20-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्ही अध्यात्मिक, आत्मिक गुप्त मदत करणारे सैनिक आहात, तुम्हाला साऱ्या जगाला नुकसाना पासून वाचवायचे आहे, बुडणाऱ्या नावेला किनाऱ्याला लावायचे आहे"

प्रश्न:-
संगमयुगावर बाबा कोणते विद्यापीठ उघडत आहेत, जे साऱ्या कल्पामध्ये होत नाही?

उत्तर:-
राजाई प्राप्त करण्याच्या शिक्षणासाठी, ईश्वरीय पित्याचे विद्यापीठ किंवा कॉलेज संगयुगावर बाबाच उघडत आहेत. असे विद्यापीठ साऱ्या कल्पा मध्ये असत नाही. या विद्यापीठा मध्ये शिक्षण घेऊन, तुम्ही दुहेरी मुकुटधारी राजांचे राजा बनत आहात.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांना प्रथमत: बाबा विचारतात की, येथे येऊन जेंव्हा बसतात, तर स्वतःला आत्मा समजून बाबा ची आठवण करता का ? कारण येथे तुम्हाला कोणता कामधंदा, मित्रसंबंधी इ. पण नाहीत. तुम्हीं हा विचार करून येता की, आम्ही बेहदच्या बाबाला भेटण्यासाठी जात आहोत. असे कोण म्हणते? आत्मा शरीराव्दारे बोलत आहे.पारलौकिक बाबांनी हे शरीर उधारीवर घेतले आहे, यांच्याद्वारे समजावत आहेत. हे एकदाच होते, जे बेहदचे बाबा येऊन शिकवत आहेत. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केल्याने, तुमची नाव पार होईल. प्रत्येकाची नाव बुडालेली आहे. जो जेवढा पुरुषार्थ करेल, तेवढी नाव पार होईल. गातात पण की, हे नावाड्या, माझी नाव पार कर. खरेतरं प्रत्येकाला स्वतःच्या पुरुषार्थांने किनाऱ्याकडे जायचे आहे. जसे पोहायला शिकवतात, मग शिकतात, तर स्वतः पोहतात. या सर्व शारीरिक गोष्टी आहेत. या आत्मिक गोष्टी आहेत. तुम्हीं जाणता की, आत्मा आता चिखलाच्या दलदली मध्ये फसली आहे. यावर हरणाचे पण उदाहरण देतात.पाणी समजून जाते,परंतु तेथे चिखल असतो, त्यामध्ये फसते. कधी कधी बोटी, मोटर इत्यादी पण चिखला मध्ये फसतात. मग त्यांना बाहेर काढतात. ते सर्व मुक्त करणारे सैनिक आहेत. तुम्ही आत्मिक सैनिक आहात. तुम्ही जाणता की, सर्व मायेच्या दलदली मध्ये फसलेले आहेत, याला मायेची दलदल म्हटले जाते. बाबा येऊन समजावत आहेत, यातून तुम्हीं कसे बाहेर येऊ शकता. ते मुक्त करत आहेत, त्यामध्ये मनुष्य मनुष्याला मदत करतात. इथे तर आत्मा दलदली मध्ये जाऊन फसली आहे. बाबा रस्ता सांगत आहेत, यातून तुम्हीं कसे बाहेर येऊ शकता. मग दुसऱ्याला पण रस्ता दाखवू शकता. स्वतःला आणि इतराला रस्ता सांगायचा आहे कि, तुमची नाव या विषय सागरातून, क्षिरसागरा कडे कशी जाईल. सतयुगाला क्षीरसागर म्हणतात, म्हणजे सुखाचा सागर. हा दुःखाचा सागर आहे. रावण दुःखाच्या सागरा मध्ये बुडवत आहे. बाबा येऊन सुखाच्या सागरामध्ये घेऊन जातात. तुम्हाला आत्मिक नुकसाना पासून वाचवणारे सैनिक म्हटले जाते. तुम्ही श्रीमता वर सर्वाना रस्ता सांगत आहात. प्रत्येकाला सांगत आहात कि, दोन पिता आहेत, एक हदचा, दुसरा बेहदचा. लौकिक पिता असताना पण सर्व पारलौकिक पित्याची आठवण करत आहेत, परंतु त्यांना थोडे पण जाणत नाहीत. बाबा कांही निंदा करत नाहीत, परंतु विश्व नाटकातील रहस्य समजावत आहेत. हे पण समजावण्यासाठी की, यावेळी सर्व मनुष्यमात्र पाच विकार रुपी दलदली मध्ये फसलेले, आसुरी संप्रदायाचे आहेत. दैवी संप्रदायाला, आसुरी संप्रदाय नमन करत आहेत, कारण ते संपूर्ण निर्विकारी आहेत. संन्याशाना नमन करत आहेत, ते पण घरदार सोडून जात आहेत. पवित्र राहतात. या संन्याशी आणि देवता मध्ये रात्रं दिवसाचा फरक आहे. देवतांचा जन्म योगबळाने होतो. या गोष्टीला कोणी जाणत नाहीत. सर्व म्हणतात ईश्वराची गतमत वेगळी आहे, ईश्वराचा अंत मिळू शकत नाही. फक्त ईश्वर किंवा भगवान म्हटल्याने एवढे प्रेम वाटत नाही. सर्वात चांगले अक्षर आहे पिता. मनुष्य बेहदच्या पित्याला ओळखत नाहीत, तर जसे निधनके आहेत.

