16-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, पापापासून हल्के होण्या साठी इमानदार,प्रामाणिक बनून, आपली कर्म कहाणी
बाबाला लिहून द्या, तर क्षमा मिळेल.
प्रश्न:-
संगमयुगावर
तुम्ही मुले कोणते बीज पेरू शकत नाही ?
उत्तर:-
देहअभिमानाचे. या बीजा मुळे सर्व विकारांचे झाड निघत आहे. यावेळी साऱ्या दुनिये
मध्ये पाच विकारांचे झाड उगवले आहे. सर्व काम, क्रोधा चे बीज पेरत आहेत, तुम्हाला
बाबाचा आदेश आहे कि, मुलांनो योगबळाने पावन बना. हे बीज पेरणे बंद करा.
गीत:-
तुम्हे पा के
हमने जहा पा लिया . . . . .
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलानी, गीत ऐकले, आता तर थोडे आहेत, अनेक मुले होतील. यावेळी थोडेच
प्रत्यक्षात बनले आहेत, तरीपण या प्रजापिता ब्रह्माला सर्व तर जाणत आहेत ना.
प्रजापिता ब्रह्मा नाव आहे. अनेक प्रजा आहे. सर्व धर्मांचे यांना मानतात जरूर.
यांच्या द्वारे मनुष्यमात्राची रचना झाली आहे ना. बाबा ने सांगितले आहे, लौकिक पिता
पण हदचे ब्रह्मा आहेत, कारण त्यांची पण वंशावळ बनत आहे ना. आडनांवा वरून वंशावळ
चालत आहे. ते हदचे आहेत, हे बेहदचे पिता आहेत. यांचे नाव प्रजापिता आहे, ते लौकिक
पिता तर मर्यादित प्रजा रचतात. कोणी तर रचत पण नाहीत. हे तर जरूर रचतात. असे कोणी
म्हणत नाही कि, प्रजापिता ब्रह्माला मुले नाहीत? यांची मुले तर सारी दुनिया आहे.
पहिल्या प्रथम तर प्रजापिता ब्रह्मा आहेत. मुसलमान पण आदम बीबी जे म्हणतात, तर जरुर
कोणाला तरी म्हणत असतील ना. ऍडम,ईव्ह, आदिदेव, आदिदेवी हे प्रजापिता ब्रह्मा साठी
म्हणतात. जे पण धर्म वाले आहेत, सर्व त्यांना मानतात. बरोबर एक आहेत, हदचे पिता,
दुसरे बेहदचे पिता आहेत. हे बेहदचे पिता सुख देणारे आहेत, तुम्हीं पुरुषार्थ पण करत
आहात,बेहदच्या स्वर्गातील सुखासाठी. इथे बेहदच्या पित्याकडून सुखाचा वारसा प्राप्त
करण्यासाठी आले आहात. स्वर्गा मध्ये बेहदचे सुख आहे, नरका मध्ये बेहदचे दू:ख पण
म्हटले जाते. दु:ख पण फार येणार आहेत. हाय हाय करत राहतील. बाबाने तुम्हाला साऱ्या
विश्वाच्या आदि, मध्य, अंताचे रहस्य समजावले आहे. तुम्ही मुले समोर बसले आहात, आणि
पुरुषार्थ पण करत आहात. हे तर माता पिता दोघे आहेत ना. एवढी अनेक मुले आहेत.
बेहदच्या मात पिता बरोबर कधी कोणी शत्रुत्व ठेवणार नाहीत. माता पित्या कडून किती
सुख मिळत आहे. गातात पण तुम्हीं माता पिता. हे तर मुले समजत आहेत. दुसऱ्या धर्माचे
पण त्या पित्यालाच बोलावत आहेत. माता-पिता म्हणत नाही. फक्त इथेच गायले जाते, तुम्हीं
माता पिता. तुम्ही मुले जाणत आहात, आम्ही शिकून मनुष्या पासून देवता, काट्या पासून
फूल बनत आहोत. बाबां नावाडी पण आहेत, बागवान पण आहेत. बाकी तुम्ही ब्राह्मण सर्व
अनेक प्रकारचे माळी आहात. मुगल गार्डन चा पण माळी आहे ना. त्याचा पगार पण चांगला
असेल. माळी पण क्रमवार आहेत ना. कांही माळी तर चांगले फुल बनवितात. फुलांमध्ये एक
फुलांचा राजा पण असतो. सतयुगा मध्ये फुलांची राणी पण असते. इथे जरी महाराजा महाराणी
आहेत, परंतु फुले नाहीत. पतित बनल्यामुळे काटे बनतात. रस्त्याने चालता चालता काटा
मारून पळून जातात. आजामिल पण त्यांनाच म्हटले जाते. सर्वात जास्त भक्ती पण तुम्ही
करत आहात. वाममार्ग मध्ये गेल्या नंतरचे चित्र पाहा, कशी, किती खराब बनविले आहेत.
