03-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, आठवणी द्वारे सतोप्रधान बनण्याच्या सोबतच राज योगाच्या शिक्षणाद्वारे कमाई
करायची आहे, मुरली किंवा योगाच्या वेळेत, बुद्धी इकडे तिकडे जायला नको"
प्रश्न:-
तुम्ही दुहेरी
अहिंसक, गुप्त योध्द्यांचा कोणता विजय निश्चित आहे आणि का?
उत्तर:-
तुम्ही मुलं मायेवरती, विजय मिळवण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुमचे लक्ष आहे की,
आम्ही रावणा पासून आपले राज्य घेऊनच दाखवू, ही पण वैश्विक नाटकामध्ये युक्ती आहे.
तुमचा विजय निश्चित आहे, कारण तुमच्या सोबत साक्षात परमपिता परमात्मा आहेत. तुम्ही
योग बळाद्वारे विजय मिळवतात. मनामनाभव च्या महामंत्रा द्वारे तुम्हाला राजाई मिळते.
तुम्ही अर्धा कल्प राज्य करतात.
गीत:-
हे प्राणी आपला
चेहरा मन दर्पण मध्ये पहा…
ओम शांती।
गोड गोड मुलं जेव्हा समोर आहेत, तर समजतात बरोबर आमचे कोणी साकारी शिक्षक नाहीत.
आम्हाला शिकवणारे तर ज्ञानाचे सागर शिवबाबा आहेत. हा तर पक्का निश्चय आहे की, ते
आमचे पिता पण आहेत. जेव्हा शिकतात तर शिक्षणा वरती लक्ष राहते. विद्यार्थी आपल्या
शाळेमध्ये असतील तर, शिक्षक आठवणीत येतील, ना की, पिता कारण शाळेमध्ये बसले आहेत.
तुम्ही पण जाणता, बाबा शिक्षक पण आहेत. नावाला तर पकडायचे नाही ना, लक्षामध्ये
ठेवायचे आहे, आम्ही आत्मा आहोत. बाबा पासून ऐकत आहोत, असे तर कधी होत नाही. न
सतयुगामध्ये होते, ना कलियुगामध्ये होते, फक्त एकाच संगमयुगा मध्ये होते. तुम्ही
स्वतःलाआत्मा समजतात. आमचे पिता या वेळेत शिक्षक पण आहेत, कारण शिकवतात, दोन्ही काम
करावे लागतात. आत्मा बाबा द्वारे शिकते. हे पण योग आणि शिक्षण होते. आत्मा शिकते तर
परमात्मा स्वतः शिकवत आहेत. यावेळेत आणखी जास्त फायदा आहे, जेव्हा तुम्ही सन्मुख
आहात. अनेक मुलं चांगल्यारितीने आठवणी मध्ये राहतात. कर्मातीत अवस्थांमध्ये पोहोचाल,
तर ती पण जशी पवित्रतेची शक्ती मिळते. तुम्ही जाणतात, शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत.
