06-10-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,जसे बाबा भविष्य २१ जन्मासाठी सुख देतात,तसेच तुम्ही मुलं पण,बाबाचे मदतगार
बना,प्रित बुद्धी बना, कोणाला दुःख देण्याचा विचार पण करु नका"
प्रश्न:-
तुम्ही रूप
बसंत मुलांचे कर्तव्य काय आहे?तुम्हाला बाबा बाबांकडून कोणती समज मिळाली आहे?
उत्तर:-
तुम्हा रूप बसंत मुलांचे कर्तव्य आहे,मुखाद्वारे नेहमी ज्ञान रत्न काढणे,तुमच्या
मुखाद्वारे कधी कटू वचन निघू नयेत.सर्व मुलांप्रति बाबांची हीच समज आहे की,
मुलांनो,आपसामध्ये कधी एक- दोघाला तंग करू नका,क्रोध करू नका,हे असुरी मनुष्यांचे
काम आहे. मन्सामध्ये पण कोणाला दुःख देण्याचा विचार यायला नको.निंदा स्तुती
मानापमान सर्व काही सहन करायचे आहे.जर कोणी काही बोलले,तर शांत राहायचे आहे.
हातामध्ये कायदा घ्यायचा नाही.
गीत:-
तू प्रेमाचा
सागर आहे..
ओम शांती।
ज्ञान आणि अज्ञान. तुम्हा मुलांमध्ये आता ज्ञान आहे- भक्त लोक कोणाची महिमा करतात
आणि तुम्ही मुलं जे येथे बसले आहात,तुम्ही कोणाची महिमा ऐकतात.रात्रंदिवसा चा फरक
आहे. ते तर असेच महिमा गात राहतात. इतके प्रेम नाही,कारण ओळखत नाहीत.तुम्हाला
बाबांनी ओळख दिली आहे,मी प्रेमाचा सागर आहे आणि तुम्हाला प्रेमाचे सागर बनवत
आहे.बाबा जे प्रेमाचे सागर आहेत,ते सर्वांना खूप प्रिय वाटतात.सतयुगामध्ये पण खूप
प्रेमाने राहतात.तुम्ही येथेच प्रेमाचे गुण शिकत आहात. कोणालाही विरोध करायचा
नाही,ज्याला बाबा खाऱ्या पाण्यासारखे म्हणतात. मनामध्ये कोणाविषयी ही नफरत,द्वेष
राहायला नको.नफरत म्हणजे द्वेष करणारे कलयुगी नर्कवासी आहेत.तुम्ही जाणतात आम्ही
सर्व भाऊ-बहीण आहोत. शांतीधाम मध्ये भाऊ भाऊ आहेत. येथे जेव्हा कर्मक्षेत्रा वरती
भूमिका वठवतात तर,भाऊबहीण आहेत. ईश्वरीय संतान आहेत.ईश्वराची महिमा आहे,ते ज्ञानाचे
सागर, प्रेमाचे सागर आहेत,म्हणजे सर्वांना सुख देतात.तुम्ही स्वत:ला विचारू शकता,जसे
बाबा भविष्य २१ जन्मासाठी सुख देतात,तसेच आम्ही पण ते कार्य करत आहोत? जर बाबांचे
मदतगार बनत नाहीत, प्रेम करत नाहीत,एक दोघा विषयी स्नेह नाही,विपरीत बुद्धि होऊन
राहतात,तर त्यांचा विनाश होतो. विप्रित बुद्धी बनणे आसुरांचे काम आहे.स्वतःला ईश्वरी
संप्रदाय म्हणून परत एक-दोघांना दुःख देणे त्यांना आसुर म्हटले जाते.तुम्हा मुलांना
कोणालाही दुःख द्यायचे नाही. तुम्हीच दुखहर्ता सुखकर्ता बाबांची मुलं आहात,तर दुःख
देण्याचे विचार पण तुम्हाला यायला नको.ते तर आसुरी संप्रदाय आहेत,ना की,ईश्वरीय
संप्रदाय कारण ते देह अभिमानी आहेत.ते कधी आठवणीच्या यात्रेमध्ये राहू शकत
नाहीत.आठवणीच्या यात्रे शिवाय कल्याण होणार नाही.वारसा देणाऱ्या बाबांची तर जरूर
आठवण करायची आहे,तेव्हाच विकर्म विनाश होतील.अर्धा कल्प एक दोघांना दुःख देत आले
आहात. एक-दोघांना तंग करत आले आहात.ते आसुरी संप्रदायाचे आहेत.जरी ते पुरुषार्थी
आहेत,तरी कधीपर्यंत दुःख देत राहणार,म्हणून बाबा म्हणतात दिनचर्या लिहा.दिनचर्या
लिहिल्यामुळे माहित होईल,आमच्या रजिस्टर मध्ये प्रगती होते की,आमची आसुरी चलन आहे?
