23-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, ही पतीत दुनिया एक जुने गांव आहे, हे तुमच्या राहण्या लायक नाही, तुम्हाला आता नवीन पावन दुनिये मध्ये जायचे आहे."

प्रश्न:-
बाबा आपल्या मुलांच्या प्रगती साठी कोणती एक युक्ती सांगत आहेत?

उत्तर:-
मुलांनो, तुम्ही आज्ञाकारी बनून बापदादाच्या मता वर चालत राहा. बापदादा दोन्ही एकत्र आहेत, त्यामुळे जरी यांच्या सांगण्या नुसार कांही नुकसान झाले, तरीपण जबाबदार बाबा आहेत, सर्व काही ठीक होईल. तुम्ही स्वतःचे मत चालवू नका, शिवबाबांचे मत समजून चालत राहा, तर खूफ प्रगती होईल.

ओम शांती।
पहिल्या प्रथम मुख्य गोष्ट आत्मिक मुलांना आत्मिक पिता समजावत आहेत कि, स्वतःला आत्मा निश्चय करून बसा आणि बाबाची आठवण करा, तर तुमचे सर्व दुःख दूर होतील. ते लोक आशीर्वाद करतात ना. हे बाबा पण म्हणतात कि, मुलांनो, तुमचे सर्व दुःख दूर होतील. फक्त स्वतःला आत्मा समजून बाबाची आठवण करा. हे तर फारच सहज आहे. हा भारताचा प्राचीन सहज राजयोग आहे. प्राचीन ची पण वेळ असली पाहिजे ना.फार फार म्हणजे तरी किती? बाबा समजावतात 5000 वर्षा पूर्वी हा राजयोग शिकवला होता. हे बाबा शिवाय कोणी समजावून सांगू शकत नाही, आणि मुला शिवाय कोणी समजू ही शकत नाहीत. गायन पण आहे, आत्मे मुले आणि परमात्मा पिता फार काळ दूर राहिले आहेत. बाबा पण म्हणतात, तुम्हीं शिडी उतरत उतरत पतीत बनले आहात. आता स्मृती आली आहे. सर्व बोलवतात कि, हे पतित पावन. कलियुगा मध्ये पतीत असतात. सतयुगा मध्ये पावन असतात. ती आहेच पावन दुनिया, ही जुनी पतीत दुनिया राहण्याच्या लायकीची नाही. परंतु मायेचा प्रभाव पण कांही कमी नाही. इथे पाहा १००-१२५ मजल्याची,मोठ मोठी घरे बनवतात. याला मायाचा देखावा म्हटले जाते. मायेचा जलवा असा आहे, जर विचारले स्वर्गामध्ये येता कां,तर म्हणतात आमच्या साठी स्वर्ग तर इथेच आहे, याला मायेचा जलवा म्हटले जाते. परंतु तुम्ही मुले जाणता कि, हे तर जुने गाव आहे, याला नर्क म्हटले जाते. जुनी दुनिया पण रौरव नरक म्हटले जाते,सतयुगाला म्हटले जाते स्वर्ग. हे अक्षर तर आहेत ना. याला विकारी जग तर सर्व म्हणतात. निर्विकारी जग तर हे स्वर्ग होते. स्वर्गाला म्हटले जाते निर्विकार जग,नरकाला विकारी जग म्हटले जाते. एवढ्या पण सोप्या गोष्टी, कोणाच्या बुद्धी मध्ये कां बसत नाहीत. मनुष्य किती दु:खी आहेत. किती युद्ध, भांडण इत्यादी होत राहते. दिवसें दिवस बाम्स इत्यादी पण असे बनवितात, जे टाकल्याने मनुष्य नष्ट होऊन जातात. परंतु तुच्छ बुध्दी मनुष्य समजत नाहीत कि, आता काय होणार आहे. या गोष्टी कोणी समजावून सांगत नाहीत, शिवाय बाबाच्या काय होणार आहे? जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे आणि नवीन दुनियेची स्थापना पण गुप्त होत आहे.

