04-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,अकाल मूर्त बाबांचा चालता-बोलता तख्त (रथ) हे (ब्रह्मा) आहेत,जेव्हा ते
ब्रह्मा तनामध्ये येतात,तेव्हा तुम्हा ब्राह्मणांची स्थापना करतात"
प्रश्न:-
हुशार मुलं
कोणत्या रहस्याला जाणून,ठीक रीतीने समजावू शकतात?
उत्तर:-
ब्रह्मा कोण आहेत आणि ते ब्रह्माच विष्णू कसे बनतात.प्रजापिता ब्रह्मा येथे आहेत,ते
काही देवता नाहीत.ब्रह्मांनीच ब्राह्मणाद्वारे ज्ञानयज्ञाची स्थापना केली आहे.हे
सर्व रहस्य हुशार मुलं जाणून समजावू शकतात.घोडेस्वर आणि प्यादे तर यामध्ये संभ्रमित
होतात.
गीत:-
ओम नमः शिवाय...
ओम शांती।
भक्तीमध्ये महिमा एकची करतात. महिमा तर गायन करतात परंतु न त्यांना जाणतात,न
त्यांच्या अर्थ सहित परीचयला जाणतात.जर अर्थ सहित महिमा जाणत असते,तर वर्णन जरूर
केले असते.तुम्ही मुलं जाणता उच्च ते उच्च भगवान आहेत. त्यांचे चित्र मुख्य
आहे.ब्रह्माची संतान पण असतील ना.तुम्ही सर्व ब्राह्मण आहात.ब्रह्माला पण ब्राह्मणच
जाणतील,दुसरे कोणी जाणनार नाहीत,म्हणून संभ्रमित होतात,हे ब्रह्मा कसे होऊ
शकतात.ब्रह्माला सूक्ष्म वतनवासी दाखवले आहे. आता प्रजापिता सूक्ष्म वतन मध्ये तर
होऊ शकत नाहीत.तेथे रचना असत नाही.या गोष्टीवरती तुमच्यासोबत खूप वादविवाद
करतात.त्यांना समजावयाला पाहिजे,ब्रह्मा आणि ब्राह्मण आहेत तर खरे ना.जसे ख्रिस्त
पासून ख्रिश्चन अक्षर निघाले, बुध्द पासून बौध्द निघाले आणि इब्राहिम पासून इस्लामी
निघाले,तसेच प्रजापिता ब्रह्मा द्वारे बाह्मण आहेत.आदी देव ब्रह्मा आहेत. वास्तव
मध्ये ब्रह्माला देवता म्हणू शकत नाही.हे पण चुकीचे आहे.जे स्वता:ला ब्राह्मण
म्हणतात,त्यांना विचारायला पाहिजे,ब्रह्मा कुठून आले? ही कुणाची रचना आहे.ब्रह्मा
ची रचना कोणी केली,कधी केली,कोणी समजावू शकणार नाहीत,जाणतच नाहीत.हे पण तुम्ही मुलं
जाणतात,शिवबाबांचा जो रथ आहे,ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात.हे तेच आहेत,जे आत्मा
कृष्ण, राजकुमार बनले होते,८४ जन्मानंतर ब्रह्मा बनले आहेत.जन्मपत्रीचे नाव तर यांचे
वेगळे असेल ना,कारण मनुष्य तर आहेत ना.यांच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचे नाव
ब्रह्मा ठेवले.हे पण मुलं जाणतात हेच ब्रह्मा, विष्णू चे रूप आहेत,नारायण बनतात
ना.८४ जन्माच्या शेवटी साधारण रथ आहे ना. हे शरीर पण सर्वांचे रथ आहेत ना.अकाल
मूर्तचे बोलता चालता तख्त आहे.शिख लोकांनी परत ते तख्त बनवले आहे,त्याला अकालतख्त
