28-12-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो :- चॅरिटी बिगन्स ऍट होम(स्वतःपासून बदलण्यास सुरुवात करा)अर्थात प्रथम स्वतः आत्म- अभिमानी बनण्याची मेहनत करा नंतर दुसऱ्यांना सांगा,आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्या तर ज्ञान तलवारी मध्ये धार येईल"

प्रश्न:-
संगमयुगावर कोणत्या दोन गोष्टींची मेहनत केल्याने सतयुगी तख्ताचे मालक बनाल?

उत्तर:-
1)दुख-सुख निंदा-स्तुती मध्ये समान स्थिती रहावी-ही मेहनत करा.कुणीही काहीही उल्टे-सुल्टे बोलले,क्रोध केला तर तुम्ही शांत राहा,कधीही मुखाची टाळी वाजवू नका.2)डोळ्यांना शुद्ध बनवा,खराब दृष्टी बिलकुल समाप्त होऊन जावी,आम्ही आत्मा भाऊ भाऊ आहोत, आत्मा समजून ज्ञान द्या,आत्म- अभिमानी बनण्याची मेहनत करा तर सतयुगी तख्ताचे मालक बनाल.संपूर्ण पवित्र बनणारे राज्य सिंहासनावर बसतात.

ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांसोबत बोलत आहेत,तुम्हा आत्म्यांना हा तिसरा नेत्र मिळाला आहे.ज्याला ज्ञानाचा नेत्र ही म्हटले जाते,या नेत्रा द्वारे तुम्ही आपल्या भावांना पहात आहात.तर बुद्धी द्वारे हे समजता ना कि जेव्हा आम्ही भाऊ-भाऊ ला पाहु तेव्हाच कर्मेंद्रिया चंचल होणार नाहीत. आणि असे करता-करता डोळे जे खराब आहेत ते शुद्ध होऊन जातील.बाबा म्हणतात विश्वाचे मालक बनण्यासाठी मेहनत तर करावी लागेल ना.तर आता ही मेहनत करा.मेहनत करण्यासाठी बाबा नवीन-नवीन गुह्य मुद्दे सांगतात ना.तर आता स्वतःला भाऊ-भाऊ समजून ज्ञान देण्याची सवय लावायची आहे.नंतर हे जे गायन आहे की "आम्ही सर्व भाऊ-भाऊ"-हे प्रत्याक्षात होऊन जाईल.आता तुम्ही खरे-खरे भाऊ आहात कारण की बाबांना जाणत आहात.बाबा तुम्हा मुलांसोबत सेवा करत आहेत.हिम्मत मुलांची मदत बाबांची.तर बाबा येऊन सेवा करण्याची हिंमत देत आहेत. तर हे सहज झाले ना.रोज हा सराव करावा लागेल,आळस यायला नको.हे नवीन-नवीन मुद्दे मुलांना मिळत आहेत,मुले जाणत आहेत की आम्हा भावांना बाबा शिकवत आहेत.आत्मे शिकत आहेत,हे आत्मीक ज्ञान आहे,याला अध्यात्मिक ज्ञान असे म्हटले जाते.फक्त याच वेळी आत्मिक ज्ञान आत्मिक पित्याकडून मिळते कारण की बाबा येतातच संगमयुगावर जेव्हा की सृष्टी बदलते,हे आत्मिक ज्ञान मिळते ही तेव्हा जेव्हा सृष्टी बदलणार असते.बाबा येऊन हेच आत्मिक ज्ञान देतात की स्वतःला आत्मा समजा.आत्मा अशरीरी आली होती,इथे नंतर हे शरीर धारण करते. सुरुवातीपासून आतापर्यंत आत्म्याने 84 जन्म घेतले आहेत. परंतु क्रमवार जे जसे आले असतील तसेच मेहनत करत राहतील.नंतर पाहायला मिळते की ज्याने जसा कल्पा पूर्वी पुरुषार्थ केला होता मेहनत केली होती तो आता ही अशीच मेहनत करत राहतो.आपल्यासाठी मेहनत करायची आहे. दुसऱ्यासाठी तर करायची नसते. तर स्वतःलाच आत्मा समजून स्वतःसोबत मेहनत करायची आहे.दुसरा काय करत आहे, त्यामध्ये आपले काय जाते.प्रथम स्वतःपासून सुरुवात करायची आहे स्वतःमेहनत करायची आहे, नंतर दुसऱ्यांना(भावांना) सांगायचे आहे.जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्याल तर तुमच्या ज्ञान तलवारी मध्ये धार राहील. मेहनत तर आहे ना.तर अवश्य, काही ना काही सहन करावे लागते.यावेळी दुख-सुख,निंदा- स्तुती,मान-अपमान सर्व थोडे-फार सहन करावेच लागते. तर जेव्हा कुणीही उल्टे-सुल्टे बोलत असेल तर म्हणतात चूप. जेव्हा कोणी चूप म्हटल्यानंतर कुणी रागवेल का.जेव्हा कोणी बोलत असेल आणि दुसराही बोलत असेल तर मुखाची टाळी वाजते.जर एकाने मुखाची टाळी वाजवली आणि दुसरे शांत राहीले तर चुप होतात.बस हेच बाबा शिकवतात.कधीही पहा कोणी क्रोध करत असेल तर शांत होऊन जा,आपोआप त्यांचा क्रोध ही शांत होऊन जाईल.दुसरी टाळी वाजणार नाही.जर टाळी ने टाळी वाजली तर नंतर गडबड होऊन जाते म्हणूनच बाबा म्हणतात मुलांनो कधीही या गोष्टींमध्ये टाळी वाजवू नका.न विकाराची,न कामाची,न क्रोधाची.