बाबा नेहमी म्हणतात कधी कोणाला दुःख देऊ नका,निंदा स्तुती,मानापमान,थंडी गर्मी,सर्व
सहन करायचे आहे.कुणी काही बोलले तर शांत राहायला पाहिजे. असे नाही की,त्यांच्या
प्रति दोन तीन कडवे वचन बोलायचे आहेत.कोणी कोणाला दुःख देतात,तर त्यांना बाबा
समजाऊन सांगतील ना.मुलं मुलांना समजाऊ शकत नाहीत. आपल्या हातामध्ये कायदा घ्यायचा
नाही.काही गोष्ट होते तर बाबांना
सांगायचे आहे.शासनाचा पण कायदा आहे,कोणी कोणाला मारू शकत नाहीत,तक्रार करू शकतात.
कायद्याने वागवणे शासनाचे काम आहे.तुम्हीपण शासनाजवळ या, हातामध्ये कायदा घेऊ नका.हे
तर आपले घर आहे,म्हणून बाबा म्हणतात रोज कर्मेंद्रिया ची कचोरी घ्या.हे पण समजत
नाहीत की,शिव बाबा आदेश करत आहेत.बाबांने म्हटले आहे,नेहमी समजा शिवबाबा ऐकवत
आहेत.असे समजू नका की,ब्रह्मा ऐकवत आहेत.नेहमी बाबा ऐकवत आहेत,असे समजा तर त्यांची
आठवण येत राहील.हा रथ शिवबाबांनी घेतला आहे.तुम्हाला ज्ञान ऐकण्यासाठी सतोप्रधान
बनण्याचा रस्ता पण बाबा समजवत आहेत.ते गुप्त आहेत,तुम्ही प्रत्यक्ष आहात.जे पण आदेश
मिळतात, तुम्ही समजा,शिव बाबांचे आहेत,तर तुम्ही सुरक्षित राहाल.तुम्ही बाबा-बाबा
शिवाला च म्हणतात. वारसा पण त्यांच्याकडून च मिळतो,त्यांच्यासोबत खूप आदराने आणि
श्रेष्ठत्वाने चालायला पाहिजे. तुम्ही म्हणतात ना,बाबा आम्ही तर लक्ष्मीनारायण
बनू,परत दुसरे तिसरे बना.सूर्यवंशी बनले नाहीत,तर चन्द्रवंशी बना.असे तर नाही खुशाल
दास दासी बनू.प्रजा बनणे तर चांगले नाही ना.तुम्हाला तर येथेच दैवी गुणांची धारण
करायची आहे.आसुरी चलन तर असायला नको,नाहीतर परत म्हणतात ब्रह्मा तनामध्ये शिवबाबा
येतात,आम्ही असे समजत नाहीत.मायेचे भूत आल्यामुळे आपसामध्ये असे म्हणतात. आपसामध्ये
आसुरी स्वभावाचे भेटतात,तर असे बोलायला लागतात. आसुरी गोष्टी मुखाद्वारे काढत
राहतात.बाबा म्हणतात,तुम्ही आत्मा रूप बसंत बनतात,तर तुमच्या मुखाद्वारे रत्न
निघायला पाहिजेत.जर कटु वचन निघत आहेत,तर आसुरी बुद्धीचे झाले.
