26-07-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
27.02.86 ओम शान्ति
मधुबन
आत्मिक सेना
कल्प-कल्पची विजयी
सर्व आत्मिक शक्ती
सेना,पांडव सेना,आत्मिक सेना सदैव विजयाच्या निश्चय आणि नशे मध्ये राहता ना,दुसरी
कोणतीही सेना जेव्हा युद्ध करते तेंव्हा विजयाचा भरोसा नसतो.निश्चय नसतो की विजय
निश्चित होणारच आहे.परंतु तुम्ही आत्मिक सेना,शक्ती सेना सदैव या निश्चयाच्या मध्ये
राहता की,न फक्त आत्ताचे विजयी आहोत परंतु कल्पा-कल्पा चे विजयी आहोत. आपल्या कल्पा
पूर्वीच्या विजयाच्या कथा भक्ती मार्गामध्ये ऐकत आहेत.पांडवांच्या विजयाच्या
स्मृतीची कथा आताही ऐकत आहेत.आपल्या विजयाचे चित्र आताही पहात आहात. भक्तीमध्ये
फक्त अहिंसक च्या ऐवजी हिंसक दाखवले आहे.आत्मिक सेनेला शारीरिक साधारण सेना दाखवले
आहे.आपल्या विजयाचे गायन आताही भक्तां द्वारे ऐकून हर्षित होत आहात.गायनही आहे प्रभू
प्रीत बुद्धी विजयंती.विपरीत बुद्धि विनशंती.तर कल्पा पूर्वीचे तुमचे गायन किती
प्रसिद्ध आहे!विजय निश्चित असल्या कारणाने निश्चय बुद्धी विजयी आहात, म्हणून माळेला
ही विजय माळा म्हटले आहे.तर निश्चय आणि नशा दोन्ही आहे ना.जर कुणी विचारले
तर,निश्चयाने म्हणाल विजय तर होणारच आहे.स्वप्नामध्ये ही, हा संकल्प येऊ शकत नाही
की माहित नाही विजय होईल किंवा नाही,होणारच आहे. पाठीमागचे कल्प आणि भविष्याला ही
जाणत आहात.त्रिकालदर्शी बनून त्याच नशेने म्हणत आहात. सर्वजण पक्के आहात ना!जर कोणी
म्हणाले की विचार करुन पहा,तर काय म्हणणार?अनेक वेळा पाहिले आहे.कोणती नवीन गोष्ट
असेल तर विचार करू, आणि पाहू.ही तर अनेक वेळेची गोष्ट आता पुन्हा करत आहोत. तर असे
निश्चय बुद्धि ज्ञानी तू आत्मे योगी तू आत्मे आहात ना!
आज आफ्रिकेच्या ग्रुप चा नंबर आहे.असे तर सर्वजण आता मधुबन निवासी आहात. कायमस्वरूपी
चा पत्ता तर मधुबन आहे ना.ते तर सेवास्थान आहे. सेवास्थान झाले ऑफीस, परंतु घर तर
मधुबन आहे ना. सेवा करण्यासाठी आफ्रिका, यू. के.इ. चारी बाजूला गेले आहात. जरी धर्म
बदलला असेल,किंवा देश बदलला असेल परंतु सेवेसाठी गेले आहात.कोणते घर आठवते? मधुबन
की परमधाम. सेवास्थानावर सेवा करत असतानाही सदैव मधुबन आणि मुरलीच आठवते ना!
आफ्रिकेमध्ये सेवा करण्यासाठी गेले आहात ना. सेवेने ज्ञानगंगा बनवले.ज्ञानगंगा मध्ये
ज्ञान स्नान करुन आज किती जण पावन बनले!मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करताना
पाहून बापदादा विचार करतात की कशा-कशा ठिकाणी सेवेसाठी निर्भय बनून खूप लगन नी
राहिले आहेत.आफ्रिकन लोकांचे राहणीमान, त्यांचा आहार व्यवहार कसा आहे,तरीही ही सेवा
करण्यासाठी राहिले आहेत. सेवेचे बळ मिळत राहते.सेवेचे प्रत्यक्ष फळ मिळते,तेच बळ
निर्भय बनवते.कधी घाबरत तर नाही ना,आणि खास निमंत्रण पहिल्यांदा इथून भेटले. विदेश
सेवेचे निमंत्रण मिळाल्यामुळे अशा-अशा देशांमध्ये पोहोचले.निमंत्रणाच्या सेवेचा पाया
इथूनच सुरू झाला. सेवेच्या उमंग उत्साहाचे प्रत्यक्ष फळ मुलांनी इथूनच दाखविले.
