15-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देण्यासाठी, ज्याद्वारे तुम्ही सृष्टीच्या आदी मध्य अंतला जाणतात"

प्रश्न:-
वाघीण सारख्या शक्तीशाली, माता-कन्या, कोणत्या गोष्टी हिमंतीने समजाऊ शकतात?

उत्तर:-
दुसऱ्या धर्मांच्या मनुष्यांना, हे समजावयाचे आहे की, बाबा म्हणतात, तुम्ही स्वतःला आत्म समजा, परमात्मा नाही. आत्मा समजून बाबांची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही मुक्तिधाम मध्ये चालले जाल. परमात्मा समजल्यामुळे तुमचे विकर्म विनाश होऊ शकणार नाहीत. या गोष्टी खूप हिमती द्वारे वाघीण सारख्या शक्तीच समजाऊ शकतात. ज्ञान समजाऊन सांगण्याचा पण अभ्यास पाहिजे.

गीत:-
नयन हीन को राह दिखाओ प्रभू. . (अज्ञानी मनुष्यांना मार्ग दाखवा प्रभू )

ओम शांती।
मुलं अनुभव करत आहेत, आत्मिक आठवणीच्या यात्रेमध्ये कठीणता दिसून येते. भक्तिमार्गा मध्ये अनेक तिर्थक्षेत्रास जातात. अनेक प्रकारचे जप-तप-यज्ञ करतात, ग्रंथ इत्यादी वाचतात, ज्यामुळे ब्रह्माची रात्र म्हटले जाते. अर्धाकल्प रात्र, तर अर्धाकल्प दिवस आहे. ब्रह्मा एकटे तर नसतील ना. प्रजापिता ब्रह्मा आहेत तर, जरूर त्यांची मुलं कुमार कुमारी पण असतील परंतु मनुष्य जाणत नाहीत. बाबाच मुलांना तिसरा नेत्र देतात, ज्याद्वारे तुम्हाला सृष्टीच्या आदी मध्य अंतचे ज्ञान मिळते. तुम्ही कल्पपूर्व पण ब्राह्मण होते आणि देवता बनले होते. जे बनले होते, तेच परत पण बनतील. आदी सनातन देवी-देवता धर्माचे तुम्हीच आहात. तुम्हीच पुजारी, परत पुज्य बनतात. इंग्रजीमध्ये पूज्यला वर्शिपवर्दी आणि पुजारीला वर्शिपर म्हणतात. भारतच अर्धाकल्प पुजारी बनतो. आत्माच मानते की, आम्हीच पूज्य होतो, परत आम्हीच पुजारी बनलो. पूज्य पासून पुजारी, परत पूज्य बनतात. बाबा तर पुजारी बनत नाहीत. तुम्ही म्हणाल आम्ही पूज्य पावन देवी-देवता होतो, परत ८४ जन्माच्या नंतर संपूर्ण पतीत पुजारी बनलो. आता भारतवासीच जे आदी सनातन देवी-देवता धर्माचे होते, त्यांना आपल्या धर्माची काहीच माहिती नाही. तुमच्या या गोष्टीला सर्व धर्माचे समजणार नाहीत. जे या धर्माचे कुठे-कुठे धर्मांतरीत झाले आहेत, ते येतील. असे धर्मांतरीत खूप झाले आहेत. बाबा म्हणतात जे शिव आणि देवतांचे, पुजारी आहेत, त्यांना सहज आहे. अन्य धर्माचे खूप डोके खातील. जे धर्मांतरित झाले आहेत, त्यांनाही ज्ञान स्पर्श होईल आणि येऊन समजण्याचा प्रयत्न करतील, नाहीतर मानणार नाहीत. आर्यसमाजी मधून पण खूप आले आहेत, शिख लोक पण आले आहेत. आदी सनातन देवी-देवता धर्मांचे धर्मांतरित झाले आहेत, त्यांना आपल्या धर्मामध्ये जरूर यावे लागेल. झाडांमध्ये पण वेगवेगळे विभाग आहेत, परत क्रमानुसार येतील. फांद्या पण निघत राहतात. ते पवित्र झाल्यामुळे त्यांचा प्रभाव चांगला निघेल. या वेळेत देवी देवता धर्माचा पाया तर नाही, जो परत भरावा लागेल. भाऊ बहिण तर बनावेच लागेल. आम्ही एक पित्याची मुलं आपसात भाऊ भाऊ आहोत, परत भाऊ-बहीण बनतात. आता जसे की नवीन सृष्टीची स्थापना होत आहे. प्रथम ब्राह्मण आहेत. नवीन सृष्टीच्या स्थापनेमध्ये प्रजापिता ब्रह्मा तर जरूर पाहिजेत. ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांची स्थापना होईल, याला रुद्र ज्ञानयज्ञ पण म्हटले जाते. यामध्ये ब्राह्मण जरूर पाहिजेत. प्रजापिता ब्रह्माची संतान तर जरूर पाहिजेत. ते आजोबा आहेत. ब्राह्मण प्रथम क्रमांका मध्ये शेंडी आहेत, म्हणजे उच्च आहेत. हा आदम बिबी, एडम म्हणजे आदी देवी, आदी देवी ला मानतात पण. यावेळी तुम्ही पुजारी पासून पुज्य बनत आहात. तुमचे सर्वात चांगले यादगार स्मृतिस्थळ, दिलवाडा मंदिर आहे. खाली तपस्या मध्ये बसले आहेत, वरती राजाई आहे आणि येथे तुम्ही चैतन्य मध्ये बसले आहात. हे मंदिर नष्ट होतील परत भक्तिमार्ग मध्ये बनतील.

