11-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुमचा मुख्य उद्देश आहे,आश्चर्यकारक रंगी-बेरंगी दुनिया स्वर्गाचे मालक
बनणे,नेहमी याच खुशीमध्ये रहा,कोमेजून जाऊ नका"
प्रश्न:-
भाग्यवान
मुलांना कोणता उमंग नेहमी राहतो ?
उत्तर:-
आम्हाला बेहदचे बाबा नवीन दुनियेचे,राजकुमार राजकुमारी बनण्यासाठी शिकवत आहेत.तुम्ही
याच उमंग-उत्साहा द्वारे सर्वांना समजावू शकता की,या लढाई मध्ये स्वर्ग सामावलेला
आहे.या लढाईच्या नंतर स्वर्गाचे दरवाजे उघडणार आहेत,याच खुशी मध्ये राहायचे आहे आणि
आनंदाने दुसऱ्याला समजावून सांगायचे आहे.
गीत:-
दुनिया रंग
रंगीली बाबा...
ओम शांती।
हे कोणी बाबांना म्हटले की,ही दुनिया रंगी-बेरंगी आहे.आता याचा अर्थ दुसरा कोणी समजू
शकत नाहीत.बाबांनी समजवले आहे, हा खेळ रंग रंगीला आहे.कोणता सिनेमा इत्यादी असतो तर
खूप रंगी-बेरंगी दृश्य इत्यादी असतात ना.आता या दुनियेला कोणी जाणत नाहीत.
तुमच्यामध्ये पण क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे विश्वाच्या आदी मध्य अंताचे ज्ञान
आहे.तुम्ही समजतात स्वर्ग खूपच रंग-बेरंगी आहे, सुंदर आहे, ज्याला कोणी जाणत नाहीत.
कोणाच्या बुद्धीमध्ये नाही की,ती आश्चर्यकारक रंग-बेरंगी दुनिया आहे. गायन पण
आहे,आश्चर्यकारक दुनिया ज्याला फक्त तुम्हीच जाणतात. तुम्हीच स्वर्गाच्या दुनियेसाठी
आपआपल्या भाग्यानुसार पुरुषार्थ करत आहात.मुख्य उद्देश तर आहेच. ती आश्चर्यकारक
दुनिया,खूपच रंगी-बेरंगी दुनिया आहे,जेथे हिरे मोत्याचे महल असतात.तुम्ही एका
सेकंदामध्ये आश्चर्यकारक वैकुंठा मध्ये चालले जाता.तेथे खेळ करतात,रास-विलास
करतात.बरोबर आश्चर्यकारक दुनिया आहे ना.येथे तर मायेचे राज्य आहे.हे पण खूप
आश्चर्यकारक आहे.मनुष्य काय काय करत राहतात.दुनियेमध्ये हे कोणीही समजत नाही
की,आम्ही नाटकांमध्ये खेळ करत आहोत.नाटक जर समजत असतील तर,नाटकाच्या आदी मध्य अंतचे
पण ज्ञान हवे. तुम्ही मुलं जाणतात,बाबा खूप साधारण आहेत.माया बिल्कुलच विसरायला
लावते,नाकाला पकडते की लगेच विसरतात.आता आठवणी मध्ये आहेत,खूप आनंदात राहतात
ओहो,आम्ही तर आश्चर्यकारक दुनिया स्वर्गाचे मालक बनत आहोत,परत विसरतात तर कोमेजून
जातात.असे कोमेजतात जे भिल पण असे कोमेजत नसतील.जरापण समजत नाहीत की,आम्ही
स्वर्गामध्ये जाणार आहोत,आम्हाला बेहदचे पिता शिकवत आहेत.एकदम मुडद्या सारखे
बसतात,ती खुशी, तो नशा राहत नाही.आता आश्चर्यकारक दुनियेची स्थापना होत आहे.
आश्चर्यकारक दुनियाचे श्रीकृष्ण राजकुमार आहेत,ते पण तुम्हीच जाणतात. कृष्ण
जन्माष्टमी वरती,जे ज्ञानामध्ये हुशार आहेत,ते समजावत असतील.श्रीकृष्ण आश्चर्यकारक
दुनियाचे राजकुमार होते.ते सतयुग, परत कुठे गेले?सतयुगापासून शिडी कसे उतरतात?
