08-10-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,बाबा आले आहेत तुम्हाला खूप आवडीने शिकवण्यासाठी,तुम्ही पण आवडीने शिका,हा
नशा राहावा की आम्हाला शिकवणारे स्वतः भगवान आहेत"
प्रश्न:-
तुम्हा
ब्रह्मकुमार कुमारींचा उद्देश किंवा शुद्ध भावना कोणती आहे?
उत्तर:-
तुमचा उद्देश आहे,कल्प पाच हजार वर्षा प्रमाणे परत
श्रीमतानुसार विश्वामध्ये सुख आणि शांतीचे राज्य स्थापन करणे.तुमची शुद्ध भावना आहे
की,श्रीमतानुसार आम्ही साऱ्या विश्वाची सद्गती करू. तुम्ही नशे द्वारे म्हणतात
की,आम्ही सर्वांना सद्गती देणारे आहोत. तुम्हाला बाबा कडून शांती चे बक्षीस
मिळते.नर्कवासीं पासून स्वर्गवासी बनणे,हेच बक्षीस घेणे आहे.
ओम शांती।
विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेतात तर,खूप आवडीने शिकत राहतात. शिक्षक पण खूप
आनंदाने,आवडीने शिकवतात. आत्मिक मुलं हे जाणतात,की बेहद्दचे पिता जे शिक्षक पण
आहेत,ते आम्हाला खूप आवडीने शिकवतात.त्या शिक्षणामध्ये तर पिता वेगळे आणि शिक्षक
वेगळे असतात,जे शिकवतात.कोणी- कोणी पिता शिक्षक पण असतात, तर ते खूप आवडीने शिकवतात,
कारण रक्ताचे नाते असते ना. आपले समजून खूप आवडीने शिकवतात.हे बाबा तर तुम्हाला
खूपच आवडीने शिकवतात,तर मुलांना पण खूप आवडीने शिकायला पाहिजे ना.प्रत्यक्ष शिवपिता
शिकवत आहेत आणि एकाच वेळेत येऊन शिकवतात. मुलांना पण खूप आवडीने शिकायला पाहिजे
ना.शिव भगवान आम्हाला शिकवत आहेत,तर प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजावत
राहतात.काही मुलांना शिकता-शिकता,विचार येतो,हे काय आहे,वैश्विक नाटकामध्ये
येण्याजाण्याचे,अवागमनचे चक्र आहे,परंतु हे नाटकाची रचनाच का केली? यामुळे काय फायदा
आहे?बस फक्त असेच चक्र लावत राहू? यापेक्षा तर यामधून मुक्त झालेले चांगले.जेव्हा
पाहतात हे तर ८४ चे चक्र लावतच राहायचे आहे,अशा प्रकारचे विचार येतात.भगवंताने असा
खेळ का रचला आहे?जे जन्म मृत्यू पासून मुक्त होऊ शकत नाही. यापेक्षा तर मोक्ष
मिळालेला चांगले.असे विचार अनेक मुलांना येतात. या जन्म मृत्यू पासून,दुःखापासून
मुक्त होऊ.बाबा म्हणतात असे कधी होऊ शकत नाही.मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करणेच
व्यर्थ होते.बाबांनी समजावले आहे, एक पण आत्मा आपल्या भूमिकेपासून,अभिनया पासून सुटू
शकत नाही.आत्म्यांमध्ये अविनाशी भूमिका भरलेली आहे.ती अनादी अविनाशी आहे,अगदी
बिनचूक कलाकार आहेत.एक पण कमी-जास्त होऊ शकत नाहीत. तुम्हा मुलांमध्ये सर्व ज्ञान
आहे.या वैश्विक नाटका मधून कोणी मुक्त होऊ शकत नाही,न कोणाला मोक्ष मिळू शकतो.सर्व
धर्मांना क्रमानुसार यायचे आहेच.बाबा समजवतात,हे पूर्वनियोजित अविनाशी नाटक
आहे.तुम्ही पण म्हणतात बाबा आम्ही आता जाणले आहे,कसे आम्ही ८४चे चक्र लावतो.हे पण
समजतात,प्रथम जे येत असतील ते ८४ जन्म घेत असतील.अंत काळात येणारे जरूर कमी जन्म
घेतील.येथे तर पुरुषार्थ करायचा आहे.जुन्या दुनिये पासून नविन दुनिया जरूर बनाणार
आहे.बाबा प्रत्येक गोष्ट नेहमी समजवत राहतात,कारण नवीन नवीन मुलं येत राहतात.त्यांना
पुढील शिक्षण कोण शिकवेल.तर बाबा नवीन मुलांना पाहून परत जुन्या मुद्द्याची उजळणी
करवत राहतात.
