18-08-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आपले सतोप्रधान भाग्य बनविण्यासाठी आठवणी मध्ये राहण्याचा खूप पुरुषार्थ करा, नेहमी आठवण ठेवा, मी आत्मा आहे, बाबा कडून पूर्ण वरसा घ्यायचा आहे."

प्रश्न:-
मुलांना आठवणीचा चार्ट ठेवणे अवघड का वाटत आहे?

उत्तर:-
कारण कांही मुले आठवणीला यथार्थ समजत नाहीत. आठवणीमध्ये बसतात आणि बुद्धी बाहेर भटकत राहते. शांत राहत नाहीत. ते मग वातावरणाला खराब करतात.आठवणच करत नाहीत, तर चार्ट मग कसे लिहतील.जरी कोणी खोटा लिहिला, तर त्यांना फार दंड पडतो.खऱ्या बाबाला खरे सांगितले पाहिजे.

गीत:-
तकदीर जगा कर आई हु. . . . .

ओम शांती।
आत्मिक मुलांना, आत्मिक पिता रोज रोज समजावत आहेत की, जेवढे होईल तेवढे देहीअभिमानी बना. स्वतःला आत्मा निश्चय करा आणि बाबांची आठवण करा, कारण तुम्ही जाणता की, आम्ही त्या बेहदच्या पित्याकडून,बेहद सुखाचे भाग्य बनविण्या साठी आलो आहोत. तर जरूर बाबाची आठवण केली पाहिजे. पवित्र सतोप्रधान बनल्याशिवाय, सतोप्रधान भाग्य बनवू शकत नाही. हे तर चांगल्या प्रकारे आठवणीत ठेवले पाहिजे. मूळ गोष्ट आहेच एक. हे तर स्वतःजवळ लिहून ठेवा. हातावर पण नाव लिहतात ना. तुम्ही पण लिहा, आम्ही आत्मा आहोत,बेहदच्या बाबा कडून,आम्ही वरसा घेत आहोत, कारण माया विसरायला लावते, त्यामुळे लिहिलेले असेल, तर वारंवार आठवणीत येईल.

मनुष्य ओम किंवा कृष्ण इ. चे चित्र पण लावून ठेवतात, आठवणीत राहण्यासाठी. ही तर आहे अगदी नवीन आठवण. हे फक्त बेहदचे बाबा समजावत आहेत. हे समजल्या मुळे तुम्ही सौभाग्यशाली तर काय, पद्म भाग्यशाली बनत आहात. बाबाला न ओळखल्यामुळे, आठवण न केल्यामुळे, कंगाल बनले आहेत. एकच बाबा आहेत,जे नेहमी जीवन सुखी बनविण्यासाठी आले आहेत. जरी आठवण पण करतात,परंतु जाणत बिल्कुल नाहीत.परदेशी पण सर्वव्यापी म्हणणे, भारतवासी कडून शिकले आहेत. भारताचे पतन झाले, त्यामुळे सर्वांचे पतन झाले आहे. भारतच जबाबदार आहे, स्वतःचे पतन आणि इतरांचे पतन करण्यासाठी. बाबा म्हणतात की, मी पण इथेच येवून भारताला, स्वर्ग, सचखंड बनवत आहे. असा स्वर्ग बनवणाऱ्याची किती निंदा केली आहे. विसरून गेले आहेत, त्यामुळे लिहिले आहे की,यदा यदाहि. . ‌. . याचा पण अर्थ बाबा येऊन समजावत आहेत. उपकार एका बाबाचे आहेत. आता तुम्ही जाणता की, बाबा येतात जरूर, शिवजयंती साजरी करत आहेत. परंतु शिवजयंती चा मान बिल्कुल नाही. आता तुम्ही मुले समजत आहात, जरूर होऊन गेले आहेत, त्यामुळे त्यांची जयंती साजरी करत आहेत. सतयुगी आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना करत आहेत. इतर सर्व जाणतात की, आमचा धर्म,अमक्याने आमुक वेळी स्थापन केला. त्यांच्या अगोदर आहेच देवी देवता धर्म. त्याला बिल्कुल जाणत नाहीत की, हा धर्म कुठे नष्ट झाला आहे. आता बाबा येऊन समजावत आहेत की, बाबा सर्वात उंच आहेत, आणखीन कोणाची महिमा नाही. धर्मस्थापकाची महिमा काय असेल. बाबाच पावन दुनियेची स्थापना आणि पतित दुनियेचा विनाश करत आहेत, आणि तुम्हाला मायेवर विजय प्राप्त करून देत आहेत. ही बेहदची गोष्ट आहे.रावणाचे राज्य साऱ्या बेहदच्या दुनिये वर आहे.हदची लंका इ.ची गोष्ट नाही. ही हार आणि जीत ची गोष्ट पण साऱ्या भारताचीच आहे.

