21-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, ज्ञानाला बुद्धीमध्ये धारण करून एकमेकात मिळून क्लास चालवा, आपले आणि
इतरांचे कल्याण करून खरी कमाई करत रहा."
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
कोणता अहंकार कधी आला नाही पाहिजे?
उत्तर:-
काही मुलांमध्ये अंहकारा येतो की, या लहान लहान मुली आम्हाला काय समजावणार. मोठी
बहीण गेली तर रुसून क्लासला येण्याचे बंद करतात. हे पण मायेचे विघ्न आहे. बाबा
म्हणतात मुलांनो, तुम्हाला शिकविणाऱ्या शिक्षिकेच्या नावा रुपाला पाहू नका, बाबाच्या
आठवणी मध्ये राहून मुरली ऐका.अहंकारा मध्ये येऊ नका.
ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावत आहेत. जेंव्हा बाबा म्हटले जाते, तर एवढ्या मुलांचा एक
लौकिक पिता, तर होऊ शकत नाही.हे आत्मिक पिता आहेत.त्यांची पुष्कळ मुले आहेत.
मुलांसाठी हा टेप, मुरली इत्यादी साहित्य आहे.मुले जाणतात की आता आम्ही संगमयुगा
मध्ये बसले आहोत, पुरुषोत्तम बनण्यासाठी. ही पण खुशीची गोष्ट आहे. बाबाच पुरुषोत्तम
बनवत आहेत. हे लक्ष्मी नारायण पुरुषोत्तम आहेत ना. या सृष्टी मध्येच उत्तम
पुरुष,मध्यम आणि कनिष्ठ आहेत. सुरुवातीला उत्तम, मध्या मध्ये मध्यम,अंता मध्ये
कनिष्ठ.प्रत्येक गोष्ट प्रथम नवीन उत्तम, मग मध्यम, नंतर कनिष्ठ म्हणजे जुनी होऊन
जाते. जगाचे पण असेच आहे. तर ज्या गोष्टीवर मनुष्यांना संशय येतो, त्यावर तुम्हाला
समजावयाचे आहे. फार करून ब्रह्मा साठीच म्हणतात की, यांना का बसवले आहे? तर त्यांना
झाडाच्या चित्रावर घेऊन जायला पाहिजे. पहा, खाली पण तपश्चर्या करत आहेत, आणि वर
एकदम शेवटच्या जन्मातील अंताच्या जन्मांमध्ये उभे आहेत. बाबा म्हणतात,मी
यांच्यामध्ये प्रवेश करत आहे.या गोष्टी समजावणारा फार हुशार पाहिजे.एक जरी बेअक्कल
निघाला, तर सर्व बी.के.चे नांव बदनाम होऊन जाते.अर्थसहित सांगायला येत नाही. जरी
संपूर्ण पास अंता मध्ये होणार आहेत. यावेळेस १६ कला संपूर्ण कोणी बनलेले नाहीत,
परंतु समजावण्या मध्ये क्रमवारीने जरूर आहेत. परमपिता परमात्मा बरोबर प्रीत बुद्धी
नाहीत,तर विपरीत बुद्धी आहेत ना. यावर तुम्ही समजावू शकता की, जे प्रीत बुद्धी आहेत,
ते विजयंती आणि जे विपरीत बुद्धी आहेत ते विनश्यंती होऊन जातात. यावर पण कांही
मनुष्य बिघडत आहेत,मग कोणता ना कोणता आरोप लावतात.भांडण तंटा करण्यामध्ये उशीर करत
नाहीत. कोणी काय पण करू शकतात.कधी चित्राला आग लावण्या मध्ये पण उशीर करत नाहीत.
बाबा मत देतात की, चित्रांचा विमा उतरा. मुलांची अवस्था पण बाबा समजतात, विकारी
दृष्टीवर पण बाबा रोज समजावत आहेत.लिहतात की,बाबा तुम्ही जे विकारी दृष्टीवर समजावले
आहे,ते बिल्कुल ठीक आहे. ही दुनिया तमोप्रधान आहे ना. दिवसेंदिवस तमोप्रधान बनत जात
आहेत. ते तर समजतात कि, कलियुग आता गुडघ्यावर चालत आहे. अज्ञान रूपी निद्रे मध्ये
बिल्कुल झोपलेले आहेत. कधी कधी म्हणतात पण की, ही महाभारताच्या लढाईची वेळ आहे, तर
जरूर भगवान कोणत्या तरी रूपांमध्ये असतील.रूप तर सांगत नाहीत. त्यांना जरूर
कोणामध्ये प्रवेश करावयाचा आहे. भाग्यशाली रथाचे गायन पण आहे. रथ तर आत्म्याचा
स्वतःचा असेल ना.त्यामध्ये येऊन प्रवेश करतात.त्यांना म्हटले जाते भाग्यशाली रथ.
