27-12-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.12.86  ओम शान्ति   मधुबन


भूतकाळ,वर्तमानकाळ आणि भविष्याला श्रेष्ठ बनवण्याची विधी


आज ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर(ब्रह्मा बाबा)आणि गॉड फादर (शिवबाबा)आपल्या अति गोड, अति प्रेमळ मुलांना मनापासून आशीर्वादांचे भेटकार्ड देत आहेत. बापदादा जाणतात की एक-एक सिकीलधा(खूप वर्षांनी भेटलेला) मुलगा किती श्रेष्ठ,महान आत्मा आहे.प्रत्येक मुलाची महानता- पवित्रता-बाबांच्या जवळ क्रमवार पोहोचत राहते.आजच्या दिवशी सर्वजण विशेष नवीन वर्ष साजरे करण्याच्या उमंग-उत्साहानी आले आहेत.दुनियेतील लोक साजरे करण्यासाठी विझलेले दिवे किंवा मेणबत्या लावतात.ते दिवे लावून साजरे करतात आणि बापदादा प्रज्वलित झालेल्या असंख्य दिपकांसोबत नवीन वर्ष साजरे करत आहेत.विझलेल्याना लावत नाहीत आणि लावलेल्यानां नंतर विझवत नाहीत.अशा लाखोंच्या अंदाजामध्ये प्रज्वलित झालेल्या आत्मिक ज्योतींच्या संघटनाचे वर्ष साजरे करणे-हे बाबांच्या शिवाय आणि तुमच्या शिवाय कोणीही साजरे करू शकत नाही.किती सुंदर जगमगत्या ज्योतींचे आत्मिक संघटनाचे दृश्य आहे!सर्वांची आत्मिक ज्योत एकटक,एकरस चमकत आहे.सर्वांच्या मनामध्ये 'एक बाबा'-हीच लगन आत्मिक दिपकांना जगमगावत आहे.एक संसार आहे,एक संकल्प आहे, एकरस स्थिती आहे-हेच साजरे करणे आहे,हेच बनून बनवणे आहे.यावेळी विदाई(दूर जाणे) आणि बधाई(शुभेच्छा)दोन्हींचा संगम आहे.जुन्याला निरोप देत आहात आणि नव्या साठी शुभेच्छा देत आहात.या संगमयुगाच्या वेळेवर सर्वजण पोहोचले आहेत म्हणूनच,जुने संकल्प आणि संस्कारांच्या निरोपाच्याही शुभेच्छा आहेत आणि नव्या उत्साहाने उडण्याच्या ही शुभेच्छा आहेत.

जो वर्तमान काळ आहे,तो काही वेळानंतर भूतकाळ होईल.जे वर्ष चालू आहे,ते १२.०० वाजल्यानंतर भूतकाळ होऊन जाईल.यावेळेला वर्तमान म्हणतात आणि उद्यासाठी भविष्य म्हणतात.भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ- या तिन्हींचा खेळ चालू राहतो.या तिन्ही शब्दांना नव्या वर्षामध्ये नव्या विधीद्वारे उपयोग करायचा आहे.कसा?भूतकाळाला सदैव सन्मानाने पास होऊन पास(व्यतीत)करायचे आहे."पास्ट इज पास्ट"(भूतकाळ जमा)तर होणारच आहे परंतु कशाप्रकारे पास करायचे आहे?झालेल्या गोष्टींना सोडून दिले परंतु झालेल्या गोष्टींना अशा श्रेष्ठ विधीद्वारे सोडून दिले ज्यामुळे झालेल्या गोष्टींना आठवल्या नंतर वाह!वाह!असे शब्द मनातून निघतात का?झालेल्या गोष्टींना अशाप्रकारे सोडून द्या की ज्यामुळे अनेकजण तुमच्या भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींमधून शिकवण घेतील? तुमच्या घडलेल्या गोष्टी स्मृतिचिन्ह बनुन जायला हवे, किर्तन अर्थात कीर्ती गात राहतील.ज्याप्रमाणे भक्ती मार्गामध्ये तुमच्याच कर्मांचे किर्तन गात राहतात.तुमच्या कर्माच्या कीर्तनाने अनेक आत्म्यांचा आत्ताही उदरनिर्वाह होत आहे.या नव्या वर्षामध्ये प्रत्येक भूतकाळातील संकल्प किंवा वेळेला अशा विधीने पास करा.समजले,काय करायचे आहे?

