20-09-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   25.03.86  ओम शान्ति   मधुबन


"संगमयुग पवित्र जीवनाचे युग आहे"


आज बापदादा सर्व स्वराज्य अधिकारी, अलौकिक राज्यसभा पाहत आहेत. प्रत्येक श्रेष्ठ आत्म्यावर प्रकाश ताज चमकत असलेला पाहात आहेत. हीच राज्यसभा, पवित्रसभा आहे. प्रत्येक परम पावन पुज्य आत्मे फक्त या एका जन्मासाठी पावन म्हणजे पवित्र बनले नाहीत परंतु पावन म्हणजे पवित्र बनण्याची रेषा, अनेक जन्माची लांब रेषा आहे. साऱ्या कल्पा मध्ये, इतर आत्मे पण पावन पवित्र बनतात. जसे पावन आत्मे, धर्मपित्याच्या रूपामध्ये, धर्म स्थापन करण्यासाठी निमित्त बनत आहेत. त्याबरोबर कांही महान आत्मा म्हणून घेणारे, पण पावन बनत आहेत. परंतु त्यांच्या पावन बनण्यामध्ये आणि तुम्हां पावन आत्म्यामध्ये फरक आहे. तुमचे पावन बनण्याचे साधन सहज आहे. काही कष्ट नाहीत, कारण बाबा कडून तुम्हा आत्म्यांना, सुख, शांती, पवित्रतेचा वारसा सहज मिळत आहे. या स्मृती द्वारे सहज आणि स्वतःच अविनाशी बनवतात! दुनियावाले पावन बनत आहेत, परंतु खूप कष्टाने आणि त्यांना २१ जन्मासाठी वारशाच्या रुपामध्ये पवित्रता प्राप्त होत नाही. आज दुनियेच्या हिशोबाने, होळीचा दिवस म्हटले जाते. ते होळी साजरी करतात आणि तुम्ही स्वतःच परमात्म्याच्या रंगांमध्ये, रंगून पवित्र आत्मे बनत आहात. साजरी करणे थोड्या वेळेसाठी असते, बनणे संपूर्ण जीवनासाठी असते. ते दिवस साजरा करतात आणि तुम्ही पवित्र जीवन बनवत आहात. हे संगमयुग पवित्र जीवनाचे युग आहे. तर रंगा मध्ये रंगून जाणे, म्हणजे अविनाशी रंग लावणे. जो नाहीसा करण्याची आवश्यकता नाही. कायमचे बाबा सारखे बनून जाता. संगमयुगावर निराकारी बाबा सारखे कर्मातीत, निराकारी स्थितीचा अनुभव करणारे आणि २१ जन्म ब्रह्माबाबा सारखे, सर्वगुणसंपन्न, संपूर्ण निर्विकारी, श्रेष्ठ जीवनाचा अनुभव करत आहात. तर तुमची होळी आहे, संगा च्या रंगा मध्ये बाबा सारखे बनण्याची. असा पक्का रंग आहे, जो समान बनवतो. अशी होळी दुनिये मध्ये कोणी खेळतात का ? बाबा, सारखे बनण्याची होळी खेळण्यासाठी येतात. किती भिन्न भिन्न रंग, बाबा द्वारे, प्रत्येक आत्म्यांवर, तेही अविनाशी चढत आहे. ज्ञानाचा रंग, आठवणीचा रंग, अनेक शक्तींचा रंग, गुणाचा रंग, श्रेष्ठ दृष्टी, श्रेष्ठ वृत्ती, श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ कामना, स्वतःच कायमची बनून जाते, हा आत्मिक रंग किती सहजतेने चढत आहे. पवित्र बनले म्हणजे पवित्र झाले. ते होळी साजरी करतात, जसे गुण आहेत, तसे रुप बनते. त्यावेळी त्यांचा कोणी फोटो काढला, तर कसा वाटेल. ते होळी साजरी करून, काय बनतात, आणि तुम्ही होळी साजरी करता, तर फरिश्ता पासून देवता बनतात. सर्व तुमचे यादगार आहेत, परंतु अध्यात्मिक शक्ती नसल्यामुळे, अध्यात्मिक स्वरूपा मध्ये साजरी करत नाहीत. बाहरमुखता असल्यामुळे, बाहरमुखी रूपा मध्येच साजरी करतात. तुमचे यथार्थ रूपा मध्ये मंगल मिलन साजरे करणे आहे.

