28-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :-जेवढा वेळ मिळेल एकांतामध्ये जाऊन आठवणीची यात्रा करा,जेंव्हा तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल तेंव्हा ही यात्रा पूर्ण होऊन जाईल "
प्रश्न:-
संगमयुगावर
बाबा आपल्या मुलांमध्ये कोणता असा गुण भरतात,जो अर्ध्याकल्पा पर्यंत चालत राहतो?
उत्तर:-
बाबा म्हणतात ज्याप्रमाणे मी अती गोड आहे, असेच मुलांनाही गोड बनवतो. देवता खूप गोड
आहेत.तुम्हीं मुले आता गोड बनण्याचा पुरुषार्थ करत आहात.जे अनेकांचे कल्याण
करतात,ज्यांच्या मध्ये कोणतेही असुरी विचार नाहीत,ते गोड आहेत.त्यांनाच उंच पद
प्राप्त होते.त्यांचीच नंतर पूजा होते.
ओम शांती।
बाबा बसून समजावत आहेत या शरीराची मालक आत्मा आहे.हे अगोदर समजवायला हवे कारण की आता
मुलांना ज्ञान मिळाले आहे.सुरुवातीला तर समजायचे आहे आम्ही आत्मा आहोत. आत्मा
शरीराद्वारे काम करते, अभिनय करते.असे विचार दुसऱ्या कोणत्या मनुष्याच्या मनात येत
नाहीत कारण की देह-अभिमाना मध्ये आहेत.इथे या विचारांमध्ये बसविले जाते-मी आत्मा
आहे.हे माझे शरीर आहे. मी आत्मा परमपिता परमात्म्याची संतान आहे.ही आठवण सतत विसरून
जाते.प्रथम हे पूर्णपणे आठवणीत ठेवले पाहिजे.यात्रेला जेंव्हा जातात तेंव्हा
म्हणतात चालत राहा.तुम्हांलाही आठवणीच्या यात्रेमध्ये चालत राहायचे आहे,म्हणजेच
आठवण करायची आहे.आठवण करत नाही त्याचा अर्थ यात्रेमध्ये चालत नाहीत.देह-अभिमान
येतो.देह-अभिमाना मुळे काही ना काही विकर्म होत राहते.मनुष्य सदैव बविकर्मच करत
राहतात असेही नाही.तरीही कमाई तर बंद होऊन जाते ना म्हणून जेवढे होईल तेवढे
आठवणीच्या यात्रेमध्ये ढिले पडू नका. एकांतामध्ये बसून स्वतःशी विचार सागर मंथन
करून मुद्दे काढायचे आहेत.किती वेळ बाबांच्या आठवणी मध्ये राहतो, गोड वस्तूची आठवण
येते ना.
मुलांना समजावले आहे,यावेळी सर्व मनुष्य एक दुसऱ्याला नुकसान पोहोचवत आहेत.फक्त
शिक्षकांची महिमा बाबा करतात, त्यातही काही-काही शिक्षक खराब असतात,नाहीतर शिक्षक
म्हणजे शिकवणारा,संस्कार घडवणारा.जे धार्मिक विचारांचे, चांगल्या स्वभावाचे असतात,
त्यांचे वागणे ही चांगले असते. वडील जर दारू इ.पीत असतील तर मुलांनाही तशीच संगत
लागते.याला म्हणतात खराब संग कारण की रावण राज्य आहे ना.राम राज्य होते,परंतु ते कसे
होते,कशाप्रकारे स्थापन झाले,या आश्चर्यकारक गोड गोष्टी तुम्ही मुलेच
जाणतात.गोड,थोडेसे गोड,अतिशय गोड म्हटले जाते ना.बाबांच्या आठवणी मध्ये राहुन तुम्ही
पवित्र बनून इतरांनाही पवित्र बनवत आहात.बाबा नव्या सृष्टीमध्ये येत
