28-10-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- तुम्ही या पाठशाळेत स्वर्गामध्ये जाण्याचा पासपोर्ट (परवाना)घेण्यासाठी
आले आहात,आत्म अभिमानी बना आणि आपले नाव रजिस्टर मध्ये लिहा, तर स्वर्गामध्ये याल."
प्रश्न:-
कोणती स्मृती
न राहिल्यामुळे मुलं बाबांचा आदर करत नाहीत?
उत्तर:-
काही मुलांना ही स्मृती राहत नाही, ज्याला संपूर्ण दुनिया बोलवत आहे,आठवण करत आहे,तो
उच्च ते उच्च पिता आम्हा मुलांच्या सेवेमध्ये उपस्थित झाला आहे,हा निश्चय क्रमवार
आहे,जेवढा जास्त निश्चय आहे तेवढा रिगार्ड(आदर)ठेवतात.
गीत:-
जो पिया के
साथ है.....
ओम शांती।
सर्व मुले ज्ञान सागरा सोबत तर आहेतच.एवढी सारी मुले एका ठिकाणी तर राहू शकत नाहीत.
जे सोबत आहेत ते प्रत्यक्ष जवळून ज्ञान ऐकतात आणि जे दूर आहेत त्यांना उशिरा
मिळते.परंतु असे नाही की सोबत असणाऱ्यांची जास्त प्रगती होते आणि दूर राहणाऱ्यांची
कमी होते,असे नाही प्रत्यक्षात पाहिले जाते जे दूर आहेत ते जास्त शिकतात आणि प्रगती
करतात.हे अवश्य आहे बेहद चा पिता येथे आहेत.ब्राह्मण मुलांमध्येही क्रमवार आहेत.
मुलांना दैवी गुणही धारण करायचे आहेत.काही-काही मुलांकडून खूप मोठ्या चुका होतात.असे
समजतात पण, बेहदचा पिता ज्याची संपूर्ण सृष्टी आठवण करते तो आमच्या सेवेमध्ये
उपस्थित आहे आणि आम्हाला उच्च ते उच्च बनण्याचा मार्ग सांगत आहेत.खूप प्रेमाने
समजावतात तरीही एवढा सन्मान,आदर करत नाहीत.बंधना मध्ये असणाऱ्या माता किती मार
खातात तडपतात तरीही आठवणीमध्ये राहून चांगल्या प्रकारे ज्ञान घेतात.त्यांचे पदही
उच्च बनते.बाबा सर्वांसाठी सांगत नाहीत.क्रमवार पुरुषार्थ नुसार तर आहेतच.बाबा
मुलांना सावधान करतात,सर्वजण एकसारखे असू शकत नाहीत.बंधनामध्ये राहणार्या माता
बाहेर राहूनही खूप कमाई करतात.हे गीत तर भक्तिमार्गाचे बनलेले आहे. तुम्ही त्याचा
अर्थ काढू शकता, त्यांना काय माहित पिया(प्रियकर)म्हणजे कोण, कोणाचा
पिया(प्रियकर)आहे? आत्मा स्वतःलाच जाणत नाही,तर बाबांना कशी जानणार?आहे तर आत्मा
ना.मी काय आहे, कुठून आले आहे-हे काहीच माहित नाही.सर्व देह-अभिमानी आहेत.कुणीही
आत्म-अभिमानी नाही.जर आत्म-अभिमानी बनले तर आत्म्याला आपल्या पित्याचा पण परिचय
होईल.देह-अभिमानी असल्यामुळे न आत्म्याला न परमपिता परमात्म्याला जाणतात.इथे तर
तुम्हा मुलांनाही बाबा सन्मुख समजावत आहेत. ही बेहदची शाळा आहे.स्वर्गाची बादशाही
प्राप्त करणे हेच सर्वांचे उद्दिष्ट आहे.स्वर्गामध्ये पण खूप प्रकारची पदे आहेत.कुणी
राजाराणी कुणी प्रजा आहे.बाबा म्हणतात मी तुम्हाला पुन्हा एकदा दुहेरी मुकुटधारी
बनवण्यासाठी आलो आहे,सर्वच बनू शकत नाहीत.जे चांगल्या प्रकारे शिकतात ते मनामध्ये
समजू शकतात आम्ही हे बनू शकतो.समर्पित ही आहेत, निश्चयही आहे.सर्वजण समजू शकतात
यांच्याकडून कोणतेही खराब काम होत नाही. काही-काही मध्ये खूप अवगुण असतात.त्यांना
