26-10-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवण्याची सेवा करायची आहे.प्रथम स्वतः
निर्विकारी बनायचे आहे नंतर दुसऱ्यांना सांगायचे आहे."
प्रश्न:-
तुम्ही महावीर
मुलांनी कोणत्या गोष्टीची पर्वा करायची नाही?फक्त कोणत्या गोष्टींची तपासणी करून
स्वतःला सांभाळायचे आहे?
उत्तर:-
जर कोणी पवित्र बनण्यामध्ये विघ्न टाकत असेल तर तुम्हाला त्याची पर्वा करायची
नाही.फक्त तपासून पहा कि मी महावीर आहे का? मी स्वतःला फसवत तर नाही?बेहद चे
वैराग्य राहते का? मी आप समान बनवतो का? माझ्यामध्ये क्रोध तर नाही? जे दुसऱ्यांना
सांगतो ते स्वतःही करतो का?
गीत:-
तुम्हे पाके
हमने……
ओम शांती।
इथे बोलण्याची गरज नाही,या समजण्याच्या गोष्टी आहेत.गोड गोड आत्मिक मुले समजत आहेत
की आम्ही ही पुन्हा एकदा देवता बनत आहोत.संपूर्ण निर्विकारी बनत आहोत.बाबा येऊन
सांगतात-मुलांनो,काम विकाराला जिंका म्हणजे पवित्र बना.मुलांनी गीत ऐकले.आता पुन्हा
एकदा मुलांना आठवण झाली आहे.आम्ही बेहदच्या पित्याकडून बेहदचा वारसा घेत आहोत,जो
कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही,तिथे दुसरे कोणी हिसकाऊन घेणारे नसतात.त्याला अद्वेत
राज्य असे म्हटले जाते.नंतर पुन्हा रावण राज्य दुसऱ्याचे असते.तुम्ही आता समजावून
घेत आहात.अशाप्रकारे समजावयाचे आहे.आम्ही पुन्हा एकदा श्रीमतावर भारताला निर्विकारी
बनवत आहोत.उच्च ते उच्च ईश्वर आहेत,असे सर्वजण म्हणतात.त्यांनाच पिता असे म्हटले
जाते.तर हेही समजवायचे आहे, भारत जो संपूर्ण निर्विकारी स्वर्ग होता आता तो विकारी
नर्क बनला आहे.नंतर आम्ही श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवत आहोत.बाबा जे सांगतात ते
लिहून घ्या नंतर त्यावर विचार सागर मंथन करून लिहिण्यासाठी मदत करायला पाहिजे.असे
काय काय लिहावे,ज्यामुळे लोकांना समजेल बरोबर भारत स्वर्ग होता?रावणाचे राज्य
नव्हते.मुलांच्या बुद्धी मध्ये आहे-आता आम्हा भारतवासीयांना बाबा निर्विकारी बनवत
आहेत.प्रथम स्वतःला पाहायचे आहे-आम्ही निर्विकारी बनलो आहोत का?मी ईश्वराला फसवत तर
नाही?असे नाही की ईश्वर आम्हाला थोडेच पाहतात.तुमच्या मूखातून असे शब्द निघू शकत
नाहीत.तुम्ही जाणता पवित्र बनवणारा पतित-पावन एकच पिता आहे.भारत पवित्र होता तेव्हा
स्वर्ग होता.हे देवी-देवता संपूर्ण निर्विकारी आहेत.जसे राजाराणी असतील तशीच प्रजा
असेल,म्हणून तर संपूर्ण भारताला स्वर्ग म्हटले जाते.आता नर्क आहे.ही ८४ जन्मांची
सीढ़ी खूप चांगली वस्तु आहे.एखाद्या चांगल्या व्यक्तीला भेट सुद्धा देऊ शकतो.मोठ्या
मोठ्या लोकांना मोठी भेटवस्तू दिली जाते ना.तर तुम्हीही जे येतात त्यांना समजावून
