30-09-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो :-सर्वात प्रथम हा विचार करा, कि मज आत्म्यावर जो कट चढलेला आहे, तो कसा उतरवायचा, सुई वर जोपर्यंत कट (गंज) चढलेला असेल तोपर्यंत चुंबक खेचू शकत नाही "

प्रश्न:-
पुरुषोत्तम संगम युगावर तुम्हाला पुरुषोत्तम बनण्यासाठी कोणता पुरुषार्थ करायचा आहे?

उत्तर:-
कर्मातीत बनण्याचा. कोणत्याही कर्म संबंधाकडे बुद्धी जायला नको अर्थात कर्मबंधन आपल्याकडे आकर्षित करायला नको. सर्व संबंध एक बाबांशी रहावे. मन कोणामध्येही गुंतलेले नसावे. असा पुरुषार्थ करा, परचिंतना मध्ये आपला वेळ वाया घालवू नका, आठवणीमध्ये राहण्याचा अभ्यास करा.

गीत:-
जाग सजनी जाग. . . .

ओम शांती।
आत्मिक मुलांनी शरीराद्वारे गीत ऐकले?कारण की बाबा आता मुलांना आत्म-अभिमानी बनवत आहेत. तुम्हाला आत्म्याचे ज्ञान मिळत आहे. दुनियेमध्ये एकही असा मनुष्य नाही ज्याच्याकडे आत्म्याचे सत्य ज्ञान आहे. तर मग परमात्म्याचे ज्ञान कसे असू शकते?हे बाबाच बसून समजावत आहेत. शरीरामध्ये येऊनच समजावून सांगतात. शरीरा शिवाय तर आत्मा काहीच करू शकत नाही. आत्मा जाणते आम्ही कुठे राहणारे आहोत, कोणाची मुले आहोत. आता तुम्ही योग्यरीतीने जाणत आहात. सर्व कलाकार अभिनय करत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे आत्मे केंव्हा येतात, हेही तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बाबा विस्तारामध्ये सांगत नाहीत थोडक्यात समजावून सांगतात. थोडक्यात म्हणजे एका सेकंदामध्ये असे समजावून सांगतात जे सतयुगाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व माहीत होऊन जाते की कशी आमची भूमिका नोंदलेली आहे. आता तुम्ही जाणत आहात बाबा कोण आहेत, त्यांची या नाटकांमध्ये काय भूमिका आहे? हेही तुम्ही जाणता उच्च ते उच्च पिता आहेत, सर्वांचे सदगती दाता, दुखहर्ता सुखकर्ता आहेत. शिवजयंती( महाशिवरात्रीचे)चे गायन आहे. सर्वजण म्हणतात शिवजयंती सर्वात उच्च आहे. खास भारतामध्ये जयंती साजरी केली जाते. ज्यांच्या ज्यांच्या राज्यांमध्ये ज्या श्रेष्ठ पुरुषाचा भूतकाळातला इतिहास चांगला असेल त्यांची मोहर(शिक्का) बनवतात. आता शिवाची जयंती पण साजरी करतात. समजवायला हवे सर्वात उच्च जयंती कोणाची आहे?कोणाची मोहर बनवायला पाहिजे?कोणत्या साधू संताची किंवा शिखांची, मुसलमानांची किंवा इंग्रजांची, कोणी तत्त्वज्ञानी चांगला असेल तर त्याची मोहर बनवत राहतात. ज्याप्रमाणे राणाप्रताप इ. ची ही मोहर बनवतात. खरेतर मोहर असायला पाहिजे बाबांची, जे सर्वांचे सदगती दाता आहेत. यावेळी बाबा आले नाहीत तर सदगती कशी होणार, कारण की सर्वजण रौरव नरकामध्ये गटांगळ्या खात आहेत. पतित-पावन शिवबाबा सर्वात उच्च ते उच्च आहेत. शिवाचे मंदिरही खूप उंच ठिकाणी बनवतात. कारण की उच्च ते उच्च आहेत ना. बाबाच येऊन भारताला स्वर्गाचे मालक बनवतात. जेंव्हा ते येतात तेंव्हा सदगती करतात. तर त्या बाबांची आठवण राहायला पाहिजे. मोहर पण शिवबाबांची कशाप्रकारे बनवायची?भक्ती मार्गामध्ये तर शिवलिंग बनवतात. तेच उच्च ते उच्च आत्मा आहेत. उंच ते उंच मंदिरही शिवाचेच बनवतात. सोमनाथ शिवाचे मंदिर आहे ना. भारतवासी तमोप्रधान असल्याकारणाने हे पण जाणत नाहीत कि शिव कोण आहे. ज्याची पूजा करतात त्याच्या कर्तव्याला ही जाणत नाहीत. राणा प्रताप ने लढाई केली, ती तर हिंसा झाली. यावेळी तर सर्वजण डबल हिंसक आहेत. विकारांमध्ये जाणे, काम कट्यार चालवणे ही पण हिंसा आहे ना. हे लक्ष्मी - नारायण डबल अहिंसक आहेत. मनुष्यांना जेंव्हा पूर्ण ज्ञान समजेल तेव्हा योग्यरीतीने मोहर काढतील. सतयुगामध्ये या लक्ष्मी- नारायणाची मोहर बनवतात. आता ही भारताची तीच मोहर असायला पाहिजे. उच्च ते उच्च त्रिमूर्ती शिव आहे. तो तर अविनाशी असायला पाहिजे कारण की भारताला अविनाशी राज्य-गादी देतात. परमपिता परमात्माच भारताला स्वर्ग बनवतात. तुमच्या मध्येही अनेक जण , जे हे विसरून जातात की बाबा आम्हाला स्वर्गाचे मालक बनवत आहेत. माया हे विसरायला लावते. बाबांना जाणल्यामुळे भारतवासी किती चुका करत आले आहेत. शिवबाबा काय करतात, हे कोणालाही माहीत नाही. शिवजयंतीचा अर्थही समजत नाहीत. जे ज्ञान बाबांच्या शिवाय दुसऱ्या कोणाकडे नाही.

