19-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो, तुमचा वायदा आहे कि, जेंव्हा तुम्ही याल, तेंव्हा आम्ही तुमचे बनू, आता बाबा आले आहेत, तुम्ही केलेला वायदा आठवण करून देण्यासाठी.

प्रश्न:-
कोणत्या मुख्य विशेषते मुळे पुज्य फक्त देवतानाच म्हटले जाते!

उत्तर:-
देवतांची विशेषता आहे, ते कधी कोणाची आठवण करत नाहीत. ना बाबाची आठवण करतात ना कोणाच्या चित्राची आठवण करतात, त्यामुळे त्यांना पूज्य म्हणतात, तिथे सुखच सुख आहे, त्यामुळे कोणाची आठवण करण्याची गरजच नाही. आता तुम्ही एका बाबांची आठवण करून असे पूज्य, पावन बनता, त्यामुळे कोणाची आठवण करण्याची गरज नाही.

ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनो,आता आत्मिक आत्मा तर म्हणत नाहीत, रुह म्हणजे आत्मा, एकच गोष्ट आहे. आत्मिक मुलांना बाबा समजावत आहेत. पूर्वी कधी पण आत्म्यांना परमपिता परमात्म्यांने ज्ञान दिले नाही. बाबा स्वतः म्हणतात कि, मी एकाच वेळी, कल्पाच्या पुरुषोत्तम संगमयुगावर येतो. असे आणखीन कोणी म्हणत नाही. साऱ्या कल्पा मध्ये शिवाय संगमयुगाच्या, बाबा स्वतः कधी येत नाहीत. बाबा संगमयुगावरच येतात, जेंव्हा भक्ती पूर्ण होते, आणि बाबा मग मुलांना ज्ञान देतात. स्वतःला आत्मा समजून, बाबाची आठवण करा. हे कांही मुलांना फारच अवघड वाटते. तसे फार सोपे आहे. परंतु बुद्धी मध्ये चांगल्या रीतीने बसत नाही. त्यामुळे वारंवार समजून सांगावे लागते. समजून सांगितले तरी पण समजत नाहीत. शाळे मध्ये शिक्षक बारा महिने शिकवितात, तरीपण काही नापास होतात. हे बेहदचे बाबा तर रोज मुलांना शिकवित आहेत, तरी पण कोणाची धारणा होते, आणि कांही विसरून जातात. मूळ गोष्ट ही समजावून सांगायची आहे कि, स्वतःला आत्मा समजा आणि बाबाची आठवण करा. बाबा सांगतात कि, माझी एकट्याची आठवण करा, आणखीन इतर कोणी मनुष्यमात्र असे म्हणू शकत नाहीत. बाबा म्हणतात मी एकाच वेळी येतो, कल्पा नंतर फक्त संगमयुगावर एकाच वेळी तुम्हा मुलांना समजावून सांगत आहे. तुम्ही हे ज्ञान प्राप्त करत आहात. दुसरे कोणी घेत नाहीत. प्रजापिता ब्रह्माची तुम्ही मुखवंशावली ब्राह्मण हे ज्ञान समजत आहात. तुम्ही जाणता कि, कल्पा