बाकी तर बायप्लाट आहेत. भारतामध्येच डबल ताजधारी आणि सिंगल ताजधारी राजे बनत आहेत,आणि जे पण मोठ मोठे बादशाह होऊन गेले आहेत, त्यांना कोणाला पण लाइटचा ताज नाही, शिवाय देवी-देवतांच्या. देवता तरी पण स्वर्गाचे मालक होते ना.आता शिवबाबा ला म्हटले जाते, परमपिता, पतितपावन. त्यांना लाइट कोठे द्यावी. लाइट तेंव्हा द्यावी, जेंव्हा बिगर लाइट वाला पतित बनेल. ते कधी बिगर लाइटवाले होतच नाहीत. बिंदूवर लाइट कशी देऊ शकतील. तसे होत नाही.दिवसें-दिवस तुम्हाला फार रहस्ययुक्त गोष्टी समजावत आहेत,जेवढ्या बुद्धींमध्ये बसू शकतील. मुख्य आठवणीची यात्राच आहे. यामध्ये मायेचे विघ्न फार पडतात. जरी कोणी आठवणीचा चार्ट ५०-६० टक्के पण लिहीत आहेत, परंतु समजत नाहीत की, आठवणीची यात्रा कशाला म्हटले जाते. विचारत राहतात की, या गोष्टीला आठवण म्हणावी? फार अवघड आहे. तुम्ही इथे दहा-पंधरा मिनिटे बसता, त्यांमध्ये पण स्वतःला पहा, आठवणी मध्ये चांगल्या रीतीने राहात आहात? फार आहेत आठवणी मध्ये राहू शकत नाहीत,तर मग ते वातावरणाला खराब करून टाकतात. फार आहेत जे आठवणी मध्ये न राहिल्यामुळे विघ्न घालतात.सारा दिवस बुद्धी बाहेर भटकत राहते.त्यामुळे इथे थोडीच शांती होईल, त्यामुळे आठवणीचा चार्ट पण ठेवत नाहीत. खोटा लिहिल्यामुळे तर आणखीनच दंड पडत आहे. फार मुले चुका करत आहेत, लपवत आहेत. खरे सांगत नाहीत.बाबा म्हणतात आणि खरे सांगत नाहीत तर किती दोष लागतो.किती जरी मोठे वाईट काम केले असेल, तरी पण खरे सांगण्या साठी लाज वाटते. जादा करून सर्व खोटे सांगतात. खोटी माया, खोटी काया. . . आहे ना. एकदम देहअभिमाना मध्ये येतात. खरे सांगणे तर चांगलेच आहे, आणखीन पण शिकतील‌. इथे खरे सांगितले पाहिजे. ज्ञांना बरोबर आठवणीची यात्रा पण जरुरी आहे, कारण आठवणीच्या यात्रेनेच, स्वतःचे आणि विश्वाचे कल्याण होणार आहे. ज्ञान सांगण्यासाठी तर फार सोपे आहे. आठवणीमध्येच मेहनत आहे. बाकी बीजा पासून झाड कसे निघत आहे, हे तर सर्वाना माहीत आहे्. बुद्धीमध्ये ८४ चे चक्र आहे, बीज आणि झाडाचे ज्ञान तर आहे ना. बाबा तर सत्य आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. त्यांच्या मध्ये ज्ञान समजावून सांगण्यासाठी आहे.ही बिल्कुल असाधारण गोष्ट आहे. हे मनुष्य सृष्टीचे झाड आहे. हे पण कोणी जाणत नाही. सर्व नेति नेति म्हणत गेले म्हणजे माहित नाही असे म्हणत गेले. कालावधीच जाणत नाहीत, तर बाकी काय जाणतील? तुमच्या मध्ये पण फार थोडे आहेत,जे चांगल्या प्रकारे जाणत आहेत. त्यासाठी चर्चासत्र पण ठेवत आहेत. आप आपले मत द्या. मत तर कोणी पण देऊ शकतात. असे नाही की, ज्यांचे नाव आहे, त्यांनाच द्यायचे आहे. आमचे नाव नाही, आम्ही कसे देऊ. नाही, कोणाला पण सेवेसाठी कोणती मत असेल, सल्ला असेल, तर लिहू शकता. बाबा म्हणतात, कोणते पण मत असेल, तर लिहले पाहिजे. बाबा या युक्ती मुळे सेवा फार वाढू शकते. कोणी पण मत देऊ शकतात. पाहतो, कोण कोणत्या प्रकारची मत देत आहे. बाबा तर म्हणत आहेत की, कोणत्या युक्तीमुळे, आम्ही भारताचे कल्याण करू,सर्वांना संदेश देऊ. आपसा मध्ये विचार करा, लिहून पाठवा. मायाने सर्वांना झोपवले आहे. बाबा येतातच, जेंव्हा मृत्यू समोर उभा आहे. आता बाबा म्हणतात की, सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे, शिका ना शिका, मरायचे जरूर आहे. तयारी करा ना करा, नवीन दूनिया जरूर स्थापन होणारच आहे. चांगली चांगली जी मुले आहेत, ते आपली तयारी करत आहेत.सुदामाचे पण उदाहरण प्रसिध्द आहे, मुठभर तांदूळ घेऊन आला .बाबा आम्हाला पण महल मिळाला पाहिजे. त्याच्या जवळ आहेच मूठभर तांदूळ, तर काय करतील. बाबांनी मम्माचे उदाहरण सांगितले आहे, मूठभर तांदूळ पण घेऊन आली नाही. तरी किती उच्च पद प्राप्त केले, यामध्ये पैशाची गोष्ट नाही. आठवणी मध्ये राहायचे आहे आणि आपल्या सारखे इतरांना बनवायचे आहे. बाबाची तर कोणती फी इ. नाही. समजत आहेत की, आमच्या जवळ पैसे पडून आहेत, तर कां आम्ही यज्ञामध्ये अर्पण करू नयेत.विनाश तर होणारच आहे. सर्व व्यर्थ होऊन जाईल. त्यापेक्षा काहीं तरी सफल करावे. प्रत्येक मनुष्य काहीं ना कांही दान पुण्य इ. जरूर करत आहेत.ते आहे पाप आत्म्यांचे,पाप आत्म्यांना दान पुण्य. तरी पण त्यांचे अल्पकाळा साठी फळ मिळत आहे.समजा, कोणी विद्यापीठ, कॉलेज इ. बनवत आहेत, पैसे जास्त आहेत, धर्मशाळा इ. बनवत आहेत, तर त्यांना घर इ. चांगले मिळेल. तरी पण आजार इ. तर होईल ना. समजा, कोणी हॉस्पिटल इ. बनवले असेल तर त्यांना चांगले आरोग्य मिळेल. परंतु त्यामुळे सर्व इच्छा तर पूर्ण होत नाहीत. इथे तर बेहदच्या बाबा कडून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे.

