23-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्हाला हीच चिंता राहिली पाहिजे की, आम्ही कसे सर्वांना सुखधाम चा रस्ता
सांगू, सर्वांना माहीत झाले पाहिजे की, हे पुरुषोत्तम बनण्याचे संगमयुग आहे. "
प्रश्न:-
तुम्ही मुले
आपसांमध्ये, एक दोघांना कोणत्या शुभेच्छा देता? मनुष्य कधी शुभेच्छा देतात?
उत्तर:-
मनुष्य शुभेच्छा देतात, जेंव्हा कोणी जन्मतो, विजयी होतो किंवा लग्न करतो किंवा
कोणता शुभ दिवस असतो. परंतु ती कांही खरी शुभेच्छा नाही, तुम्ही मुले, एक-दोघांना
बाबाचे बनल्यावर शुभेच्छा देता. तुम्ही समजता की आम्ही किती भाग्यशाली आहोत, जे
सर्व दुःखा पासून सुटून, सुखधाम ला जातो. तुम्हाला मनातले मनात खुशी होते.
ओम शांती।
बेहचे बाबा बेहदच्या मुलांना समजावत आहेत. आता प्रश्न निर्माण होतो की, बेहदचे बाबा
कोण? हे तर जाणता की, सर्वांचा पिता एक आहे, ज्याला परमपिता म्हटले जाते. लौकिक
पित्याला परमपिता म्हणत नाहीत. परमपिता तर एकच आहेत, त्यांना सर्व मुले विसरली आहेत,
त्यामुळे परमपिता परमात्मा, दु:खहर्ता सुखकर्ता आहेत, त्यांना तुम्ही मुलेच जाणत
आहात की, बाबा आमचे दुःख कसे दूर करत आहेत, मग सुख शांती मध्ये, आम्ही जातो. सर्व
तर सुखा मध्ये जात नाहीत. कांही सुखांमध्ये तर कांही शांती मध्ये जातात. कोणाची
सतयुगा मध्ये भूमिका आहे, कोणाची त्रेता मध्ये, कोणाची द्वापार मध्ये, तुम्ही सतयुगा
मध्ये राहता तर बाकीचे सर्व मुक्तिधाम मध्ये राहतात. त्याला ईश्वराचे घर म्हटले जाते.
मुसलमान लोक जेंव्हा नमाज पडतात, तर सर्व मिळून खुदाताला ची प्रार्थना करतात.
कशांसाठी? स्वर्गा मध्ये जाण्यासाठी की अल्लाहा जवळ जाण्यासाठी. आल्लाहा च्या घराला
स्वर्ग म्हणत नाहीत. तिथे तर आत्मे शांती मध्ये राहतात. शरीर असत नाही. हे तर जाणत
असतील की अल्लाहा जवळ तर शरीराने नाही, परंतु आम्ही आत्मे जातो. आता फक्त अल्लाहा
ची आठवण केल्याने तर कोणी पवित्र बनणार नाहीत. अल्लाहा ला तर जाणतच नाहीत. आता हे
मनुष्याला कसे सांगायचे की, बाबा सुख शांतीचा वरसा देत आहेत. विश्वामध्ये शांती कशी
होत आहे, विश्वामध्ये शांती कधी होती, हे त्यांना कसे समजावयाचे. सेवाधारी जी मुले
आहेत, क्रमवारी च्या पुरुषार्था नुसार, त्यांना हे चिंतन राहते. तुम्हां ब्रह्मा
मुखवंशावली, ब्राह्मणांनाच बाबाने, आपला परिचय दिला आहे. साऱ्या दुनियेतील
मनुष्यमात्राच्या भूमिकेचा पण परिचय दिला आहे. आता आम्ही मनुष्य मात्राला बाबा आणि
रचनेचा परिचय कसा देऊ? बाबा सर्वांना म्हणतात की, स्वतःला आत्मा समजून, माझी आठवण
करा, तर खुदा च्या घरी जाल. गोल्डन एज म्हणजे स्वर्गामध्ये, सर्व तर जाणार नाहीत.
