31-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :-बाबांसोबत इमानदारीने रहा,आपला खरा खरा चार्ट लिहा,कोणालाही दुःख देऊ
नका,एक बाबांच्या श्रेष्ठ मतावर चालत राहा."
प्रश्न:-
जे पूर्ण 84
जन्म घेणारे आहेत,त्यांचा पुरुषार्थ काय असेल?
उत्तर:-
त्यांचा विशेष पुरुषार्थ नरापासून नारायण बनण्याचा असेल.आपल्या कर्मेन्द्रियांवर
त्यांचा पूर्ण ताबा असेल.ते कधीही कोणाकडे वाईट नजरेने पाहणार नाहीत.जर अजूनही
कोणाकडे पाहिल्यानंतर मनामध्ये विकारी विचार येत असतील,वाईट नजर होत असेल तर समजा
पूर्ण ८४ जन्म घेणारी आत्मा नाही.
गीत:-
या पापाच्या
दुनियेतून....
ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुले जाणत आहेत की ही पापाची दुनिया आहे.पुण्यांच्या दुनियेला ही
मनुष्य जाणतात.मुक्ती आणि जीवनमुक्ती पुण्यांच्या दुनियेला म्हटले जाते.तिथे पाप
होत नाही. पाप दुःखधाम रावण राज्यांमध्ये होते.दुःख देणाऱ्या रावणाला ही पाहिले
आहे,रावणा सारखी कोणतीही गोष्ट नाही तरीही त्याचा पुतळा जाळला जातो.मुले जाणतात
आम्हीं यावेळी रावण राज्यामध्ये आहोत,परंतु किनारा केला आहे.आम्हीं आता पुरुषोत्तम
संगमयुगावर आहोत.मुले जेंव्हा इथे येतात तेंव्हा बुद्धीमध्ये हे असते-आम्ही त्या
पित्याजवळ जात आहे, जो आम्हाला मनुष्यापासून देवता बनवत आहे.सुखधाम चे मालक बनवत
आहे.सुखधाम चे मालक बनवणारा कोणी ब्रह्मा नाही,कोणीही देहधारी नाही.तो तर आहे
शिवबाबा,ज्याला स्वतःचा देह नाही.तुम्हालाही देह नव्हता,परंतु तुम्ही नंतर देह घेऊन
जन्म-मरणा मध्ये येता तेंव्हा तुम्हीं समजता आम्हीं बेहदच्या बाबांजवळ जात आहे.ते
आम्हाला श्रेष्ठ मत देत आहेत.तुम्ही असा पुरुषार्थ केल्याने स्वर्गाचे मालक बनू
शकता.स्वर्गाची तर सर्वजण आठवण करतात.नवीन दुनिया नक्की आहे असे समजतात. नक्कीच
कुणीतरी नवी दुनिया स्थापन करणारा आहे.नरकाची ही स्थापना करणारा कोणी आहे. तुमचा
सुखधामचा अभिनय केंव्हा पूर्ण होतो,हेही तुम्ही जाणता.नंतर रावण राज्यांमध्ये तुम्ही
दुःखी व्हायला सुरुवात होते.यावेळी हे आहे दुःखधाम. भले कितीही पदमपती, करोडपती असले
तरीही पतीत दुनिया असेच म्हटले जाईल.ही कंगाल दुनिया,दुःखी दुनिया आहे. भले कितीही
मोठे मोठे घर आहेत,सुखाची सर्व साधने आहेत तरीही म्हटले जाईल पतित जुनी दुनिया
आहे.विषय वैतरणी नदीमध्ये गटांगळ्या खात राहतात.हेही समजत नाहीत कि विकारांमध्ये
जाणे पाप आहे. म्हणतात त्याशिवाय सृष्टीची वृद्धी कशी होणार.बोलावतात हे भगवान,हे
पतित-पावन येऊन या दुनियेला पावन बनवा.आत्मा शरीराद्वारे असे म्हणते.आत्माच पतित
बनते म्हणून तर बोलवते. स्वर्गामध्ये एक ही जण पतित नसतो.