तुम्ही पावन बनत आहात, तर सर्व पैसे, विश्वाला पावन बनविण्या साठी लावणे चांगले आहे ना. मुक्ती, जीवनमुक्ती देत आहात, ते पण अर्धा कल्पासाठी. सर्व म्हणतात की, आम्हाला शांती कशी मिळेल. ती तर शांतीधाम मध्ये मिळत आहे आणि सत्ययुगा मध्ये एक धर्म असल्यामुळे, तेथे अशांती असत नाही. अशांती आसते रावण राज्यांमध्ये. गायन पण आहे ना राम राजा राम प्रजा. . . . . ते आहे अमरलोक. तेथे अमरलोका मध्ये मरण्याचे अक्षर नसते. येथे तर बसल्या बसल्या अचानक मरून जातात याला मृत्यूलोक, त्याला अमरलोक म्हटले जाते. तिथे मरणे होत नाही. जुने एक शरीर सोडून, मग बालक बनतात.रोग होत नाही. किती फायदा होत आहे. श्री-श्री च्या मतावर तुम्ही नेहमीसाठी निरोगी बनत आहात. तर असे आत्मिक सेंटर किती उघडली पाहिजेत. थोडे पण जे येत आहेत, ते कमी आहेत कां? यावेळी कोणता पण मनुष्य विश्वनाटकाच्या कालावधीला जाणत नाही.असे विचारतात कि, तुम्हाला कोणी शिकवले आहे? अरे, आम्हाला सांगणारे बाबा आहेत. एवढे पुष्कळ ब्रह्माकुमार-कुमारी आहेत. तुम्ही पण बी.के. आहात. शिवबाबा ची मुले आहात.प्रजापिता ब्रह्मा ची पण मुले आहात. हे आहेत, मनुष्यकुळाचे पंजोबा. त्यांच्यापासून आम्ही बी.के.बनलो आहोत. वंशावळ आहे ना. तुमचे देवी-देवतांचे कुळ फार सुख देणार आहे. इथे तुम्ही उत्तम बनत आहात, मग तेथे राज्य कराल.हे कोणाच्या बुद्धी मध्ये राहात नाही. हे पण मुलांना समजावले आहे की, देवतांचे पाय या तमोप्रधान दुनिये मध्ये पडत नाहीत. जड चित्रांची छाया पडू शकते, चैतन्याची पडू शकत नाही. तर बाबा समजावत आहेत की, मुलांनो, एक तर आठवणीच्या यात्रेमध्ये राहा, कोणते पण विकर्म करू नका,आणि सेवेच्या युक्त्या शोधा. मुले म्हणतात बाबा, आम्ही तर लक्ष्मी नारायणा सारखे बनू. बाबा म्हणतात, तुमच्या मुखामध्ये गुलाब, परंतु त्यासाठी मेहनत पण केली पाहिजे. उच्च पद प्राप्त करायचे आहे, तर आपल्यासारखे बनविण्याची सेवा करा. एके दिवशी तुम्ही पाहाल,एक एक पंडा आपल्या बरोबर १००-२०० यात्री पण घेऊन येईल. पुढे चालून पाहत राहाल. पहिल्या पासून थोडेच सर्वकांही सांगू शकतो. जे होत आहे ते पाहात राहा.

