10-08-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, आपल्या स्वधर्माला विसरणे सर्वात मोठी चूक आहे, आत्ता तुम्हाला अभूल बनायचे आहे, आपल्या घराची आणि राज्याची आठवण करायची आहे."

प्रश्न:-
तुम्हा मुलांची कोणती अवस्था वेळेला जवळ आणण्याची लक्षणं आहेत ?

उत्तर:-
तुम्ही मुले आठवणीच्या यात्रेमध्ये नेहमी मस्त राहाल, बुद्धीचे भटकणे बंद होईल,वाणी मध्ये आठवणीची धार येईल, खूप आनंदी राहाल, सतत आपल्या सतयुगी दुनियेचे दृश्य समोर येत राहतील, तेव्हाच समजा वेळ जवळ आली आहे. विनाशासाठी वेळ लागत नाही, यासाठी आठवणीचा चार्ट वाढवायचा आहे .

गीत:-
तुम्हाला प्राप्त करून आम्ही साऱ्या विश्वाला प्राप्त केले....

ओम शांती।
आत्मिक मुलांनी या गिताचा अर्थ तर समजला असेल. आता बेहदच्या पित्याला प्राप्त केले आहे. बेहदच्या पित्याकडून वारसा मिळतो, ज्या वारस्याला आत्ता कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. वारसाचा नशा तेव्हा निघून जातो,जेव्हा रावण राज्य सुरू होते. हे सुद्धा नाटक बनलेले आहे. मुलांना सृष्टी नाटकाचे ज्ञानसुद्धा दिलेले आहे. हे चक्र कसे फिरते,याला नाटक पण म्हणता येईल, ड्रामा पण म्हणता येईल. मुलं समजतात बरोबर बाबा येऊन सृष्टी चक्राचे ज्ञान सुद्धा समजावतात. ब्राह्मण कुळाचे आहेत,त्यांना समजावतात . मुलांनो तुम्ही आपल्या जन्माला जाणत नाहीत,मी तुम्हाला समजवतो. पूर्वी तुम्ही समजत होता ८४ लाख जन्मानंतर एक मनुष्य जन्म प्राप्त होतो. हे बरोबर नाही. आता तुम्ही सर्व आत्मा क्रमानुसार येत जात राहता. बुद्धीमध्ये आले आहे,प्रथम आम्ही आदी सनातन देवी देवता धर्माचे पूज्य होतो, मग पुजारी बनलो. स्वतःच पूज्य आणि स्वतःच पुजारी असे गायन आहे. मनुष्य ईश्वरासाठी समजतात की ते स्वतः पूज्य आणि स्वतः पुजारी बनतात. तुमचेच हे सर्व रूप आहे. अनेक मत मतांतर आहेत. तुम्ही आता श्रीमतावर चालता. तुम्ही समजता आम्ही विद्यार्थी पूर्वी काहीच समजत नव्हतो, आता शिकून ऊंच पद प्राप्त करत आहोत. ते विद्यार्थी पण सुरुवातीला काहीच समजत नाहीत,नंतर परीक्षा देता देता समजतात,आम्ही वकिली पास केली. तुम्ही सुद्धा आता जाणता आम्ही शिकून मनुष्यापासून देवता,विश्वाचे मालक बनत आहोत.तेथे तर आहेच एक धर्म, एक राज्य, तुमच्या राज्यावर कोणी विजय प्राप्त करू शकत नाही. तेथे तुम्हाला पवित्रता सुख-शांती संपत्ती सर्व काही प्राप्त आहे. गित सुद्धा ऐकले ना. आता हे गीत तर तुम्ही बनवले नाही. अनायास हे गीत नाटका अनुसार या वेळेसाठी बनलेले आहे.मनुष्यांनी बनवलेल्या गीताचा अर्थ बाबा बसून समजवितात . आता तुम्ही इथे बसून शांतीने आपले राज्य प्राप्त करत आहात, जे कोणी त्यावरती विजय प्राप्त करू शकत नाही. अर्धा कल्प सुखाचा वारसा राहतो. बाबा समजवतात, गोड गोड मुलांनो अर्ध्या कल्पा पेक्षाही जास्त सुख तुम्ही प्राप्त करता,नंतर रावण राज्य सुरू होते. मंदिर पण असे बनवलेले आहेत, जिथे चित्र दाखविले आहेत, देवता वाममार्गा मध्ये कसे जातात.पोशाख तर तोच आहे. पोशाख तर नंतर बदलतो. प्रत्येक राज्याचा आपला आपला पोशाख, मुकुट इत्यादी सर्व काही वेगवेगळे असते.

