12-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, नेहमी हीच स्मृति राहावी की, आम्ही श्रीमता वरती आपली राजधानी स्थापन करत आहोत, तर खूप खुशी राहील"

प्रश्न:-
हे ज्ञानाचे भोजन कोणत्या मुलांना पचत नाही?

उत्तर:-
जे चुका करून लपवतात, म्हणजे पतीत बनून परत मुरली ऐकण्यासाठी बसतात, त्यांना ज्ञान पचू शकत नाही. ते कधी मुखाद्वारे म्हणू शकत नाही की, भगवानुवाच काम महाशत्रू आहे. त्यांचे मन खात राहते. ते आसुरी संप्रदायाचे बनतात.

ओम शांती।
बाबा मुलांना समजावत आहेत, ते कोणते पिता आहेत, त्या पित्याची महिमा, तुम्हा मुलांना करायची आहे. गायन पण आहे, सत्य शिवबाबा, सत्य शिव शिक्षक, सत्य शिव गुरु, तर तेच आहेत. तुम्ही मुलं जाणतात, आम्हाला सत्य शिवबाबा मिळाले आहेत. आम्ही मुलं श्रीमतवर एक मत बनत आहोत, तर श्रीमतावर चालले पाहिजे ना. बाबा म्हणतात, एक तर देही अभिमानी बना आणि मज पित्याची आठवण करा. जितकी आठवण कराल, तेवढे आपलेच कल्याण कराल. तुम्ही आपली राजधानी स्थापन परत करत आहात. पुर्वी पण आपली राजधानी होती, आम्हीच देवता धर्माचे ८४ जन्म भोगून, अंतिम जन्मांमध्ये आता संगम मध्ये आहोत. या पुरुषोत्तम संगमयुगाचे शिवाय, तुम्हा मुलांच्या दुसऱ्या कोणाला माहिती नाही. बाबा अनेक ज्ञानाच्या गोष्टी समजवतात. बाबा समजवतात, मुलांनो चांगल्या प्रकारे आठवणीमध्ये राहाल, तर खूप खुशी राहील परंतु बाबांची आठवण करण्याच्या ऐवजी दुनियाच्या गोष्टींमध्ये राहतात. आठवण राहायला पाहिजे की, आम्ही श्रीमता वरती, आपले राज्य स्थापन करत आहोत. असे गायन पण आहे की, उच्च ते उच्च भगवान आणि उच्च ते उच्च त्यांची श्रीमत. श्रीमत काय शिकवते? सहज राजयोग. राजाई साठी शिकवत आहेत. आपल्या बाबा द्वारे सृष्टीच्या आदी मध्यं अंतला जाणून परत दैवी गुण पण धारण करायचे आहेत, त्यांचा कधीच सामना करायचा नाही. अनेक मुलं स्वतःला सेवाधारी समजून अहंकारामध्ये येतात, असे अनेक ठिकाणी होत राहते. परत कुठे-कुठे त्यांची हार होते, तर तो नशाच उडून जातो. तुम्ही माता तर अशिक्षित आहात. पुरुषांमध्ये तरीही सुशिक्षित काही आहेत. तुम्हा कुमारींना तर बाबाचे नाव प्रसिद्ध करायला पाहिजे. तुम्ही श्रीमतावर आपली राजधानी स्थापन केली होती. नारी पासून लक्ष्मी बनले होते, तर खूप नशा राहायला पाहिजे. येथे तर पहा, पाई पैशाच्या शिक्षणामध्ये कुर्बान जात आहेत. अरे तुम्ही तर गोरे बनतात, परत काळे तमोप्रधानशी मन कसे लावतात. या कब्रस्थानशी मन लावायचे नाही. आम्ही तर बाबा कडून वारसा घेत आहोत. जुन्या दुनियेशी मन लावणे म्हणजे नरकामध्ये जाणे. बाबा येऊन नरकापासून बाहेर काढतात, तरीही मुख नरकाकडे का करतात?तुमचे हे शिक्षण खूप सहज आहे. ऋषीमुनी सुद्धा जाणत नाहीत, न कोणते शिक्षक, न कोणते ऋषिमुनी समजावू शकतात. हे तर पिता- शिक्षक-गुरु पण आहेत. ते गुरु तर ग्रंथ ऐकवतात, त्यांना शिक्षक म्हणणार नाही. ते काय असे म्हणत नाहीत की, आम्ही दुनियाचा इतिहास भूगोल स्पष्ट करतो. ते तर ग्रंथाच्या गोष्टीच ऐकवतील. बाबा तुम्हा मुलांना ग्रंथाचे सर्व रहस्य समजवतात आणि परत विश्वाचा इतिहास भूगोल पण सांगतात. आता हे शिक्षक चांगले की, ते शिक्षक चांगले? त्या शिक्षकाकडून तुम्ही कितीही शिक्षण घ्या, काय कमावणार? तेही नशीब. जर शिकत शिकत अपघात झाला, मृत्यू झाला तर घेतलेले सर्व शिक्षण वाया जाते. येथे तर तुम्ही हे शिक्षण जितके शिकाल, ते व्यर्थ जाणार नाही. होय, श्रीमतावरती न चालल्यामुळे, काही उलटे बनतात, तर गटर मध्ये जाऊन पडतात. तर जितके शिकले आहे, ते काही चालले जात नाही. हे शिक्षण तर एकवीस जन्मासाठी आहे परंतु विकारांमध्ये गेल्यामुळे कल्प-कल्पांतर चे खूप खूप नुकसान होते. बाबा म्हणतात मुलांनो काळे तोंड करू नका. असे अनेक आहेत, जे काळे तोंड करून म्हणजे विकारी बनून परत मुरलीला येऊन बसतात. त्यांना कधीही ज्ञान पचन होणार नाही. जे पण ऐकतात ते पचणार नाही. परत मुखाद्वारे कोणाला म्हणू शकणार नाहीत कि, भगवानुवाच काम महाशत्रू आहे, त्याला जिंकायचे आहे. स्वतः जिंकत नाहीत तर, दुसऱ्यांना कसे म्हणतील, मन खात राहील. त्यांना म्हटले जाते आसुरी संप्रदाय. अमृत पित-पित विष खातात, तर शंभर पटीने काळे बनतात, त्यांचे खूप नुकसान होते.

