10-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,अविनाश ज्ञान रत्नाचे दानच महादान आहे,या ज्ञानाद्वारे राज्य मिळू शकते, म्हणून महादानी बना"

प्रश्न:-
ज्या मुलांना सेवेची आवड असेल,त्यांची मुख्य लक्षणं कोणती असतील?

उत्तर:-
(१)त्यांना जुन्या दुनियेचे वातावरण बिलकुल चांगले वाटणार नाही.
(२) त्यांना अनेकांची सेवा करून आपल्यासारखे बनवण्यामध्ये आनंद होईल.
(३) त्यांना शिकणे आणि शिकवण्या मध्येच आराम मिळेल.
(४)ज्ञान समजावता-समजावता गळा पण खराब झाला, तरी ते खुशीमध्ये राहतील.
(५) त्यांना कोणाच्या मिळकतीची इच्छा नसेल,कोणाच्या संपत्तीच्या पाठीमागे आपला वेळ वाया घालवणार नाहीत.
(६) त्यांचे आकर्षण सर्व बाजूने नष्ट झालेले असेल.
(७) ते बाबांसारखे उदारचित असतील, त्यांना सेवे शिवाय बाकी काहीच गोड वाटणार नाही.

गीत:-
ओम नमः शिवाय...

ओम शांती।
आत्मिक पिता ज्याची महिमा ऐकली,ते सन्मुख मुलांना शिकवत आहेत.ही पाठशाला आहे ना.तुम्ही सर्व येथे शिक्षका पासून ज्ञानाचा पाठ घेत आहात.हे सर्वोच्च शिक्षक ज्याला परमपिता पण म्हटले जाते. परमपिता तर शिव पित्यालाच म्हटले जाते.लौकिक पित्याला कधीच परमपिता म्हणणार नाहीत.तुम्ही म्हणाल आता आम्ही पारलौकिक पित्याजवळ बसलो आहोत.कोणी बसले आहेत,कोणी पाहुणे बनून येतात. तुम्ही समजता आम्ही बेहद्द पित्याजवळ बसलो आहोत,वारसा घेण्यासाठी तर मनामध्ये खूप खुशी असायला पाहिजे.मनुष्य तर बिचारे ओरडत राहतात.या वेळेत सर्वजण म्हणतात,दुनिया मध्ये शांती हवी.हे तर बिचार्‍यांना माहीत नाही की, शांती काय वस्तू आहे.ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर, बाबाच शांती स्थापन करणारे आहेत. निराकारी दुनिया मध्ये तर शांतीच आहे.येथे ओरडत राहतात की,दुनिया मध्ये शांती कशी होईल.नवीन दुनिया सतयुगामध्ये शांती होती,जेव्हा एक धर्म होता‌.नवीन दुनियेला स्वर्ग देवतांची दुनिया म्हटले जाते. ग्रंथांमध्ये जेथे तेथे अशांती च्या गोष्टी लिहिल्या आहेत.द्वापार मध्ये कंस होता, परत हिरण्यकश्यपला सतयुगा मध्ये दाखवतात, तर त्रेतामध्ये रावणाला दाखवतात. सर्व ठिकाणी अशांती दाखवली आहे. मनुष्य बिचारे खूप अज्ञानाच्या अंधकारामध्ये आहेत.ते बेहद्दच्या पित्याला बोलवतात.जेव्हा ईश्वर पिता येतात,तेव्हा येऊन शांती स्थापन करतात.ईश्वराला मुलं जाणत नाहीत.शांती तर नवीन दुनिया मध्ये असते.जुन्या दुनिया मध्ये असत नाही.नवीन दुनिया स्थापन करणारे तर शिवपिताच आहेत, त्यांनाच बोलवतात येऊन शांतीची स्थापना करा.आर्य समाजी पण गात राहतात, हे शांती देवा. बाबा म्हणतात,प्रथम पवित्रता आवश्यक आहे.आता तुम्ही पवित्र बनत आहात.सतयुग त्रेता मध्ये पवित्रता पण आहे, शांती पण आहे, आरोग्य संपत्ती सर्व आहे.धना शिवाय तर मनुष्य उदास होतात. तुम्ही येथे येतात तर लक्ष्मीनारायण सारखे धनवान बनण्यासाठी येतात. हे विश्वाचे मालक होते ना.तुम्ही विश्वाचे मालक बनण्यासाठी आले आहात, परंतु बुद्धी सर्वांची क्रमानुसार आहे. बाबांनी म्हटले होते,जेव्हा प्रभातफेरी काढतात तर सोबत लक्ष्मी-नारायणाचे चित्र ठेवा. अशी युक्ती शोधा.आता मुलांची पारस बुद्धी बनत आहे. या वेळेत आत्ता पर्यंत तमोप्रधान पासून रजोपर्यंत आले आहेत.आता सतो, सतोप्रधान पर्यंत जायचे आहे. आता ती शक्ती नाही,आठवणी मध्ये राहत नाहीत.योगबळ खूप कमी आहे.लगेच सतोप्रधान बनू शकत नाहीत.हे जे गायन आहे सेकंदांमध्ये जीवन मुक्ती, ते ठीक आहे. तुम्ही ब्राह्मण बनले आहात,तर जीवनमुक्त तर बनले आहात,परत जीवनमुक्ती मध्ये पण सर्वोत्तम,मध्यम,कनिष्ठ असतात. जे बाबाचे बनतात त्यांना जीवनमुक्ती जरूर मिळते.जरी बाबाचे बनल्यानंतर,बाबांना सोडतात तरीही जीवनमुक्ती जरुर मिळेल. स्वर्गामध्ये झाडू लावणारे बनतील. स्वर्गांमध्ये तर येतील ना, बाकी पद कमी मिळेल.