31-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- तुमची ही ईश्वरीय मिशन आहे,तुम्ही सर्वांना ईश्वराचे बनवून त्यांना
बेहदचा वारसा मिळवून देता."
प्रश्न:-
कर्मेन्द्रियांची चंचलता केव्हा समाप्त होईल?
उत्तर:-
जेव्हा तुमची स्थिती सिल्वर एज(चांदीच्या युगा सारखी )पर्यंत पोहोचेल अर्थात आत्मा
त्रेताच्या सतो स्टेज पर्यंत पोहोचेल तेव्हा कर्मेंद्रियांची चंचलता बंद होईल.आता
तुमचा परतीचा प्रवास आहे म्हणून कर्मेंद्रियांना ताब्यात ठेवायचे आहे.ज्यामुळे आत्मा
पतित बनेल असे कोणतेही कर्म लपून करू नका.अविनाशी डॉक्टर तुम्हाला जे पथ्य सांगत
आहे,त्यावर चालत राहा.
गीत:-
मुखडा देखले
प्राणी.....
ओम शांती।
आत्मिक मुलां प्रति आत्मिक पिता, फक्त तुम्हा मुलांना समजावत आहेत. आत्मिक मुले
प्रजापिता ब्रह्मा मुख वंशावली आहेत,ते जाणत आहेत,आम्हा ब्राह्मणांनाच समजावत
आहेत.सुरुवातीला तुम्ही शूद्र होतो,नंतर येऊन ब्राह्मण बनले आहात.बाबांनी वर्णांचा
हिशोब समजावला आहे. दुनियेमध्ये वर्णांना ही समजत नाहीत.फक्त गायन आहे.आता तुम्ही
ब्राह्मण वर्णाचे आहात नंतर देवता वर्णाचे बनणार आहात. विचार करा ही गोष्ट बरोबर आहे?
स्वतःला विचारून पहा.आमची गोष्ट ऐका आणि तुलना करा. शास्त्र जे जन्म-जन्मांतर ऐकले
आहेत आणि जो ज्ञानसागर पिता समजावत आहे, त्याची तुलना करा-बरोबर काय आहे?ब्राह्मण
धर्म अथवा कुळाला बिलकुल विसरून गेले आहेत.तुमच्या जवळ विराट रूपाचे चित्र योग्य
बनले आहे,यावर समजावले जाते.बाकी एवढ्या भुजांचे चित्र बनवले आहेत आणि देवींना
हत्यार इ.दाखवले आहेत ते सर्व अयोग्य आहे.हे भक्तिमार्गाचे चित्र आहेत.या डोळ्यांनी
सर्व पहातात परंतु समजत नाही.कोणाच्याही कर्तव्याला जाणत नाहीत.आता तुम्हा मुलांना
आपल्या आत्म्या विषयी माहिती झाले आहे.आणि ८४ जन्मां विषयी माहिती झाली आहे.जसे बाबा
तुम्हा मुलांना समजावत आहेत तुम्ही नंतर इतरांनाही समजावून सांगायचे आहे.शिवबाबा तर
सर्वां जवळ जाणार नाहीत.अवश्य बाबांचे मदतगार पाहिजेत ना म्हणूनच तुम्ही ईश्वरीय
मिशन आहात. तुम्ही सर्वांना ईश्वराचे बनवत आहात.समजावता तो आम्हा सर्व आत्म्यांचा
बेहदचा पिता आहे. त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो.ज्याप्रमाणे लौकिक पित्याची
आठवण केली जाते, त्यापेक्षाही जास्त पारलौकिक पित्याची आठवण करायला पाहिजे.लौकिक
पिता तर अल्पकाळासाठी सुख देतात.बेहद चा पिता बेहद चे सुख देत आहेत. आता हे ज्ञान
आत्म्यांना मिळत आहे.आता तुम्ही जाणत आहात तिन पिता आहेत.लौकिक पारलौकिक आणि अलौकिक.
बेहद चा पिता अलौकिक पित्याद्वारे तुम्हाला समजावत आहेत.या पित्याला कोणीही जाणत
नाही.ब्रह्माच्या जीवन चरित्रा विषयी कोणालाही माहिती नाही.त्यांच्या कर्तव्याबद्दल
ही जाणून घेतले पाहिजे ना.
