21-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, संगम युगावर तुम्हाला प्रेमाचे सागर बाबा प्रेमाचा वरसा देत आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वाना प्रेम द्या, क्रोध करू नका.

प्रश्न:-
आपले रजिष्टर ठीक ठेवण्यासाठी बाबांनी, तुम्हांला कोणता रस्ता सांगितला आहे?

उत्तर:-
बाबा तुम्हाला प्रेमाने राहण्याचा रस्ता सांगत आहेत, श्रीमत देत आहेत की, मुलांनो, प्रत्येका बरोबर प्रेमाने वागा, कोणाला पण दुःख देऊ नका. कर्मेंद्रियाद्वारे कधी पण कोणते उलटे कर्म करू नका. नेहमी स्वतःला तपासा कि, माझ्या मध्ये कोणता अवगुण तर नाही. मी लहरी तर नाही? मी कोणत्या गोष्टींमध्ये बिघडत तर नाही ?

गीत:-
ही पुरुषार्थ करण्याची वेळ चालली आहे. . . . .

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलानी गीत ऐकले. दिवसेंदिवस आपले घर किंवा ठिकाण जवळ येत आहे. आता जी कांही श्रीमत मिळत आहे, तिकडे दुर्लक्ष करू नका. बाबा चा आदेश मिळत आहे की, सर्वांना संदेश पोहोचवा. मुले जाणत आहेत की, लाखो करोडो ना, हा संदेश द्यायचा आहे. मग कधी तरी येतील. जेंव्हा अनेक होतील, तर अनेकांना संदेश मिळेल. बाबांचा संदेश सर्वांना मिळणारच आहे. संदेश फार सोपा आहे. फक्त सांगा, स्वतःला आत्मा समजून बाबाची आठवण करा, आणि कोणत्या पण कर्मेंद्रिया द्वारे मन्सा- वाचा, कर्मणा कोणते वाईट काम करू नका. अगोदर मना मध्ये येते, मग वाचे मध्ये येते. आता तुम्हाला खरे आणि खोटे समजण्याची बुध्दी आली पाहिजे, हे पुण्यांचे काम आहे, हे केले पाहिजे. मनामध्ये विचार येतो की, क्रोध करावा, आता बुध्दी तर मिळाली आहे, जर क्रोध केला तर ते पाप होऊन जाईल. बाबांची आठवण केल्याने, पुण्यात्मा बनाल, असे नाही कि, बरं आता केले नंतर करणार नाही. असे परत परत, करत राहिल्याने सवय होऊन जाते. मनुष्य असे कर्म करतात तर समजतात की, हे पाप नाही. विकारांमध्ये जाणे पाप समजत नाहीत. आता बाबांनी सांगितले आहे, हे मोठ्यातील मोठे पाप आहे, यावर विजय प्राप्त करायचा आहे, आणि सर्वांना बाबाचा संदेश द्यायचा आहे की, बाबा म्हणतात माझी आठवण करा. मृत्यू समोर उभा आहे. जेव्हा कोणी मरणाच्या दारी असतात, तर त्यांना म्हणतात की, ईश्वर पित्याची आठवण करा. ते समजतात हे ईश्वर पित्याजवळ चालले आहेत. परंतु ते लोक तर हे जाणत नाहीत की, ईश्वर पित्याची आठवण केल्याने काय होईल? कुठे जातील ? आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. ईश्वर पित्या जवळ तर कोणी जात नाही. तर आता तुम्हा मुलांना अविनाशी शिवबाबाची, अविनाशी आठवण करायची आहे. जेंव्हा तुम्ही तमोप्रधान दुःखी बनता. तेंव्हा तर एक-दोघांना म्हणतात की, ईश्वर पित्याची आठवण करा. सर्व आत्मे एक दोघाला सांगतात. सांगते तर आत्माच ना. असे नाही की, परमात्मा सांगत आहेत. आत्मा आत्म्याला सांगत आहे, बाबाची आठवण करा. हा एक सर्वसाधारण रिवाज आहे. मरणाच्या वेळी ईश्‍वराची आठवण करतात. ईश्वराची भीती वाटत राहते. समजतात की चांगल्या वाईट कर्माचे फळ ईश्वर देतात. वाईट काम केले तर ईश्वर धर्मराजा द्वारे फार शिक्षा देतील, त्यामुळे भिती राहते. बरोबर कर्माची भोगना तर असतेच ना. तुम्ही मुले आता कर्म, अकर्म, विकर्मा च्या गतीला समजत आहात. तुम्ही जाणता की हे कर्म, अकर्म आहे. आठवणी मध्ये राहून जे कर्म करतात, ते चांगले होते. रावण राज्यां मध्ये मनुष्य वाईटच कर्म करतात. रामराज्यां मध्ये कधी वाईट काम होत नाही. आता श्रीमत तर मिळत आहे. कुठे बोलावले जाते, हे केले पाहिजे कि नाही केले पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये विचारत राहा. समजा कोणी पोलीसाची नोकरी करत आहे, तर त्यांना पण सांगितले जाते, तुम्ही अगोदर प्रेमाने समजावून सांगा. खरे सांगितले नाही, तर मग मारा. प्रेमाने समजावून सांगितले तर हाती कांहीतरी येते, परंतु त्या प्रेमा मध्ये पण योगबळ असेल, तर त्या प्रेमाच्या ताकदीमध्ये कोणाला पण समजावले तर ते समजतील, त्यांना वाटेल, हे तर जसे ईश्वर समजावत आहेत. तुम्ही ईश्वराची मुलं योगी आहात ना. तुमच्या मध्ये पण ईश्वरीय ताकत आहे. ईश्वर प्रेमाचे सागर आहेत, त्यांच्या मध्ये ताकत आहे ना. सर्वांना वरसा देत आहेत. तुम्ही जाणता की स्वर्गांमध्ये फार प्रेम असते. आता तुम्ही प्रेमाचा पूर्ण वरसा घेत आहात. क्रमवारीने घेवून, पुरुषार्थ करून, प्रिय बनाल.

