28-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो:-तुम्ही संपूर्ण दुनियेचे खरे खरे मित्र आहात, तुमची कोणाशीही शत्रुता
असायला नको "
प्रश्न:-
तुम्ही आत्मिक
मिलट्री आहात, तुम्हाला बाबांचे कोणते डायरेक्शन(दिशानिर्देश) मिळाले आहे, जे
आचरणामध्ये आणायचे आहेत?
उत्तर:-
तुम्हाला डायरेक्शन आहे की बैज सदैव लावलेला असावा. कुणीही विचारले हे काय
आहे?तुम्ही कोण आहात?तर सांगा, आम्ही आहोत संपूर्ण दुनियेतील काम अग्नीला विझवणारे
अग्नी पथक. यावेळी संपूर्ण दुनियेमध्ये काम विकाराची आग लागली आहे, आम्ही सर्वांना
संदेश देत आहोत, आता पवित्र बना, दैवीगुण धारण करा तर तुमची नौका पार होईल.
ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुले सहज आठवणीमध्ये बसले आहेत. काही काहींना अवघड वाटते. खुपजण
गोंधळून जातात-आम्ही पाठ सरळ करून कसे बसू. बाबा म्हणतात असे काही नाही, कसेही बसू
शकता. फक्त बाबांची आठवण करायची आहे. यामध्ये कोणतीच अवघड गोष्ट नाही. ते हठयोगी असे
पाठ सरळ करून बसतात. पायावर पाय ठेवून उभे राहतात. इथे तर बाबा म्हणतात आरामा मध्ये
बसा. बाबांची आणि 84च्या चक्राची आठवण करा. ही आहेच सहज आठवण. उठता-बसता बुद्धीमध्ये
राहायला पाहिजे. जसे की हा छोटा मुलगा वडिलांच्या शेजारी बसलेला आहे, याच्या
बुद्धीमध्ये आई-वडिलांची आठवण असेल. तुम्ही पण मुले आहात ना. बाबांची आठवण करणे तर
खूप सोपे आहे. आम्ही बाबांची मुले आहोत. बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. शरीर
निर्वाहासाठी गृहस्थ व्यवहारांमध्ये खुशाल रहा, फक्त इतरांची आठवण बुद्धी मधून
काढून टाका. कुणी हनुमानाची, कोणी कोणाची, साधू इ. ची आठवण करत होते, ती आठवण सोडून
द्यायची आहे. आठवण तर करतात ना, पूजा करण्यासाठी पुजाऱ्याला मंदिरामध्ये जावे लागते,
इथे कुठेही जाण्याची गरज नाही. कुणीही भेटले तर सांगा, शिव बाबांचे सांगणे आहे मज
एका पित्याची आठवण करा. शिवबाबा तर आहेत निराकार. अवश्य तो साकार मध्ये येऊन सांगतो
माझी आठवण करा. मी पतित-पावन आहे. हे अक्षर तर बरोबर आहे ना. बाबा म्हणतात माझी
आठवण करा. तुम्ही सर्व पतित आहात. ही पतीत तमोप्रधान दूनिया आहे ना म्हणून बाबा
म्हणतात कोणत्याही देहधारी ची आठवण करू नका. ही तर चांगली गोष्ट आहे ना. कोणत्याही
गुरु इ. ची महिमा करत नाहीत. बाबा म्हणतात फक्त माझी आठवण करा तर तुमचे पाप नष्ट
होतील. हे आहे योगबल किंवा योगअग्नी. बेहदचे पिता तर खरे सांगत आहेत ना-गीतेचे
भगवान निराकार च आहेत. कृष्णाची गोष्ट नाही. भगवान सांगतात फक्त माझी आठवण करा दुसरा
कोणताही उपाय नाही. पावन बनून गेल्यानंतर उच्चपद प्राप्त कराल. नाहीतर पद कमी होईल.
