20-05-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, कामधंदा इ. करत ईश्वरीय विद्यार्थी जीवन आणि राजयोगाचा अभ्यास नेहमी
लक्षात ठेवा,स्वतः भगवान आम्हाला शिकवत आहेत,याच नशे मध्ये राहा"
प्रश्न:-
ज्या मुलांना
ज्ञानामृत ची धारणा होते, त्यांची लक्षणं कोणती असतील?
उत्तर:-
ः त्यांना नेहमीच आत्मिक नशा राहिल आणि त्या नशेच्या जोरावर ते सर्वाचे कल्याण करत
राहतील. कल्याण करण्या शिवाय त्यांना दुसरी कोणती ही गोष्ट चांगली वाटणार नाही.ते
काट्या पासून फुल बनवण्याच्या सेवे मध्ये व्यस्त राहतील.
ओम शांती।
आता तुम्ही मुले इथे बसले आहात आणि हे देखील जाणता की आम्ही आता या वैश्विक नाटका
मध्ये अभिनय करत आहोत,८४ जन्माचे चक्र पूर्ण केले आहे. हे तुम्हा मुलांच्या आठवणीत
राहिले पाहिजे. तुम्हाला माहित आहे की बाबा आम्हाला परत राज्य देण्यासाठी किंवा
तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवण्यासाठी आले आहेत. वडिलां खेरीज इतर कोणीही या
गोष्टी समजावून सांगू शकत नाही.तुम्ही इथे बसता तेव्हा तुम्ही जसे शाळे मध्ये बसले
आहात. जर तुम्ही बाहेर असाल, तर तुम्ही शाळेत नाही.तुम्हाला ठाऊक आहे की,ही
सर्वोच्च आध्यात्मिक शाळा आहे. अध्यात्मिक पिता शिकवत आहेत. मुलांना अभ्यासाची आठवण
तर ठेवली पाहिजे.हा (ब्रह्मा) पण मुलगा च झाला.यांना आणि सर्वाना शिकवणारे पिताच
आहेत. ते सर्व मानवी आत्म्यांचे पिता आहेत. ते येऊन शरीर भाड्याने घेऊन तुम्हाला
समजावून सांगत आहेत. दररोज, आपण इथे बसता तेव्हा आपल्या बुद्धीमधे आठवण असावी की,
आपण ८४ जन्म घेतले. आम्ही जगाचे स्वामी होतो, देवता होतो आणि नंतर पुनर्जन्म घेत
कनिष्ठ बनलो. भारत दिवाळखोर नसलेला होता.सर्व स्मरण शक्ती आली आहे. ही भारताची तसेच
आपली ही कथा आहे,पुन्हा स्वतःला विसरू नका. आम्ही स्वर्गात राज्य करायचो,परत
आम्हाला ८४ जन्म घ्यावे लागले. आपल्याला दिवसभर ही आठवण आणावी लागेल. व्यवसाय वगैरे
करताना,अभ्यास तर लक्षात ठेवावा लागेल.आपण जगाचे मालक कसे होतो, मग खाली आलो
आहोत,हे अगदी सोपे आहे, पण हे कुणालाही आठवत नाही. आत्मा शुद्ध नसल्यामुळे, स्मृती
राहत नाही.भगवान आपल्याला शिकवत आहेत,हे पण आठवत नाही. आम्ही बाबांचे विद्यार्थी
आहोत. बाबा म्हणत राहतात - आठवणीच्या यात्रेत रहा.पिता आपल्याला शिकवून,श्रेष्ठ
बनवत आहेत. ही स्मृती दिवसभर चालू राहावी. फक्त पिता आपल्याला आठवण करून देतात, हाच
भारत होता. आम्ही देवी देवता होतो, आता आसुर बनलो आहोत. पूर्वी तुमची बुध्दी आसुरी
होते. आता पित्याने दैवी बुद्धी दिली आहे, तरीही कुणाच्या बुद्धीमधे बसत
नाही,विसरतात.बाबा खूप नशा चढवतात. तुम्ही पुन्हा देवता बनत आहात,तर तुम्हाला तो
नशा राहायला पाहिजे. आम्ही आमचे राज्य घेत आहोत. आम्ही आमच्या राज्यात राज्य करू,
कोणाला तर अजिबात नशा चढत नाही. ज्ञान अमृत पचत नाही,म्हणजे धारणा होत नाही.
