05-08-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,हे पुरुषोत्तम संगमयुग कल्याणकारी युग आहे,यामध्येच राजयोगाच्या शिक्षणाद्वारे,तुम्हाला श्रीकृष्णपुरी चे मालक बनायचे आहे"

प्रश्न:-
बाबा मातांना ज्ञानाचा कलश का देतात?कोणती एक परंपरा भारतामध्येच चालत येते?

उत्तर:-
पवित्रतेची राखी बांधून सर्वांना पतितापासून पावन बनवण्यासाठी, बाबा मातांना कलश देतात.रक्षाबंधन पण भारतामध्येच होते,बहिण भावाला राखी बांधते. हे पवित्रतेची लक्षणं आहेत.बाबा म्हणतात,मुलांनो तुम्ही माझीच आठवण करा,तर पावन बनून,पावन दुनियेचे मालक बनाल.

गीत:-
भोलेनाथ पेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीत,बिगडीला सुधारणारे,दुसरे कोणी नाहीत…

ओम शांती।
ही भोलेनाथ ची महिमा आहे,ज्यांच्यासाठी त्यांना देणारे म्हणतात.तुम्ही मुलं जाणतात श्रीलक्ष्मी- नारायणला राज्य भाग्य कोणी दिले.जरुर भगवंतानीच दिले असेल,कारण स्वर्गाची स्थापना तर तेच करतात.स्वर्गाची बादशाही भोलेनाथने जशी लक्ष्मी नारायणला दिले,तसेच कृष्णाला पण दिली.राधे- कृष्ण किंवा लक्ष्मीनारायण तर एकच गोष्ट आहे,परंतु राजधानी नाही. त्यांना परमपिता परमात्मा शिवाय कोणीही राज्य देऊ शकत नाही. त्यांचा जन्म स्वर्गा मध्येच म्हणणार, हे पण तुम्ही मुलंच जाणतात.तुम्ही मुलंच जन्माष्टमीवरती समजावून सांगतात.कृष्णाची जन्माष्टमी आहे, तर राधेची पण असायला हवी, कारण दोघे स्वर्गाचे निवासी होते. राधे-कृष्णच स्वयंवराच्या नंतर लक्ष्मी-नारायण बनतात.मुख्य गोष्ट, त्यांना हे राज्य कोणी दिले.हा राजयोग कधी आणि कोणी शिकवला.स्वर्गामध्ये तर शिकवला नसेल.सतयुगामध्ये तर ते उत्तम पुरुष आहेत.कलयुगाच्या नंतर सतयुग आहे,तर जरूर कलियुगाच्या अंत मध्ये राजयोग शिकले असतील.जे परत नवीन जन्मांमध्ये राजाई प्राप्त केली.जुन्या दुनिये पासून नवीन पावन दुनिया बनते.जरूर पतित-पावन आले असतील.आता संगमयुगा वरती कोणता धर्म होता,हे कोणालाच माहिती नाही.जुनी दुनिया आणि नवीन दुनियेचे हे पुरुषोत्तम संगमयुग आहे,ज्याचे गायन आहे.हे लक्ष्मी-नारायण नवीन दुनियेचे मालक आहेत.यांच्या आत्म्याला,अगोदरच्या जन्मांमध्ये परमपिता परमात्मा ने राजयोग शिकवला होता.ज्या पुरुषार्थाचे प्रारब्ध नवीन जन्मा मध्ये मिळते.याचे नावच कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग आहे.जरूर अनेक जन्माच्या अंतिम जन्मांमध्ये, यांना कोणी राज योग शिकवला असेल.कलियुगामध्ये अनेक धर्म,सतयुगामध्ये एकच देवी-देवता धर्म असतो.संगमयुगा मध्ये कोणता धर्म आहे,ज्यामुळे पुरूषार्थ करून राजयोग शिकले आणि सतयुगाचे प्रारब्ध भोगले.असे समजवले जाते, संगमयुगा वरती ब्रह्माद्वारा ब्राह्मणाची स्थापना होते.चित्रांमध्ये पण ब्रह्मा द्वारे कृष्णपुरीची स्थापना होते असे दाखवले आहे. विष्णू किंवा नारायण पुरी एकच आहे.आता तुम्ही जाणता आम्ही कृष्णपुरी चे मालक बनत आहोत.या राजयोगाच्या शिक्षणाद्वारे आणि पावन बनल्यामुळे.शिव भगवानुवाच आहे ना.कृष्णाची आत्माच अनेक जन्माच्या अंतच्या जन्मांमध्ये परत असे श्रेष्ठ बनते.८४ जन्म घेतात.हा ८४ वा जन्म आहे, यांचे नाव ब्रह्मा ठेवतात,नाहीतर ब्रह्मा आले कुठून.ईश्वराने रचना केली,तर ब्रह्मा,विष्णू, शंकर कोठून आले. कशी स्थापना केली,काय छू मंत्र केला,ज्यामुळे रचना झाली.बाबा त्यांचा इतिहास सांगतात.दत्तक घेतले जाते,तर नाव बदलते,पुर्वी ब्राह्मा नाव तर नव्हते.असे म्हणतात,अनेक जन्माच्या अंतमध्ये ... तर जरूर पतित मनुष्य झाले ना. ब्रह्मा आले कोठून,कोणालाही माहिती नाही. अनेक जन्माचा अंतिम जन्म कोणाचा झाला.तसे तर लक्ष्मी-नारायण ने अनेक जन्म घेतले आहेत. नाव-रूप देश काळ,सर्व बदलत जाते. कृष्णाच्या चित्रांमध्ये ८४ जन्माची गोष्ट स्पष्ट लिहिली आहे.जन्माष्टमी रोजी कृष्णाचे चित्र खूप विक्री होतात, कारण कृष्णाच्या मंदिरातच सर्व जातात ना. राधा-कृष्णाच्या मंदिरांमध्येच जातात,कृष्णाच्या सोबत जरूर राधे असेल.राधे-कृष्ण राजकुमार राजकुमारीच,लक्ष्मीनारायण महाराजा महाराणी बनतात.त्यांनीच ८४ जन्म घेतले,परत अंतकाळातील जन्मांमध्ये ब्रह्मा-सरस्वती बनले.