मुलांना प्रत्येकाचे कल्याण करायचेच आहे,एवढे जे सेंटर बनले आहेत कशासाठी?कल्पा पूर्वीही असे सेंटर निघाले असतील.देवांचा देव बाबा पहात राहतात की खूप मुलांना ही आवड असते की बाबा सेंटर खोलू.आम्ही सेंटर खोलतो, आम्ही खर्च उचलतो.तर दिवसेंदिवस असे होत जात जाईल कारण की विनाशाचे दिवस जवळ येत जातील तेवढे नंतर या बाजूला सेवेची आवड वाढत जाईल.आता बापदादा दोघे एकत्र आहेत तर प्रत्येकाला पाहतात की काय पुरुषार्थ करत आहेत?कोणते पद प्राप्त करतील?कोणाचा पुरुषार्थ उत्तम, कोणाचा मध्यम,कोणाचा कनिष्ठ आहे?ते तर पहात आहेत. शिक्षकही शाळेमध्ये पाहतात की विद्यार्थी कोणत्या विषयांमध्ये वर- खाली होत आहेत.तर इथेही असेच आहे.काही मुले चांगल्या प्रकारे लक्ष देतात तर स्वतःला उच्च समजतात.काही नंतर वेळेवरती चुकतात,आठवणी मध्ये राहत नाहीत तर स्वतःला कमी समजतात.ही शाळा आहे ना.मुले म्हणतात बाबा आम्ही कधी-कधी खूप खुशी मध्ये राहतो,कधी-कधी खुशी कमी होऊन जाते.तर बाबा आता समजावत राहतात की जर खुशी मध्ये राहावे असे वाटत असेल तर मनमनाभव,स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा.समोर परमात्म्याला पहा तो अकाल तख्तावर बसलेला आहे.असेच भावां कडे ही पहा स्वतःला आत्मा समजून नंतर भावांशी बोला.भावाला आम्ही ज्ञान देत आहोत.बहिण नाही,भाऊ-भाऊ.आत्म्यांना ज्ञान देत आहे जर ही तुम्हाला सवय लागली तर तुमची जी खराब दृष्टी आहे जी तुम्हाला धोका देते ती हळू-हळू बंद होऊन जाईल. आत्मा-आत्म्यासोबत काय करेल?जेव्हा देह-अभिमान येतो तेव्हा घसरतात.अनेक जण म्हणतात बाबा आमची दृष्टी खराब आहे.अच्छा खराब दृष्टीला आता शुद्ध दृष्टी बनवा.बाबांनी आत्म्याला तिसरा नेत्र दिला आहे. तिसऱ्या नेत्राने पाहिल्याने नंतर तुमची देहाला पाहण्याची सवय निघून जाईल.बाबा मुलांना डायरेक्शन तर देत राहतात,यांना (ब्रह्माला)ही असेच म्हणतात.हे बाबासुद्धा देहामध्ये आत्म्यालाच पाहतात.तर यालाच आत्मिक ज्ञान म्हटले जाते.पहा,पद किती उच्च प्राप्त करता.जबरदस्त पद आहे.तर पुरुषार्थ ही असा करायला हवा.बाबाही समजतात कल्पा पूर्वीप्रमाणे सर्वांचा पुरुषार्थ चालेल.काही राजाराणी बनतील, काही प्रजे मध्ये जातील.तर इथे जेव्हा योग करवता तेव्हा स्वतःला आत्मा समजून दुसऱ्याच्या ही भ्रकुटीमध्ये आत्म्याला पाहत रहा तर त्यांची सेवा चांगली होईल.जे देही-अभिमानी होऊन बसतात ते आत्म्यांनाच पाहतात.याचा खूप सराव करा.अरे उच्च पद मिळवायचे असेल तर काहीतरी मेहनत करावीच लागेल ना.तर आता आत्म्यांसाठी हीच मेहनत आहे.हे आत्मीक ज्ञान एकदाच मिळते नंतर कधीही मिळणार नाही.न कलियुगामध्ये,न सतयुगामध्ये फक्त संगमयुगामध्ये,तेही फक्त ब्राह्मणांनाच मिळते.हे पक्के आठवणीत ठेवा.जेव्हा ब्राह्मण बनाल तेव्हाच देवता बनाल.ब्राह्मण बनले नाही तर मग देवता कसे बनाल?या संगमयुगामध्येच ही मेहनत आहे. इतर कोणत्याही वेळी असे म्हणणार नाहीत की स्वतःला आत्मा,दुसर्‍यालाही आत्मा समजून त्याला ज्ञान द्या.बाबा जे समजावत आहेत त्यावर विचार सागर मंथन करा.तपासून पहा कि हे ठीक आहे,आमच्या फायद्याची गोष्ट आहे?आम्हाला सवय लागेल की बाबांची जी शिकवण आहे ती भावांना ही द्यायची आहे, स्त्रियांनाही द्यायची आहे तर पुरुषांनाही द्यायची आहे. आत्म्यांनाच द्यायची आहे. आत्माच स्त्री-पुरुष बनली आहे. बहीण-भाऊ बनली आहे.

