09-08-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   04.03.86  ओम शान्ति   मधुबन


सर्वश्रेष्ठ रचनेचा पाया-स्नेह


आज बाप दादा आपल्या श्रेष्ठ रचनेला पाहून आनंदित होत आहेत. ही श्रेष्ठ किंवा नवीन रचना सार्‍या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आणि अतिप्रिय आहे,कारण पवित्र आत्म्यांची रचना आहे.पवित्र आत्मा असल्यामुळे आत्ता बापदादांचे प्रिय आहात आणि आपल्या राज्यामध्ये सर्वांचे प्रिय असाल.द्वापर मध्ये भक्तांचे प्रिय, देवात्मा बनाल.या वेळेत परमात्म प्रिय ब्राह्मण आत्मे आहात.सतयुग त्रेतामध्ये राज्याधिकारी,परमश्रेष्ठ दैवी आत्मे असाल आणि द्वापरयुगा पासून कलियुगा पर्यंत पूज्य आत्मे बनाल.या वेळेत तिन्ही काळापेक्षा श्रेष्ठ आहात,परमात्म प्रिय ब्राह्मण सो फरिश्ता आत्मे आहात.या वेळेतील श्रेष्ठत्वाच्या आधाराद्वारे सर्वकल्प श्रेष्ठ राहतात.तुम्ही पाहत आहात की,या अंतिम जन्मामध्ये पण,तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांचे,भक्त लोक किती आव्हान करत आहेत,खूप प्रेमाने बोलवत आहेत.जड चित्र आहेत,हे जाणून पण,तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांची भावना द्वारे पूजा करतात,भोग लावतात,आरती करतात.तुम्ही दुहेरी परदेशी समजतात की,आमच्या चित्राची पूजा होत आहे.भारतामध्ये बाबांचे कर्तव्ये चालत आहे,म्हणून बाबांच्या सोबत, तुम्हा सर्वांचे चित्र पण भारतामध्येच आहेत.जास्त मंदिर पण भारतामध्येच बनवतात.हा तर नशा आहे की, आम्हीच पूज्य आत्मे आहोत?सेवेसाठी चोहो-बाजूला विश्वा मध्ये गेले होते.काही अमेरिका तर,काही आफ्रिका मध्ये पोहोचले आहेत,परंतु कशासाठी गेले आहात? यावेळेतील सेवेचे संस्कार,स्नेहाचे संस्कार आहेत.सेवेची विशेषता स्नेह आहे.जोपर्यंत ज्ञानासोबत आत्मिक स्नेहाचा अनुभव होत नाही,तोपर्यंत ज्ञान कोणी ऐकणार नाही.तुम्ही सर्व दुहेरी परदेशी,बाबांचे तर बनले आहात,तर तुम्हा सर्वांचा पाया काय राहिला?बाबांचा स्नेह,परिवाराचा स्नेह,ह्रदयापासूनचे स्नेह,निस्वार्थ स्नेह याद्वारे श्रेष्ठ आत्मा बनवले.तर सेवेचे प्रथम सफलता स्वरूप स्नेह झाले.जेव्हा स्नेहा मध्ये बाबाचे बनतात,परत कोणत्याही ज्ञानाचा मुद्दा सहज स्पष्ट होत जातो.जे स्नेहा मध्ये येत नाहीत,ते फक्त ज्ञानाला धारण करून पुढे जाण्यामध्ये वेळ पण घेतात,कष्ट पण घेतात कारण त्यांची वृत्ती,का-कसे,असे-कसे यामध्ये जास्त चालत आहे आणि जेव्हा स्नेहामध्ये मगन होतात,तर स्नेहामुळे बाबांचे प्रत्येक बोल प्रिय वाटतात,प्रश्न समाप्त होतात.बाबांचा स्नेह आकर्षित केल्यामुळे प्रश्न करतील परंतु समजण्यासाठी करतील,अनुभवी आहात ना.जे प्रेमामध्ये मग्न होतात,ज्यांच्याशी प्रेम आहे ते,जे बोलतील त्यांना प्रेमच दिसून येते.तर सेवेचा मुळ आधार स्नेह आहे.बाबा पण सर्व मुलांना स्नेहाने आठवण करतात.स्नेहा द्वारे बोलवतात,स्नेहा द्वारेच सर्व समस्या नष्ट करतात. तर ईश्वरी जन्म,ब्राह्मण जन्माचा पायाच स्नेह आहे.स्नेहाचा पाया असणाऱ्यांना कधीच कोणती गोष्ट कठीण वाटणार नाही.स्नेहामुळे उमंग उत्साह राहतो.जी पण बाबांची श्रीमत आहे,आम्हाला त्याचे पालन करायचेच आहे.