26-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :-बाबा जे तुम्हाला हिऱ्या सारखे बनवत आहेत, त्यांच्याविषयी कधीही संशय
यायला नको, संशय बुद्धी बनणे म्हणजे स्वतःचे नुकसान करणे "
प्रश्न:-
मनुष्यापासून
देवता बनण्याच्या शिक्षणामध्ये पास होण्याचा मुख्य आधार कोणता आहे?
उत्तर:-
निश्चय. निश्चय बुद्धी बनवण्याचे धाडस पाहिजे. माया धाडसालाच तोडून टाकते. संशय
बुद्धी बनवते. चालता-चालता जर शिक्षणामध्ये किंवा शिकवणाऱ्या परम शिक्षकांमध्ये
संशय आला, तर आपले आणि इतरांचे खूप नुकसान करतात.
गीत:-
तू प्रेमाचा
सागर आहेस....
ओम शांती।
आत्मिक मुलां प्रती शिवबाबा समजावत आहेत, तुम्ही मुले बाबांची महिमा करतात, तू
प्रेमाचा सागर आहेस. त्यांना ज्ञानाचा सागर ही म्हटले जाते. जेंव्हा की ज्ञानाचा
सागर एक आहे तर इतरांना अज्ञान म्हणू शकतो कारण की ज्ञान आणि अज्ञानाचा खेळ आहे.
ज्ञान आहेच परमपिता परमात्म्याच्या जवळ. या ज्ञानामुळे नव्या दुनियेची स्थापना होते.
असे नाही की कोणी नवी दुनिया बनवते. दुनिया तर अविनाशी आहे. फक्त जुन्या दुनियेला
बदलून नवी दुनिया बनवतात. प्रलय होतो असे नाही. संपूर्ण दुनिया कधीही विनाश होत नाही.
जुनी आहे तीच बदलून नवी बनत आहे. बाबांनी समजावले आहे हे जुने घर आहे, ज्यामध्ये
तुम्ही बसले आहात. जाणत आहात आम्ही नवीन घरांमध्ये जाणार आहोत. ज्याप्रमाणे जुनी
दिल्ली आहे. आता जुनी दिल्ली नष्ट होणार आहे, त्याच्या बदल्यात नवी बनणार आहे. आता
नवी कशी बनणार?प्रथम तर त्यामध्ये राहण्यायोग्य पाहिजेत. नव्या दुनियेमध्ये तर
असतात सर्वगुणसंपन्न.... तुम्हा मुलांचे तर हे उद्दिष्ट आहे. पाठशाळेमध्ये उद्दिष्ट
तर राहते ना. शिकणारे जाणतात- मी डॉक्टर बनणार, मी वकील बनणार..... इथे तुम्ही जाणत
आहात आम्ही आलो आहे-मनुष्यापासून देवता बनण्यासाठी.
पाठशाळेमध्ये उद्दिष्ट असल्याशिवाय कोणी बसू शकत नाही. परंतु ही अशी आश्चर्यकारक
पाठशाळा आहे ज्यामध्ये उद्दिष्ट समजत असून, तरीही शिक्षण सोडून देतात. असे समजतात
हे चुकीचे शिक्षण आहे. हे उद्दिष्ट नाही असे कधी होऊ शकत नाही. शिकवणाऱ्यामध्येही
संशय येतो. त्या शिक्षणामध्ये शिकू शकत नसतील किंवा पैसे नसतील, हिंमत नसेल तर शिकणे
सोडून देतात. असे म्हणत नाहीत की वकिलीचे ज्ञान चुकीचे आहे, शिकवणारा चुकीचा आहे.
