06-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, सकाळी उठून हे चिंतन करा की,मी इतकी छोटीशी आत्मा,किती मोठ्या शरीराला
चालवत आहे,मज आत्म्यामध्ये अविनाशी भूमिकेची नोंद आहे"
प्रश्न:-
शिवबाबांना
कोणता अभ्यास आहे,कोणता नाही?
उत्तर:-
आत्म्यांचा ज्ञान रत्ना द्वारे शृंगार करण्याचा अभ्यास, बाबांना आहे, बाकी शरीराचा
शृंगार करण्याचा अभ्यास त्यांना नाही, कारण बाबा म्हणतात मला तर स्वतःचे शरीरच
नाही.मी यांचे शरीर जरी भाड्याने घेतले परंतु या शरीराचा शृंगार,ती आत्मा स्वतः
करते,मी करत नाही.मी तर नेहमी अशरीरी आहे.
गीत:-
बदल जाये
दुनिया,ना बदलेंगे हम....
ओम शांती।
मुलांनी हे गीत ऐकले. आत्म्याने या शरीराच्या कानाद्वारे ऐकले.मुलांना हे माहिती
झाले आहे, की आत्मा खूप छोटी आहे,ती आत्मा या शरीरामध्ये नाही,तर शरीर काहीच कामाचे
राहत नाही.खूप छोट्या आत्म्याच्या आधारावरती,हे मोठे शरीर चालत आहे.दुनियेमध्ये
कोणालाच माहीत नाही की,आत्मा काय गोष्ट आहे,जे या रथावरती विराजमान होते.अकालमूर्त
आत्म्याचे हे सिंहासन आहे.मुलांना पण हे ज्ञान मिळते,खूप रमणीक,रहस्य युक्त ज्ञान
आहे.जेव्हा कोणत्या अशा रहस्ययुक्त गोष्टी ऐकल्या,तर चिंतन चालते.मुलांचे पण हे
चिंतन चालत राहते की,छोटीशी आत्मा इतक्या मोठ्या शरीरामध्ये आहे.आत्म्यामध्ये ८४
जन्माच्या भूमिकेची नोंद आहे.शरीर तर नष्ट होते बाकी आत्मा राहते.खूप विचार
करण्याच्या गोष्टी आहेत.सकाळी उठून हे विचार करायला पाहिजेत.मुलांना ही स्मृती आली
आहे की,आत्मा खूप छोटी आहे,तिला अविनाशी भूमिका मिळाली आहे.मी आत्मा खूप
आश्चर्यकारक आहे.हे नवीन ज्ञान आहे,जे दुनिये मध्ये कोणालाही माहित नाही.बाबा येऊन
ज्ञान देतात,त्याचे स्मरण करायचे आहे.मी किती छोटीशी आत्मा,कशाप्रकारे भूमिका
करते.शरीर तर पाच तत्वाचे बनते.बाबांना (ब्रह्माला) थोडेच माहिती पडते,शिवबाबाची
आत्मा कधीही येत जात राहते.असे पण नाही,नेहमी यांच्यामध्येच राहते,तर हे चिंतन
करायचे आहे.तुम्हा मुलांना बाबा असे ज्ञान देतात,जे कधी कोणाला मिळू शकत नाही.तुम्ही
जाणतात,बरोबर हे ज्ञान यांच्या मध्ये नव्हते.दुसऱ्या सत्संगामध्ये अशा गोष्टी वरती
कोणाचे विचार चालत नाहीत.आत्मा आणि परमात्मा चे थोडे पण ज्ञान नाही.कोणीही
साधू-संन्यासी इत्यादी असे थोडेच समजतात की,आम्ही आत्मा शरीरा द्वारा,यांना मंत्र
देतो.आत्मा शरीराद्वारेच ग्रंथांचा अभ्यास करते.एक पण मनुष्यमात्र आत्म-अभिमानी
नाहीत.आत्म्याचे ज्ञान कोणामध्ये नाही,तर परमात्माचे ज्ञान कसे होईल?
