07-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,श्रीमता वरती चालून सर्वांना मुक्ती,जीवनमुक्ती चा रस्ता दाखवा,सर्व दिवस
हाच धंदा करत रहा"
प्रश्न:-
बाबांनी
कोणत्या सूक्ष्म गोष्टी ऐकवल्या आहेत,ज्या खूप समजून घेण्याच्या आहेत?
उत्तर:-
सतयुग अमर लोक आहे,तेथे आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते, परंतु मृत्यूचे नाव
नाही,म्हणून त्याला मृत्यू लोक म्हटले जात नाही.(२) शिवबाबाची बेहद्दची
रचना,ब्रह्माची रचना आहे,या वेळेत फक्त तुम्ही ब्राह्मण आहात.त्रिमूर्ती शिव म्हणाल,
त्रिमूर्ती ब्रह्मा नाही. या खूप सूक्ष्म गोष्टी बाबांनी ऐकवल्या आहेत,अशा गोष्टी
वरती विचार करून बुद्धीसाठी भोजन तयार करायचे आहे.
ओम शांती।
त्रिमूर्ती शिवभगवानुवाच, आता ते लोक त्रिमूर्ती ब्रह्मा म्हणतात. बाबा म्हणतात
त्रिमूर्ती शिवभगवानुवाच,त्रिमूर्ती ब्रह्मा भगवानुवाच म्हणत नाहीत.तुम्ही
त्रिमूर्ती शिवभगवानुवाच म्हणू शकतात.मनुष्य तर शिव-शंकरला एकच म्हणतात.हे तर खूप
सरळ आहे.त्रिमूर्ती ब्रह्माच्या ऐवजी त्रिमुर्ती शिवभगवानुवाच आहे.मनुष्य तर
म्हणतात,शंकराने नेत्र उघडला तर विनाश होतो.हे सर्व बुद्धी द्वारे काम घेतले
जाते.तीन देवतांची मुख्य भूमिका आहे.ब्रह्मा विष्णूची तर ८४ जन्माची मोठी भूमिका
आहे.विष्णूचा आणि प्रजापिता ब्रह्माचा अर्थ पण समजला आहे,या तिघांची भूमिका
आहे.ब्रह्माच्या नावाचे तर गायन आहे,आदीदेव, एडम.प्रजापिताचे मंदिर पण आहे.हा
विष्णूचा किंवा कृष्णाचा अंतिम८४ वा जन्म,ज्याचे नाव ब्रह्मा ठेवले आहे.ब्रह्मा आणि
विष्णूला सिद्ध करायचे आहे.आता ब्रह्माला दत्तक म्हणणार,हे दोन्ही मुलं शिवाचे
आहेत.वास्तव मध्ये शिवाचा मुलगा ब्रह्माच आहे.वास्तव मध्ये मुलगा एकच आहे.बाप आणि
दादा, विष्णूचे नाव येत नाही.प्रजापिता ब्रह्माद्वारा शिवबाबा स्थापना करत
आहेत.विष्णू द्वारा स्थापना करत नाहीत.शिवाची पण मुलं आहेत, ब्रह्माची पण मुल
आहेत.विष्णूचे मुलं म्हणू शकत नाहीत.न लक्ष्मी-नारायणला खूप मुलं होऊ शकतात. हे
बुद्धीचे भोजन आहे, स्वतःहून बुद्धीचे भोजन बनवायला पाहिजे.सर्वात जास्त भूमिका
विष्णूची आहे.विराट रूप पण विष्णूचे दाखवतात,न की ब्रह्माचे. विराट रूप विष्णूचे
बनवतात,कारण प्रथम प्रजापिता ब्रह्माचे नाव धरतात. ब्रह्माची खूप थोडी भूमिका आहे,
म्हणून विराट रूप विष्णूचे दाखवतात.चतुर्भुज रुप पण विष्णूचे बनवतात. वास्तव मध्ये
अलंकार तुमचे आहेत,या समजण्याच्या गोष्टी आहेत.कोणते मनुष्य समजावू शकत नाहीत.बाबा
नव-नवीन प्रकारे समजावत राहतात.बाबा म्हणतात त्रिमूर्ती शिवभगवानुवाच बरोबर आहे.