बाबा म्हणतात, कोणाला पण दुःख देऊ नका, नाही, तर दुःखी होऊन मराल. बाबा प्रेमाचा रस्ता सांगत आहेत. मना मध्ये आल्यानंतर ते चेहऱ्यावर पण येत राहते. कर्मेंद्रिया द्वारे केले तर रजिस्टर खराब होऊन जाते. देवतांच्या चाल चलन चे गायन करतात ना, त्यामुळे बाबा म्हणतात देवतांच्या पुजाऱ्याला समजावून सांगा. ते महिमा गातात की, तुम्ही सर्वगुणसंपन्न, 16 कला संपूर्ण आहात आणि आपली चाल चलन पण सांगतात. तर त्यांना समजावा की, तुम्ही असे होता, आता तसे नाहीत, नंतर तसे जरूर बनाल. तुम्हांला असे देवता बनायचे आहे, तर आपले वागणे असे ठेवा, तर तुम्ही असे बनाल. स्वतःची तपासणी करा की, आम्ही संपूर्ण निर्विकारी आहोत? आमच्या मध्ये कोणता आसूरी गुण तर नाही? कोणत्या गोष्टींमध्ये बिघडत तर नाही, लहरी तर बनत नाही? अनेक वेळा तुम्ही पुरुषार्थ केला आहे. बाबा म्हणतात, तुम्हाला असे बनायचे आहे. बनविणारे पण प्रत्यक्षात बाबा आले आहेत. म्हणतात की कल्प, कल्प तुम्हाला असे बनवीत आहे. कल्पा पूर्वी ज्यांनी ज्ञान घेतले होते, ते जरूर येऊन घेतील. पुरषार्थ पण करविला जातो, आणि बेफिकर पण राहतात. विश्व नाटकां मध्ये तशी नोंद आहे. कोणी म्हणतात की, विश्वनाटकात असेल तर जरूर करू. चांगला चार्ट असेल तर नाटकानुसार होईल. समजले जाते की, याच्या नशिबा मध्येच नाही. अगोदर पण असा एक बिघडला होता, नशिबा मध्ये नव्हते, तर म्हणाला की, विश्व नाटकात असेल, तर नाटक माझ्या कडून पुरुषार्थ करून घेईल. त्यानंतर तो सोडून गेला. असे तुम्हांला पण फार भेटतील. तुमचे मुख्य लक्ष्य तर समोर आहे. बैज पण तुमच्या जवळ आहे, जसा आपला जमाखर्च पाहता, तसे बैजला पण पहा, आपले वागणे बोलणे पण पहा. कधी पण विकारी द्रुष्टी जावू नये. मुखा द्वारे कोणती वाईट गोष्ट निघू नये. वाईट बोललेच नाही तर कान ऐकतील कसे? सतयुगा मध्ये सर्व दैवीगुण वाले असतात. वाईट कोणती गोष्टच नाही. त्यांनी पण प्रालब्ध, बाबा कडूनच प्राप्त केली आहे. हे तर सर्वांना सांगा, बाबाची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. यामध्ये नुकसानी ची कोणती गोष्ट नाही. संस्कार आत्मा घेऊन जाते. संन्यासी असेल तो परत संन्यासधर्मा मध्येच जाईल. त्यांचे झाड वाढत राहते ना. यावेळी तुम्ही बदलत आहात. मनुष्यच देवता बनतात. सर्व कांही एकदाच येत नाहीत. येतील पण क्रमा क्रमाने, नाटका मध्ये कोणाची वेळ नसेल तर तो थोडाच स्टेजवर येईल, आतमध्ये बसून राहील. जेंव्हा वेळ येते, त्यावेळी बाहेर स्टेजवर येऊन, आपली भूमिका बजावील. ते आहे हदचे नाटक, हे आहे बेहद चे नाटक. व बुध्दीमध्ये आहे की, आम्हा कलाकारांना आपल्या वेळेवर येऊन, स्वतःची भूमिका बजावयाची आहे. हे बेहदचे मोठे झाड आहे. क्रमवारीने येत जात राहतात. पहिल्या