26-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो - बाबा आले आहेत, तुम्हाला बेहदची जहागीर देण्यासाठी,अशा गोड बाबांची तुम्ही प्रेमाने आठवण करा तर पावन बनाल."

प्रश्न:-
विनाशाची वेळ जेवढी जवळ येत जाईल-त्याची लक्षणे काय असतील?

उत्तर:-
विनाशाची वेळ जेवढी जवळ येईल तेव्हा-1)सर्वांना माहित पडेल की आमचे बाबा आले आहेत.2)आता नव्या दुनियेची स्थापना,जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे अनेकांना साक्षात्कारही होतील.3)संन्याशी, राजे इत्यादींना ज्ञान मिळेल.4) जेव्हा ऐकतील कि बेहदचा बाबा आला आहे,तोच सदगती देणारा आहे तर अनेक जण येतील.5) वर्तमानपत्राद्वारे अनेकांना संदेश मिळेल.6) तुम्ही मुले आत्म अभिमानी बनाल,एक बाबांच्या आठवणी मध्ये अतींद्रिय सुखामध्ये राहाल.

गीत:-
इस पाप की दूनिया से.....

ओम शांती।
हे कोण म्हणत आहे आणि कोणाला म्हणत आहे- आत्मिक मुलांनो!बाबा घडीघडी आत्मिक असे का म्हणतात? कारण की आता आत्म्यांना जायचे आहे.नंतर जेव्हा या दुनियेमध्ये याल तेव्हा सुख असेल.आत्म्यांनी हा शांती आणि सुखाचा वारसा कल्पा पूर्वीही मिळवला होता.आता पुन्हा वारसा पुनरावृत्त होत आहे. पुनरावृत्त होईल तेव्हाच सृष्टीचे चक्र ही पुन्हा एकदा पुनरावृत्त होईल.पुनरावृत्त तर सर्व होते ना. जे काही घडून गेले आहे ते सर्व पुनरावृत्त होईल.तसे तर नाटकही पुनरावृत्त होते परंतु त्यामध्ये बदलही करू शकतो.काही अक्षरे विसरली तर नंतर बनवून टाकतात.याला नंतर सिनेमा म्हटले जाते,यामध्ये बदल होऊ शकत नाही.हे अनादी बनलेले आहे,त्या नाटकाला बनलेले म्हणू शकत नाही.या नाटकाला समजल्याने नंतर त्या नाटकासाठीही समजून येते.मुले समजतात जे नाटक इ.आता पाहत आहोत,ते सर्व खोटे आहेत.कलियुगा मध्ये ज्या गोष्टी पाहत आहोत त्या सतयुगामध्ये असणार नाहीत.सतयुगामध्ये जे झाले होते ते पुन्हा सतयुगामध्ये होईल.हे हदचे नाटक इ.नंतरही भक्ती मार्गामध्ये असतील.जी गोष्ट भक्ती मार्गामध्ये होते ती ज्ञानमार्ग अर्थात सतयुगामध्ये होत नाही.तर आता बेहदच्या पित्याकडून तुम्ही वारसा प्राप्त करत आहात.बाबांनी समजावले आहे-एक लौकिक पित्याकडून दुसरा पारलौकिक पित्याकडून वारसा मिळतो,बाकी जो अलौकिक पिता आहे त्याच्याकडून वारसा मिळत नाही.हा स्वतः त्यांच्याकडून वारसा प्राप्त करतो.ही जी नव्या दुनियेची संपत्ती आहे,ती बेहदचा पिताच यांच्याद्वारेच देतात. यांच्याद्वारे दत्तक घेतात म्हणून यांना पिता म्हटले जाते.भक्ती मार्गामध्ये ही लौकिक आणि पारलौकिक दोघांची आठवण येते.हे(अलौकिक)आठवणीत येत नाहीत कारण की याच्याकडून वारसा मिळत नाही.पिता अक्षर तर बरोबर आहे परंतु हा ब्रह्मा सुद्धा रचना आहे ना.रचनेला रचनाकाराकडून वारसा मिळतो.तुम्हालाही शिवबाबांनी रचले आहे.ब्रह्माला ही त्यांनी रचले आहे.वारसा रचयिता कडून मिळतो तो बेहद चा पिता आहे. ब्रह्माच्या जवळ बेहदचा वारसा आहे का?बाबा यांच्याद्वारे बसून समजावत आहे यांनाही वारसा मिळत आहे.असे नाही की वारसा घेऊन तुम्हाला देत आहे.बाबा म्हणतात तुम्ही यांचीही आठवण करू नका.ही बेहदच्या पित्याकडून तुम्हाला प्रॉपर्टी मिळत आहे.लौकिक पित्याकडून हदचा,पारलौकिक पित्याकडून बेहदचा वारसा दोन्ही राखीव आहे.शिवबाबांकडून वारसा मिळत आहे-बुद्धीमध्ये येते का! बाकी ब्रह्माचा वारसा कशाला म्हणायचे!बुद्धीमध्ये जहागीर येते ना.ही बेहद ची बादशाही तुम्हाला त्यांच्याकडून मिळत आहे.तो मोठा बाबा आहे.हे तर म्हणतात माझी आठवण करू नका,माझी तर कोणतीही संपत्ती नाही,जी तुम्हाला मिळेल.ज्याच्या कडून संपत्ती मिळणार आहे त्याची आठवण करा.ते म्हणतात माझी आठवण करा.लौकिक पित्याच्या संपत्ती साठी किती भांडणे लागतात.इथे तर भांडणाचा विषयच नाही.बाबांची आठवण नाही केली तर आपोआप बेहद चा वारसाही मिळणार नाही.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा. या रथाला ही सांगतात तू स्वतःला आत्मा समजून माझी आठवण कर तर विश्वाची बादशाही मिळेल.