22-08-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबांना तुम्ही मुलंच प्रिय आहात, बाबा तुम्हाला सुधारण्यासाठी श्रीमत देत आहेत, नेहमी ईश्वरीय मतावर चालून स्वतःला पवित्र बनवा."

प्रश्न:-
विश्वामध्ये शांती ची स्थापना कधी आणि कोणत्या विधीद्वारे होत आहे?

उत्तर:-
तुम्ही जाणता की, विश्वामध्ये शांती तर महाभारताच्या लढाई नंतरच होते परंतु त्यासाठी तुम्हाला त्यापुर्वी तयार व्हायचे आहे.स्वतःची कर्मातीत अवस्था बनवण्याची मेहनत करायची आहे.सृष्टीच्या आदि,मध्य,अंताच्या ज्ञानाची आठवण करून,बाबाच्या आठवणी व्दारे संपूर्ण पावन बनायचे आहे,तेंव्हा या सृष्टी मध्ये परिवर्तन होईल.

गीत:-
आज आंधारा मध्ये आहेत मनुष्य. . .

ओम शांती।
हे गीत भक्तिमार्गा मध्ये गायलेले आहे.म्हणतात की, आम्ही आंधारा मध्ये आहोत,आता ज्ञानाचा तिसरा डोळा द्या. ज्ञान मागतात, ज्ञान सागरा कडून.बाकी आहे अज्ञान.असे म्हटले जाते की, कलियुगामध्ये सर्व अज्ञानाच्या आसूरी निद्रेंत झोपलेले कुंभकर्ण आहेत. बाबा म्हणतात की, ज्ञान तर फारच सोपे आहे. भक्ती मार्गामध्ये किती वेद, शास्त्र इत्यादी वाचतात, हठयोग करतात, गुरु इत्यादी करतात. आता त्या सर्वांना सोडले पाहिजे, कारण ते कधीच राजयोग शिकवू शकत नाहीत.बाबाच राजाई देत आहेत. मनुष्य मनुष्य ला देऊ शकत नाहीत. परंतु त्यासाठीच संन्याशी म्हणतात की, सुख काग विष्टेसारखे आहे,कारण स्वतः घरदार सोडून निघून जातात. हे ज्ञान, ज्ञानसागर बाबा शिवाय कोणी देऊ शकत नाही. हा राजयोग भगवान शिकवत आहेत. मनुष्य मनुष्याला पावन बनवू शकत नाहीत. पतित पावन एकच बाबा आहेत. मनुष्य भक्तिमार्गा मध्ये किती फसले आहेत. जन्म-जन्मांतरा पासून भक्ती करत आले आहेत.नदीमध्ये स्नान करण्यासाठी जातातअसे पण नाही की, फक्त गंगे मध्ये स्नान करतात. कोठे पण पाण्यांचे तळे इ. दिसले तर त्याला पण पतित-पावन समजतात. हे पण गोमुख आहे. झऱ्याचे पाणी येत आहे. जसे विहिरी मध्ये पाणी येते, तर त्याला पतित पावन गंगा थोडेच म्हणतात.मनुष्य समजतात की, हे पण तीर्थ आहे. फार मनुष्य भावनेने तेथे जाऊन स्नान इ.करतात. तुम्हा मुलांना आता ज्ञान मिळाले आहे. तुम्ही सांगता तरी पण ते ऐकत नाहीत. स्वतःच्या देहाचा अहंकार फार आहे.आम्ही एवढे शास्त्र वाचले आहेत. बाबा म्हणतात की, ते वाचलेले सर्व आता विसरा. आता या सर्व गोष्टीची मनुष्यांना कशी माहिती पडेल, त्यामुळे बाबा म्हणतात,असे मुद्दे लिहून विमानाद्वारे टाका. जसे आजकाल म्हणतात की,विश्वामध्ये शांती कशी होईल? कोणी मत दिली तर त्याला बक्षीस देतात.आता ते तर शांती ची स्थापना करु शकत नाहीत. शांती कोठे आहे? खोटे बक्षीस देत राहतात.

