24-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलानों, तुम्ही खरे खुरे परवाने आहात, जे आता शमावर अर्पण होत आहात, या अर्पण होण्याची स्मृती म्हणून ही दीपावली आहे."

प्रश्न:-
बाबांनी आपल्या मुलांना, कोणता समाचार सांगितला आहे?

उत्तर:-
बाबांनी सांगितले आहे, तुम्ही आत्मे निर्वाणधाम मधून कसे येता, आणि मी कसा येतो. मी कोण आहे, काय करत आहे, कसे रामराज्य स्थापन करत आहे, कसा तुम्हा मुलांना रावणावर विजय मिळवून देत आहे. आता तुम्ही मुले या सर्व गोष्टीला जाणत आहात. तुमची ज्योत प्रज्वलित झाली आहे.

गीत:-
तुम्हीच माता पिता.....

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले. आत्म्याने या शरीराच्या कर्मेंद्रियाद्वारे गीत ऐकले. गीतांमध्ये सुरुवातीला तर बरोबर आहे. शेवटी भक्तीचे अक्षरं आहेत, तुमच्या पायाची धूळ आहोत. आता मुले पायाची धूळ थोडेच होतील. हे चूक आहे. बाबा मुलांना बरोबर अक्षर समजावत आहेत. बाबा येतात, पण तेथूनच, जेथून तुम्ही मुले आली आहेत. ते निर्वाणधाम आहे. मुलांना सर्वांचा येण्याचा समाचार तर सांगितला आहे. माझा पण सांगितला आहे कि, मी कसा येत आहे. येऊन काय करत आहे‌. रामराज्य स्थापन करण्यासाठी रावणावर विजय प्राप्त करवीत आहे. मुले जाणतात कि, रामराज्य आणि रावणराज्य, या सृष्टीवरच होते. आता तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात. धरती, आकाश, सूर्य इत्यादी, सर्व तुमच्या हातामध्ये येत आहे. तर म्हटले जाते, रावणराज्य सर्व विश्‍वावर आणि रामराज्य पण सर्व विश्‍वावर आहे. रावण राज्यांमध्ये किती करोडो आहेत, राम राज्यांमध्ये थोडे असतात, मग हळूहळू वाढ होत जाते. रावणराज्या मध्ये वाढ फार होत आहे, कारण मनुष्य विकारी बनतात. रामराज्या मध्ये निर्विकारी आहेत. मनुष्यांची ही गोष्ट आहे. तर राम पण बेहद चे मालक, रावण पण बेहदचा मालक आहे. आता किती अनेक धर्म आहेत. गायन पण आहे कि, अनेक धर्माचा विनाश. बाबानी झाडावर पण समजावले आहे.

आता दसरा साजरा करत आहेत, रावणाला जाळत आहेत. हे हदचे जाळणे आहे. तुमची तर बेहदची गोष्ट आहे.रावणाला फक्त भारतवासी जाळत आहेत, परदेशांमध्ये पण जिथे जिथे, भारतवासी जास्त आहेत, तिथेच जाळतात. तो हदचा दसरा आहे. दाखवतात लंकेमध्ये रावण राज्य करत होता, सीतेचे अपहरण करुन लंकेमध्ये घेऊन गेला. या हदच्या गोष्टी आहे. आता बाबा सांगतात कि,सर्व विश्‍वावर रावणाचे राज्य आहे.आत्ता रामराज्य नाही. रामराज्य म्हणजे ईश्वराने स्थापन केलेले‌. सतयुगाला रामराज्य म्हटले जाते. माळा स्मरण करतात, रघुपती राघव राजाराम म्हणतात, परंतु राजारामला आठवण करत नाहीत, जे साऱ्या विश्वाची सेवा करतात, त्यांची माळा स्मरण करतात‌.

