18-10-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
07.04.86 ओम शान्ति
मधुबन
तपस्वीमूर्त,त्यागमूर्त,विधाताच, विश्व राज्यअधिकारी
आज आत्मीक शमा आपल्या
आत्मिक परवान्यांना पाहत आहेत. सर्व आत्मिक परवाने, शमाला भेटण्यासाठी चोहीकडून आले
आहेत. आत्मिक परवान्याचे प्रेम, आत्मिक शमा आणि आत्मिक परवाने जाणतात. बापदादा
जाणतात की, सर्व मुलांचा मनापासूनचा स्नेह आकर्षित करून, या अलौकिक मेळ्यामध्ये
सर्वांना घेऊन आला आहे. हा आलौकिक मेळा, अलौकिक मुले आणि बाबा जाणतात! दुनिये साठी
हा मेळा गुप्त आहे. जर कोणाला म्हटले, आत्मिक मेळ्यामध्ये जात आहोत, तर ते काय
समजतील? हा मेळा नेहमीसाठी मालामाल बनविणारा आहे. हा परमात्म मेळा सर्व प्राप्ती
स्वरूप बनवणारा आहे. बापदादा सर्व मुलांच्या मनातील, उमंग- उत्साहाला पाहत आहेत.
प्रत्येकाच्या मनामध्ये स्नेहाच्या सागराच्या लाटा पसरत आहेत. हे बापदादा पाहत आहेत
आणि जाणत पण आहेत कि, लगन द्वारे विघ्नविनाशक बनून, मधुबन निवासी बनले आहेत.
सर्वांच्या सर्व गोष्टी स्नेहा मध्ये समाप्त झाल्या आहेत. एव्हररेडी बनण्याचा सराव
करून दाखविला. एवररेडी झाले आहात ना. हा पण गोड नाटकातील, गोड अभिनय पाहून बापदादा
आणि ब्राह्मण मुले हर्षित होत आहेत. स्नेह असल्यामुळे सर्व गोष्टी सोप्या वाटतात आणि
प्रिय पण वाटतात. जे झाले ते नाटका नुसार चांगले झाले. किती वेळा अशी भागदौड करून
आले आहात. रेल्वेने आले आहात की, पंखाने उडत आले आहात? याला म्हटले जाते, जिथे मन
आहे तिथे असंभव पण संभव होऊन जाते. स्नेहाचे स्वरूप तर दाखविले, आता पुढे काय करायचे
आहे? जे आतापर्यंत झाले ते श्रेष्ठ झाले, आणि श्रेष्ठ होईल.
आता वेळेनुसार सर्व स्नेही, सर्वश्रेष्ठ मुलांकडून बापदादा आणखीन विशेष काय इच्छित
आहेत? तसे तर पूर्ण अवतरणाच्या काळी, वेळोवेळी इशारा देत आहेत. आता त्या इशाऱ्यांना
प्रत्यक्ष रूपामध्ये पाहण्याची वेळ जवळ आली आहे. स्नेही आत्मे आहात, सहयोगी आत्मे
आहात, सेवाधारी आत्मे पण आहात. आता महातपस्वी आत्मे बना. आपल्या संघटित स्वरूपातील
तपस्येच्या आत्मिक ज्वालेद्वारे सर्व आत्म्यांना दुःख अशांती पासून मुक्त करण्याचे,
महान कार्य करण्याची वेळ आली आहे. जसे एकीकडे विनाकारण खुनाच्या, खेळाची लाट पसरत
चालली आहे, सर्व आत्मे स्वतःला निराधार अनुभव करत आहेत, अशावेळी सर्व आधाराची
अनुभूती करण्यासाठी निमित्त, तुम्ही महातपस्वी आत्मे आहात. चोहीकडे या तपस्वी
स्वरूपाद्वारे आत्म्यांना, आत्मिक आरामाचा अनुभव करावयाचा आहे. साऱ्या विश्वातील
आत्मे प्रकृतीद्वारे, वायुमंडळाद्वारे, मनुष्य आत्म्यांद्वारे, स्वतःच्या मनाच्या
कमजोरीद्वारे, तनाद्वारे बेचैन आहेत. अशा आत्म्यांना सुख शांतीच्या स्थितीचा, एक