आता मुले समजतात आम्ही शिव बाबांचा वारसा ब्रम्हा बाबांकडून घेत आहोत. बाबा तर गोड मुलांनो म्हणतात. मुलांनो तुम्ही आपल्या जन्माला जाणत नाहीत. ऐकते तर आत्माच ना. आपण आत्मा आहोत,शरीर नाही. दुसरे जे पण मनुष्य मात्र आहेत, त्यांना आपल्या शरीराच्या नावाचा अभिमान असतो, कारण की देह अभिमाना मध्ये आहेत. आपण आत्मा आहोत, हे जाणतच नाहीत. शते तर आत्माच परमात्मा आणि परमात्माच आत्मा आहे,असे म्हणतात. आता तुम्हाला बाबांनी समजवले आहे, तुम्ही आत्मा विश्वाचे मालक देवी-देवता बनता. हे ज्ञान आता आहे की,आपणच देवता नंतर क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतो. ८४ जन्माचा हिशोब पण पाहिजे ना. सर्व तर ८४ जन्म घेत नाहीत. सर्व एकत्र येत नाहीत. तुम्ही जाणता कोणता धर्म कसा स्थापन होतो. इतिहास जुना होतो, तोच पुन्हा नवीन बनतो. आता ही पतित दुनिया आहे. ती तर पवित्र दुनिया आहे, नंतर इतर धर्म येतात, या कर्म क्षेत्रावर हे एकच नाटक आहे. मुख्य ४ धर्म आहेत. या संगम युगांमध्ये बाबा येऊन ब्राह्मण संप्रदाय स्थापन करतात. विराट रूपाचे चित्र बनवितात, परंतु त्यामध्ये ही चूक आहे. बाबा येऊन सर्व गोष्टी समजवतात आणि अचूक बनवितात. बाबा तर कधी शरीरामध्ये येत नाहीत आणि कोणती चूक पण करत नाहीत .ते तर थोड्या वेळेसाठी येऊन तुम्हा मुलांना सुखधामचा आणि घरचा मार्ग दाखविण्यासाठी यांच्या रथाचा आधार घेतात. ते फक्त मार्ग दाखवत नाही तर जीवन बनवतात. कल्प कल्प तुम्ही घरी जातात आणि परत दुखाची भूमिका वठविता . आपल्या आत्म्यांचा स्वधर्म शांती आहे,हे मुलांना विसरले आहे. या दुःखाच्या दुनियेमध्ये शांती कशी प्राप्त होईल, या सर्व गोष्टी तुम्ही समजला आहात. तुम्ही पण सर्वांना समजावतात. हळूहळू सर्व येत जातील, विदेशात सुद्धा माहिती होईल की,हे सृष्टी चक्र कसे फिरते, किती वर्षाचे आहे. विदेशी सुद्धा तुमच्याकडे येतील किंवा मुले तेथे जाऊन सृष्टी चक्राचे रहस्य समजावून सांगतील . विदेशी समजतात ख्रिस्त ईश्वराकडे गेले. ख्रिस्ताला ईश्वराचा मुलगा समजतात. काहीजण हे पण समजतात,ख्रिस्त पुनर्जन्म घेत-घेत आता गरीब आहे. जसे तुम्ही पण गरीब आहात ना. बेघर म्हणजे तमोप्रधान. समजतात ख्रिस्त सुद्धा येथे आहेत, परत केव्हा येतील हे जाणत नाहीत. तुम्ही समजू शकता तुमचे धर्मसंस्थापक परत आपल्या वेळे अनुसार येऊन, धर्म स्थापन करतील. त्यांना गुरु म्हणू शकत नाही. ते धर्म स्थापन करण्यासाठी येतात. सद्गती दाता फक्त एकच आहेत, ते सर्व धर्म स्थापन करण्यासाठी येतात, सर्व पुनर्जन्म घेत-घेत आता तमोप्रधान बनले आहेत.शेवटी संपूर्ण झाड जडजडीभूत अवस्थेला प्राप्त झाले आहे. आता तुम्ही जाणता,संपूर्ण झाड उभे आहे, बाकी देवी-देवता धर्माचे खोड नाही, (उदाहरणार्थ-वडाचे झाड).या सर्व गोष्टी बाबाच बसून मुलांना समजावितात . तुम्हा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे. तुम्हाला माहित आहे, आम्ही देवी-देवता होतो, परत बनत आहोत . येथे तुम्ही येता सत्यनारायणाची कथा ऐकण्यासाठी,ज्यामुळे नरापासून नारायण बनणार आहात. नारायण बनाल तर जरूर लक्ष्मी पण असेल. लक्ष्मी नारायण असतील तर जरुर त्यांची राजधानी पण असेल. फक्त लक्ष्मी नारायण तर नसतील ना. लक्ष्मी बनण्याची वेगळी कथा नाही . नारायणा सोबत लक्ष्मी पण बनते. लक्ष्मी कधी नारायण बनते. नारायण लक्ष्मी बनतात. काही काही गित खूप चांगले बनलेले आहेत. कधी मायेमुळे उदास झाले तर गीत ऐकल्याने आनंद होईल. जसे पोहायला शिकत असताना पहिल्यांदा नाका तोंडामध्ये पाणी जाते, मग त्यांना वाचवितात. येथे सुद्धा माया पासून धोका खूप खातात. पोहणारे तर खूप असतात. त्यांची सुद्धा शर्यत लागते, तर तुमची सुद्धा शर्यत आहे शांतीधाम सुखधाम मध्ये जाण्याची.मामेकम् म्हणजे फक्त शिवबाबांना आठवण करायची आहे. आठवण करत नाही तर मायाच्या गटांगळ्या खातात. बाबा म्हणतात आठवणीच्या यात्रेनेच नाव किनार्‍याला लागेल. तुम्ही परत आपल्या घरी जाल. तारू( पोहणारे ) काही खूप हुशार असतात, काही कमी असतात. येथे सुद्धा असे आहे. बाबांजवळ आपला हिशोब पाठवतात. बाबा पाहतात, आठवणीच्या यात्रेला हे योग्य रीतीने समजतात कि चुकीच्या पद्धतीने समजतात. कोणी कोणी दाखवितात आम्ही पूर्ण दिवस 5 तास आठवणीत मध्ये राहतो. आम्ही विश्वास करत नाहीत, जरूर काही चूक झाली आहे. काही समजतात आम्ही जेवढा वेळ येथे मुरली ऐकतो एवढा वेळ आठवण राहत असेल. परंतु नाही. खूप जण आहेत जे येथे बसून सुद्धा, ऐकत असताना बुद्धी बाहेर कोठे कोठे चालली जाते. पूर्ण ऐकतच नाही. भक्ती मध्ये सुद्धा असे होते. संन्यासी लोक कथा ऐकवितात नंतर विचारतात, आम्ही काय ऐकविले. पाहतात हे तर असेच बसलेले आहेत म्हणून विचारतात, मग काही सांगू शकत नाही. बुद्धी कोठे ना कोठे चालली जाते. एक अक्षर सुद्धा ऐकत नाहीत. येथे सुद्धा असे आहे. बाबा पाहतात काहीची बुध्दी भटकते,समजतात त्यांची बुद्धी बाहेर कोठे आहे. इकडे तिकडे पाहात राहतात असेही नवीन येतात. बाबा समजतात हे पूर्ण समजलेले नाहीत, त्यामुळे बाबा म्हणतात नवीन मुलांना लगेच मुरली ऐकण्यासाठी बसवू नका. नाहीतर वातावरण खराब होईल. पुढे चालून तुम्ही पहाल जे चांगली - चांगली मुले आहेत, ते येथे बसल्या बसल्या वैकुंठा मध्ये जातील. खूप आनंद होत राहील. सारखे सारखे जातील,आता वेळ जवळ आली आहे. क्रमानुसार पुरुषार्थ अनुसार,तुमची अवस्था अशी होत राहील. आपला राजवाडा पाहतील. भोजन इ. काही सांगायचे असेल त्याचा साक्षात्कार होईल. तुम्ही वेळ तर पाहत आहात.कशी- कशी तयारी केली जात आहे. बाबा म्हणतात पहा कशी एका सेकंदात संपूर्ण दुनियेचा विनाश होईल. बॉम्ब टाकला कि सर्व नष्ट होईल.