तुम्ही जाणता आता आम्ही राजयोग शिकत आहोत, परत नवीन दुनिया मध्ये जाऊ. ते जड मंदिर तुम्ही चैतन्य मध्ये बसले आहात. मुख्य मंदिर छान बनवलेले आहे. स्वर्गाला वरती छतावर दाखवले आहे, नाही तर कुठे दाखवतील. यावरती खूप चांगल्या प्रकारे समजाऊ शकता, बोला भारत स्वर्ग होता, आत्ता भारतच नर्क आहे. या धर्मातील लगेच समजतील. हिंदू मध्ये पण पहा, अनेक प्रकारच्या धर्मांमध्ये गेले आहेत. तुम्हाला त्यांना शोधून काढण्यासाठी, खूप कष्ट घ्यावे लागतात. बाबांनी समजावले आहे, स्वतःला आत्मा समजून माझीच आठवण करा, बस आणखी कोणतीच गोष्ट करायची नाही. ज्यांचा अभ्यास नाही, त्यांना तर ज्ञान गोष्टी करायच्या नाहीत, नाहीतर ब्रह्मकुमार कुमारी यांचे नाव खराब करतील. जर दुसऱ्या धर्मांचे आहेत, तर त्यांना समजून सांगायचे आहे, जर तुम्ही मुक्तिधाम मध्ये जाऊ इच्छितात, तर स्वतःला आत्मा समजा आणि शिव पित्याची आठवण करा. स्वतःला परमात्मा समजू नका. स्वता:ला आत्मा समजून पित्याची आठवण कराल तर तुमचे जन्म-जन्मांतराचे पाप नष्ट होतील आणि तुम्ही मुक्तीधाम मध्ये जाल. तुमच्यासाठी हा मनमनाभवचा मंत्रच खूप आहे, परंतु ज्ञानाच्या गोष्टी करण्यासाठी हिम्मत पाहिजे. वाघीण सारख्या माता, कन्याच सेवा करू शकतात. संन्याशी, परदेशी लोकांना भारतात घेऊन येतात की, चला आम्ही तुम्हाला, अध्यात्मिक ज्ञान देतो. आता ते तर त्याला जाणतच नाहीत. ब्रह्मलाच भगवान समजतात, त्याची आठवण करा, बस हाच मंत्र देतात. जसे कोणत्या चिमणीला आपल्या पिंजऱ्या मध्ये ठेवतात. तर अशा गोष्टी समजून सांगण्यात मध्ये पण वेळ लागतो. बाबांनी म्हटले होते, प्रत्येक चित्राच्या वरती शिवभगवानुवाच असे लिहा. तुम्ही जाणतात, या दुनिये मध्ये सर्व विना धनीचे आहेत. सर्वजण बोलवत राहतात, तुम्ही मात-पिता. . . अच्छा, याचा अर्थ काय आहे? असेच बोलत राहतात, तुमच्या कृपेने खूप सुख मिळते. आता बाबा तुम्हाला स्वर्गाच्या सुखासाठी शिकवत आहेत, ज्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. जे करतील त्यांनाच मिळेल. यावेळेत तर सर्व पतित आहेत. पावन दुनिया तर एकच स्वर्ग आहे. येथे कोणीही सतो प्रधान होऊ शकत नाहीत. सतयुगा मध्ये जे सतोप्रधान होते, तेच पतित बनतात. ख्रिस्ताच्या पाठीमागे, जे त्यांच्या धर्माचे येतात, ते प्रथम सतोप्रधान असतील ना. जेव्हा लाखांच्या अंदाजामध्ये होतील, तेव्हा सैन्य ईत्यादी तयार होते, युद्ध करून बादशाही घेतात. त्यांना सुख पण कमी, तर दुःख पण कमी मिळते. तुमच्यासारखे सुख तर कोणालाही मिळू शकत नाही. आता तुम्ही सुखधाम मध्ये जाण्यासाठी तयार होत आहात, बाकी सर्व धर्माचे स्वर्गामध्ये थोडेच येतील. भारत जेव्हा स्वर्ग होता तर, त्यासारखा पावन खंड कोणता दुसरा नसतो. जेव्हा बाबा येतात, तेव्हाच ईश्वरीय राज्य स्थापन होते. तेथे लढाई ईत्यादीची कोणतीच गोष्ट नसते. लढाई भांडण करणे, तर नंतर सुरू होते. भारतवासी फारसे लढत नाहीत, थोडेच आपसामध्ये लढाई करून वेगळे झाले आहेत. द्वापार मध्ये एक दोघे लढाई करतात. हे चित्र इत्यादी बनवण्यामध्ये पण खूप विशाल बुद्धी पाहिजे. हे पण लिहायचे आहे की, भारत जेव्हा स्वर्ग होता, परत नर्क कसा बनला आहे, हे येऊन समजून घ्या. भारत सद्गती मध्ये होता, आता दुर्गति मध्ये आहे. आता सद्गती प्राप्त करण्यासाठी च बाबा ज्ञान देतात. मनुष्यामध्ये हे आत्मिक ज्ञान नसते. ते परमपिता परमात्मा मध्येच आहे. बाबा हे आत्म्या साठी ज्ञान देतात. बाकी तर सर्व मनुष्य, मनुष्यलाच देत राहतात. ग्रंथ पण मनुष्यांनी लिहिले आहेत, मनुष्यच वाचत राहतात. येथे तर तुम्हाला आत्मिक पिता शिकवत आहेत आणि आत्मा शिकत आहे. शिकवणारी पण आत्माच आहे ना. ते लिहिणारे आणि शिकणारे मनुष्यच आहेत. परमात्माला तर ग्रंथ इत्यादी शिकण्याची आवश्यकता नाही. बाबा म्हणतात या ग्रंथामुळे, कोणाची सद्गती होऊ शकत नाही. मलाच येऊन परत घेऊन जायचे आहे. आता तर दुनिया मध्ये करोडो मनुष्य आहेत. सतयुगा मध्ये जेव्हा लक्ष्मीनारायणाचे राज्य असते, तर तेथे नऊ लाख असतात. खूप छोटे झाड असते, परत विचार करा इतके सर्व आत्मे कोठे गेले?