08-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, बाबा जसे आहेत, तसे त्यांना अर्थसहीत ओळखुन आठवण करा, यासाठी आपल्या
बुद्धीला विशाल बनवा."
प्रश्न:-
बाबांना
गरिब-निवाज का म्हटले गेले आहे?
उत्तर:-
कारण या वेळेत जेव्हा सारी दुनिया गरीब म्हणजे, दुःखी बनली आहे,तेव्हा बाबा सर्वांना
दुःखापासून सोडवण्यासाठी येतात. बाकी कोणा वरती दया करून, कपडे देणे,पैसे देणे ही
काही फार कमालीची गोष्ट नाही.यामुळे ते काही सावकार बनत नाहीत.असे नाही,मी काही या
गरिबांना पैसे देऊन गरीब निवाज म्हणून घेऊ शकतो.मी तर गरीब म्हणजे पतीतांना,
ज्यांच्यामध्ये ज्ञान नाही, त्यांना ज्ञान देऊन पावन बनवतो.
गीत:-
हाच मोसम
आहे,या दुनियेला विसरण्याचा…
ओम शांती।
गोड गोड मुलांनी गीत ऐकले.मुलं जाणतात,गीत तर दुनियावी मनुष्यांनी बनवले आहे. अक्षरं
खूप चांगले आहेत,या दुनियेला विसरायचे आहे.अगोदर असे समजत नव्हते की,मनुष्याला पण
समजून येत नाही की, नवीन दुनिया मध्ये जायचे असेल तर, जरूर जुन्या दुनियेला विसरावे
लागेल.जर इतके समजतात,जुन्या दुनियेला सोडायचे आहे,परंतु ते समजतात आणखी खूप वेळ आहे.
नवीनच जुनी होईल,हे तर समजतात परंतु खूप कालावधी दिल्याने विसरले आहेत.तुम्हाला
आत्ता स्मृती करून दिली जाते. आता नवीन दुनियेची स्थापना होत आहे म्हणून जुन्या
दुनियेला विसरायचे आहे,विसरल्याने काय होईल? आम्ही हे शरीर सोडून नवीन दुनिया मध्ये
जाऊ परंतु अज्ञान काळामध्ये अशा गोष्टी कुणाच्या ध्यानामध्ये येत नाहीत. ज्याप्रकारे
बाबा समजवतात अशा प्रकारे कोणीही समजून सांगणारे नाहीत.तुम्ही याच्या अर्थाला समजू
शकतात.हे पण मुलं जाणतात, बाबा खूप साधारण आहेत.अनन्य, चांगली चांगली मुलं पण पूर्ण
प्रकारे समजू शकत नाहीत,विसरतात की यांच्यामध्ये शिवबाबा येतात. कोणत्याही सूचना
देतात,तर समजत नाहीत की,या बाबांच्या सुचना आहेत.शिवबाबांना सर्व दिवस जसे विसरले
आहेत,पूर्ण न समजल्यामुळे ते आठवण करत नाहीत.माया आठवण करू देत नाही,नेहमी ती आठवण
थांबू शकत नाही.कष्ट करत करत अंत काळामध्ये ती अवस्था जरूर होईल.असे कोणी पण नाहीत
की,ज्यांची या वेळेत कर्मातीत अवस्था होईल.बाबा जसे आहेत त्यांना जाण्यासाठी खूप
विशाल बुद्धी पाहिजे.
तुम्हाला विचारतात, बापदादा गरम कपडे वापरतात का?तुम्ही म्हणाल दोघे वापरतात.शिवबाबा
म्हणतील,मी थोडेच गरम कपडे वापरतो.मला तर थंडी वाजत नाही. ज्यांच्यामध्ये प्रवेश
केला त्यांना थंडी वाजते.मला तर न भूक लागते, न तहान लागते.मी तर निर्लेप आहे. सेवा
करताना पण,या गोष्टीपासून अनासक्त आहे.मी खात पीत नाही. असे म्हणतात,जसे एक साधू
म्हणत होता की, मी न खातो,न पितो….. त्यांनी परत कृत्रिम वेष धारण केला आहे.देवतांची
नावं पण अनेकांनी ठेवली आहेत.दुसरे कोणी कोणत्या धर्मांमध्ये देवी-देवता बनत नाहीत.