शिवाची,श्रीकृष्णाची महिमा गातात बाकी ब्रह्माची महिमा कुठे आहे? निराकार पित्याला
अवश्य मुख तर पाहिजे ना,ज्याद्वारे अमृत देऊ शकतो.भक्ती मार्गामध्ये बाबांची कधी
यथार्थ रीतीने आठवण करू शकत नाहीत.तुम्ही आता जाणत आहात,शिवबाबांचा हा रथ आहे. रथाचा
ही शृंगार करतात ना. ज्याप्रमाणे मुहमदच्या घोड्याला ही सजवतात.तुम्ही मुले किती
चांगल्या प्रकारे मनुष्यांना समजावत आहात.तुम्ही सर्वांची महिमा करता.त्यांना सांगता
तुम्ही हे देवता होते नंतर ८४ जन्म भोगून तमोप्रधान बनले आहात. आता पुन्हा
सतोप्रधान बनायचे आहे तर त्यासाठी योग पाहिजे. परंतु खूप प्रयत्नानंतर कोणी समजून
घेते.समजल्यानंतर खुशीचा पार चढेल.समजावून सांगणाऱ्याला तर अजूनच जास्ती खुशी
होईल.बेहदच्या पित्याचा परिचय देणे काही कमी गोष्ट आहे का.समजू शकत नाहीत. म्हणतात
असे कसे होऊ शकते. बेहद च्या पित्याची जीवन कहाणी ऐकवतात.
आता बाबा म्हणतात-मुलांनो, पावन बना.तुम्ही बोलवत होते ना की हे पतित-पावन
या.गीतेमध्ये ही मनमनाभव अक्षर आहे परंतु त्याच्याविषयी कोणालाही काही माहीत
नाही.बाबा आत्म्याचे ज्ञानही किती स्पष्ट करून समजावत आहेत.कोणत्याही शास्त्रामध्ये
या गोष्टी नाहीत.खुशाल म्हणतात आत्मा बिंदी आहे भ्रकुटीच्या मध्ये तारा आहे.परंतु
यथार्थ रीतीने कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही.तेही जाणायला पाहिजे.कलियुगा मध्ये सर्व
चुकीचे आहे.सतयुगामध्ये सर्व बरोबर आहे.भक्ती मार्गामध्ये मनुष्य समजतात हे सर्व ईश्वराला
भेटण्याचे रस्ते आहेत म्हणूनच तुम्ही सुरुवातीला फॉर्म(पत्रक)भरून घेता-इथे कशासाठी
आले आहात?याद्वारेही तुम्हाला बेहद च्या पित्याचा परिचय द्यायचा आहे.तुम्ही विचारता
आत्म्याचा पिता कोण?सर्वव्यापी म्हणाल्याने तर कोणताही अर्थ निघत नाही. सर्वांचा
पिता कोण?ही मुख्य गोष्ट आहे.आपल्या-आपल्या घरामध्ये ही तुम्ही समजावु शकता. एक-दोन
मुख्य चित्र शिढी, त्रिमूर्ती,झाड हे खूप महत्वाचे आहेत.झाडामुळे सर्व धर्म वाले
समजू शकतात की आमचा धर्म केव्हा सुरू झाला!या हिशोबाने आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो
का?जे येतातच उशीरा, ते स्वर्गामध्ये जाऊ शकत नाहीत. बाकी शांतीधाम मध्ये जाऊ
शकतात.झाडामुळे ही खुप स्पष्ट होते.जे जे धर्म नंतर आले आहेत त्यांचे आत्मे अवश्य
वरती जाऊन, विराजमान होतील.तुमच्या बुद्धीमध्ये सर्व स्थापन केले जाते. बाबा
म्हणतात आदि सनातन देवी-देवता धर्माचे कलम तर लागले, नंतर झाडाचे पानही तुम्हाला
बनायचे आहे,पाना शिवाय तर झाड असत नाही म्हणूनच बाबा-आप समान बनवण्यासाठी पुरुषार्थ
करवत राहतात.इतर धर्म वाल्यांना पाने बनवावी लागत नाहीत.ते तर वरून येतात,आणि
स्थापना करतात.नंतर पाने शेवटी वरून येत-जात राहतात.तुम्ही नंतर झाडाच्या वृद्धीसाठी
ही प्रदर्शनी इ.करता.यापासून पाने लागतात, नंतर वादळ आल्याने खाली पडतात,सुकून
जातात.ही आदी सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे.यामध्ये लढाई इ.ची कोणतीही
