12-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे असेल तर,कोणाशी पण गोष्टी करताना, पाहताना
बुध्दी योग एक बाबांशी लावा"
प्रश्न:-
नवीन
दुनियेच्या स्थापनेच्या निमित्त बनणाऱ्या, मुलांना बाबा कडून कोणते मार्गदर्शन किंवा
सूचना मिळाल्या आहेत?
उत्तर:-
मुलांनो, तुमचा जुन्या दुनियेशी कोणतेही संबंध नाहीत. आपले मन जुन्या दुनियेशी लावू
नका.स्वत:ला तपासून पहा, आम्ही श्रीमताच्या विरुद्ध कर्म तर करत नाही ना? आत्मिक
सेवेच्या निमित्त बनलो आहोत?
गीत:-
भोलेनाथ पेक्षा
श्रेष्ठ कोणी नाहीत,बिगडीला सुधारणारे दुसरे कोणी नाहीत…
ओम शांती।
आता गीत ऐकण्याची काही जरुरत नाही.गीत सहसा भक्तच गातात किंवा ऐकतात.तुम्ही तर हे
शिक्षण घेत आहात.गीत पण मुलांसाठी खास निघाले आहेत.तुम्ही मुलं जाणतात,बाबा आमचे
भाग्य श्रेष्ठ बनवत आहे.आता आम्हाला बाबांची आठवण करायची आहे आणि दैवी गुण धारण
करायचे आहेत.आपली दिनचर्या तपासायची आहे, जमा होत आहे की नुकसान होत आहे?माझ्यामध्ये
काही अवगुण तर नाहीत?जर अवगुण आसतील तर आपल्याच भाग्याचे नुकसान होईल,तर त्या
अवगुणांना काढून टाकायला पाहिजे.या वेळेत प्रत्येकाला आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे
आहे.तुम्ही समजता आम्ही असे लक्ष्मीनारायण बनू शकतो,जर एक बाबां शिवाय कोणाची आठवण
करणार नाही तर. कोणाशी गोष्टी करताना, पाहताना,बुद्धीयोग परमधाम मध्ये लागलेला
पाहिजे.आम्हा आत्म्यांना बाबांची च आठवण करायची आहे. बाबांचा आदेश मिळाला आहे,
माझ्याशिवाय कोणा सोबत मन लावू नका आणि दैवी गुणांची धारणा करा.बाबा समजवतात तुमचे
आत्ता ८४ जन्म पूर्ण झाले.आता परत तुम्ही जाऊन,राजाई मध्ये प्रथम क्रमांक घ्या.असे
नको व्हायला प्रजा मध्ये जावे लागेल किंवा प्रजा मध्ये पण कनिष्ठ पद
मिळेल,नाही.स्वतःला तपासत राहा, अशी समज बाबांशिवाय कोणी देऊ शकत नाही.पित्याची
शिक्षकाची आठवण करत राहिल्यामुळे,भय राहील.असे व्हायला नको आम्हाला सजा
मिळेल.भक्तीमध्ये पण समजतात,आम्ही पाप कर्माचे भागीदार बनू.मोठ्या बाबांच्या सूचना
तर आत्ताच मिळतात,त्याला श्रीमत म्हणतात.मुलं जाणतात, श्रीमताद्वारे आम्ही बनत आहोत.
