20-12-20    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   20.03.87  ओम शान्ति   मधुबन


स्नेह आणि सत्यतेच्या अधिकाराची समानता


आज सत पिता, सत शिक्षक, सत गुरु आपल्या सत्यतेच्या शक्तिशाली सत मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. सर्वात मोठ्यातील मोठी शक्ती किंवा अधिकार सत्यतेचा आहे. सत दोन अर्थाने म्हटले जाते. एक सत म्हणजे सत्य, दुसरे सत म्हणजे अविनाशी. दोन्ही अर्थाने सत्यतेची शक्ती सर्वात मोठी आहे. पित्याला सत पिता म्हटले जाते. पिता तर अनेक आहेत, परंतु सत पिता एकच आहेत. सत शिक्षक, सत गुरु एकच आहेत. सत्य ला परमात्मा म्हटले जाते, म्हणजे परमात्म्याची विशेषता सत्य अर्थात सत आहे. तुमचे गीत पण आहे, सत्य ही शिव आहे….. दुनियेमध्ये पण म्हटले जाते, सत्यमं शिवमं सुंदरम. त्याबरोबर पिता परमात्म्या साठी सतचित आनंद स्वरूप म्हणतात. तुम्हा आत्म्याला पण सतचित,आनंद म्हटले जाते. त्यामुळे " सत" शब्दाची महिमा फार गायली जात आहे. आणि कधीपण, कोणत्या पण कार्या मध्ये अधिकाराने बोलताना, त्यावेळी असे म्हणतात, मी खरा आहे, त्यामुळे अधिकाराने बोलत आहे. सत्या साठी गायन आहे, सत्याची नाव डोलेल, परंतु बुडणार नाही. तुम्ही लोक पण म्हणता कि, सच तो बिठो नच. खरा म्हणजे सत्यतेच्या शक्तीवाला, नेहमी नाचत राहतो, कधी नाराज होत नाही, गोंधळून जात नाही, घाबरत नाही, कमजोर होत नाही. सत्यतेचा शक्तीवाला नेहमी खुशी मध्ये नाचत राहतो. शक्तिशाली आसतो, सामना करण्याची शक्ती असते, त्यामुळे घाबरत नाही. सत्यतेला सोन्या सारखे म्हटले जाते, असत्याला माती सारखे समजतात. भक्तीमध्ये पण जे परमात्म्या कडे लगन लावतात, त्यांना सत्संगी म्हटले जाते. सत्याचा संग करणारे आहेत. आणि शेवटी जेंव्हा आत्मा शरीर सोडते, त्यावेळी पण काय म्हणतात, सत नाव संग आहे. तर सत अविनाशी सत्य आहे. सत्यतेची शक्ति महान शक्ती आहे. वर्तमान वेळी बहुतांश लोक, तुम्हा सर्वांना पाहून काय म्हणतात, त्यांच्या मध्ये सत्यतेची शक्ती आहे, त्यामुळे एवढा वेळ वृध्दी करत चालत आले आहेत. सत्यता कधी हालत नाही, अचल असते. सत्यता वृध्दीला प्राप्त करण्याची विधी आहे. सत्यतेच्या शक्ती मुळे सतयुग बनवत आहात, स्वतः पण सत्य नारायण, सत्य लक्ष्मी बनत आहात. हे सत्य ज्ञान आहे, सत्य पित्याचे ज्ञान आहे, त्यामुळे दुनिये पासून वेगळे आणि प्रिय आहात.

