14-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही आता खऱ्याखुऱ्या पाठशाळे मध्ये बसले आहात, हा सत्संग पण आहे, येथे
तुम्हाला सत्य बाबांचा संग मिळाला आहे, ज्यामुळे जिवननौका किनाऱ्याला लागते"
प्रश्न:-
कर्मभोगाच्या
खेळा मध्ये, मनुष्याची समज आणि तुमच्या समज मध्ये कोणते अंतर आहे?
उत्तर:-
मनुष्य समजतात दुःख सुखाचा जो खेळ चालतो, हे दुःख सुख सर्व परमात्माच देतात आणि
तुम्ही मुलं समजतात, हे तर प्रत्येकाच्या कर्माचा भोग आहे. बाबा कधीही कोणाला दुःख
देत नाहीत, ते तर सुखाचा रस्ता दाखवण्यासाठी येतात. बाबा म्हणतात मुलांनो, मी
कोणालाही दुःखी केले नाही, हे तर तुमच्या कर्माचे फळ आहे.
गीत:-
या पापाच्या
दुनिये पासून दूर घेऊन चल जिथे सुख चैन असेल. .
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गिते ऐकले. कोणाला बोलवत आहेत? पित्याला. बाबा येऊन या
पापाच्या कलियुगी दुनियेतून पुण्यांच्या दुनिये मध्ये घेऊन चला. आता जीवत्मे सर्व
कलियुगी आहेत. त्यांची बुद्धी वरती जाते. बाबा जे मृहणतात, मी जसा आहे, तसे कोणीच
जाणत नाहीत. ऋषी-मुनी पण म्हणतात, आम्ही रचनाकर मालक म्हणजे बेहदच्या पित्याला आणि
त्यांच्या रचनेच्या आदी मध्य अंतला जाणत नाहीत. आत्मे जेथे राहतात, ते ब्रह्म
महतत्व आहे, जेथे सूर्य-चंद्र नसतात. न मुळवतन मध्ये ना, सूक्ष्मतन मध्ये. बाकी
सृष्टीरुपी मंडपामध्ये लाईट इत्यादी सर्व पाहिजेत ना. तर या मंडपामध्ये रात्री लाईट
मिळते, चंद्र तारे आणि दिवसांमध्ये सूर्यापासून प्रकाश मिळतो. या बत्ती आहेत, ही
लाईट असतानी पण अंधार म्हटले जाते. रात्रीला तरीही लाईट लावतात. सतयुग त्रेताला
दिवस म्हटले जाते आणि भक्तीला रात्र म्हटले जाते. ही पण समजून घेण्याची गोष्ट आहे.
नवीन दुनिया परत जुनी जरूर बनते. परत नवीन होईल, तर जुन्या दुनियेचा विनाश होईल. ही
बेहदची दुनिया आहे. जे राजे असतात, त्यांचे महल पण खूप मोठ-मोठे असतात. हे बेहदचे
घर, मंडप किंवा रंगमंच आहे, याला कर्मक्षेत्र पण म्हटले जाते. कर्म तर जरूर करायचे
आहेत. सर्व मनुष्यासाठी हे कर्म क्षेत्र आहे, सर्वांना कर्म करायचे आहेत, भूमिका
वठवायची आहे. प्रत्येकला आप आपली भूमिका मिळाली आहे. तुमच्या मध्ये पण कोणी आहेत,
जे या गोष्टीने चांगल्या प्रकारे समजू शकतात. वास्तव मध्ये ही गीता पाठशाला आहे.
पाठशाळा मध्ये कधी वृध्द इत्यादी शिक्षण घेतात का?येथे तर वृध्द, जवान इत्यादी सर्व
शिक्षण घेतात. वेदांची पाठशाळा तर म्हणनार नाही. तेथे तर कोणतेही मुख्य उद्देश नसते.
आम्ही इतके वेध ग्रंथ इत्यादी वाचले आहेत, याद्वारे काय बनतील? ते तर जाणत नाहीत.