बाबा अविनाशी ज्ञान देतात, याचा कधी विनाश होत नाही.मुलांच्या मनामध्ये खुशीचे ढोल वाजायला पाहिजेत. हाय-हायच्या नंतरच वाव्हा होईल. तुम्ही आत्ता ईश्वरीय संपन्न आहात, परत दैवी संतान बनाल.या वेळेत तुमचे जीवन हिरे तुल्य आहे.तुम्ही भारताचे सेवा करून भारताला शांतीमय बनवत आहात. तेथे पवित्र सुख-शांती सर्व राहते. हे तुमचे जीवन देवतांपेक्षा उच्च आहे.आता तुम्ही रचनाकार शिव पिता आणि सृष्टीच्या रचनाकाराला जाणतात. असे म्हणतात हे सण इत्यादी जे पण आहेत,परंपराने चालत येतात, परंतु कधी पासून हे कोणी जाणत नाहीत. ते समजतात जेव्हा सृष्टी सुरु झाली, तेव्हापासून रावणाला जाळण्याची परंपरा चालत येते.सतयुगा मध्ये रावण नसतो.तेथे कोणीही दुःखी नसते म्हणून ईश्वराची आठवण करत नाहीत.येथे सर्व ईश्वराची आठवण करत राहतात,ते समजतात ईश्वरच विश्वामध्ये शांती करतात. यामुळे म्हणतात येऊन दया करा,आम्हाला दुःखापासून मुक्त करा.मुलंच पित्याला बोलवतात कारण मुलांनी सुख पाहिले आहे.बाबा म्हणतात तुम्हाला पवित्र बनवून सोबत घेऊन जातो.जे पवित्र बनणार नाहीत, त्यांना जरुर सजा मिळेल.येथे मनसा वाचा कर्मणा पवित्र राहायचे आहे.मन्सा पण खूप चांगली पाहिजे,इतके कष्ट करायचे आहेत, जे अंत काळात मनामध्ये पण कोणते व्यर्थ विचार यायला नको, एक बाबांच्या शिवाय कोणाची आठवण यायला नको.बाबा समजवतात आत्तापर्यंत मनसा मध्ये व्यर्थ संकल्प येत राहतील,जो पर्यंत कर्मातीत अवस्था होईल.हनुमान सारखे अचल अडोल बनायचे आहे. यामध्येच खूप कष्ट घ्यायला पाहिजेत.जे आज्ञाधारक,इमानदार, सुपात्र मुलं आहेत,बाबा पण प्रेम त्यांच्यावरती जास्त करतात.पाच विकारांना न जिंकणारे, इतके प्रिय वाटत नाहीत.तुम्ही मुलं जाणता आम्हीच कल्प-कल्प बाबा पासून वारसा घेतो,तर खूप खुशीचा पारा चढायला पाहिजे.हे पण जाणतात, स्थापना तर जर होणार आहे.जुनी दुनिया,स्मशानभुमी जरूर होईल. आम्ही परिस्थान मध्ये जाण्यासाठी कल्पा पूर्वी सारखे पुरुषार्थ करत राहायचे आहे.ही तर स्मशानभुमी आहे ना.जुनी दुनिया आणि नवीन दुनियाची समज शिडी मध्ये आहे. ही शिडी खूप चांगली आहे,तरीही मनुष्य समजत नाहीत.येथे सागराच्या किनाऱ्यावर(आबू पर्वत) राहणारे पण पूर्ण समजत नाहीत. तुम्हाला ज्ञानदान तर जरूर करायला पाहिजे.धन दिले तर संपत नाही,दानी महादानी म्हणतात ना.जे दवाखाना,धर्मशाळा इत्यादी बनवतात, त्यांना महादानी म्हणतात.त्याचे फळ परत दुसऱ्या जन्मा मध्ये अल्पकाळासाठी मिळते.कोणी धर्मशाळा बनवतात,तर दुसऱ्या जन्मामध्ये घराचे सुख मिळेल.कोणी खूप धन दान करतात,तर राजांच्या घरी किंवा सावकाराच्या घरी जन्म घेतात.ते दान केल्याने बनतात. तुम्ही राजयोगाच्या शिक्षणाद्वारे राजाई मिळवतात.हे शिक्षण पण आहे, दान पण आहे. येथे प्रत्यक्ष आहे,तर भक्ती मार्गामध्ये अप्रत्यक्ष आहे. बाबा तुम्हाला राजयोगाच्या शिक्षणाद्वारे उच्च बनवतात. शिवबाबांच्या जवळ तर अविनाशी ज्ञानरत्न आहेत.एक-एक ज्ञानरत्न लाखो रुपयांचे आहेत.भक्त्तीसाठी असे म्हणत नाहीत.ज्ञान याला म्हटले जाते.ग्रंथांमध्ये भक्तीचे ज्ञान आहे,भक्ती कोणत्या विधीद्वारे करायची असते याचे शिक्षण मिळते.तुम्हा मुलांना ज्ञानाचा खूप नशा आहे.तुम्हाला भक्तीच्या नंतर ज्ञान मिळते. विज्ञानाद्वारे विश्वाच्या बादशाहीचा कापारी नशा चढतो.जे जास्ती सेवा करतात,त्यांना जरुर नशा चढेल.प्रदर्शनी किंवा संग्रहालया मध्ये,जे चांगले भाषण करतात,त्यांना बोलवतात.तेथे पण जरुर क्रमानुसार असतील.महारथी, घोडेस्वार, सैनिक असतात. दिलवाडा मंदिरामध्ये पण स्मृतिस्थळ बनलेले आहे. तुम्ही म्हणाल हे चैतन्य दिलवाडा मंदिर आणि ते जड दिलवाडा मंदिर आहे. तुम्ही गुप्त आहात,म्हणून तुम्हाला कोणी जाणत नाही.

