15-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, आता घरी जायचे आहे, त्यामुळे देहसहित, देहाच्या सर्व संबंधाला विसरून,
माझी एकट्याची आठवण करा आणि पावन बना."
प्रश्न:-
आत्म्याच्या
संबंधा मधील, कोणती एक गोष्ट, सूक्ष्म बुद्धी वाले समजू शकतील?
उत्तर:-
(१) आत्म्यां वर सुई सारखी हळूहळू गंज चढली आहे. आठवणी मध्ये राहिल्यानेच उतरेल,
जेंव्हा गंज उतरेल म्हणजे आत्मा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनेल, तेंव्हा बाबाची ओढ
लागेल, आणि बाबा बरोबर परत घरी जाल.(२) जेवढी गंज उतरत राहील, तेवढे दुसऱ्याला
समजावताना आकर्षित करतील, या गोष्टी फार सुक्ष्म आहेत, जे मोठी,डल बुद्धी वाले समजू
शकत नाहीत.
ओम शांती।
भगवानुवाच, आता बुद्धी मध्ये कोण आले आहेत ? ते जे गीता पाठशाला वाले आहेत, त्यांना
तर भगवानुवाच म्हटल्याने, श्रीकृष्ण बुद्धी मध्ये येतील. इथे तर तुम्हां मुलांना
सर्वोच्च बाबाची आठवण येते. यावेळी संगमयुग आहे, पुरुषोत्तम बनण्यासाठी. बाबा
मुलांना समजावत आहेत कि, देह सहित देहाचे सर्व संबंध सोडून, स्वतःला आत्मा समजा. ही
फार जरुरीची गोष्ट आहे, जे या संगमयुगा वर बाबा समजावत आहेत. आत्माच पतित बनली आहे.
मग आत्म्याला पावन बनून, घरी जायचे आहे. पतित पावनची आठवण करत आले आहेत, परंतु
कांहीच जाणत नाहीत. भारतवासी फारच घोर अंधारा मध्ये आहेत. भक्ती रात्र आहे, ज्ञान
दिवस आहे. रात्रीला आंधर, दिवसाला प्रकाश होतो. सतयुग दिवस आहे, कलियुग रात्र आहे.
आता तुम्ही कलियुगा मध्ये आहात, सतयुगा मध्ये जायचे आहे. पावन दुनिये मध्ये पतितांचा
प्रश्नच नाही. जेंव्हा पतित बनतात तर पावन होण्याचा प्रश्न निर्माण होतो. जेंव्हा
पावन आहेत, तेंव्हा पतित दुनियेची आठवणच येत नाही. आता पतीत दुनिये मध्ये आहात, तर
पावन दुनियेची आठवण येते. पतित दुनिया अंताचा भाग आहे, पावन दुनिया पहिला भाग आहे.
तिथे कोणी पतित असत नाही. जे पावन होते, तेच मग पतित बनले आहेत. 84 जन्म पण
त्यांचेच समजले जातात. या फार सुक्ष्म गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. अर्धा कल्प
भक्ती केली आहे, ती एवढी लवकर सुटणार नाही. मनुष्य तर फारच घोर अंधारा मध्ये आहेत.
