29-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :-तुम्ही आता काट्या पासून फुल बनले आहात,तुम्ही नेहमी सर्वांना सुख द्यायला पाहिजे,तुम्ही कोणालाही दुःख देऊ शकत नाही."

प्रश्न:-
चांगली सर्वोत्तम पुरुषार्थी मुलं,मोकळ्या मनाने कोणते बोल बोलतील?

उत्तर:-
बाबा आम्ही तर आदराने पास होऊनच दाखवू. तुम्ही बेफिक्र(निश्चिंत)रहा.त्यांचे रजिस्टर ही चांगले असेल.त्यांच्या मुखातून कधीही असे बोल निघणार नाहीत की आम्ही तर पुरुषार्थी आहोत.पुरुषार्थ करून माया जराही हलवू शकणार नाही असे महावीर बनायचे आहे.

ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलं आत्मिक पित्या द्वारे शिकत आहेत.स्वतःला आत्मा समजायला पाहिजे.निराकार पित्याची आम्ही निराकारी मुले आत्मे शिकत आहोत.दुनियेमध्ये साकार(देहधारी)शिक्षक शिकवतात.इथे निराकार पिता, निराकार शिक्षक आहे.बाकी यांचे(ब्रह्माचे)काही मूल्य नाही. शिवबाबा बेहद चा पिता येऊन यांचे मूल्य वाढवतात.अतिशय मूल्यवान शिवबाबा आहेत,जे स्वर्गाची स्थापना करतात.किती उच्च कार्य करतात.जेवढे बाबा उच्च ते उच्च गायले जातात तेवढेच मुलांनाही उच्च बनायचे आहे.तुम्ही जाणत आहात सर्वांत उच्च बाबा आहेत.हेही तुमच्या बुद्धीमध्ये आहे की बरोबर,आता स्वर्गाची राजाई स्थापन होत आहे, हे संगमयुग आहे.सतयुग आणि कलियुगाच्या मध्ये,पुरुषोत्तम बनण्याचे संगमयुग.पुरुषोत्तम अक्षराचा अर्थही मनुष्याला माहीत नाही.उच्च ते उच्च होते नंतर, नीच ते नीच बनले आहेत. पतित आणि पावन मध्ये किती फरक आहे.जे देवतांचे पुजारी असतात,ते स्वतः वर्णन करतात, तुम्ही सर्व गुण संपन्न......विश्वाचे मालक.आम्ही विषय वैतरणी नदी मध्ये गटांगळ्या खाणारे आहोत,असे फक्त म्हणतात, समजत काहीच नाहीत.हे विचित्र आश्चर्यकारक नाटक आहे.अशा- अशा गोष्टी तुम्ही कल्प-कल्प ऐकत आले आहात.बाबा येऊन समजावत आहेत.ज्यांचे बाबांसोबत पूर्ण प्रेम आहे त्यांना बाबांविषयी खूप आकर्षण वाटते.आता आत्मा बाबांना कशी भेटणार?साकार मध्येच भेटावे लागते,निराकारी दुनियेमध्ये तर आकर्षणाची गोष्टच नाही.तिथे तर सर्वजण पवित्र आहेत.कट (आत्म्यावरचा मळ)निघून गेला आहे.आकर्षणाची गोष्टच नाही. प्रेमाच्या गोष्टी इथेच असतात. अशा बाबांना तर एकदम पकडून ठेवा.बाबा तुम्ही तर कमाल करता.तुम्ही आमचे जीवन असे बनवता.खूप प्रेम असायला पाहिजे.प्रेम नाही कारण की आत्म्यावर कट चढलेली आहे. आठवणीच्या यात्रे शिवाय कट निघणार नाही,एवढे प्रेमळ बनू शकणार नाही.तुम्हा फुलांना तर इथेच उमलायचे आहे,फुल बनायचे आहे.तेव्हाच तर तिथे जन्मजन्मांतरासाठी फुल बनता. किती खुशी व्हायला पाहिजे- आम्ही काट्या पासून फूल बनत आहोत.फुले नेहमी सर्वांना सुख देतात.फुलांना सर्वजण आपल्या डोळ्यांवर ठेवतात,त्यांचा सुगंध घेतात.फुलांपासून इत्र(अत्तर) बनवतात.गुलाब जल बनवतात. बाबा तुम्हाला काट्या पासून फूल बनवत आहेत.तर तुम्हा मुलांना खुशी का राहत नाही!बाबांना तर आश्चर्य वाटते,शिवबाबा आम्हाला स्वर्गाचे फूल बनवत आहेत!फुल जेव्हा जुने होते,तेव्हा एकदम सुकून जाते.तुमच्या बुद्धी मध्ये आहे आता आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत.तमोप्रधान मनुष्य आणि सतोप्रधान देवतांच्या मध्ये किती फरक आहे.हे ही बाबांच्या शिवाय दुसरे कोणी समजावू शकत नाही.