याला आठवणी ची यात्रा असे म्हटले जाते.देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला अशरीरी आत्मा समजायचे आहे.यामध्येच कष्ट आहेत.शिक्षणासाठी काहीतरी कष्ट पाहिजेत ना.या आठवणीच्या यात्रेने तुम्ही पतिता पासून पावन बनत आहात.ते शरीराने यात्रा करतात.ही तर आत्म्याची यात्रा आहे.ही तुमची यात्रा परमधाम मध्ये जाण्यासाठी आहे.हा पुरुषार्थ केल्याशिवाय, परमधाम अथवा मुक्तिधाम मध्ये कोणी जाऊ शकत नाही.जे चांगल्याप्रकारे आठवण करतात तेच जाऊ शकतात आणि नंतर उंच पदही तेच प्राप्त करू शकतात.सर्वजण जाणार आहेत. परंतु ते तर पतित आहेत ना म्हणून तर बोलावतात.आत्मा आठवण करते.खाणे-पिणे सर्व आत्मा करते ना.यावेळी तुम्हाला देही-अभिमानी बनायचे आहे, हीच मेहनत आहे.मेहनत केल्याशिवाय तर काहीच मिळत नाही.खूप सोपे आहे.परंतु मायेचा विरोध होतो.कोणाचे नशीब चांगले असेल तर लगेच यामध्ये येतात.काहीजण उशिरा ही येतील.जर बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारे बसले तर म्हणतील बस आम्ही या आत्मिक यात्रेमध्ये येतो.असे तीव्र वेगाने चालले तर चांगल्या प्रकारे चालू शकतात. घरामध्ये राहतानाही बुद्धीमध्ये येईल ही तर खूप चांगली बरोबर गोष्ट आहे.मी स्वतःला आत्मा समजून पतित-पावन बाबांची आठवण करतो.बाबांच्या आज्ञेनुसार चालले तर पावन बनू शकता, आवश्य बनाल,ही तर पुरुषार्थाची गोष्ट आहे.खूप सहज आहे.भक्ती मार्गामध्ये तर खूप अवघड असते.इथे तुमच्या बुद्धीमध्ये आहे आता आम्हाला बाबांच्या जवळ परत जायचे आहे.नंतर इथे येऊन विष्णूच्या माळेमध्ये ओवले जायचे आहे. माळेचा हिसाब करा.माळा तर ब्रह्माची ही आहे,विष्णुची ही आहे,रुद्र ची ही आहे.प्रथम नव्या सृष्टीचे हे आहे ना.बाकी सर्व पाठीमागून येतात.म्हणजेच शेवटी ओवले जातात.म्हणतील तुमचे उच्च कुळ काय आहे?तुम्ही म्हणाल विष्णू कुळ.आम्ही वास्तव मध्ये विष्णू कुळाचे होतो, नंतर क्षत्रिय कुळाचे बनलो.नंतर त्यापासून अनेक घराणे निघतात. या ज्ञानामुळे तुम्ही घराणे कसे बनतात हे समजू शकता. सुरुवातीला रुद्र ची माळा बनते. उच्च ते उच्च घराणे आहे.बाबांनी समजावले आहे-हे तुमचे खूप उच्च कुळ आहे.हेसुद्धा समजतात संपूर्ण दुनियेला संदेश अवश्य मिळणार आहे.ज्याप्रमाणे काहीजण म्हणतात भगवान अवश्य कुठेतरी आला आहे परंतु माहित पडत नाही.शेवटी सर्वांना माहित पडेल.वर्तमानपत्रांमध्ये छापून येईल.आता तर थोडे छापून येते.एकच वर्तमानपत्र सर्वजण वाचतात असे नाही. वाचनालयामध्ये वाचू शकतात. काहीजण 2-4 वर्तमानपत्रही वाचतात.काहीजण अजिबातच वाचत नाहीत.हे सर्वांना माहिती पडणारच आहे की बाबा आले आहेत,विनाशाची वेळ जवळ आल्यानंतर सर्वांना माहिती पडेल.नव्या दुनिया ची स्थापना, जुन्या दुनियेचा विनाश होत आहे. अनेकांना साक्षात्कारही होईल असेही होऊ शकते.तुम्हाला संन्यासी,राजे इत्यादींनाही ज्ञान द्यायचे आहे.अनेकांना संदेश मिळणार आहे.जेव्हा ऐकतील बेहद चा पिता आहे तोच सदगती देणारा आहे तर अनेक जण येतील.आता वर्तमान पत्रामध्ये एवढे कायदेशीर पणे लोकांना आवडेल असे छापलेले नाही. काहीजण निघतील,विचारपूस करतील.मुले समजतात आम्ही श्रीमतावर सतयुगाची स्थापना करत आहोत.तुमची ही नवी मिशन आहे.तुम्ही ईश्वरीय मिशनमधे सहभागी आहात. ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशन मधले ख्रिश्चनांना सहकार्य करतात. तुम्ही ईश्वराला सहकार्य करणारे आहात म्हणूनच तुमचे गायन आहे अतींद्रिय सुख गोपगोपींना विचारा,जे आत्म अभिमानी बनले आहेत.एक बाबांची आठवण करायची आहे,दुसरे कुणीही नाही.हा राजयोग एक बाबाच शिकवतात,तोच गीतेचा भगवान आहे.सर्वांना हेच बाबांचे निमंत्रण किंवा संदेश द्यायचा आहे,बाकी सर्व ज्ञान शृंगाराच्या गोष्टी आहेत. ही सर्व चित्रे ज्ञानाचा शृंगार आहे, न की भक्तीचा.ही चित्रे मनुष्यांना समजावण्यासाठी बाबांनी बसून बनवली आहेत.ही चित्रे इत्यादी तर लोप पावणार आहेत.बाकी हे ज्ञान आत्म्यामध्ये राहून जाते.बाबांनाही हे ज्ञान आहे, नाटकामध्ये नोंद आहे.

