27-10-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- वेग वेगळ्या युक्त्या समोर ठेवून आठवणीच्या यात्रेमध्ये रहा,या जुन्या दुनियेला विसरून आपल्या शांतीधाम आणि नव्या दुनियेची आठवण करा"

प्रश्न:-
कोणते कार्य किंवा पुरुषार्थ आत्ताच चालते,संपूर्ण कल्पामध्ये नाही?

उत्तर:-
आठवणीच्या यात्रेमध्ये राहून आत्म्याला पावन बनवण्याचा पुरुषार्थ,संपूर्ण दुनियेला पतिता पासून पावन बनवण्याचे कार्य,संपूर्ण कल्पा मध्ये फक्त याच संगमयुगाच्या वेळी चालत असते.हे कार्य प्रत्येक कल्पामध्ये पुनरावृत्त होत असते. तुम्ही मुले या अनादि अविनाशी नाटकाच्या आश्चर्यकारक रहस्याला समजत आहात.

ओम शांती।
आत्मिक पिता बसून आत्मिक मुलांना समजावत आहे. म्हणून आत्मिक मुलांनीही देही-अभिमानी या आत्मिक अवस्थेमध्ये निश्चय बुद्धी होऊन बसायचे किंवा ऐकायचे आहे. बाबांनी समजावले आहे-आत्माच या कर्मेंद्रियांच्याद्वारे ऐकत असते, हे पक्के आठवणीत ठेवा.सदगती आणि दुर्गतिचे हे चक्र तर प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये असायला पाहिजे,ज्यामध्ये ज्ञान आणि भक्ती सर्वकाही येऊन जाते. चालता-फिरता बुद्धीमध्ये हे असायला पाहिजे.ज्ञान आणि भक्ती,सुख आणि दुःख,दिवस आणि रात्रीचा खेळ कसा चालतो. आम्ही 84 ची भूमिका कशा प्रकारे वठवतो.बाबांच्या आठवणी मध्ये आहे म्हणून मुलांनाही आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करवतात.यामुळे तुमचे विकर्म पण विनाश होतात आणि तुम्ही राज्य ही प्राप्त करता.तुम्ही जाणता, ही जुनी दुनिया तर आता नष्ट होणार आहे.ज्याप्रमाणे कोणाचे जुने घर असेल आणि नवीन बांधत असतील तर मनामध्ये निश्चय राहतो,आता आम्ही नव्या घरांमध्ये जाणार आहोत.नंतर घर बांधण्यासाठी दोन वर्ष लागतात. ज्याप्रमाणे नव्या दिल्लीमध्ये शासकीय विश्रामग्रह इ.बनवतात तर अवश्य शासन म्हणेल आम्ही ट्रान्सफर (बदली)होऊन नव्या दिल्लीमध्ये जाणार आहोत.तुम्ही मुले जाणत आहात ही संपूर्ण बेहद ची दुनिया जुनी झाली आहे. आता नव्या दुनियेमध्ये जायचे आहे.बाबा युक्त्या सांगतात अशा-अशा युक्त्यांनी बुद्धीला आठवणीच्या यात्रेमध्ये लावायचे आहे.आम्हाला आता घरी जायचे आहे म्हणून गोड घराची आठवण करायची आहे,ज्यासाठी मनुष्य खूप प्रयत्न करत आहेत. गोड-गोड मुलांना हे पण समजावून सांगितले आहे की हे दुःखधाम आता नष्ट होणार आहे.तुम्ही जरी या दुनियेमध्ये राहत आहात परंतु तुम्हाला ही दुनिया पसंत नाही. आम्हाला परत नव्या दुनियेमध्ये जायचे आहे.भक्तिमार्गाचे तर किती भरपूर चित्र आहेत.त्यांच्या तुलनेमध्ये तुमची चित्रे तर खूप थोडी आहेत.ही तुमची ज्ञान मार्गाची चित्रे आहेत आणि ती सर्व भक्तिमार्गाची आहेत. चित्रांवर वरच संपूर्ण भक्ती होत आहे.तुमचे तर खरे चित्र आहेत म्हणून तुम्ही समजावू शकता-चूक काय आहे आणि बरोबर काय आहे.बाबांना ज्ञानसंपन्न (नॉलेजफुल)असे म्हटले जाते.तुम्हाला हे ज्ञान आहे. तुम्ही जाणत आहात संपूर्ण कल्पा मध्ये आम्ही किती जन्म घेतले आहेत.हे चक्र कसे फिरत आहे. तुम्हाला निरंतर बाबांची आठवण आणि ज्ञानामध्ये राहायचे आहे. बाबा तुम्हाला संपूर्ण रचता आणि रचनेचे ज्ञान देत आहे.