गोष्ट नाही.फक्त बाबांची आठवण करायची आहे आणि इतरांना करून द्यायची आहे.तुम्ही
सर्वांना सांगता इतर ज्या पण रचना आहेत त्यांना सोडा.रचने कडून कधीही वारसा मिळू
शकत नाही.रचनाकार पित्याचीच आठवण करायची आहे.इतर कोणाची आठवण यायला नको.बाबांचे
बनून ज्ञानामध्ये येऊन नंतर जर कोणते असे काम करतात तर त्याचा बोझा डोक्यावर खूप
चढतो. बाबा पावन बनवण्यासाठी येतात नंतर असे काही काम करतात तर आणखी च पतित बनतात
म्हणूनच बाबा म्हणतात असे काही काम करू नका ज्यामुळे नुकसान होईल.बाबांची निंदा होते
ना.असे कर्म करू नका ज्यामुळे जास्त विकर्म होतील.पथ्य ही पाळायचे आहेत.औषधांमध्ये
ही पथ्य पाळले जातात.डॉक्टरांनी सांगितले आंबट इ.खाऊ नका तर ऐकले
पाहिजे.कर्मेन्द्रियांना ताब्यात ठेवायला पाहिजे.जर लपून खाल्ले तर औषधांचा परिणाम
होणार नाही.याला आसक्ति म्हणतात.बाबा शिकवण देतात-हे करू नका.डॉक्टर आहे ना.लिहितात
बाबा मनामध्ये संकल्प खूप येतात.खबरदार राहायचे आहे.खराब स्वप्न, मनामध्ये संकल्प
इ.खूप येतील, यांना घाबरायचे नाही सतयुग-त्रेता मध्ये या गोष्टी नसतात.तुम्ही जेवढे
पुढे जवळ जात राहाल सिल्वर एज पर्यंत पोहोचाल तेव्हा कर्मेंद्रियांची चंचलता बंद
होऊन जाईल. कर्मेंद्रिया वश होऊन जातील. सतयुग-त्रेता मध्ये वश होती ना. जेव्हा त्या
त्रेताच्या अवस्थेपर्यंत याल तेव्हा वश होतील.नंतर सतयुगाच्या अवस्थेपर्यंत येतील
तेव्हा सतोप्रधान बनतील नंतर सर्व कर्मेंद्रिया पुर्णपणे वश होऊन
जातील.सतयुग-त्रेतामध्ये वश होत्या ना.जेव्हा त्या त्रेता च्या अवस्थेपर्यंत याल
तेव्हा वश होतील.नंतर सतयुगाच्या अवस्थेमध्ये याल तेव्हा सतोप्रधान बनाल नंतर सर्व
कर्मेंद्रिया पूर्णपणे वश होऊन जातील.कर्मेन्द्रिया वश होत्या ना. नवीन गोष्ट थोडीच
आहे.आज कर्मेंद्रियांच्या वश आहेत उद्या पुन्हा पुरुषार्थ करून कर्मेंद्रियांना वश
करून घेतात.ते तर ८४ जन्मांमध्ये उतरत आलेले आहेत. आता परतीचा प्रवास आहे, सर्वांना
सतोप्रधान अवस्थेमध्ये जायचे आहे.आपला चार्ट पाहायचा आहे-आम्ही किती पाप, किती
पुण्य केले आहेत.बाबांची आठवण करत-करत लोखंडाच्या दुनियेपासून चांदीच्या
दुनियेपर्यंत पोहोचाल तेव्हा कर्मेंद्रिया वश होऊन जातील.आता कोणतेही वादळ येत
नाहीत,नंतर तुम्हाला अशी जाणीव होईल.ती अवस्थाही येईल,नंतर तुम्ही स्वर्णिम
युगामध्ये जाल.मेहनत करून पावन बनल्याने खुशीचा पाराही चढेल.जे पण येतात त्यांना
समजावून सांगायचे आहे- कसे तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत?ज्यांनी ८४जन्म घेतले
आहे,त्यांनाच समजेल.म्हणतील आता बाबांची आठवण करून मालक बनायचे आहे.८४ जन्म समजत
नसतील तर कदाचित राजाई चे मालक बनले नसतील. आम्ही तर हिम्मत देत आहोत, चांगल्या
गोष्टी ऐकवत आहे.तुम्ही खाली घसरले आहात.ज्यांनी 84 जन्म घेतले असतील त्यांना लगेच
स्मृती येईल.बाबा म्हणतात तुम्ही शांतीधाम मध्ये पवित्र होते ना.आता पुन्हा तुम्हाला
शांतीधाम,सुखधाम मध्ये जाण्याचा रस्ता सांगत आहे.दुसरे कोणीही रस्ता सांगू शकत नाही.
