29-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :-तुमचे शिक्षण पूर्णपणे योगावर अवलंबून आहे, योगाद्वारेच आत्मा पवित्र बनते, विकर्म विनाश होतात. "

प्रश्न:-
काही मुले बाबांचे बनल्यानंतर हात सोडून देतात, कोणत्या कारणामुळे असे होते?

उत्तर:-
बाबांना पूर्णपणे न ओळखल्यामुळे, पूर्ण निश्चय बुद्धी नसल्यामुळे ८-१० वर्षानंतरही बाबांना सोडून देतात, तर पदभ्रष्ट होऊन जाते. 2) खराब दृष्टी असल्यामुळे मायेची गृहचारी बसते, अवस्था खालीवर होत राहते तेंव्हाच ज्ञान योग सोडून देतात.

ओम शांती।
आत्मिक मुलां प्रति आत्मिक पिता समजावत आहेत. तुम्ही समजत आहात की आम्ही सर्वजण आत्मिक बेहद च्या पित्याची मुले आहोत, यांना बापदादा म्हटले जाते. ज्याप्रमाणे तुम्ही आत्मिक मुले आहात त्याप्रमाणे हा ही (ब्रह्मा) शिव बाबांचा आत्मिक मुलगा आहे. शिवबांना रथ तर अवश्य पाहिजे ना त्यासाठी ज्याप्रमाणे तुम्हा आत्म्यांना कर्मेंद्रिया मिळाल्या आहेत कर्म करण्यासाठी, त्याप्रमाणे शिवबांचा हा रथ आहे. कारण हे कर्मक्षेत्र आहे जिथे कर्म करावे लागते. ते घर आहे जिथे सर्व आत्मे राहतात. आत्म्याने जाणले आहे आमचे घर शांतीधाम आहे, तिथे हा खेळ नसतो. दिवे वगैरे काहीच नसतात, फक्त आत्मे राहतात. इथे अभिनय करण्यासाठी येतात. तुमच्या बुद्धी मध्ये आहे-हे बेहद चे नाटक आहे. जे कलाकार आहेत त्यांची भूमिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही मुले क्रमवार पुरुषार्था नुसार जाणत आहात. इथे कोणी साधुसंत इ. समजावत नाही. इथे आम्ही मुले बेहदच्या पित्याजवळ बसलो आहोत, आता आम्हाला परत जायचे आहे, आत्म्याला पवित्र तर अवश्य बनायचे आहे. असे नाही की शरीर पण इथे पवित्र बनेल, नाही, आत्मा पवित्र बनते. शरीर तर पवित्र तेंव्हाच बनते जेंव्हा पाच तत्व ही सतोप्रधान असतात. आता तुमची आत्मा पुरुषार्थ करून पावन बनत आहे. तिथे आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतात. इथे असू शकत नाही. आत्मा पवित्र बनल्यानंतर जुने शरीर सोडून देते, नंतर नव्या तत्वां पासून नवीन शरीर बनते. तुम्ही जाणता आमची आत्मा बेहदच्या पित्याची आठवण करते किंवा नाही?हे तर प्रत्येकाने स्वतःला विचारायचे आहे. शिक्षण सर्व योगावर अवलंबून आहे. शिक्षण तर सोपे आहे, चक्र कशाप्रकारे फिरते हेही समजले आहे, मुख्य आहे आठवणीची यात्रा. ही गुप्त यात्रा आहे. कोणाला थोडीच दिसते. बाबा सांगू शकत नाहीत की हे खूप आठवण करतात किंवा कमी आठवण करतात. होय, ज्ञानासाठी सांगू शकतो की हा ज्ञानामध्ये खूप हुशार आहे की नाही. आठवण तर कोणाला दिसत नाही. ज्ञान मुखाने सांगितले जाते. आठवण तर अजपाजाप आहे. जप अक्षर भक्ति मार्गाचे आहे, जप म्हणजे कोणाचे तरी नाव जपणे. इथे तर आत्म्याला आपल्या पित्याची आठवण करायची आहे.

