14-12-2020
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
"गोड
मुलांनो, दुःखाचे दिवस आता पूर्ण झाले,तुम्ही आता,अशा दुनिया मध्ये जाता,जेथे
कोणत्या अप्राप्त वस्तू नाहीत"
प्रश्न:-
कोणते दोन
शब्द तुमच्या बुद्धीमध्ये असल्यामुळे,जुन्या दुनिये पासून वैरागी बनतात?
उत्तर:-
उतरती कला आणि चढती कलेचे रहस्य,तुमच्या बुद्धीमध्ये आहे.तुम्ही जाणतात,अर्धा कल्प
आम्ही उतरत आलो,आत्ता तर प्रगती करण्याची वेळ आहे.बाबा, नरा पासून नारायण बनण्याचे
सत्य ज्ञान देण्यासाठी आले आहेत. आमच्यासाठी कलियुग पूर्ण झाले, नवीन दुनिया मध्ये
जायचे आहे, त्यामुळे या दुनिये पासून वैराग्य आहे.
गीत:-
धैर्यधर मनवा
सुखाचे दिवस आले की आले..
ओम शांती।
गोड गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले.आत्मिक पिता समजावत आहेत,हे एकच पुरुषोत्तम संगम
युग आहे,ज्यामध्ये कल्प-कल्प बाबा येऊन मुलांना शिकवत आहेत.बाबा आत्मिक मुलांना
म्हणतात,मनूवा म्हणजे आत्मा,हे आत्म्यांनो धैर्य धरा. आत्म्याशी गोष्टी करतात.या
शरीराची मालक आत्मा आहे.आत्माच म्हणते,मी अविनाशी आत्मा आहे.हे माझे शरीर विनाशी
आहे.आत्मिक पिता म्हणतात,मी एकाच वेळेत कल्पाच्या संगमयुगामध्ये येऊन तुम्हा मुलांना
धैर्य देतो की,आत्ता सुखाचे दिवस आले आहेत.आता तुम्ही दु:खधाम रौरव नर्कामध्ये
आहात,फक्त तुम्हीच नाही,तर सर्व दुनिया रौरव नर्कामध्येच आहे.तुम्ही जे माझे मुलं
बनले आहात,ते रौरव नर्कामधुन मधून निघून स्वर्गामध्ये जात आहात.सतयुग,त्रेता,
द्वापर पूर्ण झाले,कलियुग पण तुमच्यासाठी पूर्ण झाले.तुमच्यासाठी तर पुरुषोत्तम
संगमयुग आहे.जेव्हा तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनत आहात.आत्मा जेव्हा
सतोप्रधान बनते,तेव्हा हे शरीर सोडून देते.सतोप्रधान आत्म्याला सतयुगा मध्ये नवीन
शरीर पाहिजे. तेथे सर्व काही नवीन असते.बाबा म्हणतात मुलांनो,आत्ता दुःखधाम सोडून
सुखधाम मध्ये जायचे आहे, त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. सुखधाम मध्ये या
लक्ष्मीनारायणचे राज्य होते.तुम्ही पुरुषार्थ करत आहात, नरा पासून नारायण
बनण्यासाठी.हे नरापासून नारायण बनण्याचे सत्य ज्ञान आहे.भक्तिमार्ग मध्ये प्रत्येक
पौर्णिमेला कथा ऐकत आले आहात परंतु तो तर भक्तिमार्ग आहे,त्याला सत्य मार्ग म्हणता
येत नाही. ज्ञान मार्गच सत्य मार्ग आहे. तुम्ही शिडी उतरत उतरत खोट्या खंडांमध्ये
येतात.आता तुम्ही जाणतात,सत्य बाबांकडून आम्हाला हे ज्ञान प्राप्त होते,त्यामुळे
आम्हीच होतो परत २१ जन्म देवी-देवता बनतो.आम्हीच होतो,परत शिडी उतरत आलो आहोत.उतरती
कला आणि चढती कलाचे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे.बाबांना बोलवतात, येऊन आम्हाला
पावन बनवा.एक बाबाच पावन बनवणारे आहेत. बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही सत्ययुगामध्ये
विश्वाचे मालक होते, खूप धनवान, खूप सुखी होते.आता बाकी थोडा वेळ आहे,जुन्या
दुनियेचा विनाश समोर उभा आहे. नवीन दुनियेमध्ये एक राज्य,एक भाषा होती,त्याला
अद्वैत राज्य म्हटले जाते.आत्ता तर खूप द्वैत आहे.अनेक भाषा आहेत,जसे मनुष्याचे झाड
वृद्धी होत जाते, भाषांचे पण झाड वृद्धी होत जाते, परत एकच भाषा असेल.विश्वाच्या
इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते, असे पण गायन आहे. हे मनुष्याच्या बुद्धी मध्ये
बसत नाही.बाबाच दुःखाची जुनी दुनिया बदलून सुखाची नवीन दुनिया स्थापन करतात.
