24-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, पुण्यात्मा बनण्यासाठी जेवढे होईल तेवढे चांगले कर्म करा, ऑल राऊंडर बना, दैवीगुण धारण करा"

प्रश्न:-
कोणती मेहनत केल्याने, तुम्ही मुले पद्मापदम पती बनत आहात?

उत्तर:-
सर्वात मोठी मेहनत आहे, विकारी दृष्टीला, निर्विकारी बनविणे. डोळेच फार धोका देत आहेत. डोळ्याला निर्विकारी बनविण्यासाठी, बाबांनी युक्ती सांगितले आहे की, मुलांनो आत्मिक दृष्टीने पहा. देहाला पाहू नका. मी आत्मा आहे, हा अभ्यास पक्का करा, या मेहनतीने तुम्ही जन्मजन्मांतरा साठी पदमपती बनाल.

गीत:-
धीरज धर मनवा. . .

ओम शांती।
हे कोणी म्हटले? शिवबाबांनी या शरीराव्दारे म्हटले. कोणती पण आत्मा, शरीरा शिवाय बोलू शकत नाही. बाबा पण शरीरामध्ये प्रवेश करून, आत्म्याला समजावत आहेत, मुलांनो, आता तुमचा देहाचा संबंध नाही. इथे आत्म्याचा संबंध आहे. आत्म्याला ज्ञान मिळत आहे, परमपिता परमात्मा कडून. देहधारी जे पण आहेत, ते सर्व शिकत आहेत. बाबाला तर स्वतःचा देह नाही. तर थोड्या काळासाठी उधार घेतले आहे. आता बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा निश्चय करून बसा. बेहदचे बाबा आम्हा, आत्म्याला समजावत आहेत. यांच्याशिवाय असे कोणी समजावू शकत नाही. आत्मा, आत्म्याला कशी समजावेल. आत्म्याला समजावण्या साठी परमात्मा पाहिजेत. त्यांना कोणी पण ओळखत नाही. त्रिमूर्ती मध्ये पण शिवाला दाखवत नाहीत. ब्रह्मा द्वारे स्थापना कोण करतात. ब्रह्मा तर नवीन दुनियेचे रचनाकार नाहीत. बेहदचे पिता, रचनाकार, सर्वांचे एकच शिवबाबा आहेत. ब्रह्मा पण फक्त, आताच तुमचे बाबा आहेत, नंतर असणार नाहीत. तेथे तर लोकिक पिताच असतात. कलियुगामध्ये आहेत लौकिक आणि पारलौकिक. आता संगमयुगावर लौकिक, अलौकिक आणि पारलौकिक तीन पिता आहेत. बाबा म्हणतात, सुखधाम मध्ये, माझी कोणी आठवण करत नाहीत. विश्वाचे मालक बाबानी बनविले, मग बोलावतील का? तेथे दुसरा कोणता खंड नसतो, फक्त सूर्यवंशीच असतात. चंद्रवंशी पण नंतर येतात. आता बाबा म्हणतात मुलांनो, धीर धरा, बाकी थोडे दिवस आहेत. पुरुषार्थ चांगल्या रितीने करा. दैवी गुण धारण केले नाहीत, तर पद भ्रष्ट होईल. ही फार मोठी लॉटरी आहे. बॅरिस्टर, सर्जन इ. बनणे, पण लॉटरी आहे ना. फार पैसे मिळवतात. अनेकांवर हुकूम चालवितात‌. जे चांगल्या रीतीने शिकतात आणि शिकवितात, ते उंच पद प्राप्त करतात. बाबाची आठवण केल्याने विकर्म विनाश होतात. बाबाला तर वारंवार विसरून जातात. माया आठवण विसरून टाकते. ज्ञान विसरत नाही. बाबा म्हणतात की, स्वतःची उन्नती करायची असेल तर चार्ट ठेवा, साऱ्या दिवसांमध्ये कोणते पाप कर्म तर नाही केले? नाहीतर १०० पटीने पाप बनेल. यज्ञाची सांभाळ करणारे बसले आहेत, त्यांचे मत घेवून करा. असे म्हणतात पण की, जे खाऊ घालाल, जिथे बसवाल तिथे बसू. तर बाकी इतर इच्छा सोडून दिल्या पाहिजेत. नाहीतर पाप वाढत जाते. आत्मा पवित्र कशी बनेल. यज्ञामध्ये कोणतेही पापाचे काम करायचे नाही. इथे तुम्ही पुण्यात्मा बनत आहात. चोरी चकारी इ. करणे पाप आहे ना. माया प्रविष्ट होते ना. मग ना योगामध्ये राहतात, ना ज्ञानाची धारणा करतात. आपल्या मनाला विचारले पाहिजे, आम्ही जर आंधळ्याची काठी बनलो नाही, तर कोण आहोत? आंधळेच म्हणावे ना. यावेळेचे गायन आहे की, धृतराष्ट्राची मुले. ते रावण राज्यांमध्ये आहेत. तुम्ही संगमयुगावर आहात. राम राज्यामध्ये मग सुख प्राप्त करणारे आहात. परमपिता परमात्मा कसे सुख देत आहेत, कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. किती पण चांगल्या रीतीने समजावले, तरीपण बुद्धीमध्ये बसत नाही. स्वतःला जेंव्हा आत्मा समजतील, तेंव्हा परमात्म्याचे ज्ञान पण समजतील. आत्मा जसा पुरषार्थ करते, तशी बनते. गायन पण आहे, अंतकाळी जे स्त्रीची आठवण करतात..... बाबा म्हणतात, जे माझी आठवण करतात, ते मला प्राप्त करतात. नाहीतर फार सजा खावून येतील. सतयुगा मध्ये तर येत नाहीत, त्रेताच्या शेवटी येतील. सतयुग- त्रेताला म्हटले जाते, ब्रह्माचा दिवस. एक ब्रह्मा तर नाहीत, ब्रह्माची तर फार मुले आहेत ना. ब्राह्मणांचा दिवस, मग ब्राह्मणांची रात्र होईल. आता बाबा आले आहेत, रात्रीला दिवस बनविण्यासाठी. ब्राह्मणच दिवसांमध्ये जाण्यासाठी तयारी करत आहेत. बाबा किती समजावत आहेत, दैवी धर्माची स्थापना तर जरूर होणारच आहे. कलियुगाचा विनाश पण जरूर होणार आहे. ज्याला थोडा पण मनात संशय असेल, तर ते निघून जातील. अगोदर निश्चय मग संशय होऊन जातो. इथून निघून गेले तर मग जुन्या दुनियेमध्ये जाऊन जन्म घेतात. विनशन्ती होऊन जातात. बाबाच्या श्रीमतावर तर चालले पाहिजे ना. ज्ञानाचे मुद्दे तर फार चांगले, चांगले मुलांना देत राहतो.

