22-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो, तुम्हाला आता बाबा कडून दिव्यदृष्टी मिळाली आहे, त्या दिव्यदृष्टीने तुम्ही आत्माला आणि परमात्म्याला पाहू शकता."

प्रश्न:-
विश्व नाटकातील कोणत्या रहस्याला समजणारे, कोणते मत कोणाला पण देणार नाहीत?

उत्तर:-
जे समजतात कि, विश्व नाटकांमध्ये जे कांही होऊन गेले, ते मग जसेच्या तसे पुनरावृत्त होईल, ते कधी कोणाला भक्ती सोडून देण्याचे मत देत नाहीत. जेंव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान चांगल्या रीतीने बसेल,ते समजतील आम्ही आत्मा आहोत, आम्हाला बेहदच्या बाबा कडून, वरसा घ्यायचा आहे. जेंव्हा बेहदच्या बाबाची ओळख होईल, तर हदच्या गोष्टी स्वतःच नाहीशा होतील.

ओम शांती।
आपल्या आत्म्याच्या स्वधर्मा मध्ये बसले आहात? आत्मिक पिता, आत्मिक मुलांना विचारतात, कारण हे तर मुले जाणतात कि, एकच बेहदचे बाबा आहेत, त्यांना पण आत्मा म्हटले जाते. फक्त त्यांना सर्वोच्च म्हटले जाते. सर्वोच्च आत्मा किंवा परमात्मा म्हणतात. परमात्मा जरूर आहेत, असे म्हणत नाहीत कि, परमात्मा नाहीच. परम आत्मा म्हणजे परमात्मा. हे पण समजावले आहे, गोंधळून जायचे नाही, कारण पाच हजार वर्षापूर्वी पण तुम्ही हे ज्ञान ऐकले होते. आत्माच ऐकत आहे ना. आत्मा फारच छोटी सूक्ष्म आहे. एवढी आहे जी या डोळ्याने पाहू शकत नाहीत. असा कोणता मनुष्य नाही, ज्यांनी आत्म्याला या डोळ्याने पाहिले असेल. पाहू शकता परंतु दिव्य दृष्टीने. ते पण विश्व नाटकातील योजने नुसार. बरें, समजा कोणाला आत्म्याचा साक्षात्कार झाला, जशी इतर वस्तू दिसून येते. भक्ती मार्गा मध्ये पण कांही साक्षात्कार झाला, तर या डोळ्यांनी दिसतो, पण ती दिव्यदृष्टी मिळते, ज्यामुळे चैतन्या मध्ये पाहतात. आत्म्याला ज्ञानाचा नेत्र मिळत आहे, ज्यामुळे पाहू शकता, परंतु ध्यानांमध्ये. भक्ती मार्गा मध्ये फार भक्ती करतात, तेंव्हा साक्षात्कार होतो. जसे मीरा ला साक्षात्कार झाला, नृत्य करत होती. वैकुंठ तर नव्हते. पाच-सहाशे वर्ष झाले असतील, त्यावेळी वैकुंठ थोडेच होते. जे होऊन गेले आहे, ते दिव्य दृष्टि ने पाहिले जाते. जेंव्हा फार भक्ती करुन करून एकदम भक्तीमय होऊन जातात, त्यावेळी साक्षात्कार होतो, परंतु त्यातून मुक्ती मिळत नाही. मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता भक्ती पासून फारच वेगळा आहे. भारता मध्ये किती अनेक मंदिरे आहेत. शिवाचे लिंग ठेवतात, मोठे लिंग पण ठेवतात, लहान पण ठेवतात. आता हे तर मुले जाणतात कि, जशी आत्मा आहे तसे परमपिता परमात्मा आहेत. आकार सर्वांचा एकच आहे. जसा पिता,तशी मुले. आत्मे सर्व भाऊ भाऊ आहेत. आत्म्या शरीरा मध्ये येते अभिनय करण्यासाठी, या समजण्याच्या गोष्टी आहेत. या कांही भक्ति मार्गातील दंतकथा नाहीत. ज्ञान मार्गातील गोष्टी फक्त एक बाबाच समजावत आहेत पहिल्या प्रथम समजावणारे बेहदचे बाबा निराकाराच आहेत, त्यांना पूर्ण रीतीने कोणी पण समजू शकत नाहीत. म्हणतात, ते तर सर्वव्यापी आहेत. हे कांही सत्य नाही. बाबाला बोलावतात, फार प्रेमाने बोलवतात, म्हणतात, बाबा, जेव्हा तुम्ही याल तर आम्ही तुमच्यावरच समर्पित होऊन जाऊ. आमचे तर तुम्ही, दुसरे कोणी नाही. तर जरुर त्यांची आठवण केली पाहिजे. ते स्वतः म्हणतात, हे मुलांनो,आत्म्या बरोबरच बोलत आहेत, याला आत्मिक ज्ञान म्हटले जाते. गायन पण आहे कि, आत्मा आणि परमात्मा फार काळ दूर राहिले, याचा पण हिशोब सांगितला आहे. अनेक काळा पासून तुम्ही आत्मे दूर राहिले आहात, जे आता यावेळी बाबा जवळ आले आहेत. परत आपला राजयोग शिकण्यासाठी. हे शिक्षक सेवक आहेत. शिक्षक नेहमी आज्ञाकारी सेवक असतात. बाबा पण म्हणतात कि, मी तर सर्व मुलांचा सेवक आहे. तुम्ही किती हुज्जत ने बोलावत आहात, हे पतित पावन येऊन, आम्हाला पावन बनवा. सर्व भक्तीनी आहेत. म्हणतात, हे भगवान या, आम्हाला परत पावन बनवा.पावन दुनिया स्वर्गाला म्हटले जाते,पतित दुनिया नरकाला म्हटले जाते. या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत. हे कॉलेज अथवा ईश्वरीय पित्याचे जागतिक विद्यापीठ आहे. याचे मुख्य लक्ष्य आहे, मनुष्या पासून देवता बनणे. मुले निश्चय करतात कि, आम्हाला असे बनायचे आहे. ज्याला निश्चय होत नाही, तो शाळेमध्ये बसेल कां? मुख्य लक्ष्य तर बुद्धी मध्ये आहे. आम्ही बॅरिस्टर किंवा डॉक्टर बनू, तर शिकले पाहिजे ना. निश्चय नसेल तर येणारच नाहीत. तुम्हाला निश्चय आहे, आम्ही मनुष्या पासून देवता, नरापासून नारायण बनत आहोत. ही खरी खरी सत्य नरापासून नारायण बनण्याची कथा आहे. खरेतर हे शिक्षण आहे, परंतु याला कथा कां म्हटले जाते,? कारण पाच हजार वर्षा पूर्वी पण ऐकली होती, भूतकाळ झाला आहे., भूतकाळाला कथा म्हटले जाते. हे नरा पासून नारायण बनण्याचे शिक्षण आहे. मुले मना पासून समजतात कि, नवीन दुनिया मध्ये देवता राहतात, जुन्या दुनिया मध्ये मनुष्य राहतात. देवतां मध्ये जे गुण आहेत ते मनुष्या मध्ये नाहीत, त्यामुळे त्यांना देवता म्हटले जाते. मनुष्य देवता समोर जाऊन नमन करतात. तुम्ही सर्वगुणसंपन्न….. मग स्वतःला म्हणतात, आम्ही पापी,नीच आहोत. मनुष्य म्हणतात, देवता म्हणत नाहीत. देवता सतयुगा मध्ये होते, कलियुगा मध्ये असत नाहीत. परंतु आज काल तर सर्वांना श्री श्री म्हणतात. श्री म्हणजे श्रेष्ठ. सर्व श्रेष्ठ तर