नाहीत.सृष्टीमध्ये मनुष्य,जनावरे,शेतीवाडी इ.सर्व असते.मनुष्यासाठी सर्वकाही पाहिजे
ना.शास्त्रांमध्ये प्रलयाचे वर्णनही चुकीचे आहे.प्रलय होतच नाही.हे सृष्टीचे चक्र
फिरतच राहते.मुलांनी सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत सर्व आठवणी मध्ये ठेवायचे
आहे.मनुष्यांना तर अनेक प्रकारची चित्रे आठवणीत येतात.यात्रा इ.आठवतात. ते सर्व आहे
हदचे,तुमची आहे बेहद्द ची आठवण,बेहद्द ची खुशी,बेहद्द चे धन.बेहदचा पिता आहे
ना.हदच्या पित्याकडून सर्व हदचे मिळते.बेहद्दच्या पित्याकडून बेहद्दचे सुख
मिळते.सुख धनाने मिळते.धन तर तिथे भरपूर आहे. तिथे सर्वकाही सतोप्रधान आहे. तुमच्या
बुद्धी मध्ये आहे आम्हीं सतोप्रधान होतो,पुन्हा बनायचे आहे.हेही तुम्ही आता जाणत
आहात,तुमच्या मध्येही ही नंबर वार आहेत-गोड,थोडे गोड, अतिशय गोड आहेत ना.बाबांपेक्षा
ही गोड बनत आहात,तेच उंच पद प्राप्त करतील.अतिशय गोड तेच आहेत जे अनेकांचे कल्याण
करतात.बाबाही अति गोड आहेत ना,म्हणूनच तर सर्वजण त्यांची आठवण करतात.फक्त मध किंवा
साखरेलाच गोड म्हटले जात नाही.असे मनुष्याच्या वागण्याला ही म्हटले जाते.म्हणतात ना
हा खूप गोड मुलगा आहे.सतयुगामध्ये कोणतीही ही आसूरी गोष्ट नसते.एवढे उंच पद
मिळवतात,तर नक्कीच इथे पुरुषार्थ केला आहे.
तुम्ही आता नव्या दुनियेला जाणत आहात.तुमच्यासाठी तर जसे की उद्या नवी दुनिया
सुखधाम असेल.मनुष्यांना माहीतच नाही-शांती केव्हा होती. म्हणतात विश्वामध्ये शांती
व्हावी. तुम्ही मुले जाणता-विश्वामध्ये शांती होती ज्याची आत्ता पुन्हा स्थापना करत
आहोत.आता हे सर्वांना कसे समजावणार अशा प्रकारचे पॉइंट्स काढायला पाहिजेत,ज्याची
मनुष्याला खूप गरज आहे.विश्वामध्ये शांती व्हावी,यासाठी किती प्रयत्न करत राहतात
कारण की अशांती खूप आहे.हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र समोर ठेवायचे आहे.यांचे जेंव्हा
राज्य होते तेंव्हा विश्वामध्ये शांती होती,त्यालाच स्वर्ग देवतांची दुनिया असे
म्हटले जाते.तिथे विश्वामध्ये शांती होती.आज पासून ५ हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी
इतर कोणालाही माहीत नाहीत. ही मुख्य गोष्ट आहे.सर्व आत्मे मिळून म्हणतात विश्वामध्ये
शांती कशी होईल?सर्व आत्मे बोलावतात,तुम्ही इथे विश्वामध्ये शांती स्थापन करण्याचा
पुरुषार्थ करत आहात.ज्यांना असे वाटते की विश्वामध्ये शांती हवी आहे त्यांना तुम्ही
सांगा की भारतामध्ये शांती होती.जेंव्हा भारत स्वर्ग होता तेव्हां शांती होती,आता
नर्क आहे.नर्क (कलियुगामध्ये) अशांती आहे कारण की धर्म अनेक आहेत,मायेचे राज्य आहे.