प्रथम एकच धर्म होता, सर्व धर्मवाले तर पहिल्या प्रथम येत नाहीत. अगोदर देवी देवता धर्मवाले येतील, भूमिका करण्यासाठी. ते पण क्रमवारीने. झाडाच्या रहस्याला पण समजावयाचे आहे. बाबाच येऊन साऱ्या कल्पवृक्षाचे ज्ञान सांगत आहेत. याची तुलना मग निराकारी झाडा बरोबर करतात. एक बाबाच म्हणतात, मनुष्य झाडाचा, मी बीज आहे. बीजा मध्ये झाड सामावलेले नाही, परंतु झाडाचे ज्ञान सामावलेले आहे. प्रत्येकाची आपली आपली भूमिका आहे. चैतन्य झाड आहे ना. झाडाची पाने पण क्रमवारीने निघतात. या झाडाला कोणी पण समजत नाही, याचे बीज वर आहे, त्यामुळे याला उलटा वृक्ष म्हटले जाते. रचनाकार बाबा वर आहेत. तुम्हीं जाणता की, आम्हाला घरी जायचे आहे, जिथे आत्मे राहतात. आता आम्हाला पवित्र बनून जायचे आहे. तुमच्या द्वारे योगबळाने सारे विश्व पवित्र होऊन जाते. तुमच्यासाठी तरी पवित्र सृष्टी पाहिजे ना. तुम्ही पवित्र बनता तर दुनिया पण पवित्र बनवली पाहिजे. सर्व पवित्र होऊन जातात. तुमच्या बुध्दी मध्ये आहे, आत्म्या मध्येच मन, बुध्दी आहे ना, चैतन्य आहे. आत्माच ज्ञानाला धारण करू शकते. तर गोड गोड मुलांनी, हे सारे रहस्य बुध्दी मध्ये ठेवले पाहिजे- कसे आम्ही पुनर्जन्म घेत आहोत. ८४ चे चक्र, तुमचे पूर्ण झाले, तर इतर सर्वांचे पूर्ण होते. सर्व पावन बनतात. हे अनादि बनलेले, विश्वनाटक आहे. एक सेकंद पण थांबत नाही. सेकंदा सेकंदाला जे काही होत आहे, ते परत कल्पा नंतर होईल. प्रत्येक आत्म्यां मध्ये अविनाशी भूमिका भरलेली आहे. ते कलाकार तर २-४ तासाची भूमिका करतात. इथे तर आत्म्याला नैसर्गिक भूमिका मिळालेली आहे, तर मुलांना किती खुशी झाली पाहिजे. अतींद्रिय सुखाचे गायन संगमयुगातील आहे. बाबा येतात, एकवीस जन्मासाठी, आम्ही सदासुखी बनतो. खुशी ची गोष्ट आहे ना. जे चांगल्या रीतीने समजतात आणि समजावून सांगतात, ते सेवे मध्ये लागतात. कांही मुले जर स्वतःच क्रोधी असतील, तर क्रोध दुसऱ्या मध्ये पण प्रवेश होऊन जातो. टाळी दोन हाताने वाजते. आहे. तेथे असे होत नाही. इथे तुम्हा मुलांना शिक्षण मिळत आहे- कोणी क्रोध करेल तर तुम्ही त्याच्यावर फुले चढवा. प्रेमाने समजावा. हे पण एक भूत आहे, फार नुकसान करत आहे. क्रोध कधी केला नाही पाहिजे. शिकवणाऱ्या मध्ये तर क्रोध बिल्कुल नसला पाहिजे. क्रमवारीने पुरुषार्थ करत आहेत. कोणाचा तीव्र पुरुषार्थ आहे, तर कोणाचा थंड. थंड पुरुषार्थ वाले जरूर स्वतःची बदनामी करतील. कोणा मध्ये क्रोध असेल तर ते जेथे जातात तेथून काढून टाकतात. कोणी पण वाईट वागणारे तेथे राहू शकत नाहीत. परीक्षा जेंव्हा पूर्ण होईल, तर सर्वाना माहित पडेल. कोण कोण, काय बनणार आहे, सर्व साक्षात्कार होईल. जे जसे काम करतात, त्यांची तशी महिमा होते.

