10-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, बाबा आले आहेत तुमची बॅटरी चार्ज करण्यासाठी, जितके तुम्ही आठवणीमध्ये
रहाल, तेवढी बॅटरी चार्ज होत राहील"
प्रश्न:-
तुमच्या
खऱ्याच्या नावेला वादळ का लागतात?
उत्तर:-
कारण या वेळेत कृत्रिम पण खूप निघाले आहेत, कोणी स्वतःला भगवान म्हणतात, कोणी रिद्धी
सिद्धी दाखवतात, म्हणून मनुष्य खर्याला पारखू शकत नाहीत. खर्याचे नावेला हलवण्याचा
प्रयत्न करतात परंतु तुम्ही जाणतात की आमची खऱ्याची नाव म्हणजे सत्याची नाव कधी बुडू
शकत नाही. आज जे विघ्न आणत आहेत, ते उद्या समजतील की सद्गती चा रस्ता येथेच मिळणार
आहे. सर्वांसाठी हे एकच दुकान आहे.
ओम शांती।
आत्मिक मुलांप्रती किंवा आत्म्या प्रति कारण आत्माच कानाद्वारे ऐकते. धारणा आत्म्या
मध्येच होते. बाबाच्या आत्म्या मध्ये पण ज्ञान भरलेले आहे. मुलांना याच जन्मा मध्ये
आत्माभिमानी बनायचे आहे. भक्तिमार्गाचे ६३ जन्म, द्वापार युगापासून तुम्ही देह
अभिमाना मध्ये रहात आले. आत्मा काय आहे, हे माहिती झाले नाही. आत्मा जरूर आहे,
आत्माच शरीरामध्ये प्रवेश करते, दुःख पण आत्म्याला होते. पतित आत्मा, पावन आत्मा असे
म्हटले जाते. पतित परमात्म कधी ऐकले नाही. सर्वांच्या मध्ये जर परमात्मा असते तर,
पतित परमात्मा होतील. तर मुख्य गोष्ट आत्माभिमान बनणे आहे. आत्मा खूप सूक्ष्म आहे,
त्यामध्ये कशी भूमिका भरली आहे, हे कोणालाच माहिती नाही. तुम्ही तर नवीन गोष्टी ऐकत
आहात. या आठवणीच्या यात्रा पण बाबाच शिकवतात, दुसरे कोणी शिकवू शकत नाहीत. कष्ट पण
या मध्येच आहेत, सारखे स्वतःला आत्मा समजायचे आहे. जसे पहा ही एमर्जेंसी लाईट आली
आहे, बॅटरी वरती चालते, त्याला परत चार्ज करतात. बाबा सर्वात मोठी पावर आहे, शक्ती
आहे. आत्मे तर खूप आहेत. सर्वांना त्यांच्याद्वारे शक्ती भरायची आहे. बाबा
सर्वशक्तिमान आहेत, ज्यांचा त्यांच्याशी योग नसेल, तर बॅटरी चार्ज कशी होईल?सर्व
कल्प बॅटरी डिस्चार्ज ( कमकुवत) होण्यासाठी लागतो. आता परत बॅटरीला चार्ज करायचे आहे.