तर आज बापदादा सर्व मुलांना पाहून, सत्य ज्ञानाचा अधिकार किती धारण केला आहे? सत्यता प्रत्येक आत्म्याला आकर्षित करत आहे. जरी आजची दुनिया झुठ खंड आहे, सर्व झूठ आहेत, म्हणजे सर्वां मध्ये खोटे मिसळले आहे, तरीपण सत्यतेच्या शक्तीवाले विजयी बनतात. सत्यतेची प्राप्ती खुशी आणि निर्भयता आहे. सत्य बोलणारा नेहमी निर्भय असतो. त्याला कधी भीती वाटत नाही. जो सत्य राहत नाही, त्याला भिती जरूर वाटते. तर तुम्ही सर्व सत्यतेचे शक्तिशाली श्रेष्ठ आत्म्ये आहात. सत्य ज्ञान, सत्य पिता, सत्य प्राप्ती, सत्य आठवण, सत्य गुण, सत्य शक्ती, सर्वांची प्राप्ती आहे. तर एवढ्या अधिकाराचा नशा राहतो? अधिकाराचा अर्थ अभिमान नाही, जेवढे मोठ्यातील मोठे अधिकारी, तेवढे त्यांच्या वृत्ती मध्ये आत्मिक अधिकार राहतात. वाणी मध्ये स्नेह आणि नम्रता असते, हीच अधिकाराची निशाणी आहे. जसे तुम्ही लोक वृक्षाचे उदाहरण देता. वृक्षा मध्ये जेव्हा संपूर्ण फळाची शक्ती येते, तेव्हा वृक्ष झुकतो म्हणजे निर्माण बनून सेवा करतो. तसे आत्मिक अधिकारी मुले, जेवढा मोठा अधिकार,तेवढे निर्माण आणि सर्वाचे स्नेही असतात. परंतु सत्यतेचे अधिकारी निरअहंकारी असतात. तर अधिकार पण आसावा, नशा पण आसावा आणि निरअहंकारी पण असावे, त्याला म्हटले जाते, सत्य ज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप.

जसे या झूठ खंडा मध्ये ब्रह्मा बाबा सत्यतेच्या अधिकाराचे प्रत्यक्ष साकार स्वरूप पाहिले आहे. त्यांच्या शक्तिशाली बोलण्या मध्ये कधी पण अहंकाराची भासना येत नव्हती. मुरली ऐकताना किती अधिकाराचे बोल असतात, परंतु अभिमानाचे नसतात. अधिकाराच्या बोलण्या मध्ये स्नेह सामावलेला होता, निर्माणता होती, निरअहंकारी होते, त्यामुळे अधिकाराचे बोलणे, प्रिय वाटत होते. फक्त प्रिय नव्हते, परंतु प्रभावशाली होते. पित्याचे अनुकरण करणारे आहेत ना. सेवे मध्ये, कर्मा मध्ये ब्रह्मा बाबाचे अनुकरण आहे, कारण साकार दुनिये मध्ये साकार उदाहरण आहे, नमुना आहे. तर जसे ब्रह्मा बाबाला कर्मामध्ये, सेवेमध्ये, चेहऱ्याद्वारे, प्रत्येक वागण्या मध्ये, चालताना, फिरताना अधिकारी स्वरूपामध्ये पाहिले, तसे त्याचे अनुकरण करणारे पण स्नेही आणि अधिकारी, निर्माणता आणि महानता, दोन्ही बरोबर दिसले पाहिजे. असे नाही, फक्त स्नेह दिसून येतो आणि अधिकार नाहीसा होतो, किंवा अधिकार दिसून येतो आणि स्नेह नाहीसा होतो. जसे ब्रह्मा बाबाला पाहिले किंवा आता पण मुरली ऐकताना, प्रत्यक्ष प्रमाण आहे. तर मुलांनो, मुलांनो पण म्हणतात, परंतु अधिकारा मध्ये हे पण पाहिले. स्नेहाने मुले पण म्हणतात आणि अधिकाराने शिक्षण पण देतात. सत्य ज्ञानाला प्रत्यक्ष पण करतात, परंतु मुले, मुले म्हणून नवीन ज्ञान, सारे स्पष्ट करतात, त्याला म्हटले जाते स्नेह आणि सत्यतेच्या अधिकारा ची समानता. तर वर्तमान वेळी सेवेमध्ये या समानतेला अधोरेखित करा.