तुम्ही मुले जाणत आहात की संगमयुगावर चांगले पुरुषार्थी आहेत तेच समजतात की आम्हीं
८४ जन्म घेतले आहेत नंतर या लक्ष्मी-नारायणा सोबतच आम्हीं सतयुगामध्ये राज्य
करू.फक्त एकाने 84 जन्म घेतलेले नाहीत. राजासोबत प्रजा ही हवी आहे. तुम्हां
ब्राह्मणांमध्ये ही नंबरवार आहेत.कुणी राजा-राणी बनते, कोणी प्रजा.बाबा म्हणतात
मुलांनो आत्ताच तुम्हाला दैवीगुण धारण करायचे आहेत.हे डोळे वाईट आहेत,कोणाला
पाहिल्यानंतर विकाराची दृष्टी जात असेल तर त्यांचे ८४ जन्म म्हटले जाणार नाही.ते
नरापासून नारायण बनू शकणार नाहीत. जेंव्हा या डोळ्यांवर विजय मिळवाल तेंव्हाच
कर्मातीत अवस्था होईल.सर्व काही डोळ्यांवर अवलंबून आहे,डोळेच धोका देतात.आत्मा या
खिडकीमधून पाहत राहते, यांच्यामध्ये तर डबल आत्मा आहे.बाबाही या खिडकीमधून पहात
आहेत.आमची ही नजर आत्म्यावर जाते.बाबा आत्म्यालाच समजावतात.असे म्हणतात,हे शरीर
घेतले आहे, म्हणून बोलू शकतो.तुम्ही जाणता बाबा आम्हाला सुखाच्या दुनियेमध्ये घेऊन
जात आहेत.हे रावण राज्य आहे.तुम्ही या पतित दुनियेपासून किनारा केला आहे. कुणी खूप
पुढे गेले आहे,कुणी मागे सरकले आहे.प्रत्येक जण असे म्हणते आमची नौका पार लाव.आता
पार म्हणजे सतयुगामध्ये जाणार आहात. परंतु तिथे उंच पद प्राप्त करायचं असेल तर
पवित्र बनायचे आहे. मुख्य गोष्ट आहे बाबांची आठवण करा तरच विकर्म विनाश होतील. हा
सर्वात पहिला विषय आहे.
तुम्ही आता जाणत आहात मी आत्मा अभिनेता आहे. सुरुवातीला आम्ही सुखधाम मध्ये आलो
नंतर आता दुःखधामामध्ये आलो आहे.आता बाबा पुन्हा सुखधामामधे घेऊन जाण्यासाठी आले
आहेत,ते म्हणतात माझी आठवण करा आणि पवित्र बना. कोणालाही दुःख देऊ नका.एक दुसऱ्याला
खूप दुःख देत राहतात. कोणामध्ये काम विकाराचे भूत आले,कोणामध्ये क्रोध आला,हाताने
मारले.बाबा म्हणतात ही तर दुःख देणारी पाप आत्मा आहे.पुण्यांत्मा कसे बनाल.अजूनही
पाप करत राहतात.ही तर बदनामी करतात.सर्वजण काय म्हणतील!म्हणतात आम्हाला भगवान
शिकवतो!ते असे काम करतात का!म्हणून बाबा म्हणतात रोज रात्री स्वतःला पहा.जर सुपुत्र
मुलगा असेल तर चार्ट पाठवेल.भले काहीजण चार्ट लिहितात,परंतु त्यासोबत असे लिहत नाही
की आम्ही कोणाला दुःख दिले किंवा अशी चूक केली. आठवण करत राहायची आणि त्यासोबत उलटे
कर्मही करत राहायचे,हे ठीक नाही.उलटे कर्म तेंव्हा होतात जेंव्हा देह-अभिमाना मध्ये
येतात.
