05-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,आत्ता घरी जायचे आहे, म्हणून देही अभिमानी बना, एका बाबांची आठवण करा,तर
अंतमती सो गती होईल.
प्रश्न:-
आश्चर्यकारक
बाबांनी तुम्हाला कोणते एक,आश्चर्यकारक रहस्य ऐकवले आहे?
उत्तर:-
बाबा म्हणतात,मुलांनो आदी अविनाशी नाटक बनलेले आहे, यामध्ये प्रत्येकाची भूमिका
नोंदलेली आहे,काही पण होते,तरी त्यामध्ये नवीन काहीच नाही.बाबा म्हणतात मुलांनो,
यामध्ये माझा पण कोणता मोठेपणा नाही.मी पण वैश्विक नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलेला
आहे.हे आश्र्चर्यकारक रहस्य ऐकवून,बाबांनी जसे आपल्या भूमिकेचे महत्व कमी केले आहे.
गीत:-
शेवटी तो दिवस
आला आज,ज्याची आम्ही वाट पहात होतो.
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलं हे गीत गात आहेत.मुलं समजतात की कल्पा नंतर,परत आम्हाला धनवान
आरोग्यवान संपत्तीवान बनवण्यासाठी आणि पवित्रता सुख शांती चा वारसा देण्यासाठी बाबा
येतात. ब्राह्मण लोक आशीर्वाद देतात की,आयुष्यमान भव धनवान भव,पुत्रवान भव.तुम्हा
मुलांना तर वारसा मिळत आहे,आशीर्वादाची कोणतीच गोष्ट नाही.मुलं शिकत आहेत.पाच हजार
वर्षापूर्वी पण आम्हाला बाबांनी येऊन मनुष्या पासून देवता नरापासून नारायण बनवण्याचे
शिक्षण दिले होते.मुलं जाणतात की आम्ही काय शिकत आहोत, शिकवणारे कोण आहेत?
मुलांमध्ये पण क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणे जाणतात.हे तर म्हणतील की आम्हा मुलांना
माहित आहे की, राजधानी स्थापन होत आहे किंवा दैवी राजधानी स्थापन होत आहे. आदी
सनातन देवी देवता धर्माची स्थापना होता आहे.प्रथम शुद्र होतो परत ब्राह्मण बनलो,परत
देवता बनायचे आहे.दुनिया मध्ये कोणालाही माहीत नाही की,आम्ही आता शूद्र वर्णाच्या
आहोत.तुम्ही मुलं समजतात,ही तर खरी गोष्ट आहे.बाबा सत्य गोष्टी ऐकवून सत्य खंडाची
स्थापना करत आहेत. सत्ययुगामध्ये खोटे,पाप इत्यादी काहीच नसते. कलियुगामध्ये
अजामिल,पापी आत्मे असतात.या वेळेत बिल्कुलच रौरव नर्क आहे. दिवसेंदिवस रौरव नर्तक
दिसून येईल.मनुष्य असे कर्तव्य करत राहतील,जे समजतील बिल्कुलच तमोप्रधान दुनिया बनत
आहे. यामध्ये पण काम विकार महा शत्रू आहे.कोणी मुश्किल पवित्र शुद्ध राहू
शकतात.अगोदर फकीर लोक,जंगम लोक म्हणत होते,असे कलियुग येईल,जे बारा-तेरा वर्षाच्या
कुमारींना पण मुलं होतील.आता तीच वेळ आहे.कुमार कुमारी इत्यादी सर्व अपवित्र
राहतात. जेव्हा अगदीच तमोप्रधान बनतात तेव्हा,बाबा म्हणतात मी येतो. माझी पण
वैश्विक नाटकांमध्ये नोंद आहे. मी पण वैश्विक नाटकाच्या बंधनांमध्ये बांधलेला
आहे.तुम्हा मुलांसाठी तर कोणती नवीन गोष्ट नाही.बाबा अशा प्रकारे समजवत राहतात.चक्र
