24-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो:- हे शरीर रुपी खेळणे आत्मा रुपी चैतन्य चावीने चालत असते तुम्ही स्वतःला
आत्मा निश्चय करा तर निर्भय बनाल"
प्रश्न:-
आत्मा
शरीरासोबत खेळ खेळत खाली आली आहे, त्यामुळे त्याला काय नाव द्याल?
उत्तर:-
कठपुतळी.ज्याप्रमाणे नाटकामध्ये कठपुतळ्यांचा खेळ दाखवतात त्याच प्रमाणे तुम्ही
आत्मे कठपुतळी प्रमाणे 5 हजार वर्ष खेळ खेळत खाली पोहोचलेले आहात.बाबा आले
आहेत,तुम्हा कठपुतळ्यांना वरती चढण्याचा रस्ता दाखविण्यासाठी.आता तुम्ही श्रीमतरुपी
चावी लावाल तर वरती निघून जाल.
गीत:-
महफिल मे जल
ऊठी शमा.......
ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना श्रीमत देत आहेत-कधी कुणाचं वागणं चांगलं नसेल तर आई
वडील म्हणतात-तुला ईश्वर चांगली बुद्धी देवो!बिचाऱ्यांना हे माहितीच नाही की ईश्वर
खरोखरच मत देतो.आता तुम्हा मुलांना ईश्वरीय मत मिळत आहे.अर्थात आत्मिक पिता मुलांना
श्रेष्ठ मत देत आहेत. श्रेष्ठ बनण्यासाठी.आता तुम्ही समजतात,आम्ही श्रेष्ठ ते
श्रेष्ठ बनत आहोत.बाबा आपल्याला किती उंच मत देत आहेत.आपण त्यांच्या मतावर चालून
मनुष्यापासून देवता बनत आहोत.तेव्हा सिद्ध होते की मनुष्याला देवता बनविणारा तोच
पिता आहे शिख लोक देखील गातात की मनुष्याला देवता केले .... निश्चितच मनुष्यापासून
देवता बनवण्याची मत देतात. त्यांची महिमा देखील आहे की, एक ओंकार,कर्ता
पुरुष,निर्भय. तुम्ही सर्व निर्भय होत जातात. स्वतःला आत्मा समजतात ना. आत्म्याला
कोणतेही भय राहत नाही.बाबा म्हणतात निर्भय बना . मग भीती कशाची.तुम्हाला कोणतीही
भीती नाही तुम्ही आपल्या घरात बसून श्रीमत घेत आहात.आता श्रीमत कुणाची? कोण देतात?या
गोष्टी गीते मध्ये नाहीत.आता तुम्ही मुलं समजतात.बाबा म्हणतात तुम्ही पतित बनलेला
आहात.आता पावन बनण्यासाठी मनाने बाबांची आठवण करा.हा पुरुषोत्तम बनण्याचा मेळा
संगमयुगावरच होतो.खूप येऊन श्रीमत घेतात.यालाच म्हटले जाते ईश्वरा सोबत मुलांचा मेळा.
ईश्वरही निराकार व मुलं देखील निराकार.आपण आत्मा आहोत ही पक्की सवय करावयाची आहे.
जसे खेळण्याला चावी दिल्याने ते नाचायला लागते तसेच आत्मा देखील या शरीररूपी
खेळण्याची चावी आहे.आत्मा यात नसेल तर काहीच करू शकत नाही,तुम्ही चैतन्य खेळणे आहात.