तुम्ही जाणता आम्ही देवता बनण्यासाठी शिकत आहोत. शिक्षणामध्ये नशा राहतो ना. तुम्ही ही समजता आम्ही बाबांच्या द्वारे शिकून विश्वाचे मालक बनत आहोत.तुमचे शिक्षण भविष्यासाठी(पुढच्या जन्मासाठी)आहे.भविष्यासाठी शिक्षण असे कधी ऐकले आहे का?आम्ही नवीन दुनियेसाठी शिकत आहात,असे तुम्ही म्हणता.नव्या जन्मासाठी शिकत आहोत.कर्म,अकर्म,विकर्माची गती ही बाबा समजावून सांगतात.गीतेमध्ये ही आहे परंतु त्याचा अर्थ गीता वाल्यांना थोडाच माहित आहे.आता बाबांच्या द्वारे तुम्ही जाणले आहे की सतयुगांमध्ये कर्म अकर्म होते नंतर रावण राज्यामध्ये कर्म विकर्म व्हायला सुरुवात होते.63 जन्म तुम्ही असे कर्म करत आले आहात.विकर्मांचे ओझे डोक्यावर खूप आहे.सर्व पाप आत्मे बनले आहेत.आता ते पाठीमागचे विकर्म कशाप्रकारे नष्ट होतील. तुम्ही जाणत आहात आम्ही सुरुवातीला सतोप्रधान होतो नंतर 84 जन्म घेतले आहेत.बाबांनी नाटकाची ओळख करून दिली आहे.जे सुरुवातीला येतील,सुरुवातीला ज्यांचे राज्य असेल ते 84 जन्म घेतील.नंतर बाबा येऊन राज्य भाग्य देतील.आता तुम्ही राज्य घेत आहात.तुम्ही समजता आम्ही कशा प्रकारे 84 चे चक्र पूर्ण केले आहे.आता परत पवित्र बनायचे आहे.बाबांची आठवण करत- करत आत्मा पवित्र बनेल नंतर हे जुने शरीर नष्ट होऊन जाईल. मुलांना अपार खुशी व्हायला पाहिजे.ही महिमा तर कधीही कुठे ऐकली नाही की बाबा,पिताही आहेत,शिक्षकही आहेत,गुरूही आहेत. ते ही तिघेही उच्च ते उच्च आहेत. सतपिता,सतशिक्षक,सतगुरू तिन्ही एकच आहेत.तुम्हाला आता जाणीव होत आहे.बाबा जे ज्ञानाचा सागर आहेत,सर्व आत्म्यांचे पिता आहेत,ते आम्हाला शिकवत आहेत.युक्ती सांगत आहेत.मासिकांमध्ये ही चांगले-चांगले पॉईंट निघत राहतात.रंगीत चित्रांचे मासिक ही निघू शकते.फक्त अक्षरे छोटी-छोटी होतात.चित्र तर बनवलेले च आहेत.कुणी कुठेही बनवू शकतात. प्रत्येक चित्राची माहिती तुम्ही जाणू शकता.शिवबाबांचे कर्तव्य काय आहे, हे ही तुम्ही जाणता.मुले पित्याचे कर्तव्य पित्याकडूनच जाणून घेतील ना.तुम्ही काहीच जाणत नव्हते.छोटी मुले काय शिकणार.5 वर्षानंतर शिकायला सुरुवात करतात.नंतर शिकता- शिकता उच्च परीक्षा पास करण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात.तुम्ही किती साधारण आहात आणि काय बनत आहात!विश्वाचे मालक.तुमचा किती शृंगार होईल.सोन्याचा चमचा मुखामध्ये असेल.हे तर गायनच आहे.आताही काही चांगली मुले शरीर सोडून जातात, तर खूप चांगल्या घरांमध्ये जन्म घेतात.तर त्यांना मुखामध्ये सोन्याचा चमचा मिळतो.अगोदर कोणाजवळ तरी जन्म घेतील ना. निर्विकारींच्या जवळ सुरुवातीला श्रीकृष्णच जन्म घेणार आहेत. बाकीचे जे पण जातील ते विकारांच्या जवळच जन्माला येतील.