पावन आत्म्येच शांतीधाम मध्ये जाऊ शकतात.जेवढा गंज निघून जाईल तेवढे उच्चपद मिळेल,जो
जेवढा पुरुषार्थ करेल.प्रत्येकाच्या पुरुषार्थाला तुम्ही पहात आहात, बाबा खूप चांगली
मदत करतात. हा तर जसा जुना मुलगा आहे. प्रत्येकाच्या नाडीला(नब्ज)तर समजू शकता ना.जे
समजदार असतील त्यांना लगेच समजेल. बेहदचा पिता आहे त्यांच्याकडून अवश्य स्वर्गाचा
वारसा मिळाला पाहिजे.मिळाला होता,आता नाही,पुन्हा मिळत आहे.उद्दिष्ट समोर उभे
आहे.बाबांनी जेव्हा स्वर्गाची स्थापना केली होती,तुम्ही स्वर्गाचे मालक होते.नंतर
८४ जन्म घेऊन खाली उतरत आले आहात. आता हा तुमचा शेवटचा जन्म आहे.इतिहास पुनरावृत्त
तर अवश्य होईल ना.तुम्ही सर्व ८४चा हिसाब सांगता.जेवढे समजून घेतील तेवढी पाने बनत
जातील. तुम्हीसुद्धा अनेकांना आपसमान बनवता ना.तुम्ही म्हणाल आम्ही आलो आहे,साऱ्या
विश्वाला मायेच्या साखळीतून सोडण्यासाठी.बाबा म्हणतात मी सर्वांना रावणापासून
सोडवण्यासाठी येतो.तुम्ही मुलेही समजत आहात बाबा ज्ञानाचा सागर आहे.तुम्हीसुद्धा
ज्ञान प्राप्त करून मास्टर ज्ञानसागर बनत आहात ना.ज्ञान वेगळे आहे,भक्ती वेगळी
आहे.तुम्ही जाणता भारताचा प्राचीन राजयोग बाबाच शिकवतात.कोणीही मनुष्य शिकवू शकत
नाही.परंतु ही गोष्ट सर्वांना कशी सांगावी?इथे तर असुरांचे विघ्न ही खूप पडतात.
सुरुवातीला तर समजत होते कदाचित कुणी कचरा टाकत आहे.आत्ता समजत आहात हे विघ्न
कशाप्रकारे टाकत आहेत. नथिंग न्यू (नवीन काहीही नाही.) कल्पा पूर्वीही असे झाले होते.