होळीची विशेषता आहे जाळणे, मग साजरी करणे आणि त्यानंतर मंगल मिलन करणे. या तीन विशेषतांचे यादगार बनलेले आहे, कारण तुम्ही सर्वांनी पवित्र बनण्यासाठी, प्रथम जुने संस्कार, जुन्या आठवणी, सर्वांनी योग अग्नी मध्ये जाळल्या, तेंव्हा संगा च्या रंगा मध्ये होळी साजरी केली म्हणजे बाबा सारखा संगाचा रंग लागला. जेंव्हा बाबाच्या संगा चा रंग लागतो, तर प्रत्येक आत्म्यासाठी, विश्वातील सर्व आत्मे, परमात्मा परिवाराची बनून जातात. परमात्मा परिवाराची झाल्यामुळे, प्रत्येक आत्म्यासाठी, शुभकामना स्वतःच संस्कार बनून जाते, त्यामुळे नेहमी एक दोघांमध्ये मंगल मिलन साजरे करत राहतात. जरी कोणी शत्रु असला, आसूरी संस्काराचे असले, परंतु या आत्मिक मंगल मिलना मुळे, त्यांचेवर परमात्म रंगाचे शिंतोडे जरूर पडतात. कोणी पण तुमच्या जवळ आला तर काय करेल? सर्वांची गळाभेट घेणे. श्रेष्ठ आत्मा समजून गळाभेट घेणे. ही बाबाची मुले आहेत. ही प्रेमाची भेट, शुभ भावनेची भेट, त्या आत्म्यांच्या जुन्या गोष्टी विसरून टाकते. ते पण उत्साहा मध्ये येतात, त्यामुळे सणांच्या रूपांमध्ये यादगार बनलेले आहे. तर बाबा बरोबर होळी साजरी करणे म्हणजे अविनाशी आत्मिक रंगा मध्ये बाबा सारखे बनणे. ते लोक तर उदास राहतात, त्यामुळे खुशी साजरी करण्यासाठी, हा दिवस ठेवला आहे. आणि तुम्ही मुले तर नेहमीच खुशी मध्ये नाचता, गाता, आनंदा मध्ये राहता. जे जास्त गोंधळून जातात, काय झाले?कसे झाले?कां झाले? ते आनंदा मध्ये राहू शकत नाही. तुम्ही त्रिकालदर्शी बनल्यामुळे, काय, कां, कसे, असे संकल्प निर्माण होत नाहीत, कारण तीन काळाला जाणता. कां झाले? तुम्ही जाणता की पेपर आला आहे, पुढे जाण्यासाठी. कां झाले? नवीन कांही नाही. कां झाले असा प्रश्‍नच नाही. कसे झाले? तर माया आणखीन मजबूत बनविण्यासाठी आली आणि निघून गेली. तर त्रिकालदर्शी स्थिती असणारे यामध्ये गोंधळत नाहीत. प्रश्ना बरोबर, त्याचे उत्तर अगोदरच येते, कारण त्रिकालदर्शी आहात. नांव त्रिकालदर्शी, आणि वर्तमानाला पण न ओळखणे, कां झाले, कसे झाले, तर त्यांना त्रिकालदर्शी कसे म्हणायचे! अनेक वेळा विजयी बनले आहात आणि बनणार पण आहात. भूतकाळ आणि भविष्याला पण जाणत आहात की, आम्ही ब्राह्मणां पासून फरिश्ता, आणि फरिश्ता पासून देवता बनणारे आहोत. आज आणि उद्या ची गोष्ट आहे. प्रश्न समाप्त होऊन, पुर्ण विराम येतो.

होळीचा अर्थ पण आहे कि, झाले ते झाले, गेले ते गेले. असे बिंदू लावणे, येत आहे ना. हा पण होळीचा अर्थ आहे. जाळण्याची होळी पण आहे, रंगामध्ये रंगणारी होळी पण आहे, आणि बिंदू लावण्याची होळी पण आहे. मंगल मिलन साजरे करण्याची होळी पण आहे. चारी ही प्रकारची होळी येत आहे ना. जर एक प्रकारची पण कमी असेल, तर प्रकाशाचा ताज टिकणार नाही. खाली पडत राहील. ताज टाईट नसेल तर खाली पडत राहतो. चार ही प्रकारची होळी साजरी करण्या मध्ये उत्तीर्ण आहात? जेंव्हा बाबा सारखे बनायचे आहे तर, बाबा संपन्न पण आहेत आणि संपूर्ण पण आहेत. टक्केवारीची अवस्था पण कोठपर्यंत? ज्याशी स्नेह असतो, तर स्नेही सारखे बनणे, अवघड वाटत नाही. बाबाचे नेहमीच स्नेही आहात, तर नेहमी बाबा सारखे कां नाहीत. सोपे आहे ना.

