05-07-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
20.02.86 ओम शान्ति
मधुबन
तीव्र पुरुषार्था
द्वारे सर्वांची प्रगती
आज विशेष दुहेरी
परदेशी मुलांना डबल शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत.एक तर दूर देशा मध्ये वेगवेगळ्या
धर्मांमध्ये असून पण, भारतामध्ये राहणाऱ्या अनेक आत्म्या पेक्षा लवकर बाबांना ओळखले.
बाबांना ओळखणे म्हणजे आपल्या भाग्याला प्राप्त करण्याच्या शुभेच्छा आणि दुसरे म्हणजे
तीव्रगतीने ओळखले,तसेच तीव्र गती द्वारे सेवा करणे.तर सेवांमध्ये तीव्र गतीने पुढे
जाण्यासाठी पण दुसऱ्यांदा शुभेच्छा.सेवेची तीव्र गती होत आहे आणि पुढे पण दुहेरी
परदेशी मुलांना,विशेष कार्या अर्थ निमित्त बनायचे आहे.भारताच्या निमित्त आदी रत्न
विशेष आत्म्यांने, स्थापण्याच्या कार्यामध्ये खूप मजबूत पाया बनवून कार्याची स्थापना
केली आणि दुहेरी परदेशी मुलांनी चहूबाजूला आवाज पसरवण्यासाठी तीव्र गतीने सेवा केली
आणि करत राहतील,म्हणून बापदादा सर्व मुलांना,जन्मताच खुप लवकरच सेवेमध्ये पुढे
जाण्यासाठी विशेष शुभेच्छा देत आहेत,अभिनंदन करत आहेत.थोड्या वर्षात वेगवेगळ्या
देशांमध्ये सेवेचा विस्तार केला आहे, म्हणून आवाज पसरवण्याचे कार्य सहज वृद्धिंगत
होत आहे आणि नेहमी डबल लाईट बनून,एकदम हलके बनून,दुहेरी मुकुटधारी बनण्याचा,संपूर्ण
अधिकार प्राप्त करण्याचा तीव्र पुरुषार्थ आवश्य करतील.आज विशेष भेटण्यासाठी आले
आहेत.बापदादा पाहत आहेत, सर्वांच्या मनामध्ये खुशीचे नगारे वाजत आहेत.मुलांच्या
खुशीचे खुशीचे गीत,बापदादांना ऐकू येतात. आठवण आणि सेवेच्या आकर्षणा द्वारे पुढे
जात आहेत.आठवण पण आहे सेवा पण आहे परंतु त्यामध्ये आणखी कोणती नवीनता पाहिजे? तसे
तर दोन्ही आहेत परंतु नेहमी दोघांचे संतुलन हवे.हे संतुलनच स्वतःला आणि सेवेमध्ये
बाबांच्या आशीर्वादाचे अनुभवी बनवते.सेवेचा नेहमी उमंग उत्साह राहतो.आता आणखी
सेवेमध्ये आठवण आणि सेवेचे संतुलन ठेवल्यामुळे जास्त बुलंद आवाज,विश्वामध्ये जाईल.
विस्तार चांगला केला आहे. विस्तारच्या नंतर काय केले जाते, त्यासोबतच आता आणखी
जास्त सेवेचे सार,असे विशेष निमित्त बनायचे आहे,जे विशेष आत्मे बनून, भारतामधील
विशेष आत्म्यांना, जागृत करतील.आता भारतामध्ये सेवेची रूपरेषा वेळे प्रमाण,वृद्धी
होत आहे.नेता,धर्मनेता सोबत अभिनेता पण संपर्का मध्ये येत आहेत,बाकी कोण
राहिले?संपर्का मध्ये तर येत आहेत ना.नेता पण येत आहेत परंतु विशेष
राजनेता,त्यांच्याजवळ पण समीप संपर्का मध्ये येण्याचा संकल्प उत्पन्न होणारच आहे.
