16-08-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   07.03.86  ओम शान्ति   मधुबन


"राजयोग शिक्षणाच्या चारही विषयाची अर्थसहित स्मृती म्हणजे महा-शिवरात्री"


आज ज्ञानदाता,भाग्यविधाता, सर्वशक्तींचे वरदाता,सर्व खजान्या द्वारे भरपूर करणारे,भोलेनाथ बाबा आपल्या अतीस्नेही,सदा सहयोगी, प्रिय मुलांना,भेटण्यासाठी आले आहेत.हे मिलनच नेहमीसाठी उत्सव साजरा करण्याची आठवण बनते.वेगवेगळ्या नावाद्वारे वेळेनुसार उत्सव साजरे करतात.ते सर्व या वेळेतील पिता आणि मुलांचे मधुर मिलन,उत्साहा सहित मिलन, भविष्यासाठी उत्सवाचे रूप बनतात. या वेळेत तुम्हा सर्वश्रेष्ठ मुलांचा प्रत्येक दिवस,प्रत्येक क्षण,नेहमी खुशीमध्ये राहण्याचे क्षण आहेत.तर या छोट्याशा संगम युगाचे अलौकिक जीवन,अलौकिक प्राप्ती,अलौकिक अनुभवांना,द्वापरपासून भक्तांनी वेगवेगळ्या नावाचे,तीर्थक्षेत्र बनवले आहेत.एक जन्माचे तुमचे हे जीवन, भक्तीच्या ६३ जन्मासाठी, आठवणीचे साधन बनते.इतके महान आत्मे आहात.या वेळेतील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट तुम्ही पाहत आहात,जे प्रत्यक्षात साजरे पण करत आहात आणि निमित्त त्या यादगारला साजरे करत आहात.चैतन्य पण आहात आणि चित्र पण सोबत आहेत.