मी तुम्हाला बाबांचा संदेश देत आहे. मी संदेशी आहे. असे समजावण्यात कोणताही त्रास
नाही. माता, अहिल्या, कुब्जाही उच्च पद प्राप्त करू शकतात. इथे राहणारे असतील, किंवा
घर गृहस्थ मध्ये राहणारे असतील, असे नाही की इथे राहणारे जास्त आठवण करू शकतात. बाबा
म्हणतात बाहेर राहणारे ही खूप आठवण करू शकतात. खूप सेवा करू शकतात. इथेही बाबांकडून
ताजेतवाने(रिफ्रेश)होऊन जातात तर मनामध्ये किती खुशी राहायला पाहिजे. या खराब
दुनियेमध्ये तर थोडे दिवस राहिले आहेत, नंतर कृष्णपुरीमध्ये निघून जाऊ. कृष्णाच्या
मंदिरालाही सुखधाम म्हणतात. तर मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे. जेंव्हा की तुम्ही
बेहदच्या पित्याचे बनले आहात. तुम्हालाच स्वर्गाचे मालक बनवले होते. तुम्ही सुद्धा
म्हणता बाबा पाच हजार वर्षांपूर्वीही ही आम्ही तुम्हाला भेटलो होतो आणि परत भेटणार
आहोत. आता बाबांची आठवण केल्याने मायेवर विजय प्राप्त करायचा आहे. आता या दुःखधाम
मधे राहायचे नाही. तुम्ही सुखधाम मध्ये जाण्यासाठी शिकत आहात. सर्वांना हिसाब किताब
पूर्ण करून परत जायचे आहे. मी आलोच आहे नवी दुनिया स्थापन करण्यासाठी. बाकी सर्व
आत्मे मुक्तिधाम मध्ये निघून जातील. बाबा म्हणतात-मी काळाचाही काळ आहे. सर्वांना
शरीरामधून सोडवून सर्व आत्म्यांना घेऊन जाणार आहे. लवकर जावे असे सर्वजण म्हणतात.
इथे तर राहायचे नाही. ही तर जुनी दुनिया, जुने शरीर आहे. आता बाबा म्हणतात मी
सर्वांना घेऊन जाणार आहे. कोणालाही सोडणार नाही. तुम्ही सर्वांनी बोलवलंच आहे-हे
पतित-पावन ये. खुशाल आठवण करत राहतात परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. पतित-पावन ची
किती धून लावतात. नंतर म्हणतात रघुपती राघव राजाराम. आता शिवबाबा तर राजा बनत नाहीत,
राजाई करत नाहीत. त्यांना राजाराम म्हणणे चुकीचे आहे. माळेचे जेंव्हा स्मरण करतात
तेंव्हा राम-राम म्हणतात. तेंव्हा भगवानाची आठवण येते. भगवान तर शिव आहे. मनुष्यांची
नावे खूप ठेवली आहेत. कृष्णालाही श्याम सुंदर, वैकुंठ नाथ, मक्खन चोर इत्यादी-
इत्यादी खूप नावे दिली आहेत. तुम्ही आता कृष्णाला मक्खन चोर(लोणी चोरणारा)असे
म्हणाल का?अजिबात नाही. तुम्ही आता समजता भगवान तर एक निराकार आहे, कोणत्याही
देहधारीला भगवान म्हणू शकत नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकराला ही म्हणू शकत नाही तर मग
मनुष्य स्वतःला भगवान कसे म्हणू शकतात. वैजयंतीमाळा फक्त १०८ ची गायन केली जाते.
शिव बाबांनी स्वर्ग स्थापन केला, त्याचे हे मालक आहेत. अवश्य त्या अगोदर यांनी हा
पुरुषार्थ केला असेल. त्याला म्हटले जाते कलियुगाचा अंत आणि सतयुगाच्या सुरुवातीचे
संगमयुग. हे आहे कल्पाचे संगमयुग. मनुष्यांनी नंतर युगे-युगे असे म्हटले आहे, अवतार
नावही विसरून नंतर त्यांना दगडा धोंड्या मध्ये, कणा- कणा मध्ये आहे असे म्हटले. हेही
नाटक आहे. जी गोष्ट घडून जाते तिला नाटक म्हटले जाते. कोणाशी भांडण इ. झाले, होऊन
गेले, त्याचे चिंतन करत बसायचे नाही. ठीक आहे कोणी कमी-जास्त बोलले, तुम्ही ते
विसरून जा. कल्पा पूर्वीही असे बोलले होते. लक्षात राहिल्याने नंतर बिघडत राहतात.