सतयुगापासून कलयुग कसे झाले?उतरती कला कशी झाली?तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्येच
आहे,याच आनंदाने समजावयाला पाहिजे.श्रीकृष्ण येत आहेत, कृष्णाचे राज्य परत स्थापन
होत आहे.हे ऐकून भारतवासींना खूप खुशी व्हायला पाहिजे,परंतु हा उमंग त्यांनाच राहील
जे भाग्यवान असतील.दुनियेमध्ये मनुष्य रत्नाला पण दगड समजून फेकतात.हे अविनाश
ज्ञानाचे रत्न आहेत ना. या ज्ञानरत्नाचे सागर बाबा आहेत, त्यांची खूप किंमत आहे.हे
ज्ञान रत्न धारण करायचे आहेत.आता तुम्ही ज्ञानसागराद्वारे प्रत्यक्षात ऐकत आहात,परत
दुसरे काही ऐकण्याची आवश्यकता नाही.सतयुगामध्ये हे ज्ञानाचे रत्नं नसतात.न तेथे
वकील किंवा डॉक्टर इत्यादी बनायचे असते. तेथे हे ज्ञानच नसते.तेथे तर प्रारब्ध
भोगतात. तर कृष्णजन्माष्टमी वरती मुलांनी,चांगल्या रीतीने समजावयाचे आहे.अनेक वेळेस
त्याबाबत मुरली पण चालली आहे.मुलांना विचार सागर मंथन करायचे आहे,त्यामुळे ज्ञानाचे
मुद्दे निघतील.भाषण करायचे असेल तर,सकाळी उठून लिहायला पाहिजे,परत वाचायला पाहिजे,
विसरलेले मुद्दे परत त्यामध्ये लिहायला पाहिजेत.यामुळे धारणा पण चांगली होईल.तरीही
लिहल्यासारखे सर्वकाही बोलणार नाहीत.काहीना-काही मुद्दे विसरतात. तर समजावयाला
पाहिजे की,कृष्ण कोण आहेत,ते तर आश्चर्यकारक दुनिया चे मालक होते.भारतच स्वर्ग
होतं,त्या स्वर्गाचे मालक श्रीकृष्ण होते.आम्ही आपल्याला संदेश ऐकवतो,श्रीकृष्ण येत
आहेत.राजयोग भगवंतांनीच शिकवला आहे,आत्ता पण शिकवत आहेत.पवित्रता आणि दुहेरी ताजधारी
देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करवत आहेत.सर्व मुलांच्या स्मृतीमध्ये राहायला
पाहिजे.ज्यांना अभ्यास असेल तर चांगल्या रीतीने समजू शकतील.कृष्णाच्या चित्रांमध्ये
पण खूप चांगले लिहिले आहे,या लढाईच्या नंतर स्वर्गाचे दरवाजे उघडतील.या लढाईमध्ये
जसे स्वर्ग सामावलेला आहे.मुलांना खूप खुशी मध्ये राहायला पाहिजे.कृष्ण जन्माष्टमी
वरती मनुष्य कपडे इत्यादी नवीन परिधान करतात परंतु तुम्ही जाणता की आता आम्हाला हे
जुने शरीर सोडून नवीन सोन्यासारखे शरीर घ्यायचे आहे.कंचन काया म्हणतात ना,म्हणजे
सोन्यासारखी काया.आत्मा पण पवित्र तर शरीर पण पवित्र मिळते.आता कंचन
नाहीत,क्रमानुसार बनत आहेत. सोन्यासारखे आठवणीच्या यात्रेद्वारेच बनाल.बाबा जाणतात
अनेक जण आहेत ज्यांना आठवण करण्याची पण अक्कल नाही.आठवणीचे जेव्हा कष्ट घेतील,
