22-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुमची प्रतिज्ञा आहे की, जोपर्यंत आम्ही पावन बनत नाही, तोपर्यंत बाबाची
आठवण करत राहू, एका बाबा बरोबरच प्रेम करू.
प्रश्न:-
शहाणी मुले,
वेळेला पाहून कोणता पुरुषार्थ करतात ?
उत्तर:-
अंत काळात जेव्हा शरीर सुटेल, तर बसं, एक बाबाचीच आठवण राहील, दुसरे कांही पण
आठवणीत येणार नाही. असा पुरुषार्थ शहाणी मुले, आता पासून करत राहतात कारण कर्मातीत
बनून जायचे आहे, त्यामुळे या जुन्या शरीरा पासून ममत्व काढायचे आहे, बसं, आम्ही बाबा
जवळ जात आहोत.
गीत:-
ते आमच्या
पासून वेगळे होणार नाहीत. . . . .
ओम शांती।
बाबा मुलांना समजावत आहेत, मुले प्रतिज्ञा करतात, बेहदच्या बाबा जवळ. बाबा आम्ही
तुमचे बनलो आहोत ते ही अंत काळापर्यंत, जोपर्यंत आम्ही शांतीधाम मध्ये पोहोचू. तुमची
आठवण केल्याने, आमचे जन्मजन्मांतराचे जे पाप डोक्यावर आहेत, ते जळून जातील. यालाच
योग अग्नी म्हटले जाते, दूसरा कोणता उपाय नाही. पतीत पावन किंवा श्री श्री 108
जगद्गुरु एकालाच म्हटले जाते. तेच जगाचे पिता, जगाचे शिक्षक, जगाचे गुरु आहेत.
रचनेच्या आदि मध्य अंताचे ज्ञान बाबाच देत आहेत. ही पतीत दुनिया आहे, यामध्ये एक पण
पावन असणे असंभव आहे. पतित पावन बाबाच सर्वाची सद्गती करत आहेत. तुम्ही पण त्यांची
मुले बनले आहात. तुम्ही शिकत आहात की, जगाला पावन कसे बनवायचे? शिवाच्या अगोदर
त्रिमूर्ती जरूर लिहले पाहिजे. हे पण लिहायचे आहे की, दैवी स्वराज्य तुमचा
जन्मसिद्ध अधिकार आहे. ते पण आता कल्पाच्या संगमयुगा मध्ये. स्पष्ट लिहिल्या शिवाय
मनुष्य कांही समजू शकणार नाहीत. दुसरी गोष्ट, फक्त बी. के. जे नांव पडले आहे,
त्यामध्ये प्रजापिता अक्षर लिहणे जरूरीचे आहे, कारण ब्रह्मा नांव पण अनेकांची आहेत.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय लिहायचे आहे. तुम्ही जाणता की, दगडा
सारख्या विश्वाला पावन, पारस तर एक बाबाच बनवितात. या वेळी एक पण पावन नाही. सर्व
एकमेकांमध्ये भांडतात, शिव्या देत राहतात. बाबा साठी पण म्हणतात की, ते कच्छ, मच्छ
अवतार घेतात. अवतार कशाला म्हटले जाते, ते पण समजत नाहीत. अवतार तर एकाचा च होत आहे.
तो पण आलौकिक रीतीने, शरीरामध्ये प्रवेश करुन, विश्वाला पावन बनवत आहेत. इतर आत्मे,
तर स्वतःचे आपले शरीर घेतात. त्यांना स्वतःचे शरीर नाही. परंतु बाबा तर ज्ञानाचे
सागर आहेत मग ज्ञान कसे देतील? शरीर पाहिजे ना. या गोष्टीला तुमच्या शिवाय दुसरे
कोणी समजत नाही. गृहस्थ व्यवहारांमध्ये राहून पवित्र बनणे, हे बहादुरी चे काम आहे.