तुम्ही मुलं जाणता,आम्हा आत्म्याला बाबा म्हणतात,गोड गोड मुलांनो, तुम्ही खूप
समजदार बनत आहात. असे कोणते मनुष्य नाहीत,जे समजतील की,या शरीरामध्ये जी आत्मा आहे
त्याला,परमपिता परमात्मा सन्मुख शिकवत आहेत. खूप समजण्याच्या गोष्टी आहेत परंतु
तरीही काम धंद्यांमध्ये गेल्यामुळे विसरतात.प्रथम बाबा आत्म्याचे ज्ञान देतात,जे
कोणत्याही मनुष्यमात्राला नाही.असे गायन पण आहे ना आत्मा-परमात्मा वेगळे राहिले खूप
काळ...हिशेब आहे ना.तुम्ही जाणतात,आत्माच शरीराद्वारे बोलते, चांगले किंवा वाईट काम
करते.बाबा येऊन,खूप सुंदर बनवतात.प्रथम तर बाबा म्हणतात,सकाळी सकाळी उठून अभ्यास करा
किंवा विचार करा कि मी आत्मा कशी आहे?जी या शरीराद्वारे ऐकते.आत्म्याचे पिता परमपिता
परमात्मा आहेत,ज्यांना पतित-पावन ज्ञानाचे सागर म्हणतात. परत कोणत्या मनुष्याला
सुखाचे सागर,शांतीचे सागर कसे म्हणू शकतो?लक्ष्मी-नारायणला नेहमी पवित्रतेचे सागर
म्हणाल काय?नाही. एक बाबाच नेहमी पवित्रतेचे सागर आहेत.मनुष्य तर फक्त भक्ती
मार्गातील ग्रंथाचे वर्णन करत राहतात,प्रत्यक्ष अनुभव नाही.असे समजत नाहीत की,आम्ही
आत्मा या शरीराद्वारे बाबांची महिमा करतो.ते आमचे खूप गोड बाबा आहेत,तेच सुख देणारे
आहेत.बाबा म्हणतात आता माझ्या मतावर चाला. अविनाशी आत्म्याला,अविनाश बाबा
द्वारे,अविनाश मत मिळत आहे.तेथे तर विनाशी शरीरधारीला विनाशी शरीरधारीचे मत मिळत
राहते. सतयुगामध्ये तर तुम्ही येथील प्रारब्ध प्राप्त करतात.तेथे कधी उल्टे मत मिळत
नाही.आत्ताचे श्रीमतच अविनाशी बनते,अर्धाकल्प चालते. हे नवीन ज्ञान आहे,याला ग्रहण
करण्यासाठी विशाल बुद्धी पाहिजे आणि कार्य व्यवहारांमध्ये आणायला पाहिजे.ज्यांनी
सुरुवाती पासून भक्ती केली असेल,ते चांगल्या प्रकारे धारणा करू शकतील.हे समजायला
पाहिजे,जर माझ्या बुद्धीमध्ये ठीक धारणा होत नाही,तर जरूर आम्ही सुरुवातीपासून भक्ती
केली नाही. बाबा म्हणतात,काहीच समजले नाही,तर बाबांना विचारत रहा,कारण बाबा अविनाशी
सर्जन आहेत,त्यांना सर्वोच्च आत्मा पण म्हटले जाते. आत्मा पवित्र बनते तर त्याची
महिमा होते.आत्म्याची महिमा आहे तर,शरीराची पण महिमा होते.आत्मा तमोप्रधान आहे
तर,शरीराची पण महिमा नाही.यावेळेत तुम्हा मुलांना खूप रहस्ययुक्त बुद्धी मिळत आहे.