पूर्ण केले,नाटक पूर्ण होत आहे.आता बाबांची आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनून
सतयुगाचे मालक बनाल.बाबा खूप साधारण रीतीने समजावतात.बाबा काही आपल्या भूमिकेला इतके
महत्त्व देत नाहीत.ही तर माझीच भूमिका आहे,नवीन गोष्ट नाही. प्रत्येक ५०००
वर्षानंतर मला यावे लागते.मी पण वैश्विक नाटकांमध्ये बांधलेला आहे.मी येऊन तुम्हा
मुलांना खूपच सहज आठवणीची यात्रा शिकवतो.अंतमती सो गती... हे यावेळेचे गायन आहे.हा
अंत काळ आहे ना.बाबा युक्ती सांगतात की, तुम्ही माझीच आठवण करा,तर सतोप्रधान
बनाल.मुलं पण समजतात आम्ही नवीन दुनियेचे मालक बनू.बाबा घडीघडी म्हणतात, नवीन काहीच
नाही.एका जीनची गोष्ट ऐकवतात नाही,त्यांनी म्हटले काम द्या,तर त्याचे मालक म्हणाले
हे सीडी उतरा आणि चढा.बाबा पण म्हणतात हा खेळ उतरणे आणि चढण्याचा आहे. पतिता पासून
पावन, आणि पावन पासून पतित बनतात.ही काही अवघड गोष्ट नाही,खूप सहज आहे परंतु कोणते
युद्ध आहे,हे न समजल्यामुळे ग्रंथांमध्ये लढाईच्या गोष्टी लिहिल्या आहेत.वास्तव
मध्ये माया रावणावर विजय मिळवणे तर खूपच मोठे युद्ध आहे.मुलं पाहतात की आम्ही सारखे
सारखे बाबांची आठवण करतो, परत आठवण विसरते. माया दीपक शिजवणे.या वरतीच गुलबकावली ची
गोष्ट पण आहे. काही मुलं फार चांगले चालतात, तरीही माया येऊन दीपक विझवते. मुलं पण
म्हणतात बाबा मायचे वादळ खूप येतात.वादळ पण अनेक प्रकारचे मुलांजवळ येतात.कधी कधी
तर असे वादळ जोरात येतात की,आठ-दहा वर्षांची जुनी मुलंपण ज्ञान सोडून देतात.मुलं
जाणतात,वर्णन पण करतात. चांगले चांगले माळेतील मणी होते, जे आज नाहीत. हे पण उदाहरण
आहे, हत्तीला मगरीने खाल्ले.हे मायेचे वादळ आहे ना. बाबा म्हणतात या विकारा पासून
संभाळ करत राहा. आठवणीमध्ये रहाल तर मजबूत बनाल.देही अभिमानी बना.ही शिक्षा
बाबांकडून एकाच वेळेत मिळते,असे कधी कोणी म्हणणार नाही की,तुम्ही आत्माभिमानी बना.
सत्ययुगामध्ये असे म्हणणार नाहीत. नाव रूप देश काळ सर्व आठवणीत राहते ना.या वेळेतच
तुम्हाला समजावतो की,आता परत घरी जायचे आहे.तुम्ही सतोप्रधान होते, सतो-रजो-तमो
मध्ये तुम्हीच पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत.त्यामध्ये पण क्रमांक एकचे ब्रह्मा
आहेत.दुसऱ्यांचे ८३ जन्म पण होऊ शकतात,यांच्यासाठी तर पूर्ण ८४ जन्म आहेत.हे प्रथम
श्री नारायण होते,यांच्यासाठी म्हणतात तर सर्वांसाठी समजतात,अनेक जन्माच्या अंत
काळामध्ये ज्ञान घेऊन परत ते नारायण बनतात. कल्पवृक्षा मध्ये पण दाखवले आहे ना,येथे
श्री नारायण आणि शेवटी ब्रह्मा उभे आहेत.झाडाच्या खाली राजयोग शिकत आहे.प्रजापिताला
कधी परमपिता म्हणणार नाहीत.परमपिता एकालाच म्हटले जाते. प्रजापिता परत यांना म्हटले
