18-05-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही परत आपल्या ठिकाण्या वरती पोहचलेआहात,तुम्ही बाबा द्वारे रचनाकार आणि रचनेला जाणले आहे,तर खुशी मध्ये रोमांच यायला पाहिजेत"

प्रश्न:-
यावेळेत बाबा,तुम्हा मुलांचा शृंगार का करत आहेत?

उत्तर:-
कारण आता आम्ही श्रुंगारीत होऊन विष्णुपुरी म्हणजे सासरी जात आहात.आम्ही या ज्ञान रत्नां द्वारे श्रुंगारीत होऊन विश्वाचे महाराजा महाराणी बनतो.आत्ता संगमयुगा मध्ये आहोत,बाबा शिक्षक बणुन आम्हाला शिकवत आहेत,माहेर मधुन सासरी जाण्यासाठी.

गाणे:-
शेवटी तो दिवस आला आज,ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो…

ओम शांती।
गोड गोड मुलांनी,फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांनी गित ऐकले.तुम्ही मुलं जाणता अर्धाकल्प ज्या साजनची आठवण केली,ते आज भेटले आहेत.दुनिया हे जाणत नाही की,आम्ही अर्धा कल्प भक्ती करतो,साजन पित्याला बोलवतो. आम्ही सजनी आहोत,तो साजन आहे,हे कोणीही जाणत नाही.बाबा म्हणतात,रावणाने तुम्हाला बिलकुल तुच्छ बुद्धी बनवले आहे,त्यामध्ये ही खास भारतवासी मनुष्यांना.तुम्हीच देवी-देवता होते,हे पण विसरले आहात.तर तुच्छ बुद्धी झाले ना.स्वतःच्या धर्माला विसरले आहात, हेच तुच्छ बुद्धीचे काम आहे.आता फक्त तुम्हीच हे जाणतात,आम्ही भारतवासी स्वर्गवासी होतो.हा भारत स्वर्ग होता.थोडाच काळ झाला.सतयुग बाराशे पन्नास वर्ष होते आणि बाराशे पन्नास वर्षे रामराज्य चालले.त्यावेळी खुप सुख होते. सुखाची आठवण करून,हर्षित व्हायला पाहिजे.सतयुग त्रेता इत्यादी होऊन गेले.सत्ययुगाचे आयुष्य किती होते,हे कोणीच जाणत नाहीत.लाखो वर्ष कसे होऊ शकतात?आता बाबा येऊन समजवतात, तुम्हाला मायाने बिल्कुल तुच्छ बुद्धी बनवले आहे.या दुनिये मध्ये कोणी,स्वतःला तुच्छ बुद्धी समजत नाहीत.तुम्ही जाणता आम्ही काल तुच्छ बुद्धी होतो.आता बाबांनी इतकी बुद्धी दिली आहे,जे रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंतला आम्ही जाणले आहे.काल जाणत नव्हतो,आज जाणले आहे.जितके जितके जाणतात, तेवढे खुशीमध्ये राहायला पाहिजे.आम्ही परत आपल्या ठिकाण्यावर पोहोचलो आहोत.बरोबर बाबांनी आम्हाला स्वर्गाची राजाई दिली होती परत आम्ही गमावली आहे.आत्ता पतित बनलो आहोत.सतयुगाला पतित म्हणणार नाही,ती पावन भूमी आहे. मनुष्य म्हणतात हे पतित-पावन या.रावण राज्यांमध्ये कोणी पावन,उच्च होऊ शकत नाहीत.उच्च ते उच्च बाबांचे बनले तर मुलांनी पण उच्च बनावे.तुम्हा मुलांनी बाबांना जाणले आहे,तेही क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे.आपल्या मनाला,सकाळी सकाळी विचारा अमृतवेळ चांगली आहे.सकाळी अमृतवेळेला बसून हे विचार करा,बाबा आमचे पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत.हे ईश्वरीय पिता, परमपिता परमात्मा तर म्हणतात ना.आता तुम्ही मुलं जाणता,ज्याची आठवण करत होतो,ते भगवान आम्हाला मिळाले आहेत.आम्ही परत बेहदचा वारसा घेतआहोत.ते लौकिक पिता आहेत,हे बेहद चे पिता आहेत. तुमचे लौकिक पितापण त्या बेहदच्या पित्याची आठवण करतात.तर पित्यांचे पिता आणि पतींचे पती झाले ना,असे भारतवासीच म्हणतात,कारण आत्ता मी पित्याचा पिता आणि पतींचा पती बनतो.आता मी तुमचा पिता आहे,तुम्ही मुलं बनले आहात.बाबा बाबा करत राहतात.आता परत तुम्हाला विष्णुपुरी म्हणजे सासरी घेऊन जात आहे.हे तुमच्या पित्याचे घर आहे,परत तुम्ही सासरी जाल.मुलं जाणतात आमचा खूप चांगला शृंगार केला जात आहे.आता तुम्ही माहेर मध्ये आहात ना.तुम्हाला शिकवले पण जाते.तुम्ही या ज्ञानाने श्रुंगारीत होऊन विश्वाचे महाराजा महाराणी बनतात.तुम्ही इथे आला आहात, विश्वाचे मालक बनण्यासाठी.तुम्ही भारत वासी विश्वाचे मालक होते, जेव्हा सतयुग होते.आता तुम्ही असे म्हणणार नाही की,आम्ही विश्वाचे मालक आहोत.आता तुम्ही जाणतात, भारताचे मालक कलियुगी आहेत. आम्ही तर संगमयुगी आहोत,परत आम्ही सार्‍या विश्वाचे मालक बनू.या गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये यायला पाहिजेत.तुम्ही जाणतात विश्वाची बादशाही देणारे आले आहेत.आता संगम युगामध्ये आले आहेत.ज्ञानदाता एकच पिता आहेत. बाबांच्या शिवाय कोणत्याही मनुष्याला ज्ञानदाता म्हणणार नाही कारण बाबांच्या जवळच असे ज्ञान आहे,ज्याद्वारे साऱ्या विश्वाची सद्गती होते.पाच तत्वा सहित सर्वांची सद्गती होते.मनुष्याच्या जवळ सदगतीचे ज्ञान नाही.