तुमच्या बुद्धीमध्ये हे सारे चक्र फिरत राहते.बाबा आम्हाला सृष्टीच्या
आदी-मध्य-अंताचे रहस्य समजावत आहेत,बाबा आम्हाला प्रकाश घराचे(लाईट हाऊस)टायटल
देतात.एका डोळ्यांमध्ये मुक्तिधाम,दुसऱ्या डोळ्यांमध्ये जीवन-मुक्तिधाम.तुम्हाला
शांतीधाम मध्ये जाऊन परत सुखधाम मध्ये यायचे आहे.हे दुःखधाम आहे.बाबा म्हणतात या
डोळ्याने जे काही तुम्ही पहात आहात,ते सर्व विसरून जा. आपल्या शांतीधाम ची आठवण
करा.आत्म्याला आपल्या पित्याची आठवण करायची आहे, यालाच अव्यभिचारी योग असे म्हटले
जाते.ज्ञानही एका कडूनच ऐकायचे आहे.हे आहे अव्यभिचारी ज्ञान.आठवण ही एकाची करा.माझा
तर एक,दुसरे नाही कुणी.जोपर्यंत स्वतःला आत्मा निश्चय करणार नाही तोपर्यंत एकाची
आठवण येणार नाही.आत्मा म्हणते मी तर एक बाबांचीच बनणार आहे.मला बाबांच्या जवळ जायचे
आहे.हे शरीर तर जुने जडजडीभूत आहे, यामध्ये ही मोह ठेवायचा नाही.या ज्ञानाच्या
गोष्टी आहेत.शरीराला सांभाळायचे नाही असेही नाही. मनामध्ये समजायचे आहे-हे ही जुनी
चमडी आहे,याला आता सोडायचे आहे.तुमचा बेहद चा संन्यास आहे.ते तर जंगलामध्ये निघून
जातात.तुम्हाला घरामध्ये राहून आठवणी मध्ये राहायचे आहे.आठवणी मध्ये राहता-राहता
तुम्ही शरीर सोडू शकता.कुठेही राहा तुम्ही बाबांची आठवण करा.आठवणी मध्ये
राहाल,स्वदर्शन चक्रधारी बनाल, तर कुठेही राहात असले तरी तुम्ही उंच पद प्राप्त करू
शकता. जेवढी वैयक्तिक कष्ट कराल तेवढे पद मिळेल.घरामध्ये राहत असतानाही आठवणीच्या
यात्रेमध्ये राहायचे आहे.आता अंतिम परिणामासाठी थोडी वेळ राहिली आहे.नंतर नवी दुनिया
ही तयार असायला पाहिजे ना. आत्ता कर्मातीत अवस्था झाली तर सूक्ष्मवतन मध्ये राहावे
लागेल.सूक्ष्मवतन मध्ये राहील्यानंतरही पुन्हा जन्म घ्यावा लागतो.पुढे चालून
तुम्हाला सर्व साक्षात्कार होईल.अच्छा!
गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. एक
बाबांकडूनच ऐकायचे आहे.एकाच्याच अव्यभिचारी आठवणी मध्ये राहायचे आहे.या शरीराला
सांभाळायचे आहे,परंतु मोह ठेवायचा नाही.
2. बाबांनी जे पथ्य सांगितले आहे ते पूर्ण पाळायचे आहे. कोणतेही असे कर्म करायचे
नाही ज्यामुळे बाबांची निंदा होईल, पापाचे खाते बनेल.स्वतःचे नुकसान करून घ्यायचे
नाही.
वरदान:-
आपल्या विशाल
बुद्धी रुपी तिजोरी द्वारा ज्ञान रत्नांचे दान करणारे महादानी भव
बुद्धी सर्व
कर्मेंद्रियां मध्ये शिरोमणी गायली आहे.जे विशाल बुद्धी आहेत अर्थात ज्यांची बुद्धी
समजदार आहे त्यांचे मस्तक सदैव चमकत राहते कारण की बुद्धी रूपी तिजोरीमध्ये सर्व
ज्ञान भरलेले आहे.ते आपल्या बुद्धी रुपी तिजोरीतून ज्ञान रत्नांचे दान करून महादानी
बनतात.तुम्ही बुद्धीला सदैव ज्ञानाचे भोजन देत राहा,बुद्धी जर ज्ञान बळाने भरपूर
असेल तर प्रकृतीला ही योगबळाने ठीक करून घेते. सर्वोत्तम बुद्धी वाले संपूर्ण
ज्ञानाने सर्वोत्तम कमाई करून वैकुंठाची बादशाही प्राप्त करतात.
बोधवाक्य:-
शक्तीस्वरूप
स्थितीचा अनुभव करायचा असेल तर संकल्पांच्या गतीला कमी करा.