देवतांची चित्रे दाखविली आहेत. आता वाममार्गा तील चित्रे आहेत. तुम्हीं मुलांनी या
गोष्टी जाणल्या आहेत. तुम्हीं आता ब्राह्मण बनले आहात. आम्ही विकारा पासून फार दूर
दूर जात आहोत. ब्राह्मणा मध्ये भाऊ बहीण विकारां मध्ये जाणे हा तर मोठा विकारी
गुन्हा आहे. नावच खराब होऊन जाते. त्यामुळे लहानपणा पासून जे कांही खराब कामे केली
आहेत, ती पण बाबाला सांगितले, तर अर्धे माफ होऊन जाते. आठवण तर राहते ना. अमूक वळी
आम्हीं हे खराब काम केले. बाबाला लिहून देत आहेत. जे फार इमानदार, प्रामाणिक असतात,
हे बाबाला लिहितात. बाबा, आम्ही हे खराब काम केले. क्षमा करा. बाबा म्हणतात, क्षमा
तर होत नाही, बाकी खरे सांगितल्या मुळे तर ते हल्के होऊन जाते. असे नाही, विसरून
जाते. विसरूण जात नाही. पुढे चालून असे कोणते काम होऊ नये, त्यासाठी खबरदार करतात.
बाकी मन जरूर खात राहते. म्हणतात, बाबा, आम्ही तर आजामील होतो. या जन्माचीच गोष्ट
आहे. हे पण आता तुम्ही जाणत आहात. कधी पासून वाम मार्गामध्ये येऊन, पाप आत्मा बनले
आहात? आता बाबा परत आम्हाला पुण्यात्मा बनवित आहेत. पुण्य आत्म्यांची दुनियाच वेगळी
आहे. जरी दुनिया एकच आहे, परंतु समजता कि, दोन भागांमध्ये आहे.एक आहे, पुण्य
आत्म्यांची दुनिया, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. दुसरी पाप आत्म्यांची दुनिया आहे,
ज्याला नरक दु:खधाम म्हटले जाते. सुखाची दुनिया आणि दुःखाची दुनिया आहे. दुःखाच्या
दुनिये मध्ये सर्व ओरडत आहेत कि, आम्हाला मुक्त करा, आपल्या घरी घेऊन जावा. हे पण
मुले समजत आहेत कि, घरांमध्ये जाऊन बसायचे नाही, मग अभिनय करण्यासाठी यायचे आहे.
यावेळी सारी दुनिया पतित आहे. आता बाबाद्वारे, तुम्ही पावन बनत आहात. मुख्य लक्ष्य
समोर उभे आहे. आणखीन कोणी पण हे मुख्य लक्ष्य दाखवत नाहीत कि, आम्ही हे बनत आहोत.
बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही असे होता, आता नाहीत. पुज्य होता आता पुजारी बनले
आहात. परत पुज्य बनण्यासाठी पुरषार्थ केला पाहिजे. बाबा किती चांगला पुरुषार्थ
करवीत आहेत. हे बाबा समजवतात कि, मी राजकुमार बनेल. नंबरवन मध्ये हेच आहेत, तरीपण
प्रत्येक क्षणी, आठवण राहत नाही. विसरून जातो. किती पण कोणी मेहनत केली, परंतु आता
ती अवस्था होत नाही. कर्मातीत अवस्था तेंव्हाच होईल, जेंव्हा युद्धाची वेळ असेल.
पुरषार्थ तर सर्वांना करायचा आहे ना.यांना पण करायचा आहे. तुम्हीं समजावत पण आहात
कि, चित्रा मध्ये पाहा, बाबाचे चित्र कोठे आहे? एकदम झाडाच्या शेवटी उभे आहेत, पतीत
दुनिये मध्ये, आणि खाली तपस्या करत आहेत. किती सोपे समजावले जात आहे. या सर्व गोष्टी
बाबाने सांगितल्या आहेत. हे पण जाणत नव्हते. बाबा ज्ञानसंपन्न आहेत, त्यांची सर्व
आठवण करत आहेत, हे परमपिता परमात्मा येऊन आमचे दुःख दूर करा. ब्रह्मा, विष्णू, शंकर
तर देवता आहेत. मूलवतन मध्ये राहणाऱ्या आत्म्याला, देवता थोडेच म्हटले जाते. ब्रह्मा,
विष्णू, शंकर चे पण रहस्य बाबांनी सांगितले आहे. ब्रह्मा, लक्ष्मी नारायण हे तर
इथेच आहेत ना.सुक्ष्मवतन चा फक्त तुम्हा मुलांनाच आता साक्षात्कार होत आहे. हे बाबा
पण फरिश्ता बनत आहेत. हे तर मुले जाणतात कि, शिडीच्या वर उभे आहेत, तेच मग खाली
तपश्चर्या करत आहेत. चित्रां मध्ये फार स्पष्ट दाखविले आहे. ते स्वतःला भगवान कुठे
म्हणत आहेत. ते तर म्हणतात कि, मी कवडीतुल्य होतो, तसेच तुम्हीपण होते. आता
हिरेतुल्य बनत आहे, तसेच तुम्ही. किती सहज समजण्याच्या गोष्टी आहेत. कधी कोणी बोलले,
तर सांगा, हे तर कलियुगाच्या अंता मध्ये उभे आहेत ना. बाबा म्हणतात कि,जेंव्हा
जीर्ण, वानप्रस्थ अवस्था होते, ते़व्हा मी यांच्या मध्ये प्रवेश करतो. आता राजयोगाची
तपस्या करत आहात. तपस्या करणाऱ्यांना देवता कसे म्हणायचे? राजयोग शिकून असे बनाल.