धरणी तयार करण्यासाठी स्थापने पासून आता पर्यंत 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. विदेशाची धरणी पण आता भरपूर तयार झाली आहे. जरी 50 वर्ष झाले नसले, तरी बनलेल्या साधनावर आले आहात, त्यामुळे सुरुवातीचे पन्नास वर्ष आणि आताची पाच वर्षे बरोबर आहेत. डबल विदेशी सर्व म्हणतात कि, आम्ही लास्ट पासून फास्ट (तिव्र ) पासून फर्स्ट(प्रथम) येणारे आहोत. तर वेळे मध्ये पण फास्ट पासून फर्स्ट बनाल ना. निर्भयतेची शक्ती जरूर ठेवा. एकाच पित्याचे हे नवीन ज्ञान, सत्य ज्ञान आहे, आणि नवीन ज्ञानाने, नवीन दुनिया स्थापन होत आहे, हा आधिकार आणि नशा स्वरूपा मध्ये आला पाहिजे. पन्नास वर्षे अप्रत्यक्ष राहिलात.परंतु याचा अर्थ हा नाही कि, जो पण येईल त्यांना पाहिल्या प्रथम नवीन ज्ञानातील, नवीन गोष्टी सांगून गोंधळून टाकायचे. हा भाव नसावा. मानसिकता, नाडी, वेळ हे सर्व पाहून ज्ञान देणे, हीच ज्ञान संपन्नतेची निशाणी आहे. आत्म्याची इच्छा पहा, मानसिकता पहा, मन तयार करा, परंतु आतून सत्यतेच्या निर्भयतेची शक्ती जरूर असावी. लोक काय म्हणतील, याची भीती नसावी. निर्भय बनून धरणी जरूर तयार करा. कांही मुले समजतात कि, हे ज्ञान तर नवीन आहे, कांही लोक तर समजतच नाहीत. परंतु बेसमजांना तर समजावयाचे आहे. हे जरूर आहे कि,जशी व्यक्ती तशी रुपरेखा बनवायची आसते.परंतु व्यक्तीच्या प्रभावा मध्ये येऊ नका. आपल्या सत्य ज्ञानाच्या अधिकाराने व्यक्तीमध्ये परिवर्तन करायचे आहे, हे लक्ष्य विसरू नका.

आतापर्यंत जे केले, ते ठीक केले, करायचे होते, आवश्यक होते, कारण धरणी तयार करायची होती. परंतु कुठपर्यंत धरणी तयार करणार? आणखीन किती वेळ पाहिजे? औषध पण दिले जाते, तर अगोदरच जास्त ताकतीचे दिले जात नाही, अगोदर हलके दिले जाते. परंतु ताकत वाले औषध तर देऊ नका, हलक्या वर चालवत रहा, असे करू नका, कोणता कमजोरला जास्त पावरचे औषध देणे, हे पण चुकीचे आहे. परखण्याची पण शक्ती पाहिजे. परंतु आपल्या नवीन सत्य ज्ञानाचे अधिकारी जरूर पाहिजेत. तुमच्या सुक्ष्म अधिकाराची वृत्ती, त्यांच्या वृत्ती मध्ये बदल करील. हेच धरणी तयार करणे होय. आणि जेव्हा विशेष सेवा करून मधुबन पर्यंत येतात, तर कमीत कमी त्यांना हे जरूर माहीत झाले पाहिजे, या धरणीवर त्यांची पण धरणी तयार होत आहे. किती पण नापिक जमीन असो, कोणत्या पण धर्माचा असो कोणत्या पण पदावरील असोत,परंतु या धरणीवर ते पण नरम होऊन जातील, आणि नरम धरणी बनल्यामुळे, त्यामध्ये जे पण बीज टाकाल, त्याचे फळ सहज निघाले. फक्त भिऊ नका, निर्भय जरूर बना. युक्तीने द्या, असे होऊ नये कि, ते तुम्हा लोकांना उलहना देतील कि, अशा धरणीवर पण मी पोहोचलो, परंतु हे माहित झाले नाही कि, परमात्म्याचे ज्ञान काय आहे? परमात्म भूमीवर येऊन परमात्म्याच्या प्रत्यक्षतेचा संदेश जरूर घेऊन जातील, लक्ष्य अधिकाराचे असले पाहिजे.

