22-07-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
गोड
मुलांनो, तुम्ही फार उत्तम विद्यार्थी आहात, तुम्हाला बाबा, शिक्षक आणि सद्गुरुच्या
आठवणी मध्ये राहायचे आहे. अलोकिक सेवा करावयाची आहे."
प्रश्न:-
जे स्वतःला
बेहदचे अभिनय करणारे समजून चालत आहेत,त्यांची लक्षणे कोणती?
उत्तर:-
त्यांच्या बुद्धीमध्ये कोणत्या पण साकारी वा आकारी देहधारी ची आठवण राहणार नाही .ते
एका बाबाची आणि शांतीधाम घराची आठवण करत राहतील .कारण उपकार तर एकाचेच आहेत. जसे
बाबा साऱ्या दुनियेची सेवा करत आहेत, पतितांना पावन बनवत आहेत, तसे मुले पण बाबा
सारखी मदतगार बनतात.
ओम शांती।
प्रथम बाबा तुम्हा मुलांना सावधानी देत आहेत. इथे बसले तरी स्वतःला आत्मा समजून बाबा
समोर बसले आहात. हे पण बुद्धीमध्ये आणा की आम्ही बाबा समोर पण बसलो आहोत,
शिक्षकांसमोर पण बसलो आहोत, क्रमांक एक ची गोष्ट आहे ,आम्ही आत्मा आहोत. बाबा पण
आत्मा आहेत, शिक्षक पण आत्मा आहे.गुरु पण आत्मा आहे,एकच आहेत ना. ही नवीन गोष्ट
तुम्ही ऐकत आहात .तुम्ही म्हणता की, बाबा आम्ही तर कल्प कल्प हे ऐकत आलो आहोत .तर
बुद्धीमध्ये ही आठवण ठेवावी, बाबा शिकवत आहेत .आम्ही आत्मे या कर्मेंद्रिया द्वारे
ऐकत आहोत . हे ज्ञान यावेळी तुम्हा मुलांना मिळत आहे , उंच- ते उंच भगवाना द्वारे.
ते सर्व आत्म्याचे पिता आहेत. जे वरसा देत आहेत .काय ज्ञान देत आहेत ? सर्वांची
सद्गती करत आहेत,म्हणजे घरी घेऊन जात आहेत . किती जणांना घेऊन जातील ,हे सर्व तुम्ही
जाणत आहात.डासा सारखे सर्व आत्म्यांना जायचे आहे. सतयुगामध्ये एकच धर्म, पवित्रता,
सुख-शांती सर्व राहते, तुम्हा मुलांना चित्रावर समजणे फार सोपे आहे. मुले पण नकाशा
वर समजतात ना. हे इंग्लंड आहे ,अमुक आहे ,मग त्याची आठवण राहते .इथे पण तसेच आहे ,एका
एका विद्यार्थ्याला समजावयाचे आहे. माहिमा पण एकाचीच आहे, शिवाय नमः भगवान उंच ते
उंच आहे.रचयिता बाबा, घरातील मोठे आहेत ना. ते आहेत हद्दचे, हे आहेत सारे बेहद च्या
घराचे बाबा. ते मग शिक्षक पण आहेत, तुम्हाला शिकवत आहेत. तर तुम्हा मुलांना फार खुशी
झाली पाहिजे. तुम्ही विद्यार्थी पण उत्तम आहात. बाबा म्हणतात की, मी साधारण तना
मध्ये येतो. प्रजापिता ब्रह्मा पण जरुर इथेच पाहिजेत.. त्यांच्या शिवाय काम कसे
चालेल. आणि जरूर वयोवृद्ध पण पाहिजेत, कारण दत्तक आहेत ना .तर वयोवृद्ध पाहिजेत,
कृष्ण तर मुले मुले असे बोलू शकत नाहीत . म्हातार्यांना ते शोभते. मुलांना थोडेच
कोणी बाबा म्हणतील. तर मुलांच्या बुद्धी मध्ये आले पाहिजे की , आम्ही कोणा समोर बसलो
आहोत.मनात फार खुशी पण झाली पाहिजे .विद्यार्थी कुठे पण बसले असले, तरी त्यांच्या
बुद्धीमध्ये बाबाची आठवण येत राहते . शिक्षकाची पण आठवण येते. त्यांना तर बाबा
वेगळे,शिक्षक वेगळे असतात .तुम्हाला तर एकच, बाबा , शिक्षक, गुरु आहेत. हे बाबा पण