तुम्हां मुलांना पण असे ताजवाले बनवत आहे. हे तर देवता बनत आहेत. तसे तर 10-20
मुलांचे चित्र पण ठेवू शकता. दाखवण्यासाठी कि, हे बनवत आहेत. पूर्वी सर्वांचे असे
फोटो काढले होते. ही समजण्याची गोष्ट आहे. एकीकडे साधारण, दुसरीकडे डबल ताजधारी.
तुम्ही समजता कि, आम्ही असे बनत आहोत. बनतील तेच, ज्यांची बुद्धी रुपी लाईन स्पष्ट
असेल, आणि फार गोड पण बनवायचे आहे. यावेळी मनुष्या मध्ये काम, क्रोध इत्यादीचे बीज
किती झालेले आहे. सर्वां मध्ये पाच विकार रूपी झाड उत्पन्न होत आहेत. आता बाबा
म्हणतात कि, असे बीज पेरू नका. संगमयुगावर तुम्हाला देहअभिमानाचे बी पेरायचे नाही.
काम विकाराचे बी पेरायचे नाही. परत अर्ध्या कल्पासाठी रावण राहणारच नाही. प्रत्येक
गोष्ट, बाबा मुलांना समजावत आहेत. मुख्य तर एकच गोष्ट आहे, मनमनाभव. बाबा म्हणतात,
माझी आठवण करा. सर्वांच्या शेवटी हे आहेत, मग सर्वांच्या प्रथम पण हेच आहेत.
योगबळाने किती पावन बनायचे आहे. सुरुवातीला मुलांना तर फार साक्षात्कार झाले होते.
भक्ती मार्गामध्ये जेव्हा नौधा भक्ती करतात, तेंव्हा साक्षात्कार होतो. इथे तर
बसल्या बसल्या ध्याना मध्ये जात होते, याला जादू समजत होते. ही तर फर्स्टक्लास जादू
आहे. मीराने पण फार तपश्चर्या केली, साधु संत इत्यादींचा संग केला. इथे साधू इत्यादी
कुठे आहेत. ते तर बाबा आहेत, सर्वांचे पिता शिवबाबा आहेत. म्हणतात गुरुजींना भेटू.
येथे तर गुरु नाहीत. शिवबाबा निराकार आहेत. मग कोणाला भेटू इच्छित आहेत. त्या गुरु
जवळ जाऊन तर भेट वस्तू देतात. इथे तर बाबा बेहदचे मालक आहेत. येथे भेट वस्तू
देण्याची तर गोष्टच नाही. हे पैशाचे काय करतील? हे ब्रह्मा पण समजत आहेत कि, आम्ही
विश्वाचे मालक बनत आहोत. मुले जे कांही पैसे इत्यादी देत आहेत, तर त्यांच्या साठीच
मकान इत्यादी बनवितात. पैसे तर ना शिवबाबा च्या कामाचे आहेत,नि ब्रह्माबाबा च्या
कामाचे. हे मकान इत्यादी बनविली आहेत, मुलांसाठी. मुलेच येऊन राहतात. कोणी गरीब
आहेत, कोणी सावकार आहेत, कोणी तर 2 रुपये पण पाठवतात, बाबा आमची एक ईट लावा. कोणी
1000 पण पाठवतात. भावना तर दोघांची एकच आहे ना. तर दोघांचे समान होऊन जाते. मग मुले
येतात, जिथे पाहिजे तेथे राहोत. ज्यांनी मकान बनविले आहे, ते जर आले तर त्यांना
जरूर सुखांमध्ये ठेवतील. कोणी मग म्हणतात कि, बाबा जवळ पण दुजाभाव आहे. अरे खातरी
तर जरूर करावी लागेल ना. कोणी कसे आहेत, कोणी तर कुठे पण बसतात. कोणी फार नाजूक
असतात. विलायत मध्ये राहणारे, मोठमोठ्या घरांमध्ये राहणारे आहेत, प्रत्येक
राष्ट्रांमधून मोठे सावकार निघत आहेत. तर घरे पण तशी बनविली जातात. इथे तर पाहा,
अनेक मुले येत आहेत. आणखीन कोणत्या पित्याला, असे विचार थोडेच येतील. जरी 10-12 नातू,
नाती असतील, बरें, कोणाला 200- 500 पण असतील, यापेक्षा जास्त तर असणार नाहीत. या
बाबाचे कुटुंब किती मोठे आहे, आणखीन वृध्दी होत राहील. इथे तर राजधानी स्थापन होत
आहे. बाबाचे कुटुंब किती बनेल. मग प्रजापिता ब्रह्मा चे कुटुंब केवढे होऊन जाईल.
