23-10-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनण्यासाठी स्वतः भगवान तुम्हाला श्रेष्ठ मत देत आहेत,
त्यामुळे तुम्ही नर्कवासी पासून स्वर्गवासी बनता."
प्रश्न:-
देवता बनणाऱ्या
मुलानी, विशेष कोणत्या गोष्टीवर ध्यान दिले पाहिजे?
उत्तर:-
कधी कोणत्या गोष्टीवर रुसायचे नाही, तोंड मुडद्या सारखे करायचे नाही. कोणाला दुःख
द्यायचे नाही. देवता बनायचे आहे तर मुखातून नेहमी फुले निघावीत. जर काटे किंवा दगड
निघत असतील, तर दगड ते दगडच राहिले. फार चांगले गुण धारण करायचे आहेत. इथेच
सर्वगुणसंपन्न बनायचे आहे. सजा खाल तर मग पद चांगले मिळणार नाही.
ओम शांती।
नवीन विश्वाचे किंवा नवीन दुनियेचे मालक बनणाऱ्या, आत्मिक मुलांना, आत्मिक बाबा
समजावत आहेत. हे तर मुले समजतात कि, बाबा आले आहेत,बेहदचा वरसा देण्यासाठी. आम्ही
लायक नव्हतो. म्हणतात कि, हे प्रभू, मी लायक नाही, मला लायक बनवा. बाबा मुलांना
समजावतात कि, तुम्ही मनुष्य तर आहात, हे देवता पण मनुष्य आहेत, परंतु त्यांच्यामध्ये
दैवी गुण आहेत. यांना खरे खरे मनुष्य म्हणावे. मनुष्या मध्ये आसुरी गुण असतात, तर
त्यांचे वागणे जनावरा सारखे होते. दैवी गुण नसतील तर त्यांना आसूरी गुणांचे म्हटले
जाते. आता बाबा पुन्हा येऊन तुम्हाला श्रेष्ठ देवता बनवत आहेत. सत्यखंडा मध्ये
राहणारे खरे खरे मनुष्य हे लक्ष्मी नारायण आहेत, यांना मग देवता म्हटले जाते.
त्यांच्या मध्ये दैवी गुण आहेत. जरी गातात कि, हे पतित पावन या. परंतु पावन राजे कसे
असतात, मग पतित राजे कसे बनतात, हे रहस्य कोणी समजत नाहीत. तो भक्तिमार्ग आहे.
ज्ञानाला तर इतर कोणी जाणत नाहीत. तुम्हा मुलांना बाबा समजावत आहेत आणि असे बनवत
आहेत. कर्म तर हे देवता पण सतयुगा मध्ये करतात, परंतु पतित कर्म करत नाहीत.
त्यांच्या मध्ये दैवीगुण आहेत. छी छी काम न करणारे स्वर्गवासी होतात. नर्कवासी कडून
माया छी छी काम करवीत आहे. आता भगवान श्रेष्ठ काम करवितात आणि श्रेष्ठ मत देतात कि,
असे छी छी काम करू नका. श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनण्यासाठी श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत देत
आहेत. देवता श्रेष्ठ आहेत ना. राहतात पण नवीन दुनिया, स्वर्गामध्ये. हे पण
तुमच्यामध्ये क्रमवारी च्या पुरुषार्था नुसार जाणत आहेत, त्यामुळे माळा पण बनत आहे,
८ ची किंवा १०८ ची, तसे तर १६१०८ पण म्हणतात, ती पण काय झाली. एवढे करोडो मनुष्य
आहेत, त्यामधून 16१०८ निघाले तर किती निघाले, किती कमी टक्केवारी झाली. बाबा मुलांना
किती उंच बनवत आहेत. रोज मुलांना सांगत आहेत कि, कोणते पण विकर्म करू नका. तुम्हाला
असे बाबा मिळाले आहेत, तर फार खुशी झाली पाहिजे. तुम्ही समजता कि, आम्हाला बेहदच्या
बाबाने दत्तक घेतले आहे. आम्ही त्यांचे बनले आहोत. बाबा स्वर्गाचे रचियता आहेत. तर
अशा स्वर्गाचे मालक बनण्यासाठी लायक, सर्वगुणसंपन्न बनायचे आहे. हे लक्ष्मीनारायण
सर्वगुणसंपन्न होते. त्यांच्या श्रेष्ठतेची महिमा केली जाते, मग 84 जन्मा नंतर न
लायक बनतात. एक जन्म पण खाली उतरले, तर थोडी कला कमी होते.असे हळूहळू कमी होत जाते.
