27-07-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो , स्वतःवर स्वतःच दया करा, बाबा जे श्रीमत देतात यावर चालत राहा, बाबांची
श्रीमत् आहे- मुलांनो, वेळ वाया घालवू नका, चांगले कर्म करा"
प्रश्न:-
जी भाग्यवान
मुले आहेत, त्यांची मुख्य धारणा कोणती आहे?
उत्तर:-
भाग्यवान मुले सकाळी सकाळी उठून बाबांची खूप प्रेमाने आठवण करतील. बाबांशी गोड गोड
बोलतील. कधीही स्वतःवर निर्दय पणा करणार नाहीत. ते चांगल्या गुणांनी पास होण्याचा
पुरुषार्थ करून स्वतःला राजाई घेण्यालायक बनवतील.
ओम शांती।
मुलं बाबांसमोर बसले आहेत तर जाणतात की आमचा बेहद चा पिता आहे आणि आम्हाला बेहद सुख
देण्यासाठी श्रीमत देत आहे. त्याचेच गायन आहे- दयावान, मुक्तिदाता... खूप महिमा
करतात. बाबा म्हणतात फक्त महिमा करण्याची गोष्ट नाही. मुलांना मत देण्याचे बाबांचे
कर्तव्यच आहे. बेहद्द्चे पिता मत देत आहेत. उंच ते उंच पिता आहे तर जरूर त्यांचे
मतही उंच असेल. मत घेणारी आत्मा आहे, चांगले किंवा वाईट काम आत्माच करत असते. यावेळी
दुनियेला मिळत आहे रावणाची मत. तुम्हा मुलांना भेटत आहे रामाचे मत. रावणाच्या मतावर
चालून निर्दयी बनून उलटे काम करत राहतात. बाबा मत देतात सुलटे चांगले काम करा.
सर्वात चांगले कर्म स्वतःवर दया करा. तुम्ही जाणता मी आत्मा सतोप्रधान होती, खूप
सुखी होती नंतर रावणाचे मत मिळाल्याने तुम्ही तमोप्रधान बनला. आता परत बाबा मत देत
आहेत की एक बाबांच्या आठवणी मध्ये राहा. आता स्वतःवर दया करा, ही मत देत आहेत. बाबा
दया करत नाहीत. बाबा तर श्रीमत देतात असे-असे करा. स्वतःच स्वतःवरच दया करा. स्वतःला
आत्मा समजा आणि पतित-पावन बाबांची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. बाबा सल्ला देतात,
तुम्ही पावन कसे बनाल. बाबाचपतितांना पावन बनवणारा आहे. ते श्रीमत देतात. जर
त्यांच्या मतावर चालत नसतील तर स्वतःशीच निर्दयी वागणे आहे. बाबा श्रीमत देत आहेत
की मुलांनो वेळ वाया घालवू नका. हा पाठ पक्का करा की मी आत्मा आहे. शरीर
निर्वाहासाठी धंदा इत्यादी खुशाल करा तरीही युक्तीने वेळ काढा. काम करत असताना
आत्म्याची बुद्धी बाबांकडे असायला हवी. ज्याप्रमाणे प्रियकर-प्रेयसी काम करत, एक
दुसऱ्यावर प्रेम पण करतात ना. इथे तसे नाही. तुम्ही भक्ती मार्गामध्ये ही आठवण करता.
काहीजण म्हणतात कशी आठवण करायची? आत्मा, परमात्माचे रूप कसे आहे, कशी आठवण करायची?
कारण की भक्ति मार्गामध्ये गायन आहे परमात्मा नावा- रूपापेक्षा पेक्षा वेगळा आहे
परंतु असे नाही.असे म्हणतात की,भृकुटी मध्ये आत्मा चांदणी सारखी आहे,मग असे का
म्हणतात आत्मा कशी आहे, तिला पाहू शकत नाही. ती तर जाणून घेण्याची गोष्ट आहे.
आत्म्यालाही जाणले जाते, परमात्मालाही जाणले जाते. ती अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे.