हा तुमचा योग पण आहे आणि कमाई पण आहे. आत्म्याला सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही
सतोप्रधान बनत आहात आणि धन पण घेत आहात. स्वतःला आत्मा समजायचे आहे. बुद्धी इकडे
तिकडे जायला नको. येथे बसतात तर बुद्धीमध्ये राहिले पाहिजे की, शिवबाबा शिक्षकाच्या
रूपामध्ये शिकवण्यासाठी आले की आले. तेच ज्ञानचे सागर, आम्हाला शिकवत आहेत. बाबांची
आठवण करायची आहे. स्वदर्शन चक्रधारी पण आम्ही आहोत, प्रकाश स्तंभ पण आहोत. एका
डोळ्यांमध्ये शांतीधाम, तर दुसऱ्या डोळ्यांमध्ये जीवन मुक्तिधाम आहे. या डोळ्याची
गोष्ट नाही. आत्म्याला तिसरा नेत्र म्हटले जाते. आत्मे ऐकत आहेत, जेव्हा शरीर सोडाल
तर आत्म्या मध्ये हे संस्कार राहतील. आत्ता तुम्ही बाबांशी योग लावतात. सतयुगा
पासून तुम्ही वियोगी होते, अर्थात बाबांशी योग नव्हता. आता तुम्ही बाबासारखे योगी
बनत आहात. योग शिकवणारे ईश्वर आहेत म्हणून त्यांना योगेश्वर म्हटले जाते. तुम्ही पण
योगेश्वरची मुलं आहात. त्यांना योग लावायचा नाही, ते योग शिकवणारे परमपिता परमात्मा
आहेत. तुम्ही एक-एक योगेश्वर योगेश्वरी बनतात, परत राज-राजेश्वरी बनाल. ते योग
शिकवणारे ईश्वर आहेत, स्वतः शिकत नाहीत, शिकवत आहेत. कृष्णाची आत्मा पण अंतिम
जन्मामध्ये योग शिकून परत कृष्ण बनते, म्हणून कृष्णाला पण योगेश्वर म्हणतात, कारण
त्यांची आत्मा पण शिकत आहे. योगेश्वर द्वारे योग शिकून कृष्ण पद मिळते, त्यांचे नाव
परत बाबांनी ब्रह्मा ठेवले आहे. अगोदर लौकिक नाव होते, परत मरजीवा बनले. आत्म्यालाच
बाबाचे बनायचे आहे. बाबाचे बनले तर अनासक्त झाले अर्थात या दुनिया पासून जिवंतपणे
मेले. तुम्हीपण बाबा द्वारे योग शिकत आहात. या संस्कारा द्वारेच तुम्ही शांतीधाम
मध्ये जाल, परत नवीन भूमिकेचे प्रारब्ध स्पष्ट होईल. तेथे या गोष्टी नसतात. या
आत्ताच बाबा समजवतात. आता भूमिका पूर्ण होत आहे, परत नव्याने सुरू होईल. जसे बाबाला
संकल्प आला की, मी जाऊन येतो. बाबा म्हणतात मी येतो आणि माझी वाणी चालायला सुरू होते.
तेथे तर शांतीच आहे, परत वैश्विक नाटका नुसार त्यांची भूमिका सुरू होते. येण्याचा
तर संकल्प येतो, परत येथे येऊन भूमिका वठवतात. तुमची आत्मा पण, क्रमानुसार
पुरुषांप्रमाणे, पूर्वीप्रमाणे ऐकते. दिवसेंदिवस वृध्दी होत जाईल. एक दिवस तुम्हाला
मोठ- मोठे हॉल पण मिळतील, त्यामध्ये मोठ-मोठे लोक येतील. सर्व एकत्र बसतील.
दिवसेंदिवस सावकार पण गरीब होत जातील, पोट पाठीला लागेल. असे संकट येणार आहेत,
मुसळधार पाऊस पडेल, तर सर्व शेती इत्यादी पाण्यामध्ये बुडून जाईल. नैसर्गिक आपत्ती
तर येणार आहेत, विनाश पण होणार आहे. याला नैसर्गिक आपत्ती म्हणतात. बुद्धी म्हणते
विनाश होणार आहे. त्यासाठी बाँम्बस पण तयार आहेत. नैसर्गिक आपत्ती इत्यादी परत
भारतासाठी आहेत. यामध्ये खूप हिमंत पाहिजे. अगंदचे पण उदाहरण आहे, त्याला कोणी हलवू
शकले नाही. अशी अवस्था पक्की करायची आहे की, मी आत्मा आहे, तर शरीराचे भान निघून
जाईल. सतयुगामध्ये जेव्हा वेळ पूर्ण होतो, तर साक्षात्कार होतो. आता मला हे शरीर
सोडून मुलगा बनायचे आहे. एक शरीर सोडून दुसऱ्या मध्ये प्रवेश करतात. सजा इत्यादी
तेथे काहीच नसते. तुम्ही जवळ येत जाल. बाबा म्हणतात माझ्यामध्ये ज्या भूमिकेची नोंद
आहे, ते उघडत जाईल. मुलांना सांगत जातील, परत बाबांची भूमिका पूर्ण होईल आणि तुमची
पण पूर्ण होईल. परत तुमची सतयुगातील भुमिका सुरू होईल. आता तुम्हाला आपले राज्य
घ्यायचे आहे. हे वैश्विक नाटक, मोठ्या युक्तीने बनले आहे. तुम्ही मायेवरती विजय
मिळवतात, यामध्ये वेळ लागतो. ते लोक एकीकडे समजतात, आम्ही स्वर्गामध्ये बसलो आहोत.