पाच हजार वर्षापूर्वी,प्रत्येकानी काय मिळवले,काय बनले,कसे बनले हे पाच हजार वर्षांचे पूर्ण यादगारचे चित्र आणि जन्मपत्री सर्व स्पष्ट रूपामध्ये जाणले आहे.ऐकत आहात, पहात-पहात आनंदित होतात की, हे आपलेच गायन पूजन,आपल्याच जीवनाच्या कथा वर्णन करत आहेत. वास्तव मध्ये तुमचे चित्र तर बनवू शकत नाहीत,म्हणून भावना पूर्वक जे पण बुद्धीमध्ये आले,त्याचे चित्र बनवतात. तर प्रत्यक्षात शिवजयंती, शिवरात्री तर रोज साजरी करतात,कारण संगम आहेच अवतरणाचे युग,श्रेष्ठ कर्तव्य, श्रेष्ठ चरित्र करण्याचे युग आहे. बेहद्द युगाच्या मध्ये यादगार दिवस पण साजरा करत आहात.तुम्ही सर्व साजरा करत आहात,भेटणे,मिलन करणे आणि त्यांचे आहे साजरा करणे,आव्हान करणे.त्यांचे आहे बोलवणे आणि तुमचे आहे प्राप्त करणे.ते म्हणतात या आणि तुम्ही म्हणाल,आले आहेत,भेटले आहेत. यादगार आणि प्रत्यक्षामध्ये रात्रंदिवसाचे अंतर आहे.वास्तव मध्ये हा दिवस भोलेनाथ बाबांचा दिवस आहे,भोलानाथ म्हणजे विना हिशेबाचे अगणित भरपुर देणारे.तसे तर जितके आणि तेवढ्याचा हिशोब असतो.जो करेल त्यांना मिळेल, तेवढेच मिळेल.हा हिशेब आहे.परंतु भोलानाथ काय म्हणतात,या वेळेत देण्यामध्ये जितके आणि तेवढ्याचा हिशोब ठेवत नाही.एकाचे पदम म्हणजे अगणितचा हिशेब आहे. कुठे एक,कुठे पदम.पदम पण गणिता मधील अंतिम शब्द आहे म्हणून पदम म्हणतात.अगणित देणारे भोले भंडारीचा दिवस यादगार रूपामध्ये साजरा करतात.तुम्हाला तर इतके भेटले आहे,हे जे आत्ता पण भरपूर आहात आणि २१ जन्म २१ पिढी भरपूर राहाल.इतक्या जन्माची गॅरंटी, खात्री कोणी देऊ शकत नाही.किती पण मोठा,कोणी दाता असेल परंतु अनेक जन्माचा भंडारा भरपुर करण्याची खात्री कोणी देऊ शकत नाही.तर भोलेनाथ झाले ना. ज्ञानसंपन्न असतानी पण भोळे बनतात,म्हणून भोलेनाथ म्हटले जाते. तसे तर हिशोब करण्यामध्ये,एक-एक संकल्पाचा पण हिशेब जाणू शकतात परंतु जाणत असताना पण देण्यामध्ये भोलेनाथ बनतात.तर तुम्ही सर्व भोलेनाथ पित्याची,भोलेनाथ मुलं आहात ना.एकीकडे भोलेनाथ म्हणतात,दुसरीकडे भरपूर भंडारी म्हणतात. शिवरात्री पण पहा किती चांगल्या प्रकारे साजरी करतात,करणाऱ्यांना तर माहित नाही परंतु तुम्ही जाणतात.जे मुख्य संगम युगाचे शिक्षण आहे, ज्याचे चार विषय विशेष आहेत,त्याच्यावरती विशेष यादगार दिवस साजरे करतात. कसे? यापूर्वी पण ऐकवले होते की, विशेष या उत्सवाच्या दिवशी बिंदू आणि बुंद याचे महत्त्व असते.तर बिंदू यावेळेची आठवण म्हणजे योगाच्या विषयाची लक्षण आहेत. आठवणी मध्ये बिंदू स्थितीमध्येच स्थिर होता ना.तर बिंदू आठवणी चे लक्षण आणि बुंद म्हणजे ज्ञानाचे वेगवेगळे मुद्दे आहेत.या ज्ञानाच्या विषयाची लक्षणे बुंदच्या (थेंबाच्या) रूपामध्ये दाखवले आहेत. धारणाची लक्षणे या दिवशी विशेष व्रत ठेवतात,तर व्रत धारण करायचे आहे.धारणा मध्ये पण तुम्ही दृढ संकल्प करतात.तुम्ही व्रत ठेवतात की,असे सहनशील किंवा अंतर्मुखी अवश्य बनवून दाखवू.तर हे व्रत धारण करतात ना.तर हे व्रत धारणे ची लक्षणं आहेत आणि सेवेच लक्षण जागरण आहे.सेवा कोणालाही जागृत करण्यासाठी करतात.अज्ञान निद्रे पासून जागृत करणे,जागृती देणे हीच तुमची सेवा आहे.तर हे जागरण सेवेची लक्षणं आहेत.तर चारही विषय आहेत ना परंतु फक्त रूपरेषा त्यांनी स्थूल रूपामध्ये बदलली आहे. तरी भक्त भावनाप्रधान असतात आणि नेहमीच खऱ्या भक्ताचे लक्षणं असतील की,जे करतील त्यामध्ये दृढ राहतील,म्हणुन भक्ताशी पण शिवपित्याचा स्नेह आहे.तरीही तुमच्या यादगारला द्वापर पासून परंपरा तर चालत ठेवली आहे आणि विशेष या दिवसी जसे तुम्ही लोक येथे संगम युगामध्ये नेहमीच समर्पण समारोह साजरा करतात.वेगवेगळ्या दिवशीपण साजरा करतात,असेच तुमच्या या कार्यक्रमाची यादगार म्हणून ते स्वतःला समर्पण करत नाहीत परंतु बकऱ्याला समर्पण करतात,बळी चढवतात.तसे तर बापदादा पण असेच हसत म्हणतात, मी -मी पणाचे समर्पण हवे,तेव्हाच समर्पण म्हणजे संपूर्ण बनाल म्हणजे बाप समान बनाल.जसे ब्रह्मा बाबांनी प्रथम कोणते पाऊल टाकले होते,मी आणि माझ्या पणाचे समर्पण समारोह, म्हणजेच कोणत्याही गोष्टींमध्ये मीच्या ऐवजी नेहमी नैसर्गिक भाषेमध्ये, साधारण भाषांमध्ये पण 'बाबा' शब्द ऐकवले. मी शब्द नाही.बाबा करत आहेत, मी करत आहे, नाही.बाबा चालवत आहेत,मी सांगत आहे,नाही.बाबा म्हणतात,हद्दच्या कोणत्याही व्यक्ती किंवा वैभवाशी लगाव,हे माझे पण आहे.तर माझ्या पणाला आणि मी पणाला समर्पण करणे,यालाच बळी चढणे म्हणतात.बळी चढणे म्हणजे महाबली बनणे,तर हे समर्पण होण्याची लक्षण आहेत.