सर्व डबल परदेशी मुलं उडत्या कलेमध्ये म्हणजेच तीव्र गतीने पुरुषार्थ करत आहात
ना,साधारण नाही ना.तीव्र गतीचा पुरुषार्थ आहे ना.उडती कला म्हणजे तीव्र पुरुषार्थ
द्वारे सर्वांचे परिवर्तन होणे.जेव्हा सर्व मुलांची उडती कला बनेल,तेव्हा सर्वांच्या
परिवर्तनाचे कार्य संपन्न होईल.आता उडती कला आहे परंतु कलेमध्ये पण अवस्था आहेत,कधी
खूप चांगली अवस्था आणि कधी चांगली अवस्था बनवण्यासाठी पुरुषार्थाच्या स्थितीमध्ये
आहेत. नेहमी आणि जास्तीत जास्तत मुलांची उडती कला होणे म्हणजे समाप्ती होणे.आता
सर्व मुलं जाणतात,उडती कलाच श्रेष्ठ स्थिती आहे.उडती कलाच कर्मातीत स्थितीला
प्राप्त करण्याची स्थिती आहे.उडती कलाच देहा मध्ये राहून पण,त्यापेक्षा वेगळी आणि
नेहमी बाबा आणि सेवेमध्ये,प्रियपणाची स्थिती आहे.उडती कलाच विधाता आणि वरदाता
स्थितीची अवस्था आहे.चालता फिरता फरिश्ता किंवा देवता दोन्ही रूपाचा साक्षात्कार
करण्याची स्थिती आहे.
उडती कलाच सर्व आत्म्यांना, भिकारीपणा पासून सोडवून,बाबांच्या वारशाचे अधिकारी
बनवणारी स्थिती आहे.सर्व आत्मे अनुभव करतील की, आम्हा सर्व आत्म्याचे इष्टदेव किंवा
इष्ट देवी किंवा निमित्त बनलेले जे पण अनेक देवी देवता आहेत,ते सर्व या धरतीवर
अवतरीत झाले आहेत. सतयुगा मध्ये तर सर्व सद्गती मध्ये असतील परंतु या वेळेत जे पण
आत्मे आहेत,त्या सर्वांचे सदगती दाता आहात.जसे कोणते पण नाटक समाप्त होते,तर शेवटी
सर्व कलाकार रंगमंचावर येतात.तर आत्ता कल्पाचे वैश्विक नाटक समाप्त होण्याची वेळ
येत आहे.सर्व विश्वाच्या आत्म्यांना, स्वप्नामध्ये किंवा एक सेकंदाच्या झलक मध्ये
किंवा प्रत्यक्षतेच्या चोहूबाजूच्या आवाजाद्वारे,जरूर साक्षात्कार होईल की,या
वैश्विक नाटकांमधील हिरो कलाकार रंगमंचावर प्रत्यक्ष झाले आहेत. धरतीचे तारे धरती
वरती प्रत्यक्ष झाले आहेत.सर्व आपापल्या ईष्ठ देवांना प्राप्त करून खूप खूश होतील,
आधार मिळेल.डबल परदेशी पण ईष्ठ देव,ईष्ठ देवी आहेत ना,की हे, स्वर्णजयंती वाले
आहेत.तुम्ही पण त्यामध्येच आहात की,फक्त पाहणारे आहात.जसे आत्ता स्वर्णजयंती चे
दृश्य पाहीले.ही तर एक रमणिक भूमिका वठवली,परंतु जेव्हा अंतिम दृश्य येईल,त्यावेळेस
तुम्ही साक्षात्कार करवणारे असाल,की फक्त पाहणारे असाल?काय असाल? हिरो अभिनेते आहात
ना.आता ते दृश्य आपल्यासमोर आणा.या अंतीम दृश्यासाठी आतापासून त्रिकालदर्शी बना.पहा
कसे सुंदर दृश्य असेल आणि किती सुंदर आम्ही असू. शृंगारीत दिव्य गुण मूर्त फरिश्ता
पासून देवता,यासाठी आत्तापासून नेहमी स्वतःला फरिश्ता स्वरूपामध्ये स्थिर राहण्याचा
अभ्यास करत,पुढे जात चला.जे चार विषय आहेत, ज्ञानमूर्त, निरंतर आठवण मूर्त,सर्व
दिव्य गुण मूर्त,एका दिव्य गुणांची पण कमी असेल,तर सोळा कला संपूर्ण म्हणणार
नाहीत.सोळा कला, सर्व आणि संपूर्ण,ही तिघांची महिमा आहे. सर्वगुणसंपन्न
म्हणतात,संपूर्ण निर्विकारी म्हणतात आणि १६ कलासंपन्न म्हणतात.तिन्ही विशेषता
