22-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, सर्वात गोड अक्षर,"बाबा" आहे, तुमच्या मुखातून नेहमी बाबा-बाबा निघाले पाहिजे. सर्वांना शिवबाबाचा परिचय देत राहा"

प्रश्न:-
सतयुगा मध्ये मनुष्यच काय, जनावरे पण रोगी नसतात, कां?

उत्तर:-
कारण संगमयुगा वर बाबा सर्व आत्म्याचे आणि बेहदच्या या सृष्टीचे असे ऑपरेशन करतात, त्यामुळे रोगाचे नाव-रुप राहत नाही. बाबा अविनाशी सर्जन आहेत. आता ही सारी सृष्टी रोगी आहे, या सृष्टीमध्ये परत दुःखाचे नाव निशान राहणार नाही. येथील दुःखा पासून वाचण्यासाठी फार बहादुर बनायचे आहे.

गीत:-
तुम्हाला प्राप्त करून.....

ओम शांती।
दोनदा पण म्हणू शकता. डबल ओम शांती. आत्मा स्वतःचा परिचय देत आहे. मी आत्मा शांत स्वरूप आहे. माझे निवासस्थान शांतीधाम मध्ये आहे आणि बाबाची आम्ही सर्व मुले आहोत. सर्व आत्मे ओम म्हणतात,तिथे आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत, मग येथे भाऊ-बहिण बनतो. आता भाऊ बहिणीचे नाते सुरू होत आहे. बाबा समजावतात कि, सर्व माझी मुले आहेत, ब्रह्माची पण तुम्ही मुले आहात, त्यामुळे बहिण भाऊ आहात. तुमचा दुसरा कोणता संबंध नाही. प्रजापिता ची मुले ब्रह्माकुमार कुमारी आहात. जुन्या दुनियेला बदलण्यासाठी या वेळीच येतात. बाबा ब्रह्माद्वारेच मग नवीन सृष्टी रचत आहेत. ब्रह्मा बरोबर पण संबंध आहेत ना. युक्ती पण किती चांगली आहे. सर्व ब्रह्माकुमार कुमारी आहेत. स्वतःला आत्मा समजून, बाबांची आठवण करायची आहे, आणि स्वतःला भाऊ बहीण समजायचे आहे. विकारी दृष्टी ठेवायची नाही, इथे तर कुमार कुमारी जसे मोठे होत जातात तर डोळे विकारी बनत जातात, मग विकारी कर्म करतात. विकारी कर्म रावण राज्यामध्ये होतात. सत्ययुगामध्ये विकारी कर्म होत नाहीत. विकार अक्षराच आसत नाही. इथे तर विकारी कर्म फार होतात. त्यासाठी मग कोर्ट इत्यादी पण आहेत. तिथे कोर्ट इत्यादी असत नाही. आश्चर्य आहे ना. ना जेल, ना पोलीस, ना चोर इत्यादी असतात. या सर्व दुःखाच्या गोष्टी आहेत. जे येथे होत आहेत, त्यामुळे मुलांना समजावले आहे कि, हा तर सुख दुःखाचा खेळ आहे, हार आणि जीत होते. याला पण तुम्हीच समजत आहात. गायन पण आहे कि, मायेकडून हरला तर हरलात, बाबा येऊन अर्ध्या कल्पासाठी मायेवर विजय प्राप्त करवितात. मग अर्धाकल्प हार खावी लागते. ही कांही नवीन गोष्ट नाही. हा तर साधारण पाई पैशाचा खेळ आहे, मग तुम्ही माझी आठवण करता, तर आपले राज्य भाग्य अर्ध्या कल्पासाठी घेता. रावण राज्यांमध्ये मला विसरून जाता. रावण दुश्मन आहे, ज्याला दरवर्षी भारतवासी जाळत आहेत. ज्या देशांमध्ये फार भारतवासी आहेत, तेथे पण जाळत असतील. म्हणतात हा भारतवाशीं च्या धर्माचा उत्सव आहे. दसरा साजरा करतात, तर मुलांना समजायचे आहे, ही तर हदची गोष्ट आहे. रावण राज्य तर आता सर्व विश्‍वावर आहे. फक्त लंकेवर नाही. विश्व तर फार मोठे आहे ना. बाबाने समजावले आहे, ही सारी सृष्टी सागरावर उभी आहे. मनुष्य म्हणतात कि, खाली एक बैल किंवा गाय आहे, ज्याच्या सिंगावर सुष्टी उभी आहे, मग थकल्यावर तो सिंग बदलतो.. आता अशी गोष्ट तर नाही. पृथ्वी तर पाण्यावर उभी