03-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्हाला सेवेची खूप आवड असायला हवी,ज्ञान आणि योग आहे,तर दुसऱ्यांना पण
शिकवा. सेवेमध्ये वृद्धी करा"
प्रश्न:-
सेवेमध्ये आवड
न होण्याचे कारण काय आहे?कोणत्या विघ्ना मुळे सेवा आवडत नाही?
उत्तर:-
सर्वात मोठे विघ्न विकारी दृष्टी आहे.हा आजार सेवेमध्ये आवड राहू देत नाही. हा खूप
कडक आजार आहे.जर विकारी दृष्टी शितल झाली नाही,गृहस्थ व्यवहारांमध्ये दोन्ही चाके
ठीक चालत नाहीत,तर गृहस्थीचे ओझे होते,परत हलके होऊन सेवेमध्ये आवड राहत नाही.
गीत:-
जाग सजनिया
जाग.
ओम शांती।
गोडगोड मुलांनी हे गीत ऐकले,असे दोन-चार चांगले गीत सर्वांच्या जवळ पाहिजेत.आता हे
गित तर मनुष्यांनी बनवलेले आहेत. बेहद नाटकानुसार त्यांच्या बुद्धीमध्ये आले
आहेत,परत ते मुलांच्या कामांमध्ये येतात.असे गीत मुलांनी ऐकल्यामुळे नशा
चढतो.मुलांना तर नशा चढलेला पाहिजे,की आम्ही नवीन राजाई स्थापन करत आहोत, रावणा
पासून घेत आहोत.जसे कोणी लढाई करतात तर विचार येतो ना, यांची राजाई घ्यावी,यांचे
गाव आम्ही आपल्या ताब्यात घेऊ.आता ते सर्व हद्दी साठी लढाई करतात.तुम्हा मुलांची
लढाई मायेशी आहे,जे शिवाय ब्राह्मणांना कोणालाही माहिती नाही. तुम्ही जाणतात आम्हाला
या विश्वावरती गुप्त रितीने राज्य स्थापन करायचे आहे किंवा बाबा पासून वारसा घ्यायचा
आहे. याला वास्तव मध्ये लढाई पण म्हणणार नाही.बेहद नाटका नुसार तुम्ही जे सतोप्रधान
पासून तमो प्रधान बनले आहात,परत सतोप्रधान बनायचे आहे.तुम्ही आपल्या जन्माला जाणत
नव्हते,आता बाबांनी समजले आहे आणि जे पण धर्म आहेत त्यांना हे ज्ञान मिळणार
नाही.बाबा तुम्हा मुलांना समजवतात.असे गायन पण आहे,धर्मामध्ये ताकत आहे.भारत वासींना
माहित नाही की,आमचा धर्म कोणता आहे?तुम्हाला बाबा द्वारे माहिती पडले आहे की,आमचा
आदी सनातन देवी देवता धर्म आहे.बाबा येऊन परत तुम्हाला त्या धर्मामध्ये परिवर्तन
करतात.तुम्ही जाणतात आमचा धर्म खुप सुख देणारा आहे. तुम्हाला कोणाशी लढाई इत्यादी
करायची नाही.तुम्हाला तर आपल्या स्वर्धमा मध्ये स्थिर व्हायचे आहे आणि बाबांची आठवण
करायची आहे,यामध्ये पण वेळ लागतो.असे नाही की फक्त म्हटल्यामुळे स्थिर
राहाल.बुध्दीमध्ये स्मृति राहायला पाहिजे,मी आत्मा शांत स्वरुप आहे. आम्ही आत्मा
जेव्हा शांतीधाम मध्ये होतो,तेव्हा पवित्र होतो,परत भुमिका वठवत तमोप्रधान पतित बनलो
आहोत.आम्ही आत्मा परत पवित्र बनून,आम्हाला घरी जायचे आहे. बाबा पासून वारसा
घेण्यासाठी स्वतःला आत्मा निश्चय करून आठवण करायची आहे.तुम्हाला नशा चढेल,आम्ही
ईश्वरीय संतान आहोत. बाबांची आठवण केल्यामुळेच विकर्म विनाश होतील,खूप सहज आहे.