तुम्हा मुलांना हे माहित आहे की, आपले राज्य आता स्थापन होत आहे.आता तर आठवणींच्या यात्रे मध्ये मस्त राहायचे आहे. अशी शक्ती भरायची आहे कि, कोणाला ही दृष्टी दिली की त्यांना बाबांचा परिचय मिळेल. शेवटी भीष्म पितामह इत्यादीनां तुम्हीच ज्ञानाचे बाण मारले आहेत. ते लगेच समजतील की, हे सत्य बोलतात. ज्ञानाचे सागर पतित पावन तर निराकार ईश्वर आहेत. कृष्ण तर होऊ शकत नाही. त्यांचा जन्म तर दाखवितात.कृष्णाचा तोच चेहरा पुन्हा कधी दिसणार नाही. मग तोच चेहरा सतयुगात असेल. प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येकाचा चेहरा वेगळा असतो. ही नाटकाची भूमिका अशी बनलेली आहे. तेथे नैसर्गिक सुंदर चेहरे असतात. आता तर दिवसेंदिवस शरीर तमोप्रधान बनतात. प्रथम सतोप्रधान आणि नंतर सतो,रजो ,तमो बनत जातात. येथे मुले कशी जन्माला येतात.काहींचे पाय नाहीत, काहींची उंची कमी आहे. काय काय होत राहते. सतयुगामध्ये असे जन्माला येत नाहीत. तेथे देवतांना दाढी वगैरे सुद्धा नसते.चेहऱ्या वरून समजते की हे पुरुष आहे की स्त्री आहे. पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कर होत राहतील. बाबा कल्प कल्प येऊन आम्हाला राजयोग शिकवितात आणि मनुष्यापासून देवता बनवितात. हे सुद्धा मुलांना माहित आहे की, दुसऱ्या कुठल्याही धर्माचे आहेत, ते आपापल्या विभागात जातील. आत्म्यांचे झाड पण दाखवितात ना. चित्रांमध्ये बरेच सुधार करतात, बदलत जातात. ज्याप्रमाणे बाबा सूक्ष्मवतन साठी समजवितात, संशय बुद्धी तर म्हणतील हे काय म्हणतात. पूर्वी तर असे म्हणत होते. असे सांगतात, लक्ष्मी नारायणाच्या दोन रूपांना मिळून विष्णू म्हणतात.बाकी चार हात असलेला मनुष्य असत नाही. रावणाचे १० डोके दाखवितात. असे कोणी मनुष्य नसतात. दरवर्षी रावणाला जळतात. जसे बाहुल्यांचा खेळ आहे.

