30-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो :- सत्य पित्याद्वारे संगमावर तुम्हाला सत्याचे वरदान मिळत आहे म्हणूनच
तुम्ही कधीही खोटे बोलु शकत नाही"
प्रश्न:-
निर्विकारी
बनण्यासाठी तुम्हा मुलांना कोणती कष्ट अवश्य घ्यायचे आहेत?
उत्तर:-
आत्म-अभिमानी बनण्याचे कष्ट आवश्य घ्यायचे आहेत.भ्रकुटीमध्ये आत्म्याला च पाहण्याचा
अभ्यास करा.आत्मा समजून आत्म्याशी बोला,आत्मा होऊन ऐका.देहावर दृष्टी जायला नको-ही
मुख्य मेहनत आहे,याच मेहनती मध्ये विघ्न येतात.जेवढे होईल तेवढा हा अभ्यास करा-की
"मी आत्मा आहे,मी आत्मा आहे."
गीत:-
ओम नमः शिवाय.....
ओम शांती।
गोड मुलांना बाबांनी आठवण करून दिली आहे की सृष्टीचे चक्र कसे फिरते.आता तुम्ही मुले
जाणत आहात आम्ही बाबांकडून जे काही जाणले आहे,बाबांनी जो रस्ता सांगितला आहे,तो
दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही.स्वतःच पूज्य स्वतःच पुजारी चा अर्थ ही तुम्हाला
समजावला आहे,जे पूज्य विश्वाचे मालक बनतात, तेच पुन्हा पुजारी बनतात.परम आत्म्यासाठी
असे म्हणू शकत नाही.आता तुमच्या लक्षात आले आहे की ही तर अगदी बरोबर गोष्ट
आहे.सृष्टीच्या आदी-मध्य-अंताचा समाचार बाबाच सांगता सांगतात,दुसऱ्या कोणालाही
ज्ञानाचा सागर म्हणू शकत नाही.ही महिमा श्रीकृष्णाची नाही.कृष्ण नाव तर शरीराचे आहे
ना.तो शरीरधारी आहे,त्याच्या जवळ सर्व ज्ञान असू शकत नाही.तुम्ही आता समजत
आहात,त्यांची आत्मा ज्ञान घेत आहे.ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. बाबां शिवाय कोणी
समजावू शकत नाही.असे तर खूप साधु-संत वेग-वेगळ्या प्रकारचे हटयोग इ.शिकवत राहतात.तो
सर्व भक्तिमार्ग आहे.सतयुगामध्ये तुम्ही कोणाचीही पूजा करत नाही.तिथे तुम्ही पुजारी
बनत नाही.त्याला म्हटले च जाते पूज्य देवी-देवता होते,आता नाहीत. तेच पूज्य नंतर आता
पुजारी बनले आहेत.बाबा म्हणतात हा सुद्धा पूजा करत होता ना.यावेळी संपूर्ण दुनिया
पुजारी आहे.नव्या दुनियेमध्ये एकच पूज्य देवी-देवता धर्म असतो.मुलांच्या स्मृतीमध्ये
आले आहे बरोबर नाटकाच्या नियोजनानुसार हे अगदी बरोबर आहे.बरोबर गीता
एपिसोड(भाग)आहे.फक्त गीते मध्ये नाव बदलले आहे.जी गोष्ट समजावण्यासाठी तुम्ही मेहनत
करत आहात.2500 वर्षापासून गीता श्रीकृष्णाची समजत आले आहेत.आता एका जन्मामध्ये
समजतील की गीता निराकार भगवानांनी ऐकवली,यामध्ये वेळ तर लागतोच ना.भक्ती बद्दलही
समजावले आहे,झाड किती लांब-लचक आहे.तुम्ही लिहू शकता बाबा आम्हाला राजयोग शिकवत
आहेत.ज्या मुलांना निश्चय होतो ते निश्चयाने समजावतात.निश्चय नसेल तर स्वतःच
गोंधळून जातात-कसे समजावून सांगावे,काही समस्या तर येणार नाही.निर्भय तर अजून बनले
नाहीत.निर्भय तेव्हाच होतील जेव्हा पूर्ण देही-अभिमानी बनतील. घाबरणे तर भक्ती
मार्गामध्ये असते,तुम्ही तर सर्व महावीर आहात.दुनियेमध्ये तर कोणालाही माहीत नाही
की मायेवर विजय कसा मिळवला जातो.तुम्हा मुलांच्या आता स्मृतीमध्ये आले आहे.अगोदर पण
बाबांनी सांगितले होते मनमनाभव.पतित-पावन बाबाच येऊन हे समजावत आहेत, खुशाल
गीतेमध्ये अक्षर आहे परंतु असे कुणीही समजावत नाही.बाबा म्हणतात मुलांनो
देही-अभिमानी भव.पिठामध्ये मीठा प्रमाणे गीतेमध्ये काही अक्षरं आहेत. प्रत्येक
गोष्टीवर बाबा निश्चय बसवतात.निश्चयबुद्धी विजयंती.