आता वर्तमान काळामध्ये या, वर्तमान काळाला अशाप्रकारे वास्तविकते मध्ये आणा ज्याद्वारे प्रत्येक वर्तमान वेळ किंवा संकल्पा द्वारे तुम्हा विशेष आत्म्यां द्वारे काही न काही भेट मिळायला हवी.सर्वात जास्त खुशी कोणत्या वेळी होते?जेव्हा कोणाकडून भेटवस्तू मिळते.कसाही अशांत असेल,दुःखी असेल,त्रासून गेलेला असेल परंतु जेव्हा कोणी प्रेमाने भेटवस्तू देते तर त्यावेळी खुशीची लहर येते.दिखाव्याची भेट वस्तू नाही,मनापासून दिलेली वस्तू.सर्वजण भेटवस्तूला सदैव प्रेमाचे प्रतीक मानतात.भेट दिलेल्या वस्तूमध्ये ही किंमत 'स्नेहाची' असते,'वस्तूची' नाही.तर भेटवस्तू देण्याच्या विधीद्वारे वृद्धि प्राप्त करत राहा.समजले?सहज आहे का अवघड आहे?भंडारा भरपूर आहे ना की भेटवस्तू देता-देता भंडारा कमी होऊन जाईल?स्टॉक(साठा)जमा आहे ना.फक्त एका सेकंदाची स्नेहाची दृष्टी,स्नेहाचा सहयोग,स्नेहाची भावना,गोड शब्द,मनाच्या श्रेष्ठ संकल्पांची साथ-याच भेटवस्तू खूप आहेत.आजकाल ब्राह्मण आत्मे खूप आहेत,किंवा तुमचे भक्त आत्मे आहेत,किंवा तुमच्या संबंध संपर्का मधील आत्मे आहेत,किंवा त्रासून गेलेले आत्मे आहेत-सर्वांनाच या भेटवस्तूंची आवश्यकता आहे,दुसऱ्या भेटवस्तूंची नाही.याचा स्टॉक तर आहे ना?तर प्रत्येक वर्तमान काळाला दाता बनून वर्तमानाला भूतकाळ मध्ये बदलणे,तर सर्व प्रकारचे आत्मे मनापासून तुमचे कीर्तन गात राहतील.अच्छा.

भविष्यामध्ये काय कराल?तुम्ही सर्व लोकांना विचारताना की शेवटी भविष्य काय आहे? भविष्याला आपल्या चेहऱ्या द्वारे प्रत्यक्ष करा.तुमच्या चेहऱ्या द्वारे भविष्य प्रकट झाले पाहिजे. भविष्य काय असेल,भविष्यामध्ये डोळे कसे असतील,भविष्यामध्ये हास्य कसे असेल,भविष्यामध्ये संबंध कसे असतील,भविष्याचे जीवन काय असेल-तुमच्या चेहऱ्या द्वारे या सर्व गोष्टींचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. तुमच्या दृष्टी द्वारे भविष्याची सृष्टी स्पष्ट व्हावी.'काय होणार'-हा प्रश्न समाप्त होऊन 'असे होणार', यामध्ये बदलून जाईल.'कसे' बदलून 'असे' होऊन जावे.भविष्य देवता आहे.देवतापणाचे संस्कार अर्थात दातापणाचे संस्कार, देवता पणाचे संस्कार अर्थात ताज,तख्तधारी बनण्याचे संस्कार.जो पण पाहिल,त्याला तुमचा ताज आणि तख्त अनुभव व्हावा.कोणता ताज?सदैव हलके राहण्याचा प्रकाशाचा ताज.आणि सदैव तुमच्या कर्मांद्वारे,तुमच्या बोलण्याने आत्मिक नशा आणि निश्चिंत पणाचे चिन्ह अनुभवावे. तख्तधारीची निशाणी आहे 'निश्चिंत' आणि 'नशा'.निश्चित विजयाचा नशा आणि निश्चिंत स्थिती-ही आहे बाबांच्या दिल तख्तनशीन आत्म्याची निशाणी. जो पण येईल,तो हा तख्तनशीन आणि ताजधारी स्थितीचा अनुभव करेल-हे भविष्याला चेहऱ्या द्वारे प्रत्यक्ष करणे आहे. अशाप्रकारे नवीन वर्ष साजरे करणे म्हणजे बनून बनवणे. समजले,नव्या वर्षामध्ये काय करायचे आहे?तीन शब्दांनी मास्टर त्रिमूर्ती,मास्टर त्रिकालदर्शी आणि त्रिलोकीनाथ बनून जाणे. सर्वजण हाच विचार करतात की आता काय करायचे आहे?प्रत्येक पावला द्वारे-आठवणीने,सेवेच्या प्रत्येक पावलाने या तिन्ही विधीद्वारे सिद्धी प्राप्त करत रहा.

