17-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,ज्ञानसागर बाबा आले आहेत,ज्ञानाची वर्षा करून या धरतीला हरित
बनवण्यासाठी,आता स्वर्गाची स्थापना होत आहे,त्यामध्ये येण्यासाठी दैवी संप्रदाय
बनायचे आहे"
प्रश्न:-
सर्व गुण
असणाऱ्या मुलांचे मुख्य कर्तव्य कोणते आहे?
उत्तर:-
नेहमी श्रेष्ठ आत्मिक सेवा करणे. येथे बसून किंवा चालता-फिरता खास भारताची आणि बाकी
साऱ्या विश्वाला पावन बनवायचे आहे. श्रीमता नुसार बाबांचे मदतगार बनणे,हेच
सर्वोत्तम ब्राह्मणांचे कर्तव्य आहे.
गीत:-
जो पियाके साथ
है,उनपर सदा बरसात है.....
ओम शांती।
आत्मिक मुलांना आत्मिक पिता समजावत आहेत,जे आत्मिक पित्याच्या सोबत आहेत, कारण बाबा
ज्ञानाचे सागर आहेत. कोणते बाबा? शिवबाबा.ब्रह्मा बाबांना ज्ञानाचे सागर म्हणणार
नाही. शिवबाबा ज्यांनाच परमपिता परमात्मा म्हटले जाते. एक लौकिक शारीरिक पिता,दुसरे
आहेत पारलौकिक आत्मिक पिता. ते शरीराचे पिता,हे आत्म्याचे पिता. या गोष्टी खूप
चांगल्या रीतीने समजण्याच्या आहेत आणि हे ज्ञान ऐकवणारे ज्ञानसागर आहेत. जसे भगवान
सर्वांचे आहेत,तसेच ज्ञान पण एकच देऊ शकतात. बाकी जे ग्रंथ इत्यादी वाचतात,भक्ती
करतात, ते काही ज्ञान अर्थसाहित ज्ञान नाही. त्याद्वारे ज्ञान वर्षा होत नाही
म्हणून भारत बिल्कुल सुकून गेला आहे,जसे पाऊस पडत नाही तर जमीन सुकते ना. भारत
कंगाल झाला आहे. तो भक्तिमार्ग आहे,त्याला ज्ञानमार्ग म्हणत नाहीत. ज्ञानाद्वारे
स्वर्गाची स्थापना होते. तेथे नेहमी धरती हरित राहते,कधी सुकत नाही. हे राजयोगाचे
शिक्षण आहे. ईश्वर पिता ज्ञान देऊन दैवी संप्रदायाचे बनवतात. बाबा समजवतात, मी सर्व
आत्म्यांचा पिता आहे परंतु मला आणि माझ्या कर्तव्याला न झाल्यामुळेच मनुष्य इतके
पतित दु:खी विनाधनीचे झाले आहेत. आपसमध्ये भांडत राहतात. घरामध्ये पिता नसतात,तर
मुलं भांडण करतात,तर म्हणतात ना तुमचे पिता आहेत की नाहीत. यावेळेस सारी दुनिया
बाबांना जाणत नाहीत,त्यामुळे इतकी दुर्गती झाली आहे. बाबांना जाणल्यामुळे सदगती होते.
सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत,त्यांना बाबा म्हटले जाते, त्यांचे नाव शिव आहे.
त्यांचे नाव कधी बदलू शकत नाही. जेव्हा मनुष्य सन्यास करतात,तर त्यांचे नाव बदलतात.
लग्नामध्ये कुमारीचे नाव बदलते,ही परंपरा भारतामध्येच आहे. परदेशामध्ये असे होत नाही.
हे शिवबाबा सर्वांचे मायबाप आहेत. गायन पण करतात,तुम्हीच माता, पिता तुम्हीच आहात.