तुम्हा मांताचे संघटन तर खूप चांगले असायला हवे. मुख्य उद्देश पण समोर आहे. तुम्ही जाणतात या लक्ष्मी नारायणांच्या राज्यांमध्ये एक देवी-देवता धर्म होता. एक राज्य, एक भाषा, १०० पवित्रता शांती संपत्ती होती. त्या एका राज्याची बाबा आत्ता स्थापना करत आहेत. हे मुख्य लक्ष्य आहे. १०० % पवित्रता, सुख-शांती, संपत्तीची स्थापना आत्ता होत आहे. तुम्ही दाखवतात, विनाशाच्या नंतर श्रीकृष्ण येत आहेत, हे स्पष्ट लिहायला पाहिजे. सतयुगी एकच देवी-देवतांचे राज्य, एक भाषा, पवित्रता, सुख शांतीची परत स्थापन होत आहे. शासनाची पण हीच इच्छा आहे. सतयूग-त्रेता मध्येच स्वर्ग असतो परंतु मनुष्य स्वतःला नर्कवासी थोडेच समजतात. तुम्ही लिहू शकता, कलियुगा मध्ये सर्व नर्कवासी आहेत. आता तुम्ही संगम युगी आहात. अगोदर तुम्ही पण कलियुगी नरकवासी होते, आता परत तुम्ही स्वर्गवासी बनत आहात, भारताला स्वर्ग बनवत आहात, तेही श्रीमतावरती, परंतु ती हिम्मत संघटन असायला हवे. तुम्ही कुठे पण जाता, तर हे लक्ष्मी नारायणचे चित्र घेऊन जायचे आहे, खूप चांगले आहे. यामध्ये लिहा आदी सनातन देवी देवता धर्माचे, सुख शांतीचे राज्य, त्रिमूर्ती शिवबाबाच्या श्रीमतावरती स्थापन होत आहे. अशा प्रकारे मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये, मोठ-मोठे चित्र पाहिजेत. लहान मुलं तर लहान चित्र पंसत करतात. तर हे चित्रं तर जितके मोठे, तेवढे चांगले आहे. लक्ष्मीनारायणचे चित्र तर खूप चांगले आहे. यामध्ये फक्त लिहायचे आहे, एकच सत्य त्रिमुर्ती शिवबाबा, सत्य त्रिमूर्ती शिव शिक्षक, सत्य त्रिमूर्ती शिव गुरु आहेत. त्रिमूर्ती अक्षर लिहिणार नाहीत, तर समजतील परमात्मा तर निराकार आहेत, ते शिक्षक कसे होऊ शकतात. त्यांना ज्ञान तर नाही ना. लक्ष्मीनारायणचे चित्र पत्र्यावरती बनवून प्रत्येक जागी लावायचे आहे. ही स्थापना होत आहे. शिवबाबा ब्रह्मा द्वारे एक धर्माची स्थापना आणि बाकी सर्वांचा विनाश करण्यासाठी आले आहेत. असा नशा मुलांना नेहमी राहायला पाहिजे. थोड्या थोड्या गोष्टींमध्ये आप-आपसात एकमत मिळत नाही, तर लगेच बिघडतात. हे तर होत राहते. कोणी तिकडे, कोणी इकडे, ज्यांचे बहूमत आहे, त्यांचे मत घेतले जाते. यामध्ये नाराज होण्याची गोष्ट नाही. काही मुलं रुसतात, आमची गोष्ट स्विकारली नाही. अरे यामध्ये रुसण्याची काय गोष्ट आहे. बाबा तर सर्वांना आनंदित करणारे आहेत. मायेने सर्वांना रुसवले आहे. सर्व बाबा पासून रुसले आहेत. रुसले पण काय आहेत, बाबांना जाणतच नाहीत. ज्या बाबांनी स्वर्गाची बादशाही दिली, त्यांना जाणत नाही. बाबा म्हणतात, मी तुमच्यावरती उपकार करतो, तुम्ही परत माझ्यावर अपकार करतात. भारताचे हाल पहा कसे झाले आहेत. तुमच्यामध्ये पण खूप थोडे आहेत, ज्यांना नशा राहतो. हा नारायणी नशा आहे. असे थोडेच म्हणायला पाहिजे, आम्ही तर राम-सीता बनू. तुमचे मुख्य लक्ष आहे, नरा पासून नारायण बनणे. तुम्ही परत राम सिता बनण्यामध्ये का खुश होतात? हिम्मत ठेवायला पाहिजे ना. जुन्या दुनियेशी जरापण मन लावायचे नाही, कोणाचे मन लागले आणि हे मेले. जन्मजन्मांतर चे नुकसान होते. बाबा पासून तर स्वर्गाचे सुख मिळते परत आम्ही नरकामध्ये का पडलो आहोत. बाबा म्हणतात, तुम्ही जेव्हा स्वर्गामध्ये होते, तर दुसरा कोणता धर्म नव्हता. आता वैश्विक नाटकानुसार तुमचा धर्म नाही. कोणीही स्वतःला देवी-देवता धर्माचे समजत नाहीत. मनुष्य होऊन आपल्या धर्माला जाणले नाही, तर काय म्हणणार? हिंदू धर्म थोडाच आहे, कोणी स्थापन केला आहे, ?हे पण जाणत नाहीत?तुम्हा मुलांना किती समजावले जाते. बाबा म्हणतात मी तर काळांचा काळ, सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. बाकी जे चांगल्याप्रकारे शिकतील, ते विश्वाचे मालक बनतील. आत्ता घरी चला. ही दुनिया राहण्यालायक नाही, खूप कचरा केला आहे. बाबा तर असे म्हणतील ना. तुम्ही भारतवासी, जे विश्वाचे मालक होते, ते आत्ता खूप धक्के खात राहतात, लाज नाही वाटत? तुमच्यामध्ये पण काही आहेत, जे चांगल्याप्रकारे समजतात, क्रमानुसार तर आहेतच. अनेक मुलं अज्ञान निद्रे मध्ये राहतात. तो खुशी चा पारा चढत नाही. बाबा आम्हाला परत राजधानी देत आहेत. बाबा म्हणतात, या साधु-संतांचा पण उदार करण्यासाठी मी येतो. ते न स्वतःला, न दुसऱ्याला मुक्ती देऊ शकतात. खरे गुरु तर एकच सद्गुरु आहेत, जे संगम युगा मध्ये येऊन, सर्वांची सद्गती करतात. बाबा म्हणतात मी कल्पाच्या संगम युगे-यगे येतो, जेव्हा मला साऱ्या दुनियेला पावन बनवायचे आहे. मनुष्य समजतात पिता सर्वशक्तिमान आहेत, ते काय करू शकत नाहीत?अरे मला बोलवतातच की, येऊन आम्हाला पावन बनवा, तर मी येऊन पावन बनवतो. बाकी काय करणार. बाकी रिध्दी-सिध्दी असणारे खूप आहेत. माझे कामच आहे नर्काला स्वर्ग बनवणे. ते तर पाच हजार वर्षांच्या नंतर बनवतो. हे तुम्हीच जाणतात, आदी सनातन देवी देवता धर्म आहे. बाकी तर सर्व नंतर आले आहेत. अरविंद घोष तर आत्ता आले आहेत, तरी त्यांचे किती आश्रम बनले आहेत. तेथे काही निर्विकारी बनण्याची गोष्ट थोडीच आहे. ते तर समजतात गृहस्थ व्यवहारांमध्ये राहून पवित्र कोणी राहू शकत नाही. बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत, फक्त एक जन्म पवित्र राहा. तुम्ही जन्मजन्मांतर पतित राहिले आहात. आता मी आलो आहे, तुम्हाला पावन बनवण्यासाठी. हा अंतिम जन्म तुम्ही पावन बना. सतयुग त्रेता मध्ये तर विकार नसतात.

