07-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही बऱ्याच वर्षानंतर,परत बाबांना भेटले आहात,म्हणून खूप प्रिय आहात"
प्रश्न:-
आपल्या
स्थितीला एक रस बनवण्याचे साधन कोणते आहे?
उत्तर:-
नेहमी आठवणीत ठेवा की जो सेकंद पास झाला,ते पूर्वनियोजित नाटकांमध्ये नोंद होते.
कल्पा पूर्वी पण असेच झाले होते, आता तर निंदा स्तुती मान आपमान सर्व समोर येणार आहे,
म्हणून आपल्या स्थितीला एक रस बनवण्यासाठी, भूतकाळातील झालेल्या गोष्टीचे चिंतन करू
नका.
ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहेत.आत्मिक पित्याचे नाव काय आहे? शिवबाबा. ते
सर्व आत्म्याचे पिता आहेत.सर्व आत्मिक मुलांचे नाव काय आहे? आत्मा.जीवाचे(शरीराचे)
नाव पडते, आत्म्याचे नाव तेच राहते.मुलं जाणतात सत्संग तर अनेक आहेत.हा खरोखर
सत्याचा संग आहे, जो सत्य बाबा राजयोग शिकवून आम्हाला सतयुगा मध्ये घेऊन जातात.असा
कोणताही सत्संग किंवा पाठशाळा होऊ शकत नाही. हे पण तुम्ही मुलं जाणतात. संपूर्ण
सृष्टी चक्राचे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही मूलंच स्वदर्शन चक्रधारी
आहात.बाबा सन्मुख समजवतात, हे सृष्टीचं चक्र कसे फिरते? कोणाला पण समजून सांगा तर
चक्राच्या समोर उभे करा, आता तुम्ही या बाजूला जात आहात.बाबा जीव आत्म्याला म्हणतात
की,स्वतःला आत्म समजा. ही नवीन गोष्ट नाही ना, तुम्ही जाणतात कल्प-कल्प ऐकत आलो
आहोत,आता परत ऐकत आहोत.तुमच्या बुद्धीमध्ये कोणतेही देहधारी, पिता,शिक्षक गुरु
नाहीत.
तुम्ही जाणतात,विदेही शिवबाबा आमचे शिक्षक गुरु आहेत.दुसऱ्या कोणत्याही सत्संग
इत्यादी मध्ये अशा गोष्टी करत नाहीत.मधुबन तर हे एकच आहे.ते परत एक मधुबन वृंदावन
मध्ये दाखवतात.ते भक्ती मार्गामध्ये मनुष्याने बनवले आहे. प्रत्यक्षात मधुबन तर हे
आहे. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही सतयुग त्रेता पासून पुनर्जन्म घेत,आत्ता
संगमयुगा मध्ये, पुरुषोत्तम बनण्यासाठी उभे आहोत.बाबांनी येऊन स्मृती दिली आहे. ८४
जन्म कोण आणि कसे घेतात,ते पण तुम्ही जाणतात. मनुष्य तर फक्त म्हणतात,अर्थ काहीच
समजत नाहीत.बाबा चांगल्या रीतीने समजवतात. सतयुगा मध्ये सतोप्रधान आत्मे होते,शरीर
पण सतो प्रधान होते. यावेळेत सतयुग नाही, हे कलियुग आहे.स्वर्ण युगामध्ये आम्ही होतो,
परत चक्र लावून पुनर्जनम घेत घेत आम्ही लोहयुगा मध्ये आलो, परत चक्र जरुर लावायचे
आहे.आता आपल्या घरी जायचे आहे.तुम्ही फार वर्षांनंतर भेटलेली,गोड गोड मुलं(सिकीलधे)
आहात ना.सिकीलधे त्यांनाच म्हटले जाते, जे गायब होतात, परत बऱ्याच वर्षानंतर येऊन
भेटतात. तुम्ही पाच हजार वर्षानंतर येवून भेटले आहात. तुम्ही मुलं जाणतात हे तेच
बाबा आहेत, ज्यांनी पाच हजार वर्षांपूर्वी, या सृष्टी चक्राचे आम्हाला ज्ञान दिले
होते.स्वदर्शन चक्रधारी बनवले होते, आता परत बाबा येऊन, जन्मसिद्ध अधिकार देण्यासाठी
भेटले आहात.येथे बाबा अनुभव करवतात,यामध्ये आत्म्याच्या ८४ जन्माची अनुभूती येते.हे
सर्व बाबा सन्मुख समजवतात.जसे पाच हजार वर्षांपूर्वी, मनुष्यांना देवता किंवा कंगाल
पासून मुकुटधारी बनवण्यासाठी समजवले होते. तुम्ही समजता आम्ही ८४ पुनर्जन्म घेतले
आहेत.ज्यांनी घेतले नाहीत, ते येथे शिकण्यासाठी पण येणार नाहीत.कोणी थोडे समजतील,
क्रमानुसार तर असतात ना.
