13-07-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, सर्वांना ही खुशखबर ऐकवा की,आता परत विश्वामध्ये शांती स्थापन होत
आहे,बाबा एक सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करण्यासाठी आले आहेत"
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
नेहमी आठवणी मध्ये राहण्याचा इशारा का दिला जातो?
उत्तर:-
कारण नेहमी निरोगी आणि नेहमी पावन बनण्यासाठी आठवण केली जाते,म्हणून जेव्हा पण वेळ
मिळेल,तेव्हा आठवणीमध्ये रहा. सकाळी सकाळी स्नान इ.करून परत एकांत मध्ये फिरायला
जावा किंवा बसा.येथे तर म्हणजे मधुबन मध्ये तर कमाईच कमाई आहे.आठवणी द्वारेच
विश्वाचे मालक बनू शकाल.
ओम शांती।
गोड मुलं जाणतात की, या वर्तमान काळात सर्व विश्वामध्ये शांतीची इच्छा करतात.हे ऐकत
राहतात की विश्वामध्ये शांती कशी होईल परंतु विश्वामध्ये शांती कधी होती?ज्याची
इच्छा करतात,हे कोणी जाणत नाहीत.तुम्ही मुलं जाणतात विश्वामध्ये शांती होती,जेव्हा
लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. आज पर्यंत लक्ष्मी नारायणाचे मंदिर बनवत
राहतात.तुम्ही कोणालाही हे सांगू शकता की,विश्वामध्ये शांती पाच हजार वर्षांपूर्वी
होती,त्याची परत स्थापना होत आहे.कोण स्थापन करत आहेत,हे मनुष्य जाणत नाहीत. तुम्हा
मुलांना बाबांनी समजवले आहे, तुम्ही कोणालाही समजावू शकता, तुम्ही लिहू पण शकता
परंतु अशी कोणामध्ये हिम्मत नाही,जे कोणाला लिहू शकतील.वर्तमान पत्रामध्ये तुम्ही
वाचत राहतात,सर्व म्हणतात विश्वामध्ये शांती व्हावी.लढाई इत्यादी होते,तर मनुष्य
विश्वामध्ये शांतीसाठी यज्ञ स्थापन करतात, कोणता यज्ञ? रुद्र यज्ञाची स्थापना
करतात.आता मुलं जाणतात,या वेळेत पिता ज्याला रुद्र शिव पण म्हटले जाते,त्यांनी
ज्ञान यज्ञ स्थापन केला आहे.विश्वामध्ये शांती आता स्थापन होत आहे.सतयुगी नवीन
दुनिये मध्ये जेथे शांती होती,तर जरूर राज्य करणारे पण असतील.निराकारी दुनियासाठी
तर म्हणणार नाही की, विश्वामध्ये शांती व्हावी,तेथे तर आहेच शांती.विश्वामध्ये
मनुष्य असतात,निराकारी दुनियेला विश्व म्हणणार नाही,ते शांतीधाम आहे. तरीही काही
विसरतात.काही काहींच्या बुद्धी मध्ये आहे,ते समजावू शकतात.विश्वा मध्ये शांती कधी
होती?आता परत कशी स्थापन होत आहे? हे कोणालाही समजावून सांगणे खूप सहज
आहे.भारतामध्ये जेव्हा आदी सनातन देवी-देवता धर्माचे राज्य होते,तर एकच धर्म
होता.विश्वामध्ये शांती होती हे खूप सहज समजावून सांगण्याची आणि लिहिण्याची गोष्ट
आहे.मोठ-मोठे मंदिर बनवणाऱ्यांना पण तुम्ही लिहू शकता की,विश्वामध्ये शांती आजपासून
पाचहजार वर्षपूर्व होती, जेव्हा यांचे राज्य होते,ज्यांचे तुम्ही मंदिर
बनवतात.भारतामध्ये यांचे राज्य होते,ज्या वेळेस दुसरा कोणता धर्म नव्हता.हे तर खूप
सहज आणि समजण्याची गोष्ट आहे.वैश्विक नाटकानुसार पुढे चालून सर्व समजतील.तुम्ही ही
खुशखबर सर्वांना ऐकवू शकता,छापू पण शकता,तेही सुंदर कार्ड वरती.विश्वामध्ये शांती