बाबांची ही आठवण राहते.बाबांनी समजावले आहे-मी तुमचा पिता, शिक्षक आणि सद्गुरु ही आहे. तुम्ही फक्त हे समजावून सांगा- बाबा म्हणतात तुम्ही मला पतित-पावन,मुक्तिदाता, मार्गदर्शक असे म्हणता ना. कुठला मार्गदर्शक?शांतीधाम मुक्तिधाम चा.बाबा तिथपर्यंत नेऊन सोडतील.मुलांना शिकवून, समजावून,फुलासारखे बनवून घरी नेऊन सोडतील.बाबांच्या शिवाय तर कोणीही घेऊन जाऊ शकत नाही.भले कोणी कितीही तत्वज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी असो. ते समजतात आता आम्ही ब्रह्म तत्वामध्ये विलिन होऊन जाऊ. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की शांतीधाम तर आमचे घर आहे. तिथे जाऊन नंतर सुरुवातीला आम्ही नव्या दुनियेमध्ये येऊ.ते सर्व नंतर येणार आहेत.तुम्ही जाणता कशा प्रकारे सर्व धर्म क्रमवार येतात.सतयुग त्रेतायुगा मध्ये कोणाचे राज्य आहे.त्यांचे धर्म शास्त्र कोणते आहे.सूर्यवंशी चंद्रवंशी यांचे तर एकच शास्त्र आहे.परंतु ते काही खरे नाही कारण की तुम्हाला जे ज्ञान मिळते ते इथेच नष्ट होऊन जाते. तिथे कोणतेही शास्त्र नाही.द्वापर युगापासून जे धर्म येतात त्यांचे शास्त्र कायमस्वरूपी चालत आले आहेत.आता पुन्हा एका धर्माची स्थापना होत आहे तर बाकी सर्व धर्म विनाश होणार आहेत.एक राज्य,एक धर्म,एक भाषा,एक मत असावे असे म्हणत राहतात. ते तर एका द्वारेच स्थापन होऊ शकते.तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सतयुगाच्या सुरुवातीपासून कलियुगाच्या अंतापर्यंतचे सर्व ज्ञान आहे.बाबा म्हणतात आता पावन बनण्यासाठी पुरुषार्थ करा. तुम्हाला पतित बनण्यासाठी अर्धा कल्प लागला आहे.खरेतर संपुर्ण कल्प म्हणायला पाहिजे,ही आठवणीची यात्रा तर तुम्ही आता शिकत आहात.तिथे हे नाहीत. देवता पतीता पासून पावन बनण्याचा पुरुषार्थ करत नाहीत. ते प्रथम राजयोग शिकून इथूनच पावन बनून जातात.त्याला सुखधाम असे म्हटले जाते.तुम्ही जाणत आहात संपूर्ण कल्पा मध्ये फक्त आत्ताच आम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करत आहे.नंतर हाच पुरुषार्थ किंवा कार्य जे चालते पतित दुनियेला पावन बनवण्यासाठी,ते कल्पानंतर पुनरावृत्त होईल.चक्र तर अवश्य लावतील ना.तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत-की हे नाटक आहे,सर्व आत्मे कलाकार आहेत ज्यांच्यामध्ये अविनाशी भूमिका नोंदलेली आहे.ज्याप्रमाणे ते नाटक चालू राहते.परंतु तो चित्रपट घासला जाऊन जुना होतो.हा अविनाशी चित्रपट आहे. हे सुद्धा आश्चर्य आहे.किती छोट्याशा आत्म्यामध्ये संपूर्ण भूमिकेची नोंद आहे.बाबा तुम्हाला किती रहस्यमय गोष्टी सांगत आहेत.आता कुणीही ऐकले तर म्हणतात या तर खूप आश्चर्यकारक गोष्टी तुम्ही आम्हाला समजावत आहात. आत्मा काय आहे ते आता समजले आहे.शरीराला तर सर्व जण समजतात.डॉक्टर लोक तर मनुष्याचे हृदय बाहेर काढून नंतर आत बसवतात.परंतु आत्म्या बद्दल कोणाला काहीच माहीत नाही.आत्मा पतिता पासून पावन कशाप्रकारे बनते,हेही कोणाला माहीत नाही.