04-10-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
29.03.86 ओम शान्ति
मधुबन
दुहेरी परदेशी
मुलांसोबत बापदादाचे आत्मिक सुसंवाद
आज बाप दादा
चोहोबाजूच्या दुहेरी परदेशी मुलांना वतन मध्ये समोर ठेवून सर्व मुलांच्या विशेषता
पाहत होते, कारण सर्व मुलं विशेष आत्मे आहेत,तेव्हा तर बाबाचे बनले आहेत,म्हणजेच
श्रेष्ठ भाग्यवान बनले आहेत.विशेष तर सर्व आहेत,तरीही क्रमानुसार तर आहेतच.तर आज
बापदादा दुहेरी परदेशी मुलांना विशेष रूपामध्ये पाहत होते.थोड्या दिवसामध्ये चोहू
बाजूच्या वेगवेगळ्या रितीरिवाज किंवा मान्यता असून पण,एक मान्यता एकमत असणारे बनले
आहेत.बापदादा विशेष दोन विशेषता अनेक मुलांमध्ये पाहत आहेत.एक तर स्नेहाच्या
संबंधांमध्ये खूप लवकर बांधले गेले आहेत. स्नेहाच्या संबंधांमध्ये,ईश्वरीय परिवाराचे
बनण्यांमध्ये,बाबाचे बनण्यामध्ये चांगला सहयोग दिला आहे.तर एक स्नेहा मध्ये येण्याची
विशेषता,दुसरे स्नेहामुळे परिवर्तन शक्ती सहज प्रत्यक्षामध्ये आणली आहे. स्व
परिवर्तन आणि सोबतच समवयस्कांचे परिवर्तन करण्यामध्ये आवडीने आणि तीव्रतेने पुढे
जात आहेत.स्नेहाची शक्ती आणि परिवर्तन करण्याची शक्ती,या दोन्ही विशेषतांना हिम्मती
द्वारे धारण करून चांगला पुरावा दिला दाखवत आहेत.
आज वतन मध्ये बापदादा आपसामध्ये तुम्हा मुलांच्या विशेषते वरती आत्मिक सुसंवाद करत
होते. आता या वर्षाचा अव्यक्तचा व्यक्त मध्ये भेटण्याचा मौसम म्हणा किंवा मिलन मेळा
म्हणा,समाप्त होत आहे,तर बापदादा सर्वांचा परिणाम पहात होते.तसे तर अव्यक्त रुपाने
अव्यक्त स्थितीचे नेहमी मिलन होत आहे आणि होत राहील परंतु साकार रूपाद्वारे
भेटण्याची वेळ निश्चित करावी लागते आणि यामध्ये वेळेची मर्यादा पण पाहावी लागते.
अव्यक्त रुपामध्ये भेटण्यासाठी वेळेची मर्यादा नाही.जे जितके पाहिजे तेवढे मिलन करू
शकतात. अव्यक्त शक्तीची अनुभूती करून स्वतःची,सेवेची नेहमी वृद्धी करू शकतात.तरी
निश्चित वेळे प्रमाण या वर्षाचा हा मोसम समाप्त होत आहे, परंतु समाप्त म्हणणार
नाहीत परंतु संपन्न बनत आहेत.भेटणे म्हणजे समान बनणे.समान बनले ना.तर समाप्ती
नाही.जरी भेटण्याच्या मौसमाची वेळ समाप्त होत आहे परंतु स्वतः समान आणि संपन्न बनले
आहेत,म्हणून बापदादा चोहूबाजूच्या दुहेरी परदेशी मुलांना वतन मध्ये पाहून आनंदित
होत आहेत.कारण साकार मध्ये तर कोणी येऊ शकतात,कोणी येऊ पण शकत नाहीत,म्हणून आपले
चित्र किंवा पत्र पाठवतात.परंतू अव्यक्त रुपामध्ये बापदादा चोहूबाजूच्या संघटनाला
सहज सन्मुख ठेवू शकतात.येथे सर्वांना बोलावले तरी राहणे इत्यादीचे सर्व साधन
पाहिजेत.अव्यक्त वतन मध्ये तर या स्थुल साधनांची काहीच आवश्यकता नाही.ते तर फक्त
दुहेरी परदेशीच काय,परंतु सर्व भारताचे मुलं एकत्र केले तरी,असे वाटेल जसे बेहद्दचे
वतन आहे.तेथे कितीही लाख असतील,तरीही असेच वाटेल जसे छोटेसे संघटन दिसून येत आहे.तर
आज वतन मध्ये दुहेरी परदेशी मुलांना समोर ठेवले होते. बाप दादा पहात होते की जरी
रीतीरिवाज वेगळे आहेत,तरीही दृढ संकल्प द्वारे प्रगती चांगली केली आहे.बहुतांश उमंग
उत्साहाने चालत आहेत.काही काही खेळ दाखवणारे असतात,परंतु परिणाम मध्ये हे अंतर
पाहिले की, अगोदरच्या वर्षामध्ये जास्त संभ्रमित होते,त्या तुलनेत या वर्षाच्या
परिणामांमध्ये काही मुलं अगोदर पेक्षा मजबूत पाहिले. काही-काही बापदादांना पण खेळ
दाखवणारे मुलं पण पाहिले. संभ्रमित होण्याचा खेळ पण करतात ना.त्या वेळेचा व्हिडिओ
काढून पाहिला,तर तुम्हाला बिलकुल हे नाटक वाटेल,परंतु अगोदर पेक्षा चांगले आहेत.आता
अनुभवी बनलेले गंभीर पण बनतात. तर हा परिणाम पाहायला की,ज्ञानाशी प्रेम आहे आणि
आठवणीमध्ये राहण्याचा उमंग, वेगवेगळ्या रितीरिवाजाच्या मान्यताला सहज परिवर्तन करतो.
