19-08-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,आता तुमची सुनावणी होत आहे, शेवटी तो दिवस आला आहे, जेंव्हा तुम्ही उत्तम
ते उत्तम पुरुष,या पुरुषोत्तम संगमयुगावर बनत आहात"
प्रश्न:-
हार आणि जीत,
या संबंधां मध्ये असे कोणते, एक भ्रष्ट कर्म आहे,जे मनुष्याला दुःखी करते?
उत्तर:-
"जुगार खेळणे". अनेक मनुष्या मध्ये जुगार खेळण्याची सवय आहे, हे भ्रष्ट कर्म
आहे,कारण हारल्यामुळे दुःख होते आणि जिंकल्यामुळे खूशी होते. तुम्हा मुलांना बाबांचा
आदेश आहे, मुलांनो ,दैवी कर्म करा. असे कोणते पण कर्म केले करु नका, ज्यामुळे वेळ
वाया जाईल, नेहमी मोठा विजय प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करा.
गीत:-
शेवटी तो दिवस
आला आज. ..
ओम शांती।
डबल ओम शांती. मुलांनी पण म्हटले पाहिजे, ओम शांती. येथे मग आहे डबल ओम शांती.एक
सर्वोच्च आत्मा( शिव बाबा) म्हणतात ओम शांती. दुसरे दादा म्हणतात ओम शांती. मग
तुम्ही मुले पण म्हणता की, आम्ही आत्मे शांत स्वरूप आहोत. राहण्याचे ठिकाण पण
शांतीचा देश आहे. इथे या देशांमध्ये भूमिका करण्यासाठी आलो आहे.या गोष्टी आत्मा
विसरून गेली आहे, मग शेवटी तो दिवस तर जरुर आला आहे,जेंव्हा सुनावणी होत आहे.कोणती
सुनावणी? म्हणतात,बाबा दुःख दूर करून, सुख द्या. प्रत्येक मनुष्य सुख, शांतीच पसंत
करत आहेत. बाप पण गरीब निवाज आहेत. यावेळी भारत बिल्कुल गरीब आहे. मुले जाणतात की,
आम्ही फारच सावकार होतो. हे पण तुम्ही ब्राह्मण मुलेच ओळखत आहात, बाकी इतर सर्व
जंगलां मध्ये आहेत. तुम्हां मुलांना पण क्रमवार, पुरुषार्था नुसार निश्चय आहे.तुम्ही
जाणता की, हे आहेत श्री-श्री, त्यांची मत पण श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे.भगवानुवाच आहे
ना. मनुष्य तर राम राम नावाची अशी धून लावतात की, जसा बाजा वाजत आहे. आता राम तर
त्रेताचे राजा होते, त्यांची महिमा फार होती. 14 कला होते.दोन कला कमी, त्यांच्या
साठी पण महिमा करतात, राम राजा,राम प्रजा,........तुम्ही सावकार बनत आहात ना.रामा
पेक्षा जास्त सावकार मग लक्ष्मीनारायण असतात. राजाला अन्नदाता म्हणतात. बाबा पण दाता
आहेत, ते सर्व कांही देत आहेत,मुलांना विश्वाचे मालक बनवत आहेत. तिथे कोणती
अप्राप्त वस्तू असत नाही, ज्यांसाठी पाप करावे लागते. तेथे पापाचे नावच असत नाही.
अर्धा कल्प दैवी राज्य, परत अर्धा कल्प आसुरी राज्य आहे, असुर म्हणजे ज्यांच्या
मध्ये देहअभिमान आहे,पाच विकार आहेत.
आता तुम्ही आले आहात, नावाडी किंवा बागवाना जवळ. तुम्ही जाणता की, आम्ही
प्रत्यक्षात त्यांचे जवळ बसले आहोत. तुम्ही मुले पण बसल्या बसल्या विसरून जात आहात.