तेथे तर एकच धर्म असतो. बाकी सर्व शांतीधाम मध्ये राहतात, यामध्ये कोणी नाराज
होण्याची गोष्टच नाही. मनुष्य शांती मागतात, ती मिळते अल्लाहा किंवा गॉडफादर च्या
घरामध्ये. आत्मे सर्व येतात शांतीधाम मधून, तेथे परत तेव्हाच जातील, जे़व्हा नाटक
पूर्ण होईल. बाबा येतात पतीत दुनिये मधून, सर्वांना घेऊन जाण्यासाठी.
आता तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये आहे, आम्ही शांतीधाम मध्ये जाऊन, मग सुखधाम मध्ये
येऊ. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. पुरुषोत्तम म्हणजे उत्तम ते उत्तम पुरुष. जोपर्यंत
आत्मा पवित्र बनत नाही, तोपर्यंत उत्तम पुरुष बनू शकत नाही. आता बाबा तुम्हाला
म्हणतात, माझी आठवण करा आणि सृष्टी चक्राला ओळखा, त्याबरोबर दैवीगुण पण धारण करा.
यावेळी सर्व मनुष्यांचे चरित्र बिघडलेले आहे. नवीन दुनियेमध्ये तर चरित्र फार चांगले
असते. भारतवासीच उंच चरित्रवाले बनतात. त्या उंच चरित्रवाल्यांना कमी चरित्रवाले
माथा टेकतात. त्यांचे चरित्र वर्णन करतात. हे तुम्ही मुलेच समजत आहात. आता इतरांना
समजावयाचे कसे? कोणती सहज युक्ती रचावी? हे आत्म्याचा तिसरा डोळा उघडणे आहे.
परमात्म्यामध्ये ज्ञान आहे. मनुष्य म्हणतात, माझ्या मध्ये ज्ञान आहे. हा देहअभिमान
आहे, यामध्ये तर आत्मअभिमानी बनायचे आहे. संन्याशा जवळ शास्त्राचे ज्ञान आहे. बाबाचे
ज्ञान तर जेंव्हा बाबा येवून देतील. युक्तीने समजावयाचे आहे. ते लोक कृष्णाला भगवान
समजत आहेत. भगवानाला ओळखतच नाहीत, ऋषी-मुनी इ. म्हणतात की, आम्ही ओळखत नाही. समजतात
की, मनुष्य भगवान होवू शकत नाही. निराकार भगवानच रचता आहेत. परंतु ते कसे रचता आहेत,
त्यांचे नांव, रुप, देश, काळ काय आहे? म्हणतात नांव रूपापासून वेगळे आहेत. एवढी पण
समज नाही की, नांव, रूपापासून वेगळी वस्तू कशी असू शकते? अशक्य आहे. जरी म्हणतात
की, दगड धोंडा, कच्छ, मच्छ सर्वा मध्ये आहे, तर ते पण नांव रूप आहे ना. कधी काय, कधी
काय म्हणत राहतात. मुलांचे दिवस रात्र हेच चिंतन चालले पाहिजे की, आम्ही मनुष्याला
कसे समजावू. हे मनुष्यापासून देवता बनण्याचे, पुरुषोत्तम संगमयुग आहे. मनुष्य
देवतांना नमन करतात. मनुष्य मनुष्याला नमन करत नाहीत, मनुष्यांना भगवान किंवा
देवताना नमन करावयाचे आहे. मुसलमान लोकं प्रार्थना करतात अल्लाहची आठवण करतात.
तुम्ही जाणता की, ते लोक अल्लाहा जवळ तर जाऊ शकत नाहीत. मुख्य गोष्ट आहे अल्लाहा
जवळ कसे जायचे? मग अल्लाहा कशी नवीन सृष्टी रचत आहेत. या सर्व गोष्टी कशा
समजावयाच्या, त्यासाठी मुलांनी, विचार सागर मंथन केले पाहिजे, बाबाला तर विचार सागर
मंथन करायचे नाही. बाबा विचार सागर मंथन करण्याच्या युक्त्या मुलांना शिकवत आहेत.
यावेळी सर्व कलियुगा मध्ये तमोप्रधान आहेत. जरूर कोणत्या वेळी सतयुग पण असेल.
सतयुगाला पवित्र मानले जाते. पवित्र आणि अपवित्र. सोन्यामध्ये भेसळ केली जाते ना.