पूर्वी पण बाबांनी या संगमयुगा वर हे ज्ञान सांगितले होते. तुम्हां ब्राह्मणांचा अभिनय आहे. या वर्णांमध्ये पण जरूर फिरायचे आहे, इतर धर्मातील या वर्णांमध्ये येतच नाहीत. भारतवासी या वर्णांमध्ये येतात. ब्राह्मणच भारतवासी बनतात, त्यामुळे बाबाला भारतामध्येच यावे लागते. तुम्ही प्रजापिता ब्रह्मा चे मुखवंशावाली ब्राह्मण आहात, ब्राह्मणा नंतर मग देवता आणि क्षत्रिय. क्षत्रिय कोणी बनत नाहीत. तुम्हांला तर ब्राह्मण बनायचे आहे मग तुम्ही देवता बनता. तेथे मग हळूहळू कला कमी होतात, मग त्यांना क्षत्रिय म्हटले जाते. क्षत्रिय आपोआपच बनायचे आहे. बाबा तर येऊन ब्राह्मण बनवतात, मग ब्राह्मणा पासून देवता, मग तेच क्षत्रिय बनतात. तीन धर्म एक बाबाच आता स्थापन करत आहेत. असे नाही कि, सतयुग त्रेता मध्ये परत येतात. मनुष्य न समजल्यामुळे म्हणतात कि, सतयुग त्रेता मध्ये पण येतात. बाबा म्हणतात मी युगे युगे येत नाही, मी येतोच एक वेळा, कल्पाच्या संगमयुगावर. तुम्हाला मीच ब्राह्मण बनवत आहे, प्रजापिता ब्रह्माद्वारे. मी तर परमधाम वरून येतो. बरं, ब्रह्मा कुठून आले? ब्रह्मा तर 84 जन्म घेतात, मी तर घेत नाही. ब्रह्मा-सरस्वती जे विष्णू चे दोन रूप, लक्ष्मी नारायण बनतात. ते 84 जन्म घेऊन, मग त्यांच्या अनेक जन्मातील अंताच्या जन्मामध्ये प्रवेश करून, यांना ब्रह्मा बनवतात, यांचे ब्रह्मा नाव मी ठेवतो. हे काय त्यांचे नांव नाही. मुलांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे नाव ठेवतात. जन्मदिवस साजरा करतात. यांचे जन्मपत्री तील नाव तर लेखराज होते. ते लहानपणीचे होते, आता नांव बदलले आहे, जेंव्हा यांच्या मध्ये बाबानी प्रवेश संगमयुगावर केला आहे. ते पण नाव तेंव्हा बदलतात, जेंव्हा यांची वानप्रस्थ अवस्था असते. ते संन्यासी तर घरदार सोडून निघून जातात, तेव्हा त्यांचे नाव बदलतात. हे तर घरांमध्येच राहतात. यांचे नाव ब्रह्मा ठेवतात, कारण ब्राह्मण पाहिजेत ना. तुम्हाला आपले बनवून पवित्र ब्राह्मण बनवितात. पवित्र बनविले जाते, असे नाही कि, तुम्ही जन्मताच पवित्र आहात. तुम्हाला पवित्र बनण्याचे शिक्षण दिले जाते. कसे पवित्र बनायचे? ही मुख्य गोष्ट आहे.

