27.08.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबा आले आहेत या वेश्यालयला शिवालय बनविण्यासाठी. तुमचे कर्तव्य आहे-वेश्यांना ईश्वरीय संदेश देऊन त्यांचेही कल्याण करायचे आहे "

प्रश्न:-

कोणती मुलं आपले खूप मोठे नुकसान करतात?

उत्तर:-

जे कोणत्याही कारणामुळे मुरली चुकवतात,ते आपले खूप मोठे नुकसान करतात.काही मुले तर, आपसा मध्ये रुसल्या मुळे वर्गामध्ये(क्लास) येत नाहीत. काहीना काही बहाने बनवून घरामध्येच झोपतात,यामुळे ते आपलेच नुकसान करतात,कारण की बाबा तर रोज कोणत्या ना कोणत्या नव्या युक्त्या सांगत राहतात,ऐकलेच नाही तर आचरणात कसे आणणार.

ओम शांती। गोड गोड आत्मिक मुले हे तर जाणत आहेत की आम्ही विश्वाचे मालक बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत.भले माया विसरायला लावते.काही काहींना तर संपूर्ण दिवसभर विसरायला लावते.कधी आठवणच करत नाहीत ज्यामुळे खुशी होईल. आम्हाला भगवान शिकवतो हेही विसरून जातात.विसरून गेल्यामुळे नंतर कोणतीही सेवा करू शकत नाहीत.रात्री बाबांनी समजावले आहे-अधम पेक्षाही अधम(पापी) ज्या वेशा आहेत त्यांची ही सेवा करायला पाहिजे. वेश्यांनाही तुम्ही हे सांगू शकता की हे ज्ञान धारण केल्याने स्वर्गा मध्ये विश्वाची महाराणी बनू शकते,जे सावकार पण बनू शकत नाहीत.जे जाणतात, शिकले-सवरलेले आहेत ते सोय करतील,त्यांना ज्ञान देण्याची,तर बिचारी खूप खुश होईल कारण की त्याही अबला आहेत,त्यांना तुम्ही समजावू शकता.युक्त्या तर बाबा खूप समजावत राहतात.बोला,तुम्हीच श्रेष्ठ ते श्रेष्ठ,नीच ते नीच बनले आहात. तुमच्या नावामुळेच भारत वेशालय बनला आहे.पुन्हा तुम्ही शिवालया मध्ये जाऊ शकता-हा पुरुषार्थ केल्याने.तुम्ही आता पैशासाठी किती खराब काम करता.आता हे सोडून द्या.असे समजावल्या मुळे त्या खूप खुश होतील.तुम्हांला कोणी मना करू शकणार नाही.ही तर चांगली गोष्ट आहे ना.गरिबांचा भगवानच आहे.पैशासाठी खूप खराब काम करतात.जसे की त्यांचा धंदा चालतो.आता मुले म्हणतात आम्ही युक्ती काढू,सेवेची वृद्धी कशी होईल.काही मुले कोणत्या ना कोणत्या गोष्टी मध्ये रुसतात. मुरली ही सोडून देतात.हे समजत नाहीत की आम्ही शिकलो नाही तर स्वतःचेच नुकसान होईल. रुसून बसतात.अमके असे म्हणाले,तसे म्हणाले म्हणून येत नाही.बळजबरीने आठवड्यातून एक वेळा येतात.बाबा तर मुरली मध्ये कधी कोणते,कधी कोणते मत देत राहतात.मुरली ऐकायला तर पाहिजे ना. वर्गामध्ये जेव्हां येतील तेंव्हाच ऐकतील.असे खूप आहेत, काहीतरी कारण काढून बहाने बनवून झोपतात.अच्छा,आज जात नाही.अरे,बाबा असे चांगले चांगले पॉईंट सांगतात.सेवा केली तर उंच पदही प्राप्त कराल.हे तर शिक्षण आहे.बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये ग्रंथ खूप शिकतात.दुसरा कोणता धंदा नसेल तर ग्रंथ पाठ करून सत्संग सुरू करतात.त्यामध्ये कोणताही उद्देश इ.नाही.या शिक्षणामुळे तर सर्वांची नौका पार होते.तर तुम्हा मुलांना अशा-अशा अधमांची सेवा करायची आहे. सावकार लोक जेंव्हा पाहतील इथे अशा प्रकारचे येतात तर त्यांची येण्याची इच्छा होणार नाही.