तुम्ही जाणत आहात आम्ही बाबांची आठवण करत-करत पवित्र बनत-बनत मुक्तिधाम- शांतीधाम मध्ये जाऊन पोहोचणार आहे. असे नाही की नाटकामधून मुक्त होणार आहे. मुक्तीचा अर्थ आहे- दुःखापासून मुक्त होऊन, शांतीधाम मध्ये जायचे नंतर सुखधाम मध्ये यायचे. जे पवित्र बनतात तेच सुख भोगतात. अपवित्र मनुष्य त्यांची सेवा करतात. पवित्र ची महिमा करतात, त्यामध्येच मेहनत आहे. डोळे खूप धोका देतात, खाली घसरतात. खालीवर तर सर्वांना व्हावेच लागते. ग्रहचारी सर्वांवर बसते. जरी बाबा म्हणतात, मुलं पण समजावू शकतात, नंतर असेही म्हणतात माता गुरु पाहिजे कारण की आता माता गुरुची पद्धत चालू झाली आहे, सुरुवातीला पित्याची पद्धत होती. आता प्रथम कलश मातांना मिळतो. मातांची संख्या जास्त आहे, कुमारी पवित्रते साठी राखी बांधतात. भगवान म्हणतात काम महाशत्रू आहे याच्यावर विजय मिळवा. रक्षाबंधन पवित्रतेची निशाणी आहे, ते लोक राखी बांधतात. पवित्र बनत नाहीत. ती आहे कृत्रिम राखी, ज्ञान असल्याशिवाय कोणीही पावन बनू शकत नाही. आता तुम्ही राखी बांधत आहात. अर्थ पण समजावून सांगत आहात आणि प्रतिज्ञाही करून घेता. ज्याप्रमाणे शिख लोकांची खुण कंगन असते परंतु पवित्र बनत नाहीत. पतीतांना पावन बनवणारा, सर्वांचा सदगती दाता एक आहे, ते देहधारी नाहीत. पाण्याच्या गंगेला तर या डोळ्यांनी पाहू शकतो. बाबा जे सदगती दाता आहेत, त्यांना या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आत्मा कशी वस्तू आहे हे कोणीही पाहू शकत नाही. असे म्हणतात ही माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे, त्याला पाहिले का? म्हणतात नाही. इतर सर्व गोष्टी ज्यांना नाव आहे त्या दिसू शकतात. आत्म्याला तर नावही आहे, असे म्हणतात ही भ्रकुटीमध्ये चमकतो अजब सितारा. परंतु दिसू शकत नाही. परमात्म्याची ही आठवण करतात, दिसत काहीच नाही. या डोळ्यांनी लक्ष्मी- नारायणाला पाहू शकतो. लिंगाची पण पूजा करतात परंतु ती योग्य रीतीने करत नाहीत ना. पाहत असून सुद्धा जाणू शकत नाहीत, परमात्मा काय आहे?हे कोणीही जाणू शकत नाही. आत्मा तर खूप छोटी बिंदी आहे. डोळ्यांनी दिसू शकत नाही. न आत्म्याला, न परमात्म्याला पाहू शकतो, जाणून घेऊ शकतो. आता तुम्ही जाणत आहात आमचे बाबा यांच्यामध्ये आले आहेत. या शरीरामध्ये त्यांची स्वतःची आत्माही आहे, नंतर परमपिता परमात्मा म्हणतात - मी यांच्या रथामध्ये विराजमान आहे म्हणून बापदादा असे म्हणतात. आता दादाला तर या डोळ्याने पाहू शकता, बाबांना पाहू शकत नाही. जाणत आहात बाबा ज्ञानाचा सागर आहे, तो या शरीराद्वारे आम्हाला ज्ञान सांगत आहे. तो ज्ञानाचा सागर पतित-पावन आहे. निराकार रस्ता कसा सांगणार?प्रेरणेने तर कोणते काम होत नाही. भगवान येतो हे कोणालाही माहित नाही. शिवजयंती साजरी करतात तर अवश्य इथे येत असेल ना. तुम्ही जाणत आहात आता तो आम्हाला शिकवत आहे. बाबा यांच्या मध्ये येऊन शिकवत आहेत. बाबांना पूर्णपणे न जाणल्यामुळे, निश्चय बुद्धी नसल्यामुळे ८-१० वर्षानंतरही घटस्फोट देतात. माया बिलकुलच आंधळे बनवते. बाबांचे बनल्यानंतर सोडून देतात तर मग पदभ्रष्ट होऊन जाते. आता तुम्हा मुलांना बाबांचा परिचय मिळाला आहे तर इतरांनाही द्यायचा आहे. ऋषीमुनी इ. सर्व नेती-नेती म्हणत गेले. अगोदर तुम्हालाही माहीत नव्हते. आता