हे सुखधाम बनले आहे. दुसरीकडे गीता मध्ये गातात, भारताचे हाल ऐकवत राहतात. तुम्ही
जाणतात हे तर आणखीनच तमोप्रधान झाले आहेत. वैश्विक नाटका नुसार तमोप्रधान पण जोरात
होत जातात. आता तुम्ही सतोप्रधान बनत आहात. आता जवळ येत जातात, शेवटी विजय तर होणार
आहेच. हाहाकार होईल, त्यानंतर परत जयजयकार होईल. दुधा तुपाच्या नद्या वाहतील. तेथे
तूप इत्यादी खरेदी करावे लागत नाही. सर्वांच्या जवळ आप-आपल्या चांगल्या गाई असतात.
तुम्ही खूप उच्च बनतात. तुम्ही जाणतात, विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत
आहे. बाबा येऊन विश्वाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतात, म्हणून बाबांनी म्हटले आहे,
हे पण लिहा विश्वाच्या इतिहास भूगोलाची कशी पुनरावृत्ती होते, हे येऊन समजून घ्या.
जे पण समजदार असतील, तर ते म्हणतील आत्ता लोहयुग आहे, तर जरूर स्वर्ण युगाची
पुनरावृत्ती होईल. काही तर म्हणतील, सृष्टीचे चक्र लाखो वर्षाचे आहे. आता कसे
पुनरावृत्त होईल. येथे सूर्यवंशी चंद्रवंशीचा इतिहास तर नाही ना, शेवटपर्यंत हे
चक्र कसे पुनरावृत्त होत राहते. ते पण जाणत नाहीत, यांचे राज्य परत कधी असेल. राम
राज्याला जाणत नाहीत. आता तुमच्या सोबत शिव पिता आहेत. ज्यांच्याकडे साक्षात परमपिता
परमात्मा आहेत, त्यांचा विजय जरूर होईल. बाबा हिंसा थोडेच करतील. कोणालाही मारणे
हिंसा आहे ना. सर्वात मोठी हिंसा कामकटारी चालवणे आहे. आता तुम्ही डबल अहिंसक बनत
आहात. तेथे आहेच अहिंसा देवी देवता धर्म. तेथे न लढाई करतात, ना विकारा मध्ये जातात.
आत्ता तुमचे योगबळ आहे, परंतु याला न समजल्यामुळे ग्रंथांमध्ये आसुर आणि देवतांची
लढाई दाखवली आहे. अहिंसाला कोणी जाणत नाहीत. हे तुम्हीच जाणतात. तुम्ही गुप्त योध्दे
आहात, गुप्त असून प्रसिद्ध पण आहात. तुम्हाला कोणी योध्दे समजतील का?तुमच्या द्वारे
सर्वांना मनामनाभवचा संदेश मिळेल. हा महामंत्र आहे. मनुष्य या गोष्टींना समजत नाहीत.
