20-07-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,बंधनमुक्त बनून, सेवे मध्ये तत्पर रहा, कारण या सेवे मध्ये फार मोठी कमाई
आहे, 21 जन्मासाठी तुम्ही वैकुंठाचे मालक बनत आहात."
प्रश्न:-
प्रत्येक
मुलांना कोणती सवय करून घ्यायची आहे?
उत्तर:-
मुरली मधील मुद्द्यावर समजावण्याची. ब्राह्मणी जर कुठे सेवेला गेली, तर आपसांमध्ये
बसून क्लास करायचा आहे. जर मुरली चालवणे शिकले नाही तर आपल्या सारखे कसे
बनवाल.अभ्यास करायचा आहे.
गीत:-
मुखडा देखले
प्राणी. . . . .
ओम शांती।
मुले जेव्हा ऐकत आहेत, तर स्वतःला आत्मा निश्चय करून बसायचे आहे,आणि हा निश्चय
करायचा आहे की,बाबा परमात्मा आम्हाला सांगत आहेत. हा आदेश अथवा मत एकच बाबा देत
आहेत. यालाच श्रीमत म्हटले जाते. श्री म्हणजे श्रेष्ठ ते श्रेष्ठ. ते आहेत बेहद चे
बाबा, ज्यांना भगवान म्हटले जाते.अनेक मनुष्य आहेत, जे प्रेमाने परमात्म्याला पिता
समजत नाहीत.जरी शिवाची भक्ती करत आहेत,खुप प्रेमाने आठवण करतात,परंतु मनुष्य असे
म्हणतात की,सर्वां मध्ये परमात्मा आहे, मग ते प्रेम कोणा बरोबर करावयाचे, त्यामुळे
बाबा पासून विपरीत बुद्धी झाले आहेत. भक्ती मध्ये जेव्हा कोणाला दुःख किंवा रोग
इत्यादी होतो,तर प्रेमाने म्हणतात की,भगवान रक्षण करा.मुले जाणतात की, गीता
आहे,श्रीमद् भगवंताच्या मुखाद्वारे सांगितलेली.दूसरे कोणता असा ग्रंथ नाही,
ज्यामध्ये भगवंताने राजयोग शिकवला आहे, किंवा श्रीमत दिली आहे. एकच भारताची गीता आहे,
ज्याचा प्रभाव पण मोठा आहे. एक गीताच भगवंता नी सांगितलेली आहे. भगवान म्हणताच, एका
निराकारा कडेच दृष्टी जाते. बोटांनी इशारा वर करतात. कृष्णा साठी असे कधी म्हणू शकत
नाहीत, कारण ते देहधारी आहेत ना. तुम्हाला आता त्यांच्या बरोबर संबंधाची माहिती झाली
आहे,त्यामुळे म्हटले जाते, बाबाची आठवण करा,त्यांच्या बरोबर प्रीत करा. आत्मा आपल्या
पित्याची आठवण करत आहे.आता ते भगवान,मुलांना शिकवत आहेत.तर तो नशा फार चढला
पाहिजे,आणि नशा पण कायमचा चढला पाहिजे. असे नाही की, ब्राह्मणी समोर आहे, तर नशा
चढेल ,ब्राह्मणी नसेल तर नशा उतरेल.बस,ब्राह्मणी शिवाय आम्ही क्लास करू शकत नाही.
कोणत्या ना कोणत्या सेवाकेंद्रासाठी बाबा समजावतात की,तेथील ब्राह्मणी पाच सहा
महिन्यासाठी दुसरीकडे गेली, तर आपसांमध्ये सेवाकेंद्र सांभाळायचे आहे. कारण शिक्षण
तर सोपे आहे. कोणी तर ब्राह्मणी शिवाय जसे आंधळे, लंगडे होऊन जातात. ब्राह्मणी दुसरी
कडे गेली तर सेंटरवर जायचे सोडून देतात. अरे, अनेक जण बसले आहेत,क्लास चालवू शकत
नाहीत कां? गुरु बाहेर गेला तर शिष्य मागे संभाळतात ना. मुलांनी सेवा केली पाहिजे.
विद्यार्थ्यां मध्ये पण क्रमानुसार आहेतच ना. बापदादा जाणतात की, कोठे कोणत्या
क्लास मध्ये पाठवायचे आहे.मुले एवढी वर्षे शिकली आहेत, कांही तरी धारणा झाली पाहिजे
,जे सेंटरला आपसा मध्ये मिळून चालवू शकतील. मुरली तर मिळते ना. ज्ञान मुद्द्यां च्या,
आधारावर समजावयाचे आहे.ऐकण्याची सवय झाली आहे, पण सांगण्याची सवय पडली नाही.