आता तुम्हीं जाणता की, विश्वामध्ये शांती तर होते लढाईनंतर. ही लढाई तर कोणत्या पण वेळी लागू शकते. तशी तयारी आहे. फक्त तुम्हा मुलांनाच उशीर होत आहे. आता तुम्ही मुलांनी कर्मातीत अवस्था प्राप्त करावी,यामध्येच मेहनत आहे. बाबा म्हणतात,माझी एकाचीच आठवण करा आणि गृहस्थ व्यवहारांमध्ये राहून कमल फुलासारखे पवित्र बना आणि सृष्टीच्या आदि,मध्य,अंताच्या ज्ञानाची आठवण करत रहा.तुम्ही लिहू पण शकता की ,विश्वनाटका नुसार, कल्पा पूर्वीप्रमाणे विश्वामध्ये शांती स्थापन होईल. तुम्ही हे पण समजावू शकता की, विश्वामध्ये शांती सतयुगा मध्येच होती. इथे जरूर अशांती आहे. परंतु कांही आहेत जे तुमच्या या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांना स्वर्गा मध्ये यायचेच नाही, तर श्रीमता वर चालणार नाहीत. इथे पण फार आहेत, जे श्रीमतावर पवित्र राहू शकत नाहीत. उंच ते उंच भगवानाची तुम्हाला मत मिळत आहे. कोणाचे वागणे चांगले नसेल तर म्हणतात की तुम्हाला ईश्वर चांगली मत देवो. आता तुम्हाला ईश्वरीय मतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात की 63 जन्म तुम्ही विषय सागरामध्ये गटांगळ्या खाल्ल्या आहेत. बाबा मुलां बरोबरच बोलत आहेत. मुलांनाच बाबा सुधारतील ना. साऱ्या दुनियेला कसे सुधारतील. बाहेर वाल्यांना म्हणतात की, मुलांकडून समजून घ्या. बाबा बाहेर वाल्याबरोबर बोलू शकत नाहीत. बाबांना मुलेच प्रिय वाटतात.सावत्र मुले थोडीच आवडतील. लौकिक पिता पण चांगल्या मुलालाच धन देतात.सर्व मुले सारखी तर नसतात ना. बाबा पण म्हणतात ,जी माझी बनत आहेत, त्यांनाच मी वरसा देतो. जे माझे बनत नाहीत, ते ज्ञान पचवू शकत नाहीत. श्रीमता वर चालू शकत नाहीत.ते आहेत भक्त. बाबांनी फार पाहिले आहे,कोणी मोठा संन्याशी आला तर अनेक त्यांचे शिष्य बनतात,पैसे गोळा करतात.आप आपल्या ताकती नुसार पैसे काढत राहतात. इथे बाबा तर असे म्हणत नाहीत, पैसे गोळा करा.नाही, इथे तर जे बीज पेराल,ते २१ जन्म त्याचे फळ प्राप्त करतील. मनुष्य दान करतात तर समजतात कि ईश्वर अर्थ आम्ही करत आहोत. ईश्वर सर्मपणम म्हणतात किंवा म्हणतात कृष्णार्पण. कृष्णांचे नाव का घेतात?कारण त्यांना गीतेचे भगवान समजत आहेत. श्रीराधे अर्पणम कधी म्हणत नाहीत.ईश्वर किंवा कृष्णार्पण म्हणतात. जाणतात की फळ देणारा ईश्वरच आहे.कोणी सावकाराच्या घरी जन्म घेतात,तर म्हणतात ना, पूर्वीच्या जन्मांमध्ये फार दान पुण्य केले आहे, त्यामुळे हे बनले आहेत. राजा पण बनू शकतात.परंतु ते आहे अल्पकाळाचे काग विष्टा समान सुख. राजाला पण संन्यासी लोक, संन्यास घेण्यास सांगतात, तर त्यांना म्हणतात की, स्त्री तर नागिन आहे, परंतु द्रोपदीने तर बोलावले आहे, दु:शासन आम्हाला नगन करत आहेत. आता पण आबला किती बोलावत आहेत.आमची लाज राखा.बाबा आम्हाला हे फार मारत आहेत. म्हणतात विकार द्या, नाही तर खून करीन. बाबा या बंधनापासून सोडवत आहेत. बाबा म्हणतात की,बंधन तर नष्ट होणारच आहेत. मग 21 जन्म कधी नंगन होणार नाहीत. तेथे विकार असत नाहीत.या मृत्यू लोकांमध्ये हा शेवटचा जन्म आहे. हे आहेच विकारी जग.