हे माहीत नसते की आम्हाला एवढे उच्च पद मिळणार आहे म्हणून पुरुषार्थ करत
नाहीत.बाबांना विचारले की मी हे बनू शकतो का,तर बाबा लगेच सांगू शकतात.स्वतःला
पाहिले तर लगेच समजू शकतात, बरोबर मी उच्चपद प्राप्त करू शकणार नाही.तशा प्रकारची
लक्षणेही असायला पाहिजेत ना. सतयुग त्रेतायुगामध्ये तर अशा प्रकारच्या गोष्टी
नसतात.तिथे प्रारब्ध आहे.शेवटी जे राजे असतात,ते प्रजेवर पण खूप प्रेम करतात.हे तर
मात-पिता आहेत. तुम्ही मुलं जाणत आहात.हा तर बेहद चा पिता आहे,हे तर संपूर्ण
दुनियेची नोंद ठेवणारे आहेत.तुम्हीही रजिस्टर(नोंद) करता ना.परवाना देत आहात.
स्वर्गाचे मालक बनण्यासाठीचा परवाना(पासपोर्ट)येथे भेटत आहे.बाबांनी सांगितले
होते,जे स्वर्गामध्ये जाण्या योग्य आहेत त्या सर्वांचा फोटो असायला पाहिजे,कारण की
तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात.त्याच्या बाजूला ताज आणि तख्त वाला फोटो असायला
पाहिजे.आम्ही हे बनत आहोत.प्रदर्शनी इ. मधे ही, नमुना ठेवायला पाहिजे-हा राजयोग
आहे.समजा कोणी वकील बनत असेल तर एका बाजूला सर्वसाधारण वेशभूषे मध्ये असायला हवा,एका
बाजूला वकिलाच्या वेशभूषेचे मध्ये असायला हवा.त्याप्रमाणेच एका बाजूला तुम्ही
साधारण दुसऱ्या बाजूला दुहेरी मुकुटधारी.तुमचे एक चित्र आहे-ज्यामध्ये विचारले जाते
तुम्हाला काय बनावे असे वाटते?असे वकील इ.बनायचे आहे का?राजांचाही राजा बनायचे
आहे.अशा प्रकारची चित्रे असायला हवीत.वकील,जज इ. तर इथे आहेत.तुम्हाला नव्या
दुनियेमध्ये राजांचाही राजा बनायचे आहे.ध्येय समोर आहे.आम्ही हे बनत आहोत.किती
चांगल्या प्रकारे समजावून सांगितले जाते.चित्र ही खूप चांगले मोठे असायला पाहिजेत.ते
वकिली शिकता तर त्यांचा योग वकिलाशी असतो. वकीलच बनतात.यांचा योग परमपिता
परमात्म्याशी आहे तर दुहेरी मुकुटधारी बनतात.आता बाबा समजावतात मुलांनी कार्य करायला
पाहिजे. लक्ष्मीनारायणाच्या चित्रावर समजावणे खूप सोपे होईल.आम्ही असे बनत आहोत तर
तुमच्यासाठी अवश्य नवी दुनिया असायला पाहिजे.नरकाच्या नंतर स्वर्ग आहे.आता
पुरुषोत्तम संगम युग आहे.हे शिक्षण किती उच्च बनवणारे आहे,यामध्ये पैसे इ.ची गरज
नाही.शिकण्याची आवड असायला पाहिजे.एक व्यक्ती खूप गरीब होता,त्याच्याजवळ शिकण्यासाठी
पैसे नव्हते.नंतर शिकून,कष्ट करून एवढा साहूकार झाला आणि राणी विक्टोरिया चा मंत्री
बनला.आता तुम्ही किती गरीब आहात.बाबा किती उच्च शिक्षण देतात.यामध्ये फक्त बुद्धीने
बाबांची आठवण करायची आहे. दिवा लावण्याची ही गरज नाही. कुठेही बसून आठवण करा.परंतु
माया अशी आहे जी बाबांची आठवण विसरायला लावते. आठवणी मध्येच विघ्न पडतात. हेच तर
युद्ध आहे ना.आत्मा बाबांची आठवण केल्याने च पवित्र बनते.शिक्षणामध्ये माया काहीच
करत नाही.शिक्षणापेक्षा(मुरली) आठवणीचा नशा उच्च आहे म्हणूनच प्राचीन योग गायलेला
आहे.योग आणि ज्ञान असे म्हटले जाते.योगासाठी ज्ञान मिळत आहे-अशाप्रकारे आठवण करा.
