30-08-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
13.03.86 ओम शान्ति
मधुबन
सहज परिवर्तनाचा
आधार-अनुभवाचा अधिकार
बाप दादा आपल्या सर्व
आधार मूर्त व उद्धार मूर्त मुलांना पाहत आहेत. प्रत्येक पुत्र आजच्या या जगाला
श्रेष्ठ व संपन्न बनवण्याचा आधार आहे. आज जग आधारमूर्त, श्रेष्ठ आत्म्यांना
वेग-वेगळ्या रुपात, विधीने आवाज देत आहेत, आठवण करत आहेत. तर अशा दु:खी, अशांत
आत्म्यांना आधार देणारे,अंजली देणारे, सुख-शांती चा रस्ता दाखवणारे,ज्ञान
नेत्रहीनाला दिव्य नेत्र देणारे,भटकणाऱ्याला ठिकाणा देणारे,अतृप्त आत्म्यांना तृप्ती
देणारे,उद्धार करणारे श्रेष्ठ आत्मे आहात.संपूर्ण विश्वात अस्थिरता आहे.कुठे
धनामुळे,कुठे मनाची चिंता तर कुठे जीवनात असंतुष्टता आल्यामुळे,कुठे प्रकृती
तमोप्रधान झाल्याने अस्थिरता आहे. अशावेळी तुम्ही स्थितप्रज्ञ आत्मे आहात. दुनिया
भयात असताना तुम्ही निर्भय बनून आनंदात नाचत आहात. दुनिया अल्पकाळासाठी नाचण्या
गाण्याचे व इतर अनेक साधनांचा वापर करत असतील तर ते साधन त्यांना चिंतेच्या चितेवर
बसवत आहेत. अशांना श्रेष्ठ अविनाशी प्राप्तीच्या अनुभूतीच्या आधाराची गरज आहे.
दुनियेचे साधनं सिद्धीचा अनुभव करणारी नाहीत, त्यामुळे त्यांना काहीतरी नवीन वेगळे
हवे आहे. हाच सर्वांच्या मनाचा आवाज आहे. अल्पकाळाची साधने म्हणजे काडीचा आधार होय.
दुनिया वाले आधार अल्पकालीन साधनातून शोधतात मात्र वास्तविक यथार्थ आधार देणारे
तुम्ही सर्व आहात ना?
दुनियेच्या तुलनेत तुम्ही थोडे आहात म्हणून आठवण रूपाने औक्षौणी सेने समोर पाच
पांडव दाखवतात. तुमच्यासोबत सर्वोच्च अधिकारी आहेत. विज्ञान,शास्त्र,राजकीय,
धर्मनीती इत्यादी अधिकाऱ्यांनी आपल्या रीतीने विश्व परिवर्तनाचे कार्य करण्याचा
प्रयत्न केला आहे. तुमच्याजवळ कोणता अधिकार आहे? सर्वश्रेष्ठ परमात्म अनुभुतीचा
अधिकार.
अनुभवाच्या अधिकाराने श्रेष्ठ व सहज कुणालाही परिवर्तन करू शकता. तुमच्याकडे या
विशेष अधिकाराचा अनुभव असल्याने तुम्ही विश्वासाने, निश्चयाने, नशेने म्हणाल कि सहज
व योग्य मार्ग एकच आहे जो एका कडून मिळतो व सर्वांना एकच बनवतो. हाच सर्वांना संदेश
देता ना ! म्हणून बापदादा उद्धारमूर्त व आधारमूर्त मुलांना पाहत आहेत. पहा दादा
सोबत कोण निमित्त बनले आहेत. विश्वाचे आधार असूनही साधारण आहात. दुनिया तुम्हाला
ज्या नजरेने पाहते,बाबा त्या नजरेने पाहत नाहीत.दुनिया वाल्यांना पैसा व प्रसिद्धी
असणारे हवे असतात परंतु बाबांना ज्यांचे नाव रुप ही माहीत नाही त्यांनाच ते मोठे
करतात.अशक्य ते शक्य, साधारणला महान, निर्बलास बलवान,जे अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानी
बनवणे हीच बाबांची भूमिका आहे म्हणून बापदादा श्रेष्ठ भाग्य प्राप्त करणाऱ्या
मुलांकडे पाहून आनंदीत होतात.आता दुनियेतील देखील इतर मार्ग सोडून एका मार्गावर येऊ
पहात आहेत.जे आपण करू शकत नाहीत ते बाबा गुप्त रूपाने करतात. कुंभमेळ्यामध्ये
सर्वजण कसे स्नेहाने पाहत होते. हळूहळू सर्व प्रत्यक्ष होणार आहे.धर्म, राजकारण व
विज्ञान हे तीन मुख्य अधिकारी आहेत.आज हे तीनही परमात्मा भेटीसाठी जवळ येताना
दिसतात.परंतु बुरख्यातुन पाहत आहेत. बुरखा दूर केलेला नाही त्यामुळे ते दुविधेत
आहेत. परंतु नजर गेली आहे. एक दिवस बुरखा दूर होईल. अनेक प्रकारचे बुरखे आहेत,जसे
आज पुढारीपण,गादी व खुर्चीचा बुरखा खूप मोठा आहे. त्यातून बाहेर येण्यास वेळ लागेल
परंतु डोळे उघडले आहेत कुंभकर्ण थोडे जागे झाले आहेत.
