25-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत बाबांची आठवण करायची आहे,आठवणीनेच आयुष्य वाढेल,आठवणच शिक्षणाचा सार आहे"

प्रश्न:-
तुम्हा मुलांचे अतींद्रिय सुखाचे गायन का आहे ?

उत्तर:-
कारण की तुम्ही सदैव बाबांच्या आठवणी मध्ये खुशी साजरी करता,आता तुमचा सदैव ख्रिसमस आहे.तुम्हाला ईश्वर शिकवत आहे,यापेक्षा मोठी खुशी आणखी काय असेल,ही तुमची रोजची खुशी आहे म्हणूनच अतींद्रिय सुखाचे गायन आहे.

गीत:-
नयन हीन को राह दिखाओ प्रभू.....

ओम शांती।
ज्ञानाचा तिसरा नेत्र देणारा आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहेत.ज्ञानाचा तिसरा नेत्र बाबां शिवाय कोणीही देऊ शकत नाही.तर आता मुलांना ज्ञानाचा नेत्र मिळाला आहे.आता बाबांनी समजावले आहे भक्ती मार्ग आहे अंधाराचा मार्ग.ज्याप्रमाणे रात्री प्रकाश नसल्यामुळे मनुष्य धक्के खातात.ब्रह्माची रात्र,ब्रह्माचा दिवस असे गायनही आहे.सतयुगामध्ये असे नाही म्हणत कि आम्हाला रस्ता दाखव कारण की आता तुम्हाला रस्ता मिळाला आहे.बाबा येऊन मुक्तिधाम आणि जीवन मुक्तिधाम चा रस्ता सांगत आहेत.आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात. आता जाणत आहात की थोडा वेळ शिल्लक आहे,दुनिया तर बदलणार आहे.असे गीतही बनले आहे दुनिया बदलणार आहे..... परंतु मनुष्य बिचारे जाणत नाही की दुनिया कधी बदलणार आहे, कशी बदलणार आहे,कोण बदलणार आहे कारण की ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही.आता तुम्हा मुलांना हा तिसरा नेत्र मिळाला आहे, ज्याद्वारे तुम्ही या सृष्टी चक्राच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे. आणि हीच तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाची सैक्रीन(साखरेऐवजी वापरला जाणारा गोड पदार्थ) आहे.ज्याप्रमाणे थोडीशी सैक्रीन खूप गोड असते तसेच हे ज्ञानाचे दोन अक्षर ' मनमनाभव....' ही सर्वात गोड वस्तू आहे,बस बाबांची आठवण करा.

बाबा येतात आणि येऊन रस्ता सांगतात.कोणता रस्ता सांगतात? शांतीधाम आणि सुखधामचा.तर मुलांना खुशी होते.दुनियेला हे माहीत नाही की खुशी केव्हा साजरी केली जाते?खुशी तर नव्या दुनियेमध्ये साजरी केली केली जाईल ना.ही तर बिलकुल साधारण गोष्ट आहे की जुन्या दुनियेमध्ये खुशी कुठून येणार? जुन्या दुनियेमध्ये तर मनुष्य त्राहि-त्राहि करत आहेत कारण की तमोप्रधान आहेत.तमोप्रधान दुनियेमध्ये खुशी कुठून येणार? सतयुगाचे ज्ञान तर कोणालाही माहीत नाही,म्हणून बिचारे इथे खुशी साजरी करतात.पहा, ख्रिसमस ची खुशी किती साजरी करतात.बाबा म्हणतात खुशी ची गोष्ट कोणाला विचारायची असेल तर गोप-गोपींना(माझ्या मुलांना) विचारा कारण की बाबा खूप सहज रस्ता सांगत आहेत.गृहस्थ व्यवहारांमध्ये राहात असताना, आपला कामधंदा करत असताना कमळाच्या फुला समान रहा आणि माझी आठवण करा. ज्याप्रमाणे आशिक-माशुक असतात ना,तेसुद्धा काम धंदा करत असताना एक दुसऱ्याची आठवण करत राहतात.त्यांना साक्षात्कारही होतात ज्याप्रमाणे लैला-मजनू,हिरा-रांझा,ते विकारासाठी एक दुसऱ्याचे आशिक होत नाहीत.परंतु इथे ती गोष्ट नाही.इथे तर तुम्ही जन्मजन्मांतर त्या माशूकचे आशिक बनून राहिले आहात.तो माशुक तुमचा आशिक नाही. तुम्ही त्याला इथे येण्यासाठी बोलावता,हे भगवान येऊन अंधांना मार्ग दाखव.तुम्ही अर्ध्याकल्पा पासून बोलावले आहे.जेव्हा दुःख वाढते तेव्हा जास्त बोलावतात.जास्त दुःखामध्ये जास्त आठवण करणारेही असतात.पहा,आता किती आठवण करणारे भरपूर आहेत.गायनही आहे- दुःख में सिमरण सब करे....जेवढा उशीर होत जाईल तेवढे तमोप्रधान जास्ती होत जातात.तर तुम्ही चढत आहात आणि ते अजूनच उतरत आहेत कारण की जोपर्यंत विनाश होत नाही तोपर्यंत तमोप्रधानता वाढतच राहते.दिवसेंदिवस माया सुद्धा तमोप्रधान,वृद्धि प्राप्त करत आहे.यावेळी बाबासुद्धा सर्वशक्तिमान आहेत,तर यावेळी माया सुद्धा सर्वशक्तिमान आहे.तीसुद्धा जबरदस्त आहे.