सेकंद पण अनुभव केला, तर ते तुमचे मनापासून वारंवार आभार मानतील. वर्तमान वेळी
संघटित रूपातील ज्वाला स्वरूपाची आवश्यकता आहे. आता विधात्याची मुले, विधाता
स्वरूपामध्ये स्थित होऊन, प्रत्येक वेळी देत राहा. अखंड महालंगर लावा, कारण रॉयल
भिकारी फार आहेत. फक्त धनाचे भिकारी, भिकारी असत नाहीत, परंतु मनाचे भिकारी अनेक
प्रकारचे आहेत. अप्राप्त आत्मे, प्राप्तीच्या थेंबासाठी तहानलेले फार आहेत, त्यामुळे
आता संघटीत रूपामध्ये विधाता पणाची तरंगे पसरवा.जे खजाने जमा केले आहेत, ते जेवढे
मास्टर विधाता बनून देत राहाल, तेवढे भरत जातील. किती ऐकले आहे. आता करण्याची वेळ
आहे. तपस्वीमूर्त चा अर्थ आहे, तपस्या द्वारे शांतीच्या शक्तीची किरणे चोहीकडे पसरत
आहेत, याचा अनुभव व्हावा. फक्त स्वतःसाठी आठवण स्वरूप बनून शक्ती घेणे किंवा मिलन
साजरे करणे, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु तपस्वीरूप इतरांना देण्याचे स्वरूप आहे. जसा
सूर्य विश्वाला प्रकाशाची आणि अनेक विनाशी प्राप्तीची अनुभूती करत आहे. तसे
महातपस्वी स्वरूपा द्वारे प्राप्तीच्या किरणांची अनुभूती करा. त्यासाठी अगोदर जमेचे
खाते वाढवा. असे नाही की आठवणी द्वारे किंवा ज्ञानाच्या मननाद्वारे स्वतःला श्रेष्ठ
बनवले, मायाजीत विजयी बनवले, यामध्ये फक्त खुश राहायचे नाही. परंतु सर्व
खजान्याद्वारे साऱ्या दिवसांमध्ये किती जणांसाठी विधाता बनलात. सर्व खजाने प्रत्येक
दिवशी कार्यामध्ये लावले, कां फक्त जमेला पाहून खुश झालात. आता हा चार्ट ठेवा कि,
खुशीचा खजाना, शांतीचा खजाना, शक्तींचा खजाना, ज्ञानाचा खजाना, गुणांचा खजाना,
सहयोग देण्याचा खाजाना, किती वाटला अर्थात किती वाढवला, त्यामुळे तो साधारण चार्ट
ठेवत आहात, तो स्वतःच श्रेष्ठ होऊन जाईल. परोपकारी बनल्याने, स्वउपकारी स्वतःच बनता.
समजले, आता कोणता चार्ट, दिनचर्या ठेवायची आहे? हा तपस्वी स्वरूपाचा चार्ट आहे,
विश्व कल्याणकारी बनणे. तर किती जणांचे कल्याण केले? कां स्वकल्याणा मध्येच वेळ
चालला आहे? स्वतःचे कल्याण करण्याची वेळ गेली आहे. आता विधाता बनण्याची वेळ आली आहे,
त्यामुळे बापदादा परत वेळेचा इशारा देत आहेत. जर आतापर्यंत पण विधाता पणाच्या
स्थितीचा अनुभव केला नाही, तर अनेक जन्म विश्व राजअधिकारी बनण्याच्या, पद्मापदम
भाग्याला प्राप्त करू शकणार नाही, कारण विश्वराजन विश्वाचे मात-पिता अर्थात विधाता
आहेत. आताचे विधाता पणाचे संस्कार अनेक जन्माची प्राप्ती करत आहेत, जर आतापर्यंत
घेण्याचे संस्कार, कोणत्या पण रूपांमध्ये आहेत, नाव व्हावे,मान असावा किंवा
कोणत्याही प्रकारचे घेण्याचे संस्कार, विधाता बनवणार नाहीत.
