18.12.2020 प्रभात:मुरली ओम शांती बापदादा मधुबन
"गोड मुलांनो, दररोज विचार सागर मंथन करा, तर खुशीचा पारा चढेल. चालताना, फिरताना आठवणी मध्ये ठेवा कि, आम्ही स्वदर्शन चक्रधारी आहोत." प्रश्न:- स्वतःची प्रगती करण्याचे सहज साधन कोणते आहे? उत्तर:- आपल्या प्रगतीसाठी दररोज आपला जमाखर्च ठेवा. तपासून पाहा, आज साऱ्या दिवसा मध्ये कोणते आसूरी काम तर केले नाही? जसे विद्यार्थी आपले रजिस्टर ठेवतात, तसे तुम्हा मुलांना पण दैवी गुणांचे रजिस्टर ठेवायचे आहे, तर प्रगती होत राहील. गीत:- दूर देश का रहने वाला. . . . ओम शांती:- मुले जाणतात कि, दूर देश कशाला म्हटले जाते. दुनिया मध्ये एक पण मनुष्य हे जाणत नाही. जरी किती मोठा विद्वान असेल,पंडित असेल, तरी याचा अर्थ समजत नाही. तुम्ही मुले समजत आहात. बाबा, ज्यांना सर्व मनुष्यमात्र आठवण करतात कि, हे भगवान, ते जरूर वर मूलवतन मध्ये आहेत. आणखीन कोणाला पण हे माहित नाही. या विश्व नाटकातील रहस्याला तुम्ही मुले समजत आहात. सुरवाती पासून आतापर्यंत जे कांही झाले आहे, जे होणार आहे, ते सर्व बुद्धीमध्ये आहे. हे सृष्टी चक्र कसे फिरत आहे, ते बुद्धी मध्ये ठेवले पाहिजे. तुम्हा मुलां मध्ये पण क्रमवार समजत आहेत. विचार सागर मंथन करत नाहीत, त्यामुळे खुशीचा पार पण चढत नाही. उठता-बसता बुद्धीमध्ये राहिले पाहिजे कि, आम्ही स्वदर्शन चक्रधारी आहोत. सुरवाती पासून अंतापर्यंत मज आत्म्याला, साऱ्या सृष्टीच्या चक्राची माहिती आहे. जरी तुम्ही इथे बसले आहात, बुद्धीमध्ये मूळवतनची आठवण राहते. ते आहे गोड, शांत घर, निर्वाण धाम, शांतीधाम. जिथे आत्मे राहतात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये झटक्यात येते, आणखीन कोणाला माहित नाही. जरी किती पण शास्त्र इत्यादी वाचतात, ऐकत राहतात, फायदा कांही पण नाही. ते सर्व उतरती कले मध्ये आहेत. तुम्ही आता चढत आहात. परत घरी जाण्यासाठी तुम्ही स्वतः तयारी करत आहात. हे जुने शरीर सोडून, तुम्हाला घरी जायचे आहे. खुशी राहत आहे ना. घरी जाण्यासाठी अर्धा कल्प भक्ती केली आहे. शिडी खाली उतरतच आलात. आता बाबा आम्हाला सहज समजावत आहेत. तुम्हा मुलांना खुशी झाली पाहिजे. बाबा, भगवान आम्हाला शिकवत आहेत, ही खुशी राहिली पाहिजे. बाबा समोर बसून शिकवत आहेत. बाबा जे सर्वांचे पिता आहेत, ते आम्हाला पुन्हा शिकवत आहेत. अनेक वेळा शिकविले आहे. जेव्हा तुम्ही चक्र मारून, पूर्ण करता, तर मग बाबा येतात. यावेळी तुम्ही आहात स्वदर्शन चक्रधारी. तुम्ही विष्णुपुरी चे देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. दुनिये मधील दुसरे कोणी, हे ज्ञान देऊ शकत नाही. शिवबाबा आम्हाला शिकवित आहेत, ही खुशी किती राहिली पाहिजे? मुले जाणतात कि, हे शास्त्र इ.सर्व भक्तिमार्गाचे आहेत.