25-10-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   09.04.86  ओम शान्ति   मधुबन


खऱ्या सेवाधारीची लक्षणं.


आज ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा आपल्या जमिनीवरच्या तारा मंडळा मधील, सर्व ताऱ्यांना पाहत आहेत. चमकणारे सर्व तारे, स्वतःची चमक व प्रकाश देत आहेत.वेगवेगळे तारे आहेत. कोणी विशेष ज्ञान तारे आहेत, कोणी सहज योगी तारे आहेत, कोणी गुणदान मुर्त तारे आहेत. कोणी निरंतर सेवाधारी तारे आहेत. कोणी नेहमीच संपन्न तारे आहेत. सर्वात श्रेष्ठ, प्रत्येक सेकंदाला सफलतेचे तारे आहेत. त्याबरोबर कांही कांही फक्त आशाचे तारे पण आहेत. कुठे आशाचे तारे आणि कुठे सफलतेचे तारे! दोन्ही मध्ये महान अंतर आहे. परंतु दोन्ही तारे आहेत, आणि प्रत्येक वेगवेगळ्या तार्‍यांचा, विश्वातील आत्म्यावर, प्रकृतीवर, आपापला प्रभाव पाडत आहेत. सफलतेचे तारे चोहीकडे, आपल्या उमंग उत्साहाचा प्रभाव टाकत आहेत. आशाचे तारे स्वतःच, कधी प्रेमात, कधी मेहनतीमध्ये, दोन्हीच्या प्रभावा मध्ये राहिल्यामुळे, दुसऱ्या मध्ये पुढे जाण्याची आशा ठेवून, पुढे जात आहेत. तर प्रत्येकाने स्वतःला विचारावे कि, मी कोणता तारा आहे? सर्वांमध्ये ज्ञान, योग, गुणांची धारणा आणि सेवाभाव पण आहे, परंतु सर्व असून सुध्दा, कोणामध्ये ज्ञानाची चमक आहे,तर कोणामध्ये विशेष आठवणीची, योगाची चमक आहे. आणि कोणी कोणी आपल्या गुणमुर्तच्या चमकद्वारे, विशेष आकर्षित करत आहेत. चारीही धारणा असून सुद्धा, टक्केवारी मध्ये अंतर आहे, त्यामुळे वेगवेगळे तारे चमकणारे दिसून येतात. हे आत्मिक विचित्र तारामंडळ आहे. तुम्हां आत्मिक ताऱ्यांचा प्रभाव विश्वावर पडत आहे. तर विश्वातील स्थूल तार्‍यांचा पण प्रभाव, विश्वावर पडत आहे. जेवढे शक्तिशाली तुम्ही स्वतः बनत आहात, तेवढे विश्वातील आत्म्यावर प्रभाव पडत आहे, आणि पुढे पण पडत राहील. जसे जेवढा घोर अंधार असतो, त्यामुळे ताऱ्यांची रिमझिम जास्त स्पष्ट दिसून येते. तसे अप्राप्तीचा अंधार वाढत चालला आहे आणि जेवढा वाढत जाईल, तेवढाच तुम्हा आत्मिक ताऱ्यांचा विशेष प्रभाव अनुभव करतील. सर्वांना जमिनीवरील चमकणारे तारे, ज्योती बिंदूच्या रुपामध्ये, प्रकाशमय काया, फरिश्त्यांच्या रूपामध्ये दिसून येतील. जसे आता आकाशातील ताऱ्यांच्या मागे, ते आपला वेळ, शक्ती आणि धन लावत आहेत. तसे आत्मिक ताऱ्यांना पाहून, आश्चर्यचकित होतील. जसे आता आकाशातील ताऱ्यांना पाहत आहेत, तसे या जमिनीवर, चोहीकडे फरिस्त्यांची झलक आणि ज्योतिर्मय ताऱ्यांची झलक पाहतील, पाहून अनुभव करतील, हे कोण आहेत, कोठून या धरतीवर आपला चमत्कार दाखविण्यासाठी आले आहेत. जसे स्थापनेच्या आदिमध्ये अनुभव केला आहे कि, चोहीकडे ब्रह्मा आणि कृष्णाच्या साक्षात्काराची लहर पसरली होती. हे कोण आहेत? हे काय दिसत आहे? हे समजण्यासाठी अनेकांचे लक्ष गेले. तसे आता अंत काळात, चोहीकडे या दोन्ही रुपाची "ज्योती आणि फरिस्ता" त्यामध्ये बापदादा आणि मुलांची, सर्वांची झलक दिसून येईल. आणि सर्वांचे एका पासून अनेकांचे, इकडे आपोआपच लक्ष जाईल. आता हे दिव्य दृश्य, तुम्हा सर्वांचे संपन्न होण्यासाठी राहिले आहे. फरिश्ते पणाची स्थिती, सहज आणि स्वतःच अनुभव करतील, तेव्हा ते साक्षात फरिश्ते, साक्षात्कारा मध्ये दिसून येतील. हे वर्ष फरिश्ते पणाच्या स्थिती साठी, विशेष दिले आहे. काही मुले समजतात कि, काय फक्त आठवणीचा अभ्यास करायचा, कां सेवा पण करायची,कां सेवे पासून मुक्त होऊन, तपस्येमध्ये राहायचे. बापदादा सेवेचा यथार्थ अर्थ सांगत आहेत :-सेवाभाव म्हणजे नेहमी प्रत्येक आत्म्या प्रति शुभ भावना आणि श्रेष्ठ कामनेचा भाव. सेवाभाव म्हणजे प्रत्येक आत्म्याच्या