तुम्ही जाणता कि, भक्ती मार्गामध्ये एक पण पुज्य असत नाही. मनुष्य गुरु इ. समोर डोके टेकवतात, कारण घर-दार सोडून ते पवित्र बनतात, बाकी त्यांना पुज्य म्हणत नाहीत. पुज्य ते आहेत,जे कोणाची आठवण करत नाहीत. संन्यासी लोक ब्रह्मतत्त्वाची आठवण करतात, प्रार्थना करतात. सतयुगा मध्ये कोणाची पण आठवण करत नाहीत. आता बाबा सांगतात, तुम्हाला एकाची आठवण करायची आहे. ती तर भक्ती आहे. तुमची आत्मा पण गुप्त आहे. आत्म्याला खऱ्या रीतीने कोणी ओळखत नाहीत. सतयुग त्रेता मध्ये पण शरीरधारी, स्वतःचे नाव घेऊन अभिनय करतात. नावा शिवाय तर अभिनय करणारे असत नाहीत. कुठे जरी असले तर शरीरावर नाव जरूर असते. नावा शिवाय अभिनय कसे करतील. तर बाबांनी समजावले आहे, भक्ती मार्गांमध्ये महिमा करतात कि, तुम्ही याल, तेंव्हा आम्ही तुम्हाला आमचे बनवू, दुसरे कोणी पण नाही. आम्ही तुमचेच बनू, असे आत्मा म्हणते भक्ती मार्गामध्ये जे पण देहधारी आहेत, त्यांचे नाव ठेवतात. त्यांची आम्ही पूजा करणार नाही, तुम्ही जेंव्हा याल, तेव्हा आम्ही तुमच्यावर समर्पीत होऊ. कधी येणार हे पण ओळखत नाहीत. अनेक देहधारीची, नाव धारण करणाऱ्यांची, पूजा करत राहतात. जेव्हा अर्धा कल्प भक्ती पूर्ण होते, तेंव्हा बाबा येतात. तुम्ही जन्मजन्मांतर म्हणत आले आहात कि, आम्ही तुमच्या शिवाय कोणाची आठवण करणार नाही. स्वतःच्या देहाची पण आठवण करणार नाही. परंतु मला ओळखतच नाहीत, तर आठवण कशी करतील. आता बाबा मुलांना समजावत आहेत कि, गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा आणि बाबाची आठवण करा. बाबाच पतित पावन आहेत, त्यांची आठवण केल्यामुळे, तुम्ही पावन सतोप्रधान बनाल. सतयुग,त्रेता मध्ये भक्ती ह़ोत नाही. तुम्ही कोणाची पण आठवण करत नाही. ना बाबाची, ना चित्रांची. तेथे सुख च सुख असते. बाबानी सांगितले आहे, जेवढे तुम्ही जवळ येत राहाल, तेवढी कर्मातीत अवस्था होत राहील. सतयुगा मध्ये नवीन दुनिया, नवीन घरांमध्ये खुशी पण फार राहते, नंतर 25 % जुने होते, तर मग सर्व विसरून जातात. तर बाबा म्हणतात, तुम्ही गात होता, तुमचे बनू, तुमचे ऐकू. तर जरूर तुम्ही परमात्म्याला म्हणत होता ना. आत्मा परमात्मा पित्याला म्हणते. आत्मा सूक्ष्म बिंदू आहे. त्यांना पाहण्या साठी दिव्य दृष्टी पाहिजे. आत्म्याचे ध्यान करत नाहीत. आम्ही आत्मा एवढी छोटी बिंदू आहे, असे समजून आठवण करणे, मेहनतीचे आहे. आत्म्याच्या साक्षात्काराचा प्रयत्न करत नाहीत, परमात्म्या साठी प्रयत्न करतात, ज्याच्या साठी म्हटले जाते कि, ते हजार सूर्या पेक्षा तेजोमय आहेत. कोणाला साक्षात्कार होतो तर म्हणतात, फार तेजोमय होते, कारण तेच ऐकलेले आहे. ज्यांची नौधा भक्ती करतात, तेच मग पाहतात. नाही तर विश्वासच बसत नाही. बाबा म्हणतात, आत्म्याला पाहू शकत नाहीत, तर परमात्म्याला कसे पहाल. आत्म्याला पाहू कसे शकतील. आणखीन सर्वांचे तर शरीराचे चित्र आहे, नाव आहे, आत्मा तर बिंदू आहे, फार छोटी आहे, त्यांना कसे पहाल. प्रयत्न फार करतात परंतु या डोळ्याने पाहू शकत नाहीत. आत्म्याला ज्ञानाचे अव्यक्त डोळे मिळाले आहेत.

