04-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बेहदचे बाबा आले आहेत,तुम्हा मुलांचा ज्ञान रत्नाने शृंगार करण्यासाठी,उच्च पद मिळवायचे असेल तर नेहमी ज्ञान रत्नांनी शृंगारीत राहा"

प्रश्न:-
कोणत्या मुलांना पाहून बेहदचे पिता खूप आनंदित होतात?

उत्तर:-
जी मुलं सेवेसाठी नेहमी तत्पर राहतात,अलौकिक आणि पारलौकिक पित्याचे पुर्ण अनुकरण करतात,ज्ञान योगा द्वारे आत्म्याचा श्रूंगार करतात,पतितांना पावन बनवण्याची सेवा करतात,अशा मुलांना पाहून त्यांना खूप आनंद होतो.बाबांची इच्छा आहे की,माझ्या मुलांनी कष्ट करून उच्चपद घ्यावे.

ओम शांती।
आत्मिक पिता,आत्मिक मुलांना,समजवतात की,गोड गोड मुलांनो,जसे लौकिक पित्याला मुलं प्रिय वाटतात,तसेच बेहद्दच्या पित्याला पण बेहद्यचे मुलं प्रिय वाटतात.बाबा सावधानी देतात की,मुलांनी उच्चपद मिळवावे.हीच पित्याची इच्छा असते.तर बेहद्दच्या पित्याची पण हीच इच्छा राहते. मुलांना ज्ञान आणि योगाच्या दागिन्या द्वारे शृंगारतात.तुम्हाला दोन्ही पिता खूप चांगल्या प्रकारे श्रूंगारतात की,मुलांनी उच्चपद मिळवावे.लौकिक पिता पण आनंदित होतात,तर पारलौकिक पिता पण आनंदित होतात.जे चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करतात,त्यांना पाहून गायन पण केले जाते की,पित्याचे अनुकरण करा.तर दोघांचे अनुकरण करायचे आहे.एक आहेत आत्मिक पिता,दुसरे आहेत अलौकिक पिता. तर पुरूषार्थ करून उच्च पद मिळवायचे आहे.