विष्णू ब्रह्मा आणि शिव.यामध्ये पण प्रजापिता ब्रह्माच मुलगा आहे.विष्णूला मुलगा
म्हणणार नाही. जरी रचना म्हणतात परंतु रचना तर ब्रह्माची असेल ना.जे परत वेगवेगळे
नाव रूप घेतात.मुख्य भूमिका तर त्यांची आहे.ब्रह्माची भूमिका खूप थोडा वेळ आहे,तेही
संगमयुगामध्ये. विष्णूचे किती वेळ राज्य चालते,सर्व झाडाचे बीजरूप शिवबाबा आहेत.
त्यांच्या रचनेला शाळीग्राम म्हणतात. ब्रह्माच्या रचनेला ब्राह्मण म्हणतात. आता
जितकी शिवाची रचना आहे, तेवढी ब्रह्माची नाही.शिवाची रचना तर खूप आहे.सर्व आत्मे
त्यांची संतान आहेत. ब्रह्मांची रचना तर फक्त तुम्ही ब्राह्मणच बनतात,हद्दमध्ये आले
ना.शिवबाबा ची रचना सर्व आत्मे आहेत.बेहदच्या आत्म्याचे कल्याण करतात.ब्रह्मा द्वारे
स्वर्गाची स्थापना करतात.तुम्ही ब्राह्मणच जाऊन स्वर्गवासी बनतात, दुसरे तर कोणी
स्वर्गवासी म्हणणार नाही, निर्वाणवासी किंवा शांतीधामवासी तर सर्व बनतात.सर्वात
श्रेष्ठ सेवा तर शिव बाबांची आहे,सर्व आत्म्यांना घेऊन जातात.सर्वांची भूमिका
वेगवेगळी आहे.शिवबाबा पण म्हणतात,माझी भूमिका वेगळी आहे. सर्वांचा हिशोब चुक्तू
करून तुम्हाला पतीतापासून पावन बनवून घेऊन जातो.तुम्ही येथे पावन बनण्यासाठी कष्ट
करत आहात.दुसरे सर्व कयामतच्या वेळेत हिशेब चुक्तू करून जातील,परत मुक्तीधाम मध्ये
बसून राहतील.सृष्टीचे चक्र तर फिरायचे आहे ना.
तुम्ही मुलं ब्रह्मा द्वारा ब्राह्मण बनून परत देवता बनतात.तुम्ही ब्राह्मण
श्रीमतावर सेवा करतात,फक्त मनुष्यांना रस्ता दाखवतात,मुक्ती आणि जीवनमुक्ती प्राप्त
करायची आहे,तर असे करू शकतात.दोन्ही चाव्या हातामध्ये आहेत.हे पण जाणतात,कोण कोण
मुक्ती मध्ये, कोण कोण जीवनमुक्ती मध्ये जातील.तुमचा सर्व दिवस असाच धंदा
आहे.धन-धान्य इत्यादी चा धंदा करतात,तर बुद्धीमध्ये सर्व दिवस तेच राहते.तुमचा धंदा
रचनेच्या आदी मध्य अंतला जाणायचे आहे आणि कोणाला मुक्ति,जीवनमुक्तीचा रस्ता दाखवायचा
आहे.ज्या धर्माचे असतील,ते निघतील.असे अनेक धर्माचे आहेत,जे बदलू शकत नाहीत.जसे
इंगलो क्रिश्चन काळे असतात,रूप तर बदलत नाहीत, फक्त असेच बदलतात.असे नाही की चेहरा
इत्यादी बदलतो,फक्त धर्माला मानतात.काहीजण बौद्ध धर्माला मानतात कारण देवी-देवता
धर्म प्राय:लोप आहे ना.एक पण असे नाहीत,जे म्हणतील आम्ही आदी सनातन देवी देवता
धर्माचे आहोत. देवतांचे चित्र तर कामामध्ये येतात. आत्मा अविनाशी आहे,कधी मरत
नाही.एक शरीर सोडून परत दुसरे घेऊन भूमिका वठवते.त्यांना मृत्यू लोक म्हटले जात
नाही,ते अमर लोक आहे,फक्त शरीर बदलतात.या गोष्टी खूप सूक्ष्म समजण्याच्या आहेत.जसे
कुणाला हुंड्यामध्ये भरपुर देतात,कुणाला थोडेच देतात. काहीजण सर्वकाही दाखवून देतात,
काही बंद पेटीमध्ये देतात,अनेक प्रकार आहेत.तुम्हाला तर होलसेल मध्ये वारसा
मिळतो,कारण तुम्ही सर्व वधू आहात,बाबा वर आहेत.तुम्हा मुलांचा शृंगार करून,विश्वाची
बादशाही होलसेल मध्ये देतात. विश्वाचे मालक तुम्ही बनतात. मुख्य गोष्ट आठवणीची आहे.
