02-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्हाला राजयोगाचे शिक्षण घ्यायचे आहे आणि दुसऱ्यांना द्यायचे पण आहे,
यामध्ये आशीर्वादची गोष्ट नाही, तुम्ही सर्वांना हेच सांगा की, बाबांची आठवण करा तर
सर्व दुःख दूर होतील"
प्रश्न:-
मनुष्यांना
कोणती काळजी आहे? तुम्हा मुलांना कोणतीच काळजी नाही- का?
उत्तर:-
मनुष्यांना या वेळेत काळजीच काळजी आहे- मुलगा आजारी झाला तरी काळजी, मुलाचा मृत्यू
झाला तरी काळजी, कोणाला मुलगा नाही झाला तरी काळजी,कोणी धान्यांचा जास्त साठा केला,
पोलीस किंवा आयकर विभागाचे आले तरी काळजी…. ही सर्व खराब दुनिया,दुःख देणारी
आहे.तुम्हा मुलांना तर कोणतीच काळजी नाही,कारण तुम्हाला सद्गुरु बाबा मिळाले
आहेत.असे म्हणतात काळजी पासून दूर,स्वामी सद्गुरु आहेत.आता तुम्ही अशा दुनिया मध्ये
जातात जिथे कोणतीही काळजी नाही.
गीत:-
तू प्रेमाचा
सागर आहे…
ओम शांती।
गोड गोड मुलांनी गीत ऐकले,अर्थ पण समजत आहात की,आम्हाला मास्टर प्रेमाचा सागर बनायचे
आहे.आत्मे सर्व भाऊ भाऊ आहेत.शिवपिता तुम्हा भावांना म्हणतात,जसा मी प्रेमाचा सागर
आहे,तुम्हाला पण खूप प्रेमाने राहायचे आहे.खूप खराब दुनिया आहे.देवतां मध्ये खूप
स्नेह आहे, त्यांना खूप प्रेम करतात,प्रसाद चढवतात.आता तुम्हाला पवित्र बनायचे
आहे,ही मोठी गोष्ट नाही. ही खूपच खराब दुनिया आहे. प्रत्येक गोष्टीची काळजी राहते,
दुःखाच्या नंतर दु:ख येत राहतात. याला दुखधाम म्हटले जाते.पोलीस किंवा आयकर विभागाची
धाड पडली तर मनुष्यांना खूप त्रास होतो,गोष्ट विचारू नका.कोणी जास्त धान्याचा साठा
केला,पोलिस आले तर पिवळे पडतात.ही खूप खराब दुनिया,नर्क आहे ना.स्वर्गाची तर सर्व
आठवण करतात.स्वर्गाच्या नंतर नर्क आणि नर्काच्या नंतर स्वर्ग,असे चक्र फिरत
राहते.तुम्ही मुलं जाणतात, बाबा स्वर्गवासी बनवण्यासाठी आले आहेत. नर्कवासी पासून
स्वर्गवासी बनवतात.तेथे विकार नसतात, कारण रावणराज्यच नाही.ते संपूर्ण निर्विकारी
शिवालय असून,हे वेश्यालय आहे.तुम्ही थोडे थांबा सर्वांना माहीत होईल की,या दुनिया
मध्ये सुख आहे की दुःख आहे.थोडा भुकंप झाला,तर मनुष्यांची काय हालत होते.
सतयुगामध्ये कोणत्याच गोष्टीची काळजी करायची आवश्यकता नसते.येथे तर खूप काळजी आहे,
मुलगा आजारी पडला काळजी, मुलाचा मृत्यू झाला काळजी, दुःखच दुःख आहे.काळजीच काळजी
आहे.सर्व काळजी पासून दूर करणारे स्वामी एकच आहेत. तुम्ही शिवबाबाच्या सन्मुख बसले
आहात.ब्रह्मा काही गुरू नाहीत.हा तर भाग्यशाली रथ आहे.बाबा या भागीरथा द्वारे
तुम्हाला शिकवत आहेत.ते ज्ञानाचे सागर आहेत. तुम्हाला सर्व ज्ञान मिळाले आहे, असे
कोणी देवता नाहीत,ज्यांना तुम्ही जाणत नाहीत.सत्य आणि असत्याची परख तर तुम्हाला आहे.
