21-10-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, रोज रात्री आपला जमा खर्च पहा, नोंदवही ठेवा, तर भीती राहील कि, कुठे
नुकसान तर होत नाही."
प्रश्न:-
कल्पापूर्वी
च्या भाग्यशाली मुलांना, बाबाची कोणती गोष्ट लगेच समजून येईल?
उत्तर:-
बाबा रोज रोज मुलांना आठवणीत राहण्याचसाठी ज्या युक्त्या सांगत आहेत, त्या भाग्यशाली
मुलांनाच समजून येतील. ते त्याना लगेच अंमलामध्ये आणतील. बाबा म्हणतात, मुलांनो,
कांहीवेळ एकांता मध्ये बागेत जाऊन बसा. बाबा बरोबर गोड गोड गोष्टी करा, स्वतःचा
चार्ट ठेवा म्हणजे दिनचर्या लिहायची तर प्रगती होत राहील.
ओम शांती।
सैन्यांला प्रथम सावधान केले जाते कि, कृपया लक्ष द्या. बाबा पण मुलांना म्हणतात
कि, स्वतःला आत्मा निश्चय करून, बाबाची आठवण करता का ? मुलांना समजावले आहे कि, हे
ज्ञान बाबा या वेळेतच देत आहेत. बाबा शिकवत आहेत. भगवानुवाच आहे ना, मूळ गोष्ट ही
आहे कि, भगवान कोण आहे? कोण शिकवत आहेत? ही गोष्ट प्रथम समजणे आणि निश्चय करावयाची
आहे. मग अतिंद्रिय सुखामध्ये पण राहायचे आहे. आत्म्याला फार खुशी झाली पाहिजे.
आम्हाला बेहदचे बाबा मिळाले आहेत. बाबा एक वेळेस येऊन, भेटत आहेत वरसा देण्यासाठी.
कशाचा वारसा? विश्वाच्या बादशाहीचा वारसा देत आहेत. पाच हजार वर्षापूर्वी प्रमाणे.
हा तर पक्का निश्चय आहे कि, बाबा आले आहेत आणि सहज राजयोग शिकवत आहेत, शिकवावे लागते.
मुलांना काही शिकवले जात नाही. स्वतःच मुखातून मम्मा बाबा निघते,कारण अक्षर तर ऐकत
आहेत ना. हे आत्मिक पिता आहेत. आत्म्याला आंतरिक गुप्त नशा राहतो. आत्म्यालाच
शिकायचे आहे. परमपिता परमात्मा तर ज्ञानाचे सागर आहेतच. ते काही शिकलेले नाहीत.
त्यांच्या मध्ये ज्ञान आहेच, कशाचे ज्ञान आहे? हे पण तुमची आत्मा समजत आहे. बाबा
मध्ये सर्व सृष्टीच्या आदि मध्य अंताचे ज्ञान आहे. कसे एका धर्माची स्थापना आणि
अनेक धर्माचा विनाश होत आहे. हे सर्व जाणत आहेत, त्यामुळे त्यांना जानी जाननहार
म्हटले जाते. जानी जाननहार चा अर्थ काय आहे? हे कोणी पण बिल्कुल जाणत नाहीत. आता
तुम्हा मुलांना बाबानी समजावले आहे कि, हे बोधवाक्य पण जरूर लावा कि, मनुष्य होऊन
जर रचनाकार आणि रचनेच्या आदि,मध्य,अंताचा कालावधी, पुनरावृतीला नाही ओळखले, तर काय
म्हणावे... हे पुनरावृत्ती अक्षर पण फार जरूरीचे आहे. सुधारणा तर होत राहते
ना.गीतेचा भगवान कोण... हे चित्र फार उत्तम आहे. साऱ्या जगामध्ये ही नंबर एकची चूक
आहे. परमपिता परमात्माला न ओळखल्यामुळे मग म्हणतात कि, सर्व भगवानाची रूपे आहेत. जसे
लहान मुलाला विचारले जाते कि, तु कोणाचा मुलगा आहे? म्हणतो अमक्याचा. अमका कोणाचा
