13-09-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   22.03.86  ओम शान्ति   मधुबन


सुख शांती आणि आनंदचा आधार-पवित्रता


आज बापदादा आपल्या चोहूबाजूच्या सर्व पवित्र आणि आनंदी मुलांना पाहत आहेत. इतक्या मोठ्या संघटित रूपांमध्ये असे पवित्र आणि आनंदी दोन्ही विशेषता असणारे, या वैश्विक नाटकामध्ये दुसरी कोणती इतकी मोठी सभा व इतक्या मोठ्या संख्येमध्ये असू शकत नाही. आजकल तर कुणाला पण सर्वोच्च आणि परम पवित्रतेची पदवी देतात परंतु प्रत्यक्ष रूपामध्ये पहा तर, ती पवित्रता, ती महानता दिसून येत नाही. बापदादा पाहत होते, इतक्या महान, पवित्र आत्म्याचे संघटन कोठे होऊ शकते?प्रत्येक मुलांमध्ये हा दृढ संकल्प आहे की, न फक्त कर्माद्वारे द्वारे पवित्र बनायचे आहे, तर मन्सा वाचा कर्मणा पवित्र बनायचे आहे. तर हा पवित्र बनण्याचा श्रेष्ठ दृढ संकल्प आणि कुठे पण राहू शकत नाही, अविनाशी होऊ शकत नाही, सहज होऊ शकत नाही आणि तुम्ही सर्व पवित्रतेला धारण करणे किती सहज समजतात, कारण बाबा द्वारे ज्ञान मिळाले आणि ज्ञानाच्या शक्तीद्वारे जाणले की मज आत्म्याचे अनादी आणि आदी स्वरुपच पवित्र आहे. जेव्हा आदी अनादी स्वरूपाची स्मृती आली, तर हीच स्मृती समर्थ बनवून सहज अनुभव करवत आहे. तुम्ही जाणले आहे की आपले वास्तविक स्वरूप पवित्र आहे. संगदोषाचे स्वरुप अपवित्र आहे. तर वास्तविकतेचे आचरण करणे सहज झाले ना.

स्वधर्म, स्वदेश, सर्व आत्म्याचे पिता आणि स्वरूप, स्वकर्म, सर्वांचे ज्ञान मिळाले. तर ज्ञानाच्या शक्तीद्वारे कठीण सहज झाले. ज्या गोष्टीला आजकालचे महान आत्मा म्हणवणारे पण, असंभव, अनैसर्गिक समजतात परंतु तुम्हा पवित्र आत्म्याने, त्या असंभवला पण अगदी सहज अनुभव केले. पवित्रतेला धारण करणे सहज आहे की कठीण आहे?संपूर्ण विश्वाच्या पुढे, आव्हान करू शकता की, पवित्रता तर आमचे स्व-स्वरूप आहे. पवित्रतेच्या शक्ती मुळे, जिथे पवित्रता आहे तिथे सुख आणि शांती स्वतःच आहे. पवित्रता पाया आहे. पवित्रतेला माता पण म्हटले जाते आणि सुख शांती तिचे मुलं आहेत. तर जिथे पवित्रता आहे तिथे सुख शांती स्वतःच आहे, म्हणून आनंदित पण आहात, कधी उदास होऊ शकत नाहीत. नेहमी आनंदी राहणारे आहात. जिथे पवित्रता आहे तर आनंद पण जरूर आहे. पवित्र आत्म्याची लक्षणं नेहमी आनंदी आहात. तर बापदादा पाहत होते की किती निश्चय बुद्धी, पावन आत्मे बसले आहेत. दुनियावाले सुख शांती च्या पाठीमागे पळत आहेत, परंतु सुख शांतीचा पायाच पवित्रता आहे. त्या पायाला जाणत नाहीत म्हणून पवित्रतेचा पाया मजबूत न झाल्यामुळे, अल्पकाळाच्या सुख शांतीची प्राप्ती पण होते, परंतु आत्ता -आता आहे, आत्ता-आत्ता नाही. सदा काळासाठी सुख शांती ची प्राप्ती तर, शिवाय पवित्रतेच्या असंभव आहे. तुम्ही लोकांनी पवित्रतेच्या पायाला आपले बनवले, म्हणून सुख शांतीच्या पाठीमागे पळायची आवश्यकता नाही. सुख-शांती पवित्र आत्म्याच्या जवळ स्वतः येते. जसे आईकडे मुलं स्वतः जातात, किती पण वेगळे करा परंतु आई कडे जरूर जाणार. तर सुख शांतीची माता पवित्रता आहे. जिथे पवित्रता आहे, तिथे सुख शांती स्वतः येते. तर काय बनले आहात, बेगमपूरचे बादशहा. जुन्या दुनियाचे बादशहा नाही परंतु बेगमपुरचे बादशाहा. हा ब्राह्मण परिवार बेगमपूर म्हणजे सुखाचा संसार आहे. तर हा सुखाचा संसार, बेगमपूर चे बादशाहा बनले. सर्वोच्च पवित्र पण आहात ना. मुकुट पण आहे, सिंहासन पण आहे, बाकी काय कमी आहे. खूप सुंदर ताज आहे, लाइटचा मुकुट म्हणजे पवित्रतेची खुण कोण आहे आणि बापदादाचे हृदयासिन पण आहात. बेगमपूरच्या बादशहाचा ताज पण वेगळा आणि सिंहासन पण वेगळे आहे. बादशाही पण वेगळी, तर बादशहा पण वेगळे आहात.