प्रजापिता ब्रह्मा द्वारे दैवी घराण्याची स्थापना असे लिहिले आहे. हे राजयोगाचे
शिक्षण आहे. हे ज्ञान जे गीतेमध्ये लिहिले आहे, बाबांनी सन्मुख ऐकवले,तेच परत
मनुष्यांनी भक्तिमार्ग साठी लिहिले आहे,ज्याद्वारे तुम्ही उतरत आलेले आहात.आता
भगवान तुम्हाला प्रगती करण्यासाठी शिकवत आहेत.भक्तीला उतरती कलेचा मार्ग म्हटले
जाते.ज्ञानच चढती कलेचा मार्ग आहे,हे समजून सांगण्यासाठी तुम्ही तुम्ही घाबरू
नका.काहीजण असेही आहेत, जे या गोष्टीला न समजल्यामुळे विरोध करतील. शास्त्रार्थ,
वादविवाद करतील परंतु तुम्हाला कोणाशीही शास्त्रार्थ, वाद-विवाद करायचं नाही.तुम्ही
सांगा शास्त्र,वेद,उपनिषद, गंगा स्नान इत्यादी करणे,हे सर्व भक्ती कांड आहे.
भारतामध्ये रावणला बरोबर दरवर्षी जाळतात,तसे तर दुश्मना चा पुतळा जाळतात, तेही
अल्पकाळासाठी.येथ एक रावणाचा पुतळाच दरवर्षी जाळत राहतात. बाबा म्हणतात,तुम्ही
सुवर्णयुगी बुद्धी पासून लोहयुगी बुद्धी बनत आहात.तुम्ही खूप सुखी होते,बाबा सुखधाम
ची स्थापना करण्यासाठी येतात.परत जेव्हा भक्ती मार्ग सुरू होतो,तेव्हा तुम्ही दुःखी
बनतात. परत सुखदाताची आठवण करतात. ते पण नाम मात्र, कारण त्यांना जाणत
नाहीत.गीतेमध्ये नाव बदलले आहे.प्रथम तुम्ही हे समजून सांगा की, उच्च ते उच्च भगवान
एकच आहेत,आठवण पण त्यांची एकाची करायला पाहिजे.एकाची आठवण करणे यालाच अव्यभिचारी
ज्ञान,अव्यभिचारी आठवण म्हटले जाते.तुम्ही आता ब्राह्मण बनले आहात,तर भक्ती करत
नाहीत. तुम्हाला ज्ञान आहे.बाबा शिकवतात ज्याद्वारे आम्ही देवता बनतो.दैवी गुण धारण
करायचे आहेत,म्हणून बाबा म्हणतात प्रथम आपली दिनचर्या लिहा,तर माहिती पडेल की,आमच्या
मध्ये कोणता आसुरी गुण तर नाही.देह अभिमान प्रथम अवगुण आहे,परत काम विकार दुश्मन आहे.