भारतवासी दसऱ्यानंतर मग दिवाळी साजरी करतात. दिवाळी कां साजरी करतात? कारण देवतांचा राज्याभिषेक होत आहे. राज्याभिषेकाच्या वेळी बत्या इत्यादी फार जाळतात. एकीकडे राज्याभिषेक, दुसरीकडे मग म्हणतात, घराघरांमध्ये दिवाळी. प्रत्येक आत्म्याची ज्योत प्रज्वलित झाली आहे. आता सर्व आत्म्याची ज्योत विझली आहे.लोहयुग म्हणजे अंधार आहे. अंधार म्हणजे भक्तिमार्ग. भक्ति करत करत, ज्योत कमी होऊन जाते. बाकी ती दिवाळी तर कृत्रिम आहे. असे नाही की राज्याभिषेक होतो, त्यावेळी आतषबाजी करतात. दिवाळीच्या वेळी लक्ष्मीला बोलावतात. पूजा करतात. हे उत्सव भक्तिमार्गाचे आहेत. जो पण राजा गादीवर बसतो, त्यावेळी त्यांचा राज्याभिषेकाचा दिवस धूमधामा मध्ये साजरा करतात. हे सर्व हदचे आहे. आता तर बेहदचा विनाश, खराखुरा दसरा होणार आहे. बाबा सर्वांची ज्योत जागविण्या साठी आले आहेत. मनुष्य समजतात कि, माझी ज्योत मोठ्या ज्योती मध्ये मिळत आहे. ब्रह्मसमाजीं च्या मंदिरामध्ये नेहमी ज्योत तेवत ठेवतात. समजतात कि, जसे परवाने ज्योतीवर चक्कर मारून, समर्पित होतात, तशी आमची पण आत्मा, आता मोठ्या ज्योती मध्ये मिळून जाईल. यावर दृष्टांत बनविला आहे. आता तुम्ही अर्ध्या कल्पाचे आशिक आहात. तुम्ही येऊन एका माशूक वर समर्पित होत आहात, जळण्याची तर गोष्टच नाही. जसे ते अशिक माशुक असतात, तर ते एकमेकांचे आशिक बनतात. इथे तर ते एकच माशुक आहेत, बाकी सर्व आशिक आहेत. आशिक त्या माशुका ला भक्ती मार्गामध्ये आठवण करतात. माशुक तुम्ही या, तर आम्ही तुमच्यावर बळी चढू. तुमच्या शिवाय आम्ही कोणाला पण आठवण करणार नाही. हे तुमचे शारीरिक प्रेम नाही. त्या अशिक माशूकांचे शारीरिक प्रेम असते, बसं, एकमेकाला पाहत राहतात, पाहिल्याने जसे तृप्ती होऊन जाते. इथे तर एक माशूक बाकी सर्व आशिक आहेत. सर्व बाबाची आठवण करत आहेत. जरी कोणी निसर्गाला मानत आहेत. तरीपण ओ गाॅड, हे भगवान,मुखा तून जरूर निघते. सर्व त्यांना बोलवत आहेत, आमचे दुःख दूर करा. भक्ती मार्गामध्ये तर अनेक आशिक माशुक आहेत, कोणी कोणाचे आशिक, कोणी कोणाचे आशिक, हनुमानाचे किती आशिक आहेत? सर्व आपापल्या माशुकाचे चित्र बनवून, मग आपसामध्ये मिळून बसून, त्यांची पूजा करतात. पूजा करून मग माशूकाला बुडवितात. त्यातून अर्थ कांही पण निघत नाही. तिथे ही गोष्टी नाही. तो तुमचा माशुक नेहमीच गोरा आहे, कधी सावळा होत नाही. बाबा मुसाफिर येऊन, सर्वांना गोरा बनवत आहेत. तुम्ही पण मुसाफिर आहात ना. दूर देशांमधून येऊन इथे अभिनय करत आहात. तुमच्या मध्ये पण क्रमवारीच्या पुरुषार्था नुसार समजत आहेत. आता तुम्ही त्रिकालदर्शी बनत आहात. रचता आणि रचनेच्या आदि, मध्य, अंताला जाणत आहात, तर तुम्ही त्रिकालदर्शी ब्रह्माकुमार, कुमारी बनता. जसे जगद्गुरु इत्यादीना टायटल मिळत आहे ना. तुम्हाला हे टायटल मिळाले आहे. तुम्हाला सर्वात चांगले टायटल स्वदर्शन चक्रधारीचे मिळते. तुम्ही ब्राह्मणच स्वदर्शन चक्रधारी आहात, कां शिवबाबा पण आहेत?(शिवबाबा पण आहेत) होय, कारण स्वदर्शन चक्रधारी आत्मा शरीरा बरोबर असते. बाबा पण यांच्या मध्ये येऊन समजावत आहेत. शिवबाबा सुदर्शन चक्रधारी नसते, तर तुम्हाला कसे बनवतील. ते सर्वोच्च आत्मा आहेत. देहाला थोडेच म्हटले जाते. ते सर्वोच्च बाबाच येऊन, तुम्हाला सर्वोच्च बनवत आहेत. स्वदर्शन चक्रधारी, आत्म्या शिवाय कोणी बनवू शकत नाही. कोणते आत्मे? जे ब्राह्मण धर्माचे आहेत. जेव्हा क्षुद्र धर्माचे होते, तर जाणत नव्हते. आता बाबाद्वारे तुम्ही जाणले आहे. किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तुम्हीच ऐकत आहात आणि खुश होत आहात. बाहेरच्यांनी हे ऐकले तर आश्चर्य खातील. ओहो ! हे तर फार उंच ज्ञान आहे. बरं, तुम्ही पण असेच स्वदर्शन चक्रधारी बना, तर मग चक्रवर्ती राजा, विश्वाचे मालक बनाल. येथून बाहेर गेले, तर खल्लास. माया एवढी बहादूर आहे, येथील येथेच राहते. जसे गर्भामध्ये मुल वायदा करून बाहेर येते, तरीपण तेथील तेथेच राहून