आपआपल्या घर ग्रहस्था मध्येच राहायचे आहे.सर्व तर येथे येऊन बसणार नाहीत.ज्ञाना
मध्ये ताजेतवाने होण्यासाठी,तेच येतील, ज्यांना खूप चांगले पद मिळवायचे असेल.कमी पद
मिळवणारे जास्त पुरुषार्थ करणार नाहीत.हे ज्ञान असे आहे,जे थोडा पण पुरुषार्थ केला,
तरी ते व्यर्थ जाणार नाही.सजा खाऊन येतील. पुरुषार्थ चांगला करतील तर, सजा पण कमी
होईल. आठवणीच्या यात्रे शिवाय विकर्म विनाश होणार नाहीत.याची तर सारखी सारखी आठवण
करायची आहे.कोणताही मनुष्य भेटला तर त्यांना समजून सांगा,स्वतःला आत्मा समजा. हे
नाव तर नंतर शरीरावरती पडले आहे,कोणाला बोलवायचे असेल तर, शरीराचेच नाव घेतील ना.या
संगम युगामध्येच बेहद्दचे पिता आत्मिक मुलांना बोलवतात. तुम्ही म्हणाल आत्मिक पिता
आले आहेत.बाबा म्हणतात हे आत्मिक मुलांनो,प्रथम आत्मा परत मुलांचे नाव घेतील.आत्मिक
मुलांनो,तुम्ही समजता आत्मिक पिता, काय समजावत आहेत. तुमची बुद्धी जाणते, शिवबाबा
या भागीरथा वरती विराजमान आहेत, आम्हाला तेच सहज राजयोग शिकवत आहेत.दुसरे कोणतेही
मनुष्यमात्र नाहीत,ज्यामध्ये बाबा येऊन राजयोग शिकवतील.तेच बाबा पुरुषोत्तम संगमयुगा
मध्ये येतात,दुसरे कोणते मनुष्य कधी असे म्हणू शकणार नाहीत किंवा समजावू शकणार
नाहीत. हे पण तुम्ही जाणतात,हे ज्ञान काही ब्रह्मा पित्याचे नाही.यांना तर हे माहीत
नाही की,कलयुग जाऊन सदैव सतयुग यायचे आहे.यांचे आता कोणी देहधारी गुरु नाहीत,बाकी
तर सर्व मनुष्यमात्र म्हणतील,आमचे आमके गुरु आहेत.आमका ज्योती ज्योत मध्ये
सामावला.सर्वांचे देहधारी गुरु आहेत.धर्मसंस्थापक पण देहधारी आहेत. हा धर्म कोणी
स्थापन केला? परमपिता परमात्मा त्रिमूर्ती शिव बाबांनी,ब्रह्मा द्वारा स्थापन केला
आहे. त्यांच्या शरीराचे नाव ब्रह्मा आहे.ख्रिश्चन लोक म्हणतील ख्रिस्ताने हा धर्म
स्थापन केला.ते तर देहधारी आहेत,चित्र पण आहे.या धर्मस्थापकाचे काय चित्र
दाखवणार?शिवाचे च दाखवतील. शिवाचे चित्र पण कोणी मोठे, कोणी लहान बनवतात.ते तर
बिंदूच आहेत.नाव रूप पण आहे परंतु अव्यक्त आहेत. या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत.शिव
बाबा तुम्हा मुलांना राज्य भाग्य देऊन गेले आहेत, तेव्हा तर त्यांची आठवण करतात ना.