तर बापदादा भक्तांना एका गोष्टीचे धन्यवाद देतात की,कोणत्याही रूपा द्वारे भारतामध्ये किंवा प्रत्येक देशांमध्ये,उत्साहाची लाट पसरवण्यासाठी अनेक उत्सव बनवले आहेत,ते चांगले आहेत ना.खुशाल ते दोन दिवसासाठी असतील किंवा एका दिवसासाठी असतील परंतु उत्साहाची लाट पसरवली आहे ना म्हणुन उत्सव म्हणतात.तरी उत्साहाच्या काळात विशेष रूपा द्वारे पित्याकडे अनेकांचे लक्ष तर जाते ना.तर या विशेष दिवशी विशेष काय करणार?जसे भक्ती मध्ये कोणी नेहमी साठी व्रत घेतात आणि कोणामध्ये हिम्मत होत नाही,तर एक महिन्यासाठी,एका दिवसासाठी किंवा थोड्यावेळासाठी व्रत घेतात,परत ते व्रत सोडतात.तुम्ही तसे करत नाहीत ना. मधुबन मध्येदेहरुपी धरतीवरती तर पाऊल पडत नाही आणि जेव्हा विदेशामध्ये जाल तर देहरूपी धरतीवरती याल की,वरतीच राहाल. नेहमी वरून येऊन कर्म कराल,की खाली राहून कर्म कराल?वरती राहणे म्हणजे वरच्या स्थितीमध्ये,चांगल्या स्थिती मध्ये राहणे.वरती म्हणजे काय छतावरती लटकणे नाही.उच्च स्थितीमध्ये स्थिर होऊन कोणतेही साधारण कर्म करणे म्हणजे खाली येणे परंतु साधरण कर्म करत पण स्थिती उच्च हवी.जसे बाबा साधारण तन घेतात ना,कर्म तर साधारणच करतील ना.जसे तुम्ही लोक बोलतात तसेच बोलतील,तसेच चालतात.तर कर्म साधारण आहेत,तन पण साधारण आहे परंतु साधारण कर्म करत पण,उच्च स्थिती राहते.तसेच तुमची स्थिती पण नेहमी उच्च हवी. जसे या दिवसाला अवतरणाचा दिवस म्हणतात ना.तर रोज अमृतवेळेला असाच विचार करा की, निद्रे पासून उठलो नाही परंतु शांतीधाम मधून काम करण्यासाठी अवतरीत झालो आहे आणि रात्रीला कर्म करून शांतीधाम मध्ये चालले जावा.तर अवतार श्रेष्ठ काम करण्यासाठी अवतरीत होतात,त्यांना जन्म म्हणत नाहीत परंतु अवतरण म्हणतात.वरच्या स्थिती मधून खाली येतात,हे अवतरण आहे.तर अशा स्थितीमध्ये राहून कर्म केल्यामुळे, साधारण कर्म पण श्रेष्ठ कर्मामध्ये बदलून जातील.जसे दुसरे लोक भोजन खातात आणि तुम्ही म्हणतात ब्रह्मा भोजन खातो.तर फरक झाला ना.तुम्ही चालतात परंतु तुमची चाल फरिश्ताची चाल आहे,नेहमी हलके राहुन चालतात.तर अलौकिक चाल आणि अलौकिक श्रेष्ठ कर्म होतील.तर फक्त आजचा दिवस अवतराचा दिवस नाही परंतु संगमयुगच अवतरण दिवस आहे.