कोटी मध्ये कोणी निघत आहेत, मुश्किल कोणाच्या बुद्धी मध्ये बसत आहे. मुख्य गोष्ट तर
बाबा म्हणतात, देहाचे सर्व संबंध विसरून, माझी एकट्याची आठवण करा. आत्माच पतित बनली
आहे, त्याला पावन बनवायचे आहे. हे बाबा समजून सांगत आहेत, कारण हे बाबा, प्राचार्य,
सोनार, डॉक्टर, बॅरिस्टर सर्व कांही आहेत. ही नावे तिथे राहणार नाहीत. तिथे शिक्षण
पण राहणार नाही, इथे शिकतात नोकरी करण्यासाठी. पूर्वी स्त्रिया एवढ्या शिकत नव्हत्या,
त्या सर्व आता शिकत आहेत. पतीच्या मृत्यू नंतर सांभाळ कोण करणार? त्यामुळे स्त्रिया
पण सर्व शिकत राहतात. सतयुगा मध्ये तर अशा गोष्टी असत नाहीत, ज्याचे चिंतन करावे
लागेल. इथे मनुष्य धन इ. जमा करत आहेत, अशा वेळेसाठी. तिथे असे विचार येणार नाहीत,
ज्याची चिंता करावी लागेल. बाबा तुम्हां मुलांना, किती धनवान बनत आहेत. स्वर्गा
मध्ये फार खजाना राहतो, हिरे जवाहराता च्या खाणी सर्व भरपूर असतात. इथे नापीक जमीन
आहे, त्यामुळे ताकतच राहली नाही. तेथील फुलं आणि येथील फुलां मध्ये रात्रंदिवसा चा
फरक आहे. इथे तर सर्व वस्तू मध्ये ताकतच राहिलेली नाही. जरी किती पण अमेरिकेतून बीज
घेऊन येतात, परंतु ताकत राहिलेली नाही. धरणीच अशी बनली आहे, ज्यामध्ये जास्त मेहनत
करावी लागते. तिथे तर प्रत्येक वस्तू सतोप्रधान असते. प्रकृती पण सतोप्रधान, तर
सर्व कांही सतोप्रधान असते. इथे तर सर्व वस्तु तमोप्रधान आहेत. कोणत्या पण वस्तू
मध्ये ताकद राहिलेली नाही. हा फरक पण तुम्ही समजत आहात. जेंव्हा सतोप्रधान वस्तू
पाहता, ते तर ध्याना मध्येच पाहत आहात. तेथील फुल इ. किती चांगली असतात. होऊ शकते
कि, तेथील धान्य इ. सर्व तुम्हाला दिसून येईल. बुद्धी द्वारे पण समजू शकता. तेथील
प्रत्येक वस्तू मध्ये किती ताकत राहते. नवीन दूनिया कोणाच्या बुद्धी मध्ये येतच नाही.
या जुन्या दुनिये तील गोष्टी विचारू नका. थापा तर फार लांबलचक मारतात, तर मनुष्य
बिल्कुल अंधारा मध्ये झोपलेले आहेत. तुम्ही सांगता कि, बाकी थोडा वेळ राहिला आहे,
तर तुम्हाला काहीं जण हसतात. उत्तम रीतीने तर ते समजून घेतील, जे स्वतःला ब्राह्मण
समजतात. ही नवीन भाषा आहे.हे अध्यात्मिक शिक्षण आहे, जोपर्यंत अध्यात्मिक पिता येत
नाहीत, तो पर्यंत कोणी पण समजू शकत नाहीत. अध्यात्मिक पित्याला तुम्ही मुलेच जाणत
आहात. ते लोक जाऊन योग इ. शिकवत आहेत, परंतु त्यांना कोणी शिकवले? असे तर म्हणत
नाहीत, अध्यात्मिक पित्यांनी शिकविले आहे. बाबा तर आत्मिक मुलांना शिकवित आहेत.
तुम्ही संगमयुगी ब्राह्मणच समजत आहात. ब्राह्मण तेच बनतील,जे आदि सनातन देवी-देवता
धर्माचे असतील. तुम्हीं ब्राह्मण किती थोडे आहात. दुनिये मध्ये अनेक प्रकारच्या
अनेक जाती आहेत. असे पुस्तक जरूर असेल, त्यामुळे माहित पडेल कि, दुनिये मध्ये किती
धर्म, किती भाषा आहेत. तुम्ही जाणता कि, हे सर्व राहणार नाहीत. सतयुगा मध्ये तर एक
धर्म, एक भाषा असते. सृष्टिचक्रा ला तुम्ही जाणले आहे. तर भाषांना पण जाणू शकता कि,
या सर्व राहणार नाहीत. एवढे सर्व शांतीधाम मध्ये निघून जातील. हे सृष्टीचे ज्ञान आता
तुम्हांला मिळाले आहे. तुम्ही मनुष्यांला समजावून सांगता, तरी पण थोडेच समजत आहेत.
कोणत्या मोठ्या मनुष्या कडून उदघाटन करतात , कारण त्यांचे नाव प्रसिद्ध आहे.