तुम्ही आता भक्तिमार्ग पूर्ण करून ज्ञान मार्गामध्ये आले आहात. तुम्ही जाणत आहात आमच्या आत्म्यामध्ये हा अभिनय आहे जो चालू आहे.याची नोंद होती ज्यामुळे पुन्हा एकदा आम्ही बाबांकडून राजयोग शिकत आहोत.बाबांनाच येऊन हे ज्ञान द्यावे लागते.आत्म्यामध्ये नोंद आहे.तिथे जाऊन पोहोचतील नंतर नव्या दुनियेचा अभिनय पुनरावृत्त होईल.आत्म्याच्या संपूर्ण रेकॉर्डला सुरुवातीपासून आत्तापर्यंत या वेळी तुम्ही समजले आहे.नंतर हे सर्व बंद होऊन जाईल.भक्तिमार्गाचा अभिनयही बंद होऊन जाईल. नंतर जो तुमचा अभिनय सतयुगामध्ये चालला होता,तोच चालेल.काय होईल,हे बाबा सांगत नाहीत.जे काही होईल ते होईल. सतयुग नवी दुनिया आहे हे समजले जाते.अवश्य तिथे सर्व काही नवीन सतोप्रधान आणि स्वस्त असेल,जे काही कल्पा पूर्वी झाले होते तेच होईल.पाहतही आहात-या लक्ष्मी-नारायणाला किती सुख आहे.हिरे-जवाहरात धन खूप असते.धन आहे तर सुखही आहे.इथे तुम्ही तुलना करू शकता.तिथे करू शकणार नाही.इथल्या सर्व गोष्टी तिथे विसरून जाल.या नवीन गोष्टी आहेत,ज्या बाबाच मुलांना समजावतात.आत्म्यांना तिथे जायचे आहे,जिथे सर्व कारभार बंद होऊन जातो.हिसाब-किताब चुक्तू होतो.रेकॉर्ड पूर्ण होते.एकच रेकॉर्ड खूप मोठे आहे.म्हणतात मग आत्मा पण एवढी मोठी असायला पाहिजे.परंतु नाही.एवढ्या छोट्या आत्म्यामध्ये 84 जन्मांची भूमिका आहे. आत्मा सुद्धा अविनाशी आहे. याला फक्त आश्चर्य म्हणू शकतो. अश्याप्रकारची आश्चर्यचकित करणारी गोष्ट दुसरी कोणतीही असू शकणार नाही.बाबांच्या साठी तर म्हणतात सतयुग-त्रेता मध्ये विश्राम मध्ये राहतात. आम्ही तर संपूर्ण भूमिका वठवतो.सर्वात जास्त आमचा अभिनय आहे.तर बाबा वारसा ही उच्च देतात.म्हणतात 84 जन्म तुम्हीच घेता.आमचा तर अभिनय असा आहे जो कुणीही वठवू शकत नाही.आश्चर्यकारक गोष्टी आहेत ना.आत्म्यांना बाबा बसून समजावत आहेत हे सुद्धा आश्चर्य आहे.आत्मा स्त्री-पुरुष नाही. जेव्हा शरीर धारण करते तेव्हा स्त्री-पुरुष म्हटले जाते.सर्व आत्मे मुले आहेत तर भाऊ-भाऊ होतात.अवश्य वारसा मिळवण्यासाठी भाऊ-भाऊ आहेत.आत्मा बाबांचा मुलगा आहे ना.बाबांकडून वारसा घेत आहेत म्हणून पुरुषच म्हटले जाते.बाबांकडून वारसा घेण्याचा, सर्व आत्म्यांना हक्क आहे. त्यासाठी बाबांची आठवण करायची आहे.स्वतःला आत्मा समजायचे आहे.आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत.आत्मा,आत्माच आहे.ती कधीही बदलत नाही.बाकी शरीर कधी पुरुषाचे कधी स्त्रीचे घेत असते.या खूप गमतीदार गोष्टी समजण्याच्या आहेत,दुसरे कोणीही ऐकवू शकत नाही. बाबांकडून किंवा तुम्हा मुलांकडूनच ऐकू शकतात.बाबा तर तुम्हा मुलांसोबतच बोलतात. सुरुवातीला तर सर्वांना भेटत होते,सर्वांशी बोलत होते.आता बोलत-बोलत शेवटी तर कोणाशी बोलणारही नाहीत.मुलांकडून पित्याची प्रत्यक्षता होणार आहे ना.मुलांनीच शिकवायचे आहे. तुम्ही मुले अनेकांची सेवा करून घेऊन येता.बाबा समजवतात हे अनेकांना आपसमान बनवून घेऊन येतात.हे मोठा राजा बनतील,हे छोटा राजा बनतील. तुम्ही आत्मिक सेना आहात,जे सर्वांना रावणाच्या साखळीतून सोडून आपल्या मिशनमध्ये घेऊन येतात.जे जेवढी सेवा करतात तेवढे फळ मिळते.ज्यांनी जास्त भक्ती केली आहे तेच जास्त हुशार होतात आणि वारसा घेतात.हे शिक्षण आहे,चांगल्या रीतीने शिकले नाही तर नापास होऊन जाल.शिक्षण खूप सहज आहे.समजणे आणि समजावणे ही सहज आहे.अवघड गोष्ट नाही,परंतु राजधानी स्थापन होत आहे,त्यामध्ये तर सर्व पाहिजेत ना.पुरुषार्थ करायचा आहे.त्यामध्ये आम्ही उंच पद प्राप्त करू.मृत्यूलोकामधून बदली होऊन अमरलोकामध्ये जायचे आहे.जेवढे शिकाल तेवढे अमरपुरी मध्ये उच्चपद प्राप्त कराल.