आत्मा पण अगोदर पवित्र सतोप्रधान असते, मग त्यामध्ये भेसळ पडत जाते. जेंव्हा
तमोप्रधान बनते, तेंव्हा बाबाला यावे लागते, बाबाच येऊन सतोप्रधान, सुखधाम बनवत
आहेत. सुखधाम मध्ये फक्त भारतवासीच होते, बाकी सर्व शांतीधाम मध्ये जातात. शांतीधाम
मध्ये सर्व पवित्र राहतात, मग इथे येऊन हळू हळू अपवित्र बनतात. प्रत्येक मनुष्य सतो,
रजो, तमो जरूर बनत आहे. आता त्यांना कसे सांगायचे की, तुम्ही सर्व अल्लाहा च्या घरी
जाऊ शकता. देहाचे सर्व संबंध सोडून, स्वतःला आत्मा समजा. भगवानुवाच तर आहेच. माझी
आठवण केल्याने, हे जे पाच भुत आहेत, ते निघून जातील. तुम्हा मुलांना दिवस-रात्र हीच
चिंता राहिली पाहिजे. बाबाला पण चिंता झाली, तेंव्हा तर विचार आला की, खाली जावे,
जाऊन सर्वांना सुखी बनवावे. त्यांच्या बरोबर मुलांना पण मदतगार बनायचे आहे. एकटे
बाबा काय करतील. तर असे विचार सागर मंथन करा. असा काय उपाय काढावा, ज्यामुळे मनुष्य
झटक्यात समजून जातील की, हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. यावेळेस मनुष्य पुरुषोत्तम बनू
शकतात. प्रथम उंच होते मग खाली उतरतात. पहिल्या प्रथम तर खाली पडत नाहीत ना. आल्या
बरोबरच तमोप्रधान बनत नाहीत. प्रत्येक वस्तू प्रथम सतोप्रधान, मग सतो, रजो, तमो बनत
जाते. मुले एवढ्या प्रदर्शनी इ. करतात, तरीपण मनुष्य काहीच समजत नाहीत, तर आणखीन
काय उपाय करावा. वेगवेगळे उपाय तर करावे लागतात ना. त्यासाठी वेळ पण मिळाला आहे.
झटक्यात तर कोणी संपूर्ण बनू शकत नाही. चंद्र पण थोडा थोडा वाढत शेवटी संपूर्ण बनतो.
आम्ही पण तमोप्रधान बनलो, मग सतोप्रधान बनण्यासाठी वेळ लागतो. ते तर आहे जड मग हे
चैतन्य आहे. तर आम्ही कसे समजावे. मुसलमानांच्या मौलवीना समजावा की, तुम्ही हे नमाज
कां पडत आहात, कोणाच्या आठवणीमध्ये पडत आहात. असे विचार सागर मंथन करायचे आहे.
उत्सवाच्या दिवशी, राष्ट्रपती इ. पण मस्जिद मध्ये जातात. मोठ्या लोकांना भेटतात.
सर्व मस्जिदींची मग एक मोठी मस्जिद असते. तेथे जातात ईद मुबारक देण्यासाठी. आता
मुबारक तर ही आहे, जेंव्हा आम्ही सर्व दुःखापासून सुटून सुखधाम मध्ये जाऊ, तेंव्हा
म्हटले जाते मुबारक असो. आम्ही आनंदाची बातमी सांगत आहे. कोणी विजयी बनले तर,
त्यांना शुभेच्छा देतात. कोणी लग्न केले तरी पण शुभेच्छा देतात. नेहमी सुखी राहा.