हे नाटक पण जू सारखे चालत आहे ना. तुम्ही पण हळूहळू खाली उतरत आहात, तर 1250 वर्षां
मध्ये दोन कला कमी होतात. मग रावण राज्यां मध्ये लवकर लवकर कला कमी होत जातात.
ग्रहण लागले जाते. जसे सूर्य, चंद्राला पण ग्रहण लागते ना. असे नाही कि, चंद्र,
ताऱ्यांना ग्रहण लागत नाही, सर्वांना पूर्ण ग्रहण लागलेले आहे. आता बाबा म्हणत आहेत
कि, आठवणीनेच ग्रहण उतरेल. कोणते पण पाप करू नका. पहिल्या नंबरचे पाप आहे,
देहअभिमाना मध्ये येणे. हे मोठे पाप आहे. मुलांना एका जन्मा साठीच शिक्षण मिळत आहे,
कारण आता दुनियेला बदलायचे आहे. मग असे शिक्षण कधी मिळत नाही. बॅरिस्टर इत्यादीचे
शिक्षण तर तुम्ही जन्म जन्मांतर घेत आले आहात. शाळा इत्यादी तर नेहमीच असतात. हे
ज्ञान एकदाच मिळाले,बसं.ज्ञानसागर बाबा एकदाच येत आहेत. ते स्वतःची आणि आपल्या
रचनेच्या आदि मध्य अंताचे सारे ज्ञान देत आहेत. बाबा किती सोपे सांगत आहेत, तुम्ही
आत्मे अभिनय करणारे आहात. आत्मा आपल्या घरातून येऊन इथे अभिनय करते. त्याला
मुक्तिधाम म्हटले जाते. स्वर्ग जीवनमुक्ती आहे. इथे तर जीवनबंध आहे. हे अक्षर पण
अर्थ सहीत आठवण करायचे आहेत. मोक्ष कधी मिळत नाही. मनुष्य म्हणतात मोक्ष मिळाला
पाहिजे म्हणजे येण्या जाण्या पासून मुक्त होऊ परंतु अभिनया पासून तर सुटू शकत
नाहीत.हे अनादि पूर्वंपार बनलेला खेळ आहे. जगाच्या इतिहास भूगोलाची हुबेहुब
पुनरावृत्ती होत आहे. सतयुगा मध्ये तेच देवता येतील. मग नंतर इस्लामी, बौद्धी
इत्यादी सर्व येतात. हे मनुष्यांचे झाड बनले आहे. याचे बीज वर आहे. बाबा मनुष्य
सुष्टीचे बीजरूप आहेत. मनुष्य सृष्टी तर आहेच, परंतु सतयुगा मध्ये फार छोटी असते,
मग हळूहळू फार वाढ होत जाते. बरे, मग छोटी कशी होईल?बाबा येऊन पतिता पासून पावन
बनवत आहेत. किती थोडे पावन बनतात. कोटी मधून कोणी निघत आहेत. अर्धा कल्प थोडे
असतात, अर्ध्या कल्पामध्ये किती वाढ होत आहे. तर सर्वात जास्त संप्रदाय देवतांचा
झाला पाहिजे, कारण पहिल्या प्रथम ते आले आहेत, परंतु इतर दुसऱ्या धर्मामध्ये गेले
आहेत, कारण बाबालाच विसरले आहेत, या एकाच चुकीचा खेळ आहे.विसल्यामुळे कंगाल बनले
आहेत. विसरून विसरून एकदम विसरून गेलेत. भक्ती पण अगोदर एकाचीच करतात, कारण सर्वांची
सद्गती करणारे एक आहेत, मग दुसऱ्या कोणाची भक्ती कां केली पाहिजे. या लक्ष्मी
नारायणाला बनविणारे तेच शिव आहेत. कृष्ण बनविणारे कसे होऊ शकतील. असे तर होऊ शकत