बाबा म्हणतात मी तुम्हा मुलांना ज्ञान देत आहे.मी आत्म्यांना पाहतो आणि आत्मेही समजतात की आमचा परमात्मा जो पिता आहे, तो ज्ञान देत आहे तर याला आत्म-अभिमानी बनले आहेत असे म्हटले जाते.यालाच आत्म्याची परमात्म्या सोबत, अध्यात्मिक ज्ञानाची देवाण-घेवाण असे म्हटले जाते. तर बाबा ही शिकवण देतात की जेव्हा कोणीही पर्यटक इ.येतात तरीही स्वतःला आत्मा समजून, आत्म्याला बाबांचा परिचय द्यायचा आहे.आत्म्यामध्ये ज्ञान आहे,शरीरामध्ये नाही.तर त्यांनाही आत्मा समजूनच ज्ञान द्यायचे आहे.यामुळे त्यांनाही चांगले वाटेल.जसे की ही तुमच्या मुखामध्ये धार आहे.या ज्ञानाच्या तलवारी मध्ये धार येईल कारण की देही-अभिमानी बनता ना.तर हा सुद्धा सराव करून पहा.बाबा म्हणतात तपासून पहा-हे बरोबर आहे?आणि मुलांसाठीही नवीन गोष्ट नाही कारण की बाबा सोपे करून समजावत आहेत.चक्र लावले आता नाटक पूर्ण होत आहे,आता बाबांच्या आठवणी मध्ये राहता.तमोप्रधान पासून सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेचे मालक बनत आहात नंतर अशीच सिढी उतरता,पहा किती सहज सांगत आहेत. प्रत्येक 5 हजार वर्षानंतर मला यावे लागते.नाटकाच्या नियोजनानुसार मीसुद्धा बांधलो आहे.येऊन मुलांना खूप सहज आठवणीची यात्रा शिकवत आहे. बाबांच्या आठवणीमध्ये अंत-मती-सो गती होऊन जाईल,हे या वेळेसाठी आहे.हा अंतकाळ आहे.आता यावेळी बाबा सन्मुख युक्ती सांगत आहेत की माझी आठवण करा तर सदगती होऊन जाईल.मुलेही समजतात की शिकून हे बनणार,आमका बनणार.हे सुद्धा असे समजतात की मी जाऊन नव्या दुनियेमध्ये देवी-देवता बनणार आहे.कोणती नवीन गोष्ट नाही,बाबा तर घडी-घडी म्हणतात(नथिंगन्यू)नवीन काहीही नाही.ही तर शिडी चढायची-उतरायची आहे,जिन्न ची गोष्ट आहे ना.त्याला सिढी उतरणे आणि चढण्याचे काम दिले गेले. आठवणीच्या यात्रेने खूप मजबूत होऊन जाल म्हणूनच भिन्नभिन्न प्रकाराने बाबा मुलांना बसून शिकवतात की मुलांनो आता देही-अभिमानी बना.आता सर्वांना परत जायचे आहे.तुम्ही आत्मे पूर्ण 84 जन्म घेऊन तमोप्रधान बनले आहात.भारतवासीच सतो-रजो-तमो बनतात.दुसर्‍या कोणत्याही देशात पुर्ण 84 जन्म घेतात, असे म्हणत नाहीत. बाबांनी येऊन समजावले आहे नाटकामध्ये प्रत्येकाची भूमिका आपापली असते.आत्मा किती छोटी आहे.वैज्ञानिकांना हे समजणारही नाही की एवढ्या छोट्याश्या आत्म्यामध्ये ही अविनाशी भूमिका भरलेली आहे. ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे.ही छोटी सी आत्मा आणि भूमिका किती वठवत आहे! तीसुद्धा अविनाशी!हे नाटकही अविनाशी आहे आणि पूर्वापार(बनलेले)आहे. असे पच नाही, कुणी म्हणेल की केव्हा बनले?नाही.हे नैसर्गिक आहे.हे ज्ञान खूप आश्चर्यकारक आहे,कधी कोणी ही हे ज्ञान सांगू शकत नाही.अशी कोणाची ताकत नाही जो हे ज्ञान सांगू शकेल.

