13-12-20 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.03.87 ओम शान्ति
मधुबन
खऱ्या आत्मिक सजनीची
लक्षणे
आज आत्मिक साजन आपल्या
आत्मिक सजनींना,आत्म्यांना भेटण्यासाठी आले आहेत.सर्व कल्पामध्ये या वेळेतच आत्मिक
साजन आणि सजनींचे मिलन होते. बाप दादा आपल्या प्रत्येक आत्मिक सजनींना पाहून आनंदित
होत आहेत की,कसे आत्मिक आकर्षणा द्वारे आकर्षित होऊन आपल्या खऱ्या साजनला जाणले आहे,
प्राप्त केले आहे.हरवलेल्या सजनींना पाहून साजन पण खुश होतात, कारण परत आपल्या
ठिकाण्यावरती पोहोचले आहेत. असे सर्व प्राप्ति करवणारे दुसरे कोणी असू शकत
नाहीत.आत्मिक साजन नेहमी आपल्या सजनींना भेटण्यासाठी कोठे येतात? जसे श्रेष्ठ
साजन-सजनी आहेत,असे श्रेष्ठ स्थानावरती भेटण्यासाठी येतात.हे कोणते स्थान आहे,जेथे
मिलन होते.या स्थानाला जे पण म्हणा, सर्व नावं देऊ शकता.तसे तर मिलनचे स्थान,जे
प्रिय वाटतात,ते कोणते स्थान आहेत?मिलन एक तर फुलांच्या बागेमध्ये होते किंवा
सागराच्या किनाऱ्यावर मीलन होते. ज्याला तुम्ही लोक बीच म्हणजे समुद्राचा किनारा
म्हणतात. तर आत्ता कुठे बसले आहात, ज्ञानसागराच्या किनाऱ्यावरती, आत्मिक मिलनाच्या
स्थानावरती बसले आहात.आत्मिक किंवा ईश्वरीय बागेमध्ये आहात.बाकी अनेक प्रकारचे बाग
पाहिले असतील परंतु अशी बाग जेथे प्रत्येक जण एक दोघांपेक्षा जास्त उमलेले फुलं
आहेत.एक-एक श्रेष्ठ सुंदरता द्वारे सुगंध देत आहेत,अशी बाग आहे.याच बीच वरती बापदादा
किंवा साजन भेटण्यासाठी येतात.तुम्ही अनेक बीच पाहिले असतील परंतु असा बीच कधी
पाहिला,जेथे ज्ञान सागराच्या लाटा, शक्तीच्या लाटा,वेगवेगळ्या लाटा नेहमीसाठी
ताजेतवाने करतात.तर हे स्थान पसंत आहेत आहे ना. जेथे स्वच्छता पण आहे आणि आनंद पण
आहे, सुंदरता पण आहे. इतक्या प्राप्ती पण आहेत.असे मनोरंजनाचे विशेष स्थान,तुम्हा
सजनीसाठी साजन ने बनवले आहे, जेथे आल्यामुळेच प्रेमाची अनुभूती करतात,अनेक
प्रकारच्या कष्टा पासून मुक्त होतात.सर्वात मोठे कष्ट नैसर्गिक आठवणीचे,ते सहज
अनुभव करतात आणि कोणत्या कष्टा पासून सुटतात लौकिक नोकरीपासून पण मुक्त होतात. भोजन
बनवण्यापासून पण मुक्त होतात,मधुबनमध्ये सर्व बनवलेले,तयारच मिळते ना.तर आठवण पण
स्वतःच अनुभव होते.ज्ञानरत्ना द्वारे झोळी भरत राहते.अशा स्थानावर जेथे कष्टा पासून
मुक्त होतात आणि प्रेमामध्ये मगन होतात.