बाबांच्या आठवणीत राहिले तर, धारणा पण होईल. सेंटरवर असे पण कोणी असले पाहिजे, जे
म्हणतील ठीक आहे,ब्राह्मणी गेली आहे तर,आम्ही सेंटर सांभाळू.बाबानी, ब्राह्मणी ला
कुठे चांगल्या सेंटरवर सेवेसाठी पाठवले आहे. ब्राह्मणी शिवाय अडून राहायचे नाही.
ब्राह्मणी सारखे नाही बनला, तर दुसऱ्याला आपल्या सारखे कसे बनवाल, प्रजा कशी बनवाल.
मुरली तर सर्वांना मिळत आहे. मुलांना खुशी झाली पाहिजे कि, आम्ही संदली वर बसून
समजावू. अभ्यास केल्याने सेवाधारी बनू शकता. बाबा विचारतात की, सेवाधारी बनले आहांत?
कोणी पण तयार झाले नाहीत. सेवेसाठी सुट्टी घेतली पाहिजे.कोठे पण सेवेसाठी बोलावणे
आले,तर तेथे सुट्टी घेऊन गेले पाहिजे.जी बंधनमुक्त मुले आहेत,ती अशी सेवा करू शकतात.
त्या सरकार पेक्षा या सरकार ची कमाई फार मोठी आहे.भगवान शिकवत आहे, ज्याद्वारे
तुम्ही २१ जन्मासाठी वैकुंठाचे मालक बनता. किती भारी प्राप्ती आहे, त्या कमाई मध्ये
काय मिळेल? अल्प काळाचे सुख. इथे तर विश्वाचे मालक बनत आहात. ज्यांना पक्का निश्चय
आहे, ते म्हणतात की,आम्ही तर हीच सेवा करू. परंतु पूर्ण निश्चय पाहिजे. पाहिले
पाहिजे की, आम्ही कोणाला समजावू शकतो ! फार सोपे आहे.कलियुगाच्या अंता मध्ये एवढे
करोडो मनुष्य आहेत, सतयुगा मध्ये जरूर थोडे असतील. त्याच्या स्थापनेसाठी जरूर बाबा
संगमयुगा वरच येतील. जुन्या दुनिया चा विनाश होणार आहे. महाभारताचे युद्ध पण
प्रसिद्ध आहे. ते लागतेच तेंव्हा, जेंव्हा भगवान घेऊन,राजयोग शिकवून, राजांचा राजा
बनवत आहेत. कर्मातील अवस्थे ला प्राप्त करवत आहेत.सांगतात की, देहाचे सर्व संबंध
सोडून, माझी एकाची आठवण करा,तर पाप नष्ट होतील. स्वतःला आत्मा समजून, बाबा ची आठवण
करावयाची आहे. हेच कष्ट घ्यायचे आहेत.योगाचा अर्थ एक पण मनुष्य समजत नाहीत. बाबा
समजावतात,भक्तिमार्गाची पण विश्व नाटकांमध्ये नोंद आहे. भक्तिमार्ग चालणारच आहे.हा
खेळ बनलेला आहे. ज्ञान-भक्ती- वैराग्य.वैराग्य पण दोन प्रकारचे आहे. एक आहे हद्दचे,
दुसरे आहे बेहद्द चे. आता तुम्ही मुले साऱ्या जुन्या दुनियेला विसरण्याचा पुरुषार्थ
करत आहात, कारण तुम्ही जाणता की, आम्ही आता शिवालय, पावन दुनियेमध्ये जात आहोत.
तुम्ही सर्व ब्रह्माकुमार कुमारी, भाऊ-बहीण आहात. विकारी दृष्टी जाऊ शकत नाही. आज
काल तर सर्वांची दृष्टी विकारी झाली आहे. तमोप्रधान आहेत ना. याचे नांवच आहे नरक,
परंतु स्वतःला नर्क वासी थोडे समजत आहेत. स्वतःची माहितीच नाही, तर म्हणतात की,
स्वर्ग-नरक इथेच आहे. ज्याच्या मनात जे झाले ते म्हणत आहेत. इथे कांही स्वर्ग नाही.
