25-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, कधी थकून आठवणीची यात्रा सोडायची नाही. नेहमी देहीअभिमानी राहण्याचा
प्रयत्न करा. बाबाचे प्रेम प्राप्त करण्यासाठी किंवा गोड बनण्यासाठी, आठवणीच्या
यात्रेमध्ये राहा."
प्रश्न:-
१६ कला
संपूर्ण किंवा उत्कृष्ठ बनण्यासाठी कोणता पुरुषार्थ जरूर करायचा आहे?
उत्तर:-
जेवढे होईल तेवढे स्वतःला आत्मा समजा. प्रेमाचे सागर शिवबाबाची आठवण करा तर
उत्कृष्ठ बनाल. ज्ञान फार सोपे आहे, परंतु १६ कला संपूर्ण बनण्यासाठी आठवणी द्वारे
आत्म्याला निर्दोष बनवायचे आहे.आत्मा समजल्यामुळे गोड बनत जाल. सर्व कटकटी समाप्त
होऊन जातील.
गीत:-
तू प्यार का
सागर है. . .
ओम शांती।
प्रेमाचे सागर शिवबाबा, आपल्या मुलांना पण असे प्रेमाचे सागर बनवत आहेत. मुलांचे
मुख्य लक्ष्य आहे की, आम्ही असे लक्ष्मी नारायण बनू. यांचेवर सर्व किती प्रेम करतात.
मुले जाणतात की, बाबा आम्हाला यांच्यासारखे गोड बनवत आहेत. गोड इथेच बनायचे आहे आणि
बाबाच्या आठवणी द्वारेच बनाल. भारताच्या योगाची महिमा आहे, ही आहे आठवण. या आठवणी
द्वारे तुम्ही यांच्या सारखे, विश्वाचे मालक बनत आहात. हेच मुलांना कष्ट घ्यायचे
आहेत. तुम्हीं या घमंडी मध्ये राहू नका की, आम्हाला ज्ञान फार आहे. मूळ गोष्ट आहे
आठवण. आठवणच प्रेम देत आहे. फार गोड, फार प्रिय बनू इच्छित असाल, उंच पद प्राप्त करू
इच्छिता, तर मेहनत करा. नाहीतर फार पश्चाताप कराल, कारण फार मुले आहेत, ज्यांच्या
कडून आठवण पोहोचत नाही, थकून जातात तर सोडून देतात.एक तर देहअभिमानी बनण्यासाठी फार
प्रयत्न करा. नाहीतर फार कमी पद प्राप्त कराल. एवढे गोड कधी होणार नाहीत.फार थोडी
मुले आहेत, जी आकर्षित करतात, कारण ते आठवणी मध्ये राहत आहेत. फक्त बाबांची आठवण
पाहिजे. जेवढी आठवण कराल, तेवढे फार गोड बनाल. या लक्ष्मी नारायण ना नी पण
पूर्वीच्या जन्मा मध्ये फार आठवण केली आहे. आठवणी मुळेच गोड बनले आहेत. सतयुगा तील
सूर्यवंशी प्रथम क्रमांका मध्ये आहेत, चंद्रवंशी दुसऱ्या क्रमांका मध्ये येतात.हे
लक्ष्मी नारायण फार प्रिय आहेत. या लक्ष्मी नारायणाचे चेहरे आणि राम-सीतेच्या
चेहऱ्यामध्ये फार फरक आहे.या लक्ष्मी नारायणाचे नावावर कधी कोणता कलंक लागलेला नाही.
कृष्णावर चुकीचे कलंक लावले आहेत, राम सीते वर पण लावले आहेत.
बाबा म्हणतात की, फार गोड तेंव्हा बनाल जेंव्हा समजाल कि, मी आत्मा आहे. आत्मा
समजून बाबांची आठवण करण्यामध्ये फार मजा आहे. जेवढी आठवण कराल, तेवढे सतो प्रधान १६
कला संपूर्ण बनाल.१४ कला मध्ये तरी पण दोष आहेत.१६ कला संपूर्ण बनायचे आहे. ज्ञान
तर फार सोपे आहे. कोणी पण शिकू शकतात. ८४ जन्म कल्प, कल्प घेत आले आहात. आता परत घरी
तर कोणी जाऊ शकत नाही, जो पर्यंत पूर्ण पवित्र बनले नाहीत. नाहीतर सजा खावी लागते.