हे सद्गतीसाठी नाहीत. भक्तीमार्गाची सामग्री पण पाहिजे ना. भरपूर सामग्री आहे. बाबा सांगतात कि, त्यामुळे तुम्ही खाली उतरत आले आहात. किती दारोदार भटकले आहात. आता तुम्ही शांत होऊन बसले आहात. तुमचे धक्के खाणे आता सुटले आहे. तुम्ही जाणता कि, बाकी आता थोडा वेळ राहिला आहे. आत्म्याला पवित्र बनविण्यासाठी बाबा तोच रस्ता दाखवत आहेत. म्हणतात कि, माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल आणि मग सतोप्रधान दुनियेमध्ये राज्य कराल. हा रस्ता कल्प कल्प अनेक वेळा बाबानी सांगितला आहे. मग आपल्या अवस्थेला पण पाहिले पाहिजे. विद्यार्थी अभ्यास करून स्वतःला हुशार बनवतात. शिक्षणाचे पण रजिस्टर असते आणि वागण्याचे पण रजिस्टर असते. येथे तुम्हाला पण दैवी गुण धारण करायचे आहेत. रोज आपला जमाखर्च ठेवल्यामुळे फार उन्नती होईल. आज साऱ्या दिवसांमध्ये कोणते आसुरी काम तर केले नाही? आम्हाला तर देवता बनायचे आहे. लक्ष्मी नारायणाचे चित्र समोर ठेवले आहे. किती साधे चित्र आहे. वरती शिवबाबा आहेत. प्रजापिता ब्रह्मा द्वारे हा वरसा देत आहेत, तर जरुर संगमा वर ब्राह्मण ब्राह्मणी असतील ना.देवता सतयुगा मध्ये असतात. ब्राह्मण संगमयुगा वर आहेत. कलियुगा मध्ये शूद्रवर्ण वाले आहेत.विराट रूप पण बुद्धी मध्ये ठेवायचे आहे. आता आम्ही ब्राह्मण शेंडी आहोत, मग देवता बनू. बाबा, ब्राह्मणांना देवता बनविण्यासाठी शिकवत आहेत,तर दैवी गुण पण धारण करायचे आहेत. एवढे गोड बनायचे आहे. कोणाला दुःख द्यायचे नाही. जसे शरीर निर्वाहा साठी कोणते ना कोणते तरी काम करावे लागते, तसे इथेपण यज्ञाची सेवा करायची आहे. कोणी आजारी असेल, सेवा करू शकत नसेल, तर मग त्यांची सेवा करायची आहे. समजा, कोणी आजारी आहे, शरीर सोडतात, तुम्हाला दुःखी होण्याचे किंवा रडण्याची गरज नाही. तुम्हाला तर फार शांती मध्ये बाबाच्या आठवणीत राहायचे आहे. कांही आवाज करायचा नाही. ते तर स्मशाना मध्ये घेऊन जाताना, आवाज करतात कि, राम नाव सत्य आहे. तुम्हाला कांही पण म्हणायचे नाही. तुम्ही शांती मध्ये विश्वावर विजय प्राप्त करत आहात. त्यांचे सायन्स (विज्ञान) आहे आणि तुमचे सायलेन्स (शांती) आहे. तुम्ही मुले ज्ञान आणि विज्ञानाचा खरा अर्थ समजत आहात. ज्ञान म्हणजे समज आणि विज्ञान म्हणजे सर्व कांही विसरून जाणे. ज्ञाना पासून पण दूर जाणे.तर ज्ञान पण आहे, विज्ञान पण आहे. आत्मा जाणते कि, आम्ही शांतीधाम चे राहणारे आहोत. मग ज्ञान पण आहे. रूप आणि बसंत. बाबा पण रुप बसंत आहेत. रूप पण आहेत आणि त्यांच्या मध्ये साऱ्या सृष्टिचक्राचे ज्ञान पण आहे. त्यांनी विज्ञान भवन नाव ठेवले आहे. अर्थ काही पण समजत नाहीत. तुम्ही मुले समजता कि, या वेळी सायन्स पासून दुःख पण आहे, तर सुख पण आहे. तेथे सुखच सुख आहे. येथे आहे अल्पकाळात चे सुख. बाकी तर दुःखच दुःख आहे. घरा मध्ये मनुष्य किती दुखी राहतात. समजतात कि, आता मेलो तर या दुःखाच्या दुनिये पासून तर सुटलो. तुम्ही मुले जाणता कि, बाबा आले आहेत, आम्हाला