स्वर्गांमध्ये तर राजधानी होती.धार्मिक आणि सत्यवादी होते. किती बळ होते. आता तुम्ही
परत पुरुषार्थ करत आहात. विश्वाचे मालक बनत आहात. इथे तुम्ही आले आहातच, विश्वाचे
मालक बनण्यासाठी. हेवन्ली गॉड फादर (स्वर्गिय पिता) ज्याला शिव परमात्मा म्हटले जाते,
ते तुम्हाला शिकवत आहेत . मुलांमध्ये किती नशा राहिला पाहिजे. बिल्कुल सोपे ज्ञान
आहे.तुम्हा मुलांमध्ये ज्या पण जुन्या सवयी आहेत, त्या सोडून दिल्या पाहिजेत. ईर्षा
करण्याची सवय पण फार नुकसानकारक आहे. तुमचे सर्व मुरलीवर आधारीत आहे, तुम्ही कोणाला
पण मुरलीवर समजावू शकता.परंतु मना मध्ये ईर्षा राहते की, ही कांही ब्राह्मणी थोडीच
आहे, तिला काय माहित आहे. बसं, दुसऱ्या दिवशी यायचे सोडून देतात.अशा जुन्या सवयी
आहेत, त्यामुळे बदनामी पण होते. ज्ञान तर फार सोपे आहे.कुमारीला तर कोणतेच काम पण
नाही. त्यांना विचारले जाते की,ते शिक्षण चांगले,कां हे शिक्षण चांगले? तर म्हणतात
की, हे फार चांगले आहे. बाबा, मी आता ते शिक्षण घेणार नाही. तिकडे मन लागत नाही.
लौकिक पिता ज्ञानामध्ये नसेल, तर मार खातात. कांही मुली कमजोर पण आहेत.समजावले
पाहिजे की, या शिक्षणाद्वारे आम्ही महाराणी बनू. त्या शिक्षणाद्वारे काय पाई पैशाची
नोकरी करू. हे शिक्षण भविष्य 21 जन्मासाठी विश्वाचे मालक बनवत आहे.प्रजा पण
स्वर्गवासी बनत आहे ना.आता सर्व आहेत नर्क वासी.
आता बाबा म्हणतात की, तुम्ही सर्वगुणसंपन्न होता. आता तुम्हीच किती तमोप्रधान झाले
आहात.शिडी उतरत आले आहात.भारत जो सोन्याची चिमणी होता, आता तर खापराची झाली
आहे.भारत शंभर टक्के दिवाळखोर नव्हता, आता शंभर टक्के दिवाळखोर झालेला आहे. तुम्ही
जाणता की, आम्ही विश्वाचे मालक पारसनाथ होतो. मग 84 जन्म घेत घेत, आता पत्थरनाथ झाले
आहोत. आहे तर मनुष्यच, परंतु पारसनाथ आणी पत्थरनाथ म्हटले जाते.गीत पण ऐकले- स्वतः
आपल्या मनामध्ये पहा, मी कुठपर्यंत लायक बनलो आहे.नारदा चे उदाहरण आहे ना.
दिवसें-दिवस खालीच घसरत आलो आहोत.घसरत, घसरत एकदम दलदली मध्ये, गळ्यापर्यंत फसले
गेलो आहोत. आता तुम्ही ब्राह्मण सर्वांची शेंडी पकडून,दलदली मधून बाहेर
काढतात.दूसरीकडे कोठे पकडण्याची जागा पण नाही. तर शेंडीला पकडणे सोपे आहे,दलदली
मधून काढण्यासाठी शेंडीला पकडावे लागते.दलदली मध्ये असे फसले आहेत, ते काय विचारू
नका. भक्तीचे राज्य आहे ना. आता तुम्ही म्हणता कि बाबा,आम्ही कल्पापूर्वी पण,
तुमच्या जवळ आलो होतो,राज्य भाग घेण्यासाठी. लक्ष्मी नारायणाचे 'मंदिर बनवत आहेत,
परंतु त्यांना हे माहित नाही की, हे विश्वाचे मालक कसे बनले. आता तुम्ही किती
समजदार झाले आहात. तुम्हीं जाणता की,यांनी हे राज्य भाग्य कसे प्राप्त केले. मग 84
जन्म कसे घेतले.बिरला किती मंदिर बांधत आहेत.जसे बाहुल्या बनवत आहेत. ते लहान लहान
बाहुल्या बनवत आहेत, तर हे मोठ्या बाहुल्या बनवत आहेत. चित्र बनवून पूजा करत आहेत.
