18-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही विश्वा मध्ये शांती स्थापन करण्यासाठी निमित्त आहात. त्यामुळे
तुम्हाला कधीच अशांत व्हायचे नाही.
प्रश्न:-
बाबा कोणत्या
मुलांना आज्ञाकारी मुले म्हणतात ?
उत्तर:-
बाबाची मुख्य आज्ञा आहे की, मुलांनो, अमृतवेळेला (पहाटे) उठून बाबाची आठवण करा, या
मुख्य आज्ञेला पालन करतात, पहाटे लवकर स्नान इ. करून फ्रेश होऊन, ठरलेल्या वेळेवर
आठवणीच्या यात्रेमध्ये बसतात, बाबा त्यांना सपूत किंवा आज्ञाकारी म्हणतात, ते जाऊन
राजा बनतील, कपूत मुले तर झाडू मारतील.
ओम शांती।
याचा अर्थ तर मुलांना समजावला आहे. ओम म्हणजे मी आत्मा आहे. असे सर्व म्हणतात की,
जीवात्मा जरूर आहे आणि सर्व आत्म्यांचा एक पिता आहे. शरीरांचे पिता वेगवेगळे आहेत.
हे पण मुलांच्या बुद्धी मध्ये आहे, हदच्या पित्याकडून हदचा आणि बेहदच्या पित्याकडून
बेहदचा वरसा मिळत आहे. आता या वेळी मनुष्य विश्वामध्ये शांती पाहिजे म्हणतात. जर
चित्रावर समजावले तर शांतीसाठी, कलियुगाचा अंत आणि सतयुगाच्या सुरुवातीच्या
संगमयुगावर आले पाहिजे. हे सतयुग आहे नवीन दुनिया, त्यामध्ये एकच धर्म असतो,
त्यामुळे पवित्रता शांती सुख सर्व आहे. त्याला स्वर्ग म्हटले जाते. हे तर सर्व
मानतील. नवीन दुनियेमध्ये सुख आहे, दु:ख आसतच नाही. कोणाला पण समजावणे फार सोपे आहे.
शांती आणि अशांती ची गोष्ट या विश्वावरच होते. ते तर आहेच निर्वाण धाम, जिथे शांती,
अशांती चा प्रश्नच येत नाही. मुले जेंव्हा भाषण करतात, त्यावेळी पहिल्याप्रथम विश्वा
मध्ये शांती कशी होईल, ही गोष्ट सांगितली पाहिजे. मनुष्य शांती साठी फार प्रयत्न
करत आहेत, त्यांना बक्षीस पण मिळते. खरेतर यामध्ये भाग- दौड करण्याची गोष्टच नाही.
बाबा म्हणतात, फक्त आपल्या स्वधर्मा मध्ये राहा, तर विकर्म विनाश होतील. स्वधर्मा
मध्ये स्थिर झाल्याने, शांती मिळेल. तुम्ही आहात नेहमीच शांत पित्याची मुले. हा वरसा
त्यांचेकडून मिळत आहे. त्याला कांही मोक्ष म्हणत नाहीत. मोक्ष तर परमेश्वराला पण
मिळत नाही, परमेश्वराला पण भूमिका करण्यासाठी जरूर यावे लागते. म्हणतात कि, कल्प
कल्पाच्या संगमयुगावर मी येत आहे. तर ईश्वरालाच मोक्ष नाही, तर मग मुले मोक्ष कसे
प्राप्त करतील. या गोष्टी सारा दिवस, विचार सागर मंथन करण्याच्या आहेत. बाबा तर
तुम्हा मुलांना समजावत आहेत. तुम्हा मुलांना समजून सांगण्याची प्रॅक्टिस जास्त आहे.
शिवबाबा समजावत आहेत, तर तुम्ही सर्व ब्राह्मण पण समजत आहात. विचार सागर मंथन
तुम्हाला करावयाचे आहे. सेवेवर तुम्ही मुले आहात. तुम्हाला तर फार समजावे लागते.
