21-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, तुम्ही आता सदा परम पवित्र पित्याच्या गोदी मध्ये आले आहात, तुम्हाला
मन्सा मध्ये पण पवित्र बनायचे आहे."
प्रश्न:-
सदा परम
पवित्र मुलां मध्ये कोणता नशा आणि निशाणी राहील?
उत्तर:-
त्यांना नशा राहतो कि, आम्ही सदा परम पवित्र पित्याच्या गोदीमध्ये आले आहोत. आम्ही
सर्वोच्च पवित्र देवी-देवता बनत आहोत, त्यांच्या मना मध्ये पण वाईट विचार येत नाहीत.
ते खुशबूदार फुल असतात, त्यांच्या कडून कोणते पण उलटे कर्म होत नाही. ते अंतर्मुखी
बनून स्वतःची तपासणी करतात कि, माझ्या कडून सर्वांना सुगंध मिळतो? माझे डोळे कोणा
मध्ये आकर्षित तर होत नाहीत?
गीत:-
मरना तेरी गली
मे....
ओम शांती।
मुलाने गीत ऐकले, मग त्याचा अर्थ पण मना मध्ये विचार सागर मंथन करून काढला पाहिजे.
हे कोणी म्हटले, तुमच्या गल्ली मध्ये मरायचे आहे? आत्माने म्हटले, कारण आत्मा पतित
आहे.पावन तर अंताला म्हणावे, पावन तेंव्हा म्हणावे,जेंव्हा शरीर पण पावन मिळेल. आता
तर पुरुषार्थी आहात. हे पण जाणता कि, बाबा जवळ आल्याने मरावे लागते. एका बाबाला
सोडून, दुसऱ्याचे बनणे म्हणजे एकीकडे मरून दुसऱ्या जवळ जगणे. लौकिक पित्याचा पण
मुलगा शरीर सोडतो तर दुसऱ्या पित्या जवळ जाऊन जन्म घेतो. इथे पण तसे आहे, मरून
तुम्ही सदा परमपवित्र पित्याच्या गोदीमध्ये येत आहात. सदा परम पवित्र कोण आहेत?(
बाबा) आणखीन पवित्र कोण आहेत?( संन्यासी) होय, या संन्यासीना पण पवित्र म्हणतात.
तुमच्या मध्ये आणि संन्यासी मध्ये फरक आहे. ते पवित्र बनतात, परंतु जन्म तर मग पतीता
जवळ घेतात ना. तुम्ही सदा परम पवित्र बनत आहात. तुम्हाला बनविणारे सदा परम पवित्र
बाबा आहेत. ते लोक घरदार सोडून पवित्र बनतात. आत्मा पवित्र बनत आहे ना. तुम्ही
स्वर्गा मध्ये देवी-देवता आसता, तेंव्हा तुम्ही पवित्रते मध्ये, श्रेष्ठ होता. हा
तुमचा बेहदचा संन्यास आहे. तो हदचा आहे. ते पवित्र बनतात, तुम्ही सदा परम पवित्र
बनता. बुद्धीमध्ये पण येते कि, आम्ही तर नवीन दुनिये मध्ये जात आहोत. ते संन्यासी
तर रजो मध्ये येतात, फरक आहे ना. कुठे रजो आणि कुठे सतोप्रधान. तुम्ही सदा परम
पवित्र कडून पवित्र बनता. ते ज्ञानाचे सागर आहेत, प्रेमाचे सागर पण आहेत. इंग्रजी
मध्ये ओशन ऑफ नॉलेज, ओशन ऑफ लव्ह म्हणतात. तुम्हाला किती उंच बनवित आहेत. अशा
सर्वोच्च सदा परमपवित्र परमात्म्याला बोलतात कि, येऊन पतीतांना पावन बनवा. पतीत
दुनिये मध्ये येऊन आम्हाला नेहमीसाठी परम पवित्र बनवा. तर मुलांना किती नशा झाला
पाहिजे कि, आम्हाला कोण शिकवत आहेत. आम्ही काय बनतो?दैवीगुण पण धारण करायचे आहेत.
मुले लिहितात कि, बाबा आम्हाला माया वादळामध्ये,व्यर्थ विचारा मध्ये आणते. आम्हाला
मन्सा मध्ये शुद्ध बनू देत नाही, कां असे वाईट विचार येतात, जेंव्हा आम्हाला परम
पवित्र बनायचे आहे? बाबा म्हणतात, आता तुम्ही पवित्रे मध्ये फारच कनिष्ठ बनले आहात.