ब्रह्म मध्ये किंवा पाण्यामध्ये तर मिसळत नाहीत. ते सर्व मुक्तिधाम मध्ये राहतात. प्रत्येक आत्मा अविनाशी आहे, त्यामध्ये अविनाशी भूमिका नोंदलेली आहे, जी कधी नष्ट होऊ शकत नाही. आत्म्याचा कधी विनाश होऊ शकत नाही. आत्मा तर बिंदू आहे, बाकी निर्वाण इत्यादींमध्ये कोणी जाऊ शकत नाही. सर्वांना भूमिका वठवायची आहे. जेव्हा सर्व आत्मे येतात तेव्हाच येऊन, मी सर्वांना घेऊन जातो. अंत काळात बाबांची भूमिका आहे. नवीन दुनियेची स्थापना, परत जुन्या दुनिया चा विनाश होतो. हे पण अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे. तुम्ही आर्यसमाजी लोकांना समजवले, तर त्यांच्यामध्ये जे कोणी देवता धर्माचे असतील, त्यांना ज्ञान आवडेल. बरोबर, या गोष्टी तर ठीक आहेत. परमात्मा सर्वव्यापी कसे होऊ शकतात. भगवान तर पिता आहेत, त्यांच्याद्वारे वारसा मिळतो. कोणते आर्यसमाजी पण तुमच्या जवळ येतात, त्यांचे पण कलम लागत आहे. तुम्ही समजावत राहा, तुमच्या कुळाचे जे असतील ते तर येतील. भगवान पिताच पावन बनण्यासाठी युक्ती सांगतात. भगवानुवाच माझीच आठवण करा, मी पतित पावन आहे. माझी आठवण केल्यामुळेच तुमचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही मुक्तिधाम मध्ये जाल. हा संदेश सर्व धर्मासाठी आहे, तुम्ही सांगा बाबा म्हणतात, देहाचे सर्वधर्म सोडून माझी आठवण करा, तर तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल. मी गुजराती आहे, अमका आहे, हे सर्व सोडा. स्वतःला आत्मा समजा आणि त्यांची आठवण करा. ही योग अग्नी आहे. प्रत्येक पाऊल सावध होऊन चालायचे आहे. सर्व तर हे ज्ञान समजणार नाहीत. बाबा म्हणतात, पतितपावन मीच आहे. तुम्ही सर्व पावन बनल्याशिवाय निर्वाणधाम मध्ये जाऊ शकत नाहीत. रचनाच्या आदी मध्य अंतला पण समजावे लागेल. हे ज्ञानपूर्ण रीतीने समजल्यामुळे उच्चपद प्राप्त कराल. थोडी भक्ती केली असेल तर थोडे ज्ञान घेतील. ज्यांनी खूप भक्ती केली आहे, ते खूप ज्ञान घेतील. बाबा जे समजवतात, त्याला धारण करायचे आहे, वानप्रस्थीं साठी तर खूप सहज आहे. गृहस्थ व्यवहाराचा किनारा करतात. वानप्रस्थ अवस्था साठ वर्षाच्या नंतर होते, गुरु पण तेव्हाच करतात. आज-काल तर लहानपणीच गुरु करतात, नाहीतर प्रथम पिता, परत शिक्षक, परत साठ वर्षाच्या नंतर, गुरु केला जातो. सद्गती दाता तर एकच शिव पिता आहेत, हे अनेक गुरु लोक थोडेच आहेत. ते तर पैसे कमावण्याच्या युक्त्या आहेत. सद्गुरु तर सर्वांचे सद्गती करणारे एकच आहेत. बाबा म्हणतात, मी तुम्हाला सर्व वेद ग्रंथ इत्यादींचे रहस्य समजावतो. ही सर्व भक्तीमार्गाची सामग्री आहे. उतरायचे आहेच. ज्ञान भक्ती परत भक्तीचे वैराग्य आहे. जेव्हा ज्ञान मिळते तेव्हाच भक्तीचे वैराग्य होते. जुन्या दुनिये पासून तुम्हाला वैराग्य आहे, बाकी दुनिया तर सोडून कुठे जाणार? तुम्ही जाणतात ही दुनिया तर नष्ट होणार आहे, म्हणून आत्ता देहाच्या दुनियेचा संन्यास करायचा आहे. पवित्र बनल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही. पवित्र बनण्यासाठी आठवणी ची यात्रा पाहिजे. भारतामध्ये तर रक्ताच्या नद्या वाहतील, परत दुधाच्या नदी वाहतील. विष्णु ला क्षिरसागर मध्ये दाखवतात. असे समजले जाते या लढाईच्या नंतर मुक्ती जीवनमुक्ती'चे फाटक उघडेल. जितके तुम्ही मुलं पुढे जाल, तेवढाच आवाज होत राहील. आता लढाई लागली की लागली. एका चिंगारीने पाहिलेत, काय झाले होते. असे समजतात लढाई जरूर लागेल, लढाया तर चालत राहतात. एक दोघांचे मदतगार बनत राहतात. तुम्हाला पण नवीन दुनिया पाहिजे, तर जुनी दुनिया जरूर नष्ट व्हायला पाहिजे, अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती, मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे, म्हणून या दुनियेचा सन्यास करायचा आहे. दुनियेला सोडून कुठे जायचे नाही परंतु याला बुद्धीने विसरायचे आहे.