हे लक्ष्मीनारायणचे आणि शिडी चे चित्र खूप चांगले आहे, यामध्ये लिहा सतयुगामध्ये एक धर्म, एक राज्य, होते. ज्ञान समजून सांगण्याची पण युक्ती पाहिजे. वृद्ध मातांना शिकवून तयार करायला पाहिजे, ज्यामुळे प्रदर्शनीमध्ये काही समजून सांगू शकतील. कोणालाही हे चित्र दाखवून सांगा, यांचे राज्य होते, आता तर नाही. बाबा म्हणतात आता तुम्ही माझी आठवण करा, तर तुम्ही पावन बनून, पावन दुनिया मध्ये चालले जाल. आता पावन दुनिया ची स्थापना होत आहे. खूप सहज आहे. वृद्ध माता पण बसून प्रदर्शनी समजवतील तर, बाबांचे नाव प्रसिद्ध होईल. कृष्णाच्या चित्रांमध्ये पण लिहिलेले आहे. असे बोलायला पाहिजे, हे वाचा तर तुम्हाला नारायणी नशा किंवा विश्‍वाच्या मालक पणाचा नशा चढेल. बाबा म्हणतात मी तर तुम्हाला असे लक्ष्मीनारायण बनवतो. तर तुम्हाला पण दुसऱ्या वरती दया करायची आहे. जेव्हा आपले कल्याण कराल, तेव्हा तर दुसऱ्याचे पण करू शकता. वृद्ध मातांना शिकून हुशार बनवायचे आहे, ज्यामुळे प्रदर्शनी समजावून सांगतील. बाबा म्हणतात आठ-दहा वृद्ध माता ला पाठवा, तर लगेच जायाला पाहिजे. जे करतील त्यांना मिळेल. समोर मुख्य लक्ष्य आहे, हे पाहूनच खुशी होते. आम्ही हे शरीर सोडून विश्वाचे मालक बनू. जितके आठवणीमध्ये राहू, तेवढे पाप नष्ट होतील. पाकिटावरती पण छापले आहे, एक धर्म, एक देवी-देवतांची राजधानी, एक भाषेची लवकरच स्थापना होत आहे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कधीही आपसा मधे किंवा बाबांशी रुसायचे नाही. बाबा आनंदी करण्यासाठी आले आहेत, म्हणून कधीच नाराज व्हायचं नाही. बाबांचा सामना करायचा नाही.