तुम्हाला म्हटले जाते गुप्त योद्धे. कोणी समजत आहेत कां, कि तुम्ही युद्ध करत आहात. तुमचे युद्ध आहे पाच विकारा बरोबर. सर्वांना म्हणता कि, पवित्र बना, एका बाबा ची मुले आहात ना. प्रजापिता ब्रह्माची मुले तर सर्व भाऊ-बहीण झाले ना. समजावून सांगण्याची मोठी युक्ती पाहिजे. प्रजापिता ब्रह्माची तर अनेक मुले आहेत, एक तर नाही. नावच प्रजापिता आहे. लौकिक पित्याला कधी प्रजापिता म्हणत नाहीत. प्रजापिता ब्रह्मा आहेत, तर त्यांची सर्व मुले आपसा मध्ये भाऊ बहीण, ब्रह्माकुमार, कुमारी आहेत ना. परंतु समजत नाहीत. जसे पत्थर बुद्धी आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न पण करत नाहीत. प्रजापिता ब्रह्मा ची मुले भाऊ बहीण आहेत. विकारा मध्ये तर जाऊ शकत नाहीत. तुमच्या बोर्डवर पण प्रजापिता अक्षर फार जरुरीचे आहे. हे अक्षर तर जरूर लिहिले पाहिजे. फक्त ब्रह्मा लिहिल्याने एवढे जोरदार होत नाही. तर बोर्डवर पण बिनचूक अक्षर लिहून सुधारले पाहिजे. हे फार जरुरीचे अक्षर आहे. ब्रह्मा नाव तर स्त्रियांचे पण आहे. नावेच संपलेली आहेत, त्यामुळे पुरुषाचे नाव स्त्रीला ठेवतात. एवढी नांवे आणायची कोठून? आहे तर सर्व विश्व नाटकातील योजने नुसार. बाबाचे इमानदार, आज्ञाधारक बनणे, कांही मावशीचे घर नाही. बाप आणि दादा दोघे एकत्र आहेत ना. समजू शकत नाही, ते कोण आहेत? तेंव्हा शिवबाबा म्हणतात, माझ्या आज्ञेला पण समजू शकत नाहीत. उलटे सांगीतले किंवा सुलटे सांगीतले,तरी तुम्हीं समजा शिवबाबा सांगत आहेत, तर जबाबदार ते आहेत ना. त्यांच्या सांगण्याने कांही नुकसान झाले, तरी पण जबाबदार ते आहेत, ते सर्व ठीक करून देतील. शिवबाबाच समजवतात असे समजा तर तुमची प्रगती खूप होईल. परंतु मस्त प्रयासाने समजत आहेत. कोणी मग स्वतःच्या मतावर चालत राहतात. बाबा किती दुरून येत आहेत, तुम्हां मुलांना मत देण्यासाठी, समजावून सांगण्या साठी आणखीन कोणा जवळ तर हे अध्यात्मिक ज्ञान नाही. सर्व दिवस असे चिंतन चालले पाहिजे, काय लिहावे, ज्यामुळे मनुष्य समजतील. असे असे स्पष्ट अक्षरात लिहिले पाहिजे, ज्यावर मनुष्याची दृष्टी पडेल. तुम्हीं असे समजावून सांगा, ज्यामुळे त्यांना कोणता प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही. सांगा, बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, तर सर्व दुःख दूर होतील. जे चांगल्या रितीने आठवणी मध्ये राहतात, तेच उच्च पद प्राप्त करतील. ही तर सेकंदाची गोष्ट आहे. मनुष्य काय काय विचारत राहतात, तुम्हीं कांही पण सांगू नका. त्यांना सांगा, जास्त विचार करू नका, प्रथम एका गोष्टीवर निश्चय करा, प्रश्नाच्या जास्त जंगला मध्ये गेल्याने तर मग बाहेरचा रस्ता मिळणार नाही. जसे धुक्या मध्ये मनुष्य गोंधळून जातात, तर मग बाहेर निघू शकत नाहीत. इथे पण तसेच आहे, मनुष्य कोठे ना कोठे माये कडे निघून जातात. त्यामुळे प्रथम सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे, तुम्हीं तर आत्मा अविनाशी आहात. बाबा पण अविनाशी, पतित-पावन आहेत. तुम्हीं पतित आहात. आता एक तर घरी जायचे आहे, कां नवीन दुनिये मध्ये. अंता पर्यंत येत राहतात. जे पूर्ण शिकत नाहीत, ते तर जरुर शेवटी येतील. केवढा हिशोब आहे आणि मग शिक्षणा द्वारे पण समजू शकता, प्रथम कोण येतील? शाळेमध्ये पण निशाणी दाखवतात ना. पळत जाऊन, हात लावून यायचे आहे. प्रथम क्रमांकामध्ये येणाऱ्याला बक्षीस मिळते. ही बेहदची गोष्ट आहे. बेहदचे बक्षीस मिळत आहे. बाबा म्हणतात, आठवणीच्या यात्रेवर राहा. दैवीगुण धारण करायचे आहेत. सर्वगुणसंपन्न इथेच बनायचे आहे. त्यामुळे बाबा म्हणतात चार्ट ठेवा. आठवणी च्या यात्रेचा ठेवा, तर माहित पडेल कि, आम्ही किती फायद्यात कां नुकसानी मध्ये आहोत? परंतु मुले ठेवत नाहीत. बाबा म्हणतात, परंतु मुले करत नाहीत. फार थोडे करत आहेत, त्यामुळे माळा पण किती थोड्यांचीच आहे. आठ मोठी स्कॉलरशिप घेत आहेत, मग 108 जमे मध्ये आहेत ना. जमा करून कोण जातील? बादशहा आणि राणी. फार थोडासा फरक राहत आहे.