आजकालचे मनुष्य इतकी भागदौड करत असलेले पाहून, बापदादांना पण मुलावरती दया येते. किती प्रयत्न करत राहतात. प्रयत्न म्हणजे कष्ट पण जास्त करतात, परंतु प्राप्ती काय आहे?सुख पण होईल तर, सुखाच्या सोबत कोणते ना कोणते दुःख पण मिळालेले असेल. दुसरे काही नाही, तर अल्प काळाच्या सुखा सोबत चिंता आणि भीती, या दोन गोष्टी तर आहेतच. तर जेथे चिंता आहे तेथे आराम होऊ शकत नाही. जिथे भय आहे, तिथे शांती शांती होऊ शकत नाही. तर सुखाच्या सोबत, हे दुःख अशांतीचे कारण आहेतच आणि तुम्हा सर्वांना दुःखाचे कारण आणि निवारण मिळाले आहे. आता तुम्ही समस्यांचे समाधान करणारे, समाधान स्वरुप बनले आहात. समस्या तुम्हा लोकाकडे खेळण्यासाठी, खेळणी बनून येते. खेळ करण्यासाठी येते, ना की घाबरवण्यासाठी. घाबरणारे तर नाहीत ना. बाकी काय कमी राहिली, भरपुर झाले ना. मास्टर सर्वशक्तिमानच्या पुढे समस्या काहीच नाहीत. हत्तीच्या पायाखाली जर मुंगी आली तर दिसुन येईल? तर या समस्या पण तुम्हा महारथीच्या पुढे मुंगी सारख्या आहेत. खेळ समजल्यामुळे आनंद होतो, कितीही मोठी गोष्ट, लहान होते. जसे आजकाल मुलांना कोणता खेळ करवतात, बुद्धीचे. तसे मुलांना हिशोब करायला सांगा, तर तंग होतात परंतु खेळाच्या रीतीने आनंदाने करतील. तर तुम्हा सर्वांसाठी समस्या पण मुंगी सारख्या लहान आहेत ना. जिथे पवित्रता सुख शांती शांती आहे, तेथे स्वप्नांमधे पण दुःख अशांतीची लाट येऊ शकत नाही. शक्तिशाली आत्म्यांच्या पुढे हे दुःख आणि अशांती, समोर येण्याची हिंमत ठेवू शकत नाही. पवित्र आत्मे नेहमी आनंदी राहणारे असतात, हे नेहमी स्मृतीमध्ये ठेवा. अनेक प्रकारच्या समस्या मध्ये, भटकण्यापासून, दुःख अशांतीच्या जाळ्या मधून निघाले आहेत, फक्त एक दुःख येत नाही, परंतु दुःखाची वंशावळ पण सोबत येते. तर त्या जाळ्या मधून निघाले आहात, असे स्वतःला भाग्यवान समजतात ना.