बाकी ते जन्म घेत नाहीत.त्यांच्याच बाजूला बसून ज्ञान देत आहेत. किती चांगल्या
प्रकारे समजावले जात आहे. त्रिमूर्ती चे चित्र पण आहे. त्रिमूर्ती तर ब्रह्मा विष्णू
शंकर ला म्हणतात.जरूर ते कांहीतरी करून गेले आहेत.त्यामुळे रस्त्याला, घराला पण
त्रिमूर्ती चे नाव ठेवतात. जसे या रस्त्याला सुभाष मार्ग नाव दिले आहे. सुभाषचंद्र
चा इतिहास तर सर्व जाणत आहेत. त्यांचा नंतर बसून इतिहास लिहितात. मग त्याला मोठे
करतात.किती पण महिमा लिहितात. जसे गुरुनानकाचे पुस्तक किती मोठे केले आहे. तेवढे
त्यांनी तर लिहिलेले नाही. ज्ञाना ऐवजी भक्ती च्या गोष्टी लिहिल्या आहेत. हे चित्र
इ.बनवले जाते, समजावण्या साठी.हे तर जाणता कि,या डोळ्यांनी जे कांही दिसत आहे, ते
सर्व भस्म होणार आहे.बाकी आत्मा तर इथे राहू शकत नाही. जरूर घरी निघून जाईल. अशा
गोष्टी कांही सर्वांच्या बुद्धीमध्ये थोड्यांच बसणार आहेत. जर धारणा झाली असेल,तर
क्लास कां चालवत नाहीत.७-८ वर्षांमध्ये असा कोणी तयार होऊ शकत नाही,जो क्लास चालवू
शकेल. फार ठिकाणी असे चालवत पण आहेत. तरी पण समजतात की मातांचे पद उंच आहे. चित्र
तर फार आहेत,मग मुरली धारण करून त्यावर थोडे समजावत आहेत. हे तर कोणी पण करू शकते.
फार सोपे आहे. तरी पण माहित नाही,कां ब्राह्मणी ची मागणी करतात.ब्राह्मणी कोठे गेली,
तर रुसून बसतात, क्लासला जात नाहीत, आपसांमध्ये खिटपीट होऊन जाते. मुरली तर कोणी पण
बसून ऐकवू शकतो. म्हणतात वेळ नाही. इथे तर स्वतःचे कल्याण करावयाचे आहे आणि इतरांचे
पण कल्याण करावयाचे आहे. फार मोठी कमाई आहे. खरी कमाई करावयाची आहे, ज्यामुळे
मनुष्यांचे हिऱ्यासारखे जीवन बनून जाईल. स्वर्गा मध्ये सर्व जातील ना. तेथे नेहमी
खुशी राहते. असे नाही कि, प्रजेचे आयुष्य कमी असते.नाही, प्रजेचे पण आयुष्य मोठे
असते. ते आहेच अमरलोक. बाकी पद मात्र कमी जास्त होते. तर कोणत्या पण विषयावर क्लास
केला पाहिजे.असे का म्हणता कि कि,आम्हाला ब्राह्मणी पाहिजे. एकमेकांमध्ये क्लास
चालवू शकता. गप्पा ठोकत बसायचे नाही.कोणा कोणाला अहंकार येतो की, या लहान कन्या,
आम्हाला काय समजावतील? मायेची विघ्ने पण फार येतात.बुद्धी मध्ये बसत नाही..
बाबा तर रोज समजावतात, शिवबाबा तर एखाद्या विषयावरती समजावत नाहीत ना. ते तर सागर
आहेत. उसळी मारत राहतात. कधी मुलांना समजावतात, कधी बाहेर वाल्याला समजावतात. मुरली
तर सर्वांना मिळत राहते. अक्षर जरी समजत नसले, तर शिकले पाहिजे ना, आपल्या
उन्नतीसाठी पुरुषार्थ केला पाहिजे. आपले आणि दुसऱ्याचे पण कल्याण करायचे आहे. हे
बाबा( ब्रह्मा बाबा)पण सांगू शकत आहेत ना,परंतू मुलांचा बुद्धीयोग शिवाबाबा कडे
राहिला पाहिजे, त्यामुळे म्हणतात की नेहमी समजा शिवबाबा सांगत आहेत. शिवबाबा ची
आठवण करा. शिवबाबा परमधाम वरून आले आहेत, मुरली सांगत आहेत. हे ब्रह्मा तर परमधाम
मधून येऊन सांगत नाहीत. समजा, शिवबाबा या तना मध्ये येऊन,आम्हाला मुरली सांगत आहेत.