तुम्ही जेव्हा योग भट्टीमध्ये होते,तेव्हा ताज सहित सर्वांचा फोटो काढला होता.बाबानी समजवले आहे,वास्तविक मध्ये प्रकाशाचा ताज नसतो.ती तर पवित्रतेचे एक लक्षण दाखवले आहे,जे सर्व देवतांना देतात.असे नाही की,सफेद प्रकाशाचा ताज असतो.हे पवित्रतेचे चिन्ह आहे. प्रथम तुम्ही सतयुगा मध्ये राहत होते.तुम्हीच राहत होते ना.बाबा पण म्हणतात आत्मा आणि परमात्मा खूप काळ वेगळे राहिले. तुम्ही मुलं प्रथम भेटतात,परत तुम्हालाच प्रथम जायचे आहे.मुक्तीधामचे फाटक पण तुम्हाला उघडायचे आहे.तुम्हा मुलांचा बाबा शृंगार करतात.माहेरी वनवाह मध्ये राहतात,म्हणजे साधारण राहतात.या वेळेत तुम्हाला पण साधारण राहायचे आहे,न खूप उच्च दर्जाचे,ना एकदम कनिष्ठ दर्जाचे.बाबा पण म्हणतात मी साधारण तना मध्ये प्रवेश करतो. कोणत्याही देहधारीला भगवान म्हणू शकत नाहीत.मनुष्य मनुष्याची सद्गती करू शकत नाहीत.सद्गती तर गुरुच करतात.मनुष्य साठ वर्षाच्या नंतर वानप्रस्थ मधे जातात,परत गुरु करतात.ही पण परंपरा आत्ताची आहे,जी भक्तिमार्ग मध्ये चालत येते.आजकाल तर लहान मुलांना पण गुरु करवतात.जरी वानप्रस्थ अवस्था नाही परंतु अचानक मृत्यू होतो,म्हणून मुलांना पण गुरु करवतात.जसे बाबा म्हणतात,तुम्हा सर्व आत्म्यांचा,वारसा घेण्याचा हक्क आहे.ते म्हणतात गुरुशिवाय पद मिळू शकत नाही,म्हणजेच ब्रह्ममध्ये विलीन होऊ शकत नाहीत.तुम्हाला तर विलीन व्हायचे नाही.ही भक्ती मार्गातील अक्षरं आहेत.आत्मा तर बिंदू सारखी आहे,बिंदूच आहे.बाबा पण बिंदू आहेत,त्या बिंदूला ज्ञानाचे सागर म्हटले जाते.तुम्हीपण आत्मे लहान रूपातच आहात,त्यामध्ये सर्व ज्ञान भरले जाते. तुम्ही पूर्ण ज्ञान घेतात, चांगल्या मार्काने पास होतात ना. असे नाही की शिवलिंग खूप मोठे आहे.जितकी मोठी आत्मा तेवढेच परमात्मा आहेत.आत्मा परमधाम मधून येथे भूमिका वठवण्यासाठी येते.बाबा म्हणतात मी पण परमधाम वरूनच येतो परंतु मला स्वतःचे शरीर नाही.मी रूप आहे आणि बसंत पण आहे.परम आत्मा रुप आहे,त्यांच्यामध्ये सर्व ज्ञान भरलेले आहे.ज्ञानाची वर्षा करतात, तर सर्व मनुष्य,पाप आत्म्यापासून पुण्यात्मा बनतात.बाबा गती-सद्गती दोन्ही देतात.तुम्ही सदगती मध्ये जातात बाकी सर्व गतीमध्ये म्हणजेच आपल्या घरी जातात.ते गोड घर आहे.आत्माच कानाद्वारे ऐकते.आता बाबा म्हणतात,गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांनो,आता परत जायचे आहे, त्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे.पवित्र बनल्या शिवाय कोणीही परत जाऊ शकत नाही.मी सर्वांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. आत्म्याला शिवाची वरात म्हटले जाते.आता शिवबाबा शिवालयाची स्थापना करत आहेत,परत रावण येऊन वेश्यालयाची स्थापन करतात.वाममार्गाला वेश्यालय म्हटले जाते.बाबांच्या जवळ खूप मुलं अशी आहेत,जे लग्न करून पण पवित्र राहतात.सन्यासी तर म्हणतात,असे तर होऊ शकत नाही. जे दोन्ही एकत्र राहतील.येथे समजवले जाते,यामध्ये खूप प्राप्ती आहे.पवित्र राहिल्यामुळे २१ जन्माची राजधानी मिळते,तर एक जन्म पवित्र राहणे मोठी गोष्ट नाही. बाबा म्हणतात,तुम्ही कामचिते वरती बसून अगदीच काळे बनले होते.कृष्णासाठी म्हणतात गोरा आणी सावळा, शामसुंदर.हे ज्ञान यावेळेतील आहे.कामचितेवरती बसल्यामुळे सावळे बनतात,परत त्यांना गावातील खेडूत मुलगा म्हटले जाते.बरोबर असे होते ना. कृष्णाला तर असे म्हटले जाऊ शकत नाही.ब्रह्माच्या अनेक जन्माच्या अंत मध्ये बाबा प्रवेश करून गोरा बनवतात.आता तुम्हाला एक बाबांची आठवण करायची आहे.बाबा तुम्ही खूप गोड आहात,खूप गोड वारसा देता. आम्हाला मनुष्यापासून देवता मंदिर लायक बनवतात.