तपस्या स्वरूप म्हणजे घेण्यापासून त्यागमूर्त. हे हदचे घेणे, त्यागमूर्त,
तपस्वीमूर्त बनू देणार नाही, त्यामुळे तपस्वीमूर्त म्हणजे हदचे इच्छा मात्रम अविद्या
रूप. जो घेण्याचा विचार करतो, तो अल्पकाळा साठी घेत आहे, परंतु सदाकाळा साठी घालवत
आहे, त्यामुळे बापदादा वारंवार या गोष्टीचा इशारा देत आहेत. तपस्वी रूपामध्ये विशेष
विघ्नरूप हीच अल्पकाळाची इच्छा आहे, त्यामुळे आता विशेष तपस्येचा अभ्यास करायचा आहे.
समान बनण्याचा हा पुरावा द्यायचा आहे. स्नेहाचा पुरावा देणे ही तर खुशीची गोष्ट आहे.
आता तपस्वीमूर्त बनण्याचा पुरावा द्या. समजले. वेगळे संस्कार असले तरी विधाता पणाचे
संस्कार, इतर संस्कारांना दाबून टाकतील. तर आता या संस्काराला बाहेर काढा. समजले.
जसे मधुबनला पळत आले आहात, तसे तपस्वी स्थितीच्या ध्येयाकडे पळत जावा. बरे झाले इथे
आलात. सर्वजण असे आलेत, जसा कि आता विनाश होणार आहे. जे पण केले, जे पण झाले, ते
बापदादाला प्रिय आहे, कारण मुले प्रिय आहेत. प्रत्येकाने हाच विचार केला की, आम्ही
जात आहोत. परंतु दुसरे पण येणार आहेत, याचा विचार केला नाही. खरा कुंभमेळा तर इथेच
लागला आहे. सर्व शेवटचे मिलन,शेवटची डुबकी घेण्यासाठी आले आहात, याचा विचार केला
कां, एवढे सर्व जाणार आहेत तर मिलनाची विधी कशी असेल! या सुध-बुध पासून पण वेगळे
झालात! ना ठिकाण पाहिले, ना आरक्षण पाहिले. आता कधी पण हा बहाना देऊ शकणार नाहीत
की, आरक्षण मिळत नाही. विश्व नाटकांमध्ये, हा पण एक सराव झाला. संगमयुगावर आपले
राज्य नाही. स्वराज्य आहे, परंतु जगावर राज्य तर नाही, ना बापदादाला स्वतःचा रथ आहे,
दुसऱ्याचे राज्य, दुसऱ्याचे शरीर आहे, त्यामुळे वेळेनुसार, नवीन विधीचा आरंभ
करण्यासाठी हे अवतरण झाले आहे. इथे तर पाण्याचा पण विचार करावा लागतो, तिथे तर
झऱ्यामध्ये नहाल. जे पण जेवढे पण आले आहेत, बापदादा स्नेहामध्ये, स्नेहाने स्वागत
करत आहेत.
आता वेळ दिलेली आहे, विशेष शेवटच्या परीक्षे पूर्वी तयारी करण्यासाठी. शेवटच्या
पेपराच्या पूर्वी वेळ दिला आहे. सुट्टी देतात ना. तर बापदादा अनेक रहस्याने हा
विशेष वेळ देत आहेत. कांही रहस्य गुप्त आहेत तर कांही रहस्य प्रत्यक्ष आहेत. परंतु
विशेष करून प्रत्येकाने एवढे लक्ष्य ठेवायचे आहे की, नेहमी बिंदू लावायचा आहे,
म्हणजे झाले ते झाले करून, बिंदू लावायचा आहे, आणि बिंदू स्थितीमध्ये स्थित होऊन,
राज्य अधिकारी बनून, कार्य करायचे आहे. सर्व खजान्या मध्ये सिंधू, सर्वांसाठी विधाता
बनून, सिंधू बनून सर्वांना भरपूर करायचे आहे. तर बिंदू आणि सिंधू या दोन गोष्टी
विशेष स्मृतीमध्ये ठेवून, श्रेष्ठ प्रमाणपत्र घ्यायचे आहे. नेहमीच श्रेष्ठ
संकल्पाच्या सफलतेद्वारे पुढे चालत राहा. तर बिंदू बनणे, सिंधू बनणे हेच सर्व
मुलाप्रति वरदात्याचे वरदान आहे. वरदान घेण्यासाठी पळत आले आहात ना. हेच वरदात्याचे
वरदान नेहमी स्मृतीमध्ये ठेवा. अच्छा.