स्वतःला तपासायचे आहे, कधी-कधी आम्ही श्रीमताच्या विरुद्ध तर काही करत नाही ना? ज्या
गोष्टी चांगल्या वाटत नाहीत,त्या करायला नाही पाहिजेत. चांगल्या आणि वाईट गोष्टींना
तर समजता ना?अगोदर समजत नव्हते.आता तुम्ही असे कर्म शिकता,जे परत जन्म जन्मांतर
कर्म अकर्म बनतात.या वेळेत तर सर्वांमध्ये पाच भुतांची प्रवेशता आहे. आता चांगल्या
प्रकारे पुरुषार्थ करुन कर्मातीत बनायचे आहे,दैवी गुणांचे आचरण करायचे
आहे.दिवंसे-दिवस वेळ नाजूक होत जाते,दुनिया बिघडत जाते.दिवसें-दिवस बिघडतच राहील.या
दुनियेशी तुमचा काहीही संबंध नाही,तुमचा संबंध तर नवीन दुनियेशी आहे,ज्या दुनियेची
स्थापना होत आहे.तुम्ही जाणता,आम्ही नवीन दुनियाची स्थापन करण्यासाठी निमित्त बनत
आहोत.जे मुख्य लक्ष्य समोर आहे, त्याच्या सारखे बनायचे आहे. कोणताही आसुरी गुण मनात
राहायला नको.आत्मिक सेवेमध्ये राहाल,तर त्यामुळे प्रगती होत राहिल.प्रदर्शनी
संग्रहालय इत्यादी बनवतात, तर समजतात अनेक लोक येतील,त्यांना बाबांचा परिचय द्यायचा
आहे,परत ते पण बाबांची आठवण करायला लागतील.सर्व दिवस हेच विचार चालत राहावे की, सेवा
केंद्र उघडून सेवेची वृद्धी करायची आहे,हे ज्ञानरत्न तर सर्व तुमच्या जवळ आहेत.बाबा
गुणांची धारणा पण करवतात आणि ज्ञानाचा खजिना पण देतात.तुम्ही इथे बसले आहात,तर
बुद्धीमध्ये आहे,आम्ही सृष्टीच्या आदी मध्यला जाणतो,पवित्र पण राहतो.मन्सा वाचा
कर्मणा,कोणतेही खराब कर्म व्हायला नको,त्याला पूर्णपणे तपासायचे आहे.बाबा पतितांना
पावन बनवण्यासाठी आले आहेत, त्यासाठी युक्ती पण सांगत राहतात, त्यामध्येच मगन
व्हायचे आहे.सेवा केंद्र उघडून अनेकांना निमंत्रण द्यायचे आहे,प्रेमाने बसून
समजावयाचे आहे.ही दुनिया तर नष्ट होणार आहे.प्रथम तर नवीन दुनियेची स्थापना खूप
आवश्यक आहे.संगमयुगा मध्येच स्थापना होते. हे पण मनुष्यांना माहित नाही की,आता संगम
युग आहे.हे पण समजत आहात,की नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियाच विनाश, त्याचा
आता संगम आहे. नवीन दुनिया ची स्थापना श्रीमता वर होत आहे.बाबांशिवाय कोणी नवीन
दुनियाच्या स्थापनेचे मत देऊ शकणार नाहीत.बाबा मुलां द्वारेच नवीन दुनियेचे उद्घाटन
करतात,एकटे तर करणार नाहीत, सर्व मुलांची मदत घेतात.ते तर उद्घाटन करण्यासाठी मदत
घेत नाहीत,फक्त येऊन रिबीन कापतात.येथे तर ती गोष्ट नाही. यामध्ये तुम्ही ब्राह्मण
कुलभूषण मतगार बनतात.सर्व मनुष्यमात्र सद्गतीचा रस्ता अगदीच विसरले आहेत.पतित
दुनियेला पावन बनवणे हे त्याच काम आहे.बाबा नवीन दुनियेची स्थापना करतात, यासाठी
आत्मिक ज्ञान देत आहेत. तुम्ही जाणतात बाबांच्या जवळ नविन दुनिया स्थापन करण्याची
युक्ती आहे.त्यांनाच बोलवतात की, हे पतित-पावन या.शिवाची पूजा करत राहतात परंतु हे
जाणत नाहीत की, पतित-पावन कोण आहेत? दुःखामध्ये तर सर्व,हे भगवान,हे राम म्हणून
आठवण करतात.राम पण निराकारलाच म्हणतात.निराकारलाच उच्च भगवान म्हणतात,परंतु मनुष्य
खूप संभ्रभित झाले आहेत.बाबांनी येऊन त्यामधून काढले आहे.जसे धुक्यामध्ये मनुष्य
गोंधळून जातात. ही तर बेहद्दची गोष्ट आहे.खूप मोठ्या जंगलामध्ये जाऊन पडले
आहेत.तुम्हाला पण बाबांनी जाणीव करून दिले आहे की,आम्ही पण जंगलामध्ये पडलो होतो.हे