आज पासून पाच हजारवर्ष पूर्व होती,जेव्हा नवीन दुनिया,नवीन भारत होता,लक्ष्मीनारायण
चे राज्य होते,आता परत विश्वामध्ये शांती स्थापन होत आहे.या गोष्टी स्मरण केल्यामुळे
पण तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे.तुम्ही जाणता बाबांची आठवण
केल्यामुळेच,आम्ही विश्वाचे मालक बनणार आहोत.तुम्हा मुलांच्या पुरुषार्था वरती सर्व
आधारित आहे.बाबांनी समजवले आहे,जो पण वेळ मिळेल बाबाच्या आठवणीमध्ये रहा.सकाळी
स्नान इत्यादी करून परत एकांत मध्ये फिरायला जावा किंवा एकांतामध्ये बसा.मधुबन मध्ये
तर कमाईच कमाई करायची आहे.नेहमी निरोगी आणि नेहमी पावन बनण्यासाठीच आठवण आहे.येथे
जरी संन्यासी पवित्र आहेत,तरीही आजारी तर जरूर पडतात.ही रोगी दुनिया आहे,ती निरोगी
दुनिया आहे.हे पण तुम्ही जाणतात,दुनिये मध्ये कोणाला काय माहिती की,स्वर्गामध्ये
सर्व निरोगी असतात.स्वर्ग कशाला म्हटले जाते? कोणालाही माहिती नाही.तुम्ही आत्ता
जाणतात,बाबा म्हणतात कोणीही भेटले,तुम्ही समजावू शकता.कोणी स्वतःला राजाराणी
म्हणतात,तसे तर आता राजाराणी कोणीच नाहीत. तुम्हीच सांगा आता राजाराणी तर नाहीत,हे
बुद्धी मधून काढून टाका.महाराजा महाराणी श्रीलक्ष्मी श्रीनारायणची राजधानी आता
स्थापन होत आहे,तर जरुर येथे कोणतेही राजाराणी असायला नको.आम्ही राजाराणी आहोत,हे
विसरा.साधारण मनुष्या सारखे चाला.यांच्याजवळ खूप पैसे सोने इत्यादी तर राहतात ना.आता
कायदे निघत आहेत,हे सर्व शासन परत घेईल,परत साधारण मनुष्या सारखे होतील.या पण युक्ती
निघत आहेत.गायन पण आहे ना,कोणाचे जमिनीमध्ये राहील,कोणाचे राजा खाईल, सफल त्यांची
होईल,जे धनीच्या नावे लावतील.आता राजा तर कोणाची खात नाहीत.राजे तर नाहीत.प्रजा पण
प्रजेचे खात आहे. आजकालचे राज्य पण खूप आश्चर्यकारक आहे.जेव्हा राजांचे नाव अगदीच
निघून जाते परत राजधानी स्थापन होते.आता तुम्ही जाणता आम्ही तेथे जात आहोत,जेथे
विश्वामध्ये शांती असते.ते आहेच सुखधाम,सतोप्रधान दुनिया.आम्ही तेथे जाण्यासाठी
पुरुषार्थ करत आहोत.मुलींनी खूप आवडीने समजून सांगायला पाहिजे,बाहेरचा दिखावा
नकोय.आजकाल तर कृत्रिम पण खूप निघाले आहेत ना. येथे तर पक्के ब्रह्मकुमार-कुमारी
पाहिजेत. तुम्ही ब्राह्मण,ब्रह्माच्या सोबत विश्वामध्ये शांतीच्या स्थापनेचे कार्य
करत आहात.असे शांती स्थापन करणारी मुलं खूप शांत चित्त आणि खूप गोड पाहिजेत,कारण
आम्ही विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी निमित्त बनलो आहोत.तर प्रथम आपल्या मध्ये
खूप शांती पाहिजे. गोष्टी पण खूप हळूहळू,श्रेष्ठते द्वारे करायच्या आहेत.तुम्ही खूप
गुप्त आहात.तुमच्या बुद्धीमध्ये अविनाश ज्ञानरत्नांचा खजाना भरलेला आहे.शिवपित्याचे
तुम्ही वारस आहात ना.जितका खजाना बाबां जवळ आहे,तुम्हाला पण तो पूर्ण जमा करायला
पाहिजे.सर्व मिळकत तुमची आहे परंतु ती हिम्मत नाही,तर घेऊ शकत नाहीत.सर्व खजाना
घेणारेच उच्चपद प्राप्त करतात.कोणालाही ज्ञान समजून सांगण्याची आवड पाहिजे,छंद