त्यामुळे आवाज पसरेल, राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी पण उदघाटन केले आहे. या बाबांनी
उदघाठन केले तर मनुष्य थोडेच समजतील कि,परमपिता परमात्म्यांने उदघाटन केले आहे,ते
मानणार नाहीत. कोणी मोठा मनुष्य, कमिशनर इ. येईल तर त्यांच्या मागे इतर पण येतील.
यांच्या मागे तर कोणी पण येणार नाही. आता तुम्हीं ब्राह्मण मुले फारच थोडी आहात.
जेंव्हा अधिक बनाल, तेंव्हा समजतील. आता जरी समजून घेतले तरी बाबा जवळ येतील.कोणी
एकाने मुलीला म्हटले होते कि, ज्यांनी तुम्हाला हे शिकवले, आम्ही प्रत्यक्ष
त्यांच्या जवळ कां जाऊ नये. परंतु सुई वर गंज चढलेला असेल तर चुंबकाचे आकर्षण कसे
होईल? जेव्हा गंज पूर्ण उतरेल, तेंव्हा चुंबकाला धरू शकेल. सुईच्या एका टोकाला गंज
लागला असेल, तर तेवढे आकर्षित होणार नाहीत. सारा गंज उतरून जाईल, ते तर शेवटी होईल,
जेंव्हा असे बनाल, मग तर बाबा बरोबर परत घरी जाल. आता तर चिंता आहे कि, आम्ही
तमोप्रधान आहोत. गंज चढलेला आहे. जेवढी आठवण कराल, तेवढा गंज निघत जाईल. हळूहळू गंज
निघून जाईल. गंज चढला पण हळू हळू आहे ना, मग उतरेल पण तसाच. जसा गंज चढलेला आहे,
तसाच स्वच्छ होणार आहे, तर त्यासाठी बाबाची आठवण पण करायची आहे. आठवणीने कोणाचा
जास्त गंज उतरतो, तर कोणाचा कमी. जेवढा जास्त गंज उतरेल, तेवढे ते दुसऱ्याला पण
समजावून सांगण्या साठी प्रयत्न करतील. या फार सूक्ष्म गोष्टी आहेत, मोठी बुद्धी वाले
समजू शकत नाहीत. तुम्ही जाणता राजाई स्थापन होत आहे. समजावून सांगण्या साठी पण
दिवसेंदिवस युक्त्या निघत राहतात. पूर्वी थोडेच माहीत होते कि, प्रदर्शनी,
संग्रहालय पुढे चालून बनतील. पुढे असे होऊ शकते कि, आणखीन कांही निघेल. आता वेळ तर
आहे, स्थापना होत आहे. नाराज पण व्हायचे नाही. कर्मेंद्रियांना वश करू शकत नाहीत,
तर विकारा मध्ये जातात. विकारा मध्ये गेले, तर मग सुई वर फार गंज चढतो. विकारा मुळे
जास्त गंज चढतो. सतयुग त्रेता मध्ये बिल्कुल थोडी, मग अर्धा कल्पा मध्ये लवकर लवकर
गंज चढत राहतो. विकारा मध्ये जात राहतात, त्यामुळे निर्विकारी आणि विकारी असे म्हटले
जाते. निर्विकारी देवतांची निशाणी आहे ना. बाबा म्हणतात, देवी देवता धर्म प्राय:लोप
झाला आहे. खुणा तर आहेत ना. सर्वात चांगली निशाणी(खुणा) तर हे चित्र आहेत. तुम्हीं
हे लक्ष्मी नारायणाचे चित्र घेऊन परिक्रमा देऊ शकता, कारण तुम्हीं असे बनता. रावण
राज्याचा विनाश, राम राज्याची स्थापना होत आहे. हे राम राज्य, हे रावण राज्य, आता
हे संगमयुग आहे. अनेकानेक मुद्दे आहेत. डॉक्टर लोकांच्या बुद्धीं मध्ये किती औषधे
आठवणीत राहतात. बॅरिस्टर च्या बुद्धीं मध्ये पण अनेक प्रकारचे मुददे
असतात.ज्ञानाच्या विषयाचे तर फार चांगले पुस्तक बनू शकते. मग जेंव्हा भाषण करता, तर
मुद्दे मनात आले पाहिजेत. हुशार बुद्धी वाले झटक्यात पाहतात, प्रथम तर लिहिले पाहिजे,
आम्ही असे समजावून भाषण केल्यानंतर पण आठवणीत येते ना. असे समजावले असते तर बरे झाले
असते. हे मुद्दे इतरांना समजावून सांगितल्याने बुद्धीमध्ये बसतात. विषयाची पण यादी
बनलेली आहे, मग एक विषय घेऊन मनातून भाषण केले पाहिजे किंवा लिहिले पाहिजे. मग
पाहिले पाहिजे कि, सर्व मुद्दे लिहिले आहेत? जेवढे डोके चालवाल तेवढे चांगले आहे.