काजव्या पेक्षाही लहान आहे. शरीरातून कशी निघते, माहितही होत नाही. आत्मा आहे,
साक्षात्कार होतो. आत्म्याचा साक्षात्कार झाला म्हणून काय झाले. तो तर चांदणी सारखा
सूक्ष्म आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. जसा आत्मा, तसा परमात्मा ही
आत्माच आहे. परंतु परमात्म्याला म्हटले जाते- परम आत्मा. तो जन्म - मरणामध्ये येत
नाही. आत्म्याला परम तेव्हाच म्हटले जाते जेंव्हा जन्म-मरण रहीत असते. बाकी
मुक्तीधाम मध्ये तर सर्वांना पवित्र बनून जायचे आहे. त्यामध्येही क्रमवार आहेत,
ज्यांची हिरो-हिरॉईन ची भूमिका आहे. आत्मे क्रमवार तर आहेत ना. नाटकांमध्येही
काहींना खूप पगार असतो, काहींना कमी असतो. लक्ष्मी नारायणाच्या आत्म्यालाही मनुष्य
आत्म्यामध्ये मध्ये परम म्हणतात. भले पवित्र तर सर्वच बनतात तरी ही भूमिका क्रमवार
आहे. कोणी महाराजा, कोणी दासी, कोणी प्रजा. तुम्ही कलाकार आहात. जाणत आहात एवढे
सर्व देवता क्रमवार आहेत. चांगला पुरुषार्थ केला, तर उच्च आत्मा बनाल, उच्चपद
प्राप्त कराल. तुम्हाला स्मुर्ती आली आहे आम्ही ८४ जन्म कसे घेतले. आता बाबांजवळ
जायचे आहे. मुलांना ही खुशी ही आहे तर नशाही आहे. सर्वजण म्हणतात आम्ही नरापासून
नारायण विश्वाचे मालक बनणार आहोत. तर मग असा पुरुषार्थ करायला हवा. पुरुषार्था
नुसार क्रमवार पद प्राप्त करतात. सर्वांना क्रमवार भूमिका मिळालेली आहे. हे नाटक
बनलेले आहे.
आता बाबा तुम्हाला श्रेष्ठ मत देत आहेत. कसेही करून बाबांची आठवण करा तर विकर्म
विनाश होतील, तर तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल. पापांचे ओझे तर डोक्यावर
खूप आहे. कसेही करून ते इथे नष्ट करायचे आहे तेंव्हाच आत्मा पवित्र बनेल. तमोप्रधान
ही तुम्ही आत्मा बनले आहात तर सतोप्रधान ही आत्म्याला बनायचे आहे. यावेळी सर्वात
जास्त भारत कंगाल झाला आहे. हा खेळही भारतावरच आहे. बाकी ते तर फक्त धर्म स्थापन
करण्यासाठी येतात. पुनर्जन्म घेत-घेत शेवटी सर्वजण तमोप्रधान बनतात. स्वर्गाचे मालक
तुम्ही बनता. तुम्ही जाणता भारत खूप उंच देश होता. आता किती गरीब आहे, गरिबाला सर्व
मदत करतात. प्रत्येक गोष्टीची भिक मागतच राहतात. सुरुवातीला तर खूप धान्य इथून जात
होते. आता गरीब बनला आहे तर मग परतफेड होत आहे. जे घेऊन गेले होते,ते उधार मिळत आहे.
कृष्ण आणि ख्रिश्चन रास एकच आहे. ख्रिश्चनांनीच भारताला हडप केले आहे. आता पुन्हा
नाटका नुसार ते एक दुसऱ्याशी लढत आहेत, लोणी तुम्हा मुलांना मिळत आहे. असे नाही की
कृष्णाच्या मुखामध्ये लोणी होते. हे तर शास्त्रांमध्ये लिहिले आहे. सारी दुनिया
श्रीकृष्णाच्या हातामध्ये येते. सार्या विश्वाचे तुम्ही मालक बनता. तुम्ही मुले
जाणता की आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत तर तुम्हाला किती खुशी व्हायला पाहिजे.
