25-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, स्वतःवर स्वतःच कृपा करायची आहे, शिक्षण तीव्रगतीने घरच्या, कोणतेही
विकर्म करून, आपले रजिस्टर खराब करु नका ".
प्रश्न:-
या उंच शिक्षणा
मध्ये पास होण्यासाठी, मुख्य उपदेश कोणता मिळत आहे? त्यासाठी कोणत्या गोष्टीवर
विशेष लक्ष दिले पाहिजे?
उत्तर:-
या शिक्षणा मध्ये पास होण्यासाठी, डोळे फार फार पवित्र असले पाहिजेत, कारण हे डोळेच
धोका देतात, हेच विकारी बनतात. शरीराला पाहिल्यामुळे, कर्मेंद्रियामध्ये चंचलता येते,
त्यामुळे डोळे कधीपण विकारी बनू नयेत, पवित्र बनण्यासाठी भाऊ बहीण होवून राहा,
आठवणीच्या यात्रेमध्ये पुरेपूर लक्ष द्या.
गीत:-
धीरज धर मनवा.
. . . .
ओम शांती।
कोणी म्हटले? बेहदच्या बाबाने बेहदच्या मुलांसाठी म्हटले. जर कोणी मनुष्य आजारी पडला
तर त्याला आधार दिला जातो कि, धैर्य धर. तुझे सर्व दुःख दूर होतील. त्याला खुशी
मध्ये ठेण्यासाठी आधार दिला जातो. आता ती हदची गोष्ट आहे. ही बेहदची गोष्ट आहे.
बाबांची अनेक मुले आहेत. सर्वांना दुःखापासून मुक्त करायचे आहे. हे पण तुम्ही मुलेच
जाणत आहात. तुम्ही विसरले नाही पाहिजे. बाबा सर्वांची सदगती करण्यासाठी आले आहेत.
सर्वांचा सदगती दाता आहे, तर त्याचा अर्थ आहे, सर्व दुर्गतीमध्ये आहेत. साऱ्या
दुनियेतील मनुष्यमात्र, त्यामध्ये पण खास भारत, आम दुनिया म्हटले जाते. खास तुम्ही
सुखधामला जाता. बाकी सर्व शांतीधाम मध्ये जातील. बुद्धीमध्ये येते की, बरोबर आम्ही
सुखधाम मध्ये होतो, तर इतर धर्मवाले शांतीधाम मध्ये होते. बाबा आले होते, त्यांनी
भारताला सुखधाम बनविले होते. तर प्रचार प्रसार पण असा केला पाहिजे. समजावले पाहिजे
की, दर ५००० वर्षानंतर निराकार शिवबाबा येतात. ते सर्वांचे पिता आहेत. बाकी सर्व
भाऊ आहेत. भाऊच पुरुषार्थ करत आहेत, पित्याकडून वारसा घेण्याचा. असे नाही की, पिता
पुरुषार्थ करतात. सर्व पिता असतील, तर मग वारसा कोणाकडून घ्यायचा? काय भावाकडून? हे
तर होऊ शकत नाही. आता तुम्ही समजता की, ही तर फार सोपी गोष्ट आहे. सतयुगा मध्ये एकच
देवी देवता धर्म होता. बाकी सर्व आत्मे मुक्तिधामला निघून जातात. जगाच्या इतिहास
भूगोलाची पुनरावृत्ती होत आहे असे म्हणतात, तर जरुर एकच इतिहास भूगोल आहे, ज्याची
पुनरावृत्ती होत आहे. कलियुगा नंतर मग सतयुग येते. दोघांच्या मध्ये मग संगमयुग पण
जरूर असते. त्याला म्हटले जाते, सर्वोच पुरुषोत्तम कल्याणकारी युग. आता तुमच्या
बुद्धीचे कुलुप उघडले आहे, तर समजता कि, ही तर फार सोपी गोष्ट आहे. नवीन दुनिया आणि
जुनी दुनिया. जुन्या झाडा मध्ये जरूर अनेक पाने आहेत. नवीन झाडा मध्ये थोडी पाने