पाहिजे.आम्हाला भारताला,परत स्वर्ग बनवायचा आहे.धंदा इ.करत सोबत ही पण सेवा करायची
आहे, म्हणून बाबा लवकर तयारी करतात,तरीही वैश्विक नाटका नुसारच होते.प्रत्येकजण
आपल्या वेळेनुसार चालत आहे.मुलांना पण पुरुषार्थ करवत आहेत.मुलांना निश्चय आहे
की,आता बाकी थोडा वेळ आहे.आमचा अंतिम जन्म आहे, परत आम्ही स्वर्गा मध्ये असू.हे
दुःख धाम आहे,परत सुखधाम बनेल. सुखधाम बनण्यांमध्ये वेळ तर लागेल ना.हा विनाश लहान
थोडाच आहे. जसे नवीन घर बनते,परत नवीन घराचीच आठवण येते.ती हद्दची गोष्ट
आहे,त्यामध्ये कोणते संबंध इत्यादी थोडेच बदलतात.ही तर जुनी दुनियाच बदलणार आहे,परत
जे चांगल्या रीतीने शिकतील,तर ते राजाई कुळामध्ये जातील,नाहीतर प्रजामध्ये
जातील.मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे.बाबांनी समजावले आहे,तुम्ही ५०-६० जन्म सुख
मिळवतात.द्वापर मध्ये पण तुमच्याजवळ खूप धन असते.दुःख तर नंतर होते,जेव्हा राजे
आपसामध्ये लढतात,फूट पडते,त्यांनंतर दुःख सुरू होते.यापूर्वी तर धान्य इत्यादी खूप
स्वस्त होते.दुष्काळ इत्यादी पण नंतर पडतात.तुमच्याजवळ खूप धन राहते.सतोप्रधान
पासून तमोप्रधान हळूहळू बनतात.तर तुम्हा मुलांना खूप खुश राहायला पाहिजे.स्वतःला
खुशी मध्ये ठेवणार नाहीत,शांती मध्ये राहणार नाही,तर ते विश्वामध्ये शांती कशी
स्थापन करतील?अनेकांच्या बुद्धीमध्ये अशांती राहते.बाबा शांतीचे वरदान देण्यासाठी
येतात.माझी आठवण करा, तर तमोप्रधान बनल्यामुळे जी आत्मा अशांत झाली आहे,ती आठवणी
द्वारे सत़ोप्रधान शांत बनेल परंतु मुलांकडून आठवणीचे कष्ट होत नाहीत.आठवणीमध्ये न
राहिल्यामुळे परत मायचे वादळ येतात.आठवणी मध्ये राहून पूर्ण रीतीने पावन बनले
नाही,तर सजा खावे लागेल,परत पद पण भ्रष्ट होईल.असे समजायचे नाही स्वर्गा मध्ये तर
जाऊ.अरे मार खाऊन पाई पैशाचे सुख मिळवणे,हे काही चांगले आहे का?मनुष्य उच्च पदासाठी
किती पुरुषार्थ करत राहतात.असे नाही,जे मिळेल,ते चांगले आहे.असे कोणी नसेल,जे
पुरुषार्थ करणार नाहीत.भीक मागणारे फकिर लोक पण आपल्याजवळ पैसे जमा करतात. पैशाचे
तर सर्व भुकेलेले असतात.धना द्वारे प्रत्येक गोष्टीचे सुख मिळते.तुम्ही मुलं जाणता,
आम्ही बाबा कडून खूप धन घेतो. पुरुषार्थ कमी कराल,तर धन पण कमी मिळेल.बाबा धन देतात
ना. असे म्हणतात,धन आहे तर अमेरिका इत्यादी फिरून या.तुम्ही जितकी बाबांची आठवण
कराल आणि सेवा कराल,तेवढे सुख मिळेल.बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषार्थ करवतात,
उच्च बनवतात.बाबा समजतात,मुलं आमच्या कुळाचे नाव प्रसिद्ध करतील.तुम्हा मुलांना पण
ईश्वरी कुळाचे,शिव पित्याचे नाव प्रसिद्ध करायचे आहे.ते सत्य शिक्षक सद्गुरु आहेत
ना.उच्च ते उच्च पिता,उच्च ते उच्च खरे सद्गुरु पण आहेत.हे पण समजले जाते,गुरु एकच
असतात, दुसरे कोणी नाही.सर्वांचे सद्गती दाता तर एकच आहेत.हे पण तुम्हीच
जाणतात,आत्ता तुम्ही पारस बुद्धी बनत आहात.पारसपुरीचे पारसनाथ राजाराणी बनतात.खूप