हे आठवणीत ठेवले पाहिजे.अर्थ सहित हे बुद्धीमध्ये राहिले तर,ती पण आठवणीची यात्रा
आहे ना. परंतु इथे बसले तरी अनेकांचा बुद्धीयोग इकडे तिकडे फिरत राहतो. इथे तुम्ही
आठवणीच्या यात्रेमध्ये चांगल्या रीतीने राहू शकतात.कधी गांवाकडची आठवण
येईल,घरादाराची आठवण येईल. बुद्धीमध्ये हे आठवणीत राहिले पाहिजे,शिवबाबा आम्हाला
यांच्या मध्ये बसून शिकवत आहेत. आम्ही शिवबाबाच्या आठवणी मध्ये मुरली ऐकत होतो,मग
बुध्दीयोग कुठे गेला.असा अनेकांचा बुद्धीयोग भटकत आहे.इथे तुम्ही आठवणीच्या
यात्रेमध्ये चांगल्या रितीने राहू शकता.असे समजता कि, शिवबाबा परमधाम मधून आले आहेत.
बाहेर गांवाकडे राहिल्याने, असे विचार येऊ शकत नाहीत.कोणी कोणी समजतात की, शिवबाबाची
मुरली या कानाद्वारे ऐकत आहोत,मग सांगणाऱ्यांचे नाव रूप आठवण राहत नाही. हे सारे
ज्ञान आतील आहे. मनामध्ये विचार आला पाहिजे की, शिवबाबाची मुरली आम्ही ऐकत आहोत. असे
नाही की, अमुक बहीण सांगत आहे.शिवबाबाची मुरली ऐकत आहोत. ही पण आठवणीत राहण्याची
युक्ती आहे. असे नाही की, जेवढी वेळ आम्ही मुरली ऐकत आहोत, तेवढे आठवणीत आहे. नाही,
बाबा म्हणतात की, अनेकांची बुद्धी कोठे ना कोठे,बाहेर भटकत राहते.शेतीवाडी इ.ची
आठवण येत राहते.बुद्धीयोग कोठे बाहेर भटकला नाही पाहिजे.शिवबाबाची आठवण करण्यात
कांही कष्ट थोडेच आहेत, परंतु माया आठवण करून देत नाही.सारा वेळ शिवबाबाची आठवण राहू
शकत नाही, इकडचे तिकडचे विचार येत राहतात. क्रमवारीने पुरुषार्थानुसार आहेत ना.जे
फार जवळचे आहेत त्यांच्या बध्दी मध्ये चांगल्या रीतीने बसते. सर्व थोडेच ८ च्या
माळेमध्ये येऊ शकतील. ज्ञान,योग, दैवी गुण हे सर्व आपल्या मध्ये पाहायचे आहे.आमच्या
मध्ये कोणता अवगूण तर नाही ना? मायेच्या वश होऊन कोणते विकर्म तर होत नाही ना? कोणी
कोणी तर फारच लालची बनून जातात.लालच पण एक भूत आहे. त्यामुळे मायाची प्रवेशता अशी
होते की, भुख भुख करत राहतात. खाऊ खाऊ आणि पोटात बाऊ... कोणामध्ये खाण्याची फार
आसक्ती असते.जेवण पण कायद्यानुसार असले पाहिजे. अनेक मुले आहेत.आणखीन फार मुले
बनणार आहेत.किती ब्राह्मण ब्राह्मणी बनतील. मातांना पुढे केले पाहिजे. शिवशक्ती
भारत माताचा,विजय असो.
बाबा म्हणतात की, स्वतःला आत्मा समजा आणि शिवबाबाची आठवण करा. सुदर्शन चक्र फिरवत
रहा. स्वदर्शन चक्रधारी तुम्ही ब्राह्मण आहात.या गोष्टी नवीन कोणी आले, तर समजू शकत
नाही. तुम्हीं आहात सर्वोत्तम ब्रह्मा मुखवंशी, ब्राह्मण कुलभूषण,स्वदर्शन चक्रधारी.