जाते. हे देहधारी आहेत,ते विदेही, विचित्र आहेत.लौकिक बापाला पिता म्हनणार,यांना
प्रजापिता म्हनणार.ते परमपिता तर परमधाम मध्ये राहतात.प्रजापिता ब्रह्मा परमधाम
मध्ये राहत नाहीत.ते तर येथे साकारी दुनिया मध्ये राहतात. सुक्ष्म वतन मध्ये
नाही.प्रजा तर स्थुल वतन मध्ये आहे.प्रजापित्या ला भगवान म्हणू शकत नाही. भगवंताचे
कोणते शारीरिक नाव नाही.मनुष्य तन ज्यांच्या वरती नाव पडते.त्यांच्या पेक्षा ते
वेगळे आहेत. आत्मे तेथे राहतात,तर स्थुल नाव रूपापेक्षा वेगळे आहेत, परंतु आत्मा तर
आहे ना.साधुसंत इत्यादी काहीच जाणत नाहीत.ते लोक फक्त घरदार सोडतात,बाकी दुनिये
मधिल विकारांचे तर अनुभवी आहेत ना.लहान मुलांना तर काहीच माहिती होत नाही,म्हणून
त्यांना महात्मा म्हटले जाते.पाच विकाराबद्दल त्यांना काहीच माहिती राहत नाही.लहान
मुलांना म्हणून पवित्र म्हटले जाते.या वेळेत तर कोणी पवित्र आत्मा होऊ शकत नाही.
लहानापासून मोठे होतील, परत तरीही पतितच म्हणणार ना. बाबा समजवतात,सर्वांची वेगवेगळी
भूमिका या अविनाशी नाटकांमध्ये नोंदलेली आहे.या चक्रामध्ये अनेक शरीर घेतात, खूप
कार्य करत राहतात,ज्याची पुनरावृत्ती होते. प्रथम आत्म्याला ओळखायचे आहे, इतक्या
लहान आत्म्या मध्ये 84 जन्माच्या अविनाशी भूमिकेची नोंद आहे,ही सर्वात आश्चर्यकारक
गोष्ट आहे.आत्मा पण अविनाशी आहे, हे वैश्विक नाटक पण अविनाशी आणि पूर्व नियोजित
आहे.असे म्हणू शकत नाही की,कधी सुरू झाले? याला कुदरत म्हणतात ना.आत्मा कशी आहे,हे
वैश्विक नाटक कसे बनले आहे,यामध्ये कोणी काही करू शकत नाही.जसे समुद्र किंवा आकाशाचा
अंतर काढू शकत नाहीत,हे पण वैश्विक नाटक आहे. खूप आश्चर्य वाटते,जसे बाबा
आश्चर्यकारक आहेत,तसेच ज्ञान पण खूपच आश्चर्यकारक आहे. कधी कोणी सांगू शकत
नाही.सर्व कलाकार आपली भूमिका वठवत राहतात.हे नाटक कधी बनले? असे कोणी प्रश्न विचारू
शकत नाहीत. अनेक जण म्हणतात भगवंताला काय पडले होते,जे दुःख सुखाची दुनिया बनवली.अरे
हे तर अनादी आहे.प्रलय इत्यादी होत नाही, हे पूर्वनियोजित आहे.असे थोडेच म्हणू
शकतात की,हे का बनवले? आत्म्याचे ज्ञान पण बाबा तुम्हाला तेव्हाच ऐकवतात,जेव्हा
समजदार बनतात. तर तुम्ही दिवसेंदिवस प्रगती करत राहतात.प्रथम तर बाबा खूप थोडे-थोडे
ऐकवत होते. आश्चर्यकारक गोष्टी होत्या,तरीही आकर्षण तर होते ना.शिवपित्याने आकर्षित
केले.योग भट्टी चे पण आकर्षण होते ना.ग्रंथांमध्ये परत दाखवले आहे,कृष्णाला कंसपुरी
मधून काढून घेऊन गेले.आता तुम्ही जाणतात कंस इत्यादी तर स्वर्गामध्ये
नसतात.गीता,भागवत, महाभारत या सर्वांचे संबंध आहेत परंतु तसे काहीच नाही.ते समजतात
हा दसरा इत्यादी तर परंपरा पासून चालत येतो.रावण काय गोष्ट आहे, हे पण कोणी जाणत