सहज गोष्टी आहेत.भारत सुवर्णयोगी होता, विश्वामध्ये शांती कशी होती,हे तुम्ही
लक्ष्मी नारायणच्या चित्रावरून समजावू शकता.स्वर्गामध्ये शांती होती,आता नर्क
आहे,यामध्ये अशांती आहे.स्वर्गामध्ये लक्ष्मीनारायण राहतात ना.कृष्णाला लाँर्ड
कृष्णा पण म्हणतात,भगवान कृष्ण पण म्हणतात.श्रीमंत तर खूप आहेत.आत्ता लाँर्ड तर खूप
आहेत.ज्यांच्याजवळ जमीन जास्त आहे, त्यांना (लँन्ड लाँर्ड) जमीनदार म्हणतात.कृष्ण
तर विश्वाचे राजकुमार होते,ज्या विश्वा मध्ये शांती होती.हे पण कुणाला माहीत नाही
की, राधेकृष्णच लक्ष्मीनारायण बनतात. तुमच्यासाठी खूप गोष्टी बनवतात, गोंधळ
घालतात.असे म्हणतात,हे भाऊ-बहीण बनवतात.समजले जाते, प्रजापिता ब्रह्माचे मुखवंशावळ
ब्राह्मण,ज्यांच्यासाठी गायन करतात, ब्राह्मण देवताय नमः ब्राह्मण पण त्यांना नमस्ते
करतात,कारण ते खरे भाऊबहीण आहेत.पवित्र राहतात.तर पवित्रतेची का इज्जत करणार
नाहीत?कन्या पवित्र आहेत,तर तिच्या पाया पडतात.परदेशी लोक येतात तर,कन्याला नमस्ते
करतात. या वेळेत कन्याचा इतका मान का आहे?कारण तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी आहात ना.
बहुमत तुम्हा कन्यांचे आहे.शिवशक्ती पांडव सेना चे गायन आहे.यामध्ये स्त्रिया पण
आहेत. बहूमत मांतांचे आहे म्हणुन गायन आहे.तर जे चांगल्या रीतीने शिकतात,ते उच्चपद
मिळवतात.आता तुम्ही साऱ्या विश्वाचा इतिहास भूगोल जाणला आहे.सृष्टीचक्रा वरती समजवणे
पण खूप सहज आहे.भारत पारसपुरी होता,आत्ता पत्थर पुरी आहे.तर सर्व पत्थरनाथ झाले
ना.तुम्ही मुलं या ८४च्या चक्राला पण जाणतात.आता घरी जायचे आहे,तर बाबांची आठवण
करायची आहे,ज्यामुळे पाप नष्ट होतात परंतु मुलांचे आठवणीचे कष्ट पोहचत नाहीत,कारण
आळस आहे.सकाळी उठत नाहीत,जरी ऊठतात तरीही मजा येत नाही,झोप येऊ लागते,परत झोपतात,
निराशवादी बनतात.बाबा म्हणतात मुलांनो, युद्धाचे मैदान आहे,यामध्ये निराशवादी बनू
नका,आठवणीच्या बळा द्वारेच मायेला जिंकायचे आहे,हेच कष्ट घ्यायचे आहेत.खूप चांगली
चांगली मुलं अर्थसहीत आठवण करत नाहीत.चार्ट किंवा दिनचर्या लिहल्यामुळे नुकसान
फायद्याची माहिती होते.असे म्हणतात चार्ट किंवा दिनचर्या लिहिल्यावर माझ्या
अवस्थेमध्ये कमालीचा बदल झाला आहे.असे थोडेच कोणी चार्ट लिहितात.हे पण खूप कष्ट
आहेत.अनेक सेवा केंद्रा मध्ये विकारी पण जाऊन बसतात. विकर्म करत
राहतात.बाबाच्याश्रीमताचे आचरण न केल्यामुळे खूप नुकसान करतात.मुलांना माहिती थोडंच
पडते की,निराकार म्हणतात की साकार.मुलांना नेहमी समजवले जाते की,तुम्ही नेहमी समजा
शिवबाबाच श्रीमत देतात.तर तुमची बुद्धी तेथे लागून राहील.आजकाल तर साखरपुडा होता,तर
चित्र दाखवतात, पेपर मध्ये पण देतात की, यांच्यासाठी या प्रकारच्या घराची वधू किंवा
वर पाहिजे.दुनियेचे हाल काय झाले आहेत? काय होणार आहे? तुम्ही मुलं जाणता अनेक
प्रकारची मतं आहेत.तुम्हा ब्राह्मणांचे, विश्वामध्ये शांती स्थापनेसाठी एकच मत आहे.
