20-08-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, स्वतःच्या संरक्षणा साठी विकार रुपी मायेच्या,तावडीतून नेहमी सुरक्षित राहा .देहअभिमाना मध्ये कधी पण येऊ नका."

प्रश्न:-
पुण्यात्मा बनण्यासाठी बाबा सर्व मुलांना कोणता मुख्य उपदेश देत आहेत?

उत्तर:-
बाबा म्हणतात,मुलांनो,पुण्यात्मा बनण्यासाठी(१)श्रीमतावर नेहमी चालत राहा. आठवणीच्या यात्रेमध्ये दुर्लक्ष करू नका.(२) आत्माभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करून, काम महाशत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे .हीच वेळ आहे, पुण्यात्मा बनून या दु:खधामा ला पार करून सुखधामा मध्ये जावयाचे आहे.
 

ओम शांती।
बाबा रोज मुलांना विचारत आहेत.शिवबाबा ना असे म्हणत नाहीत की, ते मूंलबाळं वाले आहेत.आत्मे तर अनादि आहेत.यावेळी जेव्हा बाबा आणि दादा दोन्ही आहेत, तेंव्हाच मुलांचा सांभाळ करावयाचा आहे.किती मुले आहेत, ज्यांचा सांभाळ करावा लागतो. प्रत्येकाचा जमाखर्च ठेवावा लागतो.जसे लौकिक पित्याला पण काळजी वाटत राहते ना. समजतात की आमचा मुलगा पण या ब्राह्मण कुळा मध्ये आला तर किती चांगले होईल. आमचीही मुलं पण पवित्र बनवून, पवित्र दुनियेमध्ये जातील.कुठे या जुन्या मायेच्या नाल्यां मध्ये वाहून जाऊ नयेत.बेहदच्या बाबाला पण मुलांची काळजी वाटते. किती सेंटर आहेत, कोणत्या मुलाला कोठे पाठवले, तर तो सुरक्षित राहील. आज-काल सुरक्षितता पण अवघड झाली आहे.जगा मध्ये कोठे पण सुरक्षितता नाही. स्वर्गा मध्ये तर प्रत्येकाची सुरक्षितता आहे.इथे कोणाची पण सुरक्षितता नाही. कोठे ना कोठे विकार रूपी मायेच्या तावडी मध्ये अडकतात. आता तुम्हां आत्म्यांना इथे शिक्षण मिळत आहे. सत्याचा संग पण इथेच आहे. इथेच दुखधामा पासून सुखधामा मध्ये जावयाचे आहे,कारण आता मुलांना माहीत झाले आहे की, दुःखधाम काय आहे, सुखधाम काय आहे. बरोबर आता दुखधाम आहे.आम्ही पाप फार केले आहे, आणि तेथे पुण्य आत्मे राहत आहेत. आम्हाला आता पुण्यात्मा बनायचे आहे. आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या ८४ जन्माचा इतिहास भूगोल जाणता. दुनिये मधील कोणी पण ८४ जन्माचा इतिहास भूगोल ओळखत नाही. आता बाबांनी येऊन सारी जीवन कहाणी सांगितली आहे. आता तुम्ही जाणता की, आम्हाला पूर्ण पुण्यात्मा बनायचे आहे, आठवणीच्या यात्रे द्वारे. यामध्ये फार धोका खातात,दुर्लक्ष केल्यामुळे. बाबा म्हणतात की, यावेळी दुर्लक्ष करणे चांगले नाही. श्रीमता वर चालवायचे आहे. यामध्ये पण मुख्य गोष्ट आहे,एकतर आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे, दुसरे काम महाशत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. बाबाला सर्व बोलतात कारण त्यांचे कडून सुख शांतीचा वरसा मिळतो, सर्व आत्म्यांना. पूर्वी देहाभिमानी होतो, तर कांही पण माहीत नव्हते. आता मुलांना आत्माभिमानी बनविले जाते.नवीन जे येतात त्यांना पहिल्या प्रथम एक हदचे आणि दुसरे बेहदच्या पित्याचा परिचय द्यायचा आहे. बेहदच्या बाबा कडून स्वर्ग नशिबा मध्ये आहे्. हदच्या पित्याकडून नर्क नशिबामध्ये आहे.मुलगा जेव्हा मोठा होतो तर प्रॉपर्टीचा हक्कदार बनतो. जेंव्हा समज येते मग हळूहळू मायेच्या अधीन बनत जातात. हा सर्व रावण राज्याचा( विकारी दुनियेचा) रितीरिवाज आहे. आता तुम्ही मुले जाणता की, ही दुनिया बदलत आहे. या जुन्या जगाचा विनाश होणार आहेत.एका गीतेमध्येच विनाशाचे वर्णन आहे,आणखीन कोणत्या शास्त्रांमध्ये महाभारत महाभारी लढाईचे वर्णन नाही. गीतेचे हे आहेच पुरुषोत्तम संगमयुग.गीतेचे युग म्हणजे आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना. गीता आहेच देवी-देवता धर्माचे शास्त्र. तर हे गीतेचे युग आहे, जेंव्हा नवीन दुनिया स्थापन होत आहे. मनुष्यांना पण बदलायचे आहे. मनुष्या पासून देवता बनायचे आहे. नवीन दुनियेमध्ये जरूर दैवी गुणाचे मनुष्य पाहिजेत ना. या गोष्टीला दुनिया ओळखत नाही. त्यांनी कल्पाच्या आयुष्याची वेळ फार दिलेले आहे. आता तुम्हा मुलांना बाबा समजावत आहेत की, तुम्ही समजता की, बरोबर आम्हाला बाबा शिकवत आहेत. कृष्णा ला कधी कोणी पिता, शिक्षक, गुरु म्हणू शकत नाहीत.कृष्ण शिक्षक असेल तर तो शिकला कोठून? त्यांना ज्ञानाचे सागर म्हटले जाऊ शकत नाही.

आता तुम्हां मुलांना मोठ मोठ्यांना समजावयाचे आहे. एकमेकाला भेटून विचार विनीमय करावयाचा आहे कि, सेवेमध्ये वाढ कशी होईल.विहंग मार्गाची सेवा कशी होईल. ब्रह्मकुमारी साठी एवढा गोंधळ करतात, मग समजतील की, याच खऱ्या आहेत.बाकी दुनिया तर खोटी आहे, त्यामुळे खऱ्या नावेला हालवत राहतात. तुफान तर येत आहेत ना. तुम्हीं नाव आहात,जी पलीकडच्या तीरावर न्यावयाची आहे.तुम्ही जाणता की, आम्हाला या मायावी दुनियेपासून पार जायचे आहे.सर्वात पहिल्या क्रमांकाचे तुफान येते देहाभिमानाचे. हे सर्वात वाईट आहे.यांनी सर्वांना पतित बनवले आहे. त्यामुळे तर बाबा म्हणतात,काम महाशत्रू आहे. ते जसे की, फार वेगवान वादळ आहे. कोणी तर यावर विजय प्राप्त पण करत आहेत. गृहस्थ व्यवहारां मध्ये राहणारे पण प्रयत्न करतात, स्वतःला वाचवण्याचा.कुमार कुमारी साठी तर फारच सोपे आहे ,त्यामुळे नाव पण गायले जाते की, कन्हैया. एवढ्या कन्या जरूर शिवबाबाच्या असतील. देहधारी कृष्णाच्या तर एवढ्या कन्या होऊ शकत नाहीत.आता तुम्ही या शिक्षणाद्वारे पटरानी बनत आहात. यामध्ये पवित्रता आहे मुख्य. स्वतःच स्वतःला पाहायचे आहे की, आठवणीचा चार्ट ठीक आहे? बाबा जवळ कोणाचा ५ तासाचा कोणाचा २-३ तासाचा चार्ट येतो. कोणी तर लिहीतच नाहीत.फार कमी आठवण करतात.