नाही. राजयोग शिकवणारे कृष्ण कसे असतील, ते तर सतयुगाचे राजकुमार आहेत. किती चूक
केली आहे. बुद्धीमध्ये बसत नाही. आता बाबा म्हणतात कि, माझी आठवण करा आणि दैवी गुण
धारण करा. कोणत्या पण मालमत्तेसाठी भांडण इत्यादी असेल, तर ते नाहीसे करा. भांडण
करत तर प्राण पण निघून जातील. बाबा समजावतात कि, यांनी सोडून दिले तर भांडण इत्यादी
थोडेच झाले. कमी मिळाले तर जाऊ दिले. त्याच्या बदल्यां मध्ये राजाई मिळाली आहे. बाबा
सांगतात कि, मला साक्षात्कार झाला विनाश आणि राजाईचा तर किती खुशी झाली. आम्हाला
विश्वाची बादशाही मिळत आहे. तर हे सर्व काय आहे. असे थोडेच कोणी उपाशी मरेल. पैसे
नसणारे पण पोट भरत आहेत ना. मम्माने कांही आणले होते कां? किती मम्माची आठवण करत
आहेत. बाबा म्हणतात आठवण करत राहाता, हे तर ठीक आहे, परंतु आता मम्माच्या नावा
रूपाची आठवण करायची नाही. आम्हाला पण त्यांच्या सारखी धारणा करायची आहे. आम्ही पण
मम्मा सारखे चांगले बनून गद्दी लायक बनू. फक्त मम्माची महिमा करून थोडेच बनाल. बाबा
तर म्हणतात कि, माझ्या एकट्याची आठवण करा. आठवणी च्या यात्रेमध्ये राहा. मम्मा सारखे
ज्ञान सांगायचे आहे.मम्मा च्या महिमेचा सबूत तेंव्हा द्याल,जेंव्हा तुम्हीपण असे
महिमा लायक बनून दाखवाल.फक्त मम्मा, मम्मा म्हणून पोट भरणार नाही. आणखीनच पोट पाठीला
लागेल.शिवबाबा ची आठवण केल्याने पोट भरेल. या दादाची पण आठवण केल्याने पोट भरणार
नाही. आठवण एकाची करायची आहे. उपकार एकाचे आहेत. सेवा करण्या साठी युक्त्या रचल्या
पाहिजेत. नेहमी मुखातून फुले निघावीत. जर काटे, दगड निघाले तर दगडाचे दगडच
राहाल.गुण फार चांगले धारण करायचे आहेत. तुम्हाला येथे सर्वगुणसंपन्न बनायचे आहे.
सजा खाऊन तर मग पद चांगले मिळणार नाही. मुले इथे येतात बाबा कडून समक्ष ऐकण्यासाठी.
इथे ताजा ताजा नशा बाबा चढवत आहेत. सेंटरवर नशा चढतो, मग घरी गेल्यानंतर संबंधी इ.
ना पाहिले, तर तो नाहीसा होतो. इथे तुम्ही समजता कि, आम्ही बाबाच्या परिवारामध्ये
बसले आहोत. तिथे आसूरी परिवार असतो. किती भांडण इत्यादी करतात. तिथे गेल्यानंतर
कचरापट्टी मध्ये जाऊन पडता. इथे तर तुम्हाला बाबांची आठवण विसरली नाही पाहिजे.
दुनियेमध्ये खरी शांती कोणाला पण मिळत नाही. पवित्रता, सुख-शांती, संपत्ती बाबा
शिवाय कोणी देऊ शकत नाही. असे नाही कि, बाबा आशिर्वाद करत आहेत, आयुष्यमान भव,
पुत्रवान भव. नाही, आशीर्वादा मुळे कांही पण मिळत नाही. ही मनुष्याची चूक आहे.