बाप दादा विश्वातील सर्व आत्म्यांना बाबांचा वारसा मिळविण्याचा अधिकार देतील. कसेही
असतील परंतु आहेत बाबांचीच मुले. तेव्हा मुक्ती किंवा जीवन मुक्ती दोन्ही बाबी
वारसाच आहेत. बाबा वारस बनवण्यासाठी आले आहेत.अज्ञानी असल्याने तुम्हाला त्यांची दया
येते, बरोबरच उत्साह देखील येतो की कसे सर्व वारसदार बनतील.अच्छा, आज करेबियन यांचा
टर्न आहे.हे सर्वच बाप दादांचे लाडके आहेत. प्रत्येक स्थानाची आपआपली विशेषता
बापदादा समोर प्रत्यक्ष होते. असाही बाबांसमोर प्रत्येकाचा हिशोब असतोच. तुम्हा
सर्वांना पाहून बाबांना आनंद होतो की प्रत्येक जण आपल्या शक्तीनुसार सेवेच्या
उत्साहात राहतात. सेवा ब्राह्मणांचा विशेष व्यवसाय आहे.सेवा नसेल तर ब्राह्मण जीवन
नीरस आहे. तेव्हा सेवेचा उत्साह पाहून सदा बाप दादा आनंदी होतात.कॅरेबियनची विशेषता
काय आहे ? तर सदैव जवळ राहणारी स्थुल रूपाने नाही तर मनाने जवळ आहेत.जेवढे शरीराने
दूर तेवढेच बाबांच्या जवळ राहण्याचा अनुभव लिफ्ट रुपात मिळेल. कारण बाबा सदैव आपल्या
मुलांना पाहत असतात.मुलं नजरेत सामावलेले असतात. सर्वच जवळचे रत्न आहेत.कोणीही दूरचा
नाही नियर व डियर दोन्ही (जवळ आणि प्रिय)आहेत. जवळ नसते तर उमंग उतसाह नसता. बाबांची
साथ शक्तिशाली बनवून पुढे घेऊन जात आहे.
तुम्हा सर्वांना पाहून सगळेच आनंदी होतात की कसे हिम्मत ठेवून सेवेची वृद्धी करत
आहेत. सर्वांचा एकच संकल्प हवा की सर्वात मोठी माळ बनवायची आहे. जेथे जेथे माळेचे
मणी विखुरलेले आहेत त्यांना एकत्र करून बाबांसमोर आणायचे आहे. संपूर्ण पुष्पगुच्छ
बाबांसमोर आणायचा आहे.
त्यासाठी वर्षभर तयारी करत असतात. यावर्षी बापदादा सर्व विदेशी सेवाकेंद्र वृद्धीचा
निकाल पाहत आहेत. प्रत्येकाने छोटा किंवा मोठा पुष्पगुच्छ प्रत्यक्ष फलस्वरूपात आणला
आहे. त्यामुळे बाप दादा आपल्या स्नेहमयी मुलांना पाहून आनंदी होत आहेत.सर्व प्रेमाने
मेहनत करत आहेत. प्रेमाने मेहनत केल्यास मेहनत वाटत नाही. प्रत्येक ठिकाणाहून चांगला
समूह आला आहे. बापदादा नेहमीच आनंदी होतात की सेवेत अथक बनून सेवा करत आहेत.
त्यामुळे कधीही नाराज होऊ नका. आज थोडे आहेत उद्या जास्त होणारच आहेत. बाबांची मुले
जिथे लपलेली असतीलत ती सर्व वेळेनुसार आपला हक्क घेण्यासाठी एकत्र येणारच आहेत.
आनंदात राहा. नृत्य करा. अविनाशी बाबांचे अविनाशी बच्चे असल्याने अविनाशी प्राप्ती
आहे. आनंदही अविनाशी आहे. वेस्ट संपल्याने सर्व बेस्ट आहेत. बाबांचे बनणे म्हणजे
अविनाशी खजाण्यांचे मालक होणे. तर अविनाशी जीवन बेस्ट आहे ना! कॅरेबियन मध्ये सेवेची
सुरुवात विशेष आत्म्याची राहिलेली आहे. सरकारच्या सेवेचा पाया घाणादेशा मध्येच होता.