तसेच स्नेहाचे लक्षणं,विशेष हे गायन केले आहे,जिथे दोन राहत नाहीत परंतु दोन मिळून
एक होतात,यालाच सामावणे म्हटले जाते.भक्तांनी याच स्नेहाच्या स्थितीला सामावने किंवा
विलीन होणे म्हटले आहे.ते लोक तर विलीन होण्याचा अर्थ समजत नाहीत.प्रेमामध्ये विलीन
होणे,ही स्थिती आहे परंतु स्थिती च्या ऐवजी त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वालाच
नेहमीसाठी समाप्त केले आहे. सामवने म्हणजे समान बनणे.जेव्हा बाबांच्या किंवा आत्मिक
साजना सोबत मिलन मध्ये मग्न होतात,तर बाप समान बनणे किंवा सामावणे अर्थात समान
बनण्याचा अनुभव करतात.या स्थितीला भक्ताने सामवणे म्हटले आहे.विलीन पण
होतात,सामावतात पण, परंतु हे मिलन प्रेमाच्या स्थितीची अनुभूती आहे समजले,म्हणून
बाप दादा आपल्या सजनींना पाहत आहेत. खऱ्या सजनी म्हणजे,नेहमी सजनी, नैसर्गिक
सजनी.खऱ्या सजनींची विशेषत जाणतात का? तरी त्याची मुख्य लक्षणे आहेत.
प्रथम लक्षण-
एकच साजन
द्वारे सर्व संबंधाची वेळेप्रमाणे अनुभूती करणे. साजन एक आहे परंतु एकाच्या सोबत
सर्व संबंध आहेत.जो संबंध पाहिजे आणि ज्या वेळेस या संबंधाची आवश्यकता आहे,त्या
वेळेस त्या संबंधाचे रूपाद्वारे प्रेमाच्या तिथीचा अनुभव करू शकतात. तर प्रथम लक्षण
आहेत सर्व संबंधाची अनुभूती करणे, सर्व शब्दाला अधोरेखित करा,फक्त संबंध
नाहीत.कोणत्या अशा नटखट सजनी पण आहेत,ज्या समजतात संबंध तर जोडले आहेत परंतु सर्व
संबंध आहेत? आणि दुसरी गोष्ट वेळेवर संबंधाची अनुभूती होते? ज्ञानाच्या आधारे
संबंधांची अनुभूती आहे की, ह्रदयाच्या अनुभूती द्वारे संबंध आहेत?बापदादा खऱ्या
हृदयावरती प्रसन्न होतात.फक्त बुद्धी असणाऱ्या वरती खुश होत नाहीत परंतु दिलराम
खऱ्या ह्रदयावर खुश होतात,कारण ह्रदयापासून केलेला अनुभव मनच जाणते,दिलाराम
जाणतात.सामवण्याचे स्थान हृदयाला म्हणले आहे, बुद्धीला नाही.ज्ञान सामावण्याचे
स्थान बुद्धी आहे,परंतु साजनला सामावण्याचे स्थान हृदय आहे. साजन सजनीच्या च गोष्टी
ऐकवतील.काही सजनी बुद्धी खूप चालवतात, परंतु मनापासून केल्यामुळे बुद्धीचे कष्ट
अर्धे होते.जे मनापासून सेवा करतात त्यांची आठवण, त्यांचे कष्ट कमी आणि संतुष्टता
जास्त होते.जे मनापासून स्नेहाद्वारे आठवण करत नाहीत,फक्त ज्ञानाच्या आधारे,
बुद्धीच्या आधारे आठवण किंवा सेवा करतात,त्यांना कष्ट जास्त करावे लागतात,संतुष्टता
कमी होते.जरी सफलता पण मिळाली, तरी पण मनाची संतुष्टता कमी होते.हेच विचार करत
राहतील,झाले तर चांगले,परंतु तरीही, परंतु तरीही.…करत राहतील आणि मनापासून आठवण
करणारे,सेवा करणारे, नेहमी संतुष्टताचे गीत गात राहतील. मनाच्या संतुष्टताचे
गीत,मुखाच्या संतुष्टाताचे गीत नाही.खऱ्या सजनी मनापासून सर्व संबंधाची वेळेप्रमाणे
अनुभूती करतील.