अनेक जन्माच्या अंतमध्ये बाबानी प्रवेश केला आणि यांनाच म्हणतात तुम्ही आपल्या जन्माला जाणत नव्हते.तुम्ही पूर्वीच्या जन्मांमध्ये लक्ष्मीनारायण होते,परत हा जन्म घेतला,त्यांनी अर्जुनचे नाव ठेवले आहे.अर्जुनाला राजयोग शिकवला.अर्जुनाला वेगळे केले आहे परंतु त्याचे नाव अर्जून नाही.ब्रह्माचे जीवन चरित्र पाहिजे ना,परंतु ब्राह्माण आणि ब्राह्मणाचे वर्णन कोठेच नाही. या गोष्टी बाबाच सन्मुख समजवतात. सर्व मुलं समजून घेऊन परत दुसऱ्यांना समजून सांगतील.या गोष्टी ऐकून परत दुसऱ्यांना ऐकावयच्या आहेत.तुम्ही पण ऐकता परत ऐकवतात.हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, लीपयुग आहे. हे जास्तीचे युग आहे.पुरुषोत्तम महिना पण असतो तर त्या एका वर्षामध्ये तेरा महिने होतात.या संगम युगामधील सनच प्रत्येक वर्षी साजरे करतात. या पुरुषोत्तम संगमयुगाची कोणालाच माहिती नाही.या संगमयुगा मध्ये बाबा येऊन पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करवतात. पतीत दुनिये पासून पावन दुनियेची स्थापना करतात.रक्षाबंधन सन साजरा करण्याची परंपरा भारतामध्येच आहे. बहिण भावाला राखी बांधते परंतु ती कुमारी तरीही परत अपवित्र बनते. आता बाबांनी तुम्हा मातांना ज्ञानाचा कलष दिला आहे,ज्यामुळे ब्रह्माकुमार-कुमारी,सन्मुख पवित्रतेची प्रतिज्ञा करवण्यासाठी राखी बांधतात.बाबा म्हणतात माझीच आठवण करा,तर तुम्ही पावन बनून पावन दुनियेचे मालक बनाल.बाकी काही राखी इत्यादी बांधण्याची आवश्यकता नाही,हे समजवले जाते. जसे साधू-संन्यासी लोक दान मागतात,काही म्हणतात क्रोधाचे दान द्या,काही म्हणतात कांदा खाऊ नका. जे स्वतः खात नाहीत,ते दान घेतात. त्यापेक्षा भारी प्रतिज्ञा तर बेहद्दचे बाबा करवतात.तुम्हाला पावन बनायची इच्छा आहे,तर पतित-पावन बाबांची आठवण करा.द्वापरपासून तुम्ही पतित बनत आहात,आता सारी दुनिया पावन पाहिजे,ती तर बाबाच बनवू शकतात.सर्वांचे सदगती दाता कोणते मनुष्य होऊ शकत नाहीत. बाबा पावन बनण्याची प्रतिज्ञा घेतात. भारत पावन स्वर्ग होता.पतित पावन, ते परमपिता परमात्माच आहेत. कृष्णाला पतितपावन म्हणू शकत नाही,त्यांचा तर जन्म होतो,त्यांचे तर मात पिता पण दाखवतात.एक शिवाचा जन्म अलौकिक आहे,ते स्वतःचा परिचय देतात की,मी साधारण तना मध्ये प्रवेश करतो.शरीराचा आधार जरुर घ्यावा लागेल.मी ज्ञानाचा सागर,पतीत पावन,राजयोग शिकवणारा आहे.बाबाच स्वर्गाचे रचनाकार आहेत आणि नरकाचा विनाश करवतात. जेव्हा स्वर्ग आहेत तर नर्क नाही.आता संपूर्ण रौरव नर्क आहे. जेव्हा बिलकुल तमोप्रधान नर्क बनतो,तेव्हाच बाबा येऊन सतोप्रधान स्वर्ग बनवतात.१००टक्के पतीतपासून १००टक्के पावन बनवतात.प्रथम जन्म जरूर सतोप्रधानच मिळेल.मुलांना विचार सागर मंथन करून भाषण करायचे आहे.ज्ञान सांगणे प्रत्येकाचे वेगवेगळे आहे.बाबा पण आज एक गोष्ट,उद्या दुसरी गोष्ट समजावतात. एक सारखे समजावणे तर होऊ शकत नाही.समजा टेप द्वारे कोणी बरोबर ऐकले,तरीही, एक सारखे ऐकवू शकत नाहीत,फरक जरूर पडतो.बाबा जे काही ऐकवतात याची नोंद नाटकांमध्ये आहे.जे ज्ञान कल्पापुर्वी ऐकवले होते,तेच परत आज ऐकवतात.हे पण नोंद आहे.भगवान स्वत: म्हणतात,पाच हजार वर्ष पूर्व जे वाक्य ऐकवले होते, तेच हुबेहुब ऐकवत आहेत.हे पण बेहद्दच्या नाटकांमध्ये नोंद आहे. यामध्ये काहीच फरक पडू शकत नाही. इतक्या छोट्या आत्म्यामध्ये सर्व नोंद आहे.आता कृष्णजन्माष्टमी कधी होती,हे पण मुलं समजतात. आज पासून पाच हजार वर्ष पूर्व, काही दिवस कमी म्हणाल,कारण आता शिकत आहोत. नवीन दुनियेची ची स्थापना होत आहे.मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे.तुम्ही जाणतात कृष्णाच्या आत्म्याने ८४चे चक्र लावले आहे,आता परत कृष्णाच्या नावा रूपामध्ये येत आहे.चित्रामध्ये दाखवले आहे, जुन्या दुनियेला लात मारत आहे,नवीन दुनिया हातामध्ये आहे.आता शिकत आहे,म्हणून म्हटले जाते,श्रीकृष्ण येत आहेत.जरुर बाबा अनेक जन्माच्या अंत मध्येच शिकवतील.हे शिक्षण पूर्ण होईल,तेव्हा कृष्ण जन्म घेतील. बाकी थोडावेळ शिक्षणासाठी आहे.

