23-08-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   10.03.86  ओम शान्ति   मधुबन


बेफिक्र बादशाह बनण्याची युक्ती


आज बापदादा बेफिक्र बादशहांची सभा पाहत आहेत.ही राज्यसभा साऱ्या कल्पा मध्ये विचित्र सभा आहे. बादशहा तर फार झाले आहेत, परंतु बेफिकीर बादशहांची ही विचित्र सभा या संगमयुगावरच होत आहे.ही बेफिकीर बादशाहांची सभा सतयुगी राज्यसभे पेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तेथे तर चिंता आणि नशा या दोन्हीतील अंतरातील ज्ञानाची माहिती राहत नाही. चिंता शब्दच माहीत नाही. परंतु आता जेंव्हा सारी दुनिया कोणत्या ना कोणत्या चिंते मध्ये आहे. सकाळी उठल्यापासून आपली, परिवाराची, कार्य व्यवहाराची,मित्र संबंधीची,कोणती ना कोणती चिंता असते, परंतु तुम्ही सर्व अमृतवेळे पासून बेफिकीर बादशहा बनून दिवसाचा आरंभ करता आणि बेफिकीर बादशहा बनून,प्रत्येक कार्य करता. बेफिकर बादशाह बनून, आरामा मध्ये झोप घेता. सुखाची झोप,शांत झोप घेत आहात. असे बेफिक्र बादशहा बनले आहात. असे बनले आहात कां कोणती चिंता आहे? बाबावरती सर्व जबाबदारी देऊन बेफिक्र झाले आहात. आपल्या वर जबाबदारी समजल्याने चिंता वाटत राहते.जबाबदारी बाबाची आहे आणि मी निमित्त सेवाधारी आहे. मी निमित्त कर्मयोगी आहे. करावनहार बाबा आहेत, निमित्त करनहार मी आहे.जर ही आठवण प्रत्येक वेळी स्वतःच राहिली, तर नेहमीच बेफिकीर बादशाहा आहात. जर चुकून पण कोणत्या तरी व्यर्थ भावनेचा स्वतःवर बोजा घेतला, तर ताज ऐवजी चिंतेची अनेक टोपली डोक्यावर येतात. नाहीतर नेहमीच प्रकाशाचे ताजधारी बेफिकीर बादशहा आहात. बसं, बाबा आणि मी, तिसरा कोणी नाही.ही अनुभूती सहजच बेफिकीर बादशाह बनवित आहे. तर ताजधारी आहात की टोकरीधारी आहात ? टोकरी उचलणे आणि मुकूट घालणे किती फरक आहे. एक ताजधारी समोर उभा करा आणि एक ओझेवाला, टोकरीवाला उभा करा, तर काय पसंत पडेल. ताज का टोकरी? अनेक जन्मा मधील अनेक ओझ्याच्या टोकरी, तर बाबा येऊन उतरवून हलका बनवत आहेत. तर बेफिकीर बादशहा म्हणजे नेहमी डबल लाईट राहणारे.जोपर्यंत बादशहा बनत नाहीत, तोपर्यंत ही कर्मेंद्रिये पण आपल्या वश मध्ये राहत नाहीत.राजा बनला तरच मायाजीत, कर्मेंद्रीयजीत, प्रकृतीजीत बनाल. तर राज्यसभे मध्ये बसले आहात ना.