जाते. तुम्ही प्रदर्शनी इत्यादीं मध्ये समजावता, तर फार चांगले चांगले म्हणतात. ज्ञान फार चांगले आहे, मी असा पुरुषार्थ करेन, असे करेन..... बसं, बाहेर निघाले आणि तेथील तेथेच राहते. परंतु तरी पण कांही ना कांही प्रभाव राहतो. असे नाही कि, मग ते येणारच नाहीत. झाडाचे वृद्धी होत राहते. झाड वृध्दीला प्राप्त होईल, तर मग सगळ्यांना आकर्षण होईल. आता तर हा रौरव नरक आहे. गरुड पुराणा मध्ये पण अशा रोचक गोष्टी लिहिल्या आहेत, त्या मनुष्यांनी ऐकल्या आहेत,कारण कांही भीती राहील. त्यामधूनच निघाले आहे कि, मनुष्य साप,विंचू इत्यादी बनतो. बाबा म्हणतात, मी तुम्हाला विषय वैतरणी नदीमधून काढून, क्षिरसागरा मध्ये पाठवत आहे. मूळ तुम्ही शांतीधामचे निवासी आहात. मग सुखधाम मध्ये अभिनय करण्यासाठी येता. आता आम्ही शांतीधाम आणि सुखधामला जातो.त्या धामाची तर आठवण कराल ना. महिमा पण आहे, तुम्ही मात पिता.... ते अपार सुख तर सतयुगामध्येच असते. आता संगम आहे. इथे शेवटाला त्राहि त्राहि करतील, कारण अति दुःख होत आहे. मग सतयुगा मध्ये अति सुख होईल. अति सुख आणि अति दुःखाचा हा खेळ बनला आहे. विष्णू अवतार पण दाखवत आहेत. लक्ष्मी नारायणाचा जोडा कसा वरून येत आहे. आता वरुन तर शरीरधारी कोणी थोडेच येतात. वरून तर प्रत्येकाची आत्मा येत आहे. परंतु ईश्वराचे अवतरण फार विचित्र आहे, तेच येऊन भारताला स्वर्ग बनवत आहेत. त्यांचा सण शिवजयंती साजरी करत आहेत. जर माहीत झाले कि, परमपिता परमात्मा शिवच, मुक्ती जीवनमुक्तीचा वारसा देत आहेत, तर मग साऱ्या विश्वामध्ये गॉड फादरचा सण साजरा करतील.बेहदच्या बाबाची स्मृती साजरी तेंव्हा करतील, जेंव्हा समजतील कि, शिवबाबाच मुक्तिदाता, मार्गदर्शक आहेत. त्यांचा जन्म पण भारतामध्येच होतो. शिवजयंती पण भारता मध्ये साजरी करतात. परंतु पूर्ण ओळख नसल्यामुळे सणाची सुट्टी पण देत नाहीत. जे बाबा सर्वांचे सद्गती करणारे आहेत, त्यांची जन्मभूमी, जिथे अलौकिक कर्तव्य येऊन करतात, त्यांचा जन्मदिवस आणि तीर्थयात्रा तर मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे. तुमचे स्मृती स्थळाचे मंदिर पण इथेच आहे. परंतु कोणाला माहित नाही कि, शिवबाबाच येऊन मुक्तिदाता आणि मार्गदर्शक बनत आहेत. सर्व म्हणतात कि, सर्व दुःखा पासून सोडून, सुखधामला घेऊन चला, परंतु समजत नाहीत. भारत फार सर्वोच्च खंड आहे. भारताची महिमा अपरंपार गायली जाते. इथेच शिवबाबाचा जन्म होत आहे, त्यांना कोणी मानत नाहीत. स्टॅम्प बनवत नाहीत.इतरांचे तर फार बनवत राहतात. आता कसे समजावून सांगावे, जे यांचे महत्व सर्वांना माहित पडेल. विलायत मध्ये पण संन्यासी इत्यादी जाऊन, भारताचा प्राचीन योग शिकवतात, जेंव्हा तुम्ही हा राजयोग सांगाल, तर तुमचे फार नाव होईल. त्यांना सांगा, राजयोग कोणी शिकविला, हे कोणाला पण माहित नाही. कृष्णाने पण हठयोग शिकविला नाही. हा हठयोग संन्यासांचा आहे. जे फार चांगले लिहिणारे, वाचणारे आहेत, जे स्वतःला तत्त्ववेत्ते समजतात, ते या गोष्टीला समजतील आणि सुधरतील, म्हणतील कि, आम्ही पण शास्त्र वाचले आहेत, परंतु आता जे बाबा सांगत आहेत, ते बरोबर आहे. बाकी सर्व चूक आहे. तर ते पण समजतील, बरोबर मोठ्या तील मोठे तीर्थस्थान हे आहे, जिथे बाबा येत आहेत. तुम्ही मुले जाणता कि, याला धर्मभूमी म्हटले जाते. इथे जेवढे धर्मात्मा राहतात, तेवढे कोठेच राहत नाहीत. तुम्हीं किती दान पुण्य करत आहात. बाबाला ओळखल्या मुळे तन-मन-धन सर्व या सेवेमध्ये लावत आहात. बाबाच सर्वांचे मुक्तिदाता आहेत. सर्वांना दुःखा पासून सोडवतात. इतर धर्म स्थापक कांही दुःखापासून सोडवत नाहीत, ते तर त्यांच्या नंतर येतात. क्रमाक्रमाने सर्व अभिनय करण्यासाठी येतात. अभिनय करत करत, तमोप्रधान बनतात. मग बाबा येऊन सतोप्रधान बनवतात. तर हा भारत किती मोठे तीर्थ आहे. भारत सर्वात क्रमांक एकची उंच भूमि आहे.बाबा म्हणतात, माझी ही जन्मभूमी आहे. मी येऊन सर्वांची सद्गती करत आहे. भारताला स्वर्ग बनवत आहे.