बाबा वारंवार समजावत आहेत, जेवढे होईल तेवढे पहिल्याप्रथम ही एकच गोष्ट पक्की करा
कि, मी आत्मा आहे. आम्ही आत्मा आमचे घरी राहत होतो, तेंव्हा आम्ही सतोप्रधान होतो,
नंतर येथे जन्म घेतो.कोणी किती जन्म, कोणी किती जन्म घेतात, शेवटी तमोप्रधान बनतात.
दुनियेची ती इज्जत कमी होत जाते.नवीन घर असते तर त्या मध्ये किती आराम वाटतो. नंतर
दोष झाल्यामुळे, कला कमी होत जातात. जर तुम्हा मुलांना वाटते कि,उत्कृष्ट
दुनियेमध्ये जायचे आहे तर उत्कृष्ट बनायचे आहे. फक्त ज्ञानाला उत्कृष्ट म्हटले जात
नाही. आत्म्याला उत्कृष्ट बनवायचे आहे.जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न करा- मी आत्मा
आहे, बाबाचा मुलगा आहे. मनातून फार खुशी झाली पाहिजे. मनुष्य स्वतःला देहधारी समजून
खूष होत आहेत. मी आमक्या चा मुलगा आहे. . . तो आहे अल्पकाळाचा नशा. आता तुम्हा
मुलांना शिवबाबा बरोबर पूर्ण बुद्धी लावायची आहे, यामध्ये गोंधळून जायचे नाही. जरी
विलायत मध्ये, कोठे पण जावा, फक्त एक गोष्ट पक्की करा कि, बाबांची आठवण करायची आहे.
बाबा प्रेमाचे सागर आहेत. ही महिमा कोणत्यां मनुष्याची नाही. आत्मा आपल्या पित्याची
महिमा करत आहे. आत्मे सर्व आपसामध्ये भाऊ भाऊ आहेत. सर्वांचा पिता एक आहे. बाबा
सर्वांना म्हणतात कि. मुलांनो, तुम्हीं सतोप्रधान होता, आता तमोप्रधान बनले आहात.
तमोप्रधान बनल्यामुळे, तुम्हीं दुःखी झाले आहोत. आता माझ्या आत्म्याला परमात्मा पिता
म्हणतात कि,तुम्ही प्रथम संपूर्ण होते. सर्व आत्मे तेथे संपूर्ण होते. जरी भूमिका
वेगळी वेगळी असली,तरी संपूर्ण तर आहात ना.पवित्रते शिवाय तर तेथे कोणी जाऊ शकत नाही.
सुखधाम मध्ये तुम्हाला सुख पण आहे, तर शांती पण आहे, त्यामुळे तुमचा उंच ते उंच
धर्म आहे. भरपूर सुख राहते. विचार करा,आम्ही काय बनत आहोत. स्वर्गाचे मालक बनत आहोत.
तो आहे हिऱ्या सारखा जन्म. आता तर कवडी सारखा जन्म आहे. आता बाबा इशारा देत आहेत,
आठवणी मध्ये राहाण्याचा. तुम्ही बोलवताच कि,आम्हाला येऊन पतिता पासून पावन बनवा.