परंतु गर्भामध्ये एवढी सजा भोगावी लागणार नाही.खूप चांगल्या घरांमध्ये जन्म घेतील. सजेपासून मुक्त झाले,बाकी थोडी सजा मिळेल.एवढे दुःख मिळणार नाही.पुढे चालून पहा तुमच्याजवळ मोठ-मोठ्या घरातील मुलं, राजकुमार-राजकुमारी कसे येतात.बाबा तुमची किती महिमा करतात.तुम्हाला मी माझ्यापेक्षाही उच्च बनवत आहे.ज्याप्रमाणे कुणी लौकिक पिता मुलांना सुखी बनवतो.60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वतः वानप्रस्थ मधे निघून जातात,भक्ती करतात.ज्ञान तर कोणी देऊ शकत नाही.ज्ञानाने मी सर्वांची सदगती करतो. तुमच्या निमित्ताने सर्वांचे कल्याण होते कारण की तुमच्यासाठी नवी दुनिया अवश्य पाहिजे.तुम्हाला किती खुशी होते.आता शाकाहारींच्या संमेलनामध्ये ही तुम्हा मुलांना निमंत्रण मिळाले आहे.बाबा तर हिम्मत ठेवा असे म्हणत राहतात.दिल्लीसारख्या शहरामध्ये तर एकदम आवाज पसरायला हवा.दुनिया मध्ये अंधश्रद्धेची भक्ती खूप आहे. सतयूग त्रेतायुगामध्ये कोणत्याही प्रकारची भक्ती नसते.तो विभाग वेगळा आहे.अर्धा कल्प ज्ञानाची प्रारब्ध मिळते.तुम्हाला बेहदच्या पित्याकडून 21 जन्मांचा वारसा मिळत आहे.नंतर 21 पिढ्या तुम्ही सुखी राहता.वृद्धअवस्थेपर्यंत दुःखाचे नाव राहत नाही.संपूर्ण आयुष्यभर सुखी राहता.जेवढा वारसा प्राप्त करण्याचा पुरुषार्थ कराल तेवढे उच्चपद प्राप्त कराल.तर पूर्ण पुरुषार्थ करायला पाहिजे.तुम्ही पाहात आहात, माळ क्रमवार कशी बनत आहे.पुरुषार्था नुसारच बनणार आहे.तुम्ही आश्चर्यकारक विद्यार्थी आहात.शाळेमध्ये मुलांना निशाण्या पर्यंत पळायला लावतात ना.बाबाही म्हणतात तुम्हाला निशाण्या पर्यंत जाऊन पुन्हा इथे यायचे आहे. आठवणीच्या यात्रे द्वारे तुम्ही पळत जाऊन पुन्हा प्रथम क्रमांकामध्ये येणार आहात.मुख्य आहे आठवणी ची यात्रा. म्हणतात-बाबा आम्ही विसरून जातो.अरे बाबा एवढे तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात,त्यांना तुम्ही विसरून जाता. वादळे तर जरुर येणार आहेत.बाबा हिम्मत देतात ना.त्याबरोबरच हे युद्ध स्थळ आहे,असेही सांगतात.खरे तर युधिष्टरही बाबांनाच म्हणायला पाहिजे जे आपल्याला युद्ध करायला शिकवतात.माये बरोबर तुम्ही युद्ध कसे करू शकता,हे तुम्हाला युधिष्टर पिता शिकवत आहे.यावेळी युद्धाचे मैदान आहे ना.बाबा म्हणतात- काम महाशत्रू आहे,त्यावर जीत प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल.तुम्हाला मुखाने कोणताही जप करायचा नाही,शांत राहायचे आहे.भक्ती मार्गामध्ये किती मेहनत करतात.