येथे तर खूप मंदिरं आहेत.बाहेर तर एका शिवबाबांनाच मानतात.बुद्धी पण म्हणते,पिता
एकच असतात. पित्या कडूनच वारसा मिळतो. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे,कल्प कल्प
पुरुषोत्तम संगमयुगा मध्येच बाबा पासून वारसा मिळतो.जेव्हा आम्ही सुखधाम मध्ये
जातो,तर बाकी सर्व शांतीधाम मध्ये राहतात. तुमच्यामध्ये पण ही समज क्रमानुसार
आहे.जर ज्ञानाच्या विचारांमध्ये राहतात,तर त्यांचे बोल तेच निघतील.बाबा द्वारे
तुम्ही रूप बसंत बनत आहात.तुम्ही रुप पण आहात आणि बसंत पण आहात. दुनिया मध्ये कोणी
म्हणू शकत नाही की, आम्ही रुपबसंत आहोत. आता तुम्ही शिकत आहात, शेवटपर्यंत
क्रमानुसार पुरुषार्थ नुसार शिकत राहाल.शिवबाबा आम्हा आत्म्यांचे पिता आहेत ना.हे
पण मनाला लागते ना.भक्तिमार्ग मध्ये थोडेच मनाला लागते.हे तर सन्मूख बसले
आहेत.तुम्ही समजता,बाबा परत या वेळेतच येतील,परत कोणत्या वेळेत बाबांना येण्याची
आवश्यकता नाही. सतयुगा पासून त्रेतापर्यंत येत नाहीत.द्वापर युगा पासून कलियुगा
पर्यंत पण येत नाहीत.ते कल्पाच्या संगम युगामध्येच येतात.बाबा गरीब निवाज म्हणजे
सर्व दुनिया दु:खी, गरीब होते,त्यांचे पिता आहेत. यांच्या मनामध्ये काय राहील. आम्ही
गरीब निवाज आहोत.सर्वांचे दुःख किंवा गरीबी नष्ट होईल.ती तर ज्ञानाशिवाय कमी होऊ
शकत नाही. बाकी कपडे इत्यादी दिल्यामुळे कोणी सावकार तर बनणार नाही ना.गरिबांना
पाहिल्यानंतर वाटते की अन्न, वस्त्र द्यावेत, कारण आठवण तर येते ना की, मी गरीब
निवाज आहे. सोबत हे पण समजतो की,मी गरीब निवाज काही,भिल,गरीब लोकांसाठीच नाही.मी
गरीब निवाज असा आहे,जे बिलकुलच पतित आहेत त्यांना पावन बनवतो.मीच पतित पावन आहे,तर
विचार चालतो,मी गरीब निवाज आहे परंतु पैसे इत्यादी त्यांना कसे देऊ? पैसे इत्यादी
देणारे तर दुनिया मध्ये खूप आहेत.खूप निधी काढतात ते परत अनाथ आश्रम मध्ये पाठवतात.
जाणतात अनाथ राहतात,म्हणजे ज्यांना नाथ नाहीत. तुमचा पण अनाथ म्हणजेच पिता
नव्हते.तुम्ही गरीब होते,ज्ञान नव्हते.जे रूप बसंत आहेत, त्यांना सनाथ म्हटले जाते.