इथे तर मनुष्याची आश्चर्यकारक बुद्धी आहे. शिक्षणामध्ये संशय आल्यानंतर म्हणतात हे
शिक्षण चुकीचे आहे. भगवान शिकवतच नाहीत, राजाई इ. काहीच मिळत नाही. . . . या सर्व
थापा आहेत. अशाप्रकारे खूप मुले शिकता- शिकता नंतर सोडुन देतात. सर्वजण विचारतात
तुम्ही तर म्हणत होते आम्हाला भगवान शिकवतो, ज्यामुळे मनुष्यां पासून देवता बनतो मग
हे काय झाले?नाही, त्या सर्व थापा होत्या असे म्हणतात. आम्हाला हे उद्दिष्टच समजत
नाही, असे म्हणतात. कितीतरी आहेत जे निश्चयाने शिकत होते, संशय आल्यामुळे शिकणे
सोडून दिले. निश्चय कसा झाला नंतर संशय बुद्धी कोणी बनवले?तुम्ही म्हणता हे जर शिकले
असते तर खूप उच्चपद प्राप्त केले असते. खूप जण शिकत राहतात. वकिली शिकता-शिकता
अर्ध्यावर सोडून देतात, दुसरे तर शिकून वकील बनतात. काही जण शिकून पास होतात, काही
जण नापास होतात. नंतर काही ना काही कमी पद प्राप्त करतात. ही तर खूप मोठी परीक्षा
आहे. यामध्ये खूप धाडस पाहिजे. एक तर निश्चय बुद्धीचे धाडस पाहिजे. माया अशी आहे
आत्ता-आत्ता निश्चय, आत्ता संशय बुद्धी बनवते. खुपजण शिकण्यासाठी येतात परंतु काही
मंदबुद्धी चे असतात, क्रमवार पास होतात ना. वर्तमानपत्रामध्येही यादी येते. इथे ही
असेच आहे, खूपजण शिकण्यासाठी येतात. कोणाची चांगली बुद्धी आहे, कोणाची मंदबुद्धी आहे.
मंदबुद्धी होता-होता नंतर कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये संशय येऊन सोडून जातात.
नंतर इतरांचेही नुकसान करतात. संशयबुद्धी विनशन्ती असे म्हटले जाते. ते उच्चपद
प्राप्त करू शकत नाहीत. निश्चयही आहे परंतु पूर्णपणे शिकले नाहीत तर थोडेच पास
होतील कारण की बुद्धी काही कामाची नाही. धारणा होत नाही. आम्ही आत्मा आहे हेच
विसरून जातात. बाबा म्हणतात मी तुम्हां आत्म्यांचा परमपिता आहे. तुम्ही मुले जाणता
बाबा आले आहेत. काहींना खूप विघ्न आल्यानंतर त्यांना संशय येतो, म्हणतात आम्हाला
आमक्या ब्राह्मणी कडून निश्चय बसत नाही. अरे ब्राह्मणी कशीही असो तुम्ही तर शिकायला
तर पाहिजे ना. शिक्षक चांगले शिकवत नसतील तर विचार करतात यांना शिकण्यापासून सोडून
द्यावे. परंतु तुम्हाला तर शिकायचे आहे ना. हे बाबांचे शिक्षण आहे. शिकवणारा तो परम
शिक्षक आहे. ब्राह्मणी पण त्यांचेच ज्ञान ऐकवते, तर लक्ष त्या शिक्षणाकडे जायला
पाहिजे ना. शिक्षणाशिवाय परीक्षा पास करू शकणार नाही. परंतु बाबांवरचा निश्चय, न
झाल्याने मग शिकणेच सोडून देतात. शिकता-शिकता शिक्षकांमध्ये संशय निर्माण होतो की
यांच्याकडून हे पद मिळेल किंवा नाही, मग सोडून देतात. इतरांनाही खराब करतात, निंदा
केल्यामुळे अजूनच नुकसान करतात. खूप नुकसान होते. बाबा म्हणतात इथे जर कोणी पाप केले
तर त्यांना १००पटीने दंड भोगावा लागतो. अनेकांना खराब करण्यासाठी, एक निमित्त बनतो.
