05-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, या नाटकांमध्ये तुम्हा आत्म्यांना आप-आपली भूमिका मिळाली आहे, आता
तुम्हाला हे शरीर रुपी कपडे उतरून घरी जायचे आहे, परत नवीन राज्यांमध्ये यायचे आहे"
प्रश्न:-
बाबा कोणते पण
कार्य प्रेरणेद्वारे करत नाहीत, त्यांचे अवतरण होते, हे कोणत्या गोष्टी द्वारे
सिद्ध होते?
उत्तर:-
बाबांना करता करविता पण म्हणतात. प्रेरणाचा अर्थ तर विचार आहे. प्रेरणे द्वारे
कोणत्या नवीन दुनियेची स्थापना होत नाही. बाबा मुलांद्वारे स्थापना करतात,
कर्मेंइंद्रिया शिवाय तर काहीच करू शकत नाहीत, म्हणून त्यांना शरीराचा आधार घ्यावा
लागतो.
ओम शांती।
आत्मिक मुलं, आत्मिक पित्याच्या समोर बसले आहेत, म्हणजे आपल्या पित्याच्या समोर बसले
आहेत. आत्मा जरूर शरीराच्या सोबतच बसेल. बाबा पण जेव्हा शरीर घेतात, तेव्हाच समोर
येतात, याला म्हटले जाते, आत्मा-परमात्मा वेगळे राहिले खूप काळ. . . तुम्ही बाबांना
ईश्वर, प्रभू, परमात्मा वेग-वेगळे नावं दिले आहेत. परमपिता कधी लौकिक पित्याला
म्हटले जात नाही. फक्त परमपिता लिहले तरी हरकत नाही. परमपिता म्हणजे सर्व आत्म्याचे
पिता एकच आहेत. मुलं जाणता आम्ही परमपित्याच्या सोबत बसलो आहोत. परमपिता परमात्मा
आणि आम्ही आत्मे शांतीधामचे राहणारे आहोत. येथे भूमिका करण्यासाठी आलो आहोत.
सतयुगापासून कलियुगापर्यंत भूमिका वठवली, ही झाली नविन रचना. रचनाकार बाबांनी समजवले
आहे की, मुलांनी अशा प्रकारे भूमिका केली आहे. अगोदर हे जाणत नव्हते की, आम्हीच ८४
जन्माचे चक्र लावले आहे. आता तुम्हा मुलांशी बाबा गोष्टी करतात, ज्यांनी ८४ चे चक्र
लावले आहे. सर्व तर ८४ जन्म घेऊ शकत नाहीत. हे समजून सांगायचे आहे की, ८४चे चक्र कसे
फिरते. बाकी लाख वर्षाची गोष्ट नाही. मुलं जाणतात आम्ही प्रत्येक पाच हजार
वर्षांनंतर भूमिका करण्यासाठी येतो. आम्ही कलाकार आहोत. उच्च ते उच्च भगवंताची पण
विचित्र भूमिका आहे. ब्रह्मा आणि विष्णूची विचित्र भुमिका म्हणनार नाही. दोघेही 84
चे चक्र लावतात. बाकी शंकराची भूमिका या दुनिया मध्ये नाही. त्रिमूर्ती मध्ये
दाखवतात-स्थापना, विनाश, पालना. चित्रावरती समजून सांगायचे आहे. चित्र जे दाखवतात.
त्यावरती समजून सांगायचे आहे. संगमयुगावरतीच जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे.