तर आता मुलांना बाबा दिवसेंदिवस समजावत राहतात. आता सराव करा की मी आपल्या आत्मा भावाला आपसमान बनवण्यासाठी ज्ञान देत आहे. बाबांकडून वारसा घेण्यासाठी. कारण की सर्व आत्म्यांचा हक्क आहे.बाबा येतात सर्व आत्म्यांना आप-आपला शांती किंवा सुखाचा वारसा देण्यासाठी. आम्ही जेव्हा राजधानीमध्ये असू तेव्हा बाकी सर्वजण शांतीधाम मध्ये असतील.शेवटी जय जयकार होईल,इथे सुखच सुख असेल म्हणूनच बाबा म्हणतात पावन बनायचे आहे.जेवढे-जेवढे तुम्ही पवित्र बनत आहात तेवढे आकर्षण होत राहील.जेव्हा तुम्ही बिलकुल पवित्र बनता तेव्हा राजसिंहासनावर बसता.तर हा सराव करा.असे समजू नका बस हे ऐकले आणि सोडून दिले.नाही, या सरावा शिवाय तुम्ही चालू शकणार नाही.स्वतःला आत्मा समजा तेसुद्धा आत्मा भाऊ-भाऊला बसून समजावून सांगा.आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहे याला अध्यात्मिक ज्ञान असे म्हटले जाते.परमपिता देणारा आहे.जेव्हा मुले पूर्णपणे अध्यात्मिक बनून जातात,एकदम पवित्र बनतात तेव्हा जाऊन सतयुगी तख्ताचे चे मालक बनतात.जे पवित्र बनणार नाहीत ते माळेमध्ये ही येणार नाहीत.माळेचा ही काही अर्थ तर असेल ना.माळेचे रहस्य दुसरे कोणीही जाणत नाहीत. माळेचे स्मरण का करतात? कारण की बाबांची खूप मदत केली आहे,तर का नाही स्मरण करणार.तुमचे स्मरणही होते, आणि तुमची पूजा ही होते आणि तुमच्या शरीराची ही पूजा होते. आणि माझ्या तर फक्त आत्म्याला पूजले जाते.पहा तुमची तर माझ्यापेक्षाही जास्त डबल पूजा केली जाते.तुम्ही जेव्हा देवता बनता तेव्हा देवतांचीही पूजा करतात,म्हणूनच पूजेमध्ये ही तुम्ही पुढे,आठवणीमध्ये ही तुम्ही पुढे आणि बादशाही मध्येही तुम्ही पूढे आहात.पहा,तुम्हाला किती उच्च बनवत आहे.तर ज्याप्रमाणे लाडकी मुले असतात,खूप प्रेम असते तर मुलांना खांद्यावर,डोक्यावर ही ठेवतात. बाबा एकदम डोक्यावर चढवतात.अच्छा!