हे चक्र कसे फिरते-हे तर खूप सोपे आहे.एक दिवसांमध्ये ही शिक्षक बनू शकता.बाबा
तुम्हांला ८४ चे रहस्य समजावतात, शिकवतात.नंतर जाऊन त्यावर मनन चिंतन करायचे
आहे.आम्ही ८४ जन्म कसे घेतले?त्या शिकवणाऱ्या शिक्षकांपेक्षाही दैवी गुण जास्त धारण
करतात.बाबा सिद्ध करून सांगू शकतात. मुलं दाखवतात बाबा आमचा चार्ट पहा.आम्ही जराही
कुणाला दुःख दिलेले नाही.बाबा म्हणतात हा मुलगा तर खूप गोड आहे. चांगला सुगंध पसरवत
आहे. शिक्षक बनणे,तर सेकंदाचे काम आहे.शिक्षका पेक्षाही विद्यार्थी आठवणीच्या
यात्रेमध्ये पुढे निघून जातात.तर शिक्षका पेक्षाही उंच पद प्राप्त करतील.बाबा तर
विचारतात,कोणाला शिकवता का?रोज शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिकवा.शिवबाबा कसे येऊन
स्वर्गाची स्थापना करत आहेत?स्वर्गाचे मालक बनवत आहेत.समजावून सांगणे खूप सोपे
आहे.बाबांना चार्ट पाठवतात-बाबा आमची अशी अवस्था आहे.बाबा विचारतात मुलांनो काही
विकर्म तर करत नाही?वाईट नजर उलटे-सुलटे काम तर करवत नाही?आपले संस्कार,गुण पाहायचे
आहेत, आपले वागणे सर्वस्वपणे डोळ्यांवर अवलंबून आहे.डोळे अनेक प्रकारे धोका
देतात.जराही न विचारता एखादी वस्तू उचलून खाल्ली तर तेही पाप बनते,कारण की न विचारता
घेतली ना.इथे खूप कायदे आहेत.शिवबाबांचा यज्ञ आहे ना.निमित्त बहिणीला
विचारल्याशिवाय कोणतीही वस्तू खाऊ शकत नाही.एकाने खाल्ले तर इतरही तसेच करतील.खरे
पाहिले तर इथे कोणतीही वस्तू कुलपाच्या आत ठेवण्याची गरज नाही.कायदा असे सांगतो या
घरामध्ये,स्वयंपाक घराच्या समोर कुणीही अपवित्र येऊ नये.बाहेर तर पवित्र अपवित्रचा
विषयच नाही.परंतु स्वतःला पतित म्हणतात ना.सर्व पतित आहेत. कोणा वल्लभाचाऱ्याला
किंवा शंकराचार्यांना हात लावू शकत नाहीत कारण की ते समजतात आम्ही पावन,हे पतित
आहेत. जरी इथे सर्वांचे शरीर पतित आहे तरीही पुरुषार्था नुसार विकारांचा संन्यास
करतात.तर निर्विकारी च्या समोर विकारी मनुष्य माथा झुकवतात.असे म्हणतात हा खूप
स्वच्छ धर्मात्मा मनुष्य आहे. सतयुगामध्ये तर कुणीही मलीन नसते.आहेच पवित्र
दुनिया.सर्व एक सारखे आहेत.तुम्ही हे सर्व रहस्य जाणत आहात. सुरुवातीपासून
सृष्टीच्या आदि- मध्य-अंताचे रहस्य बुद्धीमध्ये राहायला पाहिजे.आम्हांला सर्व काही
माहीत आहे.अजून काही जाण्याची गरजच नाही.रचयिता पित्याला ओळखले,सूक्ष्मवतनला
ओळखले,भविष्य पदाला ओळखले,ज्यासाठी पुरुषार्थ करत आहात नंतर जर असे वागले तर उंच पद
प्राप्त करू शकणार नाही.कुणाला दुःख दिले,विकारांमध्ये जात राहिले, वाईट नजर
ठेवली,तर हे पाप आहे.दृष्टी बदलण्या मध्ये खूप मेहनत आहे.नजर खूप चांगली पाहिजे.डोळे
पाहतात-हे क्रोध करत आहेत तर स्वतःही भांडायला सुरुवात करतात.शिवबाबांवर थोडेही
प्रेम नाही,जराही आठवण करत नाहीत.सर्व महिमा शिवबाबांची आहे.उपकार गुरु तुमचे....