अशा प्रकारची भेट वस्तू देऊ शकता.भेटवस्तू तयारच असतात. तुमच्याजवळ ज्ञान असायला
पाहिजे.सीढीमध्ये पूर्ण ज्ञान आहे.आम्ही कशा प्रकारे ८४ जन्म घेतले आहेत-हे
आठवणीमध्ये राहायला हवे. या समजण्याच्या गोष्टी आहेत.अवश्य जे सुरुवातीला आलेले
आहेत त्यांनी 84 जन्म घेतले आहेत.बाबा 84 जन्म सांगून नंतर म्हणतात यांच्या खूप
जन्मांच्या अंता मध्ये साधारण शरीरामध्ये मी प्रवेश करतो.नंतर यांचे नाव ब्रह्मा असे
ठेवतो.यांच्याद्वारे ब्राह्मणांची रचना करतो.नाहीतर ब्राह्मण कुठून आणू.ब्रह्मा चा
पिता कोण आहे हे कधी ऐकले आहे का?नक्की ईश्वर आहे असेच म्हणतात.ब्रह्मा आणि विष्णू
यांना सूक्ष्म वतन मध्ये आहेत असे दाखवतात.बाबा तर म्हणतात मी याच्या 84 जन्मांच्या
अंता मध्ये प्रवेश करतो.दत्तक घेतल्यानंतर नाव बदलले जाते.संन्यासही करून घेतला जातो.
संन्यासी पण जेव्हा संन्यास करतात,तर लगेच विसरून जात नाहीत, आठवण अवश्य येत
राहते.तुम्हालाही आठवण येते परंतु त्यांच्याविषयी वैराग्य आहे, कारण की तुम्ही जाणता
हे सर्व नष्ट होणार आहे, परत आम्ही त्यांची आठवण का करावी.ज्ञानाद्वारे सर्व काही
चांगल्या प्रकारे समजावून घ्यायचे आहे.ते सुद्धा ज्ञान घेतल्यानंतर घरदार सोडून
देतात.त्यांना जर विचारले तुम्ही घरदार कशाप्रकारे सोडले तर सांगत नाहीत.नंतर
त्यांना युक्तीने सांगितले जाते-तुम्हाला कशाप्रकारे वैराग्य आले आहे आम्हालाही
सांगा मग आम्हीही असे करू.तुम्ही त्यांना प्रलोभन देता की पवित्र बना बाकी तर
तुमच्या सर्व आठवणी मध्ये आहे.लहानपणापासून आत्तापर्यंतचे सर्वकाही सांगू
शकता.बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे. कशाप्रकारे हे सर्वजण नाटकातील कलाकार आहेत जे
अभिनय करत आले आहेत.आता सर्वांचे कलियुगी कर्मबंधन सुटणार आहेत.नंतर शांतीधाम मध्ये
जातील. तिथून परत सर्वांचा नवीन संबंध सुरू होईल. समजावण्यासाठी बाबा चांगले चांगले
मुद्दे देत राहतात. हे भारतवासी आदी सनातन देवी-देवता धर्माचे होते पवित्र होते
परंतु ८४ जन्मानंतर अपवित्र बनले आहेत.आता परत पवित्र बनायचे आहे.परंतु पुरुषार्थ
करवणारा पाहिजे.आता तुम्हाला बाबांनी सांगितले आहे. बाबा म्हणतात तुम्ही तेच
आहात.मुलेही म्हणतात बाबा तुम्ही तेच आहात.बाबा म्हणतात कल्पा पूर्वीही तुम्हाला
शिकवून राज्य भाग्य दिले होते.कल्प कल्प असेच करत राहणार.नाटकामध्ये जे काही
झाले,विघ्न पडले,नंतरही पडणार आहेत.जीवनामध्ये काय काय होते, आठवणीमध्ये तर राहते
ना.यांच्या तर सर्व लक्षात आहे. सांगतातही गावामधला मुलगा होतो आता स्वर्गाचे मालक
बनलो.स्वर्गामध्ये गाव कसे असेल-हेही तुम्ही आता जाणत आहात.या वेळी तुमच्यासाठी ही
