08-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,जसे बाबा मार्गदर्शक आहेत,असेच मार्गदर्शक बनून सर्वांना घराचा रस्ता
दाखवा,अंधाची काठी बना"
प्रश्न:-
पूर्वनियोजित
अनादि वैश्विक नाटकाचे रहस्य कोणते आहेत,जे तुम्ही मुलंच जाणतात?
उत्तर:-
हे पूर्वनियोजित अनादी वैश्विक नाटक आहे,यामध्ये न कोणी कलाकार जास्त होऊ शकतात, न
कमी होऊ शकतात.मोक्ष कोणालाही मिळू शकत नाही.कोणी म्हणेल आम्ही या आवागमन म्हणजे
येण्या-जाण्याच्या चक्रात येणारच नाही.बाबा म्हणतात, होय,काही वेळासाठी असे होऊ
शकेल परंतु आपल्या भूमिकेपासून कोणी बिल्कुलच सुटू शकत नाही.हे वैश्विक नाटकाचे
रहस्य तुम्ही मुलंच जाणतात.
ओम शांती।
गोड गोड मुलं हे जाणतात की,भोलेनाथ कोणाला म्हटले जाते.तुम्ही संगमयुगी मुलंच जाणू
शकतात.कलियुगी मनुष्य काहीच जाणत नाहीत.ज्ञानाचे सागर शिव पिता आहेत,तेच सृष्टीच्या
आदी, मध्य,अंतचे ज्ञान समजवतात, आपली ओळख करून देतात.तुम्ही मुलं आता
समजतात,यापूर्वी काहीच जाणत नव्हते.बाबा म्हणतात मी येऊन भारताला स्वर्ग
बनवतो,बेहद्दचा वारसा देतो,जे तुम्ही आत्ता घेत आहात.तुम्ही जाणता आम्ही बेहद्दच्या
पित्याकडून,बेहद्द सुखाचा वारसा घेत आहोत.हे पूर्वनियोजित वैश्विक नाटक आहे,यामध्ये
एक पण आत्मा, कलाकार जास्त होऊ शकत नाही, न कमी होऊ शकतात.सर्वांना आपली भूमिका
मिळाले आहे. कोणी मोक्षला प्राप्त करू शकत नाही.जे जे ज्या धर्माचे आहेत,त्या
धर्मामध्ये जातात. बौद्धी किंवा ख्रिश्चन इत्यादी इच्छा करतील,आम्ही स्वर्गामध्ये
जाऊ परंतु जाऊ शकत नाहीत.जेव्हा त्यांचा धर्म स्थापक येतो,तेव्हाच त्यांची भूमिका
आहे. हे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे.साऱ्या दुनियेतील मनुष्य मात्र यावेळेस
नास्तिक आहेत,अर्थात बेहद पित्याला न जानणारे आहेत.मनुष्यच जाणतील ना.हे नाटक शाळा
मनुष्याची आहे,प्रत्येक आत्मा निर्वाणधाम मधून भूमिका करण्यासाठी येते,परत
निर्वाणधाम मध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करते. असे म्हणतात, बुद्ध निर्वाण गेले. आता
बुद्धाचे शरीर तर गेले नाही, आत्मा गेली परंतु बाबा समजवतात कोणीही जाऊ शकत
नाही.वैश्विक नाटकांमधून कोणी निघू शकत नाही, मोक्ष मिळू शकत नाही.हे पूर्वनियोजित
वैश्विक नाटक आहे ना. कोणी मनुष्य समजतात,मोक्ष मिळतो त्यासाठी पुरुषार्थ करत
राहतात.जसे जैनी लोक पुरुषार्थ करत राहतात, त्यांची आपली वेगळी परंपरा आहे. त्यांना
आपला गुरू आहे,ज्याला मानतात.बाकी मोक्ष कोणालाही मिळू शकत नाही.तुम्ही तर जाणतात,
या वैश्विक नाटकांमध्ये आम्ही कलाकार आहोत.आम्ही कधी आलो,परत कसे जाऊ, हे कोणालाही
माहिती नाही. जनावरं तर जानणार नाहीत ना, मनुष्यच म्हणतात,आम्ही कलाकार भूमिका करत
आहोत,हे कर्मक्षेत्र आहे,जेथेमनुष्य आत्मे राहतात. परमधामला कर्मक्षेत्र म्हटले जात
नाही,ती निराकारी दुनिया आहे. त्यामध्ये कोणता खेळ नाही,कार्य नाही.निराकारी दुनिया
मधून साकारी दुनिया मध्ये भूमिका वठवण्यासाठी येतात.याची पुनरावृत्ती होत राहते.