आठवणी द्वारेच आम्ही पवित्र बनून परत शांतीधाम मध्ये चालले जाऊ. दुनिया या शांतीधाम
सुखधामला जाणत नाही.या गोष्टी कोणत्या ग्रंथांमध्ये नाहीत.ज्ञानसागराची तर एकच गिता
आहे,ज्यामध्ये फक्त नाव बदलले आहे.सर्वांचे सद्गती दाता ज्ञानाचे सागर, त्या परमपिता
परमात्मा ला म्हणतात, दुसऱ्या कोणाला ज्ञानवान म्हणू शकत नाही. जेव्हा ते ज्ञान
देतील तेव्हा तुम्ही ज्ञानवान बनाल.आता सर्व भक्तीवान आहेत,तुम्ही पण असेच होते.आता
परत ज्ञानवान बनत आहात. क्रमानुसार पुरुषांप्रमाणे ज्ञान कोणामध्ये आहे,तर कोणामध्ये
नाही. तर काय म्हनाल?या हिशेबाने उच्चपद मिळू शकत नाहीत.बाबा खूप आवडीने सेवा
करतात.मुलांमध्ये ती शक्ती आली नाही,जे कोणाला चांगल्या रीतीने समजून सांगतील. अशी
युक्ती शोधायला पाहिजे.जरी मुलं कष्ट करून संमेलन इत्यादी करतात.काही भावा मध्ये
ताकत आहे,त्यांना विचार येतो की संघटन हवे,ज्याद्वारे सेवेचे उपाय मिळतील. सेवेची
वृद्धी कशी होईल,खूप कष्ट घेत आहेत.नाव जरी शक्ती सेना आहे परंतु शिकलेले नाहीत.कोणी
परत अशिक्षित पण शिकलेल्या लोकांना ज्ञान देतात .बाबांनी समजवले आहे विकारी दृष्टी
खूप नुकसान करते .हा आजार फार मोठा आहे, त्यामुळे सेवा करत नाहीत. तर बाबा विचारतात
तुम्ही युगल,दोन्ही चाक ठीक चालत आहेत.त्या युद्धात तर खूप मोठी सेना असते,स्त्रिया
पण सैनिक असतात,शिकलेल्या आहेत. त्यांना पण मदत मिळते.तुम्ही तर गुप्त आहात,कोणीही
जाणत नाहीत की,हे ब्रह्माकुमार-कुमारी काय करत आहेत?तुमच्यामध्ये पण क्रमानुसार
आहेत.गृहस्थ व्यवहाराचे ओझे डोक्यावर असल्यामुळे वाकले आहेत.ब्रह्माकुमार कुमारी
म्हणतात परंतु ती विकारी दृष्टी शीतल होत नाही. दोन्ही चाकं एकसारखे बनतील खूप कठीण
आहे.बाबा मुलांना सेवा करण्यासाठी समजवत राहतात. कोणी धनवान आहेत,तरीही सेवा करत
नाहीत,धनाचे भुकेले आहेत. मुलगा नसेल तर दुसऱ्याचा दत्तक घेतात,सेवा करत नाहीत.बाबा
आम्ही बसलो आहोत,आम्ही सेवेसाठी मोठे घर घेऊन देतो,असे म्हणत नाहीत. बाबाची दृष्टी
दिल्ली वरती विशेष आहे,कारण दिल्ली राजधानी आहे, मुख्य कार्यालय आहे.बाबा म्हणतात
दिल्लीमध्ये विशेष सेवेचा घेराव घाला,कोणालाही समजून सांगायला पाहिजे.असे गायन पण
आहे पांडवांना कौरवा कडून तीन पाऊल पृथ्वीचे मिळाले नव्हते.कौरव अक्षर गीतेचे
आहे.भगवंतांनी येऊन राजयोग शिकवला,त्याचे नाव गिता ठेवले आहे,परंतु गीतेच्या