कामविकारला जिंकल्यामुळेच तुम्ही जगजीत बनाल.तुमचा उद्देशच हाच आहे.या
लक्ष्मीनारायणाच्या राज्यांमध्ये काही अनेक धर्म नव्हते. सतयुगामध्ये देवतांचे
राज्य होते. मनुष्य तर कलियुगामध्ये असतात. जरी ते पण मनुष्य आहेत परंतु दैवी
गुणधारी मनुष्य आहेत.या वेळेत सर्व मनुष्य आसुरी गुणधारी आहेत. सतयुगामध्ये मध्ये
काम विकार महाशत्रू असत नाही.बाबा म्हणतात काम महाशत्रूला जिंकल्यामुळेच तुम्ही
जगतजीत बनाल.तेथे रावण असत नाही.हे पण मनुष्य समजू शकत नाहीत.स्वर्णिम युगातून उतरत
उतरत तमोप्रधान बुध्दी बनले आहेत.आता परत सतोप्रधान बनायचे आहे,त्यासाठी एकच औषध
मिळते,बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा,तर जन्मजन्मांतरचे पाप
नष्ट होतील.तुम्ही पापांना भस्म करण्यासाठी आले आहात,तर आत्ता कोणतेही पाप करायचे
नाहीत,नाहीतर शंभर पटीने मिळेल.विकारांमध्ये गेले तर शंभर पटीने दंड मिळेल,परत
प्रगती करण्यासाठी खूप कठीण वाटेल. प्रथम क्रमांकाचा दुश्मन आहे, काम विकार.पाचव्या
मजल्यावरुन पडल्यानंतर एकदम हात पाय मोडला,मरू पण शकतात. वरून पडल्यानंतर एकदम
हाडेच मोडतात.बाबांशी प्रतिज्ञा करुन तुम्ही तोंड काळे केले,म्हणजे आसुरी दुनिया
मध्ये चालले गेले. येथून मेले म्हणजे सोडून गेले,परत त्यांना ब्राह्मण पण म्हणणार
नाही,शूद्र म्हनणार.
बाबा खूप सहज समजवतात, प्रथम तर हा नशा पाहिजे.जर समजाल कृष्ण भगवानुवाच,तर ते पण
जरूर शिकवून जरूर आपल्यासारखे बनवतील ना परंतु कृष्ण तर भगवान होऊ शकत नाहीत.ते तर
पुनर्जन्म मध्ये येतात. बाबा म्हणतात मीच पुनर्जन्म रहीत आहे.राधाकृष्ण,
लक्ष्मीनारायण किंवा विष्णूची एकच गोष्ट आहे. विष्णूचे दोन रूप लक्ष्मी नारायण आणि
लक्ष्मीनारायण चे लहानपण राधाकृष्ण आहेत.ब्रह्मांचे रहस्य पण समजवले
आहे,ब्रह्मा-सरस्वतीच लक्ष्मी नारायण बनतात.आता परिवर्तन होत आहे,यांचे अंतकाळातील
नाव ब्रह्मा ठेवले आहे.बाकी येथे ब्रह्मा तर पहा, एकदम लोहयुगामध्ये उभे आहेत, तेच
परत तपस्या करून कृष्ण किंवा नारायण बनतात.विष्णू म्हटल्यानंतर त्यामध्ये दोघे
असतात. ब्रह्माची मुलगी सरस्वती. ह्या गोष्टी कोणी समजू शकत नाहीत.चतर्भुजा
ब्रह्माला दाखवतात कारण तो प्रवृत्ती मार्ग आहे ना. निवृत्तीमार्ग असणारे हे ज्ञान
देऊ शकत नाहीत. अनेकांना परदेशामधुन घेऊन येतात,की चला आम्ही प्राचीन राजयोग
शिकवतो.आता शिकवू शकत नाहीत.आता ईश्वर आले आहेत,तुम्ही त्यांची मुलं,ईश्वर संप्रदाय
बनले आहात. ईश्वर तुम्हाला शिकवण्यासाठी आले आहेत.तुम्ही राजयोग शिकत आहात.ते तर
निराकार आहेत.ब्रह्मा द्वारे तुम्हाला आपले बनवले आहे. बाबा-बाबा तुम्ही त्यांनाच
म्हणतात. ब्रह्मा तर मध्येच दुभाषी आहेत. भाग्यशाली रथ आहे,यांच्याद्वारे बाबा