असतात. ती सतोप्रधान दुनिया आहे, याला तमोप्रधान म्हणतात. तुमचे पण क्रमवार
पुरुषार्था नुसार बुद्धीचे कुलूप उघडले आहे, कारण सर्व यर्थात रूपामध्ये बाबाची
आठवण करत नाहीत. त्यामुळे धारणा पण होत नाही. बाबा तर पुरुषार्थ करवीत आहेत, परंतु
नशीबा मध्ये नाही. विश्वनाटका नुसार जे चांगल्या रीतीने शिकतात आणि शिकवितात, बाबाचे
मदतगार बनतात, कोणत्याही परिस्थिती मध्ये तेच उच्च पद प्राप्त करतात. शाळेमध्ये
विद्यार्थी पण समजतात की, आम्ही किती गुणांनी पास होऊ. तीव्र बुद्धीचे खूप
पुरुषार्थ करतात. जादा तासासाठी शिक्षक ठेवतात, कारण कसे पण करून पास व्हावेत. इथे
पण खूप तीव्रगतीने अभ्यास करायचा आहे. स्वतःवर कृपा करायची आहे. बाबाला जर कोणी
विचारले की, आता शरीर सुटले तर या अवस्थे मध्ये कोणते पद मिळेल? तर बाबा झटक्यात
सांगू शकतात. ही तर फार सहज समजण्याची गोष्ट आहे. जसे हदचे विद्यार्थी समजतात,
बेहदचे विद्यार्थी पण समजू शकतात. बुद्धी द्वारे समजू शकता की, माझ्याकडून वारंवार
या चुका होतात, विकर्म होतात. रजिस्टर खराब झाले तर निकाल पण तसाच लागेल.
प्रत्येकाने स्वतःचे रजिस्टर ठेवावे. तसे तर विश्वनाटका नुसार सर्वांची नोंद होतच
राहते. स्वतः पण समजतात की, माझे रजिस्टर तर फारच खराब आहे. नाही समजू शकला तर बाबा
सांगू शकतात. शाळेमध्ये रजिस्टर इ. सर्व ठेवले जाते. येथे दुनियेतील कोणाला पण
माहित नाही. नाव गीता पाठशाळा आहे. वेद पाठशाळा कधी म्हणत नाहीत. वेद उपनिषद ग्रंथ
इ. कोणाची पण पाठशाळा म्हणत नाहीत. पाठशाळे मध्ये मुख्य लक्ष्य असते. आम्ही भविष्या
मध्ये असे बनू. कांही वेद शास्त्र फार वाचतात, तर त्यांना पण नावाची पदवी मिळते.
कमाई पण होते. काही जण तर फार कमाई करतात. परंतु ती कांही अविनाशी कमाई नाही, ती
बरोबर येणार नाही. ही खरी कमाई बरोबर येणार आहे. बाकी सर्व नाहीसे होऊन जाते. तुम्ही
मुले जाणता की, आम्ही खूप कमाई करत आहोत. आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. सूर्यवंशी
राजधानी आहे, तर जरूर मुले तख्तावर बसतील. खूप उच्च पद आहे. तुमच्या स्वप्नांमध्ये
पण नव्हते कि, आम्ही पुरुषार्थ करून, राज्य पद प्राप्त करू. याला राजयोग म्हटले जाते.
तो बॅरिस्टरी योग, डॉक्टरी योग आहे. शिक्षण आणि शिकवणाऱ्या ची आठवण राहते. इथे पण
ही सहज आठवण आहे. आठवणी मध्येच मेहनत आहे. स्वतःला आत्मअभिमानी बनविले पाहिजे.
आत्म्यामध्ये संस्कार भरत आहेत. असे फार येतात, जे म्हणतात की, आम्ही तर शिवबाबाची
पूजा करत होतो, परंतु कां पुजा करत आहे, हे समजत नव्हतो. शिवालाच बाबा म्हणतात.