आणि परत सृष्टिचक्राचेही ज्ञान आहे.रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला दुसरे
कोणीही जाणत नाही.भारताचा प्राचीन योग शिकवला जातो. प्राचीन तर नव्या दुनियेला
म्हटले जाते.त्या दुनियेला लाखो वर्ष झाली असे म्हणतात.कल्पाचे आयुष्यही अनेक
प्रकारचे सांगतात.कोण काय सांगते,कोण काय सांगते.इथे तुम्हाला एकच पिता शिकवत
आहे.तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला चित्रे भेटतील. हा(ब्रह्मा)तर व्यापारी आहे
ना.बाबा म्हणतात कपड्यांवर ही छापू शकता.जर कोणाजवळ मोठ्या पडद्याची प्रेस नसेल तर
अर्धे-अर्धे करा.नंतर अशाप्रकारे जोडतात कोणालाही माहित पडत नाही.बेहदचा पिता,मोठे
शासन(बडी सरकार)म्हणते,कोणी छापून दाखवा तर मी त्याचे नाव प्रसिद्ध करेन.हे चित्र
कपड्यांवर छापून कोणी विदेशामध्ये घेऊन गेले तर तुम्हाला एका-एका चित्राचे काहीजण
5-10 हजारही देतील. तिथे खूप पैसे आहेत.मोठ-मोठे चित्र बनू शकतात,एवढ्या मोठ्या
मोठ्या प्रेस आहेत,शहरांचे दृश्य अशाप्रकारे छापतात-विचारूच नका.हे पण छापू शकतो.
ही तर एवढी आश्चर्यकारक वस्तू आहे- म्हणतील खरे ज्ञान यामध्येच आहे,इतर कोणाजवळ ही
नाही. कोणालाही माहीत नाही- समजावून सांगणारा ही इंग्लिश मध्ये हुशार
पाहिजे.इंग्लिश तर सर्वांना माहीत आहे.त्यांनाही संदेश तर द्यायचा आहे ना.तेच नाटका
नुसार विनाश करण्यासाठी निमित्त बनले आहेत.बाबांनी सांगितले आहे, त्यांच्याजवळ
बॉम्ब इ.अशा-अशा प्रकारचे आहेत जर दोघेजण(युरोप आणि अमेरिका) एकत्र आले तर संपूर्ण
विश्वाचे मालक बनू शकतात.परंतु हे नाटक असे बनले आहे की तुम्ही योगबळा द्वारे
विश्वाची बादशाही घेऊ शकता.हत्यार इ.ने विश्वाचे मालक बनू शकत नाही.ते आहे सायन्स (विज्ञान)तुमचे
आहे सायलेन्स(शांती).फक्त बाबांची आणि चक्राची आठवण करा, आप समान बनवा.
