17-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुमचे नशीब चांगले बनविण्या साठी सद्गुरु आले आहेत त्यामुळे तुमचे वर्तन फार उत्तम असले पाहिजे"

प्रश्न:-
विश्वनाटका मध्ये कोणती योजना बनलेली आहे, त्यामुळे कोणाला पण दोष देऊ शकत नाहीत?

उत्तर:-
विश्वनाटका मध्ये या जुन्या दुनियेच्या विनाशा ची योजना बनलेली आहे. यामध्ये कोणाचा दोष नाही. यावेळी विनाशा साठी प्रकृतीला पण जास्त राग आलेला आहे. चोहीकडे भूकंप होतील, घरे पडतील, महापूर येईल, दुष्काळ पडेल, त्यामुळे बाबा म्हणतात, मुलांनो, आता या जुने दुनिये पासून तुम्ही तुमचा बुध्दीयोग काढून टाका, सद्गुरूच्या श्रीमता वर चाला. जीवंतपणीच देहाचे भान सोडून, स्वतःला आत्मा समजून, बाबाची आठवण करण्याचा पुरुषार्थ करत राहा.

गीत:-
आम्हाला त्या वाटेने जायचे आहे...

ओम शांती।
कोणत्या वाटेने जायचे आहे? गुरूच्या वाटेने चालायचे आहे. हे कोणते गुरु आहेत? उठता-बसता मनुष्यांच्या मुखातुन निघत आहे की, वाह गुरु. गुरु तर अनेक आहेत. वाह गुरु कोणाला म्हणतात? सद्गुरु एकच शिवपिता आहेत. भक्तीमार्गा मध्ये अनेक गुरु आहेत, कोणी कोणाची महिमा करतात, कोणी कोणाची महिमा करतात. मुलांच्या बुद्धी मध्ये आहे, खरे सद्गुरु तर एकच आहेत, ज्यांची वाह वाह गायली जाते. खरे सद्गुरु आहेत, तर जरुर खोटे पण असतील. खरे संगमयुगा वर आहेत. भक्तीमार्गां मध्ये पण खऱ्याची महिमा गातात. सर्वोच्च बाबाच खरे आहेत, तेच मुक्तिदाता, मार्गदर्शक बनत आहेत. आजकाल चे गुरु लोक, तर गंगा स्नानासाठी किंवा तीर्थावर घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. हे सद्गुरु तर तसे नाहीत. ज्यांची सर्व आठवण करत आहेत, हे पतित पावन या. पतित पावन सद्गुरुला च म्हटले जाते. तेच पावन बनवू शकतात. ते गुरु लोक पावन बनवू शकत नाहीत. ते कांही असे म्हणत नाहीत कि, माझी एकट्याची आठवण करा. जरी गीता पण वाचतात परंतु अर्थाची माहिती बिल्कुल नाही. जरी त्यांनी समजले सद्गुरु एकच आहे, तर मग स्वतःला गुरु म्हनणार नाहीत. विश्वनाटका नुसार भक्तिमार्गा चा विभाग वेगळा आहे, ज्यामध्ये अनेक गुरू, अनेक भक्त आहेत. हे तर एकच आहेत. मग हे देवी देवता प्रथम नंबर मध्ये येतात. आता अंत काळात आहेत. बाबा येऊन त्यांना सतयुगाची राजाई देत आहेत. तर इतर सर्वांना आपोआपच परत घरी जायचे आहे, त्यामुळे सर्वांचा सद्गगती दाता एकालाच म्हटले जाते. तुम्ही समजत आहात कि,कल्प कल्प संगमयुगा वरच देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात. बाकी आणखीन कोणते काम करत नाहीत. गायन पण केले जाते कि, गती सद्गगती दाता एक आहे. ही बाबा ची महिमा आहे. गती सद्गगती संगमयुगा वरच मिळत आहे. सतयुगा मध्ये तर एक धर्म आहे. ही पण समजण्याची गोष्ट आहे ना. परंतु अशी बुद्धी कोण देणार? तुम्हीं समजता कि, बाबाच येवून युक्ती सांगत आहेत. श्रीमत कोणाला देत आहेत? आत्म्याला. ते पिता पण आहेत, सद्गुरु पण आहेत, शिक्षक पण आहेत. ज्ञान शिकवत आहेत ना. बाकी सर्व गुरु भक्ती शिकवितात. बाबांच्या ज्ञानाने तुमची सद्गगती होत आहे. मग या जुन्या दुनिये मधून निघून जातील. तुमचा हा बेहदचा संन्यास पण आहे. बाबांनी समजावले आहे, आता ८४ जन्माचे चक्र तुमचे पूर्ण झाले आहे. आता ही दुनिया नाहीशी होत आहे. जर कोणी जर खूप आजारी असतील तर म्हणतात, आता हे तर जाणारे आहेत, त्यांची आठवण काय करायची. शरीर नष्ट होणार आहे. बाकी आत्मा जाऊन दुसरे शरीर घेईल. आशा नाहीशी होते. बंगाल मध्ये तर पाहतात कि, जगणार असेल तर गंगे वर जाऊन बुडवितात, त्यामुळे प्राण निघून जातील. मूर्तींची पण पूजा करून मग म्हणतात कि, बुडून जा, बुडून जा. आता तुम्हीं जाणता कि, ही सारी जुनी दुनिया बुडणार आहे. पूर येईल, आग लागेल, भुकेने मनुष्य मरतील. ही सर्व विघ्ने येणार आहेत. भूकंपा मध्ये घरे इ. पडतात. यावेळी प्रकृतीला पण राग आलेला आहे, तर सर्वांना नष्ट करून टाकते.ही सर्व विघ्ने साऱ्या दुनिये साठी येणारे आहेत. अनेक प्रकाराने मृत्यू होणार आहे. बाॅम्स मध्ये पण विष भरले जाते. थोडा वास आल्याने बेहोष होऊन जातात. हे तुम्हीं मुले जाणता कि, काय काय होणार आहे. हे सर्व कोण करत आहे? बाबा तर करत नाहीत. हे विश्व नाटकांमध्ये नोंदलेले आहे. कोणाला दोष देऊ शकत नाहीत.नाटका मध्ये योजना बनलेली आहे. जुनी दुनिया मग नवी जरूर होणार आहे. नैसर्गिक संकटे येतील. विनाश होणारच आहे. या जुन्या दुनिये पासून बुद्धीयोग काढून टाका. याला बेहदचा संन्यास म्हटले जाते.