मनामध्ये रामराम असे जपतात,त्याला नवविधा भक्ति असे म्हटले जाते. तुम्ही जाणत आहात बाबा आम्हाला आपल्या माळे मधले मणी बनवत आहेत.तुम्ही रुद्र माळेचे मणी बनणार आहात,ज्याची नंतर पूजा होईल.रुद्र माळ आणि रूण्ड माळ बनत आहे.विष्णूच्या माळेला रुण्डमाळ असे म्हटले जाते.तुम्ही विष्णुच्या गळ्यातला हार बनत आहात.कसे बनाल?जेव्हा शर्यतीमध्ये पहिला क्रमांक मिळवाल.बाबांची आठवण करायची आहे आणि ८४ च्या चक्राला जाणायचे आहे.बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील.तुम्ही कसे प्रकाश स्तंभ आहात.एका डोळ्यांमध्ये मुक्ती,एका डोळ्यांमध्ये जीवनमुक्ती.या चक्राला जाणल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा,सुखधाम चे मालक बनाल.तुमची आत्मा म्हणते- आता मी आत्मा आपल्या घरी जाणार आहे.घराची आठवण करत-करत जाणार आहोत.ही आठवणी ची यात्रा आहे.तुमची यात्रा पहा कशी उत्कृष्ट आहे. बाबा जाणतात आम्ही असे बसल्याबसल्या क्षीरसागरामध्ये जाणार आहोत.विष्णु ला क्षीरसागरामध्ये दाखवतात ना. बाबांची आठवण करता-करता क्षीरसागरमध्ये जाणार आहोत.क्षीरसागर आता नाही. ज्यांनी तलाव बनवला आहे अवश्य क्षीर टाकले असेल. सुरुवातीला क्षीर(दूध)खूप स्वस्त होते.एका पैशामधे तांब्या भरून येत होते.तर तलाव का भरणार नाही.आता तर क्षीर कुठे आहे. पाणीच पाणी झाले आहे.बाबांनी नेपाळ मध्ये पाहिले आहे-खूप मोठे विष्णूचे चित्र आहे.सावळाच बनवला आहे.तुम्ही आता आठवणी ची यात्रा केल्याने आणि स्वदर्शन चक्र फिरवल्याने विष्णुपुरी चे मालक बनत आहात.दैवी गुणही इथे धारण करायचे आहेत.हे पुरुषोत्तम संगमयुग आहे.शिकता-शिकता तुम्ही पुरुषोत्तम बनाल.आत्म्या मधला कनिष्ठपणा निघून जाईल. नशा चढायला पाहिजे-असे बाबा रोज-रोज समजावून सांगतात. म्हणतात बाबा पुरुषार्थ करत आहोत.सर्वोत्तम मुले जे चांगल्याप्रकारे शिकतात त्यांचे रजिस्टर ही चांगले असेल. बाबांना म्हणायला पाहिजे-बाबा तुम्ही निश्चिंत(बेफिक्र)रहा आम्ही असे बनूनच दाखवू.बाबाही जाणतात अनेक शिक्षिका खूप फर्स्टक्लास(उत्कृष्ट) आहेत.सर्वजन तर फर्स्टक्लास,चांगले बनू शकत नाहीत.चांगले-चांगले शिक्षक एक दुसर्‍यालाही जाणतात.सर्वांना महारथींच्या लाईन मध्ये आणू शकत नाही. चांगले मोठ-मोठे सेवाकेंद्र खोला तर मोठे-मोठे लोक येतील.कल्पा पूर्वीही हुंडी(भंडारी)भरली होती.सांवलशाह बाबा हुंडी अवश्य भरतील.दोन्ही बाबांना खूप मुले आहेत.प्रजापिता ब्रह्मा ची किती मुले आहेत.कोणी गरीब,कोणी साधारण,कोणी सावकार,कल्पा पूर्वीही यांच्याद्वारे राजाई स्थापन केली होती,ज्याला दैवी राजस्थान असे म्हटले जात होते.आता तर आसुरी राजस्थान आहे.