09-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये योगबळा द्वारे काम घ्या, बाबांना काही ही
विचारण्याची आवश्यकता नाही, तुम्ही ईश्वरीय संतांन आहात, म्हणून कोणतेही असुरी काम
करू नका"
प्रश्न:-
तुमच्या योग
बळाचे आश्र्चर्य काय आहे?
उत्तर:-
हेच योगबळ आहे, ज्याद्वारे तुमची सर्व कर्मइंद्रिय वश होतात. योगबळा शिवाय तुम्ही
पावन बनू शकत नाही. योगबळाद्वारेच सारी सृष्टी पावन बनते, म्हणून पावन बनण्यासाठी
किंवा भोजन शुद्ध बनवण्यासाठी, आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. युक्तीने चाला, नम्रता
द्वारे व्यवहार करा.
ओम शांती।
आत्मिक पिता, आत्मिक मुलांना समजवत आहेत. दुनिये मध्ये कुणालाच माहीत नाही की
आत्मिक पिता येऊन स्वर्गाची किंवा नवीन दुनिये ची स्थापना कसे करतात, कोणीही जाणत
नाहीत. तुम्ही बाबांशी कोणत्याही प्रकारची मागणी करू शकत नाही. बाबा सर्व काही
समजवतात. काहीच विचार करण्याची आवश्यकता नाही. सर्व काही स्वत:च चांगले समजावत
राहतात. बाबा म्हणतात मला कल्प-कल्प भारत खंडामध्ये येऊन काय करायचे आहे, हे मी
जाणतो, तुम्ही जाणत नाहीत. रोज रोज समजावत राहतात. जरी कोणी एक अक्षर पण विचारले
नाही तरी, सर्व काही समजावत राहतात. काही जण विचारतात, भोजनाचे कष्ट होतात. आता ही
तर समजून घेण्याची गोष्ट आहे. बाबांनी म्हटले आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये योगबळा
द्वारे काम करा, आठवणीच्या यात्रे द्वारे काम करा, आणि कुठे पण जावा तर मुख्य गोष्ट,
बाबांची जरूर आठवण करा. कोणतेही आसुरी काम करायचे नाही. आम्ही ईश्वरीय संतान आहोत,
ते सर्वांचे पिता आहेत. एक बाबाच सर्वांसाठी ज्ञान स्पष्ट करतात. बाबा म्हणतात,
मुलांनो स्वर्गाचे मालक बनायचे आहे. राजाई मध्ये पण पद तर असतात ना. प्रत्येकाच्या
पुरुषार्था नुसार पद असते ना. मुलांना पुरुषार्थ पण करायचा आहे आणि भाग्य पण
मुलांनाच प्राप्त करायचेआहे. पुरुषार्थ करवण्यासाठी बाबा येतात. तुम्हाला काहीच
माहित नव्हते की, बाबा कधी येतील, काय करतील, कुठे घेऊन जातील? बाबाच येऊन समजवतात,
वैश्विक नाटका नुसार कोठून खाली पडले. एकदम उच्च शिखरावरुन पडले. जरा पण बुध्दीमध्ये
येत नाही की, आम्ही कोण आहोत?आत्ता जाणीव होते ना. तुम्हाला स्वप्नामध्ये पण नव्हते
की, बाबा येऊन काय करतील. तुम्ही पण काहीच जाणत नव्हते. आत्ता बाबा मिळाले आहेत, तर
समजतात, अशा बाबांच्या वरती कुर्बान जाऊ. जसे पतिव्रता स्त्री असते तर पतीवरती खूप
कुर्बान जाते. पुर्वी चिते वरती चढण्यासाठी पण घाबरत नव्हते. खूप बहादूर होती.