बाबा म्हणतात मनमनाभव.मज एका पित्याचीच आठवण करा. कोणाची स्थुती करायची
नाही.आत्म्याच्या बुद्धीमध्ये कोणत्या देहधारीची आठवण यायला नको, हे चांगल्या
प्रकारे समजण्याची गोष्ट आहे. आम्हाला शिवबाबा शिकवतात,सर्व दिवस याची पुनरावृत्ती
करत रहा. भगवानुवाच प्रथम तर आत्म्याला समजायचे आहे,हा पक्का निश्चय केला नाहीत आणि
दुसरे काही सांगितले तर काहीच बुद्धीमध्ये बसणार नाही.काहीजण तर म्हणतात या गोष्टी
तर बरोबर आहेत.कोणी म्हणतात हे समजण्या मध्ये वेळ पाहिजे,कोणी म्हणतात विचार करू.
अनेक प्रकारचे येत राहतात.ही नवीन गोष्ट आहे ना. परमपिता परमात्मा शिव आत्म्यांनाच
सन्मुख शिकवत आहेत.विचार चालतो काय करावे, ज्यामुळे मनुष्यांना हे ज्ञान समजेल.
शिवबाबा च ज्ञानाचे सागर आहेत. आत्म्याला ज्ञानाचे सागर कसे म्हणता येईल,ज्याला
शरीरच नाही. ज्ञानाचे सागर आहेत,तर जरूर कधी ज्ञान ऐकवले असेल, तेव्हा तर त्यांना
ज्ञानाचे सागर म्हणतात, तसेच का म्हणतील.कोणी खूप शिक्षण घेतात तर, त्यांना म्हटले
जाते,हे तर वेद ग्रंथ इत्यादी शिकले आहेत,म्हणून शास्त्री किंवा विद्वान म्हटले
जाते.बाबांना ज्ञानाचे सागर, अधिकारी म्हटले जाते.जरुर होऊन गेले आहेत.प्रथम तर
विचारायला पाहिजे, आता कलियुग आहे की सतयुग आहे.नवीन दूनिया आहे की जुनी दुनिया आहे.
मुख्य लक्ष तर तुमच्या समोर आहे.हे लक्ष्मीनारायण जर असतील तर त्यांचे राज्य पण
असेल ना.ही जुनी दुनिया,गरीबी नसते ना.आता तर फक्त यांचे चित्र आहेत.मंदिरामध्ये पण
मॉडेल्स दाखवतात,नाहीतर त्यांचे राजवाडे,बाग इत्यादी खूप मोठ-मोठे असतील, फक्त
मंदिरांमध्ये थोडीच राहत असतील. राष्ट्रपतींचे निवासस्थान खूप मोठे असते. देवी-देवता
तर मोठ्या राजवाड्या मध्ये राहतात, खूप जागा पण असते.तेथे घाबरण्याची गोष्ट पण
नसते.नेहमी फुले उमललेली असतात.तेथे काट्याचे जंगल नसते. ती तर फुलांची बाग आहे.तेथे
लाकडे इत्यादी जाळत नसतील, लाकडा मुळे धुर होतो, तर दुःख वाटते.तेथे आम्ही खूप
थोड्या जागे मध्ये राहतो, नंतर वृद्धी होत जाते. खूप छान बाग असेल,त्याचा सुगंध येत
राहतो.जंगल तर नसेल. आता जाणीव होते,पाहू तर शकत नाहीत. तुम्ही साक्षात्कार मध्ये
मोठ-मोठे राजवाडे इत्यादी पाहुन येतात,तसे तर तेथे बनवू शकत नाहीत. साक्षात्कार झाला
परत गायब होतात.साक्षात्कार तर झाले आहेत ना.राजे,राजकुमार-राजकुमारी असतील.खूप छान
स्वर्ग असेल. जसे येथे मैसूर इत्यादी खूप छान आहे,तसेच तेथे चांगली हवा इत्यादी
असते.पाण्याचे झरे वाहत राहतात.आत्मा समजते आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी बनवू.
आत्म्याला स्वर्गाची आठवण येत राहते ना.
