24-08-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, नेहमी या खुशीमध्ये रहा की, आम्ही ८४ चे चक्र पूर्ण केले, आता जातो आमच्या घरी, बाकी थोड्या दिवसाचा हा कर्मभोग आहे."

प्रश्न:-
विक्रर्माजीत बनणाऱ्या मुलांना, विकर्मा पासून वाचवण्यासाठी कोणत्या गोष्टीवर फार लक्ष दिले पाहिजे?

उत्तर:-
जे सर्व विकर्माचे मूळ देहअभिमान आहे, त्या देहअभिमाना मध्ये कधी येऊ नका, हे ध्यानात ठेवले पाहिजे. त्यासाठी वारंवार आत्माभिमानी बनून, शिवबाबाची आठवण करत राहा.चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ जरूर मिळते, अंत काळात विवेक खात राहील. परंतु या जन्मातील पापांच्या ओझ्याला हलके करण्यासाठी शिवबाबा ना खरे खरे सांगावयाचे आहे.
 

ओम शांती।
मोठ्यातील मोठे काम आहे शिवबाबाच्या आठवणीचे. अनेकांना फक्त ऐकण्याचा छंद आहे. ज्ञानाला समजणे तर फार सोपे आहे. ८४ जन्माच्या चक्राला समजायचे आहे.स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. जास्त कांही नाही. तुम्हीं मुले समजता की, आम्ही सर्व स्वदर्शन चक्रधारी आहोत. स्वदर्शन चक्राने कोणाचा गळा कापत नाही. जसे कृष्णासाठी दाखवत आहेत.आता हे लक्ष्मी नारायण विष्णूची दोन रूपे आहेत. काय त्यांना स्वदर्शन चक्र आहे? मग कृष्णा ला चक्र का दाखवत आहेत? एक मासिक निघते, त्यामध्ये कृष्णाचे असे फार चित्र दाखवतात. बाबा तर येऊन तुम्हाला राजयोग शिकवत आहेत,ना की चक्रा द्वारे असुरांचा घात करतात.असुर त्यांना म्हटले जाते, ज्यांचा असुरी स्वभाव आहे. बाकी मनुष्य तर मनुष्यच आहेत ना. असे नाही की स्वदर्शन चक्राने सर्वांना मारतात.भक्ती मार्गामध्ये काय काय चित्र बनवली आहेत. रात्रं-दिवसाचा फरक आहे. तुम्हा मुलांनी या सृष्टिचक्राला आणि साऱ्या विश्व नाटकाला जाणायचे आहे, कारण सर्व कलाकार आहेत. ते हदचे कलाकार तर नाटकाला जाणत आहेत.हे आहे बेहदचे नाटक. यामध्ये सविस्तर समजू शकणार नाहीत. ते तर दोन तासाचे नाटक असते. सविस्तर भूमिका जाणत आहेत. इथे तर ८४ जन्माला ओळखायचे आहे.