सर्वांची आठवणीची यात्रा एकरस होऊ शकत नाही. आणखीन पुष्कळ मुलांची वाढ होणार आहे.प्रत्येकाला आपला चार्ट पाहायचा आहे, मी कोणते पद प्राप्त करू शकेल? किती खुशी मध्ये आहे? आम्हाला नेहमी खुशी का राहणार नाही. जेंव्हा कि उंच ते उंच बाबाचे बनले आहोत. विश्वनाटका नुसार तुम्ही भक्ती फार केली आहे. भक्तांना फळ देण्यासाठी बाबा आले आहेत. रावण राज्यांमध्ये विकर्म तर होत आहेत. तुम्ही पुरुषार्थ करत आहात, सतोप्रधान दुनियेमध्ये जाण्यासाठी. जे पुर्ण पुरुषार्थ करणार नाहीत ते सतो मध्ये येतील. सर्व थोडेच ऐवढे ज्ञान घेतील. संदेश जरूर ऐकतील.जरी कोठे पण असले तरी, त्यामुळे सर्वत्र जावयाचे आहे.विलायत मध्ये पण मिशन गेली पाहिजे. जशी बुद्धांची, ख्रिश्चनांची इथे मिशन आहे ना. दुसऱ्या धर्मातील लोकांना,आपल्या धर्मांमध्ये आणण्याची मिशन आहे. तुम्ही समजता की, आम्ही मूळ देवी-देवता धर्माचे आहोत. आता हिंदू धर्माचे बनलो आहोत.तुमच्याजवळ फार करून हिंदूधर्म वालेच येतील. त्यामध्ये पण जे शिवाचे, देवतांचे पुजारी आहेत ते येतील. जसे बाबाने म्हटले आहे, राजांची सेवा करा, ते बहुतांश देवतांचे पुजारी आहेत. त्यांच्या घरांमध्ये पण मंदिर असते. त्यांचे पण कल्याण करावयाचे आहे. तुम्ही पण समजा की, आम्ही बाबा बरोबर दूर देशातून आले आहोत. बाबा आले आहेत नवीन दुनिये ची स्थापना करण्यासाठी. तुम्ही पण करत आहात. जे स्थापना करतात तेच पालना पण करतात. आतून नशा राहिला पाहिजे, आम्ही शिवबाबा बरोबर आले आहोत, दैवी राज्य स्थापन करण्यासाठी,साऱ्या विश्वाला स्वर्ग बनवण्यासाठी. आश्चर्य वाटते की,या देशांमध्ये काय काय करत आहेत. पूजा कशी करतात. नवरात्रीमध्ये देवींची पूजा होत आहे ना. रात्र आहे तर दिवस पण आहे. तुमचे एक गीत पण आहे ना,काय कौतुक पाहिले. . . मातीचा पुतळा बनवला, शृंगार करून त्याची पूजा करतात. त्यांच्यामध्ये मग मन इतके लागते की, जेंव्हा त्यांना पाण्यामध्ये बुडवतात, त्यावेळी रडतात.मनुष्य जेंव्हा मारतात,तेंव्हा त्याची अर्थी पण घेऊन जातात. हरिबोल हरिबोल म्हणून बुडवतात. जातात तर फार ना. नदी तर नेहमीच आहे. तुम्ही जानता की, हा यमुनेचा काठ होता,जिथे रास विलास इत्यादी करत होतो. तेथे तर मोठ मोठे महल असतात. तुम्हांलाच जाऊन बनवायचे आहेत.जेंव्हा कोणी मोठी परीक्षा पास करतात, तेंव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये येते की, पास होऊन मग हे करू, घर बांधू. तुम्हां मुलांना पण विचार येतो की आम्ही देवता बनत आहोत. आता आम्ही आमच्या घरी जाऊ. घराची आठवण आल्यामुळे खुशी झाली पाहिजे. मनुष्य याञा करून घरी आले, तर त्यांना खूशी होते ना. आता आम्ही घरी जात आहोत. जिथे जन्म झाला होता. आम्हां आत्म्यांचे पण घर आहे मूळवतन. किती खुशी झाली पाहिजे. मनुष्य किती भक्ती करतात मुक्तीसाठी. परंतु विश्व नाटकांमध्ये भूमिकाच अशी आहे, त्यांना परत घरी जाणे होत नाही. तुम्हीं ओळखले आहे की, त्यांना अर्धाकल्पा साठी भूमिका जरूर बजावायची आहे. आता आमचे ८४ जन्म पूर्ण झाले आहेत.