भगवान जे सांगत आहेत ते ऐकले पाहिजे ना. प्रथम तर ही श्रीमत देत आहेत, श्रेष्ठ ते
श्रेष्ठ बनण्यासाठी. तर मता वर चालले पाहिजे ना. पहिल्या प्रथम मत देत आहेत,
देहीअभिमानी बना.बाबा आम्हां आत्म्यांना शिकवत आहेत. हे पक्के पक्के आठवणीत ठेवा.
हे अक्षर आठवणीत ठेवले, तरी तरुन जाल. मुलांना समजावले आहे की, तुम्ही ८४ जन्म
घेतात. तुम्हीच तमोप्रधान पासून सतो प्रधान बनता. ही दुनिया तर पतित दुःखी आहे.
स्वर्गाला सुखधाम म्हणले जाते.मुले जाणतात की, शिवबाबा,भगवान, आम्हाला शिकवत आहेत.
त्यांचे आम्ही विद्यार्थी आहोत. ते पिता पण आहेत, शिक्षक पण आहेत,तर शिकले पण
चांगल्या रीतीने पाहिजे. दैवी कर्म पण पाहिजेत. कोणते भ्रष्ट कर्म करायचे नाही.
भ्रष्ट कर्मामध्ये, जुगार खेळणे पण येते. हे पण दुःख देते. हारले तर दुःख.
मोठी हार खाल्ली आहे. हा आहेच मोठी हार आणि विजयाचा खेळ. 5 विकार रुपी रावणा कडून
हार खाल्ली आहे, त्यावर विजय प्राप्त करायचा आहे. माये कडून हारला,तर हार आहे. आता
तुम्हा मुलांचा विजय होणार आहे. आता तुम्हाला जुगार खेळणे इ. सर्व सोडून द्यायचे आहे.
आता मोठ्यातील, मोठा विजय प्राप्त करण्यासाठी पूर्ण लक्ष दिले पाहिजे.कोणतेही असे
कर्म करायचे नाही,ज्यामुळे वेळ वाया जाईल. मोठ्यातील मोठा विजय प्राप्त करण्यासाठी
पुरुषार्थ करायचा आहे, करून घेणारे बाबा समर्थ आहेत.ते सर्वशक्तिमान आहेत.हे पण
समजवले आहे की, फक्त बाबा सर्वशक्तिमान नाहीत. रावण पण सर्वशक्तिमान आहे. अर्धा
कल्प रावणराज्य, अर्धा कल्प रामराज्य चालते. आता तुम्ही रावणावर विजय प्राप्त करत
आहात.आता या हदच्या गोष्टी सोडून,बेहद मध्ये लागले पाहिजे. बाबा नावाडी आले
आहेत.शेवटी तो दिवस आला आहे ना. तुम्हीं जी हाक मारली आहे, त्याची सुनावनी होत आहे,
उंच ते उंच बाबा जवळ.बाबा म्हणतात की, मुलांनो, तुम्हीं अर्धा कल्प फार धक्के खाल्ले
आहेत.पतित बनले आहात. पावन भारत शिवालय होता. तुम्ही शिवालया मध्ये राहत होता. आता
तुम्ही वेश्यालया मध्ये आहात. तुम्हां शिवालया मध्ये राहणाऱ्यांची पूजा होत आहे. इथे
अनेक धर्मांमध्ये किती भांडणे आहेत. बाबा म्हणतात की, या सर्वांना मी नष्ट करून
टाकत आहे.सर्वांचा विनाश होणार आहे, इतर धर्मस्थापक विनाश करत नाहीत. ते सद्गती
देणारे गुरू पण नाहीत.सद्गती ज्ञानामुळेच होत आहे. सर्वांचे सद्गती दाता,ज्ञानाचे
सागर बाबाच आहेत. हे अक्षर चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. फार असे आहेत, इथे ऐकून
बाहेर गेले, तर येथील येथेच राहून जाते. जसे गर्भ जेल मध्ये म्हणतात की, आम्ही पाप
करणार नाही. बाहेर आल्यावर, बसं, तेथील तेथेच राहते. थोडे मोठे झाल्यावर पाप
करण्यास सुरू करतात. काम कटारी चालवतात. सत्ययुगा मध्ये गर्भ महल असतो. तर बाबा
समजावत आहे, शेवटी तो दिवस आज आला आहे. कोणता दिवस? पुरुषोत्तम संगमयुगाचा. ज्याची
कोणाला पण माहिती नाही. मुलांना भासना येते की, आम्ही पुरुषोत्तम बनत आहोत. उत्तम
ते उत्तम पुरुष आम्हीच होतो, श्रेष्ठ ते श्रेष्ठ धर्म होता. कर्म पण श्रेष्ठ ते
श्रेष्ठ होते. रावण राज्य च नव्हते. शेवटी तो दिवस आला, जे बाबा येऊन शिकवत आहेत.