मनुष्य म्हणतात - आम्ही शास्त्रांशिवाय जगू शकत नाही. शास्त्र हे आपले जीवन आहे. गीतेचा किती मान आहे, हे पण आपण पाहतो. येथे तर तुमच्याजवळ मुरली किती एकत्र होतात. तुम्ही ठेऊन काय कराल! दिवसेंदिवस तुम्ही नव-नवीन मुद्दे ऐकत रहाल. होय, मुद्दे लिहून घेणे चांगले आहे. भाषण करताना तयारी कराल. हे-हे मुद्दे समजवून सांगू. विषयांची यादी असावी. आज आपण या विषयावर समजवून सांगू. रावण कोण, राम कोण, सत्य काय आहे,आम्ही तुम्हाला सांगतो की, यावेळी संपूर्ण जगामध्ये रावणचे साम्राज्य आहे. पाच विकार तर सर्वा मध्ये आहेत. बाबा येऊन पुन्हा रामाचे राज्य स्थापन करतात. हा पराभव आणि विजयाचा खेळ आहे. पराभव कसा होतो! पाच विकार रूपी रावण कडून.पूर्वी पवित्र घर आश्रम होते, आणि आता ते अपवित्र झाले आहे. लक्ष्मी - नारायण तेच नंतर ब्रह्मा - सरस्वती. बाबा म्हणतात मी यांच्या बऱ्याच जन्माच्या शेवटी येऊन प्रवेश करतो. तुम्ही पण म्हणाल की आम्हीसुद्धा अनेक जन्माच्या शेवटी येऊन बाबांना कडून ज्ञान घेत आहोत. या सर्व गोष्टी समजून घेण्याच्या आहेत.जर कोणाची कमी बुद्धी असेल तर, त्यांना समजत नाही. ही तर राजधानी स्थापन होत आहे. बरेच मुले आली आणि परत गेली आहेत, ते परत येतील.प्रजे मध्ये पाई पैश्याचे पद प्राप्त करतील. हे सुद्धा होणे आवश्यक आहे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. या नशामध्ये नेहमी राहा की, तुम्ही आता हा अभ्यास पूर्ण करुन मनुष्या पासून देवता, विश्वचे मालक बनाल. आपल्या राज्यात पवित्रता-सुख-शांती सर्वकाही असेल. त्यावर कोणी विजय प्राप्त करू शकत नाही.

