30-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्हाला एक पित्याकडून एक मत मिळत आहे,ज्याला अद्वेत मत असे म्हणतात,याच अद्वेत मता द्वारे तुम्हाला देवता बनायचे आहे"

प्रश्न:-
मनुष्य या भूलभुलैया च्या खेळा मध्ये, सर्वात मुख्य कोणती गोष्ट विसरून गेले आहेत?

उत्तर:-
आमचे घर कुठे आहे, त्याचा रस्ता या खेळामध्ये येऊन विसरून गेले आहेत.घरी कधी जायचे आहे आणि कसे जायचे आहे हेच माहित नाही.आता बाबा आले आहेत तुम्हा सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी.आवाजाच्या पलीकडे गोड घरामध्ये जाण्यासाठी तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात.

गीत:-
रात के राही थक मत जाना....

ओम शांती।
नाटका नुसार गीताचा अर्थ दुसऱ्या कोणाला समजू शकणार नाही.मनुष्यांनी काही-काही गीते अशी बनवली आहेत जी तुम्हाला मदत करत आहेत.मुले समजत आहेत,आता आम्हीच देवी-देवता बनत आहोत.ज्याप्रमाणे शिक्षण शिकणारे असे म्हणतात आम्ही डॉक्टर,वकील बनत आहोत. तुमच्या बुद्धी मध्ये आहे आम्ही नव्या दुनियेसाठी देवता बनत आहोत.असा विचार तुमच्याच मनामध्ये येतो.नवी दूनिया,अमर लोक सतयुगाला म्हटले जाते. आता तर न सतयुग आहे,न देवतांचे राज्य आहे.इथे तर असू शकत नाही.तुम्ही जाणत आहात हे चक्र फिरून आता आम्ही कलियुगाचा अंताच्या ही अंता मध्ये येऊन पोहोचलो आहे.इतर कोणाच्याही बुद्धी मध्ये चक्र येणार नाही.ते तर सतयुगाला लाख वर्ष झाली असे म्हणतात. तुम्हा मुलांना हा निश्चय आहे बरोबर 5 हजार वर्षानंतर हे चक्र फिरत राहते.तिकडे मनुष्यांचे ८४ जन्म होतात,हिशोब आहे ना.या देवी-देवता धर्माला अद्वैत धर्म असेही म्हटले जाते.अद्वेत शास्त्र ही मानले जाते.तेही एकच आहे, बाकी तर अनेक धर्म आहेत, शास्त्र ही अनेक आहेत.तुम्ही एक आहात.एका द्वारे एक मत मिळत आहे.त्याला अद्वेत मत असे म्हटले जाते.ही अद्वेत मत तुम्हाला मिळत आहे.देवी-देवता बनण्यासाठी हे शिक्षण आहे ना. म्हणूनच बाबांना ज्ञानाचा सागर, नॉलेजफुल असे म्हटले जाते. नव्या दुनियेमध्ये जाण्यासाठी ईश्वर आम्हाला शिकवत आहेत, हे मुलांना समजत आहे.हे विसरायला नको.शाळेमधले विद्यार्थी कधी शिक्षकाला विसरतात का?नाही.ग्रहस्थ व्यवहारामध्ये राहणारे ही जास्त उच्चपद प्राप्त करण्यासाठी शिकतात.तुम्ही सुद्धा आपल्या प्रगतीसाठी ग्रहस्थ व्यवहारांमध्ये राहात असूनही शिकत आहात.हे मनामध्ये असले पाहिजे आम्ही बेहदच्या पित्याकडून शिकत आहोत.शिवबाबा ही पिता आहे आणि प्रजापिता ब्रह्मा ही पिता आहे. प्रजापिता ब्रह्मा आदी देव हे नाव प्रसिद्ध आहे.