आज ऑस्ट्रेलिया वाले सन्मुख आहेत. ऑस्ट्रेलिया निवासींना

बापदादा नेहमीच तपस्या आणि महादानी पणाच्या विशेषतेचे वर्णन करतात. नेहमी सेवेच्या आवडीची तपस्या, अनेक आत्म्यांना आणि तुम्हा तपस्वी आत्म्यांना फळ देत आहे. धरतीच्या प्रमाणे विधी आणि वृद्धि दोघांना पाहून बापदादा जास्त आनंदी होतात. ऑस्ट्रेलिया निवासी असाधारण आहेतच. त्यागाची भावना, सेवेसाठी सर्वांमध्ये खूप लवकर येते, म्हणून इतके सेवाकेंद्र सुरू केले आहेत. जसे आम्हाला भाग्य मिळाले आहे, असे दुसऱ्यांना भाग्यवान बनवायचे आहे. दृढ संकल्प करणे म्हणजे तपस्या आहे. तर त्याग आणि तपस्याच्या विधीद्वारे वृध्दी करत आहात. सेवाभाव अनेक हद्दचे भाव समाप्त करतो. हाच त्याग आणि तपस्या सफलतेचा आधार बनला आहे, समजले. संघटनाची शक्ती आहे. एकाने म्हटले आणि दुसर्‍याने केले. असे नाही, एकाने म्हटले आणि दुसरा म्हणेल, हे तर होऊ शकत नाही. यामुळे संघटन नष्ट होते. एकाने म्हटले दुसऱ्याने उमंग उत्साहाने सहयोगी बनून, प्रत्यक्षात आणले, हीच संघटनेची शक्ती आहे. पांडवाचे पण संघटन आहे, कधी तु- मी नाही. बस बाबा-बाबा म्हणले तर सर्व गोष्टी समाप्त होतात. खिटपीट तेव्हाच होते, जेव्हा तू-मी, माझे तुझे असे होते. बाबांना समोर ठेवल्यामुळे कोणतीही समस्या येऊ शकत नाही आणि नेहमी निर्विघ्न आत्मे तीव्र पुरुषार्था द्वारे, उडती कला चा अनुभव करत राहतात. अनेक वर्षाची निर्विघ्न स्थिती, मजबूत स्थिती बनते. जे नेहमी विघ्नाच्या वश होतात, त्यांचा पाया कच्चा होतो आणि अनेक वर्षाचे निर्विघ्न आत्म्यांचा पाया पक्का असल्यामुळे स्वतः पण शक्तिशाली आणि दुसऱ्यांना पण शक्तिशाली बनवतात. कोणतीही तुटलेली गोष्ट जोडल्यामुळे ती कमजोर होते. अनेक वर्षांपासून शक्तीशाली असणारे आत्मे, अंत काळात पण चांगल्या मार्काने पास होतात, किंवा प्रथम वर्गांमध्ये येतात. तर नेहमी हेच लक्षात ठेवा की, अनेक वर्षांच्या निर्विघ्न स्थितीचा अनुभव आवश्य करायचा आहे. असे समजू नका, विघ्न आले दूर तर केले ना. काही हरकत नाही परंतु नेहमी विघ्न येणे आणि नष्ट करणे यामध्ये वेळ वाया जातो, शक्ती वाया जाते. ती वेळ आणि शक्ती सेवेमध्ये लावा तर एकाचे पदम गुणा जमा होईल, म्हणून खूपकाळाचे निर्विघ्न आत्मे, विघ्नविनाशक रूपामध्ये पूजले जातात. विघ्नविनाशक ची पदवी पूज्य आत्म्यांची आहे. मी विघ्नविनाशक पूज्य आत्मा आहे, या स्मृती द्वारे, नेहमी निर्विघ्न बनून उडती कला द्वारे, प्रगती करत रहा आणि दुसऱ्यांची पण प्रगती करा, समजले. आपले विघ्न तर विनाश केले परंतु दुसऱ्यासाठी पण विघ्नविनाशक बनायचे आहे. तुम्ही पहा, तुम्हा लोकांना निमित्त आत्मा पण अशी मिळाली आहे( निर्मला डॉक्टर) जे सुरूवाती पासून कोणत्याही विघ्ना मध्ये आलेली नाही. नेहमी अनासक्त आणि प्रिय राहिली आहे. थोडी स्ट्रिक्ट, कडक राहते, हे पण जरुरी आहे. जर अशी कडक शिक्षक मिळाली नसती, तर इतके वृद्धी झाली नसती. हे पण आवश्यक आहे. जसे कडू औषध आजार पणासाठी जरुरी असते ना. तर वैश्विक नाटकानुसार निमित्त आत्म्यांचा संग तर जरूर लागतो आणि जसे स्वतःआल्यामुळे सेवेची निमित्त बनली. तर ऑस्ट्रेलियामध्ये आल्या मुळे लगेच सेवा केंद्र सुरु केले, सेवेमध्ये तत्पर राहिले. हे त्यागाच्या भावनाचे वातावरण संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये आणि जे पण सबंध संपर्का मधील स्थान आहेत त्यामध्ये, त्याच स्वरूपा द्वारे वृध्दी होत आहे. तपस्या आणि त्याग ज्यांच्यामध्ये आहेत, तेच श्रेष्ठ आत्मे आहेत. तीव्र पुरुषार्थी तर सर्व आत्मे आहेत परंतु पुरुषार्थी असून पण विशेषता आपला प्रभाव जरूर करते. संपन्न तर आता सर्व बनत आहात ना. संपन्न बनले, हे प्रमाणपत्र कोणाला मिळाले नाही. परंतु संपन्नतेच्या जवळ पोहोचले आहात, यामध्ये पण क्रमानुसार आहेत. कोणी खूप जवळ पोहोचले आहेत, कोणी क्रमानुसार मागेपुढे आहेत. ऑस्ट्रेलिया वाले भाग्यशाली आहेत, त्यागाचे बीज भाग्य प्राप्त करत आहे. शक्ती सेना पण बापदादांना अतिप्रिय आहे कारण हिम्मत ठेवणारे आहेत. जिथे हिंमत आहे तिथे बाप दादांची मदत नेहमीच सोबत आहे. नेहमी संतुष्ठ राहणारे आहात ना. संतुष्ठता सफलतेचा आधार आहे. तुम्ही सर्व संतुष्ठ आत्मे आहात, तर सफलता तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, समजले. तर ऑस्ट्रेलियावाले जवळचे आणि प्रिय आहात, म्हणून जास्त आदर आहे, अच्छा.