तर बाबा म्हणतात, पहिल्या प्रथम स्वतःला आत्मा समजा आणि बाबाची आठवण करा. ही आठवणी ची यात्रा आहे. फक्त हाच बाबाचा संदेश द्यायचा आहे. तीक तीक करण्याची गरज नाही. मनमनाभव. देहाचे सर्व संबंध सोडून, जुन्या दुनियेतील सर्वांचा बुद्धी द्वारे त्याग करायचा आहे, कारण आता माघारी जायचे आहे, अशरीरी बनायचे आहे. इथे बाबा आठवण करून देतात, मग सार्या दिवसा मध्ये बिल्कुल आठवण करत नाहीत, श्रीमत वर चालत नाहीत. बुद्धी मध्ये बसत नाही. बाबा म्हणतात, नवीन दुनिये मध्ये जायचे आहे, तर तमोप्रधान पासून सतोप्रधान बनायचे आहे. बाबांनी आम्हाला राज्यभाग दिले आहे, आम्ही मग असे घालविले, 84 जन्म घेतले. लाखो वर्षाची तर गोष्ट नाही, फार मुले अल्फला न ओळखल्यामुळे मग फार प्रश्न विचारत राहतात. बाबा म्हणतात, प्रथम माझी एकट्याची आठवण करा, तर पाप नाहीसे होतील, आणि दैवीगुण धारण करा, तर देवता बनाल, आणखीन कांही विचारण्याची गरज नाही. अल्फ न समजल्या मुळे बे साठी तीक तीक केल्याने स्वतः पण गोंधळून जातात, मग तंग होऊन जातात. बाबा म्हणतात, प्रथम अल्फला जाणल्यामुळे, सर्व कांही समजून येईल. माझ्या द्वारे मला ओळखल्या मुळे, तुम्हीं सर्व कांही ओळखू शकाल, बाकी कांही जाणून घेण्याचे राहणार नाही. त्यामुळे सात दिवस ठेवलेले आहेत. सात दिवसांमध्ये खूप समजू शकाल. परंतु क्रमवार समजणारे आहेत. कोणीतर कांही पण समजत नाहीत. ते काय राजा राणी बनतील. एकावरच राज्य करतील काय? प्रत्येकाला आपली प्रजा बनवायची आहे. वेळ फार वाया घालवतात. बाबा तर म्हणतात बिचारे आहेत, जरी किती पण मोठे पदवाले आहेत, परंतु बाबा जाणतात कि, हे तर सर्व का़ंही मातीमध्ये मिसळून जाईल. बाकी थोडा वेळ आहे, विनाशकाले विपरीत बुद्धि वाल्यांचा तर विनाश होईल. आम्हा आत्म्याची प्रित बुद्धी किती आहे, ते तर समजू शकता. कोणी म्हणतात 1-2 तास आठवण राहते,त्या लौकिक पित्या बरोबर तुम्ही 1-2 तास प्रीत ठेवता कां? सर्व दिवस बाबा बाबा करत राहता. इथे जरी बाबा बाबा म्हणतात, परंतु तीव्र प्रीत थोडीच आहे. वारंवार म्हणतात शिवबाबाची आठवण करत राहा. खरी खुरी आठवण करायची आहे. चालाकी चालू शकत नाही. फार आहेत, जे म्हणतात, आम्ही तर शिवबाबा ची फार आठवण करत आहोत, मग ते तर उडत राहतील. बाबा आम्ही तर जात आहोत सेवेवर, सर्वांचे कल्याण करण्यासाठी. जेवढे अनेकांना संदेश द्याल, तेवढे आठवणी मध्ये राहाल. फार मुली म्हणतात, बंधने आहेत. अरे, बंधन तर साऱ्या दुनियेला आहे, बंधनाला युक्तीने नाहीसे करायचे आहे. युक्त्या फार आहेत. समजा, उद्या मेला तर मग मुलांना कोण सांभाळेल? जरूर कोणी ना कोणी संभाळणारे निघतील. अज्ञान काळा मध्ये तर दुसरे लग्न करतात. यावेळी तर लग्न पण समस्या आहे. कोणाला थोडे पैसे देऊन, सांगा, मुलांना सांभाळा. तुमचा हा मरजीवा जन्म आहे ना. जिवंत पणी मेलेले आहात, मग मागे कोण सांभाळेल? तर जरूर नर्स ठेवावी लागेल. पैशाने काय होऊ शकत नाही. बंधनमुक्त जरूर बनायचे आहे. सेवेचा छंद असणारे, स्वतःच जातील. दुनिये पासून तर मेले आहेत ना. इथे तर बाबा म्हणतात, मित्र संबंधी इत्यादींचा पण उध्दार करायचा आहे. सर्वांना संदेश द्यायचा आहे, मनमनामव चा, तर तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवायचे आहे. हे बाबा सांगत आहेत आणि ते तर वरून येत आहेत. त्यांची प्रजा पण त्यांच्या मागे येत राहील. जसे क्राईस्ट सर्वांना खाली घेऊन येतात. खाली अभिनय करून करून, जेंव्हा अशांत होतात तर म्हणतात, आम्हाला शांती पाहिजे. वर तर शांतीमध्ये बसले होते. मग धर्मगुरु मागे यावे लागते. परत म्हणतात, हे पतीत पावन या. खेळ कसा बनला आहे. ते शेवटी येऊन लक्ष्य घेतील. मुलानी साक्षात्कार केलेला आहे. मनमनाभव चे लक्ष्य येऊन घेतील. आता तुम्ही कंगाल पासून राजा बनत आहात. यावेळचे जे सावकार आहेत,ते भिकारी बनतील. आश्चर्य आहे. या खेळाला थोडे पण कोणी समजत नाहीत. सर्व राजधानी स्थापन होत आहे. कोणी तर गरीब पण बनतील ना. या सर्व मोठ्या बुद्धीने समजण्याच्या गोष्टी आहेत. अंताला सर्वांना साक्षात्कार होईल, आम्ही कसे बदलून जात आहोत. तुम्ही नवीन दुनिये साठी शिकत आहात. आता संगम वर आहात. शिकून पास झाल्या नंतर दैवी कुळांमध्ये जाल. आता ब्राह्मण कुळा मध्ये आहात. या गोष्टी कोणी समजत नाहीत. भगवान शिकवत आहेत, थोडे पण कोणाच्या बुद्धी मध्ये बसत नाही. निराकार भगवान जरुर येथील ना. हे नाटक फार आश्चर्यकारक बनलेले आहे, त्याला तुम्ही ओळखत आहात, आणि अभिनय करत आहात. त्रिमूर्ती च्या चित्रावर पण समजावयाचे आहे. ब्रह्मा द्वारे स्थापना. विनाश तर आपोआप होणार आहे. फक्त नाव ठेवलेले आहे हे पण नाटक बनलेले आहे. मुख्य गोष्ट आहे, स्वतःला आत्मा समजून बाबाची आठवण करा, तर गंज निघून जाईल. शाळे मध्ये जेवढे चांगल्या रीतीने शिकतात, त्यांना मोठी प्राप्ती होते. तुम्हांला 21 जन्मां साठी आरोग्य आणि संपत्ती मिळत आहे, कमी गोष्ट आहे काय. इथे जरी पैसा असेल, परंतु वेळ नाही, जे मुले नातू खातील. बाबांनी सर्व कांही या सेवे मध्ये लावले तर किती जमा झाले. सर्वांचे थोडेच जमा होत आहे. एवढे लखपती आहेत, पैसा कामाला येणार नाही. बाबा घेणारच नाहीत, ज्यामुळे मग घ्यावे लागेल. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मला प्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)बंधन नाहीसे करण्याची युक्त्यी रचली पाहिजे. बाबा बरोबर खास प्रीत ठेवली पाहिजे. बाबाचा सर्वांना संदेश द्यायचा आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे.