सतयुगा मध्ये आहेत संपूर्ण निर्विकारी. राम सीतेला पण संपूर्ण म्हणत नाहीत.ते
दुसऱ्या नंबर मध्ये गेले आहेत. आठवणीच्या यात्रे मध्ये पास झाले नाहीत. ज्ञानामध्ये
जरी किती पण तीव्र आहात,तरी पण बाबाला गोड वाटणार नाहीत. आठवणीं मध्ये राहाला, तरच
गोड बनाल. मग बाबा पण तुम्हाला गोड वाटतील.शिक्षण तर फारच सापे आहे, पवित्र बनायचे
आहे, आठवणी मध्ये राहायचे आहे. हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, मग ही जी कुठे-कुठे
कटकटी होत आहेत,अहंकार येतो, ते कधीही होणार नाहीत,यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये
राहयचे आहे. मूळ गोष्ट आहे, स्वतःला आत्मा समजून, बाबांची आठवण करणे. दुनियेमध्ये
मनुष्य किती भांडण तंटे करतात. जीवन जसे विषा समान करून टाकले आहे.असे अक्षर सतयुगा
मध्ये असत नाहीत.पुढे चालून मनुष्याचे जीवन आणखीनच विषारी होऊन जाईल. हे आहेच विषय
सागर.रौरव नरकामध्ये सर्व पडले आहेत, फार खराब आहेत. दिवसेंनुदिवस घाण वाढतच
राहते.याला म्हटले जाते खराब दुनिया. एक-दोघांना दुःख देत राहतात, कारण देहअभिमानाचे
भूत आहे. काम विकाराचे भूत आहे. बाबा म्हणतात कि, या भुतांना पळवून लावा. हे भूतच
तुमचे काळे तोंड करत आहेत. काम चितेवर बसल्यामुळे काळे बनले आहात, तेंव्हा बाबा
म्हणतात, मी येऊन ज्ञान अमृताचा पाऊस पाडत आहे.आता तुम्ही काय बनत आहात! तेथे तर
हिऱ्याचे महल असतात, सर्व प्रकारचे वैभव असते.इथे तर सर्व मिलावटी वस्तू आहेत.
गाईचे खाणे पहा, सर्वां मधून सार काढून, बाकीचे तिला देत आहेत. गाईला खायला पण ठीक
मिळत नाही. कृष्णाच्या गाई पहा कशा चांगल्या दाखवतात. सतयुगा मध्ये गाई अशा असतात,
कांही विचारू नका. पाहिल्या मुळे प्रसन्नता येते. इथे तर प्रत्येक वस्तू मधून सुगंध
काढला जातो.ही फार छी-छी दुनिया आहे. तुम्हाला याच्याशी मन लावायचे नाही. बाबा
म्हणतात, तुम्ही किती विकारी बनले आहात. लढाई मध्ये कसे एक-दोघांना मारून टाकतात.
अणुबाम्ब बनविणाऱ्याचा किती मान आहे, त्यामुळे सर्वांचा विनाश होतो. बाबा सांगत
आहेत, आजचा मनुष्य कसे झाले आहेत,उद्या कसे असतील ? आता तुम्ही आहात मध्या मध्ये.
संग तारतो कुसंग बुडवतो.तुम्ही पुरुषोत्तम बनण्यासाठी बाबाचा हात धरला आहे. कोणी
पोहायला शिकतात तर शिकवणाऱ्याचा हात पकडतात. नाही तर घुटका खातात, यामध्ये पण हात
पकडायचा आहे. नाही तर माया आकर्षित करत राहते. तुम्ही या साऱ्या विश्वाला स्वर्ग
बनवत आहात. स्वतःला नशेमध्ये ठेवायचे आहे. तुम्ही श्रीमतावर स्वतःची राजधानी स्थापन
करत आहात. सर्व मनुष्यमात्र दान तर करतात. फकीरांना देत आहेत.तीर्थयात्रे वर
पंडीताना दान देतात,तांदळाची मुठी पण दान जरूर करतात. हे सर्व भक्ती मार्गा मध्ये
चालत आले आहे.आता बाबा आम्हाला डबल दानी बनवत आहेत. बाबा म्हणतात, तीन पावले
पृथ्वीवर तुम्ही हे विद्यापीठ, ईश्वरीय दवाखाणा उघडा, यामध्ये मनुष्य येऊन २१
जन्मासाठी सुख प्राप्त करतील.इथे तर कसले कसले आजार होत आहेत. आजारां मध्ये किती
दुर्गंध येतो.हॉस्पिटल मध्ये पहा, तर घृणा येते. कर्मभोग किती आहे. या सर्व
दुःखापासून सुटण्यासाठी बाबा म्हणतात, फक्त आठवण करा,दुसरा कोणता त्रास तुम्हाला
देत नाहीत. बाबा जाणतात कि, मुलांनी फार त्रास घेतला आहे.विकारी मनुष्यांचा चेहराच
बदलून जातो. एकदम जसा मृतवत बनतात. जसा दारूडा दारू शिवाय राहू शकत नाही. दारूमुळे
फार नशा चढते, परंतु ते अल्पकाळासाठी आहे. यामुळे विकारी मनुष्याचे आयुष्य पण किती
थोडे होते. निर्विकारी देवतांचे आयुष्य सरासरी १२५ ते १५० वर्षे राहते. नेहमी निरोगी
राहिल्यामुळे आयुष्य पण वाढत राहते. निरोगी काया होऊन जाते. बाबाला अविनाशी सर्जन
पण म्हटले जाते. ज्ञान इंजेक्शन सद्गुरु ने दिले,अज्ञान अंधेरा विनाश.बाबाला ओळखत
नाहीत,त्यामुळे अज्ञानाचा अंधार म्हटले जाते, भारतवासींयांची गोष्ट आहे.ख्रिस्ताला
तर ओळखतात कि,अमूक संवतमध्ये आले .त्यांची सारी यादी आहे.कसे क्रमाने पोप गादीवर
बसतात. एकच भारत असा आहे, जे कोणाचे चरित्र ओळखत नाहीत,बोलावतात पण की दु:खहर्ता
सुखकर्ता परमात्मा, हे मात पिता. . . बरं, मात पित्यांचे चरित्र तर सांगा, कांही पण
जाणत नाहीत.