तुम्ही मुले यावेळी ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभूषण आहात.तुमचे सर्वोत्तम कूळ आहे, याला उच्च ते उच्च कुळ असे म्हटले जाते.यावेळी तुमचे हे जीवन अमूल्य आहे म्हणूनच या जीवनाचा(शरीराचा) संभाळ करायचा आहे कारण की पाच विकारांमुळे शरीराचे आयुष्य ही कमी होत आहे.तर बाबा म्हणतात या वेळी पाच विकारांना सोडून योगामध्ये रहा तर आयुष्य वाढत राहील.आयुष्य वाढत- वाढत भविष्यामध्ये तुमचे आयुष्य १५० वर्षाचे होईल.आता नाही म्हणूनच बाबा म्हणतात की या शरीरालाही खूप सांभाळायचे आहे.नाहीतर म्हणतात हे शरीर काही कामाचे नाही,मातीचा पुतळा आहे.आता तुम्हा मुलांना समज मिळाली आहे की जोपर्यंत जगायचं आहे बाबांची आठवण करायची आहे.आत्मा बाबांची आठवण वारसा मिळवण्यासाठी करते का?.बाबा म्हणतात तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा आणि दैवी गुण धारण करा तर तुम्ही नंतर असे बनाल.तर मुलांनी चांगल्याप्रकारे शिकले पाहिजे. शिकत असताना आळस इ. यायला नको नाहीतर नापास व्हाल.खूप कमी पद मिळेल. शिक्षणामध्ये मुख्य गोष्ट ज्याला सार म्हणतात ती म्हणजे बाबांची आठवण करा.जेव्हा प्रदर्शनीमध्ये किंवा सेंटरवर कुणीही येतात तर त्यांना प्रथम हे समजावून सांगा की बाबांची आठवण करा कारण की तो उच्च ते उच्च आहे.तर जो उच्च ते उच्च आहे त्याची आठवण करायची आहे त्यापेक्षा जो कमी आहे त्याची आठवण थोडीच केली पाहिजे.म्हणतात उच्च ते उच्च भगवान.भगवानच नव्या दुनियेची स्थापना करणारा आहे.पहा,बाबासुद्धा म्हणतात नव्या दुनियेची स्थापना मी करतो म्हणूनच तुम्ही माझी आठवण करा तर तुमचे पाप नष्ट होतील. तर हे पक्के आठवणीत ठेवा कारण की बाबा पतित-पावन आहे ना.ते हेच म्हणतात की जेव्हा कि तुम्ही मला पतित-पावन असे म्हणतात तर तुम्ही तमोप्रधान आहात,खूप पतित आहात,आता तुम्ही पावन बना.