आता परत घरी जायचे आहे आणि मग राजधानी मध्ये यायचे आहे. फक्त घर आणि राजधानी ची आठवण यावी. इथे बसले तरी कोणा कोणाला आपले कारखाने इ.ची आठवण येते. जसे पहा, बिर्ला आहेत, किती त्यांचे कारखाने आहेत. सारा दिवस त्यांचे विचार चालत असतात. त्यांना म्हटले, बाबाची आठवण करा, तर त्यांना किती अवघड वाटते. वारंवार धंद्याची आठवण येत राहील. सर्वात सोपे आहे माता ना, त्यामध्ये पण कन्या ना.जिवंतपणी मारायचे आहे,साऱ्या जगाला विसरायचे आहे. तुम्हीं स्वतःला आत्मा समजून, शिवबाबाचे बनता, यालाच जिवंतपणी मेले म्हटले जाते.देहासहीत देहाचे सर्व संबंध सोडून, स्वतःला आत्मा समजून, शिवबाबा चे बनायचे आहे. शिवबाबाची आठवण करत राहायचे आहे, कारण पापांचे ओझे डोक्यावर फार आहे. मनातून तर सर्वांना वाटते,आम्ही जिवंतपणी मरुन, शिवबाबाचे बनू. शरीराचे भान राहू नये.आम्ही अशरीरी आलो होतो, मग अशरीर होऊन जायचे आहे.बाबाचे बनले आहोत तर बाबा शिवाय कोणाची आठवण येऊ नये. असे लवकर झाले तर मग लढाई पण लवकर लागेल. बाबा किती समजावत आहेत आम्ही तर शिवबाबाचे आहोत ना.आम्ही तेथील राहणारे आहोत. इथे तर किती दुःख आहे.आता हा शेवटचा जन्म आहे. बाबा ने सांगितले आहे की, तुम्ही सतोप्रधान होता तर इतर कोणी पण नव्हते. तुम्ही किती सावकार होता.जरी या वेळी पैसे आहेत, परंतु हे तर कांही नाहीत,कवड्या आहेत. हे सर्व अल्पकाळाचे सुखासाठी आहे.बाबानी समजावले आहे, पूर्वी दान पुण्य केले असेल,तर पैसा पण फार मिळतो. मग दान करतात. परंतु ही आहे एका जन्माची गोष्ट. इथे तर जन्मजन्मांतरा साठी सावकार बनायचे आहे.जेवढे मोठे म्हणून घ्यावयाची आहे, तेवढे मोठे दुःख प्राप्त होते.ज्यांच्या जवळ फार धन आहे,ते तर फारच फसलेले आहेत. इकडे येऊ शकणार नाहीत.कोणी साधारण गरीबच समर्पित होतात.सावकार कधी येणार नाहीत. ते कमावतातच आपल्या मुलांसाठी नातवांसाठी, ज्यामुळे आपले कूळ चालत राहील. स्वतः त्या घरामध्ये येणार नाहीत. मुले-नातवंडे येतील, ज्यांनी चांगले कर्म केले आहे. जसे कोणी फार दान केले,तर ते राजा बनतात. परंतु नेहमी निरोगी तर राहत नाही. राज्य मिळाले तर काय झाले, अविनाशी सुख तर नाही. इथे तर पावलो पावली अनेक प्रकारची दुःखे आहेत.तिथे ही सर्व दुःखे दूर होऊन जातात.बाबाला बोलावता तच की, आमची दुःखे दूर करा. तुम्ही समजता की, सर्व दुःखे दूर होणार आहेत. फक्त बाबाची आठवण करत रहा. शिवाय एका बाबाच्या आणखीन कोणाकडून वर्सा मिळू शकत नाही. बाबा साऱ्या विश्वाचे दुःख दूर करत आहेत.यावेळी तर जानवर इत्यादी पण किती दु:खी आहेत. हे आहेच दुःखधाम.दु:ख वाढत जात आहे.