त्यामुळे जे काही पुण्यात्मा बनला होते नंतर पाप आत्मा बनतात. या शिक्षणामुळेच
पुण्य आत्मा बनतात आणि पुण्यात्मा बनवणारा एकच शिवपिता आहेत. जर कोणी शिकत नसतील तर
अवश्य काहीतरी अवगुण आहे. बस म्हणतात जे नशिबात आहे, आम्ही काय करू. जसे की हार्ट
फेल (हृदयाचा अटॅक)होतात. तर जे इथे येऊन मरजीवा बनतात, ते पुन्हा रावण राज्यांमध्ये
जाऊन मरजीवा बनतात. हिऱ्या सारखे जीवन बनवू शकत नाहीत. मनुष्य हार्ट फेल झाल्यानंतर
जाऊन दुसरा जन्म घेतात. इथे हार्ट फेल झाल्यानंतर आसुरी संप्रदायामध्ये जाऊन जन्म
घेतात. हा आहे मरजीवा जन्म. नव्या दुनियेमध्ये जाण्यासाठी बाबांचे बनतात. आत्मे
निघून जातील ना. आम्ही आत्मा या शरीराचे भान जेंव्हा सोडू तेंव्हा समजतील हे देही-
अभिमानी आहेत. आत्मा वेगळी वस्तू आहे, शरीर वेगळी वस्तू आहे. एक शरीर सोडून दुसरे
घेतो तर अवश्य वेगळी वस्तू आहे ना, तुम्ही समजत आहात आम्ही श्रीमतावर या भारतामध्ये
स्वर्गाची स्थापना करत आहोत. ही मनुष्याला देवता बनवण्याची कला शिकायची आहे. हेही
मुलांना समजावले आहे, सतसंग कोणताही नाही. सत्य तर एकाच परमात्म्याला म्हटले जाते.
त्यांचे नाव शिव आहे, तेच सतयुगाची स्थापना करतात. कलियुगाचे आयुष्य अवश्य पूर्ण
होणार आहे. साऱ्या दुनियेचे चक्र कशाप्रकारे फिरते, हे गोळ्याच्या(सृष्टी
चक्राच्या)चित्रामध्ये स्पष्ट आहे. देवता बनण्यासाठी संगमयुगावर बाबांचे बनतात.
बाबांना सोडले तर मग कलियुगामध्ये निघून जातील. ब्राह्मण पणामध्ये संशय आला तर
शुद्र घराण्यामध्ये जाऊन पडतील. नंतर देवता बनू शकत नाहीत.
बाबा हेही समजावत आहेत- कशाप्रकारे आता स्वर्गाच्या स्थापनेचा पाया पडत आहे. पायाचा
शुभारंभा नंतर उद्घाटनाचा ही शुभारंभ करतात. इथे तर गुप्त आहे. हे तुम्ही जाणत आहात
आम्ही स्वर्गा साठी तयार होत आहोत. नंतर नरकाचे नाव राहणार नाही. शेवटपर्यंत
जोपर्यंत जगायचे आहे, अवश्य शिकायचे आहे. पतित-पावन एकच पिता आहे जो पावन बनवतो. आता
तुम्ही मुले समजत आहात हे संगमयुग आहे, जेंव्हा बाबा पावन बनवण्यासाठी येतात.
