26-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- बाबा आले आहेत तुम्हाला फुलांचा राजा बनवण्यासाठी, त्यामुळे विकारांचा
कोणताही दुर्गंध असायला नको "
प्रश्न:-
विकारांचा अंश
समाप्त करण्यासाठी कोणता पुरुषार्थ करायचा आहे?
उत्तर:-
निरंतर अंतर्मुखी राहण्याचा पुरुषार्थ करा.अंतर्मुख अर्थात सेकंदामध्ये शरीरापासून
वेगळे.या दुनियेची सुध-बुध बिल्कुल विसरून जावी.एका सेकंदामध्ये वरती जाणे आणि
येणे.या अभ्यासामुळे विकारांचा अंश समाप्त होईल.कर्म करता- करता मधूनच अंतर्मुखी बना,
असे वाटले पाहिजे जसे एकदम शांती आहे.कोणताही आवाज नाही.जसे की ही सृष्टीच नाही.
ओम शांती।
इथे प्रत्येकाला बसवून सांगितले जाते की अशरीरी होऊन बाबांच्या आठवणी मध्ये बसा आणि
त्यासोबतच हे जे सृष्टीचे चक्र आहे त्याचीही आठवण करा. मनुष्य 84च्या चक्राला समजत
नाहीत.ते समजणारच नाहीत.जे ८४ चे चक्र लावतात तेच समजावून घेण्यासाठी येतील.तुम्ही
हेच आठवणीमध्ये ठेवा, यालाच स्वदर्शन चक्र म्हटले जाते, ज्यामुळे आसुरी विचार नष्ट
होतात.असे नाही की कुणी असुर बसला आहे त्याचा गळा कापला जाईल. मनुष्य स्वदर्शन
चक्राचा ही अर्थ समजत नाहीत.हे ज्ञान तुम्हा मुलांना इथेच मिळते. कमलपुष्प समान
गृहस्थ व्यवहारांमध्ये राहून पवित्र बना.भगवानुवाच आहे ना.हा एक जन्म पवित्र
बनल्याने भविष्य 21 जन्मासाठी तुम्ही पवित्र दुनियेचे मालक बनाल.सतयुगाला म्हटले
जाते शिवालय. कलियुग आहे वेशालय. ही दुनिया बदलत आहे. भारताचीच गोष्ट
आहे.दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये जायचेच नाही.जर म्हणाले जनावरांचे काय होणार? इतर
धर्मांचे काय होईल?बोला, अगोदर आपल्या बद्दल तर समजून घ्या, नंतर दुसऱ्यांविषयी
विचारा.भारतवासीच आपल्या धर्माला विसरून दुःखी झाले आहेत. भारतामध्येच बोलावतात तुम
मात-पिता.....विदेशामध्ये हे मात-पिता शब्द बोलले जात नाहीत.ते फक्त गॉड फादर
म्हणतात.बरोबर भारतामध्येच भरपूर सुख होते, भारत स्वर्ग होता- हेही तुम्ही जाणत
आहात. बाबा येऊन काट्यांना फुल बनवतात.बाबांना बागवान असे म्हटले
जाते.बोलावतात-येऊन काट्यांना फुल बनवा.बाबा फुलांचा बगीचा बनवतात.माया परत
काट्यांचे जंगल बनवते. मनुष्य तर म्हणतात- ईश्वरा तुझी माया खूप प्रबळ आहे.न ईश्वराला,
न मायेला ओळखतात. कुणी एखादा शब्द बोलले तर तेच म्हणत राहतात.अर्थ समजत नाही.तुम्ही
मुले समजता हा नाटकाचा खेळ आहे- राम राज्याचा आणि रावण राज्याचा. राम राज्यामध्ये
सुख, रावण राज्यामध्ये दुःख आहे.येथील गोष्ट आहे. ही काही ईश्वराची माया नाही.माया
म्हटले जाते ५ विकारांना, ज्याला रावण म्हणतात.बाकी मनुष्य तर पुनर्जन्म घेऊन ८४
च्या चक्रामध्ये येतात.सतोगुणी पासून तमो प्रधान बनायचे आहे.यावेळी सर्वजण
विकारापासून जन्माला येतात-म्हणून विकारी म्हटले जाते.नावही आहे विकारी दुनिया आणि
निर्विकारी दूनिया अर्थात जुन्या दुनियेपासून नवी दुनिया कशी बनते, ही तर
समजण्यासाठी सोपी गोष्ट आहे.नव्या दुनियेमध्ये प्रथम स्वर्ग होता.मुले जाणतात
स्वर्गाची स्थापना करणारा परमपिता परमात्मा आहे, त्यामध्ये भरपूर सुख आहे.