आता तुम्हा मुलांना बाबा समजावत आहेत तुम्ही इतरांवर दया करा. स्वतःवरही स्वतःच दया करा. शिक्षक शिकवतात, तेही दया करतात ना. हेसुद्धा म्हणतात मी शिक्षक आहे. तुम्हाला शिकवतो. खरे तर याचे नाव पाठशाळा ही म्हणू शकत नाही. हे तर खूप मोठे विश्वविद्यालय आहे. बाकी तर सर्व खोटी नावे आहेत. ते काही संपूर्ण विश्वासाठी कॉलेज नसतात. विश्वविद्यालय तर आहेच एका पित्याचे, जो साऱ्या विश्वाची सदगती करतो. खरे पाहता विश्वविद्यालय हे एकच आहे. याद्वारेच सर्व मुक्ती-जीवनमुक्ती मध्ये जातात अर्थात शांति आणि सुख प्राप्त करतात. विश्व तर हे आहे ना म्हणून, बाबा म्हणतात घाबरू नका. या तर समजण्याच्या गोष्टी आहेत. असेही होते आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणी कोणाचे ऐकतही नाही. प्रजेचे प्रजेवर राज्य चालते दुसऱ्या कोणत्याही धर्मामध्ये सुरुवातीपासून राज्य चालत नाही. ते तर धर्म स्थापन करण्यासाठी येतात. नंतर जेंव्हा लाखोंच्या संख्ये मध्ये होतात तेंव्हा राज्य करतात. इथे तर बाबा विश्वासाठी राज्य स्थापन करत आहेत. ही पण समजावण्याची गोष्ट आहे. या पुरुषोत्तम संगमयुगावर दैवी राजधानी स्थापन करत आहेत. बाबांनी समजावले आहे कृष्ण, नारायण, राम इ. चे काळे चित्रही तुम्ही हातामध्ये घ्या नंतर समजावून सांगा कृष्णाला श्याम-सुंदर असे का म्हणतात?सुंदर होता नंतर शाम(सावळा)कसा बनतो?भारत स्वर्ग होता. आता नर्क आहे. नर्क म्हणजे काळा, स्वर्ग म्हणजे गोरा. राम राज्याला दिवस, रावण राज्याला रात्र म्हटले जाते. तर तुम्ही समजावू शकता-देवतांना काळे का बनवले आहे. बाबा बसून समजावत आहेत-तुम्ही आता पुरुषोत्तम संगमयुगावर आहात, पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. विकारी पतित मनुष्यांशी तुमचा कोणताही संबंध नाही, हो, अजून कर्मातीत अवस्था झालेली नाही त्यामुळे कर्म संबंधी मध्ये मन गुंतले जाते. कर्मातीत बनण्यासाठी आठवणीची यात्रा करायला पाहिजे. बाबा समजावत आहेत तुम्ही आत्मा आहात, तुमचे परमात्मा पित्या सोबत प्रेम असायला पाहिजे. ओहो!बाबा आम्हाला शिकवत आहेत. तो उत्साह कोणामध्ये राहतच नाही. माया घडी-घडी देह-अभिमाना मध्ये आणते. जेंव्हा की समजतात, शिवबाबा आम्हा आत्म्यांसोबत बोलत आहेत, ती खुशी राहायला पाहिजे ना. ज्या सुईवर जराही गंज नसेल, ती चुंबका समोर ठेवल्यानंतर पटकन चिटकून बसते. थोडा जरी गंज असला तरी चिटकणार नाही. आकर्षित करणार नाही. ज्या बाजूनी गंज नसेल त्या बाजूनी चुंबक खेचेल. मुलांमध्ये आकर्षण तेंव्हाच होईल जेंव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये राहतील. गंज असेल तर आकर्षिले जाणार नाहीत. प्रत्येक जण समजू शकते आमची सुई जेंव्हा बिलकुल पवित्र बनेल तेंव्हाच आकर्षण होत राहील. गंज असल्या कारणामुळे आकर्षित होत नाहीत. तुम्ही खूप आठवण केल्या नंतर विकर्म नष्ट होऊन जातात. अच्छा, नंतर जर एखादे पाप केले तर १०० पटीने दंड पडतो. गंज चढून जातो, आठवण करू शकत नाहीत. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, आठवण विसरल्यामुळे गंज चढत जातो. मग तेवढे आकर्षण, प्रेम राहू शकत नाही. कट उतरला असेल तर प्रेम राहील, खुशी पण राहील. चेहरा हर्षित मूर्ख राहील. तुम्हाला भविष्यामध्ये असे बनायचे आहे. सेवा करत नाही तर जुन्या सडलेल्या गोष्टी करत राहतात. बाबांपासून बुद्धीयोग तोडतात. जी काही चमक होती, तीही निघून जाते. बाबांशी थोडेही प्रेम राहत नाही. प्रेम त्यांचे राहते जे चांगल्या प्रकारे बाबांची आठवण