बाबांनी समजावले आहे, मी ब्रह्माच्या रथामध्ये प्रवेश करत आहे, ब्रह्माच्या पण ८४जन्माची गोष्ट पाहिजे, मनुष्याच्या बुद्धी मध्ये, या गोष्टी येत नाहीत. हे पण समजत नाहीत की, ८४ लक्ष जन्म आहेत का ८४ जन्म आहेत? बाबा सांगतात की, तुमच्या ८४ जन्माची गोष्ट सांगत आहे. ८४ लाख जन्म असतील तर किती वर्ष सांगण्यासाठी लागतील.तुम्ही तर सेकंदामध्ये जाणत आहात,ही ८४ जन्माची कहाणी आहे. आम्ही ८४ चे चक्र कसे लावले,८४ लाख असतील तर सेकंदामध्ये थोडेच समजू शकतील. ८४ लाख जन्म नाहीत. मुलांना पण खुशी झाली पाहिजे. आमचे ८४ चे चक्र पूर्ण झाले. आता घरी जायचे आहे. बाकी थोड्या दिवसाचा हा कर्मभोग आहे. विकर्म भस्म होऊन कर्मातीत अवस्था कशी होईल, त्यासाठी या युक्ती सांगत आहेत. बाकी समजावत आहेत की,या जन्मामध्ये जे पण विकर्म केले आहेत, ते लिहून द्या, तर ओझे हलके होईल. जन्मजन्मांतराचे विकर्म तर कोणी लिहू शकत नाही. विकर्म तर होत आले आहेत. जेंव्हा रावण राज्य सुरू झाले आहे तेंवहाच विकर्म होत आहेत. सत्ययुगा मध्ये कर्म, अकर्म होतात.भगवानुवाच, तुम्हाला कर्म, अकर्म, विकर्माची गती सांगत आहे. विकर्माजीत संवत लक्ष्मी नारायणा पासून सुरू होते.शिडी मध्ये सर्व स्पष्ट आहे.शास्त्रा मध्ये कांही ह्या गोष्टी नाहीत. सूर्यवंशी चंद्रवंशी चे रहस्य पण तुम्हा मुलांना सांगितले आहे कि,ते आम्ही होतो. विराट रूपाचे चित्र पण फार बनवत आहेत, परंतु अर्थ कांहीच समजत नाहीत. बाबा शिवाय कोणी समजावू शकत नाही. या ब्रह्मांच्या वर पण कोणी आहे ना, ज्यांनी शिकवले आहे. जर कोणत्या गुरुने शिकवले असेल तर त्या गुरुचा, फक्त एकच शिष्य तर नसेल ना. बाबा सांगतात की, मुलांनो, तुम्हाला पतित पासून पावन, पावन पासून पतित बनायचे आहे. हे पण विश्व नाटकांमध्ये नोंदलेले आहे. अनेक वेळा हे चक्र पूर्ण केले आहे. पूर्ण करतच आहात. तुम्ही आहात संपूर्ण भूमिका करणारे. आधीपासून अंतापर्यंत भूमिका आणखीन कोणाची नाही. तुम्हालाच बाबा समजावत आहेत. मग तुम्ही हे पण समजता की, दुसरे धर्मातील अमुक अमुक वेळेवर येतात. तुमची तर संपूर्ण भूमिका आहे.खिश्चनासाठी म्हणत नाहीत की, ते सत्युगामध्ये होते. ते तर व्दापारच्या मध्य काळात येतात. हे ज्ञान तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्येच आहे. कोणाला समजावू पण शकता. दुसरे कोणी सृष्टीच्या आदी, मध्य,अंताला ओळखत नाहीत. रचनाकारालाच जाणत नाहीत तर रचनेला कसे जाणतील. बाबांनी समजावले आहे की,ज्या खाऱ्या गोष्टी आहेत, त्या छापून विमानाद्वारे सर्व जागी टाका. त्याचे मुद्दे आणि विषय लिहिले पाहिजेत. मुले म्हणतात काम नाही. बाबा म्हणतात की,सेवा तर फार आहे.इथे एकांतामध्ये बसून हे काम करा. ज्या पण मोठ्या संस्था आहेत, गीता पाठशाला इत्यादी आहेत,त्या सर्वांना जागे करा. सर्वांना संदेश द्यायचा आहे. पुरुषोत्तम संगमयुग आहे. जे समजदार आहेत, ते झटक्यात समजतील,जरूर संगमयुगावरच नवीन दुनिया ची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश होत आहे. सत्ययुगा मध्ये पुरुषोत्तम मनुष्य असतात. इथे आहेत आसुरी स्वभावाचे पतित मनुष्य्. हे पण बाबांनी सांगितले आहे, कुंभमेळा होत आहे, तेथे फार मनुष्य स्नान करण्यासाठी जातात. कां स्नान करण्यासाठी जातात?पावन होण्याची इच्छा असते. तर जिथे जिथे मनुष्य स्नान करण्यासाठी जात आहेत, तिथे जाऊन सेवा केली पाहिजे.मनुष्याला समजावले पाहिजे, हे पाणी कांही पतित-पावनी नाही. तुमच्या जवळ चित्र पण आहेत.गीता पाठशाळे मध्ये जाऊन ही पत्रके वाटली पाहिजेत. मुले सेवा मागत आहेत. हे लिहा कि, गीतेचा भगवान परमपिता परमात्मा शिव आहेत, ना कि श्रीकृष्ण. मग त्यांच्या चरित्राची महिमा लिहा. शिवबाबाचे चरित्र लिहा.मग स्वतःच ते निर्णय घेतील. हा मुद्दा पण लिहला पाहिजे की, पतित पावन कोण? परत शिव आणि शंकर मधील फरक पण दाखवायचा आहे.शिव वेगळे आहेत शंकर वेगळे आहेत. हे पण बाबांनी सांगितले आहे कि, कल्प पाच हजार वर्षाचे आहे. मनुष्य ८४ जन्म घेत आहेत, ना की ८४ लाख. या मुख्य मुख्य गोष्टी थोडक्यात लिहिल्या पाहिजेत. त्या विमानाद्वारे पण टाकू शकता.सांगू पण शकता. कसे हे सृष्टिचक्र आहे. यामध्ये स्पष्ट आहे अमुक अमुक धर्म, अमुक अमुक वेळेवर स्थापन होत आहे.तर हे सृष्टिचक्र पण असले पाहिजे, त्यामुळे मुख्य बारा चित्रांचे कॅलेंडर पण छापू शकता, ज्यामध्ये सारे ज्ञान येईल,आणि सेवा सहज होऊन जाईल. हे चित्र फारच आवश्यक आहेत. कोणते चित्र बनवायचे आहे, काय काय मुद्दे लिहिले पाहिजेत, ते बसून लिहा.