देह-अभिमान आहे ना. त्यांना लाज वाटेल.अच्छा,तर त्यांच्यासाठी एक वेगळी शाळा खोला.ते शिक्षण आहे पाई पैशाचे,शरीर निर्वाहासाठी.हे तर २१ जन्मासाठी आहे.कित्येकांचे कल्याण होईल.बहुतेककरून माता विचारतात की बाबा घरामध्ये गीता पाठशाळा खोलू? त्यांना ईश्वरीय सेवेची आवड असते.पुरुष लोक तर इकडे-तिकडे क्लब इ.मध्ये फिरत राहतात.सावकारांसाठी तर इथेच स्वर्ग आहे.किती फॅशन इ.करत राहतात.परंतु देवतांचे तर नैसर्गिक सौंदर्य पहा कसे आहे. किती फरक आहे.तुम्हांला इथे सत्य सांगितले जाते तर किती थोडे येतात.ते ही गरीब.त्या बाजूला लगेच जातात.तिथेही शृंगार इ.करून जातात.गुरु लोक साखरपुडाही करवतात.इथे कोणाचा साखरपुडाही केला जातो तेही त्यांना वाचविण्यासाठी.काम चितेवर चढण्यापासून वाचतील.ज्ञानचितेवर बसून पद्मा पदम भाग्यशाली बनतील. आई-वडिलांना म्हणतात हा बरबादीचा धंदा सोडून चला स्वर्गामध्ये जाऊ.तर म्हणतात काय करू, हे दूनिया वाले आमच्यावर बिघडतील,कि कुळाचे नाव बदनाम करतात. लग्न न करणे कायद्याच्या विरोधात आहे.लोकलाज, कुळाच्या मर्यादा सोडत नाहीत. भक्ती मार्गामध्ये गातात-माझा तर एक,दुसरा कोणी नाही. मीरेचे हे गीत आहेत.स्त्रियांमध्ये क्रमांक एक भक्त मीरा आहे,पुरूषांमध्ये नारदाचे गायन आहे.नारदाची गोष्ट आहे ना.तुम्हांला कोणी नवा मनुष्य म्हणाला-की मी लक्ष्मीला वरु शकतो.तर बोला,स्वतःला पहा लायक आहोत का?पवित्र सर्वगुणसंपन्न... आहात?ही तर विकारी पतित दुनिया आहे.बाबा आले आहेत त्यातून बाहेर काढून पावन बनविण्यासाठी.पावन बना तरच लक्ष्मीला वरण्यालायक बनू शकता.इथे बाबांजवळ येतात, प्रतिज्ञाही करतात नंतर घरी जाऊन विकारांमध्ये जातात.असे- असे समाचार येतात.बाबा म्हणतात अशा लोकांना, जी ब्राह्मणी घेऊन येते, तिच्या वरतीही खूप प्रभाव पडतो.इंद्र सभेची गोष्ट आहे ना.तर घेऊन येणाऱ्या वरतीही,गुन्हा दाखल होतो.बाबा ब्राम्हणींना नेहमी म्हणतात,जे कच्चे आहेत त्यांना आणू नका.तुमची अवस्था पण खालावेल कारण कायद्याविरुद्ध घेऊन आले.खरेतर ब्राम्हणी बनणे खूप सोपे आहे.१०-१५ दिवसांमध्ये बनू शकते.बाबा कुणालाही समजावण्याची खूप सोपी युक्ती सांगतात.तुम्हीं भारतवासी आदी सनातन देवी-देवता धर्माचे होते,स्वर्गवासी होते.आता नर्कवासी आहात पुन्हा स्वर्गवासी बनायचे असेल तर हे विकार सोडून द्या.फक्त बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील.किती सोपे आहे.परंतु काहींना अजिबातच समजत नाही.स्वतःलाच समजत नाही तर इतरांना काय समजावणार. वानप्रस्थ अवस्थेमध्ये ही मोहाची रग जाते ना.आज-काल वानप्रस्थ अवस्थेमध्ये एवढे जात नाहीत. तमोप्रधान आहेत ना.इथेच फसतात. सुरुवातीला वानप्रस्थींचे मोठे-मोठे आश्रम होते. आज-काल एवढे नाहीत.80-90 वर्षाचे झाले तरी घर सोडत नाहीत.समजतच नाहीत की वाणी पासून परे जायचं आहे. आता ईश्‍वराची आठवण करायची आहे.भगवान कोण आहे,हे सर्वजण जाणत नाहीत. सर्वव्यापी म्हणतात तर आठवण कोणाची करणार.हेही समजत नाहीत की आम्ही पुजारी आहोत. बाबा तर तुम्हांला पुजारी पासून पूज्य बनवत आहेत,तेही 21 जन्मासाठी.यासाठी पुरुषार्थ तर करावाच लागेल.