जरूर अनेक धर्माचा विनाश झाल्यानंतर कृष्णाचा जन्म झाला असेल,ते पण एक कृष्ण नसतील, सारी कृष्णपुरी असेल.हे ब्राह्मणच आहेत,ते परत राजयोग शिकून देवता पद प्राप्त करतील.देवता ज्ञानाद्वारे बनतात.बाबा येऊन मनुष्यापासून राजयोगा द्वारे देवता बनवतात.ही पाठशाला आहे,यामध्ये जास्त वेळ लागतो.शिक्षण सहज आहे बाकी योगामध्ये कष्ट आहेत.तुम्ही सांगू शकता,कृष्णाची आत्मा आत्ता परमपिता परमात्मा द्वारे राजयोग शिकत आहे.शिवबाबा ब्रह्मा द्वारे विष्णुपुरी चे राज्य देण्यासाठी आम्हाला शिकवत आहेत.आम्ही प्रजापिता ब्रह्माची मुलं ब्राह्मण आहोत.हे संगम युग आहे,हे खूप छोटे युग आहे.शेंडी सर्वात लहान असते ना,परत त्याच्या पेक्षा मोठे मुख असते,त्यापेक्षा मोठ्या भुजा, त्यानंतर मोठे पोट,त्याच्यानंतर पाय मोठे असतात.विराट रूप दाखवतात परंतु त्याचे रहस्य कोणाला माहित नाही.तुम्हा मुलांना हे ८४ जन्माच्या चक्राचे रहस्य समजावयाचे आहे. शिवजयंतीच्या नंतर कृष्ण जयंती येते.

