02-09-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही आत्मिक पंडे आहात, तुम्हाला सर्वांना शांतीधाम म्हणजे अमरपुरी चा
रस्ता दाखवायचा आहे"
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
कोणता नशा आहे, त्या नशेच्या आधारावरती कोणते वाक्य बोलतात?
उत्तर:-
तुम्हा मुलांना हा नशा आहे, आम्ही बाबांची आठवण करून जन्म जन्मांतर साठी पवित्र बनत
आहोत. तुम्ही निश्चयाद्वारे म्हणतात की, जरी कितीही विघ्न आले तरीही स्वर्गाची
स्थापना जरुर होणार आहे. नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश होणारच
आहे. हे पूर्वनियोजित नाटक आहे, यामध्ये संशयाची गोष्ट नाही.
ओम शांती।
आत्मिक मुलांना, आत्मिक पिता समजावत आहेत. तुम्ही जाणता आम्ही आत्मा आहोत. यावेळेत
आम्ही आत्मिक पंडे बनत आहोत आणि बनवत पण आहोत. या गोष्टी चांगल्या रीतीने धारण करा.
मायेच वादळ विसरायला लावतात. रोज सकाळ संध्याकाळ हे विचार करायला पाहिजेत, हे
अमुल्य रत्न अमुल्य जीवनासाठी, आत्मिक पित्याकडून मिळतात. तर आत्मिक पिता मुलांना
समजावतात, मुलांनो तुम्ही आता मुक्तीधामचा रस्ता सांगण्यासाठी आत्मिक पंडे किंवा
मार्गदर्शक आहात. ही खरी-खुरी अमरकथा, अमरपुरी मध्ये जाण्यासाठी आहे. अमरपुरी मध्ये
जाण्यासाठी तुम्ही पवित्र बनत आहात. अपवित्र भ्रष्टाचारी आत्मा अमरपुरी मध्ये कशी
जाईल?मनुष्य अमरनाथ यात्रा करतात, स्वर्गाला पण अमरनाथ पुरी म्हणतात. एकटे अमरनाथ
थोडेच असतात. तुम्ही सर्व आत्मे अमरपुरी मध्ये जात आहात. ती आतम्यांची अमरपुरी
परमधाम आहे, परत अमरपुरी मध्ये शरीराच्या सोबत येतात. तेथे कोण घेऊन जातात?परमपिता
परमात्मा सर्व आत्म्यांना घेऊन जातात. त्याला अमरपुरी पण म्हटले जाते परंतु बरोबर
अक्षर शांतीधाम आहे. तेथे तर सर्वांना जायचे आहे. वैश्विक नाटकाची भावी टळू शकत नाही.
हे चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करा. प्रथम तर स्वतःला आत्मा समजा. परमपिता
परमात्मा पण आत्मा आहेत, फक्त त्यांना परमपिता परमात्मा म्हणतात, ते आम्हाला समजावत
आहेत. तेच ज्ञानाचे सागर आहेत, पवित्रतेचे सागर आहेत. आत्ता मुलांना पवित्र
बनवण्यासाठी श्रीमत देतात, माझीच आठवण करा, तर तुमचे जन्म-जन्मांतरचे पाप नष्ट
होतील. आठवणीलाच योग म्हटले जाते. तुम्ही तर मुलं आहात. बाबांची आठवण करायची आहे.
आठवणी द्वारे या भवसागरातून नाव पार होईल. या विषय नगरी मधून तुम्ही शिवनगरी मध्ये
जाल, परत विष्णुपरी मध्ये याल. आम्ही तेथे जाण्यासाठी शिकत आहोत, हे येथील शिक्षण
नाही. येथे जे राजे बनतात, ते धन दान करण्यामुळे बनतात. काहीजण असे आहेत, जे
गरिबांची खूप सेवा करतात, कोणी दवाखाना, कोणी धर्मशाळा बनवत राहतात, कोणी धन दान
करतात. जसे सिंध मध्ये मुलचंद होते, गरिबांच्या जवळ जाऊन दान करत होते. गरिबांची
खूप सांभाळ करत होते. असे खूप दानी आहेत. सकाळी ऊठुन धान्याची मुठ्ठी काढतात,
गरींबाना दान करतात. आज-काल तर फसवणूक खूप आहे. पात्र व्यक्तीलाच दान द्यायला पाहिजे.