आता तुम्ही म्हणता, वाह सतगुरू वाह! जो आम्हाला हा रस्ता दाखवला. मुलांना पण समजावत आहेत, असे वर्तन नसावे, ज्यामुळे निंदा होईल. तुम्ही इथे जिवंतपणी च मरत आहात. देहाला विसरून स्वतःला आत्मा समजत आहात.देहा पासून वेगळी आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. हे तर फार चांगले म्हणत आहेत,वाह सतगुरु वाह. पारलौकिक सद्गुरु ची वाह वाह होत आहे. लोकिक गुरु तर अनेक आहेत.सद्गुरु तर एकच खरा खरा आहे,ज्यांचे मग भक्तीमार्गा मध्ये पण नाव चालत येत आहे. साऱ्या सृष्टीचा पिता तर एकच आहे. नवीन सृष्टीची स्थापना कशी होत आहे, हे पण कोणाला माहित नाही. शास्त्रा मध्ये पण दाखवतात कि, प्रलय झाला, मग पिंपळाच्या पाना वर श्रीकृष्ण आले. आता तुम्ही समजता कि, पिंपळाच्या पानावर कसे येतील. श्रीकृष्णा ची महिमा केल्याने कांही फायदा होणार नाही. आता तुम्हाला चढती कले मध्ये घेऊन जाण्यासाठी सद्गुरु मिळाले आहेत. म्हणतात ना, चढती कला त्यामुळे सर्वांचे चांगले. तर आत्मिक पिता, आत्म्याला समजावत आहेत. ८४ जन्म पण आत्माने घेतले आहेत. प्रत्येक जन्मामध्ये नाव रूप दुसरे मिळते. असे म्हणत नाहीत कि,फलान्याने ८४ जन्म घेतले आहेत. नाही, आत्म्याने 84 जन्म घेतले. शरीर तर बदलत जाते. तुमच्या बुद्धीं मध्ये या सर्व गोष्टी आहेत. सारे ज्ञान बुद्धीं मध्ये असले पाहिजे. कोणी पण आले तर त्यांना समजावा, आदी काळात देवी-देवता धर्माचे राज्य होते. मग मध्या ला रावण राज्य झाले.शिडी उतरत आले. सतयुगा मध्ये म्हणतात सतोप्रधान, मग सतो,रजो,तमो मध्ये उतरतात. चक्र फिरत राहत आहे. कोणी कोणी म्हणतात बाबाला काय पडले होते, 84 च्या चक्रामध्ये आम्हाला आणले. परंतु हे तर सृष्टी चक्र अनादि बनलेले आहे. यांच्या आदि,मध्य,अंताला जाणायचे आहे. मनुष्य असून ओळखत नसतील, तर ते नास्तिक आहेत. हे जाणल्या मुळे तुम्हाला किती उंच पद मिळत आहे. हे शिक्षण किती उंच आहे. मोठी परीक्षा पास होणाऱ्याच्या मनामध्ये किती खुशी होते ना. आम्ही मोठ्या तील मोठे पद प्राप्त करू. तुम्ही समजत आहात कि, हे लक्ष्मी नारायण त्यांच्या पूर्वीच्या जन्मांमध्ये शिकून, मग मनुष्या पासून देवता बनले.