तमोप्रधान बनत जात आहेत. आता आम्ही संगमयुगा वर बसलो आहे.ते सर्व कलियुगा मध्ये आहेत. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग .बाबा आम्हाला पुरुषोत्तम बनवत आहेत. ही आठवण राहिली,तरी पण खुशी राहील. भगवान शिकवत आहेत, विश्वाचे मालक बनवत आहेत.अशी आठवण करत राहा. त्यांची मुले भगवान भगवती झाली पाहिजेत ना या शिक्षणाद्वारे. भगवान तर सुख देणारे आहेत मग दु:ख कसे मिळत आहे? ते पण बाबा बसून समजावत आहेत. भगवानाची मुले मग दुःखा मध्ये का आहेत, भगवान दु:खहर्ता सुखकर्ता आहे, तर जरूर दुःखामध्ये येतात, त्यामुळे तर गायन केले जाते. तुम्हीं जाणता की, बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. आम्ही पुरुषार्थ करत आहोत. यामध्ये संशय थोडाच आला पाहिजे. आम्ही बी. के. राजयोग शिकत आहोत. खोटे थोडंच बोलतो.कोणाला हा संशय आला तर समजावले पाहिजे की, हे तर शिक्षण आहे. विनाश समोर उभा आहे.आम्ही आहोत संगमयुगी ब्राह्मण शेंडी. प्रजापिता ब्रह्मा आहेत तर जरूर ब्राह्मण पण असले पाहिजेत. तुम्हाला पण समजावले आहे, तेव्हा तर निश्चित झाला आहे. मुख्य गोष्ट आहे आठवणी ची यात्रा, त्यामध्येच विघ्न पडतात.स्वतःचा चार्ट पाहत रहा,किती वेळ बाबाची आठवण करत आहोत, कुठपर्यंत खुशीचा पारा चढला आहे? ही आंतरिक खुशी राहिली पाहिजे कि, आम्हाला बागवान पतित-पावनाची साथ मिळाली आहे,आम्ही शिवबाबा ना ब्रह्माबाबा द्वारे हस्तांदोलन करत आहोत. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति, मात-पिता, बापदादाची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आपले घराला आणि राजधानीला आठवण करून, अपार खुशी मध्ये राहायचे आहे. नेहमी आठवणीत ठेवा, आता आमची यात्रा पूर्ण झाली आहे. आम्ही जातो आमच्या घरी, मग राजधानीमध्ये येतो.

(२) आम्ही शिवबाबा ना ब्रह्माबाबा द्वारे हस्तांदोलन करत आहोत, ते बागवान आम्हाला पतीता पासून पावन बनवत आहेत.आम्ही या शिक्षणाद्वारे स्वर्गाची पटराणी बनत आहे.या आंतरिक खुशी मध्ये राहायचे आहे.

वरदान:-
अव्याभिचारी आणि निर्विघ्न स्थिती द्वारे, पहिल्या जन्मांची प्रालब्ध प्राप्त करणारे जवळचे आणि समान भव:

जी मुले येथे बाबांचे गुण आणि संस्कारां मध्ये जवळ आहेत, सर्व संबंधाने बाबाच्या बरोबर आणि जवळीकतेचा अनुभव करतात, तेच तेथे उत्तम कुळामध्ये पहिल्या जन्मात, जवळच्या संबंधांमध्ये येतात. पहिल्यांदा तेच येतील जे आधीपासून अंतापर्यंत अव्यभिचारी आणि निर्विघ्न आहेत.निर्विघ्न चा अर्थ हा नाही की विघ्न येणारच नाहीत, परंतु विघ्नविनाशक म्हणजे विघ्नांवर नेहमी विजयी होणारे. या दोन्ही गोष्टी आधी पासून अंतापर्यंत ठीक आहेत,तर पहिल्या जन्मांमध्ये बरोबर येतील.
 

बोधवाक्य:-
शांतीच्या शक्तीद्वारे नकारात्मकतेला, सकारात्मकते मध्ये परिवर्तन करा .