या वेळेत सारी दुनिया तमोप्रधान आहे,यामध्ये राहणारे पण सतोप्रधान आहेत.नवीन दुनिया तर सतयुग आहे,त्यामध्ये राहणारे देवता होते परत रावण म्हणजे विकाराने त्यांना जिंकले.आता परत बाबा आले आहेत.तुम्ही मुलं म्हणता,आम्ही बापदादा कडे जातो.बाबा आम्हाला दादा द्वारे स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा देत आहेत.बाबा तर स्वर्गाची बादशाही देतील आणि काय देतील?मुलांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी यायला पाहिजेत परंतु माया विसरवते कायम खुशीमध्ये राहू देत नाही.जे चांगल्या रीतीने शिकतील आणि शिकवतील तेच श्रेष्ठ पद मिळवतील. असे गायन पण आहे सेकंदामध्ये जीवन मुक्ती.एकाच वेळेस जाणायला पाहिजे.सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत.ते आले आहेत परंतु सर्व मुलं तर भेटू शकणार नाहीत,अशक्य आहे. बाबा तर शिकवण्या साठी येतात.तुम्ही पण सर्व शिक्षक आहात.गीता पाठशाला असे म्हटले जाते,हे अक्षर पण साधारण आहे. कृष्णाने गीता ऐकवली असे म्हणतात आता ही कृष्णाची पाठशाला तर नाही.कृष्णाची आत्मा पण शिकत आहे.सतयुगा मध्ये कोणी गीता पाठशाला मध्ये शिकतात आणि शिकवतात का?नाहीत.कृष्ण तर सतयुगा मध्ये आहेत,ते परत ८४ जन्म घेतात.एक पण शरीर,दुसऱ्या शरीराशी तंतोतंत मिळू शकत नाहीत.अविनाशी नाटक नुसार प्रत्येक आत्म्या मध्ये आपल्या ८४ जन्माची भूमिका भरलेली आहे.एक सेकंद दुसऱ्याशी मिळू शकत नाही.५००० वर्ष तुम्ही अभिनय करता,भूमिका करता, एक सेकंदाची भूमिका दुसऱ्या सेकंदाशी मिळू शकत नाही,ही खूपच समजण्याची गोष्ट आहे.हे अविनाशी नाटक आहे ना.भूमिकेची पुनरावृत्ती होत राहते,बाकी ते शास्त्र सर्व भक्तिमार्गाचे आहेत.अर्धा कल्प भक्ती चालते,परत मी येऊन सर्वांची सद्गती करतो.तुम्ही जाणतात पाच हजार वर्षापूर्वी आम्ही राज्य करत होतो,त्यावेळेत दुःखाचे नाव नव्हते.आत्ता तर दुःखच दुःख आहे, याला दुखधाम म्हटले जाते.शांतीधाम, सुखधाम,आणि दुखधाम.भारतवासींना च येऊन सुखधाम चा रस्ता सांगतो.कल्प कल्प परत मला यावे लागते.अनेक वेळेस आलो आहे,येत राहील,याचा अंत होऊ शकत नाही.तुम्ही चक्र लावून दुखधाम मध्ये येतात,परत मला यावे लागते.आता तुम्हाला ८४ जन्माच्या चक्राची स्मृती आली आहे.बाबांना रचनाकार म्हटले जाते.असे नाही अविनाशी नाटकाचे कोणी रचनाकार आहेत.रचनाकार म्हणजे या वेळेत सतयुगा ची येऊन रचना करतात.सतयुगा मध्ये ज्यांचे राज्य होते,परत गमावले त्यांनाच सन्मुख शिकवत आहे.मुलांना दत्तक घेतो,तुम्ही माझी मुलं आहात ना. तुम्हाला कोणी साधुसंत इत्यादी शिकवत नाहीत,शिकवणारे तर एक बाबाच आहेत,ज्यांची सर्व आठवण करतात.आठवण त्यांची करतात,तर जरूर कधी आले असतील ना.हे पण कोणाला समज नाही,का आठवण करायची?तर जरूर पतित-पावन बाबा येतात.येशू ख्रिस्ताला असे म्हणणार नाहीत की,तुम्ही परत या.ते तर समजतात,ते लिन झाले,परत येण्याची गोष्टच नाही.आठवण तरीही पतित पावन बाबांची करतात.आम्हाला परत येऊन वारसा द्या.मुलांना स्मृती आली आहे,बाबा नवीन दुनिया ची स्थापना करण्यासाठी आले आहेत.ते तरीही आपल्या वेळेत रजो तमो मध्येच येतील.आता तुम्ही मुलं समजतात,आम्ही मास्टर ज्ञानसंपन्न बनत आहोत.