मासिका मध्ये पण आले आहे, मनुष्य काय करत आहेत आणि भगवान काय करत आहेत. बाबा कांही निंदा करत नाहीत, मुलांना समजावत आहेत, कारण बाबा तर सर्व जाणतात ना. बाबा समजावण्या साठी म्हणतात की, यांच्या मध्ये आसुरी गुण आहेत, आपसा मध्ये भांडत राहतात. इथे तर भांडण्याची गरज नाही. ते कौरव संप्रदाय अर्थात आसुरी संप्रदायाचे आहेत. हे दैवी संप्रदायाचे आहेत. बाबा सांगतात की, मनुष्य मनुष्याला मुक्ती किंवा जीवनमुक्ती साठी राजयोग शिकवू शकत नाहीत. यावेळी बाबा तुम्हा आत्म्याला शिकवत आहेत.देहअभिमान आणि देहीअभिमाना मध्ये फरक किती आहे.देहअभिमाना मुळे तुम्ही खाली उतरत आले आहात. बाबा एकाच वेळेत येऊन, तुम्हाला देहीअभिमानी बनवतात. असे नाही कि, तुम्हाला सतयुगा मध्ये देहाचे संबंध नाहीत. तिथे हे ज्ञानच राहत नाही, मी आत्मा परमपिता परमात्म्याची संतान आहे. हे ज्ञान आताच तुम्हाला मिळत आहे, जे नंतर प्राय:लोप होते. तुम्हीच श्रीमता वर चालून, प्रारब्ध मिळवत आहात. बाबा येतातच राजयोग शिकवण्यासाठी. असे शिक्षण आणखीन कोठे असत नाही. दुहेरी मुकुटधारी राजे, सतयुगा मध्ये असतात. नंतर एक मुकुटधाऱ्यांची राजाई पण असते, आता ती राजाई पण राहिली नाही, प्रजेचे प्रजेवर राज्य आहे. तुम्ही मुले आता राजाई प्राप्त करण्यासाठी शिकत आहात, याला ईश्वरीय पित्याचे विद्यापीठ म्हटले जाते. तुमचे नाव पण लिहिलेले आहे. ते लोक जरी नाव गीता पाठशाळा ठेवतात. शिकवत कोण आहेत? श्रीकृष्ण भगवानुवाच म्हणतात. आता कृष्ण तर शिकवत नाहीत. कृष्ण तर स्वतः पाठशाळे मध्ये शिकण्यासाठी जात आहेत. राजकुमार राजकुमारी कसे शाळेमध्ये जातात, तेथील भाषा दुसरी आहे. असे पण नाही की, संस्कृत मध्ये गीता सांगितली आहे. इथे तर अनेक भाषा आहेत. जो जसा राजा असतो, तो तशी आपली भाषा चालवतो. संस्कृत भाषा कांही राजांची नाही. बाबा काही संस्कृत शिकवत नाहीत. बाबा तर राजयोग शिकवत आहेत, सतयुगासाठी.

