11-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,मधुबन परम पवित्र शिव पित्याचे घर आहे,येथे तुम्ही कोणत्याही पतिताला घेऊन येऊ शकत नाही"

प्रश्न:-
या ईश्वरीय संस्थेमध्ये जे पक्के निश्चय बुद्धी आहेत,त्यांची लक्षणे काय असतील?

उत्तर:-
(१) ते स्तुती निंदा सर्वांमध्ये धैर्याने काम घेतील
(२) कधी क्रोध करणार नाहीत.
(३) कोणालाही दैहिक दृष्टी द्वारे पाहणार नाहीत,आत्म्यालाच पाहतील.आत्म होऊन गोष्टी करतील.
(४) पती पत्नी सोबत राहत कमल फुला समान राहतात.
(५ )कोणत्याही प्रकारची इच्छा ठेवणार नाहीत.

गीत:-
जले ना परवाना..

ओम शांती।
आत्मिक मुलां प्रति आत्मिक पिता समजावत आहेत, म्हणजेच भगवान आत्मिक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.त्या शाळेमध्ये जे मुलं शिकतात,त्यांना काही आत्मिक विद्यार्थी म्हणत नाहीत.ते तर आसुरी विकारी संप्रदायाचे आहेत.यापूर्वी तुम्ही पण आसुरी किंवा रावण संप्रदायाचे होते.आत्ता राम राज्यांमध्ये येण्यासाठी पाच विकार रुपी रावणा वरती विजय मिळवण्याचा पुरुषार्थ करत आहात. जे ज्ञान प्राप्त करत नाहीत,त्यांना समजावे लागेल की, तुम्ही रावण राज्यांमध्ये आहात. स्वता: समजत नाहीत.तुम्ही आपल्या मित्र संबंधी इत्यादी ना म्हणतात की,आम्ही बेहद्दच्या पित्याद्वारे शिकत आहोत,तर असे नाही की,ते निश्चय करतात.कितीही पिता किंवा भगवान स्वतः म्हणतील तर हे निश्चय करत नाहीत.नवीन मनुष्यांना तर येथे येण्याचा हुकूम नाही.पत्रा शिवाय किंवा विचारल्याशिवाय कोणीही येऊ शकत नाही,परंतु कधी-कधी कोणी येतात, हे पण कायद्याचे उल्लंघन आहे. एका-एकाचा पूर्ण समाचार नाव इत्यादी विचारायचे असते, यांना पाठवू का? परत बाबा म्हणतील-लवकर पाठवा.जर आसुरी पतित दुनियाचे विद्यार्थी असतील,तर बाबा समजवतील,ते शिक्षण तर विकारी पतित शिकवतात.येथे तर ईश्वर शिकवत आहेत.त्या शिक्षणाद्वारे पाई पैशाचे पद मिळेल.जर कोणी मोठी परीक्षा पास करतील,तरी किती कमावतील? विनाश तर समोर आहे. नैसर्गिक आपत्ती पण येणार आहे. हे पण तुम्ही समजतात,जे समजत नाहीत,त्यांना बाहेर स्वतंत्र्य रूम मध्ये बसून समजावयाचे असते.हे ईश्वरी शिक्षण आहे,यामध्ये निश्चित बुद्धीच विजय होतील, म्हणजेच विश्वावरती राज्य करतील. रावण संप्रदाय असणारे तर,हे जाणत नाहीत.यामध्ये खूप खबरदारी पाहिजे.परवानगी शिवाय कोणीही येऊ शकत नाही.हे काय फिरण्याचे स्थान नाही.थोड्या दिवसांमध्ये कायदे पण कडक होतील,कारण हे परम पवित्र स्थान आहे.शिवबाबांना इंद्र पण म्हणतात ना. ही इंद्रसभा आहे. नऊ रत्नाची अंगठी पण घालतात ना.त्या रत्नांमध्ये नीलम पण असते, पन्ना, माणिक पण असेच.ही सर्व नावं ठेवलेली आहेत.परींचे पण नावं आहेत ना.तुम्ही पऱ्या उडणारे आत्मे आहात.तुमचेच वर्णन आहे परंतु मनुष्य या गोष्टींना काहीच समजत नाहीत.