एकच बाबा आहेत,जे तुम्हाला मुलांना शिकवून विश्वाचे मालक बनवत आहेत, स्वतः बनत नाहीत,म्हणून त्यांना निष्काम सेवाधारी म्हटले जाते.मनुष्य असे म्हणतात आम्ही फळाची इच्छा ठेवत नाही,निष्काम सेवा करत राहतो परंतु असे होत नाही.जसे संस्कार घेऊन जातात,त्यानुसार जन्म मिळतो,कर्माचे फळ प्रत्येकाला आवश्य मिळते.सन्यासी पण पुनर्जन्म ग्रहस्थीच्या जवळ घेऊन,संस्कारा नुसार परत संन्यास धर्मामध्ये जातात.जसे बाबा लढाई करणाऱ्यांचे उदाहरण देतात.असे म्हणतात गीतेमध्ये लिहिले आहे,जे लढाईच्या मैदानामध्ये मरतील,ते स्वर्गामध्ये जातील परंतु स्वर्गाची वेळ पण पाहिजे.स्वर्गाला तर लाखो वर्ष म्हणतात.आता तुम्ही जाणतात बाबा काय समजवत आहेत,गीते मध्ये काय लिहिले आहे?असे म्हणतात

भगवानुवाच मी सर्वव्यापी आहे.बाबा म्हणतात मी स्वतः,स्वतःची कसे निंदा करेल की,मी सर्वव्यापी असून, कुत्र्या मांजरा मध्ये आहे.मला तर ज्ञानसागर म्हणतात.मी स्वतःला परत असे कसे म्हणेल? खूपच खोटे आहे.ज्ञान तर कोणा मध्येच नाही.संन्यास इत्यादींचा खूप मान आहे,कारण ते पवित्र आहेत.सतयुगा मध्ये कोणी गुरु इत्यादी होत नाहीत.येथे तर पत्नीलाही म्हणतात,पती तुमच्या गुरु ईश्वर आहे,दुसरा कोणता गुरु करायची आवश्यकताच नाही.ते तर तेव्हाच समजले जाते,जेव्हा भक्ती पण सतोप्रधान होते.सतयुगामध्ये गुरु नव्हते.भक्तीच्या सुरुवाती ला पण गुरु नव्हते.पतीच सर्वकाही आहे,गुरू करत नाहीत.या सर्व गोष्टींना तुम्ही आत्ता समजतात.