महावीर अर्थात वीरता दाखवणे. ही पण वीरता आहे, जे काम संन्याशी करू शकत नाहीत, ते
तुम्ही करत आहात. बाबा श्रीमत देतात की, तुम्ही असे गृहस्थ व्यवहारा मध्ये राहून,
कमल फुलासारखे पवित्र बना, तरच उंच पद प्राप्त कराल. नाहीतर विश्वाची बादशाही कशी
मिळेल. हे आहेच नरा पासून नारायण बनण्याचे शिक्षण. ही पाठशाळा आहे. अनेक शिकत आहेत,
त्यामुळे लिहा, " ईश्वरीय विश्वविद्यालय". हे तर बिल्कूल बरोबर अक्षर आहे. भारतवासी
जाणतात की, आम्ही विश्वाचे मालक होतो, कालची गोष्ट आहे. आतापर्यंत राधे कृष्ण अथवा
लक्ष्मी नारायणाचे मंदिर बनवतात. कांही तर मग पतीत मनुष्यांचे पण बनवतात. व्दापर
पासून तर पतित मनुष्यच आहेत. कोठे शिवाचे, कोठे देवतांचे मंदिर बनवणे आणि कोठे या
पतीत मनुष्यांचे. हे कांही देवता थोडेच आहेत. तर बाबा समजावतात कि, या गोष्टीवर
चांगल्या प्रकारे विचार सागर मंथन केले पाहिजे. बाबा तर समजावत राहतात, दिवसेंदिवस
लिहिण्यामध्ये बदल होत राहतो, असे नाही कि, अगोदर असे कां सांगितलेल नाही. असे म्हणू
नये कि, अगोदर मनमनाभव चा अर्थ, असा कां समजावला नाही. अरे, अगोदर थोडेच असे आठवणी
मध्ये राहू शकाल. फार थोडी मुले आहेत, जी प्रत्येक गोष्टीची, प्रतिक्रिया पूर्ण
रीतीने देऊ शकतील. नशिबा मध्ये उंच पद नाही, तर शिक्षक पण काय करतील. असे नाही की,
आशीर्वाद देऊन उंच बनवतील. स्वतःला पाहायचे आहे की, आम्ही कशी सेवा करत आहोत. विचार
सागर मंथन चालले पाहिजे. गीतेचा भगवान कोण, हे चित्र फार मुख्य आहे. भगवान निराकार
आहे, ते ब्रह्माच्या शरीरा शिवाय तर सांगू शकत नाहीत. ते येतातच ब्रह्माच्या
शरीरामध्ये संगमयुगावर. नाहीतर ब्रह्मा, विष्णू, शंकर कशासाठी आहेत. आत्मचरित्र
पाहिजे ना. कोणी पण जाणत नाहीत. ब्रह्मा साठी म्हणतात की, १०० भुजा वाल्या ब्रह्मा
जवळ जावा, १००० भुजावाल्या ब्रहृमा जवळ जावा. यावर पण एक गोष्ट बनविली आहे.
प्रजापिता ब्रह्मा ची एवढी, अनेक मुले आहेत ना. येथे येतातच पवित्र बनण्यासाठी.
जन्मजन्मांतर अपवित्र बनत आले आहेत. आता पूर्ण पवित्र बनायचे आहे. श्रीमत मिळत आहे,
माझी एकाची आठवण करा. कोणी कोणी तर आतापर्यंत समजू शकले नाहीत की, आम्ही आठवण कशी
करायची. गोंधळून गेले आहेत. बाबाचे बनणे आणि विकर्माजीत न बनणे, पाप नाहीसे न होणे,
आठवणीच्या यात्रेमध्ये न राहणे, तर ते काय पद प्राप्त करतील. जरी समर्पित आहेत,
परंतु त्याचा काय फायदा. जोपर्यंत पुण्य आत्मा बनून, इतरांना बनविले नाही, तोपर्यंत
उंच पद प्राप्त करणार नाहीत. जेवढी थोडी आठवण कराल, तेवढे कमी पद प्राप्त करताल.
डबल ताजधारी कसे बनतील, मग क्रमवारीच्या पुरुषार्था नुसार उशिरा येतील. असे नाही,
आम्ही सर्व कांही समर्पित केले आहे, त्यामुळे डबल सिरताज बनू, नाही. अगोदर दास दासी
बनत बनत, मग शेवटी थोडे कांही मिळेल. अनेकांना हा अहंकार आहे की, आम्ही तर समर्पित
आहोत. अरे, आठवणी शिवाय काय बनू शकाल. दास दासी बनण्यापेक्षा, तर साहूकार प्रजा बनने
चांगले आहे. कांही दास, दासी तर कृष्णा बरोबर थोडेच झोका घेतील. या फार समजण्याच्या
गोष्टी आहेत, यामध्ये फार कष्ट केले पाहिजेत. थोड्यांमध्ये खुश व्हायचे नाही. आम्ही
पण राजा बनू. तसे तर अनेक राजा बनतील. बाबा म्हणतात की, मुख्य आहे आठवणीची यात्रा.