दुसरे लक्षण-
खऱ्या सजनी प्रत्येक परिस्थितीमध्ये,प्रत्येक कर्मामध्ये नेहमी प्राप्तीच्या खुशी
मध्ये राहतील. एक आहे अनुभूती,दुसरी आहे त्याद्वारे प्राप्ती.काही अनुभव पण करतात
की,होय माझे बाबा आहेत,साजन पण आहेत,मुलगा पण आहे परंतु प्राप्ती जेवढी पाहिजे,तेवढी
होत नाही.पिता आहेत परंतु वारशाच्या प्राप्तीची खुशी राहत नाही.अनुभूतीच्या सोबत
सर्व संबंधा द्वारे प्राप्तीचा अनुभव व्हावा.जसे बाबांच्या
संबंधाद्वारे नेहमी वर्षाच्या प्राप्तीची जाणीव व्हावी,भरपूरता व्हावी. सद्गुरु
द्वारा नेहमी वरदाना द्वारे संपूर्ण स्थितीचा किंवा नेहमी संपन्न स्वरूपाचा अनुभव
व्हावा.तर प्राप्तीचा अनुभव पण आवश्यक आहे.तो आहे संबंधाचा अनुभव,हा आहे प्राप्तीचा
अनुभव.काहींना सर्व प्राप्तींचा अनुभव होत नाही.मा.सर्वशक्तीवान आहेत परंतु वेळेवर
शक्तींची प्राप्ती होत नाही.प्राप्तीची अनुभूती नाही तर प्राप्ति मध्ये पण कमी
आहे.तर अनुभूतीच्या सोबत प्राप्ती स्वरुप पण बना,ही खऱ्या सजनी ची लक्षणे लक्षणे
आहेत.
तीसरी आहे-
ज्या सजनीला अनुभूती आहे, प्राप्ती पण आहे, ती नेहमी तृप्त राहिल, कोणत्याही
गोष्टींमध्ये अप्राप्त आत्मा वाटणार नाही.तर तृप्ती ही सजनीची
विशेषता आहे.जेथे प्राप्ती आहे, तेथे तृप्ती जरुर आहे.जर तृप्ती नाही,तर अवश्य
प्राप्तीमध्ये कमी आहे आणि प्राप्ती नाही तर सर्व संबंधामध्ये कमी आहे.तर तिसरी
लक्षणं आहेत- अनुभूती,प्राप्ती आणि तृप्ती.नेहमी तृप्त आत्मा.जशी पण वेळ असेल,जसे
पण वातावरण असेल,जसे पण सेवेचे साधन असेल,जसे पण सेवेच्या संघटना चे सोबती असतील
परंतु प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक हालचाल मध्ये तृप्त रहा.असे खऱ्या सजनी
आहात ना.तृप्त आत्म्यामध्ये कोणतीही इच्छा नसेल.तसे पाहता तृप्त आत्मे खूप कमी
असतात.कोणत्या ना कोणत्या गोष्टी मध्ये,मग ती मान,शानची भूख असते.भुक असणारे कधी
तृप्त राहू शकत नाहीत.ज्याचे पोट भरलेले असेल,ते नेहमी तृप्त असतील.तर जसे शरीराच्या
भोजनाची भुक असेल,तसेच मनाची भुख- शान,मान, साधन सुविधा आहे.ही मनाची भुक आहे.जसे
शरीराची तृप्ती असणारे संतुष्ट असतील, तसेच मनाची तृप्ती असणारे नेहमी संतुष्ट
असतील.संतुष्टता तृप्तीची लक्षणं आहेत.जर तृप्त आत्मा नसतील,मग ती शरीराची भुक असेल
किंवा मनाची भूक असेल, तर जितके पण मिळेल,ज्यादा मिळेल परंतु तृप्त आत्मा नसल्यामुळे,
नेहमीच अतृप्त राहतील.असंतुष्टता राहते.श्रेष्ठ असतात ते थोड्या मध्ये तृप्त
होतात,याची लक्षणे ते नेहमी भरपूर असतील. एका चपातीमध्ये पण तृप्त असतील आणि जे
अतृप्त असतील, ते ३६ प्रकारचे भोजन मिळून पण तृप्त होणार नाहीत,कारण मनाची भुक आहे.
खऱ्या सजनी ची लक्षणं,त्या नेहमी तृप्त असतील.तर तीन्ही लक्षणं तपासून पहा.नेहमी हा
विचार करा की,आम्ही कोणाच्या सजनी आहोत.जे नेहमी संपन्न आहेत, अशा साजनच्या सजनी
आहोत. तसं संतुष्टतेला कधी सोडू नका. सेवा सोडून द्या परंतु संतुष्टता सोडू नका. जी
सेवा असंतुष्ट बनवेल,ती सेवा, सेवा नाही.सेवेचा अर्थ आहे मेवा देणारी.तर खऱ्या सजनी
सर्व हद्दच्या इच्छा पासून दूर नेहमीच संपन्न आणि समान असतील.