दुनिया मध्ये कोणीही जाणत नाहीत की,सत्य खंड होता,आत्ता खोटा खंड आहे.हे कोणालाही
माहिती नाही,सत्य खंडाची कधी आणि कोणी स्थापना केली.ही अज्ञानाची अंधारी रात्र
आहे.ज्ञानाचा प्रकाश देतात.गायन पण आहे,तुमची गत मत तुम्हीच जाणतात.उच्च ते उच्च ते
एकच आहेत,बाकी सर्व रचना आहे.ते रचनाकार बेहद्दचे पिता आहेत.ते हद्दचे पिता तर
दोन-चार मुलांची रचना करतात.मुलगा झाला नाही तरी काळजी राहते.स्वर्गा मध्ये अशा
गोष्टी नसतात.आयुष्यमान भव,धनवान भव हे वरदान तुम्हाला मिळत राहते.तुम्ही कोणता
आशीर्वाद देत नाहीत,हे तर शिक्षण आहे ना.तुम्हीपण शिक्षक आहात. तुम्ही तर फक्त
म्हणतात शिव बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील.हे पण शिकवणे झाले ना.त्याला
म्हटले जाते सहज योग किंवा आठवण.आत्मा अविनाशी असून शरीर तर विनाशी आहे.बाबा
म्हणतात मी पण अविनाश आहे. तुम्ही मला बोलवतात की,येऊन पावन बनवा.आत्माच म्हणते ना.
पतित आत्मा,महान आत्मा म्हटले जाते.पवित्रता आहे तर सुख शांती पण आहे.
हे पवित्र ते पवित्र
चर्च आहे, क्रिश्चनांचे काही पवित्र चर्च नसते. तेथे तेथे तर विकारी पण जातात. येथे
तर विकारी मनुष्यांना येण्यासाठी मनाई आहे.एक कहाणी पण आहे ना,इंद्र सभेमध्ये एक
परी,विकारी व्यक्तीला लपवून घेऊन आली,इंद्राला माहित झाल्यानंतर तिला श्राप मिळाला
की,तू दगड बनशील.येथे तर श्राप इत्यादीची कोणतीच गोष्ट नाही.येथे तर ज्ञानाची वर्षा
होते.कोणीही पतित,या पवित्र महल मध्ये म्हणजे मधुबनला येऊ शकत नाही.एक दिवस आपण
येईल,हॉल पण खूप मोठा होईल.हे सर्वोच्च पवित्र स्थान आहे.तुम्ही पण पवित्र बनतात.
मनुष्य समजतात,विकारा शिवाय सृष्टी कशी चालेल?हे कसे होईल? आपले ज्ञान
राहते.देवतांच्या पुढे म्हणतात,तुम्ही सर्वगुणसंपन्न, आम्ही तर पापी आहोत.स्वर्ग तर
पवित्र ते पवित्र आहे. ते परत ८४ जन्म घेत अपवित्र बनतात.ती पावन दुनिया आणि ही
पतित दुनिया आहे.मुलगा जन्मला तर आनंद साजरा करतात,आजारी झाला तर तोंडचं पिवळे
पडते,मृत्यू झाला तर एकदम वेडे बनतात.असे पण काही काही असतात.अशांना पण घेऊन
येतात,बाबा यांच्या मुलांचा मृत्यू झाल्याने,डोके फिरले आहे,ही तर दु:खा ची दुनिया
आहे ना.आत्ता बाबा सुखाच्या दुनियेत घेऊन जातात.तर श्रीमतावरती चालायला पाहिजे.गुण
पण चांगले पाहिजेत. जे करतील त्यांना मिळेल.दैवी चलन पण पाहिजे. शाळेमध्ये पण
रजिस्टर मध्ये चरित्र लिहितात.कोणी तर बाहेर धक्के खात राहतात.आई-वडिलांच्या
नाकामध्ये दम करतात.आता बाबा शांतीधाम सुखधाम मध्ये घेऊन जातात.यांना शांतीचे शिखर
म्हटले जाते,म्हणजेच शांतीची उच्च अवस्था,जेथे आत्मे निवास करतात,ते शांतीचे
सर्वोच्च स्थान आहे.सूक्ष्म वतन चलचित्र आहे, त्याचा फक्त तुम्हाला साक्षात्कार
करवतात, बाकी त्यामध्ये काहीच नाही.याचा पण मुलांना साक्षात्कार झाला आहे. सतयुगा
मध्ये वृद्ध होतात,तर आनंदाने शरीर सोडतात. ही तर ८४ जन्माची जुनी कातडी आहे ना.
