19-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, सत्य पंडा आले आहेत, तुम्हाला खरी खुरी यात्रा शिकविण्यासाठी, तुमच्या
यात्रेमध्ये मुख्य पवित्रता आहे, आठवण करा आणि पवित्र बना. "
प्रश्न:-
तुम्हां
मेसेंजर किंवा पैगंबर मुलांना कोणत्या गोष्टी शिवाय, दुसऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये,
वार्तालाप करायचा नाही?
उत्तर:-
तुम्ही मेसेंजर ची मुले, सर्वांना हाच संदेश द्या की, स्वतःला आत्मा समजा आणि बाबाची
आठवण करा, तर या योग अग्नी मुळे तुमचे विकर्म विनाश होतील. हीच काळजी घ्या. बाकी
इतर गोष्टींमध्ये जाण्यात काचही फायदा नाही. तुम्हाला फक्त सर्वांना बाबाचा परिचय
द्यायचा आहे, त्यामुळे ते आस्तीक बनतील. जेंव्हा बाबांना समजतील, तर रचनेला समजणे,
सोपे होऊन जाईल.
गीत:-
आमचे तीर्थ
वेगळे आहेत.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुले जाणतात की, आम्ही खरे तीर्थवासी आहोत. खरे पंडा आणि आम्ही
त्यांची मुले जी आहोत, ते पण खऱ्या तीर्थावर जात आहेत. हा आहे खोटा खंड किंवा पतीत
खंड. आता सत्यखंड किंवा पावन खंडामध्ये जात आहोत. मनुष्य यात्रेस जात आहेत ना. कुठे
कुठे तर खास यात्रा असते, तिथे तर कोणी, कधी पण जाऊ शकतात. ही पण यात्रा आहे, या
यात्रेमध्ये तेंव्हाच जाणे होते, जेंव्हा खरे पंडा स्वतः येतात. ते कल्पाच्या
संगमयुगावर येतात. यामध्ये ना थंडी, ना गर्मी ची गोष्ट आहे. ना धक्के खाण्याची
गोष्ट आहे. ही तर आहेच आठवणीची यात्रा. त्या यात्रेमध्ये संन्याशी पण जातात. जे खरी
खुरी यात्रा करणारे असतात, ते पवित्र राहतात. तुम्ही पण सर्व यात्रेवर आहात. तुम्ही
ब्राह्मण आहात. खरे चांंगले ब्रह्माकुमार कुमारी कोण आहेत? जे कधी पण विकारांमध्ये
जात नाहीत. पुरुषार्थी तर जरूर आहेत. जरी मनात संकल्प आले, तरी मुख्य विकाराची
गोष्ट आहे. कोणी जरी विचारले की, निर्विकारी ब्राह्मण तुमच्या जवळ किती आहेत? सांगा,
असे विचारण्याची जरूरत नाही. या गोष्टीमुळे तुमचे काय पोट भरेल. तुम्ही स्वतः यात्री
बना. यात्रा करणारे किती आहेत, असे विचारल्याने कांही फायदा नाही. ब्राह्मण तर कोणी
खरे पण आहेत, तर कोणी खोटे पण आहेत. आज खरे आहेत, उद्या खोटे बनतात. विकारांमध्ये
गेले तर ब्राह्मणच राहिले नाही. मग शुद्र तो शुद्र च झाला. आज प्रतिज्ञा करतात,
उद्या विकारांमध्ये गेल्याने असूर बनतात. आता या गोष्टी कोठ पर्यंत समजावयाच्या.
यातून पोट तर भरणार नाही किंवा तोंड पण गोड होणार नाही. इथे आम्ही बाबाची आठवण करत
आहोत आणि बाबाच्या रचनेच्या आदि-मध्य- अंताला जाणत आहोत. बाकी इतर गोष्टींमध्ये
कांही राहिलेले नाही. सांगा, इथे बाबांची आठवण शिकविली जाते आणि मुख्य पवित्रता आहे.