तुम्ही आता बाबांकडून वारसा घेत आहात.बाबा म्हणतात ग्रहस्थ व्यवहारांमध्ये अवश्य
राहायचे आहे.सर्वांना इथे येऊन बसण्याची गरज नाही.सेवा करायची आहे, सेवाकेंद सुरू
करायचे आहेत.तुम्ही सैलवेशन आर्मी आहात.ईश्वरीय मिशन आहात ना.अगोदर शूद्र मायावी
मिशनचे होते,आता तुम्ही ईश्वरीय मिशनचे बनले आहात. तुमचे महत्व खूप आहे.या
लक्ष्मी-नारायणाची काय महिमा आहे.जसे राजे असतात,तसे राज्य करतात.बाकी यांना
सर्वगुणसंपन्न,विश्वाचे मालक म्हणू शकतो कारण की त्यावेळी इतर कोणाचे राज्य नसते.आता
मुलांना समजले आहे-विश्वाचे मालक कसे बनाल?आत्ता आम्ही सो देवी-देवता बनत आहोत, तर
मग त्यांच्यासमोर माथा कसे झुकवू शकतो.तुम्ही ज्ञानसंपन्न बनले आहात,ज्यांना ज्ञान
नाही ते माथा टेकत राहतात.तुम्ही सर्वांच्या कर्तव्याला आता जाणले आहे. चित्र कोणते
चूकीचे,कोणते बरोबर आहेत,तेही तुम्ही समजावू शकता.रावण राज्याबद्दल ही तुम्ही
समजावत असता.हे रावण राज्य आहे,याला आग लागणार आहे,भंभोरला आग लागणार आहे,विश्वाला
भंभोर म्हटले जाते.ज्या अक्षरांचे गायन आहे त्यांच्यावरती समजावले जाते.भक्ती
मार्गामध्ये तर अनेक चित्र बनवले आहेत.वास्तवामध्ये खरी शिवबाबांची पूजा आहे, नंतर
ब्रह्मा-विष्णू-शंकराची. त्रिमूर्ती जे बनवतात तो बरोबर आहे.नंतर हे लक्ष्मी-नारायण
बस. त्रिमूर्ती मध्ये ब्रह्मा सरस्वती ही येतात.भक्ती मार्गामध्ये किती चित्र
बनवतात.हनुमानाची ही पूजा करतात.तूम्ही महावीर बनत आहात ना.मंदिरामध्ये कोणाची हत्ती
वर सवारी,कोणाची घोड्यावर सवारी दाखवली आहे.आता अशी स्वारी थोडीच असते.बाबा म्हणतात
महारथी म्हणजे, हत्तीवर स्वार,म्हणून त्यांनी हत्तीवर सवारी बनवली आहे.कशाप्रकारे
हत्तीला मगर खाऊन टाकते(गज को ग्राह खाते है)हे ही समजावले आहे.बाबा समजावतात जे
महारथी आहेत कधी-कधी त्यांना ही मायारूपी मगर खाऊन टाकते.या ज्ञानाच्या गोष्टी
आहेत,यांचे कोणी वर्णन करू शकत नाही.बाबा म्हणतात निर्विकारी बनायचे आहे,दैवीगुण
धारण करायचे आहेत.बाबा कल्प-कल्प म्हणतात-काम महाशत्रू आहे.यामध्ये मेहनत आहे.यावर
तुम्ही विजय मिळवत आहात.प्रजापिता चे बनले तर भाऊ-बहीण झाले.खरे पाहता तुम्ही सर्व
आत्मे आहात.आत्मा आत्म्या सोबत बोलते.आत्माच कानांनी ऐकते,हे आठवणीत ठेवायला