भावनेप्रमाणे फळ देणे. भावना हद्दची नसावी, परंतु श्रेष्ठ भावना. तुम्हा सेवाधारी साठी जर कोणी आत्मिक स्नेहाची भावना ठेवेल, शक्तींच्या सहकार्याची भावना ठेवेल, खुशीची भावना ठेवेल, शक्तीच्या प्राप्तीची भावना ठेवेल, उमंग उत्साहाची भावना ठेवेल, अशा वेगवेगळ्या भावनेचे फळ, म्हणजे सहयोगाची अनुभूती करणे, त्याला सेवाभाव म्हटले जाते. फक्त भाषण करून आलो, त्या ग्रुपला समजावून आलो, कोर्स पूर्ण करून आलो किंवा सेंटर उघडून आलो, याला सेवाभाव म्हणत नाहीत. सेवा म्हणजे कोणत्या पण आत्म्याला प्राप्तीचा मेवा अनुभव करवणे, अशा सेवेमध्ये तपस्या नेहमीच चालू असते.

तपस्येचा अर्थ आहे, दृढ संकल्पाने कोणते पण कार्य करणे. जिथे यथार्थ सेवाभाव आहे, तिथे तपस्येचा भाव वेगळा नसतो. त्याग, तपस्या, सेवा या तिघांचे एकत्र रूप म्हणजे खरी सेवा आहे, आणि नामधारी सेवेचे फळ अल्पकाळासाठी मिळते. तिथेच सेवा केली आणि तिथेच अल्पकाळाच्या प्रभावाचे फळ प्राप्त झाले आणि समाप्त झाले, अल्प काळाच्या प्रभावाचे फळ, अल्प काळाची महिमा आहे, फार चांगले भाषण केले, फार चांगला कोर्स केला, फार चांगली सेवा केली. तर चांगले चांगले म्हटल्याने, अल्पकाळा चे फळ मिळाले आणि त्यांना महिमा ऐकल्याने, अल्पकाळा चे फळ मिळाले. परंतु अनुभूती करणे म्हणजे बाबा बरोबर संबंध जोडणे, शक्तिशाली बनवणे, ही आहे खरी सेवा. खऱ्या सेवेमध्ये त्याग तपस्या नसेल, तरीही 50- 50 ची सेवा नाही, परंतु 25% सेवा आहे.