ती गोष्ट नंतर कधी बोलूही नका. तुम्हा मुलांना तर सेवा करायची आहे ना. सेवेमध्ये
कोणतेही विघ्न पडायला नको. सेवेमध्ये अवगुण दिसायला नको. शिवबाबांची सेवा आहे ना.
त्यामध्ये कधीही नाही म्हणू नका, नाहीतर आपले पद भ्रष्ट कराल. बाबांचे मदतगार बनले
आहात तर पूर्ण मदत द्यायला हवी. बाबांची सेवा करण्यामध्ये थोडाही धोका देऊ नका.
सर्वांपर्यंत संदेश पोहोचवायचा आहे. बाबा म्हणतात संग्राहलयाचे नाव असे ठेवा की
मनुष्य पाहून आत मध्ये यावेत आणि येऊन समजावून घ्यावे, कारण की ही नवी गोष्ट आहे
ना. मनुष्य नवी गोष्ट पाहिल्यानंतर आत मध्ये येतात. आज-काल भारताचा प्राचीन योग
शिकण्यासाठी परदेशातून येतात. आता प्राचीन अर्थात जुन्यात जुना, तो तर भगवंतानेच
शिकवला आहे, ज्याला 5 हजार वर्ष झाली आहेत. सतयुग-त्रेता मध्ये योग नसतो, ज्याने
शिकवला तो तर निघून गेला नंतर जेंव्हा पाच हजार वर्षानंतर येतात, तेंव्हाच येऊन
राजयोग शिकवतात. प्राचीन अर्थात पाच हजार वर्षापूर्वी भगवानाने शिकवला होता. तोच
भगवान नंतर संगमयुगा वर येऊन राजयोग शिकवतो, ज्याद्वारे आपण पावन बनू शकतो. यावेळी
तर तत्त्वही तमोप्रधान आहेत. पाणीसुद्धा किती नुकसान करते. जुन्या दुनियेमध्ये
उपद्रव होत राहतात. सतयुगामध्ये मध्ये उपद्रवाची गोष्टच नाही. तिथे तर प्रकृती दासी
बनते. इथे प्रकृति दुश्मन बनून दुःख देत आहे. या लक्ष्मीनारायणाच्या राज्यांमध्ये
दुःखाची गोष्टच नव्हती. सतयुग होते. आता परत ते स्थापन होत आहे. बाबा प्राचीन
राजयोग शिकवत आहेत. नंतर पाच हजार वर्षांनंतर शिकवतील, ज्याची भूमिका आहे तोच
वठवणार. बेहदचा पिता ही भूमिका वठवत आहे. बाबा म्हणतात मी यांच्यामध्ये प्रवेश करून,
स्थापना करून निघून जातो. हाहाकारा नंतर पुन्हा जय जयकार होतो. जुनी दुनिया नष्ट
होऊन जाईल. जेंव्हा या लक्ष्मीनारायणाचे राज्य होते तेंव्हा जुनी दुनिया नव्हती. 5
हजार वर्षाची गोष्ट आहे. लाखो वर्षांची गोष्ट असू शकत नाही. तर बाबा म्हणतात इतर
सर्व गोष्टी सोडून आपले कल्याण करण्यासाठी ही सेवा करा. रुसून सेवेमध्ये धोका देऊ
नका. ही आहे ईश्वरीय सेवा. मायेचे वादळ खूप येतील. परंतु बाबांच्या ईश्वरीय
सेवेमध्ये धोका देऊ नका. बाबा सेवेनिमित्त डायरेक्शन तर देतच राहतात. मित्र संबंधी
इ. जे पण येतील, सर्वांचे खरे मित्र तुम्ही आहात. तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी तर
संपूर्ण दुनियेचे मित्र आहात कारण की तुम्ही बाबांचे मदतगार आहात. मित्रांमध्ये
कोणत्याही प्रकारची शत्रुता असायला नको. कोणतीही गोष्ट असेल तर सांगा, शिवबाबांची
आठवण करा. बाबांच्या श्रीमतावर चालत राहिले पाहिजे. नाहीतर आपले नुकसान कराल. तुम्ही
रेल्वेमधून येता, तिथे तर सर्वजण रिकामे बसलेले असतात. सेवेची खूप चांगली संधी आहे.