मुलगा? फलाण्याचा. मग म्हणतात,तो आमचा मुलगा आहे. तसे हे पण भगवानाला जाणत नाहीत,
तर म्हणतात आम्हीच भगवान आहोत.एवढी पूजा पण करतात, परंतु समजत नाहीत. गायन केले जाते
कि, ब्रह्माची रात्र ,तर जरुर ब्राह्मण ब्राह्ममणी ची पण रात्र असेल. या सर्व धारण
करण्याच्या गोष्टी आहेत. ही धारणा त्यांनाच होईल,जे आठवणी मध्ये राहतात. आठवणी ला
बळ म्हटले जाते. ज्ञान तर कमाईचे साधन आहे. आठवणीमुळे शक्ती मिळते, ज्यामुळे विकर्म
विनाश होतात. तुम्हाला बुद्धीचा योग बाबा बरोबर लावायचा आहे. हे ज्ञान बाबा आताच
देत आहेत नंतर कधी मिळत नाही. बाबा शिवाय कोणी देऊ शकत नाही. बाकी सर्व
भक्तिमार्गाचे शास्त्र आहेत, कर्मकांड इत्यादी क्रिया आहेत. त्याला ज्ञान म्हणत
नाहीत. अध्यात्मिक ज्ञान एका बाबा जवळ आहे, आणि ते ब्राह्मणांना देत आहेत. आणखीन
कोणाजवळ अध्यात्मिक ज्ञान असत नाही. दुनिया मध्ये किती धर्म मठ पंथ आहेत, किती मते
आहेत. मुलांना समजावण्या साठी किती मेहनत करावी लागते. किती वादळ येतात. गायन पण आहे
कि, माझी नाव पार लावा. सर्वांची नाव तर पार लागत नाही. कोणाची बुडून पण जाते,
कोणाची उभी राहते. दोन-तीन वर्ष होतात, कोणाचा पत्ता पण नाही. कोणीतर जिर्ण जिर्ण
होऊन जातात. कोणी तिथेच उभे राहतात, या मध्ये मेहनत फार आहे. नकली योग पण किती
निघाले आहेत. किती आश्रम आहेत. आत्मिक योग आश्रम कुठे नाही. बाबाच येवून आत्म्याला,
आत्मिक योग शिकवत आहेत. बाबा म्हणतात कि, हा तर फार सहज योग आहे. या सारखे सोपे
काहीच नाही. आत्माच शरीरा मध्ये येऊन अभिनय करत आहे. जास्तीत जास्त 84 जन्म आहेत,
मग कमी कमी होत जातात. या गोष्टी पण तुम्हा मुलांपैकी, कांही जणांच्या बुद्धीमध्ये
आहेत. बुद्धी मध्ये धारणा करण्यास कष्ट होतात.पहिली गोष्ट बाबा समजावत आहेत कि, कुठे
पण गेला, तरी प्रथम बाबाचा परिचय द्या. बाबाचा परिचय कसा द्यायचा, त्यासाठी युक्ती
पण रचली जाते.ते पण जेंव्हा निश्चय होईल, ते़व्हा समजतील बाबा तर सत्य आहेत. बाबा
जरूर सत्य गोष्टी सांगतील. यामध्ये संशय आला नाही पाहिजे. आठवणी मध्येच मेहनत आहे,
यामध्ये माया विघ्न घालते. वारंवार आठवण विसरून टाकते, त्यामुळे बाबा म्हणतात कि,
चार्ट लिहा. तर बाबा पण पाहतील कि, कोण किती आठवण करत आहे. 25 टक्के पण चार्ट ठेवत
नाहीत. का़ही तर म्हणतात कि, आम्ही सारा दिवस आठवणी मध्ये राहतो. बाबा म्हणतात, हे
फार अवघड आहे. साऱा दिवस-रात्र ज्या बंधनयुक्त आहेत,ज्या मार पण खातात, त्या आठवणी
मध्ये राहतात, शिवबाबा कधी त्या संबंधापासून मुक्त होऊ? आत्मा बोलावत आहे, बाबा
आम्ही बंधनापासून कसे सुटू. जर कोणी फार आठवण करत असेल, तर बाबा कडे चार्ट पाठवा.