पाहू,करू हे स्नेहीची लक्षणं नाहीत.बाबानी माझ्या प्रती सांगितले आहे आणि मलाच करायचे आहे,हे स्नेही आशिक आत्म्याची स्थिती आहे.स्नेही हलचल मध्ये येणारे नसतील.नेहमी बाबा आणि मी,तिसरे कोणी नाही.जसे बाबा मोठ्यात मोठे आहेत,स्नेही पण मोठ्या मनाचे असतात.संकुचीत मनाचे थोड्या थोड्या गोष्टीमध्ये संभ्रमित होतात,लहान गोष्ट पण मोठी वाटते.मोठे मन असणाऱ्या साठी,मोठी गोष्ट पण छोटी होते. दुहेरी परदेशी सर्व मोठ्या मनाचे आहेत ना.सर्व दुहेरी परदेशी मुलांना पाहून खुश होतात,किती दूर दूर वरून,परवाने शमाच्या वरती फिदा होण्यासाठी पोहोचले आहेत.पक्के परवाने आहेत ना.आज अमेरिका निवासींची पाळी आहे.अमेरिका निवासींना बाबा म्हणतात, या माझ्या मुलांनो(आ मेरे).अमेरिका निवासी पण (आ मेरे)म्हणतात. ही विशेषता आहे ना.वृक्षाच्या चित्रांमध्ये सुरुवाती पासून विशेष शक्तीच्या रूपांमध्ये अमेरिकाला दाखवले आहे. जेव्हापासून स्थापना झाली, तेव्हापासून अमेरिकेची बाबांनी आठवण केली आहे.विशेष भूमिका आहेना.जसे एक विनाशाची शक्ती श्रेष्ठ आहे,दुसरी कोणती विशेषता आहे? विशेषता तर स्थानाची पण आहे परंतु अमेरिका ची विशेषता ही पण आहे,एकीकडे विनाशाची तयारी पण जास्त करतात,दुसरीकडे परत विनाशाला समाप्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ पण तेथेच आहे.एकीकडे विनाशाचे शक्ती, दुसरीकडे सर्वांना मिळवण्याची शक्ती.तर दुहेरी शक्ती झाली ना.तेथे सर्वांना मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, तर तेथुनच परत आत्मिक मिलनचा पण आवाज बुलंद होईल. तेथे लोक तर आपल्या रिति द्वारे सर्वांना एकत्र करुन,शांतीचा प्रयत्न करतात परंतु अर्थ सहित तुम्हा लोकांचे कर्तव्य आहे ना. ते एकत्र करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु करू शकत नाहीत.वास्तव मध्ये सर्व धर्माच्या आत्म्यांना एका परिवारा मध्ये घेऊन येणे,ब्राह्मणांचे वास्तविक कार्य आहे. हे विशेष कार्य करायचे आहे.जसे विनाशाची शक्ती येथे श्रेष्ठ आहे,असेच स्थापनेच्या शक्तीचा आवाज पण बुलंद हवा.विनाश आणि स्थापना दोघांचा सोबत झेंडा फडकवण्यात यावा.एक विज्ञानाचा झेंडा आणि एक शांती चा झेंडा. विज्ञानाच्या शक्तीचा प्रभाव आणि शांतीच्या शक्तीचा प्रभाव,दोन्हीची जेव्हा प्रत्यक्षता होईल, तेव्हाच म्हणाल प्रत्यक्षतेचा झेंडा फडकला. कोणी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती,दुसऱ्या देशामध्ये जातात,तर त्यांचे स्वागत करण्यासाठी झेंडा फडकवतात, आपल्या देशाचा पण लावतात आणि त्यांच्या देशाचा पण झेंडा फडकवतात.तर परमात्मा झेंडा फडकवा,परमात्म कार्याचे पण स्वागत करावे.बाबांचा झेंडा काना-कोपऱ्या मध्ये फडकवा,तेव्हाच म्हणाला,विशेष शक्तीना प्रत्यक्ष केले. हे सुवर्ण जयंती चे वर्ष आहे ना,तर सुवर्ण तारा सर्वांना दिसून यायला हवा.कोणता विशेष तारा आकाशा मध्ये दिसून येतो,तर सर्वांचे लक्ष तिकडे जाते ना.हा सुवर्ण चमकणारा तारा,पण सर्वांच्या डोळ्यांमध्ये, बुद्धीमध्ये दिसून येईल.हे सुवर्ण जयंती साजरी करणे आहे.हा तारा प्रथम कोण चमकवेल.