अव्यक्त मुरली द्वारे निवडलेले महावाक्य, प्रश्नउत्तर.

(१) प्रश्न:- शक्ती सेना चे नाव संपुर्ण विश्वामध्ये कधी प्रसिद्ध होईल?

उत्तर:- जेव्हा संघटित रूपामध्ये एकरस स्थिती किंवा एकाच शुद्ध संकल्पा मध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास होईल. संघटनांमध्ये कोणत्या एकाचा पण दुसरा कोणता संकल्प नको. सर्व एकाच्या आकर्षणा मध्ये एकाच अशरीरी बनण्याच्या शुद्ध संकल्पा मध्ये स्थिर राहण्याचे अभ्यासी बनाल, तेव्हाच संपूर्ण विश्वामध्ये शक्‍ती सेनेचे नाव प्रसिद्ध होईल.

(२) प्रश्न:-स्थुल सैनिक युध्दाच्या मैदानामध्ये, विजय कोणत्या आधारे प्राप्त करतात, तुमच्या विजयाचा नगारा कधी वाजेल?

उत्तर :- सैनिक जेव्हा युद्धाच्या मैदानामध्ये जातात तर एकाच आदेशाद्वारे, चोहूबाजूला बंदुकीने गोळी चालवायला सुरू करतात. एकाच वेळी एकाच आदेशाद्वारे चोहू बाजूला घेराव घालतात. असेच आत्मिक सेना संघटित रूपामध्ये, एकाच इशाऱ्या द्वारे आणि एकाच सेकंदांमध्ये सर्व एकरस स्थितीमध्ये स्थिर राहाल, तेव्हाच विजयाचा नगारा वाजेल.

(३)प्रश्न:- बाबांच्या कोणत्या आदेशाला प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी नेहमी तयार रहा, तर हा कलियुगी पर्वत उचलू शकू?