पतीत आत्मा,पावन आत्मा,महान आत्मा असे म्हणतात ना.सर्वजण बोलावतात ही की हे पतित-पावन येऊन मला पावन बनवा,परन्तु आत्मा कशाप्रकारे पावन बनेल त्यासाठी अविनाशी डॉक्टर पाहिजे.आत्मा त्यालाच बोलावते जो पुनर्जन्म रहित आहे.आत्म्याला पवित्र बनवण्याचे औषध त्यांच्या जवळच आहे.तर तुम्हा मुलांनाही खुशी मध्ये अंगावर शहारे यायला पाहिजे- ईश्वर शिकवत आहे, अवश्य तुम्हाला भगवान-भगवती बनवणार आहे.भक्ती मार्गामध्ये या लक्ष्मी नारायणाला भगवान भगवती असे म्हणतात.तर जसे राजा-राणी असतील तशीच प्रजाही असेल ना.आप समान पवित्र ही बनवतात.ज्ञानसागर चांगल्या बनवतात नंतर आपल्या पेक्षाही मोठे विश्वाचे मालक बनवतात. पवित्र अपवित्रची संपूर्ण भूमिका तुम्हाला वठवावी लागते.तुम्ही जाणत आहात बाबा पुन्हा एकदा आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करण्यासाठी आले आहेत.ज्यासाठीच असे म्हटले जाते हा धर्म लोप पावला आहे. त्याची तुलना वडाच्या झाडाशी केली आहे.फांद्या खूप आहेत परंतु खोड नाही.इथेही किती धर्मांच्या फांद्या निघाल्या आहेत, मूळ देवता धर्मच नाही.लोप पावला आहे.बाबा म्हणतात तो धर्म आहे परंतु धर्माचे नाव बदलले आहे.पवित्र नसल्यामुळे स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत.देवता धर्म नाही म्हणून तर बाबा येऊन नवीन रचना रचतात. आता तुम्ही समजता आम्ही पवित्र देवता होतो.आता पतित बनलो आहे.प्रत्येक वस्तूचे असे होत असते.तुम्ही मुले हे विसरू नका.सर्वात मुख्य गोष्ट आहे बाबांची आठवण करणे ज्याद्वारे पावन बनायचे आहे.आम्हाला पावन बनव असे सर्वजण म्हणतात.आम्हाला राजा-राणी बनव असे कोणीही म्हणत नाही. तर तुम्हा मुलांना खूप नशा असायला पाहिजे.तुम्ही जाणता आम्ही ईश्वराची मुले आहोत. आता आम्हाला वारसा जरुर मिळायला पाहिजे.कल्प कल्प ही भूमिका वठवली आहे.झाडाची वृद्धी होतच राहणार आहे. बाबांनी चित्रांवर ही समजावले आहे की हे सदगती चे चित्र आहेत.तुम्ही तोंडी पण समजावू शकता आणि चित्रांवर ही समजावून सांगू शकता.तुमच्या या चित्रांमध्ये सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य येऊन जाते.जी मुले सेवा करणारी आहेत ते इतरांनाही आपसमान बनवतात.शिकून शिकवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.जेवढे जास्त शिकाल तेवढे उच्चपद प्राप्त कराल.बाबा म्हणतात मी पुरुषार्थ तर करवतो परंतु भाग्यात असायला पाहिजे ना. प्रत्येक जण नाटका नुसार पुरुषार्थ करत आहे.नाटकाचे रहस्यही बाबांनी समजावले आहे. बाबा,पिता ही आहेत,शिक्षकही आहेत.सोबत घेऊन जाणारा खरा- खरा सद्गुरू पण आहेत.ते अकाल मूर्त पिता आहेत.आत्म्याचा हा तख्त आहे ना,ज्याद्वारे ही भूमिका वठवत आहे.तर बाबांना ही भूमिका वठवण्यासाठी सदगती करण्यासाठी तख्त पाहिजे ना. बाबा म्हणतात मला साधारण शरीरामध्ये यावे लागते.भपका किंवा थाट काहीही करत नाही. त्या गुरूंचे अनुयायी तर गुरुंसाठी सोन्याचे सिंहासन महल इ. बनवतात.तुम्ही काय बनवणार? तुम्ही मुलेही आहात,विद्यार्थीही आहात.तर तुम्ही बाबांसाठी काय कराल?सिंहासन कुठे बनवाल?हा तर साधारण आहे ना.