पाहिजे.मी आत्म्याला ऐकवत आहे,देहाला नाही.खरे पाहता आम्ही आत्मे भाऊ-भाऊ आहोत नंतर
आपसा मधे भाऊ-बहीण ही आहोत. भावाला ऐकवायचे असते.दृष्टी आत्म्याकडे जायला पाहिजे.
आम्ही भावाला ऐकवत आहोत. भाऊ ऐकत आहे?हो मी आत्मा ऐकत आहे.बिकानेर मध्ये एक मुलगा
आहे जो सदैव आत्मा- आत्मा म्हणून लिहितो.माझी आत्मा या शरीराद्वारे लिहीत आहे.मज
आत्म्याचा हा विचार आहे.माझी आत्मा हे करत आहे. तर हे आत्म-अभिमानी बनने कष्टाची
गोष्ट आहे ना.माझी आत्मा नमस्ते करत आहे.जसे बाबा म्हणतात-आत्मिक मुलांनो. तर
भ्रकुटी कडे पहायला हवे. आत्माच ऐकणारी आहे,मी आत्म्याला ऐकवत आहे.तुमची नजर
आत्म्यावर पडली पाहिजे. आत्मा भ्रकुटीच्या मध्ये आहे. शरीरावर नजर पडल्याने विघ्न
येतात.आत्म्या सोबत बोलायचे आहे.आत्म्यालाच पाहायचे आहे. देह-अभिमानाला सोडा.आत्मा
जाणत आहे-बाबा ही इथे भ्रकुटीच्या मध्ये बसले आहेत. आम्ही त्यांना नमस्ते करत
आहोत.आम्ही आत्मा आहोत हे बुद्धीमध्ये ज्ञान आहे.आत्माच ऐकत आहे.हे ज्ञान अगोदर
नव्हते.हा देह अभिनय करण्यासाठी मिळाला आहे म्हणूनच देहाचे नाव ठेवले जाते. यावेळी
तुम्हाला देही-अभिमानी बनुन परत जायचे आहे.हे नाव अभिनय करण्यासाठी ठेवले
आहे.नावाशिवाय तर कारभार(कार्य व्यवहार)चालू शकत नाही.तिथे ही कारभार तर चालेल
ना.परंतु तुम्ही सतोप्रधान बनता म्हणूनच तिथे कोणतेही विकर्म होणार नाहीत.तुम्ही असे
कामच करणार नाही ज्यापासून विकर्म बनेल.मायेचे राज्यच नाही.आता बाबा म्हणतात-तुम्हा
आत्म्यांना परत जायचे आहे.हे तर जुने शरीर आहेत नंतर सतयुग-त्रेता मध्ये जाणार.तिथे
ज्ञानाची गरजच नाही.इथे तुम्हाला ज्ञान कशासाठी देत आहेत? कारण की सर्व दुर्गतीला
प्राप्त झाले आहेत.कर्म तर तिथेही करतात परंतु ते अकर्म होते.आता बाबा म्हणतात
हाताने काम करा...आत्मा बाबांची आठवण करते.सतयुगामध्ये तुम्ही पावन आहात तर सर्व
कारभार पावन होतो.तमोप्रधान रावण राज्यांमध्ये तुमचा कारभार खोटा होतो, म्हणून
मनुष्य तीर्थयात्रा इ.वर जातात.तिथे तुम्ही जे पण काम करता ते सत्यच करता.सत्याचे
वरदान मिळाले आहे.विकाराची गोष्टच नाही.कार्य व्यवहारामध्ये खोटे वागण्याची गरज
नसते.इथे तर लोभामुळे मनुष्य चोरी फसवणूक करतात,तिथे या गोष्टी नसतात.नाटका नुसार
तुम्ही असे फुलासारखे बनता.ती आहे निर्विकारी दुनिया,ही आहे विकारी दुनिया.