लिहायचे ही आहे पुरुषोत्तम संगम युगामध्ये मनुष्य नरापासून नारायण बनतो. हेही लिहिले
आहे-हा तुमचा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार आहे. बाबा आता तुम्हाला दिव्यदृष्टी देत
आहेत. आत्मा जाणत आहे आमचे 84 चे चक्र आता पूर्ण झाले आहे. आत्म्यांना बाबा बसून
समजावत आहेत. आत्मा शिकत आहे भले देह-अभिमान घडी-घडी येईल कारण की अर्ध्याकल्पा चा
देह- अभिमान आहे ना. तर देही- अभिमानी बनण्यामध्ये वेळ लागतो. बाबा बसले आहेत, वेळ
मिळाला आहे. जरी ब्रह्माचे आयुष्य १०० वर्ष आहे असे म्हणतात किंवा कमी ही असेल. समजा
ब्रह्मा निघून गेला, असे तर नाही स्थापना होणारच नाही. तुम्ही सेना तर बसलेली आहात
ना. बाबांनी मंत्र दिला आहे, शिकायचे आहे. सृष्टीचे चक्र कशाप्रकारे फिरते, हे ही
बुद्धी मध्ये आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. आठवणी मुळेच विकर्म विनाश
होतील. भक्ती मार्गामध्ये सर्वांकडून विकर्म झाले आहेत. जुनी दुनिया आणि नवी दुनिया
दोन्हींचे गोळे तुमच्यासमोर आहेत. तर तुम्ही लिहू शकता जुनी दुनिया रावणराज्य
मुर्दाबाद, नवी दूनिया ज्ञानमार्ग रामराज्य जिंदाबाद. जे पूज्य होते तेच पुजारी बनले
आहेत. कृष्णही पूज्य गोरा होता नंतर रावण राज्यांमध्ये पुजारी सावळा बनतो. हे
समजावणे तर सोपे आहे. सुरुवातीला जेंव्हा पूजा सुरू होते तेव्हा मोठे-मोठे हिऱ्यांचे
लिंग बनवतात, अतिशय मूल्यवान असतात कारण की बाबांनी एवढे साहूकार बनवले आहे ना. तो
स्वतः हिरा आहेत, तर आत्म्यांना हिऱ्या सारखे बनवत आहेत, तर त्यांना हिरा बनवून
ठेवले पाहिजे ना. हिरा नेहमी मध्यभागी ठेवतात. पुखराज इ. सोबत तर त्याची किंमत
राहणार नाही म्हणून हिऱ्याला मध्यभागी ठेवले जाते. यांच्याद्वारे ८ रत्न विजय माळेचे
दाणे बनतात, सर्वात जास्त मूल्य हिऱ्याचे असते. बाकी तर क्रमवार बनतात. शिवबाबा च
बनवतात. या सर्व गोष्टी बाबां शिवाय कोणीही समजावू शकत नाही. शिकता- शिकता
आश्चर्यवत बाबा-बाबा म्हणतात नंतर निघून जातात. शिव बाबांना बाबा म्हणतात, तर
त्यांना कधीही सोडायला नाही पाहिजे. नंतर म्हटले जाते नशीब. कोणाच्या भाग्यात जास्त
नसेल तर मग कर्म ही असे करतात तर १०० पटीने दंड बसतो. पुण्यात्मा बनण्यासाठी
पुरुषार्थ करत असताना जर पाप केले तर 100 पटीने पाप होते नंतर बुद्धू बनतात, वृद्धी
होऊ शकत नाही. १०० पटीने दंड पडल्याने प्रगती करू शकत नाही. बाबा ज्यांच्या द्वारे
तुम्ही हिऱ्या सारखे बनत आहात त्यांच्यामध्ये का संशय यायला पाहिजे. कोणत्याही
कारणामुळे बाबांना सोडले तर त्यांना मूर्ख म्हटले जाईल. कुठेही राहून बाबांची आठवण
करायची आहे, तरच सजा मिळण्यापासून सुटू शकता. इथे तुम्ही पतीतापासून पावन बनण्यासाठी
येता. अगोदर असे कर्म केले आहेत, त्यामुळे शरीराचे कर्मभोग भोगावे लागतात. आता
तुम्ही तर अर्ध्याकल्पासाठी या सर्वापासून मुक्त होता. स्वतःला पाहायचे आहे आम्ही
कितपत स्वतःची प्रगती करत आहोत, इतरांची किती सेवा करत आहोत?लक्ष्मी-नारायणाच्या
चित्रावरही वरती लिहू शकता की, ही आहे विश्वामध्ये शांतीची राजाई, जी आता स्थापन
होत आहे. हे आहे उद्दिष्ट. तिथे १००% पवित्रता, सुख-शांती आहे. यांच्या राज्यांमध्ये
दुसरा कोणताही धर्म नसतो. तर आता जे एवढे धर्म आहेत त्यांचा अवश्य विनाश होईल ना.