तुम्ही म्हणाल होय जाणतो, आम्ही आस्तिक आहोत. सृष्टीचे चक्र कशाप्रकारे फिरते, हेही तुम्ही जाणत आहात. संपूर्ण दुनिया आणि तुम्ही स्वतः हे ज्ञान मिळण्या अगोदर नास्तिक होते. आता बाबांनी समजावले आहे तर तुम्ही म्हणता आम्हाला परमपिता परमात्मा पित्याने समजावले आहे, आस्तिक बनवले आहे. आम्ही रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नव्हतो. बाबा आहेत रचनाकार, बाबाच संगमयुगावर येऊन नवीन दुनियेची स्थापना करतात आणि जुन्या दुनियेचा विनाश ही करतात. जुन्या दुनियेच्या विनाशा साठीच ही महाभारत लढाई आहे, ज्यासाठीच समजतात, त्यावेळी कृष्ण होता. आता तुम्ही समजत आहात-निराकार पिता होता, त्यांना पाहिले जाऊ शकत नाही. कृष्णाचे तर चित्र आहे, पाहू शकतो. शिवाला पाहू शकत नाही. कृष्ण तर सतयुगाचा राजकुमार आहे. तो चेहरा नंतर असू शकत नाही. कृष्णही केंव्हा, कसा आला, हे कोणाला ही माहित नाही. कृष्णाला कंसाच्या जेलमध्ये दाखवतात. कंस सतयुगामध्ये होता का?असे कसे होऊ शकते? कंसाला असुर म्हटले जाते. यावेळी सर्व आसुरी संप्रदाय आहे ना. एक दुसऱ्याला मारत-कापत राहतात. दैवी दुनिया होती, हे विसरून गेले आहेत. ईश्वरीय दैवी दुनिया ईश्वराने स्थापन केली. हेही तुमच्या बुद्धीमध्ये क्रमवार पुरुषार्था अनुसार आहे. आता तुम्ही आहात ईश्वरीय परिवार, नंतर तिथे दैवी परिवार असेल. यावेळी ईश्वर तुम्हाला स्वर्गाचे देवी-देवता बनण्याच्या लायक बनवत आहेत. बाबा शिकवत आहेत. या संगमयुगाला कोणीही जाणत नाही. कोणत्याही शास्त्रामध्ये या पुरुषोत्तम युगाची गोष्ट नाही. पुरुषोत्तम युग अर्थात जिथे पुरुषोत्तम बनायचे असते. सतयुगाला पुरुषोत्तम युग म्हणू शकतो. यावेळी तर मनुष्य पुरुषोत्तम नाहीत. याला तर कनिष्ठ तमोप्रधान म्हणू शकतो, या सर्व गोष्टी तुम्हा ब्राह्मणांशिवाय दुसरे कोणी समजू शकत नाही. बाबा म्हणतात ही आहे आसुरी भ्रष्टाचारी दुनिया. सतयुगामध्ये असे वातावरण नसते. ती श्रेष्ठाचारी दुनिया होती. त्यांचे चित्र आहेत. बरोबर हे श्रेष्ठाचारी दुनियेचे मालक होते. भारताचे राजे होऊन गेले आहेत ज्यांची पूजा होते. पूज्य पवित्र होते, तेच नंतर पुजारी बनले. पुजारी भक्तिमार्गाला, पूज्य ज्ञान मार्गाला म्हटले जाते. पूज्य पासून पुजारी, पुजारी पासून नंतर पूज्य कसे बनतात. हेही तुम्ही जाणत आहात. या दुनियेमध्ये पुज्य एकही असू शकत नाही. पूज्य परमपिता परमात्मा आणि देवतानांच म्हटले जाते. परमपिता परमात्मा सर्वांचा पूज्य आहे. सर्व धर्म वाले त्यांची पूजा करतात. अशा पित्याच्या जन्माचे इथेच गायन आहे. शिवजयंती आहे ना. परंतु मनुष्यांना काहीच माहित नाही की त्यांचा जन्म भारतामध्ये होतो. आज काल तर शिवजयंती ला(शिवरात्रीला)सुट्टी पण देत नाहीत. जयंती साजरी करा, न करा, तुमची मर्जी. कृत्रीम सुट्टी नाही. जे शिवजयंतीला मानत नाहीत ते तर आपल्या कामावर निघून जातात. खूप धर्म आहेत ना. सतयुगामध्ये अशा गोष्टी होत नाहीत. तिथे हे वातावरणच नाही. सतयुग आहे नवी दुनिया, एक धर्म. तिथे हे माहीत नसते की आमच्यानंतर चंद्रवंशींचे राज्य असेल. इथे तुम्ही सर्व जाणत आहात, या गोष्टी होऊन गेल्या आहेत. जेव्हां तुम्ही सतयुगामध्ये असाल तेव्हां कोणत्या भूतकाळाची आठवण कराल? भूतकाळ तर कलियुग आहे. त्याचा इतिहास-भूगोल ऐकून काय फायदा?