तुम्हीं गुप्त वेषामध्ये या जुन्या दुनियेचे परिवर्तन करत आहात. तुम्ही ओळखले न जाणारे सैनिक आहात. तुम्हाला कोणी ओळखत नाही. बाबा पण गुप्त, ज्ञान पण गुप्त. यांचे कोणते शास्त्र इत्यादी बनत नाही, इतर धर्मस्थापकाचे बायबल इत्यादी छापतात, जे वाचत राहतात.प्रत्येकाचे छापतात. तुमचे मग भक्ती मार्गा मध्ये छापले जाते. आता छापत नाहीत, कारण आता तर हे शास्त्र इत्यादी, सर्व नष्ट होणार आहे. आता तुम्हांला बुद्धीने फक्त आठवण करायची आहे. बाबा जवळ पण बुद्धिमध्ये ज्ञान आहे.कोणते शास्त्र इत्यादी थोडेच वाचले आहे. ते तर ज्ञानाचे सागर आहेत. ज्ञान संपन्नतेचा अर्थ मग मनुष्य समजतात कि, सर्वांचे मनातील ओळखणारे आहेत. भगवान पाहत आहेत, तेव्हा तर कर्माचे फळ देत आहेत.बाबा म्हणतात की, हे सर्व विश्व नाटकांमध्ये नोंदलेले आहे. नाटकांमध्ये जे विकर्म करतात,तर त्यांची शिक्षा मिळत राहते.चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ मिळत आहे.त्याची लिखापढी तर कांही नाही. मनुष्य समजू शकतात कि, जरूर कर्माचे फळ दुसऱ्या जन्मांमध्ये मिळत आहे. अतांच्या वेळी बुद्धीला मग खात राहते. आम्ही ही, ही पापे केली आहेत‌. सर्व आठवणीत येते. जसे कर्म तसा जन्म मिळतो. आता तुम्ही विकर्माजीत बनत आहात, तर कोणते पण असे विकर्म केले नाही पाहिजे. मोठ्या तील मोठे विकर्म आहे, देहीअभिमानी बनणे. बाबा वारंवार सांगतात की, आत्माभिमानी बनून, बाबाची आठवण करा,पवित्र तर राहायचेच आहे. सर्वात मोठे पाप आहे काम कटारी चालवणे. हेच आदि- मध्य-अंत दुःख देणारे आहे, त्यामुळे संन्याशी पण म्हणतात किं,हे काग विष्ठा समान सुख आहे.तेथे दुःखाचे नावच नाही. आता दुःखच दुःख आहे,त्यामुळे संन्याशांना वैराग्य येते. परंतु ते जंगला मध्ये निघून जातात. त्यांचे आहे हदचे वैराग्य,तुमचे आहे बहदचे वैराग्य. ही दुनियाच छी छी आहे. सर्व म्हणतात कि, बाबा येऊन आमचे दुःख दूर करून, सुख द्या.बाबाच दुख:हर्ता,सुखकर्ता आहेत. तुम्ही मुले समजता कि, नवीन दुनियेमध्ये या देवतांचे राज्य होते. तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते.जरी कोणी शरीर सोडले तर मनुष्य म्हणतात की, स्वर्गवासी झाला. परंतु हे थोडेच समजतात की, आम्ही नरका मध्ये आहोत. आम्ही जेंव्हा मरू, ते़व्हा स्वर्गामध्ये जाऊ. परंतु तो स्वर्गामध्ये गेला कि, इथेच नरकामध्ये आला? काहीच समजत नाहीत. तुम्ही मुले तीन पित्याचे रहस्य, सर्वांना समजावू शकता. दोन पिता तर सर्व समजत आहेत, लौकिक आणि पारलौकिक आणि हा अलौकिक प्रजापिता ब्रह्मा येथे संगमयुगावर आहेत.ब्राह्मण पण पाहिजेत ना. ते ब्राह्मण कांही ब्रहृमा मुखवंशावली थोडेच आहेत. ते जाणतात की ब्रह्मा होते, त्यामुळेच ब्राह्मण देवी-देवतां नम:म्हणतात. हे जाणत नाहीत की, कोणाला म्हणत आहेत, कोणते ब्राह्मण? तुम्हीं आहात पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण. ते आहेत कलयुगी. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग,जेंव्हा तुम्हीं मनुष्या पासून देवता बनत आहात. देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. तर मुलांनी सर्व मुद्दे धारण केले पाहिजेत,आणि मग सेवा केली पाहिजे. पूजा करण्यासाठी किंवा श्राद्ध खाण्यासाठी ब्राह्मण लोक येतात. त्यांच्या बरोबर पण तुम्ही बातचीत करू शकता.आम्ही तुम्हाला खरे ब्राह्मण बनवू शकतो .आता भाद्रपद महिना येत आहे, सर्व पित्रांना खाऊ घालत आहेत.हे पण युक्तीने केले पाहिजे, नाहीतर म्हणतात की, ब्रह्माकुमारी कडे गेल्यामुळे, सर्व कांही सोडून दिले आहे. असे काही करायचे नाही, ज्यामुळे नाराज होतील. युक्तीने तुम्ही ज्ञान देऊ शकता. जरूर ब्राम्हण लोक येतील, तेंव्हा तर ज्ञान देतील ना. या महिन्यांमध्ये तुम्ही ब्राह्मणांची फार सेवा करू शकता. तुम्हीं ब्राह्मण तर प्रजापिता ब्रह्मा ची मुले आहात.सांगा ब्राह्मण धर्म कोणी स्थापन केला? तुम्हीं त्यांचे पण कल्याण घरी बसल्या करु शकता.. जसे अमरनाथाच्या यात्रेवर जातात, तर ते लिहून सांगितल्याने एवढे समजू शकत नाहीत. तिथे बसून समजावले पाहिजे. आम्ही तुम्हाला खरी अमरनाथाची कथा सांगत आहोत. अमरनाथ तर एकालाच म्हटले जाते. अमरनाथ म्हणजे अमरपुरी स्थापन करतात. ते आहे सत्ययुग. अशी सेवा केली पाहिजे.तेथे पायी चालत जावे लागते.जे चांगले चांगले मोठे- मोठे मनुष्य आहेत, त्यांना जाऊन समजावले पाहिजे.संन्याशांना पण तुम्हीं ज्ञान देऊ शकता. तुम्ही साऱ्या विश्वाचे कल्याणकारी आहात. श्रीमता वर आम्ही विश्वाचे कल्याण करत आहोत. बुद्धीमध्ये हा नशा राहिला पाहिजे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या, मुलांप्रति मातपिता बापदादाची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) जेव्हा एकांत किंवा वेळ मिळेल तेंव्हा ज्ञानाच्या चांगल्या चांगल्या मुद्द्यावर, विचार सागर मंथन करून,लिहायचे आहे. सर्वांना संदेश द्यायचा आहे किंवा सर्वांच्या कल्याणाची युक्ती काढायची आहे.