या शिक्षणा द्वारे ही राजधानी स्थापन होत आहे. शिक्षणा मुळे किती उंच पद मिळत आहे. आश्चर्य आहे ना. एवढी मोठी मंदिरे जी बनत आहेत किंवा जे मोठ मोठे विद्वान इ. आहेत, त्यांना विचारा सतयुगाच्या सुरूवातीला यांनी जन्म कसा घेतला, तर ते सांगू शकणार नाहीत. तुम्हीं जाणत आहात कि, हा तर गीते तील राजयोग आहे. गीता वाचत आले आहेत, परंतु त्यामुळे फायदा कांही झाला नाही. आता तुम्हाला बाबा सांगत आहेत, तुम्ही म्हणता, बाबा, आम्हीं तुम्हाला 5000 वर्षा पूर्वी पण भेटलो होतो. कां भेटलो होतो? स्वर्गाचा वरसा घेण्यासाठी. लक्ष्मी नारायण बनण्यासाठी. कोणी पण लहान-मोठे म्हातारे इ. येतात, ते जरूर शिकून येत आहेत. मुख्य लक्ष्य हे आहे. सत्य नारायणाची खरी कथा आहे ना. हे पण तुम्ही समजत आहात, कि, राजाई स्थापन होत आहे. ते चांगल्या रीतीने समजून घेतात, त्यांना आंतरिक खुशी पण राहते. बाबा विचारतात, हिंमत आहे का़ राजाई घेण्याची? तर म्हणतात, बाबा कां नाही, आम्ही शिकत आहोत,नरा पासून नारायण बनण्यासाठी. आता पर्यंत आम्ही स्वतःला देह समजून बसलो होतो, आता बाबांनी आम्हाला खरा रस्ता सांगितला आहे. आत्माभिमानी बनण्या मध्ये मेहनत लागत आहे. वारंवार आपल्या नाव रूपां मध्ये फसतात. बाबा म्हणतात, या नाव रुपा पासून वेगळे व्हायचे आहे. आता आत्मा पण नावच आहे ना. बाबा आहेत सर्वोच्च परमपिता, लौकिक पित्याला, परमपिता म्हणत नाहीत. परम अक्षर एकाच बाबाला दिले आहे. वाह गुरु, पण त्यांनाच म्हटले जाते. तुम्ही शीख लोकांना पण समजावून सांगू शकता. ग्रंथसाहेबा मध्ये तर पूर्ण वर्णन आहे. आणखीन कोणत्या ग्रंथा मध्ये एवढे वर्णन नाही, जेवढे शिखांच्या ग्रंथा मध्ये आहे. जपसाहेब सुखमणी मध्ये आहे. हे मोठे अक्षर पण दोन आहेत. बाबा म्हणतात, साहेबांची आठवण करा, तर तुम्हाला २१ जन्मासाठी सुख मिळेल. यामध्ये गोंधळून जाण्याची गोष्टच नाही. बाबा फार सोपे करून समजावत आहेत. किती तरी हिंदू धर्मांतर करून शिख बनले आहेत.

तुम्हीं मनुष्याला रस्ता सांगण्यासाठी, किती चित्र इ. बनविता. किती सोपे करून समजावता. तुम्हीं आत्मा आहात, मग अनेक धर्मां मध्ये आले आहात. हे अनेक धर्माचे झाड आहे. हे आणखीन कोणाला माहित नाही कि, क्राईस्ट कसे येतात. बाबांनी समजावले होते, नवीन आत्मा तर कर्मभोग भोगू शकत नाही. क्राईस्टच्या आत्माने कोणते विकर्म थोडेच केले होते, ज्यामुळे सजा मिळेल. ती तर सतो प्रधान आत्मा येते, ज्या मध्ये येऊन प्रवेश करते, त्याला क्रॉस इ.वर चढवतात, क्राईस्टला नाही. ते तर जाऊन दुसरा जन्म घेऊन, मोठे पद प्राप्त करतात. पोप चे पण चित्र आहे.

यावेळी ही सारी दुनिया फारच कवडी तुल्य आहे. तुम्ही पण तसे होता. आता तुम्ही हिऱ्यासारखे बनता. असे नाही कि, त्यांचे वारस शेवटी खातील, कांहीच नाही. तुम्हीं तुमचे हात भरपूर करून जात आहात, बाकीचे सर्व खाली हात जातील. तुम्हीं भरपूर होण्यासाठी शिकत आहात. हे पण जाणता कि, जे कल्पा पूर्वी आले होते, तेच येतील. थोडे पण ऐकले तरी येतील. सर्वांना एकत्र तर पाहू शकणार नाहीत. तुम्ही प्रजा बनवत आहात. बाबा सर्वाना थोडेच पाहू शकतील. थोडे फार ऐकले तरी पण प्रजा बनत जाते. तुम्हीं त्याचे मोजमाप करु शकत नाहीत.

