03-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्हाला मनसा वाचा कर्मणा खूप आनंदात राहायचे आहे, सर्वांना खुश करायचे
आहे, कोणालाही दुःख द्यायचे नाही"
प्रश्न:-
दुहेरी अहिंसक
बनणाऱ्या मुलांना कोणती सावधानी ठेवायची आहे?
उत्तर:-
सावधानी ठेवायचे आहे की, असे कोणते बोल मुखाद्वारे निघायला नको,ज्यामुळे कोणाला
दुःख होईल,कारण वाचा द्वारे दुःख देणे पण हिंसा आहे.आम्ही देवता बनणार आहोत,म्हणून
चलन खूप श्रेष्ठ पाहिजे.खानपान न खूप उच्च, न अगदीच कनिष्ठ.
गीत:-
निर्बलची लढाई
बलवानशी, ही लढाई आहे दिवा आणि वादळाची.
ओम शांती।
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति बाबा रोज रोज समजवतात की, स्वतःला
आत्मा समजून बसा आणि बाबांची आठवण करा.असे म्हणतात, कृपया सावधान.तर बाबा म्हणतात
एक तर आठवणी कडे लक्ष द्या. बाबा खूप गोड आहेत,त्यांना प्रेमाचे सागर,ज्ञानाचे सागर
म्हटले जाते. तर तुम्हाला पण प्रेमळ बनले पाहिजे.मनसा वाचा कर्मणा प्रत्येक
गोष्टीमध्ये तुम्हाला आनंदित राहिले पाहिजे.कोणाला दुःख देऊ नका, बाबा कोणालाच दुखी
करत नाहीत. बाबा आले आहेत,सुखी करण्यासाठी,तर तुम्हाला पण कोणत्याच प्रकारे,कोणालाही
दुःख द्यायचे नाही.कोणतेही असे खराब काम व्हायला नको.मनामध्ये पण असे विचारा यायला
नको परंतु ही अवस्था अंत काळामध्ये होईल. काही ना काही कर्मेंद्रिया द्वारे चुका
होत राहतात.स्वतःला आत्मा समजले आणि दुसऱ्याला पण आत्मा पाहिले तर,परत कोणालाही
दुःख देणार नाहीत.शरीरालाच पाहणार नाही,तर दुःख कसे देऊ शकणार? यामध्ये गुप्त कष्ट
आहेत. हे सर्व बुद्धीचे काम आहे.आता तुम्ही पारसबुध्दी बनत आहात. तुम्ही जेव्हा
पारस बुद्धी होते,तर तुम्ही खूप सुख पाहिले.तुम्हीच सुखधामचे मालक होते ना.हे
दुःखधाम आहे.हे तर खूप सहज आहे.ते शांतीधाम आमचे गोड घर आहे,परत तेथून भूमिका
करण्यासाठी आलो आहोत, दुःखाची भूमिका खूप वर्ष वठवली. आता सुखधाममध्ये जायचे आहे,
म्हणून एक-दोघांना भाऊ-भाऊ समजायचे आहे.आत्मा आत्म्याला दुःख देऊ शकत नाही.स्वतःला
आत्मा समजून आत्म्याशी गोष्टी करत राहा.आत्मा सिंहासनावर विराजमान आहे.हा शिवबाबांचा
रथ आहे ना.मुलं म्हणतात आम्ही शिवबाबांच्या रथाचा शृंगार करतो, शिवबाबांच्या रथाला
खाऊ घालतो. तर शिव बाबांची आठवण राहते.ते कल्याणकारी पिता आहेत.मी पाच तत्वाचे पण
कल्याण करतो.स्वर्गा मध्ये कोणतीच गोष्ट कधी कष्ट देत नाही.येथे तर कधी वादळ,कधी
थंडी,कधी काय काय होत राहते. स्वर्गामध्ये तर नेहमी चांगला मोसम राहतो,दुःखाचे नाव
नसते.तो आहे स्वर्ग,बाबा तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवण्यासाठी आले आहेत. भगवान उच्च
ते उच्च,सर्वोच्च पिता, सर्वोच्च शिक्षक पण आहेत,तर जरूर श्रेष्ठचारी बनवतील
ना.तुम्ही लक्ष्मी नारायण होते ना. या सर्व गोष्टी विसरले आहात.हे शिवपिताच
समजवतात.ऋषी,मुनी इत्यादीं ना विचारत होते, तुम्ही रचनाकार आणि रचनेला जाणतात का?