जे आज पवित्र बनून मग अपवित्र बनत आहेत, तर ते ब्राह्मणच राहिले नाहीत. आम्ही हा
हिशोब कोठून तुम्हाला सांगावा. असे तर फार विकारी बनत असतील, मायेच्या तुफानामुळे,
त्यामुळे ब्राह्मणांची माळा बनू शकत नाही. आम्ही तर पैगंबरांची मुले, संदेश सांगत
आहोत, मेसेंजर ची मुले संदेश देत आहोत. स्वतःला आत्मा समजा आणि बाबाची आठवण करा, तर
या योग अग्नीमुळे विकर्म विनाश होतील. याची काळजी घ्या. बाकी प्रश्न तर अनेकानेक
मनुष्य विचारतात. शिवाय एका गोष्टीच्या, आणखीन इतर गोष्टींमध्ये, जाण्यात कांही
फायदाच नाही. इथे तर हे जाणायचे आहे की, नास्तिक पासून आस्तिक, विनाधनी पासून धनके,
कसे बनायचे, ज्यामुळे धनीचा वरसा मिळेल, हे विचारा. बाकी तर सर्व पुरुषार्थी आहेत.
विकाराच्या गोष्टींमध्येच अनेक नापास होत आहेत. फार दिवसा नंतर स्त्रीला पाहतात तर
कांही विचारू नका. कोणाला दारूची सवय असेल, तीर्थावर गेले तरी दारू किंवा बीडी,
ज्यांना सवय असते, ते त्याच्या शिवाय राहू शकत नाहीत. चोरून पण पीत राहतात. काय करू
शकतील. फार आहेत, जे खरे बोलत नाहीत. लपवून ठेवतात.
बाबा मुलांना युक्ती सांगत आहेत की, कसे युक्तीने उत्तर दिले पाहिजे. एक बाबाचाच
परिचय द्यायचा आहे, ज्यामुळे मनुष्य आस्तिक बनतील. प्रथम जोपर्यंत बाबाला ओळखले नाही,
तोपर्यंत कांही प्रश्न विचारणे तर फालतू आहे. असे फार आहेत, काहीच समजत नाहीत. फक्त
ऐकत राहतात, फायदा कांही पण नाही. बाबाला लिहतात की, हजार, दोन हजार आले, त्यामधून
एक-दोन समजण्यासाठी येत आहेत. अमुक अमुक मोठा माणूस येत आहे. मी समजून घेतो की,
त्यांना जो परिचय मिळाला पाहिजे, तो मिळाला नाही. पूर्ण परिचय मिळाला तर समजतील कि,
हे तर बरोबर सांगत आहेत, आम्हां आत्म्यांचा पिता, परमपिता परमात्मा आहेत, ते शिकवत
आहेत. ते सांगतात की, स्वतःला आत्मा समजून, माझी आठवण करा. हा शेवटचा जन्म पवित्र
बना. जे पवित्र बनत नाहीत, ते ब्राह्मण नाहीत, शुद्र आहेत. युद्धाचे मैदान आहे. झाड
वाढत राहील आणि तुफान पण येत राहतात. फार पाने खाली पडतात. कोण बसून हिशोब करेल की,
खरे ब्राह्मण कोण आहेत? खरे ते आहेत जे कधीच शुद्र बनत नाहीत. जरा पण दृष्टी जात
नाही. अंताला कर्मातीत अवस्था होईल. फार उंच मंजिल आहे. मना मध्ये पण येऊ नये, ती
अवस्था अंताला होईल. यावेळी एकाची पण अशी अवस्था नाही. यावेळी सर्व पुरुषार्थी आहेत.
खाली वर होत राहतात. मुख्य डोळ्याचीच गोष्ट आहे. आम्ही आत्मा आहोत, या शरीराद्वारे
भूमिका बजावत आहोत, असा पक्का अभ्यास पाहिजे. जोपर्यंत रावण राज्य आहे, तोपर्यंत
युद्ध चालत राहते. शेवटाला कर्मातीत अवस्था होईल. पुढे चालून तुम्हाला भासना येईल,
समजत जातील. आता तर झाड फार लहान आहे, तूफान येत राहतात, पाने खाली पडत राहतातत. जे
कच्चे आहेत, ते खाली पडतात. प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे की, माझी अवस्था
कुठपर्यंत आहे? बाकी जे प्रश्न विचारत आहेत, त्या गोष्टींमध्ये जास्त जाऊच नका.