म्हणतात.हे तर अकालतख्त सर्वच आहेत.आत्मे सर्व अकाल मूर्त आहेत.उच्च ते उच्च
भगवंताला रथ पण पाहिजे ना. रथामध्ये प्रवेश करून ज्ञान देतात, त्यांनाच ज्ञानसंपन्न
म्हटले जाते. रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे ज्ञान देतात.ज्ञानसंपन्नचा अर्थ
काही अंतर्यामी किंवा जानी जाननहार नाही.सर्वव्यापीचा अर्थ दुसरा आहे,जानी जाननहारचा
अर्थ दुसरा आहे.मनुष्य तर सर्वांना एकत्र करून,जे मनात येते,ते बोलत राहतात.आता
तुम्ही मुलं जाणतात, आम्ही सर्व ब्राह्मण,ब्रह्माची संतान आहोत.आमचे कुळ सर्वात
उच्च आहे.ते लोक,देवतांना उच्च मानतात, कारण सतयुग इत्यादीं मध्ये देवता
होते.प्रजापिता ब्रह्माची संतान ब्राह्मण असतात,हे कोणी जाणत नाही, शिवाय तुम्हा
मुलांच्या.त्यांना माहिती पण कसे होईल,जेव्हा ब्रह्माला सूक्ष्मवतन मध्ये समजतात.जे
शारिरीक ब्राह्मण वेगळे आहेत,जे पूजा करतात,धामा खातात.तुम्ही तुम्ही तर धामा खात
नाहीत.ब्रह्माचे रहस्य पण चांगल्या रीतीने समजावे लागते.तुम्ही सांगा,दुसऱ्या सर्व
गोष्टीला सोडून,बाबा जे पतीता पासून पावन बनवतात,प्रथम त्यांची आठवण करा.परत या
गोष्टी पण समजतील.थोड्या थोड्या गोष्टीमध्ये संशय आल्यामुळे बाबांना सोडतात. प्रथम
मुख्य गोष्ट आहे,ईश्वर आणि बादशाही.बाबा म्हणतात माझीच आठवण करा.मी जरुर कोणत्या तरी
तना मध्ये येईल ना,त्यांचे नाव पण प्रसिद्ध व्हायला पाहिजे.त्यांची येऊन स्थापना
करतो.ब्रह्मा बाबत समजावण्या साठी खूप विशाल बुद्धी पाहिजे,प्यादे घोडेस्वार
संभ्रमित होतात.अवस्था नुसार समजावतात. प्रजापिता ब्रह्मा तर येथे आहेत.ब्रह्मा
द्वारा ज्ञान यज्ञ स्थापन करतात,तर जरुर ब्राह्मणच पाहिजेत ना. प्रजापिता ब्रह्मा
पण येथे पाहिजेत, ज्याद्वारे ब्राह्मण होतील.ब्राह्मण लोक म्हणतात,आम्ही ब्रह्माची
संतान आहोत.ते समजतात परंपरा द्वारे आमचे कुळ चालत येते,परंतु ब्रह्मा कधी होते,ते
माहिती नाही.आता तुम्ही ब्राह्मण आहात.ब्राह्मण तेच आहेत,जे ब्रह्माची संतान आहेत.ते
तर बाबांच्या कर्तव्याला जाणत नाहीत. भारतामध्ये प्रथम ब्राह्मणच असतात.
ब्राह्मणांचे उच्च ते उच्च कुळ आहे.ते ब्राह्मण पण समजतात आमचे कुळ जरुर
ब्रह्मापासूनच निघाले असेल.परंतू कधी,कसे, हे वर्णन करु शकत नाहीत.तुम्ही समजतात
प्रजापिता ब्रह्माच, ब्राह्मणांची स्थापना करतात.ज्या ब्राह्मणांनाच परत देवता
बनायचे आहे. ब्राह्मणांना येऊन बाबा शिकवतात.ब्राह्मणांचे राज घराणे
नाही.ब्राह्मणांचे कुळ आहे.राज घराणे,तेव्हाच म्हणाल जेव्हा राजा राणी बनतील.जसे
सूर्यवंशी घराणे.
