18-07-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्ही डबल आत्मिक सेना आहात, तुम्हाला श्रीमता वर आपली, दैवी राजधानी
स्थापन करावयाची आहे."
प्रश्न:-
तुम्ही आत्मिक
सेवाधारी मुले, सर्वांना कोणत्या गोष्टीचा इशारा देत आहात?
उत्तर:-
तुम्ही सर्वांना इशारा देता कि, ही तीच महाभारता तील लढाई ची वेळ आहे.आता ही दुनिया
विनाश होत आहे, बाबा नवीन दुनिये ची स्थापना करत आहे. त्यानंतर मग जयजयकार होईल.
तुम्ही आपसात बसून विचार विनिमय केला पाहिजे की, विनाशाच्या पूर्वी सर्वांना बाबाचा
परिचय कसा मिळेल.
गीत:-
तुम्ही रात
घालवली झोपून...
ओम शांती।
बाबा समजावत आहेत की, उच्च ते उच्च आहेत, भगवान, मग त्यांना उच्च ते उच्च कमांडर इन
चीफ इत्यादी पण म्हटले जाते,कारण तुमची सेना आहे.तुमचा सर्वोच्च कमांडर कोण आहे? हे
पण तुम्ही जाणता की, दोन सेना आहेत. ती आहे शरीराची, तुमची आहे आत्म्याची. ती हद्द
ची आहे, तुमची बेहद्द ची आहे. तुमच्या मध्ये पण कमांडर आहेत,जनरल आहेत,लेफ्टनंट पण
आहेत. मुले जाणतात की, आम्ही श्रीमता वर राजधानी स्थापन करत आहोत. लढाईत इत्यादी ची
तर कोणती गोष्टच नाही. आम्ही साऱ्या विश्वावर परत आपले दैवी राज्य स्थापन करत आहोत
श्रीमता वर. कल्प कल्प आमची हीच भूमिका आहे. या सर्व आहेत बेहद्दच्या गोष्टी. त्या
लढाई मध्ये या गोष्टी नाहीत. उचच्च ते उच्च बाबा आहेत. त्यांना जादूगर, रत्नागर,
ज्ञानाचा सागर पण म्हटले जाते. बाबा ची महिमा अपरंपार आहे. तुम्हाला बुद्धीने, फक्त
बाबांची आठवण करावयाची आहे.माया आठवण विसरायला लावते.तुम्ही आहात डबल अहिंसक,
आत्मिक सेना. तुमचा हाच विचार चालतो की, आम्ही आमचे राज्य कसे स्थापन करावे. विश्व
नाटका नुसार जरूर होईल. पुरुषार्थ तर केला पाहिजे ना.जी चांगली चांगली मुले
आहेत,त्यांनी आपसा मध्ये विचार-विनिमय केला पाहिजे.माये बरोबर युद्ध तर अंतकाळा
पर्यंत चालत राहील. हे पण जाणता की, महाभारत लढाई होणार आहे जरूर. नाही तर जुन्या
दुनिये चा विनाश कसा होईल. बाबा आम्हाला श्रीमत देत आहेत. तुम्हां मुलांना परत आपले
राज्य स्थापन करावयाचे आहे. या जुन्या दुनिये चा विनाश होऊन, मग भारता मध्ये
जयजयकार होईल.त्याच्यासाठी तुम्ही निमित्त बनले आहात.तर आपसा मध्ये भेटले पाहिजे.