आता परदेशामध्ये चांगल्या प्रकारे वृद्धी होत आहे आणि होणार आहे. बाबांपासून दूर गेलेली मुलं जे काना कोपऱ्या मध्ये लपलेले आहेत,ते वेळे प्रमाण संपर्क मध्ये येत आहेत.सर्व एक दोघांपेक्षा,सेवे मध्ये उमंग उत्साहाने पुढे जात आहेत.हिम्मती द्वारे,बाबांची मदत पण मिळते ना. निराशवादी मध्ये पण आशेचे दीपक जागृत होतात.दुनियावाले विचार करतात,हे होणे तर असंभव आहे, खूप कठीण आहे,आणि लगन निर्विघ्न बनवून,उडत्या पक्षासारखे पोहोचवते.दुहेरी उड्डान द्वारे पोहोचले आहात ना.एक विमान दुसरे बुद्धीचे विमान.हिमंतीचे, उमंगाचे पंखा जेव्हा लागतात तर,जेथे पाहिजे तेथे उडू शकतात.मुलांच्या हिमंत वरती बापदादा नेहमी मुलांची महिमा करतात.हिंमत ठेवल्यामुळे एकापासून दुसरे दीपक जागृत होऊन माळ तर बनली आहे.प्रेमाने जे कष्ट करतात,त्याचे फळ खूप चांगले मिळते.ही सर्वांच्या सहयोगाची विशेषता आहे.कोणतीही गोष्ट असू द्या,परंतु प्रथम दृढता,स्नेहाचे संघटन पाहिजे,त्याद्वारे सफलता प्रत्यक्ष रूपामध्ये दिसून येईल.दृढता कोणत्याही जमीनमध्ये पण फळ उत्पन्न करू शकते.आज-काल वैज्ञानिक वाळूमध्ये पण फळ निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात.तर शांतीची शक्ती काय करू शकत नाही.ज्या जमिनीला स्नेहाचे पाणी मिळते,तेथील फळ पण खूप स्वादिष्ट असतात.जसे स्वर्गामध्ये मोठ-मोठी फळं आणि स्वादिष्ट पण असतात. परदेशात पण मोठी फळे असतात परंतु स्वादिष्ट नसतात,दिसायला चांगले असतात परंतु चव नसते. भारतातील फळं लहान आहेत परंतु चविष्ट असतात.पाया तर सर्व येथेच बनतो ना.ज्या सेवा केंद्रावर स्नेहाचे पाणी मिळते,ते सेवा केंद्र नेहमी फळीभुत होत राहते,सेवेमध्ये आणि सोबत्यामध्ये मध्ये पण.स्वर्गामध्ये शुद्ध पाणी,शुद्ध जमीन असेल तेव्हा फळ पण चांगले येतात.जेथे स्नेह आहे, तेथे वातावरण म्हणजे भुमी श्रेष्ठ होते.तसे पण जेव्हा कोणी अस्वस्थ,व्यथित होतात तर काय म्हणतात मला दुसरे काहीच नको, फक्त स्नेह पाहिजे. तर अस्वस्थ होऊ नये,याचे साधन पण स्नेहच आहे. सर्वात मोठी खुशीची गोष्ट हीच आहे, की जे चुकले होते ते परत आले आहेत.जर तुम्ही परदेशात पोहोचले नसते,तर सेवा कशी झाली असते?दूर होण्यात पण कल्याणच झाले ना, आणि भेटणे हे तर,कल्याणच आहे. आपापल्या स्थानांवरती सर्व उमंग उत्साहाने पुढे जात आहेत आणि सर्वांच्या मनामध्ये एकच लक्ष आहे की,बापदादाची जी इच्छा आहे की, सर्व आत्म्याला अनाथ पासून सनाथ बनवणे,ही अशा आम्ही पूर्ण करू. सर्वांनी मिळून शांतीसाठी विशेष कार्यक्रम बनवला आहे,तो पण चांगला आहे,कमीत कमी सर्वांना थोडे शांत राहण्याचा अभ्यास करवण्यासाठी निमित्त बनाल. जर कोणी अर्थ सहित एक मिनिट पण शांतीचा अनुभव करेल तर,ते त्या एक मिनिटाचा शांतीचा अनुभव,त्यांना सारखा सारखा आकर्षित करत राहील. कारण सर्वांना शांतीची इच्छा आहे परंतु विधी येत नाही,संगत अशी मिळत नाही.जेव्हा शांतिप्रिय सर्व आत्मे आहेत,तर अशा आत्म्यांना शांतीची अनुभूती झाल्यामुळे,स्वतः आकर्षित होत राहतील.प्रत्येक स्थानकावरती आपापले विशेष कार्य करणारे, चांगले निमित्त बनलेले, श्रेष्ठ आत्मे आहेत.तर कमाल करणे कोणती मोठी गोष्ट नाही.आवाज करण्याचे साधन म्हणजे आज-कालचे विशेष आत्मे.जेवढे कोणी विशेष आत्मे संपर्कामध्ये येतील तर त्यांच्या संपर्कात आल्याने,अनेकांचे कल्याण होईल. एका अतिमहत्त्वाच्या व्यक्ती द्वारे अनेक साधारण आत्म्याचे कल्याण होते.बाकी जवळच्या संबंधांमध्ये तर येणार नाहीत. आपल्या धर्मामध्ये आपल्या भूमिकेमध्ये,त्यांना विशेष कोणते ना कोणते फळ मिळते.बाबांना पण साधारण आत्मेच पसंत आहेत,वेळ पण तेच देऊ शकतात.त्यांना तर वेळच नाही परंतु ते निमित्त बनले तर अनेकांना फायदा होतो, अच्छा. पार्टीसोबत वार्तालाप:-नेहमी अमर भवचे वरदानी आत्मे आहोत, असा अनुभव करता का?नेहमी वरदाना द्वारे पुढे जात आहात ना.ज्यांचा बाबाशी अतुट स्नेह आहे,तेवढे अमर भवचे वरदानी