भारतामध्येच म्हणतात तुमच्या कृपेने सुख भरपूर. असे नाही की भक्तिमार्गा मध्ये
भगवान कृपा करत आले आहेत, नाही. भक्तीमध्ये सुख नसते. मुलं जाणतात,स्वर्गामध्ये खूप
सुखं आहेत. ती नवीन दुनिया आहे,जुन्या दुनियेमध्ये दुःखच असते. जे चांगल्या रीतीने
जिवंतपणीच मेले आहेत, म्हणजे अनासक्त झाले आहेत,त्यांचे नाव बदलू शकते परंतु माया
जिंकते. तर ब्राह्मणा पासून बदलून शुद्र बनतात,म्हणून बाबा नावं बदलत नाहीत.
ब्राह्मणांची माळा बनत नाही. तुम्ही मुलं सर्वोत्तम उच्च कुळाचे आहात. श्रेष्ठ
आत्मिक सेवा करतात. येथे बसून चालता-फिरता, तुम्ही भारताची खास,बाकी विश्वाची सेवा
करतात. विश्वाला तुम्ही पवित्र बनवतात. तुम्ही बाबांचे मदतगार आहात. बाबाच्या
श्रीमता वर चालून तुम्ही मदत करतात. हा भारतच पावन बनणार आहे. तुम्ही म्हणाल आम्ही
कल्प-कल्प भारताला पवित्र बनवून, पवित्र भारतावर राज्य करतो. ब्राह्मणा पासून परत
आम्ही भविष्या मध्ये देवी-देवता बनतो. विराट रुपाचे पण चित्र आहे. प्रजापिता
ब्रह्माची मुलं ब्राह्मणच झाले. ब्राह्मण तेव्हाच बनतील जेव्हा प्रजापिता सन्मुख
असतील. आता तुम्ही सन्मुख आहात. तुम्ही प्रत्येक जण प्रजापिता ब्रह्माची संतान
स्वतःला समजतात. ही युक्ती आहे. संतान समजल्यामुळे भाऊ-बहीण बनतात. भावा-बहिणीची कधी
विकारी दृष्टी होऊ शकत नाही. आता बाबा आदेश काढतात की,तुम्ही ६३ जन्म पतित बनले,आता
पावन दुनिया स्वर्गा मध्ये जायचे असेल,तर पवित्र बना. तेथे पतित आत्म जाऊ शकत नाही,
म्हणून मज बेहद पित्याला तुम्ही बोलवतात. आत्माच शरीराद्वारे गोष्ट करते. शिवबाबा
म्हणतात मी या शरीरा द्वारे गोष्टी करतो,नाहीतर मी कसे येऊ?माझा जन्म दिव्य आहे.
सतयुगामध्ये दैवीगुणांनी युक्त देवता आहेत. यावेळेत आसुरी गुणांनी युक्त मनुष्य
आहेत. येथील मनुष्यांना देवता म्हणू शकत नाही. जरी काहींचे नाव तर मोठे मोठे ठेवले
आहेत. साधू पण स्वतःला श्री-श्री म्हणतात आणि मनुष्याला श्री म्हणतात, कारण स्वतः
पवित्र आहेत म्हणून श्री-श्री म्हणतात. आहेत तर मनुष्यच. जरी विकारांमध्ये जात
नाहीत परंतु विकारी दुनिया मध्येच राहतात ना. तुम्ही भविष्यामध्ये निर्विकारी दैवी
दुनिया मध्ये राज्य कराल. तेथे मनुष्यच असतील परंतु ते दैवी गुणांनी युक्त असतील.
या वेळेत मनुष्य आसुरी गुणांनी युक्त पतित आहेत. गुरूनानक ने पण म्हटले आहे,मुत
पलिती कपड धोऐ... म्हणजे आत्म्याला परमात्मच स्वच्छ करतात. गुरुनानक पण पित्याची
महिमा करतात. आत्ता बाबा स्थापना आणि विनाश करण्यासाठी आले आहेत. बाकीचे जे पण
धर्मसंस्थापक आहेत,ते फक्त धर्म स्थापन करतात आणि सर्व धर्माचा विनाश करत नाहीत.