तुम्हाला शिकवत आहेत.तुम्हीपण पतिता पासून पावन बनतात.बाबा मनुष्यापासून देवता
बनवण्यासाठी शिकवत आहेत.आता तर रावण राज्य आहे, आसुरी संप्रदाय आहेत ना.आता तुम्ही
ईश्वरी संप्रदाय बनले आहात, परत दैवी संप्रदाय बनाल.आता तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगा
मध्ये आहात.पावन बनतात, संन्यासी लोक तर घरदार सोडून जातात. बाबा म्हणतात जरी
स्त्री-पुरुष घरांमध्ये एकत्र राहतात,तरी असे समजू नका की,स्त्री नागिन आहे, म्हणून
आम्ही वेगळे राहू, तर मुक्त बनू शकतो.तुम्हाला गृहस्थाचा त्याग करायचा नाही.ते
हद्दचा संन्यास करतात, जे घरदार सोडून जातात. तुम्ही येथे बसले आहात परंतु तुम्हाला
या विकारी दुनियेपासून वैराग्य आहे.या सर्व गोष्टी तुम्ही चांगल्या रीतीने धारण
करायचे आहेत, नोंद करायचे आहेत आणि पथ्य पण ठेवायचे आहे.दैवी गुणांची धारणा करायची
आहे.श्रीकृष्णाचे गुण गायन करतात ना. हे तुमचे मुख्य लक्ष आहे.बाबा बनत नाहीत,
तुम्हाला बनवतात.परत अर्धा कल्पाच्या नंतर तुम्ही खाली उतरतात,तर मग तमोप्रधान
बनतात.मी बनत नाही,हे बनतात.८४ जन्म पण यांनी घेतले आहेत.यांना पण आत्ताच सतोप्रधान
बनायचे आहे,हे पुरुषार्थी आहेत.नवीन दुनियेला सतोप्रधान म्हणाल. प्रत्येक गोष्ट
प्रथम सतोप्रधान परत सतो-रजो-तमोमध्ये येते.लहान मुलांना महात्मा पण म्हटले
जाते,कारण त्यांच्यामध्ये विकार नसतात म्हणून त्यांना फूल म्हटले
जाते.संन्याशापेक्षा लहान मुलांना उत्तम म्हणले जाते,कारण त्यांनी आपले जीवन पूर्ण
केले आहे, त्यांना पाच विकाराचा अनुभव आहे.मुलांना तर माहितीही पडत नाही,म्हणून
मुलांना पाहूनच खुशी होते,ते चैतन्य फुलं आहेत. आपला तर प्रवृत्ती मार्ग आहे ना. आता
तुम्ही मुलांना या जुन्या दुनिया पासून, नवीन दुनिया मध्ये जायचे आहे.अमरलोक मध्ये
जाण्यासाठी तुम्ही सर्व पुरुषार्थ करत आहात. मृत्युलोक मधून परिवर्तन होत आहात.देवता
बनायचे आहे,तर त्यासाठी कष्ट जरूर घ्यायचे आहेत. प्रजापिता ब्रह्माची मुलं भाऊ बहीण
होतात.भाऊ बहिण तर होते ना. प्रजापिता ब्रह्माचे संतान आपसा मध्ये कोण आहात?
प्रजापिता ब्रह्माचे गायन केले जाते.जोपर्यंत प्रजापिताची मुलं बनले नाहीत,तर
सृष्टीची रचना कशी होईल? प्रजापिता ब्रह्माची सर्व आत्मिक मुंल आहेत.ते ब्राह्मण
शारीरिक यात्रा करणारे असतात, तुम्ही तर आत्मिक यात्रा करणारे आहात.ते पतित तुम्ही
पावन आहात. ते काही प्रजापिता चे संतान नाहीत.या गोष्टी तुम्हीच समजवतात.भाऊ बहीण
जेव्हा समजाल तेव्हा विकारांमध्ये जाणार नाहीत.बाबा पण म्हणतात, खबरदार राहा,माझा
मुलगा बनवून कोणतेही विकारी काम करायचे नाही, नाहीतर पत्थरबुद्धी बनाल. इंद्रसभेची
एक गोष्ट आहे ना.शुद्राला ला घेऊन आले तर इंद्र सभेमध्ये त्याचा दुर्गंध यायला लागला.