दुसरी गोष्ट,बाबा समजावतात की, यावेळी मनुष्य किती बेसमज बनले आहेत. जर कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात,स्वर्गात गेला. परंतु स्वर्ग कोठे आहे.हा तर नरक आहे. स्वर्गवासी झाला तर जरूर नरकामध्ये होता. परंतु कोणाला स्पष्ट म्हटले की, तुम्ही नरकवासी आहात, तर क्रोधा मध्ये येऊन बिगडतात. अशांना तुम्ही लिहिले पाहिजे‌. अमुक स्वर्गवासी झाला तर त्याचा अर्थ तुम्ही नरका मध्ये आहेत ना. आम्ही तुम्हाला अशी युक्ती सांगतो,जे तुम्ही खऱ्या खऱ्या स्वर्गामध्ये जाल. ही जुनी दुनिया आता नष्ट होत आहे.वर्तमानपत्रांमध्ये द्या की, या लढाईनंतर विश्वामध्ये शांती होणार आहे,पाच हजार वर्षापूर्वी प्रमाणे. तेथे एकच आदि सनातन देवी देवता धर्म होता. ते लोक मग म्हणतात की,स्वर्गामध्ये पण कंस,जरासंघ इत्यादी असूर होते,त्रेतामध्ये रावण होता. आता त्यांच्या बरोबर डोके कोण खात राहणार.ज्ञान आणि भक्ती मध्ये रात्रं- दिवसाचा फरक आहे.एवढी सोपी गोष्ट पण मुश्कील कोणाच्या बुद्धीमध्ये बसते.तर असे सुविचार बनवले पाहिजेत. या लढाईनंतर विश्वामध्ये शांती होणार आहे. विश्वनाटका नुसार. कल्प कल्प विश्वामध्ये शांती होते.मग कलियुगाच्या अंता मध्ये अशांती होते. सत्ययुगा मध्येच शांती असते. हे पण तुम्ही लिहू शकता, गीते मध्ये चूक केल्यामुळे भारताची ही अवस्था झाली आहे.पुर्ण ८४जन्म घेणाऱ्या श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे.श्रीनारायणाचे पण टाकले नाही. त्यांचे पण 84 जन्मा मधील कांही दिवस कमी म्हटले जातात. कृष्णाचे पुर्ण 84 जन्म होतात. शिवबाबा येतातच मुलांना हीऱ्यासारखे बनविण्यासाठी, तर त्यांच्यासाठी मग डब्बी पण सोन्याची पाहिजे. यामध्ये बाबा येऊन प्रवेश करतात. आता हे सोन्याचे कसे बनतील, तर झटक्यात त्यांना साक्षात्कार केला, तुम्ही तर विश्वाचे मालक बनत आहात. आता माझी एकाची आठवण करा,पवित्र बना, तर झटक्यात पवित्र बनू लागले.पवित्र झाल्याशिवाय तर ज्ञानाची धारणा होऊ शकत नाही. वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे भांडे पाहिजे.हे ज्ञान तर आहे, परमपिता परमात्म्याचे. याला धारण करण्यासाठी पण सोन्याचे भांडे पाहिजे‌. पवित्रता पाहिजे, तरच धारणा होईल. पवित्रतेची प्रतिज्ञा करून,तरी पण विकारी बनतात,तर त्यांच्या आठवणीची यात्रा नष्ट होऊन जाते.