बाबा येऊन मुलांना समजावतात की तुमचे आता सुखाचे दिवस येणार आहेत,दुःखाचे दिवस पूर्ण झाले आहेत,बोलावता ही-हे दुःखहर्ता,सुखदाता.तर जाणत आहात ना की बरोबर सतयुगामध्ये सर्व सुखी आहेत. तर बाबा मुलांना म्हणतात की सर्व शांतीधाम आणि सुखधाम ची आठवण करत राहा.हे संगमयुग आहे,नावाडी तुम्हाला पलीकडे घेऊन जात आहे.बाकी इथे नावाडी किंवा नावेची गोष्ट नाही. ही तर महिमा आहे की माझी नौका पार कर.आता एकाची नाव तर पार लावायची नाही ना. साऱ्या दुनियेच्या नावेला पलीकडे न्यायचे आहे.ही सारी दुनिया जसे की एक खूप मोठे जहाज आहे याला पार लावतात.तर तुम्ही मुलांनी खूप खुशी साजरी करायला पाहिजे कारण की तुमच्यासाठी सदैव खुशी आहे,सदैव ख्रिसमस आहे. जेव्हापासून तुम्हा मुलांना बाबा भेटले आहेत तुमचा ख्रिसमस सदैव आहे म्हणूनच अतींद्रिय सुखाचे गायन आहे.पहा,हे सदैव खुश राहतात,का?अरे बेहद चा बाबा मिळाला आहे!तेआम्हाला शिकवत आहेत,तर ही रोज खुशी व्हायला पाहिजे ना.बेहदचा पिता शिकवत आहे, वाह!कधी कोणी ऐकले?गीतेमध्ये ही भगवानुवाच आहे की मी तुम्हाला राजयोग शिकवत आहे, ज्याप्रमाणे ते लोक बॅरीस्टर योग, सर्जन योग शिकवतात मी तुम्हा आत्मिक मुलांना राजयोग शिकवत आहे.तुम्ही इथे येता बरोबर राजयोग शिकण्यासाठी, यामध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही.तर राजयोग शिकून पूर्ण करायला पाहिजे ना.निघून जायला नको.शिकायचे ही आहे आणि धारणा ही चांगली करायची आहे.शिक्षक धारण करण्यासाठी शिकवत आहेत.

प्रत्येकाची आपापली बुद्धी असते-कोणाची उत्तम,कोणाची मध्यम,कोणाची कनिष्ठ.तर स्वतःला विचारायला पाहिजे की मी उत्तम आहे,मध्यम आहे का कनिष्ठ आहे?स्वतःला पारखले पाहिजे की मी अशी उच्च ते उच्च परीक्षा पास करून उंच पद प्राप्त करण्यालायक आहे का?मी सेवा करतो का?बाबा म्हणतात- मुलांनो,सेवा करा,बाबांचे अनुकरण करा कारण की मी सुद्धा सेवा करतो ना.सेवा करण्यासाठीच आलो आहे आणि रोज-रोज सेवा करतो कारण की रथ घेतला आहे ना.रथही मजबूत,चांगला आहे आणि सेवा तर यांची सदैव आहे.बापदादा तर यांच्या रथामध्ये सदैव आहे.भले यांचे शरीर आजारी पडते,मी तर बसलो आहे ना.मी यांच्या आत मध्ये बसून लिहितो,जर हे मुखांनी बोलू शकत नसतील तर मी लिहू शकतो.मुरली मिस होत नाही. जोपर्यंत बसू शकतो,लिहू शकतो, तर मी मुरली वाजवितो(चालवतो) मुलांना लिहूनही पाठवून देतो कारण की सेवेवर तत्पर आहे ना.तर बाबा येऊन समजावतात की, तुम्ही स्वतःला आत्मा समजून निश्चय बुद्धी होऊन सेवा करा.बाबांची सेवा,सदैव ईश्वरीय सेवेमध्ये तत्पर राहा,ज्याप्रमाणे ते असे लिहितात की मी महाराजाचा सेवाधारी आहे.तर तुम्ही काय म्हणाल?ही तर महाराजा पेक्षाही उच्च सेवा आहे कारण की तुम्हाला महाराजा बनवत आहेत. हेही तुम्ही समजू शकता की बरोबर आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत.