कल्प कल्प जेंव्हा येतात, तेंव्हाच आश्चर्यकारक गोष्टी, तुमच्या कानावर पडत आहेत.
बाबासाठी म्हणतात कि, हे प्रभू, तुमची गत मत सर्वा पासून वेगळी आहे. भक्त आणि ज्ञाना
मध्ये फरक पाहा किती आहे.
बाबा तुम्हाला समजावत आहेत, स्वर्गा मध्ये जायचे असेल तर दैवी गुण पण धारण केले
पाहिजेत. आता तर काटे आहेत ना. गातात पण मी निर्गुण, माझ्या मध्ये कोणता गुण नाही.
बाकी पाच विकारांचे अवगुण आहेत. रावण राज्य आहे. आता तुम्हाला किती चांगले ज्ञान
मिळत आहे. ते ज्ञान एवढी खुशी देत नाही, जेवढी यात आहे. तुम्हीं जाणता कि, आम्ही
आत्मे वर मूलवतन मध्ये राहणारे आहोत. सूक्ष्मवतन मध्ये ब्रह्मा, विष्णू, शंकर, तो
पण फक्त साक्षात्कार होतो. ब्रह्मा पण इथेच, लक्ष्मी नारायण पण इथेच आहेत, तो फक्त
साक्षात्कार होतो. व्यक्त ब्रह्माच मग सूक्ष्मवतनवासी ब्रह्मा, फरिश्ता कसे बनत
आहेत, ही निशाणी आहे. बाकी कांही नाही. आता तुम्ही मुले सर्व गोष्टी समजत आहात,
धारणा करत आहात. नवीन गोष्ट नाही. तुम्ही अनेक वेळा देवता बनले आहात. दैवी राज्य
होते ना. हे चक्र फिरत आहे. ते विनाशी नाटक आहे. हे अनादी अविनाशी नाटक आहे. हे
तुमच्या शिवाय कोणाच्या बुद्धी मध्ये येत नाही. हे सर्व बाबा समजावत आहेत. असे नाही
कि, परंपरे पासून चालत आले आहे. बाबा म्हणतात, हे ज्ञान आता तुम्हाला सांगत आहे. मग
हे प्राय:लोप होऊन जाईल. तुम्ही राजपद प्राप्त करत आहात, मग सतयुगा मध्ये हे ज्ञान
राहणार नाही. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) नेहमी
स्मृतीमध्ये ठेवा कि, आता आम्ही ब्राह्मण आहोत, त्यामुळे विकारा पासून फार दूर
राहायचे आहे. कधी पण विकारी गुन्हा होवू नये. बाबा बरोबर फार प्रामाणिक, इमानदार
राहायचे आहे.
(२) दुहेरी मुकुटधारी देवता बनण्यासाठी, फार गोड बनायचे आहे. बुद्धीची लाईन स्पष्ट
ठेवायची आहे. राजयोगाची तपस्या करायची आहे.
वरदान:-
ईश्वरीय नशे
द्वारे, जुन्या दुनियेला विसरणारे, सर्व प्राप्ती संपन्न भव
जसा तो नशा सर्व कांही
विसरून टाकतो, तसे हा ईश्वरीय नशा दुःखाच्या दुनियेला सहजच विसरून टाकतो. त्या
नशेमध्ये तर फार नुकसान होते, अधिक पिल्याने तर नाहीसे होतात, परंतु हा नशा तर
अविनाशी बनवीत आहे. जे नेहमी ईश्वरीय नशेमध्ये मस्त राहतात, ते सर्व प्राप्ती
संपन्न बनतात. एक बाबा दुसरे कोणी नाही, ही स्मृती नशा चढवत आहे, या स्मृतीने समर्थी
येत आहे.
बोधवाक्य:-
एक दोघांचे
अनुकरण करण्या पेक्षा बाबाचे अनुकरण करा.