आम्ही कशी कशी सेवा करू.सर्वांना बाबाचा संदेश सांगावयाचा आहे की, आता या जुन्या
दुनिया चा विनाश होणार आहे. बाबा नवीन दुनियेची स्थापना करत आहेत. लौकिक पिता पण
नवीन घर बनवतात,तर मुलांना खुशी होते.ती आहे हद्द ची गोष्ट,ही आहे साऱ्या विश्वाची
गोष्ट. नवीन दुनियेला सतयुग, जुन्या दुनियेला कलियुग म्हटले जाते. आता जुनी दुनिया
आहे, तरी माहित झाले पाहिजे, बाबा कधी आणि कसे येऊन नवीन दुनिया स्थापन करत
आहेत.तुमच्या मध्ये पण क्रमानूसार पुरुषार्था प्रमाणे ओळखत आहेत. मोठ्यात मोठे बाबा
आहेत. बाकी इतर क्रमानूसार महारथी,घोडेस्वार, प्यादे आहेत.कमांडर, कॅप्टन हे फक्त
उदाहरण देऊन समजावयाचे आहे. तर मुलांना आपसा मध्ये विचारविनिमय करून,निर्णय घ्यायचा
आहे की, सर्वांना बाबाचा परिचय कसा द्यायचा? ही आहे आत्मिक सेवा. आम्ही आपल्या
बंधू-भगिनींना इशारा देत आहोत की,बाबा नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी आले आहेत.
जुन्या दुनियेचा विनाश तर समोर उभा आहे. ही तीच महाभारता ची लढाई आहे.मनुष्य तर हे
पण समजत नाहीत की, महाभारताच्या युद्धानंतर मग काय होणार आहे. तुम्हाला आता अशी
भासना येते की, आम्ही संगमयुगावर पुरुषोत्तम बनत आहोत. आता बाबा आले आहेत
पुरुषोत्तम बनवण्यासाठी. यामध्ये लढाई इत्यादीची काही गोष्टच नाही. बाबा समजावतात
की, मुलांनो पतीत दुनियेमध्ये एक पण पावन राहत नाही, आणि पावन दुनिये मध्ये मग एक
पण पतित असत नाही. एवढी छोटीशी गोष्ट पण कोणी समजत नाही. तुम्हा मुलांना सर्व चित्र
इत्यादी चा सार समजावला जातो. भक्ती मार्गा मध्ये मनुष्य जप-तप- दान- पुण्य इत्यादी
जे पण करत आहेत, त्याद्वारे अल्पकाळा चे काग विष्ठा समान सुखाची प्राप्ती होत आहे.
परंतु जेव्हा कोणी इथे येऊन समजतील, तेव्हा या गोष्टी बुद्धी मध्ये बसतात. हे आहे
भक्तीचे राज्य. ज्ञान थोडे पण नाही. जसे पतीत दुनिये मध्ये पावन एक पण नाही, तसे
ज्ञान पण एका शिवाय आणखीन कोणामध्ये नाही. वेद शास्त्र इत्यादी सर्व भक्तिमार्गाचे
आहेत. शिडी उतरावयाची आहे. आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात, यामध्ये पण क्रमानुसार
सेना आहे. मुख्य-मुख्य जे कमांडर, कॅप्टन, जनरल इत्यादी आहेत, त्यांनी आपसा मध्ये
बसून विचार विनिमय केला पाहिजे. आम्ही बाबाचा संदेश कसा देऊ. मुलांना समजावले आहे,
मेसेंजर, पैगंबर अथवा गुरु एकच असतो. बाकी सर्व भक्तिमार्गाचे आहेत. संगमयुगी फक्त
तुम्ही आहात. हे लक्ष्मी नारायण, मुख्य उद्देश बरोबर तंतोतंत आहे.भक्ती मार्गा मध्ये
सत्यनारायणाची कथा, तिजरी ची कथा, अमर कथा बसून सांगतात.आता बाबा तुम्हाला खरी
सत्यनारायणाची कथा सांगत आहेत. भक्ती मार्गा मध्ये भूतकाळातील गोष्टी, ज्या होऊन
गेल्या आहेत त्यांचे नंतर मंदिर इत्यादी बनवतात. जसे शिवबाबा आता तुम्हाला शिकवत
आहेत, मग भक्ती मार्गांमध्ये त्यांचे मंदिर बांधतात.सतयुगा मध्ये शिव किंवा
लक्ष्मीनारायण इत्यादीचे कोणते चित्र नसते. ज्ञान बिल्कुल वेगळे आहे ,भक्ती वेगळी
आहे. हे पण तुम्ही जाणता की, त्यामुळे बाबा म्हणतात, वाईट ऐकू नका,वाईट बोलू नका..
. . .