नाहीत.जे पण देवी-देवता होते, ते खाली उतरत उतरत पतीत बनले आहेत.तेच ओरडत राहतात
कारण जास्ती पतित बनले आहेत,म्हणून बोलवत राहतात,हे पतित-पावन या.या सर्व
गोष्टींबाबत सन्मुख समजवतात. सृष्टीचक्राला पण कोणीच जाणत नाहीत.तुम्ही जाणल्यामुळे
चक्रवर्ती राजा बनतात.त्रिमूर्ती मध्ये लिहिले आहे, हा तुमचा ईश्वरीय जन्मसिद्ध
अधिकार आहे.ब्रह्मा द्वारे स्थापना, शंकरा दरवाजे विनाश,विष्णू द्वारे पालना.विनाश
पण जरूर होणार आहे.नवीन दुनिये मध्ये खूप थोडे असतात,आता तर अनेक धर्म आहेत.ते
समजतात आदी सनातन देवी देवता धर्मच नाही,परत जरूर एक धर्म असायला हवा. महाभारताचा
पण गीतेशी संबंध आहे.हे चक्र फिरत राहते,एक सेकंद पण बंद होऊ शकत नाही.ही पण काही
नवीन गोष्ट नाही,अनेक वेळेस राज्य घेतले आहे,ज्याचे पोट भरलेले असते,ते गंभीर
राहतात. मनामध्ये समजतात,अनेक वेळेस राज्य घेतले होते,काल ची गोष्ट आहे. कालच
देवी-देवता होतो, परत चक्र लावले,आज आम्ही पतित बनलो आहोत,परत आम्हीच योगबळा द्वारे
विश्वाची बादशाही घेतो.बाबा म्हणतात,तुम्हीच कल्पकल्प बादशाही घेतात.जरा पण फरक पडू
शकत नाही.राजाई मध्ये कोणी कनिष्ठ तर कोणी उच्च बनतात.हे पुरुषार्था द्वारेच होत
राहते.
तुम्ही जाणतात अगोदर आम्ही माकडा पेक्षा खराब होतो,आता बाबा मंदिर लायक बनत आहोत.
जे चांगली चांगली मुलं आहेत, त्यांची आत्मा जाणते,बरोबर आम्ही तर काहीच कामाचे
नव्हतो,आता आम्ही मूल्यवान बनत आहोत. कल्पकल्प बाबा आम्हाला कवडीपासून हिरेतुल्य
बनवतात. कल्पा पूर्वी ज्ञान घेतलेली मुलंच या गोष्टींना चांगल्या प्रकारे समजू
शकतात.तुम्हीपण प्रदर्शन इत्यादी करतात तर,नवीन काहीच नाही. यांच्याद्वारे तुम्ही
अमरपुरीची स्थापना करत आहात.भक्तिमार्गा मध्ये देवी देवता इत्यादींचे अनेक मंदिरे
आहेत.हे सर्व पुजारी पनाची सामग्री आहे. पूजे पनाची सामग्री काहीच नाही.दिवसेंदिवस
तुम्हाला रहस्ययुक्त ज्ञानाचे मुद्दे समजावत राहतो.तुमच्याजवळ यापुर्वी शिकवलेले
ज्ञानाचे अनेक मुद्दे आहेत,आतल्या त्याचे काय कराल? असेच पडून राहतात.वर्तमान मध्ये
तर बापदादा नवीन नवीन ज्ञानाच्या गोष्टी समजावत राहतात.आत्मा इतकी लहान बिंदू आहे,
त्यामध्ये सर्व भूमिका नोंदलेली आहे. हा मुद्दा अगोदर थोडाच स्पष्ट केला होता. परत
जुन्या ज्ञानाच्या मुद्द्याचे तुम्ही काय करणार? अंत काळातील परिणामच कामांमध्ये
येतो.बाबा म्हणतात कल्प पूर्वी पण तुम्हाला असेच ऐकवले होते. क्रमानुसार शिकत
राहतात.काही विषयांमध्ये खालीवरती होत राहतात. व्यापारामध्ये पण ग्रहचारी बसते,
यामध्ये हार्टफेल(संभ्रमित) व्हायचे नाही, परत उठून पुरुषार्थ केला जातो.मनुष्याचे
दिवाळं निघाल्यानंतर परत धंदा इत्यादी करून धनवान बनतात.येथे कोणी विकारांमध्ये