खरे सेवाधारी ची लक्षणं आहे, त्याग म्हणजे नम्रता आणि तपस्या अर्थात एका बाबा मध्ये निश्चय, नशे मध्ये दृढता. यथार्थ सेवा याला म्हटले जाते. बापदादा निरंतर खरे सेवाधारी बनण्यासाठी सांगत आहेत. नाव सेवा आहे आणि स्वतःच त्रस्त आहेत,तर दुसऱ्याला पण त्रस्त करतात, या सेवे पासून मुक्त होण्यासाठी बापदादा सांगत आहेत. अशी सेवा न केलेली बरी, कारण सेवेचा विशेष गुण 'संतुष्टता " आहे. इथे जर संतुष्टता नाही, स्वतःबरोबर किंवा संपर्कात असणाऱ्या बरोबरची सेवा, ना स्वतःला फळाची प्राप्ती करते,ना दुसऱ्याला. त्यामुळे स्वतः, स्वतःला अगोदर संतुष्टषमणी बनवून मग सेवेमध्ये यावे, ते चांगले आहे. नाही तर सूक्ष्म ओझे जरूर होईल. ते अनेक प्रकारचे ओझे, उडत्या कलेमध्ये विघ्नरूप बनते. ओझे वाढवायचे नाही तर ओझे उतरावयाचे आहे. जर असे समजत आसाल तर त्यासाठी एकांतवासी बनणे चांगले आहे, कारण एकांतवासी बनल्यामुळे स्व परिवर्तनाचे ध्येय राहते. तर बापदादा तपस्या, जी सांगत आहेत, ती फक्त दिवस-रात्र एका ठिकाणी बसून तपस्येसाठी सांगत नाहीत. तपस्ये मध्ये बसणे पण सेवाच आहे. लाईट हाऊस, माइट हाऊस बनून, शांतीच्या, शक्तीच्या किरणांनी वायुमंडल बनवणे आहे. तपस्ये बरोबर मन्सा सेवा जोडलेली आहे. वेगळी नाही. नाही तर तपस्या काय कराल! श्रेष्ठ आत्मा ब्राह्मण आत्मा तर झालात. आता तपस्या म्हणजे स्वतः सर्व शक्तीने संपन्न बनून, दृढ संकल्पा द्वारे विश्वाची सेवा करणे. फक्त वाणीची सेवा, सेवा नाही. जसे सुख शांती पवित्रतेचा आपसामध्ये संबंध आहे, तसे त्याग तपस्या सेवेचा संबंध आहे. बापदादा तपस्वी रूप म्हणजे शक्तिशाली सेवाधारी रूप बनण्यासाठी सांगत आहेत. तपस्वी रुपाची दृष्टी पण सेवा करत आहे. त्यांचा शांत स्वरूप चेहरा पण सेवा करत आहे, तपस्वीमूर्त च्या दर्शनानेच प्राप्तीची अनुभूती होत आहे, त्यामुळे आजकाल पहा, जे हट्टाने तपस्या करत आहेत, त्यांच्या दर्शनासाठी किती गर्दी होत आहे. ते तुमच्या तपस्ये च्या प्रभावाची आठवण, अंतापर्यंत चालत आली आहे. तर समजले, सेवाभाव कशाला म्हटले जाते.सेवाभाव म्हणजे सर्वांच्या कमजोरीला सामावून घेण्याचा भाव. कमजोरी ला सामना करण्याचा भाव नाही, सामावून घेण्याचा भाव. स्वतः सहन करून, दुसऱ्याला शक्ती देण्याचा भाव, त्यामुळे सहन शक्ती म्हटले जाते. सहन करणे, शक्ती भरणे आणि शक्ती देणे. सहन करणे म्हणजे मरणे नाही. कांही विचार करतात कि, आम्ही तर सहन करून करून मरून जाऊ. काय आम्हांला मरायचे आहे काय! परंतु हे मरणे नाही. हे सर्वाच्या मनामध्ये स्नेहाने जगणे आहे. कसा पण विरोधी असेल, रावणा पेक्षा पण तीव्र असेल, एक वेळा नाही तर दहा वेळा सहन करावे लागले, तरीपण सहनशक्तीचे फळ अविनाशी आणि मधुर आहे. तो पण जरूर बदलून जाईल. फक्त ही भावना ठेवू नका कि, मी एवढे सहन केले,तर त्याने पण कांही सहन करावे. अल्पकाळाच्या फळाची भावना ठेवू नका. दयेचा भाव ठेवा, याला म्हटले जाते "सेवाभाव". तर यावर्षी अशा खऱ्या सेवेचा सबूत देऊन, सपूतच्या यादीमध्ये येण्यासाठी सुवर्ण संधी देत आहेत. या वर्षी हे पाहणार नाहीत कि, मेळा किंवा प्रोग्राम फार चांगला केला. परंतु संतुष्टमणी बनून, संतुष्टतेच्या सेवेमध्ये नंबर पुढे घ्यायचा आहे. "विघ्नविनाशक" नावाच्या समारंभा मध्ये बक्षीस घेणे‌. समजले! यालाच म्हटले जाते, "नष्टोमोहा स्मृती स्वरूप". तर १८ वर्षाच्या समाप्तीचा,विशेष संपन्न बनण्याचा अध्याय स्वरूपा मध्ये दाखवा. यालाच म्हटले जाते "बाबा सारखे बनणे".