मुलं समजतात आमची बॅटरी डिस्चार्ज झाली आहे. आता परत चार्ज करायची आहे. कसे?बाबा
म्हणतात माझ्याशी योग लावा, हे तर खूप सहज समजण्याची गोष्ट आहे. बाबा म्हणतात
माझ्याशी बुद्धी योग लावा, तर तुमच्या आत्म्यामध्ये शक्ती भरून सतोप्रधान बनेल. हे
शिक्षण तर कमाई आहे. आठवणी द्वारे तुम्ही पावन बनतात, आयुष्यवान बनतात, बॅटरी चार्ज
होते. प्रत्येकाला तपासयाचे आहे की, मी किती बाबांची आठवण करतो. बाबांना
विसरल्यामुळे बॅटरी कमकुवत होते. कोणाचाही खरा-खुरा संबंध नाही. खरा संबध तर
तुम्हाला मुलांचा आहे. बाबांची आठवण केल्याशिवाय ज्योती जागृत कशी होईल. ज्ञान पण
फक्त बाबाच देतात. तुम्ही जाणता ज्ञान दिवस आहे, तर भक्ती रात्र आहे. परत रात्रीशी
वैराग्य होते, तर दिवस सुरू होतो. बाबा म्हणतात, रात्रीला विसरा, आता दिवसाची आठवण
करा. स्वर्ग दिवस आहे, नर्क रात्र आहे. तुम्ही मुलं आत्ता चैतन्य मध्ये आहात. हे
शरीर विनाशी आहे, मातीचे बनले आहे, माती मध्येच जाणार आहे. आत्मा तर अविनाशी आहे
ना, बाकी बॅटरी डिस्चार्ज होत राहते. आता तुम्ही खूप समजदार बनले आहात. तुमची बुद्धी
घराकडे चालली जाते, जेथुन आम्ही आलो आहोत. येथे सूक्ष्मवतनची तर माहिती पडते. तेथे
चार भुजा विष्णूच्या दाखवतात. येथे तर चार भुजा नसतात. हे पण कुणाच्या बुद्धीमध्ये
नसेल, की ब्रह्मा-सरस्वतीच परत लक्ष्मीनारायण बनतात, त्यामुळे चार भुजा दिल्या आहेत.
बाबांशिवाय कोणी समजावू शकत नाही. आत्म्यामध्ये संस्कार भरतात. आत्माच तमोप्रधान
पासून परत सतोप्रधान बनते. आत्मेच बाबांना बोलवतात, ओ बाबा, आम्ही डिस्चार्ज झालो
आहोत, आता तुम्ही या, आम्हाला चार्ज व्हायचे आहे. आत्ता बाबा म्हणतात जेवढी आठवण
कराल, तेवढी ताकत, शक्ती येईल. बाबांशी खूप प्रेम असायला हवे. बाबा आम्ही आपले आहोत,
आपल्या सोबतच घरांमध्ये जाणार आहोत. माहेर मधून सासरी चालले जातात ना. येथे तुम्हाला
शृंगार करणारे दोन पिता मिळाले आहेत. शृंगार पण चांगला पाहिजे, म्हणजे
सर्वगुणसंपन्न बनायचे आहे. तर स्वतःला विचारायचे आहे, माझ्या मध्ये कोणता अवगुण तर
नाही. मनसा मध्ये जरी वादळ आले, तरी कर्मणा द्वारे काही करायचे नाही, कोणाला दुःख
तर देत नाही?बाबा दुखहर्ता सुखकर्ता आहेत, तर आम्हाला पण सर्वांना सुखाचा रस्ता
दाखवयाचा आहे. बाबा खूप युक्त्या सांगत राहतात. तुम्ही तर सेना आहात, तुमचे नावच
प्रजापिता ब्रह्मा कुमारी कुमारी आहे. कोणीही सेवा केंद्रात आले, तर प्रथम त्यांना
विचारा कोठून आले आहात? कुणाच्या जवळ आले आहात?तर म्हणतील आम्ही ब्रह्मकुमार कुमारी
च्या जवळ आलो आहोत अच्छा, ब्रह्मा कोण आहेत?प्रजापिता ब्रह्मा चे नाव कधी ऐकले आहे?
होय प्रजापिताची तर तुम्ही पण मूलं आहात. प्रजा तर सर्व झाली ना. तुमचे पण पिता
आहेत, तुम्ही फक्त जाणत नाहीत. ब्रह्मा पण जरूर कोणाचा मुलगा असेल, त्यांच्या
पित्याचे कोणते शरीर तर पाहण्यात येत नाही. ब्रह्मा विष्णू शंकर या तिघांच्या वरती
शिवबाबा आहेत. त्रिमूर्ती शिव म्हटले जाते, ते तिघांचे रचनाकार आहेत. वरती एक
शिवबाबा आहेत, परत तीन आहेत. ब्रह्माचे पिता जरूर भगवान असतील. बाबा म्हणतात मी
यांच्यामध्ये प्रवेश करून त्यांचे नाव ब्रह्मा ठेवतो. तुम्हा मुलांचे पण नाव ठेवले
होते, तर यांचे पण नाव ब्रह्मा ठेवले. असे म्हणतात, हा माझा दिव्य अलौकिक जन्म आहे.