खेळण्याला चावी दिली नाही तर ते कोणत्याच कामाचे राहत नाही, नुसतेच उभे, स्थिर
राहिल.आत्मा देखील चैतन्य चावी आहे.आणि ही अविनाशी,अमर चावी आहे. बाबा सांगतात मी
फक्त आत्म्याला पाहतो.आत्मा ऐकत आहे ही पक्की सवय करावयाची आहे.या चावी शिवाय शरीर
चालू शकत नाही.यांनादेखील अविनाशी चावी मिळालेली आहे. 5 हजार वर्ष ही चावी चालत
राहते.चावी चैतन्य असल्याने चक्र फिरत राहते.हे चैतन्य खेळणे आहे.बाबा देखील चैतन्य
आत्मा आहे.जेव्हा चावी पूर्ण होते तेव्हा बाबा पुन्हा नव्याने युक्ती सांगतात
की,माझी आठवण करा तर चावी पुन्हा लागेल,म्हणजेच तमोप्रधान आत्मा सतोप्रधान बनेल.
ज्याप्रमाणे गाडीत पेट्रोल संपल्यानंतर पुन्हा भरले जाते, आता तुम्ही समजाल की
पेट्रोल कसे भरले जाईल.बॅटरी रिकामी झाली आहे त्यात परत शक्ती भरावयाची आहे.बॅटरी
संपल्याने प्रकाश देखील संपलेला आहे. आता तुमची आत्मा रुपी बॅटरी भरली जात आहे जेवढी
आठवण कराल तेवढी शक्ती भरली जाईल. 84 चा फेरा लावल्याने बॅटरी खाली झाली आहे.सतो,रजो,
तमो झाली आहे.आता बाबा परत आले आहेत चावी देण्यासाठी अथवा बॅटरी भरण्यासाठी.शक्ती
नसल्याने मनुष्य कसे बनतात. तर आता बाबांच्या आठवणीने बॅटरी भरावयाची आहे.याला मानवी
बॅटरी म्हणता येईल.बाबा म्हणतात माझ्यासोबत योग लावा.हे ज्ञान एक पिताच देऊ
शकतो.सदगति दाता देखील तोच आहे.आता तुमची बॅटरी पूर्ण भरत असल्याने ८४ जन्म पूर्ण
भूमिका करू शकाल,ज्याप्रमाणे नाटकात कठपुतळ्या असतात, तुम्ही आत्मे देखील या
कठपुतळ्यां प्रमाणेच आहेत . वरतून उतरताना ५ हजार वर्षांत एकदम खाली आलेले आहात.
तेव्हा पुन्हा बाबा येऊन वरती चढवतो.तो तर एक खेळणे आहे. बाबा अर्थ समजवतात चढती कला
आणि उतरती कलेचा. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे,तुम्ही समजतात की,श्रीमतामुळे आपल्याला
चावी मिळत आहे. आपण पूर्ण सतोप्रधान बनल्यावर नाटकाची पुनरावृत्ती होईल.किती सहज
गोष्ट आहे समजण्याची व समजून देण्याची.तरीही बाबा म्हणतात ज्यांनी कल्पापूर्वी
समजून घेतलं होतं तेच समजून घेतील.तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीदेखील समजून घेणार
नाहीत. बाबा बुद्धी तर सगळ्यांना एक सारखीच देतात.कुठेही बसलात बाबांची आठवण करा.जरी
समोर ब्राह्मणी नसेल तरीदेखील बाबांची आठवण करू शकता.माहित आहे बाबांच्या आठवणीनेच
विकर्म अविनाश होतील.तर त्या आठवणीत बसून जायचे आहे.खाताना,पिताना, स्नान इ. करताना
देखील बाबांची आठवण करा.थोडावेळ कोणी समोर बसलेले असेल याचा अर्थ असा नाही की ते
तुम्हाला मदत करतात,नाही! प्रत्येकाला स्वतःलाच स्वतःची मदत करावयाची आहे.ईश्वराने
मत दिलेली आहे की असे-असे करा तर तुमची दैवी बुद्धी बनेल.हे प्रलोभन दिले
जाते.श्रीमत् तर सगळ्यांनाच दिली जाते.आता कुणाची बुद्धी मंद तर कुणाची तेज
आहे.पतित पावना सोबत योग न लागल्याने बॅटरी चार्ज होत नाही बाबांची श्रीमत् ऐकत
नाहीत.योग तर लागतच नाही. आता तुम्ही अनुभव करत असाल की बॅटरी भरली जात आहे.बाबा
म्हणतात माझ्या या मताने तुम्ही देवता बनतात.या पेक्षा कोणतीही गोष्ट श्रेष्ठ
नाही.तेथे हे ज्ञान नसते.हे नाटकच असे बनले आहे.तुम्हाला पुरुषोत्तम बनविण्यासाठी
बाबा संगमावर येतात,ज्याची आठवण भक्तिमार्गात साजरी करतात, बाबा येतात तेव्हा दसरा
असतो, 5 हजार वर्षांनी प्रत्येक गोष्टीची पुनरावृत्ती होत असते.