तेच पतित पावन आहेत. तर अशा बाबाच्या श्रीमता वर चालले पाहिजे ना.आता आहे कलियुगा
चा अंत. थोडावेळ पण पाहिजे ना,पावन बनण्यासाठी. ६० वर्षानंतर वानप्रस्थ म्हणतात.
साठी तर हातात काठी. आता तर पहा, ८० वर्षाचे मनुष्य पण विकाराला सोडत नाहीत. बाबा
म्हणतात,मी यांच्या वानप्रस्थ अवस्थेमध्ये प्रवेश करून, त्यांना समजावत आहे. आत्माच
पवित्र बनून वर जात आहे. आत्माच उडत आहे. आता आत्म्याचे पंख तुटले आहेत. उडू शकत
नाही. रावणाने पंख कापले आहेत. पतित बनले आहेत. कोणी एक पण परत जाऊ शकत नाही. प्रथम
तर सर्वोच्च बाबाला जायाला पाहिजे. शिवाची वरात म्हणत आहेत ना. शंकराची वरात आसत
नाही. बाबाच्या मागे आम्ही सर्व मुले जात आहोत. बाबा आले आहेत, घेऊन जाण्यासाठी.
शरीरासह तर घेऊन जात नाहीत ना.
आत्मे सर्व पतित आहेत. जो पर्यंत पवित्र बनत नाहीत, तो पर्यंत परत जाऊ शकत नाहीत.
पवित्रता होती तर शांती आणि समृद्धी होती. फक्त तुम्ही आदि सनातन देवी देवता
धर्मवालेच होता. आता इतर सर्व धर्म वाले आहेत. देवता धर्म तर नाही. याला कल्पवृक्ष
म्हटले जाते. वडाच्या झाडाची या बरोबर तुलना केली जाते. खोड तर नाहीच. बाकी सर्व
झाड उभे आहे. तसे या पण देवी देवता धर्माचा पाया नाही.बाकी सारे झाड उभे आहे. पूर्वी
जरूर होते परंतु प्राय:लोप झाले आहे, मग पुनरावृत्ती होईल. बाबा म्हणतात की, मी परत
आलो आहे, एका धर्माची स्थापना करण्यासाठी, बाकि सर्व धर्माचा विनाश होऊन जाईल. नाही
तर सुष्टीचक्र कसे फिरेल? म्हटले पण जाते की, जगाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती
होत आहे. आता जुनी दुनिया आहे, मग नवीन दुनियेची ची पुनरावृत्ती होणार आहे.ही जुनी
दुनिया बदलून, नवीन दुनिये ची स्थापना होईल. हाच भारत नवीन पासून जुना बनत आहे.