तुम्हा मुलांना दत्तक घेतो, बाकी यांच्यामध्ये प्रवेश करतो, परत तुम्हाला ज्ञान
ऐकवतो, म्हणून हे बाप दादा झाले. ज्यांच्या मध्ये प्रवेश केला, त्यांची आत्मा तर आहे
ना, त्यांच्या बाजूमध्ये येऊन बसतो. दोन आत्म्यांची भूमिका तर येथे खूप चालते.
आत्म्याला बोलवतात, तर आत्मा कुठे येऊन बसेल. जरूर ब्राह्मणांच्या बाजूला येऊन बसेल.
हे पण दोन आत्मे आहेत. बाप आणि दादा, यांच्यासाठी बाबा म्हणतात, हे आपल्या जन्माला
जाणत नाहीत. तुम्हाला पण म्हणतात तुम्ही आपल्या जन्माला जाणत नाव्हते. आता स्मृती
आली आहे, कल्प-कल्प ८४चे चक्र लावले आहे, परत जायचे आहे. हे संगमयुग आहे. आता
परिवर्तन होत आहे. योगाद्वारे तुम्ही सतोप्रधान बनाल, बॅटरी चार्ज होईल, परत
सतयुगांमध्ये जाल. बुद्धीमध्ये सर्व चक्र फिरत राहते. सविस्तर मध्ये तर जाऊ शकत
नाहीत. झाडाचे पण आयुष्य असते, परत सुकून जातात. सर्व मनुष्य सुकलेले आहेत. सर्व
एक-दोघांना दुःख देत राहतात. आता सर्वांचे शरीर नष्ट होईल, बाकी आत्मे चालले जातील.
हे ज्ञान बाबांच्या शिवाय कोणी देऊ शकत नाही. बाबाच विश्वाची बादशाही देतात, त्यांची
खुप आठवण करायला पाहिजे. आठवणीमध्ये न राहिल्यामुळे मायेची चापट लागते. सर्वात मोठी
चापट विकारांची आहे. युद्धाच्या मैदानामध्ये तुम्ही ब्राह्मणच आहात ना, तर तुम्हाला
विकारांचे वादळ येते, परंतु कोणतेही विकर्म करायचे नाही. विकर्म केले तर हार होते.
बाबांना विचारतात असे करावे लागते. मुलं तंग करतात, तर राग येतो. मुलांना चांगल्या
प्रकारे संभाळणार नाहीत, तर खराब होतील. प्रयत्न करून पहा, तुम्ही थप्पड मारू नका.
कृष्णासाठी पण दाखवतात ना, उखळाला बांधले. रस्सी ने बांधा, भोजन देऊ नका. रडून-रडून
शेवटी म्हणतील, अच्छा आत्ता करणार नाही. मुलगा आहे तरीही परत करेल, शिक्षा द्यायची
आहे. बाबा पण मुलांना शिक्षा देतात, मुलांनो कधीच विकारांमध्ये जाऊ नका, कलंकित बनू
नका. लौकिक मध्ये पण कोणी कुपात्र मुलगा असेल, तर मात-पिता म्हणतात ना, हे काय काळे
तोंड करतात, कुळाला कलंक लावतात. हारणे-जिंकणे, जिंकणे-हारणे असे होत-होत शेवटी
जिंकाल. सत्याची नाव आहे, वादळ तर खूप येतील परंतु कृत्रिम पण खूप निघाले आहेत. कोणी
स्वतःला भगवान म्हणतात, कोणी काय म्हणतात, रिद्धी-सिद्धी पण खूप दाखवतात,
साक्षात्कार पण करवतात. बाबा म्हणतात सर्वांची सद्गती करण्यासाठी मी येतो, परत न
जंगल राहील, ना जंगलामध्ये राहणारे लोक राहतील. आता तुम्ही संगमयुगा मध्ये आहात,
तुम्ही जाणतात की जुनी दुनिया कब्रस्तान होणारच आहे. कोणी मरणाऱ्याशी मन थोडेच
लावतात, ही दुनिया तर नष्ट झाली की झाली. विनाश झाला की झाला. बाबा येतात तेव्हा,
जेव्हा नवीन ची जुनी होते. बाबांची चांगल्यारितीने आठवण कराल, तर बॅटरी चार्ज होईल.