आज कालच्या जमान्याच्या हिशोबाने पण नवीनतेचे महत्त्व आहे, जरी कोणी उलटी नवीन फॅशन काढतो, तरीपण त्याचे अनुकरण करतात. पूर्वीची कला पहा, किती उच्च दर्जाची होती. आजकालची कला तर त्यांच्यासमोर जशी एक कोर आहे. परंतु आधुनिक कला पसंद करतात. मानवाची पसंती प्रत्येक गोष्टींमध्ये नवीनतेची आहे आणि नवीनता स्वतः आपल्याकडे आकर्षित करते, त्यामुळे नवीनता, सत्यता, महानता याचा नशा जरूर ठेवा. मग वेळ आणि व्यक्ती पाहून सेवा करा. हे लक्ष्य जरूर ठेवा कि, नवीन दुनियेचे नवीन ज्ञान प्रत्यक्ष जरूर करायचे आहे. आता स्नेह आणि शक्ती प्रत्यक्ष झाली आहे. बाबाचे प्रेमाच्या सागराचे स्वरूप, शांतीच्या सागराचे स्वरूप प्रत्यक्ष झाले आहे, परंतु ज्ञानस्वरूप आत्मा आणि ज्ञानसागर बाबा या नवीन ज्ञानाला कोणत्या रूपाने द्यायचे त्याचे नियोजन आता कमी झाले आहे. ती पण वेळ येईल, सर्वांच्या मुखातून हा आवाज निघेल कि, नवीन दुनियेचे हे नवीन ज्ञान आहे. आता फक्त चांगले म्हणतात, नवीन म्हणत नाहीत. आठवणीच्या विषयाला चांगले प्रत्यक्ष केले आहे, त्यामुळे धरणी चांगली बनलेली आहे. आणखीन धरणी तयार करायची आहे. आवश्यक कार्य पण जरुरीचे आहे, जे केले ते फार चांगले, आणखीन फार चांगले केले आहे. तन, मन,धन लावून केले आहे, त्यासाठी अभिनंदन पण करत आहेत.

प्रथम जेव्हा विदेशा मध्ये गेला होता, त्यावेळी त्रिमूर्तीच्या चित्रावर समजावून सांगणे किती अवघड वाटत होते, आता त्रिमूर्तीच्या चित्रावरच आकर्षित होत आहेत. हे शिडीचे चित्र, भारताची गोष्ट आहे, असे समजत होते. परंतु विदेशां मध्ये या चित्रावर पण आकर्षित होतात. जसे हे नियोजन केले होते कि, ही नवीन गोष्ट कोणत्या रूपाने सांगावी, तर आता पण त्याचा शोध करा, असा विचार करू नका कि, हे तर करायचे आहे. नाही, बापदादा चे लक्ष्य फक्त हे आहे कि, नवीनतेच्या महानतेची शक्ती धारण करा, त्याला विसरू नका. दुनियाला समजावयाचे आहे, दुनिये तील गोष्टी ला घाबरू नका. स्वतःचु् पद्धत शोधून काढा, कारण शोध करणारी तुम्ही मुलेच आहात ना. सेवेची योजना मुले जाणतात, जसे लक्ष्य ठेवाल, तशी योजना फार चांगल्यात चांगली बनेल, आणि सफलता तर जन्मसिद्ध अधिकार आहेच, त्यामुळे नवीनतेला प्रत्यक्ष करा. ज्या पण ज्ञानातील गुह्य गोष्टी आहेत, त्यांना स्पष्ट करण्याची विधी तुमच्या जवळ फार चांगली आहे, आणि स्पष्टीकरण पण आहे. एक एका मुद्द्यावर तात्विक रुपाने स्पष्ट करू शकता. स्वतःच्या अधिकारा तील आहात. कोणत्या मनोमय किंवा कल्पने च्या गोष्टी तर नाहीत, यथार्थ आहेत, अनुभव आहे. अनुभवाचे अधिकारी, ज्ञानाचे अधिकारी, सत्तेचे अधिकारी, किती अधिकारी आहात, तर अधिकार आणि स्नेह दोघांना बरोबर कार्या मध्ये लावा.