ज्ञानामुळे दिवस, भक्तीमुळे रात्र कशी होते- हे कुणीही समजू शकत नाही.असे म्हणतात
ब्रह्मा किंवा ब्रह्मा मुख्य वंशावली ब्राह्मणांचा दिवस नंतर त्याच ब्राह्मणांची
रात्र. दिवस आणि रात्र इथे होते, हे कोणाला समजत नाही.प्रजापिता ब्रह्माची रात्र,
तर जरूर त्यांच्या ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मणांची ही रात्र असेल.अर्धा कल्प दिवस,
अर्धा कल्प रात्र.
आता बाबा आले आहेत निर्विकारी दूनिया बनवण्यासाठी. बाबा म्हणतात-मुलांनो, काम
महाशत्रू आहे, त्यावर विजय मिळवायचा आहे.संपूर्ण निर्विकारी पवित्र बनायचे आहे.
अपवित्र झाल्यामुळे तुम्ही खूप पाप केले आहे.ही आहे पाप आत्म्यांची दुनिया.पाप जरूर
शरीरा सोबतच करतात, तेंव्हाच पाप आत्मा बनतात.देवतांच्या पवित्र दुनियेमध्ये पाप
होत नाही. इथे तुम्ही श्रीमतावर श्रेष्ठ पुण्यात्मा बनत आहात.श्री श्री १०८ची माळा
आहे.वरती फुल आहे, त्याला शिव म्हणतात.ते आहे निराकारी फुल.नंतर साकार मध्ये हे
स्त्री पुरुष आहेत, त्यांची माळा बनली आहे.शिवबाबांच्या द्वारे हे पूजन स्मरण लायक
बनतात.तुम्ही मुलं जाणता-बाबा आम्हाला विजय माळेचा दाणा बनवत आहेत.आम्ही विश्वावर
विजय प्राप्त करत आहोत आठवणीच्या बळाने, आठवणीनेच विकर्म विनाश होतील.नंतर तुम्ही
सत्तोप्रधान बनाल.ते लोक तर न जाणताच असे म्हणतात प्रभू तुझी माया प्रबळ
आहे.एखाद्याकडे पैसा असेल तर असे म्हणतात यांच्याजवळ माया खूप आहे. खरेतर माया पाच
विकारांना म्हटले जाते, ज्यांना रावणही म्हटले जाते.त्यांनी रावणाचे चित्र बनवले आहे
१० तोंडाचे.आता चित्र आहे तर समजावले जाते. ज्याप्रमाणे अंगदा साठीही दाखवतात,
त्याला रावणाने हलविले परंतु हलवू शकला नाही. दुसरी कोणतीही गोष्ट नाही.बाबा
म्हणतात मायेने तुम्हाला कितीही हलविले तरी तुम्ही स्थिर राहा. रावण, हनुमान, अंगद
इ.हे सर्व दृष्टांत(उदाहरण)बनविले आहेत, याचा अर्थ तुम्ही मुले जाणता. भ्रमरीचा ही
दृष्टांत आहे.भ्रमरी आणि ब्राह्मणी रास एकच आहे. तुम्ही विष्ठेच्या किड्यांना ज्ञान
योगाने पतीता पासून पावन बनवता.बाबांची आठवण करा तर सतोप्रधान बनाल.कासवाचे ही
उदाहरण आहे.इंद्रियांना समेटून अंतर्मुख होऊन बसते. तुम्हांलाही बाबा म्हणतात कर्म
खुशाल करा नंतर अंतर्मुख होऊन बसा.जसे की ही सृष्टीच नाही. हालचाल बंद होते.भक्ती
मार्गामध्ये बाह्यमुखी बनतात. गीत गाणे, हे करणे, किती दंगा, किती खर्च होतो.किती
यात्रा भरतात.बाबा म्हणतात हे सर्व सोडून अंतर्मुखी बना.जसे की ही सृष्टीच