तुम्हा मुलांनाच ही ईश्वरीय मत अर्थात श्रीमत मिळत असते. ज्यानी तुम्ही श्रेष्ठ
बनतात तुमची आत्मा सतोप्रधान होती,ती उतरत उतरत तमोप्रधान,भ्रष्ट बनत जाते.बाबा
ज्ञान आणि योग शिकवून सतोप्रधान,श्रेष्ठ बनवतात,सांगतात तुम्ही शिडी कशी खाली उतरत
जातात. नाटक चालत राहते.या नाटकाच्या आदी-मध्य-अंताला कुणी जाणत नाही.बाबांनी
सांगितल्यावर आता आपल्याला आठवण अथवा स्मृती आली आहे.प्रत्येकाच्या जन्माची कहाणी
तर सांगू शकत नाही.जी लिहिली जाऊ शकत नाही ती वाचून कशी सांगणार! बाबा बसून सांगतात,
आता तुम्ही ब्राह्मण आहात नंतर देवता बनणार आहात.बाबांनी सांगितले आहे
ब्राह्मण,देवता, क्षत्रिय तिन्ही धर्म मी स्थापन करतो.आता तुमच्या बुद्धीमध्ये
आहे,आपण बाबांच्या द्वारे ब्राह्मण वंशी बनत आहोत,नंतर सूर्यवंशी व चंद्रवंशी बनणार
आहोत.जे नापास होतील ते चंद्रवंशी बनतील.कशात नापास? योगामध्ये! ज्ञान खूप सांगितले
जाते.तुम्ही कसे ८४ चे चक्र पूर्ण करतात.मनुष्य तर 84 लाख म्हणून किती दूर गेले
आहेत. आता तुम्हाला ईश्वरीय मत मिळाली आहे.त्याच्यापुढे संगमयुग आहे बाबा दुनियेला
सांगतात तुम्ही आता बदलत आहात,यावेळी बाबा तुम्हाला सांगतात.तुम्ही म्हणाल कल्प-
कल्प आम्ही बदलत आलो आहोत आणि बदलत राहू.ही चैतन्य बॅटरी आहे ना!ती जड आहे!मुलांना
माहित आहे ५ हजार वर्षानंतर बाबा आलेले आहेत.श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत देत
आहेत.उंच-उंच परमेश्वराची उंच मत मिळत आहे.ज्यामुळे तुम्ही उंच पद
मिळवतात.तुमच्याजवळ जेव्हा कोणी येते तेव्हा सांगा, तुम्ही ईश्वराची संतान आहात,
ईश्वर शिवबाबा आहे त्यामुळे शिवजयंती साजरी करतात,तो सदगती दाता देखील आहे,त्यांना
स्वतःचे शरीर नाही तर मग कोणाच्या द्वारे मत देतात?तुम्ही आत्मा आहात शरीराच्या
द्वारे गप्पा गोष्टी करता ना!शरीरा शिवाय आत्म काहीच करू शकत नाही.निराकार पिता
देखील कसे आले?गायन आहे ना रथावर आहे.मग कोणी काय आणि कोणी काय बसून बनवले आहे.