तुम्ही जाणता कि, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. आता आम्ही पुरुषोत्तम बनत आहोत,तर
पूर्ण शिकले पाहिजे. लोक लाज कुळाची मर्यादे मध्ये अनेक जण अडकले आहेत. या बाबांनी
तर कोणाची पण पर्वा केली नाही. किती शिव्या इ. खाल्ल्या, ना मनात ना चिता मध्ये
होते,रस्त्याने चालता चालता ब्राह्मण फसला. बाबाने ब्राह्मण बनवले तर शिव्या खाव्या
लागल्या. सारी पंचायत एकीकडे, तर दादा दुसरी कडे. सारी सिंधी पंचायत म्हणत होती की,
हे काय करत आहात! अरे, गीतेमध्ये भगवानुवाच आहे ना, काम महाशत्रू आहे, यावर विजय
प्राप्त केल्याने विश्वाचे मालक बनाल. हे तर गीतेतील अक्षर आहेत.माझ्या द्वारे पण
कोणी सांगत आहे की, काम विकाराला जिंकल्याने तुम्ही जगतजीत बनाल. या लक्ष्मी
नारायणाने पण विजय प्राप्त केला आहे ना. यामध्ये लढाई इ.ची काहीच गोष्ट
नाही.तुम्हाला स्वर्गाची बादशाही देण्यासाठी आलो आहे. आता पवित्र बना आणि बाबाची
आठवण करा.पत्नी म्हणते मी पवित्र बनेल,पती म्हणतो मी बनणार नाही. एक हंस एक बगळा
होऊन जातात.बाबा येऊन ज्ञान रत्न टिपणारे हंस बनवतात. परंतु एक बनतो दुसरा बनत नाही,
तर भांडण सुरू होते. सुरुवातीला तर फार ताकत होती. आता एवढी हिंमत कोणामध्ये नाही.
जरी म्हणतात आम्ही वारस आहोत परंतु वारस बनण्याची गोष्ट वेगळी आहे. सुरुवातीला तर
कमाल होती.मोठ मोठ्या घरातील झटक्यात सोडून आले, वारसा घेण्यासाठी. तर ते लायक बनले.