ज्यांना नशा चढलेला आहे,त्यांना कोणाचे कल्याणा शिवाय दुसरे काही करायला आवडणार
नाही. फुला सारखे बनवण्याच्या सेवेत मग्न असतील. आम्ही प्रथम फुला सारखे होतो,परत
मायाने काटा काढला. आता पुन्हा फुला सारखे बनत आहोत. अशा गोष्टी स्वत: शी केल्या
पाहिजेत. या नशे मध्ये राहुन कोणी एखाद्यास समजावून सांगितले तर, ताबडतोब ज्ञानाचा
बाण लागेल. भारत हा अल्लाह चा बाग होता.तोच आता अपवित्र झाला आहे. आम्ही संपूर्ण
जगाचे स्वामी होतो, काय महान गोष्ट आहे! आपण आता काय झालो आहोत! आपण किती खाली
पडलो? आपले, पडणे आणि चढण्याचे हे नाटक आहे.बाबाच बसून ही कहाणी सांगतात.ती खोटी
आहे, ही खरे आहे.ते सत्य नारायणची कहाणी सांगतात,परंतू समजत नाहीत आपण कसे चढलो आणि
मग कसे उतरलो. बाबांनी खरी सत्य नारायणची कहाणी सांगितली आहे. राज्य कसे गमावले, ही
सर्व कहाणी आपली च आहे. आत्म्याला आता माहिती झाले आहे की,आपण आता पित्याकडून राज्य
कसे घेणार आहोत. बाबा येथे विचारतात, तेव्हा होय, नशा आहे म्हणतात,परत बाहेर
गेल्यानंतर कोणताही नशा राहत नाही. मुलं स्वत: समजतात, जरी ते हात उठवतात, परंतू
चलन अशी आहे की,तो नशा राहू शकत नाहीत.भासना तर येते ना.
पिता तुम्हा मुलांना आठवण करुन देतात की - मुलांनो, मी तुम्हाला राज्य दिले होते
नंतर तुम्ही ते गमावले. आपण खाली उतरत आले आहात कारण हे नाटक चढणे आणि खाली
उतरण्याचे आहे. आज राजा आहे, उद्या त्यांना काढुन टाकतात. वर्तमानपत्रात अशा
बर्याच गोष्टी येतात, जर प्रती उत्तर दिले तर, काही वेगळेच समजतील. हे एक नाटक
आहे, जर तुम्हाला हे आठवले तरीही नेहमी आनंदी रहाल. आपल्या बुध्दी मध्ये आहे की,आज
पासुन ५००० वर्षांपूर्वी शिवबाबा आले आणि राजयोग शिकविला.लढाई झाली. पिता आता या
सर्व सत्य गोष्टी तुम्हाला सांगत आहे. हे पुरुषोत्तम युग आहे. कलियुगा नंतर हे
पुरुषोत्तम युग येते. कलियुगाला पुरुषोत्तम युग म्हणणार नाहीत. सुवर्ण काळाला पण
म्हणनार नाही. असुरी संप्रदाय आणि दैवी संप्रदाय म्हणतात,त्यांच्या मधील हे संगम
युग आहे,जेव्हा जुने जग नवीन बनत आहे. नवीन पासुन जुने होण्यासाठी संपूर्ण चक्र
लागते. हे आता संगम युग आहे. सतयुगा मध्ये देवी देवतांचे राज्य होते, आता ते नाही.