बापदादा खुश आहेत कि, मेहनतीने सेवा करून करून, एवढ्या वृद्धीला प्राप्त केले आहे आणि करतच राहतील. आपल्या देशात आणि परदेशात पण. देशांमध्ये पण व्यक्ती आणि नाडी पाहून सेवा केल्यामुळे सफलता मिळते. विदेशा मध्ये पण याच विधीने सफलता मिळते.अगोदर संपर्का मध्ये आणणे, हे धरणी तयार करणे होय, संपर्का नंतर मग संबंधा मध्ये आणा, फक्त संपर्का मध्येच सोडून देऊ नका. संबंधा मध्ये आणून मग त्यांच्या बुद्धीला समर्पित करा, ही शेवटची अवस्था आहे. संपर्का मध्ये आणणे पण आवश्यक आहे, मग संबंधा मध्ये आणायचे आहे. संबंधा मध्ये येत येत,समर्पण बुद्धी होऊन जाईल, जे बाबानी सांगितले आहे तेच सत्य आहे, मग प्रश्न निर्माण होऊ नये. जे बाबा सांगतात तेच खरे आहे कारण अनुभव होऊन जातो, त्यामुळे मग प्रश्न नाहीसे होतात. ज्याला समर्पण बुद्धी म्हटले जाते. लक्ष्य ठेवा कि, समर्पण बुद्धी पर्यंत आणणे आवश्यक आहे. तेंव्हा माईक तयार झाला असे म्हणावे. माईक काय आवाज करेल? फक्त यांचे ज्ञान चांगले आहे, असे नाही, हे नवीन ज्ञान आहे, हेच नवीन दुनिया आणेल, असा आवाज व्हावा. तेव्हा तर कुंभकर्ण जागतील ना. नाहीतर फक्त डोळे उघडतात, फार चांगले, फार चांगले म्हणून मग झोपून जातात, त्यामुळे जसे स्वतः बालक पासून मालक बनले आहात, तसे त्यांना बनवा. बिचार्यांना फक्त साधारण प्रजे पर्यंत आणू नका, परंतु राज्य अधिकारी बनवा. त्यासाठी योजना तयार करा. कोणत्या तरी विधीने करा, ज्यामुळे गोंधळून पण जावू नयेत आणि समर्पण बुद्धी पण बनतील. नवीनता पण वाटेल, गोंधळाचा अनुभव करणार नाहीत. स्नेह आणि नवीनतेचे अधिकारी वाटतील.

आता पर्यंतची जी अवस्था आहे, सेवेची विधी, ब्राह्मणांची वृद्धी झाली, हे फार चांगले आहे, कारण अगोदर बीजाला गुप्त ठेवले, ते पण आवश्यक आहे. बीजाला गुप्त ठेवायचे असते, बाहेर ठेवल्याने फळ देत नाही. धरणी मध्ये बीजाला ठेवायचे असते, परंतु आत धरणी मध्येच राहू नये. बाहेर प्रत्यक्ष व्हावे, फलस्वरूप बनावे, ही पुढची अवस्था आहे. समजले? लक्ष्य ठेवा कि, नवीन करायचे आहे. असे नाही कि, या वर्षां मध्ये व्हावे. परंतु लक्ष्य बीजाला बाहेर प्रत्यक्ष करेल. असे पण नाही कि, सरळ जाऊन भाषण सुरू करायचे. अगोदर सत्यतेच्या शक्तीची भासना देणारे भाषण करावे लागेल. शेवटी तो दिवस येईल, हे सर्वांच्या मुखातून निघेल, जसे नाटकां मध्ये दाखवतात ना, सर्व धर्माचे मिळून म्हणतात कि, आम्ही एक आहोत, एकाचे आहोत. असे नाटक दाखवता ना. असे प्रत्यक्षात रंगमंचावर सर्व धर्म वाले मिळून, एकाच आवाजा मध्ये बोलतील. एक पिता आहे, एक ज्ञान आहे, एकच लक्ष्य आहे, एकच घर आहे, हेच आहे, आता असा आवाज पाहिजे. असे दृश्य जेंव्हा बेहदच्या रंगमंचावर येईल, तेंव्हा प्रत्यक्षतेचा झेंडा फडकेल आणि या झेंड्याच्या खाली, सर्व हे गीत गातील. सर्वांच्या मुखातून एकच आवाज निघेल, "आमचे बाबा." तेंव्हा म्हणू प्रत्यक्ष रूपामध्ये शिवरात्री साजरी केली. अंधार नाहीसा होऊन, सुवर्ण प्रभातचा देखावे दिसून येईल. याला म्हणतात आज आणि उद्याचा खेळ. आज अंधार, उद्या सुवर्ण प्रभात. हा शेवटचा पडदा आहे. समजले?

बाकीच्या ज्या योजना बनविल्या आहेत, त्या चांगल्या आहेत. प्रत्येक ठिकाणची धरणी प्रमाणे योजना बनवावी लागते. धरणी प्रमाणे विधी मध्ये कांही अंतर जरी पडत असेल, तर तशी कांही गोष्ट नाही. शेवटी सर्वांनी तयार होऊन, मधुबन धरणी वर छाप जरूर लावायची आहे. वेगवेगळ्या वर्गाला तयार करून,छाप जरूर लावायची आहे. पासपोर्ट वर पण छाप लावल्या शिवाय जाऊ देत नाहीत ना. तर ती छाप येथे मधूबन मध्येच लागेल.