जरी वाणीद्वारे फार चांगलें बोलतात परंतु आठवणीची शक्ती नाही, तर ती ताकत राहत नाही,
धारदार तलवार नाही. बाबा म्हणतात ही कोणती नवीन गोष्ट नाही. पाच हजार वर्षांपूर्वी
पण आले होते. बाबा विचारतात, अगोदर कधी भेटले होते? तर म्हणतात कल्पा पूर्वी भेटलो
होतो. कोणी परत म्हणतात वैश्विक नाटक स्वतः पुरुषार्थ करवेल. अच्छा आत्ता वैश्विक
नाटक पुरुषार्थ करवत आहे ना, तर पुरुषार्थ करा, एकाच जागी तर बसायचे नाही ना.
ज्यांनी कल्पा पूर्वी पुरुषार्थ केला होता, ते करतील. आत्तापर्यंत जे आले नाहीत, ते
येतील. जे ज्ञानामध्ये चालता-चालता पळून गेले, लग्न इत्यादी केले, त्यांची पण
वैश्विक नाटकांमध्ये भूमिका असेल, तर परत पुरूषार्थ करतील, जातील कुठे?बाबांच्या
जवळच सर्वांना यावेच लागेल. असे लिहिले आहे, भीष्मपितामह इत्यादी पण अंत काळात
येतील. आता तर खूप अहंकार आहे, परत त्यांचा अहंकार नष्ट होईल. तुम्ही पण प्रत्येक
पाच हजार वर्षानंतर भूमिका वठवत राहतात, राजाई घेतात परत गमावतात. दिवसेंदिवस सेवा
केंद्रांची वृद्धी होत जाईल. भारतवासी जे देवी-देवतांचे पुजारी आहेत, त्यांना
समजावयाचे आहे. सतयुगा मध्ये देवी-देवता धर्म होता, तर त्यांची पूजा करतात.
ख्रिश्चन लोक ख्रिस्ताची महिमा करतात. आम्ही आदी सनातन देवी-देवता धर्माची महिमा
करतो. तो कोणी स्थापन केला?ते लोक समजतात, कृष्णाने स्थापन केला, तेव्हा तर त्यांची
पूजा करत राहतात. तुमच्यामध्ये पण क्रमानुसार आहेत. कोणी किती कष्ट करतात, कोणी
किती?असे दाखवतात ना गोवर्धन पर्वत करंगळीने उचलला.
आता ही जुनी दुनिया आहे, सर्व गोष्टींमधून शक्ती निघून गेली आहे. सोने पण खानी
द्वारेच निघते, स्वर्गामध्ये तर सोन्याचे महल बनवतात. आता तर सरकार तंग झाली आहे,
कारण कर्ज घ्यावे लागते. तेथे तर खूप धन असते. भिंतीमध्ये पण हिरे-मोती लावत राहतात.
हिऱ्यांची जडत करण्याचा छंद असतो. तेथे धनाची कमी नसते, कारून चा खजिना राहतो.
