09-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,जे संकल्प ईश्वरीय सेवार्थ चालतात,त्याला शुद्ध संकल्प किंवा निरसंकल्पच म्हणाल, व्यर्थ नाही."

प्रश्न:-
विकर्मा पासून वाचण्यासाठी कोणते कर्तव्य पालन करण्यामध्ये अनासक्त रहा?

उत्तर:-
मित्र संबंधीची सेवा जरूर करा परंतु अलौकिक ईश्वरीय दृष्टी ठेवून करा,त्यामध्ये मोहाची रग जायला नको.जर कोणत्या विकारी संबंधा मुळे संकल्प चालतात, तर ते विकर्म बनतात म्हणून अनासक्त होऊन कर्तव्यपालन करा.जेवढे शक्य होईल देही अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करा.

ओम शांती।
आज तुम्हा मुलांना संकल्प, विकल्प,निरसंकल्प किंवा कर्म, अकर्म, विकर्मा वरती समजावले जाते.जोपर्यंत तुम्ही इथे आहात, तोपर्यंत तुमचे संकल्प जरूर चालतील.संकल्प केल्याशिवाय कोणताही मनुष्य एक क्षण पण राहू शकत नाही.आता हे संकल्प येथे पण चालतील,सतयुगा मध्ये पण चालतील आणि अज्ञान काळामध्ये पण चालत होते परंतु ज्ञानामध्ये आल्यामुळे संकल्प, संकल्प नाहीत कारण तुम्ही परमात्माच्या सेवा अर्थ निमित्त बनले आहात,जे यज्ञासाठी संकल्प चालतात,ते संकल्प नाहीत तर ते निरसंकल्पच आहेत.बाकी जे फालतू संकल्प चालतात, म्हणजे कलियुगी संसार आणि कलियुगी मित्र संबंधीच्या प्रति चालतात,त्यांना विकल्प म्हटले जाते,ज्याद्वारे विकर्म बनतात आणि विकर्मा मुळे दुःख होते.बाकी जे यज्ञाप्रति किंवा ईश्वरीय सेवा प्रति चालतात,ते तर निरसंकल्प झाले. शुद्ध संकल्प खुशाल चालवा. बाबा तुम्हा मुलांना सांभाळण्यासाठी,येथे बसले आहेत. मुलांची सेवा करण्यासाठी त्यांचे संकल्प जरूर चालतात परंतु हे संकल्प, संकल्प नाहीत, याद्वारे विकर्म बनत नाहीत.परंतु जर कोणत्या विकारी संबंधा मुळे संकल्प चालतात, तर त्यांचे विकर्म आवश्य बनतात.

बाबा तुम्हा मुलांना म्हणतात,मित्र संबंधीची सेवा खुशाल करा परंतु अलौकिक ईश्वरीय दृष्टी द्वारे, त्यामध्ये मोहाची रग जायला नको,अनासक्त होऊन आपले कर्तव्य पालन करायला पाहिजे. परंतु जे कोणी येथे असून पण कर्म संबंध मध्ये राहून,त्यांना नष्ट करत नाहीत,तरीही त्यांना परमात्माला सोडायला नाही पाहिजे.हात पकडलेला राहील,तर काही ना काही पद प्राप्त करतील.आता हे तर प्रत्येक स्वतःला जाणतात की, माझ्या मध्ये कोणते विकार आहेत. जर कोणामध्ये एक पण विकार असेल तर, तो जरूर देह अभिमानी झाला, ज्यामध्ये विकार नाहीत देही अभिमानी झाले.कोणा मध्ये कोणते विकार आहेत तर,ते जरूर सजा खातील आणि जे विकार रहित आहेत,ते सजा पासून मुक्त होतील. जसे पहा, ज्या मुलांच्या मध्ये ना काम विकार आहे,ना क्रोध आहे,ना लोभ आहे,ना मोह आहे,ते सेवा खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. आता त्यांची खूप ज्ञान विज्ञानमय अवस्था आहे.तर तुम्ही सर्वपण त्यांची प्रशंसा कराल.आता जसे मी जाणतो,तसेच तुम्ही मुलं पण जाणतात.चांगल्या मुलांना सर्व चांगलेच म्हणतील, ज्यांच्यामध्ये काही अवगुण आहेत,त्यांची प्रशंसा करणार नाहीत.आत्ता हा निश्चय करायचा आहे,ज्यांच्या मध्ये कोणते विकार आहेत,ते सेवा करू शकत नाहीत. जे विकारापासून दूर आहेत, ते सेवा करून,आपल्यासारखे बनवू शकतात,म्हणून विकाराला पूर्ण पणे जिंकायला पाहिजे,विकल्पाला पूर्ण जिंकायचे आहे. ईश्वर अर्थ संकल्पाला निरसंकल्प ठेवता येईल. वास्तव मध्ये निरसंकल्पकता त्यालाच म्हटले जाते, जे संकल्पच चालणार नाहीत.दु:ख सुखापेक्षा अनासक्त व्हावे.ती अवस्था तर, जेव्हा तुम्ही सर्व कर्मभोग चुक्तू करून चालले जाल,तेथे दुःख सुखापेक्षा वेगळ्या अवस्थांमध्ये, तेव्हा कोणते संकल्प चालणार नाहीत.त्या वेळेत कर्म, अकर्म दोघांपेक्षा वेगळ्या अवस्था मध्ये राहतात.