तर नेती नेती म्हणत होते,म्हणजे जाणत नाही.तेव्हा त्यांच्या जवळच हे ज्ञान नव्हते
तर, परत परंपरा द्वारे कसे चालत येऊ शकेल.बाबा म्हणतात हे ज्ञान मी आत्ताच देतो.
तुमची सद्गती झाल्यानंतर परत ज्ञानाची आवश्यकता राहत नाही.दुर्गती होत नाही.
सतयुगाला सद्गती म्हटले जाते.येथे दुर्गती आहे परंतु हे कोणालाही माहीत नाही की,
आम्ही दुर्गति मध्ये आहोत. बाबांसाठी म्हटले जाते,ते मुक्तिदाता, मार्गदर्शक, नावाडी
आहेत.विषय सागरा मधून सर्वांची नाव पैलतीरावर घेऊन जातात, त्यांना क्षीरसागर
म्हणतात.विष्णुला क्षीरसागर मध्ये दाखवतात.हे सर्व भक्तिमार्गाचे गायन आहे. मोठा
तलाव आहे, ज्यामध्ये विष्णूचे मोठे चित्र दाखवतात.बाबा समजवतात, तुम्हीच सर्व
विश्वावर राज्य केलेले आहे,अनेक बार हारले आणि जिंकले आहात.बाबा म्हणतात काम
महाशत्रू आहे, त्याच्यावरती विजय मिळवल्याने तुम्ही जगतजीत बनणार, तर आनंदाने बनायला
पाहिजे ना.खुशाल गृहस्थ व्यवहारांमध्ये,प्रवृत्ती मार्गा मध्ये राहा, परंतु कमळफुला
समान पवित्र राहा.आता तुम्ही काट्या पासून फूल बनत आहात.बुद्धीमध्ये येते की,हे
काट्या चे जंगल आहे. एक-दोघांना तंग करत राहतात, मारत राहतात.तर बाबा, गोड गोड
मुलांना म्हणतात,तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. लहान-मोठ्या सर्वांची
वानप्रस्थ अवस्था आहे. तुम्हाला वाणी पासून दूर जाण्यासाठी शिकवतात ना. तुम्हाला तर
सद्गुरू मिळाले आहेत,ते तर वानप्रस्थ मध्ये घेऊन जातील.हे विद्यापीठ आहे. भगवानुवाच
आहे ना.मी तुम्हाला राजयोग शिकवून,राजांचे राजा बनवतो.जे पुज्य राजे होते, तेच परत
पूजारी राजे बनले आहेत. तर बाबा म्हणतात, मुलांनो चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करून
दैवी गुण धारण करा.खुशाल खा-प्या,श्रीनाथ मंदिरामध्ये जावा.तेथे तुपाचा प्रसाद
मिळतो,तुपाच्या विहिरीच बनवल्या आहेत.परत ते कोण खातात, पूजारी. श्रीनाथ आणि
जगन्नाथ दोघांना काळे बनवले आहे.जगन्नाथ च्या मंदिरामध्ये देवतांचे खराब चित्र
आहेत.तेथे भाताचा हंडा बनवतात, ते शिजल्यानंतर त्याचे चार भाग होतात.फक्त भाताचा
भोग लावतात, कारण आत्ता साधारण आहेत ना.इकडे गरिब तिकडे सावकार आहेत.आत्ता तर खूप
गरिब आहेत.खाण्यासाठी पण मिळत नाही.सतयुगा मध्ये तर सर्व काही आहे.तर बाबा
आत्म्यांना सन्मुख समजावतात.शिवबाबा खूप गोड आहेत.ते तर निराकार आहेत,प्रेम
आत्म्याशी केले जाते ना.आत्म्यालाच बोलावले जाते.शरीर तर नष्ट झाले.त्यांच्या
आत्म्याला बोलवले जाते, ज्योती जागृत करतात, यामुळे सिध्द होते,आत्म्याला अंधार
होतो.आत्मा तर शरिर रहित आहे,तर त्याला. अंधार कसा होतो.स्वर्गात या गोष्टी होत
नाहीत.हा सर्व भक्ती मार्ग आहे.बाबा खूप चांगल्याप्रकारे समजवतात.ज्ञान खूप गोड