स्वर्गवासी बनवण्यासाठी. किती गद्गद् झाले पाहिजे. कल्प कल्प बाबा आम्हाला स्वर्गवासी बनवण्या साठी येत आहेत, तर अशा बाबाच्या मतावर चालले पाहिजे ना. बाबा म्हणतात, गोड मुलानो, कधी कोणाला दुःख देऊ नका. गृहस्थ व्यवहारा मध्ये राहून पवित्र बना. आम्ही भाऊ-बहीण आहोत, हे प्रेमाचे नाते आहे. आणखीन कोणती दृष्टी जाऊ शकत नाही. प्रत्येकाचा आजार आपापला आहे, त्यानुसार मत पण देत राहतात. विचारतात, बाबा अशी परिस्थिती आहे, या परिस्थिती मध्ये काय करावे? बाबा समजावतात, भाऊ बहिणीची दृष्टी खराब नसली पाहिजे. कोणते पण भांडण नसावे. मी तुम्हा आत्म्यांचा पिता आहे ना. शिवबाबा ब्रह्मा तना द्वारे बोलत आहेत. प्रजापिता ब्रह्मा शिवबाबा चा मुलगा आहे. साधारण तना मध्येच येत आहे ना. विष्णू तर सतयुगा मध्ये असतात. बाबा म्हणतात,मी यांच्या मध्ये प्रवेश करून, नवीन दुनिया निर्माण करत आहे. बाबा विचारतात, तुम्ही विश्वाचे महाराजा महाराणी बनाल? होय, बाबा, कां बनणार नाही. होय, यामध्ये पवित्र राहावे लागेल. हे तर अवघड आहे. अरे, तुम्हाला विश्वाचा मालक बनवत आहे, तुम्ही पवित्र राहू शकत नाही? लाज वाटत नाही? लौकिक पिता पण समजावतात, वाईट काम करू नका. या विकारा मुळेच विघ्न पडतात. सुरुवाती पासून यावरच गोंधळ होत आला आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, यावर विजय प्राप्त करा. मी आलो आहे पवित्र बनवण्यासाठी. तुम्हा मुलांना खरे खोटे चांगले-वाईट याचा विचार करण्याची बुद्धी मिळाली आहे. हे लक्ष्मी नारायण मुख्य लक्ष्य आहे. स्वर्गवासी मध्ये दैवी गुण असतात. नर्कवासी मध्ये अवगुण आहेत. आता रावण राज्य आहे, हे पण कोणी समजत नाही. रावणाला प्रत्येक वर्षी जाळतात. शत्रु आहे ना. जाळतच आले आहेत, समजत नाहीत कि, हा कोण आहे? आम्ही सर्व रावण राज्यातील आहोत ना. तर जरुर आम्ही असुर आहोत, परंतु स्वतःला कोणी असुर समजत नाहीत. अनेक जण म्हणतात पण कि, हे राक्षस राज्य आहे. यथा राजा राणी तथा प्रजा. परंतु एवढी पण समज नाही. बाबा समजावतात कि, राम राज्य वेगळे असते, रावण राज्य वेगळे असते. आता तुम्ही सर्वगुणसंपन्न बनत आहात. बाबा म्हणतात, माझ्या भक्तांना ज्ञान सांगा. जे मंदिरांमध्ये जाऊन देवतांची पूजा करत आहेत. बाकी इतर अशा मनुष्या बरोबर माथा मारू नका. मंदिरा मध्ये तुम्हाला अनेक भक्त मिळतील. नाडी पण पाहिली पाहिजे. डॉक्टर लोक नाडी पाहूनच झटक्यात सांगतात कि, याला कोणता आजार झाला आहे. दिल्ली मध्ये एक अजमलखाॅ वैद्य प्रसिद्ध होता. बाबा तर तुम्हाला २१ जन्मासाठी सदा निरोगी, धनवान बनवत आहेत. इथे तर सर्व रोगी अशक्त आहेत.