आणखीन कोणाला बाबा म्हणत नाहीत. हनुमान, गणेश इ. ची पूजा करतात, ब्रह्मांची पूजा
होत नाही. जरी अजमेर मध्ये मंदिर आहे. तेथील थोडे ब्राह्मण लोक पूजा करत असतील. बाकी
महिमा इ. कांही नाही. श्रीकृष्णाची, लक्ष्मी नारायणाची किती महिमा करतात. ब्रह्मांचे
नाव नाही, कारण ब्रह्मां तर यावेळी सावळे आहेत. मग बाबा येऊन, त्यांना दत्तक घेतात.
हे पण फार सोपे आहे. तर बाबा मुलांना वेग-वेगळ्या प्रकारे समजावत आहेत. बुद्धीमध्ये
हे ठेवा कि, शिवबाबा आम्हाला सांगत आहेत. ते पिता पण आहेत, शिक्षक, गुरु पण आहेत.
शिवबाबा ज्ञानाचे सागर, आम्हाला शिकवत आहेत. आता तुम्ही मुले त्रिकालदर्शी बनत आहात.
ज्ञानाचा तिसरा डोळा तुम्हाला मिळाला आहे. हे पण तुम्ही समजता की, आत्मा अविनाशी आहे.
आत्म्याचे पिता पण अविनाशी आहेत. हे पण दुनिये मध्ये कोणी जाणत नाही. ते तर सर्व
बोलावतात की, बाबा आम्हाला पतिता पासून पावन बनवा. असे म्हणत नाहीत की, जगाचा
इतिहास भूगोल येऊन सांगा. ते तर बाबा स्वतः येऊन सांगत आहेत. पतिता पासून पावन आणि
पावन पासून पतित कसे बनले? इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते, ते पण सांगत आहेत. 84
चे चक्र आहे. आम्ही पतित कां झालो, मग पावन बनून, कुठे जाण्याची इच्छा आहे. मनुष्य
तर संन्याशी इ. जवळ जाऊन म्हणतात की, मनाला शांती कशी मिळेल? असे म्हणत नाहीत की,
आम्ही संपूर्ण निर्विकारी, पावन कसे बनू? असे म्हणण्यासाठी लाज वाटते. आता बाबांनी
सांगितले आहे, तुम्ही सर्व भक्तीन आहात. मी भगवान साजन आहे. तुम्ही सजनी आहात.
तुम्ही सर्व माझी आठवण करता. मी प्रवासी फार सुंदर आहे. साऱ्या दुनियेतील
मनुष्यमात्रांना सुंदर बनवतो. जगातील आश्चर्य स्वर्गच आहे. इथे सात आश्चर्य सांगतात.
तिथे तर जगातील आश्चर्य एकच स्वर्ग आहे. बाबा पण एक, स्वर्ग पण एक, त्याला सर्व
मनुष्य मात्र आठवण करत आहेत. इथे तर कांही आश्चर्य नाही. तुमच्या मनामध्ये धीर आहे
की, आता सुखाचे दिवस येत आहेत.
तुम्ही समजत आहात की, या जुन्या दुनियेचा जेव्हा विनाश होईल, तेव्हा तर स्वर्गाची
राजाई मिळेल. आणखी राजाई स्थापन झाली नाही. प्रजा बनत आहे. मुलं आपसामध्ये विचार
करतात की, सेवेची वृद्धी कशी होईल? सर्वांना संदेश कसा द्यावा? बाबा आदि सनातन देवी
देवता धर्माची स्थापना करत आहेत. बाकी सर्वांचा विनाश करतात. अशा बाबाची आठवण केली
पाहिजे ना. जे बाबा आम्हाला राजतिलकाचे अधिकारी बनवतात, बाकी सर्वांचा विनाश करतात.