आहे.यासाठी डोळे उघडे ठेवून ऐकावं लागतं.बाबांना तर पहावे लागेल ना.तुम्ही
जाणतात,शिवबाबा येथे विराजमान आहेत,तर डोळे उघडे ठेवून बसायला पाहिजे ना.बेहद्दच्या
बाबांना पहावे लागेल ना.या पुर्वी मुली बाबांना पाहिल्या नंतर लगेच ध्यानात जात
होते.डोळे बंद असताना पळत होते.कमाल तर होती ना.बाबांनी समजावले आहे,एक दुसऱ्यांना
पाहता,तर समजा,आम्ही आत्मा भावा बरोबर बोलत आहोत,भावाला समजवतो.तुम्ही बेहद्दच्या
बाबांचे मानणार नाही का?तुम्ही या अंतिम जन्मामध्ये पवित्र बनाल,तर पवित्र दुनियेचे
मालक बनाल.बाबा तर अनेकांना समजतात,कोणी तर लगेच म्हणतात बाबा,आम्ही जरुर पवित्र
बनू.पवित्र बनणे तर चांगले आहे ना.कुमारी पवित्र आहेत तर सर्व तिच्या पाया
पडतात.लग्न झाल्यानंतर तर पुजारी बनते, सर्वांच्या पुढे डोके टेकवायला लागते.तर
पवित्रता चांगली आहे ना.पवित्रता आहे तर शांती आणि संपत्ती पण आहे.सर्व पवित्रते
वरती आधारित आहे.हे पतित-पावन या, असे बोलवतात पण.पावन दुनिया मध्ये रावण नसतो.ते
रामराज्य आहे,सर्व खिरखंड होऊन राहतात. धर्माचे राज्य आहे परत रावण कुठून आला?
रामायण इत्यादी खूप प्रेमाने बसू ऐकतात, हा सर्व भक्तिमार्ग आहे.तर मुली
साक्षात्कार मध्ये रास करतात.सत्याच्या नावेचे गायन आहे,हालू शकेल परंतु बुडणार
नाही.दुसऱ्या कोणत्या सत्संगामध्ये जाण्यासाठी मनाई करत नाही येथे तर खूप अडथळा
आणतात.बाबा तुम्हाला ज्ञान देतात, तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी बनतात. ब्राह्मण तर
जरूर बनायचे आहे. बाब तर स्वर्ग स्थापन करणारे आहेत,तर जरूर आम्हीपण स्वर्गाचे मालक
असायला हवेत.आम्ही इथे नरकामध्ये का पडलो आहोत? आता समज मध्ये येते की अगोदर आम्ही
पण पुजारी होतो,आता परत २१ जन्मासाठी पुज्य बनू.६३ जन्म पुजारी बनलो,आता परत पूज्य
स्वर्गाचे मालक बनू.हे नरापासून नारायण बनण्याचे ज्ञान आहे. भगवानुवाच मी तुम्हाला
राजांचे राजा बनवतो.पतित राजे,पावन राजाच्या पुढे नमन वंदन करतात. प्रत्येक
महाराजांच्या राजवाड्यात मध्ये मंदिर जरूर असेल. ते पण राधा-कृष्ण,लक्ष्मी-नारायण
किंवा राम सीता चे असेल.आजकाल तर गणेश, हनुमान इत्यादीचे पण मंदिर बनवत
राहतात.भक्तिमार्गा मध्ये खूप अंधश्रद्धा आहे.आता तुम्ही समजता बरोबर आम्ही राजाई
केली, परत वामार्गामध्ये गेलो. आता बाबा समजवतात तुमचा हा अंतिम जन्म आहे.गोड गोड
मुलांनो तुम्ही अगोदर स्वर्गामध्ये होते,परत उतरत उतरत अगदीच विकारी बनले
आहात.तुम्ही म्हणाल आम्ही खूप उच्च होतो,परत बाबा आम्हाला उच्च बनवतात.आम्ही
प्रत्येक पाच हजार वर्षानंतर हे ज्ञान घेत आलो आहोत.याला म्हटले जाते विश्वाच्याच्या
इतिहासाची पुनरावृत्ती.
बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांना विश्वाचे मालक बनवतो.सर्व विश्वावरती तुमचे राज्य
असेल. गीता मध्ये पण आहे ना बाबा,तुम्ही आम्हाला असे राज्य देतात,जे कोणीही हिरावून
घेऊ शकत नाही. आता तर खूप हद्दी झाल्या आहेत, पाण्याच्या वरती,जमिनीच्या वरती भांडणं
होत राहतात.आपपल्या राज्याची सांभाळ करत राहतात. करणार नाहीत तर,मुलं दगडं मारावयास
लागतात.ते लोक समजतात ही नवीन युवा पिढी, पैलवान बनून भारताची रक्षा करतात.त्यामुळे
पैलवानी दाखवत राहतात.दुनियाची परिस्थिती पहा कशी झाली आहे.रावण राज्य आहे ना.
बाबा म्हणतात, हे आसुरी संप्रदाय आहेत.तुम्ही आत्ता दैवी संप्रदाय बनत आहात.देवता
आणि आसुरांची परत लढाई कशी लागेल? तुम्ही तर दुहेरी हिंसक बनतात.देवी देवतांना डबल
अहिंसक म्हटले जाते.अहिंसा परमो देवी-देवता धर्म म्हटले जाते. बाबांनी समजवले
आहे,कोणाला वाचा द्वारे दुःख देणे,पण हिंसा आहे.तुम्ही देवता बनतात,तर प्रत्येक
गोष्टीमध्ये श्रेष्ठत्व असायला हवे.खान पण,न खूप भारी,न एकदम हल्के,एकरस हवे.राजे
इत्यादींचे बोलणे पण खूप कमी असते.प्रजांचे पण राजांवरती खूप प्रेम असते.येथे तर पहा
काय हाल झाले आहेत. किती आंदोलन करत राहतात.बाबा म्हणतात जेव्हा अशी परिस्थिती
होते,तेव्हा मी येऊन विश्वामध्ये शांती करतो.शासन म्हणते सर्व मिळून एक व्हायला
पाहिजेत.जरी आपसात सर्व भाऊ भाऊ आहेत,परंतु हा तर खेळ आहे ना.बाबा म्हणतात
मुलांनो,तुम्हाला कोणती काळजी करायची नाही.येथे अन्नधान्याचे पण कष्ट आहेत.तेथे तर
खूप अन्नधान्य असेल. पैशाशिवाय जितके पाहिजे,तेवढे मिळू शकेल.आता ती दैवी राजधानी
स्थापन करत आहोत.तुमचे आरोग्य पण असे बनवतो, ज्यामुळे स्वर्गामध्ये कधी रोग होणारच
नाही,खात्री आहे. आम्ही या देवतां सारखे यांचे चरित्रवान बनत आहोत.जस-जसे मंत्री
असतील, तसे त्यांना समजावून सांगू शकतात.युक्तीने समजावयाला पाहिजे.आपले मत
रजिस्टरमध्ये चांगले लिहतात,परंतु तुम्ही तर समजून घ्या ना,तर म्हणतात आम्हाला वेळ
नाही.तुम्ही मोठे लोक आवाज कराल,तर गरिबांचे पण कल्याण होईल.