आता तुम्हाला तर बाबांनी सांगितले आहे, आम्ही एक-दोघांना शुभेच्छा कसे देऊ. यावेळी
आम्ही बाबा कडून, मुक्ती जीवनमुक्तीचा वरसा घेत आहोत. तुम्हाला पण शुभेच्छा मिळू
शकतात. बाबा समजावतात की, तुम्हाला मुबारक आहे. तुम्ही २१ जन्मासाठी पद्मपती बनत
आहात. आता सर्व मनुष्य कसे बाबा कडून वरसा घेतील, सर्वांना शुभेच्छा द्या. तुम्हाला
आता माहीत झाले आहे, परंतु तुम्हाला लोक शुभेच्छा देत नाही. कारण तुम्हाला ते ओळखतच
नाहीत. शुभेच्छा दिल्या तर स्वतः पण शुभेच्छा, घेण्याच्या लायकीचे बनावे. तुम्ही तर
गुप्त आहात ना. एक दोघांना शुभेच्छा देऊ शकता. तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही बाबाचे
बनले आहात. तुम्ही किती नशीबवान आहात. कोणाला लॉटरी मिळाली किंवा मुलगा झाला तर
म्हणतात की, शुभेच्छा आहेत. मुले पास झाली, तरी पण त्यांना शुभेच्छा देतात. तुम्हाला
मनातले मनात खुशी होत आहे. स्वतःला शुभेच्छा देत आहात. आम्हाला बाबा मिळाले आहेत,
त्यांच्याकडून आम्ही वरसा घेत आहोत.
बाबा समजावतात, तुम्ही आत्मे जे दुर्गतीला प्राप्त झाले आहात, ते आता सद्गतीला
प्राप्त होतात. शुभेच्छा तर एकच सर्वांना मिळत आहे. शेवटी सर्वांना माहीत पडेल, जे
उंच ते उंच बनतील, त्यांना खालचे शुभेच्छा देतील. तुम्ही सूर्यवंशी कुळांमध्ये
महाराजा महाराणी बनता. खालच्या कुळातील शुभेच्छा त्यांना देतात, जे विजय माळेचे मणके
बनतात. जे पास होतात, त्यांना शुभेच्छा मिळतात, त्यांची पूजा होते. आत्म्याला पण
शुभेच्छा देतात, जी उंच पद प्राप्त करते. मग भक्ती मार्गामध्ये त्यांचीच पूजा होते.
मनुष्यांना हे माहित नाही की पूजा का करतात. तर मुलांना हीच चिंता राहिली पाहिजे
की, कसे समजावे? आम्ही पवित्र बनले आहोत, दुसऱ्यांना कसे पवित्र बनवायचे? दुनिया तर
फार मोठी आहे ना. काय केले पाहिजे, जो घरा घरां मध्ये संदेश पोहोचेल. पत्रके
टाकल्याने तर सर्वांना मिळणार नाहीत. इथे तर प्रत्येकाच्या हातामध्ये संदेश दिला
पाहिजे, कारण त्यांना बिल्कुल माहित नाही की, बाबा जवळ कसे जायचे. म्हणतात सर्व
रस्ते परमात्म्याला भेटण्याचे आहेत. परंतु बाबा म्हणतात की, ही भक्ती, दान पुण्य,
तर जन्मजन्मांतर करत आले आहात, परंतु रस्ता कुठे मिळाला? म्हणतात, हे सर्व अनादि
चालत आले आहे, परंतु कधी पासून सुरू झाले? अनादि चा अर्थ समजत नाहीत. तुमच्या मध्ये
पण क्रमवारी च्या पुरुषार्था नुसार समजत आहेत. ज्ञानाची प्रालब्ध 21 जन्म मिळते,
तिथे सुख आहे, मग दुःख आहे. तुम्हा मुलांना हिशोब समजावला जातो, कोणी फार भक्ती केली
आहे ! या सर्व किरकोळ गोष्टी प्रत्येकाला तर समजावल्या जात नाहीत. काय करावे,
कोणत्या वर्तमानपत्रा मध्ये टाकावे, वेळ तर लागणार आहे. सर्वांना संदेश एवढ्या लवकर
तर मिळणार नाही. सर्व पूरषार्थ करू लागले, तर मग स्वर्गामध्ये येतील. असे होऊच शकत
नाही. आता तुम्ही पुरषार्थ करत आहात, स्वर्गासाठी. आता आमच्या धर्मातील जे आहेत,
त्यांना कसे ज्ञान द्यावे ? कसे माहित पडेल, कोण कोण बदलून तिकडे गेले आहेत. हिंदू
धर्मवाले खरेतर देवी-देवता धर्माचे आहेत, हे पण कोणी समजत नाही. पक्के हिंदू आहेत,
ते आपल्या आदि सनातन देवी देवता धर्माला मानतील. यावेळी तर सर्व पतित आहेत.