अशा गोष्टी स्वतः सोबत करायच्या आहेत.मुखाद्वारे काहीच बोलायचे नाही.भक्ती मार्गामध्ये तुम्ही मज साजन ची खुप आठवण करत आला आहात,आता तुम्ही येऊन भेटले आहात.बाबा तुम्ही तर सर्वांपेक्षा खूप गोड आहात.तुमची आठवण,आम्ही का करणार नाही.तुम्हालाच प्रेमाचे शांतीचे सागर,प्रेमाचे सागर म्हटले जाते,तुम्हीच वारसा देतात.बाकी प्रेरणा द्वारे काहीच मिळत नाही. बाबा तर सन्मुख तुम्हा मुलांना शिकवतात.ही पाठशाळा आहे ना. बाबा म्हणतात,मी तुम्हाला राजांचे राजा बनवतो,हा राजयोग आहे. आता तुम्ही मूळवतन,सूक्ष्म वतन, स्थूल वतनला जाणले आहे.इतकी छोटी आत्मा कशा प्रकारे भूमिका वठवत राहते.हे पूर्वनियोजित आहे, याला म्हटले जाते अनादी अविनाशी वैश्विक नाटक.हे नाटक फिरत राहते,यामध्ये संशयाची कोणती गोष्ट नाही.बाबा सृष्टीच्या आदी मध्य अंतचे रहस्य समजवतात.तुम्ही स्वदर्शन चक्रधारी आहात.तुमच्या बुद्धीमध्ये सर्व चक्र फिरत राहते.याद्वारे तुमचे पाप नष्ट होतात.बाकी कृष्णाने कोणते सुदर्शन चक्र चालून हिंसा केलेली नाही.स्वर्गामध्ये न लढाईची हिंसा असते,ना काम कटारी चालवली जाते.देवी-देवता तर दुहेरी अहिंसक असतात.यावेळेत तुमचे पाच विकारा बरोबर चालते.बाकी दुसऱ्या कोणत्या युद्धाची गोष्टच नाही.आता बाबा तर उच्च ते उच्च आहेत परत उच्च ते उच्च लक्ष्मीनारायण सारखा वारसा देतात. यांच्यासारखे उच्च बनायचे आहे.जितका तुम्ही पुरुषार्थ कराल तेवढे उच्चपद मिळेल.हाच तुमचा कल्प-कल्प अभ्यास राहील.आता चांगला पुरुषार्थ केला,तर कल्प कल्प करत राहाल.शारीरिक शिक्षणा द्वारे इतके उच्च पद मिळू शकत नाही,जितके आत्मिक शिक्षणाद्वारे मिळू शकते.उच्च ते उच्च हे लक्ष्मीनारायण बनतात. हे पण मनुष्य आहेत परंतु दैवी गुणांची धारणा करतात,म्हणून देवता म्हटले जाते.बाकी ८-१० भुजा असणारे कोणी असत नाहीत. भक्तीमध्ये साक्षात्कार होतो,तर खूप रडतात,दुःखामुळे अश्रू येतात.येथे तर बाबा म्हणतात,आश्रू आले तर नापास झाले.आईचा मृत्यू झाला तरी तुम्ही ज्ञान रत्न घेत राहा. आजकाल तर मुंबईमध्ये कोणाचा मृत्यू होतो,तर ब्रह्मकुमारींना बोलवतात की,येऊन शांती द्या. तुम्ही समजतात, आत्म्याने एक शरीर सोडून दुसरे घेतले,यामध्ये तुमचे काय जाते,रडल्या मुळे काय फायदा होईल? असे म्हणतात त्यांना काळानी झडप घातली, घेऊन गेले. अशी कोणती गोष्ट असत नाही.ही तर आत्मा आपोआप एक शरीर सोडते. आपल्या वेळेनुसार शरीर सोडून दुसरा जन्म घेते.बाकी काळ कोणती गोष्ट नाही.सतयुगा मध्ये गर्भ महल असतो,सजा मिळण्याची कोणती गोष्ट नाही.तेथे तुमचे कर्म अकर्म बनतात.तेथे माया नसल्यामुळे विकर्म होत नाहीत. तुम्ही विकर्माजीत बनतात.प्रथम विकर्माजीत संवत चालतो,परत भक्तिमार्ग सुरू होतो,तर राजा विक्रम संवत सुरू होते.यावेळेत जे विकर्म केले आहेत,त्यांच्या वरती विजय मिळवायचा आहे, विकर्माजीत नाव ठेवले जाते.द्वापर युगा मध्ये विक्रम राजा असतो,तर विकर्म करत राहतात.सुई वरती जर गंज चढला असेल तर,चुबंक आकर्षित करणार नाही.जितका पापाचा गंज उतरत जाईल,तर चुंबक आकर्षित करेल. बाबा तर पूर्ण पवित्र आहेत.तुम्हालापण योगबळाद्वारे पवित्र बनवतात.जसे लौकिक पिता पण मुलांना पाहून खुश होतात ना.बेहद्दचे पिता पण मुलांच्या सेवेमुळे खुश होतात.मुलं खूप कष्ट घेत आहेत.सेवेसाठी नेहमी तत्पर राहायचे आहे.तुम्ही मुलं पतितांना-पावन बनवणारी ईश्वरी संस्था आहात.आता तुम्ही ईश्वरीय संतान आहात,बेहद्द चे पिता आहात आणि तुम्ही सर्व भाऊ-बहीण आहात,बस दुसरा कोणता संबंध नाही.मुक्तिधाम मध्ये पिता आणि तुम्ही आत्मे भाऊ-भाऊ आहात.परत सतयुगामध्ये जातात,तर तेथे एक मुलगा, एक मुलगी बस.येथे तर खूप नातेवाईक असतात.जसे काका-मामा इत्यादी.

