16-07-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,हे विकर्म विनाश करण्याचे युग आहे,या युगामध्ये कोणतेही विकर्म करायचे
नाही, पावन जरूर बनायचे आहे."
प्रश्न:-
अतींद्रिय
सुखाचा अनुभव, कोणत्या मुलांना होऊ शकतो?
उत्तर:-
जे अविनाशी ज्ञान रत्नाद्वारे भरपूर आहेत,त्यांना अतिइंद्रिय सुखाचा अनुभव होऊ
शकतो.जे जितके ज्ञानाला जीवनामध्ये धारण करतील,तेवढेच सावकार बनतात. जर ज्ञान रत्न
धारण करत नाहीत, तर गरीब आहेत.बाबा तुम्हाला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान
देऊन त्रिकालदर्शी बनवत आहेत.
गीत:-
ओम नमः शिवाय…
ओम शांती।
भुतकाळ परत वर्तमान काळ होतो,परत हा जो वर्तमान आहे, तो भूतकाळ होईल.हे गायन
भूतकाळातील आहे.आता तुम्ही पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहात. पुरुषोत्तम अक्षर जरूर
लिहायला पाहिजे.तुम्ही वर्तमान पाहतात,जे भूतकाळाचे गायन आहे,ते आता प्रत्यक्षात
होत आहे.यामध्ये कोणता संशय घ्यायचा नाही.मुलं जाणतात संगमयुग आहे,कलियुगाचा अंत पण
जरूर आहे.बरोबर संगम युग,पाच हजार वर्षापुर्वी झाले होते,तेच वर्तमान आहे.आता बाबा
आले आहेत,भविष्य पण तेच होईल,जे भुतकाळा मध्ये होऊन गेले आहे. बाबा राजयोग शिकवत
आहेत,परत सतयुगा मध्ये तुम्ही राज्य कराल. आता हे संगमयुग आहे,ही गोष्ट मुलां शिवाय
कोणीही जाणत नाहीत.तुम्ही प्रत्यक्षामध्ये राजयोग शिकत आहात, हे खूपच सहज आहे.जे पण
लहान किंवा मोठी मुलं आहेत,सर्वांना एक गोष्ट जरूर समजायची आहे की, बाबांची आठवण
करा,तर विकर्म विनाश होतील.जेव्हा विकर्म विनाश होण्याची वेळ आहे,तर असे कोण असेल,जे
परत विकर्म करतील?परत माया विकर्म करवते,तर समजतात मायेकडून चापट खाल्ली.आमच्या
कडूनही मोठी चूक झाली.जेव्हा बाबांना बोलवतातच,हे पतित-पावन या.आता बाबा आले
आहेत,तर पावन बनायला पाहिजे ना.ईश्वराचे बनून परत पतित बनायला नको.सतयुगा मध्ये
सर्व पवित्र होते.हा भारतच पावन होता.गायन पण आहे,निर्विकार दुनिया आणि विकारी
दुनिया.ते संपूर्ण निर्विकारी आणि आम्ही विकारी आहोत,कारण आम्ही विकारांमध्ये
जातो.पतित नावंच विकारींचे आहे.पतितच बोलवतात, येऊन पावन बनवा.क्रोधी बोलवत
नाहीत.बाबा परत वैश्विक पूर्वनियोजित नाटका नुसार येतात, जरा पण फरक पडू शकत नाही.जो
भूतकाळ झाला,तोच वर्तमान होत आहे.भूतकाळ,वर्तमान आणि भविष्याला जानणे,यालाच
त्रिकालदर्शी म्हटले जाते.ही आठवणी ठेवावे लागेल,यासाठी खूप कष्ट पाहिजेत,सारखे
विसरतात.नाहीतर तुम्हा मुलांना खूप अतिइंद्रिय सुखामध्ये राहिले पाहिजे.तुम्ही
अविनाशी ज्ञानाद्वारे खूप सावकार बनतात.जेवढी ज्यांची धारणा आहे, ते खूप सावकार बनत
आहेत परंतु नवीन दुनिया साठी बनतात.तुम्ही जाणतात,आम्ही जे काही करतो ते भविष्य
नवीन दुनियासाठी आहे. बाबा जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी
आले आहेत,तेही हुबेहूब पूर्वी सारखेच.तुम्ही मुलं पण पहाल, नैसर्गिक आपत्ती पण
होईल,भूकंपा मुळे सर्व नष्ट होईल.भारतामध्ये खूप भूकंप होतील.आम्ही तर हे म्हणतो,
हे तर होणारच आहे.कल्पा पूर्वी पण झाले होते,तेव्हा तर म्हणतात, सोन्याची द्वारका
खाली गेली.मुलांनी चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये बसवायला पाहिजे की,आम्ही पाच हजार
वर्षांपूर्वी पण,हे ज्ञान घेतले होते. यामध्ये काहीच फरक पडू शकत नाही.बाबा पाच
हजार वर्षांपूर्वी पण आम्ही आपल्याकडून वारसा घेतला होता.आम्ही अनेक वेळेस
आपल्याकडून वारसा घेतला आहे. त्याची मोजदाद होऊ शकत नाही. अनेक वेळेस तुम्ही
विश्वाचे मालक बनले होते,परत फकिर बनतात. यावेळेत भारत पूर्ण फकिर आहे. तुम्ही
लिहतात पण वैश्विक नाटकानुसार होत आहे.ते वैश्विक नाटक म्हणत नाहीत,त्यांचे नियोजन
आपले आहे.तुम्ही म्हणतात, वैश्विक नाटकानुसार आम्ही परत स्थापना करत आहोत,तेही ५०००
वर्षा पूर्वीसारखेच.कल्पपूर्व जे कर्तव्य केले होते, ते आता पण श्रीमता द्वारे करत
आहोत.श्रीमता द्वारे शक्ती घेतो. शिवशक्ती नाव पण आहे ना.तर तुम्ही शिवशक्ती देवी
आहात,ज्यांचे मंदिरांमध्ये पण पूजन होते.तुम्हीच देवी आहात,ते परत विश्वावरती राज्य
करतात.जगदंबाची पहा किती पूजा होते,अनेक नावं ठेवली आहेत.तसे तर एकच आहेत.जसे पिता
एकच शिव आहेत.तुम्हीपण विश्वाला स्वर्ग बनवतात,तर तुमची पूजा होते. अनेक देवी
आहेत,लक्ष्मीची किती पूजा करतात.दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करतात, ती
मुख्य आहे.महाराजा महारानी एकत्र मिळून महालक्ष्मी म्हणतात,त्यामध्ये दोघे
येतात.आम्हीपण महालक्ष्मीची पूजा करत होतो,धन मिळाले तर समजतात,महालक्ष्मीची कृपा
झाली. बस प्रत्येक वर्षी पूजा करत राहतात. अच्छा,त्यांच्याकडून धन मागतात. देवीकडून
काय मागणार?तुम्ही संगमयुगी देवी,स्वर्गाचे वरदान देणारे आहात.मनुष्यांना हे माहित
नाही की, देवी पासून स्वर्गाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.तुम्ही देवी आहात ना.
मनुष्यांना ज्ञानदान करतात,ज्याद्वारे सर्व इच्छा पूर्ण करतात.आजारी इत्यादी
असेल,तर देवीला म्हणतात ठीक करा,रक्षा करा.अनेक प्रकारच्या देवी आहेत.तुम्ही संगम
युगाच्या शिवशक्ती देवी आहात. तुम्हीच स्वर्गाचे वरदान देतात,बाबा पण
देतात.महालक्ष्मी दाखवतात, नारायणला गुप्त ठेवतात.बाबा तुम्हचा खूप प्रभाव
वाढवतात.देवी २१ जन्मासाठी सुखाची इच्छा पूर्ण करते.लक्ष्मी द्वारे धन मागतात.धन
मिळवण्या साठी मनुष्य चांगला धंदा इत्यादी करतात.तुम्हाला तर बाबा येऊन साऱ्या
विश्वाचे मालक बनवतात,खूप धन देतात.श्रीलक्ष्मी नारायण विश्वाचे मालक होते,आता गरीब
आहेत.तुम्ही मुलं जाणता राजाई केली परत हळूहळू उतरती कला होते.पुनर्जन्म घेत घेत कला
