14-08-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबा तुमचा ज्ञान रत्नांनी शृंगार करून परत घरी घेऊन जाण्यासाठी आले आहेत,त्यानंतर राजाई मध्ये पाठवतील,तर अपार खुशी मध्ये राहा,एका शिवपित्याशी प्रेम करा"

प्रश्न:-
आपल्या धारणेला मजबूत, बनवण्याचा आधार कोणता आहे?

उत्तर:-
आपल्या धारणेला मजबूत बनवण्यासाठी,नेहमी हे करा की आजचा दिवस जो गेला,चांगले झाले परत कल्पाच्या नंतर होईल.जे काही झाले ते कल्पापूर्वी पण असेच झाले होते,नवीन काहीच नाही.ही लढाई पण पाच हजार वर्षांपूर्वी लागली होती परत होईल,विनाश होणारच आहे.या भंभोरचा विनाश होणारच आहे... असे प्रत्येक क्षणी वैश्विक नाटकाची स्मृति राहावी,तर धारणा मजबूत होत जाईल.

गीत:-
दूर देशाचे राहणारे आले दुसऱ्यांच्या देशामध्ये...
 

ओम शांती।
मुलं अगोदर पण दूर देशांमधून दुसऱ्यांच्या देशांमध्ये आले होते.आता या दुसऱ्यांच्या देशांमध्ये दुखी आहेत,म्हणून बोलावतात, आपल्या देशामध्ये,आपल्या घरी घेऊन चला.तुम्हीच बोलवले आहे ना. अनेक वर्षा पासून आठवण करत आले आहात,तर बाबा पण खुशी-खुशी येतात.बाबा जाणतात मी मुलांच्या जवळ जातो,जे मुलं काम चिते वरती बसून काळे झाले आहेत, त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ आणि परत राज्यांमध्ये पाठवू. त्यांच्यासाठी ज्ञाना द्वारे शृंगार पण करू.मुलं पण बाबा पेक्षा जास्त खुश राहायला पाहिजेत.जेव्हा बाबा आले आहेत तर,त्यांचे बनायला पाहिजे, त्यांना खूप प्रेम करायला पाहिजे. बाबा रोज समजावतात आत्माच गोष्टी करते ना.बाबा पाच हजार वर्षानंतर बेहद्द नाटका नुसार तुम्ही आले आहात,आम्हाला खूप खुशीचा खाजना मिळत आहे.बाबा आमची झोळी भरत आहेत,आम्हाला आपल्या घरी शांतीधाम मध्ये घेऊन जातात,परत राजधानीमध्ये पाठवतील.तर खूप खुशी व्हायला पाहिजे.बाबा म्हणतात मला या दुसऱ्यांच्या राजधानीमध्येच यायचे आहे.बाबांची खूप मोठी आणि आश्चर्यकारक भूमिका आहे,खास जेव्हा या दुसऱ्यांच्या देशांमध्ये आले आहेत.या गोष्टी तुम्ही आता समजतात,परत हे ज्ञान प्राय:लोप होते. स्वर्गामध्ये आवश्यकताच राहत नाही.बाबा म्हणतात तुम्ही खूप बेसमज बनले आहात.वैश्विक नाटकांमधील कलाकार असून पण पित्याला जाणत नाहीत,जे पिता करनकरावनहार आहेत,काय करतात,काय करवतात, हेच विसरले आहेत. साऱ्या जुन्या दुनियेला स्वर्ग बनवण्यासाठी येतात आणि ज्ञान देतात.ते ज्ञानाचे सागर आहेत तर जरूर ज्ञान देण्याचे कर्तव्य करतील ना,परत तुमच्या द्वारे पण करवतात, कारण दुसऱ्याला पण संदेश द्यायचा आहे की, बाबा सर्वासाठी म्हणतात आता देहाचे भान सोडून माझी आठवण करा,तर विकर्म विनाश होतील.मी श्रीमत देतो. पाप आत्मे तर सर्वच आहेत,या वेळेत सर्वच तमोप्रधान अवस्थेला प्राप्त झाले आहेत.जसे बांबूच्या जंगलाला आग लागते,तर एकदम सर्व जळून नष्ट होते.जंगलामध्ये पाणी कोठून येईल,जे अग्नीला विझवता येईल. जुनी दुनिया आहे,त्याला पण आग लागणार आहे.हे पण नवीन नाही. बाबा छान-छान ज्ञानाच्या गोष्टी सांगत राहतात,तर त्याची नोंद करायला पाहिजे.बाबांनी समजावले आहे,धर्म संस्थापक फक्त आपला धर्म स्थापन करण्यासाठी येतात,त्यांना संदेशवाहक किंवा पैगंबर इत्यादी काहीच म्हणू शकत नाही. हे पण खूप युक्तीने लिहायचे आहे.