जे चांगल्या रितीने आठवणीं मध्ये राहत आहेत, त्यांना खुशी राहते. बाबा समजावतात की,
आत्मा एक शरीर सोडून, दुसरे घेते. सतयुगा मध्ये खुशीने एक शरीर सोडून, दुसरे घेतात.
इथे तर रडायला सुरु करतात, सतयुगातील गोष्टी विसरून गेले आहेत. तेथे तर शरीर असे
सोडतात, जसे सापाचे उदाहरण आहे ना. हे जुने शरीरा आता सोडायचे आहे. तुम्ही जाणता
की, आम्ही आत्मा आहोत, हे तर जुने शरीर आता सोडायचे आहे. शहाणी मुले जी बाबाच्या
आठवणी मध्ये राहतात, ते तर म्हणतात की, बाबाच्या आठवणी मध्ये शरीर सोडू, मग जाऊन
बाबाला भेटू. कोणत्या पण मनुष्य मात्राला हे माहित नाही की, कसे भेटू शकाल. तुम्हां
मुलांना रस्ता मिळाला आहे. आता पुरुषार्थ करत आहात, जिवंतपणीच मेले आहात, परंतु
आत्मा पवित्र बनली पाहिजे ना. पवित्र बनून मग हे जुने शरीर सोडून जायचे आहे. समजतात
की, कशी कर्मातील अवस्था होऊन जाईल, तर हे शरीर सुटेल, परंतु कर्मातीत अवस्था झाली,
तर शरीर आपोआप सुटून जाईल. बसं, आम्ही बाबा जवळ जाऊन राहू. या जुन्या शरीरा पासून
जशी घृणा येत आहे. सापाला जुन्या कातणी पासून घृणा येत असेल ना. तुमचे नवीन शरीर
तयार होत आहे. परंतु जेंव्हा कर्मातीत अवस्था होईल, शेवटी तुमची अशी अवस्था होईल.
बसं, आम्ही आता जात आहोत. लढाईची पण पूर्ण तयारी होईल. विनाशाचा सारा आधार तुमच्या
कर्मातीत अवस्थेवर आहे. अंत काळात कर्मातीत अवस्थेला, क्रमवारीने सर्व प्राप्त
होतील. किती फायदा आहे. तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात, तर बाबाची किती आठवण केली
पाहिजे. तुम्ही पहाल की, कांही असे पण निघतील, जे उठता, बसता बाबाची आठवण करत
राहतील. मृत्यू समोर उभा आहे. वर्तमानपत्रां मध्ये पण दाखवतात की, आताचे आता लढाई
सुरू होईल. मोठी लढाई लागली, तर बॉम्ब टाकतील. विनाशाला उशीर लागणार नाही. शहाणी
मुले समजतात, जे बेसमज आहेत, ते कांही समजत नाहीत. थोडी पण धारणा होत नाही. जरी होय,
होय म्हणत राहतात, परंतु समजत काही पण नाहीत. आठवणी मध्ये राहत नाहीत. जे देहअभिमाना
मध्ये राहतात, त्यांना ही दुनियाच आठवणीत राहते, ते काय समजू शकतील. आता बाबा
म्हणतात की. देहीअभिमानी बना. देहाला विसरून जावा. शेवटाला तुम्हीं फार प्रयत्न करू
शकाल, आता तुम्हीं समजत नाहीत. शेवटी फार पश्चाताप होईल. बाबा साक्षात्कार पण
करवतील. ही, ही पापे केली आहेत. आता खावा सजा. पद पण पाहा. सुरुवातीला पण असे
साक्षात्कार केले होते, नंतर शेवटी पण साक्षात्कार होतील.
बाबा म्हणतात की, आपली इज्जत घालवू नका. शिक्षण घेण्याचा पुरुषार्थ करा. स्वतःला
आत्मा समजून, माझी एकट्याची आठवण करा. तेच पतित पावन आहेत. दुनियेमध्ये कोणी पण
पतित-पावन नाही. शिवभगवानुवाच, जेंव्हा म्हणतात की, सर्वांचा सदगती दाता, पतित-पावन
एक आहे. त्यांचीच सर्व आठवण करतात. परंतु जेव्हा स्वतःला आत्मा बिंदू समजाल, तेंव्हा
बाबाची आठवण येईल. तुम्ही जाणता की, आम्हा आत्म्या मध्ये 84 जन्माची भूमिका नोंदलेली
आहे, ती कधी विनाश होत नाही. हे समजून घेणे काही मावशीचे घर नाही, विसरून जातात,
त्यामुळे ते कोणाला समजावू शकत नाहीत. देहअभिमानाने सर्वांना एकदम मारून टाकले आहे.