अनेक जन्मातील अंता मध्ये आता बाबा येऊन तुम्हाला तीव्र गतीने शिकवत आहेत. तर
मुलांच्या बुद्धीमध्ये हा नशा राहिला पाहिजे कि, आम्ही काय बनत आहोत. या लक्ष्मी
नारायणाला असे कोणी बनविले? भारत स्वर्ग होता ना. यावेळी भारत तमोप्रधान भ्रष्टाचारी
आहे. मग याला आम्ही सदा परम पवित्र बनवित आहोत. बनविणारे तर जरूर पाहिजेत ना.
स्वतःमध्ये पण तो नशा आसला पाहिजे कि, आम्हाला देवता बनायचे आहे. त्यासाठी गुण पण
तसे पाहिजेत. एकदम खालून वर चढत आहात. शिडी मध्ये पण उत्थान आणि पतन लिहिले आहे ना.
जे खाली पडलेले आहेत ते कसे स्वतःला परमपवित्र म्हणू शकतील. सदा परमपवित्र तर बाबाच
घेऊन मुलांना बनवित आहेत. तुम्ही इथे आले आहात, विश्वाचे मालक सदा परम पवित्र
बनण्यासाठी, तर किती नशा असला पाहिजे. बाबा आम्हाला एवढे उंच बनवित आहेत. मन्सा,
वाचा, कर्मणा पवित्र बनायचे आहे. खुशबूदार फुल बनवायचे आहे. सतयुगाला म्हटले जाते
फुलांची बाग. दुर्गंध कोणता पण नसावा. देहअभिमाना मुळे दुर्गंध येतो. कुदृष्टि कोणा
मध्ये पण जाऊ नये. असे उलटे काम होऊ नये, जे मनाला खात राहील आणि खाते बनत जाईल.
तुम्ही एकवीस जन्मासाठी धन जमा करत आहात. तुम्ही मुले जाणता कि, आम्ही फार
संपत्तीवान बनत आहोत. आपल्या आत्म्याला पाहायचे आहे कि, आम्ही दैवी गुणाने भरपूर
आहोत? जसे बाबा म्हणतात, तसा मी पुरुषार्थ करत आहे. तुमचे मुख्य लक्ष्य तर पहा, कसे
आहे. कुठे संन्याशी, कुठे तुम्हीं. तुम्हा मुलांना नशा असला पाहिजे कि, आम्ही
कोणाच्या गोदीमध्ये आले आहोत. आम्हाला काय बनवित आहेत? अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे,
आम्ही कुठ पर्यंत लायक बनले आहोत? आम्हाला किती गुलगुल बनायचे आहे, जो सर्वांना
ज्ञानाचा सुगंध येईल. तुम्ही अनेकांना सुगंध देत आहात ना. आपल्या सारखे बनविता.
प्रथम तर नशा असला पाहिजे कि, आम्हाला शिकविणारे कोण आहेत. ते तर सर्व भक्ती
मार्गातील गुरु आहेत. ज्ञान मार्ग मध्ये गुरु कोणी होऊ शकत नाही, शिवाय एक परमपिता
परमात्म्याच्या. बाकी सर्व भक्ती मार्गातील आहेत. भक्ती कलियुगा मध्ये होत आहे.
रावणाची प्रवेशता होत आहे. हे पण दुनिये मध्ये कोणाला माहित नाही. आता तुम्ही जाणत
आहात. सतयुगा मध्ये आम्ही 16 कला संपूर्ण होतो. मग एक दिवस जरी गेला, तरी त्याला
पूर्णमासी थोडेच म्हणतील. इथे पण असे आहे. थोडे थोडे जू सारखे चक्र फिरत राहते. आता
तुम्हाला पूर्ण 16 कला संपूर्ण बनायचे आहे. ते पण अर्ध्या कल्पा साठी. मग कला कमी
होत जातात. हे तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे. तर तुम्हा मुलांना किती नशा असला
पाहिजे. अनेकांच्या बुद्धीमध्ये हे येत नाही कि, आम्हाला शिकवणारे कोण आहेत?
ज्ञानाचे सागर मुलांना म्हणतात, मुलांनो नमस्ते. तुम्ही ब्रह्मांडाचे पण मालक आहात,
तिथे सर्व राहतात, मग विश्वाचे तुम्ही मालक बनता. तुमचा उत्साह वाढवण्या साठी बाबा
म्हणतात कि, तुम्ही माझ्यापेक्षा उंच बनता. मी विश्वाचा मालक बनत नाही. माझ्या
पेक्षा पण तुम्हाला उंच महिमावाले बनवित आहे. बाबाची मुले उंच बनतात, तर बाबा
समजतात कि, यांनी शिकून किती ऊंच पद प्राप्त केले आहे. बाबा पण म्हणतात, मी तुम्हाला
शिकवित आहे. आता स्वतःचे पद जेवढे उंच बनवू इच्छिता, त्यासाठी पुरुषार्थ करा. बाबा
आम्हाला शिकवित आहेत, प्रथम तर नशा राहिला पाहिजे. बाबा तर कधीपण येऊन सांगू शकतात,
ते तर यांच्या मध्ये आहेतच. तुम्ही त्यांची मुले आहात ना. हा रथ पण त्यांचा आहे ना.