त्यांची तर वृद्धी होत राहते. आता बाबा वृध्दी बंद करतात. एक धर्माची स्थापना आणि
अनेक धर्माचा विनाश वैश्विक नाटकं नुसार होणारच आहे. बाबा म्हणतात मी आदी सनातन
देवी-देवता धर्माची स्थापना करतो,ज्यासाठी तुम्ही शिकत आहात. सतयुगा मध्ये अनेक
धर्म नसतात. वैश्विक नाटकांमध्ये सर्व धर्मासाठी,परत घरी जाण्याची नोंद आहे. या
विनाशाला कोणी टाळू शकत नाही. विश्वा मध्ये शांती तेव्हाच होईल,जेव्हा विनाश होतो.
या लढाई द्वारे स्वर्गाचे गेट उघडतात. तुम्ही हे पण लिहू शकता की,ही महाभारी लढाई
कल्पापुर्वी पण लागली होती. तुम्ही प्रदर्शनीचे उद्घाटन करतात,तर हे लिहा बाबा
परमधाम मधून स्वर्गाचे उद्घाटन करण्यासाठी आले आहेत. बाबा म्हणतात मी स्वर्गीय
ईश्वरी पिता स्वर्गाचे उद्घाटन करण्यासाठी आलो आहे. स्वर्गवासी बनवण्यासाठी मुलांची
मदत घेतो. इतक्या सर्व आत्म्याला नाहीतरी पावन कोण बनवेल? अनेक आत्मे आहेत.
घराघरांमध्ये तुम्ही हे समजावू शकता, भारतवासी तुम्ही सतोप्रधान होते, परत ८४
जन्मानंतर तमोप्रधान बनले आहात,आता परत सतोप्रधान बना. असे म्हणू नका की,आम्ही
ग्रंथाला मानत नाहीत. तुम्हीच सांगा ग्रंथाला आणि भक्तिमार्गाला तर आम्ही मानत
होतो,परंतु आत्ता ही भक्तिमार्गाची रात्र पूर्ण होत आहे,ज्ञानाद्वारे दिवस सुरू होतो.
बाबा सदगती करण्यासाठी आले आहेत. ज्ञान देण्याची खूप युक्ति पाहिजे. कोणी चांगल्या
रीतीने धारण करतात,कोणी कमी करतात. प्रदर्शनीमध्ये पण जे हुशार मुलं आहेत,तेच
चांगल्या रीतीने समजावतात. जसे बाबा शिक्षक आहेत,तर मुलांना पण शिक्षक बनायचे आहे.
गायन आहे सद्गुरु भवसागर पार करतात. बाबांनाच सत्य खंडाची स्थापना करणारे सत्य बाबा
म्हणतात. खोटा खंड तर रावण स्थापन करतो. आता जेव्हा सद्गती करणारे मिळाले आहेत,तर
आम्ही भक्ती कसे करू शकतो. भक्ती शिकवणारे तर अनेक गुरू लोग आहेत,सद्गुरु तर एकच आहे.
असे म्हणतात सद्गुरु अकाल,परत अनेक गुरू बनवत राहतात. सन्यासी उदासी अनेक प्रकारचे
लोक आहेत. शीख लोक स्वतः म्हणतात सद्गुरु अकाल अर्थात त्याला काळ खात नाही.
मनुष्याला तर काळ खातो. बाबा समजवतात त्यांचे परत आहे जप साहेब,तर सुख मिळेल. मुख्य
दोनच अक्षरे आहेत. बाबा म्हणतात,माझी आठवण करा म्हणजे जप साहेब. साहेब एकच आहेत.
गुरुनानकनी पण इशारा केला होता की,त्यांना जपा. वास्तव मध्ये तुम्हाला जप करायचा
नाही परंतु आठवण करायची आहे. हे आठवण करणे म्हणजे,अजपाजाप आहे. मुखाद्वारे काहीच
बोलू नका, शिव शिव म्हणायचे पण नाही. तुम्हाला तर शांतीधाम मध्ये जायचे आहे. आता
बाबांची आठवण करा. अजपाजाप एकच असतो,जे बाबा शिकवतात. ते तर किती घंटा इत्यादी
वाजवतात,आवाज करत राहतात, महिमा करतात. ते म्हणतात अचतम केशवम. . परंतु एक पण अक्षर
समजत नाहीत. सुख देणारे तर एकच बाबा आहेत. व्यास पण त्यांनाच म्हणतात.