भक्तीचा ही बाजार आहे. दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. मनुष्य सुद्धा यात्रेला जातात
समजतात नक्कीच काहीतरी खरे असेल.आता तुम्ही समजत आहात, असे केल्याने कोणी पावन बनू
शकत नाही.पावन बनण्याचा रस्ता मनुष्य कोणी सांगू शकत नाही.पतित-पावन एकच पिता
आहे.दुनिया एकच आहे,फक्त नवी आणि जुनी असे म्हटले जाते.नव्या दुनियेमध्ये नवीन
भारत,नवीन दिल्ली असे म्हटले जाते.नवी होणार आहे,ज्यामध्ये पुन्हा नवीन राज्य
असेल.इथे जुन्या दुनियेमध्ये जुने राज्य आहे. जुनी आणि नवी दुनिया कशाला म्हटले
जाते,हेही तुम्ही जाणत आहात.भक्तीचा किती मोठा विस्तार आहे.याला अज्ञान म्हटले
जाते.ज्ञानसागर एक बाबा आहे. बाबा तुम्हाला असे म्हणत नाहीत की राम-राम म्हणा किंवा
अजून काही करा.नाही,दुनियेचा इतिहास भूगोल कसा पुनरावृत्त होतो हे मुलांना समजावले
जाते.हे शिक्षण तुम्ही शिकत आहात. याचे नाव आहे अध्यात्मिक शिक्षण,अध्यात्मिक
ज्ञान.याचा अर्थ ही कोणाला माहित नाही. ज्ञानसागर तर एकच बाबांना म्हटले जाते.तो
आहे-अध्यात्मिक ज्ञानसंपन्न पिता.बाबा आत्म्यांशी बोलतात.तुम्हीं मुले समजता आत्मिक
पिता शिकवत आहे.हे आहे अध्यात्मिक ज्ञान.आत्मिक ज्ञानालाच अध्यात्मिक ज्ञान असे
म्हटले जाते.
तुम्ही मुले जाणत आहात परमपिता परमात्मा बिंदी आहे, तो आम्हांला शिकवत आहे. आम्ही
आत्मे शिकत आहोत.हे विसरायचे नाही.आम्हां आत्म्यांना जे ज्ञान मिळत आहे,नंतर आम्हीं
दुसऱ्या आत्म्यांना ही देतो.हे आठवणीत तेंव्हा राहील जेंव्हा स्वतःला आत्मा समजून
बाबांच्या आठवणीमध्ये राहाल.आठवणी मध्ये खूप कच्चे आहेत लगेच देह- अभिमान
येतो.देही-अभिमानी बनण्याची प्रॅक्टिस करायची आहे. मी आत्मा यांच्याशी सौदा करत
आहे.मी आत्मा व्यापार करत आहे.स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करण्या मध्येच फायदा
आहे.आत्म्याला हे ज्ञान आहे की की आम्हीं यात्रा करत आहे.कर्म तर करायचेच आहे. मुले
इत्यादींनाही सांभाळायचे आहे.काम धंदा ही करायचा आहे. धंदा करत असताना आठवणी मध्ये
राहिले पाहिजे की मी आत्मा आहे,हे खूप अवघड आहे. बाबा म्हणतात कोणतेही उलटे काम
कधीही करू नका.सर्वात मोठे पाप आहे विकाराचे.तोच खूप त्रास देणारा आहे.आता तुम्ही
मुले पावन बनण्याची प्रतिज्ञा करत आहात.त्याच स्मृतीमधे हे रक्षाबंधन साजरे केले
जाते.सुरुवातीला तर एक पैशाची राखी मिळत होती. ब्राह्मण लोक जाऊन राखी बांधत
होते.आज काल तर राखी ही किती फॅशन वाली बनवतात. खरेतर आहे आत्ता ची गोष्ट.तुम्हीं
बाबांशी प्रतिज्ञा करता-आम्ही कधीही विकारांमध्ये जाणार नाही.तुमच्याकडून विश्वाचे
मालक बनण्याचा वारसा घेऊ. बाबा म्हणतात६३ जन्म तर विषय वैतरणी नदी मध्ये गटांगळ्या
खाल्ल्या आता तुम्हाला क्षीरसागरामध्ये घेऊन जात आहे.सागर कोणताही नाही. तुलना