जुनी दुनिया गावच आहे ना.कुठे स्वर्ग,कुठे हा नर्क.मनुष्य तर मोठे मोठे महल इमारती
इत्यादी पाहून समजतात हाच स्वर्ग आहे.बाबा म्हणतात हे तर सर्व दगड-माती आहे,याचे
काहीही मूल्य नाही.सर्वात जास्त हिऱ्याचे मूल्य असते.बाबा म्हणतात विचार करा
सतयुगामध्ये तुमचे सोन्याचे महल कशाप्रकारे होते.तिथे तर सर्व खाणी भरलेल्या
असतात.भरपूर सोने असते.तर मुलांना किती खुशी व्हायला पाहिजे.कधी नाराज झाले, तर
बाबांनी समजावले आहे, काही अशा प्रकारचे गिते आहेत जे ऐकल्यानंतर तुमचे मन लगेच
आनंदित होईल.सर्व ज्ञान बुद्धी मध्ये येईल.तुम्ही समजता बाबा आम्हाला विश्वाचे मालक
बनवत आहेत.ते कधी कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.अर्ध्या कल्पा साठी आम्ही सुखधाम चे
मालक बनत आहोत.राजाचा मुलगा समजतो आम्ही या हदच्या राजाईचे वारस आहोत. तुम्हाला किती
नशा असायला हवा-आम्ही बेहद्च्या पित्याचे वारस आहोत.बाबा स्वर्गाची स्थापना करत
आहेत आम्ही २१ जन्माचे वारस बनत आहोत.किती खुशी व्हायला पाहिजे.ज्याचे वारस बनत
आहोत अवश्य त्याची आठवण करायला पाहिजे.आठवण केल्याशिवाय तर वारस बनू शकत नाही.आठवण
केली तर पवित्र बनाल आणि तरच वारस बनू शकाल.तुम्ही जाणत आहात श्रीमतावर आम्ही
विश्वाचे मालक दुहेरी ताजधारी बनत आहोत.जन्म जन्मांतर आम्ही राज्य करू.मनुष्य भक्ती
मार्गामध्ये विनाशी दान पुण्य करतात. तुमचे अविनाशी ज्ञान धन आहे.तुम्हाला किती मोठी
लॉटरी मिळत आहे.कर्मानुसार फळ मिळत असते ना. कुणी मोठा राजाचा मुलगा असेल तर मोठी
हदची लॉटरी मिळाली असे म्हणू शकतो.ज्यांचा एक ताज आहे ते सर्व विश्वाचे मालक बनू
शकत नाहीत.डबल ताज वाल्या विश्वाचे मालक तुम्ही बनत आहात. त्यावेळी दुसऱ्या कोणाचेही
राज्य नसते.बाकीचे सर्व धर्म नंतर येतात.जोपर्यंत त्यांची वृद्धी होत असते तोपर्यंत
सुरुवातीचे राजे विकारी बनल्यामुळे मतभेद झाल्यामुळे वेगळेवेगळे तुकडे
होतात.सुरुवातीला तर संपूर्ण विश्वामध्ये एकच राज्य होते.हे मागच्या जन्माचे फळ
आहे,असे तिथे कोणीही म्हणत नाही.आता बाबा तुम्हा मुलांना श्रेष्ठ कर्म शिकवत आहेत.जो
जसे कर्म करेल, सेवा करेल त्याची परतफेड ही अशीच मिळेल.कर्म नेहमी चांगलेच करायला
हवे.कसे कर्म केले पाहिजेत हे समजत नसेल तर त्यासाठी श्रीमत घ्यायला पाहिजे. सतत
पत्र लिहून विचारायला पाहिजे. प्रधानमंत्री असतील तरीही, तुम्ही समजू शकता, त्यांना
किती पत्र येत असतील.परंतु ते काही एकटेच वाचत नसतील. त्यांच्यासमोर अनेक सचिव
असतात,तेच सर्व पत्र पहात असतात.जे पत्र खूप महत्त्वाचे असेल तरच ते