तेव्हाच वाणी मध्ये शक्ती येईल.आता ती ताकत कुठे आहे, योगच नाही.लक्ष्मी-नारायण
बनण्यासाठी चेहरा पण तसा पाहिजे ना,अभ्यास करायला पाहिजे.कृष्ण जन्माष्टमी वरती
समजून सांगणे खूप सहज आहे.कृष्णासाठी शामसुंदर म्हणतात,कृष्णाला सावळा नारायणला पण
सावळा,रामाला पण सावळेच दाखवले आहे.बाबा म्हणतात,माझी मुलं प्रथम ज्ञानाच्या चितेवर
बसून स्वर्गाचे मालक बनले होते,ते परत कुठे गेले.काम चिते वरती बसून क्रमानुसार खाली
उतरत आले.सृष्टीपण सतोप्रधान, सतो, रजो,तमो बनते. तर मनुष्याची अवस्था पण असेच
होते.काम चितावर बसल्याने सर्व काळे बनले आहेत.आता मी सुंदर बनवण्यासाठी आलो
आहे.आत्म्याला सुंदर बनवले जाते.बाबा प्रत्येकाच्या चलनाद्वारे समजतात,मनसा,वाचा,
कर्मणा कसे चालत आहेत.कर्म कसे करतात, त्याद्वारे माहिती होते.मुलांची चलन तर खूप
चांगली असायला पाहिजे. मुखाद्वारे नेहमी रत्न निघायला पाहिजेत. कृष्ण जयंतीवरती
समजावून सांगणे खूप चांगले आहे.श्याम आणि सुंदर चा विषय पाहिजे. कृष्णाला पण सावळे
तर नारायणा पण सावळे,परत राधाला पण सावळे का बनवतात? शिवलिंग पण काळ्या दगडाचे
बनवतात,आता ते काळे थोडेच आहेत.शिव कसे आहेत आणि त्यांना कसे बनवतात,या गोष्टीला
तुम्ही मुलंच जाणतात.सावळे का बनवतात,तुम्ही या वरती पण समजावून सांगू शकता. आता
पाहू या, मुलं काय सेवा करतात.बाबा म्हणतात,हे ज्ञान सर्व धर्मासाठी आहे,त्यांना पण
सांगायचे आहे, बाबा म्हणतात माझी आठवण करा,तर तुमचे जन्म जन्मांतराचे पापं नष्ट
होतील.पवित्र बनायचे आहे.तुम्ही कोणालाही राखी बांधू शकतात. युरोपियन मनुष्याला पण
बांधू शकतात.कोणीही असू द्या त्यांना सांगा,भगवान जरूर कोणत्या न कोणत्या तनाद्वारे
म्हणतील ना,ते म्हणतात माझीच आठवण करा,देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा
समजा.बाबा खूप चांगल्या रीतीने समजावतात,तरीही मुलं समजत नाहीत.तर बाबा समजतात,
यांच्या भाग्यामध्ये नाही.हे तर समजत असतील की,शिवबाबा शिकवत आहेत.रथा शिवाय तर
शिकवू शकत नाहीत,इशारा देणे पुष्कळ आहे.काही मुलांना समजून सांगण्याचा अभ्यास चांगला
आहे.बाबा मम्मा साठी तर समजतात,हे उच्च पद मिळवणारे आहेत. मम्मा पण सेवा करत होती
ना. या गोष्टीला पण समजायचे आहे. मायेचे पण अनेक प्रकारचे रूप असतात. अनेक जण
म्हणतात आमच्यामध्ये मम्मा येते, शिवबाबा येतात परंतु नवीन नवीन गोष्टी तर, एका
कायमस्वरूपी तना द्वारे ऐकवतील, ना की दुसऱ्याच्या तनाद्वारे. असे तर होऊ शकत नाही.