कमाल त्या एक निमित्त बनवणाऱ्याची आहे जे किती सुंदर सुंदर लपलेले रत्न बाहेर
आले.आता तर खूप वृध्दी झाली आहे.तो लपला आणि तुम्ही प्रत्यक्ष झाले.निमंत्रणामुळे
प्रथम नंबर आला.तर आफ्रिका वाल्यांना बापदादा आफरीन (संधीचा फायदा) घेणारे आहेत असे
म्हणतात.आफरीन घेण्याचे स्थान आहे की, वातावरण अशुद्ध आहे.अशुद्ध वातावरणामध्ये वाढ
होत आहे. म्हणूनच आफरीन म्हणतात.
शक्ती सेना आणि पांडव सेना दोन्हीही शक्तिशाली आहेत, जास्तीत जास्त भारतीय आहेत.
परंतु भारतापासून दूर गेलेत,दूर असले तरीही आपला हक्क तर सोडू शकत नाही.तिथेही
बाबांचा परिचय मिळाला.बाबांचे बनले. नैरोबी मधे मेहनत लागली नाही. दूर गेलेले सहजच
पोहोचले आणि गुजरातींचे हे विशेष संस्कार आहेत.ज्याप्रमाणे त्यांची ही रीत आहे-
सर्वजण मिळून गरबा रास करतात.एकटे करत नाहीत. छोटा असो किंवा मोठा असो,सर्वजण मिळून
गरबा डान्स जरूर करतात. ही संगठनाची निशाणी आहे. सेवेमध्ये पाहिले आहे,गुजराती
संगठन वाले असतात. एक आला तर 10 जणांना घेऊन येतो. ही संगठना ची पद्धत
त्यांच्यामध्ये चांगली आहे, म्हणूनच लवकर वाढ होते. सेवेची वाढ आणि विस्तारही होत
आहे.अशा-अशा ठिकाणी शांती ची शक्ती देणे,भीतीच्या बदल्यात खुशी देणे हीच श्रेष्ठ
सेवा आहे. अशा स्थानांवर आवश्यकता आहे.विश्व कल्याणकारी आहात तर विश्वाच्या चारही
बाजूंनी सेवा वाढवायची आहे,आणि निमित्त बनायचेच आहे.कोणताही कोपरा जर राहिला तर
तक्रार जरूर करतील.चांगले आहे हिम्मत मुलांची मदत बाबांची.सहयोगी ही तिथूनच निघतात
आणि सेवा ही करत आहेत. हाही सहयोग झाला ना.स्वतः खूप चांगल जागे झाले आहात, परंतु
जागे होऊन जागे करण्याच्या निमित्त बनणे,हा डबल फायदा झाला.जास्त करून सेवाधारी ही
तिथलेच आहेत.ही विशेषता चांगली आहे.विदेश सेवेमध्ये जास्तीत जास्त तिथूनच निघून,
तिथेच सेवा करण्यासाठी निमित्त बनतात. विदेश ने भारताला सेवाधारी दिले नाहीत.
भारताने विदेशला दिले आहेत. भारत ही खूप मोठा आहे. वेगळे-वेगळे झोन आहेत.स्वर्ग तर
भारतालाच बनवायचे आहे. विदेश तर पर्यटन स्थळ बनणार आहेत.तर सर्वजण तयार आहात ना.आज
कुणाला कुठे पाठवले तर तयार आहात ना! जर हिम्मत ठेवली तर मदतही मिळते.तयार तर जरूर
राहायला पाहिजे. आणि जेंव्हा वेळ अशी येईल तेंव्हा ऑर्डर करावीच लागेल. बाबांच्या
द्वारे ऑर्डर मिळणारच आहे.केंव्हा करणार,ती तारीख सांगणार नाही. तारीख सांगितली तर
सगळेच जण एक नंबरनी पास होतील. इथे तारखेचा ही अचानक एक प्रश्न येईल!तयार आहात
ना.इथेच राहा असे सांगितले तर मुले-बाळे इ. आठवणीत येतील? सुखाचे साधन तर तिथे आहेत
परंतु स्वर्ग तर इथेच बनणार आहे.तर सदैव तयार राहणे ही आहे ब्राह्मण जीवनाची
विशेषता.आपल्या बुद्धीची लाईन स्पष्ट असावी.सेवा करण्यासाठी निमित्तमात्र स्थान
बाबांनी दिले आहे. तर निमित्त बनून सेवेमध्ये उपस्थित आहात. नंतर बाबांचा इशारा
मिळाल्यावर काहीच विचार करण्याची गरज नाही.सूचनेप्रमाणे सेवा चांगल्या प्रकारे करत
आहात,म्हणून न्यारे आणि बाबांचे प्यारे आहात. आफ्रिकेने ही वाढ चांगली केली आहे.