जसे ब्राह्मणांमध्ये राजा तर बनत नाहीत. ते जे म्हणतात,कौरव आणि पांडवांचे राज्य
होते,दोन्ही चुकीचे आहे,दोघांचे राज्य नसते.प्रजेचे प्रजा वरती राज्य आहे,त्यांना
राजधानी म्हणणार नाही,ताजच नाही.बाबांनी समजावले होते,प्रथम दुहेरी ताजधारी
भारतामध्ये होते,परत एकेरी ताजधारी बनले,यावेळेत तर ताजच नाहीत.हे चांगल्या प्रकारे
स्पष्ट करायचे आहे.काही चांगली धारण करणारे असतील,तर ते चांगल्या रीतीने समजून
सांगतील.ब्रह्मा बाबत जास्त स्पष्ट करायचे आहे.विष्णूला तर जाणत नाहीत.हे पण
समजावयाचे आहे,वैकुंठाला विष्णुपुरी म्हटले जाते,म्हणजे लक्ष्मी-नारायणाचे राज्य
होते.कृष्ण राजकुमार असेल,तर म्हणेल माझे पिता राजा आहेत.असे नाही कृष्णाचे पिता
राजा होऊ शकत नाहीत.कृष्णाला राजकुमार म्हटले जाते,तर जरूर राजाच्या जवळ जन्म झाला
असेल.सावकाराच्या जवळ जन्म घेतला तर राजकुमार थोडेच म्हणतील. राजाचे पद आणि
सावकाराच्या पदा मध्ये रांत्र-दिवसाचा फरक पडतो.कृष्णाचे पिता,राजाचे नावच
नाही.कृष्णाचे नाव खूप प्रसिद्ध आहे. पित्याचे उच्चपद नाही,ते दुसऱ्या दर्जाचे पद
आहे,फक्त कृष्णाला जन्म देण्यासाठी निमित्त बनतात.असे नाही कृष्णाच्या आत्म्या
पेक्षा, ते जास्त शिकलेले आहेत,असे नाही.कृष्णच परत नारायण बनतात.बाकी पित्याचे नाव
गायब होते.ते पण जरुर ब्राह्मणच आहेत,परंतु अभ्यासामध्ये कृष्णा पेक्षा कमी
आहेत.कृष्णाच्या आत्म्याचे शिक्षण,त्यांच्या पित्यापेक्षा उच्च असते तेव्हा तर नाव
होते. कृष्णाचे पिता कोण होते,हे जसे कोणालाच माहिती नाही,पुढे चालून माहिती
होईल.येथुनच बनायचे आहेत.राधेचे पण मातपिता असतात,परंतु त्यांच्या पेक्षा,राधेचे
नाव जास्त होते, कारण मातपिता कमी शिकले आहेत.राधे चे नाव त्यांच्यापेक्षा जास्त
होते.या सविस्तर गोष्टी मुलांना समजून घ्यायच्या आहेत.सर्व शिक्षणावर आधारीत
आहे.ब्रह्मा बाबत समजावून सांगण्यासाठी पण अक्कल पाहिजे.तेच श्रीकृष्ण आहेत,त्यांची
आत्मा ८४ जन्म भोगते.तुम्ही पण ८४ जन्म घेतात.सर्व तर एकत्र येणार नाहीत.जे
शिक्षणामध्ये प्रथम असतात,स्वर्गामध्ये पण प्रथम येतील. क्रमानुसार तर असतात ना.खूप
सूक्ष्म गोष्टी आहेत,कमी बुद्धी वाले तर धारणा करू शकत नाहीत, क्रमानुसार
जातात.तुम्हीपण क्रमानुसार परिवर्तन होतात.खूप मोठी रांग आहे,जी शेवटी जाईल.