सांगा, आम्ही बाबाच्या श्रीमता वर चालत आहोत. ते बेहदचे बाबा येऊन आम्हाला बेहदचे
सुख देत आहेत किंवा नवीन दुनिया स्थापन करत आहेत. तिथे सुखच असते. जिथे मनुष्य
राहतात त्यालाच दुनिया म्हटले जाते. निराकारी जगामध्ये आत्त्मे आहेत ना. हे कोणाच्या
बुद्धीमध्ये येत नाही की, आत्मा कशी बिंदू आहे. हे पण अगोदर कोणी नवीन आले तर,
त्याला सांगायचे नाही. पहिल्या प्रथम तर समजावयाचे आहे की, बेहदचे बाबा, बेहदचा वरसा
देत आहेत. भारत पावन होता, आता पतीत आहेत. कलियुगा नंतर मग सतयुग येणार आहे. दुसरे
कोणी पण समजावू शकत नाही, शिवाय बी. के. च्या, ही आहे नवीन रचना. बाबा शिकवत आहेत,
ही शिकवण बुद्धीमध्ये राहिली पाहिजे. कोणती अवघड गोष्ट नाही, परंतु माया विसरून
टाकते, विकर्म करविते. अर्धाकल्पा पासून विकर्म करण्याची सवय पडली आहे. या सर्व
आसुरी सवयी संपविल्या पाहिजेत. बाबा स्वतः म्हणत आहेत की, सर्व पुरुषार्थी आहेत.
कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी फार वेळ लागत आहे. ब्राह्मण कधी विकारांमध्ये
जात नाही. युद्धाच्या मैदाना मध्ये चालता, चालता हार खातात. या प्रश्ना पासून कांही
फायदा नाही. प्रथम आपल्या बाबाची आठवण करा. आम्हाला शिवबाबांनी कल्पा पूर्वीप्रमाणे
आदेश दिला आहे की, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. ही तीच लडाई आहे. बाबा एक
आहेत. कृष्णाला पिता म्हणत नाहीत. कृष्णाचे नाव टाकले आहे. चुकी पासुन खरे बनवणारे
बाबा आहेत, त्यामुळे तर त्यांना सत्य म्हटले जाते ना. यावेळी तुम्ही मुलेच, साऱ्या
सुष्टीच्या रहस्याला जाणत आहात. सतयुगा मध्ये आहे, दैवी राजधानी. रावण राज्यांमध्ये
मग आहे, आसुरी राजधानी. संगमयुगा वर स्पष्ट करून दाखविले पाहिजे. हे पुरुषोत्तम
संगमयुग आहे. त्या बाजूला देवता, या बाजूला आसुर आहेत. बाकी त्यांचे युद्ध तर झाले
नाही. युद्ध तर तुम्हां ब्राह्मणांचे विकारा बरोबर आहे. याला पण युद्ध म्हणत नाहीत.
सर्वात मोठा काम विकार आहे, हा महाशत्रू आहे. यावर विजय प्राप्त केल्यानेच तुम्ही
जगतजीत बनाल. या विषा साठीच अबलाना मार खावा लागतो. अनेक प्रकारचे विघ्न पडतात. मूळ
गोष्ट पवित्रतेची आहे. पुरुषार्थ करत करत, तूफान येत येत, तुमचा विजय होईल. माया
थकून जाईल. कुस्ती मध्ये जे पैलवान असतात, ते झटक्यात सामना करतात. त्यांचा धंदाच
आहे, चांगल्या प्रकारे सामना करून विजयी होणे. पैलवानाचे फार मोठे नाव होते. बक्षीस
मिळते. तुमच्या तर या गुप्तगोष्टी आहेत.