तर इंद्रानी विचारले की, पतितला येथे का घेऊन आले?परत त्यांना श्राप दिला.वास्तव
मध्ये या सभेमध्ये कोणीही पती येऊ शकत नाही. जरी बाबांना माहिती पडले किंवा नाही
पडले,हे तर आपलेच नुकसान करतात आणि शंभर पटीने दंड मिळतो.पतितांना परवानगी नाही.
त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली ठिक आहे.जेव्हा पावन बनण्याची खात्री देतील,दैवी गुण
धारण करतील,तर त्यांना परवानगी देऊ शकतात. दैवी गुण धारण करण्यामध्ये वेळ
लागतो.पावन बनण्याची एकच प्रतिज्ञा आहे.
हे पण समजवले आहे, देवतांची आणि परमात्माची महिमा वेगवेगळी आहे.पतितपावन
मार्गदर्शक,मुक्तीदाता बाबाच आहेत. सर्व दुःखापासून मुक्त करून आपल्याला शांतीधाम
मध्ये घेऊन जातात.सर्व दु:खापासून मुक्त करुन शांतीधाम घेऊन जातात. शांतीधाम,सुखधाम,
आणि दु::खधाम हे पण चक्र आहे.आता दुखधामला विसरायचे आहे. शांतीधाम मधुन सुखधामला
तेच येतील,जे क्रमानुसार पास होतील,तेच येतील.दुसऱ्या धर्माचे असेच होते.मुलांना
रोज समजवले जाते, शाळेमध्ये रोज शिकणार नाही,मुरली ऐकणार नाही,तर अनुपस्थित
होतील.शिक्षणाची लिफ्ट पण जरूर पाहिजे.ईश्वरीय विद्यापीठांमध्ये अनुपस्थित थोडेच
राहिले पाहिजे? हे शिक्षण खूप उच्च आहे,ज्याद्वारे तुम्ही सुखधामच चे मालक बनतात.
स्वर्गांमध्ये तर धन धान्यासाठी काही पैसे लागत नाहीत.आता तर खूप महाग झाले आहे.
शंभर वर्षांमध्ये खूप महागाई वाढली आहे. स्वर्गामध्ये तर कोणत्या अप्राप्त वस्तू
नसतात,ते सुखधामच आहे. तुम्ही आता तेथे जाण्यासाठी तयारी करत आहात.तुम्ही गरीब
पासून राजकुमार बनतात.सावकार लोक स्वत:ला गरिब थोडेच समजतात.अच्छा.
गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति बापपदाची प्रेमपूर्वक आठवण आणि
सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
(१) बाबांशी
जी संपूर्ण पावन बनण्याची प्रतिज्ञा केली आहे,ती मोडायची नाही.खूप पथ्य ठेवायचे
आहेत. आपली दिनचर्या तपासायची आहे की,आमच्या मध्ये कोणते अवगुण तर नाहीत?
(२)ईश्वरीय विद्यापीठांमध्ये कधी अनुपस्थित करायचे नाही.सुखधामचे मालक बनण्यासाठी
मुरली,जे उच्च शिक्षण आहे,ते एक दिवस पण चुकवायचे नाही.
वरदान:-
मनसा वाचा आणि
कर्मणाच्या पवित्रतेमध्ये संपूर्ण गुण घेणारे क्रमांक एकचे आज्ञाधारक भव.
मनसा पवित्रता म्हणजे
संकल्पा मध्ये पण अपवित्रतेचे संस्कार विलीन व्हायला नको.नेहमी आत्मिक स्वरूप
म्हणजेच भावा- भावाची श्रेष्ठ स्मृती रहावी.आपल्या बोलमध्ये नेहमी सत्यता आणि मधुरता
हवी, कर्मणामध्ये नेहमी नम्रता, संतुष्टता आणि हर्षितमुखता हवी.याच आधारावरती
क्रमांक मिळतात आणि असे संपूर्ण पवित्र आज्ञाधारक मुलांचेच बाबा पण गुणगान करतात.ते
आपल्या प्रत्येक कर्माद्वारे बाबांच्या कर्तव्याला सिद्ध करणारे जवळचे रत्न आहेत.
बोधवाक्य:-
संबंध संपर्क
आणि स्थितीमध्ये लाईट बना, दिनचर्येत नाही.