तुम्ही श्रीमता द्वारे विश्वामध्ये शांती स्थापन करतात,तर मुलांना पण शांती मध्ये
राहायचे आहे.जे करेल त्यांना मिळेल,नाहीतर खूप नुकसान होईल.जन्म जन्मांतर चे नुकसान
होईल.मुलांना म्हणतात आपले नुकसान आणि फायदा पहा,आम्ही कोणाला दुःख तर नाही दिले?
बाबा म्हणतात तुमचा एक-एक सेकंद खूप किंमती आहे. सजा खाऊन थोडेफार पद मिळाले तर काय
मोठी गोष्ट आहे? तुम्हची तर खूप धनवान बनायची इच्छा आहे ना?प्रथम जे पुज्य
आहेत,त्यांनाच पुजारी बनायचे आहे.इतके धन असेल,जे सोमनाथ मंदीर बनवले.तेव्हा तर पूजा
करतात.हा पण हिशोब आहे. मुलांना तरीही समजवले जाते,चार्ट ठेवा, दिनचर्या तपासा,तर
खूप फायदा होईल,नोंद करायला पाहिजे. सर्वांना संदेश देत रहा,गप्प राहू
नका.रेल्वेमध्ये पण तुम्ही समजावून,परत साहित्य द्या.त्यांना सांगा हे करोडो
रुपयांचे ज्ञान रत्न आहेत.लक्ष्मी नारायणचे जेव्हा भारतामध्ये राज्य होते,तेव्हा
विश्वामध्ये शांती होती.आता शिव पिता परत ती राजधानी स्थापन करण्यासाठी आले
आहेत.तुम्ही बाबांची आठवण करा,तर विकर्म विनाश होतील आणि विश्वामध्ये शांती
होईल,अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आम्ही
विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी निमित्त ब्राह्मण आहोत,आम्हाला खूप शांत चित्त
राहायचे आहे.बोलचाल पण खूप हळू आणि श्रेष्ठते द्वारे करायचे आहे.
(२) आळस सोडून आठवणीचे
कष्ट घ्यायचे आहेत.कधीच निराशवादी बनायचे नाही.
वरदान:-
विकाररुपी
सापाला पण शैया बनवणारे विष्णू समान सदा विजयी निश्चींत भव.
विष्णूला नेहमी
शेषशैया दाखवतात, ही तुम्हा विजयी मुलांच्या सहज योगी जीवनाची आठवण आहे.सहजयोगा
द्वारे विकार रुपी साप पण वश होतात.जी मुलं विकार रुपी सापावर विजय प्राप्त करुन,
त्यांना आरामाची शैय्या बनवतात,ते नेहमी विष्णूच्या समान आनंदी व निश्चिंत
राहतात.तर नेहमी हे चित्र आपल्या समोर पहा की, विकारांना वश केलेले अधिकारी
आहोत.आत्मा नेहमी आरामाच्या स्थितीमध्ये निश्चिंत आहे.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-
बालक आणि मालक पणाच्या संतुलन द्वारे योजनेला प्रत्यक्षात आणा.