आहात,नेहमी बेफिक्र बादशाहा आहात. कोणत्याही कार्याच्या निमित्त बनून बेफिक्र राहणे,हीच विशेषता आहे.जसे बाबा निमित्त तर बनतात ना, परंतु निमित्त बनून पण अनासक्त आहेत,असे पित्याचे अनुकरण करा. नेहमी स्नेहाच्या सुरक्षेमुळे पुढे जात चला.स्नेहाच्या आधारावरती बाबा नेहमी सुरक्षित करून पुढे घेऊन जात आहेत.हा पण अटळ निश्चय आहे ना. स्नेहाचा आत्मिक सबंध मिळाला, या आत्मिक सबंधाद्वारेच एक दोघांचे प्रिय झाले.बापदादानी मातांना एक शब्द खूप सहज करून सांगितला आहे,या एका शब्दाची आठवण करा, "माझे बाबा" माझे बाबा म्हटल्याने सर्व खजाने मिळतात.माझे बाबा म्हणले आणि सर्व खजाना मिळाला.मातांना चावी सांभाळणे तर चांगल्या प्रकारे येते ना.तर बापदादानी पण ही चावी दिली आहे,त्याद्वारे जो खजाना पाहिजे, तो मिळू शकतो. एका खजान्याची चावी दिली नाही,सर्व खजीन्याची चावी दिली आहे.बस बाबा-बाबा करत राहा,तर आत्ताचे बालकच मालक आणि भविष्यामध्ये पण मालक बनाल.नेहमी याच खुशीमध्ये नाचत रहा,अच्छा.

वरदान:-
निश्चयाच्या अखंड रेषेद्वारा क्रमांक एकचे भाग्य बनवणारे, विजयाचे टिळाधारी भव.

जे निश्चय बुद्धी मुलं आहेत, ते कधीच "कसे किंवा असे"च्या विस्तारा मध्ये जात नाहीत.त्यांच्या निश्चयाची अतुट रेषा अन्य आत्म्यांना पण स्पष्ट दिसून येते.त्यांच्या निश्चयाच्या रेषा मध्ये-मध्ये खंडित होत नाही.असे रेषा असणाऱ्यांच्या मस्तका मध्ये अर्थात स्मृतीमध्ये नेहमी स्मृतीचा तिलक,टीळा दिसून येईल.ते जन्मताच सेवेच्या जिम्मेवारीचे ताजधारी असतील. नेहमी ज्ञान रत्ना द्वारे खेळणारे असतील,नेहमी आठवण आणि खुशीच्या झोक्यामध्ये जीवन व्यतीत करणारे असतील.हीच क्रमांक एक भाग्याची रेषा आहे.

सुविचार:-
बुद्धीरुपी संगणकामध्ये(काँम्पुटरमध्ये) पूर्ण विरामाची मात्रा देणे म्हणजेच प्रसन्नचित्त राहणे.