क्रमानुसार आपल्या स्थानावरती जाऊन निवास करतील.सर्वांचे स्थान बनलेले आहे.हा फार
आश्चर्यकारक खेळ आहे परंतु कोणी समजत नाहीत.याला काट्याचे जंगल म्हटले जाते.येथे
सर्व एक-दोघांना दु:ख देत राहतात.तेथे तर नैसर्गिक सुख आहे, येथे कृत्रिम सुख
आहे.खरे सुख देणारे तर बाबाच आहेत.येथे कागविष्टा समान सुख आहे.दिवसेंदिवस
तमोप्रधान बनत जातात,खूप दुःख आहे.मुलं म्हणतात बाबा,मायेचे वादळ खूप येतात,माया
गोंधळात टाकते,दुःखाची जाणीव होते. सुखदाता बाबाची मुलं बनून,जर दुःखाची जाणीव
झाली,तर बाबा म्हणतात मुलांनो हा तुमचा मोठा कर्मभोग आहे.जेव्हा बाबा मिळाले
आहेत,तर दुःखाची जाणीव व्हायला नाही पाहिजे.जे जुने कर्मभोग आहेत त्याला योगाद्वारे
नष्ट करा.जर योगबळ नसेल तर,सजा खाऊन नष्ट करावे लागतील.मोचरा आणि मानी तर चांगले
नाही ना,म्हणजे सजा खाऊन थोडेसे पद मिळवणे चांगले नाही.तर पुरुषार्थ करायला पाहिजे,
नाहीतर लवाद बसतो.प्रजा तर खूप आहे.हे तर वैश्विक नाटकानुसार सर्व गर्भजेल मध्ये
खूप सजा खातात. आत्मे खूप भटकत राहतात.कोणती कोणती आत्मा खूप नुकसान करते. जेव्हा
कोणामध्ये अशुद्ध आत्म्याचा प्रवेश होतो,तर ते खूप हैराण होतात. नवीन दुनिया मध्ये
अशा गोष्टी नसतात.आता तुम्ही नवीन दुनिये मध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करतात. तेथे
जाऊन नवीन नवीन महल बनवावे लागतील.राजांच्या जवळ जन्म घेताल,जसे कृष्ण जन्म घेतात.
परंतु इतके महल इत्यादी सर्व अगोदर थोडेच असतात,ते तर बनवावे लागतील.कोण
बनवते,ज्यांच्याजवळ जन्म घेतात ते बनवतात.गायन पण आहे,राजांच्या जवळ जन्म होतो.कसा
होतो, ते पुढे चालून तुम्ही पहाल.आता थोडेच बाबा सांगतील,ते परत कृत्रिम नाटक
होईल,म्हणून काहीच सांगत नाहीत.वैश्विक नाटकामध्ये ते सांगण्याची नोंद नाही. बाबा
म्हणतात,मी पण कलाकार आहे.पुढील गोष्टी जाणत असतो, तर खूप काही सांगितले असते.बाबा
आंतरयामी असते,तर अगोदरच सांगीतले असते.बाबा म्हणतात, नाही,वैश्विक नाटकांमध्ये जे
होत आहे,त्याला साक्षी होऊन पाहत चला आणि सोबत आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त
राहा.यामध्येच नापास होतात.ज्ञान कधी कमी-जास्त होत नाही,आठवणी ची यात्रा कधी
कमी,कधी जास्त होते.ज्ञान तर जे मिळाले,ते तर आहेच ना.आठवणीच्या यात्रेमध्ये कधी
उमंग उत्साह राहतो,कधी राहत नाही.खाली वरती यात्रा होत राहते,असे ज्ञानामध्ये होत
नाही. ज्ञानाला यात्रा पण म्हटले जात नाही, आठवणी ची यात्रा आहे.आठवण केल्यामुळे
तुम्ही सुरक्षित राहाल.देह अभिमानामध्ये आल्यामुळे तुम्ही खूप धोखा खातात.विकर्म
करतात. काम महाशत्रू आहे,त्यामध्ये नापास होतात. क्रोध इत्यादीच्या बाबा इतक्या
गोष्टी करत नाहीत.ज्ञानाद्वारे एक तर सेकंदांमध्ये जीवन मुक्ती म्हणतात, किंवा
सागराला शाई बनवा तरी पण महिमा पूर्ण होणार नाही,किंवा असे म्हणतात ईश्वराची आठवण
करा. आठवण कशाला म्हटले जाते,हे थोडेच जाणतात.असे म्हणतात कलियुगा मधुन आम्हाला
सतयुगामध्ये घेऊन चला.जुन्या दुनियेमध्ये दुःखच दुःख आहे.तुम्ही पाहता
पावसाळ्यामध्ये अनेक इमारती पडतात,अनेक लोक पाण्यामध्ये बुडतात.जास्त पाऊस