इतर बरेच धर्म आले आहेत.हे तुमच्या बुद्धी मध्ये राहते का?असे बरेच लोक आहेत
ज्यांनी 6 - 8 महिने, 12 महिने ज्ञान योग केला,नंतर सोडुन दिले,विकरात गेले.जरी ते
बनतात परंतु अभ्यास न केल्यास परत फसतात. फक्त पवित्रता देखील काम करत नाही. असे
बरेच संन्यासी पण आहेत, ते सन्यास धर्म सोडून परत कुटुंबातील सदस्य बनतात, लग्न
इ.करतात. तर आता बाबा मुलांना समजावून सांगतात - तुम्ही शाळेत बसला आहात. हे लक्षात
आहे की आम्ही आमचे राज्य कसे गमावले आणि किती जन्म घेतले.आत्ता परत बाबा
म्हणतात,जगाचे मालक बना.पावन नक्कीच बनायचे आहे.जितकी तुम्ही जास्त आठवण कराल तेवढे
तुम्ही शुद्ध व्हाल कारण सोन्यात भेसळ होते ती कशी बाहेर निघेल ? तुम्हा मुलांच्या
बुद्धि मध्ये आहे,आत्मा सतोप्रधान होती तर 24 कॅरेट होती,परत विकारात जात तुम्ही
अशा अवस्थेत आला आहात. आपण काय झालो आहोत? पिता आपल्या सारखे झाले नाहीत. तुम्ही
मुलंच असे म्हणता की आम्ही देवता होतो. भारताची स्तुती आहे, नाही का? कोण भारतात
येतात आणि कोणते ज्ञान देतात हे कोणालाही माहिती नाही. मुक्तीदाता कधी येतात, हे तर
माहित असावे ना. जर भारत प्राचीन गायला जात असेल तर
निश्चित पणे भारतातच अवतरण होईल किंवा भारतात च जयंती साजरी केली जाईल.जरुर बाबा
नक्की येथेच येतात.असेही म्हटले जाते की भागीरथ. तर मग मनुष्य शरीरात प्रवेश केला
असेल ना? मग घोडागाडी का दाखवली आहे? किती फरक आहे. कृष्ण आणि रथ दाखविला आहे.
माझ्या बाबत कुणालाच माहित नाही.तुम्हाला आता समजले आहे की,बाबा या रथा वर येतात,
त्यांनाच भाग्यवान रथ म्हटले जाते.विष्णू ब्रह्मा, च्या चित्रात स्पष्ट आहे.
त्रिमूर्ती वरील चित्रात शिव आहेत,ही शिवाची ओळख कोणी करुन दिली. बाबांनी च हे
चित्र बनवले आहेत. तुम्हाला आता समजले आहे की, बाबा या ब्रह्मा रथात आले आहेत.
ब्रह्मा च विष्णू आहेत, विष्णूच ब्रह्मा बनतात. हे देखील मुलांना समजावून सांगितले
आहे, विष्णूच ८४ जन्मानंतर ब्रह्मा बनतात.तर ब्रह्मा पासुन विष्णू एका सेकंदात
बनतात. आपल्या बुद्धीमध्ये या अद्भुत गोष्टी धारण करायच्या आहेत.सर्व प्रथम,
आपल्याला पित्याच्या परिचयाचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. भारत नक्कीच स्वर्ग होता.
स्वर्गीय पित्यानेच स्वर्ग बनवला असेल. हे चित्र प्रथम श्रेणीचे आहे, आपल्याला ते
स्पष्ट करण्यास आवडते. बाबांना ही छंद आहे. आपण हे सेवा केंद्रात देखील स्पष्ट करत
रहा. येथे, थेट बाबा आहेत.पिता आत्म्याना बसून समजावून सांगतात. आत्म्याने समजावून
सांगणे आणि पित्याने समजावणे यात नक्कीच फरक आहे, म्हणूनच लोक येथे ऐकायला येतात.
पिता वारंवार मुलं मुलं म्हणतात. भावाचा इतका परिणाम पडत नाही,जितका वडिलां चा
प्रभाव पडतो. इथे तुम्ही पित्यासमोर बसले आहात. जेव्हा आत्मा आणि परमात्मा एकत्र
येतात,तेव्हा त्याला मेळा म्हणतात. बाबा तुमच्या समोर बसून समजवतात, तर खूप नशा
चढतो. त्यांना वाटते की,बेहदचे पिता सांगतात,तर आम्ही त्यांचे का ऐकणार नाही? पिता
म्हणतात,मी तुम्हाला स्वर्गात पाठविले आणि मग तुम्ही ८४ जन्म घेत घेत अपवित्र
झाले.परत तुम्ही शुद्ध पवित्र होणार नाहीत! आत्म्याला म्हणतात. काहीजण समजतात, बाबा
सत्य सांगतात, काहीजण लगेच म्हणतात, बाबा,मी का नाही पवित्र बनणार !