नवीन कोणी ऐकले तर म्हणेल स्वदर्शन चक्र तर, विष्णूचे आहे. हे मग एवढ्या सर्वांना
म्हणतात, मानणार नाहीत,त्यामुळे नविन मुलांना क्लासला बसू देत नाहीत.ते समजू शकत
नाहीत. कोणी कोणी मग बिगडून जातात,काय आम्ही बेसमज आहोत,जे आम्हाला येऊ देत नाहीत,
कारण इतर सत्संगा मध्ये असे कोणीपण जात राहते. तेथे तर शास्त्रातील गोष्टी सांगत
राहतात. त्या ऐकणे प्रत्येकाचा हक्क आहे. इथे तर काळजी घेतली जाते. हे ईश्वरी ज्ञान
बुद्धीमध्ये नाही बसले तर बिगडून जातात. चित्रांची पण काळजी घेतली पाहिजे. या आसुरी
दुनिया मध्ये, आपली दैवी राजधानी स्थापन करावयाची आहे.जसे क्राईस्ट आले आपला धर्म
स्थापन करण्यासाठी. हे बाबा दैवी राजधानी स्थापन करत आहेत. यामध्ये हिंसेची कोणती
गोष्ट नाही.तुम्हीं ना काम कटारी ची, ना स्थूल हिंसा करत आहात. गायन पण आहे की,खराब
झालेले कपडे धुवायचे आहेत.मनुष्य तर फार घोर अंधारा मध्ये आहेत. बाबा येऊन घोर
अंधाराला, प्रकाश करत आहेत.तरीपण कांही बाबा बाबा म्हणून,परत तोंड फिरवतात.शिक्षण
सोडून देतात.भगवान विश्वाचे मालक बनवण्यासाठी शिकवत आहेत, असे शिक्षण सोडून दिले तर
त्याला म्हटले जाते महामूर्ख. किती जबरदस्त खजाना मिळत आहे.अशा बाबाला थोडेच कधी
सोडले पाहिजे. एक गाणे पण आहे,तुम्ही प्रेम करा, किंवा लाथ मारा,आम्ही तुमचे दार कधी
सोडणार नाही.बाबा आले आहेत बेहद ची बादशाही भेट देण्यासाठी. सोडण्याची तर गोष्टच
नाही. होय, चांगले लक्षण धारण केले पाहिजेत.स्त्रिया पण तक्रार करतात की, हे आम्हाला
फार तंग करतात.आजकाल लोक फार खराब आहेत, काळजी घेतली पाहिजे. भावाने बहिणीचा संभाळ
केला पाहिजे. आम्हा आत्म्यांना कोणत्या पण परिस्थिती मध्ये, बाबा कडून वरसा जरूर
घ्यावयाचा आहे. बाबाला सोडल्याने वरसा नष्ट होऊन जातो. निश्चयबुद्धी
विजयंती,संशयबुध्दी विनशंती,पद पण फार कमी होऊन जाते. ज्ञान तर एकच ज्ञान सागर बाबा
देऊ शकतात. बाकी सर्व भक्ती आहे. जरी कोणी किती पण स्वतःला ज्ञानी समजत असेल, तरी
बाबा म्हणतात की सर्वा जवळ, शास्त्र आणि भक्तीचे ज्ञान आहे.खरे ज्ञान कोणाला म्हटले
जाते, हे पण मनुष्य समजत नाहीत. अच्छा!
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति, मात-पिता बाप दादाची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात,आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)लक्ष दिले
पाहिजे की, मुरली ऐकते वेळी बुद्धी बाहेर भटकत तर नाही? नेहमी स्मृतीमध्ये राहिले
पाहिजे कि, आम्ही शिवबाबाचे महावाक्य ऐकत आहोत. ही पण आठवणीची यात्रा आहे.
(२) स्वतःच स्वतः ला तपासायचे आहे की, माझ्यामध्ये ज्ञान योग आणि दैवी गुण आहेत.
लालच चे भूत तर नाही?मायेच्या वश होऊन कोणते विकर्म तर होत नाही?
वरदान:-
दिव्य
बुद्धीच्या लिफ्ट द्वारे तीन लोकांची सहल करणारे सहयोगी भव:
संगमयुगावर सर्व
मुलांना दिव्य बुद्धीची लिफ्ट मिळाली आहे.या आश्चर्यकारक लिफ्ट द्वारे तीन
लोकांमध्ये जिथे पाहिजे, तिथे जाऊ शकता.फक्त स्मृतीचा बटन चालू करा, तर सेकंदामध्ये
तिथे पोहोचाल आणि जेवढा वेळ, ज्या लोकांचा अनुभव करू इच्छिता तेवढा वेळ तेथे स्थिर
राहू शकता. या लिफ्टचा वापर करण्यासाठी अमृतवेळेला काळजीपूर्वक बसून, स्मृती रुपी
बटनला यथार्थ रीतीने सेट करा.अधिकारी होऊन, या बटनला कार्यामध्ये आणा, तर सहजयोगी
बनाल.मेहनत नाहीशी होऊन जाईल.
बोधवाक्य:-
मनाला नेहमी खुशी मध्ये ठेवा, हीच जीवन जगण्याची कला आहे.