नाही.स्वतःला पहा आम्ही लायक बनलो आहे?कोणता विकार त्रास तर देत नाही? आम्ही बाबांची
आठवण करतो का?बाबा जे विश्वाचे मालक बनवतात, अशा बाबांची दिवस-रात्र आठवण केली
पाहिजे.आम्ही आत्मा आहोत, आमचा तो पिता आहे.मनामध्ये हे हे चालायला हवे-आता आम्ही
नव्या दुनियेचे फूल बनत आहोत. धोत्र्याचे फुल बनायचे नाही. आम्हाला तर एकदम फुलांचा
राजा सुगंधी बनायचे आहे. कोणताही दुर्गंध राहायला नको. वाईट विचार निघून जायला हवेत.
खाली पाडण्यासाठी मायेचे वादळ खूप येतील.कर्मेन्द्रियांनी कोणतेही विकर्म करायचे
नाही. असे-असे स्वतःला पक्के करायचे आहे.स्वतःला सुधारायचे आहे. कोणत्याही देहधारी
ची मला आठवण करायची नाही.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, शरीर
निर्वाहासाठी कर्म भले करा. त्यातूनही वेळ काढू शकता.भोजन करताना पण बाबांची महिमा
करत रहा.बाबांची आठवण करून खाल्ल्याने जेवणही पवित्र होऊन जाते जेंव्हा बाबांची
निरंतर आठवण कराल तेंव्हा आठवणीने खूप जन्मांचे पाप नष्ट होतील आणि तुम्ही
संतोप्रधान बनाल. पहायचे आहे किती खरे सोने बनलो आहे?आज किती वेळा आठवण केली?काल 3
तास आठवण केली, आज 2तास आठवण केली-आज तर नुकसान झाले.चढाव-उतराव होत राहील. यात्रेला
गेल्यानंतर कुठे उंच, तर कुठे खाली उतरावे लागते.तुमची अवस्थाही खालीवर होत राहील.
आपले खाते बघायचे आहे.मुख्य आहे आठवणीची यात्रा.
भगवानुवाच आहे तर जरूर मुलांनाच शिकवतील.साऱ्या दुनियेला कसे शिकवतील.आता भगवान
कोणाला म्हणायचे? कृष्ण तर शरीर धारी आहे. भगवान तर निराकार परमपिता परमात्म्याला
म्हटले जाते.स्वतः म्हणतात मी साधारण शरीरामध्ये प्रवेश करतो.ब्रह्माचे ही वृद्ध
शरीराचे गायन आहे.सफेद दाढी मिशा तर वृद्ध मनुष्याच्या असतात ना.जरूर अनुभवी रथ हवा
आहे.छोट्या रथामध्ये थोडीच प्रवेश करतील. स्वतःलाच म्हणतात मला कोणीही ओळखत नाही.तो
आहे परमपिता किंवा परमआत्मा.तुम्हीसुद्धा १००% पवित्र होता.आता १००टक्के अपवित्र
बनला आहात.सतयुगामध्ये १००% पवित्रता होती तर शांती आणि समृद्धी होती. मुख्य आहे
पवित्रता.तुम्ही पहात आहात पवित्रत आत्म्या समोर अपवित्र माथा झुकवतात, त्यांची
महिमा गातात.संन्याशांच्या समोर कधीही असे म्हणत नाहीत की तुम्ही सर्व गुण संपन्न.....आम्ही
पापी नीच आहोत.देवतांच्या समोर असे म्हणतात.बाबांनी समजावले आहे-कुमारीच्या सर्व जण
पाया पडतात नंतर लग्न करते तेंव्हा ती सर्वांना नमस्कार करते कारण विकारी बनते ना.