गोड-गोड वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. गायन आणि पूजन योग्य बनण्यासाठी अध्यात्मिक बनायचे आहे,आत्म्याला शुद्ध बनवायचे आहे.आत्म-अभिमानी बनण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.

2. मनमनाभव च्या अभ्यासाद्वारे अपार खुशी मध्ये राहायचे आहे. स्वत:ला आत्मा समजून आत्म्यासोबत बोलायचे आहे, डोळ्यांना शुद्ध बनवायचे आहे.

वरदान:-
सदाकाळाच्या अटेंशन(लक्ष्य)द्वारे विजय माळे मध्ये गुंफले जाणारे खूप काळाचे विजयी भव.

खूप काळाचे विजयीच, विजय माळेचे मणके बनतात.विजयी बनण्यासाठी सदैव बाबांना समोर ठेवा-जे बाबांनी केले तेच आम्हाला करायचे आहे.प्रत्येक पावला मध्ये जो बाबांचा संकल्प तोच मुलांचा संकल्प,म्हणून जे बाबांचे शब्द तेच मुलांचे शब्द- तेव्हाच विजयी बनाल.हे अटेंशन सदाकाळा साठीचे पाहिजे तरच सदा काळाचे राज्य-भाग्य प्राप्त होईल कारण की जसा पुरुषार्थ आहे तशी प्रारब्ध आहे.सदैव चा पुरुषार्थ असेल तर सदैवचे राज्य-भाग्य आहे.

बोधवाक्य:-
सेवेमध्ये सदैव जी हाजिर करणे-हाच प्रेमाचा खरा पुरावा आहे.