आहे, चोहीकडे पाणीच पाणी आहे. तर आता साऱ्या दुनियेवर रावणाचे राज्य आहे, मग राम अथवा ईश्वरीय राज्य स्थापन करण्यासाठी, बाबाला यावे लागते. फक्त ईश्वर म्हटल्याने पण म्हणतात कि, ईश्वर तर सर्वशक्तीवान आहे, सर्व कांही करू शकतात. फालतू महिमा करतात. एवढे प्रेम राहत नाही. इथे ईश्वराला पिता म्हटले जाते. बाबा म्हटल्याने वारसा मिळण्याची गोष्ट होऊन जाते. शिवबाबा म्हणतात, नेहमी बाबा, बाबा म्हणत राहा. ईश्वर वा प्रभू इत्यादी अक्षर विसरून गेले पाहिजेत. बाबा ने सांगितले आहे, माझी एकट्याची आठवण करा. प्रदर्शनी इत्यादी मध्ये पण जेंव्हा समजावून सांगता, त्यावेळी वारंवार शिवबाबाचा परिचय द्या.शिवबाबा एकच सर्वोच्च आहेत, ज्यांना गॉडफादर म्हटले जाते. मुसलमान अल्लाह म्हणतात. सकाळी दहा मिनिटे बसून कुराण चा अर्थ सांगतात की, अल्ला मियानी सांगितले आहे कि, कोणाला दुःख द्यायचे नाही, असे केले नाही पाहिजे. असे समजत नाहीत कि, बाबांनी सांगितले आहे. बाबा अक्षर सर्वात गोड आहे. शिवबाबा, शिवबाबा मुखातून निघाले पाहिजे. मूख तर मनुष्याचे आहे. गायीचे मुख थोडेच असू शकते. तुम्ही शिवशक्ती आहात. तुमच्या मुख कमलाद्वारे ज्ञान अमृत निघत आहे. तुमचे नाव मोठे करण्यासाठी गोमुख म्हटले जाते. गंगे साठी असे म्हणत नाहीत. मुख कमलाद्वारे अमृत आता निघत आहे. ज्ञानामृत पिल्यानंतर मग विष पिऊ शकत नाहीत. अमृत पिल्यामुळे तुम्ही देवता बनत आहात. आता मी आलो आहे, असुरांना देवता बनविण्यासाठी. तुम्ही आता दैवी संप्रदायाचे बनत आहात. संगमयुग कधी, कसे होते, हे कोणाला ही माहित नाही. तुम्ही जाणता कि, आम्ही ब्रह्माकुमार कुमारी पुरुषोत्तम संगमयुगी आहोत.बाकी जे पण आहेत, ते सर्व कलियुगी आहेत. तुम्ही किती थोडे आहात. झाडाचे पण तुम्हाला ज्ञान आहे. झाड अगोदर छोटे असते, मग वृध्दी होत आहे.किती शोध निघाले आहेत कि, मुले कमी जन्मावीत. परंतु मनुष्यांची इच्छा एक असते आणि होते दुसरेच. सर्वांचा मृत्यू तर होणारच आहे. पिके फार चांगली आली आहेत, पाऊस जास्तज् पडला, किती नुकसान होते. नैसर्गिक संकटाला तर कोणी समजू शकत नाही. कोणत्या गोष्टीचा ठिकाणा थोडाच आहे. कुठे पिक चांगले आले आणि बर्फाच्या गारा पडतात, तर किती नुकसान होऊन जाते. पाऊस नाही झाला, तरीपण नुकसान. याला नैसर्गिक संकटे म्हणतात. हे तर पुष्कळ होणार आहे, यापासून वाचण्यासाठी फार बहादूर झाले पाहिजे. कोणाचे ऑपरेशन होणार असेल, कोणी कोणी ते पाहू पण शकत नाहीत, पाहूनच बेशुद्ध होऊन जातात. आता या साऱ्या वाईट सृष्टीचे ऑपरेशन होणार आहे, बाबा म्हणतात, मी येऊन सर्वांचे ऑपरेशन करत आहेत. सारी सृष्टी रोगी आहे. अविनाशी सर्जन पण बाबाचे नाव आहे. ते साऱ्या विश्वाचे ऑपरेशन करत आहेत, ज्यामुळे विश्वामध्ये राहणाऱ्यांना कधी दुःख होणार नाही. किती मोठे सर्जन आहेत. आत्म्याचे ऑपरेशन,बेहदच्या सृष्टीचे पण आपरेशन करणारे आहेत. तिथे मनुष्य तर काय, जनावरे पण रोगी असत नाहीत. बाबा सांगतात माझा आणि मुलांचा कोणता अभिनय आहे. याला म्हटले जाते, रचनेच्या आदि,मध्य, अंताचे ज्ञान,जे तुम्ही आता घेत आहात. मुलांना पहिल्या प्रथम तर ही खुशी झाली पाहिजे.