तुम्ही जाणता की, आम्ही आत्मे पवित्र होतो. आता अपवित्र झाले आहोत, मग पवित्र बनायचे
आहे. हाच संदेश सर्वाना द्यायचा आहे, आणखीन कोणी प्रश्न विचारले, तर तुम्हाला त्या
गोष्टींमध्ये जायचेच नाही. तुमचा आत्मिक धंदा आहे. आम्हा आत्मा मध्ये बाबाने ज्ञान
भरले होते, त्यानंतर प्रारब्ध मिळाली, ज्ञान संपून गेले. आता परत बाबा ज्ञान भरत
आहेत. बाकी तुम्ही नशे मध्ये राहा, सांगा, बाबाचा संदेश देत आहोत की, बाबाची आठवण
करा, तर कल्याण होईल. तुमचा हा आत्मिक धंदा आहे. पहिली गोष्ट आहे की, बाबाला ओळखा.
बाबाच ज्ञानाचे सागर आहेत. ते कांही पुस्तक थोडेच सांगतात. ते लोक जे डॉक्टर ऑफ
फिलोसोफी इ. बनतात, ते पुस्तके वाचतात. भगवान तर ज्ञानाचे सागर आहेत. त्यांना
सृष्टीच्या आदि- मध्य- अंताचे ज्ञान आहे. ते काही शिकलेले आहेत काय? ते तर सर्व वेद
शास्त्र इ. ला जाणतात. बाबा म्हणतात, माझी भूमिका तुम्हाला ज्ञान समजावून सांगण्याची
आहे. ज्ञान आणि भक्तीचा फरक इतर कोणी सांगू शकत नाही. ही ज्ञानाची शिकवण आहे.
भक्तीला ज्ञान म्हटले जात नाही. सर्वांचा सदगती दाता एकच बाबा आहेत. जगाचा इतिहास
जरूर पुनरावृत्त होत आहे. जुन्या दुनिये नंतर मग नवीन दुनिया जरूर येणार आहे. तुम्ही
मुले जाणता की, बाबा आम्हाला परत शिकवत आहेत. बाबा म्हणतात, माझी आठवण करा, जोर सारा
या गोष्टीवर आहे. बाबा जाणतात की, फार चांगली चांगली, प्रसिद्ध मुले, या आठवणीच्या
यात्रेमध्ये फार कमजोर आहेत, आणि जे प्रसिद्ध नाहीत, बंधनांमध्ये आहेत, गरीब आहेत,
ते आठवणीच्या यात्रे मध्ये खूप राहतात. प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावे की,
मी बाबाची किती वेळ आठवण करतो? बाबा म्हणतात की, मुलांनो, जेवढे शक्य होईल तेवढी
माझी आठवण करा. मनातून खुफ हर्षित राहा. भगवान शिकवत आहेत, तर किती खुशी झाली पाहिजे.
बाबा म्हणतात, तुम्ही पवित्र आत्मा होता, मग शरीर धारण करून, अभिनय करून पतित बनले
आहात. आता परत पवित्र बनायचे आहे. मग तोच दैवी अभिनय करायचा आहे. तुम्ही दैवी
धर्माचे आहात ना. तुम्हीच 84 जन्माचे चक्र मारले आहे. सर्व सूर्यवंशी पण ८४ जन्म
थोडेच घेत आहेत. शेवटी येत राहतात ना. नाही तर झटक्यात सर्व येतील. सकाळी उठून
बुद्धीला कांही काम दिले, तर समजू शकतील. मुलांनाच विचार सागर मंथन करायचे आहे.
शिवबाबा तर करणार नाहीत. ते तर म्हणतात, विश्वनाटका नुसार जे कांही सांगत आहे, असे
समजा की, कल्पापूर्वी जे सांगितले होते, तेच सांगीतले आहे. मंथन तुम्ही करत आहात.
तुम्हाला च समजावून सांगायचे आहे, ज्ञान द्यायचे आहे. हे ब्रह्मा पण मंथन करत आहेत.