विद्यार्थी आहेत ना. शिक्षण घेत आहेत .फक्त भाड्याने शरीर दिले आहे. आणखीन कोणता
फरक नाही. बाकी तुमच्या सारखेच आहेत. यांची आत्मा पण असे समजते, जसे तुम्ही समजत
आहात. उपकार आहेतच एकाचे, त्यांनाच प्रभू, ईश्वर म्हटले जाते .हे पण म्हणतात की ,
स्वतःला आत्मा समजून ,एका परमात्म्याची आठवण करा. बाकी इतर आकार साकार देहधारी ना
विसरून जावा. तुम्ही शांतीधाम मध्ये राहणारे आहात .तुम्ही आहातच बेहद्दची भूमिका
करणारे .या गोष्टी तर कोणी जाणत नाही. जगा मधील कोणाला पण हे माहीत नाही .इथे जे
येतात ते समजतात .आणि बाबा च्या सेवेमध्ये मध्ये लागतात. ईश्वरीय मदतगार आहेत ना .बाबा
पण आले आहेत सेवा करण्यासाठी .पतिता पासून पावन बनविण्याची सेवा करत आहेत . राज्य
गेल्या नंतर मग जेव्हा दुखी होतात, तर मग बाबाला बोलतात .ज्यांनी राज्य दिले आहे ,
त्यांनाच बोलतात.
तुम्ही मुले जाणता की, बाबा सुखधाम चे मालक बनवण्यासाठी आले आहेत. दुनिये मध्ये हे
कोणाला पण माहित नाही. आहेत तर सारे भारतवासी,एका धर्माचेच,हा आहेच मुख्य धर्म .तो
धर्म जेव्हा नसतो, तेव्हा तर बाबा येऊन स्थापन करतात. मुले समजतात की ,परमेश्वर
ज्याला सारी दुनिया अल्लाह, गॉड, म्हणून बोलावत आहेत . ते इथे विश्वनाटका नुसार
कल्पा पूर्वीप्रमाणे आले आहेत . हा आहे गीतेचा अध्याय. ज्यामध्ये बाबा येऊन स्थापना
करत आहेत. गायन पण केले जाते की, ब्राह्मण आणि देवी-देवता,. . .क्षत्रिय म्हणत
नाहीत. ब्राह्मण देवी देवताय नमः म्हणतात . कारण क्षत्रिय बनतात तर मग २ कला कमी
होऊन जातात. स्वर्ग म्हटले जाते नवीन दुनियेला. त्रेताला नवीन दुनिया म्हणत नाहीत .पहिल्या
प्रथम सत्ययुग आहे ,एकदम नवी दुनिया. ही आहे जुनी ते जुनी दुनिया . मग नवीन त्या
नवीन दुनिये मध्ये जातात .आम्ही आता त्या दुनिये मध्ये जात आहे. त्यामुळे तर मुले
म्हणतात, आम्ही नरापासून नारायण बनतो. कथा पण आम्ही सत्यनारायणाची ऐकत आहोत.
राजकुमार बनण्याची कथा म्हणत नाहीत. सत्यनारायणाची कथा आहे, ते नारायणाला वेगळे
समजत आहेत. परंतु नारायणाच्या जीवना ची गोष्ट नाही . ज्ञानाच्या गोष्टी तर फार आहेत
ना .त्यामुळे ७ दिवस दिले जातात . ७ दिवस भट्टीमध्ये राहिले पाहिजेत ,परंतु असे पण
नाही की, इथे भट्टीमध्ये येवून राहायचे आहे. असे तर मग भट्टीचा बहाना करून अनेक जण
येतील. अभ्यास सकाळी आणि संध्याकाळी चांगला होतो. दुपारचे वातावरण चांगले नसते,
रात्रीची पण १० ते १२ पर्यंत ची वेळ वाईट आहे. इथे तुम्हा मुलांना पण आठवणीची मेहनत
करायची आहे, सतोप्रधान बनायचे आहे.तिथे तर सारा दिवस कामधंदा राहतो. असे पण फार
आहेत ,ते धंदा दोरी करताना पण, शिक्षण घेतात ,जास्त चांगली नोकरी मिळण्यासाठी. इथे
तुम्ही शिकता, तर शिक्षकांची पण आठवण केली पाहिजे ,जे शिकवीत आहेत . बरं, शिक्षक
समजून पण आठवण करा ,तरीपण तिघांची एकत्रित आठवण येईल, बाबा, शिक्षक, गुरु.