तुम्हा मुलांसाठी हे संगमयुग आहे. तुमच्यासाठी कलियुग पूर्ण झाले. बाबा म्हणतात,तुम्हाला सुखधाम शांतीधाम मध्ये घेऊन जाण्यासाठी,मी आलो आहे.तुम्ही सुखधामचे रहिवासी होते,परत दुःखधाम मध्ये आले आहात.तुम्ही पुकारतात, बाबा या जुन्या दुनिये मध्ये या.तुमची दुनिया तर नाही.आता तुम्ही काय करत आहात?योगबळा द्वारे आपल्या दुनिये ची स्थापना करत आहोत.असे म्हटले जाते,अहिंसा परमो देवी-देवता धर्म.तुम्हाला न काम कटारी चालवायचे आहे,न लढाई भांडण करायचे आहे.बाबा म्हणतात मी प्रत्येक पाच हजार वर्षानंतर येतो, लाखो वर्षाची गोष्ट नाही.बाबा म्हणतात यज्ञ,दान-पुण्य इत्यादी करता तुम्ही खालीच उतरत आले आहात.ज्ञानाद्वारे सद्गती होते.मनुष्य तर कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपले आहेत,जे जागृतच होत नाहीत, म्हणून बाबा म्हणतात मी कल्प कल्प येतो.माझी पण नाटकांमध्ये भूमिका आहे,भूमिके शिवाय मी काहीच करू शकत नाही.मी पण नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलेलो आहे, वेळेनुसारच येतो.नाटकाच्या नियोजनानुसार मी तुम्हा मुलांना परत घेऊन जातो.आता मनामनाभवचा हा मंत्र देतो परंतु याचा अर्थ पण कोणीच जाणत नाहीत.बाबा म्हणतात देहाचे सर्व संबंध सोडून माझीच आठवण करा,तर तुम्ही पावन बनाल.बाबांची आठवण करण्यासाठी मुलं मेहनत करत राहतात.हे ईश्वरीय विश्वविद्यालय साऱ्या विश्वाला सद्गती देणारे आहे, दुसरे कोणते ईश्वरीय विश्वविद्यालय असू शकत नाही.ईश्वर पिता स्वतः येऊन साऱ्या विश्वाला परिवर्तन करतात,नरकापासून स्वर्ग बनवतात, ज्यावरती परत तुम्ही राज्य करतात. शिवाला बाबुलनाथ पण म्हणतात, कारण ते येऊन तुम्हाला काम कटारी पासून सोडवून पावन बनवतात. भक्तिमार्ग मध्ये पण खुप दिखावा आहे. येथे तर शांती मध्ये आठवण करायची आहे.ते अनेक प्रकारचे हठयोग इत्यादी करतात,त्यांचा निवृत्ती मार्गच वेगळा आहे.ते ब्रह्मला मानतात.ब्रह्म योगी,तत्व योगी आहेत. तर ते झाले आत्म्याचे राहण्याचे स्थान,ज्याला ब्रह्मांड म्हटले जाते.ते परत ब्रह्मलाच भगवान समजतात. त्यामध्ये मिळून जाऊ असे म्हणतात, म्हणजेच आत्म्याला विनाशी बनवले आहे.बाबा म्हणतात, मीच येऊन सर्वांची सद्गती करतो.शिवबाबाच येऊन सर्वांची सदगती करतात,तर ते हिऱ्या सारखे झाले ना,परत तुम्हाला स्वर्ण युगामध्ये घेऊन जातात.तुमचा पण हा हिऱ्या सारख्या जन्म आहे, परत सुवर्णयुगा मध्ये घेऊन जातात. हे ज्ञान तुम्हाला बाबाच येऊन शिकवतात,ज्याद्वारे तुम्ही देवता बनतात,परत हे ज्ञान प्रायलोप होते.या लक्ष्मी-नारायण मध्ये पण, रचनाकार आणि रचनेचे ज्ञान नाही, अच्छा.

