01-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो,तुम्ही आत्ता आत्मिक पित्याद्वारे आत्मिक व्यायाम शिकत आहात,या
व्यायामाद्वारे तुम्ही मुक्तिधाम शांतीधाम मध्ये जाऊ शकाल"
प्रश्न:-
बाबा मुलांना
पुरूषार्थ करवत राहतात परंतु मुलांना कोणत्या गोष्टी मध्ये खूप कडक राहायला पाहिजे?
उत्तर:-
जुन्या दुनियेला आग लागण्याच्या अगोदर तयार होऊन, स्वतःला आत्मा समजून बाबाच्या
आठवणीमध्ये राहुन,बाबा कडून पूर्ण वारसा घेण्यामध्ये खूप काटेकोर राहायचे आहे.नापास
व्हायचे नाही,जसे विद्यार्थी नापास होतात तर पश्चाताप करतात, समजतात माझे वर्ष फुकट
गेले,कोणी तर म्हणतात,नाही शिकले तर काय झाले,परंतु तुम्हाला खूप काटेकोर पणे
राहायचे आहे.शिक्षक असे म्हणायला नको की,आत्ता खूप उशीर झाला.
ओम शांती।
आत्मिक पिता आत्मिक मुलांना आत्मिक शाळेमध्ये मार्गदर्शन करत आहेत किंवा असे म्हणा
मुलांना आत्मिक व्यायाम शिकवत आहेत.जसे शिक्षक सूचना देतात किंवा व्यायाम शिकवतात,हे
आत्मिक पिता पण मुलांना सूचना देतात,काय म्हणतात मनमनाभव. जसे ते म्हणतात सावधान रहा.
बाबा पण म्हणतात मनमनाभव.हे जसे प्रत्येकाच्या वरती दया करतात.बाबा म्हणतात
मुलांनो,माझी आठवण करा,अशरीरी बना.हा आत्मिक व्यायाम आत्म्याला,आत्मिक पिताच
शिकवतात.ते सर्वोच्च शिक्षक आहेत,तर तुम्ही नायब शिक्षक आहात.तुम्ही पण सर्वांना
म्हणतात,स्वतःला आत्मा समजा, बाबांची आठवण करा,देही अभिमानी भव.मनमनाभवचा अर्थ पण
हा आहे.मुलांच्या कल्याणासाठी सूचना देत राहतात, मार्गदर्शन करतात.ते स्वतः
कोणाकडून शिकले नाहीत,बाकी इतर,सर्व शिक्षकाकडून शिकून परत शिकवत राहतात.शिवबाबा तर
कोणत्या शाळेमध्ये किंवा कोणाकडून शिकलेले नाहीत.हे फक्त शिकवतात,म्हणतात तुम्हा
मुलांना बुद्धीचा व्यायाम शिकवतो. ते सर्व शारीरिक व्यायाम शिकवतात,त्यांना व्यायाम
पण शरीरा द्वारेच करावा लागतो.येथे तर शरीराची गोष्टच नाही.बाबा म्हणतात,माझे तर
शरीरच नाही.मी तर बुद्धीचा व्यायाम शिकवतो, सूचना देतो.त्यांच्यामध्ये बुद्धीचा
व्यायाम शिकवण्यासाठी पूर्वनियोजित नाटका नुसार नोंद आहे,त्यांच्यात सेवा सामावलेली
आहे.ते बुद्धीचा व्यायाम शिकवण्यासाठीच येतात.तुम्हाला तमोप्रधान पासून सतोप्रधान
बनायचे आहे.हे तर खूप सहज आहे.शिडी बुद्धीमध्ये आहे.आम्ही कसे८४चे चक्र लावून खाली
उतरले आहोत.आता तुम्हाला परत जायचे आहे.असे कोणीही आपल्या शिष्याला किंवा
विद्यार्थ्यांना म्हणत नाहीत की, हे आत्मिक मुलांनो, आता परत जायचे आहे.असे आत्मिक
पित्याशिवाय कोणी समजावू शकणार नाही.मुलं समजतात,आत्ता आम्हाला परत जायचे आहे.ही
दुनियाच तमोप्रधान आहे.आम्ही सतोप्रधान दुनियेचे मालक होतो,परत ८४ चे चक्र लावून
तमोप्रधान दुनियेचे मालक बनलो आहोत.येथे तर दुःखच दुःख आहे.बाबांना दुखहर्ता
सुखकर्ता म्हणजे तमोप्रधान पासून सतोप्रधान बनवणारे एकच पिता आहेत.तुम्ही मुलं
समजतात,आम्ही खूप सुख पाहिले आहे.कसे राज्य केले,ते आठवत नाही परंतु मुख्य लक्ष्य
समोर आहे.ती फुलांची बाग आहे.आता आम्ही काट्या पासून फुलासारखे बनत आहोत.