हे सर्व तर आहेतच समर्पित. जर हे समर्पित झाले नसते तर सेवेच्या निमित्त कसे बनतील. समर्पित आहेत तेंव्हा ब्रह्माकुमार कुमारी बनून सेवेसाठी निमित्त बनले आहात. देशात किंवा विदेशात कोणी खिश्श्चन कुमारी, किंवा बौद्ध कुमारी बनून सेवा करत आहात कां? बी.के. बनुन सेवा करत आहात ना. तर समर्पित ब्राह्मणा च्या यादी मध्ये सर्व आहेत. आता इतरांना करायचे आहे. मरजीवा बनलात, ब्राह्मण बनले आहात. मुले म्हणतात, माझे बाबा, तर बाबा म्हणतात, मी तुमचा झालो. तर समर्पित झाले ना. जरी प्रवृत्ती मध्ये आहेत, कोणी सेवाकेंद्रावर आहेत, परंतु ज्यानी मनापासुन म्हटले, माझे बाबा, तर बाबांनी त्यांना आपले बनविले. हा तर मनाचा सौदा आहे. मुखाचा स्थूल सौदा नाही, हा मनाचा आहे. सरेंडर(समर्पित) म्हणजे श्रीमता च्या अंडर राहणारे. सर्व सभा सरेंडर आहे ना. त्यामुळे फोटो पण काढला आहे ना. आता चित्रांमध्ये आले आहात, तर बदलू शकत नाहीत. परमात्मा घरांमध्ये चित्र काढले आहे. हे कमी भाग्य नाही. हा स्थूल फोटो नाही परंतु बाबाच्या ह्रदया मध्ये फोटो निघाला आहे. अच्छा.

सर्व सत्यतेचे अधिकारी असणारे श्रेष्ठ आत्म्यांना, सर्व नविनता आणि महानतेला प्रत्यक्ष करणारे, खरे सेवाधारी मुलांना, सर्व स्नेह आणि अधिकारात समानता ठेवणारे, प्रत्येक पावला मध्ये बाबा कडून आशीर्वाद घेण्याचे अधिकारी श्रेष्ठ आत्म्याना, सर्व सत्य म्हणजे अविनाशी रत्नांना, अविनाशी भूमिका करणारे, अविनाशी खजान्याचे बालक सो मालिकांना विश्व रचनाकार सत पिता,सत शिक्षक, सत गुरु ची प्रेमपुर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
मनाच्या मौनाद्वारे, सेवेमध्ये नवीनता शोध करणारे, सिद्धी स्वरूप भव

जसे पहिल्या प्रथम मौन व्रत ठेवले होते, त्यामुळे सर्व मोकळे झाले होते, वेळ वाचला होता, तसे आता मनाचे मौन ठेवा, ज्यामुळे व्यर्थ संकल्प येणार नाहीत. जसे मुखातून आवाज येवू नये, तसे व्यर्थ संकल्प येवू नयेत, हे आहे मनाचे मौन, तर वेळ वाचेल या मनाच्या मौनाने, सेवेमध्ये नवीन शोध निघेल, त्यामुळे साधना कमी आणि सिध्दी जास्त होईल. जसे सायन्सचे साधन, सेकंदां मध्ये विधीला प्राप्त करतात, त्या प्रमाणे या सायलेन्स च्या साधनाद्वारे सेकंदा मध्ये विधी प्राप्त होईल.

सुविचार:-
जे स्वतः समर्पित स्थिती मध्ये राहतात,त्यांना सर्वाचा सहयोग पण समर्पित होतो.


सूचना:- आज महिन्यातील तिसऱ्या रविवार आहे, सर्व राज योगी तपस्वी बंधू-भगिनी सायंकाळी ६-३० ते ७-३० वाजे पर्यंत विशेष योग अभ्यासाचे वेळी, आपल्या लाईट माईट स्वरूपा मध्ये स्थित होऊन,भ्रकुटीच्या मध्ये, बाप दादाला आव्हान करून, एकत्रित स्वरूपाचा अनुभव करा आणि चहूकडे लाईट माईट ची किरणे पसरविण्याची सेवा करा.