बाबा मुलांना समजावत आहेत, मुलं तर सर्व भाऊ भाऊ आहेत.तर प्रत्येक चित्रांमध्ये,हे जरुर लिहायला पाहिजे की,शिवबाबा हे समजवतात. बाबा म्हणतात,मुलांनो,मी येऊन आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करतो,ज्यामध्ये १००% सुख-शांती पवित्रता सर्व आहे म्हणून त्याला स्वर्ग म्हटले जाते.तेथे दुःखाचे नाव नाही,बाकी जे पण धर्म आहेत, त्या सर्वांचा विनाश करण्यासाठी निमित्त बनतो.सतयुगा मध्ये एकच धर्म आहे.ती नवीन दुनिया आहे. जुन्या दुनिया ला नष्ट करतो,असा धंदा दुसरे कोणी करू शकत नाही. असे म्हटले जाते,शंकराद्वारे विनाश. विष्णू पण लक्ष्मी नारायणाच आहेत. प्रजापिता ब्रह्मा येथेच आहेत,हेच पतीतापासून पावन फरिश्ता बनतात,म्हणून परत ब्रह्मा देवता म्हटले जाते.ज्यामुळे देवी-देवता धर्माची स्थापना होते.हे बाबा पण देवी-देवता धर्माचे प्रथम राजकुमार बनतात.तर ब्रह्मा द्वारे स्थापना,शंकर द्वारे विनाश.हे चित्र तर द्यावे लागतील,हे चित्र तर समजवण्यासाठी बनवले आहेत,याचा अर्थ कोणालाही माहिती नाही.स्वदर्शन चक्राबद्दल पण समजवले आहे,परमपिता परमात्मा सृष्टीच्या आदी मध्य अंतला जाणतात,त्यांच्यामध्ये सर्व ज्ञान आहे.तर ते स्वदर्शन चक्रधारी झाले ना,मी हेच ज्ञान ऐकवतो.बाबा तर असे म्हणत नाहीत की, मला कमलफुल समान बनायचे आहे. सतयुगामध्ये तुम्ही कमलफुला समानच राहतो.संन्याशासाठी हे म्हणू शकत नाही,ते तर जंगलामध्ये चालले जातात.बाबा म्हणतात,प्रथम ते पवित्र सतोप्रधान असतात, भारताला पवित्रतेच्या शक्तीद्वारे वाचवतात. भारता सारखा पवित्र देश दुसरा कोणता असत नाही.जशी बाबांची महिमा आहे,अशीच भारताची पण महिमा आहे.भारतच स्वर्ग होता,हे लक्ष्मीनारायण राज्य करत होते,परंतु ते कुठे गेले? हे पण तुम्हीच जाणतात.दुसऱ्या कोणाच्या बुद्धीमध्ये थोडेच असेल की,हे देवताच ८४ जन्म घेऊन पुजारी बनतात.आता तुम्हाला सर्व ज्ञान आहे.आता तुम्हाला सर्व ज्ञान आहे,आम्हीच पूज्य देवी-देवता बनतो,परत पुजारी मनुष्य बनू.तर मनुष्य जे, वेगवेगळे चित्र बनवतात, असे कोणते मनुष्य नसतात.हे सर्व भक्तिमार्गाचे अनेक चित्र आहेत. तुमचे ज्ञान तर गुप्त आहे.हे ज्ञान सर्व घेणार नाहीत,जे देवी देवता धर्माची पानं असतील,तेच घेतील.बाकी जे दुसऱ्या धर्माला मानणारे असतील, ते ऐकणार नाहीत.शिव आणि देवतांची भक्ती करतात, तेच येतील. प्रथम माझी पूजा करतात, परत पुजारी बनून स्वतःची पण पूजा करतात.तर आता खुशी होते की,आम्ही पूज्यपासून पुजारी बनलो,आता परत पूज्य बनत आहोत.खूप खुशी वाटते. येथे तर अल्प काळासाठी खुशी मध्ये राहतात,स्वर्गामध्ये तर तुम्हाला नेहमीच खुशी राहते.दिवाळी लक्ष्मीला बोलवण्यासाठी नसते, राज्य राज्याभिषेकाच्या वेळेस दिपवाळी असते,बाकी यावेळेत जे उत्सव केले जातात,ते तेथे नसतात.स्वर्गामध्ये तर सुख आहे.या वेळेतच तुम्ही आदी मध्य अंतला जाणतात.हे सर्व ज्ञानाचे मुद्दे लिहा,संन्याशांचा हठयोग आहे,हा राजयोग आहे.बाबा म्हणतात प्रत्येक पेजमध्ये जिथे-तिथे शिवबाबाचे नाव जरूर लिहा.शिवबाबा आम्हा मुलांना समजवतात.निराकार आत्मे आत्ता साकारमध्ये बसले आहेत.