चोहीकडच्या सर्व स्नेही, सहयोगी मुलाना, नेहमी बाबाच्या आज्ञेचे पालन करणारे,
आज्ञाकारी मुलांना, नेहमी विशाल मनाने, मोठ्या मनाने सर्वांना सर्व खजाने वाटणारे,
महान पुण्य आत्मा मुलांना, नेहमी बाबा सारखे बनण्याचे उमंग उत्साहाने उडत्या
कलेद्वारे ,उडवणाऱ्या मुलांना विधाता, वरदाता, सर्व खजान्याचे सिंधू, बापदादाची
प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
अव्यक्त
बापदादाशी पार्टीत आलेल्यांची मुलाखत
(१) स्वतःला पद्मापदम भाग्यवान अनुभव करत आहात! कारण, देणारे बाबा एवढे देतात की,
जे एका जन्मासाठी तर भाग्यवान बनतच आहात परंतु अनेक जन्मापर्यंत हे अविनाशी भाग्य
चालत राहते. असे अविनाशी भाग्याचा कधी स्वप्नांमध्ये पण विचार केला होता? असंभव
वाटत होते ना? परंतु आज संभव झाले आहे. तर असे श्रेष्ठ आत्मे आहात, ही खुशी राहते?
कधी कोणत्या पण परिस्थिती मध्ये खुशी नाहीशी तर होत नाही! कारण बाबा द्वारे खुशीचा
खजाना रोज मिळत आहे, तर जी वस्तू रोज मिळते, ती वाढत जाईल ना! कधीपण खुशी कमी होऊ
शकत नाही, कारण खुशीच्या सागराद्वारे मिळतच राहते, अखुट आहे. कधी पण कोणत्या
गोष्टींच्या चिंतेमध्ये राहणारे नाहीत. मालमत्तेचे काय होईल, परिवाराचे काय होईल?
याची पण चिंता नाही, बेफिक्र. जुन्या दुनियेचे काय होईल! परिवर्तनच होणार आहे ना.
जुन्या दुनिया किती पण श्रेष्ठ असेल, परंतु सर्व जुनेच आहे, त्यामुळे बेफिकर बनले
आहात. माहित नाही कि,आज आहोत, उद्या राहू कि नाही राहू, याची पण चिंता नाही. जे
होईल ते चांगले होईल. ब्राह्मणां साठी सर्व चांगले आहे. वाईट कांही नाही. तुम्ही तर
पहिल्या पासूनच बादशहा आहात, आता पण बादशहा, भविष्यामध्ये पण बादशहा. जेंव्हा
नेहमीसाठी बादशहा बनलात तर बेफिकीर झालात. अशी बादशाही जे कोणी हिसकावून घेऊ शकत
नाही. कोणी बंदुकीद्वारे बादशाही उडवू शकत नाही. हीच खुषी नेहमी राहावी आणि इतरांना
पण देत राहा. इतरांना पण बेफिकीर बादशहा बनवा..
(२) नेहमी स्वतःला बाबाच्या आठवणीच्या छत्रछाये मध्ये राहणारे, श्रेष्ठ आत्मे अनुभव
करत आहात? ही आठवणीची छत्रछाया, सर्व विघ्ना पासून सुरक्षित करत आहे. कोणत्या पण
प्रकारचे विघ्न, छत्रछाये मध्ये राहणाऱ्यांच्या जवळ येऊ शकत नाही. छत्रछाये मध्ये
राहणारे निश्चित विजयी आहेत. तर असे बनले आहात? छत्रछाये मधून जरी संकल्प रुपी पाय
बाहेर निघाला, तर माया वार करेल. कोणत्या पण प्रकारची परिस्थिती आली, छत्रछाये मध्ये
राहणाऱ्यांना अवघडातील अवघड गोष्ट पण सहज होऊन जाईल. डोंगरा एवढी गोष्ट रुई सारखी
अनुभव होईल. अशा छत्रछायेची कमाल आहे. जर अशी छत्रछाया मिळाली आहे, तर काय केले
पाहिजे. जरी अल्पकाळाचे कोणते पण आकर्षण असेल, परंतु बाहेर निघालात, तर गेलात,
त्यामुळे अल्पकाळाच्या आकर्षणाला पण ओळखले पाहिजे. या आकर्षणा पासून नेहमी दूर राहा.