करत राहतात. बाबांनाही त्यांचे आकर्षण वाटते. हा मुलगा सेवा पण चांगली करतो आणि आठवणीमध्ये ही राहतो. तर बाबांचे प्रेम अशा मुलांवर राहते. जे स्वतःवर लक्ष ठेवतात, आमच्या हातून काही पाप तर नाही झाले. जर आठवण केली नाही तर गंज कशी उतरेल. बाबा म्हणतात चार्ट ठेवा तर कट उतरून जाईल. तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे असेल तर कट उतरायला पाहिजे. चढतातही आणि उतरतातही. १०० पटीने दंड होतो. बाबांची आठवण करत नाहीत तर काही ना काही पाप करत राहतात. बाबा म्हणतात गंज उतरल्याशिवाय तुम्ही माझ्याजवळ येऊ शकत नाही. नाहीतर परत सजा खावी लागेल. सजा पण मिळते, पद पण भ्रष्ट होते. मग बाबांकडून वारसा काय मिळणार?असे कर्म करू नका की ज्यामुळे अजूनच जास्ती कट चढेल. प्रथम तर आपला कट कसा उतरेल याचा विचार करा. विचार करत नाहीत तर बाबा समजतात यांच्या भाग्या मध्ये नाही. चांगले गुण पाहिजेत. चांगले संस्कार पाहिजेत. लक्ष्मी- नारायणाच्या संस्कारांचे गायन आहे. या वेळचे लोक त्यांच्यासमोर आपल्या गुणांचे वर्णन करतात. शिवबांना ओळखतच नाहीत, सदगती करणारा तर तोच आहे, संन्याशाने कडे जातात. परंतु सर्वांचा सदगती दाता एकच आहे. बाबा स्वर्गाची स्थापना करतात नंतर तर खाली उतरावे लागते. बाबांच्या शिवाय कोणीही पावन बनवू शकत नाही. मनुष्य खड्ड्यामध्ये जाऊन बसतात, त्यापेक्षा गंगे मध्ये जाऊन बसले तरी स्वच्छ होतील कारण की गंगेला पतित-पावनी म्हटले जाते. मनुष्य शांती मागतात, ती तर घरी गेल्यानंतर भूमिका पूर्ण होईल. आम्हा आत्म्यांचे घर निर्वाणधाम आहे. इथे शांती कुठून येणार. तपस्या करतात, तेही एक कर्मच आहे ना, फक्त शांत बसलेले असतात. शिवबाबांना तर जाणतच नाहीत. तो सर्व आहे भक्तिमार्ग, पुरुषोत्तम संगमयुग एकच आहे, जेंव्हा बाबा येतात. आत्मा स्वच्छ बनून मुक्ती- जीवनमुक्ती मध्ये निघून जाते. जे मेहनत करतात तेच राज्य करतील, बाकी जे मेहनत करणार नाहीत ते सजा खातील. सुरुवातीला सजेचाही साक्षात्कार केला होता. शेवटीही साक्षात्कार होईल. पहातील आम्ही श्रीमतावर न चालल्यामुळे हे हाल झाले आहे. मुलांना कल्याणकारी बनायचे आहे. पिता आणि रचनेचा परिचय द्यायचा आहे. ज्याप्रमाणे सुईला रॉकेल मध्ये टाकल्यानंतर कट उतरून जातो, त्याप्रमाणे बाबांची आठवण केल्याने कट उतरून जातो. नाहीतर ते आकर्षण, ते प्रेम बाबांमध्ये राहत नाही. मित्र-संबंधी इत्यादींच्या मध्ये सारे प्रेम निघून जाते, मित्र- संबंधीच्या जवळ जाऊन राहतात. कुठे त्या गंजलेल्या लोकांची संगत आणि कुठे ही संगत. गंजलेल्या वस्तू सोबत राहिल्याने त्यांनाही गंज चढतो. गंज उतरवण्यासाठीच बाबा येतात. आठवण केल्यानेच पवित्र बनाल. अर्ध्याकल्पा पासून खूपच कट चढलेला आहे. आता बाबा चुंबक म्हणत आहेत, माझी आठवण करा. बुद्धीचा योग जेवढा माझ्यासोबत असेल तेवढी गंज उतरेल. नवी दुनिया तर बनणारच आहे, सतयुगामध्ये सुरुवातीला देवी-देवतांचे खूप छोटेसे झाड असते, नंतर वृद्धी होत जाते. इथूनच तुमच्या जवळ येऊन पुरुषार्थ करत राहतात. वरून कोणीही येत नाही. ज्याप्रमाणे इतर धर्माचे आत्मे वरून खाली येतात. इथे तुमची राजधानी तयार होत आहे. सर्व शिकण्यावर अवलंबून आहे. बाबांच्या श्रीमताच्या आचरण करण्यावर आहे, बुद्धीयोग बाहेर जात राहतो, तेंव्हाही आत्म्यावर गंज चढतो. इथे येतात तेंव्हा सर्व हिसाब किताब चुक्तू करून, जिवंत असताना सर्व काही नष्ट करून येतात. संन्यासी पण संन्यास करतात तरीही खूप काळापर्यंत सर्व काही आठवणी मध्ये येत राहते.