बाबा समजवतात सर्वांच्या वरती काळ मंडारत आहे.आज-काल करत करत काळ नष्ट करेल.तुम्ही
कुंभकर्णा सारखे बनले आहात. मुलांना समजून सांगण्यामध्ये खूप आनंद पण येतो.बाबांनी
हे चित्र इत्यादी बनवले आहेत.दादांना हे थोडेच ज्ञान होते.तुम्हाला वारसा लौकिक आणि
पारलौकिक पित्याकडून मिळतो.अलौकिक पित्याकडून वारसा मिळत नाही.हे तर दलाल आहेत
ना,यांच्याद्वारे वारसा मिळत नाही.प्रजापिता ब्रह्मा ची आठवण करायची नाही.ब्रह्मा
बाबा म्हणतात,माझ्याकडून तर तुम्हाला काहीच मिळत नाही.मी पण शिकतो.वारसा एक हद्दचा
आहे,दुसरा बेहद्द पित्याचा आहे. प्रजापिता ब्रह्मा काय वारसा देतील. शिवबाबा
म्हणतात माझीच आठवण करा,हा रथ आहे ना. रथाची आठवण करायची नाही. उच्च ते उच्च
भगवंतालाच म्हटले जाते.बाबा आत्म्यांना समजवतात. आत्माच सर्वकाही करते ना.एक कातडी
सोडून म्हणजे शरीर सोडून दुसरे घेते,जसे सापाचे उदाहरण आहे. भ्रमरी पण तुम्हीच
आहात.ज्ञानाची भू-भू करत रहा.ज्ञान ऐकत ऐकत तुम्ही कोणालाही विश्वाचे मालक बनवू
शकता.बाबाच तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात.जे बाबा तुम्हाला विश्वाचे मालक
बनवतात,अशा बाबांची,का नाही आठवण करणार?आता बाबा आले आहेत,तर वारसा का नाही घ्यायला
पाहिजे?असे का म्हणतात की,वेळ मिळत नाही.चांगली चांगली मुलं तर सेकंदांमध्ये समजू
शकतात. बाबांनी समजवले आहे,मनुष्य लक्ष्मीची पूजा करतात,आता लक्ष्मी द्वारे काय
मिळते आणि जगदंबा कडून काय मिळते.लक्ष्मी तर स्वर्गाची देवी आहे, तिच्याकडून पैसे
पैसे मागत राहतात.जगदंबा तर विश्वाचे मालक बनवते,सर्व इच्छा पूर्ण
करते.श्रीमताद्वारे सर्व इच्छा पूर्ण होतात,अच्छा.
गोड गोड फार वर्षापूर्वी भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) या
कर्मेंद्रिया द्वारे कोणतीही चूक व्हायला नको,म्हणून मी आत्मा आहे, ही स्मृती पक्की
करायची आहे.शरीराला पाहिचे नाही.एक बाबा कडे लक्ष द्यायचे आहे.
(२) आत्ता वानप्रस्थ अवस्था आहे, म्हणून वाणी पासून दूर जाण्याचा पुरुषार्थ करायचा
आहे.पवित्र जरूर बनायचे आहे.बुद्धीमध्ये राहावे की, सत्याची नाव हलू शकेल परंतु
बुडणार कधीच नाही,म्हणून येणाऱ्या विघ्नाला घाबरायचे नाही.
वरदान:-
अहम आणि वहमला
समाप्त करुन दयावान बनणारे विश्व कल्याणकारी भव.
कशी पण अवगुण असणारी
कडक संस्कार असणारे,कमी बुद्धी वाले, नेहमी निंदा करणारी आत्मा असेल, परंतु जे
दयावान विश्व कल्याणकारी मुलं आहेत,ते सर्व आत्म्याच्या प्रति कायदेशीर सोबत प्रेमळ
पण बनतील.कधी ते या अहंकारा मध्ये येणार नाहीत की, हे तर कधीच बदलू शकत नाहीत.हे तर
असेच आहेत किंवा हे काहीच करू शकत नाही,मीच सर्व काही करतो.हे काहीच नाहीत.या
प्रकारचा अहंकार आणि वहम सोडून, कमजोरी आणि अवगुणांला जाणत असून, क्षमा करणारे
दयावान मुलंच विश्वकल्याणाच्या सेवेमध्ये सफल होतात.
बोधवाक्य:-
जेथे
ब्राह्मणांच्या तन मन धनाचा सहयोग आहे,तेथे सफलता सोबत आहे.