जातात,तरीही बाबा म्हणतात चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करून उच्चपद मिळवा,परत प्रगती
करण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे. बाबा म्हणतात विकारी बनले आहात,तर परत निर्विकारी
बना.असे पण खूप आहेत,जे विकारात जातात परत पवित्र राहण्यासाठी प्रयत्न करतात.बाबा
मनाई थोडेच करतील.बाबा जाणतात,असे पण खूप येतील. बाबा म्हणतात पुरुषार्थ करा,तरीही
काही ना काही मदतगार तर जरुर बनतील. पूर्वनियोजित नाटका नुसारच म्हणतील.बाबा
म्हणतात अच्छा, मुलांनो आता तृप्त झाले, खूप विकारांमध्ये बुडत राहिले, आता परत
पुरुषार्थ करा.बेहद्दचे बाबा तर असेच म्हणतील ना. बाबांच्या जवळ अनेक भेटण्यासाठी
येतात.बाबा म्हणतात बेहद्दच्या पित्याचे मानणार नाहीत का? पवित्र बनणार नाहीत
का?बाबा आत्मा समजून आत्म्याला म्हणतात,तर ज्ञानाचा बाण लागतो.समजा पत्नीला
ज्ञानबाण लागतो,तर ती म्हणते, मी तर प्रतिज्ञा करते.पतीला ज्ञानाचा बाण लागत नाही.
पुढे चालून त्यांना पण पवित्र राहण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तरीही असे खूप
येतात,त्यांची पत्नी ज्ञानामध्ये घेऊन येते.तर ते म्हणतात पत्नी माझी गुरु आहे.ते
ब्राह्मण लोक हाथियाला बांधताना म्हणतात पण,पती तुम्हचा गुरु, ईश्वर आहे.येथे बाबा
म्हणतात, तुमचा तर एकच शिव पिता सर्व काही आहे.माझे तर एक दुसरे कोणी नाही.सर्व
त्यांचीच आठवण करतात.सर्व त्यांचीच आठवण करतात.त्या एकाशीच योग लावायचा आहे.हे शरीर
पण माझं नाही,अच्छा.
गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात-पिता बापदादाची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) कोणतीही
ग्रहचारी येते,तर संभ्रमित होऊन बसायचे नाही,परत पुरूषार्थ करून बाबांच्या आठवणी
मध्ये राहून उच्च पद मिळवायचे आहे.
(२) स्वतःची स्थिती आठवणी द्वारे अशी मजबूत बनवायची आहे,जे कोणतेही मायचे तुफान चालू
शकणार नाहीत.विकारापासून आपली सांभाळ करत राहायचे आहे.
वरदान:-
त्रिकालदर्शी
आणि साक्षी दृष्टा बनून प्रत्येक कर्म बंधनमुक्त स्थितीचा अनुभवा द्वारे दृष्टांत
रूप भव.
जर त्रिकालदर्शी
स्थिती वरती स्थिर होऊन कर्माच्या आदी मध्य अंतला जाणून कर्म करतात,तर कोणतेही
विकर्म होऊ शकत नाहीत,नेहमी सुकर्म होईल.असेच साक्षी दृष्टा बनून कर्म केल्यामुळे
कोणत्याही कर्माच्या बंधनामध्ये कर्मबंधनी आत्मा बनणार नाही.कर्माचे फळ श्रेष्ठ
असल्यामुळे,कर्म संबंधांमध्ये येतील,बंधनांमध्ये नाही.कर्म करत अनासक्त आणि प्रिय
राहतील,तर अनेक आत्म्याच्या समोर दृष्टांत रुप म्हणजे उदाहरण बनतील.
बोधवाक्य:-
जे मना द्वारे
संतुष्ट आहेत, तेच डबल लाईट,म्हणजे एकदम हल्के आहेत.