प्रेरक अक्षर पण चुकीचे आहे. जसे कोणी म्हणतात, आज आम्हाला बाहेर जाण्याची प्रेरणा
नाही. प्रेरणा म्हणजे विचार. प्रेरणेचा दुसरा कोणता अर्थ नाही. परमात्मा काही
प्रेरणे द्वारे काम करत नाहीत, न प्रेरणे द्वारे ज्ञान मिळू शकते. बाबा या
कर्मइंद्रिये द्वारे भुमिका वठविण्यासाठी येतात, कारण कर्ता-करविता आहेत ना. तर
जरूर मुला द्वारेच करतील. शरीरा शिवाय तर करू शकत नाहीत. या गोष्टीना पण कोणी जाणत
नाहीत. न ईश्वर पित्याला जाणतात. ऋषीमुनी इत्यादी म्हणतात, आम्ही ईश्वराला जाणत
नाहीत. न आत्म्याचे, न परमात्माचे, कोणामध्ये ज्ञान आहे. बाबा मुख्य
निर्माता-दिग्दर्शक आणि श्रीमत पण देतात. मनुष्याच्या बुद्धी मध्ये तर सर्व बसले
आहेत. तुम्ही समजता बाबा, आमचे पिता आहेत. ते लोक तर सर्वव्यापी म्हणतात, तर पिता
समजू शकत नाहीत. तुम्ही समजता, हा बेहद पित्याचा परिवार आहे. सर्वव्यापी
म्हटल्यामुळे परिवाराचा सुगंध येत नाही. त्यांना म्हटले जाते निराकार शिवबाबा.
निराकारी आत्म्याचे बाबा. शरीर आहे तेव्हा तर आत्मा बोलते की, बाबा. शरीरा शिवाय तर
आत्मा बोलू शकत नाही. भक्तीमार्गात तर बोलवत आले आहेत. ते समजतात ते बाबा दु:खहर्ता
सुखकर्ता आहेत. सुखधाम मध्ये सुख मिळते, तर शांतीधाम मध्ये शांती मिळते. येथे तर
दु:खच आहे. हे ज्ञान तुम्हाला संगमयुगा मध्येच मिळते. जुन्या आणि नवीन युगाच्या
मध्ये मिळते. बाबा तेव्हाच येतात, जेव्हा नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा
विनाश होणार आहे. प्रथम नवीन दुनियेची स्थापना म्हणायला पाहिजे. प्रथम जुन्या
दुनियेचा विनाश म्हणने चुकीचे होते. आता तुम्हाला बेहदच्या नाटकाचे ज्ञान मिळत आहे.
जसे ते आत्मे घरांमधून साधारण कपडे घालून येतात, परत नाटकासाठी दुसरे कपडे घालतात,
परत नाटक पूर्ण झाल्यानंतर, आप-आपले कपडे घालून घरी जातात. हे पण बेहदचे नाटक आहे.
आता ही बेहदची सारी जुनी दुनिया आहे, परत नवीन दुनिया होईल. ती दुनिया खूप लहान आहे
आणि एकच धर्म आहे. तुम्हा मुलांना जुन्या दुनिये पासून निघून, हदच्या दुनिया मध्ये,
नवीन दुनिया मध्ये यायचे आहे. कारण तेथे एकच धर्म आहे. अनेक धर्म, अनेक मनुष्य
झाल्यामुळे बेहद होते. तेथे तर एक धर्म आणि थोडेच मनुष्य असतात. एका धर्माच्या
स्थापनेसाठी यावे लागते. तुम्ही मुलं या बेहदच्या नाटकाच्या रहस्याला समजतात की, हे
चक्र कसे फिरते. या वेळेत जे काही प्रत्यक्षात होते, त्याचेच परत भक्ती मार्गामध्ये
सण साजरे करतात. क्रमानुसार कोण-कोणते सण येतात, हे पण तुम्ही मुलं जाणतात. उच्च ते
उच्च भगवान शिवबाबाची जयंती म्हणनार. ते येतील तेव्हाच परत सण इत्यादी बनतात.