भारतवासींना परिवर्तन करणे सहज आहे.ते तर देवतांना जाणतात, ग्रंथांच्या मिक्स
ज्ञानाला जाणतात. तर मान्यता भारतीयांसाठी इतक्या नविन नाहीत.तरीही एकूण
चोहूबाजूच्या मुलांमध्ये,असे निश्चय बुद्धी,अटल,अचल आत्मे पाहिले. असे निश्चय बुद्धी
दुसर्यांना पण निश्चय बुद्धी बनवण्यामध्ये उदाहरण बनले आहेत.प्रवृत्ती मध्ये राहत
पण शक्तिशाली संकल्पा द्वारे,दृष्टी वृत्तीचे परिवर्तन करतात.ते पण विशेष रत्न
पाहिले.काही अशी पण मुलं आहेत,जे जितके आपल्या रिवाजाप्रमाणे,अल्पकाळाच्या
साधनांमध्ये,अल्पकाळाच्या सुखामध्ये व्यस्त होते,असे पण रात्रंदिवस परिवर्तन करणारे,
चांगले तीव्र पुरुषार्थीच्या रांगेत चालले आहेत.जरी जास्त संख्या मध्ये नाहीत परंतु
तरीही चांगले आहेत. बापदादा झाटकूचे उदाहरण देतात.असेच मनाद्वारे त्यागाचा संकल्प
केल्यानंतर परत आपले मन पण जायला नको,असे पण आहेत. आज एकूण परिणाम पाहत
होते.शक्तीशाली आत्म्यांना पाहून, बाप दादा आनंदीत होऊन, आत्मिक वार्तालाप करत होते
की, ब्रह्माच्या रचनेच्या दोन प्रकारचे गायन केलेले आहे.एक ब्रह्माच्या मुखाद्वारे
ब्राह्मण निघाले आणि दुसरी रचना ब्रह्माने संकल्पाद्वारे सृष्टी स्थापन केली.तर
ब्रह्मा बाबांनी खूप काळापासून,श्रेष्ठ शक्तिशाली संकल्प केले आहेत,तर बापदादा
दोघेही,तरीही स्थापनेसाठी,शिवाची स्थापना तर म्हणनार नाही.शिववंशी म्हणाल.शिवकुमार
शिवकुमारी म्हणनार नाही.ब्रह्माकुमार कुमारी म्हणाल.तर ब्रह्माने विशेष श्रेष्ठ
संकल्पा द्वारे आव्हान केले म्हणजेच स्थापना केली.तर ब्रह्माच्या शक्तिशाली संकल्पा
द्वारे पोहोचले आहेत.