कोणताही सत्संग आहे, त्यामध्ये मुख्य लक्ष काहीच नाही. आता तर त्यांना सत्संग
म्हणायला पण लाज वाटते. सत्य तर एक बाबाच आहेत. त्यांच्यासाठी म्हणतात संग तारे,
कुसंग बोरे, म्हणजे सत्याच्या संगाद्वारे जीवनौका किनाऱ्याला लागते. कुसुसंगा द्वारे
बुध्दी. कलियुगी मनुष्यांचा कुसंग आहे. सत्य तर एकच आहेत. आता तुम्हाला आश्चर्य
वाटत आहे, संपूर्ण सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान बाबा कसे देतात. तुम्हाला तर
खुशी व्हायला पाहिजे. तुम्ही तर खर्या-खुऱ्या पाठशाळा मध्ये बसले आहात, बाकी सर्व
खोट्या पाठशाळा आहेत. त्या सत्संग इत्यादी मध्ये काहीच बनत नाहीत. शाळा-कॉलेज
इत्यादींमध्ये तरीही काहीतरी बनतात, कारण शिक्षण घेतात, बाकी सत्संगा मध्ये कोणतेही
शिक्षण नाही. सत्संगाला शिक्षण म्हणता येत नाही. ग्रंथ इत्यादी वाचून परत दुकान
उघडून बसले आहेत, पैसे कमावतात. थोडे ग्रंथ इत्यादी शिकून गुरूद्वार उघडून बसले
आहेत. गुरुद्वार पण किती सुरू करत राहतात. गुरु का द्वार म्हणजे घर म्हणनार ना.
फाटक उघडते, तर तेथे जाऊन ग्रंथ इत्यादी वाचतात. तुमचे गुरुचे द्वार हे मुक्त आणि
जीवन मुक्तिधाम. सद्गुरुचे नाव काय आहे?अकालमूर्त. सद्गुरुला अकालमुर्त म्हणतात. ते
येऊन मुक्ती जीवनमुक्ती'चे द्वार उघडतात. अकाल मूर्त आहेत ना, त्यांना कधी काळ खाऊ
शकत नाही. आत्मा तर बिंदी आहे आहे, त्यांना काळ कसा खाऊ शकतो?ती आत्मा तर शरीर
सोडून पळून जाते. मनुष्य थोडेच समजतात, कि जुने शरीर सोडून परत दुसरे घेतले, परत
यामध्ये रडण्याची काय आवश्यकता आहे? हे तुम्ही जाणतात, की हे वैश्विक नाटक इत्यादी
बनलेले आहे, प्रत्येकाला भूमिका वठवायचे आहे. बाबांनी समजवले आहे, सत्ययुगा मध्ये
नष्टोमोह आहेत. कहाणी पण आहे ना. पंडित लोक ऐकवतात, माता पण ऐकून-ऐकुन परत ग्रंथ
उघडून बसतात, ऐकण्यासाठी. अनेक मनुष्य जाऊन ऐकतात. त्याला कनरस म्हटले जाते.
वैश्विक नाटका नुसार मनुष्य तर म्हणतील आमचा काय दोष आहे?बाबा म्हणतात, तुम्ही
आम्हाला बोलवतात की, दुःखा पासून घेऊन चला. आता मी आलो आहे, तर माझे ऐकायला पाहिजे
ना. ना. बाबा मुलांना समजवतात, चांगली मत मिळते तर, घ्यायला पाहिजे ना. तुमचा पण
काही दोष नाही. हे पण नाटक होते. रामराज्य आणि रावण राज्याचा खेळ बनला आहे.
खेळांमध्ये कोणाची हार होते तर त्याचा दोष थोडाच आहे. हारणे आणि जिंकणे तर होत राहते.
यामध्ये लढाईची गोष्ट नाही. तुम्हाला तर बादशाह होती, हे पण तुम्हाला अगोदर माहीत
नव्हते. आता तुम्ही समजता, जे सेवाधारी आहेत, त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. दिल्लीमध्ये
सर्वात चांगले समजवणारे कोण आहेत? तर लगेच जगदीशचे नाव घेतील? तुमच्यासाठी मासिक पण
काढतात. त्यामध्ये सर्व काही येते. अनेक प्रकारचे ज्ञानाचे मुद्दे लिहतात. बृजमोहन
पण लिहतात. मासिकांमध्ये लिहिणे मावशीचे घर थोडेच आहे. जरुर विचार सागर मंथन करतात,
चांगले सेवा करतात. अनेक लोक वाचून खुश होतात. मुलांना पण ज्ञानाचा नाष्टा मिळतो.