तर बाबा पण साकार मध्ये समजावतील ना,ते म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, शिवभगवानुवाच मुलां प्रति.ते स्वतः उपस्थित आहेत ना.मुख्य मुख्य गोष्टी पुस्तकांमध्ये अशा स्पष्ट लिहा,जे वाचल्यानंतर स्वतःच ज्ञान समजेल. शिवभगवानुवाच लिहिल्यामुळे आनंद होईल,हे बुद्धीचे काम आहे ना.बाबा शरीर भाड्याने घेऊन परत ऐकवतात तर,यांची आत्मा पण ऐकते.मुलांना खूप नशा राहिला पाहिजे.बाबा वर खूप प्रेम असायला हवे.हा तर त्यांचा रथ आहे,हा अनेक जन्माचा अंतिम जन्म आहे,यांच्या मध्ये प्रवेश केला आहे. ब्रह्मा द्वारा हे ब्राह्मण बनतात, परत मनुष्यापासून देवता बनतात. चित्रा मध्ये खूप स्पष्ट आहे.खुशाल आपले चित्र द्या,वरती किंवा बाजूला दुहेरी मुकुट असलेले चित्र हवे.योग बळाद्वारे आम्ही असे बनतो.शिवबाबा वरतीआहेत,त्यांची आठवण करत-करत मनुष्या पासून देवता बनतो.खूप स्पष्ट आहे.रंगीत चित्राचे असे पुस्तक हवे,जे मनुष्य पाहून खूश होतील.त्या पासुन थोड्या कमीप्रतीचे,गरिबासाठी छापू शकतात.मोठ्या पासून छोटे,छोटया पासून छोटे करू शकतात,ज्यामध्ये सर्व रहस्य येतील.गीतेच्या भगवंताचे चित्र मुख्य आहे.त्या गीते वरती कृष्णाचे चित्र,तर या गीते वरती त्रिमूर्तीचे चित्र छापल्यामुळे मनुष्याला समजण्यामध्ये सहज होईल. प्रजापिता ब्रह्माची मुलं ब्राह्मण येथेच आहेत.प्रजापिता ब्रह्मा सूक्ष्मवतन मध्ये तर होऊ शकत नाहीत.ब्रह्मा देवतायं नम:,विष्णू देवताय नमः असे म्हणतात,आता देवता कोण झाले.देवता तर येथे राज्य करत होते,दैवी घराणे तर आहे ना. तर हे सर्व चांगल्या रीतीने समजून सांगावे लागते.ब्रह्माच विष्णू परत विष्णूच ब्रह्मा दोन्ही येथे आहेत.चित्र आहेत तर समजवले जाऊ शकते.प्रथम ईश्वराला सिद्ध करा तर सर्व गोष्टी आपोआप सिद्ध होतील. गोष्टी तर खूप आहेत आणि सर्व धर्म स्थापक, स्थापना करण्यासाठी येतात.बाबा तर स्थापना आणि विनाश दोन्ही करतात.सर्व वैश्विक नाटकं नुसारच होते.ब्रह्मा बोलू शकतात,विष्णू बोलू शकतात का?सूक्ष्मवतन मध्ये काय बोलतील?या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.येथे तुम्ही समजून परत परिवर्तन होतात.वरच्या वर्गांमध्ये जातात,खोली दुसरी मिळते.मूळ वतन मध्ये तर बसायचे नाही,परत तेथून क्रमानुसार येत राहायचे आहे. प्रथम मुख्य गोष्ट एकच आहे, त्यावरती जोर द्यायचा आहे.कल्पा पूर्वी पण असे झाले होते,हे संमेलन इत्यादी पण कल्पा पूर्वी झाले होते. असे ज्ञानाचे मुद्दे काढा.आजचा दिवस जो झाला,चांगले झाले,कल्पा नंतर पण असेच होईल.अशा प्रकारे आपली धारणा पक्की होत जाईल. बाबांनी म्हटले होते मासिकांमध्ये पण छापा,लढाई झाली होती,त्याच्यात नवीन काहीच नाही,पाच हजार वर्षांपूर्वी पण असेच झाले होते.या गोष्टी तुम्ही समजतात,दुसऱ्या देशातले समजू शकत नाहीत.ते म्हणतील या गोष्टी तर खूपच आश्चर्यकारक आहेत.अच्छा कधी येऊन आम्ही समजून घेऊ. शिवभगवानुवाच मुलं प्रति असे अक्षर लिहाल तर, येऊन समजून घेतील. प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी नाव तर लिहिले आहे ना.प्रजापिता ब्रह्मा द्वारे ब्राह्मणाची स्थापना करतात.ब्राह्मण देवी देवताय नमः म्हणतात.