ती अक्कल तर नाही. जे भीक मागणारे असतात, त्यांना दान देणे काही दान नाही. त्यांचा
तर हा धंदाच आहे. गरिबांना दान करणारे चांगले पद मिळवतात.
आत्ता तुम्ही सर्व आत्मिक पंडे आहात. तुम्ही प्रदर्शनी किंवा संग्रहालय उघडतात, तर
असे नाव लिहा ज्याद्वारे सिद्ध होईल, स्वर्गाकडे जाण्यासाठी मार्गदर्शक, किंवा नवीन
विश्वाच्या राजधानीचे मार्गदर्शक, परंतु मनुष्य काही समजत नाहीत. हे काट्याचे जंगल
आहे. स्वर्गाला फुलांची बाग म्हटले जाते, तेथे देवता राहतात. तुम्हा मुलांना हा नशा
राहायला पाहिजे की, आम्ही बाबांची आठवण करून, जन्म जन्मांतर साठी पवित्र बनत आहोत.
तुम्ही जाणतात, कितीही विघ्न आले तरी, स्वर्गाची स्थापना जरूर होणार आहे. नविन
दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश होणारच आहे. हे पूर्वनियोजित नाटक आहे,
यामध्ये संशयाची गोष्ट नाही. जरा पण संशय यायला नको. पतित-पावन तर सर्वच म्हणतात.
इंग्रजी मध्ये पण म्हणतात, येऊन आम्हाला दुःखापासून मुक्त करा. पाच विकारामुळेच
दुःख होते. ती निर्विकार दुनिया, सुखधाम आहे. आता तुम्हा मुलांना स्वर्गामध्ये जायचे
आहे. मनुष्य तर समजतात स्वर्ग वरती आहे, त्यांना हे माहित नाही की मुक्तिधाम वरती
आहे. जीवनमुक्ती मध्ये तर येथेच यायचे आहे. या सर्व गोष्टी, बाबाच तुम्हा मुलांना
समजवतात. त्यांना चांगल्या रीतीने धारण करून, ज्ञानाचे मंथन करायचे आहे. विद्यार्थी
पण घरामध्ये हाच विचार करत राहतात, हा पेपर द्यायचा आहे, आज हे करायचे आहे. तर
तुम्हा मुलांना आपल्या कल्याणासाठी, आत्म्याला पवित्र बनवायचे आहे. पवित्र बनून
मुक्तिधाम मध्ये जायचे आहे आणि ज्ञानाद्वारे परत देवता बनतात. आत्माच म्हणते आम्ही
मनुष्य पासून वकिल बनत आहोत, आम्ही आत्मा मनुष्या पासून राज्यपाल बनतो. आत्माच शरीरा
सोबत बनते. शरीर तर नष्ट होते, परत नव्याने शिकावे लागते. आत्माच विश्वाचे मालक
बनण्यासाठी शिकते. बाबा म्हणतात हे चांगल्या प्रकारे आठवण करा की, आम्ही आत्मा आहोत.
देवतांना असे म्हणायची आवश्यकता राहत नाही, आठवण करून द्यावी लागत नाही, कारण ते तर
पावन देवता आहेत. पारब्ध भोगत आहेत, पतित थोडेच आहेत, जे बाबांची आठवण करतील. तुम्ही
आत्मा पतित आहात, म्हणून बाबांची आठवण करायची आहे. त्यांना तर आठवण करण्याची
आवश्यकताच नाही. हे वैश्विक नाटक आहे ना. एक पण दिवस दुसऱ्या दिवसा सारखा राहत नाही.