संपूर्ण विश्व दैवी राजस्थान होते,एवढे खंड नव्हते.हीच दिल्ली यमुनेचा किनारा होता, त्याला परिस्तान असे म्हटले जात होते.तिथे नद्यांना पूर इत्यादी थोडीच येतो.आता तर किती पूर येतो,धरण फुटतात.जसे काही आपण प्रकृतीचे दास बनलो आहोत.नंतर तुम्ही मालक बनणार आहात.तिथे मायेची एवढी ताकत नसते जी आपली बेइज्जती करू शकते.धरती मध्ये एवढी ताकत नसते की,ती हलू शकेल.तुम्हालाही महावीर बनायचे आहे.हनुमानाला महावीर म्हणतात.बाबा म्हणतात तुम्ही सर्वजण महावीर आहात.महावीर मुले कधीही हलू शकत नाहीत. महावीर महावीरनीचे मंदिर बनले आहेत.एवढ्या सर्वांचे चित्र थोडेच ठेवतील.प्रतिकात्मक रुपाने बनवले आहे.तुम्ही आता भारताला स्वर्ग बनवत आहात तर किती खुषी व्हायला पाहिजे. किती चांगले गुण असायला पाहिजेत.अवगुणांना काढून टाका.सदैव हर्षित रहा.वादळे तर येतील.वादळ आले तरच महावीरनीची ताकत दिसून येईल. तुम्ही जेवढे मजबुत बनाल तेवढे वादळ येतील.आता तुम्ही पुरुषार्थ करुन क्रमवार पुरुषार्थ नुसार महावीर बनत आहात.बाबाच ज्ञानाचा सागर आहेत.बाकी सर्व शास्त्र इ.तर भक्तिमार्गाची सामग्री आहे.तुमच्यासाठी आहे-पुरुषोत्तम संगमयुग. कृष्णाची आत्मा इथेच बसली आहे.भागीरथ हाच आहे.तुम्ही सुद्धा असेच भागीरथ आहात, भाग्यशाली आहात ना.भक्ति मार्गामध्ये बाबा तर कोणाचाही साक्षात्कार करवू शकतात.याच कारणामुळे मनुष्यांनी सर्वव्यापी आहे असे म्हटले आहे,हीसुद्धा नाटकाची भावी(नोंद)आहे.तुम्ही मुले खूप उच्च शिक्षण घेत आहात.अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आत्म्यावर जो कट(गंज) चढलेला आहे,त्याला आठवणीच्या यात्रे द्वारे उतरून खूप-खूप प्रेमळ बनायचे आहे. प्रेम असे असायला हवे ज्याद्वारे सदैव बाबांचे आकर्षण राहायला पाहिजे.

2. मायेच्या वादळांना घाबरायचे नाही,महावीर बनायचे आहे. आपल्या अवगुणांना काढून टाकायचे आहे,सदैव हर्षित राहायचे आहे.अचल राहायचे आहे.(डावाडोल व्हायचे नाही)

वरदान:-
आपल्या अधिकाराच्या शक्तीद्वारे त्रिमूर्ती रचनेला सहयोगी बनवणारे मास्टर रचनाकार भव

त्रिमूर्ती शक्ति(मन,बुद्धि आणि संस्कार)ही तुम्हा मास्टर रचनाकार ची रचना आहे.यांना आपल्या अधिकाराच्या शक्तीने सहयोगी बनवा.ज्याप्रमाणे राजा स्वतः कार्य करत नाही,करवून घेतो, करणारे राज्य कारभारी वेगळे असतात.अशाप्रकारे आत्माही करावनहार आहे,करनहार या त्रिमूर्ती शक्ती आहेत.तर मास्टर रचनाकाराच्या वरदानाला स्मृतीमध्ये ठेवून त्रिमूर्ती शक्तींना आणि साकार कर्मइंद्रियांना योग्य मार्गावर चालवा.

बोधवाक्य:-
अव्यक्त पालने च्या वरदानाचा अधिकार घेण्यासाठी स्पष्टवादी बना.