मुळवतन तर गोड घर मुक्तिधाम आहे.त्यासाठीच मनुष्य खूप यज्ञ तप करतात, परंतु वापस तर कोणी जाऊ शकत नाहीत,फक्त थापा मारत राहतात.सर्वांचे सद्गती दाता तर एकच आहेत,दुसरे कोणी होऊ शकत नाही.आता तुम्ही संगम युगामध्ये आहात.येथे तर असंख्य मनुष्य आहेत.सतयुगामध्ये खूप थोडे असतात.स्थापना परत विनाश होतो.आता अनेक धर्म असल्यामुळे इतका हंगामा आहे.तुम्ही शंभर टक्के पवित्र होते,परत ८४ जन्माच्या नंतर १००% अपवित्र बनतात.आता बाबा येऊन सर्वांना जागृत करतात.आता जागे व्हा, सतयुग येत आहे.सत्य बाबा तुम्हाला २१ जन्माचा वारसा देतात. भारतच सत्य खंड बनतो,बाबा सत्य खंड बनवतात,परत खोटा खंड कोण बनवते? पाच विकार रूपी रावण.रावणाचा खूप मोठा पुतळा बनवतात,परत त्याला जाळतात, कारण क्रमांक एक चा दुश्मन आहे. मनुष्याला ही माहिती नाही की, कधी पासून रावणाचे राज्य सुरू झाले. बाबा समजवतात अर्धा कल्प रामराज्य आहे,अर्धा कल्प रावण राज्य आहे.बाकी रावण कोणताही मनुष्य नाही,ज्याला मारायचे आहे. यावेळी सर्व दुनिये वरती रावण राज्य आहे.बाबा येऊन रामराज्याची स्थापना करतात,परत जयजयकार होतो.स्वर्गा मध्ये नेहमी आनंदित राहतात,त्याला सुखधाम म्हटले जाते.याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते.बाबा म्हणतात या पुरुषार्था द्वारे तुम्ही असे श्रेष्ठ बनणार आहात.तुमचे चित्र पण बनवले होते,अनेक जण आले परत ज्ञान घेऊन पण अनेक जण सोडून गेले. बाबा येऊन तुम्हा मुलांना खूप प्रेमाने समजावत राहतात.पिता शिक्षक आणि गुरु प्रेम करतात ना. सद्गुरु चे निंदक उच्च पद मिळवू शकत नाहीत.तुमचे मुख्य लक्ष समोर आहे.त्या गुरूंच्या जवळ तर मुख्य लक्षच नसते.ते काही शिक्षण देत नाहीत.हे तर शिक्षण आहे, याला दवाखाना आणि विद्यापीठ पण म्हटले जाते.ज्याद्वारे तुम्ही नेहमी निरोगी संपत्तीवान बनतात. येथे तर खोटेच-खोटे आहे,गायन पण आहे,खोटी काया खोटी माया, खोटी सर्व दुनिया.सतयुगाला सत्य खंड म्हटले जाते.तेथे तर हिरे जवाहरतांचे महल असतात. सोमनाथ चे मंदिर पण भक्तिमार्ग मध्ये बनवले आहे.खूप धन होते, परत मुसलमानांनी येऊन लुटले. मोठ मोठ्या मजिस्द बनवल्या. बाबा तर तुम्हाला कारूनचा खजाना देतात.सुरुवातीपासून तुम्हाला सर्व साक्षात्कार करण्यात आले आहेत.अल्ला अवलदीन बाबा आहेत ना.पहिला-पहिला धर्म स्थापन करतात.तो दैवी घराणा आहे.दैवी घराण्याला स्वर्ग म्हटले जाते.आता तुम्ही जाणतात परत दुसऱ्यांना सांगायचे आहे.सर्वांना कसे माहिती होईल,परत कोणी तक्रार करणार नाहीत की, आम्हाला माहिती झाले नाही.तुम्ही सर्वांना ज्ञान देत राहतात,तरीही बाबांना सोडून चालले जातात.या इतिहासाची पुनरावृत्ती जरुर होते. बाबांना भेटण्यासाठी येतात, तर बाबा विचारतात अगोदर कधी भेटले होते का? तर मुलं म्हणतात, बाबा पाच हजार वर्षांपूर्वी पण आम्ही भेटण्यासाठी आलो होतो.बेहद्दचा वारसा घेण्यासाठी आलो होतो,कोणी येऊन ज्ञान ऐकतात, तर काहींना ब्रह्माचा साक्षात्कार होतो,तर त्यांचीच आठवण राहते.परत म्हणतात आम्ही हेच रूप पाहिले होते.बाबा पण मुलांना पाहून आनंदित होतात. तुमची अविनाशी ज्ञान रत्नाद्वारे झोळी भरत आहे ना.हे शिक्षण आहे.सात दिवसाचा साप्ताहिक पाठ्यक्रम घेऊन,कोठेही राहून मुरलीच्या आधारावर चालू शकतात.सात दिवसामध्ये इतके समजतील,जे परत मुरली पण समजू शकतील.बाबा तर मुलांना सर्व रहस्य चांगल्या प्रकारे समजवत राहतात,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रति बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)स्वदर्शन चक्र फिरवत पापांना नष्ट करायचे आहे.आत्मिक शिक्षणाद्वारे आपले पद श्रेष्ठ बनवायचे आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये अश्रू येऊ द्यायचे नाहीत.