यापूर्वी चितेवर खूप चढत होते. येथे तर बाबा असे कोणतेच कष्ट देत नाहीत. जरी नाव
ज्ञान चिता आहे, परंतु जळणे इत्यादी कोणतीच गोष्ट नाही. बाबा असे समजवतात जसे लोण्या
मधून केस निघतो. मुलं समजतात, बरोबर जन्मानंतरचे डोक्यावरती पापाचे ओझे आहे. कोणी
एक अजामिल नाहीत. प्रत्येक मनुष्य एक दोघा पेक्षा जास्ती अजामील आहेत. मनुष्याला
काय माहिती की, पूर्वीच्या जन्म मध्ये काय काय केले आहे?आता तुम्ही समजता पापच केले
आहेत. वास्तव मध्ये पुण्यात्मा एक पण नाही, सर्व पापात्मे आहेत. पुण्य करतील तर
पुण्यात्मा बनतील. पुण्यात्मा तर सतयुगांमध्ये असतात. कोणी दवाखाना इत्यादी उघडला
तर, काय झाले? शिडी उतरण्या पासून थोडेच वाचले? चढती कला तर झाली नाही. खाली उतरत
जातात. हे बाबा तर इतके प्रिय आहेत, ज्यांच्यासाठी म्हणतात जिवंतपणी कुर्बान जाऊ,
कारण ते पतींचे पती, पित्यांचे पिता, सर्वात उच्च आहेत.
मुलांना आत्ता बाबा जागृत करत आहेत. असे बाबा जे स्वर्गाचे मालक बनवतात आणि किती
साधारण आहेत. सुरुवातीला मुली जेव्हा आजारी पडत होत्या, तर बाबा स्वतः त्यांची सेवा
करत होते. अंहकार काहीच नाही. बापदादा तर उच्च ते उच्च आहेत, ते म्हणतात जसे कर्म
मी यांच्याकडून करवून घेईन, किंवा करेल, यांना पाहून दुसरे पण करतील, दोघे जसे एक
सारखे होतात. माहिती थोडेच होते, बाबा काय करतात, दादा काय करतात. कर्म, अकर्म व
विकर्माची गती बाबाच सन्मुख समजवतात. बाबा खूप उच्च आहेत. मायेचा किती प्रभाव आहे.
ईश्वर पिता म्हणतात असे करू नका, तरीही मानत नाहीत. भगवान म्हणतात, गोड मुलांनो हे
काम करू नका, तरी उलटे काम करतात. उलटे काम करण्यासाठी मना करतात ना, परंतु माया पण
खूप जबरदस्त आहे. चुकून पण बाबांना विसरायचे नाही. कोणी काहीही करतील, मारतील किंवा
काय करतील. असे काही बाबत करत नाहीत परंतु हे जास्तीत जास्त म्हटले जाते. गीत पण आहे,
तुमचा दरवाजा कधीच सोडणार नाही. तुम्ही काहीही करा, बाहेर काय ठेवले आहे. बुद्धी पण
म्हणते, जाणार कुठे. बाबा बादशाही देतात, परत थोडीच कधी मिळू शकते. असे थोडेच
दुसऱ्या जन्मांमध्ये काही मिळू शकते, नाही. हे पारलौकिक बाबा आहेत, जे तुम्हाला
मालक बनवतात. मुलांना दैवी गुण धारण करायचे आहेत, तेही बाबा मत देतात. आपले पोलीस
इत्यादीचे काम पण करा, नाहीतर काढून टाकतील. आपले काम तर करायचं आहे. डोळे वटारुन
पाहवे लागते. जेवढे शक्य होईल तेवढे प्रेमाने काम करा. नाहीतर युक्तीने डोळे वटारून
शकता, हात चालवायचा नाही. बाबाची अनेक मुलं आहेत, बाबांना पण मुलांची काळजी राहते
ना. मुख्य गोष्ट पवित्रतेची आहे. जन्मजन्मांतर पासून तुम्हीच बोलवले आहे ना, हे
पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा, परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. बाबांना बोलवतात
म्हणजेच जरूर पतित आहेत, नाहीतर बोलवण्याची आवश्यकता नाही. पूजेची पण आवश्यकता नाही.