तर असे सदा परमपवित्र बाबा आले आहेत, तुम्हाला पावन बनविण्यासाठी, आणि तुम्ही मग
इतरांना पावन बनविता. मी सेवानिवृत्त होत आहे. आता तुम्ही सदा परम पवित्र बनत आहात,
तर इथे कोणी पतित येऊ शकत नाही. ही सदा परम पवित्र परमात्म्याचा चर्च आहे. त्या
चर्च मध्ये तर सर्व विकारी जातात. सर्व अपवित्र पतित आहेत. हा तर फार मोठा पवित्र
चर्च आहे. इथे कोणी पतित-पाय ठेवू शकत नाही. परंतु आता असे करू शकत नाहीत. जेंव्हा
मुले पण अशी बनतात, तेंव्हा असे कायदे काढले जातील. इथे कोणी आत येऊ शकणार नाहीत,
विचारतात ना, आम्ही सभे मध्ये जाऊन बसू? बाबा म्हणतात, अधिकारी इत्यादी कडे काम
राहते, तर त्यांना बसविले जाते. जेंव्हा तुमचे नाव प्रसिद्ध होईल, मग तुम्हाला
कोणाची परवाह नाही. आता ठेवावी लागते. सदा परम पवित्र पण दुःखी राहतात. आता नाही
म्हणू शकत नाहीत. प्रभाव निघाल्यामुळे मग इतर लोकांशी दुश्मनी पण कमी होऊन जाईल.
तुम्ही पण सांगा कि, आम्हा ब्राह्मणांना राजयोग शिकविणारे सदा परमपवित्र पिता आहेत.
संन्यासी ना सदा परम पवित्र थोडेच म्हणतात. ते येतातच रजोगुणांमध्ये. ते विश्वाचे
मालक बनू शकतील कां? आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात. कधी तर फार चांगली चलन असते,
मग कधी अशी चलन होते, जे नाव बदनाम करतात. अनेक सेंटर वर असे येतात, जे कांही पण
समजत नाहीत. तुम्ही स्वतःलाच विसरून जाता कि, आम्ही काय बनत आहोत. बाबा पण चलन
पाहून समजतात कि, हे काय बनतील? भाग्या मध्ये उंच पद असेल, तर त्यांचे वागणे फार
उत्तम असते. फक्त आठवणी मध्ये ठेवा कि, आम्हाला कोण शिकवित आहे, तरीपण अपार खुशी
होईल. आम्ही ईश्वरीय पित्याचे विद्यार्थी आहोत. तर किती मान ठेवला पाहिजे. आता अजून
शिकत आहेत. बाबा पण समजतात कि, आणखीन वेळ लागणार आहे. क्रमवार तर प्रत्येक
गोष्टींमध्येच असतात. घर पण अगोदर सतोप्रधान असते, मग सतो,रजो,तमो होते. आता तुम्ही
सतोप्रधान 16 कला संपूर्ण बनणारे आहात. इमारत बनत जात आहे. तुम्ही सर्व मिळून
स्वर्गाची इमारत बनवित आहात. याची पण तुम्हाला फार खुशी झाली पाहिजे. भारत जो
अपवित्रते मध्ये कनिष्ठ झाला आहे, त्याला आम्ही पवित्रते मध्ये सदा परम पवित्र
बनवित आहोत, तर स्वतःवर किती काळजी घेतली पाहिजे. आमची दृष्टी अशी नसावी, ज्यामुळे
आमचे पद भ्रष्ट होईल. असे नाही कि, बाबाला लिहिले, तर बाबा काय म्हणतील. नाही, आता
तर सर्व पुरुषार्थ करीत आहेत. त्यांना पण आता सदा परमपवित्र थोडे म्हणतील. बनतील,
तर मग हे शरीर पण राहणार नाही. तुम्ही पण सदा परम पवित्र बनत आहात. बाकी त्यामध्ये
पण पदे आहेत, त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे आणि करून घ्यायचा आहे. बाबा मुद्दे तर
फार देत आहेत. कोणी आले तर तपासून पहा, कुठे हे सदा परम पवित्र आणि कुठे ते
पवित्र.या लक्ष्मी नारायणाचा जन्म तर सतयुगा मध्ये होतो. ते येतातच नंतर, किती फरक
आहे. मुले समजतात कि, शिवबाबा आम्हाला कसे बनवित आहेत, सांगतात, माझी एकट्याची आठवण
करा, स्वतःला अशरीरी आत्मा समजा. सर्वोच्च शिवबाबा शिकऊन, सर्वोच्च बनवित आहेत.