पाहिजेत.सोळा कला म्हणजे संपन्न पण पाहिजेत,संपूर्ण पण पाहिजेत आणि सर्व पण
पाहिजेत.तर हे तपासून पहा.ऐकवले होते ना,हे वर्ष अनेक वर्षाच्या हिशेबा मध्ये जमा
करण्याचे आहे,परत अनेक वर्षाचा कर्मभोग समाप्त होईल,परत कमी वर्ष राहीले असे
म्हणतील.अनेक वर्ष राहिले नाहीत,असे म्हणतील.अनेक वर्षाच्या पुरुषार्थाच्या
रांगेमध्ये या. तेव्हाच अनेक वर्षाचे राज्य भाग्य प्राप्त करण्याचे अधिकारी बनाल.२-४
वर्ष पण कमी झाले,तर अनेक वर्षाच्या,पुरुषार्थामध्ये जमा होणार नाही.प्रथम जन्म आणि
प्रथम प्रकृतीचे श्रेष्ठ सुख हवे.१-१-१ ईसवी सन हवे. सर्वांमध्ये क्रमांक एक
हवा,त्यासाठी काय करावे लागेल?सेवेमध्ये पण क्रमांक १,स्थितीमध्ये पण क्रमांक १,
तरच १-१-१ मध्ये येऊ शकाल.तर सतयुगाच्या सुरुवातीला येणारे, क्रमांक एक आत्म्याच्या
सोबत भूमिका वठवणारे आणि क्रमांक एक जन्मांमध्ये भूमिका करणारे.तर ईसवी सनाची
सुरुवात पण तुम्ही करणार ना.प्रथम जन्म घेणारेच,प्रथम तारीख, प्रथम महिना,प्रथम इसवी
सन सुरू करतील.तर डबल परदेशी क्रमांक एक मध्ये येतील ना.अच्छा फरिश्ता चे वस्त्र
घालता येतात ना.हे चमकणारे वस्त्र आहेत.ही स्मृती आणि स्वरूप बनणे म्हणजेच फरिश्ता
वस्त्र धारण करणे आहे. चमकणारी गोष्ट दूरवरून आकर्षित करते.तर फरिश्ता वस्त्र म्हणजे
फरिश्ता स्वरूप दूर दूर पर्यंत आत्म्यांना आकर्षित करेल.अच्छा.
आज यु.के(युनाईटेड किंगडम)ची पाळी आहे. यु. के.ची विशेषता काय आहे. लंडनला सतयुगा
मधे पण राजधानी बनवणार की,फक्त फिरण्याचे स्थान बनवणार? तसे तर युनायटेड किंग्डम आहे
ना, तेथे पण राजधानी बनवणार की फक्त राजे फिरून येतील.तरीही जे नाव आहे राजधानी
म्हणतात ना,तरी या वेळेत सेवेची राजधानी तर आहेच. साऱ्या देशाच्या सेवेची राजधानी,
निमित्त तर आहातच.राजधानी नाव तर ठीक आहे,सर्वांना एकत्र करणारी राजधानी आहे.सर्व
आत्म्यांना बाबांशी भेटवणारी राजधानी आहे.यु.के.रहिवासींना बापदादा म्हणतात,ओ.के.
राहणारे.यु.के. म्हणजे ओके राहणारे.कधी कोणाला विचारले तर,ओ.के.आहे असे म्हणतात
ना.असे तर म्हणत नाहीत ठीक तर आहोत,लांब श्वास घेऊन म्हणतात, होय.जेव्हा ठीक असतात,
तर लगेच ओके ओके असे म्हणतात. तर संगमयुगाची राजधानी,सेवेची राजधानी,ज्यामध्ये
राज्यसत्ता अर्थात राजाई घराण्याची आत्मे,तयार होण्यासाठी प्रेरणा चहुबाजूनी
पसरेल.तर राजधानीमध्ये राज्याधिकारी बनवण्याचे राज्यस्थान तर झाले ना,म्हणून बाप
दादा प्रत्येक देशाच्या विशेषतेला विशेष रूपामध्ये आठवण करतात आणि त्या वैशिष्ट्या
द्वारे नेहमी पुढे घेऊन जातात.बाप दादा कमजोरीला पाहत नाहीत,फक्त इशारा देतात.खूप
छान,खूप छान आहेत,असे म्हणत,म्हणत चांगले बनतात. कमजोर आहात,कमजोर आहात असे म्हणले
तर कमजोर बनतात.एक तर अगोदरच कमजोर असतात,दुसरे कोणी कमजोर म्हटले,तर मूर्छीत
होतात.कसे पण मुर्छीत असतील परंतु त्याला श्रेष्ठ स्मृतीची, विशेषताच्या
स्मृतीची,संजीवनी बुटी खाऊ घाला,तर मूर्छीत पासून सुरजीत म्हणजे जागृत होतील.