तुम्ही मुले जाणता कि, बाबा स्वर्गाचे मालक बनविण्यासाठी आले आहेत. अशा बाबाची फार प्रेमाने आठवण करा. तुम्हाला पाहून इतर पण तसे कर्म करतील. त्याला म्हटले जाते अलौकिक दिव्य कर्म. असे समजू नका, कोणी जाणत नाही. असे कांही येतील, जे तुमचे हे चित्र घेऊन जातील. चांगले चांगले चित्र बनले तर बोट भरून घेऊन जातील. बोट जिथे जिथे उभी राहील, तिथे चित्र लावतील. तुमची फार सेवा होईल. फार मोठ्या मनाने हुंडी भरणारे सांवलशहा पण निघतील,जे हे काम करण्यास सुरु करतील. कारण सर्वांना माहीत पडेल कि, हे कोण आहेत, जे जुन्या दुनियेला बदलून, नवीन दुनिया स्थापन करत आहेत. तुमची पण अगोदर तुच्छ बुद्धी होती, तुम्ही आता किती स्वच्छ बुद्धीचे बनत आहात. तुम्ही जाणता कि, आम्ही या ज्ञान आणि योगबळाने,विश्वाला स्वर्ग बनवत आहोत. इतर सर्व मुक्तिधाम मध्ये निघून जातील. तुम्हाला पण सत्ताधिश बनायचे आहे. बेहदच्या बाबाची मुले आहात ना. आठवणी मुळे शक्ती मिळते. बाबाला जगातील सर्वोच्च सत्ता म्हटले जाते. सर्व वेद शास्त्रांचा सार सांगत आहेत. तर मुलांना सेवेचा किती उमंग राहिला पाहिजे. मुखातून ज्ञान रतना शिवाय, आणखीन कांही निघू नये. तुम्ही प्रत्येक जण रूप बसंत आहात. तुम्ही पाहता कि, सारी दुनिया हिरवीगार होऊन जाते. सर्व काही नवीन, तिथे दु:खाचे नाव नाही. पाच तत्व पण तुमच्या सेवेसाठी हजर राहतात. आता ते नुकसानीचे काम करत आहेत, कारण मनुष्य लायक नाहीत. बाबा आता लायक बनवत आहेत. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती, मात पिता, बाप दादाची, प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) रूप बसंत बनवून, मुखाद्वारे नेहमी ज्ञान रतन सांगायचे आहेत. सेवेमध्ये उत्साह ठेवायचा आहे. आठवणी मध्ये राहायचे आणि सर्वांना बाबाची आठवण द्यायची आहे, हेच दिव्य आलौकिक कार्य करायचे आहे.