नेहमी चमकणाऱ्या आत्मिक ताऱ्यांना, नेहमी संतुष्टतेची किरणे पसरविणारे संतुष्टमणी, नेहमी एकाच वेळी, त्याग तपस्या, सेवेचा प्रभाव टाकणारे, प्रभावशाली आत्म्यानां, नेहमी सर्व आत्म्याना आत्मिक भावनेचे आत्मिक फळ देणारे, बीज स्वरूप बाबा सारख्या श्रेष्ठ मुलांना, बापदादाची संपन्न बनण्यासाठी, प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

पंजाब तसेच हरियाणा झोन मधील भाऊ बहिणी बरोबर अव्यक्त बापदादांचा वार्तालाप

नेहमी स्वतःला अचल अडोल आत्मे अनुभव करत आहात? कोणत्या पण प्रकारच्या हालचाली मध्ये अचल राहणे, ही श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्याची निशाणी आहे. दुनिया हलचल मध्ये आहे, परंतु तुम्ही श्रेष्ठ आत्मे हालचालींमध्ये येऊ शकत नाही. कां? विश्व नाटकातील प्रत्येक देखाव्याला जाणणारे आहात. ज्ञानसंपन्न आत्मे, शक्तिसंपन्न आत्मे नेहमी स्वतःच अचल राहतात. तर कधी वायुमंडळाला घाबरत तर नाहीत! निर्भय आहत? शक्ती निर्भय आहेत? कां, थोडी थोडी भीती वाटते? कारण हे तर पहिल्यापासूनच स्थापनेच्या वेळेपासून जाणता कि, भारतामध्ये गृहयुध्द होणारच आहेत. हे सुरवातीच्या चित्रांमध्ये पण तुम्ही दाखवलेले आहे. तर जे दाखवले आहे, ते होणार तर आहे ना. भारताची भूमिकाच गृहयुद्धाची आहे, त्यामुळे नवीन कांही नाही. तर नवीन कांही नाही असे वाटते, कां घाबरून जाता? काय झाले, कसे झाले, हे झाले. .‌. . , समाचार ऐकून, पाहून पण, विश्व नाटकातील बनलेली भावी, शक्तिशाली बनून पहा, आणि इतरांना पण शक्ती देत रहा, तुम्हा सर्वांना हेच काम आहे ना! दुनियेतील घाबरतात आणि तुम्ही त्या आत्म्याला शक्ती देता. जे पण संपर्का मध्ये येतील, त्यांना शक्तीचे दान देत राहा. आता अशांती च्या वेळी शांती देण्याची वेळ आहे. तर शांतीचा संदेश देणारे आहात. शांतीदूत म्हणून गायन आहे ना !

