास बसत नाही. दररोज पाहिले पाहिजे-आम्ही कोणाला दुखवले नाही? पद खूप उच्च आहे, अतुलनीय कमाई आहे. नाही तर तुम्हाला पुन्हा रडावे लागेल. शर्यत असते ना. काही लाखो रुपये कमवतात, तर काही गरीबच राहतात. आत्ता तुमची ईश्वरीय

शर्यत आहे, यामध्ये कोणतीही पळण्याची शर्यत नाही, फक्त प्रिय बाबांची आठवण करा. काही चुक झाली तर लगेच सांगायला पाहिजे. बाबा आमच्या कडुन ही चूक केली. कर्म ईद्रियांनी ही चूक केली. बाबा म्हणतात, चुक किंवा बरोबर, विचार करण्याची बुध्दी तर मिळाली आहे ना. तर आत्ता चुकीचे काम करू नका. तुम्ही चुकीचे काम केले, तर लगेच सांगा, बाबा तोबा - तोबा, क्षमा करा. कारण सध्या बाबा ऐकण्यासाठी बसले आहेत. जे वाईट कृत्य घडले, ते लगेच सांगा किंवा लिहा, बाबा, हे वाईट कृत्य झाले तर, अर्धे माफ होईल. असे नाही मी कृपा करेल. क्षमा किंवा कृपा काहीच करणार नाही. प्रत्येकाने स्वत: ला सुधारले पाहिजे. बाबांच्या आठवणी द्वारेच विकर्म नष्ट होतील, भुतकाळातील विकर्म पण योगाच्या सामर्थ्याने नष्ट होतील. बाबांचे बणुन परत बाबांची निंदा करवू नका. सतगुरु चे निंदक उच्च पद प्राप्त करु शकत नाहीत. तुम्हाला खूप उच्च पद मिळते. इतर गुरूंमध्ये काही राजाईचे पद थोडेच आहे. येथे तुमच्या साठी लक्ष्य आहे. भक्ती मार्गा मध्ये लक्ष्य नाही. जरी असले, तरी थोड्या काळासाठी. कुठे २१ जन्माचे सुख, कुठे पाई पैशाचे थोडेसे सुख. असे नाही धना मुळे सुख होते. दुःख पण खूप होते. अच्छा समजा, कोणी दवाखाना बनवला तर दुसऱ्या जन्मामध्ये रोग कमी होईल, असे तर नाही शिक्षण जास्त मिळेल. धन पण जास्त मिळेल. त्याच्यासाठी सर्वकाही करावे लागेल. कोणी धर्मशाळा बनवतात तर दुसऱ्या जन्मांमध्ये महल मिळेल, असे नाही की निरोगी बनतील, नाही. बाबा तर खूप गोष्टी समजवत राहतात. काही तर समजून घेतात आणि इतरांना पण समजवतात. काही तर काहीच समजत नाहीत. तर दररोज दिनचर्या तपासून पहा. आज कोणते पाप तर नाही केले. कोणत्या गोष्टीत नापास तर झालो नाही. बाबा मत देतात, खराब काम करायला करायचे नाही. तुम्ही जाणता आम्ही तर आत्ता स्वर्गामध्ये जातो. मुलांना खुशीचा पारा चढत नाही. बाबांना खुप खुशी आहे. मी वृध्द आहे, हे शरीर सोडुन राजकुमार बनणार आहे. तुम्ही पण अभ्यास करता, तर तशीच खुशी राहायला पाहिजे. परंतु बाबांची आठवण करत नाहीत. बाबा तर खूप सहज समजवतात, इंग्रजी इत्यादी शिकण्या साठी खूप डोकं खराब होते. हे तर खुप सहज आहे. आपण या अध्यात्मिक शिक्षणा मुळे शीतल बनतो. आता त्यांचे मऊ अंग कोणी बनवले? यामध्ये फक्त तुम्ही पित्याची आठवण करत राहा तर कर्म इंद्रिय एकदम शीतल बनतील. शरीर तर तुम्हाला आहे. शिवबाबाला तर शरीर नाही. श्रीकृष्णाला कर्म इंद्रिय आहेत. त्यांचे कर्मेंद्रिये तर शितल आहेत म्हणून त्यांचे नाव ठेवले आहे. आता त्यांचा संग कसा करायचा, ते तर सत्ययुगा मध्ये असतात. त्यांचे पण असे शितल कर्मेन्द्रिय कोणी बनवले? आता तुम्ही समजतात. तर तुम्हा मुलांना इतकी धारणा पण करायला पाहिजे. भांडायचे बिल्कुलच नाही. खरे बोलायचे आहे, खोटे बोलण्यामुळे सत्यानाश होतो.

बाबा तुम्हा मुलांना सर्व गोष्टी समजवतात. प्रदर्शनी मध्ये चित्र पण चांगले चांगले बनवा, जे परत सर्वां जवळ जातील. चांगली गोष्ट पाहून, अनेक जण पाहण्या साठी येतील. समजवणारे पण हुशार पाहिजेत. सेवा करणे पण शिकायचे आहे. चांगली ब्राह्मणी पण पाहिजे, जी दुसऱ्यांना आपल्या सारखे बनवेल. जी आपल्या सारखी व्यवस्थापक बनवतील, त्यांना चांगली ब्राह्मणी म्हणाल. तीचे पद पण उच्च असेल. बेबी बुध्दी नको, नाहीतर पळवुन घेऊन जातील. रावण संप्रदाय आहेत ना. अशी ब्राह्मणी तयार करायची आहे, जी परत सेवाकेंद्र सांभाळू शकेल.

गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांना आपल्या अभ्यासाचा जलवा दाखवायचा आहे. तुम्हाला भारत स्वर्ग बनवण्याच्या व्यवसायात गुंतले पाहिजे. आपल्या प्रगतीची काळजी घ्या. खिरखंड होऊन राहायचे आहे.

२) जर आपण चुकत असाल तर, आपल्या पित्याकडून क्षमा घेऊन स्वत: ला सुधारावे लागेल. पिता कृपा करत नाहीत, पित्याच्या आठवणी द्वारे पाप कर्म नष्ट करायचे आहेत. निंदा होईल, असे कोणतीही कृती करायची नाही.

वरदान:-
आपल्या शक्तिशाली स्थिति द्वारे प्रत्येकाच्या शुभ इच्छा पूर्ण करणारे महादानी भव.

अंत काळात येणारे, थोड्या वरती खुश होतील, कारण त्यांची भुमिकाच कणा-दाना घेण्याची आहे, अशा आत्म्यांना त्यांच्या भावनेचे फळ मिळावे, कोणीही वंचित राहू नये. यासाठी आताच आपल्या मध्ये सर्व शक्ती जमा करा. जेव्हा आपण आपल्या संपूर्ण सामर्थ्यवान, महादानी स्थिती मध्ये स्थिर असाल, तेव्हा तुम्ही कोणत्याही आत्म्याला, आपल्या सहयोगा द्वारे महादान देण्याच्या कर्तव्याच्या आधारावर, शुभ भावनेचे बटन चालू करताच, संतुष्टतेचा अनुभव कराल.

बोधवाक्य:-
नेहमी ईश्वरीय मर्यादा वरती चालत राहा तर प्रतिष्ठित पुरुष बनाल.