29-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- संगमयुगावर तुम्ही ब्राह्मण संप्रदाय बनले आहात,तुम्हाला आता मृत्यूलोकाच्या मनुष्यापासून अमरलोक चे देवता बनायचे आहे."

प्रश्न:-
तुम्ही मुले कोणत्या ज्ञानाला समजल्यामुळे बेहद चा संन्यास करता?

उत्तर:-
तुम्हाला नाटकाचे यथार्थ ज्ञान आहे,तुम्ही जाणत आहात नाटकानुसार आता या साऱ्या मृत्यूलोकाला भस्मीभूत व्हायचे आहे.आता ही दुनिया कवडी तुल्य बनली आहे आम्हाला हिर्यासारखे बनायचे आहे. यामध्ये जे काही होते ते पुन्हा हुबेहूब कल्पा नंतर पुनरावृत्त होईल म्हणूनच तुम्ही या साऱ्या दुनियेपासून बेहदचा संन्यास केला आहे.

गीत:-
आने वाले कल की तुम तकदीर हो...

ओम शांती।
मुलांनी गीताची ओळ ऐकली.अमरलोक येणार आहे.हा मृत्युलोक आहे.अमरलोक आणि मृत्यूलोकाचे हे आहे पुरुषोत्तम संगमयुग.आता बाबा संगमयुगावर शिकवत आहेत, आत्म्यांना शिकवत आहेत म्हणूनच मुलांना म्हणतात आत्म- अभिमानी होऊन बसा.हा निश्चय करायचा आहे-आम्हाला बेहद चा पिता शिकवत आहे. लक्ष्मी-नारायण म्हणजे मृत्यूलोकाच्या मनुष्यापासून अमरलोकाचे देवता बनणे हे आमचे उद्दिष्ट आहे.असे शिक्षण तर कधीही कानाने ऐकले नाही,न कोणाला सांगताना पाहिले, मुलांनो तुम्ही आत्म- अभिमानी होऊन बसा.हा निश्चय करायचा आहे-बेहदचे पिता आम्हाला शिकवत आहेत.कोणता पिता?बेहदचे पिता निराकार शिव आहेत.आता तुम्ही समजता आम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत. आता तुम्ही ब्राह्मण संप्रदाय बनले आहात नंतर तुम्हाला देवता बनायचे आहे.असे म्हणायला नको की सतयुगाचे मालक होते. सतयुगामध्ये विश्वाचे मालक होते. नंतर ८४ जन्म घेऊन शिढी उतरत-उतरत सतोप्रधान पासून सतो-रजो-तमो मध्ये आले आहेत.प्रथम सतोप्रधान होते तेव्हा पारस बुद्धी होते नंतर आत्म्यावर कट चढतो.मनुष्याला समजत नाही.बाबा म्हणतात तुम्ही काहीही जाणत नव्हते. अंधविश्वास होता.जाणल्या शिवाय कोणाची पूजा करणे किंवा आठवण करणे याला अंधविश्वास म्हटले जाते.आणि आपल्या श्रेष्ठ धर्म,श्रेष्ठ कर्माला ही विसरून गेल्यामुळे ते कर्म भ्रष्ट, धर्म भ्रष्ट होऊन जातात. भारतवासी यावेळी दैवी धर्मापासून भ्रष्ट आहेत.बाबा समजावतात वास्तविक पाहता तुम्ही प्रवृत्ती मार्ग वाले आहात. तेच देवता जेव्हा अपवित्र बनतात तेव्हा देवी-देवता म्हणू शकत नाहीत म्हणून नाव बदलून हिंदू धर्म ठेवले आहे.हेसुद्धा नाटकाच्या नियोजनानुसार होते.सर्वजण एका पित्याला बोलावतात-हे पतित-पावन ये.तो एकच परमात्मा आहे जो जन्म-मरण रहीत आहे.नावा-रूपा पेक्षा वेगळी कोणती वस्तू आहे असे नाही.आत्मा किंवा परमात्म्याचे रूप खूप सूक्ष्म आहे,ज्याला स्टार किंवा बिंदू असे म्हणतात. शिवाची पूजा करतात,शरीर तर नाही.आता आत्मा बिंदू ची पूजा होऊ शकत नाही म्हणून त्याला पूजा करण्यासाठी मोठे बनवतात. शिवाची पूजा करत आहे असे समजतात.परंतु त्याचे रूप काय आहे,हे जाणत नाहीत.या सर्व गोष्टी बाबा यावेळी येऊन समजावत आहेत.बाबा म्हणतात तुम्ही आपल्या जन्माला जाणत नाहीत. ८४ लाख योनी बद्दल तर चुकीचे सांगितले आहे.आता बाबा तुम्हा मुलांना बसून समजावत आहेत.आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात नंतर देवता बनायचे आहे.कलियुगी मनुष्य शूद्र आहेत.तुम्हा ब्राह्मणांचे उद्दिष्ट मनुष्यापासून देवता बनण्याचे आहे.हा मृत्युलोक पतित दुनिया आहे.नवी दुनिया ती होती,जिथे देवी-देवता राज्य करत होते.यांचे एकच राज्य होते.हे साऱ्या विश्वाचे मालक होते.आता तर तमोप्रधान दुनिया आहे.अनेक धर्म आहेत.हा देवी-देवता धर्म लोप पावला आहे.देवी-देवतांचे राज्य केव्हा होते,किती वेळ चालले,हा दुनियेचा इतिहास-भूगोल कोणालाही माहीत नाही.बाबाच येऊन तुम्हाला समजावत आहेत.हे आहे ईश्वर पित्याचे विश्व विद्यापीठ,ज्याचे उद्दीष्ट आहे अमरलोकचे देवता बनने.याला अमरकथा ही म्हटले जाते.तुम्ही या ज्ञानामुळे देवता बनुन काळावर विजय मिळवत आहात. तिथे कधी काळ खाऊ शकत नाही.मरण्याचे तिथे नाव नाही.आता तुम्ही नाटकाच्या नियोजनानुसार,काळावर विजय मिळवत आहात.भारतवासी ही 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा नियोजन करतात ना.समजतात आम्ही रामराज्य स्थापन करत आहोत.