अशा सर्व नेहमी पवित्र आणि आनंदी राहणाऱ्या, पवित्र हंसाचे, श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाबा, पवित्र बनवण्यासाठी, अविनाशी अभिनंदन करत आहेत. नेहमी बाबा सारखे बनण्यासाठी, नेहमी पवित्र युगामध्ये, आनंद साजरा करण्यासाठी, अभिनंदन करत आहेत. नेहमी पवित्र हंस बनून, ज्ञान रत्ना द्वारे संपन्न बनवण्यासाठी, अभिनंदन करत आहेत. सर्व रंगा मध्ये रंगून, पुज्य आत्मा बनल्याने, अभिनंदन आहे, आणि प्रेमळ आठवण पण नेहमीच आहे. अशा सेवाधारी बाबाची, मालक मुलांसाठी, नमस्ते पण नेहमीच आहे. तर प्रेमळ आठवण आणि नमस्ते.

आज मलेशियाचा ग्रुप आहे. दक्षिण-पूर्व. सर्व हे समजत आहात की, आम्ही कोठे कोठे विस्कटून गेलो होतो. परमात्मा परिवाराच्या बोटीमधून उतरून, कुठल्या कुठे कोपऱ्या मध्ये निघून गेलो. संसार सागरा मध्ये चुकलो, कारण द्वापरयुगामध्ये, आत्मिक बॉम्ब ऐवजी शरीराच्या भानाचा बॉम्ब पडला. रावणाने बॉम्ब टाकला, त्यामुळे बोट फुटून गेली. परमात्म परिवाराची बोट फुटून गेली, आणि कोठ कोठे निघून गेलात. जिथे पण आधार मिळाला. बुडणाऱ्याला कुठे पण आधार मिळाला, तर तो घेतात ना. तुम्हां सर्वांना पण, ज्या धर्माचा, ज्या देशाचा, थोडा पण आधार मिळाला, तेथे पोहचलात. परंतु संस्कार तर तेच आहेत ना, त्यामुळे दुसऱ्या धर्मा मध्ये गेला, तरी आपल्या वास्तविक धर्माचा परिचय मिळाल्याने पोहचलात. साऱ्या विश्वामध्ये पसरले होता. हे विस्कटून जाणे, पण कल्याणकारी आहे, ज्यामुळे अनेक आत्मांना, एकट्यांने काढण्याचे कार्य केले. विश्वामध्ये परमात्म परिवाराचा परिचय देण्यासाठी कल्याणकारी बनलात. सर्व जर भारता मध्ये च राहिले असते, तर विश्वाची सेवा कशी करता आली असती? त्यामुळे कोन्या कोन्या मध्ये पोहोचले आहात. सर्व मुख्य धर्मामध्ये, कोणी ना कोणी पोहोचले आहेत. एक जरी निघाला तरी आपल्या सारख्याना, जरूर उठवत आहे. बाप दादा ना पण पाच हजार वर्षांनंतर, दूर गेलेली मुले पाहून खुशी होत आहे. तुम्हां सर्वांना पण खुशी होत आहे ना. पोहोचले तर आहात. भेटले तर आहात.

मलेशियाचा कोणी व्ही. आय. पी. आता पर्यंत आलेला नाही. सेवेच्या लक्ष्या मध्ये, त्यांना पण निमित्त बनवले पाहिजे. सेवेच्या तीव्र गतीसाठी, निमित्त बनतात, त्यामुळे त्यांना पुढे करावे लागते. बाबा साठी तर तुम्हींच श्रेष्ठ आत्मे आहात. आत्मिक नशेमध्ये तर तुम्ही श्रेष्ठ आहात ना. कुठे तुम्हीं पुज्य आत्मे, आणि कुठे ते माये मध्ये फसलेले. अनोळखी आत्म्यांना पण परिचय तर द्यायचा आहे ना. सिंगापूर मध्ये पण आता वृद्धी होत आहे. जिथे बाबाचे अनन्य रत्न पोहोचत आहेत, ते रत्न, इतर रत्नांना काढत आहेत. सेवेमध्ये हिम्मत ठेवून, तळमळी ने पुढे चालत आहात. तर मेहनतीचे फळ श्रेष्ठ मिळते. आपल्या परिवाराला एकत्र करायचे आहे. परिवारातील निघून गेलेला, परिवारामध्ये येतो, तर किती खुश होते आणि मनापासून धन्यवाद देतात. तर हे पण परिवारा मध्ये येऊन, किती धन्यवाद देत असतील. निमित्त बनून, बाबाचे बनविले, तर संगमयुगा मध्ये धन्यवादाच्या माळा फार पडत आहेत.