ज्ञान तर खूप सहज आहे,फक्त ईश्वराची आठवण करायची आहे. परंतु विचार केला जातो,आठवणच
बुद्धी मधून खिसकते,विसरुन जाते. अनेक जण म्हणतात,बाबा आठवण विसरते.तुम्ही कुणालाही
समजून सांगता,त्यावेळेस आठवण अक्षर बोला,योग अक्षर चुकीचे आहे. शिक्षकाला
विद्यार्थ्यांची आठवण राहते.बाबा सर्वोच्च आत्मा आहेत. तुम्ही आत्मा सर्वोच्च
नाहीत.तुम्ही पतित आहात.आत्ता बाबांची आठवण करा.शिक्षकाची,पित्याची, गुरुची आठवण
केली जाते.गुरु लोक सन्मुख ग्रंथ ऐकवतील,मंत्र देतील. बाबाचा मंत्र एकच आहे,मनमनाभव,
परत काय होईल मध्याजी भव.तुम्ही विष्णुपुरी मध्ये चालले जाल.तुम्ही सर्व तर राजाराणी
नाही बनणार. राजा राणी आणि प्रजा असते.तर मुख्य त्रिमूर्ती आहे.शिवबाबांच्या नंतर
ब्रह्मा आहेत,परत मनुष्य सृष्टी म्हणजे ब्राह्मणा ची स्थापना करतात. ब्राह्मणांना
सन्मुख शिकवतात.या नवीन गोष्टी आहेत ना.तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणी भाऊ-बहीण
झाले.वृध्द पण म्हणतात,आम्ही भाऊ-बहीण आहोत. हे मनामध्ये समजायचे आहे,कुणाला
फालतूमध्ये म्हणायचे नाही. भगवंतांनी प्रजापिता ब्रह्मा द्वारा सृष्टी ची स्थापना
केली,तर भाऊ-बहीण झाले ना.जेव्हा एक प्रजापिता ब्रह्माची मुल आहेत,या समजण्याच्या
गोष्टी आहेत.तुम्हा मुलांना खूप खुश व्हायला पाहिजे,आम्हाला कोण शिकवत आहे,
शिवबाबा,त्रिमूर्ती शिव.ब्रह्माची पण थोड्या वेळाची भूमिका आहे.विष्णूचे सतयुगाच्या
राजधानीमध्ये आठ जन्म भूमिका चालते.ब्रह्माची तर एकाच जन्माची भूमिका आहे.विष्णूचे
भूमिका मोठी आहे.त्रिमूर्ती शिव मुख्य आहेत,परत ब्रह्माची भूमिका येते,जे तुम्हाला
मुलांना विष्णुपुरी चे मालक बनवतात.ब्रह्मा पासून ब्राह्मण,परत देवता बनतात.तर ते
झाले अलौकिक पिता.थोड्या वेळासाठी हे पिता आहेत, ज्यांना सर्व मानतात.आदिदेव आदम आणि
बिबी,यांच्याशिवाय सृष्टी ची स्थापना कशी करता येईल. आदी देव आणि आदी देवी आहेत ना.