इथे तुम्ही जाणत आहात आम्ही बाबांच्या जवळ बसलो आहे. बाबा शिक्षकही आहेत, सद्गुरु ही आहेत. बाबा सर्वांची सदगती करण्यासाठी आले आहेत. अवश्य सर्व आत्म्यांना घेऊन जातील. मनुष्य तर देह-अभिमाना मध्ये येऊन म्हणतात, सर्व मातीमध्ये मिळून जाणार आहे. हे समजत नाहीत आत्मे तर निघून जातील, बाकी हे शरीर मातीचे बनले आहे, हे जुने शरीर नष्ट होऊन जाते. आम्ही आत्मे एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेतो. हा या दुनियेतील आमचा शेवटचा जन्म आहे, सर्व पतित आहेत, सदैव पावन तर कोणी राहू शकत नाही. सतोप्रधान, सतो, रजो, तमो होतातच. ते लोक तर म्हणतात सर्व ईश्वराची रूपे आहेत, लीला करण्यासाठी, ईश्वराने आपली अनेक रूपे बनवली आहेत. हिसाब-किताब काहीच जाणत नाहीत. न लीला करणाऱ्याला जाणतात. बाबाच बसून दुनियेचा इतिहास-भूगोल समजावतात. खेळांमध्ये प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे. सर्वांची अवस्था वेगवेगळी आहे, ज्याची जशी अवस्था असते, त्याची महिमा होते. या सर्व गोष्टी बाबा संगमयुगावरच समजावतात. सतयुगामध्ये नंतर सतयुगाची भूमिका चालू राहील. तिथे या गोष्टी होणार नाहीत. इथे तुमच्या बुद्धीमध्ये सृष्टी चक्राचे ज्ञान फिरत राहते. तुमचे नावच आहे स्वदर्शन चक्रधारी. लक्ष्मी- नारायणाला थोडेच स्वदर्शन चक्र दिले जाते. हे इथेच आहे. मूलवतन मध्ये फक्त आत्मे राहतात, सूक्ष्मवतन मध्ये काहीच नाही. मनुष्य, जनावर, पशु-पक्षी इ. सर्व इथेच असतात. सतयुगामध्ये मोर इ. दाखवतात. असे नाही की तिथे मोराचे पंख काढून घालतात, मोराला दुःख थोडीच देतील. असेही नाही मोराचे पडलेले पंख मुकुटा मध्ये घालतील. नाही, मुकुटा मध्ये ही खोटी निशाणी दाखवली आहे. तिथे सर्व वस्तू खूप सुंदर असतात. कोणत्याही खराब वस्तू चे नाव रूप नसते. अशी कोणतीही वस्तू नसते जिच्याकडे पाहून किळस येईल. इथे तर किळस येते ना. तिथे जनावरांनाही दुःख होत नाही. सतयुग किती सुंदर असेल. नावच आहे स्वर्ग, हेवन, नवी दुनिया. इथे तर जुन्या दुनियेमध्ये पहा पावसामुळे घरे पडतात. लोक मरतात. भूकंप होईल सर्वजण दबून मरून जातील. सतयुगामध्ये खूप थोडे असतात नंतर वाढ होत राहते. प्रथम सूर्यवंशी असतील. जेंव्हा दुनिया २५% जुनी होईल तेंव्हा नंतर चंद्रवंशी असतील. सतयुगामध्ये 1१२५० वर्ष आहेत, ती आहे १००% नवी दुनिया. जिथे देवी-देवता राज्य करतात. तुमच्या मध्येही अनेकजण या गोष्टी विसरून जातात. राजधानी तर स्थापन होणारच आहे. नाराज होऊन बसू नका. पुरुषार्थाची गोष्ट आहे. बाबा सर्व मुलांकडून एक सारखा पुरुषार्थ करून घेतात. तुम्ही स्वतःसाठी विश्वामध्ये स्वर्गाची राजाई स्थापन करत आहात. स्वतःला पाहायचे आहे मी काय बनणार आहे? अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात - पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. या पुरुषोत्तम युगामध्ये स्वर्गाचे देवी-देवता बनवण्याचे शिक्षण शिकून स्वतःला योग्य बनवायचे आहे. पुरुषार्था मध्ये
नाराज व्हायचे नाही.