तुमच्या बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे.तुम्ही जाणतात सुरुवाती पासून आम्ही कशी भूमिका
करत आलो.तुम्ही अर्थ सहीत जाणतात, कसे क्रमानुसार येतात.किती जन्म घेतो.या वेळेतच
बाबा येऊन ज्ञानाच्या गोष्टी ऐकवतात. सतयुगामध्ये तर प्रारब्धच आहे.हे या वेळेतच
तुम्हाला समजवले जाते.गीतेमध्ये पण सुरुवातीला आणि अंत काळात पण या गोष्टी
येतात,मनमनाभव.शिक्षण पद मिळविण्यासाठी साठी दिले जाते. तुम्ही राजा बनण्यासाठी
आत्ता पुरुषार्थ करत आहात.दुसऱ्या धर्मासाठी तर समजवले आहे की, ते क्रमानुसार
येतात.धर्मस्थापका च्या नंतर सर्वांना यायचे आहे. राजाईची गोष्ट नाही.एकच गीता
ग्रंथ आहे,ज्याची खूप महिमा आहे. भारता मध्येच बाबा येऊन ऐकवतात आणि सर्वांची सदगती
करतात.ते जे धर्म स्थापक येतात त्यांचा मृत्यू होतो,तर मोठ मोठे तीर्थ
बनवतात.वास्तव मध्ये सर्वांचे तीर्थ हा भारतच आहे,जेथे बेहद्दचे बाबा येतात.बाबांनी
भारतामध्येच येऊन सर्वांची सद्गती केली आहे. बाबा म्हणतात मलाच मुक्तिदाता,
मार्गदर्शक म्हणतात ना.मी तुम्हाला जुनी दुनिया,दुःखाच्या दुनिये पासून मुक्त
करून,शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन जातो.
मुलं जाणतात,बाबा आम्हाला शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन जातात,बाकी सर्व शांतीधाम
मध्ये जातील.बाबा येऊन दुःखापासून मुक्त करतात.त्यांचा जन्म मृत्यू तर नाही.बाबा
येऊन परत चालले जातात,त्यांच्यासाठी असे थोडेच म्हणतील की मृत्यू झाला.जसे शिवानंद
साठी म्हणतात,शरीर सोडून दिले,परत क्रियाकर्म करत राहतात.हे शिव पिता चालले
जातील,परत यांचे क्रियाकर्म,उत्सव इ.काहीच करायचे नसते.त्यांची तर येण्याची पण
माहिती होत नाही. तर क्रियाकर्म इत्यादीची गोष्टच नाही.बाकी सर्व मनुष्यांचे क्रिया
कर्म करतात, बाबांचे क्रिया कर्म होत नाही.त्यांना शरीरच नाही. सतयुगा मध्ये या
ज्ञान भक्तीच्या गोष्टी असत नाहीत.या आत्ताच चालतात आणि सर्व भक्तीच
शिकवतात.अर्ध्याकल्पा साठी भक्ति परत अर्ध्या कल्पानंतर बाबा येऊन ज्ञानाचा वारसा
देतात.ज्ञान काय तेथे चालत येत नाही.तेथे बाबांची आठवण करण्याची आवश्यकता राहत
नाही.मुक्ती मध्ये आहेत.तेथे आठवण करत नाहीत,दुःखाची तक्रार पण नसते.भक्ती पण प्रथम
अव्यभिचारी होते,परत व्यभिचारी होते.यावेळेस तर अती व्यभिचारी भक्ती आहे,याला म्हटले
जाते रौरव नर्क.एकदम अती रौरव नर्क आहे. परत बाबा येऊन छान स्वर्ग बनवतात.या वेळेत
१०० % दुःख परत १०० % सुख-शांती होईल. आत्मा जाऊन आपल्या घरामध्ये विश्राम करेल.हे
समजून सांगणे खूप सहज आहे.बाबा म्हणतात मी तेव्हाच येतो,जेव्हा नवीन दुनियेची
स्थापना करून,जुन्या दुनियेचा विनाश करायचा असतो.इतके कार्य फक्त एक तर करणार
नाही.सेवा करणारे पण खूप पाहिजेत.या वेळेत तुम्ही बाबांचे सेवाधारी मुलं बनले
आहात.भारताचे खास खरी सेवा करत आहात.सत्य बाबा खरी सेवा शिकवतात.स्वत:चे,भारताचे आणि
विश्वाचे कल्याण करतात. तर खूप आवडीने करायला पाहिजे ना.बाबा खूप आवडीने सर्वांची
सदगती करतात.आत्ताच सर्वांची सद्गती जरूर होते.हा शुद्ध अहंकार, शुद्ध भावना आहे.