तिथे तर कोणी रोगी असत नाहीत. तुम्ही सदा आरोग्यवान, सदा धनवान बनता. तुम्ही तुमच्या योगबलाने कर्मेंद्रिया वर विजय प्राप्त करत आहात. तुम्हाला ही कर्मेंद्रिये कधी धोका देऊ शकत नाहीत. बाबाने समजावले आहे, आठवणी मध्ये चांगल्या रितीने राहा, देहीअभिमानी बना, तर कर्मेंद्रिये धोका देणार नाही. इथेच तुम्ही विकारावर विजय प्राप्त करत आहात. तिथे कुदृष्टी असत नाही. रावण राज्यच नाही. ते अहिंसक देवी-देवतांचा धर्म आहे. युद्ध इत्यादीची तर गोष्टच नाही. हे युद्ध तर शेवटचे होत आहे, त्यातून स्वर्गाचे दार उघडत आहे. मग कधी युद्ध होणार नाही. यज्ञ पण शेवटचा आहे. मग अर्धाकल्प कोणता यज्ञ होणार नाही. यामध्ये सारा कचरा स्वाहा होऊन जातो. या यज्ञातूनच विनाश ज्वाला निघत आहे. सारी सफाई होऊन जाईल. मग तुम्हा मुलांना साक्षात्कार पण केला आहे, तेथील शुबीरस इ. पण फार स्वादिष्ट उत्तम पदार्थ असतात. त्या राज्याची आता तुम्ही स्थापना करत आहात, तर किती खुशी झाली पाहिजे. तुमचे नाव पण शिवशक्ती भारत माता आहे. शिवा कडून तुम्ही शक्ती घेत आहात, फक्त आठवणीद्वारे. धक्के खाण्याची तर गोष्टच नाही. ते समजतात कि, जे भक्ती करत नाहीत, ते नास्तिक आहेत. तुम्ही म्हणता जे बाबा आणि रचनेला ओळखत नाहीत, ते नास्तिक आहेत. तुम्ही आता आस्तीक बनले आहात. त्रिकालदर्शी पण बनले आहात. तीन लोक, तीन काळाला तुम्ही जाणले आहे. या लक्ष्मी नारायणा ला बाबा कडून हा वारसा मिळाला आहे. आता तुम्ही तसे बनत आहात. या सर्व गोष्टीं बाबाच समजावत आहेत. शिवबाबा स्वतः सांगतात कि, मी यांच्या मध्ये प्रवेश करून समजावत आहे. नाही तर मी निराकार कसे समजावून सांगू. प्ररणेद्वारे शिक्षण होते कां? शिकविण्या साठी तर मुख पाहिजे ना. गोमुख तर हे आहे ना. ही मोठी मम्मा आहे ना. मनुष्य माता आहे. बाबा समजावतात, यांच्याद्वारे तुम्हा मुलांना सृष्टीच्या आदि मध्य अंताचे रहस्य समजावत आहे. युक्ती सांगत आहे. यामध्ये आशीर्वादाची तर गोष्टच नाही. आदेशावर चालायचे आहे. श्रीमत मिळत आहे. कृपेची तर गोष्ट नाही. म्हणतात कि, बाबा वारंवार विसर पडत आहे, कृपा करा .अरे, हे तर तुमचे काम आहे, आठवण करण्याचे. मी काय कृपा करू. माझ्या साठी तर सर्व मुलेच आहेत. कृपा केली तर सर्वच तख्तावर जाऊन बसतील. पद तर शिक्षणानुसार प्राप्त करायचे आहे. शिकायचे तर तुम्हाला आहे ना. षुरषार्थ करत राहा. अति प्रिय बाबाची आठवण करायची आहे. पतित आत्मा परत घरी जाऊ शकत नाही. बाबा म्हणतात, जेवढी तुम्ही आठवण कराल, तर आठवण करून करून पावन बनाल. पावन आत्मा इथे राहू शकत नाही. पवित्र बनला तर शरीर पण नवीन पाहिजे. पवित्र आत्म्याला अपवित्र शरीर मिळणे, हा कायदा नाही. संन्याशी पण विकारा पासून जन्म घेतात ना. हे देवता विकारा पासून जन्म घेत नाहीत. ज्यामुळे संन्यास करावा लागेल. हे तर उंच आहेत ना. खरे खरे महात्मा हे आहेत. जे नेहमी संपूर्ण निर्विकारी आहेत. तिथे रावण राज्य असत नाही. आहेच सतोप्रधान राम राज्य. खरे तर राम पण म्हणू नये.शिवबाबा आहेत ना. याला म्हटले जाते, राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ.रुद्र किंवा शिव एकच आहे. कृष्णाचे तर नाव नाही. शिवबाबा येउन ज्ञान सांगत आहेत.