प्रलय कधीच होत नाही.असे ग्रंथांमध्ये दाखवतात,महाभारत लढाई मध्ये यादव आणि कौरवाचा
मृत्यू झाला,बाकी पाच पांडव राहिले,त्यांचा पण डोंगरावरती जाऊन मृत्यू झाला,बाकी
काहीच राहिले नाही.यामुळे समजतात प्रलय झाला.या सर्व गोष्टी बनवल्या आहेत. परत असे
दाखवतात,समुद्रामध्ये पिंपळाच्या पानावरती एक लहान मुलगा,अंगठा चोकत आला.आता
याद्वारे दुनिया ची स्थापना कशी होईल.मनुष्य जे काही ऐकतात,सत्य सत्य करत राहतात.आता
तुम्ही मुलं जाणतात,ग्रंथांमध्ये काय काय लिहिले आहे,हे सर्व भक्ती मार्गातील ग्रंथ
आहेत.भक्तांना फळ देणारे एकच भगवान पिता आहेत.कोणी मुक्ती मध्ये,कोणी जीवनमुक्ती
मध्ये चालले जातात.प्रत्येक कलाकार जेव्हा भूमिका असेल,तेव्हाच येईल. हे नाटकाचे
रहस्य तुमच्या शिवाय दुसरे कोणी जाणत नाहीत.ते म्हणतात आम्ही रचना आणि रचनेला जाणत
नाहीत.नाटकातील कलाकार बनून,वैश्विक नाटकाच्या आदी मध्य अंतच्या कालावधीला जानणार
नाहीत,तर बेसमज म्हणाल, समजावून सांगितल्यानंतर पण समजत नाहीत.८४ लाख जन्म
समजल्यामुळे,कालावधी पण लाखो वर्षाचा दिला आहे.आता तुम्ही समजता,बाबा कडून
कल्प-कल्प येऊन स्वर्गाची बादशाही घेतो.पाच हजार वर्षापूर्वी पण आपल्याशी भेटलो
होतो,वारसा घेतला होता.राजाराणी तथा प्रजा सर्व विश्वाचे मालक बनतात.प्रजा पण
म्हणेल आम्ही विश्वाचे मालक आहोत. तुम्ही जेव्हा विश्वाचे मालक बनता,त्यावेळेस
चंद्रवंशीचे राज्य नसते.तुम्ही मुलं वैश्विक नाटकाच्या सर्व आदी मध्य अंतला जाणतात.
मनुष्य भक्तिमार्ग मध्ये ज्याची पूजा करतात,त्यांना पण जाणत नाहीत. ज्याची भक्ती
करायची असते, त्यांच्या चरित्राला पण जाणायला पाहिजे ना.तुम्ही मुलं आता सर्वांचे
चरित्र,बाबा द्वारे जाणतात.तुम्ही बाबांचे बनला आहात.बाबांचे चरित्र, कर्तव्याची
तुम्हाला माहिती आहे.ते पिता पतित पावन,मुक्तिदाता मार्गदर्शक आहेत.तुम्हाला पांडव
म्हणतात.तुम्ही सर्वांचे मार्गदर्शक, अंधाची काठी बनतात, सर्वांना रस्ता
सांगण्यासाठी.जसे बाबा गाईड,मार्गदर्शक आहेत,तसेच तुम्हालापण बनायचे आहे.सर्वांना
रस्ता सांगायचा आहे,तुम्ही आत्मा,ते परमात्मा आहेत,त्यांच्याकडून बेहद्दचा वारसा
मिळतो.भारतामध्ये बेहद्दचे राज्य होते,आता नाही.तुम्ही मुलं जाणतात,आम्ही बेहद्दच्या
पित्याकडून बेहद सुखाचा वारसा घेत आहोत,म्हणजेच मनुष्या पासून देवता बनत
आहोत.आम्हीच देवता होतो परत ८४ जन्म घेऊन शुद्र बनलो आहोत.बाबा येऊन शुद्रा पासून
ब्राह्मण बनवतात.यज्ञामध्ये ब्राह्मण जरूर पाहिजेत.हा ज्ञान यज्ञ आहे.भारतामध्ये
यज्ञ स्थापना करतात,यामध्ये खास आर्यसमाजी खूप यज्ञ करत राहतात.आता हा तर रुद्र
ज्ञान यज्ञ आहे,यामध्ये सर्व जुनी दुनिया स्वाह होणार आहे.आता बुद्धी द्वारे काम
घ्यावे लागते. कलियुगामध्ये तर खूप मनुष्य आहेत. इतकी सारी जुनी दुनिया नष्ट होईल.