ज्ञान पण नष्ट होवून जाते. कोणाला म्हणू शकत नाहीत कि, भगवानुवाच, काम महाशत्रू आहे.त्यांचा बाण लागणार नाही. ते मग कुक्कड ज्ञानी होवून जातात.कोणता पण विकार असू नये. रोज दिनचर्या पहा.जसे बाबा सर्वशक्तिमान आहेत,तशी माया पण सर्वशक्तिमान आहे. अर्धाकल्प रावणाचे राज्य चालते. यावर विजय, बाबा शिवाय कोणी प्राप्त करवू शकत नाही. विश्वनाटका नुसार रावण राज्य पण होणार आहे. भारताच्याच हार आणि विजया वर हे नाटक बनलेले आहे.हे बाबा तुम्हां मुलांना सांगत आहेत. मुख्य आहे,पवित्र होण्याची गोष्ट.बाबा म्हणतात की, मी येतच आहे पतितां ना पावन करण्यासाठी. बाकी शास्त्रांमध्ये पांडव आणि कौरव यांचे युद्ध,जुगार इत्यादी दाखवले आहे.अशा गोष्टी कशा होऊ शकतात.राजयोगाचे शिक्षण असे होते काय? युद्धाच्या मैदानामध्ये गीता पाठशाला असते कां? कोठे जन्म मरण रहित शिवबाबा, कोठे पूर्ण 84 जन्म घेणारे श्रीकृष्ण. त्यांच्या शेवटच्या जन्मांमध्ये बाबा येऊन प्रवेश करतात. किती स्पष्ट आहे.गृहस्थ व्यवहारांमध्ये राहून पवित्र बनायचे आहे.संन्यासी तर म्हणतात की, दोघे एकत्र राहून पवित्र राहू शकत नाहीत.त्यांना सांगा की, तुम्हाला तर कांही प्राप्ती नाही, तर कसे राहतील. इथे तर विश्वाची बादशाही मिळत आहे. बाबा म्हणतात की,माझ्यासाठी या कुळाची लाज राखा. शिवबाबा म्हणतात की, यांच्या दाढी ची लाज राखा.हा एक शेवटचा जन्म पवित्र राहा तर स्वर्गाचे मालक बनाल. स्वतःसाठी मेहनत करायची आहे. दुसरे कोणी स्वर्गामध्ये येऊ शकत नाही. ही तुमची राजधानी स्थापन होत आहे. यामध्ये सर्व पाहिजेत ना. तेथे वजीर तर असत नाहीत.राजांना मत देण्याची आवश्यकता नाही. पतित राजांना एक वजीर असतो.इथे तर पहा किती मंत्री आहेत. आपसामध्ये भांडत राहतात.बाबा सर्व झंझट पासून सोडवतात. तीन हजार वर्षापर्यंत परत कोणती लढाई होणार नाही. जेल इत्यादी राहणार नाही.कोर्ट इत्यादी कांही पण राहणार नाही‌. तेथे तर सुखच सुख आहे.त्यासाठी पुरुषार्थ केला पाहिजे.मृत्यू तर डोक्यावर आहे. आठवणीच्या यात्रे द्वारे विकर्माजीत बनायचे आहे. तुम्हीच पैगंबर आहात तर सर्वांना बाबाचा संदेश द्यायचा आहे कि, मनमनाभव. अच्छा!