तुम्ही खरी-खुरी सेवा करतात परंतु गुप्त.आत्माच शरीरा द्वारे करते. तुम्हाला अनेक
जण विचारतात, ब्रह्मकुमारीज चा उद्देश काय आहे? तुम्ही सांगा विश्वामध्ये सतयुगी
सुख शांती चे स्वराज्य स्थापन करणे. आम्ही प्रत्येक पाच हजार वर्षानंतर
श्रीमतानुसार विश्वामध्ये शांती स्थापन करून,विश्व शांतीचे बक्षीस घेतो.यथा राजाराणी
तथा प्रजा बक्षीस घेते.नर्क वासी पासून स्वर्गवासी बनणे,कमी बक्षीस आहे काय? ते
शांतीचे बक्षीस घेऊन खुश होत राहतात,मिळत काहीच नाही.खरे बक्षीस तर आत्ता आम्ही बाबा
पासून घेत आहात,तेही विश्वाच्या बादशाहीचे.असे म्हणतात, भारत आमचा देश आहे,खूप महिमा
करतात.सर्वजण समजतात,आम्ही भारताचे मालक आहोत, परंतु मालक कुठे आहेत?आता तुम्ही मुलं
बाबाच्या श्रीमता द्वारे राज्य स्थापन करत आहात. हत्यार,पावर तर काहीच नाही.दैवी
गुण धारण करतात म्हणून,तुमची पुजा होते.अम्बाची खूप पूजा होते,परंतु असे अम्बा कोण
आहे? ब्राह्मण आहे कि देवता? हे पण माहिती नाही.अम्बा,काली,दुर्गा, सरस्वती इत्यादी
असे अनेक नावं आहेत.येथे पण अम्बाचे छोटे मंदिर आहे.अम्बाला खूप भुजा देतात. असे तर
नाही,याला अंधश्रद्धा म्हटले जाते.ख्रिस्त बुद्ध इत्यादी आले,त्यांनी आपापले धर्म
स्थापन केले.तिथी तारीख सर्व सांगतात, तेथे अंधश्रद्धाची गोष्टच नाही.येथे
भारतवासींना तर काहीच माहिती नाही,आमचा धर्म कोणी आणि कधी स्थापन केला? म्हणून याला
अंधश्रद्धा म्हटले जाते.आता तुम्ही पुजारी आहात,परत पुज्य बनत आहात.तुमची आत्मा पण
पूज्य तर शरीर पण पूज्य बनते.तुमच्या आत्म्याची पूजा होते,परत देवता बनतात, तरीही
पुजा होते.बाबा तर निराकारी आहेत,ते नेहमी पुज्य आहेत,कधीच पुजारी बनत नाहीत.
मुलांसाठी म्हटले जाते,स्वतःच पुज्य आणि स्वतःच पुजारी आहेत.बाबा तर नेहमीच पुज्य
आहेत.येथे येऊन बाबा खरी सेवा करतात,सर्वांना सद्गती देतात.बाबा म्हणतात,दुसऱ्या
कोणत्या देहधारीची आठवण करू नका.येथे तर मोठे लखपती- करोडपती जाऊन अल्लाह-अल्लाह
म्हणत राहतात.खूप अंधश्रद्धा आहे. बाबांनी तुम्हाला हम सो चा अर्थ पण समजवला आहे.ते
तर स्वतःला शिव म्हणतात,आत्मा सो परमात्मा म्हणतात.आता बाबांनी त्याच्यामध्ये
सुधारणा केली आहे.आता निर्णय करा भक्तिमार्ग मध्ये सत्य गोष्टी ऐकल्या,की बाबा सत्य
गोष्टी सांगतात.हमसो चा अर्थ पण खूप लांब लचक आहे.आम्ही ब्राह्मण, देवता, क्षत्रिय,
बनतो.आता हम सो चा अर्थ कोणता बरोबर आहे. आम्ही आत्मा चक्रामध्ये अशाप्रकारे
येतो.विराट रूपाचे पण चित्र आहे, यामध्ये चोटी ब्राह्मण आणि बाबांना दाखवले
नाही.देवता कोठून आले? उत्पत्ती कशी झाली?कलियुगा मध्ये तर शूद्र वर्ण आहे.सत्ययुगा
मध्ये लगेच देवता वर्ण कसा झाला,काहीच समजत नाहीत. भक्तिमार्गा मध्ये मनुष्य किती
फसले आहेत.कोणी ग्रंथ शिकले, विचार आला,मंदीर बनवले,बस ग्रंथ बसून ऐकवतात.अनेक
मनुष्य येतात,अनेक शिष्य बनतात,फायदा तर काहीच होत नाही.अनेक दुकानं निघाली आहेत.आता
हे सर्व दुकानं नष्ट होतील.ही दुकानदारी सर्व भक्ती मार्गाची आहे.यामुळे खूप धन
कमावतात.संन्यासी म्हणतात,मी ब्रह्मयोगी,तर योगी आहोत.जसे भारतवासी वास्तव मध्ये
देवी देवता धर्माचे आहेत,परंतु हिंदुधर्माचे म्हणतात.तसे ब्रह्म तर तत्व आहे,जेथे
आत्मे राहतात.त्यांनी परत ब्रह्मज्ञानी,तत्त्वज्ञानी नाव ठेवले आहे.नाहीतर ब्रह्म
तत्व तर राहण्याचे स्थान आहे.तर बाबा समजवतात,खूप मोठी चूक केली आहे.हा सर्व भ्रम
आहे.मी येऊन सर्व भ्रम दूर करतो.भक्तिमार्गा मध्ये म्हणतात पण,हे प्रभू तुमची गत मत
वेगळी आहे.गती तर कोणी करू शकत नाहीत.अनेक मतं मिळत राहतात.येथील मत तर खूप कमाल
करते,संपूर्ण विश्वाला परिवर्तन करते.