आज युरोप खंडाची पाळी आहे. युरोपने चांगला विस्तार केला आहे.युरोप खंडाने आपल्या शेजारच्या देशाच्या कल्याणाची चांगली योजना बनवली आहे. जसे बाबा नेहमीच कल्याणकारी आहेत तसे मुले पण बाबा सारखी कल्याणाची भावना ठेवणारी आहेत. आता कोणाला पण पाहिले तर दया येते ना की, हे पण बाबाचे बनावेत.पहा, बापदादा स्थापनेच्या वेळेपासून,विदेशातील सर्व मुलांना कोणत्या ना कोणत्या रूपांमध्ये आठवण करत आले आहेत. बापदादाच्या आठवणीमुळे, वेळ आल्यावर, चोहीकडची मुले पोहोचली आहेत. परंतु बापदादानी आव्हान फार वेळेपूर्वी केले आहे. आव्हान केल्यामुळे तुम्ही लोक पण चुंबका सारखे आकर्षित होऊन पोहचले आहात.असे वाटत आहे ना की, कसे आम्ही बाबाचे बनले आहोत. बनले आहोत हे तर चांगले वाटतच आहे, परंतु काय झाले, कसे झाले, हे कधी तरी बसून विचार करा, कोठून कोठे येऊन पोहोचले आहोत,तर विचार केल्याने विचित्र पण वाटत आहे ना. नाटकांमध्ये नोंद होती,नाटकातील नोंदीमुळे सर्वांना काना- कोपऱ्यातून काढून एका परिवारा मध्ये पोहचले आहात. आता हाच परिवार आपला वाटल्यामुळे, अति प्रिय वाटत आहे. बाबा प्रिय ते प्रिय आहेत,तर तुम्ही पण सर्व प्रिय बनले आहात. तुम्ही पण कमी नाहीत. तुम्ही पण सर्व बापदादांच्या संगा च्या रंगां मुळे अतिप्रिय बनले आहात. कोणाला जरी पाहिले तरी प्रत्येक जन एक दोघा पेक्षा प्रिय वाटत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मियतेचा प्रभाव दिसत आहे. विदेशी ना मेकअप करणे चांगले वाटत आहे! तर हे फरिश्ते पणाचा मेकअप करण्याचे स्थान आहे. हा मेकअप असा आहे,जे फरिश्ता बनून जातात. जसे मेकअप नंतर, कोणी कसा पण असेल, परंतु तो बदलून जातो. मेक-अप मुळे फार सुंदर दिसत आहात. तर इथे पण सर्व चमकणारे फरिश्ते वाटत आहेत, कारण आत्मिक मेकअप केला आहे.त्या मेकप मध्ये तर नुकसान पण होते. यामध्ये काही नुकसान नाही. तर सर्व चमकणारे, सर्वांचे स्नेही आत्म्ये आहात ना! इथे स्नेहा शिवाय आणखीन कांही पण नाही. उठला तरी स्नेहाने सुप्रभात करता, खाता तरी पण स्नेहाने ब्रह्माभोजन खात आहात, चालत असताना पण स्नेहाने बाबाच्या बरोबर हातामध्ये हात घालून चालत आहात. विदेशींना हातामध्ये हात घालून चालणे, चांगले वाटत आहे! तर बापदादा पण म्हणतात की, नेहमी बाबा च्या हातामध्ये हात देऊन मग चाला. एकटे चालू नका. एकटे चालल्याने तर मग कधी उदास होऊन जाल, आणि कधी कोणाची नजर पण पडेल. बाबा बरोबर चालला तर,एकतर कधीच मायेची नजर पडणार नाही आणि दुसरे सोबत असल्या कारणाने नेहमीच खुशी खुशी मध्ये, मौजमध्ये खाताना, चालताना, मौज साजरी करत राहाल. तर साथी सर्वांना पसंत आहे ना!आणखीन कोणत्या जोडीदाराची जरुरत तर नाही ना ! कधी थोडे मनाला खूष करण्यासाठी, आणखीन कोणी पाहिजे? धोखा देणाऱ्या संबंधापासून सुटले आहात. त्यामध्ये धोखा पण आहे आणि दुःख पण आहे.आता अशा संबंधां मध्ये आले आहात जिथे ना धोखा आहे ना दुःख आहे. वाचले आहात.नेहमी साठी वाचले आहात. असे पक्के आहात? कोणी कच्चे तर नाही? असे तर नाही तिथे गेल्यावर पत्र लिहतील की, काय करावे, कसे करावे, माया आली.