आजच्या दिवशी तुम्ही लोक बापदादांचे अभिनंदन करतात परंतु बापदादा म्हणतात 'प्रथम तुम्ही'.जर मुलं नसतील तर,पिता कोण म्हणेल. मुलंच पित्याला,पिता म्हणतात म्हणून प्रथम मुलांचे अभिनंदन.तुम्ही सर्व वाढदिवसाचे गीत गाता ना, हैपी बर्थडे टू यू... बाप दादा पण म्हणतात तुम्हाला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मुलांनी बाबांना दिल्या आणि बाबांनी पण मुलांना दिल्या. तुमची पालना शुभेच्छा द्वारेच होत आहे.तुम्हा सर्वांची पालना कशी आहे? पित्याच्या,परिवाराच्या शुभेच्छा द्वारे पालना होत आहे.शुभेच्छा द्वारे नाचतात, गातात,पालना होते,उडत राहतात.ही पालनापण आश्चर्यकारक आहे.एक-दोघांना प्रत्येक क्षणी काय देतात?शुभेच्छा आणि हीच पालनाची विधी आहे.कोणी कसेही आहेत,हे तर बाप दादा पण जाणतात. तुम्हीपण जाणतात की,क्रमानुसार तर आहेतच.जर क्रमानुसार बनत नाहीत परत सतयुगा मध्ये कमीत कमी नऊ लाख सिंहासन बनवावे लागतील, म्हणून क्रमानुसार तर आहेतच.तर क्रमानुसार असणारच परंतु कधी कोणाला जर तुम्ही समजवतात,हे चुकीचे आहे,हे चांगले काम करत नाहीत.तर चुकणाऱ्यांना बरोबर करण्याची विधी किंवा अर्थसहित कर्म न करणाऱ्यांना,अर्थसहित कर्म शिकवण्याची विधी,कधीपण त्याला सरळ,तुम्ही चुकीचे आहात असे म्हणू नका.हे म्हटल्यामुळे त्याच्यामध्ये कधी परिवर्तन होणार नाही.जसे आग विझवण्यासाठी आग केली जात नाही परंतु त्याला शितल पाणी दिले जाते,म्हणून कधीही त्याला प्रथम तुम्ही चुकीचे आहात,तुम्ही चुकीचे आहात,असे म्हणू नका,त्यामुळे तो आणखी कमजोर होईल.प्रथम त्याला छान-छान म्हणा,त्याची महिमा करा,प्रथम शितल पाणी द्या,परत त्याला विचारा की,आग का लागली?प्रथम हे म्हणू नका की,तुम्ही असे केले,तुम्ही असे आहात,प्रथम शितल पाणी द्या, नंतर त्यांना जाणीव होईल कि,आग लागण्याचे कारण काय आहे आणि आणि आग विझवण्याचे साधन काय आहे.जर वाईट व्यक्तीला वाईट म्हटले तर,अग्नीमध्ये तेल घातल्यासारखे आहे,म्हणून फार चांगले-फार चांगले म्हणून परत त्याला कोणतीही गोष्ट सांगा,तर त्यांच्यामध्ये ऐकण्याची धारण करण्याची हिम्मत येईल.यामुळे ऐकवत होते की,फार चांगले फार चांगले,म्हणने याच शुभेच्छा आहेत. जसे बापदादा पण कधी कोणाला प्रत्यक्ष चुकीचे आहात,असे म्हणत नाहीत,तर मुरली मध्ये ऐकवतात की, बरोबर काय आहे आणि चुकीचे काय आहे. परंतु जर कोणी सहज विचारले की,मी चुकीचा आहे,तर म्हणा नाही, तुम्ही तर खूप चांगले आहात,कारण त्यावेळेस हिंमत राहत नाही.जसे पेशंट जात असतो,शेवटचा श्वास जरी घेत असला,तरी डॉक्टरला विचारले, मी जात आहे का? तर कधी म्हणणार नाहीत,होय जात आहात. परंतु त्यावेळेस हिंमत होत नाही. कोण कमजोर ह्रदयाचे असतील, आणि तुम्ही अशा गोष्टी सांगाल तर,त्यांचे हृदय बंद होऊ शकते,म्हणजेच पुरुषार्था मध्ये परिवर्तन करण्याची शक्ती येणार नाही.तर संगम युग आहेच शुभेच्छा द्वारे वृध्दी प्राप्त करण्याचे युग.या शुभेच्छा श्रेष्ठ पालना आहेत.यामुळे तुम्हच्या या शुभेच्छा द्वारे पालना करण्याची आठवण म्हणुन,जेव्हा पण कोणत्या देवी-देवताचा दिवस साजरा करतात,तर त्याला मोठा दिवस म्हणतात.दिवाळी असेल,शिवरात्री असेल,तर म्हणतात मोठा दिवस म्हणतात.जो पण उत्सव असतो, त्याला मोठा दिवस म्हणतात, कारण तुमचे मोठे मन आहे,म्हणुन त्यांनी मोठा दिवस म्हटले आहे.तर एक दोघांना शुभेच्छा देणे म्हणजेच, मोठ्या मनाचे आहेत.असे पण नाही की,चुकीच्याला चुकीचे समजणार नाही परंतु थोडा धैर्य ठेवा,इशारा तर द्यावा लागेल,परंतु वेळ पाहून द्यायचा आहे.तो मरत आहे आणि त्याला कोणी म्हटले,तुम्ही मरा,तुम्ही मरा.तर वेळ पहा,त्याची हिम्मत पहा. छान-छान म्हटल्यामुळे हिम्मत येते, परंतु मनापासून म्हणा,असेच वरून-वरुन म्हणू नका,तर ते समजतील मला असेच म्हणत आहेत,ही भावना ची गोष्ट आहे. मनातुन दयेचा भाव हवा, तर त्याला मनाच्या दयेचे भाव समजतील म्हणून नेहमी शुभेच्छा देत रहा,शुभेच्छा घेत रहा.हे शुभेच्छांचे वरदान आहे. आजच्या दिवसासाठी गायन करतात, शिवाचा भंडारा भरपुर..तर तुमचे पण गायन आहे,फक्त बाबाचे नाही.नेहमी भंडारा भरपूर हवा,दाताची मुलं दाता बना.भक्त लेवता आहेत,आणी तुम्ही देणारे देवता,म्हणजे दाता.कोणाला थोडे पण देऊन परत तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता,तर त्यांना त्याची जाणीव होणार नाही.परत त्याच्याकडून काही पण करून घेऊ शकतात,परंतु प्रथम त्याला हिंमत द्या,उमंग द्या,खुशी द्या,परत त्याच्याकडून कोणतीही गोष्ट करून घेऊ शकतात.रोज उत्सव साजरा करत रहा.रोज बाबांशी मिलन करणे,हे उत्सव साजरा करणे आहे,तर रोज उत्सव आहे.

