11-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, हा वैश्विक नाटकाचा खेळ चालत आहे, ज्याची जी भूमिका ज्या वेळेत व्हायला
पाहिजे, त्याची पुनरावृत्ती होत आहे, ही गोष्ट अर्थ सहित समजायची आहे"
प्रश्न:-
मुलांचा
प्रभाव कधी निघेल, आजतागायत कोणत्या शक्तीची कमी आहे?
उत्तर:-
जेव्हा योगामध्ये मजबूत बनाल, तेव्हाच प्रभाव निघेल. आता ती शक्ती नाही, आठवणी
द्वारे शक्ती मिळते. ज्ञान तलवारी मध्ये आठवणी ची धार पाहिजे, जी आजतागायत कमी आहे.
जर स्वतःला आत्म समजून बाबाची आठवण करत रहाल, तर नाव किनार्याला लागेल. ही सेकंदाची
गोष्ट आहे.
ओम शांती।
आत्मिक मुलांना आत्मिक पिता समजावत आहेत. आत्मिक पिता एकालाच म्हटले जाते, बाकी
सर्व आत्मे आहेत. त्यांना परमात्मा म्हटले जाते. बाबा म्हणतात मी पण आत्मा आहे परंतु
मी, परम सर्वश्रेष्ठ, सत्य आहे. मीच पतित-पावन, ज्ञानाचा सागर आहे. बाबा म्हणतात मी
येतोच भारतामध्ये, मुलांना विश्वाचे मालक बनवण्यासाठी. तुम्हीच मालक होते ना, आता
स्मृती आली आहे. मुलांना स्मृती देतात की, तुम्ही प्रथम सतयुगा मध्ये आले, परत
भूमिका वठवत, ८४ जन्म भोगून अंत काळात आले. तुम्ही स्वतःला आत्मा समजा. आत्मा
अविनाशी आहे आणि शरीर विनाशी आहे. आत्माच देहाच्या सोबत, आत्म्याशी गोष्टी करते.
आत्म अभिमानी बनून राहत नाहीत, तर जरूर देह अभिमान आहे. मी आत्मा आहे, हे सर्व
विसरले आहेत. असे म्हणतात पाप आत्मा, पुण्यात्मा, महान आत्मा. ते परत परमात्मा तर
बनू शकत नाहीत. कोणीही स्वतःला शिव म्हणू शकत नाहीत. शरीरांचे शिव नाव तर अनेकांचे
आहे. आत्मा शरीरामध्ये प्रवेश करते, तर नाव पडते, कारण शरीराद्वारे भुमिका, वठवायची
असते. मनुष्य परत देह अभिमाना मध्ये येतात की, मी अमका आहे. आत्ता समजतात की मी
आत्मा आहे. आम्ही ८४ जन्माची भूमिका वठवली आहे. आता आम्ही आत्म्याला जाणले आहे.
आम्ही आत्माच सतोप्रधान होतो, परत तमोप्रधान बनलो. बाबा तेव्हाच येतात, जेव्हा सर्व
आत्म्यावर विकाराचा गंज जडलेला असतो. जसे सोन्यामध्ये भेसळ होते ना. तुम्ही प्रथम
सोन्यासारखे होते, परत चांदी, तांबा, लोखंडाची भेसळ होऊन तुम्ही अगदीच काळे झाले
आहात. या गोष्टी दुसरे कोणी समजू शकत नाही. सर्वजण म्हणतात आत्मा निर्लेप आहे, तर
भेसळ कशी होते. हे पण बाबांनी मुलांना समजवले आहे. बाबा म्हणतात मी भारतामध्येच येतो,
जेव्हा अगदीच तमोप्रधान बनतात, बरोबर वेळेत येतो. जसे वैश्विक नाटकांमध्ये बिनचूक
खेळ चालत आहे ना. जी भूमिका ज्या वेळेस होणार असेल, त्याच वेळेत पुनरावृत्ती होईल,
त्यामध्ये जरा पण फरक पडू शकत नाही. हे हदचे नाटक आहे, ते बेहद्दचे नाटक आहे. या
सर्व खूप सूक्ष्म समजण्याच्या गोष्टी आहेत. बाबा म्हणतात, तुम्ही जी भुमीका वठवली,
ती वैश्विक नाटकानुसार आहे. कोणतेही मनुष्य मात्र न रचनाकाराला, न रचनाच्या आदी
मध्यं अंताला जाणतात. ऋषीमुनी पण सर्व नेती- नेती म्हणजे, माहित नाही, माहित नाही,
असे करत आले. आता तुम्हाला कोणी विचारले, रचनाकार आणि रचनेच्या आधी मध्य अंतला
जाणतात, तर तुम्ही लगेच म्हणणार, होय. तेही तुम्ही आत्ताच जाणू शकतात, परत कधीही
जाणू शकत नाहीत. बाबांनी समजावले आहे, तुम्हीच मज रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य
अंतला जाणतात. अच्छा लक्ष्मी नारायणाचे राज्य कधी असेल, हे जाणत असणार?नाही.