ते मग रुद्र यज्ञ निर्माण करतात. त्यामध्ये मातीचे लिंग आणि शालिग्राम बनवतात. पूजा करून मग तोडून टाकतात. जसे बाबा देवींचे उदाहरण सांगतात. देवीना श्रंगार करून, खाऊ पिऊ घालून, पूजा करून मग पाण्यामध्ये विसर्जण करतात. तसेच शिवबाबा आणि शालग्रामाची पण फार प्रेमाने आणि शुद्धीने पूजा करून, मग नष्ट करतात. हा सारा भक्तीचा विस्तार आहे. आता बाबा मुलांना समजावत आहेत, जेवढे बाबांच्या आठवणी मध्ये राहाल, तेवढी खुशी होईल. रात्री दररोज आपला जमाखर्च पाहिला पाहिजे. कांही चुक तर केली नाही? स्वतःचा कान धरला पाहिजे. बाबा आज माझ्याकडून ही चूक झाली. क्षमा करा. बाबा म्हणतात खरे सांगितले तर अर्धे पाप नाहीसे होईल. बाबा तर बसले आहेत ना. आपले कल्याण करू इच्छित असाल, तर श्रीमता वर चाला. जमा खर्च ठेवल्याने फार प्रगती होईल. खर्च तर काहीच नाही. उंच पद प्राप्त करायचे असेल तर मन्सा, वाचा, कर्मणा, कोणाला पण दुःख देऊ नका. कोणी कांही म्हणाले तर ऐकून न ऐकल्यासारखे करा. अशी मेहनत करायची आहे. बाबा आलेच आहेत, तुम्हा मुलांचे दुःख दूर करून, नेहमीसाठी सुख देण्यासाठी. तर मुलांना पण असे बनायचे आहे. मंदिरांमध्ये सर्वात चांगली सेवा होऊ शकते. तेथे धार्मिक वृतीचे तुम्हाला फार भेटतील. प्रदर्शनी मध्ये फार येतात. प्रोजेक्टर पेक्षा पण प्रदर्शनी मेळ्यामध्ये चांगली सेवा होते. यामध्ये खर्च होतो,तर जरूर फायदा पण होत आहे ना. अच्छा. गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रती मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश:- - (१)बाबाने खरे खोटे समजण्याची बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीच्या आधारावर दैवीगुण धारण करायचे आहेत. कोणाला दुःख द्यायचे नाही. आपसा मध्ये भाऊ बहिणीचे खरे प्रेम असावे. कधी वाईट दृष्टी जाऊ नये.
- (२)बाबाच्या प्रत्येक आदेशावर चालून, चांगल्या रीतीने शिकून, स्वतःच स्वतःवर कृपा करायची आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी जमाखर्च ठेवायचा आहे, कोणी दुःख देणाऱ्या गोष्टी बोलत असेल, तर ऐकून न ऐकल्यासारखे करायचे आहे.
वरदान:- सर्व संबंधांचा अनुभव एका बाबाकडून करणारे अथक आणि विघ्न विनाशक भव. ज्या मुलांचे सर्व संबंध एका बाबा बरोबर आहेत, त्यांना इतर सर्व संबंध निमित्तमात्र अनुभव होतील. ते नेहमी खुशी मध्ये नाचणारे असतील. कधी थकलेला अनुभव करणार नाहीत, अथक बनतील. बाबा आणि सेवा याच लगन मध्ये मगन राहतील. विघ्नामुळे थांबण्या पेक्षा, नेहमी विघ्न विनाशक असतील. सर्व संबंधाचा अनुभव एका बाबा कडून झाल्यामुळे डबल लाइट राहतील. कोणते ओझे राहणार नाही. सर्व तक्रारी नाहीशा होतील, संपूर्ण स्थितीचा अनुभव करतील. सहज योगी बनतील. बोधवाक्य:- विचारा द्वारे पण कोणत्या देहधारी वर आकर्षित होणे, म्हणजे बेवफा बनणे होय. ||| ओम शांती |||ओम शांती.
|
|