उत्तर:-बाबा हाच आदेश देतात की, एका सेकंदामध्ये सर्व एकरस स्थितीमध्ये स्थिर राहा. जेव्हा सर्वांचे संकल्प, एका संकल्प मध्ये सामावतील, तेव्हाचा कलयुगी पर्वत उचलू शकतो. तर तो एक सेकंद नेहमीसाठी सेकंद राहील. असे नाही एक सेकंद स्थिर राहा, परत खाली या.

(४) प्रश्न:- प्रत्येक ब्राह्मण मुलांची जबाबदारी कोणती आहे?

उत्तर:- सर्व संघठनाला एकरस स्थितीमध्ये स्थिर करण्यासाठी सहयोगी बनणे, ही प्रत्येक ब्राह्मणांची जबाबदारी आहे. जसे अज्ञानी आत्म्याला, ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी, नेहमी शुभ भावना, कल्याणाची भावना ठेवत प्रयत्न करत राहतात, असेच आपल्या दैवी संघठनाला पण एकरस स्थितीमध्ये स्थिर करणे आणि संघटनांच्या शक्तीला वृद्धिंगत करण्यासाठी, एक दुसर्‍याच्या प्रती, प्रत्येक वेगवेगळ्या रूपा द्वारे प्रयत्न करा. याचे नियोजन करा. असेच स्वता:ला खुश ठेवायचे नाही की, मी वैयक्तिक रूपाने तर ठीक आहे.

(५) प्रश्न:-परमात्म ज्ञानाची विशेषता कोणती आहे?

उत्तर:- संघटनांची शक्तीच परमात्म ज्ञानाची विशेषता आहे. या ब्राह्मण संघटनाची विशेषता देवता रूपामध्ये, प्रत्यक्षात एक धर्म, एक राज्य, एक मताच्या रूपा मध्ये चालत राहते.

(६) प्रश्न:-कोणत्या एका गोष्टीचे संपूर्ण परिवर्तनच, संपूर्णतेला जवळ घेऊन येईल?

उत्तर:- प्रत्येकामध्ये जे देहाभिमानाचे मूळ संस्कार आहेत, ज्याला तुम्ही लोक स्वभाव म्हणतात, ते संस्कार अंश मात्र पण राहायला नकोत. त्या संस्काराला परिवर्तन करून, बापदादांच्या संस्काराला धारण करणे, हाच अंतिम पुरुषार्थ आहे.

(७) प्रश्न:-बापदादांची प्रत्यक्षता कोणत्या आधारावर होईल?

उत्तर:-जेव्हा एका-एकामध्ये बाप दादाचे संस्कार दिसून येतील. बापदादांच्या संस्काराला कॉपी करून, त्यांच्यासारखे बना, तर वेळ आणि शकत्ती वाचेल आणि संपूर्ण विश्वामध्ये बाप दादांना सहज प्रत्यक्ष करू शकाल. भक्तिमार्ग मध्ये तर फक्त म्हण आहे की, जिकडे पाहावे तिकडे तुच आहे, परंतु येथे तर प्रत्यक्षामध्ये जिकडे पाहावे, ज्याला पाहू बापदादाचे संस्कारच दिसून येतील.

वरदान:-
अहंकाराच्या अंशाचा पण त्याग करणारे, स्वमानधारी पुण्यात्मा भव.

स्वमानधारी मुलं सर्वांना मान देणारे असतात, दाता म्हणजे दयाळू असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही आत्म्याच्या प्रती संकल्प मात्र पण अहंकार राहत नाही. हे असे का? असे करायला नको होते?असे व्हायला नको, ज्ञान असे म्हणते का?हे पण सूक्ष्म रोब, अहंकाराचा अंश आहे परंतु स्वमानधारी पुण्यात्मे, जे खाली पडले आहेत, त्यांना पण उठवण्यास मदत करतील, सहयोगी बनवतील, तर कधीच हा संकल्प येऊ शकत नाही की, हे तर आपल्या कर्माचे फळ भोगत आहेत, करतील तर जरुर मिळेल‌. हा पडायलाच पाहिजे, असे संकल्प तुम्हा आत्म्याचे होऊ शकत नाहीत.

सुविचार:-
संतुष्ट आणि प्रसन्नतेची विशेषताच, उडत्या कलेचा अनुभव करवेल.