शिवबाबा प्रथम येऊन गिता ऐकवतात म्हणजेच आदी मध्य अंतचे ज्ञान ऐकवतात. योग पण
शिकवतात, त्यासोबत तुम्हाला शिकवतात पण. प्रथम शिवपिता आले, शिवजयंती म्हणजे
शिवरात्री झाली, परत म्हणनार गिता जयंती. आत्म्यांना ज्ञान ऐकवतात, तर गीताजयंती
झाली ना. तुम्ही मुलं विचार करा आणि सणाला क्रमानुसार लिहा. या गोष्टींना आपल्या
धर्माचे समजतील. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय वाटतो. दुसर्या धर्माची गोष्टच नाही.
जरी कोणाला दुसरा धर्म प्रिय असेल परंतु त्यामध्ये येऊ शकत नाहीत. स्वर्गामध्ये
दुसऱ्या धर्माचे थोडेच येऊ शकतात. कल्पवृक्षा मध्ये अगदी स्पष्ट आहे. जे-जे धर्म
ज्यावेळेस येतात, परत त्याच वेळेत येतील. प्रथम बाबा येतात, तेच येऊन राजयोग
शिकवतात, तर म्हणतील शिवजयंती, परत गीताजयंती, परत नारायण जयंती म्हणले जाते. ते तर
सतयुग होते. ते पण क्रमानुसार येतात. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. शिवजयंती कधी झाली,
हे पण माहिती नाही. ज्ञान ऐकवले ज्याला गीता म्हटले जाते, परत विनाश पण होतो. जगदंबा
इत्यादीच्या जयंतीची सुट्टी पण देत नाहीत. मनुष्य कोणाचेही तिथी तारीख इत्यादी
बिलकुल जाणत नाहीत. लक्ष्मी- नारायण राम-सिताच्या राज्याला पण जाणत नाहीत. अडीच
हजार वर्षांमध्ये जे आले आहेत त्यांना जाणतात, परंतु त्यांच्या अगोदर जो देवी देवता
धर्म होता, त्यांना किती काळ झाला कोणी जाणत नाहीत. पाच हजार वर्षांपेक्षा मोठा
कल्प तर होऊ शकत नाही. अर्ध्या मध्ये तर पुष्कळ संख्या झाली, बाकी अर्ध्या मध्ये
यांचे राज्य होते. परत जास्त वर्षाचे कल्प कसे होऊ शकते. ८४ लाख जन्म पण होऊ शकत
नाहीत. ते लोक समजतात कल्पाचे आयुष्य लाख वर्षाचे आहे. मनुष्याला अज्ञान अंधारामध्ये
टाकले आहे. कुठे सर्व नाटकच पाच हजार वर्ष आहे, कुठे फक्त कलियुगालाच म्हणतात, आणखी
चाळीस हजार वर्षे बाकी आहेत. जेव्हा लढाई लागते तर समजतात, भगवंताला यायला पाहिजे
परंतु भगवान तर संगमयुगा मध्येच यायला पाहिजेत. महाभारत लढाई तर संगमयुगा मध्येच
लागते. बाबा म्हणतात मी पण कल्प-कल्प संगमयुगा मध्येच, नवीन दुनियेची स्थापना आणि
जुन्या दुनियेचा विनाश करण्यासाठी येतो. नवीन दुनियेची स्थापना झाली तर जुन्या
दुनियेचा विनाश होईल, यासाठीच लढाई आहे. यामध्ये शंकराच्या प्रेरणेची काहीच कोणतीच
गोष्ट नाही. हे तर समजते जुनी दुनिया जरुर नष्ट होईल. इमारतीत ईत्यादी भूकंपामध्ये
सर्व नष्ट होतील, कारण नवीन दुनिया पाहिजे ना. नवीन दुनिया जरूर होती. दिल्ली
परीस्थान होती, यमुनेचा किनारा होता, लक्ष्मी नारायणाचे राज्य होते, चित्र पण आहेत.