पण आता माहीत झाले आहे की,जुनी दुनिया आहे,याचा अंत निश्चित आहे.मनुष्य तर बिल्कुलच
रस्ता जाणत नाहीत.बाबांना बोलवत राहतात.आता तुम्ही बोलवत नाहीत.आता तुम्ही मुलं
वैश्विक नाटकाच्या आदी मध्य अंतला जाणतात,परंतु क्रमानुसार.जे जाणतात ते खूप खुशी
मध्ये राहतात.दुसऱ्यांना पण रस्ता सांगण्यामध्ये तत्पर राहतात.बाबा तर म्हणतात
मोठ-मोठे सेवाकेंद्र उघडा,मोठ-मोठे चित्र असतील तर मनुष्य सहज समजू शकतील. मुलांसाठी
चित्र पण जरुर पाहिजेत.त्यांना सांगायचे आहे की ही पण शाळा आहे.येथील आश्र्चर्यकारक
चित्र आहेत.त्या शाळेतील चित्रांमध्ये हद्दच्या गोष्टी आहेत.ही पण पाठशाळा आहे,
ज्यामध्ये बाबा आम्हाला सृष्टीच्या आदी मध्य अंतचे रहस्य सांगून लायक बनवतात.मनुष्या
पासून देवता बनण्याची ही ईश्वरीय पाठशाला आहे.ईश्वरीय विश्वविद्यालय असे लिहले
आहे.ही ईश्वरीय पाठशाला आहे.ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारे पण मनुष्य समजू शकत
नाहीत,विद्यापीठ पण लिहायला पाहिजे.असे ईश्वरीय विश्वविद्यालय कोणतेही नाही. बाबांनी
कार्ड पाहिले होते,काही वाक्य विसरले आहेत.बाबांनी अनेक वेळेस सांगितले आहे,
प्रजापिता जरूर लिहा, तरीही मुलं विसरतात,पूर्ण वाक्य लिहायला पाहिजेत.जे मनुष्यांना
माहिती होईल की, हे ईश्वरी कॉलेज तर खूप मोठे आहे.मुलं जे सेवेसाठी उपस्थित आहेत,ते
चांगले सेवाधारी आहेत.त्यांच्या मनामध्ये राहते की, आम्ही, आमक्या सेवा केंद्र मध्ये
जाऊन सेवेची वृद्धी करू.तेथील मुलं आळसी झाले आहेत.त्यांना जागृत करू,कारण माया अशी
आहे,जी सारखे सारखे विसरायला लावते.मी स्वदर्शन चक्रधारी आहे, हे विसरतात.मायेचा
खूप विरोध होतो. तुम्ही युध्दाच्या मैदानामध्ये आहात.माया डोके फिरवून उलटे काम
करायला लावते,त्यापासून खूप सांभाळ करायचा आहे.मायचे वादळ तर सर्वांना लागते.लहान
किंवा मोठे सर्व युद्धाच्या मैदानामध्ये आहेत.पैलवानला मायेचे वादळ हालवू शकत
नाही.ती अवस्था पण येणार आहे. बाबा समजतात वेळ खूप खराब आहे, परिस्थिती बिघडत जात
आहे.राजाई सर्व नष्ट होणार आहे. सर्वांना सत्ते पासून उतरवतील. परत प्रजेचे प्रजेवर
राज्य,सर्व दुनिया वरती होईल.तुम्ही आपली नवीन राजधानी स्थापन करत आहात,तर येथील
राजाईचे नाव रुप नष्ट होईल.पंचायती राज्य होत जाते.जेव्हा प्रजेचे राज्य असते तेव्हा
आपसात भांडण इत्यादी होतात.स्वराज्य किंवा रामराज्य तर वास्तव मध्ये नाही,म्हणून
साऱ्या दुनिया मध्ये भांडण होत राहतात. आजकाल हंगामा तर सर्व ठिकाणी आहे.तुम्ही
जाणता आम्ही आपली राजधानी राज्य स्थापन करत आहोत.तुम्ही सर्वांना रस्ता दाखवत
आहात.बाबा म्हणतात माझीच आठवण करा,आठवणीत राहून दुसऱ्यांना पण समजवायचे आहे की,देही
अभिमानी बना.देह अभिमान सोडा.असे नाही की तुमच्यामध्ये सर्व देही अभिमानानी बनले
आहेत,नाही,बनायचे आहे. तुम्ही पुरुषार्थ करतात आणि दुसऱ्यांना पण करवतात. आठवण
करण्याचा प्रयत्न करतात, परत विसरतात.हाच पुरुषार्थ करायचा आहे.मुख्य गोष्ट बाबांची
आठवण करणे होय.मुलांना खूप समजावत राहतात.ज्ञान खूप चांगले मिळत आहे.मुख्य गोष्ट
पवित्र राहणे आहे. बाबा पावन बनवण्यासाठी आले आहेत, परत पतित बनायचे नाही,आठवणी
द्वारेच तुम्ही सतोप्रधान बनाल.हे विसरायचे नाही.माया यामध्येच विघ्न आणते.