सतयुग त्रेता मध्ये, हे होत नाही. या मंत्राद्वारे तुम्ही राजाई मिळवली, परत
आवश्यकता नाही. तुम्ही जाणता, आम्ही कसे चक्र लावून आलो. आता परत बाबा महामंत्र
देतात, परत अर्धा कल्प राज्य कराल. आताच तुम्हाला दैवीगुण धारण करायचे आणि करावयाचे
पण आहेत. बाबा मत देतात, आपला चार्ट, दिनचर्या ठेवण्यामध्ये खूप मजा येईल. रजिस्टर
मध्ये पण चांगले, त्यापेक्षा चांगले आणि सर्वात चांगले असते ना. स्वतःला पण जाणीव
होते ना. कोणी चांगला अभ्यास करतात, तर कोणाचे लक्ष लागत नाही, तर नापास होतात. हे
परत बेहदचे शिक्षण आहे. पिता शिक्षक पण आहेत, गुरु पण आहेत, एकत्र चालतात. हे एकच
पिता म्हणतात, तुम्ही स्वतःला आत्मा समजून पित्याची आठवण करा. मी तुमचा पिता आहे,
ब्रह्मा द्वारे राज्य देतो. तर हा मध्येच दलाल झाला, यांच्याशी योग लावायचा नाही.
आता तुमची बुद्धी, त्या पतींच्या पती, शिव साजनच्या सोबत लागली आहे. यांच्याद्वारे
तुम्हाला आपले बनवतात. ते म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. आम्ही
आत्म्याने भूमिका पूर्ण केली, आता पित्याकडे परत घरी जायचे आहे. आता तर सर्व सृष्टी
तमोप्रधान आहे. पाच तत्व पण तमोप्रधान आहेत. तेथे तर सर्व काही नवीन होईल. येथे तर
हिरे मोती इत्यादी काहीच नाहीत. सतयुगा मध्ये परत कुठून येतील?खाणी आता रिकाम्या
झाल्या आहेत, त्या परत भरतील. खाणी मधून खोदून हिरे-मोती घेऊन येतील. विचार करा
सर्व नवीन गोष्टी होतील. प्रकाश इत्यादी पण जसे नैसर्गिक राहतो. विज्ञान द्वारे येथे
शिकत राहतात, तेथे विज्ञान पण कामाला येईल. हेलिकॅप्टर घरा समोर उभे राहतील. बटन
दाबले आणि उडतील. काहीच कष्ट नाहीत. तेथे सर्व फुलप्रूफ, अपघात विरहीत राहतात.
अपघात इत्यादी होत नाहीत. कधी मशीन इत्यादी खराब होऊ शकत नाही. घरामध्ये बसून
सेकंदामध्ये शाळेमध्ये किंवा फिरायला जाऊ शकतात. प्रजेसाठी परत त्यापेक्षा कमी
प्रतीचे असतील. तुमच्यासाठी तेथे सर्व सुख असतात. अचानक मृत्यू होऊ शकत नाहीत. तर
तुम्हा मुलांना खूप लक्ष द्यायला पाहिजे. मायेचा पण जोर खूप आहे. हा मायेचा अंतिम
दिखावा आहे. लढाई मध्ये किती मरतात. लढाई बंद होत नाही. कुठे इतकी सारी दुनिया, कुठे
फक्त एक स्वर्गच असेल. तेथे असे थोडेच म्हणतील, गंगा पतित पावनी आहे. तेथे
भक्तिमार्गाची कोणतीच गोष्ट नसते. येथे गंगानदी मध्ये तर शहराचा सर्व कचरा पडत राहतो.
मुंबईचा सर्व कचरा समुद्रामध्ये वाहत जातो. भक्तीमध्ये तुम्ही मोठे मंदिर बनवतात,
हिऱ्या-मोत्याचे सुख तर राहते ना. पाऊन हिस्सा सुख आहे, पाव हिस्सा दु:ख आहे. जर
अर्धे-अर्धे असेल तर, परत मजा राहणार नाही. भक्तिमार्गा मध्ये पण तुम्ही खूप सुखी
राहतात. अंत काळात मंदिराला लुटत आले आहेत. सतयुगा मध्ये तुम्ही खूप सावकार होते.
तर तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे. मुख्य लक्ष समोर आहे, मातपित्याचे तर
निश्चित आहे. गायन पण आहे, खुशी सारखा खुराक नाही. योगाद्वारे आयुष्य वाढते.
आत्म्याला स्वतःचे दर्शन झाले आहे की, आम्ही ८४ चे चक्र लावतो. इतकी भूमिका वठवतो.