यांच्यामध्ये कोणते ज्ञान नाही. हे तर आश्चर्य आहे. तुम्ही म्हणतात आमच्यामध्ये हे
ज्ञान आहे. हे पण तुम्ही समजतात. बाबांची भूमिका एकाच वेळेत आहे. तुमचे मुख्य
लक्ष्य आहेच लक्ष्मी नारायण बनणे. तुम्ही लक्ष्मीनारायण बनले परत शिक्षणाची आवश्यकता
राहत नाही. एकदा वकील बनले तर बनले, परत शिकण्याची आवश्यकता नसते. बाबा जे शिकवणारे
आहेत, त्यांची आठवण तर करायला पाहिजे. तुम्हाला सर्व सहज केले आहे. बाबा नेहमी
तुम्हा मुलांना म्हणतात, स्वतःला आत्मा समजा, मी बाबांचा आहे. प्रथम तुम्ही नास्तिक
होते, आता आस्तिक बनले आहात. या लक्ष्मीनारायणने पण आस्तिक बनूनच हा वारसा घेतला आहे.
जे आता तुम्ही घेत आहात. आता तुम्ही अस्तिक बनत आहात. आस्तिक-नास्तिक हे अक्षर या
वेळेतील आहे. तेथे हे अक्षरच नसते. विचारण्याची पण आवश्यकता नाही. येथे प्रश्न येतो,
तेव्हाच विचारतात, रचनाकार आणि रचनेला जाणतात का? तर नाही म्हणतात. बाबाच येऊन आपला
परिचय देतात आणि रचनेच्या आदी मध्य अंतचे रहस्य समजवतात. बाबा बेहद्दचे मालक
रचनाकार आहेत. बाबांनी मुलांना समजवले आहे, दुसरे धर्म संस्थापक पण येथे जरूर येतात.
तुम्हाला साक्षात्कार केला होता की, इब्राहिम ख्रिस्त इत्यादी कसे येतात. ते अंत
काळामध्ये, जेव्हा खूप आवाज निघेल, तेव्हा येतील. बाबा म्हणतात मुलांनो देह आणि
देहाच्या सर्व धर्माचा त्याग करून माझी आठवण करा. आता तुम्ही सन्मुख बसले आहात.
स्वतःला देह समजू नका, मी आत्मा आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहाल,
तर नाव किनार्याला लागेल. सेकंदाची गोष्ट आहे. मुक्ती मध्ये जाण्यासाठी तुम्ही अर्धा
कल्पा पासून भक्ती करत आले परंतु कोणतीही आत्मा परत जाऊ शकत नाही. पाच हजार
वर्षांपूर्वी पण बाबांनी समजावले होते, आत्ता पण समजवत आहे. श्रीकृष्ण या गोष्टी
समजावू शकत नाहीत. त्यांना पिता पण म्हणणार नाही. पिता लौकिक आहेत, अलौकिक आणि
पारलौकिक. हद्दचे पिता लौकिक, बेहद्दचे पिता पारलौकिक, आत्म्यांचे पिता आहेत. हे
एकच संगमयुगी आश्चर्यकारक पिता, यांनाच अलौकिक म्हणले जाते. प्रजापिता ब्रह्माला तर
कोणी आठवण करत नाहीत. हे आमचे आजोबा आहेत, हे बुद्धीमध्ये येत नाही. असे म्हणतात
की, आदीदेव, एडम. . . परंतु फक्त सांगण्या पूरते. मंदिरामध्ये पण आदी देवाचे चित्र
आहे ना. तुम्ही तेथे जाल, तर समजाल हे आमचे यादगार आहे. बाबा पण बसले आहेत, आम्ही
पण बसलो आहोत. येथे बाबा चैतन्य मध्ये बसले आहेत. तेथे जड चित्र ठेवले आहेत, वरती
स्वर्ग पण ठीक आहे. ज्यांनी मंदिर पाहिले आहे, ते बरोबर जाणतात की, बाबा आम्हाला आता
चैतन्य मध्ये राजयोग शिकवत आहेत, नंतर मंदिर बनवतात. हे स्मृतीमध्ये यायला पाहिजे
की, हे सर्व आमचे स्मृतिस्थळ, यादगार आहेत. हे लक्ष्मी नारायण आता आम्ही बनत आहोत.