तुम्हा मुलांना जाणीव होते, काय काय असेल? कोठे आम्ही राहत आसू. यावेळी ती स्मृती
राहते. चित्रांना पहा,तुम्ही खूप खुशनसीब आहात.तेथे दुःखाची कोणती गोष्ट नसते.आम्ही
तर स्वर्गामध्ये होतो, परत खाली उतरलो,आता परत स्वर्गामध्ये जायचे आहे. कसे जाऊ?
दोरीला लटकून जाऊ काय?आम्ही आत्मे तर शांतीधामचे राहणारे आहोत.बाबांनी स्मृती दिले
आहे की,आता तुम्हाला परत देवता बनायचे आहे आणि दुसर्यांना पण बनवायचे आहे.अनेकांना
घर बसल्या साक्षात्कार होतो.बंधनयुक्त मातांनी पण कधी पाहिले नाही,तरी खूप उत्साहा
मध्ये राहतात.आपले घर जवळ आल्यानंतर आत्म्याला खुशी होते ना.असे समजतात, बाबा
आम्हाला ज्ञान देऊन शृंगार करण्यासाठी आले आहेत.शेवटी एक दिवस वर्तमान पत्रामध्ये
पण येईल.आत्ता तर स्तुती-निंदा, मानापमान सर्व समोर येते.तुम्ही जाणतात कल्पापूर्वी
पण असेच झाले होते.जो सेकंड झाला,त्याचे चिंतन करायचे नाही. वर्तमान पत्रा मध्ये पण
येते कल्पा पूर्वी पण असेच आले होते.परत पुरुषार्थ केला जातो.हंगामा जो झाला होता,तो
झाला. नाव तर प्रसिद्ध झाले ना, परत तुम्ही त्याचा प्रतिसाद देतात.कोणी शिकतात,कोणी
शिकत नाहीत. काहींना वेळ मिळत नाही,दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त राहतात. आता तुमच्या
बुद्धीमध्ये हे बेहद्द चे मोठे वैश्विक नाटक आहे. टिकटिक चालूच राहते,चक्र फिरत
राहते.एका सेकंदामध्ये जे पास झाले,परत पाच हजार वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती
होते.जे झाले त्याबाबत सेकंदा नंतर विचार येतो,ही चूक झाली,वैश्विक नाटकामध्ये
नोंदले गेले. कल्पा पूर्वी पण अशी चूक झाली होती,परत भविष्यामध्ये करणार
नाही.पुरुषार्थ करत राहतात.तुम्हाला समजवले जाते,सारख्या सारख्या चुका करणे चांगले
नाही.हे कर्म चांगले नाही, मन खात राहते.आमच्या द्वारे हे खराब काम झाले.बाबा
समजावून सांगत राहतात, असे करू नका, ज्यामुळे कोणाला दुःख होईल. मनाई केली जाते.बाबा
सांगतात, हे काम करायचे नाही.कोणतीही गोष्ट न विचारता घ्यायची नाही,त्याला चोरी
म्हटले जाते.असे काम करू नका, कडवे बोल बोलू नका. आज-काल दुनिया तर पहा कशी आहे,कोणी
नौकरा वरती रागवतात तर ते दुश्मनी करतात.स्वर्गामध्ये तर सिंह आणि शेळी आपसमध्ये
खिरखंड होऊन राहतात.खार्या पाण्यासारखे आणी खिरखंड.काम विकार महाशत्रू आहे ना.काम
कटारी चालवून एक दोघांना दुःख देत राहतात. ही सारी दुनिया खाऱ्या पाण्यासारखी
आहे.सतयुगा मध्ये तर सर्व मनुष्य आपसमध्ये गोडी-गुलाबीने राहतात आणि या गोष्टींना
दुनिया जाणत नाही. मनुष्य तर स्वर्गाला लाखो वर्ष म्हणतात. तर कोणती गोष्ट
बुद्धीमध्ये येऊ शकत नाही.जे देवता होते त्यांनाच स्मृतीमध्ये येते.तुम्ही जाणतात
हे देवी-देवता सतयुगा मध्ये होते. ज्यांनी ८४ जन्म घेतले आहेत,ते परत येऊन शिकतात