बेहदच्या पित्याचाही रामराज्य बनवण्याचे नियोजन आहे.ते तर सर्व मनुष्य आहेत.मनुष्य तर राम राज्य स्थापन करू शकत नाहीत.सतयुगाला रामराज्य म्हटले जाते. या गोष्टींना कोणीही जाणत नाही. मनुष्य किती भक्ती करतात, शारीरिक यात्रा करतात.दिवस अर्थात सतयुग-त्रेता मध्ये या देवी-देवतांचे राज्य होते.नंतर रात्री म्हणजे द्वपरयुगापासून भक्तिमार्ग सुरू होतो.सतयुगामध्ये भक्ती नसते. ज्ञान,भक्ती,वैराग्य हे बाबा समजावत आहेत.वैराग्य दोन प्रकारचे आहे- एक आहे हठयोगी निवृत्तीमार्ग वाल्यांचे,ते घरदार सोडून जंगलामध्ये जातात.दुसरा म्हणजे तुम्हाला संपूर्ण मृत्यूलोकाचा, बेहद्दचा संन्यास करायचा आहे.बाबा म्हणतात ही सारी दुनिया भस्म होणार आहे. नाटकाला खूप चांगल्या प्रकारे समजायचे आहे.घड्याळाच्या काट्याप्रमाणे टिक-टिक होत राहते.जे काही होते परत कल्प 5 हजार वर्षांनंतर हुबेहूब पुनरावृत्त होईल.याला खूप चांगल्या रीतीने समजून बेहद चा संन्यास करायचा आहे.समजा कोणी विदेशामध्ये गेले तर म्हणतात इथे आम्ही हे ज्ञान शिकू शकतो का? बाबा म्हणतात हो कुठेही बसून तुम्ही शिकू शकता.यामध्ये सुरुवातीला 7 दिवसाचा कोर्स घ्यावा लागतो.आत्म्याला फक्त हे समजवायचे आहे,खूप सहज आहे.आम्ही सतोप्रधान विश्वाचे मालक होतो तेव्हा सतोप्रधान होतो.आता तमोप्रधान बनलो आहोत. 84 जन्मामध्ये एकदमच कवडी तुल्य बनलो आहे.आता आम्ही पुन्हा हिऱ्या सारखे कसे बनणार?आता कलियुग आहे नंतर अवश्य सतयुग होणार आहे, बाबा किती सहज समजावत आहेत,7 दिवसाचा कोर्स समजून घ्यायचा आहे.कशाप्रकारे आम्ही सतोप्रधान पासून तमोप्रधान बनलो आहे.काम चितेवर बसून तमोप्रधान बनलो आहे.आता परत ज्ञान चितेवर बसुन सतोप्रधान बनायचे आहे. दुनियेचा इतिहास-भूगोल पुनरावृत्त होतो,चक्र फिरत राहते. आता संगमयुग आहे नंतर सतयुग होईल.आम्ही आता कलियुगी विकारी बनलो आहोत,आता पुन्हा सतयुगी निर्विकारी कसे बनायचे?त्यासाठी बाबा रस्ता सांगत आहेत.बोलवतात, आमच्या मध्ये कोणताही गुण नाही,आता आम्हाला गुणवान बनवा.जे कल्पापूर्वी बनले होते त्यांनाच आता बनवायचे आहे.बाबा समजावतात-सुरुवातीला तर स्वतःला आत्मा समजा.आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. तुम्हाला आता देही-अभिमानी बनायचे आहे.आत्ताच तुम्हाला देही-अभिमानी बनण्याची शिक्षण मिळत आहे.तुम्ही सदैव देही-अभिमानी राहाल असे नाही. नाही,सतयुगामध्ये तर शरीराला नावे असतात.लक्ष्मी-नारायणाच्या नावावरच संपूर्ण कारभार चालतो.आता हे आहे संगमयुग, जेव्हा बाबा आपल्याला समजावत आहेत.तुम्ही अशरीरी आले होते नंतर अशरीरी बनून परत जायचे आहे.स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. ही आत्मिक यात्रा आहे.आत्मा आपल्या आत्मिक पित्याची आठवण करते.बाबांची आठवण केल्याने पाप भस्म होऊन जातील,याला योग अग्नी म्हटले जाते.आठवण तर तुम्ही कुठेही करू शकता.सात दिवसांमध्ये समजावून सांगायचे असते.हे सृष्टिचक्र कसे फिरते,कसे आम्ही सिढी उतरत आहे?आता पुन्हा या एकाच जन्मांमध्ये चढती कला होत आहे.विदेशामध्ये मुले राहतात,तिथेही मुरली जाते.ही शाळा आहे ना.खरे पाहता हे ईश्वरीय विद्यापीठ आहे.गीतेचाच राजयोग आहे.परंतु श्रीकृष्णाला भगवान म्हटले जात नाही.ब्रह्मा- विष्णू-शंकराला ही देवता म्हटले जाते.आता तुम्ही पुरुषार्थ करून पुन्हा देवता बनत आहात. प्रजापिता ब्रह्मा ही अवश्य इथे असेल ना.प्रजापिता तर मनुष्य आहे ना.प्रजा अवश्य इथेच रचली जाते.हम सो चा अर्थ बाबांनी खूप सहज रीतीने समजावला आहे. भक्ती मार्गामध्ये तर म्हणतात आम्ही आत्मा सो परमात्मा, म्हणूनच परमात्म्याला सर्वव्यापी म्हटले आहे.बाबा म्हणतात सर्वांमध्ये आत्मा व्यापक आहे. मी कसा व्यापक असेल?तुम्ही मला बोलावता-हे पतित-पावन या,आम्हाला पावन बनवा. निराकार आत्मे सर्व येऊन आपला आपला रथ(शरीर) घेतात.प्रत्येक अकालमुर्त आत्म्याचे हे तख्त आहे.तख्त म्हणा किंवा रथ म्हणा.बाबांना तर रथ नाही.तो निराकार गायला आहे.सूक्ष्म शरीर आहे,न स्थूल शरीर आहे.निराकार स्वतः रथामध्ये जेव्हा बसतो तेव्हा बोलू शकतो.रथा शिवाय पतीतांना पावन कसे बनवणार?बाबा म्हणतात मी निराकार यांचे शरीर कर्जाऊ(लोन)घेतो.