भगवंताला विसरले आहेत.बाबा घडीघडी म्हणतात, मुख्यत: या ज्ञानाच्या मुख्य मुद्द्याला
स्पष्ट करा.पूर्वी बाबा म्हणत होते,बनारसच्या विद्युत मंडळींना समजून सांगा.बाबा
युक्त्या तर सांगत राहतात,परत चांगल्या प्रकारे प्रयत्न करायचे आहेत.बाबा नेहमी
समजावत राहतात,क्रमांक एक दिल्ली आहे,त्यामध्ये सेवेचे उपाय शोधा. संघटन मध्ये हा
विचार करा.मुख्य गोष्ट आहे,मोठा मेळा इत्यादी दिल्लीमध्ये कसा करता येईल? ते लोक तर
दिल्लीमध्ये खूप उपोषण इत्यादी करत राहतात. तुम्हाला तर असे काही करायचे नाही,लढाई
भांडण इत्यादी करायचे नाही.तुम्ही तर फक्त जे अज्ञान निद्रेत आहेत त्यांना जागृत
करतात.दिल्ली निवासींना खूप कष्ट घ्यायचे आहेत.तुम्ही तर जाणता,आम्ही ब्रह्मांडचे
मालक,परत कल्पपूर्वी सारखे सृष्टीचे मालक बनू. हे निश्चित आहे.विश्वाचे मालक बनायचे
आहेच.आता तुम्हाला तीन पाऊल पृथ्वीचे राजधानीमध्येच पाहिजेत,जेथे ज्ञानाचे गोळे
सोडता येतील.नशा पाहिजे ना. मोठ-मोठ्यांचा आवाज पाहिजे ना. यावेळेस भारत सर्व गरीब
आहे. गरिबांची सेवा करण्यासाठी बाबा येतात.दिल्लीमध्ये तर खूप चांगली सेवा व्हायला
पाहिजे.बाबा इशारा देत राहतात,दिल्ली निवासी समजतात,बाबा आमचे लक्ष वेधून घेतात.
आपसमध्ये खूप गोडी-गुलाबीने राहायचे आहे. आपला पांडवाचा किल्ला बनवायचा आहे,तो तर
दिल्लीमध्येच बनवावा लागेल.यामध्ये विशाल बुद्धी पाहिजे. बरेच काही करू शकतात.ते
लोक गायन करतात की,भारत आमचा देश आहे,आम्ही असे करू परंतु स्वतः मध्ये काहीच दम
नाही.परदेशातील मदतीशिवाय सुधारू शकत नाहीत. तुम्हाला तर बेहद्दच्या पित्याकडून खूप
मदत मिळत आहे,इतकी मदत कोणी देऊ शकत नाही.आता लवकर किल्ला बनवायचा आहे.तुम्हा
मुलांना बाबा विश्वाची बादशाही देतात,तर मग उत्साह खुप पाहिजे.इकडच्या तिकडच्या
गोष्टी मध्ये अनेकांची बुद्धी जाते.काही माता बंधनांमध्ये आहेत. पुरुषांना तर
कोणतेच बंधन नाही. मातांना निर्बल म्हटले जाते. पुरुष शक्तिशाली असतात.पुरुष लग्न
करतात तर,त्यांना बळ दिले जाते की, तुम्हीच गुरु,ईश्वर सर्वकाही आहात.स्त्री तर जसे
पाठीमागे लटकणारी शेपटी आहे,तर खरोखर शेपटी होऊनच लटकते.पतीमध्ये मोह मुलांमध्ये
मोह ठेवते.पुरुषांमध्ये इतका मोह राहत नाही,त्यांची तर एक चप्पल गेली,दुसरी,तिसरी
घेतात. सवय पडली आहे.बाबा समजावत राहतात,अशा प्रकारे वर्तमानपत्रांमध्ये ज्ञानाच्या