बाबा तर समजवत आहेत ना, हा चांगला सर्जन आहे, यांच्या बुद्धीं मध्ये अनेक मुद्दे
आहेत. ज्ञानाने भरपूर झाले तर सेवे शिवाय मजा येणार नाही.
तुम्ही प्रदर्शनी करता, तर कुठे 2-4 कुठे 6-8 निघतात. कुठेतर एक पण निघत नाही.
हजारोनी पाहिले, तर निघतात किती थोडे, त्यामुळे आता मोठ मोठी चित्रे पण बनवितात.
तुम्हीं हुशार होत जात आहात. मोठ्या लोकांची काय अवस्था आहे, ती पण तुम्ही पाहत
आहात. बाबांनी समजावले आहे, हे पाहिले पाहिजे कि, कोणाला हे ज्ञान दिले पाहिजे,
त्यांची अवस्था पाहिली पाहिजे. जे माझे भक्त आहेत. गीता वाल्यांना मुख्य एक गोष्ट
समजावयाची आहे कि, भगवान सर्वोच्च ला म्हटले जाते. ते निराकार आहेत. कोणत्या पण
देहधारी मनुष्याला भगवान म्हटले जात नाही. तुम्हा मुलांना आता सारे समजले आहे.
संन्याशी पण घराचा संन्यास करून पळून जातात. कांही ब्रह्मचारी पण निघून जातात. मग
दुसऱ्या जन्मां मध्ये पण तसेच होत आहे. जन्म तर जरुर मातेच्या गर्भातून घेतात. जो
पर्यंत लग्न केलेले नाही, तोपर्यंत बंधनमुक्त आहेत, एवढे सारे संबंधी इ. आठवणीत येत
नाहीत. लग्न केले तर मग संबंधीची आठवण येत राहते. वेळ लागत आहे. लवकर बंधन मुक्त
होत नाहीत, आपल्या जीवना तील तर सर्वांनाच माहिती असते. संन्याशी समजतात कि, अगोदर
आम्ही गृहस्थी होतो, मग संन्यास घेतला आहे. तुमचा मोठा संन्यास आहे, त्यामुळे मेहनत
घ्यावी लागते. ते संन्यासी भस्म लावतात, डोक्याचे केस काढतात,कपडे बदलतात. तुम्हाला
तर असे कांही करण्याची गरज नाही. येथे तर कपडे बदलण्याची पण गोष्ट नाही. तुम्हीं
पांढरी साडी नाही घातली, तरी पण कांही हरकत नाही. हे तर बुद्धीचे ज्ञान आहे. आम्ही
आत्मा आहोत. बाबा ची आठवण करायची आहे, त्यामुळेच गंज निघेल आणि आम्ही सतोप्रधान बनवू
परत घरी जावू. कोणी योग बळाने पावन बनतील, कोणी सजा खाऊन बनतील. तुम्हा मुलांना तर
गंज उतरण्याची मेहनत करावयाची आहे, त्यामुळे याला योग अग्नी पण म्हटले जाते. अग्नी
मुळे पाप भस्म होतात. तुम्ही पवित्र बनता. काम चितेला पण अग्नी म्हणतात. काम अग्नी
मध्ये जळाल्या मुळे काळे बनले आहेत. आता बाबा म्हणतात, गोरे बना. या गोष्टी तुम्हां
ब्राह्मणा शिवाय कोणाच्या बुद्धी मध्ये येत नाहीत. या गोष्टीच वेगळ्या आहेत.