तात्पुरते कर्जाऊ घेतले आहे,याला भाग्यशाली रथ म्हटले जाते. बाबाच सृष्टीच्या आदि-मध्य- अंताचे रहस्य सांगून तुम्हा मुलांना त्रिकालदर्शी बनवतात.इतर कोणी मनुष्य हे ज्ञान जाणू शकत नाहीत. यावेळी सर्व नास्तीक आहेत. बाबा येऊन सर्वांना आस्तिक बनवतात.रचयिता-रचनेचे रहस्य बाबांनी तुम्हाला सांगितले आहे.आता तुमच्या शिवाय इतर कोणी समजावू शकत नाही.तुम्हीच या ज्ञानामुळे नंतर एवढे उच्चपद प्राप्त करता.हे ज्ञान आत्ताच फक्त तुम्हा ब्राह्मणांना मिळत आहे. बाबा संगमयुगावरच येऊन हे ज्ञान देतात.सदगती देणारे एक बाबाच आहेत.मनुष्य,मनुष्याला सदगती देऊ शकत नाही.ते सर्व भक्तिमार्गाचे गुरु आहेत.सद्गुरु एकच आहे,त्यांना म्हटले जाते वाह सद्गुरु वाह!याला पाठशाळा ही म्हटले जाते.नरापासून नारायण बनण्याचे उद्दिष्ट आहे. त्या सर्व भक्ति मार्गाच्या कथा आहेत.गीते मुळे सुद्धा काही प्राप्ती होत नाही.बाबा म्हणतात मी तुम्हा मुलांना समोर येऊन शिकवत आहे,ज्यामुळे तुम्ही हे पद प्राप्त करत आहात.यामध्ये मुख्य पवित्र बनण्याची गोष्ट आहे. बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे.यामध्येच माया विघ्न टाकत असते.तुम्ही आपला वारसा मिळवण्यासाठी बाबांची आठवण करता.हे ज्ञान सर्व मुलांजवळ जाते.कधीही मुरलीला गैरहजर राहू नका.मुरली चुकवणे म्हणजे गैरहजर राहणे. मुरली मुळे कुठेही राहून रिफ्रेश (ताजेतवाने)राहाल.