नैसर्गिक संकटे पण विश्व नाटकांमध्ये नोंदलेली आहेत. त्याशिवाय दुनियेचा विनाश होऊ
शकत नाही. बाबा सांगत आहेत की, आता तुमची परीक्षा फार जवळ आली आहे. मृत्युलोका तून
अमर लोकांमध्ये जायचे आहे. जेवढे चांगल्या रीतीने शिकाल आणि शिकवाल, तेवढे उच्च पद
मिळेल, कारण आपली प्रजा बनवता. पुरषार्थ करून सर्वांचे कल्याण केले पाहिजे. स्वत:
पासून सुरवात केली पाहिजे. हा कायदा आहे. अगोदर मित्र, संबंधी, आपल्या वंशातील,
तेवढेच येतील. नंतर इतर लोक येतील. सुरवाती पासून असेच झाले आहे. हळूहळू वृध्दी होत
गेली. मग मुलांना राहण्यासाठी मोठे घर बनविले, त्याला ओम निवास म्हणत होते. मुले
येऊन शिकू लागली. हे सर्व विश्व नाटकांमध्ये नोंदलेले होते. त्याची पुनरावृत्ती होत
आहे. याला थोडेच कोणी बदलू शकते. हे शिक्षण किती उच्च आहे. आठवणीची यात्राच मुख्य
आहे. मुख्य डोळेच मोठा धोका देतात. डोळे विकारी झाले तर, मग शरीराची कर्मेंद्रिये
चंचल होतात. कोणती चांगली मुलगी पाहिली, तर बसं, तिच्या मध्ये अडकून पडतात. असे
दुनियेमध्ये फार केसेस होतात. गुरुची पण विकारी दृष्टी होते. इथे बाबा म्हणतात,
विकारी दृष्टी बिल्कुल झाली नाही पाहिजे. भाऊ-बहीण बनून राहिला, तर पवित्र राहू
शकाल. मनुष्यांना काय माहित, ते तर हसतात. शास्त्रामध्ये तर या गोष्टी नाहीत. बाबा
म्हणतात, हे ज्ञान तर प्राय:लोप होते. नंतर द्वापार मध्ये हे शास्त्र इ. बनतात. आता
बाबा मुख्य गोष्ट सांगत आहेत की, अल्फ ची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. स्वतःला
आत्मा समजा. तुम्ही ८४ चे चक्र फिरून आले आहात. आता मग तुमची आत्मा देवता बनत आहे.
छोट्याशा आत्म्यामध्ये 84 जन्माची अविनाशी भूमिका भरलेली आहे. आश्चर्य आहे ना. अशा
जगातील आश्चर्यकारक गोष्टी, बाबा येऊन सांगत आहेत. कोणाचा ८४ जन्माचा, तर कोणाचा
५०-६० जन्मांचा अभिनय आहे. परमपिता परमात्म्याला पण अभिनय मिळालेला आहे. विश्वनाटका
नुसार हे अनादि अविनाशी नाटक आहे. सुरू कधी झाले, बंद कधी होईल, हे सांगू शकत नाही,
कारण हे अनादि अविनाशी नाटक आहे. या गोष्टी कोणी ओळखत नाही. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति, मातपिता बाप दादाची प्रेम पूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आता
परीक्षेची वेळ फार जवळ आली आहे, त्यामुळे पुरुषार्थ करून, आपले आणि इतर सर्वांचे
कल्याण करायचे आहे. शिकायचे आणि शिकवायचे आहे. स्वत: पासून सुरूवात करायची आहे.
(२) देही-अभिमानी बनून अविनाशी खरी कमाई जमा करायची आहे. आपले रजिस्टर ठेवायचे आहे.
कोणते पण असे विकर्म होऊ नये, ज्यामुळे रजिस्टर खराब होईल.
वरदान:-
निमित्त
पणाच्या स्मृती द्वारे, मायेचे गेट बंद करणारे, डबल लाईट भव.
जे नेहमी स्वतःला
निमित्त समजून चालतात, त्यांना डबल लाईट स्थितीचा अनुभव स्वतःच होतो. करता-करविता
करवत आहेत, मी निमित्त आहे, या स्मृतीनेच सफलता मिळते. मी पणा आला म्हणजे मायचे गेट
उघडले, निमित्त समजले तर मायेचे गेट बंद होते. तर निमित्त समजल्याने, मायाजीत पण
बनता, आणि डबल लाईट पण बनता. त्यामुळे सफलता पण अवश्य मिळते. ही आठवणच पहिला
क्रमांक घेण्याचा आधार आहे.
बोधवाक्य:-
त्रिकालदर्शी बनून प्रत्येक कर्म करा, तर सफलता सहज मिळत राहते.