सूचना देतात कि, रोज रात्रीला आपला जमाखर्च काढा. डायरी ठेवा. डायरी ठेवल्यामुळे,
भीती राहील, आमचे नुकसान तर होत नाही. बाबा पाहतील तर काय म्हणतील, एवढ्या अति
प्रिय बाबाची थोडाच वेळ आठवण करतो! लौकिक पित्याला, पत्नीला, तुम्ही आठवण करता, माझी
एवडी थोडी पण आठवण करत नाहीत.चार्ट ठेवला तर स्वतःलाच लाज वाटेल. या अवस्थे मध्ये,
मी पद प्राप्त करू शकत नाही, त्यामुळे बाबा चार्ट वर जोर देत आहेत. बाबाला आणि 84
जन्माच्या चक्राला आठवण करायचे आहे, तर मग चक्रवर्ती राजा बनाल. आपल्या सारखे बनविले,
तर प्रजेवर राज्य कराल. हा आहेच राजयोग, नरापासून नारायण बनण्यासाठी. मुख्य लक्ष्य
हे आहे. आत्म्याला पाहू शकत नाहीत, समजावून घ्यावे लागते. यामध्ये आत्मा आहे, हे पण
समजावे लागते. या लक्ष्मी-नारायणाची राजधानी जरूर होती. यांनी सर्वात जास्त मेहनत
घेतली आहे, तेंव्हा शिष्यवृत्ती मिळाली आहे. जरूर यांची फार प्रजा असेल. सर्वोच्च
पद प्राप्त केले आहे, जरूर जास्त आठवण केली असेल, तेव्हा तर सन्मानाने पास झाले
आहेत. हे पण शोधून काढले पाहिजे कि, आमचा योग का लागत नाही? धंदा इत्यादीच्या झंझट
मध्ये बुद्धी फार चालते. त्यामधून वेळ काढून, या बाजूला जास्त लक्ष दिले पाहिजे.
कांही वेळ काढून बागेमध्ये एकांतात बसले पाहिजे. स्त्रिया तर जाऊ शकत नाहीत. त्यांना
तर घर सांभाळावे लागते. पुरुषांना सोपे आहे. कल्पपूर्वीचे जे, भाग्यशाली आहेत,
त्यांनाच हे समजून येईल. शिक्षण तर फार चांगले आहे. बाकी प्रत्येकाची आपली बुद्धी
आहे. कसे पण करून बाबाकडून वरसा घ्यायचा आहे. बाबा सर्व सूचना देत आहेत. करायचे तर
मुलांनाच आहे. बाबा सूचना सर्वासाठी देतात.एक एकाने वैयक्तिक येऊन पण कोणी विचारले,
तर त्यांना मत देऊ शकतात. तीर्थ यात्रेवर मोठ्या डोंगरावर जातात, तर मार्गदर्शक लोक,
सावधान करत राहतात. फार मुश्किलीने जातात. तुम्हा मुलांना तर बाबा फार सोप्या
युक्त्या सांगत आहेत. बाबांची आठवण करायचे आहे. शरीराचे भान नष्ट करायचे आहे. बाबा
म्हणतात माझी आठवण करा. बाबा येऊन ज्ञान देऊन निघून जातात. आत्म्या सारखे तीव्र
रॉकेट आणखीन कोणते असत नाही. ते लोक चंद्रावर इत्यादी ठिकाणी जातात, तर किती वेळ
वाया घालवतात. हे पण विश्व नाटकांमध्ये नोंदलेले आहे. तो सायन्सचा घमंड पण विनाशा
साठी मदत करत आहे. ते सायन्स आहे, तुमचे सायलेन्स (शांती )आहे. स्वतःला आत्मा समजून,
बाबांची आठवण करायची आहे.ही डेड सायलेन्स (मृतवत शांती)आहे. मी आत्मा शरीरा पासून
वेगळी आहे. हे शरीर जुनी चप्पल आहे. साप, कासवाचे उदाहरण पण तुमच्यासाठी आहे.
तुम्हीच किड्या सारख्या मनुष्याला, भू भू करून, मनुष्या पासून देवता बनवत आहात.