तुम्ही मुले आता किती खुशी मध्ये आहात, नवीन दुनिया स्थापन होत आहे. सुखधामच्या
स्थापने साठी बाबा आम्हाला परत मत देत आहेत, त्यामध्ये पण क्रमांक एक ची मत देत
आहेत की, पावन बना. पतित तर सर्व आहेत ना. जी पण चांगली चांगली मुले आहेत, त्यांनी
आपसा मध्ये बसून विचार विनिमय केला पाहिजे की, सेवेला कसे वाढवावे, गरिबांना कसा
संदेश द्यावा, बाबा तर कल्पा पूर्वीप्रमाणे आले आहेत. सांगतात की, स्वतःला आत्मा
समजून, माझी पित्याची आठवण करा.राजधानी जरूर स्थापन होणार आहे.समजतील पण जरूर. जे
देवी देवता धर्मा चे नाहीत, ते समजणार नाहीत. विनाशकाळी ईश्वरापासून विपरीत बुद्धि
आहेत ना. तुम्ही मुले जाणता की, आमचा धनी आहे,त्यामुळे तुम्हाला विकारांमध्ये जायचे
नाही, लढाई भांडण करायचे नाही. तुमचा ब्राह्मण धर्म फार उच्च आहे. ते क्षुद्र
धर्माचे आहेत,तुम्ही ब्राह्मण धर्माचेआहात. तुम्ही शेंडी आहात, ते पाय आहेत. शेंडी
च्या वर उंच ते उंच भगवान निराकार आहेत.या डोळ्यांनी न दिसल्यामुळे विराट
रूपामध्ये,शेंडी( ब्राह्मण)आणि शिवबाबा ला दाखवले नाही. फक्त म्हणतात देवता,
क्षत्रिय, वैश्य, शूद्र. जे देवता बनतात, तेच मग पुनर्जन्म घेऊन, क्षत्रिय, वैश्य,
शूद्र बनतात. विराट रूपा चा अर्थ पण कोणी समजत नाहीत.आता तुम्ही समजत आहात, तर
चित्र बरोबर बनवायचे आहे. शिवबाबा ना पण दाखवायचे आहे, आणि ब्राह्मणांना पण दाखवायचे
आहे, तुम्हाला आता सर्वांना हा संदेश द्यायचा आहे की, स्वतःला आत्मा समजून, बाबा ची
आठवण करा. तुमचे काम आहे संदेश देणे. जसे बाबा ची महिमा अपरंपार आहे, तशी भारता ची
पण फार महिमा आहे. हे पण सात दिवस जे कोणी ऐकेल, तेंव्हा बुद्धीमध्ये बसेल. म्हणतात
की, वेळ नाही .अरे,अर्धा कल्प बोलावत आले आहात, आता ते प्रत्यक्षात आले आहेत.
बाबांना यावेच लागते अंतवेळी. हे पण तुम्ही ब्राह्मण जाणत आहात,क्रमानुसार,
पुरुषार्था नुसार.शिक्षणाला सुरुवात केली आणि निश्चय झाला.माशूक आले आहेत, ज्यांना
आम्ही बोलावत होतो, जरूर कोणाच्या तरी शरीरा मध्ये आले आहेत.त्यांना स्वतःचे शरीर
तर नाही. बाबा म्हणतात की,मी यांच्या मध्ये प्रवेश करून, तुम्हां मुलांना, सृष्टी
चक्राचे, रचियता आणि रचनेचे ज्ञान देत आहे.हे आणखीन कोणी जाणत नाही्. हे शिक्षण आहे.
फार सोपे करून समजावत आहेत.बाबा म्हणतात की, मी तुम्हाला, किती धनवान बनवत आहे.