फक्त भूतकाळात होऊन गेले आहेत.ज्याप्रमाणे गांधीजी ही भूतकाळात होऊन गेले आहेत.त्यांना बापूजी म्हणतात परंतु समजत नाहीत,न समजताच बोलतात.हे शिवबाबा खरे-खरे आहेत,ब्रह्मा बाबा ही खरे-खरे आहेत,लौकिक पिताही खरे-खरे असतात.बाकी महापौर इ.ना तर असेच बापू म्हणतात.ते सर्व आर्टिफिशिअल(कृत्रिम)आहे.इथे खरे आहे.परमात्मा पिता येऊन ब्रह्मा द्वारे सर्व आत्म्यांना आपले बनवतात.त्यांची तर आवश्य भरपूर मुले असतील.सर्वजण शिवबाबांची मुले आहेत,सर्वजण त्यांची आठवण करतात.तरीही काही जण त्यांना मानत नाहीत,पक्के नास्तिक असतात-जे म्हणतात दुनिया संकल्पा पासून बनली आहे.तुम्हाला आता बाबा सांगत आहेत आम्ही शिकत आहोत-हे बुद्धीमध्ये लक्षात ठेवा. शिकवणारे शिवबाबा आहेत.हे रात्रंदिवस आठवणी मध्ये राहायला पाहिजे.हीच गोष्ट माया सतत विसरायला लावते म्हणून आठवणीत ठेवावी लागते.पिता, शिक्षक,गुरु तिघांनाही विसरून जातात.एकच आहे तरीही विसरून जातात.इथे रावणा सोबत लढाई आहे.बाबा म्हणतात-हे आत्म्यांनो तुम्ही सतोप्रधान होते आता तमोप्रधान बनले आहात.आत्मा जेव्हा शांतीधाम मध्ये होती तेव्हा पवित्र होती.पवित्र असल्याशिवाय कोणतीही आत्मा वरती राहू शकत नाही म्हणून सर्व आत्मे पतित-पावन बाबांना बोलवत राहतात.जेव्हा सर्वजण पतीत तमोप्रधान बनतात तेव्हा बाबा येऊन म्हणतात मी तुम्हाला सतोप्रधान बनवतो.तुम्ही जेव्हा शांतीधाम मध्ये होते,तेव्हा सर्व पवित्र होते.तिथे कोणतीही अपवित्र आत्मा राहू शकत नाही. सर्वांना सजा भोगून पवित्र अवश्य बनायचे आहे.पवित्र बनल्याशिवाय कोणीही परत जाऊ शकत नाही.कोणी असे म्हणतात,ब्रह्म मध्ये लीन झाला आमका ज्योत ज्योतीमध्ये सामावला.ही सर्व भक्तिमार्गाची अनेक मते आहेत.तुमची अद्वेत मत आहे.मनुष्यापासून देवता तर एक बाबाच बनवू शकतात.कल्प- कल्प बाबा शिकवण्यासाठी येतात.त्यांचे कार्य हुबेहूब कल्पा पूर्वीप्रमाणेच चालते.हे अनादी बनलेले नाटक आहे.सृष्टीचे चक्र फिरत राहते.सतयुग,त्रेता,द्वापर, कलियुग नंतर आहे हे संगमयुग. देवता,इस्लाम,बौद्ध, ख्रिश्चन हे मुख्य धर्म आहेत अर्थात ज्यांच्यामध्ये राजाई चालते. ब्राह्मणांची राजाई नसते, कौरवांची ही राजाई नसते.आता तुम्हा मुलांना सतत बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे. तुम्ही ब्राह्मणांनाही समजावून सांगू शकता.बाबांनी अनेक वेळा समजावले आहे-प्रथम ब्राह्मण चोटी(शेंडी)आहे,ब्रह्माची ची मुख्य वंशावली प्रथम तुम्ही आहात.हे तुम्ही जाणत आहात नंतर भक्ती मार्गामध्ये आम्हीच पूज्य पासून पुजारी बनतो.