प्रधानमंत्र्यांच्या टेबलावरती ठेवतात.इथे ही असेच होते. महत्त्वाच्या पत्रांचे
उत्तर लगेच दिले जाते. बाकीच्यांसाठी प्रेमपूर्ण आठवण असे लिहिले जाते.एकेकाला वेगळे
बसून पत्र लिहावे असे तर होऊ शकत नाही,खूप अवघड आहे.मुलांना किती खुशी होते-ओहो! आज
बेहदच्या पित्याची चिठ्ठी आली आहे.शिवबाबा ब्रह्माद्वारे प्रति उत्तर देतात.मुलांना
खूप आनंद होतो.सर्वात जास्त बंधनांमध्ये असणाऱ्या मातांना आनंद होतो.ओहो! आम्ही
बंधनांमध्ये आहोत बेहदचे पिता आम्हाला कशाप्रकारे पत्र लिहितात.डोळ्यांवर पत्र
ठेवतात.अज्ञान काळामध्ये ही पतीला परमेश्वर समजणाऱ्या स्त्रिया पतीचे पत्र
आल्यानंतर त्याचे चुंबन घेतात.तुमच्या मध्ये ही बापदादांचे पत्र पाहिल्यानंतर काही
मुलांना एकदम शहारे येतात,प्रेमाचे अश्रू येतात.चुंबन घेतात,डोळ्यांवर ठेवतात,खूप
प्रेमाने पत्र वाचतात.बंधना मधल्या माता काय कमी आहेत का.काही मुलांवर माया विजय
मिळवते.काही तर समजतात आम्हाला अवश्य पवित्र बनायचे आहे.भारत पवित्र होता आता
अपवित्र बनला आहे.कल्पा पूर्वीप्रमाणे जे पवित्र बनले असतील तेच पवित्र बनण्याचा
पुरुषार्थ करतील.तुम्हा मुलांना समजावणे खूप सोपे आहे.तुमचेही हेच नियोजन आहे ना.
गीतेचे युग चालू आहे.गीतेच्याच पुरुषोत्तम युगाचे गायन आहे.तुम्ही गीतेचे
पुरुषोत्तम युग आहे, असे लिहा. याच वेळी जुनी दुनिया बदलून नवी बनते.तुमच्या
बुद्धीमध्ये आहे बेहदचा पिता जो आमचा शिक्षकही आहे त्यांच्याद्वारे आम्ही राजयोग
शिकत आहोत. चांगल्या रीतीने शिकाल तर डबल शिरताज बनाल. किती मोठी शाळा आहे राजाई
स्थापन होत आहे. अवश्य प्रजाही अनेक प्रकारची असेल.राजाईची वाढ होत राहील.कमी ज्ञान
घेणारे शेवटी येतील.जो जसा पुरुषार्थ करेल तो पहिल्यांदा येईल.हा सर्व बनलेला खेळ
आहे.हे नाटकाचे चक्र पुनरावृत्त होत राहते ना. आता तुम्ही बाबांकडून वारसा घेत
आहात.बाबा म्हणतात पवित्र बना.यामध्ये कोणी विघ्न टाकत असेल तर त्याची परवा करू
नका.भाकरी तुकडा तर मिळू शकतो ना.मुलांनी पुरुषार्थ करायला पाहिजे तरच आठवण
राहील.बाबा भक्तिमार्गाचे उदाहरण सांगतात- पूजा करत असताना बुद्धी योग बाहेर जात
होता, तर स्वतःचा कान पकडत होते,थप्पड मारत होते.आता हे ज्ञान आहे यामध्ये आठवण
करण्याची गोष्ट मुख्य आहे. आठवण राहिली नाही तर स्वतःला थप्पड मारायला पाहिजे.माया
माझ्यावर विजय का मिळवते.मी एवढा कच्चा आहे का.मला तर यांच्यावर विजय मिळवायचा
आहे.स्वतःच स्वतःला चांगल्या प्रकारे सांभाळायचे आहे.स्वतःला विचारा मी एवढा महावीर
आहे का? इतरांनाही महावीर बनवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. जेवढे अनेकांना आप समान