संजीवनी बुटी तर सर्वां जवळ आहे ना.तर विशेषतांच्या स्वरूपाचे दर्पण त्याच्यासमोर
ठेवा,कारण प्रत्येक ब्राह्मण आत्मा विशेष आहे.करोडो मधून काही आहेत ना,तर विशेष झाले
ना.फक्त त्या वेळेत आपली विशेषता विसरतात.त्याला स्मृती दिल्याने विशेष आत्मा बनतील
आणि जितके विशेषता चे वर्णन करा,
तर स्वतः आपली कमजोरी आणखी जास्त स्पष्ट अनुभव होईल.तुम्हाला करण्याची आवश्यकताच
राहणार नाही.जर तुम्ही कोणाला कमजोरी ऐकवाल तर ते लपवतील,टाळतील. तुम्ही विशेषता
ऐकवा.जोपर्यंत कमजोरी स्वतःच अनुभव करत नाहीत,तोपर्यंत परिवर्तन करू शकत
नाहीत.खुशाल तुम्ही पन्नास वर्ष कष्ट करत राहा,म्हणून या संजीवनी बुटी द्वारे जागृत
करून,तीव्र पुरुषार्थ करा आणि करवत चला.हेच यु.के.करत आहे ना,अच्छा.
लंडन मधून अनेकानेक स्थानावरती किती जण गेले आहेत?भारतामधून तर गेले आहेत.लंडन मधून
किती गेले आहेत?ऑस्ट्रेलिया मधून किती गेले आहेत?ऑस्ट्रेलियाने पण वृद्धी केली आहे
आणि कुठे कुठे गेले आहेत? ज्ञानगंगा जितक्या दूरदूर वाहतील तेवढे चांगले
आहे.यु.के.ऑस्ट्रेलिया, अमेरिका,युरोपमध्ये किती सेवा केंद्र आहेत.सर्वांनी आपापली
संख्या ऐकवली,म्हणजेच वृध्दी करत आहात ना.आता कोणते विशेष स्थान राहिले आहे.अनेक
आहेत,त्यासाठी नियोजन करत आहात ना.विदेशांना हीच भेट आहे,की खूप सहज सेवा केंद्र
उघडू शकतात.लौकिक सेवा पण करतात आणि अलौकिक सेवेच्या पण निमित्त बनू
शकतात.भारतामध्ये तरीही निमंत्रण वरती सेवा केंद्र स्थापन करण्याची विशेषता राहिली
परंतु विदेशामध्ये स्वतःच,स्वता:ला निमंत्रण देतात.निमंत्रण देणारे पण स्वतः आणि
पोहोचणारे पण स्वतः, तरी पण सेवेमध्ये सहज वृध्दी होण्यासाठी एक भेट मिळाली आहे.
जिथे पण जावा दोन-तीन जण मिळून तेथे स्थापनेच्या निमित्त बनू शकतात आणि बनत
राहतील.हे वैश्विक नाटकानुसार भेट किंवा लिफ्ट मिळाली आहे,कारण थोड्या वेळा मध्ये
सेवेला समाप्त करायचे आहे. तर तीव्र गती व्हायला पाहिजे,तेव्हा तर वेळेवर समाप्ती
होऊ शकेल. भारताची विधी आणि परदेशातील विधीमध्ये अंतर आहे म्हणून विदेशामध्ये लवकर
वृद्धी होत आहे आणि होत राहील.एकच दिवसांमध्ये अनेक सेवा केंद्र उघडू शकतात.