तुम्ही मुले योगबळा द्वारे विश्वाची बादशाही घेत आहात.ते आपापसात अवश्य लढणार
आहेत.त्यांच्या भांडणांमध्ये लोणी तुम्हाला मिळणार आहे. कृष्णाच्या मुखामध्ये
लोण्याचा गोळा दाखवतात.दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ अशी म्हण ही आहे.असेच घडत
आहे.संपूर्ण विश्वाच्या राजाईचे लोणी तुम्हाला मिळत आहे.तर तुम्हाला किती खुशी
व्हायला पाहिजे.वाह बाबा तुमची तर कमाल आहे.ज्ञान तर तुमचेच आहे.किती चांगल्या
प्रकारे समजावतात.आदि सनातन देवी-देवता धर्म वाल्यांनी विश्वाची बादशाही कशाप्रकारे
मिळवली.याचा कधी कुणी विचारच केला नसेल.त्यावेळी दुसरे कोणतेही खंड नसते.बाबा
म्हणतात मी विश्वाचे मालक बनत नाही,तुम्हाला बनवतो.शिक्षणाने तुम्ही विश्वाचे मालक
बनत आहात.मी अशरीरी परमात्मा आहे.तुम्हा सर्वांना शरीर आहे देहधारी
आहात.ब्रह्मा-विष्णू- शंकराला ही सूक्ष्म शरीर आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आत्मा आहात
असेच मीही परमात्मा आहे. माझा जन्म दिव्य आणि अलौकिक आहे दुसरे कोणीही असा जन्म घेत
नाही.हे ठरलेले आहे.हे सर्व नाटकामध्ये नोंद आहे.आत्ता कुणी मरण पावले-तर हे ही
नाटकामध्ये नोंदले आहे.नाटकाबद्दल किती समजावून सांगितले जाते. क्रमवार समजतील.काही
तर मंदबुद्धी चे असतात.तीन प्रकारचे असतात.शेवटचा दर्जा(शेरा) वाल्याला मंद आहे असे
म्हणतात.स्वतः समजू शकतात हा पहिल्या दर्जाचा आहे,हा दुसऱ्या दर्जाचा आहे.प्रजे
मध्येही असे आहेत.शिकवण तर एकच आहे.मुले जाणतात हे शिकून आम्ही दुहेरी ताजधार बनणार
आहोत.आम्ही डबल शिरताज होतो नंतर सिंगल ताज नंतर एकही ताज नाही असे बनलो. जसे कर्म
तसे फळ असे म्हटले जाते.सतयुगामध्ये असे म्हणत नाहीत.इथे चांगले कर्म केले तर एका
जन्मासाठी चांगले फळ मिळेल.काही असे कर्म करतात त्यामुळे जन्मापासूनच रोगी असतात.हा
सुद्धा कर्मभोगच आहे ना.मुलांना कर्म,अकर्म, विकर्मा बद्दल ही समजावले आहे. इथे जसे
कर्म करतात त्याचे चांगले किंवा वाईट फळ प्राप्त करतात.कोणी साहुकार बनते तर अवश्य
त्यांनी चांगले कर्म केले असतील.आता तुम्ही जन्मजन्मांतरचे प्रारब्ध बनवत
आहात.आत्ताच्या पुरुषार्था नुसार, गरीब सावकारा मधला फरक तर तिथेही असतो ना.ती
प्रारब्ध 21 जन्मांसाठी अविनाशी आहे.इथे अल्प काळाचे मिळते.कर्म तर करावेच लागते
ना.हे कर्म क्षेत्र आहे.सतयुग आहे स्वर्गाचे कर्म क्षेत्र.तिथे विकर्म होतच नाही.या
सर्व गोष्टी बुद्धीमध्ये धारण करायच्या आहेत.काही जणच निराळे आहेत जे सदैव पॉईंट
लिहीत राहतात.चार्ट ही लिहिता-लिहिता नंतर थकून जातात.तुम्ही मुलांनी पॉईंट(मुद्दे)
लिहायला पाहिजेत.खूप गुह्य-गुह्य पॉईंट आहेत.सर्व पॉईंट तुमच्या लक्षातही राहणार
नाहीत,विसरून जातील.नंतर पश्चाताप होईल की हे पॉईंट तर आम्ही विसरूनच गेलो.सर्वांचे
हाल असेच होते. विसरून जाते नंतर दुसऱ्या दिवशी आठवते.मुलांनी आपल्या प्रगतीसाठी