गोष्टी द्या.मुलांना बाबांना प्रसिध्द करायचे आहे.हे समजवणे तुमचे काम आहे.बाबांच्या
सोबत दादा पण आहेत. हे तर जाऊ शकत नाहीत.तुम्ही म्हणाल शिवबाबा, आमच्यावर हे संकट
आले आहे, यामध्ये आपण मत द्या.अशा गोष्टी विचारतात.बाबा तर पतितांना पावन
बनवण्यासाठी आले आहेत.बाबा म्हणतात,तुम्हा मुलांना सर्व ज्ञान मिळते.प्रयत्न करून
आपसा मध्ये विचार करा.तुम्हा मुलांना बेहद्दची सेवा करायची आहे,मुंगीच्या गतीने सेवा
तर चालत आली आहेच.आता अशी सेवा करा ज्यामुळे अनेकांचे कल्याण होईल.बाबांनी कल्पा
पूर्वी पण समजवले होते,आता पण समजवत राहतात.अनेकांची बुद्धी कुठे ना कुठे फसलेली आहे
उमंग उत्साहच नाही,लगेच देह अभिमान येतो.देहअभिमाना मुळेच सत्यानाश होतो.आता
सत्यवान बाबा उच्च बनवण्यासाठी खूप सहज गोष्टी सांगतात.बाबांची आठवण करा तर शक्ती
येईल, नाहीतर शक्ती येत नाही.जरी सेवा केंद्र सांभाळतात परंतु नशा नाही,कारण
देहाभिमान आहे.देही-अभिमानी बनाल तर नशा चढेल.आम्ही कोणत्या पित्याची मुलं आहोत.बाबा
म्हणतात,जितके तुम्ही देही अभिमानी रहाल,तेवढे बळ मिळेल.अर्ध्याकल्पाचा
देह-अभिमानाचा नशा आहे,तर देही अभिमानी बनण्यामध्ये खूप कष्ट लागतात.असे नाही बाबा
ज्ञानाचे सागर आहेत,आम्ही पण ज्ञान घेतले आहे,अनेकांना समजावत आहोत परंतु आठवणीची
शक्ती पण पाहिजे ना.ज्ञान तलवार आहे परत आठवणीची यात्रा आहे.दोन्ही वेग-वेगळ्या
गोष्टी आहेत.ज्ञानामध्ये आठवणीच्या यात्रेची शक्ती पाहिजे. नाहीतर ती तलवार काय
कामाची राहत नाही.शिख लोक तलवारीचा खूप मान ठेवतात,ती तर हिंसक गोष्ट
झाली,ज्याद्वारे लढाई केली.वास्तव मध्ये गुरु लोक लढाई थोडेच करू शकतात.गुरु तर
अहिंसक पाहिजेत ना.लढाई द्वारे थोडीच सद्गती होते. तुमची तरी योगाची गोष्ट आहे.
आठवणीच्या बळा शिवाय ज्ञान तलवार काम करणार नाही.विकारी दृष्टी खूप नुकसान करणारी
आहे. आत्मा कानाद्वारे ऐकते.बाबा म्हणतात, तुम्ही आठवणीमध्ये मस्त राहा,तर सेवेची
वृद्धी होत जाईल. कधीकधी मुलं म्हणतात,बाबा नातेवाइक ऐकत नाहीत.बाबा
म्हणतात,आठवणीच्या यात्रेमध्ये कच्चे आहात,म्हणून ज्ञान तलवार काम करत नाही.आठवण
करण्याचे कष्ट घ्या.हे गुप्त कष्ट आहेत.मुरली चालवणे तर प्रत्यक्ष आहे.आठवण करण्याचे
गुप्त कष्ट आहेत ज्याद्वारे शक्ती मिळत राहते.ज्ञानाद्वारे शक्ती मिळत नाही.तुम्ही
पतिता पासून पावन आठवणीच्या बळा द्वारे बनतात.कमाई करण्याचा पुरूषार्थ करायचा आहे.