ब्रह्माची भूमिका फक्त याच संगमयुगातील आहे.देवतांची भूमिका खूप चालते.देवता तर
फक्त सतयुगा मध्ये म्हणणार.त्रेतायुगात क्षत्रीय म्हटले जाते,या रहस्ययुक्त गोष्टीचे
ज्ञान मिळते.सर्व तर एकाच वेळेत वर्णन करु शकत नाहीत.ते त्रिमूर्ती ब्रह्मा
म्हणतात,शिवाला तर गायब केले आहे.आम्ही परत त्रिमूर्ती शिव म्हणतो.हे चित्र इत्यादी
सर्व भक्तिमार्गाचे आहेत.प्रजेची रचना ब्रह्मा द्वारे करतात,परत तुम्ही देवता
बनतात.विनाशाच्या वेळेत नैसर्गिक आपत्ती पण येतात,विनाश तर होणारच आहे,कलियुगाच्या
नंतर परत सतयुग असेल.इतक्या सर्व शरीराचा विनाश तर होणारच आहे. सर्व काही
प्रत्यक्षात पाहिजे ना, फक्त नेत्र उघडल्यामुळे विनाश थोडाच होऊ शकतो.जेव्हा स्वर्ग
गायब होतो, त्यावेळेस पण भूकंप इत्यादी होतात. तर काय,त्या वेळेत शंकर तिसरा नेत्र
उघडतात.गायन पण आहे ना,द्वारका किंवा लंका पाण्याच्या खाली गेली. आता बाबा समजवतात,
मी पत्थर बुद्धींना,पारसबुध्दी बनवण्यासाठी आलो आहे.मनुष्य बोलवतात,हे पतित पावन,
येऊन पावन दुनिया बनवा,परंतु हे समजत नाहीत की आता कलियुग आहे,त्याच्यानंतर सतयुग
येईल.तुम्हा मुलांना खुशीमध्ये नाचायला पाहिजे.बॅरिस्टर इत्यादीची परीक्षा पास
करतात,तर मनात विचार येतो ना,आम्ही पैसे कमवू,परत घर बनवू, असे करू.तर तुम्हा मुलं
आता खरी कमाई करत आहात.स्वर्गामध्ये तुम्हाला सर्व काही नवीन मिळेल. विचार करा
सोमनाथाचे मंदिर कसे होते,तसे एक मंदिर तर नसेल ना. त्यामंदिराला अडीच हजार वर्ष
झाले, बनवण्यामध्ये वेळ तर लागला असेल ना,पूजा केली असेल.त्यानंतर ते लुटून घेऊन
गेले,लगेच तर आले नसतील.अनेक मंदिर असतील,पूजे साठी मंदीर बनवले आहेत ना. आता तुम्ही
जाणता बाबाची आठवण करत करत आम्ही स्वर्ण युगामध्ये चालले जाऊ.आत्मा पवित्र बनत जाईल,
कष्ट करावे लागतात ना,कष्टाशिवाय काम चालत नाही.गायन पण आहे सेकंदामध्ये जीवन मुक्ती
परंतु असे थोडीच मिळते.हे समजवले जाते, मुलं बनाल तर जरूर मिळेल.तुम्ही मुक्तिधाम
मध्ये जाण्यासाठी आता कष्ट करत आहात.बाबाच्या आठवणीमध्ये राहावे लागते.दिवसें दिवस
बाबा तुम्हा मुलांना शुद्ध बुद्धी बनवतात.बाबा म्हणतात मी तुम्हाला खूप रहस्य युक्त
गोष्टी ऐकवतो. यापूर्वीही थोड्याच ऐकले होते की आत्मा पण बिंदी आहे,परमात्मा पण
बिंदी आहे.तुम्ही म्हणाल अगोदर का नाही सांगितले. बेहद नाटकांमध्ये नव्हते.अगोदरच
तुम्हाला हे ऐकवले असते,तर तुम्ही समजू शकले नसते. हळूहळू समजवत राहतात.हे रावण
राज्य आहे,ज्यामध्ये सर्व देह अभिमानी बनतात.सतयुगा मध्ये आत्माभिमानी असतात.स्वतःला
आत्म जाणतात.आपले शरीर मोठे झाले आहे,आता हे सोडून परत लहान शरीर घ्यायचे आहे.