विचार करायला पाहिजे.बाबा जाणतात कुणी थोडेच अर्थ सहित लिहत असतील.बाबा व्यापारी
आहेत ना.ते विनाशी रत्नांचे व्यापारी आहेत.हे ज्ञान रत्नांचे आहेत. खूप मुले योगा
मध्येच नापास होतात.बिनचूक आठवणीमध्ये कुणी एक दीड तासच राहू शकतात.आठ तास
पुरुषार्थ करायचा आहे.तुम्हा मुलांना शरीर निर्वाह ही करायचा आहे.बाबांनी प्रेम
करणाऱ्यांचे ही उदाहरण दिले आहे.बसल्या-बसल्या आठवण आली आणि लगेच समोर येतात.हा
सुद्धा एक प्रकारचा साक्षात्कार आहे.तो तीची आठवण करतो,ती त्याची आठवण करते.इथे तर
एकच माशुक (प्रियकर)आहे,तुम्ही सर्वजण आशिक आहात.तो सुंदर माशुक तर सदैव गोरा
आहे.सदा पवित्र आहे.बाबा म्हणतात मी सदैव सुंदर प्रवासी आहे. तुम्हालाही सुंदर बनवत
आहे.या देवतांचे नैसर्गिक सौंदर्य आहे.इथे तर कशा-कशा प्रकारची फॅशन
करतात.वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालतात.तिथे तर एकरस नैसर्गिक सौंदर्य असते.आत्ता
पासून तुम्ही अशा दुनियेमध्ये जात आहात.बाबा म्हणतात मी जुन्या पतित देशामध्ये पतित,
शरीरामध्ये येतो.इथे पावन शरीर नाही. बाबा म्हणतात मी यांच्या खूप जन्मांच्या शेवटी
प्रवेश करून प्रवृत्ती मार्ग स्थापन करतो. पुढे चालून तुम्ही खूप सेवा करण्यायोग्य
बनाल.पुरुषार्थ कराल नंतर समजेल.अगोदरही असा पुरुषार्थ केला होता, आताही करत
आहोत.पुरुषार्था शिवाय तर काहीही मिळू शकत नाही.तुम्ही जाणत आहात आम्ही नरापासून
नारायण बनण्याचा पुरुषार्थ करत आहोत. नव्या दुनियेची राजधानी होती, आता नाही,नंतर
होणार आहे. लोखंडाच्या युगा नंतर सोन्याचे युग अवश्य येणार आहे.कल्पा पूर्वीप्रमाणे
राजधानी स्थापन होणारच आहे.अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. समर्पित
होण्याबरोबरच निश्चय बुद्धीही बनायचे आहे. कोणतेही खराब काम व्हायला नको.मनामध्ये
कोणताही अवगुण राहायला नको तरच चांगले पद मिळू शकते.
2. ज्ञान रत्नांचा व्यापार करण्यासाठी बाबा जे चांगले चांगले मुद्दे सांगतात,ते
लिहून घ्यायचे आहेत.नंतर ते आठवणीत ठेवून इतरांना सांगायचे आहे.सदैव आपल्या उन्नतीचा
विचार करायचा आहे.
वरदान:-
बिनतारी (वायरलेस)
सेट द्वारे विनाश काळामध्ये अंतिम सुचनेला कैच करणारे (वाइसलेस) निर्विकारी भव.
विनाशाच्या काळामध्ये
अंतिम डायरेक्शन कैच( दिशानिर्देश समजून घेण्यासाठी)करण्यासाठी वाइसलेस
बुद्धी(पवित्र आणि शांत बुद्धी)पाहिजे ज्याप्रमाणे ते लोक वायरलेस सेट द्वारे(रेडिओ
द्वारे)एक दुसऱ्यापर्यंत आवाज पोहोचवू शकतात.इथे वाइसलेस(शांतीची)ची वायरलेस आहे या
वायरलेस द्वारे आपला आवाज येईल की या सुरक्षित ठिकाणी पोहोचा.जी मुले बाबांच्या
आठवणी मध्ये राहणारी वायरलेस आहेत,ज्यांना अशरीरी बनण्याचा अभ्यास आहे ते विनाशा
मध्ये विनाश होणार नाहीत परंतु स्वइच्छेने शरीर सोडतील.
बोधवाक्य:-
योगाचा किनारा
करून कर्मामध्ये व्यस्त होऊन जाणे- म्हणजेच आळशी बनणे आहे.