हे वैश्विक नाटक चालत राहते. सर्व दिवसांची भूमिका सेकंद बाय सेकंद बदलत राहते.
नोंद होत राहते. कोणत्याही गोष्टींमध्ये घाबरायचची आवश्यकता नाही. या ज्ञानाच्या
गोष्टी आहेत. खुशाल आपला धंदा इत्यादी करा परंतु भविष्यामध्ये उच्चपद मिळवण्यासाठी
पूर्ण रितीने पुरुषार्थ करा. गृहस्थ व्यवहारांमध्ये पण राहायचे आहे. कुमारी तर
गृहस्थ व्यवहारा मध्ये गेली नाही. गृहस्थी त्यांनाच म्हटले जाते, ज्यांना मूलबाळं
आहेत. बाबातर कुमारी, अधरकुमारी, सर्वांना शिकवतात. अधरकुमारींचा अर्थ पण समजत
नाहीत. काय अर्धे शरीर आहे?आता तुम्ही जाणतात, कन्या पवित्र आहे आणि अधर कन्या
त्यांनाच म्हटले जाते, जे अपवित्र बनल्यानंतर परत पवित्र बनण्यासाठी पुरुषार्थ
करतात. तुमचेच स्मृतिस्थळ आहे ना. बाबाच तुम्हा मुलांना समजवतात, मुलांना शिकवत
आहेत. तुम्ही जाणता आम्ही आत्मे मुळवतनला पण जाणतो, परत सूर्यवंशी चंद्रवंशी कसे
राज्य करतात, क्षत्रीयांना बाण का दाखवला आहे, हे पण तुम्हीच जाणतात. लढाई इत्यादीची
गोष्ट नाही. न आसुरांची गोष्ट आहे. न चोरीची गोष्ट सिद्ध होते. असा तर कोणी रावण
नसतो, जे सीतेचे अपहरण करेल. बाबा समजवतात गोडगोड मुलांनो, तुम्ही समजता आम्ही
स्वर्गाचे, मुक्ती जीवनमुक्तीचे पंडे आहोत. आम्ही आत्मिक पंडे आहोत. ते कलयुगी
ब्राह्मण आहेत. पुरुषोत्तम बनण्यासाठी शिकत आहेत. आम्ही पुरुषोत्तम संगम युगामध्ये
आहोत. बाबा अनेक प्रकारे समजावत राहतात. तरीही देह अभिमानांमध्ये आल्यामुळे विसरतात.
मी आत्मा आहे, बाबांचा मुलगा आहे, हा नशा राहत नाही. जितकी आठवण कराल, तेवढा देह
अभिमान निघून जाईल. आपली सुरक्षा करत रहा, सांभाळ करत राहा. माझा अभिमान नष्ट झाला
आहे, हे तपासत राहा. आम्ही आता जात आहोत, परत आम्ही विश्वाचे मालक बनू. आमची हिरो
हिरोईन ची भूमिका आहे. हिरो-हिरॉईनचे नाव तेव्हाच मिळते जेव्हा, कोणी विजय मिळवतात.
तुम्ही विजय मिळवतात, तर तुमचे हिरो हिरोईन चे नाव पडते, यापूर्वी नव्हते. ज्यांची
हार होते, त्यांना हीरो हीरोइन म्हणत नाहीत. तुम्ही मुलं जाणता, आम्ही जाऊन हीरो
हीरोइन बनतो. तुमची भूमिका उच्च आहे. कवडी आणि हिऱ्यामध्ये तर खूप फरक आहे ना. कोणी
कितीही लखपती किंवा करोडपती आहेत, परंतु हे सर्व विनाश होणार आहे. तुम्ही आत्मे तर
धनवान बनतात. बाकी सर्व दिवाळं मारतात. या धारण करण्याच्या गोष्टी आहेत.
निश्चयांमध्ये राहायचे आहे. येथे नशा चढतो, बाहेर गेल्यामुळे नशा उतरतो. येथील
गोष्टी येथेच राहतात. बाबा म्हणतात, बुद्धीमध्ये राहावे, बाबा आम्हाला शिकवत आहेत.