नंतर आता आम्ही पूज्य बनत आहोत. ते ब्राह्मण गृहस्थी असतात,न की संन्यासी.संन्यासी हटयोगी आहेत, घरदार सोडणे हट आहे ना.हटयोगी सुद्धा अनेक प्रकारचा योग शिकवतात.जयपुर मध्ये हटयोगीचें सुद्धा संग्रहालय आहे. राजयोगा चे चित्र नाहीत.राजयोगा चे चित्र इथे देलवाडा मध्ये आहेत.यांचे संग्रहालय तर नाही.हटयोगाचे किती संग्रहालय आहेत.राजयोगाचे मंदिर येथे भारतामध्येच आहे.हे चैतन्य आहे.तुम्ही इथे चैतन्या मध्ये बसले आहात.मनुष्यांना स्वर्ग कुठे आहे हे काहीच माहीत नाही. देलवाडा मंदिरामध्ये खाली तपस्या करण्यासाठी बसले आहेत,जसेच्या तसे प्रतीक(यादगार) बनवले आहेत. अवश्य स्वर्ग वरती दाखवायला पाहिजे.मनुष्याला असे वाटते कि स्वर्ग वरती आहे.हे तर चक्र फिरतच राहते.अर्ध्या कल्पा नंतर स्वर्ग खाली निघून जाईल पुन्हा अर्ध्या कल्पा नंतर स्वर्ग वरती येईल.याचे आयुष्य किती आहे हे कोणालाही माहीत नाही.बाबांनी तुम्हाला संपूर्ण चक्र समजावले आहे.तुम्ही ज्ञान घेऊन वरती जाता,चक्र पूर्ण होते पुन्हा नव्याने चक्र सुरू होईल.हे बुद्धीमध्ये चालायला पाहिजे.ज्याप्रमाणे ते शिक्षण घेत असतात तेव्हा बुद्धीमध्ये सर्व पुस्तक इ. आठवणीत राहतात ना.हे सुद्धा शिक्षण आहे.हे भरपूर असायला हवे,विसरायला नको.वृद्ध,तरुण, छोटी मुलं सर्वांना हे शिक्षण शिकण्याचा अधिकार आहे.फक्त अल्फ(परमात्म्याला) जाणायचे आहे.अल्फला जाणल्यानंतर पित्याची संपत्ती पण बुद्धीमध्ये येईल.जनावराच्या ही बुद्धीमध्ये मुलं इ.सर्व राहतात.जंगलामध्ये गेले तरीही घर आणि वासरे आठवणी मध्ये राहतात.स्वतः शोधून येतात.आता बाबा म्हणतात मुलांनो मामेकम(माझी आठवण करा)आणि घराची आठवण करा.जिथून तुम्ही भूमिका बजावण्यासाठी आले आहात.आत्म्याला आपले घर खूप आवडते.किती आठवण करत राहतात परंतु रस्ता विसरले आहेत.तुमच्या बुद्धी मध्ये आहे आम्ही खूप दूर राहतो.परंतु तिथे कसे जायचे असते,आम्ही का जाऊ शकत नाही,हे काहीच माहीत नाही,म्हणून बाबांनी सांगितले आहे भुलभुलय्या चा खेळ ही बनवतात जिथे जातो तिथे दरवाजा बंद होतो.आता तुम्ही जाणत आहात या लढाईनंतर स्वर्गाचा दरवाजा उघडतो.या मृत्यू लोकांमधून सर्वजण जातील,एवढे सर्व मनुष्य क्रमवार कर्मानुसार आणि भूमिके नुसार जाऊन राहतील. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत.मनुष्य ब्रह्म तत्वामध्ये जाण्यासाठी किती प्रयत्न करतात.आवाजाच्या पलीकडे जायचे आहे.आत्मा शरीरामधून निघून गेल्यावर आवाज राहत नाही.मुले जाणतात ते तर आमचे गोड घर आहे.देवतांची आहे गोड राजधानी,अद्वेत राजधानी.