करण्यासाठी म्हटले जाते. तुम्हांला शिवालया मध्ये घेऊन जातात.तिथे भरपूर सुख आहे.आता
हा शेवटचा जन्म आहे,हे आत्म्यांनो पवित्र बना.काय बाबांचे म्हणणे ऐकणार नाही. ईश्वर
तुमचा पिता सांगत आहे गोड मुलांनो विकारांमध्ये जाऊ नका. जन्मजन्मांतर चे पाप
डोक्यावर आहे,ते माझी आठवण केल्यामुळेच भस्म होईल.कल्पा पूर्वीही तुम्हाला शिकवण
दिली होती.बाबा गॅरेंटी तेंव्हाच देतात जेव्हां तुम्हीं हे अश्वासन देता की बाबा
आम्हीं तुमची आठवण करत राहू.एवढी आठवण करत राहा की शरीराचा भानही विसरून
जावा.संन्याशांमधेही काही-काही खूप पक्के ब्रह्मज्ञानी असतात.तेही असे बसल्याबसल्या
शरीर सोडतात. इथे तुम्हाला तर बाबा समजावत आहेत.पावन बनून जायचे आहे. ते तर आपल्या
मतावर चालतात. असे काही नाही की,ते शरीर सोडल्यानंतर मुक्ती-जीवनमुक्ती मध्ये
जातात.नाही.नंतर इथेच येतात परंतु त्यांचे अनुयायी समजतात की तो निर्वाण मध्ये
गेला.बाबा समजावतात-एकही परत जाऊ शकत नाही,कायदाच नाही.झाडाची वृद्धी जरूर होणार आहे.
आता तुम्हीं संगमयुगावर बसले आहात,दुसरे सर्व मनुष्य कलीयुगामध्ये आहेत.तुम्हीं दैवी
संप्रदायाचे बनत आहात.जे तुमच्या धर्माचे असतील ते येत राहतील.देवी-देवतांचे ही तिथे
संगठन (सिजरा)आहे ना.इथे बदली होऊन दुसऱ्या धर्मामध्ये गेले आहेत,पुन्हा निघून
येतील. नाहीतर तिथे जागा कोण भरणार. नक्कीच ते आपली जागा भरून काढण्यासाठी पुन्हा
येतील.या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत.खूप चांगले-चांगले ही येतील जे दुसऱ्या धर्मामध्ये
बदलून गेले आहेत ते पुन्हां आपल्या जागेवर येतील.तुमच्याजवळ मुसलमान इ.पण येतात
ना.खूप लक्ष ठेवावे लागते,लगेच पडताळणी करतात, इथे दुसऱ्या धर्माचे लोक कसे काय
जातात?गंभीर परिस्थितीमध्ये अनेकांना पकडतात नंतर पैसे मिळाल्यावर सोडून देतात.जे
कल्पा पूर्वी घडले आहे ते तुम्ही आता पहात आहात.कल्पा पूर्वीही असे घडले होते.आता
तुम्हीं मनुष्यापासून देवता उत्तम पुरुष बनत आहात. हे आहे सर्वोत्तम ब्राह्मणांचे
कुळ. यावेळी बाबा आणि मुले आत्मिक सेवा करत आहेत.एखाद्या गरिबाला धनवान बनविणे-हिच
आत्मिक सेवा आहे.बाबा कल्याण करतात तर मुलांनी ही मदत केली पाहिजे.जे अनेकांना रस्ता
दाखवतात ते खूप पुढे जाऊ शकतात.तुम्हां मुलांना पुरुषार्थ करायचा आहे परंतु चिंता
करायची नाही,कारण की तुमची जबाबदारी बाबांवर आहे. पुरुषार्थ तीव्रतेने करवला जातो
नंतर जे पण फळ निघते,तर समजले जाते कल्पा पूर्वीप्रमाणे झाले.बाबा मुलांना म्हणतात-
मुलांनो,काळजी करू नका. सेवेमध्ये मेहनत करा.बनत नसतील तर काय करणार!या कुळाचा नसेल
तर तुम्हीं कितीही प्रयत्न करा,कुणी तुमचे डोके कमी खातील,कुणी जास्त. बाबांनी
सांगितले आहे जेंव्हा दुःख जास्त वाढेल तेव्हां येतील. तुमचे काहीही व्यर्थ जाणार
नाही. तुमचे काम आहे योग्य मार्ग दाखवणे.शिवबाबा म्हणतात माझी आठवण करा तर तुमचे