दिवस-रात्र सेवेमध्ये राहता. अध्यात्मिक संग्रहालया मध्ये सारा दिवस लोक येतच
राहतात. कोठे कोठे तर रात्री १०-११ वाजेपर्यंत येतात. कोठे कोठे तर पहाटे ४
वाजल्यापासून सेवा करण्यास सुरू करतात. हे तर घर आहे, जेंव्हा वाटते तेंव्हा बसू
शकता. सेंटरवर तर बाहेरून दुरुन येतात, त्यामुळे वेळ ठरवावी लागते. इथे तर कोणत्याही
वेळी मुले उठू शकतात, परंतु अशावेळी पण अभ्यास करू नये, जेंव्हा मुले उठतील आणि
जांभळ्या, डुलक्या देत राहतील, त्यामुळे पहाटेची वेळ ठेवलेली आहे. त्यावेळेस स्नान
इ. करून, फ्रेश होऊन, वेळेवर येत नाहीत, तर त्यांना आज्ञाकारी म्हणत नाहीत. लौकिक
पित्याला पण सपूत आणि कपूत मुले असतात. बेहदच्या पित्याला पण आहेत. सपूत जाऊन राजा
बनतील. कपूत जाऊन झाडू मारतील. सर्व कांही माहित तर पडते ना. कृष्ण जन्माष्टमी वर
पण समजावले आहे. कृष्णाचा जन्म होतो, तेव्हा तर स्वर्ग असतो. एकच राज्य असते.
विश्वामध्ये शांती असते. स्वर्गा मध्ये फार थोडे मनुष्य असतात. ती आहेच नवीन दुनिया.
तिथे अशांती तर असत नाही. शांती तेव्हा असते, जेव्हा एक धर्म असतो. त्या धर्माची
स्थापना बाबा करत आहेत. त्यानंतर जेव्हा इतर धर्म येतात तर अशांती होत राहते. तेथे
आहेच शांती, १६ कला संपूर्ण आहेत ना. चंद्र पण जेव्हा संपूर्ण असतो, तर किती शोभून
दिसतो, त्याला पुर्ण चंद्र म्हटले जाते. त्रेतामध्ये तीनचतुर्थांश म्हणतात, खंडित
होतो ना. दोन कला कमी होतात. संपूर्ण शांती सतयुगा मध्ये असते. २५ टक्के जुनी दुनिया
झाली म्हणजे कांही ना कांही खिटखिट होत राहते. दोन कला कमी झाल्याने शोभा कमी होते.
स्वर्गा मध्ये फारच शांती, नरकामध्ये फारच अशांती. ही वेळ अशी आहे, ज्यावेळी मनुष्य
विश्वामध्ये शांती पाहिजे म्हणतात. यापूर्वी असा आवाज नव्हता की, विश्वामध्ये शांती
पाहिजे. आता जाणीव होत आहे, कारण आता विश्वामध्ये शांती होत आहे. आत्म्याला वाटते
की, विश्वामध्ये शांती असली पाहिजे. मनुष्य तर देहभानामध्ये असल्यामुळे फक्त
म्हणतात की, विश्वामध्ये शांती पाहिजे. ८४ जन्म आता पूर्ण झाले आहेत. हे आता, बाबाच
येऊन समजावत आहेत. बाबाची आठवण करत आहेत. ते कधी कोणत्या रूपामध्ये येऊन स्वर्गाची
स्थापना करतील, त्यांचे नावाच आहे हेवनली गॉड फादर(स्वर्गिय पिता )हे कोणाला पण
माहीत नाही की, स्वर्ग कसा निर्माण करत आहेत. श्रीकृष्ण तर निर्माण करू शकत नाहीत.
त्यांना म्हटले जाते देवता. मनुष्य देवताना नमन करत आहेत. त्यांच्यामध्ये दैवी गुण
आहेत, त्यामुळे त्यांना देवता म्हटले जाते. चांगले गुण असणाऱ्याला म्हटले जाते, हा
तर जसा देव आहे. भांडण-तंटा करणाऱ्याला म्हटले जाते, हा जसा असूर आहे. मुले जाणतात
की, आम्ही बेहदच्या बाबा समोर बसले आहोत. तर मुलांचे वागणे, किती चांगले असले पाहिजे.
अज्ञान काळामध्ये पण ब्रम्हाबाबा नी पाहिले आहे की, 6-7 कुटुंब एकत्र राहत होते,
एकदम प्रेमाने राहत होते. कांही घरांमध्ये फक्त दोघेच असतील, तरीपण भांडण-तंटा करत
राहतात. तुम्ही तर आहात ईश्वरीय संतान. फार गोडीने राहिले पाहिजे. सतयुगा मध्ये
क्षीरखंड असतात, इथे क्षीर खंड होऊन राहण्याचे तुम्ही शिकत आहात, तर फार प्रेमाने
राहिले पाहिजे. बाबा म्हणतात कि, आतून तपास करा, मी कोणते विकर्म तर केले नाही?