अल्लाह अवलदिन चा खेळ दाखवतात ना. टाळी वाजवल्या नंतर महल येतो. येथे पण दिव्यदृष्टी
मिळाल्यामुळे स्वर्गामध्ये चालले जातात. तेथे राजकुमार राजकुमारी च्या जवळ मुरली
इत्यादी सर्व गोष्टी हिऱ्यांच्या असतात. येथे तर कोणती अशी गोष्ट घालून बसले, तर
लुटून घेऊन जातील, मारून पण घेऊन जातील. तेथे अशा गोष्टी नसतात. ही जुनी दुनिया खुप
खराब आहे. या लक्ष्मी-नारायणाची दुनिया तर
वाह- वाह होती. हिरे जवाहरताचे महल होते. एकटे तर असणार नाहीत ना, त्याला म्हटले
जाते स्वर्ग. तुम्ही जाणता बरोबर आम्ही स्वर्गाचे मालक होतो. आम्हीच हे सोमनाथचे
मंदिर इत्यादी बनवले होते. हे तर समजतात की, आम्ही कसे होतो, परत भक्तिमार्ग मध्ये
कसे मंदिर बनवून पूजा केली. आत्म्याला आपल्या ८४ जन्माचे ज्ञान आहे. किती हिरे
जवाहरात होते, ते परत कुठे गेले?हळूहळू सर्व नष्ट होत गेले. मुसलमान आले त्यांनी
लुटून कबर मध्ये लावले, ताजमहल इत्यादी बनवले, परत इंग्रज सरकार ने तेथून खोदून
घेऊन गेले. आता तर काहीच नाही, भारत गरीब आहे, कर्ज कर्ज घेत राहतात. धन-धान्य साखर
इत्यादी काही मिळत नाही. आता विश्व बदलणार आहे परंतु त्याच्या पूर्वी आत्म्याच्या
बॅटरीला सतोप्रधान बनवण्यासाठी चार्ज करायचे आहे. बाबांची आठवण जरूर करायची आहे.
बुध्दीचा योग बाबांच्या सोबत हवा, त्यांच्या द्वारेच वारसा मिळतो. मायेची लढाई पण
यामध्येच होते. यापुर्वी या गोष्टीला तुम्ही थोडेच समजत होते. जसे दुसरे तसेच तुम्ही
होते. तुम्ही आता संगमयुगी आहात, बाकी सर्व कलयुगी आहेत. मनुष्य म्हणतात यांना तर,
जे येते ते बोलत राहतात परंतु समजून सांगण्याची पण युक्ती पाहिजे. तुमची हळूहळू
वृद्धि होत जाईल. आत्ता बाबा मोठे विद्यापीठ सुरू करत आहेत, यामध्ये समजवण्यासाठी
चित्र तर पाहिजेत ना. पुढे चालून तुमच्याजवळ सर्व ट्रान्सलाईट चे चित्र बनतील, परत
तुम्हाला समजावून सांगणे सहज होईल. तुम्ही जाणतात आम्ही आपली बादशाहीची, बाबांच्या
आठवणीने परत स्थापन करत आहोत. माया मध्येच खूप धोका देते. बाबा म्हणतात माये पासून
सुरक्षित रहा. युक्ती तर खूप सांगत राहतात. मुखाद्वारे फक्त एवढेच सांगा की, बाबांची
आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही लक्ष्मी नारायण बनाल. हे बैजेस
इत्यादी भगवंताने स्वतः बनवले आहेत, तर यांचा खूप मान ठेवायला पाहिजे, अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपुर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) सर्व
गुणांद्वारे आपला शृंगार करायचा आहे, कधीही कोणाला दुःख द्यायचे नाही. सर्वांना
सुखाचा रस्ता दाखवायचा आहे.
(२) सर्व दुनिया कब्रस्थान झाली आहे म्हणून याच्याशी मन लावायचे नाही. स्मृति राहावी
की आम्ही परिवर्तन होत आहोत, आम्हाला तर नवीन दुनियेमध्ये जायचे आहे.
वरदान:-
प्रवृत्ती
मध्ये राहत मी-माझ्या पनाचा त्याग करणारे, खरे विश्वस्त मायाजीत भव.
जसे घाणी मध्ये
किडे उत्पन्न होतात तसेच जेव्हा मी पणा, माझे पणा येतो तर मायेचा जन्म होतो.
मायाजीत बनण्याचा सहज उपाय आहे, स्वतःला नेहमी विश्वस्त समजा. ब्रह्माकुमार म्हणजे
विश्वस्त, विश्वस्ताचे कोणत्या गोष्टींमध्ये ममत्व राहत नाही, कारण त्यांच्यामध्ये
माझे पना नसतो. ग्रहस्थी समजाल तर माया येईल आणि विश्वस्त समजाल तर माया पळून जाईल
म्हणून अनासक्त होऊन परत प्रवृत्तीच्या कार्यामध्ये या, तर मायाप्रुफ रहाल.
बोधवाक्य:-
जिथे अभिमान
असतो तेथे अपमानाची जाणीव जरूर होते.