आणि काट्या पासून फुलासारखे बनतात.ही शिव पित्याचे एकच विद्यापीठ आहे, त्यांच्या
शाखा निघत राहतात.ईश्वर जेव्हा येतील, तेव्हा तर त्यांचे मदतगार बनतील,
ज्यांचेद्वारे ईश्वर स्वत: राजाई स्थापन करतील.तुम्ही समजता आम्ही ईश्वराचे मतदार
आहोत.ते शारीरिक सेवा करतात,ही आत्मिक सेवा आहे.बाबा आम्हा आत्म्यांना आत्मिक सेवा
शिकवत आहेत,कारण आत्माच तमोप्रधान बनली आहे.परत बाबा सतोप्रधान बनवत आहेत.बाबा
म्हणतात माझीच आठवण करा,तर विकर्म विनाश होतील.ही योग अग्नी आहे. भारताच्या प्राचीन
योगाचे गायन आहे ना.कृत्रिम योग तर खूप आहेत म्हणून बाबा म्हणतात आठवणी ची यात्रा
म्हणणे बरोबर आहे.बाबांची आठवण करत करत तुम्ही शिवपुरी मध्ये चालले जाल.ती शिवपुरी
आहे.ती विष्णुपुरी आहे आणि ही रावण पुरी आहे.विष्णुपुरीच्या नंतर रामपुरी. सूर्यवंशी
च्या नंतर चंद्रवंशी येतात. ही तर साधारण गोष्ट आहे. आता तुम्ही संगमयुगा मध्ये
आहात. हे फक्त तुम्हीच जाणतात.चांगल्या रीतीने आचरण करतात,ते दुसऱ्यांना पण समजून
सांगतात. आम्ही पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहोत, हे कोणाच्या बुद्धीमध्ये
राहिले,तरीही सर्व वैश्विक नाटक बुद्धीमध्ये येईल परंतु कलयुगी देहाचे संबंधी
इत्यादी आठवणीत राहतात.बाबा म्हणतात तुम्हाला एका शिवपित्याची आठवण करायची
आहे.सर्वांचे सद्गती करणारे एकच आहेत,म्हणून बाबांनी समजले आहे शिव बाबाची जयंती
आहे,जी साऱ्या दुनियेला परिवर्तन करते.तुम्ही ब्राह्मण जाणतात, आता आम्ही
पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहोत.जे ब्राह्मण आहेत,त्यांनाच रचनाकार आणि रचनेचे
ज्ञान बुद्धी मध्ये आहे,अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) कोणतेही
असे कर्म करायचे नाही ज्याद्वारे कोणाला दुःख होईल. कडवे बोल बोलायचे नाहीत,खूप खूप
खिरखंड म्हणजे गोड बनून राहायचे आहे.
(२) कोणत्याही देहधारीची स्तुती करायची नाही. बुद्धीमध्ये रहावे की आम्हाला शिवबाबा
शिकवत आहेत.त्याचींच महिमा करायची आहे.आत्मिक ईश्वरीय सेवाधारी बनायचे आहे.
वरदान:-
सर्वांचे गुण पहात स्वतःमध्ये बाबांच्या गुणांना धारण करणारे गुणमूर्त भव.
संगम युगामध्ये,जे
मुलं गुणांची धारण करतात, तेच विजयी माळेमध्ये येतात म्हणून पवित्र बणून सर्वांच्या
गुणाला पहा आणि एका बाबांच्या गुणाला स्वतःमध्ये धारण करा.ही गुण माळच सर्वांच्या
गळ्यामध्ये असायला हवी.जे जितके बाबांचे गुण स्वतःमध्ये धारण करतील,त्यांच्या
गळ्यामध्ये तेवढीच मोठी माळ तयार होईल. गुण माळेचे स्मरण केल्यामुळे स्वतः पण
गुणमूर्त बनतात,याची आठवण म्हणून देवता आणि शक्तींच्या गळ्यामध्ये माळ दाखवतात.
बोधवाक्य:-
त्रयस्थ पणाची
किंवा साक्षीपणाची स्थितीच अर्थसहित निर्णयाचे आसन आहे.