2. या कलियुगातुन, सतयुगात जाण्यासाठी आठवणींच्या यात्रेत चांगला पोहणारा बनायचे आहे. माये पासून धोका खायचा नाही. स्वतःची तपासणी करायची आहे आठवणीच्या यात्रेला योग्य रीतीने समजून लिहायचे आहे.

वरदान:-
श्रेष्ठ वेळेच्या आधारावर सर्व प्राप्तीच्या अधिकाराचे अनुभव करणारे पद्मापदम भाग्यवान भव.

जे श्रेष्ठ वेळेमध्ये जन्म घेणारे भाग्यशाली मुले आहेत, ते कल्प पूर्वीच्या आठवणी च्या आधारावर जन्मताच आपलेपणाचा अनुभव करतात. ते जन्मताच सर्व वारशाचे अधिकारी होतात. जेसे बिजामध्ये संपूर्ण वृक्षाचे सार सामावले आहे, असे प्रथम क्रमांकाची असलेले आत्मे, सर्व स्वरूपाच्या प्राप्तीचे खजाने, आल्याबरोबरच अनुभवी होतात. ते कधीही असे म्हणत नाही की सुखाचा अनुभव होतो, शांतीचा नाही, शांतीचा होतो, पण सुखाचा आणि शक्ती नाही. सर्व अनुभवांनी संपन्न असतात.

बोधवाक्य:-
आपल्या प्रसन्नतेच्या सावलीने शीतलतेचा अनुभव करण्यासाठी निर्मल आणि निर्मान बना.