आज सद्गुरूवार आहे, नेहमी खरे बोलले पाहिजे. व्यापारा मध्ये पण म्हणतात कि, खरे बोला.फसविण्याच्या गोष्टी करू नका. तरी पण लोभा मध्ये येऊन, कांही जास्त दाम सांगून, सौदा करतात. खरे तर कधी कोणी बोलत नाहीत. खोटेच खोटे बोलतात, त्यामुळेच सत्य पित्याची आठवण करतात. म्हणतात कि, सत्य नावांचा संग आहे. आता तुम्ही जाणता कि, बाबा जे सत्य आहेत, तेच आम्हां आत्म्या बरोबर येतील. आता सत्या बरोबर तुम्हा आत्म्याचा संग झाला आहे, तर तुम्हीच बरोबर जाता. तुम्ही मुले जाणता कि,शिवबाबा आले आहेत, ज्यांना सत्य म्हटले जाते. ते आम्हा आत्म्यांला पवित्र बनवून,एकदाच बरोबर घेऊन जातात. सतयुगा मध्ये असे म्हणत नाहीत कि, राम राम संग आहे किंवा सत नाव संग आहे. नाही. बाबा म्हणतात कि, आता मी तुम्हां जवळ आलो आहे. डोळ्याच्या पापणीवर बसून घेऊन जातो. हे डोळे नाहीत, तिसरा नेत्र आहे. तुम्ही जाणता कि, यावेळी बाबा आले आहेत, घेऊन जाण्यासाठी. शंकराची वरात नाही, ही शिवाच्या, मुलांची वरात आहे. ते पतींचे पती आहेत. म्हणतात कि, तुम्ही सर्व सजनी आहात, मी साजन आहे. तुम्ही सर्व आशिक आहात, मी माशूक आहे.माशूक एकच असतो ना. तुम्हीं अर्ध्याकल्प माशूकचे,आशिक आहात. आता मी आलो आहे, सर्व भक्तीनी आहेत. भक्तांचे रक्षण करणारा भगवान आहे. आत्मा शरीराबरोबर भक्ती करत आहे.सतयुग त्रेतामध्ये भक्ती होत नाही. भक्तीचे फळ सतयुगा मध्ये मिळते, जे आता मुलांना देत आहे. ते तुमचे माशुक आहेत, जै तुम्हाला बरोबर घेऊन जातील, मग तुम्ही आपल्या पुरुषार्था नुसार जाऊन राज्य भाग्य घ्याल. हे कुठे पण लिहिले नाही. म्हणतात कि, शंकराने पार्वतीला अमरकथा सांगितली. तुम्ही सर्व पार्वती आहात, मी आता तुम्हाला कथा सांगत आहे. अमरनाथ एकालाच म्हटले जाते. बाबा सर्वोच्च आहेत, त्यांना तर स्वतःचा देह नाही. म्हणतात कि, मी अमरनाथ तुम्हा मुलांना अमरकथा सांगत आहे. शंकर-पार्वती इथे कुठून येतील. ते तर सूक्ष्मवतन मध्ये आहेत, जिथे सूर्य चंद्राचा प्रकाश पडत नाही.