असेल तर मुली पण अनेक प्रकारचे ज्ञानाच्या गोष्टी ऐकवत राहतात. मासिकांमध्ये पण
अनेक गोष्टी येत राहतात.असे नाही मम्मा बाबा त्यांच्यामध्ये येतात,परत ते लिहायला
लावतात, नाही.बाबा प्रत्यक्षामध्ये येतात,तेव्हा तर येथे ऐकण्यासाठी तुम्ही
येतात.जर मम्मा बाबा कोणा मध्ये येत असतील,तर तेथेच बसून त्यांच्याकडून शिका परंतू
असे नाही.येथे येण्याचे सर्वांना आकर्षण होते,दूर राहणाऱ्यां ना तर आणखी जास्त
आकर्षण होते. तर मुलांना जन्माष्टमी वरती खूप सेवा करू शकतात.कृष्णाचा जन्म कधी झाला
हे कोणालाही माहिती नाही.तुमची आत्ता झोळी भरत आहे, तर खुशी मध्ये राहायला पाहिजे
परंतु बाबा पाहतात, खुशी काही जणांना बिलकुलच राहत नाहीत.श्रीमतावरती न चालण्याची
जसे शपथ घेतात. सेवाधारी मुलांना तर सेवा आणि सेवाच करत राहतात.बाबा ची सेवा केली
नाही,कोणाला रस्ता दाखवला नाही, तर आम्ही अंध आहोत,असे समजतात.या खूप समजण्याच्या
गोष्टी आहेत.बैज मध्ये पण कृष्णाचे चित्र आहे, यावरती पण तुम्ही समजावू
शकतात.कोणालाही विचारले की,यांना सावळे का दाखवले आहे,तर सांगू शकणार नाहीत.
ग्रंथांमध्ये पण लिहिले आहे की, रामाच्या स्त्रीचे अपहरण झाले परंतु अशा काही गोष्टी
स्वर्गामध्ये होत नाहीत.
तुम्ही भारतवासीच परिस्थानी होते, आता कब्रस्तानी बनले आहात,परत ज्ञानचिता वरती
बसून दैवी गुणांची धारणा करून,परीस्थानी बनतात. सेवा तर मुलांना करायची आहेच.
सर्वांना संदेश द्यायचा आहे,यामध्ये खूप समज पाहिजे,इतका नशा पाहिजे,आम्हाला स्वतः
भगवान शिकवत आहेत,भगवंताच्या सोबत राहत आहोत.भगवंताची मुलं आहोत, तर आम्ही शिकत पण
आहोत. वसतीगृहा मध्ये राहतात,तर बाहेरचा संग लागत नाही.ही पण शाळा आहे. ख्रिश्चन
मध्ये तरीही चाल चलन चांगली असते,आता तर बिलकुलच चाल चलन नाही,सर्व तमोप्रधान बनले
आहेत. देवतांच्या पुढे जाऊन माथा टेकवतात,त्यांची खूप महिमा आहे.सतयुगामध्ये
सर्वांची दैवी चलन असते,आता आसुरी चलन आहे. अशा प्रकारे तुम्ही भाषण केले,तर ऐकून
खूप खुश होतील.लहान मुख मोठ्या गोष्टी,ते कृष्णासाठी म्हणतात. आता तुम्ही खूप मोठ्या
गोष्टी ऐकत आहात,असे श्रेष्ठ बनण्यासाठी. तुम्ही मोठ्या गोष्टी ऐकत राहतात.तुम्ही
राखी कोणालाही बांधू शकतात.हा बाबांचा संदेश सर्वांना द्यायचा आहे. ही लढाई
स्वर्गाचे दार उघडते.आता पतिता पासून पावन बनायचे आहे. बाबांची आठवण करायची
आहे.देहधारीची आठवण करायची नाही.एक बाबाच सर्वांचे सद्गती करतात.ही योगी दुनिया
आहे.तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये क्रमानुसार पुरुषांप्रमाणे धारणा होते.शाळेमध्ये
पण शिष्यवृत्ती घेण्यासाठी खूप कष्ट करतात,येथे पण खूप मोठी शिष्यवृत्ती आहे.सेवा
खूप आहे.माता पण खूप सेवा करू शकतात, चित्रं सोबत घेऊन जावा.कृष्णाला सावळे,
नारायणाला सावळे,रामचंद्रांचे सावळे चित्र,शिवाचे पण सावळे चित्र घ्या आणि त्यावरती
समजून सांगा.देवतांना सावळे का बनवले आहे, श्यामसुंदर का म्हणतात? श्रीनाथ द्वारे
जावा तर बिल्कुल काळे चित्र आहे.तर असे चित्र एकत्र करायला पाहिजेत.आपले चित्र पण
दाखवायला पाहिजेत.श्यामसुंदर चा अर्थ समजावून सांगा की,तुम्ही आत्ता राखी बांधा,
काम चितेवरुन उतरुन, ज्ञानचिता वरती बसा,तर गोरे बनाल. तेथे पण तुम्ही सेवा करू शकता.