बाबा म्हणतात, काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त करा. प्रतिज्ञा करण्यास सांगत आहेत, इथे जे पण येतात, त्यांचे कडून प्रतिज्ञा केली जाते. काम विकारावर विजय प्राप्त केल्याने, तुम्ही जगतजीत बनाल. हा मुख्य विकार आहे. ही हिंसा व्दापार पासून चालत आली आहे, ज्यामुळे वाममार्ग सुरू झाला. देवता कसे वाममार्गा मध्ये जातात, त्याचे पण मंदिर आहे. तिथे फार वाईट चित्रे बनविली आहेत. बाकी वाममार्गा मध्ये कधी गेले, त्याची तिथी तारीख तर नाही. सिद्ध होते कि, काम चितेवर बसल्यामुळे काळे बनतात, परंतु नाव रूप तर बदलून जात आहे ना. काम चितेवर चढल्यामुळे लोखंडासारखे बनतात. आता तर ५ तत्व पण तमोप्रधान आहेत, त्यामुळे शरीर पण असे तमोप्रधान बनत आहेत. जन्मा पासूनच कोणी कसे, कोणी कसे, होऊन जातात. तिथे तर एकदम सुंदर शरीर असते. आता तमोप्रधान झाल्यामुळे शरीर पण तशीच आहेत. मनुष्य ईश्र्वर, प्रभू इत्यादी वेगवेगळ्या नावाने आठवण करतात, परंतु त्या बिचार्‍यांना कांहीच माहित नाही. आत्मा आपल्या पित्याची आठवण करत आहे, हे बाबा, येऊन शांती द्या. इथे तर कर्मेद्रियाद्वारे अभिनय करत आहेत, तर शांती कशी मिळेल. विश्वामध्ये शांती होती, जेंव्हा लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. परंतु लाखो वर्षाचा कल्पाचा कालावधी म्हटल्यामुळे, मनुष्य बिचारे कसे समजतील. जेंव्हा देवी-देवतांचे राज्य होते, त्यावेळी एक राज्य, एक धर्म होता, आणखीन कोणत्या खंडामध्ये, असे म्हणत नाहीत की, एक धर्म, एक राज्य होते. इथे आत्म्याला वाटते कि, एक राज्य असावे. तुमची आत्मा जाणते की, आता आम्ही एक राज्य स्थापन करत आहोत. तिथे साऱ्या विश्वाचे मालक आम्ही राहू. बाबा आम्हाला सर्व काही देत आहेत. कोणी पण आमचे राज्य हिसकावून घेऊ शकत नाही. आम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनत आहोत. विश्वामध्ये काही सूक्ष्मवतन, मूलवतन येत नाही.हे सृष्टीचे चक्र इथेच फिरत आहे. याला बाबा,जे रचनाकार आहेत, तेच ओळखत आहेत. असे नाही कि,रचना रचत आहेत. बाबा येतातच संगमयुगावर, जुन्या दुनियेला नवीन दुनिया बनविण्यासाठी. दूरदेशा तून बाबा आले आहेत, तुम्हीं जाणता कि, नवीन दुनिया आमच्या साठी बनत आहे. बाबा आम्हा आत्म्यांचा शृंगार करत आहेत. त्याच्या बरोबर मग शरीराचा पण शृंगार होत आहे. आत्मा पवित्र झाल्यामुळे, मग शरीर पण सतोप्रधान मिळते. सतोप्रधान तत्वा पासून शरीर बनेल. यांचे सतोप्रधान शरीर आहे ना, त्यामुळे नैसर्गिक सुंदरता राहते. गायन पण आहे की धरल्या मध्ये शक्ती असते. आता शक्ती कुठून मिळते? एकच देवी देवतांचा धर्म आहे, ज्यापासून ताकत मिळत आहे. हे देवताच साऱ्या विश्वाचे मालक बनत आहेत, आणखीन कोणी विश्वाचे मालक बनत नाही. तुम्हाला किती ताकद मिळत आहे. लिहले पण आहे की, आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना शिवबाबा, ब्रह्माव्दारे करत आहेत. या गोष्टी दुनीये मधील थोडेच कोणी जाणतात. बाबा म्हणतात कि, मी ब्राह्मण कुळाची स्थापना करत आहे, मग त्यांना सूर्यवंशी राजधानी मध्ये घेऊन जातो. जे चांगल्या रितीने शिकतात, ते उत्तीर्ण होऊन, सूर्यवंशी मध्ये येतात. सर्व ज्ञानाच्या गोष्टी आहेत, त्यांनी मग स्थूल बाण हत्यारे इत्यादी दाखविले आहेत. बाण चालवण्याचे पण शिकवत आहेत. लहान मुलांना पण बंदूक चालवणे शिकवतात. तुमचा मग योगाचा बाण आहे. बाबा म्हणतात कि, माझी आठवण करा, तर तुमचे विकर्म नष्ट होतील. हिंसेची कोणती गोष्टच नाही. तुमचे शिक्षण पण गुप्त आहे. तुम्ही आहात अध्यात्मिक, आत्मिक, दुसऱ्याला नुकसानी पासून वाचवणारे सैनिक. कोणाला पण माहित नाही कि, आत्मिक सैनिक कसे आहेत. तुम्ही गुप्त अध्यात्मिक, आत्मिक नुकसानी पासून वाचणारे सैनिक आहात. साऱ्या दुनियेला तुम्ही वाचवत आहात. सर्वांची नाव बुडालेली आहे. बाकी सोन्याची लंका कांही नाही. असे नाही कि, सोन्याची द्वारका समुद्रामध्ये खाली गेली आहे. ती वर निघून येईल. नाही, द्वारके मध्ये यांचे राज्य होते, परंतु सतयुगा मध्ये होते. सतयुगी राजांचा पोशाखच वेगळा असतो. त्रेताचा वेगळा. वेगवेगळे पोशाख, वेगवेगळी रसम रिवाज असते. प्रत्येक राजांचा रिती रिवाज आप आपला असतो, सतयुगाचे तर नाव घेतल्यानेच दिल खुश होऊन जाते. असे म्हणतात स्वर्ग पॅराडाईज, परंतु मनुष्य कांही पण जाणत नाहीत. मुख्य तर हे दिलवाडा मंदिर आहे. हुबेहूब तुमचे स्मृतिस्थळ आहे.मॉडेल तर नेहमी छोटे बनवतात ना. हे बिलकुल बिनचूक मॉडेल आहे. शिवबाबा पण आहेत. आदिदेव पण आहेत. वर छताला स्वर्ग दाखविला आहे. शिवबाबा आहेत तर जरूर रथ पण असेल. आदिदेव बसले आहेत, हे पण कोणाला माहित नाही. हा शिवबाबा चा रथ आहे. महावीर च राज्य प्राप्त करत आहेत. आत्म्यां मध्ये ताकत कशी येत आहे, हे पण तुम्हीं आता समजत आहात. वारंवार स्वतःला आत्मा समजा. आम्ही आत्मे सतोप्रधान होतो, तर पवित्र होतो. शांतीधाम, सुखांमध्ये जरूर पवित्रच राहतात. आता बुद्धी मध्ये आले आहे कि, किती सोपी गोष्ट आहे. भारत सतयुगामध्ये पवित्र होता. तिथे अपवित्र आत्मा राहू शकत नाही. एवढे सर्व पतित आत्मे वर कसे जातील. जरूर पवित्र बनूनच जातील. आग लागेल, मग सर्व आत्मे निघून वर जातात. बाकी शरीर खाली राहतात. या सर्व निशाणी पण आहेत. होळीचा अर्थ कोणी समजतात थोडेच. सर्व दुनिया यामध्ये स्वाह होणार आहे. हा ज्ञान यज्ञ आहे. ज्ञान अक्षर काढल्यामुळे बाकी रुद्र यज्ञ म्हणतात. खरं तर हा रुद्र ज्ञान यज्ञ आहे. हा ब्राह्मणाद्वारे रचला जातो. खरे खुरे ब्राह्मण तुम्हीं आहात. प्रजापिता ब्रह्माची तर सर्व मुले आहेत ना. ब्रह्मा द्वारेच मनुष्य सृष्टी रचली जाते. ब्रम्हाला ग्रेट ग्रेट ग्रँड फादर,आजोबा,पुरावे म्हटले जाते. त्यांची वंशावळ आहे ना. जसे वेगवेगळ्या जातीची वंशावळ असते. तुमच्या बुद्धी मध्ये आहे कि, मुळवतन मध्ये आत्म्यांचा सिजरा आहे, नियमानुसार. शिवबाबा,नंतर ब्रह्मा, विष्णू, शंकर नंतर लक्ष्मीनारायण इत्यादी, ही सर्व मनुष्यांची वंशावळ आहे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति, मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) आत्मिक नुकसानीपासून वाचवणारे सैनिक बनून, स्वतःला आणि इतरांना खरा रस्ता सांगायचा आहे. साऱ्या दुनियेला विषय सागरा पासून वाचवण्या साठी बाबाचे पुरेपुर मदतगार बनायचे आहे .