आज सजनी च्या गोष्टी ऐकवत आहे. नाज नखरे रे पण खूप करतात. साजन पण पाहून हसतात.नाज
नखरे खुशाल करा, परंतु साजनला साजन समजून त्याच्या समोर करा, दुसऱ्याच्या समोर
नाही.वेगवेगळे हद्दचे स्वभाव, संस्काराचे नखरे आणि नाज करतात. जेथे माझा स्वभाव,माझे
संस्कार शब्द येतात,तेथे पण नाज नखरे सुरू होतात.बाबांचा स्वभावच माझा स्वभाव
असावा.माझा स्वभाव बाबाच्या स्वभाव पेक्षा वेगळा असू शकत नाही.तो मायेचा स्वभाव आहे,
दुसऱ्याचा स्वभाव आहे,त्याला माझे कसे म्हणू शकतो?माया परक्याची आहे, आपली नाही.बाबा
आपले आहेत, माझा स्वभाव म्हणजे बाबांचा स्वभाव.मायेच्या स्वभावाला माझे म्हणणे
चुकीचे आहे.माझा शब्दच फेऱ्यांमध्ये घेऊन येतो,अर्थात चक्रा मध्ये घेऊन येतो.सजनी
साजनच्या पुढे असे नाज नखरे पण दाखवते. जे बाबांचे तेच माझे आहे.प्रत्येक
गोष्टीमध्ये, भक्तीमध्ये हेच म्हणता. जे तुझे तेच माझे आहे,माझे काहीच नाही,परंतु
जे तुझे तेच माझे.जे बाबाचे संकल्प,तेच माझे संकल्प. सेवेची भूमिका
वठवण्याचे,बाबांचे स्वभाव संस्कार ते माझे.तर या द्वारे काय होईल?हद्दचे माझे, तुझे
होईल.तुझे च माझे आहे,वेगळे काही माझे नाही.जे पण बाबा पासून वेगळे आहे,ते माझे
नाहीच.तो मायेचा फेरा आहे,या हद्दच्या नाज नखऱ्यातुन निघून आत्मिक नाज-मी तुझी आणि
तू माझा,वेगवेगळ्या संबंधाच्या अनुभूतीचे आत्मिक नखरे जरूर करा,परंतु हे करू
नका.सबंध निभावण्या मध्ये आत्मिक नखरे करू शकतात,प्रेमाच्या प्रीतीचे नखरे चांगले
असतात.कधी सखा च्या संबंधा द्वारे प्रेमाच्या नखऱ्याचा अनुभव करा,तो नखरा नाही परंतु
वेगळेपण आहे.स्नेहाचे नखरे प्रिय असतात.जसे लहान मुलं खूप स्नेही आणि पवित्र
असल्यामुळे त्यांचे नखरे सर्वांना चांगले वाटतात. शुद्धता आणि पवित्रता मुलांमध्ये
असते, दुसरा मोठा कोणते नाज नखरे करतील तर ते खराब म्हटले जाते.तर बाबा पासून
वेगवेगळ्या संबंधाचे,स्नेहाचे,पवित्रतेचे नाज नखरे जरुर करा,जर करायचे असतील तर.
नेहमी साथ आणि हातच,खऱ्या सजनी साजन ची लक्षणं आहेत. साथ आणि हात सुटायला नको. नेहमी
बुद्धीची साथ हवी आणि बाबांच्या प्रत्येक कार्यांमध्ये सहयोगाचा हात हवा.एक
दोघांच्या सहयोगाची लक्षणे, हातामध्ये हात दाखवतात ना.तर नेहमी बाबांचे सहयोगी
बना.हे आहे नेहमी हातामध्ये हात आणि नेहमी बुद्धीद्वारे सोबत राहणे.मनाची लगन
बुद्धीची साथ हवी.या स्थितीमध्ये राहणे म्हणजे खऱ्या साजन आणि सजनीच्या स्थितीमध्ये
राहणे, समजले.वायदाच हा आहे की, सोबत राहयचे आहे.कधी-कधी सोबत राहू,हा वायदा
नाही.मनाचा लगाव कधी साजन सोबत आहे आणि कधी नाही,तर ते नेहमी साथ नाही झाले
ना,म्हणून खऱ्या सजनी च्या स्थितीमध्ये या.दृष्टीमध्ये पण साजन,वृत्तीमध्ये पण
साजन,सृष्टीच साजनची.