तुमच्यासाठी फार सोपे आहे, तर झटक्यात आठवण आली पाहिजे. हे आमचे बाबा पण आहेत ,
शिक्षक आणि गुरु पण आहेत . उंच ते उंच बाबा आहेत ,त्यांच्याकडून आम्हाला स्वर्गाचा
वारसा मिळत आहे. आम्ही स्वर्गामध्ये जरूर जाऊ. स्वर्गाची स्थापना जरूर होणार आहे,
तुम्ही पुरुषार्थ फक्त करता, उंच पद प्राप्त करण्यासाठी. हे पण तुम्ही जाणत आहात.
मनुष्या ना हे पण माहीत नाही, तुमचा आवाज पसरत राहील. तुम्हा ब्राह्मणांचा अलौकिक
धर्म आहे, श्रीमतावर अलौकिक सेवेमध्ये मध्ये तत्पर राहणे. हे पण मनुष्याला माहित
पडेल की, तुम्ही श्रीमता वर किती उंच काम करत आहात. तुमच्या सारखी अलौकिक सेवा कोणी
करू शकत नाही. तुम्ही ब्राह्मण धर्मवाले च असे कर्म करत आहात. तर अशा कर्मा मध्ये
लागले पाहिजे. यामध्येच व्यस्त राहिले पाहिजे, बाबा पण व्यस्त राहत आहेत ना. तुम्ही
राजधानी स्थापन करत आहात. ते तर पंचायत मिळून, फक्त पालन करीत आहेत. इथे तुम्ही
गुप्त वेशांमध्ये कार्य करत आहात. तुम्ही आहातच गुप्त. ना ओळखले जाणारे सैनिक ,अहिंसक.
याचा अर्थ पण कोणी समजत नाहीत. तुम्ही आहात डबल अहिंसक, मोठी हिंसा तर विकाराचीआहे
,जी पतित बनवत आहे . त्याच्या वरच विजय प्राप्त करायचा आहे. भगवानुवाच काम महाशत्रू
आहे. यावर विजय प्राप्त केल्यानच तुम्ही जगतजीत बनता , हे लक्ष्मी नारायण जगतजीत
आहेत ना. भारत जगतजीत होता .हे विश्वाचे मालक कसे बनले, हे पण बाहेरचे समजू शकत
नाहीत.हे समजण्यासाठी फार मोठी विशाल बुद्धी पाहिजे. मोठ्या परीक्षे साठी मनुष्यांची
विशाल बुद्धी असते ना . तुम्ही श्रीमता वर आपले राज्य स्थापन करत आहात .तुम्ही
कोणाला पण समजावू शकता की, विश्वामध्ये शांती होती ना .दूसरे कोणते राज्य नव्हते.
स्वर्गामध्ये अशांती नव्हती. स्वर्गाला म्हटले जाते, अल्लाहाची बाग ,फक्त बाग थोडीच
असते .मनुष्य पण पाहिजेत ना .आता तुम्ही मुले जाणता की, आम्ही स्वर्गाचे मालक बनत
आहोत. तुम्हा मुलांना किती नशा राहिला पाहिजे .आणि उंच विचारात राहिले पाहिजे .
तुम्ही बाहेरच्या कोणत्या पण सुखाची इच्छा ठेवत नाहीत. यावेळी तुम्हाला फारच साधे
राहायचे आहे.आता तुम्ही सासर घरी जात आहात, हे आहे माहेरघर. इथे तुम्हाला दोन पिता
मिळाले आहेत, एक निराकार उंच ते उंच ,दुसरे मग साकारी . आता तुम्ही सासर घरी म्हणजे
विष्णुपुरी ला जात आहात .त्याला कृष्णपुरी म्हणत नाहीत. मुलाची पुरी म्हनत नाहीत.
विष्णुपुरी म्हणजे लक्ष्मी नारायणाची पुरी. तुमचा आहे राजयोग. तर जरूर नरा पासून
नारायण बनतील.