अंगठी मध्ये जेव्हा रत्न घालतात, तर त्यांच्यामध्ये कोणी पुखराज, नीलम,पेरुज पण असतात.काहींचे मूल्य हजार रुपये,तर काहींचे मूल्य दहा-वीस रुपये पण असते. मुलांमध्ये पण क्रमानुसार आहेत. काही तर शिकून मालक बनतात, काही परत दासदासी पण बनतात. राजधानी स्थापन होत आहे ना.तर बाबा सन्मुख शिकवत आहेत. इंद्र पण त्यांनाच म्हटले जाते. ही ज्ञानाची वर्षा आहे.ज्ञान तर शिवाय बाबांच्या कोणी देऊ शकत नाही. तुमचे मुख्य लक्ष हेच आहे.जर निश्चय झाला की ईश्वर शिकवत आहेत,तर ते शिक्षणाला सोडणार नाहीत.जे पत्थर बुद्धीच असतील, त्यांना कधी ज्ञानबाण लागणार नाही,चालता-चालता विकारांमध्ये जातील.पाच विकार अर्ध्याकल्पाचे शत्रू आहेत.माया देह अभिमान मध्ये घेऊन जाऊन चापट मारते,परत आश्र्चर्यवत ऐकून,सांगून,पळून जातात. ही माया खूप मोठी बलवान आहे,एकाच चापटी मध्ये विकारांमध्ये घेऊन जाते.आम्ही कधी विकारात जाणार नाहीत असा निश्चय केल्यावर पण मायची चापट लागते.येथे तर स्त्री-पुरुष दोघांनाही पवित्र बनवले जाते.ते ही ईश्‍वराच्या शिवाय कोणी बनवू शकत नाही. ही ईश्वरीय संस्था आहे.

बाबांना नावाडी पण म्हटले जाते. तुम्ही नाव आहात.नावाडी येतात तर सर्वांची जीवन नौका किनाऱ्याला लावतात.असे म्हणतात सत्याची नाव हालेल परंतु बुडणार नाही.अनेक मठ पंथ आहेत.ज्ञान आणि भक्तीची जशी लढाई होते.कधी भक्तींचा विजय होतो, शेवटी तर ज्ञानाचा विजय होईल.भक्तीकडे खूप मोठ-मोठे योध्दे आहेत.ज्ञान मार्गात पण मोठ,मोठे योध्ये आहेत.अर्जुन, भीम इत्यादी नावं ठेवली आहेत.या तर सर्व गोष्टी बनवल्या आहेत. गायन तर तुमचे आहे ना.हिरो हिरोईन ची भूमिका तुम्ही आता वठवत आहात.यावेळतच युद्ध चालते.तुमच्या मध्ये पण खूप आहेत,जे या गोष्टींना बिल्कुल जाणत नाहीत.जे चांगले चांगले असतील,त्यांनाच ज्ञानाचा बाण लागेल.तिसऱ्या दर्जाचे तर बसू शकणार नाहीत.दिवसेंदिवस खूप कडक कायदे होत जातील.पत्थर बुद्धी जे काही समजत नाहीत, त्यांना येथे बसवणे पण बेकायदेशीर आहे.

हा हॉल परम पवित्र स्थान आहे.पोप ना पवित्र म्हणतात ना. हे शिवपिता तर परम पवित्र आहेत. बाबा म्हणतात,या सर्वांचे मला कल्याण करायचे आहे.हे सर्व विनाश होणार आहेत,हे पण कोणी थोडेच समजतात.जरी ऐकतात परंतु एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाद्वारे सोडून देतात.न काही धारण करतात, न करवतात.असे मुके आणि भैरे खूप आहेत.बाबा म्हणतात वाईट ऐकू नका,वाईट बोलू नका...ते तर माकडाचे चित्र दाखवतात,परंतु हे तर मनुष्यांसाठी म्हटले जाते.मनुष्यच यावेळेत माकडा पेक्षा पण खराब बनले आहेत.नारदाची पण गोष्ट बनवली आहे,त्यांना सांगा तुम्ही आपला चेहरा पहा,पाचविकार तर स्वत: मध्ये नाहीत? जसे साक्षात्कार होतो.हनुमान चा पण साक्षात्कार होतो ना.बाबा म्हणतात कल्प-कल्प असे होत राहते.सतयुगा मध्ये अशा गोष्टी नसतात.ही जुनी दुनिया तर नष्ट होणार आहे.जे पक्के निश्चय बुद्धी आहेत,ते समजतात कल्पा पूर्वी पण आम्ही असे राज्य केले होते.बाबा म्हणतात मुलांनो आता दैवी गुणांची धारणा करा.कोणतेही बेकायदेशीर काम करू नका. निंदा-स्तुती सर्वांमध्ये धैर्याने काम करायचे आहे,क्रोध करायचं नाही. तुम्ही खूप उच्च विद्यार्थी आहात, स्वयम् भगवान पिता शिकवत आहेत.ते तर प्रत्यक्ष शिकवत आहेत,तरीही अनेक मुलं विसरतात, कारण साधारण तना मध्ये आहेत ना.बाबा म्हणतात देहधारीला पाहिल्यामुळे तुम्ही इतके ज्ञान घेऊ शकत नाहीत,आत्म्याला पहा. आत्मा येथे भुकटीच्या मध्ये राहते. आत्मा ऐकून खांदा हलवते,नेहमी आत्म्याशी गोष्टी करा.तुम्ही आत्मा या शरीर रुपी आसनावर बसले आहात.तुम्ही तमोप्रधान होते,आता सतोप्रधान बनायचे आहे.स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केल्यामुळे देहाचे भान कमी होत जाईल.अर्धा कल्प याचे भान राहिले आहे.या वेळेत सर्व देह अभिमानी आहेत.