तुम्ही राजॠषी आहात,ते हठयोगी ॠषी आहेत.आता तुम्ही ज्ञान-ज्ञानेश्वरी आहात.ज्ञानसागर तुम्हाला ज्ञान देत आहेत.तुम्ही अविनाशी सर्जनाची मुलं आहात. सर्जनच नाडी पाहतात.तर आपली नाडीलाच जाणत नाहीत, तर दुसऱ्याला परत कसे जाणतील. तुम्ही अविनाशी सर्जनाची मुलं आहात ना.ज्ञान अंजन सद्गुरु दिले... हे ज्ञानाचे इंजेक्शन आहे ना. आत्म्याला इंजेक्शन लागते ना. ही महिमा आत्ताची आहे आणि सद्गुरुची महिमा आहे.गुरुंना पण इंजेक्शन सद्गुरुच देतील.तुम्ही अविनाश मुलं आहात.तर तुमचा धंदा ज्ञान इंजेक्शन देणे आहे. डॉक्टरांमध्ये पण कोणी महिन्याला लाख रुपये,कोणी पाचशे रुपये कमावतात.क्रमानुसार एक दोघांच्या कडे जातात ना.उच्च न्यायालया मध्ये, सर्वोच्च न्यायालया मध्ये निर्णय होतात, यांना फाशी द्या.परत राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करतात,तर त्यांना माफ पण करतात.