पडेल,नैसर्गिक आपत्ती होतील. हे सर्व अचानक होत राहील. कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये
आहेत. विनाशाच्या वेळेत जातील,परत काय करू शकतील,मरून जातील.भूकंप होतील,वादळ
इत्यादी सर्व होत राहील.बॉम्ब पण फेकत राहतील परंतु येथे गृहयुध्द होईल.रक्ताच्या
नद्या वाहतील,मारामारी होईल.एक दोघावरती केस करत राहतात, तर जरूर लढतील.सर्व
विनाधनीचे आहेत,तुम्ही तर धनी चे बनले आहात.कोणती लढाईत इत्यादी तुम्हाला करायची
नाही. ब्राह्मण बनल्यामुळे तुम्ही धनीचे बनले आहात.धनी पित्याला किंवा पतीला
म्हणतात.शिवबाबा तर पतींचे पती आहेत.कन्येचा साखरपुडा होतो तर म्हणतात,मी अशा
पतीसोबत कधी भेटेल.आत्मा म्हणते,शिवबाबा माझा आपल्याशी साखरपुडा झाला आहे.आता आम्ही
आपल्याला,कधी भेटू.कोणी तर खरे सांगतात,कोणी तर खूप लपवतात,खरे लिहित नाहीत,बाबा
आमच्याकडून ही चूक झाली,क्षमा करा.जर कोणी विकारांमध्ये गेले, तर बुद्धीमध्ये धारणा
होऊ शकत नाही.बाबा म्हणतात,तुम्ही अशी मोठी चूक करणार तर,चकनाचूर व्हाल.तुम्हाला तर
मी गोरा बनवण्यासाठी आलो आहे,परत तुम्ही काळे तोंड कसे करतात?जरी स्वर्गा मध्ये आले
तरी पाई-पैशाचे पद मिळेल.राजधानी स्थापन होत आहे ना.कोणी तर विकाराशी हार खाऊन,जन्म
जन्मांतर चे पद भ्रष्ट करतात.काही तर म्हणतात, तुम्ही हे पद मिळवण्यासाठी आले
आहात.बाबा इतके उच्च बनतील,तर आम्ही मुलं प्रजेमध्ये थोडेच बसणार.पिता गादीवरती
बसेल आणि मुलगा दास दासी बनेल,तर खूप लाज वाटेल ना. अंत काळात तुम्हाला सर्व
साक्षात्कार होतील,परत खूप पश्चात्ताप होईल. विनाकारण आम्ही असे केले. संन्यासी पण
ब्रह्मचारी बनून राहतात तर विकारी लोक त्यांच्या पाया पडतात.पवित्रतेचा मान आहे.
कुणाच्या भाग्या मध्ये नाही,बाबा येऊन शिकवतात,तरीही गफलत करत राहतात.आठवण करत
नाहीत,तर खूप विकर्म बनतात. तुम्हा मुलावरती आता बृहस्पतीची दशा आहे,यापेक्षा उच्च
दशा कोणती असत नाही.तुम्हा मुलांवरती दशा पण चक्र लावत राहते,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती,मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) या
वैश्विक नाटकाचे प्रत्येक दृश्य साक्षी होऊन पाहिचे आहे.एका बाबांच्या आठवणीमध्ये
मस्त राहायचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये कधी उमंग कमी व्हायला नको.
(२) राजयोगाच्या अभ्यासामध्ये कधी गफलत करू नका.आपले उच्च भाग्य बनवण्यासाठी पवित्र
जरूर बनायचे आहे.हार खाऊन जन्म जन्मांतर साठी पदभ्रष्ट करायचे नाही.
वरदान:-
मनमनाभवच्या
मंत्रा द्वारा, सर्व दुःखापासून दूर राहणारे,नेहमी सुखरूप भव.
जेव्हा कोणत्याही
प्रकारचे दुःख येते तर हा मनमनाभवचा मंत्र घ्या,ज्याद्वारे दुःख पळून जाईल.
स्वप्नामध्ये पण दुःखाचा अनुभव व्हायला नको.तन पण आजारी पडेल,धन खाली वरती होईल,काही
पण होईल परंतु दुःखाची लाट यायला नको.जसे सागरामध्ये लाटा येत राहतात आणि जात
राहतात परंतु ज्यांना पोहायला येते,ते सुखाचा अनुभव करतात.लाटेला उडी मारून पार
करुन खेळत राहतात. तर सागराची मुलं,तुम्ही सुखरूप आहात दुःखाची लाट यायला नको.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-
प्रत्येक संकल्पा मध्ये दृढतेच्या विशेषतेला प्रत्यक्षात आणा, तर प्रत्यक्षता होऊन
जाईल.