रात्रंदिवस हीच धून राहावी की आम्ही बाबांची आठवण करून सतोप्रधान बनू.बाबांची आठवण
अशी पक्की व्हायला पाहिजे, जेणेकरून अंत काळात एक बाबांच्या शिवाय कोणाची आठवण यायला
नको.प्रदर्शनी मध्ये प्रथम हे समजायला पाहिजे की, सर्वांचे पिता उच्च ते उच्च भगवान
आहेत. सर्वांचे पिता पतित-पावन सद्गती दाता हे आहेत, तेच स्वर्गाचे रचनाकार आहेत.
आता तुम्ही मुलं जाणतात, बाबा संगमयुगा मध्ये येतात,बाबाच राजयोग शिकवतात.पतितपावन
दुसरे कोणी होऊ शकत नाही. प्रथम तर बाबांचा परिचय द्यावा लागेल.आता एका-एकाला
चित्रावरती सन्मुख समजावू सांगू तर इतक्या गर्दीला कसे समजावू शकता.परंतु प्रथम तर
शिवपित्याच्या चित्रावर समजणे मुख्य आहे.भक्ती तर खूप आहे, ज्ञान तर एक आहे,हे
समजावून सांगायचे आहे.बाबा मुलांना खूप युक्ती सांगत राहतात.पतितपावन एकच पिता
आहेत.रस्ता पण दाखवतात.गीता कधी ऐकवली आहे,हे पण कोणाला माहिती नाही. द्वापर युगाला
काय संगमयुग म्हटले जात नाही.युगे युगे तर बाबा येत नाहीत. मनुष्य तर बिल्कुलच
संभ्रमित झाले आहेत.सर्व दिवस हाच विचार चालतो की, कसे कोणाला समजून सांगायचे आहे.