तुमच्या पावला- पावला मध्ये पदम आहे. फक्त एका लक्ष्मीनारायणाचे राज्य
नव्हते,राजधानी होती ना. यथा राजाराणी तथा प्रजा - सर्वांच्या पावला मध्ये पदम असते.
तिथे तर अमाप धन असते. पैशासाठी कोणी पाप इत्यादी करत नाही, भरपूर धन असते. अल्लाह
अवलदीनचा खेळ दाखवतात ना. अल्लाह जो अवलदिन अर्थात जो देवी-देवता धर्माची स्थापना
करत आहे. सेकंदामध्ये जीवन मुक्ती देतात. सेकंदामध्ये साक्षात्कार होतो. कारुनचा
खजाना दाखवतात. मीरा श्रीकृष्णा सोबत साक्षात्कारा मध्ये रास करत होती. तो
भक्तिमार्ग होता. इथे भक्तीमार्गाची गोष्ट नाही. तुम्ही तर खरोखर वैकुंठा मध्ये
जाऊन राज्य करणार आहात. भक्ती मार्गामध्ये फक्त साक्षात्कार होतो. यावेळी तुम्हा
मुलांना तुमच्या ध्येयाचा साक्षात्कार होतो, जाणता आम्ही हे बनणार आहोत. मुले
विसरतात म्हणून हे बैज दिले जातात. आता आम्ही बेहद च्या पित्याचे बनलो आहोत. किती
खुशी व्हायला पाहिजे. हे तर घडी-घडी पक्के करायला पाहिजे. परंतु माया विरोधात
असल्यामुळे ती खुशी उडून जाते. बाबांची आठवण केली तर नशा राहील- बाबा आम्हाला
विश्वाचे मालक बनवत आहे. नंतर माया विसरायला लावते तर काहीना काहीतरी विकर्म घडते.
तुम्हा मुलांना स्मुर्ती आली आहे- आम्ही 84 जन्म घेतले आहेत, दुसरे कोणी 84 जन्म
घेत नाही. हेही समजायला हवे- जेवढे आम्ही आठवण करू तेवढे उच्चपद प्राप्त करू आणि
इतरांना आपल्या समानही बनवायचे आहे, प्रजा बनवायची आहे. स्वतःच्या घरापासून सुरुवात
करायला पाहिजे. तीर्थयात्रेला हि पहिल्यांदा स्वतः जातात नंतर मित्र संबंधी
इत्यादींनाही एकत्र घेऊन जातात. तर तुम्हीही प्रेमानी सर्वांना समजावून सांगा.
सर्वांना नाही समजणार. एकाच घरामध्ये वडिलांना समजले तर मुलाला समजणार नाही.
आईवडिलांनी कितीही मुलांना सांगितले की या जुन्या दुनियेत मन लावू नका तरीही ऐकणार
नाहीत,त्रस्त करतात. जे या झाडाचे कलम असेल तेच येऊन समजू शकतात. या धर्माची स्थापना
पहा कशाप्रकारे होत आहे, इतर धर्म वाल्यांचे कलम लागत नाही. ते तर वरून येतात.