गिता मध्ये पण मुलांनी ऐकले.मुलं म्हणतात,बाबा प्रेमाचे सागर, सुखाचे सागर
आहेत.बाबांची महिमा आहे.बाबा म्हणतात तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण
करा,यामध्ये अनेक चांगली चांगली मुलं नापास होतात. देही अभिमानी स्थिती मध्ये राहू
शकत नाहीत.देही अभिमानी बनाल तेव्हाच इतके उच्चपद मिळेल. काही मुलं फालतू
गोष्टींमध्ये खूप वेळ वाया घालवतात.ज्ञानाच्या गोष्टी बुद्धीमध्ये राहत नाहीत.हे पण
गायन आहे की,घरच्या गंगेचा मान ठेवत नाहीत.घरच्या गोष्टीचा इतका मान ठेवत
नाहीत.जेव्हा कृष्ण
इत्यादीचे चित्र घरी पण आहे,परत श्रीनाथ द्वारे इत्यादी मंदिरांमध्ये दूर दूर
पर्यंत का जातात?शिवाच्या मंदिरांमध्ये पण दगडाचे लिंग बनवलेले असते.डोंगरातून दगड
निघतात,ते घासून घासून लिंग बनतात.त्यांच्यामध्ये काही दगडांमध्ये सोने पण लागलेले
असते.असे म्हटले जाते सोन्याचा कैलास पर्वत आहे.सोने पण डोंगरा मधून निघते ना.तर
थोडे सोने दगडाला पण लागलेले असते.ते परत खूप चांगले गोलाकार बनतात,त्याची परत
विक्री करतात. मार्बलचे पण शिवलिंग बनवत राहतात.आत्ता भक्ती मार्गातील भक्तांना
तुम्ही म्हणाल, तुम्ही बाहेर का भटकातात?तर बिघडतील.बाबा स्वतः म्हणतात, तुम्हा
मुलांनी खूप पैसे बरबाद केले आहेत,ही पण नाटकांमध्ये नोंद आहे.जे तुम्हाला धक्के
खावे लागतात. हा ज्ञान आणि भक्ती चा खेळ आहे.आता तुम्हा मुलांना सर्व समज मिळाली
आहे.ज्ञान सुखाचा रस्ता आहे,ज्ञानाद्वारे सतयुगी राजाई मिळते.या वेळेत राजाराणी तथा
प्रजा सर्व नरकाचे मालक आहेत.जेव्हा कोणाचा मृत्यू होतो, तर म्हणतात स्वर्गवासी
झाले,या गोष्टींना आता तुम्ही समजले आहे. आता तुम्ही म्हणता,आम्ही स्वर्गवासी
बनण्यासाठी,स्वर्गाची स्थापना करणाऱ्या बाबां जवळ बसले आहात.ज्ञानाचे थेंब मिळत
आहेत.थोडे पण ज्ञान ऐकले तर स्वर्गामध्ये जरूर येतील,बाकी सर्व पुरुषार्थ वरती
आधारित आहे.ते समजतात गंगाजल ची लोटी मुखामध्ये घातल्यामुळे पतिता पासून पावन
बनतात.लोटी भरून घेऊन जातात,परत रोज एक-एक थेंब पाण्यामध्ये मिसळून स्नान करतात.ते
जसे गंगा स्नान होते,असे समजतात.परदेशामध्ये पण गंगाजल भरून घेऊन जातात.ही सर्व
भक्ती आहे.
बाबा मुलांना समजवतात, मुलांनो माया खूप जोराने चापट मारते, विकर्म करवते म्हणून
कचेरी करा. स्वतःच आपली कचेरी करणे चांगले आहे. तुम्ही स्वतःच स्वतःला राजतिलक
देतात,तर स्वतःला तपासायचे आहे.तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे.