कोणतीही गोष्ट कामांमध्ये येणार नाही.सतयुगा मध्ये परत सर्व काही नवीन होईल.येथे तर
खूप अस्वछता आहे.मनुष्य कसे अस्वच्छ राहतात. धनवान मनुष्य मोठ्या महला मध्ये राहतात,
गरीब अस्वच्छ जागेत, झोपडी मध्ये राहतात.आता या झोपड्यांना पण तेथुन खाली करत
राहतात,त्यांना दुसरीकडे जागा देऊन,ती जमीन परत विकत राहतात, नाही तर जबरदस्ती उठवत
राहतात. गरीब खूप दुखी आहेत.जे सुखी आहेत, ते पण कायमस्वरूपी सुखी नाहीत.जरी सुख
असले,तरीही हे सुख काग विष्ठा समान सुख आहे असे म्हणतात.शिवभगवानुवाच आम्ही या माता
द्वारे स्वर्गाचे द्वार उघडत आहोत. मातांना ज्ञान कलश दिला आहे,तर सर्वांना
ज्ञानामृत पाजतात.तुमचा प्रवृत्ती मार्ग आहे.तुम्ही खरे-खुरे ब्राह्मण आहात.तर
सर्वांना ज्ञान चितावरती बसवतात.आता तुम्ही दैवता संप्रदाय बनतात.आसुरी संप्रदाय
म्हणजे रावण राज्य.गांधीजी म्हणत होते,रामराज्य पाहिजे.ते पण बोलवत होते,पतित-पावन
या,परंतू स्वतःला पतित थोडेच समजतात.बाबा मुलांना जागृत करतात.तुम्ही घोर अंधारातून
प्रकाशात आले आहात.मनुष्य समजतात,गंगा स्नान केल्यामुळे पावन बनू.गंगेमध्ये
हरिद्वारचा सर्व कचरा पडतो,परत सर्व कचरा शेतीमध्ये टाकतात.सतयुगा मध्ये अशा गोष्टी
होत नाहीत.तेथे तर धनधान्य खूप असते,पैसा थोडाच खर्च करावा लागतो.बाबा तर अनुभवी
आहेत ना.यापूर्वी पण धनधान्य खूप स्वस्त होते.सतयुगा मध्ये खूप थोडे मनुष्य असतात,
तर प्रत्येक गोष्ट स्वस्त असते.तर बाबा म्हणतात,गोड मुलांनो, आता तुम्हाला
पतितापासून पावन बनायचे आहे. युक्ती खूप सहज सांगतात,स्वतःला आत्मा समजून बाबांची
आठवण करा.आत्म्या मध्येच बनावट झाल्यामुळे खराब बनली आहे.जे पारसबुद्धी होते,तेच
पत्थरबुद्धी बनले आहेत.तुम्ही मुलं आत्ता,बाबांच्या जवळ पत्थरनाथ पासून पारसनाथ
बनण्यासाठी आले आहात.बाबा तुम्हाला सुवर्ण युगी विश्वाचे मालक बनवतात.ही लोहयुगी
दुनिया आहे. बाबा सम्मुख मुलांना पारसपुरीचे मालक बनवतात.तुम्ही जाणतात येथील महल
माडी इत्यादी काहीच कामाचे राहणार नाहीत.सर्व नष्ट होतील.येथे काय ठेवले आहे.
अमेरिकेच्या जवळ खूप सोने आहे. येथे तर थोडेफार सोने आहे,ते पण मातांच्या जवळ आहे,ते
पण घेत राहतात,कारण त्यांना कर्जामध्ये सोनं द्यावे लागते.तुमच्याजवळ तर
स्वर्गामध्ये सोनं च सोनं असेल.येथे कवड्या,तेथे हिरे असतील.याला लोह युगी दुनिया
म्हटले जाते.भारतच अविनाशी खंड आहे,कधी विनाश होत नाही.भारतच सर्वात उच्च ते उच्च
देश आहे.तुम्ही माता साऱ्या विश्वाचा उद्धार करतात,तुमच्यासाठी जरूर नवीन दुनिया
पाहिजे,जुन्या दुनियेचा विनाश पाहिजे.या खूप समजण्याच्या गोष्टी आहेत.शरीर
निर्वाहासाठी धंदा इत्यादी पण करायचा आहे,काहीच सोडायचे नाही.बाबा म्हणतात,सर्व काही
करत असताना,माझी आठवण करत राहा. भक्तिमार्गामध्ये पण तुम्ही,मज साजनची आठवण करत आले
आहात की,आम्हाला येऊन काळ्यापासून गोरे बनवा,म्हणजेच पतिता पासून पावन बनवा.त्यांना
प्रवासी पण म्हटले जाते,तुम्ही पण सर्व प्रवासी आहात ना.तुमचे घर परमधाम आहे,तेथे
सर्व आत्मे राहतात.