(२) निर्वाण धाम मध्ये जाण्यासाठी पूर्ण पावन बनायचे आहे. रचनेच्या आधी मध्य अंतला पूर्ण समजून नवीन दुनियेमध्ये उच्च पद मिळवायचे आहे.

वरदान:-
अलबेलापन, आळसाच्या निद्रेला सोडचिठ्ठी देणारे चक्रवर्ती भव.

साक्षात्कार मूर्त बनून, भक्तांना साक्षात्कार करण्यासाठी किंवा चक्रवर्ती बनण्यासाठी बनण्यासाठी, निद्राजीत बना. जेव्हा विनाशाला विसरतो, तेव्हाच अलबेलापन, आळस निद्रा येते. भक्तांचे बोलवणे ऐका, दुखी आत्म्यांची दुःखाची पुकार ऐका, ताहनलेल्या आत्म्याच्या प्राथनेचा आवाज ऐका, तर कधीच आळस किंवा निद्रा येणार नाही. तर आता नेहमीच जागृत बनून, अलबेलापन, आळसच्या निद्रेला सोडचिट्टी द्या आणि साक्षात्कार मूर्त बना.

बोधवाक्य:-
तन-मन-धन, मन-वाणी कर्म, कोणत्याही प्रकारांमध्ये बाबांच्या कर्तव्या मध्ये सहयोगी बना तर सहजयोगी बनून जाल.