बाबांवर प्रेमही करायचे आहे कारण की हि खूप प्रेमळ वस्तू आहे.प्रेमाचा सागरही आहे,एकरस प्रेम होऊ शकत नाही.कुणी आठवण करतात, कोणी करत नाहीत.कोणाला समजावण्याचा ही नशा राहतो ना.हा खूप मोठा मोह(भुरळ) आहे.कोणालाही सांगायचे आहे- ही युनिव्हर्सिटी(विद्यापीठ)आहे. हे अध्यात्मिक शिक्षण आहे.असे चित्र इतर कोणत्याही शाळेमध्ये दाखवले जात नाहीत. दिवसेंदिवस आणखी चित्र निघत राहतील.जे पाहिल्यानंतर मनुष्याला लगेच समजेल.सीढ़ी खूप चांगली आहे.परंतु देवता धर्माचा नसेल तर त्याला समजणार नाही.जो या कुळाचा असेल त्याला बाण(तीर)लागेल. जी आमच्या देवता धर्माची पाने असतील तेच येतील.तुम्हाला जाणीव होईल हे तर खूप आवडीने ऐकत आहेत.काहीजण तर असेच निघून जातील. दिवसेंदिवस नवीन-नवीन गोष्टी ही मुलांना समजावत राहतात.सेवा करण्याची खूप आवड असायला पाहिजे.जे सेवेमध्ये अग्रेसर असतील तेच हृदयामध्ये बसतील आणि तख्तावर वर चढतील.पुढे चालून तुम्हा सर्वांना साक्षात्कार होत राहील.त्या खुशी मध्ये तुम्ही रहाल.दुनियेमध्ये तर हाहाकार खूप होणार आहे. रक्ताच्या नद्या ही वाहणार आहेत.हिमत्तीने सेवा करणारे कधी उपाशी मरणार नाहीत.परंतु इथे तर तुम्हाला वनवासा मध्ये राहायचे आहे.सुखही तिथे मिळेल.कन्येला तर वनवासा मध्ये बसवतात ना.सासरच्या घरी गेल्यानंतर खूप दागिने घालतात. तुम्हीसुद्धा सासरी जात आहात तर तो नशा राहतो ना.
ते तर सुखधाम आहे.अच्छा!