हे मृत्युलोक बनलेले आहे. सर्व अकाली मरत आहेत. जसे जनावर, पक्षी, इ. मरतात, तसे
मनुष्य पण मरतात, फरक कांही नाही. लक्ष्मी नारायण अमरलोकचे मालक आहेत ना. अकाली
मृत्यु तेथे होत नाही. दुःखच नसते. इथे दुःख झाले, तर जाऊन मरतात. अकाली मृत्यू
स्वत:च ओढून घेतात. हे लक्ष्य फार उंच आहे. कधी पण विकारी दृष्टी जाऊ नये. यामध्ये
मेहनत आहे. एवढे उंच पद प्राप्त करणे, कांही मावशीचे घर नाही. बहादुरी पाहिजे.
नाहीतर थोड्या गोष्टींमध्ये पण व घाबरतात. कोणी बदमाश घरात घुसला, अंगाला हात लावला,
तर हातात दांडके घेऊन, त्याला पळवले पाहिजे. भित्रे थोडेच बनायचे आहे. शिवशक्ती
पांडव सेनेचे गायन आहे ना. जे स्वर्गाचे दार उघडत आहेत. नाम प्रसिद्ध आहे, तर मग अशी
बहादुरी पण पाहिजे. जेंव्हा सर्वशक्तीमान बाबाच्या आठवणीमध्ये राहाल, तेंव्हा ती
शक्ती प्रवेश करेल. स्वतःला आत्मा समजून, बाबांची आठवण करायची आहे, या योग अग्नी
मुळेच विकर्म विनाश होतील, मग विश्वजीत राजा बनाल. आठवणीची मेहनत आहे, जो करेल तो
प्राप्त करेल. दुसऱ्यांना पण सावधान करायचे आहे. आठवणीच्या यात्रेनेच नाव पार होईल.
शिक्षणाला यात्रा म्हणत नाहीत. ती आहे शरीराची यात्रा, ही आहे आत्म्याची यात्रा.
सरळ शांतीधाम आपल्या घरी जायचे आहे. बाबा पण घरी राहत आहेत. माझी आठवण करत करत,
तुम्ही घरी पोहचाल. इथे सर्वांना भूमिका बजावायची आहे. विश्वनाटक तर अविनाशी चालतच
राहते. मुलांना सांगत आहेत की, एक तर बाबाची आठवण करा आणि पवित्र बना, दैवीगुण धारण
करा आणि जेवढी सेवा कराल घेऊन तेवढे उंच पद प्राप्त होईल. कल्याणकारी जरूर बनायचे
आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति, मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) नेहमी
आठवणीत ठेवा, सर्वशक्तिमान बाबा आमच्या बरोबर आहेत, या आठवणीनेच शक्ती प्रवेश होईल.
विकर्म भस्म होतील. शिवशक्ती पांडव सेना नांव आहे, तर बहादुरी दाखवायची आहे. भित्रे
बनायचे नाही.
(१) जिवंतपणी मेल्यानंतर, हा अहंकार येऊ नये की, मी तर समर्पित आहे. समर्पित होऊन
पुण्यात्मा बनून, इतरांना बनवायचे आहे, त्यामध्येच फायदा आहे.
वरदान:-
आपल्या शुभ
भावनेद्वारे निर्बल आत्म्यांमध्ये बळ भरणारे, नेहमी शक्तीस्वरूप भव:
सेवाधारी मुलांची
विशेष सेवा आहे- स्वतः शक्तीस्वरूप राहणे आणि सर्वांना शक्तीस्वरूप बनविणे, म्हणजे
निर्बल आत्म्यां मध्ये बळ भरणे. त्यासाठी नेहमी शुभभावना आणि श्रेष्ठ काम ना स्वरूप
बना. शुभ भावनेचा अर्थ हा नाही की, कोणामध्ये भावना ठेवून, ठेवून त्याचे भाववान होणे.
ही चूक करू नका. शुभ भावना पण बेहदची असावी. एका प्रति विशेष भावना पण नुकसान कारक
आहे, त्यामुळे बेहद मध्ये स्थित होऊन निर्बल आत्म्यांना, आपल्या प्राप्त झालेल्या
शक्तींच्या आधारावर शक्तीस्वरूप बनवा.
बोधवाक्य:-
अलंकार
ब्राह्मण जीवनाचा श्रंगार आहे, त्यासाठी अलंकारी बना, देहअहंकारी नाही.