तुम्ही मुले खरेखुरे परमेश्वराचे मदतगार आहात. खरे परमेश्वराचे मदतगार त्यांना
म्हणतात ,जे कमीत कमी आठ तास आत्माभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करतात. कोणते
कर्मबंधन नसेल, तर मदतगार बनू शकतात. आणि कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात.
नरापासून नारायण बनायचे आहे, तर कर्मातीत अवस्था जरूर पाहिजे. कर्मबंधन असेल तर
शिक्षा खावी लागेल , मुले स्वतः समजतात की, आठवणी ची मेहनत फार कठीण आहे . युक्ती
फार सोपी आहे, फक्त बाबांची आठवण करायची आहे . भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे.
योगासाठी हे ज्ञान आहे. बाबा येऊन शिकवत आहेत . कृष्ण काही योग थोडाच शिकवतात.
कृष्णाला मग सुदर्शनचक्र दिले आहे, हे पण चित्र किती चुकीचे आहे. आता तुम्हाला
कोणत्या चित्र इत्यादीची, आठवण करायची नाही. सर्व काही विसरून जा .कोणामध्ये बुद्धी
गेली नाही पाहिजे, बुद्धीची लाईन स्पष्ट पाहिजे . अभ्यासाची वेळ आहे.दुनियेला
विसरून ,स्वतःला आत्मा समजा आणि बाबाची आठवण करा, तरच पाप नाहीशे होईल. बाबा
म्हणतात पहिल्या प्रथम तुम्ही अशरीरी आले होता, आता तुम्हाला जायचे आहे. तुम्ही
सर्वांगीण भुमिका करणारे आहात. ते आहेत हद्दचे अभिनेते तुम्ही आहात बेहद्दचे. तुम्ही
समजता की आम्ही अनेक वेळा, भूमिका बजावली आहे .अनेक वेळा तुम्ही बेहदचे मालक बनले
आहात. या बेहद च्या नाटकामध्ये ,मग लहान लहान, नाटक पण अनेक वेळा चालत आले आहेत .
केव्हा पासून केव्हा पर्यंत . सतयुगापासून कलियुगा पर्यंत ,जे काही झाले आहे ,
त्याची पुनरावृत्ती होत आहे. सुरुवाती पासून शेवटपर्यंत तुमच्या बुद्धी मध्ये आहे .
मूळवतन , सूक्ष्म वतन आणि सुष्टीचे चक्र .बस ,आणखीन कोणत्या गोष्टीचे तुमचे काम नाही.
तुमचा धर्म फार सुख देणार आहे. जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा तो येईल . नंबर जसे
आले आहेत, तसेच मग जातील. इतर धर्माचे काय करावे .तुम्हाला फक्त, एका बाबाच्या
आठवणीत राहीले पाहिजे. चित्र इत्यादी सर्व विसरून एका बाबाची आठवण करायचे आहे.
ब्रह्मा, विष्णू ,शंकर ची पण नाही, फक्त एकाचीच. ते समजतात, परमात्मा लिंग आहे. आता
लिंगा सारखी कोणती वस्तू असत नाही. ते मग ज्ञान कसे सांगतील. काय प्रेरणेने ?कोण
लाऊडस्पीकर ठेवतील, ते तुम्ही ऐकाल . प्रेरणेपासून तर काही होत नाही. असे नाही की
शंकर प्रेरणा देत आहेत हे सर्व विश्व नाटकांमध्ये पहिल्यापासून नोंदलेले आहे, विनाश
तर होणारच आहे. जसे तुम्ही आत्मे शरीराद्वारे बोलतात, तसे परमात्मा पण तुम्हा
मुलांशी बोलत आहेत,त्याची भूमिकाच दिव्य अलौकिक आहे. पतिता पासून पावन बनवणारे एकच
बाबा आहेत. ते म्हणतात की माझी भूमिका सर्वापासून वेगळी आहे. कल्पा पूर्वी जे आले
होते ते येत राहतील, जे काय होऊन गेले ते विश्वैक नाटका नुसार झाले,त्यामध्ये थोडा
पण फरक पडत नाही. पुरुषार्थाची काळजी केली पाहिजे. असे नाही की नाटका नुसार माझा कमी
पुरुषात चालत आहे. मग तर पद फारच कमी मिळेल. पुरुषार्थाला तीव्र केले
पाहिजे.विश्वैक नाटकावर सोडून देऊ नये. स्वतःलाच पाहत रहा. पुरुषार्थ वाढवत
राहा.चार्ट ठेवा, माझा पुरुषार्थ वाढत आहे का?कमी तर होत नाही ना. फार काळजी घेतली
पाहिजे. इथे तुम्हाला ब्राह्मणांची संगत आहे. बाहेर सर्वांचा कुसंग आहे. ते सर्व
उल्टेच ऐकवतात.आता बाबा तुम्हाला कुसंगापासून बाहेर काढत आहेत.