विषय सागरा तून्,क्षिरसागरा कडे घेऊन जाणे, तुमचे काम आहे. संन्याशाला हे यज्ञ तप
इत्यादी कांही पण करायचे नाही. भक्ती आणि ज्ञान हे गृहस्थी साठी आहे. त्यांना तर
सतयुगा मध्ये यायचेच नाही. निवृतीमार्ग वाले या गोष्टीला काय जाणतील हे पण विश्व
नाटकांमध्ये नोंदलेले आहे, ज्यांनी पूर्ण 84 जन्म घेतले आहेत, तेच नाटकानुसार येत
राहतील. यामध्ये पण क्रमवारीने निघतात. माया फार प्रबळ आहे.डोळे फार विकारी आहेत.
ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाल्यामुळे, डोळे निर्विकारी बनतात, मग अर्धाकल्प कधी विकारी
बनत नाहीत. डोळे फार धोकेबाज आहेत. तुम्हीं जेवढी बाबाची आठवण कराल, तेवढी
कर्मेंद्रिये शीतल होतील.परत 21 जन्म कर्मेंद्रियांची चंचलता होणार नाही. तिथे
कर्मेंद्रिये चंचल होत नाहीत. सर्व कर्मेंद्रिये शांत सतोगुणी असतात. देहअभिमाना
मुळेच सर्व शैतानी करतात. बाबा तुम्हाला देहीअभिमानी बनवत आहेत. अर्ध्या कल्पासाठी
तुम्हाला वरसा मिळत आहे. जेवढी जे मेहनत करतील, तेवढे उंच पद मिळेल. देहीअभिमानी
बनण्याचे कष्ट घ्यायचे आहेत,तरच कर्मेंद्रिया धोका देणार नाहीत. अंतकाळा पर्यंत
युद्ध चालत राहील. जेंव्हा कर्मातीत अवस्था प्राप्त होईल, तोपर्यंत युद्ध पण सुरू
होईल. दिवसेंदिवस आवाज होत राहील, मृत्यूला घाबरतील.
बाबा म्हणतात हे ज्ञान सर्वांसाठी आहे. फक्त बाबाचा परिचय द्यायचा आहे. आम्ही
आत्म्ये सर्व भाऊ भाऊ आहोत. सर्व एका बाबाची आठवण करत आहेत. गॉडफादर म्हणतात ना. जरी
कोणी निसर्गाला मानणारे आहेत, परंतु गाॅड तर आहे ना. त्यांची आठवण करतात, मुक्ती,
जीवनमुक्ती साठी. मोक्ष तर मिळत नाही. जगाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होत आहे.
बुद्धीला पण वाटते कि, जेव्हा सतयुग होते तर एकच भारत होता. मनुष्य तर काहीच जाणत
नाहीत. या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते ना. लाखो वर्षाची गोष्ट तर होऊ शकत नाही.
लाखो वर्ष असते, तर किती लोकसंख्या वाढली असती. बाबा म्हणतात कि, आता कलियुग पूर्ण
होऊन, सतयुगाची स्थापना होत आहे. ते समजतात कि, कलियुग तर आजून लहान आहे. एवढ्या
हजार वर्षांचे आयुष्य आहे, तुम्ही मुले जाणता कि, एक कल्प 5000 वर्षाचे
आहे.भारतामध्येच स्थापना होत आहे. भारतच आता स्वर्ग बनत आहे. आता आम्ही श्रीमता वर
हे राज्य स्थापन करत आहात. आता बाबा म्हणतात कि, माझी एकट्याची आठवण करा. पहिल्या
प्रथम हेच शब्द सांगा. जोपर्यंत बाबा वर निश्चय होत नाही, तोपर्यंत प्रश्न विचारीत
राहतात.परत कोणत्या गोष्टीचे उत्तर मिळाले नाही, तर समजतात कि, हे कांहीच जाणत
नाहीत आणि म्हणतात कि, भगवान आम्हाला शिकवत आहेत. त्यामुळे प्रथम एकाच गोष्टीवर
सांगून थांबा. अगोदर बाबावर निश्चित होईल कि, बरोबर सर्व आत्म्यांचा पिता एकच आहे,
आणि ते रचनाकार आहेत. तर जरुर संगमयुगावरच येतील. बाबा म्हणतात कि, मी युगे युगे
येत नाही. कल्पाच्या संगमयुगावर येतो. मी आहेच, नवीन सृष्टीचा रचनाकार, तर मधेच कसा
येऊ. मी येतोच जुन्या आणि नवीन दुनियेच्या मध्ये. याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले
जाते. तुम्ही पुरुषोत्तम पण इथेच बनत आहात. लक्ष्मीनारायण सर्वात पुरुषोत्तम आहेत.