लक्ष्मी नारायणला स्वर्गाचे म्हणू शकता. तुम्ही मुलांनी साक्षात्कार पण केला आहे,
कसे स्वयवर इत्यादी होते. बाबा या सर्व गोष्टीची उजळणी करवतात. अच्छा, ज्ञानाच्या
गोष्टी आठवण मध्ये येत नाहीत, तर बाबांची आठवण करा, शिक्षकांची आठवण करा. शिक्षक जे
शिकवतात, ते जरूर आठवणीत येईल. शिक्षक आठवणीत येतील तर ज्ञान पण बुद्धीमध्ये राहील
आणि उद्देश पण बुद्धीमध्ये राहील. आठवण ठेवावीच लागेल, कारण तुमचे विद्यार्थी जीवन
आहे ना. हे पण जाणतात, जे आम्हाला शिकवतात, ते आमचे पिता पण आहेत. लौकिक पिता काही
गायब होत नाहीत. लौकिक पारलौकिक आणि परत हे अलौकिक आहेत. यांची कोणी आठवण करत नाहीत.
लौकिक पित्याकडुन तर वारसा मिळतो. शेवटपर्यंत आठवण राहते. शरीर सोडले तर दुसरे पिता
मिळतात. जन्म जन्मांतर लौकिक पिता मिळत राहतात. पारलौकिक पित्याची पण दुःख व
सुखामध्ये आठवण करतात. मुलगा झाला तर ईश्वराने दिला असे म्हणतात. बाकी प्रजापिता
ब्रह्माची आठवण का करतील?त्यांच्याद्वारे काहीच मिळत नाही. यांना अलौकिक म्हटले जाते.
तुम्ही जाणतात की आम्ही ब्रह्मा द्वारे शिवबाबा पासून वारसा घेत आहोत. जसे आम्ही
शिकतो, तसेच हा रथ निमित्त बनलेला आहे. अनेक जन्मांच्या अंत मध्ये यांचे शरीरच रथ
बनले आहे. रथाचे नाव तर ठेवावे लागते. हा बेहदचा सन्यास आहे. रथ कायम राहतो,
दुसऱ्यांचा ठिकाणा नाही. चालता-चालता सोडून जातात. हा रथ तर वैश्विक नटकानुसार कायम
आहे, यालाच भाग्यशाली रथ म्हटले जाते. तुम्हा सर्वांना भाग्यशाली म्हणणार नाही,
एकालाच म्हटले जाते, ज्यामध्ये बाबा येऊन ज्ञान देतात. स्थापनेचे कार्य करतात.
तुम्ही भाग्यशाली रथ नाहीत. तुमची आत्मा या रथा मध्ये बसून शिकत आहे. आत्मा पवित्र
बनते, म्हणून भाग्य या तनाचे आहे, ज्यामध्ये बसून बाबा शिकवतात. हा अंतिम जन्म खूप
भाग्यशाली आहे, परत शरीर बदलून आम्ही देवता बनतो. या जुन्या शरीराद्वारेच तुम्ही
शिक्षण घेतात, शिवबाबाचे बनतात. तुम्ही जाणतात, आमचे जीवन अगोदर कवडी तुल्य होते,
आता हिरेतुल्य बनत आहे. जेवढे शिकाल तेवढे उच्चपद मिळवाल. बाबांनी समजावले आहे
आठवणीची यात्राच मुख्य आहे. यालाच भारताचा प्राचीन योग म्हटले जाते, ज्याद्वारे
तुम्ही पावन बनतात. स्वर्गवासी तर सर्वच बनतात, परत सर्व शिक्षणावर आधारित आहे.