कल्प कल्प तुमच्या सारखे पवित्र आणि सुखी कोणी नाही. तुम्ही मुले या वेळी सर्वांना
ज्ञानदान देत आहात. बाबा तुम्हाला रत्नांचे दान देत आहेत, तुम्ही दुसऱ्यांना देत
आहात. भारताला स्वर्ग बनवत आहात. तुम्ही आपल्याच तन-मन-धनाने श्रीमतावर भारताला
स्वर्ग बनवत आहात. किती उच्च कार्य आहे. तुम्ही गुप्त सेना आहात ,कोणाला पण माहित
नाही. तुम्ही जाणता की, आम्ही विश्वाची बादशाही घेत आहोत.श्रीमता द्वारे श्रेष्ठ
बनत आहे.आता बाबा म्हणतात,माझी एकट्याची आठवण करा. कृष्ण तर म्हणू शकत नाही, ते तर
राजकुमार आहेत. तुम्ही राजकुमार बनत आहात. सतयुग त्रेता मध्ये पवित्र प्रवृत्ती
मार्ग आहे. अपवित्र राजे,पवित्र राजा राणी, लक्ष्मी नारायणाची पूजा करत आहेत.पवित्र
प्रवृत्ती मार्ग वाल्यांचे राज्य चालत आहे, मग अपवित्र प्रवृत्ती मार्ग होत आहे.
अर्धा-अर्धा आहे ना.दिवस आणि रात्र. लाखो वर्षा ची गोष्ट असेल, तर मग अर्धा अर्धा
होऊ शकत नाही. लाखो वर्ष असतील, तर मग हिंदू जे वास्तविक देवी-देवता धर्माचे आहेत,
त्यांची संख्या फार मोठी झाली पाहिजे.असंख्य झाले पाहिजेत, आता तर जनगणना करत आहेत
ना. हे विश्व नाटका मध्ये नोंदलेले आहे, ते नंतर पण होईल. मृत्यू समोर उभा आहे. हे
तेच महाभारताचे युद्ध आहे. तर आपसा मध्ये मिळून सेवेचे नियोजन केले पाहिजे. सेवा
करत पण आहात. नवीन नवीन चित्र निघत आहेत, प्रदर्शनी पण करत आहेत. ठिक आहे, तरी पण
काय केले पाहिजे? बरं, आध्यात्मिक संग्रहालय बनवा. स्वतः पाहून जातील,मग इतरांना
पाठवतील. गरीब किंवा सावकार धर्मकार्या साठी पैसे काढतात ना. सावकार जास्ती काढतात,
यामध्ये पण तसेच आहे. कोणी 1000 काढतात,कोणी कमी. कोणी तर दोन रुपये पण पाठवतात,
म्हणतात की एका रुपयाची ईट लावा. एक रुपया 21 जन्मासाठी जमा करतात. हे आहे गुप्त.
गरीबाचा एक रुपया आणि सावकाराचे हजार रुपये बरोबर होऊन जातात. गरीबा जवळ आहेच थोडे,
तर मग काय करतील. हिशोब आहे ना. व्यापारी लोक धर्माऊ साठी पैसे काढतात,आता काय केले
पाहिजे. बाबाला मदत करावयाची आहे.बाबा मग त्या बदल्यात 21 जन्मासाठी देत आहेत. बाबा
येऊन गरीबांना मदत करत आहेत. आता तर ही दुनियाच राहणार नाही. सर्व माती मध्ये
मिसळून जाईल. हे पण जाणत आहात की, स्थापना जरूर होणार आहे कल्पा पूर्वीप्रमाणे.
निराकार शिवबाबा म्हणतात की, मुलांनो, देहाचे सर्व धर्म सोडून, एका बाबाची आठवण
करा.हे ब्रह्मा पण रचना आहेत ना. ब्रह्मा कोणाचा मुलगा, कोणी निर्माण केला. ब्रह्मा,
विष्णू ,शंकर ला कसे निर्माण करत आहेत, हे पण कोणी समजत नाही. बाबा येऊन सत्य गोष्टी
समजावत आहेत. ब्रह्मा पण जरूर मनुष्य सृष्टीं मध्येच असतात. ब्रह्माच्या वंशावळीचे
गायन आहे. भगवान मनुष्य सृष्टीची रचना कशी करतात, हे कोणी पण जाणत नाहीत .ब्रह्मा
तर येथे असले पाहिजेत ना. बाबा म्हणतात, ज्यांच्या मध्ये मी प्रवेश केला आहे,त्यांचा
पण अनेक जन्मांतील शेवटचा जन्म आहे. यांनी पूर्ण 84 जन्म घेतले आहेत.ब्रह्मा कांही
रचनाकार नाहीत.रचनाकार तर एक निराकार च आहेत. आत्मे पण निराकार आहेत. ते तर अनादी
आहेत.कोणी निर्माण केले नाहीत, मग ब्रह्मा कुठून आले.बाबा म्हणतात की, मी यांच्या
मध्ये प्रवेश करून नांव बदलले आहे. तुम्हा ब्राह्मणांची पण नांवे बदलली होती. तुम्ही
आहात राजऋषी. सुरुवातीला संन्यास घेऊन एकञ राहू लागले, त्यामुळे नांवे बदलली
होती,नंतर पाहिले कि, माया ने खाऊन टाकले, मग माळ बनवणे, नांव बदलणे,सर्व सोडून दिले.