आता बाबा म्हणतात तुम्ही निर्विकारी बनाल तर अर्धा कल्प निर्विकारी बनून राहाल.आता
५ विकारांचे राज्य संपत आहे.हा आहे मृत्युलोक, तो आहे अमरलोक. आता तुम्हां
आत्म्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळत आहे, कशासाठी? तुम्ही स्वतःला स्वतःच राजतिलक
द्या. ज्याप्रमाणे कायद्याचे शिक्षण घेतात तर स्वतःच स्वतःला वकिलाचा तिलक
देतात.शिकले तर तिलक मिळेल.आशीर्वादाने थोडीच मिळणार आहे.मग तर सर्वांवर शिक्षक कृपा
करतील, सगळेजण पास होतील.मुलांना स्वतःच स्वतःला राजतिलक द्यायचा आहे.बाबांची आठवण
कराल तर विकर्म विनाश होतील आणि चक्राची आठवण केल्याने चक्रवर्ती महाराजा बनाल.बाबा
म्हणतात तुम्हांला राजांचाही राजा बनवतो देवी-देवता डबल ताजधारी बनतात.पतीत राजे ही
त्यांची पूजा करतात तुम्हांला पुजारी राजा पेक्षाही उंच बनवतात.जे खुप दान-पुण्य
करतात ते राज्यांच्या जवळ जन्म घेतात कारण कर्म चांगले केले आहेत.आता इथे तुम्हांला
मिळाले आहे अविनाशी ज्ञान धन, ते धारण करून दान करायचे आहे.हीच खरी कमाई
आहे.शिक्षकही ज्ञानाचे दान करतात.ते आहे अल्पकाळासाठी.विदेशा मधून शिकून येतात,
आल्यानंतर हृदयघात होतो तर शिकलेले नष्ट होते. सारी मेहनत फुकट गेली.तुमची मेहनत
वाया जाऊ शकत नाही. तुम्ही जेवढे चांगले शिकाल तेवढे २१ जन्म तुमचे शिक्षण कायम
राहील.तिथे अवकाळी मृत्यू होत नाही.हे शिक्षण सोबत घेऊन जाणार आहात.
आता जसे बाबा कल्याणकारी आहेत तसेच तुम्हां मुलांना ही कल्याणकारी बनायचे आहे.
सर्वांना रस्ता सांगायचा आहे. बाबा तर मत खूप चांगली देतात. एकच गोष्ट समजावून सांगा
की, सर्वश्रेष्ठ शिरोमणी श्रीमद भगवत गीतेची एवढी महिमा का आहे? भगवंताचे श्रेष्ठ
मत आहे. आता भगवान कोणाला म्हणायचे?भगवान तर एकच आहे.तो आहे निराकार, सर्व
आत्म्यांचा पिता, म्हणूनच आपापसात भाऊ-भाऊ म्हटले जाते नंतर जेव्हा ब्रह्मा द्वारा
नवीन सृष्टी रचतात तेंव्हा भाऊ-बहीण बनतात.यावेळी तुम्हीं भाऊ-बहीण आहात तर पवित्र
राहायला हवे.ही युक्ती आहे. वाईट दृष्टी एकदमच निघून जावी. सांभाळायचे आहे, माझ्या
डोळ्यांनी काही वाईट तर नाही पाहिले?बाजारामध्ये चणे पाहिल्यावर मन तर नाही गेले?
असे अनेकांचे मन जाते, नंतर खातातही.ब्राह्मणी आहे, कोणी भाई म्हणतात, चणे खाणार
का, एकदा खाल्ल्यानंतर पाप थोडीच लागणार आहे!जे कच्चे असतात ते लगेच खातात.यावर
शास्त्रांमध्ये ही, अर्जुनाचे उदाहरण आहे.या कथा बसून बनविल्या आहेत.बाकी आहेत सर्व
या वेळेच्या गोष्टी.