कोणी कोणी प्रदर्शनीमध्ये खूप कष्ट घेतात, तर कोणी कोणी कर्म बंधनांमध्ये फसलेले
आहेत, त्यामुळे एवढे ज्ञान घेऊ शकत नाहीत. हे पण वैश्विक नाटकच म्हणणार. अबलावर
अत्याचार होण्याची पण वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे. अशी भूमिका का आहे? हा प्रश्न
उठू शकत नाही. हे तर पूर्वनियोजित नाटक आहे. यामध्ये थोडेच काही करू शकतात? कोणी
म्हणतात आम्ही काय गुन्हा केला आहे? ज्यामुळे अशी भूमिका मिळाली आहे. आता गुन्हा
करण्याची तर गोष्टच नाही. ही तर भूमिका आहे. अबला काहीतरी निमित्त बनतील,
ज्यांच्यावर अत्याचार होतात. असे तर सर्वच म्हणतील, आम्हाला ही भूमिका का मिळाली
आहे?नाही, हे तर पूर्वनियोजित नाटक आहे. पुरुषा वरती पण अत्याचार होतात. या
गोष्टींमध्ये खूप सहनशीलता पाहिजे. माया चे अनेक विघ्ने येतात. विश्वाची बादशाही
घेत आहात, तर काहीतरी कष्ट घ्यावे लागतील. वैश्विक नाटकांमध्ये आपत्ती इत्यादी होत
राहते. अबलावरती आत्याच्या होणे हे पण लिहिलेले आहे. रक्ताच्या नद्या वाहतील. कुठेच
सुरक्षा राहणार नाही. आता तर सकाळी मुरली ऐकण्यासाठी सेवा केंद्रावर जातात. ही वेळ
पण येईल, ज्या वेळेस तुम्ही बाहेर पण निघू शकणार नाहीत. दिवसें दिवस जमाना बिघडत
जातो आणि बिघडणारच आहे. दुःखाचे दिवस खूप जोरात येतील. आजारपण इत्यादी दुःख तर होते
ना. परत भगवंताची आठवण करतात, बोलतात. आता तुम्हाला माहित आहे, बाकी थोडे दिवस आहेत,
परत आम्ही आपल्या शांतीधाम, सुखांमध्ये जरूर जाऊ. दुनियेला तर हे पण माहिती नाही.
आत्ता तुम्हा मुलांना त्याची जाणीव होते ना. आता बाबांना पूर्ण रीतीने जाणले आहे.
ते सर्व तर समजतात, परमात्मा लिंग आहे. शिवलिंगाची पुजा करत राहतात. तुम्ही शिवाच्या
मंदिरामध्ये जात होते, कधी हा विचार केला की, शिवलिंग काय गोष्ट आहे. जरूर हे जड आहे,
तर चैतन्य मध्ये पण असेल. हे तर तेव्हा काय आहे?भगवान तर रचनाकार वरती आहेत. त्यांची
लक्षणे, फक्त पूजा साठी आहेत. पूज्य बनतील तर परत या गोष्टी राहणार नाहीत. शिवकाशी
च्या मंदिरामध्ये जातात, कोणाला थोडेच माहिती आहे कि, भगवान तर निराकार आहेत. आम्ही
पण त्यांची मुलं आहोत. बाबा ची मुलं बनून परत आम्ही दुःखी का? विचार करण्याची गोष्ट
आहे ना. आत्मा म्हणते आम्ही परमात्मा ची संतान आहोत, परत आम्ही दुःखी का? बाबा तर
सुख देणारे आहेत, बोलवतात पण, हे भगवान आमचे दुःख नष्ट करा. तर ते कसे नष्ट करतील?