तुम्ही असे म्हणणार नाही की,कसा निश्चय करू? जर संशय आहे तर विनाश होईल.शाळा सोडली
तर शिक्षण बंद होते,पद पण मिळवू शकणार नाही.खूप नुकसान होते. प्रजे मध्ये पण कमी पद
मिळेल. मुख्य गोष्टच सतोप्रधान पूज्य देवी-देवता बनणे आहे.तुम्ही आता तर देवता
नाहीत ना.तुम्हा ब्राह्मणांना समज आली आहे. ब्राह्मणच येऊन बाबा द्वारे आत्मिक
व्यायाम शिकतात.मन आनंदीत होते ना.हे राजयोगाचे शिक्षण चांगले वाटते ना.भगवानुवाच
आहे, जरी त्यांनी कृष्णा चे नाव लिहिले आहे,परंतु तुम्ही समजतात कृष्णाने आत्मिक
व्यायाम शिकवला नाही, हे तर स्वयं शिवपिताच शिकवत आहेत.कृष्णाची आत्माच वेगवेगळे
रूप धारण करून तमोप्रधान बनली आहे,त्यांना पण शिकवतात.स्वतः शिकत नाहीत,दुसरे सर्व
कोणाकडून तरी जरूर शिकतात. हे तर शिकवणारे आत्मिक पिता आहेत.तुम्हाला शिकवतात,परत
तुम्ही दुसऱ्यांना शिकवतात.तुम्ही८४ जन्म घेऊन पतित बनले आहात, आता परत पावन बनायचे
आहे, त्यासाठी आत्मिक पित्याची आठवण करायची आहे.भक्तिमार्गा मध्ये तुम्ही गायन करत
आले आहात,हे पतित पावन,आता तुम्ही कुठे पण जाऊन पहा.तुम्ही राजॠषी आहात ना,कुठे पण
फिरू शकतात.तुम्हाला कोणते बंधन नाही.तुम्हा मुलांना हा निश्चय आहे की, बेहद्दचे
पिता सेवा करण्यासाठी आले आहेत.पिता मुलांकडून शिकवण्याचा मोबदला कसे
घेतील.शिक्षकाची मुलं असतील तर मोफत शिकवतील ना. हे पण मोफत शिकवतात.असे तुम्ही समजू
नका की,आम्ही काही देत आहोत.हे शिक्षणाचे शुल्क नाही. तुम्ही तर काहीच देत
नाहीत,त्या मोबदल्यात खूप काही घेतात. मनुष्य दान पुण्य करतात,तर समजतात त्या
मोबदल्यात आम्हाला दुसऱ्या जन्मांमध्ये मिळेल. ते तर अल्प काळाचे क्षणभंगुर सुख
मिळते.जरी दुसऱ्या जन्मात मिळते,परंतु ते खाली उतरणाऱ्या जन्मामध्ये मिळते.शिडी
उतरतच येतात ना.आत्ता जे तुम्ही करतात,ते चढती कलेमध्ये जाण्यासाठी.कर्माचे फळ
म्हणतात ना.आत्म्याला तर कर्माचे फळ मिळतेच.या लक्ष्मी नारायणला पण कर्माचे फळ
मिळाले आहे ना.बेहद्दच्या पित्या कडून बेहद्द चे फळ मिळते.तेथे अप्रत्यक्ष मिळते.