ज्या शिक्षणाद्वारे आम्ही मनुष्या पासून देवता बनतो. यामध्ये काहीच कष्ट नाहीत.
कामधंदा इत्यादी पासून काही वेळ काढून, आठवण करू शकतात. हा पण आपल्यासाठी धंदा आहे
ना. सुट्टी घेऊन, बाबांची आठवण करा. हे काय खोटे बोलत नाहीत. सर्व दिवस असा थोडाच
घालवायचा आहे, आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे. युक्त्या तर खूप आहेत, जेवढे
शक्य होईल, तेवढा वेळ काढून बाबांची आठवण करा. शरीर निर्वाहासाठी धंदा इत्यादी पण
खुशाल करा. मी तुम्हाला विश्वाचे मालक बनण्याची खूप चांगले श्रीमत देत आहे. तुम्ही
मुलं पण सर्वांना मत देणारे आहात. वजीर मत देण्यासाठी असतात ना. तुम्ही पण मत देणारे
आहात. सर्वांना मुक्ती जीवन मुक्ती कशी मिळेल, ते ही याच जन्मा मध्ये, त्यासाठी
रस्ता दाखवत आहात. मनुष्य सुविचार इत्यादी बनवतात, तर ते भिंतीवरती लावतात. जसे
तुम्ही पण लिहितात, "पवित्र बना, राजयोगी बना". परंतु या द्वारे समजत नाहीत. आता
तुम्ही समजता, आम्हाला बाबा पासून हा वारसा मिळत आहे, मुक्तीधाम पण वारसा आहे. मला
तुम्ही पतित-पावन म्हणतात, तर मी येऊन पावन बनण्याची मत देतो. तुम्ही पण मत देणारे,
सल्लगार आहात. मुक्तीधाम मध्ये कोणी जाऊ शकत नाहीत, जोपर्यंत बाबा सल्ला देत नाहीत,
श्रीमत देत नाहीत. श्री म्हणजे श्रेष्ठ मत, शिवबाबांची आहे. आत्म्याला शिवबाबांची
श्रीमत मिळत आहे. बाबांची श्रीमत मिळत आहे. आत्म्याला पाप आत्मा, पुण्य आत्मा म्हटले
जाते, पाप शरीर म्हटले जात नाही. आत्माच शरीराद्वारे पाप करते म्हणून पाप आत्मा
म्हटले जाते. शरीरा शिवाय आत्मा न पाप करू शकते, न पुण्य करु शकते. तर जितके शक्य
होईल, तेवढा विचार सागर मंथन करा. वेळ तर खूप आहे. शिक्षक किंवा प्राध्यापक जे आहेत,
त्यांना पण एक युक्तीने आत्मिक शिक्षण शिकवायचे आहे, ज्याद्वारे सर्वांचे कल्याण
होईल. बाकी शारीरिक शिक्षणाने काय होईल. आम्ही हे शिकवत आहोत, बाकी थोडे दिवस आहेत.
विनाश समोर उभा आहे. मनामध्ये उमंग उत्साह राहायला पाहिजे की, कसे मनुष्यांना रस्ता
दाखवू. एका मुलीला परीक्षे मध्ये गीतेचे भगवान कोण आहेत? हे विचारले होते. तर तिने
लिहिले गीतेचे भगवान शिव आहेत, तर तिला नापास केले. ती समजत होती, मी तर बाबांची
महिमा करत आहे, गितेचे भगवान शिव आहेत. तेच ज्ञानाचे सागर, प्रेमाचे सागर आहेत.