दुःख-सुख तर आपलेच कर्म भोग आहेत. मनुष्य तर समजतात सुख, दु:ख परमात्माच देतात,
त्यांना पण दोष देतात. बाबा म्हणतात मी तर कधी दुःख देत नाही. मी तर अर्धा कल्प सुख
देऊन जातो, परत दुःख आणि सुखाचा खेळ बनलेला आहे. फक्त सुखाचाच खेळ असेल तर, परत ही
भक्ती इत्यादी काहीच झाली नसती. भगवंताला भेटण्यासाठी ही भक्ती इत्यादी सर्व करतात
ना. आता बाबा सन्मुख सर्व समाचार ऐकवतात. बाबा म्हणतात, तुम्ही मुलं खूप भाग्यशाली
आहात. ते ऋषी-मुनी इत्यादी खूप प्रसिद्ध आहेत. तुम्ही तर राजऋर्षी आहात, ते तर
हठयोगी ऋषी आहेत. ऋषी म्हणजे पवित्र. तुम्ही स्वर्गाचे राजे बनतात, तर पवित्र जरूर
बनावे लागेल. सतयुग त्रेता मध्ये ज्यांचे राज्य होते, परत त्यांचेच होईल. बाकी सर्व
नंतर येतील. तुम्ही आता म्हणतात, आम्ही सर्व श्रीमतावर आपले राज्य स्थापन करत आहोत.
जुन्या दुनियेचा विनाश होण्यामध्ये वेळ तर लागेल ना. सतयुग येत आहे, कलयुग जात आहे.
किती मोठी दुनिया आहे. एका-एका शहरांमध्ये किती मनुष्य भरलेले आहेत. धनवान मनुष्य
दुनियाचे चक्र लावत राहतात परंतु येथे संपूर्ण दुनिया तर कोणी पाहू शकत नाही.
सतयुगामध्ये पाहू शकता, कारण सतयुगामध्ये एकच राज्य असते. इतके राजे थोडेच असतील.
येथे तर खूप मोठी दुनिया आहे. इतक्या मोठ्या दुनिया चक्र कोण लावेल?तेथे तर तुम्हाला
समुद्रामध्ये जायचे नाही. तेथे श्रीलंका, ब्रह्मदेश इत्यादी असतील का? नाही. काहीच
नसते. ही कराची इत्यादी पण नसेल. तुम्ही सर्व गोड नदीच्या किनाऱ्यावरती राहतात. तेथे
शेती बाडी इत्यादी सर्व असते. सृष्टी तर खूप मोठी आहे. मनुष्य खूप थोडे राहतात, परत
वृद्धी होत राहते. परत तेथे जाऊन आपले राज्य स्थापन केले. हळूहळू हप करत गेले. आपले
राज्य स्थापन केले. आता तर सर्वांना सोडावे लागते. एकच भारत आहे, ज्यांनी कोणाचे
राज्य घेतले नाही, कारण भारत वास्तविक मध्ये अहिंसक आहे ना. भारतच संपूर्ण दुनियेचा
मालक होता, नंतर सर्व आले आहेत, जे तुकडे-तुकडे घेऊन गेले. तुम्ही कोणाला हप केले
नाही, इंग्रजांनी सर्वांना हप केले आहे. तुम्ही भारतवासींना तर बाबा विश्वाचे मालक
बनवतात. तुम्ही परदेशात, कुठे गेले नाहीत. तुम्हा मुलांच्या बुद्धी मध्ये या सर्व
गोष्टी आहेत. वृद्ध माता तर इतके समजू शकणार नाहीत. बाबा म्हणतात चांगले आहे, जे
तुम्ही काही शिकले नाहीत. जे शिकले आहेत ते सर्व बुद्धीने काढावे लागते. एक गोष्ट
फक्त धारण करायची आहे, गोड मुलांनो, बाबांची आठवण करा. तुम्ही पण म्हणत होते ना,
बाबा तुम्ही याल तर, आम्ही तुमच्यावरती कुर्बान म्हणजे बळी जाऊ. तुम्ही परत
आमच्यावरती कुर्बान म्हणजे बळी जावा. देवाण-घेवाण तर होते ना. लग्नाच्या वेळेत
स्त्री-पुरुष एक दोघांच्या हातामध्ये मीठ देतात. बाबांना पण म्हणतात, आमचे जुने
सर्वकाही, तुम्हाला देतो. मरायचे तर आहेच, हे सर्व नष्ट होणार आहे. तुम्ही आम्हाला
परत नवीन दुनिये मध्ये द्या. बाबा सर्वांना घेऊन जाण्यासाठी आले आहेत, काळाचे काळ
आहेत ना. सिंधमध्ये म्हणतात, हा कोणता खेळ आहे, जे सर्वांना पळवून घेऊन जातात.