तुम्ही मुले जाणता आता आम्हाला, सत्याचा संग मिळाला आहे. आम्ही आमच्या बाबांच्या आठवणी मध्ये राहतो. मित्र-संबंधी इत्यादींना ही ओळखतो. ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहत असताना, कर्म करत असताना बाबांची आठवण करत राहतो, पवित्र बनायचे आहे, इतरांनाही शिकवायचे आहे. नंतर भाग्यात असेल तर चालत राहतील. ब्राह्मण कुळाचा नसेल तर देवता कुळामध्ये कसा येईल?खूप सोपे मुद्दे दिले जातात, ज्यामुळे पटकन एखाद्याच्या बुद्धीमध्ये बसू शकते. विनाश काळात विपरीत बुद्धीचे चित्रही स्पष्ट आहे. आता तर राजधानी नाही. दैवी राजधानी होती, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. आता तर पंचायती राज्य आहे, समजावून सांगायला काही हरकत नाही. परंतु गंज निघालेला असेल तरच एखाद्याला समजू शकते. प्रथम गंज(आत्म्यावर साठलेला पाप कर्मांचा मळ) काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले संस्कार पाहायचे आहेत. रात्रंदिवस आम्ही काय करत आहोत?स्वयंपाक घरात भोजन बनवत असताना, भाकरी बनवत असताना जेवढे होईल तेवढे आठवणीमध्ये राहा, फिरायला जाता तिथेही आठवणीमध्ये रहा. बाबा सर्वांच्या अवस्थेला जाणतात ना. परचिंतन करत राहतात तर अजूनच कट चढतो. परचिंतनाची कोणतीही गोष्ट ऐकू नका. अच्छा