वी.आई.पी. ची सेवा चांगली होत आहे. शासनाचेही संबंध चांगले आहेत.ही विशेषता आहे की
सर्व प्रकारच्या वर्गातल्या आत्म्यांचा संपर्क कोणत्या ना कोणत्या वेळी जवळ घेऊन
येत आहे.आज संपर्क वाले उद्या संबंध वाले होतील.त्यांना जागे करत राहिले
पाहिजे.नाहीतर थोडे डोळे उघडून नंतर झोपतात. कुंभकरण तर आहेतच. झोपेचा नशा असेल तर
काहीही खाल्ले पिले तरी विसरून जातात. कुंभकर्ण ही असे आहेत. म्हणतात हो नंतर
येऊ,असे करू परंतु विचारले तर म्हणतात विसरून गेलो,म्हणून सतत जागे करावे
लागते.गुजरातीनी बाबांचे बनवण्यामध्ये तन-मन-धनाने स्वतःला सेवेमध्ये लावण्यामध्ये
क्रंमांक चांगला घेतला आहे.सहजच सहयोगी बनतात. हेसुद्धा भाग्य आहे.संख्या गुजरातींची
चांगली आहे.बाबांचे बनण्याची लॉटरी काही कमी नाही.
प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी बाबांपासून दुरावलेले रत्न आहेत. जिथे पण पाऊल ठेवता
कोणी ना कोणी तरी निघते.बेपर्वा,निर्भय बनून सेवेमध्ये लगनने पुढे गेलात तर पदम गुणा
मदत मिळत राहते.खास निमंत्रण तर तरीही इथूनच सुरू झाले.तरीही सेवा जमा तर झाली ना.
ते जमेचे खाते वेळेवर जरूर खेचून आणेल. तर सर्वजण क्रमांक एक, तीव्र पुरुषार्थी,
संधी घेणारे आहात ना.संधी आणि संधी घेतच राहायचे आहे.सर्वांची हिम्मत पाहून बापदादा
खुश होतात.अनेक आत्म्यांना बाबांचा आधार देण्याचे निमित्त बनले आहात. चांगले
संपूर्ण परिवार आहेत. परिवाराला बाबा फुलांचा गुच्छ म्हणतात. हीसुद्धा विशेषता
चांगली आहे.तसे तर सर्व ब्राह्मणांचे स्थान आहेत.जर कुणी नैरोबी ला गेले किंवा
कुठेही गेले तर म्हणतील आमचे सेंटर, बाबांचे सेंटर आहे.आमचा परिवार आहे.तर किती
भाग्यवान आहात! बापदादा प्रत्येक रत्नाला पाहून खुष होतात.कोणत्याही ठिकाणी राहणारे
आहेत परंतु बाबांचे आहेत आणि बाबा मुलांचे आहेत,म्हणूनच ब्राह्मण आत्मा अतिप्रिय
आहे.विशेष आहे.एक दुसऱ्यापेक्षा जास्त चांगले वाटतात. अच्छा.
आता आत्मिक
व्यक्तिमत्त्वा द्वारे सेवा करा (अव्यक्त निवडलेले महावाक्य)
1)- तुम्हा ब्राह्मणा सारखे व्यक्तिमत्व संपूर्ण कल्पामध्ये दुसऱ्या कोणाचे नाही
कारण की तुम्हां सर्वांचे व्यक्तिमत्व बनवणारा श्रेष्ठ ते श्रेष्ठ स्वयम् परमात्मा
आहे.तुमचे सर्वात मोठ्यात मोठ्यात मोठे व्यक्तिमत्व आहे - स्वप्न किंवा संकल्पा
मध्येही संपूर्ण पवित्रता. या पवित्रते सोबत चेहरा आणि वागण्यामध्ये आत्मिकतेचे
व्यक्तिमत्त्व आहे-आपल्या या व्यक्तिमत्त्वामध्ये सदैव स्थित राहा तर सेवा स्वतः
होईल.कोणी कशीही त्रासलेली,अशांत आत्मा असेल तुमच्या आत्मिक व्यक्तिमत्त्वाची
झलक,प्रसन्नतेची नजर त्यांना प्रसन्न करेल.दृष्टीने भरपूर होतील.आता वेळ जवळ येत आहे
त्यानुसार दृष्टीने भरपूर करण्याच्या सेवेची वेळ आहे. तुमच्या एका नजरेने ते
प्रसन्नचित्त होतील,मनातील आशा पूर्ण होतील.