सत्य बाबा आता तुम्हाला सत्य कथा सांगत आहेत. बाबा शिवाय सत्य कथा दुसरे कोणी सांगू शकत नाही. हे पण समजता की, विनाश होण्यासाठी वेळ लागतो. किती मोठी दुनिया आहे, अनेक घरे इत्यादी पडून नष्ट होतील. भूकंपा मध्ये किती नुकसान होते. किती मरतात. बाकी तुमचे छोटे झाड असेल. दिल्ली परिस्थान बनेल. एकाच परिस्थाना मध्ये लक्ष्मीनारायणा चे राज्य चालते. किती मोठे मोठे महल बनतात. बेहदची जहागिरी मिळत आहे. तुम्हाला कांही खर्च करावा लागत नाही. बाबा सांगतात की, यांच्या (ब्रह्माबाबा च्या) जीवना मध्ये किती स्वस्त धान्य होते. तर सत्ययुगा मध्ये किती स्वस्त असेल. दिल्ली एवढे तर एक एकाचे घर आणि जमीन इ.असेल. गोड नदीवर तुमचे राज्य चालेल. एक एकाला काय आसत नाही. नेहमी अन्न मिळत राहते. तेथील फळे आणि फुले पण पाहता, किती मोठ मोठी असतात. तुम्ही शुबीरस पिऊन येता. सांगतात कि, तिथे माळी होता. आता माळी तर जरूर वैकुंठा मध्ये किंवा नदीच्या किनारी असेल. तिथे किती थोडे असतात. कुठे आता एवढे करोड, कुठे नऊ लाख राहतील, आणि सर्व कांही तुमचे असेल. बाबा अशी राजाई देतात,जे आमच्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. आकाश, धरती इत्यादी सर्वांचे मालक तुम्ही बनता. गीत पण मुलानी ऐकले. असे सहा-आठ गीत आहेत,जे ऐकल्यामुळे खुशीचा पारा चढतो. जर अवस्थे मध्ये कांही गडबड असेल, तर् गीत ऐकत राहा. हे खुशीचे गीत आहेत. तुम्ही तर अर्थ पण जाणता. बाबा फार युक्त्या सांगत आहेत, स्वतःला हर्षितमुख बनविण्यासाठी. बाबाला लिहीतात, बाबा एवढी खुश राहत नाही. मायेचे तुफान येतात. अरे, मायेचे तुफान आले तर तुम्ही बाजा वाजवत राहा. खुशी साठी मोठ मोठ्या मंदिरां मध्ये पण फाटकावर बाजा वाजवत राहतात. बॉम्बेतील माधवबाग मधील, लक्ष्मीनारायणा च्या मंदिरा तील फाटका वर पण बाजा वाजवत राहतात.तुम्हाला म्हणतात कि, हे पिक्चर मधील रेकॉर्ड कां वाजता. त्यांना काय माहित, हे पण नाटका नुसार कामांमध्ये येणाऱ्या वस्तू आहे. याचा अर्थ तर तुम्ही मुले समजत आहात. हे ऐकले तरी पण खुशी मध्ये याल. परंतु मुले विसरून जातात. घरामध्ये कोणाला दुःख असेल, तर हे गीत ऐकून फार खुश होतील. ही फार मूल्यवान वस्तू आहे. कोणाच्या घरामध्ये भांडण असेल तर त्यांना सांगा, भगवानुवाच काम महाशत्रू आहे. यावर विजय प्राप्त केल्याने, आम्ही विश्वाचे मालक बनतो, मग फुलांची वर्षा होईल, जयजयकार होईल. सोन्याचे फुल टाकतात. तुम्ही आता काट्या पासून सोन्याचे फूल बनत आहात. मग तुमचे अवतरण होईल, त्यावेळी फुले पडणार नाहीत, परंतु तुम्ही फूल बनून येता. मनुष्य समजतात कि, सोन्याची फुले पडतात‌. एक राजकुमार विलायत मध्ये गेला, तिथे मेजवानी दिली होती, त्या साठी सोन्याची फुले बनविली. सर्वां वर वर्षाव केला. खुशी मुळे ऐवढी खात्री केली. खरे खरे सोन्याचे बनविले होते. बाबा त्यांच्या राज्याला पण चांगल्या रीतीने ओळखत आहेत. खरेतर तुम्ही फुल बनून येता. सोन्याची फुले तुम्ही वरून खाली उतरता. तुम्हा मुलांना किती मोठी लॉटरी मिळत आहे, विश्वाच्या बादशाहीची.जसे लौकिक पिता, मुलांना सांगतात कि, तुमच्यासाठी हे आणले आहे, तर मुले किती खुश होतात. बाबा पण म्हणतात कि, तुमच्यासाठी स्वर्ग आणला आहे. तुम्ही तिथे राज्य कराल तर किती खुशी झाली पाहिजे. कोणाला लहान भेट दिली, तर म्हणतात कि, बाबा तुम्ही तर आम्हाला विश्वाची बादशाही देता, ती भेट तर काय आहे. अरे, शिवबाबाची भेट जवळ राहिली तर आठवण राहील, आणि तुम्हाला पद्म मिळतील. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति, मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) सत्य बाबा बरोबर परत जायचे आहे, त्यामुळे नेहमी खरे होऊन राहायचे आहे. कधी पण खोटे बोलायचे नाही.

(२) आम्ही ब्रह्माबाबा ची मुले आपसामध्ये भाऊ बहिण आहोत, त्यामुळे कोणते पण विकारी कर्म करायचे नाही. भाऊ भाऊ आणि भाऊ बहिणी शिवाय आणखीन कोणत्या संबंधाचे भान राहू नये.

वरदान:-
लोकपसंद सभेचे तिकीट बुक करणारे राज्य सिंहासन अधिकारी भव:

कोणता पण संकल्प किंवा विचार केला तर अगोदर तपासून पहा कि, हा विचार व संकल्प बापपसंद आहे? जे बापपसंद आहे, ते लोकपसंद स्वतःच बनतील. जर कोणत्या पण संकल्पा मध्ये स्वार्थ असेल, तर मनपसंद म्हणावे आणि विश्व कल्याणार्थ असेल तर लोकपसंद व प्रभूपसंद म्हणावे. लोकपसंद सभेचे सभासद बनणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य अधिकारी व राज्य सिंहासन प्राप्त होईल.

बोधवाक्य:-
परमात्म सोबतीचा अनुभव करा, तर सर्वकांही सहज अनुभव करून, सुरक्षित राहाल.