त्रिमूर्ती देखील सूक्ष्म वतन मध्ये दाखवले आहे.बाबा सांगतात या सर्व
साक्षात्काराच्या गोष्टी आहेत. शेवटी रचना तर सर्व येथेच आहे. रचयिता बाबांना देखील
या ठिकाणी यावे लागते.पतित दुनियेत येऊनच पावन बनवावे लागते.येथे मुलांना थेट पावन
बनवत आहेत.समजतात परंतु ज्ञान बुद्धीत बसत नाही.कुणाला समजू शकत नाहीत.श्रीमतावर
चालत नाहीत त्यामुळे श्रेष्ठ बनू शकत नाही.ज्यांना समजतच नाही ते पद कसे घेणार!जेवढी
सेवा कराल तेवढे पद मिळेल. बाबा सांगतात शरीराची पूर्ण हाडे सेवेत स्वाहा
करा.अष्टपैलू सेवा करा.बऱ्याच कन्या सेवेसाठी तडफडत असतात.बाबा आम्हाला सोडवा तर
आम्ही सेवेला सुरुवात करू,ज्याने अनेकांचे कल्याण होईल.सर्व दुनिया शारीरिक सेवा
करते ज्याने सिडी उतरतच आलेले आहेत. आता या आत्मिक सेवेने शिडी चढली जाते.प्रत्येक
जण समजतात की हा आपल्यापेक्षा अधिक सेवा करतो.खूप सेवाधारी कन्या आहेत.सेवाकेंद्र
देखील सांभाळू शकतात.वर्गात क्रमांकानुसार बसवतात येथे मात्र तसे केले जात नाही
अन्यथा निघून जातील,सेवा केली नाही तर पद देखील कमी होईल.पद नंबरवार असेल.खूप पद
क्रमवार असतील,परंतु ते सुखधाम आहे आणि हे दुःखधाम आहे.तेथे कुणी आजारी
नसेल.बुद्धीने काम केले जाईल.समजून घ्या!सेवा कमी केली तर पद देखील छोटे
मिळेल.लक्षात ठेवा सेवेनेच पद मिळते.स्वतःची तपासणी करा प्रत्येक जण आपल्या अवस्थेला
जाणून असतो,मम्मा बाबा देखील सेवा करत आले आहेत.चांगली- चांगली मुलं आहेत,भलेही
नोकरीत आहात तर अर्ध पगारी रजा घेऊन सेवा करण्यास हरकत नाही.जे बाबांच्या हृदयात
आहेत ते ताऊसी सिंहासनावर बसतात क्रमवार पुरुषार्थानुसार!असेच विजय माळेत
येतात.अर्पण होतात,सेवा करतात.कोणी अर्पण होतात परंतु सेवा न केल्याने पद कमी
होते.राजधानी श्रीमतानुसार स्थापन होत आहे असे कधी ऐकले का?किंवा ज्ञानामुळे राजाई
स्थापन होते हे कधी ऐकले का?कधी पाहिले का?होय!दान- पुण्य केल्याने राजाच्या घरी
जन्म घेऊ शकतात!परंतु ज्ञान घेतल्याने राजाई स्थापन होते हे कधी ऐकले आहे का?कुणाला
माहीत नाही परंतु बाबा सांगतात तुम्हीच ८४ जन्म घेतले आहेत.तुम्हाला आता वरती जायचे
आहे.खूप सोपे आहे.तुम्ही कल्पा-कल्पा नुसार समजून घेतात क्रमवार पुरुषार्था
नुसार,बाबा मुलांची आठवण देखील क्रमवार पुरुषार्थानुसार करतात.बाबा सेवाधाऱ्यांची
खुप आठवण करतात.तर स्वतःची तपासणी करा की मी बाबांच्या हृदयात आहे का?माळेचा दाणा
बनू शकतो का?अडाणी मुलं देखील शिकलेल्या मुलां पेक्षा भारी ठरतील.बाबा सांगतात
मुलांनो पुरुषार्थ करा परंतु नशिबातच नसेल किंवा नाटकांमध्ये भूमिकाच नसेल तर कितीही