उपकार त्या सद्गुरूचे जाणे गोविंद, श्रीकृष्णाचा साक्षात्कार करवला.गुरुद्वारे
तुम्ही गोविंद बनत आहात.फक्त साक्षात्काराने तोंड गोड होत नाही.मीरेचे तोंड गोड झाले
का?खऱ्या स्वर्गामध्ये तर गेली नाही.तो आहे भक्तिमार्ग त्याला स्वर्गाचे सुख असे
म्हणू शकत नाही.फक्त गोविंदा ला पाहायचे नाही त्याच्यासारखे बनायचे आहे.तुम्ही इथे
आले आहात असे बनण्यासाठी.तर बाबा सर्वांना असा सल्ला देतात की चार्टमध्ये असेही लिहा-
डोळ्यांनी धोका तर दिला नाही? पाप तर केले नाही?डोळे कोणत्या ना कोणत्या गोष्टी
मध्ये धोका अवश्य देतात.डोळे एकदम शांत व्हायला पाहिजेत.स्वतःला अशरीरी समजा.ही
कर्मातीत अवस्था शेवटी होईल.तेही जेंव्हा बाबांना आपला चार्ट पाठवत राहाल.जरी
धर्मराजाच्या रजिस्टरमध्ये आपोआप सर्वकाही जमा होत राहते.परंतु बाबा साकार मध्ये आले
आहेत तर म्हणतात साकार मध्ये सर्वकाही माहीत व्हायला पाहिजे.तर खबरदार करतील.वाईट
नजरेचे किंवा देह-अभिमानी असतील तर तो वातावरणाला अशुद्ध बनवेल.इथे बसल्यानंतर ही
बुद्धीयोग बाहेर निघून जातो. माया खूप धोका देते.मनामध्ये खूप वादळे येतात.श्रेष्ठ
बनण्यासाठी किती मेहनत करावी लागते. बाबांजवळ येतात बाबा आत्म्याचा ज्ञान शृंगार
करतात.असे समजतात आता आम्ही आत्मे ज्ञानाने पवित्र होणार आहे.नंतर शरीरही पवित्र
मिळेल.आत्मा आणि शरीर दोन्ही सतयुगामध्ये पवित्र असतात.नंतर अडीच हजार वर्षानंतर
रावण राज्य सुरू होते.मनुष्य म्हणतात ईश्वराने असे का केले?हे अनादि नाटक बनले
आहे.ईश्वराने थोडीच काही केले आहे.सतयुगामध्ये असतो-एक देवी-देवता धर्म.काहीजण
म्हणतात अशा ईश्वराची आम्हीं आठवण का करू.परंतु तुमचा इतर धर्मांशी काही संबंध
नाही.जे काटे बनले आहेत तेच येऊन फुलं बनतील.मनुष्य म्हणतात काय भगवान फक्त
भारतवासीनांच स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे का,आम्ही मानत नाही, भगवानाला ही दोन डोळे
आहेत का!परंतु हे तर नाटक बनले आहे.सर्वजण स्वर्गामध्ये आले तर मग अनेक धर्मांचा
अभिनय कसा चालेल?स्वर्गामध्ये एवढे करोड आत्मे नसतात.पहिली मुख्य गोष्ट आहे भगवान
कोण आहे,त्याला तर ओळखा.हेच समजले नाही तर अनेक प्रश्न विचारत राहतील. स्वतःला आत्मा
समजले तर म्हणतील ही गोष्ट बरोबर आहे. आम्हांला पतिता पासून पावन अवश्य बनवायचे
आहे.त्या एकाची आठवण करायची आहे. सर्व धर्मांमध्ये ईश्वराची आठवण करतात.