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादांची प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. माळेमध्ये गुंफण्यासाठी देही-अभिमानी बनून तीव्र वेगाने आठवणीची यात्रा करायची आहे. बाबांच्या आज्ञेवर चालून पावन बनायचे आहे.

2. बाबांचा परिचय देऊन अनेकांना आपसमान बनवण्याची सेवा करायची आहे.इथे वनवासा मध्ये राहायचे आहे.शेवटचे(अन्तिम) हाहाकाराचे दृश्य पाहण्यासाठी महावीर बनायचे आहे.

वरदान:-
प्रत्येक कर्मामध्ये बाबांचे अनुकरण करून स्नेहाचे प्रतिउत्तर देणारे तीव्र पुरुषार्थी भव

ज्याच्याशी स्नेह असतो त्याचे अनुकरण आपोआपच केले जाते. सदैव आठवणीत ठेवा की हे कर्म जे आम्ही करत आहोत हे बाबांना अनुसरून आहे?जर नसेल तर तिथेच थांबवा.बाबांची नकल(कॉपी)करून बाबांच्या समान बना.कॉपी करण्यासाठी ज्याप्रमाणे कार्बन पेपर टाकतात तसे अटेंशनचा(लक्ष देण्याचा) पेपर टाका तर कॉपी होईल कारण की, आत्ताच तीव्र पुरुषार्थी बनून स्वतःला प्रत्येक शक्तीने संपन्न बनवण्याची वेळ आहे.जर स्वतःच स्वतःला संपन्न नाही करू शकत तर सहयोग घ्या.नाहीतर पुढे जाऊन टू लेट(खूप उशीर होईल) होऊन जाल.

बोधवाक्य:-
संतुष्टतेचे फळ प्रसन्नता आहे,प्रसन्नचित्त बनल्याने प्रश्न समाप्त होऊन जातील.