प्रथम येणारांनी तर कमाल केली. आता असे कोणी विरळे निघतील.लोकलाज फार आहे.प्रथम जे
आले त्यांनी फार हिंमत दाखवली्. आता कोणी एवढे साहस ठेवेल, फार कठीण आहे.होय, गरीब
ठेऊ शकतात. माळेचा माणका बनायचे आहे, तर पुरषार्थ केला पाहिजे. माळा तर फार मोठी आहे.८
ची पण आहे, १०८ ची पण आहे,मग १६१०८ ची पण आहे. बाबा स्वतः म्हणतात की, फार फार
मेहनत करा. स्वतःला आत्मा समजा, खरे सांगत नाहीत. चांगले चांगले जे स्वतःला समजत
आहेत, त्यांच्याकडून पण विकर्म होत आहेत. जरी ज्ञानी तू आत्मा आहेत.त्यांचे समजावणे
चांगले आहे, परंतु योग नाही, ते ह्रदयामध्ये बसत नाहीत. आठवणी मध्येच राहत नाहीत,
तर ह्रदयावर पण बसत नाहीत.आठवणी द्वारेच आठवण येईल ना. सुरुवातीला झटक्यात समर्पित
झाले.आता समर्पित होणे, मावशीचे घर नाही. मूळ गोष्ट आहे आठवण, तेंव्हाच खुशीचा पारा
चढेल. जेवढ्या कला कमी होत गेल्या, तेवढे दुःख वाढत गेले आहे. आता मग जेवढ्या कला
वाढतील,तेवढा खुशीचा पार चढेल.शेवटी तुम्हाला सर्व साक्षात्कार होतील. जास्त आठवण
करणाराला काय पद मिळत आहे. शेवटी फार साक्षात्कार होतील. जेव्हा विनाश होईल, तेंव्हा
तुम्ही स्वर्गाच्या साक्षात्काराचा हलवा खाल. बाबा वारंवार समजावत आहेत, बाबाची
आठवण वाढवा. कोणाला थोडे समजावले, यामध्ये बाबा खुश होत नाहीत, एका पंडिताची पण
गोष्ट आहे ना. स्वतः म्हणतो, राम राम म्हटल्याने सागर पार होऊन जाऊ. हे दाखवितात
कि, निश्चया मध्ये विजय आहे. बाबा मध्ये संशय आल्याने विनशंती होऊन जातात. बाबाच्या
आठवणी मुळेच पाप नष्ट होतील, रात्रंदिवस प्रयत्न केले पाहिजेत. मग कर्म़ेद्रियाची
चंचलता बंद होऊन जाईल. यामध्ये फार मेहनत आहे.फार आहेत ज्यांचा आठवणीचा चार्ट नाही.
म्हणजे पायाच नाही. जेवढे होईल तेवढे कशी पण आठवण करायची आहे, तरच सतोप्रधान,१६ कला
बनाल. पवित्रते बरोबर आठवणी ची यात्रा पण पाहिजे.पवित्र राहिल्यामुळेच आठवणी मध्ये
राहू शकाल. हे मुद्दे चांगल्या रीतीने धारण करा. बाबा किती निरहंकारी आहेत. पुढे
चालून तुमच्या पायावर सर्व झुकतील. म्हणतील, बरोबर, या माता स्वर्गाचे द्वार उघडत
आहेत.आठवणीची धार आता कमी आहे. कोणत्या पण देहधारी ची आठवण करायची नाही. तमोप्रधान
पासून सतोप्रधान बनण्याची मेहनत करायची आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात-पिता बापदादाची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात, आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)या पतीत
दुःखदायी दुनिये बरोबर मन लावायचे नाही. एका बाबाचा हात धरून पार जायचे आहे.
(२)माळेचा मणका बनण्यासाठी फार साहस ठेवून पुरुषार्थ करायचा आहे.ज्ञान रतन घेणारे
हंस बनायचे आहे. कोणते पण विकर्म करायचे नाही.
वरदान:-
बाबा आणि
सेवेच्या स्मृति द्वारे एकरस स्थितीचा अनुभव करणारे सर्व आकर्षण मुक्त भव
जसे सेवकाला नेहमी
सेवा आणि मालकाची आठवण राहते. तसेच जगाच्या सेवाकाला, खऱ्या सेवाधारी मुलांना पण,
बाबा आणि सेवे शिवाय काहीपण आठवणीत राहीले नाही पाहिजे,यामुळेच एकरस स्थितीमध्ये
राहण्याचा अनुभव होईल. त्यांना एका बाबाच्या आठवणीच्या रसा शिवाय इतर सर्व रस निरस
वाटतील. एका बाबाच्या रसाचा अनुभव झाल्यामुळे कोठे पण आकर्षित होणार नाहीत, या एकरस
स्थितीचा, तीव्र पुरुषार्थच, सर्व आकर्षणा पासून मुक्त बनवेल. हेच श्रेष्ठ ध्येय आहे.
बोधवाक्य:-
नाजूक
परिस्थिती च्या पेपर मध्ये पास व्हायचे असेल,तर स्वतःचा स्वभाव शक्तिशाली बनवा.