चोहूबाजूच्या मुलांना,संगम युगाच्या प्रत्येक दिवशी,अवतरण दिवसाच्या अविनाशी शुभेच्छा आहेत. नेहमी बाप समान दाता आणि वरदाता बनून प्रत्येक आत्म्याला भरपुर करणारे, मास्टर भोलेनाथ मुलांना,नेहमी आठवणी मध्ये राहून प्रत्येक कर्माला आठवण बनवणाऱ्या मुलांना,प्रगती आणि सेवेच्या प्रगतीमध्ये,उमंग उत्साहा द्वारे पुढे जाणाऱ्या श्रेष्ठ मुलांना,विशेष आजच्या विशेष दिवशी शिवजयंती सो ब्राह्मण जयंती,हिरेतुल्य जयंती,नेहमीच सर्वांना सुखी बनवण्याची,संपन्न बनवण्याच्या जयंतीच्या शुभेच्छा, प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
प्रत्येक शक्तीला हुकमानुसार चालवणारे,मास्टर रचनाकार भव.

कर्म सुरू करण्याच्या पूर्वी,जसे कर्म तसे शक्तीचे आवाहन करा.मालक बनून आदेश द्या की,या सर्व शक्ती भुजासमान आहेत,तुमच्या आदेशा शिवाय काहीच करू शकत नाहीत. आदेश द्या सहनशक्ती कार्य सफल कर,तर पहा सफल झालेलेच आहे. परंतु आदेश देण्याच्या ऐवजी घाबरतात,करू शकेल की नाही?तर याप्रकारची भीती आहे, तर आदेश चालू शकत नाही,म्हणून मास्टर रचनाकार बनून प्रत्येक शक्तीला आदेशाप्रमाणे चालवण्यासाठी निर्भय बना.

सुविचार:-
आधारदाता बाबांना प्रत्यक्ष करून,सर्वांना आधार द्या.


सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आहे,सर्व राजयोगी तपस्वी भाऊ-बहिणींनी,सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत विशेष योग अभ्यासाच्या वेळेस,आपल्या पूर्वज पणाच्या स्वमाना मध्ये स्थिर होऊन, कल्पवृक्षाच्या खोडामध्ये बसून, वृक्षाला शक्तिशाली योगाचे दान देत, आपल्या वंशावळीची दिव्य पालन करा.