बाबांना मार्गदर्शन करावे लागते.टेपद्वारे पण पुर्ण मुरली ऐकू शकता.कोणी कोणी
म्हणतात, टेप द्वारे आम्ही मुरली ऐकत आहोत,का नाही प्रत्यक्षात जाऊन ऐकायची, म्हणून
सन्मुख येतात.मुलांना खूप सेवा करायची आहे.रास्ता दाखवायचा आहे.प्रदर्शनीमध्ये
येतात,चांगले आहे असे म्हणतात, परत बाहेर गेल्यानंतर मायेच्या वातावरणामध्ये सर्व
नष्ट होते. स्मरण करत नाहीत,त्यांचा पाठपुरावा करायला पाहिजे. बाहेरच्या
वातावरणामध्ये गेल्यामुळे माया आकर्षित करते.गोरख धंद्यामध्ये लागतात,म्हणून मधुबनचे
आकर्षण आहे.तुम्हाला तर समज मिळाली आहे.तुम्ही तेथे जाऊन समजून सांगा,भगवान कोण
आहेत? अगोदर तुम्ही पण असेच जाऊन डोके टेकवत होते,आता तर बिलकुल बदलेले आहात.भक्ती
सोडली आहे.तुम्ही आता मनुष्यांपासून देवता बनत आहात.बुध्दी मध्ये सर्व ज्ञान
आहे,दुसरे काय जाणतील की,प्रजापिता ब्रह्माकुमार कुमारी कोण आहेत? तुम्ही समजावून
सांगू शकता की,वास्तव मध्ये तुम्ही पण प्रजापिता ब्रह्माकुमार कुमारी आहात.या
वेळेतच ब्रह्माद्वारे स्थापना होत आहे.ब्राह्मण कुलपण जरूर पाहिजे.संगम युगामध्येच
ब्राह्मण कुळ असते.अगोदर ब्राह्मणाची शेंडी प्रसिद्ध होते.शेंडी द्वारे किंवा जनेऊ
द्वारे ओळखत होते की,हे हिंदू आहेत.आता तर ते चिन्ह पण नाहीत.आता तुम्ही जाणता,
आम्ही ब्राह्मण आहोत.ब्राह्मण बनल्यानंतर नंतरच देवता बनू शकता. ब्राह्मणांनेच नवीन
दुनियेची स्थापना केली आहे. योगबळाद्वारेच सतोप्रधान बनत आहात.स्वतःला तपासायचे आहे,
कोणताही आसुरी गुण असायला नको.खारे पाण्या सारखे वागायचे नाही.हा तर यज्ञ आहे
ना.यज्ञाद्वारे सर्वांची सांभाळ होत राहते.यज्ञामध्ये संभाळणारे विश्वस्त पण
राहतात.यज्ञाचे मालक शिवबाबा आहेत.हे ब्रह्मा पण विश्वस्त आहेत.यज्ञाची संभाळ करावी
लागते.तुम्हा मुलांना जे पाहिजे, ते यज्ञाद्वारे घ्यायचे आहे. दुसऱ्या कोणाकडून
घेऊन वापराल तर त्यांची आठवण येत राहील. यामध्ये बुद्धीची लाईन खूप स्पष्ट
पाहिजे.आता तर परत जायचे आहे, वेळ खूप थोडा आहे, म्हणून आठवणीच्या यात्रेमध्ये पक्के
राहायचे आहे. हाच पुरुषार्थ करायचा आहे.अच्छा.
गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आपली
प्रगती करण्यासाठी आत्मिक सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे.जे पण रत्न मिळाले आहेत,
त्यांची धारणा करून,दुसऱ्यांना पण करायची आहे.
(२) स्वता:ला तपासायचे आहे की,आमच्या मध्ये कोणते अवगुण तर नाहीत?आम्ही विश्वस्त
बनून राहतो का? कधी खाऱ्या पाहण्यासारखे तर वागत नाही? बुद्धीची लाईन स्पष्ट आहे?
वरदान:-
बोलणे, विचार
करणे, आणि कर्म करणे या तिन्ही गोष्टींना समान बनवणारे,ज्ञानी तू आत्मा भव.
आता वानप्रस्थ
अवस्थांमध्ये जाण्याची वेळ जवळ येत आहे, म्हणून कमजोरीच्या माझ्या पणाला किंवा
व्यर्थच्या खेळाला समाप्त करून,बोलणे,विचार करणे आणि कर्म करणे समान बनवा,तेव्हा
ज्ञान स्वरूप म्हणाल.जे असे ज्ञानस्वरुप, ज्ञानी तू आत्मे आहेत,त्यांचे प्रत्येक
कर्म,संस्कार, गुण आणि कर्तव्य समर्थ बाबांच्या समान असतील.ते कधी व्यर्थचे विचित्र
खेळ, खेळू शकणार नाहीत.नेहमी परमात्म मिलनच्या खेळामध्ये व्यस्त राहतील.एका बाबांशी
मिलन करतील आणि दुसऱ्यांना बापसमान बनवतील.
बोधवाक्य:-
सेवेचा
उमंग,लहान लहान रोगांना नष्ट करतो म्हणून सेवेमध्ये नेहमी व्यस्त रहा.