बाबा येऊन राजयोग शिकवतात. सर्व ज्ञान समजावतात,ज्याचे नंतर भक्ती मार्गामध्ये शास्त्र इ. बसून बनवले आहेत.आता तुम्हाला ते शास्त्र इ.वाचण्याची गरज नाही.त्या शाळेमध्ये वृद्ध महिला इ.शिकू शकत नाहीत.इथे तर सर्वजण शिकतात.तुम्ही मुले अमरलोक मध्ये देवता बनतात, तिथे ज्यामुळे कोणाची ग्लानी(निंदा)होईल अशा प्रकारचे शब्द बोलले जात नाहीत.आता तुम्ही जाणत आहात स्वर्ग होऊन गेला आहे,त्याची महिमा आहे. किती मंदिरे बनवतात.त्यांना विचारा- लक्ष्मीनारायण केव्हा होऊन गेले आहेत? काहीही माहीत नाही.आता तुम्ही जाणत आहात आम्हाला आपल्या घरी जायचे आहे. मुलांना समजावले आहे-ओम चा अर्थ वेगळा आहे आणि हम सो हम चा अर्थ वेगळा आहे.त्यांनी परत सो हम सो चा अर्थ एकच केला आहे.तुम्ही आत्मा शांतीधाम ची राहणारी आहात नंतर अभिनय करण्यासाठी येता. देवता,क्षत्रिय,वैश्य,शूद्र बनता. ओम म्हणजे मी आत्मा.किती फरक आहे.ते लोक दोघांना एकच आहे असे म्हणतात.या बुद्धीने समजण्याच्या गोष्टी आहेत.ज्यांना पूर्णपणे समजलेले नाही असे लोक झोपत राहतात. कमाई मध्ये कधीही झोप येत नाही.ती कमाई तर अल्पकाळासाठी आहे.इथे तर अर्ध्या कल्पासाठी आहे.परंतु बुद्धी दुसरीकडे भटकल्यानंतर थकून जातात.आळस देत राहतात.तुम्हाला डोळे बंद करून बसायचे नाही.तुम्ही तर जाणता आत्मा अविनाशी आहे,शरीर विनाशी आहे.कलियुगी नर्कवासी मनुष्यांच्या पाहण्यामध्ये आणि तुमच्या पाहण्यांमध्ये रात्रंदिवसा चा फरक आहे.मी आत्मा बाबांच्या द्वारे शिकत आहे.हे कोणालाही माहीत नाही. ज्ञानसागर परमपिता परमात्मा येऊन शिकवत आहेत.मी आत्मा ऐकत आहे.स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश होतील. तुमची बुद्धी वरती निघून जाईल. शिवबाबा आम्हाला ज्ञान सांगत आहेत,यासाठी खूप शुद्ध बुद्धी असायला हवी.बुद्धी शुद्ध बनवण्यासाठी बाबा युक्ती सांगत आहेत-स्वतःला आत्मा समजल्याने बाबांची आठवण अवश्य येईल.स्वतःला आत्मा यासाठीच समजायचे आहे, बाबांची आठवण येईल संबंध राहील जो संपूर्ण कल्प तुटलेला आहे.तिथे तर प्रारब्ध आहे सुखच सुख आहे,दुःखाची गोष्ट नाही. त्याला स्वर्ग म्हणतात.स्वर्गाची रचना करणारा पिता स्वर्गाचे मालक बनवत आहे.अश्या पित्याला ही किती विसरून जातात.बाबा येऊन मुलांना दत्तक घेतात.मारवाडी लोक खूप दत्तक घेतात तर त्यांना खुशी होते ना-मी सावकाराच्या गोद मध्ये आलो आहे.साहूकाराचा मुलगा गरीबा जवळ कधीच जाणार नाही.ही प्रजापिता ब्रह्मा ची मुले आहेत तर अवश्य मुख वंशावली असतील ना.तुम्ही ब्राह्मण मुख वंशावली आहात.ते आहेत कुख वंशावली.हा फरक तुम्ही जाणू शकता.तुम्ही जेव्हा समजावून सांगाल तेव्हा मुख वंशावली बनतील.हे दत्तक घेणे आहे. पत्नीला समजतात माझी पत्नी. आता पत्नी कूख वंशावली आहे का मूख वंशावली?पत्नी मुख वंशावली आहे.नंतर जेव्हा मुले होतात ती आहेत कूख वंशावली. बाबा म्हणतात ही सर्व मुख वंशावली मुले आहेत,माझ्या सांगण्याने हे माझे बनले आहेत ना.माझी मुले आहेत असे म्हटल्यानंतर नशा चढतो.तर ही सर्व मुख वंशावली आहेत आत्मे थोडीच मुख वंशावली आहेत. आत्मा तर अनादी-अविनाशी आहे.तुम्ही जाणत आहात ही मनुष्य सृष्टी कशाप्रकारे बदलत आहे.मुद्दे(पॉईंट्स)तर मुलांना खूप मिळतात.तरीही बाबा म्हणतात- दुसरे काही धारणा होत नसेल, मुख चालत नसेल तर तुम्ही बाबांची आठवण करत राहा तर तुम्ही भाषण इ.करणाऱ्यांपेक्षा ही उच्चपद प्राप्त करू शकता. काहीवेळा भाषण करणारे सुद्धा वादळामध्ये खाली घसरतात.ते घसरले नाहीत,बाबांची आठवण करत राहिले तर उच्चपद प्राप्त करू शकतात.सर्वात जास्ती जे विकारांमध्ये घसरतात ते पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांची हाडे ही तुटतात.देह- अभिमान पाचवा मजला आहे. कामविकार चौथा मजला आहे नंतर उतरत येतात.बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे. बाबा आम्ही खाली घसरलो असेही लिहितात.क्रोधा साठी आम्ही खाली घसरलो असे म्हणत नाहीत.काळे तोंड केल्याने खूप घाव बसतो नंतर दुसऱ्याला काम महाशत्रू आहे असे म्हणू शकत नाहीत.बाबा सतत समजावून सांगतात-वाईट दृष्टीला खूप सांभाळायचे आहे.सतयुगामध्ये निवस्त्र होण्याची गोष्टच नाही. वाईट नजर जात नाही.दृष्टी पवित्र बनते.ते पवित्र राज्य आहे.ही दुनिया खूप खराब आहे.आता तुमच्या आत्म्याला पवित्र नेत्र मिळत आहेत जे 21 जन्म काम करतात.तिथे कुणीही खराब बनत नाही.मुख्य गोष्ट बाबा समजावत आहेत बाबांची आठवण करा आणि 84च्या चक्राची आठवण करा.हे सुद्धा आश्चर्य आहे जे श्री नारायण आहेत तेच अंता मध्ये येऊन भाग्यशाली रथ बनतात.ब्रह्मा सो विष्णू,विष्णू सो ब्रह्मा,हा 84 जन्मांचा इतिहास बुद्धीमध्ये ठेवायचा आहे.अच्छा!