तुम्हा मुलांमध्ये जे चांगल्याप्रकारे पुरूषार्थ करतात त्यांनाच महावीर असे म्हटले जाते.तर हे तपासून पाहायला पाहिजे की कोण महावीर आहे जो बाबांच्या दिशानिर्देशावर चालत राहतो. बाबा समजावतात की मुलांनो स्वतःला आत्मा समजा, भाऊ-भाऊ पहा.बाबा स्वतःला भावांचा पिता समजतात आणि भावांनाच बघतात.सर्वांना तर पाहणार नाहीत.हे ज्ञान तर आहे की शरीरा शिवाय तर कोणी ऐकू शकत नाही,बोलू शकत नाही. तुम्ही तर जाणता ना की मी सुद्धा या शरीरामध्ये आलो आहे.मी हे शरीर कर्जाऊ(लोन)घेतले आहे. शरीर तर सर्वांना आहे,शरीरा सोबतच आत्मा इथे शिकत आहे. तर आता आत्म्यांना समजायला पाहिजे की बाबा आम्हाला शिकवत आहेत.बाबांची बैठक कुठे आहे?अकाल तख्तावर. बाबांनी समजावले आहे की प्रत्येक आत्मा अकाल मूर्त आहे,तीचा कधीही विनाश होत नाही,कधीही जळत,कापत,बुडत नाही.लहान-मोठी होत नाही. शरीर लहान-मोठे होते.तर दुनियेमध्ये जेवढे मनुष्य आहेत त्यांच्या मध्ये जे आत्मे आहेत त्यांचा तख्त ही भ्रकुटी आहे. शरीर भिन्न-भिन्न आहे.कोणाचे अकाल तख्त पुरुषाचे,कोणाचे स्त्रीचे,कोणाचे मुलाचे.तर जेव्हा पण कोणाशी बोलत असता तर हे समजा की मी आत्मा आहे, आपल्या भावासोबत बोलत आहे.बाबांचा संदेश देत आहे की शिवबाबांची आठवण करा तर हा जो गंज लागला आहे तो निघून जाईल.ज्याप्रमाणे सोन्यामध्ये भेसळ पडल्यानंतर त्याची किंमत कमी होते तर तुमची सुद्धा किंमत कमी झालेली आहे.आता एकदमच किंमत कमी झाली आहे.याला दिवाळं ही म्हटलं जातं.भारत किती धनवान होता,आता कर्ज घेत आहे. विनाशा मध्ये तर सर्वांचा पैसा नष्ट होऊन जाईल.देणारे,घेणारे सर्व नष्ट होऊन जातील बाकी जे अविनाशी ज्ञान रत्न घेणारे आहेत ते नंतर येऊन आपले भाग्य घेतील.अच्छा!

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. बाबांचे अनुकरण करून बाबांच्या समान सेवाधारी बनायचे आहे.स्वतःच स्वतःला पारखायचे आहे कि मी उच्च ते उच्च परीक्षा पास करून उच्च पद प्राप्त करण्यालायक आहे का?

2. बाबांच्या दिशानिर्देशावर चालून महावीर बनायचे आहे,ज्याप्रमाणे बाबा आत्म्यांना पाहतात, आत्म्यांना शिकवतात,असे आत्मा भाऊ-भाऊ पाहून बोलायचे आहे.

वरदान:-
तनाची तंदुरुस्ती, मनाची खुशी आणि धनाच्या समृद्धी द्वारे श्रेष्ठ भाग्यवान भव

संगमयुगावर सदैव स्व मध्ये स्थित राहिल्याने तनाचा कर्मभोग सुळा पासून काटा होऊन जातो,तनाचा रोग योगा मध्ये परिवर्तन करता म्हणून सदैव स्वस्थ आहात.मनमनाभव असल्यामुळे खुशी च्या खाणीने सदैव संपन्न आहात म्हणूनच मनाची खुशी ही प्राप्त आहे आणि ज्ञान धन, सर्व धना पेक्षा श्रेष्ठ आहे.ज्ञान धन वाल्यांची प्रकृति स्वतः दासी बनते आणि सर्व संबंध ही एका सोबत आहेत,संपर्क ही होली हंसासोबत आहेत....म्हणून श्रेष्ठ भाग्यवान चे वरदान स्वतः प्राप्त आहे.

बोधवाक्य:-
आठवण आणि सेवा दोन्हीचे संतुलनच दुहेरी लॉक(कुलूप)आहे.