संन्याशी इत्यादी पण आशीर्वाद करू शकत नाहीत. आज आशीर्वाद देतात ,उद्या स्वतःच मरून
जातात. पोप पण पहा किती होऊन गेले आहेत. गुरु लोकांची गादी चालते, लहानपणीचा गुरु
मेला, तर दुसरा करतात, लहान चेल्याला गुरु बनवितात. इथे तर बापदादा देणारे आहेत. ते
घेऊन काय करतील. बाबा तर निराकार आहेत ना,घेतात साकार. ही पण समजण्याची गोष्ट आहे.
असे कधी पण म्हणू नका कि, आम्ही शिवबाबाला देत आहोत. नाही, आम्ही शिव बाबा कडून पदम
घेत आहोत, देत नाही. बाबा तर तुम्हाला अगणित देत आहेत. शिवबाबा तर दाता आहेत, तुम्ही
त्यांना कसे द्याल? मी दिले, असे समजल्यामुळे मग देहअभिमान येतो. आम्ही शिवबाबा
कडून घेत आहोत. बाबा जवळ एवढी अनेक मुले येतात, येऊन राहतात तर प्रबंध केला पाहिजे
ना. म्हणजे तुम्ही देत आहात, स्वतःसाठीच. त्यांना स्वतःचे थोडेच कांही करायचे आहे.
राजधानी पण तुम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही पण करत आहात. तुम्हाला स्वतःपेक्षा
पण उंच बनवत आहेत. अशा बाबाला तुम्ही विसरून जाता. अर्धा कल्प पूज्य, अर्धा कल्प
पुजारी. पुज्य बनल्यामुळे तुम्ही सुखधामचे मालिक बनता, मग पुजारी बनल्यामुळे
दु:खधामचे मालिक बनता. हे पण कोणाला माहित नाही कि, बाबा कधी येऊन, स्वर्गाची
स्थापना करत आहेत. या गोष्टीला तुम्हीं संगम युगी ब्राह्मणच जाणत आहात. बाबा एवढे
चांगल्या रीतीने समजावत आहेत, तरी पण बुद्धीमध्ये बसत नाही. जसे बाबा समजावत आहेत,
तसे युक्तीने समजावले पाहिजे्. पुरषार्थ करून असे श्रेष्ठ बनायचे आहे. बाबा मुलांना
समजावत आहेत, मुलांमध्ये फार चांगले दैवी गुण असले पाहिजेत. कोणत्या गोष्टींमध्ये
रुसायचे नाही, चेहरा मुडद्या सारखा करायचा नाही. बाबा सांगतात, असे कोणते काम आता
करू नका. चंडिका देवीचा पण मेळा लागत आहे. चंडिका त्यांना म्हटले जाते, जे बाबाच्या
मतावर चालत नाही. जे दुःख देतात, अशा चंडिकाचा पण मेळा लागतो.मनुष्य अज्ञानी आहेत
ना.अर्थ थोडाच समजत आहेत. कोणामध्ये ताकत नसेल, तर ते जसे खोखले आहेत. तुम्हीं
बाबाना चांगल्या रीतीने आठवण करता, तर बाबा द्वारे तुम्हाला ताकत मिळते. परंतु इथे
राहून पण अनेकांची बुद्धी बाहेर भटकत राहते. त्यामुळे बाबा म्हणतात कि, इथे चित्रा
समोर बसा, तर तुमची बुद्धी त्यामध्ये व्यस्त राहील. सृषटीच्या गोळ्यावर, शिडी वर
कोणालाही समजून सतयुगा मध्ये फार थोडे मनुष्य असतात. आता तर पुष्कळ मनुष्य आहेत.
बाबा म्हणतात कि, मी ब्रह्मा द्वारे नवीन दुनियेची स्थापना करत आहे, जुन्या दुनियाचा
विनाश करत आहे. असा बसून अभ्यास केला पाहिजे. स्वतःचे मुख स्वतःच उघडायचे आहे.