बुद्धीमध्ये सर्व खेळ आहे. यावेळीच पवित्र बनण्यासाठी मेहनत करायला पाहिजे.योगबळाने
तुम्ही विश्वाचे मालक बनता,योगबळ महत्वाचे आहे.बाबा म्हणतात भक्ती मार्गातील, यज्ञ
तप इ.ने कुणीही मला प्राप्त करू शकत नाही.सतो-रजो-तमो मध्ये यायचेच आहे.हे ज्ञान
खूप सहज आणि रमणिक आहे,कष्टच हे आहे.या योगाचीच महिमा आहे ज्यामुळे तुम्हाला
सतोप्रधान बनायचे आहे.तमोप्रधान पासून सतोप्रधान बनण्याचा रस्ता बाबा च सांगत
आहेत.दुसरे कोणी हे ज्ञान देऊ शकत नाही.खुशाल काहीजण चंद्रावर गेले आहेत, कोणी
पाण्यावर चालतात.परंतु तो काही राजयोग नाही.नरापासून नारायण तर बनू शकत नाही.इथे
तुम्ही समजू शकता आम्ही आदी सनातन देवी-देवता धर्माचे होतो जे आता पुन्हा बनत आहोत.
स्मृती आली आहे.बाबांनी कल्पा पूर्वीही हे समजावले होते.बाबा म्हणतात निश्चय बुद्धी
विजयंती. निश्चय नसेल तर ते ऐकण्यासाठी येणारच नाहीत.निश्चय बुद्धी पासून नंतर संशय
बुद्धीही बनतात.खूप चांगले-चांगले महारथी ही संशयामध्ये येतात. मायेचे थोडे वादळ
आल्यानंतर देह अभिमाना मध्ये येतात.
हे बापदादा दोघेही एकत्र आहेत ना.शिवबाबा ज्ञान देतात नंतर निघून जातात ते काय
होते,कोण सांगणार.बाबांना विचारायचे का तुम्ही सदैव असता का निघून जाता?बाबांना तर
हे विचारू शकत नाही ना.बाबा म्हणतात मी तुम्हाला पतीतापासून पावन होण्याचा रस्ता
सांगत आहे.येतो, जातो,मला तर खूप कामे करावी लागतात.मुलांजवळ ही जातो,
त्यांच्याकडून कार्य करवून घेतो. यामध्ये संशयाची कोणती गोष्ट नाही.बाबांची आठवण
करणे-हे आपले काम आहे. संशय आल्यामुळे घसरतात. माया जोरात थप्पड मारते. बाबांनी
सांगितले आहे अनेक जन्मांच्या अंताच्या ही अंताला मी यांच्यामध्ये येतो.मुलांना
निश्चय आहे बरोबर बाबाच आम्हाला हे ज्ञान देत आहेत,इतर कोणी देऊ शकत नाही.तरीही हा
निश्चय किती जणांचा ढासळतो,हे बाबा जाणतात.तुम्हाला पावन बनायचे आहे तर बाबा
म्हणतात माझी आठवण करा,दुसऱ्या कोणत्याही गोष्टी मध्ये पडू नका.तुम्ही अशा गोष्टी
करता, तर पक्का निश्चय नाही हे लक्षात येते. सुरुवातीला एक गोष्ट समजावून घ्या
ज्याच्या द्वारे तुमचे पाप नष्ट होतात,बाकी फालतू गोष्टी करण्याची गरज
नाही.बाबांच्या आठवणीने विकर्म विनाश होतील मग इतर गोष्टींमध्ये का जाता! पहा कोणी