संकल्पाची रचना पण कमी नाही. जसे संकल्प शक्तिशाली आहेत,तर दूर वरून वेग वेगळ्या
पडद्याच्या मधील मुलांना आपल्या परिवारामध्ये घेऊन यायचे होते,श्रेष्ठ शक्तिशाली
संकल्पाने प्रेरित करून जवळ आणले,म्हणून या शक्तिशाली संकल्पाची रचना पण शक्तिशाली
आहे.अनेकांचा अनुभव पण आहे,जसे बुद्धीला विशेष कोणी प्रेरणा देऊन जवळ घेऊन येत
आहे.ब्रह्माच्या शक्तिशाली संकल्पा मुळे,ब्रह्माचे चित्रांना पाहताना,चैतन्याचा
अनुभव होतो. चैतन्य संबंधाच्या अनुभवा द्वारे पुढे जात आहेत.तर बापदादा रचनेला
पाहून आनंदित होत आहेत.आता आणखी पुढे चालून,आणखी शक्तिशाली रचनेचे प्रत्यक्ष प्रमाण
देत राहतील.दुहेरी परदेशीच्या सेवेच्या वेळेचा हिशोब केला असता,आता लहानपणाचा वेळ
समाप्त झाला.आता अनुभवी बणून, दुसर्यांना पण अचल अडोल बनवण्याचा,अनुभव करवण्याची
वेळ आहे.आता खेळ करण्याचा वेळ समाप्त झाला.आता नेहमी समर्थ बणून निर्बल आत्म्यांना
समर्थ बनवत चला.तुम्हा लोकांमध्ये निर्बलतेचे संस्कार असतील तर, दुसऱ्यांना पण
निर्बलच बनवणार. वेळ कमी आहे, आणि रचना जास्तीत जास्त येणार आहे.इतक्या संख्येमध्ये
खुश होऊ नका,की खूप आले आहेत.आणखी संख्या वाढणार आहे.परंतु जसे आपण इतका वेळ पालना
घेतली आणि ज्या विधीद्वारे आप लोकांनी पालना घेतली,आता ते परिवर्तन होत जाईल.
जसे पन्नास वर्षाचे पालना घेणारे स्वर्णजयंती वाले आणि हिरक जयंतीवाल्या मध्ये अंतर
तर राहिले ना.असे अंत काळात येणाऱ्या मध्ये पण अंतर होत जाईल.तर थोड्या वेळात
त्यांना शक्तिशाली बनवायचे आहे.स्वतः त्यांची श्रेष्ठ भावना तर असेल ना,परंतु तुम्हा
सर्वांना असे थोड्या वेळेत पुढे जाणाऱ्या मुलांना,आपल्या संबंध आणि संपर्काचा सहयोग
द्यायचा आहे, ज्यामुळे त्यांना सहज पुढे जाण्याचा उमंग आणि हिंमत येईल.आता ही सेवा
होणार आहे,फक्त स्वतःसाठी शक्ती जमा करण्याची वेळ नाही. परंतु आपल्या सोबत
दुसर्यांप्रति पण इतकी शक्ती जमा करायची आहे,जे दुसऱ्यांना पण सहयोग देऊ शकतील.फक्त
सहयोग घेणारे नाहीत परंतु देणारे बनायचे आहे. ज्यांना दोन वर्ष झाले आहेत,
त्यांच्यासाठी दोन वर्ष पण कमी नाहीत.थोड्या वेळेतच सर्व काही अनुभव करायचे आहे.जसे
वृक्षांमध्ये दाखवतात ना,अंत काळात येणारे आत्मे पण चार अवस्था मधून जरूर जातात.परत
दहा-बारा जन्म पण झाले,किंवा किती पण झाले,तरी अंत काळात येणाऱ्यांना पण, थोड्या
वेळेतच सर्व शक्तींचा अनुभव करावयाचा आहे.विद्यार्थी जीवनाचा आणि सोबतच सेवाधारी
जीवनाचा पण अनुभव करायचा आहे. सेवाधारीनी फक्त कोर्स करणे किंवा भाषण करायचे
नाही,तर सेवाधारी म्हणजे नेहमी उमंग उत्साहाचा सहयोग देणे.शक्तिशाली बनण्याचा सहयोग
देणे.थोड्या वेळेतच सर्व विषयात पास करायचे आहे.इतक्या तीव्र गतीने कराल तेव्हा तर
पोहोचू शकाल,म्हणून एक दोघांना सहयोगी बनवायचे आहे. एक दोघांचे योगी बनायचे नाही.
एक दोघांशी योग लावणे सुरू करायचे नाही.सहयोगी आत्मा नेहमी योगाद्वारे बाबांच्या
जवळ आणि समान बनवते. आपल्यासारखे नाही परंतु बाप समान बनवायचे आहे.जी पण स्वतःमध्ये
कमजोरी आहे,त्यांना येथेच सोडायचे आहे, परदेशामध्ये घेऊन जायचे नाही.शक्तिशाली आत्म
बणून शक्तिशाली बनायचे आहे.हाच विशेष दृढ संकल्प नेहमी स्मृतीमध्ये हवा,अच्छा.