मनामध्ये जे चालत आहे, ते बाहेर पण निघाले पाहिजे. मुके तर नाहीत ना. घरांमध्ये
गप्पा मारण्या साठी तोंड उघडते, ज्ञान सांगण्यासाठी उघडत नाही. चित्र तर सर्वांना
मिळत आहेत, हिम्मत ठेवली पाहिजे, आपल्या घराचे कल्याण करावे. आपली खोली चित्राने
सजवून ठेवा, तर तुम्ही व्यस्त राहाल. हे जसे तुमचे ग्रंथालय होऊन जाईल. दुसऱ्यांचे
कल्याण करण्यासाठी चित्र इत्यादी लावली पाहिजेत. जे येतील त्यांना समजावा. तुम्ही
फार सेवा करू शकता. थोडे पण ऐकले तरी प्रजा बनेल. बाबा एवढ्या उन्नतीच्या युक्ती
सांगत आहे. बाबाची आठवण करा तर तुमचे विकर्म विनाश होतील. बाकी गंगे मध्ये जाऊन
एकदम बुडाला, तरी पण विकर्म विनाश होणार नाहीत. या सर्व अंधश्रद्धा आहेत. हरिद्वार
मध्ये तर सर्व शहराची घाण जाऊन, गंगे मध्ये पडते. सागरा मध्ये किती घाण पडते.
नदीमध्ये तर कचरा पडत राहतो, त्यामुळे मग पावन कसे बनाल. मायेने सर्वांना बिल्कुल
बेसमज बनविले आहे.
बाबा मुलांनाच म्हणत आहेत कि, माझी आठवण करा. तुमची आत्मा बोलावत आहे ना, हे पतित
पावन या. ते तुमच्या शरीराचे लौकिक पिता तर आहेत. पतित पावन एकच बाबा आहेत. आता
तुम्ही त्या पावन बनविणाऱ्या बाबाची आठवण करत आहात. जीवनमुक्ति दाता एकच आहेत, दुसरे
कोणी नाही. एवढ्या सोप्या गोष्टीचा अर्थ पण कोणी समजत नाहीत. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति, मातपिता बाप दादाची, प्रेमपूर्वक आठवण
आणि नमस्ते. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) मुखाद्वारे
ज्ञान रतन सांगण्याचा अभ्यास केला पाहिजे. कधी मुखातून काटे किंवा दगड निघाले नाही
पाहिजेत. स्वतःचे आणि घराचे कल्याण करण्यासाठी, घरांमध्ये चित्रे लावा, त्यावर
विचार सागर मंथन करून, दुसऱ्यांना समजावून सांगा. व्यस्त राहायचे आहे.
(२) बाबा कडून आशीर्वाद मागण्या पेक्षा, त्यांच्या श्रेष्ठ मतावर चाला. उपकार बाबाचे
आहेत, त्यामुळे त्यांची आठवण करायची आहे, हा अभिमान येऊ नये कि,आम्ही बाबाला एवढे
दिले.
वरदान:-
विश्व
कल्याणकारी च्या उच्च स्थितीवर, स्थिर होऊन विनाश लीला पाहणारे, साक्षी दृष्टी भव
अंतिम विनाश लीला
पाहण्यासाठी, विश्व कल्याणकारी च्या उच्च स्थितीमध्ये राहा.ज्या स्थितीवर स्थित
झाल्यामुळे,देहाचे सर्व आकर्षण म्हणजे संबंध, पदार्थ, संस्कार, प्रकृतीच्या
हालचालीचे आकर्षण नाहीशी होऊन जाते. जेव्हा अशी स्थिती होईल, तेंव्हा साक्षी दृष्टा
बनून, वरच्या स्थितीवर, स्थित होऊन, शांतीची, शक्तीची किरणे सर्व आत्म्यांना देऊ
शकाल.
बोधवाक्य:-
ईश्वरी शक्तीने
बलवान बना, तर मायेचा जोर नाहीसा होईल