ब्रम्हा द्वारे आम्ही हे शिकत आहोत. ब्रह्मा विष्णू बनत आहेत हे पण तुम्ही जाणत
आहात. मनुष्य तर कांही पण समजत नाहीत. आता साऱ्या सृष्टीवर रावणाचे राज्य आहे.
तुम्ही राम राज्य स्थापन करत आहात, ज्याला तुम्ही जाणत आहात. विश्व नाट कानुसार
आम्ही स्वर्ग स्थापन करण्याच्या लायकीचे बनत आहोत. आता बाबा लायक बनवित आहेत, बाबा
शिवाय शांतीधाम सुखधाम ला कोणी घेऊन जाऊ शकत नाही. गप्पा मारत राहतात कि, फलाना
स्वर्गा मध्ये गेला, मुक्तीधाम मध्ये गेला. बाबा म्हणतात हे विकारी पतित आत्मे,
शांतीधामला कसे जाऊ शकतील. तुम्ही सांगू शकता, तर समजून येईल कि, यांना किती नशा आहे.
असे विचार सागर मंथन करा, कसे समजावून सांगायचे. चालताना, फिरताना मनातून आले पाहिजे,
धीर पण धरायचा आहे. आम्ही पण लायक बनत आहोत. भारतवासीच पूर्ण लायक आणि पूर्ण नालायक
बनत आहेत. आणखीन कोणी नाही. आता बाबा तुम्हाला लायक बनवित आहेत. ज्ञान फार मजेचे आहे.
मनातून फार खुशी झाली पाहिजे. आम्ही या भारताला नेहमीसाठी परम पवित्र बनवू. वागणे
फार उत्तम पाहिजे.खाणे, पिणे, वागण्या द्वारे माहित पडते. शिवाबाबा आम्हाला एवढे
उंच बनवित आहेत. त्यांची मुले बनले आहात तर नाव करायचे आहे. वागणे असे असावे, तर
समजून येईल, ही तर सदा परम पवित्र परमात्म्याची मुले आहेत. हळूहळू तुम्ही बनत जाता.
महिमा निघत राहील, मग कायदे कानून सर्व निघतील, जो कोणी पतीत आता येऊ शकणार नाहीत.
बाबा समजू शकतात कि, यासाठी वेळ पाहिजे. मुलांना फार पुरषार्थ करायचा आहे. आपली
राजधानी पण तयार होईल. मग सांगण्या साठी काही हरकत नाही. मग तर इथून खाली आबूरोड
पर्यंत रांग लागेल. आता तुम्ही पुढे चालत राहा. बाबा तुमच्या भाग्याला उंच बनवित
आहेत. पदम भाग्यशाली पण कायदेशीर म्हणतात ना.पायामध्ये पण पद्म दाखवत आहेत ना. ही
सर्व तुम्हा मुलांची महिमा आहे. तरी पण बाबा म्हणतात, मनमनाभव, बाबाची आठवण करा.
अच्छा.
गोड गोड फार वर्षांनी
भेटलेल्या मला प्रति, मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक
पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) असे कोणते
काम करू नये, ज्यामुळे मन खात राहील. पूर्ण खुशबूदार फुल बनवायचे आहे. देहअभिमानाचा
दुर्गंध काढायचा आहे.
(२) वागणे फार उत्तम
असले पाहिजे, सदा परमपवित्र बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. दृष्टी अशी नसावी,
ज्यामुळे पद भ्रष्ट होईल.
वरदान:-
प्रत्येक
खजान्याला कार्यामध्ये लावून, पद्माची कमाई जमा करणारे, पद्मापदम भाग्यशाली भव.
प्रत्येक सेकंदा मध्ये
पद्माची कमाई जमा करण्याचे वरदान विश्वनाटका नुसार संगमच्या वेळेला मिळाले आहे. अशा
वरदानाला स्वतःसाठी जमा करा आणि इतरांना पण दान करा, तसेच संकल्पाचा खजाना, ज्ञानाचा
खाजाना,स्थूल धन रूपी खजान्याला कार्यामध्ये लावून, पद्माची कमाई जमा करा कारण
यावेळी स्थूल धन पण ईश्वरा प्रति समर्पण केल्यामुळे, एक नवा पैसा पण एक रत्ना सारखा
किंमतीचा होऊन जातो. तर या सर्व खजाना स्वतःसाठी आणि सेवेसाठी कार्यामध्ये लावा, तर
पद्मा पदम भाग्यशाली बनाल.
बोधवाक्य:-
जिथे मनापासून
स्नेह आहे, तिथे सर्वांचा सहयोग सहज प्राप्त होतो.