बाबा श्रीमत देतात,अशाप्रकारे करा, दैवी गुणांची धारणा करा,जे करतील त्यांनाच
मिळेल.तुम्हाला तर आनंदामध्ये शहारे यायला पाहिजेत. बेहद्दचे बाबा मिळाले आहेत,
त्यांच्या सेवेमध्ये मदतगार बनायचे आहे.आंधळ्याची काठी बनायचे आहे.जेवढे जास्त
बनाल,तेवढे आपलेच कल्याण होईल.बाबांची तर सारखी सारखी आठवण करायची आहे.यामध्ये एका
जागेवरती बसण्याची गोष्ट नाही. चालता-फिरता आठवण करायची आहे.रेल्वेमध्ये पण तुम्ही
सेवा करू शकता.तुम्ही कोणालाही समजाऊ शकता की, उच्च ते उच्च कोण आहेत,त्यांची आठवण
करा,तर वारसा त्यांच्याद्वारे मिळेल.आत्म्याला बेहद्दच्या पित्याकडून बेहदचा वारसा
मिळतो. कोणी दान पुण्य केल्यामुळे राज्यांच्या जवळ जन्म घेतात,ते ही अल्प
काळासाठी,नेहमी राजा बनू शकत नाहीत.तर बाबा म्हणतात येथे तर २१ जन्माची खात्री आहे.
स्वर्गामध्ये हे माहीत होणार नाही की,आम्ही बेहद्दच्या पित्याकडून हा वारसा घेतला
आहे.हे ज्ञान तुम्हाला या वेळेत मिळते तर खूप चांगल्या प्रकारे, पुरुषार्थ करायला
पाहिजे. पुरुषार्थ करत नाहीत म्हणजेच आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेतात.दिनचर्या
लिहित राहा तर भय राहील.कोणी कोणी लिहितात पण,बाबा पाहतील तर काय म्हणतील.चाल चलन
मध्ये तर खूप फरक राहतो ना.तर बाबा म्हणतात गफलत सोडा,नाहीतर खूप पश्चाताप करावा
लागेल.आपल्या पुरुषार्थाचा अंत काळात साक्षात्कार जरूर होईल,परत खुप रडावे
लागेल.काय कल्प कल्प असाच वारसा मिळेल? दासदासी जाऊन बनतील.अगोदर तर ध्यानामध्ये
जाऊन ऐकवत होते की,आमके आमके दासी आहेत,असे बनतील. परत बाबाने बंद केले. अंत काळात
परत तुम्हा मुलांना साक्षात्कार होतील.साक्षात्कार शिवाय सजा मिळू शकत नाही,कायदाच
नाही. मुलांना खूप युक्त्या समजवल्या जातात,तुम्ही आपल्या पतीला सांगा,बाबा म्हणतात
काम विकार महा शत्रू आहे, यांच्यावरती विजय मिळवा.माया जिते जगजीत बना.आता आम्ही
स्वर्गाचे मालक बनावे की, तुमच्यामुळे अपवित्र बनून नरकामध्ये जावे.खूप
प्रेमाने,नम्रता द्वारे समजावून सांगा,मला नरकामध्ये का ढकलत आहात?अशा अनेक मुली
आहेत,ज्या पतिला ज्ञान समजावून सांगत सांगत,शेवटी ज्ञानामध्ये घेऊन आलेल्या
आहेत.परत त्यांचे पती म्हणतात,माझी पत्नी तर माझा गुरु आहे,यांनी आम्हाला खूप चांगला
रस्ता दाखवला आहे.बाबांच्या पुढे लोटांगण घालतात.कधी जिंकतात,तर कधी हारतात पण. तर
मुलांना खूप खूप गोड बनायचे आहे.जे सेवा करतील तेच प्रिय वाटतात.भगवान मुलां जवळ आले
आहेत,तर त्यांच्या श्रीमता वर चालावे लागेल.श्रीमता वर चालत नाहीत,तर मायेचे वादळ
लागल्याने विकारांमध्ये जातात.असे पण आहेत,जे काही कामाचे नाहीत. हा राजयोगाचा
अभ्यास साधारण नाही.दुसऱ्या सर्व सत्संग इत्यादीमध्ये तर फक्त कनरस आहे, ज्यामुळे
अल्पकाळाचे सुख मिळते. या बाबा द्वारे तर २१ जन्माचे सुख मिळते.बाबा सुख शांतीचे
सागर आहेत.आम्हाला पण बाबा कडून वारसा घ्यायचा आहे.सेवा कराल तेव्हाच वारसा
मिळेल,म्हणून बैज नेहमी लावलेला असावा.आम्हाला असे सर्व गुण संपन्न बनायचे आहे.