आता तुमच्या बुध्दीमध्ये आहे,की इतके सर्व धर्म कसे-कसे आपल्या विभागांमध्ये जाऊन
राहतात.हे सर्व वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे.हे पण मुलं जाणतात दिव्यदृष्टी दाता
तर एकच बाबा आहेत.बाबांना मुलं म्हणतात,ही दिव्यदृष्टीची चावी आम्हाला द्या,तर आम्ही
कोणालाही साक्षात्कार करू.बाबा म्हणतात, नाही,ही दिव्यदृष्टीची चावी कोणालाही मिळू
शकत नाही,त्याच्याऐवजी मी तुम्हाला विश्र्वाची बादशाही देतो.मी घेत नाही. माझी
भूमिका आहे साक्षात्कार करण्याची.साक्षात्कार झाल्यामुळे खूप खुश होतात परंतु मिळत
काहीच नाही.असे नाही नाही की,साक्षात्कारा द्वारे कोणी निरोगी बनतात किंवा धन मिळते,
नाही.मीराला साक्षात्कार झाला परंतु मुक्ती थोडीच मिळाली.मनुष्य समजतात,ती वैकुंठा
मध्येच राहत होती परंतु वैकुंठ,कृष्णपुरी आहे कोठे?हे सर्व साक्षात्कार आहेत. बाबा
सर्व गोष्टी सन्मुख समजवत राहतात.यांना पण प्रथम विष्णूचा साक्षात्कार झाला तर खूप
खुश झाले,ते पण जेव्हा पाहिले की मी तर महाराजा बनत आहे.विनाश पण पाहिला,परत राजाईचा
साक्षात्कार पण केला,तेव्हा निश्चय बसला,ओहो!मी तर विश्वाचे मालक बनत आहे.बाबांची
प्रवेशता झाली.बाबा तुम्ही हे सर्व घ्या आणि आम्हाला तर विश्वाची बादशाही द्या.
तुम्ही पण हा सौदा करण्यासाठी आले आहात ना.जे ज्ञान घेतात त्यांची परत भक्ती
सुटते,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी
मुख्य सारांश:-
(१) दैवीगुण
धारण करून,श्रीमतानुसार भारताची खरी सेवा करायची आहे. स्वतःचे,भारताचे आणि संपूर्ण
विश्वाचे कल्याण खूप आवडीने करायचे आहे.
(२) वैश्विक नाटकाच्या अविनाश नोंदीला अर्थ सहित समजून वेळ व्यर्थ घालवण्याचा
पुरुषार्थ करायचा नाही. व्यर्थ विचार पण चालवायचे नाहीत.
वरदान:-
एकाग्रता च्या
अभ्यासाद्वारे एकरस स्थिती बनवणारे,सर्व सिध्दी स्वरुप भव.
जिथे एकाग्रता
आहे,तिथे स्वत: एकरस स्थिती आहे.एकाग्रता द्वारे संकल्प बोल आणि कर्माचे व्यर्थ पण
समाप्त होते आणि समर्थ पण स्वत: येते.एकाग्रता म्हणजे एकाच श्रेष्ठ संकल्पा मध्ये
स्थिर राहणे.ज्या एका बिजरुपी संकल्पा मध्ये सर्व वृक्षरुपी विस्तार सामावला आहे.
एकाग्रतेला वाढवा तर सर्व प्रकारची हालचाल समाप्त होईल.सर्व संकल्प आणि कर्म सहज
सिद्ध होतील.यासाठी एकांतवासी बना.
बोधवाक्य:-
एकदा केलेल्या
चुकां बाबत नेहमी विचार करणे म्हणजे डागा वरती डाग लावणे,म्हणून झालेल्या गोष्टींना
विराम द्या.