आत्म्यालाच मिळते ना.आत्म्याला खूप गोड बनायला पाहिजे,सर्वांना सुख द्यायला
पाहिजे.बाबा खूप गोड आहेत,आत्म्याला खूप गोड बनवतात.आत्म्याकडून कोणतेही अकर्तव्य
कार्य व्हायला नको,याचा अभ्यास करायला पाहिजे.असे तपासायचे आहे की,माझ्या द्वारे
कोणते अकर्तव्य तर होत नाही ना. शिवबाबा कधी अकर्तव्य कार्य करतील? नाही.ते येतातच
उत्तम ते उत्तम कल्याणकारी कार्य करण्यासाठी. सर्वांना सद्गती देतात. तर बाबा जे
कर्तव्य करतात,मुलांना पण असेच कर्तव्य करायला पाहिजे. हे पण समजवले आहे,ज्यांनी
सुरुवातीपासून भक्ती केली आहे, त्यांच्या बुद्धी मध्येच हे ज्ञान धारण होऊ
शकेल.आत्ता पण देवतांचे खूप भक्त आहेत.स्वतःचा बळी देण्यासाठी पण तयार
राहतात.ज्यांनी खूप भक्ती केले आहे,त्यांच्या पाठीमागे कमी भक्ती करणारे लटकत
राहतात.त्यांची महिमा गायन करतात.त्यांचे तर प्रत्यक्षामध्ये सर्व पाहण्यात
येते,येथे तर तुम्ही गुप्त आहात.तुमच्या बुद्धीमध्ये सृष्टीच्या आदी मध्य अंतचे
सर्व ज्ञान आहे.हे पण मुलांना माहिती आहे की,बाबा आम्हाला शिकवण्यासाठी आले
आहेत.आत्ता परत आम्ही घरी जाऊ, जेथे सर्व आत्मे येतात,ते आपले घर आहे.तेथे शरीरच
नाही,तर आवाज कसा होईल.आत्म्याच्या शिवाय शरीर जड बनते.मनुष्याचा शरीरामध्ये किती
मोह राहतो.आत्मा शरीराद्वारे निघाली तर बाकी पाच तत्व राहतात, त्याच्यावर पण किती
प्रेम राहते.पत्नी,पतीच्या चिते वरती चढण्यासाठी तयार होते.शरीरामध्ये खुप मोह
राहतो.आता तुम्ही समजता साऱ्या दुनिये पासून नष्टोमोहा बनायचे आहे. हे शरीर नष्ट
होणार आहे,तर त्यामधून मोह निघायला पाहिजे ना,परंतु अनेक जण मोह ठेवतात.ब्राह्मणाला
खाऊ घालतात, आठवण करतात ना,अमक्याचे श्राद्ध आहे.आता ते थोडेच खाऊ शकतात. मुलांना
तर या सर्व गोष्टी पासून वेगळे व्हायला पाहिजे.वैश्विक नाटकांमध्ये प्रत्येकजण
भूमिका वठवत राहतात. यावेळेत तुम्हाला ज्ञान आहे, आम्हाला नष्टोमोहा बनायचे आहे.
मोहजीत राजाची पण गोष्ट आहे ना. दुसरे कोणी मोहजीत राजा नसतात, कथा तर खूप बनवल्या
आहेत ना. स्वर्गामध्ये अवकाळी मृत्यू होत नाही. तर विचारण्याची पण गोष्ट राहत
नाही.या वेळेत तुम्हाला मोहजीत बनवतात.स्वर्गामध्ये मोहजीत राजा होते,यथा राजा राणी
तथा प्रजा पण होती.ती तर नष्टोमोहा ची राजधानी आहे.रावण राज्यांमध्ये मोह असतो, तेथे
विकार असत नाहीत,रावण राज्यच नाही.रावणाची राजाई चालत येते.रामराज्या मध्ये काय होते,
काहीच माहिती नाही.बाबांच्या शिवाय दुसरे कोणीच सांगू शकत नाहीत.बाबा या शरीरांमध्ये
असून देह अभिमानी आहेत. जरी भाड्याने घर घेतले तरी त्यामध्ये मोह राहतो, घराला
चांगल्या प्रकारे सजवतात. यांना तर सजावट करायची नाही कारण बाबा तर अशरीरी आहेत
ना.यांना कोणताही शृंगार इत्यादी करण्याचा अभ्यास नाही.मुलांना शृंगार करण्याचा
अभ्यास आहे. सृष्टीच्या आदी मध्य अंतच्या रहस्याला समजतात.शरीर तर अपवित्रच
आहे,यांना जेव्हा दुसरे नवीन शरीर मिळेल,तर पवित्र होतील. या वेळेत तर ही जुनी
दुनिया आहे, ही नष्ट होणार आहे. हे पण दुनिये मध्ये कोणालाच माहिती नाही, हळूहळू
माहिती पडत जाईल.नवीन दुनियेची ची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश,हे तर
बाबांचेच काम आहे.नवीन दुनिये ची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश तर बाबांचेच
काम आहे.बाबाच येऊन, ब्रह्मा द्वारा प्रजेची स्थापना करुन,नवीन दुनियेची स्थापना
करत आहेत.तुम्ही नवीन दुनिया मध्ये आहात?नाही.नवीन दुनियेची स्थापन होत आहे.तर
ब्राह्मणांची शेंडी पण उंच आहे. बाबांनी समजवले आहे,बाबाच्या सन्मुख येतात,तर प्रथम
ही आठवण करायची आहे की,आम्ही ईश्वर पित्याच्या सन्मुख जात आहोत. शिवबाबा निराकार
आहेत,त्यांच्या सन्मुख आम्ही कसे जाऊ?तर त्या पित्याची आठवण करुन परत बाबाच्या
सन्मुख यायचे आहे.तुम्ही जाणतात,ते या रथामध्ये विराजमान आहेत. हे शरीर तर पतित आहे.