(२)दुरांदेशी बुद्धी ठेवून या बेहदच्या खेळायला समजून घ्यायचे आहे. भिकारी पासून राजा बनण्याच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे. आठवणीचा खरा खुरा चार्ट ठेवायचा आहे

वरदान:-
सत्यतेच्या आधारावर, एका बाबाला प्रत्यक्ष करणारे, निर्भय अधिकारी स्वरूप भव.

सत्यता च प्रत्यक्षेचा आधार आहे. बाबाला प्रत्यक्ष करण्या साठी निर्भय आणि अधिकारी स्वरूप बनून बोला, संकोचा नी नाही. जेंव्हा अनेक मतवाले फक्त एका गोष्टीला मानतील कि, आम्हां सर्वांचा पिता एक आहे आणि तेच आता कार्य करत आहेत, आम्ही सर्व एकाची संतान एक आहोत, आणि हे एकच यथार्थ आहे. तर विजयाचा झेंडा फडकेल. याच संकल्पाने मुक्तिधामला जाल आणि मग जेंव्हा आपला अभिनय करण्यासाठी याल, तर प्रथम हे संस्कार बाहेर येतील कि, ईश्वर एक आहे. हीच सुवर्ण युगाची स्मृती आहे.

बोधवाक्य:-
सहन करणे म्हणजेच स्वतःच्या शक्ती रूपाला प्रत्यक्ष करणे होय