बाबा म्हणतात, तुम्हीच पावन होते, आत्ता पतित बनले आहात.आता बाबा आले आहेत, तुम्हाला
पावन बनवण्यासाठी.तुम्हीच मला बोलावले आहे ना. जीवात्माच पतित बनली आहे, परत तीच
पावन बनेल.तुम्ही देवी-देवता घराण्याचे होते ना.आता आसुरी घराण्याचे आहात.आसुरी आणि
ईश्वरीय म्हणजे दैवी घराण्यामध्ये खूप फरक आहे.हे तुमचे ब्राह्मण कुळ आहे. घराण्याला
डिनायस्टी म्हटले जाते, तेथे राज्य असते.येथे राज्य नाही. गीते मध्ये पांडव आणि
कौरवांचे राज्य लिहिले आहे परंतु असे तर नाही.
तुम्ही तर आत्मिक मूल
आहात. बाबा म्हणतात,गोड मुलांनो खूप खूप गोड बना,प्रेमाचे सागर बना. देह अभिमाना
मुळे प्रेमाचे सागर बनत नाहीत,म्हणून खूप सजा खावी लागते. परत सजा आणि थोडे पद
मिळते.स्वर्गामध्ये तर येतील परंतु खूप सजा खातील. सजा कशी मिळते,हे पण तुम्हा
मुलांनी साक्षात्कार केला आहे. बाबा तर समजवतात,खूप प्रेमाने चाला,नाहीतर क्रोधाचा
अंश राहतो. तुम्ही धन्यवाद माना,बाबा मिळाले आहेत, जे आम्हाला नरका मधून
स्वर्गामध्ये घेऊन जातात.सजा खाणे तर खूप खराब आहे.तुम्ही जाणतात सतयुगा मध्ये
प्रेमाची राजधानी आहे.प्रेमा शिवाय काहीच नाही.येथे तर थोड्या गोष्टींमध्ये चेहराच
बदलतो.बाबा म्हणतात मी तर पतित दुनिया मध्ये आलो आहे.मला निमंत्रणच पतित दुनिया
मध्ये देतात.बाबा परत सर्वांना निमंत्रण देतात,अमृत प्या.विष आणि अमृताचे एक पुस्तक
पण निघाले आहे,हे पुस्तक लिहिणाऱ्यांना बक्षीस मिळाले आहे,ते प्रसिद्ध झाले आहे.ते
पाहायला पाहिजे, काय लिहिले आहे.बाबा तर तुम्हाला ज्ञानामृत पाजत आहेत, तुम्ही परत
विष का पितात? राखी पौर्णिमा या वेळेतीलच आठवण आहे ना.बाबा सर्वांना म्हणतात,
पवित्रतेची प्रतिज्ञा करा,हा अंतिम जन्म आहे.पवित्र बना,योगामध्ये राहा,तर पाप नष्ट
होते.स्वतःला विचारायला पाहिजे,आम्ही आठवणी मध्ये राहतो की नाही ? मुलांची आठवण
करून खुश होतात ना.पत्नी पतीची आठवण करून खुश होते ना.हे कोण आहेत? भगवानुवाच
निराकार.बाबा म्हणतात,यांच्या ८४ जन्माच्या नंतर परत स्वर्गाचे मालक बनवतो.आता छोटे
झाड आहे,तर मायेचे वादळ खूप लागतात.या सर्व मोठ्या गुप्त गोष्टी आहेत.बाबा म्हणतात,
मुलांनो आठवणीच्या यात्रेमध्ये रहा आणि पवित्र बना.येथेच पूर्ण राजधानी स्थापन होत
आहे.गीतेमध्ये लढाई दाखवतात,पांडव डोंगरावरती जाऊन नष्ट झाले,परिणाम काहीच निघाला
नाही.