हे विश्व नाटक आहे.तुमची सर्वात मुख्य भूमिका आहे,बाबा बरोबर, जे तुम्ही जुन्या दुनियेला नवीन बनवत आहात.हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. आता तुम्हीं सुखधामचे मालक बनत आहात. तेथे दुखाचे नाव निशाण असत नाही. बाबा आहेत दुख:हर्ता सुखकर्ता. येऊन दुःखापासून मुक्त करत आहेत. भारतवासी समजतात, एवढं धन आहे, मोठमोठे महल आहेत, वीज आहे, बस हाच स्वर्ग आहे. हा सर्व माये चा भपका आहे. सुखासाठी फार साधन जोडत आहेत. मोठ मोठे महल, घरे बनवत आहेत,तरीही मृत्यू कसा अचानक होतो,तेथे तर मरण्याची भीती नसते. इथे तर अचानक मरुन जातात, किती शोक करतात. समाधी वर जाऊन, आश्रू ढाळतात. प्रत्येकाची आपली आपली रुढी परंपरा आहे. अनेक मतं आहेत. सतयुगा मध्ये अशा गोष्टी आसत नाहीत. तेथे तर एक शरीर सोडून, दुसरे घेतात. तर तुम्ही किती सुखांमध्ये जात आहात. त्यासाठी किती पुरषार्थ केला पाहिजे. पावलो पावली मत घेतली पाहिजे. गुरूची किंवा पतीची मत घेतात, नाही तर आपल्या मतावर चालले पाहिजे. आसुरी मत काय काम करेल. आसुरा कडेच ढकलेल.आता तुम्हाला मिळत आहे ईश्वरी मत, उंच ते उंच, त्यासाठी गायन पण आहे, श्रीमत भगवानुवाच. तुम्ही मुले श्रीमता वर साऱ्या विश्वाला स्वर्ग बनवत आहात. त्या स्वर्गाचे तुम्ही मालक बनत आहात, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पावलावर श्रीमत घ्यायची आहे, परंतु कोणाच्या भाग्यामध्ये नसेल तर मग मतावर चालत नाहीत. बाबांनी समजावले आहे, कोणाला पण स्वतःची कांही अक्कल असेल, मत असेल, तर बाबा कडे पाठवून द्या. बाबा जाणतात की, कोण कोण मत देण्याच्या लायकीचे आहेत. नवीन नवीन मुले निघत आहेत. बाबा तर जाणतात की, कोणती चांगली चांगली मुले आहेत. दुकानदाराने पण विचार मांडले पाहिजेत. कसे प्रयत्न केले तर बाबाचा परिचय मिळेल. दुकानामध्ये पण सर्वांना आठवण करून देत राहा. भारतामध्ये जेंव्हा सुतयुग होते, तेंव्हा एकच धर्म होता. यामध्ये नाराज होण्याची, तर कोणती गोष्टच नाही. सर्वांचा एक पिता आहे. बाबा म्हणतात की, माझी एकट्याची आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील. स्वर्गाचे मालक बनाल. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति मात-पिता, बापदादाची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याची ,आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) श्रीमता वर चालून, साऱ्या विश्वाला, स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे, अनेकांना आपल्यासारखे बनवायचे आहे. आसुरी मता पासून आपला सांभाळ करायचा आहे.