तुम्हां मुलांना आता हे ज्ञान मिळत आहे.तुम्ही समजत आहात सृष्टीचक्र कसे
फिरते.तुम्हीं प्रदर्शनीमध्ये किती समजावून सांगता.खूप थोडेच निघतात. म्हणून असे
थोडीच म्हणू शकतो की प्रदर्शनी करायची नाही. नाटकामध्ये(ड्रामामधे) होते,केले.काही
ठिकाणी प्रदर्शनी मधूनच निघतात.काही ठिकाणी निघत नाहीत.पुढे चालून येतील,उंच पद
प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करतील.कुणाला कमी पद प्राप्त करायचे असेल तर तेवढा
पुरुषार्थ करणार नाहीत.तरीही बाबा मुलांना समजावतात,कोणतेही विकर्म करू नका.याचीही
नोंद ठेवा की आम्ही कोणाला दुःख तर नाही दिले?कोणाशी भांडण तर नाही केले?उलट-सुलट
तर बोललो नाही?कोणतेही अकर्तव्य तर नाही केले?बाबा म्हणतात जे वाईट कर्म केले आहेत
ते लिहा.हे तर जाणत आहात द्वापर युगापासून विकर्म करत आता खूपच विकर्मी बनलो आहोत.
बाबांना लिहून दिल्याने ओझे हलके होईल.लिहितात आम्हीं कोणाला दुःख देत नाही.बाबा
म्हणतात अच्छा,चार्ट घेऊन या, मग पाहू.बाबा बोलवतात अशा चांगल्या मुलाला पाहूया तर
खरे. सुपुत्र मुलांवर बाबा खूप प्रेम करतात.बाबा जाणतात अजून कुणीही संपूर्ण बनले
नाही.बाबा प्रत्येकाला पाहतात, कसा पुरुषार्थ करतात.मुले चार्ट लिहत नाही तर अवश्य
काहीतरी कमी आहे,जी बाबांपासून लपवतात.खरा इमानदार मुलगा त्यालाच समजतो जे चार्ट
लिहितात.चार्ट सोबत संस्कारही चांगले पाहिजेत. अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक मुलांना आत्मिक पित्याचा नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. स्वतःचे ओझे
हलके करण्यासाठी जे वाईट कर्म झाले आहेत,ते बाबांना लिहून द्यायचे आहेत.आता कोणालाही
दुःख द्यायचे नाही.सुपुत्र बनून राहायचे आहे.
2. आपली दृष्टी खूप
चांगली बनवायची आहे.डोळे धोका द्यायला नको-याकडे लक्ष द्यायचे आहे.आपले संस्कार खूप
चांगले ठेवायचे आहेत.काम क्रोधाच्या अधीन होऊन कोणतेही पाप करायचे नाही.
वरदान:-
झालेल्या
गोष्टींचा विचार न करता पूर्णविराम देणारे तीव्र पुरुषार्थी भव
आत्तापर्यंत जे काही
झाले-त्याला पूर्णविराम लावा.झालेल्या गोष्टींचा विचार न करणे-हाच तीव्र पुरुषार्थ
आहे.जर कुणी घडलेल्या गोष्टींचे चिंतन करत असेल तर वेळ,शक्ती,संकल्प सर्व व्यर्थ
जाते.आता वाया घालवण्याची वेळ नाही कारण की संगम युगाचे दोन क्षण अर्थात दोन सेकंद
ही वाया घालविले तर अनेक वर्ष वाया घालवणे आहे,म्हणून वेळेच्या महत्वाला जाणून आता
झालेल्या गोष्टींना पूर्णविराम लावा. पूर्णविराम लावणे अर्थात सर्व खजान्यांनी
पूर्ण बनणे.
बोधवाक्य:-
जेंव्हा
प्रत्येक संकल्प श्रेष्ठ असेल तेंव्हा स्वतःचे आणि विश्वाचे कल्याण होईल.