भगवानच बनवित आहेत. श्रेष्ठ देवता सतयुगा मध्ये होते, यावेळी कोणीच मनुष्य श्रेष्ठ नाही. तुम्ही मुले आता बेहदचा संन्यास करता. तुम्हीं जाणता कि,ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे, त्यामुळे या सर्वा पासून वैराग्य येते. ते आहेत हठयोगी संन्यासी. घरदार सोडून आलेत, मग येऊन महला मध्ये बसले आहेत. नाही तर झोपडी तयार करण्यासाठी कांही खर्च थोडाच येत आहे, कांही पण नाही. एकांतासाठी झोपडी मध्ये बसले पाहिजे, न कि महला मध्ये. बाबाची पण झोपडी बनलेली आहे. झोपडी मध्ये सर्व सुख आहेत. आता तुम्हा मुलांना पुरुषार्थ करून मनुष्या पासून देवता बनायचे आहे. तुम्हीं जाणता कि, विश्व नाटकामध्ये जे कांही होऊन गेले, ते मग जसेच्या तसे पुनरावृत्त होईल, त्यामुळे कोणाला पण अशी मत द्यायची नाही कि, भक्ती सोडा. जेंव्हा ज्ञान बुद्धी मध्ये येईल, तर समजतील आम्ही आत्मा आहोत, आम्हाला आता बेहदच्या बाबा कडून वरसा घ्यायचा आहे. बेहदच्या बाबाची जेंव्हा ओळख होईल, तेंव्हा हदच्या गोष्टी नाहीशा होतील. बाबा म्हणतात,गृहस्थ व्यवहारा मध्ये राहून, फक्त बुद्धीचा योग बाबाशी जोडायचा आहे. शरीर निर्वाहा साठी कर्म पण करायचे आहे, जसे भक्ती मध्ये कोणी नौधा भक्ती करतात. नियमाने रोज जाऊन दर्शन करतात. देहधारी जवळ जाणे, हे सर्व शरीराच्या यात्रा आहेत. भक्ती मार्गा मध्ये किती धक्के खातात. येथे कोणता पण धक्का खात नाहीत. येतात तेंव्हा समजण्यासाठी बसविले जाते. बाकी आठवण करण्यासाठी कांही एका जागेवर बसायचे नाही. भक्ती मार्गा मध्ये कोणी कृष्णाचा भक्त असेल, तर असे नाही कि, चालताना फिरताना कृष्णाची आठवण करू शकत नाहीत. त्यामुळे जे शिकलेले मनुष्य आहेत, ते म्हणतात, कृष्णाचे चित्र घरामध्ये ठेवले आहे, तर मग तुम्ही मंदिरा मध्ये कां जाता. कृष्णाच्या चित्राची पूजा तुम्हीं कुठेही करा. बरं, चित्र ठेवू नका, आठवण करत राहा. एक वेळा वस्तू पाहिली तर मग ती आठवणी मध्ये येते. तुम्हाला पण हेच म्हणतात, शिवबाबाला तुम्ही घरामध्ये बसून आठवण करू शकत नाही कां? ही तर नवीन गोष्टी आहे. शिवबाबा ला कोणीच जाणत नाहीत. नाव,रूप,देश, काळाला जाणत नाहीत, म्हणतात सर्वव्यापी आहेत. आत्म्याला परमात्मा तर म्हणत नाहीत. आत्म्याला पित्याची आठवण येते. परंतु पित्याला जाणत नाहीत, तर समजण्या साठी सात दिवस पाहिजेत. मग किरकोळ मुद्दे पण समजावले जातात. बाबा ज्ञानाचे सागर आहेत ना. किती काळा पासून ऐकत आले आहात, कारण हे ज्ञान आहे ना. समजता कि, आम्हाला मनुष्या पासून देवता बनण्याचे ज्ञान मिळत आहे. बाबा म्हणतात, तुम्हाला नवनवीन गोष्टी सांगत आहे. तुम्हाला मुरली मिळत नाही तर