तुम्ही मुलं खुश होतात ना. बाबा घेऊन जाण्यासाठी येतात, आम्ही तर आनंदाने आपल्या घरी
जाऊ. सहन पण करावे लागते. चांगल्या चांगल्या घरातील माता पण मार खातात. तुम्ही तर
खरी कमाई करत आहात. मनुष्य थोडेच जाणतात, ते तर कलियुगी शुद्र संप्रदाय आहेत. तुम्ही
तर संगमयुगी आहात, पुरुषोत्तम बनत आहात. तुम्ही जाणतात, सर्वात श्रेष्ठ पुरुषोत्तम
लक्ष्मीनारयण आहेत. परत कला गुण कमी होत जातात, वरून खाली येत राहतात, परत हळूहळू
विकारात जातात. या वेळेत सर्व विकारात गेले आहेत. झाड जुने झाले आहे, खोड सडले आहे.
आता परत स्थापना होत आहे. पाया भरणी होते. कलम खूप छोटे असते, परत याद्वारे खूप मोठे
झाड होते. हे पण मनुष्य सृष्टीचे झाड आहे. सतयुगामध्ये खूप छोटे झाड असते. आता तर
खूप मोठे झाले आहे. मनुष्य सृष्टीचे वेगवेगळ्या प्रकारचे फूल आहेत. एकाच झाडांमध्ये
खूप विविधता आहे. अनेक धर्माचे मनुष्यांचे झाड आहे. एक चेहरा दुसऱ्याशी मिळू शकत
नाही. हे पूर्वनियोजित नाटक आहे ना. एकसारखी भूमिका कोणाची होऊ शकत नाही. याला
कुदरत म्हटले जाते, पूर्वनियोजित नाटक आहे. यामध्ये पण बनावट खूप आहे. जे खऱ्या
गोष्टी असतात, त्या नष्ट पण होतात. परत पाच हजार वर्षानंतर, वास्तविकमध्ये येतील.
चित्र इत्यादी पण खरे थोडेच बनले आहेत. ब्रह्माचा चेहरा परत तुम्ही पाच हजार
वर्षानंतर पहाल. या वैश्विक नाटकाचे रहस्य समजण्यासाठी खूप विशाल बुद्धी पाहिजे.
तुम्ही बाकी काहीच समजू नका, फक्त एक गोष्ट बुद्धीमध्ये ठेवा, एक शिव बाबा दुसरे
कोणीच नाहीत. हे आत्म्याने म्हटले आहे, बाबा आम्ही तुमची च आठवण करु. हे तर सहज आहे
ना. हाताने काम करत राहा आणि बुद्धी द्वारे बाबांची आठवण करत रहा, अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) सहनशीलतेचा
गुण धारण करून मायेच्या विघ्नामध्ये पास व्हायचे आहे. अनेक संकट येतील, अशा वेळेस
सहन करत बाबाच्या आठवणी मध्ये राहायचे आहे. खरी कमाई करायची आहे.
(२) विशाल बुद्धी
बनून या पूर्वनियोजित नाटकाला चांगल्याप्रकारे समजायचे आहे. हे ईश्वरीय वैश्विक
नाटक बनले आहे, म्हणून प्रश्न येऊ द्यायचा नाही. बाबा जे चांगले मत देतात, त्यावरती
चालत राहायचे आहे.
वरदान:-
बाबांसारखे
वरदानी बनून, प्रत्येकाच्या मनाला आराम देणारे मास्टर दिलाराम भव.
जे बाप समान वरदानी
मुलं आहेत, ते कधी कोणाच्या कमजोरी ला पाहत नाहीत. ते सर्वांच्या वरती दयाळू बनतात.
जसे बाबा कोणाची कमजोरी मनामध्ये ठेवत नाहीत, असे वरदानी मुलं पण कोणाची कमजोरी
मनामध्ये धारण करत नाहीत. ते प्रत्येकाच्या मनाला आराम देणारे मास्टर दिलाराम बनतात,
म्हणून सोबती असतील किंवा प्रजा, सर्वांचे गुणगाण करत रहा. सर्वांच्या मनामधुन हाच
आशीर्वाद निघावा की, हे आमचे नेहमी स्नेही-सहयोगी आहेत.
बोधवाक्य:-
संगमयुगा वरती
श्रेष्ठ आत्मा तेच आहेत, जे नेहमी बेफिकीर बादशहा आहेत.