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमळ आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)ज्ञानाची धारणा करण्यासाठी, पवित्र बनवून, बुद्धी रुपी भांडे स्वच्छ करायचे आहे. फक्त कुक्कड ज्ञानी बनायचे नाही.

(२) प्रत्यक्ष बाबा समोर आपले सर्व अर्पण करून, श्रीमता वर चालून २१ जन्मासाठी राज्यपद प्राप्त करायचे आहे.

वरदान:-
शुद्धतेच्या विधीद्वारे किल्याला मजबूत करणारे, नेहमी विजयी आणि निर्विघ्न भव:

या किलल्यामध्ये प्रत्येक आत्मा नेहमी विजयी आणि निर्विघ्न बनेल,त्यासाठी विशेष वेळेवर चोहीकडे एकत्र योगाचे कार्यक्रम ठेवा.मग कोणी पण योगाच्या तारेला कापू शकणार नाही, कारण सेवा जेवढी वाढत राहील,तेवढी माया आपले बनविण्याचा प्रयत्न करेल.त्यामुळे असे कोणते पण कार्य सुरू करते वेळी, शुद्धतेच्या विधीचा स्वीकार करतात. असा संघटित रूपांमध्ये,तुम्हां सर्वश्रेष्ठ आत्म्यांचा एकच शुद्ध संकल्प पाहिजे,विजयी बनणे.ही आहे शुद्धतेची विधी- ज्या मुळे किल्ला मजबूत होऊन जातो.

बोधवाक्य:-
युक्तीयुक्त किंवा यथार्थ सेवेचे प्रत्यक्ष फळ आहे खुशी.


"मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य"

आता विकर्म बनवण्याची स्पर्धा करायची नाही

प्रथम तर स्वतःजवळ हे लक्ष अवश्य असले पाहिजे कि, आम्हाला कोणत्या रीतीने, आपल्या विकारांना वश करायचे आहे, तेंव्हाच ईश्वरीय सुख-शांती मध्ये राहू शकता. आपला मुख्य पुरुषार्थ आहे स्वतः शांती मध्ये राहून, इतरांना शांती मध्ये आणायचे आहे. यामध्ये सहनशक्ती जरूर पाहिजे.सारे आपल्यावर अवलंबून आहे,असे नाही की, कोणी कांही म्हटले तर अशांती मध्ये आले पाहिजे,नाही.ज्ञानाचा पहिला गुण आहे, सहनशक्ती धारण करणे.पहा, अज्ञान काळामध्ये पण म्हणतात की, जरी कोणी किती पण शिव्या दिल्या,तर असे समजा की, मला कूठे जखम झाली? जरी कोणी शिव्या दिल्या, तो स्वतः तर अशांती मध्ये आला, त्याचा जमाखर्च त्याचा बनला,परंतु आम्ही पण अशांती मध्ये आलो, कांही म्हटले तर मग, आमचे विकर्म बनेल,तर विकर्म बनवण्याची स्पर्धा करायची नाही. आपले तर विकर्म भस्म करायचे आहेत, ना की बनवायचे आहेत.असे विकर्म तर जन्मजन्मांतर बनवत आले आहात आणि त्यामुळे दुःख मिळाले आहे. आता तर ज्ञान मिळाले आहे कि,या पाच विकारावर विजय प्राप्त करा.विकारांचा पण फार मोठा विस्तार आहे, फार सूक्ष्म रीतीने येत आहेत. कधी इर्षा येते तर विचार येतो की, त्याने असे केले, तर मी का करू नये? ही आहे मोठी चूक. स्वतःला तर अभूल बनवायचे आहे. जर कोणी कांही म्हटले तर असे समजा की,ही पण माझी परीक्षा आहे.किती माझ्यामध्ये सहनशीलता आहे?जर कोणी म्हटले,मी फार सहन केले,एका वेळेस जरी जोश आला तर शेवटी नापास झालात. ज्यांनी म्हटले त्यांनी स्वतःचे बिघडवले, परंतु आपल्याला तर बनवायचे आहे, ना की बिघडावयाचे आहे.त्यामुळे चांगला पुरुषार्थ करून, जन्मजन्मांतरा साठी चांगली प्रारब्ध बनवायची आहे. बाकी जे विकाराच्या वश आहेत, त्यांच्यामध्ये भुताची प्रवेशता आहे,भुतांची भाषाच तशी निघत आहे, परंतु जे दैवी आत्मे आहेत,त्यांची भाषा दैवीच निघेल. तर स्वतःला दैवी बनवायचे आहे, ना की आसुरी,अच्छा.