मुलांची आठवण जेव्हा एकरस राहते,अवस्था चांगली आहे,तर खुप खुशी होते आणि जेव्हा
आठवण व्यवस्थीत नाही,कोणत्या गोष्टी मध्ये संशय आहे,तर खुशी गायब होते. काय
विद्यार्थ्यांना शिक्षक आठवणीत येत नाहीत का? येथे तर घरामध्ये (मधुबन) मध्ये
राहतात,सर्व काही करत,शिक्षकांची आठवण करायची आहे.या शिक्षका द्वारे तर खूप उच्च पद
मिळते.गृहस्थ व्यवहारांमध्ये पण राहायचे आहे.शिक्षकांची आठवण राहिली तर,पिता आणि
गुरुची पण आठवण येईल.बाबा अनेक प्रकारे समजवत राहतात परंतु घरांमध्ये धनदौलत,
मुलं-बाळ इत्यादी पाहून विसरतात.बाबा खूप चांगल्या रीतीने समजावतात,तुम्हाला आत्मिक
सेवा करायची आहे.बाबांची आठवण करणेच उच्च ते उच्च सेवा आहे. मनसा वाचा कर्मणा
बुद्धीमध्ये बाबांची आठवण राहावी.मुखाद्वारे ज्ञानाच्या गोष्टी ऐकवा,कोणाला दुःख
देऊ नका.कोणतेही अकर्तव्य करायचे नाही. मुख्य गोष्ट अल्लाह म्हणजे ईश्वराला न
समजल्यामुळे दुसरे काहीच समजू शकणार नाहीत.प्रथम ईश्वर कोण आहेत,ते पक्के करा परत
पुढे जायला पाहिजे. शिवबाबा राजयोग शिकवून विश्वाचे मालक बनवतात.या छी-छी दुनिये
मध्ये मायेचा दिखावा खूप आहे,किती फॅशन करत राहतात.या खराब दुनियेपासून तर नफरत
यायला पाहिजे.एका बाबांची आठवण केल्यामुळे तुमचे विकर्म विनाश होतील,पवित्र
बनाल.वेळ वाया घालवू नका.चांगल्या रीतीने धारणा करा. माया दुश्मन अनेकांची अक्कल
नष्ट करते.कमांडर पण गफलत करतात,तर त्यांना काढून टाकतात.स्वतः कमांडरला पण लाज
वाटते,परत राजीनामा देतात. इथे पण असेच होते. चांगले चांगले कमांडर म्हणजे महारथी
पण ज्ञान सोडून जातात,अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आठवण
करण्याचे गुप्त कष्ट घ्यायचे आहेत.आठवणीच्या मस्तीमध्ये राहिल्यामुळे सेवेमध्ये
स्वतः वृद्धी होत राहील.मन्सा वाचा कर्मणा आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा
आहे.
(२) मुखाद्वारे
ज्ञानाच्या गोष्टीच ऐकावयाच्या आहेत.कोणालाही दुःख द्यायचे नाही.कोणतेही अकर्तव्य
करायचे नाही.देही अभिमानी बनण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.
वरदान:-
विजयी
रत्नाच्या नशे द्वारे नेहमी हर्षित राहणारे,सर्व आकर्षण पासून मुक्त भव.
विजयी रत्नांची
आठवण,बाबांच्या गळ्यातील हार आहे,ज्याची आजपर्यंत पुजा होत राहते.तर नेहमी हा नशा
राहावा की,आम्ही बाबांच्या गळ्यातील हार विजयी रत्न आहोत. आम्ही विश्वाच्या मालकाचे
बालक आहोत.आम्हाला जे मिळाले आहे, ते कोणालाही मिळू शकत नाही, हा नशा आणि खुशी
कायमस्वरूपी राहिली तर,कोणत्याच प्रकारचे आकर्षण राहणार नाही.जे नेहमी विजयी आहेत,
ते नेहमी आनंदित आहेत.एक बाबाच्या,आठवणीच्या आकर्षणा मध्येच,आकर्षित आहेत.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-
एकाच्या अंत मध्ये जाणे म्हणजे एकांतवासी बनणे.