(2) जुन्या दुनियेशी, जुन्या देहाशी मन लावायचे नाही. सत्य पिता, सत्य शिक्षक आणि सद्गुरूच्या सोबत खरे राहायचे आहे. नेहमी एकाच्या श्रीमता वरती चालून, देही अभिमानी बनायचे आहे.

वरदान:-
आदी रत्नाच्या स्मृती द्वारे, आपल्या जीवनाचे मूल्य जानणारे, सदा समर्थ भव.

जसे ब्रह्मा आदीदेव आहेत, असेच ब्रह्मकुमार कुमारी पण आदी रत्न आहेत. आदी देवाची मुलं मास्टर आदिदेव आहात. आदी रत्न समजल्यामुळे आपल्या जीवनाच्या मूल्याला जाणू शकाल, कारण रत्न म्हणजे प्रभूरत्न, ईश्वरीय रत्न, तर किती किंमत झाली, म्हणून नेहमी स्वतःला आदी देवाची मुलं मास्टर आदिदेव समजून, प्रत्येक कार्य करा तर, समर्थ भवचे वरदान मिळेल. काहीच व्यर्थ जाऊ शकणार नाही.

बोधवाक्य:-
ज्ञानी तू आत्मा, तेच आहेत, जे धोका खाण्याच्या अगोदर पारखून, स्वतःला वाचवतील.