येथे तुमचे संकल्प जरूर चालतील कारण तुम्ही सर्व दुनियेला शुद्ध बनवण्यासाठी निमित्त बनलेले आहात.त्यासाठी तुमचे शुद्ध संकल्प जरूर चालतील.सतयुगा मध्ये शुद्ध संकल्प चालवल्यामुळे संकल्प,संकल्प नाहीत,कर्म करत पण कर्मबंधन बनत नाहीत, समजले.आता कर्म,अकर्म आणि विकर्मची गती तर परमात्माच समजावू शकतात,तेच विकर्मा पासून सोडवणारे आहेत.जे या संगमयुगामध्ये तुम्हाला शिकवत आहेत,म्हणून मुलांनो खूप सावध राहा.आपला हिशोब पाहत राहा. तुम्ही इथे आले आहात,कर्मभोग चुक्तू करण्यासाठी. असे तर नाही, येथे येऊन हिशोब बनवत राहा तर त्याची सजा खावी लागेल.ही गर्भ जेलची सजा पण काय कमी नाही. यामुळे खूप पुरुषार्थ करायचा आहे. लक्ष खूप श्रेष्ठ आहे,म्हणून सावध होऊन राहयचे आहे.विकल्पला जिंकायचे जरूर आहे.आता तुम्ही विकल्पावरती किती प्रमाणात विजयी बनले आहात,किती प्रमाणात निरसंकल्प म्हणजे दुःख सुखा पासून वेगळ्या अवस्थेमध्ये राहतात.हे तुम्ही स्वतःला जाणत राहा.जे स्वत:ला समजू शकत नाहीत,ते मम्मा बाबांना विचारू शकतात कारण तुम्ही तर त्यांचे वारस आहात,तर ते सांगू शकतात. निरसंकल्प अवस्थांमध्ये राहिल्यामुळे तुम्ही स्वतःला तर काय, कोणत्याही विकारी च्या विकर्माला नष्ट करू शकता. कोणतेही कामी पुरुष तुमच्या समोर येतील,त्यांचे विकारी संकल्प चालणार नाहीत.जसे कोणी देवतांच्या जवळ जातात,तर त्यांच्यासमोर शांत होतात.तसेच तुम्ही पण गुप्त रूपामध्ये देवता आहात, तुमच्या पुढे कोणतेही विकारी संकल्प चालू शकत नाहीत. परंतु असे खूप कामी पुरुष आहेत, ज्यांचे काही संकल्प चालले तरी, त्याचा आघात करू शकणार नाही, जर तुम्ही योगयुक्त उभे राहाल तर. तुम्ही मुलं येथे आले आहात, परमात्म्याला विकाराची आहुती देण्यासाठी,परंतु कोणी कोणी आता पण कायदेशीर आहूती दिली नाही. त्यांचा योग परमपिता सोबत जोडलेला नाही.सर्व दिवस बुद्धीयोग भटकत राहतो,म्हणजेच देही अभिमानी बनले नाहीत.देह अभीमाना मुळे कोणाच्या भाव- स्वभावा मध्ये येतात,त्यामुळे परमात्मा सोबत प्रेम जोडले जाऊ शकत नाही,म्हणजे परमात्मा अर्थ सेवा करण्याचे अधिकारी बनू शकत नाहीत.तर परमात्मा कडून सेवा घेऊन,परत सेवा करत आहेत, म्हणजेच पतितांना पावन करत आहेत,तेच माझी खरे,पक्के मुलं आहेत,त्यांना खूप श्रेष्ठ पद मिळते. आता परमात्मा स्वतःहून येऊन तुमचे पिता बनले आहेत.त्या पित्याला साधारण रुपामध्ये जाणून कोणत्या प्रकारचे संकल्प उत्पन्न करणे, म्हणजेच विनाशाला प्राप्त होणे आहे.आता ती वेळ येईल,जे १०८ ज्ञानगंगा पूर्ण अवस्थेला प्राप्त करतील.बाकी जे शिकलेले नाहीत, ते तर आपलीच बरबादी करतील.हा निश्चय करायला पाहिजे,जे कोणी ईश्वरीय यज्ञामध्ये लपून काम करतात,तर त्यांना जानीजाननहार बाबा पाहतात, परत ते आपल्या साकार स्वरूप बाबांना जाणीव करवतात,सावधानी देण्यासाठी.तर कोणती गोष्ट लपवायला नाही पाहिजे.