तर तुम्हा मुलांना नशा राहायला पाहिजे,उदारचित्त राहायला हवे.या भागीरथ मध्ये बाबांनी प्रवेश केला आहे,तर यांना बाबांनी उदारचित्त बनवले ना.स्वतः तर काय पण करू शकतात ना.ते यांच्यामध्ये येऊन मालक बनून बसले आहेत.चला हे सर्व भारताच्या कल्याणासाठी लावायचे आहे.तुम्ही धन भारताच्या कल्याणासाठीच लावतात.कोणी विचारतात,हा खर्च कसा करतात. तुम्ही सांगा आम्ही आपल्याच तन-मन-धना द्वारे सेवा करत आहोत. राज्य आम्ही करु, तर पैसे पण आम्हीच लावू नका.आम्ही आपला खर्च करतो.आम्ही ब्राह्मण श्रीमतावर राज्य स्थापन करतो.जे ब्राह्मण बनतील,तेच खर्च करतील. शूद्रा पासून ब्राह्मण बनले,त्यांनाच देवता बनवायचे आहे.बाबा तर म्हणतात,सर्व चित्र ट्रान्सलेटचे बनवा, ज्यामुळे मनुष्यांना आकर्षण होईल.कोणाला लगेच ज्ञानबाण लागेल.कोणी जादू समजून घाबरतात,तर ते येत नाहीत. मनुष्यापासून देवता बनवणे,ही तर जादू आहे ना.भगवानुवाच मी तुम्हाला राजयोग शिकवतो.हठयोगी कधी राजयोग शिकवू शकत नाहीत.या गोष्टी तुम्ही आत्ता समजतात. तुम्ही मंदिर लायक बनत आहात.यावेळेत संपुर्ण विश्व बेहद्दची लंका आहे.संपुर्ण विश्वामध्ये रावणाचे राज्य आहे.बाकी सतयुगामध्ये रावण इत्यादी कसे असू शकतात. बाबा म्हणतात,आता मी जे ऐकवतो ते ऐका,या डोळ्याने काहीच पाहू नका.ही जुनी दुनियाचा विनाश होणार आहे,म्हणून आम्ही आपल्या शांतीधाम सुखधामची च आठवण करतो.आता तुम्ही पूजारी पासून पुज्य बनत आहोत.हे क्रमांक एक चे पूजारी होते, नारायण ची खूप पूजा करत होते.आता परत पूज्य नारायण बनत आहोत.तुम्हीपण पुरुषार्थ करून बनू शकतात. राजधानी तर चालते ना.जसे राजा एडवर्ड प्रथम, दुसरे,तिसरे चालत येतात. बाबा म्हणतात,तुम्ही सर्वव्यापी म्हणून आमचा तिरस्कार करत आले आहेत,तरीही मी तुमच्यावरती उपकार करतो.हा खेळ असाच आश्चर्यकारक बनलेला आहे.पुरुषार्थ जरूर करायचा आहे. कल्पा पूर्वी ज्यांनी पुरुषार्थ केला होता,तेच अविनाशी नाटका नुसार करतील.ज्या मुलांना सेवेची आवड राहते,त्यांना रात्रंदिवस हेच चिंतन राहते.तुम्हा मुलांना बाबांकडून रस्ता मिळाला आहे,तर तुम्हा मुलांना सेवे शिवाय, बाकी दुसरे काही चांगले वाटत नाही.कलयुगी दुनिया मधील वातावरण चांगले वाटत नाही.सेवा करणाऱ्यांना तर सेवे शिवाय आराम वाटत नाही. शिक्षकांना शिकवण्या मध्येच मजा येते.आता तुम्ही खूप उच्च शिक्षक बनले आहात.तुमचा धंदाच हा आहे.जितके चांगले शिक्षक,तेवढे अनेकांना आपल्यासारखे श्रेष्ठ बनवाल,त्यांना त्याचा जास्त फायदा मिळेल.त्यांना शिकवण्याशिवाय आराम मिळणार नाही.प्रदर्शनी इत्यादीमध्ये रात्री बारा वाजतात, पण तरीही आनंद होतो, थकावट होत नाही.जरी गळा खराब होतो, तरीही आनंद राहतो, कारण ईश्वरीय सेवा आहे ना. ही खूप उच्च सेवा आहे, त्यांना परत काहीच गोड वाटत नाही.ते म्हणतील आम्ही हे घर इत्यादी घेऊन काय करणार? आम्हाला तर शिकवायचे आहे.हीच सेवा करायची आहे.मिळकत इत्यादी मध्ये खिटपिट होत राहते तर,म्हणाल हे सोने इत्यादी काय कामाचे आहे, जे कानच कापून नेहतील.शेवटी जीवननौका विषय सागरातून क्षिरसागर मध्ये जाऊ शकत नाही.बाबा म्हणतात घर जरूर बनवा,त्यांच्याच नावावरती राहू द्या, ब्रह्मकुमार कुमारींना तर सेवा करायची आहे.या सेवेमध्ये बाहेरचे कोणतेही बंधन चांगले वाटत नाही.कोणाचे आकर्षण जाते. कोणाचे आकर्षण नष्ट झालेले आहे. बाबा म्हणतात मनमनाभव तर तुमच्या विकर्माचा विनाश होईल. खूप मदत मिळते, तर या सेवेमध्ये तत्पर राहायला पाहिजे.यामध्ये खूप कमी आहे.इमारत इत्यादीदी ची गोष्ट नाही. इमारत,घर देऊन जर बंधन घालतील, तर असे घर घेणार नाहीत.जे सेवा जाणत नाहीत,ते काही कामाचे नाहीत.शिक्षक आपल्यासारखे बनवतात. ते बनत नाहीत, तर काहीच कामाचे नाहीत. सहयोगी आत्म्याची ची खूप जरुरत असते ना. यामध्ये पण कन्या मातांची जास्त जरुरत आहे. मुलं समजतात बाब तर शिक्षक आहेत. मुलं पण शिक्षक पाहिजेत.असे नाही की, शिक्षक दुसरे काही काम करू शकत नाहीत. सर्व काम करायला पाहिजे.अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)रात्रंदिवस याच चिंतना मध्ये राहायचे आहे, बाकी सर्व आकर्षण नष्ट करायचे आहे.सेवे शिवाय आराम नाही. सेवा करून आपल्यासारखे बनवायचे आहे.