समजावण्यासाठी खूप बुद्धी असायला पाहिजे. नाहीतर मग आपल्या अवस्थे अनुसार समजावून
सांगतात. चित्रां समोर बसून विचार चालवायला पाहिजेत. समज तर मिळाली आहे. समजत असेल
तर समजवायला हवे यासाठी बाबा संग्रहालय सुरू करतात. गेट वे टू हेविन(स्वर्गा कडे
जाण्याचा मार्ग), हे नावही चांगले आहे. ते आहे दिल्ली गेट, इंडिया गेट. हे आहे
स्वर्गाचे गेट. तुम्ही आता स्वर्गाचे गेट उघडत आहात. भक्ती मार्गामध्ये अशाप्रकारे
गोंधळून जातात जसे की भूलभुलैया मध्ये गोंधळून जातात. रस्ता कोणालाही सापडत नाही.
मायेच्या राज्यांमध्ये सर्वजण फसले जातात. नंतर बाबा येऊन बाहेर काढतात. कोणाला
बाहेर निघण्याची इच्छा होत नसेल तर बाबा पण काय करतील यासाठी बाबा म्हणतात महान
मूर्ख पहायचे असतील तर इथे पहा, जे शिकणे सोडून देतात. संशय बुद्धी बनून
जन्मजन्मांतरासाठी स्वतःचा खून करतात. नशीब बिघडल्यानंतर असे होते. ग्रहचारी
बसल्यामुळे गोरा बनण्याच्या ऐवजी काळे बनतात. आत्मा गुप्तरितीने शिकत आहे, आत्माच
शरीराद्वारे सर्वकाही करत आहे. आत्मा शरीरा शिवाय तर काहीच करू शकत नाही. आत्मा
समजण्याचीच मेहनत आहे. स्वतःला आत्मा निश्चय करत नाहीत तर मग देह- अभिमाना मध्ये
येतात. अच्छा
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. परम
शिक्षकाची शिकवण आम्हाला नरापासून नारायण बनवणारी आहे, याच निश्चयाद्वारे ध्यान
देऊन शिक्षण शिकायचे आहे. शिकविणाऱ्या शिक्षकाकडे(ब्राह्मणीकडे) पाहायचे नाही.
2. देही-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, मरजीवा बनलो आहे तर या शरीराचे भान
सोडून द्यायचे आहे. पुण्य आत्मा बनायचे आहे. कोणतेही पाप कर्म करायचे नाही.
वरदान:-
स्व -स्थितीच्या
आसनावर स्थिर राहून परिस्थितींवर विजय प्राप्त करणारे मास्टर रचनाकार भव
कोणतीही परिस्थिती,
प्रकृती द्वारे येते यासाठी परिस्थिती रचना आहे आणि स्व-स्थिती वाला रचनाकार आहे.
मास्टर रचनाकार किंवा मास्टर सर्वशक्तिमान कधीही हार खाऊ शकत नाही, अशक्य आहे. जर
कोणी स्वतःचे सीट, आसन सोडतो तेंव्हाच हार होते. सीट सोडणे म्हणजे शक्तीहीन बनणे.
स्वस्थितीच्या आधारावर शक्ती स्वतःच येतात. जे स्वस्थिती वरून खाली येतात त्यांना
मायेची धूळ लागते. बापदादांचे लाडके मरजीवा जन्मधारी ब्राह्मण, कधीही देह
अभिमानाच्या मातीमध्ये खेळू शकत नाहीत.
बोधवाक्य:-
दृढता घट्ट
संस्कारांनाही मेणा प्रमाणे पाघळून (नष्ट करून) टाकते.