पहिल्या प्रथम समजावून सांगा की, तुम्ही आत्मा आहात, देह नाही. नाहीतर सारी लॉटरी नष्ट होईल. जरी तेथे राजा किंवा प्रजा सर्व सुखी राहतात, तरीपण पुरुषार्थ तर उंच पद प्राप्त करण्याचा केला पाहिजे ना. असे नाही, सुखधाम मध्ये तर जाऊ ना. नाही, उच्च पद प्राप्त करायचे आहे, राजा बनण्यासाठी आले आहात, असे शहाणे पण पाहिजेत. बाबा ची सेवा केली पाहिजे. आत्मिक सेवा नाही तर स्थूल सेवा पण आहे. काही ठिकाणी भाऊ पण क्लास चालवतात. एक बहीण अधून मधून जाऊन क्लास करते. झाड हळूहळू वृध्दीला प्राप्त होत आहे. सेवाकेंद्रावर किती तरी येतात, मग हळूहळू निघून जातात. विकारांमध्ये गेल्याने मग सेवाकेंद्रा वरती पण येण्यासाठी लाज वाटते, ढिल्ले पडतात. मग म्हटले जाते हा आजारी पडला आहे. बाबा सर्व गोष्टी समजावत राहतात. आपला जमा खर्च रोज ठेवा. जमा आणि खर्च होतो ना. नुकसान आणि फायदा. आत्मा पवित्र झाली, म्हणजे २१ जन्मासाठी जमा झाले. बाबाच्या आठवणीनेच जमा होते. पाप नष्ट होतात. असे म्हणतात पण की, हे पतित पावन बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा. असे थोडेच म्हणतात की, येऊन विश्वाचे मालक बनवा. नाही, हे तुम्ही मुले जाणता की, मुक्ती आणि जीवनमुक्ती, दोन्ही पावनधाम आहेत. तुम्ही जाणता की, आम्ही मुक्ती जीवनमुक्तीचा वारसा घेत आहोत. जे चांगल्या रीतीने शिकत नाहीत, ते शेवटी येतात. स्वर्गा मध्ये तर यायचे आहे, सर्व आपापल्या वेळेवर येतील. सर्व गोष्टी समजावल्या जातात. झटक्यात तर कोणी समजत नाही. इथे तुम्हाला बाबांची आठवण करण्यासाठी किती वेळ मिळत आहे. जे पण येतात त्यांना सांगा की, पहिल्याप्रथम स्वतःला आत्मा समजा. हे ज्ञान बाबाच देत आहेत. जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत. आत्माभिमानी बनायचे आहे. आत्मा ज्ञान घेत आहे, परमात्मा पित्याची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील, मग सृष्टीच्या आदि, मध्य, अंताचे ज्ञान देतात. रचनाकाराची आठवण केल्यानेच पाप भस्म होतील. मग रचनेच्या आदि, मध्य, अंताचे ज्ञानाला समजल्या मुळे तुम्ही चक्रवर्ती राजा बनता. बसं, मग इतरांना पण सांगायचे आहे. चित्र पण तुमच्या जवळ आहेत. हे तर सारा दिवस बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही विद्यार्थी पण आहात, गृहस्थी पण विद्यार्थी आहेत. तुम्हाला पण गृहस्थ व्यवहारा मध्ये राहून कमलफुला सारखे बनायचे आहे. भाऊ-बहिणी ची कधी विकारी दृष्टी होत नाही. इथे तर ब्रह्माचे मुखवंशावली आहात ना. विकारी दृष्टीला निर्विकारी बनविण्यासाठी फार मेहनत करावी लागते. अर्ध्या कल्पाची सवय पडली आहे, ती काढून टाकण्यासाठी मोठी मेहनत आहे. सर्व लिहितात की, हा मुद्दा जो बाबाने समजावला आहे, विकारी दृष्टीला नाहीसा करण्याचा, तो फार कठीण आहे. वारंवार बुद्धी तिकडे जाते. फार