कमी होतात.आता पहा कशी हालत झाली आहे,ही पण नवीन गोष्ट नाही. प्रत्येक पाच हजार
वर्षानंतर चक्र फिरत राहते.आता भारत खूप गरीब आहे,रावण राज्य आहे.भारत पुर्वी उच्च
क्रमांकाचा,होता.आता शेवटी आहे, शेवटी जाणार नाही,तर क्रमांक एक कसा होईल, हिशोब आहे
ना.विचार सागर मंथन केले तर,सर्व गोष्टी आपोआप बुद्धीमध्ये येतील.किती गोड गोष्टी
आहेत.आता तर तुम्ही सर्व सृष्टीच्या चक्राला जाणले आहे. शिक्षण फक्त शाळेमध्ये
शिकवले जात नाही,शिक्षक गृहपाठ पण देतात.बाबा पण तुम्हाला गृहपाठ देतात.दिवसा धंदा
इ.करायचा आहे. अमृतवेळे सर्वां रिकामे असतात, सकाळी दोन तीन वाजता ची वेळ खूप चांगली
आहे.त्या वेळेत उठून बाबांची प्रेमाने आठवण करा.बाकी या विकारांनी तुम्हाला आधी
मध्य अंत दुःख दिले आहे परंतु याचा अर्थ काही जाणत नाहीत. बस फक्त परंपरा द्वारे
रावणाला जाळण्याची पद्धत चालत आली आहे.वैश्विक नाटका नुसार नोंद आहे.रावणाला मारत
आले परंतु रावण मरत नाही. आता तुम्ही मुलं जाणता,रावणाला जाळणे कधी बंद होईल.आत्ता
तुम्ही खरीखुरी सत्यनारायण ची कथा ऐकतात.तुम्ही जाणतात,आम्हाला आता बाबा कडून वारसा
मिळत आहे.बाबांना न जाणल्या मुळे सर्व विनाधनीचे झाले आहेत.बाबा जे भारताला स्वर्ग
बनवतात,त्यांना पण जाणत नाहीत,ही पण नाटकांमध्ये नोंद आहे.शिडी उतरत उतरत तमोप्रधान
बनले आहेत,तेव्हा तर बाबा येतील परंतु स्वतःला तमोप्रधान समजतात थोडेच.बाबा म्हणतात
या वेळेत सर्व,जड जडीभूत अवस्थेला मिळाले आहेत.एक पण सतोप्रधान नाही.सतोप्रधान
शांतीधाम आणि सुखधाम मध्ये असतात.आता तर तमोप्रधान आहेत.बाबा तुम्हा मुलांना अज्ञान
निद्रेतून जागृत करतात,तुम्ही परत दुसऱ्यांना जागृत करतात,जागृत होत राहतात.जसे
मनुष्य म्हणतात, त्यांच्यापुढे दिवा प्रज्ज्वलित ठेवतात,समजतात की प्रकाश
मिळेल.आत्ता तर घोर अंधकार आहे,आत्मे वापस आपल्या घरी जाऊ शकत नाहीत.जरी मन होते
दुःखापासून सुटावे,परंतू एक पण मुक्त होऊ शकत नाही.ज्या मुलांना पुरुषोत्तम
संगमयुगाची स्मृती राहते,ते ज्ञान रत्न दिल्याशिवाय राहू शकत नाहीत.जसे मनुष्य
पुरुषोत्तम महिन्यांमध्ये खूप दानपुण्य करतात, असेच या पुरुषोत्तम संगमयुगा मध्ये
तुम्हाला ज्ञान रत्नाचे दान करायचे आहे.हे पण समजतात,स्वतः परमपिता परमात्मा शिकवत
आहेत.कृष्णाची गोष्ट नाही,कृष्ण तर स्वर्गाचे प्रथम राजकुमार,परत पुनर्जन्म घेत आले.
बाबांनी वर्तमान आणि भविष्याचे पण रहस्य समजवले आहे.तुम्ही त्रिकालदर्शी बनतात,दुसरे
कोणी त्रिकालदर्शी बनवू शकत नाहीत, शिवाय बाबांच्या.सृष्टीच्या आदी मध्यं अंतचे
ज्ञान बाबांनाच आहे,त्यांना ज्ञानाचे सागर म्हटले जाते.उच्च भगवंताचे गायन आहे,तेच
रचनाकार आहेत.स्वर्गिय पिता अक्षर खूप स्पष्ट आहे,स्वर्ग स्थापन करणारे आहेत.