हे पण नाटकांमध्ये नोंद आहे.हे पूर्वनियोजित नाटक आहे ना.तुम्ही जाणतात की,आम्ही
कल्पाच्या नंतर येऊन बाबा पासून बेहद्दचा वारसा घेतो.बाबा आमच्यासाठी आध्यात्मिक
विद्यालय सुरू करतात.शासनाचे शारीरिक विद्यालय आहे.जेथे वेगवेगळ्या
प्रकारचे,अर्ध्याकल्पा पासून शिकत आलो आहात.आता बाबा २१ जन्मासाठी सर्व दुःख दूर
करण्यासाठी शिकवत आहेत.तेथे तर राजाई आहे,त्यामध्ये क्रमानुसार येत राहतात.जसे येथे
पण राजा,राणी,वजीर,प्रजा इत्यादी सर्व क्रमानुसार आहेत.हे जुन्या दुनिया मध्ये
आहेत,नवीन दुनिया मध्ये तर खूप थोडे असतील.तेथे सुख पुष्कळ असेल,तुम्ही विश्वाचे
मालक बनतात.राजे-महाराजे होऊन गेले आहेत.तेथे खूप आनंद साजरा करतात,परंतु बाबा
म्हणतात त्यांना तर खाली उतरायचे आहेच. सर्वांची उतरती कला तर होते ना. देवतांची पण
हळूहळू उतरती कला होते परंतु तेथे रावणराज्य नसते, म्हणून सुखच सुख आहे.येथे तर
राज्य आहे.तुम्ही जसे प्रगती करतात,तशीच अधोगती पण होत राहते.आत्मे पण वेगवेगळे नाव
रूप धारण करत करत खाली उतरत आले आहेत.पुर्वनियोजीत नाटका नुसार कल्पा
पूर्वीप्रमाणेच तमोप्रधान बनले आहेत.काम विकारात गेल्यामुळेच दुःख सुरू होते.आत्ता
तर अती दुःख आहे.तेथे परत अती सुख असेल.तुम्ही कोणालाही विचारू शकता, रचनाकार आणि
रचनेच्या आदी मध्य अंताला जाणतात का?तर नाही म्हणतील.हे तर तेच विचारतील,जे सर्वथा:
जाणत असतील.जर स्वतःच जाणत नसतील,तर कसे विचारू शकतील?तुम्ही जाणतात ऋषीमुनी इत्यादी
कोणीही त्रिकालदर्शी नाहीत.बाबा तर आम्हाला त्रिकालदर्शी बनवत आहेत.हे बाबा जे
विश्वाचे मालक होते,त्यांना पण ज्ञान नव्हते.या जन्मामध्ये पण साठ वर्षापर्यंत
ज्ञान नव्हते.जेव्हा बाबा आले,तेव्हापासून हळूहळू हे सर्व ऐकवत जातात.जरी निश्चय
बुद्धी होतात,तरीही माया अनेकांना विकारांमध्ये घेऊन जाते.नावं ऐकवू शकत
नाहीत,नाहीतर निराशवादी बनतील.समाचार तर येत राहतात ना.खराब सगंत लागली,नवीन लग्न
झालेल्यांची सगंत लागली.दृष्टी चंचल झाली,तर म्हणतात आम्ही लग्न करण्या शिवाय राहू
शकत नाहीत.अच्छा,महारथी रोज मुरली ऐकणारे,मधुबनला पण अनेक वेळेस जाऊन आलेले,त्यांना
पण मायारूपी मगरीने पकडले आहे. असे खूप केस होत राहतात. आणखी लग्न केले नाही, माया
तोंडामध्ये घेऊन हप करत राहते. स्त्री रुपी माया आकर्षित करत राहते. मगरीच्या
तोंडामध्ये येऊन पडले आहेत,परत हळूहळू हप करत राहते.कोणी गफलत करतात किंवा दृष्टी
चंचल होते,ते समजतात आम्ही वरुन एकदम खड्ड्यांमध्ये पडू.असे म्हणाल, मुलगा खूप
चांगला होता,आता बिचारा गेला.साखरपुडा झाला आणि मृत्यू झाला,म्हणजे विकारांमध्ये
गेला.बाबा मुलांना नेहमी सावधान करतात की,मुलांनो जिवंत राहा,कुठे मायेचा आघात
जोरात व्हायला नको.ग्रंथांमध्ये पण या गोष्टी आहेत ना.आत्ताच्या गोष्टी नंतर त्याचे
गायन होते.तर तुम्ही पुरुषार्थ करत राहतात.असे व्हायला नको की,मायारूपी मगर हप करेल.