भाषण खूप चांगल्या रीतीने करू शकता की,यांना सावळे का बनवले आहे,शिवलिंगाला काळे
बनवतात. सुंदर आणि श्याम का म्हणतात, आम्ही समजावून सांगतो,यामुळे कोणी नाराज होणार
नाहीत.सेवा करणे तर खूप सहज आहे.बाबा समजवत राहतात,मुलांनो चांगले गुण धारण
करा,कुळाचे नाव प्रसिद्ध करा. तुम्ही जाणतात,आम्ही उच्च ते उच्च ब्राह्मण कुळाचे
आहोत,परत रक्षाबंधन चा अर्थ पण तुम्ही कोणालाही समजू शकता.वेश्यांना पण समजावून राखी
बांधू शकता, सोबत चित्र हवेत.बाबा म्हणतात माझीच आठवण करा.हा आदेश मानल्यामुळे
तुम्ही गोरे म्हणजे पवित्र बनाल,खूप युक्त्या आहेत.कोणीही नाराज होणार नाही.कोणी
मनुष्यमात्र कोणाची सद्गती करू शकणार नाहीत,शिवाय शिवबांच्या. रक्षाबंधनचा दिवस नसला
तरीही, तुम्ही राखी बांधू शकता,याचा अर्थ समजावयाचा आहे.जेव्हा पाहिजे तेव्हा
राखी.बांधली जाऊ शकते. तुमचा धंदा आहे,बोला बाबांच्या सोबत प्रतिज्ञा करा,बाबा
म्हणतात,माझीच आठवण करा,तर तुम्ही पवित्र बनाल.मस्जिद मध्ये जाऊन पण तुम्ही समजावू
शकता, आम्ही राखी बांधण्यासाठी आलो आहोत,या गोष्टी तुम्हालापण समजण्याचा अधिकार
आहे,पिता म्हणतात,माझी आठवण करा तर पापं नष्ट होतील.पावन बनून पावन दुनिया चे मालक
बनाल.आता तर पतित दुनिया आहे ना.सुवर्णयुग जरूर होते,आता लोहयुग आहे. तुम्हाला
स्वर्ण युगामध्ये खुदा च्या जवळ जायचे नाही का? असे ऐकवले तर लगेच चरणामध्ये येऊन
पडतील,अच्छा.
गोड गोड,फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) ज्ञान
रत्नांच्या सागरा द्वारे,जे अविनाशी ज्ञान रत्न प्राप्त होत आहेत,त्यांचा आदर
ठेवायचा आहे.विचार सागर मंथन करून,स्वतःमध्ये ज्ञानाचे रत्न धारण करायचे
आहेत.मुखाद्वारे नेहमी रत्न निघायला हवेत.
(२)आठवणीच्या यात्रा मध्ये राहून वाणीला शक्तिशाली बनवायचे आहे. आठवणी द्वारेच आत्म
कंचन बनेल म्हणून आठवण करण्याची अक्कल शिकायची आहे.
वरदान:-
जुन्या देहाला
आणि दुनियेला विसरणारे बापदादाचे हृदयासीन भव.
संगमयुगी श्रेष्ठ
आत्म्याचे स्थान,बाप दादांचे ह्रदय सिंहासन आहे.असे तख्त साऱ्या कल्पा मध्ये मिळू
शकत नाही.विश्वाचे राज्य किंवा एखाद्या देशाच्या राज्याचे तख्त तर मिळत राहील परंतु
हे सिंहासन मिळू शकत नाही. हे इतके विशाल सिंहासन आहे,जे चाला-फिरा परंतु नेहमी
हृदयासीन बनून रहा.जी मुलं नेहमी बापदादाच्या हृदयात राहतात, ते या जुन्या देह किंवा
देहाच्या दुनिया पासून विस्मृत राहतात,त्याला पाहून पण न पाहिल्यासारखे करतात.
बोधवाक्य:-
घोषवाक्य:- हद्यचे नाव,मान,शानच्या पाठीमागे लागणे म्हणजे सावलीच्या पाठीमागे लागणे
आहे.