युरोप वाल्यांनी विशेष कोणती कमाल केली आहे? बापदादा नेहमी पाहतात की, बाबा जे सांगत आहेत कि, प्रत्येक वर्षी, बाबा समोर गुलदस्ता घेऊन या, हे बाबा चे बोलणे प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी चांगले लक्ष ठेवले आहे. हा उमंग नेहमीच राहिला आहे आणि आता पण आहे, की, प्रत्येक वर्षी नव नवीन चुकलेली बाबा ची मुले आपल्या घरी यावीत, आपल्या परिवारा मध्ये यावीत. तर बापदादा पाहत आहेत की, युरोपने पण हे लक्ष ठेवून, चांगली वृध्दी केली आहे. तर बाबांच्या महावाक्याना, आज्ञेला पालन करणारे, आज्ञाकारी म्हटले जातात आणि जी आज्ञाकारी मुले आहेत त्यांच्यावर विशेष बाबा चा आशीर्वाद नेहमीच राहतो. आज्ञाकारी मुले स्वतःच आशीर्वादाचे पात्र आत्मे होत आहेत. समजले! कांही वर्षांपूर्वी किती थोडे होता, परंतु प्रत्येक वर्षी वृध्दीला प्राप्त करून, मोठ्यात मोठा परिवार बनवला आहे. तर एका पासून दोन, दोघांपासून तीन असे किती सेंटर झाले आहेत. यु.के. तर वेगळा,मोठा आहेच, संबंध तर सर्वांचा यु.के.बरोबर आहेच, कारण विदेशाचा पायाच तो आहे.किती पण शाखा निघाल्या, झाड विस्ताराला प्राप्त करत राहिले,परंतु संबंध तर पायाशीच राहील ना. जर पाया बरोबर संबंध नाही ठेवला, तर विस्तार वृध्दीला कसा प्राप्त होईल. लंडन मध्ये विशेष अनन्य रत्नांना निमित्त बनवले, कारण पाया आहे ना. तर सर्वांचा संबंध, आणि सूचना सहज मिळाल्यामुळे,पुरुषार्थ आणि सेवा दोन्ही सहज होऊन जाते. बापदादा तर आहेतच. बापदादा शिवाय एक सेकंद पण चालू शकत नाहीत, असे एकत्र आहात. तरी पण साकार रूपामध्ये, सेवेच्या साधनां मध्ये, सेवेचे कार्यक्रम, योजनेमध्ये आणि त्याच बरोबर आपल्या प्रगतीसाठी, कोणाला कोणती पण सूचना हवी असेल, तर संबंध ठेवावा लागतो. हे पण निमित्त बनलेले माध्यम आहे, त्यामुळे सहजच उपाय मिळू शकतो. काही वेळा असे माये चे वादळ येते की,त्यावेळी बुद्धी स्पष्ट नसल्यामुळे, बापदादा च्या सूचनांना, शक्तींना धारण करू शकत नाहीत. अशा वेळी मग साकार माध्यम निमित्त बनविले आहेत. ज्यांना तुम्ही लोक दीदी, दादी, म्हणतात.या निमित्त आहेत. त्यामुळे वेळ वाया जाणार नाही. बाकी बापदादा जाणतात कि,हिम्मतवान आहात. तेथून निघून आणि तेथेच सेवे साठी निमित्त बनले आहात, तर स्वत: पासूनच सुरूवात करण्याचा पाठ चांगला पक्का केला आहे,तेथेच निमित्त बनून, वृध्दीला प्राप्त करणे,हे फार चांगले आहे.कल्याणाच्या भावनेने पुढे जात आहात. तर जिथे दृढ संकल्प आहे, तिथे सफलता आहेच.कांही पण झाले तरी सेवेमध्ये सफलता प्राप्त करावयाचीच आहेच. या श्रेष्ठ संकल्पा मुळे आज प्रत्यक्ष फळ मिळाले आहे. आता आपल्या श्रेष्ठ परिवाराला पाहून विशेष खुशी होत आहे आणि विशेष पांडवच शिक्षक आहेत. शक्ती तर नेहमी मददगार आहेतच. पांडवांकडून नेहमी सेवेच्या विशेष वृध्दी चे प्रत्यक्ष फळ मिळत आहे. आणि सेवे पेक्षा सेवाकेंद्रा ची रिमझिम, सेवाकेंद्रा ची शोभा शक्तीमुळे होते. शक्तींची आपली भूमिका आहे, पांडवांची आपली भूमिका आहे, त्यामुळे दोघांची आवश्यकता आहे. ज्या सेंटरवर फक्त शक्ती आहेत आणि पांडव नाहीत, तर शक्तिशाली होत नाहीत, त्यामुळे दोघांची जरूरत आहे. आता तुम्ही लोक जागे झाले आहात तर एक दोघांमुळे सहजच अनेक जागे होतील. कष्ट आणि वेळ तर लागला,परंतु आता चांगली वृद्धी झाली आहे. दृढ संकल्प कधी सफल होणार नाही, असे होऊ शकत नाही. हा प्रत्यक्ष पुरावा पाहत आहात. जरी थोडे पण दिलशिकस्त झालात कि,इथे तर होणारच नाही. तर आपला थोडासा कमजोर संकल्प,पण सेवेमध्ये फरक पाडत आहे. दृढतेच्या पाण्यामुळे फळ लवकर निघत आहे. दृढताच सफलता प्राप्त करत आहे.