आता तुम्ही मुलं
सृष्टीच्या आदी मध्य अतला जाणतात.बाबा ज्ञानाचे सागर आहेत ना.ते सर्वोच्च आत्मा
आहेत.आत्म्याचे स्वरूप काय आहे,हे कोणालाही माहिती नाही.तुमच्या बुद्धी मध्ये आहे,
ते बिंदू आहेत.तुमच्या मध्ये पण अर्थ सहित कोणी समजत नाहीत,परत म्हणतात बिंदूची कशी
आठवण करायची? काहीच समजत नाहीत. तरीही बाबा म्हणतात,थोडे पण ज्ञान ऐकले तरी ज्ञानाचा
विनाश होत नाही.ज्ञान घेऊन परत सोडून देतात, परंतु थोडे जरी ज्ञान ऐकले तरी
स्वर्गामध्ये जरूर येतील.जे खूप ऐकतील,धारणा करतील,ते तर राजाई घराण्यांमध्ये येतील.थोडे
ज्ञान ऐकणारे प्रजा मध्ये येतील. राजधानी मध्ये तर राजा राणी इत्यादी सर्व असतात
ना.तेथे वजीर नसतात.येथे विकारी राजांना वजीर ठेवावा लागतो.बाबा तुमची बुद्धी खूप
विशाल बनवतात.स्वर्गामध्ये वजीर ठेवण्याची आवश्यकता राहत नाही.गाय आणि सिंह एकत्र
पाणी पितात.तर बाबा समजवतात तुम्ही खाऱ्या पाण्यासारखे बनू नका, खिरखंड बना.दूध आणि
साखर दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत ना. मतभेद इत्यादी काहीच करु नका. येथे तर मनुष्य
खूप भांडत राहतात.हा रौरव नर्क आहे.नर्का मध्ये बुडत राहतात.बाबा येऊन बाहेर
काढतात,काही तर काढत- काढत फसतात.काही तर दुसऱ्याला काढण्यासाठी जातात, आणि स्वतःच
फसतात.यज्ञाच्या सुरुवातीला अनेकांना माया रुपी मगरीने एकदमच हप केले.जरा पण खुण
राहिली नाही.कोणी कोणी परत येतात.कोणी एकदम नष्ट होतात.येथे प्रत्यक्षात सर्व होत
आहे.तुम्ही यज्ञाचा इतिहास ऐकला तर आश्र्चर्य कराल.असे गायन आहे,तुम्ही प्रेम करा
किंवा नका करू,आम्ही आपला दरवाजा सोडणार नाही.बाबा तर कधी मुखाद्वारे असे काही
म्हणत नाहीत. खूप प्रेमाने शिकवतात.मुख्य लक्ष तर समोर आहे. उच्च ते उच्च बाबा,
विष्णू सारखे बनवतात.तेच विष्णू परत ब्रह्मा बनतात.सेकंदामध्ये जीवन मुक्ती
मिळाली,परत ८४ जन्म घेऊन असे बनले.तुम्ही पण असेच बनतात.तुमचे पण फोटो काढत होते
ना.तुम्ही ब्रह्माची मुलं ब्राह्मण आहात.तुम्हाला ताज आत्ता नाही,भविष्यामध्ये
मिळेल, म्हणून तुमचे ते फोटो पण ठेवले आहेत. बाबा मुलांना दुहेरी मुकुटधारी
बनवतात.तुम्हाला जाणीव होते की बरोबर आमच्यामध्ये पाच विकार होते.(नारदाचे उदाहरण )
प्रथम भक्त पण तुम्हीच बनले आहात. आता बाबा खूपच उच्च बनवतात. एकदम पतित पासून पावन
बनवतात.बाबा काहीच घेत नाहीत. शिवबाबा काय घेणार?तुम्ही शिवबाबाच्या भंडारे मध्ये
देतात,मी तर विश्वस्त आहेना.देवाण-घेवाण सर्व हिशोब, शिवबाबांशी आहे.मी पण शकतो आणि
शिकवतो.ज्यांनी आपले सर्व काही दिले,ते परत काय घेतील. कोणत्या गोष्टींमध्ये ममत्व
राहत नाही. गायन पण आहे आमका स्वर्गवासी झाला परत त्यांना नरकाचे खानपान इत्यादी का
खाऊ घालतात? अज्ञान आहे ना. नर्कामध्ये आहेत तर पुनर्जन्म पण नरका मध्येच घेतील
ना.आता तुम्ही अमरलोक मध्ये जातात.ही पण बाजोली आहे. तुम्ही ब्राह्मण शेंडी
आहात,परत देवता क्षत्रिय बनाल, म्हणून बाबा समजतात खूप गोड बना,तरी सुधरत नाहीत,तर
म्हटले जाते त्यांचे भाग्य.स्वतःलाच नुकसान पोहोचवतात.ते सुधरत नाहीत, तर पुरुषार्थ
पण काय करणार.