हदची प्राप्ती तर या एका जन्मा मध्येच नाहीशी होऊन जाईल. बेहदची प्राप्ती नेहमी
बरोबर राहील. तर बेहदची प्राप्ती करणारे म्हणजे छत्रछाये मध्ये राहणारे विशेष आत्मे
आहात, साधारण नाही. ही आठवण नेहमी साठी शक्तिशाली बनवेल.
जे अतिप्रिय लाडके असतात, ते नेहमीच छत्रछाये मध्ये राहतात. आठवणच छत्रछाया आहे. या
छत्रछायेतून संकल्प रुपी पाय, बाहेर काढला तर माया येते. ही छत्रछाया मायेला समोर
येऊ देत नाही. मायेची ताकदच नाही,छत्रछाये मध्ये येण्याची. ते नेहमीच मायेवर विजयी
बनतात. मुलगा बनणे म्हणजे छत्रछाये मध्ये राहणे. हे पण बाबाचे प्रेम आहे, जे नेहमी
मुलांना छत्रछाये मध्ये ठेवतात. तर हे विशेष वरदान आठवणी मध्ये ठेवा की, प्रिय बनले
आहात, छत्रछाया मिळाली आहे. हे वरदान नेहमी पुढे घेऊन जाईल.
निरोप घेते
वेळी:-सर्वांनी
जागरण केले! तुमचे भक्त जागरण करतात तर भक्तांना शिकविणारे इष्ट देवच आहेत, जेंव्हा
इथे इष्ट देव जागरण करतील, तेव्हा भक्त त्यांचे अनुकरण करतील. तर सर्वांनी जागरण
केले म्हणजे आपल्या खात्यामध्ये कमाई जमा केली. तर आजची रात्र कमाई करण्याच्या,
मोसमाची रात्र झाली.जसा जमा करण्याचा मोसम असतो, तर मोसमामध्ये जागावेच लागते. तर
हा कमाई करण्याचा मौसम आहे, त्यामुळे जागणे म्हणजे कमविणे. तर प्रत्येकाने आपापल्या
शक्तीनुसार, यथाशक्ती जमा केले आणि जमा केले ते,महादानी बनून इतरांना देत
राहा,म्हणजे स्वतः पण अनेक जन्म खात राहाल. आता सर्व मुलांना परमात्मा मिलनाची
सुवर्ण प्रभात करत आहेत. तसे तर सोन्यापेक्षाही हिऱ्याची सुप्रभात आहे. स्वतः पण
हिरे आहात आणि सकाळ पण हिऱ्याची आहे आणि जमा पण हिरे करत आहात, तर सर्व हिरे च हिरे
आहेत, त्यामुळे हिऱ्यासारखी सुप्रभात म्हणतात.
वरदान:-
संकल्पाला
तपासून व्यर्थच्या खात्याला, समाप्त करणारे, श्रेष्ठ सेवाधारी भव:
श्रेष्ठ सेवाधारी ते
आहेत, ज्यांचा प्रत्येक संकल्प शक्तिशाली असतो, एक पण संकल्प कुठे व्यर्थ जाऊ नये,
कारण सेवाधारी म्हणजे विश्वाच्या रंगमंचावर अभिनय करणारे. सारे विश्व तुमचे अनुकरण
करत आहे, जरी तुम्ही एक संकल्प व्यर्थ केला तर फक्त तुमच्यासाठी नाही केला, परंतु
अनेकासाठी निमित्त बनलात, त्यामुळे आता व्यर्थच्या खात्याला समाप्त करून, श्रेष्ठ
सेवाधारी बना.
सुविचार:-
सेवेच्या वातावरणा
बरोबर बेहदच्या वैराग्य वृत्तीचे वातावरण बनवा.
सूचना:-
आज महिन्याचा तिसरा रविवार आहे. सर्व राजयोगी तपस्वी बंधू-भगिनीं सायंकाळी ६-३० ते
७-३० वाजेपर्यंत विशेष योगाभ्यासाचे वेळी, मास्टर सर्वशक्तिवानाच्या, शक्तिशाली
स्वरूपामध्ये स्थित होऊन, प्रकृती सहित सर्व आत्म्यांना पवित्रतेची किरणे द्या,
सतोप्रधान बनण्याची सेवा करा.