चहूबाजूला परदेशामध्ये निमित्त राहणाऱ्यांना,सेवेसाठी खूप छान संधी आहे.भारतवासींना
पहा व्हिसा(परदेशात राहण्याचा परवाना) पण मुश्किल मिळतो.तर ही संधी परदेशात
राहणारेच,तेथील सेवेच्या निमित्त बनतात,म्हणून सेवेची संधी आहे.जसे शेवटी येऊन पुढे
जाण्याची संधी आहे,तसेच सेवेची संधी पण सहज मिळाली आहे म्हणून तक्रार करणार नाही
की,आम्ही तर शेवटी आलो आहोत.जसे शेवटी येऊन पुढे जाण्याची विशेष संधी आहे,तसेच
प्रत्येक सेवाधारी पण आहेत.सर्व सेवाधारी आहेत,की सेवाकेंद्रावरती राहणारेच सेवाधारी
आहेत.कुठे पण आहात,सेवे शिवाय चैन मिळू शकत नाही.सेवाच आरामाची निद्रा आहे.असे
म्हणतात आरामशीर झोपणे हेच जीवन आहे.सेवाच आरामशीर झोपणे आहे.सेवा नाही तर चैन
नाही.ऐकले ना सेवा फक्त वाणीची नाही,प्रत्येक सेकंद सेवा आहे.प्रत्येक संकल्पामध्ये
सेवा आहे.कोणी पण हे म्हणू शकत नाही की,मग ते भारतवासी असतील किंवा परदेशामध्ये
राहणारे असतील.कोणी ब्राह्मण हे म्हणू शकत नाहीत,की सेवेची संधी नाही.आजारी आहेत
तरीही,मनसा सेवा,वातावरण बनवण्याची सेवा,वातावरणामध्ये शांती पसरण्याची सेवा करू
शकतात.कोणत्याही प्रकारची सेवा करा परंतु सेवेमध्ये व्यस्त रहा.सेवाच जीवन
आहे.ब्राह्मणाचा अर्थच आहे सेवाधारी,अच्छा.
नेहमी उडत्या कलेद्वारे सर्वांच्या परिवर्तनाच्या स्थितीमध्ये स्थित राहणारे,नेहमी
स्वतःला फरिश्ता अनुभव करणारे,नेहमी विश्वाच्या पुढे इष्ट देव रूपांमध्ये प्रत्यक्ष
होणारे देव आत्मे,नेहमी स्वतःला विशेष आत्मा समजून दुसऱ्यांना पण,विशेषतेचा अनुभव
करवणारे,विशेष आत्म्यांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
पार्टीसोबत वार्तालाप:-
नेहमी स्वतःला कर्मयोगी अनुभव करतात ना. कर्मयोगी जीवन म्हणजे प्रत्येक कार्य करत
आठवणीच्या यात्रेमध्ये नेहमी राहणे.हेच श्रेष्ठ कार्य शिवपित्याची मुलंच करतात आणि
नेहमीच सफल होतात.तुम्ही सर्व कर्मयोगी आत्मे आहात ना. कर्मामध्ये राहताना नेहमी
अनासक्त आणि प्रेमळ राहणे याच अभ्यासामध्ये स्वतःला पुढे घेऊन जायचे आहे.स्वतःच्या
सोबतच विश्वाची जिम्मेवारी सर्वांचे वरती आहे परंतु हे सर्व स्थूल साधन आहेत.
कर्मयोगी जीवना द्वारे नेहमी पुढे जात रहा.हेच जीवन अती प्रिय जीवन आहे.सेवा पण
व्हावी आणि खुशी पण राहावी.दोन्ही सोबत-सोबत ठीक आहे ना.स्वर्णजयंती तर सर्वांची
आहे.सुवर्ण म्हणजे सतोप्रधान स्थितीमध्ये स्थित राहणारे.तर नेहमी आपल्या या श्रेष्ठ
स्थिती द्वारे प्रगती करत चला.सर्वांनी चांगल्या प्रकारे सेवा केली ना.सेवेची संधी
पण आत्ताच मिळते,परत ही संधी समाप्त होते.तर नेहमी सेवेमध्ये पुढे जात रहा.अच्छा.
वरदान:-
बाबांच्या
छत्रछायेच्या अनुभवाद्वारे विघ्नविनाशकची पदवी घेणारे अनुभवी मूर्त भव.
येथे बाबा सोबत
आहेत,तेथे कोणी काही करू शकत नाहीत.या सोबतीचा अनुभवच छत्रछाया बनते. बापदादा
मुलांची रक्षा नेहमीच करतात.तुम्हा लोकांना अनुभवी बनवण्यासाठी परिक्षा
येतात,म्हणून समजायला पाहिजे की ही परीक्षा पुढच्या वर्गांमध्ये घेऊन जात आहे.
यामुळे नेहमीसाठी विघ्नविनाशक ची पदवी आणि अनुभवी मूर्त बनण्याचे वरदान मिळेल.जरी
आत्ता कोणी थोडा गोंधळ करतात किंवा विघ्न आणतात, तरीही हळूहळू शितल बनतील.
सुविचार:-
जे वेळेवरती सहयोगी
बनतात,त्यांना एकाचे पदम पटीने फळ मिळते.