बाबा म्हणतात,मी
आत्म्याशी गोष्टी करतो.अविनाशी आत्म्याला अविनाशी परमात्मा पिता, ज्ञान देत
आहेत.आत्म कानाद्वारे ऐकते. तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतात,रस्ता दाखवणारे
सर्वोच्च पंडा बसले आहेत.श्रीमत म्हणते, पवित्र बना,माझी आठवण करा, तर तुमचे पाप
नष्ट होतील.तुम्ही च सतोप्रधान होते,८४ जन्म पण तुम्हीच घेतले आहेत.बाबा यांना च
समजवतात,तुम्ही सतोप्रधान पासून आता तमोप्रधान बनले आहात, आत्ता परत माझी आठवण
करा.याला योग अग्नी म्हटले जाते. हे ज्ञान पण आत्ता तुम्हाला आहे. सतयुगामध्ये मला
कोणी आठवण करत नाहीत.या वेळेतच मी म्हणतो माझी आठवण करा,तर तुमचे पाप नष्ट
होतील,दुसरा कोणता रस्ता नाही.हे तर विद्यालय आहे ना.याला म्हटले जाते
विश्वविद्यालय,विश्व विद्यापीठ.रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अतचे ज्ञान दुसरे कोणी
जाणत नाहीत. शिवबाबा म्हणतात,या लक्ष्मी नारायण मध्ये पण हे ज्ञान नाही.ही तर
प्रारब्ध आहे ना,अच्छा.
गोड गोड फार
वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातापिता,बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा, आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) प्रेमाच्या
राजधानी मध्ये जायचे आहे,म्हणून आपसमध्ये खिरखंड होऊन राहायचे आहे.कधीच खाऱ्या
पाण्यासारखे बणून मतभेद मध्ये यायचे नाही.स्वतःला स्वतःच सुधारायचे आहे.
(२) देह अभिमान सोडून
मास्टर प्रेमाचे सागर बनायचे आहे.आपले दैवी चरित्र बनवायचे आहे.खूप खूप गोड होउन
चालायचे आहे.
वरदान:-
मग्न
अवस्थाच्या अनुभवाद्वारे मायेला आपले भक्त बनवणारे, माया जीत भव.
मग्न अवस्थेचा अनुभव
करण्यासाठी,आपले अनेक स्वमान किंवा स्वरूप, अनेक गुणांचा शृंगार, अनेक प्रकाराचा
आनंद,आत्मिक नशेचा,तसेच रचनाकार आणि रचनेच्या विस्ताराच्या गोष्टी,प्राप्ति च्या
गोष्टी स्मृतीमध्ये ठेवा.जे तुम्हाला पसंद आहे,त्यावरती मनन करा, तर मग्न अवस्था
सहज अनुभव होईल.परत कधी परवश होणार नाहीत.माया नेहमीसाठी नमस्कार करेल, संगम युगाची
प्रथम भक्त माया बनेल.जेव्हा तुम्ही मायाजीत मास्टर भगवान बनाल, तेव्हा माया भक्त
बनेल.
बोधवाक्य:-
आपले उच्चार
आणि आचरण ब्रह्मा पित्यासमान असेल, तेव्हा म्हणाल खरे ब्राह्मण.