विकर्म विनाश होतील.असे अनेक जण म्हणतात भगवान जरूर आहे.महाभारत युद्धाच्या वेळी
भगवान होता.फक्त कोणता भगवान होता,यामध्ये गोंधळून गेले आहेत.कृष्ण तर असू शकत
नाही.कृष्ण त्या चेहऱ्याने पुन्हा सतयुगामध्येच असेल.प्रत्येक जन्मामध्ये चेहरे
बदलतात.सृष्टी बदलत आहे.जुन्या सृष्टीला नवी सृष्टी, भगवान आता कशी बनवत आहे,हे
कोणालाही माहित नाही. शेवटी तुमचे नाव प्रसिद्धीस येईल. स्थापना होत आहे नंतर हे
राज्य करतील,विनाशही होईल.एका बाजूला नवी दुनिया,एका बाजूला जुनी दुनिया-हे चित्र
खूप चांगले आहे.म्हणतात ही ब्रह्मा द्वारे स्थापना,शंकरा द्वारे विनाश..... परंतु
काहीच समजत नाही.मुख्य चित्र आहे त्रिमूर्ती चे.उंच ते उंच आहे शिवबाबा.तुम्हीं
जाणत आहात-शिवबाबा ब्रह्मा द्वारे आम्हाला आठवणी ची यात्रा शिकवत आहेत.बाबांची आठवण
करा,योग शब्द अवघड वाटतो. आठवण हा शब्द खूप सोपा आहे. बाबा शब्द खूप प्रेमळ आहे.
तुम्हाला स्वतःलाच लाज वाटेल- आम्ही आत्मे बाबांची आठवण करत नाही,ज्यांच्या द्वारे
विश्वाची बादशाही मिळत आहे!स्वतःलाच लाज वाटेल.बाबाही म्हणतील तुम्ही तर बेसमज आहात,
बाबांची आठवण करू शकत नाही तर वारसा कसा मिळवणार! विकर्म विनाश कसे होतील!तुम्हीं
आत्मा आहात मी तुमचा परमपिता परमात्मा अविनाशी आहे ना.तुम्हांला वाटत आहे आम्ही
पावन बनून सुखधाम मध्ये जावे तर श्रीमतावर चालत रहा. मज पित्याची आठवण करत राहा तर
विकर्म विनाश होतील. आठवणच केली नाही तर विकर्म विनाश कसे होतील! अच्छा
गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति माता-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1.
सर्वप्रकारे पुरुषार्थ करायचा आहे,चिंता करायची नाही कारण आपली जबाबदारी घेणारा
स्वतः बाबा आहे.आपले काहीही व्यर्थ जाऊ शकत नाही.
2. बाबां प्रमाणे खूप-खूप गोड बनायचे आहे.अनेकांचे कल्याण करायचे आहे.या शेवटच्या
जन्मांमध्ये पवित्र जरूर बनायचे आहे.धंदा इ.करत असताना अभ्यास करा की मी आत्मा आहे.
वरदान:-
प्रत्येक पावला
मध्ये पदमांची कमाई जमा करणारे सर्व खजान्यांनी संपन्न वा तृप्त आत्मा भव
जी मुले बाबांच्या
आठवणी मध्ये राहून प्रत्येक पाऊल उचलतात ते पावला पावला मध्ये पदमांची कमाई जमा करत
राहतात.या संगमयूगा वरच पदमांच्या कमाईची खान मिळते.संगमयुग आहे जमा करण्याचे
युग.आता जेवढे जमा करायचे आहे तेवढे करू शकता.एक पाऊल अर्थात एक सेकंदही विना जमा
केल्याचा जायला नको अर्थात व्यर्थ जायला नको.भंडारा सदैव भरपूर असायला हवा.अप्राप्त
नाही कोणती वस्तू.....असे संस्कार असावे. जेंव्हा आता अशी तृप्त किंवा संपन्न आत्मा
बनाल तेंव्हा भविष्यामध्ये अखूट खजान्याचे मालक बनाल.
बोधवाक्य:-
कोणत्याही गोष्टींमध्ये नाराज होण्याच्या बदल्यात ज्ञानसंपन्नतेच्या आसनावर
विराजमान रहा.