तुम्ही सर्व सीता आहात.तुम्हांला बाबा म्हणतात एक बाबांची आठवण करा तर पाप नष्ट
होतील.बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टी नाहीत.आता तुम्हीं समजता रावणासारखा कोणी
मनुष्य नाही. ही तर विकारांची प्रवेशता होते, तेंव्हा रावण संप्रदाय म्हटले जाते.
जसे की कुणी-कुणी असे काम करतात तेंव्हा म्हटले जाते- तू तर असूर आहेस.वागणे आसूरा
सारखे आहे.विकारी मुलाला म्हणतात तू कुळाला कलंक लावणारा आहेस.इथे बेहदचे बाबा
म्हणतात तुम्हांला मी काळ्यापासून गोरे बनवतो, तरीही तुम्ही काळे तोंड का करता.
प्रतिज्ञा करून पुन्हा विकारी बनता.काळयाहूनही काळे बनता, म्हणूनच दगडाची बुद्धी असे
म्हटले जाते.आता पुन्हा तुम्हीं पारस बुद्धी बनत आहात.तुमची चढती कला होत
आहे.बाबांना ओळखले आणि विश्वाचे मालक बनले.संशयाची गोष्ट असू शकत नाही.बाबा आहेत
स्वर्गाची स्थापना करणारा पिता.तर नक्कीच मुलांसाठी स्वर्गाची भेट घेऊन येतील
ना.शिवजयंती ही साजरी करतात-काय करत असतील?उपवास इ.करत असतील.खरे तर उपवास करायला
पाहिजे विकारांचा. विकारामध्ये जाऊ नका.यामुळेच तुम्ही आदि-मध्य-अंत दुःख प्राप्त
केले आहे.आता हा एक जन्म पवित्र बना.जुन्या दुनियेचा विनाश समोर उभा आहे.तुम्हीं
पाहाल भारतामध्ये 9 लाख शिल्लक राहतील, नंतर शांती होईल.दुसरे धर्मच राहणार नाहीत
ज्यामुळे मुळे भांडण होईल.एका धर्माची स्थापना बाकी अनेक धर्म विनाश होतील. अच्छा
गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. अविनाशी
ज्ञान धन स्वतःमध्ये धारण करून नंतर दान करायचे आहे.शिक्षणाने स्वतःला स्वतःच
राजतिलक द्यायचा आहे. ज्याप्रमाणे बाबा कल्याणकारी आहेत त्याप्रमाणे कल्याणकारी
बनायचे आहे.
2. खाण्यापिण्याचे पूर्णपणे पथ्य ठेवायचे आहे.कधीही डोळे धोका द्यायला नको- याकडे
लक्ष द्यायचे आहे.स्वतःला सुधरायचे आहे.कर्मेन्द्रियांनी कोणतेही विकर्म करायचे नाही.
वरदान:-
बीजरूप स्थिती
द्वारे साऱ्या विश्वाला लाईटचे पाणी देणारे विश्व कल्याणकारी भव
बीजरूप अवस्था सर्वात
शक्तिशाली अवस्था आहे हीच अवस्था प्रकाश स्तंभाचे कार्य करत असते, याद्वारे संपूर्ण
विश्वामध्ये प्रकाश पसरविण्याच्या निमित्त बनता.ज्याप्रमाणे बीजाद्वारे स्वतःच
साऱ्या वृक्षाला पाणी मिळत असते.परंतु संपूर्ण विश्वापर्यंत आपला प्रकाश
पसरविण्यासाठी विश्व कल्याणकारीची शक्तिशाली अवस्था पाहिजे.यासाठी प्रकाशाचे स्तंभ
बना न की बल्ब. प्रत्येक संकल्पा मध्ये स्मृती राहावी की सार्या विश्वाचे कल्याण
होवो.
बोधवाक्य:-
मिळून मिसळून(एडजस्ट होण्याची) राहण्याची शक्ती नाजूक वेळेवर सन्मानाने पास करविते.