प्रयत्न करा ऐकत नाहीत.कोणती ना कोणती ग्रहचारी बसली जाते.देह अभिमानामुळे अजून
विकार येतात,मुख्य विकार आहे-देह- अभिमान,सतयुगात देह-अभिमान नाही,तिथे तुमचे
प्रारब्ध असेल. हे बाबा समजावून सांगतात,लिहून ठेवा-निराकार भगवान सांगतात माझी
एकाची आठवण करा.स्वतःला आत्मा समजा.आपल्या शरीराची आठवण करू नका.ज्याप्रमाणे
भक्तिमार्गात एका शिवाची पूजा होते त्यामुळे ज्ञान देखील एक शिवच देतात बाकी सर्व
भक्ती, अव्यभिचारी ज्ञान एकाच बाबांकडून मिळते.ज्ञानसागर बाबांकडून ज्ञानाची रत्ने
मिळतात त्या सागराची गोष्ट नाही.हे ज्ञान सागर तुम्हाला ज्ञान रत्न देत असल्याने
तुम्ही देवता बनतात. शास्त्रात काय-काय लिहून ठेवले आहे,सागरातून देवता निघाले आणि
रत्न दिले!बाबा ज्ञानसागर असून तुम्हा मुलांना रत्न देतात, तुम्ही ज्ञान रत्न
वेचतात पूर्वी दगड वेचत होतात त्यामुळे दगडाच्या बुद्धीचे बनले होतात, आता ज्ञान
वेचत असल्याने पारसनाथ बनलेले आहात. पारसनाथ बनतात ना!हे पारसनाथ म्हणजेच
लक्ष्मीनारायण,विश्वाचे मालक होते,भक्तीमार्गात तर अनेक नावे आणि चित्रे बनवून
ठेवलेली आहेत.वास्तवात लक्ष्मी-नारायण किंवा पारसनाथ एकच आहे. नेपाळमध्ये
पशुपतीनाथाचा मेळा लागतो, तो ही पारसनाथच आहे , अच्छा!
गोड-गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण,
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्कार.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. बाबांनी जे
ज्ञान रत्न दिले आहेत तेच वेचायचे आहेत दगड नाही,देह-अभिमान रुपी कडक आजारापासून
स्वतःला वाचवायाचे आहे.
2. आपल्या बॅटरीला पूर्ण चार्ज करण्यासाठी सर्वशक्तिमान बाबांसोबत योग लावायचा आहे.
आत्म अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करावयाचा आहे.निर्भय बनायचे आहे.
वरदान:-
सर्व संबंध आणि
सर्व गुणांंच्या अनुभूतीत संपन्न बनणारे संपूर्ण मूर्त भव
संगमयुगावर विशेष
सर्व प्राप्ती मध्ये स्वतःला संपन्न बनवायचा आहे.त्यामुळे सर्व खजाने,सर्व
संबंध,सर्व गुण आणि कर्तव्याला समोर ठेवून तपासायचे आहे की, सर्व गोष्टींमध्ये
अनुभवी बनले आहेत का?जर कोणत्याही गोष्टीचा अनुभव कमी असेल तर त्यात स्वतःला संपन्न
बनवा. एकही संबंध किंवा गुण कमी असेल तर तो संपूर्ण स्थिती किंवा संपूर्ण मूर्त
म्हटला जाऊ शकत नाही.म्हणून बाबांच्या गुणांचा किंवा आपल्या आदी स्वरूपातील गुणांचा
अनुभव करा तरच संपूर्ण मूर्त बनाल.
बोधवाक्य:-
जोशात येणे हे
देखील मनाचे रडणे आहे,आता रडण्याची फाईल संपून टाका.