वेगवेगळ्या प्रकारे माया पकडत राहते.मुख्य काम महाशत्रू आहे. यापासून खूप संभाळ
करायची आहे.पतित दुनिया पासून पावन दुनिया कशी बनत आहे,हे तुम्ही पाहत आहात.यामध्ये
संभ्रमित होण्याची गोष्टच नाही,फक्त स्वतःला आत्मा समजून बाबाची आठवण केल्यामुळे
सर्व दुःख दूर होतात. बाबाच पतित-पावन आहेत.हे योग बळ आहे ना.भारताचा प्राचीन
राजयोग खूप प्रसिद्ध आहे.ते समजतात,ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्ष स्वर्ग होता.तर जरूर
दुसरा कोणता धर्म नसेल.खूप सहज गोष्टी आहेत, परंतु समजत नाहीत.आता तुम्ही समजतात,ते
राज्य परत स्थापन करण्यासाठी बाबा आले आहेत. पाच हजार वर्षापूर्वी पण शिवबाबा आले
होते,जरूर हेच ज्ञान दिले असेल,जसे आत्ता देत आहे.बाबा स्वत:म्हणतात,मी कल्प-कल्प
साधारण तनामध्ये येऊन राजयोग शिकवतो.तुम्ही राजॠर्षी आहात, अगोदर नव्हते.बाबा आले
आहेत, तेव्हा पासून बाबांच्या जवळ राहतात.तुम्ही शिकतात पण सेवा पण करतात,स्थूल आणि
सूक्ष्म सेवा असते.भक्तिमार्गा मध्ये पण सेवा करतात,आणि घरदार पण सांभाळतात.बाबा
म्हणतात आता भक्ती पूर्ण झाली,ज्ञान सुरू होत आहे.मी ज्ञानाद्वारे सद्गती करण्यासाठी
येतो.तुमच्या बुद्धी मध्ये आहे,आम्हाला बाबा पावन बनवत आहेत.बाबा म्हणतात, वैश्विक
नाटका नुसार तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आलो आहे. शिक्षक शिकवतात तर मुख्य लक्ष
बुद्धीमध्ये असते.हे उच्च ते उच्च शिक्षण आहे,जसे कल्पा पूर्वी समजावले होते,तेच
समजावत राहतात.नाटकाचे घड्याळ चालत राहते,सेकंद बाय सेकंद जे झाले,त्याचीच परत पाच
हजार वर्षानंतर पुनरावृत्ती होते.दिवस जात राहतात.असे विचार दुसऱ्या कोणाच्या
बुद्धीमध्ये येत नाहीत. सत्ययुग त्रेतायुग,द्वापरयुग,कलियुग झाले,परत त्याची
पुनरावृत्ती होते.तेच झाले,जे कल्पापुर्वी झाले होते.थोडे दिवस आहेत, ते तर लाखो
वर्ष म्हणतात,त्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही म्हणाल,बाकी थोडे तास आहेत.हे पण वैश्विक
नाटकांमध्ये नोंद आहे.जेव्हा आग लागेल तेव्हा जागृत होतील, परत खूप उशीर झालेला
असेल.तर बाबा पुरुषार्थ करवत राहतात.तुम्ही तयार होऊन बसा.शिक्षकाला असे म्हणावे
लागणार नाही की,फार उशीर झाला.नापास होणारे खूप पश्चात्ताप करतात.ते समजतात आमचे
वर्ष फुकट जाईल.काहीतरी म्हणतात शिकले नाहीतर काय झाले.तुम्हा मुलांना तर खूप
काटेकोर रायचे आहे,सावधान राहायला पाहिजे. आम्ही तर बाबा पासून पूर्ण वारसा
घेऊ,स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. यामध्ये काही कष्ट होतात, तर
बाबांना विचारू शकता.हीच मुख्य गोष्ट आहे.बाबांनी आज पासून पाच हजार वर्षापूर्वी पण
म्हटले होते- माझी च आठवण करा,(मामे कम याद करो).मीच पतित-पावन, सर्वांचा पिता
आहे.कृष्ण तर सर्वांचे पिता होऊ शकत नाहीत.तुम्ही शिवाच्या,कृष्णाच्या पुजाऱ्यांना