कोणाला दुःख तर दिले नाही? असे कोणी बसून, स्वतःला तपासत नाहीत. ही फार समजण्याची
गोष्ट आहे. तुम्ही मुले विश्वामध्ये शांती स्थापन करणारे आहात. जर घरामध्येच अशांती
करणारे असाल, तर मग शांती कशी कराल. लौकिक पित्याचा मुलगा, तंग करत असेल तर म्हणतात
की, हा मेलेला बरा. कोणती सवय लागली तर ती पक्की होऊन जाते. हे समजू शकत नाही कि,
आम्ही तर बेहदच्या बाबाची मुले आहोत, आम्हाला तर विश्वामध्ये शांती स्थापन करायची
आहे. शिवबाबा ची मुले बनून, जर अशांत होत असाल, तर शिवबाबा जवळ जावा. ते तर हिरा
आहेत, झटक्यात तुम्हाला युक्ती सांगतील, अशी शांती होऊ शकते. शांती साठी प्रबंध
करून देतील. असे फार आहेत, त्यांचे वागणे दैवी घाराण्यासारखे नाही. तुम्ही गोड
दुनियेमध्ये जाण्यासाठी तयार होत आहात. ही आहेच खराब दुनिया वेश्यालय, या पासून तर
घृणा येते. विश्वामध्ये नविन दुनिये मध्येच शांती असते. संगमयुगात होऊ शकत नाही.
येथे शांत बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. पूर्ण पूरुषार्थ केला नाही तर मग सजा भोगावी
लागेल. माझ्याबरोबर तर धर्मराज पण आहेत ना. जेंव्हा जमाखर्च पूर्ण करण्याची वेळ
येईल, त्यावेळी फार मार खावा लागेल. कर्माचा भोग जरूर आहे. आजारी पडतात, हा पण
कर्मभोग आहे ना. बाबाच्या वर तर कोणी नाही. बाबा समजावतात की, मुलांनो, फुलासारखे
बना तर उंच पद मिळेल, नाही तर काही फायदा नाही. भगवान पिता ज्यांची अर्धाकल्प आठवण
केली, त्यांचेकडून वरसा घेतला नाही, तर मुले काय कामाची? परंतु विश्वनाटकानुसार हे
पण जरूर होणार आहे. तर समजावण्याच्या युक्त्या फार आहेत. विश्वामध्ये शांती तर
सतयुगामध्ये होती, जिथे लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. लढाई पण जरूर लागणार आहे
कारण अशांती आहे ना. कृष्ण सतयुगामध्ये येतील. असे म्हटले जाते कि, कलियुगामध्ये
देवतांची सावली पडत नाही. या गोष्टी तुम्ही मुलेच आता ऐकत आहात. तुम्ही जाणता की,
शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. धारणा करायची आहे, सारे आयुष्य पण जात आहे. म्हटले पण
जाते की, सारे आयुष्य समजावले, तरी पण समजत नाहीत.
बेहदचे बाबा सांगत आहेत, पहिल्याप्रथम मुख्य गोष्ट समजावून सांगा, ज्ञान वेगळे आणि
भक्ती वेगळी आहे. अर्धाकल्प आहे दिवस, अर्धाकल्प रात्र आहे. शास्त्रांमध्ये कल्पाचे
आयुष्यच उलटे लिहिले आहे. त्यामुळे अर्धे अर्धे पण होऊ शकत नाही. तुमच्यामध्ये कोणी
ग्रंथ इ. वाचलेले नसतील, तर ते चांगले आहे. वाचलेले असतील तर संशया मध्ये येतात,
प्रश्न विचारत राहतात. खरे पाहिले तर जेंव्हा वानप्रस्थ अवस्था होते, त्यावेळी
भगवंताची आठवण करत राहतात. कोणाच्या ना कोणाच्या मताद्वारे. मग जसे गुरु शिकवतील.