श्रीमतावर चालायचे आहे.बाहेर जातात तर बाबा समजावतात-पवित्र बनायचे आहे,वैष्णव होऊन राहायचे आहे. वैष्णव ही दोन प्रकारचे असतात, वैष्णव,वल्लभाचारी ही असतात परंतु विकारांमध्ये जातात.पवित्र तर नाहीत.तुम्ही पवित्र बनून विष्णूवंशी बनत आहात.तिथे तुम्ही वैष्णव राहाल,विकारांमध्ये जाणार नाहीत.ते आहे अमरलोक,हे आहे मृत्युलोक,इथे विकारांमध्ये जातात.तुम्ही आता विष्णुपुरी मध्ये जात आहात,तिथे विकार असत नाही.ती निर्विकारी दुनिया आहे.योगबळाने तुम्ही विश्वाची बादशाही घेत आहात.ते दोघे एक दुसऱ्याशी भांडतात, लोणी मध्ये तुम्हाला मिळत आहे. तुम्ही आपली राजधानी स्थापन करत आहात.सर्वांना हा संदेश द्यायचा आहे.छोट्या मुलांचा ही हक्क आहे.शिवबाबांची मुले आहात ना.तो सर्वांचा हक्क आहे. सर्वांना सांगायचे आहे स्वतःला आत्मा समजा.आई-वडिलांना ज्ञान असेल तर मुलांनाही शिकवतील-शिवबाबांची आठवण करा.शिवबाबांशिवाय दुसरे कोणीही नाही.एकाच्या आठवणी मुळेच तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल.यामध्ये खूप चांगले शिक्षण घ्यायला पाहिजे. विदेशामध्ये राहत असतानाही तुम्ही शिकू शकता.यामध्ये पुस्तक इ.कशाचीही गरज नाही.कुठेही बसून तुम्ही शिकू शकता.बुद्धीने आठवण करू शकता.हे शिक्षण एवढे सोपे आहे.योग किंवा आठवणीने बळ मिळते.तुम्ही आता विश्वाचे मालक बनत आहात.बाबा राजयोग शिकवून पावन बनवत आहेत.तो हटयोग आहे,हा राजयोग आहे.यामध्ये पथ्य चांगल्या प्रकारचे पाहिजे.या लक्ष्मी-नारायणा सारखे सर्वगुणसंपन्न बनायचे आहे. खाण्यापिण्याचे ही पथ्य पाळले पाहिजे-आणि दुसरी गोष्ट बाबांची आठवण करायची आहे तर जन्मजन्मांतराचे पाप नष्ट होतील.याला सहज राजयोग म्हटले जाते,राजाई प्राप्त करण्यासाठी.जर राजाई घेतली नाही तर गरीब बनाल.पूर्ण श्रीमतावर चालल्याने श्रेष्ठ बनाल. भ्रष्ट पासून श्रेष्ठ बनायचे आहे. त्यासाठी बाबांची आठवण करायची आहे.कल्पा पूर्वीही तुम्ही हे ज्ञान घेतले होते जे आता पुन्हा घेत आहात.सतयुगामध्ये दुसरे कोणते राज्य नव्हते.त्याला सुखधाम म्हटले जाते.आता हे दुःखधाम आहे आणि जिथून आपण आत्मे आलो आहे ते आहे शांतीधाम.शिवबाबांना आश्चर्य वाटते-दुनियेमध्ये मनुष्य काय- काय करत आहेत!कमी मुले जन्माला यावेत यासाठी किती प्रयत्न करत राहतात.समजत नाही हे तर बाबांचे काम आहे. बाबा लगेच एका झटक्यात एका धर्माची स्थापना करून बाकी अनेक धर्मांचा विनाश करतात.ते लोक कमी मुले जन्माला यावी म्हणून किती औषधे इ.काढतात. बाबांच्या जवळ तर एकच औषध आहे.एका धर्माची स्थापना होणार आहे.ती वेळ येणार आहे जेंव्हा सर्वजण म्हणतील हे तर पवित्र बनत आहेत.मग औषधी इ.ची ही काय गरज आहे.तुम्हाला बाबांनी मनमनाभव चे असे औषध दिले आहे की,ज्यामुळे तुम्ही 21 जन्मासाठी पवित्र बनता.
अच्छा!

गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. पवित्र बनून पक्के वैष्णव बनायचे आहे.खाण्या-पिण्याचे ही पुर्ण पथ्य पाळायचे आहे.श्रेष्ठ बनण्यासाठी श्रीमतावर अवश्य चालायचे आहे.

2. मुरलीच्या अभ्यासाद्वारे स्वतःला रिफ्रेश(ताजेतवाने)करायचे आहे, कुठेही राहून सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.एकही दिवस मुरलीला गैरहजर रहायचे नाही.

वरदान:-
विरहा ला(जुदाई)सदा काळासाठी निरोप देणारे स्नेही स्वरूप भव

जो स्नेही पसंत आहे तोच स्नेह करणाऱ्याला पसंत असावा-हेच स्नेहाचे स्वरूप आहे.चालणे- खाणे-पिणे-राहणे स्नेही च्या मनपसंत असावे म्हणूनच जो पण संकल्प किंवा कर्म करता तर प्रथम विचार करा कि हे स्नेही पित्याच्या मनपसंत आहे.असे खरे स्नेही बना तर निरंतर योगी, सहजयोगी बनाल.जर स्नेही स्वरूपाला समान स्वरूपामध्ये परिवर्तन कराल तर अमर भवचे वरदान मिळेल आणि विरहाला सदाकाळासाठी निरोप मिळेल.

बोधवाक्य:-
स्वभाव सरळ आणि पुरुषार्थ लक्ष ठेवणारा(अटेंशन वाला)बनवा.