तुम्ही मुले विश्व नाटकाच्या आदि मध्य अंता ला जाणत आहात. तुम्ही सर्व अंतर्यामी आहात. आत्मा मनातून जाणते की, हे सृष्टी चक्र कसे फिरत आहे. साऱ्या सुष्टीतील, मनुष्यांची चाल चलन, आणि सर्व धर्माचे तुम्हाला ज्ञान आहे. त्याला म्हटले जाते- अंतर्यामी. आत्म्याला सर्व माहिती पडले आहे. असे नाही की, भगवान घटा घटा मध्ये आहे, त्यांना ओळखण्याची काय गरज आहे? ते तर आता पण म्हणत आहेत की, जो जसा पुरुषार्थ करेल, तसे फळ प्राप्त करील. मला जाणण्याची काय गरज आहे. जो करत आहे, त्याची शिक्षा पण स्वतःच भोगत आहे. असे वाईट वागाल तर अधम गतीला प्राप्त कराल. पद फार कमी मिळेल, त्या शाळेमध्ये जर नापास झाले, तर मग दुसऱ्या वर्षाला शिकतात. हे शिक्षण तर कल्प कल्पासाठी आहे. आता शिकले नाहीत, तर कल्प कल्पांतर शिकणार नाहीत. ईश्वरीय लॉटरी तर पूर्ण घेतली पाहिजे ना. या गोष्टी, तुम्ही मुले समजू शकता. जेंव्हा भारत सुखधाम असतो, तेंव्हा बाकी सर्व शांतीधाम मध्ये असतात. मुलांना खुशी झाली पाहिजे, आता आमचे सुखाचे दिवस येत आहेत. दिवाळीचे दिवस जवळ आले तर म्हणतात ना, बाकी एवढ्या दिवसा नंतर मग नवीन कपडे घालू. तुम्ही पण म्हणता स्वर्ग येत आहे, आम्ही आमचा शृंगार केला, तर मग स्वर्गामध्ये चांगले सुख मिळेल. सावकारांना तर सावकारीचा नशा राहतो. मनुष्य फारच घोर आंधारा मध्ये आहेत, मग अचानक माहित पडले, हे तर खरे सांगत होते. खऱ्याला तर तेंव्हा समजतील, जेंव्हा खऱ्याचा संग मिळेल. तुम्ही आता खऱ्याच्या संगा मध्ये आहात. तुम्ही खरे बनत आहात, खऱ्या बाबाद्वारे. ते सर्व असत्य बनत आहेत, असत्याद्वारे. आता फरक पण छापत आहात की, भगवान काय करत आहेत आणि मनुष्य काय करत आहेत. मासिकामध्ये पण छापू शकता. शेवटी विजय तर तुमचा होणार आहे. ज्यांनी कल्पा पुर्वी पद प्राप्त केले आहे ते जरूर प्राप्त करतील. हे निश्चित आहे. तेथे अकाले मृत्यू होत नाही. आयुष्य पण फार मोठे असते. जेंव्हा पवित्रता होती, तर फार आयुष्य होते. पतितपावन परमात्मा बाबा आहेत, तर जरूर त्यांनीच पावन बनविले असेल. कृष्णाची गोष्ट तर शोभत नाही. पुरुषोत्तम संगमयुगावर कृष्ण कोठून येतील. त्याच चेहऱ्याचा मनुष्य तर आसत नाही. ८४ जन्म, ८४ चेहरे, ८४ कर्म. हा बनलेला खेळ आहे. त्यामध्ये फरक पडू शकत नाही. विश्व नाटक असे आश्चर्यकारक बनलेले आहे. आत्मा छोटी बिंदी आहे. त्यामध्ये अनादि भूमिका भरलेली आहे. यालाच निसर्ग म्हटले जाते. मनुष्य ऐकून आश्चर्य खातात. परंतु प्रथम हा तर संदेश द्या की, बाबाची आठवण करा. तेच पतित पावन आहेत, सर्वांचे सद्गती दाता आहेत. सतयुगा मध्ये दुःखाची गोष्ट असत नाही. कलियुगा मध्ये तर किती दुःख आहे. परंतु या गोष्टी समजणारे क्रमवार आहेत. बाबा तर रोज समजावत राहतात. तुम्ही मुले जाणता की, शिवबाबा आले आहेत, आम्हाला शिकण्यासाठी, मग बरोबर घेऊन जातील. जवळ राहणाऱ्या पेक्षा, बंधनयुक्त माता, कन्या जास्त आठवण करतात. त्या उंच पद प्राप्त करू शकतात. हे पण समजून घेण्याची गोष्ट आहे ना. बाबाच्या आठवणी मध्ये फार तडपत राहतात. बाबा म्हणतात की, मुलांनो, आठवणी च्या यात्रे मध्ये राहा, दैवीगुण पण धारण करा, तर बंधन नाहीसे होतील. पापाचा घडा नष्ट होऊन जाईल. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती, मात-पिता, बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आपली चाल चलन देवता सारखी बनवायची आहे. कोणते पण वाईट बोल, मुखाद्वारे बोलायचे नाहीत. हे डोळे कधी विकारी होऊ नयेत.