बाबा म्हणतात,मला आठवा तर तुमचे पाप नष्ट होतील. तुम्ही वास्तविक सोने व्हाल.मी
सर्वांचा पतित पावन पिता आहे, म्हणून पित्याचे समजावून सांगणे आणि आत्म्यांनी (
मुलांनी ) स्पष्टीकरण करणे यात बराच फरक आहे.असे समजा की नवीन कोणी येतात, जे येथील
फुलं आहेत,त्यांना ज्ञान आवडेल. हे सांगतात ते ठीक आहे. जे येथील कुळाचे नसल्यास,
ज्ञान समजणार नाहीत. तर आपण देखील हे स्पष्ट केले पाहिजे,आम्हा आत्म्यांना पिता
म्हणतात,आपण शुद्ध पावन बना.मनुष्य शुद्ध होण्यासाठी गंगा स्नान करतात, ते गुरु
करतात परंतू पतित पावन तर शिवपिता आहेत. पिता आत्म्यांना म्हणतत की तुम्ही इतके
अपवित्र झाला आहात, म्हणूनच आत्मा त्यांची आठवण करते की,येऊन पावन बनवा.पिता
म्हणतत,मी कल्प कल्प येतो, मुलांनो या शेवटच्या जन्मासाठी शुद्ध पवित्र बना. हे
रावण राज्य संपणार आहे. मुख्य गोष्ट म्हणजे शुद्ध होणे,पवित्र बनणे. स्वर्गात विष
नसते,म्हणजे अपवित्रता नसते.जेव्हा एखादी व्यक्ती येते, तेव्हा त्यांना समजावून
सांगा की बाबा म्हणतात,स्वत: ला आत्मा समजा आणि मज पित्याची आठवण करा, तर तुम्ही
शुद्ध पावन बनाल आणि भेसळ बाहेर येईल.तुम्हाला मनमनाभाव हा शब्द आठवतो ना. पिता
निराकार आहे, आपण आत्माही निराकार आहोत. ज्याप्रमाणे आपण शरीराने ऐकतो, पितासुद्धा
या शरीरात येतात आणि स्पष्टीकरण देतात. अन्यथा,मी कसे सांगावे की,तुम्ही माझीच आठवण
करा आणि शरीराचे सर्व नाती सोडा. नक्कीच ते येथे येतात, ब्रह्मामध्ये प्रवेश करतात.
प्रजापिता आता प्रत्यक्षात आहेत.याच्या माध्यमातून आम्हाला असे म्हणतात,आम्ही बेहद
पित्याचेच मानतो. ते म्हणतात शुद्ध व्हा,पावन बना. अपवित्र बनू नका.जुन्या शरीराचा
अभिमान सोडून द्या. जर तुम्ही माझी आठवण केली तर अंतिम अवस्था चांगली होऊन भविष्य
पण चांगले च होईल,तुम्ही लक्ष्मी नारायण बनाल.
पित्या पासुन विचलित करणारे मुख्य कार्य म्हणजे - एकमेकांचे, परचिंतन करणे.वाईट
ऐकणे आणि सांगणे. बाबा सुचना देतात,वाईट ऐकू नका.यांच्या गोष्टी त्यांना सांगणे,
त्यांचे शब्द यांना सांगणे,अशा खराब सवयी तुम्हा मुलां मध्ये राहायला नको.
यावेळी, जगात सर्व विपरीत बुध्दी आहेत,नाही का ?राम (शिवबाबा) शिवाय दुसरे काही
सांगायचे तर त्याला धूतीपण असे म्हणतात. आता बाबा म्हणतात,हा धुतीपणा सोडा.तुम्ही
सर्व आत्म्यांना सांगा,हे सिता,तुम्ही एका रामाची आठवण करा.तुम्ही संदेश देणारे
आहात, हा संदेश द्या की पित्याने सांगितले आहे, मला आठवा, एवढेच. या गोष्टी सोडून
इतर सर्वजण धुतीपना आहे. बाबा सर्व मुलांना म्हणतात- हा धुतीपणा सोडा. रामा समवेत
सर्व सीतेचा योग जोडा. हा तुमचा व्यवसाय आहे. फक्त हा संदेश देत रहा. पिता आले
आहेत, ते म्हणतात,तुम्हाला सुवर्णयुगात जायचे आहे. आता या लोहयुगाला सोडायला
पाहिजे. तुम्हाला वनवास मिळाला आहे, तुम्ही जंगलात बसले आहात ना? वनाला जंगल
म्हणतात.मुलीचे लग्न झाल्यावर ती जंगलात बसते, मग राजवाड्यात जाते. तुम्ही पण
जंगलात बसला आहात. आता सासरी जावं लागेल,या जुन्या देहा ला सोडा. एका बाबाची आठवण
ठेवा. ज्यांची विनाश काळात प्रीत आहे, ते राजवाड्यात जातील, बाकीचे म्हणजे विपरीत
बुध्दीना वनवास आहे. जंगलात वास्तव्य आहे. पिता तुम्हाला मुलांना वेगवेगळ्या
मार्गांनी समजावून सांगतात. ज्याच्याकडून तुम्ही इतके सार्वभौमत्व घेतले आहे त्या
पित्याला विसरलात, त्यामुळे तुम्ही वनवासात गेला आहात. वनवास आणि बागेत राहणे.