तुम्ही मुले सेवेवर आहात, बाबा पण सेवेवर आहेत. बाबा सेवे शिवाय राहू शकत नाहीत. रोज सकाळी सेवा करण्यासाठी येतात. सत्संग इ. पण सकाळीच करतात. त्यावेळी सर्वांना वेळ असतो. बाबा तर म्हणतात, तुम्हां मुलांना घरातून अगदी सकाळी पण यायचे नाही, आणि रात्रीला पण यायचे नाही, कारण दिवसेंदिवस दुनिया फार खराब होत जाते, त्यामुळे गल्ली गल्ली मध्ये सेवाकेंद्र जवळ असले पाहिजे, जे घरातून निघाले आणि सेंटरवर पोचले, सहज होऊन जावे. तुमची वृद्धी होत जाईल, तेंव्हा राजधानी स्थापन होईल. बाबा समजावतात तर फार सोपे आहे. या राजयोगा द्वारे स्थापना होत आहे, बाकी ही सारी दुनिया राहणारच नाही. प्रजा तर किती पुष्कळ बनणार आहे. माळा पण बनणार आहे. मुख्य तर जे अनेकांची सेवा करून आपल्या सारखे बनवितात, तेच माळेचे मणके बनतात. लोक माळा फिरवितात, परंतु अर्थ थोडाच समजतात. गुरु लोक माळ जपण्यासाठी देत आहेत, त्यामुळे बुद्धी त्यामध्ये लागते. काम महाशत्रू आहे. दिवसेंदिवस फार तीव्र होत जाईल. तमोप्रधान बनत जातील. ही दुनिया फार खराब आहे. बाबाला अनेक जण म्हणतात कि, आम्ही तर फार तंग झाले आहोत, लवकर सतयुगा मध्ये घेऊन चला. बाबा म्हणतात, धीर धरा, स्थापना होणारच आहे, ही खात्री आहे, ही खात्रीच तुम्हांला घेऊन जाईल. मुलांना हे पण सांगितले आहे कि, तुम्ही आत्मे परमधाम मधून आले आहात, मग तिथेच परत जायचे आहे, मग अभिनय करण्यासाठी याल. तर परमधाम ची आठवण केली पाहिजे. बाबा पण म्हणतात कि, माझी एकट्याची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. हा संदेश सर्वाना द्यायचा आहे. आणखीन कोणी पैगंबर मेसेंजर इ. नाहीत. ते तर मुक्तिधाम मधून खाली घेऊन येतात, मग त्यांना पण शिडी खाली उतरायची आहे. जेव्हा पूर्ण तमोप्रधान बनतील, तर मग बाबा येऊन सर्वांना, सतोप्रधान बनवितात. तुमच्यामुळे सर्वांना परत घरी जावे लागते, कारण तुम्हाला नवीन दुनीया पाहिजे ना. हे पण नाटक बनलेले आहे. मुलांना फार नशा राहिला पाहिजे. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) देहाच्या नाव रूपा पासून वेगळे होऊन, देहीअभिमानी बनायचे आहे. असे वर्तन नसावे कि, ज्यामुळे सद्गुरूची निंदा होईल.

(२) माळेचा मणका बनण्यासाठी अनेकांना आपल्या सारखे बनविण्याची सेवा करायची आहे. आंतरिक खुशीमध्ये राहायचे आहे कि, आम्हीं राजाई प्राप्त करण्यासाठी शिकत आहोत. हे शिक्षण नरापासून नारायण बनण्यासाठी आहे.

वरदान:-
कल्याणकारी वृत्ती द्वारे सेवा करणारे, सर्व आत्म्यांच्या आशीर्वादाचे अधिकारी भव.

कल्याणकारी वृत्ती द्वारे सेवा करणे, हे सर्व आत्म्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचे साधन आहे. जेंव्हा लक्ष्य राहते कि, आम्ही विश्वकल्याणकारी आहोत, तर अकल्याणाचे कर्तव्य होऊ शकत नाही. जसे कार्य असते, तशी आपली धारणा होते, जर कार्य आठवणीत राहिले, तर नेहमी रहमदिल, नेहमी महादानी राहाल. प्रत्येक पावला मध्ये कल्याणकारी वृत्तीने चालाल, मी पणा येणार नाही, निमित्तभाव आठवणीत राहील. अशा सेवाधारीना सेवेच्या बदल्या मध्ये सर्व आत्म्यांचा आशीर्वादा चा अधिकार प्राप्त होऊन जातो.

बोधवाक्य:-
साधनांचे आकर्षण, साधनेला खंडित करून टाकते.