आत्म्याचे शरीर प्रथम लहान असते,परत मोठे होते.येथे तर कोणाचे किती आयुष्य असते,
कोणाचे किती.कोणाचा अवकाळी मृत्यू होतो,कोणाकोणाचे १२५ वर्षाचे पण आयुष्य असते.तर
बाबा समजवतात,तुम्हाला खूप खुशी व्हायला पाहिजे,बाबा पासून वारसा घेत आहोत.गंधर्व
विवाह केला,ही काय खुशीची गोष्ट नाही,ही तर कमजोरी आहे.कुमारी जर म्हणाली, मी
पवित्र राहू इच्छिते,तर कोणी मारू थोडेच शकतात.ज्ञान कमी आहे तर घाबरतात.छोट्या
कुमारीला जर कोणी मारतील,रक्त इत्यादी निघाले, तर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होतो,
परत त्याची सजा मिळते.जनावराला पण कोणी मारतात,तर त्यांच्यावरती केस होते,दंड
होतो.तुम्हा मुलांना पण मारू शकत नाही. कुमारांना पण मारू शकत नाहीत,ते तर आपली
कमाई करून शरीर निर्वाह करू शकतात.पोट काही जास्त खात नाही.काही मनुष्याचे पोट ४-५
रुपये,काही मनुष्याचे ४००-५०० रुपये खाते. पैसे जास्त आहेत,तर लालच वाढत जाते.
गरिबांकडे पैसे नाहीत,त्याला लालच पण राहत नाही.ते तर सुक्या रोटी मध्येच खुश
होतात.मुलांना जास्त खान पान मध्ये पण जायचे नाही.खाण्याचा छंद नसलं पाहिजे. तुम्ही
जाणतात तेथे आम्हाला सर्व काही मिळेल,बेहदची बादशाही,बेहदचे सुख मिळते.तेथे कोणते
आजार इत्यादी नसतात. आरोग्य,संपत्ती,आनंद सर्व काही राहते.वृध्द अवस्था पण चांगली
राहते, खुशी राहते.कोणत्या प्रकारचे कष्ट राहत नाही.प्रजा पण असेच बनते परंतु असे
पण नाही प्रजा बनलो तरीही ठीक आहे.परत असेच बनतील,जसे तेथील भील लोक असतात.सूर्यवंशी
लक्ष्मी नारायण बनायचे आहे,तर तसा पुरुषार्थ पण करायला पाहिजे,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)आम्ही
ब्रह्माची नवीन रचना,आपसामध्ये भाऊ-बहीण आहोत,हे मनामध्ये समजायचे आहे,कोणाला
सांगण्याची आवश्यकता नाही.नेहमी याच खुशी मध्ये राहायचे आहे की,आम्हाला शिवबाबा
शिकवत आहेत.
(2)खानपानची लालच ठेवायची नाही. लालच सोडून बेहद बादशाहीच्या सुखाची आठवण करायची आहे.
वरदान:-
मायेच्या
संबंधांना घटस्फोट देऊन,बाबांच्या संबंधाचा सौदा करणारे,मायाजीत,मोहजीत भव.
आता स्मृती द्वारे
जुना सौदा नष्ट करून एकटे बना.आपसा मध्ये एक दोघांचे सहयोगी जरूर रहा परंतु सोबती
बनवू नका.सोबती एकाला बनवा तर मायेच्या संबंधापासून घटस्पोट मिळेल,मायाजीत,मोहजीत
विजयी राहाल.जर थोडा पण कोणामध्ये मोह असेल,तर तीव्र पुरुषार्थीच्या ऐवजी पुरुषार्थी
बनाल. म्हणून काय पण होईल,काही झाले तरी, खुशी मध्ये नाचत राहा,याला म्हणतात
नष्टोमोहा.असे नष्टोमोहा राहणारे च विजयी माळेचे दाणे बनतात.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-
सत्यतेच्या विशेषतः द्वारे हिऱ्याच्या चमकीला वाढवा.