तुम्ही सर्वांना ज्ञान चितेवरती बसवतात.सर्व हिशेब चुक्तू करून जाणार आहेत,परत
येतील पण. तुम्ही आत्मा जेवढी आठवण कराल, तेवढे पवित्र बनाल आणि उच्च पद प्राप्त
कराल.मातांना तर खूप वेळ असतो.पुरुषांची बुद्धी धंदा इत्यादी कडे चक्कर लावत राहते
म्हणून बाबांनी त्यांना ज्ञानाचा कलश दिला आहे.येथे तर स्त्रीला म्हणतात पती, तुमचा
ईश्वर गुरु सर्व काही आहे, तुम्ही तर त्याची दासी आहात.आता परत बाबा तुम्हा माताना
खूप श्रेष्ठ बनवत आहेत.तुम्ही नारीच भारताचा उद्धार करतात.कोणी कोणी बाबांना
विचारतात,येण्या-जाण्याच्या चक्रापासून सुटू शकतो का?बाबा म्हणतात होय,थोड्या
वेळासाठी सुटू शकता.तुम्ही मुलं तर सर्वांगिन सुरुवातीपासून अंत काळापर्यंत भूमिका
वठवत आले आहात.दुसरे जे आहेत, ते मुक्तिधाम मध्ये राहतात. त्यांची भूमिका थोडीच
आहे.ते तर स्वर्गामध्ये जाणारे नाहीत.आवागमन पासून मोक्ष त्यालाच म्हणतात,जे
अंतकाळात येतील आणि लगेच जातील.ज्ञान इत्यादी तर ऐकू शकणार नाहीत.तेच ज्ञान
ऐकतात,ज्यांनी सुरुवातीपासून अंत काळापर्यंत भूमिका वठवल्या आहेत. काहीजण तर
म्हणतात,आम्हाला हेच पसंद आहे.आम्ही शांतीधाम मध्येच बसून राहू,परंतू असे थोडेच होऊ
शकते.वैश्विक नाटकांमध्ये नोंदलेले आहे,जे अंत काळामध्ये जरूर येतील,बाकी सर्व वेळ
शांतीधाम मध्ये राहतील.हे वैश्विक नाटक आहे ना.अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. एक खरा खुरा
ब्राह्मण बनून सर्वांना ज्ञानामृत पाजायचे आहे.ज्ञान चिते वरती बसवायचे आहे.
2. शरीर निर्वाह अर्थ धंदा इत्यादी सर्व काही करत, पतिता पासून पावन
बनण्यासाठी बाबाच्या आठवणीमध्ये राहून,सर्वांना बाबांची आठवण द्यायची आहे.
वरदान:-
निरंतर आठवण
आणि सेवेच्या संतुलना द्वारे बालपणाचे नखरे नष्ट करणारे,वानप्रस्थी भव.
छोट्या छोट्या
गोष्टींमध्ये संगम युगाच्या अमुल्य वेळेला गमावणे म्हणजेच बालपणाचे नखरे आहेत. आता
हे नखरे शोभत नाहीत. वानप्रस्थ मध्ये फक्त एकच कार्य राहते,बाबाची आठवण आणि सेवा.
या शिवाय दुसऱ्या कोणाची आठवण यायला नको,उठा तरी सेवा आणि आठवण, झोपा तरीही आठवण आणि
सेवा,निरंतर याचे संतुलन राहावे.त्रिकालदर्शी बनून, लहानपणाच्या गोष्टी किंवा
लहानपणाच्या संस्काराचा समाप्ती समारोह साजरा करा.तेव्हा म्हणाल वानप्रस्थी.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-सर्व प्राप्ती संपन्न आत्म्याची लक्षणं संतुष्टता आहे, संतुष्ट राहा आणि
संतुष्ट करा.