त्यांचे अनुयायी येत राहतात. हे तर स्थापना करतात आणि सर्वांना पावन बनवून घेऊन
जातात म्हणून यांना सद्गुरु मुक्तिदाता असे म्हटले जाते. खरा गुरू एकच आहे. मनुष्य
कधी कुणाची सद्गती करू शकत नाही. सद्गती दाता आहे, एक त्यांनाच सद्गुरु असे म्हटले
जाते. भारताला सत्यखंड ही तेच बनवतात. रावण खोटे खंड बनवतो. बाबांविषयी खोटे आणि
देवतांविषयी खोटे सांगतात. म्हणून बाबा सांगतात वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका... याला
वेशालय म्हटले जाते. सतयुग आहे शिवालय. हे मनुष्यांना थोडेच समजते. ते तर
स्वतःच्याच मतावर चालत राहतात.किती भांडण तंटा करत राहतात. मुले आईला, नवरा, बायकोला
मारण्या मध्ये उशीर करत नाही. एक दुसऱ्याला त्रास देत राहतात. मुलगा पाहतो वडिलांकडे
खूप पैसा आहे, देत नसेल तर मारायलाही उशीर करत नाही. किती खराब दुनिया आहे. आता
तुम्ही काय बनत आहात. तुमच्यासमोर तुमचे ध्येय उभे आहे. तुम्ही तर फक्त म्हणत होते
हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा. असे थोडीच म्हणत होते की आम्हाला विश्वाचे
मालक बनवा. परमात्मा स्वर्गाची स्थापना करतो तर आम्ही स्वर्गामध्ये का नाही. नंतर
रावण तुम्हाला नर्क वासी बनवतो. कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष सांगितल्यामुळे विसरून
गेले आहेत. बाबा म्हणतात तुम्ही स्वर्गाचे मालक होते. म्हणतात गोड आत्म्यांनो,
मुलांनो बाबांची आठवण करा तर तुम्ही तमोप्रधान पासून सतो प्रधान बनाल. तमोप्रधान
बनायला अर्धा कल्प लागला आहे, पूर्ण कल्प म्हटले तरी चालेल कारण की कला तर कमी होत
जातात ना. यावेळी कोणतीही कला नाही. म्हणतात मी निर्गुण आहे माझ्यामध्ये कोणताही
गुण नाही, याचा अर्थ किती स्पष्ट आहे. इथे निर्गुन बालकांची संस्थाही आहे.
बालकांमध्ये कोणताही गुण नाही. नाहीतर बालकाला महात्मा पेक्षाही उंच म्हटले जाते,
त्यांना विकारही माहीत नसतात. महात्म्यांना तर विकार माहित असतात किती चुकीचे अक्षर
बोलत राहतात. माया बिल्कुल अयोग्य बनवते. गीता ही वाचतात, म्हणतात ही भगवानुवाच -
काम महा शत्रू आहे, हा आदि-मध्य-अंत दुःख देणारा आहे तरीही पवित्र बनण्या मधे किती
विघ्न आणतात. मुलगा लग्न करत नसेल तर किती बिघडतात. बाबा म्हणतात तुम्हा मुलांना
श्रीमतावर चालायचे आहे. जो फुल बनणारा नसेल, त्याला कितीही समजावून सांगितले तरी तो
मानणार नाही. काही ठिकाणी मुले म्हणतात आम्हाला लग्न करायचं नाही तर आई-वडील किती
अत्याचार करतात. बाबा म्हणतात मी जेंव्हा ज्ञान यज्ञ रचतो असतो तेंव्हा अनेक
प्रकारचे विघ्न पडतात. पृथ्वीची तीन पावले ही देत नाहीत. तुम्ही फक्त बाबांच्या
मतावर आठवण करून पवित्र बनत आहात, दुसरा कोणताही त्रास नाही. फक्त स्वतःला आत्मा
समजून बाबांची आठवण करा. ज्याप्रमाणे तुम्ही आत्मे या शरीरामध्ये अवतरित आहात तसेच
बाबाही अवतरित आहेत. नंतर मग कच्छ अवतार, मत्स्य अवतार कसे म्हणू शकतो! किती ग्लानी
केली आहे! म्हणतात दगडा-दगडामध्ये भगवान आहे. बाबा म्हणतात माझी आणि देवतांची ग्लानी
करतात. मला यावे लागते, येऊन तुम्हा मुलांना पुन्हा एकदा वारसा देतो. मी वारसा देतो,