शिवबाच्या आठवणीमध्ये न राहता, कोणतेही काम केले,तर पाप लागते. आम्ही शिवबाबांच्या
जवळ जातो. परत दुसऱ्या जन्मामध्ये दुसरे संबंधी असतील.तेथे देवतांच्या गोदीमध्ये
जाऊ.ईश्वरी गोद एकाच वेळेत मिळते.बाबा आम्ही आपले बनलो आहोत,असे मुलं म्हणतात.अनेक
जण आहेत,ज्यांनी कधी बाबांना पाहिले नाही,ते बाहेर राहतात.असे लिहतात,शिवबाबा आम्ही
आपल्या गोदीचे मुलं बनलो आहोत.बुद्धीमध्ये ज्ञान आहे,आत्मा म्हणते आम्ही शिवबाबांचे
बनलो आहोत.यापूर्वी आम्ही पतीतांच्या गोदीमध्ये होतो. भविष्यामध्ये पवित्र
देवतांच्या गोदीमध्ये जाऊ. हा जन्म दुर्लभ आहे.तुम्ही हिऱ्यासारखे या संगमयुगा मध्ये
बनतात.संगमयुग काही कोणत्या पाणीच्या सागराच्या आणि नदीच्या संगमला म्हटले जात नाही.
रात्रं दिवसाचा फरक आहे. ब्रह्मपुत्रा मोठ्यात मोठी नदी आहे,जी सागराला जाऊन
मिळते.नद्या सागराला जाऊन मिळतात. तुम्हीपण सागरा द्वारे निघालेल्या ज्ञानाच्या
नद्या आहात. ज्ञानसागर शिवबाबा आहेत.मोठ्यात मोठी नदी ब्रह्मपुत्रा आहे.यांचेच नाव
ब्रह्मा आहे. सागरा सोबत यांचे संबंध आहेत. तुम्हाला माहित आहे नद्या कुठून
निघतात,सागरा द्वारेच निघतात,परत सागरामध्येच येऊन मिळतात. सागरापासून गोड पाणी
आकर्षित करून घेतात.सागराची मुलं परत सागरा मध्ये जाऊन मिळतात.तुम्ही ज्ञानाच्या
सागरा द्वारे निघाले आहात, परत सर्व तेथे चालले जाल,जेथे ते राहतात,तेथे तुम्ही
आत्मा पण राहतात.ज्ञान सागर येऊन तुम्हाला पवित्र गोड बनवतात.आत्मा जी खाऱ्या
पाण्यासारखी बनली आहे, तिला गोड बनवतात.पाच विकारा रुपी खारटपणा पासून तुम्ही बाहेर
येतात,तर तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनतात.बाबा खूप पुरुषार्थ करून
घेतात.तुम्ही खूप सतोप्रधान होते,स्वर्गामध्ये राहत होते. आता तुम्ही बिलकूलच छी छी
बनले आहात.रावणाने तुम्हाला कसे बनवले आहे.भारतामध्येच गायन केले जाते की,हिऱ्या
सारखा जन्म अमलोक. बाबा म्हणत राहतात,तुम्ही कवडी च्या पाठीमागे, का हैराण
होतात.कवड्या पण जास्त थोड्याच पाहिजेत.गरीब तर लगेच समजतात. सावकार तर म्हणतात
इथेच आमच्यासाठी स्वर्ग आहे.तुम्ही मुलं जाणतात,जे पण मनुष्य मात्र आहेत, सर्वांचा
या वेळेत कवडी सारखा जन्म आहे.आम्ही पण असेच होतो. आता बाबा आम्हाला खूप श्रेष्ठ
बनवत आहेत.मुख्य लक्ष तर आहे ना.आम्ही नरापासून नारायण बनतो. भारत आत्ता कवडी सारखा
कंगाल आहे.भारतवासी स्वता:थोडेच जाणतात.येथे तुम्ही खूप साधारण,अबला आहात.कोणते मोठे