काही मनुष्य तर ब्रह्मकुमार कुमार यांचे नाव ऐकूनच घाबरतात कारण ते समजतात हे भाऊ-बहिण बनवतात.अरे प्रजापिता ब्रह्मा चा मुलगा बनणे तर चांगले आहे ना. ब्रह्माकुमार कुमारीच स्वर्गाचा वारसा घेतात.आता तुम्ही पण घेत आहात,तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी बनले आहात.दोघे म्हणतात आम्ही भाऊ-बहीण आहोत,शरीराचे भान आणि विकाराचा वास निघून जातो.आम्ही त्याची मुलं भाऊ बहीण विकारांमध्ये कसे जाऊ शकतो?हे तर महापाप आहे, ही पवित्र राहण्याची युक्ती पण अविनाश नाटकांमध्ये नोंदलेली आहे.संन्याशा चा निवृत्तीमार्ग आहे.तुम्ही प्रवृत्ती मार्गाचे आहात.आता तुम्ही या दुनियाचे रिती रीवाजला सोडून,या दुनियेला विसरुन जावा.तुम्ही स्वर्गाचे मालक होते परत रावणाने छी छी बनवले आहे.हे पण बाबांनी समजवले आहे.काही असे म्हणतात,आम्ही कसे मानू,आम्ही ८४ जन्म घेतले आहेत.हे तर आम्ही चांगलेच म्हणतो ना,८४ जन्म घेतले नसतील,तर हे ज्ञान घेणार नाहीत.असे समजले जाते हे देवी-देवता धर्माचे नाहीत,स्वर्गा मध्ये येऊ शकणार नाहीत.प्रजा मध्ये पण कमी पद घेतील.प्रजा मध्ये पण श्रेष्ठ पद आणि कनिष्ठ पद तर आहेत ना.या गोष्टी ग्रंथांमध्ये नाहीत.भगवान येऊन राजधानी स्थापन करतात.श्रीकृष्ण स्वर्गाचे मालक होते ना.स्थापना बाबाच करतात.बाबांनी गिता ज्ञान ऐकवले,ज्याद्वारे हे पद मिळवले,परत शिकणे,शिकवण्याची आवश्यकता राहत नाही.तुम्ही अभ्यास करून,हे पद प्राप्त करतात, परत थोडेच गीता ज्ञान चा अभ्यास कराल.ज्ञानाद्वारे सदगती मिळाली. जितका पुरुषात तेवढे उच्चपद प्राप्त कराल.जितका पुरुषार्थ कल्पा पूर्वी केला होता,तसेच करत राहतात.साक्षी होऊन पाहायचे आहे.शिक्षकाला पण पाहिचे आहे,यांनी आम्हाला शिकवले आहे. आम्हाला यांच्यापेक्षा हुशार बनायचे आहे.खूप संधी आहे,प्रयत्न करायचा आहे श्रेष्ठ बनण्यासाठी.तमोप्रधान पासून सतोप्रधान बनणे ही मुख्य गोष्ट आहे.या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत ना.गृहस्थ व्यवहारांमध्ये पण राहायचे आहे,आणि बाबांची आठवण करायची आहे,तर पावन बनाल.येथे सर्व पतित आहेत,यामध्ये दुःखच दुःख आहे.सुखाचे राज्य कधी होते,हे कोणालाच माहिती नाही.दुःखांमध्ये असे म्हणतात,हे भगवान,हे राम,हे दुःख का दिले?आता भगवान तर कोणालाच दुःख देत नाहीत,रावण दुःख देतात.आता तुम्ही जाणतात आमच्या राज्यांमध्ये दुसरा कोणता धर्म नव्हता परत सर्वधर्म येतील. तुम्ही कुठेही जावा,ज्ञान तर सोबत आहे,

मनमनाभव चे लक्ष तर मिळाले आहे ना. बाबांची आठवण करा,बाबा द्वारे आम्ही स्वर्गाचा वारसा घेत आहोत.हे पण आठवण करू शकत नाहीत.ही आठवण पक्की पाहिजे ना,तर अंत मती, सो गती चांगली होईल. अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटल्या मुलां प्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) पहाटे अमृतवेला उठून विचार करायचा आहे, बाबा आमचे पिता पण आहेत,शिक्षक पण आहेत.आता आमचा ज्ञान रत्नाने श्रुंगार करण्यासाठी बाबा आले आहेत.ते पित्यांचे पिता,तर पतींचे पती आहेत.असे विचार करत अपार खुशीचा अनुभव करायचा आहे.

(२) प्रत्येकाचा पुरुषार्थ साक्षी होऊन पाहायचा आहे.उच्चपद मिळवण्याची संधी आहे,म्हणून तमोप्रधान पासुन सतोप्रधान बनवायचे आहे.

वरदान:-
संगमयुगाच्या प्रत्यक्ष फळा द्वारा शक्तिशाली बनणारे सदा समर्थ आत्मा भव.

संगम युगामध्ये जे आत्मे सेवेच्या निमित्त बनतात,त्यांना निमित्त बनण्याचे प्रत्यक्ष फळ शक्तींची प्राप्ती होते.हे प्रत्यक्ष फळ श्रेष्ठ युगाचे फळ आहे.असे फळ खाणारे, शक्तिशाली आत्मा,कोणत्याही परिस्थिती च्या वरती सहज विजय मिळवतात.ते समर्थ बाबांच्या सोबत असल्यामुळे,व्यर्थ पासून सहज मुक्त होतात.विषारी सापासारख्या परिस्थिती वरती त्यांचा विजय होतो म्हणून यादगार मध्ये दाखवतात श्रीकृष्णाने सापाच्या डोक्या वरती डान्स केला.

बोधवाक्य:-
चांगल्या मार्गाने पास होऊन,झालेल्या गोष्टींना विसरा(पास करा) आणि बाबांच्या जवळ(पास) रहा.