तर कधी पण कोठे राहताना, चालताना, नेहमी स्वता:ला शांती चे दूत समजून चाला. शांतीचे दूत आहोत, शांतीचा संदेश देणारे आहोत, तर स्वतः पण शांत स्वरूप शक्तिशाली राहाल, आणि दुसऱ्याला पण देत राहाल. ते अशांती देतील, तुम्हीं शांती द्या. ते आग लावतील तुम्ही पाणी टाका. हेच काम आहे ना. याला म्हणतात खरे सेवाधारी. तर अशावेळी याच सेवेची आवश्यकता आहे. शरीर तर विनाशी आहे, परंतु आत्मा शक्तिशाली आसेल तर एक शरीर सुटले तरीपण दुसऱ्यामध्ये आठवण्याची प्रालब्ध चालत राहते, त्यामुळे अविनाशी प्राप्ती करवीत राहा. तर तुम्ही कोण आहात? शांतीचे दुत. शांतीचा संदेश देणारे, मास्टर शांती दाता, मास्टर शक्तिदाता. ही आठवण नेहमी राहत आहे ना! नेहमी स्वतःला याच आठवणी द्वारे पुढे घेऊन जावा. इतरांना पण पुढे येऊन जावा, हीच सेवा आहे. सरकारचे कोणते पण नियम असतात, तर त्याचे पालन करावेच लागते, परंतु जेंव्हा थोडा पण वेळ मिळतो, तर मन्साद्वारे, वाणीद्वारे सेवा जरूर करत राहा. आता मन्सा सेवेची तर फार आवश्यकता आहे, परंतु जेव्हा स्वतः मध्ये शक्ती भरलेली असेल, तेंव्हा दुसऱ्याला देऊ शकाल. तर नेहमी शांतीदाता ची मुले, शांतीदाता बना. दाता पण आहात तर विधाता पण आहात. चालताना फिरताना आठवणीत ठेवा, मी मास्टर शांती दाता, मास्टर शक्तिदाता आहे. या आठवणी व्दारे अनेक आत्म्यांना प्रकंपन देत राहा. तेव्हा त्यांना वाटेल कि, यांच्या संपर्कामध्ये राहिल्यामुळे, शांतीची अनुभूती होत आहे. तर हेच वरदान आठवणीत ठेवा कि, बाबा सारखे मास्टर शांती दाता, शक्तिदाता बनायचे आहे. सर्व बहादूर आहात ना! हालचालींमध्ये पण व्यर्थ संकल्प चालू नयेत, कारण व्यर्थ संकल्प, समर्थ बनू देत नाहीत. काय होईल, असे तर होणार नाही ना. . . हे व्यर्थ आहे. जे होईल त्याला शक्तिशाली होऊन पहा, आणि दुसऱ्याला पण शक्ती द्या. हे पण रस्त्या वरील देखावे आहेत. हे पण एका बाजूला चालत आहे.बाजूचा देखावा समजून पाहा, तर घाबरणार नाहीत. अच्छा.

निरोपाच्या वेळी.:- (अमृतवेळा)

हे संगमयुग "अमृतवेळा" आहे. संपूर्ण संगमयुग अमृतवेळा असल्यामुळे, यावेळीच्या महानते चे गायन होते. तर संपूर्ण संगमयुग म्हणजे अमृतवेळा म्हणजे हिऱ्याची सुप्रभात आहे. नेहमी बाबा मुलांबरोबर आहेत आणि मुले बाबा बरोबर आहेत, त्यामुळे बेहदची हिऱ्याची सुप्रभात. बापदादा नेहमीच सांगत आहेत, परंतु व्यक्त स्वरूपा मध्ये, व्यक्त देशाच्या हिशोबाने आज पण सर्व मुलांना, नेहमी बरोबर राहण्याची सुप्रभात म्हणा, सुवर्ण सुप्रभात म्हणा, हिऱ्याची सुप्रभात म्हणा, जे पण म्हणाल, ते बापदादा सर्व मुलांना देत आहेत. स्वतः पण हिऱ्या सारखे आहात, आणि सकाळ पण हिऱ्यासारखी आहे, आणखीन हिऱ्यासारखे बनण्याची आहे, त्यामुळे नेहमी बरोबर राहण्याची सुप्रभात. अच्छा.

वरदान:-
पाच तत्व आणि पाच विकारांना, आपले सेवाधारी बनवणारे, मायाजीत स्वराज्य अधिकारी भव

जसे सतयुगा मध्ये विश्व महाराजन व विश्व महाराणीचा राजाई पोशाखाला मागून दास-दासी उचलून धरतात, तसे संगमयुगावर तुम्ही मुले जेंव्हा मायाजीत, स्वराज्य अधिकारी बनून स्वमान रूपी पोशाखाने नटून-थटून राहाल, तर हे पाच तत्व आणि पाच विकार तुमच्या पोषाखाला मागून उचलतील म्हणजे अधीन होऊन चालतील, त्यासाठी दृढ संकल्पाच्या पट्ट्याने, सन्मानाच्या पोषाखाला घट्ट करा, वेगवेगळे पोशाख आणि शृंगाराच्या अलंकाराने, नटून थटून, बाबा बरोबर राहा, तर हे विकार व तत्व परिवर्तन होऊन, सहयोगी सेवाधारी बनतील.

सुविचार:-
ज्या गुणांचे व शक्तींचे वर्णन करता, त्यांच्या अनुभवा मध्ये मगन राहा. अनुभवच सर्वात मोठी सत्ता आहे.