आता तुम्ही जाणता कि,मी आत्मा किती लहान आहे. मज आत्म्यामध्ये 84 जन्माची भूमिका नोंदलेली आहे, जी मला रिपीट करायचे आहे. बाबाची श्रीमत श्रेष्ठ बनण्यासाठी मिळत आहे, तर त्यावर चालले पाहिजे. तुम्हाला दैवीगुण धारण करायचे आहेत. खाणे पिणे पण उत्तम असते पाहिजे. वागणे पण फार चांगले पाहिजे. तुम्ही देवता बनत आहात. देवता स्वतः पुज्य आहेत, ते कधी कोणाची पूजा करत नाहीत. ते तर डबल सिरताज आहेत ना. ते कधी कोणाला पुजत नाहीत, त्यामुळे पुज्य आहेत ना. सतयुगा मध्ये कोणाची पूजा करण्याची आवश्यकता नाही. बाकी होय, एकमेकांचा सन्मान जरूर करतात. असे नमन करतात, याला मान देणे म्हणतात. असे नाही कि, मनातून त्यांची आठवण करतात. मान तर द्यायचा आहे. जसे राष्ट्रपती आहेत, सर्व त्यांचा मान ठेवतात, जाणतात कि, हे मोठे पदवाले आहेत, नमन थोडेच करायचे आहे. तर बाबा सांगतात कि, हा ज्ञान मार्ग बिल्कुल वेगळा आहे, यामध्ये फक्त स्वतःला आत्मा समजायचे आहे, जे तुम्ही विसरून गेले आहात. शरीराच्या नावाची आठवण करतात. काम तर जरूर नावानेच करायचे आहे. बिगर नावा शिवाय कोणाला बोलवणार कसे. जरी तुम्ही शरीरधारी बनून अभिनय करत आहात, परंतु बुद्धी मध्ये शिवबाबाची आठवण करायची आहे. कृष्णाचे भक्त समजतात, आम्हाला कृष्णाची आठवण करायची आहे. जिकडे पाहतो तिकडे कृष्ण च कृष्ण आहे. आम्ही पण कृष्ण तुम्ही पण कृष्ण. अरे तुमचे नाव वेगळे, त्यांचे नाव वेगळे, सर्व कृष्ण च कृष्ण कसे होऊ शकतील. सर्वांचे नाव कृष्ण थोडेच असू शकते, जे येते, ते बोलत राहतात. आता बाबा सांगतात, भक्ती मार्गातील सर्व चित्र इ.ना विसरून, एका बाबाची आठवण करा. चित्रांना तर तुम्ही पतित-पावन म्हणणार नाहीत. हनुमान इ. पतित-पावन थोडेच आहेत. अनेक चित्र आहेत, कोणी पण पतित-पावन नाही. कोणी पण देवी इत्यादी, ज्यांना शरीर आहे, त्यांना पतित-पावन म्हणत नाहीत. 6-8 हातांच्या देवी बनवितात, सर्व आपल्या बुद्धीनुसार. या कोण आहेत, ते पण ओळखत नाहीत. ही पतित पावन बाबाची मुले मदतगार आहेत, हे कोणाला पण माहित नाही. तुमचे हे रूप तर साधारण आहे. हे शरीर तर विनाश होणार आहे. असे नाही कि, तुमचे चित्र इत्यादी राहतील. हे सर्व नाहीसे होणार आहे. खरे तर देवी तुम्हीं आहात. नाव पण ठेवले जाते, सीतादेवी, फलानी देवी, राम देवता म्हणत नाहीत. फलानी देवी किंवा श्रीमती म्हणतात, ते पण चुकीचे आहे. आता पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. तुम्ही म्हणता पण कि, पतीता पासून पावन बनवा. असे म्हणत नाहीत कि, लक्ष्मी नारायण बनवा. पतिता पासून पावन पण बाबाच बनवतात. नरापासून नारायण पण तेच बनवितात. ते लोक पतित-पावन निराकाराला म्हणतात आणि सत्य नारायणाची कथा सांगणारे आणखी इतर दाखवितात. असे तर म्हणत नाहीत कि, बाबा सत्य नारायणाची कथा सांगून अमर बनवा, नरा पासून नारायण बनवा. फक्त म्हणतात कि, येऊन पावन बनवा. बाबाच सत्य नारायणाची कथा सांगून, पावन बनवित आहेत. तुम्ही मग इतरांना सत्य कथा सांगत आहात. आणखीन कोणी जाणत नाहीत. तुम्ही जाणत आहात, जरी तुमच्या घरांमध्ये मित्र, संबंधी, भाऊ इत्यादी आहेत, परंतु ते पण समजत नाहीत. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रति मातपिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) स्वतःला श्रेष्ठ बनविण्यासाठी, बाबाची जी श्रीमत मिळत आहे, त्यावर चालायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. खाणे, पिणे, वागणे सर्व उत्तम ठेवायचे आहे.

(२) एक दोघांची आठवण करायची नाही, परंतु मान जरुर ठेवायचा आहे. पावन बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे आणि करून घ्यायचा आहे.

वरदान:-
सर्व खजान्यांचा वेळेवर वापर करून, निरंतर खुशीचा अनुभव करणारे, खुशनसीब आत्मा भव.

बापदादा द्वारे ब्राह्मण जन्म होताच, साऱ्या दिवसामध्ये अनेक श्रेष्ठ खुशीचे खजाने प्राप्त होतात. त्यामुळे तुमच्या नावाने आता पर्यंत अनेक भक्त, अल्पकाळाच्या खुशीमध्ये राहतात, तुमच्या जड चित्रांना पाहून खुशी मध्ये नाचतात. तसेच तुम्ही खुशनशीब आहात, फार खाजाने मिळाले आहेत, परंतु आता वेळेवर त्याचा वापर करा. चावीला नेहमी समोर ठेवा, म्हणजे नेहमी स्मृतीमध्ये ठेवा आणि स्मृतीला स्वरूपामध्ये आणा, तर निरंतर खुशीचा अनुभव होत राहील.

बोधवाक्य:-
बाबाच्या श्रेष्ठ आशेचा दीपक जागविणारेच कुलदीपक आहेत.