संकल्प येतात. आता डोळ्याचे काय करावे? सुरदासाचे उदाहरण देतात. ती तर एक गोष्ट बनविली आहे. पाहतात की डोळे आम्हाला धोका देत आहेत, तर डोळे काढून टाकले. आता अशी गोष्ट तर नाही. डोळे तर सर्वांना आहेत, परंतु विकारी आहेत, त्यांना निर्विकारी बनवायचे आहे. मनुष्य समजतात की, घरांमध्ये राहून हे होऊ शकत नाही. बाबा म्हणतात होऊ शकते, कारण प्राप्ती फार आहे. तुम्ही जन्मजन्मांतरा साठी पद्मपती बनत आहात. तेथे मोजमाप असतच नाही. आज-काल नांव पण पद्मापती देतात. तुम्हाला मोजता येणार नाही, असे पदमपती बनता. तेथे माजणे असतच नाही. मोजणे तेव्हा होते, जेव्हा रुपये पैसे इ. निघतात. तेथे तर सोन्या-चांदीच्या मोहराचा वापर होतो. पूर्वी राम सीतेच्या राज्यांतील मोहरा इ. मिळत होत्या. बाकी सूर्यवंशी राजाई तील कधी पाहिल्या नाहीत. चंद्रवंशी च्या पहात आले आहेत. अगोदर तर सोन्याचे शिक्के होते, मग चांदीचे झाले. हे तांबे इ. तर शेवटी निघाले आहे. आता तुम्ही मुले बाबा कडून परत वरसा घेत आहात. सतयुगा मध्ये जो रितीरिवाज चालतो, तो तर चालेलच. तुम्ही आपला स्वतःचा पुरुषार्थ करा. स्वर्गा मध्ये फार थोडे असतात, आयुष्य पण मोठे असते. अकाली मृत्यु होत नाही. तुम्ही समजता की, आम्ही मृत्यूवर विजय प्राप्त करत आहे. मरण्याचे नावच नसते. त्याला म्हटले जाते अमरलोक, हे मृत्युलोक आहे. अमर लोकांमध्ये हाहाकार होत नाही. कोणी वृध्द वारला, तर आणखीनच खुशी होते, हा जाऊन लहान मुलगा बनेल. इथे तर मेल्यावर रडू लागतात. तुम्हाला किती चांगले ज्ञान मिळत आहे, किती धारणा केली पाहिजे. इतरांना पण समजावले पाहिजे. बाबाला कोणी विचारले की, आम्ही आत्मिक सेवा करू इच्छित आहे. बाबा झटक्यात म्हणतात, जरूर करा. बाबा कोणाला मनाई करत नाहीत. ज्ञान नसेल तर बाकी अज्ञानच आहे. अज्ञानामुळे मग फार बदनामी करतात. सेवा तर चांगल्या प्रकारे केली पाहिजे ना. तेव्हा तर लॉटरी मिळेल. फार मोठी लॉटरी आहे. ही ईश्वरी लॉटरी आहे. तुम्ही राजा राणी बनाल, तर तुमचे नातू, नाती सर्वाना त्याचे फळ मिळते. इथे तर प्रत्येक जण आपल्या कर्मानुसार फळ प्राप्त करत आहे. कोणी फार धन दान केले तर राजा बनतात, तर बाबा मुलांना सर्वकांही समजावत आहेत. चांगल्या रीतीने समजून घेऊन, धारणा करायची आहे. सेवा पण करायची आहे. अनेकांची सेवा होत आहे. कोठे भक्ति-भावनेचे फार चांगले असतात. फार भक्ती केली असेल, तरच ज्ञान पटेल. चेहऱ्यावरून माहित पडते, ऐकले तर खूष होऊन जातात. जे समजत नाहीत, ते इकडे तिकडे पाहत राहतात किंवा डोळे बंद करून बसतात. बाबा सर्व पाहातात. कोणाला समजावू शकत नाहीत, तर ते कांही समजलेच नाहीत. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने काढून टाकतात. आता ही वेळ आहे बेहदच्या बाबा कडून, बेहदचा वरसा घेण्याची. जेवढा घ्याल, तेवढा जन्मजन्मांतर, कल्पकल्पांनतर मिळेल. नाहीतर मग शेवटी फार पश्चाताप होईल मग सर्वांना साक्षात्कार होईल. आम्ही पुर्ण शिकलो नाही, त्यामुळे पद पण प्राप्त होत नाही. बाकी जाऊन काय बनतील? नोकर, चाकर, साधारण प्रजा. येथे राजधानी स्थापन होत आहे. जस जसे करत राहतात, त्यानुसार फळ मिळत आहे. नवीन दुनियेसाठी फक्त तुम्हीच पुरुषार्थ करत आहात. मनुष्य दान पुण्य करतात, ते पण या दुनिये साठी, ही तर साधारण गोष्ट आहे. आम्ही चांगले कर्म करतो तर त्याचे फळ दुसऱ्या जन्मांमध्ये चांगले मिळते. तुमची तर 21 जन्माची गोष्ट आहे. जेवढे होईल तेवढे चांगले कर्म करा, सर्वांगिण पुरूषार्थी बना. क्रमांक एकचे ज्ञानी तू आत्मा आणि योगी तु आत्मा बनले पाहिजे. ज्ञानी पण पाहिजेत, भाषण करण्यासाठी महारथी ना बोलावतात, जी सर्व प्रकारची सेवा करतात, तर पुण्य पण मिळते ना. विषय आहेत ना. आठवणी मध्ये राहून कोणते पण काम केले, तर चांगले गुण मिळू शकतात. आपल्या मनाला विचारले पाहिजे, आम्ही सेवा करत आहोत? कां फक्त खात राहतो, कि झोपतो? इथे तर हे शिक्षण आहे, आणखीन कोणती गोष्ट नाही. तुम्ही मनुष्या पासून देवता, नरा पासून नारायण बनत आहात. अमरकथा, तिजरी ची कथाही एकच आहे. मनुष्य तर सर्व खोट्या कथा जाऊन ऐकत आहेत. तिसरा डोळा तर बाबा शिवाय कोणी देऊ शकत नाही. आता तुम्हाला तिसरा डोळा मिळाला आहे, ज्यामुळे तुम्ही सृष्टीच्या आदि, मध्य, अंताला जाणत आहात. या शिक्षणामध्ये कुमार, कुमारीनी तर फार तीव्र गतीने पुरुषार्थ केला पाहिजे. चित्र पण आहेत, कोणाला विचारले पाहिजे की, गीते चे भगवान कोण आहेत! हीच मुख्य गोष्ट आहे. भगवान तर एकच आहेत, त्यांच्याकडून वरसा, मुक्तिधामचा मिळत आहे. आम्ही तेथील राहणारे आहोत, इथे अभिनय करण्यासाठी आलो आहोत. आता पावन कसे बनायचे. पतित-पावन तर एकच बाब आहेत. पुढे चालून, तुम्हा मुलांची अवस्था पण फार चांगली होऊन जाईल. बाबा अनेक तऱ्हेने समजावून सांगत आहेत. एक तर बाबांची आठवण करायची आहे, त्यामुळे जन्म-जन्मांतराचे पाप नाहीसे होतील. आपल्या मनाला विचारा की, आम्ही किती आठवण करत आहे?चार्ट ठेवणे चांगले आहे, स्वतःची प्रगती करा. स्वतःवर दया करा, आपले वागणे पाहत राहा. जर आम्ही चुका करत राहिलो, तर रजिस्टर खराब होऊन जाईल, यामध्ये दैवी चलन असली पाहिजे. गायन पण आहे की, जे खायला दयाल, जिथे बसवाल, जे आदेश द्याल, ते करु. आदेश तर जरूर तनाद्वारे देतील ना. गेट वे टू स्वर्ग(स्वर्गाकडे जाण्याचा. मार्ग) हे अक्षर चांगले आहे. हे दार आहे स्वर्गाला जाण्याचे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति, मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) पुण्य आत्मा बनण्यासाठी, इतर सर्व इच्छा सोडून, हे पक्के करायचे आहे की, बाबा जे खायला देतील, जिथे बसवतील, तिथे बसू. कोणते पण पापाचे कार्य करायचे नाही.