त्यांचे कर्तव्य जाणत नाहीत, म्हणजे बाहुल्यांची पूजा झाली ना. आता तुम्ही जाणता
की, बाबांनी आम्हाला किती सावकार बनवले होते, आता किती कंगाल बनलो आहोत.जे पुज्य
होते, तेच आता पुजारी बनले आहेत. भारत लोक भगवानासाठी म्हणतात, तुम्हीच पुज्य आणि
तुम्हीच पुजारी. तुम्हीच सुख देत आहात, तुम्हीच दुःख देत आहात,सर्व कांही तुम्हीच
करत आहात,त्यामध्येच मस्त होऊन जातात.असे म्हणतात की,आत्मा निर्लेप आहे,कांही पण
खा-प्या मजा करा. शरीराला लेप छेप लागतो, ते गंगा स्नान केल्यामुळे शुद्ध होऊन जाते.
जे पाहिजे ते खावा,काय-काय फैशन आहेत. ज्यांनी जो रिवाज पाडला, तो चालत राहतो. आता
बाबा समजावत आहेत की, विषयसागरा मधून निघून शिवालयाकडे चला. सतयुगाला क्षीरसागर
म्हटले जाते,हे विषयसागर आहे.तुम्ही जाणता की, आम्ही 84 जन्म घेऊन पतित बनलो आहोत,
त्यामुळे तर पतित-पावन बाबाला बोलावत आहेत. चित्रावर समजावले जाते, त्यामुळे मनुष्य
सहज समजून जातात.शिडी मध्ये पूर्ण 84 जन्माचा वृत्तांत आहे.एवढी सोपी गोष्ट पण
कोणाला समजावू शकत नाहीत.तर बाबा समजतात की, पूर्ण अभ्यास करत नाही,प्रगती करत
नाहीत.
तुम्हा ब्राह्मणाचे कर्तव्य आहे की, भ्रमरी सारखे ,किड्यांना भू- भू करून, आपल्या
सारखे बनवायचे आहे. तुमचा पुरुषार्थ आहे, सापा सारखी जुनी कातण सोडून नवी घ्यायची
आहे. तुम्ही जाणता की, हे जुने सडलेले शरीर आहे, याला सोडायचे आहे. ही दुनिया पण
जुनी आहे. शरीर पण जुने आहे. हे सोडून,आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. तुमचे हे
शिक्षण आहेच, नवीन दुनिया स्वर्गा साठी. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. सागराच्या
एका लाटेने सर्व कांही डावाडोल होऊन जाईल. विनाश तर होणारच आहे ना. नैसर्गिक संकटे
कोणाला पण सोडणार नाहीत. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या, मुलांप्रति, मात-पिता, बापदादाची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) मनामध्ये
ईर्षा इत्यादी, च्या जुन्या सवयी आहेत, त्याला सोडून आपसांमध्ये फार प्रेमाने मिळून
राहायचे आहे.ईर्षे मुळे शिक्षण सोडून द्यायचे नाही.
(२) या जुन्या
सडलेल्या शरीराचे भान सोडून द्यायचे आहे. भ्रमरी सारखे ज्ञानाची भू-भू करून, विकारी
किड्यांना आपल्यासारखे बनविण्याची सेवा करायची आहे. या आत्मीक धंद्यामध्ये,
राहावयाचे आहे.
वरदान:-
सर्वशक्तीमाना
च्या सत्तेच्या आधारावर, आत्म्यांना मालामाल बनविणारे पुण्यात्मा भव
जसे दान-पुण्य ची
सत्ता असणाऱ्या राजामध्ये, सत्तेची पूर्ण ताकत होती,त्या शक्तीच्या आधारावर,ते
कोणाला कांही पण बनवत होते.तसे तुम्ही महादानी पुण्य आत्म्यांना प्रत्यक्षात बाबा
द्वारे प्रकृतीजीत, मायाजीत ची विशेष सत्ता मिळाली आहे. तुम्ही तुमच्या शुद्ध
संकल्पाच्या आधारावर, कोणत्या पण आत्म्याचा बाबाशी संबंध जोडून,त्यांना मालामाल बनवू
शकतात. फक्त या सत्तेचा यथार्थ वापर करा.
बोधवाक्य:-
जेंव्हा तुम्ही
संपूर्णतेचे अभिनंदन कराल,त्यावेळी प्रकृती आणि माया निरोप घेईल.