स्वतःला तपासायचे आहे की, आम्ही कोणाला दुःख तर देत नाही?आसुरी चलन तर चालत
नाही.माया असे काम करते की, तुम्ही विचारू नका,चांगल्या चांगल्या घरातील मुलं
सांगतात, मायाने हे विकर्म करवले.कोणी खरे सांगतात,कोणी सांगत पण नाहीत. कोणी खरे न
सांगितल्यामुळे शंभर पटीने दंड मिळतो,परत ती सवय वाढत जाते.बाबांना सांगाल तर बाबा
सावधान करतील.बाबा म्हणतात पाप केले तर,रजिस्टर मध्ये लिहा आणि सांगा,तर तुमचे अर्धे
पाप नष्ट होईल.ऐकवत नाहीत, लपवतात तर,परत करत राहतात. श्राप मिळत राहतो.न सांगितल्या
मुळे एकाचा शंभर पटीने दंड मिळत राहतो.बाबा खूप चांगली मत देत राहतात,परंतु कोणा
कोणाला काहीच परिणाम होत नाही.तर जसे आपल्या भाग्याला लात मारतात,खूप नुकसान
करतात.अंत काळात सर्वांना साक्षात्कार होईल,असे बनतील. वर्गामध्ये पुढे जात
राहतात,तर गुण मिळतात ना.दुसऱ्या वर्गात गेल्यामुळे परिणाम निघत राहतो. तुम्ही पण
आपल्या वर्गामध्ये जातात,तर गुणांची माहिती होते, परत खूप रडाल,परत काय करू
शकाल?परिणाम तर निघाला,जे भाग्या मध्ये होते, ते घेतले.बाबा सर्व मुलांना सावधान
करतात. कर्मातित अवस्था आत्ता होऊ शकत नाही.कर्मातित अवस्था झाली तर,परत हे जुने
शरिर सोडावे लागेल.आता काही ना काही विकर्म होत राहतात.कर्मभोग आहे म्हणून पूर्ण
योग लागत नाही.आता कोणीही म्हणू शकत नाही की, आम्ही कर्मातित अवस्थांमध्ये आहोत,जवळ
आल्यामुळे त्याची लक्षणे दिसून येतील.सर्व तुमच्या अवस्थेवरती आणि विनाशा वरती
आधारित आहे.तुमचे राजयोगाचे शिक्षण पूर्ण होत जाईल,तर पाहतील, लढाई समोर आहे,अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मातपिताची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) मायेचे वश
होऊन कोणतेही अशी चलन चालायची नाही.आपल्या चलनचे रजिस्टर ठेवायचे आहे. असे कोणते
कर्म करायचे नाही, ज्यामुळे पश्चाताप करावा लागेल.
(२) खूप खूप प्रेमाने आणि नम्रताने सेवा करायची आहे.खूप गोड बनायचे आहे.मुखाद्वारे
आसुरी बोल काढायचे नाहीत.आपल्या संगाची खूप संभाळ करायची आहे. श्रीमतावर चालत
राहायचे आहे.
वरदान:-
मन्सा संकल्प
किंवा वृत्ती द्वारे श्रेष्ठ वातावरणाचा सुगंध पसरवणारे शिवशक्ती एकत्रित भव.
जसे आज काल स्थूल
सुगंधाच्या साधनाद्वारे गुलाब चंदन आणि वेगवेगळ्या प्रकारचा सुगंध पसरवत राहतात,असे
तुम्ही शिव शक्ती एकत्रित बनून,मन्सा संकल्प व वृत्ती द्वारे सुख शांती प्रेम
आनंदाचा सुगंध पसरवत जावा.रोज अमृतवेळेला वेगवेगळ्या श्रेष्ठ वातावरणाच्या कारंजा
सारखे आत्म्यांच्या वरती गुलाब पाणी घाला.फक्त संकल्पाचे ऑटोमॅटिक बटन चालू करा,तर
विश्वामध्ये ज्या अशुद्ध वृत्तीची घाण आहे,ती समाप्त होईल.
बोधवाक्य:-
सुखदाता द्वारे
सुखाचे भांडार प्राप्त होणे,हीच त्यांच्या प्रेमाची लक्षणं आहेत.