सनाथ सावकाराला,अनाथ गरिबाला म्हटले जाते.तुमच्या बुद्धीमध्ये आहे, सर्व गरीब आहेत,
काही ना काही त्यांना द्यावे. बाबा गरीब निवाज आहेत,तर म्हणतील अशा गोष्टी
द्यावेत,ज्यामुळे नेहमीसाठी सावकार बनतील. बाकी हे कपडे इत्यादी देणे तर साधारण
गोष्ट आहे,त्याच्यामध्ये आम्ही का जावे.आम्ही तर अनाथांना सनाथ बनवू.जरी कोणी कितीही
पदमपती असतील परंतु ते सर्व अल्प काळासाठी आहे.ही अनाथांची दुनिया आहे.जरी पैसेवाले
आहेत,ते पण अल्पकाळासाठी आहेत.तेथे तर सदैव सनाथ आहेत, कर्माचा पश्चाताप करावा लागत
नाही.येथे तर खूप गरीब आहेत.ज्यांना धन आहे,त्यांना तर आपल्याच धनाचा नशा चढलेला
राहतो की,आम्ही तर स्वर्गात आहोत, परंतु नाहीत, हे तर तुम्ही जाणतात.या वेळेस
कोणीही मनुष्य सनाथ नाहीत. सर्व अनाथ आहेत. हे पैसे इत्यादी सर्व तर मातीमध्ये
जाणारे आहे.मनुष्य समजतात,आमच्याजवळ इतके धन आहे,जे मुलं नातवंडे खात राहतील. परंपरा
चालत राहील,परंतु असे तर चालणार नाही.हे सर्व विनाश होईल म्हणून तुम्हाला या जुन्या
दुनिये पासून वैराग्य आहे.
तुम्ही जाणतात नवीन दुनियेला स्वर्ग,जुन्या दुनियेला नरक म्हटले जाते. आम्हाला बाबा
नवीन दुनियेसाठी सावकार बनवत आहेत. ही जुनी दुनिया तर नष्ट होणार आहे. बाबा खूप
सावकार बनवतात.हे लक्ष्मीनारायण सावकार कसे बनतील?काय कोणा सावकाराकडून वारसा मिळाला,
की लढाई केली? जसे दुसरे राजगादी मिळवतात,काय अशाप्रकारे राजगाद्दी मिळवली,की
कर्मानुसार हे धन मिळाले.बाबांचे कर्म शिकवणे तर वेगळे आहे.कर्म -अकर्म -विकर्म
अक्षरं पण स्पष्ट आहेत ना.ग्रंथांमध्ये काही अक्षर आहेत, पिठामध्ये मीठा एवढेच सत्य
आहे.कुठे इतके करोडो मनुष्य बाकी फक्त नऊ लाख राहतात. पाव टक्का पण झाले नाहीत.तर
याला म्हटले जाते पिठामध्ये मीठ. सर्व दुनिया विनाश होते. खूप थोडे संगमयुगा मध्ये
राहतात.कोणी तर अगोदरच शरीर सोडून जातात,ते परत स्वागत करतील.जसे मुगली कन्या होती,
चांगली होती,तर खूपच चांगल्या घरामध्ये जन्म झाला असेल.क्रमानुसर सुखामध्येच जन्म
घेतात,सुख तर त्यांना पाहिचे आहे. थोडे दुःख पण पाहिचे आहे.कर्मातीत अवस्था तर
कोणाची झाली नाही.जन्म खूप सुखी घरांमध्ये घेतील.असे समजू नका की, येथे काही सुखी
घरं नाहीत. खूप परिवार असे चांगले असतात, तुम्ही विचारू नका.बाबांनी पाहिले
आहेत,एकाच घरामध्ये सर्व सुना इत्यादी शांती मध्ये मिळून-मिसळून राहतात.सर्व सोबत
भक्ती करतात, गीता वाचतात.बाबांनी विचारले, इतके सर्व एकत्र राहतात, तर भांडण होत
नाहीत.तर ते म्हणाले,आमच्या येथे तर स्वर्गच आहे आणि सर्व एकत्र राहतो.कधी भांडत
नाही, शांती मध्ये राहतो.असे म्हणतात येथे तर जसा स्वर्ग आहे. तर जरूर स्वर्ग झाला
असेल,तेव्हा तर म्हणतात ना की,येथे तर जसे स्वर्ग आहे,परंतु येथे त्यांचा स्वभाव
स्वर्गवासी बनण्याचा दिसून येत नाही.दास दासी पण बनणार आहेत ना.ही राजधानी स्थापन
होत आहे. बाकी जे ब्राह्मण बनतात,ते दैवी घरण्यामध्ये येणारे आहेत परंतु क्रमानुसार
आहेत.कोणीतरी खूप गोड असतात, सर्वावरती प्रेम करतात. कधी कोणाला रागवत
नाहीत.रागवल्यामुळे दुःख होते.जे मनसा वाचा कर्मणा दुःख देत राहतात,त्यांना म्हटले
जाते दुःखी आत्मा.जसे पुण्यात्मा, पापात्मा म्हणतात ना.शरीराचे नाव घेतात का?