(२) विकर्मा पासून, वाचण्यासाठी देहीअभिमाने बनून बाबांची आठवण करायची आहे. आता कोणते पण विकर्म करायचे नाही. या जन्मांमध्ये केलेले विकर्म बापदादाना खरे खरे सांगायचे आहेत.

वरदान:-
संपन्नते द्वारे संतुष्टतेचा अनुभव करणारे, नेहमी हर्षित, विजयी भव:

जे सर्व खजान्याने संपन्न आहेत, तेच नेहमी संतुष्ट आहेत. संतुष्टता म्हणजे संपन्नता. जसे बाबा संपन्न आहेत,त्यामुळे त्यांच्या महिमे मध्ये सागर शब्द म्हणतात. तसे तुम्ही मुले पण मास्टर सागर म्हणजे संपन्न बना, तर नेहमी खुशीमध्ये नाचत राहाल. मनामध्ये खुशी शिवाय आणखीन कांही येऊ शकत नाही. स्वत: संपन्न झाल्यामुळे कोणा कडून पण तंग होणार नाहीत. कोणत्या पण प्रकारची समस्या किंवा विघ्न, एक खेळ अनुभव होईल, समस्या मनोरंजनाचे साधन बनून जाईल. निश्चयबुद्धी झाल्यामुळे नेहमी हर्षित आणि विजयी बनतील.
 

बोधवाक्य:-
नाजूक परिस्थिती मध्ये घाबरू नका, त्याद्वारे पाठ शिकून, स्वतःला परिपक्व बनवा.