मुलांना हेही समजावत राहतात- वेश्यांची ही सेवा करा.गरिबांचा ही उद्धार करायचा आहे.मुले प्रयत्न करत राहतात वाराणसीला ही गेले होते.त्यांना तुम्ही ज्ञान दिले तर म्हणतील वा बी.के.ची तर कमाल आहे-वेश्यानांही हे ज्ञान देतात.त्यांना समजवायचे आहे आता तुम्ही हा धंदा सोडून शिवालया चे मालक बना.हे ज्ञान शिकून इतरांनाही शिकवा.वेश्या ही नंतर इतरांना शिकवू शकतात. शिकून हुशार झाल्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांनाही समजावून सांगतील.हॉलमध्ये चित्र इ.ठेवून समजावून सांगा तर सर्वजण म्हणतील वेश्यांना ही शिवालय वासी बनवण्यासाठी या बी.के निमित्त बनल्या आहेत. मुलांच्या मनामध्ये सेवेसाठी विचार चालायला पाहिजेत. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. अहिल्या,कुब्जा,भीलनी, गणिका या सर्वांचा उद्धार करायचा आहे.साधूंचा ही उद्धार केला असे गायनही आहे.हे तर समजत आहात, शेवटी साधूंचा ही उद्धार होणार आहे.ते आता तुमचे बनले तर संपूर्ण भक्ती मार्गच नष्ट होऊन जाईल.क्रांती घडेल. संन्यासी लोक आपला आश्रम सोडून देतील असे म्हणतील बस आम्ही हार खाल्ली.हे शेवटी होणार आहे.असे-असे करा अशा प्रकारचे डायरेक्शन बाबा देत राहतात.बाबा तर कुठे बाहेर जाऊ शकत नाहीत.बाबा म्हणतात मुलांकडे जाऊन शिका. समजावून सांगण्याच्या युक्त्या तर मुलांना सांगत राहतात.मनुष्यांच्या मुखा मधून वाहवा निघायला पाहिजे असे कार्य करून दाखवा.शक्‍तींच्या मध्ये ज्ञान बाण ईश्वराने भरले आहे असे गायनही आहे.तुम्ही जाणत आहात हे बाण तुम्हाला या दुनियेतून त्या दुनियेत घेऊन जात आहेत.तुम्हा मुलांना खूप विशाल बुद्धी बनायचे आहे.एका ठिकाणी जरी तुमचे नाव प्रसिद्धीस आले शासनाला माहित पडले तर खूप प्रभाव पडेल.एका ठिकाणावरून काही चांगले ५-७ अधिकारी निघाले तर ते पेपर मध्ये बातमी छापतील.म्हणतील या बी.के.वेश्यांकडूनही त्यांचा धंदा सोडवून त्यांना शिवालया चे मालक बनवतात.खुप वाह वा होईल.पैसे इत्यादी ते सर्व घेऊन येतील.तुम्ही पैशाचे काय करणार! तुम्ही मोठ-मोठे सेवाकेंद्र खोलाल.पैशापासून चित्र इ. बनवतात.मनुष्यांना पाहून खूप आश्चर्य वाटेल.म्हणतील अगोदर तुम्हाला बक्षीस दिले पाहिजे. शासकीय कार्यालयांमध्ये ही तुमचे चित्र घेऊन जातील.या चित्रांवर खूप प्रभावित होतील. मनुष्यांना देवता कसे बनवावे- हीच इच्छा मनामध्ये असायला पाहिजे.हे तर जाणत आहात ज्यांनी कल्पा पूर्वी घेतले आहे, तेच घेणार आहेत.एवढा पैसा इ. सर्व काही सोडून देणे खूप मेहनत आहे.बाबांनी सांगितले आहे- माझे स्वतःचे घरदार मित्र-संबंधी इ.काहीही नाही.मला काय आठवणार,तुम्हा मुलांच्या शिवाय आणि बाबांच्या शिवाय माझ्याजवळ काहीही नाही. सर्वकाही अदला बदली(एक्सचेंज)करून टाकले. बाकी बुद्धी कुठे जाणार.बाबांना शरीर दिले आहे,ज्याप्रमाणे तुम्ही शिकता मीही शिकत आहे.फक्त शरीर बाबांना कर्जाऊ,भाड्याने दिले आहे.