मनुष्य असतील तर, त्यांना येथे बसण्याचे मन होणार नाही.जेथे मोठे मोठे
मनुष्य,सन्यासी, गुरु इत्यादी लोक असतील, तेथेच मोठ-मोठ्या सभांमध्ये जातील.बाबा
म्हणतात मी तर गरीब निवाज आहे.असे म्हणतात भगवान गरिबांचे रक्षण करतात. आता तुम्ही
जाणतात की,आम्ही खूप सावकार होतो.आता परत बनत आहोत. बाबा लिहतात पण तुम्ही,
पद्मापदमपती बनतात.तेथे मारामारी इत्यादी नसते.येथे तर पहा पैशाच्या पाठीमागे खूप
मारामारी करतात. भ्रष्टाचार द्वारे पैसे पण खूप मिळवतात.पैसे तर मनुष्यांना पाहिजेत
ना.तुम्ही मुलं जाणतात, बाबा आमचा खजाना भरपूर करतात.अर्ध्या कल्पासाठी जितके पाहिजे
तेवढे धन घ्या परंतु पूर्ण रीतीने पुरुषार्थ करा,गफलत करू नका.असे म्हटले
जाते,पित्याचे अनुकरण करा. पित्याचे अनुकरण कराल,तर असे श्रेष्ठ बनाल. नरापासून
नारायण,नारीपासून लक्ष्मी बनणे, ही मोठी परीक्षा आहे.यामध्ये जरा-पण गफलत करायची
नाही. बाबा जे श्रीमत देतात,त्यावरती चालायचे आहे,कायद्याचे उल्लंघन करायचे
नाही.श्रीमता द्वारेच तुम्ही श्रेष्ठ बनतात.लक्ष खूप मोठे आहे. आपली रोज दिनचर्या
लिहा.कमाई केली की, नुकसान झाले.बाबांची आठवण किती केली? किती लोकांना रस्ता
दाखवला?अंधाची लाठी तुम्ही आहात ना.तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) जसे बाबा
गोड आहेत,तसेच गोड बनून, सर्वांना सुख द्यायचे आहे.कोणतेही अकर्तव्य कार्य करायचे
नाही.उत्तम ते उत्तम कल्याणाचे कार्यच करायचे आहे.
(२) कवडीच्या पाठीमागे
हैरान व्हायचे नाही. पुरुषार्थ करून आपले जीवन हिऱ्यासारखे बनवायचे आहे.गफलत करायची
नाही.
वरदान:-
आव्हान आणि
प्रत्यक्ष समानता द्वारा स्वतःला पापापासून सुरक्षित ठेवणारे विश्व सेवाधारी भव.
तुम्ही मुलं आव्हान
करतात,त्या आव्हान आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये समानता हवी,नाहीतर पुण्य आत्म्याच्या
ऐवजी ओझे असणारे आत्मा बनाल,या पाप आणि पुण्याच्या गतीला जाणून स्वतःला सुरक्षित
ठेवा,कारण संकल्पा मध्ये पण कोणत्याही विकाराची कमजोरी, व्यर्थ बोल,व्यर्थ
भावना,घ्रुणा किंवा ईर्ष्याची भावना,पापाच्या खात्याला वाढवते म्हणून पुण्यात्मा
भवच्या वरदाना द्वारे स्वतःला सुरक्षित ठेवून विश्वा सेवाधारी बना.संघटित रूपामध्ये
एकमत,एकरस परिस्थितीचा अनुभव करवा.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:-पवित्रतेची शमा चोहू बाजुला प्रज्वलित करा,तर बाबांना सहज पाहू शकाल.