अव्यक्त महावाक्य अखंड महादानी बना.

महादानी म्हणजे मिळालेले खजाने, बिना स्वार्थाने, सर्व आत्म्या प्रति देणारे- निस्वार्थी. स्वतःच्या स्वार्था पासून दूर राहणारी आत्माच महादानी बनू शकते. दुसऱ्यांच्या खुशीमध्ये स्वतःची खुशी अनुभव करणे पण महादानी बनणे होय. जसा सागर संपन्न आहे, अखुट आहे, अखंड आहे, तसे तुम्हीं मुले पण मास्टर, अखंड, अखुट खजाण्याचे मालक आहात. तर जे खजाने मिळाले आहेत, त्यांना महादानी बनून, इतरांसाठी कार्यामध्ये लावत राहा. जे पण संबंधां मध्ये येणारे, भक्त वा साधारण आत्मे आहेत, त्यांच्या साठी नेहमी हीच तळमळ राहिली पाहिजे की, यांना भक्तीचे फळ मिळाले पाहिजे. जेवढे दयाळू बनाल, तेवढे अशा भटकणाऱ्या आत्म्याला सहज रास्ता दाखवाल.

तुमच्या जवळ सर्वात मोठ्यात मोठा खजाना, खुशीचा आहे. तुम्ही या खुशीच्या खजाण्याचे दान करत राहा. ज्यांला खुशी द्याल, ते वारंवार तुम्हाला धन्यवाद देतील. दु:खी आत्म्यांना खुशीचे दान दिल्याने, ते तुमचे गुण गातील. यामध्ये महादानी बना. खुशीचा खजाना वाटा. आपल्या जवळच्यांना जागे करा. रस्ता दाखवा. आता वेळेनुसार आपल्या प्रत्येक कर्मेंद्रिया द्वारे महादानी आणि वरदानी बना. मस्तका द्वारे सर्वांना, स्व-स्वरूपाची स्मृती द्या. डोळ्याद्वारे स्व-देश आणि स्वराज्याचा रस्ता दाखवा. मुखाद्वारे रचयिता आणि रचनेच्या विस्ताराला स्पष्ट करून, ब्राह्मणा पासून देवता बनण्याचे वरदान द्या. हाता द्वारे नेहमी सहज योगी, कर्मयोगी बनण्याचे वरदान द्या. चरण कमळा द्वारे, प्रत्येक पावला मध्ये बाबाचे अनुकरण करून, प्रत्येक पावला मध्ये पद्माची कमाई जमा करणारे वरदानी बना, असे प्रत्येक कर्मेंद्रिया द्वारे महादान, वरदान देत राहा. मास्टर दाता बनून, परिस्थितीला परिवर्तन करणारे, दुबळ्यांना शक्तिशाली बनविणारे, वायुमंडल किंवा वृत्तीला आपल्या शक्तीद्वारे परिवर्तन करणे, नेहमी स्वतःला कल्याणार्थ, जबाबदार आत्मा समजून, प्रत्येक गोष्टींमध्ये सहयोग आणि शक्तीचे महादान आणि वरदान देण्याचा संकल्प करा . मला द्यायचे आहे, मला करायचे आहे, मला बदलायचे आहे, मला निर्मान बनायचे आहे. असे "ओटे सो अर्जुन" म्हणजे दातापणाची विशेषता धारण करा.