अगोदर होतो, परत शिडी उतरत आलो. आता आम्ही परत घरी जाऊन, राम राज्या मध्ये येऊ. परत
रावण राज्य होते आणि आम्ही वाम मार्गामध्ये जातो. बाबा खूप चांगल्या रीतीने
समजावतात. यावेळेत सर्व मनुष्य पतित आहेत, म्हणून बोलवत राहतात, हे पतित-पावन येऊन
आम्हाला पावन बनवा, दुःख दूर करून सुखाचा रस्ता सांगा. असे म्हणतात भगवान जरूर
कोणत्या न कोणत्या वेषा मध्ये येतील. आता कुत्रे, मांजर, दगड-माती मध्ये तर येणार
नाहीत. गायन पण आहे, भाग्यशाली रथामध्ये येतात. बाबा स्वत: म्हणतात मी साधारण
रथामध्ये प्रवेश करतो. हे आपल्या जन्माला जाणत नाहीत, तुम्ही आत्ता जाणतात. यांच्या
अनेक जन्माच्या अंत मध्ये जेव्हां वानप्रस्थ अवस्था होते, तेव्हा मी प्रवेश करतो.
भक्तिमार्गा मध्ये पांडवाचे खूप मोठ-मोठे चित्र बनवले आहेत. रंगून मध्ये बुध्दाचे
खूप मोठे चित्र आहे. इतके मोठे कोणी मनुष्य थोडेच असतात. मुलांना तर आता हसू येत
असेल, की रावणाचे चित्र कसे बनवले आहे. दिवसेंदिवस मोठे करत जातात. ही काय गोष्ट आहे,
ज्याला प्रत्येक वर्षे जाळतात. असा कोणता दुश्मन असेल, दुश्मना चे चित्र बनवून
जाळतात. अच्छा रावण कोण आहे, कधी दुश्मन बनले? जे प्रत्येक वर्षी जाळत आले आहेत. या
दुश्मनाची कोणालाच माहिती नाही, त्याचा अर्थ कोणी जाणत नाहीत. बाबा समजवतात ते रावण
संप्रदाय आहेत, तुम्ही राम संप्रदाय आहात. आत्ता बाबा म्हणतात गृहस्थ व्यहारात
राहून, कमलफुल समान बना आणि माझी आठवण करत रहा. असे म्हणतात बाबा, हंस आणि बगळे कसे
एकत्र राहू शकतात. खिट-पिट होते, जरूर होईल. सहन करावे लागते. यामध्ये युक्त्या पण
खूप आहेत. बाबांना राजु रमजबाज म्हटले जाते. सर्व त्यांची आठवण करतात ना, हे भगवान
दुःख दूर करा, दया करा. मुक्त करा. ते मुक्तिदाता सर्वांचे एकच आहेत. तुमच्याजवळ
कोण येतात तर त्यांना वेगवेगळे समजून सांगा. कराची मध्ये एका-एकाला वेगवेगळे बसून
समजावत होते.
तुम्ही मला जेव्हा योगामध्ये मजबूत बनाल, तेव्हा तुमचा प्रभाव निघेल. आता ती शक्ती
नाही. आठवणी द्वारे शक्ती मिळते, ज्ञानाद्वारे शक्ती मिळत नाही. ज्ञान तलवार आहे
त्यामध्ये आठवणीची धार पाहिजे. बाबा रोज म्हणतात, मुलांनो आठवणीच्या यात्रेमध्ये
राहिल्यामुळे तुम्हाला शक्ती मिळेल. ज्ञानामध्ये एवढी ताकत नाही, आठवणी द्वारे
तुम्ही संपूर्ण विश्वाचे मालक बनतात. तुम्ही आपल्यासाठीच सर्व काही करतात. अनेक जण
आले, परत गेले. माया खूप प्रबळ आहे. अनेक जण येत नाहीत, असे म्हणतात ज्ञान तर खूप
चांगले आहे, आनंद पण होतो. बाहेर गेले तर नष्ट होतो. जरा पण थांबू देत नाही.