चोहूबाजूच्या सर्व मुलांना, विशेष स्नेह संपन्न प्रेमपूर्वक आठवण देत आहेत,नेहमी
स्नेही नेहमी सहयोगी आणि शक्तिशाली,अशा श्रेष्ठ आत्म्यांना बाप दादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि नमस्ते.
सर्वांना ही खुशी आहे की,विविधता असून पण एकाचे बनले आहेत. आता वेगवेगळे मत
नाही.एकाच ईश्वरीय मतावर चालणारे श्रेष्ठ आत्मे आहात.ब्राह्मणांची भाषा पण एकच
आहे.एका बाबांचे आहेत आणि बाबांचे ज्ञान दुसऱ्यांना पण देऊन, सर्वांना एक बाबांचे
बनवायचे आहे. खूप मोठा परिवार आहे,जिथे पण जावा, ज्या देशांमध्ये पण जावा,तर हा नशा
आहे की,आपले घर आहे. सेवा स्थान म्हणजे आपले घर आहे. असे कोणी पण नसेल,त्याला इतकी
घरं असतील.जर तुम्हा लोकांना कोणी विचारले,तुमच्या ओळखीचे कुठे राहतात,तर तुम्ही
म्हणणार सार्या विश्वामध्ये आहेत.जिथेपण जावा,आपलाच परिवार आहे.खूप बेहद्दचे
अधिकारी झाले.सेवाधारी झाले आहात.सेवाधारी बनणे म्हणजे अधिकारी बनणे.हा बेहद्द चा
आत्मिक आनंद आहे.आत्ता प्रत्येक स्थान आणि आपल्या शक्तिशाली स्थिती
द्वारे,विस्ताराला प्राप्त होत आहे.अगोदर थोडे कष्ट वाटतात, परत उदाहरण मुर्त
बनतात,तर त्यांना पाहून दुसरे पण सहज पुढे जात राहतात.बापदादा सर्व मुलांना हाच
संकल्प नेहमी आठवणीमध्ये देतात की,स्वतः आठवण आणि सेवेच्या उमंग उत्साहा मध्ये रहा.
आनंदाने तीव्र गतीने पुढे जात राहा आणि दुसर्यांना पण असेच उमंग उत्साहाने पुढे
घेऊन चला.आणि चोहूबाजूचे जे साकार मध्ये पोहोचले नाहीत,त्यांचे चित्र आणि पत्र सर्व
पोहोचले आहेत.सर्वांच्या प्रती उत्तरांमध्ये बापदादा सर्वांना मनापासुन प्रेमपूर्वक
आठवण देत आहेत.जितका आत्ता उमंग उत्साहा आनंद आहे,त्यापेक्षा आणखी आनंदाला पदमगुणा
वाढवा. काहीजणांनी आपल्या कमजोरीचा समाचार पण लिहिला आहे, त्यांच्यासाठी पण बाप दादा
म्हणतात,तुम्ही लिहिले म्हणजेच बाबांना दिले.दिलेली गोष्ट परत आपल्या जवळ राहू शकत
नाही. कमजोरी दिली परत त्यांना संकल्प मध्ये पण आणू नका.तिसरी गोष्ट कधी पण कोणाचे
पण,स्वतःचे संस्कार किंवा संघटनचे संस्कार,किंवा वातावरणाच्या हालचालींमुळे कमजोर
बनू नका. नेहमी बाबांना एकत्रित रूपामध्ये अनुभव करून,कमजोर पासून शक्तिशाली बणून
पुढे जात राहा. कर्मभोग चुकते झाले म्हणजेच ओझे उतरले.आनंदाने पाठीमागील कर्मभोग
नष्ट करत जावा.बापदादा नेहमी मुलांचे सहयोगी आहेत.व्यर्थ विचार पण कमजोर
करतात.ज्याचे व्यर्थ विचार जास्त चालतात तर,त्यांनी दोन-चार वेळेस मुरली वाचा.मनन
करा,शिक्षण घेत चला. तर कोणती ना कोणती ज्ञानाची गोष्टी बुध्दी मध्ये बसेल.शुद्ध
संकल्पाच्या शक्तीला जमा करत जावा,तर व्यर्थ नष्ट होत जाईल. समजले.