म्हणतात जमुनेच्या काठावर परीस्थान होते. बाबा म्हणतात, तुम्ही काम चितेवर बसून
कब्रिस्तानी बनले आहात. मग तुम्हाला परी स्थानी बनवत आहेत. श्रीकृष्णाला श्यामसुंदर
म्हणतात. कां? कोणाच्या बुद्धी मध्ये पण येत नाही. नांव तर चांगले आहे ना. राधे आणि
कृष्ण, ते आहेत, नवीन जगातील राजकुमार आणि राजकुमारी. बाबा म्हणतात, काम चितेवर
बसल्यामुळे लोहयुगा मध्ये आहेत. गायन पण आहे की, सागराची मुले काम चितेवर बसून जळून
मेली. आता बाबा सर्वावर ज्ञान वर्षा करत आहेत. मग सर्व निघून जातील, स्वर्ण
युगामध्ये. आता आहे संगमयुग. तुम्हाला अविनाशी ज्ञान रत्नाचे दान मिळत आहे, ज्यामुळे
तुम्ही सावकार बनत आहात. हे एक एक रतन लाखो रुपयाचे आहे. ते लोक मग समजतात की,
शास्त्रां मधील महावाक्य,लाखो रुपया ची आहेत. तुम्ही मुले या शिक्षणाद्वारे पदमपती
बनत आहात. कमाई चे साधन आहे ना. या ज्ञान रत्नाला तुम्ही धारण करत आहात. बुद्धी रुपी
झोळी भरत आहात. ते मग शंकरा साठी म्हणतात, हे बम बम महादेव, भर दे झोळी. शंकरा वर
किती कलंक लावले आहेत. ब्रह्मा आणि विष्णु ची भूमिका इथे आहे. हे पण तुम्ही जाणता
८४ जन्म विष्णू साठी म्हटले आहेत, लक्ष्मीनारायणा साठीपण. तुम्ही ब्रह्मा साठी पण
म्हणता. बाबा सांगत आहेत, खरे काय आहे, चूक काय आहे, ब्रह्मा आणि विष्णु ची भूमिका
काय आहे. तुम्हींच देवता होता, चक्कर मारून आता ब्राह्मण बनले आहात, परत आता देवता
बनत आहात. भूमिका सारी इथे होत आहे. वैकुंठा मधील खेळ पाहत आहात. इथे तर वैकुंठ नाही.
मीरा नृत्य करत होती. ते सर्व साक्षात्कार म्हणावेत. किती त्यांचा मान आहे.
साक्षात्कार केला, कृष्णा बरोबर नृत्य केले. तर काय,स्वर्गांमध्ये तर गेली नाही ना.
गती सद्गती तर संगमयुगावरच मिळते. या पुरुषोत्तम संगमयुगाला तुम्हीच समजतात. आम्ही
बाबा द्वारे आता मनुष्या पासून देवता बनत आहोत. विराट रूपाचे ज्ञान पण पाहिजे ना.
चित्र ठेवत आहेत, परंतु समजत कांहीच नाहीत. अकासुर आणि बकासुर, ही सर्व या
संगमयुगातील नांवे आहेत. भस्मासुर पण नांव आहे. काम चितेवर बसून भस्म झाले आहेत. आता
बाबा म्हणतात की, मी सर्वांना परत ज्ञान चितेवर बसवून घेऊन जात आहे. आत्मे सर्व भाऊ
भाऊ आहेत.असे म्हणतात पण की, हिंदी चीनी भाई भाई, हिंदू-मुस्लीम भाई भाई आहेत. आता
भाऊ भाऊ पण आपसा मध्ये भांडण करत आहेत. कर्म तर आत्मा करत आहे ना. शरीराद्वारे आत्मा
भांडत आहे. पाप पण आत्म्या वर लागते,त्यामुळे पापत्मा म्हटले जाते. बाबा किती
प्रेमाने समजावत आहेत. शिवबाबा आणि ब्रह्माबाबा दोघांना हक्क आहे, मुलांनो, मुलांनो,
म्हणण्याचा. बाबा, दादा द्वारे म्हणत आहेत, हे मुलांनो! समजत आहात ना.आम्ही आत्मे
इथे येऊन भूमिका बजावत आहोत. मग अंताला बाबा येऊन, सर्वांना पवित्र बनवून बरोबर
घेऊन जातील. बाबाच येऊन ज्ञान देत आहेत. येतात पण इथेच. शिवजयंती पण साजरी करत आहेत.