मनुष्यांनी कुसंगांमध्ये येऊन स्वतःचे राहणे, वागणे,स्वतःची वेशभुषा इत्यादी सर्व
बदलून टाकले आहे.देश वेश पण बदलला आहे. हे पण जसे की आपल्या धर्माचा अपमान केला आहे.
पहा कसे-कसे केसांचा श्रुंगार इ.करतात.१००-१५०रु. केसांचा श्रुंगार करण्यासाठी
देतात. याला अती देहअभिमान म्हणतात. ते कधी ज्ञान घेऊ शकत नाहीत. बाबा म्हणतात,
तुम्हाला फारच साधे राहायचे आहे.महागडी साडी घातली तरीपण अभिमान येतो. देह अभिमान
तोडण्यासाठी सर्व साधारण घातले पाहिजे. चांगली वस्तू देह अभिमाना मध्ये आणते. तुम्ही
यावेळी वनवासा मध्ये आहात. प्रत्येक वस्तू मधून मोह काढला पाहिजे. फार साधारण
राहायचे आहे. लग्नात इत्यादी ठिकाणी गेला तर, रंगीत कपडे इत्यादी घालून जावा,
व्यवहार करण्यासाठी, मग घरी आल्यावर काढून टाका. तुम्हाला तर वाणी पासून पण दूर
जायचे आहे. वानप्रस्थी पांढऱ्या पोषाखा मध्ये राहतात.तुम्हा एक-एकाची, लहान- मोठ्या
सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. लहान मुलांना पण शिवबाबा ची आठवण द्यावयाची आहे.
त्यामध्ये त्यांचे कल्याण आहे. बस, आम्हाला आता शिव बाबा जवळ जायचे आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात- पिता बापदादाची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) नेहमी
लक्षात ठेवा की,आमचे कोणते पण वागणे देह अभिमानी नसले पाहिजे. फार साधे राहायचे आहे.
कोणत्या पण वस्तू मध्ये ममत्व ठेवायचे नाही. कुसंगापासून स्वतःचा सांभाळ करायचा आहे.
(२) आठवणीची मेहनत करून सर्व कर्म बंधनापासून मुक्त होऊन कर्मातीत बनायचे आहे. कमीत
कमी आठ तास आत्म अभिमानी बनून खरेखुरे परमेश्वराचे मदतगार बनायचे आहे.
वरदान:-
नेहमी बेहद्द
अवस्थेमध्ये स्थित राहणारे बंधनमुक्त जीवन मुक्त भव.
देह अभिमान मर्यादीत
स्थिती आहे आणि आत्म अभिमानी बनणे, ही आहे अमर्यादित स्थिती.देह भानात आल्याने अनेक
कर्माच्या बंधनांमध्ये मध्ये यावे लागते, परंतु जेव्हा आत्मा देही अभिमानी बनतो, तर
ही सर्व बंधने नाहीशी होतात. असे म्हटले जाते बंधनमुक्त जीवनमुक्त आहेत. असे जे
बेहदच्या स्थितीमध्ये स्थिर राहतात,ते दुनियेतील वातावरण, तमोगुणी वृत्ती, मायेचा
आघात, या सर्व गोष्टीपासून मुक्त होतात. यालाच म्हटले जाते जीवनमुक्त स्थिती.त्याचा
अनुभव संगम युगावरच करायचा आहे.
बोधवाक्य:-
निश्चय
बुद्धीची लक्षणं आहेत, निश्चित विजयी आणि निश्चिंत, त्यांच्याजवळ व्यर्थयेऊ शकत नाही.