(२) ही वेळ वानप्रस्थ अवस्थांमध्ये राहण्याची आहे,म्हणून वनवाह मध्ये खूप साधारण राहायचे आहे,न खूप उच्च,न एकदम कमी.परत परमधाम मध्ये जाण्यासाठी आत्म्याला संपूर्ण पावन बनवायचे आहे.

वरदान:-
मनन शक्तीद्वारे बुद्धीला शक्तिशाली बनवणारे,मास्टर सर्वशक्तीमान भव.

मनन शक्तीच दिव्य बुद्धीची खुराक आहे.जसे भक्तीमध्ये जप करण्याचा अभ्यास आहे,असे ज्ञानामध्ये स्मृतीची शक्ती म्हणजे आठवणीची शक्ती आहे.या शक्तीद्वारे मास्टर सर्वशक्तिमान बना.रोज अमृतवेळेला आपले एक स्वमान स्मृतीमध्ये ठेवा आणि त्यावरती मनन करत राहा,तर मननशक्ती द्वारे बुद्धी शक्तिशाली राहील. शक्तिशाली बुद्धीच्या वरती मायेचा वार होऊ शकत नाही,परवश होऊ शकत नाहीत,कारण माया सर्वात प्रथम व्यर्थ संकल्पाच्या बाणा द्वारेच दिव्य बुद्धीला कमजोर बनवते,या कमजोरी पासून सुरक्षित राहण्याचे साधनच मनन शक्ती आहे.

बोधवाक्य:-
आज्ञाधारक मुलंच आशीर्वादाच्या पात्र आहेत, आशीर्वादाचा प्रभाव मनाला नेहमी संतुष्ठ ठेवतो.