मुख्य उद्देश किती सोपे आहे. सर्वांना सांगा ही स्थापना होत आहे. बाबाने म्हटले आहे
कि, पुरुषोत्तम आक्षर जरूर लिहा, कारण इथे तुम्ही कनिष्ठ पासून पुरुषोत्तम बनत आहात.
अशा मुख्य गोष्टी विसरल्या नाही पाहिजेत. आणि संवतची तारीख पण जरूर लिहिली पाहिजे.
इथे तुमची पहिल्या पासूनच राजाई सुरू होते. इतरांची राजाई पहिल्या पासून सुरू होत
नाही. ते धर्म स्थापक येतात, त्यानंतर त्यांच्या मागे त्यांच्या धर्माची वृध्दी होते,
करोडो बनतात, मग राजाई चालते. तुमची तर सुरुवाती पासून सतयुगा मध्ये राजाई असते. हे
कोणाच्या पण बुद्धी मध्ये येत नाही कि, सतयुगा मध्ये यांची राजाई कुठून
आली.कलीयुगाच्या अंतामध्ये अनेक धर्म आहेत, मग सतयुगा मध्ये एक धर्म, एक राज्य कसे
झाले्? किती हिरे जवाहराचे महल आहेत. भारत असा होता, ज्याला पॅराडाइज म्हटले जाते.
5000 वर्षाची गोष्ट आहे. लाखो वर्षाचा हिशोब कुठून आला. मनुष्य किती गोंधळून गेले
आहेत. आता त्यांना कोण समजावेल. ते थोडेच समजत आहेत कि, आम्ही आसुरी राज्यांमध्ये
आहोत. यांची (देवी-देवतांची) महिमा तर सर्वगुणसंपन्न. .. आहे. यांच्या मध्ये पाच
विकार नाहीत, कारण देहीअभिमानी आहेत. तर बाबा म्हणतात कि, मुख्य गोष्ट आहे आठवणीची.
८४ जन्म घेत घेत तुम्ही पतित बनले आहात, आता परत पवित्र बनायचे आहे. हे विश्वनाटका
तील चक्र आहे. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति, मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) ज्ञानाच्या
तिसऱ्या नेत्राला धारण करून, आपले धोकेबाज डोळे निर्विकारी बनवायचे आहेत. आठवणी
मुळेच कर्मेंद्रिया शीतल, सतोगुणी बनतील, त्यासाठी मेहनत करायची आहे.
(२) धंदे इत्यादी पासून वेळ काढून, एकांता मध्ये जाऊन आठवण करायची आहे, कारण पाहायचे
आहे कि,आमचा योग कां लागत नाही. स्वतःचा चार्ट ठेवायचा आहे.
वरदान:-
निर्णय शक्ती
आणि नियंत्रणाच्या शक्तीद्वारे नेहमी सफलता मूर्त भव:
कोणत्या पण लौकिक आणि
अलौकिक कार्यामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी, विशेष नियंत्रणाची शक्ती आणि निर्णय
करण्याची आवश्यकता असते, कारण जी पण आत्मा तुमच्या संपर्का मध्ये येते, तर अगोदर
तपास करा कि, याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. नाडी परीक्षा करून त्याच्या
इच्छेनुसार त्यांना तृप्त करणे आणि स्वतःच्या नियंत्रण शक्तीद्वारे, दुसऱ्यावर
आपल्या अचल स्थितीचा प्रभाव टाकणे. या दोन्ही शक्ती, सेवेच्या क्षेत्रांमध्ये
सफलतामूर्त बनवतात.
बोधवाक्य:-
सर्वशक्तिमान
बाबाला दोस्त बनवा तर माया कागदाचा वाघ बनेल.