बैज तर खूप चांगली वस्तु आहे. प्रत्येकाने लावलेला असावा. कुणी विचारले तुम्ही कोण
आहात तर सांगा, आम्ही आहोत अग्नि पथक, ज्याप्रमाणे ते अग्निशामक वाले असतात, आग
विझवण्यासाठी. तर यावेळी संपूर्ण सृष्टी काम अग्नीमध्ये जळत आहे. आता बाबा सांगतात
काम महाशत्रूवर विजय मिळवा. बाबांची आठवण करा, पवित्र बना दैवीगुण धारण करा, तर नौका
पार होईल. हे बैज श्रीमतावरच बनले आहेत. खूप थोडी मुले आहेत जे बैजवर सेवा करतात.
बाबा मुरली मध्ये किती समजावत राहतात. प्रत्येक ब्राह्मणा जवळ हा बैज असायला पाहिजे,
कोणीही भेटल्यानंतर त्यांना याच्यावर समजावयाचे आहे, हे बाबा आहेत, यांची आठवण
करायची आहे. आम्ही साकार बाबांची महिमा करत नाही. सर्वांचा सदगती दाता एकच निराकार
पिता आहे, त्यांची आठवण करायची आहे. आठवणीच्या बळाने तुमचे पाप नष्ट होतील. नंतर
अंत मती सो गती होऊन जाईल. दुःखधामा मधून मुक्त व्हाल. नंतर तुम्ही विष्णुपुरी मध्ये
याल. किती मोठी खुशखबरी आहे. पुस्तके सुद्धा देऊ शकता. सांगा, तुम्ही गरीब आहात तर
आम्ही मोफत देऊ शकतो. साहुकारांनी तर पैसे दिले पाहिजे कारण कि हे तर छापावे लागतात
ना. ही अशी वस्तू आहे ज्याद्वारे तुम्ही फकीरा पासून विश्वाचे मालक बनू शकाल.
समजावून तर खूप सांगितले जाते. कोणत्याही धर्माचा असो, सांगा, वास्तव मध्ये तुम्ही
आत्मा आहात, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. आता विनाश समोर उभा आहे, ही
दुनिया बदलणार आहे. शिव बाबांची आठवण केली तर विष्णुपुरी मध्ये याल. सांगा, ही
तुम्हाला करोडो पदम रुपयांची वस्तू देत आहे. बाबांनी किती समजावले आहे-बैज वर सेवा
करायची आहे परंतु बैज लावतच नाहीत. लाज वाटते. ब्राह्मणी ज्या पार्टी घेऊन येतात
किंवा कुठे ऑफिस इ. मध्ये एकट्या जातात तेंव्हा हा बैज अवश्य लावलेला पाहिजे, तुम्ही
ज्यांना याच्यावरती समजावून सांगाल ते खूप खुश होतील. सांगा, आम्ही एका पित्यालाच
मानतो, तोच सर्वांना सुख-शांती देणारा आहे, त्याची आठवण करा. पतित आत्मा तर जाऊ शकत
नाही. आता ही जुनी दुनिया बदलत आहे. अशाप्रकारे रस्त्यामध्ये सेवा करत आले पाहिजे.