प्रश्न उत्तरामध्ये गोंधळून जात असेल तर त्याला सांगा की तुम्ही या गोष्टींना सोडून
एक बाबांच्या आठवणी मध्ये राहण्याचा पुरुषार्थ करा.संशयामध्ये आले तर शिकणे सोडून
देतील, नंतर कल्याण होणार नाही.नाडी पाहून समजवायचे आहे.संशयी असेल तर एका
मुद्द्यावरच थांबायचे आहे.खूप युक्तीने समजावून सांगावे लागते.मुलांना प्रथम हा
निश्चय व्हावा-बाबा आले आहेत, आम्हाला पावन बनवत आहेत. ही तर खुशी राहते.शिकले
नाहीतर नापास होतील,त्यांना खुशी ही कशी होईल.शाळेमध्ये शिक्षण तर एकच असते.नंतर
कोणी शिकून लाखो रुपये कमावतात,कुणी 5-10 रुपये कमावतात.नरापासून नारायण बनणे हे
तुमचे उद्दिष्ट आहे.राजाई स्थापन होत आहे.तुम्ही मनुष्यापासून देवता बनाल. देवतांची
तर मोठी राजधानी आहे,त्यामध्ये उच्च पद मिळवणे हे शिक्षण आणि वागण्यावर अवलंबून
आहे.तुमचे वागणे खूप चांगले असायला पाहिजे. बाबा आपल्यासाठी ही म्हणतात-आत्ता
कर्मातीत अवस्था बनलेली नाही. आम्हालाही संपूर्ण बनायचे आहे, अजून बनलो नाही.ज्ञान
तर खूप सहज आहे.बाबांची आठवण करणे ही सहज आहे परंतु केली पाहिजे ना.अच्छा!
गोड-गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलां प्रति मात-पिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण
आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1. कोणत्याही
गोष्टी मध्ये संशय बुद्धी बनून शिक्षण सोडायचे नाही.प्रथम तर पावन बनण्यासाठी एक
बाबांची आठवण करायची आहे,दुसऱ्या गोष्टींमधे जायचे नाही.
2. शरीरावर नजर गेल्यामुळे विघ्नं येतात म्हणूनच भृकुटी मध्ये पाहायचे आहे.आत्मा
समजून, आत्म्याशी बोलायचे आहे.आत्म- अभिमानी बनायचे आहे,निर्भय बनून सेवा करायची आहे.
वरदान:-
दृढ संकल्पा
द्वारे अवगुण रुपी कलियुगी पर्वताला समाप्त करणारे समर्थी स्वरूप भव
नाराज होणे,कोणत्याही
संस्कार किंवा परिस्थितीच्या वशीभूत होणे,व्यक्ती किंवा वैभवाकडे आकर्षित होणे,या
सर्व अवगुण रुपी कलियुगी पर्वतांना दृढ संकल्पाचे बोट देऊन सदा काळासाठी समाप्त करा
अर्थात विजयी बना.विजय आमच्या गळ्यातील माळ आहे-सदैव या स्मृतीने समर्थी स्वरूप
बना.हीच स्नेहाची परतफेड आहे. ज्याप्रमाणे साकार पित्याने स्थितीला स्तंभ बनवून
दाखवले अशाप्रकारे बाबांचे अनुकरण करून सर्व गुणांचे स्तंभ बना.
बोधवाक्य:-
साधन सेवेसाठी
आहेत,आराम पसंत बनण्यासाठी नाही.