आता प्रत्येक आत्म्यासाठी, विशेष अनुभवीमूर्त बनून, विशेष अनुभवाची खान बनून, अनुभवीमूर्त बनवण्याचे महादान करा. ज्यामुळे प्रत्येक आत्मा, अनुभवाच्या आधारावर अंगद सारखी बनेल. चालत आहोत, करत आहोत, ऐकत आहोत, सांगत आहोत, नाही. परंतु अनुभवाचा खजाना प्राप्त केला, असे गीत गाऊन, खुशीच्या झोक्या मध्ये झुलत राहा. तुम्हा मुलांना जे पण खजाने बाबाद्वारे मिळाले आहेत, त्यांना वाटत राहा म्हणजे महादानी बना. सदैव कोणी पण आले, तर तुमच्या भंडाऱ्या मधून खाली जाऊ नयेत. तुम्ही सर्व फार काळाचे सोबती आहात आणि फार काळाचे अधिकारी आहात. तर अंत काळातील कमजोर आत्म्यांना, महादानी, वरदानी बनून अनुभवाचे दान आणि पुण्य करा. हे पुण्य अर्धाकल्पा साठी, तुम्हाला पूजनीय आणि गायन योग्य बनवेल. तुम्ही सर्व ज्ञानाच्या खाजाण्याने संपन्न धनाच्या देवी आहात. जेंव्हा पासून ब्राह्मण बनले आहात, तेंव्हापासून जन्मसिद्ध अधिकारां मध्ये ज्ञानाचा, शक्तीचा खजाना मिळाला आहे. या खजाण्याचा स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापर करा, तर खुशी वाढेल. यामध्ये महादानी बना, अर्थात नेहमी अखंड भंडारा चालत राहो.

ईश्वरीय सेवेमध्ये, मोठ्यातील मोठे पुण्य आहे, पवित्रतेचे दान देणे. पवित्र बनणे आणि बनवणेच पुण्यात्मा बनणे होय, कारण कोणत्या तरी आत्म्याला आत्मघात, महापापा पासून मुक्त करत आहात. अपवित्रता आत्मघात आहे. पवित्रता जीवनदान आहे. पवित्र बना आणि बनवा, हेच महादान करून पुण्यात्मा बना. महादानी अर्थात फारच निर्बल, निराश, असमर्थ आत्म्याला, जादा बळ देऊन, आत्मिक रहम दिल बनवणे. महादानी अर्थात आशावादी, केस मध्ये होप (उमेद) निर्माण करणारे. तर मास्टर रचयिता बनून, प्राप्त केलेल्या शक्ती, व प्राप्त ज्ञान, गुण व सर्व खजाने, इतरासाठी महादानी बनून देत चला. दान नेहमी फारच गरिबांना दिले जाते. निराधारांला आधार दिला जातो. तर प्रजेसाठी महादानी, व अंत काळामध्ये भक्त आत्म्यासाठी महादानी बना. आपसामध्ये एक दुसऱ्यासाठी, ब्राह्मणात महादानी नाही. ते तर आपसामध्ये सहयोगी, साथी आहात. भाऊ भाऊ आहात व आपल्यासारखेच पुरुषार्थी आहेत. त्यांना सहयोग द्या. अच्छा.

वरदान:-
शक्तिशाली वृत्तीद्वारे, मन्सा सेवा करणारे, विश्व कल्याणकारी भव:

विश्वातील तडपणाऱ्या आत्म्यांना, रस्ता सांगणारे, साक्षात बाबासारखे, प्रकाश स्तंभ, शक्ती स्तंभ बना. लक्ष्य ठेवा की, प्रत्येक आत्म्याला कांहीना कांही द्यायचे आहे. मुक्ती द्या नाही तर जीवन मुक्ती द्या. सर्वा साठी महादानी वरदानी बना. आता आपापल्या ठिकाणाची सेवा तर करत आहात, परंतु एका ठिकाणी बसून, मन्सा शक्तीद्वारे, वातावरण, प्रकंपना व्दारे विश्व सेवा करा. अशी शक्तिशाली वृत्ती बनवा, ज्यामुळे वातावरण बनेल. तेव्हांच विश्व कल्याणकारी आत्मा म्हटले जाईल.

सुविचार:-
अशरीरीपणा चा व्यायाम आणि व्यर्थ संकल्प रुपी भोजनाचे पथ्य पाळून स्वतःला तंदुरुस्त बनवा.


सूचना:-
आज महिन्यातील तिसरा रविवार आहे, सर्व राज योगी, तपस्वी भाऊ बहिणीनी, सायंकाळी ६-३० ते ७-३० वाजेपर्यंत, या विशेष योगअभ्यासाच्या वेळी, आपल्या आकारी फरिस्ता स्वरूपा मध्ये स्थित होऊन, भक्तांचा आवाज ऐका, आणि उपकार करा. मास्टर दयाळू, कृपाळू बनून, सर्वावर दयेची दृष्टी टाका. मुक्ती जीवनमुक्तीचे वरदान द्या.