काही-काहीना तर खूप आनंद होतो. आत्ता बाबा आले आहेत, आम्ही तर आपल्या सुखधाम मध्ये
जातो. बाबा म्हणतात, आत्ता पूर्ण राजधानी स्थापन झाली तर नाही ना. तुम्ही या वेळेत
ईश्वरी संतान आहात, परत देवता बनाल. कला कमी झाल्या ना. मीटरमध्ये पॉईंट असतात, इतके
पॉईंट कमी. आत्ता तुम्ही आता एकदम उच्च बनतात, परत कमी होत होत खाली येतात. शिडी
उतरायची आहेच. आता तुमच्या बुध्दीमध्ये शिडीचे ज्ञान आहे. चढती कलामुळे सर्वांचे
चांगले होते, परत हळूहळू उतरती कला होते. सुरुवाती पासून या चक्राला चांगल्या रीतीने
समजायचे आहे. या वेळेत तुमची चढती कला होते, कारण बाबा सोबत आहेत ना. ईश्वर ज्याला
मनुष्य सर्वव्यापी म्हणतात, ते बाबा गोड मुलं म्हणत राहतात, आणि मुलं परत बाबा बाबा
म्हणत राहतात. बाबा आम्हाला शिकवण्यासाठी आले आहेत, आत्माच आत्मसात करते. आम्ही
आत्मा शांत आहोत. या शरीरा द्वारे कर्म करते. अशांत अक्षर तेव्हाच म्हटले जाते,
जेव्हा दुःख असते. बाकी शांती तर माझा स्वधर्म आहे. अनेक जण म्हणतात, मनाची शांती
हवी. अरे आत्मा स्वतःच शांत सर्व रुप आहे. त्यांचे घर शांतीधाम आहे. तुम्ही स्वत ला
का विसरले आहात?तुम्ही तर त्या शांतीधाम मध्ये राहणारे आहात, शांती तर तिथेच मिळेल.
आजकाल म्हणतात, एक राज्य, एक धर्म, एक भाषा हवी. एक जात, एक धर्म, एक ईश्वर. आत्ता
शासन दिसते पण, एक ईश्वर आहे, परत सर्वव्यापी का म्हणतात? एक ईश्वर तर कोणी मानत
नाहीत. तर आता तुम्हाला परत हे लिहायचे आहे. लक्ष्मीनारायणचे चित्र बनवतात, तर वरती
लिहा, सतयुगा मध्ये जेव्हा यांचे राज्य होते, तर एक ईश्वर, एक दैवी धर्म होता, परंतु
मनुष्य काही समजत नाहीत, लक्ष देत नाहीत. लक्ष त्यांचे जाईल, जे आपल्या ब्राह्मण
कुळाचे आहेत. दुसरे कोणी समजणार नाहीत, म्हणून बाबा म्हणतात, वेगवेगळे बसून समजून
सांगा. त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या, तर माहिती पडेल, कारण कोणी कोणाला मानतात,
कोणी कोणाला मानतात. सर्वांना एकत्र कसे समजावू शकतो. आप-आपली गोष्ट प्रथम ऐकतील.
प्रथम तर विचारायला पाहिजे कुठे आला आहात? ब्रह्मकुमार कुमारींचे नाव ऐकले
आहे?प्रजापिता ब्रह्मा तुमचे कोण लागतात? कधी नाव ऐकले आहे?तुम्ही प्रजापिता ब्रह्मा
चे संतान नाहीत का?आम्ही तर प्रत्यक्षात आहोत. होय तुम्ही पण आहात, परंतु समजत
नाहीत. समजून सांगण्याचे चांगली युक्ती पाहिजे, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रती बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१)मंदिर
इत्यादींना पाहात, नेहमी ही स्मृती रहावी की, हे सर्व आमचे यादगार, स्मृतिस्थळ आहेत.
आता आम्ही असे लक्ष्मीनारायण सारखे बनत आहोत.
(२) ग्रहस्थ व्यवहारांमध्ये कमल फुल समान राहायचे आहे. हंस आणि बगळे सोबत आहेत, तर
खूप युक्तीने चालायचे आहे. सहन पण करायचे आहे.
वरदान:-
मायेच्या बंधना
पासून नेहमी निर्बंधन राहणारे योगयुक्त बंधनमुक्त भव.
बंधनमुक्त ची
लक्षण आहेत, नेहमी योगयूक्त. योग युक्त मुलंच जिम्मेवारीचे बंधन किंवा मायेच्या
बंधनापासून मुक्त असतात. मनाचे पण बंधन नको. लौकिक जिम्मेवारी तर खेळ आहे, म्हणून
सूचनेनुसार खेळाच्या रीतीने हसून खेळा, तर कधी लहान लहान गोष्टी मध्ये थकून जाणार
नाहीत. जर बंधन समजतात, तर तंग होतात. का, कसे चा प्रश्न उपस्थित होतो, परंतु
जिम्मेवार बाबा आहेत, तुम्ही निमित्त आहात, या स्मृती द्वारे बंधनमुक्त बनाल, तर
योग्ययुक्त बनू शकाल.
बोधवाक्य:-
कर्ता-करविता
च्या स्मृती द्वारे, भान आणि अभिमानला समाप्त करा.