भक्ती पण शिकवत आहेत. असे कोणी नाहीत जे भक्ती शिकवत नाहीत. त्यांच्यामध्ये भक्तीची
ताकत आहे, त्यामुळे तर एवढे शिष्य बनतात. शिष्यांना भक्त, पुजारी म्हणतात. येथे
सर्व पुजारी आहेत. तेथे कोणी पुजारी असत नाहीत. भगवान कधी पुजारी बनत नाहीत. अनेक
मुद्दे समजावले जात आहेत. हळूहळू तुम्हा मुलांमध्ये पण समजावून सांगण्याची ताकद येत
राहील. आता तुम्ही सांगत आहात की, कृष्ण येऊ लागले आहेत. सतयुगामध्ये जरूर कृष्ण
असतात, नाहीतर जगाच्या इतिहास भूगोलाची कशी पुनरावृत्ती होईल? फक्त एक कृष्ण तर असत
नाहीत, यथा राजा राणी तथा प्रजा सर्व असतात. ही पण समजून घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही
मुले समजत आहात की, आम्ही तर बाबाची मुले आहोत. बाबा वरसा देण्यासाठी आले आहेत.
स्वर्गामध्ये तर सर्व येणार नाहीत. ना त्रेतामध्ये सर्व येतील. हे झाड हळूहळू
वृध्दीला प्राप्त करत आहे. मनुष्य सृष्टीरूपी झाड आहे. तेथे आहे आत्म्यांचे झाड.
येथे ब्रह्माद्वारे स्थापना, मग शंकराद्वारे विनाश, मग पालना. . . . अक्षर पण हे
नियमानुसार सांगितले पाहिजेत. मुलांच्या बुद्धीमध्ये हा नशा आहे की, हे सृष्टीचे
चक्र कसे चालत आहे. रचना कशी होत आहे. आता नवीन, लहान रचना आहे ना. तशी ही बाजोली
आहे. प्रथम क्षुद्र अनेक आहेत, मग बाबा येऊन ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांची रचना
करतात. ब्राह्मण शेंडी आहेत. शेंडी आणि पाय आपसात मिळत आहेत. अगोदर ब्राह्मण
पाहिजेत. ब्राह्मणांचे युग फार लहान आहे. मग देवता आहेत. हे वर्णाचे चित्र पण कामाचे
आहे. हे चित्र समजावून सांगण्यासाठी फार सोपे आहे. अनेक मनुष्यांची अनेक रूपे आहेत.
समजावून सांगताना किती मजा येते. ब्राह्मण जेव्हा असतात, तेव्हा सर्व धर्म असतात.
शुद्रा मधून ब्राह्मणांचे कलम लागत आहे. मनुष्य तर झाडांचे कलम लावत आहेत. बाबा पण
कलम लावत आहेत, त्यामुळे विश्वामध्ये शांती होते. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति, मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) नेहमी हे
आठवणीमध्ये ठेवा कि, आम्ही ईश्वराची मुले आहोत. आम्हाला क्षीरखंड होऊन राहायचे आहे.
कोणाला पण दुःख द्यायचे नाही.
(२) स्वतःच स्वतःची तपासणी करायची आहे की, माझ्याकडून कोणते विकर्म तर होत नाही.
अशांत होणे किंवा अशांती पसरविण्याची सवय तर नाही.
वरदान:-
एक बाबा दुसरे
कोणी नाही, या स्मृती द्वारे, बंधनमुक्त, योगयुक्त भव:
आता घरी
जाण्याची वेळ आली आहे, त्यामुळे बंधनमुक्त, आणि योगयुक्त बना. बंधनमुक्त म्हणजे ढिले
कपडे, टाईट नाहीत. आदेश मिळाला आणि सेकंदांमध्ये गेले. असे बंधनमुक्त, योगयुक्त
स्थितीचे वरदान प्राप्त करण्यासाठी, नेहमी हा वायदा आठवणी मध्ये ठेवा कि, "एक बाबा
दुसरे कोणी नाही". कारण घरी जाण्यासाठी किंवा सतयुगी राज्यात येण्यासाठी, या जुन्या
शरीराला सोडले पाहिजे. तर तपास करा की, असे एवररेडी बनले आहात, कां अजून पण कांही
बंधनानी बांधलेले आहात ? हे जुने शरीर, घट्ट तर नाही.
बोधवाक्य:-
व्यर्थ संकल्प
रुपी भोजन जास्त खाऊ नका, तर मोठेपणाच्या आजारा पासून बनाल.