गोड,गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा,आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(1) या जुन्या दुनिया मध्ये राहून,डबल अहिंसक बनून,योगबळा द्वारे आपली नवीन दुनिया स्थापन करायची आहे. आपले जीवन हिऱ्या सारखे बनवायचे आहे.

(2) बाबा जे ऐकवतात त्यावरती विचार सागर मंथन करून दुसऱ्यांना पण ऐकावयाचे आहे.नेहमी नशा राहावा की,योगाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही कृष्णपुरी मध्ये जाऊ.

वरदान:-
व्यर्थला पण शुभ भाव आणि श्रेष्ठ भावने द्वारे परिवर्तन करणारे खरे मरजीवा भव.

बापदादाची श्रीमत आहे,मुलांनो व्यर्थ गोष्टी ऐकू नका, दुसऱ्यांना ऐकवू नका आणि व्यर्थ विचार पण करु नका.नेहमी शुभ भावने द्वारे विचार करा,शुभ बोल बोला.व्यर्थला पण शुभ भावने द्वारे ऐका.शुभचिंतक बनून,व्यर्थ बोलच्या भावनेला परिवर्तन करा.नेहमी भाव आणि भावनेला श्रेष्ठ ठेवा,स्वतःला परिवर्तन करा,ना की दुसऱ्याच्या परिवर्तनाचा विचार करा.स्वतःचे परिवर्तनच दुसऱ्या आत्म्याचे परिवर्तन आहे. यामध्ये प्रथम मी,या मरजीवा बनण्यामध्येच मजा आहे.यालाच महाबली म्हटले जाते.यामध्ये खुशी ने मरा,हे मरणेच जीवन जगणे आहे. हेच खरे जीवन दान आहे.

बोधवाक्य:-
घोषवाक्य:- संकल्पाची एकाग्रता, श्रेष्ठ परिवर्तना मध्ये तीव्र गती घेऊन येते.