तुम्ही किती ओरडता. बाबा म्हणतात, तुम्ही बाबाची आठवण करा. मुरली वाचता, तरीपण विसरून जाता. पहिल्या प्रथम तर ही आठवण करायची आहे, मी आत्मा आहे, एवढी छोटी बिंदू आहे. आत्म्याला पण ओळखायचे आहे. म्हणतात याची आत्मा निघून, दुसऱ्या मध्ये प्रवेश केला. आम्ही आत्माच जन्म घेत घेत आता अपवित्र बनले आहोत. अगोदर तुम्हीं पवित्र गृहस्थ धर्माचे होता. लक्ष्मी नारायण दोन्ही पवित्र होते. मग दोन्ही पण अपवित्र बनले, मग दोन्ही पवित्र होतात, तर काय अपवित्र पासून पवित्र बनले? कां पवित्र जन्म घेतला? बाबा समजावत आहेत, कसे तुम्ही पवित्र होता? मग वाममार्गा मध्ये गेल्याने अपवित्र बनले आहात. पुजारीला अपवित्र, पूज्यला पवित्र म्हटले जाते. साऱ्या जगाच्या इतिहास भूगोलाचे ज्ञान तुमच्या बुद्धी मध्ये आहे. कोण कोण राज्य करत होते? कसे त्यांना राज्य मिळाले, हे तुम्ही ओळखता, असे कोणी ओळखत नाहीत. तुमच्या जवळ पण पूर्वी हे ज्ञान, रचता आणि रचनेच्या आदि,मध्य, अंताचे नव्हते, म्हणजे तुम्हीं नास्तिक होता. तुम्ही जाणत नव्हता. नास्तिक बनल्यामुळे किती दुःखी बनले आहात. आता तुम्ही इथे आले आहात, हे देवता बनण्यासाठी. तिथे किती सुखी होते. दैवीगुण पण येथे धारण करायचे आहेत. प्रजापिता ब्रह्माची मुले बहिण भाऊ आहेत ना. वाईट दृष्टी गेली नाही पाहिजे, यामध्ये मेहनत आहे. डोळे फार विकारी आहेत. सर्व अवयवा मध्ये विकारी डोळे आहेत. अर्धा कल्प विकारी, अर्धा कल्प निर्विकारी राहतात. सतयुगा मध्ये विकारी असत नाहीत. डोळे विकारी आहेत, तर त्यांना आसूर म्हटले जाते. बाबा स्वतः म्हणतात, मी पतीत दुनिये मध्ये येत आहे. जे पतित बनले आहेत, त्यांनाच पावन बनायचे आहे. मनुष्य तर म्हणतात, हे स्वतःला भगवान म्हणतात. कल्पवृक्षा मध्ये पहा, एकदम तमोप्रधान दुनियेच्या शेवटी उभे आहेत. तेच मग तपस्या करत आहेत. सतयुगा पासून लक्ष्मी नारायणाची राजधानी चालते. संवत पण या लक्ष्मी नारायणा पासून मोजला जातो. बाबा म्हणतात, लक्ष्मी नारायणाचे राज्य दाखवता, तर त्यामध्ये लिहा, यांच्या १२५० वर्षानंतर त्रेता येते. शास्त्रां मध्ये मग लाखो वर्ष लिहिले आहेत. रात्रं दिवसाचा फरक आहे ना. ब्रह्माची रात्र अर्धा कल्प,ब्रह्माचा दिवस अर्धा कल्प. या गोष्टी बाबा सांगत आहेत.तरी पण म्हणतात, गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा, बाबाची आठवण करा. त्यांची आठवण करत करत तुम्ही पावन बनाल, मग अंत मती सो गती होऊन जाईल. बाबा असे म्हणत नाहीत कि, इथेच बसून राहा. सेवाधारी मुलांना तर ते बसवत नाहीत. सेंटर, म्युझियम इत्यादी उघडत राहा. किती जणांना निमंत्रण देत आहात, येऊन ईश्वरीय पित्याचा जन्मसिद्ध अधिकार, विश्वाची बादशाही घ्या. तुम्ही बाबाची मुले आहात. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर तुम्हाला पण स्वर्गाचा वरसा मिळाला पाहिजे. बाबा म्हणतात, मी एकदाच येऊन स्वर्गाची स्थापन करतो. एकाच दुनिये मध्ये, यांचे चक्र फिरत राहते. मनुष्यांची तर अनेक मते, अनेक गोष्टी आहेत, मत मतांतर तर किती आहेत, याला म्हटले जाते अद्वैत मत. झाड किती मोठे आहे. किती फांद्या निघत आहेत. किती धर्म पसरले आहेत, प्रथम तर एक मत, एक राज्य होते. सर्व विश्वावर यांचे राज्य होते. हे पण आता तुम्हाला माहीत झाले आहे. आम्ही साऱ्या विश्वाचे मालक होतो. मग 84 जन्म भोगून, कंगाल बनले आहोत. आता तुम्ही मृत्यूवर विजय प्राप्त करत आहात, तिथे कधी अकाले मृत्यू होत नाही. इथे तर पाहा, बसल्या बसल्या अकाली मृत्यू होत आहे. चोहीकडे मृत्युच मृत्यू आहे. तिथे असे होत नाही. पूर्ण जीवन आयुष्य चालत राहते. भारता मध्ये पवित्रता, शांती, समृद्धी होती. दीडशे वर्ष सरासरी आयुष्य होते, आता किती आयुष्य कमी आहे. ईश्वराने तुम्हाला योग शिकविला आहे, तर तुम्हाला योगेश्वर म्हणतात. तिथे थोडेच म्हणतात. यावेळी तुम्ही योगेश्वर आहात. तुम्हाला ईश्वर राजयोग शिकवत आहेत. मग राज राजेश्वर बनायचे आहे. आता तुम्ही ज्ञानेश्वर आहात,मग राजेश्वर म्हणजे राजांचे राजा बनाल. अच्छा.

गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रति, मात पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)डोळ्याला निर्विकारी बनविण्याची मेहनत करायची आहे. बुद्धीमध्ये नेहमी ठेवा, आम्ही प्रजापिता ब्रह्माची मुले भाऊ-बहीण आहोत. विकारी दृष्टी ठेवू शकत नाहीत.

(२)शरीर निर्वाहि साठी कर्म करताना, बुद्धीचा योग एका बाबा बरोबर लावा. हदच्या सर्व गोष्टी सोडून बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे.बेहदचे संन्याशी बनायचे आहे.

वरदान:-
नेहमी अतींद्रिय सुखाच्या झोक्या मध्ये झोका घेणारे, संगमयुगा च्या सर्व अलौकिक प्राप्ती द्वारे संपन्न भव.

जी मुले अलौकिक प्राप्तीने नेहमी संपन्न आहेत, ते अतींद्रिय सुखाच्या झोक्यामध्ये झुलत राहतात. जशी जी प्रिय मुले असतात, त्यांना झोक्यामध्ये झुलवतात. तसेच सर्व प्राप्ती संपन्न ब्राह्मणांचा झोका, अतिंद्रिय सुखाचा झोका आहे, या झोक्यामध्ये नेहमीच झुलत राहा. कधी पण देहअभिमाना मध्ये येऊ नका.जे झोक्यातून उतरून, जमिनीवर पाय ठेवतात, तर घाण होऊन जातात. सर्वोच्च बाबाची, स्वच्छ मुलेच अतिंद्रीय सुखाच्या झोक्यामध्ये झुलतात, मातीमध्ये पाय ठेवत नाहीत.

बोधवाक्य:-
"मी त्यागी आहे", या अभिमानाचा त्याग खरा त्याग आहे.