जरी चूक होते परंतु त्यांना सांगितल्यामुळे पुढच्या साठी मुलांना सावधान करतील.मुलांनी प्रथम स्वतःला समजावयाला पाहिजे की,मी कोण आहे?मी शरीराला म्हणत नाहीत, मी तर आत्म्याला म्हणतात.मी आत्मा कोठून आलो आहे?कोणाची संतान आहे? आत्म्याला जेव्हा हे माहीत होईल की, मी आत्मा परमपिता परमात्मा ची संतान आहे,तेव्हा आपल्या पित्याची आठवण करण्यामध्ये आनंद होईल.मुलांना आनंद तेव्हाच येतो,जेव्हा पित्याच्या कर्तव्याला जाणतात.जोपर्यंत लहान आहेत, वडिलांच्या कर्तव्याला जाणत नाहीत, तो पर्यंत एवढा आनंद राहत नाही.जसे मोठे होतात,वडिलांच्या कर्तव्याची माहिती होते,तर तो नशा, ती खुशी, तो आनंद वाढत जातो.तर प्रथम त्यांच्या कर्तव्याला जाणायला पाहिजे की, आमचे पिता कोण आहेत? ते कुठे राहतात? जर कोणी म्हणतील,आत्मा त्यांच्यामध्ये विलीन होतो, तर आत्मा विनाशी होईल,तर आनंद कोणाला मिळेल. तुमच्या जवळ जिज्ञासू येतात,तर त्यांना विचारायला पाहिजे, तुम्ही येथे काय शिकतात? याद्वारे कोणते पद मिळेल?त्या कॉलेजमध्ये शिकणारे सांगतात की, आम्ही डॉक्टर बनत आहोत, अभियंता बनत आहोत, तर त्यांच्यावरती विश्वास करतात ना, ते बरोबर शिकत आहेत.येथे पण विद्यार्थी सांगतात की, ही दुःखाची दुनिया आहे,ज्याला नर्क किंवा आसुरी दुनिया म्हटले जाते‌.त्यांच्या विरोधात हेवन किंवा दैवी दुनिया,ज्याला स्वर्ग म्हटले जाते.हे तर सर्वजण जाणतात,समजू शकतात की, हा स्वर्ग नाही, हा तर नरक आहे किंवा दुःखाची दुनिया आहे, पाप आत्म्याची दुनिया आहे, तेव्हा तर त्याला बोलवतात की, आम्हाला पुण्यांच्या दुनिया मध्ये घेऊन चला. तर हे मुलं जे शिकत आहेत,ते जाणतात की आम्हाला बाबा, त्या पुण्यांच्या दुनिया मध्ये घेऊन जात आहेत.तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना, मुलांनी विचारायला पाहिजे,त्यांना शिकवायला पाहिजे. ते आपल्या शिक्षक किंवा पित्याचे कर्तव्य सांगू शकतात.पिता थोडेच आपले महिमा स्वतः करतील, शिक्षक आपली महिमा स्वतःच करतील काय? ते तर विद्यार्थी ऐकवतील की, शिक्षक कसे आहेत? तेव्हा तर म्हणतात, विद्यार्थी शिक्षकाला प्रसिद्ध करतात. तुम्ही मुलं तर इतका कोर्स शिकून आलेले आहात, तुमचे काम आहे, नवीन मुलांना समजवणे.बाकी शिक्षक जे बी.ए.,एम.ए. शिकले आहेत,ते विद्यार्थ्यांना ए,बी,सी,डी थोडेच शिकवतील? कोण कोणते विद्यार्थी चांगले हुशार असतात,तर ते दुसऱ्यांना पण शिकवतात.त्यामध्ये माता गुरु तर प्रसिद्ध आहेत.ही दैवी धर्माची प्रथम माता,ज्याला जगदंबा म्हणतात. माताची खूप महिमा आहे. बंगालमध्ये काली, दुर्गा,सरस्वती आणि लक्ष्मी या चार देवींची खूप पूजा करतात.आता त्याच्या कर्तव्याची माहिती व्हायला पाहिजे. जसे लक्ष्मी आहे, तर ती धनाची देवी आहे.ती तर येथे राज्य करून गेली आहे‌‌. बाकी काली दुर्गा इत्यादी याच्यांच वरती नावं पडलेली आहेत‌. जर चार माता आहेत, तर त्यांचे चार पती पण असायला हवेत. आता लक्ष्मीचे पती नारायण तर प्रसिद्ध आहेत.