"परमात्म्याचे आशीर्वाद घ्यायचे असेल तर आज्ञाधारक बना"(अव्यक्त मुरली मधून)

जसे बाबा ने सांगितले, तसे केले. बाबाचे सांगणे आणि मुलांचे करणे, याला म्हटले जाते नंबर एकचा आज्ञाधारक. बाबाच्या प्रत्येक सूचनेला, श्रीमताला यथार्थ समजून पालन करणे याला म्हटले जाते आज्ञाकारी बनणे. श्रीमतामध्ये थोडी पण मनमत किंवा परमताचा विचार येवू नये.बाबांची आज्ञा आहे,माझी एकट्याची आठवण करा. जर या आज्ञेचे पालन केले,तर आज्ञाकारी मुलांना बाबा चा आशीर्वाद मिळतो, आणि सर्व कांही सोपे होऊन जाते.

बापदादा नी अमृत वेळेपासून, रात्री झोपे पर्यंत, मन्सा, वाचा, कर्मणा आणि संबंध संपर्का मध्ये कसे चालायचे आहे, कसे राहायचे आहे.सर्वांसाठी श्रीमत म्हणजेच, आज्ञा दिलेली आहे.प्रत्येक कर्मा मध्ये मन्सा स्थिती कशी असावी, त्याची पण सुचना, आज्ञा, मिळालेली आहे. त्या आज्ञे प्रमाणे चालत राहा्. हीच परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा आधार आहे. या आशीर्वादा मुळेच आज्ञाकारी मुले नेहमी डबल लाईट, उडती कलेचा अनुभव करत आहेत. बापदादा ची आज्ञा आहे, कोणत्या पण आत्म्याला दुःख देऊ नका. ना दुःख घेऊ नका. तर कांही मुले दुःख देत नाहीत परंतु घेतात. हे पण व्यर्थ संकल्प चालण्याचे कारण बनून जाते. कोणती व्यर्थ गोष्ट ऐकून दुःखी झालात तर अशा लहान-लहान अवज्ञा, मनाला भारी करून टाकतात आणि मन भारी झाल्यामुळे उच्च स्थिती मध्ये उडू शकत नाही.

बापदादा ची आज्ञा मिळाली आहे की, मुलांनो,व्यर्थ विचार करू नका, पाहू नका, व्यर्थ ऐकू नका, बोलू नका, व्यर्थ कर्मा मध्ये वेळ घालवू नका. तुम्ही वाईटा पासून तर दूर झाले आहात,तर आता असे आज्ञाकारी, चरित्राचे चित्र बनवा, त्यामुळे परमात्मा आशीर्वादाचे अधिकारी बनाल. बाबांची आज्ञा आहे मुलांनो, अमृतवळेला विधीपूर्वक शक्तिशाली आठवणीमध्ये राहा, प्रत्येक कर्म कर्मयोगी बनून करा, निमित्त भावांमध्ये, निर्मान होवून करा.अशी दृष्टी वृत्ती सर्वासाठी आज्ञा मिळाल्या आहेत, जर या आज्ञांचे विधिपूर्वक पालन करत राहिलात. तर नेहमीच अतिंद्रियसुख किंवा खुशी संपन्न शांत स्थितीचा, अनुभव करत राहाल.