सरकारपर्यंत आवाज पसरवणे ही विशेषताच आहे.सरकार सुद्धा तीन मिनिटांच्या मौनाचा
प्रयत्न करत आहे. सरकारच्या जवळ पोहोचण्याची हीच संधी होती. त्यामुळे परिणाम सुद्धा
चांगला आला. तसेच व्हीआयपी देखील तयार केले त्यामुळे अनेकांची सेवा झाली. निमंत्रणच
असे व्हीआयपी स्वरूपात मिळाले त्यासाठी कॅरिबियन निमित्त आहेत.
आज सगळीकडे एक उदाहरण बनुन अनेकांना प्रेरणा देत आहेत. त्याचे फळ सर्वांनाच मिळेल.
सरकारच्या अधिक जवळ येऊन ज्ञानयुक्त पद्धतीने ज्ञानीपणाच्या सेवेचा अनुभव करत आहेत.
कोणत्याही सभेमध्ये सेवा करताना लौकीक गोष्टी असुद्या मात्र त्याही करताना असे बोला
की त्यात वेगळेपणा व प्रेमळपणाचा अनुभव व्हावा. ही संधी आहे. त्याला सेवेचे साधन
बनवा. सुरुवातीपासून सेवेच्या संधीची लॉटरी मिळाली आहे. सर्व स्थानांची वृद्धी
चांगली आहे. तेथील प्रसिद्ध पंडितांनाही तयार करा व घाणात ही भरपूर पंडित आहेत ते
जवळचे असून भारतीय संस्कृती मानणारे आहेत. जसे हरिद्वारमध्ये साधूंचे संघटन तसे
तेथील पंडितांचे करा. स्नेहाने जवळ करा. आपोआप मधुबनला येतील. आल्यास ज्ञाना जवळ
पोहोचतील,जातील कुठे ? तर हे करून दाखवा. अच्छा,
युरोप काय करेल ? संख्येने कमी नाहीत. संख्या काही असू द्या दर्जा असेल तर नंबर एक
आहात. ज्यांना जे आणता आले नाहीत ते तुम्ही आणाल. फार मोठी गोष्ट नाही. "हिम्मत
मुलांची मदत बाबांची " मुलांची व परिवाराची हिंमत व बाबांची मदत असेल तर मोठी गोष्ट
नाही. जे वाटेल ते करा. शेवटी सर्वांना एकाच जागी यायचेआहे. कुणी अगोदर कुणी नंतर
मात्र यावे तर लागेलच. कितीही आनंदी असाल परंतु इच्छा तर असतातच. जोपर्यंत ज्ञान
नाही तोपर्यंत विनाशी इच्छा पूर्ण होत नाहीत. एक इच्छे नंतर दुसरी इच्छा उत्पन्न
होतच राहते.त्यामुळे संतुष्टता येत नाही तर जे दुःखी आहेत,त्यांना ईश्वरीय
निस्वार्थ स्नेह, स्नेही जीवन, आत्मस्नेह, परमात्मस्नेह यांचा अनुभव होऊ शकत
नाही.कितीही स्नेह असुद्या परमात्म स्नेह कुठेच नाही. खरा स्नेह, परिवाराचा स्नेह,
सर्वांना हवा आहे परंतु असा परिवार कुठे मिळेल ? तर त्यांना ज्याची कमी आहे
त्याद्वारे समजून सांगा.अच्छा,
सर्व विशेष आत्मे आहात. जर विशेषता नसेल तर ब्राह्मण बनू शकत नाही. विशेषतेमुळेच
ब्राह्मण जीवन मिळाले आहे.तुमची विशेषता म्हणजे "कोटीत कुणीतरी व कुणामध्येही कुणी
" प्रत्येकाची अशी एक विशेषता आहे. सर्व दिवस सेवा व बाबा यातच मग्न आहात ना !
लौकिक कार्यात निमित्त असावे. मात्र मनामध्ये बाबा व सेवा असावी.
वरदान:-
सदैव निजधाम व
नित्य स्वरूपाच्या स्मृती मुळे वैरागी, एकांतवासी, सर्वप्रिय भव.
निराकारी दुनिया व
निराकारी स्वरूप सदैव एकांतवासी व सर्वप्रिय बनवते. आपण निजधामवासी असून येथे
सेवेसाठी अवतरित होतो.आपण येथील नाहीत,परंतु अवतार आहोत. फक्त ही छोटी गोष्ट लक्षात
ठेवा तर वैरागी बनाल. जे अवतार न समजता गृहस्थी समजतात त्यांची गाडी चिखलात
बसते.गृहस्थी म्हणजे ओझे, अवतार म्हणजे हलकेपणा! अवताराच्या स्मृतीने निजधाम,
निजरूप स्मरणात राहून उपराम (वैरागी) बनाल.
सुविचार:-
ब्राम्हण तोच जो
शुद्धी व विधीपूर्वक प्रत्येक कार्य करेल.