बाबांचे नाव बागवान पण आहे परंतू जेव्हा कुणाच्या बुद्धी मध्ये येईल.भारता मध्ये
आमचे राज्य होते. परत बागेत जायचे आहे.अद्याप .तुम्ही येथे बसला आहात तरीही आपण
अमर्यादित पित्याकडून आपले राज्य घेत आहोत. बाबा म्हणतात, माझ्यावर प्रेम करा, तरी
तुम्ही विसरतात.बाबा गा-हणे करतात, तुम्ही मज पित्याला किती विसरणार ? परत आपण
सुवर्णयुगात कसे जाल? स्वतःला विचारा की आम्हाला,बाबा किती वेळ आठवतात? आपण आठवणी
च्या अग्नीत पडलो आहोत, ज्यामुळे पाप नाश होतात. एका पित्याशी प्रेमळ बुद्धी असणे
आवश्यक आहे.सर्वात चांगला साजन आहे जो, आपल्याला प्रथम वर्गाचे अधिकारी बनवतो. कुठे
तृतीय श्रेणीमध्ये बकरी सारखा प्रवास करणे, कुठे वातानुकूलित मध्ये, खुपच फरक आहे.
जर तुम्हाला या विचारांचे मंथन करायची सवय लावाल तर तुम्हाला आनंद होईल. हे बाबा
असेही म्हणतात,मी पण शिवबाबांची आठवण करण्या साठी खुप कष्ट घेतो. दिवसभर हे विचार
सुरू असतात. तुम्हा मुलांनाही तशीच मेहनत घ्यावी लागेल.अच्छा.
सर्वात गोड, गोड,फार वर्षा नंतर भेटलेल्या लाडक्या मुलांना,मात पिता बापदादाची -
प्रेम पुर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना अभिवादन.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) कोणाला ही
एका रामाच्या गोष्टी खेरीज इतर कोणाचेही ऐकवयाचे नाही. एकाची गोष्ट दुसर्यास
सांगणे,पर चिंतन करणे,हा धुतीपणा आहे, तो सोडा.
(२) एका बाबांशीच
प्रेम करा. जुन्या शरीराचा गर्व सोडून द्या आणि एका पित्याचे स्मरण करून स्वत: ला
शुद्ध बनवा.
वरदान:-
अलौकिक
नशेच्या अनुभुती द्वारे विश्वासाचा पुरावा देणारे नेहमी विजयी भव.
अलौकिक आत्मिक नशा
निश्चयाचा आरसा आहे. निश्चयाचे प्रमाण आहे नशा आणि नशेचे प्रमाण आनंद आहे. जे नेहमी
आनंदी असतात आणि आत्मिक नशेत असतात त्यांच्यासमोर मायेची कोणतीही चाल चालू शकत
नाही.बेफिक्र बादशाह आणि बादशाही मध्ये माया येऊ शकत नाही. अलौकिक नशा सहज जुन्या
जगाला किंवा जुन्या संस्कारांना विसरतो, म्हणून नेहमी आपण आत्मिक स्वरूपाच्या नशेत,
अदभुत जीवनाच्या नशेत, देवदूताच्या नशे मध्ये किंवा भविष्याच्या नशे मध्ये राहा तर
आपण नेहमीच विजयी बनाल.
बोधवाक्य:-
गोड पणाचा गुण
म्हणजेच ब्राम्हण जीवनाची महानता, म्हणून गोड बणुन गोड बनवा.