नवीन वर्षाचा उमंग-उत्साह तर खूप आहे ना.डबल विदेशींना डबल उमंग आहे ना.नवीन वर्ष साजरे करण्यासाठी किती साधनांचा वापर कराल?ते लोक विनाशी साधन वापरतात आणि मनोरंजनही अल्पकाळाचे करतात.आत्ता-आत्ता पेटवतील आत्ता-आत्ता विझवतील.परंतु बापदादा अविनाशी विधीने अविनाशी सिद्धी प्राप्त करणाऱ्या मुलांसोबत नवीन वर्ष साजरे करत आहेत.तुम्ही लोक ही काय कराल?केक कापाल,मेणबत्ती पेटवाल,गीत गाल,टाळ्या वाजवाल.हे सुद्धा खूप करा,भले करा.परंतु बापदादा सदैव अविनाशी मुलांना अविनाशी शुभेच्छा देत आहेत आणि अविनाशी बनवण्याची विधी सांगत आहेत.साकार दुनियेमध्ये साकारी उत्सव साजरा करताना पाहून बापदादानां ही खुशी होत आहे कारण की असा सुंदर परिवार जो पूर्ण परिवारच ताजधारी,तख्तधारी आहे आणि एवढ्या लाखोंच्या संख्येमध्ये एकच परिवार आहे,असा परिवार संपूर्ण कल्पा मध्ये एकदाच मिळतो.म्हणून खूप नाचा,गा,मिठाई खा.बाबा तर मुलांकडे पाहून,भासना घेऊनच खूश होतात.सर्वांच्या मनाचे कोणते गीत वाजत आहे?खुशीचे गीत वाजत आहेत.सदैव 'वाह!वाह!' चे गीत गा.वाह बाबा!वाह भाग्य!वाह गोड परिवार!वाह श्रेष्ठ संगमयुगाची सुंदर वेळ!प्रत्येक कर्म 'वाह वाह!'आहे.वाह!वाह! चे गीत गात रहा.बापदादा आज स्मित हास्य करत होते-काही मुले वाह!वाह!च्या गीताच्या ऐवजी दुसरेही गीत गातात.तेसुद्धा दोन शब्दाचे गीत आहे,ते माहित आहे का? यावर्षी त्या दोन शब्दांचे गीत गाऊ नका.ते दोन शब्द आहेत-'का' आणि 'मी' जास्तकरून बापदादा जेव्हा मुलांचा टी.व्ही पाहतात तर मुले 'वाह-वाह!' च्या बदल्यात 'का-का' खूप करत असतात.तर 'का' च्या बदल्यात 'वाह-वाह!' म्हणा आणि मी च्या बदल्यात 'बाबा-बाबा'म्हणा.समजले?

जे पण आहात,जसे पण आहात तरीही बापदादांना आवडणारे आहात,म्हणूनच सर्वजण प्रेमाने भेटण्यासाठी येता.अमृतवेळेला सर्व मुले सदैव हेच गीत गातात-'प्रेमळ बाबा,गोड बाबा' आणि बापदादा मोबदल्यामध्ये सदैव 'प्रेमळ मुले,गोड मुले'असे गीत गातात.अच्छा.तसे तर यावर्षी निराळे(न्यारे)आणि प्रेमळ(प्यारे)चा पाठ आहे,तरीही मुलांच्या स्नेहाचे आव्हान बाबांनाही निराळ्या दुनिये मधून प्रेमळ दुनियेमध्ये घेऊन येते.आकारी विधीमध्ये हे सर्व पाहण्याची आवश्यकता नाही.आकारी मिलनच्या विधीमध्ये एकाच वेळी अनेक बेहद च्या मुलांना बेहद मिलनाची अनुभूती करवतात.साकारी विधीमध्ये तरीही हद मध्ये यावे लागते.मुलांना पाहिजे तरी काय- मुरली आणि दृष्टी.मुरली मध्येही भेटणे तर आहेच.पाहिजे तर वेगळे बोलू शकतात,पाहिजे तर सोबतही बोलू शकतात,बोलणार तर तीच गोष्ट आहे.जी गोष्ट संघटनांमध्ये बोलतात तीच एकांतामध्ये ही बोलतात.तरीही पहा प्रथम संधी डबल विदेशीयांनाच मिळाली आहे. भारतातील मुले 18 तारखेची(18 जानेवारी)वाट पाहत आहेत आणि तुम्ही लोक प्रथम संधी घेत आहात.अच्छा.35-36 देशांमधून आलेले आहेत.हा सुद्धा 36 प्रकारचा भोग झाला.36 चे गायन आहे ना.36 प्रकार झाले आहेत.