बाबा समजवतात, तुम्हा अबलावरती किती अत्याचार होतात, सहन करायचे आहे. युक्त्या तर
खूप सांगत राहतात. खूप नम्रताने व्यवहार करा, बोला तुम्ही तर भगवान आहात, परत हे
विकाराची इच्छा का ठेवतात. लग्न करते वेळेस म्हणतात, मी तुमचा ईश्वर, गुरु सर्वकाही
आहे, आता मी पवित्र राहू इच्छिते. भगवंताला तर पतित-पावन म्हटले जाते ना, तुम्हीच
पावन बनवणारे बना. असे प्रेमाने नम्रता द्वारे गोष्टी करायला पाहिजेत. क्रोध केला
तर तुम्ही फुलांची वर्षा करा, मारतात तर स्वतः पण दुःखी होतात. जसे दारूडे दारू
पितात, तर खूप नशा चढतो, स्वतःला बादशहा समजतात. हे कामविकार रुपी विष पण अशीच
गोष्ट आहे, तुम्ही विचारू नका. ते पश्चाताप पण करतात, परंतु सवय लागली आहे, तर लवकर
सुटत नाही. एक-दोनदा विकारांमध्ये गेले, बस नशा चढला, परत विकारात जात राहतात. जसे
नशा केल्याने आनंद वाटतो, असे समजतात, तसेच विकार पण असेच आहेत. येथे खूप कष्ट
घ्यायचे आहेत. योगबळा शिवाय कोणत्याही कर्मेंद्रियाला वश करू शकणार नाही. योग बलाची
करामत आहे, तेव्हा तर नाव प्रसिद्ध आहे. परदेशातून पण योग शिकण्यासाठी येतात, शांती
मध्ये बसतात. घरदारा पासून दूर होतात, ते तर अर्धा कल्पा साठी कृत्रिम शांती आहे.
कुणाला खऱ्या शांतीची माहिती नाही. बाबा म्हणतात, मुलांनो तुमचा स्वधर्म शांत आहे.
या शरीरा द्वारे तुम्ही काम करतात, जोपर्यंत शरीर धारण करत नाही, तोपर्यंत आत्मा
शांत राहते. परत कुठे न कुठे जाऊन प्रवेश करते. येथे तर परत कोणी कोणी सूक्ष्म
शरीराद्वारे धक्के खात राहतात. ते छायाचे शरीर असते. कोणी दुःख देणारे पण असतात,
कोणी चांगले पण असतात. येथे पण कोणते मनुष्य असतात, कोणाला दुःख देत नाहीत. काही तर
खूप दुःख देतात. काहीतर जसे साधू, महात्मा असतात.
बाबा समजावतात गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांनो, तुम्ही पाच हजार वर्षानंतर
येऊन भेटले आहात, काय घेण्यासाठी आले आहात?बाबांनी सांगितले आहे, तुम्हाला काय
मिळणार आहे. बाबा तुमच्याकडून काय मिळणार आहे, हा तर प्रश्नच नाही. तुम्ही तर
स्वर्गीय ईश्वर पिता आहात. नवीन दुनियेचे रचनाकार आहात, तर जरूर आपल्याकडून
बादशाहीच मिळेल. बाबा म्हणतात थोडे पण काही समजून जातात, तर स्वर्गा मध्ये येतात.
मी स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आलो आहे. मोठ्यात मोठी असामी भगवान आणि प्रजापिता
ब्रह्मा आहेत. तुम्ही जाणतात विष्णू कोण आहेत, दुसऱ्या कोणाला ही माहिती नाही.
तुम्ही म्हणणार आम्ही यांच्या घराण्याचे आहोत, हे लक्ष्मी नारायण तर सतयुगांमध्ये
राज्य करतात. हे चक्र इत्यादी वास्तव मध्ये विष्णूचे थोडेच आहे, हे अलंकार तर आम्हा
ब्राह्मणांचे आहेत. आता हे ज्ञान आहे. सतयुगामध्ये थोडेच असे समजवतील. अशा गोष्टी
सांगण्याची कोणामध्ये शक्ती नाही. तुम्ही या ८४ च्या चक्राला जाणतात, याचा अर्थ पण
कोणी समजू शकत नाहीत. मुलांना बाबांनी समजवले आहे. मुलांनी समजले आहे, आम्हाला तर
हे अलंकार शोभत नाहीत. आम्ही आत्ता ज्ञान घेत आहोत, पुरुषार्थ करत आहोत, परत असे
श्रेष्ठ बनू. सुदर्शन चक्र फिरवत-फिरवत आम्ही देवता बनू. स्वदर्शन चक्र म्हणजे
रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे ज्ञान जाणणे. साऱ्या दुनिया मध्ये, कोणी पण
हे समजू शकत नाही की, हे सृष्टीचे चक्र कसे फिरते?बाबा खूप सहज करून समजवतात, या
चक्राचा कालावधी इतका मोठा तर होऊ शकत नाही. मनुष्य सृष्टीचा समाचार ऐकवला जातो की,
इतके मनुष्य आहेत. असे थोडेच सांगितले जाते की, कासव किती आहेत, मासे इत्यादी किती
आहेत. मनुष्याची गोष्ट केली जाते. तुम्हाला पण प्रश्न विचारतात, बाबा सर्व काही
सांगत राहतात, फक्त त्यावरती पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे.