रावण शाप देतो. हा खेळ आहे. जे श्रीमतावर चालत नाही तर समजले जाते यांचे भाग्य एवढे
उच्च नाही. नशीबवान सकाळी- सकाळी उठून बाबांची आठवण करतील, बाबांशी बोलतील. स्वतःला
आत्मा समजून बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. खुशीचा पाराही चढेल. जे
सन्मानांनी पास होतात तेच राज्य करण्याच्या लायक बनू शकतात. फक्त एक लक्ष्मीनारायण
राज्य करत नाहीत. राजधानी आहे. आता बाबा म्हणतात तुम्ही किती स्वच्छ बुद्धी बनत
आहात. याला सत्संग म्हटले जाते. सत्संग एकच असतो. जो पिता खरे - खरे ज्ञान देऊन
सतखंडाचा मालक बनवत आहे. कल्पाच्या संगमावरच सत्याचा संग मिळतो. स्वर्गा मध्ये
कोणत्याही प्रकारचा सत्संग असत नाही. आता तुम्ही आहात आत्मिक मदत पथक. तुम्ही
विश्वाची नौका पार करत आहात. तुम्हाला सोडवणारा, श्रीमत देणारा बाबा आहे. तुमची
महिमा खूप मोठी आहे. बाबांची महीमा, भारताची महिमा अपरंपार आहे. तुम्ही ब्रह्मांडाचे
ही आणि विश्वाचे ही मालक बनत आहात. मी तर फक्त ब्रह्मांडाचा मालक आहे. तुमची पूजाही
डबल होते. मी देवता बनत नाही त्यामुळे माझी डबल पूजा होत नाही. तुमच्या मध्येही
नंबर वार समजतात आणि खुशी मध्ये येऊन पुरुषार्थ करतात. ज्ञानामध्ये किती फरक आहे.
सतयुगामध्ये लक्ष्मीनारायणाचे राज्य चालते. तिथे वजीर नसतात. लक्ष्मीनारायण ज्यांना
भगवान भगवती असे म्हणतात तर मग ते वजीरा चा सल्ला घेतील का! जेव्हा पतित राजे बनतात
तेव्हा वजीर इत्यादी ठेवतात. आता तर आहे प्रजेचा प्रजेवर राज्य. तुम्हा मुलांना या
जुन्या दुनियेचे वैराग्य आहे. ज्ञान, भक्ती, वैराग्य. ज्ञान फक्त आत्मिक पिताच
शिकवतात दुसरे कोणी शिकवू शकत नाही. बाबाचं पतित-पावन सर्वांचे सदगती दाता आहेत.
अच्छा!
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात - पिता बाप दादांची प्रेमपूर्ण
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. बाबांच्या
आठवणी सोबत इतरांना आप समान बनवण्याची सेवाही करायची आहे. स्वतःच्या घरापासून
सुरुवात करायची आहे... सर्वांना प्रेमानी समजावयाचे आहे.
2. या जुन्या
दुनियेपासून बेहद्दचे वैरागी बनायचे आहे. वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका.... त्या
बेहद्द च्या पित्याची मुले आहोत, तो आम्हाला कारून चा खजाना देत आहे. याच खुशी मध्ये
राहायचे आहे.
वरदान:-
एका सेकंदाच्या
बाजीद्वारे साऱ्या कल्पाचे भाग्य बनवणारे श्रेष्ठ भाग्यवान भव
या संगम युगाच्या
वेळेला वरदान मिळालेले आहे जे पाहिजे, जसे पाहिजे, जेवढे पाहिजे, तेवढे भाग्य बनवू
शकतो कारण की भाग्यविधाता बाबांनी भाग्य बनवण्याची चावी मुलांच्या हातामध्ये दिली
आहे. शेवटचा ही तीव्र गतीने जाऊन पहिला येऊ शकतो. फक्त सेवेच्या विस्तारामध्ये
स्वतःची स्थिती सेकंदामध्ये सार स्वरूप बनवण्याचा अभ्यास करा. आत्ता- आत्ता सांगितले
एका सेकंदामध्ये मास्टर बीज बना, तर वेळ लागायला नको. या एका सेकंदाच्या बाजी द्वारे
संपूर्ण कल्पाचे भाग्य बनवू शकता.
बोधवाक्य:-
डबल सेवेद्वारे
शक्तिशाली वातावरण बनवा तर प्रकृतीही दासी बनेल.