पतित-पावन या , असे बोलवतात. निराकाराची आठवण करतात की, आम्हाला येऊन पावन
दुनियेमध्ये घेऊन चला. त्यांनी एवढे मोठे राज्य कसे घेतले? यावेळी भारतामध्ये तर
कोणती राजाई नाही, ज्याला जिंकून राज्य घेतले असेल. ते कोणती लढाई जिंकून राजाई
प्राप्त करत नाहीत. मनुष्या पासून देवता कसे बनवले जाते, कोणाला माहित नाही.
तुम्हाला पण आता बाबा कडून माहीत झाले आहे. इतरांना तर कसे सांगावे, जे मुक्ती
जीवनमुक्ती ला प्राप्त करतील. पुरषार्थ करविणारा पण पाहिजे ना. जो स्वतःला ओळखून
अल्लाहाची आठवण करेल. त्यांना सांगा, तुम्ही ईद मुबारक कोणाला म्हणत आहात. तुम्ही
अल्लाहा जवळ जात आहात, पक्का निश्चय आहे? ज्याच्या साठी तुम्हाला एवढी खुशी राहते.
हे तर अनेक वर्षांपासून तुम्ही करत आले आहात. कधी खुदा जवळ जाल कि नाही? गोंधळून
जातात. बरोबर, आम्ही जे शिकतो, करतो, ते कशासाठी? उंच ते उंच एक अल्लाहाच आहेत.
त्यांना सांगा, अल्लाहाची मुले तुम्ही पण आत्मा आहात. आत्म्याला वाटते की, आम्ही
अल्लाहा जवळ जाऊ. आत्मा जी अगोदर पवित्र होती, ती आता पतित झाली आहे. आता याला
स्वर्ग तर म्हणत नाहीत. सर्व आत्मे पतित आहेत, पावन कसे बनतील, जे अल्लाहाचे घरी
जातील. तेथे विकारी आत्मा असत नाही. निर्विकारी असली पाहिजे. आत्मा तर कांही
झटक्यात सतोप्रधान बनत नाही. हे सर्व विचार सागर मंथन केले जाते. बाबाचे विचार सागर
मंथन चालते, तेव्हा तर ते समजावत आहेत. युक्त्या काढल्या पाहिजेत, कोणाला कसे
समजवावे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति, मातपिता बाप दादाची प्रेमळ आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) जसा बाबाला
विचार आला की, मी जाऊन मुलांना दुःखा पासून सोडवावे, सुख द्यावे, असे बाबाचे मदतगार
बनायचे आहे. घराघरांमध्ये संदेश देण्याच्या युक्त्या काढल्या पाहिजेत.
(२) सर्वांच्या शुभेच्छा प्राप्त करण्यासाठी, विजयमाळे चा मणका बनण्याचा पुरुषार्थ
करायचा आहे. पुज्य बनायचे आहे.
वरदान:-
नम्रता आणि
अधिकार, या संतुलना द्वारे बाबाला प्रत्यक्ष करणारे विशेष सेवाधारी भव:
जिथे संतुलन
असते तिथे कमाल दिसून येते. जेंव्हा तुम्ही नम्रता आणि सत्यता चे अधिकारी, या
संतुलना द्वारे कोणाला पण बाबा चा परिचय द्याल, तर कमाल दिसून येईल. या रूपानेच
बाबाला प्रत्यक्ष करायचे आहे. तुमचे बोलणे स्पष्ट असावे, त्यामध्ये स्नेह पण असावा,
नम्रता आणि मधुरता पण असावी, तर महानता आणि सत्यता पण असावी, तर प्रत्यक्षता होईल.
बोलताना मधून मधून अनुभव करवीत जावा, ज्यामुळे लगन मध्ये मगन मूर्तचा अनुभव होईल.
अशा स्वरूपा द्वारे सेवा करणारेच विशेष सेवाधारी आहेत.
बोधवाक्य:-
वेळेवर कोणते
पण साधन नसले, तरीपण साधने मध्ये विघ्न पडू नये.