बनवाल तेवढा उंच दर्जा मिळेल.आपले राज्य भाग्य घेण्यासाठी,स्पर्धा करायची आहे.जर
आमच्या मध्येच क्रोध असेल तर इतरांना कसे सांगू शकतो की क्रोध करू नका.खरेपणा झाला
नाही ना.लाज वाटायला पाहिजे. दुसऱ्यांना समजावून ते उच्च बनतात,आम्ही खालीच राहतो
याला पुरूषार्थ म्हणायचे का!(पंडिताची गोष्ट) बाबांची आठवण करत तुम्ही या विषय सागरा
मधून क्षीरसागरामध्ये जाता.बाकी ही सर्व उदाहरणे बाबा बसून समजावत आहेत, जे नंतर
भक्ती मार्गामध्ये पुनरावृत्त होतात.भ्रमरी चेही उदाहरण आहे.तुम्ही ब्राह्मणी आहात
ना,बी.के.तर खरे खरे ब्राह्मण आहेत.प्रजापिता ब्रह्मा कुठे आहेत?नक्कीच येथे असेल
ना.तिथे थोडीच असेल.तुम्हा मुलांना खूप हुशार बनायला पाहिजे.मनुष्यांना देवता
बनवण्याचा बाबांचा प्लॅन आहे.हे चित्र पण समजावण्यासाठी आहेत.यामध्ये लिखावट पण
अशाप्रकारची असायला पाहिजे.गीतेच्या भगवानाचा हा प्लॅन आहे ना.आम्ही ब्राह्मण शेंडी
आहोत.एका ची गोष्ट थोडीच आहे.प्रजापिता ब्रह्मा तर शेंडी ब्राह्मणांची झाली
ना.ब्रह्मा आहे ब्राम्हणांचा पिता.यावेळी खूप मोठा परिवार असेल ना.तुम्हीच नंतर दैवी
परिवारामध्ये येता.यावेळी तुम्हाला खूप खुशी होत आहे कारण की लॉटरी मिळत आहे.तुमचे
खूप नाव आहे.वंदे मातरम,शिवाची शक्ती सेना तुम्ही आहात ना. ते सर्व खोटे आहे.खूप
असल्यामुळे गोंधळून जातात म्हणून राजधानी स्थापन करण्यामध्ये मेहनत लागते. बाबा
म्हणतात हे नाटक बनलेले आहे.यामध्ये माझी सुद्धा भूमिका आहे.मी सर्वशक्तिमान
आहे.माझी आठवण केल्यामुळे तुम्ही पवित्र बनता.सर्वात जास्त चुंबक शिवबाबा आहे,तो
सर्वात उंच राहतो.अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. सदैव या
नशेमध्ये किंवा खुशी मध्ये राहायचे आहे की आम्ही 21 जन्मां साठी बेहद च्या बाबांचे
वारस बनलो आहोत.ज्यांचे वारस बनलो आहोत त्यांची आठवणही करायची आहे आणि पवित्र ही
अवश्य बनायचे आहे.
2. बाबा जे श्रेष्ठ कर्म शिकवत आहेत,तेच कर्म करायचे आहे.श्रीमत घेत राहायची आहे.
वरदान:-
मन्सा वर
पूर्ण लक्ष देणारे चढत्या कलेचे अनुभवी विश्व परिवर्तक भव
आता शेवटच्या
वेळेमध्ये मन्सा द्वारे विश्व परिवर्तनाच्या निमित्त बनवायचे आहे त्यासाठी आता
मन्सेचा एकही संकल्प व्यर्थ गेला तर खूप काही गेले,एक संकल्प ही साधारण गोष्ट समजू
नका,वर्तमान काळी संकल्पांची हलचल सुद्धा खूप मोठी हलचल मानली जाते कारण आता वेळ
बदलली आहे,पुरुषार्थाची गतीही बदलली आहे तर संकल्पा मध्येच पूर्णविराम पाहिजे.जेव्हा
मन्सा वरती एवढे लक्ष राहील तेव्हाच चढत्या कलेद्वारे विश्व परिवर्तक बनू शकाल.
बोधवाक्य:-
कर्मामध्ये
योगाचा अनुभव होणे अर्थात कर्मयोगी बनणे.