बापदादाच्या
विशेष प्रेरणा
चोहूबाजूच्या देश किंवा विदेशामध्ये, अनेक असे लहान लहान स्थान आहेत.या वेळेतील
प्रमाणा नुसार, साधारण आहेत परंतु मालामाल मुलं आहेत.तर असे पण काही आहेत,जे
निमित्त बनलेल्या मुलांना पण,आपल्याकडे चक्कर लावण्याची आशा,खूप काही पासून पाहत
आहेत.परंतु अशा पूर्ण होत नाहीत.ती पण बापदादा अशा पूर्ण करत आहेत.विशेष महारथी
मुलांना नियोजन करून,चोहूबाजूला,ज्यांचे आशाचे दीपक बनवून ठेवले आहेत,ते जागृत
करायचे आहेत.आशांचे दीपक जागृत करण्यासाठी बापदादा विशेष वेळ देत आहेत.सर्व महारथी
वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन,गावातील मुलां जवळ,वेळेनुसार जाऊ शकलो नाहीत,त्यांची इच्छा
पूर्ण करायची आहे.मुख्य स्थानावरती तर मुख्य कार्यक्रम करण्यासाठी जातात परंतु जे
लहान-लहान स्थान आहेत त्यांच्यासाठी यथाशक्ती कार्यक्रमच मोठे कार्यक्रम
आहेत.त्यांची भावनाच सर्वात मोठा कार्यक्रम आहे.बापदादां जवळ असे काही मुलांचे अनेक
दिवसांपासून चे अर्ज फाईल मध्ये पडले आहेत,ही फाईल पण बापदादा पूर्ण करू इच्छितात.
महारथी मुलांना चक्रवर्ती बनवण्याची विशेष संधी देत आहेत, परत असे नाही म्हणायचे
सर्व ठिकाणी दादीनी जावे,असे नाही. जर एकच दादी सर्व ठिकाणी जाईल,परत तर पाच वर्षे
लागतील आणि परत पाच वर्ष बापदादां नी येऊ नये,हे मंजूर आहे? बापदादांना भेटण्याचा
कार्यक्रम मधुबन लागले चालत राहिल आणि दादी सेवेसाठी चक्र लावत राहील, हे पण चांगले
वाटणार नाही, म्हणून महारथी चे कार्यक्रम बनवा.जेथे कोणी गेले नाहीत तेथे जाण्यासाठी
कार्यक्रम बनवा आणि विशेष यावर्षी जेथे पण जावा,तर एक दिवस बाहेरची सेवा,एक दिवस
ब्राह्मणांची तपस्ये चा कार्यक्रम बनवा.हे दोन्ही कार्यक्रम जरूर पाहिजेत,फक्त
कार्यक्रमांमध्ये जाऊन भागदौड करून येऊ नका.जितके शक्य होईल,असा कार्यक्रम बनवा,
ज्यामध्ये ब्राह्मणांची विशेष भट्टी होईल आणि सोबतच असा कार्यक्रम ठेवा ज्याद्वारे
अति महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क होईल, परंतु थोडक्यात कार्यक्रम व्हावा. प्रथमच
असा कार्यक्रम बनवा ज्या द्वारे ब्राह्मणांना पण विशेष उमंग उत्साहाची शक्ती
मिळेल.निर्विघ्न बनण्यासाठी हिम्मत उल्हास मिळेल.तर चोहू बाजूचे चक्र लावण्याचा
कार्यक्रम बनवण्यासाठी,म्हणजे संदेश देण्यासाठी विशेष वेळ देत आहेत, कारण वेळे
प्रमाण परिस्थिती पण बदलत आहे आणि बदलत राहील, म्हणून फाईल नष्ट करायची आहे.
वरदान:-
आत्मिकतेच्या
श्रेष्ठ स्थिती द्वारा वातावरणाला आत्मिक बनवणारे सहज पुरुषार्थी भव.
आत्मिक स्थिती द्वारा
आपल्या सेवा केंद्राचे असे आध्यात्मिक वातावरण बनवा,ज्याद्वारे स्वतःची आणि
येणाऱ्यांची सहज प्रगती होऊ शकेल, कारण जे पण बाहेरच्या वातावरणा द्वारे थकून
येतात,त्यांना जास्त सहयोगाची आवश्यकता असते,म्हणून त्यांना आत्मिक वातावरणाचा
सहयोग द्या. सहज पुरुषार्थी बना आणि दुसर्यांना पण बनवा.प्रत्येक येणारी आत्मा
अनुभव करेल की,हे स्थान सहजच प्रगती करण्याचे स्थान आहे.
सुविचार:-
वरदानी बनून शुभ भावना
आणि शुभ इच्छाचे वरदान देत रहा.