(२ बाबांसारखे उदारचित्त बनायचे आहे.सर्वांची नाडी पाहून सेवा करायची आहे.आपले तन-मन-धन भारतच्या कल्याणा मध्ये लावायचे आहे.अचल अडोल बनण्यासाठी आज्ञाधारक, इमानदार बनायचे आहे.

वरदान:-
अंतरमुखताच्या गुफा मध्ये राहणारे देहा पासून अनासक्त, देही भव.

ज्या पांडवाच्या गुफा दाखवतात, त्याच अंतरमुखताच्या गुफा आहेत. जितके देहापासून अनासक्त,देही म्हणजे आत्म स्वरूपाच्या गुफा मध्ये स्थिर राहाल तर तेवढेच दुनियाच्या वातावरणापेक्षा दूर, वातावरणाच्या प्रभावा मध्ये येणार नाहीत. जसे गुफा मध्ये राहणारे, बाहेरच्या वातावरणापेक्षा दूर होतात,तसेच या आंतरमुखताच्या गुफा पण, सर्वांपासून अनासक्त बनवतात आणि बाबांचे प्रिय बनवते. आणि जे बाबांचे प्रिय आहेत,ते स्वतःच सर्वापेक्षा वेगळे होतात.

बोधवाक्य:-
साधना बीज आहे, साधन त्याचे विस्तार आहे, विस्तारामध्ये साधनेला लपवू नका.