ज्याप्रमाणे ब्रह्मा बाबांच्या चेहऱ्यामध्ये किंवा वागण्यामध्ये जे व्यक्तिमत्त्व
होते त्यामुळे सर्व आकर्षित झाले,अशाप्रकारे बाबांचे अनुकरण करा.सर्व प्राप्तीची
लिस्ट(सूची)बुद्धीमध्ये ठेवा तर चेहरा आणि वागण्यामध्ये प्रसन्नतेचे व्यक्तिमत्व
दिसेल आणि हे व्यक्तिमत्व प्रत्येकाला आकर्षित करेल. आत्मिक व्यक्तीमत्वा द्वारे
सेवा करण्यासाठी आपली अवस्था सदैव हर्षित आणि काळजीपूर्वक असायला हवी.अवस्था बदलायला
नको.कारण काहीही असेल,त्याचे निवारण करा. सदैव प्रसन्नतेच्या व्यक्तिमत्त्वामध्ये
राहा. प्रसन्नचित्त राहिल्याने खूप चांगले अनुभव कराल. प्रसन्नचित्त आत्म्याच्या
सोबत राहणे, त्यांच्याशी बोलणे,बसणे सर्वांना आवडते.तर लक्ष ठेवा प्रश्नचित्त नाही,
प्रसन्नचित्त राहायचे आहे.
तुम्ही मुले बाह्य रूपामध्ये भले साधारण व्यक्तिमत्वाचे आहात परंतु आत्मिक
व्यक्तिमत्त्वा मध्ये सर्वात क्रमांक एक आहात. तुमच्या चेहऱ्यावर,वागण्यामध्ये
पवित्रतेचे व्यक्तिमत्व आहे.जेवढा-जेवढा जो पवित्र आहे तेवढे त्याचे व्यक्तिमत्व न
फक्त दिसून येते परंतु अनुभव होतो आणि ते व्यक्तिमत्त्वच सेवा करत असते. जो उच्च
व्यक्तिमत्वाचा असतो त्याचे कुठेही ही, कशामध्ये ही लक्ष जात नाही कारण तो सर्व
प्राप्तीनीं संपन्न असतो. ते कधीही आपल्या प्राप्तीच्या भंडाऱ्या मध्ये कोणती
अप्राप्ती अनुभव करत नाहीत. ते सदैव मनाने भरपुर असल्या कारणाने संतुष्ट राहतात, अशी
संतुष्ट आत्माच इतरांना संतुष्ट करू शकते.
जेवढी पवित्रता आहे, तेवढे ब्राह्मण जीवनाचे व्यक्तिमत्व आहे, जर पवित्रता कमी,तर
व्यक्तिमत्वही कमी. हे पवित्रतेचे व्यक्तिमत्व सेवेमध्ये सहज सफलता मिळवून
देते.परंतु जर एक विकारही अंश-मात्र असेल तर दुसरे सोबती ही त्याच्यासोबत जरूर
असतील.ज्याप्रमाणे पवित्रतेचा सुख शांतीशी घनिष्ठ संबंध आहे,अशाप्रकारे अपवित्रते
चाही पाच विकारांशी घनिष्ठ संबंध आहे म्हणून कोणत्याही विकाराचा अंशही राहायला नको
तेव्हां म्हटले जाईल पवित्रतेच्या व्यक्तीमत्वा द्वारे सेवा करणारे.