शिवजयंती नंतर मग कृष्ण जयंती येत आहे. श्रीकृष्णच मग श्री नारायण बनत आहेत. मग
चक्कर लावून अंताला सावळे( पतित) बनत आहेत. बाबा येऊन पुन्हा गोरा बनवत आहेत. तुम्ही
ब्राह्मणा पासून देवता बनता. मग शिडी उतरता. हा 84 जन्माचा हिशोब, आणखीन कोणाच्या
बुद्धीमध्ये बसत नाही्. बाबाच मुलांना समजावत आहेत. गीत पण ऐकले, शेवटी भक्तांची
सुनावणी होत आहे. बोलावतात पण की. हे भगवान येऊन आम्हाला भक्तीचे फळ द्या. भक्ती फळ
देत नाही. फळ भगवान देत आहेत. भक्तांना देवता बनवत आहेत. तुम्ही फार भक्ती केली आहे.
पहिल्या प्रथम तुम्ही शिवाची भक्ती केली आहे.जे चांगल्या प्रकारे या गोष्टीला
समजतात, तुम्हांला भासना येईल की, हे आमच्या कुळातील आहेत. कोणाच्या बुद्धी मध्ये
बसत नाही, तर समजा की, भक्ती कांही केली नाही, शेवटी आले आहेत. इथे पण अगोदर येणार
नाहीत. हा हिशोब आहे. ज्यांनी फार भक्ती केली आहे, त्यांना जास्त फळ मिळेल. थोडी
भक्ती, थोडे फळ. ते स्वर्गाचे सुख भोगू शकत नाहीत, कारण सुरवाती पासून शिवाची भक्ती
थोडी केली आहे. तुमची बुद्धी आता काम करत आहे. बाबा वेगवेगळ्या युक्ती, फार सांगत
आहेत. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मातपिता बापदादाची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) एक एक
अविनाशी ज्ञान रत्न जे पद्म सारखे आहेत. त्यांने आपली झोळी भरून, बुद्धीमध्ये धारण
करून, मग दान करायचे आहे.
२) श्री श्री च्या श्रेष्ठ मतावर पुर्ण रितीने चालायचे आहे. आत्म्याला सतोप्रधान
बनवण्यासाठी, देहीअभिमानी बनण्याचा, पुर्ण पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
मनमनाभव च्या
विधीद्वारे, बंधनाच्या बिजाला समाप्त करणारे,नष्टोमोहा स्मृती स्वरुप भव:
बंधनाचे बीज संबंध आहे.
जेव्हा बाबा बरोबर सर्व संबंध जोडले आहेत, तर आणखीन कोणा मध्ये मोह कसा राहू शकतो.
विना संबंधाचा मोह होत नाही आणि मोह नाही तर बंधन नाही. जेंव्हा बीज नष्ट केले आहे,
तर बिना बिजाचा वृक्ष निर्माण होत नाही. जर आता पर्यंत बंधन आहेत, तर सिद्ध आहे की,
कांही तोडले आहे,कांही जोडले आहे, त्यामुळे मनमनाभव च्या विधी द्वारे, मनाच्या बंधना
पासून मुक्त,नष्टोमोहा स्मृती स्वरुप बना, मग या तक्रारी नाहीशा होतील किं, काय
करावे, बंधन आहे, संपत नाही.
बोधवाक्य:-
ब्राह्मण
जीवनाचा श्वास, उमंग उत्साह आहे, त्यामुळे कोणत्या पण परिस्थिती मध्ये, उमंग
उत्साहाचा जोर, कमी होऊ नये.