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. बाबांच्या आठवणीने बुद्धीला शुद्ध बनवायचे आहे.बुद्धी शिक्षणाने सदैव भरपूर रहावी. पिता आणि घर सदैव आठवणीत ठेवायचे आहे आणि दुसऱ्यांना आठवण करून द्यायची आहे.

2. या अंतिम जन्मांमध्ये खराब दृष्टीला समाप्त करून पवित्र दृष्टी बनवायची आहे.वाईट दृष्टी जायला नको यासाठी स्वतःला खूप सांभाळायचे आहे.

वरदान:-
आठवण आणि सेवेच्या संतुलना द्वारे चढत्या कलेचा अनुभव करणारे राज्य अधिकारी भव

आठवण आणि सेवेचे संतुलन असेल तर प्रत्येक पावला मध्ये चढत्या कलेचा अनुभव करत रहाल.प्रत्येक संकल्पा मध्ये सेवा असेल तर व्यर्थ पासून दूर रहाल. सेवा जीवनाचे एक अंग बनायला हवे ज्याप्रमाणे शरीरामध्ये सर्व अंग आवश्यक आहेत त्याप्रमाणे ब्राह्मण जीवनाचे विशेष अंग सेवा आहे.जास्त सेवेचा चान्स मिळणे, स्थान मिळणे,सोबत मिळणे हीसुद्धा भाग्याची निशाणी आहे. अशाप्रकारे सेवेची सुवर्णसंधी घेणारे राज्य अधिकारी बनतात.

बोधवाक्य:-
परमात्म प्रेमाच्या पालने चे स्वरूप आहे-सहजयोगी जीवन.