(२) क्रोधाचे भुत फार नुकसान करते. टाळी दोन हाताने वाजते, त्यामुळे कोणी क्रोध केलात तर त्यापासून किनारा केला पाहिजे. त्यांना प्रेमाने समजावयाचे आहे.

वरदान:-
अव्यक्त स्वरूपाच्या साधनेद्वारे शक्तिशाली वातावरण बनविणारे अव्यक्त फरिश्ता भव:

वातावरणाला शक्तिशाली बनवण्याचे साधन आहे, स्वतःच्या अव्यक्त स्वरूपाची साधना. याचे वारंवार ध्यान ठेवा की, ज्या गोष्टीची साधना केली जाते, त्या गोष्टीचे ध्यान राहते. तर अव्यक्त स्वरूपाची साधना म्हणजे वारंवार लक्ष देण्याची तपस्या पाहिजे, त्यामुळे अव्यक्त फरिश्ता भव चे वरदान आठवणी मध्ये ठेवून, शक्तिशाली वातावरण बनविण्याची तपस्या करा, तर तुमच्या समोर जो पण येईल, तो व्यक्त आणि व्यर्थ गोष्टी पासून दूर जाईल.

बोधवाक्य:-
सर्वशक्तिमान बाबाला प्रत्यक्ष करण्यासाठी एकाग्रतेच्या शक्तीला वाढवा.