सर्व आत्मे, कलाकार खाली येतील, तर बाबा सर्वांना घेऊन जातील. शिवा ची वरात म्हणतात
ना. हे सर्व तुम्ही मुलं क्रमानुसार पुरुषांप्रमाणे जाणतात. जितके आठवणीमध्ये राहाल,
तेवढी खुशी राहील. दिवसेंदिवस तुम्हाला जाणीव होत आहे, कारण शिकवणारे तर पिता आहेत
ना. हे पण शिकवत राहतात, यांना म्हणजे ब्रह्माला विचारण्याची आवश्यकता राहत नाही.
तुम्ही तर विचारत राहतात. हे तर ऐकत राहतात. त्यांचे कार्य खूपच आश्चर्यकारक आहे.
हे पण आठवणीमध्ये राहतात, परत मुलांना वर्णन करून सांगतात. बाबा मला खाऊ घालतात.
यांना आपला रथ देतो, तर का नाही खाऊ घालणार? हा मानवी घोडा आहे. शिवबाबांचा रथ आहे,
असे विचार केल्यामुळे, बाबांची आठवण राहील. आठवणी मध्येच फायदा आहे. भंडाऱ्या मध्ये
भोजन बनवतात, तरी पण समजा आम्ही बाबांच्या मुलांसाठी बनवत आहोत. स्वत: पण शिवबाबाची
मुलं आहोत, अशी आठवण केल्यामुळे फायदाच आहे. सर्वात जास्त पद पण, त्यांनाच मिळेल,
जे आठवणी मध्ये राहून कर्मातीत अवस्था प्राप्त करतात आणि सेवा पण करतात. हे बाबा पण
खूप सेवा करत राहतात ना. यांची बेहदची सेवा आहे, तुमची हदची सेवा आहे. सेवा द्वारेच
यांना पद मिळते. शिव बाबा म्हणतात, असे-असे करा, यांना पण मत देतात. मुलांना वादळ
तर येतात. आठवणींशिवाय कर्मेंद्रिया वश होणे असंभव आहे. आठवणी द्वारेच नाव
किनार्याला लागेल. हे शिव बाबा म्हणतात की ब्रह्मा म्हणतात, हे समजणे पण कठीण आहे.
यामध्ये खूप सूक्ष्म बुद्धी पाहिजे, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या वेळेत
पूर्णपणे मरजीवा बनायचे आहे. ज्ञान चांगल्या प्रकारे घ्यायचे आहे. आपला चार्ट किंवा
दिनचर्या लिहायची आहे. आठवणीमध्ये राहून आपली कर्मातीत अवस्था बनवायची आहे.
२)अंतिम विनाशाचे दृश्य पाहण्यासाठी हिंमतवान बनायचे आहे. मी आत्मा आहे, या
अभ्यासाद्वारे शरीराचे भान नष्ट होत जाईल.
वरदान:-
कोणत्याही
विकराळ समस्येला शितल बनवणारे, संपूर्ण निश्चियबुध्दी भव.
जसे बाबामध्ये निश्चय
आहे, तसेच स्वतःमध्ये आणि वैश्विक नाटकामध्ये पण संपूर्ण निश्चय हवा. स्वतःमध्ये जर
कमजोरीचा संकल्प येत असेल, तर कमजोरीचे संस्कार बनतात, म्हणून व्यर्थ संकल्प,
कमजोरीचे किटाणू आपल्या मनामध्ये प्रवेश होऊ द्यायचे नाहीत. सोबत जे पण वैश्विक
नाटकाचे दृश्य पाहतात, हलचलच्या दृश्या मध्ये पण कल्याण अनुभव व्हावा. वातावरण
गोंधळाच्या असेल, समस्या विकराळ असतील परंतु नेहमी निश्चय बुद्धी विजयी बना, तर
विकराळ समस्या पण शितल होतील.
बोधवाक्य:-
ज्यांचे बाबा
आणि सेवेशी प्रेम आहे, त्यांना परिवाराचे प्रेम स्वतःच मिळते.