वास्तव मध्ये आत्माच बनते. सर्व पापत्मा पण एक सारखे होत नाहीत. पुण्यात्मा पण सर्व
एकसारखे होत नाहीत, क्रमानुसार पुरुषार्थ अनुसार असतात. विद्यार्थी स्वतः समजतात
की, आमचे चरित्र, अवस्था कशी आहे? आम्ही कसे चालतो? सर्वांशी गोड बोलतो? कोणी काही
म्हणाले तर लगेच उलट सुलट उत्तर तर देत नाहीत ना. बाबांना अनेक मुलं म्हणतात,
मुलांवरती राग येतो.बाबा म्हणतात, जेवढे शक्य होईल तेवढे,प्रेमाने काम करुन
घ्या.लहान मुलांना सुधरवण्यासाठी कान पकडतात ना. कृष्णासाठी दाखवतात ना उखळाला
बांधले.ही पण येथील गोष्ट आहे.लहान मुलगा चंचल आहे, तर तुम्ही त्याला खाटेला किंवा
झाडाला बांधा,चापट मारू नका.असे नाही मुलगा मोठा होऊन आई-वडिलांना बांधेल.नाही ही
मुलांसाठी शिक्षा आहे.अगदी तंग करतील तर कानाला पकडू शकतात. कोणती मुलं एकदम
नाकामध्ये दम करतात.निर्मोही पण बनायला पाहिजे. येथे तर तुम्ही मुलं समजतात,आम्हाला
लक्ष्मीनारायण सारखे बनायचे आहे. मुख्य लक्ष्य समोर आहे. खूप उच्च उद्दिष्ट आहे.
शिकवणारे पण सर्वोच्च आहेत ना. श्रीकृष्णाचे खूप महिमा गायन करतात, सर्वगुणसंपन्न,१६
कला संपूर्ण… आता तुम्ही मुलं जाणतात आम्ही तसेच श्रेष्ठ बनवत आहोत. तुम्ही येथे आले
आहात, असे श्रेष्ठ बनण्यासाठी.तुमची ही खरी सत्यनारायणाची कथा आहे, नरापासून नारायण
बनण्याची. अमर कथा आहे,अमर पुरी मध्ये जाण्यासाठी.कोणी संन्यासी इत्यादी या
गोष्टींना जाणत नाहीत.कोणत्या मनुष्यमात्राला ज्ञानाचे सागर किंवा पतित-पावन म्हटले
जात नाही. जेव्हा संपूर्ण सृष्टीच पतित आहे,तर आम्ही पतित पावन कोणाला म्हणायचे?