त्यांच्यामध्ये ज्ञान आहे,ते देतात,सुख पण तेच देतात. तुम्ही मुलं समजतात,आमची चढती
कला होत आहे. शिडीमध्ये कलांना दाखवले आहे,या वेळेत तर कोणत्या कला गुण नाहीत. गायन
पण करतात मज निर्गुण मध्ये काहीच कला नाहीत. एक निर्गुण संस्था पण आहे. आता बाबा
म्हणतात,बालक तर महात्मा सारखे असतात,त्यांच्यामध्ये कोणते अवगुण नाहीत. त्यांचे
नाव ठेवतात निर्गुन बालक. जर बालकांमध्ये गुण नाहीत,तर पित्यामध्ये पण नाहीत.
सर्वांमध्ये अवगुण आहेत. गुणवान तर फक्त देवता बनतात. क्रमांक एकचा अवगुण आहे,जे
पित्याला जाणत नाहीत. दुसरा अवगुण आहे,जे विषय सागर मध्ये बुडत राहतात. बाबा
म्हणतात तुम्ही बुडत राहिले,आता मी ज्ञानसागर तुम्हाला क्षीरसागर मध्ये घेऊन जातो.
मी क्षीरसागर मध्ये जाण्यासाठी तुम्हाला ज्ञान देतो. मी यांच्या बाजूमध्ये येऊन
बसतो,जेथे आत्मा राहते,मी तर स्वतंत्र आहे. कुठे पण जाऊ येऊ शकतो. तुम्ही पित्रांना
खाऊ घालतात,तर आत्म्यालाच खाऊ घालतात,शरीर तर भस्म होते, त्यांना पाहू पण शकत नाहीत.
तुम्ही समजता,अमक्या आत्म्याचे श्राद्ध आहे. आत्म्याला बोलावले जाते,याची पण
वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे. कधी आत्मा येते,कधी येत पण नाही. कोणी सांगतात,कोणी
सांगत पण नाहीत. येथे पण आत्म्याला बोलवतात,येऊन बोलते परंतु असे नाही सांगत
की,अमक्या ठिकाणी जन्म घेतला आहे. इतके म्हणतात की आम्ही सुखी आहोत,चांगल्या
घरांमध्ये जन्म घेतला आहे. चांगले ज्ञान असणारे मुलं,चांगल्या घरी जन्म घेतील,कमी
ज्ञान असणारे कमी पद मिळवतील. बाकी सुख तर आहेच. राजा बनणे तर चांगले आहे की,दासी
बनणे चांगले आहे?राजा बनायचे आहे तर,या शिक्षणामध्ये तत्पर राहायचे आहे. ही दुनिया
तर खूप खराब आहे. दुनियावी संगाला कुसंग म्हटले जाते. एकच सत्याचा संग भवसागर पार
करतो,बाकी सर्व तर बुडवणारे आहेत. बाबा तर सर्वांची जन्मपत्री जाणतात. ही पापाची
दुनिया आहे,तेव्हाच बोलवतात, दुसरीकडे कुठे घेऊन चला,जिथे सुख शांती मिळेल. आता बाबा
म्हणतात, गोड गोड मुलांनो,माझे बनून परत माझ्या मतावरती चाला. ही खूप खराब दुनिया
आहे. खूप भ्रष्टाचार करत राहतात,लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होतो. आता बाबा आले
आहेत,मुलांना स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी,तर खूप खुशी व्हायला पाहिजे. वास्तव मध्ये
ही खरी गीता आहे,परत हे ज्ञान प्राय:लोप होते. आता तुम्हाला हे ज्ञान आहे परत दुसरा
जन्म घ्याल तर,हे ज्ञान नष्ट होईल,परत प्रारब्ध मिळेल. तुम्हाला पुरुषोत्तम
बनवण्यासाठी बाबा शिकवत आहेत. आता तुम्ही बाबांना जाणले आहे. आता अमरनाथची यात्रा
होते,तुम्ही स्पष्ट करा ज्यांना सूक्ष्मवतन मध्ये दाखवतात,ते स्थूल वतन मध्ये कसे
आले,डोंगर इत्यादी तर येथे आहेत ना. तेथे पतीत कसे होऊ शकतात,जे पार्वतीला ज्ञान
देतील. बर्फाचे लिंग हाताने बनवतात, ते तर कोठे पण बनवू शकतात. मनुष्य तीर्थक्षेत्रा
वरती जाऊन खूप धक्के खात राहतात. ते समजत नाहीत की,शंकराच्या जवळ पार्वती कशी आली,जे
तिला पावन बनवतील. शंकर काय परमात्मा नाहीत,ते पण देवता आहेत. मनुष्याला खूप समजावले
जाते, तरीही काहीच समजत नाहीत. पारस बुद्धी बनू शकत नाहीत. प्रदर्शनीमध्ये अनेक लोक
येतात,ते म्हणतात ज्ञान तर चांगले आहे, सर्वांना घ्यायला पाहिजे. अरे तुम्ही तर घ्या
ना,तर म्हणतात आम्हाला वेळ नाही. प्रदर्शनीमध्ये पण लिहायला पाहिजे की,या लढाईच्या
नंतर शिव पिता स्वर्गाचे उद्घाटन करत आहेत. विनाशाच्या नंतर स्वर्गाचे द्वार उघडतील.