बाबाने समजावले आहे, योगबळा द्वारे तुम्ही सृष्टीला पावन बनवतात, तर काय योग
बळाद्वारे भोजन शुध्द करू शकत नाहीत. अच्छा, तुम्ही तर असे बनले परत दुसऱ्यांना पण
आपल्यासारखे बनवा. आता तुम्ही मुलं समजतात, बाबा स्वर्गाची बादशाही देण्यासाठी परत
आले आहेत, तर यांना नाकरायचे नाही. विश्वाची बादशाही नाकारली तर नष्ट व्हाल, परत
कचऱ्याच्या डब्यात मध्ये जाऊन पडाल. ही सारी दुनियाच कचरा आहे, तर याला कचऱ्याचा डबा
म्हणणार. दुनियाचे हाल पहा, कसे झाले आहेत. तुम्ही तर जाणता, आम्ही विश्वाचे मालक
बनू. हे कोणालाही माहिती नाही की, सत्ययुगा मध्ये एक राज्य होते, मानणार नाहीत.
आपलाच अंहकार राहतो. जरा पण ऐकत नाहीत. ते म्हणतात, ही सर्व तुमची कल्पना आहे.
कल्पना द्वारे हे शरीर इत्यादी बनले आहे, अर्थ काहीच समजत नाहीत. बस ही ईश्र्वराची
कल्पना आहे, ईश्वर पाहिजे ते बनवू शखतात, त्यांचा हा खेळ आहे, अशा गोष्टी करतात,
विचारु नका. आता तुम्ही मुलं जाणतात बाबा आले आहेत. वृद्ध माता पण म्हणतात, बाबा
प्रत्येक पाच हजार वर्षानंतर, आम्ही आपल्या कडून स्वर्गाचा वारसा घेतो. आम्ही
स्वर्गाची राजाई घेण्यासाठी आलो आहोत. तुम्ही जाणतात, सर्व कलाकाराची आप-आपली भूमिका
आहे. एकाची भूमिका दुसऱ्याशी मिळू शकत नाही. तुम्ही परत याच नावा रुपामध्ये येऊन,
या वेळेतच बाबाकडून वारसा घेण्यासाठी पुरुषार्थ कराल. खूप कमाई आहे. जरी बाबा
म्हणतात, थोडे पण ऐकले तरी स्वर्गामध्ये जाल, परंतु प्रत्येक मनुष्य पुरुषार्थ उच्च
बनण्यासाठीच करतात ना. तर पुरुषार्थ प्रथम आहे, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातापिता, बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) जसे बाबा
मुलांची सेवा करतात, कोणता अंहकार नाही, असे अनुकरण करायचे आहे. बाबाच्या
श्रीमतावरती चालून विश्वाची बादशाही घ्यायची आहे. नाकारायची नाही.
(२) शिवबाबा पित्यांचे पिता, पतींचे पती, जे सर्वात उच्च आहेत, प्रिय आहेत,
त्यांच्यावरती बळी जायचे आहे. ज्ञान चीतावर बसायचे आहे. कधी चुकून पण बाबांना
विसरून उलटे काम करायचे नाही.
वरदान:-
मास्टर
ज्ञानसागर बनून, ज्ञानाच्या खोलीमध्ये जाणारे अनुभव रूपी रत्ना द्वारे संपन्न भव.
जी मुलं
ज्ञानाच्या खोलीमध्ये जातात, ते अनुभव रुपी रत्नांनी संपन्न बनतात. एक आहे ज्ञान
ऐकणे आणि ऐकवणे, दुसरे आहे अनुभवी मूर्त बनणे. अनुभवी नेहमी अविनाश आणि निर्विघ्न
राहतात, त्यांना कोणीही हालवू शकत नाही. अनुभवीच्या पुढे मायेचे कोणतेही प्रयत्न
सफल होत नाहीत. अनुभवी धोका खाऊ शकत नाहीत, म्हणून अनुभवांना वाढवत प्रत्येक गुणांचे
अनुभवी बना. मनन शक्ती द्वारा शुद्ध संकल्पाचा खजिना जमा करा.
बोधवाक्य:-
फरिश्ता ते
आहेत, जे देहाच्या सूक्ष्म अभिमानाच्या सबंधा पासून पण वेगळे आहेत.