तुमचे नाव खूप प्रसिद्धीस येईल, बाबा समजतात कदाचित लाज वाटते म्हणून बैज लावून सेवा
करत नाहीत. एकतर बैज, शिडी चे चित्र किंवा त्रिमूर्ती, गोळा(सृष्टिचक्र)आणि झाडाचे
चित्र सोबत असावे, आपसा मधे बसून एक दुसऱ्याला समजावून सांगा तर सर्वजण एकत्र येतील.
विचारतील हे काय आहे? सांगा, शिवबाबा यांच्याद्वारे(ब्रह्माद्वारे)ही नवी दुनिया
स्थापन करत आहे. आता बाबा म्हणतात माझी आठवण करा, पवित्र बना. अपवित्र तर परत जाऊ
शकत नाहीत. अशा गोड-गोड गोष्टी सांगायला पाहिजेत. तर खुशी मध्ये सर्वजण ऐकतील. परंतु
कोणाच्याही बुद्धीमध्ये बसत नाही. सेंटर वर क्लास मध्ये जेंव्हा जाता तेंव्हाही बैज
लावलेला असावा. मिलट्री वाल्यांचा हा बिल्ला(बैज)लावलेला असतो. त्यांना कधी लाज
वाटते का? तुम्हीपण आत्मिक मिलट्री आहात ना. बाबा डायरेक्शन देतात मग आचरणामध्ये का
आणत नाही. बैज लावलेला असेल तर शिवबाबांची पण आठवण राहील-आम्ही शिवबाबां ची मुले
आहोत. दिवसेंदिवस सेवा केंद्रही सुरू होत राहतील. कोणी ना कोणी येतच राहतील.
विचारतील आमक्या शहरांमध्ये तुमची शाखा नाही का. बोला, कुणी सोय करत असेल घर इ. ची,
निमंत्रण दिले तर आम्ही येऊन सेवा करू शकतो. हिम्मत मुलांची मदत बाबांची, बाबा तर
मुलांनाच सांगतील सेवाकेंद्र खोला, सेवा करा. ही सर्व शिवबाबांची दुकाने आहेत ना.
मुलांच्या द्वारे चालवत आहेत. अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. कधीही आपसा
मध्ये रुसून सेवेमध्ये धोका द्यायचा नाही. विघ्न रूप बनायचे नाही. आपले अवगुण
दाखवायचे नाही. बाबांचे पूर्णपणे मदतगार बनायचे आहे.
2. कधीही कोणाशी भांडण इ. झाले, होऊन गेले, त्याचे चिंतन करायचे नाही. कोणी
कमी-जास्ती बोलले, तुम्ही ते विसरून जावा. ती गोष्ट नंतर कधी बोलूही नका.
वरदान:-
झालेल्या
गोष्टींना दया स्वरूप बनुन सामावणारे शुभचिंतक भव
जर कोणाच्याही
घडलेल्या अवगुणांच्या गोष्टी कोणी सांगितल्या तर शुभ भावने द्वारे किनारा करा.
व्यर्थ चिंतन किंवा अवगुणांच्या गोष्टी आपसा मधे करू नका. होऊन गेलेल्या गोष्टींना
दया स्वरूप बनून सामावून घ्या. सामावून शुभ भावने द्वारे त्या आत्म्याच्या प्रति
मनसा सेवा करत रहा. भले संस्कारांच्या अधीन होऊन कुणी उलटे बोलते, करते किंवा ऐकते
तर त्याला परिवर्तन करा. एकाकडून दुसऱ्या पर्यंत, दुसऱ्याकडून तिसऱ्या पर्यंत
अशाप्रकारे व्यर्थ गोष्टींची माळ तयार व्हायला नको. या गोष्टीवर ध्यान ठेवणे
म्हणजेच शुभचिंतक बनणे.
बोधवाक्य:-
संतुष्टमणी बना तर प्रभू प्रिय, लोकप्रिय आणि स्वयंप्रिय बनाल