येथे कोणी पुण्यात्मा होऊ शकत नाहीत.बाबा समजवतात,ही दुनियाच पतित आहे.श्रीकृष्ण
प्रथम क्रमांक मध्ये आहेत,त्यांना पण भगवान म्हणू शकत नाही. जन्म-मरण रहीत तर एकच
निराकार पिता आहेत. गायन पण केले जाते शिव परमात्माए नमः,ब्रह्मा विष्णू शंकरला
देवता म्हणून परत शिवाला परमात्मा म्हणतात.तर शिव सर्वात श्रेष्ठ झाले ना. ते
सर्वांचे पिता आहेत. वारसा पण पित्या पासून मिळणार आहे. सर्वव्यापी म्हटल्यामुळे
वारसा मिळत नाही.बाबा स्वर्गाची स्थापना करणारे आहेत, तर जरूर स्वर्गाचा वारसा
देतील.हे लक्ष्मीनारायण क्रमांक एक मध्ये आहेत. राजयोगाच्या अभ्यासामुळे हे पद
मिळवले आहे.भारताचा प्राचीन योग,का नाही प्रसिद्ध होणार? याद्वारे मनुष्य विश्वाचे
मालक बनतात,त्याला म्हटले जाते सहजयोग सहज ज्ञान.आहे पण खूपच सहज. एका जन्माच्या
पुरुषार्थामुळे खूप प्राप्ती होते. भक्तिमार्ग मध्ये तर जन्म जन्मांतर धक्के खात आले
आहात,मिळाले काहीच नाही. येथे तर एक जन्मांमध्ये मिळते म्हणून सहज म्हटले जाते,
सेकंदांमध्ये जीवनमुक्ती म्हटले जाते.आजकाल तर पाहा कसे-कसे संशोधन निघत
राहते.विज्ञानाचे पण आश्चर्य आहे. शांतीचे पण आश्र्चर्य आहे. ते सर्व दिसून येते.
येथे काहीच नाही. तुम्ही तर शांती मध्ये बसले आहात, नोकरी इत्यादी पण करत आहात.
हाताने काम करा आणि बुद्धीने बाबांची आठवण करा, आणि आत्म्याचे मन शिव साजन कडे लागले
पाहिजे. साजन सजनी चे पण गायन आहे ना. ते तर एक दोघांच्या चेहऱ्यावरती आकर्षित
होतात. विकारांची गोष्टच राहत नाही. कुठे पण बसले तर आठवण येते, भोजन करत असतील तरी
त्यांना समोर पाहत राहतात. शेवटी तुमची ही अवस्था होईल. बाबांची आठवण करत राहा,
अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) रूप बसंत
बनून मुखाद्वारे नेहमी सुखद बोलच बोलायचे आहेत. दुःखद बोल बोलायचे नाहीत. त्यांच्या
विचारांमध्ये राहायचे आहे. मुखाद्वारे ज्ञान रत्न काढायचे आहेत.
(२) निर्मोही बनायचे आहे. प्रत्येकाकडून प्रेमाने काम करुन घ्यायचे आहे, रागवायचे
नाही. अनाथला सनाथ बनवण्याची सेवा करायची आहे.
वरदान:-
अपवित्रतेच्या
नावारूपाला पण समाप्त करून परम पवित्र ची पदवी प्राप्त करणारे पवित्र हंस भव.
जसे हंस कधी दगड चोकत
नाही, रत्न धारण करतात.असेच पवित्र हंस कधी कोणाच्या अवगुणाला म्हणजे दगडाला धारण
करत नाहीत.ते समर्थला वेगळे करुन व्यर्थला सोडून देतात आणि समर्थ ला स्वीकार
करतात.असे पवित्र हंसच पवित्र शुद्ध आत्मे आहेत, त्यांचा आहार, व्यवहार सर्व शुद्ध
होतो. शुद्धी म्हणजे अपवित्रता पण समाप्त होते.तेव्हा भविष्यामध्ये परमपवित्र पदवी
प्राप्त होते म्हणून कधी चुकीने पण कोणाच्या अवगुणाला धारण करू नका.
बोधवाक्य:-
सर्वंश त्यागी
तेच आहेत,जे जुन्या स्वभाव संस्काराच्या वंशाचा पण त्याग करतात.