बी. के. ना मंथन करायचे आहे. शिवबाबा ना नाही. मूळ गोष्ट कोणा बरोबर पण जास्त
बोलायचे नाही. वाद-विवाद शास्त्रवादी आपसांमध्ये फार करतात, तुम्हाला वाद विवाद
करायचा नाही. तुम्हाला फक्त संदेश द्यायचा आहे. प्रथम फक्त मुख्य एका गोष्टीवरच
समजावून सांगा आणि लिहून घ्या. पहिल्या प्रथम हे लक्ष्य ठेवा की, हे कोण शिकवत आहे,
ते लिहा. ही गोष्ट तुम्ही शेवटी सांगत आहात, त्यामुळे ते संशया मध्ये येतात. निश्चय
बुद्धी न झाल्यामुळे, समजत नाहीत. फक्त म्हणतात गोष्ट तर बरोबर आहे. पहिल्याप्रथम
मुख्य गोष्टच ही आहे. रचतनाकार बाबाला समजा, मग रचनेचे रहस्य समजून घ्या. मुख्य
गोष्ट गीतेचा भगवान कोण? तुमचा विजय पण याच गोष्टीवर होणार आहे. पहिल्या प्रथम कोणता
धर्म स्थापन झाला? जुन्या दुनियेला नवीन दुनिया कोण बनवत आहेत. बाबाच आत्म्यांना
नवीन ज्ञान सांगत आहेत, त्यामुळे नवीन दुनिया स्थापन होत आहे. तुम्हाला बाबा आणि
रचने ची ओळख झालेली आहे. पहिल्या प्रथम तर अल्फ वर पक्के करा, तर बे बादशाही तर
आहेच. बाबा कडूनच वरसा मिळत आहे. बाबाला ओळखले आणि वरशाचे हक्कदार बनले. मुलगा जन्म
घेतो, आई-वडिलांना पाहतो आणि पक्का निश्चय होऊन जातो. आई- वडिलां शिवाय कोणा कडे पण
जाणार नाही कारण आईकडून दूध मिळते. इथे पण ज्ञानाचे दूध मिळत आहे. माता पिता आहेत
ना. या फार सुक्ष्म गोष्टी आहेत, लवकर कोणी समजू शकणार नाहीत. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति, मातपिता, बाप दादाची, प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचे आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) खरा खुरा
पवित्र ब्राह्मण बनायचे आहे. कधी शुद्र पतित बनण्याचा विचार मनामध्ये पण येऊ नये.
जरा पण दृष्टी जाऊ नये, अशी अवस्था बनवायची आहे.
(२) बाबा जी शिकवण देत आहेत, ते शिक्षण बुद्धी मध्ये ठेवायचे आहे. जी विकर्म
करण्याची आसुरी सवय पडलेली आहे, ती नाहीशी करायची आहे. पुरुषार्थ करत करत संपूर्ण
पवित्रतेची उंच मंजिल प्राप्त करायची आहे.
वरदान:-
प्रवृत्ती
मध्ये राहून पर-वृत्ती मध्ये राहणारे निरंतर योगी भव:
निरंतर योगी बनण्याचे
सहज साधन आहे, प्रवृत्ती मध्ये राहून पर-वृत्ती मध्ये राहणे. पर-वृत्ती म्हणजे
आत्मिक स्वरूप. जे आत्मिक रूपामध्ये स्थिती राहतात, ते नेहमीच न्यारे आणि बाबाचे
प्रिय बनतात. कांही पण करताना, असे वाटते पाहिजे की, ते काम केलेच नाही, परंतु खेळ
केला आहे. तर प्रवृत्ती मध्ये राहून, आत्मिक रूपामध्ये राहिल्याने, सर्व खेळा
प्रमाणे सहज अनुभव होईल. बंधन वाटणार नाही. फक्त स्नेह आणि सहयोगा बरोबर, शक्तीची
जोड द्या, तर उंच उडी मारू शकाल.
बोधवाक्य:-
बुद्धीची
महीनता किंवा आत्म्याचे हल्केपणा, ही ब्राह्मण जीवनाचे व्यक्तीमत्व आहे.