आता बाबा म्हणतात देहीअभिमानी बना.आत्माच सर्वकाही धारण करते,खाते पिते,सर्व आत्माच करते.बाबांना तर अभोक्ता म्हटले जाते.ते निराकार आहेत.हे शरीरधारीच सर्व काही करतात.ते तर काही खात पित नाहीत, अभोक्ता आहेत.परत दुसरे लोक त्यांची कॉपी करतात.मनुष्यांना खुप फसवतात.तुमच्या बुद्धीमध्ये आता सर्व ज्ञान आहे.कल्पापूर्वी ज्यांनी समजले होते, तेच समजतील.बाबा म्हणतात कल्प-कल्प येऊन तुम्हाला शिकवतो आणि साक्षी होऊन पाहतो.क्रमानुसार पुरुषार्थ प्रमाणे जे शिकले होते,तेच शिकतील.वेळ तर लागतो ना.असे म्हणतात,कलियुग आणखी चाळीस हजार वर्ष शिल्लक आहे,म्हणजेच खूप अज्ञान अंधरा मध्ये आहेत ना. भक्तिमार्ग आणि ज्ञान मार्गामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे,ही पण समजून घेण्याची गोष्ट आहे. मुलांनी नेहमी खूप खुशी मध्ये राहिले पाहिजे.सर्व काही आहे, कोणतीही इच्छा नाही.तुम्ही जाणतात कल्पा पूर्वी पण आमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या होत्या,म्हणून पोट भरलेले होते.ज्यांना ज्ञान नाही त्यांचे थोडेच पोट भरू शकेल.असे म्हटले जाते खुशी सारखा खुराक नाही. जन्मजन्मांतर ची राजाई मिळते. दासदासी बनणाऱ्यांना एवढी खुशी राहत नाही.पूर्ण महावीर बनायचे आहे,जे माया हालवू शकणार नाही. बाबा म्हणतात डोळ्याची खूप संभाळ करायची आहे.विकारी दृष्टी जायला नको.स्त्रीला पाहिल्यानंतर चलायमान होतात. तुम्ही भाऊ-बहीण, कुमार कुमारी आहात ना,परत कर्मेंद्रियाची चंचलता का करता?मोठ-मोठे लखपती करोडपतीला पण माया नष्ट करते,तर गरिबांना पण माया एकदम नष्ट करते.परत बाबांना म्हणतात,आम्ही धक्का खाल्ला. अरे दहा वर्ष ज्ञान घेतल्यानंतर पण तुम्ही हरले,आता तर रसातळाला जाल म्हणजे अगदी कमी पद मिळेल.मनामध्ये समजतात यांची अवस्था कशी आहे?काहीजण तर खूप छान सेवा करतात.कन्यांनी पण भीष्मपितामह इत्यादींना बाण मारले आहेत ना.गीते मध्ये थोडेफार सत्य आहे.हे ज्ञान तर भगवानूवाच आहे ना.जर कृष्ण भगवंतानी गीता ज्ञान ऐकवले,तर परत असे का म्हणतात,मी जो आहे जसा आहे कोणी विरळाच मला जाणतात. कृष्ण येथे असतील तर माहित नाही,काय करतील.कृष्णाचे शरीर तर सतयुगामध्येच असते.हे जाणत नाहीत,की कृष्णाच्या अनेक जन्माच्या अंत काळातील शरीरांमध्ये,मी प्रवेश करतो. कृष्णाला भेटण्यासाठी तर सर्व पळत-पळत येतील.पोप इत्यादी येतात तर, असंख्य मनुष्य एकत्र होतात.मनुष्य थोडेच समजतात की,या वेळेत सर्व पतित तमोप्रधान आहेत. ते म्हणतात हे पतितपावन या, परंतु समजत नाहीत की,आम्ही पण पतित आहोत.मुलांना बाबा खूप चांगल्या प्रकारे समजावत राहतात.बाबांची बुद्धी तर सर्व सेवाकेंद्राच्या अन्यन मुलांकडे चालली जाते.जेव्हा अनेक मुलं येथे येतात तर येथे पाहतो,नाही तर बाहेरच्या मुलांची आठवण येते, त्यांच्यापुढे ज्ञानाचा डान्स करतो. बहुतांश ज्ञानी तू आत्मा असल्यानंतर मजा येते.नाहीतर मुलीवर अत्याचार होतात.कल्प- कल्प सहन करावे लागते. ज्ञानामध्ये आल्यानंतर भक्ती सुटत जाते.असे समजा घरामध्ये मंदिर आहे, स्त्री-पुरुष दोघे भक्ती करतात, स्त्रीला ज्ञानाची आवड लागते आणि भक्ती सोडते,तर खूप हंगामा होतो. विकारांमध्ये न गेल्यामुळे, ग्रंथ इत्यादी न वाचल्यामुळे पण भांडणं होतात,यामुळे विघ्न खूप पडतात. दुसऱ्या सत्संगामध्ये जाण्यासाठी कोणीही अडथळा आणत नाही.येथे तर पवित्रतेची गोष्ट आहे.पुरुष पवित्र राहू शकत नाहीत, तर जंगलामध्ये चालले जातात, स्त्रिया कुठे जातील? स्त्रियांसाठी ते समजतात, नरकाचे द्वार आहे. बाबा म्हणतात,या तर स्वर्गाचे द्वार आहेत.तुम्ही आता स्वर्गाची स्थापना करत आहात.आता स्वर्गाची स्थापना होत आहे,ही समजून घेण्याची गोष्ट आहे.तुम्ही मूलंपण क्रमानुसार समजतात,पवित्र राहतात,बाकी धारणा क्रमानुसार होते.तुम्ही तर तेथून निघून,येथे येऊन बसले आहात,परंतु आता तर समजवले जाते,गृहस्थ व्यवहारांमध्ये राहत कमल फुल समान पवित्र राहायचे आहे.ते ही अंतिम जन्माची गोष्ट आहे.गृहस्थ व्यवहारांमध्ये राहात स्वतःला आत्म समजायचे आहे.आत्माच अशी श्रेष्ठ बनते. आत्माच जन्मजन्मांतर वेगवेगळे कपडे परिधान करते. आता आम्हा आत्म्यांना परत जायचे आहे.बाबांशी योग लावायचा आहे. मुख्य गोष्ट ही आहे.आत्माच या कर्मेंद्रिया द्वारे ऐकते.आत्म शरीरात नसेल तर, शरीर मुडदा बनते.बाबा खूप आश्चर्यकारक ज्ञान देतात. परमात्मा शिवाय तर या गोष्टी कोणी समजावू शकत नाहीत.सन्याशी इत्यादी कोणी आत्म्याला थोडेच पाहतात. ते तर आत्म्यालाच परमात्मा समजतात, दुसरीकडे म्हणतात आत्म्याला लेपछेप लागत नाही.शरीराला पवित्र बनवण्यासाठी गंगा स्नान करतात. हे समजत नाहीत की, आत्माच पतित बनते.आत्माच सर्व काही करते. बाबा समजवत राहतात, हे समजू नका की मी अमका आहे, हा अमका का आहे,असे नाही. सर्व आत्मे आहेत, जातीपातीचा कोणताही भेद करायला नको‌ स्वतःला आत्मा समजा, शासन पण कोणत्या धर्माला मानत नाही. हे सर्व देहाचे धर्म आहेत परंतु सर्व आत्म्यांचे पिता तर एकच आहेत.आत्म्यालाच पाहिचे आहे.सर्व आत्म्यांचा स्वधर्म शांत आहे.अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बाप दादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) ज्या गोष्टी कामाच्या नाहीत त्या एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायच्या आहेत. वाईट ऐकायचे नाही, वाईट बोलायचे नाही, वाईट पाहिचे नाही.बाबा ज्या शिक्षा देतात त्यांना धारण करायचे आहे.