तुम्ही बेहदच्या शाळेमध्ये बसले आहात. तुम्हीच परत देवता बनाल. तुम्ही समजू शकता,
उच्चपद कोण प्राप्त करतील. त्यांची शैक्षणीक पात्रता काय असायला पाहिजे. अगोदर
आमच्यामध्ये पण ती शैक्षणीक पात्रता नव्हती, आसुरी मतावर होतो. आत्ता ईश्वरीय मत
मिळत आहे. आसुरी मतावर आम्ही उतरती कलेमध्ये जातो. ईश्वरीय मतावर आम्ही चढती
कलामध्ये जातो. ईश्वरीय मत देणारे एकच आहेत, आसुरी मत देणारे अनेक आहेत. मात-पिता,
भाऊ-बहीण शिक्षक-गुरु अनेकांचे मत मिळत राहते. आता तुम्हाला एकाच मत मिळत आहे, जे
२१ जन्म कामांमध्ये येते. तर अशा प्रकारच्या श्रीमतावर चालायला पाहिजे ना. जितके
चालाल तेवढे श्रेष्ठ पद मिळवाल. कमी चालाल तर कमी पद मिळेल. एकाच भगवंताची श्रीमत
आहे. उच्च ते उच्च भगवानच आहेत, ज्यांनी कृष्णाला पण उच्च ते उच्च बनवले. परत
रावणाने कनिष्ठ ते कनिष्ठ बनवले. बाबा गोरे बनवतात परत रावण सावळे बनवतात. बाबा तर
वारसा देतात. ते तर निर्विकारीच आहेत. देवतांची महिमा गायन करतात, तुम्ही सर्वगुण
संपन्न, संपूर्ण निर्विकारी. सन्याशांना तर संपूर्ण निर्विकारी म्हणणार नाहीत.
सतयुगा मध्ये आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतात. देवतांना तर सर्वच जाणतात, ते
संपूर्ण निर्विकारी असल्यामुळे, संपूर्ण विश्वाचे मालक बनतात. आता नाहीत, परत तुम्ही
बनतात. बाबा पण संगम युगामध्ये येतात. ब्रह्मा द्वारे ब्राह्मण. ब्रह्माचे तर तुम्ही
सर्व मुलं आहात. ते तर आजोबा आहेत. तुम्ही सांगा ब्रह्माचे नाव ऐकले आहे का? परमपिता
परमात्मा ब्रह्मा द्वारा सृष्टीची स्थापना करतील ना. ब्राह्मण कुळ आहे ना. ब्रह्मा
मुख वंशावळ भाऊ बहिण झाले. येथे राजा राणीची गोष्ट नाही. हे ब्राह्मण कुळ तर संगमाचे
थोडा वेळ चालते. राजाई न पांडवाची आहे, ना कौरवाचे आहे, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) २१ जन्म
श्रेष्ठ पदाचे अधिकारी बनण्यासाठी सर्व आसुरी मताला सोडून एका श्रीमतावर चालायचे आहे.
संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे.
(२)या जुन्या शरीरामध्ये बसून बाबांनी दिलेल्या ज्ञानाला धारण करून देवता बनायचे आहे.
हे खूप किमती जीवन आहे, यामध्ये हिरे तुल्य बनायचे आहे.
वरदान:-
सर्व
संबंधाच्या सहयोगाच्या अनुभूती द्वारे निरंतर योगी, सहजयोगी भव.
प्रत्येक वेळेत
बाबांच्या वेगवेगळ्या संबंधाचा सहयोग घेणे, म्हणजेच अनुभव करणेच सहज योग आहे. बाबा
कोणत्याही वेळेत संबंध निभावण्यासाठी बांधलेले आहेत. साऱ्या कल्पामध्ये आत्ताच सर्व
अनुभवांची खान प्राप्त होते, म्हणून नेहमी सर्व संबंधाचा सहयोग घ्या आणि निरंतर योगी,
सहज योगी बना. जे सर्व संबंधाची अनुभती किंवा प्राप्ती मध्ये राहतात, ते जुन्या
दुनियेच्या वातावरणा मधुन सहज उपराम होतात.
बोधवाक्य:-
सर्व
शक्तीद्वारे संपन्न राहणेच, ब्राम्हण स्वरूपाची विशेषता आहे.