बापदादा सर्व मुलांच्या सेवेचा उमंग-उत्साह पाहून खुश होत आहेत.जे सर्वांनी तन-मन-धन समय-स्नेह आणि हिमंतीने सेवेमध्ये लावले आहे,त्याच्या बापदादा पदमगुणा शुभेच्छा देत आहेत.यावेळी समोर आहात किंवा आकार रूपामध्ये समोर आहात परंतु बापदादा सर्व मुलांना लगनने मग्न राहण्याच्या शुभेच्छा देत आहेत.सहयोगी बनले,सहयोगी बनवले.तर सहयोगी बनण्याच्या आणि सहयोगी बनवण्याच्या डबल शुभेच्छा.काही मुलांच्या सेवेच्या उमंग उत्साहाचे समाचार आणि त्यासोबतच नवीन वर्षाच्या उमंग उत्साहाच्या पत्रांची माळ बापदादांच्या गळ्यामध्ये गुंफली गेली.ज्यांनी पण कार्ड(पत्र) पाठवले आहेत बापदादा पत्रांच्या मोबदल्या मध्ये सन्मान आणि प्रेम दोन्ही देत आहेत.समाचार ऐकून-ऐकून हर्षित होत आहेत.गुप्त रूपामध्ये सेवा केली,किंवा प्रत्यक्ष रूपामध्ये केली परंतु बाबांना प्रत्यक्ष करण्याच्या सेवेमध्ये सदैव सफलता आहेच.स्नेहामुळे सेवेचा परिणाम-सहयोगी आत्मे बनणे आणि बाबांच्या कार्यामध्ये जवळ येणे-हीच सफलतेची निशाणी आहे.सहयोगी आज सहयोगी आहेत,उद्या योगी ही बनतील.तर सहयोगी बनवण्याची विशेष सेवा सर्वांनी चारीही बाजूला केली, त्‍यांच्‍यासाठी बापदादा 'अविनाशी सफलता स्वरूप भव' चे वरदान देत आहेत.अच्छा.

जेव्हा तुमची प्रजा,सहयोगी, संबंधीयांची वृद्धी होईल तर वृद्धीच्या प्रमाणाच्या विधीला ही बदलावे लागते ना.खुशी होत आहे ना,भले वृध्दी होत आहेत.अच्छा.

सर्व सदैव स्नेही,सदैव सहयोगी बनून सहयोगी बनवणारे,सदैव शुभेच्छा प्राप्त करणारे,सदैव प्रत्येक सेकंद,प्रत्येक संकल्पाला श्रेष्ठ ते श्रेष्ठ,गायन-योग्य बनवणारे,सदैव दाता बनुन सर्वांना स्नेह आणि सहयोग देणारे-अशा श्रेष्ठ,महान भाग्यवान आत्म्यांना बापदादांची आठवण प्रेम आणि संगमाची शुभ रात्रि आणि सुप्रभात.