पण हे ज्ञान ऐकवू शकतात.आत्मा पूज्य बनली नाही तर,तुम्ही किती पण कष्ट घ्या,समजणार
नाहीत.आता नास्तिक बनले आहेत,कदाचित पुढे चालून आस्तिक बनतील.समजा कोणी लग्न करून
विकारांमध्ये जातात,परत येऊन ज्ञान घेतात, परंतु वारसा तर खूप कमी होईल, कारण
बुद्धीमध्ये दुसर्याची आठवण येऊन बसली.ती विसरणे खूप कठीण होते.प्रथम पत्नीची
आठवण,परत मुलांची आठवण येते.मुलांपेक्षा जास्त पत्नीची आठवण आकर्षित करते,कारण खूप
वर्षाची आठवण आहे ना.मुलं तर नंतर होतात,परत मित्र संबंधी, सासर यांची आठवण
येते.प्रथम पत्नी सोबत खूप वर्ष राहिले,हे पण असेच आहे.तुम्ही म्हणाल आम्ही
देवतांच्या सोबत खूप वेळ होतो. तसे तर म्हणाल,बाबांच्या सोबत खूप वर्षापासून प्रेम
आहे.ज्यांनी पाच हजार वर्षपुर्व,आम्हाला पावन बनवले.कल्प-कल्प येऊन आमचे रक्षण
करतात,तेव्हा तर त्यांना दुखहर्ता सुखकर्ता म्हणतात.तुमच्या बुद्धीची लाईन स्पष्ट
हवी.या डोळ्यांनी जे काही,तुम्ही पाहतात ते सर्व कब्रदाखल होणार आहे.आता तुम्ही
संगमयुगा मध्ये आहात.अमरलोक येणार आहे. आता आम्ही पुरुषोत्तम बनण्यासाठी पुरुषार्थ
करत आहोत. हे कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग आहे.तुम्ही या दुनिया मध्ये पाहत
रहा,काय काय होत आहे.आता बाबा आले आहेत,तर जुनी दुनिया नष्ट होणार आहे.पुढे चालून
अनेकांच्या बुद्धीमध्ये येईल,कोणी तरी आले आहेत,जे दुनियाला परिवर्तन करत आहेत.ही
तीच महाभारत लढाई आहे.तुम्ही खूप समजदार बनले आहात.खुप मंथन करण्याच्या गोष्टी
आहेत.आपला श्वास पण व्यर्थ घालवायला नको. तुम्ही जाणतात ज्ञानाद्वारे श्वास सफल होतो.
अच्छा.
गोड- गोड फार
वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक
पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) माये
पासून सुरक्षित राहण्यासाठी संग दोषापासून आपली खूप संभाळ करायची आहे.आपली बुद्धी
रुपी लाईन स्पष्ट ठेवायची आहे.श्वास व्यर्थ घालवायचा नाही,ज्ञानाद्वारे श्वास सफल
करायचे आहेत.
(२) जितका वेळ मिळेल
योगबळ जमा करण्यासाठी,आत्मिक व्यायाम,अभ्यास करायचा आहे. आता कोणत्याही नवीन बंधना
मध्ये अडकायचे नाही.
वरदान:-
बाबांच्या
छत्रछायेत नाजुक परिस्थितीमध्ये पण कमलपुष्पा सारखे अनासक्त आणि प्रिय भव.
संगम युगामध्ये जेव्हा
बाबा सेवाधारी बनून येतात,तर त्यांच्या छत्रछाये मध्ये,मुलांची नेहमी सेवा
करतात.आठवण करताच सेकंदांमध्ये त्यांच्या सोबतीचा अनुभव होतो.ही आठवणीची
छत्रछाया,कोणत्याही नाजूक परिस्थितीमध्ये,कमळाच्या फुलासारखे अनासक्त आणि प्रिय
बनवते,कष्ट वाटत नाहीत.बाबांना बुद्धी समोर ठेवल्यामुळे आणि स्वस्थिती मध्ये स्थिर
राहिल्यामुळे कोणतीही परिस्थिती परिवर्तन होते.
बोधवाक्य:-
व्यर्थ
गोष्टीचा पडदा मध्ये येऊ देऊ नका,तर बाबांच्या सोबतीचा अनुभव होत राहील.