(२) ईश्वरीय लॉटरी प्राप्त करण्यासाठी, आत्मिक सेवेमध्ये राहायचे आहे. ज्ञानाची धारणा करून, इतरांची करायची आहे. चांगले गुण घेण्यासाठी कोणते पण कर्म, आठवणी मध्ये राहून करायचे आहे.

वरदान:-
स्नेहाच्या बाणाद्वारे, स्नेहा मध्ये घायाळ करणारे, स्नेह आणि प्राप्ती संपन्न, लवलीन आत्मा भव:

जसे लौकिक रिती मध्ये कोणी कोणाच्या, स्नेहा मध्ये लवलीन असेल तर, ते चेहऱ्याद्वारे, डोळ्याद्वारे, वाणीद्वारे अनुभव होतो की, हे लवलीन आहेत, आशिक आहेत. तसे जेव्हा रंगमंचावर येता, तर जेवढे आपल्या मनातून, बाबा विषयी स्नेह दिसून येईल, तेवढेच स्नेहाचे बाण, इतरांना पण स्नेहा मध्ये घायाळ करतील. भाषणाचा विचार करणे, मुद्यांचा पुनर्विचार करणे, असे स्वरूप नसावे, स्नेह आणि प्राप्ती संपन्न स्वरूप, लवलीन स्वरूप असावे. अधिकारी होऊन बोलल्यामुळे, त्याचा प्रभाव पडतो.

बोधवाक्य:-
संपूर्णतेद्वारे, समाप्तीच्या वेळेला, जवळ आणा.