कोणते ब्राह्मण?तुम्ही ब्राह्मणांना पण समजावू शकता,की ब्रह्माची संतान कोण आहेत?प्रजापिता ब्रह्माची इतके मुलं आहेत,तर जरूर येथे दत्तक घेतले असतील. आपल्या कुळाचे असतील,ते चांगल्या रीतीने समजतील.तुम्ही तर बाबांची मुलं बनले आहात.बाबा ब्रह्माला पण दत्तक घेतात,नाहीतर शरीराची गोष्ट आली कोठून?ब्राह्मणच या गोष्टीला समजतील,संन्यासी समजणार नाहीत.अजमेर मध्ये ब्राह्मण असतात आणि हरिद्वारमध्ये सन्याशी असतात.पंडे ब्राह्मण असतात,परंतु ते तर भुकेले असतात.तुम्ही सांगा,तुम्ही तर शारीरिक पंडे आहात,आत्ता आत्मिक पंडे बना. तुमचे नाव पण पंडा आहे.पांडव सेनेला पण समजत नाहीत.बाबा पांडवाचे सिरमौर आहेत.ते म्हणतात मुलांनो माझीच आठवण करा,तर विकर्म विनाश होतील आणि आपल्या घरी चालले जाल,परत अमरपुरीची मोठी यात्रा होईल.मूळवतनची खूप मोठी यात्रा असेल.सर्व आत्मे जातील,जसे माशांचा झुंड असतो ना,माशांची राणी पण असते,तिच्या पाठीमागे सर्व जातात.हे आश्चर्य आहे ना.सर्व आत्मे पण मच्छरा सारखे जातील.शिवाची वरात आहे ना.तुम्ही सर्व सजनी आहात,मी साजन तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे.तुम्ही छी-छी बनले आहात,म्हणून श्रुंगार करून सोबत घेऊन जातो.जे शृंगार करणार नाहीत,ते सजा खातील.जायचे तर आहेच.काशी कलवट मध्ये मनुष्य मरतात,तर सेकंदांमध्ये खूप सजा खातात.मनुष्य ओरडत राहतात,हे पण असेच आहे.जसे समजतात,आम्ही जन्मजन्मांतर चे दुःख,सजा भोगत आहोत.तर दुःखाची जाणीव होते.जन्म जन्मांतरच्या पापाची सजा मिळते. जितके सजा खाल,तेवढे पद कमी होईल,म्हणून बाबा म्हणतात योगबळा द्वारे कर्मभोग चुक्तू करा. आठवणी द्वारे जमा करत चला,ज्ञान तर खूप सहज आहे.आता प्रत्येक कर्म ज्ञान युक्त करायचे आहे.दान पण पात्र पाहुन द्यायचे आहे.पाप आत्म्यांना दिल्यामुळे,परत त्याचा परिणाम होतो.ते पण पापत्मा बनतात. अशाना कधी दान द्यायचे नाही,जे त्या पैशाने परत कोणते पाप इत्यादी करतील.पाप आत्म्याला देण्यासाठी दुनियामध्ये खूप बसले आहेत.आता तुम्हाला असे करायचे नाही,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता प्रत्येक कर्म ज्ञान मुक्त करायचे आहे, पात्र व्यक्तीलाच दान द्यायचे आहे. पाप आत्म्या सोबत असतात, पैसे इत्यादीची देवाणघेवाण करायची नाही.योगबळा द्वारे सर्व जुने हिशेब चुक्तू करायचे आहेत.

२)अपार खुशी मध्ये राहण्यासाठी स्वतःसोबत गोष्टी करायचे आहेत. बाबा तुम्ही आले आहात,तर अपार खुशीच्या खजान्याद्वारे आमची झोळी भरत आहात.तुमच्या सोबत आम्ही प्रथम शांतीधाम जाऊ,परत आपल्या राजधानीमध्ये येऊ.

वरदान:-
कल्फ-कल्पाच्या विजयाच्या स्मृती आधारे माया दुश्मनाला आव्हान करणारे महावीर विजयी भव.

महावीर विजयी मुलं परीक्षेला पाहून घाबरत नाहीत,कारण त्रिकालदर्शी असल्यामुळे,ते जाणतात की आम्ही कल्प-कल्पाचे विजयी आहोत. महावीर कधी असे म्हणू शकत नाहीत की,बाबा आमच्या जवळ मायेला पाठवू नका,कृपा करा, आशीर्वाद करा,शक्ती द्या, काय करू, कोणता रस्ता दाखवा... ही पण कमजोरी आहे.महावीर दुश्मनाला आव्हान करतात की,या आणि आम्ही विजयी बनू .

बोधवाक्य:-
वेळेची सुचना आहे, समान बना आणि संपन्न बना.