2. या बेहद च्या खेळा मध्ये प्रत्येक कलाकाराची भूमिका आणि अवस्था(पोजीशन) वेगवेगळी आहे. जशी ज्याची अवस्था तसा त्याला मान मिळतो. हे सर्व रहस्य समजून दुनियेच्या इतिहास-भूगोलाचे स्मरण करून स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे.

वरदान:-
श्रीमतामध्ये मनमत आणि जनमताची भेसळ(मिलावट) समाप्त करणारे खरे स्व कल्याणी भव

बाबांनी मुलांना सर्व खजाने स्व कल्याण आणि विश्व कल्याणा प्रति दिले आहेत परंतु त्यांचा वापर व्यर्थ गोष्टींसाठी करणे, अकल्याणाच्या कार्यामध्ये लावणे, श्रीमतांमध्ये मनमत आणि जनमताची भेसळ करणे-हा गैरवापर (अमानत मे ख्यानत) आहे. आता हा गैरवापर आणि भेसळ समाप्त करून आत्मीयता आणि दयाभाव धारण करा. आपल्यावर आणि सर्वांवर दया करून स्व कल्याणी बना. स्वतःला पहा, बाबांना पहा इतरांना पाहू नका.

बोधवाक्य:-
सदैव हर्षित तेच राहू शकतात जे कुठेही आकर्षित होत नाहीत.