आज-काल दोन प्रकारच्या व्यक्तिमत्वाचे गायन आहे- एक शारीरिक व्यक्तिमत्व,दुसरे पद
प्रतिष्ठेचे व्यक्तिमत्व. ब्राम्हण जीवनामध्ये ज्या ब्राम्हण आत्म्यामध्ये
संतुष्टतेची महानता आहे-त्यांच्या चेहऱ्यामध्ये ही संतुष्टता आणि श्रेष्ठ स्थितीच्या
अवस्थेचे व्यक्तिमत्व दिसून येते. ज्यांच्या डोळ्यांमध्ये,चेहऱ्यामध्ये,
वागण्यामध्ये संतुष्टतेचे व्यक्तिमत्त्व दिसून येते तेच तपस्वी आहेत.त्यांचे चित्त
सदैव प्रसन्न असेल, मन-बुद्धी आराममध्ये, सुख-चैन च्या स्थितीमध्ये असेल, कधीही
बेचैन होणार नाही. प्रत्येक शब्द आणि कर्मा द्वारे दृष्टी आणि वृत्ती द्वारे
व्यक्तिमत्व आणि श्रेष्ठतेचा अनुभव करवतील.
विशेष आत्म्यांना किंवा महान आत्म्यांना देशाचे किंवा विश्वाचे व्यक्तिमत्त्व असे
म्हटले जाते. पवित्रतेचे व्यक्तिमत्व अर्थात प्रत्येक कर्मामध्ये महानता आणि
विशेषता.आत्मिक व्यक्तिमत्व वाले आत्मे आपली शक्ती, वेळ, संकल्प वाया घालवत नाहीत,
सफल करतात.अशा व्यक्तिमत्त्व वाले कधीही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपले मन बुद्धी
व्यस्त ठेवत नाहीत.आत्मिक व्यक्तिमत्व वाल्या विशेष आत्म्यांची दृष्टी,वृत्ती,बोल...
सर्वांमध्ये अलौकिकता असेल, साधारणता नसेल. साधारण कार्य करत असताना ही शक्तिशाली
कर्मयोगी स्थितीचा अनुभव करवतील. ज्याप्रमाणे ब्रह्मा बाबांना पाहिले- मुलांसोबत
भाजीही कापत असतील,खेळत असतील परंतु व्यक्तिमत्त्व सदैव आकर्षित करत राहिले.तर
बाबांचे अनुकरण करा.
ब्राह्मण जीवनाचे व्यक्तिमत्व 'प्रसन्नता' आहे या व्यक्तिमत्वाला अनुभवामध्ये आणा
आणि इतरांनाही अनुभवी बनवा.सदैव शुभचिंतनानीं संपन्न रहा, शुभचिंतक बनुन सर्वांना
स्नेही, सहयोगी बनवा.शुभचिंतक आत्माच सदैव प्रसन्नतेच्या व्यक्तिमत्त्वामध्ये राहून
विश्वा समोर विशेष व्यक्तिमत्त्व वाले बनू शकतात.आज-काल व्यक्तिमत्व वाले आत्मे
फक्त ठराविकच बनतात अर्थात त्यांचे नाव प्रसिद्धीस येते परंतु तुम्ही आत्मिक
व्यक्तिमत्त्व वाले फक्त ठराविक अर्थात गायन योग्य नाही परंतु गायन योग्य सोबत
पूजनीय योग्यही बनता. कितीही मोठ्या धर्म-क्षेत्रामध्ये,राज्य क्षेत्रामध्ये,
विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये व्यक्तिमत्त्व वाले प्रसिद्ध झाले आहेत परंतु तुम्हां
आत्मिक व्यक्तीमत्वा सारखे ६३ जन्म पूजनीय बनले नाही.
वरदान:-
एकत्रीत
स्वरूपाच्या स्मृति द्वारे श्रेष्ठ स्थितीच्या आसनावर स्थित राहणारे सदैव संपन्न भव
संगम युगावर शिवशक्ती
च्या एकत्रीत स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहिल्याने प्रत्येक अशक्य कार्य शक्य होऊन
जाते.हेच श्रेष्ठ स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये स्थित राहिल्याने संपन्न भवचे वरदान
मिळून जाते.बापदादा सर्व मुलांना सदैव सुखद स्थिती चे आसन देतात.सदैव या आसनावर
स्थित रहा तर अतींद्रिय सुखाच्या झोक्या मध्ये झोके घेत राहाल, फक्त विस्मृती चे
संस्कार समाप्त करा.
सुविचार:-
शक्तिशाली वृत्ती
द्वारे आत्म्यांना योग्य आणि योगी बनवा.