आज-काल दुनिया मध्ये, प्रत्येक गोष्टी मध्ये लबाडी फार आहे. दुधा मध्ये पण भेसळ
करतात. खरी वस्तू तर मिळतच नाही. बाबा साठी पण खोटे बोलतात,स्वतःलाच भगवान म्हणू
लागले आहेत. आता तुम्ही मुले जाणता की,आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे. तुमच्या
मध्ये पण नंबरवार पुरुषार्था नुसार आहेत. बाबा ओळखतात की, कोण कसे शिकत आहेत,आणि
शिकवत आहे, काय पद प्राप्त करतील.निश्चय आहे की,आम्ही बाबा द्वारे जगातील ताजधारी
राजकुमार बनत आहोत. तर तसा पुरुषार्थ करून दाखवला पाहिजे. आम्ही ताजधारी राजकुमार
बनू. नंतर 84 जन्माचे चक्कर मारून,आता परत बनत आहोत.हा आहे नरक, यामध्ये काहीच
राहिले नाही.मग बाबा येऊन,भंडारा भरपूर करून, काल कंटक दूर करतात. तुम्ही सर्वांना
विचारा. इथे भंडारा भरपूर करण्यासाठी आले आहात ना. अमरपुरी मध्ये काळ येऊ शकत नाही.
बाबा येतातच भंडारा भरपूर करून,काल कंटक दूर करण्यासाठी. ते आहे अमर लोक, हे आहे
मृत्युलोक.अशा गोड गोड गोष्टी ऐकून इतरांना सांगावयाच्या आहेत. व्यर्थ सांगायचे नाही.
अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति, मातपिता बाप दादाची,प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) बाबा
विश्वाचे मालक बनविण्यासाठी, हे शिक्षण शिकवत आहेत, त्यामुळे असे म्हणायचे नाही की,
आम्हाला वेळ नाही. श्रीमतावर तन-मन-धनाने, भारताला स्वर्ग बनवण्याची सेवा करायचे आहे.
(२) आपसा मध्ये फार गोड गोड ज्ञानाच्या गोष्टी ऐकायच्या आणि इतरांना सांगावयाच्या
आहेत. बाबाचा हा आदेश,नेहमी आठवणीत ठेवा, वाईट बोलू नका,वाईट ऐकू नका. . . .
वरदान:-
पुरुषार्था
मध्ये सूक्ष्म आळसाचा पण त्याग करणारे सर्वांगीण तत्पर भव
पुरुषार्था मधील
कंटाळा, आळसा चे लक्षण आहे.आळसी लवकर थकतात, उमंग वाले अथक असतात. जे पुरुषार्था
मध्ये कंटाळा करतात, त्यांनाच आळस येतो, ते विचार करतात की, काय करावे एवढेच होऊ
शकते, ज्यादा होऊ शकत नाही. हिम्मत नाही,चालत तर आहोत, करत तर आहोत- आता या सूक्ष्म
आळसा चे पण नाव निशाण राहू नये, त्यासाठी नेहमी तत्पर, आणि सर्वांगीण भव.
बोधवाक्य:-
वेळेच्या
महत्वाला समोर ठेवून,सर्व प्राप्तीचे खाते,पूर्ण जमा करा.