तुम्हांला म्हणतात कि, हे तर शास्त्राला मानतच नाहीत. नास्तिक बनले आहेत. त्यांना
सांगा, शास्त्र तर आम्ही वाचली आहेत, मग बाबांनी ज्ञान दिले आहे. ज्ञानाने सदगती
होत आहे. भगवानुवाच, वेद उपनिषद इ. वाचल्याने, दान पुण्य इ. केल्याने, कोणी पण मला
प्राप्त करू शकत नाहीत. माझ्या द्वारे मला प्राप्त करु शकता. बाबा येऊन लायक बनवित
आहेत. आत्म्यावर गंज चढलेला आहे, तेंव्हा बाबाला बोलतात कि, येऊन पावन बनवा. आत्मा
जी तमोप्रधान बनली आहे, त्याला सतोप्रधान बनवायचे आहे, तमोप्रधान पासून, तमो,रजो,सतो,
मग सतोप्रधान बनायचे आहे. जर मध्येच गडबड झाली, तर गंज चढत राहील.
बाबा आम्हाला एवढे उंच बनवित आहेत, तर ती खुशी राहिली पाहिजे ना. विलायत मध्ये
शिक्षणा साठी फार खुशीने जातात ना. आता तुम्हीं किती समजदार बनत आहात. कलियुगा मध्ये
किती तमोप्रधान बेसमज बनले आहात. जेवढे प्रेम कराल तेवढे आणखीनच सामना करतात. तुम्ही
मुले समजता कि, आमची राजधानी स्थापन होत आहे. जे चांगल्या रीतीने शिकतात, आठवणी
मध्ये राहतात, ते चांगले पद प्राप्त करतील. कलम भारता पासून लागत आहे. दिवसेंदिवस
वर्तमानपत्र इ. तून तुमचे नाव प्रसिद्ध होत राहील. वर्तमानपत्र तर सर्वत्र जातात.
ते वर्तमानपत्र वाले कधी चांगले लिहितात, कधी खराब, कारण ते पण ऐकलेल्या गोष्टीवर
चालतात ना. ज्यांनी जे सांगितले, ते लिहून टाकतात. ऐकलेल्या गोष्टी वर फार चालतात,
त्याला परमत म्हटले जाते. परमत आसूरी मत आहे. बाबाची श्रीमत आहे. कोणी उलटी गोष्ट
सांगितली, तर मग यायचेच सोडून देतात.जे सेवेत राहतात, त्यांना सर्व माहित राहते. इथे
तुम्ही जी पण सेवा करत आहात, ही तुमची नंबरएक ची सेवा आहे. इथे तुम्ही सेवा करत
आहात, तिथे फळ मिळत आहे. कर्तव्य तरी इथे बाबा बरोबर करत आहात ना. अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण
आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) आत्मा रुपी
सुई वर गंज चढलेला आहे, त्याला योग बळाने काढून सतोप्रधान बनण्याची मेहनत करायची आहे.
कधी पण ऐकलेल्या गोष्टीवर चालून, शिक्षण सोडून द्यायचे नाही.
(२) बुद्धी मध्ये ज्ञान मुद्द्यानी भरपूर करून, सेवा करायचे आहे. त्यांची अवस्था
पाहून ज्ञान द्यायचे आहे. फार तीक्ष्ण बुद्धीचे बनायचे आहे.
वरदान:-
आदि आणि आनादि
स्वरूपा च्या स्मृतीद्वारे आपल्या मूळ स्वधर्माचा अंगीकार करणारे, पवित्र आणि योगी
भव.
ब्राह्मणाचा मुळ
स्वधर्म पवित्रता आहे, अपवित्रता परधर्म आहे. तर पवित्रतेचा स्वीकार करणे, लोक
मुश्किल समजत आहेत, ते तुम्हां मुलासाठी अति सहज आहे, कारण स्मृती मध्ये आले आहे
कि, आमचा वास्तविक आत्म स्वरूप सदा पवित्र आहे. अनादि स्वरूप पवित्र आत्मा आहे आणि
आदि स्वरूप पवित्र देवता आहे. आत्ता शेवटचा जन्म पण पवित्र ब्राह्मण जीवन आहे,
त्यामुळे पवित्रताच ब्राह्मण जीवनाचे व्यक्तिमत्व आहे. जो पवित्र आहे तोच योगी आहे.
बोधवाक्य:-
सहजयोगी
म्हणून अलबेला पण आणू नका, शक्तीरुप बना.