कृष्णाची आत्मा पण ज्ञान घेत आहे. असे लिहिले तर तिला नापास केले. मात -पित्याला
म्हणाली, मी हे शिक्षण घेणार नाही. आता या आत्मिक शिक्षणामध्ये तत्पर राहील. मुलगी
पण खूप हुशार आहे. अगोदरच ती म्हणत होती, मी असे लिहले, तर नापास होईल, परंतु खरेतर
आहे ना. पुढे जाऊन समजतील, बरोबर या मुलीने लिहिले होते, ते सत्य होते, जेव्हा
प्रभाव निघेल. अशी प्रदर्शनी किंवा संग्रहालय मध्ये त्यांना बोलवतील, तर माहिती
होईल आणि बुद्धी मध्ये येईल की, हे तर बरोबर आहे. अनेक मनुष्य येतात, तर विचार
करायचा आहे, असे काय करावे ज्यामुळे, मनुष्य लगेच समजतील. ही काहीतरी नवीन गोष्ट आहे.
काहीना काही जरूर समजतील, जे या घराण्याचे असतील. तुम्ही सर्वांना आत्मिक रस्ता
दाखवतात, बिचारे खूप दुःखी आहेत, त्या सर्वांचे दुःख कसे दूर होतील. खिटपीट तर खूप
आहे ना. एक दोघांचे दुश्मन बनतात, तर कसे खलास करतात. आता बाबा मुलांना चांगल्या
प्रकारे समजावत राहतात. माता तर शिकलेल्या नाहीत. बाबा म्हणतात शिकले नाही तर, आणखी
चांगले आहे. ग्रंथ इत्यादी जे वाचले आहेत, तेसर्व येथेच विसरायचे आहेत. आता मी जे
ऐकवतो, ते ऐका. असे समजायला पाहिजे, निराकार परमपिता परमात्मा शिवाय कोणी सद्गती करू
शकत नाही. मनुष्यामध्ये तर ज्ञानच नाही, तर ते परत सदगती कसे करू शकतील. ज्ञानाचे
सागर एकच आहेत, मनुष्य असे थोडेच म्हणतील?जे या कुळाचे असतील, तेच समजण्यासाठी
प्रयत्न करतील. एक पण कोणी मोठा मनुष्य निघेल, तर खूप प्रसिद्धी होईल. गायन पण आहे
तुलसीदास, "गरिबांचे कोणी कोणी ऐकत नाही". सेवेच्या युक्त्या तर बाबा खूप सांगत
राहतात. मुलांनी त्याचा अमल करायला पाहिजे, अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)काम धंदा
इत्यादी करत, भविष्य उच्च पद मिळवण्यासाठी पुर्ण पुरुषार्थ करायचा आहे. हे नाटक
सेकंद बाय सेकंद बदलत राहते, म्हणून कोणतेही दृश्य पाहून घाबरायचे नाही.
२) हे आत्मिक शिक्षण शिकून दुसर्यांना पण शिकवायचे आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे.
मनामध्ये हाच उमंग असायला पाहिजे की, कसे सर्वांना पावन बनण्याचा सल्ला देऊन,
परमधाम घरचा रस्ता दाखवू.
वरदान:-
दुहेरी
सेवेद्वारे अलौकिक शक्तीचा साक्षात्कार करवणारे, विश्व सेवाधारी भव.
जसे बाबांचे स्वरूप
विश्व सेवक आहे, तसेच तुम्ही पण बाप समान विश्व सेवाधारी आहात. शरीराद्वारे स्थुल
सेवा करत, मनसा द्वारे विश्व परिवर्तनाच्या सेवेमध्ये तत्पर रहा. एकाच वेळी तन आणि
मनाद्वारे एकत्र सेवा करा. जे मन्सा आणि कर्मणा दोन्ही सेवा सोबत करतात, ते पाहणार्यां
पण अनुभव किंवा साक्षात्कार होतो की, हे कोणी अलौकिक शक्ती आहेत, म्हणून या
अभ्यासाला निरंतर आणि नैसर्गिक बनवा. मन्सा सेवेसाठी विशेष एकाग्रतेचा अभ्यास वाढवा.
बोधवाक्य:-
सर्वप्रती गुणग्राहक बना, परंतु ब्रम्हा पित्याचे अनुकरण करा.