(२) कोणत्याही हद्दच्या इच्छा ठेवायच्या नाहीत.डोळ्याची खूप संभाळ करायची आहे.विकारी दृष्टी जायला नको. कोणत्याही कर्मेंद्रिया चंचल व्हायला नकोत. आनंदाने भरपूर राहायचे आहे.

वरदान:-
लक्ष रुपी तेल (घृत) द्वारा आत्मिक स्वरूपाच्या तार्यांची चमक वाढवणारे आकर्षण मूर्त भव.

जेव्हा बाबा द्वारे, ज्ञानाद्वारे आत्मिक स्वरूपाचा तारा चमकला तर तो विझू शकत नाही, परंतु चमकेची टक्केवारी कमी जास्त होऊ शकते.हा तारा नेहमीच चमकत तेव्हाच आकर्षित करेल, जेव्हा रोज अमृतवेळेला लक्ष रुपी तेल घालत राहाल.जसे दिव्या मध्ये तेल घालतात, तर तो एकरस जळत राहतो.असे संपूर्ण लक्ष देणे म्हणजेच बाबांचे सर्व गुण आणि शक्तींना स्वतःमध्ये धारण करणे.या लक्षा द्वारे आकर्षण मूर्त बनू शकाल.

बोधवाक्य:-
बेहदच्या वैराग वृत्ती द्वारे साधनाच्या बीजाला प्रत्यक्ष करा.