बाबांची आज्ञा आहे की, मुलांनो, तन मन धन आणि जन या सर्वांला बाबाची अमानत समजा, जो पण संकल्प करत आहात, तो सकारात्मक करा, सकारात्मक विचार करा. शुभ भावनेचे संकल्प करा. देहअभिमानाच्या,मी आणि माझ्या पासून दूर राहा. हेच दोन मायेचे दरवाजे आहेत. संकल्प, वेळ आणि श्वास ब्राह्मण जीवनाचे अमुल्य खजाने आहेत. याला व्यर्थ वाया घालू नका. जमा करा. समर्थ राहण्याचा आधार आहे, नेहमी आणि स्वतः आज्ञाकारी बनणे. बापदादाची मुख्य पहिली आज्ञा आहे, पवित्र बना,कामजीत बना. आज्ञापालन करण्यामध्ये बहुतांश पास झाले आहेत, परंतु त्याचा दुसरा बंधू क्रोध, यामध्ये कधी कधी अर्धे नापास होऊन जातात. कांही म्हणतात की, क्रोध केला नाही, परंतु थोडा रोब तर दाखवला पाहिजे ना‌. तर ही पण अवज्ञा आहे, जी खुशी चा अनुभव करू देत नाही.

जी मुले अमृतवेळे पासून रात्रीपर्यंत सारा दिवस दिनचर्ये च्या प्रत्येक कर्मामध्ये आज्ञे प्रमाणे चालत आहेत, ते कधी कष्टाचा अनुभव करणार नाहीत. त्यांना आज्ञाकारी बनण्याचे विशेष फळ,बाबाच्या आशीर्वादाची अनुभूती होत आहे.त्यांचे प्रत्येक कर्म फलदायी होऊन जाते.जी आज्ञाकारी मुले आहेत, ती नेहमीच संतुष्टते चा अनुभव करत आहेत.त्यांना तीन प्रकारची संतुष्टता स्वतः आणि नेहमीच अनुभवा मध्ये येते. (१) ते स्वतः पण संतुष्ट राहतात.(२) विधीपूर्वक कर्म केल्यामुळे सफलता रूपी फळाच्या प्राप्तीने, पण संतुष्ट राहतात.(३) संबंध संपर्का मध्ये पण, त्यांच्या वर सर्व संतुष्ट राहतात. आज्ञाकारी मुलांचे प्रत्येक कर्म आज्ञेप्रमाणे असल्यामुळे श्रेष्ठ होत आहे. त्यामुळे कोणते पण कर्म बुद्धीला, मनाला विचलीत करत नाही. ठीक केले, कां नाही केले, हा संकल्प येऊ शकत नाही. ते आज्ञे प्रमाणे चालल्यामुळे नेहमी हलके राहतात,कारण ते कर्म बंधनाच्या वश होऊन,कोणते कर्म करत नाहीत. प्रत्येक कर्म आज्ञेप्रमाणे केल्यामुळे परमात्म आशीर्वादाच्या,प्राप्तीच्या, फलस्वरूपाने, ते नेहमीच आंतरिक इच्छाशक्तीचा, अतिंद्रीय सुखाचा आणि भरपूरतेचा अनुभव करत राहतात. अच्छा.

वरदान:-
खऱ्या सोबतीची साथ घेणारे,सर्वां पासून वेगळे, सर्वांचे प्रिय,निर्मोही भव:

रोज अमृतवेळेला सर्व संबंधाचे सुख बापदादा कडून घेऊन इतरांना दान करा. सर्व सुखाचे अधिकारी बनून इतरांना बनवा. कोणते पण काम असले तरी त्यामध्ये लौकिक साथीची आठवण येऊ नये. प्रथम बाबा ची आठवण यावी, कारण खरे मित्र बाबा आहेत. खऱ्या मित्राची साथ घेतली तर सहजच सर्वांपासून वेगळे आणि प्रिय बनाल. जे सर्व संबंधांमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, एका बाबाची आठवण करतात.ते सहजच निर्मोही बनून जातात.त्यांचा कोणामध्ये पण लगाव अथवा झुकाव राहत नाही. त्यामुळे त्यांची माये पासून हार पण होत नाही.

सुविचार:-
मायेला पाहण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी त्रिकालदर्शी आणि त्रिनेत्री बना,तेंव्हाच विजयी बनाल.