(२) ज्ञान योगाने पवित्र बनून, आत्म्याचा श्रंगार करायचा आहे, शरीराचा नाही. आत्मा पवित्र बनल्यामुळे शरीराचा स्वतःच शृंगार होत आहे.

वरदान:-
मन बुद्धीला मनमता पासून मुक्त करून, सुक्ष्मवतन चा अनुभव करणारे दुहेरी लाईट भव:

फक्त संकल्प शक्ती म्हणजे मन आणि बुद्धीला, नेहमी मनमता पासून वेगळे ठेवा, तर येथे राहून पण वतन मधील सर्व देखावे, असे स्पष्ट अनुभव कराल, जसे दुनियेतील कोणता पण देखावा स्पष्ट पाहता. या अनुभूती साठी कोणते पण ओझे स्वतःवर ठेवू नका ,सर्व ओझे बाबाला देऊन डबल लाईट बना. मन बुद्धी द्वारे नेहमी शुद्ध संकल्पाचे भोजन करा. कधी पण व्यर्थ संकल्प किंवा विकल्पाचे भोजन करू नका, तर ओझ्यापासून हलके होऊन, उंच स्थितीचा अनुभव करू शकाल.

बोधवाक्य:-
व्यर्थला पूर्णविराम द्या आणि शुभ भावनेचा साठा जमा करा.