शिवरात्री पण खूप साजरी करतात परंतु ते कधी आले,काय केले?काही माहीत नाही,तर साजरी
करून काय करतील? हे पण वैश्विक नाटकांमध्ये नोंदलेले आहे.या वेळेत तुम्ही मुलंच
नाटकाच्या आदी मध्य अंतला जाणतात,परत कधीच जाणत नाहीत.बाबा जेव्हा येतील तेव्हाच
जाणतील.आत्ता तुम्हाला स्मृति आली आहे,हे ८४ जन्माचे सृष्टी चक्र कसे
फिरते.भक्तिमार्ग मध्ये काय आहे, त्याद्वारे काहीच मिळत नाही.खूप भक्त लोक,अनेक
भक्त यात्रेमध्ये धक्के खाण्यासाठी जातात,बाबांनी तुम्हाला त्यापासून सोडवले
आहे.आत्ता तुम्ही जाणतात,आम्ही श्रीमतावरती परत भारताला श्रेष्ठ बनवत
आहोत.श्रीमतद्वारेच श्रेष्ठ बनतात.श्रीमत संगम युगामध्येच मिळते.तुम्ही तर अर्थसहीत
जाणता, आम्ही कोण होतो,परत असे कसे बनलो,आत्ता परत पुरुषार्थ करत आहोत.पुरुषार्थ
करत करत मुलं जर कधी नापास झाले,तर बाबांना समाचार द्या,बाबा सावधान करतील परत उभे
राहण्यासाठी.कधीही कमजोर होऊन बसायचे नाही,परत उभे राहायचे आहे,औषध घ्या,सर्जन तर
आहेत ना.बाबा समजवतात,पाच मजल्यावरून पडणे आणि दोन मजल्यावरून पडण्या मध्ये फरक आहे
ना.काम विकार म्हणजे पाचव्या मजल्यावरुन पडणे आहे,म्हणून बाबा म्हणतात काम महाशत्रू
आहे,त्यांनी तुम्हाला पतित बनवले आहे.आता पावन बना.पतित पावन बाबाच येऊन पावन
बनवतात.जरुर संगम युगामध्येच बनवतील.कलियुग अंत आणि सतयुग आदीचा हा संगम आहे.मुलं
जाणतात,बाबा आत्ता कलम लावत आहेत,परत पूर्ण रीतीने झाड वाढेल.ब्राह्मणाचे झाड वृद्धी
होईल परत सूर्यवंशी चंद्रवंशी मध्ये जाऊन सुख भोगाल.खूप सहज समजवले जाते.बरं,मुरली
मिळत नाही तर,बाबांची आठवण करा.हे बुद्धीमध्ये ठेवा की,शिवबाबा ब्रह्मा तनाद्वारे
आम्हाला म्हणतात की, माझी आठवण करा,तर विष्णूच्या घराण्यामध्ये चालले जाल.सर्व
पुरुषार्था वरती आधारित आहे.कल्प- कल्प जो पुरुषार्थ केला आहे,तसाच करत राहाल.अर्धा
कल्प देह अभिमानी बनले,आत्ता देही अभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करा,यामध्येच
कष्ट आहेत.हे शिक्षण तर खूपच सहज आहे.मुख्य गोष्ट पावन बनण्याची आहे.बाबांना विसरणे
ही तर मोठी चूक आहे.देह अभिमामाना मध्ये आल्यामुळेच विसरतात.शरीर निर्वाहसाठी धंदा
इत्यादी ८ तास खुशाल करा,बाकी ८ तास आठवणीमध्ये राहण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे.ती
अवस्था लवकर होणार नाही,अंत काळात जेव्हा ही अवस्था होईल,तेव्हा विनाश होईल.
कर्मातीत अवस्था झाली,परत आत्मा शरीरात राहू शकणार नाही, मुक्त होईल,कारण आत्मा
पवित्र बनेल ना.जेव्हा क्रमानुसार कर्मातीता अवस्था होईल,तेव्हा लढाई सुरू
होईल,तोपर्यंत रंगीत तालीम होत राहील,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक मुलांना आत्मिक पित्याचा नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) या
पुरुषोत्तम महिन्यामध्ये,अविनाश ज्ञान रत्नाचे दान करायचे आहे.अमृतवेळेला उठून
विचार सागर मंथन करायचे आहे.श्रीमता वरती शरीर निर्वाह करत बाबांनी,जो ग्रहपाठ दिला
आहे,तो पण जरुर करायचा आहे.
(2) पुरुषार्था मध्ये
कधी आळस आला,तर बाबांना समाचार देऊन,श्रीमत घ्यायची आहे.सर्जनला सर्व ऐकावयाचे
आहे.विकर्म विनाश करण्याच्या वेळेत,कोणतेही विकर्म करायचे नाहीत.
वरदान:-
देह,सबंध आणि
वैभवाच्या बंधना द्वारे,स्वतंत्र बाप समान कर्मातीत भव.
जे निमित्तमात्र
श्रीमतानुसार प्रवृत्तीला सांभाळत,आत्मिक स्वरूपामध्ये राहतात,मोहामुळे नाहीत
त्यांना जरी आत्ता आदेश मिळाला या,तर लगेच येतील.नगारा वाजेल आणि विचार करण्यातच
वेळ जायला नको,तेव्हाच नष्टमोहा बनाल,म्हणून नेहमी स्वतःला तपासायला पाहिजे
की,देहाचे सबंध, वैभवाचे बंधन,आपल्याकडे आकर्षित तर करत नाही ना?जिथे बंधन असेल तेथे
आकर्षण राहील परंतु जे स्वतंत्र आहेत,ते बाप समान कर्मातीत स्थितीच्या जवळ आहेत.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-
स्नेह आणि सहयोगाच्या सोबत शक्तिरूप बना,तर राजधानीमध्ये अग्रक्रमांक मिळेल.