बाबांनी समजावले आहे ही जुनी दुनिया संपणार आहे. आता आम्हाला घरी जायचे आहे-बस एवढीच धून लागली पाहिजे.तिथे कोणताही गुन्हा घडत नाही.बाबा येऊन त्या पवित्र दुनियेसाठी तयारी करवत आहेत.सेवा करणाऱ्या लाडक्या मुलांना तर डोळ्यांच्या पापणीवर बसवून घेऊन जातात.तर अधमांचा उद्धार करण्यासाठी बहादुरी पाहिजे,त्या शासनामध्ये तर मोठे मोठे संघटन असते. शिकले-सवरलेले तयार (टीप टॉप) होऊन जातात.इथे तर किती गरीब साधारण आहेत.त्यांना बाबा बसून एवढे श्रेष्ठ बनवतात.वागणेही खूप श्रेष्ठ असायला हवे.भगवान शिकवत आहेत.त्या शिक्षणामध्ये कोणी खूप मोठी परीक्षा पास करतात तेंव्हा किती तयार होऊन(टीप-टॉप होऊन)जातात.इथे तर बाबा गरीब निवाज आहेत.गरीबच काही ना काही पाठवून देतात. एक-दोन रुपयांची ही मनीऑर्डर पाठवतात.बाबा म्हणतात तुम्ही तर महान भाग्यशाली आहात. मोबदल्यामध्ये मध्ये खूप मिळते. हीसुद्धा काही मोठी गोष्ट नाही. साक्षी होऊन नाटक पाहायचे आहे.बाबा म्हणतात मुलांनो चांगल्याप्रकारे शिका.हा ईश्वरी यज्ञ आहे जे पाहिजे ते घ्या.परंतु इथे घेतले तर तिथे कमी मिळेल. स्वर्गामध्ये तर सर्व काही मिळणार आहे.बाबांना तर सेवेमध्ये खूप उत्स्फूर्त मुले हवी आहेत.सुदेश सारखी,मोहिनी सारखी,ज्यांना सेवेची आवड आहे.तुमचे नाव खूप प्रसिद्ध होईल.नंतर तुम्हाला खूप मान देतील.बाबा सर्व गोष्टी सांगत राहतात.बाबा तर म्हणतात मुलांनो इथे जेवढा वेळ मिळेल,तेवढी आठवण करा. परीक्षेचे दिवस जवळ आल्यानंतर एकांतामध्ये जाऊन अभ्यास करतात.व्यक्तिगत शिक्षकही ठेवतात.आमच्याकडे शिक्षक तर खूप आहेत,फक्त शिकण्याची आवड असायला पाहिजे.बाबा तर खूप सहज समजावतात. फक्त स्वतःला आत्मा निश्चय करा.हे शरीर तर विनाशी आहे. तुम्ही आत्मा अविनाशी आहात. हे ज्ञान एकदाच मिळते नंतर सतयुगापासून कलियुगाच्या अंतापर्यंत कोणालाही मिळत नाही.तुम्हांलाच मिळते.आम्ही आत्मा आहोत हा तर पक्का निश्चय करा.बाबांकडून आम्हांला वारसा मिळत आहे.बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील.बस.हे मनात घोळत राहिले तरीही खूप कल्याण होऊ शकते.परंतु चार्ट ठेवत नाहीत. लिहीता-लिहीता थकून जातात. बाबा खूप सहज करून सांगतात. मी आत्मा सतोप्रधान होते आता तमोप्रधान बनले आहे.आता बाबा म्हणतात माझी आठवण करा तर सतोप्रधान बनाल.किती सोपे आहे तरीही विसरून जातात. जेवढा वेळ बसाल स्वतःला आत्मा समजा.मी आत्मा बाबांचा मुलगा आहे.बाबांची आठवण केल्याने स्वर्गाची बादशाही मिळते.बाबांची आठवण केल्याने अर्ध्या कल्पाचे पाप भस्म होतात. किती सहज युक्ती सांगतात.सर्व मुले ऐकत आहेत.हे बाबा स्वत:ही सराव करतात म्हणूनच तर शिकवतात ना.मी बाबांचा रथ आहे,बाबा मला खाऊ घालतात. तुम्ही मुलेही असे समजा.शिवबाबांची आठवण करत राहा तर किती फायदा होईल.परंतु विसरून जातात. खूप सोपे आहे.धंदा करताना ग्राहक नसेल तर आठवण करत बसा.मी आत्मा आहे,बाबांची आठवण करायची आहे.आजारी असतानाही आठवण करू शकता. बंधनांमध्ये असाल तर तिथेही बसून तुम्ही आठवण करत राहा तर १०-२० वर्षवाल्यां पेक्षाही उंच पद प्राप्त करू शकता. अच्छा

गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति माता-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते

धारणेसाठी मुख्य सारांश:-

  1. सेवेमध्ये खूप उस्फुर्त बनायचे आहे.जेवढा वेळ भेटेल एकांतामध्ये बसून बाबांची आठवण करायची आहे. शिक्षणाची आवड ठेवायची आहे. शिक्षणावर(मुरली वर)रुसायचे नाही.
  2. आपले वागणे खूप श्रेष्ठ ठेवायचे आहे,बस आता घरी जायचे आहे, जुनी दुनिया संपणार आहे त्यामुळे मोहाची रग काढून टाकायची आहे.वानप्रस्थ (आवाजाच्या पलीकडे) अवस्थेमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे.अधमांचाही (पापींचा)उद्धार करण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-

ब्रह्मा बाबां समान महात्यागा पासून महान भाग्य बनवणारे क्रमांक एक फरिश्ता सो विश्व महाराजन भव

क्रमांक एक फरिश्ता पासून विश्व महाराजन बनण्याचे वरदान त्याच मुलांना प्राप्त होते,जे ब्रह्मा बाबांच्या प्रत्येक कर्मरूपी पावलावर पाऊल टाकतात. ज्यांचे मन-बुद्धी बुद्धी साकार मध्ये सदैव बाबांसमोर समर्पित आहेत.ज्याप्रमाणे ब्रह्मा बाबांनी याच महात्यागा द्वारे महान भाग्य प्राप्त केले अर्थात नंबरवन संपूर्ण फरिश्ता आणि नंबरवन विश्व महाराजन बनले अशाप्रकारे बाबांचे अनुकरण करणारी मुलेही महानत्यागी किंवा सर्वस्व त्यागी असतील.संस्कार रूपांनी ही विकारांच्या वंशाचा त्याग करतील.

बोधवाक्य:-

आता सर्व आधार तुटणार आहेत म्हणूनच एक बाबांना आपला आधार बनवा.

||| ओम शांती |||

*_ओम शांती_*