तर ही साजन आणि सजनीचे संघटन आहे.बाग पण आहे, आणि सागराचा किनारा पण आहे.हा
आश्चर्यकारक असा खाजगी बीच, सागराचा किनारा आहे.जो हजारोंच्या मध्ये पण स्वतंत्र आहे.
प्रत्येक जण अनुभव करतो की,माझ्यासोबत साजनचे वैयक्तिक प्रेम आहे.प्रत्येकाला
वैयक्तिक प्रेमाची जाणीव होते ना,हेच आश्चर्यकारक साजन आणि सजनी आहेत.एकच साजन आहे
परंतु ते सर्वांचे आहेत.सर्वांचा अधिकार सर्वात जास्त आहे.प्रत्येकाला अधिकार
आहे.अधिकरा मध्ये क्रमांक नाहीत.अधिकार प्राप्त करण्यामध्ये क्रमांक होतात.नेहमी
हीच वृत्ती ठेवा की,आम्ही ईश्वरीय बागेमध्ये हात आणि सोबत घेऊन चालत आहोत किंवा बसले
आहोत. आत्मिक बीच वरती हात आणि सोबत घेऊन आनंद साजरा करत आहोत. तर नेहमीच मनोरंजना
मध्ये राहा, नेहमी खुश राहा, नेहमी संपन्न राहा. अच्छा. हे दुहेरी परदेशी पण दुहेरी
भाग्यवान आहेत, अच्छा. चांगले आहे, जे आज पर्यंत पोहोचले, पुढे चालून काय परिवर्तन
होईल,ते तर वैश्विक नाटकाची भावी,परंतु दुहेरी भाग्यशाली वेळेनुसार पोहचले आहेत,
अच्छा.
नेहमी अविनाशी सजनी बनवून आत्मिक साजन सोबत प्रेमाची रिती निभावणारे, नेहमी स्वतःला
सर्व प्राप्ती द्वारे संपन्न अनुभव करणारे, नेहमी प्रत्येक स्थिती किंवा
परिस्थितीमध्ये तृप्त राहणारे, नेहमी संतुष्टतेच्या द्वारे भरपूर बनून दुसऱ्यांना
पण भरपूर करणारे, असे नेहमीच्या सोबत आणि हात मिळवणाऱ्या खऱ्या सजनीला आत्मिक साजनची
मनापासुन प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
वरदान:-
नेहमी श्रेष्ठ आणि नवीन प्रकारच्या सेवा द्वारे वृद्धी करणारे, सहज सेवाधारी भव.
संकल्पा द्वारे
ईश्वरीय सेवा करणे, ही पण सेवेची श्रेष्ठ आणि नवीन पद्धत आहे.जसे जवाहरी रोज सकाळी
आपल्या रत्नाला तपासतात की, स्वच्छ आहे,ठीक आहे, चांगल्या जागेवरती ठेवले आहेत,असे
रोज अमृतवेळेला आपल्या सबंध संपर्का मध्ये येणाऱ्या आत्म्यावरती, संकल्पाद्वारे
दृष्टी घाला.तुम्ही त्यांना संकल्पा द्वारे आठवण कराल, तेवढेच ते संकल्प
त्यांच्याजवळ पोहोचतील. याप्रकारे सेवेची नवीन पद्धत अवलंबन करून, वृध्दी करत चला.
आपल्या सहज योगा च्या सूक्ष्म शक्ती, आत्म्यांना आपल्याकडे स्वतः आकर्षित करतील.
सुविचार:-
बहानेबाजीला,कारणाला
नष्ट करा, आणि बेहद्दच्या वैराग्य वृतीला विलीन करा.