(२) आठवणी च्या मेहनतीने, आत्म्याला सतोप्रधान बनवायचे आहे. सुदामा सारखे जे पण मूठभर तांदूळ आहेत, ते सर्व सफल करून,आपल्या सर्व इच्छां पूर्ण करायच्या आहेत.

वरदान:-
परीक्षा आणि समस्ये मध्ये नाराज होण्याऐवजी मनोरंजनाचा अनुभव करणारे, नेहमी विजयी भव:

या पुरुषार्थी जीवनामध्ये, विश्वनाटका नुसार, समस्या किंवा परिस्थिती तर येणार च आहेत. जन्म घेतात, पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवणे म्हणजे परीक्षा आणि समस्यांचे आव्हान करणे.जेंव्हा रस्ता पार करायचा आहे, तर रस्त्या मध्ये, देखावे नसावेत, असे कसे होऊ शकेल.. परंतु त्या देखाव्याला पार करण्या ऐवजी, जर करेक्शन करत राहाल, तर बाबांच्या आठवणी चे कनेक्शन लूज होऊन जाईल आणि मनोरंजना ऐवजी मनाला नाराज कराल. त्यामुळे वाह देखावा वाह ,असे गीत गात पुढे चालत राहा, म्हणजे नेहमी विजयी भव चे वरदानी बनाल.

बोधवाक्य:-
मर्यादे च्या आत चालणे म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम बनणे.