विदेश सेवेवर उपस्थित शिक्षकां प्रति-अव्यक्त महावाक्य
निमित्त सेवाधारी मुलांना बापदादा सदैव 'समान भव' च्या वरदानाने पुढे घेऊन जात आहेत. बापदादा सर्व पांडव किंवा शक्ती, जे पण सेवेसाठी निमित्त आहेत त्या सर्वांना विशेष पदमापदम भाग्यवान श्रेष्ठ आत्मे समजतात. सेवेचे प्रत्यक्ष फळ खुशी आणि शक्ती,हा विशेष अनुभव तर करत आहात.आता जेवढे स्वतः शक्तिशाली प्रकाश स्वरूप, शक्तीस्वरूप बनून सेवा कराल तेवढ्या लवकर चारी बाजूला प्रत्यक्षतेचा झेंडा फडकेल. प्रत्येक निमित्त सेवाधारीला विशेष सेवेच्या सफलते साठी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत-एक गोष्ट सदैव संस्कारांना मिळवण्याची एकता,प्रत्येक ठिकाणावरून ही विशेषता दिसून यावी.दुसरे सदैव प्रत्येक निमित्त सेवाधारीना प्रथम स्वतःला हे दोन सर्टिफिकेट(प्रमाणपत्र) द्यायचे आहेत.एक 'एकता' दुसरे 'संतुष्टता'.संस्कार भिन्नभिन्न तर असतातच आणि असणारच परंतु संस्कारांशी टक्कर घेणे किंवा किनारा करून स्वतःला सुरक्षित ठेवणे-हे आपल्यावर अवलंबून आहे.काहीही घडल्यानंतर जर कोणाचा असा संस्कार असेल तर दुसऱ्याने टाळी वाजू द्यायची नाही.ते बदल करो अथवा न करो परंतु तुम्ही तर बदलू शकता ना! जर प्रत्येकाने स्वतःला बदलले, सामावून घेण्याची शक्ती धारण केली तर दुसर्‍याचे संस्कारही अवश्य शितल होऊन जातील. तर सदैव एक दुसऱ्यासोबत स्नेहाच्या भावनेने,श्रेष्ठतेच्या भावनेने संपर्कामध्ये या,कारण की निमित्त सेवाधारी-बाबांच्या चेहऱ्याचा आरसा आहेत.तर जे तुमचे वास्तविक जीवन आहे तेच बाबांच्या चेहऱ्याचा आरसा होऊन जातो म्हणूनच सदैव असा जीवन रूपी आरसा आहात- ज्यामध्ये बाबा कसे आहेत जसे आहेत तसे दिसायला हवे.बाकी मेहनत खूप चांगली करत आहात,हिम्मतही चांगली आहे. सेवेची वृद्धी उमंग ही खूप चांगला आहे म्हणूनच विस्ताराला प्राप्त करत आहात.सेवा तर चांगली आहे,आता फक्त बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी प्रत्यक्ष जीवनाचा पुरावा सदैव दाखवा.सर्वजण एकाच आवाजामध्ये बोलतील की हे ज्ञानाच्या धारणेमध्ये तर एक आहेत परंतु संस्कार मिळवण्या मध्येही नंबरवन आहेत.असेही नाही की भारतामधल्या शिक्षिका वेगळ्या आहेत,विदेशांमधल्या शिक्षिका वेगळ्या आहेत.सर्व एकच आहेत. हे तर फक्त सेवेसाठी निमित्त बनले आहेत,स्थापनेमध्ये सहयोगी बनले आहेत आणि आताही सहयोग देत आहेत, म्हणूनच स्वतः सर्व गोष्टींमध्ये विशेष भूमिका वठवावी लागते. तसे बापदादा आणि निमित्त आत्म्यां जवळ विदेशी किंवा देशी मध्ये कोणतेही अंतर नाही.जिथे ज्याची सेवेची विशेषता आहे,मग तो कोणीही असो,तिथे त्याच्या विशेषतेचा लाभ घ्यावा लागतो. बाकी एक दुसऱ्याला सन्मान देणे ही ब्राह्मण कुळाची मर्यादा आहे, स्नेह घेणे आणि सन्मान देणे. विशेषतेला महत्त्व दिले जाते न की व्यक्तीला.अच्छा.

वरदान:-
प्रत्येक सेकंद आणि संकल्पाला अमूल्य रीतीने व्यतीत करणारे अमूल्य रत्न भव

संगमयुगाच्या एका सेकंदाची ही खूप मोठी किंमत आहे. ज्याप्रमाणे एकाचे लाख गुणा बनते तसेच जर एक सेकंदही व्यर्थ गेला तर लाखो गुणा व्यर्थ जाते- म्हणूनच एवढे लक्ष ठेवा तर आळशीपणा समाप्त होऊन जाईल.आता तर कोणी हिसाब घेणारे नाहीत परंतु थोड्या वेळा नंतर पश्चाताप होईल कारण की या वेळेची खूप किंमत आहे.जो आपल्या प्रत्येक सेकंद,प्रत्येक संकल्पाला अमूल्य रीतीने व्यतीत करतो तोच अमूल्य रत्न बनतो.

सुविचार:-
जो सदैव योगयुक्त आहे तो सहयोगाचा अनुभव करत विजयी बनून जातो.