कालीचे पती कोण आहेत?(शंकर) परंतु शंकराला पार्वती चे पती दाखवतात.पार्वती काही काळी नाही.अनेक जण कालीची पूजा करतात,माताची आठवण करतात, परंतु पित्याची माहिती नाही. कालीमातेचा एकतर पती असायला हवा किंवा पिता असायला हवेत, परंतु हे कोणालाच माहीत नाही. तुम्हाला समजावयाचे आहे की, दुनिया तर एकच आहे,जी कधी दुःखाची दुनिया किंवा नर्क बनते,तीच सतयुगा मध्ये स्वर्ग बनते. लक्ष्मी नारायण पण या सृष्टीवर सतयुगाच्या वेळेत राज्य करत होते. बाकी सूक्ष्म मध्ये तर कोणते वैकुंठ नाही,जेथे सूक्ष्म लक्ष्मी‌‌ नारायण आहेत.त्यांचे चित्र येथेच आहेत, तर जरूर राज्य करून गेले आहेत. खेळ सर्व या साकारी दुनिया मध्ये चालतो, इतिहास भूगोल या साकारी दुनिये मध्येच आहे.सूक्ष्मवतन मध्ये काही इतिहास भूगोल होत नाही.परंतु सर्व गोष्टींना सोडून तुम्ही नवीन जिज्ञासूला, विद्यार्थ्यांना प्रथम ईश्वर कोण आहेत,नंतर बादशाही कशी मिळते,हे समजून सांगायचे आहे.अल्फ म्हणजे ईश्वर,तेच सर्वोच्च आहेत.जो पर्यंत हे समजले नाही, तोपर्यंत तुम्ही पूर्ण परमात्मा प्रति प्रेम होऊ शकत नाही,तोपर्यंत तो आनंद मिळत नाही,कारण प्रथम जेव्हा पित्याला जाणतील,तेव्हा त्यांच्या कर्तव्याला जाणून आनंदित होतील.तर प्रथम गोष्ट परमात्म्याला समजल्यामुळे आनंद मिळेल.ईश्वर तर सच्चिदानंद स्वरूप आहेत, आम्हा मुलांना तो आनंद का राहत नाही? ती गुदगुदी का होत नाहीत? मी ईश्वराचा मुलगा आहे,मी नेहमी आनंदी, मास्टर ईश्वर आहे.ती खुशी होत नाही, तर सिद्ध आहे,स्वता:ला ईश्वराचा मुलगा समजत नाहीत. ईश्वर तर नेहमीच आनंदी आहेत परंतु मी आनंदी नाही, कारण की पित्याला जाणत नाहीत, गोष्ट तर खूप सहज आहे. कोणा कोणाला हे ज्ञान ऐकण्याच्या ऐवजी,शांती चांगली वाटते, कारण अनेक आहेत जे ज्ञान घेऊ शकत नाहीत.इतका वेळ कुठे आहे? बस ईश्वराला जाणून शांती मध्ये राहणे,हे पण चांगले आहे.जसे सन्याशी डोंगराच्या गुफे मध्ये जाऊन परमात्म्याच्या आठवणी मध्ये बसतात.तसेच परमपिता परमात्म्याच्या, त्या सर्वोच्च प्रकाशाच्या आठवणीमध्ये राहणे, हे पण चांगले आहे.त्यांच्या आठवणी द्वारे संन्यासी पण निर्विकारी बनू शकतात.परंतु घरी बसुन आठवण करू शकत नाहीत.तेथे तर मुलांबाळा मध्ये मोह जात राहतो, म्हणून संन्यास करतात.पवित्र बनतात तर त्यामध्ये सुख तर आहे ना.सन्याशी सर्वात चांगले आहेत. आदी देव पण संन्यासी बनले ना.हे समोर आदी देवाचे मंदिर आहे, तेथे तपस्या करत आहेत‌‌.गीतेमध्ये पण म्हणतात,देहाच्या सर्व धर्माचा संन्यास करा.ते संन्यास करतात तर महात्मा बनतात.गृहस्थीला महात्मा म्हणने बेकायदेशीर आहे. तुम्हाला तर परमात्मने येऊन संन्यास करवला आहे. सुखासाठीच संन्यास करतात. महात्मा कधी दुखी होत नाहीत.राजेपण संन्यास करतात, तेव्हा ताज इत्यादी काढून टाकतात. जसे गोपीचंद राजाने सन्यास केला, तर जरूर त्यामध्ये सुख आहे अच्छा.

गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) कोणतेही उल्टे कर्म,लपुन करायचे नाही.बापदादा पासून कोणती गोष्ट लपवायची नाही. खूप खूप सावधान राहायचे आहे.

(२) विद्यार्थी शिक्षकांना प्रसिद्ध करतात,जे शिकले आहात, ते दुसऱ्यांना शिकवायचे आहे. सतचितानंद ईश्वराची मुलं आहात, या स्मृतीद्वारे खुषी मध्ये राहायचे आहे.

वरदान:-
प्रत्येक आत्म्याला श्रेष्ठ बनवण्याच्या भावना द्वारे, आदर देणारे शुभचिंतक भव.

प्रत्येक आत्म्याच्या प्रती श्रेष्ठ भावना म्हणजेच श्रेष्ठ बनवण्याची किंवा पुढे घेऊन जाण्याची भावना ठेवणे, म्हणजे शुभचिंतक बनणे. आपल्या शुभ वृत्ती द्वारे, शुभचिंतक स्थिती द्वारे, दुसऱ्याच्या अवगुणाला पण परिवर्तन करणे, कोणाची कमजोरी किंवा अवगुणाला आपली कमजोरी समजून वर्णन करण्याच्या ऐवजी, पसरवण्याच्या ऐवजी, सामवणे आणि परिवर्तन करणे म्हणजेच आदर देणे आहे. मोठ्या गोष्टीला लहान बनवणे,कमजोरला शक्तिवान बनवणे, त्याच्या संगतीच्च्या रंगांमध्ये न येणे,नेहमी त्यांना उमंग उत्साहामध्ये घेऊन येणे,हेच आदर देणे आहे.असे आदर देणारे शुभचिंतक आहेत.

बोधवाक्य:-
त्यागाचे भाग्य नष्ट करणारा, जुना स्वभाव संस्कारच आहे, यामुळेच यांचा पण त्याग करा.