बाबांनी म्हटले होते,प्रत्येक चित्रामध्ये लिहा,पारलौकिक परमपिता
परमात्मा,त्रिमूर्ती भगवानुवाच. त्रिमूर्ती न लिहिल्यामुळे म्हणतील की,शिव तर
निराकार आहेत,ते कसे ज्ञान देतील?असे समजले जाते,हेच प्रथम गोरे होते, कृष्ण
होते,परत असे मनुष्य बनले आहेत. आता तुम्हाला मनुष्या पासून देवता बनवतात,परत
इतिहासाची पुनरावृत्ती होते. गायन पण आहे मनुष्यपासूनच देवता बनतात,परत शिडी उतरून
मनुष्य बनतात,परत बाबा येऊन देवता बनवतात. बाबा म्हणतात,कल्प-कल्प,कल्पाच्या संगम
युगामध्ये यावे लागते. युगे-युगे म्हणणे चुकीचे आहे. मी संगम युगामध्ये येऊन
तुम्हाला पुण्यात्मा बनवतो,परत रावण तुम्हाला पापत्मा बनवतात. बाबा जुन्या दुनियेला
नवीन बनवतात. या समजण्याच्या गोष्टी आहेत,अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)बाबा सारखे
शिक्षक बनायचे आहे. खूप युक्तीने सर्वांना या खोट्या खंडा मधून काढून सत्य
खंडांमध्ये चालण्यासाठी लायक बनवायचे आहे.
२) दुनियेचा संग कुसंग आहे म्हणून, कुसंगापासून किनारा करून एकच सत्याचा संग करायचा
आहे. उच्च पदासाठी या राजयोगाच्या अभ्यासामध्ये तत्पर राहायचे आहे. एका बाबांच्या
मतावर चालायचे आहे.
वरदान:-
संतुष्टता
द्वारा सर्वांकडून प्रशंसा प्राप्त करणारे नेहमी प्रसन्नचित्त भव.
संतुष्टता ची लक्षणे
प्रत्यक्ष रूपामध्ये प्रसन्नता दिसून येते आणि जे नेहमी संतुष्ट किंवा प्रसन्न
राहतात,त्यांची प्रत्येक जण प्रशंसा अवश्य करतात. तर प्रशंसा,प्रसन्नता द्वारा
प्राप्त करू शकतात म्हणून नेहमी संतुष्ट आणि प्रसन्न राहण्याचे विशेष वरदान स्वतः
पण घ्या आणि दुसऱ्यांना पण द्या, कारण या यज्ञामध्ये अंतिम आहुती, सर्व ब्राह्मणांची
सदा प्रसन्नता आहे. जेव्हा नेहमी प्रसन्न रहाल,तेव्हाच प्रत्यक्ष आवाज पसरेल,अर्थात
विजयाचा झेंडा फडकेल.
बोधवाक्य:-
हिऱ्यासारखे बनून, हिऱ्यासारखे बनण्यासाठी संदेश देणेच,हिरक जयंती ती साजरी करणे आहे.