तुम्ही जाणत आहात,आम्ही सूर्यवंशी घराण्यामध्ये सुरुवातीला येण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत.ही नरापासून नारायण बनण्याची कथा आहे.आत्म्याला तिसरा नेत्र मिळाला आहे.मी आत्मा ज्ञान ऐकून देवता बनत आहे.नंतर राजांचाही राजा बनणार आहे.शिवबाबा म्हणतात मी तुम्हाला डबल शिरताज बनवत आहे.नाटका नुसार कल्पा पूर्वीप्रमाणे तुमची बुद्धी आता स्वच्छ आहे.आता आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे.सृष्टी चक्राची ही आठवण करायची आहे.जुन्या दुनियेला बुद्धी द्वारे विसरायचे आहे.अच्छा!

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. आता आमच्यासाठी नवी दुनिया स्थापना होत आहे,हे बुद्धीमध्ये राहायला पाहिजे.ही दुःखाची जुनी दुनिया नष्ट झाली म्हणजे झाली.ही दूनिया तुम्हाला पसंत यायला नको.

2. ज्याप्रमाणे बाबांनी आपले सर्व काही आदलाबदली केले तर बुद्धी कुठेही गेली नाही.अशा प्रमाणे बाबांचे अनुकरण करायचे आहे.मनामध्ये फक्त हीच इच्छा ठेवायची आहे की आम्हाला मनुष्यापासून देवता बनवण्याची सेवा करून,या वेशालयाला शिवालय बनवायचे आहे.

वरदान:-
मुरलीच्या ज्ञानरत्ना द्वारे मायेला समर्पित करणारे मास्टर मुरलीधर भव

मुरल्या तर खूप ऐकल्या आहेत आता असे मुरलीधर बना ज्यामुळे माया मुरलीच्या समोर समर्पित(सरेंडर)होऊन जाईल. मुरलीच्या रहस्याचा साज जर सदैव वाजत राहिला तर माया नेहमीसाठी समर्पित होईल. मायेचे मुख्य स्वरूप कारणाच्या रूपामध्ये येते.जेव्हा मुरली द्वारे कारणाचे निवारण मिळून जाईल तेव्हा माया नेहमीसाठी समाप्त होऊन जाईल.कारण नष्ट अर्थात माया नष्ट.

बोधवाक्य:-
अनुभवी स्वरूप बना तर चेहर्याद्वारे भाग्यवान असल्याची झलक दिसून येईल.