(२) खरेखुरे आशिक बनून, एका माशुका वर समर्पित व्हायचे आहे, म्हणजे बळी चढायचे आहे, तेंव्हाच खरी दिवाळी साजरी होईल.

वरदान:-
ग्रृहस्थ व्यवहार आणि ईश्वरीय व्यवहार, दोन्हीच्या समानते द्वारे, नेहमी हलके आणि सफल भव:

सर्व मुलांना शरीर निर्वाह आणि आत्म निर्वाहाची डबल सेवा मिळालेली आहे. परंतु दोन्ही सेवेमध्ये वेळेचे, शक्तीचे समान लक्ष्य पाहिजे. जर श्रीमताचा काटा बरोबर असेल तर दोन्ही बाजू समान होतील. परंतु ग्रृहस्थ शब्द बोलताना,गृहस्थी होऊन जाता, तर मग बहानेबाजी सुरू होते, त्यामुळे गृहस्थी नसून विश्वस्त आहे, या स्मृतीने गृहस्थ व्यवहार आणि ईश्वरीय व्यवहार, दोन्हीमध्ये समानता ठेवा, तर नेहमी हलके आणि सफल बनाल.

बोधवाक्य:-
पहिल्या डिव्हिजन मध्ये येण्यासाठी, कर्मेद्रीयजीत आणि मायाजीत बना.