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. ज्याप्रमाणे बाबा शिक्षक रूपामध्ये शिकवून सर्वांवर दया करतात, अशाप्रकारे स्वतःवर आणि इतरांवर दया करायची आहे. शिक्षण(मुरली) आणि श्रीमतावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे, आपले संस्कार सुधरायचे आहेत.

2. आपसा मध्ये कोणत्याही जुन्या सडलेल्या गोष्टींचे परचिंतन करून बाबांपासून बुद्धीयोग तोडायचा नाही. कोणतेही पाप कर्म करू नका. आठवणीमध्ये राहून गंज उतरवायचा आहे.

वरदान:-
सर्वशक्तींना हुकुमाप्रमाणे (ऑर्डरप्रमाणे ) आपले सहयोगी बनवणारे प्रकृती जीत भव

सर्वात मोठ्यात मोठी दासी प्रकृती आहे. जी मुले प्रकृतीजीत बनण्याचे वरदान प्राप्त करतात त्यांच्या हुकुमाप्रमाणे सर्व शक्ती आणि प्रकृती रुपी दासी कार्य करत असते म्हणजेच वेळेवर सहयोग देत असते. परंतु जर प्रकृतीजीत बनण्याच्या बदल्यात आळसाच्या झोपेमधे किंवा अल्प काळाच्या प्राप्तीच्या नशेमध्ये व व्यर्थ संकल्पांच्या नाचण्या मध्ये मस्त होऊन आपला वेळ घालवत असाल तर शक्ती हुकमावर कार्य करणार नाहीत म्हणून तपासून पहा कि प्रथम मुख्य संकल्प शक्ती, निर्णय शक्ती आणि संस्कारांची शक्ती तिन्ही हुकमा मध्ये चालत आहेत का?

बोधवाक्य:-
बापदादांचे गुण गात रहा तर स्वतः ही गुणवान बनाल.